SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

27    C
... ...View News by News Source

हिंगोली, वसमतमध्ये उपनगराध्यक्ष पदाचा तिळगुळ कोणाला मिळणार?:पहिली सभा शुक्रवारी, कळमनुरीत शिवराज पाटील यांची वर्णी

हिंगोली पालिकेची पहिली सर्व साधारण सभा शुक्रवारी ता. १६ रोजी होणार असून उपनगराध्यक्षपदाची तिळगुळ कोणाला मिळणार याची उत्सूकता राजकिय वर्तुळाला लागली आहे. तर दुसरीकडे कळमनुरीत शिंदेसेनेचे शिवराज पाटील यांची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हिंगोली, कळमनुरी पालिकेवर शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वात शिंदेसेनेची एकहाती सत्ता आली असून वसमत येथे राष्ट्रवादीचे आमदार राजेश नवघरे यांनी राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवून देत पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला आहे. त्यानंतर आता पालिकेमध्ये उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार तसेच स्विकृत सदस्य पदी कोणाची निवड करायची याबाबत राजकिय हालचाली गतीमान झाल्या होत्या. दरम्यान, कळमनुरी पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा मंगळवारी ता. १३ नगराध्यक्षा आश्‍लेषा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यासभेत उपनगराध्यक्षपदी शिवराज पाटील यांची निवड होण्याचे संकेत आहेत. या शिवाय स्विकृत सदस्यासाठी शिंदेसेनेचे १३ व राष्ट्रवादीचे चार असे सदस्य सोबत घेतले जाणार असून या ठिकाणी शिंदेसेनेचे दोन स्विकृत सदस्य होणार आहेत. त्यासाठी बबलू पत्की, आयाज पठाण यांची निवड निश्‍चित मानली जात असून आमदार संतोष बांगर यांनी या नावांना हिरवा कंदील दाखविल्याचे सुत्रांनी सांगितले. या सोबतच हिंगोली पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा रेखा बांगर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी ता. १६ होणार आहे. यावेळी उपनगराध्यक्षांची निवड केली जाणार आहे. पालिकेत शिंदेसेनेचे १७ नगरसेवक असून राष्ट्रवादीचे (अजित पवारगट) १०, भाजपा पाच तर काँग्रेसचे दोन सदस्य आहेत. त्यामुळे या ठिकाणीही आमदार बांगर कोणाच्या नावाला पसंती देणार याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र त्यानंतरही उपनगराध्यक्षपदासाठी माबूद बागवान यांचेच नांव आघाडीवर आहे. तर स्विकृत सदस्यपदासाठी अनिल नेनवाणी, बापुराव बांगर यांचे नांव आघाडीवर आहे. वसमत नगर पालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी ता. १५ नगराध्यक्षा सुनीता बाहेती यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या पालिकेत राष्ट्रवादीचे १६, काँग्रेस ४, भाजपा ४, शिंदेसेना २, ठाकरेगट २ व इतर दोन असे संख्या बळ आहे. उपनगराध्यक्षपदासाठी आमदार राजेश नवघरे कोणाला पसंती देतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 11:07 am

संभाजीनगरच्या भावी नगरसेवकांनो खबरदार:निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हायकोर्ट कठोर; 2,740 कोटींच्या योजनेचे काम थांबवू नका, नवनियुक्त लोकप्रतिनिधींना थेट इशारा

छत्रपती संभाजीनगर शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 2,740 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणूक प्रक्रियेनंतर नव्याने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी या योजनेच्या कामात कोणताही हस्तक्षेप करू नये, असा स्पष्ट आणि ठाम इशारा न्यायालयाने दिला आहे. निवडणूक निकालानंतर लोकनियुक्त मंडळ महापालिकेचा कारभार हाती घेणार असले तरी, या दरम्यान सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी न्यायालयाने आधीच सावधगिरीचा इशारा दिला आहे. या संदर्भातील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पार पडली. न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, या योजनेच्या कामात कोणत्याही स्वरूपाचा अडथळा सहन केला जाणार नाही. जाणूनबुजून कामात व्यत्यय आणणे हे थेट न्यायालयाचा अवमान मानले जाईल. अडथळा निर्माण करणारी व्यक्ती कोणत्याही पदावर किंवा हुद्द्यावर असली, तरी तिच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असा अत्यंत कठोर इशाराही न्यायालयाने यावेळी दिला. या स्पष्ट भूमिकेमुळे प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, या भव्य पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 3,700 अश्वशक्तीचे तीन मोठे पंप बसविण्यात येणार आहेत. यापैकी एक पंप आधीच बसवण्यात आला असून, त्याची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. मात्र जॅकवेलसह 2,500 मिमी व्यासाच्या जलवाहिनीत वेल्डिंग प्रक्रियेतून निर्माण झालेला कचरा आणि साचलेला गाळ मोठ्या प्रमाणावर आढळून आला आहे. हा गाळ आणि कचरा काढण्यासाठी पंप सतत चालू ठेवावा लागणार असून, एक पंप सुरू ठेवल्यास ही प्रक्रिया सुमारे एका महिन्यात पूर्ण होईल, तर दोन पंप वापरल्यास ती सुमारे 18 दिवसांत पूर्ण होऊ शकते, अशी माहिती जीव्हीपीआर कंपनीने न्यायालयाला दिली. योजनेतील पायाभूत कामांबाबतही न्यायालयात सविस्तर माहिती देण्यात आली. 2,500 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच जॅकवेलच्या ‘ए पोर्शन’चा स्लॅबही पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. मात्र, शहरातील अंतर्गत जलवाहिन्यांचे काम अजून मोठ्या प्रमाणावर अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले. एकूण 15 झोनपैकी पहिल्या टप्प्यातील 120 किलोमीटर आणि दुसऱ्या टप्प्यातील 237 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांचे काम अद्याप शिल्लक आहे. या कामासाठी सुमारे एक हजार कामगारांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात केवळ 500 कामगार सध्या कार्यरत असल्याची बाब सुनावणीदरम्यान समोर आली. त्यामुळे कामाच्या गतीवर परिणाम होत असल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट झाले. याशिवाय, या पाणीपुरवठा योजनेतील एकूण 53 जलकुंभांपैकी आतापर्यंत केवळ नऊ जलकुंभांचेच काम पूर्ण झाले असल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित जलकुंभांचे काम वेगाने पूर्ण करण्याची गरज असल्याचेही या सुनावणीत अधोरेखित झाले. आर्थिक बाबींविषयी माहिती देताना महापालिकेच्या वतीने अ‍ॅड. संभाजी टोपे यांनी सांगितले की, शासनाकडून कर्ज स्वरूपात मिळालेले 822 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने आणि कामाच्या प्रगतीनुसार संबंधित कंपनीला अदा करण्यात येत आहेत. जीव्हीपीआर कंपनीने जीवन प्राधिकरणाकडे सादर केलेली बिले तपासून ती महापालिकेकडे पाठवली जातात. सध्या 21.18 कोटी रुपयांचे बिल महापालिकेकडे प्राप्त झाले असून, त्याची तपासणी करून पुढील 15 दिवसांत ही रक्कम कंपनीला दिली जाईल, असे न्यायालयाला सांगण्यात आले. संभाजीनगरच्या पाणीप्रश्नाच्या सोडवणुकीला गती मिळण्याची अपेक्षा या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीत विविध पक्षकारांनी आपापली बाजू मांडली. न्यायालयाचे मित्र म्हणून अ‍ॅड. शंभुराजे देशमुख उपस्थित होते. शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली, तर मूळ याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. अमित मुखेडकर यांनी युक्तिवाद केला. जीव्हीपीआर कंपनीकडून ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे आणि जीवन प्राधिकरणातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी न्यायालयासमोर आपली भूमिका स्पष्ट केली. या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने पाणीपुरवठा योजनेच्या कामावर कोणताही राजकीय किंवा प्रशासकीय अडथळा येऊ नये, यासाठी कठोर भूमिका घेतली असून, या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पाणीप्रश्नाच्या सोडवणुकीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 11:02 am

छत्रपती संभाजीनगरमध्ये मांजाचा कहर:एकाच नायलॉन मांजाने 2 दुचाकीस्वारांचे गळे कापले, एकाचा डोळा थोडक्यात वाचला

सिडको एन-७ भागातील देवगिरी बँकेसमोर गुरुवारी (८ जानेवारी) सायंकाळी ५.३० च्या सुमारास तुटून आलेल्या एकाच नायलॉन मांजाने दोन दुचाकीस्वार जखमी झाले. या भीषण घटनेत एका तरुणाच्या डोळ्याला तब्बल २१ टाके पडले असून, दुसऱ्या तरुणाच्या मानेला ३ टाके पडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, सय्यद अहमद रक्ताने माखलेले असतानाच, त्यांच्या अगदी मागून येणारे शेख यासीन शेख मोसीन (रा. रहेमानिया कॉलनी) हेदेखील त्याच लोंबकळणाऱ्या मांजाच्या विळख्यात अडकले. त्यांच्या मानेला मांजाने जोरात घासले गेल्याने तेदेखील गंभीर जखमी झाले. भररस्त्यात दोन तरुण एकामागून एक रक्ताने माखलेले पाहून नागरिक हादरून गेले. २१ टाके, कायमस्वरूपी व्रण रस्त्यावरील नागरिकांनी प्रसंगावधान राखून या दोघांच्या अंगावर गुंडाळलेला मांजा कापला आणि त्यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात हलवले. उपचारादरम्यान सय्यद अहमद यांच्या डोळ्याच्या बाजूला झालेली जखम इतकी खोल होती की, डॉक्टरांना २१ टाके घालावे लागले. थोड्या फरकाने त्यांचा डोळा वाचला असला तरी चेहऱ्यावर कायमस्वरूपी व्रण उमटले आहेत, तर शेख यासीन यांच्या मानेला ३ टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अज्ञातावर गुन्हा दाखल, शोध सुरूयाप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात पतंगबाजावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सोपान नरळे करत असून पतंगबाजांचा शोध सुरू आहे. दिव्य मराठी फर्स्ट पर्सन, सय्यद अहमद मिस्बाउद्दीन चिस्ती (जखमी तरुण)काही कळायच्या आत तो मांजा फासासारखा माझ्या गळ्याला आवळला गेला...'मी गुरुवारी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास माझ्या दुचाकीवरून नेहमीप्रमाणे नारेगावकडे निघालो होतो. गाडीचा वेग मध्यम होता. सिडको एन-७ भागातील देवगिरी बँकेसमोर मी पोहोचलो आणि अचानक एक तुटलेला मांजा वाऱ्याच्या वेगाने माझ्या दिशेने आला. तो मांजा आहे हे समजण्यापूर्वीच तो माझ्या चेहऱ्याभोवती फासासारखा अडकला. तो नायलॉन मांजा इतका धारदार होता की जसा मी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, तसा तो माझ्या नाकावर आणि डोळ्यांच्या कोपऱ्यात खोलवर रुतत गेला. प्रचंड वेदना झाल्या आणि चेहऱ्यावरून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. मी रक्ताने माखलेला असतानाच, माझ्या अगदी मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीस्वाराच्या गळ्यालाही तोच लोंबकळणारा मांजा अडकला. मांजा त्याच्या मानेला जोरात घासला गेल्याने तोही रक्ताळला. भररस्त्यात आम्हा दोघांनाही अशा अवस्थेत पाहून नागरिक मदतीसाठी धावून आले. हा नायलॉन मांजा केवळ धागा नाही, तर तो साक्षात मृत्यूचा फास आहे. नायलॉन मांजा रोखण्यासाठी टास्क फोर्स नेमा : खंडपीठ कायदेशीर बंदी असूनही नायलॉन मांजाची विक्री आणि वापर रोखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली आहे. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांनी नायलॉन मांजाचा समूळ नायनाट करण्यासाठी राज्याच्या पोलिस महासंचालकांना तातडीने विशेष कार्यदल स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जखमी तीन पीडित बालकांना प्रत्येकी २ लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. सर्व डेटा ६ आठवड्यांत द्या : प्रशासनाला या आदेशांच्या अंमलबजावणीचा सविस्तर डेटा ६ आठवड्यांत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावा लागणार आहे. अनुपालन न झाल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा न्यायालयाने दिला आहे. खंडपीठाने दिले महत्त्वाचे निर्देश नायलॉन मांजाचे ऑनलाइन मार्केटिंग रोखण्यासाठी आयटी तज्ज्ञ, नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. पुढील चार आठवड्यांच्या आत पीडित भरपाई निधी आणि भविष्यासाठी कायमस्वरूपी धोरण तयार करावे. मनपाने तपासणी करून दोषींचे परवाने रद्द करावेत, दुकाने सील करावीत आणि फौजदारी खटले चालवावेत. उत्पादन, विक्री आणि वितरणाची साखळी तोडण्यासाठी आंतरविभागीय समन्वय अनिवार्य करण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 10:58 am

पुणेकरांना मोफत बस अन् मेट्रो सेवा देणार:अजित पवारांची मतदारांना ग्वाही; दोन्ही राष्ट्रवादीचा पुण्यासाठी संयुक्त जाहीरनामा जाहीर

पुणे महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती सुपूर्द केल्यास नागरिकांना बस व मेट्रो सेवेचा मोफत लाभ देण्यात येईल, अशी घोषणा सत्ताधारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केली. या योजनेमुळे शहर प्रदूषणमुक्त होईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि पुणेकरांचे दररोज होणारे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान वाचेल, असे ते म्हणालेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने शनिवारी अष्टसूत्री प्रगतीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, दीपक मानकर, सुभाष जगताप, श्रीकांत पाटील, विशाल तांबे, प्रदीप देशमुख आदी दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते. मोफत बस व मेट्रो प्रवास यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, पुण्यात दररोज 30 लाख वाहने रस्त्यावर धावतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत इंधन आणि वेळेचा अपव्यय होतो. यामुळे पुणेकरांचे दररोज 30 कोटी रुपये, म्हणजेच वर्षाला 10 हजार 800 कोटी रुपये वाया जातात. मोफत बस आणि मेट्रो सेवा दिल्यास दोन्ही कंपन्यांना मिळून वर्षाला केवळ 300 कोटी रुपये द्यावे लागतील. अजित पवार यांनी यावेळी पुण्यातील जुने वाडे, म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्वसन आणि 150 मॉडेल शाळा उभारण्याचेही आश्वासन दिले. तसेच, शहराला दररोज नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तथा टँकर माफियांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी पाणीपुरवठा यंत्रणा सुधारण्यावर भर देण्याचीही ग्वाही दिली. महिलांना 5 लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज शहरातील गंभीर वाहतूक समस्या सोडवण्यासाठी खड्डेमुक्त रस्त्यांचे नियोजन आहे. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुणे शहराला देशात आघाडीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. सोसायट्यांना स्वच्छतेबाबत 20 टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव आहे. नागरिकांना हायटेक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच, कॉर्पोरेशन शाळेतील विद्यार्थ्यांना टॅबलेट दिले जातील. एवढेच नव्हे तर पालिकेचे मोफत कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचे वचनही अजित पवार यांनी दिले आहे. प्रस्तुत जाहीरनामा पुढील 5 वर्षांसाठी आहे. आम्ही आळशी नसून, पहाटे 6 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत काम करणारी माणसे आहोत. पुण्याची दिशा बदलणारा हा जाहीरनामा आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. वैद्यकीय सुविधा पुणे महानगरपालिका क्षेत्रात 200 'राजमाता जिजाऊ क्लिनिक' (अद्ययावत प्राथमिक आरोग्य केंद्र) उभारली जातील. येथे तपासणी, आरोग्य सेवा आणि महत्त्वाची औषधे मोफत मिळतील. यामुळे मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होईल. आनंदीबाई जनजागृती मोहीम वरील सर्व आरोग्य केंद्रांच्या परिसरात दरमहा विशेष शिबिरे आयोजित केली जातील. याद्वारे नवविवाहित महिलांना सीझर टाळण्याचे उपाय, आरोग्य आणि सुरक्षित बाळंतपणाबाबत मार्गदर्शन केले जाईल. आई आणि बाळाचे आरोग्य जपण्यासाठी वेळेवर समुपदेशन आणि वैद्यकीय सल्ला दिला जाईल. MRI, CT स्कॅन व तत्सम चाचण्या अत्यल्प दरात उपलब्ध करून देणाऱ्या लॅब PPP मॉडेल अंतर्गत उभ्या करणार. सध्या पीएमसीद्वारे चालविण्यात येणाऱ्या रुग्णालयांमध्ये मंजूर असलेल्या सुमारे 940 बेडपैकी केवळ 425 बेड उपलब्ध आहेत. ही कमतरता भरून काढण्यासाठी विद्यमान रुग्णालयांचे अद्ययावतीकरण केले जाईल. तसेच नवीन रुग्णालयांची उभारणी करून एकूण बेडची वाढवली जाईल. विशेषतः वाघोली (500 बेड), अण्णासाहेब मगर रुग्णालय, हडपसर (300 बेड), वारजे (350 बेड) तसेच कोंढवा-येवलेवाडी-महंमदवाडी (250 बेड) येथे नवीन रुग्णालये उभारून व विद्यमान रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करून एकूण 1,400 अतिरिक्त रुग्णालयीन बेड उपलब्ध करून दिले जातील. आजच्या 425 बेडच्या 7 पट, असे एकूण 2800 बेड उपलब्ध होणार.राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातील इतर आश्वासने खाली वाचा

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 10:53 am

भाजप सोडून अजित पवार आमच्यासोबत लढताहेत हेच महत्त्वाचे:संजय राऊतांनी केले स्पष्ट; तुषार आपटेंच्या नियुक्तीवरून वादंग

अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील युतीबाबत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली असली, तरी सध्याच्या निवडणुकीत ते भाजप सोडून आमच्यासोबत लढत आहेत, हे आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे असल्याचे राऊत यांनी सांगितले. राजकारणात भूमिका आणि बाजू वेळेनुसार बदलत असतात, मात्र भाजपविरोधात उभे राहणे हा मुद्दा आमच्यासाठी निर्णायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आल्याचे चित्र समोर आले असले, तरी त्यात कोणतेही आश्चर्य वाटण्यासारखे नाही, असे मतही संजय राऊत यांनी व्यक्त केले. पवार कुटुंबीयांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू भाजपविरोध हाच राहिला असून, शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना ठाम विरोध आहे, असे राऊत म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी या वैयक्तिक नसून राजकीय भूमिकांवर आधारित असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. बदलापूर महानगरपालिकेत तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशेषतः या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर बदलापूर महानगरपालिकेतील वातावरण तापले असून, आगामी काळात याचे पडसाद राजकीय पातळीवर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर संजय राऊत यांनी जोरदार टीका करत भाजपवर निशाणा साधला आहे. राऊत यांनी आरोप केला की, तुषार आपटे हे बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणात सहआरोपी आहेत. अशा गंभीर आरोपांचा सामना करणाऱ्या व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक बनवण्याचा निर्णय अत्यंत धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपकडून नैतिकतेच्या गप्पा मारल्या जातात, मात्र प्रत्यक्षात अशा प्रकारच्या नियुक्त्या करून चुकीचा संदेश दिला जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. तुषार आपटेंच्या नियुक्तीमुळे बदलापूर शहरात चर्चांना उधाण आले असून, या निर्णयामुळे भाजप अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे स्वीकृत नगरसेवकपदाच्या माध्यमातून महापालिकेत ताकद वाढवण्याचा प्रयत्न होत असताना, दुसरीकडे या नियुक्तीमुळे निर्माण झालेल्या वादामुळे भाजपवर टीकेची झोड उठली आहे. संजय राऊतांच्या आरोपांनंतर हे प्रकरण अधिक चिघळण्याची चिन्हे असून, येत्या काळात या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईबाबत भाजपच्या प्रचारासाठी आलेले अण्णामलाई यांनी केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह असल्याची टीकाही खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे हे अस्वीकार्य असून, भाजपला मुंबई तोडण्याची भाषा मान्य आहे का, असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थित केला. भाजपच्या प्रचार सभेत आलेल्या नेत्यांकडून मुंबईबाबत असे विधान होणे म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. मुंबईसंदर्भात इतके गंभीर वक्तव्य केले जात असताना शिंदे गप्प का आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुंबईच्या एकात्मतेवर घाला घालणाऱ्या वक्तव्यांवर सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट भूमिका मांडायला हवी, असे सांगत राऊत यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांवर निशाणा साधला. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 10:32 am

खोट्या गुन्ह्यात फडणवीसांना अडकवण्याचा प्रयत्न, SITचा धक्कादायक अहवाल:माजी अधिकाऱ्यांवर गुन्ह्याची शिफारस

ठाणे नगर पोलिस ठाण्यात 2016 साली दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या पुनर्तपासणीमधून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा गंभीर खुलासा समोर आला आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कथित कट रचण्यात आल्याचा निष्कर्ष विशेष तपास पथकाच्या (SIT) अहवालातून काढण्यात आला आहे. या अहवालात तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहायक पोलिस आयुक्त सरदार पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची स्पष्ट शिफारस करण्यात आली आहे. हा अत्यंत संवेदनशील अहवाल राज्याच्या माजी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सेवानिवृत्तीपूर्वी गृह विभागाकडे सादर केला होता. अहवालात नमूद केल्यानुसार, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना त्यांना विविध प्रकरणांत गोवण्याचे प्रयत्न अधिक तीव्र झाले. जुन्या गुन्ह्याचा फेरतपास करण्याच्या नावाखाली पोलिस यंत्रणेवर दबाव टाकणे, साक्षीदारांवर प्रभाव टाकणे आणि पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न झाल्याचा गंभीर ठपका SIT ने ठेवला आहे. या फेरतपासणीवर यापूर्वी उच्च न्यायालयानेही शंका व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले होते. विशेष तपास पथकाच्या चौकशीत असे स्पष्ट झाले आहे की, माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी ठाणे नगर पोलिस ठाण्यातील २०१६ च्या गुन्ह्याचा फेरतपास करण्याचे आदेश देत फडणवीस यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी दबाव आणला होता. हा अहवाल रश्मी शुक्ला यांनी निवृत्तीच्या केवळ पाच दिवस आधी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे पाठवला होता. त्यात संजय पांडे यांच्यासह उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आणि सहायक आयुक्त सरदार पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची शिफारस करण्यात आली आहे. संजय पांडे मुंबईचे पोलिस आयुक्त आणि त्यानंतर राज्याचे पोलिस महासंचालक झाल्यानंतर या प्रकरणाला वेग आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ठाणे तसेच मुंबईतील सायबर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आधार घेत फडणवीस यांना अडकवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता. या संपूर्ण प्रक्रियेत राजकीय हेतू असल्याचा संशय SIT अहवालातून व्यक्त करण्यात आला असून, पोलिस यंत्रणेचा गैरवापर झाल्याचे चित्र समोर आले आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, ठाणे नगर पोलिस ठाण्यात 2016 मध्ये श्यामसुंदर अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. विकासक संजय पुनमिया आणि अग्रवाल हे एकेकाळी व्यावसायिक भागीदार होते. त्यांच्या वादातून हा गुन्हा नोंदवण्यात आला आणि 2017 मध्ये आरोपपत्रही दाखल झाले होते. तरीही, संजय पांडे यांनी या गुन्ह्याच्या फेरतपासाचे आदेश दिले. याच काळात, 2016 मधील गुन्हा फेरतपासाच्या नावाखाली 2021 ते जून 2024 दरम्यान आपला छळ करण्यात आला आणि खंडणी मागितल्याचा आरोप करत संजय पुनमिया यांनी ठाणे नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून संजय पांडे यांच्यासह सात जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खंडणी प्रकरणाच्या तपासादरम्यान 2016 मधील गुन्हा पुन्हा उकरून काढण्यात आला. या तपासात फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेले ध्वनिमुद्रित व चित्रित संभाषण कालिना येथील न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. तपासात हे संभाषण फडणवीस किंवा शिंदे यांचे नसून, निवृत्त सहायक आयुक्त सरदार पाटील, मीरा-भाईंदर महापालिकेचे माजी नगररचनाकार दिलीप घेवारे आणि विकासक संजय पुनमिया यांच्यातील असल्याचे स्पष्ट झाले. नोंद वहीतील पाने गायब असल्याचेही अहवालात नमूद या ध्वनिमुद्रणातून ‘फडणवीस आणि शिंदे यांना अटक का केली नाही’ असा सवाल संजय पांडे यांनी सरदार पाटील आणि पोलिस निरीक्षक मनोहर पाटील यांना केल्याचे उघड झाले आहे. ठाणे नगर पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात फडणवीस आणि शिंदे यांना अटक करण्यासाठी पांडे यांनी मोठा दबाव टाकल्याचा निष्कर्ष SIT ने काढला आहे. याशिवाय, सरदार पाटील यांच्या सरकारी वाहनाच्या वापर नोंद वहीतील 5 मे 2021 ते 21 मे 2021 या कालावधीतील पाने गायब असल्याचेही अहवालात नमूद आहे. ही बाब पुरावे नष्ट करण्याचा गंभीर प्रकार असल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणामुळे राज्यातील पोलिस प्रशासन आणि राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 10:12 am

नाना - काका महाराजांची पालखी कारंजाकडे मार्गस्थ:वारकरी तल्लीन, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा''च्या गजरात वारकरी सहभागी‎

दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नाना - काका कृपा करा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा'च्या गजरात गुरूवार, दि. ८ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता नाना काका महाराजांच्या पालखीसह पायदळ वारी मार्गस्थ झाली. रविवार, दि. ११ जानेवारीपर्यंत आयोजित पायदळ वारीची सुरुवात स्थानिक अमृत नगरमधील श्रीक्षेत्र बरसाना येथून झाली. त्यानंतर मादन प्लॉटमधील काका महाराजांच्या वास्तव्य स्थानामध्ये दर्शन घेऊन वारी मार्गस्थ झाली. तत्पूर्वी, काका महाराजांच्या वास्तव्य स्थानी पालखीचे आगमन झाल्यानंतर महिला भाविकांनी पाऊली व फुगड्या खेळून पालखीचे स्वागत केले. पालखीचे हे २३ वे वर्ष आहे. या पायदळ वारीमध्ये सहभागी शेकडो वारकरी सहभागी झाले आहेत. या पायदळ वारीतील वारकऱ्यांच्या सुविधेसाठी अजय ताम्हण यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. ही पायी वारी रविवारी श्री क्षेत्र कारंजा लाड येथील श्री गुरू मंदिरात पोहोचणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 10:09 am

शेतकऱ्यांकडील कर्ज वसुलीसाठी मायक्रो फायनान्स कंपन्यांचा तगादा:वसुली रोखा; क्रांतिकारी शेतकरी'' ची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक‎

कर्ज पुरवठा केलेल्या मायक्रो फायनान्स कंपन्या शेतकरी, शेतमजुरांना दिलेल्या कर्जावर सावकारापेक्षाही मोठ्या प्रमाणात व्याज आकारून वसुली करत असल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. गंभीर बाबीची दखल घेऊन सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांवर आरबीआयचे नियमानुसार कर्ज वसुलीबाबत कडक निर्बंध लादण्यात यावेत व सर्व सामान्य नागरीक, शेतकरी व शेतमजुरांना आत्महत्या करण्यापासून रोखावे व त्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली. गत वर्षी उन्हाळ्यात मे महिन्याच्या अखेरीस तीन वेळा अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर जून महिन्याच्या प्रारंभीच जोरदार पाऊस पडेल, अशी स्थिती निर्माण झाली. मात्र पावसाने पाठ फिरवली. त्यानंतर मृग नक्षत्राला प्रारंभ झाल्यानंतर पेरणी योग्य दमदार पाऊस झाला नाही. मात्र जून महिन्याच्या अखेरीस अतिवृष्टी झाली. त्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या दीड आठवड्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कपाशी पिकाचे नुकसान झाले. पीक जमिनीवर झोपले असल्याचे चित्र दिसत होते. जोरदार पाऊस कोसळल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. शेतकरी संकटात असतानाच आता मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत असून, याच अनुषंगाने क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, जिल्हा उपाध्यक्ष संजय सोनोने, रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख पूर्णाजी खोडके, सुनील इंगळे, पांडुरंग कंटाळे, शेख हमीद, संतोष रुद्रकार, रमेश चिंचे, शेख मुख्तार, सतीश नागे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. ...त्यामुळे हवा दिलासा : गतवर्षी शेतमालाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे पुढील आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. त्यामुळे मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होत असलेल्या वसुलीला चाप लावण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यात जून महिन्यात अतिवृष्टीमुळे ४ हजार २१५ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली. १६३ गावांमधील ७ हजार ५७७ शेतकऱ्यांचे ६ कोटी ५ लाख ५६ नुकसान झाले होते. हा निधी मंजूर झाला आहे. जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा फटका ७ हजार ३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना बसला होता. ११ हजार ५९७ शेतकऱ्यांचे ६ कोटी २१ लाखांचे नुकसान झाले होते. या दोन्ही महिन्यांची मदत मंजूर झाली आहे.ऑगस्ट महिन्यात १ लाख ६ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीचा फटका १ लाख २० हजार ६९७ शेतकऱ्यांना बसला आहे. मदतीसाठी ९२ कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली. ही मागणीही मंजूर झाली. जिल्ह्यात यंदा सप्टेंबर अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसान भरपाईसाठी वाढीव क्षेत्राकरिता सर्वात शेवटी २३ कोटी ३७ लाख मंजूर झाले होते. याचा लाभ २१ हजार २९३ शेतकऱ्यांना मिळणार आहे. ही वाढीव मदत २६ हजार ८८९ हेक्टर क्षेत्रासाठी आहे. यापूर्वी १ लाख ७२ हजार ८७५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी १६२ कोटी ९५ लाख मंजूर झाले. अन्यायाचा वाचला पाढा : सन २०२०मध्ये आधी कोरोना आणि नंतर अतिवृष्टी व नापिकीमुळे शेतकरी पूर्ण अडचणीत आला असल्याचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे. अशातच काही लाभार्थीनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, गहाण कर्ज, महिला बचत गटाद्वारे कर्ज घेतलेले आहे; परंतु मायक्रो फायनान्स कंपन्या सदरचे कर्ज रकमेला अवाढव्य प्रमाणात व्याजदर आकारून कर्जधारकांकडून मोठ्या प्रमाणात जबरदस्ती आर्थिक वसुली करत आहे. जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स कंपन्या या सर्रास आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करून कर्जधारकांना अवैध सावकारी स्वरूपात फायनान्स कंपन्या कर्जधारकांकडून एजंटांमार्फत वेठीस धरण्यात येत आहेत, असा आरोप संघटनेकडून होत आहे. सर्व सामान्य नागरीक, शेतकरी व शेतमजूर या काही कंपन्यांच्या जुलमी व मनमानी कारभाराला त्रस्त झालेला आहे, अशी टीकाही संघटनेने केली.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 10:06 am

श्री दत्त महाराज पालखीचे टाळमृदंगाच्या गजरात स्वागत:धार्मिक खिरपुरी खुर्द येथे पार पडला साेहळा

माहूर निवासी चंचल भारती महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा (जिल्हा. बुलडाणा) येथून निघालेल्या श्री दत्त महाराज पालखीचे खिरपुरी खुर्द येथे भक्तिभावपूर्ण वातावरणात आगमन झाले. या आगमनाने संपूर्ण खिरपुरी गाव दत्तनामाच्या गजराने दुमदुमून गेले होते. मोहनराज भारती महाराज यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले हे दत्तमार्गक्रमण दत्त सांप्रदायिक गावांमधून श्रद्धा, सेवा व भक्तिभावाने पुढे नेण्यात येत आहे. पालखी खिरपुरी गावाच्या हद्दीत प्रवेश करताच ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत, ढोल-ताशांच्या गजरात व दत्तनामाच्या जयघोषात स्वागत केले. गावातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर कलश घेत दत्त महाराजांच्या नामस्मरणात पालखीची शोभायात्रा काढली. पालखीच्या स्वागतासाठी गावातील रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. घराघरांत दीपप्रज्वलन करण्यात आले असून संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते. पालखीत सुमारे २५० महिला व पुरुष दत्तभक्त सहभागी होते. भक्तांच्या सेवेसाठी ग्रामस्थांनी पाणी, अल्पोपहार व विश्रांतीची व्यवस्था केली होती. दत्तशिखर येथील वासुदेव भारती महाराज, सर्वतीर्थावरील जीवन भारती महाराज तसेच स्वतः मोहनराज भारती महाराज यांच्या सान्निध्यात चाललेली ही पवित्र श्री दत्त महाराज पालखी १७ जानेवारी रोजी माहूर येथे पोहोचणार आहे. महाप्रसादाचे वितरण पालखीचा खिरपुरी येथे मुक्काम असल्याने सायंकाळी दत्त आरती, भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर रात्री पालखीतील सर्व दत्तभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. तसेच खिरपुरी येथील दत्त मंदिरातही सर्व भक्तांसाठी महाप्रसादाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 10:05 am

मतदान केंद्र, स्ट्राँग रुमची पाहणी; तयारीचा आढावा:मुख्य निवडणूक निरीक्षक अर्पित चौहान यांनी घेतली मतदानाचे नियोजन

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्य निवडणूक निरीक्षक अर्पित चौहान यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येथील स्ट्राँग रूम, मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. अर्पित चौहान यांनी झोन क्रमांक १ अंतर्गत अकोला जिल्हा मराठा मंडळ, रामदास पेठ, झोन क्रमांक १ अंतर्गत शासकीय धन्य गोदाम, जिल्हाधिकारी कार्यालय, झोन क्रमांक ३ अंतर्गत निमवाडी पोलिस वसाहत येथील मल्टिपर्पज हॉल, झोन क्रमांक ४ अंतर्गत राजमाता जिजाऊ अभियंता प्रशिक्षण केंद्र, झोन क्रमांक ५ अंतर्गत जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन, झोन क्रमांक ६ अंतर्गत शासकीय गोदाम, खदान येथे पाहणी केली. मतदान केंद्रांची अधिक संख्या असलेल्या डाबकी रोड येथील मनपा उच्च प्राथमिक शाळा क्रमांक १०, अकोट फैल येथील मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक ६, मनपा हिंदी बालक शाळा क्रमांक २, सिंधी कॅम्प येथील सिंधी हिंदी शाळा, मोठी उमरी येथील जि. प. मराठी केंद्र शाळा क्रमांक १ येथे प्रत्यक्ष पाहणी केली. मनपा आयुक्तांकडून आराखडा सादर : मुख्य निवडणूक निरीक्षक अर्पित चौहान यांनी मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या दालनात निवडणूक नियोजन व तयारीचा आढावा घेतला. डॉ. लहाने यांनी पीपीटीद्वारे प्रशासनाची तयारी, उपाययोजनांची माहिती दिली. प्रशासनाने नियोजन, मतदान प्रक्रियेसाठी नियोजित आराखडा दाखवला. याप्रसंगी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने, मुख्य निवडणूक निरीक्षकांचे संपर्क अधिकारी सतीश गावंडे, सर्व निवडणूक‍ निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, स्विय्य सहायक जितेंद्र तिवारी, मनपा बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता अजय गुजर, मनपा सचिव अमोल डोईफोडे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर, पालिका सचिव अमोल डोईफोडे आदी उपस्थित होते. मुख्य निवडणूक निरीक्षक अर्पित चौहान यांनी आचारसंहिता पथक, मतदान सी. यू. युनिट आणि बी. यू. युनिटबाबत, स्ट्राँग रूम, मतमोजणी केंद्र आणि लागणारे मनुष्यबळ, संवेदनशील मतदान केंद्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार बीयू युनिटचा १०० टक्के पुरवठा आदींबाबत माहिती घेतली. मतमोजणी प्रक्रिया सहा ठिकाणी होणार असून पत्रकारांना मतमोजणी संदर्भातील संपूर्ण माहिती एकत्रित एकाच ठिकाणी मिळावी, याकरिता उपाययोजना करण्यासाठी निर्देश दिले. माहिती एकाच ठिकाणी मिळण्याबाबत निर्देश

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 10:04 am

पोलिसांचे अवैध दारूभट्ट्यांवर 85 ठिकाणी छापे:मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई; जिल्ह्यात 9 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त‎

मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस दलामार्फत जिल्ह्यातील अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्याविरुद्ध ‘ऑपरेशन प्रहार' अंतर्गत गुरुवारी दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत विविध पोलिस ठाण्यांतील पोलिस पथकांनी ८५ ठिकाणी कारवाई केली. कारवाईदरम्यान ९ लाख ६८ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. अवैध धंद्यात सहभागी असलेल्यांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात आली. तसेच स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्रपणे एका ठिकाणी छापा टाकत अवैध दारू विक्री व निर्माण करणाऱ्या ठिकाणांवर धडक देवून २० लिटर गावठी दारू व २८५ लिटर सडवा मोह असा ४६ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध दारू विरुद्ध मोहीम सुरूच राहणार अवैध दारू विरोधातील ही मोहीम सुरूच राहणार असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर अवैध दारू विक्री व निर्माण करणाऱ्या विषयी माहिती असल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावे तसेच निवडणूक प्रक्रिया भयमुक्त व शांततेत पार पाडण्यासाठी अकोला पोलिस दल सज्ज आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 10:03 am

नागपूर रणांगण तापलं:शिक्षण सम्राट बनलेल्या नेत्यांवर टीका, पण NCP चा एक मोठा गट भाजपसोबत असल्याचे लक्षात येताच गडकरींनी भाषा सावरली

नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच्या वाठोडा परिसरात घेतलेल्या प्रचार सभेत काँग्रेसवर जोरदार शब्दांत टीका केली. आपल्या खास शैलीतील उपरोधिक भाषणातून गडकरींनी काँग्रेसच्या धोरणांवर हल्लाबोल करत उपस्थितांची मने जिंकली. ‘एक पव्वा दटाओ आणि गरीबी हटाओ, मेरा भारत महान, हमे दो, देशी दारू दुकान…’ अशा मिश्किल पण धारदार शब्दांत त्यांनी काँग्रेसवर टीका करत सभेत एकच खळबळ उडवून दिली. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आजवर गरिबांसाठी नेमकं काय केलं, असा थेट सवालही गडकरींनी उपस्थित केला. या प्रचार सभेत बोलताना गडकरींनी काँग्रेसच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले. काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःसाठी शिक्षण संस्था उभारून शिक्षणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पैसा कमावला आणि गरिबांची लूट केली, असा आरोप त्यांनी केला. रोजगार आणि शिक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना ‘शिक्षकांचा अर्धा पगार तुम्ही द्या आणि अर्धा आम्ही देऊ, हीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची रोजगार हमी’ असे म्हणत गडकरींनी त्यांची खिल्ली उडवली. या वक्तव्यामुळे सभेत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मात्र, शिक्षण सम्राट बनलेल्या नेत्यांवर टीका करत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट सध्या भाजपसोबत असल्याचे लक्षात येताच गडकरींनी आपली भाषा सावरली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, सध्या भाजपसोबत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी असून, पूर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीशी तिची तुलना करता येणार नाही. या मुद्द्यावर बोलताना त्यांनी राजकीय समजूतदारपणाचे दर्शन घडवले आणि सभेत कोणताही संभ्रम राहू दिला नाही. नागपूर महानगरपालिकेत भाजपचा पुन्हा एकदा झेंडा फडकवण्यासाठी नितीन गडकरी सध्या जोरदार प्रचार करत आहेत. त्यांनी वाठोडा, शांतीनगर आणि कळमना परिसरात तीन स्वतंत्र प्रचार सभा घेतल्या. तर आजही गिट्टीखदान, फुटाळा आणि नारा या भागांमध्ये त्यांच्या तीन प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. या सभांमधून गडकरी नागपूरकर मतदारांशी थेट संवाद साधत असून, भाजपच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडत आहेत. प्रचार सभांदरम्यान गडकरींनी गेल्या तीन टर्ममध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली नागपूर महानगरपालिकेत झालेल्या विकासकामांची सविस्तर माहिती दिली. शहरातील रस्ते, उड्डाणपूल, वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या सुधारणा त्यांनी उदाहरणांसह मांडल्या. आपल्या केंद्रीय मंत्रीपदाच्या कार्यकाळात रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून नागपूरच्या विकासात कसा मोठा बदल घडवून आणला, याचा उल्लेख करत त्यांनी भाजपच्या विकासाभिमुख राजकारणावर भर दिला. येत्या काळात भाजप पुन्हा सत्तेत आल्यास नागपूर शहरासाठी कोणकोणती कामे केली जाणार आहेत, याची सविस्तर ब्लू प्रिंटही गडकरींनी मतदारांसमोर ठेवली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना ‘खासदाराच्या पोटी खासदार आणि नगरसेवकांच्या पोटी नगरसेवक जन्माला येणार नाहीत, नगरसेवक हा जनता आणि कार्यकर्त्यांमधूनच घडायला हवा’ असे परखड मत गडकरींनी मांडले. त्यांच्या या विधानाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. आज अधिकृत निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार दरम्यान, नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून आज अधिकृत निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शहर अध्यक्ष दयशंकर तिवरी यांच्या हस्ते हा जाहीरनामा जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे, हा जाहीरनामा तयार करताना भाजपने थेट जनतेकडून सूचना आणि अपेक्षा मागवल्या होत्या. नागरिकांच्या मागण्या आणि मतांचा समावेश या जाहीरनाम्यात करण्यात आल्याने भाजपचा हा जाहीरनामा नागपूरच्या विकासाचा आराखडा ठरेल, असा दावा पक्षाकडून केला जात आहे. आगामी निवडणुकीत भाजपचा कमबॅक घडवून आणण्यासाठी गडकरींच्या प्रचाराचा हा निर्णायक टप्पा मानला जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 9:31 am

बालहक्क, संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज- उत्तम शिंदे:मंगरूळपीर पंचायत समितीमधील प्रशिक्षण कार्यक्रमास प्रतिसाद‎

बालकांचे संरक्षण ही केवळ शासकीय जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकानी बालकांचे अधिकारी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणे ही सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी बाल संरक्षण कायद्यांची अचूक माहिती ठेवून संवेदनशीलतेने कार्य केल्यास बालकांना सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्य देता येईल, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उत्तम शिंदे यांनी येथे व्यक्त केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच बेटी बचाव–बेटी पढाओ या योजनेंतंर्गत बालकल्याण क्षेत्रात कार्यरत ग्रामसेवक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, विशेष बाल पोलिस पथक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांचे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार तालुकास्तरीय प्रशिक्षण शुक्रवारी ९ जानेवारी रोजी मंगरूळपीर येथील पंचायत समितीत घेण्यात आले. बालहक्क संरक्षण, बालविवाह प्रतिबंध, बालकांवरील अत्याचार रोखणे तसेच बाल संरक्षण कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणा अधिक सक्षम करणे, हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना फाळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उत्तम शिंदे, गट पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धावडे, परिविक्षा अधिकारी गणेश ठाकरे, तालुका विधी सेवा प्राधिकरण, मंगरूळपीर येथील अॅड. बी. वाय. श्रृगारे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी भगवान ढोले, कायदा तथा परिविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी, प्रकल्प सहयोगी एव्हीए नीती आयोगाच्या नीलिमा भोंगाडे यांची उपस्थिती होती. या वेळी अॅड. बी. वाय. श्रृगारे व जिनसाजी चौधरी यांनी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अधिनियम हा केवळ शिक्षा देणारा कायदा नसून बालकांचे संरक्षण, पुनर्वसन आणि न्याय मिळवून देण्यासाठीचा प्रभावी कायदा आहे. बालकांवरील लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यास वेळेवर तक्रार नोंदवणे, योग्य कार्यवाही करणे व बालकांशी संवेदनशीलतेने वागणे अत्यंत आवश्यक आहे. या कायद्याची योग्य अंमलबजावणी झाल्यास बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनंता इंगळे, रामेश्वर वाळले, एकनाथ राठोड, अविनाश सोनुने, संतोष भगत यांचे सहकार्य लाभले. सर्वांना बालविवाह निर्मूलनाबाबत शपथ नीलिमा भोंगाडे यांनी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम – २००६ या कायद्याविषयी मार्गदर्शन केले, तर दिपाली दळवी यांनी सखी वन स्टॉप सेंटर विषयी माहिती देत महिलांसाठी उपलब्ध सहायक व संरक्षण योजनांवर प्रकाश टाकला. प्रशिक्षणाच्या शेवटी उपस्थित सर्वांना बालविवाह निर्मूलनाबाबत शपथ देण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 9:17 am

पहाटेचा स्फोट आणि मृत्यूचे तांडव:गोरेगावच्या आगीत तिघांचा दुर्दैवी अंत; फ्रीजच्या स्फोटाने तिघांचा जीव घेतला, घरही जळून खाक

मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. भगतसिंग नगर येथील एका सोसायटीमधील घरात अचानक आग लागून दोन पुरुष आणि एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून, पीडित व्यक्ती गाढ झोपेत असतानाच हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घरातील फ्रीजचा अचानक स्फोट झाल्याने आग भडकली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. झोपेत असलेल्या तिन्ही जणांना आगीची तीव्रता आणि धुरामुळे बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. काही क्षणांतच संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी सापडले. घरातून मोठ्या प्रमाणात धूर आणि ज्वाळा बाहेर पडताना दिसताच शेजाऱ्यांनी तातडीने पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तात्काळ बचावकार्य सुरू करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही वेळातच आग आटोक्यात आणण्यात यश आले, मात्र तोपर्यंत घरातील तिघेही जण मृत अवस्थेत आढळून आले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही पीडितांचा मृत्यू आगीमुळे निर्माण झालेल्या धुरामुळे गुदमरून झाल्याची शक्यता आहेआम्ही हे सातत्याने अपडेट करत आहोत.... घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. फ्रीज स्फोटाची शक्यता प्राथमिक तपासात व्यक्त करण्यात आली असली, तरी तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किट याबाबतही चौकशी केली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भगतसिंग नगर परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये घरगुती विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 9:16 am

गुलाब गार्डन मुलांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरावे- आयुक्त शर्मा यांचे निर्देश:फेब्रुवारीत फ्लॉवरिंग एक्झिबिशन घेण्याच्या आयुक्तांच्या सूचना‎

लहान मुलांसाठी विशेष आकर्षण म्हणून उद्यानात ट्री हाऊस उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. यामुळे गुलाब गार्डन हे केवळ विरंगुळ्याचे ठिकाण न राहता कुटुंबांसाठी व मुलांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे निर्देश महानगर पालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी शुक्रवार ९ रोजी शहरातील एकमेव गुलाब गार्डनची पाहताना उद्यान अधीक्षकांना दिले. कँम्प रोड येथे महानगरपालिका अंतर्गत असलेल्या गुलाब गार्डनची सखोल पाहणी केली. या पाहणीदरम्यान उद्यानाच्या एकूण स्थितीचा आढावा घेत नागरिकांच्या सोयीसुविधा, सौंदर्यीकरण व पर्यावरणपूरक विकासाच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण सूचना व निर्देश दिले. पाहणीदरम्यान आयुक्तांनी गुलाब गार्डनमधील अंतर्गत रस्ते, हिरवळ, संरचना व उपलब्ध सुविधांची तपासणी केली. उद्यानातील जुनी व खराब झालेली संरचना दुरुस्त करून आवश्यक ठिकाणी रंगकाम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच उद्यान अधिक आकर्षक व निसर्गरम्य दिसावे यासाठी शोभिवंत वेली, फुलझाडे व विविध प्रकारच्या सजावटीच्या वनस्पतींची लागवड करण्यावर त्यांनी भर दिला. उद्यानात आकर्षक पेंटिंग व भित्तीचित्रे (म्युरल्स) तयार करून नागरिकांसाठी एक सुंदर व आनंददायी वातावरण निर्माण करण्याचेही आदेश देण्यात आले. तसेच येत्या फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात गुलाब गार्डनमध्ये भव्य फ्लॉवरिंग एक्झिबिशन आयोजित करण्याचेकरण्याचे निर्देश देण्यात आले. या प्रदर्शनासाठी आवश्यक तयारी, फुलझाडांची लागवड, सजावट, प्रकाशयोजना व नागरिकांच्या सोयीसुविधांचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले. गुलाब गार्डन हे अमरावती शहरातील एक महत्त्वाचे सार्वजनिक उद्यान असून नागरिकांच्या आरोग्य, विरंगुळा व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने त्याचा सर्वांगिण विकास करणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने, गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. या पाहणीप्रसंगी महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक अजय विंचुरकर, कंत्राटी निरीक्षक महेश जोशी, उपस्थित होते. चार वर्षांपासून शहरातील उद्याने पडली ओसाड महानगर पालिकेद्वारे शहराच्या विविध भागात मोठ्या संख्येत उद्यानांची उभारणी करण्यात आली असली तरी या उद्यानांचे कंत्राट गेल्या चार वर्षांपासून देण्यात आले नसल्याने त्यांच्या रखरखावासोबतच दुरुस्तीकडे लक्षच नाही. परिणामी या उद्यांनांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे. शहरातील एकमेव गुलाब उद्यानात रखरखावाच्या अभावी गुलाबाच्या फुलांची फारच कमी झाडे उरली आहे. त्यामुळे या उद्यानाचा पुर्नविकास करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 9:13 am

शालेय सांस्कृतिक महोत्सवात कार्यक्रमांची मेजवानी रंगली:वारकरी भारूड व आदिवासी, गोंडी समूह नृत्याने वेधले लक्ष‎

जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा स्तरीय प्राथमिक शालेय क्रिडा क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव येथील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात सुरू आहे. जिल्हा परिषदअंतर्गत जिल्हास्तरीय प्राथमिक शाळेत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाला गुरुवारपासुन सुरुवात झाली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाला क्रीडा संयोजक प्रवीण खांडेकर, विस्तार अधिकारी सुनिल खडे, गटशिक्षणाधिकारी, संदीप बोडखे, संतोष घुगे, विनोद गाडे, सपना भोगावकर, सुरेश चिमणकर, भाग्यश्री घोंगडे, मीनाक्षी दांडगे यांच्यासह गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आदींची उपस्थिती होती.यात वरुड पंचायत समितीतील रवाळा शाळेने आदिवासी नृत्य सादर केले. तिवसा पंचायत समितीतील विरगव्हाण शाळेने बंजारा नृत्य सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे परीक्षक म्हणून प्रा. स्वप्नील मोरे, प्रा. प्रफुल्ल गांजरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन हर्षा दुरगकर यांनी केले. असे क्रीडा महोत्सवाचे प्रसिध्दी प्रमुख विनोद गाडे, विनायक लकडे, राजेश सावरकर, शकील अहमद, श्रीनाथ वानखडे, हेमंतकुमार यावले, पुनम उके यांनी कळविले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 9:11 am

