SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

26    C
... ...View News by News Source

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल

वाराणसी : प्रयागराज माघ मेळ्यात निर्माण झालेला वाद आता स्वामी अविमुक्तेश्वरानंद काशीत आल्यानंतरही संपला नाही. आमचे प्रमाणपत्र तर तुम्ही मागितले आता मुख्यमंत्री योगी यांनी त्यांचे हिंदू असल्याचे सिद्ध करावे असे सांगत त्यांनी योगींवर हल्लाबोल केला आहे. धर्म आणि सत्ता यात निर्णायक परीक्षेचा काळ आला आहे. स्वतंत्र भारतात गोमातेचे रक्षण आणि गोहत्या बंदी कायद्याची मागणी करणे […] The post स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 9:28 pm

भारत, चीन, रशियाने आणली नवीन ‘पेमेंट सिस्टम’

वॉशिंग्टन : ब्रिक्स देशांच्या वाढत्या शक्तीने अमेरिका नेहमीच अस्वस्त असते. आता या समूहाने डॉलरवरील अवलंबित्व संपवण्यासाठी एक खास मास्टर प्लॅन तयार केला आहे. भारत, चीन आणि रशियाच्या पुढाकाराने आता ब्रिक्स एक विशेष ‘डिजिटल पेमेंट सिस्टम’ आणण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात कामही सुरू झाले आहे. यामुळे ट्रम्प यांचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, समूह नवीन चलन […] The post भारत, चीन, रशियाने आणली नवीन ‘पेमेंट सिस्टम’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 9:26 pm

यूजीसीमुळे भाजपला मोठे नुकसान

नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग(यूजीसी) च्या नव्या नियमांवरून देशभरात वादंग उभं राहिले होते. हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहचला होता. सवर्ण समाजाच्या आक्षेपानंतर कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने सुनावणी घेतली. त्यानंतर यूजीसीच्या नव्या नियमांना स्थगिती देण्याचे आदेश कोर्टाने दिले. आता १९ मार्चला सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यात सरकारकडून आलेल्या उत्तरावर कोर्ट काय […] The post यूजीसीमुळे भाजपला मोठे नुकसान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 9:25 pm

बापू एक व्यक्ती नव्हे तर विचार

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केले. यावेळी, बापू ही केवळ एक व्यक्ती नाही, तर एक असा विचार आहे, जो कधीही नष्ट केला जाऊ शकत नाही. कारण गांधी भारताच्या आत्म्यात अमर आहेत असे म्हणत राहूल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राहुल […] The post बापू एक व्यक्ती नव्हे तर विचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 9:24 pm

अलमट्टी धरणाला राष्ट्रीय दर्जा नाकारला

नवी दिल्ली/सांगली : कर्नाटकातील कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या उंची वाढीला नव्हे तर दुरुस्तीला परवानगी दिली आहे, असा खुलासा केंद्रीय जल आयोगाने केला आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना भेडसावणा-या पुराच्या पार्श्वभूमीवर, कर्नाटकातील अलमट्टी धरणाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यास आणि त्याची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाने नकार दिला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकरी आणि […] The post अलमट्टी धरणाला राष्ट्रीय दर्जा नाकारला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 9:22 pm

ट्रम्प यांनी पीएम मोदींवर वशीकरण केले होते

नवी दिल्ली : देशात यूजीसीच्या नियमांबाबत मोठा वाद निर्माण झाला होता, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती दिल्याने हे प्रकरण संपुष्टात आले. यासोबतच, न्यायालयाने सरकार आणि यूजीसीला नियम नव्याने तयार करण्याचे आणि त्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अयोध्येचे परमहंस आचार्य यांनी याबाबत एक मोठा दावा केला आहे. हा दावा सोशल मीडियावर व्हायरल […] The post ट्रम्प यांनी पीएम मोदींवर वशीकरण केले होते appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 9:21 pm

उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवारच का?:दांडगा राजकीय वारसा, महिलांच्या रोजगारासाठी कार्य..; वाचा सविस्तर राजकीय कारकीर्द

