सामाजिक ऐक्यासाठी सम्यक विचार गरजेचे
लातूर : प्रतिनिधी अनेक प्रख्यात साहित्यीकांनी, विचारवंतांनी, महापुरुषांनी आपल्या साहित्य संपदेतून पोक्त समाज निर्मिती व सामाजिक ऐक्यासाठी सम्यक विचारांची मांडणी केली आहे. सम्यक विचारधाराच सामाजिक विचारांचे व्यापकत्व प्रतीत करीत असते, असे प्रतिपादन प्रसिध्द समिक्षक, विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले. सम्यक साहित्य विचारमंच, लातूर यांच्यावतीने ‘साहित्य, समाज, सम्यक विचार आणि परितर्वन’ या विषयावर जाहीर व्याख्यानाच्या […] The post सामाजिक ऐक्यासाठी सम्यक विचार गरजेचे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर : प्रतिनिधी जिल्हा स्तरीय बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘हिरकणी हाट’ या विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन लातूर जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील याच्या हस्ते मोठया उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, राज्य कृषी मूल्य अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार […] The post ‘हिरकणी हाट’ चे उद्घाटन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जि. प. सेसमधून २ बालकांवर कॉक्लीअरइम्प्लांट शस्त्रक्रिया
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग व दिव्यांग सक्षमीकरण विभागाअंतर्गत वैयक्तीक लाभाच्या अनेक योजना राबविल्या जातात. याअंतर्गत कर्णबधिर, दिव्यांग व्यक्तींना कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यासाठी अर्थसहाय्य ही योजना राबविण्यात आली. सदर योजनेअंतर्गत लातूरच्या गोरे कान, नाक, घसा हॉस्पिटलमध्ये २ बालकांवर कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी […] The post जि. प. सेसमधून २ बालकांवर कॉक्लीअरइम्प्लांट शस्त्रक्रिया appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवीन गुळ मार्केट येथे १०१ वृक्ष लागवड
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कृषि उत्पन्न बाजार समितीचे नविन गुळ मार्केट जनावर बाजार आवारात विविध प्रकारच्या १०१ वृक्षांची लागवड शनिवारी बाजार समितीचे सभापती जगदिशराव बावने यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण पाटील, युवराज जाधव, श्रीनिवास शेळके, आनंद […] The post कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवीन गुळ मार्केट येथे १०१ वृक्ष लागवड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारावीनंतर करिअरची निवड करताना आवड, क्षमता, संधीचा संगम साधा
लातूर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी-निवडी, क्षमता आणि भविष्यातील उद्दिष्टे लक्षात घेऊन करिअरची निवड करणे अत्यावश्यक आहे. योग्य मार्गदर्शन, तज्ज्ञांचे सल्ले तसेच विविध क्षेत्रांबाबतची सखोल माहिती यांचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य दिशा निश्चित करता येते, असे प्रतिपादन एमआयटी करिअर गाईडन्स सेलचे प्रमुख बळीराम हांडगे यांनी केले. एमआयटी शिक्षण संस्था समूह, लातूर यांच्या […] The post बारावीनंतर करिअरची निवड करताना आवड, क्षमता, संधीचा संगम साधा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र विधानपरिषदेतील राजकीय समीकरणे आता बदलण्याच्या उंबरठ्यावर आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेच्या एकूण ९ सदस्यांचा कार्यकाळ येत्या १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर, उद्या या सर्व सदस्यांना सभागृहात अधिकृतपणे निरोप दिला जाणार आहे. हे सर्व सदस्य विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिले गेले होते. उद्या सभागृहात निरोप दिला जाणाऱ्या सदस्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या निरोपामुळे शिवसेना (यूबीटी) ची विधानपरिषदेतील उपस्थिती आणि मांडणीत बदल होणार आहे. तसेच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचाही कार्यकाळ संपत असल्याने, या रिक्त होणाऱ्या जागांवर आता कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उद्या निरोप देण्यात येणाऱ्या आमदारांमध्ये भाजपचे चार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर काँग्रेसचा एक सदस्य निवृत्त होणार आहे. या नऊ आमदारांची निवड 14 मे 2020 रोजी करण्यात आली होती. उद्या निरोप दिले जाणारे विधानपरिषदेचे आमदार १) उद्धव ठाकरे - शिवसेना (UBT) २) नीलम गोऱ्हे - शिवसेना (शिंदे) ३) अमोल मिटकरी - राष्ट्रवादी (अजित पवार) ४) शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी (शरद पवार) ५) राजेश राठोड - काँग्रेस ६) संदीप जोशी - भाजप ७) दादाराव केचे - भाजप 8) रणजितसिंह मोहिते-पाटील - भाजप ९) संजय केनेकर - भाजप पुढील राजकीय वाटचाल कशी? येत्या १३ मे रोजी या सदस्यांचा कार्यकाळ अधिकृतपणे संपल्यानंतर या ९ जागा रिक्त होतील. हे सर्व सदस्य विधानसभा कोट्यातून निवडून आलेले असल्याने, आगामी काळात विधानसभेतील पक्षीय बलाबलानुसार या जागांचे वाटप होणार आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला सर्वाधिक ४ जागा आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांची गणिते आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरणार आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधी पक्षांचे ७ आरोप
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी संसदेत विरोधी खासदारांनी नोटीस दिली आहे. लोकसभा-राज्यसभेत आणलेल्या नोटीसमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांवर ७ आरोप लावण्यात आले आहेत. ते सरकारच्या इशा-यावर काम करतात असे म्हटले आहे. ज्ञानेश कुमार यांनी रकफ द्वारे लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला, असा विरोधकांचा आरोप आहे. नोटीसमध्ये त्यांच्या नियुक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित […] The post मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधी पक्षांचे ७ आरोप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विदर्भातील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार दत्ता राघोबाजी मेघे (वय ८९) यांचे रविवारी दिनांक २२ मार्च रोजी नागपूर येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनाने विदर्भाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. दत्ताजी मेघे हे विदर्भातील प्रभावी व दूरदृष्टीचे नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत लोकसभा खासदार म्हणून जनतेचे प्रतिनिधित्व केले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी, विशेषतः शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सावंगी मेघे येथे भव्य रुग्णालयाची स्थापना केली. त्यांच्या कार्यकाळात विदर्भातील अनेक विकासकामांना गती मिळाली. राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांनी शिक्षण संस्थांची उभारणी करून ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या अनेक शैक्षणिक व वैद्यकीय संस्था आजही समाजसेवेचे कार्य करत आहेत. त्यामुळे ते केवळ राजकारणी नव्हे, तर समाजसेवक म्हणूनही जनमानसात लोकप्रिय होते. दत्ता मेघे यांचा स्वभाव साधा, लोकाभिमुख आणि कार्यपद्धती पारदर्शक होती. सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी ते ओळखले जात. त्यामुळे त्यांना सर्वपक्षीय आदर लाभला होता. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांसह मोठा राजकीय व सामाजिक वारसा आहे. त्यांच्या निधनाने विदर्भाने एक अनुभवी, अभ्यासू आणि जनतेशी नाळ जुळलेला नेता गमावला आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, अशा भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहेत. शेवटचा ठरला पाडवा पहाट माजी खासदार दत्ता मेघे यांनी नववर्षाच्या स्वागतार्ह वर्ध्यातील सोशालिस्ट चौक येथे आयोजित पाडवा पहाट कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली होती आणि तीच उपस्थिती त्यांची शेवटची ठरली. तब्बल तीन तास त्यांनी संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
डॉ. जनार्दन वाघमारे सरांचे स्मारक लातुरात व्हावे
लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, सुप्रसिद्ध साहित्यिक, नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू, माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी नांदेडच्या नरहर कुरुंदकर स्मारकाच्या धर्तीवर लातूर येथे त्यांचे स्मारक उभे राहिले पाहिजे, त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचीही गरज आहे, असा सूर लातूर येथे शुक्रवारी आयोजित डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या श्रद्धांजली सभेत अनेक मान्यवर […] The post डॉ. जनार्दन वाघमारे सरांचे स्मारक लातुरात व्हावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन
नागपूर : विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघाबोजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४० वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या दत्ता मेघे यांनी राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर आपली छाप पाडली. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे […] The post विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूरच्या दिशा प्रतिष्ठानतर्फे १६ विद्यार्थ्यांना धनादेश वाटप
लातूर : प्रतिनिधी एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने कार्यरत असलेल्या दिशा प्रतिष्ठानच्या वतीने १६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क करिता २ लाख ५३ हजार रुपयांचे धनादेश (चेक) वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. संजय शिवपूजे, राजेश मित्तल, विजय पस्तापुरे, अग्रवाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या […] The post लातूरच्या दिशा प्रतिष्ठानतर्फे १६ विद्यार्थ्यांना धनादेश वाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारतातील दहशतवादी घटनांमध्ये ४३% घट
नवी दिल्ली : भारतात गेल्या एका वर्षात दहशतवादी घटनांमध्ये ४३% घट नोंदवली गेली आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०२६ च्या यादीत भारत १३ व्या स्थानावर आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत भारत दोन स्थानांनी खाली आला आहे. यापूर्वी भारत ११ व्या स्थानावर होता. त्याचबरोबर, यादीनुसार दक्षिण आशिया सलग दहाव्या वर्षी दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित क्षेत्र राहिले आहे. पहिल्यांदाच […] The post भारतातील दहशतवादी घटनांमध्ये ४३% घट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सध्या काही लोक केवळ साधूंच्या वेशभूषा आणि दिखावा करून लोकांना फसवतात व पैशावर डल्ला मारतात. त्यामुळे खऱ्या आणि खोट्या साधूंमध्ये फरक ओळखणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत प. पू. रमेशभाई ओझा यांनी रविवारी ता. २२ येथे व्यक्त केले. येथील रामलिला मैदानावर गणराज गणेश मंडळाच्या वतीने आयोजित भागवत कथा वाचन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलतांना रमेश भाई ओझा म्हणाले की, संसारात दिसणारे सुख हे अनित्य आहे. परिवारात अशांतता, कलह आणि तणाव निर्माण होणे हीच संसाराची खरी ओळख आहे. तरीही माणूस या दुःखमय अवस्थेलाच सुख समजून त्यात अडकून राहतो. खरा आनंद हा बाह्य वस्तूंमध्ये नसून अंतर्मनात आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनात आहे. सद्गुरूच माणसाला योग्य दिशा दाखवतात, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्ममार्ग आणि भक्तीमार्ग यातील फरक स्पष्ट करताना ते म्हणाले की, कर्ममार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला सुख हवे असते, तर भक्तीमार्गातील व्यक्तीला ‘आनंद’ हवा असतो. स्वर्गातील सुख उच्च असले तरी तेही अनित्यच आहे, मात्र भक्तीतून मिळणारा आनंद नित्य आणि शाश्वत असतो. जीवनातील विषमता मांडताना त्यांनी एखादा माणूस झोपडीत जन्म घेतो तर दुसरा श्रीमंत घराण्यात का जन्म घेतो याचे याचे उत्तर देताना त्यांनी कर्मसिद्धांत स्पष्ट करत प्रत्येकाच्या जीवनातील परिस्थिती ही त्याच्या कर्मांवर आधारित असल्याचे सांगितले. भागवत कथा हीच माणसाला योग्य मार्ग दाखवणारी आहे, असे सांगत त्यांनी प्रथम स्कंधातील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचे सविस्तर विवेचन केले. यावेळी मौनी बाबांच्या कथेद्वारे खोट्या साधूंचा पर्दाफाश करत त्यांनी सांगितले की, काही लोक केवळ वेशभूषा आणि दिखावा करून लोकांना फसवतात व पैशावर डल्ला मारतात. त्यामुळे खऱ्या आणि खोट्या साधूंमध्ये फरक ओळखणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भागवत कथेतून दिलेल्या या जीवनमूल्यांनी उपस्थित भाविकांना आत्मचिंतनाचा नवा दृष्टिकोन दिला. यावेळी हजारो भविकांनी कथेचा लाभ घेतला.
इराणच्या हल्ल्याने लिटिल इंडिया दिमोना हादरले
जेरुसलेम : या शहरातील गल्ल्यांमध्ये मराठीसह हिंदी शब्दही कानावर पडतात. येथेही क्रिकेटचे चाहते मोठे आहेत. येथील दुकानांमध्ये सोहनपापडी, गुलाबजाम, पापडी चाट आणि भेळपुरी सारखे भारतीय पदार्थ सहज मिळतात. हे वर्णन भारतातील एखाद्या शहराचे नसून इस्रायलमधील दिमोना शहराचे आहे. इस्रायलच्या अण्वस्त्र साठ्यापासून २० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या या शहरात भारतीय वंशाच्या नागरिकांची मोठी वस्ती आहे. शनिवारी […] The post इराणच्या हल्ल्याने लिटिल इंडिया दिमोना हादरले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे जिल्ह्यातील वाघोली (ता. हवेली) येथे पार पडलेल्या ६६ व्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने आपला दबदबा कायम राखत विजेतेपदावर नाव कोरले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत हर्षवर्धनने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा ४-२ असा पराभव केला. या विजयासह हर्षवर्धनने दुसऱ्यांदा 'महाराष्ट्र केसरी'ची गदा उंचावत 'डबल महाराष्ट्र केसरी' होण्याचा बहुमान मिळवला. अशी कामगिरी करणारा तो महाराष्ट्रातील सातवा मल्ल ठरला आहे. महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यातील हा अंतिम सामना तांत्रिक आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा ठरला. सामन्याच्या सुरुवातीला महेंद्र गायकवाडने आक्रमक पवित्रा घेत १ गुण मिळवून आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर हर्षवर्धनने चपळाईने १ गुण मिळवत विश्रांतीपर्यंत धावसंख्या १-१ अशी बरोबरीत आणली. दुसऱ्या सत्रात महेंद्रला 'ॲक्टिव्हिटी टास्क' देण्यात आला, मात्र तो गुण मिळवण्यात अपयशी ठरल्याने हर्षवर्धनला तांत्रिकदृष्ट्या १ गुण मिळाला. त्यानंतर हर्षवर्धनने पकड मजबूत करत आणखी २ गुण मिळवले आणि ४-१ अशी निर्णायक आघाडी घेतली. शेवटच्या क्षणी हर्षवर्धन मॅटच्या बाहेर गेल्याने महेंद्रला १ गुण मिळाला, मात्र वेळ संपली तेव्हा ४-२ अशा फरकाने हर्षवर्धन विजयी झाला. अंतिम फेरीपर्यंतचा रस्ता महाराष्ट्र केसरीच्या अंतिम गदेसाठी 'माती' आणि 'गादी' अशा दोन विभागांतून विजेते मल्ल आमनेसामने आले होते. सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने माती विभागाच्या अंतिम फेरीत हिंगोलीच्या तडाखेबंद सिकंदर शेखचा ३-० असा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. नाशिकच्या हर्षवर्धनने मॅट (गादी) विभागाच्या अंतिम फेरीत सोलापूर शहराच्या जय पाटीलचा १०-० अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. हर्षवर्धनवर कौतुकाचा वर्षाव हर्षवर्धन सदगीरने यापूर्वीही महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली होती. आता पुन्हा एकदा त्याने आपल्या कौशल्याच्या जोरावर हे यश मिळवल्याने नाशिकसह संपूर्ण कुस्ती वर्तुळातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वाघोलीच्या मैदानावर जमलेल्या हजारो कुस्तीप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात या नव्या 'डबल महाराष्ट्र केसरी'चे स्वागत केले.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी मध्यरात्री दरी पूल परिसरात तीन ते चार वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जांभुळवाडी येथील दरी पूल परिसरात शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. तीन ते चार वाहनांची धडक झाली, ज्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. किरकोळ जखमी झालेल्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली. रात्रीची वेळ असल्याने बाह्यवळण मार्गावर वाहतूक कोंडी झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. यापूर्वी १३ मार्च रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास नवले पूल परिसरात एका भरधाव ट्रकने सिग्नलला थांबलेल्या वाहनांना धडक दिली होती. त्या अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला होता. कात्रज बोगद्याकडून येणाऱ्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला होता. ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने महिलेची फसवणूक घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी चंदननगर भागातील एका महिलेची तीन लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ४८ वर्षीय महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला चंदननगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर काही दिवसांपूर्वी संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे मिळतील. एका तारांकित हॉटेलला रिव्ह्यूज मिळवून द्यायचे आहेत, अशी बतावणी करुन चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या खात्यात परताव्यापोटी काही रक्कम दिली. परतावा मिळाल्याने महिलेचा विश्वास बसला. चोरट्यांनी ऑनलाइन टास्कमध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. पैसे गुंतविल्यानंतर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर महिलेला परतावा दिला नाही, तसेच मूळ रक्कमही दिली नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश बडाख तपास करत आहे.
मुंढव्यातील केशवनगर भागात मित्रांना पिस्तूल दाखवताना झालेल्या गोळीबारात एक अल्पवयीन युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना १८ मार्च रोजी रात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. १८ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी गायकवाड, मुंडे आणि एक अल्पवयीन युवक मुंढव्यातील केशवनगर भागातील गुरुकृपा सोसायटीजवळ मोकळ्या जागेत थांबले होते. आरोपी मुंडे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल होते. ते एकमेकांना पिस्तूल दाखवत होते आणि हाताळत होते. यावेळी जखमी अल्पवयीन मुलानेही पिस्तूल हाताळले. त्यानंतर आरोपी मुंडे याने पिस्तूल घेतले आणि अल्पवयीन मुलाच्या दिशेने रोखले. पिस्तूलाचा चाप ओढल्यानंतर गोळी सुटली आणि ती अल्पवयीन मुलाच्या कमरेत शिरली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. याबाबत एका अल्पवयीन मुलाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सक्षम युवराज गायकवाड (वय १९), ओम दुर्गा गायकवाड (वय १९, दोघे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) आणि सोनू उर्फ सोन्या मुंडे उर्फ सुमित सुजित बर्णवाल (वय २१, रा. मांजरी, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे आणि मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सहायक निरीक्षक पिंगुवाले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शहरात बेकायदा पिस्तूल बाळगण्याचे प्रकार वाढले आहेत. दहशत माजवण्यासाठी सराईत गुन्हेगारांकडून पिस्तूल बाळगले जाते. दोन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील उमराटी गावात छापा टाकून देशी बनावटीची पिस्तुले तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता. उमराटीतून मध्यस्थांमार्फत पुण्यात पिस्तुले विक्रीसाठी पाठवली जात असल्याचे तपासात उघड झाले होते. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये उमराटीतील देशी बनावटीच्या पिस्तुलांचा वापर झाल्याचे तपासात समोर आले होते. पोलिसांनी या प्रकरणी देशी बनावटीची पिस्तुले तयार करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे आणि यंत्रसामग्री जप्त केली होती.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सध्या जगभरात सुरू असलेल्या युद्धग्रस्त परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. एकविसाव्या शतकात सुरू असलेली युद्धे दुर्दैवी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'युद्ध नको, बुद्ध हवा' हा संदेश जगासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. आठवले यांच्या हस्ते पद्मपाणी फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागामार्फत आयोजित दुसऱ्या पाली साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे पाली विभागाचे प्रमुख आणि संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. बिमलेन्द्र कुमार, गगन मलिक, भदंत हर्षबोधि महाथेरो, डॉ. योजना भगत, उपमहापौर परशुराम वाडेकर, धम्मदीप वानखेडे, डॉ. करुणा जाधव, डॉ. नीरज बोधी, सारंग आव्हाड, स्वागताध्यक्ष डॉ. सिद्धार्थ धेंडे, डॉ. गौतम चाबुकस्वार, संयोजक राहुल डंबाळे, सुवर्ण डंबाळे आणि आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आठवले म्हणाले की, पाली भाषेने जगाला विज्ञानवाद, समानता, मानवता आणि शांततेचे ज्ञान दिले आहे. बौद्ध तत्त्वज्ञान याच भाषेतून जगभर पोहोचले. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण प्रयत्न केले असून, यापुढेही तिच्या प्रचार आणि प्रसारासाठी शासकीय पातळीवर सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जगभरातील युद्धस्थिती, सामाजिक असमानता आणि हिंसाचार दूर करण्यासाठी पाली भाषेचा प्रसार आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. बिमलेन्द्र कुमार यांनी सांगितले की, गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आणि समृद्ध भारतीय परंपरेचे भांडार पाली भाषेत उपलब्ध आहे. दुःखातून बाहेर पडून समाधान प्राप्त करण्याचा आणि चित्तशुद्धीचा मार्ग पाली भाषेने दाखवला आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात पाली भाषेचा ऐच्छिक भाषा म्हणून समावेश होणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, बौद्ध तत्त्वज्ञानासोबतच सामाजिक, आर्थिक, राजनैतिक अशा सर्व विषयांवरील व्यापक साहित्य पाली भाषेत उपलब्ध आहे. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी, तिच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी कोणतेही ठोस कार्यक्रम हाती घेण्यात आलेले नाहीत. राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या धर्तीवर पाली भाषेच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय विद्यापीठ किंवा संस्थेची स्थापना करावी आणि महाविद्यालयांमधील पाली भाषेच्या प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या. सध्याच्या काळात केवळ पाली भाषाच नव्हे तर बौद्ध धम्म धोक्यात आला असल्याची भीती गगन मलिक यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. सर्वसामान्यांना ज्ञान देण्याची जबाबदारी असलेल्या प्रथम पाली भाषेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. बौद्ध धर्माचे संवर्धन व प्रसार करणाऱ्या भिक्षूची संख्या मर्यादित आहे. समाजातील सुशिक्षित आणि कर्तृत्ववान युवक भिक्षू होण्यास तयार नाहीत, अशी खंत व्यक्त करतानाच मलिक यांनी भिक्षू होण्याची तयारी असलेल्या युवकांच्या थायलंड मधील पंधरा वर्षाच्या प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी देखील दर्शविली. पाली भाषा ही माणसांना जोडणारी, मैत्रीची आणि परिवर्तनाची भाषा असल्याचे भदंत हर्षबोधी महाथेरो यांनी नमूद केले. बौद्ध धर्माचा, गौतम बुद्धांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा, विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भिख्खू संघाने एकत्र येऊन पुढाकार घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. पाली भाषेतील समृद्ध साहित्य सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवादित केले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे चिवर धारण न केलेले संन्यासी होते, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.पाली भाषेच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी हाती घेतली पाहिजे, असे आवाहन सुवर्ण डंबाळे यांनी प्रास्ताविकात केले. यावेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पाली भाषेच्या प्रसारासाठी निधी मिळावा आणि प्राथमिक शिक्षणात पाली भाषेचा समावेश करावा, अशा मागण्या केल्या. राहुल डंबाळे यांनी पाली भाषेच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य पालीमध्ये अनुवादित करण्याची घोषणा यावेळी केली. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. महेश देवकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. त्याचप्रमाणे पाली भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणारे गायक पावा, गगन मलिक, अतुल भोसेकर आणि संमेलन अध्यक्ष बीमलेन्द्र कुमार यांचाही सत्कार करण्यात आला.
