SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
... ...View News by News Source

लातूरच्या सुरक्षिततेसाठी काँग्रेस पक्ष मैदानात

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने सीमा ओलांडली असून, सामान्य नागरिक दहशतीच्या छायेखाली वावरत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने सोमवार दि. २ फेब्रुवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. यावेळी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख […] The post लातूरच्या सुरक्षिततेसाठी काँग्रेस पक्ष मैदानात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 11:50 pm

लातूरच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आणि शाश्वत आराखडा जनतेसमोर मांडला

लातूर : प्रतिनिधी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी काँग्रेस आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करत लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाचा स्पष्ट रोडमॅप जनतेसमोर मांडला आहे. १ फेब्रुवारी रोजी महापूर जिल्हा परिषद गटातील प्रचार सभेदरम्यान काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत या जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. या जाहीरनाम्यात […] The post लातूरच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आणि शाश्वत आराखडा जनतेसमोर मांडला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 11:48 pm

अल्टिमेटम संपला, रोहयोच्या कार्यालयात शुकशुकाट 

लातूर : प्रतिनिधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. या कर्मचा-यांनी मागण्या मंजूर कराव्यात म्हणून शासनाला अनेक अल्टीमेटम दिले, पण मागण्या मंजूर न झाल्याने लातूर जिल्हयासह महाराष्ट्रातील रोहयोचे कंत्राटी कर्मचारी मागण्या मंजुर कराव्यात या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मौदानावर आंदोलनासाठी बसले आहेत. त्यामुळे रोहयोच्या जिल्हा […] The post अल्टिमेटम संपला, रोहयोच्या कार्यालयात शुकशुकाट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 11:47 pm

काँग्रेस पदाधिका-यांनी परिवर्तन घडविण्यासाठी सज्ज व्हावे

औसा : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सत्ता काळातील महागाई, बेकारी, भ्रष्टाचार, कमिशनखोरी याला जनता कंटाळली असल्याचे सांगून ‘सिंहासन खाली करो कि जनता आती है’, या रामधारीसिंह (दिनकर) यांच्या कवितेचा संदर्भ देत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पदाधिका-यांनी परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज व्हावे, जनता तुमच्या सोबत असल्याचे औसा तालुक्यातील उजनी येथील प्रचार सभेत […] The post काँग्रेस पदाधिका-यांनी परिवर्तन घडविण्यासाठी सज्ज व्हावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 11:46 pm

जनतेचे हक्क आणि सेवेसाठी निवडणूक रिंगणात : अ‍ॅड. कोळगावे

चाकूर : प्रतिनिधी जनतेच्या हक्कासाठी ही जिल्हा परिषद निवडणूक लढवित असून, सत्तेसाठी नाही. सेवेसाठी राजकारण असून शिक्षण, रोजगार, रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत सोयी सुविधांना प्राधान्य असेल, या माध्यमातून वडवळ गट विकसित करणार आहे. सहकारमहर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार […] The post जनतेचे हक्क आणि सेवेसाठी निवडणूक रिंगणात : अ‍ॅड. कोळगावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 11:43 pm

जनसेवा काँग्रेसचे धोरण तर भ्रष्टाचार ही भाजपची निती

लातूर (बोरी) : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाला जनसेवेचा मोठा आणि गौरवशाली वारसा असून देशाच्या सर्वांगीण विकासात काँग्रेसचे योगदान बहुमोल आहे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी केले. लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बोरी येथे आयोजित सभेत […] The post जनसेवा काँग्रेसचे धोरण तर भ्रष्टाचार ही भाजपची निती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 11:42 pm

बोरिवलीत भाजप आमदाराचा ड्रग्ज अड्ड्यांवर छापा:महिला कार्यकर्त्यांसह मोठी कारवाई

बोरिवली रेल्वे स्थानक परिसरात वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्याविरोधात स्थानिक आमदार संजय उपाध्याय यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. उपाध्याय यांनी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांसह या परिसरातील विविध संशयास्पद ठिकाणांवर स्वतः छापे टाकून गांजा आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांना रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. कारवाईचे व्हिडिओ… ​या धाडसत्रादरम्यान पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका विशिष्ट समुदायातील व्यक्तींचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्यात गृहखात्याची जबाबदारी भाजपकडेच असताना स्वतः सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला रस्त्यावर उतरून ही कारवाई करावी लागल्याने स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 10:34 pm

मुली दरिद्री मुलांच्या मागे : इंदूरीकर महाराज

अकोला : तरुणांसह शेतक-यांच्या पोरांना प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी एक तळमळीचं आवाहन केलं आहे. पोरांनो, मोर्चे आणि दंगलीच्या भानगडीत पडू नका, तुमचा वापर फक्त ‘यूज आणि थ्रो’साठी होतोय असे इंदुरीकर महाराज म्हणाले. आज प्रत्येक कामामध्ये पोलिस व्हेरिफिकेशन आवश्यक आहे, अशा दंगलीत तुम्ही दिसला तर त्यासाठी १० वर्षांची शिक्षा आहे असेही इंदुरीकर महाराज म्हणाले. इंदुरीकर महाराज […] The post मुली दरिद्री मुलांच्या मागे : इंदूरीकर महाराज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 10:02 pm

आठवड्यातील मंगळवारची कॅबिनेट बैठक रद्द

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादीसह राज्याच्या राजकारणातही मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांतही या दुर्घटनेचा आणि अजित पवारांच्या नसण्याचा परिणाम होईल, अशी चर्चा स्थानिक स्तरावर होत आहे. दुसरीकडे पवार कुटुंबीय देखील दु:खातून सावरत राजकीय पाऊले टाकत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर […] The post आठवड्यातील मंगळवारची कॅबिनेट बैठक रद्द appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 9:46 pm

मुंबईत भाजपाला पाठिंबा नाही

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिका महापौरपदासाठी मनसे सत्ताधारी भाजपाला पाठिंबा देणार अशी जोरदार चर्चा सोमवार सकाळपासून सुरू झाली होती. मात्र खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच या अफवांचे खंडन केले आहे. मी सांगतो ना, नाही म्हणजे नाही. अशा शब्दांत राज ठाकरे यांनी ही शक्यता फेटाळून लावली. मुंबई महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांची सध्या गटनोंदणी सुरू आहे. या […] The post मुंबईत भाजपाला पाठिंबा नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 9:35 pm

जि. प., पं. स. निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला भरपगारी सुटी

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना आणि कारखान्यांमधील कामगार कर्मचा-यांना या दिवशी सुटी किंवा सवलत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. उद्योग, उर्जा, कामगार आणि […] The post जि. प., पं. स. निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला भरपगारी सुटी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 9:33 pm

अपघात की घातपात…भाजपच्या घोटाळ्याच्या फाईलवर बोलताच अजितदादांचा अपघाती मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल राष्ट्रवादीतल्याच काही लोकांनी शंकेचा सूर लावलेला असताना, शिवसेना(ठाकरे) खासदार संजय राऊत यांनीही आज पत्रकार परिषदेत व राज्यसभेत अजित दादांच्या अपघाती निधनाबद्दल शंका व्यक्त करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. भाजपच्या घोटाळ्याची फाईल आपल्याकडे असून ती आपण उघड करणार असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी १५ जानेवारीला केले […] The post अपघात की घातपात…भाजपच्या घोटाळ्याच्या फाईलवर बोलताच अजितदादांचा अपघाती मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 9:30 pm

डॉ. सोंळके, जुनघरे, पंजाबी 'वॉल ऑफ फेम'वर सन्मानित:सीईओंच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव

अमरावती जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांच्या संकल्पनेतून 'वॉल ऑफ फेम' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यासाठी २६ जानेवारीपासून हा उपक्रम राबवला जात आहे. या महिन्यात डॉ. धीरज सोळंके, वाहनचालक ज्ञानेश्वर जुनघरे आणि बांधकाम विभागाचे सुरय्या पंजाबी यांचा सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची दर महिन्याला निवड केली जाते. सीईओंच्या हस्ते या तिन्ही कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून, त्यांची छायाचित्रे 'वॉल ऑफ फेम'वर झळकवण्यात आली आहेत. या निवडीसाठी सर्व खातेप्रमुखांकडून त्यांच्या अधिनस्थ कर्मचाऱ्यांचा मासिक कार्यमूल्यांकन अहवाल मागवला जातो. त्यातूनच उत्कृष्ट तीन कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांची छायाचित्रे 'वॉल ऑफ फेम'वर प्रसिद्ध केली जातात. संबंधित कर्मचाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित खातेप्रमुखांच्या हस्ते गौरवही केला जातो. जानेवारी २०२६ मधील कार्यमूल्यांकनाच्या आधारे भातकुली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धीरज सोळंके, वाहन चालक ज्ञानेश्वर जुनघरे आणि बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यक सुरैय्या पंजाबी यांची निवड झाली आहे. या तिन्ही कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी अतिशय कार्यक्षमतेने पार पाडली असून, उत्कृष्ट काम केले आहे. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्कृष्ट कामासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. यामुळे प्रत्येक विभागाचे काम अधिक प्रभावी होणार असून, जिल्हा परिषद ग्रामीण भागातील नागरिकांसाठी काम करणारी यंत्रणा असल्याने अप्रत्यक्षपणे सामान्य नागरिकांनाही याचा मोठा फायदा मिळेल. या उपक्रमाचे दूरगामी सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 9:23 pm

मोर्शी-अमरावती महामार्गावर बसच्या धडकेत मजूर ठार:बसचालकाने एसटी बस शिरखेड पोलीस ठाण्यात जमा केली; तपास सुरू

मोर्शी-अमरावती महामार्गावर सावरखेड ते गोराळा दरम्यान एका एसटी बसच्या धडकेत एका मजुराचा जागीच मृत्यू झाला. मोनू उईके (वय ४५, रा. पिंपरीढाणा, ता. भैसदेही, जि. बैतुल, मध्यप्रदेश) असे मृत मजुराचे नाव आहे. या घटनेनंतर बसचालक विशाल अमझरे याने अपघातग्रस्त बस शिरखेड पोलीस ठाण्यात जमा केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोर्शी तालुक्यातील सावरखेड येथील मोर्शी-अमरावती महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ थ्रेशर मशीनवर काम करणारे काही मजूर ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरण्यासाठी थांबले होते. मोनू उईके हा त्या वेळी मुख्य रस्त्यावर उभा होता. अमरावतीहून मोर्शीकडे जाणाऱ्या एका एसटी बसने त्याला धडक दिली. या धडकेत मोनू उईके याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याला तात्काळ मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर बसचालक विशाल अमझरे याने स्वतः अपघातग्रस्त बस शिरखेड पोलीस ठाण्यात जमा केली. शिरखेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 9:22 pm

मंगळवारची कॅबिनेट बैठक रद्द:सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात कधी जाणार? तारीख ठरली

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेली राजकीय पोकळी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील त्याचे संभाव्य परिणाम चर्चेत असतानाच, पवार कुटुंब या दु:खातून सावरून नवी राजकीय जबाबदारी पेलताना दिसत आहे. नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या पदाची शपथ आता मंत्रालयात कधी जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु मंगळवारची मंत्रिमंडळाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात आता 9 फेब्रुवारी रोजी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र अजूनही शोकाकुल असून, त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाणी जनसागर लोटत आहे. बारामतीमध्ये अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर त्यांचे अस्थिकलश राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी पाठवण्यात आले आहेत. आज अनेक जिल्ह्यांत हे कलश पोहोचले असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने आपल्या लाडक्या नेत्याला अत्यंत भावूक वातावरणात श्रद्धांजली वाहिली. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. दुसरीकडे, बारामती येथील निवासस्थानी पवार कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या बारामतीतच असून त्या सांत्वनासाठी येणाऱ्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. दरम्यान, या दुःखद प्रसंगामुळे उद्या मंत्रालयात होणारी मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे या आठवड्यात कोणतीही कॅबिनेट बैठक होणार नसून, प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळ सध्या या मोठ्या धक्क्यातून सावरताना दिसत आहे. 9 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार मंत्रालयात जाणार राज्य मंत्रिमंडळाची नियमित मंगळवारी होणारी बैठक उद्या रद्द करण्यात आली असून, अजित पवारांचे दुःखद निधन आणि राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांची धामधूम यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणार का, या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार असून 9 फेब्रुवारी रोजी त्या मंत्रालयात उपस्थित होऊन आपला पदभार स्वीकारतील. दरम्यान, आपल्या लाडक्या नेत्याच्या निधनाने व्यथित झालेले कार्यकर्ते आणि नागरिक आजही मोठ्या संख्येने बारामतीत पवार कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी गर्दी करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 9:10 pm

अमरावती विद्यापीठात समता पॅनलचा एकतर्फी विजय:अजय देशमुख पुन्हा अध्यक्ष; सर्व 13 जागा जिंकल्या

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचारी संघाच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीत 'समता पॅनल'ने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. अजय देशमुख यांच्या नेतृत्वाखालील या पॅनलने सर्व १३ जागांवर एकतर्फी विजय मिळवत इतिहास रचला. या निवडणुकीत अजय देशमुख यांची पुन्हा अध्यक्षपदी, तर नरेंद्र घाटोळ यांची महासचिवपदी मोठ्या मताधिक्याने निवड झाली. एकूण २३७ कर्मचाऱ्यांपैकी २३१ कर्मचाऱ्यांनी (९७.४६ टक्के) मतदानाचा हक्क बजावला. विजयी उमेदवारांमध्ये अध्यक्ष व महासचिव यांच्याशिवाय उपाध्यक्ष प्रेम मंडपे (तृतीय श्रेणी) व पंकज ठाकूर (चतुर्थ श्रेणी), सहसचिव विजय चवरे व शशिभूषण हुसे, कोषाध्यक्ष योगेश कांत यांचा समावेश आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून मयूर बोरकर, मंगेश रोंघे, निलेश वंदे, निनाद देशपांडे, सतीश लोखंडे आणि किरण नांदाणे यांची निवड झाली. निकाल जाहीर होताच समता पॅनलच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि ढोल-ताशांच्या गजरात विजयाचा गुलाल उधळला. विजयी उमेदवारांची विद्यापीठ परिसरातून वाजत-गाजत विजय रॅली काढण्यात आली, ज्याचा समारोप संत गाडगे बाबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. या ऐतिहासिक विजयाबद्दल कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. नितीन कोळी, वित्त व लेखाधिकारी सी.ए. पुष्कर देशपांडे, उपकुलसचिव मंगेश वरखेडे, डॉ. दादाराव चव्हाण यांच्यासह राज्यातील विविध कर्मचारी संघटनांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे. या निवडणुकीसाठी ऋतुराज देशमुख यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले, तर संजय खोब्रागडे, मोहन इंगळे, श्रीकांत मोहदरकर यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून सहकार्य केले. रवींद्र सयाम यांनी मतदान अधिकारी आणि अनिल मेश्राम यांनी मतमोजणी अधिकारी म्हणून आपली जबाबदारी चोख पार पाडली.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 8:51 pm

एकनाथ शिंदेंकडून लाडक्या बहिणींना मोठी संधी:आरक्षण नसतानाही तीनही महापालिकांवर 'महिलाराज', राजकीय वर्तुळात चर्चा

ठाणे जिल्ह्यातील महापालिका निवडणुकांनंतर आता महापौर निवडीचे वारे वाहू लागले असून, शिवसेनेचे पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या तिन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये लाडक्या बहिणींना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, महापौरपदासाठी महिला आरक्षण नसतानाही शिंदे यांनी आपल्या 'लाडक्या बहिणीं'वर विश्वास टाकत ठाण्यातून शर्मिला पिंपळोलकर-गायकवाड, कल्याण-डोंबिवलीतून हर्षाली थविल चौधरी आणि उल्हासनगरमधून अश्विनी निकम यांची नावे निश्चित केली आहेत. सत्तेच्या केंद्रस्थानी महिलांना संधी देऊन आणि त्यांचे हात बळकट करून एकनाथ शिंदे यांनी या निवडीच्या माध्यमातून राजकीय वर्तुळात नवा पायंडा पाडला आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा सकारात्मक प्रभाव आणि महिला मतदारांनी शिवसेनेला दिलेला भरघोस प्रतिसाद लक्षात घेता, महापौर निवडीत महिलांनाच प्राधान्य देण्याची आग्रही भूमिका खासदार श्रीकांत शिंदे यांनी मांडली होती. त्यांच्या या प्रस्तावाला एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवल्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या सत्तेची धुरा महिलांच्या हाती येणार आहे. विशेष म्हणजे, या महापालिकांच्या इतिहासात आरक्षण नसतानाही केवळ गुणवत्तेवर आणि राजकीय प्रतिनिधित्वावर महिलांना महापौरपदाची संधी मिळण्याची ही पहिलीच वेळ असून, या निर्णयामुळे सत्तेच्या पटलावर खऱ्या अर्थाने 'महिलाराज' अवतरल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या निकालातून महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झाले होते, मात्र महापौरपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता होती. या तिन्ही महापालिकांमध्ये महापौरपद महिलांसाठी आरक्षित नसल्याने, सहाजिकच पुरुष नगरसेवकांनाच संधी मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी सर्व राजकीय अंदाज चुकीचे ठरवत या महत्त्वाच्या शहरांची धुरा आपल्या पक्षाच्या 'लाडक्या बहिणीं'कडे सोपवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी नेहमीच महिला सक्षमीकरणाला प्राधान्य दिले असून, सत्तेत महिलांचा वाटा केवळ आरक्षणापुरता मर्यादित नसावा, असा विचार या निर्णयामागे आहे. महिलांना संधी मिळण्यासाठी आरक्षणाची वाट न पाहता, त्यांच्या कुवतीनुसार आणि कर्तृत्वानुसार त्यांना सर्वोच्च पदे मिळावीत या हेतूनेच या तिन्ही महापालिकांच्या महापौरपदासाठी महिला नगरसेविकांची निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे राजकीय स्थान अधिक बळकट झाले असून सर्वत्र या निर्णयाचे स्वागत होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 8:43 pm

बंगालची जाणीवपूर्वक बदनामी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत पाऊल ठेवताच केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवर जोरदार निशाणा साधला आहे. चाणक्यपुरी येथील बंग भवन येथे जाऊन त्या बंगालमधून आलेल्या लोकांची भेट घेणार आहेत आणि दिल्ली पोलिसांकडून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती घेणार आहेत. बंगालला जाणीवपूर्वक बदनाम केले जात असून केंद्रीय यंत्रणा भाजपाच्या इशा-यावर काम […] The post बंगालची जाणीवपूर्वक बदनामी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 7:48 pm

चिनी सैन्य चार टँकसह भारतात घुसले

नवी दिल्ली : सध्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना डोकलामचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर संसदेत मोठा गदारोळ सुरू झाला. राहुल गांधी यांनी डोकलामसंदर्भात भाष्य करताच, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणात या मुद्दाचा कसलाही उल्लेख नाही, असे म्हणाले. राहुल गांधींनी संसदेत […] The post चिनी सैन्य चार टँकसह भारतात घुसले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 7:46 pm

शेख हसीना यांना १० वर्षांचा तुरुंगवास

ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ढाका येथील एका विशेष न्यायालयाने पूर्बाचल प्लॉट घोटाळा प्रकरणात शेख हसीना यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे, या घोटाळ्यात केवळ हसीनाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही दणका बसला असून, त्यांची भाची आणि ब्रिटिश खासदार ट्यूलिप सिद्दीक यांना ४ […] The post शेख हसीना यांना १० वर्षांचा तुरुंगवास appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 7:45 pm

सरकारच्या तिजोरीची दारोमदार ‘पान मसाला’वर

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये पान मसाला उत्पादनावर आकारण्यात आलेल्या आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकरातून सरकारला १४,००० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. पान मसाल्यावर १ फेब्रुवारीपासून आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर लागू करण्यात आला आहे, जो ४० टक्के जीएसटी व्यतिरिक्त आहे. पान मसाला उत्पादन युनिटच्या उत्पादन क्षमतेच्या आधारे या उपकराची गणना केली […] The post सरकारच्या तिजोरीची दारोमदार ‘पान मसाला’वर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 7:44 pm

बलूचची महिला आर्मी पडली पाकवर भारी

इस्लामाबाद : बलूच लिबरेशन आर्मीने रविवारी दावा केला की, ऑपरेशन हेरॉफच्या दुस-या टप्प्यात बलूचिस्तानच्या अनेक भागात केलेले हल्ले ४० तासापेक्षा अधिकवेळ सुरु होते. संघटनेने ग्वादर येथे झालेल्या धुमश्चक्रीचा व्हीडीओ सुद्धा जारी केला. यात एक महिला फिदायीन फायटर दिसत आहे. बीएलएचा प्रवक्ता जीयंद बलूचनुसार संघटनेने खरान, मस्तुंग, दलबंदीन, तुंप आणि पसनी आपले ठरवलेले लक्ष्य साध्य केलय […] The post बलूचची महिला आर्मी पडली पाकवर भारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 7:41 pm

अर्थव्यवस्थेचे बदललेले समीकरण धोकादायक

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकताच भारताला मोठा धोक्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने हा टॅरिफ लावण्यात आला होता. भारताने आता पूर्णपणे रशियाकडून तेल खरेदी बंद केली. मात्र, असे असतानाही अमेरिकेने टॅरिफ कमी केला नाही. […] The post अर्थव्यवस्थेचे बदललेले समीकरण धोकादायक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 7:32 pm

भरधाव टँकरची दुचाकीला धडक:उमरखेडच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वरिष्ठ लिपीकाचा मृत्यू, भाटेगाव शिवरातील घटना

डोंगरकडा ते वारंगाफाटा मार्गावर भाटेगाव शिवारात भरधाव टँकरने दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ता. २ सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी तातडीने टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्हयातील गुट्टेवाडी येथील रहिवासी असलेले शिवाजी बापूराव गुट्टे (३०) हे उमरखेड (जि. यवतमाळ) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वरिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत होते. दोन दिवस कार्यालयास सुट्टी असल्यामुळे ते दुचाकी वाहनावर त्यांच्या गावी गुट्टेवाडी येथे कुटुंबाला भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर आज सकाळी ते परत उमरखेडकडे निघाले होते. त्यांचे दुचाकी वाहन डोंगरकडा ते वारंगा फाटा मार्गावर भाटेगाव शिवारात आले असतांना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात शिवाजी हे रस्त्यावर कोसळले. अपघातात ते गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश घोटके, जमादार संतोष नागरगोजे, शिवाजी पवार यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी शिवाजी यांना तातडीने उपचारासाठी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. या अपघातानंतर पोलिसांनी तातडीने टँकर चालकास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत शिवाजी यांच्या पश्‍चात आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 7:31 pm

भारत-पाक सामना होणार?