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर आता त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यांचा पदभार स्वीकारणार असल्याचे समोर आले आहे. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार दिला असल्याची माहिती समोर आली असून त्यांचा निरोप नरेश आरोरा हे मुंबईकडे घेऊन जाण्यास निघाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची उद्या महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन सायंकाळी 5 वाजता शपथविधी देखील पार पडण्याची शक्यता आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपण सुनेत्रा पवार यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात.. सुनेत्रा पवारच का? सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यामागे अनेक कारणे आहेत. परंतु, सुनेत्रा पवारच का? जेव्हा पक्षात इतरही अनेक ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत, जसे की छगन भुजबळ असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे देखील आहेत. मात्र, अजित पवार यांच्या पत्नी म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाला पहिली पसंती ही कार्यकर्ते व समर्थकांकडून होतीच शिवाय सुनेत्रा पवार यांना असलेला दांडगा राजकीय वारसा. तसेच त्यांच्याजागी इतर कुठल्या नेत्यांना संधी दिली असती तर राष्ट्रवादीमधील कारभार डळमळीत होण्याची शक्यता होती. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे जबाबदारी दिली असती तर सुनील तटकरे किंवा छगन भुजबळ सारखे ज्येष्ठ व अनुभवी नेते नाराज झाले असते. त्यामुळे अशा महत्त्वाच्या पदावर आणि पक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी तिथे ‘पवार’च पाहिजे होता. त्यानुसारच सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त आहे. दांडगा राजकीय वारसा सुनेत्रा पवार या धाराशिवचे नेते स्व. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत, तर राणाजगजितसिंह पाटील यांच्या त्या आत्या लागतात. धाराशिवच्या राजकारणात पद्मसिंह पाटलांचा चांगलाच दबदबा होता. त्यांचा वारसा राणाजगजितसिंह पाटील पुढे नेत आहेत. सुनेत्रा पवार या नेहमी सांगतात की, राजकारण आणि सामाजिक कार्याबद्दलची त्यांची आवड त्यांच्या वडिलांकडून आली आहे. ते स्वातंत्र्यसैनिक होते आणि गावातील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते. त्यांनी हेही सांगितले की, त्यांचे बालपण घराघरात जाऊन लोकांना भेटत, त्यांच्याशी संवाद साधत गेले आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार या पवार घरण्याशी जोडल्यानंतर पुन्हा राजकारण अगदी जवळून त्यांना अनुभवता आले आहे. महिलांच्या रोजगारासाठी टेक्सटाइल पार्क सुनेत्रा पवार यांना पर्यावरणाची तसेच स्वच्छतेची आवड आहे. ही आवड जोपासण्यासाठी त्यांनी बारामती येथे एन्व्हायरनमेंटल फोरम ऑफ इंडिया ही सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्या पर्यावरणाशी निगडीत काम करत आल्या आहेत. महिलांना रोजगार मिळावा यासाठी सुनेत्रा पवारांनी टेक्सटाइल पार्कची सुरुवात केली. या पार्कमध्ये हजारो महिलंनया रोजगार उपलब्ध झाला आहे. 2006 पासून या पार्कचे अध्यक्षपद हे सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. याचसोबत विद्या प्रतिष्ठान या संस्थेवरही त्या विश्वस्त म्हणून काम करत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात 2023 साली अजित पवारांनी वेगळे होत राष्ट्रवादी पक्ष फोडत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2024 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना निवडणुकीत उतरवले. सुनेत्रा पवारांचा तेव्हा सामना झाला होता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी. हा काळ अजित पवारांसाठी कठीण काळ होता, पण अशा परिस्थितीत देखील सुनेत्रा पवारांनी अजितदादांना खंबीर साथ दिली आणि जोरदार प्रचार केला. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. लोकसभेत जरी पराभव झाला असला तरी सुनेत्रा पवारांची वर्णी राज्यसभेवर लावण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक झाली. या जागेसाठी सुनेत्रा पवारांनी 13 जून 2024 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेच्या सदस्यपदावर निवड झाली. पार्थ पवार आणि जय पवारांकडे राजकारणाच्या अनुभवाचा अभाव तर दुसरीकडे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे अद्याप राजकारणाचा तेवढा अनुभव नाही. पार्थ पवारांचा मागच्या निवडणुकीत पराभव झाला होता. यावरून अजित पवारांवर जोरदार टीका देखील झाली होती. स्वतःच्या मुलाला निवडून आणता आले नाही, म्हणत विरोधकांनी टीका केली होती. तर जय पवार राजकारणापासून अंतर ठेऊनच असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे कुठली मोठी जबाबदारी देणे जवळपास अशक्यच आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यामुळे महिला वर्गाचा देखील येत्या काळात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री पदावर महिला चेहरा असणे एवढे देखील महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना पाठबळ देते. त्यामुळे ही बाजू देखील मजबूत ठरत आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:55 pm

