माळहिप्परगा-पाटोदा मार्गावरील पूल बनला जीवघेणा
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा ते पाटोदा खुर्द दरम्यान अतिशय कमी उंचीचा पूल आहे. पावसाळ्यात थोडाही पाऊस पडला तरी या पुलावरून पाणी वाहते . गतवर्षी पावसाळ्यात या पुलावरून प्रवास करीत असताना पुरात वाहून जाऊन दोघांचा मृत्यू झाला होता. यामुळे या पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली होती. […] The post माळहिप्परगा-पाटोदा मार्गावरील पूल बनला जीवघेणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पोहरेगाव येथे उद्या मोफत कर्करोग निदान शिबिर
रेणापूर : प्रतिनिधी लातूर ग्रामीणचे युवा नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील पोहरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्या सौ. मनिषा कदम यांच्या पुढाकारातून सोमवार दि ६ एप्रील रोजी ‘मोफत कर्करोग (कॅन्सर) निदान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत […] The post पोहरेगाव येथे उद्या मोफत कर्करोग निदान शिबिर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी तालुक्यात अवकाळी पावसासह आलेल्या जोरदार वादळी वा-यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्या तोंडावर आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने हजेरी लावली. त्यासोबतच जोरदार वा-यामुळे गहू, हरभरा, ज्वारी यांसारखी पिके आडवी पडली असून अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान […] The post अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
५५ लाख मे. टन ऊसाचे विक्रमी गाळप
लातूर : योगीराज पिसाळ जिल्हयात पावसाळा लांबल्यामुळे साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगामही उशिराने सुरू झाला. जिल्हयातील १२ साखर कारखान्यांनी मार्च अखेर पर्यंत ५५ लाख ३१ हजार २५० मेट्रीक टन ऊसाचे गाळप करून ५२ लाख २४ हजार ८९७ क्विटल साखरेचे वेळेत व विक्रमी गाळप करून नवा इतिहास रचत ऊस गाळप हंगामाची सांगता झाली आहे. जिल्हयात पहिल्यांदाच […] The post ५५ लाख मे. टन ऊसाचे विक्रमी गाळप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पदोन्नतीनंतरच समायोजन करण्याचे शिक्षणाधिकारी अंधारे यांचे आश्वासन
लातूर : प्रतिनिधी २०२४-२५ च्या व २०२५_-२६ च्या अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनापूर्वी लातूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या रिक्त असलेल्या विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक व प्राथमिक पदवीधर या सर्व पदांची पदोन्नती करण्याचे वेळापत्रक तात्काळ जाहीर करून सदर पदांची पदोन्नती करण्यात यावी. तसेच ज्या शाळांची संच मान्यता चुकलेली आहे व २०२४-२५ च्या संच मान्यतेपेक्षा २० ऑक्टोबर २०२५ च्या […] The post पदोन्नतीनंतरच समायोजन करण्याचे शिक्षणाधिकारी अंधारे यांचे आश्वासन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विश्वमैदान राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणारे केंद्र ठरेल
लातूर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांमधील क्रीडागुणांना चालना देत त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींचे दालन खुले करून देणारे एमआयटी शिक्षण संकुलातील ‘विश्वमैदान’ हे आगामी काळात उत्कृष्ट खेळाडू घडविणारे महत्त्वाचे क्रीडा केंद्र ठरेल, असा विश्वास आमदार विक्रम काळे यांनी व्यक्त केला. माईर एमआयटी शिक्षण संस्था समूह, लातूर यांच्या वतीने आयोजित ‘विश्वमैदान २०२६’ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन […] The post विश्वमैदान राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणारे केंद्र ठरेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘पीएनजी’चा प्रसार वाढविण्याचा प्रयत्न
लातूर : प्रतिनिधी शहरात २०२१ पासून प्राइप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) पुरवठ्यास सुरुवात झाली; पण या ५ वर्षांत महापालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे केवळ २ हजार घरांपर्यंत ‘पीएनजी’ पोहोचले आहे मात्र, केंद्र आणि राज्य सरकार ‘पीएनजी’साठी आग्रही असल्याने स्थानिक प्रशासनाकडूनही आता ‘पीएनजी’चा प्रसार वाढावा यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आजवर दोन […] The post ‘पीएनजी’चा प्रसार वाढविण्याचा प्रयत्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लेकीच्या जन्माचा आनंद, गरजूंना ज्ञानाचा प्रकाश
लातूर : प्रतिनिधी सामाजिक जाणीवेचा सुंदर संदेश देणारी एक हृदयस्पर्शी घटना नुकतीच घडली. सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांच्या घरी नवजात मुलीचा जन्म झाला आणि या आनंददायी क्षणाला त्यांनी समाजोपयोगी वळण देत अनोख्या पद्धतीने साजरा केला. खुशीग्राम फाउंडेशनमधील अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांनी आपल्या मुलीच्या जन्माचा आनंद समाजासोबत वाटला. वैष्णवी इंडॉस्कॉपी हॉस्पिटल […] The post लेकीच्या जन्माचा आनंद, गरजूंना ज्ञानाचा प्रकाश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी करा
लातूर : प्रतिनिधी येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनुष्का पाटोळे या विद्यार्थीनीचा संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबाबत तिच्या कुटूंबियांकडून तिच्या मृत्यूबाबत घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे अनुष्काच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन केली आहे. संसदेत खासदार […] The post अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महापालिकेकडून शहरातील युनिपोल जप्त
लातूर : प्रतिनिधी गंधर्व मिडीया, लातूर यांची जाहिरात करण्याची मुदत संपुष्टात आल्यामुळे व सदर युनिपोल मुदतीत काढन न घेतल्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीप्रमाणे सदरील युनिपोल (जाहिरात बोर्ड) जप्त, अटकावणी करण्यात आले आहे. सदरील युनिपोल हा लातूर शहर महानगरपालिका, लातूर यांच्या मालकीचा आहे. सदर युनिपोलवर लातूर महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय जाहिरात करणे किंवा सदर युनिपोल काढून […] The post महापालिकेकडून शहरातील युनिपोल जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याचेही दृश्य समोर आले आहे. तसेच पुण्यात गुरुवारी (दिनांक 3 एप्रिल) अतिवृष्टी सदृश पाऊस पडला. या पावसामुळे पुण्यातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाचे अपयश म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, पुण्यात काल झालेला पाऊस ‘क्लाऊडबर्स्ट’ किंवा 4 तासांत झालेल्या अत्यंत जास्त पर्जन्याच्या श्रेणीतला नव्हता. मात्र ह्या पावसाने प्रशासनाचे अपयश अधोरेखित केले. पाण्याच्या तुंबण्यामागे एखादी अचानक घडलेली घटना कारणीभूत नव्हती. त्यामागचे मूळ कारण म्हणजे, गेल्या अनेक वर्षांपासून सरकार आणि सत्ताधाऱ्यांनी पर्यावरणीय धोक्याच्या चिन्हांकडे केलेले सातत्यपूर्ण दुर्लक्ष, अशी टीका त्यांनी केली आहे. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, मागील 4 वर्षांपासून पर्यावरण तज्ज्ञ, शहरी नियोजक, अभियंते, नागरीक सातत्याने विनाशाकडे नेणाऱ्या प्रकल्पांविरोधात आवाज उठवत आहेत आणि उपायही सुचवत आहेत. अशा अव्यवहार्य प्रकल्पांमध्ये, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट, चुकीच्या ठिकाणी उभारलेले मेट्रो खांब, नदीपात्रातील अतिक्रमणे, नदीच्या रेड आणि ब्लू फ्लड लाईन्समध्ये केलेले बदल, वेताळ टेकडीच्या नाशाचा प्रस्ताव, हे सर्व मुद्दे वारंवार मांडण्यात आले आहेत. पुन्हा एकदा स्पष्ट करतो, फक्त काँक्रीट ओतणे म्हणजे विकास नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, गेल्या दशकभरापासून पुण्यात ‘ट्रिपल इंजिन सरकार’ असूनही, हा कथित विकास प्रत्यक्षात संकटच ठरत आहे. जर हा तथाकथित विकास असाच सुरू राहिला, तर पुण्याला अशा परिस्थितींना अनेकदा सामोरे जावे लागेल आणि ‘विकास’ नावाखाली केवळ मृगजळ दाखवले जाईल. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, 2021 मध्ये पर्यावरण मंत्री म्हणून, मी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट थांबवून तो पुण्याच्या गरजेनुसार पुन्हा आखण्याचे निर्देश दिले होते. नदीच्या नैसर्गिक व मूळ रेड-ब्लू फ्लड लाईन्स पुन्हा निश्चित करणे अत्यावश्यक आहे. सलीम अली पक्षी उद्यान पुनर्जीवित केले होते, जे आज पुन्हा ढिगाऱ्यांनी भरले जात आहे. वेताळ टेकडी आणि इतर मोकळ्या जागांचे संवर्धन अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच निर्णय आता आपल्या हातात आहे आणि त्याच्या परिणामाची झलक काल पुणेकरांनी प्रत्यक्ष अनुभवली असल्याची टीका ठाकरे यांनी केली आहे.
बार्शीतील विशाल फटे याच्या कोट्यवधींच्या शेअर मार्केट घोटाळ्याची जखम अजूनही ताजी असतानाच, याच शेअर मार्केटमधील गुंतवणुकीपायी झालेल्या कर्जातून मुक्त होण्यासाठी एका तरुणाने 73 वर्षीय वृद्ध महिलेची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्याच्या नादात स्वतःला कर्जबाजारी करून बसलेल्या या तरुणाने 73 वर्षीय गंगुबाई गडदे यांना आपल्या घरी बोलावून धारदार शस्त्राने त्यांचा खून केला. गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गंगुबाईंचा शोध घेत असताना पोलिस तपासातून हा अंगावर शहारे आणणारा थरार समोर आला असून, या घटनेने संपूर्ण बार्शी तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. बार्शी येथील शशिकांत किसन वायकुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी चांगदेव पाटील याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) आणि 238 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीची 73 वर्षीय चुलत बहीण गंगुबाई कालिदास गडदे या एकट्या राहत असून, घराच्या भाड्यातून आपला उदरनिर्वाह करत होत्या. मात्र, 25 मार्च 2026 रोजी त्या घराला कुलूप लावून कोणालाही न सांगता अचानक बेपत्ता झाल्या. दोन दिवस त्यांचा शोध न लागल्याने अखेर 27 मार्च रोजी बार्शी शहर पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आरोपीने सीसीटीव्ही फुटेजही डिलीट केले तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता, गंगुबाई या संशयित चांगदेव गोवर्धन पाटील याच्यासोबत एका इमारतीत जाताना स्पष्टपणे दिसून आल्या. मात्र त्या तिथून परत बाहेर पडताना दिसल्या नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, संशय बळावू नये यासाठी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही जाणीवपूर्वक डिलीट करण्यात आल्याचे तपासात उघड झाले. याच पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी शोध घेतला असता गंगुबाईंचा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीने शेअर मार्केटच्या कर्जापायी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली बार्शी शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने बेपत्ता वृद्ध महिलेचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपासावर भर दिला होता. या प्रकरणातील संशयित आरोपी चांगदेव पाटील याला 2 एप्रिल रोजी पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला टाळाटाळ करणाऱ्या आरोपीने पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. शेअर मार्केटमध्ये झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी आणि कर्जातून मुक्त होण्यासाठी त्याने गंगुबाईंच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी ही हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. टॉवेलने त्यांचे नाक व तोंड दाबून निर्घृण हत्या 25 मार्च रोजी आरोपीने नियोजित कटानुसार गंगुबाई यांना आपल्या घरी बोलावले आणि त्यांना लिंबू सरबतातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्या बेशुद्ध झाल्यानंतर त्याने टॉवेलने त्यांचे नाक व तोंड दाबून त्यांची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह एका काळपट रंगाच्या पिशवीत भरला आणि स्वतःच्या हुंदाई वेरना कारमधून (क्र. MH-20 CS 8937) नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. विश्वास ठेवून गंगुबाईंनी आश्रय दिला होता या घटनेतील सर्वात धक्कादायक आणि क्लेशदायक बाब म्हणजे, आरोपी चांगदेव पाटील हा मृत गंगुबाईंकडे गेल्या पाच वर्षांपासून भाड्याने राहत होता. त्यांचे आणि गंगुबाईंचे नाते अत्यंत जिव्हाळ्याचे आणि कुटुंबवत्सल होते. ज्याच्यावर विश्वास ठेवून गंगुबाईंनी त्याला आश्रय दिला, त्याच भाडेकरूने केवळ पैशांच्या लालसेपोटी वृद्ध आजींचा जीव घेतल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी पुणे महानगरपालिकेने एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या निधी तरतुदीबद्दल महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांचा महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातर्फे नागरी सत्कार करण्यात आला. हा सत्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आला. रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते. संयोजक विठ्ठल गायकवाड आणि लता राजगुरू यांचीही यावेळी उपस्थिती होती. यावेळी बोलताना महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महामाता रमाई यांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी कार्य केले. प्रत्येकाचे आयुष्य प्रकाशमान व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पुण्यातील सर्व जनतेचा विकास व्हावा, हाच आमचा सामूहिक प्रयत्न असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. नागपुरे पुढे म्हणाल्या की, सामाजिक कार्य करताना कौतुक स्वीकारणे योग्य वाटत नाही. समाजहितासाठी कार्य करत राहावे याच भावनेने आमचे प्रयत्न सुरू आहेत. कर्तव्याच्या भावनेतूनच स्मारकाच्या सुशोभिकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आपल्या भाषणात म्हटले की, लोकशाहीच्या विकासासाठी संवाद महत्त्वाचा असतो. महापौर आणि उपमहापौर याच भूमिकेतून वाटचाल करत आहेत, याचा मनस्वी आनंद आहे. त्यांच्या कारकिर्दीतील विकासाचे पर्व महत्त्वाचे ठरणार आहे. उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी सांगितले की, शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या, कष्टप्रद जीवन जगणाऱ्या कुटुंबातून मी आलो आहे. माझीही वाटचाल कष्टातूनच झाली आहे. भविष्यातील वाटचाल सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठीच राहणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले की, स्मारकाच्या विकासासाठी निधी देण्याची संधी मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजतो. कर्तव्याच्या भावनेतूनच कार्य करत राहणार आहे.
प्रतिस्पर्धी टोळीच्या खुनाचा कट उधळला:शेखापुरे टोळीच्या तिघांना अवैध पिस्तुलांसह अटक
गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने प्रतिस्पर्धी उमाप टोळीतील सदस्याच्या खुनाचा कट उधळला आहे. या प्रकरणी शेखापुरे टोळीतील तीन सराईत आरोपींना अवैध पिस्तुलांसह अटक करण्यात आली. कोंढवा पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे एक मोठा गुन्हा टळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखापुरे टोळीतील सदस्यांनी उमाप टोळीतील एका सदस्याचा खून करण्याचा कट रचला होता. यासाठी त्यांनी अवैध पिस्तुले मिळवून तयारी सुरू केली होती. या कटात सहभागी असलेल्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित मल्लिकार्जुन शेखापुरे याच्याबाबत खंडणी विरोधी पथक-२ चे पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार, त्याला सोमवारी पेठ येथून अटक करण्यात आली. दुसरा आरोपी निखिल ज्ञानोबा लगाडे (वय २३, रा. गुलटेकडी) याच्याबाबत युनिट-०५ चे पोलीस अंमलदार अकबर शेख व राहुल दमडेरे यांना माहिती मिळाली होती. तर, तिसरा आरोपी अन्वर उर्फ जंबा शाकीर शेख (वय २३, रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) याच्याबाबत युनिट-०२ चे पोलीस अंमलदार शंकर नेवसे, विनोद चव्हाण, उज्ज्वल मोकाशी व विनायक वाघमारे यांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, संबंधित पथकांनी सापळा रचून १३ मार्च रोजी काही आरोपींना शस्त्रांसह ताब्यात घेतले होते. त्यानंतर फरार मुख्य आरोपीचा शोध घेऊन २ एप्रिल रोजी त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक व शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक राजमाने (खंडणी विरोधी पथक-२), पोलीस निरीक्षक संदीप पवार (युनिट-०५) व पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप (युनिट-०२) यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी ही कारवाई यशस्वी केली.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे पुढील विधानसभेत भाजपकडून निवडणूक लढवतील असा दावा केला होता. त्यावर आता भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत याणणू त्यांचे संपर्कातील आमदार सांभाळून ठेवावे. आपले आमदार आणि खासदार कसे टिकून राहतील याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असे महाजन यांनी म्हटले आहे. गिरीश महाजन म्हणाले, तुम्ही तुमचा पक्ष सांभाळून ठेवा. आगामी काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये विजय कसा होईल? यश कसे मिळेल? याकडे बघावे असे महाजन म्हणाले. आम्ही तर आमचे लोक परत घेणार नाही, पण तुम्ही तुमची मूठभर जे लोक आहेत ते सांभाळून ठेवा, असा टोला महाजन यांनी लगावला आहे. तसेच अजित पवार गटाकडून, शिंदे गटाकडून आमच्याकडे कोण येत आहेत, या राऊत यांच्या गोष्टींना लोक कंटाळले आहेत, असेही महाजन म्हणाले. एकनाथ खडसे 7-8 गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत पुढे एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ खडसे यांनी तक्रार करावी, कुठे डायरेक्टर आहे, कुठे मी पैसे लपवले आहेत, त्यांनी माझी तक्रार करावी. तुमची प्रत्येक आठवड्याला एसआरडी चौकशी होते, गुन्हे दाखल होत आहेत, ते तुम्ही बघा. लोकांच्या जमिनी खाऊन चालले महार वतानाच्या जमिनी खाऊन चालले, हायवेमध्ये जमिनी घेतात, त्यांचे कार्यकर्ते लगेच झाडे लावतात. तसेच 7-8 गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत. 136 कोटी रुपयांचा रॉयल्टीमध्ये तुम्हाला दंड झालेला आहे. आपण आपले बघा, माझ्याविषयी काही शंका असेल तर तुम्ही तक्रार करा, असे महाजन यांनी म्हटले. मुलीच्या नावावर घेतली ती का तुम्ही परत करत नाही? पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मला जसे कळाले की ती जमीन महार वतनाची आहे, ती जमीन लगेच परत केली. खरेदीचे देखील पैसे घेतले नाहीत, जे घेतले होते ते सुद्धा पैसे त्यांना परत दिले. तुम्ही जी जमीन मुलीच्या नावावर घेतली ती का तुम्ही परत करत नाही? असा सवालही महाजन यांनी खडसे यांना विचारला आहे. तसेच आपल्या एवढ्या बातम्या येत आहेत ती म्हातारी जमिनीसाठी चकरा मारत आहे. मात्र, तुम्हाला काही वाटते आहे का? असा सवालही महाजन यांनी केला. फोनवर संवाद झाला म्हणून कुणी गुन्हेगार ठरत नाही अशोक खरात यांचे एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या कथित फोन कॉल्सवर प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून सत्य लवकरच बाहेर येईल. केवळ फोनवर संवाद झाला म्हणून कुणी गुन्हेगार ठरत नाही, असे मत व्यक्त करत त्यांनी अंजली दमानिया यांच्या आरोपांवर सावध भूमिका घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून त्यामध्ये काय तथ्य आहे, हे लवकरच स्पष्ट होईल असा विश्वासही महाजन यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषदेतील नवनियुक्त सदस्यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व पक्षांच्या सदस्यांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीला आमदार राहुल कुल, आमदार शरद सोनावणे, आमदार बाबाजी काळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, प्रदीप कंद, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व नवनियुक्त सदस्य उपस्थित होते. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे १०, शिवसेना (शिंदे गट) ४, शिवसेना (उबाठा गट) ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) १ असे सदस्य निवडून आले होते. या सर्व सदस्यांनी बैठकीत जिल्ह्यातील विविध समस्यांवर चर्चा केली. जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्यावर यावेळी भर देण्यात आला. एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या- चंद्रकांतदादा पाटील युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पाईप नॅचरल गॅस ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही वाढती गरज ओळखून नागरिकांना तात्काळ नवीन कनेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश पाटील यांनी दिले. तसेच, मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास लोकसहभागातून १०० कर्मचारी उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे नैसर्गिक गॅसच्या मागणीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील यांची एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. कोथरुड विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण पुणे शहरात पीएनजी पुरवठा विनाव्यत्यय सुरू राहण्याबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी एमएनजीएलचे डायरेक्टर कुमार शंकर, कमर्शियल डायरेक्टर शंकर करजगी, स्वतंत्र डायरेक्टर बागेश्री मंठाळकर, व्हाईस प्रेसिडेंट शत्रुघ्न सिंह, रितेश इंगोले, ओंकार डुबल, लोकेश सरोदे आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला पाटील यांनी एमएनजीएलच्या शहरातील पुरवठा, तांत्रिक अडचणी याबबतचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, मागणी आणि पुरवठ्याबाबत ही सविस्तर माहिती जाणून घेतली. युद्धजन्य परिस्थितीमुळे अचानक मागणी वाढल्याने नागरिकांशी समन्वय साधून भागांत पाईप लाईन पोहोचवण्याचे काम जलदगतीने पुरवावे. तसेच, कामाला गती देण्यासाठी जर मनुष्यबळाची कमतरता भासत असेल, तर लोकसहभागातून १०० कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
रिसोडमध्ये बीएलओला लाथा-बुक्क्यांनी मारहाण:मतदार पडताळणी मॅपिंग कामात अडथळा, कर्मचारी संतप्त
