SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
...

मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक; 500 वारकरी भजनी मंडळांचा सहभाग:शोभायात्रेत अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा सजीव देखावा ठरला आकर्षण‎

प्रतिनिधी | येवला शहरात रामनवमीनिमित्त बुधवारी (दि.२५) सायंकाळी श्री साईबाबांचा पालखी सोहळा उत्साहात पार पडला. बदापूर रस्त्यावरील साईबाबा मंदिरापासून भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीत साकारण्यात आलेले सजीव देखावे मुख्य आकर्षण ठरले. ‘ ॐ साई राम’च्या जयघोषात शहर दुमदुमून गेले होते. या देखाव्यात साईबाबा, त्यांच्या निस्सीम भक्त बाईजाबाई आणि म्हाळसापती यांची वेशभूषा केलेले कलाकार सहभागी झाले होते. हुबेहूब साकारलेल्या या सजीव देखाव्याने शहरवासीयांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. पालखी शहरातून मार्गस्थ होत असताना ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर घरांसमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच फुलांची उधळण करून पालखीचे स्वागत करण्यात आले. या सोहळ्याप्रसंगी शहर आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मिरवणुकीदरम्यान डीजेच्या तालावर साईंच्या गीतांवर तरुणाईने ठेका धरला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. भक्ती आणि शिस्तीचा अनोखा संगम या मिरवणुकीत पाहायला मिळाला. प्रतिनिधी | लासलगाव शहरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भक्तीपूर्ण भजन आणि धार्मिक वातावरणामुळे संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते. या शोभायात्रेत वेळापूर येथील धर्मवीर मर्दानी खेळ व शिवकालीन प्रशिक्षण केंद्र वेळापूर यांच्या पथकाने सहभाग नोंदवला. लासलगाव परिसरातील ५००हून अधिक वारकरी भजनी मंडळे या मिरवणुकीत सहभागी झाली होते. प्रभू रामलल्ला यांचा अयोध्या येथील जिवंत देखावा स्थानिक कलाकार दत्ता भांबरे यांनी साकारला होता. लासलगाव बसस्थानक परिसरातील बाबा अमरनाथ मंदिरात सायंकाळी ४ ते ५ या वेळेत श्री हनुमान चालीसा पाठाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी ५ वाजता स्टेशनरोड, बस स्टँड परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठमार्गे श्रीराम मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. अनेक तरुणांनी भगवी टोपी परिधान करून ‘राम लल्ला’च्या जयघोषात सहभाग घेतला. सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रीराम गीतांचा ‘स्वरस्पंदन ऑर्केस्ट्रा’ कार्यक्रम झाला. रात्री ८ वाजता झेंडा चौक येथे महाप्रसादाचे आयोजन केले होते. लासलगाव येथील राम मंदिर ट्रस्टच्या वतीने श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. परिसरातील भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या हस्ते महाआरती पार पडली. उत्सव यशस्वीपणे पार पडावा यासाठी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव होळकर, डॉ. कैलास पाटील, डॉ. युवराज पाटील, सुरेश वडनेरे, विष्णू निकम यांच्यासह इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

दिव्यमराठी भास्कर 27 Mar 2026 8:09 am

हिंदू समाजाने संघटित होणे आगामी काळासाठी गरजेचे:घोटीतील कार्यक्रमात अभिनेते पोंक्षे यांचे प्रतिपादन‎

आगामी काळातील विविध सामाजिक आणि राष्ट्रीय आव्हानांचा विचार करता हिंदू समाजाने संघटित होणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त घोटी येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हिंदू संमेलनानिमित्त संपूर्ण शहर भगव्या ध्वजांनी सजले होते. प्रमुख चौकांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तर विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. आपल्या ओघवत्या शैलीत शरद पोंक्षे यांनी भारताच्या इतिहासावर प्रकाश टाकला. यावेळी संघाचे धर्मजागरण प्रमुख राजू पुलया यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेमागील उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि प्रवासातील संघर्ष यावर माहिती दिली. कार्यक्रमात गीता कुलकर्णी यांनी कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. सूत्रसंचालन सुरेश काजळे यांनी केले तर आभार हेमंत सुराणा यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बबन जाधव, विक्रम मुनोत, भाऊ बोर, श्रीकांत काळे, मधुकर जाधव आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी शहरातील हिंदू बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 27 Mar 2026 8:08 am

पिंपळगाव रेणुकाईत सिमेंट काँक्रिटीकरण कामाला गती:आमदार संतोष दानवे यांच्याकडून साडेसत्तावीस लाख रुपयांच्या निधीतून केले जातेय काम

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे आमदार संतोष दानवे यांच्या सुमारे साडेसत्तावीस लाख रुपयांच्या निधीतून सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. गावातील महत्त्वाच्या भागांमध्ये या कामाला वेग आला आहे. ग्रामस्थांच्या दैनंदिन वापरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या या रस्त्याच्या कामामुळे गावातील वाहतूक व्यवस्था अधिक सुकर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या कामाअंतर्गत जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः पावसाळ्यात चिखल व खड्ड्यांमुळे होणाऱ्या अडचणी आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. शाळेच्या परिसरातील रस्ता सुस्थितीत झाल्यामुळे पालकांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील रस्त्याचे काम सुरू आहे. या भागात काम जलद गतीने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा रस्ता गावाच्या दृष्टीने ऐतिहासिक व सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात असल्याने या कामाकडे ग्रामस्थांचे विशेष लक्ष लागले आहे. कामाची गुणवत्ता राखत ते वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, गावातील रेणुकामाता मिरवणूक अगदी जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक बनले आहे. मिरवणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असल्याने अपूर्ण कामामुळे अडथळे निर्माण होऊ नयेत. यासाठी प्रशासन व संबंधित यंत्रणा सतर्क झाली आहे. याच अनुषंगाने भाजप नेते राजेंद्र देशमुख व ग्रामपंचायतीने कामाची पाहणी केली. संबंधित गुत्तेदाराला आवश्यक सूचना दिल्या. त्यांनी रस्त्याचे काम तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले. कामामध्ये कोणतीही तडजोड न करता दर्जेदार काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. काम जलद पूर्ण झाले पाहिजे. मात्र गुणवत्ता ही सर्वोच्च प्राधान्याने राखली गेली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 27 Mar 2026 7:45 am

बालाजीरूपात दिसले राम, द्राक्षांची आरास, बुंदीचा प्रसाद‎:घराघरात अन् मंदिरांत जन्मोत्सव, 3 मिरवणुकांतून जयघोष, हजारो भाविक झाले नतमस्तक‎

उस्मानपुरा येथील राम मंदिरात तिरुपतीचे डेकोरेशन करण्यात आले. समर्थनगरातील श्रीसमर्थ राम मंदिरात दीड क्विंटल द्राक्षांची आरास करण्यात आली. धनश्री पूर्णपात्रे, अश्विनी पूर्णपात्रे, दीप्ती पाटणी, तृप्ती पाठक यांनी तीन दिवसांत घोटीव कागद, स्टोन, लेसच्या वापरातून ११ इंचांचा टोप तयार केला. एमडीएफ शीटवर काचेचे तुकडे लावून पडदा तयार केला. रामनवमीच्या निमित्ताने मोहन पूर्णपात्रे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. गेल्या वर्षी १२० किलोची बुंदी केली होती. यंदा २०० किलो बुंदीचे वाटप करण्यात आले. या वेळी काकडी, टरबूज, खरबूज, तसेच ३० किलो भाजलेली हरभऱ्याची डाळ वाटप करण्यात आली. दिवसभरात १० हजार भाविकांनी दर्शन केले. अजिंक्य पूर्णपात्रे यांची उपस्थिती होती.श्रीराम यांच्या सुंदर मूर्तीसोबत भाविक मोबाइलमध्ये फोटो काढत होते. उस्मानपुरा येथील राम मंदिरात तिरुपतीचे सुंदर असे डेकोरेशन करण्यात आले. विशेष म्हणजे श्रीराम यांचा टोप महिलांनी हातांनी तयार केला आहे. रंगीत सजावट सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. रामनवमी उत्सव समितीतर्फे राजाबाजार संस्थान गणपतीपासून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी लालबागच्या ब्रास बँडच्या ३५ जणांनी ८ ड्रम, ८ बीट्स, ४ हाफ ढोल, ३ ताशे, २ रोटो, एक की-बोर्ड, ७ भोंगे लावले होते. पथकाने श्रीराम जानकी बैठे हैं.., राम जी की निकली सवारी.., अंजनीच्या सुता.. अशा विविध प्रकारची गाणी सादर केली. कोळीवाड्याच्या ब्रास बँडच्या पथकाने विविध गीते सादर केली. यंदा समितीने देखावा सादर केला. यात अंबरनाथ, मुंबईहून हनुमान रथ ओढताना असा देखावा होता. सारथी म्हणून लक्ष्मण होते. मागे प्रभू श्रीराम सीतेसोबत आशीर्वाद देताना दिसत होते. हा देखावा लक्ष वेधून घेत होता. १० हजार राजगिरा लाडूंचे वाटप केले. मिरवणूक शहागंज, सिटी चौक मार्गे कुंभारवाडा अशी तीन किलोमीटरपर्यंत काढण्यात आली. या वेळी नगरसेवक ऋषिकेश जैस्वाल उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 27 Mar 2026 7:43 am

किराडपुुरा राम मंदिरात आरतीला 1500 भाविकांची गर्दी अन् रक्तदान शिबिरही:बालाजी मठ संस्थानच्या उत्सवात तरुणाईसह आबालवृद्धांचा जल्लोष‎

शहरातील पुरातन राममंदिर म्हणून किराडपुरा राममंदिर प्रसिद्ध आहे. या राममंदिरातील आरतीचा विशेष मान आहे. मंत्री अतुल सावे, आमदार संजय केणेकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये तसेच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते आरती झाली. ट्रस्टचे अध्यक्ष मानसिंग पवार, सहसचिव दयाराम बसैय्ये यांनी मागील महिनाभरापासून संपूर्ण उत्सवाचे नियोजन केले होते. रक्तदान शिबिर, संत साहित्याचे स्टॉल्सही येथे लावण्यात आले होते. पहाटे अभिषेक झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. १९ तास मंदिरात भाविकांची गर्दी होती. मंदिराचे संस्थापक सरचिटणीस लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल यांच्या स्मरणार्थ दुपारी सुंदरकांड कथा झाली . पं. दिनेश शर्मा यांनी कथावाचन केले. तुलसीदास रचित रामचरितमानसमधील ५ वा अध्याय सुंदरकांड आहे. त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांना संगीतमय पद्धतीने सादर केले. १. हनुमंतांचे लंकेकडे प्रस्थान-सीतामाईंचा शोध घेण्यासाठी हनुमान अडथळ्यांवर मात करत लंकेत जातात. २. सीता-हनुमान भेट- हनुमान सीतेला रामाचा संदेश देतात आणि त्यांचे सांत्वन करतात. ३. लंका दहन- अशोकवनाची नासधूस केल्यावर बंदी बनलेले हनुमान विशाल रूपाने पूर्ण लंका जाळून राख करतात. ४. रावण-बिभीषण संवाद आणि राम शरण-सीतामाईला सन्मानाने परत पाठवा, असे बिभीषण रावणाला समजावतोस, पण रावणाने साफ इन्कार केल्यावर बिभीषण रामाला शरण येतात. ५. समुद्र ओलांडण्याची तयारी- समुद्र मंथनाची तयारी होते.

दिव्यमराठी भास्कर 27 Mar 2026 7:42 am

सुरतमध्ये राहून नशेच्या गोळ्या:औषधी पाठवणाऱ्याला पकडले, अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई‎

शहरातील ड्रग्ज सिंडिकेटला नशेच्या गोळ्या आणि औषधींचा पुरवठा करण्यासाठी गुजरातमध्ये बसून जाळे विणणाऱ्या एजंटला अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने अटक केली आहे. तो केवळ या काळ्या व्यापारासाठीच २०२१ पासून सुरतमध्ये वास्तव्यास असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्यासह सुरतमधील एका मेडिकल चालकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अजमत अहेमद बेग (रा. शीतल चार रस्ता, सुभाषनगर, सुरत), रमेश गोमाराम चौधरी (रा. गौरवपंथ रोड, पालनपूर गाव, सुरत) असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. छावणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (२१ मार्च) एएनटीएफच्या पथकाने सापळा रचला होता. ट्रॅव्हल्सने सुरत येथून माल घेऊन आलेला सय्यद अझर सय्यद अकबर (२६, रा. चांदमारी, छावणी) पोलिसांची चाहूल लागताच २ हजार गोळ्या, ११४ सिरप बाटल्या टाकून पळून गेला होता. अखेर सोमवारी (२३ मार्च) छावणी परिसरातून त्याला अटक करण्यात आली. ट्रॅव्हल्सने सुरतहून नशेचा साठा आणणारा ड्रग्ज माफिया अंधा फिरोजचा भाऊ सय्यद अझर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या, तसेच घाटी रुग्णालयासमोर सापळा लावून त्याचा नातेवाईक तौफिक रशीद अली यालाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून आरोपी अजमत व रमेशची माहिती मिळाली. पथकाने दोघांना गुजरातमधून अटक केली. ही कारवाई निरीक्षक गीता बागवडे, सहायक निरीक्षक दीपाली पाटील व त्यांच्या पथकाने केली. ४,४०० नायट्राझेपम गोळ्या १३२ कोडिन सिरपच्या बाटल्या १९.५३ : लाख रुपये जप्त मालाची किंमत अजमत बेग हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचाच असून, त्याचे आजोळ छावणीतील चांदमारी भागात आहे. स्थानिक ओळखींचा फायदा घेत त्याने शहरातील नशेखोरांना माल पुरवण्याचे कंत्राटच घेतले होते. तो सुरतमधील केअर फार्मसीचा चालक रमेश चौधरी याला जादा पैशांचे आमिष दाखवून नशेच्या गोळ्या आणि सिरपची खरेदी करायचा. विशेष म्हणजे, हे मेडिकल चालक औषध वितरकांकडून (डिस्ट्रिब्युटर) या नशेच्या गोळ्या कोणत्याही बिलाशिवाय घेत होते. रेकॉर्डवर नोंद नसल्यामुळे कोणत्याही विभागाच्या ही बाब लक्षात येत नव्हती. सिल्क मिल भागातील कुख्यात ड्रग्ज माफिया अखिल मालक याला गुन्हे शाखेने ३ महिन्यांपूर्वी बेड्या ठोकल्या होत्या. तत्पूर्वी त्याचा पार्टनर अंधा फिरोजला पकडले होते. अखिल गुजरातच्या आयशाकडून माल मागवून शहरात पेडलर्सला द्यायचा. मात्र, सखोल तपास न झाल्याने त्याच साखळीद्वारे माल आणून पुन्हा नशेचा बाजार केला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दिव्यमराठी भास्कर 27 Mar 2026 7:39 am

तिसऱ्या दिवशीही पंपांवर रांगा, ड्रम,‎बाटलीत मिळणार नाही सुटे इंधन‎:अहिल्यानगर‎ शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी पंप बंद, मागणी वाढल्याने उडाला गोंधळ‎

जिल्ह्यात मुबलक प्रमाणात इंधन पुरवठा असला‎तरी, आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये‎धास्ती वाढली आहे. त्यामुळे पेट्रोल पंपावर‎वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र‎शहरासह जिल्हाभरात आहे. एका पेट्रोलपंपावर‎दैनंदिन सरासरी मागणीच्या दुप्पट, इंधनाची गरज‎भासल्यामुळे काही पंपावर इंधन शिल्लक नव्हते.‎पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशनच्या‎म्हणण्यानुसार जिल्ह्यातील अनेक पंपांवर पेट्रोल‎नव्हते. तर प्रशासनाच्या मते, जिल्ह्यात इंधन साठा‎पुरेसा आहे, अफवांमुळे पंपांवर रांगा लागत आहेत.‎ नागरिकांकडूनच इंधनाची साठेबाजी सुरू‎झाल्यामुळे पंपांवरील पेट्रोल लवकर संपत‎असल्याचे दिसते. यामुळे गुरुवारी पंप‎चालकांकडून वाहनातच इंधन दिले जात होते. ‎‎बाटलीत अथवा ड्रममध्ये पेट्रोल व डिझेल देण्यास ‎‎पंपावर नकार दिला जात आहे. अहिल्यानगर ते ‎‎छत्रपती संभाजीनगर मार्गावर काही पंप गुरुवारी‎दुपारी बंद होते. तसेच शहरातीलही काही खासगी‎पंप बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे ज्या‎ठिकाणी इंधन उपलब्ध आहे, तेथे लांबच लांब रांगा ‎‎पहायला आहेत. ग्रामीण भागात मोठ्या ‎‎वाहनांबरोबरच, ड्रम अथवा बाटल्यांमध्ये इंधनाची ‎‎मागणी होते. चार दिवसांपूर्वी तसे इंधन दिले जात‎होते. परंतू, वाढती गर्दी पाहता, सुटे इंधन दिले जात ‎‎नाही. त्यामुळे अफवांना पुन्हा बळ मिळत आहे. ‎‎दरम्यान, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा‎असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी‎हेमा बडे यांनी सांगितले.‎ ८४६ किलोलिटर उपलब्ध‎ प्रशासनाने दिलेल्या अधिकृत‎आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील इंधन‎साठ्याची वस्तुस्थिती अत्यंत‎समाधानकारक आहे. पेट्रोलची‎जिल्ह्याची दररोजची गरज ३०८‎किलोलिटर इतकी असून, सध्या ८४६‎किलोलिटर इतका मुबलक साठा‎उपलब्ध आहे. तसेच, डिझेलची‎दररोजची गरज ६८९ किलोलिटर‎असताना, सध्या १४७१ किलोलिटर‎इतका साठा उपलब्ध आहे.‎ अफवा पसरवल्यास थेट गुन्हा‎ दाखल करू : जिल्हाधिकारी‎ जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व गॅसचा मुबलक‎साठा आहे. वितरण सुरळीत आहे. सध्या‎सोशल मीडियावर इंधन तुटवड्याबाबत‎खोट्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या‎पसरवल्या जात आहेत. नागरिकांनी पेट्रोल‎पंपांवर विनाकारण गर्दी करू नये. इंधन‎तुटवड्याबाबत खोटा मेसेज किंवा‎चुकीची माहिती पसरवणे हा अपराध‎आहे. जे लोक नागरिकांत घबराट निर्माण‎करत आहेत, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल‎करू, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.‎पंकज आशिया यांनी दिला आहे.‎ कंपन्यांनी इंधन पुरवठा‎सुरू ठेवलाय‎ कंपन्यांकडून गुरुवारी इंधन पुरवठा‎सुरू करण्यात आला. लोकांनी‎एकदम गर्दी केल्याने जिल्ह्यात ४००‎पैकी १७० पंप बंद होते. नगर शहरात‎बहुतांश पंप बंद होते. यापूर्वी‎कंपन्यांना नफा मिळाला आहे. आता‎त्यांनी नफा-तोट्याच्या फारसा‎विचार नक तरा इंधनाचा पुरवठा‎सुरळीत ठेवावा.‎ - डॉ. स्वाधीन गाडेकर, अध्यक्ष,‎पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशन,‎अहिल्यानगर.‎ शेतकऱ्यांची अडचण‎ शेतीसाठी ट्रॅक्टर, हार्वेस्टर, पॉवर‎टिलर आदी यंत्रांचा वापर केला‎जातो. कमी वेगाची ही वाहने, थेट‎पेट्रोलपंपापर्यंत नेऊन, इंधन भरणे‎परवडणारे नाही. त्यामुळे ड्रममध्येच‎डिझेलची मागणी होते. सुटे इंधन‎देण्यावर प्रशासनाने टाच आणली‎आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण‎झाली आहे. सध्या अर्धातास रांगेत‎थांबल्यानंतर इंधन उपलब्ध होते.‎ दिवसभरात ‎दोन टँकर‎ १५००० लिटर, २० हजार लिटर व १२‎हजार लिटरच्या टँकरद्वारे पंपावर‎इंधन पुरवठा होतो. दैनंदिन‎मागणीनुसार इंधनाचा टँकर बुक‎केला जातो. ग्रामीण भागातील एका‎पंपावर १५ हजार लिटरचा एक टँकर‎एक अथवा दोन दिवस पुरतो. तर‎शहरी भागात काही पंपावर दोनही‎टँकर लागतात. सद्यस्थितीत १२‎हजार लिटरच्या टँकरची मागणी‎कमी आहे, मागणी वाढल्याने दुप्पट‎टँकरची गरज निर्माण होत आहे.‎

दिव्यमराठी भास्कर 27 Mar 2026 7:22 am

लेटरहेडवर ‘औरंगाबाद’ नाव असल्यामुळे‎ एमआयएम नगरसेवकांचे प्रस्ताव फेटाळले‎:स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी प्रस्ताव ठरवले नियमबाह्य‎

शहराचे नाव बदलून ३ वर्षांचा‎कालावधी उलटला, अधिकृत ‎‎कागदपत्रांवरही ‘छत्रपती‎संभाजीनगर’ हा उल्लेख आहे.‎तरीही नावाच्या मुद्द्यावरून‎महापालिकेत पुन्हा एकदा राजकीय‎वाद पेटला आहे. एमआयएमच्या ३३ ‎‎नगरसेवकांनी ‘औरंगाबाद‎महापालिका’ असा उल्लेख‎असलेल्या लेटरहेडवर वॉर्ड विकास ‎‎निधीची मागणी सादर केली. मात्र,‎स्थायी समिती सभापती अनिल‎मकरिये यांनी हे सर्व प्रस्ताव नियमभंग‎म्हणून फेटाळले.‎ मनपात सध्या अर्थसंकल्पीय‎प्रक्रिया सुरू असून, प्रत्येक‎वॉर्डाकडून कामांसाठी मागण्या‎घेतल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर‎एमआयएमच्या नगरसेवकांनी सादर‎केलेली पत्रे चर्चेचा विषय ठरली.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎काही अधिकाऱ्यांच्या मते, ‘नाव‎बदलानंतर सर्व अधिकृत व्यवहार‎नव्या नावानेच होणे बंधनकारक‎आहे; अन्यथा प्रशासकीय गोंधळ‎निर्माण होऊ शकतो.’‎ नाव बदलाचा मुद्दा केवळ‎औपचारिक नसून, तो राजकीय‎भूमिका आणि ओळखीशी जोडला‎गेला आहे. एमआयएमकडून‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‘औरंगाबाद’ नावाचा सातत्याने‎वापर होत असल्याने, त्यामुळे‎भाजप, शिवसेना विरुद्ध एमआयएम‎असा संघर्ष सभागृहात पहाण्यास‎मिळणार आहे. निधी हवा असेल तर‎नियम पाळावे लागतील. अधिकृत‎नावाचाच वापर अनिवार्य‎असल्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी‎स्वीकारली आहे.‎ भविष्यात मनपामध्ये शहराच्या नावाचा मुद्दा तापणार‎ २०२२ मध्ये शहराचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यात आले.‎त्यानंतर सर्व शासकीय व प्रशासकीय कागदपत्रांमध्ये नवीन नाव लागले,‎मात्र काही राजकीय पक्षांकडून जुन्या नावाचा वापर सुरूच आहे. या‎निर्णयामुळे वॉर्ड पातळीवरील विकासकामांचा निधी तात्पुरता अडकण्याची‎शक्यता आहे. नगरसेवकांनी त्वरित लेटरहेड बदलून प्रस्ताव पुन्हा सादर‎करण्यास सुरुवात केली आहे. नावाच्या प्रश्नावरून सुरू झालेला हा वाद‎केवळ शब्दांपुरता मर्यादित नसून प्रशासन, राजकारण आणि स्थानिक‎ओळखीच्या संघर्षाचे प्रतीक ठरत आहे. पुढील काही दिवसांत हा मुद्दा‎अधिक तापण्याची चिन्हे आहेत.‎

दिव्यमराठी भास्कर 27 Mar 2026 7:17 am

आठवडी बाजार बंद करून शहरात मॉलसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा कुटिल डाव:भाजप आ. केणेकरांचा घरचा आहेर; बेरोजगारांनी अवैध धंदे, दरोडे टाकावे का?