80 शाळांमध्ये राबवणार शाळा सुरक्षा कार्यक्रम

जिल्ह्यातील नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचा धोका लक्षात घेता, आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रशिक्षित करण्यात आलेले ३०० आपदा मित्र आणि आपदा सखी आता जिल्ह्यातील पूरप्रवण व धोकादायक भागातील तब्बल ८० शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे थेट प्रशिक्षण देणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करण्यासाठी ३०० आपदा मित्र व सखींची निवड करून त्यांना १२ दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षित स्वयंसेवकांना शाळा सुरक्षा कार्यक्रम प्रभावीपणे राबवता यावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतेच एक दिवसीय उजळणी प्रशिक्षणही देण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पूर, भूकंप, आग आणि वीज पडणे यांसारख्या संकटांच्या वेळी ‘काय करावे आणि काय करू नये' याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच प्रथमोपचार, शोध व बचाव साहित्याची ओळख, जखमींना उचलण्याच्या विविध पद्धती आणि आपत्ती काळातील शासनाची भूमिका या विषयावर प्रात्यक्षिकांसह जनजागृती केली जाणार आहे. मान्सून कालावधीत आणि इतर आपत्तींमध्ये हे आपदा मित्र प्रशासनाला मोलाची मदत करत आहेत. या शालेय प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातही या स्वयंसेवकांची ओळख निर्माण होणार असून, आपत्तीच्या वेळी होणारी जीवितहानी टाळण्यासाठी मोठे मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. या कार्यक्रमाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि जिल्हा शोध व बचाव पथक उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे, कोणतेही मानधन न घेता हे आपदा मित्र समुदाय समन्वयक म्हणून सामाजिक बांधिलकीतून कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांना यावर मिळणार प्रात्यक्षिक या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पूर, भूकंप, आग आणि वीज पडणे यांसारख्या संकटांच्या वेळी ‘काय करावे आणि काय करू नये' याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच प्रथमोपचार, शोध व बचाव साहित्याची ओळख, जखमींना उचलण्याच्या विविध पद्धती आणि आपत्ती काळातील शासनाची भूमिका या विषयावर प्रात्यक्षिकांसह जनजागृती केली.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 9:11 am

‘परमशेट्टी'त 20 वर्षांनंतर दहावीचा वर्ग पुन्हा भरला!:आठवणींना उजाळा; माजी विद्यार्थांनी शाळेला दिली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची भेट‎

दुधनी (ता. अक्कलकोट) येथील एस.जी. परमशेट्टी हायस्कूलमध्ये तब्बल २० वर्षांनंतर दहावीचा वर्ग पुन्हा भरल्याचा आगळावेगळा अनुभव माजी विद्यार्थ्यांनी घेतला. २००५-०६ मधील दहावीच्या बॅचचा स्नेहमेळावा जयगुशांतलिराध्या शिवाचार्य महास्वामींच्या सानिध्यात उत्साहात पार पडला. ​कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि महास्वामीजींच्या आशीर्वादाने झाली. प्रभारी मुख्याध्यापक मल्लया स्वामी यांनी सर्वांचे स्वागत केले. विशेष म्हणजे, माजी विद्यार्थ्यांनी प्रार्थना, राष्ट्रगीत आणि परिपाठ सादर करून पुन्हा एकदा शालेय शिस्तीचा अनुभव घेतला. 'छडी लागे छमछम...' म्हणत शिक्षकांकडून प्रेमाने छडीचा मार खाऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्वागत केले. ​स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून या माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. सर्व विद्यार्थ्यांनी मिळून शाळेला दोन सीसीटीव्ही कॅमेरे, दोन मोठे टेबल फॅन आणि नऊ ग्रीन मॅट स्नेहभेट म्हणून दिले. बसवराज हौदे यांनी प्रास्ताविक केले, तर सुरेश खंडाळ, आशिफ जमादार, संजय पवार, शिल्पा कुलकर्णी यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ​यावेळी माजी मुख्याध्यापक शिवपुत्र शाखापुरे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महास्वामीजींनी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद दिले. मल्लिनाथ गौर यांनी सूत्रसंचालन केले, तर चंद्रशेखर खंडाळ यांनी आभार मानले. ‘छडी'चा मार अन् कृतज्ञतेची भेट! ​वयाची चाळी शी ओलांडल्यानंतरही शाळेच्या बाकावर बसल्यावर प्रत्येकातील 'विद्यार्थी' पुन्हा जागा झाला. केवळ गप्पा न मारता, आपल्या शाळेच्या सुरक्षिततेसाठी विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे भेट देऊन एक नवा आदर्श घालून दिला. तसेच शिक्षकांची शिस्त आणि आजच्या काळातील तंत्रज्ञानाची जोड, असा अनोखा संगम या मेळाव्याच्या निमित्ताने दुधनीमधील परमशेट्टी प्रशालेत पाहायला मिळाला.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 9:10 am

सोलार कंपनीचे लाड पुरवण्यासाठी महावितरणकडून वारंवार वीज खंडित:हन्नूर परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांवर खंडित वीज पुरवठ्याचा होतोय परिणाम‎

हन्नूर ( ता. अक्कलकोट) येथील वीज मंडळाचे उपकेंद्र असून या उपकेंद्राअंतर्गत सौरऊर्जा कंपनीचे काम चालू आहे. या कंपनीच्या कामानिमित्त वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. एक प्रकारे या विभागात सौरऊर्जा कंपनीचे अरेरावी चालवली जात असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जाते. हन्नूर ते चपळगाव नन्ना एक्सप्रेस वे-द्वारे वीज वितरीत केली जाते. त्या डेपोद्वारे शेतकऱ्यांना २० ते २५ कनेक्शन देण्यात आले आहे. परंतु या वीजग्राहक शेतकऱ्यांना सुरळीत वीज वापरास मिळत नसून चपळगाव परिसरात वीजप्रवाह वारंवार खंडीत करून शेतकऱ्यांचे पिकांचे पाण्याअभावी नुकसान करत असल्याचे चांगलच दिसून येत आहे. खाजगी कंपन्यांची अरेरावी पुढे वीज वितरण विभाग नांगी टाकत आहे का? असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. या परिसरात सोलार कंपनीने एक प्रकारे मनमानी करून दादागिरी अवलंब करत आहे. यावर तात्काळ प्रशासनाकडून प्रतिबंध करून अखंडीत वीज व उच्च दाबाने नियमित पुरवठा करून शेतकरी वर्गास दिलासा देण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा शेतकरी वर्गाची संयम सुटून वीज वितरण विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. सोलार कंपनीचे महत्वाचे काम सुरु असेल, तरच वीज खंडीत केली जाते ^हन्नूर येथील एमएसइबी (उपकेंद्र) अंतर्गत वीज पुरवठा सुरळीत आहे. एखादया वेळेस सोलार कंपनीचे महत्वाचे काम असेल, तरच वीज खंडीत केली जाते. अन्यथा उपकेंद्राअंतर्गत हन्नूर, चपळगांव, चपळगाववाडी आदी भागात दिवसा व्यवस्थित वीज पुरवठा केले जात आहे. राजू आडम, उपकार्यकारी अभियंता, अक्कलकोट

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 9:09 am

वाखरीतील पालखी महामार्ग बनला ‘डेथ ट्रॅप':आठ दिवसात दोघांंचा बळी, आठ दिवसात चार दुर्घटना,मृत्यूचा फेरा कधी थांबणार प्रवाशांचा सवाल‎

वाखरी ( ता.पंढरपूर ) हद्दीतील पालखी महामार्गावर गेल्या काही महिन्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मागील आठ दिवसात चार अपघात झाले आहेत आणि दोन जणांचा जीव गेलेला आहे. त्यामुळे वाखरी बायपास ते इसबावी विसावा दरम्यान स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी होत आहे. वाखरी हद्दीतून पुणे - मोहोळ महामार्ग बायपास, वाखरी ते टाकळी बायपास आणि वाखरी बायपास ते पंढरपूर असे तीन महामार्ग बनले आहेत. या मार्गावर एकही स्पीड ब्रेकर नाही, तसेच रस्ता चांगला झाल्याने वाहने सुसाट जात आहेत. पंढरपूर शहराबाहेरून अवजड वाहतूक वळवण्यात आलेली आहे. आणि नवीन झालेल्या मार्गामुळे ही सर्व अवजड वाहतूक वाखरी मार्गे सर्व दिशांनी जात आहे. त्यामुळे अवजड वाहने, हलकी वाहने मोठ्या वेगाने जात असतात, परिणामी लहान मोठे अपघात सातत्याने होत आहेत. आठ दिवसांपूर्वी शेतात भाजीपाला घेऊन जात असलेल्या हरी मस्के या शेतकऱ्याला पालखी तळाजवळ ट्रक ने धडक दिली, या धडकेत जखमी झालेल्या हरी मस्के या शेतकऱ्याचा बळी गेला आहे. तर गुरुवार रात्री दहा वाजता पालखी तळाजवळच आयशर टेम्पो ने रिक्षाला धडक दिल्याने मंगळवेढा येथील एका इसमाचा जागीच मृत्यू झालेला आहे. टाकळी - वाखरी बायपास मार्गावर गुरुवारीच क्रेटा कारचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. अशा प्रकारे अपघाताची मालिका सुरू झाल्यामुळे सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागत आहे. वाखरी परिसरात एकाही मार्गावर एकही गतिरोधक नाही. वाखरी गावठाण आणि लक्ष्मणदास महाराज आश्रम शाळा परिसरातही गतिरोधक नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे आणि सुमारे ८०० विद्यार्थांचा जीव टांगणीला लागलेला आहे. बायपास ते पंढरपूर या मार्गावर गतीरोधक हवे .पालखी तळ पाण्याच्या विहिरीजवळ . आश्रमशाळा आणि पालखी तळ चौक .वाखरी गावठाण वळणाजवळ . गोसावी पेट्रोल पंपासमोर . इसबावी विसावा या पाच ठिकाणी गतिरोधक तसेच गाव, शाळा, चौक दर्शवणारे सूचना फलक, स्पीड मर्यादा सूचना फलक आवश्यक आहेत. या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी प्र‌‌‌वाशांमधून होत आहे. रस्ते वाहतूक प्रशासनाने याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. गतिरोधक नसल्याने अपघात होत असतात ^वाखरी येथील पालखी तळाजवळ आमची भटक्या विमुक्त जाती, जमातीच्या मुलांची आश्रमा शाळा आहे. त्याचबरोबर माध्यमिक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे. या ठिकाणी रस्त्यावरील रहदारी अतिशय वेगवान असते, शिवाय एकही गतिरोधक नाही. त्यामुळे सतत अपघात होत असतात. अपघात प्रवण परिसर आणून शालेय मुलांची सुरक्षितता धोक्यात आलेली आहे, तरी पालखी तळाशेजारी, शाळेच्या परिसरात गतिरोधक आणि त्या अनुषंगाने इतर सुविधा निर्माण करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे करणार आहोत. -मोहन क्षीरसागर, मुख्याध्यापक

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 9:08 am

वाहतूक पोलिसाचा संदेश, लहान मुलांना दुचाकी नको सायकल द्या:मोहोळ ते जेजुरी 200 कि.मी सायकल प्रवास‎

मोबाइलसह सद्यस्थितीचा टू व्हीलर किशोरीन विद्यार्थी, विद्यार्थिनी सद्यस्थितीला वापरताना पाहावयास मिळत आहे.मात्र मोहोळ शहरा नजीक नजीक पिंपरी परिसरामध्ये कॉलेज विद्यार्थिनींचा आयशर टेम्पोची धडक बसून जागीच मृत्यू झाला होता. मोटर सायकल बरोबरच सायकल देखील कमी नसल्याचे दाखवत अवघ्या बारा तासांमध्ये वाहतूक शाखेच्या पोलिसा हवालदाराने २०० किलोमीटर प्रवास करून दुचाकी ऐवजी सायकल वापरण्याचा संदेश दिला. मोहोळ पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे सिद्धेश्वर बाबरसह नारायण बनसोडे यांनी दि.२७ डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन दरम्यान मोहोळ येथून जेजुरी येथे जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी अवघ्या बारा तासांमध्ये २०० किलोमीटरचा प्रवास पार केला. या प्रवासा मधून त्यांनी युवा पिढीला वाहन चालवण्याचे वाढत्या प्रमाणासह अपघाता बरोबरच इंधन बचत प्रदूषण मुक्त प्रवास निरोगी शरीर ठेवण्याचा संदेश देत वाढत्या अपघाताला आळा बसविण्यासाठी सायकलवर प्रवास करण्याचा कानमंत्र दिला.दोनशे किलोमीटरचा प्रवास अवघ्या बारा तासात प्रवास केल्याने दि. जानेवारी रोजी मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे. या प्रवासाचे शहरासह तालुक्यातून कौतुक होत आहे.पुढील सायकल राईट की काश्मीर ते कन्याकुमारी करण्याचा मानस आहे. हा प्रवासाचे युवकांनी मार्गदर्शन घ्यावे. गाडी ऐवजी सायकलचा वापर करावा हा संदेश देशभरात पोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न आहे. मोहोळ ते जेजुरी असा दोनशे किलोमीटरचा प्रवास केला आहे. पालकांनी विद्यार्थ्यांना कमी वयामध्ये टू व्हीलर ऐवजी सायकल वापरावे यामधून मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 9:08 am

लाकडाच्या ओंडक्यातून कुलांगे घडवतात जिवंत भासणारी शिल्प:कुलांगे यांनी साग, उंबर, चंदन अशा लाकडांतून तयार केलेली शिल्प अनेकांना भावली‎

झाडाची मुळे, लाकडाच्या ओंडक्यातून साध्या छन्नी-हातोडा, वाकस, पटाशीचा वापर गणपती, दत्त, श्रीकृष्ण, स्वामी समर्थ, अशा देवतांबरोबर क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरचे विश्वचषक जिंकलेले शिल्प, बेटी बचावसारख्या सामाजिक विषयांवर जिवंत भासावीत अशी शिल्पे केडगाव येथील कलावंत मधुकर कुलांगे तयार करतात. आता ते विश्वकर्मा यांची फायबर मूर्ती तयार करत आहेत. माध्यम कोणतंही असो, कलाकाराचे हात लागले की त्याचं सोने होते. हे कुलांगे यांनी साकारलेली चित्रे आणि शिल्पे पाहताना येतो. कुलांगे शहर सहकारी बँकेत कॅशियर होते. बँकेतून निवृत्त झालेल्या कुलांगे यांनी पूर्णवेळ कलेसाठी वाहून घेतले आहे. याआधी त्यांनी हौशी रंगभूमीसाठी नेपथ्य रचना करण्यातही योगदान दिले आहे. सध्या ते केडगावात विविध प्रकारची माध्यमे वापरून कलाकृती तयार करतात. शाडूची माती प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करूनही त्यांनी गौतम बुद्धांचे शिल्प तयार केले आहे. साग, उंबर, चंदन अशा लाकडांतून त्यांनी तयार केलेली शिल्प अनेकांना भावली आहेत. त्यांच्या या शिल्पांना नगरसह इतर जिल्ह्यांसह परराज्यांतूनही मागणी आहे. कुलांगे यांनी खडूशिल्पांची मालिकाही साकारली आहे. केडगावमध्ये तयार होणारे साधे खडू वापरून त्यांनी त्यावर अतिशय देखणी व्यक्तिशिल्पे साकारली आहेत. कॅनव्हास पेंटींगही ते करतात. गानकोकिळा लता मंगेशकर यांचे अवघड अशा बाभळीच्या लाकडावर कुलांगे यांनी शिल्प काढले आहे. ते शिल्प लतादिदींना देण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी प्रकृती अस्वास्थामुळे लतादिदी भेटू शकत नाहीत, पण बऱ्या झाल्यानंतर त्यांची भेट घालून देईल, असे सांगितले होते. पण ती भेट होऊ शकली नाही याची खंत कुलांगे यांना आहे. कुलांगे यांनी सिमेंटच्या ब्लॉकवरही शिल्प तयार केले आहे. बाभळीच्या लाकडावर तयार केलेले लतादिदींचे शिल्प.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 8:58 am

ट्रकची दुचाकीस धडक; जखमी महिलेचा मृत्यू:पतीही गंभीर जखमी; पानबारा शिवारातील दुर्घटना‎

तालुक्यातील पानबारा शिवारात रघुनाथ पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी (दि.९) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेतील चालकाच्या भरधाव ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तिचा पतीही या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. ट्रक (क्र.टीएस ०८ क्यूबी ६३१५)चा चालक अमित आत्माराम लंगर (रा.गोंधरी, ता.औसा, जि.लातूर) हा अत्यंत वेगात ट्रक चालवत होता. तर मोटारसायकल (क्र.एमएच ३९ एस २१३०)वरून अशोक रामचंद्र कोकणी (वय ४१) व त्यांची पत्नी जबनीबाई अशोक कोकणी (वय ४०, रा.नावली, ता.नवापूर) हे बर्डीपाडा (दहिवेल) येथील नातेवाइकांकडे जाऊन परत नावलीकडे येत होते. पानबारा गावाच्या शिवारात रघुनाथ पेट्रोल पंपासमोर ट्रकचालकाने कोकणींच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. याच मार्गावरून पिंपळनेरकडे जाणारे शिक्षक ललित चौरे यांनी तत्काळ महामार्गावरील रुग्णवाहिका क्रमांक १०३३ ला माहिती दिली. रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल होताच जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलवले. अशोक कोकणीवर प्रथमोपचार केले. त्यांची पत्नी जबनीबाई यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू ओढवला . दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक अमित लंगर हा घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र सोनखांब गावाजवळ ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत त्यास ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. तेव्हा तो अत्यंत मद्यधुंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. विसरवाडी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून धडक देत महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने चालकाविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 8:42 am

पिंपळगाव हरे. शाळेच्या मॉडेलची राज्यावर निवड:53 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मिळवले यश‎

ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव हरेश्वर येथील विद्यार्थ्यांनी जळगाव येथील सेंट टेरेसा हायस्कूल येथे आयोजित ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश मिळवून माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातून द्वितीय क्रमांक मिळवला. माध्यमिक गटातून अनुज अजय बडगुजर ( इयत्ता ११ वी) या विद्यार्थ्यांच्या उपकरणास जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले.तसेच उपकरणाची राज्यस्तरासाठी निवड झाली. त्यांना माध्यमिक विभागाचे विज्ञान शिक्षक उल्हास श्रीराम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विज्ञान प्रदर्शनातील गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष पी.बी. पाटील, चिटणीस एस.व्ही. गीते, संचालक मंडळ तसेच ग्रामविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 8:36 am

श्रमसंस्कार शिबिर हा एक कार्यक्रम नसून जीवन घडवणारे संस्कार केंद्र:एरंडोल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे झाले उद्घाटन‎

येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) विभागातर्फे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे दत्तक गाव धारागीर येथे माजी सैनिक बालसिंग पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. विशेष श्रमसंस्कार शिबिर हे काही दिवसांचा कार्यक्रम नसून, जीवन घडवणारे संस्कार केंद्र आहे. श्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना या शिबिरातून प्रत्यक्ष अनुभवायला मिळते, असे मत यावेळी बोलताना माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील, माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, जगदीश पाटील, सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच गोविंदा सोनवणे, ग्रामसेवक रूपाली साळुंखे, पोलिस पाटील सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंग पाटील, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद साळी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य प्रा. अरविंद बडगुजर यांची प्रमुख उपस्थिती होती. शाश्वत विकासासाठी पाणलोट व्यवस्थापन आणि पडीत जमीन विकासावर विशेष भर या संकल्पनेवर शिबिर आयोजित करण्यात आले आहे.रासेयोच्या माध्यमातून विद्यार्थी समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून कार्य करतात.एनएसएसमुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर जीवनातील खरे धडे मिळतात, असे प्रतिपादन संस्थाध्यक्ष अमित पाटील यांनी केले. प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय गाढे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. सविता पाटील यांनी केले तर आभार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश येंडाईत यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 8:35 am

मुलांच्या यशात-अपयशात त्याच्या पाठीशी राहणे हेच असते खरे पालकत्व:चोपडा येथील प्रताप विद्या मंदिरातील कार्यक्रमात राजीव तांबे यांचे प्रतिपादन‎

प्रत्येक वेळी आपल्याला नवीन निर्णय घ्यावा लागतो. माणूस स्वतः शास्त्रज्ञ असतो. मुलांनी चुका केल्या तर त्यांना चुका लक्षात आणण्यापेक्षा त्या दुरुस्त करण्यासाठी त्याला शिकवा. चूक म्हणजे शिकण्याची संधी आहे. पालकांना बदलावे लागेल. असे मत पुणे प्रसिद्ध लेखक कवी,नाटककार राजीव तांबे यांनी चोपड्यात बोलताना व्यक्त केले. चोपडा प्रताप विद्या मंदिराच्या १०८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुलांचा उर्वरित. पान ४ वर कार्यक्रमात अरुणभाई गुजराथी यांनी सांगितले की, पालक हा मुलांचा मालक नाही. विज्ञान फार पुढे जात आहे. कायद्याने मनुष्य सुधारत नाही. तो शिक्षणाने सुधारतो. एआयमध्ये आता जग दिसणार आहे. या शाळेत त्यावर शिक्षण दिले पाहिजे. विज्ञानवादी शिक्षण दिले पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय गोसावी, प्रा. योगिता पाटील यांनी केले होते. आभार मुख्याध्यापक पी.एस. गुजराथी यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 8:34 am

गणेशगावला आठवडाभरापासून मिळेना पाणी:सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर माेहाडीतील महिलांचे उपाेषण मागे‎

तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गणेशगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असून आठवड्याभरापासून नळाला थेंबभरही पाणी आलेले नाही. याबाबत स्थानिक प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर महिलांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तालुक्यातील मोहाडी येथील गणेशगाव वस्ती येथे गेल्या अनेक महिन्यांपासून भेडसावणाऱ्या तीव्र पाणीटंचाईकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त महिलांनी राघोजी क्रांतीसेनेचे अध्यक्ष सोमनाथ वतार, ग्रामपंचायत सदस्य मनोज निकम, शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय मौले, किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. यावेळी महिलांनी पाणी द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा, ‘ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महिलांनी आरोप केला आहे की, कोट्यवधी रुपयांची पाणी पुरवठा योजना अर्धवट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागत उर्वरित पान. ४ ^गणेशगाव येथील महिलांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्यांची पूर्तता केली जाईल. पाणीपट्टी माफ करण्याविषयी जी मागणी केली ती ग्रामसभेत घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल, आंदोलक महिलांची समजूत काढून उपोषण मागे घेतले आहे. शैलेंद्र नलावडे, ग्रामपंचायत अधिकारी, मोहाडी

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 8:31 am

नाशिक - पुणे मार्ग दिंड्यांनी फुलला, ठिक - ठिकाणी ग्रामस्थांकडून स्वागत, महामार्गावर अनेक ठिकाणी चहा, नाष्ट्यांची व्यवस्था‎

टाळ-मृदंगाच्या गजरात ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम..’ नामाचा जयघोष करत नाशिक-पुणे महामार्ग दिंड्यांनी फुलला आहे. त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव व दर्शनासाठी वारकरी मार्गस्थ झाले आहेत. त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सव दि. १४ व १५ जानेवारी रोजी होत आहे. यात्रेसाठी राज्यातील विविध भागांतून लाखो भाविक येतात. दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वर येथे शेकडो दिंड्या मार्गस्थ होत आहेत. सजविलेल्या आकर्षक रथावर निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका व प्रतिमा ठेवलेली असते. महिला भाविकांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. प्रत्येक वारकऱ्यांच्या खांद्यावर भगवी पताका व मुखातून हरिनामाचा गजर सुरू असतो. नांदूरशिंगोटे येथे पालखी सोहळा घेऊन जाणाऱ्या दिंड्या मुक्कामी राहतात. येणाऱ्या भाविकांना चहा, नाश्त्यासह सकाळी व रात्री अन्नदानाची व्यवस्था ग्रामस्थांकडून केली जाते. महामार्गावर असणाऱ्या दोडी, माळवाडी, गोंदेफाटा, गुरेवाडी, हबेवाडी, सिन्नर बायपास आदी ठिकाणी भाविकांच्या विसाव्याची सोय केली जाते. पहाटे पाच वाजेपासूनच वारकऱ्यांकडून भजने सुरू होतात. रस्त्याने जाणाऱ्या पायी दिंडीचे ग्रामस्थांकडून स्वागत केले जाते. प्रामुख्याने अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील दररोज पन्नास ते साठ दिंड्या रस्त्याने जात आहेत. गेल्या २१ वर्षांपासून पायी दिंडीचे आयोजन केले जाते. येथील रेणुकामाता मंदिरासमोरून पालखीची सजविलेल्या आकर्षक रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावर्षी प्रथमच पालखीच्या रथासाठी बैलजोडीला मान मिळाला होता. गावात जागोजागी रथाचे पूजन करण्यात आले. सिन्नर, चेहडी, राणेनगर, महिरवणी आदी ठिकाणी मुक्काम करून दिंडी मंगळवारी (दि.१३) त्र्यंबकेश्वर येथे पोहोचणार आहे. परिसरातील दोडी, दापूर, नळवाडी, मुसळगाव आदी ठिकाणाहून त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या यात्रोत्सवासाठी पायी दिंड्या मार्गस्थ झाल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 8:30 am

चांदवड-देवळ्याचा पाणीप्रश्न कायमचा सोडवण्यासाठी राबविणार ‘जलसमृद्धी’:दोन्ही तालुक्यातील गावा-गावांमध्ये जावून तयार करणार जल आराखडा‎

