मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही छ. संभाजीनगर : प्रतिनिधी मराठवाड्याची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी उद्योग आणि त्यातून रोजगार निर्मिती, कृषि, पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात अथकपणे काम करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमात दिली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभ येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या […] The post मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या ऐतिहासिक संशोधन क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता भारत इतिहास संशोधक मंडळात ठेवण्यात येईल, त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. गेली 50 वर्षे गजानन मेहेंदळे यांनी आपले जीवन इतिहासाच्या संशोधनाला वाहिले होते. ते शिवचरित्र आणि युद्ध इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जात होते. त्यांनी शिवचरित्रावर मराठी आणि इंग्रजी भाषेत अनेक जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिले. फारसी, मोडी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन अशा अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या निधनावेळी ते 'इस्लामची ओळख' आणि 'औरंगजेब' या विषयांवर संशोधन आणि लिखाण करत होते. ज्येष्ठ मराठी इतिहास संशोधक व अभ्यासक गजानन भास्कर मेहेंदळे यांचा जन्म १९ डिसेंबर १९४७ रोजी झाला. ते विशेषतः शिवचरित्र आणि मुघलकालीन दस्तऐवजांवरील संशोधनासाठी ओळखले जातात. पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळाशी संबंधित असलेले मेहेंदळे, मराठीसह फारसी/उर्दू व इतर भाषांतील दस्तऐवजांचा सखोल अभ्यास करत होते. त्यांनी शास्त्रीय स्रोत, नकाशे आणि संदर्भांवर आधारित इतिहासाची मांडणी केली आहे. गजानन भास्कर मेहेंदळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आणि शिवचरित्रावर सखोल ग्रंथ आणि शोधनिबंध लिहिले. त्यांचे ग्रंथ अनेक इतिहास अभ्यासक आणि अभ्यासक्रमांमध्ये संदर्भ म्हणून वापरले जातात. विशेषतः मुघलकालीन फारसी कागदपत्रांचे वाचन आणि त्यातून ऐतिहासिक निष्कर्ष काढण्यात त्यांचा हातखंडा होता. ते फारसी दस्तऐवजांच्या संशोधनासाठी एक महत्त्वाचे नाव मानले जात होते. गजानन मेहेंदळेंची प्रमुख पुस्तके
अर्ध्याहून जास्त मतदारांना कागदपत्रे मागणार नाही
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने बुधवारी सांगितले की, बहुतेक राज्यांमधील अर्ध्याहून अधिक मतदारांना विशेष सघन पुनरावृत्ती दरम्यान कोणतेही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही कारण त्यांची नावे मागील एसआयआरच्या मतदार यादीत समाविष्ट आहेत. आयोगाच्या अधिका-यांनी सांगितले की, शेवटचा एसआयआर प्रत्येक राज्यात वेगवेगळया वर्षांत करण्यात आला होता. बहुतेक ठिकाणी ही प्रक्रिया २००२ ते २००४ दरम्यान झाली. […] The post अर्ध्याहून जास्त मतदारांना कागदपत्रे मागणार नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
त्रिभाषा धोरणाच्या सक्तीला झालेल्या तीव्र विरोधामुळे राज्य सरकारने आपला निर्णय मागे घेतला. त्यानंतर, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत असलेल्या त्रिभाषा धोरणावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी समितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत समितीच्या कामकाजासंदर्भात चर्चा करण्यात आली असून, त्रिभाषा धोरणाबाबत एक वेबसाईट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेबसाईटवर एक लिंक दिली जाईल, जिथे पालकही आपली मते मांडू शकतील, अशी माहिती समितीचे अध्यक्ष, माजी खासदार आणि शिक्षणतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी दिली. राज्य सरकारच्या निर्णयावर झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. 2021 मध्ये माशेलकर समितीने पहिली ते बारावीपर्यंत मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा असाव्यात अशी शिफारस केली होती. मात्र, शासनाने हा निर्णय जाहीर केल्यानंतर त्यावर मोठी चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर, आता नवी समिती स्थापन करण्यात आली असून, माजी खासदार आणि शिक्षणतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांची तिच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज झालेल्या बैठकीत समितीच्या कामकाजाची दिशा ठरवण्यात आली. पालकांसह लोकांची मते जाणून घेण्यासाठी त्रिभाषा धोरणाबाबत एक वेबसाईट आणि लिंक तयार करण्यात आली असून, त्यावर थेट सूचना व मते नोंदवता येणार आहेत. याव्यतिरिक्त, शिक्षण संस्था, महाविद्यालयांचे प्राचार्य आणि मराठी भाषेशी संबंधित संस्थांसाठी एक प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. कोणत्या इयत्तेत त्रिभाषा असावी? आणि भाषा शिकवण्याची पद्धत कशी असावी? यांसारखे महत्त्वाचे प्रश्न या प्रश्नावलीत समाविष्ट आहेत. राज्यातील आठ ठिकाणी प्रत्यक्ष दौरे समितीने राज्यातील आठ ठिकाणी प्रत्यक्ष दौरे करून लोकांची मते जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यांमध्ये दिवसभर लोकांशी संवाद साधून त्यांच्या सूचना गोळा केल्या जातील. या दौऱ्यांदरम्यान समिती आपली कोणतीही भूमिका मांडणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या दौऱ्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे छत्रपती संभाजीनगर (8 ऑक्टोबर), नागपूर (10 ऑक्टोबर), कोल्हापूर (30 ऑक्टोबर), रत्नागिरी (31 ऑक्टोबर), नाशिक (11 नोव्हेंबर), पुणे (13 नोव्हेंबर), आणि सोलापूर (21 नोव्हेंबर). त्यानंतर मुंबईत अंतिम बैठक होणार असून, तिथे राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांचीही भेट घेतली जाणार आहे. समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी सांगितले की, या सर्व ठिकाणी आम्ही दिवसभर बसून लोकांची मते जाणून घेऊ. आमची भूमिका न मांडता फक्त लोकांचे म्हणणे समजून घेऊ. 5 सप्टेंबरपर्यंत आम्ही शिफारशींसह अहवाल सादर करू, त्यानंतर अंतिम निर्णय सरकार घेणार आहे. कोट्यवधी विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय असणार आहे.
लातूर शहरात जनसुरक्षा कायद्याला कडाडून विरोध
लातूर : प्रतिनिधी गेल्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने सर्व विरोधी पक्ष व संघटनांना नेस्तनाबूत करण्यासाठी जन सुरक्षा कायदा मंजूर केला आहे. हा कायदा अतिशय घातक स्वरूपाचा असून जन सामान्यांना संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणार आहे. या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दूपारी ४ यावेळेत मराठवाडा मुक्ती दिनी जन […] The post लातूर शहरात जनसुरक्षा कायद्याला कडाडून विरोध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आमदार अमित देशमुख यांच्याकडून आदरांजली
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी दि. १७ सप्टेंबर रोजी सकाळी लातूर येथीलभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे जाऊन हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा […] The post आमदार अमित देशमुख यांच्याकडून आदरांजली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी शेकडो महिलांना फसवून त्यांचे अश्लील व्हिडीओ शूट करण्यात आल्याचा आल्याचा आरोप आहे. या गंभीर प्रकरणाच्या सखोल तपासासाठी राज्य महिला आयोगाने विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिती दिली आहे की, खेवलकरांच्या रेव्ह पार्टी प्रकरणात 250–300 पेक्षा अधिक महिलांना आमिष दाखवून फसवण्यात आले. या पार्टीदरम्यान मोबाईल आणि लॅपटॉपमधून अत्यंत अश्लील व्हिडीओ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पीडित महिलांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या सर्व तक्रारींच्या आधारे पुणे पोलिस आयुक्तांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रकरणाचा तपास केवळ वरवर न होता, सखोल व्हावा यासाठी एसआयटी गठीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मते, या प्रकरणाचा संबंध मानवी तस्करीच्या रॅकेटशी असण्याची शक्यता आहे. रेव्ह पार्टीमध्ये विविध प्रलोभने दाखवून आणलेल्या महिलांचा गैरवापर झाला असावा अशी शंका त्यांनी व्यक्त केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि महिलांची फसवणूक व लैंगिक अत्याचार थांबावेत यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या. कोण आहेत प्रांजल खेवलकर? ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे दुसरे पती आहेत. पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्याशी विवाह केला. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंब मुक्ताईनगर येथे राहते. प्रांजल खेवलकर हे राजकारणापासून दूर असून, त्यांचा मुख्य व्यवसाय जमीन खरेदी-विक्रीचा आहे. ते रिअल इस्टेट आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या असून, एक ट्रॅव्हल कंपनीदेखील असल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा
लातूर : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे लातूर जिल्ह्यात ओल्या दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे लातूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने शेतक-यांना सरसकट मदत करण्याची मागणी शासनाकडे करणार असल्याचे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच […] The post जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठा कुणबीचे दस्तऐवज उपलब्ध करून घ्यावेत
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी कुणबी मराठा आरक्षण संदर्भात महत्त्वाचे दस्तावेज उपलब्ध करून घ्यावेत, अशी मागणी निवेदन शिरूर अनंतपाळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने दि. १६ सप्टेबर मंगळवार रोजी तहसीलदार शिरूर अनंतपाळ यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने लागू केलेल्या ९ सप्टेंबर २०२५ रोजीचा जी.आर. जो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन निर्णय […] The post मराठा कुणबीचे दस्तऐवज उपलब्ध करून घ्यावेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी आमदार धिरज देशमुख यांनी अतिवृष्टीने बाधित नुकसानीची केली पाहणी
लातूर : प्रतिनिधी यंदाच्या मे महिन्यापासून सततच्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील विविध भागात शेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सोयाबीन व अन्य पिके खराब झाली आहेत, घरात पाणी शिरल्याने अनेक ठिकाणी घरांचेदेखील नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी दि. १७ […] The post माजी आमदार धिरज देशमुख यांनी अतिवृष्टीने बाधित नुकसानीची केली पाहणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जळकोट तालुक्यात कमी उंचीच्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुका निर्मितीला सव्वीस वर्षे पूर्ण झाले आहेत परंतु या काळात मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे तालुक्यात सध्या कमी उंचीच्या पुलामुळे गंभीर प्रश्न निर्माण होऊ लागलेले आहेत. फुलाची उंची कमी असल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जळकोट तालुक्यामध्ये मुख्य रस्त्यावरून गावाला जोडणा-या रस्त्यावर असणा-या नदीवरील पूल हे अत्यंत कमी उंचीचे […] The post जळकोट तालुक्यात कमी उंचीच्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धाराशिव : प्रतिनिधी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आता चलो दिल्लीचा नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीत अधिवेशन घेणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट अंमलबजावणीनंतर हे अधिवेशन होणार असल्याचे जरांगे म्हणाले. लवकरच अधिवेशनाची तारीख जाहीर होणार आहे. धाराशिवमध्ये हैदराबाद गॅझेट संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी […] The post जरांगे पाटील दिल्लीत धडकणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. मराठवाड्यात पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक हिरावले गेले आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर येऊन अनेक जनावरे दगावली आहेत. शेतातील पिके वाहून गेली असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्याही (दिनांक 18 सप्टेंबर) अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे पावसाचा धोका अद्यापही कायम आहे. महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने 18 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या अंदाजानुसार, उद्या राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यावर दुहेरी संकट येण्याची शक्यता असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वीजांच्या कडकडटासह तसेच मेघगगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग 30-40 किमी इतका असण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, कोकणातील तीन जिल्हे सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरीमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर मुंबई आणि पालघरमध्ये मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून, सोलापूरमध्ये आधीच मोठं नुकसान झालं असलं, तरी पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांना हवामान विभागाने 'यलो अलर्ट' जारी केला आहे. विदर्भात हाय अलर्ट दरम्यान, भारतीय हवामान विभागाने विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांसाठी 'हाय अलर्ट' जारी करत, अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भासोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.
उत्पनाचा दाखला आता एकदाच, अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार
मुंबई : महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला असून शिष्यवृत्तीसाठी आता वारंवार उत्पन्न दाखला आणि कागदपत्रे द्यावी लागणार नाहीत. महाडीबीटी पोर्टलवर एकदाच अपलोड केलेली माहिती ग्रा धरण्यात येणार असून ऑटो सिस्टीमद्वारे शिष्यवृत्ती वेळेत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष(सीईटी सेल) आणि तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत(डीटीई) व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थी एकदाच उत्पन्नाचा दाखला […] The post उत्पनाचा दाखला आता एकदाच, अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणा-या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर
गाझियाबाद : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणा-या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. गाझियाबादच्या टेक्नो सिटीमध्ये झालेल्या चकमकीत दोघांनाही ठार करण्यात आले आहे. ही चकमक यूपी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि दिल्ली-हरियाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत घडली आहे. रवींद्र हा रोहतकचा रहिवासी होता आणि अरुण हा सोनीपतचा रहिवासी होता. दोघेही गोल्डी ब्रार […] The post अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणा-या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर मंगळवारी मध्यरात्री एका व्यावसायिकाने टॅक्सी थांबवून समुद्रात उडी मारली. अमित शांतीलाल चोप्रा (वय 47) असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. 'साप चावला' असा आरडाओरडा करून त्यांनी टॅक्सी थांबवली आणि समुद्रात उडी घेतली. व्यावसायिक कारणांमुळे असलेल्या तणावातून त्यांनी आत्महत्या केली असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. मात्र, त्यांना कोणतीही चिठ्ठी सापडली नाही. त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अमित चोप्रा मूळचे राजस्थानचे असून त्यांचे सर्व नातेवाईक तिथेच राहतात. मात्र, चोप्रा हे पत्नी आणि मुलांसोबत मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे राहत होते आणि मुंबईतच त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. मंगळवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांनी एक टॅक्सी पकडली. टॅक्सी वांद्रेमार्गे सी-लिंकवर आल्यावर त्यांनी अचानक 'आपल्याला साप चावला' असा आरडाओरडा सुरू केला. त्यामुळे घाबरलेल्या टॅक्सीचालकाने गाडी बाजूला थांबवली. याच संधीचा फायदा घेत चोप्रा यांनी टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि थेट सी-लिंकवरून समुद्रात उडी मारली. टॅक्सीचालकाने तात्काळ सी-लिंक कर्मचारी आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून चोप्रा यांचा मृतदेह समुद्रातून बाहेर काढला. यापूर्वीही वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवून आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या, त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून येथे वाहने थांबवता येणार नाहीत अशी व्यवस्था केली होती. असे असतानाही, 'साप चावला' असा आरडाओरडा करत या व्यावसायिकाने टॅक्सी थांबवली आणि उडी मारून आपले जीवन संपवले.
आक्रोश मोर्चाला वेगळे वळण:बच्चू कडूंसह शेतकरी आक्रमक, गेट उघडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश
शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेश पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी शेतीच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, जिल्हाधिकारी निवेदन घेण्यासाठी आंदोलनस्थळी आले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या बच्चू कडूंसह शेतकऱ्यांनी कार्यालयाचे प्रवेशद्वार बळजबरीने उघडून आत प्रवेश केला, ज्यामुळे शेतकरी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने नाशिकमध्ये काढलेल्या आक्रोश मोर्चाच्या धर्तीवर, जळगाव येथे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर पक्षविरहित शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. काळ्या फिती व काळे कपडे घालून सरकारचा निषेध करण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना ठाकरे गटाचे उन्मेश पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी केले. मोर्चा दरम्यान जोरदार घोषणाबाजी करत केळी, कापूस, कांदा, मका, ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांसमोर बोलताना माजी खासदार उन्मेश पाटील आणि बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर त्यांनी सडकून टीका करत महायुतीला धारेवर धरले. तसेच, बच्चू कडू यांनी यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यावरही थेट निशाणा साधला. केळीचे भाव आता जळगाव जिल्ह्यातच ठरवावे या मोर्चादरम्यान, माजी खासदार उन्मेश पाटील यांनी विविध मागण्यांचा उहापोह केला. त्यात, बऱ्हाणपूरमधून काढले जाणारे केळीचे भाव आता जळगाव जिल्ह्यातच ठरवावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, कापूस व ज्वारी खरेदीतील समस्यांवर तातडीने तोडगा काढावा, केळी पिकविम्याच्या अडचणी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, विदर्भातील धान पिकाप्रमाणे कापूस व केळीला बोनस जाहीर करावा, कापूस भावांतर योजना लागू करावी आणि दूध उत्पादकांना अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. या मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी यावे, असा आग्रहही त्यांनी धरला. जिल्हाधिकारी कार्यालयात धडक बराच वेळ वाट पाहूनही जिल्हाधिकारी किंवा इतर कोणताही अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्याने माजी खासदार उन्मेश पाटील आणि बच्चू कडू हे शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. मात्र, पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वार आधीच बंद केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांच्या विरोधाला न जुमानता बळजबरीने गेट उघडून कार्यालयाच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर प्रशासकीय इमारतीच्या लोखंडी गेटवर उभ्या असलेल्या पोलिसांना बाजूला सारून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मारली. शेतकऱ्यांचा रोष पाहून अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले, त्यानंतरच परिस्थिती निवळली. सायंकाळी उशिरापर्यंत माजी खासदार पाटील आणि बच्चू कडू हे शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात थांबले होते
मराठा आरक्षणाचा काढलेला जीआर हा ओबीसींचे आरक्षण संपवणारा आहे. यापुढे आम्ही दांडके नाही तर कोयते काढू, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. हिंगोली येथील कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर ओबीसींचा एल्गार मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी लक्ष्मण हाके यांनी हे विधान केले आहे. या विधानामुळे वाद वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, बंजारा समाजानेही आता वेगळे आरक्षण न मागता ओबीसींची एकजूट राखावी, कुणीही ओबीसींमध्ये फूट पडेल असे कृत्य करू नये. मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे, ते जीआर मागे घेतील. ओबीसी आरक्षणासाठी हा विद्रोह आहे. आमच्या हक्काचे ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट घातला आहे. आता हातामध्ये दांडके नाही तर कोयते घेऊ, असा इशारा हाके यांनी यावेळी बोलताना दिला. एकत्र येऊन आपले आरक्षण वाचवले पाहिजे हैदराबाद गॅझेटचा जीआर लागू झाल्यानंतर बंजारा समाजाने अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. यावर बोलताना लक्ष्मण हाके यांनी बंजारा समाजाला विनंती केली आहे की, आपल्या ताटातले आरक्षण वाचवणे महत्त्वाचे आहे. 'डोंगराच्या पल्याड हवेली आहे' असे सांगितले जात आहे. ती हवेली कधी मिळेल हे माहीत नाही, पण आधी आपले झोपडे वाचवू. आता कोणत्याही समाजाने आपआपसात फूट पडेल असे वागू नये. एसटी आरक्षण कधी मिळेल हे सांगता येत नाही, पण तोपर्यंत आपल्या हक्काचे आरक्षण संपून जाईल. सध्या एकट्याने काही मागण्याची ही वेळ नाही. सर्वांनी एकत्र येऊन आपले आरक्षण वाचवले पाहिजे. बंजारा समाजही आक्रमक हैदराबाद गॅझेटनुसार, अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात हजारो बंजारा पुरुष आणि महिला पारंपरिक वेशभूषेत मोर्चात सहभागी झाले होते. 'जय सेवालाल' आणि 'एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सभा घेत, आदिवासी आरक्षणाची मागणी मान्य न झाल्यास मुंबईत मोर्चा नेण्याचा इशारा त्यांनी दिला. याच मागणीसाठी अकोला येथेही बंजारा समाजाने आंदोलन केले. बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनातही मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेतील बंजारा समाज उपस्थित होता.
सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे एका विवाहित तरुणाने, बीड जिल्ह्यातील गेवराईचा माजी उपसरपंच असलेल्या गोविंद बर्गेने, एका नर्तिकेच्या नादात आत्महत्या केली. या घटनेमुळे सोलापूर आणि बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. गोविंदच्या मृत्यूने त्याचे कुटुंब पोरके झाले, ज्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. या घटनेनंतर नर्तिका पूजा गायकवाड हिला नेटकरी आणि गोविंदच्या गावकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. गोविंदच्या मेहुण्याने दिलेल्या तक्रारीनंतर पूजा गायकवाडला अटकही करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे राज्यातील गावांमध्ये चालणाऱ्या 'कला केंद्रांचा' मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कला केंद्रांमधून चालणारा वेश्याव्यवसाय आणि इतर अवैध धंदे उघडकीस आल्याने, 'तमाशा' या पारंपारिक लोककलेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी 'आम्हाला बदनाम करू नका' असे आवाहन करत, तमाशा आणि कला केंद्रांमधील फरक स्पष्ट केला आहे. मंगला बनसोडे म्हणाल्या, सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्रात चार भिंतीमध्ये कार्यक्रम असतो तर लोकनाट्य तमाशामध्ये शंभर कलावंत असतात आणि ते त्यांची कला हजारो रसिकांसमोर सादर करतात. वयाच्या 7 व्या वर्षापासून ते आजपर्यंत हजारो रसिकांसमोर मी कला सादर केली. त्यावेळी रसिकांनी देखील आम्हाला न्याय दिला, आमच्यावर प्रेम केले. त्यामुळेच मला आणि माझ्या आईला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, असे परखड मत बनसोडे यांनी मांडले आहे. तमाशा आणि कला केंद्र यामध्ये जमीन-आसमानाचा फरक पुढे बोलताना मंगला बनसोडे म्हणाल्या, कला केंद्र आणि तमाशा हे वेगळे आहेत, कला केंद्रामुळे आमचा तमाशा बदनामी करू नये. तमाशा आणि कला केंद्र यामध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. तमाशामध्ये लोककला, समाज प्रबोधन हे कलाकार हजारो प्रेक्षकांसमोर दाखवत असतात. त्यामुळेच, शासनासह रसिकांनी देखील लक्षात घेतलं पाहिजे कला केंद्र ही वेगळी बाजू आहे आणि लोकनाट्य कला म्हणजेच तमाशा ही वेगळी बाजू आहे, असे सांगत मंगल बनसोडे यांनी दोन्हीतील फरक स्पष्ट केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे एका युवकाने कला केंद्रातील नर्तिकेच्या नादात गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर नर्तिका पूजा गायकवाड आणि संबंधित कला केंद्रांवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर, तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी तमाशा आणि कला केंद्रांमधील फरक स्पष्ट करत, तमाशा कलेला बदनाम न करण्याचे आवाहन केले आहे.
राज्यातील सर्व ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान विकसित करणार
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये वैशिष्टयपूर्ण व नवीन नगरपंचायत, नगरपालिका योजने अंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करतानाच या उद्यानांना ‘नमो उद्यान’ नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. यानिर्णयामुळे राज्यातील एकूण ३९४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान वर्षभरात विकसित […] The post राज्यातील सर्व ३९४ नगरपरिषदा, नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान विकसित करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रात ओला दुुष्काळ जाहीर करा
मुंबई : प्रतिनिधी राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यात नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाल्याने नुकसानीचे पंचनामे करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे. मराठवाडा […] The post महाराष्ट्रात ओला दुुष्काळ जाहीर करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वसमत येथे उभारण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट देण्याचे नियोजन असतानाही पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी या केंद्राकडे पाठ फिरवली. त्यामुळे तालुक्यातील राजकिय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाली असून राष्ट्रवादी अन शिंदेसेनेच्या नेत्यामधील वाद कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर झेंडामंत्री म्हणून टिका होत असल्यामुळे त्यांनी हिंगोली जिल्ह्यात दोन दिवस मुक्कामी राहण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार त्यांच्या वतीने बुधवारी ता. १७ व गुरुवारी ता. १८ या दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी ता. १७ अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी करणे व सायंकाळी वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संसोधन व प्रशिक्षण केंद्राला भेट देण्याचे नियोजन होते. त्यानुसार पालकमंत्री झिरवाळ यांनी आज सकाळी ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण केले. त्यानंतर त्यांनी हिंगोली, सेनगाव तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर वसमत तालुक्यातील हट्टा व गुंडा या भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह अधिकारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी हट्टा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तर गुंडा येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दोन शेतकरी महिलांच्या कुटुंबियांना शासनाच्या निर्णयानुसार आर्थिक मदत लवकरच दिली जाईल असे आश्वासन दिले. दरम्यान, त्यानंतर पालकमंत्री झिरवाळ यांचा ताफा वसमतच्या शासकिय विश्रामगृहात थांबला. त्यानंतर पालकमंत्री झिरवाळ हे हळद संशोधन केंद्रास भेट देणार असल्याने केंद्राचे अध्यक्ष तथा शिंदेसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्यासह शिंदेसेनेचे पदाधिकारी स्वागतासाठी उपस्थित होते. मात्र पालकमंत्र्यांचा ताफा केंद्राच्या ठिकाणी थांबलाच नाही. विशेष म्हणजे सर्व ताफा केंद्राच्या समोरून गेल्यानंतरही पालकमंत्र्यांनी केंद्राकडे पाठ फिरवली. या प्रकारामुळे वसमतच्या राजकिय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार गट) व शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये असलेल्या अंतर्गत वादातून पालकमंत्र्यांनी या ठिकाणी भेट देण्याचे टाळले असल्याचे बोलले जात आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीवर चिंता व्यक्त करत सरकारला इशारा दिला आहे. पुण्यात संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आंबेडकर म्हणाले की, देशात सध्या पंधरा लाख तरुण बेरोजगार आहेत. अमेरिकेने टेरिफ ५० टक्के केल्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही बेरोजगारी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. नेपाळ आणि बांगलादेशमधील परिस्थितीकडे सरकार गांभीर्याने पाहत नसल्यास भारतालाही अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. डेक्कन येथील गुडलक चौकात कलाकार कट्ट्यावर संशोधक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी मागील तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. बुधवारी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनीही उपस्थित राहून आंदोलकांना पाठिंबा दिला. आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, नेपाळ आणि बांगलादेशमधील घटनांनंतर विद्यार्थी शक्तीची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत मंत्रालयावर धडकणे हाच एक पर्याय आहे, अन्यथा कुणीही दखल घेणार नाही. शिष्यवृत्ती दर महिन्याला मिळणे आवश्यक असताना, आता वर्षानुवर्षे प्रक्रियाच होत नाही. बजेट नाही असे म्हणणे चुकीचे आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांना भेटण्याची ग्वाही दिली. मोहन जोशी यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत शरद पवार यांनीही विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती देऊन संशोधनाला चालना द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांनी यावेळी निर्धार व्यक्त केला की, जोपर्यंत पोर्टलवर जाहिरात पडत नाही आणि सरसकट शिष्यवृत्ती लागू होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.
शाळकरी मुलाचे अपहरण करून खून:पोलिसांच्या शोधमोहिमेची माहिती मिळताच मृतदेह झाडीत फेकला, तिघे अटकेत
सोमवार १५ सप्टेंबर रोजी अपहरण केलेल्या शाळकरी मुलाचा मृतदेह झाडीत आढळल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. जित युगराज सोनेकर (वय ११) असे अपहरण करून खून केलेल्या मुलाचे नाव आहे. तीनही आरोपींनी १५ सप्टेंबरला भानेगाव बसस्टॉप येथून अरूण भारती याच्या एम. एच. ४०, ए-७९९७ क्रमाकांच्या कारमध्ये जितचे अपहरण करून सिल्लेवाडा परिसरात नेले. तिथे गळा दाबून हत्या केली. आरोपींंनी जितचा मृतदेह चनकापूर कॉलनीमध्ये एका क्वाॅर्टरमध्ये लपवून ठेवला. पोलिसांची तपास पथके वारंवार जितचा शाेध घेत असल्याचे माहिती झाल्याने १७ सप्टेंबरच्या मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास मृतदेह चनकापूर कॉलनी शिवारात झाडी झुडुपात फेकुन दिला. अपहृत मुलाची आई नीलीमा युगराज सोनेकर (वय ३५, चनकापुर कॉलनी, ता. सावनेर) यांनी त्यांचा मुलगा जित युगराज सोनेकर (वय ११) हा शाळेतून घरी परत आला नाही अशी तोंडी तक्रार खापरखेडा पोलिस ठाण्यात केली होती. जित युगराज सोनेकर (वय ११) हा शंकरराव चव्हान इंग्लीश मीडीयम शाळा, प्रकाशनगर, खापरखेडा येथे सहाव्या वर्गात शिकतो. १५ रोजी जित शाळा सुटल्यावर सायंकाळी नेहमी प्रमाणे घरी आला नाही. त्याची आई नीलीमा सोनेकर हीने शाळेत जावुन चौकशी केली तसेच आजुबाजूच्या परीसरात मुलाचा शाेध घेतला असता तो आढळला नाही. अपहरण झालेल्या युगचा सीसीटीव्ही, ओळखीचे नातेवाईक, मित्र, शाळेतील शिक्षक यांचा माध्यमातून शाेध घेणे सुरू हाेते. १७ रोजी चनकापूर कॉलनी शिवारातील झुडुपात एका मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती खापरखेडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठुन चौकशी केली असता तो जित सोनेकर असल्याची ओळख पटली. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी राहुल गौरीलाल पाल (वय २५), अरूण बैचु भारती (वय २५) व यश गिरीश वर्मा (वय २१) असल्याचे निष्पन्न झाले. आराेपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
नक्षल्यांनी घातपातासाठी लपवून ठेवलेली जुनी स्फोटके पोलिस दलाने हस्तगत केली. गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांकडून घातपाती कारवाया करुन सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्यांचा वापर केला जातो. अशी स्फोटके वेगवेगळ्या ठिकाणी जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरुन ठेवली जातात. अशा पूरुन ठेवलेल्या स्फोटकांचा वापर नक्षल्यांकडून विध्वंसक कारवायांसाठी केला जातो. गडचिरोली पोलीस दलाने नक्षल्यांनी लपवून ठेवलेली स्फोटके अभियानादरम्यान जप्त केलेले आहे. कोरची पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लेकुरबोडी जंगल परिसरात नक्षलवाद्यांकडून पोलीस पथकास घातपात करण्याच्या उद्देशाने मागील वर्षापासून स्फोटक पदार्थ व साहित्य लपवून ठेवण्यात आलेले आहे, अशा मिळालेल्या विश्वसनीय गोपनीय माहितीवरून १५ रोजी लेकुरबोडी जंगल परिसरात विशेष अभियान पथकाची तीन पथके व बिडीडीएसचे एक पथक रवाना करण्यात आले. तपासा दरम्यान १६ रोजी जंगल परिसरात पायी शोध अभियान राबवत असताना पोलीस पथकास लेकुरबोडी जंगल परिसरात एक संशयीत ठिकाण मिळून आले. यावरुन बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून तपासणी केली असता, लपवून ठेवलेला एक ०५ लिटरचा स्टिलचा डब्बा, १.२५ किलो पांढरी स्फोटक पावडर, २.५० किलो धार लावलेले लोखंडी सिंलटर, ०४ नग क्लेमोर व ०८ नग इलेक्ट्रीक वायर बंडल मिळून आले. सुरक्षिततेची योग्य काळजी घेत पोलीस पथकाकडून घटनास्थळावर मिळून आलेले सर्व स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात १७ सप्टेंबर २०२५ रोजी 'परमवीर चक्र गॅलरी'चे लोकार्पण करण्यात आले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राणी लक्ष्मीबाई पार्कमध्ये उभारण्यात आलेल्या या गॅलरीचे उद्घाटन झाले. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर (सीएमआयए) ने संजकाज ग्रुप आणि मातृभूमी ग्रुपच्या सहकार्याने ही गॅलरी साकारली आहे. ही गॅलरी देशाच्या शौर्य, पराक्रम आणि बलिदानाचे प्रेरणादायी दर्शन घडवेल, असे मत जी. श्रीकांत यांनी यावेळी व्यक्त केले. शाळकरी विद्यार्थी आणि युवकांसाठी ही गॅलरी विशेष प्रेरणादायी ठरेल, तसेच समाजात देशभावना जागृत करेल, असेही ते म्हणाले. गॅलरीमध्ये देशाचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार 'परमवीर चक्र' प्राप्त २१ शूरवीरांच्या शौर्यकथा, युद्ध प्रसंगांचे तपशील, छायाचित्रे आणि संबंधित लष्करी रेजिमेंट्सची माहिती दृश्यात्मक स्वरूपात सादर करण्यात आली आहे. मातृभूमी संस्थेने हे प्रदर्शन साकारले आहे. संजकाज ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीएमआयएचे माजी अध्यक्ष गिरीधर संगनेरिया यांनी सांगितले की, लेह-कारगिल येथील शूरवीरांच्या स्मृती स्थळाला भेट दिल्यानंतर त्यांना ही गॅलरी उभारण्याची प्रेरणा मिळाली. ही गॅलरी देशाच्या शौर्याचा आणि बलिदानाचा अभिमान आहे, असेही ते म्हणाले. या लोकार्पण सोहळ्याला एमएससीडीसीएलचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने, सीएमआयएचे माजी अध्यक्ष राम भोगले, मुकुंद कुलकर्णी, नरेंद्र गुप्ता, कमांडर अनिल सावे, गिरीधर संगनेरिया, उमेश दाशरथी, कमलेश धुत, शिवप्रसाद जाजू, रवी माछर, अनिल माळी, सतीश लोणीकर, सीएमआयएचे अध्यक्ष उत्सव माछर, मानद सचिव मिहीर सौन्दलगेकर, ऋषिकेश गवळी, हर्षित मोदानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उदयन शालिनी संस्थेच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत आणि राज्यगीत सादर केले.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली आहे. या अटकेमुळे बांधकाम आणि उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अटकेपूर्वीच राजेंद्र लोढा यांनी लोढा ग्रुपच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. मुंबई पोलिसांनी लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना वरळी परिसरातून अटक केली असून, कोर्टाने त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राजेंद्र लोढा यांच्यावर लोढा ग्रुपची 85 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, राजेंद्र लोढा यांनी लोढा ग्रुपचे सध्याचे संचालक आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे पुत्र अभिषेक लोढा यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाने आणखी वेगळे वळण घेतले आहे. अभिषेक लोढा यांचे बरेवाईट करण्याची धमकी राजेंद्र लोढा यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अभिषेक लोढा यांच्याकडे एक हस्तकला पाठवून त्यांना धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या हस्तकाच्या माध्यमातून त्यांनी आपण 'सुसाईड बॉम्बर' असल्याचे सूचित करत, कारवाई झाल्यास अभिषेक लोढा यांचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. राजेंद्र लोढा यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत अनेक ठिकाणी जमीन अधिग्रहण केल्याचा आणि लोढा ग्रुपचे काही फ्लॅट्स परस्पर विकल्याचा आरोप आहे, ज्यामुळे त्यांनी मोठी मालमत्ता जमा केली. यामुळे लोढा ग्रुपने त्यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. लोढा डेव्हलपर्सने यापूर्वीच जाहीर केले होते की राजेंद्र लोढा यांनी 17 ऑगस्ट 2025 पासून कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आणि त्यांच्या वर्तनाशी संबंधित काही बाबी कंपनीच्या नैतिकता समितीच्या निदर्शनास आल्या होत्या. याच कारणामुळे गेल्या महिन्यात त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
मुलीच्या लग्नासाठी वडिलोपार्जित मालमत्ता विकणे योग्यच : सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली : प्रतिनिधी मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाचा अनेक वर्षांपर्यंत कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम होतो, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने एका वडिलांनी आपल्या मुलीच्या लग्नाचा खर्च भागवण्यासाठी वडिलोपार्जित मालमत्ता विकण्याचा निर्णय योग्य ठरवला आहे. हिंदू एकत्र कुटुंबाच्या कर्त्याला ‘कायदेशीर गरजे’साठी संयुक्त कुटुंबाची मालमत्ता विकण्याचा अधिकार आहे. यामध्ये मुलीच्या विवाहाचा खर्च समाविष्ट आहे, असेही […] The post मुलीच्या लग्नासाठी वडिलोपार्जित मालमत्ता विकणे योग्यच : सुप्रीम कोर्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डुकराच्या प्रत्यारोपित हृदयाने दिले जीवदान!
