SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

21    C
... ...View News by News Source

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:वेरूळ घाटामधील वाहतूक कोंडीवर ‎तोडगा; शूलिभंजन डोंगरातून वाहतूक‎, नवीन रस्त्यासाठी प्रस्ताव सादर, 2 वर्षांत होऊ शकते काम‎

छत्रपती संभाजीनगर- खुलताबाद-वेरूळ-‎कन्नड हा राज्यातील अत्यंत महत्त्वाचा पर्यटन‎व धार्मिक मार्ग मानला जातो. मात्र या‎मार्गावरील खुलताबाद ते वेरूळदरम्यानचा‎अवघा तीन किलोमीटरचा अरुंद घाट रस्ता‎सध्या तीव्र वाहतूक कोंडी, अपघात आणि‎प्रवाशांच्या मनस्तापाचे केंद्र बनला आहे. दररोज‎हजारो वाहनांची ये-जा, भाविक व पर्यटकांची‎वाढती गर्दी आणि अरुंद रस्त्यामुळे निर्माण‎होणारी कोंडी ही मोठी समस्या बनली आहे. या‎परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून‎शूलिभंजन गावाच्या पाठीमागील डोंगराळ‎भागातून थेट वेरूळपर्यंत नवीन पर्यायी रस्ता‎तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला‎असून, तो राज्य शासनाच्या मंजुरीसाठी‎पाठवण्यात आला आहे.‎ राज्य शासनाच्या निर्देशानुसार तयार करण्यात‎आलेल्या या प्रस्तावात सध्याच्या‎घाटरस्त्यावरील धोकादायक वळणे, अत्यंत‎अरुंद रस्ता, वाढती वाहनसंख्या, वारंवार होणारे‎अपघात, भाविक व पर्यटकांना होणारा त्रास या‎सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला आहे. पर्यायी रस्त्यासाठी येईल‎ कोट्यवधी रुपयांचा खर्च‎ या पर्यायी रस्त्यासाठी‎कोट्यवधी रुपयांचा खर्च‎अपेक्षित असून, निधी राज्य‎शासन, पर्यटन विकास योजना‎किंवा विशेष अनुदानातून‎मिळण्याची शक्यता आहे.‎डोंगराळ व वनक्षेत्रातून रस्ता‎जाणार असल्याने वन विभागाची‎परवानगी, पर्यावरणीय मंजुरी‎तसेच मर्यादित जमीन संपादन‎आवश्यक ठरणार आहे.‎प्रस्तावाला शासनाची मंजुरी‎मिळाल्यानंतर काही महिन्यांत‎काम सुरू होऊन, अंदाजे १ ते २‎वर्षांत रस्ता पूर्ण होण्याची‎शक्यता वर्तवण्यात येत आहे.‎शासनस्तरावर प्रस्तावाला गती‎मिळाल्यास समस्या सुटेल.‎ वेरूळ बायपासलाही मंजुरी;‎लवकरच कामास होणार प्रारंभ‎ वेरूळ लेण्यांसमोरून घृष्णेश्वर मंदिर व‎कन्नड चौकापर्यंत होणाऱ्या प्रचंड‎वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा मिळणार‎आहे. ४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर‎झालेला वेरूळ बायपास रस्त्याचे कामही‎लवकरच सुरू होणार आहे. हा बायपास‎वेरूळ लेणी क्रमांक एकपासून थेट‎सोलापूर-धुळे महामार्गाला जोडला‎जाणार आहे. हा दीड ते दोन किमीचा‎रस्ता घृष्णेश्वर मंदिर परिसर व वेरूळ‎गावाच्या बाहेरून जाणार असल्याने‎वेरूळ लेण्यांसमोरची कोंडी, घृष्णेश्वर‎मंदिराजवळील वाहनांचा गोंधळ, वेरूळ‎घाटात तासन‌्तास लागणारी वाहतूक‎कोंडी यांचा कायमस्वरूपी तिढा सुटणार‎आहे. वेरुळमधील वाहतूक कोंडीची‎समस्या सोडवण्यासाठी हा पर्याय अत्यंत‎महत्त्वपूर्ण ठरणार आहे.‎ पुढे काय : पर्यटकांना एक‎नव्हे, अनेक होतील फायदे‎ शूलिभंजनमार्गे हा पर्यायी रस्ता सुरू‎झाल्यानंतर खुलताबाद- वेरूळ‎घाटातील वाहतुकीचा ताण मोठ्या‎प्रमाणात कमी होईल. वाहनांच्या‎लांबच लांब रांगा इतिहासजमा‎होतील. भाविक व पर्यटकांचा प्रवास‎अधिक सुरक्षित, सुलभ व वेळेची‎बचत करणारा ठरेल. रुग्णवाहिका,‎अग्निशमन दल यांसारख्या‎आपत्कालीन सेवांना जलद मार्ग‎उपलब्ध होईल, असे अनेक फायदे‎होणार असल्याचे प्रशासन‎सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.‎आताही अनेकदा होणाऱ्या वाहतूक‎कोंडीमुळे पर्यटकांसह भाविकांचा‎मोठा वेळ वाया जातो. शिवाय‎मानसिक त्रासही होता. पर्यटकांना‎अधिक सुविधा मिळेल.‎

दिव्यमराठी भास्कर 20 Jan 2026 7:07 am

जिल्हा परिषद निवडणूक:शिवसेना-भाजप युतीची शक्यता अत्यंत कमी; 950 जणांनी भाजपकडे मागितली उमेदवारी

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप युती होण्याची चिन्हे कमी आहेत. भाजपच्या उमेदवारीसाठी जालना रस्त्यावर धूत हॉस्पिटल ते विमानतळ अशा दुतर्फा चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जि.प. ६३, पं. स.च्या १२६ जागांसाठी ९५० इच्छुकांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. कॅबिनेट मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब आणि आमदार अनुराधा चव्हाण हे उमेदवारांच्या निवडीबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत. पैठण येथील शिवसेनेचे दत्ता गोर्डे यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. युतीसंदर्भात बैठकांचे सत्र युतीसंदर्भात शिवसेना, भाजपची बैठक सोमवारी झाली. त्यात वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्याची शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितले. महानगर पालिका निवडणुकीत युती न झाल्याने शिवसेनेला फटका बसला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत युती आणि जागावाटपासंदर्भात शिवसेना बॅकफूटवर राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरात ६३ गटांसाठी १३२६ अर्ज विक्री प्रशासकीय स्तरावर उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत एकूण १३२६ अर्जांची विक्री करण्यात आली. प्रत्यक्ष अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. सोमवारपर्यंत ३४ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत ३४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या जागांसाठी २२ उमेदवारांनी, तर पंचायत समितीच्या गणांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहेत. दोन दिवसांत अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत ही संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. ॲनालिसिस - भाजपची ‘वेट अँड वॉच’ रणनीती मनपा निवडणुकीप्रमाणेच शेवटच्या क्षणापर्यंत युतीची चर्चा करायची आणि जागावाटप मनासारखे झाले नाही तर ऐनवेळी स्वबळाचा नारा द्यायचा, अशी भाजपची खेळी असू शकते. ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार नाहीत, तेथे इतर पक्षांतील ताकदवान नेत्यांना उमेदवारी देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. यामुळे पक्षाची ताकद ग्रामीण भागात वेगाने वाढवता येईल.

दिव्यमराठी भास्कर 20 Jan 2026 6:57 am

मुकुंदवाडीत मोबाइल चोरीच्या वादातून सराईत गुन्हेगाराचा पहाटेतच गोळीबार:घरात पळाल्याने मनपा स्वच्छता निरीक्षक थोडक्यात बचावले, आरोपी अटकेत

मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात सोमवारी (१९ जानेवारी) सकाळी सहा वाजेच्या सुमारास सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने गोळीबार करून एकास जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या नागरिकांना धमकी देऊन त्याने दहशत निर्माण केली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात शुभम जाट, मयूर उनगे, शिवा ऊर्फ छोट्या रवी भालेराव, गोल्या ऊर्फ विजय दिनकर धनई, मनोज संजय पडूळ, सागर राऊत, अमर ऊर्फ अतुल पवार यांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सचिन लाहोट (३५, शिवशाहीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. सकाळीच टोळके त्यांच्या नावाने शिवीगाळ करून बाहेर येण्यासाठी चिथावणी देत होते. त्यांनी खिडकीतून पाहिले असता, शुभमच्या हातात गावठी कट्टा तर अन्य टोळक्याच्या हातात तलवारी व चाकू होते. कुटुंब दरवाजा उघडत नसल्याने त्याने दगड दरवाजावर मारून तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सचिन घराच्या गच्चीवर पळाले. त्यांना बघून शुभमने त्यांच्या दिशेने गोळी झाडली. हा गदारोळ ऐकून आजूबाजूची मंडळी जमली. टोळक्याने कुणी मध्ये आले तर त्यांनादेखील जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र लोकांचा जमाव वाढत असल्याने त्यांनी पळ काढला. तातडीने पुंडलिकनगर पोलिसांच्या पथकासह गुन्हे शाखेचे टीम दाखल झाली. त्यांनी आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली. घटनास्थळी पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले, निरीक्षक गजानन कल्याणकर, अशोक भंडारे, सचिन इंगोले यांनी पाहणी केली. पोलिसांना बघून पाण्याच्या टाकीत लपला बीड बायपास येथील म्हस्के पेट्रोल पंपाच्या परिसरात शुभमचे घर आहे. तिथे उपनिरीक्षक अर्जुन राऊत यांचे पथक दाखल होताच शुभम गच्चीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पथकाने चहुबाजूने वेढा घातला. त्या वेळी तो पाण्याच्या टाकीत लपून बसला होता. बाहेर काढण्याचा प्रयत्न केल्यावर त्याने खिशातील ब्लेड काढून स्वतःवर हल्ला करण्याची धमकी दिली. त्याच्या आई, बहीण व भावानेदेखील पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने टाकी फोडून त्याला बाहेर काढत ताब्यात घेतले. तिथून त्याला खाली आणत असताना त्यांच्या कुटुंबाने अडवण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांसह आरोपीही पडला होता. एमपीडीएच्या कारवाईनंतर वर्षभराने शहरात येऊन राडा शुभम जाट हा सराईत गुन्हेगार अाहे. त्याच्यावर २०१३ पासून १० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर २०२१ मध्ये एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवस त्याने शहरात वास्तव्य केले. मात्र त्यानंतर तब्बल दीड वर्ष तो हैदराबादमध्ये राहायला होता. तो गेल्या महिन्यातच शहरात परतला आहे. परत येताच आपली दहशत पुन्हा निर्माण करण्यासाठी तो चोरी व गावठी कट्टा नाचवण्याचे प्रकार करत होता. त्यातूनच त्याने हा राडा केला आहे. त्याच्यासोबत अटकेत असलेल्या अमर पवारवर एमआयडीसी वाळूज ठाण्यात खुनाच्या गुन्ह्यासह अन्य तीन गुन्हे दाखल आहेत. तर, मयूर उनगे व विजय धनई यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. यातील आरोपींना मोठ्या शिताफीने पोलिसांच्या पथकाने अटक केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पॅरलल इन्व्हेस्टिगेशन

दिव्यमराठी भास्कर 20 Jan 2026 6:52 am

संभाजीनगरमध्ये एलएनके एनर्जी 60 एकरांत उभारणार सौर प्रकल्प:पाच वर्षांत 10 हजार कोटींची गुंतवणूक, 3 दिग्गज उद्योजक एकत्र

दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) वार्षिक बैठकीत महाराष्ट्रातील ऊर्जा क्षेत्रासाठी एक मोठी घोषणा करण्यात आली. देशातील तीन दिग्गज उद्योजकांनी एकत्र येत ‘एलएनके एनर्जी’ या प्रगत स्वच्छ ऊर्जा कंपनीची मुहूर्तमेढ रोवली असून पुढील ५ वर्षांत तब्बल १०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर क्रांती घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. या प्रकल्पाचे पहिले पाऊल महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे पडणार आहे. सूत्रांनी सांगितले की, संभाजीनगर येथील ६० एकर जागेवर कंपनी आपला पहिला प्रकल्प उभारणार असून, यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करारही करण्यात आला आहे. हा प्रकल्प केवळ बॅटरी किंवा सौर पॅनल बनवण्यापुरता मर्यादित नसून, संपूर्ण ‘स्वच्छ ऊर्जा क्षेत्र’ तयार करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होऊन राज्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार आहे. प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये सौर ऊर्जा निर्मिती : येथे ६ गिगावॅट क्षमतेचे सोलार सेल आणि मॉड्यूल तयार केले जातील. एकात्मिक प्रकल्प: इनगॉट आणि वेफर निर्मितीसाठीचा विशेष प्लँटही याच ठिकाणी असेल. हरित हायड्रोजन: भविष्यात हरित हायड्रोजन आणि शाश्वत इंधन निर्मितीवर कंपनीचा विशेष भर असेल. तीन दिग्गज उद्योगपती : या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे नेतृत्व भारतातील तीन अनुभवी उद्योजक करत आहेत: तिसऱ्या मुंबईसाठी मोठी गुंतवणूक : फडणवीस महाराष्ट्रातील सर्व भौगोलिक क्षेत्रासाठी गुंतवणूक मिळवू. दहा ते बारा क्षेत्रांतील उद्योगांशी समन्वय साधला जात आहे. आता तिसऱ्या मुंबईसाठी मोठी गुंतवणूक मिळणार आहे. आमच्याकडे उत्तम मेन्यू कार्ड आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यशस्वी होऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. गेल्या वर्षी दावोसमधील १.६ लाख कोटींच्या करारांपैकी ७२ टक्के करार प्रत्यक्षात उतरल्याचा दावा सरकारने केला आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा होणार भक्कम “आम्ही केवळ एक व्यावसायिक संधी म्हणून नव्हे, तर देशाची ऊर्जा सुरक्षा आणि औद्योगिक स्वयंपूर्णता वाढवण्यासाठी एक संस्था उभी करत आहोत. त्या दिशेनेच आमची वाटचाल सुरू आहे. ती कायम राहील,” असा विश्वास सह-संस्थापक कुशाग्र नंदन यांनी व्यक्त केला. तर, प्रगत तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाची अंमलबजावणी हेच एलएनके एनर्जीचे मुख्य सूत्र असेल, असे परितोष लधानी यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 20 Jan 2026 6:45 am

मंत्र्यांना सभागृहातील आश्वासनांची 90 दिवसांत पूर्तता करणे बंधनकारक:‘संसदीय कार्य’ची मंत्रालयीन विभागांना सूचना

विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी आणि गतिमान करण्यासाठी राज्य शासनाच्या संसदीय कार्य विभागाने सोमवारी (१६ जानेवारी) नवीन सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंत्र्यांनी सभागृहात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आश्वासन दिल्यापासून ९० दिवसांच्या आत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ३० दिवसांत प्रश्नांची उत्तरे देणेही अनिवार्य करण्यात आले असून, याला संबंधित विभाग जबाबदार धरले जाणार आहेत. १९९८ सालापासून लागू जुन्या नियमांमध्ये बदल करून आता मंत्रालयीन विभागांना संसदीय प्रश्नांची उत्तरे आणि आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी कडक कालमर्यादा आखून देण्यात आली आहे. शासन परिपत्रकानुसार, विधानमंडळ सचिवालयाकडून आलेल्या प्रत्येक संसदीय आयुधावर ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने, विहित नमुन्यात आणि ठरलेल्या मुदतीत माहिती देणे आवश्यक राहील. प्रश्न स्वीकृतीबाबत मत नोंदवू नये, सभासदांविषयी आक्षेपार्ह भाषा टाळावी, तसेच लक्षवेधी सूचनांवरील निवेदनांत अयोग्य अभिप्राय देऊ नयेत, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहेत. आश्वासनांवर सरकारची करडी नजर मंत्र्यांनी सभागृहात दिलेली आश्वासने नव्वद दिवसांत पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले. प्रत्येक विभागात सचिवांच्या अध्यक्षतेखाली आश्वासन व संसदीय आयुधे पूर्तता समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही समिती दर १५ दिवसांनी प्रलंबित कामांचा आढावा घेईल. दोन वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आश्वासने निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देशही दिले आहेत. सभागृहावर थेट देखरेख अधिवेशन काळात विभागाशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विधिमंडळाच्या गॅलरीत व विभागात जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे बंधनकारक केले आहे. तसेच, प्रत्येक विभागात सहसचिव/उपसचिव दर्जाचा अधिकारी समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिव्य मराठी इनसाइड - आमदारांची नाराजी हेच प्रमुख कारण विधानमंडळात प्रश्नांची उशिरा उत्तरे, अपूर्ण माहिती आणि मंत्र्यांच्या आश्वासनांची प्रलंबित अंमलबजावणी यामुळे आमदारांमध्ये वाढलेली नाराजी हे या परिपत्रकाचे मुख्य कारण आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सभागृहाची प्रतिष्ठा धोक्यात येत असल्याने सरकारने थेट विभागीय सचिवांवर जबाबदारी निश्चित केली आहे. ती कितपत यशस्वी ठरेल, याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळेल.

दिव्यमराठी भास्कर 20 Jan 2026 6:36 am

महापौराच्या आरक्षणाने होऊ शकतो नवा राजकीय तिढा:22 जानेवारीला मुंबईत महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत

मुंबईसह राज्यातील सर्व २९ महापालिकांतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी मंत्रालयात निघणार आहे. मुंबईमध्ये महापौरपद ‘अनुसूचित जमाती’ (एसटी) प्रवर्गासाठी राखीव झाले, तर भाजप किंवा शिंदेसेनेकडे त्या प्रवर्गातील उमेदवार नाही. उद्धवसेनेकडे एसटी प्रवर्गातील दोन नगरसेवक आहेत. त्यामुळे बहुमत मिळवूनही महायुतीपुढे नवा राजकीय तिढा निर्माण होऊ शकतो. अशा स्थितीत उद्धवसेनेचा महापौर होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सूत्रांनी सांगितले की, एका काचेच्या बरणीत मनपाचे नाव आणि आरक्षण लिहिलेल्या चिठ्ठ्या असतील. शालेय विद्यार्थ्याच्या हस्ते ‘लॉटरी’ (सोडत) काढून आरक्षण जाहीर केले जाईल.या वेळी नगरविकास राज्यमंत्री, नगरविकासचे सचिव, वरिष्ठ अधिकारी प्रशासक काळ आणि न्यायालयाच्या यापूर्वीच्या काही आदेशामुळे या वेळी आरक्षणाच्या रचनेत बदलही होऊ शकतो. जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे- आरक्षण ठरवणे, सोडत काढण्याचे सर्व अधिकार राज्य सरकारकडेच महापौर आरक्षण कोटा कसा ठरतो? आरक्षणाचा कोटा कोण ठरवतो? ‘मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८’ मधील कलम १९ नुसार राज्य सरकारलाच आरक्षण ठरवणे, सोडत काढण्याचे सर्व अधिकार आहेत. मुंबईत सरकारची भूमिका काय असेल? नगरविकास विभागाने मुंबईच्या महापौरपदाचे नाव एसटी कोट्यासाठी निवडले तरच ती चिठ्ठी सोडतीत समाविष्ट केली जाईल, अन्यथा नाही. मुंबईत एसटी लोकसंख्या आणि महापौरपदाचे आरक्षणाचा काय संबंध?मुंबईत एसटी लोकसंख्या १ ते १.१% असल्याने मुंबईपेक्षा जास्त एसटी लोकसंख्येच्या नाशिक (७.२०), ठाणे (२.३२), संभाजीनगर (१.३०), जळगावला (४.३०) आधी आरक्षण शक्य आहे. सत्ताधाऱ्यांकडे एसटीचा उमेदवार नसेल तर विरोधकांचा महापौर होईल का?होऊ शकतो. पण मुंबई मनपाच्या सुत्रानुसार २००७ च्या शासन निर्णयानुसार ‘खुल्या प्रवर्गातून’ विजयी उमेदवार महापौरपदासाठी पात्र ठरतो. मग सत्तेचा रिमोट कंट्रोल कुणाकडे?महापौरांना मर्यादित आर्थिक अधिकार आहेत. पैशाने शक्तिशाली स्थायी समिती सत्ताधाऱ्यांच्याच नियंत्रण राहते. महापौराला हटवता येते का?६ महिन्यांनी अविश्वास आणता येतो. पण नवा महापौरही राखीव प्रवर्गातील आवश्यक असतो. पुणे - भाजपकडे एसटी प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, आमच्याकडे १६५ जणांच्या सभागृहात ११९ नगरसेवक आहेत. त्यात आरक्षित वर्गातील सर्व नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे महापौरपद एसटी प्रवर्गासाठी आरक्षित निघाल्यास आम्हाला कोणत्याही चिंतेचे अजिबात कारण नाही. संभाजीनगर - उद्धवसेनेचे रशीद मामू, एमआयएमच्या जाधव भाजपकडे ५७ नगरसेवक असून ओपन, ओबीसी आणि एससी प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध आहेत. मात्र एसटी प्रवर्गातील उमेदवार नाही. शहरात दोनच एसटी उमेदवार आहेत. प्रभाग ४ मधून उद्धवसेनेचे रशीदमामू आणि प्रभाग ०१ मधून एमआयएमच्या विजयश्री जाधव. मुंबई - उद्धवसेनेकडे एसटी प्रवर्गातील दोन उमेदवार मुंबई मनपात भाजपकडे ८९ तर शिंदेसेनेकडे २९ नगरसेवकांच्या आधारे बहुमत आहे. मात्र त्यांच्याकडे एसटी प्रवर्गातील एकही नगरसेवक नाही. दुसरीकडे जनतेने पराभूत केलेल्या उद्धवसेनेकडे जितेंद्र वळवी (प्रभाग ५३) आणि प्रियदर्शिनी ठाकरे (प्रभाग १२१) हे दोन एसटी उमेदवार आहेत.