दुष्काळी तालुके म्हणून ओळख असलेल्या चांदवड व देवळा तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी ‘जलसमृद्धी अभियान’ राबविण्यात येत आहे. यातून सिंचनाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून दोन्ही तालुके सुजलाम - सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. दोन्ही तालुक्यातील गावागावांमध्ये जावून जलआराखडा करण्यात येणार असल्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी सांगितले. या अभियानाच्या शुभारंभ येथील मध्यवर्ती प्रशासकीय सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार अनिल चव्हाण, गटविकास अधिकारी मच्छींद्र साबळे, कृऊबा सभापती नितीन आहे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार डॉ. आहेर यांनी सांगितले की, सिंचन विभागातील अधिकाऱ्यांसमवेत संपूर्ण तालुक्यात पाहणी दौरा करून सूक्ष्म नियोजनातून जल कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यात जुने पाझर तलाव, नवीन साईटवर साठवण बंधारा, वळण योजना, बंधारे-पाटचाऱ्यांची दुरुस्ती, लिफ्टने पाणी योजना यांचा विचार करुन संबंधित गावांना सिंचनाचा फायदा कसा देता येईल, याचा विचार केला जाणार आहे. पार-तापी नर्मदेच्या पाच टीएमसी पाण्याचा समावेश पार गोदावरी प्रकल्पात करण्यात आला असून त्यास शासनमान्यता मिळाली आहे. हे पाच टीएमसी पाणी दिंडोरीसह चांदवड व येवला तालुक्यासाठी वापरण्यात येणार आहे. याचा डीपीआर तयार होत असताना हायराईज कॅनॉलचा प्रश्न मार्गी लागू शकतो. पाणी उपलब्धता लगेच शक्य नसली तरी पुढील चार वर्षात प्रत्येक गावात तेथील भौगोलिक परिस्थिती व प्राथमिकता लक्षात घेऊन पाणी कसे आणता येईल व तेथील पाण्याचा प्रश्न कसा मिटवता येईल, यासाठी प्रयत्न होणार असल्याचे आमदार डॉ. आहेर यांनी सांगितले.माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, कृऊबा सभापती नितीन आहेर यांनीही पाणी उपलब्धतेबाबत मार्गदर्शन केले. सरपंच, पदाधिकारी यांनी केटीवेअर बंधारे, पाझरतलाव, पोटचार्‍या, लिकेज, पाणी लिफ्टींग, नालाबंडींग दुरुस्ती व संबंधीत परिसरात पाणी उपलब्धतेसाठी उपाययोजनांबाबत यावेळी विविध सूचना केल्या. २६ जानेवारी रोजीच्या ग्रामसभेत गावाची प्राथमिकता ठरवून अपेक्षीत सिंचनाची कामे, उपाययोजना व मुख्यमंत्री शेत पाणन योजनेंतर्गत अपेक्षीत रस्त्यांचे ठराव करुन घ्यावेत, असे आवाहन आमदार डॉ. आहेर यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री शेत पाणन योजनेंतर्गत रस्त्यांसाठी स्वतंत्र निधीची उपलब्धता होणार असल्याचे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 8:27 am

समाज सेवेतून स्वयंसेवकांनी नेतृत्व गुण विकसित करावे:एकलहरेत उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यवंशी यांचे प्रतिपादन‎

राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश समजून स्वयंसेवकांनी समाजाच्या सेवेतून नेतृत्व गुण विकसित करावे. शिक्षणाबरोबर आपल्यातील कौशल्य विकसित करून जीवन यशस्वी करावे. या स्पर्धेच्या युगात इतर गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या भावी आयुष्यासाठी आपले ध्येय निश्चित करून जिद्द, कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जीवन यशस्वी करावीत, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी केले. कळवण एज्युकेशनच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे तालुक्यातील एकलहरे येथे उद्घाटन करतांना सूर्यवंशी बोलत होते. यावेळी कळवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब शिंदे, पोलिस उपनिरीक्षक जगदीश बोरसे, प्राचार्य डॉ. बी .एस. पगार, राकेश बोरसे, उत्तम निकम, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एस.एम. पगार आदी उपस्थित होते. डॉ. रावसाहेब शिंदे यांनी राष्ट्रीय सेवा योजना दिशादर्शक असून शाश्वत विकासासाठी तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे. पर्यावरणीय अनेक समस्या निर्माण झाल्या असून अशा शिबिरातून समाज प्रबोधन होऊन निश्चित पर्यावरण संवर्धनासाठी मदत होईल. याप्रसंगी जयवंत बोरसे, विष्णू बोरसे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. उद्घाटन कार्यक्रमासाठी रामराव पगार, शिवाजी निकम आदींसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते. या सात दिवशी शिबिरात विद्यापीठाच्या शाश्वत विकासासाठी पाणलोट आणि पडीक जमीन व्यवस्थापन या संकल्पनेतून मृदा व जलसंवर्धन, ग्रामस्वच्छता, नदी स्वच्छता, जैवविविधतेचे संवर्धन, सलगसमपातळी चर, हे उपक्रम हाती घेतले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 8:26 am

शिव-पार्वती विवाह स्त्री-पुरुष ऊर्जेचे प्रतीक- खणसे महाराज

शिव आणि पार्वती यांचा विवाह म्हणजे प्रेम, भक्ती आणि विश्वातील संतुलन राखणाऱ्या स्त्री-पुरुष ऊर्जेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन शिवमहापुराण प्रवक्ते हभप कैलास महाराज खणसे यांनी केले. गुरुवारी खंडाळा येथे सुरेश पाटणे यांच्या पत्नी कमलबाई पाटणे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पाटणे परिवाराच्या वतीने आयोजित पाच दिवसीय श्री शिव महापुराण कथा व हरी किर्तनाच्या चौथ्या दिवशी ते बोलत होते. शंकर-पार्वती विवाह अध्याय सुरू असताना महाराजांनी सांगितले की, हे दैवी मिलन नर आणि नारी तत्वांच्या एकत्रीकरणाचे प्रतीक आहे. त्रियुगी नारायण मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि इतर देवतांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. हे मंदिर या पवित्र विवाह सोहळ्याचा साक्षीदार आहे. कार्यक्रमात एका जोडप्याने शिव-पार्वतीची वेशभूषा परिधान करून विवाह सोहळ्याचा देखावा सादर केला. यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती प्रकाश शिंदे, उद्योजक संजय पाटणे, रवी पाटणे, राजेंद्र पाटणे, अशोक शिंदे, प्रभाकर बागुल, ज्ञानेश्वर बहाळस्कर, रमेश बहाळस्कर, गणेश पाटणे यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 8:12 am

शांतता, सलोखा, बंधुभाव अबाधित राहण्यासाठी लाडगावला विशेष दुआ:2 महिन्यांपासून होती तयारी सुरू, समित्यांचे केले होते गठन‎

तालुक्यातील लाडगाव येथे झालेल्या दोनदिवसीय तालुकास्तरीय इज्तेमाची शुक्रवारी (दि. ९) उत्साहात सांगता झाली. या इज्तेमाला तालुक्यासह जिल्ह्यातून पंधरा हजार भाविकांनी उपस्थिती लावली होती. देशात शांतता, सलोखा आणि बंधुभाव अबाधित राहावा यासाठी विशेष ‘दुआ’ करण्यात आली. मौलांना हुसेन साहब यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या दुआमध्ये उपस्थितांनी एकमुखाने ‘आमीन’ म्हणत सहभाग घेतला होता. इज्तेमासाठी शुक्रवारी सकाळपासूनच हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव लाडगावकडे दाखल होत होते. इज्तेमा स्थळाकडे जाणारे रस्ते वाहनांनी ओसंडून वाहत होते. दुपारपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी दुवापूर्वी नमाजसाठी भाविकांची धावपळ सुरू होती. शहरापासून इज्तेमा स्थळापर्यंत ‘खिदमतगार’ म्हणून हजारो तरुणांनी स्वतःला झोकून देत सेवा बजावली. त्यांच्या अथक परिश्रमामुळे वाहतूक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू होती. इज्तेमाच्या पूर्वतयारीसाठी जिल्ह्यातून निघालेल्या हजारो ‘जमात’ गुरुवारीच इज्तेमास्थळी दाखल झाल्या होत्या. या इज्तेमामध्ये वैजापूर तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांतील मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. इज्तेमात सहभागी झालेल्या सर्व समाजबांधवांसाठी अवघ्या ३० रुपयांत पोटभर जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. ही व्यवस्था खंडाळा सेंटरतर्फे करण्यात आली होती. थंड पाणी, चहा, सरबत तसेच रुग्णालय, औषधे, रुग्णवाहिका, अग्निशमन बंब व तज्ज्ञ डॉक्टरांची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. इज्तेमास्थळी भव्य बाजारही भरवण्यात आला होता. शेवटच्या दिवशी खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. दोन दिवसांत विविध जिल्ह्यांतील महत्त्वाच्या धर्मगुरूंनी मार्गदर्शन केले. सर्व नमाजचे पठणही येथेच पार पडले. शुक्रवारी सायंकाळी मौलांना हुसेन साहब यांच्या उपस्थितीत सुख-शांतीसाठी विशेष दुवा करण्यात आली. सेवा करणाऱ्यांना बरकत दे... ः प्रार्थनेनंतर हजारो भाविक एकाच वेळी बाहेर पडत असताना कुठेही गोंधळ झाला नाही. वैजापूर तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी अथक परिश्रम घेत वाहतूक सुरळीत ठेवली. प्रशासनासह स्वयंसेवकांचे विशेष सहकार्य लाभले. ‘आमचे सर्व गुन्हे पदरात घे, सेवा करणाऱ्यांना बरकत दे’ अशा शब्दांत दुवाला सुरुवात झाली. जमिनी देणारे व मदत करणाऱ्यांसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. या वेळी मौलांना हुसेन साहब यांच्यासह भाविकांचे डोळे पाणावले होते.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 8:12 am

सावंगीत उद्यापासून भैरवनाथ बाबांच्या तीनदिवसीय यात्रोत्सवाचा शुभारंभ:गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून उभारले तब्बल दोन कोटींचे भव्य मंदिर‎

सावंगी ता.गंगापूर येथील श्री भैरवनाथ बाबांचा तीन दिवसीय यात्रा उत्सव दि. ११ रविवारपासून सुरू होत आहे.यात्रेमुळे दर रविवारी भरणारा आठवडी बाजार सावंगी मध्ये भरवला जातो. ही परंपरा सुरुवातीपासून चालत आलेली आहे. मंगळवार पर्यंत चालणाऱ्या यात्रोत्सवाची गावकऱ्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून तब्बल दोन कोटी रुपयांचे भव्य भैरवनाथ बाबांचे मंदिर बांधले आहे. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन मंदिरात आकर्षक रंगरंगोटी केली आहे. त्यामुळे यंदाच्या यात्रा उत्सवात गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पुर्वी पेक्षा यंदा दोन पटीने यात्रा उत्सवात गर्दी वाढणार आहे. भाविकांच्या नवसाला पावणारे प्रसिद्ध जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री भैरवनाथ बाबांचे सांवगी येथे सुमारे शंभर वर्षांहून अधिक जुन्या मंदिराचा गावकऱ्यांकडून नवीन मंदिर बांधून जीर्णोद्धार करण्यात आला आहे. येथील प्रसिद्ध भैरवनाथ बाबांचे मंदिर नवसाला पावतात, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने यात्रेच्या दिवशी पंचक्रोशीतील लाखो भाविक सावंगीला येऊन रोडग्यांचा नैवेद्य नवसापोटी बनवून पाहुणे मंडळींना खाऊ घालतात. तसेच विंचू-पान लागलेले भाविक तर मोठ्या श्रद्धेने एक दिवस मंदिरात वास्तव्य करतात. यंदाचा यात्रा उत्सव मंदिर बांधकाम समितीच्या मार्गदर्शनाखालीच पार पडणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अशोकदादा पवार आणि उपाध्यक्ष संजय पांडव यांनी दिव्य मराठी कडे दिली आहे. याव्यतिरिक्त समितीत २१ जनांचा समावेश आहे. दरम्यान मंदिर परिसरासह तीन दिवसीय यात्रोत्सवास ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांना सोई सुविधा नियोजन व्यवस्थेवर आमचे लक्ष असणार आहे, अशी माहिती सरपंच मीनाताई संजय पांडव यांनी दिली आहे. पारंपरिक मनोरंजनाचे कार्यक्रमही होणार यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा तर रविवारी मनोरंजनासाठी दादासाहेब पवार यांनी नेहमीप्रमाणे लोकनाट्य, तमाशा असे पारंपरिक मनोरंजनाचे कार्यक्रम देखिल आयोजित करण्यात आलेले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 8:11 am

जीवनदान महाकुंभ सामाजिक प्रकल्प अंतर्गत रक्तदान शिबिर:आयोजित महारक्तदान शिबिरामध्ये 167 रक्तदात्यांनी केले रक्तदान‎

शहरालगत असलेल्या पावन गणपती येथे दिनांक ६ जानेवारी २०२६ मंगळवार रोजी जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेतून जीवनदान महाकुंभ ह्या सामाजिक प्रकल्प अंतर्गत भव्य दिव्य असे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पैठणचे नवनिर्वाचित नगरसेवक ज्ञानेश्वर दहिवाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे प्रमुख आयोजक या संस्थेचे तालुका अध्यक्ष दिनेश हुले, अध्यात्मिक प्रमुख पठाडे, सेवा केंद्र अध्यक्ष भागेशकुमार अग्रवाल, मोनिका अग्रवाल, सामाजिक उपक्रम प्रमुख शिवाजी ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गणरायाचे पूजन करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने सेवा केंद्र अध्यक्ष भागेश कुमार अग्रवाल यांनी समाधान व्यक्त केला. सध्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेता जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या जीवनदान महाकुंभअंतर्गत मागील तीन वर्षांपासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात हे शिबिर राबवले जाते. यावर्षी पैठण येथील शिबिरात १६७ रक्तदात्यांनी जाते. यावर्षी पैठण येथील शिबिरात १६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून हे जीवनदान महाकुंभ प्रकल्प यशस्वी केले. या रक्तदात्यांमुळे अनेक लोकांना जीवनदान मिळेल. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी भागेशकुमार अग्रवाल, शुभम ठोंबरे, कुणाल तिळवणे, महेश कस्तुरे, मनीष तोतला, ऋषी टेकाळे व जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या सर्व भक्तांनी परिश्रम घेतले.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 8:10 am

छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणूक:काँग्रेसची मराठा, मुस्लिम समाजांच्या मतांवर भिस्त, एमआयएमला रोखण्याचा प्रयत्न

मनपा निवडणुकीत काँग्रेसने शहराध्यक्ष युुसूफ शेख आणि खासदार कल्याण काळे यांच्याकडे नेतृत्व सोपवले आहे. त्यांच्या माध्यमातून काँग्रेसने त्यांची हक्काची असलेल्या मुस्लिम आणि मराठा समाजाच्या मतांचे एकत्रीकरण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एमआयएमला टक्कर देण्यासाठी तब्बल २९ मुस्लिम उमेदवार काँग्रेसने रिंगणात उतरवले आहेत. २०१५ मध्ये काँग्रेसचे ११ नगरसेवक निवडून आले होते. विरोधी पक्षनेतेपद हे नेहमी काँग्रेसकडे होते. मात्र, एमआयएमचे २५ नगरसेवक आल्याने काँग्रेसची विरोधी पक्षाची जागा त्यांनी घेतली. आता मुस्लिमबहुल प्रभागांत काँग्रेसने २९ जागांवर उमेदवार उतरवले आहेत. आघाडीच्या पर्यायातून मते मिळवण्याचे प्रयत्न आघाडीत काँग्रेस ७२, तर राष्ट्रवादी २१ असा ९३ जागा लढवत आहे. कल्याण काळे यांना जालना मतदारसंघात मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात साथ लाभली होती. त्याचा प्रयोग पुन्हा मनपा निवडणुकीत करण्याचा प्रयत्न आहे. आमदार, वरिष्ठ नेते नसल्यामुळे अडचण जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. यापूर्वी मनपाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांच्या सभा होत असत. मात्र, या वेळी वरिष्ठ नेत्यांनी फारसे लक्ष घातलेले दिसत नाही. हर्षवर्धन सपकाळ यांनी सभा घेतली.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 7:46 am

मी महापालिका बोलतेय..:मनपातील सत्तेचं गणित समजून घेताना विदेशी शिष्टमंडळ चक्रावलं..., महापालिकेत 2000 मध्ये उपमहापौर अन् स्थायी समिती सभापती ही पदे होती विरोधी पक्षांकडे

आता मी एक असा किस्सा सांगणार आहे जो तुमचे डोके चक्रावून टाकेल. महापालिकेत शिवसेना-भाजपच्या चढाओढीच्या राजकारणातील हा प्रसंग आहे. तिसऱ्या महापालिकेत म्हणजे २००० मध्ये भाजपने महापौरपदाची वाटणी करून घेतली. त्यानुसार भागवत कराड हे महापौर झाले हे तर मी सांगितलंच आहे, पण त्या निवडणुकीत उपमहापौरपद आणि स्थायी समिती सभापतिपदाबाबतच करार पाळण्यात आला नाही. त्यातून भलतंच घडलं. उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत नरवडे पाटील विजयी झाले. एकदा एक विदेशी शिष्टमंडळ महापालिका भेटीला आलं होतं. त्यावेळी घडलेला हा गमतीदार प्रसंग. महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेता, स्थायी समिती सभापतिपद आणि सभागृह नेता ही पदं महत्त्वाची असतात. विदेशी शिष्टमंडळानं अर्थातच इंग्रजी भाषेतून चर्चा केली. सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि एकूणच महापालिकेचं थोडक्यात कामकाज त्यांना समजून घ्यायचं होतं. त्यांनी विचारलं रुलिंग पार्टीबाबत... त्यावर महापौरांनी स्पष्ट केलं की, शिवसेना-भाजप संयुक्तपणे सत्तेत आहे. त्यावर स्वाभाविकपणानं त्यांना वाटलं उपमहापौरही ‘रुलिंग पार्टी’चाच असंल. तेव्हा त्यांनी वसंत नरवडे यांना ‘शिवसेना का?’ असे विचारले. तेव्हा खुलासा झाला की ते तर विरोधी पक्षात आहेत, पण उपमहापौर आहेत. मग विरोधी पक्षनेत्याची ओळख करून दिली. त्यावर ते म्हणाले, ‘अच्छा विरोधी पक्षनेता आणि उपमहापौर म्हणजे तुमची अर्धी सत्ता आहेच...’ आता आला क्रमांक स्थायी समिती सभापतींचा, तर तिथंही गणित बिघडलेलं होतं. तिथे होता दुसराच सभापती. महापालिकेतील हे गौडबंगाल विदेशी शिष्टमंडळाला काही कळेना. कोण सत्तारूढ, कोण विरोधी काहीच थांगपत्ता लागेना. कारण विरोधातील काँग्रेस, राष्ट्रवादी या दोन पक्षांचे कमी नगरसेवक. तरीही त्यांच्याकडं उपमहापौरपद. शिवसेना, भाजप यांच्या युतीत ज्यांचे कमी नगरसेवक त्यांच्याकडं महापौर. स्थायी समितीत युतीचे अधिक सदस्य असताना सभापतिपद काँग्रेसकडं. थोडक्यात ही ओळख विदेशी शिष्टमंडळाला बरंच काही सांगून गेली. एकाच पक्षाच्या लोकांनी क्रॉस वोटिंग केलं असणार किंवा काही सदस्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला असणार, असं त्यांना वाटलं. ते जितके खोलात जायचा प्रयत्न करायचे तितके बुचकळ्यात पडायचे. कारण विरोधी आघाडीतील मागासवर्गीय संघटना, अपक्ष आणि इतर पक्षांचे संख्याबळ, दोन-तीन संलग्नित बंडखोर यामुळे त्यांची आकडेमोड संपेनाच. शेवटी महापौरांनी त्यांना हस्तक्षेप करून सांगितलं, की असं कधी कधीच असंत. बहुतांशी वेळा सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे अत्यंत स्पष्टपणानं लक्षात येतात... त्यावर एकच हशा पिकला. तरीही शिष्टमंडळातला एक जण म्हणाला, ‘ओके म्हणजे आमची भेटच चुकीच्या काळात झाली तर...’ एकूण काय तर या महापालिकेतील सत्तेचं गणित विदेशी शिष्टमंडळाला शेवटपर्यंत कळलंच नाही.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 7:43 am

गोंदियात बिबट्याने आईवडिलांसमोर हल्ला करून बालकाला ठार केले:खडकी गावात अंगणात चुलीजवळ शेकत असताना घडली घटना

अंगणात आईवडिलांसमोरच बिबट्याने उचलून नेलेल्या ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याच्या खडकी (डोंगरगाव) येथे ही घटना घडली. कुटुंब शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता चुलीजवळ शेकण्यासाठी बसलेले होते. हियांश शिवशंकर रहांगडाले असे मृत बालकाचे नाव आहे. जंगलाजवळ शिवशंकर रहांगडाले यांचे घर आहे. २ महिन्यांपूर्वीही बालिका ठार खडकी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. याआधीही अनेकदा ग्रामस्थांनी वन विभागाकडे तक्रारी दिल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वीच तिरोडा तालुक्यातील इंदुरा गावात ९ वर्षीय मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली होती. तरीही कोणतीही ठोस उपाययोजना वन विभागाने केली नाही. प्रशासनाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा. पीडित कुटुंबाला आर्थित मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 7:37 am

संतोष देशमुख खून प्रकरण:दोषी पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार, चौकशीच्या निष्कर्षांच्या छाननीसाठी समिती स्थापन

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर आता त्यातील निष्कर्षांच्या छाननीसाठी आणि दोषींवर कारवाईचा “ॲक्शन टेकन रिपोर्ट’ तयार करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी एक उच्चस्तरीय छाननी समिती स्थापन केली आहे. २०२४ च्या हिवाळी अधिवेशनात या हत्या प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १५ जानेवारी २०२५ रोजी निवृत्त न्यायमूर्ती एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती नेमली गेली. काय करेल छाननी समिती गृह विभागाच्या शासन निर्णयानुसार अपर मुख्य सचिवांच्या (गृह) अध्यक्षतेखालील ६ सदस्यांची समिती पुढील कामे करणार आहे: १) चौकशी समितीच्या निष्कर्षांची सखोल छाननी करणे. २) सुचवलेल्या उपाययोजनांवर शासनाने करावयाच्या कारवाईचा मसुदा तयार करणे. ३) भविष्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे. अहवालात काय आहे न्यायमूर्ती ताहलियानी समितीने २४ नोव्हेंबर २०२५ रोजी आपला अहवाल शासनाला सादर केला. सूत्रांच्या माहितीनुसार, या अहवालात या घटनेत दोषी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अल्प आणि दीर्घकालीन उपाययोजनांची शिफारस केली आहे. स्थानिक पोलिसांकडून तपासात मोठी चूक संतोष देशमुख हत्येचा मुख्य सूत्रधार म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड याला अटक झाली आणि त्याच्यावर मकोकांतर्गत कारवाई केली. या प्रकरणात धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. चौकशी समितीने या घटनेला पोलिस अधिकारी, कर्मचारी जबाबदार असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 7:35 am

संभाजीनगरच्या 2500 मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याची कोर्टाला माहिती:नव्या नगरसेवकांनी पाणी योजनेमध्ये हस्तक्षेप केल्यास फौजदारी- हायकोर्ट

शहरासाठी मंजूर २,७४० कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामात नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करू नये, असे मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (९ जानेवारी) बजावले. महापालिकेची निवडणूक सुरू आहे. निकालानंतर लोकनियुक्त मंडळ मनपाचा कारभार पाहील. अशा स्थितीत नवीन पाणीपुरवठा योजनेत अडथळे आणले जाऊ शकतात, अशी शंका सुनावणीप्रसंगी उपस्थित झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अभय मंत्री यांनी योजनेच्या कामात अडथळे आणणाराची गय करणार नाही. कामात आणलेला अडथळा हा न्यायालयाचा अवमान समजला जाईल. अशी व्यक्ती कुठल्याही पदावरील अथवा हुद्द्याची असो त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. नवीन पाणीपुरवठा योजनेत ३७०० अश्वशक्तीचे ३ पंप बसवले जाणार आहेत. त्यापैकी एक पंप बसवला असून त्याची चाचणी पूर्ण झाल्याचे सुनावणीप्रसंगी सांगण्यात आले. जॅकवेलसह २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीत वेल्डिंग व इतर कचरा मोठ्या प्रमाणावर साचलेला आहे. संबंधित कचरा एक पंप सतत सुरू ठेवल्यानंतर एक महिन्यात स्वच्छ होईल. २ पंप सुरू ठेवले तर कचरा स्वच्छ करण्यास १८ दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती जीव्हीपीआर कंपनीने दिली. अडीच हजार मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. जॅकवेलच्या ‘ए पोर्शन’चा स्लॅब पूर्ण झाला. अंतर्गत जलवाहिनीचे १५ झोन असून पहिल्या टप्प्यातील १२० किमीचे व दुसऱ्या टप्प्यातील २३७ किमीचे काम शिल्लक आहे. कामावर एक हजार कामगारांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात ५०० कामगार कामावर असल्याचे सांगण्यात आले. योजनेतील ५३ जलकुंभांपैकी केवळ नऊ जलकुंभांचे काम पूर्ण केल्याचे सुनावणीदरम्यान सांगण्यात आले आहे. मनपा १५ दिवसांत देणार २१.१८ कोटी महापालिकेला शासनाकडून कर्जापोटी मिळालेले ८२२ कोटी रुपये टप्प्याटप्प्याने, कामाच्या प्रगतीनुसार कंपनीस दिले जात असल्याचे मनपाचे वकील संभाजी टोपे यांनी सांगितले. जीव्हीपीआर कंपनीने जीवन प्राधिकरणाकडे पाठवलेले बिल खातरजमा केल्यानंतर मनपाकडे पाठवले जाते. अशा प्रकारचे २१.१८ कोटींचे बिल मनपाकडे पाठवले आहे. ते तपासून १५ दिवसांत अदा केले जाईल, असे ॲड. टोपे यांनी न्यायालयास सांगितले. याचिकेत न्यायालयाचे मित्र ॲड. शंभुराजे देशमुख, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, मूळ याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. अमित मुखेडकर, जीव्हीपीआरसाठी ज्येष्ठ विधिज्ञ आर. एन. धोर्डे, जीवन प्राधिकरणातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 7:29 am