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार:पद स्वीकारण्यास होकार; राष्ट्रवादी कॉंग्रेसची उद्या महत्त्वाची बैठक

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदावर कोण बसणार, अशी चर्चा सुरू झाली असून यात सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास होकार दिला असल्याचे समजते. तसेच उद्याच सायंकाळी 5 वाजता शपथविधी देखील पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाची शनिवारी सकाळी 11 वाजता महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीत उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जात आहे. उद्याच्या बैठकीत सगळ्यांचे एकमत झाले तर उद्याच शपथविधी होऊ शकतो, असे सूचक विधान छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना केले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरतील. तसेच नरेश आरोरा हे सुनेत्रा पवारांचा निरोप घेऊन मुंबईकडे रवाना झाल्याचे देखील समोर आले आहे. राजकीय गोष्टींची चर्चा करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी नरेश आरोरा यांना बारामती येथे बोलावले असल्याची माहिती आहे. त्यानुसार नरेश आरोरा आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर त्यांचा निरोप घेऊन आरोरा मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे. काय म्हणाले होते छगन भुजबळ? पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, लोकांची जी मागणी आहे ती रास्त आहे. सुनेत्रा ताईंकडे पक्ष प्रमुख पद देण्यात यावे. अनेक लोकांची अशी मागणी आहे आणि त्यात काही चूक आहे, असे मला वाटत नाही. पण शेवटी याबाबत जो काही निर्णय होणार आहे तो सीएलपीमध्ये होईल. भुजबळ यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेविषयी विचारले असता, त्यांनी याबाबत मला फारसे काही माहित नसल्याचे स्पष्ट केले आहे. धार्मिक विधी झाल्यानंतर ठरवू- सुनील तटकरे सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यासंदर्भात बोलताना म्हणाले, आज मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हे खरे आहे. सुनेत्रा वहिनी आणि कुटुंब धार्मिक विधीमध्ये आहेत. धार्मिक विधी झाल्यानंतर आम्ही सर्व चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही ठरवू. जे काही जनतेच्या मनात आहे, कार्यकर्त्यांच्या मनात आहे त्यानुसार निर्णय घेऊ. आज आपण पाहत आहोत की संपूर्ण राज्य शोकात आहे. दादांचे सर्व पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवले आहेत. त्यातच आम्ही आहोत, असे तटकरे यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 7:56 pm

मुंब्रा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी:3 महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण करणाऱ्या टोळीला अकोल्यातून अटक