नवी दिल्ली : टी२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत साखळी फेरीत भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना १५ फेब्रुवारीला ठरल्याप्रमाणे आहे. मात्र या सामन्यावर पाकिस्तानने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे. यानंतर आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला थेट इशारा दिला आहे. जर का पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असे असताना पाकिस्तानचा […] The post भारत-पाक सामना होणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 7:31 pm

अमेरिकेने हल्ला केल्यास मध्य-पूर्वेत युद्ध करणार

तेहरान : इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. इराणवर अमेरिकेने कोणताही लष्करी हल्ला केला, तर मध्य- पूर्वेत प्रादेशिक युद्ध सुरू करणार व यामुळे संपूर्ण प्रदेशात व्यापक संघर्ष पसरेल, असे […] The post अमेरिकेने हल्ला केल्यास मध्य-पूर्वेत युद्ध करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 7:29 pm

मेक्सिकोत सापडले १४०० वर्षे जुने थडगे

मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या दक्षिणेकडील भागात पुरातत्वशास्त्रज्ञांना १४०० वर्षे जुनी, कोरीव कामांनी सजलेली झापोटेक संस्कृतीचे एक थडगे सापडले आहे. मेक्सिकोच्या राष्ट्रीय मानववंशशास्त्र आणि इतिहास संस्थेने गेल्या आठवड्यात या संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनानुसार, ओक्साका राज्यातील सॅन पाब्लो हुइट्झो येथे असलेली ही कबर सुमारे ६०० वर्षांपूर्वी झापोटेक संस्कृतीने बांधली होती असे स्पष्ट होते. या […] The post मेक्सिकोत सापडले १४०० वर्षे जुने थडगे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 7:27 pm

दलाई लामांनी जिंकला ग्रॅमी पुरस्कार

नवी दिल्ली : तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी वयाच्या ९० व्या वर्षी ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. ६८ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात त्यांनी पुरस्कारावर आपली मोहोर उमटवत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ९० वर्षीय दलाई लामा यांना त्यांच्या मेडिटेशन: द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलिनेस द दलाई लामा या ऑडिओ प्रकल्पासाठी हा सन्मान मिळाला. त्यांना सर्वोत्कृष्ट […] The post दलाई लामांनी जिंकला ग्रॅमी पुरस्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 7:25 pm

सरकारी बँकातील विदेशी गुंतवणूक वाढणार

नवी दिल्ली : सरकारी बँकांमधील थेट विदेशी गुंतवणुकीची (एफडीआय) मर्यादा २० वरून ४९ टक्क्यांवर वाढवण्यात येणार आहे. सरकारने त्यासाठी आंतरमंत्रालयीन पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती वित्त सचिव एम. नागराजू यांनी दिली. वित्त मंत्रालय गेल्या काही महिन्यांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेशी (आरबीआय) याबाबत चर्चा करत आहे. अद्याप प्रस्ताव अंतिम झालेला नसल्याची माहिती याविषयाशी संबंधित अधिका-यांनी माध्यमांना दिली. […] The post सरकारी बँकातील विदेशी गुंतवणूक वाढणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 7:22 pm

मलंगगड यात्रा:जय मच्छिंद्र, जय मलंगच्या घोषणेने मलंगगड दुमदुमला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतले मच्छिंद्रनाथाचे दर्शन

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात असलेल्या मलंगगडावर आज माघ पौर्णिमेनिमित्त भक्तीचा महापूर लोटला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक मलंगगडाला भेट देऊन मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेनेच्या वतीने गडावर पारंपरिक पद्धतीने भगवा ध्वज फडकवण्यात आला. 'जय मच्छिंद्र, जय मलंग'च्या जयघोषाने अवघा परिसर भक्तीमय झाला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही मलंगगड यात्रा आजही त्याच जोमाने सुरू आहे. हे केवळ धार्मिक स्थळ नसून लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. मलंगगडावरील काही बांधकामाबाबत न्यायालयात प्रलंबीत असलेल्या प्रकरणात लवकरच अपेक्षित असलेला निर्णय येईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. रोपवेमुळे भाविकांना दिलासा हिंदुची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट असा जयघोष करीत राज्यभरातून तसेच परराज्यातून लाखो भाविक मलंगनाथाच्या दर्शनासाठी मलंगगडावर दाखल होतात. नाथांच्या समाधीचे दर्शन घेऊन् मलंग गडावर नाथांचा जयघोष दुमदुमतो. यावर्षीच्या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे नव्याने सुरू झालेली फ्युनिक्युलर (रोपवे) सेवा. या सेवेमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग भाविकांना गडावर चढणे सुलभ झाले आहे. राज्यभरातून आणि परदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतेय, ही आनंदाची बाब आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले. हिंदू-मुस्लिम दोन्ही धर्मीयांची श्रद्धा कल्याणपासून ११ किमी अंतरावर असलेले मलंगगड हे हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मीयांच्या आस्थेचे केंद्र आहे. मुस्लिमांसाठी ही १२ व्या शतकातील सुफी संत हाजी अब्दुल रहमान (हाजी मलंग बाबा) यांची दर्गा आहे, तर नाथ संप्रदायाचे अनुयायी याला मच्छिंद्रनाथांचे समाधी स्थळ मानतात. अशा दोन्ही दाव्यांमुळे हा गड नेहमीच चर्चेत असतो. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मात्र, दरवर्षी माघ पौर्णिमेच्या निमित्ताने शिवसेनेसह हिंदु संघटना गडावर उत्सव साजरा करतात. यावेळचा भक्तिमय माहौल सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेत असतो. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 7:21 pm

भाजप, काँग्रेसकडून महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल:नागपूर मनपा निवडणूक शुक्रवारी; नीता ठाकरे, स्नेहल ठाकरे रिंगणात

नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आज (गुरुवारी) आपले अर्ज दाखल केले. महापौरपदासाठी भाजपने नगरसेविका नीता ठाकरे यांना, तर काँग्रेसने नगरसेविका स्नेहल ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. उपमहापौरपदासाठी भाजपच्या लीला हाथीबेड आणि काँग्रेसचे विवेक निकोसे यांनी अर्ज भरले आहेत. या पदांसाठीची निवडणूक ६ फेब्रुवारी रोजी कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी ११ वाजता होणार असून, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर पीठासीन अधिकारी असतील. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समितीच्या सभागृहात नागपूर महानगरपालिकेच्या सचिव डॉ. रंजना लाडे यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज सादर केले. भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार नीता ठाकरे (प्रभाग क्र. २८ क) यांनी दोन प्रतींमध्ये अर्ज दाखल केले. त्यांचे सूचक म्हणून नरेंद्र (बाल्या) बोरकर आणि माया इवनाते होते, तर अनुमोदक म्हणून अश्विनी जिचकार आणि निरंजना पाटील यांनी स्वाक्षरी केली. उपमहापौरपदाच्या भाजप उमेदवार लीला हाथीबेड (प्रभाग क्र. २९ क) यांनीही दोन उमेदवारी अर्ज भरले. मंगला खेकरे आणि विनोद कन्हेरे हे त्यांचे सूचक होते, तर कल्पक भनारकर आणि मनीषा अतकरे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष आणि माजी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, माजी आमदार अनिल सोले, माजी आमदार गिरीश व्यास, भाजपचे गटनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह अनेक नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. काँग्रेसकडून महापौरपदासाठी नगरसेविका स्नेहल ठाकरे (प्रभाग क्र. ११ ब) यांनी अर्ज दाखल केला. सरस्वती सलामे सूचक होत्या, तर मंजु चाचेरकर यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे उमेदवार विवेक निकोसे (प्रभाग क्र. ९ अ) यांनी अर्ज भरला. प्रमोद जोगिंदर सिंग ठाकूर हे त्यांचे सूचक होते, तर प्रगती यादव यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. यावेळी काँग्रेसचे गटनेते संजय महाकाळकर, नगरसेविका सरस्वती सलामे, नगरसेविका मंजु चाचेरकर आणि नगरसेवक प्रमोद जोगिंदर सिंग ठाकूर उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 6:41 pm

अजित पवार-जयंत पाटलांमधील बैठकीचा तपशील समोर:सुळे केंद्रात-पाटील राज्यात, रोहित पवारही मंत्रिमंडळात; अन् पक्षाची सूत्रे दादांकडे!

दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत पडद्यामागे काय चर्चा झाली होती, याचे काही तपशील समोर आल्याने राजकीय वर्तुळात नव्याने खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विलीनीकरणानंतर एकत्रित पक्षाने महायुतीत सहभागी व्हावे, असा प्राथमिक आराखडा चर्चेत होता. या आराखड्यात केंद्रात सुप्रिया सुळे यांना मंत्रिपद आणि राज्य मंत्रिमंडळात शरद पवार गटातील एका नेत्याला स्थान देण्याचा प्रस्ताव मांडला गेला होता. तसेच, एकत्र येणाऱ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय शरद पवार घेतील, अशी रूपरेषा अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत चर्चिल्याचे सांगितले जाते. यातील मिळालेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद तर जयंत पाटील यांना राज्यात मंत्रिपद देण्यात येणार होते. तर रोहित पवार यांनाही राज्यात राज्यात राज्यमंत्री पद देण्यात येणार होते. इतकेच नाही तर नवीन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद हे खासदार अमोल कोल्हे यांच्याकडे सोपवण्यावर एकमत झाले होते. केंद्राची संपूर्ण जबाबदारी सुप्रिया सुळेंवर तर राज्यातील संपूर्ण जबाबदारी अजित पवारांकडे राहिल, असेही निश्चित झाले होते, अशी माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर या चर्चांना अधिक वेग आला. शरद पवार गटातील नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादींमध्ये विलिनीकरणाची अंतिम चर्चा झाल्याचा दावा केला. त्यासाठी जयंत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचा उल्लेख करण्यात येत आहे. या बैठकीत पुढील राजकीय दिशा ठरवण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुंबईतील जयंत पाटील यांच्या घरी 23 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत शरद पवार गटातील सुमारे 14 नेते उपस्थित होते आणि अजित पवार यांच्यासोबत जवळपास अडीच तास चर्चा झाली, अशी माहिती समोर आली आहे. या चर्चेत दोन्ही गटांनी एकत्र येऊन महायुतीत सहभागी होण्याचा पर्याय गांभीर्याने विचारात घेतल्याचे सांगितले जाते. या प्रस्तावात केंद्र आणि राज्यातील मंत्रिपदांची शक्यता, तसेच संघटनात्मक निर्णयप्रक्रियेची रूपरेषा यांचा समावेश होता. या आधी कराड येथे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात स्वतंत्र बैठक झाल्याचीही माहिती दिली जाते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार स्वतःच चर्चेची सूत्रे हाताळत होते, तर शरद पवार यांच्या बाजूने प्रमुख नेते चर्चेत सहभागी होत होते. विलिनीकरणानंतर पक्षरचना कशी असेल, निर्णयप्रक्रिया कोणाकडे असेल आणि महायुतीत जाण्याबाबतची भूमिका काय असेल, या मुद्द्यांवर चर्चा केंद्रित होती. दरम्यान, या चर्चांची माहिती अजित पवार गटातील काही वरिष्ठ नेत्यांना नव्हती, असा दावा केला जात आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना याबाबत माहिती झाल्यास काय होईल, असा प्रश्न उपस्थित झाला असता, मी पक्ष चालवतोय, मी बघून घेईन, अशा शब्दांत अजित पवारांनी ठाम भूमिका व्यक्त केल्याचे सांगितले जाते. यामुळे चर्चेची संवेदनशीलता आणि गोपनीयता अधोरेखित होत असल्याचे मानले जाते. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाकडून या सर्व दाव्यांना फेटाळण्यात येत आहे. विलिनीकरणाबाबत कोणतीही अंतिम चर्चा झाली नव्हती, अशी भूमिका त्या गटातील नेते मांडत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना अधिक धार आली आहे. शरद पवार गटाच्या दाव्यांमुळे आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. आधी भाजपला विचारावं लागेल - भुजबळ याच वेळी, छगन भुजबळ यांनी वेगळा मुद्दा उपस्थित करत, असं विलिनीकरण करायचं असेल तर आधी भाजपला विचारावं लागेल, असे विधान केले आहे. त्यामुळे या संभाव्य राजकीय समीकरणात भाजपची भूमिका काय असेल, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. पुढील काळात या दाव्यांवर अधिकृत भूमिका आणि नवीन घडामोडी समोर येतात का, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 6:39 pm

अजित पवारांचा मृत्यू संशयास्पद, उच्चस्तरीय चौकशी करा!:भाजपच्या घोटाळ्याच्या फाइलचा उल्लेख करत संजय राऊतांची राज्यसभेत मागणी

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चा सत्रात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचा मुद्दा उपस्थित करत या विमान अपघाताची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच केंद्र सरकारवर जोरदार आरोप केले. आज मला अजित पवारांची आठवण येत आहे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आम्ही सगळे अजूनही धक्क्यात आहोत, आम्हाला अजूनही कळत नाहीये की हे झाले कसे? अजित पवारांवर 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सरकारने केला होता. पण ते भारतीय जनता पक्षासोबत आले आणि पवित्र झाले, अशी टीका संजय राऊत यांनी केली. ... आणि 10 दिवसांनी अजित पवारांचा मृत्यू झाला पुढे संजय राऊत म्हणाले, 15 जानेवारी रोजी अजित पवारांनी एक वक्तव्य केले होते आणि भाजपला उद्देशून म्हटले होते की 'माझ्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप करत असाल तर त्यातला पैसा फक्त आम्हीच नाही खाल्ला, भाजपने सुद्धा या घोटाळ्यात पैसा खाल्ला आहे आणि त्यांची फाइल सुद्धा माझ्याकडे आहे'. हे त्यांनी 15 जानेवारी रोजी म्हटले होते आणि 10 दिवसांनी अजित पवारांचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. मी आरोप करत नाहीये, पण हा मृत्यू संशयास्पद आहे. मला जस्टीस लोया यांची सुद्धा आठवण आली संजय राऊत म्हणाले, अजित पवार हे नेहमी ती फाइल सोबत ठेवत होते. ते जेव्हा मुंबईहून निघाले होते, तेव्हा सुद्धा ती फाइल त्यांच्या सोबत होती. त्यानंतर अर्ध्या तासात त्यांचा मृत्यू होतो. याची चौकशी झाली पाहिजे. आता तर मला जस्टीस लोया यांची सुद्धा आठवण आली आहे. अजित पवारांचा मृत्यू पाहिल्यानंतर जस्टीस लोया यांची आठवण आली, असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारला आरोप केले. सोनम वांगचूक कुठे आहे? संजय राऊत यांनी संसदेत बोलताना सरकारवर देखील जोरदार आरोप केले. हे सरकार बेजबाबदार आहे. लोकशाही या देशात आता राहिलेली नाही. न्यायालय असो किंवा निवडणूक आयोग या सरकारी कंपन्या बनल्या आहेत. सोनम वांगचूक कुठे आहे? त्यांचा अपराध काय आहे? त्यांनी सांगितले होते की आमची जमीन चीनने घेतली, तर त्यांना राष्ट्रद्रोही ठरवत तुरुंगात टाकले. कुठे आहे लोकशाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. हे सरकार भ्रष्टाचाराने व्यापलेली पुढे बोलताना संजय राऊत यांनी 'मनरेगा'च्या मुद्द्यावरून टीका केली. मनरेगाचे नाव तर बदलले, पण रोजगार कुठून आणणार? शेतकऱ्यांना रोजगार मिळायचा, तो तुम्ही बंद केला. मराठवाड्यात 2025 साली 3 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. हे सरकार भ्रष्टाचाराने व्यापली आहे. देशभरातील भ्रष्टाचारी एकत्र आणतात आणि सरकार बनवतात, तोडतात. आधी नेत्यांना घडवले जायचे, आज नेत्यांना विकत घेतले जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 6:32 pm

अजितदादा आपल्यात असते तर चित्र वेगळे असते:सध्या तरी राजकीय चर्चा करू नका, माझी हात जोडून विनंती- रोहित पवार

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अजित पवारांचे अकाली निधन झाले आणि संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. त्यानंतर अवघ्या तीनच दिवसात सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदासाठी निवडले आणि शपथविधी देखील पार पडली. यावरून अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळाले. आता देखील दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या घटनांवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी आपले मत व्यक्त केले आहे. रोहित पवारांनी ट्विट करत म्हटले की, माननीय अजितदादा गेल्यापासून अनेकजण राजकीय चर्चा करताना दिसतायत, पण आज कोणत्याही राजकीय चर्चेपेक्षा अजितदादांच्या जाण्याच्या दुःखाची व्याप्ती कितीतरी पट मोठी आहे. अजितदादा आपल्यात असते तर चित्र वेगळं असतं आणि दादांशिवाय कुणीही त्यावर चर्चाही केली नसती, पण आज दादाच आपल्यात नाहीत. पुढे रोहित पवार म्हणाले, अजित दादांचं जाणं हे आपल्या सर्वांवरच आभाळ कोळसल्यासारखं आहे आणि अशा वातावरणात कुणीही राजकीय चर्चा करणं योग्य वाटत नाही. त्यामुळं पवार कुटुंबातील एक सदस्य म्हणून माझी सर्वांनाच हात जोडून विनंती आहे की, दादांच्या आत्म्याला क्लेश होईल, त्यांच्या विचारांना ठेच पोचेल आणि त्यांच्या स्पष्ट व परखड स्वभावाला साजेसं वाटणार नाही असं तूर्तास तरी कुणीही न बोलणंच अधिक योग्य ठरेल. भविष्यात यथावकाश चर्चा करायला काही अडचण नाही पण त्यासाठीची योग्य वेळ आज नाही, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे. दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकारणातील समीकरणे बदलत असल्याचे दिसत आहे. शरद पवार गटातील नेत्यांनी दावा केला आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावे, अशी अजित पवारांची इच्छा होती. त्यानुसार बैठक देखील झाल्याचे शरद पवार गटातील नेत्यांनी म्हटले आहे. परंतु, या चर्चांवर रोहित पवारांनी मौन धारण केल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित पवारांनी तेरावा झाल्यानंतर राजकीय भाष्य करणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कशी भरून काढणार?:रोहित पवारांचा सवाल अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली असली, तरी अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य असल्याचे चित्र दिसत आहे. अजितदादांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा आपल्या भावनांना वाट करून देत एक हृदयस्पर्शी ट्विट केले आहे. अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण आणि कशी भरून काढणार? असा आर्त सवाल त्यांनी या माध्यमातून उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 5:56 pm

अजित पवारांच्या अंत्यसंस्कारात गर्दीतून 25 लाखांचे दागिने चोरी:12 ते 15 जणांना लक्ष्य करत चोरट्यांनी साधला डाव; काही आरोपींना अटक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील अंत्यसंस्कारावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत 12 ते 15 जणांचे सुमारे 25 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. 28 जानेवारी रोजी झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, विशेषतः मोठ्या पोलिस बंदोबस्तातही हा प्रकार घडला. अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी विद्या प्रतिष्ठान परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, इतर पक्षांचे नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. याच गर्दीचा गैरफायदा घेत सोनसाखळी चोरट्यांनी आपला डाव साधला. काही चोरट्यांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मोहम्मद सादिक मोहम्मद सिराज, मोहम्मद अनिस मोहम्मद युनुस, येजाज भग्गू मिरावले (सर्व रा. दिग्रस, यवतमाळ), राजकुमार बाबुराव आठवले (रा. गेवराई, बीड), बाळ बबन बोथे (रा. पळसदेव, ता. इंदापूर, पुणे) आणि त्याचे दोन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणजीत बाबासाहेब जाधव आणि रमेश लालासाहेब वाबळे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. एका नामांकित वृत्तवाहिनीचे पत्रकार रणजीत जाधव हे 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या निधनाची बातमी कव्हर करण्यासाठी विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात आले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोन्याची साखळी चोरली. त्यांनी तात्काळ एका चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, परंतु साखळी मिळू शकली नाही. याच पद्धतीने गर्दीचा फायदा घेऊन अंकुश दिघे, प्रशांत सपकाळ, विजय शिंदे, जालिंदर बसले, संजय काटे, निलेश काटे, अशोक मोरे, मनोहर जाधव, सतीश सातकर, विकास भागवत आणि विजया पवार यांचेही दागिने चोरट्यांनी पळवले आहेत. बारामती पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याबाबत आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून इतर आरोपींचे साथीदार निष्पन्न केले जात असल्याची माहिती बारामती पोलिसांनी दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 5:22 pm

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजपला विचारावे लागेल:छगन भुजबळांचे विधान, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

दोघे ठाकरे जसे एकत्र आले तसे पवार एकत्र यावे, असे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच ते म्हणाले की अशा काही चर्चा झाल्या नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले. माझ्याशी कधीही हे बोलले नाही, कल्पनाही नाही. तसेच दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करायचे असेल तर भाजपला विचारावे लागेल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दिवंगत नेते तथा माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थी कलशाचे विविध जिल्ह्यात दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली जात आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांनी अजित पवारांना आदरांजली वाहिली. तत्पूर्वी भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत विविध प्रश्नांवर भाष्य केले आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर देखील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला भाजपला विचारावे लागेल छगन भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत जे काही करायचे ते आम्हाला भाजपसोबत राहून करायचे आहे. असे काही करायचे असेल तर त्याबाबत आम्हाला भाजपला विचारावे लागेल. कोणाला घ्यायचे, कोणाला नाही घ्यायचे याबाबत भाजपचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांनाही विचारावे लागेल. काय बोलणे झाले हे माझ्यासह कोणालाही माहित नसल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणासंबंधी मुख्यमंत्र्यांना तर विचारावेच लागेल. ज्यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये आहोत त्यांना तर विचारावे लागेल ना. जर सरकारमधून बाहेर पडायचे असेल, एनडीएबरोबर जायचे असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. मात्र, असा विचार दादांनी केला असेल हे कदापिही आम्हाला वाटत नाही. आम्ही उपमुख्यमंत्र्यांची निवड केली, आता त्यांचे नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वात चर्चा होतील, कधी-कधी नाही होत, असे म्हणत सुनेत्रा पवार यांच्यासोबत या संदर्भात चर्चा होईल, असे भुजबळांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 5:14 pm

कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा; महापौरपदी रुपाराणी निकम

कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर महापौरपदासाठी रुपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापुरात आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी निकम यांच्या नावाची घोषणा केली. कोल्हापुरात कोणत्याही स्थितीत शिवसेना शिंदे गटाचा महापौर झाला पाहिजे यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बॅनरबाजी केली होती. त्यामुळे महापौरपदावरून चांगलीच रस्सीखेच रंगली होती. मात्र, आता भाजपकडून रुपाराणी निकम […] The post कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा; महापौरपदी रुपाराणी निकम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 5:00 pm

मुंढवा जमीन गैरव्यवहारात मोठी कारवाई:1886 पानी आरोपपत्रात शीतल तेजवानीच आरोपी; पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांची नावे गायब, दमानियांचा संतप्त सवाल