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:हिंदुत्त्वाच्या नावावर केलेली युती शिवसेना-भाजपने सत्तेसाठी तोडली, उबाठा गटाने 12 मामू उमेदवार दिले ते त्यांचे वाटोळं करणार, भाजप- उबाठा आमने-सामने

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका प्रभागात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पाणीटंचाई, रखडलेली विकासकामे, अर्धवट रस्ते, ड्रेनेजचा प्रश्न आणि रात्री-अपरात्री होणारा पाणीपुरवठा या मूलभूत समस्यांवरून सत्ताधारी शिंदे गटाची शिवसेना आणि ठाकरे गट (उबाठा) एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. उमेदवारीपासून ते विकासकामांपर्यंत प्रत्येक मुद्द्यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, प्रभागातील नागरिकांच्या प्रश्नांपेक्षा राजकीय वादच अधिक केंद्रस्थानी आला आहे. शिवसेनेचे उमेदवार बाबाभाऊ तायडे यांनी माजी नगरसेवकांवर विकासकामांकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करत, पाणी योजनेचे “तीनतेरा” झाल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांवर खोटी आश्वासने, जातीय राजकारण आणि सत्तेसाठी हिंदुत्त्वाशी तडजोड केल्याचा आरोप केला आहे. उमेदवार पळून जाणे, बाहेरून उमेदवारी “आयात” केल्याचे आरोप, आणि पाणी प्रश्नावरून उभे राहिलेले आंदोलनाचे इशारे यामुळे निवडणूक रणधुमाळी अधिक तीव्र झाली आहे. ६५ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या प्रभागात टँकरवर अवलंबून असलेला पाणीपुरवठा, बंद पथदिवे आणि अस्वच्छतेचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. अशा परिस्थितीत मतदार कोणाच्या शब्दांवर विश्वास ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिव्य मराठी डिजिटलचा लढाई मनपाची मुद्दा नागरिकांच्या शो ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिंदे-ठाकरे शिवसेनेमध्ये झालेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर आता या प्रभागातील समस्या सोडवल्या जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खैरेंनी पाणी योजनेचे तीन तेरा वाजवले शिवसेनेचे उमेदवार बाबाभाऊ तायडे म्हणाले की, आमच्य प्रभागात समस्यांचा डोंगर आहे. माजी नगरसेवकांनी आमच्या परिसराचे वाटोळे केले आहे.आमच्याकडे ड्रेनेज, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची टाकी नाही असे एक ना अनेक प्रश्न आहेत.परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.आमच्या परिसरात शिवसेनेच्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही अनेक कामे केली आहेत, या कामांवर आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. नगरसेवकांचे काम होते ते त्यांनी केले नाही उलट आमच्या परिसराला तांडा म्हणून संबोधले यामुळे जनतेमध्ये त्यांच्याविरोधात रोष आहे. त्यांना दांडा दाखवण्याचे काम आम्ही करणार आहोत. सत्तेशिवाय शहानपण नसते, आमच्याकडे आमदार आमचे, खासदार आमचे, मंत्री आमचे आहेत त्यामुळे आम्ही कामे करू शकत आहोत. चंद्रकांत खैरे यांनी पाणी योजनेचे तीन तेरा वाजवले. हिंदुत्त्वासाठी केलेली युती यांनी सत्तेसाठी तोडलीठाकरे गटाचे उमेदवार कुणाल राऊत म्हणाले की, आमच्या प्रभागात अनेक समस्या आहेत या वॉर्डात सत्ताधारी अनेक कामे केल्याचा दावा करतात ते ऐकले की एकच शब्द आठवतो, फेको, फेको आणि फेको लपेटो अशी परिस्थिती झाली आहे.याचे दोन्ही आमदार विधानसभेच्यावेळी काढावर निवडून आले आहेत. ते पण जातीच्या गणितामध्ये तफावत नसती तर हे दोन्ही आमदार पराभूत झाले असते. आम्ही पाण्यासाठी रक्त घ्या पण पाणी द्या असे आंदोलन संजय शिरसाट यांच्या घरासमोर करणार होतो त्यांनी आंदोलनच होऊ दिले नाही. हिंदुत्त्वासाठी केलेली युती यांनी सत्तेसाठी तोडली, काय उपयोग तुम्ही हिंदुत्त्वाच्या नावाने एकत्र येतात आणि युती तोडतात. ही लोकं जातीच्या नावाने राजकारण करतात, शहर पूर्णपणे भकास झाले आहे. आमच्याकडे पाणी येण्याची वेळ निश्चित नाही, त्यामुळे महिलांना खूप त्रास होतो. यांना प्रचाराला लोकं भेटत नाही. रस्ते यांनी केलेले नाहीत, ते केंद्र सरकारच्या निधीतून झाले आहेत. पाण्याचे आश्वासन दिले पण योजना पूर्ण करू शकलेले नाही. मनपा आयुक्तांनी पैसे लुटले आहेत दोन महिन्यात ते पळून जाणार आहे. ही कुणाची माणसं आहेत? रस्त्याचे उद्घाटन ६ महिन्यापूर्वी झाले आणि निवडणुकीवेळी काम करत मतदान मिळवायचे हे काम सत्ताधारी करत आहेत. तर जाती-जातींमध्ये भांडण लावण्याचे काम सुद्धा सरकारकडून सुरू आहे. हे सर्व ईडीला घाबरुन पळून गेलेली लोकं आहेत. सचिन खैरे हे गुलमंडी प्रभागात राहतात ठाकरे गटाचे विलास संभाहारे म्हणाले की, आमच्या प्रभागात रात्री २ वाजता किंवा ३ वाजता येते. त्या वेळेत बदल करणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांकडून अनेक वेळा पाण्याची डेडलाइन देण्यात आली आहे. मग पाणी का आले नाही केवळ पाइपलाइन टाकून ठेवल्या आहेत. सचिन खैरे हे गुलमंडी प्रभागात राहतात त्यामुळे त्यांनी तिथून उमेदवारी घेतली. ठाकरे गटाचे कार्यकर्ते सक्षम आहेत ते पक्षासाठी काम करू शकतात.केवळ २० टक्के काम राहिलेशिवसेनेच्या उमेदवार प्रतिभा जगताप म्हणाल्या की, माझ्या मतदारसंघात पाहिला तर केवळ पाण्याची समस्या आहे, इतर कोणतीही समस्या नाही. पाण्याचा विषय आमच्या प्रभागात आहे तो येणाऱ्या ४ ते ५ महिन्यात संपणार आहे.यामुळे महीला खूश आहेत. आम्हाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे, ८० टक्के कामे झालेली आहेत, आता आमच्यासाठी केवळ २० टक्के काम राहिलेले आहे. सरकारने सर्व गोष्टी पुरवल्या आहेत. आम्ही जनतेचे काम करत आहोत मागील दोन निवडणुकीत आम्ही विरोधकांना त्यांची जागा दाखवली आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ. लोकांना पाणी न मिळण्यासाठी जुने नगरसेवक कारणीभूत आहेत, ते उबाठाचे नगरसेवक होते. पाण्याची योजना कुणी खाल्ली हे पाहणं महत्त्वाचे आहे. आमचे सरकार आल्यापासून अनेक कामे झाली आहेत, आता पाणी येणार आहे. मे महिन्यात पाणी येणार आहे, आम्ही खोटे बोलणारी लोकं नाहीत. उबाठा गटाला नेताच उरलेला नाही. पालकमंत्री-मंत्र्यांनी शहरासाठी काहीही केलेल नाही ठाकरे गटाचे प्रमोद दुथडे म्हणाले की, मनपा आल्यापासून तिच्यावर शिवसेना-भाजपची सत्ता आहे.त्यावेळी आम्ही एक ते दोन दिवसांनी पाणी देत होतो. पण हे सराकर आल्यापासून ८ ते १० दिवसांनी पाणी येते. बेरात्री पाणी येत असल्याने आरोग्यावर परिणाम होत आहे. यासाठी नगरसेवक काहीच करु शकत नाहीत. पालकमंत्री असो की मंत्री त्यांनी शहरासाठी काहीही केलेल नाही. त्यांचे शहरामकडे लक्षच नाही. नगरसेवकांना जास्त काही निधी मिळत नसतो. पण नगरविकास मंत्री यांच्यामुळे प्रभागाचे नुकसान झाले आहे. बेरात्री येणारे पाणी आमच्या काळात देणार नाही.टँकर मुक्त प्रभाग करण्याचा आमचा हेतू राहणार असून दिवसा पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. काही लोकांनी माझ्यावर आरोप करणाऱ्या लोकांना माहिती नसेल की मी गेली २५ वर्षे लोकांची सेवा करत आहे, आमदारकी लढलो हे खरे पण पक्षाचा झेंडा म्हणजेच आमचा उमेदवार आहे. या आहेत प्रभागाच्या समस्या हिमायतबाग, पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, भावसिंगपुरा, भीमनगर, कानिफनाथ कॉलनी आदी भागांमध्ये मूलभूत समस्या अद्यापही कायम आहेत. अर्धवट काम केलेले रस्ते, जुनाट ड्रेनेजलाइनमुळे सांडपाणी रस्त्यावर येणे, गलिच्छ नाले व डासांचा उपद्रव यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.या प्रभागातील अद्यापही टँकरने पाणीपुरवठा होतो. अनेक ठिकाणी तर टँकरदेखील उपलब्ध नसल्याने नागरिकांना बोअर आणि विहिरीच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.या परिसरात ६५ हजार नागरिक राहतात. मात्र, असे असले तरी घंटागाडी आठवड्यात तीन ते चार वेळेसच येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. प्रभागात १८ घंटागाड्या आहेत. मनपा आणि स्मार्ट सिटीने रस्त्याच्या कामासाठी मोठा खर्च केला. यामुळे रस्त्याचे जाळे वाढले. मात्र, अंतर्गत रस्त्याची कामे अद्याप बाकी असल्याने नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग, फेरीवाल्यांचा ताबा आणि स्ट्रीट लाइट बंद असल्याने रात्री अपघात व गुन्ह्यांचा धोका वाढल्याचे स्थानिकांन सांगितले. अशी आहे प्रभागाची व्याप्ती पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, भावसिंगपुरा, जयसिंगपुरा, हनुमान टेकडी, हिमायतबाग, विद्युत कॉलनी, गणेश कॉलनीचा काही भाग, चाऊस कॉलनी, विद्युत कॉलनी, साफल्यनगर, पेठेनगर, भीमनगर भागश:, कानिफनाथ कॉलनी, कुतुबपुरा, पराक्रम कॉलनी. एकूण मतदार । 35 हजार 602

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 7:05 am

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:रात्री-बेरात्री येणारं दूषित पाणी, फुटलेल्या ड्रेनेज लाईन, कचऱ्याचा सडा आणि अतिक्रमणाचा विळखा, ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’मध्ये प्रभाग ३ ची वेदनादायक वास्तवकथा

छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये नागरिकांना रोजच्या आयुष्यात मूलभूत नागरी सुविधांसाठी झगडावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात समाविष्ट असलेल्या या प्रभागात पहाडसिंगपुरा, बेगमपुरा यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांचा समावेश होतो. मात्र, या भागातील नागरिकांना पाणी, ड्रेनेज, स्वच्छता, रस्ते आणि पार्किंगसारख्या अत्यावश्यक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. वाढत्या समस्येमुळे आम्ही यावेळी मतदानचं करणार नाहीत असं प्रभागातील नागरिकांनी दिव्य मराठीच्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' या टॉक शोमध्ये मत मांडले. दूषित पाण्याची समस्या कायम या प्रभागातील सर्वात गंभीर समस्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची. अनेक भागांमध्ये नियमित पाणीपुरवठा होत नाही. पाणी येण्याची कोणतीही ठरावीक वेळ नसल्यामुळे नागरिकांना जागून पाणी भरावे लागते. यावर बोलताना प्रभागातील रहिवासी कस्तुरीबाई गायकवाड म्हणतात 'आमच्या भागात एक तर ८-१० दिवसांनी पाणी येत. तेही वेळेवर नाही. रात्री - बेरात्री कधीही पाणी सोडल जात. त्याचा काही एक टाइम ठरलेला नाहीये. पाणी सोडल्यावर त्यातून आर्धा तास तर ड्रेनेजचे पाणी येते. त्यामुळे त्याचा वास एवढा येतो की, ते हातात सुद्धा घ्यावस वाटत नाही. आधीच एक तास पाणी येत. त्यातही आर्धा तास घाण पाणी आम्ही कस पाण्याचं नियोजन करावं तेच कळत नाही. दरवेळी विकत टँकर मागवणे म्हणजे आमच्या खिशाला कात्री बसणं आहे.' या प्रभागातील कामगार, महिला, वृद्ध नागरिक यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. प्रभागातील अनेक ठिकाणच्या लोकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. ड्रेनेज लाईन चोकअप होते प्रभाग क्रमांक ३ मध्ये ज्याप्रमाणे पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत याचबरोबर ड्रेनेज व्यवस्थेची अवस्था अत्यंत बिकट आहे. बेगमपुरा परिसरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन चोकअप झालेल्या आहेत. या भागातील रहिवासी वैष्णवी गायकवाड म्हणतात की, 'सतत ड्रेनेज लाईन चोकअप होत राहते. संपूर्ण रस्त्यावर घाण पाणी सांडलेले असल्यामुळे आम्हाला त्या दुर्गंधीत राहावं लागत आहे. काही ठिकाणी ड्रेनेज लाईन फुटलेल्या आहेत. आमच्याकडे जागा कमी असल्यामुळे आमचे छोटे - छोटे लेकरं त्याच पाण्यात खेळतात. अनेकदा आम्ही तक्रार केली मात्र, बोलूनही काही एक फायदा नाही. ही लोक काहीच करत नाहीत. आमच्या आरोग्याचा खूप मोठा प्रश्न आहे.' आमच्या सुख दुःखात साथ नाही प्रभागातील वंदनाताई म्हणतात की, 'मध्यरात्री आम्हाला पाणी सोडतात. आम्ही सगळेजण झोपेत असतो. रात्री जर कोणाला मोटारीचा शॉक बिक बसला तर ही लोक बघायला सुद्धा येत नाहीत. माझ्या आईच्या घरी आग लागली होती. तर कोणीही बघायला आलं नाही. आम्ही काही पैसे मागत नाहीत. पण साधे सांत्वनपर शब्द सुद्धा यांच्या तोंडून निघाले नाहीत. जर आमच्या सुख -दुःखात साथ देऊ शकत नसतील तर आम्ही मतदान तरी का करायचं? ना आम्हाला पाणी व्यवस्थित मिळत, ना रस्ते बरोबर आहेत. सगळे अर्धवट काम करून सोडून दिली आहेत. त्यांच्याकडे प्रश्न घेऊन जावं म्हणतात आमच्या हातात नाही. आमच्याकडे वेळ नाही. ड्रेनेज लाईन आमच्या फुटलेल्या आहेत पण त्याकडे कोणाचं लक्ष सुद्धा नाहीये. तेच पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत. कधी कधी तर असं वाटत की आम्ही गटार पितो आहोत. जर आमचे प्रश्न सोडवले जात असतील तरच मतदान. नाही तर नाही'. स्वच्छतेबाबतही परिस्थिती समाधानकारक नाही. काही भागांमध्ये कचरा गोळा करणारी गाडी नियमितपणे येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कचरा साचून राहतो. रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी येत नसल्याने अनेक ठिकाणी रहिवाशांनाच रस्ते साफ करावे लागत आहेत. ही बाब महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. सतत फोन करून सांगावं लागत रहिवासी अर्चनाताई म्हणतात की, 'आमच्याकडे सतत पाण्याची पाईपलाईन फुटत राहते. त्यामुळे आम्हाला पाणीच व्यवस्थित मिळत नाही. ड्रेनेज फुटल्यानंतर आम्ही फोने केल्यानंतर त्यांना जाग येते. ड्रेनेज फुटल्यामुळे त्याच सगळं पाणी दारात येत आणि त्यामुळे आम्हाला त्याचा एवढा त्रास होतो की, कोणी ना कोणी आजरी पडतच. फक्त एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला फोन करून सांगायची वेळ येऊ नये. येणाऱ्या नगरसेवकाच आमच्याकडे लक्ष असावं.' आम्ही स्मशानात खेळतो प्रभागातील काही मुलांशी आम्ही संवाद साधला तेव्हा समजले की, येथील मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाहीये. यावर बोलताना जय झाडगे म्हणतो 'मी ज्ञानेश्वर विद्यालयात शिकतो. माझ्या शाळेला खेळण्यासाठी ग्राउंड नाहीये. आमच्या भागात कुठेच ग्राउंड नाहीये. त्यामुळे आम्हाला विद्यापीठच्या ग्राउंड मध्ये जाऊन खेळावं लागत. नाहीतर आम्ही स्मशानात जाऊन फुटबॉल खेळतो. आमची एवढीच अपॆक्षा आहे की, आम्हाला आमच्या भागात एक तरी छोटस का होईना पण ग्राउंड द्या. जेणेकरून आम्हाला स्मशानात खेळण्याची वेळ येऊ नये.' तसेच या प्रभागात अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कुठेही वाहन लावली जात असल्यामुळे अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. रुग्णवाहिका किंवा अग्निशमन वाहनांसारख्या अत्यावश्यक सेवांना अडथळे निर्माण होतात. याचा थेट फटका येथील रहिवाशांना बसत आहे. एकूणच, छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांची अवस्था अतिशय दयनीय आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. येत्या काळात तरी महापालिकेने या भागातील पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. अशी आहे प्रभागाची रचना प्रभाग क्रमांक ३ मध्ये बेगमपुरा, पहाडसिंगपुरा, विद्युत कॉलनी, हनुमान टेकडी, साफल्य नगर, पेठे नगर, भावसिंगपूरा भागशः, भीम नगर भागशः, कानिफनाथ कॉलनी, जयसिंगपुरा कुतुबपुरा, पराक्रम कॉलनी भागशः, गणेश कॉलनी भागशः, एन-12, चाऊस कॉलनी, हिमायत बाग यांचा समावेश होतो. या भागात एकूण 43062 लोकवस्ती आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Jan 2026 7:00 am

देशात ८० टक्के मनोरुग्ण उपचारापासून वंचित!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि खर्चिक उपचार मोफत व्हावेत, या दृष्टीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारे विविध योजना जाहीर करतात. मात्र, प्रत्यक्षात देशात लाखो रुग्ण कोणत्या ना कोणत्या कारणावरून उपचारापासून वंचित राहात आहेत. त्यातच देशातील तब्बल ८० टक्के रुग्ण उपचारापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. इंडियन सायकेट्रिक सोसायटीने (आयपीएस) […] The post देशात ८० टक्के मनोरुग्ण उपचारापासून वंचित! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 1:11 am

ट्रम्पचे डोके बिघडले?

दुस-यांदा अमेरिकेची सत्ता हाती आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आश्चर्यकारक अन् धोकादायक निर्णय घेत आहेत. त्यामुळे त्यांचे डोके ठिकाणावर आहे काय अशी शंका निर्माण झाली आहे. एकामागून एक धक्कादायक निर्णय घेतले जात असल्यामुळे ट्रम्प यांचे डोके निश्चितच बिघडले आहे असे सा-या जगाचे ठाम मत बनत चालले आहे. ट्रम्प सत्तेत आल्यापासून सातत्याने भारतासह जगाची चिंता वाढवणारे निर्णय घेत […] The post ट्रम्पचे डोके बिघडले? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 1:10 am

सोयाबीन-तुरीची गंज जळून खाक

रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर तालुक्यातील समसापूर गट क्रमांक ४६ व ४७ मधील शेतात ठेवलेला सोयाबीन आणि तुरीची गंज कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना दि. ७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीमध्ये तब्बल ३ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले असून मला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी प्रल्हाद मारुती मुदामे […] The post सोयाबीन-तुरीची गंज जळून खाक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 1:09 am

मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है…?

लातूर : प्रतिनिधी लातूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणूकीत भाजपाने प्रभाग क्र. ११ मध्ये प्रभागा बाहेरील उमेदवार दिले आहेत. प्रचारा दरम्यान हे भाजपाचे उमेदवार जेंव्हा तुमच्याकडे येतील तेंव्हा त्यांना तुम्ही त्यांना ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है..’, असा प्रश्न मतदारांनी त्या उमेदवारांना विचारावा, या उलट काँग्रेस-वंचित बहूजन आघाडीने स्थानिक प्रभागातील विकासाची जाण व तळमळ असणारे […] The post मेरे अंगने मे तुम्हारा क्या काम है…? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 1:07 am

मतदारांनी काँग्रेस-वंचितच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे

लातूर : प्रतिनिधी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्य काळापासून धोरणं आखून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. तोच धागा पकडून लोकनेते विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचा विकास केला. त्यांच्या विचारावर पाऊल टाकत आमदार अमित देशमुख, माजी आमदार धिरज देशमुख हे सुध्दा काम करीत असून काँग्रेस पक्षाचा हात आम आदमी के साथ, या उक्तीप्रमाणे सर्वसामान्यांच्या विकासाच्या योजना […] The post मतदारांनी काँग्रेस-वंचितच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 1:06 am

भाजप दलाल-उपटसुंभांचा पक्ष

नाशिकमधील सभेत उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल नाशिक : प्रतिनिधी भाजपचे हिंदुत्व हे खरे आहे की चुनावी आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. राम मंदिर केले म्हणून तुम्ही डंका पिटला आणि प्रभू रामचंद्र जिथे तपश्चर्येला बसले, तेथील सगळी झाडे जर कापली तर आम्ही काय सांगणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला. […] The post भाजप दलाल-उपटसुंभांचा पक्ष appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 1:04 am

जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी जी-२४ ग्रुपचा काँग्रेस-वंचितला पाठिंबा

लातूर : प्रतिनिधी संविधानिक संस्थाचे स्वातंत्र्य संपुष्टात आणून सर्व सत्ता एका विचारसरणीच्या हातात केंद्रित केल्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे. आज भाजपने देशावर हुकूमशाही लादली आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. आरएसएसच्या आधीपत्याखाली काम करणा-या जातीयवादी भाजपला रोखण्यासाठी जी-२४ या ग्रुपने लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. हुकूमशाही […] The post जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी जी-२४ ग्रुपचा काँग्रेस-वंचितला पाठिंबा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 1:03 am

प्रभाग १४, १५, १७ मधील माफियाराज मोडून काढा

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच इकडून तिकडे उडी मारुन गेलेल्यांनी प्रभाग क्रमांक १४, १५ आणि १७ मधील नागरिकांचा छळ केला. या भागात दहशत पसरवली आहे. या परिसरात माफियाराज सुरु आहे. हे मोडून काढायचे असेल तर काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या चारित्र्यवान, उच्च शिक्षीत, कर्तव्यदक्ष, कर्तबगार, प्रामाणिक, गतिशील, सुसंस्कृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, […] The post प्रभाग १४, १५, १७ मधील माफियाराज मोडून काढा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Jan 2026 1:02 am

राज ठाकरेंचे नाशिककरांना भावनिक आवाहन:म्हणाले- 1500 रुपयांसाठी आई-वडील विकले गेले, असे मुलांना वाटू देऊ नका