दिव्यमराठी भास्कर 20 Jan 2026 6:32 am

यंदाही राज्यात गुंतवणूक वाढणार

मुख्यमंत्र्यांना विश्वास, महाराष्ट्र गुंतवणूकदारांसाठी गेट वे ऑफ इंडिया झ्युरिक : वृत्तसंस्था महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हे भारतात येणा-या गुंतवणुकीसाठी गेटवे ऑफ इंडिया […] The post यंदाही राज्यात गुंतवणूक वाढणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Jan 2026 1:16 am

प्रसिद्ध संगीतकार, प्राध्यापक रावसाहेब मोरे यांचे निधन

बर्दापूर येथे मंगळवारी अंत्यसंस्कार मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधील चेंबूर भागातील विवेकानंद कला, वाणिज्य महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, प्रसिद्ध संगीतकार, गायक रावसाहेब भाऊसाहेब मोरे (५२) यांचे अल्पशा आजाराने सोमवार, दि. १९ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी बर्दापूर (ता. अंबाजोगाई) येथे मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार […] The post प्रसिद्ध संगीतकार, प्राध्यापक रावसाहेब मोरे यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Jan 2026 1:14 am

अहमदपुरात उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

अहमदपूर : प्रतिनिधी येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षकांचे दुर्लक्ष तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांच्या डोळेझाकपणामुळे येथील बेशिस्त व मनमानी कारभार वाढल्यामुळे येथील २ महिला रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. या प्रकरणी उपसंचालकांनी त्वरित बैठक घेऊन सखोल चौकशी करून मयताच्या नातेवाईकांना न्याय मिळवून देण्यात यावा, या मागणीसाठी युवक नेते डॉ. सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली सम्राट […] The post अहमदपुरात उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 11:42 pm

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या चाकूर तालुक्याची पुनर्रचना

लातूर : प्रतिनिधी अखिल म प्रा शिक्षक संघ शाखा चाकूर पदाधिका-यांच्या पुनर्रचनेची लातूर येथे बैठक घेयात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष सुनिलकुमार हाके हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा नेते बालकुंदे परमेश्वर, जिल्हा सरचिटणिस सुनिलजी बिराजदार, नेट, सेट, पिएचडी अखिल महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद कांदे, […] The post अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या चाकूर तालुक्याची पुनर्रचना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 11:41 pm

बोगस प्रमाणपत्राद्वारे अभियंता पदापर्यंत मजल

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात विद्यापिठांच्या बोगस पदव्या दाखवून कनिष्ठ अभियंता पदापर्यंत मजल मारली. या संदर्भाने तक्रार दाखल होताच सदर कनिष्ठ अभियंत्यांच्या पदवीचा शोध घेण्यात आला असता प्रमागणपत्र बोगस असल्याचे निदर्शनास आले. लातूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने अशा बोगस प्रमाणपत्रा अधारे नोकरीचा लाभ घेणा-या ८ जणांची विभागीय चौकशी लावली जाणार आहे. तसेच या […] The post बोगस प्रमाणपत्राद्वारे अभियंता पदापर्यंत मजल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 11:39 pm

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तयार रहा

लातूर : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आमदार अमीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली घवघवीत यश मिळवून काँग्रेस वंचित आघाडीने ७० जागेपैकी ४७ जागा जिंकून लातूर महापालिकेवर झेंडा फडकवला आहे. त्यात काँग्रेसच्या प्रचार यंत्रणा, सभा मतदारापर्यंत जावून काँग्रेसचा विचार पोहोचवणे या सर्व जबाबदा-या प्रामाणिकपणे कार्य केल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या […] The post जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तयार रहा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 11:38 pm

वसई-विरारमध्ये 'बविआ'ची एकहाती सत्ता:भाजपचा दारुण पराभव; मिलिंद नार्वेकरांनी घेतली ठाकूर बंधूंची भेट

वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने भारतीय जनता पक्षाचा पराभव करत दणदणीत विजय मिळवल्यानंतर, उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आमदार मिलिंद नार्वेकर यांनी हितेंद्र ठाकूर आणि भाई ठाकूर यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीत भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळाला होता, ज्यामध्ये ठाकूर यांच्या पक्षाने बाजी मारली. या यशानंतर नार्वेकरांनी ठाकूर यांच्या राजकीय कामगिरीचे विशेष कौतुक केले असून, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती, मात्र हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत महापालिकेवर आपला झेंडा फडकवला. एकूण 115 जागांपैकी 71 जागांवर दणदणीत विजय मिळवत बहुजन विकास आघाडीने स्पष्ट बहुमत प्राप्त केले, तर भाजपला 43 जागांवर समाधान मानावे लागले. ठाकूर यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपला रोखत मिळवलेल्या या यशाची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. या ऐतिहासिक विजयानंतर ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी हितेंद्र ठाकूर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. नार्वेकर यांनी केवळ ठाकूर यांचेच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांचे आणि बहुजन विकास आघाडीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचेही विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निवडणुकीत भाजपविरुद्ध थेट संघर्ष केल्यानंतर झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे आता नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे. वसई-विरारमध्ये बविआची एकहाती सत्ता वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात बहुजन विकास आघाडीने (बविआ) आपले वर्चस्व कायम राखत 115 पैकी 71 जागांवर दणदणीत विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 43 जागांवर यश मिळाले, तर शिवसेना शिंदे गट केवळ एका जागेवर विजय मिळवू शकली आहे. विशेष म्हणजे, इतर कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा अपक्ष उमेदवाराला या महापालिकेत आपले खाते उघडता आले नाही, ज्यामुळे वसई-विरारमध्ये पुन्हा एकदा हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील 'बविआ'ची एकहाती सत्ता आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 11:23 pm

जि.प. पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थान, दालनांच्या दुरुस्तीसाठी ६० लाखांची तरतूद:नव्या पदाधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज

आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेता, अमरावती जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये, तर मुख्यालयातील दालनांच्या दुरुस्तीसाठी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मार्च २०२२ मध्ये तत्कालीन पदाधिकारी आणि सदस्यांचा कार्यकाळ संपल्यापासून सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये प्रशासक राजवट सुरू आहे. निवडणुका कधी होतील, हे अनिश्चित असल्याने गेल्या तीन वर्षांपासून पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थाने आणि दालनांच्या दुरुस्तीसाठीची वार्षिक तरतूद पुढे ढकलली जात होती. आता निवडणुका अपेक्षित असल्याने जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतीमधील निवासस्थाने आणि मुख्यालयातील दालनांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे सभापती असे एकूण सहा पदाधिकारी असतात. अध्यक्षांकडे आमसभा, स्थायी समिती आणि जल व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद असते, तर उपाध्यक्षांकडे दोन समित्यांचे सभापतीपद असते. याशिवाय महिला व बालविकास आणि समाजकल्याण समितीसाठी स्वतंत्र सभापती असतात, तर शिक्षण, आरोग्य, वित्त व बांधकाम यापैकी प्रत्येकी दोन खाती अन्य दोन सभापतींकडे दिली जातात. या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी शासनातर्फे निवासस्थाने आणि कार्यालये उपलब्ध करून दिली जातात, ज्यांची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारीही शासनाची असते. पदाधिकाऱ्यांना जिल्हाभर प्रवासासाठी सरकारी किंवा खासगी वाहन वापरण्याची मुभा असते. खासगी वाहन वापरल्यास जिल्हा परिषद प्रशासनातर्फे इंधन भत्ता दिला जातो. मात्र, हा भत्ता पुरेसा नसल्याने बहुतांश पदाधिकारी सरकारी वाहनांचीच मागणी करतात. त्यामुळे या वाहनांसाठी लागणारे इंधन आणि चालकाची सोय देखील प्रशासनातर्फेच केली जाते.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 10:33 pm

बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू:नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करत बाबा सिद्दिकी सारखीच नवनीत राणा यांची हत्या करू, अशी धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पूर्वी देखील नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हिंदू शेरणी आणि निवडणूक प्रचारादरम्यान हैदराबाद येथील भाषणानंतर नवनीत राणा यांना धमकी देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांना फोनवरून धमकी देण्यात आल्याने अमरावती जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धमकी प्रकरणी नवनीत राणा यांचे खासगी स्वीय सहाय्यक सचिन सोनोने यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत अमरावतीमध्ये भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले आहे. परंतु, या निवडणुकीत एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नवनीत राणा यांच्यावर केलेली टीका चांगलीच चर्चेत आली. मुले जन्माला घालण्याच्या संदर्भात नवनीत राणा यांनी वक्तव्य केले होते. तोच मुद्दा पकडत ओवेसी यांनी नवनीत राणा यांना डिवचले होते. त्यानंतर, आता पोलिसांना फोन करून नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान, यापूर्वी हैदराबाद येथील अब्दुल नावाच्या एका व्यक्तीने घाणेरड्या शब्दांत नवनीत राणा यांना पत्रातून धमकी दिली होती. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात त्यांना धमकीचे दुसरे पत्र आले होते. तेव्हा देखील नवनीत राणा यांच्या स्वीय सहाय्यकाच्या फिर्यादिवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 10:31 pm

विदेशी गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र भारताचे 'गेटवे ऑफ इंडिया':राज्याच्या सर्व भागासाठी वैविध्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक येणार- CM देवेंद्र फडणवीस

'महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो. ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक एकोसिस्टम तयार केली आहे. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हे भारतात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी गेटवे ऑफ इंडिया आहे. त्यामुळे भारतातील अन्य राज्यांशी आमची चांगल्या अर्थाने स्पर्धा आहे. सरतेशेवटी देशासाठी ही बाब चांगलीच ठरते. पण यातही महाराष्ट्र पुढे आहे याचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह प्रतिनिधीमंडळासमवेत दावोस येथे दाखल झाले आहेत. या दरम्यान त्यांनी आज महाराष्ट्र पॅव्हेलीयनमध्ये माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील सर्व भौगोलिक क्षेत्रासाठी गुंतवणूक मिळवणार असून. त्यासाठी वैविध्यपूर्ण अशा दहा ते बारा क्षेत्रातील उद्योगांशी समन्वय साधला जात आहे. आता तिसरी मुंबई उभी राहते आहे. तिच्यासाठी मोठी गुंतवणूक मिळण्याचे संकेत आहेत. आमच्याकडे उत्तम मेन्यू कार्ड आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यशस्वी होऊ, असे फडणवीस म्हणाले. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम गुंतवणूकदारांसाठी चावडी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक ही उद्योग, गुंतवणूकदारासाठी एक प्रकारे चावडी आहे. याठिकाणी दरवर्षी आम्ही महाराष्ट्राकडे काय आहे, कोणती क्षमता आहे, हे शोकेस करण्यासाठी येत असतो. यंदाही गतवर्षीच्या तुलनेत आणखी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास आहे. कारण देशात अशा प्रकारे येणारी गुंतवणूक व त्याबाबतचे करार करण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. अशाप्रकारे सुमारे 60 ते 65 करार प्रत्यक्षात आणण्यात महाराष्ट्राला यश मिळाले आहे. दावोस परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहेच. इथे उद्योगजगत एकत्र येतो. महाराष्ट्रातून आलेल्या उद्योजकांनी या मंचाचा पुरेपूर उपयोग करावा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. महाराष्ट्र 2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनणार दरम्यान, सकाळ मीडिया ग्रुपच्या ग्लोबल इॅम्पॅक्ट फोरमवर देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत झाली. त्यावेळी ते म्हणाले, गेल्या दशकात महाराष्ट्राने सरासरी 10 टक्क्यांहून अधिक विकासदर कायम राखला असून, राज्य 2032 पर्यंत देशातील पहिले ट्रिलियन डॉलर्सची असणारी अर्थव्यवस्था बनू शकते. मात्र, हा टप्पा आणखी वेगाने 2030 पर्यंत गाठण्याचे उद्दिष्ट आहे. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, सध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती आव्हानात्मक असली, तरी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अंदाजानुसार भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेतील ‘ब्राइट स्पॉट’ आहे. जगभरातील विकासदर मंदावले असताना, महाराष्ट्र मात्र आपला विकासदर टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे. देशातील 39 टक्के थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात गेल्या वर्षी भारतात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी 39 टक्के ‘एफडीआय’ महाराष्ट्रात आला आहे. त्यामुळे गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राज्य शासनाने आतापर्यंत 15 ते 16 धोरणे लागू केली असून, या धोरणांमुळे गुंतवणूकदारांसाठी सक्षम आणि विश्वासार्ह इकोसिस्टीम तयार झाली आहे. आज महाराष्ट्रात गुंतवणुकीची कमतरता नाही; गरज आहे ती योग्य वातावरण निर्माण करण्याची, आणि ते वातावरण महाराष्ट्रात तयार झाले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. एमएसएमई हे अर्थव्यवस्थेचा कणा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) हे अर्थव्यवस्थेचा कणा असून रोजगारनिर्मितीत त्यांचा सर्वाधिक वाटा आहे. केंद्र व राज्य सरकार एमएसएमईंना प्रोत्साहन देत आहे. केवळ भांडवल नव्हे, तर आजच्या काळात विश्वासार्हता हा सर्वात मोठा घटक आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्राने दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता केली असून, राज्याचा ट्रॅक रेकॉर्ड आश्वासक असल्याचे त्यांनी सांगितले. 16 लाख कोटींचे सामंजस्य करार, रूपांतरण दर 75-80 टक्के गेल्या वर्षी महाराष्ट्रात तब्बल 16 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले. यात प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतरित व्हावेत यासाठी राज्याने स्वतंत्र ट्रॅकिंग यंत्रणा उभारली आहे. देशपातळीवर जिथे सामंजस्य करारांचे रूपांतरण प्रमाण साधारणतः 25 ते 30 टक्के असते, तिथे महाराष्ट्रात हे प्रमाण 50 ते 55 टक्के असून, दावोस करारांच्या बाबतीत 75 ते 80 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. जमीन वाटप, मंजुरी प्रक्रिया, तसेच ‘वॉर रूम’च्या माध्यमातून प्रत्येक गुंतवणूकदाराला उद्योग क्षेत्राशी जोडून ठेवण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. स्टार्टअप्स, एआय आणि भविष्यातील तंत्रज्ञान आजच्या काळात स्टार्टअप्स अवघ्या 3-4 वर्षांत युनिकॉर्न होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डेटा, फ्रंटियर टेक्नॉलॉजीज या क्षेत्रांमध्ये भारत, विशेषतः महाराष्ट्र आघाडी घेऊ शकतो. त्याचबरोबर, महाराष्ट्रात देशातील 60 टक्के डेटा सेंटर क्षमता असून, महाराष्ट्र आता भारताची ‘डेटा सेंटर कॅपिटल’ बनले आहे. हरित ऊर्जेवर आधारित, उच्च दर्जाची वीजपुरवठा व्यवस्था उभारून ही क्षमता आणखी वाढवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी आणि 35 लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्या नवी मुंबई विमानतळाजवळ एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी, मेडिसिटी आणि जीसीसी सिटी उभारली जात असून, या एकत्रित प्रकल्पातून सुमारे 35 लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्या निर्माण होतील, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या संपूर्ण क्लस्टरमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडणार आहे. वाढवण बंदर : पुढील 100 वर्षांसाठी प्रगतीचे केंद्र वाढवण हे जगातील टॉप 10 बंदरांपैकी एक असून जेएनपीटीपेक्षा तीनपट मोठे असलेले हे बंदर जगातील सर्वात मोठ्या जहाजांना सामावून घेण्यास सक्षम असेल. पुढील तीन वर्षांत पहिला टप्पा कार्यान्वित होईल, आणि पुढील 100 वर्षांसाठी भारताच्या सागरी व पुरवठा साखळीला बळ देईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. उद्योगांना पूर्ण संरक्षण उद्योगविकासासाठी कायदा व सुव्यवस्था अत्यंत महत्त्वाची असून, महाराष्ट्रात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवले जात आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्रात गुंतवणूक सुरक्षित आहे, विश्वासार्ह आहे आणि भविष्यासाठी सर्वोत्तम असल्याचेही त्यांनी सांगितले. शहर देशाच्या जीडीपीचा कणा 1980 ते 2000 या काळात शहरीकरणाचा वेग प्रचंड वाढला आणि तो आजतागायत कायम आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शहरीकरणाकडे पाहण्याची दृष्टी बदलली. देशाच्या सुमारे 65 टक्के जीडीपीचे निर्माण शहरांच्या आसपास होते, हे वास्तव ओळखून प्रधानमंत्री मोदी यांनी प्रथमच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू केली. स्मार्ट सिटी योजना, अमृत सिटी, स्वच्छ भारत अभियान, शहरांतील पायाभूत सुविधा, सामाजिक क्षेत्रातील गुंतवणूक आणि संस्थात्मक उभारणी यांसारख्या उपक्रमांमुळे आज भारतीय शहरे झपाट्याने बदलत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्रातील 29 महापालिका, 45 टक्के लोकसंख्या राज्यातील 29 महापालिकांमध्ये राज्याच्या सुमारे 40 ते 45 टक्के लोकसंख्या राहते. या शहरांचे जीवनमान उंचावले, त्यांना अधिक राहण्यायोग्य बनवले, तर केवळ नागरिकांचे जीवनच बदलणार नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 10:02 pm

अमरावती मनपा स्वीकृत नगरसेवक संख्या 9 झाली:महापौर, उपमहापौर निवडीसह 15 फेब्रुवारीपूर्वी पहिल्या बैठकीत निवड

अमरावती महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची संख्या ५ वरून थेट ९ झाली आहे. सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के किंवा जास्तीत जास्त १० सदस्य असा मनपा अधिनियमात सुधारणा केल्याने ही वाढ झाली आहे. हे स्वीकृत सदस्य महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीसाठी होणाऱ्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्या बैठकीत निवडले जातील. मतमोजणीच्या दिवसापासून साधारणतः महिनाभरात ही बैठक घेण्याचे निर्देश असल्याने, ती आगामी १५ फेब्रुवारीपूर्वी होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीवेळी स्वीकृत नगरसेवकांची संख्या केवळ पाच होती. मात्र, २३ मार्च २०२३ रोजी शासनाने मनपा अधिनियमात केलेल्या सुधारणांमुळे हा बदल झाला आहे. या वाढीव सदस्यसंख्येचा फायदा पालिकेतील सर्वच राजकीय पक्ष आणि नवनिर्वाचित सदस्यांद्वारे स्थापन होणाऱ्या गटांना होणार आहे. पहिल्या बैठकीचा क्रम निश्चित करण्यात आला आहे. यात सर्वप्रथम महापौर आणि उपमहापौरांची निवडणूक होईल, त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले जाईल आणि शेवटी स्थायी समिती सदस्यांची निवड केली जाईल. अमरावती मनपाची लोकनिर्वाचित सदस्य संख्या ८७ आहे. या संख्येच्या दहा टक्के म्हणजे ८.७ सदस्य होतात. नियमानुसार, अपूर्णांकातील संख्या नजीकच्या पूर्णांकात गृहीत धरली जाते, त्यामुळे पालिकेत नऊ स्वीकृत नगरसेवक निवडले जातील. स्थायी समितीचे १६ सदस्य निवडण्याचा विषय हा स्वीकृत सदस्यांच्या निवडीनंतरचा असतो. या निवडीसाठी मनपा सभागृहातील पक्ष आणि अपक्ष नगरसेवकांनी स्थापन केलेल्या गटांतील सदस्यांची संख्या विचारात घेतली जाते. कायद्यानुसार, प्रत्येक गटाला त्यांच्या सदस्य संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिले जाते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप २५ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेस आणि युवा स्वाभिमान पक्षाकडे (वायएसपी) प्रत्येकी १५ नगरसेवक आहेत. एमआयएमकडे १२, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कडे ११ नगरसेवक आहेत. शिवसेना (शिंदे गट) आणि बहुजन समाज पार्टीकडे प्रत्येकी ३ नगरसेवक आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे दोन, तर युनायटेड फोरममध्ये सहभागी असलेल्या वंचित बहुजन आघाडीकडे एक नगरसेवक आहे. विविध समित्यांवर प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी या पक्षांना किंवा अपक्षांना संयुक्त गट स्थापन करणे आवश्यक आहे. अमरावती मनपाच्या स्थायी समितीची सदस्य संख्या १६ आहे, तर शिक्षण, विधी, शहर सुधारणा आणि महिला व बालविकास यांसारख्या इतर सर्व समित्यांमध्ये प्रत्येकी ९ सदस्य असतात.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 9:51 pm

महापौर पदाची मॅरेथॉन!

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका तर पार पडल्या आता सा-यांच्या नजरा महापौर पदाच्या आरक्षण सोडतीवर आहेत. निवडून आलेल्या नगरसेवकांचे लक्ष महापौर पदाच्या रेसवर आहे. निवडणुकीपूर्वी आरक्षण काढल्यास पाडापाडीचे राजकारण होईल, या भीतीने नगर विकास विभागाने महापौर पदाचे आरक्षण आजवर काढले नव्हते. आता निवडणूक पार पडल्यानंतर या पदासाठी नगर विकास विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीपूर्वी राज्य […] The post महापौर पदाची मॅरेथॉन! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 9:51 pm

'लाडकी बहिण' योजनेचे 300 महिलांचे पैसे रखडले:नांदगावच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तीनशेहून अधिक महिलांना 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेचे गेल्या तीन महिन्यांपासून पैसे मिळाले नाहीत. याविरोधात त्यांनी सोमवारी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी आंदोलक महिलांचे निवेदन स्वीकारले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे यांनी केले. चर्चेदरम्यान, केवायसी (KYC) करताना चुकीची माहिती भरली गेल्याने या महिलांचे पैसे रखडले असल्याचे समोर आले. यासंदर्भात महिलांनी यापूर्वी महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांना समाधानकारक माहिती मिळाली नव्हती. यावर निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी पुढाकार घेत महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या दालनात बोलावले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी संबंधित महिलांना माहिती दिली की, केवायसीमध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी संबंधित पोर्टल पुन्हा सुरू करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. पोर्टल सुरू झाल्यानंतर चुकांची दुरुस्ती झाल्यास संबंधित महिलांना त्यांचे लाभ पूर्ववत मिळतील. या आंदोलनात वंदना भोवते, उषा गायधनी, वनमाला मांगुलकर, शिला मोहतुरे, रेखा इंगळे, सुजाता सावळे, अर्चना गायधनी, स्वामिनी सरकटे, विमल सावळे, बेबी साबळे, किरण इंगळे, बेबी कंटाळे, विमल खवले, मनकर्णा गोळे, सीमा पवार, छाया भालेराव, ज्योती साबळे, आरती सावळे, पूनम घुले आदी महिला सहभागी झाल्या होत्या.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 9:47 pm

जंगलात वणवा पेटला, चिलीत आणीबाणी लागू

सॅनटियागो : चिलीमध्ये जंगलांना लागलेल्या आगीमुळे किमान १८ लोकांचा मृत्यू झाला असून हजारो एकर जंगल जळून खाक झाले आहे. शेकडो घरे नष्ट झाली आहेत. मध्य आणि दक्षिण चिलीमध्ये सध्या भीषण उष्णतेची लाट आहे. राष्ट्राध्यक्ष गेब्रियल बोरिक यांनी बायोबियो आणि नुब्ले मध्यवर्ती भागांमध्ये आणीबाणीच्या स्थिती घोषित केली आहे. चिलीच्या जंगलांमध्ये लागलेली आग वेगाने पसरत असून आतापर्यंत […] The post जंगलात वणवा पेटला, चिलीत आणीबाणी लागू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 9:47 pm

‘नशामुक्त भारत’साठी विद्यार्थ्यांना शपथ 

लातूर : प्रतिनिधी अमली पदार्थ सेवन एक सामाजिक व्याधी असून या विळख्यातून तरुण पिढीला बाहेर काढण्याची गरज आहे. यासाठी ‘नशामुक्त भारत’ अभियान प्रभावी ठरत आहे, असे प्रतिपादन लातूर जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सचिव व्यंकटेश गिरवलकर यांनी येथे केले. राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत व सर्वोच्च न्यायालयाच्या योजनेअंतर्गत लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालय, जिल्हा विधी […] The post ‘नशामुक्त भारत’साठी विद्यार्थ्यांना शपथ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 9:46 pm

अ‍ॅड. मनोहरराव गोमारे समाजाला दिशा देणारे व्यक्तिमत्त्व 

लातूर : प्रतिनिधी अ‍ॅड. मनोहरराव गोमारे हे आदर्श व्यक्तिमत्व होते. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय होते. ते विचारांची धगधगती मशाल होते. समाजाला दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले, असे प्रतिपादन कळंब तालुक्यातील रांजणी येथीद नॅचरल शुगरचे प्रमुख बी. बी. ठोंबरे यांनी केले. लातूर एज्युकेशन सोसायटी, लातूरद्वारा ज्ञानेश्वर विद्यालय, लातूर येथे आयोजित करण्यात […] The post अ‍ॅड. मनोहरराव गोमारे समाजाला दिशा देणारे व्यक्तिमत्त्व appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 9:45 pm

उमेदवारांवर प्रतिबंधात्मक नियमांचा अंकुश

लातूर : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी लातूर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या १० पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्याच दिवशीपासून या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ही निवडणूक संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा […] The post उमेदवारांवर प्रतिबंधात्मक नियमांचा अंकुश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 9:43 pm

अनियमित दिनचर्येमुळे कर्करोग होण्याचा धोका!