मुंब्रा परिसरातून अवघ्या 3 महिन्यांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या एका टोळीचा मुंब्रा पोलिसांनी छडा लावला आहे. पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील खेटरी गावातून आरोपींना ताब्यात घेऊन चिमुरडीची सुखरूप सुटका केली आहे. दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास फिर्यादी फरजाना मोहम्मद फिरोज मन्सुरी या आपल्या दोन मुलींना घेऊन मुंब्रा येथील खडीमशीन रोडवरून जात होत्या. त्यांची मोठी मुलगी रडत असल्याने एका अनोळखी बुरखाधारी महिलेने मदतीचा बहाणा केला. 'छोटी बच्ची को मेरे गोद मे देदो, मै भी सामने ही जा रही हूँ' असे म्हणून तिने 3 महिन्यांच्या आफियाला आपल्या कडेवर घेतले आणि संधी मिळताच तिथून पळ काढला. तपासाचे मोठे आव्हान आणि पोलिसांचे चातुर्य या घटनेनंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासासाठी तात्काळ 4 पथके तैनात करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी अत्यंत चिकाटीने काम केले. मुंब्रा ते सीएसएमटी आणि मुंब्रा ते टिटवाळा या दरम्यानचे सुमारे 1600 सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. विशेष म्हणजे आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बाळाचे कपडे आणि स्वतःचा बुरखा बदलला होता. अशा परिस्थित मोठे आव्हान असताना पोलिस पथकाने सलग 6 दिवस दररोज 16 ते 18 तास काम करून तपासाचे धागेदोरे जोडले. अकोल्यात पडली झडप तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी प्रथम मुंब्रा येथील नसरीन इकलाख शेख हिला ताब्यात घेतले. तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस पथकाने थेट अकोला गाठले. तेथून मोहम्मद मुजीब गुलाब (31 वर्षे) आणि त्याची पत्नी खैरुणिसा मुजीब मोहम्मद (30 वर्षे) यांना अटक करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक ठाणे शहराचे पोलिस आयुक्त अशुतोष डुंबरे, सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाखरे करत आहेत. आरोपींची सविस्तर माहिती या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. नसरीन इकलाख शेख ही महिला मुंब्रा येथील शादी महल हॉल रोड, इन्शानगर भागात राहणारी आहे. सीसीटीव्ही तपासात ती मुंब्रा रेल्वे स्टेशनवरून रिक्षानी जाताना दिसली होती. तिच्याच माहितीवरून पोलिसांनी मुख्य आरोपींचा शोध लावला. मोहम्मद मुजीब गुलाब (वय 31 वर्षे) हा मुख्य आरोपी अकोला जिल्ह्यातील खेटरी (ता. पातुर) येथील हाजी नगरचा रहिवासी आहे. तो मुंब्रा रेल्वे स्टेशनवर अपहरण करणाऱ्या महिलेची वाट पाहत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले होते. खैरुणिसा मुजीब मोहम्मद (वय 30 वर्षे) ही मोहम्मद मुजीबची पत्नी असून ती देखील या गुन्ह्यात सामील होती. तिला आणि तिच्या पतीला अकोल्यातून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 3 महिन्यांची मुलगी आफिया हिला सुखरूप ताब्यात घेतले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 6:59 pm

साहेब आणि दादा आम्हाला वेगळे कधीच नव्हते:अजित पवारांच्या आठवणीने संदीप क्षीरसागर यांना अश्रू अनावर; पवार कुटुंबासोबतच राहण्याचा निर्धार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात अकाली निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. बारामतीमध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. बारामती येथे अजित पवारांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर अनेक ठिकाणी शोक सभांचे आयोजन करण्यात आले. बीड येथे झालेल्या शोकसभेत शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. साहेब आणि दादा आम्हाला वेगळे कधीच नव्हते, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच आपण पवार कुटुंबीयांच्या निर्णयासोबत राहणार असल्याचे क्षीरसागर यांनी म्हटले आहे. बीड येथे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत संदीप क्षीरसागर यांना भावना अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. पवार कुटुंब एकत्र बसून जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही राहणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले. साहेब आणि दादा आम्हाला वेगळे कधीच नव्हते, असे म्हणताना क्षीरसागर यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. संदीप क्षीरसागर म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी वेगळे झाले तेव्हा आम्ही साहेबांना म्हणत होतो की अजित दादांच्या हातात तुम्ही सूत्र द्या, आता देखील पवार कुटुंब एकत्र बसून जो निर्णय घेतील आम्ही त्या निर्णयासोबत आहोत. पवार कुटुंबाशिवाय आम्हाला काहीच दिसत नाही, असे क्षीरसागर म्हणाले. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबतच्या हालचाली सुरू अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात वेग आला असून, पक्ष एकत्रीकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय पवार कुटुंबीय लवकरच एकत्र बसून घेण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी झालेल्या प्राथमिक चर्चांमध्ये सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे आणि शशिकांत शिंदे यांसारख्या प्रमुख नेत्यांचा सहभाग होता. मात्र आता बदललेल्या परिस्थितीत संपूर्ण पवार कुटुंब या विषयावर सविस्तर विचारमंथन करणार असून, विलीनीकरणाबाबतचा अंतिम शब्द ज्येष्ठ नेते शरद पवार यांचाच असेल, अशी माहिती समोर येत आहे. अजित पवार NCP एकीकरणासाठी सकारात्मक होते; जयंत पाटलांचा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या एकीकरणाबाबत पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली असून, शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र यावेत, हीच आपली सुरुवातीपासूनची भूमिका होती, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच एकीकरणाच्या मुद्द्यावर इतक्या ठाम शब्दांत प्रतिक्रिया देण्यात आल्याने, राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 6:40 pm

हिंगोलीच्या शाळांचा कायापालट:पंजाबच्या महिला सरपंचांचे पथक भारावले, जिल्ह्याचा अभ्यास दौरा उत्साहात