राज्य निवडणूक आयोगामार्फत सुरू असलेल्या मतदार पडताळणी मोहिमेदरम्यान वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात कार्यरत बीएलओवर काही जणांकडून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रत्यक्ष पुनर्पडताळणी आणि मॅपिंगच्या कामासाठी गेलेल्या या कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्यामुळे निवडणूक कामकाजात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून, प्रशासकीय वर्तुळात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. रिसोड शहरात सन 2002 आणि 2024 च्या पुनर्मतदान प्रक्रियेच्या प्रत्यक्ष पडताळणी व मॅपिंगसाठी गेलेले बीएलओ नवनाथ मुंढे यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी लाथा-बुक्क्यांनी भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, गंभीर जखमी झालेल्या मुंढे यांना तातडीने वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे निवडणूक कामात असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भीती व खळबळ उडाली असून, हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असला तरी अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. वाशिम जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस वाशिम जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, आज अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने बळीराजाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. वाशिम शहरात सुमारे 45 मिनिटे झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले, तर कारंजा तालुक्यातील जांब गाव परिसरासह जिल्ह्याच्या विविध भागांत गारांचा वर्षाव झाला. या नैसर्गिक संकटामुळे बीजवाई कांदा आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आरोग्य व्यवस्थापनात सोलापूर महापालिका राज्यात दुसरी
सोलापूर : आरोग्य व्यवस्थापन व माहिती पध्दती – कुटुंब कल्याण, माताबाल संगोपन व नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत फेब्रुवारी २०२६ अखेर झालेल्या कामाबद्दल सोलापूर महापालिका राज्यात ९१ गुण मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. यासाठी सोलापूर महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी डॉ. राखी माने आणि त्यांच्या टीमने चांगली कामगिरी बजावली आहे. आरोग्य व्यवस्थापन व माहिती पध्दती अतंर्गत कुटुंब कल्याण, […] The post आरोग्य व्यवस्थापनात सोलापूर महापालिका राज्यात दुसरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राजकीय वैमनस्यातून आपल्याला अपघातात ठार मारण्याचा कट रचल्याची तक्रार भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत बंधू अभिजीत तायडे यांनी केली असून, याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यासह तिघांविरुद्ध अमरावती ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीत प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांचा पराभव केल्याच्या रागातून हा कट आखल्याचा गंभीर आरोप तायडे यांनी आपल्या तक्रारीत केला असून, या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण तायडे यांना राजकीयदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांच्या चुलत बंधूंना, म्हणजेच अभिजीत तायडे यांना अपघाताचा बनाव करून जीवे मारण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यासाठी सक्रिय असलेल्या 40 वर्षीय अभिजीत तायडे यांनी यासंदर्भात लेखी तक्रार दिली असून, राजकीय वैमनस्यातून आपल्याला संपवण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा तायडे बंधूंनी या तक्रारीत केला आहे. ऑडिओ क्लिप पोलिसांकडे सोपवली तक्रारीनुसार, गेल्या डिसेंबर महिन्यात बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानी झालेल्या एका बैठकीत बच्चू कडू, शुभम ऊर्फ गोलू माहोरे आणि इतरांनी मिळून अभिजीत तायडे यांना अपघातात ठार मारण्याचा कट रचला होता. एका गोपनीय साक्षीदाराने या संवादाचे रेकॉर्डिंग केले असून, त्या संभाषणाचा पुरावा असलेला पेन ड्राईव्ह तक्रारदाराने पोलिसांकडे सोपवला आहे. तसेच आमदार प्रवीण तायडे विधिमंडळाच्या अधिवेशनात व्यस्त असल्यामुळे ही तक्रार नोंदवण्यास विलंब झाल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे. बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल प्राप्त तक्रार आणि पेन ड्राईव्हमधील प्राथमिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, बच्चू कडू, शुभम ऊर्फ गोलू माहोरे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 55, 58 आणि 61 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जप्त केलेली ऑडिओ क्लिप आणि त्यातील संभाषणाची सत्यता पडताळण्यासाठी ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार असून, त्याद्वारे तांत्रिक पुराव्यांची खातरजमा केली जाणार आहे. पुढील तपास सुरू या संवेदनशील प्रकरणामुळे जिल्ह्यात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला असून, सध्या चांदूर बाजार पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात गंभीर आरोप करताना खळबळजनक माहिती समोर आणली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, पुराव्यांमध्ये अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यात 177 वेळा, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याला 17 वेळा फोन केल्याचे दिसून येत आहे. हे फोन कॉल नेमके कोणत्या कारणासाठी करण्यात आले, असा थेट सवाल दमानिया यांनी उपस्थित केला असून, त्यांच्या या आरोपांवर आता मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उदय सामंत म्हणाले, उदय सामंतांनी फोन केलाय का? आता ज्यांचे फोनवर बोलणे झाले, त्यांनी अशोक खरातच्या कृत्याचे समर्थन केलेले नाही. आता त्याने या नेत्यांशी बोलणे झाल्यावर त्याचा गैरफायदा घेऊन हे कृत्य केले आहे. मात्र ही वृत्ती संपुष्टात आणण्याची भूमिका शिवसेनेची आहे. आमच्या बाजूला येऊन काही लोक फोटो घेतात. मग त्याने काही चुकीचे कृत्य केले तर त्यात आम्ही सामील आहोत का? असा सवाल सामंत यांनी उपस्थित केला. हॉटेल व्यावसायिकांना सुरळीत गॅस पुरवठा करण्याच्या स्पष्ट सूचना एमएनजीएलकडून हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठा करण्यास होत असलेल्या दिरंगाईची गंभीर दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजक आणि हॉटेल व्यावसायिकांना सुरळीत गॅस पुरवठा करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तरीही हा तुटवडा जाणीवपूर्वक किंवा कृत्रिमरित्या निर्माण केला जात असल्याचे आढळल्यास सरकार संबंधितांवर कठोर पावले उचलेल, असे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. दुसरीकडे, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक स्तरावर ‘लिक्विफाइड नॅचरल गॅस’ च्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून त्याचे सावट पुरवठ्यावर दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. त्यानुसार, नागरिकांना दैनंदिन वापरासाठी 100 टक्के सीएनजी गॅस उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर व्यावसायिक वापरासाठी हा पुरवठा 80 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नर्गिस फ्रूटवालाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. मनसेने आपल्याला केवळ मदतच केली नाही, तर माणुसकी म्हणून देखील सहकार्य केले. जे पोलिसांनी केले नाही ते मनसेने केले, अशा शब्दात नर्गिसने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र नेमके झाले काय होते? जाणून घेऊया.. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या नर्गिस फ्रूटवालाचा 4 लाख रुपयांचा कॅमेरा कॅबमध्ये विसरली होती. कॅमेरा विसरल्याचे लक्षात आल्यानंतर तिने संबंधित कॅब चालकाला संपर्क केला. मात्र, चालकाने कॅमेरा परत करण्यास नकार दिल्याचा आरोप नर्गिसने केला. त्यानंतर तिने चेंबूर आरसीएफ आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी कॅब चालकाला कॉल केला, परंतु, आपल्याकडे काहीच नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर तिच्या संपर्कात असलेल्या एकाने मनसेची मदत घेण्याचे सुचवले आणि नर्गिस मनसेच्या शाखेत पोहोचली. मनसे वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई आणि शाखाध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे यांनी नर्गिसच्या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली. नवी मुंबई परिसरात त्यांनी त्या कॅब चालकांचा शोध लावला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी चालकाच्या घराची झडती घेतली आणि कॅमेरा ताब्यात घेतला. अवघ्या 24 तासांतच नर्गिसला तिचा कॅमेरा मिळाल्याने तिने आनंद व्यक्त केला. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विभाग अध्यक्ष संदेश देसाई आणि शाखा अध्यक्ष लक्ष्मण वाघमोडे यांचे तिने आभार मानले आहेत.
पुरावे योग्य वेळी योग्य ठिकाणी देणार
नाशिक : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी भोंदू अशोक खरातची भेट घेतल्याचा पुनरुच्चार केला आहे. नीलम गो-हे यांनी अनेकदा भोंदू अशोक खरातची भेट घेतली. या भेटीवेळी उपस्थित असलेल्या लोकांनीच मला ही माहिती दिली आहे. तृप्ती देसाई यांनी काही दिवसांपूर्वी नीलम गो-हे यांनी अशोक खरातची भेट घेतल्याचा आरोप […] The post पुरावे योग्य वेळी योग्य ठिकाणी देणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोथरूड येथील न्यू अजंता अव्हेन्यू सोसायटीतील ७० झाडे तोडल्याप्रकरणी तक्रारदार राजेंद्र आगरवाल यांचा दावा प्रथमदर्शनी योग्य असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या दिवाणी न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणात न्यायालयाने तक्रारदाराच्या बाजूने आदेश दिले आहेत. आगरवाल यांनी आपल्या ७०व्या वाढदिवसानिमित्त मित्रांच्या मदतीने ७० झाडे लावली होती, मात्र सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ती उपटून टाकल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष जयंत साठे यांना न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी वैयक्तिक हमीपत्र सादर करावे लागले. आगरवाल यांनी पुणे महानगरपालिकेच्या ई-पोर्टलवरून प्राप्त केलेल्या दैनंदिन स्थिती अहवालात ही माहिती नमूद आहे. यावरून तक्रारीतील बाबी गंभीर आणि सत्य असल्याचे दिसून येते, असा दावा आगरवाल यांनी केला आहे. आगरवाल यांच्या मते, त्यांची तक्रार केवळ कायद्याचे पालन आणि पर्यावरण संरक्षणाच्या प्रामाणिक हेतूने करण्यात आली होती. सार्वजनिक हितासाठी केलेल्या तक्रारींना खोटे ठरवण्याचा प्रयत्न होणे ही चिंताजनक बाब आहे. या प्रकरणाकडे वस्तुनिष्ठ आणि कायदेशीर दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या तक्रारीची दखल घेऊन ती योग्य ठरल्याने, आगरवाल यांनी समाधान व्यक्त केले आहे. प्राजित नायर यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती राज्य शासनाने प्रशासनातील महत्त्वपूर्ण फेरबदल करून २०१७ च्या तुकडीतील आयएएस अधिकारी प्राजित नायर यांची पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी म्हणून नियुक्ती केली आहे. नायर हे सध्या गोंदिया जिल्हाधिकारी पदी कार्यरत आहेत.व प्राजित नायर हे २०१७ च्या आयएएस तुकडीचे अधिकारी असून त्यांनी विविध प्रशासनिक पदांवर कार्य केले आहे आणि आता पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्या नव्या जबाबदाऱ्यांमध्ये महापालिकेच्या कामकाजाचे नियोजन, प्रशासनिक प्रक्रिया, शहर विकास प्रकल्प आणि नागरिकांशी समन्वय या बाबींचा समावेश असणार आहे. प्राजित नायर हे गेल्या काही काळापासून विविध जिल्हा व प्रशासकीय पदांवर कार्यरत होते, ज्यात जिल्हाधिकारी पदाचा आणि विभागीय प्रशासनातील महत्त्वाचे कार्यांचा अनुभव यांचा समावेश आहे.
मुंबई : राज्यातील पाणीसाठा मागील वर्षाच्या तुलनेत समाधानकारक असला तरी यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पाऊसपाण्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाने ओढ दिल्यास टंचाई किंवा दुष्काळसदृश उपाययोजनांची तयारी सुरू आहे. मागील काही वर्षांपासून महाराष्ट्राने समाधानकारक पाऊस अनुभवला. यंदा मात्र जागतिक तापमानवाढीमुळे अल निनोचा प्रभाव जाणविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस […] The post यंदा पाणीसाठा समाधानकारक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी दोघांची ५१ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी डेक्कन आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय, रिडिम पॉईंटच्या आमिषाने एका तरुणाची सुमारे चार लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. कर्वे रस्त्यावरील एका ज्येष्ठ नागरिकाला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी ३७ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घातला. या संदर्भात ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत, कात्रज भागातील एका तरुणाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १४ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, रिडिम पॉईंट मिळवून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका तरुणाची ३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट परिसरातील मुकुंदनगर येथे राहणाऱ्या तक्रारदार तरुणाशी सायबर चोरट्यांनी मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी स्वतःला बँकेचे प्रतिनिधी असल्याचे भासवून रिडिम पॉईंट मिळवून देण्याचे आमिष दाखवले. चोरट्यांनी तरुणाला एक लिंक पाठवली. ती लिंक उघडताच तरुणाच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने ३ लाख ९० हजार रुपये काढून घेण्यात आले. खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिसांकडे तक्रार केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारमळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पुणे, प्रतिनिधी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी नवी दिल्लीत झालेल्या देशपातळीवरील शेतकरी संघटनांच्या बैठकीत आशिया खंडात साम्राज्यवादी शक्ती आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वाढते वर्चस्व चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे. कॉर्पोरेट कंपन्या नैसर्गिक संसाधनांवर ताबा मिळवत असून, याचा थेट फटका भारतीय शेतकरी, आदिवासी आणि कष्टकरी वर्गाला बसत आहे, ज्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वावर गंभीर गदा येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शेट्टी म्हणाले की, जगभरातील साम्राज्यवादी शक्ती आणि बहुराष्ट्रीय कंपन्या आशियातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळवून केवळ आर्थिक शोषण करत नाहीत, तर पर्यावरणाचा समतोलही बिघडवत आहेत. यामुळे ग्रामीण समुदायांच्या उपजीविकेवर मोठे संकट ओढवले आहे. त्यांनी सध्याच्या भारतीय धोरणांवरही टीका केली. ही धोरणे आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या दबावाखाली राबवली जात असून, ती कामगार आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहेत. नैसर्गिक संसाधने कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घातली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अमेरिकेसोबत झालेल्या काही खाजगी आणि असमान करारांमुळे भारतीय शेती, बी-बियाणे आणि अन्न पुरवठा साखळीवर बाह्य नियंत्रण वाढत आहे. यामुळे भारतीय शेतकरी स्वयंपूर्ण राहण्याऐवजी विदेशी कंपन्यांवर अवलंबून राहण्याची भीती निर्माण झाली आहे. भारतीय शेतकरी सध्या देशांतर्गत शेतकरी विरोधी धोरणे, संसाधनांवरील कॉर्पोरेट ताबा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेने वाढवलेला साम्राज्यवाद अशा तीन आघाड्यांवर लढत असल्याचे शेट्टी यांनी नमूद केले. या बैठकीत केंद्र सरकारने तातडीने काही मुद्द्यांवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. यामध्ये नैसर्गिक संसाधनांवरील कॉर्पोरेट ताबा त्वरित थांबवावा, शेतकऱ्यांचे जमिनीचे हक्क आणि त्यांचे संरक्षण सुनिश्चित करावे, तसेच अमेरिकेसह इतर देशांसोबत झालेले शेतकरी-विरोधी करार सार्वजनिक करून त्यावर संसदेत खुली चर्चा व्हावी, अशा मागण्यांचा समावेश आहे. याशिवाय, कृषी क्षेत्राला कॉर्पोरेट नियंत्रणातून मुक्त करावे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला हमीभाव (MSP) व न्याय्य मोबदला मिळावा, अशी मागणीही करण्यात आली. केंद्र सरकारने विदेशी शक्तींच्या दबावाला बळी न पडता देशातील कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. जर या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर दिल्लीतील संसद मार्गावर तीव्र जनआंदोलन उभारण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला
पुणे महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागामार्फत गेल्या चार वर्षांत झालेल्या हजारो कोटी रुपयांच्या खर्चाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापौर मंजुषा नागपुरे यांच्याकडे तातडीने नैमित्तिक समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासक काळात ड्रेनेज विभागाचे वार्षिक बजेट सुमारे साडेसातशे कोटी रुपये होते. त्यामुळे गेल्या चार वर्षांत तब्बल ३००० कोटी रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय, 'जायका' प्रकल्पासाठी या वर्षाअखेर ९०० कोटी रुपये खर्च झाले असून, चालू वर्षात इतर कामे कमी करून २८९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, राष्ट्रीय पूर नियंत्रण अभियानांतर्गत केंद्र सरकारकडून २८० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. त्यापैकी १२५ कोटी रुपये पूरप्रवण भागांसाठी खर्च करण्याचे निर्देश होते. मात्र, या निधीच्या वापराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांत ड्रेनेज विभागाने साधारण ४२ कोटी रुपये खर्च केल्याचेही निवेदनात नमूद आहे. मोठ्या प्रकल्पांसाठी सल्लागार नेमून त्यांना मोबदला देण्यात आला, तसेच विविध कामांची बिले काढण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष कामांच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. विशेषतः, नव्याने समाविष्ट नऊ गावांमध्ये ड्रेनेज व्यवस्थेची दयनीय अवस्था असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवेदनात मुंबई महानगरपालिका कायदा कलम ३१ नुसार, महानगरपालिकेला विशेष विषयांच्या चौकशीसाठी नैमित्तिक समिती स्थापन करण्याचा अधिकार असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. या समितीत निवडून आलेले सदस्य तसेच विषयातील तज्ज्ञ अशा व्यक्तींना सहभागी करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. लोकनियुक्त प्रतिनिधी नसल्यामुळे प्रशासनाची मनमानी वाढली असून, हजारो कोटींच्या खर्चाची पारदर्शक चौकशी होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे ड्रेनेज विभागासाठी स्वतंत्र नैमित्तिक समिती स्थापन करून संपूर्ण प्रकरणाची तपासणी करावी, अशी मागणी संबंधित पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
राज्यातील शाळांची एकाच वेळी पटपडताळणी
पुणे : राज्यातील शाळांची नियतकालिक मूल्यांकन चाचणीदरम्यान पटपडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार ११ एप्रिल, १५ एप्रिल आणि २२ एप्रिल या दिवशी शिक्षण विभागाचे पथक शाळांना भेट देऊन विद्यार्थी उपस्थितीचा आढावा घेऊन त्याची प्रणालीमध्ये नोंद करणार आहे. पटपडताळणीची प्रक्रिया एकाच वेळी पूर्ण करण्यासाठी नववी आणि अकरावीच्या परीक्षाही याच दिवशी आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्राथमिक […] The post राज्यातील शाळांची एकाच वेळी पटपडताळणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे शहरात झालेल्या अतिवृष्टीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर पुणे महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार, नदी आणि नाल्यांच्या बाजूला असलेल्या बेकायदा बांधकामांचे नव्याने सर्वेक्षण करून ती अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. महापौर मंजुषा नागपुरे यांनी याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, सध्याचा पाऊस अनिश्चित स्वरूपाचा असून कमी वेळेत अधिक पाऊस होत आहे. यामुळे शहरातील विविध भागांत पाणी साचले, ज्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. एका ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मनपात आपत्कालीन बैठक घेण्यात आली. मनपाने स्ट्रॉम वॉटरलाइन ड्रेनेज सफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यासाठी पाइपलाइनचा आकार वाढवण्यात येणार आहे. झाडे छाटणीचे काम केवळ पावसाळ्यापूर्वीचे नसून वर्षभराचे आहे, असे सांगत नियमानुसार परवानगी देऊन कामाला सुरुवात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धोकादायक झाडे पावसाळ्यापूर्वी काढली जातील. ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्याबाबत पंचनामा करण्यात येईल. झाड पडून मयत झालेल्या महिलेच्या कुटुंबाला पाच लाखांची आर्थिक मदत आणि अतिरिक्त दोन लाख रुपये निधी देण्यात येणार असल्याची घोषणा महापौर नागपुरे यांनी केली. यावेळी उपस्थित असलेले पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांनी माहिती दिली की, नुकताच एका तासात १०४ मिमी पाऊस झाला, ज्यामुळे दोन ठिकाणी ढगफुटीसदृश घटना घडल्या. मनपा प्रशासन सातत्याने काम करत असून, शहराचा विस्तार वाढल्याने आव्हाने वाढली आहेत. शहरात २२७ ठिकाणी कामे करण्याची गरज असून, ती तीन विभागांत विभागून केली जातील. यापैकी १२० ठिकाणी जूनपूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यात येतील. वर्षानुवर्षे काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत, त्या ठिकाणांचा यात समावेश आहे. झाड छाटणीसाठी २४ तासांत परवानगी देण्यात येईल. प्रत्येक वॉर्डला कामांसाठी दहा लाख निधी दिला जातो, परंतु खर्चात कमी-अधिकता असल्याने तशा सूचना दिल्या आहेत. शहरातील ३२ धोकादायक वाड्यांमधील रहिवाशांचे एप्रिलपूर्वी स्थलांतर करण्यात येणार आहे. क्षेत्रीय अधिकारी दररोज कामावर येण्यापूर्वी दोन तास फिरून त्यांच्या भागातील अडचणींचा आढावा घेतील, असे आयुक्त राम यांनी सांगितले. पुणे शहर देशातील एक महत्वपूर्ण शहर आहे. दुबई, सिंगापूर मध्ये देखील १०० मिमी पाऊस एक तासात झाला तर पाणी जमा होते. त्यामुळे त्रास सर्वच ठिकाणी होत असतो. पाऊस न साचता ते तात्काळ निघून गेले पाहिजे याचे प्रयत्न करण्यात येत आहे. पुणे शहरात जुनी स्ट्रॉम वॉटर पाइपलाइन केवळ १६ टक्के असून ती ११३ मिमी अपेक्षित असल्याने त्याबाबत काम सुरू आहे. बेकायदा होर्डिंग्ज बाबत ऑडिट करून नवीन गाईड लाइननुसार काम करण्यात येईल.