वाढत्या वाहतूक कोंडीचे कारण पुढे करीत महापालिकेच्या स्थापनेपूर्वीपासून सुरू असलेले आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयास भाजपचे आमदार संजय केणेकर यांनी कडाडून विरोध करीत स्वतःच्या पक्षाचे महापौर, सभापती यांना घरचा आहेर दिला आहे. आ. केणेकरांच्या आमदारकीची मुदत संपत असताना त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात दंड थोपटले आहेत. निर्णय मागे घेतला नाही तर रस्त्यावर उतरण्याची धमकी दिली आहे. बेरोजगारांना गुन्हेगारीकडे वळवणारा हा निर्णय आहे. यामुळे शहराचे सामाजिक वातावरण बिघडवण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. महापालिका प्रशासन आणि आ. संजय केणेकर यांच्यात नेहमीच वादाच्या ठिणग्या उडत आलेल्या आहेत. शहरातील हजारो नागरिकांना रोजगार आणि सुविधा ठरलेले आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाविरोधात भाजपच्या आमदाराने उघड दंड थोपटले आहेत. मनपा आयुक्त आणि प्रशासनाला कात्रीत पकडण्याची संधी सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका प्रशासनाने कुठलेच झोन अद्याप निर्माण केले नाहीत. विक्रेत्यांसाठी झोन निर्माण केले नाहीत. हातगाडीचे धोरण ठरवले नाही. अनेक जण रस्त्यावर दुकाने थाटून उपजीविका भागवत आहेत. अंतर्गत राजकारण तापले भाजपमध्ये अंतर्गत राजकारण तापलेले आहे. पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत घेतलेल्या पहिल्याच निर्णयास अपशकुन झाला आहे. स्वकीयांच्या विरोधात भूमिका घेणारे आ. केणेकर यांनी आपला सवतासुभा राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाला विरोध दाखवून त्यांनी ते अधोरेखित केले. आठवडी बाजाराच्या ठिकाणी फेरीवाले आठवडी बाजाराचा तसा काही फायदा नागरिकांना राहिलेला नाही. आठवडी बाजाराच्या ठिकाणी फेरीवाले ठेवले जातील. फेरीवाल्यांसाठीच्या झोनची निर्मिती लवकरच करण्यात येईल. आ. केणेकरांनी काळजी करू नये. - अनिल मकरिये, स्थायी समिती सभापती, मनपा छत्रपती संभाजीनगर.

दिव्यमराठी भास्कर 27 Mar 2026 7:12 am

शरद पवारांसाठी जागा सोडल्याने चतुर्वेदी ठाकरेंसमोरच संतापल्या:उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले, अंतिम निर्णय माझाच

“ऑपरेशन टायगर’च्या दहशतीखाली असलेल्या ठाकरे गटात आता अंतर्गत बंडाळीचा वणवा पेटला आहे. मातोश्रीवर पार पडलेल्या खासदारांच्या बैठकीत राज्यसभेच्या जागेवरून अभूतपूर्व हाय-व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ही जागा शरद पवारांसाठी सोडल्याने प्रियांका चतुर्वेदी यांनी थेट शड्डू ठोकला. आदित्य ठाकरेंच्या कार्यशैलीवर खासदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. बैठकीत प्रियांका चतुर्वेदी यांनी संजय राऊतांच्या भूमिकेवर थेट प्रहार केला. “संजय राऊत यांनी पवारांचे नाव का घेतले? मला माझा तीव्र निषेध नोंदवायचा आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावर उद्धव ठाकरे यांनी “पक्षप्रमुख मी आहे. निर्णय माझाच असेल,’ असे सुनावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, वादाची ठिणगी अधिकच भडकली. मराठवाड्यातील एका खासदाराने, “चतुर्वेदींना ६ वर्षे संधी देऊन पक्षाला काय फायदा झाला?” असा बोचरा सवाल केला. राऊत, आदित्य ठाकरेंत मतभेद - म्हस्के क्काची जागा पवारांच्या झोळीत टाकल्याने पक्षात संतापाची लाट आहे. एकेकाळी “ज्यांना जायचे आहे त्यांनी जा” असे ठणकावून सांगणारे ठाकरे आता “माझा तुमच्यावर विश्वास आहे” अशी आर्जवाची भाषा वापरत आहेत. प्रियांका चतुर्वेदींच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात तीव्र मतभेद उफाळून आले आहेत. त्यांच्यात मोठी खडाजंगी आणि शाब्दिक चकमक झाल्याचा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. आदित्य ठाकरेंनी राज्याचे दौरे करावेत, खासदारांचा घरचा आहेर केवळ राज्यसभेची जागाच नाही. आदित्य ठाकरेंच्या निष्क्रियतेवरूनही बैठकीत रणकंदन झाले. “उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीमुळे त्यांना मर्यादा आहेत. आदित्य ठाकरेंनी तरी एसी गाड्यांतून उतरून राज्याचे दौरे करावेत,” अशा शब्दांत खासदारांनी त्यांना घरचा आहेर दिला. या टीकेमुळे आदित्य ठाकरे इतके नाराज झाले की संपूर्ण बैठकीत त्यांनी एकाही खासदाराशी संवाद साधला नाही.

दिव्यमराठी भास्कर 27 Mar 2026 7:09 am

सुविधा नसल्याने नऊ हजारांवर शाळा अडचणीत:आता ‘पट वाढवा’ अभियान, शाळा दर्जा-सुविधांची वानवा दूर करण्याचे सरकारपुढे माेठे आव्हान

राज्यातील ४३४६ शाळांत वीज नाही, १४ हजार ८६७ शाळांत मैदाने नाहीत, ३९४ शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही, आठ हजार शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी शिकत आहेत. यू-डायस प्लस २०२५-२६ च्या अहवालानुसार विद्यार्थी संख्या एका वर्षात १ लाख २८ हजार २०९ ने घटली. ९ हजार २६६ शाळा ‘एकशिक्षकी’ असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता पट वाढवा अभियान सुरू केले आहे. पण शाळा दर्जाचा आणि सुविधांची वानवा जेव्हा दूर होईल तेव्हाच या शाळा गजबजतील. ‘गुढीपाडवा-पट वाढवा’ या राज्यस्तरीय अभियानाचे उद्घाटन नुकतेच पुण्यात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शाळांच्या पटसंख्येचा विषय चर्चेत आला. जिल्हा परिषद व शासकीय शाळा गजबजून जाव्यात आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पण खासगी शाळांकडून ज्या सुविधा उभारल्या जात आहेत त्या तुलनेत जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांत त्या मिळत नाहीत, मग या शाळा गजबजणार कशा? असा प्रश्न विचारला जात आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून शाळा टिकवण्याचे प्रयत्न जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले, जिल्हा परिषदेच्या ३०३ मॉडेल स्कूल, २५ विद्यार्थ्यांना नासा व २५ विद्यार्थ्यांना युरोपियन स्पेस एजन्सीकडे पाठवण्याचे नियोजन आहे. आंतरराज्यीय विद्यार्थी दौरे, बाल संसद, शिक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम यासारखे उपक्रम राबवण्यात येत आहेत. ६८३ शाळांमध्ये मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह नाही- भुसे राज्यातील २९९० शाळांत विद्युत सुविधा तर ६८३ शाळांमध्ये मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याची कबुली शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. सर्व शाळांत पिण्याच्या पाण्याची सुविधा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. साडेआठ हजार शाळा अडचणीत येण्याची शक्यता ३९४ शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही, आठ हजार शाळांमध्ये १० पेक्षा कमी विद्यार्थी, तर रत्नागिरी ७१३, पुण्यात ६२७, रायगड ६८२, सिंधुदुर्ग ५६९, मुंबई उपनगरातील ३६०, मुंबई शहरातील ३४, ठाण्यातील १९९, पालघरमधील १२४ शाळांतही विद्यार्थ्यांची संख्या १०च्या खालीच आहे. त्यात जिल्हानिहाय स्थिती अशी आहे - गोंदिया -२१३, भडारा-१४१, नागपूर-५५५, चंद्रपूर-४३७, गडचिरोली-६४१, वर्धा-३१८, यवतमाळ-३५०, अमरावती-३१४, अकोला-११३, वाशिम-१३३, हिंगोली-१३, नांदेड-३१४, बुलडाणा-१५८, परभणी-१२६, लातूर-२०१, धाराशिव-१७४, जालना-१८४, बीड-५३३, सोलापूर-३४१, जळगाव-१०७, छत्रपती संभाजीनगर-३४७ वर्षात एक लाख २८ हजार विद्यार्थी संख्या घटली यू-डायस प्लस २०२५-२६ च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या एका वर्षात १ लाख २८ हजार २०९ ने घटल्याचे समोर आले आहे. राज्यातील एकूण ९ हजार २६६ शाळा सध्या ‘एकशिक्षकी’ असून त्यापैकी ८ हजार ५८६ शाळा या केवळ सरकारी व्यवस्थापनाच्या आहेत. परिणामी काही शाळा बंद होण्याच्या मार्गावर असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

दिव्यमराठी भास्कर 27 Mar 2026 7:07 am

आयआरएस मोटेंकडून २ हजार कोटींचा घोटाळा- आ. पडळकर:मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी सचिन मोटे यांच्यावर २ हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याचा खळबळजनक आरोप केला आहे. नवी मुंबईतील गृहनिर्माण प्रकल्पांच्या नावाखाली हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा दावा पडळकरांनी केला असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशीचे आदेश दिले आहेत. पडळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मोटे आणि त्यांच्या नातेवाईकांनी “डीडीएसआर’ ग्रुपच्या माध्यमातून तथागत, स्वप्नपूर्ती, अणुविश्व आणि सात्त्विक अशा विविध हाउसिंग सोसायट्या स्थापन केल्या. गुंतवणूकदारांना ९ ते १८ महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून हजारो कोटी रुपये गोळा करण्यात आले. या पैशांतून भूखंड खरेदी करून त्यावर बेकायदा सोसायट्यांचे जाळे विणल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड सचिन मोटे असल्याचा दावा पडळकरांनी केला आहे. या घोटाळ्यात केवळ आयआरएस अधिकारीच नव्हे, तर सिडको, जीएसटी आणि गृहनिर्माण विभागातील काही बडे अधिकारी सामील असल्याचा संशय पडळकरांनी व्यक्त केला आहे. अश्लील व्हिडिओ आणि ब्लॅकमेलिंगचा गंभीर दावा या घोटाळ्यासोबतच पडळकरांनी एक धक्कादायक आरोप केला आहे. गुंतवणूकदारांना आणि संबंधित व्यक्तींना धमकावण्यासाठी व ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांचे महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. तसेच, विश्वास संपादन करण्यासाठी या कार्यालयांमध्ये चक्क रतन टाटा यांचा फोटो वापरून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 27 Mar 2026 7:04 am

राज्यभर कारवाई:शाळांच्या नावातील ‘ग्लोबल’, ‘इंटरनॅशनल’ शब्द वगळण्याचे शिक्षण विभागाचे आदेश, पालकांची दिशाभूल होत असल्याने महत्त्वाचे पाऊल

राज्य शिक्षण मंडळाशी संलग्न असूनही नावामध्ये ‘ग्लोबल’, ‘इंटरनॅशनल’ किंवा ‘सीबीएसई’ असे शब्द वापरून पालकांची दिशाभूल करणाऱ्या शाळांविरुद्ध शिक्षण विभागाने दंडुका उगारला आहे. शिक्षण संचालनालयाने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी मार्च महिन्यापासून राज्यभर सुरू झाली असून, अपात्र शाळांच्या नावातील हे भपकेबाज शब्द तत्काळ वगळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काय आहेत नवे नियम? सीबीएसई : हा शब्द केवळ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत शाळांनाच वापरता येईल.इंटरनॅशनल/ग्लोबल: हे शब्द वापरण्यासाठी शाळेची परदेशातील शाखा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिकृत संलग्नता असणे अनिवार्य आहे.कठोर तपासणी: नवीन शाळांची मान्यता किंवा दर्जावाढीचे प्रस्ताव सादर करताना नावांची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. शिक्षणाच्या व्यापारीकरणाला आळा बसवणारे पाऊल पालकांनी मुलांच्या शाळेतील प्रवेशावेळी ‘इंटरनॅशनल’ किंवा ‘ग्लोबल’ नावामागील शासन परवानगीबाबत पडताळणी करावी. शिक्षण विभागाने घेतलेली भूमिका ही पहिली पायरी आहे. आता पालकांची फसवणूक थांबावी, शिक्षणातील व्यापारीकरणाला आळा बसावा, आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा शिक्षण व्यवस्थेवर बसावा यासाठी कठोर अंमलबजावणीची गरज आहे. - निशांत नारनवरे, इंग्लिश टीचर असोसिएशन, नागपूर

दिव्यमराठी भास्कर 27 Mar 2026 6:54 am

भोंदूबाबा खरातचे हे साम्राज्य तब्बल 17 एकर परिसरात पसरलेले:मंदिराचा दगड अन् भाविकांचा पैसा वापरून कॅप्टनने उभा केला ऐषारामाचा ‘किल्ला’

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारण कमालीचे तापले असून शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी थेट ‘मातोश्री’वर निशाणा साधत खळबळजनक आरोप केले आहेत. “क्रूरकर्मा खरातला पाण्याची जोडणी ही ‘मातोश्रीच्या मॅडम’च्या आग्रहाखातर देण्यात आली होती,” असा दावा करत म्हात्रे यांनी ठाकरे कुटुंबाला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या संपूर्ण प्रकरणाला त्यांनी ‘ताज का राज’असे नाव दिले असून, हा राज फुटल्यास विरोधकांच्या तोंडचे पाणी पळेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शीतल म्हात्रे यांच्या दाव्यानुसार, दक्षिण मुंबईतील ‘ताज’ हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि अशोक खरात यांच्यात एक गुप्त बैठक पार पडली होती. याच बैठकीत खरात याच्या संस्थेला नळ जोडणी देण्यावर शिक्कामोर्तब झाले. “पाइपलाइनचा जीआर काढण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमनी आदेश दिला होता की नाही? आणि त्यामागे कोणती न्यूमरॉलॉजी होती?” असा टोकदार सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. खरातला शासकीय योजनांचा लाभ नेमका कुणाच्या काळात आणि कुणाच्या मध्यस्थीने मिळाला, याचे उत्तर आता उबाठा गटाने द्यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. दरम्यान, अंधारे यांनी वैयक्तिक पातळीवर हल्ले करू नयेत, असे प्रत्युत्तर म्हात्रेंना दिले. चोरीचे वाहन सांगण्यासाठी घ्यायचा १० हजार रुपये वाहन चोरीला गेल्यास ते शोधून देण्याच्या नावाखाली हा भोंदूबाबा नागरिकांकडून १० हजार रुपये उकळत असे. चोरीचे वाहन कोणत्या दिशेला आणि कुणाकडे मिळेल, हे सांगण्याच्या नावाखाली त्याने सर्वसामान्यांसह अनेक श्रीमंत भाविकांनाही आपल्या जाळ्यात ओढले होते. कालपर्यंत नतमस्तक होणारे आता गप्प खरातचे पाप चव्हाट्यावर आल्यानंतर आता मिरगाव परिसरात दहशतीसोबतच शांतता पसरली आहे. कालपर्यंत कॅप्टनसमोर हात जोडणारे ज्येष्ठ नागरिक आता ‘आम्हाला काही माहिती नाही’ म्हणत तोंड फिरवत आहेत. खरातच्या फार्म हाऊसची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही या प्रकरणापासून हात झटकले आहेत. स्वतःच्या कुटुंबानेही आता खरातशी असलेले नाते तोडले आहेत. त्याच्या कृत्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासावर त्यांनी खंत व्यक्त केली आहे. खरात प्रकरण : पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघांना कोपरगावातून अटक अहिल्यानगर | अशोक खरातवरील गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. या गुन्ह्यातील पीडित महिलांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी कोपरगाव (जि. अहिल्यानगर) येथून दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणी कोपरगाव ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ मार्च २०२६ रोजी कोपरगाव येथील एडब्ल्यू नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर राहुल गंगाधर शिंदे (अनिल कोल्ड्रिंक्स, कोपरगाव) याने त्याच्या मोबाइलवरून व्हिडिओ प्रसारित केले होते. पोलिसांनी तपास केला असता, राहुल शिंदे याला हे व्हिडिओ कोपरगावच्याच योगेश पंढरीनाथ आढाव याने पाठवल्याचे उघड झाले. तसेच योगेशला हे व्हिडिओ त्याचा मित्र संदीप गर्जे (रा. माजलगाव, जि. बीड) याने पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले. कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात राहुल गंगाधर शिंदे, योगेश पंढरीनाथ आढाव आणि संदीप गर्जे या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अंधारेंना आमदारकी हवीय : म्हात्रे या आरोपांनंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि शीतल म्हात्रे यांच्यात ट्विटरवर जोरदार युद्ध रंगलं आहे. अंधारे यांनी म्हात्रे यांच्यावर खालच्या पातळीवर राजकारण केल्याचा आरोप केला, तर म्हात्रे यांनी पलटवार करताना म्हटले की, अंधारे यांना विधान परिषदेची आमदारकी हवी आहे, म्हणूनच त्यांचा हा सर्व आटापिटा सुरू आहे. खरात प्रकरणावरून सुरू झालेला हा वाद आता थेट कौटुंबिक आरोपांपर्यंत पोहोचल्याने राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. ईशान्येश्वर मंदिर आणि लागूनच असलेल्या कॅप्टन खरातच्या फार्म हाऊसची रचना पाहिली असता, दोन्ही ठिकाणचे बांधकाम एकाच वैशिष्ट्यपूर्ण दगडाने केल्याचे स्पष्ट दिसते. ज्या दगडाने सिन्नरच्या मिरगाव येथील ईशान्येश्वर महादेवाचा गाभारा आणि मंदिर उभारले गेले, त्याच पवित्र दगडाचा वापर करून लैंगिक अत्याचाराचा आरोपी कॅप्टन अशोक खरात याने आपले आलिशान फार्म हाऊस उभे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ईशान्येश्वर मंदिरासाठी भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेला खास ‘देवास कोंदण’ (नेवासा दगड) खरातने स्वतःच्या खासगी साम्राज्याच्या बांधकामासाठी वापरल्याचे ‘दिव्य मराठी’ने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत उघड झाले आहे. ईशान्येश्वर मंदिर आणि लागूनच असलेल्या कॅप्टन खरातच्या फार्म हाऊसची रचना पाहिली असता, दोन्ही ठिकाणचे बांधकाम एकाच वैशिष्ट्यपूर्ण दगडाने केल्याचे स्पष्ट दिसते. खरातचे हे साम्राज्य तब्बल १७ एकर परिसरात पसरलेले आहे. तिथे ५,००० हून अधिक आंब्याची झाडे आहेत. या घनदाट झाडांच्या आडोशानेच खरात आपली अघोरी कृत्ये आणि काळी कृत्ये करत असल्याची चर्चा आता परिसरात जोर धरू लागली आहे. भाविकांच्या भक्तीचा वापर करून या भोंदूने स्वतःचे इमले उभे केले. व्हीआयपींची रांग आणि प्रेरणादायी भाषणांचा बनाव खरात हा परिसरात ‘कॅप्टन सर’ म्हणून ओळखला जायचा. १६ ऑगस्ट २०१० रोजी मंदिराची स्थापना झाल्यापासून दरवर्षी येथे १६ ऑगस्टला मोठा धार्मिक सोहळा आणि पारायण आयोजित केले जायचे. या सोहळ्याला १० हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी रांगा लावत असत. अनेक बडे राजकीय नेतेही येत असत. याच सोहळ्याचा फायदा घेऊन खरात तरुण मुला-मुलींना ‘आत्मविश्वासाने सामोरे जा’, ‘देवाची भक्ती करा’ असे सल्ले देत त्यांचा विश्वास संपादन करायचा. मात्र, याच विश्वासाचा त्याने नंतर गैरफायदा घेतल्याचे आता समोर येत आहे. मंदिर परिसरात सरकारी पैशातून झगमगाट मिरगावात शिरल्यानंतर आजही रस्ते मातीचे आणि कच्च्या स्वरूपाचे आहेत. मात्र, खरातच्या ‘शिवनिका’ संस्थेच्या ईशान्येश्वर मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉकचा थर आणि आलिशान सांस्कृतिक हॉल दिमाखात उभा आहे. विशेष म्हणजे, यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत १ कोटी रुपयांच्या निधीतून खरातसाठी पेव्हर ब्लॉकच्या परिसराचा कायापालट केलाय.

दिव्यमराठी भास्कर 27 Mar 2026 6:42 am

क्रिकेटप्रेमींसाठी उद्यापासून आयपीएलची पर्वणी

मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाकडून यंदाच्या वर्षातील आयपीएलच्या दुस-या सत्रातील वेळापत्रक जारी करण्यात आले. यापूर्वी बीसीसीआयने पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जारी केले असून दोनच दिवसांत आयपीएलचा धुरळा उडणार आहे. २८ मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंज बंगळुरू यांच्यात बंगळुरुतील चेन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे तर स्पर्धेतील दुस-या सत्रातील सामने १३ एप्रिल […] The post क्रिकेटप्रेमींसाठी उद्यापासून आयपीएलची पर्वणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 27 Mar 2026 1:06 am

६ मित्र राष्ट्रांसाठी होर्मुझ मार्ग खुला

कच्चे तेल वाहतुकीत सूट, भारताला होणार फायदा तेहरान : वृत्तसंस्था मध्य पूर्वेत गेल्या चार महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. इराण विरुद्ध इस्रायल, अमेरिका संघर्षामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अडचणीत आल्या आहेत. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी खनिज तेलाची वाहतूक रोखल्याने अनेक देशांसमोर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. पण इराणने या संकटातून ६ देशांची सुटका केली आहे. यामध्ये भारताचा […] The post ६ मित्र राष्ट्रांसाठी होर्मुझ मार्ग खुला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 27 Mar 2026 1:04 am

देशात पुरेसा इंधन साठा!