लोकसहभागातून शाळेचा झालेला कायापालट, शाळेची वाढती गुणवत्ता पाहून पंजाब राज्यातील महिला सरपंचांचे शिष्टमंडळ भारावून गेले. यावेळी त्यांनी विद्यार्थीनींशी संवाद साधला तसेच ग्रामपंचायतची कामकाज व कामे पाहून कौतूक केले. पंजाब राज्यातील महिला सरपंचांचे पथक हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहे. या पथकामध्ये 45 महिला सरपंच असून त्यांच्याकडून जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती कामकाजाची पाहणी करून माहिती घेतली जात आहे. या शिवाय शाळा, अंगणवाडी केंद्रांनाही भेटी दिल्या जाणार असून गावात शासकिय योजनांच्या माध्यमातून केली जाणारी कामे, लोकसहभागातून केली जाणारी कामे याची माहितीही घेतली जाणार आहे. ता. 1 फेब्रुवारी पर्यंत हे पथक जिल्ह्यात पाहणी करणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने विस्तार अधिकारी व ग्रामसेवकांची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, आज या पथकाने औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी गावाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ग्रामसेवक सुनील मुळे, गावकरी बापुराव घोंगडे यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षकांची उपस्थिती होती. यावेळी गावकरी घोंगडे यांनी या पथकाला लोकसहभागातून शाळेची रंगरंगोटी, वृक्षलागवड, मैदानाची साफसफाई केल्याचे सांगितले. सदर सर्व कामे गावकऱ्यांनी श्रमदान करून केल्याचेही त्यांनी सांगितले. तर शाळेसाठी दानशूर व्यक्तीमत्व म्हणून ओळख असलेल्या दोडल परिवाराने सुमारे दोन ते अडीच एकर जागा दिल्याचेही त्यांनी सांगितले. या शिवाय शाळेतील गुणवत्तेबाबत मुख्याध्यापक व शिक्षकांनी माहिती दिली. शाळेसाठी गावकऱ्यांनी दिलेला लोकसहभाग, शाळेची गुणवत्ता पाहून महिला सरपंचाचे पथक भारावून गेले. यावेळी गावातील कामे पाहून त्यांनी गावकऱ्यांचे कौतूक केले.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 6:11 pm

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यात सर्वधर्म प्रार्थना:गांधी विचार कधीही संपणार नाहीत, ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांचे प्रतिपादन

महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त पुणे येथील गांधी भवन, कोथरूड येथे शुक्रवारी सर्वधर्म प्रार्थना आणि भजन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि माजी आमदार उल्हास पवार यांनी गांधी विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, गांधी विचार कधीही संपणार नाहीत आणि त्यांना जगभरात मान्यता व सन्मान आहे. कार्यक्रमात 'मानवतेसाठी लढणारा महात्मा' या अॅड. शंकर निकम लिखित पुस्तकाचे प्रकाशन शीलाताई बाबा आढाव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उल्हास पवार यांच्यासह डॉ. चैत्रा रेडकर, लक्ष्मिकांत देशमुख आणि अन्वर राजन व्यासपीठावर उपस्थित होते. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीने या कार्यक्रमाचे संयोजन केले. उल्हास पवार यांनी आपले अनुभव कथन करताना सांगितले की, लंडन आणि वॉशिंग्टन येथे गांधीजींच्या जीवनावर आधारित चित्रपटांचे सर्व शो हाऊसफुल्ल होते. तेथे तीन पिढ्या एकत्र बसून चित्रपट पाहत होत्या. परदेशी नागरिक गांधीजींच्या देशातून आलेला म्हणून त्यांच्याशी संवाद साधत होते. हे गांधी विचारांच्या जागतिक प्रभावाचे द्योतक आहे. पवार पुढे म्हणाले की, गांधीजींच्या हत्येचे सहा वेळा प्रयत्न झाले आणि त्यांचे विचार संपवण्याचे अनेकदा प्रयत्न झाले व आजही होत आहेत. गांधीजींची हत्या झाली असली तरी त्यांचे विचार आजही लोकांच्या मनात, विचारात आणि आचरणात जिवंत आहेत. त्यांच्यावर असंख्य पुस्तके लिहिली गेली आहेत. अॅड. शंकर निकम यांनी गांधी विचारांचा अतिशय बारकाईने मागोवा घेतला असून, त्यांचे वाचन व चिंतन सर्व वयोगटातील लोकांनी करावे असे आवाहन त्यांनी केले. डॉ. चैत्रा रेडकर यांनी गांधीजींच्या जात निर्मूलनाविषयीच्या कार्यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, गांधीजींनी जात नको, पण ज्या व्यवसायामुळे जात नावास आली, तो व्यवसाय आणि ते कलाकौशल्य टिकवले पाहिजे अशी भूमिका घेतली होती. तेल घाणा कसा चालवायचा याचे ज्ञान तेली समाजातील व्यक्तींना आहे, त्याचा उपयोग राष्ट्रनिर्मितीसाठी आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी होऊ शकतो. त्यांनी स्पष्ट केले की, तेली समाजाला वर्षानुवर्षे जातीवरून हिणवले गेले, त्यामुळे तरुण पिढी आता इतर व्यवसाय आणि नोकरीकडे वळत आहे. अशा स्थितीत जात नको, पण व्यवसाय टिकवा असे गांधीजींचे मत होते. समाजात द्वेष पसरवण्यासाठी समाजमाध्यमातून गांधीजींविषयी जो अपप्रचार केला जातो, त्याला अभ्यासपूर्ण लेख आणि अनुभवाद्वारे नेस्तनाबूत करण्याची गरज आहे. अॅड. निकम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गांधीजींनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या माध्यमातून इंग्रजांवर दबाव आणला. त्यांच्या आंदोलनात प्रत्येक जाती, धर्म आणि व्यवसायाचे लोक सहभागी होते.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 6:03 pm