नाशिकचा स्वयंघोषित 'कॅप्टन' अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर, आता त्याच्या समर्थनासाठी सामाजिक क्षेत्रातील मोठी व्यक्तिमत्त्वे पुढे येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हिवरे बाजारचे सरपंच आणि पद्मश्री पोपटराव पवार यांचा खरातसोबतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला असून, खरातच्या 'ओशनोलॉजी' या तथाकथित शास्त्राला वैज्ञानिक आधार असल्याचे प्रमाणपत्रच पवारांनी दिले आहे. विशेष म्हणजे, खरात सध्या गजाआड असताना त्याचे कुटुंबीय हिवरे बाजारात वास्तव्यास असल्याची माहिती समोर येत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, पोपटराव पवार आणि अशोक खरात यांचे संबंध २०११ पासूनचे आहेत. हिवरे बाजार येथील मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने खरात तेथे तीन दिवस मुक्कामास होता. गावात पाणी येण्यासाठी खरात यांनी काही उपाय सांगितले होते. गावच्या देवीची पूजा केल्यानंतर मोठा फरक पडला, असे खळबळजनक वक्तव्य पवारांनी या व्हिडिओमध्ये केले आहे. खरातच्या 'ओशनोलॉजी'चा वापर युरोपमधील पोलीस तपासासाठी करतात, असा अजब दावाही त्यांनी यावेळी केला. खरातच्या कुटुंबाला हिवरे बाजारात आश्रय? अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर नाशिकमध्ये त्याच्याविरुद्ध संतापाची लाट आहे. अशा परिस्थितीत खरातचे कुटुंबीय सध्या हिवरे बाजार येथे पोपटराव पवार यांच्या आश्रयाला असल्याची माहिती समोर येत आहे. केवळ आश्रयच नव्हे, तर खरातला लागणारी कायदेशीर मदत आणि आर्थिक रसद देखील पोपटराव पवार पुरवणार असल्याचे बोलले जात आहे. सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच म्हणून देशभरात ओळख असलेल्या पोपटराव पवारांसारखी व्यक्ती एका भोंदू बाबाच्या चमत्कारांचे समर्थन कशी करू शकते? असा सवाल आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. खरातच्या 'अध्यात्मिक' जाळ्यात केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर ग्रामीण विकासाचे मॉडेल उभे करणारे नेतृत्वही अडकल्याने या प्रकरणाची व्याप्ती किती खोलवर आहे, हे स्पष्ट होत आहे. हे ही वाचा… अशोक खरात प्रकरण:अजितदादांना सत्य माहीत होते, त्यांनी चाकणकरांचा राजीनामा मागितला; पण तटकरेंनी थांबवला - रूपाली ठोंबरे नाशिकच्या भोंदू 'कॅप्टन' अशोक खरात प्रकरणाने आता केवळ सामाजिकच नव्हे, तर राजकीय क्षेत्रालाही हादरवून सोडले आहे. खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी आता थेट चाकणकर यांच्यावर अशोक खरातच्या 'सेक्स रॅकेटच्या मास्टरमाईंड' असल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच अजितदादांनी चाकणकरांचा राजीनामा मागितला होता. पण सुनील तटकरेंनी तो थांबवला, असा मोठा दावाही ठोंबरे पाटील यांनी केलाय. सविस्तर वाचा…
हिंगोली तालु्क्यातील सागद ते पातोंडा मार्गावर धानापूर शिवारात दोन दुचाकीच्या धडकेमध्ये पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. २२ सायंकाळच्या सुमारास घडली आहे. बासंबा पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्हयातील खंडाळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी अरविंद भिमराव पवार (४०) हे आज दुपारच्या सुमारास खंडाळा पोलिस ठाण्यात कामकाज करून दुचाकीवर सिरसम मार्गे हिंगोलीकडे निघाले होते. त्यांचे दुचाकी वाहन हिंगोली तालुक्यातील सागद ते पातोंडा मार्गावर धानापूर शिवारात आले असतांना एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात अरविंद हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक मदन गव्हाणे, नामदेव हाके, कैलास गुंजकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने अरविंद यांना रुग्णवाहिकेद्वारे हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात दाख केल. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. दरम्यान, मयत पोलिस कर्मचारी अरविंद पवार हे सन २००७ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील आयआरबी गटात भरती झाले होते. त्या ठिकाणावरून त्यांची बदली हिंगोलीच्या राज्य राखीव दलात झाली होती. राखीव दलात कार्यरत असतांना त्यांनी महाराष्ट्रासह बाहेर राज्यातही निवडणुक, सण, उत्सव बंदोबस्त केले. तर नक्षलग्रस्त भागातही त्यांनी बंदोबस्त केला आहे. सुमारे एक वर्षापुर्वीच त्यांनी यवतमाळ जिल्हा पोलिस दलात बदली झाली होती. त्यानंतर त्यांना खंडाळा पोलिस ठाणे देण्यात आले होते. सहा महिन्यापासून ते खंडाळा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होते. शिस्तप्रिय कर्मचारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. या शिवाय महत्वाचे गुन्हे निकाली काढण्यात त्यांनी महत्वाची भुमीका बजावली होती. त्यांच्या अपघाती निधनाने खंडाळा पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. मयत अरविंद यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या पत्नी हिंगोली जिल्हा पोलिस दलात कार्यरत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत बासंबा पोलिस ठाण्यात नोंद झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
इस्लामाबाद : जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला, तर आम्ही कोणताही विचार न करता भारत, मुंबई आणि नवी दिल्लीवर हल्ला करू. आम्ही त्यांना सोडणार नाही, पुढे काय होईल ते नंतर पाहू अशा शब्दांमध्ये पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी गरळ ओकली आहे. एकीकडे पाकिस्तानचे शेजारील देश अफगाणिस्तानसोबतचे संबंध ताणलेले असताना बासित यांच्यासारख्या व्यक्तीने भारतातील महत्त्वाच्या शहरांवर […] The post …तर मुंबई, दिल्लीवर हल्ला करू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शत्रु राष्ट्रे वगळता होर्मुझ सर्वांसाठी खुले
तेहरान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील ४८ तासांत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली न केल्यास इराणच्या वीज प्रकल्पांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. या इशा-यानंतर काही तासांतच इराणने आपली भूमिका मवाळ केली आहे. शत्रू देशांशी (प्रामुख्याने अमेरिका आणि इस्रायल) संबंधित जहाजे वगळता इतर सर्व जहाजांसाठी हा जलमार्ग खुला राहील असे इराणच्या वरिष्ठ प्रतिनिधीने स्पष्ट […] The post शत्रु राष्ट्रे वगळता होर्मुझ सर्वांसाठी खुले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराण युद्धाचा एअर इंडियाला मोठा फटका
नवी दिल्ली : इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे एअर इंडियाने गेल्या तीन आठवड्यांत पश्चिम आशियातील सुमारे २,५०० उड्डाणे रद्द केली आहेत. सध्या या भागात एअर इंडियाच्या नियमित वेळापत्रकाच्या तुलनेत केवळ ३० टक्के उड्डाणे सुरू असल्याची माहिती एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी कर्मचा-यांना पाठवलेल्या पत्रात दिली आहे. विल्सन यांनी पत्रात नमूद केले आहे की, मध्यपूर्वेतील […] The post इराण युद्धाचा एअर इंडियाला मोठा फटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ४ ठार
जिंतूर : प्रतिनिधी जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळील गणेशपुर शिवारात रविवार दि. २२ मार्च रोजी सकाळी भरधाव ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील ४ जागीच ठार झाले असून अन्य २ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर ५० ते ६० फूट अंतरावर फेकल्या गेलेल्या कारचा चुराडा झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, […] The post भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ४ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दोहा : मध्यपूर्वेत सध्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. या भागातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, कतारमधून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहे. कतारच्या प्रादेशिक जलक्षेत्रात रविवारी पहाटेच्या सुमारास एका हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात […] The post हेलिकॉप्टर अपघातात ६ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
फरसावाले बाबांनंतर ड्रायव्हरचा मृत्यू
मथुरा : मथुरेत झालेल्या एका भीषण अपघातात गोरक्षक फरसावाले बाबा यांचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या ट्रक चालकाचाही आता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोसीकला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे दोन ट्रकची धडक झाली, ज्यामध्ये गोरक्षक चंद्रशेखर ऊर्फ फरसेवाले बाबा यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पसरलेल्या […] The post फरसावाले बाबांनंतर ड्रायव्हरचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चीनच्या अर्थव्यवस्थेची पिछेहाट
बीजिंग : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य तणावाचा सर्वाधिक तडाखा आता जगाची मॅन्युफॅक्चरिंग हब असलेल्या चीनला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मॉडर्न डिप्लोमसीच्या ताज्या अहवालानुसार कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि कच्च्या मालाची टंचाई यामुळे चीनच्या उत्पादन क्षेत्राची कंबर मोडली आहे. यामुळे चीन कॉस्ट-पुश इन्फ्लेशन म्हणजेच उत्पादन खर्च वाढल्यामुळे येणा-या महागाईच्या जाळ्यात अडकण्याची भीती व्यक्त होत […] The post चीनच्या अर्थव्यवस्थेची पिछेहाट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चीन देणार भारतीय व्यापा-यांना पक्की दुकाने
नवी दिल्ली : चीनने भारतीय व्यापा-यांना मोठे सरप्राइज दिले असून आपल्या अधिपत्याखालील तिबेट भागातील तकलाकोट येथे आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, चीनने भारतीय व्यापा-यांसाठी पक्की दुकाने तयार केली आहेत. यामुळे, आता भारतीय व्यापा-यांना इतिहासात पहिल्यांदाच अशा पक्क्या आणि सुसज्ज दुकानांमध्ये बसून व्यापार करण्याची संधी मिळेल. सीमावर्ती भागातील स्थानिक व्यापा-यांना चीनच्या या निर्णयाचा फायदा होऊ शकतो. […] The post चीन देणार भारतीय व्यापा-यांना पक्की दुकाने appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ३ ठार
जिंतूर : प्रतिनिधी जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळील गणेशपुर शिवारात रविवार दि. २२ मार्च रोजी सकाळी भरधाव ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील ३ जागीच ठार झाले असून अन्य ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर ५० ते ६० फूट अंतरावर फेकल्या गेलेल्या कारचा चुराडा झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, […] The post भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ३ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरलेला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी खरातचे धागेदोरे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताशी जोडले असून, यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे. अजितदादांच्या निवासास्थानाजवळ झालेली अघोरी पूजा आणि त्यांचा अपघात यांचा काही संबंध आहे का? असा खळबळजनक सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले की, अशोक खरातचे कृत्य महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळीमा फासणारे आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अजितदादांच्या निवासस्थानाजवळ आणि कार्यालयाजवळ अघोरी पूजा करण्यात आली होती. तसेच सप्टेंबर महिन्यात 'करंगळी कापण्याचा' एक प्रकार झाला होता, जो अघोरी कृत्यांचाच भाग होता. या सर्व घटना आणि दादांचा अपघात यात काही साम्य आहे का? याचा तपास होणे गरजेचे आहे. खरातला ज्या तत्परतेने अटक केली, तशीच तत्परता अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीत का दाखवली जात नाही? असा सवालही त्यांनी केला. अशोक खरातच्या संपत्तीचा स्रोत काय? अशोक खरातच्या अवाढव्य मालमत्तेवर बोट ठेवत अमोल मिटकरी म्हणाले, एका साध्या भोंदू बाबाकडे २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती येते कुठून? यामागे कोणते अधिकारी आणि मंत्री आहेत, हे आता समोर आले पाहिजे. खरातचे एका व्हीएसआर कंपनीच्या मालकासोबतही संबंध असल्याचा संशय असून, यामध्ये अनेक साक्षर लोक आणि अधिकारी आहारी गेले आहेत, हे राज्याचे दुर्दैव आहे. पोलिसांना मिळालेले व्हिडिओ ५७ नाहीत, तर ५०० पेक्षा जास्त असू शकतात, असा आमचा अंदाज आहे. ज्यांना दादांनी मोठं केलं, ते अधिवेशनात गप्प का? पक्षांतर्गत आणि महायुतीमधील राजकीय स्थितीवर भाष्य करताना अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली. अजितदादा हे शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचे नेते आहेत, मात्र त्यांना संपवण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात दादांच्या अपघाताच्या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही. ज्यांना दादांनी मोठे केले, ते आज मूग गिळून गप्प का आहेत? असा टोला त्यांनी स्वपक्षीय आणि मित्रपक्षातील नेत्यांना लगावला. अंनिस आणि सरकारी भूमिकेवर प्रश्न राज्यात जादूटोणा विरोधी कायदा असतानाही असे प्रकार उघडपणे कसे घडतात, यावर अमोल मिटकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरातला कोणाच्या काळात पाणी आरक्षित करून मिळाले आणि त्याला कोणकोणत्या मंत्र्यांचे सहकार्य लाभले, याची सखोल चौकशी व्हावी. महायुती असो वा महाविकास आघाडी, जो कोणी दोषी असेल त्याला सरकार पाठीशी घालणार नाही, असा मला विश्वास आहे, अशी आशाही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली.
मानवतच्या पेठ मोहल्ल्यात दोन दुचाकी जाळल्या
परभणी : मानवत येथील पेठ मोहल्ला परिसरातील नगरेश्वर मंदिरासमोर उभ्या असलेल्या दोन स्प्लेंडर मोटारसायकली दि. २१ मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. गेल्या १५ दिवसांतील ही तिसरी घटना आहे. सातत्याने होणा-या वाहन जाळपोळीच्या मालिकांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मानवत येथील नागेश्वर मंदिरासमोर राहणारे पुरुषोत्तम शिवाजी भायेकर […] The post मानवतच्या पेठ मोहल्ल्यात दोन दुचाकी जाळल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने डॉ. संजीवनी मगर सन्मानित
परभणी : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त नाशिक येथे आयोजित सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल जिल्ह्यातील पहिल्या महिला नवजात शिशूतज्ञ डॉ.संजीवनी मगर यांना दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.महेंद्र देशपांडे, डॉ.अमित केले, उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आशा पाटील, मिस इंडिया अश्विनी […] The post दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने डॉ. संजीवनी मगर सन्मानित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन
जालना : ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनचे नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे आज निधन झाले. जालना येथील राहत्या घरी आज दुपारी साडेबारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनावर ओबीसी नेत्यांकडून शोक व्यक्त केला जात असून ओबीसी चळवळीच्या आठवणी जागवल्या जात आहेत. सुरुवातीला मुस्लिम ओबीसी आरक्षणासाठी […] The post ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईतील बिट्टू बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : मुंबईतील बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये ठेवण्यात आलेल्या ‘बिट्टू’ या ६ वर्षांच्या नर बिबट्याचा दीर्घकालीन आजारामुळे २१ मार्च २०२६ रोजी मृत्यू झाला. या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. बिट्टू हा ८ डिसेंबर २०१९ रोजी ठाणे वनविभागाच्या येऊर परिसरातून बचाव करण्यात आलेला बिबट्या होता. काही दिवस उपचार आणि निगराणीनंतर त्याला […] The post मुंबईतील बिट्टू बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पतीला केबिनबाहेर बसवून गर्भवती महिलेवर अत्याचार
नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्याविरोधातील प्रकरण अधिकच गंभीर बनत चालले आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये आधीच अटकेत असलेल्या खरातविरुद्ध आता आणखी एक नवीन गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाणे येथे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीनुसार, पीडित महिला गर्भवती असताना ‘पूजा विधी’च्या नावाखाली खरातने तिच्यावर लैंगिक अत्याचार […] The post पतीला केबिनबाहेर बसवून गर्भवती महिलेवर अत्याचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘सोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे!
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रभावी नेतृत्वाची दखल घेत सुप्रसिद्ध इंग्रजी मासिक ‘सोसायटी अचिव्हर्स’ यांनी त्यांच्या विशेष मुलाखतीसह त्यांना कव्हर पेजवर स्थान दिले आहे. ‘देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर इथिकल लीडरशिप’ या शब्दांत त्यांच्या राजकीय व सामाजिक प्रवासाचा गौरव करण्यात आला आहे. मॅग्झिनची स्पेशल एडिशन यंदा प्रकाशित झाली असून […] The post ‘सोसायटी अचिव्हर्स’च्या कव्हर पेजवर मंत्री पंकजा मुंडे! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका
नागपूर : विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा आणि गोंदियासह अनेक भागांत अवकाळी पाऊस व गारपिटीने चांगलाच तडाखा दिला. परिणामी, अनेक ठिकाणी गहू, हरभरा, मका पिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारपासूनच अनेक ठिकाणी वातावरणात बदल जाणवत होता. काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी दुपारी सुरुवातीला पाऊस व गारपीट सुरू झाली. चांदूर रेल्वे येथे वीज कोसळली. हवामान […] The post विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोल्हापुरात विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या
कोल्हापूर : प्रतिनिधी शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात एका २३ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून या नोटमध्ये आई-वडिलांसाठी भावनिक संदेश लिहिला आहे. याप्रकरणी पोलिस सखोल तपास करत असून मृत मुलीच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इशिता मधुसुदन सावंत असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. […] The post कोल्हापुरात विद्यार्थिनीची वसतिगृहात आत्महत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुढील दोन दिवसांत उकाडा वाढणार; हवामान खात्याचा अंदाज
पुणे : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात हळूहळू वाढ होत असून, उकाड्यात देखील चांगलीच वाढ झाली आहे. तर पुढील दोन ते तीन दिवसांत हवामानात बदल होणार असून, कमाल आणि किमान तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शहरातील उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. […] The post पुढील दोन दिवसांत उकाडा वाढणार; हवामान खात्याचा अंदाज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चाकणकर मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप
पुणे : प्रतिनिधी रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वांत मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी केला आहे. रुपाली ठोंबरे-पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या पत्रामध्ये हा आरोप केला आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या पत्रात हा गंभीर आरोप आहे, ते पत्र त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. नाशिकचा भोंदूबाबा […] The post चाकणकर मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार; रुपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईचे आराध्य दैवत आणि जगप्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात एका कर्मचाऱ्यानेच दानपेटीवर हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजेंद्र पेंडुरकर (वय ५७) असे या आरोपीचे नाव असून, सीसीटीव्ही फुटेजमधून हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दादर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेंद्र पेंडुरकर हा लोअर परळ परिसरातील रहिवासी असून तो मंदिरातच कर्मचारी म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी मंदिरातच काम करणाऱ्या एका सहकाऱ्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पेंडुरकर संशयास्पदरीत्या दानपेटीतून पैसे काढताना दिसले. हा प्रकार त्यांनी तात्काळ मंदिर ट्रस्टच्या वरिष्ठांच्या कानावर घातला. त्यानंतर ट्रस्टने गेल्या ८ ते १० दिवसांचे रेकॉर्डिंग तपासले असता, आरोपी वारंवार दानपेटीतील पैशांवर डल्ला मारत असल्याचे स्पष्ट झाले. १० हजारांची कबुली, पण संशय मोठ्या रकमेचा मंदिर ट्रस्टने दिलेल्या तक्रारीनंतर दादर पोलिसांनी राजेंद्र पेंडुरकरला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने दानपेटीतून सुमारे १० हजार रुपये चोरल्याची कबुली दिली आहे. मात्र, तो गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चोरी करत असल्याने, चोरलेली एकूण रक्कम ही मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या चोरीच्या कृत्यात मंदिरातील इतर काही कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, या दिशेने आता पोलिस सखोल तपास करत आहेत. कडेकोट सुरक्षेला कर्मचाऱ्याकडूनच सुरुंग सिद्धिविनायक मंदिर हे देशातील सर्वात श्रीमंत आणि हाय-प्रोफाईल मंदिरांपैकी एक मानले जाते. येथे दररोज हजारो भाविकांसह राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावतात. नुकताच टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी ट्रॉफीसह याच मंदिरात दर्शन घेतले होते. अशा कडेकोट सुरक्षा आणि सीसीटीव्हीचे जाळे असलेल्या मंदिरात खुद्द कर्मचाऱ्यानेच चोरी केल्याने मंदिर प्रशासनाच्या अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या दादर पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपीने ही रक्कम कुठे खर्च केली किंवा त्याचे इतर कोणाशी लागेबांधे आहेत का? याचा शोध घेतला जात आहे.