केंद्राचा दावा, मग पेट्रोल, डिझेल वाटपात मर्यादा का?, नागरिकांचा सवाल नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात इंधन टंचाईबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान केंद्र सरकारने देशातील इंधन पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून परिस्थिती नियंत्रणात आहे, असा दावा केला आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही केले. देशातील सर्वच पेट्रोल पंप आणि गॅस वितरण केंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती […] The post देशात पुरेसा इंधन साठा! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 27 Mar 2026 1:02 am

किल्लारी येथे रामनवमी उत्सवास आले यात्रेचे स्वरुप

किल्लारी : वार्ताहर किल्लारी येथे रामनवमीनिमित्त राष्ट्रीय संत मोरारीबापू यांच्या प्रेरणेतून भूकंपग्रस्तांचे मनोबल वाढविणे व भक्ती वाढविण्याच्या संकल्पनेतून कोट्यवधी रुपये खर्च करून ४ एकरमध्ये भव्य मंदीर उभारले आहे. त्यांचे श्रध्दास्थान आसलेल्या राममांदिरात रामनवमी सिताराम ट्रस्ट लातूरच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने परिसरातील जवळपास १० हजार भाविकांनी दर्शन केले. सोमवारपासून रामायण पाट, भजनाचा कार्यक्रम […] The post किल्लारी येथे रामनवमी उत्सवास आले यात्रेचे स्वरुप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 11:14 pm

दुचाकीमध्ये बसलेल्या नागाला सर्पमित्रांनी दिले जीवदान

चाकूर : प्रतिनिधी तालुक्यातील मांडूरकी या गावात इस्माईल पठाण यांच्या दुचाकीमध्ये साप गेल्याचे दिसून आले. त्यांनी ताबडतोब सर्पमित्र शिरूरकर, अल्ताफ सय्यद व शुभम भातके यांना संपर्क साधला. याची माहिती मिळताच शिरूरकर ग्रुपची टीम त्या ठिकाणी पोहचून शिताफीने या अतिविषारी नागास बाहेर काढून त्यास निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे साप थंड वातावरणाच्या […] The post दुचाकीमध्ये बसलेल्या नागाला सर्पमित्रांनी दिले जीवदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 11:12 pm

बॅडमिंटन स्पर्धेत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वर्चस्व

लातूर : प्रतिनिधी माईर एमआयटी शिक्षण संस्था समूह, लातूर यांच्या वतीने आयोजित ‘विश्वमैदान २०२६’ आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सवात पहिल्याच दिवशी रंगलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत आपले वर्चस्व सिद्ध केले. साई कृष्णा आणि नेहाल शाह यांच्या उल्लेखनीय खेळाच्या जोरावर जीएमसी संघाने विविध गटांत विजयांची मालिका कायम ठेवली. दुसरीकडे […] The post बॅडमिंटन स्पर्धेत विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वर्चस्व appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 11:11 pm

८७ व्या दिवशी ‘योग महोत्सव’ उत्साहात साजरा 

लातूर : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त देशभर सुरू असलेल्या १०० दिवसीय काउंटडाउन मालिकेच्या अनुषंगाने ८७ व्या दिवशी लातूर येथील एमआयडीसी भागातील जेएसपीएम कॅम्पसमध्ये ‘योग महोत्सव’ उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र योग व प्राकृतिक चिकित्सा आयुर्विज्ञान परिषद, जेएसपीएम शिक्षण संस्था, स्वामी विवेकानंद विद्यालय लातूर व सप्तरश्मी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आयुष मंत्रालय व मोरारजी […] The post ८७ व्या दिवशी ‘योग महोत्सव’ उत्साहात साजरा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 11:10 pm

प्रशासकराज संपताच धनवर्षाव सुरू

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषद व १० पंचायत समित्यांवर मार्च २०२२ पासून प्रशासक राज असल्याने १५ व्या वित्त आयोगाचा निधी शासनाने रोखून ठेवला होता. जिल्हा परिषदेत व पंचायत समितीत सदस्य निवडूण येताच शासनाने गेल्या चार वर्षापासूनचा जो १५ व्या वित्त आयोगाचा निधी रोखून धरला होता, तो आता मोकळा करण्यास सुरूवात केली. बंधित व अबंधित […] The post प्रशासकराज संपताच धनवर्षाव सुरू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 11:09 pm

मनोधैर्य योजनेची 81 प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढा:विभागीय आयुक्तांचे निर्देश: दक्षता समितीच्या बैठकीत प्रकरणांचा निपटारा करण्याचे आदेश

विभागीय दक्षता व नियंत्रण समितीसमोर मनोधैर्य योजनेची तब्बल ८१ प्रकरणे प्रलंबित आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास गतीने पूर्ण करून गुन्ह्याची नोंद आणि पुढील चौकशी योग्यरित्या पूर्ण करावी. प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी यंत्रणांना दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय दक्षता व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी, समाज कल्याण अधिकारी आणि सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. या बैठकीत श्रीमती केदार यांनी अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गत एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या आर्थिक वर्षात दाखल प्रकरणे, मंजूर प्रकरणांच्या संदर्भात पीडितांना अर्थसहाय्याची सद्यस्थिती तसेच न्यायालयात दाखल व प्रलंबित प्रकरणांबाबत माहिती सादर केली. अमरावती विभागामध्ये या काळात एकूण ८१ प्रकरणे पोलीस स्तरावर प्रलंबित आहेत. यामध्ये अमरावती शहरातील ४, अमरावती ग्रामीणची ६, अकोला जिल्ह्याची ८, यवतमाळची १३, बुलडाणाची सर्वाधिक ३३ आणि वाशिम जिल्ह्यांतील १७ प्रकरणांचा समावेश आहे. यापैकी ३३ प्रकरणांचा पोलीस तपास पूर्ण झाला असून, दोन प्रकरणे पोलीस तपासाअंती निकाली निघाली आहेत. पोलीस तपासावरील उर्वरित ४६ प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात यावीत, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. ही प्रकरणे निकाली निघण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरावर जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीने दरमहा नियमितपणे आढावा घ्यावा. तसेच, संबंधित जिल्हा शासकीय अभियोक्ता यांनी प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली निघतील यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. सन १९९५ ते मार्च २०२६ अखेर न्यायालयात एकूण ७ हजार ९९२ प्रकरणे दाखल झाली आहेत. त्यापैकी ४ हजार ४२५ प्रकरणे निकाली निघाली. यातील एकूण ४४८ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली असून, ३ हजार ९९७ प्रकरणांमध्ये आरोपी निर्दोष सुटले आहेत. सद्यस्थितीत ३ हजार ५४७ प्रकरणे न्यायालयाच्या स्तरावर प्रलंबित आहेत. ही प्रकरणे त्वरेने निकाली निघावीत, यासाठी सर्व अधिकाऱ्यांमार्फत प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 10:46 pm

वडगाव माहोरे येथे धुळीच्या प्रदूषणाविरोधात चक्काजाम आंदोलन:स्टोन क्रशर, आरएमसी प्रकल्पावर कारवाईचे प्रशासनाचे आश्वासन

नांदगाव पेठ परिसरातील वडगाव माहोरे येथील नागरिकांनी वाढत्या प्रदूषणामुळे संतप्त होत स्टोन क्रशर आणि आरएमसी प्रकल्पाविरोधात चक्काजाम आंदोलन केले. धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी गिट्टी व मुरूम वाहतूक करणारी वाहने रोखली. यामुळे काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. १८ फेब्रुवारी रोजी पालकमंत्र्यांच्या तक्रार निवारण मेळाव्यात सादर केलेल्या निवेदनाकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांचा संताप वाढला होता. आरोग्याशी तडजोड नाही अशी भूमिका घेत त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आंदोलनाची तीव्रता पाहून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे प्रमुख संजय पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पाहणीत स्टोन क्रशर व आरएमसी प्रकल्पाने प्रदूषण नियंत्रणाचे नियम सातत्याने मोडल्याचे स्पष्ट झाले. यावर तातडीने कारवाई करत संबंधित प्रकल्प बंद करण्याचा प्रस्ताव मुंबई मुख्य कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले. अमरावतीचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) अनिल भटकर यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रदूषण विभागाने दाखवलेल्या नियमभंगाच्या आधारे प्रकल्प बंद करण्याचे परिपत्रक काढले जाईल, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश दहातोंडे यांनी कायदा व सुव्यवस्था राखत नागरिकांच्या बाजूने उभे राहण्याचे आणि प्रकल्प बंद करण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाकडून मिळालेल्या ठोस आश्वासनांनंतर नागरिकांनी तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित केले असले तरी, जोपर्यंत प्रकल्प पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला. या आंदोलनात अमरावती महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुरेखा लुंगारे यांच्यासह वडगाव माहोरे येथील युवा नेते अक्षय चव्हाण, प्रशांत किटूकले, ऋषी पडोळे, राहुल नेमाडे, चंद्रशेखर दारोकार, नंदू गौरकर, हरीश मेश्राम आणि भवानी परिसरातील शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 10:45 pm

संत गाडगे बाबांची दशसूत्री जीवनाचा खरा आधार:माजी विशेष सचिव अनिल जोशी यांचे अमरावती विद्यापीठात प्रतिपादन

भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी विशेष सचिव अनिल जोशी यांनी प्रतिपादन केले की, संत गाडगे बाबांच्या विचारांची दशसूत्री आणि त्यांची सेवाभावी वृत्ती हाच मानवी जीवनाचा खरा आधार आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात 'संत गाडगे बाबांची दशसूत्री आणि सेवाभावी संस्थांची भूमिका' या विषयावर आयोजित विशेष कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे होते, तर विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही.एम. मेटकर आणि श्री संत गाडगे बाबा अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे उपस्थित होते. जोशी यांनी आपल्या भाषणात गाडगेबाबांच्या 'दशसूत्री' कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी ऋणमोचन येथील घाट, विद्यार्थ्यांसाठी बांधलेली वसतिगृहे आणि स्वच्छतेचा झाडू यांसारख्या गाडगेबाबांच्या कार्याचा उल्लेख केला. त्यांच्या मते, हा झाडू केवळ स्वच्छतेचे नाही तर मन स्वच्छ करण्याचे प्रतीक होते. अनिल जोशी पुढे म्हणाले की, संत गाडगे बाबांचे कीर्तन आणि भजन हे लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम होते. ते संत गाडगे बाबांना 'मास कम्युनिकेशनचे कुलगुरू' असे संबोधले. डॉ. व्ही.एम. मेटकर यांनी बाबांच्या दशसूत्रीचा प्रसार ही काळाची गरज असल्याचे सांगितले. माजी आमदार दिवंगत बबनराव मेटकर यांच्या पुढाकाराने आणि तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्यामुळे विद्यापीठात अध्यासन केंद्राची स्थापना झाल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी सांगितले की, संत गाडगे बाबांनी दिलेली दशसूत्री केवळ शब्दांचा समूह नसून ती निकोप समाजाच्या निर्मितीची गुरुकिल्ली आहे. दशसूत्रीचा आधार घेऊन सेवाभावी संस्था खऱ्या अर्थाने बाबांचा वारसा पुढे चालवत आहेत. या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून बाबांच्या विचार व कार्याचा प्रसार देश पातळीवर होत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. कार्यक्रमादरम्यान संत गाडगे बाबांच्या विचार व कार्यानुसार कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद, नंददीप फाऊंडेशन, संत गाडगे बाबा बहुउद्देशीय संस्था, माणुसकीची भिंत सोशल फाऊंडेशन, संत गाडगे बाबा ज्येष्ठ नागरिक संघ, मातोश्री सुशिलाताई वृद्धाश्रम, संत श्री दोला महाराज वृद्धाश्रम, राजीव गांधी कृषी सेवाभावी संस्था, संत गाडगे बाबा सामाजिक प्रतिष्ठान या संस्थांचा समावेश होता. तसेच श्रीमती डोईफोडे, संदीप चिस्तरकर व अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे यांचाही सत्कार करण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 10:45 pm

महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे आकाशात दर्शन:मुंबईत भव्य ‘ड्रोन शो’चा थरार!

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या “विरासत आणि विकास” या संकल्पनेनुसार राज्य शासन काम करत आहे. महाराष्ट्राची समृद्ध परंपरा, कला, साहित्य, लोकसंगीत आणि संस्कृती आधुनिक पद्धतीने जगासमोर मांडण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि राष्ट्राभिमान यांचे भव्य व नेत्रदीपक दर्शन घडविणारा अभूतपूर्व ड्रोन शो मुंबई येथे आयोजित करण्यात आला, त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनपर भाषणात ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सचिव डॉ.किरण कुलकणी, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे तसेच या ड्रोन शोचा आनंद घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. महाराष्ट्र ही संतांची आणि वीरांची भूमी असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेऊन सांस्कृतिक वारसा जपला जात असल्याचे मंत्री ॲङ शेलार यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील संस्कृती ही “सॉफ्ट पॉवर” म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्याची माहिती देताना मंत्री शेलार म्हणाले की, पूर्वी दरवर्षी 300-350 कार्यक्रम होत असताना आता 1200 हून अधिक कार्यक्रम राज्यभर आयोजित केले जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा विस्तार साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आल्याचे जाहीर करत त्यांनी सांगितले की, देश-विदेशात, विशेषतः मॉरिशस येथेही सार्वजनिक गणेशोत्सवाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. तसेच गणेशोत्सवाला युनेस्को च्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमात प्रथमच ड्रोन शोच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नकाशा, छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त विशेष सादरीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा उपक्रम प्रख्यात संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या संकल्पनेतून साकारला असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवचरित्राची गाथा आकाशात उजळणार- सचिव डॉ.किरण कुलकर्णी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला आजचा कार्यक्रम भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले. महाराष्ट्राच्या परंपरेचे वैभव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा नव्या माध्यमातून उलगडण्याचा हा अनोखा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या पराक्रम आणि कर्तृत्वाचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात, असे सांगत त्यांनी या महान व्यक्तिमत्त्वांविषयी असलेल्या आदरभावाला उजाळा दिला. “शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल किती लिहावे आणि किती बोलावे, असा प्रश्न पडतो. त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करताना कागद कमी पडतो, शब्द थिटे पडतात,” असे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र शासनाने आधुनिक माध्यमांचा वापर करत आकाशाच्या विशाल पटावर शिवचरित्र उलगडण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन नागरिकांना अनुभवता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राम नवमी निमित्त आयोजित या कार्यक्रमात आकाशात चमचमणाऱ्या दिव्यांच्या माध्यमातून शिवकालीन पराक्रमाचे दृश्य साकारले जाणार असून, नागरिकांनी या अनोख्या अनुभवाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 10:03 pm

मध्यस्थीसाठी विलंब का?

आखाती प्रदेशात उद्भवलेल्या अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे भारतासह इतर अनेक देशांत इंधन आणि नैसर्गिक वायू पुरवठ्याची साखळी कमालीच्या संकटात सापडली. सामान्य लोक गॅस सिलिंडरसाठी रांगेत ताटकळताना दिसले. मात्र केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री इंधनाबाबत काळजी करू नये असे सांगत आहेत हा विरोधाभास नव्हे काय? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनतेला या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना […] The post मध्यस्थीसाठी विलंब का? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 9:08 pm

लातूर जिल्ह्यातून १९ लाख ७५ हजारांचा गुटखा जप्त 

लातूर : प्रतिनिधी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थाविरुद्ध व्यापक मोहीम उघडली आहे. त्याअंतर्गत लातूर जिल्ह्यात दि. १६ ते २५ मार्च या कालावधीत गुटखा विक्री, साठवणुक व वाहतूक करणा-या आरोपींविरुद्ध कारवाई करुन १९ लाख ७५ हजार ९८५ रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा, वाहने जप्त केले आहे. या प्रकरणी बीएनएसअंतर्गत […] The post लातूर जिल्ह्यातून १९ लाख ७५ हजारांचा गुटखा जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 9:06 pm

माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर

लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर तालुक्यातील टाकळगाव येथे रविवार, २९ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात नामवंत […] The post माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 9:05 pm

महमदापूर श्रीरामनगर येथे सत्यम रिसॉर्टचा शुभारंभ 

लातूर : प्रतिनिधी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर लातूर तालुक्यातील मौजे. महमदापूर पाटी येथे दि. १९ मार्च रोजी सत्यम रिसॉर्टचा शुभारंभ राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य साखर संघाचे संचालक आबासाहेब पाटील, जागृती शुगर्सचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, विकासरत्न […] The post महमदापूर श्रीरामनगर येथे सत्यम रिसॉर्टचा शुभारंभ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 9:04 pm

इराणने भारतासह पाच देशांना इंधन वाहतुकीस परवानगी दिली:भारतात पुरेसा इंधन साठा; परिस्थिती लवकरच सुरळीत होईल - अली दारूवाला

देशात इंधन टंचाईच्या चर्चेदरम्यान, ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. भारतात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, पुढील 10 ते 12 दिवसांत परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. इराणने भारतासह जगातील पाच देशांना इंधन वाहतुकीसाठी अधिकृतपणे परवानगी दिली आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता ही परवानगी देण्यात आली, ज्यामुळे इंधन पुरवठा साखळी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, काही पेट्रोल पंप बंद असल्याच्या घटना समोर येत असल्या तरी, त्यामागे इंधन तुटवडा कारणीभूत नसल्याचे दारूवाला यांनी सांगितले. सध्या पेट्रोल पंप चालकांकडून इंधनासाठी आगाऊ पेमेंटची मागणी केली जात आहे. जे चालक आगाऊ पैसे भरू शकत नाहीत, त्यांचे पंप तात्पुरते बंद ठेवले जात आहेत. सरकारला प्रति लिटर सुमारे 50 रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याने ही अॅडव्हान्स पेमेंटची अट लागू करण्यात आली आहे. मात्र, यामुळे देशात इंधन साठा कमी असल्याचा गैरसमज पसरवू नये, असे आवाहनही दारूवाला यांनी केले. एकूणच, इंधन पुरवठा व्यवस्थित असून लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे जिल्ह्यात युरिया खतांचा पुरेसा साठा उपलब्ध पुणे जिल्ह्यात युरिया खतांच्या तुटवड्याबाबत काही वृत्तसंस्थांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सध्या जिल्ह्यात युरिया खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. हंगाम 2025-26 साठी जिल्ह्याला एकूण 74,000 मेट्रिक टन युरिया खतांचे मंजूर वाटप करण्यात आले होते. त्यापैकी आजअखेर 70,249 मेट्रिक टन (95 टक्के) पुरवठा झाला असून, मागील हंगामातील 13,347 मेट्रिक टन शिल्लक साठाही उपलब्ध आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामासाठी युरिया खतांची कोणतीही कमतरता भासणार नाही, असे प्रशासनाने सांगितले आहे. तालुकानिहाय साठा व पुरवठ्याचा तपशील पाहता, आंबेगाव, बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, पुरंदर, शिरूर व वेल्हा या सर्व तालुक्यांमध्ये समाधानकारक प्रमाणात खत उपलब्ध आहे. काही तालुक्यांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक पुरवठा पूर्ण झाला आहे.शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आवश्यकतेनुसारच खत खरेदी करावे व अधिक साठा करून ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. तसेच, खतांच्या वितरणावर प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवण्यात येत असून, कोणत्याही प्रकारचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ दिला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 8:37 pm

राजकारणात वैयक्तिक टीका टाळा:युद्धालाही नियम असतात, कुटुंबीयांवर हल्ले करू नका- सुषमा अंधारे

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर निशाणा साधत राजकारणात वैयक्तिक टीका टाळण्याचा सल्ला दिला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, युद्धालाही काही नियम असतात आणि त्यात कुटुंबीयांवर हल्ले केले जात नाहीत. अंधारे यांनी स्पष्ट केले की, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेकदा टीका केली असली तरी त्यांच्या कुटुंबीयांविरोधात कधीही अपशब्द वापरले नाहीत. राजकारणात विविध नेत्यांमध्ये राजकीय मतभेद असले तरी एकमेकांच्या कुटुंबीयांवर हल्ले न करण्याचे संकेत आहे त्यामुळे सर्वच राजकीय नेत्यांनी हे नियम पाळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नीलम गोऱ्हे आणि इतर काही नेत्यांवर आरोप केला. हे नेते स्वतःला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यातील पक्ष संघटनाबांधणीबाबत गोऱ्हे यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोलाही त्यांनी लगावला. काही नेत्यांनी आपल्याला ट्रोल केले जाईल असे म्हटले होते, मात्र प्रत्यक्षात लोकांनी त्यांना गांभीर्याने घेतले नाही, अशी टीका अंधारे यांनी केली. काही नेत्यांचे उपद्रव मूल्य शून्य झाले असल्याचा घणाघातही त्यांनी केला. यावेळी त्यांनी पाणी प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांचे समर्थन केले. जलसंपदा मंत्री असताना त्यांनी नियमांनुसार पाणी दिले होते, त्याचा गैरवापर इतरांनी केला असल्यास त्यांना जबाबदार धरता येणार नाही, असे अंधारे म्हणाल्या. तसेच, शस्त्र परवान्याच्या मुद्द्यावर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कुटुंबीयांवर टीका करायची असल्यास राजकारणाची पातळी खालावू नये, असा इशारा देत अंधारे यांनी विरोधकांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 8:34 pm

भोंदूगिरीचा आणखी एक चेहरा:'अध्यात्म' शिकवण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार; 'मी शंकर तू पार्वती' म्हणायचा हा बाबा

राज्यात अशोक खरात प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू असतानाच, आता वसईतील एका स्वयंघोषित भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःला शंकर म्हणवून घेत मी शंकर तू माझी पार्वती आहेस असे सांगत एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या ऋषिकेश वैद्य याच्याविरुद्ध वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील 35 वर्षीय पीडित महिलेची 2023 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून वसईतील 'आमची वसई' संस्थेचा प्रमुख आणि स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्याशी ओळख झाली होती. वैद्य याने महिलेच्या धार्मिक वृत्तीचा गैरफायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने जवळीक साधली आणि डिसेंबर 2023 मध्ये पुण्यात तिची भेट घेतली. यावेळी आपण 'महादेवाचा अवतार' असून 'तू माझी पार्वती आहेस' असे भासवून त्याने महिलेला भुलवले आणि पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेऊन तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, या दरम्यान त्याने पीडितेचे अश्लील छायाचित्रेही काढली होती, ज्याचा वापर करून त्याने तिचे शोषण केल्याचे समोर आले आहे. आरोपी ऋषिकेश वैद्य याने काढलेल्या अश्लील छायाचित्रांच्या आधारे पीडित महिलेला ब्लॅकमेल करून पुन्हा भेटीसाठी दबाव टाकला. मे 2025 मध्ये वसईतील 'हॉटेल एक्सप्रेस इन' येथे तिला बोलावून पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाशिकच्या अशोक खरात प्रकरणाची बातमी समोर आल्यानंतर पीडितेने हिंमत एकवटून घडलेला प्रकार पतीला सांगितला. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडल्याने तांत्रिक कारणास्तव हे प्रकरण पुढील तपासासाठी पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. माणिकपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पीडित महिलेने असाही खळबळजनक दावा केला आहे की, ऋषिकेश वैद्य याने स्वतःला धर्मगुरू भासवून अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढले असून त्यांचे लैंगिक शोषण केले आहे. 'आमची वसई' या संस्थेचा बुरखा पांघरून अध्यात्माच्या नावाखाली चालणाऱ्या या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, पोलिस आता इतर संभाव्य पीडितांचा शोध घेत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 8:32 pm