भोपाळ : वृत्तसंस्था धावपळीच्या युगात जगभरात जीवनशैली बदलली आहे. त्यातच अनेक ठिकाणी रात्र-दिवस कामाच्या शिफ्ट चालतात. त्यामुळे कामाच्या निमित्ताने आणि विविध कारणासाठी जागरण वाढले आहे. त्यातच नाईट शिफ्टमध्ये काम करणा-या लोकांसाठी चिंता वाढविणारी बातमी आहे. कारण रात्री उशिरापर्यंत जागल्यामुळे आणि अनियमित दिनचर्येमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यातून कर्करोग होण्याचा धोका वाढतो. एम्स भोपाळच्या नवीन संशोधनातून […] The post अनियमित दिनचर्येमुळे कर्करोग होण्याचा धोका! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 9:39 pm

मनसे गटनेतेपदी यशवंत किल्लेदार

मुंबई : प्रतिनिधी मनसेचे मुंबईत सहा नगरसेवक निवडून आले आहेत. मनसेच्या गटनेतेपदी आता यशवंत किल्लेदार यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची पक्षपातळीवरील सर्व प्रक्रिया पार पडली असून मंगळवारी कोकण भवन येथे जाऊन गटाची स्थापना करण्यात येणार असल्याचे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. दरम्यान, गटनेतेपदी निवड झाल्यानंतर लगेचच यशवंत किल्लेदार यांनी मुंबईत कोणत्याही परिस्थितीत बिहार भवन उभारू […] The post मनसे गटनेतेपदी यशवंत किल्लेदार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 9:29 pm

महापौर पदासाठी २२ जानेवारीला आरक्षण सोडत

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील २९ महापालिकांमधील महापौर पदासाठी येत्या २२ जानेवारीला आरक्षण सोडत काढली जाणार आहे. नगरविकास विभागाने सोमवारी याबाबतची सूचना जारी केली. या सोडतीनंतर मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांमधील महापौरपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग येईल. त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे आणि राजकीय पक्षांचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे. मुंबईसह २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल […] The post महापौर पदासाठी २२ जानेवारीला आरक्षण सोडत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 9:27 pm

ओबीसी बहुजन पक्ष व काँग्रेसची आघाडी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका एकत्रित लढणार

मुंबई : प्रतिनिधी प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडी व काँग्रेस पक्षाची आघाडी झाली आहे. ही एक वैचारिक आघाडी असून आगामी जिल्हा परिषद निवडणुका एकत्रित लढू असा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ओबीसी बहुजन पक्षाचे नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांनी त्यांचे सहकारी […] The post ओबीसी बहुजन पक्ष व काँग्रेसची आघाडी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका एकत्रित लढणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 9:23 pm

महापौर पदासाठी शिंदेंना दिल्लीतून पाठबळ

मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या महापौर पदासाठी भाजप आणि शिंदे गटात फोडाफोडी होण्याची शक्यता आहे. शिवसेना फोडल्यामुळे अमित शहा त्यांना दिल्लीत खांद्यावर घेऊन फिरतात. कुणीतरी त्यांना दिल्लीतून चावी देत आहे. अन्यथा २९ नगरसेवकांच्या जोरावर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का? भाजप किंवा देवेन्द्र्र फडणवीस यांचा महापौर होऊ नये म्हणून दिल्लीतून शिंदेंना चावी देणारा कोण?, असा […] The post महापौर पदासाठी शिंदेंना दिल्लीतून पाठबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 9:21 pm

सोलापूर की ‘ट्रॅफिक जाम’पूर

सोलापूर : सोलापूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत चालला आहे. धावपळीच्या काळात बऱ्याच चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी झालेली असते. सोलापूर जिल्हा-सत्र न्यायालय व जिल्हा परिषद समोर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. वैतागलेले वाहनधारक सोलापूर आहे की ट्रॅफिक जामपूर असा त्रागा करत होते. सोमवार दि. १९ जानेवारी रोजी सोलापूर जिल्हा परिषद परिसरात प्रचंड […] The post सोलापूर की ‘ट्रॅफिक जाम’पूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 9:13 pm

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध

नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखेर नितीन नवीन यांची निवड करण्यात आली असून भाजपकडून १६ जानेवारीपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यक्रम सुरू झाला होता, त्यानुसार आज अर्ज नामांकनप्राप्त आणि पाठिंब्याच्या जोरावर नितीन नबीन ३७ सेटसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. यापूर्वी त्यांना भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले होते. या निवडीसाठी भाजपचे जवळपास सर्व मुख्यमंत्री, राज्य […] The post भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 8:52 pm

नांदेडमध्ये रंगणार 'हिंद दी चादर' सोहळा:गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त भव्य आयोजन, गृहमंत्री अमित शहांना निमंत्रण

'श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त “हिंद दी चादर” हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे आयोजित केला आहे. या सोहळ्याचे निमंत्रण केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांना राज्यस्तरीय समागम समिती सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटीदरम्यान दिले. नवी दिल्ली येथे राज्यस्तरीय समागम समितीच्या (महाराष्ट्र राज्य) पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेऊन निमंत्रण दिले. केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी 25 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारले. यावेळी पोहरादेवीचे महंत बाबुसिंग महाराज (सहअध्यक्ष), समन्वय समितीचे अध्यक्ष रामसिंग महाराज, नांदेड येथील गुरुद्वारा प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग, समन्वयक श्री. रामेश्वर नाईक, सहसमन्वयक जसपाल सिंग, सदस्य चरणदीप सिंग (हॅप्पीसिंग), सतिश निहलानी आणि सहनिमंत्रक तेजासिंग बावरी आदी उपस्थित होते. नांदेड येथील मोदी मैदान येथे आयोजित या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे २५ जानेवारीला दुपारी २ ते ५ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. तसेच, पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर धाम सरकार) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील निमंत्रण स्वीकारले असून ते २४ जानेवारीला या सोहळ्याला उपस्थित राहतील, अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 8:05 pm

हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी 279 कोटींचा निधी!:पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण आणि विशेष घटक, आदिवासी उपयोजना अशा एकूण जिल्हा वार्षिक योजना (2026-27)च्या 278 कोटी 95 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीची बैठकीत सोमवारी ता. 19 मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे झाली. यावेळी विधान परिषदेचे सदस्य विक्रम काळे, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार चंद्रकांत नवघरे, प्रधान सचिव तथा पालक सचिव रिचा बागला, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधीक्षक नीलभ रोहण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी जी. जी. चितळे, प्रदीप नळगीरकर यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हा वार्षिक योजने मध्ये सन 2025-26 या चालू वर्षात डिसेंबर-2025 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेऊन जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 साठीच्या प्रारुप आराखड्यास यावेळी मान्यता देण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण योजना 201.66 कोटी, अनुसूचित जाती उपयोजना 54 कोटी, आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना 23.79 कोटी अशा एकूण शासनाने ठरवून दिलेल्या कमाल मर्यादेत 278 कोटी 95 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास आज झालेल्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेमध्ये सर्व कार्यान्वयीन यंत्रणेकडून 583 कोटी 45 लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. यावेळी पुनर्विनियोजन प्रस्ताव, क वर्ग तीर्थक्षेत्र मान्यतेस्तव प्राप्त प्रस्ताव आणि डोंगरी विकास कार्यक्रम 2025-26 च्या आराखड्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. आमदार तानाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्री पाणंद रस्ते निर्मितीसाठी वाढीव निधीची मागणी केली असून, हे रस्ते झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी आमदार मुटकुळे यांनी केली तसेच चिरागशाह तलावातील गाळ काढून त्याचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली. तर आमदार चंद्रकांत ऊर्फ राजू नवघरे यांनीही रस्ते, तसेच सती पांगरा येथील तलाव दुरुस्ती आणि सुशोभिकरण करण्याबाबत आग्रही मागणी केली. या बैठकीला ऐनवेळी आलेल्या विषयांवर चर्चा करण्यात आली असून, पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आगामी बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्याचे सादरीकरण केले.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 7:49 pm

धर्म, अर्थ, नीती परस्परपूरक:डॉ. सचिन चतुर्वेदी यांचे प्रतिपादन; भांडारकर संस्थेच्या 'धर्मशास्त्र' ऑनलाइन अभ्यासक्रमाचे उद्घाटन

नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सचिन चतुर्वेदी यांनी प्रतिपादन केले आहे की, धर्म, अर्थ आणि नीती या आधुनिक काळात स्वतंत्र मानल्या जात असल्या तरी त्या परस्परपूरक आहेत. प्राचीन भारतीय शिक्षणक्रमात त्यांचा समावेश याच पद्धतीने केला जात असे. धर्माशिवाय अर्थ आणि धर्म तसेच अर्थ या दोघांशिवाय नीतीची कल्पना अपूर्ण राहते, याची जाणीव भारतीयांना होती, असे ते म्हणाले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातर्फे आयोजित वसंत कोठारी स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना डॉ. चतुर्वेदी बोलत होते. कौटिल्याच्या अर्थशास्त्राबरोबरच विदुरनीती, शुक्रनीती, कामंदकीय नीतिसार यांसारख्या ग्रंथांचाही अभ्यासक्रमात समावेश होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, देश, काल आणि पात्र व्यक्ती या संकल्पनांवर आधारित धोरणांची आज देशाला गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात बॅ. वसंत कोठारी यांचे पुतणे राज कोठारी यांच्या हस्ते वसंत कोठारी स्मृती सभाकक्ष, वारसा-उद्यान आणि संस्थेच्या ‘अर्थ अँड नीति – फॅसेट्स ऑफ धर्मशास्त्र’ या ऑनलाइन अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी सांगितले की, प्राचीन भारतात शस्त्रविद्या, विद्वत्ता आणि शेती या तिन्ही बाबी परस्परपूरक आणि आवश्यक मानल्या जात होत्या. अहिंसेचा अतिरेक समाजात प्रचलित नव्हता. त्यामुळेच अरबी आक्रमणापुढे अनेक देश एकामागून एक कोसळत असताना भारताने त्या आक्रमणाशी पाच शतके यशस्वी मुकाबला केला होता, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना संस्थेच्या विद्यापरिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप आपटे यांनी सांगितले की, सर्व समस्यांना अगदी अखेरची अशी उत्तरे नसतात, तर काही वेळेला आंशिक आणि मर्यादित तोडगे हेही महत्त्वाचे ठरतात, हे प्राचीन परंपरेने जाणलेले होते. संस्थेच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सध्या विविध विषयांचे एकूण तेवीस अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आजपर्यंत सुमारे तीस हजार विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांचा लाभ घेतला आहे. कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी सांगितले की, यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भांडारकर संस्था अधिकाधिक लोकांपर्यंत प्राचीन भारतीय ज्ञानाचा प्रसार करत आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 7:41 pm

पुणे मनपात स्वतंत्र सांस्कृतिक समिती स्थापन करा:राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील यांची मागणी

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराच्या महानगरपालिकेत इतर स्वतंत्र समित्यांप्रमाणेच स्वतंत्र “सांस्कृतिक समिती” स्थापन करावी, अशी मागणी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक पार पडून नवीन सत्तास्थापना होत असताना शहराच्या प्रशासनात शिक्षण मंडळ, वृक्ष प्राधिकरण समिती, पीएमपीएमएल समिती, जिल्हा नियोजन समिती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या समित्या कार्यरत आहेत. मात्र, सांस्कृतिक क्षेत्रासाठी स्वतंत्र समिती नसणे ही खेदजनक बाब असल्याचे बाबासाहेब पाटील यांनी नमूद केले. पुणे शहर हे केवळ शैक्षणिक किंवा औद्योगिक केंद्र नसून ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक वारशाचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे. नाट्य, चित्रपट, संगीत आणि साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार पुण्यात घडले असून आजही मोठ्या प्रमाणावर कलाकार येथे वास्तव्यास आहेत. शहरातील नाट्यगृहे, सांस्कृतिक केंद्रे, विविध उत्सव, परंपरा तसेच कलाकारांच्या समस्यांचा सखोल विचार करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी महानगरपालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक समिती असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर चित्रपट, वेब सिरीज, मालिका आणि जाहिरातींचे शूटिंग होत आहे. या शूटिंगसाठी आवश्यक परवानग्या, नियोजन तसेच कलाकार व तंत्रज्ञांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीही सांस्कृतिक समितीची गरज आहे. मुंबईप्रमाणे पुण्यातही चित्रपटसृष्टीला पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. यामुळे नवीन सत्ताधाऱ्यांनी तात्काळ पुढाकार घेऊन पुणे महानगरपालिकेत स्वतंत्र सांस्कृतिक समिती स्थापन करावी, अशी मागणी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने पालकमंत्री अजित पवार, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे करण्यात आल्याचे बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले. ही समिती पुण्याच्या सांस्कृतिक वारशाच्या जतन व संवर्धनासाठी मोलाची ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 7:41 pm

पुण्यात चार ठिकाणी घरफोड्या:आठ लाखांचा ऐवज लंपास, एका चोरट्याला अटक

पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांत चार वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या झाल्या असून, चोरट्यांनी सुमारे आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यापैकी एका घटनेत विमाननगर पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली आहे. नवी पेठेतील सुशीला अपार्टमेंटमध्ये एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांची रोकड आणि दागिने चोरले. ही घटना रविवारी दुपारी घडली असून, सायंकाळी साडेपाच वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. गजबजलेल्या रविवार पेठेतील बंदिवान मारुती मंदिराजवळील आदित्य अपार्टमेंटमध्येही रविवारी दुपारी घरफोडी झाली. कुटुंबीय बाहेर गेले असताना चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून एक लाख तीन हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस कर्मचारी हर्षल दुडम तपास करत आहेत. पुणे-सातारा रस्त्यावरील नातूबाग परिसरातील इंद्रलोक सोसायटीत एका ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख चार हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरली. तक्रारदार नातेवाईकांकडे गेले असताना ही घटना घडली. सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सद्दामहुसेन फकीर अधिक तपास करत आहेत. दरम्यान, विमाननगर भागात एका सदनिकेतून एक लाख बत्तीस हजार नऊशे नव्वद रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी विमाननगर पोलिसांनी व्यंकटेश वसंत करंडे (वय ३४) याला अटक केली आहे. या घटनेबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 7:37 pm

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या:पतीसह चारजणांना अटक, दोन दिवसांची पोलिस कोठडी

पुण्यातील धनकवडी येथील आंबेगाव पठार भागात सासरकडील छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासू, सासरे आणि नणंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पती सागर चंद्रकांत शेडगे, सासरे चंद्रकांत शेडगे (दोघे रा. स्वामीकृपा बिल्डिंग, आंबेगाव पठार, धनकवडी) आणि नणंद सारिका हर्षल वाल्हेकर (वय ३३, रा. आंबेगाव बुद्रुक, कात्रज) यांचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्योती सागर शेडगे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ज्योती यांचा भाऊ सागर रेणुसे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या बहिणीचा, ज्योतीचा विवाह पाच वर्षांपूर्वी कोविड काळात आरोपी सागर शेडगे याच्याशी झाला होता. त्यावेळी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. कोविडमुळे सासरकडील मंडळींच्या काही इच्छा पूर्ण न झाल्याने त्यांनी लग्नानंतर ज्योतीचा छळ सुरू केला. विवाहात मानपान केला नाही, हुंड्यात वस्तू दिल्या नाहीत, तसेच 'तू गावंढळ आहेस, स्वयंपाक येत नाही' असे टोमणे मारण्यात आले. पतीने ज्योतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केला. पती सागरला दारू पिण्याचे व्यसन होते, ज्यामुळे तिचा त्रास आणखी वाढला. ज्योती याबाबत माहेरी सांगत असे, परंतु तिला 'मन जुळण्यास वेळ लागेल' असे समजावून सांगितले जात होते. त्रास जास्तच वाढल्याने माहेरचे लोक ज्योतीला गावी पाबे येथे घेऊन गेले. त्यानंतर भाऊ आणि इतर दोन बहिणींनी पती सागर शेडगे याला समजावून सांगितले आणि ज्योतीला व्यवस्थित नांदवण्याची विनंती केली. काही दिवस व्यवस्थित नांदवल्यानंतर पुन्हा ज्योतीला त्रास सुरू झाला. दरम्यानच्या काळात सागर तिला दारू पिण्यास प्रवृत्त करत असल्याचेही तिने माहेरी सांगितले होते. तसेच त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचाही संशय तिने माहेरी व्यक्त केला होता. या वारंवारच्या छळाला कंटाळून ज्योतीने राहत्या घरात आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक प्रियांका निकम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 7:36 pm

पुरंदर विमानतळ कामाचे आमिष, शेतकऱ्यांची 77 लाखांची फसवणूक:सुपा पोलिसांनी आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करत आरोपीला अटक केली

पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांची ७७ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा सुपा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ७७ लाख रुपये किमतीचे तीन जेसीबी आणि तीन ट्रॅक्टर जप्त केले असून, मुख्य सूत्रधारांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपींनी 'बी.जी. कन्स्ट्रक्शन' नावाच्या बनावट कंपनीची कागदपत्रे तयार केली होती. सासवड भागात सुरू असलेल्या विमानतळाच्या कामासाठी जेसीबी आणि ट्रॅक्टर भाड्याने हवे असल्याचे सांगून त्यांनी नांदेड आणि धाराशिव येथील शेतकऱ्यांशी संपर्क साधला. १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अधिकृत करारनामा करून, प्रत्येक वाहनासाठी दरमहा एक लाख रुपये भाडे देण्याचे आमिष दाखवण्यात आले. वाहने ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी ती परस्पर विकून शेतकऱ्यांची फसवणूक केली. शेतकरी बालाजी गोविंदराव गादेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर सुपा पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी निलेश अण्णा थोरात (रा. मोरगाव, बारामती) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने अजय चव्हाण (सातारा), दिनेश मोरे (नांदेड) आणि तुषार शिंदे (धाराशिव) यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी निलेश थोरात याच्याकडून नांदेड येथील तीन जेसीबी आणि धाराशिव व कळंब परिसरातील तीन ट्रॅक्टर असा एकूण ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपासात समोर आले आहे की, आरोपीने शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील शेतकऱ्यांचीही फसवणूक केली होती. त्यांना फायनान्स कंपनीने जप्त केलेले ट्रॅक्टर असल्याचे सांगून त्यांची विक्री केली होती. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अनोळखी व्यक्ती किंवा कंपनीशी व्यवहार करताना शहानिशा केल्याशिवाय आपली महागडी वाहने भाड्याने देऊ नयेत.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 7:33 pm

अजित पवारांचे पुण्यात नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन:महापालिका कामकाज आणि जबाबदाऱ्यांवर दिल्या सूचना

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे नवनिर्वाचित नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीस सुमारे ३० नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. तब्बल एक तास चाललेल्या या सत्रात अजित पवार यांनी नगरसेवकांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी अजित पवार यांनी नगरसेवकांना महापालिकेचे कामकाज, तिचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धती यांची सखोल माहिती करून घेण्यास सांगितले. त्यांनी 'महापालिका समजून घ्या, महापालिकेचा इतिहास तोंडपाठ करा,' असा सल्ला दिला. तसेच कायदे, नियम आणि महानगरपालिकेच्या अधिकारांशी संबंधित उपलब्ध पुस्तके आणि संदर्भ साहित्य आवर्जून वाचण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जनतेने दिलेला विश्वास सार्थ ठरेल असे काम करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. नवनिर्वाचित नगरसेवकांनी केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता प्रशासन, विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांची जाण ठेवावी, असेही त्यांनी सांगितले. शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारीने काम करण्याचा कानमंत्र अजित पवार यांनी दिला. पुणे शहराच्या विकासात महापालिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून नगरसेवकांनी अभ्यासू आणि सक्रिय भूमिका घ्यावी, असेही ते म्हणाले. या बैठकीमुळे आगामी महापालिका कामकाज, गटनेतृत्व आणि राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, पुणे महापालिका सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन वेगवेगळे गट म्हणून कामकाज होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एक गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट म्हणून, तर दुसरा गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या नावाने महापालिकेत बसणार आहे. यासाठी औपचारिकरीत्या दोन स्वतंत्र गटांची नोंदणी केली जाणार असल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 7:31 pm

विनापरवानगी मिरवणूक प्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरुद्ध गुन्हा:पर्वती पोलिस ठाण्यात नवनिर्वाचित नगरसेवक सूरज लोखंडे यांच्यावर कारवाई

पुण्यात विनापरवानगी मिरवणूक काढल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित नगरसेवक सूरज लोखंडे यांच्याविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शहरात मिरवणुका काढण्यास बंदी असतानाही त्यांनी हा आदेश मोडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीचा निकाल लागला. जनता वसाहत परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सूरज लोखंडे अटीतटीच्या लढतीत विजयी झाले होते. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जनता वसाहत परिसरातून त्यांच्या विजयाची मिरवणूक काढण्यात आली. पोलिसांनी मिरवणुका काढण्यास बंदी घातली असतानाही लोखंडे यांनी या आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी पोलीस शिपाई काटकर यांनी पर्वती पोलीस ठाण्यात नगरसेवक सूरज लोखंडे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार एन. आदक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीतच वैमनस्यातून दोघा तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दहा ते बारा जणांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. मुकेश नामदेव पोटे (वय ४२, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) आणि त्याचा मित्र या हल्ल्यात जखमी झाले आहेत. पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुमीत पवार, विजय हुलावळे, निलेश पवार, भैय्या पवार, किरण पवार यांच्यासह पाच ते सहा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास पोटे आणि त्यांचा मित्र जनता वसाहत परिसरातून जात असताना वाघजाई मित्र मंडळाजवळ हा प्रकार घडला. पूर्वी झालेल्या भांडणातून आरोपींनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादामधून टोळक्याने पोटे आणि त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तीक्ष्ण शस्त्राने वार केले. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक बी. एम. माळी या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 7:28 pm

डॉ. माधव गाडगीळ यांना एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन समर्पित:पुणे येथे 23 ते 27 जानेवारी दरम्यान आयोजन

पुण्यातील ऐतिहासिक एम्प्रेस गार्डनमध्ये 'एम्प्रेस गार्डन पुष्प प्रदर्शन २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. २३ ते २७ जानेवारी २०२६ या कालावधीत होणारे हे प्रदर्शन यंदा ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना समर्पित करण्यात आले आहे. प्रदर्शन समितीचे अध्यक्ष सुमन किर्लोस्कर आणि उपाध्यक्ष सुरेश पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन शुक्रवार, २३ जानेवारी रोजी दुपारी १२:०० वाजता पुणे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या हस्ते होईल. डॉ. माधव गाडगीळ हे 'अॅग्री-हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया' या संस्थेचे मानद सदस्य होते. त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी उद्घाटनानंतर विशेष श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण कलात्मक पुष्परचना असणार आहे. जपानी पद्धतीच्या (इकेबाना) पुष्परचना आणि विविध प्रकारचे बोन्साय वृक्ष हे यंदाच्या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरतील. निसर्गप्रेमी आणि पुष्पप्रेमींना एम्प्रेस गार्डन विविध पानाफुलांनी नटलेले पाहण्याची संधी यानिमित्ताने मिळणार आहे. या प्रदर्शनात राज्यस्तरीय सहभाग असून, पुणे शहरासह कोल्हापूर, सांगली, नाशिक आणि इतर राज्यांतील नामांकित नर्सरी व्यावसायिक सहभागी होणार आहेत. बागप्रेमींसाठी फुलांची मांडणी, फळे-भाजीपाला स्पर्धा आणि आकर्षक कुंड्यांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी नुकत्याच झालेल्या चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धेत ८०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 'अॅग्री-हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया' ही संस्था १८३० पासून कार्यरत असून, एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन पाहते. केवळ मनोरंजन हा हेतू न ठेवता, जनमानसात निसर्गाची ओढ आणि पर्यावरणाविषयी आपुलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन भरवले जाते, असे पिंगळे यांनी सांगितले. सर्व निसर्ग आणि पुष्पप्रेमींनी या प्रदर्शनाचा आनंद घेण्यासाठी तसेच डॉ. माधव गाडगीळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 7:21 pm