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेतील डॉक्टरांनी विज्ञानाच्या जगात एक कमाल करून दाखवली आहे. मेरीलँड शहरातील ५८ वर्षांच्या एका व्यक्तीला, जो मृत्यूच्या जवळ होता, त्याला डुकराचे हृदय प्रत्यारोपित (ट्रान्सप्लांट) करून नवीन जीवन दिले. हा रुग्ण मानवी हृदय प्रत्यारोपणासाठी शारिरीक दृष्ट्या अनुकूल नव्हता; पण डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. ज्या वैद्यकीय टीमने ही शस्त्रक्रिया केली, […] The post डुकराच्या प्रत्यारोपित हृदयाने दिले जीवदान! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारत-अमेरिका यांच्यात व्यापार करारावर सहमती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दोन्ही देशांमध्ये व्यापार करार झाल्यास हा कर पूर्णपणे हटण्याची किंवा कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. आज भारत आणि अमेरिका यांच्यातील अधिका-यांमध्ये या कराराबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. दोन्ही देशांनी हा करार लवकरात लवकर करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. तसेच आजच्या बैठकीत या कराराबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती […] The post भारत-अमेरिका यांच्यात व्यापार करारावर सहमती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘एआय’ अस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडल्यास जगाचा विनाश; चीनच्या दाव्यामुळे जगभरात खळबळ
बिजींग : वृत्तसंस्था जगभरातील सैन्यदल आपल्या कारवाया अधिक गतीने आणि अचूक व्हाव्यात यासाठी आपल्या शस्त्रांमध्ये आणि ऑपरेशन्समध्ये एआयचा वापर करत आहेत. याचे ताजे उदाहारण म्हणजे जूनमध्ये इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झाले, या युद्धामध्ये इस्रायलकडून इराणवर हल्ला करण्यासाठी ‘एआय’चा वापर करण्यात आला होता. मात्र या ‘एआय’बद्दल चीनने जो इशारा दिला आहे, त्यामुळे संपूर्ण जगाचा थरकाप […] The post ‘एआय’ अस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडल्यास जगाचा विनाश; चीनच्या दाव्यामुळे जगभरात खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्य सरकारने आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील मराठा उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले. पण आता मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या प्रमाणपत्रांवर शंका व्यक्त केली आहे. आज देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्र योग्य आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही जे जीआर काढले आहेत त्या जीआर प्रमाणे जे पात्र आहेत त्यांना दाखले मिळतील. यातील किती लोकांना कुणबी प्रमाणपत्राचे दाखले मिळाले याची आकडेवारी माझ्याकडे नाही. पण कुठूनही मिळत नाही अशी तक्रार आलेली नाही. त्यामुळे त्याची जे काही योग्य कागदपत्रांची पूर्तता आहे ती पूर्तता, त्यानंतर ज्या दोन समित्या तयार केल्या आहेत त्यांचा अहवाल याच्या आधारावर मिळेल. छगन भुजबळांच्या आक्षेपावर फडणवीसांचे स्पष्टीकरण मंत्री छगन भुजबळ यांनी कुणबी प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, भुजबळ साहेब यांनी जे म्हटले आहे त्या संदर्भात या पूर्वीच मी स्पष्ट केले आहे खाडाखोड चालणार नाही. ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांच्याच नातेवाईकांना दाखले मिळतील, आपला कायदा आहे. जर कोणाला एखाद्याला मिळालेल्या दाखल्यावर आक्षेप असेल तर तो आक्षेप घेऊ शकतो. त्यामुळे भुजबळ साहेबांच्या जर कुठे नजरेस आले असेल तर निश्चितपणे दखल घेऊन त्यासंदर्भात तक्रार दाखल केली तर त्यावर उचित कारवाई केली जाईल. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकणे निषेधार्य मुंबई येथे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्यात आला होता. त्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. यावर प्रश्न विचारण्यात आला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशा प्रकारची घटना ही निषेधार्य आहे. ज्या कुठल्या समाजकंटकाने ही घटना केली आहे त्याला पोलिस शोधून काढतील आणि कारवाई करतील. यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणे हे मला योग्य वाटत नाही. महाराष्ट्राचा आलमाटीची ऊंची वाढवण्यासाठी विरोध सध्या आलमाटी धरणाच्या उंचीवरून वाद सुरू आहेत. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राचा आलमाटीची ऊंची वाढवण्यासाठी विरोध आहे. या संदर्भात आवश्यकता पडली तर महाराष्ट्र सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि कर्नाटक राज्याच्या विरोधात पीटिशन करेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महसूल विभागाच्या वतीने सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे. यात वेगवेगळ्या प्रकारच्या 10 महत्त्वाच्या योजना राबवण्यात येत आहेत. पाणंद रस्त्यांचे मॅपिंग असेल किंवा लोक अदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे असेल, जे वाद आहेत ते वाद संपवण्याच्या गोष्टी या माध्यमातून करण्यात येणार आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
कार-ट्रकच्या भीषण अपघातात ७ जागीच ठार
नेल्लोर : आंध्र प्रदेशातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील नेल्लोर जिल्ह्यात बुधवारी वाळूने भरलेला ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला, ज्यात एकाच कुटुंबातील सात जणांना जागीच आपला जीव गमवावा लागला. सर्व मृत नेल्लोर शहरातील रहिवासी होते आणि आत्मकुर सरकारी रुग्णालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी जात होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेल्लोर जिल्ह्यातील संगम मंडलजवळ वाळूने […] The post कार-ट्रकच्या भीषण अपघातात ७ जागीच ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक
मुंबई : लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक करण्यात आली आहे. फसवणूक आणि धमकीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने ही कारवाई केली आहे. फसवणुकीच्या प्रकरणात राजेंद्र लोढा यांना आरोपी बनवण्यात आलेले आहे. राजेंद्र लोढा यांना मुंबईतील वरळी परिसरातून अटक करण्यात आली असून आज कोर्टाने त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राजेंद्र लोढा […] The post लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दुबई : आशिया कप २०२५ स्पर्धेतील १० वा सामना पाकिस्तान आणि यूएई यांच्यात होणार होता. दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरोची लढाई होती. या सामन्यात विजयी संघ थेट सुपर ४ फेरीत जागा मिळवणार होता. मात्र या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकला आहे. सामनाधिकार अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई न केल्याने पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानी […] The post पाकिस्तान-यूएई सामना रद्द appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त एका भव्य सोहळ्यात ७५०० विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ घेतली. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 'स्वच्छ भारत मिशन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे' असे प्रतिपादन केले. बावनकुळे यांनी सांगितले की, आपले जीवनमान उंचावण्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी परिसराची स्वच्छता अत्यंत गरजेची आहे. पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारत मिशनचे प्रेरणादायी अभियान देशाला दिले आहे. शहराची स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. विद्यार्थी घर, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतील, तर देश निश्चितच सशक्त बनेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून 'स्वच्छ सुंदर विकसित कसबा मिशन' आणि 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, आमदार विक्रांत पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक पलांडे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना हेमंत रासने यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींचे २०४७ पर्यंत देशाला विकसित करण्याचे स्वप्न आहे. त्यांना अपेक्षित असलेले स्वच्छ भारत मिशन प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकाने सहभाग नोंदवला पाहिजे. 'स्वच्छ, सुंदर विकसित कसबा' हा उपक्रम केवळ स्वच्छतेची शपथ नसून समाजाला दिलेला एक संदेश आहे. मोदींच्या पुढील वाढदिवसापर्यंत पुणे शहर देशातील क्रमांक एकचे स्वच्छ शहर बनवण्याचा संकल्प आज विद्यार्थ्यांसह करण्यात आला, असेही रासने म्हणाले.
पुणे येथे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पणन मंत्री जयकुमार रावल यांनी राज्यातील शेतमाल निर्यात वाढीसाठी निर्यात सुविधा केंद्रे सक्षम करण्याचे निर्देश दिले. फळे, भाजीपाला आणि इतर शेतमालाची निर्यात वाढवून शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे राज्य सरकारचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. भाजीपाला व फळे निर्यात करण्यासाठी जागतिक बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करून त्यानुसार सुविधा केंद्रांनी तत्परतेने काम करावे. भौगोलिक मानांकनानुसार राज्यातील फळांचे ब्रँडिंग करावे आणि निर्यात मार्गदर्शन केंद्र सुरू करावे, असेही रावल म्हणाले. ही निर्यात सुविधा केंद्रे पूर्ण क्षमतेने २४x७ सुरू ठेवावीत, असे निर्देश त्यांनी दिले. ही बैठक पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात पार पडली. यावेळी आमदार चरणसिंग ठाकूर, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रविणकुमार नहाटा, दोडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, मलकापूरचे संजय काजळे-पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे, विपणन व तपासणी संचालनालयाचे विपणन अधिकारी व्ही. एस. यादव, कृषी पणन संचालक विकास रसाळ, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, मुख्य व्यवस्थापक विनायक कोकरे आणि नाबार्डचे उप महाप्रबंधक हेमंत कुंभारे आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला स्पर्धात्मक दर देण्यासाठी जागतिक बाजार व्यवस्थेचा अभ्यास करण्याचे आवाहन रावल यांनी केले. राज्यात उत्पादित होणाऱ्या फळे व भाजीपाला उत्पादनाला जगाच्या बाजारपेठेत जेथे मागणी असेल तेथे निर्यात करण्यासाठी सुविधा केंद्रांनी तत्परतेने काम करावे. तसेच, पणन सुविधा सक्षम करून प्रभावीपणे काम करणाऱ्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पाठीशी सरकार सक्षमपणे उभे राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. अशा बाजार समित्यांना अधिक काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल. बाजार समितीच्या क्षेत्रीय पीक पद्धती, उपलब्ध पायाभूत सुविधा, आधुनिकीकरणाची गरज आणि भविष्यात आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधांचा अभ्यास करून आगामी १० वर्षांचा व्यवसाय विकास आराखडा तयार करावा. बाजार समितीने ५, १० आणि १५ एकर जागेत बाजारपेठ निर्मितीकरता विविध पायाभूत सुविधांचा समावेश करून आदर्श पायाभूत आराखडा तयार करावा, असेही निर्देश देण्यात आले. राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे १०० टक्के संगणकीकरण करण्यात यावे, या दृष्टीने काम करणाऱ्या बाजार समित्यांना पणन मंडळाकडून प्रोत्साहन दिले जाईल.मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यात फळे व भाजीपाला हाताळणी सुविधा केंद्रे निर्माण करण्यात आली असून, शेतकऱ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ झाला पाहिजे.
लोकअदालतीत महावितरणची 1057 प्रकरणे निकाली:2 कोटी 18 लाखांची वसुली; 51317 पैकी 1053 ग्राहकांकडून भरणा
पुण्यात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये महावितरणची १०५७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणांतून महावितरणची २ कोटी १८ लाखांची वसुली सुद्धा झाली. यामध्ये दाखल पूर्व व प्रलंबित अशा दोन्ही प्रकरणांचा समावेश आहे. नियमित वसुली बरोबरच कायमस्वरुपी बंद असलेल्या व थकबाकीमुळे बंद केलेल्या जवळपास ग्राहकांच्या वीज बिल वसुलीसाठी महावितरण कायम आग्रही असते. त्यासाठी वेळोवेळी वसुली मोहिमा राबवल्या जातात. त्यातूनही ज्या प्रकरणांत वसुली होत नाही अशी प्रकरणे महावितरणतर्फे लोकअदालतीमध्ये ठेवली जातात. महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे परिमंडलातील गणेशखिंड, रास्तापेठ व पुणे ग्रामीण या तीन मंडलांमध्ये थकबाकीमुळे बंद असलेल्या ५१३१७ वीज ग्राहकांना १३ सप्टेंबर रोजी पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीपुढे ठेवण्यात आले होते. सर्व प्रकरणातील वादांना तशा नोटीसही बजावण्यात आल्या होत्या. तसेच वीजचोरीची ८३ प्रकरणे देखील लोक अदालतीपुढे ठेवण्यात आली. ५१३१७ प्रकरणांपैकी १०५३ प्रकरणांमध्ये २ कोटी १४ लाख ८९ हजार ३०८ रुपयांचा भरणा झाला. यात सर्वाधिक पुणे ग्रामीण मंडलातील १० ग्राहकांकडून १ कोटी ३ लाख ४१ हजारांचा तर त्यापाठोपाठ रास्तापेठ मंडल ९६ लाख ९७ हजार ८१८ व गणेशखिंड मंडलातून १७ लाख ८४ हजार ९३० रुपये वसूल झाले. तर वीजचोरीच्या ८३ पैकी ४ गुन्ह्यांमध्ये तडजोड झाली. त्यातून ४ लाख ८ हजार ४४० रुपयांची रक्कम वसूल झाली. या लोकअदालतीच्या यशस्वितेसाठी प्रभारी विधी सल्लागार दिनकर तिडके, कनिष्ठ विधी अधिकारी नितल हासे, अंजली चौगुले व इम्रान शेख यांनी परिश्रम घेतले.