'टीबी मुक्त भारत अभियान' फेज 2 चे उद्घाटन:जागतिक क्षयरोग दिनानिमित्त अमरावतीत सीईओ संजिता महापात्र यांच्या हस्ते

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयातर्फे 'टीबी मुक्त भारत अभियान' फेज २ चे उद्घाटन २६ मार्च रोजी करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजिता महापात्र यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला. भारत सरकारच्या 'टीबी मुक्त भारत' या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टपूर्तीसाठी या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. क्षयरोगाचे लवकर निदान, सर्व रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार, औषधोपचार पूर्ण करण्यावर भर देणे, क्षय रुग्णांचे विशेष व्यवस्थापन आणि संपर्कातील व्यक्तींची तपासणी करणे ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. यासोबतच, टीबी प्रतिबंधात्मक उपचार वाढविणे, घराघरात जाऊन टीबी स्क्रीनिंग व सर्वेक्षण करणे आणि जलद तपासणी करणे यावरही भर दिला जाईल. कुपोषित रुग्णांसाठी पोषण सहाय्य, 'निक्षय मित्र' उपक्रमाद्वारे सामाजिक सहभाग वाढवणे, एचआयव्ही, मधुमेह आणि कुपोषण यांसारख्या उच्च जोखमीच्या गटांवर विशेष लक्ष केंद्रित करणे हे या अभियानाचे प्रमुख उपक्रम असतील. खाजगी वैद्यकीय क्षेत्राचा सक्रिय सहभाग देखील अपेक्षित आहे. यावेळी बोलताना सीईओ संजिता महापात्र यांनी सांगितले की, टीबी निर्मूलनासाठी केवळ आरोग्य विभागच नव्हे, तर संपूर्ण समाजाने एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. 'टीबी हरेल देश जिंकेल' या घोषवाक्याखाली सर्वांनी एकत्र येऊन टीबीमुक्त भारत घडविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्षल क्षीरसागर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. ज्योत्स्ना पोटपिटे, जिल्हा क्षय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पवार आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. रुपाली कोरडे व डॉ. संदीप सुखसोहळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विशाल धांडे यांनी केले, तर पुरुषोत्तम खडसे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गो. ग. राठी शासकीय क्षयरोग रुग्णालय आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 8:05 pm

शहीदांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी बुध्दीप्रामाण्यवादी व्हा:प्रा. मधुकर जाधव यांचे अमरावती विद्यापीठात शहीद दिनानिमित्त प्रतिपादन

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात शहीद दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात प्रा. मधुकर जाधव यांनी 'शहीदांच्या स्वप्नातील भारत' या विषयावर मार्गदर्शन केले. देशहिताचे कार्य, राष्ट्रीय एकात्मता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून बुध्दीप्रामाण्यवादी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. हे व्याख्यान विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे होते. अधिसभा सदस्य नितीन टाले व कैलास चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. निलेश कडू आणि विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात प्रा. जाधव यांनी लाला लजपतराय यांच्या विचारांचा भगतसिंगांवर कसा प्रभाव होता, हे सांगितले. लाला लजपतराय यांच्या निधनानंतर भगतसिंग व्यथित झाले आणि त्यांनी त्याचा बदला घेतला. असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यामागे भारतीयांचे विचार ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हेतू होता, जीवितहानी करण्याचा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भगतसिंगांनी अटक करवून घेतल्यानंतर कारागृहात भारतीयांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीविरोधात उपोषण केले होते. ब्रिटिश काळात भारतीयांना प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावे लागत होते, तसेच बाबू गेणू यांनीही भारतातील कच्चा माल ब्रिटिशांना नेण्यास विरोध केला होता. या उदाहरणांवरून स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचे महत्त्व प्रा. जाधव यांनी अधोरेखित केले. आजच्या युवकांनी आपले ज्ञान आणि कौशल्य समाजहित व देशहितासाठी वापरावे, शहीदांचे चरित्र वाचावे आणि त्यांचे विचार आत्मसात करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 7:56 pm

महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिल मतपत्रिका मुंबईला रवाना:आठवडाभरात मतमोजणी सुरू होणार, अमरावतीतून 1202 मतदान

महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीच्या मतपत्रिका मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील 1202 वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्व जिल्ह्यांच्या मतपेट्या मुंबईत एकत्र आल्यानंतर येत्या आठवडाभरात मतमोजणीला सुरुवात होईल, अशी माहिती आहे. 25 सदस्यीय महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलसाठी 24 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान घेण्यात आले. अमरावतीतील एकूण अडीच हजार वकील मतदारांपैकी 1202 मतदारांनी या प्रक्रियेत भाग घेतला. या निवडणुकीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलमध्ये पाच महिलांना प्रतिनिधित्व देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापैकी तीन सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे, तर दोन सदस्य नामनिर्देशित पद्धतीने निवडले जातील. यावर्षी स्थानिक पातळीवरून अमरावतीतून कोणीही निवडणूक लढवले नाही, हे विशेष होते. एरवी किमान एक किंवा त्याहून अधिक उमेदवार या निवडणुकीत असायचे. असे असूनही, मतदानाच्या दिवशी वकिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला आणि मतदानासाठी त्यांना अर्धा ते एक तास रांगेत उभे राहावे लागले. महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलमध्ये दादरा-नगरहवेली आणि दिव-दमण हे दोन केंद्रशासित प्रदेशही समाविष्ट आहेत. त्यामुळे कौन्सिलच्या एकूण सदस्यांची संख्या सुमारे 2 लाख 15 हजार एवढी आहे. मतदान केलेल्या सर्व वकिलांच्या मतपत्रिका त्यांनी नोंदवलेल्या पसंतीक्रमानुसार मोजणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळेच निकालाला एक ते दीड महिना एवढा कालावधी लागतो. मतमोजणी सुरू झाल्यानंतर, अंतिम निकाल येण्यास वेळ लागेल.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 7:38 pm

अमरावतीच्या एटीएममध्ये 500 च्या नोटांचा तुटवडा:रामनवमीच्या सुटीमुळे नागरिकांना गैरसोय

अमरावती शहरातील काही एटीएममध्ये गुरुवारी ५०० रुपयांच्या नोटांचा तुटवडा जाणवला. साईनगर, शिलांगण रोड आणि एमआयडीसी परिसरातील एटीएममध्ये ही समस्या प्रामुख्याने दिसून आली, ज्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. हजार रुपयांहून अधिक रक्कम काढताना ग्राहकांना ५०० रुपयांच्या नोटा कमी प्रमाणात मिळाल्या, तर शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटा अधिक प्राप्त झाल्या. अनेक नागरिकांना मोठी रक्कम काढण्यासाठी दोन ते तीन वेळा व्यवहार करावे लागले. रामनवमीची सुटी असल्याने गुरुवारी सर्व बँका बंद होत्या. यामुळे बहुसंख्य नागरिकांना पैशांच्या व्यवहारांसाठी एटीएमवर अवलंबून राहावे लागले. वाढलेल्या मागणीमुळे एटीएममधील नोटांचा साठा लवकर संपल्याचे दिसून आले. या संदर्भात बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी ही बाब नेहमीची नसल्याचे सांगितले. एकाध-दुसऱ्या एटीएममध्ये ५०० च्या नोटा कमी उपलब्ध असल्याने असे घडले असावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नोटांचा पुरवठा नियमितपणे होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिखर बँक, अमरावतीचे व्यवस्थापक पंकजकुमार यांनी सांगितले की, आरबीआयमार्फत सर्व बँकांना नोटांचा पुरवठा नियमितपणे केला जातो. जुन्या नोटा मशीनमध्ये टाकल्यास त्या अडकून मशीन बंद पडू शकते. त्यामुळे असे प्रकार टाळण्यासाठी काही एटीएममध्ये ५०० च्या नोटा कमी टाकल्या गेल्या असाव्यात, ज्यामुळे शंभर-दोनशेच्या नोटा अधिक मिळण्याची शक्यता असते.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 7:36 pm

नागपुरात इंधन तुटवडा तीव्र; कंपन्यांच्या धोरणामुळे समस्या:जिल्हाधिकाऱ्यांनी रेशनिंगची गरज नाकारली; 'डे एण्ड क्रेडिट'ची मागणी

नागपुरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा तीव्र झाला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आगाऊ रक्कम भरल्याशिवाय इंधन न देण्याच्या धोरणामुळे आणि दुपारी ३ नंतर ऑर्डर न स्वीकारल्याने ही समस्या वाढली आहे. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी 'डे एण्ड क्रेडिट' दिल्यास ही कोंडी सुटू शकते असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, नागपुरात रेशनिंगची गरज नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. एक-दोन दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील काही पेट्रोलपंप चालकांनी स्वतःहून दुचाकींसाठी २०० रुपये आणि कारसाठी २ हजार रुपयांपर्यंतचे रेशनिंग सुरू केले आहे. पेट्रोलपंपचालकांच्या संघटनेनुसार, बँक व्यवहारातील विलंब हे या तुटवड्याचे प्रमुख कारण आहे. पंपावरील रात्री आणि सकाळच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम सकाळी बँकेत भरल्यानंतर ती खात्यात दिसण्यासाठी आणि आरटीजीएसद्वारे कंपन्यांकडे वळती करण्यासाठी तीन ते चार तास लागतात. यामुळे अनेकदा दुपारी ३ वाजेपर्यंत इंधनाची ऑर्डर नोंदवणे शक्य होत नाही. पूर्वी रात्री ११ वाजेपर्यंत ऑर्डर स्वीकारल्या जात होत्या, मात्र आता दुपारी ३ पर्यंतची मर्यादा ठेवल्याने अडचण वाढली आहे. आखाती देशांतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान असताना, कंपन्यांच्या या अचानक बदललेल्या नियमांनी पंपचालकांना मोठी रक्कम उभी करावी लागत आहे. स्थानिक प्रशासनाने बँक व्यवहाराची प्रक्रिया गतिमान करून ती एक तासावर आणल्यास पंपचालकांना वेळेत आगाऊ रक्कम भरून ऑर्डर देता येईल आणि इंधनपुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल, असे पंपचालकांचे म्हणणे आहे. अमित गुप्ता यांनी सांगितले की, पेट्रोलपंप चालक अनेक वर्षांपासून कंपन्यांकडून नियमित इंधन खरेदी करत आहेत. तरीही अचानक नियम बदलून आगाऊ रकमेची अट आणि आता दुपारी ३ नंतर ऑर्डर न घेण्याचा निर्णय घेतल्याने ग्राहकांना नियमित पुरवठा करताना मोठी अडचण येत आहे. बँक प्रक्रियेमुळे दुपार होते आणि ३ वाजताची वेळ ओलांडल्यास इंधन मिळत नाही, ज्यामुळे पंपचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 7:33 pm

बांगलादेशींच्या नावाखाली अधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करू नका:प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांवर अन्याय होतोय- संजय निरुपम

अधिकृत व अनधिकृत असे फेरीवाले कोण? याबाबत सोमवार दि. 23 मार्च, 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश पाहून बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी फेरीवाले यांच्याबाबत योग्य तो तोडगा काढत फेरीवाल्यांना न्याय द्यावा. अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेत आमची सत्ता आल्यापासून बांगलादेशी फेरीवाले या नावाखाली कारवाई केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात, या नावाखाली कायदेशीर फेरीवाल्यांवरही कारवाई होत आहे. मी मुंबई पोलिस यांना आव्हान देतो की, त्यांनी गेल्या 2 महिन्यांत किती अवैध बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे, याचे ठोस आकडे जाहीर करावेत. तसेच संबंधित कारवाईची पारदर्शकता राखण्यासाठी त्या व्यक्तींची माहिती आणि पुरावे सार्वजनिक करावेत. जर पोलिसांना खरोखरच बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांचा शोध घ्यायचा असेल, तर केवळ फेरीवाल्यांवर लक्ष केंद्रित करून चालणार नाही. लेदर, कापड कारखान्यात काम करणारे मजूर, जरी (भरतकाम) उद्योग तसेच बिल्डींग कंट्रक्शन मधील कार्यरत कामगार यांचीही सखोल तपासणी करण्यात यावी. फक्त फेरीवाल्यांना लक्ष्य करणे हे अन्यायकारक असून, त्यामुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या हजारो कुटुंबांवर अन्याय होत आहे, असे संजय निरुपम म्हणाले. स्ट्रीट व्हेंडर कायदा अजूनपर्यंत लागू का करण्यात आला नाही? मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिका ने हा कायदा तातडीने लागू करावा. टाउन वेंडिंग कमिटीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. टाउन वेंडिंग कमिटीच्या मध्ये सुमारे 20 सदस्य असतील, त्यापैकी सुमारे 6 सदस्य फेरीवाल्यांचे प्रतिनिधित्व करतील, तर काही सदस्य सरकारकडून असतील. 2014 च्या कायद्यानुसार टाउन वेंडिंग कमिटीची स्थापन करण्याची जवाबदारी पूर्णपणे बृहन्मुंबई महानगरपालिका कडे आहे. मात्र 12 वर्षांनंतरही ही कमिटी अद्याप स्थापन झालेली नाही. टाउन वेंडिंग कमिटीची स्थापन करण्यासाठी न्यायालयाचा स्पष्ट आदेश असूनही, मनपा याकडे अद्याप दुर्लक्ष करत आहे. महानगरपालिका आणि स्थानिक पोलीस यांना मुंबईत फेरीवाल्यांचा प्रश्न जसा आहे तसाच सुरू राहावा असे वाटते. परंतु प्रत्यक्षात, फक्त फेरीवाल्यांवर लक्ष केंद्रित करून कायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवरही अनावश्यक कारवाई होत आहे, असे संजय निरुपम म्हणाले. बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 1 लाखांहून अधिक फेरीवाले अधिकृतपणे नोंदणीकृत आहेत. हे सर्व फेरीवाले कायदेशीररित्या आपला व्यवसाय करत असून, अवैध या नावाखाली त्यांच्यावर होणारी कारवाई तात्काळ थांबविण्यात यावी. एकीकडे केंद्र शासनाच्या विविध योजनांद्वारे फेरीवाल्यांना आर्थिक मदत व कर्ज दिले जाते, तर दुसरीकडे स्थानिक प्रशासन व पोलिस यंत्रणांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते- ही दुहेरी भूमिका अत्यंत चिंताजनक आहे. याकरिता मी फेरीवाल्यांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पत्र लिहून या विषयाबाबतची सविस्तर माहिती देणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने कारवाई करण्याची गरज अधोरेखित झाली आहे, असे संजय निरुपम म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 7:05 pm

भावाशी खासगीत संपर्क साधल्याने सीजेआय नाराज

नवी दिल्ली : मेडिकल प्रवेशासंदर्भातील एका केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आज कडक भूमिका घेतली. याचिकाकर्त्याच्या वडिलांकडून मुख्य न्यायाधीशांच्या कुटुंबियांशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाल्याने कोर्टाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी हा न्याय प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रकार आहे. हा प्रकार कोर्टाचा अवमान का समजला जाऊ नये याबाबत विचार करण्यात येईल असे देखील ते म्हणाले. […] The post भावाशी खासगीत संपर्क साधल्याने सीजेआय नाराज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 6:45 pm

पहिल्या पूरक यादीत १३ लाख नावे वगळली

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजनच्या पहिल्या सप्लिमेंटरी यादीतून १३ लाख नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. यासह, राज्यात एकूण वगळलेल्या मतदारांची संख्या सुमारे ७६ लाख झाली आहे. निवडणूक आयोगाच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, ‘अंडर अ‍ॅडज्युडिकेशन’मध्ये ठेवलेल्या सुमारे ६० लाख मतदारांपैकी ३२ लाख नावांची तपासणी झाली आहे. यापैकी सुमारे ४०% मतदार यादीतून वगळण्यात आले […] The post पहिल्या पूरक यादीत १३ लाख नावे वगळली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 6:32 pm

महिलेची तक्रार असल्यास नरहरी झिरवाळांना सोडायचे नाही:रोहित पवारांचा थेट इशारा; सुनील तटकरेंवर पुन्हा साधला निशाणा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सुरू असतानाच आता मंत्री नरहरी झिरवाळ यांचाही एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सावध भूमिका मांडली असून, व्हिडिओतील सर्व व्यक्ती सज्ञान असल्याने आणि कोणाची तक्रार नसल्यास यावर राजकीय भाष्य करणे उचित ठरणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र, संबंधित महिलेची काही तक्रार असल्यास नरहरी झिरवाळ यांना सोडायचे नाही, असा स्पष्ट इशाराही पवार यांनी यावेळी दिला आहे. आमदार रोहित पवार म्हणाले, झिरवाळ यांच्या बंगल्यावरील व्हिडिओमध्ये जे काही लोक दिसत आहेत, त्यांचे वय नक्कीच 18-19 च्या पुढे आहे. त्याच्यामध्ये त्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे की नाही ते पाहावे लागेल. पोलिसांकडे जर तक्रार दिली असेल तर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे. वयाने जास्त असणाऱ्या लोकांमध्ये जे काही व्यक्तिगत संबंध आहेत, व्हिडिओच्या माध्यमातून ते लोकांसमोर आले असले तरी महिलेची तक्रार नसेल तर यावर राजकीय बोलणे अवघड जात आहे. मात्र, महिलेने जर कंप्लेंट केली असेल तर झिरवळ साहेबांना सोडायचे नाही, असा इशाराच पवारांनी दिला आहे. सुनील तटकरेंवर टीका पुढे बोलताना रोहित पवारांनी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, तटकरे म्हणाले मी महाविकास आघाडीच्या बैठकीला नव्हतो. अहो तुमचा नेता आणि माझा काकाच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी 1200 किमी दूर कर्नाटकात होतो. तसेच पुढे बोलताना पवार म्हणाले, जयंत पाटील आणि माझ्यात जो विषय आहे तो आमच्या पक्षाचा विषय आहे. इथे मी लढत आहे माझ्या काकासाठी कारण मला ते चिरंजीव म्हणायचे. तुम्ही त्यांना किती त्रास दिला हे जगजाहीर आहे. तुमच्या पार्लरची, हेलिकॉप्टरची बिले, हॉटेलची बिले पक्षाच्या खर्चात जोडत होतात. आता त्यांच्या पक्षाच्या खात्याची माहिती घेतली तर लक्षात येईल पुरेसे पैसे खात्यात नाहीत, असे म्हणत पवारांनी तटकरेंवर टीका केली आहे. मला मुख्यमंत्र्यांवर विश्वास रोहित पवार म्हणाले, मुख्यमंत्री यांनी सभागृहात भाषण केले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे की, जर काही असेल तर आरोपीला खोदून काढू. मला मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. तसेच मुख्यमंत्री म्हणाले टेक्निकली कर्नाटकात गुन्हा दाखल होऊन उपयोग नाही, त्यासाठी व्हिक्टिम असायला हवा. आता व्हिक्टिम स्वतः अजित पवार आणि ते कसे काय गुन्हा दाखल करणार, कुटुंब म्हणून मी गुन्हा दाखल केला आहे, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 6:31 pm

लाल महालात 'कथा शिवरायांची' सादरीकरण, शिवभक्तांची दाद:हिंदू महिला सभेच्या सदस्यांनी शिवतेजदिन सोहळ्यात प्रभावीपणे सादर केले

पुणे येथे समस्त हिंदू आघाडीतर्फे ऐतिहासिक लाल महालात शिवतेजदिन सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यात 'कथा शिवरायांची' या नाट्यरूप कथाकथनाचे प्रभावी सादरीकरण झाले, ज्याला शिवभक्तांनी उत्स्फूर्त दाद दिली. कसबा पेठ येथील लाल महाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात शाहिस्तेखानाला धडा शिकवला, तो ऐतिहासिक दिवस 'शिवतेजदिन' म्हणून साजरा होतो. याच औचित्याने हिंदू महिला सभेच्या वतीने 'कथा शिवरायांची' हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा प्रवास नाट्यरूप कथाकथनातून मांडण्यात आला. हिंदू महिला सभेच्या सहा सदस्यांनी पारंपरिक वेशभूषा करून हे सादरीकरण केले. त्यांनी वाद्यवृंदाच्या साथीने गवळण, भारूड, जोगवा, पाळणा, पोवाडा आणि निवेदनाद्वारे शिवरायांचे कार्य प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. या कार्यक्रमाची संहिता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरली होती, जी वसुधाताई मेहेंदळे यांनी संकलित आणि दिग्दर्शित केली. प्राची सप्रे, सुनीता अभ्यंकर, प्राची गोडबोले, वंदना जोगळेकर, स्मिता नातू आणि सुधा राजगुरू यांनी हे कथानक प्रेक्षकांसमोर मांडले. सादरीकरणात शिवरायांच्या जन्मापासूनच्या घटनांचा समावेश होता. किल्ले शिवनेरीवर शहाजीराजे आणि जिजाऊ मासाहेबांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. त्यांनी बारा मावळ एकत्र करून रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली आणि तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवरायांच्या वाढत्या कर्तृत्वाची बातमी विजापूर दरबारात पोहोचल्यावर अफझलखान स्वराज्यावर चालून आला. शिवरायांनी सईबाईंच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून अफझलखानाचा खात्मा केला. यानंतर सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला. बाजीप्रभूंच्या पराक्रमाने पावनखिंड गाजली. सुरतेची लूट, शहाजीराजांचा मृत्यू, मिर्झाराजे आणि दिलेरखानाची स्वारी, शिवरायांची आग्रा भेट आणि कैदेतून सुटका, बहलोलखानावरील स्वारी, प्रतापरावांचे बलिदान, पन्हाळ्याची अविश्वसनीय मोहीम आणि शिवराज्याभिषेकापर्यंतचा संपूर्ण कालपट या सादरीकरणात समाविष्ट होता. या कार्यक्रमाला पल्लवी पिळणकर यांनी हार्मोनिअमवर आणि धनंजय चिंचणीकर यांनी तबल्यावर साथसंगत केली.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 5:46 pm

अमेरिकेसह २० देशांत अचानक कोरोना परतला

वॉशिंग्टन/नवी दिल्ली : अमेरिकेसह जगभरात २० हून अधिक देशात पुन्हा कोरोनाच्या केस वाढत आहेत. अमेरिकेत कोविडच्या व्हेरिएंट सार्स-कोव्ह-२ बीए.३.२ ची प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या वेरिएंटच्या केस सातत्याने वाढत आहेत. अमेरिकेच्या सीडीसींचे म्हणणे आहे की हा व्हेरिएंट पाय पसरत आहे. हळूहळू केस वाढत आहेत. अशात प्रश्न निर्माण होत आहे की अन्य देशात […] The post अमेरिकेसह २० देशांत अचानक कोरोना परतला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 5:46 pm

'जुगाड' ही भारतीय संशोधनाची महत्त्वपूर्ण ओळख:केम्ब्रिज विद्यापीठाचे प्रा. जयदीप प्रभू यांचे मत; 'लीन स्पार्क' पुस्तकाचे प्रकाशन