भविष्यात तुमच्या मुलांना पश्चाताप होऊ नये, 1500 रुपयांसाठी आपले आई-वडील विकले गेले असे म्हणू नये अशी जर इच्छा असेल शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकच्या सभेत बोलताना केले आहे. यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार टीका केली. नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी नाशिकला दत्तक घेतो असं सांगितलं. त्यांच्या सांगण्याला नाशिककर भुलले आणि आम्ही सत्तेत असताना केलेली कामे विसरली. दत्तक घेणारे फडणवीस नंतर पुन्हा आलेच नाहीत. 2012 साली आमची सत्ता असताना त्यावेळी कुंभमेळा झाला. त्याचे नियोजन उत्तम करण्यात आले. त्यासाठी एकही झाड कापले नाही. त्यावेळच्या नगरसेवकांचा, प्रशासकांचा सत्कार झाला. मग आता काय झाले? भाजपचे आगोदरच ठरते. कुंभमेळ्याच्या नावाखाली आता झाडे तोडायची, नंतर साधू परत गेल्यानंतर ती जागा उद्योगतपीच्या घशात घालायची. यांचे हे सगळे आधीच ठरलेले असते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. फडणवीसांनी एकही काम केले नाही पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, नाशिक नियो मेट्रो प्रकल्प, लॉजिस्टिक पार्क, बाह्य रिंग रोड, आदिवासी क्रीडा प्रबोधिनी असे अनेक प्रकल्प फडणवीसांनी जाहीर केले. पण एकही काम त्यांनी केले नाही. भाजपने फक्त धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली लोकांना भुलवले. 2017 साली आमची सत्ता गेली आणि भाजप निवडून आला. एवढे काम करूनही मला पराभव पाहायला लागला आणि ज्या लोकांनी काहीही केले नाही ते सत्तेत आले. आजही तेच सुरू आहे. पैसे वाटायचे आणि सत्ता मिळवायची हे काम सुरू आहे. आम्ही नाशिक महापालिका कर्जमुक्त केली राज ठाकरे म्हणाले, नाशिकमध्ये आमची सत्ता असताना रतन टाटा यांच्या मदतीने आम्ही बोटॅनिकल गार्डन तयार केले होते. गेल्या पाच वर्षात यांनी त्याची काय अवस्था केली? नाशिकमध्ये आमची सत्ता असताना महापालिकेवर 700 कोटी कर्ज होते. पुढच्या पाच वर्षात आम्ही नाशिक महापालिका कर्जमुक्त केली. पाच वर्षात विरोधकांकडूनही कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला नाही. मी कंत्राटदारांची बैठक घेतली होती. तुमच्याकडे जर कुणी पैसे मागितले तर सांगा, पण जर रस्त्यावर खड्डे पडले तर त्या खड्ड्यात उभा करून मारेन असे सांगितले होते. हे होऊ शकते, पण यांना आता करायचे नाही. कल्याणमध्ये एका घरातील तीन उमेदवारांना 15 कोटी रुपयांची ऑफर महाराष्ट्रात 60-70 नगरसेवक बिनविरोध निवडून आले, त्यासाठी किती पैसा खर्च केला? कल्याणमध्ये एका घरातील तीन उमेदवारांना 15 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. इतके पैसे कुठून येतात? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, 1952 मध्ये स्थापन झालेल्या जनसंघाला 2026 मध्ये पोरं भाड्याने घ्यावी लागतात. तुमचे कार्यकर्ते होते ना, मग बाहेरून का घेता? एखाद्या दुसऱ्या ठिकाणी हे ठिक आहे, पण सगळीकडेच हे सुरू. त्यातून तुमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फक्त कामंच करायची. भ्रष्टाचारी भाजपच्या पेकाटात लाथ घाला आमचा आई-बाप 1500 रुपयांसाठी विकले गेले, विकास झालाच नाही असे जर तुमच्या मुलांनी भविष्यात म्हणू नये असे वाटत असेल तर आम्हाला सत्ता द्या. आज आमच्या पाठिशी उभे राहा, भ्रष्टाचारी भाजपच्या पेकाटात लाथ घाला. हे शहर उत्तम करायचे असेल तर तुम्ही सज्ज व्हा, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 10:01 pm

ज्येष्ठाची 17 लाखांची फसवणूक:कायदेशीर कारवाईची भीती दाखवत सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात एका ज्येष्ठ नागरिकाची कायदेशीर कारवाईची भीती दाखवून १७ लाख ४३ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी त्यांच्या बँक खात्याचा वापर केल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी ही फसवणूक केली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाने याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. पहलगाममधील दहशतवादी हल्ला प्रकरणाचा तपास करत असल्याची बतावणी त्यांनी केली. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याचा वापर दहशतवाद्यांनी केला असून, जम्मू-काश्मीर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगितले. कायदेशीर कारवाईची आणि अटकेची भीती दाखवून त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला धमकावले. अटक टाळण्यासाठी पैसे जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकाने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा केली. परंतु आणखी पैशांची तक्रारदार यांना संशया आला त्यांनी खातरजमा केली असता, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा विविध घटनांमध्ये सायबर चोरट्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:42 pm

खराडीत युवकाची दगडाने ठेचून हत्या:इन्स्टाग्राम वादातून मित्रानेच केला खून, आरोपी अटकेत

खराडी परिसरात सोशल मीडियावरील जुन्या वादातून एका २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना ८ जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास स्वीट इंडिया चौकाजवळील स्वास्थ क्लिनिक इमारतीसमोर घडली. आकाश उर्फ अक्षय किसन तराले असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. या प्रकरणी खराडी पोलिसांनी विजय उर्फ जलवा संजय वाघमारे याला अटक केली आहे. मृत आकाश हा मूळचा लोहगाव येथील खांडवे नगरचा रहिवासी होता आणि सध्या तो वाघोली येथे राहत होता. तो नेहमी त्याचा मित्र अमित चंद्रकांत भोसले याच्यासोबत खराडी परिसरात येत-जात असे. आकाश, अमित आणि आरोपी विजय हे तिघेही एकमेकांना ओळखत होते आणि त्यांची स्वीट इंडिया चौक परिसरात अनेकदा भेट होत असे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे सोशल मीडियावरील जुना वाद होता. आकाश त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर सूरज सालबे नावाच्या तरुणाचे फोटो आणि व्हिडिओ ठेवत असल्याने विजय नाराज होता. यावरून त्यांच्यात यापूर्वीही अनेकदा वाद झाले होते. ८ जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास आकाश आणि अमित दुचाकीवरून खराडीत आले होते. रात्री नऊच्या सुमारास विजय हातात बिअरची बाटली घेऊन तिथे आला आणि आकाशला शिवीगाळ व धमक्या देऊ लागला. वाद वाढल्यानंतर विजयने बिअरच्या बाटलीने आकाशच्या डोक्यात वार केला. आकाश जमिनीवर कोसळताच आरोपीने जवळचा मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यावर पुन्हा वार करत निर्घृणपणे हल्ला केला. या घटनेने घाबरलेल्या अमितने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. जखमी अवस्थेत आकाशला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. खराडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:40 pm

आमचे आरोग्य तुमच्या जाहीरनाम्यात दिसू द्या:'आम्ही पर्यावरण प्रेमी' संघटना आक्रमक; खुलेआम जळतोय कचरा, सार्वजनिक वाहतूक ‘पंक्चर’

छत्रपती संभाजीनगर शहरातील वाढत्या हवेच्या प्रदूषणाकडे व त्याच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांकडे लक्ष वेधण्यासाठी जागरूक नागरिकांनी वेगळा मार्ग निवडला आहे. मनपा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात पर्यावरण आणि पर्यायाने शुद्ध हवेशी संबंधित मुद्यांना स्थान देऊन कृती करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे ज्या ज्या शहरांमध्ये निवडणुका आहेत तेथील नागरिकांना देखिल मदत करण्याचा निर्णय ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ने घेतला आहे. शहरात खुलेआम कचरा जाळला जातो, सर्व वाहतूक सिग्नलला टायमर नाहीत. बसची संख्या तोकडी आहे, स्मशानभूमीतील प्रदूषणाबाबत उपायोजना करण्यात आलेल्या नाहीत, बांधकाम करतानाचे नियम पाळले जात नाहीत, पार्किंगच्या जागा बेकायदा विकल्याने कायमस्वरूपी वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. यामुळे शहरात पीएम 2.5 आणि पीएम 10 ची स्थिती वर्षभरात जवळजवळ 200 ते 290 दिवस खराब राहिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हवेचा दर्जा दर्शवणा-या तीन पैकी एका केंद्राची माहिती नियमित मिळतच नाही. या गंभीर विषयाला राजकारणी महत्त्व देत नाहीत. त्यामुळे विविध संस्थांच्या या मंचने एक पत्र राजकीय पक्षांना पाठवले. प्रत्यक्ष भेटी घेण्याचाही प्रयत्न आहे. पत्राला आमदार संजय केणेकर यांनी तत्काळ प्रतिसाद देत सविस्तर चर्चा केली. शिवाय पक्षाला पत्र लिहिणार असल्याचे स्पष्ट केले. दमा, कॅन्सर, हृदय रोग ते मधूमेह हवेचे प्रदूषण आता केवळ पर्यावरणाशी संबंधित समस्या राहिलेली नाही, तर ती सार्वजनिक आरोग्य, उपजीविका आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित गंभीर संकट बनली आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, उघड्यावर काम करणारे कामगार, विक्रेते आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांना बसतो. हवा प्रदूषण म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण आहे. त्यामुळे लोकांमध्येही या अभियानातून जागृती होईल अशी ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ची अपेक्षा आहे. सर्व पक्षांना, उमेदवारांना आवाहन स्वच्छ हवा, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि प्रभावी घनकचरा व्यवस्थापन या बाबींना निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये व कृतीत प्राधान्य देण्यात यावे, अशी आमची आग्रहाची मागणी आहे. आपण तसे करत असाल तर कृपया 9049067888 या क्रमांकावर कळवावे. ‘जबाबदार उमेदवार’ म्हणून आपली दखल घेतली जाईल. आपणही सहभागी व्हा ‘हवी शुद्ध हवा’ अभियान अनेक संस्था मिळून प्रत्यक्ष पालापाचोळा व्यवस्थापन करत आहे. यात औदुंबर फाऊंडेशन (कला कट्टा), रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इस्ट, इको ग्रीन, बेस्ट फाऊंडेशन, क्रेझी फ्रेंड्स ग्रुप, दीपशिखा फाऊंडेशन, ग्रीन बार्टर, प्लॉगर्स ग्रुप, जनसहयोग प्रतिष्ठान, गरवारे कम्युनिटी सेंटर, रीड ॲंड लीड फाऊंडेशन, अम्ब्रेला फाऊंडेशन, संडे क्लब, जय जय रघुवीर समर्थ सेवाभावी संस्था, अर्बन रिसर्च फाऊंडेशन यांचा सहभाग आहे. आपणही सहभागी होऊ शकता.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:38 pm

पाकने शोधली ‘युपीआय’पेक्षा वेगवान, सुरक्षित पेमेंट प्रणाली

इस्लामाबाद : वृत्तसंस्था पाकिस्तानने आपल्या अडाणी जनतेसाठी भारताच्या प्रगत आणि सुरक्षित युपीआय सिस्टीमपेक्षाही फास्ट पेमेंट सिस्टीम शोधली आहे. एखाद्याला पैसे पाठवायचे असतील तर पाकिस्तानी लोकांना बोटांनी टाईप करण्याची किंवा विशिष्ट मेनू शोधण्याची गरज राहणार नाही. पाकिस्तान आपल्या बँकिंग क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलत असून, लवकरच तिथे व्हॉइस-अ‍ॅक्टिव्हेटेड बँकिंग अ‍ॅप्स लाँच केले जाणार आहेत. या सुविधेमुळे […] The post पाकने शोधली ‘युपीआय’पेक्षा वेगवान, सुरक्षित पेमेंट प्रणाली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 9:35 pm

लॅँड फॉर जॉब : लालूंच्या कुटूंबियांवर आरोप निश्चित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. रेल्वेतील कथित जमीन देऊन नोकरी घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने लालू प्रसाद यादव, राबडी देवी, तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित केले आहेत. यामुळे आता या प्रकरणाचा रीतसर […] The post लॅँड फॉर जॉब : लालूंच्या कुटूंबियांवर आरोप निश्चित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 9:30 pm

सबरीमाला सोने चोरी; मुख्य पुजारी ताब्यात

सबरीमाला : वृत्तसंस्था सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी आज एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या एसआयटीने मंदिर परिसरातील सोन्याचे दागिने गायब झाल्याप्रकरणी मंदिराचे मुख्य पुजारी कंडारारू राजीवारू यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सबरीमाला मंदिरातील सोन्याची चोरी झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. तसेच घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन सरकारने चोरीचा तपास […] The post सबरीमाला सोने चोरी; मुख्य पुजारी ताब्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 9:29 pm

शेअर मार्केटमध्ये पाचव्या दिवशी घसरण; ११.५६ लाख कोटी बुडाले!

मुंबई : वृत्तसंस्था भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण सुरूच असून, या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, जवळपास दोन महिन्यांनंतर सेन्सेक्स पुन्हा ८३ हजारांच्या पातळीवर आला आहे. गेल्या पाच दिवसांत गुंतवणूकदारांचे तब्बल ११.५६ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. शुक्रवारी सेन्सेक्स सुमारे ४७० अंकांनी घसरून ८३,७०८ च्या आसपास पोहोचला. सकाळी सेन्सेक्स ८४,०२२ वर […] The post शेअर मार्केटमध्ये पाचव्या दिवशी घसरण; ११.५६ लाख कोटी बुडाले! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 9:28 pm

पत्नीवर गर्भधारणेस सक्ती करता येत नाही!

नवी दिल्ली : प्रतिनिधी वैवाहिक कलह किंवा पती-पत्नीमध्ये वाद सुरू असताना पत्नीवर गर्भधारणा सुरू ठेवण्यासाठी सक्ती केली जाऊ शकत नाही. असे करणे हे केवळ तिच्या शारीरिक स्वायत्ततेचे उल्लंघन नसून तिच्या मानसिक त्रासात भर टाकणारे आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. या टिप्पणीसह न्यायालयाने पतीकडून दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यातून पत्नीची निर्दोष मुक्तता […] The post पत्नीवर गर्भधारणेस सक्ती करता येत नाही! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 9:26 pm

इराणच्या १०० शहरांत महागाईविरोधी भडका! हिंसाचारात ४५ ठार; तेहरान एअरपोर्ट, इंटरनेट-फोन बंद

तेहरान : वृत्तसंस्था इराणमध्ये महागाईविरोधात १३ दिवसांपासून सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान गुरुवारी रात्री परिस्थिती आणखी बिघडली. देशभरातील १०० पेक्षाही अधिक शहरांमध्ये हिंसक निदर्शनांचा वणवा पसरला आहे. निदर्शकांनी रस्ते अडवले, जाळपोळ, तोडफोड केली. लोकांनी खोमेनीचा मृत्यू आणि इस्लामिक रिपब्लिकचा अंत झाला अशा घोषणा दिल्या. काही ठिकाणी निदर्शक क्राउन प्रिन्स रझा पहलवी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले होते. त्यांनी […] The post इराणच्या १०० शहरांत महागाईविरोधी भडका! हिंसाचारात ४५ ठार; तेहरान एअरपोर्ट, इंटरनेट-फोन बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 9:25 pm

माजी खासदार सुरेश कलमाडींना पुण्यात श्रद्धांजली:विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना दिला उजाळा

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री, पुण्याचे खासदार आणि भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना शुक्रवारी पुण्यात श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी बंडगार्डन रस्त्यावरील पूना क्लब येथे आयोजित श्रद्धांजली सभेत या लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला. सुरेश कलमाडी (वय ८१) यांचे मंगळवारी निधन झाले होते. कलमाडी कुटुंबीयांच्या वतीने या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पत्नी मीरा कलमाडी, चिरंजीव सुमीर, सून नंदिता आणि कन्या सोनाली व पायल यांचे मान्यवरांनी सांत्वन केले. पूना क्लबमधील हिरवळीवरील मांडवात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. फुलांनी सजवलेल्या व्यासपीठावर सुरेश कलमाडी यांची तसबीर ठेवण्यात आली होती. मान्यवरांनी तसबिरीला फुले वाहून आणि दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. संपूर्ण मांडवात उदबत्तीचा सुवास दरवळत होता. व्यासपीठावर लावण्यात आलेल्या स्क्रीनवर सुरेश कलमाडी यांची विविध छायाचित्रे झळकत होती. बालपणापासून ते तरुणपणातील, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), हवाई दलातील, राजकारणातील, पुणे फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि क्रीडा स्पर्धांमधील छायाचित्रांनी त्यांच्या जीवनाचा पट उपस्थितांसमोर उलगडला. सुरेश कलमाडी यांच्या विविध क्षेत्रांतील कार्यामुळे राजकीय, सामाजिक, उद्योग, कला, क्रीडा, शिक्षण, आर्थिक आणि आरोग्य अशा क्षेत्रांतील नामवंतांची मांदियाळी या सभेला जमली होती. कलमाडी यांनी नावीन्याचा ध्यास घेऊन शहराचा केलेला कायापालट, पुणे फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, शनिवारवाडा नृत्य महोत्सव आणि पुणे व्यासपीठ यांसारख्या त्यांच्या कल्पक योजनांना पुणेकरांनी यावेळी आदराने स्मरण केले. कलमाडी हे एक उत्तम क्रीडा संघटक होते. त्यांनी पुणे शहरात सुरू केलेली मॅरेथॉन जागतिक पातळीवर नेली. पुण्यातील राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे तसेच दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे त्यांनी केलेले दिमाखदार आयोजन या आठवणींना क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी उजाळा दिला. या श्रद्धांजली सभेत 'रघुपती राघव राजाराम', 'सूर निरागस हो', 'शिवनंदना हे शुभनायका' यांसारख्या भजनांनी वातावरण भक्तिमय झाले होते. सरिता कुमठेकर (गायन), सायली चितोडकर (गायन), श्लोक मोकलकर (गिटार), शिवानंद वैरागकर (तबला), ओंकार डांगमाळी (किबोर्ड) आणि अभय ओक (बासरी) यांनी यात सहभाग घेतला. विवेक भागवत यांनी संयोजक म्हणून काम पाहिले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:01 pm

भाजपने महापालिकेला अक्षरशः 'ओरबाडून खाल्ले':वाहतूक, पाणी, शिक्षण, ड्रग्ज, गुन्हेगारी समस्यांवरून कॉंग्रेसची जोरदार टीका

पुणे महापालिकेच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात आणि चार वर्षांच्या प्रशासकीय काळात भाजपने महापालिकेला अक्षरशः 'ओरबाडून खाल्ले' आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांच्या मते, भाजपच्या काळात पुणे शहर वाहतूक कोंडी, पिण्याचे पाणी, शिक्षण, ड्रग्ज आणि गुन्हेगारी यांसारख्या गंभीर समस्यांनी ग्रासले आहे. शिंदे यांनी दावा केला की, महापालिकेच्या सत्ताकाळात भाजपचे नगरसेवक कमी आणि ठेकेदार जास्त होते. त्यांनी निधी वाटपात मोठ्या प्रमाणात असमानता असल्याचा आरोप केला. मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या प्रभागासाठी १३४ कोटी ८ लाख, गणेश बिडकर यांनी ३० कोटी, धीरज घाटे यांनी ३२ कोटी, हेमंत रासणे यांनी ९० कोटी, श्रीनाथ भिमाले यांनी ८३ कोटी, सुनील कांबळे यांनी ५१ कोटी आणि सिद्धार्थ शिरोळे यांनी ३० कोटी रुपये महापालिकेच्या निधीतून घेतले. या सात जणांनी मिळून सुमारे ४०० कोटींचा निधी घेतला, मात्र विकास कुठेच दिसत नाही, असे शिंदे म्हणाले. एका प्रभागासाठी दीडशे कोटी आणि दुसऱ्या प्रभागासाठी एक-दोन कोटी देणे हा समतोल विकास आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. २०१९ मध्ये आलेल्या पुरावेळी राज्य सरकारकडून आलेले १६५ कोटी रुपये परत गेले. तसेच, २०१६ मध्ये आणलेली पाणीपुरवठा योजना कार्यान्वित नसतानाही पाणीपट्टीत पाच-पाच टक्क्यांची वाढ करून दहा वर्षे नागरिकांकडून ती वसूल केली गेली. ही योजना आजही केवळ कागदावर असून, कामे न करताच ठेकेदारांना पैसे दिले असल्याचा आरोपही त्यांनी केला. मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पासाठी ८५० कोटींचे अनुदान असतानाही ६६१ कोटींचा अतिरिक्त भार महापालिकेने करदात्यांवर लादला. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि ५५ किलोमीटरच्या वाहिन्यांचे नियोजन असूनही निविदांची अंमलबजावणी झाली नाही. नदी सुधारण्याऐवजी केवळ सुशोभीकरण करून 'मलमपट्टी' करण्याचे काम केले, असे शिंदे म्हणाले. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची निविदा १३०० कोटींवरून अचानक १८०० कोटींवर कशी गेली, यात ५०० कोटींची फुगीर वाढ कशी झाली, हा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कोरोना काळात ९५६ पीएमपीएमएलच्या बस नऊ महिने एका जागेवर उभ्या होत्या. या बस चालू नसल्याने ठेकेदारांना पैसे देणे अपेक्षित नव्हते, तरीही मुरलीधर मोहोळ यांनी ठेकेदारांना ९९ कोटी रुपये देण्याचा घाट घातल्याचा आरोप शिंदे यांनी केला. पूर्वी भाजप 'काँग्रेसमुक्त भारत'ची घोषणा देत होते, परंतु आता पुणेकरच 'भाजपमुक्त पुणे' करून त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वास अरविंद शिंदे यांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 9:00 pm

विरोधकांना 'कात्रजचा घाट' दाखवा!:पुणे महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंचा आक्रमक एल्गार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कात्रज येथील जाहीर सभेत पुणेकरांना आक्रमक आवाहन केले. पुणे महापालिकेसाठी शिवसेनेची पाटी कोरी असली तरी, त्यावर विकासाची अक्षरे लिहिण्याची ताकद शिवसेनेत आहे. पुणेकरांनी शिवसेनेला भरभरून मतदान करून विरोधकांना कात्रजचा घाट दाखवावा आणि पुणे महापालिकेवर भगवा फडकवावा, असे ते म्हणाले. पुणे महापालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढत आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत विजय आमचाच होणार, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या सभेला व्यासपीठावर नीलम गोऱ्हे, तानाजी सावंत, रवींद्र धंगेकर, प्रमोद नाना भानगिरे, अजय भोसले, रमेश कोंडे, कुलदीप कोंडे, नमेश बाबर, आबा बागुल यांसह शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण चिन्हावर उभे असलेले सर्व उमेदवार उपस्थित होते. सभेत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांकडे लक्ष वेधत शिंदे म्हणाले की, प्रत्येक सभा, रोड शो आणि प्रचार रॅलीत 'लाडक्या बहिणींची' संख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे. महिलांचा सहभाग हा विजयाचा पाया असून, ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला ठाम उभ्या असतात, त्यांचा मतपेटीत क्रमांक पहिलाच असतो, असा अनुभव त्यांनी विधानसभा ते नगरपरिषदांपर्यंत घेतला आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपरिषदेत हॅट्ट्रिक झाली असून, आता महापालिकेत चौकार मारायचा आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पुणे हे महाराष्ट्राचे चैतन्य आणि विद्येचे माहेरघर असल्याचे सांगत, अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या पुणे महापालिकेला विकासाचे अमृत देण्याची गरज असल्याचे शिंदे म्हणाले. आमचा अजेंडा सत्ता नसून विकास आहे. सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवणारा विकास हाच शिवसेनेचा झेंडा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत विकासाभिमुख व लोककल्याणकारी निर्णय घेतल्याचा दाखला देत, त्यांनी चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवल्याचा अनुभव सांगितला. तसेच, कात्रजची वाहतूक कोंडीही दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा शब्द त्यांनी पुणेकरांना दिला. शिवसेना स्वबळावर लढत असल्याने तिला हलक्यात घेऊ नये, असा इशाराही शिंदे यांनी विरोधकांना दिला. मी बोलतो ते करतो. एकदा कमिटमेंट केली की मागे हटत नाही, असे सांगत त्यांनी 'लाडकी बहीण योजना' कधीही बंद होणार नाही, याची ग्वाही दिली. विरोध झाला, कोर्टात गेले तरीही योजना सुरू राहिली, कारण तुमचा एकनाथ शिंदे ठामपणे उभा होता, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख अधोरेखित करताना शिंदे म्हणाले की, शिवसेनेत मालक-नोकर नाहीत, सर्वजण सहकारी आहेत. कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणारी शिवसेना नाही. छातीवर वार घेणारे, कार्यकर्त्यांसाठी पुढे उभे राहणारे नेते आणि पदाधिकारी आमच्याकडे आहेत. कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळालाच पाहिजे, कारण निवडणुकीत विजयाचा कणा कार्यकर्ताच असतो, असे त्यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 8:57 pm

एकनाथ शिंदेंचा लातूरमध्ये मोठा धडाका!:17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, विरोधकांसमोर विजयाचे तगडे आव्हान

लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी राजकीय खेळी करत आपली ताकद दाखवून दिली आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या तब्बल 17 अपक्ष उमेदवारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. शिंदे यांनी या सर्व उमेदवारांचे पक्षाच्या वतीने स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे लातूरमध्ये शिवसेनेचे बळ वाढले असून, निवडणुकीच्या रणधुमाळीत शिंदेंनी निकालाआधीच हा मोठा धडाका लावल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या या 17 उमेदवारांमध्ये काही भाजपमधील नाराज, तर काही इतर पक्षांत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या सर्वांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अधिकृतपणे हाती भगवा झेंडा घेतला. या घडामोडीमुळे अनेक प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांसाठी निवडणूक लढवणे आता अधिक सोपे झाले असल्याचे बोलले जात आहे. अपक्षांच्या या पाठिंब्यामुळे लातूर महापालिकेच्या सत्तासंघर्षात शिवसेनेचे पारडे जड झाले असून, विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. याबद्दल एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ते म्हणाले, लातूर महानगरपालिकेतील 17 अपक्ष उमेदवारांनी काल हाती भगवा झेंडा घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यात प्रामुख्याने श्रीकांत रांजणकर, मनोज जोशी, निलेश मांदळे, अर्चना कांबळे, अजय गजाकोष, प्रशांत बिरादार, शोभा सोनकांबळे, प्रशांत काळे, ओमप्रकाश नंदगावे, राहुल साबळे, नरसिंह घोणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष उत्तमराव लोंढे आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, विलास पारकर, धीरज देशमुख आणि लातूरचे माजी महापौर सुरेश पवार, शहरप्रमुख रविकांत चव्हाण, युवासेना जिल्हाप्रमुख कुलदीप सूर्यवंशी, महिला जिल्हाप्रमुख अर्चना बिराजदार तसेच लातुर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते, अशी माहिती शिंदेंनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 7:39 pm