अमरावती-मुंबई विमानसेवेचे वेळापत्रक अखेर बदलले
अमरावती : मुंबई-अमरावती-मुंबई या फेरीच्या वेळापत्रकात एअर अलायन्स विमानसेवा कंपनीने २७ ऑक्टोबरपासून बदल होण्याचे संकेत दिले असून वेळापत्रकात बदलाची मागणी गत काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींसह प्रवाशांची होती. आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे चार दिवस अमरावती-मुंबई-अमरावती फे-या चालणार आहे. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत अमरावती ते मुंबई अलायन्स एअरची विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातून सोमवार, […] The post अमरावती-मुंबई विमानसेवेचे वेळापत्रक अखेर बदलले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या तक्रारीनंतर भुजबळांच्या मालकीच्या बेनामी संपत्तीची चौकशी पुन्हा सुरू करण्याचे आदेश विशेष सत्र न्यायालयाने दिले आहेत. यापूर्वी ही चौकशी तांत्रिक कारणामुळे थांबवण्यात आली होती, ती आता नव्याने सुरू होणार आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, छगन भुजबळ आणि त्यांच्या सारखे असंख्य मंत्री जे अमाप भ्रष्टाचार करून अफाट पैसा कमावतात, त्यांच्या विरुद्ध तुम्ही कितीही लढलात तरी काहीही होणार नाही याची त्यांना खात्री असते आणि ती का असते याचा एक मोठा खुलासा मी करणार आहे. छगन भुजबळ यांनी कोरोना काळात एक डिस्चार्ज पिटिशन सादर केले होते सेशन कोर्टात. त्यात त्यांना 9 सप्टेंबर 2021 ला डिस्चार्ज दिला गेला. या नंतर जे पीपी होते त्यांनी ठरवले की याच्याविरुद्ध आपल्याला अर्ज करण्याची गरज आहे. तसेच पुढे आपल्याला हायकोर्टात जाण्याची गरज असल्याचे त्यांना वाटले म्हणून एक जीआर निघाला. हा जीआर निघाला 26 नोव्हेंबर 2021 ला तेव्हा सरकार होते उद्धव ठाकरेंचे. हा जीआर निघाल्यावर भुजबळ गेले असतील उद्धव ठाकरेंना भेटायला म्हणून हा जीआर रद्द करण्यात आला. म्हणजे त्यांच्या डिस्चार्जला कोर्टात आव्हान डेटा येणार नाही असे सांगण्यात आले. सरकार भुजबळ यांच्या पाठीशी पुढे बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, त्यानंतर एक आमदार आहेत नाशिकचे त्यांनी ती केस पुन्हा अधिवेशनात मांडल्यानंतर फडणवीसांच्या काळात एक जीआर काढण्यात आला 12 एप्रिल 2023 ला. हा जीआर निघाल्यानंतर आता आपण 2025 मध्ये आहोत, तब्बल दोन वर्षे फडणवीस सरकारने काहीही केले नाही. याचाच अर्थ सरकार त्यांच्या पाठीशी आहे. याच्यावर ते हायकोर्टात गेले नाहीत, याच्या विरोधात ते लढले नाहीत आणि म्हणून भुजबळ यांच्यासारखी माणसे माझ्यावर डीफेमेशनच्या केसेस करायला गेलेत, त्यांना मी तिथे कोर्टात बघून घेईनच. पण, माझ्याकडे सगळ्यात स्ट्रॉंग पुरावा आहे. मरीन लाइनला भुजबळांच्या नावाने इमारत अंजली दमानिया म्हणाल्या, 2016 मध्ये एक बेनामी ट्रान्झॅक्शन प्रोहिबिशन अॅक्ट आली. ही कायद्याने आली ऑगस्ट महिन्यात पण नोव्हेंबर 2016 ला त्याचे नोटिफिकेशन निघाले. 25 नोव्हेंबरला ताबडतोब देशातली पहिली तक्रार मी त्याबाबत केली आणि त्याच्यात कसे आहे की 470 दिवसात कारवाई झाली पाहिजे, असा त्यांचा एक टाइमलाइन आहे. म्हणून मी पूर्णच्या पूर्ण दोन तक्रारी पाठवल्या होत्या. पहिली तक्रार होती सगळ्या डायरेक्टरच्या विरोधात आणि दुसरी तक्रार होती ऑपरेटरच्या विरोधात. मात्र या दोन्हीवर कारवाई झाली नाही. म्हणून एक वर्षांनी 2017 मध्ये मी पुन्हा एक तक्रार केली. मुंबईच्या मरीन लाइन्सच्या तिथे अल जबऱ्या नावाची एक बिल्डिंग आहे, ती पूर्ण भुजबळ यांनी विकत घेतली. तुम्ही विचार करा मरीने लाइन्सचा भाव काय असेल, तिथली पूर्ण बिल्डिंग भुजबळ यांनी विकत घेतली. याविरोधात मी तक्रार केली. त्यावर आयकर विभागाने आणि ईडीने चौकशी करण्यास सुरुवात केली 2021 मध्ये. परत भुजबळ पळत पळत हायकोर्टात गेले आणि त्यांना दिलासा मिळाला. छगन भुजबळ यांना दिलासा का मिळाला तर सुप्रीम कोर्टात एक गणेश डेलकॉम नावाची एक केस होती. त्या केसमध्ये त्यांचे असे म्हणणे होते की बेनामी ट्रान्जॅक्शन प्रोहिबीशन अॅक्टच्या एका सेक्शनला चॅलेंज करण्यात आले होते आणि ती जी ऑर्डर झाली त्या बेसिसवर भुजबळ यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि डिसेंबर 2023 ला त्यांना दिलासा मिळाला. ओबीसी चेहरा पाहिजे म्हणून छगन भुजबळांना मंत्री बनवले अंजली दमानिया म्हणाल्या की, भाजपला एक ओबीसी चेहरा पाहिजे म्हणून छगन भुजबळ यांना मंत्री बनवण्यात आले, त्यांना पुन्हा पद देण्यात आले. तब्बल नऊ वर्षे झाली तरी आजही त्यांची चौकशी पूर्ण होत नाही. आयकर विभागाला ताबडतोब लिहून त्यावर पुन्हा कारवाई सुरू करावी असे पत्र मी त्यांना दिले. त्यामुळे आयकर विभागाला ते कायद्याने क्रमप्राप्त होते म्हणून ही कारवाई त्यांना सुरू करावी लागली. विशेष न्यायालयात यावर सुनावणी होऊन न्यायालयाने बेहिशेबी आणि बेनामी मालमत्ता प्रकरण पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
मुंबई : केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गो-हे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, विधानपरिषद सदस्य संजय खोडके तसेच महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) जितेंद्र भोळे, सचिव (३) विलास आठवले, मा.सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे सचिव पंडीत खेडकर, उप सचिव विजय कोमटवार, […] The post प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिवादन
छत्रपती संभाजीनगर : केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनम्र अभिवादन केले.छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. The post प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिवादन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नीटच्या विद्यार्थ्याची हत्या करणा-या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
गोरखपूर : नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या एका विद्यार्थ्याची गोतस्करांनी हत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. तसेच या घटनेविरोधात लोकांकडून तीव्र आंदोलनही होत होते. दरम्यान, या विद्यार्थ्याची हत्या करणा-या आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याची माहिती गोरखपूरमधून समोर आली आहे. एन्काऊंटर करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रहीम असे असून या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. […] The post नीटच्या विद्यार्थ्याची हत्या करणा-या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आघाडीचा निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच
पुणे : प्रतिनिधी पुण्यातील प्रश्न सोडविण्यासाठी विकासाचा दृष्टिकोन असलेले नगरसेवक आपल्याला निवडून आणावे लागतील, त्यादृष्टीने महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, असा सल्ला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. त्याचवेळी महाविकास आघाडीत एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय हा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय […] The post आघाडीचा निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार
विशाखापटनम : केंद्र सरकारने जीएसटीमध्ये बदल केले आहेत. यासाठी आता आणखी पाच दिवस वाट पाहावी लागणार आहे. जवळपास ९० टक्के वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. यामुळे सरकारला फटका तर जनतेला फायदा होणार आहे. यावर आता अर्थमंत्र्यांचे वक्तव्य आले आहे. बुधवारी विशाखापटनम येथे आयोजित नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा कार्यक्रमात निर्मला सीतारामन यांनी जीएसटीमध्ये झालेल्या बदलांमुळे […] The post लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
३० सप्टेंबरपर्यंत मुंडे सोडणार ‘सातपुडा ’
मुंबई : प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मंत्री असताना त्यांना सातपुडा बंगला दिला गेला होता. पण मंत्रिपद गेल्यानंतरही त्यांना हा बंगला सोडवत नसल्याची टीका होत होती. दरम्यान ३० सप्टेंबरपर्यंत माजी मंत्री धनंजय मुंडे सातपुडा हा सरकारी बंगला सोडण्याची शक्यता आहे, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री […] The post ३० सप्टेंबरपर्यंत मुंडे सोडणार ‘सातपुडा ’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बीडमध्ये देखील रेल्वे सेवा सुरू व्हावी या मागणीला यश आले असून गेल्या अनेक दशकांपासूनचे बीडकरांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आजपासून बीड ते अहिल्यानगर मार्गावर बीडमधून पहिली रेल्वे धावण्यास सुरू झाली आहे. याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार तसेच मंत्री पंकजा मुंडे व खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी दिलेल्या योगदानाची आठवण करून दिली. कष्टाळू आणि कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे ही रेल्वे सुरू होत आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांनी केलेल्या कामाची देखील आठवण काढत बजरंग सोनवणे यांना टोला लगावला आहे. बजरंग सोनवणे यांचे 'दबंग खासदार' असे बॅनर त्यांच्या समर्थकांकडून दाखवण्यात येत होते. ते बघून पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे या दबंग खासदार होत्या, त्यांनी दिलेल्या योगदानामुळे रेल्वे आली असल्याचे त्यांनी म्हटले. गोपीनाथ मुंडेंची आठवण सांगताना पंकजा मुंडे भावूक पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढत त्यांनी केलेल्या कामाची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, या रेल्वेसाठी कोणाचे योगदान किती हे सगळ्यांना माहीत आहे. मी श्रेयाच्या विषयात जाणार नाही. मी अखेरच्या श्वासापर्यंत या जिल्ह्याची पालक म्हणून भूमिका बजावणार आहे. केशर काकू क्षीरसागर यांच्यापासून ते बजरंग बप्पा सोनवणे यांच्या पर्यंत मनापासून या रेल्वेसाठी सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे. या रेल्वेसाठी प्रीतम मुंडे यांची भूमिकाही महत्त्वाची राहिली आहे. गोपीनाथराव मुंडे यांनी आर्थिक उन्नतीसाठी रेल्वे महत्त्वाची असल्याचे मला सांगितले, मुंडे साहेबांच्या काळात विरोधी पक्षाचे खासदार असताना सर्वाधिक 450 कोटींचा निधी आला होता. या रेल्वेला अखेर स्वरूप मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या प्रसंगी गोपीनाथ मुंडेंची आठवण येते, असे म्हणत पंकजा मुंडे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. बीड जिल्ह्याने आपला स्वाभिमान कधी गहाण टाकला नाही पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, पंतप्रधान मोदींनी 2292 कोटी निधी या रेल्वेला एका झटक्यात दिला. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, पियुष गोयल, रावसाहेब दानवे यांनी या रेल्वेसाठी मदत केली. देवेंद्रजींचे या रेल्वेसाठी मी कोटी कोटी आभार मानते. बीड जिल्ह्याने आपला स्वाभिमान कधी गहाण टाकला नाही, आजचा सुवर्णयोग असल्याचे मुंडे म्हणाल्या. तसेच अजित पवारांना उद्देशून बोलताना त्या म्हणाल्या, दादा तुम्ही आम्हाला बारामतीपेक्षा जास्त म्हणणार नाही पण तेवढीच आर्थिक मदत द्या. नितीन गडकरींनी आम्हाला 10 हजार कोटींचे राष्ट्रीय महामार्ग दिले असेही पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. तसेच आज सगळ्यांनी नगरपर्यंत जावे. श्रेयवादाने या रेल्वेकडे पाहू नका. गोपीनाथ मुंडे का ये सपना पुरा करूंगा असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, अशी आठवण देखील मुंडे यांनी यावेळी बोलताना करून दिली.
महायुती सरकारने काढलेला हैदराबाद गॅझेटियरचा शासन निर्णय (जीआर) ओबीसी आरक्षण संपवणारा आहे. त्यामुळे ज्या सत्ताधारी व विरोधकांना मराठा समाजाच्या मतांची काळजी लागली आहे त्यांना आम्ही धडा शिकवणार, असा इशारा ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी बुधवारी दिला. हिंगोलीत बुधवारी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात ओबीसींचा एल्गार मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी, औंढा नागनाथाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना हाके यांनी वरील संताप व्यक्त केला. ते म्हणाले, सरकारने मराठा आरक्षण करण्यासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जीआर काढला. हा जीआर ओबीसी आरक्षण संपवणारा आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. त्यांनी हा जीआर रद्द करावा. अन्यथा ओबीसी आरक्षण संपण्याची भीती आहे. आज हिंगोलीत ज्या कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, ते रद्द करावे ही आमची मागणी आहे. ज्या सत्ताधारी व विरोधकांना मराठा समाजाच्या मतांची काळजी लागली आहे, त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. केवळ डीएनए ओबीसी आहे असे म्हणून चालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी तो आपल्या कर्तृत्वांनी दाखवला पाहिजे, असेही हाके यावेळी म्हणाले. हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल, तर वाडी तांड्यावर राहणाऱ्या बंजारा समाजालाही आपल्याला एसटीचे आरक्षण मिळेल असे वाटू शकते. बंजारा समाजाने आपल्या ताटातील आरक्षण वाचवणे हे महत्त्वाचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अगोदर आपली झोपडी वाचवू. आपल्यात फूट पडेल असे कोणत्याही समाजाने वागू नये. आज आपली उद्ध्वस्त झालेली झोपडी वाचवण्यासाठी एकत्र येऊ या. महाराष्ट्रातील 450 जातींनी कारखानदारांनी उद्ध्वस्त केलेली झोपडी वाचवण्यासाठी एकत्र आले पाहिजे, असे हाके म्हणाले. मनोज जरांगेंवरही साधला निशाणा लक्ष्मण हाके यांनी यावेळी मनोज जरांगे यांच्यावरही निशाणा साधला. तसेच त्यांच्या आंदोलनामागे विरोधक असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, विरोधी पक्षांनी एका चौथी नापास व्यक्तीला या आंदोलनाचे नेतृत्व दिले. त्याला रसद पुरवली. त्यांनी बेकायदा मागणी केली आणि सरकारनेही त्याच्या मागणीनुसार जीआर काढला. त्यामुळे आम्हा ओबीसींना कुणीही वाली राहिला नाही. विरोधी पक्ष नाही. सत्ताधारी पक्षही नाही. जरांगे पाटलांचे आंदोलन विरोधी पक्षांनी उभे केले. त्यांनी आंदोलन उभे केले नसते तर आमचे आरक्षण गेलेच नसते. शरद पवारांनी आंदोलन उभे केले नसते किंवा ही बेकायदा मागणी आहे, हे मागासांचे आरण आहे असे त्यांनी जरांगेंच्या कानात सांगितले असते तर आमच्यावर आज ही वेळ आलीच नसती, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांना आपला ओबीसी डीएनए कर्तृत्वाने दाखवावा लागेल पत्रकारांनी यावेळी हाके यांना तुम्ही नेहमीच शरद पवारांवर टीका करता, पण जीआर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे ना? असा प्रश्न केला. त्यावर हाके म्हणाले, आम्ही सरकारचा जीआर फाडून टाकला ना? त्याचे काय कौतुक करतो आम्ही? आम्ही शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरलो आहोत. फडणवीस म्हणतात भाजपचा डीएनए ओबीसींचा आहे. पण नुसत बोलून चालणार नाही. ते त्यांना आपल्या कर्तृत्वाने दाखवावे लागेल, असे हाके म्हणाले.
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गट्टा जांबिया पोलिस ठाणे हद्दीतील मोडस्के जंगल परिसरात झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना १७ सप्टेंबर रोजी यश आले आहे. घटनास्थळावरून ए-४७ रायफल, अत्याधुनिक पिस्तूल, जिवंत दारुगोळा व नक्षली साहित्य मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले आहे. या चकमकीमुळे नक्षली संघटनांना मोठा धक्का बसला आहे. मोडस्के जंगल परिसरात काही नक्षली […] The post दोन महिला नक्षलींचा खात्मा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अथकपणे काम करू
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी मराठवाड्याची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी उद्योग आणि त्यातून रोजगार निर्मिती, कृषि, पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात अथकपणे काम करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमात दिली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृतीस्तंभ येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी […] The post मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अथकपणे काम करू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उद्योगासाठी कच्चा माल पुरवण्याच्या बहाण्याने 2 लाख 70 हजार रूपये घेऊन कोणताही उद्योग न देता फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील नारायण शिराळकर व सविता सुनिल शिराळकर (दोघेही रा. एकदंत अपार्टमेंट, बारामती) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रागिनी सुधीर धोंगडे (43, मु. पो. आळे, ता. जुन्नर पुणे) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 5 जून 2024 रोजी शिराळकर दाम्पत्याने महिला उद्योग वर्धिनी या समूहाची टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे बैठक घेतली होती. त्या बैठकीत महिलांना घरबसल्या उद्योग देतो असे खोटे सांगितले. राखी प्रकल्प, जपमाळ प्रकल्प यासाठी कच्च्या मालाचा पुरवठा करतो असे सांगून महिलांना विश्वासात घेवून त्यांच्याकडून तब्बल 2 लाख 70 हजार रूपये घेतले. परंतु, महिलांकरिता कोणताही उद्योग न देता तसेच दिलेले पैसे परत न देता घेतलेल्या पैशाचा अपहार करत फसवणूक केल्याचे तक्रारीत सांगितले आहे. खोटी कागदपत्रे सादर करून मिळवले पाच कोटींचे कर्ज, दोघांवर गुन्हा दाखल मालमत्ता खरेदीसाठी गृहकर्जाची खोटी कागदपत्रे तयार करून ती बँकेला खरी आहे असल्याचे भासवून बँकेकडून पाच कोटी रूपयांचे कर्ज मंजुर करून ते न फेडणार्या दोघांवर फरासखाना पोलिस ठाण्यात फसवणूकीचा व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महंमद युनूस शरीफ शेख आणि दरिउस सोलमन राफत अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत अर्जुन अथोली (39, रा. साळुंखे विहार सोसायटी, साळुंखे विहार) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार 14 जुलै 2023 ते सप्टेंबर 2025 दरम्यान रविवार पेठेतील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेत घडला. दोघांनी बँकेकडून 5 कोटी 27 लाख 69 हजार 192 रुपयांची बँकेची फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्वेता बेल्हेकर करीत आहेत.
विद्या महामंडळ संस्थेच्या मूक-बधिर शिक्षण संशोधन व विकास केंद्रातर्फे कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शुक्रवार, 19 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे होणार आहे, अशी माहिती डॉ. अ.ल. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यवाह विद्या महामंडळ लिलाधर गाजरे, मुक बधिर विभागाचे महेंद्र अर्विकर व अश्विनी जोशी यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेत एकूण 8 कर्णबधिर शाळा शाळांचा सहभाग असून 105 कर्णबधिर विद्यार्थी आपली कला सादर करणार आहेत. स्पर्धा दुपारी 12 ते 3.30 या वेळेत होणार असून, त्यानंतर लगेचच बक्षिस वितरण समारंभ 3.30 वाजता होणार आहे. आधार मूकबधिर विद्यालय, धायरी मूकबधिर विद्यालय, भावे हायस्कूल, चिंचवड बधिर मूक विद्यालय, हडपसर बधिर मूक विद्यालय, आपटे प्रशाला मूकबधिर विद्यालय, अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट, बधीर मूक विद्यालय सुऱ्हुद मंडळ या शाळा स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे परीक्षण प्रख्यात नाट्य व कला क्षेत्रातील मान्यवर करणार असून, उषा उंडे, विनिता पिंपळखरे आणि सुधांशु पानसे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. या मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकास मोमेंटो व उत्कृष्ट संगीत, उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि उत्कृष्ट लेखनाला मोमेंटो व रोख रकमेचे पारितोषीक देण्यात येणार आहे.कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या कलेला उत्तेजन मिळावे व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा भरविण्यात येते.
पुणे : प्रतिनिधी लेखक हा टीपकागदासारखा असावा लागतो, असे नमूद करून ते म्हणाले, लेखक, कवीचा संबंध अश्रूंशी असतो. लेखकाने टीकेची पर्वा न करता स्वत:च्या मनाला वाटेल-पटेल ते लिहावे. पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे हे लेखकाचे काम आहे, मराठी वाचक अत्यंत जागरूक आहे. अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याचा आनंद व्यक्त करून ते म्हणाले, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी व्याकुळ नव्हतो. […] The post लेखक टीपकागदासारखा असावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईतील दादर परिसरात असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पुतळ्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे म्हटले. तसेच असे कृत्य करण्यामागे दोन शंका उपस्थित केल्या आहेत. अज्ञात व्यक्तीने मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर दोन्ही शिवसेना आणि मनसे आक्रमक झाल्या आहेत. वातावरण दूषित करण्यासाठी कोणीतरी हे कृत्य केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसैनिकांनी पुतळ्याची साफसफाई केली आहे. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी दुपारी घटनास्थळी भेट देऊन पुतळ्याची पाहणी केली. नेमके काय म्हणाले उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे म्हणाले, सदर प्रकार दोन प्रकारच्या व्यक्ती करु शकतात. त्यामधील पहिले म्हणजे स्वत:च्या आई-वडिलांचं नाव घ्यायला शरम-लाज वाटणाऱ्या लावारिस लोकांनी हे कृत्य केले असेल. तसेच दुसरे म्हणजे बिहारमध्ये ज्याप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा अपमान झाला, म्हणून बिहार बंद करण्याचा एक असफल प्रयत्न केला गेला. त्याप्रमाणेच हा सर्व प्रकार करुन महाराष्ट्र पेटवण्याचा उद्देश असू शकतो, अशी भीती उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. आठ-दहा वर्षांपूर्वी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासोबत असाच प्रकार घडला होता, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, भावना त्यावेळी तीव्र होत्या, आजही तीव्र आहेत. आम्ही शांत रहायला सांगितले आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत असून, आम्ही आरोपींना शोधून काढू, असे पोलिस म्हणत आहेत. पुढे काय होते बघू, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज ठाकरेंच्या पोलिसांना सूचना दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मीनाताई ठाकरेंच्या पुतळास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित असणाऱ्या पोलिसांकडून देखील संबंधित घटनेची माहिती घेतली. सीसीटीव्ही चालू आहेत का? असा राज ठाकरेंनी पोलिसांना प्रश्न विचारला. तसेच सगळे सीसीटीव्ही चेक करा, 24 तासांमध्ये आरोपींना शोधून काढा, अशा सूचनाही राज ठाकरेंनी पोलिसांना केल्या. हे ही वाचा... मराठवाड्याला मराठवाडा का म्हणतात?:कसे पडले नाव? काय आहे इतिहास? वाचा भाषिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी आता महाराष्ट्र राज्याचा भाग असलेला मराठवाडा हा प्रदेश पूर्वी हैदराबाद संस्थानाचा भाग म्हणून ओळखला जात होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी हा भूभाग स्वतंत्र होऊन भारतात समाविष्ट झाला. यंदा 17 सप्टेंबरला या घटनेला 77 वर्षे पूर्ण होऊन 78 वे वर्ष सुरू होईल. या निमित्ताने, मराठवाड्याचा इतिहास, त्याचे नाव कसे पडले, आणि तो निजामशाहीच्या जोखडातून कसा मुक्त झाला, याबाबत थोडक्यात जाणून घेऊया... सविस्तर वाचा...