बंगळुरूत स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर

बंगळुरू : कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने २५ मे नंतर होणा-या बंगळुरू येथील स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनऐवजी बॅलेट पेपर वापरण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रेटर बंगळुरू एरिया स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत बॅलेट पेपरवर मतदान पार पडणार आहे. कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी जी.एस संगरेशी यांनी ही घोषणा केली. येत्या मे-जून महिन्यात याठिकाणी निवडणूक लागणार आहे. मुख्य निवडणूक […] The post बंगळुरूत स्थानिक निवडणुका बॅलेट पेपरवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 7:19 pm

बजाज पुणे ग्रँड टूर 2026:प्रोलॉग स्पर्धेने दाखवून दिली भव्यतेची चुणूक

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची प्रोलॉग शर्यत आज पार पडली. या स्पर्धेत ३५ देशांतील २८ संघांचे १६४ आंतरराष्ट्रीय सायकलपटू सहभागी झाले आहेत. हे सायकलपटू सह्याद्रीच्या घाटरस्त्यांवरून ४३७ किलोमीटरचा आव्हानात्मक प्रवास करत विजेतेपदासाठी प्रयत्न करतील. ७.५ किलोमीटर लांबीच्या प्रोलॉग (टाइम ट्रायल) शर्यतीला दुपारी १.३० वाजता सुरुवात झाली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे पहिल्या स्पर्धकाला हिरवा झेंडा दाखवून शर्यतीचे उद्घाटन केले. यावेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, राज्य क्रीडा व युवक कल्याण आयुक्त शीतल तेली-उगले आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रोलॉग शर्यतीत स्पर्धकांनी वैयक्तिक स्वरूपात, एकामागोमाग एक मिनिटाच्या अंतराने सुरुवात केली. ही मास स्टार्ट शर्यत नसून, प्रत्येक सायकलपटूची वैयक्तिक वेळ अंतिम निकालासाठी महत्त्वाची ठरणार आहे. पुणेकरांनी शहरातील मध्यवर्ती रस्त्यांवरून जाणाऱ्या सायकलपटूंचे उत्साहात स्वागत केले. स्पर्धेच्या पुढील टप्प्यांमध्ये आशिया खंडातील ७८, युरोपमधील ६९, तर ओशनिया, अमेरिका आणि आफ्रिका खंडांतील सायकलपटू सहभागी होणार आहेत. भारताचा इंडियन डेव्हलपमेंट संघही या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाला आहे, ज्यामुळे देशांतर्गत सायकलिंगला प्रोत्साहन मिळेल. स्पर्धेच्या मार्गावर सुरक्षेसाठी सुमारे १,५०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा, विशेष शाखा, बॉम्ब नाशक पथक आणि शीघ्र कृती दलाचा समावेश होता. वाहतूक व्यवस्थापनासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले होते, तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका आणि तांत्रिक सहाय्य पथकेही सज्ज ठेवण्यात आली होती. बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही स्पर्धा मंगळवार, २० जानेवारी ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडेल. ही स्पर्धा पुणे आणि परिसराच्या क्रीडा, पर्यटन आणि जागतिक ओळखीला नवे परिमाण देणारी ठरेल. आजची प्रोलॉग शर्यत ही केवळ या भव्य आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेची सुरुवात असून, पुढील दिवसांत सह्याद्रीच्या घाटरस्त्यांवर रंगणारी मुख्य शर्यत अधिक रोमांचक असेल.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 7:17 pm

मध्य प्रदेशच्या मंत्र्याला सर्वोच्च न्यायालयाची फटकार

भोपाळ : ऑपरेशन सिंदूर दरम्यान कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणारे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. शाह यांच्या ऑनलाइन माफीवर सोमवारी न्यायालयाने म्हटले की आता खूप उशीर झाला आहे. शहा यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची परवानगी देण्याबाबत २ आठवड्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. मुख्य न्यायाधीश […] The post मध्य प्रदेशच्या मंत्र्याला सर्वोच्च न्यायालयाची फटकार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 7:16 pm

मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही:राज ठाकरेंच्या नगरसेवकाने थोपटले दंड, यशवंत किल्लेदारांचे थेट सरकारला आव्हान

यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत 'मराठी अस्मिता' आणि 'परप्रांतीय' हे मुद्दे केंद्रस्थानी राहिल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या लढतीकडे लागले होते. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी मतांच्या ध्रुवीकरणासाठी प्रयत्न झाले, तर राज ठाकरे यांनी मुंबई गुजरातला नेण्याच्या शक्यतेवरून आक्रमक भूमिका घेत जोरदार प्रचार केला होता. मात्र, मराठी माणूस विरुद्ध परप्रांतीय अशा रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात ठाकरे बंधूंना मुंबईची सत्ता राखण्यात अपयश आले. भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला असून, त्यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकीकडे भाजपने मुंबईत विजय मिळवलेला असतानाच, आता बिहारमधील नितीश कुमार सरकारने मुंबईत 'बिहार भवन' उभारण्याची घोषणा केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रस्तावावर अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, मुंबईत बिहार भवन कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा इशारा मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवका यशवंत किल्लेदार यांनी दिला आहे. यशवंत किल्लेदार म्हणाले, आम्ही मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही. महागाई वाढली आहे, या गोष्टीकडे लक्ष द्यायचे सोडून नको त्या गोष्टीत पैसे घालवतात. मुंबईत बिहार भवन बांधण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही खर्च करा ना, इथे आमचे प्रश्न सुटत नाहीत, तुम्ही तुमचे प्रश्न सोडवा, असे किल्लेदार यांनी म्हटले आहे. तसेच निवडून आलेले नगरसेवक हे कट्टर आहेत, जे गद्दार आहेत ते आधीच निघून गेले आहेत. त्यामुळे ऑपरेशन टायगर वगैरे सगळे फेल आहे, असे म्हणत कुठलाही नगरसेवक फुटणार नसल्याचे किल्लेदार यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत 30 मजली बिहार भवन मुंबईत साकारले जाणारे प्रस्तावित बिहार भवन 30 मजली असून बेसमेंटसह या इमारतीची एकूण उंची सुमारे 69 मीटर इतकी असेल. आधुनिक वास्तूशैलीचा नमुना असणारी ही इमारत पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने उभारली जाणार असून, यामध्ये सौर पॅनेल, सांडपाणी शुद्धीकरणासाठी 'एसटीपी' प्रकल्प आणि विस्तीर्ण हिरवळीचे क्षेत्र अशा अत्याधुनिक व शाश्वत सुविधांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 7:14 pm

दोन हाय-स्पीड ट्रेन एकमेकांना धडकून २० ठार

माद्रिद : दक्षिण स्पेनमध्ये दोन वेगवान गाड्यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात किमान २० जणांचा मृत्यू झाला असून ७३ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ही दुर्घटना कॉर्डोबा प्रांतातील आदमुजजवळ घडली, ज्यामुळे माद्रिद आणि अंदालुसिया दरम्यानची रेल्वे सेवा स्थगित करण्यात आली आहे. मालागा येथून माद्रिदला जाणारी एक ट्रेन रुळावरून घसरली आणि समोरून येणा-या दुस-या […] The post दोन हाय-स्पीड ट्रेन एकमेकांना धडकून २० ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 7:13 pm

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा 50 हजार लोकांचा अतिभव्य मोर्चा!:मागण्या पूर्ण होईपर्यंत अनिश्चित काळासाठी पालघरमध्ये धरणे आंदोलनाचा निर्धार

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आज पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आलेल्या सुमारे 50,000 लोकांचा एक अतिभव्य पायी मोर्चा काढला. हा मोर्चा डहाणू तालुक्यातील चारोटी येथून सुरू झाला असून, रात्री मनोर येथे मुक्काम करेल आणि उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करेल. जोपर्यंत सरकारच्या वतीने निश्चित कालमर्यादेसह लेखी स्वरूपात आपल्या ज्वलंत आणि प्रलंबित मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत हा प्रचंड जनसमुदाय पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करणार आहे. अखिल भारतीय किसान सभा (एआयकेएस), सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (एडवा), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच (एएआरएम) यांसारख्या संघटनाही मोठ्या संख्येने सामील झाल्या आहेत. या मोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि एआयकेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, पॉलिट ब्युरो सदस्य आणि एडवाच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, केंद्रीय समिती सदस्य, माकप राज्य सचिव आणि किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, केंद्रीय समिती सदस्य आणि सीटूचे राज्य सचिव, डहाणूचे दोन वेळा आमदार असलेले विनोद निकोले, राज्य सचिवमंडळ सदस्य आणि एएआरएमचे राज्य निमंत्रक किरण गहला आणि इतर अनेक जण करत आहेत. उद्या सीपीएमचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन हे देखील या मोर्चात सामील होतील. या मोर्चाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत वनाधिकार कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे, सर्व देवस्थान, इनाम, वरकस आणि सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करणे, मोदी सरकारने रद्द केलेली मनरेगा योजना पूर्ववत सुरू करणे, स्मार्ट मीटर योजना रद्द करणे, पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे, चार श्रम संहिता रद्द करणे, वाढवण आणि मुरबे बंदरांचे जनविरोधी प्रकल्प रद्द करणे, पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करणे, शिक्षण, रोजगार, रेशन, आरोग्य इत्यादी सुविधांमध्ये वाढ करणे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 6:37 pm

यूएईचे शेख दीड तासासाठी भारतात येणार

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान आज, सोमवारी भारत दौ-यावर येत आहेत. मात्र, त्यांचा हा दौरा अतिशय संक्षिप्त असून ते फक्त ९० मिनिटे (दीड तास) भारतात असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या विशेष आमंत्रणावरून ते या दौ-यावर येत आहेत. जागतिक राजकारणातील वाढता तणाव पाहता, ही भेट […] The post यूएईचे शेख दीड तासासाठी भारतात येणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 6:31 pm

बापाला डिवचू नका

मॉस्को : ग्रीनलँडवर अमेरिकेने ताबा मिळवण्याबाबत युरोपिअन युनिअनने अमेरिकेचा कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे अमेरिकेने या युरोपिअन देशांना १० टक्के कर लादला आहे. आता रशियाचे राजदूत प्रमुख किरिल दिमित्रीव्ह यांनी युरोपिअन देशांनाच इशारा दिला आहे. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांना लक्ष्य करत एका पोस्टमध्ये किरिल दिमित्रीव्ह म्हणाले प्रिय उर्सुला वॉन डेर लेयन, […] The post बापाला डिवचू नका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 6:29 pm

कॉंग्रेसची ओबीसी बहुजन आघाडीसोबत युती:वारे कोणत्या दिशेने वाहतेय ते लक्षात घ्या, हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा

नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत केलेल्या युतीला मोठे यश मिळाले असून, या आघाडीने लातूर महापालिकेवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. राज्यातील इतर विविध महापालिका निवडणुकांमध्येही या प्रयोगाला मतदारांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचे दिसून आले. महापालिकांमधील या घवघवीत यशानंतर काँग्रेसने आता आपला विस्तार वाढवण्यावर भर दिला असून, आगामी निवडणुकांसाठी मित्रपक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेसने आता 'ओबीसी बहुजन आघाडी'सोबत अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, चंद्रकांत बावकर व जे. डी. तांडेल यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील हे ऑनलाईन उपस्थित होते. या नव्या समीकरणामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय चुरस अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, ओबीसींचा केलेला विश्वासघात लक्षात आल्यानंतर आता ओबीसी काँग्रेस सोबत येत आहे. वारे कोणत्या दिशेने वाहत आहे ते लक्षात घ्या, असा इशारा त्यांनी दिला. तसेच हा आमचा संघर्षाचा काळ असून वैचारिक पातळीवर आम्ही एकत्रित आलो आहोत, असे सपकाळ म्हणाले. पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्सवर देखील टीका केली. ते म्हणाले, हॉटेल पॉलिटिक्स त्यांची राजकीय शैली असेल. मात्र, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा हॉटेलमध्ये ते घेऊन जाणार का? लोकशाहीवर विश्वास नाही का? असा सवाल सपकाळ यांनी केला. तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडून भाकरी फिरवण्याची शक्यता नसल्याचे सपकाळ म्हणाले. समविचारी पक्षांसोबत आम्ही जात आहोत- प्रकाश शेंडगे कॉंग्रेस आणि ओबीसी बहुजन आघाडी यांच्यात युती झाल्यानंतर प्रकाश शेंडगे म्हणाले, शासन निर्णय काढून ओबीसींच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. 27% आरक्षण ओबीसींना मिळाले. मात्र, त्यावर घाला घालण्याचे काम केले जात आहे. कुणबी दाखले देण्याचे काम केले जात आहे. ओबीसी बहुजन आघाडी आता पक्ष निर्माण झाला असून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा आम्ही ठरवले आहे. समविचारी पक्षांसोबत आम्ही जात आहोत. आरक्षणाचा मुद्दा असेल, आमचे प्रश्न असतील, यावर आवाज उठवण्याचे काम राहुल गांधी यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच आमची चर्चा मागील दोन दिवसापासून सुरु होती. काँग्रेससोबत सगळी चर्चा झाली आणि त्यानंतर जिथे जिथे शक्य तिथे तिथे जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि ओबीसी बहुजन आघाडी एकत्र निवडणूक लढतील, असेही शेंडगे यांनी स्पष्ट केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 6:27 pm

गोव्यात दोन रशियन महिला पर्यटकांचा गळा चिरुन खून

पणजी : गोव्यात दोन रशियन महिला पर्यटकांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांनी संशयित रशियन नागरिकाला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक संशयिताने पाच जणांचा खून केल्याचा दावा केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. याच दरम्यान, समोर आलेल्या आसामी महिलेच्या मृत्यू प्रकरणातही संशयिताच्या सहभागाची शक्यता पडताळून पाहिली जात आहे. गोव्यात हरमल […] The post गोव्यात दोन रशियन महिला पर्यटकांचा गळा चिरुन खून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 6:20 pm

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद २४ तासांपासून उपोषणावर

प्रयागराज : माघ मेळ्यात शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. पालखी म्हणजेच रथयात्रा थांबवल्याच्या निषेधार्थ शंकराचार्य त्याच ठिकाणी धरणे धरून बसले आहेत, जिथे पोलिसांनी त्यांना सोडले होते. ते आपल्या मंडपात रात्रभर थंडीत धरणे धरून बसले होते. २३ तासांपासून त्यांनी धान्याचा एक कणही ग्रहण केला नाही. पाणीही सोडले. दरम्यान, शंकराचार्यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद […] The post शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद २४ तासांपासून उपोषणावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 6:01 pm

सेंगरच्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

उन्नाव : दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी बलात्कारी कुलदीप सिंह सेंगरच्या शिक्षेच्या निलंबनाची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या पोलिस कोठडीतील मृत्यू प्रकरणात ट्रायल कोर्टाने त्याला १० वर्षांच्या कठोर कारावासाची आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने म्हटले होते की, कुटुंबातील एकमेव कमावत्या सदस्याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरणात कोणतीही नरमाई दाखवता […] The post सेंगरच्या शिक्षेला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 6:00 pm

भारताच्या ३० टक्के टॅरिफने ट्रम्प सरकार चिंतेत

नवी दिल्ली : अमेरिकेतून आयात होणा-या डाळींवर भारताने ३० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा निर्णय घेतल्याने, अमेरिकन सरकार चांगलेच बिथरले आहे. याचे कारण म्हणजे, भारत हा जगातील सर्वात मोठा डाळींचा ग्राहक देश असून जागतिक डाळींच्या एकूण वापरापैकी सुमारे २७ टक्के खपत भारतात होते. देशांतर्गत गरज भागवण्यासाठी भारत मोठ्या प्रमाणावर डाळींची आयात करतो. यामध्ये अमेरिका, रशिया, […] The post भारताच्या ३० टक्के टॅरिफने ट्रम्प सरकार चिंतेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 5:59 pm

अकार्यक्षम मंत्र्यांना मिळणार डच्चू?

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पक्षात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत. विशेषत: ज्या मंर्त्यांकडे आणि आमदारांकडे विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्यांच्या सुमार कामगिरीवर एकनाथ शिंदे नाराज असून अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. पालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी आपल्या मंर्त्यांना विविध […] The post अकार्यक्षम मंत्र्यांना मिळणार डच्चू? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 5:58 pm

मुंबई महापालिकेत मनसेची पहिली खेळी!:यशवंत किल्लेदार यांची गटनेतेपदी निवड, नवनियुक्त नगरसेवकांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब

मुंबईच्या महापौर पदावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांचा महापालिकेतील गटनेता निवडला आहे. मनसेच्या नगरसेवकांचा गटनेता म्हणून यशवंत किल्लेदार यांची निवड करण्यात आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ'वर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत नवनियुक्त नगरसेवक, नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर तसेच नितीन सरदेसाई उपस्थित होते. गटनेते पदावर आपली निवड झाली असल्याची माहिती यशवंत किल्लेदार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. ते म्हणाले, आज सर्व नगरसेवकांची बैठक पार पडली. त्यामध्ये गटनेता म्हणून आपली निवड झाली आहे. पक्षाकडून कोणत्याही प्रकारचे प्रतिज्ञापत्र घेतले नाही, पक्षाला तशी गरज वाटली नसल्याचे किल्लेदार म्हणाले. यशवंत किल्लेदार हे प्रभाग 192 मधून विजयी झाले आहेत. यशवंत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रीती पाटणकर यांचा 1 हजार 425 मतांनी पराभव केला. यशवंत किल्लेदार हे शिवसेना भवनाच्या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामुळे त्यांचा विजय हा मनसेसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबई महापालिकेत मनसेचे एकूण 6 नगरसेवक निवडून आले आहेत. दरम्यान, मुंबईच्या महापौर पदावरून मोठा पेच शिवसेना आणि भाजपमध्ये पडलेला आहे. तसेच महापौर पदासाठी शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये देखील बोलणी झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबई महापालिकेत 2017 सालाची भरपाई ठाकरे भाजपला करून देणार असल्याची चर्चा आहे. 2017 साली ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपने माघार घेतली होती. अशातच, महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मुंबई महापालिकेत एकूण 65 नगरसेवक निवडून आले आहेत. हे सर्व नगरसेवक महापौर निवडीच्या वेळी गैरहजर राहून भाजपला मदत करू शकतात, अशी देखील चर्चा रंगली आहे. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना गैरहजर राहिल्यास ती निवडणूक बिनविरोध होईल.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 5:53 pm

मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार:बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला शिवसेनेचा महापौर व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना - एकनाथ शिंदे

मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून सध्या शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहे. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचे म्हटले आहे. महापालिका निवडणुकीत मुंबईकरांनी महायुतीला पसंती दिली आहे, आम्ही जनमताचा आदर करणार. विरोधकांकडून अफवा पसरवण्यात येत असून त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे शिंदे म्हणाले. तसेच बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असावा ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते, असेही शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे म्हणाले, 2019 साली जनमताचा अनादर करत ठाकरेंनी वेगळी सत्ता स्थापन केली. तसे आम्ही करणार नाही. आम्ही जनमताचा आदर करतो. बाळासाहेबांचा आशीर्वाद, नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका लढल्या गेल्या. त्यानुसार ज्या ज्या ठिकाणी आम्ही महायुतीत लढलो त्या त्या ठिकाणी महायुतीचा महापौर निवडून येणार. तर ठाण्यात अडीच वर्षांच्या महापौरपदाची चर्चा सुरू असल्याचे चर्चा आहे, यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, या विरोधकांनी पसरवलेल्या अफवा आहेत. आमची लढाई ही सत्ता खुर्चीसाठी नाही, आमची लढाई ही मुंबईच्या विकासासाठी आहे. मुंबईकरांना आम्ही काय देणार आहोत यावर आम्ही लक्ष दिले असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच नवनियुक्त नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे, यावर प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले, आमच्या पक्षाची बैठक घेतली, नव्याने निवडून आल्यानंतर त्यांना मार्गदर्शन केले. पुढच्या पाच वर्षात त्यांनी काय काम करायची याबद्दल त्यांना मार्गदर्शन करण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. गट नेत्यांची निवड लवकरच होणार दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे सर्व नगरसेवक हे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्सला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. या नगरसेवकांचा महापालिकेतील 'गट' तातडीने स्थापन केला जाणार असून याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून गट नेत्यांची निवड केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव, अमोल घोले सारख्या तरुण अनुभवी नगरसेवकांचे नाव गटनेत्यांच्या यादीत आल्याचे समजते. गट स्थापन केल्यानंतर नगरसेवक फुटीबाबत निश्चिंत राहता येईल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे गट स्थापन करण्याची कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 5:24 pm

संजय शिरसाट यांच्या मुलीवर गुन्हा का नाही?:जलील यांचा सवाल, तलवार नाचलवल्याचा आरोप; शिंदेंनी पाठिंबा मागितल्याचाही दावा

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत तलवार नाचवल्याप्रकरणी मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांच्यावर गुन्हा का दाखवण्यात आला नाही? असा सवाल एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, मालेगाव महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने एमआयएमचा पाठिंबा मागितल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा यांचा छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून विजयी झाल्या आहेत. त्यांनी निवडणूक निकालानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत तलवार नाचवली होती. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे अशीच तलवार नाचवल्याप्रकरणी शिंदे गटाच्याच अभिजीत जीवनवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. इम्तियाज जलील यांनी या प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मिरवणुकीत तलवार नाचवल्याप्रकरणी गरीब नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण संजय शिरसाट यांच्या मुलीवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. कायदा व न्याय श्रीमंतांना वेगळा व गरिबांना वेगळा असतो का? असे ते म्हणालेत. संजय शिरसाट यांची दोन्ही मुले विजयी उल्लेखनीय बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत संजय शिरसाट यांची सिद्धांत व हर्षदा ही दोन्ही मुले विजयी झालेत. सिद्धांत शिरसाट हे प्रभाग क्रमांक 29 अ मधून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांची लढत भाजपचे भगवान गायकवाड व ठाकरे गटाच्या किशोर साबळे यांच्याशी होती. येथील अतितटीच्या लढतीत सिद्धांत यांचा विजय झाला. दुसरीकडे, हर्षदा शिरसाट या प्रभाग क्रमांक 18 अ मधून महापालिकेच्या रणांगणात होत्या. त्यांचा सामना भाजपच्या मयुरी बर्थने यांच्याशी होता. हर्षदा यांची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे संजय शिरसाट यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक बनली होती. त्यात हर्षदा यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना धोबीपछाड देत विजय मिळवला. यामुळे शिरसाट यांना मोठा दिलासा मिळाला. शिंदे गटाने मालेगावात एमआयएमचा पाठिंबा मागितला -जलील दुसरीकडे, इम्तियाज जलील यांनी मालेगाव महापालिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एमआयएमचा पाठिंबा मागितल्याचा दावाही केला आहे. तीन-चार महापालिकेत एमआयएमला अनुकूल परिस्थिती आहे. काँग्रेसने एका ठिकाणी आमचा पाठिंबा मागितला आहे. शिंदे गटानेही मागितला आहे. पण आम्ही त्याला स्पष्ट नकार दिला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत मालेगावसारख्या ठिकाणी शिंदेंसोबत जाार नाही. ते भाजपसोबत सत्तेत आहेत. भाजप व शिदे गटाला वगळून चांगले अलायन्स करता येत असेल तर त्याचा अहवाल आम्हाला पाठवा अशा सूचना आम्ही आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे ते म्हणालेत. खाली वाचा मालेगावातील पक्षीय बलाबल