कल्याण रेल्वे स्थानकात आज दुपारी एका अज्ञात तरुणाने ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढून तब्बल दोन तास रेल्वे प्रशासनाला ओलीस धरल्याचा थरारक प्रकार घडला. प्रशासनाने वीजपुरवठा खंडित करून या तरुणाला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र पळून जाण्याच्या प्रयत्नात या तरुणाला विजेचा जोराचा धक्का बसला आणि तो खांबावरून खाली कोसळला. या भीषण अपघातात तरुण गंभीर जखमी झाला असून मध्य रेल्वेची वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ च्या दरम्यान असलेल्या विद्युत खांबावर एक तरुण चढल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास आले. ओव्हरहेड वायरमध्ये हजारो व्होल्टचा विद्युत प्रवाह असल्याने स्थानकात एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कोणताही मोठा अनर्थ घडू नये यासाठी प्रशासनाने तत्काळ त्या मार्गावरील वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला. दोन तास प्रयत्नांची पराकाष्ठा पोलिसांनी मेगाफोनवरून त्या तरुणाला खाली उतरवण्यासाठी वारंवार विनंती केली, त्याच्या मागण्या विचारल्या, मात्र तो तरुण प्रचंड भेदरलेल्या अवस्थेत होता आणि कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. काही प्रवाशांनी आणि तरुणांनीही त्याला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने कोणालाही जवळ येऊ दिले नाही. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सुमारे १२० मिनिटे लोकल गाड्या ठिकठिकाणी उभ्या राहिल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सुमारे दोन तासांच्या या नाट्यानंतर, त्या तरुणाने खांबावरून प्लॅटफॉर्मच्या शेडवर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात त्याचा संपर्क जिवंत विद्युत वाहिनीशी आला आणि त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. क्षणात तो तरुण खांबावरून खाली फेकला गेला. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. वाहतूक हळूहळू पूर्ववत या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. रखडलेली रेल्वे वाहतूक आता संथ गतीने सुरू झाली असली तरी वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. संबंधित तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले, तो मानसिक रुग्ण होता की अन्य काही कारणाने त्याने हे कृत्य केले, याचा तपास आता लोहमार्ग पोलीस करत आहेत. तरुणाला विजेचा धक्का बसल्याचे पाहून स्थानकावरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला
मुुंबई : प्रतिनिधी सध्या संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. खरात प्रकरण गंभीर असून या प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला […] The post खरात प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराण विरुद्ध अमेरिका - इस्त्रायल युद्धामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातील हॉटेल, ढाबे व उपहारगृह चालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार व्यावसायिक गॅसचा पुरवठ्यात 20 टक्क्यांची वाढ करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी दिली. यामुळे छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धामुळे सरकारने व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर निर्बंध घातले होते. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने 21 मार्च रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार यापूर्वी राज्याला केवळ 30 टक्के एलपीजी वाटप मंजूर होते. आता 23 मार्चपासून पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त 20 टक्के वाटप वाढवण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण गॅस पुरवठा हा संकटपूर्व पातळीच्या 50 टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे. या वाढीव 20 टक्के गॅस पुरवठ्यात हॉटेल्स, ढाबे, उपहारगृहे, औद्योगिक कॅन्टिन, अन्न प्रक्रिया उद्योग व दुग्ध व्यवसायाला प्राधान्य देण्यात येणार आहे. याशिवाय राज्य शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून चालवण्यात येणाऱ्या अनुदानित कॅन्टिन, कम्युनिटी किचन्स तसेच स्थलांतरित मजुरांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. 'प्रस्तुत निर्णयामुळे व्यावसायिक एलपीजीच्या तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या हॉटेल व अन्नपदार्थ व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळेल. पण गॅस मिळवण्यासाठी त्यांना तेल विपणन कंपन्यांकडे नोंदणी करणे व पीएनजी जोडणीसाठी अर्ज करणे आवश्यक असणार आहे', असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. केरोसिन वितरणाप्रकरणी महत्त्वाचे निर्णय दुसरीकडे, सरकारने राज्यातील केरोसिन वितरणासंबंधीही काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत. त्यानुसार, प्रलंबित परवाने आपोआप नुतनीकरण झाल्याचे मानण्यात येणार आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय परवाने वारसांच्या नावाने तत्काळ वर्ग करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. ज्या गावांमध्ये किरकोळ केरोसिन परवानाधारक उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी रास्तभाव दुकान चालवणाऱ्या दुकानदारांना किरकोळ केरोसिन परवानाधारक म्हणून मान्यता देऊन परवाना देण्याचे निर्देश देण्यात आलेत. सरकारने 20 मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या शासनपत्रातही या संदर्भातील कार्यवाही करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या सर्व निर्णयामुळे राज्यातील इंधन पुरवठ्याला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. हे ही वाचा… IG दत्तात्रय कराळेंनी अशोक खरातला पाठिशी घातले:तृप्ती देसाई यांचा आरोप; भोंदू खरातचे प्रकरण गतवर्षीपासून दाबले जात असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नाशिकचे तत्कालीन आयजी दत्तात्रय कराळे यांच्यावर अशोक खरातला पाठिशी घालण्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा दत्तात्रय कराळे यांचा गुरू होता. त्यामुळे ते आपल्या गुरूवर कशी कारवाई करतील? त्यांनीच त्याला पाठिशी घातले, असे त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी भोंदू अशोक खरातचे एन्काउंटर होण्याची भीतीही व्यक्त केली. वाचा सविस्तर
नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांची यादी अधिकच भयावह होत चालली आहे. आधीच अनेक महिलांच्या शोषणाप्रकरणी कोठडीत असलेल्या खरातविरुद्ध आता नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात आणखी एक अत्यंत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिला गरोदर असताना तिच्यावर 'पूजा विधी'च्या नावाखाली अत्याचार केल्याचा धक्कादायक आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. नव्याने समोर आलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला गर्भवती असताना अशोक खरातने तिला विधी करण्याच्या बहाण्याने बोलावले होते. यावेळी महिलेसोबत आलेल्या तिच्या पतीला कार्यालयाबाहेर बसवून त्याने आतमध्ये 'उपचार' आणि 'धार्मिक विधी'चे नाटक करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या कृत्याबद्दल कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने पीडितेला दिली होती. या नवीन तक्रारीमुळे अशोक खरातचा पाय आता आणखी खोलात गेला आहे. नकली साप अन् वाघाच्या कातड्याचा धाक विशेष तपास पथकाच्या (SIT) तपासात खरातच्या कार्यालयातून धक्कादायक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. भाविकांमध्ये आपली 'दैवी शक्ती' सिद्ध करण्यासाठी आणि त्यांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी अशोक खरात नकली साप आणि वाघाच्या कातड्याचा वापर करत असे. या अघोरी साहित्याद्वारे तो विधी करत असल्याचे भासवत असे. या कृत्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी आता खरातवर 'महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्या'सह भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६४(१), ७४ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता अशोक खरातचे पाप उघड झाल्यानंतर आता आणखी तीन महिलांनी धैर्याने पुढे येत तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे. 'एसआयटी'ने या महिलांचे जबाब अत्यंत गोपनीय पद्धतीने नोंदवण्यास सुरुवात केली आहे. या महिलांच्या साक्षीमुळे खरातविरोधातील कायदेशीर बाजू अधिक भक्कम होणार आहे. यापूर्वीच खरातच्या डिजिटल उपकरणांमधून १०० हून अधिक संशयास्पद व्हिडिओ मिळाल्याने खळबळ उडालेली असताना, आता प्रत्यक्ष समोर येणाऱ्या पीडितांच्या संख्येमुळे तपास यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. तपासाचा फास आवळला विशेष तपास पथक आता अशोक खरातच्या संपर्कातील इतर संशयित आणि त्याला मदत करणाऱ्यांची कसून चौकशी करत आहे. खरातने अंकशास्त्राच्या आणि भविष्याच्या नावाखाली किती महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, याचा पूर्ण भांडाफोड करण्यासाठी पोलिस आता तांत्रिक पुराव्यांसोबतच प्रत्यक्ष जबाबांवर भर देत आहेत. हे ही वाचा… ज्याला मूल-बाळ नाही त्यांनाही व्हायचे:मिरगावातील ग्रामस्थाने सांगितले अशोक खरातचे किस्से, म्हणाले- बाबा जे सांगतो ते होतेच महाराष्ट्रात सध्या भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या खरातच्या नादी लागल्याने राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना देखील त्यांच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता अशोक खरातबद्दल स्थानिक लोकांकडून काही माहिती समोर यायला लागली आहे. बाबाकडे गेल्यानंतर तो परफेक्ट सांगतो. तो सांगतो ते होतेच, असे आमच्याकडे दोन-तीन किस्से घडले असल्याचे स्थानिकाने सांगितले आहे. सविस्तर वाचा…
महाराष्ट्रात सध्या भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या खरातच्या नादी लागल्याने राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना देखील त्यांच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता अशोक खरातबद्दल स्थानिक लोकांकडून काही माहिती समोर यायला लागली आहे. बाबाकडे गेल्यानंतर तो परफेक्ट सांगतो. तो सांगतो ते होतेच, असे आमच्याकडे दोन-तीन किस्से घडले असल्याचे स्थानिकाने सांगितले आहे. मिरगावमध्ये अशोक खरातचे मोठे घर आहे. याच गावातील काही लोकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी एका इसमाने सांगितले की, बाबाकडे (अशोक खरात) गेल्यानंतर तो परफेक्ट सांगतो. तो सांगतो ते होतच, असे आमच्याकडे दोन-तीन किस्से घडले होते. ज्याला मूल-बाळ होत नाही, त्याला सांगितल्यानंतर मूल-बाळ झाल. असे किस्से परिसरात ऐकले आहेत. त्या माणसाबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला होता. बाहेरचे अनेक लोक त्यांच्याकडे येत होते. बाबांनी असे करायला नको होते. परिसरात त्यांचे खूप मोठे नाव होते. आता गावाचे नाव बदनाम झाले असल्याचे येथील ग्रामस्थाने 'मुंबई तक'शी बोलताना सांगितले आहे. पुढे बोलताना त्या ग्रामस्थाने सांगितले की, आमचा साहेबांशी (अशोक खरात) 9-10 वर्षांपासून परिचय आहे. आम्ही मूळचे इथलेच आहोत. त्यामुळे जाणे-येणे अगदी जवळून आहे. येथील शंकराचे मंदिर गावाची शानच आहे. मंदिरासाठी लोकांचा विरोध राहणार नाही. हे प्रकरण उघड झाल्यानंतर लोकांचा त्यांना विरोध असेल. मीडियासमोर हे प्रकरण समोर आले. आम्हाला याची माहिती असती तर आमचे आणि त्यांचे संबंध वाईटच असते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. स्थानिक लोकांना प्राधान्य दिले नाही ग्रामस्थाने पुढे सांगितले की, आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. मात्र, त्यांच्याकडे असलेल्या वेटिंगमुळे आम्ही कधी त्यांच्याकडे थांबलो नाही. ते स्थानिक लोकांना कधी प्राधान्य देत नव्हते. बाहेरचे लोक शनिवार-रविवारी भरपूर असायचे. आम्ही घरातील समस्या घेऊन जाणार होतो. पण आम्हाला त्याने वेळ न दिल्याने नंतर परत जाणे झाले नाही. आमचा घरगुती प्रॉब्लेम होता. वेळ न दिल्याने आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही. राजकीय नेत्यांना त्यांच्याबद्दल माहिती असते तर तेही इथे आले नसते. या व्यक्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात गावाचे नाव बदनाम झाले आहे. पैशांची मागणी व्हायची पुढे बोलताना ते म्हणाले, आम्ही बाहेरच्या लोकांना कधीच विचारले नाही, तुम्ही कशासाठी येता? आणि का येता? आमच्या समस्येचे निवारण करण्यासाठी त्यांनी आम्हाला नाशिकला बोलावले होते. मात्र, आमच्या मनातच नव्हते नाशिकला जायचे.. कारण तिथे पैसे मागतात, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. आम्ही गरीब माणसं आहोत, आमच्याकडे काय पैसे नव्हते.
महाराष्ट्रात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी पक्षाच्या सर्व खासदारांची तातडीने बैठक बोलवल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच पक्षांतर्गत नाराजी असल्याचे देखील बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री व शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हापासून ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली असल्याचे समजते. दिल्लीत खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या ठाकरे गटाच्या खासदारांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत अंतर्गत नाराजी उफाळून आल्याची माहिती मिळत असून, यावेळी खासदारांनी थेट वरिष्ठ नेत्यांसमोर आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खासदारांना पुरेसा वेळ देत नाहीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाकडून अपेक्षित असलेले पाठबळ किंवा मदत मिळाली नाही, अशा शब्दांत खासदारांनी आपली उघड नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. संजय राऊत यांच्या बैठकीत खासदारांनी नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे समजते. जर उद्धव ठाकरेंना प्रकृती किंवा इतर कारणांमुळे काही मर्यादा असतील, तर आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र का फिरत नाहीत? असा सवालही खासदारांनी विचारला होता. खासदारांच्या या आक्रमक भूमिकेनंतर आज उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. आता या बैठकीतून सध्यातरी सर्व काही आलबेल असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका विधवा महिलेशी वर्षभर लैंगिक संबंध ठेवून लग्नास नकार देणाऱ्या एका कथित मठाधिपतीच्या नांदेड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पीडित महिला ज्या व्यक्तीला गुरू माणून श्रद्धेने शरण गेली, अखेर त्यानेच तिचा घात केला. या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, पीडित विधवा महिला मे 2025 मध्ये पहिल्यांदा नांदेड शहरातील गाडीपुरा भागातील एका मठात गेली होती. तिथे तिची ओळख हरिगिरी महाराज यांच्याशी झाली. पीडिता दर गुरूवारी मोठ्या श्रद्धेने या मठात दर्शनासाठी येत होती. तिने हरिगिरी महाराजांना आपले गुरू मानले होते. पण या भोंदू महाराजाची तिच्यावर वाईट नजर होती. तो सतत तिला फोन करून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. अखेर त्यात त्याला यश आले. वाढदिवसाच्या दिवशीच केला बलात्कार हरिगिरी महाराजांचा 14 जुलै 2025 रोजी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने तो स्वतः पीडित महिलेच्या घरी गेला. तिथेच त्याने पहिल्यांदा महिलेवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर ही बाब कुणालाही न सांगण्यासाठी त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत त्याने अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. पण त्यानंतर महिलेने लग्नाचा तगादा लावताच तो तिला टाळू लागला. मी संन्यासी असल्यामुळे लग्न करू शकत नाही, असे म्हणत आपले हात वर करू लागला. यामुळे आपली फसवणूक झाल्याची बाब महिलेच्या लक्षात आली. त्यानंतर तत्काळ तिने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर झालेल्या चौकशीत पोलिसांनी भोंदू हरिगिरी महाराजाच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलिसांनी हरिगिरी दत्तगिरी महाराजांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो पोलिसांच्या कोठडीत आहे. नाशिकच्या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर नांदेडमध्ये हे प्रकरण समोर आल्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. काय आहे अशोक खरात प्रकरण? नाशिकच्या अशोक खरात नामक भोंदू बाबाने महिलांना भविष्य सांगण्याच्या बहाण्याने त्यांचे लैंगिक शोषण केले. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. या प्रकरणी सध्या अशोक खरातला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना नुकताच या प्रकरणात राजीनामाही द्यावा लागला आहे. हे ही वाचा… IG दत्तात्रय कराळेंनी अशोक खरातला पाठिशी घातले:तृप्ती देसाई यांचा आरोप; भोंदू खरातचे प्रकरण गतवर्षीपासून दाबले जात असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नाशिकचे तत्कालीन आयजी दत्तात्रय कराळे यांच्यावर अशोक खरातला पाठिशी घालण्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा दत्तात्रय कराळे यांचा गुरू होता. त्यामुळे ते आपल्या गुरूवर कशी कारवाई करतील? त्यांनीच त्याला पाठिशी घातले, असे त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी भोंदू अशोक खरातचे एन्काउंटर होण्याची भीतीही व्यक्त केली. वाचा सविस्तर
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार या खरातने केले असल्याचे समोर आले आहे. तसेच रुपाली चाकणकर यांचे अनेक फोटो व्हिडिओ अशोक खरातसोबत असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा पदावरून पायउतार व्हावे लागले आहे. या भोंदुगिरीच्या प्रकरणांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार मांडले आहेत. अंबादास दानवे यांनी ट्विट करत महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्व तसेच समाजधुरिण यांना उद्देशून म्हटले की, महाराष्ट्र हे देशातील एक अत्यंत पुरोगामी, विचारी आणि स्वाभिमानी प्रवृत्ती जपणारे राज्य आहे. स्वातंत्र्योत्तर काळात आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या उत्तुंग नेतृत्वाने या मातीला विचारांचे खतपाणी घातले. या महान नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात कधीही अंधभक्तीला, बुवाबाजीला किंवा ढोंगीपणाला थारा दिला नाही. उलट, त्यांनी सामान्यांमध्ये तार्किक विचार आणि प्रखर वैज्ञानिक दृष्टिकोनाची पेरणी केली. एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष प्रहार पुढे अंबादास दानवे म्हणाले, आज मात्र राज्याची सद्यस्थिती आणि विशेषतः नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात यांसारखी प्रकरणे पाहिल्यावर मनात दाटून येणारा प्रश्न हाच आहे की, हा खरोखर तोच महाराष्ट्र आहे का? जिथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेबांसारखा अंधश्रद्धा मुळापासून उपटून टाकणारा आणि थोतांडावर आसूड ओढणारा क्रांतीकारी नेता जन्माला आला, त्याच नेत्याचे भक्त म्हणवणारे आज सत्ता आणि स्वार्थासाठी खरात सारख्या भोंदू प्रवृत्तींची संगत आवडीने पसंत करत आहेत? ज्या प्रवृत्तींवर शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर प्रहार केले, आज त्याच प्रवृत्तींच्या मांडीला मांडी लावून माननीय बाळासाहेबांचा वारसा सांगणारे बसलेले पाहून मनात या ढोंगीपणाची चीड उत्पन्न होते, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर प्रहार केला आहे. तुमचे 'आक्रोश मोर्चे' कुठे गेले? पुढे अंबादास दानवे म्हणाले, नाशिकमधील या तथाकथित 'कॅप्टन'ने ज्या प्रकारे जनता, बायकांची फसवणूक केली आणि त्याला ज्या पद्धतीचे राजकीय अभय मिळत गेले, ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारे आहे. भाजपचे सो कॉल्ड मोर्चा फेम नितेश राणे, महेश लांडगे यांसारखे नेते जे दरवेळी हिंदुत्वाचा आव आणून गळे काढत असतात, त्यांना आज माझा एक सवाल आहे— आता तुमचे 'आक्रोश मोर्चे' कुठे गेले? अशोक खरातच्या या भोंदूपणामुळे ज्या शेकडो महिलांची फसवणूक झाली, ज्यांना मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले, त्या पीडित महिलाही हिंदूच आहेत ना? मग आज तुमचा हिंदुत्वाचा कैवार कुठे हरवला आहे? राजकीय सोयीसाठी हिंदुत्वाचा वापर करणाऱ्यांना या भगिनींचे अश्रू का दिसत नाहीत? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. अशा प्रवृत्तींना थारा देऊन अधोगतीचा धडा गिरवायचा का? माझ्या आईने मला नेहमीच एक गोष्ट शिकवली आहे, ती म्हणजे स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवणे. ते मी पाळतो आणि पाळत राहणार. महाराष्ट्र हा कायम देशाला राजकारण आणि समाजकारणात दिशा देणारा अग्रगण्य प्रांत ठरला आहे. राजकारणाची झालेली अभूतपूर्व वाताहत अख्ख्या देशाने पाहिलीच आहे, पण आता समाजकारणातही आपण अशा प्रवृत्तींना थारा देऊन अधोगतीचा धडा गिरवायचा का? हे एकदा स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीला नक्की विचारून पहा, असे आवाहनही अंबादास दानवे यांनी केले आहे.
नाशिकमध्ये गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणाने आता वेगळीच दिशा घेतली असून, या वादात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे समोरासमोर आल्या आहेत. रुपाली पाटील- ठोंबरे यांनी देसाईंवर कोट्यवधींच्या 'सेटलमेंट'चा खळबळजनक आरोप केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा केला की, अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओ घेऊन दोन जण तृप्ती देसाई यांच्याकडे आले होते. मात्र, पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी देसाई यांनी राज्य महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी 'तडजोड' केली. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. SIT ने देसाईंचीही सखोल चौकशी करावी या प्रकरणाचा तपास सध्या विशेष तपास पथकाद्वारे (SIT) सुरू आहे. रुपाली पाटील यांनी या चौकशीचा फेरा आता तृप्ती देसाई यांच्यापर्यंत नेण्याची मागणी केली आहे. ज्या तृप्ती देसाई महिलांच्या हक्कासाठी लढण्याचा आव आणतात, त्यांनीच या गंभीर प्रकरणात तडजोड कशी केली? या प्रकरणाचे मूळ शोधण्यासाठी SIT ने देसाईंचीही सखोल चौकशी करावी, अशी आक्रमक भूमिका पाटील यांनी घेतली आहे. या गंभीर आरोपांनंतर तृप्ती देसाई काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पेनड्राईव्ह घेऊन आले- देसाई तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या, गतवर्षी मार्च महिन्यात श्रीरामपूरच्या एका दैनिकात अशोक खरातशी संबंधित एक बातमी आली होती. तेव्हा मला फोन आला होता. कॅप्टन म्हणून ओळखला जाणाऱ्या अशोक खरातचे काही व्हिडिओ आमच्याकडे येणार असल्याचे मला सांगण्यात आले होते. त्यानंतर महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दबाव आणला. जे लोक पेनड्राईव्ह देणार होते, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. त्यामुळेच त्या लोकांनी ते व्हिडिओ देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर गत 5 मार्च रोजी काही लोक तो पेनड्राईव्ह घेऊन आले. त्यानंतर अशोक खरात परदेशात पळून जाणार होता. पण मी त्या लोकांना पोलिसांकडे पाठवले आणि पुढे कारवाई झाली. मुख्यमंत्र्यांनी एन्काउंटरचा डाव उधळून लावावा अशोक खरात याचे संबंध अनेक मंत्री, राजकारण्यांशी आहेत. त्यामुळे अनेकांचे पितळ उघडे पडू शकते. त्याचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध आहेत. हे संबंध पुढे येऊ शकतात. म्हणूनच अशोक खरात याला संपवण्याचा कट रचला जाऊ शकतो, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या, अशोक खरातने मोठे कांड केलेले आहे. त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केलेले आहे. त्याला तातडीने संपवून चालणार नाही. त्याला प्रत्येक दिवशी शिक्षा मिळाली पाहिजे. त्याचे एन्काऊंटर करण्याचा डाव असेल, तर तो उधळून लावला पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणीही तृप्ती देसाई यांनी केली.
ई-केवायसीसाठी शेवटचे १० दिवस शिल्लक
मुंबई : प्रतिनिधी लाडकी बहीण योजनेच्या तिस-या टप्प्यातील पडताळणीसाठी आता केवळ शेवटचे १० दिवस शिल्लक आहेत. ३१ मार्चपर्यंत लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे. तर अपात्र महिलांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ४५ लाखांपेक्षा जास्त महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. अटी आणि नियमांचे पालन न करणा-या लाडक्या बहिणींवर कडक कारवाई देखील करण्यात येत […] The post ई-केवायसीसाठी शेवटचे १० दिवस शिल्लक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नाशिकचे तत्कालीन आयजी दत्तात्रय कराळे यांच्यावर अशोक खरातला पाठिशी घालण्याचा आरोप केला आहे. अशोक खरात हा दत्तात्रय कराळे यांचा गुरू होता. त्यामुळे ते आपल्या गुरूवर कशी कारवाई करतील? त्यांनीच त्याला पाठिशी घातले, असे त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी भोंदू अशोक खरातचे एन्काउंटर होण्याची भीतीही व्यक्त केली. तृप्ती देसाई टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या की, अनेक बडे नेते अशोक खरातच्या संपर्कात होते. त्यांच्यात आर्थिक संबंधही होते. आमदार, खासदार, आयएएस अधिकारी आदी सर्वांचेही खरातशी संबंध होते. या सर्वांची नावे पुढे येऊ नयेत म्हणून एकच मार्ग उरतो. तो म्हणजे खरातला संपवण्याचा. त्यामुळे अशोक खरातचे एन्काउंटर होऊ शकते. त्यामुळेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा डाव उधळवून लावण्याचे आवाहन केले आहे. हे रॅकेट पूर्णतः उद्धवस्त करण्याची गरज आहे. या प्रकरणात जे कुणी अधिकारी, नेते आहेत, त्यांच्यावर मकोका अंतर्गत झाली पाहिजे. अशोक खरातला शिक्षा झाली पाहिजे. तसेच त्याच्याशी संबंध असलेल्यांवरही कारवाई झाली पाहिजे. गतवर्षीच प्रकरण उजेडात येणार होते तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या, गतवर्षी मार्च महिन्यात श्रीरामपूरच्या एका दैनिकात अशोक खरातशी संबंधित एक बातमी आली होती. तेव्हा मला फोन आला होता. कॅप्टन म्हणून ओळखला जाणाऱ्या अशोक खरातचे काही व्हिडिओ आमच्याकडे येणार असल्याचे मला सांगण्यात आले होते. त्यानंतर महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दबाव आणला. जे लोक पेनड्राईव्ह देणार होते, त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. त्यामुळेच त्या लोकांनी ते व्हिडिओ देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर गत 5 मार्च रोजी काही लोक तो पेनड्राईव्ह घेऊन आले. त्यानंतर अशोक खरात परदेशात पळून जाणार होता. पण मी त्या लोकांना पोलिसांकडे पाठवले आणि पुढे कारवाई झाली. आयजी दत्तात्रय कराळेंवर गंभीर आरोप तृप्ती देसाईंनी यावेळी आयजी दत्तात्रय कराळेंवर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, आयजी दत्तात्रय काळेंनी अशोक खरातला वारंवार पाठिशी घातले. त्यामुळे त्याची हिंमत वाढली. आयजीच खरातला गुरू मानत असतील, तर ते त्यांच्यावर कशी कारवाई करणार? यामुळे हे प्रकरण गतवर्षी उघड झाले नाही. पोलिसांचा दबाव वाढला होता. आयजी कराळे यांची या प्रकरणात मोठी चूक आहे. चाकणकरांचा प्रकरण दाबण्याचा पुरेपुर प्रयत्न रुपाली चाकणकरांनी पीडित महिलांसाठी एकही फोन केला नाही. पण त्यांनी त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तीला पाठिशी घातले. त्यामुळे त्याच याला जबाबदार आहेत. त्यांनी पत्रकारांवर दबाव टाकला. त्यांना नोटीसा पाठवल्या. त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी केले पाहिजे. चाकणकरच नाही तर या प्रकरणात जे-जे दोषी आढळतील, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करतो हे चाकणकरांना गतवर्षीच माहिती झाले होते. पण त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे अशोक खरातच्या कृत्यांची मला माहिती नव्हती हे त्यांचे म्हणणे साफ चुकीचे आहे. चाकणकर अशोक खरातला गुरू मानत होत्या.आता अशोक खरातला अटक झाली आहे. त्यानंतर आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे. सरकारसाठी महिलांची प्रतिष्ठा अत्यंत महत्त्वाची असल्याचे ते म्हणालेत. त्यामुळे पुढे काय कारवाई होते हे पहावे लागेल, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.