‘एमपीएससी’ची भरती प्रक्रिया जलद गतीने होणार
नागपूर : महाराष्ट्रात २०२६ मध्ये ७०,००० हून अधिक सरकारी पदांची मेगा भरती होणार असून यामध्ये पोलिस, तलाठी, आणि शिक्षकांसह इतर अनेक विभागांतील रिक्त पदे भरली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भरती प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले असून २०,००० पदे एमपीएससीद्वारे भरली जातील. मात्र भरती प्रक्रिया राबवण्यास अनेकदा अडचणी येतात तसेच राज्य सरकारच्या विविध […] The post ‘एमपीएससी’ची भरती प्रक्रिया जलद गतीने होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच महायुतीच्या वतीने सुनेत्रा पवार या उमेदवार असणार आहेत. त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी जाहिर केले आहे. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना उमेदवार न देण्याची विनंती केली आहे. या संदर्भात माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्यांना अजित दादा यांचा दीर्घ काळ सहवास लाभला आहे. काँग्रेस असो की, कोणत्याही पक्षाचा माणूस त्यांच्याकडे गेला तरी अजित पवार त्याचं काम करत होते. त्या अजित पवारांचीच ही सीट आहे. काँग्रेस सोबत अजित पवार यांचा अनेक वर्षांचा सहवास राहिला आहे. आयुष्यातील 75 टक्के राजकारण अजित पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या सहवासात घालवले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना माझी मागणी आहे की, त्यांनी ही सीट बिनविरोध करावे. राहुरी मध्ये त्यांची लढण्याची इच्छा असेल, तर त्यांनी लढावे. त्यांचा तो अधिकार आहे. त्या ठिकाणी आम्हीही लढायला तयार आहोत. मात्र, बारामती मध्ये आमच्या वहिनी सुनेत्रा पवार यांची निवडणूक आहे. ती सर्वांनीच बिनविरोध करावी, अशी आमची मागणी असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांचा देखील काँग्रेसला बारामतीमध्ये पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या पक्षाच्या नेत्यांना देखील आम्ही हीच विनंती करत आहे. अजित पवार यांचा या सर्वांनाही सहवास राहिला आहे. अजित पवारांची आठवण अजूनही आपल्या सोबत आहेत. त्यांना जाऊन अजून वर्ष देखील झाले नाही. त्यामुळे किमान या निवडणुकीच्या माध्यमातून तरी काँग्रेसने आपले मोठे मन दाखवावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाच्या विलिनीकरण संदर्भातला निर्णय हा सुनेत्रा पवार यांचाच असेल. त्या त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. त्यामुळे विलिनीकरण संदर्भातला त्यांनी घेतलेला निर्णय अंतिम असेल. त्यामुळे या संदर्भात काही बोलण्यास बावनकुळे यांनी नकार दिला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचं तात्काळ सर्वेक्षण राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचं तात्काळ सर्वेक्षण केलं जाईल आणि अहवालानंतर नुकसान भरपाई दिली जाईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसामुळं गेल्या काही दिवसात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे त्याच्या तात्काळ सर्वेक्षणाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. या पत्रात सुनील तटकरे तसेच प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर त्यांच्या पदांचा उल्लेख करण्यात आला नव्हता. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून त्यात आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांनी कोषाध्यक्ष शिवाजीराव गर्जे यांना खडेबोल सुनावले असल्याची माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला 10 मार्च रोजी पत्र पाठवले होते. या पत्रात सुनेत्रा पवार यांच्या नावासमोर अध्यक्षा, तर शिवाजीराव गर्जे यांच्या नावासमोर खजिनदार असा उल्लेख होता. मात्र पक्षातील ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर पदांचा उल्लेख करण्यात आला नव्हता. तसेच हे पत्र शिवाजीराव गर्जे यांनीच तयार केल्याचे कळल्यानंतर सुनील तटकरे यांनी त्यांना झापल्याची चर्चा आहे. आमदार शिवाजीराव गर्जे हे पवार कुटुंबाचे विश्वासू मानले जातात. निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेले पत्र हे त्यांनीच तयार केल्याचे समजते. 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या कागदपत्रात फक्त राष्ट्रीय अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष यांच्या पदांचा उल्लेख करण्यावरून तटकरे आणि गर्जे यांच्यात वाद झाल्याचे कळते. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अंतर्गत कलह निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. पत्र रोहित पवारांच्या हाती कसे लागले? तसेच आणखी महत्त्वाची बाब अशी की निवडणूक आयोगाला पाठवलेले पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या हाती कसे लागले? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे. 10 मार्च 2026 रोजी निवडणूक आयोगाला देण्यात आलेले पत्र बाहेर कोणी दिले याची चौकशी केली जाणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. यापूर्वीच कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून झाडाझडती घेण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनील तटकरे तसेच प्रफुल्ल पटेल यांना पक्षातून दूर केले जात असल्याची चर्चा आहे. सुनील तटकरे हे अशोक खरातच्या प्रकरणामुळेही अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसेच प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी अजित पवारांच्या निधनानंतर पक्ष बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला आहे. त्यात आता निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात दोन्ही नेत्यांच्या पदांचा उल्लेख न केल्याने चर्चेला उधाण आले आहे. कोण आहेत शिवाजीराव गर्जे? आमदार शिवाजीराव गर्जे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डीचे आहेत. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी उपजिल्हाधिकारी म्हणून काही वर्षे प्रशासकीय सेवा केली. राजकारणात येताना त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर 2002 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. गेल्या 20-25 वर्षांपासून ते पक्षाची कार्यालयीन जबाबरी सांभाळत होते. त्यामुळे ते शरद पवारांचे विश्वासतले बनले. या काळात त्यांना आमदारकीने अनेकवेळा हुलकावणी दिली होती. मात्र दीड वर्षांपूर्वी अजित पवारांनी दिलेला शब्द पाळला आणि त्यांना आमदार केले.
पुण्यात गुरुवारी अर्धा तास तुफान पाऊस झाला. यामुळे शहरातील अनेक सखल भागांत कंबरेपर्यंत पाणी साचले. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत 'स्मार्ट सिटी पुणे आता वॉटर किंगडम' झाल्याचा टोला हाणला. पुण्यात 2 एप्रिल रोजी 130 वर्षांनंतरचा विक्रमी पाऊस झाला. यापूर्वी 1896 साली एका दिवसात 51.1 मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यानंतर काल गुरुवारी एकाच दिवसात 65 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या मुसळधार पावसाचा अनेकांना फटका बसला. शहरातील गंगाधाम चौकातील एक मोठी होर्डिंग पावसामुळे कोसळली. पण सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. पण यामुळे रस्ते वाहतूक मंदावली. दुसरीकडे, अन्य एका ठिकाणी झाड कोसळून 1 महिला दगावली. या घटनेत 2 जण बालंबाल बचावले. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. अर्ध्या तासाच्या पावसात पुणे अक्षरशः बुडाले विजय वडेट्टीवार या प्रकरणी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, पुणेकरांनी भाजपला अगदी भरभरून दिलं. 6 आमदार, 119 नगरसेवक, 1 खासदार, भाजपाचे एक केंद्रीय मंत्री, राज्यातील एक कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री या पुणे शहरात राहतात. असं असताना काल अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात हे शहर अक्षरशः बुडालं. स्मार्ट सिटी पुणे आता वॉटर किंगडमकडे वाटचाल करत आहे. इतरवेळी क्रेडिट घेण्यासाठी पुढे येणारे पुण्याचे स्वयंघोषित शिल्पकार यांनाच याचे श्रेय दिले पाहिजे. पुणेकरांना फुकटात वॉटर सफारी मिळाली.. अजून किती विकास पुणेकरांना हवा आहे? असा प्रश्न वडेट्टीवारांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. सरकार नेमके काय करते? दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, स्वतःला पुण्याचे शिल्पकार म्हणवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण पुण्यातील कालचे चित्र पाहिले की नाही? स्मार्ट सिटी होणार होती, मेट्रो सिटी असे स्वप्न दाखवण्यापेक्षा दररोजच्या सांडपाण्याचे आणि कचऱ्याचे प्रश्न जर सरकारला सोडवता येणार नसतील आणि दर पावसाळ्यामध्ये पुण्यातील रस्ते, नाले,गल्ल्या तुडुंब भरणार असतील त्यात दरवर्षी लोकांचे मालमत्तेचे नुकसान होणार असेल तर आपले सरकार नेमके काय करते? मागील दहा वर्षात पुणे महानगरपालिकेने आलेले कोट्यवधी रुपयांच्या विविध अनुदानाचे काय केले ? त्या पैशाची विल्हेवाट कुठे लावली की फक्त कंत्राटदारांना कामे देऊन कमिशन खाल्ले? असा प्रश्न पडतो, असे ते म्हणालेत. फडणवीसांचे बॅनर पाण्याखाली विजय वडेट्टीवार व विकास लवांडे या दोघांनीही देवेंद्र फडणवीस यांचे होर्डिंग असलेले एक बॅनर पोस्ट केले आहे. रस्त्याच्या अगदी शेजारी लावण्यात आलेले हे बॅनर पावसाच्या पाण्यात बुडाल्याचे दिसून येत आहे. या होर्डिंगवर फडणवीस यांचा उल्लेख पुण्याचे शिल्पकार व महाराष्ट्राचे नवे नेतृत्व म्हणून करण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या विधानाची सध्या चर्चा सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील पुढच्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील, असा दावा राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक भाष्य केले आहे. संजय राऊत भविष्यात ठाकरे गट फोडणार असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले, शिवसेना पक्षाचे जे तुकडे झाले आहेत, ते संजय राऊत यांच्यामुळे झाले आहेत. एकसंघ शिवसेनेचे तुकडे करण्यास संजय राऊत हेच कारणीभूत आहेत, संजय राऊत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय राऊत जळगावमध्ये लग्नाला येतात आणि राजकीय गप्पा मारतात. आम्ही शिवसेनेत किती निष्ठावंत आहोत हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, अशी टीका पाटील यांनी केली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना सोडण्याचा कोणताही विचार मी करू शकत नाही, असे स्पष्टीकरणही यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. पुढे ते म्हणाले, जेव्हा आम्ही असे कुठलेही काम करू तेव्हा थेट घरी बसू. संजय राऊत शिवसेनेचा ठाकरे गट फोडून एक नवा गट स्थापन करून उरलेली शिवसेना फोडण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे गटात राऊत हे मोठी उठाव करणार आहेत. ते नवीन गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत, असा खळबळजनक दावाही पाटलांनी केला आहे. काय म्हणाले होते संजय राऊत? संजय राऊत म्हणाले होते की, आमदार चंद्रकांत पाटील आणि पाचोरा पारोळाचे आमदार पुढची निवडणूक भाजपकडून लढतील. हे दोन्ही आमदार गिरीश महाजन यांच्या अतिशय निकटवर्तीय असल्याचे मानले जातात. त्यामुळे ही माझी खात्रीची माहिती आहे, असा दावा राऊत यांनी केला होता.
आंध्र प्रदेशात मध्यरात्री 11 ते 2 वाजेपर्यंत तब्बल 5 टक्के मतदान झाले आहे. असाच फ्रॉड महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही झाला आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांनी केला आहे. आंबेडकरांनी या प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती प्रभाकर यांचा दाखला दिला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीपासूनच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व निष्पक्षतेबाबत त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, काही ठिकाणी मतदान व मतमोजणीत अनियमितता झाल्याचाही त्यांचा दावा आहे. त्यांनी शुक्रवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीचा दाखला देत पुन्हा एकदा आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. निर्मला सीतारामन यांनी फोडले भाजपचे बिंग प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपच्या नेत्यांनीच आता त्यांचे बिंग फोडण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती डॉक्टर प्रभाकर हे चांगले अर्थतज्ज्ञ व विश्लेषक आहेत. त्यांनी 2024 च्या आंध्र प्रदेशाच्या निवडणुकीच्या पॅटर्नचे विश्लेषण केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, निवडणूक संपल्यानंतर 5 टक्के मतदान हे मध्यरात्री 11 ते 2 च्या दरम्यान टाकण्यात आले आहे. त्यांचे हे विधान अत्यंत गंभीर आहे. एवढा मोठा भ्रष्टाचार करून भाजपने आंध्र प्रदेशात सरकार स्थापन केले. या प्रकरणी चंद्राबाबू नायडू यांना लाभ झाला. त्यामुळेच एपस्टीन फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्यानंतरही आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू शांत बसले आहेत. ते कसलीच भूमिका घ्यायला तयार नाहीत. हा फ्रॉड महाराष्ट्रात झालेल्या फ्रॉड सारखाच आहे. महाराष्ट्रातही मतदानाची वेळ संपल्यानंतर 76 लाख मतदान करण्यात आले. याविरोधात चेतन अहिरे यांनी हायकोर्टात रिट याचिका दाखल केली होती. त्यावर मुंबई हायकोर्टातील दोन न्यायाधीशांनी चेतन अहिरे हे महाराष्ट्राची निवडणूक कशी चॅलेंज करू शकतात? असा सवाल केला होता. चेतन अहिरे हे भारतीय नागरिक, मतदार आहेत. तो जर कोर्टात चॅलेंज करू शकत नसेल तर कोण करू शकते? याचा खुलासा कोर्टाने करावा, अशी मागणीही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केली. मध्यमवर्गीयांनी रस्त्यावर उतरून रोष व्यक्त करावा प्रकाश आंबेडकरांनी यावेळी मध्यमवर्गीयांना रस्त्यावर उतरण्याचेही आवाहन केले. भारतीय मध्यमवर्गीय स्वतःच्या कुटुंबातच फसलेला आहे. जर देश सुरक्षित, तर कुटुंब सुरक्षित आहे. मध्यमवर्गीय जसे कुटुंबाला सुरक्षित करतो, तसे त्याने देशालाही सुरक्षित केले पाहिजे. अमेरिकेत राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधात तिथल्या नागरिकांनी 'नो किंग', 'अमेरिकन्स आर डेमॉक्राट्स', अशारितीने त्यांनी घोषणा दिली आहे, तशाच पद्धतीने भारतीय मध्यमवर्गीयांनी सुद्धा स्वतःचे लढण्याचे चारित्र्य दाखवावे. आम्ही सुद्धा भारतीय आहोत. भारतीय म्हणून आमचे कुटुंब सुरक्षित आहे. मध्यमवर्गीय रस्त्यावर उतरेल आणि आपला रोष व्यक्त करेल असे मी मानतो, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकिय योजनांवर भर देऊन त्यामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचे प्रयत्न केले जाणार असून आगामी काळात रोजगार व नवीन उद्योग उभारणीकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी समाज माध्यमांना दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी समाज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हिंगोली जिल्हयाची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती मांडली. प्रशासन, विकास आणि लोकसहभाग यांचा समतोल साधत जिल्ह्यात राबविण्यात असलेल्या योजनांचीही त्यांनी माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने शासकिय योजनांमधून नागरीकांचा सक्रीय सहभाग वाढवून जास्तीत जास्त पात्र नागरीकांपर्यंत शासकिय योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंगोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाची सकारात्मक भुमीका असल्याचेल सांगतक त्यांनी जिल्ह्यात महसूल अभियान, आरोग्यविषयक मोहिमा, सिंचन प्रकल्प तसेच पायाभूत सुविधा विकासाच्या कामांद्वारे नागरिकाभिमुख सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. शेतकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय पर्यटन विकास, शेती क्षेत्रातील नव्या संधी, युवकांसाठी कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मिती तसेच महिला स्वयंरोजगारासाठी स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर याबाबत प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंगोली जिल्हयात महिलांनी उत्पादित केलेल्या हळदीला अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी मिळावी यासाठी हिंगोली गोल्ड हळद चे ब्रँडींग करण्यात आले. लोकप्रतिनिधी तसेच उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन त्या त्या जिल्हयातून हिंगोली गोल्ड हळदीची मागणी नोंदविण्याची विनंती त्यांनी केली. या शिवाय बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू तसेच खाद्यपदार्थांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्टया सक्षम केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेे.
मुलीच्या छेडछाडीला विरोध, SRPF कर्मचाऱ्याची हत्या:नागपुरात गुंडांनी चाकूने वार केले, दोन भाऊ अटकेत
नागपुरात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने एका एसआरपीएफ कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. पंकज ठाकूर असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून, या प्रकरणी आकाश मंडल आणि हर्षित मंडल या दोन भावांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश मंडल हा पंकज ठाकूर यांच्या १५ वर्षीय मुलीचा पाठलाग करत होता. मुलीने ही बाब वडिलांना सांगितल्यानंतर पंकज ठाकूर यांनी आकाशला मुलीपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. मात्र, आकाशने आपले वर्तन सुरूच ठेवले. गुरुवारी रात्री हनुमान जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसादाच्या कार्यक्रमात आरोपी आणि मुलगी पुन्हा समोरासमोर आले. आकाश मुलीशी बोलताना पाहून पंकज ठाकूर संतापले आणि त्यांच्यात वाद झाला. ठाकूर यांनी मुलीला घरी पाठवले, पण यानंतर घटनेने हिंसक वळण घेतले. कार्यक्रमानंतर घरी जात असताना शाळेजवळ आरोपींनी पंकज ठाकूर यांना पुन्हा गाठले. सुरुवातीला शाब्दिक वाद आणि नंतर हाणामारी झाली. ठाकूर आणि त्यांचे मेहुणे आरोपींवर भारी पडू लागले, तेव्हा हर्षित मंडलने चाकू काढून पंकज ठाकूर यांच्यावर सपासप वार केले. ते खाली कोसळताच आरोपींनी त्यांच्यावर पुन्हा हल्ला करत गंभीर जखमी केले. आरोपी मृत झाल्याचे समजून घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी पंकज ठाकूर यांना मृत घोषित केले. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करत मंडल बंधूंना अटक केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दहशतवादविरोधी कायद्याखालील (टाडा) गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या दोन कैद्यांना मुदतपूर्व सुटका देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळताना स्पष्ट केले की, अशा प्रकरणांमध्ये राज्य सरकारला शिक्षेत सूट देण्याचे अधिकार मर्यादित आहेत. न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील चैतू इरपा वड्डा (६३) आणि डोगे कोरके वड्डे (७०) हे दोघे नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांनी १५ मार्च २०१० च्या शासन आदेशाचा आधार घेत मुदतपूर्व सुटकेची मागणी केली होती. या आदेशानुसार, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४३२ आणि ४३३ अंतर्गत राज्य सरकारला शिक्षेत सूट किंवा रूपांतरण करण्याचे अधिकार आहेत. मात्र, राज्य सरकारने त्यांची ही मागणी फेटाळली होती. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या २३ जुलै २०१५ च्या आदेशाचा आधार घेतला होता. या आदेशानुसार, गंभीर आणि केंद्रीय कायद्यांखालील गुन्ह्यांमध्ये राज्य सरकारला शिक्षा कमी करण्याचा अधिकार वापरता येत नाही. याचिकाकर्ते टाडा कायदा, १९८७ च्या कलम ३ व ४ अंतर्गत दोषी ठरलेले असल्याने हा निर्बंध त्यांच्यावर लागू होतो, असे नमूद करण्यात आले. उच्च न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले की, अशा प्रकरणांत मुदतपूर्व सुटका देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे विशेष सूट देता येत नाही. राज्य सरकारचा निर्णय पूर्णपणे कायदेशीर आणि योग्य असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. याचिकेत कोणताही ठोस कायदेशीर आधार नसल्याचे नमूद करत न्यायालयाने ती थेट फेटाळली.
महाराष्ट्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा (CET) व्यवस्थापनात गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी अधिसभा सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी केला आहे. पुणे येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कुलकर्णी यांनी शासनाकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परीक्षा व्यवस्थापनाच्या निविदा प्रक्रियेत एका विशिष्ट उद्योग समूहाला अनुचित लाभ दिला जात आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत 2021 ते 2025 या कालावधीत विविध कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रामुख्याने एकाच समूहातील सहा संलग्न कंपन्यांना देण्यात आल्या. निविदा प्रक्रियेसाठी ठरवण्यात आलेले निकष संबंधित अधिकाऱ्यांशी संगनमत करून निश्चित करण्यात आले, ज्यामुळे इतर स्पर्धकांना संधी मिळाली नाही, असा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे. यापूर्वी 20 जून 2023 आणि 27 डिसेंबर 2023 रोजी यासंदर्भात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावर ठोस कारवाई होण्याऐवजी तक्रारदाराचीच चौकशी करण्यात आल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले. एका कंपनीविरोधात तक्रार असूनही त्याच समूहातील इतर कंपन्यांना ऑक्टोबर 2024 मध्ये कार्यादेश देण्यात आले, असेही निवेदनात म्हटले आहे. या प्रक्रियेत सुमारे 699 कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून, त्याचा आर्थिक भार विद्यार्थ्यांवर पडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परीक्षा केंद्र उभारणी, संगणकीय मूल्यांकन, मॉक टेस्ट आणि मनुष्यबळ प्रशिक्षण अशा विविध सेवा याच कंपन्यांकडून पुरवल्या जात आहेत. परीक्षा वेळापत्रक उशिरा जाहीर केल्यामुळे प्रवेश प्रक्रिया विस्कळीत होत असून काही खाजगी संस्थांना त्याचा फायदा होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कंपन्यांचे कार्यादेश तात्काळ रद्द करणे, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करणे आणि भविष्यात परीक्षा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा उभी करण्याची मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून विनय गौडा जी. एस. यांनी आज मावळते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी कार्यालयात हा पदभार हस्तांतरण सोहळा पार पडला. मावळते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आपल्या कार्यकाळात प्रशासनाला गती दिली. लोकसभा निवडणुकीचे यशस्वी नियोजन, 'जिल्हाधिकारी आपल्या दारी' सारखे दससूत्री उपक्रम राबवून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला. याशिवाय, पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन आणि जिल्ह्यातील महसुली कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे जिल्हा प्रशासनाची प्रतिमा सुधारण्यास मदत झाली. नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा हे २०१५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. सांगलीतील पूर नियंत्रण, आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण आणि सातारा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना राबवलेल्या विकासकामांचा त्यांना मोठा अनुभव आहे. पदभार स्वीकारल्यानंतर विनय गौडा यांनी आपली प्राथमिकता स्पष्ट केली. ते म्हणाले, जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावणे आणि शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे ही आपली प्राथमिकता असेल. गौडा यांनी पुढे सांगितले की, छत्रपती संभाजीनगर हा ऐतिहासिक आणि धार्मिक जिल्हा आहे, तसेच तो दुष्काळी भाग असल्याने काही आव्हाने असतील. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचे काम करणार असून, सुरू असलेल्या योजना चालू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आरोग्य आणि शिक्षण विभागावर विशेष भर देणार असल्याचे नमूद केले. तसेच, नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्यात १०० लाख टन साखरेचे उत्पादन
पुणे : यंदाच्या ऊस गाळप हंगामाच्या सुरुवातीला देशात ३५० लाख टन, तर राज्यात ११० लाख टन साखरेचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता हे एकूण साखरेचे उत्पादन अनुक्रमे ३१५ आणि १०० लाख टन होईल, असे चित्र आहे. राज्यात आतापर्यंत ९८.८७ लाख टन, तर देशात २७१ लाख टन उत्पादन झाले आहे. राज्यात पुढील १० दिवसांत […] The post राज्यात १०० लाख टन साखरेचे उत्पादन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील अनेक भांगात वीजपुरवठा खंडित
पुणे/मुंबई : राज्यातील शहर व परिसरात गुरुवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळामुळे अनेक अतिउच्चदाब व उच्चदाब वाहिन्यांमध्ये बिघाड झाला. परिणामी, राज्यातील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी युद्धपातळीवर परिश्रम घेत आहेत. दरम्यान काही भागांचा बाधित झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरु करण्यात आला. साधारणत: तासभर झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी […] The post राज्यातील अनेक भांगात वीजपुरवठा खंडित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जळगाव : राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघात होणा-या पोटनिवडणुका लढण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतर उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस हा पक्ष बिहार, पश्चिम बंगाल, नागालँड असेल अशा सगळ्या ठिकाणी निवडणूक लढण्यासाठी पुढे जातो आणि निकाल लागल्यानंतर कळतं की आपण […] The post महाविकास आघाडीमध्ये फूट? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भोंदू अशोक खरात हे प्रकरण केवळ बलात्कार किंवा फसवणुकीपुरते मर्यादित नाही. या प्रकरणात काही लोकांनी जीव दिल्याचाही प्रकार समोर येत आहे, असा दावा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या माहितीमुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अशोक खरातला तब्बल 17 वेळा फोन केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ माजली आहे. पत्रकारांनी याविषयी मंत्री संजय शिरसाट यांना छेडले असता त्यांनी थोडी कळ काढा या प्रकरणी सर्व पर्दाफाश होईल असे स्पष्ट केले. ते म्हणाले, भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास पोलिस यंत्रणा करत आहे. एका महिला अधिकाऱ्याने हे सर्व प्रकरण उजेडात आणले आहे. त्याची चौकशी अत्यंत योग्य पद्धतीने सुरू आहे. हा भोंदू बाबा एका प्रकरणात अडकलेला नाही, तर अनेक प्रकरणांत अडकलेला नाही. बलात्कार व मनी लाँड्रिंगच नाही, तर आणखी काही प्रकरणे पुढे येत आहेत. काही लोकांनी जीव देण्याचेही प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे मी सर्वांना विनंती करत आहे की, त्याला राजकारणाकडे वळण देऊ नका. हे सर्व पाहता आपण खरातला वाचवतो की काय? असे वाटते. सर्वांवर 100 टक्के गुन्हा दाखल होईल संजय शिरसाट म्हणाले, प्रस्तुत प्रकरणात अशोक खरात राहिला बाजूला आणि इतरांवरच आरोप प्रत्यारोप होत आहेत. जे काही चौकशीत समोर येईल, मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, कोणताही नेता असू द्या. सरकार त्याच्यावर कारवाई करेल. त्याची कुणीही चिंता करू नये. सध्या रोज एकच विषय चालू आहे खरात व त्याच्याशी संबंधित असणाऱ्या पुढाऱ्यांचा. पुढारी असतील किंवा अधिकारी ज्यांचा - ज्यांचा या प्रकरणात समावेश असेल, त्या सर्वांवर कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणात हात असलेल्या लोकांवर 100 टक्के गुन्हा दाखल केला जाईल हे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपण प्रतिक्षा केली पाहिजे. कशाचे फोन होते, काय होते हे पाहावे लागेल. माझेही फोटो आहेत. याचा अर्थ मी गुन्हेगार असेल तर मी सुद्धा जेलमध्ये गेले पाहिजे. मी कुणालाही स्पेअर करा असे म्हणत नाही. पण खरातने ज्या पद्धतीचे गुन्हे गेलेत, ते महाराष्ट्राच्या इतिसात असे करणारा तो पहिला गुन्हेगार असावा. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई व्हावी ही सर्वसामान्य लोकांसह आमचीही इच्छा आहे. थोडी कळ काढा सर्व पर्दाफाश येईल, असे शिरसाट म्हणाले. इंदू मिलमधील बाबासाहेबांचा पुतळा डिसेंबरपर्यंत बसवण्याचा प्रयत्न संजय शिरसाट यांनी यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्याचाही संकल्प केला. ते म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबडेकर जयंती सर्व लोकांनी मिळून एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने कशी साजरी करता येईल यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सूचना केल्या आहेत. ही आंबेडकर जयंती अधिक जल्लोषात व्हावी असा सरकारचा मानस आहे. त्या पद्धतीनेच ही जयंती साजरी होईल. मुख्यमंत्र्यांशी इंदू मिलच्या पुतळ्यासंबंधीही चर्चा झाली. त्यांनी मला पुन्हा एकदा तिकडे जाऊन पाहणी करण्याची सूचना केली. मी लवकरच नोएडाला जाऊन पाहणी करेन. सध्याच्या युद्धामुळे काही माल येण्यास विलंब होत आहे. त्याचे दरही वाढलेत. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शासनानेही त्यालाही मान्यता दिली आहे. पुतळ्याचे थांबणार नाही. डिसेंबरपर्यंत हा पुतळा येथे बसवण्याचा आमचा मानस आहे. त्या पद्धतीने आमची तयारी सुरू आहे. पुतळ्याला लागणाऱ्या मालात किती दरवाढ झाली? याची माहिती आमच्याकडे नाही. पण हे सगळ्या जगात दरवाढ झाली आहे. अशावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम कुठेही थांबता कामा नये हा आमचा प्रयत्न आहे, असे शिरसाट म्हणाले.