पुण्यातील मुंढवा परिसरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून या घडामोडीने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात सादर केलेल्या या दोषारोपपत्रात फक्त शीतल तेजवानी यांचे नाव आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आधी चर्चेत असलेली दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांची नावे आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या दोघांना या टप्प्यावर दिलासा मिळाल्याची चर्चा आहे. या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पूर्वी पार्थ पवार यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. मात्र, सादर करण्यात आलेल्या 1886 पानी विस्तृत चार्जशीटमध्ये त्यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दिग्विजय पाटील यांचाही उल्लेख आरोपपत्रात नाही. परिणामी, या दोघांविरोधातील तपासाची दिशा काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कालच केली होती. त्यानंतर लगेचच आरोपपत्र दाखल झाल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी शीतल तेजवानी हिला या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपी मानत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. या कारवाईमुळे प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया पुढे सरकली असली, तरी अनेक प्रश्न अनुत्तरीतच राहिल्याचे दिसते. अंजली दमानिया यांनी या संदर्भात संताप व्यक्त करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. महाराष्ट्र हा फक्त राजकीय दलालीचा अड्डा झाला आहे का? कायदा फक्त सामान्यांसाठीच आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी नमूद केले की, शीतल तेजवानी यांनी एसपी सिव्हिल सूट 2213/2025 दिग्विजय पाटील यांच्या विरोधात दाखल करत व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे, तर दिग्विजय पाटील यांनी एसपी सिव्हिल सूट 2347/2025 शीतल तेजवानी यांच्या विरोधात दाखल केला आहे. दमानिया यांनी पुढे म्हटले की, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी 8/12/2025 रोजी हा व्यवहार अवैध ठरवत तो रद्द करण्यात यावा, यासाठी अर्ज केल्याची नोंद आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मग पार्थ पवारांना शिक्षा कोण देणार? कशी देणार? हा व्यवहार गुंडाळून टाकला जाणार का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. न्याय हा शब्द राजकारण्यांना लागूच होत नाही का? अशीही त्यांनी विचारणा केली. दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी ईओडब्ल्यूच्या कारवाईवर टीका करत म्हटले की, आरोपपत्र फक्त शीतल तेजवानीवरच दाखल झाले आहे. मग दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार यांच्यावरील चौकशीचे काय? असा सवाल त्यांनी केला. हा न्याय नाही, ही न्यायाची थट्टा आहे, असेही त्यांनी नमूद केले. या पोस्टमुळे या प्रकरणाला राजकीय आणि सामाजिक पातळीवर अधिकच चर्चेचे स्वरूप आले आहे. एकीकडे पोलिसांनी मोठी कारवाई करत विस्तृत चार्जशीट दाखल केली असली, तरी त्यातील नावांवरून आणि अनुपस्थित नावांवरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील पुढील सुनावणी आणि न्यायालयीन प्रक्रियेत आणखी कोणते तपशील समोर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा न्यायव्यवस्था, तपास यंत्रणा आणि राजकीय व्यक्तींच्या संदर्भातील चर्चांना उधाण आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 4:43 pm

‘मुळा-मुठा’साठी ठोस पाऊल उचलणार

लोणी-काळभोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार देशातील सर्वच नद्यांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देत आहेत. त्यानुसार पुण्याची जीवनवाहिनी असणा-या मुळा-मुठा नदीतील प्रदूषण ही गंभीर समस्या आहे. नदीत प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाणी, तसेच थेट नदीपात्रात टाकण्यात येणारा कचरा या अत्यंत गंभीर बाबींची नोंद सरकार घेत आहे. भविष्यात स्थानिक महापालिकांच्या समन्वयातून ‘नमामी गंगा’ […] The post ‘मुळा-मुठा’साठी ठोस पाऊल उचलणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 4:10 pm

पुना क्लब गोल्फने क्वाड्रानगुलर चषकावर नाव कोरले:मेजर जनरल संदीप सेठी यांच्या हस्ते चषकाचे वितरण

अतिशय प्रतिष्ठित अशा क्वाड्रंगुलर गोल्फ टूर्नामेंट 2026 च्या अतीतटीच्या लढतीमध्ये ९७४ स्टेबलफोर्ड गुणांसह अव्वल स्थान पटकावीत पुना क्लब गोल्फ कोर्स ने २०२६ चा क्वांड्रांगुलर चषक पटकावला आहे .या चषकाचे वितरण साउथ कंमाड चे मेजर जनरल संदीप सेठी यांच्या हस्ते पुना गोल्फ कोर्स चे कप्तान इकराम खान यांना आपल्या पूर्ण संघासमवेत प्रदान करण्यात आले .या स्पर्धेत पुणे क्लब गोल्फ कोर्स (PCGC) विजेते,RSI (SSGC) उपविजेता,राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) तिसऱ्या स्थानी तर CME हा संघ चौथ्या क्रमांकावर होते .पुना गोल्फ क्लब 974 ,SSTA(RSI ) 959 , NDA (894) CME (841 या प्रकारे वरील संघाने आपली कामगिरी पार पाडली . संबंधित गोल्फ स्पर्धा ही अतिशय मानांकित मानली जाते यामध्ये विविध प्रतिष्ठित असे गोल्फ क्लब स्पर्धेत भाग घेतात. क्वाड्रंगुलर गोल्फ चषकाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते .या स्पर्धेचे सामने RSI गोल्फ कोर्स ,एन डी ए गोल्फ कोर्स आणि सीएमई गोल्फ कोर्स आणि पुना क्लब गोल्फ कोर्स येथे आयोजित करण्यात आले होते .या स्पर्धेला चारही ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुना गोल्फ क्लब संघाकडून इकराम खान ,इंद्रनील मुजगुले ,कार्तिक कृष्णराज,अजय कपूर ,आदित्य पुसाळकर,नीरज गुलाटी,मोहनिश अडवाणी ,सुशांत खोसला ,सुमेध गांगल ,बीजय लेंका,राज दत्ता ,अवनय खन्ना यांनी अतिशय सुरेख अशा खेळाचे प्रदर्शन दाखवले. सर्व विजयी खेळाडूंचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 4:06 pm

पुणे शहरात अपघाती मृत्यू 40 टक्क्यांनी कमी करणार:पोलिस आयुक्तांची घोषणा; दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई

पुणे शहरात अपघाती मृत्यूचे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट पुणे पोलिसांनी ठेवले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी ही माहिती दिली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर, विशेषतः दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी पुणे शहरात दारू पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी सहा हजार जणांवर कारवाई करण्यात आली होती. ही मोहीम यापुढेही तीव्र करण्यात येणार आहे. शहरात कोणीही दारू पिऊन वाहन चालवणार नाही, हे सुनिश्चित करण्याचे पोलिसांचे लक्ष्य आहे. पुणे वाहतूक विभागातर्फे शिवाजीनगर मुख्यालयात आयोजित 'रस्ता सुरक्षा अभियान २०२६' समुपदेशन व मार्गदर्शन शिबिरात पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते. यावेळी पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव उपस्थित होते. अमितेश कुमार यांनी सांगितले की, ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्यांवर आणि चुकीच्या दिशेने वाहन चालवणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल. मोटार वाहन कायद्यांतर्गत परवाना रद्द करणे आणि वाहन जप्त करणे यासारख्या उपाययोजना केल्या जातील. जड वाहन चालकांच्या वाहनांची तपासणी केली जाईल आणि अपघात टाळण्यासाठी १५ दिवसांत शक्य असलेल्या भागांमध्ये दिवसा जड वाहनांना बंदी घालण्यात येईल. दारू पिऊन वाहन चालवणे अत्यंत धोकादायक असून त्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. सन २०२३ मध्ये दारू पिऊन वाहन चालवल्याच्या ५५० केसेस होत्या, तर २०२४ मध्ये ३ हजार आणि २०२५ मध्ये ६ हजार केसेस दाखल झाल्या आहेत. यावर्षी 'सर्जिकल स्ट्राइक'द्वारे या केसेसची संख्या आणखी वाढवण्यात येईल. नाकाबंदी आणि गस्तीदरम्यान दारू पिऊन वाहन चालवताना आढळल्यास तात्काळ परवाना रद्द करणे आणि वाहन जप्त करणे यासारखी कारवाई केली जाईल. पुणे शहर दारू पिणाऱ्या चालकांपासून मुक्त करण्याचे पोलिसांचे ध्येय आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 4:05 pm

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊ नये म्हणून रचला कट; वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

नागपूर : प्रतिनिधी आपल्या संस्कृती नुसार दशक्रिया झाल्यावर घरातील सुरळीत कामकाज सुरू होते. पण राज्यातील राजकारण इतके सडके झाले आहे की कसलीही वाट न बघता शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला. यातूनच दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्र येऊ नये हा कट शिजला, असा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि […] The post राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊ नये म्हणून रचला कट; वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 4:03 pm

भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल उघडताच अजितदादांचा घातपात?

मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर अन् संशय व्यक्त करणारे मुद्दे उपस्थित केले. याचा मुद्यांचा संदर्भ घेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, भाजपच्या घोटाळ्याची फाईल, असल्याचा अजितदादांनी केलेला उल्लेख अन् त्यांचा विमान अपघाती मृत्यू! रहस्यमय रित्या मृत्यू झालेल्या ‘जस्टीस […] The post भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल उघडताच अजितदादांचा घातपात? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 4:01 pm

एकाच दिवशी बुलडाणा जिल्ह्यात सात जण बेपत्ता

बुलडाणा : प्रतिनिधी एकीकडे मुंबईसारख्या झगमगत्या शहरातून १२ लहान मुले एकाच दिवशी अचानक बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच बुलढाणामधील मलकापूर शहरातून उच्चभ्रू परिवारातील तीन जण संशयास्पदरित्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये एकाच कुटुंबातील ३२ वर्षीय आई, ११ वर्षीय मुलगी आणि ८ वर्षीय मुलाचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली असून […] The post एकाच दिवशी बुलडाणा जिल्ह्यात सात जण बेपत्ता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 3:58 pm

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण:रक्त नमुने बदलणाऱ्या मध्यस्थासह 3 आरोपींना जामीन मंजून, सुप्रीम कोर्टाने पालकांवर ओढले ताशेरे

पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणात मोठी कायदेशीर घडामोड समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आदित्य सूद, आशिष मित्तल आणि अमर गायकवाड या तिघांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सुमारे १८ महिन्यांपासून कारागृहात असलेल्या या आरोपींना यामुळे दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर केला. जामीन मिळालेल्यांमध्ये आदित्य अविनाश सूद (कारमध्ये मागे बसलेल्या मुलाचे वडील), आशिष सतीश मित्तल (मुख्य आरोपीच्या वडिलांचा मित्र) आणि अमर संतोष गायकवाड (रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ३ लाख रुपयांची लाच घेणारा कथित मध्यस्थ) यांचा समावेश आहे. या तिघांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने नमूद केले की, आरोपी गेल्या १८ महिन्यांपासून तुरुंगात आहेत आणि प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. पुराव्यांशी छेडछाड होण्याची शक्यता कमी असल्याने त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. यापूर्वी कनिष्ठ आणि उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. न्यायालयाने पालकांना सुनावले खडे बोल सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती नागरत्ना यांनी पालकांच्या बेजबाबदारपणावर नाराजी व्यक्त केली. पालक आपल्या मुलांना नियंत्रणात ठेवण्यास सक्षम नसल्याचे दिसत आहे. नशिली पदार्थांचे सेवन हा वेगळा विषय आहे, मुलांना चैनीसाठी पैसे आणि गाडीच्या चाव्या देणे अयोग्य आहे. पालकांना मुलांसाठी वेळ नसतो आणि ते त्याची भरपाई पैशांनी करतात, हे सामाजिक वास्तव चिंताजनक आहे, अशा घटनांसाठी केवळ मुलेच नव्हे तर त्यांचे पालकही तितकेच जबाबदार असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले. कल्याणीनगर अपघातानंतर अल्पवयीन मुलाने मद्यपान केले होते की नाही, हे लपवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या मदतीने रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा आरोप आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीच्या पालकांसह काही मध्यस्थ आणि डॉक्टरांचा यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. पुराव्यांमध्ये फेरफार करून तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी संबंधितांना अटक केली होती. नेमके प्रकरण काय होते? १९ मे २०२४ रोजी पुण्याच्या कल्याणी नगर भागात ही भीषण दुर्घटना घडली होती. एका बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने पोर्श कार चालवत दोन आयटी (IT) इंजिनिअर्सना धडक दिली होती. या धडकेत त्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी आरोपीच्या पालकांनी आणि डॉक्टरांनी रक्ताचे नमुने बदलण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामध्ये गायकवाड आणि इतर आरोपींचा सहभाग होता. पालकांसाठी धोक्याची घंटा सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निरीक्षणात स्पष्ट केले आहे की, केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नाही, तर पालकांनी आपल्या मुलांच्या कृतींची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने सोपवणे हा केवळ वाहतूक नियमांचा भंग नसून तो इतरांच्या जीवाशी खेळ असल्याचे कोर्टाच्या भूमिकेवरून स्पष्ट झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 3:46 pm

धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार, काँग्रेसमधील संघर्ष उघड्यावर:नगरसेवकांच्या दरवाजांवर नोटीस; दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या समोर बैठक

चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या गट नोंदणीवरून निर्माण झालेला वाद आता नागपूर विभागीय आयुक्तांच्या पातळीवरून थेट शासनाच्या दारात पोहोचला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार या दोन गटांमध्ये विभागलेल्या नगरसेवकांच्या नोंदणीप्रकरणी मोठा पेच निर्माण झाला आहे. 23 जानेवारी रोजी धानोरकर गटातील 13 नगरसेवकांनी नागपूर विभागीय आयुक्तांसमोर स्वतंत्र गट नोंदवला. त्याच दिवशी वडेट्टीवार गटातील नगरसेवकांनी या नोंदणीवर आक्षेप घेत काँग्रेसची एकत्रित गट नोंदणी व्हावी, अशी मागणी केली. या आक्षेपानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रकरण शासनाकडे पाठवून नियमानुसार निर्णय घ्यावा, अशी शिफारस केल्याची माहिती आहे. दरम्यान, 10 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर महापौर पदाची निवडणूक होणार असल्याने हा वाद अधिकच महत्त्वाचा ठरला आहे. जर तोवर शासनदरबारी निर्णय झाला नाही, तर गट नोंदणी न झालेल्या काँग्रेस नगरसेवकांना मतदानाचा अधिकार मिळेल की नाही, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत हा वाद न सुटल्यास वडेट्टीवार गटातील ज्या नगरसेवकांची नोंदणी प्रलंबित आहे, त्यांना महापौर निवड प्रक्रियेत मतदान करण्यासाठी विभागीय आयुक्तांसमोर विशेष शपथपत्र सादर करावे लागू शकते. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया आणि तिची वैधता याबाबतही नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढला आहे. त्यामुळे या संदर्भातील बैठक आता दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या समोर होणार असल्याची माहिती मिळत आहे. दरवाजांवर नोटीस चिटकवली दुसरीकडे, या वादाला विचित्र वळण मिळाले आहे. वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी सर्व 27 काँग्रेस नगरसेवकांची बैठक स्वतःच्या घरी बोलावली. मात्र, धानोरकर गटाच्या नगरसेवकांना नोटीस प्रत्यक्ष देण्याऐवजी त्यांच्या घरांच्या दरवाजांवर ती चिटकवण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एखाद्याच्या घरावर नोटीस चिटकवणे हे अवमानकारक मानले जाते, अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसमधील गटबाजी टोकाला नोटीसच्या वेळेबाबतही गोंधळ निर्माण झाला. नोटीसमध्ये बैठक रविवारी दुपारी 12 वाजता असल्याचे नमूद केले गेले. मात्र, धानोरकर गटाचे नगरसेवक राहुल घोटेकर यांच्या घरावर ही नोटीस रविवारी दुपारी 2 वाजता लावण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या कृतीतून काँग्रेसमधील गटबाजी किती टोकाला पोहोचली आहे, हे स्पष्ट होत आहे. 66 पैकी भाजप 23, काँग्रेसचे 27 नगरसेवक सध्या काँग्रेसचे 27 नगरसेवक दोन गटात विभागले गेले आहेत. वडेट्टीवार गटाकडे 20, तर धानोरकर गटाकडे 7 नगरसेवक असल्याची माहिती आहे. या दोन्ही गटांमधील संघर्ष उघडपणे दिसू लागला आहे. पक्षाच्या अंतर्गत बैठकीसाठी नोटीस घरावर चिटकवणे कितपत योग्य, यावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. चंद्रपूर महापालिकेतील एकूण संख्याबळही या वादाला महत्त्व देते. 66 नगरसेवकांपैकी भाजप 23, काँग्रेस 27, काँग्रेस समर्थित जनविकास सेना 3, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) 6, वंचित 2, बसपा 1, शिवसेना (शिंदे गट) 1, अपक्ष 2 आणि एमआयएम 1 अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील गटबाजीचा थेट परिणाम महापौर निवडणुकीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे. आता शासनदरबारी या वादावर काय निर्णय होतो, आणि 10 फेब्रुवारीपूर्वी चित्र स्पष्ट होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 3:18 pm

यवतमाळमध्ये जन्म दाखल्यांचा महाघोटाळा:1500 लोकसंख्येच्या गावात 27 हजार जन्मांच्या नोंदी, 11 आरोपींना अटक; उद्या किरीट सोमय्यांचा दौरा

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेंदूरसणी या छोट्याशा गावातून समोर आलेल्या २७ हजार ३४९ बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, राज्याच्या गृहविभागाने विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती केली असून, एसआयटीने या प्रकरणी ११ आरोपींना अटक केली आहे. बनावट जन्म दाखला घोटाळ्यातील 2 आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या उद्या (मंगळवार) यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत. काय आहे 'शेंदूरसणी' जन्म प्रमाणपत्र घोटाळा? शेंदूरसणी गावाची एकूण लोकसंख्या अवघी दीड हजार आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत ग्रामपंचायतीच्या 'सीआरएस' (Civil Registration System) पोर्टलवर तब्बल 27 हजार 349 जन्म आणि 11 मृत्यूच्या संशयास्पद नोंदी आढळल्या. तांत्रिक तपासणीत असे समोर आले की, या ग्रामपंचायतीचा लॉगिन आयडी चक्क मुंबईतून वापरला जात होता आणि मुख्य सर्व्हर हॅक करून या नोंदी करण्यात आल्या होत्या. बिहार कनेक्शन आणि 11 जणांना अटक या घोटाळ्याचे धागेदोरे बिहारपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आणि सरकारी पोर्टल हॅक करणारा मास्टरमाइंड बिहारमधून पकडण्यात आला आहे. पोलिसांनी आतापर्यंत तबीश असगर अली, अभिजित मोरे, संतोष सूर्यवंशी यांच्यासह एकूण 11 आरोपींना अटक केली आहे. उर्वरित 2 मुख्य आरोपी अद्याप फरार असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. राज्याच्या सायबर विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील 'एसआयटी' या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. किरीट सोमय्यांचा यवतमाळ दौरा बनावट जन्म प्रमाणपत्रांविरोधात किरीट सोमय्या यांनी पहिल्यापासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. यापूर्वीही त्यांनी मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड इत्यादी ठिकाणी भेट देऊन या घोटाळ्याप्रकरणी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. आता किरीट सोमय्या उद्या यवतमाळला भेट देऊन जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांशी चर्चा करणार आहेत. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करून माहिती दिली आहे. सिल्लोडमध्ये 4 हजार 700 हून अधिक संशयित दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही जन्मप्रमाणपत्र घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात 10 हजार 68 बांगलादेशी नागरिकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. संभाजीनगर शहरात 2 हजार 448, तर सर्वाधिक 4 हजार 730 बांगलादेशी नागरिक हे एकट्या सिल्लोड तालुक्यात वास्तव्यास आहेत. त्यांनी जन्म प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. त्यांच्या प्रत्येक अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 2:43 pm

राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार होते, हे 2000% सत्य:जितेंद्र आव्हाड यांचा दावा; फडणवीस-मिटकरी यांच्यावर बोलण्यास नकार

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार होते, हे 2000% सत्य आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा दावा केला आहे. अजित पवार यांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. तसेच अस्थींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना विरणीकरणाची चर्चा सुरू होती, असा दावा केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, आज राजकारणावर बोलणे योग्य नाही. आम्ही अजित पवार यांच्या अस्थींचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. अशावेळी अपघात कसा झाला? काय झालं? याविषयी प्रश्न विचारणे किंवा बोलणे देखील योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलिनीकरण होणार होते, हे 2000% खरे असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्यासारखा नेता आजपर्यंत झालेला नाही. त्यांची निर्णय क्षमता आणि काम करण्याचा हातोटी, होती असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. कोणताही निर्णय घेण्यात त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही, असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. राज्यात सुरू असलेल्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी केलेले हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. देवेंद्र फडणवीस किंवा अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर काहीही बोलण्याची जितेंद्र आव्हाड यांनी नकार दिला आहे. मात्र राष्ट्रवादीचे विलनीकरण होणार होते, दोन हजार टक्के सत्य असल्याचा दावा देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. मात्र, आता या संदर्भातले निर्णय हे राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेते घेतील, असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. नेमकं काय होणार? दरम्यान, अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सध्या भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत आहे. तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे विलीनीकरण करायचे असेल तर शरद पवार यांच्या पक्षाला सत्तेत सहभागी व्हावे लागेल किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सत्तेतून बाहेर पडावे लागेल. असे असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका सांगितल्यानंतर आता पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 2:39 pm

चर्चेत नव्हते, त्यांना बैठकीबद्दल काय माहिती असणार?:फडणवीसांचा दावा फेटाळत शरद पवारांचा सवाल; अधिवेशनासाठी दिल्लीला जाणार

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्याआधी 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांच्या निवासस्थानी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात बैठक झाल्याचा दावा शरद पवार गटातील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. या दाव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते की, दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार असत्या तर अजित पवार यांनी त्यांना याबाबत सांगितले असते. ते माझ्याशी सर्व गोष्टी शेअर करायचे, असा त्यांचा दावा होता. मात्र, या वक्तव्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेत या विषयावर ठोस प्रतिक्रिया दिली. त्यांच्या विधानामुळे या चर्चेला पुन्हा वेग आला आहे. शरद पवार यांनी प्रतिप्रश्न उपस्थित करत म्हटले, विलीनीकरणाच्या चर्चेत जे उपस्थित नव्हते, त्यांना बैठकीबद्दल काय माहिती असणार? या एका वाक्याने त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दाव्यावर अप्रत्यक्षपणे सवाल उपस्थित केला. अजितदादा गटातील काही नेत्यांकडून मागील दोन दिवसांपासून अशा कोणत्याही चर्चा झाल्याचे नाकारले जात असताना पवारांचे हे विधान विशेष लक्षवेधी ठरले आहे. या घडामोडींमुळे शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा नवा राजकीय वाद उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अजित पवारांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादींच्या भवितव्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. जयंत पाटील यांच्या घरी बैठक झाल्याचा दावा एकीकडे, तर त्याचे खंडन दुसरीकडे, अशा विरोधाभासी भूमिकांमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजितदादा गटातील नेते विलीनीकरणाच्या चर्चांना नकार देत असताना शरद पवारांनी सूचकपणे बैठकीचा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि अजितदादा गटाचे नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पवारांच्या विधानामुळे या चर्चेला नवे परिमाण मिळाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला जाणार दरम्यान, शरद पवार हे मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. दोन दिवस संसदीय कामकाजात सहभाग घेतल्यानंतर ते पुन्हा बारामतीकडे रवाना होणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडेही राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. येणाऱ्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विलीनीकरणाच्या चर्चांवरून सुरू झालेला हा वाद पुढे कोणत्या दिशेने वळतो, आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शरद पवारांच्या वक्तव्याने या विषयावर पुन्हा प्रकाशझोत पडला असून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 2:17 pm