केम्ब्रिज विद्यापीठातील नेहरू प्रोफेसर ऑफ इंडियन बिझनेस अ‍ॅट जज बिझनेस स्कूलचे प्राध्यापक आणि लेखक जयदीप प्रभू यांनी 'जुगाड'ला भारतीय संशोधनाची एक महत्त्वपूर्ण विशेषता म्हटले आहे. मर्यादित संसाधने वापरून गुंतागुंतीच्या समस्यांचे निराकरण करणे, ही भारतीय संशोधनाची खासियत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रा. प्रभू हे फ्यूल बिझनेस स्कूलने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्या 'लीन स्पार्क' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. काटकसरीचे नवोन्मेष, तात्पुरते उपाय, लवचिकता आणि वेग यातून अपारंपरिक शोध म्हणजे 'जुगाड' असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला फ्यूल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे तसेच प्रा. मयुरी देशपांडे उपस्थित होत्या. प्रा. जयदीप प्रभू यांनी 'लीन स्पार्क'ची चार प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली. यामध्ये लीन अंमलबजावणी, संरचित प्रयोग आणि निरंतर शिक्षण, उद्देशपूर्ण साधेपण (आवश्यक वैशिष्ट्ये व अनावश्यक गुंतागुंत दूर करणे) आणि अनुकूलनक्षम विस्तारक्षमता (विविध वातावरणांमध्ये विकसित होण्यासाठी डिझाइन करणे) यांचा समावेश आहे. मोठ्या संस्थांसाठी कार्य करताना भरपूर शिकणे, चपळ व्हायला शिकणे, वगळलेले गट समाविष्ट करणे, कर्मचाऱ्यांना प्रयोग करण्यासाठी वेळ आणि संधी देणे महत्त्वाचे आहे. चपळ उद्योजकांसह व्यस्त राहून आणि उदयोन्मुख बाजारपेठांशी संलग्न होऊन 'जुगाड' करायला शिकण्याची मानसिकता ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. लहान संस्थांनी मोठ्या संस्थांसोबत भागीदारी करायला शिकावे, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी डॉ. केतन देशपांडे यांनी सांगितले की, फ्यूल संस्था राष्ट्रनिर्माणासाठी कार्य करत आहे. युवकांना कौशल्यपूर्ण शिक्षण दिल्यास आत्मनिर्भर भारत बनण्यास वेळ लागणार नाही. आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येणाऱ्या भारतात आता संशोधनाला अधिक प्राधान्य देणे गरजेचे असून, सध्या देशाला कौशल्य-आधारित युवकांची गरज आहे. या प्रसंगी प्रा. जयदीप प्रभू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नेतृत्व गुण, कष्ट, संशोधन आणि कमी खर्चात सामाजिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 5:44 pm

रेशनकार्डधारकांना मिळणार ३ लिटर केरोसीन;सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी आखाती देशांमध्ये सुरू असणा-या युद्धाचा जगावर परिणाम होत आहे. यामुळे इंधनाचा आणि एलपीजी गॅसचा काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सध्या एलपीजी गॅसच्या किमती वाढल्या आहेत, तसेच एलपीजी गॅस बुकिंगचा कालावधी वाढला आहे त्यामुळे नागरिकांना खूप वाट पाहावी लागते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठे […] The post रेशनकार्डधारकांना मिळणार ३ लिटर केरोसीन;सरकारचा मोठा निर्णय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 5:40 pm

पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा:सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार, गिरीश महाजनांचा इशारा

सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल तुटवड्यासंदर्भात जे अफवा पसरवीत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, असा इशारा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर गॅस एजन्सीच्या बाहेर लोकांनी रांगा लावल्याचे पाहायला मिळाले होते. आता पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र तुटवडा नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात येत आहे. गिरीश महाजन म्हणाले, इंधन पुरवठ्यासंदर्भात जगभरात अशीच परिस्थिती आहे, पण आपण संयम बाळगावा. करमर्शियल गॅस बाबतीत शॉर्टेज आहे, घरगुती बाबतीत नाही. भारतात रॉकेल आले असून त्याचा वापर करून आपली गरज भागवू शकतो. तसेच सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल तुटवड्यासंदर्भात जे अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशाराही महाजन यांनी दिला आहे. पेट्रोल टंचाईच्या संदर्भात बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मागील महिन्यापेक्षा दीड पट मागणी गेल्या चार महिन्यात वाढली आहे. कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे, पेट्रोल पंप चालकांकडे संपूर्ण पेट्रोल-डिझेलचा साठा आहे. मात्र, मागणी अधिक वाढल्याने तुटवडा जाणवत आहे. अतिरिक्त साठा करण्याची गरज नाही, सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. त्यामुळे रांगा लागत आहेत. सिलिंडरसाठी देखील रांगा लावण्याची गरज नाही. नागरिकांना घरपोच सिलिंडर मिळत आहेत, कुठेही गर्दी करू नका, त्यामुळे सेवा विस्कळीत होत आहे, कुठेही तुटवडा नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना गिरीश महाजन यांना अशोक खरात प्रकरणी देखील प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, अशोक खरात प्रकरण अतिशय गंभीर असून ही विकृती आहे. आपल्या समाजात काही लोक या गोष्टी मानणारे आहेत, ते विश्वास ठेवतात. मला दोन महिन्यांपूर्वी याबाबत कल्पना होती, पोलिसांना तशी सूचना दिली होती. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार गंभीर दखल घेतली जाईल. पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, अशोक खरात कायमस्वरूपी कसा जेलमध्ये राहील हे पाहिले जाईल. खरातची हजारो कोटींची प्रॉपर्टी आहे, त्याच्या प्रॉपर्टीज कशा जोडल्या जातील याबाबत देखील कारवाई होईल, अशी माहिती महाजन यांनी दिली आहे. संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर तोबा गर्दी:वाहनांच्या प्रचंड रांगा, टू व्हिलरला फक्त 200 चे पेट्रोल मिळणार, वाचा ग्राउंड रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लॉकडाऊन लागू होणार असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरताच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. 'उद्या पेट्रोल मिळणार नाही' या भीतीने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी रांगा लावल्यात. शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर दोन दिवसांपासून लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. या अचानक वाढलेल्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले, “इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, पण लोक अफवांवर विश्वास ठेवून एकाच वेळी गर्दी करत आहेत. त्यामुळे व्यवस्थापन करणे कठीण जात आहे.” वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 5:35 pm

दीक्षा त्रिपाठी बनल्या ‘अमर’ कोर्स पूर्ण करणा-या देशातील पहिल्या महिला

पुणे : भारतीय सैन्याच्या लेफ्टनंट दीक्षा त्रिपाठी यांनी एक अभूतपूर्व यश संपादन केले आहे. त्यांनी ‘आर्मी मार्शल आर्ट्स रुटीन’ म्हणजेच ‘एएमएआर’ अमर कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला असून अशी कामगिरी करणा-या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. हा कोर्स पुणे येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग(एआयपीटी) मध्ये असतो. भारतीय लष्करातील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक कोर्सेसमध्ये याची […] The post दीक्षा त्रिपाठी बनल्या ‘अमर’ कोर्स पूर्ण करणा-या देशातील पहिल्या महिला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 5:30 pm

अंधारे-म्हात्रेंमध्ये ट्विटर वॉर

मुंबई : प्रतिनिधी अशोक खरात प्रकरण आता केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित राहिलेले नाही. यात अनेक राजकीय नेत्यांची नावे आणि कनेक्शन्स समोर येत आहेत. अशोक खरात प्रकरणाने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचे पडसाद दोन्ही शिवसेनेवर पडत असल्याचे दिसत आहेत. शीतल म्हात्रे यांनी या प्रकरणात थेट ‘मातोश्री’ला खेचल्याने या वादाला आता नवीन वळण […] The post अंधारे-म्हात्रेंमध्ये ट्विटर वॉर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 5:28 pm

शेतरस्त्यावर अडथळा, सरकारचा कडक इशारा:अतिक्रमण करणाऱ्यांवर मोठी कारवाई; फार्मर आयडी ब्लॉक करण्याचा निर्णय

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेत सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या सुधारित निर्णयानुसार, शेतरस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचे नुकसान करणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकरणांत संबंधित शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आणि आधार कार्ड पाच वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार असून, त्या कालावधीत त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. महसूल व वन विभागाने यासंदर्भात शुद्धीपत्रक जारी केले असून, याआधी 14 डिसेंबर 2025, 7 जानेवारी 2026 आणि 18 फेब्रुवारी 2026 रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे पाणंद रस्त्यांवर अडथळा निर्माण करणाऱ्यांवर प्रशासन अधिक कठोरपणे कारवाई करणार आहे. नव्या नियमांनुसार, शेतरस्त्यांवरील अतिक्रमण सात दिवसांच्या आत काढण्याचे आदेश दिले जातील. आदेशानंतरही अतिक्रमण हटवले नाही, तर प्रशासन स्वतः कारवाई करून ते हटवणार आहे. याशिवाय इतर शेतकऱ्यांच्या ये-जा हक्काच्या रस्त्यावर शेती करणेही पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आणि आधार क्रमांक पाच वर्षांसाठी ब्लॉक केला जाईल, तसेच त्यांना सरकारी योजनांपासून वंचित ठेवण्यात येईल. योजनेच्या अंमलबजावणीत जमीन उपलब्धतेबाबतही स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी कोणतेही भूसंपादन केले जाणार नाही. शेतकरी स्वेच्छेने जमीन देऊ शकतात, मात्र त्यासाठी नोंदणीकृत दानपत्र किंवा हक्कसोड आवश्यक राहील. एकदा जमीन दिल्यानंतर ती परत मागता येणार नाही. या प्रक्रियेसाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्यात आले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कंत्राटदार निवड प्रक्रियेतही सुधारणा तसेच, कामकाज पारदर्शक राहण्यासाठी कंत्राटदार निवड प्रक्रियेतही सुधारणा करण्यात आल्या आहेत. पात्र कंत्राटदारांचे पॅनेल तयार करून त्यांना समान प्रमाणात काम वाटप केले जाईल. कंत्राटदारांकडे आवश्यक यंत्रसामग्री स्वतःच्या मालकीची असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कामाच्या रकमेच्या 2 टक्के किंवा किमान 15 लाख रुपयांची सुरक्षा ठेव अनिवार्य असेल. याशिवाय विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीत पाच शेतकऱ्यांची निवड करण्याचे अधिकार संबंधित आमदारांना देण्यात आले असून, महसूल यंत्रणेला या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 5:22 pm

पुढचे चार दिवस ‘अवकाळी’चे संकट

मुंबई : प्रतिनिधी राज्यात मार्च महिन्याच्या अखेरीस उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला असतानाच आता हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झालेले असताना दुसरीकडे अवकाळी पावसाची चाहूल लागली आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा […] The post पुढचे चार दिवस ‘अवकाळी’चे संकट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 5:19 pm

अमरावतीत रुग्णवाहिकेची कारला धडक; ८ वर्षीय मुलीचा मृत्यू

अमरावती : प्रतिनिधी अमरावतीत भरधाव रुग्णवाहिकेने धामणगाव तालुक्यातील देवगाव चौफुलीवर पोलिस उपनिरीक्षकांच्या कारला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडल्याची घटना घडली. या भीषण अपघातात एका आठ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची थरारक दृश्यं सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दशासर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक राहुल […] The post अमरावतीत रुग्णवाहिकेची कारला धडक; ८ वर्षीय मुलीचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 5:14 pm

झिरवाळांसाठी माजी मंत्र्यांनी लावला सापळा

मुंबई : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा ट्रान्सवूमनसोबतचा आक्षेपार्ह व्हीडीओ समोर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यानी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, झिरवाळ यांना अडकवण्यासाठी माजी मंत्र्याने ट्रॅप लावल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस आमदार, विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, ‘झिरवाळांची जागा रिकामी करून घेण्यासाठी एक मोठे नाव समोर येत आहे. […] The post झिरवाळांसाठी माजी मंत्र्यांनी लावला सापळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 5:12 pm

पश्चिम आशियातील संकटात फ्रान्सने दिले भारताला आमंत्रण

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संकटात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गुरुवारी फ्रान्स दौ-यावर गेले आहेत. त्याठिकाणी जयशंकर हे जी ७ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत होणा-या बैठकीत सहभागी होतील. मध्य पूर्वेत सुरू असलेले अमेरिका, इस्रायलविरुद्ध इराण युद्ध आणि त्यामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील जल वाहतुकीवर झालेला परिणाम या मुद्यांवर या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे. परराष्ट्र मंत्री […] The post पश्चिम आशियातील संकटात फ्रान्सने दिले भारताला आमंत्रण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 5:11 pm

माझ्यावरही अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न केला:चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक दावा, म्हणाले- जादू करणारा माणूसच मेला

महाराष्ट्रात अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आले असून, महिलांसोबतचे अनेक व्हिडिओ आता समोर येताना दिसत आहे. तसेच हा बाबा काळी जादू करायचा, असेही समोर आले असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी खळबळजनक दावा केला आहे. माझ्यावरही अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा खैरे यांनी केला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अशोक खरातच्या संदर्भात काही आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी त्यांच्याच मित्रपक्षातील काही सहकाऱ्यांनी खरातकडून तंत्र-मंत्र तसेच अघोरी पूजा केली असल्याचा दावा सपकाळ यांनी केला होता. यावरच चंद्रकांत खैरे म्हणाले की, माझ्यावर सुद्धा अघोरी पूजा झाली होती. पण मी इतका धार्मिक आहे, देवभक्त आहे की माझ्यावर अघोरी पूजा करणारा माणूसच मरून गेला. मी मेलो नाही, तोच माणूस मेला, असा गौप्यस्फोट खैरे यांनी केला आहे. पुढे बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, राजकीय लोक बाबा लोकांकडे जातात. त्यांनी जाऊ नये. साधुसंतांच्या, देवांच्या दारी जाऊन प्रार्थना करावी. बाकीच्या लोकांच्या दारी कधी जाऊ नये. माझा जादूटोणावर अजिबात विश्वास नाही. मी इतका मजबूत आहे की माझ्या पाठीशी देवाची शक्ती आहे. मी अध्यात्मवादी आहे, धार्मिक वृत्तीचा आहे. म्हणून माझ्यावर जादूचे कोणतेही प्रयोग होत नाहीत. माझ्यावर जादूचा प्रयोग करणारा माणूस स्वतःच मेला. कन्नड तालुक्यातील नाचणवेलचा हा माणूस असल्याचीही माहिती खैरे यांनी दिली. माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे, सावध राहा!:नादाला लागाल तर नामोनिशाण नष्ट करू, भोंदू खरातने 20 वर्षांपूर्वी अंनिसला दिली होती धमकी भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे पाढे आता एकामागून एक उलगडू लागले आहेत. खरातने केवळ महिलांचे शोषणच केले नाही, तर त्याचा पर्दाफाश करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनाही शस्त्राचा धाक दाखवून धमकावले होते, असा खळबळजनक दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. सुमारे दोन दशकांपासून खरातचे हे अघोरी उद्योग सुरू असून, त्याने अंनिसच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे, माझ्या नादाला लागाल तर तुमचे नामोनिशाण नष्ट करू अशी धमकी दिल्याची माहिती आता समोर आली आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 4:58 pm

चढ्या दराने गॅस विकणाऱ्या एजन्सी धारकांविरोधात शिवसेना आंदोलन करणार:गॅस एजन्सी धारकांची भेट घेऊन निवेदन देणार

घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडर चढ्या दराने विकणाऱ्या गॅस एजन्सींच्या विरोधात शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार, ता. 26 मार्च रोजी झालेल्या बैठकीत या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवार ता. 27 मार्च रोजी संभाजीनगरातील 23 गॅस एजन्सीना निवेदन देऊन चढ्या दराने सिलेंडर गॅस विकू नये,अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात येणार आहे. शहरातील विविध भागांत नागरिकांना गॅस सिलिंडर जादा दराने विकले जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढत आहे.चढ्या दराने विक्री करणाऱ्या संबंधित गॅस एजन्सींवर तातडीने कारवाई करावी तसेच प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात यावा असा निर्णय या बैठकीत घेतला आहे. याप्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, राज्य संघटक चेतन कांबळे,उपजिल्हाप्रमुख संतोष खेंडके, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, विधानसभाप्रमुख प्रमोद ठेंगडे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, वीरभद्र गादगे, गिरीश चपळगांवकर, माजी महापौर रशीद मामू खान, नगरसेवक गणेश लोखंडे, सचिन खैरे,राहुल सोनवणे, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, युवासेना जिल्हायुवाधिकारी हनुमान शिंदे,उपशहरप्रमुख सुगंध कुमार गडवे, बापू कवडे, सचिन वाघ, सोमीनाथ नवपुते, संजय हरणे, पुरुषोत्तम पानपट, सुरेश पवार, सीताराम सुरे, मंगेश भाले, दिनेश राजे भोसले, सुरेश गायके, किरण सालपे, गणेश सुरे, मोहन म्हस्के, भागीनाथ रिठे, गोरख सोनवणे, नंदू लबडे, योगेश पवार, मधुकर वाघमारे,वैजिनाथ म्हस्के, सलीम खामगावकर, संदीप चव्हाण, रणजीत दाभाडे, राहुल वाणी, देविदास रत्नपारखी, नरेंद्र देवतवाल, सुधीर जाधव, शिवकुमार देशमुख, मयूर तुपे, शौकत पटेल, नानासाहेब रणयेवले,नगरसेविका सुनीता सोनवणे,महिला आघाडी सुनीता सोनवणे, मीरा देशपांडे, रेणुका जोशी, राजश्री पोफळे, बबीता रणयेवले, छाया देवराज, सीमा गवळी, विजया पवार, प्रतिभा राजपूत व दीपाली पाटील उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 4:58 pm

सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावरून वाद:फडणवीसांच्या कौतुकावर काँग्रेस भडकली; सपकाळांचा जोरदार हल्ला, खुलाशाची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलेलं कौतुक सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या वक्तव्यावर काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुळे यांनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी केली आहे. सुळे यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत मतभेद उघड झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचा दावा केला. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी अघोरी पूजा केल्याचा आरोप त्यांनी केला, तर एकनाथ शिंदे गटानेही फडणवीसांना पदावरून खाली खेचण्यासाठी अशाच प्रकारच्या पूजांचा आधार घेतल्याचा दावा त्यांनी केला. या सगळ्या प्रकारातून संविधानाची पायमल्ली होत असून मनुस्मृतीचे दिवस परत आणण्याचा कट असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. सपकाळ यांनी पुढे म्हटलं की, खरात प्रकरणाबाबत सरकारला आधीपासून माहिती होती, तरीही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. सहा महिन्यांपासून माहिती असताना सरकार झोपले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, या प्रकरणाचा वापर राजकीय हेतूंसाठी केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. विरोधकांना गप्प बसवण्यासाठी हा मुद्दा वापरला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, महाविकास आघाडीतील समन्वयावर बोलताना सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या बैठकीतील नाराजी हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचं स्पष्ट केलं. मात्र राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांबाबत आघाडीत सखोल चर्चा होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. मागील काळात समन्वयाचा अभाव जाणवला होता, पण पुढील काळात तो टाळण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, असंही त्यांनी सुचवलं. राजकारण अधिक तापण्याची शक्यता सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया देताना सपकाळ यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांचं विधान दिशाभूल करणारं आहे. फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा वारसा पुढे नेत आहेत. चोर आणि संन्याशाला एकत्र दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर सुळे यांनी तात्काळ खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली असून, या वादामुळे राज्यातील राजकारण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 4:40 pm

बोलत नाही म्हणून अल्पवयीन मुलीवर कोयत्याने वार!:मारहाण करत जीवे मारण्याची दिली धमकी, मुलुंड परिसरात खळबळ

एका 16 वर्षीय तरुणीने केवळ बोलणे बंद केल्याच्या रागातून तिच्याच ओळखितल्या एका तरुणाने तिच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मुंबईच्या मुलुंड परिसरात घडली असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आशिष बनसोड असे आरपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष बनसोड आणि पीडित मुलगी दोघेही बदलापूरचे रहिवासी असून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. काही दिवसांपासून काही वैयक्तिक कारणांमुळे मुलीने आरोपी आशिषसोबत बोलणे बंद केले होते. याचाच राग मनात धरून आशिष मुलुंडमधील तिच्या कॉलेजजवळ गेला आणि मुलीला गाठले. यावेळी सोबत आणलेल्या कोयत्याने मुलीच्या गळ्यावर वार केला. मुलीच्या सोबत असलेल्या मित्रालाही मारहाण करत गंभीर जखमी केले. इतकेच नव्हे तर हा हल्ला केल्यानंतर दोघांनाही जीवे मारण्याची धमकी आरोपी आशिषने दिली. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आशिष बनसोड या आरोपीला शस्त्रासह अटक केली असून, त्याच्यावर यापूर्वीही बदलापूरमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या मुलुंड पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. ही घटना केवळ वैयक्तिक गुन्हा नसून समाजातील महिलांच्या वाढत्या असुरक्षिततेचे भीषण वास्तव मांडणारी आहे. मुंबईसारख्या शहरात भरदिवसा होणारे असे हल्ले चिंतेचा विषय ठरत असून, महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक कायदे, पोलिसांची वाढीव सतर्कता आणि सामाजिक जागरूकता निर्माण होणे आता अनिवार्य झाले आहे. या निमित्ताने प्रशासनाने ठोस पावले उचलून महिलांना सुरक्षित वातावरण देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 4:39 pm

एलपीजी घेऊन ‘सी बर्ड’ येतेय!