पुणे पोलिस दलात मोठे फेरबदल:30 पोलिस निरीक्षकांच्या शहरांतर्गत बदल्या, अमितेश कुमार यांनी बजावले आदेश

पुणे शहर पोलिस दलातील ३० पोलिस निरीक्षकांच्या शहरांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी (२९ फेब्रुवारी) याबाबतचे आदेश जारी केले. या बदल्यांमध्ये विविध पोलिस ठाण्यांमधील आणि विभागांमधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रशासकीय सोयीसाठी आणि कार्यक्षमतेसाठी या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांमध्ये जयंत राजुरकर (गुन्हे, सहकारनगर ते समर्थ पोलिस ठाणे), राघवेंद्रसिंह क्षीरसागर (कल्याण ते उत्तमनगर), विनय पाटणकर (नियंत्रण कक्ष ते सिंहगड पोलिस ठाणे), मारुती पाटील (वाहतूक नियंत्रण विभाग ते येवलेवाडी पोलिस ठाणे), संतोष खेतमाळस (आर्थिक गुन्हे शाखा ते लष्कर पोलिस ठाणे), नंदकुमार गायकवाड (पर्वती पोलिस ठाणे ते वाघोली पोलिस ठाणे) यांचा समावेश आहे. तसेच, मनिषा पाटील (मार्केटयार्ड ते लोहगाव पोलिस ठाणे), विश्वजीत जगताप (लोहगाव ते मार्केटयार्ड पोलिस ठाणे), राजेंद्र सहाणे (वाहतूक शाखा ते पर्वती), महेश बोळकोटगी (शिवाजीनगर ते वारजे माळवाडी पोलिस ठाणे), उमेश गित्ते (समर्थ ते गुन्हे लक्ष्मीनगर पोलिस ठाणे), मोहन खंदारे (उत्तमनगर ते आर्थिक गुन्हे शाखा) यांची बदली झाली आहे. दिलीप दाईगडे (सिंहगड ते गुन्हे शाखा), अमर काळंगे (येवलेवाडी ते गुन्हे शिवाजीनगर), युवराज हांडे (वाघोली ते गुन्हे शाखा), विश्वजीत काईगडे (वारजे माळवाडी ते गुन्हे शाखा), माया देवरे (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा), मनोजकुमार लोंढे (गुन्हे शाखा ते गुन्हे, सहकारनगर पोलिस ठाणे) यांना नवीन पदस्थापना मिळाली आहे. याशिवाय, निलेश बडाख (गुन्हे, वारजे माळवाडी ते गुन्हे मुंढवा पोलिस ठाणे), पल्लवी मेहेर (गुन्हे, येरवडा ते गुन्हे, वाघोली पोलिस ठाणे), नितीन भोयर (गुन्हे, सिंहगड रोड ते विशेष शाखा), जितेंद्र कदम (गुन्हे शाखा ते कल्याण शाखा), सुनिता नवले (गुन्हे, मार्केटयार्ड ते गुन्हे, येवलेवाडी पोलिस ठाणे), धनंजय पिंगळे (गुन्हे, शिवाजीनगर ते वाहतूक शाखा) आणि गिरीश दिघावकर (लष्कर ते शिवाजीनगर पोलिस ठाणे) यांचाही बदली झालेल्यांमध्ये समावेश आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 6:00 pm