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 5:10 pm

मुंबई महापालिकेत ठाकरेंचाच महापौर होणार?:आरक्षण सोडतीत योग्य पत्ते पडले तर ठाकरेंचाच महापौर होणार; 2 हुकमी एक्के खिशात

महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत योग्य पत्ते पडले तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच उमेदवार महापौर होईल असा नवा दावा केला जात आहेत. या प्रकरणी कोणत्याही पक्षाकडे नाहीत असे दोन हुकमी एक्के ठाकरे गटाकडे आहेत. त्यामुळे या चर्चेला ऊत आला आहे. उद्धव ठाकरे यांनी 2 दिवसांपूर्वीच देवाची इच्छा असेल तर आपलाच महापौर होईल हे विधान केले होते हे विशेष. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्या आहेत. तर ठाकरे बंधूंना 71 जागा मिळाल्या आहेत. सत्ताधारी शिवसेना 29 जागा जिंकत थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेली आहे. आता निवडणुकीनंतर फोडाफोडी होण्याच्या भीतीने एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात हलवले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत उद्धव ठाकरेंचाच महापौर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठाकरेंचाच महापौर होईल याचे गणित काय? येत्या 22 जानेवारीला महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे. त्यात कोणत्या प्रवर्गाचा महापौर मुंबईच्या खुर्चीत विराजमान होणार? हे स्पष्ट होणार आहे. निवडणुकीपूर्वी नगरसेवकांसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये 2 जागा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यानुसार 53 व 121 हे 2 प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले होते. या दोन्ही प्रभागांत सर्वच पक्षांनी उमेदवार दिले. पण दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आरक्षण सोडतीत महापौर पद एसटीला सुटले तर त्यावर ठाकरे गटाचा उमेदवार बसेल हे निश्चित आहे. एसटीच्या राखीव जागांवर कोण निवडून आले? महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 53 व प्रभाग क्रांक 121 हे दोन प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. त्यात प्रभाग क्रमांक 53 मधून ठाकरे गटाच्या जितेंद्र वळवी यांनी शिंदे गटाच्या अशोक खांडवे यांचा पराभव केला. प्रभाग क्रमांक 121 मध्येही ठाकरे गटाच्याच प्रियदर्शनी ठाकरे यांचा विजय झाला. त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवार प्रतिमा खोपडे यांचा पराभव केला. इतर कोणत्याही पक्षाकडे अनुसूचित जमातीचा उमेदवार नाही. त्यामुळे दैवाने साथ दिली तर मुंबई महापालिकेचे महापौर पुन्हा ठाकरे गटाकडे चालत येईल. देवाची इच्छा असेल तर आपलाच महापौर होईल - उद्धव ठाकरे उल्लेखनीय बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधला. त्यात त्यांनी देवाची इच्छा असेल तर महापौर आपलाच होईल असे विधान केले होते त्यांच्या या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली होती. याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. विशेषतः मुंबई महापालिकेत ठाकरे गट व भाजपची युती होणार का? असा प्रश्नही या प्रकरणी उपस्थित केला जात होता. त्यावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टीकरण द्यावे लागले होते. देवाच्या मनात म्हणजे मी नाही. महापौर महायुतीचाच होईल हे वरच्या देवाने ठरवले आहे, असे ते म्हणाले होते. असे असले तरी महापौर पदाच्या आरक्षण सोडतीतच नेमके महापौर पद कोणत्या प्रवर्गाला सुटेल व त्यावर कोण विराजमान होणार हे स्पष्ट होणार आहे. खाली पाहू मुंबई महापालिकेचे पक्षीय बलाबल

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 4:18 pm

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक:औंढा नागनाथ येथे भाविकांची गैैरसोय होणार नाही याकडे संस्थानने लक्ष द्यावे - आमदार संतोष बांगर

देशातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे महाशिवरात्र उत्सव व रथोत्सवाच्या वेळी भाविकांची गैरसोय होणार नाही याकडे संस्थानने लक्ष देऊन त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आमदार संतोष बांगर यांनी सोमवारी ता. १९ केल्या आहेत. औंढा नागनाथ येथील भक्तनिवास येथे महाशिवरात्री उत्सवाच्या पूर्वतयारीची बैठक झाली. यावेळी आमदार संतोष बांगर, संस्थानचे अध्यक्ष तथा हरीश गाडे, पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, नगराध्यक्ष कपिल खंदारे, पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनगराध्यक्ष मनोज देशमुख, संस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, मुख्य पुजारी तुळजादास भोपी श्रीपाद भोपी महावितरणचे उपअभियंता नीरज रणवीर, एसटी महामंडळाचे शिवाजी बांगर, सुरक्षा रक्षक विभागाचे प्रमुख बबन सोनुने, विजय महामुने, विष्णू रणखांबे यांच्यासह पुजारी, भाविकांची उपस्थिती होती. यावेळी आमदार बांगर यांनी महाशिवरात्र महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. संस्थानकडून स्थापन केलेल्या विविध समित्यांनी जबाबदारीने काम करावे. देश, विदेशातून येणाऱ्या भाविकांना सौजन्याची वागणुक द्यावी. भाविकांची संख्या लक्षात घेता त्यांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध होईल याकडे लक्ष द्यावे. मंदिर परिसरात नियमितपणे स्वच्छता केली जाईल याची दक्षता घ्यावी. तसेच महोत्सवाच्या काळात विज पुरवठा सुरळीत राहिल याची विज कंपनीने दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शहरी भागासह ग्रामीण भागातील भाविकांना औंढा नागनाथ येथे नागनाथाच्या दर्शनासाठी येण्यासाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी, आवश्‍यक त्या मार्गावर महामंडळाने जादा बसेस सोडण्याच्या सूूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी तहसीलदार हरिष गाडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रस्ताविक वैजनाथ पवार यांनी केले तर सुरेंद्र डफळ यांनी आभार मानले. ता. १५ फेब्रूवारी रोजी होणार महाशिवरात्र महोत्सव औंढा नागनाथ येथे ता. १५ फेब्रूवारी रोजी महाशिवरात्री महोत्सव तर ता. १८ फेब्रूवारी रोजी रथोत्सवाचा कार्यकम होणार आहे. यासाठी विधिध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये दर्शन व्यवस्था, धार्मिक कार्यक्रम, पालखी मिरवणूक, रथोत्सव, भोजन, आरोग्य, यात्रा प्रसिद्धी, वाहतूक व्यवस्था, विद्युत व्यवस्था, सुरक्षा, आदि समित्यांच्या समावेश आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 3:52 pm

माजी महापौरांच्या बंगल्यावर दगडफेक

ठाणे : प्रतिनिधी भिवंडी महापालिकेतील कोणार्क विकास आघाडीचे विजयी उमेदवार माजी महापौर विलास पाटील व प्रतिभा पाटील यांच्या बंगल्यावर हल्ला करण्यात आला. हल्ला करणारे भाजपा आमदार महेश चौघुले यांचे पुत्र मित चौगुले व त्यांचे समर्थक असल्याचा विलास पाटील यांच्याकडून करण्यात आला. या हल्ल्यामुळे विलास पाटलांच्या समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात या संदर्भात ठिय्या मांडलेला. पोलिसांकडून […] The post माजी महापौरांच्या बंगल्यावर दगडफेक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 3:39 pm

पुणे- मालेगाव महामार्गावर भीषण अपघात; ४ ठार, २० जखमी

नाशिक : प्रतिनिधी पुण्याहून मालेगावला निघालेल्या खासगी ट्रव्हल बसचा नाशिकमध्ये भयंकर अपघात झाला. पहाटे ३ वाजताच्या सुमारास बस आणि पिकअपची जोरात धडक झाली. या अपघातामध्ये ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले आहे. मालेगाव-मनमाड महामार्गावर पहाटे ३ वाजता अपघात झाला. अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. स्थानिकांनी धाव घेत तात्काळ मदतकार्य सुरू केले. […] The post पुणे- मालेगाव महामार्गावर भीषण अपघात; ४ ठार, २० जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 3:36 pm

संजय राऊतांची आजारपणामुळे बुद्धी भ्रष्ट झाली:मुंबई हातातून गेल्याने मातोश्रीचा खर्च चालवायची चिंता, प्रकाश महाजनांची टीका

महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. शिंदे गट आणि भाजपचे नगरसेवक कैदखान्यात आहेत, या संजय राऊतांच्या टीकेला शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी अत्यंत जळजळीत भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई महापालिका हातातून गेल्यामुळे आता 'मातोश्री-२'चा खर्च कसा चालवायचा, ही चिंता ठाकरेंना सतावत आहे. अशा शब्दांत महाजनांनी ठाकरेंच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्याचा टोला लगावला. संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या 'कैदखाना' आणि 'नगरसेवक फोडाफोडी'च्या आरोपांचा समाचार घेताना प्रकाश महाजन म्हणाले की, संजय राऊत यांची आजारपणामुळे बुद्धी भ्रष्ट झाली आहे. निवडणुकीच्या काळात सर्व नगरसेवकांनी जीवाचे रान केले आहे, त्यामुळे त्यांना एकत्र ठेवले आहे. शिवसेनेचा (शिंदे गट) एकही नगरसेवक फुटणार नाही, उलट ठाकरेंचेच नगरसेवक आमच्या संपर्कात असून ते फुटण्याची दाट शक्यता आहे. २०१९ च्या 'दगाफटक्या'ची आठवण भाजप आणि शिंदे गटात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप फेटाळताना महाजन यांनी उद्धव ठाकरेंच्या भूतकाळातील निर्णयांवर निशाणा साधला. आम्ही युतीमध्ये निवडणुका लढलो आहोत आणि आम्ही शब्दाचे पक्के आहोत. २०१९ मध्ये ज्याप्रमाणे ठाकरेंनी सोबत लढून निकालानंतर दगाफटका केला, तसे आम्ही करत नाही. फडणवीस आणि शिंदे हे दोघे मिळून राज्याच्या आणि युतीच्या हिताचाच निर्णय घेतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. बाळासाहेबांचे राजकीय वारस एकनाथ शिंदेच! प्रकाश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारल्याचा दावा केला. ते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने निकालांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनाच वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा खरा राजकीय वारस म्हणून जाहीर केले आहे. उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या भावाला (राज ठाकरे) फसवले, त्यामुळे त्यांच्या ६५ जागांवरून ६ जागा कशा येतात, हे त्यांनी आधी तपासावे. मीडिया त्यांच्या बाजूने असूनही त्यांना जनतेने बहुमत दिलेले नाही. मातोश्री-२ वरून टोला मुंबई महापालिकेवरील ठाकरेंची सत्ता संपुष्टात आल्याचा संदर्भ देत महाजन म्हणाले, फोडाफोडीचे राजकारण त्यांनी करू नये. मुंबईकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. आता पालिकेची सत्ता गेल्यामुळे मातोश्री-२ चे मेंटेनन्स कोण करणार? हा खरा प्रश्न त्यांना पडला आहे. हे ही वाचा… निवडणुकीतील पराभवानंतर सोशल मीडियावर टीका:रूपाली ठोंबरे यांचा संताप, ट्रोलर्सला दिला कायदेशीर कारवाईचा इशारा रूपाली पाटील ठोंबरे यांचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. अनेक युजर्सकडून त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट आणि कमेंट्स केल्या जात आहेत. या ट्रोलिंगची गंभीर दखल घेत रूपाली पाटील यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. टीका करणे हा लोकशाहीचा भाग असला तरी, वैयक्तिक पातळीवर जाऊन चिखलफेक करणाऱ्यांना सोडणार नाही, असे म्हणत त्यांनी थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. सायबर गुन्हे शाखेकडे या तक्रारी केल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 3:35 pm

दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीत मिठाचा खडा?:एकत्र यायचे असेल तर सत्तेतून बाहेर पडा, शरद पवारांच्या नेत्याचा DCM अजित पवारांना सल्ला

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीची युती होण्याची शक्यता असताना शरद पवार गटाच्या आमदार उत्तम जानकर यांनी युतीसाठी अजित पवारांपुढे सत्तेतून बाहेर पडण्याची अट ठेवली आहे. यामुळे दोन्ही पक्षांच्यात संभाव्य युतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शरद पवार व अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली होती. पण त्यानंतरही त्यांना दारूण पराभव झाला होता. आता पवार कुटुंब जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यासंबंधीची बोलणी त्यांच्या नेतृत्वांत सुरू झाली आहे. पण शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी अजित पवारांपुढे युतीसाठी महायुती सरकारमधून बाहेर पडण्याची अट ठेवल्यामुळे दोन्ही पक्षांची अडचण झाली आहे. उत्तम जानकर म्हणाले, महापालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे. पण मला याची कोणतीही कल्पना नाही. बिर्याणीत गुळवणी चालेल का? ते पुढे म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असे मला वाटत नाही. कारण, शरद पवारांचा विचार वेगळा आहे आणि आता अजित पवार हे सत्तेसोबत आहेत. त्यामुळे बिर्याणीमध्ये गुळवणी चालेल की नाही? हे मला माहिती नाही. अजित पवारांना कोणता तरी एक निर्णय घ्यावा लागेल. उद्या काय घडेल हे मला माहिती नाही. पण शरद पवारांचा वेगळा विचार आहे. तो घेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्यामुळे अजित पवारांना एकत्र यायचे असेल तर प्रथम त्यांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल. त्यांना शरद पवारांच्या विचाराने पुढे जावे लागेल. काही तरी धोरण असल्याशिवाय कोणताही पक्ष चालत नाही. त्यासाठी विचार असावा लागतो. मग कोणताही पक्ष असू द्या. भाजपचाही हिदुत्त्वाचा विचार आहे. शिवसेनेचाही हिंदुत्त्वाचा विचार आहे. तसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार पुरोगामीत्वाचा आहे. त्यामुळे काही तरी धोरण व भविष्य ठरवावे लागते, असे उत्तम जानकर म्हणाले. अजित पवारच अंतिम निर्णय घेतील दुसरीकडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर सूचक विधान केले आहे. ते म्हणाले, आमच्याच पक्षाची नव्हे तर कोणत्याही पक्षांची आघाडी असली तरी चिन्ह हे एकच असले पाहिजे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी मिळून लढण्याच्या मुद्यावर आमचे पक्षाध्यक्ष अजित पवार योग्य तो निर्णय घेतील. निवडणुकीत ग्रामीण भागातील अनेक लोकांचा मतदान करताना चिन्हावरून गोंधळ उडतो. त्यामुळे चिन्ह एकच असले पाहिजे. तूर्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार अजित पवारांचा आहे, असे ते म्हणालेत.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 3:29 pm

चंद्रपुरात काँग्रेस नगरसेवकांचा एक गट भाजपच्या संपर्कात:माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दावा; शिवसेनेच्या ठाकरे गटाशीही बोलणी सुरू

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरातील काँग्रेसच्या नगरसेवकांचा एक मोठा गट भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेससह अनेक पक्षांचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. हे सर्वजण विकासाच्या मुद्यावर भाजपसोबत येण्यास तयार आहेत, असे ते म्हणालेत. चंद्रपूर महापालिका निवडणुकीचा निकाल गत शुक्रवारी लागला. त्यात काँग्रेसने सर्वाधिक 27 जागा जिंकल्या. तर भाजपला 24 जागांवर समाधान मानावे लागले. येथे या दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी इतर पक्षांची मदत लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेससह अनेक पक्षांचे उमेदवार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत. काँग्रेसच्याही एका गटाला असे वाटते की, शहरात आपण जनतेला काय उत्तर देणार? उद्या शहरात विकासच झाला नाही तर काय होईल? या शहराचे स्वच्छतेचे विषय आहेत. विजेच्या संदर्भातील विषय आहेत. या शहरात उद्या पगार द्यायलाच पैसे राहिले नाही, तर मग महापालिकेत नगरसेवक म्हणून आपण काय काम करायचे? या परिस्थितीत जनतेला उत्तर देणे अवघड होईल असे विविध प्रश्न त्यांना पडले आहेत, असे सुधीर मुनगंटीवार आज सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. भाजपची ठाकरे गटाशीही चर्चा सुरू ते पुढे म्हणाले, शिवसेनेच्या ठाकरे गटाच्याही अनेक नगरसेवकांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. तुम्ही भाजपचा महापौर बनवत असाल तर आम्ही तुमच्यासोबत येण्यास तयार आहोत असे ते म्हणालेत. या प्रकरणी आमची त्यांच्याशी दोनवेळा चर्चाही झाली आहे. पहिल्या भेटीतच महापौर पद कुणालाही देता येणार नसल्याचे आम्ही त्यांना सांगितले. चंद्रपूर शहराच्या विकासासाठी भाजपचाच महापौर करावा लागेल. भाजप कोणत्याही परिस्थितीत ठाकरे गटाला महापौर पद देणार नाही. प्रसंगी भाजप विरोधी बाकावर बसेल. भाजपला मुनगंटीवार - जोरगेवारांच्या वादाचा फटका उल्लेखनीय बाब म्हणजे चंद्रपूर महापालिका निवडणुकीत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार व किशोर जोरगेवार यांच्या अंतर्गत वादामुळे भाजपला मोठा फटका बसला आहे. या निवडणुकीत भाजपच्या विद्यमान महापौर राखी कांचलवार यांचा काँग्रेसच्या उमेदवाराने दारुण पराभव केला. गत महापालिका निवडणुकीत भाजपने थेट 36 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले होते. पण यावेळी त्यांना केवळ 24 जागांवर समाधान मानावे लागले. त्यातच काँग्रेसने येथे सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्यामुळे भाजपच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दरम्यान, या ठिकाणी कोणत्या पक्षाचा महापौर होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 3:11 pm

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात 'माघी श्री गणेश जयंती महोत्सव':22 जानेवारीला मुख्य जन्मोत्सव आणि भव्य रथ शोभायात्रा

मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून 'माघ श्री गणेश जयंती महोत्सवा'चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आज, १९ जानेवारीपासून सुरू झालेला हा उत्सव २५ जानेवारीपर्यंत चालणार असून, सात दिवसांच्या या सोहळ्यात धार्मिक विधींसह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे. महोत्सवाच्या काळात मंदिरात दररोज पहाटेपासूनच चैतन्याचे वातावरण असणार आहे. कार्यक्रमांची सुरुवात दररोज पहाटे ५:०० ते ५:३० या वेळेत होणाऱ्या काकड आरतीने होईल. त्यानंतर दिवसभर महा नैवेद्य, अभिषेक आणि नमस्कारन यांसारखे पारंपरिक वैदिक विधी संपन्न केले जाणार आहेत. भक्तांना बाप्पाचे मंगलमय रूप डोळ्यात साठवण्यासाठी मंदिर प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. देशभरातील कलाकारांची सांस्कृतिक सेवाया महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे दररोज संध्याकाळी आयोजित केले जाणारे सांस्कृतिक कार्यक्रम. यामध्ये देशभरातील प्रख्यात कलाकार आपली कला बाप्पाच्या चरणी अर्पण करणार आहेत. यामध्ये भजन, लोकनृत्य, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य आणि वाद्य संगीताचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. २२ जानेवारीला भव्य रथ शोभायात्रा भाविकांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे, ही आमची प्राथमिकता आहे. दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या रांगेचे व्यवस्था करण्यात येते. २२ जानेवारी रोजी माघी गणेश जयंतीचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. या दिवशी दुपारी ३:०० वाजता श्री सिद्धिविनायकाची एक भव्य रथ शोभायात्रा काढली जाणार आहे. सजवलेल्या रथातून बाप्पा आपल्या भक्तांच्या भेटीला येणार असून, ही शोभायात्रा पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईतील भाविकांची अलोट गर्दी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी दिली. सांस्कृतिक वारसा जपण्याचा मानस या सप्ताहभर चालणाऱ्या महोत्सवाचा मुख्य उद्देश केवळ धार्मिक अनुष्ठान नसून, आपली समृद्ध भारतीय सांस्कृतिक परंपरा जिवंत ठेवणे हा आहे, असे मंदिर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 3:05 pm

डॉक्टर संग्राम पाटील यांची मुंबई विमानतळावर पुन्हा चौकशी:लंडनला जाण्यापासून रोखले, विमान सुटले; 10 तारखेलाही झाली होती चौकशी

भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरीक डॉक्टर संग्राम पाटील यांना आज पुन्हा मुंबई विमानतळावर चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीच्या फेऱ्यात त्यांचे लंडनला जाणारे विमान सुटल्यामुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. डॉक्टर संग्राम पाटील हे मूळचे जळगावचे आहेत. ते सध्या ब्रिटनमध्ये स्थायिक आहेत. गत 10 जानेवारी रोजी ते आपल्या कुटुंबासह मायदेशी परतले होते. त्यानंतर मुंबई विमानतळावर त्यांना चौकशीच्या नावाखाली दिवसभर बसवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी उशिरा त्यांची सुटका करण्यात आली होती. सोशल मीडियावरील एका पोस्टच्या संदर्भात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. संग्राम पाटील हे भाजप सरकारवरील आपल्या टीकेसाठी ओळखले जातात. त्यातूनच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप झाला. त्यामुळे त्याचे सोशल मीडियात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर आज 19 जानेवारी रोजी ते आपल्या कुटुंबासह लंडनच्या दिशेने निघाले होते. पण मुंबई विमानतळावर पुन्हा त्यांना चौकशीला सामोरे जावे लागले. चौकशीच्या गडबडीत लंडनचे विमान सुटले यासंबंधीच्या माहितीनुसार, संग्राम पाटील यांनी आपण 19 जानेवारी रोजी सकाळच्या विमानाने ब्रिटनला परत जाणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले लूक आऊट सर्क्युलर मागे घेण्याची ग्वाही दिली होती. पण प्रत्यक्षात वेगळेच चित्र पहावयास मिळाले. संग्राम पाटील आज सकाळी 8 च्या इंडिगोच्या विमानाने ब्रिटनला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले. पण इमिग्रेशन काउंटरवरच त्यांना थांबवण्यात आले. त्यांना विमानात चढण्यास मज्जाव करण्यात आला. या गडबडीत त्यांचे लंडनचे विमान सुटले. विशेष म्हणजे डॉक्टर संग्राम पाटील यांच्याविरोधात सायबर क्राईम विभागात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच आधारावर त्यांच्याविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. संग्राम पाटील यांच्याविरोधातील काय आहे तक्रार? डॉक्टर संग्राम पाटील यांच्यावर भाजप व तिच्या नेत्यांविरोधात सोशल मीडिवर आक्षेपार्ह लिखान केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशचे सोशल मीडिया सहसंयोजक निखील श्यामराव भामरे यांनी यासंबंधीची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार संग्राम पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पण आता डॉक्टर संग्राम पाटील यांना परदेशात जाण्यापासून रोखण्यात आल्याने हा विषय अधिकच गंभीर बनला आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 2:41 pm

निवडणुकीतील पराभवानंतर सोशल मीडियावर टीका:रूपाली ठोंबरे यांचा संताप, ट्रोलर्सला दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