नवी दिल्ली : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा विपरित परिणाम भारताला होणा-या इंधन पुरवठ्यावर झाला आहे. एकीकडे स्वयंपाकाच्या गॅससाठी वितरण एजन्सींसमोर रांगा लागल्या आहेत, तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेलसाठी पेट्रोल पंपांसमोरही रांगा लागल्या आहेत. या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून सुमारे आठ वर्षांनंतर भारताने इराणकडून एलपीजी खरेदी केला आहे. भारताचे […] The post एलपीजी घेऊन ‘सी बर्ड’ येतेय! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 4:36 pm

संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर तोबा गर्दी:वाहनांच्या प्रचंड रांगा; आता टू व्हिलरला फक्त 200 चे पेट्रोल मिळणार, वाचा ग्राउंड रिपोर्ट

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लॉकडाऊन लागू होणार असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरताच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. 'उद्या पेट्रोल मिळणार नाही' या भीतीने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी रांगा लावल्यात. शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर दोन दिवसांपासून लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. या अचानक वाढलेल्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले, “इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, पण लोक अफवांवर विश्वास ठेवून एकाच वेळी गर्दी करत आहेत. त्यामुळे व्यवस्थापन करणे कठीण जात आहे.” दुसरीकडे तेल कंपन्यांनी आता अ‍ॅडव्हान्स रक्कम घेणे सुरू केले आहे. त्यामुळेही पेट्रोल उशिरा येत असल्याचे समजते. या साऱ्या गोंधळामुळे नागरिकांमध्ये मात्र संतापाचे वातावरण दिसून आले. एका वाहनधारकाने प्रतिक्रिया देताना म्हटले, “सरकारने आधी स्पष्ट माहिती द्यायला हवी. अफवा पसरतात कारण अधिकृत माहिती वेळेवर मिळत नाही.” तर दुसऱ्या एका नागरिकाने सांगितले की, “आम्हाला खात्री नाही उद्या काय होईल, म्हणून आजच पेट्रोल भरून घेतोय.” एकंदर पॅनिक स्थिती निर्माण झालीय. या ग्राउंड रिपोर्टमधून जाणून घेऊयात नेमकी काय परिस्थिती आहे ते... तेल कंपन्यांनी व्यवहाराची पद्धत बदलली आहे. यापूर्वी पेट्रोल पंपचालक आधी तेल घ्यायचे. त्यानंतर पैशाचा भरणा होत असे. मात्र, आता अमेरिका-इराण युद्ध सुरू झाले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधन प्रश्न निर्माण झाला. हे पाहता तेल कंपन्यांनी अ‍ॅडव्हान्स रक्कम घेणे सुरू केले. मात्र, पेट्रोल पंपचालक अ‍ॅडव्हान्स रक्कम देत नाहीत. त्यामुळे त्यांना पेट्रोल मिळत नसल्याचे समोर आले आहे. बहुतांश पंपचालक उशिरा पेमेंट देत आहेत. त्यामुळे सर्वांनाच उशिरा इंधन मिळत आहे. याचा फटका वाहनधारकांना बसत असून, पेट्रोल पंपावर रांगा लागल्याचे चित्र आहे. एका तरुणाने सांगितले की, 'गेली चार तास आम्ही रांगेत उभे आहोत. पण आम्हाला अजूनही पेट्रोल मिळालेले नाही. या उडालेल्या अफवेमुळे ज्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल आहे ते लोकही इथे येऊन गर्दी करत आहेत. एका वृद्ध नागरिकाने सांगितले की, ‘गेली दोन तास झाले मी या रांगेत उभा आहे. इथे लोक गाड्यात पेट्रोल असूनसुद्धा पेट्रोल भरायला आले आहेत. मी बघतोय अनेकजण त्यांच्या गाडीतून पाइपने पेट्रोल काढून ते कॅनमध्ये भरत आहेत. त्यांच्यामुळे आमच्यासारख्या वयस्करांना दिवसभर उन्हातान्हाच थांबावं लागत आहे. स्पष्ट माहितीचा अभाव पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. एका कर्मचाऱ्याने सांगितले की, “इंधनाचा पुरवठा सुरू आहे, पण लोक घाबरून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे साठा पटकन संपतो आणि पंप बंद करावे लागतात.” नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि संताप स्पष्टपणे दिसून येत आहे. एका वाहनधारकाने प्रतिक्रिया देताना म्हटले, सरकारने वेळेवर स्पष्ट माहिती दिली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती.” तर दुसऱ्या नागरिकाने सांगितले, “उद्याची खात्री नाही, म्हणून आजच इंधन भरून घेतोय.” इंधन गोंधळाचा फटका पाणीपुरवठ्यालाही बसला आहे. बीड बायपास परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, डिझेल न मिळाल्याने अनेक टँकरच्या फेऱ्या विस्कळीत झाल्या. संभाजीनगर जिल्ह्यात दररोज 19,130 सिलिंडरचा पुरवठा होत आहे. मात्र, बुकिंगचा आकडा तब्बल 60 हजारांच्या वर गेला आहे. लोकांच्या पॅनिक बुकिंगमुळे यंत्रणेवर मोठा ताण येत असून गरजेनुसार गॅस उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. फोर व्हिलरला 2000 चे पेट्रोल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी एक आदेशही जारी केला आहे. त्यांनी माहिती दिली आहे की, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर इंधन टंचाईबाबत अफवा पसरविल्या जात असल्याने पेट्रोल पंपांवर नागरिकांची अनावश्यक गर्दी होत आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी तसेच सर्वांना समान प्रमाणात इंधन मिळावे यासाठी प्रशासनाने इंधन वितरणाचे योग्य नियोजन केले आहे. प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, सर्व वाहनांना इंधन मिळावे यासाठी दुचाकी वाहनांना 200 रुपयांपर्यंत आणि चारचाकी वाहनांना 2000 रुपयांपर्यंत इंधन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नाही. इंधनाचा कोणताही तुटवडा नाहीसुरक्षेच्या दृष्टीने इंधन साठवणूक धोकादायक ठरू शकते, त्यामुळे कॅन किंवा बाटल्यांमध्ये इंधन न घेता थेट वाहनांमध्येच इंधन भरून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने इंधन पुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधनसाठ्याची माहिती फलकावर दर्शविण्यात येणार असून नागरिकांना खरी परिस्थिती समजून घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नादच करायचा नाहीकोल्हापूरमध्येही पेट्रोल टंचाई आहे. त्यामुळे पंपावर वाहनधारक रांगा करत आहेत. गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने इंधन विक्रीवर निर्बंध घातलेत. त्यात दुचाकी वाहनधारकांना दररोज 200 रुपये, तर चारचाकी वाहनधारकांना दररोज 2000 रुपयांचेच पेट्रोल देण्यात येत आहे. पूर्वी वाहनधारक गाड्याच्या टाक्या फुल्ल करून घेत होते. त्यामुळे पेट्रोल पंप ड्राय होत. मात्र, आता या निर्बंधामुळे पेट्रोल पंपावरील गर्दी आटोक्यात आली आहे. नायराचे पेट्रोल महागइराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नायरा एनर्जीचे पेट्रोल प्रति लिटर ₹ 5 ने आणि डिझेल ₹ 3 ने महाग झाले आहे. आता भोपाळमध्ये पेट्रोलचा दर ₹111.72 आणि डिझेलचा दर ₹94.88 वर पोहोचला आहे. नायरा एनर्जीने केलेली ही दरवाढ स्थानिक कर आणि व्हॅटनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी असू शकते. काही राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ₹5.30 पर्यंत वाढ झाली आहे. नायराचे देशभरात सुमारे 7,000 पेट्रोल पंप आहेत. सरकार म्हणाले अफवा पसरवू नकामंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी म्हणाल्या की, 'देशात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. अफवा पसरवू नका आणि भीतीपोटी जास्त तेल खरेदी करणे टाळा. त्याचप्रमाणे सिलिंडर बुकिंगची टाइमलाइन बदलल्याच्या बातम्याही चुकीच्या आहेत. शहरांमध्ये ही मुदत २५ दिवस तर ग्रामीण भागात ४५ दिवस निश्चित आहे.' पीएनजी जोडणी घ्यावीच लागणारपाइप्ड नॅचरल गॅसची (पीएनजी) जोडणी घेतलेली घरे तसेच पीएनजी कनेक्शन न घेतलेल्या घरांचा तीन महिन्यांनंतर एलपीजी सिलिंडर पुरवठा बंद केला जाणार आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे एलपीजी पुरवठ्यावर वाढणाऱ्या ताणादरम्यान केंद्र सरकारने हा आदेश जारी केला. पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले की, पाइपलाइनद्वारे पीएनजीचा सतत पुरवठा होतो. त्यामुळे रिफिल बुक करण्याची गरज भासत नाही. तांत्रिक कारणांमुळे एखाद्या घरापर्यंत पीएनजी कनेक्शन देणे शक्य नसेल तर अधिकृत एजन्सी एनओसी (नाहरकत प्रमाणपत्र) देऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये एलपीजी पुरवठा बंद होणार नाही. एजन्सीला याची नोंद ठेवावी लागेल. घरापर्यंत पीएनजी लाइन पोहोचल्यानंतर एनओसी परत घेतली जाईल. हाउसिंग सोसायटी आणि संबंधित संस्थांना तीन कामकाजाच्या दिवसांत परवानगी द्यावी लागेल. गेल्या २५ दिवसांत २.५ लाख नवीन पीएनजी कनेक्शन देण्यात आले असून २.२० लाख लोकांनी एलपीजीवरून पीएनजीकडे स्थलांतर केले आहे. ऑनलाइन डिलिव्हरी महागकच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे पेट्रोल महाग झाले आहे. त्यामुळे डिलिव्हरी पार्टनर्सचा खर्च वाढतो आहे आणि कंपनीच्या लॉजिस्टिक्स ऑपरेशन्सवरही परिणाम होतो आहे. हे कारण लक्षात घेता झोमॅटोने ऑर्डरवरील प्लॅटफॉर्म फीमध्ये 19% वाढ केली आहे. युजर्सना प्रत्येक ऑर्डरवर ₹12.50 ऐवजी आता ₹14.90 म्हणजेच ₹2.40 जास्त प्लॅटफॉर्म फी द्यावी लागेल. GST जोडल्यानंतर ही रक्कम आणखी वाढेल. प्लॅटफॉर्म फी हे प्रत्येक फूड ऑर्डरवर लागू होणारे अतिरिक्त शुल्क आहे. हे GST, रेस्टॉरंट शुल्क आणि डिलिव्हरी फीपेक्षा वेगळे आहे. झोमॅटो प्लॅटफॉर्म दररोज 20 ते 25 लाख ऑर्डर डिलिव्हर करतो. तर झोमॅटोची मुख्य प्रतिस्पर्धी कंपनी स्विगी सध्या करांसह सुमारे ₹14.99 प्लॅटफॉर्म फी आकारत आहे. भीतीमुळेच इंधन-गॅसची मागणी; पुरवठा सुरळीत जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी म्हणाले, 'छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 48 पेट्रोल पंप आहेत. यातील बुधवारी आठहून अधिक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नव्हते. तर रात्री अकरापर्यंत बहुतांश पेट्रोल पंपावरील इंधन साठा संपला होता. त्यामुळे एकाच दिवशी जवळपास दहा लाख लिटर पेट्रोल आणि डिझेलची विक्री झाली. शहरात पेट्रोल आणि डिझेलचा 19 लाख लिटरची क्षमत आहे. दररोज 12 लाख लिटर इंधन शहरात येत असून पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. नागरिकांनी पॅनिक बुकिंग करू नये आणि आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन भरून घेऊ नये. सोबतच 12 हजार सिलिंडरचा पुरवठा होत असताना मागणी मात्र 60 हजारांवर पोहोचली आहे. ही अतिरिक्त मागणी केवळ भीतीपोटी होत असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे.'- प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी इंधनाचा तुटवडा नाही राज ऑटो पेट्रोल पंपचे प्रमुख हेमंत खिंवसरा यांच्या म्हणाले, 'इंधनाचा तुटवडा नाही, तर अफवेमुळे लोक टाक्या फुल्ल करून घेत आहेत. तसेच पूर्वी तेल कंपन्या पंपचालकांना पाच दिवसांच्या क्रेडिटवर इंधन पुरवत असत. मात्र, आता केवळ आगाऊ पैसे भरल्यावरच टँकर मिळत असल्याने काही पंपांवर तांत्रिक अडचण निर्माण होत आहे.'- हेमंत खिवंसरा, राज ऑटो पेट्रोल पंप

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 4:22 pm

खरात प्रकरणावरून महिला नेत्यांमध्ये चकमक:व्हिडिओ, ताज बैठक आणि आरोपांची मालिका; अंधारेंचा शितल म्हात्रेंना थेट सवाल

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलेले असताना आता महिला नेत्यांमध्येही जोरदार शब्दयुद्ध रंगले आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी ‘ताज का राज’ असा सवाल करत ठाकरे गटावर निशाणा साधला होता. या आरोपांनंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत म्हात्रेंवरच सवालांचा भडिमार केला. दोन्ही नेत्यांमधील ही चकमक सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. शितल म्हात्रे यांनी केलेल्या ट्विटमध्ये अशोक खरातला पाण्याची जोडणी देण्यासाठी ‘ताज’ हॉटेलमध्ये बैठक झाली होती का, असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच या निर्णयामागे मातोश्रीतील व्यक्तींचा आग्रह होता का, असा थेट आरोप त्यांनी केला. ‘ताज का राज’ उघड झाला तर अनेक गोष्टी समोर येतील, असेही त्यांनी सूचित करत ठाकरे गटावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या आरोपांवर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत म्हात्रेंना प्रतिप्रश्न विचारला. तुमचा ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो? असा टोला लगावत त्यांनी विषय भरकटवू नका, असेही म्हटले. अंधारे यांनी म्हात्रेंच्या आधीच्या व्हिडिओ वादाचा संदर्भ देत त्यावरच लक्ष केंद्रीत केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, खरात प्रकरणातील गंभीर मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, पण मुद्दाम वेगळ्या विषयांकडे लक्ष वळवले जात आहे. दरम्यान, शितल म्हात्रे यांनीही अंधारेंच्या टीकेला उत्तर देताना मूळ मुद्दा ‘ताज’मधील बैठकीचाच असल्याचे सांगितले. खरातला पाणीपुरवठा देण्यामागे कोण होते, कोणत्या नेत्याने मध्यस्थी केली आणि पाईपलाईनसाठी जीआर काढताना कोणाचा दबाव होता, याची चौकशी व्हायला हवी, असे त्यांनी ठामपणे म्हटले. तसेच या सर्व प्रकरणामागे काही विशिष्ट गणित किंवा न्यूमरॉलॉजीचा संबंध होता का, याचाही तपास व्हावा, असा दावा त्यांनी केला. आरोप-प्रत्यारोपांमुळे खरात प्रकरणाला राजकीय रंग याचवेळी, अंधारेंवर वैयक्तिक टीका करत म्हात्रे म्हणाल्या की, त्या त्या काळात शिवसेनेत नव्हत्या आणि इतर राजकीय कार्यक्रमात व्यस्त होत्या, त्यामुळे त्यांना सर्व घडामोडींची माहिती नसावी. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे खरात प्रकरणाचा राजकीय रंग अधिकच गडद होत असून, पुढील काळात या वादातून आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 3:56 pm

फलक लावण्याच्या वादातून गोळीबाराचा प्रयत्न:पुण्यातील गंज पेठेतील घटना, आठ आरोपींना अटक

महात्मा फुले पेठेत (गंज पेठ) श्री हनुमान जन्मोत्सवाचा फलक लावण्याच्या वादातून टोळक्याने तरुणाला मारहाण करुन त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. स्वप्नील सुनील पाटणकर (वय २२, रा. महात्मा फुले स्मारकाजवळ, महात्मा फुले पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. पाटणकर याने याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अनिश धडे, ओम लोंढे, सुलतान सय्यद, चैतन्य उर्फ सार्थक शिवपावय, मितेश विनोद माने, सार्थक गावडे, वरद महेंद्र कांबळे, महेंद्र उर्फ वास्को रामचंद्र कांबळे यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, बुधवारी (२५ मार्च) मध्यरात्री एकच्या सुमारास पाटणकर आणि त्याचा मित्र महात्मा फुले पेठ परिसरात श्री हनुमान जन्मोत्सवाचे फलक लावत होते. त्या वेळी आरोपींशी पाटणकर आणि त्याचा मित्राचा वाद झाला. आरोपी सुलतान सय्यद याने त्याच्याकडील पिस्तूल काढले. पाटणकरवर पिस्तूल रोखून त्याने चाप ओढला. मात्र, पिस्तुलातून गोळी सुटली नाही. पाटणकर याच्याबोबर असलेले मित्र आदित्य, अथर्व आणि आदेश यांना पट्ट्याने मारहाण केले. पाटणकर याच्या डोक्यात पिस्तुलाचा दस्ता मारल्याने तो जखमी झाले. आरोपींनी पाटणकर आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना दगड, तसेच बाटल्या फेकून मारल्या. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस कुरुनुर पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 3:48 pm

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी डिजिटल साक्षरता महत्त्वाची : मंत्री आदिती तटकरे

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी बचतीतून लघुउद्योग सुरू केले आहेत. अशा अनेक महिलांना महिला विकास मंडळाच्या माध्यमातून दिले जाणारे प्रशिक्षण, अनुदान आणि भांडवल यामुळे महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी तसेच, उत्पादने बाजारपेठेत पोहोचविण्यासाठीही मोठा आधार मिळत आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करताना त्यांना डिजिटल आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला […] The post महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी डिजिटल साक्षरता महत्त्वाची : मंत्री आदिती तटकरे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 3:10 pm

अत्याधुनिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार दिशादर्शक

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ दिशादर्शक ठरणार आहे. २७ व २८ मार्च २०२६ रोजी जिओ कन्व्हेशन सेंटर येथे या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित […] The post अत्याधुनिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार दिशादर्शक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 3:09 pm

मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला

मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद असून महाराष्ट्रासाठी ही मोठी हानी आहे. मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, […] The post मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 3:06 pm

इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे शिवचरित्राचा आणि मराठा इतिहासाचा वस्तुनिष्ठ मागोवा घेणारा एक व्यासंगी संशोधक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी आयुष्यभर महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर मांडण्याचे काम केले. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि […] The post इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 3:05 pm

तत्त्वनिष्ठ, व्यासंगी इतिहास संशोधक हरपला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : ज्यांच्या व्यासंग आणि संशोधनपूर्ण मांडणीमुळे नव्या पिढीसाठी शिव-शाहू चरित्रांचा अमूल्य असा ठेवा उपलब्ध झाला, अशा डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे आपण इतिहास संशोधन क्षेत्रातील तत्त्वनिष्ठ, व्यासंगी मार्गदर्शकाला मुकलो आहोत, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, […] The post तत्त्वनिष्ठ, व्यासंगी इतिहास संशोधक हरपला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 3:04 pm

छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधन खरेदीवर मर्यादा:दुचाकीसाठी ₹200, चारचाकीसाठी ₹2000; जिल्हा प्रशासनाचा अफवा रोखण्यासाठी तात्पुरता निर्णय

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने पेट्रोल-डिझेल खरेदीवर तात्पुरत्या मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अफवांना आळा घालण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, दुचाकी वाहनांना केवळ २०० रुपयांचे पेट्रोल, तर तीन व चार चाकी वाहनांना जास्तीत जास्त २००० रुपयांचे पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करता येणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या मते, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, काही अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त इंधन भरून घेत आहेत, ज्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक तेवढेच इंधन भरावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित होईल, असा विश्वासही प्रशासनाने व्यक्त केला आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 2:58 pm

हिंगोलीत भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन:धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल

जैन धर्मीयांचे २४ वे तिर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या २६२४ व्या जन्मकल्याणक निमित्त हिंगोली येथे भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २९ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रख्यात वक्ते डॉ. विवेकजी जैन (छिंदवाडा, म.प्र.) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान. “मैं और मेरे महावीर”, “भगवान बनने जन्मे हम” आणि “जिस पंथ चले भगवान वही आचरणीय” या विषयांवर ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यादरम्यान पुढील प्रमाने कार्यक्राचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २९ मार्च रोजी महाविर भवन येथे दुपारी १२ ते ४ आनंदनगरी (शुद्ध जैन रेसिपी) सायं. ७.०० वा. सांस्कृतिक कार्यक्रम, ८.१५ वा. “मैं और मेरे महावीर” या विषयावर डॉ. विवेकजी जैन (छिंदवाडा, म.प्र.) यांचे व्याख्यान तसेच दि. ३० मार्च २०२६ सोमवार रोजी सायं. ७.०० वा. सांस्कृतिक कार्यक्रम ८.१५ वा. “भगवान बनने जन्मे हम” या विषयावर व्याख्यान. दि. ३१ मार्च मंगळवार रोजी सकाळी ८.०० वा. शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर,आदिनाथ दिगंबर जैन मंदिर,रामगल्ली, पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, कासारवाडा, ग्रामीण पोलिस स्टेशन, महावीर किर्ती स्तंभ, संयम किर्ती स्तंभ, गणपती चौक, गांधी चौक, खुराणा पेट्रोल पंप मार्गे महावीर भवन येथे शोभायात्रेचा समारोप होनार असुन त्यानंतर डॉ. विवेकजी जैन यांचे “जिस पंथ चले भगवान वही आचरणीय” व्याख्यान होनार असून त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन सकल दिगंबर जैन समाज हिंगोली यांनी केले आहे. हे ही वाचा… पेट्रोल पंपधारकांनी कॅन, बाटल्यामध्ये इंधन देऊ नये:जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश, म्हणाले - पुरेसा साठा उपलब्ध, अफवामुळे गर्दी जिल्ह्यातील नागरिकांनी पेट्रोल किंवा इंधना बाबत कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच पेट्रोल पंपधारकांनी कॅन किंवा बाटल्यांमध्ये इंधन देऊ नये असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी दिले आहेत. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 2:48 pm

अत्याचाराच्या ठिकाणी SIT ची छापा टाकत कारवाई:ऑफिस सील, मोठे पुरावे हाती येण्याची शक्यता; शटर उघडलं आणि उघडकीस आलं सत्य

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास वेग घेत असताना आता विशेष तपास पथक थेट त्या ठिकाणी पोहोचलं आहे, जिथे महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत. खरातच्या ओकस कार्यालयात आज SIT ने सखोल तपासणी सुरू केली. शटर उघडताच तपास पथकाने आत प्रवेश केला आणि संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी करण्यात आली. या ठिकाणीच अनेक महिलांचे शोषण झाल्याचा आरोप असल्याने या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, न्यायालयाने अशोक खरात याला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून त्याची चौकशी सुरू आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक आणि अत्याचार केल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर बनले आहे. गेल्या काही दिवसांत तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, आता या कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. SIT पथकाने कार्यालयात सापडलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. या ठिकाणी विविध फाईल्स, नोंदी आणि इतर साहित्य आढळून आले असून त्यातून मोठे धागेदोरे मिळू शकतात, असा अंदाज आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर हे कार्यालय अधिकृतपणे सील करण्यात आले आहे. या कारवाईमुळे खरातच्या कारभाराचा अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. शिवनिका संस्थेचे बँक खाते सील तपासाच्या पुढील टप्प्यात आर्थिक व्यवहारांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. खरातच्या ‘शिवनिका’ संस्थेचे बँक खाते सील करण्यात आले असून, त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती गोळा केली जात आहे. जमीन, घर, दुकाने अशा विविध मालमत्तांची चौकशी सुरू असून, त्यासाठी नोंदणी विभागाकडून राज्यभरात तपास सुरू आहे. धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरातने एवढी मोठी संपत्ती कशी उभी केली आणि त्यामागे पैसा कुठून आला, याचा तपास सध्या सुरू आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत या तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता असून, आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 2:42 pm

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. गोवारीकर स्मृती व्याख्यान संपन्न:'भारताला अवकाशात प्रवेश मिळवून देणारे दूरदर्शी तंत्रज्ञ' यावर प्रमोद काळे यांचे मार्गदर्शन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील सर सी. व्ही. रमण सभागृहात डॉ. वसंत आर. गोवारीकर स्मृती व्याख्यान नुकतेच संपन्न झाले. अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटरचे माजी संचालक प्रमोद काळे यांनी या व्याख्यानात 'डॉ. वसंत आर. गोवारीकर: भारताला अवकाशात प्रवेश मिळवून देणारे दूरदर्शी तंत्रज्ञ' या विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात प्रमोद काळे यांनी डॉ. गोवारीकर यांच्या भारतीय अवकाश कार्यक्रमातील महत्त्वपूर्ण योगदानाचा आढावा घेतला. घन इंधन तंत्रज्ञानाच्या विकासातील त्यांच्या अग्रणी कार्यामुळे भारताच्या प्रक्षेपण क्षमतेत वाढ झाली आणि देशाला स्वयंपूर्ण व विश्वासार्ह अवकाश प्रवेश मिळाला, असे त्यांनी नमूद केले. स्वावलंबनाच्या काळात देशी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले नेतृत्व अत्यंत मोलाचे होते, असे काळे यांनी अधोरेखित केले. काळे यांनी डॉ. गोवारीकर यांच्या वैज्ञानिक, प्रशासकीय आणि संस्थापक नेतृत्वाचा प्रवासही उलगडून सांगितला. प्रतिभावान संशोधक घडविणे, सक्षम वैज्ञानिक संस्था उभारणे आणि नवोन्मेषी संस्कृती जोपासणे यावर त्यांनी विशेष भर दिला होता. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून त्यांनी शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात दिलेले योगदानही काळे यांनी अधोरेखित केले. या व्याख्यानादरम्यान मांडलेल्या वैयक्तिक आठवणी आणि ऐतिहासिक संदर्भांमुळे उपस्थितांना डॉ. गोवारीकर यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची सखोल ओळख मिळाली. भारताच्या अवकाश कार्यक्रमाच्या विकासाची कथा आणि त्यामागील दूरदृष्टी यांचे प्रभावी चित्रण या व्याख्यानातून स्पष्ट झाले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गोसावी यांनी व्याख्यानाच्या सखोलता, स्पष्टता आणि समकालीन महत्त्वाचे कौतुक केले. डॉ. गोवारीकर यांसारख्या दूरदर्शी शास्त्रज्ञांचे स्मरण आणि सन्मान करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन चिकाटी, उत्कृष्टता आणि राष्ट्रनिर्मितीची भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप उत्स्फूर्त प्रश्नोत्तर सत्राने झाला, ज्यात उपस्थितांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपली बौद्धिक उत्सुकता व्यक्त केली.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 2:24 pm