दुुचाकी-कार अपघातात तीन मित्र ठार

गंगाखेड : लातूर जिल्ह्यातील किनगाव येथील उरूसावरून गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी या गावी परत येत असताना दि. ८ रोजी रात्री ११.३० च्या सुमारास दुचाकी व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात आनंदवाडी गावातील तीन मित्र ठार झाले. या घटनेमुळे आनंदवाडी गावात शोककळा पसरली असून शुक्रवारी चूल पेटली नाही. गंगाखेड तालुक्यातील आनंदवाडी गावचे तीन मित्र मोटारसायकलवरून (दुचाकी […] The post दुुचाकी-कार अपघातात तीन मित्र ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 7:20 pm

एप्रिल-मे 2026 पर्यंत पीएमपीला 2500 नव्या गाड्या:खासदार मुरलीधर मोहोळ यांची घोषणा; 20 लाख प्रवाशांना फायदा

पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विस्तार करण्यासाठी एप्रिल-मे २०२६ पर्यंत पीएमपीच्या ताफ्यात सुमारे २,५०० नव्या गाड्या दाखल केल्या जातील, अशी माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. यामुळे पीएमपीचा ताफा ४ हजार गाड्यांचा होईल आणि दररोज १८ ते २० लाख प्रवाशांना सुरक्षित, सुलभ, जलद व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला. खासदार मोहोळ शुक्रवारी पर्वती विधानसभा मतदारसंघात महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पदयात्रा व रॅलीद्वारे मतदारांशी संपर्क साधल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भाजपचा भर असून, त्यासाठीच मेट्रो आणि पीएमपी या दोन्ही सेवा कार्यक्षमतेने चालवण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळही पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. विस्तारित पीएमआरडीएसह शहरातील बस मार्ग व फेऱ्यांचा फेरआढावा घेतला जाणार आहे. ताफ्यात एक हजार ई-बस आणण्याची प्रक्रिया सुरू असून, या गाड्यांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. सध्या ३९४ मार्गांवर सेवा देणाऱ्या पीएमपीच्या मार्गात आणखी किमान १०० नवीन मार्गांची भर पडेल. यामुळे उपनगरातील दुर्लक्षित भाग, झपाट्याने विकसित होत असलेले शहराबाहेरील परिसर तसेच औद्योगिक आणि आयटी हब्सपर्यंत सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असे मोहोळ यांनी नमूद केले. पर्यावरणपूरक आणि गतिमान वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी पीएमपीकडून २५ इलेक्ट्रिक दुमजली (डबल-डेकर) गाड्या भाडेतत्त्वावर सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, येत्या वर्षात पुण्यातील रस्त्यांवर पुन्हा एकदा डबल-डेकर धावणार आहेत. सप्टेंबर महिन्यात हिंजवडी, भोसरी, कोरेगाव पार्क आणि विमाननगर मार्गांवर १० दिवसांची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली होती. बॅटरी क्षमता, ऊर्जा कार्यक्षमता आणि शहरातील वाहतूक परिस्थितीसाठीची उपयुक्तता तपासणाऱ्या तज्ज्ञ समितीच्या सकारात्मक अहवालानंतर या गाड्यांना हिरवा कंदील मिळाल्याची माहिती मोहोळ यांनी दिली. या प्रस्तावित डबल-डेकर बस प्रमुख मार्गांवर धावतील. यामध्ये हिंजवडी फेज ३ (वर्तुळाकार), रामवाडी मेट्रो स्थानक - खराडी, मगरपट्टा सिटी - कल्याणी नगर मेट्रो, पुणे रेल्वे स्थानक - लोहगाव विमानतळ, देहू - आळंदी आणि चिंचवड - हिंजवडी या मार्गांचा समावेश आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 7:18 pm

बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू:गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात घडली घटना

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृताचे नाव हियांश शिवशंकर रहांगडाले (वय ४) असे आहे. हियांश त्याच्या आई-वडिलांसोबत घराच्या मागील अंगणात चुलीजवळ शेकत बसला होता. याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत त्याला उचलून नेले. पालकांनी आरडाओरड करत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट चिमुकल्याला ठार करून जंगलात पसार झाला. खडकी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून, यापूर्वीही ग्रामस्थांनी वन विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. वेळेवर उपाययोजना न झाल्याने एका निष्पाप जीवाला प्राण गमवावे लागल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे रहांगडाले कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. प्रशासनाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि पीडित कुटुंबाला तत्काळ मदत व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 7:17 pm

बोपोडीत ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणार:सनी निम्हण यांची घोषणा, आरोग्य सुविधा बळकट करणार

पुण्यातील बोपोडी परिसरात ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा भारतीय जनता पक्ष-रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे औंध-बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी केली आहे. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा ही मूलभूत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. बोपोडी परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन निम्हण यांनी दिले. या भागात महापालिकेचे दोन दवाखाने असून, त्यांना दर्जेदार करण्याबरोबरच एक ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. ही घोषणा चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण, परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड आणि सपना छाजेड यांच्या बोपोडी परिसरात काढलेल्या पदयात्रेदरम्यान करण्यात आली. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदारांशी संवाद साधताना सनी निम्हण म्हणाले की, बोपोडी परिसराचा सर्वांगीण व समतोल विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या बोपोडीतील नागरिकांना उपचारासाठी पिंपरीतील वाय.सी.एम. हॉस्पिटल, खडकीतील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल किंवा पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये जावे लागते. येथील शेवाळे दवाखाना कार्यरत असला तरी, त्यात सोयी-सुविधांचा अभाव असून केवळ ओपीडी सेवा उपलब्ध आहे. खेडेकर दवाखान्यात अत्याधुनिक सोयी-सुविधांसह ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, असे निम्हण यांनी स्पष्ट केले. तसेच, संजय गांधी दवाखाना, जो सध्या बांधून तयार आहे पण सुरू झालेला नाही, तो लवकरात लवकर पूर्ण क्षमतेने सुरू केला जाईल. यामुळे बोपोडीच्या नागरिकांची आरोग्यसेवा बळकट होईल, असे निम्हण यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 7:16 pm

नागपुरात वाळू व्यावसायिकांवर ईडीची छापेमारी:चौकशी टाळल्याने कारवाई, पहाटेपासून 10 पथके सक्रिय

नागपूर जिल्ह्यातील सावनेर, खापा आणि पाटणसावंगी परिसरात वाळू व्यवसायाशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजल्यापासून नागपूर आणि दिल्ली येथील ईडीच्या सुमारे १० पथकांनी एकाच वेळी विविध ठिकाणी छापे टाकले. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात आणलेल्या वाळू विक्रीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली. हे प्रकरण चार वर्षांपूर्वीचे असून, शासनाची वाळू रॉयल्टी चुकवून २०२१ मध्ये कोट्यवधी रुपयांचा वाळू व्यवसाय केल्याप्रकरणी काही वाळू व्यावसायिकांवर नागपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. त्याच प्रकरणाच्या अनुषंगाने ईडीकडून ही कारवाई करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यावसायिकांना यापूर्वी चौकशीसाठी अनेकदा बोलावण्यात आले होते. मात्र, चौकशीत अपेक्षित सहकार्य न केल्यामुळे ईडीने थेट छापेमारीचा मार्ग स्वीकारला. सावनेरमध्ये प्रफुल्ल आणि उत्तम कापसे, विनोद गुप्ता, लक्ष्मीकांत सातपुते, दादू कोलते यांच्यावर, तर पाटणसावंगी येथे शरद रॅाय आणि मनोज गायकवाड यांच्यावर ईडीने धाडी टाकल्याची चर्चा आहे. खापा येथे अमित राय यांच्याशी संबंधित ठिकाणांवरही कारवाई करण्यात आली. यातील एक व्यावसायिक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी संबंधित असल्याचे समजते. या व्यावसायिकांविरुद्ध नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ईडीकडून या कारवाईबाबत गुप्तता बाळगली जात आहे. व्यावसायिकांच्या निवासस्थान आणि कार्यालयांसह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 7:12 pm

'मित्रा मिशन'चा नागरिक जाहीरनामा, वॉर्डनिहाय समस्यांवर लक्ष:पुणे महापालिका निवडणुकीसाठी '2026 सवाल 26!!' सादर

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मित्रा मिशन' या थिंक टँकने 'नागरिक जाहीरनामा' सादर केला आहे. शहरातील नागरी समस्यांचे वास्तव स्वरूप समजून घेण्यासाठी संस्थेने व्यापक आणि शास्त्रोक्त अभ्यास मोहीम राबवली. केवळ कागदी माहितीवर अवलंबून न राहता, संस्थेच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देत वॉर्ड क्रमांक ८ (बोपोडी), २५ (सदाशिव-नारायण पेठ), ३० (वारजे-कर्वेनगर) आणि ३९ (अप्पर इंदिरानगर) या भागांचा सखोल अभ्यास केला. या प्रक्रियेत विविध सामाजिक स्तरांतील ४८ नागरिकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या अभ्यासातून असे दिसून आले की, प्रत्येक वॉर्डमधील समस्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. बोपोडीमध्ये रेल्वे लगतच्या वस्त्या आणि पडीक जमिनींचे प्रश्न समोर आले. सदाशिव-नारायण पेठेत जुन्या वाड्यांचा पुनर्विकास, अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडी ही प्रमुख आव्हाने आहेत. वारजे-कर्वेनगरमध्ये वेगाने वाढणारे शहरीकरण, तर अप्पर इंदिरानगरसारख्या डोंगरउतारावरील दाट वस्तीत मूलभूत सुविधांची देखभाल ही मुख्य समस्या असल्याचे नागरिकांनी सांगितले. या अभ्यासाच्या निष्कर्षांवर आधारित 'मित्रा मिशन'ने '२०२६ सवाल २६!!' हा नागरिक जाहीरनामा सादर केला आहे. या जाहीरनाम्यात पाणीपुरवठा, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन, रस्ते व वाहतूक, सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संरक्षण आणि प्रशासकीय पारदर्शकता यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठोस प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. जाहीरनाम्यात शुद्ध पाणीपुरवठा, कार्यक्षम मलशुद्धीकरण केंद्रे, खड्डेमुक्त रस्ते, सक्षम बससेवा, दर्जेदार महापालिका शाळा आणि सरकारी आरोग्यसेवा यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत लोकप्रतिनिधींनी स्पष्ट उत्तरदायित्व स्वीकारावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. हा जाहीरनामा केवळ मतदानाच्या प्रक्रियेपुरता मर्यादित नसून, प्रशासनाला जबाबदार धरण्याची एक संधी आहे, असा संदेश देतो. पुण्याच्या शाश्वत आणि सक्षम भविष्यासाठी हा नागरिकांचा कृती आराखडा ठरू शकतो, असे 'मित्रा मिशन'ने म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 7:09 pm

राष्ट्रीय 'इनोव्हेट यू टेकॅथॉन 3.0' हॅकेथॉन पुण्यात:400 हून अधिक संघांचा सहभाग अपेक्षित

राष्ट्रीय स्तरावरील 'इनोव्हेट यू टेकॅथॉन ३.० – २०२६' चे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे आयोजित ही स्पर्धा २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या एआयएसएसएमएस इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयओआयटी) येथे होणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला चालना मिळावी, हा या हॅकेथॉनचा मुख्य उद्देश आहे. इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, यंदा या हॅकेथॉनचे तिसरे वर्ष असून, दरवर्षी स्पर्धेचा प्रतिसाद आणि व्याप्ती वाढत आहे. मागील वर्षी देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ४०० हून अधिक संघांनी यात सहभाग घेतला होता. यंदाही देशभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. या हॅकेथॉनमध्ये एज्युटेक, पर्यावरण, आरोग्यसेवा, ट्रॅफिक मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन आणि ॲग्रिटेक यांसारख्या विषयांवरील सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना दिले जाईल. एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास २ लाख रुपये, उपविजेत्या संघास १ लाख रुपये तर तृतीय क्रमांकाच्या संघास ७५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. प्रत्येक विषय गटातील विजेत्यांनाही स्वतंत्र पारितोषिके दिली जाणार असून, सर्वाधिक नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी प्रकल्पाला ‘इनोव्हेशन अवॉर्ड’ प्रदान करण्यात येणार आहे. या उपक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एआयसीटीई, तंत्रशिक्षण संचलनालय, एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे आणि सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ यांचा पाठिंबा लाभला आहे. विद्यार्थ्यांनी innovateyou.in या संकेतस्थळावर ५ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन यादव यांनी केले आहे. नोंदणी करताना अडचणी आल्यास विद्यार्थी +91 83900 38371 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. नोंदणीकृत स्पर्धकांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच, विजयी संघांना पुढील टप्प्यात बूट कॅम्प, स्टार्टअप एक्स्पो आणि तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 7:04 pm

देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट, हाच आमचा फॉर्म्युला:राज आणि उद्धव ठाकरे भावनात्मक मते मागतात; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी युती केली आहे. यावरून महायुतीमधील घटक पक्षांनी विशेषतः भाजपचे जोरदार टीका केली आहे. आता महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवर भाष्य करत टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना भावनात्मक मते मागायची आहेत. महाराष्ट्रातील जनता विकासाला मत देते. राज ठाकरे ईव्हीएम मशीन, मतचोरीवर बोलले. पण ते काहीच चालत नसल्यामुळे आता असे बोलत आहेत. पंचवीस वर्ष तुमचा महापौर होता, मुख्यमंत्रीपद होते, त्यावेळेस तुम्ही काय केले? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, तुम्हाला मुंबईचा खरेच विकास करायचा असेल तर व्हीजन डॉक्युमेंट द्या. त्यांच्याकडे काहीही प्लॅन नाही. त्यांना फक्त भावनात्मक बोलायचे आहे. डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट हाच फॉर्म्युला चालणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, चंद्र सूर्य असतील तोपर्यंत त्यांना दिल्लीचे ऐकावे लागेल. यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचा पक्ष आहे, पक्षाची शिस्त आहे. सर्वात मोठा पक्ष आहे. रस्त्यावरचा पक्ष थोडीच आहे. या पक्षाला एक भूमिका आहे. आम्ही अंतिम निर्णय स्वीकारणारी लोक आहोत. आतापर्यंत भाजपचया सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय केंद्र सरकारने पूर्ण केले आहेत. केंद्र सरकारचा निर्णय देवेंद्र फडणवीस पूर्ण करतात, असे प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिले आहे. पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचे सरकार मजबूत आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र काम करतील. आम्ही समन्वय समितीत निर्णय घेतला, त्यावेळेस उदय सामंत हजर होते. पंधरा ठिकाणी आम्ही एकत्र आलो आहोत, काही ठिकाणी आमची मैत्रीपूर्ण लढत आहे. तसेच लोक आम्हाला मत देतील. विरोधी पक्ष किंचित झालेला दिसेल, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 6:50 pm

भाजपने परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करेन:गणेश नाईकांचे विधान; 'नवी मुंबईकरांसाठी जुनं तेच सोनं' म्हणत प्रत्युत्तर

आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महायुती बहुतांश ठिकाणी एकत्रच लढत असली, तर काही ठिकाणी मात्र स्वबळावर लढत आहे. पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढत आहे, तर नवी मुंबई महापालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजप स्वबळावर लढत आहेत. येथील निवडणूक ही एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक अशी रंगणार आहे. भाजप नेते व मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना डिवचले आहे. भाजपने परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करून घोडे बेपत्ता करेन, असे म्हणत थेट आव्हानच दिले आहे. नवी मुंबईत शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. गणेश नाईक आणि शिंदे गटात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई शहरात सुरू केलेल्या 'नवी मुंबई, नवे सरकार' या प्रचाराला 'नवी मुंबईकरांसाठी जुनं तेच सोनं' असल्याचे प्रत्युत्तर गणेश नाईक यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना दिले. गणेश नाईक म्हणाले की, ठाणे हा कोणाचाही बालेकिल्ला नाही. केंद्रीय नेतृत्वाने रोखले नसते आणि माझ्याकडे जबाबदारी दिली असती तर संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय चित्र पालटून दाखवले असते. तसेच गेल्या पाच वर्षात प्रशासकीय कालावधीत नवी मुंबईला लुटणाऱ्यांना येथील मतदार घरचा रस्ता दाखवतील, असेही गणेश नाईक यांनी म्हटले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे. गणेश नाईकांना हलक्यात घेतले एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना गणेश नाईक म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्याशी माझे काहीही वैयक्तिक मतभेद नाही. पण एकनाथ शिंदे नेहमी म्हणतात, मला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार करेन. पण तुम्ही गणेश नाईकांना हलक्यात घेतले ना.... तुमच्या आधी मी इथे तीन वेळा ठाणे जिल्ह्याचा पालमंत्री होतो. तुमच्या सुपुत्राच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील 14 गावांचा नवी मुंबईत समावेश करताना मंत्रालयात बैठक बोलावली. त्यात आम्हाला विचारले देखील नाही, अशी खंत नाईक यांनी व्यक्त केली. टांगा पलटी करून घोडे फरार नाही तर बेपत्ता करून टाकेल तसेच हा प्रस्ताव पूर्वी मीच मांडला होता. पण त्यात काही तरी अटी होत्या. गणेश नाईकांना हलक्यात घेतले. भाजपने मला परवानगी दिली तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करून घोडे फरार नाही तर बेपत्ता करून टाकेल, असा इशाराच नाईकांनी दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा येथील राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे. तसेच यावर एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देतात याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 6:16 pm

परभणी शहर मी दत्तक घ्यायला तयार:फक्त घड्याळ आणि तुतारीचे उमेदवारांना निवडून द्या, अजित पवारांचे मतदारांना आवाहन

परभणी शहर मी दत्तक घ्यायला तयार आहे, पण महापालिकेत राष्ट्रवादीच्या घड्याळ आणि तुतारीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. तसेच माझ्या विचारांची महानगरपालिका निवडून दया. सर्व स्तराचा विकास करायचे काम माझे आहे. उपमुख्यमंत्री म्हणून मी शब्द देतो की इथल्या विकासाचा पाठपुरावा मी स्वतः करणार, असेही पवारांनी यावेळी म्हटले. परभणीत प्रचार सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, परभणीचा जसा पाहिजे तसा विकास दुर्दैवाने झाला नाही. सर्व धर्मातील उमेदवार मग नवीन असो की जुने देण्याचा प्रयत्न करतो. दोघांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असतो. पिंपरी चिंचवडचा विकास कसा केला हे विचारा, असे अजित पवार म्हणाले. इथल्या विकासाचा पाठपुरावा करणार पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, केंद्राचा आणि राज्याचा निधी कसा आणायचा याची सांगड घालावी लागते. परभणीत पिण्याच्या पाण्याची योजना, भूमिगत गटार योजना हातात घेतली आहे. सर्व रस्ते चांगले करू. सर्व जाती धर्मातील नागरिकांना सुविधा देऊ. जाती पातीचा, नात्याचा उमेदवार आहे म्हणून बघू नका, विकास कोण करेल हे बघा. उपमुख्यमंत्री म्हणून मी शब्द देतो की इथल्या विकासाचा पाठपुरावा मी स्वतः करणार, असे आश्वासन देखील पवारांनी यावेळी दिले. परभणीला धूळमुक्त आणि खड्डेमुक्त करणार परभणी धूळ आणि खड्ड्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. मी धुळमुक्त, खड्डेमुक्त शहर करण्यासाठी पुढाकार घेतो. तसेच जिल्ह्याचे ठिकाण असेल तिथे कॅन्सरचे रुग्णालय उभे करणार. राज्याचा केंद्राचा निधी आणू, जसे पिंपरी चिंचवड, बारामती केले तसेच परभणी करू, असे आश्वासन अजित पवारांनी दिले. इथली एमआयडीसी बंद आहे ती चालू करू, तसेच उद्योगपती पाणी, जमीन, लाईट आणि रस्ते आहेत का नाही ते पाहत असतात, असेही पवार म्हणाले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पहिले जकात मिळत होता, पुन्हा एलबीटी मिळत होता, त्यात सर्व होत होते. मात्र, आता जीएसटी मिळतोय, पण त्यात आमचे भागत नाही. आम्हाला जेवढा पैसा पाहिजे तेवढा मिळत नाही. सगळी काम करता येतात, पण पैशांचे सोंग करता येत नाही. नागरिकांना चांगल्या सुविधा पाहिजे असतात, मी त्या 100 टक्के परभणीला देणार. महानगरपालिकेची इमारत अद्ययावत बांधू माझे अनेक उद्योगपती मित्र आहेत. मध्यंतरी बारामतीला गौतम अदानी आले होते. त्यांनाही मी बोलू शकतो. 35 वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक महत्त्वाच्या विकास कामांना निधीही दिला. परभणी महानगरपालिकेची इमारत अद्ययावत बांधू. महापालिकेत सरकारने मान्यता दिली तर भरती करू. परभणीकरांना हेवा वाटेल असे क्रीडा संकुल तयार करून देईल, क्रीडा खाते माझ्याकडेच असल्याचेही पवारांनी सांगितले. परभणीतील सय्यद शाह तुराबुल हक्क दर्गाह,परदेश्वर मंदिर परिसर याचा विकास आराखडा तयार करून निधी देवू. परभणी शहर दत्तक घ्यायला तयार पण महापालिकेत राष्ट्रवादीचे घड्याळ आणि तुतारीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन अजित पवार यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 5:47 pm

दडपशाहीमुळे जनता दहशतीत

मुंबई : सत्ताधारी महायुतीच्या धाक, दडपशाहीमुळे जनता दहशतीत असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना केला. महापालिकेच्या निवडणुकीत पातळी सोडून एकमेकांवर टीका केली जात आहे. राज्यात येत्या १५ तारखेला मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमधीलच भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या ३ घटकपक्षांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला […] The post दडपशाहीमुळे जनता दहशतीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 5:26 pm

शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार का?:रोहित पवार राज्यात, तर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का? सुळेंनी केला मोठा खुलासा

राज्यात येत्या 15 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे. या दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाणार का? असा देखील प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळे यांना पुण्यात झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचया युतीविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना सुळे म्हणाल्या, कार्यकर्त्यांची इच्छा, जे निवडणूक लढवणारे कार्यकर्ते होते, त्यातील बऱ्याच कार्यकर्त्यांची ही इच्छा होती आणि ते एक टीमवर्क होते. याच टीमवर्कच्या माध्यमातून दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत जाणार का? महापालिकेच्या निवडणुकीनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएबरोबर जाईल का? तसेच सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील आणि रोहित पवार राज्यात मंत्री होतील अशा चर्चा सुरू आहेत, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, या चर्चा मी व्हॉट्सअप ग्रुपवर वाचल्या आहेत. मात्र, मी त्या चर्चांवर फार विचार करत नाही. जे माझ्या कामाच्या बाहेर आहे, त्याचा विचार मी कशाला करू? मी वास्तवात जगत असते. एका सशक्त लोकशाहीमध्ये लोकांना मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळे लोक वेगवेगळ्या माध्यमातून मते मांडत असतात. लोक काय बोलतात, लोक पक्षाबाबत काय बोलतात, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, या ऐकून घ्यायच्या असतात, असे सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का? तसेच सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री होणार अशा देखील चर्चा सुरू असतात, यावर काय सांगाल? असा प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या, याचे उत्तर माझ्याकडे नाही. मात्र, 11 वर्षांपासून मी चर्चा ऐकते. लोक बोलत असतात, पण आपण आपले काम करत राहायचे. बारामतीच्या लोकांनी खूप विश्वासाच्या नात्यांनी मला निवडून दिले आहे. त्यामुळे माझी पहिली जबाबदारी माझ्या मतदारसंघातील मूलभूत सुविधा सोडवणे आहे. लोकांनी मला ज्या कामांसाठी दिल्लीत पाठवले ते काम मी पूर्ण केले पाहिजे, ते काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे, असे सुळे यांनी म्हटले.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 5:17 pm

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशनचे २१ वे अधिवेशन आळंदीत:देशभरातून १ हजारहून अधिक बँक अधिकारी सहभागी होणार

बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स ऑर्गनायझेशनचे २१ वे त्रैवार्षिक अधिवेशन १० व ११ जानेवारी २०२६ रोजी आळंदी येथे आयोजित करण्यात आले आहे. आळंदी येथील आर.एम.डी. सभागृह, फूटवाले धर्मशाळा येथे होणाऱ्या या अधिवेशनात देशभरातून १ हजारहून अधिक बँक अधिकारी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत. असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील देशपांडे आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. अश्विनी देव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अधिवेशनाचा उद्घाटन समारंभ शनिवार, १० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता होईल. राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधू सक्सेना, भारतीय मजदूर संघाचे अखिल भारतीय महासचिव रविंद्र हिमते, अखिल भारतीय सचिव (वित्तीय क्षेत्र) गिरीशजी आर्य आणि असोसिएशनचे संस्थापक बाळासाहेब फडणवीस यांचीही प्रमुख उपस्थिती असेल. या अधिवेशनात भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती, बँकिंग क्षेत्रापुढील आव्हाने, तसेच अधिकारी व सामान्य ग्राहकांच्या हिताशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली जाईल. या चर्चांमधून विविध धोरणात्मक ठराव संमत केले जाणार आहेत. अधिवेशनातील प्रमुख ठरावांमध्ये आयकर कायदा १९६१ मधील कलम १७ (२) (viii) मध्ये दुरुस्ती करून परिक्विझिट करातून दिलासा देण्याची मागणी समाविष्ट आहे. तसेच, एनपीएस अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत मृत्यू किंवा अपंगत्वाच्या प्रकरणात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात येणार आहे. याशिवाय, एनपीएस लागू होण्यापूर्वी जाहीर झालेल्या जाहिरातींमधून भरती झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ देण्याची मागणीही केली जाईल. पदोन्नती परीक्षांमध्ये पारदर्शकता आणणे, अधिकाऱ्यांच्या वाढलेल्या कामकाजाच्या तासांवर नियंत्रण ठेवून काम-जीवन समतोल राखणे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणीही या अधिवेशनात ठळकपणे मांडण्यात येणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 5:09 pm