पुण्याच्या राजकीय पटलावर वजनदार मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना या निवडणुकीत मतदारांनी नाकारले आहे. यामध्ये प्रामुख्याने माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा समावेश असून, त्यांच्या पराभवाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती राष्ट्रवादीच्या आक्रमक नेत्या आणि माजी प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांच्या पराभवाची. रूपाली पाटील ठोंबरे यांचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. अनेक युजर्सकडून त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट आणि कमेंट्स केल्या जात आहेत. या ट्रोलिंगची गंभीर दखल घेत रूपाली पाटील यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. टीका करणे हा लोकशाहीचा भाग असला तरी, वैयक्तिक पातळीवर जाऊन चिखलफेक करणाऱ्यांना सोडणार नाही, असे म्हणत त्यांनी थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. सायबर गुन्हे शाखेकडे या तक्रारी केल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रूपाली ठोंबरे यांची पोस्ट जशास तशी... रूपाली पाटील ठोंबरे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, सोशल मीडियावर बंधु,भगिनी,वडील मंडळी तसचे पोर्टल, न्यूज चॅनेल वालो... माझ्या बाबतीत संदर्भात जाणीवपूर्वक हेतुपरस्पर फेक नेरेटिव पोस्ट, बदनामीकारक पोस्ट, अश्लील कमेंट कृपया करुच नये. वैचारिक मनभेद असतील ,आपण माहिती घेऊन तपासून खात्री करून मगच व्यक्त व्हावे किंवा पोस्ट करावी. आपल्याला संविधानाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा दुसऱ्यासाठी गैरवापर करून बदनामी, अश्लील कमेंट करू नये.अन्यथा नाहक आपल्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी लागेल व गुन्हा सुद्धा दाखल करावा लागेल. त्यामुळे माझी विनंती आहे फेक नेरेटिव पसरवणाऱ्या ट्रॉलर्सला माझ्या बाबतीत कोणतीच चुकीच्या बदनामीच्या पोस्ट करू नये.जाणीवपूर्वक गैरसमज करणाऱ्या पोस्ट करू नये. मी व माझी सोशल टीम परिवार ट्रॉलर्सला जशास तसे उतर देण्यास समर्थ आहोतच पण त्यासोबत कडक कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यास तत्पर आहे. त्यामुळे ट्रॉलर्स तो कोणत्याही पक्षाचा,जातीचा, धर्माचा असो संविधानाने,कायद्याने ,घटनेने कायदेशीर कारवाईस पात्र राहील. नो फेक नेरेटिव्ह, नो बदनामी पोस्ट, नो अश्लील कमेंट्स, नो अब्रुनुकसान नो समाज भावना दुखावणे. हीच जाहीर नोटीस समजावी, असेही रूपाली ठोंबरे यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. रूपाली पाटलांचा दोन प्रभागातून पराभव दरम्यान, रूपाली ठोंबरे यांनी पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 आणि 26 या दोन प्रभागामधून निवडणूक लढवली होती. या दोनही प्रभागातून त्यांचा पराभव झाला. मतमोजणी दरम्यान त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत मोठा गोंधळ देखील घातला होता. त्यामुळे जवळपास दोन मतमोजणी थांबली होती. त्यानंतर झालेल्या मतमोजणी रूपाली पाटील ठोंबरे यांचा पराभव झाला. यावरूनच रूपाली पाटील ठोंबरे यांच्यावर टीका होत आहे. अशातच आता रुपाली पाटलांनी ट्रोलर्सना थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. राष्ट्रवादीतील दिग्गजांची 'पॉवर' पडली कमी दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. पुण्यातील सत्तासंघर्षात भाजपने १६० पैकी ११९ जागांवर मुसंडी मारत महापालिकेवर आपला 'एकहाती' झेंडा फडकवला आहे. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात थेट लढत अपेक्षित होती, मात्र भाजपने केलेल्या सुनियोजित रणनीतीसमोर राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 2:37 pm

सतेज पाटील शिंदेंच्या साथीने कोल्हापुरात सत्ता गेम फिरवणार का?:सूचक वक्तव्याने राजकारण तापलं; मुंबईचा परिणाम कोल्हापुरावर

राज्यातील सत्तासमीकरणांचा केंद्रबिंदू सध्या केवळ मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नसून, त्याचे पडसाद आता थेट कोल्हापुरात उमटताना दिसत आहेत. मुंबई महापालिकेतील महापौरपदावरून सुरू असलेली रस्सीखेच आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेवर प्रभाव टाकू लागल्याचे चित्र आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतरही सत्ता स्थापनेचा मार्ग अद्याप स्पष्ट झालेला नाही. अशा परिस्थितीत पडद्यामागे सुरू असलेल्या हालचालींमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांनी केलेले सूचक वक्तव्य चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहे. पडद्यामागे काय सुरू आहे, ते सध्या जाहीर करता येणार नाही, असे म्हणत त्यांनी अधिक तपशील देण्याचे टाळले. मात्र, त्यांच्या या एका वाक्यानेच कोल्हापुराच्या राजकारणात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात संभाव्य युती होण्याची शक्यता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोल्हापूर महापालिकेतील सध्याचे संख्याबळ पाहता, काँग्रेसकडे 34 जागा असून ती सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपकडे 26 जागा, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 15 जागा आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 4 जागा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे 1 जागा आणि इतरांकडे 1 जागा आहे. महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी 41 जागांची मॅजिक फिगर आवश्यक आहे. सध्या कोणताही पक्ष एकट्याच्या जोरावर हा आकडा गाठू शकलेला नाही, त्यामुळे युतीशिवाय पर्याय उरलेला नाही. राजकीय गणित पाहता, काँग्रेस आणि शिंदे गट एकत्र आल्यास त्यांच्याकडे 49 नगरसेवकांचे स्पष्ट बहुमत तयार होऊ शकते. त्यामुळे मुंबईत शिंदेंना डावलले गेले, तर कोल्हापुरात काँग्रेससोबत हातमिळवणी करून सत्ता स्थापन करण्याचा पर्याय शिंदे गटासाठी खुला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुंबईतील सत्तासंघर्षाचा परिणाम राज्यातील इतर महापालिकांवरही होणार असल्याचे संकेत यामुळे अधिक ठळक झाले आहेत. या निवडणुकीत कोल्हापुरात थेट लढत काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि महायुती यांच्यातच रंगली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह महायुतीतील अनेक दिग्गजांनी प्रचारात पूर्ण ताकद लावली होती. मात्र, तरीही काँग्रेसने 34 जागा जिंकून आपली ताकद कायम ठेवली. सतेज पाटील यांनी तिसऱ्यांदा काँग्रेसची सत्ता कोल्हापुरात आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र महायुतीने मॅजिक फिगर गाठत काँग्रेसचे हे स्वप्न रोखले. तरीही, चित्र पूर्णपणे संपलेले नाही. महायुतीकडे काठावरचे बहुमत असले, तरी स्थिर सरकारसाठी आवश्यक असलेला आकडा आणि विश्वासार्हता अद्याप प्रश्नात आहे. अशातच काँग्रेस-शिंदे गट युतीचा पर्याय समोर येत असल्याने कोल्हापुरातील सत्ता गणित पुन्हा एकदा उलथापालथीच्या टप्प्यावर येऊन ठेपले आहे. सतेज पाटील यांच्या सूचक विधानामुळे या शक्यतेला अधिक बळ मिळाले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, मुंबईतील सत्ता समीकरणांवरच कोल्हापूरसह राज्यातील अनेक महापालिकांचे निर्णय अवलंबून असू शकतात. जर मुंबईत शिवसेना-भाजपमध्ये मतभेद वाढले, तर त्याचे पडसाद कोल्हापुरात स्पष्टपणे उमटू शकतात. त्यामुळे सतेज पाटील शिंदेंच्या साथीने कोल्हापुरात सत्ता गेम फिरवणार का? हा प्रश्न सध्या संपूर्ण राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. पुढील काही दिवसांत पडद्यामागील हालचाली उघडकीस येण्याची शक्यता असून, कोल्हापुराच्या सत्तास्थापनेचा अंतिम फैसला लवकरच होणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 2:22 pm

औंढा पोलिसांनी वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या:३ जेसीबी, ५ ट्रॅक्टरसह ८९.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त; १६ जणांवर गुन्हा

औंढा नागनाथ तालुक्यातील रुपूर शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात पोलिसांंच्या पथकाने छापा टाकून तीन जेसीबी, पाच ट्रॅक्टर, पाच ब्रास वाळूसह ८९.१५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सोळा जणांवर सोमवारी ता. १९ पहाटे औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांना पाहताच फरार झालेल्या आरोपींची वाहनांच्या क्रमांकावरून नांवे शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वाळू घाटांवरून अवैधरित्या वाळूची वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागाचे तर पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी पोलिसांचे पथक स्थापन केले आहे. या पथकांकडून दररोज वाळू घाटांवर जाऊन माहिती घेतली जात आहे. या शिवाय वाळू घाटावर जाणाऱ्या वाहनांची अचानक तपासणी करून कारवाई केली जात आहे. दरम्यान, औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, पोलिस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, जमादार माधव सुर्यवंशी, अमोल चव्हाण, तान्हाजी ढाकरे, विलास पाईकराव, राजकुमार कुटे, इजाज पटेल यांची दोन पथके रविवारी ता. १८ रात्री गस्तीवर होती. यावेळी रुपूर शिवारातून पूर्णा नदीच्या पात्रात जेबीसीच्या मदतीने वाळू उपसा करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून दोन्ही पथकाने रुपूर शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात जाऊन छापा टाकला. मात्र पोलिसांना पाहताच वाहनावरील सर्व जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. यामध्ये पोलिसांनी नदी पात्रातून तीन जेसीबी, पाच ट्रॅक्टर व पाच ब्रास वाळू असा ८९.१५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी सर्व मुद्देमाल पोलिस ठाण्यात आणला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक वाघमारे यांच्या तक्रारीवरून आठही वाहनांच्या चालक व मालकावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी वाहनांच्या नोंदणीवरून वाहन मालकाचा शोध घेण्यास सुरवात केली असून वाहन चालक व मालकांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या गेल्या असून यामुळे आता अवैध वाळू उपसा व वाहतूकीला लगाम बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 2:19 pm

112 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी झेडपीसाठी इच्छुक:आरोपींना वाचवण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांचा दबाव, कर्जदार संघटनेच्या वकिलांचा गंभीर आरोप

ईडीने धाड टाकलेल्या सातारा जिल्ह्यातील यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेतील तब्बल ११२ कोटींच्या आर्थिक घोटाळा प्रकरणात आरोपींना वाचविण्यासाठी भाजपाचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकातदादा पाटील आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांचा पोलीस यंत्रणेवर दबाव असल्याचा खळबळजनक आरोप बँकेच्या ठेवीदार, कर्जदार संघटनेचे वकील निलेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, बँकेचे तत्कालीन चेअरमन आणि घोटाळ्यातील आरोपी महेशकुमार जाधव हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये, अशी मागणी देखील ॲड. जाधव यांनी केली. भाजप नेत्यांकडून आरोपींची वकिली यशवंत बँकेच्या ठेवीदार, कर्जदार संघटनेचे वकील निलेश जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप केले. ॲड. जाधव म्हणाले की, भाजपाचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडें हे यशवंत बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शेखर चरेगावकर आणि तत्कालिन चेअरमन महेशकुमार जाधव यांना राजाश्रय देत आहेत. भाजप नेते त्यांची एकप्रकारे वकिली करत आहेत. त्यामुळेच या मुख्य आरोपींना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही. आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावी यशवंत को-ऑपरेटीव्ह बँकेत ११२ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. याप्रकरणी ५० जणांवर एमपीआयडी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला असतानाही पोलिसांनी केवळ एका आरोपीला अटक केली आहे. उर्वरीतांना पोलिसांनी अभय दिले आहे. केवळ चार जणांना अटकपूर्व जामीन मंजुर झाला आहे. उर्वरीत आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावी, अशी मागणी ठेवीदार, कर्जदार संघटनेच्यावतीने ॲड. जाधव यांनी केली. ईडीकडून अधिकृत माहिती दिली जात नाही आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची गेली पाच दिवस मुंबई चौकशी सुरू असल्याचा दावा ॲड. जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र, ईडीकडून अधिकृत माहिती दिली जात नाही. चरेगावकर यांचे बंधू विठ्ठल उर्फ शौनक यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, बाकी सर्व आरोपी हे उजळ माथ्याने फिरत आहेत, असेही ॲड. जाधव म्हणाले. घोटाळ्यातील आरोपी झेडपीसाठी इच्छुक आर्थिक घोटाळ्यातील काही आरोपींनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेतली आहे. आरोपी आणि संशयास्पद कर्जप्रकरणे नावावर असणाऱ्यांना ईडीने नोटीसा बजावल्या आहेत असे असताना घोटाळ्यातील आरोपी आणि तत्कालिन चेअरमन महेशकुमार जाधव यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे. त्यांना उमेदवारी दिल्यास यशवंत बँक ठेवीदार, कर्जदार संघटना आक्रमकपणे प्रचार करणार असल्याचा इशाराही ॲड. निलेश जाधव यांनी दिला आहे. दरम्यान, यशवंत बँक आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी तथा सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचे बंधू शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर यांचीही ईडीने चौकशी केलेली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते कराडच्या नवीन शासकीय विश्रामगृहाची देखभाल करत आहेत. कसलेही टेंडर न काढता मागील एक दीड वर्ष त्यांना देखभालीचे काम बांधकाम विभागाने दिले असल्याची खळबळजनक माहिती ॲड. जाधव यांनी दिली. तसेच नंतर टेंडरसाठी शार्दुल चरेगावकर यांनी बोगस कागदपत्रे दिली असल्याची बाब देखील उघडकीस आली आहे. त्याबद्दलही आमचा लढा सुरू असल्याचे ॲड. निलेश जाधव यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 2:10 pm

२२ जानेवारीला २९ महापालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झालं. तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. यानंतर आता महापालिकेमधील महपौरपदाच्या आरक्षण सोडतीबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. सर्व २९ महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत २२ जानेवारी रोजी काढली जाणार आहे. २२ जानेवारीला सकाळी ११ वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे […] The post २२ जानेवारीला २९ महापालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 2:09 pm

मुंबईत महायुतीचाच महापौर होणार:देवेंद्र फडणवीस - एकनाथ शिंदेंत फोनवरून चर्चा; CM दावोसवरून परतल्यानंतर सुटणार BMC चा तिढा

मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजप व शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. पण महापौर कोणत्या पक्षाचा होणार? या मुद्यावरून दोन्ही पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे फडणवीस दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर मुंबईच्या महापौरपदाचा तिढा सुटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई महापालिकेसाठी गत आठवड्यात निवडणूक झाली. त्यात भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्या. तर शिंदे गटाला 29, ठाकरे गटाला 65, तर काँग्रेस व मनसेला अनुक्रमे 24 व 6 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपला आपल्या मदतीशिवाय महापौर बनवणे अशक्य असल्याचे लक्षात येताच शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात हलवले आहे. त्यानंतर त्यांनी भाजपपुढे अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव ठेवून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिंदेंच्या या डावपेचामुळे मुंबीचा महापौर कोण होणार? हा प्रश्न कळीचा बनला आहे. या पार्श्वभूमीवर सूत्रांनी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंशी फोनवरून संवाद साधल्याचा दावा केला आहे. भाजप ठाकरेगटासोबत जाण्याच्या चर्चेत तथ्य नाही यासंबंधीच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथून फोनवरून एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी दावोस दौऱ्यानंतर एकत्र बसून या मुद्यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. भाजप ठाकरे गटासोबत जाण्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. याविषयी अफवांवर विश्वास ठेवण्याची काहीही गरज नाही. मुंबईकरांनी महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाईल असे कृत्य कोणत्याही पक्षाकडून होणार नाही असे दोन्ही नेत्यांनी ठरवल्याची माहिती आहे. या सूचक संवादामुळे फडणवीस परदेश दौऱ्यावरून मुंबईत परतल्यानंतर मुंबईच्या महापौरपदाचा तिढा निकाली निघण्याची शक्यता वाढली आहे. दुसरीकडे, राज्याच्या नगरविकास विभागाने महापौरपदाचे आरक्षण सोडवण्यासाठी गुरुवारी बैठक बोलावली आहे. तोपर्यंत भाजप - शिंदे गटाचा महापौरपदाचा वाद निकाली निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या कुठे आहेत शिंदेंचे मुंबईतील नगरसेवक? शिंदे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवकांचा मुक्काम सध्या मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे. निवडणूक निकाल लागला तेव्हाचा या नगरसेवकांना इथे हलवण्यात आले आहे. नवीन नगरसेवकांपैकी कुणीही भाजप किंवा ठाकरे गटाशी संपर्क साधू नये यासाठी खबरदारी म्हणून शिंदे गटाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. विशेषतः भाजपला शिंदे गटाच्या मदतीशिवाय मुंबईत आपला महापौर करता येणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे शिंदेंनी आपल्या नगरसेवकांच्या पाठिंब्याच्या मोबदल्यात भाजपपुढे अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव ठेवल्याचीही माहिती आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 1:54 pm

भाजपचा एकनाथ शिंदेंवर प्रचंड दबाव:आता ठाण्याच्या महापौर पदावरही सांगितला दावा; आमदार निरंजन डावखरे यांनी टाकला डाव

मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार? या मुद्यावरून भाजप व शिंदे गटात रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाने भाजपपुढे अडीच वर्षांच्या महापौरपदाचा प्रस्ताव ठेवून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने आता थेट शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्याच्या महापौरपदावर दावा सांगितला आहे. भाजपच्या या राजकीय खेळीमुळे शिंदे गटाची मोठी अडचण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सद्यस्थितीत ठाणे महापालिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बहुमत आहे. पण सत्ता राखण्यासाठी त्यांना भाजपची साथ महत्त्वाची आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी ठाण्याच्या महापौर पदावर दावा सांगितला आहे. ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे गटाला बहुमत मिळाले. पण आमचाही सन्मान झाला पाहिजे. भाजपने शीळ ते वडवली या पट्ट्यात अत्यंत प्रभावी कामगिरी केली. आमच्या वाट्याला ज्या जागा आल्या, तिथे आम्ही 100 टक्के स्ट्राईक रेट राखला. आता आमची ताकद वाढली आहे. त्यामुळे ठाण्याचा महापौर भाजपचा असावा अशी आमच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. ठाणे महापालिकेत भाजपला किमान 2 वर्षांसाठी महापौरपद मिळावे. अन्यथा आम्ही सत्तेत न राहता विरोधी बाकावर बसणे पसंत करू, असा इशारा निरंजन डावखरे यांनी दिला आहे. शिंदे गटाच्या मुंबईतील राजकीय दबावतंत्राला उत्तर म्हणून डावखरेंनी ठाण्यात हा डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ठाकरे - फडणवीसांत दूरध्वनीवरून चर्चा दुसरीकडे, भाजपने मुंबईच्या महापौरपदाच्या मुद्यावर ठाकरे गटाशी बोलणी सुरू केल्याचाही दावा केला जात आहे. शिंदेंच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे. पण तूर्त भाजप आमदार प्रवीण दरेकर व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा दावा फेटाळला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने 2017 साली ठाकरे गटाचा महापौर व्हावा म्हणून महापौरपदाच्या निवडणुकीवेळी गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला होता. या मदतीची कथित परतफेड म्हणून ठाकरे गट यंदा महापौरपदाच्या निवडणुकीवेळी गैरहजर राहून भाजपची मदत करेल. पण भाजप व ठाकरे गटाने ही शक्यता फेटाळल्याने यासंबंधीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा दुसरीकडे, ठाकरे गटाने मुंबईच्या महापौरपदावरून भाजपवर निशाणा साधला आहे. ज्या दिवशी मुंबईत भाजपचा महापौर बसेल, त्या दिवशी संपूर्ण मुंबई शोकसागरात बुडेल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत भाजपचा महापौर बसवण्यासंबंधी केलेल्या विधानाचाही समाचार घेतला. मोदींचे भाषण लिहिणाऱ्यांचा इतिहास कच्चा आहे. मुंबीत फक्त शिवसेना आहे व राहील. मुंबईकरांनी जे आकडे दिलेत, त्यावरून भाजपचा विजय झाला नसल्याचे स्पष्ट होते. मोदींनी आता आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे ते म्हणालेत. संजय राऊत यांनी यावेळी एकनाथ शिंदेंचा यांचा उल्लेख उपरोधिकपणे लोहपुरुष म्हणूनही केला. एकनाथ शिंदे हे भाजपचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अमित शहा त्यांना खांद्यावर घेऊन फिरतात, पण शिंदेंची चावी नक्की कुणाकडे आहे? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 1:10 pm

नगसेवकांना ज्याची प्रतिक्षा, त्याची तारीख आणि वेळ ठरली:राज्यातील 29 महापालिकांतील महापौर पदाच्या आरक्षण ठरवण्यासाठी सोडत

राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणासंदर्भात महत्त्वाची हालचाल सुरू झाली असून, या विषयावर तोडगा काढण्यासाठी आणि आरक्षण ठरवण्यासाठी नगरविकास विभागाकडून उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने याबाबत अधिकृत पत्रक जारी केले असून, ही बैठक गुरुवार, 23 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान राज्याचे नगरविकास मंत्री भूषवणार आहेत. शासनाच्या या पत्रानुसार, राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये महापौर पदासाठी आरक्षण निश्चित करण्याबाबत सध्या निर्माण झालेल्या पेचावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. मंत्रालयातील परिषद सभागृहात, सहाव्या मजल्यावर ही बैठक पार पडणार असून, त्यामध्ये संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. महापौर पदाचे आरक्षण हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तास्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या बैठकीत आरक्षण सोडत काय निघते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांनी हे पत्र जारी केले असून, त्यात स्पष्ट करण्यात आले आहे की, आरक्षण निश्चितीचा निर्णय नगरविकास मंत्र्यांच्या निर्देशानुसार घेतला जाणार आहे. या बैठकीत होणाऱ्या चर्चेनंतर महापौर पदाच्या आरक्षणाबाबत अंतिम सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या महापालिका सत्तास्थापनेसाठी हा निर्णय निर्णायक ठरणार आहे. या पत्राची प्रत मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव तसेच संबंधित वरिष्ठ सचिवांना देण्यात आली आहे. यावरून राज्य सरकार या विषयाकडे किती गांभीर्याने पाहत आहे, हे स्पष्ट होते. महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर अनेक शहरांमध्ये महापौर पदाच्या आरक्षणावरून राजकीय चर्चा आणि मतभेद निर्माण झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बैठकीतील निर्णय प्रशासकीयच नव्हे, तर राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा राज्यातील महापालिकांमध्ये सत्तास्थापना, महापौर निवड आणि पुढील प्रशासकीय निर्णय यासाठी आरक्षण निश्चित होणे आवश्यक असते. त्यामुळे या बैठकीतून निघणारा निर्णय केवळ प्रशासकीय नव्हे, तर राजकीय दृष्ट्याही महत्त्वाचा ठरणार आहे. गुरुवारी होणाऱ्या या बैठकीकडे सर्व राजकीय पक्षांचे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 1:03 pm

मुंबई महापालिकेत 'स्वीकृत'साठी रस्सीखेच:इच्छुकांची पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग, मनसेने पाठिंबा दिल्यास ठाकरे गटाचे 3 नगरसेवक वाढणार