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या:पुण्याच्या बिबवेवाडीतील घटना, आरोपी पतीला अटक

पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरातील अप्पर इंदिरानगर येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. सारिका शुभम घोडके (वय 23, रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर शुभम श्रीकांत घोडके (वय 29) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत सारिकाची आई गेणीबाई रुपसिंग चव्हाण (वय 50) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार तिचा छळ करत होता. या कारणावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. 24 मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास वाद विकोपाला गेला. संतापाच्या भरात शुभमने सारिकाला कठीण वस्तूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, डोक्यावर आणि शरीरावर झालेल्या गंभीर मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 1:56 pm

पेट्रोल पंपधारकांनी कॅन, बाटल्यामध्ये इंधन देऊ नये:जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश, म्हणाले - पुरेसा साठा उपलब्ध, अफवामुळे गर्दी

जिल्ह्यातील नागरिकांनी पेट्रोल किंवा इंधना बाबत कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच पेट्रोल पंपधारकांनी कॅन किंवा बाटल्यांमध्ये इंधन देऊ नये असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी दिले आहेत. या संदर्भात पाटील यांनी सांगितले की हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तथापि, समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेल्या अफवांमुळे नागरिकांकडून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असून रांगा लागलेल्या आहेत. परिणामी मागणी व पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झालेला आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने व इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी संबंधितांना आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त रुपये 200/- पर्यंतच इंधन भरण्यात यावे. तीनचाकी व चारचाकी वाहनासाठी जास्तीत जास्त रुपये 2000/- पर्यंतच इंधन भरण्यात यावे. कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या, ड्रम इत्यादीमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी व रांगा टाळून आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे.रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनाना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्यात यावा. प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोज आपल्या पंपावर उपलब्ध असलेला शिल्लक साठा, त्या दिवशी प्राप्त झालेला साठा व मागणी केलेला साठा याची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करावी. सर्व पेट्रोल पंप धारकांनी सदर आदेशांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 कायद्यांनुसार कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी दिला आहे. शहरी पेट्रोलपंपावर बंदोबस्त द्यावा शहरी भागातील पेट्रोल पंपावर गर्दीमुळे गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरी पेट्रोल पंपावर दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त द्यावा असे पत्र जिल्हा पुरवठा विभागाने पोलिस अधीक्षक कार्यालयास दिले आहे

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 1:47 pm

सोशल मीडियावर अश्लील क्लिप्स टाकणाऱ्यांना धक्का, ग्रुपच्या ॲडमिनवरही गुन्हा:व्हिडिओ लगेच डिलीट करा; पोलिसांचा कडक इशारा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता एक नवा आणि गंभीर मुद्दा समोर आला आहे. खरात याच्याशी संबंधित काही अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असल्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे. या व्हिडिओंच्या माध्यमातून महिलांची ओळख उघड होत असल्याने परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पहिल्यांदाच गुन्हा दाखल करत संबंधितांवर कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. या व्हिडिओंचे प्रसारण केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील राहुल शिंदे, योगेश आढाव तसेच बीड जिल्ह्यातील संदीप गरजे या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात या तिघांमधील व्हिडिओ शेअरिंगची साखळी उघडकीस आली आहे. राहुल शिंदेला हे व्हिडिओ त्याचा मित्र योगेश आढाव याने पाठवले, तर योगेशला ते संदीप गरजे याच्याकडून मिळाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९४ (२) आणि ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत कलम ६७ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कायद्यांनुसार अश्लील सामग्री प्रसारित करणे आणि व्यक्तीची ओळख उघड करणे हे गंभीर गुन्हे मानले जातात. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी स्वतंत्र पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. ग्रुपच्या ॲडमिनवरही गुन्हा दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारचे कोणतेही व्हिडिओ किंवा क्लिप्स आपल्या मोबाईलमध्ये असल्यास तात्काळ डिलीट करावेत. विशेषतः पीडित महिलांची ओळख उघड करणारे किंवा त्यांचा सन्मान धोक्यात आणणारे व्हिडिओ शेअर करणे कायद्याने गुन्हा आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या सामग्रीचा प्रसार केल्यास केवळ संबंधित व्यक्तींवरच नव्हे, तर त्या ग्रुपच्या अॅडमिनवरही गुन्हा दाखल होऊ शकतो. व्हिडिओंचा गैरवापर करू नये, अन्यथा कठोर कारवाई अशोक खरात प्रकरणात आधीच अनेक गंभीर आरोप समोर आले असताना आता या व्हिडिओ प्रकरणामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, पीडित महिलांचा सन्मान राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणीही अशा प्रकारच्या व्हिडिओंचा गैरवापर करू नये, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 1:47 pm

सातारा-देवळाई परिसरात भीषण पाणीटंचाई; टँकरने पाणीपुरवठा करा:नगरसेविका सविता कुलकर्णी यांची मनपा आयुक्ताकडे मागणी

उन्हाळ्याची अधिकृत सुरुवात होण्यापूर्वीच बीड बायपास परिसरात पाण्याचे संकट उभे राहिले आहे. बीड बायपास आणि नो-नेटवर्क झोनमधील सुमारे साडेतीन लाख नागरिक सध्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भूगर्भातील पाणीपातळी वेगाने खालावल्याने विहिरी आणि बोअरवेल कोरडे पडले आहेत. या परिसराला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी भाजप नगरसेविका सविता कुलकर्णी यांनी मनपा आयुक्ताकडे केली आहे. सविता कुलकर्णी म्हणाल्या की, सातारा-देवळाई हा परिसर 2016 मध्ये महानगरपालिकेत समाविष्ट झाला. येथील घरे कायदेशीर असून अनेक नागरिकांनी गुंठेवारी नियमितीकरणही केले आहे. असे असूनही, प्रशासनाकडून नियमित पाणीपुरवठा करण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सविता कुलकर्णी म्हणाल्या की, नवीन जलवाहिनीचे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. उन्हाळा लक्षात घेता नागरिकांचे हाल थांबवण्यासाठी महापालिकेने स्वखर्चाने टँकर आणि ड्रमद्वारे पाणी पुरवावे. टँकरच्या पाण्यासाठी नागरिकांकडून कोणताही अतिरिक्त कर किंवा शुल्क घेऊ नये. कामात विलंब करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून, त्यातून होणाऱ्या वसुलीतून पाणीपुरवठ्याचा खर्च भागवण्यात यावा. परिसरातील नागरिकांना या भीषण उन्हाळ्यात पाण्यासाठी त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. 600 रुपयांना खासगी टँकर एकीकडे मनपाचे स्वस्त आणि शुद्ध पाणी मिळवण्यासाठी सोसायट्यांच्या रांगा लागल्या आहेत, तर दुसरीकडे याच टंचाईचा गैरफायदा घेत खासगी टँकरचालक एका फेरीसाठी 600 रुपयांपर्यंत उकळून सर्वसामान्यांची लूट करत आहेत. 6 टाक्यांची ट्रायल का नाही? नो-नेटवर्क झोनमध्ये नळाचे पाणी अद्याप पोहोचलेले नाही. मागणी असूनही टँकर मिळत नसल्याने आम्ही महापौरांची भेट घेऊन जाब विचारणार आहोत, असे देवळाई परिसराच्या नगरसेविका सविता कुलकर्णी यांनी म्हटले तर नगरसेविका अनिता घोडेले म्हणाल्या की, सातारा-देवळाईतील 12 पैकी 6 टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यांची ट्रायल का नाही? भारतीय संविधानाच्या कलम 21नुसार स्वच्छ पाणी मिळवणे हा मूलभूत अधिकार आहे. पाणीपुरवठा सुनिश्चित करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची घटनात्मक जबाबदारी आहे (कलम 243 डब्ल्यू). मनपाच्या नियमांनुसार, 18 कुटुंबांच्या गटाला 5 हजार लिटरचे एक टँकर मिळते. महिन्याकाठी एकूण 15 टँकर दिले जातात आणि त्यासाठी 6,588 रुपये शुल्क आकारले जाते.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 1:38 pm

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानाशी संबंध:शीतल म्हात्रेंचा खळबळजनक दावा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता या प्रकरणात नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळालं आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत खरातला देण्यात आलेली पाण्याची जोडणी ही ‘मातोश्रीच्या मॅडम’च्या आग्रहामुळेच झाली, असा गंभीर आरोप केला आहे. या विधानामुळे ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शीतल म्हात्रे यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘ताज का राज’ असा उल्लेख करत, या प्रकरणामागील सत्य बाहेर आल्यास अनेकांचे तोंडचे पाणी पळेल, असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, खरात प्रकरण आता केवळ गुन्हेगारी तपासापुरते मर्यादित न राहता थेट राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी आले आहे. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या प्रकरणावरून आणखी राजकीय घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात नाशिकमधील दारणा धरणातून अशोक खरात यांच्या ‘शिवनिका’ संस्थेसाठी 39 लाख लिटर पाणी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर)ही समोर आल्याने वाद अधिकच चिघळला आहे. या पाणीपुरवठ्यासाठी धरणापासून सुमारे 48 किलोमीटर लांबीची पाइपलाईन टाकण्यात आली होती. अधिकृत नोंदीनुसार हे पाणी पिण्यासाठी राखीव असल्याचे सांगितले गेले, मात्र प्रत्यक्षात त्याचा वापर खरातच्या 21 एकर आंबा बागेसाठी केल्याचा आरोप होत आहे. हा प्रस्ताव 25 जून 2020 रोजी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजूर झाला होता, तेव्हा जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते. याचबरोबर, अशोक खरात याच्याविरोधातील कारवाईही सुरू असून न्यायालयाने त्याला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. सध्या विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. यामध्ये खरातविरोधात आतापर्यंत दहावा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. फार्महाऊसमधून 21 काडतुसे जप्त तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब उघडकीस आली आहे. अशोक खरात याच्याकडे असलेल्या बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे स्पष्ट झाले आहे. हा परवाना 15 ऑक्टोबर 2012 रोजी मंजूर करण्यात आला होता आणि 1 जानेवारी 2024 रोजी त्याचे नूतनीकरणही करण्यात आले होते. तपासात खरातच्या फार्महाऊसमधून 21 काडतुसे जप्त करण्यात आली असून त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली असल्याचे समोर आले आहे. या काडतुसांचा वापर नेमका कशासाठी करण्यात आला, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. दरम्यान, हा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 1:31 pm

ठाकरे गटाच्या बैठकीत राडा; प्रियंका चतुर्वेदी भडकल्या

मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेत (ठाकरे) राज्यसभेच्या जागेवरुन धुसफूस असल्याचे समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सात जागांसाठी बिनविरोध निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला येणारी जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडण्यात आली. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली, तर भाजपचे चार आणि शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) यांचा प्रत्येकी […] The post ठाकरे गटाच्या बैठकीत राडा; प्रियंका चतुर्वेदी भडकल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 1:24 pm

ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक डॉ. जयसिंगराव पवार कालवश

कोल्हापूर : प्रतिनिधी महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज निधन झाले. आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८५ वर्षाचे होते. आज सकाळी ९.१५ वाजता कोल्हापूरातील साने गुरुजी वसाहत येथील त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघेल अशी माहिती आहे. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, विचारवंत आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रकृती […] The post ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक डॉ. जयसिंगराव पवार कालवश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 26 Mar 2026 12:37 pm

राज्यात यलो अलर्ट, पुढचे चार दिवस धोक्याचे:मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांत हवामानात बदल

राज्यात मार्च महिन्याच्या अखेरीस उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला असतानाच आता हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झालेले असताना दुसरीकडे अवकाळी पावसाची चाहूल लागली आहे. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेसोबतच पावसाचा हा दुहेरी परिणाम अनेकांना जाणवू लागला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथेही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत गारपीटही झाली असल्याने शेतकऱ्यांसमोर नव्या संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळल्या असून काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह गारपीट झाल्याची नोंद आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे आधीच उष्णतेचा सामना करणाऱ्या जनतेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. एका बाजूला ऊन आणि दुसऱ्या बाजूला पाऊस दरम्यान, काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार असल्याने हवामानाची ही दुहेरी स्थिती नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. एका बाजूला कडक ऊन आणि दुसऱ्या बाजूला अचानक पाऊस व वादळी वारे यामुळे वातावरण अस्थिर झाले आहे. पुढील काही दिवस हवामानाचा हा अनिश्चित पॅटर्न कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 12:23 pm

रुपाली चाकणकरांमुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात:महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्या; बैठकीत आमदारांची मागणी, निर्णय सुनेत्रा पवारांच्या हातात

महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना आणखी एक मोठा राजकीय धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. महिलांवरील अत्याचारांचे आरोप, व्हिडिओ क्लिप्स आणि विविध गंभीर गुन्ह्यांच्या चर्चेमुळे हे प्रकरण अधिकच गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर चाकणकर यांचे नाव समोर आले होते, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. या प्रकरणात चाकणकर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या अशोक खरातच्या तथाकथित दरबारात उपस्थित असल्याचे दिसल्याने वाद निर्माण झाला. याशिवाय त्यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याचेही आरोप झाले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना अशा प्रकारच्या वादात नाव येणे ही गंभीर बाब मानली गेली. अखेरीस वाढत्या दबावामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तो सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणे दिली असून खरात प्रकरणाचा उल्लेख टाळला. राजीनाम्यानंतरही त्यांच्यावरील दबाव कमी झालेला नाही. सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावर आहेत. मात्र, हे पदही त्यांच्या हातातून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये याबाबत एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. चाकणकर यांच्या नावामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नेत्यांमध्ये आहे. बैठकीत अनेक आमदारांची मागणी दरम्यान, दर मंगळवारी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीतही हा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला. देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत अनेक आमदारांनी चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेमुळे पक्षावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढत आहे. निर्णय सुनेत्रा पवार यांच्या हातात आता या सर्व घडामोडींनंतर चाकणकर यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय सुनेत्रा पवार यांच्या हातात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षातील वाढता विरोध आणि जनमताचा दबाव लक्षात घेता, पुढील काही दिवसांत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाकणकर यांना आणखी एक धक्का बसतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 11:54 am

राज्यभरात राम नवमीचा उत्साह:पुण्यात वाहतुकीतील बदल, काळाराम मंदिरात श्री रामाला 'सोन्याच्या मिशा; शेगावात दिंड्या दाखल

आज चैत्र शुद्ध नवमी... अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव! मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा आज संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. चैत्र नवरात्रीची सांगता आणि प्रभू रामांच्या आगमनाचा आनंद व्यक्त करण्यासाठी सकाळपासूनच राज्यातील राम मंदिरांमध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. 'जय श्रीराम' आणि 'सियावर रामचंद्र की जय'च्या घोषणांनी अवघा आसमंत दुमदुमून गेला असून, गावागावांत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. राम नवमीनिमित्त आज पुणे शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांमुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत शहरातील बाजीराव रोड आणि लष्कर (कॅम्प) परिसरातील वाहतूक वळवण्यात येणार असून काही रस्ते पूर्णपणे बंद राहतील. असे असतील बदल बाजीराव रोड: पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असेल. वाहनधारकांनी टिळक रोड – अलका टॉकीज – खंडोजी बाबा चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा. लष्कर विभाग: वाय जंक्शन येथील वाहतूक बंद राहील. एम.जी. रोडवरील वाहने १५ ऑगस्ट चौकातून वळवण्यात येतील, तर महंमद रफी चौकातील वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे जाईल. कोहिनूर हॉटेल परिसरातील वाहतूक भोपळे चौकमार्गे वळवण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे. शेगावमध्ये ७५० हून अधिक दिंड्या दाखल शेगावमध्ये आज १३२ वा श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त श्रींच्या मंदिरावर मनमोहक रोषणाई करण्यात आली असून राज्यभरातून ७५० हून अधिक भजनी दिंड्या संतनगरीत दाखल झाल्या आहेत. दुपारी श्रींची पालखी, रथ आणि अश्वासह नगर परिक्रमेसाठी निघणार असून सायंकाळी ६ वाजता मंदिरात परतेल. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता दर्शनासाठी 'एकेरी मार्ग' (One-way) निश्चित करण्यात आला आहे. काळाराम मंदिरात प्रभू रामाला 'सोन्याच्या मिशा पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात रामजन्मोत्सवानिमित्त प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांना 'सोन्याच्या मिशा' लावून अनुपम शौर्य शृंगार करण्यात आला आहे. अरण्यकांडातील १४ हजार राक्षसांच्या वधाचे आणि प्रभूंच्या अजोड पराक्रमाचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा ते द्वादशीपर्यंत हे विशेष रूप सजवले जाते. पेशवेकालीन या मंदिरात प्रभूंच्या या विलोभनीय दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. बेलापूरचा रामनवमी उत्सव अन् 'बेलापूर श्री' कुस्तीचा थरार बेलापूर गावात २०० वर्षांची परंपरा असलेला रामनवमी उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा होत आहे. 'राम जन्मला'च्या गजराने मंदिर परिसर दुमदुमला असून, रात्री निघणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. हनुमान जन्मोत्सवापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्याची सांगता भव्य जत्रेने होईल, जिथे लाल मातीतील कुस्त्यांच्या जंगी फडात 'बेलापूर श्री' हा मानाचा किताब प्रदान केला जाईल.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 11:43 am

पळसपमध्ये रविवारी एकदिवसीय ग्रामीण मराठवाडा साहित्य संमेलन:डॉ. सुरेश सावंत भूषवणार अध्यक्षपद, मान्यवरांची उपस्थिती राहणार

धाराशिव जिल्ह्यातील पळसप येथे रविवारी ता. 29 एकदिवसीय ग्रामीण मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून यावेळी चर्चासत्र, कविसंमेलनासह विविध सांस्कृतीक कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजन समितीचे जिल्हाध्यक्ष बंटी मईंग यांनी दिली आहे. शिक्षण महर्षी माजी आमदार वसंतराव काळे यांच्या पुण्यतिथिनिमित्त स्व. अजितदादा पवार साहित्य नगरी, पळसप येथे आयोजित संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार विक्रम काळे तर अध्यक्ष म्हणून नांदेड येथील साहित्यिक डॉ. सुरेश सावंत उपस्थित राहतील. यावेळी सकाळी आठ वाजता ग्रंथदिडीचे उद्घाटन जयकुमार शिताळे यांच्या हस्ते होईल. सकाळी दहा वाजता मराठी साहित्य मंडळाचे डॉ. घ. ना. पांचाळ यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी सव्वा दहा वाजता चित्रकार शिवाजीराव हांडे यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन साहित्यीक राजेंद्र अत्रे यांच्या हस्ते होईल. सकाळी साडेदहा वाजता संमेलनाचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजीमंत्री संजयजी बनसोडे, साहित्यक प्रा.फ.म.शहाजिंदे, संमेनाध्यक्ष मा. डॉ. सुरेश सावंत व संमेलनाचे स्वागताध्यक्ष विक्रम काळे यांच्या उपस्थितीत होईल. दरम्यान, दुपारी दिड वाजता बदलते ग्रामीण जीवन या विषयावर परिसंवाद होणार असून यामध्ये प्रा.गंगाधरराव हिंगोले, प्राचार्य डॉ राजकुमार मस्के व प्राचार्य डॉ. कैलास इंगळे इत्यादी विचारवंत सहभागी होणार आहेत. दुपारी तीन ते चार यावेळेत सत्यशिला तौर, डॉ.सुरेश पाटील व स्वाती कान्हेगांवकर यांच्या उपस्थितीत कथाकथन होईल. दुपारी साडेचार वाजताल जिजा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कवी शिवाजी कऱ्हाळे, गोडाती काळे, सिंधुताई दहिफळे इत्यादींचा सहभाग असणार आहे. संध्याकाळी सहा वाजता आमदार सतीश चव्हाण, प्रविण स्वामी यांच्या हस्ते संमेलनाचा समारोप होणार आहे.यावेळी साहित्यिकाचा सत्कार होणार आहे. रात्री आठ वाजता वसंतोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम होईल. या संमेलनात जिल्ह्यातील रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बंटी मईंग, आनंद जाधव, आत्माराम मईंग, मनोहर पोपळाईत, सुभाष जिरवणकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 11:41 am

भाजपमुळे हिंदुत्वाचे अध:पतन:सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधानच उपस्थित नसतील, तर त्याला अर्थ नाही- संजय राऊत

सर्वपक्षीय बैठकीला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी जर उपस्थित नसतील तर त्या बैठकीला काही अर्थ नाही, पंतप्रधान बैठकीला येणार नव्हते तर आम्ही सर्वांनी त्या बैठकीला जाणे टाळायला हवे होते, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर भाजपमुळे हिंदुत्वाचे अध:पतन झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री किंवा पोलिस खाते यांना आता शांतपणे काम करू द्या. रोजच या विषयावर चर्चा करत इतर महत्त्वाच्या विषयाकडे पाणी टाकण्याचे काम करू नये. खरात प्रकरणी तपास सुरू असताना त्यावर संशय व्यक्त करणे योग्य नाही. भाजपमुळे हिंदुत्वाचे अध:पतन संजय राऊत म्हणाले की, भाजप सत्तेत आल्यापासून राजकीय नेतृत्व, अध्यात्म आणि हिंदुत्वाचे अध:पतन झाले आहे. राज्यात जे सध्या सुरू आहे त्यावर कोणावर आणि कितीवेळा बोलणार, मुख्यमंत्री, ज्यांची नावे यामध्ये येत आहेत त्यांनी या विषयावर बोलणं गरजेचे आहे. आमच्या पक्षात काहीही मतभेद नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. मी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा स्थापनेपासूनचा सदस्य आहे. माझ्या जन्मापासून मी या पक्षाचा सदस्य आहे. माझी नियुक्ती बाळासाहेबांनी केली संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना नेते म्हणून नियुक्त केले त्यामधील मी एक आहे. उद्धव ठाकरे आणि माझे काय नाते आहे हे सर्वांना माहिती आहे. उद्धव् ठाकरेंनी बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीला मी हजा नव्हतो. पण त्या बैठकीत कोणी नाराजी व्यक्त केली नाही. नाराजीच्या बातम्यावर जर आम्ही काम करायला लागलो तर पक्ष वाढलाच नसता. उद्धव् ठाकरेंनी बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीत कोणी नाराजी व्यक्त केली नाही. ठाकरे गटाच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा! शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राज्यसभेच्या जागेवरून खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पक्षप्रमुखांसमोरच तीव्र नाराजी व्यक्त केल्याने बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 'आय वॉन्ट टू प्रोटेस्ट' (I want to protest) म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची चर्चा आहे.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 11:36 am