आठवी विश्वनाथ स्पोर्ट मिट २३ जानेवारीपासून:एमआयटी एडीटी विद्यापीठात राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय स्पर्धा

पुणे येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठात आठव्या विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम-२०२६) या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वराजबाग येथील विद्यापीठाच्या अत्याधुनिक क्रीडा संकुलात २३ ते २८ जानेवारी २०२६ या कालावधीत स्पर्धेचा आठवा हंगाम पार पडेल. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, २३ जानेवारी रोजी पद्मश्री, अर्जुन पुरस्कार आणि ऑलिंपिक कांस्यपदक विजेते मुष्टीयोद्धा विजेंदर सिंह यांच्या हस्ते होणार आहे. एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडेल. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी विनित कुमार, मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त बॅडमिंटनपटू तृप्ती मुरगुंडे, विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि डॉ. सुनीता कराड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण समारंभ बुधवार, २८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. पद्मश्री व अर्जुन पुरस्कारप्राप्त रोईंगपटू कॅप्टन बजरंग लाल ताखर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात येईल. या समारंभाला ऑलिंपियन जलतरणपटू विरधवल खाडे आणि मेजर ध्यानचंद पुरस्कारप्राप्त रोवर स्मिता शिरोळे-यादव उपस्थित राहणार आहेत. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, टेनिस, टेबल टेनिस, खो-खो, वॉटर पोलो, बुद्धिबळ, जलतरण, इनडोअर रोईंग, बॉक्सिंग आणि तिरंदाजी अशा १५ क्रीडा प्रकारांमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल. देशभरातील १३५ हून अधिक शिक्षण संस्थांमधील ५ हजारांपेक्षा जास्त खेळाडूंनी आतापर्यंत सहभाग नोंदवला आहे. ‘खेळाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणी’ या ब्रीदवाक्यासह आयोजित या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजेल आणि देशाला नवे प्रतिभावान खेळाडू मिळतील, असा विश्वास प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 5:08 pm

येरवडा कारागृहात कैद्याला बेदम मारहाण:गंभीर दुखापत केल्याप्रकरणी एका कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल

येरवडा कारागृहात एका कैद्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत कैदी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एका कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवकरप्पा गराळे (वय ६५) असे जखमी कैद्याचे नाव आहे, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कैदी फजिल अहमद अब्दुलकयुम अन्सारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा कारागृहातील हवालदार प्रकाश भोसले यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षा भोगत असलेले गराळे आणि अन्सारी यांना कारागृहातील चांगल्या वर्तणुकीमुळे खुल्या कारागृहात काम देण्यात आले होते. खुल्या कारागृहातील बराक क्रमांक एक परिसरात त्यांच्यात वाद झाला. या वादातून अन्सारीने गराळे यांच्या चेहऱ्यावर ठोसे मारले, ज्यामुळे गराळे फरशीवर पडून जखमी झाले. मारहाणीत गराळे यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गेल्या महिन्यात याच येरवडा कारागृहात एका कैद्याचा फरशीच्या तुकड्याने मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. कारागृहात अशा हाणामारीच्या घटना रोखण्यासाठी आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, नियंत्रण कक्षातून कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. तरुणाला दगडाने मारहाण पुणे शहरात कोथरूड भागात एका तरुणाला दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. नितीन बाळू कोंढाळकर (वय ३५, रा. सुतारदरा, कोथरूड) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढाळकर हे सुतारदरा परिसरात रात्री साडेअकराच्या सुमारास थांबले होते. त्यावेळी दोघांनी काही कारण नसताना त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्यांना शिवीगाळ करुन रस्त्यात पडलेल्या दगडाने मारहाण केली. पोलीस हवालदार योगेश सुळ तपास करत आहेत.|

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 5:07 pm

ठाण्याच्या मीनाक्षी शिंदेंचे आक्षेपार्ह वक्तव्य:आगरी समजाविषयी अपमानास्पद शब्द, धमक्याही दिल्या; ऑडिओ क्लिप व्हायरल

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळत आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटातील बंडखोरीमुळे मानपाडा, कोलशेत या भागातील प्रभाग क्रमांक 3 मधील निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष आहे. असे असतानाच, या प्रभागातून निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या ठाणे महिला जिल्हा प्रमुख व माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा एक व्हिडिओ व्हारल झाला असून त्यात आगरी समजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत पोलिस कारवाईच्या धमक्या दिल्याचे समजते. या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधील संभाषणात मीनाक्षी शिंदे यांनी आगरी समजाविषयी आक्षेपार्ह विधान करत अपमानास्पद शब्द वापरण्यात आल्याचे ऐकू येत आहे. (दिव्य मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.) मीनाक्षी शिंदे यांच्या या ऑडिओ क्लिपमुळे आगरी समाजात नाराजीचा सूर उमटला असून याचा जाहीर निषेध केला जात आहे. मीनाक्षी शिंदे यांच्या ऑडिओ क्लिपचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यासोबत एक संदेशही लिहिण्यात आला आहे. पायाखालची जमीन खचली आहे म्हणून धमक्यांची भाषा केली जात आहे. मात्र नागरिक या धमक्यांना भीक घालणार नाही. तसेच ठाण्याच्या प्रथम नागरिकपदाची जबाबदारी सांभाळलेल्या व्यक्तीकडून अशी भाषा शोभते का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आता क्रांतीची मशाल पेटणार असून जनता ही हुकुमशाही मोडून काढेल, असेही म्हटले आहे. नेमका वाद काय? ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर हा परिसर येतो. याच प्रभागातून माजी महापौर व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे निवडून येतात. परंतु, याच प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांचे बंधू भूषण भोईर गेल्यावर्षी निवडून आले. यानंतर दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. त्यात मीनाक्षी शिंदे यांचे समर्थक असलेले शाखाप्रमुख विक्रांत वायचळ यांनी भोईर यांच्या जागी स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याला संधी देण्याची मागणी केली. यामुळे पक्ष विरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत वायचळ यांना शाखाप्रमुख पदावरून निलंबित केले होते. त्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनीही राजीनामा दिला होता. या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाने भूषण भोईर यांची उमेदवारी रद्द करत वायचळ यांना उमेदवारी दिली. याच कारणांमुळे आता भूषण भोईर यांनी बंडखोरी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 4:51 pm

शिंदे गटाने भाजपच्या तोंडचा घास पळवला:भाजपला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने अंबरनाथमध्ये स्थापन करणार सत्ता

अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने जोरदार झटका दिला आहे. शिंदे गटाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून अंबरनाथमध्ये आपली सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, काँग्रेसच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीने अंबरनाथची सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला मोठा हादरा बसला आहे. शिंदे गटाच्या या राजकारणामागे एकनाथ शिंदेंचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे असल्याचा दावा केला जात आहे. अंबरनाथ नगरपालिकेत भाजपचे 16, तर शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले होते. पण भाजपने शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रथम काँग्रेससोबत आघाडी केली. पण वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केल्यानतंर भाजपने काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संधान साधले. त्यानंतर सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. पण भाजपच्या या खेळीमुळे शिंदे गट दुखावला गेला. परिणामी, त्याने भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटून टाकण्याची धूर्त राजकीय खेळी खेळली. श्रीकांत शिंदेंनी फिरवले फासे शिंदे गटाचे खासदार तथा एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी भाजपच्या संपर्कात गेलेल्या अजित पवारांच्या पक्षाशी संधान साधले. त्यांना विश्वासात घेत त्यांच्यापुढे अंबरनाथमध्ये युती करून संयुक्त सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्याला तत्काळ होकार दिला. त्यानुसार आता शिदे गटाचे 27, राष्ट्रवादीचे 4 व एका अपक्ष उमेदवाराच्या मदतीने त्यांनी 32 नगरसेवकांचा एक गट स्थापन केला. या सर्वांनी मिळून सत्ता स्थापनेचा दावा केला, तसेच तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यामुळे अंबरनाथमध्ये शिंदे गटाचा झेंडा फडणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. भाजप - शिंदे गटासाठी होती प्रतिष्ठेची लढाई उल्लेखनीय बाब म्हणजे अंबरनाथ नगरपरिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. याठिकाणी शिंदे गटाच्या मनिषा वाळेकर व भजापच्या तेजश्री करंजुले यांच्यात नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत झाली. त्यात भाजपच्या तेजश्री करंजुले विजयी झाल्या. भाजपच्या ताब्यात नगराध्यक्षपद गेले असले तरी इथे शिंदे गटाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे भाजपने काँग्रेसच्या मदतीने येथील सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केला होता. पण शिंदे गटाच्या चलाख खेळीमुळे त्यांचा प्रयत्न फसला. खाली पाहा अंबरनाथमधील पक्षीय बलाबल

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 4:49 pm

मिशन ॲडमिशन:जवाहर नवोदय विद्यालयातील रिक्त जागेवर प्रवेश; 7 फेब्रुवारी रोजी चाचणी परीक्षेचे आयोजन

कन्नड येथील जवाहर नवोदय विदयालयात इयत्ता 6 व 11 वीच्या काही जागा रिक्त राहिल्या आहेत. त्या जागांवर प्रवेश देण्यासाठी पुन्हा चाचणी परीक्षा होणार आहे. कन्नड येथे पाच केंद्रावर शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.15 ते 01.45 दरम्यान ही परीक्षा होईल. चाचणी परीक्षेकरिता ज्या विदयार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत, अशा संबंधित पालकांनी सदर परीक्षेचे परीक्षा हॉल टिकीट / अॅडमिटकार्ड www.navodaya.gov.in, https://cbseitms.nic.in/2025/nvsix 9 किंवा https://cbseitms.nic.in/2025/nvsxi 11 या संकेतस्थळावरून रजिस्ट्रेशन नंबर व Password (Dateof Birth) चा उपयोग करून डाउनलोड करून प्रिंट घ्यावी. हे अॅडमीट कार्ड परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर घेऊन येणे आवश्यक आहे, असे आवाहन प्राचार्य बुल्लन सरोज यांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 4:29 pm

एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल:MIM च्या असदुद्दीन ओवैसी यांचा विश्वास; अजित पवारांवर साधला निशाणा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे एक दिवस हिजाब घालणारी महिलाही भारताची पंतप्रधान होईल, असा ठाम विश्वास एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैंसी यांनी शुक्रवारी येथील एका सभेत बोलताना व्यक्त केला. यावेळी त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. अजित पवारांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत. राष्ट्रवादीला मत म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला पाठिंबा, असे ते म्हणाले. सोलापूरचे एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते सध्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत. असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी त्यांच्याविरोधात सभा घेतली. यावेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. तसेच एक दिवस हिजाब घालणारी महिला या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. ..पण तो दिवस पाहण्यासाठी मी जिवंत नसेन ओवैसी म्हणाले, आपण सोलापूरला पुण्यासारखे सुंदर बनवू शकतो. भाजपचे लोक इथे एवढ्या वर्षांपासून राहत आहेत. पण काहीच करत नाहीत. पाकिस्तानच्या राज्यघटनेत एकाच धर्माचा माणूस राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो असे नमूद आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार कोणताही व्यक्ती भारतीय पंतप्रधान होऊ शकतो. एक दिवस असा येईल जेव्हा हिजाब घालणारी महिला या देशाची पंतप्रधान बनेल. पण कदाचित तो दिवस पाहण्यासाठी मी जिवंत नसेन. पण एक दिवस हा दिवस नक्की उजडेल. ते पुढे म्हणाले, मी देशाच्या संसदेत बोलणारा माणूस आहे. अजित पवार हे नरेंद्र मोदी यांच्या मांडीवर जाऊन बसलेत. त्यामुळे त्यांना मत देणे हे नरेंद्र मोदींना मत देण्यासारखे आहे. अजित पवारांना मत म्हणजे मोदींनी आणलेल्या वक्फ कायद्याला समर्थन. अजित पवारांना दर्गा, मशिदीशी काहीही देणेघेणे नाही. पण आपल्याला आहे. मोदी, शिंदे, अजित पवार ही एकच त्रिमूर्ती आहे. ते तुमच्यापुढे येऊन तुमच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न करतली. पण त्यांना तुम्ही मतपेटीतून उत्तर द्या. एमआयएम हा गरिबांचा पक्ष आहे. तो गरिबांसाठी काम करतो. ..तर मग मी तुमच्या बापावर बोलेन कुणी तरी माझ्या शेरवाणीला हात घालण्याचे विधान केले. त्यांनी त्यांच्या राजकीय बापाला म्हणजे अजित पवारांना माझ्यापुढे आणून बसवावे. मी त्यांना 3 मिनिटांत मूके केले नाही तर मग सांगा. येथील नई जिंदगी परिसरातूनच काही वर्षांपूर्वी एमआयएमला संजिवनी मिळाली. आज पुन्हा येथील जनतेने एमआयएमच्या मागे उभे राहण्याची गरज आहे. भाजप, आरएसएस, अजित पवार व शिंदे गटाचे लोक या परिसराला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी एवढेच लक्षात घ्यावे की, हा परिसर माझा आवडता आहे. हा परिसर सोलापूरचे हृदयस्थान आहे. त्यामुळे तुम्ही या परिसराविषयी काही बोललात, तर मग मी तुमच्या बापावर बोलेन, असा इशाराही असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी आपल्या विरोधकांना दिला.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 4:19 pm

‘आरटीई’ प्रवेशांची प्रक्रिया सुरू

पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्यातील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आरटीई प्रवेशासाठीचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, ९ ते १४ जानेवारी या कालावधीत शाळा नोंदणी आणि पडताळणीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणीबाबत […] The post ‘आरटीई’ प्रवेशांची प्रक्रिया सुरू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 3:54 pm

भाजप देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष

इचलकरंजी : भाजप हाच सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष आहे. अशा पक्षाच्या तालावर उपमुख्यमंत्री अजित पवार नाचतात. भाजपच्या तालावर नाचणारे स्वतंत्र नाहीत, तर ते कैद्यासारखे आहेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले, निवडणुकीमध्ये उमेदवारांची पळवापळवी, दबावतंत्राचा वापर, दमदाटी […] The post भाजप देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 3:52 pm

भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप म्हणजे ‘नुरा कुस्ती’

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचारावरून भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप म्हणजे ‘नुरा कुस्ती’ आहे. जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळे सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपचे आमदार भ्रष्टाचाराचे ‘आका’ म्हणतात, मात्र या ‘आकां’ना भाजपच्याच नेत्यांनी मांडीवर घेतले आहे, अशी टीका उद्धवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी पक्षाचे जिल्हाप्रमुख, माजी आमदार […] The post भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप म्हणजे ‘नुरा कुस्ती’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 3:50 pm

शक्तिपीठ महामार्ग कमीत कमी बागायती शेतीमधून जाणार

मुंबई/कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा महामार्ग आहे. काही लोकांनी त्याला विरोध केला असला तरी आम्ही या मार्गाचा नवा प्लॅन तयार केला असून तो कमीत कमी बागायती शेतीमधून जाणारा असेल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार दि. ९ जानेवारी रोजी केला. महापालिका निवडणुकीनंतर कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत आम्ही आवाहन करणार असून कोल्हापूरकर त्याला प्रतिसाद […] The post शक्तिपीठ महामार्ग कमीत कमी बागायती शेतीमधून जाणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 3:42 pm

सेनगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद ठाकरे गटाला:यमुनाबाई देशमुख नगराध्यक्षा; शिलानंद वाकळे यांची उपनगराध्यक्षपदी निवड, काँग्रेसचे एक मत ठाकरेंना

सेनगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी ठाकरे गटाच्या यमुनाबाई देशमुख तर उपनगराध्यक्षपदी शिलानंद वाकळे यांची शुक्रवारी ता. ९ निवड झाली आहे. या निवडीच्या घोषणानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. सेनगाव नगर पंचायतीमध्ये ठाकरे गटाचे पाच, राष्ट्रवादीचे (अजित पवारगट) पाच, काँग्रेस दोन तर भाजपाचे पाच सदस्य आहेत. अध्यक्षपदासाठी ठाकरे गटाच्या यमुनाबाई देशमुख तर भाजपाच्या मिराबाई खाडे यांनी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर आज पिठासन अधिकारी तथा तहसीलदार सखाराम मांडवगडे, प्रभारी मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी आज बैठक झाली. यावेळी हातवर करून मतदान घेण्यात आले. यामध्ये ठाकरे गटाच्या देशमुख यांना ११ तर भाजपाच्या खाडे यांना पाच मते मिळाली. उपनगराध्यक्षपदासाठी ठाकरे गटाचे शिलानंद वाकळे व भाजपाचे अमोल तिडके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये वाकळे यांना ११ तर तिडके यांना पाच मते मिळाली. या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या एका सदस्याने ठाकरे गटाच्या बाजूने मतदान केले तर एक सदस्य गैरहजर होता. दरम्यान, पिठासन अधिकारी मांडवगडे, मुख्याधिकारी मुंडे यांनी नगराध्यक्षपदी देशमुख व उपनगराध्यक्षपदी वाकळे यांच्या निवडीची घोषणा करताच नगरपंचायत परिसरात ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी नुतन नगराध्यक्ष व उपनगराध्यांचा सत्कार करण्यात आला. नुतन अध्यक्ष व उपनगराध्यक्षांना आता सव्वा वर्षाचा कार्यकाळ मिळणार असून या कालावधीत पिण्याचे पाणी, शहर स्वच्छतेसह नागरी सुविधा देण्यासाठी काम करावे लागणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 3:32 pm

शिंदे, अजित पवारांची एमआएमसोबत युती

मुंबई : महायुतीत भाजपसोबत सत्तेत असलेले त्यांचे मित्रपक्ष म्हणजेच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गय, यांनीही भाजपच्या पावलावर पाऊल टाकल्याचे दिसत आहे. भाजपनंतर शिंदे आणि अजित पवारांची एमआयएमसोबत युती झाल्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील परळी नगरपालिकेत शिंदे गट, एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे एकत्र आले आहेत. त्यामुळे […] The post शिंदे, अजित पवारांची एमआएमसोबत युती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Jan 2026 3:29 pm

चारठाणकर संगीत महोत्सव:सेलू येथे 10 जानेवारीपासून आयोजन, हुबळीचे कुमार मर्डुर यांच्यासह तळवलकर, टाक यांचे गायन रंगणार...!

सेलू येथे १० ते ११ जानेवारी दरम्यान संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात हुबळी, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरचे कलावंत रसिकांना मंत्रमुग्ध करतील, अशी माहिती साहित्य संगीत कला मंचचे श्रीकांत उमरीकर यांनी दिली. ज्या मराठवाड्याच्या भूमीत देवगिरी किल्ल्यावर 'संगीत रत्नाकर' सारख्या महान ग्रंथाची रचना आचार्य शारंगदेवाने केली, गोपाल नायक सारखा महान गायक ज्या भूमीत जन्मला, अजिंठा वेरूळच्या शिल्पांत चित्रांत मंदिरांवरील शिल्पांमध्ये गायन वादन नृत्याचे पुरावे जिथे आढळून येतात ती ही सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न भूमी. मराठवाड्याच्या याच मातीतील भूमीपुत्र सेलूचे महान संगीतकार गायक संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर. त्यांनी चालवलेल्या सांगितीक वारश्याची आठवण म्हणून २०१८ पासून सेलू शहरांत संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवा चे आयोजन करण्यात येते. महोत्सवाचे हे ८ वे वर्ष असून १०-११ जानेवारी २०२६ रोजी हा संगीत महोत्सव संपन्न होतो आहे. महोत्सवाचे उद्घाटन सूरमणी डॉ. कमलाकर परळीकर यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सवात शनिवार, दिनांक १० जानेवारी रोजी लातूरच्या सायली टाक आणि मुंबईच्या सायली तळवलकर यांचे गायन होईल. सोबतच पुण्याचे कलावंत नीतेश पुरोहित यांचे सरोद वादन होईल. रविवार, दिनांक ११ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगरच्या मृगनयनी सिस्टर्सचे भरतनाट्यम रंगेल. छत्रपती संभाजीनगरचे कलावंत वैभव पांडे, हुबळीचे कुमार मर्डुर यांचे गायन होईल. सोबतच मुंबईचे किशोर पांडे यांचे तबला सोलो होईल. या कलावंतांना प्रशांत गाजरे, शांतीभूषण देशपांडे - चारठाणकर, यश खडके, प्रशांत जोशी-सावरगावकर, जगमित्र लिंगाडे (छत्रपती संभाजीनगर) यांची साथसंगत लाभेल. संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवात यापूर्वी पं. रघुनंदन पणशीकर, पं. विजय कोपरकर, पं. कृष्णेंद्र वाडीकर, प्रसाद खापर्डे, पं. कैवल्यकुमार, विदुषी यशस्वी सरपोतदार, नागेश आडगावकर, ईश्वर घोरपडे, अभिजीत अपस्तंब, पंकज देशपांडे, हेमांगी नेने, तबला वादक पं. राम बोरगावकर, सारंगीवादक पं. संगीत मिश्रा, सुंदरीवादक कपिल जाधव, बासरीवादक ऐनोद्दीन वारसी, सनईवादक पं. कल्याण अपार, महागामी गुरुकुलाच्या शिष्यांची ओडीसी व कथ्थक नृत्यं सादर झालेली आहेत. ही सगळी चळवळ लोकसहभागांतून चालू आहे. सेलूसोबतच परभणी, वसमत, फुलंब्री, जालना, शेंदूरवादा, छत्रपती संभाजीनगर, वसमत येथेही शास्त्रीय संगीत विषयक उपक्रम साजरे होतात. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रसिकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 3:28 pm

रोज खा मटण अन् कमळाचे दाबा बटण:भाजप नेते अशोक चव्हाण यांचे विधान; काँग्रेसची 'आदर्श' चव्हाण म्हणत उपरोधिक टीका

भाजप नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड वाघाला महापालिका निवडणुकीत मतदारांना सर्वांचे मटण खाऊन केवळ भाजपलाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या विधानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेसने या प्रकरणी त्यांचा चिमटा काढत त्यांचा उल्लेख अशोक चव्हाण नव्हे तर 'आदर्श चव्हाण' असा केला आहे. राज्यात सध्या मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीचा फड रंगला आहे. यामुळे राज्याचे वातावरण कडाक्याच्या थंडीतही चांगलेच तापले आहे. नांदेडमध्येही या निमित्ताने राजकीय पक्षांत आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. त्यात आता भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी मतदारांना उद्देशून केलेल्या एका वादग्रस्त विधानाची भर पडली आहे. ते म्हणाले, सध्या निवडणूक सुरू आहे. सर्वच लोक पार्ट्या खाऊ घालतील. याची पार्टी, त्याची पार्टी... मी तर म्हणेन रोज खा मटण, परंतु कमळाचे दाबा बटण. एवढे काम करा. नाही तर एकाचे मटण खाऊन दुसऱ्याला मतदान कराल. मी काही मटण देणार नाही, पण सांगितलेले लक्षात घ्या, असे ते म्हणाले. अशोक चव्हाण यांनी यावेळी आपल्याला सोडून गेलेल्याची राजकीय कारकिर्द संपल्याचाही दावा केला. ते म्हणाले, जे गेले त्यांना जाऊ द्या. त्याने आपल्याला काही फरक पडत नाही. एक गेला आणि दुसरा आला. (जवळच्या एका उमेदवाराला उद्देशून म्हणत). जे मला सोडून गेले ते बरबाद झाले. त्यामुळे कुणीही माझ्या नादी लागू नका. कारण, लागले तर तुमचे वाईट होईल, असे ते म्हणाले. आदर्श चव्हाण म्हणत काँग्रेसची टीका दुसरीकडे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी अशोक चव्हाण यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. या प्रकरणी त्यांनी अशोक चव्हाणांचा उल्लेक आदर्श चव्हाण असा केला आहे. आदर्श चव्हाण... अच्छा अशोक चव्हाण का? मला वाटले आदर्श चव्हाण. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते तेव्हा असे अजिबात करत नव्हते. आता पक्ष बदलल्यामुळे त्यांची संस्कृतीही बदलली आहे. म्हणजे मतदारांची किंमत त्यांनी एका मटणापुरती केली आहे. हे मतदारांचे महत्त्व कमी करणारी गोष्ट आहे, असे त्या म्हणाल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे अशोक चव्हाण यांनी गत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यानंतर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा त्यांना प्रचंड टीका सहन करावी लागली होती. हे ही वाचा... शरद अन् अजित पवार भाजपला उल्लू बनवत आहेत:प्रकाश आंबेडकर यांचा दावा; सत्तेसाठी तत्त्वांचे राजकारण बाजूला पडत असल्याची खंत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शरद व अजित पवार एकच असल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे. शरद पवार व त्यांचे पुतणे अजित पवार एकच आहेत. ते सत्तेसाठी फक्त भाजपला उल्लू बनवत आहेत. सत्तेसाठी तत्वे बाजूला ठेवून वागत आहेत, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 9 Jan 2026 3:27 pm