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच आता 'स्वीकृत' अर्थात नामनिर्देशित नगरसेवकपदासाठी राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. २०२३ मध्ये विधीमंडळात मंजूर झालेल्या विधेयकानुसार, मुंबई पालिकेत पहिल्यांदाच नामनिर्देशित सदस्यांची संख्या ५ वरून १० करण्यात आली आहे. त्यामुळे या १० जागांवर आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावण्यास आणि मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. सभागृहात आता २२७ निवडून आलेले आणि १० नामनिर्देशित असे एकूण २३७ नगरसेवक असणार आहेत. पक्षांच्या सध्याच्या संख्याबळानुसार स्वीकृत सदस्यांचे गणित पुढीलप्रमाणे जुळत आहे. भाजपला सर्वाधिक जागा असल्याने ४ स्वीकृत नगरसेवक. शिवसेना शिंदे गटाला १ जागा. शिवसेना ठाकरे गटाला २ जागा, परंतु, मनसेने पाठिंबा दिला तर ३ होऊ शकतात. तर काँग्रेसला अपक्षांच्या पाठिंब्यावर ३ जागा मिळण्याची शक्यता आहे. स्वीकृत नगरसेवकाचे निकष स्वीकृत नगरसेवक हे पालिकेतील तज्ज्ञ सदस्य असतात. त्यांची निवड थेट जनतेतून होत नाही, तर शहराच्या विकास प्रक्रियेत प्रशासन, कायदा, आरोग्य, शिक्षण, अभियांत्रिकी किंवा सामाजिक क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा समावेश व्हावा, हा यामागचा मुख्य उद्देश असतो. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार वकील, डॉक्टर, प्राध्यापक किंवा निवृत्त अधिकारी यांना या पदावर प्राधान्य दिले जाते. स्वीकृत नगरसेवकांची निवड महापालिका आयुक्तांच्या शिफारशीने आणि सभागृहाच्या संमतीने होते, तर अंतिम शिक्कामोर्तब राज्य सरकारकडून केले जाते. त्यामुळे आता या १० खुर्च्यांवर कोणत्या तज्ज्ञांची (की कार्यकर्त्यांची) वर्णी लागणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. स्वीकृत नगरसेवकाचे अधिकार स्वीकृत नगरसेवकांना जनतेतून निवडून आलेल्या नगरसेवकांप्रमाणेच मानधन, भत्ते आणि विकास निधी मिळतो. ते सभागृहातील चर्चांमध्ये सहभागी होऊ शकतात आणि सूचना मांडू शकतात. परंतु, त्यांच्यावरही काही मर्यादा आहेत. स्वीकृत नगरसेवकांना महापौर, उपमहापौर किंवा स्थायी समितीच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नसतो. प्रशासनाची डोकेदुखी वाढली एकीकडे राजकीय हालचालींना वेग आला असताना, महापालिका प्रशासनासमोर मात्र तांत्रिक पेच निर्माण झाला आहे. मुंबई महापालिका मुख्यालयातील ऐतिहासिक सभागृहाची आसन व्यवस्था २२७ नगरसेवकांसाठी आहे. आता १० नवीन सदस्य वाढल्यामुळे या वाढीव सदस्यांना नक्की कुठे बसवायचे? असा प्रश्न प्रशासनाला सतावत आहे. त्यामुळे सभागृहात काही अंतर्गत बदल करावे लागण्याची शक्यता आहे. हे ही वाचा… पालिका निकालानंतर एकनाथ शिंदे नाराज:'भाकरी फिरवण्या'ची तयारी; अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्याची शक्यता, नव्या चेहऱ्यांना संधी? राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पक्षात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत. विशेषतः ज्या मंत्र्यांकडे आणि आमदारांकडे विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्यांच्या सुमार कामगिरीवर मुख्यमंत्री प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर, अकार्यक्षम मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 1:01 pm

चांदी ३ लाखांवर, सोन्याचे दरही वाढले

जळगाव : प्रतिनिधी सध्या सोन्या- चांदीचे भाव जे धाडकन वाढत आहेत, ते पाहून डोक्याला तर झिणझिण्याच येतील. सोने आणि चांदीच्या किमती घसरण्याचे सर्व अंदाज खोटे ठरत असून आणि हे दोन्ही मौल्यवान धातू दररोज विक्रम मोडताना दिसत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी, चांदीच्या किमतींमध्ये इतकी मोठी वाढ झाली की १ किलो चांदीची किंमत तब्बल 3 लाख […] The post चांदी ३ लाखांवर, सोन्याचे दरही वाढले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 12:56 pm

चांदी ३ लाखांपार, सोन्याचे दरही वाढले

जळगाव : प्रतिनिधी सध्या सोन्या- चांदीचे भाव जे धाडकन वाढत आहेत, ते पाहून डोक्याला तर झिणझिण्याच येतील. सोने आणि चांदीच्या किमती घसरण्याचे सर्व अंदाज खोटे ठरत असून आणि हे दोन्ही मौल्यवान धातू दररोज विक्रम मोडताना दिसत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी, चांदीच्या किमतींमध्ये इतकी मोठी वाढ झाली की १ किलो चांदीची किंमत तब्बल 3 लाख […] The post चांदी ३ लाखांपार, सोन्याचे दरही वाढले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 12:56 pm

राज्यात पुन्हा वाढला गारठा

मुंबई : प्रतिनिधी नववर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या अवकाळी पावसानंतर महाराष्ट्रातील हवामान सतत बदलताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा राज्यात थंडी वाढली असून पुढचे काही दिवस थंडीचा कडाका वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. विशेषत: उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता असून पुढील काही दिवस पहाटे आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवू शकते. […] The post राज्यात पुन्हा वाढला गारठा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Jan 2026 12:54 pm

माहिती आयोगात दाखल प्रकरणांचा गतीने निपटारा:छत्रपती संभाजीनगर खंडपीठाची उल्लेखनीय कामगिरी; जवळपास दहापटीने वाढ

राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे. सन 2024 मध्ये खंडपीठाने 14 हजार 1 द्वितीय अपिले निकाली काढली असून, 2025 मध्ये 10 हजार 783 द्वितीय अपिलांचा यशस्वी निपटारा करण्यात आला आहे. आयोगाकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींच्या निपटाऱ्याच्या प्रमाणात जवळपास दहापटीने वाढ झाली असून, द्वितीय अपिलांच्या प्रलंबिततेत सुमारे 55 टक्क्यांची लक्षणीय घट झाली आहे. राज्य माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर यांच्या प्रभावी प्रशासकीय नियोजनामुळे आणि सातत्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. तक्रार निवारणात 2025 मध्ये 10 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. 2024 अखेरीस प्रलंबित असलेल्या 165 तक्रारींची संख्या डिसेंबर 2025 अखेर 85 वर आली असून, त्यामुळे प्रलंबित तक्रारींमध्ये 51 टक्के घट झाली आहे. द्वितीय अपिलांच्या प्रलंबिततेतही मोठी घट झाली आहे. 2024 अखेरीस 8 हजार 699 द्वितीय अपिले प्रलंबित होती. ती संख्या डिसेंबर 2025 अखेर 3 हजार 946 इतकी झाली असून, प्रलंबित अपिलांच्या प्रमाणात सुमारे 55 टक्के घट झाल्याचे स्पष्ट होते. राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाची ही कामगिरी माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीस बळ देणारी ठरली आहे. जलद व पारदर्शक निपटारा करण्यावर भर राज्य माहिती आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामार्फत प्रकरणांचा जलद व पारदर्शक निपटारा करण्यावर भर देण्यात आला आहे. नियोजनबद्ध कामकाज, सुनावणीतील शिस्त आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यामुळे प्रलंबित अपिले व तक्रारींच्या निपटाऱ्यात लक्षणीय प्रगती साधता आली आहे. नागरिकांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत वेळेत न्याय मिळावा, हाच आयोगाचा मुख्य उद्देश आहे. भविष्यातही प्रलंबित प्रकरणे कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील तसेच माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अधिक मजबूत करण्यात येईल, - प्रकाश इंदलकर, राज्य माहिती आयुक्त

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 12:34 pm

शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा?:सर्वोच्च न्यायालयात बुधवारी अंतिम सुनावणी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'घड्याळ'बाबतही होणार फैसला

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा आणि दोन महत्त्वाच्या प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याचा पेच आता सर्वोच्च न्यायालयात सुटण्याच्या मार्गावर आहे. शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हाबाबत येत्या बुधवारपासून (२१ जानेवारी) अंतिम सुनावणीला सुरुवात होत आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ सलग दोन दिवस या प्रकरणाचा युक्तिवाद ऐकून घेणार असून, राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निकाल लवकरच जाहीर होण्याची चिन्हे आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर देखील सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उघड बंड केले होते. त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसह प्रथम गुजरात व तेथून गुवाहाटीला प्रयान केले होते. शिंदे यांनी नंतर आपल्या समर्थक आमदार व खासदारांच्या संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व चिन्हावर दावा सांगितला होता. त्यासंबंधीचा कायदेशीर लढा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे झाला. त्यात आयोगाने संख्याबळाच्या आधारावर शिवसेना पक्ष व चिन्ह हे उद्धव ठाकरे यांच्याकडून काढून शिंदे यांच्या गटाला दिले. या निर्णयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. यासोबतच, शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याऐवजी पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयालाही शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आव्हान दिले असून, या दोन्ही याचिकांवर आता बुधवारी एकत्र सुनावणी होणार आहे. सलग दोन दिवस अंतिम युक्तिवाद याप्रकरणी नोव्हेंबरमध्ये मागील सुनावणी झाली होती. त्या सुनावणीवेळीच सर्वोच्च न्यायालयाने अंतिम सुनावणीची तारीख निश्चित करत, प्रकरणाचा निकाल लवकरच दिला जाईल, असे संकेत दिले होते. त्यावेळी न्यायालयाने 21 व 22 जानेवारीला सलग दोन दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेऊ, याव्यतिरिक्त दुसरे प्रकरण सूचिबद्ध केले जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. न्यायालयाने कोर्ट मास्टरना दोन्ही दिवशी इतर प्रकरण कार्यतालिकेत सूचिबद्ध न करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरू होणार असून, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. ‘राष्ट्रवादी’ आणि 'घड्याळ' बाबत सुनावणी दुसरीकडे, शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ चिन्हाचा वादही सर्वोच्च न्यायालयाच्या अजेंड्यावर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष व चिन्हाबाबत याचिका दाखल केली असून, अजित पवार गटाच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला जयंत पाटील यांनी आव्हान दिलं आहे. शिवसेनेच्या युक्तिवादानंतर राष्ट्रवादी प्रकरणाची सुनावणी घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत निवडणुका नुकत्याच संपल्या आहेत. आता जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचदरम्यान शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या अंतिम सुनावणीला वेग मिळणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 12:25 pm

मुंबईत बिहारच्या नितीश सरकारचा मास्टरस्ट्रोक:30 मजली ‘बिहार भवन’ उभारून आर्थिक राजधानीत प्रशासकीय ताकद वाढवणार

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता बिहार सरकारची ठळक आणि भक्कम उपस्थिती दिसणार आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार सरकारने मुंबईत अत्याधुनिक आणि भव्य ‘बिहार भवन’ उभारण्याचा निर्णय घेतला असून, हा प्रकल्प केवळ एक इमारत नसून बिहारच्या प्रशासकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक ओळखीचा नवा अध्याय ठरणार आहे. मुंबईत वास्तव्यास असलेल्या लाखो बिहारवासीयांसाठी हे भवन एक महत्त्वाचे आधारकेंद्र ठरणार असल्याचं मानलं जात आहे. प्रस्तावित बिहार भवन हे 30 मजली असणार असून, बेसमेंटसह इमारतीची एकूण उंची सुमारे 69 मीटर इतकी असेल. ही इमारत अत्याधुनिक वास्तूशैलीत उभारली जाणार असून, आधुनिक शहरी नियोजन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात आधुनिकतेसोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे. या भव्य इमारतीत सौर पॅनेल बसवण्यात येणार असून, ऊर्जेच्या गरजांसाठी नवीकरणीय स्रोतांचा वापर करण्यात येईल. पाण्याच्या पुनर्वापरासाठी अत्याधुनिक एसटीपी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याशिवाय, इमारतीभोवती हिरवळीचे क्षेत्र विकसित करण्यात येणार असून, हा प्रकल्प ‘ग्रीन बिल्डिंग’ संकल्पनेनुसार उभारला जाणार आहे. त्यामुळे पर्यावरणीय जबाबदारी जपत आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा बिहार सरकारचा उद्देश स्पष्ट दिसतो. दिल्लीतील बिहार भवनाच्या धर्तीवरच मुंबईतील हे भवन देखील सर्व सुविधांनी सुसज्ज असणार आहे. या इमारतीत बिहार सरकारच्या विविध विभागांची कार्यालये, प्रशासकीय कामकाजासाठी स्वतंत्र विभाग, तसेच बैठका आणि कार्यक्रमांसाठी 72 आसनांची अत्याधुनिक सभागृहे असतील. याशिवाय, अधिकाऱ्यांसाठी आणि पाहुण्यांसाठी आधुनिक पार्किंग व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईत येणाऱ्या बिहार सरकारच्या अधिकाऱ्यांना तसेच राज्याशी संबंधित कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठी सोय होणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारितील एलफिंस्टन एस्टेट परिसरात उभारला जाणार आहे. यासाठी सुमारे 0.68 एकर म्हणजेच 2952.77 चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ निश्चित करण्यात आलं आहे. इतक्या मोक्याच्या ठिकाणी बिहार भवन उभारल्यामुळे मुंबईतील प्रशासकीय आणि आर्थिक केंद्रांशी बिहार सरकारचा थेट संपर्क अधिक सुलभ होणार आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 314.20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा खर्च बिहार सरकारकडून करण्यात येणार आहे. एक महत्त्वाचं संपर्क आणि मदतकेंद्र मुंबई ही रोजगार, उद्योग, व्यवसाय, शिक्षण आणि उपचार यासाठी देशभरातील लोकांचं प्रमुख केंद्र आहे. बिहारमधील हजारो विद्यार्थी, कामगार, उद्योजक आणि रुग्ण दरवर्षी मुंबईत येत असतात. अशा परिस्थितीत, बिहार भवनामुळे या नागरिकांना निवासाची सोय, शासकीय मार्गदर्शन, तसेच विविध प्रकारच्या सहकार्याची सुविधा एका छताखाली मिळणार आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या बिहारवासीयांसाठी हे भवन एक महत्त्वाचं संपर्क आणि मदतकेंद्र ठरणार आहे. मुंबईत बिहार सरकारची उपस्थिती अधिक बळकट दरम्यान, बिहार भवन निर्माण विभागाने या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून, एलफिंस्टन एस्टेट परिसरातील सीमा भिंतीचं काम पूर्ण करण्यात आलं आहे. प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्तीही करण्यात आली असून, लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईत बिहार सरकारची प्रशासकीय उपस्थिती अधिक बळकट होणार असून, बिहार राज्याच्या विकासात्मक धोरणांना राष्ट्रीय पातळीवर नवी दिशा देणारा ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 12:24 pm

अजित पवार PA अन् कर्मचाऱ्यांवर संतापले:'बारामती हॉस्टेल'चा दरवाजा बंद पाहून संताप, काहीवेळ ताटकळत उभे राहण्याची वेळ

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या करड्या शिस्तीसाठी ओळखले जातात. त्यामु्ळे ते कोणत्याही कार्यक्रमासाठी जात असताना तेथील आयोजक सर्वकाही ठिकठाक आहे की नाही याची दहावेळी तपासणी करतात. पण अनेकदा काही ना काही तरी राहून जाते आणि मग अजित पवार संबंधितांची चांगलीच कानउघाडणी करतात. असाच प्रकार आज पुण्यातील एका बैठकीपूर्वी घडला. त्याचे झाले असे की, अजित पवार सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणनीती आखण्यात व्यस्त आहेत. ते नियोजित भेटींसाठी आज सकाळीच पुण्यातील बारामती हॉस्टेलवर धडकले. ते येणार म्हणून कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा व भेटीसाठी आलेले नागरीक तिथे गोळा झाले होते. पण एवढी गर्दी असूनही हॉस्टेलच्या कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले नव्हते. कार्यालयाचे दार बंदच होते. तेवढ्यात अजित पवारांचा ताफा हॉस्टेलवर पोहोचला. तेव्हाही दरवाजा उघडण्यात आला नाही. यामुळे अजित पवारांवरही काही वेळ ताटकळत उभे राहण्याची वेळ आली. अखेर पीए व कर्मचाऱ्यांवर संतापले राज्याचा उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री बारामती हॉस्टेलच्या बाहेर उभे असूनही दरवाजा उघडत नव्हता. अखेर हा प्रकार पाहून अजित पवारांचा पारा चढला. त्यांनी तिथे उपस्थित कर्मचारी व कार्यकर्त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर त्यांनी आपल्या पीएलाही बोलावून या प्रकाराची विचारणा केली. कार्यालय उघडून कार्यकर्त्यांना आत बसू का दिले नाही? कार्यालय कशाला बंद ठेवले? चावी आणायला त्रास होत आहे का? अशा कडक शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यांचा हा रौद्रावतार पाहून उपस्थित कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. अखेर घाईघाईने कार्यालय उघडण्यात आले. त्यानंतर अजित पवार आत गेले व पुढील कार्यक्रम सुरू झाला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात अजित पवार बारामती हॉस्टेलच्या बाहेर पांढऱ्या पेहरावात उभे असल्याचे व कर्मचारी दार उघडताना कावरेबावरे झाल्याचे दिसून येत आहे. अजित पवारांना पुणे, पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीत धक्का उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेत जबर झटका बसला आहे. या दोन्ही महापालिका त्यांच्या हातून गेल्या आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले होते. पण त्याची कोणतीही जादू पुण्याच्या मतदारावर दिसून आली. त्यांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मतदान टाकले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांनी भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर थेट टीका केली. त्यानंतर महेश लांडगे यांनी अजित पवारांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महेश लांडगे यांची साथ दिली. यामुळे अजित पवारांना योग्य तो संदेश मिळाला. या घडामोडींनंतर आता अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करून जिल्हा व नगरपंचायतीच्या निवडणुका लढवणार असल्याची माहिती आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 11:54 am

भाजपच्या बालेकिल्ल्यात भूकंप? नागपुरात 40 नगरसेवक अपात्र ठरण्याची शक्यता:48 तासांत राजकीय भूकंपाची शक्यता

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीसाठी एकीकडे आनंदाची लाट असताना, दुसरीकडे एका मोठ्या महानगरपालिकेत सत्तेला हादरा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईसह अनेक महापालिकांवर भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने सत्ता स्थापन केली असली, तरी नागपूर महानगरपालिकेत निवडून आलेल्या 40 नगरसेवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. पुढील 48 तासांत या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता असून, तसे झाल्यास नागपूर मनपात पुन्हा पोटनिवडणुकांचा सामना करावा लागू शकतो. नागपूर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर झाला. एकूण 151 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवत 102 जागांवर विजय मिळवला आणि सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसने 35 जागा जिंकत दुसरा क्रमांक मिळवला, तर एमआयएमने 6, मुस्लीम लीगने 4, ठाकरे गटाने 2 जागा जिंकल्या. याशिवाय अजित पवार गट आणि बसपाला प्रत्येकी एक जागा मिळाली. या निकालामुळे नागपूरमध्ये भाजपची सत्ता जवळपास निश्चित मानली जात असतानाच, आता या 40 नगरसेवकांवरील अपात्रतेची टांगती तलवार भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. या संपूर्ण वादाचं मूळ ओबीसी आरक्षणाशी संबंधित आहे. नागपूर महानगरपालिकेत ओबीसी प्रवर्गातून 40 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, एकूण आरक्षणाची टक्केवारी सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या 50 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा जास्त गेल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यामुळे या 40 नगरसेवकांच्या निवडीवर कायदेशीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर ही बाब गंभीर मानली जात असून, या निवडणुका घटनात्मक चौकटीत बसतात की नाही, याचा फैसला न्यायालयाला करावा लागणार आहे. विशेष म्हणजे, 2021 साली न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी यांच्या खंडपीठाने दिलेल्या ऐतिहासिक निकालात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली होती. त्या निकालानुसार, एकूण आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक असू शकत नाही, असा स्पष्ट आदेश आहे. जर या निर्णयाचा थेट आधार घेतला गेला, तर नागपूरसह चंद्रपूर महानगरपालिकेतील आरक्षणाच्या आधारे निवडून आलेल्या जागांवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा मुद्दा केवळ नागपूरपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरू शकतो. या प्रकरणी 21 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय नेमका कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर न्यायालयाने ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचे मान्य करत निवडणुका रद्द केल्या, तर नागपूर महानगरपालिकेतील 40 जागांवर पुन्हा पोटनिवडणुका घ्याव्या लागतील. यामुळे भाजपचे संख्याबळ कमी होऊ शकते आणि मनपातील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. काही कायदेतज्ज्ञांच्या मते, असा निर्णय झाल्यास त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटू शकतात. राज्यातील अनेक नगरपरिषदा, नगरपंचायती आणि महानगरपालिकांमधील ओबीसी आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. परिणामी, अनेक ठिकाणी निवडणुका रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवावी लागण्याची वेळ येऊ शकते. ही परिस्थिती प्रशासकीय यंत्रणेसाठी मोठे आव्हान ठरेल, तसेच राजकीय अस्थिरतेलाही खतपाणी घालणारी ठरू शकते. पुढील दिशा निश्चित करणारा निकाल मात्र, याचबरोबर काही तज्ज्ञ असा अंदाज व्यक्त करत आहेत की, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने आणि प्रशासनावर येणारा अतिरिक्त ताण लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालय या निवडणुकांना एकदाच दिलेला अपवाद, म्हणून वैध ठरवू शकते. मात्र, भविष्यातील निवडणुकांसाठी आरक्षणाची मर्यादा काटेकोरपणे पाळण्याचे कडक निर्देश दिले जाऊ शकतात. त्यामुळे 21 जानेवारीचा निकाल केवळ नागपूरमधील 40 नगरसेवकांचे राजकीय भवितव्य ठरवणार नाही, तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण धोरणाची पुढील दिशा निश्चित करणारा ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 11:48 am

पालिका निकालानंतर एकनाथ शिंदे नाराज:'भाकरी फिरवण्या'ची तयारी; अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्याची शक्यता, नव्या चेहऱ्यांना संधी?