संजूबाबा राऊत हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी सांगितले की 3 वर्षे निवडणुकीसाठी आहेत, त्यानंतर लोकसभा निवडणूक आहे. 3 वर्षांनंतरचे उमेदवार आतापासून ठरवले पाहिजे, संघटन बांधणी आतापासून केली पाहिजे. निवडणूक कोण लढणार याबद्दल निर्णय घेतला पाहिजे असा सल्ला संजूबाबा राऊत यांनी जळगावमध्ये बसून उद्धव ठाकरेंना दिला आहे. कारण उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाही, आदित्य ठाकरे घराबाहेर पडत नाही, असा टोला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. उबाठा गटातील दुफळी संजय राऊतांनी जो उबाठाला घरचा आहेर दिला त्यावरुन दिसून येते. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत तुमच्या सरकारने शेतकऱ्यांना काहीही मदत केली नाही. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करत नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. हे सरकार शेतकऱ्यांचा विचार करणारे आहे. म्हणून कोणतीही निवडणूक नसताना देवाभाऊंच्या सरकारने शेतकरी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. मविआने केवळ आश्वासन दिले आणि घरात बसून कारभार केला. 'संकटमोचक' रस्त्यावर, तर तुमचे नेते 'घरकोंबडे नवनाथ बन म्हणाले की, संकटमोचक रस्त्यावर उतरतात, शेतकऱ्यांमध्ये जातात त्यांची कामे करतात. तुमचे नेते कुठे आहेत? तुम्ही घरकोंबडा म्हणून काम करतात. ते जळगावमध्ये जात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडे जाणार आहेत का? आदित्य ठाकरे मराठवाड्यात नुकसानीची पाहणी करणार का? मागच्या वेळी तुम्ही पाहणी करायला गेले आणि ड्रायफ्रुटस खात बसले. संकटमोचकावर बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही ते जनतेमधील नेते आहेत. राऊत एक काय ते ठरवा नवनाथ बन म्हणाले की, जळगावमध्ये उबाठाची गुंडगिरी सुरू आहे. संदीप कर्णिक नावाचे अधिकारी चांगले काम करतात म्हणतात नेमके एकच काही तरी सांगा. कुणाच्या दरबारात कोण जात होते हे राऊतांनी सांगू नये. खरातचे कारनामे समोर येताच त्याला अटक करण्याची हिंमत देवाभाऊंनी केली. भाजप सरकार कोणतेही चुकीचे कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठिशी घालत नाही. उद्धव ठाकरे सरकारने वाझे सारख्या खंडणी वसूल करणाऱ्यालादेखील समर्थन केले आहे. मविआत समन्वय नाही नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेस परस्पर उमेदवार देणार असे जाहीर करते. त्यांच्यामध्ये समन्वय नाही. हे आपल्याला प्रत्येक निवडणुकीत दिसून आले. संजय राऊत हे शरद पवारांची प्रवक्तेगिरी करत राहुरीवर शरद पवारांचा हक्क आहे सांगत आहेत. त्यांचे असे झाले आहे की मीठ उबाठाचे खायचे अन् काम शरद पवारांचे करायचे.
कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक येथील वाळूघाटावरील गौण खनिज उत्खनन प्रकरणात कंत्राटदारास तब्बल ८५ लाख रुपये दंडाची नोटीस उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी दिली आहे. या प्रकरणी ४८ तासात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी बुद्रूक शिवारातील वाळूघाटाचा लिलाव झाला होता. सदर लिलावातून वाळू घाट सिध्दांत बिल्डींग मटेरीयलचेे सिध्दांत नरवाडे कुपटी यांनी घेतला आहे. या वाळू घाटाच्या लिलावामध्येच सर्व अटी व शर्ती नमुद करण्यात आल्या होत्या. त्यानुसार वाळू घाटातून नियमानुसार ८९० ब्रास वाळू उपसा करणे अपेक्षीत होते. त्यानुसार या ठिकाणी वाळू उपसा करून वाहतूक केली जात होती. मात्र वाळू घाटावर चार बोटीद्वारे वाळू उपसा करून चार जेसीबीद्वारे वाळू व मुरुम भरून ११ हायवा द्वारे वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना यांच्या पथकाने ता. २७ मार्च रोजी रात्री छापा टाकला असता त्या ठिकाणी काही हायवामध्ये मुरुम तर काही हायवामध्ये वाळू आढळून आली. तसेच घाटावरील जेसीबीद्वारे रस्ता तयार करण्याचे काम केले जात असल्याचे पथकाला दिसून आले. त्यावरून सहाय्यक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना यांच्या पथकाने चार बोटी जाळून नष्ट केल्या तर ११ हायवा व चार जेसीबी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात जमा केल्या आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केला. त्यामध्ये ८९० ब्रास वाळू उपसा करणे अपेक्षीत असतांना प्रत्यक्षात १००० ब्रास वाळू उपसा केल्याचे अहवालात नमुद केले या शिवाय लिलावातील अटी व शर्तीचा भंग केल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावरून उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी सिध्दांत बिल्डींग मटेरीयलचे सिध्दांत नरवाडे यांना नोटीस दिली असून यामध्ये एकूण दंडात्मक रक्कम ८५.७० लाख रुपये का आकारले जाऊ नये तसेच पुढील काळात अनाधिकृतरित्या गौणखणीज उत्खनन व वाहतूक करणार नाही याचे बंध प्रमाणपत्र का घेण्यात येेऊ नये याचा खुलासा ४८ तासात सादर करावा अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपविभागीय अधिकारी भुते यांनी दिला आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तांबाळा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा काही अज्ञात हल्लेखोरांनी स्पोर्ट्स कार्ड खेळणाऱ्या एका क्लबमध्ये अचानक प्रवेश करत दहशत माजवली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर पूर्ण तयारीनिशी आले होते. त्यांच्या हातात बंदुका, तलवारी यांसारखी घातक शस्त्रे होती. क्लबमध्ये घुसल्यानंतर त्यांनी उपस्थित लोकांवर हल्ला चढवला. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हवेत गोळीबारही केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे क्लबमधील लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि अनेकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली. या हल्ल्यात चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून, सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. एका आरोपीला अटक दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांसाठी ती महत्त्वाचा पुरावा ठरत आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे, तर इतर हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे तांबाळा परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
१८ वर्षांच्या इतिहासात २३ हॅटट्रिक
मुंबई : आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात २३ हॅटट्रिक पाहायला मिळाल्या असून पहिल्या हॅटट्रिकसह सर्वाधिक तीन वेळा आणि एका हंगामात दोन हॅटट्रिकचा पराक्रम हा भारतीय गोलंदांनी करून दाखवला आहे. लक्ष्मीपती बालाजी हा आयपीएलच्या इतिहासात पहिली हॅटट्रिक नोंदवणारा गोलंदाज आहे. पहिल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाकडून खेळताना पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने इरफान पठाण, पीयूष चावला आणि विक्रम […] The post १८ वर्षांच्या इतिहासात २३ हॅटट्रिक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पणजोबाच्या पावलावर रणबीरचे पाऊल
मुंबई : नितेश तिवारी यांच्या आगामी रामायण चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारत असल्याने सध्या मोठी चर्चा सुरू आहे. आज हनुमान जयंंतीच्या मुहुर्तावर या चित्रपटाचा पहिला टीझर समोर आला आहे. या निमित्ताने कपूर कुटुंबातील एक अत्यंत जुना आणि ऐतिहासिक योगायोग समोर आला आहे. रणबीर कपूरचे पणजोबा आणि भारतीय सिनेसृष्टीचे दिग्गज अभिनेते पृथ्वीराज कपूर यांनीही […] The post पणजोबाच्या पावलावर रणबीरचे पाऊल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांवर संस्कार व्हावेत, या उद्देशाने आता समर्थ रामदास स्वामी रचित 'मनाचे श्लोक' सक्तीचे करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी हा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव समोर येताच एमआयएम पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. एमआयएमचे गटनेते विजय उबाळे यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. उबाळे यांनी आपली भूमिका मांडताना म्हटले की, शाळा हे शिक्षणाचे मंदिर आहे, तिथे कोणत्याही विशिष्ट धर्माच्या शिकवणीची सक्ती करणे चुकीचे आहे. शाळांमध्ये धर्माधारित शिक्षण देण्याऐवजी विद्यार्थ्यांना संविधानाचे मूल्य आणि त्यातील कर्तव्यांचे शिक्षण द्यायला हवे. एमआयएमने विरोध केल्यानंतर त्यावर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपण पाहिले तर त्यांच्या मनपावर मनाच्या श्लोकांचा परिणाम होता असे विधान केले आहे. यामुळे त्यांच्यावर टीका होण्यास सुरूवात होताच त्यांनी माफी मागत यापुढे अशी जोडणी करण्यात येणार नाही. माझ्या बोलण्याचा उद्देश वेगळा होता पण तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते असे त्यांनी म्हटले आहे. किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या? एमआयएमने विरोध केल्यानंतर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मनाचे श्लोकाला कुणीतरी विरोध केला असे मला समजले. त्याला विरोध करण्याची काहीच गरज नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लहानपण जर आपण पाहिले त्यांच्या मनावर मनाच्या श्लोकांचा परिणाम दिसतो. मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामी यांनी लिहले आहेत. मनपाच्या अनेक शाळा आहेत, त्यांचे लाखात विद्यार्थी आहेत जर असे असतील तर त्यांच्या मनावरती खऱ्या अर्थाने सर्व जाती-धर्म पंथाच्या लहान मुलांवर संस्कार व्हावे म्हणून मनाचे श्लोक फक्त हिंदूचे आहेत असे म्हणू नये. अशी जोडणी पुन्हा करणार नाही- पेडणेकर यानंतर विरोधकांनी टीका करण्यास सुरूवात करताच किशोरी पेडणेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, मी अशी जोडणी पुन्हा करणार नाही. त्या माध्यमातून कुणाचे मन दुखावले गेले असेल तर मी माफी मागते. पण माझा उद्देश होता. कोणत्याही जाती पंथाचा नागरिक चांगला घडावा आणि आपल्या देशाच्या संविधानाचे कर्तव्य आणि अधिकार त्याला कळेल असे म्हणायचे होते. पण यापुढे अशी जोडणी होणार नाही.
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भोंदू अशोक खरातची भेट घेतल्याचा पुनरुच्चार केला आहे. नीलम गोऱ्हे यांनी अनेकदा भोंदू अशोक खरातची भेट घेतली. या भेटीवेळी उपस्थित असलेल्या लोकांनीच मला माहिती दिली होती. याचे पुरावे योग्य वेळी व योग्य ठिकाणी सादर केले जातील, असे त्या म्हणाल्यात. दरम्यान, रुपाली चाकणकरांनी स्वतःहून एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे, असेही त्या म्हणाल्यात. तृप्ती देसाई यांनी काही दिवसांपूर्वी नीलम गोऱ्हे यांनी अशोक खरातची भेट घेतल्याचा आरोप केला होता. पण गोऱ्हे यांनी एका पत्रकार परिषदेद्वारे हे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर आज तृप्ती देसाई यांनी आपण आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, नीलम गोऱ्हेंची माहिती पूर्णतः खरी आहे. गोऱ्हे यांनी अशोक खरातच्या ऑफिसमध्ये त्याची भेट घेतली होती. या भेटीवेळी उपस्थित असलेल्या लोकांनी मला ही माहिती दिली आहे. त्यामुळे ही गोष्ट एखाद्या त्रयस्त व्यक्तीने दिलेली नाही. ज्या काही गोष्टी आहेत व साक्षीदार आहेत ते योग्य वेळी समोर येऊन बोलतील. शिवसेनेच्या लोकांनीच दिली नीलम गोऱ्हेंची माहिती तृप्ती देसाईंनी यावेळी सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच आपल्याला ही माहिती दिल्याचेही आवर्जुन स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, मला माहिती देणारी एक व्यक्ती नाशिक, तर दुसरी पुण्याची आहे. त्यांनी तूर्त मला हे प्रकरण एसआयटी व त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत जात नाही, तोपर्यंत आमचे नाव घेऊ नका असे सांगितले आहे. कारण, त्यांच्या कुटुंबीयांवर दबाव आणला जाऊ शकतो. त्यांचे स्टेटमेंट बदलण्यासाठी त्रास दिला जाऊ शकतो. पण जेव्हा केव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते लोक स्वतः समोर येतील किंवा मी त्याचे पुरावे समोर आणेल. हे लोक शिवसेनेत फार मोठे पदाधिकारी आहेत किंवा नाही हे मी आत्ता सांगणार नाही. पण त्यांची विश्वासार्हता चांगली आहे. ते योग्यवेळी मीडिया, एसआयटी व एकनाथ शिंदेंपुढे नीलम खरात व अशोक खरातच्या भेटीची माहिती देतील. शिंदे सेनेच्या लोकांकडून या प्रकरणात माझा वापर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांच्याकडे अनेक नेते व प्रवक्ते आहेत. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाच्या लोकांनी मला पुरावे दिल्याचा आरोप केला. पण ते मोठ-मोठे लोक आमच्याकडे कशाला येतील? त्यांनी त्यांच्या त्यांच्या विरोधी पक्षांना व प्रवक्त्यांना सांगितले असतील. पण यातील माहिती पूर्णपणे खरी आहे, त्याचे पुरावे योग्यवेळी योग्य ठिकाणी सादर केले जातील, असे त्या म्हणाल्या. अशोक खरातने काळे पैसे पांढरे केले तृप्ती देसाई यांनी यावेळी अशोक खरात नॉमिनी असणाऱ्या 100 हून अधिक बँक खात्यांवरही भाष्य केले. त्या म्हणाल्या, सध्या अशोक खरातच्या बाबतीत दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. आता नागरी पतसंस्थेत 100 हून अधिक बोगस खाते उघडण्यात आली. त्यात अशोक खरात स्वतः नॉमिनी आहे. यावरून काही जणांनी त्याचा काळा पैसा पांढरा करण्याचे काम केल्याचे स्पष्ट होते. आता हे प्रकरण पुढे आल्यानंतर रुपाली चाकणकरांच्या भगिणी असतील, त्यांचे नातेवाईक किंवा इतर कुणी असतील. त्यांची चौकशी एसआयटी करेल. जे काही सत्य असेल ते समोर येईल. पेनड्राईव्ह कुठे अडकले? त्या म्हणाल्या, 2025 मध्ये श्रीरामपूरच्या एका वृत्तपत्राने बातमी दिली. त्यानंतर महिला आयोगाने त्यावर दबाव टाकला. त्या वृत्तपत्राच्या संपादकाने फोन करून मला या प्रकरणाची माहिती दिली होती. त्यांनी मला या प्रकरणातील पेनड्राईव्ह आल्यानंतर ते देण्याचे सांगितले होते. परंतु या प्रकरणी बातमी आल्यानंतर खरात अलर्ट झाला. यामुळे जे लोक पेनड्राईव्ह घेऊन येणार होते, त्या संपादकाला देणार होते ते आलेच नाहीत. यामुळे ते संपादकही माझ्याकडे आले नाही. त्यानंतर आम्ही या प्रकरणाचा फॉलोअप घेतला असता आम्हाला असा निरोप आला की, नोव्हेंबर - डिसेंबरच्या दरम्यान पेनड्राईव्ह मिळतील. पण त्याचवेळी पोलिस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे पेनड्राईव्ह देणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला व ते पेनड्राईव्ह गायब करण्यात आले. चाकणकरांनी स्वतः चौकशीला सामोरे जावे तृप्ती देसाई यांनी यावेळी रुपाली चाकणकरांना स्वतःहून एसआयटी चौकशीला सामोरे जाण्याचेही आवाहन केले. रुपाली चाकणकर यांनी आपल्याला कोणताही समन्स मिळाला नसल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी त्यांच्या विरोधकांनी पेरलेल्या बातम्या दुर्दैवी आहेत. पण त्यांना निश्चितच समन्स मिळेल. त्यांची चौकशी होईल. त्यांनी स्वतः तातडीने या प्रकरणाच्या चौकशीला सामोरे जावे अशी माझी मागणी आहे, असे त्या म्हणाल्या.
नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात आता नवीन वाद निर्माण झाला आहे. लेखिका अरुणा सबाने यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महिलांनाही दोषी धरून कारवाई करण्याची मागणी केली आहे. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या या प्रकरणात अशोक खरात नावाचा व्यक्ती स्वतःला ज्योतिषी म्हणवत महिलांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचा आरोप आहे. गोड बोलून, कधी धमकी देऊन तो महिलांना आपल्या कार्यालयात बोलावत असे. तेथे त्यांना पेढा आणि कडवट चवीचे पेय देऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. एवढंच नव्हे तर या सर्व घटनांचे चित्रीकरणही केल्याचे तपासात समोर आले आहे. एका महिलेच्या तक्रारीनंतर 17 मार्च रोजी पोलिसांनी खरातला अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी नवा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून, ज्या महिला स्वेच्छेने खरातकडे गेल्या त्यांना ‘पीडित’ न म्हणता दोषी मानून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी पत्रात नमूद केलं आहे की, काही व्हिडिओ पाहिल्यानंतर महिलांना जबरदस्ती किंवा गुंगीचे औषध दिल्याचे स्पष्ट दिसत नाही, तर त्या स्वतःहून सहभागी झाल्यासारख्या वाटतात. त्यामुळे अशा महिलांवरही कायदेशीर कारवाई व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सबाने यांनी आणखी एक मागणी करत माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही कारवाई करण्याची गरज व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, सर्व महिला सुशिक्षित असूनही अशा भोंदू व्यक्तीच्या आहारी कशा जातात, हा मोठा प्रश्न आहे. ज्या महिलांना कुटुंबीयांनी जबरदस्तीने पाठवले असेल त्यांना पीडित मानता येईल, मात्र स्वेच्छेने गेलेल्या महिलांना सूट देऊ नये, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या पत्रामुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून संबंधित महिलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इतर संशयितांची चौकशी सुरू या पार्श्वभूमीवर तपास यंत्रणाही अधिक सक्रिय झाल्या आहेत. अशोक खरातचा मुलगा सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. सुरुवातीला तो काही बोलत नव्हता, मात्र नंतर त्याने घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम येत असल्याचे सांगितले. या पैशांचे स्रोत आणि व्यवहारांची माहिती वडिलांकडेच होती, असे त्याने कबूल केले आहे. तसेच, या प्रकरणाशी संबंधित डॉक्टर, आर्थिक व्यवहारातील लोक आणि इतर संशयितांची चौकशी सुरू असून पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, इतिहासकार, लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते प्रा. डॉ. राम पुनियानी यांना ‘भाई वैद्य फाउंडेशन’तर्फे ‘लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. थोर समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या आठव्या स्मृतिदिनी हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजित वैद्य यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना प्रा. डॉ. राम पुनियानी यांनी सामाजिक आंदोलनाचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ लोकशाही यंत्रणेतच सामाजिक आंदोलन उभे राहू शकते आणि त्यातूनच समाज बदलता येतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. समाजात परिवर्तन घडवण्यासाठी आणि शोषितांच्या अधिकारांसाठी लढा उभारणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या मुख्य सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर स्मिता पुनियानी, भाई वैद्य फाउंडेशनच्या सचिव प्रा. डॉ. गीतांजली वैद्य, आरोग्य सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस लक्ष्मीकांत मुंदडा, आरोग्य सेनेचे केंद्रीय समिती सदस्य संतोष म्हस्के आणि आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य शाखा प्रमुख अतुल रुणवाल उपस्थित होते. प्रा. डॉ. राम पुनियानी यांनी यावेळी बाबरी मशीद विध्वंसावरही भाष्य केले. ६ डिसेंबर रोजी पाडण्यात आलेली बाबरी मशीद ही केवळ एका धार्मिक स्थळाच्या विध्वंसापुरती मर्यादित घटना नव्हती, तर महात्मा गांधींच्या हत्येनंतर भारतीय लोकशाहीवरील तो दुसरा सर्वात मोठा हल्ला होता, असे त्यांनी नमूद केले. बाबरी मशीद नेस्तनाबूत करणे हे केवळ हिंदू-मुस्लिम राजकारणापुरते मर्यादित नसून, दलित, शेतकरी, आदिवासी, शोषित आणि समाजातील मागासलेल्या घटकांचे अधिकार दडपण्याचे षडयंत्र होते, असेही ते म्हणाले. धर्माच्या भावना भडकावून बाबरी मशीद आंदोलन उभे केले गेले. धर्मावर आधारित राजकारण राष्ट्रांची कशी वाताहात करते, हे शेजारील राष्ट्रांकडे पाहून लक्षात येते. अशा राजकारणामुळे लोकशाही संपुष्टात येते आणि इतिहासाचा अभ्यास न करता मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवला जात आहे, असे पुनियानी यांनी सांगितले. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. अभिजित वैद्य म्हणाले की, डॉ. राम पुनियानी यांना आज प्रदान केलेला हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर तो विचारांचा, सत्यशोधनाचा आणि निर्भीड सामाजिक बांधिलकीचा सन्मान आहे. इतिहास, धर्मनिरपेक्षता आणि मानवाधिकार या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आजच्या भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते, असेही त्यांनी नमूद केले.
आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी लावला छडा:मिस्त्री काम करणारा आरोपीला जुन्नरमधून अटक
पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा झाला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. केळगाव-हनुमानवाडी येथील ठाकरवाडी येथे गुरुवारी मध्यरात्री एका 6 वर्षांच्या चिमुरडीची गळा आवळून, तर तिला सांभाळणाऱ्या 79 वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात वार करून हत्या करण्यात आली होती. विनायक तुकाराम भवारी (वय 35, रा. जुन्नर, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हनुमानवाडी येथील रहिवासी संगीता दत्तात्रय गवारी या इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीला गेल्या होत्या. त्यावेळी घरी त्यांची नात धनश्री सोनू दत्तात्रय केदारी (वय 6) आणि तिला सांभाळण्यासाठी शेजारी राहणाऱ्या मंगल शिंदे (वय 79) या दोघीच होत्या. मध्यरात्री आरोपीने घरात प्रवेश करून गाढ झोपेत असलेल्या धनश्रीचा गळा आवळला, तर मंगल शिंदे यांच्या डोक्यावर गंभीर वार करून दोघांचीही हत्या केली. शुक्रवारी सकाळी संगीता गवारी कामावरून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. आळंदी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले.आळंदी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. बी. नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनायक भवारी हा मिस्त्री काम करतो. त्याचे तक्रारदार महिलेशी दोन वर्षांपूर्वी दुसरे लग्न झाले होते. कौटुंबिक कारणांवरून त्यांच्यात वाद सुरू होते आणि ते एक महिन्यापासून विभक्त राहत होते. विनायक भवारी वारंवार घरी ये-जा करत असल्याने मयत मंगल शिंदे त्याला जाब विचारत होत्या. तसेच, मुलगी धनश्री देखील त्याला घरी येऊ नको असे सांगत होती. या रागातून आरोपीने तक्रारदार महिलेच्या घरी येऊन मंगल शिंदे यांची हत्या केली. मंगल शिंदे यांची हत्या करत असताना अल्पवयीन धनश्रीने आरडाओरड केली. त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने तिचाही गळा आवळून खून केला.या दुहेरी हत्याकांडाचा पुढील तपास आळंदी पोलिस करत आहेत.
बीड न्यायालयाने सतीश उर्फ खोक्या भोसले याला हत्येचा प्रयत्न प्रकरणात निर्दोष ठरवून मोठा दिलासा दिला आहे. एक वर्ष कारागृहात राहिल्यानंतर त्याची सुटका झाली असून या निर्णयामुळे जिल्ह्यात चर्चा रंगल्या आहेत. न्याय देवतेने मला न्याय दिला, असे म्हणत त्याने दिलासा व्यक्त केला. तसेच, मला जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका नेत्याला लक्ष्य करण्यासाठी आदिवासी समाजातील मला टार्गेट करण्यात आले, असेही त्याने म्हटले आहे. सुमारे वर्षभरापूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर ढाकणे पिता-पुत्रावर हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणानंतर पोलिसांनी त्याला अटक करून छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात ठेवले होते. दीर्घ सुनावणीनंतर बीड न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे भोसले याला या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर काल त्याची अधिकृत सुटका झाली आणि आज तो कारागृहाबाहेर आला. दरम्यान, भोसले याच्याशी संबंधित आणखी एक प्रकरणही चर्चेत आहे. एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा त्याचा व्हिडिओ काही काळापूर्वी व्हायरल झाला होता. या घटनेप्रकरणी त्याच्यावर वेगळा गुन्हा दाखल असून तो सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्या प्रकरणात भोसलेला जामीन मिळालेला आहे. त्यामुळे हत्येच्या प्रयत्नाच्या आरोपातून मुक्तता मिळाली असली तरी इतर प्रकरणांमुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरूच आहे. काही लोक वातावरण बिघडवत असल्याचा आरोप न्यायालयाच्या निर्णयानंतर भोसलेने माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. न्याय देवतेने मला न्याय दिला, असे म्हणत त्याने दिलासा व्यक्त केला. तसेच, मला जाणीवपूर्वक संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका नेत्याला लक्ष्य करण्यासाठी आदिवासी समाजातील मला टार्गेट करण्यात आले, असा आरोपही त्याने केला. पुढे बोलताना त्याने कुटुंबावर तीन वेळा हल्ले झाल्याचा दावा केला. आयुष्यभराची कमाई लावून उभारलेलं घर पाडण्यात आलं. गेल्या एका वर्षात माझ्या कुटुंबाने खूप त्रास सहन केला, असेही सांगितले. जिल्ह्यातील जातीयवाद आणि राजकीय वैमनस्यामुळे काही लोक वातावरण बिघडवत असल्याचा आरोप करत भोसलेने या प्रकरणाला वेगळं वळण दिलं आहे.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांनी तातडीने या प्रकरणी संवेदना व्यक्त करणे गरजेचे होते. त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली नाही. शेतकऱ्यांना खूप हाल सहन करावे लागत आहेत. जळगावमधील जे लोकं सत्तेत आहे त्यांच्या संवेदना ठार मेलेल्या आहेत, ते 24 तास राजकारण करतात, संकटमोचक गिरीश महाजन शेतकऱ्यांवर संकट आल्यावर कुठे असतात असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, बारामतीमध्ये कौटुंबिक कारणास्तव शरद पवार यांचा पक्ष कदाचित निवडणूक लढणार नाही, पण इतरांना निवडणूक लढवू नये असे सांगू नये. ही लोकशाही आहे, त्यावर एकत्र बसत निर्णय घ्यावा लागेल. मविआतील नेते एकत्र बसून या दोन्ही जागा संदर्भात निर्णय घ्यावा लागेल. शिवसेनेने राहुरीत लढावे असे आमचे कार्यकर्ते सुद्धा म्हणत आहे. भाजपला मदत होईल असे निर्णय घेऊ नये ही आमची भूमिका आहे. महाजन केवळ राजकीय संकटमोचकाचे काम करतात का? संजय राऊत म्हणाले की, संकटमोचन हे केवळ राजकीय संकटमोचकाचे काम करतात का? शेतकऱ्यांवर जेव्हा संकट येतात तेव्हा हे काही काम करताना दिसत नाही. केवळ पक्ष फोडणे, आमदार, नगरसेवक पळवणे हे त्यांचे कर्तव्य आहे का? हे राज्याचे दुर्दैव आहे. जळगाव जिल्ह्यात राजकीय हुकुमशाही संजय राऊत म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात राजकीय हुकुमशाही सुरू आहे. पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी सुरू आहे, पोलिसांनी स्वत:ला वर्दीतील गुंड समजू नये. जळगावमध्ये पोलिस गणवेशातील हुकुमशाही आहे, त्याचा वापर राजकीय विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी करत असतात. हळूहळू तुमचाही जोर ओसरणार आहे. शिंदे गटाचे आमदार हे संकटमोचकाच्या संपर्कात आहेत ते पुढची निवडणूक भजपमधून लढवतील असे वाटते. तिन्ही पक्षाने एकत्र निर्णय घ्यावा संजय राऊत म्हणाले की, राहुरी आणि बारामतीमध्ये पोटनिवडणूक आहे. मविआ म्हणून आपण निर्णय घेतला पाहिजे. राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून चांगल्या प्रकारे ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीवर चर्चा होते, काँग्रेस अनेक ठिकाणी सर्वांत आधी निवडणूक लढवण्यासाठी पुढे जाते निकालानंतर कळते आपण कुठे आहोत. जिथे ज्या पक्षाची ताकद आहे त्याच पक्षाने निवडणूक लढवावी. मविआतील तिन्ही पक्षांनी एकत्र येत निवडणुकीचा विचार केला पाहिजे.
सोलापूर जिल्ह्यातील अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा वाद चिघळू न देता दोन्ही समाजांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. मराठा असो वा धनगर, दोन्ही समाज आपलेच आहेत. एकमेकांमध्ये तेढ निर्माण करण्यापेक्षा आपण शांत डोक्याने एकत्र बसून या विषयावर निश्चितपणे मार्ग काढू शकतो, असे जरांगे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आणि धनगर समाजामध्ये फूट पाडण्यासाठी कोणी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे का? पुतळ्याच्या मुद्द्यावरून समाजात तेढ निर्माण करण्याचा हा कोणाचा डाव आहे का? यावर आपण सर्वांनी बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. नेमके प्रकरण काय? अंजनगाव (ता.माढा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खेलोबा मंदिर समितीच्या जागेत उभारल्यावरुन गुरुवारी सकाळपासून मंदिर समितीच्या आवारातील पुतळा हटवण्यासाठी मानकरी फरांडे महाराज यांच्यासह परिसरातील समाज बांधव ठिय्या मारुन बसले होते. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मंदिराच्या जागेत पुतळा असल्यास हटवण्याच्या सूचनेस पुतळा समर्थकांनी संमती दिली असली तरी मंदिर समितीने विनापरवाना पुतळा हटवा, मगच जागा मोजणी करा, अशी भूमिका घेतल्याने तोडगा निघाला नाही. दुसऱ्या दिवशी गावातील वातावरणात तणाव होता. आमदार अभिजीत पाटील, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलकांशी गुरुवारी संवाद साधून पण शिष्टाई निष्फळ ठरली. प्रशासनाने मंदिराच्या जागेची मोजणी करावी, मंदिर समितीच्या जागेत शिवाजी महाराजांचा पुतळा येत असेल तर शिवभक्त तो स्वतःहून काढून घेतील, अशी तयारी शिवभक्तांनी दर्शवली असली तरी आधी अनधिकृतपणे उभारण्यात आलेला पुतळा हटवा, मगच मोजणी करा, असा पवित्रा मंदिर समितीने घेतल्याने दोन गटांतील वाद चालूच राहिला आहे. अंजनगाव खे. येथे दुसऱ्या दिवशीही तणावपूर्ण वातावरण होते. पोलिस प्रशासनाने शिवरायांचा पुतळा न हटवल्याने गुरुवारी सकाळी खेलोबा मंदिराचे मानकरी फरांडे महाराज यांच्यासह परिसरातील समाज बांधव आक्रमक पवित्रा घेत मंदिराच्या आवारात ठिय्या मारुन बसले. यावर पोलिस अधीक्षक अतुलकु लकर्णी यांनी मोजणी करून हा पुतळा मंदिराच्या जागेतयेत असेल तर शिवभक्तांनी तो काढून घेण्याचे आवाहन केले. यास शिवभक्तांनी होकार दिला, परंतू जोपर्यंत पुतळा हटवला जात नाही. तोपर्यंत मंदिराची मोजणी न करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतल्याने तोडगा निघाला नाही. छत्रपती शिवरायांचा पुतळा मंदिर प्रवेशद्वारात खेलोबा देवा प्रमाणेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आमचे कुलदैवत मानतो. परंतु ज्या जागेवर शिवरायांचा पुतळा उभा केला आहे, ती जागा मंदिराच्या प्रवेशद्वारावर येत असल्याने धार्मिक विधी करण्यास अडथळा निर्माण होणार आहे. संबंधितांनी इतर ठिकाणी महाराजांचा पुतळा उभा करावा, आम्ही त्यास मदत करू. राजाभाऊ वाघमोडे महाराज, मुख्य मानकरी हाकेंना चुकीची माहिती, चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न अंजनगाव खे. येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणी लक्ष्मण हाकेंना माझ्याबाबत चुकीची माहिती देण्यात आली आहे. गैरसमजुतीमुळे ते माझ्यावर आरोप करत आहेत. चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. अभिजीत पाटील, आमदार. आमदार अभिजीत पाटलांमुळे पुतळा हलवला नाही पुतळ्याच्या माध्यमातून कधी वंजारी, कधी दलित आता धनगर समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतोय. यामागील हेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी करावी. बुधवारी जिल्हा प्रशासनाने पुतळा स्थलांतरित करण्याचे ठरवले होते. परंतुआमदार अभिजीत पाटील यांच्यामुळे पुतळ्याचे स्थलांतर रोखले. गृह विभागाच्या कार्यपद्धती प्रश्नांकित आहे. लक्ष्मण हाके, ओबीसी नेते पुतळा मंदिर जागेत असल्यास काढा- पोलिस अधीक्षक पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शिवभक्तांना पुतळा इतर जागेवर स्थलांतरित करण्याचे आवाहन करताना मंदिराच्या जागेत पुतळा येत असेल तर स्वःतहून पुतळा काढून घेण्याचे आवाहन शिवभक्तांना केले. शिवभक्तांनी ज्या जागेवर पुतळा उभा आहे, ती जागा आणि मंदिराच्या जागेचा गट नंबर वेगळा आहे. मंदिराच्या जागेत पुतळा असल्यास तो स्वतःहून काढून घेण्याची तयारी आहे. नसल्यास संबंधितांनी न्यायालयात जावे. मोजणीसाठी गेलेल्या 10 कर्मचाऱ्यांना पाठवले परत माढा भूमी अभिलेख कार्यालयातील 4 माळशिरस 3 व उत्तर सोलापूर येथील 3 असे 10 कर्मचारी मंदिराची मोजणी करण्यास गेले असता मंदिर समितीच्या लोकांनी आदेश दाखविण्याबरोबरच नोटीस न देता कशी काय मोजणी करता असे सांगत कर्मचाऱ्यांना माघारी पाठवले. दगडफेकीच्या घटनेनंतरपोलिस बंदोबस्तात वाढ ग्रामपंचायतीकडे तीन आठवड्यापूर्वी केला होता अर्ज तीन आठवड्यापूर्वी दत्तात्रय पाटेकर, ओंकार चव्हाण आणि गजानन कृपाळ यांनी अंजनगाव खे ग्रामपंचायतीकडे पुतळा उभा करण्यासाठी अर्ज केला होता. ग्रामपंचायत प्रशासनाने रितसर परवानगी घेऊन पुतळा उभारण्याचे सांगत अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. पोलिस प्रशासनास माहिती कळल्यानंतर पोलिसांनी तिघांना नोटिस बजावली होती, असे साहा.पोलिस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण:बडतर्फ पीएसआय गोपाळ बदनेला 5 महिन्यांनंतर जामीन मंजूर
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या खळबळजनक आत्महत्या प्रकरणात अडकलेले बडतर्फ पोलfस उपनिरीक्षक गोपाळ बदनेला दिलासा मिळाला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कारागृहात असलेल्या बदने याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मंजूर केला. 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि विशिष्ट अटींच्या अधीन राहून न्यायालयाने हा निर्णय दिला. 23 ऑक्टोबर 2025 रोजी फलटणमधील एका हॉटेलमध्ये बीड येथील रहिवासी असलेल्या महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती, ज्यामध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि घरमालक प्रशांत बनकर यांच्याकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाचा उल्लेख केला होता. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. नेमके प्रकरण काय? साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या या डॉक्टरने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. मात्र या मृत्यूमागे केवळ नैराश्य नव्हते, तर एक भयंकर गुन्हा दडलेला असल्याचे समोर आले. आत्महत्येनंतर डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली आढळली. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी स्वतःवर चार वेळा बलात्कार झाल्याचा आरोप निलंबित पीएसआय गोपाल बदनेवर केला. तसेच प्रशांत बनकर यानेही मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख केला. आत्महत्येपूर्वी काही महिन्यांपासून त्या आरोग्य विभाग आणि पोलिसांमधील तणावग्रस्त वातावरणात होत्या, अशी माहिती पुढे आली. वैद्यकीय तपासणीसंबंधी काही वादानंतर त्या चौकशीत सापडल्या होत्या आणि त्यातूनच मानसिक ताण वाढला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. डॉ. संपदा मुंढे यांनी गंभीर मानसिक छळामुळे आत्महत्या केली. याचा महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने तीव्र निषेध करीत या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या महिलांच्या मुद्यावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. फडणवीस सरकारने अचानक मोठ्या संख्येने लाडकी बहीण योजनेतून लाभार्थ्यांची कपात केली. मग एवढे महिने महाराष्ट्राच्या तिजोरीतून गेलेल्या पैशांची भरपाई कोण करणार? असा सवाल ठाकरे गटाने या प्रकरणी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारच्या तिजोरीतील 21 हजार कोटी पाण्यात गेल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर उपरोक्त शब्दांत निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, निवडणुकीच्या काळामध्ये नियोजनशून्य महायुतीने मतांच्या लालसेपोटी पैशांची खैरात केली. योजनेच्या नावाखाली पगारी मतदार मिळवण्याचा प्रयत्न केला. आता अचानक एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणींच्या लाभार्थ्यां मध्ये कपात केली. मग इतकी महिने महाराष्ट्राच्या तिजोरीतून गेलेला पैसा याची भरपाई कोण करणार..? एरवी क्रेडिट घेण्यासाठी पुढे येणाऱ्या फडणवीस शिंदे आणि आदिती तटकरे यांच्यापैकी आता कोण हे नुकसान भरून काढणार आहे? असा सवाल सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये पाण्यात गेलेल्या 21 हजार कोटींचा हिशोब कोण देणार? याचे उत्तरही महायुती सरकारकडे मागितले आहे. अपात्र लाभार्थ्यांवरून राजकारण तापणार उल्लेखनीय बाब म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित केली होती. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. महिला वर्गात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या योजनेचा फायदा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत झाला. त्यांची सलग दुसऱ्यांदा राज्यात सत्ता आली. त्यानंतर सरकारने या योजनेतील बोगस लाभार्थ्यांची छाननी करण्याचा निर्णय घेतला. त्यात हजारो बोगस लाभार्थी निष्पन्न झाले. विशेषतः वार्षिक अडीच लाखांचे उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी ही योजना सुरू असताना त्यात सधन महिला तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले. अखेर सरकारने प्रारंभी या योजनेतून सरकारी कर्मचाऱ्यांना वगळले. त्यानंतर ई केवायसीच्या माध्यमातून इतर बोगस लाभार्थ्यांकडे आपला मोर्चा वळवला. त्यातही हजारो महिला या योजनेतून बाद झाल्या. पण आता याच अपात्र बहिणींच्या विषयावरून राज्याचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
मुंबईत बेकायदा दिवे आणि सायरन लावून फिरणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत 80 वाहनांवरील अवैध साहित्य जप्त केले आहे. मंत्रालय परिसरातच ही कारवाई झाल्याने या प्रकरणाने विशेष लक्ष वेधले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत विशेष मोहीम राबवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली. मंत्रालय आणि विधानभवन परिसरात मोठ्या प्रमाणावर खासगी वाहनांवर लाल, निळे आणि पिवळे फ्लॅश लाईट्स तसेच सायरन वापरले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासणी मोहीम सुरू केली आणि एकामागून एक वाहनांची तपासणी करत 80 गाड्यांवर कारवाई केली. संबंधित वाहनांवरील सर्व बेकायदा दिवे आणि सायरन जप्त करण्यात आले असून वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. नियमांनुसार, अशा प्रकारचे दिवे आणि सायरन केवळ आपत्कालीन सेवा, कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणा आणि अधिकृत शासकीय वाहनांनाच वापरण्याची परवानगी आहे. मात्र काही वाहनचालक प्रतिष्ठा दाखवण्यासाठी किंवा वाहतुकीत सवलत मिळवण्यासाठी या सुविधा बेकायदेशीररित्या वापरत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या वापरामुळे इतर वाहनचालकांमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि काही वेळा वाहतूक नियम मोडण्यास प्रोत्साहन मिळते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय, अशा बेकायदा दिवे आणि सायरनचा वापर करून काही गंभीर गुन्ह्यांमध्येही गैरफायदा घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ वाहतूक नियमभंग म्हणून न पाहता, सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत गंभीर बाब म्हणून पाहिले जात आहे. याच कारणामुळे पोलिसांनी ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. गुन्हा दाखल करण्याचीही कारवाई होऊ शकते दरम्यान, पुढील काळातही अशा नियमभंगावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. बेकायदा दिवे किंवा सायरन आढळल्यास संबंधित वाहनचालकांवर मोठा दंड आकारला जाईल, तसेच वाहनाची नोंदणी रद्द करण्याची शिफारस आरटीओकडे केली जाईल. काही गंभीर प्रकरणांमध्ये थेट गुन्हा दाखल करण्याचीही कारवाई होऊ शकते. नागरिकांनीही जागरूक राहून अशा वाहनांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर मध्यरात्री मोठी कारवाई करत दोन LPG गॅस टँकर जप्त करण्यात आले आहेत. या टँकरमधील गॅस काळ्या बाजारात विकला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काल उशिरा रात्री समृद्धी महामार्गावर तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. दोन टँकर संशयास्पद हालचाली करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मोठ्या प्रमाणावर LPG गॅसचा साठा आढळून आला. हा गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून विक्रीसाठी वापरला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तत्काळ टँकर ताब्यात घेतले. या प्रकरणाबाबत माहिती देताना विभागाचे अधिकारी चंद्रकांत डांगे यांनी सांगितले की, या टँकरमधील गॅस व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरून काळ्या बाजारात विकला जात होता. एका सिलिंडरची किंमत 5 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत आकारली जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकारामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, यामागील संपूर्ण साखळी उघड करण्यासाठी यंत्रणा प्रयत्न करत आहेत. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत….