हिंदू रक्षा समितीने बडकस चौकात सामूहिक रामरक्षा पठन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभाग घेतला. देव, देश आणि धर्माच्या कल्याणासाठी हा सत्यसंकल्प करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार टोळीचे सदस्य मुकुल कानिटकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. श्रीरामरक्षा स्तोत्र हे श्रीरामरूपी पुरुषार्थाने सीताशक्तीच्या साहाय्याने श्रीहनुमंतासारखा पराक्रम करण्यासाठी आचरणात आणण्याचा सुमार्ग आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. व्यासपीठावर नागपूरच्या महापौर नीता ठाकरे आणि समितीचे संयोजक सुनील काबरा उपस्थित होते. मातृशक्ती जागरणाच्या या अभिनव उपक्रमाचे हे एकोणविसावे वर्ष होते. 2006 साली द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी गोळवलकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त याची सुरुवात झाली होती. रामरक्षेचे सामूहिक आवर्तन म्हणजे देव, देश आणि धर्माच्या कल्याणासाठी केलेला सत्यसंकल्प आहे. कानिटकर म्हणाले की, जगातील जवळपास 56 देश सध्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष युद्धाच्या छायेत असले तरी भारतीय जनमानस शांत, स्थिर आणि विकसित राष्ट्राच्या प्रगतीसाठी आत्मबलाने अग्रेसर आहे. ही रामरक्षेचीच प्रचिती आहे. 500 वर्षांच्या संघर्षानंतर श्रीरामजन्मभूमीवर साकारलेले राष्ट्रमंदिर आपण सगळे पाहू शकलो. तसेच, 200 वर्षानंतर देवव्रत रेखे यांसारखा युवक दंडक्रमविक्रमादित्य होऊ शकला, हे वैदिक मंत्रातील संयम आणि संकल्पाचे प्रतीक आहे. त्यांनी मातृशक्तीला फॅशनच्या नावाखाली सुरू असलेल्या उन्मादापासून सावध राहण्याचा सल्लाही दिला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर हजारो महिलांनी सामूहिक रामरक्षा पठन केले. यावेळी पंडित बच्छराज व्यास चौकातील वातावरण राममय झाले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इतवारी भाग संघचालक संजय शिरपूरकर, दक्षिणामूर्ती नगर संघचालक दिनेश वंडलकर, नगरसेवक सुधीर राऊत, भारतीय शिक्षण मंडळाचे महानगर मंत्री डॉ. भालचंद्र हरदास, श्रीपाद रिसालदार, चंदू पेंडके, माजी नगरसेविका श्रद्धा पाठक, प्रतिभा दटके, मोहिनी खोत, राखी जामकर, माधुरी मांजरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन चारुता हरदास यांनी केले आणि महाआरतीने सांगता झाली.
पुण्यातील वाघोली येथे रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित 68 व्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेचा आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. अवघ्या काही तासांत महाराष्ट्राला नवा 'महाराष्ट्र केसरी' मिळणार असून, या मानाच्या गदेवर कोण नाव कोरणार याकडे संपूर्ण कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे. यंदा माती विभागाच्या अंतिम फेरीत हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेख आणि सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाड यांच्यात हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार असून, या दोन्ही दिग्गज मल्लांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. दुसरीकडे, गादी विभागातून नाशिकचा माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सद्गीर आणि सोलापूर शहरचा जय पाटील यांच्यात अंतिम झुंज रंगणार आहे. उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात जय पाटीलने माजी विजेता पृथ्वीराज मोहोळला अवघ्या 36 सेकंदात चितपट करून सर्वांना थक्क केले, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत हर्षवर्धन सद्गीरने 2020 मधील आपली लय कायम राखत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलवर 6-2 अशा गुणफरकाने मात करून अंतिम फेरीत धडक मारली. आता या चारही मल्लांपैकी 2026 चा महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी कोण ठरणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. माती विभागाच्या पहिल्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत 'भारंदाज' डावाच्या जोरावर सोलापूर शहराच्या रविराज चव्हाणवर 10-0 असा एकतर्फी विजय मिळवला. तर दुसऱ्या अटीतटीच्या उपांत्य लढतीत हिंगोलीच्या 'चपळ चित्त्या'ने म्हणजेच सिकंदर शेखने अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकरचा 4-3 अशा निसटत्या गुणफरकाने पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. या विजयामुळे आता माती विभागाच्या अंतिम झुंजीत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड या दोन दिग्गज मल्लांमध्ये कुस्तीचा थरार पाहायला मिळणार आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत माती विभागाच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेख आणि सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाड आमनेसामने ठाकले असून, या 'रि-मॅच'मुळे कुस्ती शौकिनांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वी 2023 च्या स्पर्धेतही हे दोन्ही तुफानी मल्ल माती विभागाच्या अंतिम लढतीत भिडले होते, मात्र त्यावेळी पंचांच्या एका वादग्रस्त निर्णयामुळे सिकंदरला पराभव स्वीकारावा लागून महेंद्र गायकवाड विजयी ठरला होता, ज्यावर राज्यभरात मोठी टीका झाली होती. त्यानंतर महेंद्रला मुख्य अंतिम फेरीत शिवराज राक्षे कडून पराभूत व्हावे लागले होते. आता त्याच ऐतिहासिक वादाच्या पार्श्वभूमीवर, चपळाई विरुद्ध बलदंड शरीरयष्टी अशा या अटीतटीच्या झुंजीत कोण मैदान मारणार आणि 2023 च्या त्या वादाचा वचपा निघणार का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असून, विशेष तपास पथकाने शनिवारी अशोक खरात आणि त्याचा ऑफिसबॉय नीरज जाधव यांची समोरासमोर बसवून चौकशी केली असता, पोलिसांदेखतच दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. या नाट्यमय घडामोडीसोबतच नीरज जाधवच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डमध्ये (सीडीआर) तब्बल 30 ते 40 महिलांचे संपर्क क्रमांक आढळल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. या नव्या धाग्यादोऱ्यांमुळे एसआयटीच्या हाती लवकरच ठोस पुरावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष तपास पथकाने नीरज जाधवच्या कॉल डिटेल रेकॉर्डची सखोल तपासणी केली असता, त्यामध्ये तब्बल 30 ते 40 महिलांचे संपर्क क्रमांक आढळल्याने या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. 'फोकस प्रॉपर्टी' येथे ऑफिसबॉय म्हणून काम करत असताना नीरज या महिलांच्या सतत संपर्कात राहून त्यांना अशोक खरातचे निरोप पोहोचवत असल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या खुलाशामुळे नीरज जाधवच्या माध्यमातून महत्त्वाचे पुरावे हाती लागण्याची दाट शक्यता असून, या भोंदूबाबाची सर्व काळी कृत्ये आणि गुन्हेगारी कुंडली लवकरच उघड होणार असल्याची शक्यता आहे. अशोक खरात प्रकरणातील तपासाचा वेग कायम असून, आज रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही एसआयटीचे अधिकारी हिमांशू चौकशीसाठी पोलिस क्लब येथे दाखल झाले आहेत. खरातची आज पुन्हा एकदा एसआयटीमार्फत कसून चौकशी केली जाणार असून, या चौकशीतून नवीन आणि महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. आयकर विभागाची प्रकरणात उडी या प्रकरणाला आता आर्थिक वळण मिळाले असून, एसआयटीच्या जोडीला आयकर विभागाने देखील या तपासात उडी घेतली आहे. खरातच्या नावावर असलेल्या कोट्यवधींच्या मालमत्ता, संशयास्पद व्यवहार, उत्पन्नाचे स्त्रोत आणि प्राप्तिकर विवरणपत्रांची आता सखोल पडताळणी होणार आहे. विशेष म्हणजे, त्याला आर्थिक मदत करणारे देणगीदार आणि त्याचे व्यावसायिक भागीदारही आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले असून, खरातच्या मोठ्या आर्थिक जाळ्याचा लवकरच पर्दाफाश होण्याची चिन्हे आहेत.
स्वत:ला देवाचा अवतार सांगून महिलांचे शोषण करणारा भोंदूबाबा 'कॅप्टन' अशोक खरात सध्या गजाआड आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 58 व्हिडिओ जप्त केले असून, यात अनेक बडे नेते आणि हस्तींचे चेहरे उघडे पडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर प्रश्नांची सरबत्ती करत समाजाला आरसा दाखवला आहे. अतुल कुलकर्णी यांनी उपस्थित केलेला पहिलाच प्रश्न काळजाला भिडणारा आहे. ते विचारतात, एखादा बाबा पकडला गेला कीच त्याला 'भोंदू' का म्हणायचे? त्याआधी तो काय असतो? आणि जे कधीच पकडले जात नाहीत, त्यांचे काय? हा प्रश्न केवळ खरातपुरता मर्यादित नसून, गल्लीबोळात उभे राहिलेल्या स्वयंघोषित महाराजांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. अंध होण्याला कारणीभूत कोण? अतुल कुलकर्णी म्हणाले की, जेव्हा एखाद्या महाराजाचे काळे कारनामे चव्हाट्यावर येतात, तेव्हा त्याचे अनुयायी स्वतःला 'पीडित' मानतात. पण , हे भक्त नेमके कोण असतात? भागीदार, पीडित, अंधळे, अंधश्रद्धाळू की मूर्ख?अंध होण्याला कारणीभूत कोण? फसवणारा की स्वतःहून फसणारा? असा सवाल कुलकर्णी यांनी केला आहे. हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं, तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का? ज्याप्रमाणे आपण डोळे मिटून एखाद्या बाबावर विश्वास ठेवतो, तसाच विश्वास आपण राजकीय नेत्यांवरही ठेवतो का? असा बोचरा सवाल त्यांनी केला आहे. तटकरे साहेब, तुमच्या बोटाच्या जखमेचे रहस्य काय?- लवांडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोंदू अशोक खरातच्या मुद्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अहो सुनील तटकरे साहेब, तुमच्या बोटाचे रहस्य काय? भोंदू अशोक खरातच्या नादी लागू कुठे रक्ताचा अभिषेक केला होता का? असा तिखट सवाल शरद पवार गटाने या प्रकरणी सुनील तटकरेंना केला आहे. भोंदू अशोक खरात व त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या राजकारण्यांमुळे पुरोगामी महाराष्ट्राची शरमेने मान खाली गेली आहे. या प्रकरणी राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर भोंदू खरातच्या सांगण्यानुसार अनामिका कापल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानेही सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर असेच आरोप केलेत. सुनील तटकरेंनी आपल्या हाताचा अंगठा अशोक खरातच्या सूचनेनुसार रक्ताचा अभिषेक करण्यासाठी कापला होता का? असा सवाल शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. वाचा सविस्तर नाशिकच्या भोंदूबाबाचा एन्काउंटर होऊ शकतो? महिलांचे लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत असलेल्या नाशिकच्या हायप्रोफाईल भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला आता एक वेगळेच वळण लागले आहे. अशोक खरातचे बड्या राजकारण्यांशी आणि मंत्र्यांशी संबंध असल्याने त्यांचे नाव समोर येऊ नये, यासाठी खरातचा एन्काऊंटर करण्याचा कट रचला जाऊ शकतो, असा खळबळजनक दावा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केला आहे. या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भोंदू अशोक खरातच्या मुद्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अहो सुनील तटकरे साहेब, तुमच्या बोटाचे रहस्य काय? भोंदू अशोक खरातच्या नादी लागू कुठे रक्ताचा अभिषेक केला होता का? असा तिखट सवाल शरद पवार गटाने या प्रकरणी सुनील तटकरेंना केला आहे. भोंदू अशोक खरात व त्याच्याशी संबंध ठेवणाऱ्या राजकारण्यांमुळे पुरोगामी महाराष्ट्राची शरमेने मान खाली गेली आहे. या प्रकरणी राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर भोंदू खरातच्या सांगण्यानुसार अनामिका कापल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानेही सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर असेच आरोप केलेत. सुनील तटकरेंनी आपल्या हाताचा अंगठा अशोक खरातच्या सूचनेनुसार रक्ताचा अभिषेक करण्यासाठी कापला होता का? असा सवाल शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. कुणी तर्जनी, तर कुणी अंगठा कापून घेतला विकास लवांडे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, अहो सुनील तटकरे साहेब तुमच्या फोटोमध्ये बोटाच्या जखमेचे रहस्य काय आहे? लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरातच्या नादी लागून कुठं रक्ताचा अभिषेक केला होता का? कुणी तर्जनी कुणी अंगठा कापून घेतला आहे. काय भानगड कळत नाही. जरा खराखुरा खुलासा होऊ द्या साहेब. आपण ज्येष्ठ नेते आहात बिनधास्त बोला साहेब. त्या अशोक खरातची कॅप्टन फाईल असली तरी तुम्हाला कसली भीती? तुम्ही खरं खरं बोलाच. महाराष्ट्र वाट बघतोय. हिंदूत्ववादी संघटनांवरही साधला निशाणा विकास लवांडे यांनी यावेळी अशोक खरातच्या मुद्यावर मौन बाळगणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांवरही निशाणा साधला. लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरात ज्याने हिंदू धर्मातील अनेक महिलांचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले , फसवणूक केली. अशोक खरात हा एकमेव नाही असे अनेक भोंदू बाबा महाराष्ट्रात आणि देशात आहेत जे सर्वसामान्य लोकांचे आणि महिलांचे मानसिक शारीरिक आणि आर्थिक शोषण करत असतात. मात्र या विषयावर आरएसएस परिवारातील तथाकथित हिंदुत्ववादी संघटना, बजरंग दल, भिडेंचे धारकरी आणि भाजपाचे आमदार महेश लांडगे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार नितेश राणे,आमदार संग्राम जगताप हिंदू जन आक्रोश मोर्चा कधी काढणार आहात की नाही? फक्त आरोपी परधर्मीय असेल तरच मोर्चे काढणार? उघडा डोळे बघा नीट, असे त्यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारेंनी चाकणकरांवर केले होते असेच आरोप दुसरीकडे, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर असेच आरोप केले होते. त्या एका पीडितेचा दाखला देत म्हणाल्या होत्या, रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिक कापली होती. हे कृत्य अशोक खरातपुढे झाले होते. खरातनेच कर्मकांडासाठी त्यांना अनामिक कापण्यास सांगितले होते. त्यातून त्यांच्या बोटाला जखम झाली. ती जखम तब्बल 4 महिने तशीच होती. त्याचा एक फोटो माझ्याकडे आहे. त्यात चाकणकरांनी अनामिकाला बँडेज लावल्याचे दिसून येत आहे. रुपाली चाकणकर व अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर उपस्थित होत्या. एवढेच नव्हे तर चाकणकरांच्या घरात खरात यांची भाची राहते. प्रस्तुत प्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यामुळे त्यांची तत्काळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली पाहिजे. त्या फरार होण्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांनी यापूर्वीही आपल्या पदाचा दुरुपयोग करून या प्रकरणी अनेकांवर दबाव आणला आहे. त्या मध्यरात्री 2-2 वाजता फोन करून पीडितांना धमकी देत होत्या. त्यामुळे त्यांचा सीडीआर तपासला गेला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे व त्यांची नार्को टेस्ट केली गेली पाहिजे, असे अंधारे म्हणाल्या.
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने धर्माच्या तसेच कर्मकांडाच्या नावाखली अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे असंख्य व्हिडिओ समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी विधान केले आहे. अध्यात्माच्या नावाखाली कर्मकांड करू नये. तसेच कर्मकांडाकडे कोणी जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले, जीवनातील दुःख कमी करण्याची ताकद आपल्या श्रद्धास्थानाच्या माध्यमातून करावी. अध्यात्माच्या नावाखाली कर्मकांड करू नये. एखादी व्यक्ती कर्मकांड करू लागला की त्यातून तो बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे कर्मकांडाकडे कोणी जाऊ नये. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ ग्राम अभियान व पालखी ग्राम प्रदक्षिणा आयोजित करण्यात आली होती. यावेळी वळसे पाटील बोलत होते. दिलीप वळसे पाटील म्हणाले, दैनंदिन जीवनात आम्ही विविध धार्मिक कार्यक्रमात जात असतो. निरगुडसर येथील महिला श्री दत्त महाराज, स्वामी समर्थांची नि:शुल्क सेवा करत असून आयुष्यात श्री दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ यांचे विचार जोपासून कार्य करणे गरजेचे आहे. समर्थांचे, गुरुमाऊलीं स्वामींचे आशीर्वाद आपल्याला पुढे घेऊन जातील.स्वामींची सेवा करण्यासाठी सभा मंडप, सभागृह हवे असेल तर बांधून देतो. श्री स्वामी समर्थ यांचे मंदिर निरगुडसर येथे असावे. यासाठी 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त पैसे दिले जातील, असेही यावेळी त्यांनी जाहीर केले. पुढे बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, माझ्या आयुष्यात श्री दत्त महाराज व माझे खूप जुने नाते असून माझ्या वडिलांचे नाव दत्तात्रय व आईचे नाव अनुसया होते. लहानपणी घराच्या देव्हाऱ्यात दत्तात्रयाचा छोटा फोटो होता. त्याची पूजा करायचे काम माझ्याकडेच असायचे.त्यातून आनंद मिळायचा. दरम्यान, गावात श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेची पालखीतून अत्यंत उत्साहात मिरवणूक काढण्यात आली असून, यावेळी ठिकठिकाणी काढलेल्या मनमोहक रांगोळ्या आणि महिलांच्या लक्षणीय उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीता थोरात यांनी प्रास्ताविक केले, ज्यानंतर सतीश माटे व संगीता थोरात यांची समयोचित भाषणे झाली, तर संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन विजय कुलकर्णी यांनी प्रभावीपणे केले. या सोहळ्याला भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, अनिल पाटील, स्वामी समर्थांचे ऊर्जा स्तोत्र सतीश मोटे, सरपंच रवींद्र वळसे पाटील, मेंगडेवाडीचे सरपंच बाळासाहेब मेंगडे, महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष सुरेश टाव्हरे, माजी उपसरपंच शांताराम गावडे, मुख्याध्यापक सुनील वळसे पाटील यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
देशाच्या अर्थव्सवस्थेचे आणि रुपयांचे काय होणार याची चिंता जनाब संजय राऊत यांनी करू नये. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार लोकांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करते, त्यामुळे पश्चिम बंगालमधील जनता आमच्यासोबत उभी राहील, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, ज्या पद्धतीने मविआचे सरकार महाराष्ट्रात अडीच वर्षे अन्याय करत होते, त्यांच पद्धतीने पश्चिम बंगालमधील सरकार सर्वसामान्य लोकांवर अन्याय करते. त्यामुळे यावेळी तिथे आमचे सरकार येणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची अवस्था ही उबाठासारखी होणार आहे. मंत्र्यांना सहआरोपी करा नवनाथ बन म्हणाले की, भोंदू बाबांना भेटणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी करा अशी मागणी संजय राऊत करतात. हाच न्याय लावायचा असेल तर याच भोंदू बाबासाठी पायघड्या घालणारे मविआ सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहआरोपी करायचे का? कारण त्यांनी दुष्काळाच्या काळात लोकांना पाणी नसताना या भोंदू बाबासाठी जीआर काढत भोंदू बाबासाठी पाणी उपलब्ध केले. 2003 मध्ये जर भोंदू बाबावर गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर 15 वर्षांनी मविआचे सरकार आले त्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते, तेव्हा या भोंदूबाबावर कारवाई करण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही. पण देवाभाऊंचे सरकार आल्यावर या भोंदू बाबावर कारवाई करण्यात आली आहे. मिलींद नार्वेकर, उद्धव ठाकरेंना सहआरोपी करायचे का? या प्रश्नाचे राऊतांनी हिंमत असेल तर उत्तर द्यावे. ..म्हणून राऊत बैठकीपासून दूर नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटामध्ये संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे सामना जोरात सुरू आहे. यामुळेच आज उबाठा गटाच्या खासदारांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आलेली असताना राऊत त्या बैठकीपासून दूर राहत दांडी मारणे पसंत केले आहे. कारण राऊत VS आदित्य ठाकरे सामना जोरात सुरू आहे. हे सुरू असताना राऊत आमदार आणि खासदारांच्या निधीबद्दल तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. उबाठा गटात सुद्धा दोन गट पडले आहेत.तुमची सत्ता असताना आमच्या 105 आमदारांना निधी देण्यात येत नव्हता. 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले त्यामुळे राऊतांनी निधीबद्दल बोलूच नये.