राज्य सरकारने आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील मराठा उमेदवारांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप केले. पण आता मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या प्रमाणपत्रांवर शंका व्यक्त केली आहे. आज देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्र योग्य आहेत का? या प्रमाणपत्रांच्या नोंदी 2 सप्टेंबरपूर्वी शोधल्या होत्या का? असे विविध प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत. मराठवाड्यात आज सर्वत्र मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यात तेथील पालकमंत्र्यांच्या हस्ते मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यात लातूरमध्ये 2, हिंगोलीत 50, तर धाराशिवमध्ये 4, बीडमध्ये 5 उमेदवारांचा समावेश होता. यामुळे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. पण छगन भुजबळांनी या प्रमाणपत्रांवर शंका व्यक्त करून त्यांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भुजबळ याविषयी म्हणाले, मराठा समाजाला आज देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे आधीच शोधून ठेवली होती का? हे पहावे लागेल. आज दिलेली प्रमाणपत्रे 2 सप्टेंबरच्या आधी शोधली होती का? दिलेली पत्र योग्य आहेत का? ते तपासायला हवे. मंत्रिमंडळाच्या ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल सांगितले होते की, चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र जारी केले तर त्यावर कारवाई होईल. त्याचा आम्हाला कोर्टात फायदा होईल. सदर प्रमाणपत्र चेक करून दिले असतील तर हरकत नाही. पण खोटी माहिती देऊन, चुकीच्या मार्गाने दिली असतील तर माझा विरोध आहे. माझा कोणत्याही समाजाला विरोध नाही. ही शासनाची समिती आहे. सर्वानी याविषयी आपली भूमिका मांडली आहे, असे भुजबळ म्हणाले. आत्ता पाहू कसे काढावे मराठा - कुणबी जात प्रमाणपत्र? मराठा - कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी अर्थात प्रांत कार्यालयाकडे (एसडीओ) यांच्याकडे अर्ज करावा लागेल. त्यानंतर पडताळणीसाठी तो अर्ज स्थानिक समितीकडे पाठवला जाईल. ही समिती वंशावळ तपासणी करेल. तसेच जुन्या नोंदी, ग्रामपंचायत दाखले, रहिवासी दाखला, वाडवडिलांच्या नोंदी आदी दस्तऐवज तपासेल. या समितीचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रमाणपत्र देण्याचा अंतिम निर्णय घेतील. यासाठी शासनाने समिती सदस्यांना विशेष प्रशिक्षण देण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रशिक्षणात जात प्रमाणपत्राच्या नियमावली, चौकशीची पद्धत, अहवाल तयार करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींचे मार्गदर्शन केले जाईल. हे ही वाचा... अखेर कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीडमध्ये 5 मराठा बांधवांना मिळाले प्रमाणपत्र; तुम्हाला मिळाले? बीड - मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. सरकारने आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र जारी करण्यास सुरूवात केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज 5 मराठा बांधवांना हे प्रमाणपत्र दिले गेले. त्यामुळे या प्रमाणपत्रासाठी बलिदान देणाऱ्या अनेकांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव येथे 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना'चा राज्यस्तरीय शुभारंभ केला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील एक कोटी महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याचा संकल्प व्यक्त केला. हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम किनगाव (ता. फुलंब्री) येथील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या आवारात आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून हा शुभारंभ करण्यात आला. हे अभियान १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये राबवले जाईल. या सोहळ्यास राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार डॉ. कल्याण काळे, संदीपान भुमरे, आमदार अनुराधा चव्हाण आणि आमदार संजना जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा देऊन केली. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त करत ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' हे केवळ योजनांची अंमलबजावणी करून लाभ देणारे अभियान नाही, तर ते प्रत्येक ग्रामस्थाला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे अभियान आहे. लोकसहभाग हा या अभियानाचा मूळ गाभा आहे. फडणवीस यांनी सांगितले की, महिलांना केवळ १५०० रुपयांवर अवलंबून राहावे लागू नये यासाठी त्यांना महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल. प्रत्येक गावात महिलांसाठी एक पतसंस्था सुरू करून जिल्हा बँकेमार्फत त्यांना एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. यातून राज्यातील एक कोटी महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याचा शासनाचा संकल्प आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अभियानातील पारितोषिक योजनेची माहिती दिली. या स्पर्धेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना एकूण २५० कोटी रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. तालुकास्तरावर प्रथम १५ लाख, द्वितीय १२ लाख आणि तृतीय ८ लाख रुपये, जिल्हास्तरावर प्रथम ५० लाख, द्वितीय ३० लाख आणि तृतीय २० लाख रुपये तर राज्यस्तरावर प्रथम ५ कोटी, द्वितीय ३ कोटी आणि तृतीय २ कोटी रुपयांची बक्षिसे दिली जातील. इतकी पारितोषिके देणारी ही देशातील पहिलीच योजना असल्याचे त्यांनी नमूद केले.
सातारा येथे होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांचा महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी बोलताना पाटील यांनी मुंबईतील भाषिक प्रश्नावर भाष्य केले. पाटील म्हणाले की मराठी माणूस परप्रांतात गेल्यावर तेथील भाषा शिकतो. मात्र मुंबईत राहणारे अमराठी लोक मराठी शिकण्यास नकार देतात. त्यांनी प्रत्येक तालुक्यात पुस्तकाचे गाव आणि वाचनालये निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. कार्यक्रमाला डॉ. श्रीपाल सबनीस, प्रा. मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी आणि सुनिताराजे पवार उपस्थित होते. पाटील यांनी लेखकाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की लेखकाने टीकेची पर्वा न करता मनाला वाटेल ते लिहावे. त्यांनी मराठी वाचकांच्या जागरूकतेचेही कौतुक केले. 2009 मध्ये आलेली अध्यक्षपदाची संधी त्यांनी नाकारली होती. सध्याच्या काळात भाषा आणि संस्कृतीवर येणाऱ्या संकटांबद्दल चिंता व्यक्त करत पाटील यांनी तरुण पिढीला मोबाईलच्या व्यसनातून बाहेर काढून साहित्याकडे वळवण्याचा मानस व्यक्त केला. त्यांनी स्वतःवरील वाङ्मय चोरीच्या आरोपांबद्दल खेदही व्यक्त केला.मोघम बोलून चुकीच्या वावड्या उठविणे योग्य नाही. मला मायमराठी वाचकांची साथ लाभलेली असून माझ्या साहित्यकृतींमधील शब्दांची आणि सत्याची धार याला वाचकांनी न्याय दिला आहे. न्यायदेवता माझ्या शब्दांकडे लक्ष ठेवून असल्यामुळे पुढील काळातही मला उत्तम लेखन करावेच लागेल. रावसाहेब कसबे म्हणाले, साहित्य संमेलन हा एक आनंदोत्सव असावा. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून युवा पिढीला तुम्हीही लिहू शकता असा विश्वास देणे आवश्यक आहे. लिहिणे ही कुणा एका जाती-धर्म-लिंगाची मक्तेदारी नाही. साहित्यकृती हा नुसता समाज किंवा निसर्गाशी संवाद नसतो तर तो स्वत:शीच संवाद असतो त्यातून प्रश्न निर्माण होतात आणि ते सोडविण्यासाठी साहित्यकृतींची निर्मिती होते.
दुरुस्तीसाठी दिलेली दहा लाखांची कार घेऊन गॅरेज चालक पसार झाल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी गॅरेज चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका वकिलाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी गॅरेज चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वकिलांच्या मित्राने त्यांना कार वापरण्यासाठी दिली होती. न्यायालयात ये-जा करण्यासाठी ते कार वापरत होते. आरोपी गॅरेज चालक त्यांच्या ओळखीचा आहे. हांडेवाडी परिसरात गॅरेज आहे. वकिलाने कार दुरुस्तीसाठी दिल्यानंतर गॅरेज चालकाने कार दुरुस्तीसाठी ४० हजार रुपये खर्च येईल. कारचे सुटे भाग बाहेरून मागवावे लागतील, असे सांगितले. कार दुरुस्तीसाठी वेळ लागणार असून, दोन महिन्यात कार दुरुस्त करुन देतो, असे गॅरेज चालकाने त्यांना सांगितले. जुलै महिन्यात त्यांनी कार दुरुस्तीसाठी दिली. दोन महिन्यानंतर कार परत न केल्याने तक्रारदार वकील गॅरेज चालकाला भेटण्यासाठी गेले. तेव्हा गॅरेज बंद होते. त्यांनी चौकशी केली. तेव्हा गॅरेज चालकाने भाडेतत्त्वावर गॅरेजसाठी जागा घेलली होती. गॅरेज बंद करुन चालक निघून गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख तपास करत आहेत. जंगली महाराज रस्त्यावर दुचाकी चोरी जंगली महाराज रस्त्यावरील श्री पाताळेश्वर मंदिरासमोर लावलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कोथरूड भागात राहायला आहे. १२ सप्टेंबर राेजी सकाळी दहाच्या सुमारास त्याने श्री पाताळेश्वर मंदिरासमोर दुचाकी लावली होती. दुचाकी चोरून चोरटा पसार झाला. चोरलेल्या दुचाकीची किंमत ५० हजार रुपये आहे, असे तरुणाने दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित बडे तपास करत आहेत.
मंत्र्यांच्या बंगल्यांसाठी कोटींची उधळपट्टी?
मुंबई : महागाईच्या काळात ४० ते ५० लाख रुपयांत चांगले घर उभारले जाऊ शकते; पण मंत्रिमहोदयांचे निवासस्थान असल्यास खर्चदेखील मंत्रिपदासारखाच मोठा असतो, हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारातून स्पष्ट होते. रवि भवन परिसरातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘देवगिरी’बंगल्यासह इतर दोन बंगले तसेच नाग भवनातील चार बंगल्यांच्या छतांच्या दुरुस्तीसाठी विभागाने तब्बल १ कोटी ८ लाख २६ हजार […] The post मंत्र्यांच्या बंगल्यांसाठी कोटींची उधळपट्टी? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिवभोजन थाळी केंद्रचालकांचे थकलेले दोनशे कोटी सरकार देणार
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना महायुती सरकारच्या काळात रखडली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून शिवभोजन केंद्रचालकांना अनुदानच न मिळाल्याने १८०० केंद्रचालकांनी ठिकठिकाणी उपोषण करीत निदर्शने केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोरही निदर्शने करण्यात आली. अखेर या शिवभोजन केंद्रचालकांचे थकलेले दोनशे कोटी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यभरात १८०० शिवभोजन […] The post शिवभोजन थाळी केंद्रचालकांचे थकलेले दोनशे कोटी सरकार देणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात अतिवृष्टीने १८ लाख हेक्टर क्षेत्र बाधित
मुंबई : राज्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी, महापुरामुळे १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टरचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा ३० जिल्ह्यांना फटका बसला आहे. या संकटाच्या काळात शेतक-यांनी घाबरून जाऊ नये. ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण होऊन शेतक-यांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. उर्वरित पंचनामे पूर्ण करून तत्काळ मदत देण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री […] The post राज्यात अतिवृष्टीने १८ लाख हेक्टर क्षेत्र बाधित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विश्वास पाटलांची संमेलनाध्यक्षपदावरील निवड रद्द करण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी सातारा येथे होऊ घातलेल्या ९९ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले विश्वास पाटील यांच्या अनेक साहित्यातील कथाबीज चोरलेले असल्याचा एक आरोप त्यांचेच बंधू तथा ‘दाह’ या कादंबरीचे लेखक सुरेश पाटील यांनी केला आहे. ‘पानिपत’कारांनी त्यांच्या ‘लस्ट फॉर लालबाग’ या कादंबरीमध्ये ‘दाह’मधीलच कथाबीज घेतल्याचे सुरेश पाटील यांनी एका लेखामध्ये म्हटले आहे आणि […] The post विश्वास पाटलांची संमेलनाध्यक्षपदावरील निवड रद्द करण्याची मागणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या
मुंबई : प्रतिनिधी राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यांत नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाले आहे. आधीच शेतक-यांची कर्जमाफी झाली नाही. त्यात शेतातील पीक देखील हातातून गेले आहे. त्यामुळे बळिराजा अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतक-यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी […] The post राज्यातील शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुक्तिसंग्राम हुतात्मा स्तंभावर ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री शुभेच्छा संदेश देत असताना काही आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे ओबीसी समाजाचा संताप या निषेधातून व्यक्त झाला. आंदोलकांनी हैदराबाद गॅझेट रद्द करण्याची मागणी केली आणि ओबीसींवर अन्याय करू नका अशा घोषणा दिल्या. ओबीसी समाज संघटनेचे रामभाऊ पेरकर यांच्यासह चार जणांनी हा निषेध केला. पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना ताब्यात घेतले. या घटनेवर मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी हा स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान असल्याचे म्हटले. काही लोकांचा केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी या विषयावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
राज्यात ३९४ ठिकाणी ‘नमो उद्यान’ विकसित करणार
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व नगर परिषदा व नगरपंचायतींमध्ये वैशिष्ट्यपूर्ण व नवीन नगरपंचायत,नगरपालिका योजनेअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करतानाच या उद्यानांना ‘नमो उद्यान’ नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील एकूण ३९४ नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये नमो […] The post राज्यात ३९४ ठिकाणी ‘नमो उद्यान’ विकसित करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात आरक्षणाच्या मुद्यावर सुरू असलेल्या आंदोलनांमुळे सामाजिक विण दुबळी होत असल्यावर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणी राज्य सरकारला रास्त तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जात आहे. आज आनंदाचा दिवस आहे. पण दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही. सध्या दोन समाजात कारण नसताना वातावरण ढवळून निघत आहे. त्यामुळे सरकारने सर्वांमध्ये एकवाक्यता कशी येईल हे पाहिले पाहिजे, असे ते म्हणालेत. महायुती सरकारने मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यासाठी नुकताच एक जीआर काढला. या जीआरमुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटमधील नोंदींच्या आधारावर कुणबी अर्थात ओबीसी आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण यामुळे ओबीसी बांधव नाराज झालेत. त्यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्यास कडाडून विरोध केला आहे. त्यातच बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार आपल्या समाजाला एसटी अर्थात अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यावर आदिवासी बांधवांनी आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी एक समाज दुसऱ्या समाजाविरोधात उभा टाकत असताना शरद पवारांनी सरकारला या मुद्यावर रास्त तोडगा काढण्याचे व सर्वांमध्ये एकवाक्यता निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. कारण नसताना वातावरण ढवळून निघत आहे शरद पवार शनिवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, आज मुक्तिसंग्राम दिन साजरा केला जात आहे. आज आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे. पण दुर्दैवाने तसे चित्र दिसत नाही. मी नुकतेच सामाजिक विण दुबळी होत असल्याची चिंता व्यक्त केली होती. बंजारा समाजाने नुकताच एक मोर्चा काढला. त्यांनी आपला समावेश आदिवासी समाजात करण्याची मागणी केली. बंजारा समाजाने ही मागणी करताच दुसऱ्या दिवशी आदिवासी समाजाचा मोर्चा झाला. दोन समाजात कारण नसताना वातावरण ढवळून निघत आहे. आता सरकारने दोन समित्या नेमल्या. त्याची काही आवश्यकता होती का? एक समिती एका जातीची आणि दुसरी समिती दुसऱ्या जातीची. यामुळे दुसऱ्या घटकांचे मत विचारातच घेतले जाणार नाही. इथे सामंजस्य व एकता निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी सर्वांना एकत्र बसावे लागेल. रास्त मागण्यांची पूर्तता कशी करता येईल हे पाहिले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी या सर्वांमध्ये एकवाक्यता कशी येईल हे पाहिले पाहिजे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज शरद पवारांनी यावेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्याचेही आवाहन केले. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊसाचे खूप नुकसान झाले आहे. आमच्याकडे जी माहिती आली, त्यात सोलापूर जिल्ह्यात रस्त्यावर पाणी साचले आहे. सोलापूर जिल्ह्यात रस्त्यावर पाणी वाहिल्याचे मी कधी ऐकले नव्हते. पुणे जिल्ह्यातही प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ मदत केली पाहिजे, असे ते म्हणाले.