औंढा तालुक्यातील लाख येथील मधोमती विद्यालयातील एका शिक्षकाकडून 28 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकास निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश शाळा प्रशासनाने नुकतेच काढले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील लाख येथील मधोमती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाला संपूर्ण वर्षाचा घरभाडे भत्त्या पोटी 58 हजार रुपयांची रक्कम मिळाली होती. मात्र सदर रकमेतून 50 टक्के रक्कम दे असा मुख्याध्यापक संतोष कढणे याने शिक्षकाकडे तगादा लावला होता. सदर रक्कम न दिल्यास मुख्यालयी राहात नसल्याचा अहवाल शिक्षण विभागाकडे पाठविण्याची धमकीही देण्यात आली होती. त्यानंतर तडजोड होऊन 28 हजार रुपये देण्याचे ठरले होते. सदर रक्कम घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ता. 5 मार्च रोजी पकडले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुचपतचे उपाधिक्षक राजेश मलपिल्लू पुढील तपास करीत आहेत. या संदर्भात लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. त्या अहवालावरून मुख्याध्यापक कढणे यास निलंबित करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी विपुल भागवत यांनी शाळा प्रशासनाला दिले होते. दरम्यान, लाचलुचपत विभागाचा अहवाल व शिक्षण विभागाच्या आदेशानंतर शाळा प्रशासनाने लाचखोर मुख्याध्यापक संतोष कढणे यास निलंबित केले आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश नुकतेच काढण्यात आले असून याबाबतचा अहवाल देखील लाचलुचपत विभागाकडे सादर करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता खंडणी आणि ब्लॅकमेलिंगचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यावसायिकाच्या टॅबमधील खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाखांची मागणी करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी सापळा रचत चार आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे. नाशिक शहरात गुन्हेगारीचे नवे प्रकार समोर येत असून, एका ज्येष्ठ व्यावसायिकाला लक्ष्य करत खंडणी उकळण्याचा गंभीर प्रयत्न उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वी या व्यावसायिकाच्या कार्यालयातून टॅब चोरीला गेला होता. या टॅबमध्ये त्याच्या एका परिचित महिलेसोबतचे अनेक खासगी व्हिडिओ साठवलेले होते. हा टॅब आरोपींच्या हाती लागल्यानंतर त्यांनी त्या व्हिडिओंचा आधार घेत व्यावसायिकाला धमकावण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, या टॅबमध्ये 200 च्या आसपास खासगी आणि आक्षेपार्ह स्वरूपाचे व्हिडिओ असल्याचा अंदाज आहे. या व्हिडिओंना सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी संबंधित व्यावसायिकाकडे 12 लाख रुपयांची मागणी केली. या धमक्यांमुळे घाबरलेल्या व्यावसायिकाने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर सातपूर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने तात्काळ कारवाई सुरू करत सापळा रचला. खंडणीखोरांनी व्यावसायिकाला पैसे देण्यासाठी ठराविक ठिकाणी बोलावले होते. पोलिसांनी या संधीचा फायदा घेत गुप्तपणे कारवाई केली. आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी चित्रपटाला शोभावा असा पाठलाग करत त्यांना पकडले. 10 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना चार संशयितांना रंगेहाथ अटक करण्यात आली. सध्या सर्व आरोपी पोलिस कोठडीत असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. टॅबमध्ये व्हिडिओ असणेही संशयास्पद दरम्यान, या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. टॅबमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ असणे ही बाब संशयास्पद ठरत आहे. त्यामुळे आता पोलिसांचा तपास केवळ आरोपींपुरता मर्यादित न राहता तक्रारदार व्यावसायिकाकडेही वळला आहे. हे व्हिडिओ नेमके कोणाचे आहेत, ते कशा प्रकारे तयार झाले आणि यामागे मोठे रॅकेट आहे का, याचा शोध घेतला जात आहे. एकूणच, अशोक खरात प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या नाशिकमध्ये या नव्या घटनेने खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांची बदली झाल्याचे आदेश गुरुवारी (२ एप्रिल) धडकताच शहराच्या राजकीय वर्तुळात त्यांना थांबवण्यासाठी चर्च सुरू झाली आहे. शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट असताना हा बदल नको, अशी भूमिका मंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घेतली आहे. या बदलीला स्थगिती आणण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या निर्णायक टप्प्यात आहे. २०० एमएलडी पाणी आणण्यासाठी मुख्य जलवाहिनीची चाचणी सुरू आहे. अशा वेळी नवीन आयुक्त आल्यास कामाची गती मंदावेल, अशी भीती व्यक्त होत आहे. सावेंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती करणार पाणीपुरवठा योजना आणि नवीन कचरा संकलन यंत्रणा मार्गी लागेपर्यंत बदल नको. मंत्री अतुल सावे यांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार. - समीर राजूरकर, महापौर तुम्हीच सांगा, आयुक्त जी. श्रीकांत यांची बदली योग्य आहे की नाही? महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांची बदली करण्यात आली आहे. अधिकाऱ्याची बदली ही प्रशासकीय बाब असली तर आयुक्तांच्या कार्यकाळात पाणीपुरवठा योजनेचे काम पुढे सरकले. या पार्श्वभूमीवर आयुक्तांच्या बदलीबद्दल आपल्याला काय वाटते. १. महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांच्या बदलीबद्दल तुमचे मत काय ?[A] बदली योग्य आहे [B] बदली अयोग्य आहे २. शहर पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी जी. श्रीकांत यांची गरज आहे का ?[A] होय [B] नाही विनय गौडा जी. सी., नवे जिल्हाधिकारी गौडा हे जुलै २०२२ पासून चंद्रपूर जिल्हाधिकारी होते. त्यापूर्वी नंदुरबार येथे त्यांनी सीईओ म्हणून काम केले आहे. त्यांनी १०० दिवसांच्या कृती आराखड्यात चंद्रपूर जिल्ह्याला पहिल्या क्रमांकावर आणले. जिल्ह्यातील जिवती हा तालुका नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत निवडला गेलेला एकमेव तालुका होता. पीएस मिन्नू नवे जि. प. सीईओ प्रत्येक समस्येचा बारकाईने अभ्यास करणे आणि त्यावर उपाययोजना करणे ही त्यांची बलस्थाने आहेत. वयाच्या २१ व्या वर्षी त्या विवाहबद्ध झाल्या. २३ व्या वर्षी त्या आई झाल्या. वयाच्या ३२ व्या वर्षी आयएसए पद मिळवले. मंठा (जि. जालना) येथे शाळांच्या समस्या होत्या. त्यांनी तब्बल ५ तास बैठक घेतली. सर्व समस्या जाणून घेतल्या. त्यांचा निपटारा केला. अमोल येडगे, नवे मनपा आयुक्त आयएएसच्या २०१४ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. ते कराड तालुक्यातील रहिवासी आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. कोल्हापूरमध्ये त्यांनी ‘एआय-ऑफिस लेन्स’, ‘कार्यालय कवच’ आणि ‘सेवादूत’ यांसारखे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित (एआय) उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. ‘राजकीय’ समन्वयाचा परिणाम जी. श्रीकांत यांचा सत्ताधारी नेत्यांशी असलेला समन्वय हा या मुदतवाढीच्या मागणीमागील मुख्य केंद्रबिंदू असल्याचे बोलले जाते. ५,५०० पेक्षा जास्त अतिक्रमणे हटवताना श्रीकांत यांनी खंबीरपणा दाखवला. तोच खंबीरपणा आगामी काळातही नेत्यांना अपेक्षित आहे. पाणी योजना पूर्ण झाल्यावर त्याचे ‘क्रेडिट’ घेताना प्रशासकासोबत असलेले ट्युनिंग महत्त्वाचे ठरते. पाणीपुरवठा योजनेसह शहरातील रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी आयुक्तांनी पुढाकार घेतला होता. या कामांच्या निमित्ताने राजकीय नेत्यांशी ट्युनिंग जुळले होते. त्यामुळे बदली होऊ नये, अशी राजकीय नेत्यांची इच्छा आहे. मुदतवाढीचा घाट कशासाठी? जी. श्रीकांत यांनी निश्चितच मालमत्ता कर वसुली, पाणी प्रश्न, रस्ता रुंदीकरण आणि शहर सौंदर्यीकरणात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मात्र, प्रशासकीय नियमानुसार बदल्या हा शासन प्रक्रियेचा भाग आहे. जेव्हा मंत्री “बदली आम्ही थांबवू’ असे म्हणतात, तेव्हा प्रशासनावर राजकीय वर्चस्व अधिक असल्याचे दिसून येते. पाणी योजना हे एक तांत्रिक काम असून ते कंत्राटदार आणि अभियंत्यांच्या माध्यमातून चालते. केवळ एका अधिकाऱ्याच्या बदलीमुळे योजना ठप्प होईल, हा दावा प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरू शकतो. ही मुदतवाढ खरोखर ‘पाण्यासाठी’ आहे की आपल्या ‘सोयीच्या’ अधिकाऱ्यासाठी, अशीदेखील चर्चा आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत असतानाच त्याची पत्नी कल्पना खरात फरार असल्याने तपास अधिकच वेगाने सुरू झाला आहे. लूकआऊट नोटीस जारी केल्यानंतर SITने थेट माहेरी धडक देत चौकशी केली आणि त्यातून समोर आलेल्या माहितीने तपासाला नवे वळण मिळाले आहे. नाशिकमध्ये गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात सध्या फरार असून, तिचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) सक्रिय झाले आहे. दोन दिवस उलटूनही कल्पना सापडली नसल्याने तिच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. याचदरम्यान SITने खरात कुटुंबातील सदस्यांवर लक्ष केंद्रीत करत चौकशीचा वेग वाढवला आहे. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन याची पुन्हा चौकशी करण्यात आली असून, कल्पनाचे दोन भाऊ यांचीही तपास पथकाने विचारपूस केली आहे. दरम्यान, SITचे पथक स्थानिक पोलिसांच्या मदतीने सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील कल्पना खरातच्या माहेरी पोहोचले. येथे झालेल्या चौकशीत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, कल्पना खरात गेल्या 16 वर्षांपासून माहेराशी संपर्कात नाही. इतकेच नव्हे, तर अशोक खरात तिला माहेरी येऊ देत नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. लग्नानंतर कल्पनाने माहेराशी फारसा संबंध ठेवला नव्हता, तसेच तिचा भाऊसुद्धा तिला भेटू शकला नसल्याचे सांगण्यात आले. तिच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती साधी असून, ते अल्पशेतीवर उदरनिर्वाह करत असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणाला आणखी एक महत्त्वाचा पैलू जोडला गेला आहे. शिर्डी परिसरात जमीन खरेदी व्यवहारात कल्पना खरातने एका शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे. या संदर्भात SITने पुन्हा एकदा हर्षवर्धन खरातची चौकशी केली. तपासात असेही उघड झाले की, या व्यवहारात कल्पना आणि तिच्या भावांचा आर्थिक संबंध होता. त्यामुळे आता या प्रकरणात फक्त अशोक खरातच नव्हे, तर त्याचे नातेवाईकही तपासाच्या कक्षेत आले आहेत. संचालकांचा खरातच्या आर्थिक व्यवहारांशी संबंध असल्याचे पुरावे दरम्यान, अशोक खरातशी संबंधित शिवनिका संस्थानच्या तीन संचालकांचीही SITकडून चौकशी करण्यात आली आहे. इशान्येश्वर मंदिराशी संबंधित या संस्थेच्या माध्यमातून मोठे आर्थिक व्यवहार झाले असल्याचा संशय आहे. SITकडे उपलब्ध माहितीनुसार, या संचालकांचा खरातच्या आर्थिक व्यवहारांशी संबंध असल्याचे पुरावे मिळाले आहेत. महिलांची फसवणूक आणि धार्मिक विधींच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याचा आरोप आधीच असताना, आता आर्थिक व्यवहारांचा तपास अधिक गडद होत चालला आहे. एकूणच, कल्पना खरात फरार असताना तिच्या नातलगांपासून ते संस्थात्मक संबंधांपर्यंत तपासाचा विस्तार होत असून, पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. दोन्ही मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा निर्धार पक्षाने केला असून, पक्षश्रेष्ठींकडून यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. राज्यातील बारामती आणि राहुरी या महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने या दोन्ही जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. बारामतीत संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या असून, इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतिम उमेदवार निवडताना पक्ष नेतृत्व काळजीपूर्वक निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. राहुरी मतदारसंघातही उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दोन्ही ठिकाणी उमेदवारांची नावे जाहीर करण्यापूर्वी मित्रपक्षांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप आणि रणनीती यावरही या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीसाठी सहा अर्ज तर राहुरीसाठी चार अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच, इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखतीही पार पडल्या आहेत. येत्या दोन दिवसांत निवडणुकीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. दोन्ही मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय दरम्यान, आज समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसने दोन्ही मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय निश्चित केला आहे. उमेदवार निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, आज दिवसभरात ती पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर उद्या माध्यमांसमोर अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे बारामती आणि राहुरीतील लढती अधिक रंगतदार होणार असून, राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर आणि काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी आपल्या इतर मान्यवरांसह नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी दोन्ही मतदारसंघातील रेल्वेसंबंधित समस्यांवर प्रकाश टाकला. त्याचवेळी काटोल-वरुड-मोर्शीमार ्गे पुणे जाण्यासाठी नवीन रेल्वे तसेच याच मार्गावरुन मेट्रो सुरु करण्याची मागणी केली आहे. दरम्यान दोन्ही आमदारांनी मांडलेल्या मागण्यांना वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. यावलकर यांनी काटोल, नरखेड, वरुड, मोर्शी, बडनेरा, पुणे या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला. या भागातील रहिवाशांना सध्या पुणे रेल्वे मार्गाशी थेट जोडणी नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वैष्णव यांनी ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान काटोलचे आमदार ठाकूर यांनीही या प्रस्तावाचे समर्थन केले असून ही रेल्वेगाडी लवकरात लवकर सुरु करावी, अशी मागणी रेटली. यासोबतच प्रवाशांची सोय, सुरक्षितता आणि वेग सुधारण्याच्या उद्देशाने नागपूर-काटोल-नरखेड रेल्वे मार्गावर मेट्रो सुरु करावी, असाही प्रस्ताव यावेळी देण्यात आला. दिल्ली-नागपूर मार्गावरील ढवळापूर येथील जुन्या दगडी पुलाच्या जागी आधुनिक ‘बॉक्स ब्रिज' उभारण्याची आवश्यकताही यावेळी अधोरेखित करण्यात आली. आधीच्या प्रस्तावांनाही दिला यावेळी दिला उजाळा काटोल आणि नरखेड येथील दक्षिण एक्सप्रेसचे थांबे पूर्वीप्रमाणेच सुरू करावे, भुसावळ-नरखेड रेल्वेगाडीचे सातत्य वारंवार मुदतवाढ देण्यापेक्षा कायम राखावे, वर्धा, काटोल, नरखेड मार्गासाठी नवीन जोड रेल्वे मार्ग उभारला जावा आदी मुद्दांबाबत दोन्ही आमदारांनी यापूर्वीच प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. त्या जुन्या प्रस्तावांची आठवण करुन देताच वैष्णव यांनी या सर्व प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद दिला जाणार असून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.
मतदान जनजागृतीतील ‘रिल्सस्टार्स’चा गौरव:अमरावती मनपा सार्वत्रिक निवडणुकीत राबवला होता अनोखा उपक्रम
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात व्यापक मतदार जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का वाढविण्याच्या उद्देशाने स्वीप विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांपैकी तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय ठरलेली रिल स्पर्धा ही एक नाविन्यपूर्ण आणि प्रभावी संकल्पना ठरली. दरम्यान, मतदान जनजागृतीमध्ये प्रभावी ठरलेल्या तीन ‘रिलस्टार्स’चा मनपा आयुक्तांच्या हस्ते गुरुवारी (दि. २) गौरव करण्यात आला. डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती करण्याचा उद्देश ठेवून या रिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शहरातील अनेक तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांनी मतदानाचे महत्त्व, लोकशाहीतील नागरिकांची भूमिका आणि प्रत्येक मताचे मूल्य यावर आधारित आकर्षक, सर्जनशील आणि संदेशपूर्ण रिल्स तयार केल्या. स्पर्धेत सादर झालेल्या रिल्सपैकी उत्कृष्ट रिल्सची निवड तज्ज्ञ समितीमार्फत करण्यात आली. निवड प्रक्रियेत संदेशाची परिणामकारकता, सर्जनशीलता, सादरीकरणाची पद्धत तसेच जनजागृतीवर होणारा प्रभाव या बाबींचा विचार करण्यात आला. विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यासाठी पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम तसेच शाळा निरीक्षक योगेश पखाले उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. तीघांचा झाला गौरव या स्पर्धेत दीक्षांत हर्षल मनोहरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कार्तिक काळबांडे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. तनुश्री धीरज कडू यांनी तृतीय क्रमांक मिळविला. मतदान जनजागृतीसाठी केलेल्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
‘पेसा’ कायद्यानुसार मेळघाटमध्ये कार्यरत कंत्राटी शिक्षकांचे तीन दिवसापासून सुरू असलेले काम बंद व धरणे आंदोलन आज, गुरुवार, २ एप्रिल रोजी मागे घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांच्यासोबत झालेल्या यशस्वी चर्चेअंती हा क्षण उगवला. सीईओंनी या शिक्षकांना सकारात्मक कारवाईचे लेखी आश्वासन दिले आहे. दरम्यान आंदोलन मागे घेण्यात आल्यामुळे उद्या, शुक्रवारची सुटी वगळता शनिवार, ४ एप्रिलपासून सर्व शिक्षक आपापल्या शाळांवर रुजू होणार आहेत. मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात हे शिक्षक गेल्या काही वर्षांपासून मानधन तत्वावर कंञाटी म्हणून काम करित आहेत. अनुभव आणि वाढते वय या आधारे त्यांनी सेवेत नियमित करण्याची रास्त मागणी केली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे शिफारस करावी, यासाठी हे आंदोलन सुरु करण्यात आले होते. ३० मार्चपासून सुरु झालेल्या या आंदोलनातील रितेश शिंदे, अविनाश उदापुरे, सागर सुर्यवंशी, विशाल हगवणे, राहुल सोनार, मंगेश आठवले, सीमाबानो शाह, प्रियंका चोपडे, सरिता राऊत व दीपक मेमनकर या दहा शिक्षकांनी दुसऱ्या दिवसापासून साखळी उपोषणही सुरु केले होते. या आंदोलनात किशोर वानखडे, स्वाती पोटे, शितल खडसे, प्राजक्ता दातीर, अक्षय गजभिये, सचिन भालकर, संदीप देशकर, राहुल ठाकरे, सुप्रिया गायकवाड, अश्विन मालवे, आशिष इंगळे,शिशीर साबळे, वैशाली थोटे, देविदास उईके, पार्वती पवार, शालिनी बुराडे, मनोज पारीसे, कल्पना गोवारे, पूजा मेहरे, तेजस चहाकर, प्रियंका चोपडे, संजीवनी कुकडे, संजीवनी गायकवाड, निखिल चव्हाण, ज्योती मेश्राम, प्रफुल्ल पवार, उत्कर्षकुमार चिमोटे, पूजा सिडाम, संदीप राठोडआदी सहभागी झाले होते. तीन दिवसांच्या काळात या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अमरावती, शिक्षक भारती अमरावती, सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद शाळा व शिक्षण वाचवा अभियान, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना आदी संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला. एवढेच नव्हे तर खुद्द खासदार बळवंतराव वानखडे, अचलपुरचे आमदार प्रवीण तायडे, धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड, शिवसेना नेत्या प्रिती बंड यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी यांनीही सीईओंना पत्र पाठवून आंदोलनाचा समेट घडवण्याची सूचना केली.
महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहरातील झोन क्रमांक १ आणि ५ मध्ये मागील दोन दिवसांपासून साफसफाई आणि कचरा संकलनाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. या गंभीर प्रकारामुळे लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ‘कोणार्क कंपनी’ आणि मनपा प्रशासन यांच्यातील संशयास्पद संगनमतामुळेच शहराची स्वच्छता व्यवस्था कोलमडल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला आहे. या गंभीर समस्येबाबत गुरुवारी (दि. २) काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी विरोधी पक्षनेते विलास इंगोले, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे, नगरसेवक धीरज हिवसे आणि नगरसेविका राजश्री जठाळे यांनी प्रशासनाच्या ढिसाळ धोरणाचा तीव्र शब्दांत निषेध केला. काँग्रेस नेत्यांनी आरोप केला की, प्रशासनाने नवीन कंत्राट देताना अत्यंत अपारदर्शक पद्धतीचा अवलंब केला आहे. यंत्रणा पूर्णपणे सज्ज नसतानाही कोणार्क कंपनीला काम देणे अडचणीचे झाले आहे. काँग्रेस पक्षाने प्रशासनाला ३ एप्रिल २०२६ पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. या कालावधीत स्वच्छता व्यवस्था सुरळीत झाली नाही, तर होणाऱ्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी मनपा प्रशासन आणि कोणार्क कंपनीची असेल. प्रशासनाने आपली जबाबदारी ओळखून कोणार्क कंपनीवर त्वरित कारवाई करावी. पर्यायी व्यवस्था उभी करावी. अन्यथा काँग्रेस पक्ष अत्यंत आक्रमक आंदोलन करेल. असा सज्जड इशारा देण्यात आला आहे. शहरातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मनपा प्रशासनाविरोधात काँग्रेस पक्ष आता गप्प बसणार नाही. हे स्पष्ट करण्यात आले आहे. असेही काँग्रेस नगरसेवकांनी सांगितले आहे. शहराच्या स्वच्छतेचा कंत्राट घेतलेल्या कोणार्क कंपनीने अमरावतीकरांची एकप्रकारे थट्टा चालवली आहे. दोन दिवसांपासून दहापेक्षा अधिक प्रभागांतील सफाई कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे शहरात कचऱ्याचा डोंगर साचला आहे. विशेष म्हणजे, कोणार्क कंपनीसमोर मनपा प्रशासन हतबल असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया काँग्रेससह इतर पक्षांतील काही नगरसेवकांकडून समोर येत आहेत. मोठा गाजावाजा करून या ‘कोणार्क’ कंपनीला तब्बल सात वर्षांसाठी कोट्यवधींचे कंत्राट दिले. ती कंपनी सुरुवातीलाच संकटकाळात मनुष्यबळाची पर्यायी व्यवस्थाही उभी करू शकली नाही. कामगार संपावर गेल्यावर पर्यायी मनुष्यबळ किंवा भांडवल वापरून स्वच्छता राखणे कंपनीचे कर्तव्य होते. मात्र प्रत्यक्षात ही कंपनी तसे करू न शकल्यामुळे नापास ठरत आहे. अतिरिक्त आयुक्तांनी कंपनीच्या असमाधानकारक कामकाजामुळे ५० हजार रुपये दंड ठोठावला असला, तरी अमरावतीकरांना दंडाची रक्कम नको. त्यांना परिसर, शहर, बाजारपेठ स्वच्छ हवे आहेत. कचरामुक्त रस्ते हवे आहेत. अशी अपेक्षा अमरावतीकरांची आहे. ^थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे शहरातील काही प्रभागात दोन दिवसांपासून काम बंद आहे. ही समस्या लवकरच दूर करून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. - डॉ. अजय जाधव, स्वच्छता अधिकारी, मनपा अमरावती. उद्यापासून काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा; पर्यायी व्यवस्था उभी करण्याची मागणी अडचण असल्यामुळे काही प्रभागात काम बंद
महाराष्ट्र शासनाने नुकतीच दिव्यांग सक्षमीकरण विभाग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंढे यांची बदली केली. सचिव म्हणून कार्यरत असतांना राज्यातील खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळून खोट्या दिव्यांगांना चाप बसला होता. खऱ्या दिव्यांगांच्या नावावर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणारे बोगस दिव्यांग व दिव्यांगाच्या नावावर शासकीय अनुदान लाटणाऱ्या बोगस संस्था प्रमुख यांना पायबंद घातला जात होता. परंतु शासनाने अल्पावधीत त्यांची बदली केल्यामुळे राज्यातील दिव्यांगांवर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली असून शासन खऱ्या दिव्यांगांवर अन्याय करणाऱ्यांच्या बाजूने उभे आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. दिव्यांगांचे हक्क मारणाऱ्या बोगस संस्था आणि त्या संस्थानचे प्रमुख यांना संरक्षण शासनाचे वतीने दिले जात आहे का? या प्रश्नाचे उत्तर कोण देणार. दिव्यांगांना हक्काची जाणीव करून त्यांचे सक्षमीकरण करणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली रद्द करावी आणि त्यांना किमान तीन वर्षे याच विभागात कायम ठेवण्याची आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय बरडे, सचिव मो. अजिज तथा से. नि. दिव्यांग कर्मचारी जिल्हाध्यक्ष दिलीप सरदार, रवींद्र सिरसाट, गणेश अत्तरकर, प्रवीण फुले, ओमप्रकाश बरेठी, उपाध्यक्ष सुभाष पिसे, किशोर वानखडे यांच्यासह समविचारी संघटना राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे अध्यक्ष प्रकाश अवचार, दिव्यांग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष सुधीर कडू, दिव्यांग बेरोजगार संघटना अध्यक्ष श्रीकांत देशमुख, पदाधिकारी माधुरी देठे, उज्वला शर्मा, अनुराधा शेंडे, दीपाली रोठे, वंदना चौधरी,शिल्पा वाघमारे, संगीता पाकदाने, भारती मडावी, ज्योती गाडगे, अर्चना अढाऊ आदींसह दिव्यांग उपस्थित होते.
समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि अकोला, अमरावती व बुलडाणा या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले ‘वारी हनुमान' हे तीर्थक्षेत्र सध्या विदर्भातील भाविकांचे मुख्य श्रद्धास्थान बनले आहे. हे छोटेसे गाव आता आपल्या अध्यात्मिक महतीमुळे ‘वारी हनुमान' या नावाने जगप्रसिद्ध झाले आहे. हनुमान जयंतीनिमित्त हे तीर्थक्षेत्र भाविकांच्या गर्दीने फुलले आहे. येथे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमधील भाविकही येतात. गावाच्या आणि मंदिराच्या विकासात लोकसहभागाचा मोठा वाटा आहे. भाविकांनी दिलेल्या देणग्या, लोकवर्गणी आणि शासनाकडून मिळणारा निधी यांच्या माध्यमातून येथे विकासकामे वेगाने सुरू आहेत. भाविकांसाठी निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि परिसराचे सौंदर्यीकरण यावर भर दिला जात आहे. येथे निसर्गाचा अनमोल चमत्कार पाहायला मिळातो. कारणे येथे बारमाही कोमट पाणी असते. वारी हनुमान येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पुरातन चमत्कारी गोमुख. हनुमंत दर्शनासाठी वान नदीचा पूल ओलांडताना या गोमुखाचे दर्शन होते. विशेष म्हणजे, या गोमुखातून वर्षानुवर्षे पाण्याचा ओघ सतत सुरू आहे. या कुंडातून येणारे पाणी नेहमी कोमट असते, हे आजही एक न उलगडणारे कोडे आहे. या कुंडाची खोली किती आहे आणि पाण्याचा स्रोत नेमका कोठून येतो, याचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. भाविक याला हनुमंताचा आशीर्वाद आणि निसर्गाची अनोखी किमया मानतात. या क्षेत्रात केवळ हनुमंताचीच नव्हे, तर प्रभू रामचंद्र, माता सीता आणि लक्ष्मण यांच्याही अत्यंत देखण्या आणि आकर्षक मूर्ती आहेत. मंदिराचा परिसर निसर्गरम्य असून, भैरवगडच्या कुशीत वसलेले हे स्थान मनाला शांती देणारे आहे. केवळ पर्यटनस्थळ नव्हे हातांना बळ देणारे ऊर्जाकेंद्र ^वारी हनुमान केवळ पर्यटनस्थळ नसून लाखो हातांना बळ देणारे ऊर्जाकेंद्र आहे. येथील कोमट पाण्याचे गोमुख विदर्भाचे वैभव आहे. - डॉ. सतीश वाकोडे, तेल्हारा.
कोथळीत महाप्रसादासाठी माकडांची पंगत:हनुमान जयंतीनिमित्त भक्ती, सेवाभावाची दाेन दशकांपासूनची परंपरा
भाविकांकडून हनुमान जन्मोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दर्शनासाठी भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी उसळल्याचे चित्र आहे. सर्वच हनुमान मंदिरांमध्ये गुरुवारी भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे देखील मोठ्या प्रमाणात आयोजन केले होते. बार्शीटाकळी तालुक्यातील कोथळी बुद्रुक येथे निसर्गरम्य, घनदाट वृक्षांच्या सान्निध्यात वसलेल्या मुंगसाजी माऊली संस्थान परिसरात माणसांप्रमाणेच पन्नास ते साठ माकडांनी शिस्तबद्ध पद्धतीने एका रांगेत बसून महाप्रसादाचा आस्वाद घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. ही अनोखी परंपरा पुजारी रामदास महाराज गेल्या वीस वर्षांपासून जपली आहेत. कोथळी बुद्रुक येथील पुजारी रामदास महाराज यांनी हनुमान जन्मोत्सवाच्या पावन पर्वानिमित्त या परिसरात वास्तव्यास असलेल्या वानर सेनेलाच महाप्रसादाचे आमंत्रण दिले. शंभरहून अधिक ताटांमध्ये विविध खाद्यपदार्थ तयार करून ते माकडांच्या चरणी अर्पण करण्यात आले. हनुमान जयंतीला कोथळी बुजरुक येथील मुंगसाजी महाराज संस्थानात दरवर्षी माकडांना खास मेजवानी दिली जाते. माकडांच्या उर्वरित पान ४ महापंगतीसाठी खास मेनू मुंगसाजी महाराज संस्थान येथील रामदास शिंदे महाराज यांच्या पुढाकारातून दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त माकडांसाठी खास पंगत आयोजित केली जाते. या पंगतीत माकडांना आवडणारे चणे, सोयाबीन, गव्हाच्या बिट्ट्या आणि विविध मिष्टान्न पदार्थ वाढले जातात. परिसरातील वानरसेना मोठ्या आवडीने या महापंगतीचा आस्वाद घेतात. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वानरसेना एका रांगेत बसून महाप्रसाद घेतात या मंदिरावर पंचक्रोशीतील भाविक भक्तांची मोठी श्रद्धा आहे. रामनवमी ते हनुमान जयंतीवरस्थान या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी असते. मानव, निसर्गागी नाते सांगणारा उपक्रम ^मानव आणि निसर्गाशी नाते सांगणारा हा उपक्रम मी गेल्या दोन दशकांपासून राबवत आहे. हनुमान जयंतीनिमित्त वानरसेनेची पंगत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. ही पंगत बघण्यासाठी गर्दी उसळत असते. वानरसेना ही हिंदू धर्मांचे संस्कृती समजून उपक्रम राबवत आहे.- रामदास शिंदे महाराज, मुंगसाजी महाराज संस्थान, कोथळी बु. (ता. बार्शीटाकळी)
सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी सध्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने गुरुवारी अनोखे आंदोलन करण्यात आले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी नालीतून गॅस काढण्याचा प्रतिकात्मक उपक्रम राबवला. गटारीत शेगडीची नळी लावून प्रतिकात्मकरित्या पेटवला गॅस पेटवून त्यावर चहा केल्याचे भासवले. या अनोख्या आंदोलनाची शहरात दिवसभर चर्चा होती. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतातही जाणवत असून, गॅस टंचाईची समस्या अधिक तीव्र झाली आहे. शहरी भागात नागरिकांना तब्बल २५ दिवसांनी, तर ग्रामीण भागात ४५ दिवसांनी गॅस सिलिंडर मिळत असल्याचे सांगितले जात आहे. गॅस मिळवण्यासाठी विविध एजन्सीसमोर नागरिकांची मोठी गर्दी होत असून, रोजंदारीवर काम करणाऱ्या लोकांना काम सोडून तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तत्काळ गॅस पुरवठा सुरळीत करावा, तसेच एजन्सीसमोर उभ्या असलेल्या नागरिकांसाठी उन्हापासून संरक्षणाची व्यवस्था करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. यावेळी सरकारच्या निषेधार्थ गटारीतून गॅस सिलिंडरमध्ये गॅस भरल्याचा प्रतीकात्मक प्रयत्न करत अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे महानगराध्यक्ष देवा गावंडे यांनी सांगितले. या आंदोलनाची चर्चा सुरू होती.
‘आमच्या परिसराला आठ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. तो ही जेमतेम एक ते दीडतास. त्यातही अलीकडे गढूळ पाणीपुरवठा होत आहे. वारंवार तक्रारी करुनही निगरगट्ट मनपा पाणीपुरवठा विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. आम्हाला नियमित चार दिवसांआड दोन तास पाणी मिळावे, एवढीच माफक अपेक्षा आहे.’ अशा तक्रारी जुने शहरातील शिवसेना वसाहत, गोकर्णा पार्क, अन्नपूर्णा माता मंदिर परिसर, जाजू नगरसह परिसरातील महिलांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना व्यक्त केल्या. असाच काहीशा तक्रारींचा सूर शहराच्या वाढीव वस्ती भागातील मलकापूर, खडकी, शिवणी परिसरातील नागरिकांचा आहे. याबाबत महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग मात्र, याबाबत काहीही कृती करत नसल्याच्या शहरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. जलवाहिनीच्या विस्ताराचा अभाव, जलकुंभ धुण्याचे काम आदी थातूर मातूर कारणे सांगून महापालिका पाणीपुरवठा विभाग वेळ मारून नेत आहे. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकही या पाणीप्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने नागरिकांचा रोष आेढवून घेत आहेत. विरोधी पक्षांचे नगरसेवक आतापर्यंत झालेल्या प्रत्येक सभेत अनियमित आणि गढूळ पाणीपुरवठ्याची समस्या मांडत आहेत. मात्र, मनपा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्षच केल्याने ही समस्या सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीची होत आहे. मलकापूर, शिवणी, गुडधी, उमरी, शिवर, खडकी, खरप, अकोली आदी वाढीव वस्ती परिसरात गेल्या आठवड्यापासून सहा ते सात दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. टाकी पूर्ण क्षमतेने भरली नाही. कधी लिकेज काढायचे आहेत, अशी वेगवेगळी कारणे सांगून पाणी पुरवठ्याचा दिवस एकेक दिवस पुढे सरकवत आता सहाव्या ते सातव्या दिवशी पाणीपुरवठा केला जात आहे. सरासरी दीड तास पाणी पुरवठा हल्ली केला जात आहे. उन्हाळ्यात कुलर सुरू झाल्याने पाण्याचा वापर वाढला आहे. मात्र महापालिकेने दोन तासाऐवजी दीड तासांवर पाणीपुरवठा आणला आहे, अशी आेरड प्रामुख्याने मलकापूर, उमरी व गुडधी परिसरातील नागरिकांची आहे. मलकापूर, उमरी, गुडधीत अनियमित पाणीपुरवठा दोन ते अडीच तास पाणीपुरवठा व्हावा ^अन्नपूर्णा माता मंदिरामागील गोकर्णा पार्क परिसरात पाचशे ते साडेपाचशे घरांची वस्ती आहे. या भागात पंधरवड्यापासून नळांना ८ ते १० दिवसांआड तेही गढूळ पाणी येत आहे. पुरवठा आता आठ दिवसांवर गेला आहे. केवळ एक ते दीड तास पाणी मिळते. दोन ते अडीच तास शुद्ध पाणीपुरवठा व्हावा. - प्राजक्ता देशमुख, गृहिणी, गोकर्णा पार्क, जुने शहर. काटेपूर्णात ३७.९०% जलसाठा शिल्लक शहरात गेल्या आठवड्यात ४२ अंशांपर्यंत तापमान गेले होते. उन्हाळ्याच्या प्रारंभीच जिल्ह्यातील लहान मोठ्या २९ धरणातील साठा ४६ टक्क्यांवर आला तर शहरासह ६४ खेडी गावांची तहान भागवणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात आजच्या स्थितीत २ एप्रिलला ३२.७३ दलघमी म्हणजे ३७.९० टक्केच शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने जिल्ह्यातील धरणांचा साठा वेगाने कमी होत आहे. गेल्या चार दिवसात काटेपूर्णाचा जलसाठा एक टक्क्याने कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचे सावट जाणवणार, अशी चिन्हे एप्रिलच्या प्रारंभीच दिसू लागली आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचे अधिकार प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काढून घेतल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्षांनी केला आहे. हे अधिकार तत्काळ पूर्ववत करण्याची मागणी जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांची समक्ष भेट घेऊन केली आहे. गुरुवारी, दुपारी जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्षांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे आदी उपस्थित होते. नगरपालिकेच्या आर्थिक धोरणावर आणि खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी नमुना क्रमांक ६४ या फॉर्मवर नगराध्यक्षांची स्वाक्षरी असणे अनिवार्य असते. २०१६ ते २०२१ या काळात हे अधिकार नगराध्यक्षांकडे होते आणि त्यांच्या सहीशिवाय चेक (धनादेश) तयार होत नसतं. मात्र, मध्यंतरीच्या काळात नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त असल्याने सर्व निर्णय प्रक्रियेतून लोकसहभाग नाहीसा झाला. आता निवडणुका होऊन लोकनियुक्त प्रतिनिधी सत्तेत आले असतानाही प्रशासकीय अधिकारी नमुना ६४ वर नगराध्यक्षांना स्वाक्षरी करू देत नसल्याचे नगराध्यक्षांचे म्हणने आहे. सध्या ठराव घेणारा, काम करून घेणारा आणि चेकवर सही करणाराही शासन नियुक्त अधिकारीच आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पारदर्शकता संपली असून लोकनियुक्त प्रतिनिधी केवळ नामधारी उरले आहेत. जर हे अधिकार अबाधित ठेवले नाहीत, तर भविष्यात नगराध्यक्ष आणि प्रशासन यांच्यात मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. असे मत रमेश बारसकर यांनी व्यक्त केले.
दक्षिण मुखी मंदिरात बजरंगबलीचा पाळणा:सकाळी विधिवत पूजा, महाभिषेक, लघुरुद्र महाप्रसादाचे केले वाटप
तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहर व परिसरात गुरुवारी सकाळी महापूजा, लघुरुद्र, महाभिषेक, महाप्रसाद अशा धार्मिक कार्यक्रमांसोबत भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हनुमान मंदिर परिसरात भाविकांची भल्या सकाळपासूनच गर्दी झाली होती, तर ठिकठिकाणच्या हनुमान मंदिरातही भक्तजनांची रीघ लागली होती. हनुमान जयंतीनिमित्त बहुतांश मंदिरे आकर्षक रोषणाईने सजविण्यात आली. यानिमित्त हनुमान मूर्तीची विधिवत पूजा व हनुमान याग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील दिशा विहार येथील श्री वटवृक्ष दक्षिण मुखी हनुमान मंदिरात वेदमूर्ती गुड्यया स्वामी यांच्या विविध मंत्रोप्चाराने हनुमान जन्मसोहळा( पाळणा ), लघुरुद्र, भजन सेवा आदींचा समावेश होता. पाळणा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती शिंदे, अलका दसले, उज्ज्वला गुरव, चंद्रकला हत्ते, विजयालक्ष्मी कुंभार, श्रीदेवी गुरव, कलावती रोळी, रुपाली कोरे, आरती आळंद, अनिता कुंभार, स्वामी, आदींनी परिश्रम घेतले. शहरातील दिशा विहार येथील श्री वटवृक्ष दक्षिण मुखी हनुमान मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले. या मंडळातर्फे हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला. मधला मारुती येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर, सेन्ट्रल चौक हनुमान मंदिर, नवीन राजवाडा चाळ हनुमान मित्रमंडळ व खासबाग गल्ली हनुमान जयंतीनिमित्त हनुमान जन्मोत्सव, सामूहिक हनुमान चालिसा पठण, महाप्रसाद वाटप, दूध वाटप, भक्तिसंगीत असे विविध कार्यक्रम झाले. पागा चाळ आवारातील जुने मारुती मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच मंदिरात दिवसभर दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. शहराप्रमाणे तालुक्यातही हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. गौडगाव, चपळगाव, सलगर, दुधनी, मैंदर्गी, नागणसूर, जेऊर, तडवळ, वागदरी, उडगी, तोलनुर, हंजगी, बादोला व परिसरात हनुमान जयंतीनिमित्त हनुमान मंदिरात शोभायात्रा, महाआरती, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री वटवृक्ष हनुमान मंदिरात महाप्रसाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख चंद्रकांत दसले, रमेश शिंदे, दिगंबर शिंदे, वेदेश गुरव, माजी सैनिक अनिल हत्ते आदींनी परिश्रम घेतले. शोभायात्रा, महाआरती
कुर्डुवाडी इराण आणि इस्रायलमधील युद्धाची झळ आता थेट गावखेड्यातील घरापर्यंत पोहोचली आहे. बाजारपेठेत याची दाहकता स्पष्टपणे दिसत आहे. व्यावसायिक गॅस बंद झाल्यामुळे छोट्या व्यावसायिकांनी थेट चुली पेटवल्या आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या किमती वाढल्यामुळे तेल कंपन्यांनी नोंदणीकृत घरगुती गॅस दर स्थिर ठेवले आहेत. पण व्यावसायिक गॅस सिलिंडर माढा तालुक्यात पूर्णपणे बंद केल्यामुळे तालुक्यासह कुर्डुवाडीतील हॉटेल व्यावसायिकांना गॅसला पर्याय शोधावा लागत आहे. काहींनी चुली पेटवल्या आहेत.तर काहींनी हॉटेलमधील पदार्थांमध्ये कपात केली आहे. कुर्डुवाडीतील अहिल्यादेवी बाल उद्यान परिसरातील पावभाजी, वडापाव, फास्ट फूड गाडीवाल्या व्यावसायिकांनी गॅसऐवजी चुलीचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे ग्राहकांना सेवा देताना विलंब होत आहे. राज्य सरकारने गॅस व इंधनबाबत कोणतीच कपात नसल्याचा दावा केला. पण कुर्डुवाडीतील शासन निर्णयाविरुद्ध परिणाम पाहावयास मिळत आहे. यामुळे शहरातील हॉटेल व्यावसायिक आणि खानावळींना चंगलाच फटका बसला आहे. परिणामी येणाऱ्या काही दिवसात हॉटेलमधील जेवण आणि बाहेरचे खाद्यपदार्थ महाग होण्याची शक्यता आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या मध्यमवर्गीय नागरिक गॅसमुळे दुहेरी संकटात सापडला आहे. आता परिस्थिती आटोक्यात आली असून, शहरी बुकिंग २५ दिवसाचा आणि ग्रामीण भागाचा ४५ दिवसाचा ग्याप ठेवण्यात आला आहे. दि. १२ मार्च रोजी काँग्रेस शहराध्यक्ष फिरोज खान यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनी गॅस टंचाईबाबत निवेदन दिले होते. बुकिंग केल्यानंतर ४५ दिवसांत गॅस स्टोव्ह, इंडक्शनला मागणी वाढली माढा तालुक्यामध्ये सध्या नागरिक गॅस टंचाईबाबत भयभीत होऊन नंबर लावण्यासाठी ऑनलाइन गडबड करत होते. नियमित गॅसपुरवठा एजन्सीकडून बुकिंग करताच एका तासात गॅस मिळत होता. पण गॅस टंचाईच्या अफ़वामुळे गॅस बुकिंग केल्यानंतर तीन दिवसावरून आता थेट २५ दिवसांनी शहरी आणि ग्रामीणमध्ये ४५ दिवसांत ग्राहकांपर्यंत पोहोचणार असल्यामुळे नागरिक अन्य स्त्रोताकडे वळत आहेत. यामुळे पुन्हा चूल, स्टो, इंडक्शन यांची मागणी बाजारात वाढत आहे. हॉटेलमध्ये घरगुती गॅस आढळल्यास कारवाई तालुक्यात ७ गॅस एजन्सी एकूण ९१,४९४ घरगुती तर १,२४९ व्यावसायिक ग्राहक सध्या व्यावसायिक गॅस वितरण पूर्णपणे बंद असल्यामुळे हॉटेल व्यवसायिकांना गॅसऐवजी चुलीचा वापर करावा लागत आहे. माढा तालुक्यात एचपी भारत गॅस आणि इंडेन गॅसचे एकूण ९१,४९४ घरगुती ग्राहक आहेत. त्याचबरोबर व्यावसायिक ग्राहक १,२४९ असून, सात गॅस एजन्सी गॅस वितरण व्यवस्था सांभाळतात. तालुक्यात एक एचपी गॅस एजन्सीचे १६,१७८ घरगुती, एचपी व्यावसायिक ग्राहक आहेत. तर भारत गॅस कंपनीचे चार एजन्सी असून ६२ हजार २९४ घरगुती आणि ९२८ व्यावसायिक ग्राहक आहेत. दोन इंडेन गॅस एजन्सीचे १२,३४२ तर १०५ व्यावसायिक ग्राहक आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये घरगुती गॅस टाकी आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तालुक्यात भारारी पथके नेमली असून, स्वतः तालुका पुरवठा अधिकारी पवार यांच्यासह अन्य अधिकारी यावर लक्ष ठेवून असतील.