श्रद्धेच्या नावाने महिलांच्या अब्रुशी खेळणाऱ्या ढोंगी अशोक खरात विषयी दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या लबाड अशोक खरातने अनेक महिलांची फसवणूक केली. त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आता डी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या एका विवाहित विद्यार्थिनीने या भोंदू बाबाच्या कू कृत्याचा पर्दाफाश केला आहे. या 24 वर्षीय विद्यार्थिनीने जे सांगितले ते अक्षरशः अंगावर शहारे आणणारे आहे. पीडित विद्यार्थिनीने एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ती आपल्या पतीसोबत भोंदू अशोक खरातचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याच्या कार्यालयात गेली होती. तिथे अशोक खरातने तिचे दोन्ही हात पाहून तिच्या लग्नाला कुणाची तरी नजर लागल्याचे सांगून ती काढण्याची गरज व्यक्त केली. असे केले नाही तर सदर महिलेच्या जिवाचे काही बरेवाईट होऊ शकते अशी पुस्तीही त्याने जोडली. त्यामुळे सदर दाम्पत्य घाबरले. त्यांनी खरातकडे यावर उपाय सांगण्याची विनंती केली. त्यानुसार, खरातने त्यांना प्लास्टिकच्या एका बाटलीत पाणी देऊन ते 3 दिवस बेडरूममध्ये ठेवण्यास सांगितले. या 3 दिवसांत हे पाणी काळे झाले तर नजर दूर होईल असे समजा असे तो म्हणाले. जेवढे पाणी पिले तेवढा जास्त फायदा इतरांकडून अशोक खरातविषयी चांगल्या गोष्टी ऐकल्यानंतर, त्या जोडप्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर, बाबांनी त्या महिलेच्या पतीला खोलीबाहेर पाठवले आणि त्या महिलेला दरवाजा बंद करण्यास सांगितले. मग त्यांनी तिला एका तांब्याच्या भांड्यातून पिण्यासाठी पाणी दिले. त्या पाण्याची चव खारट व कडवट होती. ते पाणी पिल्यानंतर त्या महिलेला चक्कर येऊ लागली. मळमळल्यासारखे वाटू लागले. तिने तशी गोष्ट खरातला सांगितली. त्यावर तो तिला म्हणाला की, ती जितके जास्त पाणी प्राशन करेल, तेवढेच अधिक चांगले परिणाम मिळतील. त्यानंतर, त्याने त्या महिलेला डोक्यावर एक काचेचा ग्लास ठेवून व डोळे बंद करून गायत्री मंत्राचा जप करण्यास सांगितले. त्या महिलेने त्याने सांगितले तसे केले. मात्र, त्याच क्षणी भोंदू अशोक खरातने खोलीतील लाईट बंद केली. त्यानंतर त्याने सदर विद्यार्थिनीला मागच्या बाजूने पकडून तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. मी भगवान श्रीकृष्णाचा अवतार, तर तू 'राधा' आहेस असे सांगत, त्याने तिच्याशी अनैसर्गिक लैंगिक कृत्य केले. पती-पत्नीचा जीव घेण्याची दिली धमकी या घटनेनंतर भोंदू खरातने त्या विवाहितेला धमकावले आणि सक्त ताकिद दिली की, तिने कुणाकडेही याबद्दल वाच्यता केली, तर तो तिचा व तिच्या पतीचाही जीव घेईल. त्यानंतर भोंदू बाबाच्या भीतीमुळे आणि लोकांच्या त्याच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे त्या महिलेने ही बाब दीर्घकाळापर्यंत गुप्तच ठेवली. त्यानंतर, त्या महिलेने एका महाविद्यालयात प्रवेश घेतला. अशोक खरातने तिला सांगितले होते की, प्रत्येक परीक्षेपूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी त्याला भेटणे अनिवार्य आहे; अन्यथा, तो तिचे सर्व गुपित तिच्या पतीला सांगेल आणि त्याला ठार मारून टाकेल. याच भीतीपोटी, ती विवाहित विद्यार्थिनी प्रत्येक वेळी त्याला भेटण्यास जात राहिली. 2-23 ते डिसेंबर 2025 या कालावधीत भोंदू खरातने तिला अनेकदा आपल्या कार्यालयात बोलावून घेतले आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. चालू महिन्यात विवाहितेच्या एका नातेवाईकाने तिला सांगितले की, अशोक खरात हा एक ढोंगी बाबा असून, तो नेमक्या याच पद्धतीने महिलांचे शोषण करतो. सुरुवातीला ती महिला खूपच भयभीत झाली होती; मात्र, आपल्या नातेवाईकाच्या पाठिंब्यामुळे तिला धीर मिळाला. तिने पुढे येण्याचे धाडस केले आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर, 17 मार्च रोजी त्या महिलेने नाशिक शहर पोलिस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल केला आणि त्याच आधारावर पोलिसांनी अशोक खरात याला अटक केली.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या दुर्दैवी हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार 28 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 29 एप्रिल रोजी निकाल घोषित केला जाईल. संतोष देशमुखांच्या निधनानंतर मस्साजोगचा नवीन कारभारी कोण असेल, याकडे आता संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे. राजकीय हालचाली पाहता, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सध्या गावात सक्रिय असून, त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ही निवडणूक पूर्णतः बिनविरोध करून गावकऱ्यांकडून संतोष देशमुख यांना आदरांजली वाहिली जाणार, की त्यांच्या वारसदारा विरोधात अन्य कोणी उमेदवार उभा राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 28 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान मस्साजोग सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत कार्यक्रमानुसार, 7 ते 13 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडणार असून, 15 एप्रिल रोजी या अर्जांची छाननी केली जाईल. इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्यासाठी 17 एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली असून, या सर्व प्रशासकीय प्रक्रियेनंतर 28 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडेल आणि 29 एप्रिल रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन गावाचा नवा कारभारी कोण, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. संतोष देशमुखांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. एका कंपनीकडून होणाऱ्या खंडणी वसुलीला विरोध केल्यामुळेच ही हत्या झाल्याचा प्राथमिक आरोप आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने 27 फेब्रुवारी रोजी बीड जिल्हा न्यायालयात 1200 हून अधिक पानांचे विस्तृत दोषारोपपत्र दाखल केले असून, यामध्ये देशमुख यांची हत्या आणि त्याशी संबंधित अन्य दोन प्रकरणांचा तपशीलवार समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराडसह सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, मेष केदार, सिद्धार्थ सोनावणे, सुधीर सांगले आणि प्रतीक घुले या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.
महाराष्ट्राची भूमिका ही कायम पुरोगामी राहिलेली आहे. राज्यात जर अशी भोंदूगिरी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असेल तर त्या भोंदू बाबांच्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांना सहआरोपी केली पाहिजे, त्याशिवाय ही भोंदूगिरी थांबणार नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, अशोक खरातांचे काय प्रकरण होते हे आम्हाला माहिती नाही हे सांगणे म्हणजे त्या प्रकरणातून पळवाट काढणे आहे. या प्रकारचा पहिला गुन्हा त्यांच्यावर 2003 मध्ये दाखल झाला आहे. एका वृत्तपत्राने यार बातम्या केल्या तर त्या पत्रकारांना धमक्या देण्यात आल्या. 2003 मध्ये गुन्हा दाखल झाला 2005 मध्ये माहिती समोर आली तरीही मंत्री मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांच्याकडे जात असतील, पायावर डोके ठेवत पुजा करत असतील तर त्यांनाही सहआरोपी केले पाहिजे. नाशिक पोलिस आयुक्तांवर विश्वास संजय राऊत म्हणाले की, खरात प्रकरणी पोलिस तपास सुरू आहे, नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णे हे सक्षम अधिकारी आहेत. या प्रकरणात कुणाचेही नाव आले तर त्यांना सोडण्यात येणार नाही, मला नाशिक पोलिस आयुक्तांवर खात्री आहे. अन् तो गट आमच्यातून बाहेर पडला संजय राऊत म्हणाले की, दीपक केसरकर यांच्यावर विश्वास ठेवू नका. ते आमच्या सरकारमध्ये होते ते नंतर दुसऱ्या सरकारमध्ये पळून गेले हे जरी खरे असले तरी या गोष्टीचा छंद असणाऱ्या लोकांचा एक गट तयार झाला आणि ते आमच्या पक्षातून बाहेर पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करता यावा म्हणून राष्ट्रपती शासन लावण्याचे प्रयत्न करत आहेत. युद्धात आपले प्रचंड नुकसान संजय राऊत म्हणाले की, इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात आतापर्यंत हजारो बॉम्ब पडले आहेत. त्यातून धुराचे, आगीचे लोळ निघाले. तेल विहिरी जाळण्यात आल्या. त्यातून तेहरानचे आकाश काळेकुट्ट झाले व अॅसिडचा पाऊस पडू लागला. हे विषारी काळे ढग भारताच्या आकाशात पोहोचतील अशी भीती आहे. बॉम्ब न पडताही आपले प्रचंड नुकसान त्यात होईल!
अशोक खरात प्रकरण रुपाली चाकणकरांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या प्रकरणामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्यावर अनेकांनी टीका करण्यासही सुरुवात केली आहे. त्यात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचा सनसनाटी आरोप ठोंबरे पाटील यांनी केला आहे. तसेच अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना मुख्य आरोपी करा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी रुपाली चाकणकर यांना मुख्य आरोपी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे चाकणकर यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच विरोधकांनी हे प्रकरण लावून धरल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदानंतर आता चाकणकर यांचे महिला प्रदेशाध्यक्षपदही जाण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात काय म्हटले? रुपाली ठोंबरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले की, प्रथमतः महाराष्ट्राला काळीमा फासणारे हे सेक्स रॅकेट आपण निडरपणे उघडकीस आणल्याने मी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने अभिनंदन करते व आभार मानते. रुपाली निलेश चाकणकर हिचे बलात्कारी भोंदूबाबा कॅप्टन खरात बरोबरचे हितसंबंध संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहेत. परंतु मला मिळालेल्या माहिती नुसार सदर प्रकरणामध्ये कॅप्टन खरात हा भोंदूबाबा हे सगळे कांड केवळ महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सहभागामुळे व पाठिंब्यामुळेच करू शकला आहे. रुपाली चाकणकर यांनी पुण्यासह अनेक ठिकाणी पदाचा दुरुपयोग करून पोलिसांवर दबाव टाकून अनेक खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याबाबत मी आपणास स्वतंत्र माहिती देईल. तसेच भोंदूबाबाला असे गैरकृत्य करण्यास पाठींबा दिलेला आहे. त्यामुळे रुपाली निलेश चाकणकर हिचे बाबतीत काही महत्वाच्या बाबी मला माहित असून त्यातील अनेक गोष्टींचा उलगडा मी आपल्यासमोर करेल त्यापैकी रुपाली चाकणकर हिचे बाबतीतील काही महत्वाच्या बाबी खालीलप्रमाणे: 1) मागीलवर्षी पत्रकाराने याच भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांचा पर्दाफाश करून त्याच्या गैरकृत्याची बातमी दिल्यानंतर त्याला फोन करून त्याचे विरूद्ध कारवाई करण्याची धमकी देऊन त्यांचे कडून माफीनामा घेतला होता. त्यामुळे सदर भोंदूबाबा हा पूर्वीपासून बलात्कार करत असल्याचे रुपाली चाकणकर यांना माहित होते त्यामुळे प्रथमतः त्यांना ताब्यात घेऊन तपास चालू करणे आवश्यक आहे. 2) दि.29/12/2025 रोजी नाशिक ग्रामीण वावी पोलीस स्टेशन येथे गुन्हा र. क्र. 468/2025 हा रुपाली चाकणकर यांनी दाखल करावयास लावला आहे. त्यामध्ये कॅप्टन खरात याचा लैंगिक शोषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता तो व्हिडिओ यापुढे व्हायरल होऊ नये व भोंदूबाबा वाचावा याकरिता पोलिसांवर दबाव टाकून सदर गुन्हा दाखल करून भोंदूबाबानी केलेल्या कृत्यांवर पाणी टाकले आहे. 3) शिर्डी पोलीसस्टेशन येथे फोन करून कॅप्टन खरात याला वाचवले. यावरून स्पष्ट दिसते कि, भोंदूबाबा कॅप्टन खरात याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. माझी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या वतीने लाडक्या भावास नम्र विनंती कि, रुपाली चाकणकर यांचेवर कारवाई होण्या इतपत पुरावे असून तिला तात्काळ अटक करून मत्यपरिस्थिती बाहेर आणून पिडीत महिलांना न्याय द्यावा.
देशातील स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत 25 व्या स्थानावरून थेट टॉप-10 मध्ये झेप घेण्याचे उद्दिष्ट छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने ठेवले असले तरी वास्तव मात्र वेगळेच आहे. इंदूर आणि सुरतसारख्या शहरांच्या तुलनेत संभाजीनगरचे कचरा संकलन आणि वर्गीकरण 60 ते 70 टक्क्यांवर अडकले आहे. प्रशासनाने कचरा प्रक्रियेत 60% यश मिळवल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात तो केवळ खतनिर्मितीपर्यंत मर्यादित आहे. इंदूरसारखे उत्पन्न देणारे बायो-सीएनजी किंवा सुरतसारखे वेस्ट-टू-एनर्जी (शुद्ध करून पाणी विक्री) प्रकल्प अद्यापही शहरात कार्यान्वित झालेले नाहीत. शहरात दररोज सुमारे 400 मेट्रिक टन कचरा जमा होतो, मात्र त्यापैकी 60 टक्के कचऱ्याचे वर्गीकरण होते. प्रकल्पांतून खतनिर्मिती केली जाते. दुसरीकडे, इंदूर आणि सुरतसारखी शहरे कचऱ्यापासून वीज, इंधन आणि पेव्हर ब्लॉक बनवून वर्षाला 100 कोटींहून अधिक महसूल मिळवत आहेत. जोपर्यंत शहरात एमआरएफ सेंटर आणि सांडपाणी पुनर्वापराचे मोठे प्रकल्प उभे राहत नाहीत, तोपर्यंत केवळ कागदी घोडे नाचवून टॉप 10 चे स्वप्न पूर्ण होणे कठीण आहे. शहरात उघड्यावर कचरा दिसणार नाही मनपा पदाधिकारी, प्रशासन आणि नागरिक या सर्वांनी संयुक्तपणे शहर स्वच्छता मनावर घेणे अत्यावश्यक आहे. मागील सर्वेक्षणात आपण ज्या ठिकाणी कमी पडलो होतो त्याची पूर्तता करत आहोत. येत्या काळामध्ये शहरात उघड्यावर कचरा दिसणार नाही. कचरा प्रोसेसिंगमधून उत्पन्न कसे मिळेल याकडे आपली वाटचाल सुरू आहे. -जी. श्रीकांत, मनपा आयुक्त. लीगसी वेस्ट पूर्णपणे नष्ट करणे गरजेचे शहरासह नारेगाव, पडेगाव आदी जुन्या कचरा डेपोंवर साचलेला वर्षांनुवर्षांचा कचरा 100% नष्ट करणे आवश्यक आहे. टॉप 10 मध्ये येण्यासाठी शहरात कुठेही कचऱ्याचा डोंगर दिसता कामा नये. लोकसहभाग, वर्तणूक बदल करणे गरजेचे “माझा कचरा, माझी जबाबदारी’ हे स्वीकारत नाही तोपर्यंत केवळ मनपाच्या यंत्रणेवर टॉप 10 मध्ये येणे कठीण आहे. थुंकणे, उघड्यावर कचरा टाकणे यांविरुद्ध दंडात्मक कारवाईची गरज आहे. कृष्णा भोगे, माजी मनपा आयुक्त सार्वजनिक, वैयक्तिक स्वच्छतकडे लक्ष द्यावे शहर हागणदारीमुक्त असले तरी प्रसाधनगृहांची स्वच्छता, देखभाल आणि गुगल मॅपवर त्यांचे लोकेशन अपडेट असणे याला सर्वेक्षणात महत्त्व आहे. शहराला 7-स्टार कचरामुक्त मानांकन मिळवणे उद्दिष्ट ठेवावे. लोकसहभागातूनच शहर टॉप टेनमध्ये आणणे शक्य 100% वर्गीकरण : टॉप टेनमधील शहरांमध्ये नागरिक स्वतःहून कचरा 6 वेगवेगळ्या प्रकारांत (ओला, सुका, घातक, इलेक्ट्रॉनिक, सॅनिटरी आणि कचरा) विभागतात. संभाजीनगरमध्ये अनेक भागांत ओला आणि सुका कचरा संकलित करताना तो एकत्रित होतो. प्रत्येक घरातून 100% वर्गीकरण करून घेणे हे आव्हान आहे. सांडपाणी प्रक्रिया स्वच्छ सर्वेक्षणात शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे अनिवार्य आहे. शहरातील पूर्ण क्षमतेने सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवणे आणि प्रक्रिया केलेले पाणी विकून उत्पन्न मिळवणे हे एक तांत्रिक आव्हान आहे. मनपाने छोटी प्रक्रिया केंद्रे जागोजागी सुरू केली आहेत, त्याचा किती फायदा होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कचऱ्यातून उत्पन्न इंदूर आणि सुरतसारखी शहरे कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून कोट्यवधींचे उत्पन्न मिळवतात. संभाजीनगर शहरात खतनिर्मिती होते, परंतु बायो-सीएनजी किंवा वेस्ट-टू-एनर्जी, सी अँड वेस्ट सारखे मोठे प्रकल्प कार्यान्वित करणे आवश्यक आहे. मनपाने सी अँड डी वेस्ट सारखे उभारणी सुरू केली आहे. याची क्षमता वाढवणे गरजेचे आहे.
अवैध गर्भपात:यूट्यूबवर शिकून वॉर्डबॉयने केली लिंगनिदानाची चाचणी, डॉ. सोनवणेचे दोन खास हस्तक अटक
नारेगाव भागात उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भपात आणि लिंगनिदान प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिसांनी शनिवारी (21 मार्च) पिसादेवी भागात सापळा रचून मुख्य सूत्रधार डॉ. सतीश सोनवणे याच्या दोन खास हस्तकांना अटक केली. राहुल माणिकराव झोंड (28, रा. मयूर पार्क), सोमनाथ परसराम बारसे (31, रा. कमळापूर, वाळूज) अशी आरोपींची नावे आहेत. यातील आरोपी राहुल केवळ बारावी उत्तीर्ण असून, तो यूट्यूबवरून लिंगनिदान करण्याचे शिकला होता. या टोळीतील सदस्य व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून परस्परांच्या संपर्कात होते. एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सेामनाथ जाधव, सहायक निरीक्षक कैलास लहाने यांनी सापळा रचला. पोलिसांनी एका महिला कर्मचाऱ्याला डमी पेशंट बनवून आरोपींशी संपर्क साधला. गर्भपात करायचा आहे, असे आरोपींना सांगितले. त्यावर आरोपीने 14 हजार रुपयांत तपासणी करण्यात येईल, असे सांगितले. पोलिसांनी होकार देताच आरोपी पिसादेवीला आले अन् पोलिसांच्या सापळ्यात अडकले. आरोपी राहुल झोंड आणि सोमनाथ बारसे शनिवारी कारमधून येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना झडप घालून पकडले. त्यांच्याकडून विदेशी बनावटीचा पोर्टेबल सोनोग्राफी ‘प्रोब’ आणि एक टॅब आणि एक कार जप्त कोली आहे. ही कारवाई गणेश डोइफोडे, देविदास काळे यांच्या पथकाने केली. डॉ. सोनवणे, सपकाळच्या मागावर पोलिस या प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. सतीश सोनवणे आणि महालॅब कर्मचारी महिलेचा पती सपकाळ हे दोघेही अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. सपकाळ हा या साखळीतील महत्त्वाचा दुवा असून तो आणि डॉ. सोनवणे मिळून हे रॅकेट चालवत होते. पोलिस आता या दोघांच्या मागावर असून त्यांच्या अटकेनंतर शहरातील अनेक बड्या रुग्णालयांचे आणि लॅबचे धाबे दणाणले आहे. रॅकेटचा मास्टरमाइंड डॉ. सोनवणे, महालॅब कर्मचाऱ्याचा पती पसारच मुख्य सूत्रधार डॉ. सतीश सोनवणेच्या टोळीत आरोपी राहुल झोंड आणि सोमनाथ बारसे हे दोघे काम करत होते. सोनवणेला पोलिसांनी अटक केली आणि हर्सूल जेलमध्ये पाठवले. त्या वेळी या दोघांनी त्याच्याकडे असलेले ‘प्रोब’ स्वत:कडे घेतला. बाहेरील काम पाहण्यासाठी त्याच्याकडे विदेशी ‘प्रोब’ सोपवला. राहुल झोंड शहरातील एका नामांकित रुग्णालयात वॉर्डबॉय आणि ओटी असिस्टंट म्हणून काम केल्याने त्याला वैद्यकीय क्षेत्राची जुजबी माहिती होती. उर्वरित ज्ञान त्याने यूट्यूबवरून मिळवले. सोमनाथ बारसे दहावी उत्तीर्ण असून तो डॉ. सोनवणेचा जुना चालक आहे. टॅब हाताळणे आणि लोकेशन शोधण्यात तो पटाईत आहे.