काल माझी पण बारी आली होती, थोडक्यात वाचलो!:तुम्ही मला श्रद्धांजली वाहिली असती; मंत्री शिरसाटांनी सांगितला किस्सा

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराने जोर धरला असताना, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एका प्रचारसभेत आपल्या आयुष्यातील भीषण अपघाताचा किस्सा सांगितला.अजितदादा अचानक गेले, कुणाला वाटलं तरी होतं का? काल माझी पण बारी आली होती. तुम्ही मला आज श्रद्धांजली वाहत असता, पण थोडक्यात वाचलो, असे सांगत शिरसाट यांनी स्वत:च्या वाहनाचा घडलेला अपघाताचा किस्सा उपस्थितांना सांगितला. अजित पवार यांच्या अकाली एक्झिटचा दाखला देत त्यांनी उमेदवारांना 'टेंशन' न घेण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधनानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील तोंडावर आहेत. अजित पवारांच्या निधनामुळे तोंडावर असलेल्या निवडणुकांचा प्रचार देखील थंडावल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या नियोजित सभा रद्द केल्या. अशातच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बजाजनगर येथील जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या सभेत धक्कादायक किस्सा सांगितला. नेमके काय म्हणाले संजय शिरसाट? संजय शिरसाट म्हणाले, मी महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बजेट असलेला मंत्री आहे. साडे बावीस हजार कोटींचं माझं एकट्याचं बजेट आहे. त्यावर किती झिरो असतात एकदा विचारून तर घ्या, असं संजय शिरसाट म्हणाले. एक उमेदवार आहे, तो मतदारांना फोन पे करतो म्हणाला. लोकांना मूर्ख बनवणं सोपं आहे का? गेले 20 वर्ष मी आमदार आहे. पण माझ्या मतदारसंघात कुणाला वाटत नाही की मंत्री आहे. …तर तुम्ही मला श्रद्धांजली वाहिली असती आयुष्याच्या अनिश्चिततेवर भाष्य करताना संजय शिरसाट म्हणाले की, कालची घटना सांगतो, माणसाचा काही भरोसा नाही. अजितदादा आपल्यातून गेले कुणाला काही वाटलं तरी होतं का? काल माझीपण बारी आली होती पण मी थोडक्यात वाचलो. येताना गाडी खड्ड्यात आदळली अन् गाडीचे डाव्या साइडचे दोन्ही टायर बर्स्ट झाले. गाडी साधीसुधी नव्हती मर्सडीज गाडी होती. दुसरी एक गाडी होती, त्या गाडीत बसून मी आलो. पण अपघात झालेली गाडी आत्तापर्यंत घरी नाही आली. काय भरोसा माणसाच्या आयुष्याचा... जर काही काल मला झालं असतं तर तुम्ही मला श्रद्धांजली वाहिली असती. तुम्हाला नशिबाने काय मिळतं, त्यावर तुम्ही आम्ही जिवंत आहोत. उमेदवारांना दिला 'टेन्शन-फ्री' मंत्र निवडणुकीच्या धावपळीत तणावाखाली असलेल्या उमेदवारांना शिरसाट यांनी मोलाचा सल्ला दिला. मी आयुष्यभर सगळ्यांना सांगतो, आजचा दिवस चांगला जाऊ द्या. उद्याची चिंता करू नका. उमेदवारांनो, तुम्हीही काही टेन्शन घेऊ नका, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमधील मरगळ झटकण्याचा प्रयत्न केला. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर नाराजी दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी ज्या प्रकारे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावर संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती. राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात खुर्ची जिंकली, पण माणूस हरला, अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी सत्तेच्या घाईवर टीका केली होती.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 2:10 pm

भाजपला कुबड्या नकोत, महाजनांच्या वक्तव्याने शिवसेना संतप्त:एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय; वातावरण तापले

नाशिक महापालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत तणावाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपला कुबड्यांची गरज नाही, असे वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटातील शिवसेना नेते संतप्त झाले आहेत. या मुद्द्यावर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. एका वाक्यामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण अचानक तापल्याचे चित्र आहे. नाशिक महापालिकेत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता. सत्तास्थापनेसाठी समन्वय साधण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या पदांवर वाटाघाटी होऊ शकतात, अशी चर्चा सुरू होती. मात्र, या प्रस्तावानंतर काही दिवसांतच मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपला कुबड्यांची गरज नाही, असे वक्तव्य करत स्पष्ट नाराजी व्यक्त केली. या वक्तव्याने शिवसेनेत संतापाची लाट उसळली. भाजपकडून आलेल्या प्रस्तावानंतर आता अशी भूमिका घेणे अनाकलनीय असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. भाजपमध्येच समन्वयाचा अभाव आहे, अशी टीकाही करण्यात आली. शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी या संबधीची नाराजी उघडपणे व्यक्त केली. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार स्वतः आमच्या पक्ष कार्यालयात आले होते. त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला. आणि आता त्यांचे वरिष्ठ नेते ‘कुबड्या नको’ असे म्हणत आहेत. हा शब्दप्रयोग चुकीचा आहे, असे बोरस्ते म्हणाले. या घडामोडींमुळे मित्रपक्षांमधील विश्वासावर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचे त्यांनी सूचित केले. बोरस्ते यांनी पुढे सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. शिंदे साहेब जो निर्णय देतील, तो आम्ही मान्य करू. त्यांनी विरोधी बाकावर बसण्यास सांगितले, तर आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वीच भाजपच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजप आणि शिवसेना यांच्यातील तणाव उघड शिवसेनेने उपमहापौर, स्थायी समिती आणि अन्य महत्त्वाच्या पदांबाबत अपेक्षा व्यक्त केली होती. महायुती सत्तेत आल्यास आगामी निवडणुकांसाठी तिन्ही पक्षांना सोयीचे ठरले असते, असा त्यांचा युक्तिवाद आहे. मात्र, गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण चित्र बदलल्याचे ते म्हणाले. आता परिस्थितीचा सविस्तर आढावा शिंदे यांना दिला जाणार आहे. या सगळ्या घडामोडींमुळे नाशिकमधील महापालिकेचे राजकारण तापले आहे. एका वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील तणाव उघड झाला आहे. पुढील काळात हा वाद कोणत्या दिशेने वळतो, आणि महापौर निवडणुकीच्या समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 1:58 pm

अहिल्यानगरात महापौर पद राष्ट्रवादीकडे, उपमहापौर भाजपकडे:ज्योती गाडे अन् धनंजय जाधवांची नावे जाहीर; नागपुरात नीता ठाकरे महापौर

अहिल्यानगर महापालिकेत भाजप-राष्ट्रवादी युतीकडून महापौर आणि उपमहापौर पदांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजप-राष्ट्रवादी युतीत सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणि उपमहापौरपद भाजपकडे देण्यात आले आहे. त्यामुळे ज्योती गाडे महापौर आणि धनंजय जाधव उपमहापौर पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अहिल्यानगर मनपामध्ये आजच महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. युतीत पहिले अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर राहील, असे ठरल्यामुळे महापौरपदासाठी ज्योती गाडे यांची निवड झाली आहे. तर उपमहापौरपदासाठी भाजपकडून धनंजय जाधव यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यांच्या कार्यकाळाची मुदत सव्वा वर्षांची असेल, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे उपस्थित होते. शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता अहिल्यानगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने युतीत एकत्र येऊन महापालिकेची निवडणूक लढवली आहे. मतदारांनी युतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. शिवसेनेने स्वतंत्रपणे लढवलेल्या निवडणुकीत 10 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे शिवसेना महापालिकेत सर्वात मोठा विरोधी पक्ष ठरणार आहे. युतीच्या ज्योती गाडे महापौर होणार असल्याने शिवसेना विरोधी बाकावर राहणार असून, त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात येण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर शिवसेनेच्या गटनेता पदावर‎ दत्तात्रय कावरे यांची वर्णी दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या गटनेता‎पदावर नगरसेवक दत्तात्रय ‎‎कावरे यांची निवड करण्यात‎ आली आहे. रविवारी शासकीय ‎‎विश्रामगृहावर आयोजित ‎‎नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय ‎‎घेण्यात आला. येत्या दोन दिवसांत ‎‎नाशिक येथील विभागीय आयुक्त ‎‎कार्यालयात गटनोंदणी करण्यात ‎‎येणार असल्याचे सांगण्यात आले.‎ नागपूर महानगरपालिका महापौर-उपमहापौर पदाच्या उमेदवारांची घोषणा! ​नागपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी प्रभाग 28 च्या नगरसेविका नीता ठाकरे आणि उपमहापौर पदासाठी प्रभाग 29 च्या नगरसेविका लीला हाथीबेड यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी ही अधिकृत घोषणा केली.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 1:46 pm

राज्यातील सर्व शाळांमध्ये मोबाइलवर बंदी घाला

अकोला : प्रतिनिधी बारावी आणि दहावीची परीक्षा तोंडावर आहे, मुले काहीच अभ्यास करेना. त्यांचं लक्ष मोबाईलमध्ये आहे. परीक्षावेळी खिडकीतून चिट्ठी घ्यायच्या आणि शिक्षकांना दम द्यायचा, आजच्या ४० टक्के मुलांची अशी परिस्थिती आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये नियमावली आणली पाहिजे. परीक्षा काळात ‘मोबाईल’वर बंदी घातली पाहिजे’, अशी मागणी इंदुरीकर महाराजांनी केली. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी तरुणांसह शेतक-यांच्या […] The post राज्यातील सर्व शाळांमध्ये मोबाइलवर बंदी घाला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 1:40 pm

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार; आरोपीचे अकोला कनेक्शन

अकोला : प्रतिनिधी दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. लॉरेन्स बिश्नोई टोळीतील शुभम लोणकर या सदस्याने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारलीये. शुभम लोणकर आरजू बिश्नोई तो त्याच्या पोस्टमध्ये लिहित, मुंबईतील दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली. याआधी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची आणि आता रोहीत […] The post रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार; आरोपीचे अकोला कनेक्शन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 1:38 pm

नाशिकच्या महापौरपदाची दहा महिलांमध्ये स्पर्धा

नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेत १२२ पैकी ७२ जागा जिंकत भाजपने स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवले आहे. महापौरपद सर्वसाधरण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे महिलाच महापौर होणार हेही फिक्स आहे. परंतु तब्बल दहा महिला महापौरपदासाठी इच्छुक असल्याने तिढा वाढला आहे. भाजपचे ७२ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यात तब्बल ४० महिला नगरसेवक आहेत. महापौरपद सर्वसाधरण महिला प्रवर्गासाठी […] The post नाशिकच्या महापौरपदाची दहा महिलांमध्ये स्पर्धा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Feb 2026 1:33 pm

मशाल दिसली तर असलेला निधीही कापून टाकतो:'कमळ आणि धनुष्यबाणा'साठीच तिजोरी उघडणार, भर प्रचारसभेत नीतेश राणेंचे वक्तव्य

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. अशातच भाजप नेते आणि मंत्री नीतेश राणे यांनी प्रचार सभेत केलेल्या एका विधानामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. जिथे कमळ किंवा धनुष्यबाण हे चिन्ह दिसेल तिथे आम्ही भरभरून निधी देऊ, पण जिथे मशाल चिन्ह दिसेल तिथला असलेला निधीही आम्ही कमी करू, असे खळबळजनक वक्तव्य नीतेश राणे यांनी केले आहे. कणकवलीतील फोंडा जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मामा हळदिवे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. नीतेश राणे यांनी आपल्या भाषणात अत्यंत आक्रमक पवित्रा घेत मतदारांना आणि विरोधकांना थेट इशारा दिला. निधी देताना आम्ही चिन्ह बघणार. कमळ आणि धनुष्यबाण ही आमची अधिकृत चिन्हं आहेत. त्यामुळे या चिन्हांच्या उमेदवारांनाच विकासाचा वाटा मिळेल. चुकून कुठे मशाल चिन्ह निघालं, तर तिथला निधी देणं तर लांबच, उलट असलेला निधीही आम्ही कमी करून टाकतो, असे नीतेश राणे म्हणालेत. ग्रामपंचायत निवडणुकांचा दिला दाखला निधी वाटपाबाबत विधान करताना नीतेश राणे यांनी त्यांच्या पूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकीतील वक्तव्या दाखला दिला. ग्रामपंचायत निवडणुकीतही मी सरपंचांना स्पष्ट सांगितले होते. आमच्या बाजूने उभे राहा, नाहीतर एक रुपयाचाही निधी मिळणार नाही. त्याचा परिणाम म्हणून सगळे सरपंच पटापट आमच्याकडे आले, असा दावा नीतेश राणे यांनी यावेळी केला. जिल्ह्याचा विकास आम्हीच करू शकतो जिल्ह्याचा विकास केवळ राणे कुटुंब आणि महायुतीच करू शकते, असा विश्वास व्यक्त करताना नीतेश राणे म्हणाले की, गेली २७ वर्षे जिल्हा परिषद खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांना मतदान करायला लोकांकडे कोणतेही कारण नाही. जिल्ह्याच्या विकासाचा वारसा पुढील पाच वर्षेही आमच्याच हातात राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ठाकरे गटावर बोचरी टीका शिवसेना ठाकरे गट म्हणजेच 'उबाठा'ची आपल्याला कोणतीही काळजी नसल्याचे सांगत राणेंनी टोला लगावला. त्यांचे जे काही थोडे-थोडके उमेदवार उरले आहेत, ते प्रचारात कुठे दिसतही नाहीत. काही तर लपत फिरत आहेत. शेवटी निवडणुकीनंतर त्यांनाही निधीसाठी आमच्याकडेच यावे लागणार आहे, असे ते म्हणाले. फोंड्यासाठी एक कोटी निधीची घोषणा फोंडा मतदारसंघातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी नीतेश राणे यांनी मोठी घोषणा केली. मामा हळदिवे यांना या मतदारसंघातून नंबर वनची लीड मिळवून द्या, पहिल्याच टप्प्यात एक कोटी रुपयांचा विकास निधी या मतदारसंघासाठी मंजूर करतो, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 12:56 pm

ठाकरे बंधूंसोबत लढूनही मनसे मुंबईत भाजपसोबत?:भाजप-मनसे समीकरण पुन्हा चर्चेत; मात्र, राज ठाकरेंनी शक्यता फेटाळली

मुंबई महापालिकेच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून भाजप मोठी राजकीय चाल खेळण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर येत आहे. राज ठाकरे यांच्या मनसेकडून भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत घेतल्यानंतर महापौरपदाच्या निवडणुकीत संख्याबळ मजबूत करण्यासाठी भाजप सक्रिय झाल्याचे संकेत आहेत. महायुतीचे एकूण संख्याबळ 121 पर्यंत नेल्यानंतर मनसेच्या 6 नगरसेवकांबाबतही चर्चेची दारे उघडल्याची माहिती मिळत आहे. मात्र, दुसरीकडे राज ठकारे यांनी ही शक्यता फेटाळली आहे. मनसे भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपने 89 जागांवर विजय मिळवला असून सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 114 आकड्यापासून तो काही पावले दूर आहे. महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. शिंदे गटाच्या शिवसेनेला 29 जागांवर यश मिळाले. या दोन्ही पक्षांची बेरीज 118 होते; मात्र स्थैर्यासाठी आणखी पाठिंबा मिळवण्याची रणनीती आखली जात असल्याचे समजते. यावेळी ठाकरे बंधूंनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या, तर राज ठाकरे यांच्या मनसेला 6 जागांवर समाधान मानावे लागले. हीच मनसेची संख्या आता महापौर निवडणुकीत निर्णायक ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मनसेने भाजपला पाठिंबा दिल्यास महापौरपदाच्या लढतीत समीकरणे अधिक स्पष्ट होतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. दरम्यान, भाजपने संघटनात्मक पातळीवरही महत्त्वाची हालचाल केली आहे. गणेश खणकर यांची मुंबईतील भाजप गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. संघाचा स्वयंसेवक, बूथ प्रमुख, भाजपचा सरचिटणीस ते नगरसेवक असा प्रवास असलेल्या खणकरांनी या निवडीबद्दल पक्षाचे आभार मानले. भ्रष्टाचारमुक्त मुंबई हे आमचे ध्येय असेल. मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी आम्ही काम करू, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या निवडीमुळे महापालिकेतील भाजपच्या रणनीतीला नवे बळ मिळाल्याचे मानले जात आहे. महापौर निवडीसाठी राजकीय गणिते अधिक गुंतागुंतीची मुंबई महापालिकेच्या अंतिम निकालानुसार भाजप 89, शिवसेना ठाकरे गट 65, शिंदे यांची शिवसेना 29, काँग्रेस 24, मनसे 6, एमआयएम 8, राष्ट्रवादी काँग्रेस 3, समाजवादी पक्ष 2 आणि एनसीपी (शरद पवार गट) 1 अशा जागा मिळाल्या आहेत. या आकड्यांवरून कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने महापौर निवडीसाठी राजकीय गणिते अधिक गुंतागुंतीची झाली आहेत. त्यामुळे लहान पक्ष आणि अपक्षांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. महापौरपद खुल्या गटातील महिलांसाठी राखीव यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महापौरपदाचे आरक्षण. मुंबई महापालिकेचे महापौरपद यावेळी खुल्या गटातील महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे पुढील महापौर महिला असणार हे निश्चित झाले आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपकडून कोणत्या महिला उमेदवाराची निवड होते, याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे. मात्र त्याहून महत्त्वाचे म्हणजे मनसेचा अंतिम निर्णय काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 12:52 pm

संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाआरती:संभाजीनगरच्या क्रांती चौकात समाज बांधवांची मोठी उपस्थिती

चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी गुरु श्री रविदास महाराज यांच्या 649 व्या जयंतीनिमित्त शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या क्रांती चौक येथे महाआरती व प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम श्री गौरव जाटवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास नगरसेविका हर्षदा शिरसाट यांच्यासह मनोज गांगवे, नंदू गवळी, अभिषेक जीवनवाल, विजय वाघचौरे, संतोष जाटवे, किशन जाटवे, संदीप शिरसाट, जवाहर भगुरे, ज्योतीराम पाटील, स्वप्नील डिब्बे, सचिन उसरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुमित पवार, अनिरुद्ध ढवळे, आदित्य ऋषी वंजारे, कुणाल दांडगे, करण बताडे, आदित्य घोडके, शुभम तरटे, सोनू इंगोले, लखन त्रिभुवन, आर्यन काटकर, प्रथमेश दाभाडे, गौरव इंगळे, सम्यक वाकळे, योगेश जाटवे यांच्यासह समस्त चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 12:39 pm

अजितदादांचा 100 टक्के घात झाला:धूर नव्हता, पण धोका होता; आमदार अमोल मिटकरींचे विधान चर्चेत, बारामती दुर्घटनेवर शंका

बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी झालेल्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या प्रश्नांवर आता त्यांच्याच पक्षातील नेते अमोल मिटकरी यांनी शंका उपस्थित केली आहे. धूर नव्हता, पण धोका होता, असे म्हणत त्यांनी या घटनेतील शत-प्रतिशत सत्य समोर यावे, अशी मागणी केली आहे. अजितदादांचा 100 टक्के घात झाला असून आपण शेवटपर्यंत लढा देणार असल्याचेही मिटकरी यांनी म्हटले आहे. 28 जानेवारी 2026 च्या सकाळी बारामतीत घडलेल्या विमान अपघाताने महाराष्ट्र हादरला. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पिंकी माळी, विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. शोककळा पसरलेली असतानाच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडली. या सगळ्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांच्या प्रतिक्रियेला विशेष संवेदनशील मानले जात आहे. अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना धूर नव्हता, पण धोका होता, असे विधान केले. त्यांच्या मते, या दुर्घटनेबाबत संपूर्ण सत्य बाहेर येणे अत्यावश्यक आहे. त्यांनी सांगितले की, ही त्यांच्यासाठी वैयक्तिकरीत्या अपूरणीय हानी आहे आणि ते जिवंत असताना या विषयावर संघर्ष करत राहतील. तसेच, अजित पवार यांच्या कुटुंबाप्रती आपली निष्ठा कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या संपूर्ण मुद्द्यावर आपली सविस्तर भूमिका मे महिन्यात जाहीर करणार असल्याचे त्यांनी सूचित केले. मिटकरी यांनी सोशल मीडियावरही केलेल्या पोस्टमुळे या चर्चेला आणखी वेग आला. देवगिरीतील दोन रिकाम्या खुर्च्यांचा उल्लेख करत त्यांनी आपली वेदना व्यक्त केली. या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, ते या घटनेचे राजकारण करणार नाहीत; मात्र निर्माण झालेल्या शंकांकडे दुर्लक्षही करणार नाहीत. सवाल विचारणे गॉसिप नाही, तर सत्याच्या शोधाची सुरुवात आहे, असे त्यांनी लिहिले. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्नही लक्षवेधी ठरले आहेत. दुर्घटनेत सहा जणांच्या मृत्यूचा उल्लेख असताना केवळ पाच मृतदेह कसे सापडले, हा त्यांचा पहिला प्रश्न आहे. सहावा व्यक्ती नेमका कुठे गेला, याबाबत त्यांनी स्पष्टता मागितली आहे. उड्डाणापूर्वी प्रवाशांची डिजिटल यादी उपलब्ध असतानाही या यादीत विसंगती का आढळते, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. याशिवाय, दुर्घटनेनंतर कोणतेही कागद जळालेल्या अवस्थेत का सापडले नाहीत, असा मुद्दाही त्यांनी मांडला. पायलट वारंवार का बदलले गेले, याचाही त्यांनी उल्लेख केला. या सर्व बाबी केवळ योगायोग आहेत का, की त्यामागे काही वेगळे कारण आहे, याचा तपास व्हावा, अशी त्यांची भूमिका दिसून येते. त्यांनी या प्रश्नांमधून कोणावरही थेट आरोप न करता, सत्य बाहेर यावे, एवढीच अपेक्षा व्यक्त केली आहे. सत्यासाठी प्रश्न विचारणे थांबवणारही नाही अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या आठवड्यातच महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेल्या या नव्या चर्चेमुळे वातावरण पुन्हा तापले आहे. एकीकडे शोक, दुसरीकडे राजकीय हालचाली, आणि त्यातच मिटकरींचे प्रश्न, या सगळ्यामुळे या दुर्घटनेभोवतीचे गूढ अधिक गडद झाल्याचे चित्र आहे. मिटकरी यांनी स्पष्ट केले आहे की, ते या विषयावर राजकारण करणार नाहीत; मात्र सत्यासाठी प्रश्न विचारणे थांबवणारही नाहीत. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणात आणखी कोणते मुद्दे पुढे येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 12:26 pm