संजय राऊतांनी उबाठा संपवण्याची सुपारी घेतली, भाजपचा आरोप:औरंगजेब फॅन क्लब चालवणाऱ्यांनी हिंदुत्वावर बोलू नये- नवनाथ बन

जनाब संजय राऊत यांचा जन्म शिवसेना वाढवण्यासाठी झाला की शिवसेना संपवण्यासाठी झाला हे महाराष्ट्राने पाहिले आहे. उबाठा गटाकडून संपवण्याची सुपारी तुम्ही काँग्रेसकडून घेतली आहे, म्हणून रोज वायफळ बडबड करत उबाठाचे अस्तित्व संपवण्याचे काम संजय राऊत करत आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, राऊतांनी सांगू नये की माझा जन्म शिवसेनेत झाला, मी जन्मापासून शिवसेनेत आहे हे ऐकून लोकांना हसू येते.कारण तुम्ही शिवसेनेविरोधात लिहलेले लेख जनतेने वाचले आहेत. उबाठाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचे काम तुम्ही करत आहात. येणाऱ्या काळात तुम्ही संपूर्ण उबाठा गट संपवल्याशिवाय राहणार नाही. उबाठामध्ये दोन गट नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटामध्ये संजय राऊत विरुद्ध उद्धव ठाकरे हा सामना जोरात रंगतो आहे. कारण राज्यसभेच्या निवडणुकीत राऊतांनी ज्या पद्धतीने शरद पवारांचे नाव पुढे करत प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याचे काम राऊतांनी केले. त्यामुळे त्यांच्या दिल्लीतील पुस्तक प्रकाशनाला उद्धव ठाकरे गेले नाही.उबाठा गटामध्ये दुफळी माजली आहे. एका बाजूला राऊतांचा गट तर दुसरीकडे ठाकरेंचा गट असल्याचे दिसून येत आहे. राऊत थोड्या दिवसात उबाठा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. कारण उद्धव ठाकरे त्यांना पुन्हा राज्यसभेची संधी देणार नाही हे त्यांना लक्षात आले आहे. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जातील. राऊत सोनिया गांधींच्या चरणी लीन नवनाथ बन म्हणाले की, भाजपमुळे हिंदुत्त्वाचे अध:पतन झाले आहे असा दावा संजय राऊत करत आहेत. ज्यांनी हिंदुत्वांशी फारकत घेत औरंगजेब फॅन क्लब चालवत आहेत त्यांनी भाजपवर टीका करू नये. तुमचे हिंदुत्व काय आहे हे जनतेने पाहिले आहे. तुमच्या हिंदुत्वामुळे तुम्ही काँग्रेसच्या मांडीला-मांडी लावून पुढे बसलात. औरंगजेब फन क्लब आणि अफजल खानाची वंशावळ पुढे जाण्याचे काम तुमच्या बेगडी हिंदुत्वाकडून सुरू आहे. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून सोनिया गांधींच्या चरणी लीन झालात. त्यामुळे जनतेने तुम्हाला नाकारले आहे. तुम्ही हिंदुत्वावर काही बोलू नका तुम्हाला काहीच अधिकार नाही.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 11:16 am

अशोक खरातला संपवून मोकळे व्हावे, चर्चाही नको:नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणावर भिडे गुरुजींची संतप्त प्रतिक्रिया

नाशिकच्या 'भोंदूबाबा' अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणावर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अत्यंत प्रखर शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. अशोक खरातला मारून टाकून मोकळे व्हावे, या प्रकरणावर चर्चासुद्धा करू नये, अशा कडक शब्दांत भिडे गुरुजींनी प्रतिक्रिया दिली आहे. खरातच्या कृत्यांचे एकामागून एक प्रकरण समोर येत असतानाच भिडे गुरुजींच्या विधानाने आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. अशोक खरात याने अध्यात्माच्या नावाखाली अनेक पिडीत महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केवळ शोषणच नव्हे, तर अनेकांना धमकावून त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता हडप केल्याचे गंभीर आरोपही त्याच्यावर आहेत. भीती आणि अंधश्रद्धेचा वापर करून खरातने फसवणुकीचे मोठे साम्राज्य उभे केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट होत आहे. अनेक बडे नेते खरातच्या भेटीसाठी जात असत, तर काही नेत्यांच्या घरी त्याचे येणे-जाणे होते. या संदर्भातील काही फोटो आणि पुरावे समोर आल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. राजकीय वरदहस्तामुळेच खरात इतका मोकाट वागत होता का? असा सवाल आता विरोधकांकडून विचारला जात आहे. चर्चा नको, थेट संपवून टाका! या प्रकरणावर भाष्य करताना संभाजी भिडे गुरुजी यांनी अशा प्रवृत्तींना समाजात स्थान असता कामा नये, अशी भूमिका घेतली. अशा गुन्हेगारांवर वेळ घालवून चर्चा करण्यापेक्षा त्यांना कायमस्वरूपी संपवून टाकणे हाच एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान अशोक खरातच्या विरोधात आता समाजमन आक्रमक झाले असून, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी एल्गार पुकारला आहे. दहावीत नापास, गावात 'कोंबडी चोर' अन् नेव्हीत हमाल अशोक खरात याने आपल्या 'अंकशास्त्रा'च्या जोरावर अनेकांना भुरळ घातली होती. मात्र, प्रत्यक्षात तो दहावीच्या परीक्षेत गणित विषयात नापास झाला होता. वावी येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकत असताना त्याचे वर्तन अत्यंत वादग्रस्त होते. घरून अंडी चोरून ती शाळेत विकणे, यासारख्या उद्योगांमुळे त्याला परिसरात 'कोंबडी चोर' किंवा 'मोटर चोर' म्हणून हिणवले जायचे. खरातने केवळ ज्योतिषशास्त्रातच नव्हे, तर आपल्या पेशाबाबतही खोटे दावे केले होते. मर्चंट नेव्हीमध्ये तो 'हमाल' किंवा खालच्या श्रेणीतील कामगार म्हणून रुजू झाला होता. पाच-सात वर्षांनंतर गावात परतल्यावर त्याने स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घेण्यास सुरुवात केली.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 11:07 am

ठाकरे गटाच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा!:राज्यसभेच्या जागेवरून प्रियंका चतुर्वेदी भडकल्या, संजय राऊतांच्या भूमिकेवर घेतला आक्षेप

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राज्यसभेच्या जागेवरून खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पक्षप्रमुखांसमोरच तीव्र नाराजी व्यक्त केल्याने बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 'आय वॉन्ट टू प्रोटेस्ट' (I want to protest) म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण आलेले आहे. लोकसभेतील संख्याबळ वाढवण्यासाठी शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार फोडणार असल्याचा चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. बैठकीच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी खासदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला. भाजप आणि राष्ट्रवादीचे लोक मला सांगत आहेत की तुमचे खासदार फुटणार आहेत. मात्र, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ही लढाई मी तुमच्याच जीवावर लढत आहे, अशा शब्दांत ठाकरेंनी फुटीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेच्या जागेवरून ठिणगी या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत काय बोलणे झाले, याबाबतही माहिती दिली. काँग्रेसने राज्यसभेच्या जागेसाठी मागणी केली होती. मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चन्नीथला यांनी फोन करून ही जागा काँग्रेसला देण्याची विनंती केली होती. यावर ठाकरेंनी तुम्ही आधी शरद पवारांशी बोला, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय होणार? असे सांगत ही पेचाची परिस्थिती बैठकीत मांडली. याच वेळी प्रियंका चतुर्वेदी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. संजय राऊतांच्या विधानावरून उडाले खटके उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील समन्वयावर बोलत असतानाच प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांना मध्येच थांबवून आक्षेप घेतला. संजय राऊत हे शरद पवार यांच्या संदर्भात वारंवार विधाने का करत आहेत? असा रोकडा सवाल चतुर्वेदी यांनी केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तात्काळ संजय राऊत यांची बाजू सावरून धरली. राऊत बोलले म्हणून काय झाले? पक्षप्रमुख मी आहे, शेवटी अंतिम निर्णय मीच घेणार आहे, अशा शब्दांत ठाकरेंनी चतुर्वेदी यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यातील शीतयुद्ध आता चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मराठवाड्यातील खासदारांचा घरचा आहेर बैठकीत केवळ चतुर्वेदी भडकल्या असे नाही, तर त्यांच्यावरही पक्षांतर्गत टीका झाली. प्रियंका चतुर्वेदींना ६ वर्षे राज्यसभेची संधी देऊन पक्षाचा नेमका काय फायदा झाला? असा बोचरा सवाल मराठवाड्यातील एका खासदाराने बैठक संपल्यावर उद्धव ठाकरेंना केला. दुसरीकडे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरही काही खासदारांनी नाराजी व्यक्त केली. आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत नाहीत, त्यांनी मैदानात उतरले पाहिजे, अशी तक्रार खासदारांनी केली. या टीकेनंतर आदित्य ठाकरे बैठकीत शांत राहिले, मात्र त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 10:39 am

निकृष्ट दर्जाच्या मका बियाण्यांमुळे पोरज येथील शेतकऱ्यांचे नुकसान:मंत्री जाधव यांनी नुकसान भरपाई मिळवून दिल्याने शेतकऱ्यांकडून सत्कार‎

तालुक्यातील पोरज येथील ११ शेतकऱ्यांना बायर कंपनीच्या निकृष्ट दर्जाच्या मका बियाण्यांमुळे लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. या शेतकऱ्यांना कंपनीकडून एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई मिळवून दिल्याबद्दल २२ मार्च रोजी मेहकर येथे जाऊन शेतकऱ्यांनी नामदार प्रतापराव जाधव यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले. पोरज येथील शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींकडून मका बियाण्यांची खरेदी करून पेरणी केली होती. खरेदी वेळी एकरी ४० क्विंटल उत्पादन मिळेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात अत्यल्प उत्पादन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे संबंधित प्रति निधीकडून निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरवण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी २ फेब्रुवारी २०२६ पासून खामगाव येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला तालुका शिवसेना प्रमुख राजेंद्र बघे, अ‍ॅड. अमोल अंधारे, राजेंद्र अमलकार यांनी भेट देऊन शेतकऱ्यांची बाजू जाणून घेतली. तसेच याबाबत ना. प्रतापराव जाधव यांच्याशी संपर्क साधला. यानंतर प्रतापराव जाधव यांनी कृषी अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या सूचना केल्या. ४ फेब्रुवारी रोजी कंपनीचे प्रतिनिधी परम सिंग व तालुका कृषी अधिकारी पवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. या वेळी कंपनीकडून एकरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेतले. त्यानुसार ५ मार्च २०२६ रोजी संबंधित ११ शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली. या प्रसंगी संदीप हेरोडे, देवेंद्र इंगळे, विजय बोराडे, प्रदीप हेरोडे, निलेश वाकोडे, कडूबा शेगोकार, श्याम सकळकडे, अभय बोराडे, चत्तरसिंग बोराडे, शरद बोराडे, संजय काळे यांच्यासह पोरज येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 10:21 am

विदर्भातील शाश्वत शेतीसाठी अपारंपरिक पिकांची साथ गरजेची:कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे प्रतिपादन‎

व्यावसायिक शेती पद्धतीचा अवलंब देशांतर्गत शेती व्यवसायाला शाश्वतेकडे नेणारा ठरणार, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. भाजीपालाशास्त्र विभाग, उद्यानविद्या शाखा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे एकात्मिक उद्यान पिके विकास अभियानांतर्गत सुपारी व मसाला पिके संचालनालय कालिकत, केरळ यांच्या अर्थसहाय्यातून ‘मसाला व सुगंधी वनस्पती पिकांचे शाश्वत उत्पादन व प्रक्रियेसाठी अद्ययावत तंत्रज्ञान’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय शेतकरी चर्चासत्र उद्घाटनप्रसंगी डॉ. गडाख बोलत होते. विदर्भ व मराठवाड्याचा विचार करता अपारंपरिक पिकांचा प्रभावी वापर आवश्यक आहे, असे सांगून विद्यापीठाद्वारे मसाला व सुगंधी वनस्पती पिकांचे क्षेत्र वाढीसाठी राबवलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली. आपल्याकडील जमिनीच्या २० टक्के क्षेत्रावर नगदी अथवा अपारंपरिक पिकांची लागवड करत उत्पादनावर आधारित भविष्यातील पीक पद्धतीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. मिरची व भाजीपाला संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. श्याम घावडे, विसार शिक्षण विभागप्रमुख डॉ. नितीन कोष्टी, भाजीपालाशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विजय काळे, डॉ. अभय वाघ, कृषी विज्ञान केंद्र अकोलाचे डॉ. गजानन तुपकर, कृषीविज्ञान केंद्र वाशीमचे डॉ. निवृत्ती पाटील, कृषी विभागाचे विजय शेगोकार, राज्यभरातून आलेले शेतकरी बंधू व भगिनींची सभागृहात उपस्थिती होती. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तथा दीप प्रज्वलनाने सुरुवात झालेल्या चर्चासत्रात मसाला व सुगंधी वनस्पती पिकांबाबत अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान, पीक संरक्षण, मसाला व सुगंधी वनस्पती पिकांचे मूल्यसंवर्धन तथा प्रक्रिया, विपणन व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. विद्यापीठ प्रक्षेत्र भेटीतून प्रत्यक्ष लागवड तंत्रज्ञान शेतकरी बांधवांना आत्मसात करता येणार आहे. प्रास्ताविक अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. अरविंद सोनकांबळे यांनी केले तर अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई यांनी स्वागतपर भाषण केले. सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले तर डॉ. विजय काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. चर्चासत्र आयोजनासाठी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात उद्यानविद्या विभागाचे अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. उपक्रमास राज्यभरातून बहुसंख्य शेतकऱ्यांची उपस्थित होते. मसाला पिकांचे प्रदर्शन सुद्धा भरवण्यात आले. प्रदर्शनात सहभागी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कृषी विद्यापीठ अथवा तत्सम संस्थांच्या प्रक्षेत्र भेटीने प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहता येते. विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी राज्यांतर्गत शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या अथक प्रयत्नातून व काळसुसंगत शास्त्रीय मार्गदर्शनात राज्यातील मसाला पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. हळद, आले, धने, ओवा, मेथी, मिरची आदी मसाला पिके व सुगंधी वनस्पतींचे उत्पादन घेण्याकडे कल वाढत आहे. विद्यापीठाच्या उद्यानविद्या शाखेने वैदर्भीय शेतीला नवीन दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्याचा उल्लेख केला. शेतकऱ्यांना अपारंपरिक पिकांच्या अद्ययावत लागवड तंत्रज्ञानाबद्द्ल माहिती व प्रक्रिया तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी भाजीपालाशास्त्र विभाग, उद्यानविद्या शाखा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे मसाला व सुगंधी वनस्पती पिकांचे शाश्वत उत्पादन व प्रक्रियेसाठी अद्ययावत तंत्रज्ञान विषयावर २४ व २५ मार्चला दोन दिवसीय राज्यस्तरीय शेतकरी चर्चासत्र कृषी महाविद्यालयाच्या समिती सभागृहात घेण्यात आले. उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. अरविंद सोनकांबळे, फळशास्त्रविभाग प्रमुख डॉ. शशांक भराड यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी, राज्य शासन पुरस्कृत महिला उद्योजक शेतकरी शोभा गायधणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 10:19 am

वैद्यकीय मंत्र्यांचा आदेश डावलून रुग्णांना बाहेरून औषधांचा भुर्दंड:‘सर्वाेपचार’मध्ये बाहेरील औषधांसाठी चिठ्ठी लिहून देणे सुरूच‎

औषध खरेदीसाठी दरवर्षी शासनाकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करुन दिला जातो तरीही येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचालित सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी आवश्यक ती आैषधी बाहेरून आणण्यासाठी चिठ्ठी लिहून दिली जात आहे. यातून ‘जीएमसी’च्या आवारातील खासगी मेडिकल चालकाचा खिसा भरला जात आहे, हे चित्र ‘दिव्य मराठी’ने बुधवारी रुग्णालय परिसरात दुपारी साडेबारा ते दीड वाजेच्या दरम्यान केलेल्या पाहणीत दिसून आले. आ. अमोल मिटकरी यांनी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील औषधांच्या तुटवड्याबाबत १३ मार्च २०२६ ला विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा कोणताही तुटवडा नाही, असा दावा त्यांनी केला होता. अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयाबाबत आलेल्या तक्रारींची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून अहवाल मागवला जाईल. तसेच ‘शासकीय रुग्णालयांत औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. रुग्णांना बाहेरून औषधे लिहून देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. मात्र, त्यांच्या आदेशाला डावलून येथील‘सर्वोपचार’ रुग्णालयात बाहेरील औषधांसाठी चिठ्ठी लिहून देणे सुरूच असून, यामुळे गोरगरीब रुग्णांच्या खिशाला नाहक झळ बसत आहे. उर्वरित पान ४ डॉक्टरांकडून रुग्णांना औषधांची चिठ्ठी देऊन बाहेरील मेडिकलमधून औषधी आणण्यास सांगितले जाते. रुग्णालयाच्या आवारातील एका खासगी मेडिकल दुकानांकडे रुग्णांना पाठवले जात असल्याच्या तक्रारीही आहेत. रुग्णालयाच्या आवारातील या मेडिकलवर औषध खरेदीचा रुग्णांना आग्रह केला जातो. रुग्ण दुसरीकडे गेला तर बऱ्याचदा ती आैषधी उपलब्ध होत नाही, अशी स्थिती आहे. संबंधित डॉक्टरांना आता ‘जीएमसी’ प्रशासन काय तंबी देते, याकडे लक्ष लागून आहे. ...तर इथे करा तक्रार रुग्णांना बाहेरून औषधी केसपेपरवर किंवा साध्या कागदाच्या चिठ्ठीवर लिहून दिल्यास रुग्णांनी तत्काळ संबंधित रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी. याशिवाय शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य विभाग किंवा शासनाच्या हेल्पलाइनवर संपर्क करावा. लेखी तक्रार केल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता अधिक असते.मात्र बहुतांश रुग्ण लेखी तक्रार करण्यास धजावत नाही, त्यामुळे डॉक्टरांचे फावते आहे. सर्व औषधांचा पुरेसा साठा ^अँटीबायोटिक्स, जीवनरक्षक औषधे, लस साठा पुरेसा आहे. रुग्णांना बाहेरून आैषधी लिहून देणे बंद केले आहे. आपल्याकडे उपलब्ध आैषधीची दैनंदिन यादी सर्व डॉक्टरांना दिली जाते. तरी काही डॉक्टर बाहेरची आैषधी लिहत असतील तर त्यांना ते बंद करण्याच्या सूचना तातडीने दिल्या जातील.- डॉ. संजय सोनुने, अधिष्ठाता, जीएमसी. विशिष्ट मेडिकलमधूनच औषधी खरेदीचा आग्रह का? रुग्णांच्या नातेवाइकांचा सवाल

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 10:17 am

रिझर्व्ह बँकेकडून 500 रुपयांच्या नोटांचा नियंत्रित पुरवठा:मार्चएंडच्या पार्श्वभूमीवर निर्णय, ग्राहक जाताहेत शाखेत

रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर पाचशेच्या नोटांचा नियंत्रित पुरवठा होत असल्यामुळे शहरातील एसबीआयच्या एटीएममध्ये मंगळवारी सायंकाळपासून तुटवडा दिसून आला. बुधवारी सकाळी एसबीआयच्या मलकापूर, आदर्श कॉलनी आणि तुकाराम चौकातील एटीएममध्ये पाहणी केली. मलकापूर एसबीआयचे एटीएम बंद होते. आरबीआयकडून पाचशेच्या नोटांचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे कमतरता जाणवत आहे. एटीएममध्ये पाचशेच्या नोटांचे तीन तर शंभरच्या नोटांचा एक स्लॉट असतो. त्यामुळे एकाच स्लॉटमध्ये शंभरच्या नोटा टाकता येतात व लवकर संपून जातात, पाचशेच्या नोटाच नसल्यामुळे आम्ही एटीएम बंद ठेवल्याचे तेथील शाखाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाऊन रक्कम काढता येत आहे. आदर्श कॉलनीतील एसबीआय एटीएममधून दोन हजार रुपयांची रुपयांची रोकड काढली असता एक ५०० रुपयांची आणि १५ शंभर रुपयांच्या नोटा निघाल्या. तर तुकाराम चौकातील एसबीआयच्या एटीएममधून १०० रुपयांच्या नोटा निघत होत्या. दरम्यान, शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियात याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या बँकेला संलग्न ७ एटीएममध्ये कॅश सुरळीत असल्याचे सांगितले. शाखेला एटीएम अटॅच असल्यामुळे त्यांना अडचण आली नाही, असे सेंट्रल बँकेच्या प्रमुख शाखेचे व्यवस्थापक सचिन डोके यांनी सांगितले. दरम्यान, एसबीआयच्या शहरात भरपूर शाखा असून एटीएमची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, एटीएममधून १०० रुपयांच्या चलनात कमी रक्कम निघत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना बँकेच्या शाखेत जाऊन रक्कम काढावी लागत आहे. {ग्राहकांना एटीएममधून मर्यादित रक्कम काढता येत असल्याचे दिसून आले. अधिक रक्कम काढायची असल्यास संबंधित बँक शाखेत जाऊन ग्राहकांना रक्कम काढता येत होती. अनेक ग्राहकांनी एसबीआयच्या शाखेत जाऊन विड्रॉल स्लिप भरत रक्कम काढल्याचे सांगितले. {ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाऊन वेळ खर्ची घालावा लागत आहे. बँकांच्या शाखेत जाऊन पैसे काढण्याचा ग्राहकांना सराव राहिलेला नाही. एटीएममधून पैसे काढून व्यवहार करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. अधिक रकमेसाठी आता बँकेच्या शाखेचाच पर्याय आरबीआयकडून पाचशेच्या नोटांचा पुरवठा कमी ^रिझर्व्ह बँकेने पाचशेच्या नोटांचा पुरवठा कमी केला आहे. पाचशेच्या नोटांचा तुटवडा जाणवत असून पुरवठा करण्याबाबत आरबीआयला तीनदा मेल केला आहे. आरबीआयने एटीएममध्ये वापरण्याजोग्या जुन्या नोटा एटीएममध्ये टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचे काम चालू आहे. नोटांचा पुरवठा ५ एप्रिल नंतर सुरळीत होण्याची शक्यता आहे. - स्वप्निल लग्गड, सहाय्यक व्यवस्थापक, एसबीआय मुख्य शाखा, टॉवर चौक.

दिव्यमराठी भास्कर 26 Mar 2026 10:17 am