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या नियोजित पाच मजली महाप्रसादगृहाचे काम प्रगतिपथावर असून, त्या कामाची प्रत्यक्ष पाहणी शुक्रवारी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्याकडून करण्यात आली. वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे. ही इमारत वातानुकुलित असून, बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट आहे. टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर मूर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या नवीन नियोजित महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था आहे. या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यावेळी मंडळाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, सचिव श्यामराव मोरे, ओंकारेश्वर उटगे, प्रशांत खेडकर, योगेश अहंकारी, अमित थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती. श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर मूर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या नवीन नियोजित महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था आहे.
शहरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त पारंपरिक कावड मिरवणूक काढली. यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले. श्रीराम मंदिर परिसरातील हनुमान मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे श्रीराम मंदिरात भाविकांनी हनुमान चालिसा पठण केली. यावेळी ‘बोल बजरंग बली की जय’ आणि ‘जय हनुमान'च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. श्रीराम मंदिर, अहिल्यादेवी चौक, गणेश चौक, पाटील गल्ली, शिंपी गल्ली, टिळकरोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बाजारपेठमार्गे कावड यात्रा काढण्यात आली. नांदूरमधमेश्वर येथील गोदावरी नदीतून भाविकांनी आणलेल्या पवित्र जलाने हनुमान मूर्तीला जलाभिषेक करण्यात आला. किल्ला परिसरात महिलांनी कावडधारकांचे विधीवत पूजन केले. याप्रसंगी श्रीराम मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, हनुमान भक्तमंडळ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लासलगाव रेल्वे स्टेशन परिसरातील हनुमान मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. उत्सवानंतर सायंकाळी येथे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. लासलगाव शहरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त कावड मिरवणुकीत सहभागी झालेले भाविक. संत नामदेव मंदिरात सोहळा शहरातील श्री संत नामदेव मंदिरातही पहाटे हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. यानिमित्त ऋषी टापसे यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. याप्रसंगी समाजाचे अध्यक्ष मोहित बकरे, अरविंद टापसे, अनिल बकरे, अशोक क्षीरसागर, सुधीर झांबरे समाजबांधव उपस्थित होते.
नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करा:शिवसेना उबाठा पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन
बागलाण तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि भीषण गारपिटीमुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे शासनाने कोणतेही निकष न लावता सरसकट पंचनामे करावेत आणि तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे व शहरप्रमुख रविंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यातील अवकाळीग्रस्त गावांमध्ये कांदा, गहू, डाळिंब, टोमॅटो, द्राक्ष, शेवगा, टरबूज आणि कांदा बियाण्यांच्या डेंगळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने उन्हाळी कांद्याला किमान २,५०० ते ३,००० रुपये प्रति क्विंटल दर देऊन खरेदी करावी, तसेच यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान तातडीने जाहीर करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई न मिळाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहरप्रमुख रविंद्र सोनवणे यांनी यावेळी दिला. अस्मानी संकटामुळे बळीराजा आधीच खचलेला असताना प्रशासनाने पंचनाम्यांत दिरंगाई करू नये, असेही त्यांनी नमूद केले. निवेदन देताना राजनसिंग चौधरी, सुमित सोनवणे, राजेंद्र खानकरी, शरद शेवाळे, कारभारी पगार आदींसह पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
बालविवाह रोखण्यासाठी समुपदेशन गरजेचे:चांदवड न्यायालयामध्ये अॅड. संग्राम थोरात यांचे प्रतिपादन
बालविवाह मुळापासून रोखण्यासाठी केवळ कायदा पुरेसा नाही, तर पालकांचे समुपदेशन आणि सामाजिक स्तरावर मोठी जनजागृती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अॅड. संग्राम थोरात यांनी केले. तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदेविषयक प्रबोधन शिबिरात ते बोलत होते. यावेळी बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी आणि शिक्षेबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस. एस. छल्लाणी होते, तर सहदिवाणी न्यायाधीश व्ही. डी. सुंगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅड. थोरात यांनी १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुलगी आणि २१ वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा यांचा विवाह लावणे हा गंभीर गुन्हा आहे. असा विवाह ठरवणारे, लग्न लावणारे आणि लग्नाला उपस्थित असणारे सर्वजण या कायद्यांतर्गत गुन्हेगार ठरतात. यात दोन वर्षांची शिक्षा किंवा एक लाख रुपये दंडाची तरतूद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. भैय्यासाहेब पटेल यांनी शिबिराच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. शिबिराचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अॅड. पंकज काळे यांनी केले. या शिबिरास चांदवड वकील संघाचे सदस्य, महिला व पुरुष पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकअदालतीचे महत्त्व याप्रसंगी न्यायाधीश एस. एस. छल्लाणी यांनी 'वैकल्पिक वाद निवारण पद्धती' यावर मार्गदर्शन केले. मध्यस्थी केंद्राच्या माध्यमातून वाद मिटवल्यास पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचतो, असे सांगून त्यांनी दि. ८ एप्रिल रोजी चांदवड न्यायालयात आयोजित 'फिरत्या लोकअदालतीत' जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटविण्याचे आवाहन केले.
येथील श्री रेणुका देवी मंदिरात चैत्रोत्सवानिमित्त गुरुवारी (दि.२) श्रींच्या मुखवट्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांचा गजर आणि ‘आई राजा उदो उदो'च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. रंगमहालातून पालखीने मंदिरात आणलेले हे मुखवटे विधीवत पूजेनंतर देवीच्या मूर्तीवर चढविण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. चैत्र पौर्णिमेनिमित्त पहाटे ५ वाजता नितीन चांदवडकर व नाना सानप यांच्या हस्ते श्री रेणुका मातेचा महाअभिषेक व महापूजा करण्यात आली. उत्सवानिमित्त देवीला पैठणी परिधान करून गाभारा फुलांनी सजविण्यात आला होता. दुपारी १२ वाजता नैवेद्य आरती आणि सायंकाळी ७: ३० वाजता महाआरती पार पडली. यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे व्यवस्थापक एम. के. पवार, सहाय्यक व्यवस्थापक सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहित हरेंद्र वैद्य, अमोल कुलकर्णी, विजय जोशी आदींसह श्री रेणुका देवी सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगांचे योग्य नियोजन करण्यात आल्याने दर्शन व्यवस्था अतिशय सुलभ व शिस्तबद्ध झाली होती. तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने भाविकांसाठी थंड पाणी आणि महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास झालेल्या भजनाच्या कार्यक्रमाने संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर आणि कळसावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासनाने मोठा शामियाना उभारला होता. यावेळी भाविकांना नितीन चांदवडकर व नाना सानप यांच्यातर्फे बुंदी-मसालेभात, साबुदाणा खिचडी आणि केळीचे वाटप करण्यात आले. तसेच मोनू अग्रवाल व पप्पू भालेराव यांनी मठ्ठा वाटप केले, तर श्री महावीर जैन सेवा केंद्रातर्फे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
व्यावसायिक गॅस सिलिंडर त्वरित उपलब्ध करून द्या:मनमाड येथील हॉटेल चालकांची मागणी
शहरात कमर्शियल गॅस सिलेंडरची मोठी टंचाई निर्माण झाली असून, यामुळे हॉटेल, केटरिंग आणि खाद्यपेय व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. गॅस अभावी व्यवसाय ठप्प होण्याची भीती व्यक्त करत, शासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. गॅस मिळत नसल्याने अनेकांना लाकूड, डिझेल व इलेक्ट्रिक भट्ट्यांचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. याचा थेट परिणाम खाद्यपदार्थांच्या चवीवर आणि उत्पादन खर्चावर होत असल्याची खंत व्यावसायिकांनी व्यक्त केली. या प्रश्नी तहसीलदार तसेच तलाठी विशाखा गोसावी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात करण्यात आले. तसेच आमदार सुहास कांदे यांनी या प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. या बैठकीस शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, फुले-शाहू-आंबेडकर मंचचे फिरोज शेख, गुरुदीप सिंग कांत, रेवाशेठ मोटवानी, नितीन पाटील आदींसह शहरातील हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. असोसिएशनची स्थापना यावेळी मनमाड शहरातील हॉटेल व खाद्यपेय व्यावसायिकांची नवी संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदी आशिष भंडारी तर सचिवपदी हेमंत गांगुर्डे यांची निवड करण्यात आली.
अहिंसेचा मार्गच जगाला तारक:उमराणे येथे विचारसभेत आमदार राहुल आहेर यांचे प्रतिपादन
सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात भगवान महावीरांनी दिलेला अहिंसेचा मार्गच जगासाठी तारक आहे. जैन समाज हा समाजात दुधात साखरेसारखा मिसळला असून, ज्या-ज्या ठिकाणी हा समाज व्यापाराच्या निमित्ताने गेला, तिथे त्यांनी समृद्धी आणली आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. उमराणे येथे भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त आयोजित विचारसभेत ते मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते. महोत्सवाच्या प्रारंभी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथातून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेत जैन बांधवांनी अहिंसा परमो धर्म की जय, भगवान महावीर की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मिरवणुकीनंतर जैन स्थानकात संघपती शांतीलाल मोदी यांच्या अध्यक्षतेखाली विचारसभा झाली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे यांनी भगवान महावीरांची अहिंसा परमो धर्म, क्षमा विरस्य भूषणम्, ही तत्त्वे जगाला सुख-शांती देणारी असल्याचे सांगितले. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांनीही महावीरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी संघपती शांतीलाल मोदी, माजी सभापती विलास काका देवरे, सभापती देवानंद वाघ, दीपक निकम, सचिन देवरे आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदापाठोपाठ आता विषय समिती सभापती निवडीतही भाजपने आपला राजकीय वरचष्मा सिद्ध केला आहे. बहुमताचे गणित अत्यंत चतुराईने जुळवल्यामुळे सभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यामध्ये भाजपने आपल्या दोन महिला सदस्यांसह मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि सचिन गरड या अपक्ष समर्थकाला संधी देऊन सत्तेचे समतोल राखला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना आणि उबाठाचे सदस्य गैरहजर राहिले. सभापतिपदी भाजपच्या मीनाक्षी पवार आणि अनिता मोटे यांची निवड झाली आहे. तसेच सत्तेला सुरुंग लागू नये म्हणून भाजपने शब्द दिल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) बालाजी सोनटक्के यांनाही सभापती पद दिले आहे. विशेष म्हणजे भाजप पुरस्कृत अपक्ष सदस्य सचिन गरड यांनाही या सत्तेत वाटा मिळाला आहे. पक्षीय बलाबल - एकूण जागा ६३ {भाजप - २३ {शिवसेना - २१ { उबाठा - ०९ {राष्ट्रवादी अजित पवार - ०४ {राष्ट्रवादी शरद पवार - ०१ { प्रहार - १ {काँग्रेस - ०१ (भाजपमध्ये प्रवेश) { इतर - ०३ विरोधकांची ऐनवेळी माघार महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील डोणगावकर आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून गीतांजली वरुण पाथ्रीकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले होते. मात्र, भाजपचे भक्कम संख्याबळ आणि अपक्षांची मिळालेली साथ पाहून विरोधकांनी निर्धारित वेळेत अर्ज दाखल केले नाहीत. परिणामी, निवडणूक बिनविरोध झाली. पीठासीन अधिकारी यांनी सर्व ३१ उपस्थित सदस्यांच्या सह्या घेतल्या. त्यानंतर दाखल अर्जांपैकी मीनाक्षी पवार यांची महिला बालविकास सभापतिपदी तर बालाजी सोनटक्के यांची समाज कल्याण सभापतिपदी निवड झाली आहे. उर्वरित दोघांना सर्वसाधारण सभेत पद वाटप करण्यात येणार आहे. १ खासदार, ६ आमदार तरी शिवसेना जिल्हा परिषदेत विरोधी पक्षात : कालपर्यंत दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजपला रोखण्यासाठी ‘फील्डिंग' लावत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपची रणनीती शिवसेनेवर भारी पडली. १ खासदार आणि ६ आमदार असूनही शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. येत्या काळामध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसणार आहे. या विजयामुळे ग्रामीण भागातील भाजपची पकड अधिक घट्ट झाली असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे. जिल्हा परिषदेत सभापती निवडणूक पार पडली. या वेळी विविध मान्यवर.
खुलताबाद भद्रा मारुती हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास अत्यंत भक्तिभावाने व धार्मिक विधींनी महापूजा, अभिषेक व महाआरती पार पडली. मंदिर परिसरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. यंदा सहा लाखांच्या वर भाविकांनी भद्रा मारुतीचे दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी सुमारे पाच लाख भाविकांनी दर्शन घेतले होते, अशी माहिती माहिती भद्रा मारुती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू बारगळ, जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी दिव्य मराठीला दिली. संस्थानतर्फे महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हजारो भाविकांनी शिस्तबद्ध रांगेत महाप्रसादाचा लाभ घेतला. यंदा ११ क्विंटल मसाले भात, १३ क्विंटल बुंदी असा २४ क्विंटल महाप्रसाद वाटण्यात आला. मंदिरात मंत्री अतुल सावे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू बारगळ, कचरू बारगळ, रामनाथ बारगळ, योगेश अवचट व राम मोदाळे यांच्या हस्ते विधी पार पडले. सकाळी सहा वाजता हनुमान महाआरती उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. मंदिरात महापूजा, महाआरती करताना पदाधिकारी, दुसऱ्या छायाचित्रात दर्शनासाठी लागलेली भाविकांची रांग. फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पायी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि अन्नदात्यांकडून अनेक ठिकाणी फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. केळी, शाबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू, चहा, शरबत तसेच इतर उपवासाचे पदार्थ भाविकांना मोफत वितरित करण्यात आले. भद्रा मारुती मूर्तीच्या भव्य सजावटीने वेधले लक्ष संदीप मुळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रा मारुती मूर्तीची अत्यंत देखणी व आकर्षक सजावट करण्यात आली होती. झेंडू, गुलाब, मोगरा आदी विविध फुलांच्या आरासेमुळे मूर्ती अधिकच तेजस्वी व दिव्य भासत होती. रंगीबेरंगी फुलांच्या माळा, आकर्षक वस्त्रे तसेच पारंपरिक अलंकारांनी मंदिराचा संपूर्ण परिसर सजवण्यात आला होता.
अवकाळी पावसामुळे दुचाकीच्या चाकात चिखल अडकला होता. रस्त्याच्या कडेला उभे राहून चिखल काढत असताना रस्त्याच्या कामावरील सिमेंट मिक्सर वाहनाने रिव्हर्स घेतला. दुचाकीसह भाऊसाहेब शेजूळ यांना तब्बल ५० फूट ओढत नेले. त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू झाला. मुलगी शिवानी गंभीर जखमी झाली. घटना हनुमान जयंतीच्या दिवशी गुरुवारी सकाळी ८ वाजता वैरागड येथील पुलाजवळ घडली. भाऊसाहेब किसनराव शेजूळ (रा. राजुरा, ता. गंगापूर) यांचा मृत्यू झाला. मुलगी शिवानी भाऊसाहेब शेजूळ हिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भाऊसाहेब सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे दूध टाकून आले. त्यानंतर शिवानीला क्लासला सोडण्यासाठी लासुर स्टेशनकडे मोटारसायकल (एमएच २० एफएस ६८६१ वरून निघाले. बुधवारी रात्रीच्या अवकाळी पावसामुळे रस्त्यावरील चिखल चाकात गुंतला. त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली. काडीने चिखल काढत होते. गावकरी झाले संतप्त घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी पोहोचले. संताप व्यक्त केला. शिल्लेगाव पोलिसांनी धाव घेतली. भाऊसाहेब यांना गंभीर अवस्थेत लासूर स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी आर्थिक व्यवहार करून जिल्हा परिषद सभापतींच्या निवडणुकीत सदस्यांना तटस्थ राहण्याचे आदेश दिले, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य कृष्णा डोणगावकर यांनी केला आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वीच अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीवेळीही दानवे यांच्यावर १८ कोटींच्या सौदेबाजीचा आरोप झाला होता, त्यापाठोपाठ आता पुन्हा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे २३, शिंदेसेनेचे २१ सदस्य विजयी झाले होते, उबाठाकडे ९ सदस्य होते. सभापती निवडीवेळी शिंदेसेना आणि उबाठाने एकत्र येत भाजपला धक्का देण्याची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी मातोश्रीचा हवाला देत सदस्यांना तटस्थ राहण्याचे निर्देश दिले. यामुळे संतापलेल्या डोणगावकर यांनी दानवे यांच्यावर थेट हल्ला चढवला. दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतली आणि भाजपला मदत करण्यासाठी हा सर्व बनाव रचला, असा दावा डोणगावकर यांनी केला. पैशाचे आरोप बिनबुडाचे माझी आणि शिंदे यांची बैठक झालेली नाही. आमचे संख्याबळ केवळ ९ असल्याने आमचा अध्यक्ष किंवा सभापती होण्याचा प्रश्नच नव्हता. पक्षप्रमुख ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला गेला. मी केवळ आदेशाचे पालन केले. पैशाचे आरोप आरोप केले त्यांनाच त्याचे पुरावे मागावेत. - अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, उद्धवसेना उबाठाला मिळणार होते उपाध्यक्ष, सभापतिपद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीवेळी दानवे यांनी सदस्य संजय निकम आणि सोनवणे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना निकम यांनी, दानवे यांनीच आमचा १८ कोटींत शिंदेसेनेसोबत सौदा केला, असा पलटवार केला होता. सभापती निवडणुकीत ठाकरे सेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेसोबत चर्चेमध्ये उद्धवसेनेला उपाध्यक्ष आणि एक सभापतिपद देण्याचे मान्य करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदांपाठोपाठ आता विषय समिती सभापती निवडीतही भाजपने आपला राजकीय वरचष्मा सिद्ध केला आहे. बहुमताचे गणित अत्यंत चतुराईने जुळवल्यामुळे सभापतिपदांची निवडणूक बिनविरोध पार पडली. यामध्ये भाजपच्या दोन महिला सदस्यांसह मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि सचिन गरड या अपक्ष समर्थकाला भाजपने संधी देऊन सत्तेचे समतोल राखला आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना आणि उबाठाचे सदस्य गैरहजर राहिले. सभापतिपदी भाजपच्या मीनाक्षी पवार आणि अनिता मोटे यांची निवड झाली आहे. सत्तेला सुरुंग लागू नये म्हणून भाजपने शब्द दिल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) बालाजी सोनटक्के यांनाही सभापतिपद दिले आहे. विशेष म्हणजे भाजप पुरस्कृत अपक्ष सदस्य सचिन गरड यांनाही या सत्तेत वाटा मिळाला आहे. मीनाक्षी पवार यांची महिला व बालविकास सभापतिपदी, तर बालाजी सोनटक्के यांची समाजकल्याण सभापतिपदी निवड झाली आहे. उर्वरित दोघांना सर्वसाधारण सभेत पद वाटप करण्यात येणार आहे. दुपारी दोननंतर या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. पीठासीन अधिकारी संतोष गोरड यांनी सकाळी १० ते १२ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले. सकाळी ६ अर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र त्यापैकी फक्त ४ अर्ज दाखल झाले. ...अखेर शिवसेना विरोधी पक्षात कालपर्यंत दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजपला रोखण्यासाठी ‘फील्डिंग’ लावत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत भाजपची रणनीती शिवसेनेवर भारी पडली. १ खासदार आणि ६ आमदार असूनही शिवसेनेला जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. येत्या काळामध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसणार आहे. या विजयामुळे ग्रामीण भागातील भाजपची पकड घट्ट होईल. अविश्वासाच्या सावटामुळे मित्रांना संधी जिल्हा परिषदेत कोणत्याही पक्षाचे बहुमत नाही. भाजपला ९ तर शिवसेनेला ११ सदस्य कमी पडतात. भाजपने राष्ट्रवादी अजित पवार, प्रहार, अपक्ष यांच्या साथीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्षपद मिळवले. अविश्वास ठराव येण्याची शक्यता विचारात घेऊन भाजपने ४ पैकी २ सभापतिपदे स्वत:कडे ठेवली. एक पद राष्ट्रवादीला व एक अपक्षाला दिले. अविश्वासाच्या सावटामुळे इतरांना सत्तेत वाटा दिल्याचे मानले जाते. ऐनवेळी विरोधकांची माघार महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील डोणगावकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाकडून गीतांजली वरुण पाथ्रीकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले होते. मात्र, भाजपचे भक्कम संख्याबळ आणि अपक्षांची मिळालेली साथ पाहून विरोधकांनी निर्धारित वेळेत अर्ज दाखल केले नाहीत.

28 C