25 हजार कोटींचा कुंभमेळा डीपीआरविना?:कलम 7 अन् 15 चे उल्लंघन; नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी नियोजनाचा अभाव- विजय कुंभार

माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या कामांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, 25 हजार कोटी रुपयांची कामे कोणताही सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) न करता सुरू आहेत. हा प्रश्न केवळ प्रशासकीय नसून कायदेशीर, नैतिक आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित असल्याचे विजय कुंभार यांनी म्हटले आहे. विजय कुंभार यांच्या माहितीनुसार, 2025 मध्ये लागू झालेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अधिनियमानुसार, कुंभमेळ्यासाठी एकात्मिक 'कुंभ मेळा प्लॅन' तयार करणे बंधनकारक आहे. या आराखड्यात सर्व प्रकल्प, खर्च, खरेदी प्रक्रिया, अंमलबजावणीची रूपरेषा आणि वित्तीय नियोजन समाविष्ट असणे अपेक्षित आहे. मात्र, असा कोणताही एकात्मिक डीपीआर प्रत्यक्षात अस्तित्वात नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. माहिती अधिकार कायद्यांतर्गत कुंभार यांनी कुंभमेळा प्राधिकरणाकडे डीपीआरची मागणी केली होती. त्यांना वेळेत उत्तर मिळाले नाही. समाजमाध्यमांवर हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मिळालेले उत्तर डीपीआर नसून, विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या कामांची केवळ तुकड्या-तुकड्यांत दिलेली माहिती असल्याचे कुंभार यांनी म्हटले. त्यांनी या उत्तराला 'नियोजनाचा दस्तऐवज नव्हे, तर खर्चाचा विखुरलेला तपशील' असे संबोधले. डीपीआर शिवाय प्रकल्प राबवणे म्हणजे नियोजनशून्य प्रशासन असल्याचा आरोप कुंभार यांनी केला. त्यांच्या मते, डीपीआर हा कोणत्याही मोठ्या सार्वजनिक प्रकल्पाचा 'ब्लूप्रिंट' असतो. त्यात कामाचा व्याप, खर्चाचा अंदाज, कालमर्यादा, तांत्रिक व्यवहार्यता, पर्यावरणीय व कायदेशीर बाबी, तसेच जोखीम आणि त्यावरील उपाय स्पष्ट केलेले असतात. डीपीआर नसल्यास अंदाधुंद खर्च, अपव्यय, भ्रष्टाचार आणि निधीच्या गैरवापराचा धोका वाढतो, असे त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळा प्राधिकरण अधिनियमातील तरतुदींनुसार, कलम 7(1)(अ) अंतर्गत एकात्मिक कुंभमेळा आराखडा, कलम 7(1)(ब) नुसार एकाच प्राधिकरणामार्फत नियोजन व अंमलबजावणी, तर कलम 7(1)(क) नुसार कामांना मंजुरी ही आराखड्यावर आधारित असणे बंधनकारक आहे. तसेच, कलम 15(3) नुसार सर्व निधी कुंभमेळा प्राधिकरणाकडे हस्तांतरित होणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात विभागनिहाय स्वतंत्र कामे व खर्च सुरू असल्याने कायद्याच्या मूळ संकल्पनेलाच हरताळ फासला जात असल्याचा आरोप कुंभार यांनी केला. कुंभमेळ्याच्या उत्कृष्ट नियोजनासाठी 'अत्यंत अनुभवी' मंत्र्यांची समिती नेमण्यात आली असतानाही, जर कायद्याचे पालनच होत नसेल, तर असा कायदा करण्याचा उपयोग काय, असा सवालही विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 12:25 pm

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नयेत म्हणून कुठेतरी कट शिजला:उपमुख्यमंत्रिपद संवैधानिक नाही, तरी घाई का?- विजय वडेट्टीवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करण्यासंदर्भात अजित पवार यांनी का कल्पना दिली नाही हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. भाजपचा निर्णय त्यांच्या पक्षाचे नेते घेतील तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल त्यांच्या पक्षाचे नेते निर्णय घेतील. भाजपला सांगितले का नाही? त्यांना सांगितल्याशिवाय पुढचा काही कार्यक्रमच ठरत नाही का? मग हा पक्ष भाजप म्हणेल त्या पद्धतीने चालतो का? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात. पण एक खरे की दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून हा कट कुठे तरी शिजला आणि त्यातून ही ठिणगी पडली असे मला वाटते असे मला वाटते, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्रिपद हे संवैधानिक पद नाही त्यामुळे हे सर्व काही तेराव्यानंतर सुद्धा होऊ शकले असते. पण यामध्ये खूप काही शिजत आहे. अजित पवार यांची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात अशी इच्छा होती असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले, त्यांनी अजित पवार यांची शपथ सुद्धा घेतली. पण आता राजकारण फार सडके झालेले आहे. मला वाटते की राष्ट्रवादीचे पुढे काय होईल यावर आपण चर्चा न करता ते विधात्यावर सोडून द्यावे. गोयल यांनी अंदाज घेतला विजय वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार यांच्या जवळचे लोकं विलीनीकरणाबद्दल ठासून सांगत आहेत. त्यावरुन आता यावर आम्ही बोलण्यापेक्षा दोन्ही पक्षातील लोकांना काय ते ठाऊक आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊ नये हा कट कुठेतरी शिजला आणि त्यातून ही ठिंणगी पडली असे मला वाटते. पियुष गोयल यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचे वक्तव्य केले आणि अंदाज घेऊन पाहिला. निगेटिव्ह कमेंट आल्याने तो प्रस्ताव थांबवला. नाहीतर काय पटेल होऊन जातील असे सर्व नियोजन होते. विमान अपघाताबद्दल लोकांना संशय विजय वडेट्टीवार म्हणाले की, अजित पवार यांच्या विमानाचा अपघाताबद्दल राज्यातील 80 टक्के लोक संशय व्यक्त करत आहेत. सोशल मिडीयावर आपण सर्व जण पाहतोय की लोकं बोलताय हा अपघात नाही तर घातपात आहे. सहावी बॉडी कुठे गेली? वेळेवर पायलट का बदलला गेला हा सुद्धा प्रश्न आहे. ज्या पायलटचे नाव पुढे आला होता तो जिवंत आहे. कारण तो वेळेवर पोहचू शकला नाही किंवा त्यांच्या ऐवजी कपूर नावाच्या दुसऱ्या पायलेटला तिथे पाठवले. पण एक नक्की की दाल मे कुछ काला लगता है. याची चौकशी होणं गरजेचे आहे. मंत्री स्वत:ला राजे समजताय विजय वडेट्टीवार म्हणाले की, नाही आता नवीन राजे गेलेत आणि हे राजे आलेत स्वत:ला राजे म्हणून घेणाऱ्या लोकांना सरकारचा पैसा आणि मिळकत त्यांची वाटते. खुर्ची आणि सत्ता राजेशाहीप्रमाणे राबवण्याची पद्धत आता वाढीस लागली आहे त्यातूनच असे मंत्री काही वक्तव्य करत करत आहे. ते सेवक आहेत मालक नाहीत. त्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात.नीतेश राणे यांनी काल एक वक्तव्य केले की मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. मी जे सांगेल तेच होईल असे वक्तव्य केले होते यावर बोलताना वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 12:17 pm

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या दाव्यांवर हसन मुश्रीफांनी मांडली वेगळीच बाजू:म्हणाले- जयंत पाटील माझ्याशी बोलले होते; सुनेत्रा वहिनींचाही उल्लेख

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत अनेक चर्चा आणि बैठका झाल्याच्या दाव्यांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. जयंत पाटील माझ्यासाठी बोलले होते, पण मुख्य नेत्यांना घेऊन कोणतीही बैठक झाली नव्हती, असे सांगत मुश्रीफ यांनी या चर्चांना वेगळे वळण दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या जाण्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवार गट यांच्या विलिनीकरणाबाबत अनेक दावे, तर्कवितर्क आणि बैठकींच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसत आहेत. काही नेत्यांकडून या संदर्भात बैठका झाल्याचे संकेत देण्यात आले, तर काहींनी यावर मौन बाळगले. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी केलेले वक्तव्य विशेष लक्षवेधी ठरले आहे. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, जयंत पाटील यांनी विलिनीकरणाच्या संदर्भात त्यांच्याशी काही चर्चा केली होती. मात्र, आम्हाला घेऊन आणि शरद पवार गटातील मुख्य नेत्यांना घेऊन कोणतीही अधिकृत बैठक झाली नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे विलिनीकरणासाठी खरोखरच औपचारिक स्तरावर काही प्रक्रिया सुरू होती का, की ती केवळ चर्चेपुरती मर्यादित होती, हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, या विषयावर मुख्यमंत्र्यांनीही खंडन केल्याचे मुश्रीफ यांनी नमूद केले. अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना मुश्रीफ भावुक झाले. दादा किती मोठे होते, त्यांचा विकासातील वाटा किती मोठा होता, हे सर्वांना माहिती आहे. अजितदादांनंतर आम्ही पोरके झालो आहोत, असे ते म्हणाले. जे पोटात ते ओठात असं स्पष्ट बोलणारे आणि दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व आता नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी आणि पक्षाला आधार देण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी दु:ख बाजूला ठेवत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. विलिनीकरणाच्या चर्चांवर बोलताना मुश्रीफ यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. आम्ही एडीएमध्ये आहोत. त्यांच्या संमतीशिवाय असे काही घडले असते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यामुळे या कथित बैठकींमध्ये नेमके कोण सहभागी होते, आणि त्या बैठकींना कितपत अधिकृत मान्यता होती, याबाबत संभ्रम वाढला आहे. जयंत पाटील यांनी अनेक बैठका झाल्याचे सांगितले असले, तरी त्या बैठकींचे स्वरूप काय होते, याबद्दल स्पष्टता नसल्याचे त्यांनी सूचित केले. मुश्रीफ यांनी सांगितले की, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांदरम्यान अजित पवारांनी काही संकेत दिले होते. ज्यांना तुतारी चिन्हावर लढायचं त्यांनी त्यावर लढा, आणि ज्यांना घड्याळ चिन्हावर लढायचं त्यांनी त्यावर लढा, असे दादांनी सांगितले होते. त्यांच्या सूचनांनुसार काही जिल्ह्यांमध्ये प्रयत्नही करण्यात आले. मात्र, हे प्रयत्न औपचारिक विलिनीकरणाच्या दिशेने होते की स्थानिक पातळीवरील निवडणूक धोरणाचा भाग होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिल्याचे मुश्रीफ यांनी मान्य केले. दादांची दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावी अशी इच्छा होती का? या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, अशा चर्चा आमच्यासमोर कधी झालेल्या नाहीत. त्यांनी ऐकलेल्या वक्तव्यांवरून काही संकेत मिळत असले, तरी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना सामावून घेऊन कोणतीही औपचारिक चर्चा झाल्याचे त्यांना ठाऊक नसल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले. पक्ष एकत्र ठेवणे हीच सध्याची प्राथमिकता राजकीय वर्तुळात सध्या दोन महत्त्वाचे प्रश्न चर्चेत आहेत, विलिनीकरण झाले असते तर शरद पवार भाजपसोबत सत्तेत गेले असते का, की अजित पवार सरकारमधून बाहेर पडले असते? या प्रश्नांवर अद्याप कोणतीही ठोस भूमिका समोर आलेली नाही. मुश्रीफ यांच्या वक्तव्यानंतर मात्र हे स्पष्ट झाले आहे की, या संदर्भातील अनेक चर्चा अजूनही पडद्यामागे आहेत. यथावकाश सुनेत्रा वहिनी आणि पवार परिवार जे ठरवतील, त्यानुसार पुढील दिशा निश्चित होईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, कार्यकर्त्यांना धीर देणे आणि पक्ष एकत्र ठेवणे हीच सध्याची प्राथमिकता असल्याचे मुश्रीफ यांच्या वक्तव्यातून स्पष्टपणे दिसून येते.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 12:00 pm

कळमनुरीत मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ:निकृष्ठ दर्जाचे भोजन, पिण्यासाठी पाणी नाही, कडाक्याच्या थंडीत थंड पाण्याने आंघोळ करण्याची वेळ

कळमनुरी येथे समाज कल्याण विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहात वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. निकृष्ठ दर्जाचे भोजन, पिण्यासाठी पाणी नाही अन गिझर बंद पडल्याने कडाक्याच्या थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. कळमनुरी येथे असलेल्या या वसतीगृहाची विद्यार्थी क्षमता 100 असून सध्या या ठिकाणी 50 विद्यार्थी राहतात. या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही. या संदर्भात विद्यार्थ्यांकडून वारंवार तक्रारी केल्यानंतर देखील गृहपालांचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची प्रचंड हेळसांड होऊ लागली आहे. या ठिकाणी असलेल्या सुमारे 25 ते 30 खोल्यांपैकी केवळ तीन खोल्यांमध्येच पाणी येते. त्यातही छतावर असलेल्या पाण्याच्या टाक्या मागील काही महिन्यांपासून धुतलेल्या नसल्यामुळे घाण पाणी येत आहे. हेच पाणी विद्यार्थ्यांना अंघोळीसाठी वापरावे लागत आहे. विद्यार्थ्यांना अंघोळीसाठी गरम पाण्यासाठी बसविलेले गिझर बंद पडल्याने कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना थंड पाण्याची अंघोळ करावी लागत आहे. या शिवाय स्वच्छतागृहाचीही दुरावस्था झाली असून महिन्यातून केवळ एक वेळच स्वच्छतागृहाची साफसफाई केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांमधून करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर स्वच्छतागृहात पाणी येत नसल्याने विद्यार्थ्यांना खालच्या मजल्यावरून पाणी आणावे लागत आहे. या वसतीगृहामध्ये भोजन निकृष्ठ दर्जाचे दिले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. भोजनात भाता मध्ये आळ्या निघत आहे तर वरणामध्ये किडे निघत आहे. पोळ्या देखील कच्या दिल्या जात आहेत. कंत्राटदारांकडे तक्रार केल्यास तुम्ही जेवण कमी खा म्हणजे चांगले जेवण देता येईल असे सांगितले जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, वसतीगृहातील कारभाराची विद्यार्थ्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे तक्रार केल्यानंतर वंचितचे तालुकाध्यक्ष राजू कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रविवारी ता. 1 पाहणी केली. या पाहणीमध्ये वसतीगृहातील सर्वच गैरप्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी वंचितकडून आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर समाज कल्याण विभागाचे अधिकारी अमोल घुगे यांनी वसतीगृहात धाव घेतली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला. वसतागृहातील विद्यार्थ्यांना योग्य सोयी सुविधा देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. यासंदर्भात अधिकारी अमोल घुगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही दोषीवर कारवाई करावी- कांबळे वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष राजू कांबळे म्हणाले की, या वसतीगृहात असलेल्या गैरसोयींची चौकशी करावी तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.या शिवाय वसतीगृहाच्या गृहपालावर कारवाई करावी. यापुढे विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यास वंचितकडून तिव्र आंदोलन केले जाईल.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 11:29 am

विलिनीकरणावर आधी शरद पवार गट बोलेल, मग आम्ही- सुनील तटकरे:भाजप मित्रपक्ष आहे, पण निर्णय आमचेच; राऊतांच्या टीकेला काहीच महत्त्व नाही

आज आम्ही एनडीमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत. देशाच्या विकासासाठी आम्ही एक आहोत. भाजपच्या विचारांशी प्रणित एनडीएमध्ये येण्यासाठी भूमिका ज्यांना सोबत यायचे त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात आमच्या पक्षाची भूमिका ठरली, त्यानुसार आम्ही निवडणूक लढवली आणि जिंकलो, विलीनीकरणाबद्दल शरद पवार गटातील नेते बोलल्यानंतर आम्ही बोलू, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपचा मित्रपक्ष आहे. भाजपने कधीही आम्हाला कोणता निर्णय घ्यावा असे सांगितले नाही. आमच्या पक्षाचे निर्णय आम्हीच घेतो भाजप मित्रपक्ष म्हणून आमच्या निर्णयाच्या सोबत आहे. प्रफुल्ल पटेल आणि माझी काही वेगळी भूमिका नाही. शरद पवार यांनी माझी प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक केली मी यशस्वीपणे काम केले. अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करण्यात यावी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर आमची सुद्धा तीच भूमिका आहे. राऊत काय म्हणतात त्याला महत्त्व नाही सुनील तटकरे म्हणाले की, संजय राऊत काय म्हणतात याला मी फारसे महत्त्व देत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या नेतृत्वात एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राज्यातील जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत यावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे प्रत्येक जण टीका करत असतो, संजय राऊत यांची टीका यापेक्षा काही वेगळी असेल असे मला वाटत नाही, विलीनीकरण कुठल्या पक्षाचे कुठल्या पक्षात होणार? सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनकरणाच्या संदर्भात शशिकांत शिंदे काय बोलले याबद्दल काही बोलणार नाही. पण इतर सहकार्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या ते अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच सुरू झाले. विलीनीकरण कुठल्या पक्षाचे कुठल्या पक्षात होणार? याचा खुलासास किंवा माहिती कळाली तर मला बोलता येईल. वडेट्टीवारांनी आमच्या पक्षावर बोलू नये सुनील तटकरे म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांनी आमच्या पक्षावर बोलण्यापूर्वी चंद्रपूर मनपामध्ये काँग्रेसचा महापौर करावा. काँग्रेस अंतर्गत नगरसेवक पळवापळवी करणाऱ्या विजय वडेट्टीवारांनी आमच्या पक्षाबद्दल फारसे बोलण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी महापौर पदाकडे लक्ष दिले पाहिजे. आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढवली आणि 41 जांगावर उमेदवार निवडून आणले. आमचा पक्ष बळकट आहे. नेता निवडीचा अधिकार हा निवडून आलेला आमदारांचा असतो.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 11:20 am

अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कशी भरून काढणार?:रोहित पवारांचा सवाल, म्हणाले - नवीन पिढीसमोर 'छत्र' धरण्याचे आव्हान

अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली असली, तरी अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अशक्य असल्याचे चित्र दिसत आहे. अजितदादांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा आपल्या भावनांना वाट करून देत एक हृदयस्पर्शी ट्विट केले आहे. अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण आणि कशी भरून काढणार? असा आर्त सवाल त्यांनी या माध्यमातून उपस्थित केला आहे. रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, माणूस किती मोठा होता हे समजण्यासाठी आधी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागतो, असे म्हटले जाते. दादांच्या मोठेपणाची जाणीव कुटुंबातील व्यक्ती म्हणून मला आधीपासूनच होती, पण गेल्या चार-पाच दिवसांपासून सामान्य माणसे ज्या आठवणी सांगत आहेत, त्यावरून दादांचे अफाट कर्तृत्व पुन्हा नव्याने अनुभवायला मिळत आहे. नवीन पिढीसमोर 'छत्र' धरण्याचे आव्हान अजितदादांच्या निधनामुळे त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आज खऱ्या अर्थाने 'पोरका' झाला आहे. रोहित पवार यांनी या परिस्थितीचे वर्णन करताना म्हटले आहे की, या लोकांसाठी पुन्हा एकदा आधारवड बनण्याची आणि त्यांच्या डोक्यावर छत्र धरण्याची अत्यंत कठीण जबाबदारी आता आमच्यासारख्या नवीन पिढीवर आली आहे. ही जबाबदारी आम्ही आमच्या परीने नक्कीच निभावू, पण दादांची जागा कोणी घेणे शक्य आहे का? रोहित पवार यांची पोस्ट जशीच्या तशी... राजकारणातील एखादा नेता आपल्यातून निघून जातो पण मागं राहणाऱ्या किती जणांच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम होतो, त्यांचं किती नुकसान होतं हे गेल्या चार-पाच दिवसांपासून पाहतोय. सध्या अनेक लोकं भेटतायत आणि मा. अजितदादांबाबतच्या त्यांच्या असंख्य आठवणी भाऊक होऊन सांगतात. हे लोकं फक्त राष्ट्रवादी काँग्रस पक्षाशी किंवा राजकारणाशी संबंधित आहेत असं नाही तर सामान्य माणसं आहेत, पण अजितदादांमुळं त्यांच्या जीवनात कसं परिवर्तन झालं, अजितदादांनी त्यांचं कोणतं काम केलं, कशी मदत केली हे सांगत असताना त्यांना अश्रू आवरणं कठीण होतं. हे अनुभवत असताना मा. अजितदादा किती मोठे होते आणि त्यांच्या जाण्याने किती नुकसान झालं, समाजमनावर दुःखाची किती मोठी छाया पसरली, हे दिसतं. म्हणतात ना की, माणूस किती मोठा होता हे समजण्यासाठी आधी त्याला जगाचा निरोप घ्यावा लागतो. अजितदादांचं मोठेपण माझ्यासारख्या कुटुंबातल्या व्यक्तीला तर पहिल्यापासूनच माहित होतं, पण त्यापेक्षाही अजितदादा किती मोठे होते हे मलाही आता पुन्हा नव्याने अनुभवायला मिळतंय. अजितदादांवर प्रेम करणारी ही माणसं आज पोरकी झालीत आणि त्यांच्या डोक्यावर पुन्हा छत्र धरण्याची खूप अवघड जबाबदारी आमच्यासारख्या नवीन पिढीवर आलीय. ती आम्ही आमच्यापरिने नक्कीच निभावू पण तरीही प्रश्न उरतो की, अजितदादांच्या नसण्याने निर्माण झालेली भली मोठी पोकळी कोण आणि कशी भरुन काढणार? दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेने जोर घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या संदर्भातील सर्व घडामोडींचा सविस्तर 'इतिवृत्तांत' जनतेसमोर मांडण्याचा निर्णय घेतला असून ९ फेब्रुवारीनंतर आमदार रोहित पवार आणि इतर प्रमुख नेते एक मोठी पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत १७ जानेवारी २०२६ रोजी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीचे व्हिडिओ चित्रीकरण आणि इतर पुराव्यांसह विलीनीकरणाचे नेमके काय टप्पे ठरले होते, याची सविस्तर माहिती उघड केली जाणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 11:10 am

महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल; थंडीचा कडाका ओसरणार:शीतलहरीची शक्यता धूसर, उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात हवामान राहील उष्ण

हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार,राज्यात थंडीचा प्रभाव ओसरून उबदार हवामान राहण्याची दाट शक्यता आहे. ‘ला-निना’चा प्रभाव कमकुवत झाल्याने आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे, किमान व कमाल तापमानात सरासरीपेक्षा वाढ नोंदवली जाऊ शकते. संपूर्ण महिन्यात शीतलहरीची शक्यता धूसर असून, उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात हवामान उष्ण राहील. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात थंडी ओसररून किमान तापमानात वाढ होईल पहिला आठवडा : कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रात रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. मराठवाडा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात दिवसाचे तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले जाईल. दुसरा आठवडा : कोकणात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्तच राहील, तर मराठवाड्यात ते सरासरी इतके असेल. हवामान कोरडे राहील. तिसरा व चौथा आठवडा : उन्हाचा चटका महिनाअखेरीस वाढण्याची शक्यता. जळगावात उच्चांकी ४१.१ तापमानाची नोंद १९७४ मध्ये : फेब्रुवारीत जळगावात १९७४ साली राज्याचा सर्वाधिक ४१.२ अंश सेल्सिअसचा उच्चांक नोंदवला गेला. नाशिकमध्ये १९७२ मध्ये पारा ऐतिहासिक १.१ अंशांपर्यंत घसरल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यात १९११ सालापासूनचे थंडीचे विक्रम अद्याप कायम आहे. बाष्पयुक्त वारे आणि ढगाळ वातावरणामुळे तापमान वाढले - दिव्य मराठी एक्स्पर्ट: एस. डी. सानप, हवामान वैज्ञानिक फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच राज्याच्या किमान तापमानात वाढ नोंदवण्यात येत आहे. हवामान बदलाच्या या प्रक्रियेत वाऱ्यांच्या दिशेत झालेला बदल हे प्रमुख शास्त्रीय कारण आहे. सध्या बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने हवेतील आर्द्रता वाढली आहे. परिणामी, अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. तेव्हा जमिनीतून उत्सर्जित होणारी उष्णता वातावरणात अडकून राहते, ज्यामुळे किमान तापमानात वाढ होते.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 11:09 am

पुण्यात आरोपीचा पोलीस ठाण्यातून पळण्याचा प्रयत्न:विश्रांतवाडीत उडी मारताना पकडून अटक

विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या इमारतीतून उडी मारून पसार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. साहिल सादिक शेख (वय 21, रा. इंदिरानगर, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल शेखला एका गुन्ह्यात विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 31 जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात येणार होती. याच दरम्यान, शेखने उलटी होत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्याला पोलिस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरील कक्षात ठेवण्यात आले होते, जिथे पोलिस शिपाई सचिन पवार त्याच्यासोबत होते. शेखने अचानक पोलिस शिपाई पवार यांचा हात झटकला आणि पहिल्या मजल्यावरून उडी मारून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस शिपाई पवार यांनी प्रसंगावधान राखून शेखला तात्काळ ताब्यात घेतले. यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई सचिन पवार यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुगडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. बनावट वाहन क्रमांक वापरणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा बनावट वाहन क्रमांकाची पाटी वापरणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकणी तहा मन्सूर अली (वय 19, रा. कुबेरा पार्क, कोंढवा,पुणे ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार महेंद्र राऊत यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार राऊत हे कोथरूड वाहतूक विभागात नियुक्तीस आहेत. आरोपी दुचाकीस्वार तरुण 30 जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पौड फाटा चौकातून निघाला होता. पोलिस हवालदार राऊत यांना वाहनाच्या पाटीवर असलेल्या क्रमांकाबाबत संशय आल्याने त्यांनी दुचाकीस्वार तरुणाला अडवले. त्याची चैाकशी करुन दुचाकीच्या कागदपत्रांबाबत मागणी केली. तेव्हा आरोपी तरुणाने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत तरुणाने बनावट क्रमांकाचा वापर केल्याचे उघडकीस आले. बनावट क्रमांकाचा वापर करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याात आला. सहायक फौजदार कोंडे तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 10:41 am

पुण्यात मोटारीतून सोडण्याचा बहाणा करुन तरुणाला लुटले:मोटार चालकासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे शहरातील नगर रस्ता परिसरात एका तरुणाला मोटारीतून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटण्यात आले. मोटार चालक आणि त्याच्या चार साथीदारांनी तरुणाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत ऑनलाइन पद्धतीने 18 हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी येरवडा येथील लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार पेठेतील नरपरतगिरी चौकात राहणारा तक्रारदार तरुण 30 जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास नगर रस्ता परिसरात पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनाची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी एका मोटारीतून आलेल्या आरोपींनी त्याला पुणे स्टेशनपर्यंत सोडण्याची बतावणी केली. मोटारीत बसल्यानंतर मोटार चालक आणि त्याच्या साथीदारांनी तरुणाला मारहाण केली. त्याला नगर रस्ता आणि बंडगार्डन रस्ता परिसरातून फिरवण्यात आले. आरोपींनी तरुणाला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून ऑनलाइन पद्धतीने 18 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर आरोपींनी तरुणाला रस्त्यात सोडून मोटारीसह पळ काढला. घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली असून, सहायक पोलिस निरीक्षक नंदनवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्रवासी महिलेचा विनयभंग दरम्यान, बाणेर भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटार चालकाने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरात राहणाऱ्या 42 वर्षीय महिलेने प्रवासी वाहतूक करणाऱ्या ॲप आधारित मोटार सेवेसाठी नोंदणी केली होती. रविवारी (1 फेब्रुवारी) सकाळी पावणेनऊच्या सुमारास मोटार चालकाने महिलेला बाणेर परिसरात सोडले. मोटार भाड्यावरून मोटार चालक आणि महिलेत वाद झाला. त्यानंतर मोटार चालकाने महिलेशी अश्लील कृत्य करून घटनास्थळावरून पळ काढला.पसार झालेल्या मोटार चालकाचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस हवालदार एस. शिरसाठ या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 10:39 am

हिंगोली तालुक्यातील फाळेगावात कापड दुकानासह घरफोडी:चोरट्यांकडून सुमारे 1 लाखांचा ऐवज लंपास, बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथे एका कापड दुकानासह घरफोडीकरून चोरट्यांनी 1 लाख रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तीन चोरट्यांविरुध्द बासंबा पोलिस ठाण्यात रविवारी ता. 1 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील फाळेगाव येथील तान्हाजी वैद्य यांचे फाळेगाव येथे कापड दुकान आहे. नेहमी प्रमाणे वैद्य हे शनिवारी ता. 31 रात्री दुकानबंद करून घरी गेले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी दुकानातील साहित्याची नासधुस केली. त्यानंतर गल्ल्यात ठेवलेले रोख 40 हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. दरम्यान, त्यानंतर चोरट्यांनी गावातील उत्तम असोले यांच्या घराचे कुलुप कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातही सामानाची नासधुस करून कपाटात ठेवलेले 50 हजार रुपये व 10 तोळे वजनाची चांदी असा 60 हजाराचा मुद्देमाल पळविला. दरम्यान, कापड दुकानदार वैद्य हे रविवारी ता. 1 सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असतांना त्यांना दुकानाचे कुलुप तुटलेले दिसून आले. त्यामुळे दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच तातडीने बासंबा पोलिसांना माहिती देण्यात आली. बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक एस. जी. काळे, मदन गव्हाणे, जमादार पोले, भडके यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी गावातील असोले यांचे घर फोडण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथेही जाऊन पाहणी केली आहे. यावेळी एका सीटीटीव्ही कॅमेऱ्यामधे तीन चोरटे दिसून आले. या प्रकरणी वैद्य यांच्या तक्रारीवरून बासंबा पोलिसांनी तीन चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जमादार भडके पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 10:27 am

स्वतंत्र लढलो तिथे सत्तेमध्ये वाटा नाही, नाशकात महाजनांकडून शिंदेसेनेची कोंडी:मित्रपक्षाला स्थान म्हणजे स्वपक्ष कार्यकर्त्यांवर अन्याय असल्याची भूमिका

राज्यात आम्ही जेथे महायुतीच्या माध्यमातून महापालिकेच्या निवडणुका लढलो, तेथेच मित्रपक्षांना सत्तेत घेतले जाईल. जेथे स्वतंत्र लढलो, तेथे त्यांना सत्तेत घेणे म्हणजे आमच्या पक्षातील लोकांवर अन्याय होणार असल्याचे सांगत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत देत कोंडी केली. रविवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, जेथे स्वतंत्र लढलो, तेथे कुबड्यांची गरजच नाही. आम्ही स्वबळावर ताकद दाखवून दिली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाली होती. पालिकेतील 122 पैकी 72 जागा भाजपने स्वबळावर जिंकून पुन्हा एकहाती सत्ता मिळवली. विरोधात लढणाऱ्या शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 26 आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) चार नगरसेवक निवडून आले. केंद्र व राज्यात तिन्ही पक्ष सत्तेत एकत्र आहेत. त्यामुळे नाशिक महापालिकेतसुद्धा भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने एकत्र काम करावे, अशी भूमिका भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी मांडली होती. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीने ‘पटेल ऐवजी पाटील’ यांच्यावर अध्यक्षाची जबाबदारी सोपवावी असे म्हटले. यावर महाजन म्हणाले, ठाकरेंनी स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्यावे. नाशिकमधील त्यांचा एकमेव नगरसेवक आमच्याकडे येण्यास तयार असल्याचे सांगत त्यांनी उपस्थितांना अवाक केले. नाशिकमध्ये भाजपला कुबड्यांची गरज नाही. भाजपचे 72 नगरसेवक निवडून आले असून त्याच्यात महत्वाची पदे वाटली जातील, असे संकेत महाजन यांनी दिले. नाशिक महापौर मुंबईत ठरवणार गिरीश महाजन म्हणाले की, भाजप सरकाने 11 वर्षांच्या काळात घेतलेल्या निर्णयामुळे देशाची प्रगती झाली असून आपण आता एक्स्पोर्टर झालो आहोत. 2047 मध्ये आपला देश आर्थिक महासत्ता असेल. नाशिकमध्ये महापौरपदाच्या शर्यतीत भाजपमधील 40 पैकी 10 नगरसेविका आग्रही असल्याने या पदाचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित नाशिकच्या महापौर पदाबाबत निर्णय होणार आहे. महापालिका निवडणूकीत भाजपने 72 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. नाशिकचे महापौरपद सर्वसाधारण महिला संवर्गासाठी जाहीर झाल्याने भाजपच्या 40 पैकी 16 महिला या पदासाठी पात्र आहेत. पत्रकार परिषदेनंतर मंत्री महाजन यांना महापौरपदाबाबत विचारले असता या पदासाठी 10 महिला आग्रही असल्याचे सांगत यावरर मुंबईत निर्णय होईल,असे स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 10:22 am

रिल्सचे वेड जीवावर; डिप्लोमाचा विद्यार्थी बुडाला:सिद्धेश्वर तलावात पोहता पाेहता बेपत्ता, मित्र करत होते शूटिंग, वाचवण्याचे प्रयत्न फोल

सोशल मीडियासाठी रिल्स बनवण्याच्या नादात मित्रमंडळी असताना डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास सिद्धेश्वर तलावात घडली. सुरंजन शेंडगे (16, रा. अशोक चौक, मूळ रा. रादाळे, ता. फलटण) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. तो सोलापुरात शिक्षण घेत होता. सुरंजन हा बेलेराव आणि माळवदकर या दोन मित्रांसह पोहण्यासाठी गेला होता. गणपती घाटावरून त्याने पाण्यात उडी मारली. मित्र शूटिंग करत होते. अचानक नाका-तोंडात पाणी गेल्याने सुरंजन गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी बेलेराव याने उडी मारली, मात्र तोही बुडू लागला. हे पाहून माळवदकरने आरडाओरडा केली. एका होडी चालकाने बेलेराव याला वाचवले पण सुरंजन पाण्याचा मध्यभागी बुडाला होता. अडीच तास शोधूनही सापडला नाही... सुरंजन हा एकुलता एक मुलगा होता. तो सोलापुरात चुलत मावस भावाकडे राहत होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलिसांनी अडीच तास शोध मोहीम राबवली पण सुरंजन सापडला नाही. अंधार झाल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले असून सोमवारी सकाळी पुन्हा मोहीम राबवण्यात येणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 10:10 am

सोलापूर मनपात कोंड्याल की धक्कातंत्र; नवा महापौर आज ठरणार:आज अर्ज दाखल करणार, गोरेंची भूमिका महत्त्वाची, भाजपच्या निर्णयाकडे लक्ष

महापौरआणि उपमहापौरपदासाठी सोमवारी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. सकाळी 10 ते 11.30 वाजेपर्यंत त्यासाठी मुदत आहे. सोलापूर मनपात 102 पैकी भाजपचे 87 नगरसेवक असल्याने त्यांचाच बिनविरोध महापौर होणार हे निश्चित आहे. पण त्यासाठी पक्षश्रेष्ठी कुणाचे नाव पुढे करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. कोठे व देशमुख गट आपल्याच उमेदवारांसाठी आग्रही आहेत. त्यामुळे उमेदवार देताना गटबाजी होऊ नये म्हणून पक्षाने व्हीप बजावला. त्यात म्हटले की, ‘पक्षाला न विचारता कोणालाही सूचक वा अनुमोदक होऊ नका.’ कोठे गटाकडून विनायक कोंड्याल व देशमुख गटाकडून किरण देशमुख यांची नावे आतापर्यंत चर्चेत होती. पण आता गटनेतेपदी निष्ठावंत नरेंद्र काळेंची निवड झाल्यानंतर महापौरपदासाठीही गटबाजीऐवजी निष्ठावंतांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे महिलाआघाडी शहराध्यक्षा रंजिता चाकोते यांचेही नाव चर्चेत आले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरेंकडे पक्षाने सर्व निर्णयाचे अधिकार दिले आहेत. ते कोणाचे नाव पुढे करतात यावर नवा महापौराचे भवितव्य ठरेल. पुन्हा महिलेलाच संधी देण्यावर विचारमंथन विनायक कोंड्याल वकिरण देशमुख यांची नावे चर्चेत असतानाच अचानक रंजिता चाकोते यांच्या नावाची चर्चा सुरु करण्यात आली. कोंड्याल हे आमदार कोठे यांचे भाऊजी आहेत. पण ते निवडणुकीपूर्वीच भाजपात आले आहेत. त्यामुळे आयारामांना संधी द्यायची की नाही यावर पक्षात खल सुरु आहे. दुसरीकडे किरण देशमुख हे आमदार पूत्र आहेत, त्यांना संधी दिली तर घराणेशाहीचा ठपका पक्षावर बसू शकतो. तसेच पुन्हा गटबाजीआणि पक्षांतर्गत संघर्ष आणखी पेटण्याची भीती आहे. यावर उपाय म्हणून कुठल्याही गटात नसलेल्या चाकोते यांचे नाव पुढेआलेआहे. त्या पक्षाच्या महिलाआघाडी अध्यक्षाआहेतच. शिवाय रोहिणी तडवळकर यांच्या निकटवर्तीय आहेत. गेली 10 वर्षे महिलाच महापौर होत्या, त्यामुळे पुन्हा महिलेलाच संधी द्यावी, असा मतप्रवाहआहे. नगरसेवकांना न विचारता उमेदवार जाहीर करणार नगरसेवकांना न विचारताच महापौरपदासाठीच्या उमेदवाराची प्रदेश भाजपमार्फत घोषणा होणारआहे. आतापर्यंत भाजप नगरसेवकांच्या दोन वेळा बैठका झाल्या. 19 जानेवारीला हॉटेलमध्ये व 24 जानेवारीला सारस्वत ब्राह्मण मंगल कार्यालयात बैठक झाली. पण त्यात महापौरपदी कोण उमेदवार असावा, याबाबत नगरसेवकांचे मत नेत्यांकडून विचारण्यात आले नाही. त्यामुळे आता सदस्यांना न विचारताच नाव जाहीर होईल. निष्ठावंत नरेंद्र काळेंची निवड झाल्यानंतर महापौरपदासाठीही गटबाजीऐवजी निष्ठावंतांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे महिलाआघाडी शहराध्यक्षा रंजिता चाकोते यांचेही नाव चर्चेत आले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरेंकडे पक्षाने सर्व निर्णयाचे अधिकार दिले आहेत. ते कोणाचे नाव पुढे करतात यावर नवा महापौराचे भवितव्य ठरेल.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 9:59 am

नाशिकमध्ये महापाैरपदासाठी 10 महिला आग्रही:मात्र अंतिम फैसला हाेणार मुंबईतच, मंत्री गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण, 40 पैकी 16 नगरसेविका पात्र

महापौरपदाच्या शर्यतीत भाजपमधील 40 पैकी 10 नगरसेविका आग्रही असल्याने या पदाचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित नाशिकच्या महापौर पदाबाबत निर्णय होणार असल्याचे जलसंपदा तथा नाशिकचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत भाजपच्या कार्यालयात मंत्री महाजन यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेश असल्याचे सांगतानाच भाजप सरकाने 11 वर्षांच्या काळात घेतलेल्या निर्णयामुळे देशाची प्रगती झाली असून आपण आता एक्स्पोर्टर झालो आहोत. 2047 मध्ये आपला देश आर्थिक महासत्ता असेल असा दावा त्यांनी केला. यावेळी आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, प्रवक्ते गोविंद बोरसे आदींसह नगरसेवक उपस्थित होते. व्यासपीठावर स्पर्धक नगरसेविका विराजमान महापालिका निवडणूकीत भाजपने 72 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. नाशिकचे महापौरपद सर्वसाधारण महिला संवर्गासाठी जाहीर झाल्याने भाजपच्या 40 पैकी 16 महिला या पदासाठी पात्र आहेत. पत्रकार परिषदेनंतर मंत्री महाजन यांना महापौरपदाबाबत विचारले असता या पदासाठी 10 महिला आग्रही असल्याचे सांगत यावरर मुंबईत निर्णय होईल,असे स्पष्ट केले. यावेळी मंत्री महाजन यांच्यासमवेत व्यासपीठावर महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या हिमगौरी आडके, स्वाती भामरे, डॉ. दीपाली कुलकर्णी व सुप्रिया खोडे विराजमान झालेल्या होत्या.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 9:59 am

छत्रपती संभाजीनगरात ‘भिशी’तून माय-लेकाने घातला 3 कोटींचा गंडा:15 हून अधिक जणांची फसवणूक, गुन्हा दाखल

जादा परताव्याचे आमिष आणि ‘भिशी’च्या विश्वासावर शहरात एक मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. केवळ सातवी पास असलेल्या एका महिलेने आपल्या मुलाच्या साथीने शहरातील 16 हून अधिक नागरिकांना 2 कोटी 99 लाख रुपयांचा गंडा घातला. विशेष म्हणजे, गुंतवणूकदारांच्या पैशांवर या महिलेने शहरात 70 लाखांचा बंगला बांधला, तर स्वतःच्या गावी शेती घेऊन तेथे मंदिरही उभारले. पैशांची परतफेड न करता धमकावणाऱ्या या माय-लेकावर मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जयश्री गजानन गिरी (42, रा. मुकुंदवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नंदाबाई आधुडे ही 2014-18 पासून भिशी चालवत होती. सुरुवातीला छोट्या रकमेच्या भिशी वेळेवर पूर्ण करून तिने महिलांचा विश्वास संपादन केला. नोव्हेंबर 2022 मध्ये तिने 12 लाख रुपयांची भिशी सुरू केली. जयश्री गिरी यांनी त्यात 10 लाख रुपये भरले होते, तर त्यांचे जुने 10 लाख असे एकूण 20 लाख रुपये नंदाबाईकडे जमा होते. 2018 ते 2025 या काळात माय-लेकांनी 15 हून अधिक लोकांकडून सुमारे 2 कोटी 92 लाख रोख आणि 6 लाख 99 हजार रुपये ऑनलाइन स्वरुपात जमा करून घेतले. मुदत संपल्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार उघडकीस आला. फसवणूक झालेल्यांमध्ये सपना मरकड (50 लाख), मीरा फलके (50 लाख), विलास माने (30 लाख), कमलबाई सुरसे (21.50 लाख) यांच्यासह इतर 11 जणांचा समावेश आहे. गुंतवणूकदारांनाच धमक्या मूळची जालना जिल्ह्यातील (ता. घनसावंगी) असलेली नंदाबाई मागील 15 वर्षांपासून शहरात वास्तव्यास आहे. भिशीच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशातून तिने शहरात 70 लाखांचे घर, 3 ते 4 ठिकाणी मालमत्ता आणि गावात शेती घेतल्याचे समोर आले आहे. गुंतवणूकदारांनी पैसे मागितल्यास त्यांना उलट पोलिसांत खोट्या तक्रारी करण्याची भीती दाखवली जात होती.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 9:47 am

नवे पदाधिकारी येण्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर महापालिकेत खांदेपालट:वसंत भोयेंकडे ‘पाणी’, तर सविता सोनवणेंकडे ‘अतिक्रमण’

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत महापौर आणि उपमहापौर यांच्यासह नवीन लोकप्रतिनिधींनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रशासकीय यंत्रणेला गती देण्यासाठी मोठे फेरबदल केले आहेत. निवडणूक प्रक्रिया संपताच रिक्त पदे भरण्यावर आणि महत्त्वाच्या विभागांमध्ये अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यावर त्यांनी भर दिला आहे. अभियंत्यांच्या खांद्यावर ‘रस्ता’ अन् ‘यांत्रिकी’ रस्ते विकासाचा विभाग आता कार्यकारी अभियंता बाळासाहेब शिरसाट यांच्या नियंत्रणाखाली असेल. त्यांना उपअभियंता म्हणून संजय कुलकर्णी, आरती नवगिरे आणि लक्ष्मीकांत कोतकर सहकार्य करतील. कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) म्हणून सचिन वाईकर, तर कार्यकारी अभियंता विजय गोरे यांच्याकडे घनकचरा स्थापत्य, बीओटी आणि इमारती हे विभाग सोपवण्यात आले आहेत. झोन, वॉर्ड स्तरावर बदल झोन 1 मध्ये अर्चना राजपूत यांची वॉर्ड अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय झोन 4 मध्ये उदय मानवतकर, झोन 7 मध्ये विलास भणगे आणि झोन 10 मध्ये लता पुजारी यांना जबाबदारी दिली आहे. सहायक आयुक्त ऋतुजा पाटील यांच्याकडे पर्यटन, कामगार आणि पर्यावरण हे विभाग असतील, तर उदय मोकाशी कर नियंत्रण कक्ष पाहतील. मनपात करण्यात आलेल्या नियुक्त्या पाणीपुरवठा : शहराच्या अत्यंत कळीच्या पाणीपुरवठा विभागाची संपूर्ण धुरा कार्यकारी अभियंता वसंत भोये यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.अतिक्रमण हटाव : या विभागाची सूत्रे आता उपायुक्त सविता सोनवणे सांभाळतील.कामगार विभाग : या विभागाचा अनुभव असलेले उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांची पुन्हा एकदा या पदावर वर्णी लागली आहे.दक्षता कक्ष : महत्त्वाच्या असलेल्या दक्षता कक्षाच्या प्रमुखपदी पुन्हा एकदा एम. बी. काझी यांना पसंती दिली.नगररचना व गुंठेवारी : उपअभियंता संजय चामले यांची परत नगररचना विभागात बदली करून त्यांच्याकडे गुंठेवारी कक्षाची जबाबदारी दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 9:40 am