मराठवाडा मुक्तिसंग्रामासाठी अनेक हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या लढ्याचे योगदान अमूल्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी बुधवारी ता. १७ येथे केले. हिंगोलीत स्वातंत्र्यसेनानी अण्णासाहेब टाकळगव्हाणकर बाल उद्यानातील हुतात्मा स्मारक स्मृतिस्तंभ येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ प्रसंगी झिरवाळ बोलत होते. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय मालती पैठणकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश, राज्य राखीव पोलीस दलाच्या महानिदेशक पौर्णिमा गायकवाड उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री झिरवाळ म्हणाले, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्तिसंग्रामाचा लढा सुरु झाला होता. मराठवाड्याच्या प्रत्येक गावातून स्वातंत्र्य सैनिकांनी शौर्याने हा लढा लढला. यामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची आहुती दिल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे. यामध्ये गावांमधील पाणंद व रस्त्यांचे सर्वेक्षण केले जाईल. सर्वासाठी घरे’ उपक्रमांतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय जमिनींचे पट्टे वाटप, जनतेच्या तक्रारी सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले जाईल. गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु असून लवकरच त्यांना मदत मिळवून देण्याची कार्यवाही सुरू करणार असल्याचे पालकमंत्री झिरवाळ यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांना पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच वसमत येथे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सूत्रसंचालन पंडीत अवचार यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराशी संबंधित असलेल्या समरसता साहित्य संमेलनाचे यापूर्वी अध्यक्षपद भूषविलेल्या विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नेमणूक करून महात्मा फुले यांच्या भाषेतच सांगायचे असेल तर घालमोडे दादांची ही परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली आहे असेच दिसून येते. त्यामुळे या संमेलनावर संघाच्या वर्चस्वाचाच म्हणजेच मनुवादी विचारसरणीचा प्रभाव असणार हे उघड आहे, अशी प्रतिक्रिया विद्रोही सांस्कृतीक चळवळ महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव व सरचिटणीस कॉ. डॉ. जालिंदर घीगे यांनी व्यक्त केली आहे. सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची नेमणूक केल्यानंतर त्यावर सातारा येथेच होणाऱ्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे निमित्ताने विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव व कॉ. डॉ. जालिंदर घिगे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया देऊन खरमरीत टीका केली आहे. शिव-फुले-शाहू-डॉ बाबासाहेब आंबेडकर-अण्णाभाऊ साठे-क्रांतिसिंह नाना पाटील-कर्मवीर भाऊराव पाटील तसेच संत परंपरेतील संत कबीर, जगद्गुरु तुकोबाराय, संत सोयराबाई, संत जनाबाई आदींच्या समतावादी, मानवतावादी भूमिकेच्या विरोधात बोलणाऱ्याची 99 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. महात्मा फुले यांनी उल्लेखलेल्या बोलक्या सुधारकांच्या उदाहरणातील हे अध्यक्ष आहेत, असेच म्हणावे लागेल, असे विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे प्रवक्ते कॉ. विनाश कदम यांनी म्हटले आहे. जात वर्चस्वातून अपमानजनक असे वक्तव्य करणाऱ्या आणि नंतर माफी मागणाऱ्या माफीवीर विश्वास पाटील यांची नेमणूक करून अखिल भारतीय वाल्यांनी आपली भूमिकाच स्पष्ट केलेली आहे. मागासवर्गीयांबद्दल जात वर्चस्वातून त्यांनी जे अकलेचे तारे तोडले त्याची बक्षीशीच मनुवाद्यांनी त्यांना अध्यक्षपद देऊन दिली असल्याचे स्पष्ट होत असल्याचे कॉ. विनाश कदम म्हणाले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनवाल्यांनी चिपळूण येथे परशुराम तर ठाणे येथे नथुराम यांच्याशी बांधिलकी दाखवली होती. तसेच आता छ. संभाजी महाराज यांची बदनामी करण्यात पुढे असलेल्या विश्वास पाटील यांची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली असल्याने त्यांचा हेतू स्पष्ट असल्याचे दिसत आहे, असाही आरोप विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रवक्ते कॉ. अविनाश कदम यांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विद्रोही परंपरेचा व विचारांचा कृतिशील वारसा जपणाऱ्या व जगणाऱ्या साहित्यिकांनी, विचारवंतांनी व कार्यकर्त्यांनी मानवतावादी मुख्य प्रवाह असणाऱ्या बुद्ध, महावीर, चार्वाक, गाडगेबाबा, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या विद्रोही परंपरेला साजेसे असे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन साताऱ्यात होणार आहे. ते वैचारिक भूमिकेला बळ देणारे असणार आहे. त्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विद्रोहीने केले आहे. मराठी संमेलनास न जाण्याचे आवाहन महात्मा फुलेंनी तत्कालीन ग्रंथकार सभेस पत्र लिहून अशा घालमोडे दादांच्या संमेलनास न जाण्याची भूमिका घेतली होती. कष्टकरी, बहुजन वर्गाच्या दुःखाची चर्चा न करणाऱ्या व त्यावर उपाय न सांगणाऱ्या अशा अखिल भारतीय मराठी संमेलनास न जाता बहुजन समाजाने आपले दुःख, वेदना, प्रश्न उपाय मांडणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन देखील अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव, सरचिटणीस डॉ जालिंदर घीगे , प्रवक्ते कॉ अविनाश कदम, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संस्थापक व माजी संमेलनाध्यक्ष वाहरूभाऊ सोनवणे, डॉ बाबुराव गुरव, ॲड. भाई सुभाष पाटील आदींनी केले आहे.
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना युरियाचा तुटवडा भासू नये म्हणून महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे तातडीने अतिरिक्त पुरवठ्याची मागणी केली आहे. सध्या राज्यातील युरियाचा साठा केवळ २.३६ लाख मेट्रिक टन इतकाच असून, खरीपातील वाढलेल्या पेरणीमुळे आणि मक्याच्या क्षेत्रात झालेल्या तब्बल ५४ टक्के वाढीमुळे खताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यासाठी १२ लाख मेट्रिक टन युरियाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची विनंती भरणे यांनी रसायन व खत मंत्री जे.पी. नड्डा यांना पत्राद्वारे केली आहे. राज्याला एप्रिल ते जुलै या कालावधीत केंद्राकडून १०.६७ लाख मेट्रिक टन युरियाचे वाटप होणे अपेक्षित होतं, मात्र, एकूण युरिया खतापैकी फक्त ७८% म्हणजे ८.४१ लाख मेट्रिक टन युरियाचा पुरवठा करण्यात आला. त्यातच ऑगस्ट महिन्यात २.७९ लाख मेट्रिक टन वाटपातील केवळ ०.९६ लाख मेट्रिक टन पुरवठा मिळाला आहे. राज्यात खरीप हंगामातील पेरणी ९८ टक्के पूर्ण झाली असून, एकूण पेरणी क्षेत्र १४४ लाख हेक्टर आहे. विशेष म्हणजे, यंदा १४.३० लाख हेक्टरवर मक्याची पेरणी झाली असून मका पेरणी तब्बल ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कापूस, मका आणि इतर पिकांसाठी टॉप ड्रेसिंग डोसची मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी टाळण्यासाठी ऑगस्ट महिन्यातील वाटपाची तातडीने पूर्तता करावी, तसेच प्रलंबित आयात पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. माहे ऑगस्ट- सप्टेंबर मध्ये झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढणार असून आगामी रब्बीसाठी १२ लाख मॅट्रिक टन युरियाच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशीही विनंती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यांत नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाले आहे. आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात शेतातील पीक देखील हातातून गेले आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली आहे. राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.सोयाबीन, मका, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी वडेट्टीवर यांनी केली. शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी. तसेच बँकेकडून शेतकऱ्यांची होणारी वसुली थांबवावी, पिक विमा कंपन्यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी आपल्या पत्रात केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे बळीराजा आस लावून बसला होता की त्याला काही मदत मिळेल पण या बैठकीत देखील शेतकऱ्यांसाठी काही निर्णय झाला नाही.शेतकरी निराश झाला आहे. त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. राज्यातील पंचनामे लवकर पूर्ण करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी अस वडेट्टीवार यांनी पत्रात नमूद केले आहे. हे ही वाचा... मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त संभाजीनगरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण:अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार, देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. 1948 साली मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला, त्या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील स्मारकावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आजच्या समारंभासाठी शहरातील सिद्धार्थ उद्यानातील स्मारकाच्या ठिकाणी कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आजपासून मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येत आहे. सविस्तर वाचा...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्याच्या विकासावर दृष्टिक्षेप टाकला. त्यांच्या भाषणानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी त्यांना 6 प्रश्न विचारलेत. या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी सरकारने मराठवाड्याच्या विकासासाठी दिलेले एकही आश्वासन पूर्ण न झाल्याचा आरोप करत सरकार सर्वच आघाड्यांवर नापास झाल्याचा आरोप केला. राज्य मंत्रिमंडळाची 2023 मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक झाली. या बैठकीत सरकारने मराठवाड्याच्या विकासासाठी विविध आश्वासने दिली होती. आजच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा सरकारने मराठवाड्यासाठी काय केले? याची उजळणी केली. महाराष्ट्राच्या औद्यागिकरणाचा पुढचा टप्पा आणि पुढील मॅग्नेट हे छत्रपती संभाजीनगर व जालना असेल. समृद्धी महामार्ग आणि डीएमआयसीमुळे संभाजीनगर आज सर्व गुंतवणुकदारांचे अतिशय आवडते स्थान झाले आहे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या भाषणानंतर आमदार अंबादास दानवे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. अंबादास दानवे याविषयी म्हणाले की, आज मुक्तिसंग्राम दिनी मुख्यमंत्री महोदयांच्या भाषणानंतर पडलेले काही प्रश्न. अपेक्षा आहे की ते उत्तर देतील.. 1. बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिराबाबत जो विषय सांगितला तो अगोदरच्या भाषणातील 'कॉपी पेस्ट' नाही का? 2. चार लाख विहिरींच्या कामांपैकी केवळ 30 हजार पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्री बोलले. केवळ आठ टक्के उद्देश गाठणे या कारभाराला शालेय भाषेप्रमाणे 'नापास' म्हणावे का? 3. पाणीपुरवठा योजनेसाठी 822 कोटी सरकारने दिले म्हणता, मग ती सरकारची मदत आहे की सॉफ्ट लोन? हे कर्ज फेडण्यासाठी महापालिकेला आपल्या प्रॉपर्टी विकण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे का? 4. उल्हास खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात आणण्यासाठीचे काम सहा महिन्यात सुरु होणार म्हणता, मग या योजनेचे सर्वेक्षण सध्या कुठे कुठे सुरु आहे ते सांगाल का? 5. ह्युंदाई कंपनीची किती गुंतवणूक मराठवाड्यात कुठे आणि केव्हा आली? 6. आज मराठवाड्यातील 4500 गावे आणि 1.75 लाख शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आहेत. यांना दिलासा देण्यासाठी नक्की कशी आणि कोण्या निकषांत सरकार मदत करणार आहे? असे विविध प्रश्न दानवे यांनी यासंबधी उपस्थित केले. 'देव त्यांना सद्बुद्धी देईल' अंबादास दानवे यांनी यावेळी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाच्या मुद्यावरूनही मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. स्वामीजी आपण या सरकारला माफ कराल अशी अपेक्षा आहे. निझामाला दे माय धरणी ठाय करून सोडणारे आपले कर्तृत्व अजून या सरकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळलेले दिसत नाही! त्यांनीच आज भाषणात एक वाक्य वापरले आहे. 'देव त्यांना सद्बुद्धी देईल'. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील अग्रभागी असलेले नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांचा हा पुतळा ऑक्टोबर २०२४ पासून अनावरणासाठी मुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत आहे. अर्धा डझनपेक्षा अधिक पत्रे मुख्यमंत्री महोदयांच्या वेळेसाठी त्यांच्या कार्यालयाला लिहिली. पण खंत आहे की, त्यांच्याकडे या पुतळ्याच्या अनावरणासाठी 15 मिनिटेही नव्हती, असे ते म्हणाले.
कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. बीडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पाच मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आंदोलनाला यश मिळल्याची भावना व्यक्त होत असून अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर २ सप्टेंबर २०२५ […] The post कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी कार्यक्रमस्थळी गोंधळ
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाचा सोहळा आज छत्रपती संभाजीनगर येथे पार पडत आहे. मुख्य शासकीय सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सिद्धार्थ उद्यानात सुरू होता. मात्र मुख्यमंत्री फडणवीस हे भाषणासाठी उभे राहिल्यानंतर ओबीसी आंदोलकांनी सभास्थळी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. सरकारने मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचे सांगत या आंदोलकांनी […] The post मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी कार्यक्रमस्थळी गोंधळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांची तब्येत खालवल्यानंतर त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात कलमाडी यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरेश कलमाडी हे त्यांनी सुरू केलेल्या पुणे फेस्टिव्हल या कार्यक्रमाला सुद्धा यंदा उपस्थित राहिले नव्हते. याच दरम्यान काल पुणे दौऱ्यावर असणारे शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन सुरेश कलमाडी यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची काल कार्यकारिणी बैठक आणि मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या आधीच शरद पवार यांनी थेट दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गाठत सुरेश कलमाडी यांची भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. शरद पवारांना पाहताच सुरेश कलमाडी यांनी पवारांना 'हाऊ आर यू' असं विचारलं. त्यावर पवारांनी कलमाडींना 'आय अॅम फाईन' असं उत्तर दिले. डॉ. धनंजय केळकर यांनी कलमाडी यांच्या तब्येतीची सविस्तर माहिती शरद पवार यांना दिली. यावेळी शरद पवार यांच्यासोबत मीरा कलमाडी, सुमिर कलमाडी, विठ्ठल मणियार, अंकुश काकडे आदी उपस्थित होते. लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता सुरेश कलमाडी यांच्या जवळच्या सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांपासून ते नियमित आरोग्य तपासणी आणि उपचारांसाठी रुग्णालयात आहेत. त्यांची प्रकृती चांगली असून, कोणतीही गंभीर आरोग्य समस्या आढळलेली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील काही दिवसांत डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. ‘सबसे बडा खिलाडी’ ते राजकारणापासून दुरावा 'सबसे बडा खिलाडी, सुरेशभाई कलमाडी' अशी ओळख असणारे कलमाडी एकेकाळी पुण्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू होते. पुण्यातून दिल्लीपर्यंत त्यांचा मोठा प्रभाव होता. मात्र, 2010 च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या गैरव्यवहारातील आरोपांमुळे त्यांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा धक्का बसला. या प्रकरणामुळे काँग्रेसने त्यांना निलंबित केले आणि त्यांना नऊ महिने तिहार जेलमध्येही राहावे लागले. तेव्हापासून ते सक्रिय राजकारणापासून दूर आहेत आणि कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती दिसत नाही. शरद पवार-सुरेश कलमाडी मैत्रीचे जुने संबंध एकेकाळी दिल्ली गाजवणाऱ्या महाराष्ट्रातील या दोन मैत्रांचे दिल्ली दरबारी चांगले सूत जुळत असे. शरद पवार आणि सुरेश कालमाडी यांच्या मैत्रीचे अनेक किस्से राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात नेहमीच चर्चेत असतात. सुरेश कलमाडी सक्रिय राजकारणापासून दूर असले तरी शरद पवारांसोबतच्या मैत्रीचे नाते आजही कायम आहे, हे या भेटीतून दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कट कारस्थानांचा कारखाना असल्याची तिखट टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. शरद पवार हे कारस्थानांचा कारखाना आहेत. कारस्थान कसे रचायचे हे त्यांच्याकडे पाहून शिकता येईल. त्यांनी निवडणूक आयोगासारख्या विश्वासार्ह संस्थेवर शंका निर्माण करायला लावून देशाची दिशाभूल केली. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे ते म्हणालेत. गोपीचंद पडळकर बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शरद पवार हे कट कारस्थानाचा कारखाना आहेत. कारस्थान कसे रचायचे हे त्यांच्याकडे पाहून शिकता येईल. मारकडवाडी प्रकरणात त्यांनी देशाची दिशाभूल करत निवडणूक आयोगाविषयी संशयावस्था निर्माण केली. आयोगाची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. निवडणूक या देशाचा गाभा आहे. त्यावर षडयंत्र करून शंका घेण्यास भाग पाडणे हा देशद्रोह आहे. त्यामुळे पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. 50 वर्षांपूर्वीची गोष्ट आठवते, पण 8 महिन्यांपूर्वीची नाही शरद पवार हे आधुनिक काळातील नारदमुनी आहेत. एकीकडे ते मंडल यात्रा काढतात, तर दुसरीकडे त्यांचा नात मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून आंदोलन करतो. ही दुतोंडी भूमिका आहे. ते कारस्थान रचून एखाद्या यंत्रणेविषयी संशय निर्माण करतात. चिठ्ठ्या गिळता येतात. पळवता येतात. त्यामुळे सहकार क्षेत्रात शरद पवारांचे प्राबल्य आहे. सहकारात ईव्हीएम आले, तर त्यांचे प्राबल्य संपुष्टात येईल. निवडणूक हा या देशाचा गाभा आहे. त्यावर षडयंत्र रचून शंका घेण्यास भाग पाडणे हा देशद्रोह आहे. पवारांनी स्वतः सांगितले की, माझ्याकडे 2 जण आले होते. त्यांनी विधानसभा निवडणुकीत 160 आमदार निवडून आणण्याची ऑफर दिली होती. ही ऑफर दिल्यानंतर त्यांनी तत्काळ गृहमंत्र्यांना फोन करून त्याची माहिती देणे गरजेचे होते. पण शरद पवारांनी हा प्लॅन राहुल गांधींना सांगितला. त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर 8 महिन्यांनी त्यांनी ही गोष्ट सार्वजनिक केली. तुम्ही पोलिसांकडे जाण्याऐवजी राहुल गांधींकडे गेला म्हणजे हे कारस्थानच आहे, असे पडळकर म्हणाले. शरद पवारांना आता ते 2 जण कोण होते हे आठवत नाही. त्यांना 50 वर्षांपूर्वी भेटलेले लोक व गोष्टी आठवतात. पण 8 महिन्यांपूर्वी भेटण्यास आलेले लोक का आठवत नाहीत? असा सवालही गोपीचंद पडळकर यांनी यावेळी उपस्थित केला. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा निषेध गोपीचंद पडळकरांनी यावेळी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याच्या घटनेचाही निषेध केला. माँ साहेब आमच्या श्रद्धास्थानी आहेत. त्यांच्या पुतळ्यावर रंग फेकणे योग्य नाही. पोलिस या प्रकरणात योग्य ती कारवाई करतील, असे ते म्हणाले. दरम्यान, मुंबईतील दादर परिसरात मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे. या पुतळ्यावर आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला. या प्रकरणी राज्याच्या राजधानीत मोठा तणाव निर्माण झाला आहे. हे ही वाचा...