जायकवाडी प्रकल्पाची सिंचन क्षमता 1 लाख 84 हजार हेक्टर आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत सिंचनात घट झाली आहे. 2024-25 वर्षातील खरीप, रब्बी आणि उन्हाळी सिंचनाच्या अहवालातून जायकवाडी प्रकल्पासंदर्भातील वास्तव समोर आले आहे. या अहवालानुसार, केवळ 54,592 हेक्टर क्षेत्रापर्यंतच (30 टक्के) नाथसागराचे पाणी पोहोचले आहे. कालव्याची दुरवस्था, नादुरुस्त झालेल्या वितरिका, अपुरे मनुष्यबळ आणि सिंचन व्यवस्थापनाकडे झालेल्या दुर्लक्षाचा फटका शेतीला बसला आहे. कालव्यांची दुरवस्था झाल्यामुळे गेल्या वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जायकवाडीत सुमारे 32 टक्के उपयुक्त साठा वापराविना शिल्लक होता. जायकवाडीचा डावा कालवा 208 किमीचा असून, त्याद्वारे 1 लाख 42 हजार हेक्टर सिंचन होते. डाव्या कालव्याच्या 1,350 किमीच्या चाऱ्या 90 टक्क्यांपर्यंत खराब झाल्याचे अहवालात उघड झाले आहे. 750 कोटींचा कालवे दुरुस्तीचा प्रस्ताव लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने गोदावरी पाटबंधारे महामंडळाने पाठवला असून अद्याप त्यासाठी निधी मिळालेला नाही. 14 दिवसांची पाणीपाळी 30 दिवसांवर जायकवाडीच्या कालव्याच्या केलेल्या सर्वेक्षणात कालव्यांच्या पीसीबी (प्लेन सिमेंट काँक्रीट) लायनिंग सुमारे 90 टक्के उखडल्या आहेत. त्यामुळे पाणी सोडताना वहनव्यय 50 टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्याने 14 दिवसांची पाणीपाळी 30 दिवसांवर गेली आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्याची क्षमता 3600 क्युसेक आहे. प्रत्यक्षात सध्या 1800 क्युसेक पाणी वाहून नेले जाते. कालव्यामुळे 40 % नुकसान कालवे खराब झाल्यामुळे 40% नुकसान होत आहे. कालवा, चारी नादुरुस्तीमुळे सिंचन घटले आहे. कालवे दुरुस्तीचा 750 कोटींचा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे. - संतोष तिरमनवार,कार्यकारी संचालक, गोदावरी पाटबंधारे महामंडळ दुर्लक्षाचा फटका डावा कालवा पूर्णपणे खराब झाल्यामुळे, व्यवस्थापनाकडे सतत दुर्लक्षामुळे सिंचन 30 टक्क्यांवर आले आहे. कालवा, वितरिकांची दुरुस्ती गरजेची आहे. त्याचबरोबरच कालवा आधुनिकीकरण गरजेचे आहे. त्यामुळे धरणात पाणी उपलब्ध असूनही सिंचन क्षेत्राला पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे अपेक्षित लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यासाठी एकूण 3,500 कोटींचा पूर्ण प्रस्ताव मंजूर होणे गरजेचे आहे. - जयसिंह हिरे, जल अभ्यासक सिंचन नियोजनाचा परिणाम गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे निवृत्त कार्यकारी संचालक अजय कोहीरकर यांनी सांगितले की, पाण्याचे वाटप करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी पाणी भरल्यानंतर ते योग्य प्रमाणात वितरित झाले की नाही हे पाहण्यासाठी योग्य नियोजन अपेक्षित आहे. मात्र ते होत नाही. सिंचन अहवालातील स्थिती (2024-25)डावा कालवाखरीप 506रब्बी 18,540उन्हाळी 10,867दुहंगामी 2,984बारमाही 16,117एकूण सिंचन 49,114उजवा कालवासिंचन 5,478
अशोक खरात सारख्या भोंदूंवर आरोप सिद्ध झाले तर भर चौकात गोळ्या घालाव्यात, असे विधान कालीचरण महाराज यांनी केले आहे. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या चौकशीसाठी एसआयटी पथक स्थापन करण्यात आले आहे. अशोक खरात हा किती विकृत होता याची संपूर्ण माहिती आता उघड झाली आहे. तसेच त्याच्या नावावर असलेली बेनाम संपत्ती देखील समोर आली आहे. तसेच महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सर्वच स्तरातून होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कालीचरण महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकरांशी संवाद साधत असताना कालीचरण महाराज यांना धर्माच्या नावावर पैशांचा बाजार सुरू असल्याबद्दल विचारणा केली, त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, बाजार सगळीकडे आहे. वकील पैसे घेतात, डॉक्टर पैसे घेतात, मजूर पैसे घेतात. मग धर्माचे कार्य करणाऱ्यांनी पैसे घेऊ नये, असा काही नियम आहे का? धर्माचे कार्य करणाऱ्यांनाही मानधन दिले जाते. त्यात दोष नाही. दोष तेव्हा निर्माण होतो जेव्हा लोकांना ठगले जाते. जो लोकांना ठगतो तो नरकात जाणार आहे. जे लोक कूकर्म करत आहेत ते नरकात जाणार आहेत. त्यांना शासकीय दंडही मिळणार, असे त्यांनी म्हटले आहे. भर चौकात गोळी मारली पाहिजे पुढे बोलताना कालीचरण महाराज म्हणाले, स्वयंघोषित कोणताही महाराज नाही. लोक त्यांना महाराज म्हणतात. कोणताच महाराज म्हणत नाही की मला महाराज म्हणा. लोकांनी महाराज केलेला आहे. लोकांनी पूजनीय पदावर बसवले असेल आणि त्या पदावरुन दुरोपयोग होत असेल, कूकर्म होत असेल, किंवा धर्म कलंकीत केले जात असेल तर ते लोक महापापी आहेत. जे लोक अशा कूकर्मात अडकले आहेत, त्यांचे गुन्हे सिद्ध होतात तर त्यांना भर चौकात गोळी मारली पाहिजे, असे विधान त्यांनी केले आहे. त्यांना नरकात भोगावे लागेल पैशांची लूटमार, भीती दाखवून लुटणे असेल, लैंगिक शोषण, अत्याचार असेल हे कूकर्म आहेत. त्यांना नरकात भोगावे लागेल आणि राजाकडूनही दंड मिळेल, असे कालीचरण महाराज म्हणाले. पुढे ते म्हणाले की, जे प्रतिष्ठित साधू, संत आहेत, ज्यांमागे खूप मोठा जनसमुदाय आहे. अशा साधूच्या मागे लागलो तर त्यांचे शिष्य आपल्याला मतदान करतील, असे राजा लोकांना वाटते. राजाची ही सामान्य इच्छा आहे. प्रत्येक सामान्य राजाला असे वाटते. अशा साधू लोकांना राजा लोक सन्मान देतात. पण तो भ्रष्ट निघाला तर राजा लोक त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या 5 जिल्हा परिषद सदस्यांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याने भाजपला सत्ता मिळाली आहे. यात भाजपच्या प्रिया शिंदे अध्यक्ष झाल्या तर राजू भोसले उपाध्यक्ष. त्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी लोकशाहीचा खून केला असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरगड्यासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप गोरे यांनी केला आहे. जयकुमार गोरे म्हणाले, पालकमंत्री कालपासून विनाकारण आकांडतांडव करत आहेत. मागेपुढे पाच गाड्यांचा ताफा घेऊन फिरणे आणि पोलिसांची हरेसमेंट करणे हे त्यांचे नित्याचे झाले आहे. चौकात पोलिस दिसला नाही तर त्याला सस्पेंड करण्याच्या धमक्या दिल्या जातात. साक्षात पोलिस अधीक्षकांशी बोलताना सुद्धा ते एखाद्या घरगड्याशी बोलल्यासारखे वागतात, हे अत्यंत निंदनीय आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांची ही निवडणूक होती, त्यात पालकमंत्र्यांना आत जाण्याची काय गरज होती? जिलहा परिषदेच्या इतिहासात आजवर कधीही अशा पद्धतीने बैठक लागली नव्हती, मग कालच ती कशी लागली? असा सवाल गोरे यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना जयकुमार गोरे म्हणाले, ज्या सदस्यांवर 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यांना पालकमंत्री स्वतः हाताला धरून आत कसे घेऊन जाऊ शकतात? हा गुन्हा कोणी दाखल केला आहे, हे मीडियाला त्यांनी का सांगितले नाही? जर तुमचं तुमच्या सदस्यांवर विश्वास नव्हता, तर त्यांना 45 दिवस डांबून का ठेवले होते? गाडीतून उतरवून त्यांना जबरदस्ती हाताला धरून नेणे ही लोकशाही आहे का? असे अनेक प्रश्न जयकुमार गोरे यांनी उपस्थित केले. पाटण आणि वाईमध्ये काय चालले आहे हे जनतेला माहीत आहे. लक्षात ठेवा, जे पेरले ते कधीतरी नक्कीच उगवते, असा थेट इशारा गोरे यांनी शंभूराज देसाई तसेच मंत्री मकरंद पाटील यांना दिला आहे. दरम्यान, सातारा जिलहा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे 27 सदस्य विजयी झाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 20, शिवसेना शिंदे गटाचे 15, कॉंग्रेसचा एक, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सदस्य विजयी झाले आहेत. तर एका जागेवर अपक्ष विजयी झाला होता.
जिल्ह्यात शनिवारी ठिकठिकाणी रमजान ईद उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि धार्मिक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. समाजात प्रेम, शांतता आणि बंधुत्व टिकवण्याचा संदेश दिला. रमजान ईदनिमित्त विविध सािहत्याने बाजार पेठ फुलली. नवीन कपडे, सुगंधी अत्तर, शेरवानी कुर्ते, महिलांसाठी हिजाब, पारंपरिक पेहराव खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. प्रत्येक घरामध्ये गोडधोड पदार्थही तयार करण्यात आले. दरम्यान इद २१ मार्च रोजी साजरी होणार असल्याचे कच्छी मस्जिद, अकोलाचे अध्यक्ष जावेद जकरिया यांनी जाहीर केले होते. त्यानुसार सकाळपासून महानगरातील सर्व मशिदी आणि ईदगाहांमध्ये नमाजासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली आणि सर्वत्र ईदचा आनंद दिसून आला. मुस्लिम समाजात ईद-उल-फितरचा सण धार्मिक उत्साह आणि बंधुत्वाच्या वातावरणात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सर्व मशिदी आणि ईदगाहांमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा करून अल्लाहचे आभार मानले. बोरगाव मंजू | येथे मुस्लिम बांधवांनी ईद-उल-फितर उत्साहात (रमजान ईद) साजरी केली. राष्ट्रीय एकात्मता तथा बंधुभावाच्या वातावरणात पार पडली. जगात शांती व अमन रहावे, यासाठी प्रार्थना केली. मौलाना सय्यद शफकत यांनी इस्लामी शिकवणीवर विचार व्यक्त केले. मौलाना जहीर यांच्या इमामतीखाली सर्व समाज बांधवांनी एकत्रितपणे ईदची नमाज अदा केली. तसेच देशात शांतता, सलोखा व समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. नमाजानंतर मौलाना जहीर साहेब यांनी खुतबा देत आपसी ऐक्य, बंधुभाव आणि गरजूंची मदत करण्याचा संदेश दिला. नमाजानंतर सर्वांनी एकमेकांच्या गळाभेटीने ईदच्या शुभेच्छा देत प्रेम व सौहार्दाचा संदेश दिला. प्रसंगी शहरातील नागरिकांनी आपल्या घरात पारंपरिक पदार्थ जसे सेवई, शीरखुर्मा इत्यादी पदार्थ स्वाद घेऊन सणाचा आनंद साजरा केला. ईदच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ठाणेदार अनिल गोपाळ यांच्यासह पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. दोन वेळा झाली जमात अकोल्यातील ऐतिहासिक कच्छी मशिदीत ईद-उल-फितरच्या दोन नमाज आयोजित करण्यात आल्या. पहिली जमात सकाळी ८.४५ वाजता मुफ्ती मोहम्मद सादिक अख्तर रझवी मरकझी यांच्या इमामतीत झाली, तर दुसरी जमात सकाळी ९.४५ वाजता नायब इमाम मौलाना आरिफ रजा यांच्या इमामतीत पार पडली. गरजंूना मदत करावी कच्छी मशिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद जकरिया यांनी सर्व नागरिकांना ईदच्या शुभेच्छा देत सांगितले की ईद-उल-फितर हा सण संयम, त्याग, मानवता आणि बंधुभावाचा संदेश देतो. सर्वांनी धर्म, जात आणि पंथ यापलीकडे जात गरजूंना मदत करावी. तसेच समाजात एकता दृढ करावी.
अकोला केंद्र, राज्य आणि महापालिकेतील सत्तेत भाजपसोबत असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यक्रमात भाजपवरच टिकास्त्र डागण्यात आले. शनिवारी पार पडलेल्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर आरोप करीत आगामी काळात नागरी प्रश्नांवरुन कोंडीत पकडण्याचे संकेत दिले. त्यानंतर भाजपकडूनही पटलवार करीत युती धर्म पाळण्याचा सल्ला शिंदे सेनेला देण्यात आला. अशातच शिंदे गटाअंतर्गतही वाद उफाळून आला असून, जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांना कार्यक्रमाचे नियमंत्रणच देण्यात आले नव्हते. त्यामुळे आता हा मुद्दाही पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचणार आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या (उबाठा) चार नगरसेवक व जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शनिवारी या सर्वांचा सत्कार सोहळा व प्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी आमदार गोपिकिशन बाजोरीया, जिल्हाप्रमुख नारायणराव गव्हाणकर, चंद्रशेखर पांडे, विप्लप बाजोरिया, विठ्ठल सरप, उपजिल्हाप्रमुख योगेश अग्रवाल, महिला जिल्हाध्यक्ष उषा विरक, रेखा राऊत, तरुण बगेरे, नगरसेवक सागर भारुका, मनोज पाटील, सोनाली सरोदे, सुरेखा काळे, अतुल एडणे, खुशी भटकर होत्या. सूत्रसंचालन निवासी उपजिल्हा प्रमुख संतोष अनासने यांनी केले. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यक्रमात सहभागी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते. शिंदे गटामध्ये असा रंगला नवीन वाद सत्कार सोहळ्याला विलंब झाल्याने जिल्हाप्रमुख अश्वीन नवले हे तेथून निघून गेले. दुसरे जिल्हाप्रमुख श्रीरंग पिंजरकर यांना कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले नसल्याचे त्यांनीच सांगितले. पक्षात काही नेते केवळ श्रेय घेण्यासाठी आणि भांडण लावण्याचे काम करीत आहेत. लवकरच पक्ष प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सर्व बाबी सांगणार असल्याचेही पिंजरकर म्हणाले. मनपा निवडणुकीपासूनच िशंदे गट व भाजपमध्ये राजकीय रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीत जुने शहरात दोन्ही बाजूच्या उमेदारांमध्ये लढत झाली आणि दोन्ही पक्षाचे उमेदवार पडले. याला किनार विधानसभा निवडणुकीची होती. अकोला पश्चिममध्ये विधानसभेत पूर्वाश्रमीचे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार भाजपविरोधात लढले होते. परिणामी भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर ठाकरे गटाचे हे पदाधिकारी शिंदे सेनेत दाखल झाले. मात्र दोन्ही पक्षाच्या या पदाधिकाऱ्यांमध्ये राजकीय कुरघोडी सुरू आहे. आता तर ठाकरेंच्या शिवसेनेतील चार नगरसेवक शिंदे सेनेत दाखल झाल्याने मनपातील शिंदे गटाचे संख्याबळ वाढले आहे. अशातच शनिवारी झालेल्या सत्कार सोहळ्यातूनही मनपामध्ये दोन्ही पक्षांमधील राजकीय संघर्ष आणखी वाढणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. ^आम्ही शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) टिकेला सकारात्मक घेतो. मात्र त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी टिका करताना, बोलताना विचार करूनच बोलावे. द्वेष भावनेतून पक्ष किंवा एखाद्या व्यक्तिबाबत बदनामीकारक बोलू नये. मुळात त्यांनी युती धर्म पळावा - गिरीश जोशी, माजी नगरसेवक. असे डागले भाजपवर टिकास्त्र - यापूर्वी सत्तेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातही आमचे हाल झाल्याचे शिंदे सेनेचे महानगराध्यक्ष राजेश मिश्रा म्हणाले. सत्तेत असनाताही आम्हाला लढावे लागले. त्यामुळे आता आम्ही सत्तेत आहोत तर नागरी समस्यांबाबत कसे बोलायचे, ते अर्थात भाजप नाराज होईल, असा विचार करून चालणार नाही, असे मिश्रा म्हणाले. तसेच मनपा सभागृहाला िटपू सुलतानचे दिलेले नाव सर्व प्रक्रिया पार पाडून काढून टाकावे, अशीही मागणी त्यांनी केली.
मोताळा राज्यात घरगुती व व्यावसायिक गॅसचा वाढता तुटवडा आणि दरवाढ विरोधात मोताळा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी तहसील कार्यालयासमोरच चूल पेटवून शासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करीत मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या मार्फत आज शुक्रवारी निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या गुढीपाडवा व रमजानसारख्या सणासुदीच्या काळातही गॅसचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून, सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर वेळेवर ओटीपी मिळत नसल्याने तसेच बुकिंग प्रक्रिया सुरळीत नसल्याने नागरिकांना तासंतास रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळत नाही. अधिकृत प्रक्रियेत गॅस उपलब्ध नसताना अतिरिक्त दोन ते अडीच हजार रुपये दिल्यास सहज सिलिंडर मिळत असल्याच्या तक्रारी समोर येत असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात करण्यात आलेली ६० रुपयांची वाढ तात्काळ मागे घ्यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. शिवाय यावेळी मोताळा महिला आघाडी तालुकाप्रमुख कल्पना पुरी, तालुकाप्रमुख विजय इंगळे, संगीता कोळसे, प्रियंका क्षीरसागर, सुनंदा अहिरे, विमल अहिरे, दुर्गा सोडे, सविता अहिरे, शालिनी खराटे, राजकन्या गवई, तारा कोळसे, सखु राजपूत, अश्विनी उबाळे, शेवंता सुरडकर, अरुणा महाजन, अर्चना पाटील, शोभा शर्मा, अक्षय जवरे, ज्ञानेश्वर कोळसे, विठ्ठल कोळसे यांच्यासह महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या. मोताळा येथील तहसील कार्यालयासमोर चूल पेटवून निषेध करतांना शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या. खानावळींवर मोठा परिणाम; कामगार सापडले अडचणीत व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉटेल, खानावळ व लघु उद्योजकांवर गंभीर परिणाम झाला असून, हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे. गॅस पुरवठा सुरळीत करणे, बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणणे, काळाबाजार रोखण्यासाठी कठोर कारवाई करणे, व्यावसायिक गॅसचा पुरवठा तात्काळ पूर्ववत करणे तसेच बाधित व्यावसायिक व विद्यार्थ्यांना आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
आखाती युद्धामुळे विविध उद्योग - व्यवसायांवरही परिणाम झाला असून, या उद्योगांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पारले बिस्किटांची निर्मिती करणाऱ्या शहरातील शिवांगी बेकर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा गॅस पुरवठाही बंद झाल्यामुळे उत्पादन ठप्प झाले असून, कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवांगी बेकर्सच्या माध्यमातून पारले बिस्किट्स प्रायव्हेट लिमिटेडसाठी २० वर्षांपासून जॉब वर्क' तत्त्वावर बिस्किटांचे उत्पादन केले जाते. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज ८० मेट्रिक टन िबस्किटांचे उत्पादन होते. त्यासाठी दोन बेकिंग ओव्हनसाठी दररोज सुमारे ३ मेट्रिक टन एलपीजी इंधनाची (गॅस) आवश्यकता भासते. या प्रकल्पासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) जळगाव येथील प्लांटच्या माध्यमातून एलपीजी इंधनाची प्लांट पुरवठा केला जात होता. मात्र, आखाती युद्धामुळे सर्वत्र इंधनाची समस्या जाणवत आहे. त्यामुळे प्रकल्पाचा एलपीजी इंधन पुरवठा दि. ११ मार्चपासून जळगाव येथील प्लांटकडून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कंपनीची पारले-जी उत्पादन लाईन दि. ११ मार्चपासून बंद आहे. तसेच राउंड क्रीम उत्पादन लाईन दि. १७ मार्चपासून बंद करण्यात आली आहे. एलपीजी इंधनाअभावी संपूर्ण उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ४७५ कामगार कार्यरत प्रकल्पाच्या दोन्ही उत्पादन लाइन्सवर एकूण ४७५ कामगार कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून नियमितपणे उत्पादन प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली जाते. कंपनीतील ४७५ कामगार पूर्णपणे याच कामावर अवलंबून आहेत. मात्र, एलपीजी अभावी उत्पादन प्रक्रिया बंद झाल्याने कामाअभावी कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. ८० मे. टन उत्पादन दैनंदिन आहारातील एक महत्त्वाचा आणि सहजरित्या उपलब्ध होणारा खाद्यपदार्थ म्हणून बिस्किटाला स्थान आहे. खामगाव येथील शिवांगी बेकर्सच्या कंपनीच्या माध्यमातून दररोज ८० मेट्रिक टन िबस्किटांचे उत्पादन होते. हे उत्पादन विविध ठिकाणी वितरीत केले जाते. कामगारांसाठी कामगार मंत्र्यांनी प्रयत्न करावेत ^दहा दिवसांपासून कामगारांच्या हाताला काम नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जेवढे दिवस काम नाही, तेवढ्या दिवसांचा किमान वेतनानुसार मोबदला मिळावा, यासाठी कामगार मंत्र्यांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे. - विजय मांडवेकर, कामगार प्रतिनिधी प्रकल्पातील उत्पादन प्रक्रिया ठप्प झाल्याने मोठ्या कामगारवर्गाला सांभाळणे आणि त्यांना आर्थिक आधार देणे व्यवस्थापनासाठी कठीण होत चालले आहे. परिणामी प्रकल्प मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीला किमान एक उत्पादन लाईन सुरू ठेवण्यासाठी ५० ते ६० टक्के एलपीजी इंधनाचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा. या संदर्भात बीपीसीएलच्या जळगाव येथील प्लांटला सूचना देऊन कंपनीला दिलासा द्यावा, अशी मागणी संचालक प्रकाश केडिया यांनी जिल्हाधिकारी व कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे केली.