मुंबई महापालिकेत 'महायुती'ची नवी खेळी!:दोन स्वतंत्र गटांची करणार नोंदणी; शिवसेनेच्या गटनेतेपदी शिंदेचे विश्वासून अमेय घोले यांची निवड

मुंबई महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेचे पडघम वाजू लागले असतानाच महायुतीने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्या २९ नगरसेवकांची गट नोंदणी करण्याची तयारी पूर्ण केली असून, अभ्यासू आणि विश्वासू नगरसेवक अमेय घोले यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमेय घोले यांची निवड करण्यामागे त्यांचा महापालिकेतील दांडगा अनुभव कारणीभूत असल्याचे बोलले जाते. अमेय घोले हे गेल्या तीन टर्मपासून नगरसेवक म्हणून निवडून येत असून त्यांना पालिकेच्या कामकाजाची सखोल माहिती आहे. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जाते. तसेच अमेय घोले यांचा दांडगा जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू ठरली आहे. महायुतीची दोन स्वतंत्र गटांत नोंदणी मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६५ आणि मनसेचे ६ नगरसेवक निवडून आल्याने स्थायी समितीत सत्ताधारी आणि विरोधकांचे संख्याबळ समसमान होण्याची चिन्हे होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर तोडगा काढला आहे. आज कोकण भवनात भाजपच्या ८९ नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी होईल. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ नगरसेवक आणि शरद पवार गटातील १ नगरसेवक अशा एकूण ४ नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेला समर्थन दिले आहे. या संख्याबळामुळे शिंदे सेना आणि राष्ट्रवादी एकत्रित गट स्थापन करणार आहेत. अशा प्रकारे महायुतीचे दोन स्वतंत्र तांत्रिक गट स्थापन झाल्यामुळे, नियमानुसार महायुतीचा स्थायी समितीमधील आकडा एकाने वाढणार आहे. यामुळे समितीमध्ये कोणतेही प्रस्ताव मंजूर करताना महायुतीला कोणाच्याही पाठिंब्याची गरज उरणार नाही. सोमवारी सकाळी 10 वाजता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रसेचे नगरसेवक मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात जमतील. येथून हे सर्वजण कोकण भवन येथे गट नोंदणीसाठी रवाना होतील. शिंदेंचे दबावतंत्र मागे, महायुतीमध्ये समन्वय निवडणूक निकालानंतर पहिली अडीच वर्षे महापौरपद मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून काही काळ दबावतंत्राचा वापर करण्यात आला होता, ज्यासाठी नगरसेवकांना हॉटेलमध्येही ठेवण्यात आले होते. मात्र, भाजपने तडजोड न करण्याची भूमिका घेतल्यामुळे अखेर समन्वय साधण्यात आला आहे. आज सकाळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक पालिका मुख्यालयात जमून तिथून एकत्रितपणे कोकण भवनाकडे रवाना होणार आहेत.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 9:38 am

शहरातील ‘हॉकर्स झोन’ ओस; फेरीवाले, विक्रेते पुन्हा रस्त्यावर:गांधी रोड, बाजारपेठेत विक्रेत्यांच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष‎

शहरात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने आणि पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी मोठा गाजावाजा करत सहा महिन्यांपूर्वी खुले नाट्यगृहाच्या बाजूला भाटे क्लबलगत स्थापन केलेल्या हॉकर्स झोनमध्ये गांधी रोडवरील सुमारे दीडशे ते दोनशे पथविक्रेत्यांना १ ऑगस्टपासून स्थलांतरीत केले होते. मात्र अवघ्या पाच महिन्यातच मनपाच्या दुर्लक्षामुळे ‘हॉकर्स झोन’चा बोजवारा उडाला असून, हॉकर्स झोनमधील चार-पाच विक्रेते वगळता इतर सर्वांनी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करून आपला व्यवसाय सुरु केला आहे. बाजारपेठेसह गांधी रोडवरील सर्व किरकोळ व्यावसायिकांना हॉकर्स झोनमध्ये स्थलांतरीत करण्यासाठी सहा महिन्यापूर्वी मनपा आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांनी पुढाकार घेतला होता. हॉकर्स झोनमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा मनपाने पुरवल्या. त्यांच्या आवाहनाला दीडशेवर पथ विक्रेते आणि फेरीवाल्यांनी प्रतिसाद देत १ ऑगस्टपासून दिवाळीपर्यंत येथे आपली दुकाने लावली. ग्राहकही येथे येण्यास सुरवात झाली होती. त्यानंतर मात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील खुले नाट्यगृह ते जैन मंदिर आणि गांधी रोड ते सिटी कोतवाली परिसरात रस्त्याच्या उर्वरित पान ४ मनपा अतिक्रमण विभाग, ट्रॅफिक पोलिसांचेही दुर्लक्ष गांधी रोड, फतेह चौक आणि काला चबुतरा भागात पायी चालणेही अवघड होेते, सहा महिन्यांपूर्वीची रस्त्यांवरील अतिक्रमणाची स्थिती पुन्हा ‘जैसे थे’ झाली आहे. सायंकाळी तर या भागातून दुचाकी घेऊन मार्ग काढताना कसरतच करावी लागते. बस स्थानकाकडून खुले नाट्यगृहाकडे जाणाऱ्या गांधी रोड परिसरात फुटपाथवर आणि रस्त्याच्या कडेला किरकोळ वस्तू आणि रेडिमेड कापड विक्रेत्यांनी दुकाने, हातगाड्या लावल्यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांना त्रास होत आहे. अतिक्रमण विभाग आणि शहर वाहतूक पोलिसांच्या गाड्या बाजारात फिरतात मात्र, अतिक्रमण काढण्यास कुणी धजावत नसल्याचे चित्र आहे. ^गेल्या दीड- दोन महिन्यांपासून यंत्रणा निवडणुकीत व्यस्त असल्याने अतिक्रमणाकडे दुर्लक्ष झाले आहे. आता निवडणूक आटोपल्याने लवकरच पथ विक्रेत्यांच्या अतिक्रमणावर कारवाईसाठी मोहीम राबवली जाईल. हॉकर्स झोनमध्येच बसून त्यांनी व्यवसाय करावा, अन्यथा त्यांच्यावर पोलिसांच्या मदतीने कडक कारवाई केली जाणार आहे .- डॉ. सुनील लहाने, महापालिका आयुक्त.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 9:24 am

आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठीची जबाबदारी युवा पिढीने स्वीकारावी:कृषी आपत्ती व्यवस्थापन शिबिरात कुलगुरूंचे आवाहन‎

राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर अर्थात आव्हान- चान्सलर्स ब्रिगेड’ चा समारोप डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झाला. या शिबिरात विद्यार्थी-विद्यार्थ िनींनी आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे गिरवले. युवकांचा देश म्हणून संपूर्ण विश्वावर छाप पाडलेल्या आपल्या भारताची युवा शक्ती आता शैक्षणिक, सामाजिक, वैज्ञानिक, अध्यात्मिकदृष्ट्या संस्कारीत झाली असून आत्मनिर्भरतेकडे अग्रेसित झाली आहे. तरूणाई देशाचे उज्वल भवितव्य घडवण्यासाठी तत्पर असल्याचे प्रतिपादन डॉ कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी याप्रसंगी केले. सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण होणे, कौशल्य व नेतृत्व गुण विकसित होणे, अचानक घडणाऱ्या नैसर्गिक अथवा मानवनिर्मित घटनांमुळे होणारी जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान व सामाजिक अव्यवस्था टाळण्यासाठी ते सज्ज असावेत, यासाठी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ आपत्तीपूर्व तयारी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिराच्या समारोप सत्रात एनडीआरएफ, पुणेचे कमांडंट दीपक तिवारी, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य शिवराम घोडके, विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. देवानंद पंचभाई, संचालक संशोधन डॉ. श्यामसुंदर माने, संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता डॉ. अरविंद सोनकांबळे, निरीक्षण समितीचे सदस्य डॉ. सतीश कोलते, डॉ. हेमंत वऱ्हातकार, डॉ. रामेश्वर कोठावळे, डॉ. मिलिंद काळे, वित्तीय व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. तानाजी चौगुले यांनी सहभाग नोंदवला. असा होता दिनक्रम : शिबिराचा दिनक्रम निश्चित करण्यात आला होता. यात सकाळी योगा, प्राणायाम, कवायतीनंतर रुग्णाची काळजी, अत्यवस्थ रुग्णांना सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवण्याचे कौशल्य अवगत करण्यात आले. दुपारी सत्रात कृतीयुक्त प्रशिक्षण देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे आपत्कालीन परिस्थितीत व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन झाले. त्यानंतर लँड स्लाइड रेस्क्यू ऑपरेशन, वैयक्तिक आणि परिवाराची आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा, सामुदायिक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन, भूकंप, वीज पडणे, चक्रीवादळ, भूस्खलन, जंगलातील वणवा आदी प्रसंगी काय करावे आणि काय, नाही त्यावर कृतीयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्यांचा सत्कार व फिरत्या चषक पटकावलेल्या विद्यापीठांची नावे जाहीर करण्यात आली. सर्वोत्तम विद्यापीठ फिरता चषक- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी फिरता चषक- डॉ. नितीन कुमार दादासाहेब माळी (नंदुरबार), कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, डॉ. नीता भानुदास बोचे (बुलडाणा), संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांना देण्यात अले. सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक फिरता चषक दोन विद्यार्थी, दोन विद्यार्थिनींना देण्यात आले. यात निसर्ग प्रल्हाद सावंत (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर), अथर्व शरद ताठे (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ), आर्या भालचंद्र कदम (महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक), प्रणाली विजय टाले यांचा समावेश होता. बेस्ट प्रोसेशन रोटेटिंग ट्रॉफी मुंबई विद्यापीठ मुंबई अंतर्गत जिल्हा रायगड यांना प्रदान करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 9:21 am

चिखलदरा येथील कॉफी बागेतून यावर्षी निघणार 15 टन उत्पादन‎:ब्रिटीश काळापासून बहरत असलेल्या बागा, हे महाराष्ट्रातील एकमेव उत्पादन केंद्र असल्याचा स्थानिकांचा दावा‎

ब्रिटीश काळापासून बहरत असलेल्या मेळघाटच्या चिखलदरा येथील कॉफी बागेतून यावर्षी १५ टन उत्पादन होणार आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव उत्पादन केंद्र असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. येथील कॉफी ही अरेबिका जातीची असून तिला चांगली मागणी आहे. विदर्भात उष्ण वातावरणापासून सुटका मिळविण्यासाठी तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांनी चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध लावला. या ठिकाणी कॉफीची लागवड होऊ शकते, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांनी येथे कॉफीची लागवड केली. आजघडीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉफीच्या बागा आहेत. वनखात्याच्या माहितीनुसार सुमारे ६०० हेक्टर क्षेत्र कॉफीच्या झाडांनी व्यापले आहे. कॉफीची झाडे ही मोठ्या झाडांच्या सावलीत वाढतात. कारण, या झाडांना ऊन सहन होत नाही. सध्या ज्या भागात कॉफीची बाग आहे, त्या भागात आंबा, वड तसेच इतर सदाहरित झाडे आहेत. त्या-त्या झाडांच्या खाली कॉफीची झाडे वाढत आहेत. ब्रिटीश काळातील ती झाडे आजदेखील जशीच्या तशीच आहेत. विशेष म्हणजे, इंग्रजांनी लावलेल्या कॉफीच्या या बागेवर आदिवासी युवकांना रोजगार मिळत आहे. या कॉफीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्येही उलेख केला होता. मात्र, या बागांची व्याप्ती वाढवून राजाश्रय मिळाल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. सध्या कॉफीच्या झाडांना लालबुंद फळे लागली आहेत. येथे ये-जा करणाऱ्या पर्यटकांना ही फळे आकर्षित करीत आहेत. ही बाग सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. कॉफी संपूर्ण महाराष्ट्रात फक्त चिखलदऱ्यात उत्पादित केली जाते, हे अनेकांना माहीतसुद्धा नाही. सरकारी यंत्रणेचेही या बागांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. ब्रिटिश गेल्यानंतर कोणीच कॉफीच्या बागा लावण्याचा प्रयत्न केला नाही. जुन्याच कॉफीच्या बागा चिखलदऱ्यात वाढत आहेत. या बागांची संख्या वाढवून कॉफी फळापासून भुकटी (पावडर) तयार करण्यासाठी लागणारे शास्त्रोक्त प्रक्रिया केंद्र उभारण्याचीही गरज आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 9:01 am

स्थानिक पोलिस अनभिज्ञ, ‘डीआरआय’ने पकडले पाच किलो एमडी; तिघे ताब्यात:नवसारी परिसरातील जीएसटी कार्यालयात पथकाने मांडले हाेते बस्तान‎

शहर व जिल्ह्यात आजपर्यंत शहर व ग्रामीण पोलिसांकडून एमडी जप्तीच्या अनेक कारवाया झालेल्या आहेत. स्थानिक पोलिसांना एकाचवेळी कधीही शंभर ग्रॅमपेक्षा अधिक एमडी जप्त करण्यात यश आले नाही. मात्र एकाचवेळी तब्बल ४ किलो ९०० ग्रॅम एमडी शहरातून एकाचवेळी पकडून ‘डिआरआय’ने खळबळ उडवून टाकली आहे. या कारवाईने अमरावतीत अंमली पदार्थाचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे या कारवाईपासून स्थानिक पोलिस पुर्णत: अनभिज्ञ होते. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मागील काही महिन्यांपासून राज्यभरात विविध ठिकाणी अंमली पदार्थांचे रॅकेट उघड केले आहेत. अडीच महिन्यांपूर्वीच जिल्ह्यालगतच्या वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथे एमडी तयार करण्याचा कारखानाच उघड केला होता. दरम्यान अमरावतीत इतक्या मोठ्या प्रमाणात एमडी येऊ शकते, हे सुद्धा आज डीआरआयच्या कारवाईने उघड झाले आहे. रविवारी दुपारी नागपूर येथून डीआरआयचे तीन पथक शहरात दाखल झालेत. त्यांनी सुरूवातीला शहरातील दोन ते तीन ठिकाणी छापे मारले. याचदरम्यान एकाच ठिकाणाहून त्यांना तब्बल ४ किलो ९०० ग्रॅम एमडी जप्त करण्यात यश आले. या एमडीची किंमत जवळपास ४.९० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. एमडी जप्त केल्यानंतर उर्वरित. पान ४ कारवाईत स्थानिक पोलिसांनाही दूर ठेवले डीआरआयच्या पथकाने नागपूरातून येऊन अमरावतीत कारवाई केली. या संदर्भात त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली नाही. दरम्यान ज्यावेळी स्थानिक पोलिसांना कारवाईची माहिती मिळाली, त्यावेळी ते स्थानिक नवसारी परिसरात असलेल्या जीएसटी भवन(कार्यालयात)मध्ये पोहोचले होते. मात्र डीआरआयच्या पथकाने स्थानिक पोलिसांसुद्धा या कारवाईपासून दूर ठेवत माहिती देण्याबाबत टाळले आहे. तसेच गरजेनुसार आपली मदत घेण्यात येईल असे सांगितले होते. अमरावतीत कारवाई केल्यानंतर जप्त केलेले एमडी व ताब्यात घेतलेल्या तिन्ही संशयितांची चौकशी करण्यासाठी डीआरआयच्या पथकाने नवसारी परिसरातील जीएसटी भवन गाठले. या ठिकाणी पथक संशयितांसह आतमध्ये गेल्यानंतर भवनच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतून कुलूप लावून कारवाई सुरू होती. कोणीही कारवाईमध्ये खंड करु नये, तसेच कारवाईबाबत माहिती बाहेर येऊ नये, यासाठी डीआरआयकडून ही गोपनियता पाळली गेली आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 9:00 am

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अस्थिकलश आज शहरामध्ये आणणार:रेल्वेस्टेशन चौकातील राष्ट्रवादी कार्यालयात दर्शनासाठी ठेवणार‎

मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात राष्ट्रवादी परिवाराने राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे रविवारी १ फेब्रुवारीला पूजन केले. या वेळी दादांना आदरांजली अर्पण करण्यात आली. दरम्यान अजित पवार यांच्या अस्थिंचे दर्शन करता यावे म्हणून राज्यभरात त्यांचा अस्थिकलश नेण्यात येणार आहे. हा अस्थिकलश घेऊन आमदार संजय खोडके सोमवारी २ फेब्रुवारी शहरात पोहोचणार आहेत. अमरावती विभागातील पाच जिल्हे तसेच वर्धा जिल्ह्यासाठी हा अस्थिकलश राहणार आहे. अस्थिकलश शहरात पोहोचताच रेल्वे स्टेशन चौकातील राष्ट्रवादी कार्यालयातून प्रत्येक जिल्ह्याचा अस्थिकलश त्या -त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. तर अमरावती जिल्ह्यासाठी अजित पवार यांचा अस्थिकलश आमदार सुलभा खोडके यांच्या रेल्वे स्टेशन चौकस्थित जनसंपर्क कार्यालय येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सोमवारी दुपारी दोन वाजतापासून उर्वरित. पान ४

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 8:59 am

तालुका सायकल स्पर्धेत 300 हून अधिक स्पर्धक:माझी वसुंधरा अभियान, पर्यावरण संरक्षण जनजागृती‎

आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी सायकलचा वापर हा प्रभावी उपाय असून त्यामुळे आरोग्य सुदृढ राहते. पर्यावरणाचे संरक्षण होते. इंधन व आर्थिक बचतही साधता येते. याच उद्देशाने वरुड सायकल स्वार बहुउद्देशीय संस्था, नगर परिषद यांच्या संयुक्त सहकार्याने माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत पर्यावरण संरक्षणाच्या जनजागृतीसाठी तालुकास्तरीय सायकल स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा देशबंधुदास वाचनालय येथून मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरू केली. .यावेळी मुख्याधिकारी गजानन भोयर, डॉ विजय देशमुख, रवि मानव, प्रवीण कोहळे, ईश्वर सलामे, संजय जयस्वाल उपस्थित होते. स्पर्धेचा मार्ग वरुड टेंभुरखेडा, बाहादा, वरुड असा ठेवला होता. १४ वर्षांवरील गटासाठी ३० कि.मी. तर १४ वर्षांखालील गटासाठी २० कि.मी. अंतर निश्चित करण्यात आले होते. या स्पर्धेत वरुड तालुक्यातील विविध शाळा, परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला. शाळेतील ३५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. १४ ते १७ वर्षे मुलांच्या गटात पियुष सालोडे याने प्रथम क्रमांक पटकावला. आयुष सारडे व सुमित राऊत यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. याच वयोगटातील मुलींच्या गटात पूर्वा कवटकर प्रथम, पलक आगरकर द्वितीय व समृद्धी पेठे तृतीय क्रमांकावर राहिल्या. १८ ते ३० वर्षे पुरुष गटात उदय दारोकर प्रथम, ऋषिकेश जावरकर द्वितीय व भूषण इंगळकर तृतीय आले. महिला गटात समिक्षा तायवाडे प्रथम, शीतल बावणे द्वितीय व साक्षी नेवारे तृतीय क्रमांकावर राहिल्या. ३१ ते ४५ वर्षे खुल्या पुरुष गटात प्रविण धावळे प्रथम, अमित खासबागडे द्वितीय व विजय बाखल तृतीय आले. ४६ ते ६० वर्षे पुरुष गटात मंगेश लुंगे यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर विजय फुटाणे व हरिहर वरुडकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. ४६ ते ६० वर्षे महिला गटात रिया तिडके यांनी प्रथम क्रमांक मिळवला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात हीतांश बेलसरे, मृदुल बरसागडे व आराध्य मांडवे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. मुलींच्या गटात स्नेहा खांडेलवाल, पूर्वी नारिंगे व विदाश्री बोडखे यांनी यश संपादन केले. ६० वर्षांवरील वयोगटात उद्धव फुटाणे, सुरेश जैन (वय ८२), प्रमोद लोंढे, रामदास दांडे व डॉ. राम गोधणे या ज्येष्ठ सहभागींचा मोमेंटो देऊन सन्मान केला.कार्यक्रमातील स्पर्धकांना प्रमाणपत्र, मेडल देऊन गौरवले.सर्वाधिक स्पर्धक न्यू ऑरेंज सिटी येथून सहभागी झाल्याबद्दल मुख्याध्यापिका. माधुरी भोंडे, पराग भोंडे यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन बाळा चांगदे यांनी केले. बक्षीस वितरण मंडळ अधिकारी देवांनंद मेश्राम यांनी केले , तर आभार पियुष खंडेलवार यांनी मानले. कार्यक्रमा साठी सायकल स्वार संस्थेचे योगेश गीद व सदस्य, नगर परिषदेचे कर्मचारी, पोलीस स्टेशन, ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 8:58 am

विद्यार्थी विकास कक्षाच्या सहयोगाने वरुडला कौशल्य विकास कार्यशाळा

श्री. शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित महात्मा फुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय वरुड येथे विद्यार्थी विकास कक्ष यांच्या सहयोगाने महाविद्यालयातील अंतीम वर्षांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय कौशल्य विकास कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला संत गाडगे बाबा विद्यापीठच्या विद्यार्थी विकास कक्षाने ''सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट वर्कशॉप' या योजनेंतर्गत मंजूरी व निधी दिला होता. कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य प्राचार्य डॉ. दिलीप हांडे यांच्या मार्गदर्शनात केले. यावेळी प्राचार्य डॉ. दिलीप हांडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी प्रशिक्षक डॉ.आर.एन. महिंदकर, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ.संजय सातपुते, विद्यार्थी विकास कक्ष समन्वयक प्रा. खुशाल इंगळे, प्रा. विलास हिरणवाळे, प्रा. सतीश कोलटेके, प्रा. आम्रपाली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. खुशाल इंगळे यांनी केले. कार्यशाळेचे प्रशिक्षक डॉ.आर.एन.महिंदकर यांनी १० वेगवेगळ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रेरणा, ध्येय निश्चिती, शाब्दिक संवाद, गैर-मौखिक संभाषण, सादरीकरण कौशल्ये, वेळचे व्यवस्थापन, गटचर्चा, रेझ्युमे राइटिंग, मुलाखत कौशल्ये, चारित्र्य आणि नैतिकता याविषयी मार्गदर्शन केले. सोप्या भाषेत आणि दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे देऊन कार्यशाळेची सर्व सत्रे पॉवर पॉईंटच्या माध्यमातून कुशलतेने व्यवस्थापन केले. कार्यशाळेच्या समारोपीय समारंभात विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये या कौशल्यांचा वापर ध्येय निश्चितीसाठी होईल असे मनोगतात व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.दिलीप हांडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच आपल्या आवडीनुसार आपले करिअर बनविणे सोयिचे होते. असेही त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. खुशाल इंगळे तर आभार प्रा.विलास हिरणवाळे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 8:57 am