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार सक्रिय:दूषित झालेल्या नीरा नदीची केली पाहणी, बारामतीकरांना आता 'साहेबांचा' आधार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती व येथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची भावना ही पोरकेपणाची झाली होती. परंतु, आज अजित पवारांच्या अस्थि विसर्जनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे स्वतः बारामतीमध्ये सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज बारामती येथे शरद पवारांकडून नीरा नदीची पाहणी करण्यात आली. अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. विशेषतः बारामतीमध्ये सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे, आता अजितदादानंतर बारामतीकडे कोण बघणार, इथल्या लोकांच्या समस्या कोण बघणार, असा प्रश्न बारामतीकरांना पडला होता. परंतु, अजित पवारांच्यानंतर आता शरद पवार बारामतीमध्ये सक्रिय झाले आहेत. त्यांनी येथील नीरा नदीची पाहणी केली आहे. नीरा नदीबद्दल सातत्याने चर्चा होती की नीरा नदी प्रदूषित झाली आहे. आता त्याची पाहणी करून यासंदर्भात शरद पवारांनी माहिती घेतली आहे. अजितदादांच्या निधनाने शरद पवार खचल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आज शरद पवारांनी पुन्हा कामाला सुरुवात करत बारामतीकरांना विश्वास धीर देण्यासाठी सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार जेव्हा नीरा नदीची पाहणी करण्यासाठी पोहोचले तेव्हा येथील स्थानिकांनी कार्यकर्त्यांनी येथील तक्रारी व समस्या मांडल्या. नदीचे पाणी क्षारयुक्त झाले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या दूषित पाण्यामुळे शेतीवर परिणाम होत असून जमिनी सुद्धा क्षारपट झाल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले आहे. तसेच नीरा नदीत कारखान्याचे दूषित पाणी सोडल्याने नदीचे पाणी खराब झाले आहे. यावर कारखान्यांनी आता वेस्ट पाणी टाकणार नाही असे सांगितले असेल तरी इतर अनेक घटकांमुळे पाणी दूषित होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यावेळी शरद पवारांनी नदीच्या भागातील सर्व कारखान्यांची नावे घेतली. ज्यातून दूषित पाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कारखान्यांचे जे दूषित पाणी येत आहे, ते नदीत सोडण्यापेक्षा बॉयलर सिस्टम आणावी, अशी मागणी स्थानिकांनी शरद पवारांकडे केली आहे. अजित पवारांनी देखील खूप लक्ष घातले असल्याची आठवण देखील यावेळी स्थानिकांनी सांगितली. अनेक वर्षांपासून बारामतीची जबाबदारी शरद पवारांनी अजित पवारांकडे सोपवली होती. त्यानंतर शरद पवार हे देशाच्या राजकारणात सक्रिय होते. अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला. अनेक विकासकामे इथे केली. मात्र, अजितदादांच्या अकाली निधनानंतर आता शरद पवारांनी पुन्हा एकदा बारामतीचे सूत्र हाती घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 5:50 pm