विविध जैवविविधतेने परिपूर्ण अशा मेळघाटच्या जंगलात विविध प्राण्यांसह दुर्मिळ झाडे, दऱ्या-खोऱ्यांचा संगम आहे. एकाच ठिकाणी पर्यटकांना असा नैसर्गिक अनुभव देणाऱ्या मेळघाट जंगलात पर्यटकांसाठी जंगल सफारीची सोयही आहे. आता शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. त्या वेळी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मेळघाट भ्रमंतीचा उत्तम पर्याय पर्यटकांसमोर तयार झाला आहे. मेळघाट जंगलात वाघांसह अस्वल, सांभर, रानगवा यांसारखे विविध प्रकारचे प्राणी पर्यटकांना अनेकदा दर्शन देतात. सध्या शंभरावर वाघांची संख्या या जंगलात आहे. मेळघाटाचे जंगल विस्तीर्ण आहे. ते दऱ्या-खोऱ्यांचे आहे. झाडांची संख्या जास्त आहे. जंगल दाट आहे. त्यामुळे वाघांचे दर्शन होण्याचे प्रमाण कमी असते. तरीही अलीकडे अनेकदा पर्यटकांना जंगल सफारीदरम्यान वाघोबा दिसतो, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. मेळघाटात सध्यास्थितीत वैराट (चिखलदरा), सेमाडोह, नरनाळा आणि धारगड या उर्वरित. पान ४ Q. मेळघाट जंगल सफारीची वैशिष्ट्ये काय? A . मेळघाट जंगल हे दऱ्या-खोऱ्या व वैविध्यपूर्ण वनस्पती, झाडांनी नटलेले आहे. या ठिकाणी प्राण्यांसोबतच निसर्गातील विविधता पाहायला मिळते. Q. मेळघाटात जंगल सफारीमध्ये नेमके काय पाहावे? A. केवळ वाघ दिसावा म्हणूनच ही सफारी करू नये. या जंगलात इतरही प्राणी आहेत. ते दिसू शकतात. वेगवेगळे पक्षी आहेत. शिवाय या जंगलातील वनस्पती व काही झाडे वैविध्यपूर्ण आहेत. Q. पर्यटन वाढावे यासाठी आणखी काय प्रयत्न केले पाहिजे A. पर्यटकांना उत्तम दर्जाची राहण्याची व भोजनाची व्यवस्था उपलब्ध करून द्यायला पाहिजे. स्थानिकांचा सहभाग आणखी वाढवला पाहिजे. ^वनविभागाकडून जंगल सफारी मार्गावर दर दोन ते तीन किमी अंतरावर प्राण्यांसाठी पाणवठ्याची सोय केली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी प्राणी पाणवठ्यांवर येतात. त्या कारणाने उन्हाळ्यात निश्चितच जंगल सफारीदरम्यान प्राणी दिसण्याची शक्यता दाट आहे. तुर्तास चार ठिकाणांहून जंगल सफारीची सोय आम्ही सुरू केली आहे. - डॉ. मयुर भैलुमे, प्र. विभागीय वन अधिकारी, मेळघाट. यादव तरटे, वन्यजीव अभ्यासक तथा माजी सदस्य राज्य वन्यजीव मंडळ. जंगल सफारी महत्त्वाचे मुद्दे वन्यजीव दर्शन : वाघांसह अस्वल, सांबर, रानगवा. सफारीची वेळ : दररोज सकाळी ६ ते १० , दुपारी ३ ते ६. वाहन , क्षमता : एका जिप्सीत चालक, गाईडसह ६ पर्यटक. खर्च आणि अंतर : प्रती वाहन २,५०० , सुमारे ३० ते ४० कि.मी. धारगड सफारी अकोट परिसरात असलेल्या धारगड सफारीमध्येही पर्यटकांना अडीच ते तीन तास जंगल सफारीचा आनंद घेता येतो. पाणवठ्यांची व्यवस्था, प्राणी दिसण्याची दाट शक्यता केवळ वाघ दिसावा म्हणून नाही, निसर्गाचे वैविध्य पाहावे
स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे ट्रस्ट, अमरावती यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या २०२५च्या उत्कृष्ट वाड्.मय निर्मिती राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यावर्षी साहित्यिक, झाडीबोलीमहर्षी, डॉ. हरिश्चंद्र बोरकर (साकोली जि. भंडारा) यांना ‘साहित्यव्रती’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. विविध साहित्य प्रकारासाठी राज्यातील साहित्यिकांना यावेळी सन्मानीत करण्यात येणार आहे. या पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार रश्मी पदवाड मदनकर, नागपूर यांच्या ‘कायांतर' या कादंबरीला देण्यात आला आहे तर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार क्षितिज देसाई, ठाणे ‘शीतपेटीतून जेव्हा जाग येते' या कथासंग्रहाला मिळाला आहे. रत्नागिरीच्या कविता मोरवणकर यांच्या ‘उद्याचा दहशतगर्द अंधार' या कवितासंग्रहाला व गडचिरोली येथील प्रभू राजगडकर यांच्या येथे आमचाही श्वास कोंडतो आहे यांना पुरस्कार जाहीर झाला. सोलापूरचे डॉ. शिवाजी शिंदे यांचा समीक्षाग्रंथ ‘निवडक स्री आत्मकथने-सामाजिक सत्व आणि स्वत्व' हा समीक्षा ग्रंथ व उत्कृष्ट संपादनासाठी ‘अक्षयआंदण' (शिवा राऊत यांची कविता) या ग्रंथाची निवड झाली आहे. या ग्रंथाचे संपादन बबन नाखले व अरूण मानकर यांनी केले आहे. शिरजगाव येथील युवा कवी नितीन पर्हाड यांना ‘उभरती प्रतिभा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या ट्रस्टच्यावतीने गेल्या बारा वर्षांपासून मराठी साहित्यातील विविध लेखन प्रकारासाठी महाराष्ट्रातील साहित्यिकांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्याचा मानस केला आहे. याच योजने अंतर्गत विदर्भातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्य सेवेची दखल घेऊन त्यांना ‘साहित्यव्रती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यावर्षी यंदा भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, झाडीबोली महर्षी म्हणून विख्यात असलेले मा. डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना त्यांच्या प्रदीर्घ व निरंतर साहित्यसेवेसाठी देण्याचा निर्णय पुरस्कार समितीने एकमताने घेतला. लवकरच होणार पुरस्काराचे वितरण या पुरस्कारांसाठी प्राप्त झालेल्या ग्रंथांचे परिक्षकांनी परिक्षण केल्यानंतर पुरस्कार समितीच्या सभेत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पुरस्कारांचे मुख्य आयोजक माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे, संस्थेचे सचिव श्रेयस पोटे, समितीच्या संयोजक प्राचार्य डॉ. शोभा रोकडे, प्राचार्य डॉ.अनुप्रिता देशमुख यांनी पुरस्कारांची घोषणा केली. यावेळी पुरस्कार समितीचे सदस्य प्रा. डॉ. कुमार बोबडे, प्रा़ डॉ. पंकज वानखडे, विशाल मोहोड, संदिप देशमुख उपस्थित होते. सदर पुरस्कारांचे वितरण पी.आर.पोटे पाटील ग्रूप ऑफ एज्यूकेशनल इन्स्टीट्यूट, मुख्य कार्यालय सभागृह,कठोरा रोड, अमरावती येथे एका सोहळ्यात करण्यात येईल.
आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनतीच्या बळावर माणूस यशस्वी होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पदवीसोबतच आपल्या आवड, क्षमतेनुसार व्यवसाय निवडावा तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी व्हाल. असे प्रतिपादन पदवी वितरण समारंभाचे अध्यक्ष तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारीणी सदस्य सुभाष बन्सोड यांनी केले आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीद्वारा संचालित महात्मा फुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय, वरूड तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व आठवा पदवी वितरण सोहळा नुकताच पार पडला. हा सोहळा महाविद्यालयाच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारीणी सदस्य सुभाष बनसोड तर प्रमुख उपस्थितांमध्ये विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. रवींद्र कडू, निवृत्त उपायुक्त शेषराव खाडे, मधुकर रोडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप हांडे, डॉ. एस. आर. कोंडूलकर, प्रा. एम. आर.उमेकर, डॉ. सी. डी. पाखरे, डॉ. एस.व्ही. सातपुते, डॉ. आर. पी. गणोरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी क्रांतीसूर्य महात्मा फुले, संत गाडगेबाबा व डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनानंतर विद्यापीठ गीत व डॉ. पंजाबराव देशमुख गौरव गीताने पदवी वितरण समारंभाची सुरुवात झाली. डॉ. रवींद्र कडू यांनी नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या हिताकरिता व भविष्यातील आव्हाने पेलण्याकरिता अपेक्षित बदल केलेला असून पुस्तकी ज्ञानासोबतच कौशल्य आधारित शिक्षण यावर भर दिला आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी नवीन बदल होत असताना त्यामधील चांगले काय ते तपासून घेतले पाहिजे. तसेच आपल्यातील सुप्त गुणांना ओळखून आपले भविष्य घडवले पाहिजे असे म्हटले. सेवानिवृत्त उपायुक्त शेषराव खाडे यांनी आजच्या या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना आपण भारताचे जबाबदार नागरिक आहात, याची जाणीव ठेवून आपले जीवन यशस्वी करावे असे सांगितले. त्यासाठी आपणास आपले मित्र, शेजारी, शिक्षक, सहकारी हे सामाजिक उत्तरदायित्वाची महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात, याचेही आजच्या तरुणांनी भान ठेवावे असे म्हटले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे शाळा निरीक्षक मधुकर रोडे यांनी उच्च पदवी शिक्षणाबरोबरच चारित्र्यसंपन्न व सद्गुण असणारा माणूस बना, त्यासाठी आवश्यक असणारे संस्कार आत्मसात करा, असे सांगितले. या पदवी वितरण सोहळ्यामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी भावना पाठक, हर्षा दारोकर, शैलजा लोखंडे, घोषणा राऊत, सपना शेकापुरे, रोषणी पवनी यांच्यासह प्रत्येक विभागातून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पदवी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप हांडे यांनी केले. सूत्र संचालन डॉ. रिना बकाले यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. चर्तुभूज कदम यांनी मानले. यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद यांच्यासह वरुड तालुक्यातील मान्यवर मंडळी, महाविद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील प्रावीण्यप्राप्त, पदवी प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चांगले स्वप्न पहा, साकारण्यासाठी लढा आणि यश मिळवा विद्यार्थ्यांनी कौशल्याधारित शिक्षण घेऊन समाजात आपली स्वतःची ओळख निर्माण करावी. तसेच शिक्षक व पालक हे आपल्या जीवनाचे शिल्पकार आहेत, याची जाणीव ठेवावी. चांगली स्वप्ने पाहा, त्यासाठी लढा आणि यशस्वी व्हा, असे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप हांडे यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
कोरोना काळापासून बंद पडलेला येथील नगरपालिकेचा जलतरण तलाव गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरु करण्यात आला आहे. या जलतरण तलावामुळे परतवाडा - अचलपुर शहरातील नागरिकांना एक आगळीवेगळी भेट मिळाली आहे. नगराध्यक्ष रुपाली माथने व आमदार प्रवीण तायडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या जलतरण तलावाचे उद्घाटन करण्यात आले. अचलपुर शहरातील नागरिकांच्या सेवेत असलेला हा स्विमिंग पूल कोरोना काळात बंद पडून त्याची दुरवस्था झाली होती. शेवटी नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत मराठी नववर्षाच्या शुभमुहूर्तावर तो पुन्हा सुरू करण्यात आला. अचलपूरचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी धीरज गोहाड, महिला व बालकल्याण सभापती दुर्गा सोनपरोते, नियोजन सभापती दर्शना ठाकूर, नगरसेविका अपर्णा रोडे, आरोग्य सभापती समशेर खान यांच्या उपस्थितीत स्विमिंग पूलचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार तायडे म्हणाले की, स्विमिंग पूल सुरू झाल्यामुळे नागरिकांना आरोग्यदायी व्यायामाची सुविधा उपलब्ध झाली असून क्रीडा विकासाला चालना मिळणार आहे. पोहणे हा उत्तम व्यायाम प्रकार असून युवकांमध्ये क्रीडा संस्कार वाढण्यास याचा मोठा फायदा होईल. तो पुन्हा सुरु झाल्याने खेळाडूंना सरावासाठी चांगली संधी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.नगराध्यक्ष रूपाली माथने यांनी सांगितले की, स्विमिंग पूल सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार होत होती. आवश्यक दुरुस्ती व स्वच्छता करून नववर्षाच्या निमित्ताने ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी स्विमिंग पूल परिसराची पाहणी केली. यावेळी नगरसेवक ल. ज. दीक्षित, सुरेंद्र तांबे, अक्षय पखाले, चंद्रेश बहोरिया, स्वीकृत सदस्य अभय माथने, निल माहेश्वरी, उपसभापती हेमा आसवानी, नगरसेविका अक्षरा लहाने, कविता आखूड, सारिका डांगे, अभियंता मनिष शर्मा, निशांत मिश्रा, कंत्राटदार सुनील अग्रवाल तसेच पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनापासून होता बंद छत्रपती शिवाजी महाराज प्रभाग क्रमांक ७ मधील कल्याण मंडपम परिसरात असलेला सदर जलतरण तलाव हा कोरोनाच्या काळात बंद पडला होता. दरम्यान ही क्रीडापुरक सुविधा पुन्हा सुरू व्हावी, यासाठी सतत प्रयत्न सुरु होते. आ. प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष व या प्रभागाच्या नगरसेविका तसेच राज पाटील यांनी स्विमिंग पूल सुरू करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. स्विमिंग पूलची योग्य देखरेख व संचालन व्हावे यासाठी आवश्यक प्रक्रिया केली जाणार असून सध्या हा पूल पालिकेमार्फत चालविण्यात येणार असल्याची माहिती अभियंता मनिष शर्मा यांनी दिली.
येथील नेहरू मैदानात आगामी मंगळवार, २४ मार्चपासून शिवकेसरी ‘कुस्ती दंगल’चे आयोजन करण्यात आले आहे. नमो युवक संस्था, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि विदर्भ कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुरुष, महिला आणि कुमार अशा तीन गटात होणार आहे. या आयोजनाबाबत माध्यमांशी वार्तालाप करताना हव्याप्र मंडळाचे उपाध्यक्ष नगरसेवक ॲड. प्रशांत देशपांडे, विदर्भ कुस्तीगीर परिषदेचे नगरसेवक प्रा. डॉ. संजय तिरथकर आणि नमो युवक संस्थेचे अध्यक्ष करण डेंडवाल यांनी माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, या स्पर्धेच्या माध्यमातून लाखो रुपयांची बक्षीसे वितरित केली जाणार आहेत. ही स्पर्धा राज्यस्तरीय असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील नामवंत मल्ल या स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेचे विधीवत उद्घाटन २४ मार्चला सायंकाळी ६ वाजता केले जाईल. तर पुरस्कारांचे वितरण दुसऱ्या दिवशी बुधवार, २५ मार्च रोजी आयोजित एका दीमाखदार सोहळ्यात केले जाईल. या स्पर्धेत सुमारे ३०० मल्ल सहभागी होणार असून हे सर्व सोमवार, २३ मार्चलाच अमरावती शहरात दाखल होणार आहेत. स्पर्धा हव्याप्र मंडळद्वारा पुरविल्या जाणाऱ्या १२ बाय १२ फुटाच्या मॅटवर होणार आहे. एकाचवेळी किमान तीन मॅटवर कुस्ती सुरु असेल. दरम्यान प्रत्येक गटातील विजेत्यांना चांदीची गदा व रोख रकमेचा पुरस्कार दिला जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या स्पर्धेसाठी सुमारे ५ हजार क्रीडाप्रेमी बसू शकतील, अशी लाकडी गॅलरी उभी करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेला प्रशांत हरकुट, दीपक सम्राट ( साहू ), कौशिक अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते. अनेक मल्ल घडवणारे अमरावती शहर अमरावती शहराची ओळख ही फार पूर्वीपासूनच साहित्य, शिक्षण व क्रीडानगरी म्हणून रुढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व केलेली हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अशी जगविख्यात क्रीडा संस्था याठिकाणी आहे. शिवाय या संस्थेत कुस्तीसाठीचा स्वतंत्र विभाग असून विदर्भ व महाराष्ट्र केसरीसारखे अनेक मल्ल या संस्थेने घडविले आहे. सदर आयोजनाच्या माध्यमातून शहर व जिल्ह्यात खेळ आणि क्रीडाविषयक जागरुकता निर्माण केली जाणार असून शरीर बळकट करण्यासाठीचा धडा या माध्यमातून दिला जाणार आहे.
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास नेरपिंगळाई परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तब्बल दीड तास विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाच्या सरींनी संपूर्ण परिसर हादरून गेला होता. अचानक आलेल्या या पावसामुळे गहू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यांच्या तीव्र झोतामुळे उभे गहू पीक मोठ्या प्रमाणात आडवे पडले आहे. काढणीच्या अवस्थेत असलेले हे पीक जमिनीवर आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पडलेल्या गव्हाची काढणी करणे अत्यंत कठीण झाले असून मजुरीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रात्रीच्या वेळी विजांचा सतत गडगडाट होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतात पाणी साचल्यामुळे काढणीची कामे ठप्प झाली असून पुढील काही दिवस हवामान स्थिर न राहिल्यास नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानाची नोंद घेण्याची मागणी केली आहे. गहू पिकाच्या नुकसानीचे अचूक मूल्यांकन करून शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या घटनेनंतर आज, शनिवारी सुटी असूनही महसूल व कृषी विभागाने प्राथमिक माहिती जाणून घेतली. परंतु नेमके नुकसान किती झाले, हे सायंकाळपर्यंतही कळू शकले नव्हते. अमीत लांडे, कृषीतज्ञ, अमरावती गुणवत्तेवर होणार परिणाम पावसामुळे गहू ओला झाल्याने त्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. गव्हाच्या उंब्यामध्ये ओलावा शिरल्याने धान्य खराब होणे, बुरशी लागणे आणि साठवणुकीदरम्यान नुकसान होण्याचा धोका वाढला आहे. परिणामी, बाजारभावात घट होण्याची भीती आहे.
‘संयम, त्याग, मानवतेचा संदेश देणारा सण रमजान’:मराठा मंडळाचा रविवारी उपवर युवक -युवती मेळावा
प्रत्येक सण हा केवळ एका धर्मापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण समाजाला काही ना काही जीवनमूल्य देऊन जातो. संयम, त्याग आणि मानवतेचा संदेश देणारी रमजान ईदही तशीच आहे. रमजानमध्ये महिनाभर चाललेल्या आत्मशुद्धीच्या, संयमाच्या तपस्येचा आणि मानवतेच्या जाणीवेचा हा उत्सव आहे, असे प्रतिपादन आमदार सुलभाताई खाडके व आमदार संजय खोडके यांनी केले. आज, शनिवारी येथील पठाण चौक परिसरात पोहोचून त्यांनी ज्येष्ठ नागरिक, युवक बांधवाना ईद मुबारक म्हणत सर्वांना शुभेच्छा दिल्या.आजच्या काळात समाज अनेक आव्हानांना सामोरा जात आहे. धार्मिक तणाव, सामाजिक विषमता, आर्थिक असमानता आणि वाढती असहिष्णूता. अशा परिस्थितीत रमजान ईद आपल्याला एक वेगळा मार्ग दाखवते. संयमाचा, सहिष्णूतेचा आणि परस्पर आदराचा या शब्दसुमनांनी आमदार संजय खोडके यांनी ईद निमित्ताने सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम बांधवानी पारंपारीक वेशभूषा धारण करीत या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवला होता. यावेळी यश खोडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील सदस्य, पदाधिकारी तसेच मनपा नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते. अमरावती | मराठा विवाह मंडळ व वाचनालय, नारायण नगर बगिचा, रुख्मिणी नगर अमरावतीच्यावतीने आगामी रविवार, २२ मार्च रोजी उपवर युवक-युवती व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा वार्षिक मेळावा सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत रुक्मीणीनगर स्थित सुयोग मंगल कार्यालयात होईल. याप्रसंगी उपवर युवक-युवती परिचय पुस्तकसुध्दा प्रकाशित करण्यात येणार आहे. गरजूंनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा व इतरांना माहिती देवून समाज कार्यास सहकार्य करावे, अशी विनंती मराठा विवाह मंडळाचे सरकार्यवाह दिगंबर शहापूरे यांनी केली आहे. बडनेरातही ईदचा उत्साह आज सकाळी ८.४५ च्या सुमारास मौलाना सईद अख्तर मुरादाबादी यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावतीच्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यात आले. नमाजनंतर एकमेकांना गळाभेट देत ‘ईद मुबारक’च्या शुभेच्छा देण्यात आल्या. अमरावती महानगराचे उपशहर असलेल्या बडनेरा येथेही ईदचा उत्साह दिसून आला. ईदच्या पार्श्वभूमीवर येथील बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. कपडे, सुका मेवा, अत्तर तसेच शिरखुरम्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी दुकाने गजबजून गेली होती.
चिंच-बोरांचा बाजार ठरला रोजगाराचे साधन:आष्टी बसस्टँडवर उन्हात कष्टकऱ्यांची धडपड; नागरिकांचीही मागणी
भातकुली तालुक्यातील आष्टी व वायगाव बसस्टँड परिसरात सध्या चिंच व बोरांच्या विक्रीचा हंगाम सुरू झाला आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी महिला-पुरुष भर उन्हात चिंचा व बोरं गोळा करून रस्त्यालगत स्टॉल लावून विक्री करताना दिसत आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी सुरू असलेली त्यांची ही धडपड लक्ष वेधून घेत आहे. परतवाडा-अमरावती मार्गावरील आष्टी बसस्टँड परिसरात सध्या चिंच व बोरीच्या छोट्या-मोठ्या दुकानांची रांग लागलेली दिसते. भातकुली तालुक्यातील आष्टी, वायगाव, कामनापूर, जावरा व देवरी निपाणी या गावांतील कष्टकरी नागरिक सकाळपासून चिंचा व बोरं गोळा करून बसस्टँड परिसरात विक्रीसाठी बसतात. प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून या आंबट-गोड चिंचा-बोरांना चांगली मागणी असल्याने दिवसभर स्टॉलवर वर्दळ दिसून येते. आष्टी बसस्टँड परिसरात साधारण चार ते पाच तर वायगाव बसस्टँड परिसरात पाच ते दहा छोटे स्टॉल लावले जातात. ग्रामीण भागातील शेतांच्या बांधांवर तसेच रस्त्यालगत असलेल्या चिंचेच्या व बोरीच्या झाडांवरून फळे गोळा करून ती विक्रीसाठी आणली जातात. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असला तरी कष्टकरी महिला-पुरुष दिवसभर उन्हात बसून विक्री करताना दिसत आहेत. भातकुली तालुक्यातील आष्टी, वायगाव, कामनापूर, जावरा व देवरी निपाणी परिसरातील अनेक कष्टकरी कुटुंबांसाठी चिंच व बोरांची विक्री हा महत्त्वाचा रोजगार ठरत आहे. शेतमजुरीचे काम कमी असलेल्या काळात ग्रामीण भागातील महिला-पुरुष रस्त्यालगतच्या झाडांवरून चिंच-बोरंं गोळा करून बसस्टँड परिसरात विक्रीसाठी आणतात. या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा काही प्रमाणात उदरनिर्वाह होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. झाड चिंचेचे, उत्पन्न हजारोंचे शेतकऱ्यांकडून १० ते १५ हजार रुपयांत चिंचेचे झाड विकत घेतले जाते. त्यावरील चिंचा तोडून त्या विक्रीकरिता आणल्या जातात. दररोज सुमारे ३० ते ४० किलो चिंचा विक्रीसाठी आणल्या जात असून त्यांना ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. त्यातून दिवसाकाठी सुमारे एक ते दोन हजार रुपये उत्पन्न मिळते. तसेच वाळलेली बोरंही विक्रीसाठी आणली जात असून त्यांना ४० ते ६० रुपये प्रतिकिलो असा दर मिळतो. या कामात कुटुंबातील सदस्यही मदत करतात, असे विक्रेते सुनील खर्चान, सतीश आठवले व देविदास खर्चान यांचे म्हणणे आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे पडसाळी येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या द्राक्ष पिकाच्या नुकसानीची पाहणी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मंत्री शेलार यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची स्थिती पाहिली आणि शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले. यावेळी शहाजी पवार तसेच तहसीलदार नीलेश पाटील उपस्थित होते. त्यांनी नुकसानीबाबत प्राथमिक माहिती दिली. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले. यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून शासन त्यांच्या पाठीशी उभे राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. प्रतिनिधी | टेंभुर्णी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री, आमदार व शेतकरी प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक लावून शेतकऱ्यांच्या केळी पिकाच्या अडकून पडलेल्या पैशाचा प्रश्न मार्गी लावू, असे प्रतिपादन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केले. टेंभुर्णी येथे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी केळी एक्स्पोर्टमध्ये गेल्या ३ महिन्यापासून माढा, करमाळा, पंढरपूर आदी तालुक्यातील केळी पिकाचे अडकून पडलेल्या ४०० कोटींच्या थकीत बिलाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत टेंभुर्णी येथे केळी शेतकरी, विक्रेता, व्यापारी, वेंडर आणि कंपनीचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पुढे बोलताना भरत गोगावले म्हणाले की, या बैठकीत शेतकरी विक्रेते यांनी पोटतिडकीने प्रश्न मांडले आहेत.शेतकरी फार मेहनतीने शेतात राबतो.त्यांची ही स्वप्ने असतात. पेमेंट अडकून पडल्याने सर्जन हवालदिल झाले आहेत. बंदरात अजून ही मोठ्या प्रमाणात शेतमाल भरलेले कंटेनर अडकून पडले आहेत. विक्रेता हा शेतकरी व व्यापारी यांच्यातील दुवा आहे. घेतलेला माल ही अडकून पडलेला आहे. कोकणातील आंबा पिकाची हीच अवस्था आहे. या अवस्थेवर अधिवेशन संपण्यापूर्वी तोडगा निघणे गरजेचा आहे, असेही गोगावले यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले. तसेच केळी व द्राक्ष पिकाचा भाऊसो फुंडकर योजनेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री, शेतकरी संबंधित मंत्री यांची मिटिंग झाल्याशिवाय प्रश्न मार्गी लागणार नाही असे ही गोगावले म्हणाले. शेतकरी खचला आहे. शेतकऱ्याचे खत, पाणी, खर्च वाया जात आहे. संकट कसे दूर करता येईल, त्यासाठी जे जे म्हणून प्रयत्न करणे गरजेचे आहे, ते मी प्रामाणिकपणे करणार असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला आहे. शेतकरी जगला तरच शासन ही व्यवस्थित काम करू शकेल. युद्धजन्य परिस्थितीमुळे ४०० कोटींपेक्षा जास्त रक्कम अडकून पडली आहे.यावेळी ना.गोगावले यांनी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होतील असे काम करू नका असे सुनावले. प्रास्ताविक संयोजक संजय कोकाटे यांनी केले.यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या तसेच शासनाने प्रामाणीकपणे प्रयत्न करावेत, अशी मागणी संजय कोकाटे यांनी केली. यावेळी केळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, भीमराव भुसनर, संदीप माने, किरण डोके यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे, बाळासो पाटील, पोपट अनपट, महेश चिवटे यांच्यासह परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्याचे खत, पाणी, खर्च वाया केळीच्या गिरीवी भाज्या तयार होतात, यामुळे जगात मोठी मागणी आहे. भविष्यात केळीचा पल्प करून निर्यात केल्यास जास्त फायदा होईल. शासनाच्या हमीवर २० रु.किलोप्रमाणे बँकेकडून आऊट सोर्स निधी उपलब्ध करून द्यावा. शासनाने मार्ग काढावा, अशी मागणी आमदार अभिजित पाटील यांनी केली.