डाव्या विचारांचा उजवा प्रकाशक अरविंद पाटकर- प्रा. तेलंग:जिल्हा प्रगतिशील लेखक संघातर्फे चांदूर रेल्वे येथे आदरांजली‎

मनोविकास प्रकाशनचे कॉ अरविंद पाटकर म्हणजे, परिवर्तनवादी विचारांनी भारलेले आणि झपाटलेले व्यक्तिमत्त्व होते. मुंबईत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून बराच काळ कार्य केलेल्या पाटकरांनी पुढील काळात मनोविकास प्रकाशनाच्या माध्यमातून हजारो पुस्तकांचे प्रकाशन केले. सामाजिक परिवर्तनाचा चळवळीसाठी उपयुक्त ठरतील अशी पुस्तके प्रकाशित करण्याकडे त्यांचा अधिक कल होता. नवे नवे लेखक शोधून त्यांना लिहिते करणे, त्यांची पुस्तके प्रकाशित करून ती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविणे, हा त्यांचा ध्यास होता. महाराष्ट्रातील गावागावांत पोहोचून अफाट मित्रपरिवार जोडलेल्या पाटकर यांनी मराठी लोकांत वाचन संस्कृती रूजावी यासाठी आयुष्यभर प्रयत्न केलेत. असे प्रतिपादन प्रा. प्रसेनजीत तेलंग यांनी कॅा. पाटकर यांच्या आदरांजली सभेत केले. २९ जानेवारी रोजी पुणे येथे कॅा. अरविंद पाटकर यांचे निधन झाले. अमरावती जिल्हा प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने चांदूर रेल्वे येथे आयोजित आदरांजली सभेच्या निमित्ताने प्रा.तेलंग बोलत होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार आणि दिवंगत शांता बावणकर यांनाही यासमयी या कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात आली. म.गांधी स्मृती दिनानिमित्ताने या कार्यक्रमात महात्मा गाधींनी अभिवादन करण्यात आले. अजित पवार यांच्या कर्तृत्वावर जयप्रकाश चोरडीया तर शांताबाई बावणकर यांच्या जीवनकार्यावर विनोद जोशी यांनी प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष चांदूर रेल्वे न.प. सदस्य सुमेध सरदार होते. कार्यक्रमाचे संचालन सागर दुर्योधन यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठे भूषण नाचवणकर. गणेश होले, बेराड यांनी मोलाचे सहकार्य केले. या आदरांजली सभेसाठी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 8:56 am

नांदगाव पेठ येथील ग्रामसभेत वाद- प्रतिवाद; सीईओ करणार चौकशी:सरपंच, ग्रामसेवकांनी उत्तरे दिली नाही; प्रशासन, सभा समाप्तीनंतर आले अनावश्यक प्रश्न‎

नांदगाव पेठ येथे आयोजित ग्रामसभेदरम्यान नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तसेच सभेतून सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर महसूल तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रा. मोरेश्वर इंगळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांना निवेदन सादर करून संबंधितांवर योग्य कारवाईची मागणी केली आहे. ग्रामसभा ही गावाच्या विकासासाठी महत्त्वाचे लोकशाही व्यासपीठ मानली जाते. यामध्ये नागरिकांच्या सहभागातून विविध विकासकामे, योजनांची अंमलबजावणी तसेच स्थानिक प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेतले जातात. मात्र, या ग्रामसभेत नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्यांवर सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे उपस्थित काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामसभेत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केल्यावर सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी ह्या सभेतून निघून गेल्या, असा संबंधित नागरिकांचा आरोप आहे. सदर निवेदनानुसार, ग्रामसभेला सुमारे ४०० नागरिक उपस्थित होते. प्रश्नोत्तरांच्या टप्प्यावर अनेक नागरिकांनी विविध विकासकामे, योजना व प्रशासकीय बाबींवर प्रश्न उपस्थित केले. मात्र, काही प्रश्नांवर स्पष्ट उत्तरे मिळाली नाहीत. त्यानंतर ग्रामसभा संपण्यापूर्वीच सरपंच कविता डांगे व ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे सभागृहातून बाहेर पडल्या. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. सुमारे १३ हजार मतदार आणि ३० हजार लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या ग्रामसभेसाठी ही बाब योग्य नसून या घटनेची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रा. मोरेश्वर इंगळे यांनी केली आहे. या निवेदनावर तेथील अनेक नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत. सभा संपल्यावर आले होते अनावश्यक प्रश्न ग्रामसभा उत्साहात झाली असून, नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. ग्रामसभेचा मुख्य विषयही निकाली काढण्यात आला. मात्र सभा संपल्यानंतर काही तरुणांकडून अनावश्यक प्रश्न विचारले जात असल्याने सरपंचांसह आपण कार्यालयात परतल्याचे ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे यांनी स्पष्ट केले. ग्रामसभेतून काढता पाय घेतल्याचा आरोप चुकीचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 8:39 am

गुरुकुंज मोझरीत विदर्भस्तरीय एकल भक्ती गीत गायन स्पर्धा:सतीश वानखडे, प्रमोदिनी आव्हाड, कनिष्का पाटील प्रथम‎

माय मंजुळामाता पुण्यतिथी निमित्त विदर्भ स्तरीय भक्ती गीत गायन स्पर्धेमध्ये एकूण ११२ गायकांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट कला सादर करून श्रोत्यांना मंत्र मुग्ध केले. या स्पर्धेचे उद्घाटन पद्मश्री जनार्दनपंत बोथे, सरपंच सुरेंद्र भिवगडे, गोपाल कडू, धनराज बारबुद्धे संजय देशमुख, माधुरी निमकर, प्रल्हाद माहुलकर तालमणी, पं. रघुनाथ करडीकर, किशोर अगडे, जयश्री सोनारे, सुनील इंगोले, वामनराव यावल मोर्शी, निलेश इंगळे आदी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत व स्पर्धेचे उदघाटन कलावंत धनश्री किरण खंडारे यांच्या मधुर गायनाने करण्यात आले. प्रथम पाहुण्यांचे हस्ते वं. राष्ट्रसंत व मंजुळामाता यांच्या फोटोचे पूजन करून दिप प्रज्वलित करण्यात आले. यावेळी पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन श्री गुरुदेव कलामंच सेवा मंडळा द्वारे स्वागत करण्यात आले. गुरुदेव कला मंच सेवा मंडळ वं. राष्ट्रसंत यांच्या विचाराने प्रेरित होऊन मागील वर्षापासून विदर्भ स्तरीय एकल गायन स्पर्धेचे आयोजन करीत असून या स्पर्धेमध्ये विदर्भातून ११२ पुरुष महिला,व बाल कलाकारांनी सहभाग नोंदविला यामध्ये प्रथम पुरुष गटातील बक्षीस ७ हजार रुपयेचे सतीश वानखडे आजनगाव जि.वर्धा, दुसरे बक्षीस गजानन गायकवाड तिवसा, ५ हजार रुपये, तर तिसरे बक्षीस ३ हजार देवकुमार मुधोळकर गुरुकुंज यांनी पटकाविले. तर महिला गटामधून प्रथम बक्षीस प्रमोदिनी आव्हाड तिवसा ५ हजार रुपये, द्वितीय बक्षीस भारती केने ३ हजार रुपये,काटसुर तर तिसरे बक्षीस पूजा शेंडे यवतमाळ २ हजार रुपयांचे बक्षीस भारती केने, पूजा शेंडे या अंध मुलींना देण्यात आले. तर बाल गटातील प्रथम बक्षीस ५ हजार रुपयांचे कनिष्का पाटील जरूड, द्वितीय चिंचोळकर आकोट ३ हजार, तर तृतीय कावेरी खराटे वरुड १ हजार ५०० रूपयांचे बक्षीस पटकाविले. सर्व गटातील प्रोत्सांहन पर बक्षीस प्रणव सुलताने, कृष्णा पिंपळकर, आनंदी वाट, मनीष वरघट, साक्षी विश्वकर्मा, नम्रता वाटमोडे, प्रियंका तायवाडे, नंदा गवळी, हर्ष पिंजारी, ऋषिकेश गाडगे, पंजाब अप्पा तायडे, प्रफुल ढोले, यादी स्पर्धकांना प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र कठाने, उपग्रामसेवा धिकारी, कोषाध्यक्ष महादेव बेले, धीरज बनारसे, गजानन चौधरी, गोपाल कसर,बबन कापटे, विवेक बुरे शरद हिवराळे, कवडु मलमे, रामेश्वर बांबल, मंजुळा माता महिला भजन मंडळ अध्यक्षा राजकन्या शेळके, कृपासिंधू महिला भजन मंडळ अध्यक्षा वैशाली उमप होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवाधिकारी दिपक तिखे तर संचालन अक्षय पाचघरे, राणी कडु, आभार गुरुदेव कला मंच चे सचीव तथा गुरुदेव नगरचे माजी उपसरपंच किरण खंडारे यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 8:38 am

11 व्या अजिंठा - वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता:'परज्या' चित्रपटाने पटकावला सुवर्ण कैलाशा पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या ११व्या अजिंठा -एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (AIFF) ने यंदा भारतीय सिनेमाच्या वैविध्यपूर्ण आणि आशयघन प्रवासाचं प्रभावी दर्शन घडवलं. २८ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत चाललेल्या या महोत्सवात देश-विदेशातील चित्रपटांनी सिनेप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं. परज्या चित्रपटाला गोल्डन कैलाशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये एकूण 70 चित्रपटांचे सादरीकरण झाले. त्यामध्ये काही मराठी, तेलगू, हिंदी, तेलगू, म,ल्याळम, इंग्लिश, फ्रेंच यासारख्या अनेक भाषेत चित्रपट दाखवण्यात आले. काही सिनेमे कॉमिडी होते तर काहींमुळे प्रेक्षकांचे डोळे पाणावले. काहींनी सामाजिक भान दाखवून दिल तर काहींनी जागृती सोबतच माहितीचा साठा दिला. दरवर्षी असे चित्रपट निवडून काढले जातात आणि ते प्रेक्षकांच्या भेटीला आणले जातात. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून दिग्दर्शक आनंद एल. राय, ध्वनी संयोजक पद्मश्री रसूल पुकुट्टी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल उपस्थित होते. यावेळी अंकुशराव कदम म्हणाले, 'महोत्सवाने केवळ मनोरंजन नव्हे, तर शैक्षणिक, सामाजिक आणि जीवनाबद्दलची समज वाढते.' पुढच्यावर्षी शालिवाहन पुरस्कार 'माणसाच्या हृदयाला स्पर्श करण्याची क्षमता चित्रपटात असते. मराठी चित्रपटासाठी पुढच्या वर्षीपासून सुवर्ण शालिवाहन हा पुरस्कार दिला जाणार आहे,' असे कागलीवाल यांनी सांगितले. आजच्या या समारोप समारंभात समाधानाची भावना आहे, असे महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले. समन्वयक नीलेश राऊत यांनी सर्वांचे आभार मानले. एकूण 65 चित्रपटांची नोंदणी यंदाच्या Indian Competition विभागात एकूण ६५ चित्रपटांची नोंद झाली होती. या स्पर्धेतून ९ उत्कृष्ट चित्रपट व कलाकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं, ही बाब AIFF च्या वाढत्या प्रतिष्ठेचं द्योतक ठरली. MGM शॉर्ट फिल्म सेक्शनमध्ये सादर झालेल्या चित्रपटांनी सामाजिक आशय, प्रयोगशीलता आणि प्रभावी मांडणी यांचा सुंदर संगम दाखवला. यामध्ये बेस्ट शॉर्ट फिल्म म्हणून ‘निर्वाना’ या चित्रपटाची निवड करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'कान्हा' या विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने केलं होत.मराठवाडा शॉर्ट फिल्ममध्ये ‘बयान’ (दिग्दर्शक – आकाश महातुळे) आणि ‘सुलतान’ (दिग्दर्शक – अविनाश कांबिकर) या चित्रपटांनी विशेष लक्ष वेधून घेतलं. यांना देखील अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यंदाचा बेस्ट मराठवाडा शॉर्ट फिल्म अवॉर्ड ‘मुक्ता आर्टिकल 21A’ या चित्रपटाला देण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश दुतडमल असून, या पुरस्कारात मेमेंटो आणि रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. दरवर्षी प्रमाणे याहिवर्षी प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेल्या चित्रपटाला आणि त्याच्या दिग्दर्शकाला गौरवण्यात येते. त्याप्रमाणे Audience Award हा ‘सांबर बोंडा’ या चित्रपटाला मिळाला. साध्या कथानकातून मानवी नातेसंबंध, दैनंदिन जीवनातील भावभावना आणि हलक्याफुलक्या विनोदाचा सुंदर मिलाफ साधणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला. ‘सांबर बोंडा’ ने हे सिद्ध केलं की, प्रभावी सिनेमा करण्यासाठी नेहमीच भव्यतेची गरज नसते कधी कधी साधेपणाच सर्वात मोठी ताकद ठरतो. Indian Competition मधील मानाचे पुरस्कार Indian Competition मध्ये आशयघन चित्रपट आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटला. बेस्ट स्क्रीनप्ले चा पुरस्कार अनुपर्णा रॉय यांना ‘Songs of Forgotten Tree’ या चित्रपटासाठी प्रदान करण्यात आला. याच चित्रपटासाठी नाज शेख यांना बेस्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. बेस्ट अभिनेता म्हणून ‘परज्या’ या चित्रपटातील भूमिकेसाठी प्राज्वल कोल्लार यांची निवड झाली. 'परज्या' चित्रपटाने पटकावला सुवर्ण कैलाशा पुरस्कार मिथक परंपरा आणि आजच्या वास्तवाचा साध्या पण प्रभावी पद्धतीने मेळ घालत मानवी मूल्यांवर प्रकाश टाकणाऱ्या 'परज्या' चित्रपटाने यंदाचे सुवर्ण कैलाश पारितोषिक पटकावले. विचार करण्यास भाग पाडणारा हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. महोत्सवातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. या चित्रपटाचे दिग्दर्शक महादेव हाडपड आहेत. अजिंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा केवळ पुरस्कार सोहळा नसून, नवोदित दिग्दर्शक, लेखक आणि कलाकारांसाठी प्रेरणास्थान बनत आहे. सामाजिक वास्तव, मानवी संवेदना आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा समतोल साधणाऱ्या चित्रपटांना AIFF नेहमीच प्रोत्साहन देतो. यंदाचा ११वा AIFF महोत्सव भारतीय सिनेमाच्या सशक्त वाटचालीचा साक्षीदार ठरत, छत्रपती संभाजीनगरला पुन्हा एकदा जागतिक सिनेनकाशावर अधोरेखित करून गेला.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 8:36 am

मंगळवेढ्यात 87 दिव्यांग स्त्री, पुरुष थांबणार स्वत:च्या पायावर:रतनचंद शहा यांच्या जयंतीनिमित्त दिव्यांगासाठी विशेष उपक्रम‎

कृत्रिम अवयव अंगरोपण शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगांच्या महत्त्वाची गरज पूर्ण होणार असून यामुळे त्यांना सन्मानाने समाजामध्ये जीवन जगण्याचा आनंद घेता येणार आहे, असे हे महत्त्वाचे काम या शिबिरामुळे झालेले आहे. अशा आयोजकांविषयी आपण नेहमीच कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, असे प्रतिपादन पालवी प्रतिष्ठानच्या प्रमुख मंगलाताई शहा यांनी व्यक्त केले. या शिबिरात ८७ महिला व पुरुषांच्या हात पायांच्या जयपूर फुटांची मापे घेण्यात आली. त्या विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. रतनचंद शिवलाल शहा यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त यंत्र हार्वेस्ट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड व लायन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम यांच्या वतीने मोफत कृत्रिम अवयव अंगरोपण शिबिर (जयपुर फूट) आयोजित केले आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी संत दामाजी महाविद्यालयात बोलत होते. यावेळी पालवी प्रतिष्ठानच्या प्रमुख मंगलाताई शहा, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल शहा, सचिव किसनराव गवळी, लायन्स क्लब पुणे सुप्रीमचे पदाधिकारी सूर्यकांत शहा, संजना झंवर उपस्थित होते. पुढे बोलताना शहा म्हणाल्या की, अशा कार्यक्रमासाठी मला यायला मिळणे हे माझे मी भाग्य समजते, नवे पाऊल नवा आत्मविश्वास आपल्या ही आपल्यासाठी एक ओळ आहे. मात्र यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल होणार आहे, शहा सर्वतोपरी मदत करतात, त्यांना वारसा लाभला आहे. डॉ. अस्मिता सुराणा म्हणाल्या, या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगाना चांगली सोय होणार आहे, पण हे हात- पाय बसवल्यानंतर त्याचा वापराचा सराव करणे आवश्यक आहे. हा सराव करत असताना त्यांना अडचणी आल्या तर त्यांना ^स्व. रतनचंद शिवलाल शहा यांनी मंगळवेढा परिसरामध्ये समाजकारण करत असताना मंगळवेढ्याचे नगराध्यक्ष म्हणून अर्बन बँक, संत दामाजी कारखाना, संत दामाजी महाविद्यालय, दामाजी हायस्कूल यांच्या माध्यमातून येथील पंचक्रोशीतील लोकांच्या गरजा ओळखून त्यांचे सर्वांगीण जीवन समृद्ध करण्याच्या हेतूने अनेक समाजोपयोगी कामे केली. रतनचंद शहा यांच्या जयंतीच्या निमित्त या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगांच्या गरजा लक्षात घेऊन दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांच्याच भागात अशा पद्धतीने कृत्रिम हात- पाय त्यांना बसून मिळावेत. -राहुल शहा, अध्यक्ष त्यांना सर्व प्रकारची मदत करायला, आम्ही तयार आहोत. समाजासाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे हे काम आम्ही महाराष्ट्राच्या सर्व दिव्यांगापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. डॉ.संजना झंवर म्हणाल्या की, जिथे कोण जात नाही, तिथे आमचे लायन्स क्लब सेवेसाठी हजर असते. दि. ४ फेब्रुवारी रोजी स्त्रियांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी १ लाख सॅनिटरी पॅड आम्ही मोफत देणार आहोत. रजनी आंबादे म्हणाल्या की, हे शिबिर फक्त कृत्रिम अवयव देत नाही तर नवीन ऊर्जा देत आहे. ही माहिती सर्वांच्या पर्यंत जरूर पोहोचवा. हे नवे पाऊल- नवा आत्मविश्वास आहे. यानंतर २ व ३ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांच्या सायबर अवेअरनेसचे आयोजन केले आहे. त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी मंगळवेढा तालुका दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष समाधान हेंबाडे, माजी नगराध्यक्ष प्रकाश गायकवाड, सी.ए. निलेश मर्दा, प्र. प्राचार्य औदुंबर जाधव, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र गायकवाड उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तींना समाजात सन्मानाने जगता येणार

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 8:29 am

आवताडे अन् भालके यांच्या प्रतिष्ठेची लढाई:भोसे, मरवडे, दामाजी नगरात दुरंगी सामना, लक्ष्मी दहिवडीमध्ये तिरंगी लढत, भोसे, मरवडे, दामाजी नगरात दुरंगी लढत‎

मंगळवेढा तालुक्यातील ८ पंचायत समिती गणासाठी व ४ जिल्हा परिषद गटासाठी निवडणुका होत असून लक्ष्मी दहिवडी गटामध्ये तिरंगी लढत दिसून येत असून भोसे, मरवडे, संत दामाजी नगर या जिल्हा परिषद गटात दुरंगी थेट लढत होत आहे. मरवडे व भोसे जिल्हा परिषद गटातील निवडणूक ही आमदार समाधान आवताडे यांच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे. विधानसभा व नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपसोबत असणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता भाजप विरोधात गेल्यामुळे, ही निवडणूक जरी पक्षीय पातळीवर वाटत असली तरी शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक गटातटावर होताना दिसून येणार आहे. या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांच्या गटाला की भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत विकास आघाडीला संधी देणार हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे. केंद्रात व राज्यात सत्ता असताना देखील भाजपाला जिल्हा परिषदेच्या दोन जिल्हा परिषद गटात स्थानिक उमेदवार उभे करता आले नाहीत. मंगळवेढा पंचायत समितीमध्ये प्रशासक येण्यापूर्वी, आवताडे गटाकडे बहुमत होते. आमदार समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांची सत्ता होती. भाजपाने चार जिल्हा परिषद गटात आमदार समाधान आवताडे यांनी आपली ताकद उभी केली असून गावोगावी प्रचार दौरा सुरू केला आहे. लक्ष्मी दहिवडी वडी पंचायत समिती गणातील उमेदवार भगीरथ भालके यांचे समर्थक तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार लेंडवे यांनी उमेदवारी अर्ज भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने, तीर्थक्षेत्र विकास आघाडीला धक्का बसला आहे. 04 महिला तालुक्यात १ लाख ९ ६ हजार मतदार 87,997 पुरूष 81,538 इतर जनहित आघाडी - ०५ कॉंग्रेस - ०३

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 8:28 am

जिल्ह्यातील 170 केंद्रांवर 15,753 विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती पूर्व परीक्षा

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे, या उद्देशासाठी मिशन आरंभ राबवण्यात येत आहे. या मिशनचा भाग म्हणून, रविवारी जिल्हाभरात शिष्यवृत्तीपूर्व सराव चाचणी परीक्षा शिक्षण विभागाच्यावतीने घेण्यात आली. या परीक्षेला १५ हजार ७५३ विद्यार्थी उपस्थित राहिले. पाचवी व आठवीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. या परीक्षेच्या धरतीवर मिशन आरंभ अंतर्गत ५ सराव चाचणी परीक्षांचे नियोजन आखण्यात आले. ही चाचणी परीक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. ही पाचवी सराव चाचणी परीक्षा जिल्हाभरातील १७० केंद्रांवर रविवारी (१ फेब्रुवारी) घेण्यात आली. त्या परीक्षेसाठी पाचवीतील १३ हजार ६२९ तर आठवीतील ९३९ विद्यार्थी उपस्थित होते. तर पाचवीतील १०५७ तर आठवीतील १२८ विद्यार्थी गैरहजर राहिले. या परीक्षेचा निकाल ९ फेब्रुवारीला जाहिर होणार आहे. शिक्षण विभागच पाठवतोय पालकांच्या प्रतिक्रिया मिशन आरंभ अंतर्गत झालेल्या शिष्यवृत्ती पूर्वी परीक्षेनंतर, जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने प्रेस नोट जारी करण्यात आली. त्यात पालकांची प्रतिक्रिया, विद्यार्थ्यांची व शिक्षकांची प्रतिक्रिया प्रशासनानेच घेऊन पाठवली आहे. त्यामुळे तीनही प्रतिक्रियेत सराव परीक्षेचे कौतूक करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Feb 2026 8:20 am