जनाब संजय राऊत यांची आज पत्रकार परिषद झाली नाही. पण उबाठाच्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. सामना अग्रलेखात म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संधी गमावली आहे. खरं तर संधी ही उद्धव ठाकरे आणि उबाठाने गमावली आहे. पंतप्रधान मोदी भविष्य घडवत आहे तर उबाठाचे भविष्य इतिहास जमा होत आहे, हे उद्धव ठाकरे आणि उबाठाने लक्षात ठेवावे, असा टोला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आज आम्ही सेवा पंधरवाडा म्हणून आम्ही मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत.आम्ही जनतेची सेवा करत आहोत तर तुम्ही केवळ मेवा खाण्याचे काम करत आहात. आमचा सेवा पंधरवाडा असतो तर तुमचा उबाठाचा मेवा पंधरवाडा असतो हे जनतेला माहिती आहे. मोदी यांनी देशाला विकासाकडे नेण्याचे काम केलं आहे. तुम्ही केवळ अग्रलेख लिहिण्यात धन्यता मानत आहात हे वास्तव आहे. उबाठाचे राजकारण मागे फिरतंय नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हा देश प्रगती करत आहे. जनतेचा नेता म्हणून मोदी यांची ओळख आहे. तर तुम्ही पराभवाच्या छायेत अजून देखील जगत आहात. देश पुढे जात असला तरी तुमचे राजकारण मागे फिरत आहे हे इथली जनता जाणते. उद्धव ठाकरे 'घरबसल्या मुख्यमंत्री' नवनाथ बन म्हणाले की, मोदींनी संधी गमावली नाही, तर इतिहास घडवला. राम मंदिराचे शतकांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले, कलम 370 हटवले आणि देशाला नवा मार्ग दाखवला. संधी उद्धवजी ठाकरेंनी गमावली. अडीच वर्षांत त्यांनी काहीच केले नाही. त्यामुळे इतिहास मोदींना 'युगपुरुष' म्हणून, तर उद्धवजींना 'घरबसल्या मुख्यमंत्री' म्हणून ओळखेल. राहुल गांधींसारखे नेतृत्व काळे नवनाथ बन म्हणाले की, मासाहेब आमच्या सर्व मराठी जनतेच्या आदर्श आहेत. त्यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना गजाआड केल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चितच कारवाई करतील. मोदींचा वाढदिवस काळा नाही, सुवर्ण दिवस आहे. काळा दिवस तर आणीबाणीचा होता, आणि काळे नेतृत्व राहुल गांधींसारखे आहे, असे म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांच्या 'मोदींचा वाढदिवस काळा दिवस' या विधानावर बन यांनी पलटवार केला आहे. तेव्हा व्यंगचित्र काढायला हवं होतं नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच फोडाफोडीचे राजकारण केले आहे. फडणवीस यांनी सर्व समाजाला एकत्र आणले आहे असे त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या आरोपावर बोलताना म्हटले आहे. तर राज ठाकरेंनी भारत-पाक सामन्यावर व्यंगचित्र काढण्याऐवजी, 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये जवानांनी पराक्रम गाजवला तेव्हा त्यांचे अभिनंदन करणारे व्यंगचित्र काढायला हवे होते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. रोहित पवारांवर हल्लाबोल नवनाथ बन म्हणाले की, रोहितजी, तुमचा आत्मविश्वास फक्त दीड हजार मतांवर आणि अजित दादांच्या आशीर्वादावरच उभा आहे. देवेंद्र फडणवीस यांचा आत्मविश्वास मात्र जनतेच्या पाठिंब्यावर आहे. त्यांनी सलग तीनवेळा मुख्यमंत्रीपद मिळवले आहे, असे म्हणत त्यांनी रोहित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
म्हशीने जन्म दिला दुतोंडी रेडकू
कोल्हापूर : प्रतिनिधी कधी कधी काही अशा घटना घडत असतात की, निसर्गाचा चमत्कार म्हणूनच त्याकडे पाहावे लागते. कोणत्याही जीवाचा जन्म ही एक अलौकिक गोष्ट असते. मात्र कधी कधी जन्मावेळीच काही प्राण्यांमध्ये अजब वैशिष्ट्ये पाहायला मिळत असतात. अशीच एक अचंबित करणारी घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापुरातल्या एका शेतक-याच्या म्हशीने दुतोंडी रेडकाला जन्म दिल्यामुळे सोशल मीडियावर या […] The post म्हशीने जन्म दिला दुतोंडी रेडकू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिवसेनेच्या शिंदे व ठाकरे गटातील राजकीय हाडवैर सर्वश्रूत आहे. या दोन्ही पक्षांचे पक्षप्रमुख संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर राजकीय चिखलफेक करतात. विशेषतः ठाकरे गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांना गद्दार गँग म्हणून चिडवतो, तर शिंदे गट उद्धव यांच्यावर हिंदुत्व सोडल्याची विखारी टीका करतो. ही टीका-टिप्पणी सुरू असताना आता थेट शिंदे गटाच्या कार्यालयातून ठाकरे गटाच्या एका कार्यकर्तीला फोन केल्याची घटना घडली आहे. मग काय? थेट शिंदे गटाच्या कार्यालयातून वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यासाठी फोन आल्यानंतर सदर कार्यकर्तीने तो फोन रेकॉर्डिंगवर टाकला आणि लगेच व्हायरल केला. त्यानंतर विविध प्रश्न विचारून त्या कार्यकर्तीने फोन करणाऱ्या व्यक्तीला अक्षरशः भंडावून सोडले. त्याचे झाले असे की, शिंदे गटाच्या कार्यालयातून लावण्यात आलेला फोन चक्क ठाकरे गटाच्या सोशल मीडिया राज्य समन्वयक अयोध्या पौळ यांना लागला. त्यानंतर त्या दोघांत काय संभाषण झाले हे तुम्ही खाली ऐका... अयोध्या पौळ याविषयी सांगतात, जुलै महिन्यातच मी कॉल रेकॉर्डिंग बंद केले होते. आज एक मस्त फोन आला मग काय, टाकला कॉल रेकॉर्डिंगला आणि... पुढचं तुम्हीच ऐका..
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे अर्थात केशव सीताराम ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. आज आजोबा हयात असते तर धर्माच्या नावाखाली, उत्सवाच्या नावाखाली देवालाच ताब्यात घेण्याचे, त्याला पण आर्थिक महत्वकांक्षेच्या चौकटीत बसवण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत ते पाहून, धर्माचा बाजार मांडणाऱ्या आणि त्याकडे डोळे मिटून बघणाऱ्या व्यवस्थेवर प्रहार केले असते, असे ते त्यांची आठवण काढताना म्हणालेत. प्रबोधनकार ठाकरे हे बाळासाहेब व श्रीकांत ठाकरे यांचे वडील, तर उद्धव व राज ठाकरेंचे आजोबा होते. त्यांची आज जयंती आहे. प्रबोधनकार संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक पुढारी होते. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, असमानता व अन्यायाविरोधात लढा उभारला. आपल्या प्रखर लेखणीने सामाजिक वाईटाशी दोनहात करत समाजाच्या उत्थानाचा प्रयत्न केला. आपले क्रांतिकारी विचार व सडेतोड लेखनामुळे त्यांना प्रबोधनकार ही उपाधी मिळाली. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज एका पोस्टद्वारे त्यांच्या कार्याची महती विषद केली. राज ठाकरे काय म्हणाले आपल्या पोस्टमध्ये? राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, आज आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती... आजोबांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रं वापरून पुराणमतवाद्यांशी दोन हात केले. महात्मा ज्योतिबा फुलेंचं साहित्य हे आमच्या आजोबांचं प्रेरणास्रोत. यातूनच त्यांच्या समाजसुधारणेच्या कल्पना पुरेशा स्पष्ट झाल्या आणि त्यानंतर आजोबांनी सामाजिक कार्याचा पाया घातलाच पण त्यात ढवळाढवळ करणाऱ्यांची पार दाणादाण उडवून दिली. आज जेंव्हा एखाद्या कळकळीच्या विषयवार तरी भूमिका घ्या म्हणून साहित्यिक आणि कलाकारांना सांगावं लागतं, त्यावेळेस समाजसुधारणेची स्पष्ट भूमिका घेऊन अफाट साहित्य निर्माण करून वेळेस अंगावर येणाऱ्या सगळ्या पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणाऱ्या आमच्या आजोबांच कौतुक करावं तितकं कमी आहे. संयुक्त महाराष्ट्र चळ्वळीतलं त्यांचं योगदान अतुलनीय आहे. ही अशी एक चळवळ होती ज्यात संपूर्ण महाराष्ट्राची एकजूट दिसली, ती पक्षविरहित होती, विचारधारा विरहित होती, या सगळ्या शक्तींना एकत्र ठेवण्याचं काम आजोबांनी केलं. आजोबांचं एक पुस्तक आहे त्यांचं नाव आहे 'देवांचा धर्म की धर्माची देवळे'... आज आजोबा हयात असते तर धर्माच्या नावाखाली, उत्सवाच्या नावाखाली देवालाच ताब्यात घेण्याचे, त्याला पण आर्थिक महत्वकांक्षेच्या चौकटीत बसवण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत ते पाहून, धर्माचा बाजार मांडणाऱ्या आणि त्याकडे डोळे मिटून बघणाऱ्या व्यवस्थेवर प्रहार केले असते.असो. पण आम्हा सर्व ठाकरे परिवाराला ओळख , ताकद, आणि विचारांची स्पष्टता मिळाली ती निव्वळ आजोबांमुळेच. आजोबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असे ते म्हणाले. या पोस्टसोबत त्यांनी आपला आजोबांसोबतचा एक फोटोही टाकला आहे. त्यात ते प्रबोधनकारांसोबत बसलेले दिसतात. व्यंगचित्रातूनही जय अमित शहांवर निशाणा दुसरीकडे, राज ठाकरे यांनी भारत - पाक क्रिकेट सामन्यावरून एका व्यंगचित्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व त्यांचे सुपुत्र जय शहा यांच्यावर निशाणा साधला. या व्यंगचित्रात शहा पितापुत्र पहलगाम हल्ल्यात ठार झालेल्या भारतीयांना भारताने क्रिकेट सामन्यात पाकवर विजय मिळवल्याचे सांगत त्यांना उठवण्याचा प्रयत्न करत असताना दिसून येत आहेत. त्यांच्या या व्यंगचित्राची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. हे ही वाचा... धुरंधर; प्रबोधनकार ठाकरे:मराठी समाज मनात मोक्याच्या ठिकाणी पक्क्या गाठी मारून जातिभेदांच्या जखमांचा खोलवर शोध घेणारा बहुजन हिंदुत्त्ववादी भाग्यदर्शी लोखंडे | छत्रपती संभाजीनगर - माणुसकी हा शब्द मानवतेच्या सर्वोच्च मूल्यांचे प्रतीक आहे. माणुसकी ही कोणत्याही जाती, धर्म, भाषा किंवा सीमांच्या पलीकडे जाऊन माणसाला माणसाशी जोडणारी भावना आहे. ती व्यक्तीच्या हृदयातून निर्माण होते आणि कृतीतून व्यक्त होते. मग एखाद्याला संकटात मदत करणे असो, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे असो किंवा समाजातील दुबळ्या घटकांना आधार देणे असो. ती वेळोवेळी आपली उपस्थिती जाणवून देते. वाचा सविस्तर
मुंबईकरांच्या प्रवासाला अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (MMRDA) ने मुंबई मोनो रेल सेवा 20 सप्टेंबर 2025 पासून तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा तात्पुरता 'ब्लॉक' नवीन रोलिंग स्टॉक, प्रगत सीबीटीसी (CBTC) सिग्नलिंग प्रणाली आणि जुन्या गाड्यांच्या दुरुस्तीसाठी घेण्यात आला आहे. यामुळे भविष्यात मोनो रेल अधिक सुरक्षित, सुरळीत आणि विश्वासार्ह होईल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे. चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या दोन्ही दिशांमधील मोनो रेल सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन एमएमआरडीएच्या वतीने करण्यात आले आहे. एमएमआरडीएचे आयुक्त काय म्हणाले? एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, हा तात्पुरता ब्लॉक मोनो रेलचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. नवीन गाड्या, अत्याधुनिक सीबीटीसी सिग्नलिंग आणि जुन्या गाड्यांची दुरुस्ती करून आम्ही ही प्रणाली अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सज्ज बनवत आहोत. आम्ही प्रवाशांच्या संयमाचे कौतुक करतो आणि खात्री देतो की जेव्हा मोनोरेल पुन्हा सुरू होईल, तेव्हा ती अधिक सामर्थ्याने आणि चांगल्या सेवेसह मुंबईकरांची सेवा करेल. सुरू असलेले प्रमुख बदल आधुनिक सिग्नलिंग प्रणाली : हैदराबादमध्ये विकसित झालेली सीबीटीसी तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक प्रणाली प्रथमच मुंबई मोनोरेलमध्ये बसवली जात आहे. इंटरलॉकिंग व उपकरणे : 32 ठिकाणी 5 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग बसवले गेले असून चाचणी सुरू आहे. 260 वाय-फाय ऍक्सेस पॉईंट्स, 500 RFID टॅग्स, 90 ट्रेन डिटेक्शन सिस्टम्स व अनेक WATC युनिट्स बसवले गेले आहेत. रेल्वे रेक्स : एमएमआरडीएकडून ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत १० नवे रेक्स मेधा (MEDHA) व एसएमएच रेल यांच्या सहकार्याने विकत घेतले आहेत. या प्रणालीमुळे सुरक्षितता वाढणार, गाड्यांमधील अंतर कमी होणार आणि सेवा अधिक विश्वासार्ह होणार असल्याचे सांगितले जात आहे. सेवा बंद ठेवणे का आवश्यक? सध्या मोनो रेलची सेवा दररोज सकाळी 6.15 ते रात्री 11.30 पर्यंत सुरू असते. त्यामुळं फक्त रात्री 3.5 तासच इन्स्टॉलेशन व चाचणीसाठी वेळ उपलब्ध होतो. दरवेळी पॉवर रेल बंद करणे, डिस्चार्ज व रीचार्ज करण्याच्या प्रक्रियेमुळे गती मंदावते. सेवा बंद ठेवल्यामुळे अखंडपणे इन्स्टॉलेशन, कमिशनिंग आणि चाचणी करता येईल. याचबरोबर जुन्या रेक्सचे ओव्हरहॉलिंग आणि रेट्रोफिटिंग होऊन तांत्रिक बिघाड पूर्णपणे टळणार आहे. आगामी मेट्रो प्रकल्पांसाठी मनुष्यबळ प्रशिक्षण व पुनर्विनियोजन करण्यासही ही विश्रांती उपयुक्त ठरणार आहे. 2 महिन्यांत तीनदा अडकली मोनो रेल दरम्यान, मागील दोन महिन्यांत तांत्रिक बिघाडांमुळे मोनो रेल सेवा तीनवेळा अधांतरी अडकली होती. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. या घटनांसंदर्भात एमएमआरडीएने चौकशी समिती नेमली असून, दीर्घकालीन विश्वासार्हतेसाठी सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
गेल्या 4 महिन्यांपासून (15 मे ते 15 सप्टेंबर) सतत पाऊस पडत आहे. राज्यात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे मी महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी जो शब्द दिला होता की आमचे सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी देऊ हे शब्द पाळावा आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड अस्वस्थता आहे. सरकारने जो जी आर काढला आहे त्यातून नक्की कुणाला आरक्षण मिळाले आहे हे कुणालाच समजत नाहीये. सरकारकडून कन्फ्युजिंग सिग्नल हे सरकार देत आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे. तर ओला दुष्काळ, राज्याची आर्थिक परिस्थिती असे अनेक विषय राज्यात असल्याची आठवण त्यांनी सत्ताधाऱ्यांना करुण दिली. फडणवीसांनी जनतेला समजून सांगावे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगले प्रेझेंटेशन करावं आणि राज्याला आज आरक्षणाची परिस्थिती काय आहे? सरकारने जो नवीन जी आर काढला आहे त्यांचा किती लोकांना फायदा होणार आहे, झाला आहे, त्यांची संपूर्ण माहिती पारदर्शकपणे राज्यातील जनतेला समजून सांगावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे आपण त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजे. ठाकरेंवर टीका करणे दुर्दैवी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंवर आरोप करणाऱ्या सोबत असलेली मंत्रिमंडळातील अर्धी टीम तर तीच आहे. उद्धव ठाकरेंवर आरोप करणं हे दुर्दैवी आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा चौकशी लावा ना? उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात खूप चांगले काम केले आहे, असे भारत सरकारने म्हटले आहे. ते सरकार भाजप चेच आहे ना? मनपा, जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर अशी टीका करणे अत्यंत दुर्दैवी आहे. शहांची भेट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महिनाभरापूर्वी मी गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी गेले होते, यावेळी मी त्यांना विनंती केली होती की महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अमित शहा यांच्याकडे दोन खात्यांचा कारभार आहे, एक सहकार आणि दुसरे गृह खाते. अतिवृष्टीच्या काळात एनडीआरएफची टीम मदतीसाठी येते ती गृहमंत्रालयाच्या अखत्यारित असते. तर सरसकट कर्जमाफीची जी आमची मागणी आहे ती सहकार विभागाच्या मार्फत अर्थ मंत्रालयाकडे जात असते अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
शिवाजी पार्क परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. अज्ञात व्यक्तीने मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शिवसैनिकांनी पुतळ्याची साफसफाई केली आहे. पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. सध्या परिसरात खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वातावरण दूषित करण्यासाठी कोणीतरी हे कृत्य केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. या घटनेमागे एखादा समाजकंटक आहे की माथेफिरू आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. सकाळी 6.10 वाजल्यानंतर घटना घडली असावी स्थानिक आमदार महेश सावंत यांनी सांगितले की, आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले. त्याच वेळी पोलिसही दाखल झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार सकाळी 6.10 वाजेपर्यंत सर्व काही व्यवस्थित असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. याचा अर्थ ही घटना सकाळी 6.10 वाजल्यानंतर झाली असावी अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी दुपारपर्यंत आरोपीची माहिती समोर येणार असल्याचे सांगण्यात आले. अनिल देसाईंचा सरकारचा आरोप कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी केला आहे. या समाजकंटकी किंवा भेकडांवर कुठले संस्कार नक्कीच झालेले नसतील. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पण राज्यातील पोलिस यंत्रणा आणि सरकार काय करतंय? असा संतप्त सवाल अनिल देसाई यांनी उपस्थित केला आहे. निषेध करण्याच्या पलिकडची ही गोष्ट आहे. सरकारचे अपयश प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतंय. उद्धव ठाकरेंना या प्रकाराची कल्पना दिलेली आहे. आम्ही आमच्या पातळीवर जे करायचे आहे, ते करतोय, असे अनिल देसाई म्हणाले. अशा समाजकंटकांना आजच्या प्रकाराचे प्रत्युत्तर मिळेल, असा इशाराही अनिल देसाई यांनी दिला. शिवसैनिकांनी पुतळा परिसर स्वच्छ केला आहे. शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी असा प्रकार घडतोय, यावरून सध्या मुंबई सुरक्षित नाहीये, असे दिसतंय. सरकार भलत्यासलत्या कार्यक्रमांमध्ये मश्गुल आहे. आजची घटना म्हणजे सरकारचे अपयश असून, ते महाराष्ट्रापुढे आले आहे, अशी टीकाही अनिल देसाई यांनी सरकारवर केली. शिवसैनिकांमध्ये मीनाताईंविषयी आदराचे स्थान बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिकांमध्ये एक आदराचे स्थान होते. शिवसैनिक त्यांना 'माँसाहेब' असे संबोधत असत आणि त्यांचा प्रचंड आदर करत. 1995 साली मीनाताई ठाकरे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, शिवसैनिकांनी त्यांच्या स्मृती कायम जपण्यासाठी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांचा अर्धपुतळा उभारला. तेव्हापासून आजपर्यंत हा पुतळा त्याच ठिकाणी उभा आहे,.
औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू शिवारातील नाल्याच्या पाण्यात बुधवारी ता. 17 सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून औंढा नागनाथ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेहाच्या अंगावर कपडेच नसल्याने त्याची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटू शिवारातून नाला वाहतो. मागील काही दिवसांत जिल्हाभरात पडलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला होता. त्यामुळे नदी, नाले भरून वाहू लागले होते. मंगळवारी रात्री पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, आज सकाळी काही शेतकरी शेतात जात असतांना त्यांना नाल्याच्या पाण्यात एक मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती तातडीने औेंढा नागनाथ पोलिसांना कळवण्यात आली. पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार रविकांत हरकाळ, किशोर पारीसकर, अमोल चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर गावकरीही मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता मृतदेहाच्या अंगावर कुठलेही कपडे नव्हते शिवाय ओळख पटवण्यासाठी कुठलेही धागेदोरे आढळून आले नाहीत. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला आहे. सदर मृतदेह इतर ठिकाणाच्या नदी किंवा नाल्याच्या पाण्यातून वाहून आला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी जिल्हयातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेण्यास सुरवात करण्यात आली आहे. या शिवाय विदर्भातून ही माहिती घेण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरु केले आहेत.
शाळेतून घरी जात असलेल्या एका 13 वर्षीय मुलाला रस्त्यात अडवून त्याच्या ओळखीतील एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलांविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलाच्या आईने बाणेर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अल्पवयीन आरोपी विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 13 वर्षीय मुलगा 11 सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी निघाला होता. त्यावेळी आरोपी अल्पवयीनाने त्याला रस्त्यातच अडवले. खेळायला जाऊ असा बहाणा केला. त्यानंतर मुलाला शाळेच्या परिसरात एका झाडाजवळ नेऊन त्याला पैसे देण्याचे आमिष दाखविले. मुलावर त्याने बळजबरीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलाने त्याला विरोध केल्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत सांगण्यात आहे. पोलिस उपनिरीक्षक एस सानप पुढील तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी गुन्हा कॉलेज वरून घरी जात असताना अल्पवयीन मुलीची बॅग व मोबाईल हिसकावत घेऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश चंद्रकांत जगताप (25, रा. चैत्र बन वसाहत, बिबवेवाडी) याच्यावर बाल लैंगिक अत्याचार व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी एका 17 वर्षीय मुलीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. महिलेला फिरायला जाऊ म्हणत विनयभंग महिलेला फिरायला जाऊ म्हणत कॉल करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम लोणे (40, रा. हिंदवीनगर, उरूळी देवाची) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 38 वर्षीय महिलेनी तक्रार दिली आहे. आरोपीने फिर्यादी महिलेच्या मोबाईल वर कॉल करून चला आपण फिरायला जाऊया म्हणून जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत सांगितले आहे.
कोंढव्यात रिक्षाचालकाला मारहाण:स्मशानभूमीजवळ कोयत्याचा धाक दाखवून केली हल्ला, दोघांना अटक
पुणे शहरात कोंढव्यात टोळक्याने एका रिक्षा चालक तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहम्मद सोहेल उर्फ पंजाबी आजम खान (वय 25, रा. नवाजीश पार्क, कोंढवा) याने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मोहम्मद खान हा रिक्षा चालक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक खान हा साळुंखे विहार रस्त्यावरील स्मशानभूमी जवळून निघाला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला अडवून पट्ट्याने मारहाण केली. एका आरोपीने त्याला कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. पसार झालेल्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून, पसार साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक एन महाडिक तपास करत आहेत. बिबवेवाडीत बेकरी कामगाराला मारहाण बिबवेवाडी भागात एका बेकरी कामगाराला दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी कुणाल वैराट, मंगेश माने (दाेघे रा. बिबवेवाडी गावठाण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अर्श फैजुल अन्सारी (वय 17) याने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अन्सारी हा बिबवेवाडी गावठाण परिसरातील एका बेकरीत कामाला आहे. 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी किरकोळ कारणावरून त्याचा आरोपींशी वाद झाला. आरोपींनी अन्सारीला मारहाण केली. दुकानातील वजन काटा फेकून मारला. त्यावेळी बेकरीतील कामगारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी कामगारांना मारण्याची धमकी दिली. पोलिस उपनिरीक्षक बाळू चोपडे तपास करत आहेत.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात राजकीय वातावरण तापले असताना, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंग चित्राच्या माध्यमातून थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'नक्की कोण जिंकलं?' असा सवाल करत त्यांनी अमित शहा आणि जय शहा यांच्यावर सूचक टीका केली असून, या सामन्यामागील राजकीय आणि आर्थिक हित संबंधांवरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आशिया कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून देशभरात निर्माण झालेल्या राजकीय वादात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सहभाग घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक व्यंगचित्र प्रसिद्ध करून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि आयसीसी अध्यक्ष जय शहा यांच्यावर टीका केली आहे. नेमके राज ठाकरेंच्या व्यंगचित्रात काय? या व्यंगचित्रात नक्की कोण जिंकलं? आणि नक्की कोण हरलं? असा रोखठोक सवाल विचारण्यात आला आहे. चित्रात अमित शहा आणि जय शहा भारताच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना दाखवले आहेत, तर दुसऱ्या बाजूला पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या भारतीयांचे मृतदेह दाखवले आहेत. या माध्यमातून ठाकरे यांनी क्रिकेट सामन्यामागील राजकीय आणि आर्थिक स्वार्थावर उपरोधिक टीका केली आहे. उबाठाकडून सरकारवर टीका दरम्यान, पहलगाम येथे 26 भारतीयांचे प्राण गेले असतानाही पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळणे योग्य आहे का, असा सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि अन्य विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, हे मोदींचे जुने विधान आठववत, विरोधकांनी मग रक्त आणि क्रिकेट एकत्र कसे? असा सवाल उपस्थित केला. राज ठाकरे यांनी अनेक वर्षांनंतर पुन्हा व्यंगचित्र माध्यमातून आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या नव्या शैलीतील राजकीय टीकेची सध्या चर्चा जोरात आहे. पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्राचे शत्रू- राऊत दुसरीकडे संजय राऊत यांनी म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उबाठाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी हे आमचे वैयक्तिक शत्रू नाहीत, पण ते शिवसेनेचे आणि पर्यायाने शिवरायांच्या महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असे विधान त्यांनी केले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांची शिवसेना त्यांनी एका द्वेषापोटी फोडली. महाराष्ट्र हे लक्षात ठेवेल.मोदी यांनी आत्ममग्नता सोडून आत्मचिंतन करावे. त्यांना इतिहास घडवण्याची संधी होती, पण त्यांनी आपला संपूर्ण कालखंड थिल्लर राजकारणात घालवून एक महान संधी गमावली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी जेसीबीद्वारे नागपुरी गेट चौक, जमील कॉलनी, ट्रान्सपोर्ट नगर, वलगाव रोड, वली चौक परिसरात अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई केली. मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवली. या कारवाईत रस्ते, फुटपाथ व सार्वजनिक ठिकाणी केलेली अतिक्रमणे हटवण्यात आली. यात झोपड्या, शेड, पत्र्याचे शेड, बेकायदेशीर बांधकाम तसेच व्यावसायिकांनी पसरवलेल्या जागेवरील सामग्री हटवण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणे मोकळे होऊन वाहतूक सुलभ झाली आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून ही कारवाई केली. पुन्हा अतिक्रमण करू नये, अन्यथा कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. ट्रान्सपोर्ट नगर परिसरात राबवलेली अतिक्रमण हटाव मोहीम ही नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरळीत वाहतुकीसाठी आहे. रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक ठिकाणे ही सर्वांची सामाईक मालमत्ता असून त्यावर कोणीही बेकायदेशीरपणे कब्जा करू नये. मनपाच्या वारंवार सुचनांनंतरही काही ठिकाणी अतिक्रमण केले जात असल्यामुळे ही कारवाई अपरिहार्य ठरली. नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण टाळून मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त सौम्या शर्मा यांनी केले. सकाळी ११ वाजतापासून जेसीबीद्वारे नागपुरी गेट चौक ते जमील कॉलनी, ते ट्रान्सपोर्ट नगर ते वलगाव रोड, वली चौकापर्यंत मनपाच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. जोपर्यंत शहरातील रस्ते व फुटपाथ मोकळे होणार नाही तोपर्यंत ही अतिक्रमणाची कारवाई सुरू राहील. ज्यांनी अतिक्रमण केले असेल त्या सर्वांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा मनपा प्रशासन काढून घेईल. शहरातील मुख्य बाजारपेठ कापड बाजारातील अतिक्रमणांवरही कारवाई करणार असल्याचे मनपाच्या अतिक्रमण पथक प्रमुखांनी सांगितले. कारवाई दरम्यान सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले, उपअभियंता विवेक देशमुख, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, निरीक्षक अन्सार अहमद, बबलू सोनवणे, शुभम पांडे, अतिक्रमण विभागातील कर्मचारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
बेपत्ता मुलाचा शेततळ्यात मृतदेह:वीरगव्हाण येथील घटना; दोन दिवसांपासून झाला होता बेपत्ता
कुऱ्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वीरगव्हाण येथील ११ वर्षीय मुलगा रविवारपासून (दि. १४) बेपत्ता होता. त्या मुलाचा नातेवाईक, कुटुंबीय, एलसीबी तसेच ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू होता. दरम्यान या चिमुकल्याचा मंगळवारी (दि. १६) गावापासून काही अंतरावरील एका मोठ्या स्वरूपातील शेततळ्यात मृतदेह तरंगताना दिसला. या घटनेने गावात खळबळ उडाली असून मुलगा शेततळ्यावर कधी व का गेला, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. ध्रुव विजय राठोड (११, रा. वीरगव्हाण, ता. तिवसा) असे मृत मुलाचे नाव आहे. ध्रुव राठोड हा रविवारपासून बेपत्ता झाला होता. याबाबत कुटुंबीयांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली होती. मुलाचा कुटुंबीयांकडून शोध सुरू होता. मात्र दोन दिवस मुलगा कुठेही दिसला नाही. दरम्यान मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावापासून काही अंतरावरील एका शेतातील शेततळ्यात एक निर्वस्त्र मृतदेह तरंगताना आढळला. ही माहिती गावकऱ्यांना मिळाली. त्यावेळी गावकरी तसेच कुऱ्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह ध्रुवचा असल्याचे समोर आले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. मात्र ध्रुव शेततळ्यावर कसा व कधी गेला. कोणासोबत गेला. त्याचे कपडे कुठे आहेत, असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. कुऱ्हा पोलिसांकडे मंगळवारी रात्रीपर्यंत या बाबतीत कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नव्हते.
शहरातील अनेक भागांत रस्त्यांची काहीशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. २०० ते १५० मीटरच्या डांबरी रस्त्यावर मध्येच अर्धवट कुठेतरी सिमेंट काँक्रीटचा ५० मीटरचा रस्ता तयार करून ठेवण्यात आला. या रस्त्याचे उतारही (रॅम्प) व्यवस्थित नाहीत. त्यामुळे अशा धोकादायक रस्त्यावर वाहन चढवताना आणि त्यावरून उतरताना नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे. वाहन वर चढवताना किंवा उतरवताना वाहनासह शरीराला जोरात धक्का बसतो. बरेचदा वाहनावरून नियंत्रण सुटून वाहन खाली पडण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे शहरातील अनेक नागरिकांना दुखापती झाल्या आहेत. शहरातील जुना भाग, पन्नालाल नगर, गुरुकृपा कॉलनी तसेच नवीन भागात असे अर्धवट रस्ते तयार झाले आहेत. निधी आला की उर्वरित रस्ता पूर्ण करू, असे सांगून नागरिकांची बोळवण केली जात आहे. परंतु, मनपाकडे निधीची चणचण असल्यामुळे हा रस्ता केव्हा पूर्ण होईल ते काही सांगता येत नाही. मनपा सध्या मोजक्याच डांबरी रस्त्यांना मंजुरी देत आहे. सिमेंट काँक्रीटचा १०० मीटर रस्ता तयार करण्यासाठी किमान ८ ते १० लाख रुपये खर्च येतो. त्यात १०० मीटरचे किमान ३ डांबरी रस्ते तयार होतात. सिमेंट काँक्रीटचे रस्ते बरीच वर्षे टिकतात. त्याचवेळी डांबरी रस्ते मात्र एका वर्षातच उखडतात. या रस्त्यावर खड्डे पडले की तिथून वाहतूक करणे {उर्वरित. पान ४ निधी नसल्याने अडचण काँक्रीटच्या मजबूत रस्त्यांची मागणी लोकांकडून होत आहे. मात्र मनपाकडे पुरेसा निधी नसल्याने जेवढा रस्ता मंजूर झाला तेवढा पूर्ण केला जात आहे. हा रस्ता पूर्ण केला नाही तर त्याचा निधी इतरत्र खर्च होईल, या भीतीमुळे असे अर्धवट रस्ते तयार होत आहेत. त्यामुळे अंतर्गत भागात गुळगुळीत सिमेंट रस्ते व त्याला जोडलेले उखडलेले डांबरी रस्ते असेच दृश्य दिसतेय. वाहनाचे पार्ट््स, शरीराची हाडे होतात खिळखिळी ^शहराच्या जुन्या भागात तसेच बरेच ठिकाणी रॅम्प असलेले रस्ते आहेत. त्याच प्रमाणे नवीन शहरी भागात असेच रस्ते आहेत. तिथे अर्धवट सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवून ठेवलेत. त्यावरून वाहन चालवणे क्लेशदायक आहे. वाहनाचे पार्ट््स व शरीराची हाडेही खिळखिळी होत आहेत. -सागर वेलणकर, नागरिक. खड्ड्यात नियंत्रण सुटून पडल्यामुळे पाय फ्रॅक्चर ^वाहन सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर चढवताना त्रास होतो. वाहनाचा वेग जास्त असला तर जबर धक्का बसतो आणि वेग कमी असेल तर तोल जातो. रॅम्पच्या आधी खोल खड्डा असल्याने पाय खाली टेकला नाही. परिणामी तोल जाऊन माझ्या पायावरच गाडी पडल्यामुळे तो फ्रॅक्चर झाला. -आस्था सातव, नागरिक
बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश नको, या मागणीसाठी आता विरोध दिवसेंदिवस वाढतच आहे. सकल आदिवासी एकता महासंघाने आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. बंजारा समाजाच्या अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षणाच्या मागणीला विरोध केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करुन अनुसूचित जमातीचे एस टी चे आरक्षण देण्याची मागणी करीत गोरसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन सादर करण्यात आले होते. मराठा आरक्षणाबाबत शासन आदेश जारी झाल्यानंतर आता आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. मात्र या मागणीला विरोध होत आहे. दरम्यान सकल आदिवासी महासंघाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेत आपल्या मागण्या लावून धरल्या. यावेळी कार्याध्यक्ष संग्रामसिह सोळंके, अध्यक्ष जानकिराम डाखोरे, सचिव विजय हळदे, राजू गोंधळेकर, आर. डी. सोळंके, धनंजय गोंधळेकर, महेंद्रसिंग राठोड, सुरेश सोळहके यांच्या यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी होते. बंजारा समाजाच्या काही संघटना व काही राजकीय नेत्यांकडून हैदराबाद गॅझेटचा आधार घेवून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी असंवैधानिक असून महाराष्टातील मूळ आदिवासी समाजाच्या ४५ जमातीबाबत गंभीर परिणाम करणारी आहे, असे सकल आदिवासी एकता महासंघाचे म्हणणे आहे. बंजारा समाजाची भाषा, संस्कृती, जीवनशैली ही आदिवासींच्या मूळ स्वरूपाशी भिन्न आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यानंतरच्या आयोगांनी बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश केलेला नाही. बंजारा समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करू नये. अन्यथा मूळ आदिवासी समाज हक्काचे रक्षणासाठी घटनात्मक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा निवेदनातून दिला आहे. बंजारा समाजाचा दावा असा निजाम प्रांतातील १९०१ ते १९४८ पर्यंत हैदराबाद गॅझेटमध्ये गोरबंजारा, लंबाडा, लमाण जातीची नोंद जमात अशी असून त्यानुसार तेलंगणा आंध्र प्रदेशातील बंजारा, लंबाडा जातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेले आहे. मात्र १९४८ नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाड्यासह विदर्भ, खांदेशचा भाग महाराष्ट्राला जोडल्यामुळे मूळचे असलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण संपुष्टात येवून विमुक्त जातीच्या संवर्गात रुपांतरीत करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजावर एसटी आरक्षणाबाबत घोर अन्याय झाला आहे, अशी भावना समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात आली होती. राज्यात गोरबंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करुन अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी गोरसेनेने केली होती.