सुटीसाठी गावी आलेल्या युवकाचा अपघातात मृत्यू:गादेगाव येथील दुर्घटना, अकस्मित मृत्यूची नोंद
महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेला युवक पाडव्याच्या सुट्टीसाठी गावी आलेला होता. रविवारी परत कॉलेजला जाणार होता, परंतु शनिवारी त्याचे शेतात काम करीत असताना अपघाती मृत्यू झाला. सुमित मोहन बागल (वय- १९) असे त्या युवकाचे नाव आहे. गादेगाव ( ता. पंढरपूर) येथे शनिवारी ही दुर्घटना घडली. गादेगाव येथील सुमित मोहन बागल हा युवक डी. वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथे पहिल्या वर्षात शिकत होता. गुढी पाडव्याची तीन दिवसाची सुट्टी आहे म्हणून तो गावाकडे आलेला होता. आणि सुट्टी संपवून रविवारी तो परत कोल्हापूरला कॉलेजसाठी जाणार होता. शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास शेतात ट्रॅक्टर चालवत असताना त्याचा तोल गेला आणि मोठ्या चाकाखाली सापडून तो जागीच ठार झाला. सुमितच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच गादेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. शनिवारी रात्री गादेगाव येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर निमगावला पंचायत समितीचे सभापती पद मिळाल्याने दोन्ही गटाच्या राजकारणातील तरुणाईने राजकीय मतभेद विसरून नूतन सभापती दत्ता मगर यांचा सन्मान केला. राजकीय कट्टरतेसाठी परिचित असलेल्या निमगावकरांनी इथून पुढे निवडणुकीपुरतेच राजकारण विकासाच्या राजकारणासाठी सर्वजण मिळूनच काम करु, हा नवा आर्दश या निमित्ताने इतरांसमोर ठेवला आहे. निमगाव (ता.माळशिरस) हे गाव गजी ढोल, कुस्ती, आदर्श शेती बरोबरच या गावातील कडव्या राजकीय कुरघोड्यांसाठी पंचक्रोशीतच काय पण संपूर्ण तालुक्यात परिचित आहे. इतर गावाप्रमाणेच येथेही दोन राजकीय बलदंड गट आहेत. दोन्ही पक्षांचे अगदी टोकाचे राजकारण व्हायचे. यथावकाश राजकारणातील नव तरुणाईने ही परिस्थिती निवळण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र मूळ राजकारणाचे पडसाद अजून तसेच होते. गावालाच सभापती पद मिळाल्याने गावचा बहुमान म्हणून तरुणाई एकवटली. निमगाव ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता आहे. पंचायत समिती निवडणुकीत मोहिते पाटील जानकर गट आघाडीकडून शिवसेना शिंदे गटाचे दत्तात्रय मगर हे निवडणुकीत उतरले. त्यांच्या विरोधात भाजपने ग्रामपंचायत सदस्य असलेले किरण पाटील यांना उतरवले. मगर हे विजयी झाले पण राजकीय डावपेचातून सभापती पदी त्यांची वर्णी लागली. यापूर्वी जवळपास २६ वर्षे समिती सदस्य असूनही गावाला हुलकावणी दिली. सभापती पद मिळाल्याने आनंदोत्सव साजरा झाला. या निमित्ताने झालेल्या अभिनंदनाच्या भाषणात या पदाचे महत्त्व विषद करून दोन्ही गटांकडून निवडणुकी पुरतेच राजकारण असावे असा सूर आळवण्यात आला. त्यास उपस्थित तरुणाईने टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. त्यामुळे अलिकडील जीवघेण्या राजकारणात निमगावात मात्र एक नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे. नेत्यांच्या भाषणातून आणाभाका
रामा शेळके ठरला गुरु रेवणसिद्ध केसरी:ग्रामदैवत गुरु रेवणसिद्ध यात्रेनिमित्त कुस्ती कार्यक्रम
हराळवाडी (ता. मोहोळ) ग्रामदैवत गुरु रेवणसिद्ध यात्रेनिमित्त दि. २० मार्च रोजी आयोजित भव्य कुस्ती मैदानात प्रेक्षकांची प्रचंड गर्दी उसळली. पंचक्रोशीसह जिल्ह्यातील नामांकित पैलवानांनी या मैदानात दमदार हजेरी लावत चुरशीच्या लढती रंगवल्या. १०० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंतच्या कुस्त्यांनी दिवसभर मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. मैदानातील अंतिम आणि मानाची कुस्ती हराळवाडीचा पै. रामा शेळके आणि सांगलीचा पै. राजकुमार पाटील यांच्यात रंगली. एक लाख रुपयांच्या इनामासाठी झालेल्या या लढतीत रामा शेळके यांनी अप्रतिम लपेट डाव टाकत राजकुमार पाटील यांना चितपट केले. या शानदार विजयामुळे रामा शेळके यांना रोख १ लाख रुपये व चषक देऊन मानाचा ‘गुरु रेवणसिद्ध केसरी’ किताब बहाल करण्यात आला. उपविजेता पै. राजकुमार पाटील यांना २० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती ७५ हजार रुपयांची ठेवण्यात आली होती. या लढतीत पुळुजचा पै. नव्हतेज कोंडकर याने मोहोळच्या पै. विक्रम गायकवाड याच्यावर मात करत बक्षीस पटकावले. विजेत्या पैलवानांना रोख रक्कम, मानचिन्ह आणि फेटा बांधून सन्मानित करण्यात आले. आयोजकांच्या उत्तम नियोजनामुळे संपूर्ण कुस्ती स्पर्धा उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी मैदान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. पंच म्हणून यांनी काम पाहिले या कुस्ती मैदानासाठी रवि शेळके, विठ्ठल हराळे, सिद्धू माने, रवि पवार, सोन्याबापू ऐवळे, रंगसिद्ध शेळके, विलास शेळके, रोहित शेळके यांनी पंच म्हणून काम पाहिले. तर रवि शेळके, सचिन हेगडे, चंद्रकांत ढगे, साधूनाना पाटील, रामचंद्र शेळके, श्रीकांत धोडमिसे आणि सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी मैदान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
सांगोला तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहांची अत्यंत दयनीय अवस्था असल्याचे वास्तव समोर येत आहे. स्वच्छ भारत अभियान, शालेय स्वच्छता उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध योजना राबवल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहांची योग्य देखभाल होत नसल्याचे दिसून येते. सांगोला तालुक्यात ३८४ जि. प शाळांपैकी ३०० शाळेत स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर तसेच शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे. तालुक्यातील काही शाळांमध्ये स्वच्छतागृहांची अवस्था इतकी खराब आहे की विद्यार्थ्यांना त्यांचा वापर करणेच कठीण झाले आहे. काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, तर काही ठिकाणी दरवाजे तुटलेले आहेत. यामुळे विशेषतः मुलींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सांगोला तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत मुलींसाठी असलेले स्वच्छतागृह गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. पाण्याची टाकी खराब झाल्यामुळे आणि साफसफाई न झाल्यामुळे विद्यार्थिनींना स्वच्छतागृह वापरता येत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थिनींना दिवसभर शाळेत असताना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. दुसरे उदाहरण म्हणजे तालुक्यातील एका ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत स्वच्छतागृहाच्या दरवाज्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. दरवाजे तुटलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना गोपनीयता मिळत नाही. परिणामी अनेक विद्यार्थी स्वच्छतागृह वापरणे टाळतात आणि शाळेबाहेर मोकळ्या जागेचा वापर वापर करतात. या परिस्थितीचे दुष्परिणाम गंभीर स्वरूपाचे आहेत. स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोटाचे आजार, संसर्गजन्य रोग आणि स्वच्छतेशी संबंधित समस्या वाढण्याची शक्यता असते. विशेषतः मुलींमध्ये शाळेत गैरहजेरी वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे स्वच्छतागृहांची अनुपलब्धता असल्याचे तज्ज्ञ सांगतात. स्थानिक पालक आणि ग्रामस्थांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्या असल्या तरी शिक्षण विभागाकडून अपेक्षित पातळीवर कार्यवाही होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन शाळांमधील स्वच्छतागृहांची दुरुस्ती व नियमित स्वच्छता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि शिक्षणावर होणारे दुष्परिणाम अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्वच्छता गृहाची सफाई होत नाही ^शाळेमध्ये स्वच्छता गृहाची सफाई होत नाही. हात व पाय स्वच्छ धुण्यासाठी पाणी नसते. त्यामुळे मुले तसच वर्गात बसतात. तसेच खातात, त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतोय. समाधान वाघमारे, पालक नाझरे नाझरे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली दिसत आहे. ^गटशिक्षण अधिकारी नसल्याने त्याबाबत जास्त माहिती नाही. सर्व शाळांमधील माहिती घेऊन त्याबाबत वरिष्ठांकडे पाठपुरवा करण्यात येईल. अमोल भंडारी, शिक्षण विस्तार अधिकारी वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे
पूररेषेतील बांधकाम बंदीमुळे अडचण:बांधकाम परवान्याच्या 200 फाईल्स मंजुरी अभावी प्रलंबित
राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने पूररेषेच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील नवीन बांधकामांवर प्रतिबंध घातल्याने पंढरपूरमधील नदीकाठच्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या निर्णयाविरोधात माजी नगरसेवक विक्रम शिरसट, नगरसेवक सुनील वाळूजकर आणि लक्ष्मण शिरसट यांनी मुख्याधिकारी महेश रोकडे यांची भेट घेऊन तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली. चंद्रभागा नदीकाठच्या गोविंदपुरा, हरिदास वेस, भजनदास चौक, घोंगडे गल्ली, जुनी पेठ, संत पेठ आणि प्रदक्षिणा मार्ग या दाट लोकवस्तीच्या भागात पावसाळ्यात पुराचे पाणी शिरते. पूर परिस्थितीमुळे येथील जुन्या घरांची आणि मठांची पडझड होत असल्याने पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती करणे आवश्यक असते. मात्र, शासनाच्या नव्या नियमामुळे नगरपालिका प्रशासनाने या भागातील बांधकाम परवान्याच्या सुमारे २०० फायली प्रलंबित ठेवल्या आहेत. घराच्या दुरुस्तीपासून रोखणे अन्यायकारक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. मठ आणि जुन्या वाड्यांचा प्रश्न गंभीर या भागात अनेक ऐतिहासिक मठ आणि जुन्या इमारती आहेत. त्यांच्या देखभालीसाठी बांधकाम परवानगी मिळणे गरजेचे आहे. परवानगी अभावी नागरिकांचे हाल होत असून प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी विक्रम शिरसट यांनी यावेळी केली. उजनी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे दरवर्षी या भागाला पुराचा फटका बसतो, अशा स्थितीत रहिवाशांना त्यांच्या हक्काच्या घराच्या दुरुस्तीपासून रोखणे अन्यायकारक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
दिवसा अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी असतानाही, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची सर्रास पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसत आहे. बायपासचा मार्ग सोडून टोल वाचवण्यासाठी ही वाहने शहरातून ये-जा करत आहेत. पोलिसांकडून केवळ दंडात्मक कारवाई होत असल्याने या बेशिस्त वाहतुकीला चाप बसलेला नाही. तसेच शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्रही कायम आहे. सध्या शहरात ठिकठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यातच अवजड वाहनांच्या प्रवेशामुळे सकाळ-संध्याकाळ नोकरदार आणि शालेय विद्यार्थ्यांची मोठी कुचंबणा होत आहे. विशेषतः सोलापूर आणि पुणे महामार्गावरून येणारे कंटेनर व ट्रक रात्री ९ नंतर संभाजीनगर रस्त्यावर लांबच लांब रांगा लावतात. या बेकायदा वाहतुकीमुळे गेल्या काही दिवसांत अनेक निष्पापांचे बळी गेले असून, चार दिवसांपूर्वीच एका अवजड वाहनाने काही गाड्यांना चिरडल्याची घटना घडली. शहर वाहतूक शाखेकडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळाचा फायदा वाहनचालक घेत आहेत. केवळ दंड वसूल करून महसूल वाढवला जात असला, तरी सामान्य नागरिकांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. या विरोधात आता संतप्त नगरकरांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. {सन २०११ मध्ये जिल्हाधिकारी डॉ.पी.अन्बलगन यांनी सकाळी ९ ते १२, सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी केली.{ सन २०१६ मध्ये जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत शहरात कायमची प्रवेशबंदी केली. { सन २०१६ पासून बायपास रस्त्यांना जोडणाऱ्या शेंडी, विळद, कल्याण, केडगाव, अरणगाव, आदी चौकांमध्ये कायमस्वरुपी वाहतूक व स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. { सप्टेंबर २०२५ पासून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी अवजड वाहनांना सकाळी ६ ते रात्री १ यावेळेत प्रवेशबंदी केली. फक्त रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वाहनांना प्रवेश आहे. या विभागांची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेचे उल्लंघन झाल्यास अवजड वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी शहराच्या हद्दीत शहर वाहतूक शाखेची आहे. महामार्गावरुन शहरात येणाऱ्या चौकांमध्ये महामार्ग पोलिसांनी दक्ष राहण्याची गरज आहे. तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागही शहरातील अवजड वाहनांवर कारवाई करु शकतो.
व्याख्यानमाला:जागतिक अर्थकारणावरील स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठीच सध्याचे युद्ध- चंद्रशेखर टिळक
सध्या जग युद्धाच्या वणव्यात लोटले गेले आहे. त्याचा प्रारंभ तर झाला आहे पण शेवट कधी होईल ते सांगता येत नाही. या युद्धाच्या मुळाशी कोणताही धर्म वगैरे नाही. तर पृथ्वीच्या पोटात दडलेल्या अनमोल खनिज संपत्तीवर वर्चस्व मिळवण्यासाठी आणि जागतिक अर्थकारणामध्ये स्वतःचा दबदबा निर्माण करण्यासाठी हे युद्ध लढले जात असल्याचे प्रतिपादन अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी केले. स्व. माधवलाल मालपाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राजस्थान युवक मंडळाच्यावतीने आयोजित ‘मंथन’ व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ‘जागतिक राजकारण आणि भारतीय अर्थकारण’ या विषयावर ते बोलत होते. टिळक म्हणाले, पृथ्वीच्या पोटात दडलेली खनिज संपत्ती आणि जागतिक राजकारण व अर्थकारण यांचा खूप जवळचा संबंध आहे. ही सांगड अनेक शतकांपासून आहे. या संपत्तीवर वर्चस्व मिळवण्यासाठी वेळोवेळी धुमश्चक्री झाल्याची अनेक उदाहरणे इतिहासातील दाखल्यांमधून मिळतात. या गोष्टींची वारंवार पुनरावृत्ती होत असते. त्याचाच परिपाक सध्याच्या इस्त्रायल-अमेरिका आणि इराण या देशातील संघर्षातून दिसत आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीत जागतिक अर्थकारणावर असलेली आपली पकड सैल होऊ द्यायची नाही. त्यासाठी अमेरिका आजपर्यंत विविध क्लुप्त्या लढवित अल्याचेही टिळक यांनी सांगितले. विविध देशांवर प्रभुत्व गाजविण्याची अमेरिकेची शैली भारताला मात्र कधीही नामोहरम करू शकली नाही. अलीकडच्या काही वर्षात भारताने आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने ठोस पावले टाकली आहेत. त्यामुळे भारत अनेक गोष्टींमध्ये स्वयंपूर्ण झाला आहे. मेक इन इंडिया चळवळीने व्यापक स्वरूप धारण केले आहे. लघुउद्योग आणि कुटीर उद्योग लाखोंच्या संख्येने उभे राहत आहेत. त्यामुळे युद्धाचा कोणताही थेट दुष्परिणाम भारताला भोगावा लागलेला नाही असे त्यांनी यावेळी नमूद केले. मंडळाचे सहसचिव कृष्णा आसावा यांनी प्रास्तविक आणि परिचय करून दिला. मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष सुमित अट्टल यांनी आभार मानले.
जागतिक चिमणी दिनानिमित्त करंजी येथील श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे अभिनव उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या परिसरातील झाडांवर चिमण्यांसाठी वॉटर फिडर (पाण्याची भांडी) व फूड फिडर (धान्य ठेवण्याची भांडी) लावून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा उपक्रम गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता अंतर्गत राबविण्यात आला. आधुनिक जीवनशैली, वाढते प्रदूषण, मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या किरणांचा परिणाम, झाडांची कमी होत चाललेली संख्या आणि अन्नसाखळीतील बदल या सर्व घटकांमुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याच विचारातून शाळेने पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी स्वतःहून या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी केवळ शाळेतच नव्हे तर घरीही अशाच प्रकारचे फिडर लावण्याचा संकल्प केला. या उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय म्हस्के व पर्यवेक्षक जयवंत पुजारी यांनी मार्गदर्शन केले. गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता अंतर्गत समन्वयक स्वाती अहिरे यांनी या उपक्रमाचे नियोजन, अंमलबजावणी व देखरेख यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून उपक्रम यशस्वी केला. जागतिक चिमणी दिनानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम नसून, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. विद्यार्थ्यांच्या मनात निसर्गाविषयी प्रेम, संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. आजच्या काळात पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याची टंचाई या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. अशा वेळी शालेय स्तरावरूनच विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे धडे दिल्यास भविष्यात जबाबदार नागरिक घडू शकतात. चिमण्यांसाठी फिडर लावणे हा दिसायला छोटासा उपक्रम असला तरी त्याचा प्रभाव मोठा आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण होते आणि पर्यावरण रक्षणाची जाणीव विकसित होते. चिमण्यांसारख्या लहान पक्ष्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी मोठ्या उपाययोजनांची गरज नाही, तर छोट्या-छोट्या कृतीही मोठा बदल घडवू शकतात असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. शाळेच्या वतीने पुढील काळातही असेच विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आकारी पडीत शेतकऱ्यांची दखल न घेतल्यास जेलभरो:आत्मक्लेष आंदोलनातून शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
शासन जमिनीचे मालक कधीच झालेले नसून शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित केलेल्या नाहीत असे आशयाचे पत्र शासनाच्यावतीने उच्च न्यायालयात सादर केल्यानेच छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने आठ आठवड्यांत जमिनी वाटपासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश १४ ऑगस्ट २०२४ राज्य सरकारला दिल्यानंतर, सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देऊनही सरकार मूळ वारसांना जमीन वाटपाचा निर्णय घेत नसल्याने आज आम्हाला आत्मक्लेश आंदोलन करावे लागले. या आंदोलनाची दखल १५ दिवसांत महायुतीच्या सरकारने घेतली नाही तर जलभरो आंदोलनानंतर जमिनीवर कब्जा आंदोलन करण्याचा इशारा शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आयोजित आत्मक्लेश आंदोलनात बोलताना अँड अजित काळे यांनी दिला. शेती महामंडळाच्या हरिगांव मळा पंचक्रोशीतील शिरसगाव, वडाळा महादेव, ब्राम्हणगाव, ऊंदिरगाव, खैरी निमगाव, खानापूर, माळवाडगाव, मुठेवाडगाव या ९ गावांतील आकारी पडीत शेतकऱ्यांचे जमिनी संदर्भात अनेक दशकांपासून आंदोलन सुरू आहे. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन अंतिम अन् निर्णायक टप्प्यावर आलेले आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ८ आठवड्यांत म्हणजे ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले असतानाही शासनस्तरावर कुठलीही हालचाल झालेली नाही. उलट शासनाने ४ हजार एकर जमीन उद्योगास देण्यासाठी हालचाली सुरू केल्याने हे आंदोलन अधिकच तीव्र झाल्याने शुक्ररवारी अॅड. अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे उपस्थितीत आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. अॅड. काळे म्हणाले, आमच्या वाडवडिलांच्या हक्काच्या जमिनी संदर्भात स्थानिक आमदार, खासदार, मंत्री कुणीही मदत केली तर त्यांना डोक्यावर घेऊ. मात्र राजकारण केले तर त्यांना बदडून काढू. यावेळी प्रकाश चित्ते, सुरेश ताके, शालन झुराळे, गंगाधर चौधरी, सचिन वेताळ, शरद आसने, दत्तात्रय मुठे, रूपेश काले, अनिल औताडे, युवराज जगताप आदींनी मनोगत व्यक्त केले. रणरणत्या उन्हात तीन तास आंदोलन शुक्रवारी सकाळी ११ वाजता नेवासा रोडवरील बाजार समिती आवारापासून अॅड. अजित काळे यांच्या नेतृत्वात ९ गावांतील हजारो आकारी पडीत शेतकऱ्यांचा मोर्चा महात्मा गांधी पुतळ्याकडे निघाला. भर उन्हात हजारो आंदोलक रस्त्यावर बसले. तीन तासांपेक्षा अधिक वेळ शांततेच्या मार्गाने आंदोलन चालले. तहसीलदार मिलिंद वाघ, शहर पोलीस निरीक्षक देशमुख यांनी शासनाच्यावतीने निवेदन स्वीकारले.

31 C