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पक्षात मोठे फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत. विशेषतः ज्या मंत्र्यांकडे आणि आमदारांकडे विविध जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्यांच्या सुमार कामगिरीवर मुख्यमंत्री प्रचंड नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर, अकार्यक्षम मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिका निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना विविध जिल्ह्यांची जबाबदारी वाटून देताना ही त्यांच्यासाठी 'लिटमस टेस्ट' असल्याचे संकेत दिले होते. मात्र, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर यांसारखे बालेकिल्ले वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाला अपेक्षित यश मिळालेले नाही. आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीतही अनेक ठिकाणी नेत्यांची पकड सैल असल्याचे दिसून येत आहे. या अकार्यक्षमतेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री शिंदे 'भाकरी फिरवण्याच्या' तयारीत असून, लवकरच काही मंत्र्यांची सुट्टी होण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदेंच्या या हालचालींमुळे पालिका पातळीवरील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. स्थानिक नेत्यांची गटबांधणी आणि मंत्रिमंडळातील चेहरा-फेर यांमुळे पुढील काही आठवड्यांत राज्याच्या राजकीय वर्तुळात लक्षणीय हालचाल दिसू शकते. गटनेते निवडीसाठी अनुभवी नावांची चर्चा एकीकडे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात फेरबदल करणार असल्याची चर्चा असतानाच, दुसरीकडे नवनिर्वाचित नगरसेवकांची फाटाफूट टाळण्यासाठी ते स्वत: मैदानात उतरले आहेत. मुंबई महापालिकेत आज शिवसेनेच्या अधिकृत 'गटाची' स्थापना केली जाणार आहे. या गटनेते पदासाठी यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले यांच्यासारख्या अनुभवी आणि तरुण नावांची चर्चा सुरू आहे. आजच ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नगरसेवक फुटणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी पक्षीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. 'ताज' हॉटेलमधील पॉलिटिक्स आणि सुरक्षा चक्र नगरसेवकांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर आता त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता आणि कायदेशीर गट नोंदणी करण्यावर भर दिला जात आहे. जोपर्यंत पालिकेत सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ही 'हॉटेल वारी' सुरूच राहणार असल्याचे समजते. शिवसेनेच्या या हालचालींमुळे मित्रपक्ष भाजप आणि विरोधक ठाकरे गट यांच्यातही खळबळ उडाली आहे. हे ही वाचा… उल्हासनगरमध्ये 'वंचित'ला मोठा धक्का!:दोन नगरसेवकांचा शिंदे सेनेला पाठिंबा, उपमुख्यमंत्र्यांना भेटून पाठिंब्याचे पत्र सुपूर्द उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या समीकरणांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला (VBA) मोठा धक्का बसला आहे. पक्षाकडून निवडून आलेल्या दोन्ही नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे उल्हासनगरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 11:36 am

वारंगाफाटा शिवारात तीन वाहनांसह 24.67 लाखांचा गुटखा पकडला:पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; दोघे ताब्यात

आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत वारंगाफाटा शिवारात नांदेड परिक्षेत्राच्या पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने सोमवारी ता. १९ पहाटे चार वाजता छापा टाकून तीन वाहनांसह २४.६७ लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. नांदेड परिक्षेत्रातील हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर जिल्हयात अवैध व्यवसायासोबतच गुटखा विक्री, अवैध दारु विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकासह नांदेड परिक्षेत्रातचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. या पथकाकडून अवैध व्यवासायाची माहिती घेऊन छापे टाकले जात आहे. या शिवाय नागरीकांनीही माहिती द्यावी यासाठी ‘खबर’ हि संकल्पना देखील हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत वारंगाफाटा शिवारात तीन वाहनांमधून गुटखा आणून तो आखाडा बाळापूर व परिसरात पुरवठा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दशरथ तलदेवार, जमादार प्रदीप खानसोळे, संजीव जिंतकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी यांच्या पथकाने आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास वारंगाफाटा शिवारात पाहणी केली. यावेळी एका काँम्प्लेक्स जवळ दोन पीकअप व एक महिंद्रा टीयूव्ही वाहन उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याठिकाणी असलेल्या दोघांची चौकशी सुरु केली असता त्यांनी सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय आल्याने पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात गुटख्याची पोती आढळून आली. दरम्यान, पोलिसांनी तीन वाहने ताब्यात घेऊन आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणली. वाहनातील पोत्यांमध्ये राजनिवास, विमल, मुसाफीर, जाफराणी दर्जा नावाचा गुटखा आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी तीन वाहनांसह गुटख्याची पोती असा २४.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरमी करण अवचार, प्रभाकर अवचार (रा. भोसी, ता. कळमनुरी) यांना ताब्यात घेतले असून त्यांची अधिक चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 11:31 am

ठाकरे कार्ड वापरणं बंद करा:सुषमा अंधारेंनी भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला सुनावले; म्हणाल्या- ठाकरे गटाचे नगरसेवक कुठेही ‘नॉटरीचेबल’ नाही

महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून राजकीय वर्तुळात चर्चांचा जोर वाढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात पडद्यामागे संवाद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या असून, या चर्चांमुळे सत्ताकारणातील समीकरणं अधिक गुंतागुंतीची होताना दिसत आहेत. महापौर निवडणुकीदरम्यान ठाकरे गटाचे 65 नगरसेवक गैरहजर राहतील आणि त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल, अशा चर्चांनी माध्यमांमध्ये जोर धरला आहे. या चर्चांना खतपाणी घालत भाजप आणि ठाकरे गटात महापौरपदावरून बोलणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून दिली जात आहे. मात्र या दाव्यांवर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या संपूर्ण चर्चांवर स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडत, सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप आणि शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे. त्यांच्या पोस्टमुळे हे प्रकरण आणखी तापलं असून, ठाकरे गट कुठल्याही सौद्याचा भाग होणार नाही, हे त्यांनी ठामपणे अधोरेखित केलं आहे. सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, महापौरपदावरून शिंदे आणि फडणवीस यांच्यात सुरू असलेली रस्सीखेच माध्यमांमध्ये रंगवली जात आहे. मात्र या सत्तासंघर्षात उद्धव ठाकरे यांना ओढण्याचं कोणतंही कारण नाही. शिंदे आणि फडणवीस यांनी आपापसात काय सौदेबाजी करायची ती जरूर करावी, पण स्वतःचा राजकीय मोलभाव वाढवण्यासाठी ठाकरे यांचं नाव वापरू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. ऑफर, प्रस्ताव अशा शब्दांत बातम्या पेरणं म्हणजे लुटूपुटूचं राजकारण असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. अंधारे यांनी पुढे सवाल उपस्थित करत म्हटलं की, टीका करायची असो किंवा सत्तेत बसण्यासाठी एकमेकांवर दबाव टाकायचा असो, प्रत्येक वेळी ठाकरे कार्डच का वापरावं लागतं? यावरूनच ठाकरे यांची राजकीय ताकद अजूनही किती प्रभावी आहे, हे दिसून येतं, असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे लगावला. ठाकरे गटाला सत्तेपेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा आहे आणि त्या विश्वासाशी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, हे त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं. ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट भूमिका घेतली. त्या म्हणाल्या की, ठाकरे गटाचे नगरसेवक कुठेही ‘नॉटरीचेबल’ नाहीत. त्यांना कोणत्याही हॉटेलमध्ये डांबून ठेवलेलं नाही आणि ठेवण्याची गरजही नाही. जनतेने विश्वासाने दिलेली मतं हीच आमची खरी ताकद आहे. त्यामुळे टेबल न्यूज पेरण्याचे बालिश प्रयत्न कोणीही करू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही सत्तेसाठी नाही तर विचारांसाठी लढतो आणि ही लढाई सुरूच राहील, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात कुठलीही चर्चा झालेली नाही, असा स्पष्ट दावा त्यांनी केला. ठाकरे-भाजपत बोलणी सुरू असल्याच्या ज्या बातम्या समोर येत आहेत, त्या फक्त वृत्तपत्रांमधील चर्चांवर आधारित असून आम्ही अशा सूत्रांवर विश्वास ठेवत नाही, असंही राऊत म्हणाले. महापौर कोण होणार हे भाजप आणि गौतम अदानी ठरवतील, असा उपरोधिक टोला लगावत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. मुंबईच्या निकालातून भाजपविरोधी वातावरण दिसते राऊत यांनी पुढे म्हटलं की, मुंबईकरांनी दिलेल्या आकड्यांनुसार भाजप कितीही विजयाचा दावा करत असली, तरी हा विजय नैतिकदृष्ट्या विजय नाही. मुंबईच्या निकालातून भाजपविरोधी वातावरण स्पष्ट दिसून येतं, असा दावा त्यांनी केला. एकीकडे महापौरपदासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये चाललेली रस्सीखेच, तर दुसरीकडे ठाकरे गटाची ‘नो डील’ भूमिका, यामुळे मुंबईच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठे राजकीय धक्के बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 11:29 am

एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरे-भाजप एकत्र?:मुंबईच्या महापौरपदावर मोठा डाव; ठाकरे गट गैरहजर राहणार आणि भाजपचा महापौर बिनविरोध

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात पडद्यामागे संवाद सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. या संभाव्य चर्चांचा केंद्रबिंदू म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न. मुंबईच्या महापौरपदाच्या शर्यतीत भाजपला शिंदे गटावर पूर्णपणे अवलंबून राहावं लागू नये, यासाठी ठाकरे गटाशी एक वेगळी रणनीती आखली जात असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. या चर्चांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येत आहे तो म्हणजे महापौरपदाच्या निवडणुकीवेळी ठाकरे गटाचे 65 नगरसेवक गैरहजर राहण्याची शक्यता. जर असं घडलं, तर मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकते. त्यामुळे भाजपचा उमेदवार थेट महापौर होण्याचा मार्ग मोकळा होईल. यालाच राजकीय वर्तुळात 2017 सालाची परतफेड म्हणून पाहिलं जात आहे. मात्र या चर्चांवर भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट शब्दांत आक्षेप घेतला असून, ठाकरे गटासोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी महापौरपदाबाबत कोणतीही बोलणी झालेली नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे एकीकडे सूत्रांकडून चर्चांची माहिती समोर येत असताना, दुसरीकडे दोन्ही बाजूंनी अधिकृत नकार दिला जात असल्याने या संपूर्ण प्रकरणावर सस्पेन्स कायम आहे. मात्र, मुंबईच्या राजकारणात जेव्हा अशा चर्चांना हवा मिळते, तेव्हा त्यामागे काहीतरी घडामोडी सुरू असतात, अशी धारणा अनुभवी राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर 2027 सालातील महापौर निवडीची आठवण पुन्हा ताजी झाली आहे. त्या वेळी भाजपकडे संख्याबळ असूनही, ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी भाजपने माघार घेतली होती. भाजपने सत्तेत सहभागी न होण्याचा निर्णय घेत पहारेकरीची भूमिका स्वीकारली होती. इतकंच नव्हे, तर भाजपने विरोधी पक्षनेतेपदही न स्वीकारल्यामुळे ते पद काँग्रेसकडे गेलं होतं. आज पुन्हा तशीच रणनीती वापरली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्याच्या निवडणूक निकालांकडे पाहिल्यास, मुंबई महानगरपालिकेत सत्तास्थापनासाठी 114 नगरसेवकांची आवश्यकता आहे. भाजपचे 89 आणि शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून आले असून, दोघांची बेरीज 118 होते. दुसरीकडे ठाकरे गटाचे 65 आणि मनसेचे 6 नगरसेवक आहेत. या आकड्यांवरून स्पष्ट होतं की, भाजपला सत्तास्थापनासाठी शिंदे गटाची मदत अपरिहार्य आहे. हीच बाब एकनाथ शिंदे यांना ताकद देते आणि त्यामुळेच अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाची मागणी शिंदे गटाकडून होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवरच एकनाथ शिंदेंची मुंबईत जोरदार हालचाल सुरू झाली आहे. नगरसेवकांची संभाव्य फूट टाळण्यासाठी शिंदे गटाकडून वेगाने पावलं उचलली जात आहेत. आज शिंदे शिवसेनेच्या नव-निर्वाचित नगरसेवकांचा अधिकृत गट स्थापन केला जाणार असून, त्यासाठीची सर्व कायदेशीर आणि कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. गट नेत्यांच्या यादीत यामिनी जाधव, तृष्णा विश्वासराव आणि अमेय घोले यांसारख्या तरुण आणि अनुभवी नगरसेवकांची नावं चर्चेत आहेत. प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यास धोका कमी राजकीय जाणकारांच्या मते, गट स्थापन करण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यास नगरसेवक फुटीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळेच शिंदे गटाकडून ही प्रक्रिया तातडीने राबवली जात आहे. एकीकडे ठाकरे-भाजप चर्चांची कुजबुज आणि दुसरीकडे शिंदेंची धावपळ, यामुळे मुंबईचा महापौर कोण होणार, हा प्रश्न केवळ संख्याबळाचा न राहता रणनीती, विश्वासघात आणि राजकीय शह-काटशहाचा बनत चालल्याचं चित्र सध्या दिसत आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 11:18 am

वकील असीम सरोदे यांच्या पुण्यातील ऑफिसमध्ये चोरी:15 वर्षांची चंदनाची 2 झाडे तोडून नेली, पहाटे 3.30 च्या सुमारास घडली घटना

सुप्रसिद्ध विधिज्ञ असिम सरोदे यांच्या पुण्यातील ऑफिसमध्ये चोरी झाली आहे. चोरांनी त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात असणारी चंदनाची 2 झाडे तोडून नेली आहेत. या घटनेचा पुणे पोलिस तपास करत आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, वकील असिम सरोदे यांचे पुण्यातील डेक्कन परिसरात भांडारकर रोडवर कार्यालय आहे. त्यांच्या कार्यालयापुढे चंदनाची 2 झाडे होती. त्यांचे वय अंदाजे 15 वर्षांच्या आसपास होते. चंदन चोरांनी आज सोमवारी पहाटे 3.30 च्या सुमारास या कार्यालयात प्रवेश करून ही दोन्ही झाडे तोडून नेली. ही झाडे तोडून नेईपर्यंत या कार्यालयाच्या शेजारी राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्याची माहिती मिळाली नाही. आज सकाळी हा प्रकार उजेडात आला. त्यानंतर या प्रकरणी डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात कार्यालयाच्या कुंपण भिंतीला चिकटून असणारी 2 झाडे तोडून नेण्यात आल्याचे दिसून येत आहे. डेक्कन परिसरात अनेकदा घडल्या घटना उल्लेखनीय बाब म्हणजे डेक्कन परिसरात चंदन चोरी होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे असीम सरोदे यांनी पोलिसांकडे झाडांच्या सुरक्षेबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी आली आहे. महागडच्या गाड्यांतून आलेल्या काही चोरट्यांनी ही झाडे तोडून नेल्याचेही सांगण्यात येत आहे. पोलिस या चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. चंदन चोरांनी एका वकिलाच्याच कार्यालयात ते ही असीम सरोदेंसारख्या चर्चित वकिलाच्या कार्यालयातच डल्ला मारल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोण आहेत असीम सरोदे? असीम सरोदे हे एक नामवंत वकील आहेत. त्यांचा भारतीय संविधान व कायद्याचा अभ्यास दांडगा आहे. ते सातत्याने राज्यासह देशभरातील विविध सामाजिक व राजकीय मुद्यावर आपले परखड मत मांडत असतात. मानवी हक्कांवरही त्यांचा सखोल अभ्यास आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण बार असोसिएशनचे ते पुण्याचे अध्यक्ष आहेत. ते सध्या शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत आपली बाजू मांडत आहेत. एवढेच नाही तर संसदेत घुसखोरी करून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडणाऱ्या घटनेतील आरोपी असणाऱ्या अमोल शिंदे नामक तरुणालाही ते कायदेशीर मदत पुरवत आहेत. हे ही वाचा… फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने राजकारण सोडले:'आता मला थांबायचंय' म्हणत संदीप जोशी यांचा तडकाफडकी राजकीय संन्यास भाजप नेते तथा विधानपरिषदेचे सदस्य संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सध्याची राजकीय संस्कृती, पक्षांतर तथा निष्ठावान कार्यकर्त्यांवर होणारा कथित अन्याय यावर परखड मत व्यक्त करत 13 मे रोजी आपल्या आमदारकीची मुदत संपल्यानंतर कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने राजकारण सोडणे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 11:05 am

फडणवीसांच्या जवळच्या आमदाराने राजकारण सोडले:'आता मला थांबायचंय' म्हणत संदीप जोशी यांचा तडकाफडकी राजकीय संन्यास

भाजप नेते तथा विधानपरिषदेचे सदस्य संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सध्याची राजकीय संस्कृती, पक्षांतर तथा निष्ठावान कार्यकर्त्यांवर होणारा कथित अन्याय यावर परखड मत व्यक्त करत 13 मे रोजी आपल्या आमदारकीची मुदत संपल्यानंतर कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने राजकारण सोडणे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. खाली वाचा संदीप जोशींचे पत्र जशास तसेच आमदार संदीप जोशी आपल्या पत्रात म्हणतात, नमस्कार, हे पत्र लिहिण्याचा निर्णय सहज घेतलेला नाही. राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती. मात्र आज सत्तेसाठी सुरू असलेले पक्षांतर, संधीसाधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे. मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कुणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजही मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो, पण हे चित्र पाहता आता आपणच थांबावे, असा विचार मनात पक्का होत गेला आहे. आणि तोच निर्णय या पत्रातून मांडत आहे. मी आता 55 वर्षांचा झालो आहे. स्वतःची जागा रिक्त करणे आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणे हे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या पुढील राजकीय वाटचालीला मी पूर्ण विचारांती पूर्णविराम देत आहे. पक्षाने मला मोठे केले याची मला जाणीव आहे. त्यामुळे या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून मी आज हा निर्णय जाहीर करीत आहे. माझ्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत, अर्थात आमदारकी, 13 मे रोजी संपुष्टात येत आहे. ही मुदत पक्षाने दिलेली जबाबदारी समजून मी पूर्ण करणार आहे. आमदार म्हणून माझ्यावर असलेली सर्व घटनात्मक, नैतिक आणि सार्वजनिक कर्तव्ये मी पूर्ण जबाबदारीने पार पाडेन. 13 मे नंतर पक्षाला मी आमदारकी मागणार नाही किंवा पक्षाने दिली तरी नम्रपणे त्यास नकार देईन. एखाद्या सामान्य, तरुण कार्यकर्त्याला अथवा पक्ष निर्णय घेईल त्या व्यक्तीला ती द्यावी. 13 मे नंतर मी संपूर्णपणे सक्रीय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय कोणत्याही क्षणिक भावनेतून नाही, तर सखोल विचारांती घेतलेला आहे. यापुढे मी सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ता म्हणून आयुष्य जगेन आणि सर्वसामान्यांची सेवा आणि त्यांच्यासाठी कार्य करत राहीन. राजकारणातून निवृत्त होण्याचा हा निर्णय माझ्या कुटुंबासाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या स्नेहीजनांसाठी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी धक्का देणारा आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. या सर्वांची मी मनापासून माफी मागतो आणि अत्यंत नम्रपणे हा निर्णय जाहीर करतो. राजकारण हे माझ्या आयुष्यातील एक निमित्त होते. या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या निभावण्याची संधी मिळाली. हे कार्य मात्र पुढेही अविरत सुरू राहील. कोरोनाच्या काळात एकल पालकत्त्व नशिबी आलेल्या बहिणींसाठीचा ‘सोबत पालकत्व प्रकल्प’, नागपुरात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठीचा ‘दीनदयाल थाळी प्रकल्प’, मोहगाव झिल्पी येथील गोसेवा प्रकल्प, श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर हे सामाजिक प्रकल्प, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना, महाराष्ट्र राज्य ॲम्युचर हॉकी संघटना, महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना, नागपूर बॉडी बिल्डिंग असोसिएशन, खासदार क्रीडा महोत्सव या क्रीडा क्षेत्रातील विविध पदांना न्याय देईन, तरुण खेळाडूंसोबत उभा राहून त्यांना प्रोत्साहन देईन. काळ कोणासाठी थांबत नसतो. तो पुढे जातच राहतो. मात्र त्या काळातील काही क्षण आपल्याला आतून हादरवतात. त्या क्षणी घेतलेला निर्णय आपल्याला स्वतःशी प्रामाणिक ठेवतो. इतरांना नाही, किमान स्वतःला न्याय देता आला, तरच जगणे अर्थपूर्ण ठरते, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि तोच निर्णय आज मी घेतला आहे. कुटुंबानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माझ्यावर संस्कार केले. मला घडवले. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकत राजकारणात अनेक संधी दिल्या. या सामान्य कार्यकर्त्याला चार वेळा नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधान परिषदेचे सदस्य अशी जबाबदारी देत सन्मान दिला. याबद्दल मी भारतीय जनता पार्टी आणि शीर्षस्थ नेतृत्वाचा कायम ऋणी राहीन. राजकारणात राहिलो तर पुढेही संधी मिळतील, याची मला खात्री आहे. कारण एक सामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान बनू शकतो, हे केवळ भाजपमध्ये शक्य आहे, हे मी अभिमानाने सांगतो. मात्र माझ्या असण्यामुळे कुठल्याही सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये, हे माझे प्रामाणिक मत आहे. आणि नसण्यामुळे कोणाचे काहीही अडणार नाही, हे अंतिम सत्य आहे. म्हणूनच अधिक काही न बोलता, आज मी हा निर्णय घेत आहे. शेवटी एवढेच… _*कुर्सी नहीं, क़ीमत बचाने चला हूँ,*__*शोर नहीं, सुकून चुनने चला हूँ।*__*किसी और की राह रोशन हो सके,*_*_इसलिए ख़ुद एक क़दम पीछे हटा हूँ।*_ आता मी थांबतोय. धन्यवाद मित्रांनो, असे संदीप जोशी यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 10:47 am

मुंबईत महापौर बसवणे सहज शक्य नाही:भाजप विजयोत्सव करत असला, तरी त्यांचा विजय झालेला नाही - संजय राऊत

मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत, याचा अर्थ मुंबईचा महापौर कोण असावा हे दिल्लीतून आधीच ठरवण्यात आले आहे. यामध्ये केवळ भाजपच नाही, तर गौतम अदानी सुद्धा निर्णय घेणार आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली. मुंबईकरांनी दिलेले आकडे पाहता महापौर बसवणे इतके सोपे नाही, असेही ते म्हणाले. शिवाय महापौरपदासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचे वृत्त संजय राऊत यांनी फेटाळून लावले. मोदी आपल्या भाषणात म्हणतात की, ज्या मुंबईत काँग्रसेचा जन्म झाला, त्या मुंबईत काँग्रेसचा आम्ही पराभव केला. मोदी यांना राजकीय इतिहासाचे भान नाही. गेली किमान २५ वर्षे या मुंबईवर शिवसेनेचेच राज्य आहे. त्यामुळे काँग्रेस महाराष्ट्रात जरी असली, तर मुंबईत शिवसेना होती. तेव्हा मोदींचे भाषण लिहिणाऱ्या माणसांच्या इतिहासाचे भान कच्चे आहे, असे संजय राऊत म्हणाले. आम्ही सध्या मजा बघतोय महापौर पदाच्या शर्यतीत उबाठा पक्ष आहे की, विरोधी पक्षात बसण्याचे ठरवलंय? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. ते म्हणाले, अजुन आम्ही काहीच ठरवले नाही. आता आम्ही फक्त मजा बघत आहोत. कुणी पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. माझ्या माहितीप्रमाणे भाजपच्या नगरसेवकांना देखील कुठेतरी हलवत आहेत. कोण कोणाला घाबरतंय? सरकार त्यांचे आहे. मुख्यमंत्री दावोसमध्ये बसून मुंबईकडे लक्ष ठेवत आहेत. आमचे नगरसेवक आपापल्या घरी आहेत. त्यांची बैठक मातोश्रीवरच होत आहे. पण तुमचे मुंबईतील, केडीएमसीतील नगरसेवक डांबून का ठेवावे लागले? याचे उत्तर शिंदेनी द्यायला पाहिजे. कदाचित मराठी पंतप्रधान बनतोय… संजय राऊत पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री फडणवीसांचे दावोसमध्ये पंतप्रधानांसारखे स्वागत करण्यात आले. ही चांगली गोष्ट आहे. एका मराठी माणूस म्हणून फडणवीस यांची पंतप्रधानपदाकडे पावले पडत असतील, तर मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमानच आहे. त्यांनी दिल्लीत जावे, पंतप्रधानपदावर दावा ठोकावा. महानगरपालिका, नगरपालिका जिंकल्या. दावोसमध्ये त्यांचे प्रचंड स्वागत झाले. कोणत्या मुख्यमंत्र्यांचे अशाप्रकारचे स्वागत मी आतापर्यंत पाहिले नाही. नवीन प्रथा सुरू झालेली आहे. त्यामुळे आमच्या आशा पल्लवीत झाल्यात की, देशाला मराठी पंतप्रधान मिळतो.” ठाकरे अन् फडणवीसांची कोणतीही चर्चा नाही मुंबईच्या महापौरपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, अशी कोणतीही चर्चा झाली नाही. ठाकरे-भाजपात बोलणी सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सगळ्या वृत्तपत्रातील बातम्या आहेत. आम्ही सूत्रांवर विश्वास ठेवत नाही. शिंदेंसाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू एकनाथ शिंदेंना महापौरपदासाठी दिल्लीतून चावी लावली जात आहे. मुंबईत भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांचा महापौर होऊ नये, यासाठी दिल्लीतून प्रयत्न सुरू आहेत, असा दावाही संजय राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.

दिव्यमराठी भास्कर 19 Jan 2026 10:34 am