दगडूशेठ ट्रस्टकडून 1771 दिव्यांगांना कृत्रिम अवयव:'जय गणेश रुग्णसेवा' अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या पुढाकाराने 'जय गणेश रुग्णसेवा' अभियानांतर्गत महाराष्ट्रातील 1771 दिव्यांगांना कृत्रिम अवयव प्रदान करण्यात येत आहेत. पुण्यातील थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील ट्रस्टच्या आरोग्य सेवा केंद्र, हिराबाग कोठी येथे हे शिबीर आठवडाभर चालणार आहे. हे शिबीर टाटा ऑटोकॉम सिस्टिम्स, पिनॅकल इंडस्ट्रीज आणि श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती, जयपूर फूट, इंदूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी टाटा ऑटोकॉम सिस्टिम्स लि. चे व्हाईस चेअरमन डॉ. अरविंद गोयल, सुमती गोयल, पिनॅकल इंडस्ट्रीज लि. चे चेअरमन डॉ. सुधीर मेहता, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे आणि सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. सुधीर मेहता म्हणाले की, एकत्रितपणे काम केल्याने मोठे यश मिळते, जे एकट्याने शक्य नाही. गरजू रुग्णांपर्यंत पोहोचणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. अनेकांची मानसिकता असते की अवयव नसतील तर काम थांबते, पण कृत्रिम अवयव लावल्यानंतर काम सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे. डॉ. अरविंद गोयल यांनी सांगितले की, पुण्याप्रमाणेच भविष्यात नागपूर आणि विदर्भातही अशी शिबिरे आयोजित केली जातील. तसेच दिव्यांगांना रोजगार निर्मितीसाठीही प्रयत्न केले जातील. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी माहिती दिली की, पुण्यासह लातूर, परभणी, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, धाराशिव येथून अनेक दिव्यांग या शिबिरासाठी आले आहेत. गोवा राज्यातूनही काही रुग्ण सहभागी झाले आहेत. ट्रस्टच्या पुढाकाराने आतापर्यंत 7 हजार दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्यात आले आहेत. या शिबिरात व्हीलचेअर, कुबड्या, काठ्या, कॅलिपर आणि जयपूर फूट प्रदान केले जात आहेत. विशेष म्हणजे, पोलिओग्रस्त लहान मुलांसाठी विशेष व्हीलचेअरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 5:26 pm

सोने, चांदीचे दर घसरले

जळगाव : प्रतिनिधी शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी दिवसभरात चांदीचे दर चार लाखांवर, तर २४ कॅरेट सोन्याचे दर एक लाख ८० हजारांवर पोहोचले होते. परंतु, शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही धातूंच्या दरात मोठी घसरण झाली. उच्चांकी दरवाढीला अचानक ब्रेक लागल्याने ग्राहकांना ब-यापैकी दिलासा मिळाला. दोन्ही मौल्यवान धातूंच्या बाजारात शुक्रवारी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. गेल्या काही सत्रांत […] The post सोने, चांदीचे दर घसरले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 5:26 pm

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रंगावलीतून सन्मान:दत्तमंदिर ट्रस्टतर्फे भव्य कलाकृती साकारत अभिवादन

पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे भव्य रंगावलीतून अभिवादन करण्यात आले. बुधवार पेठेतील शतकोत्तर परंपरा लाभलेल्या या दत्तमंदिरासमोर ही कलाकृती साकारण्यात आली आहे. या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. रजनी उकरंडे, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, उत्सव प्रमुख महेंद्र पिसाळ, उप उत्सवप्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनिल रुकारी, राजेंद्र बलकवडे यांच्यासह सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले की, रांगोळी ही जमिनीवर साकारणारी कलाकृती आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोडलेले नेते आहेत. त्यामुळे रांगोळीद्वारे त्यांचा सन्मान करण्यात आला. मंदिरासमोर साकारलेली ही रंगावली तब्बल २० बाय २५ फूट आकाराची असून, श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनच्या कलाकारांनी ती तयार केली आहे. ही रंगावली रविवार, दि. १ फेब्रुवारीपर्यंत पाहण्यासाठी उपलब्ध असेल. अजित पवार यांना अभिवादन करण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. शनिवारी युवा, तर रविवारी रंगणार बालसाहित्य संमेलन विवेक व्यासपीठ, विवेक साहित्य मंच, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, शिक्षण विवेक, विवेक नुक्कड साहित्य मंच, युवाविवेक, शिल्पकार चरित्रकोश, श्री मुकुंद भवन ट्रस्ट, पुणे मराठी ग्रंथालय आणि विदिशा विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ३१ जानेवारी रोजी यंदाचे युवा साहित्य संमेलन आणि रविवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी बालसाहित्य संमेलन रंगणार असून दोन दिवस वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारांसह कला-संगीताची अनोखी पर्वणी रसिकांना विनामूल्य अनुभवता येणार आहे, अशी माहिती विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांनी दिली आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेते अॅम्फी थिएटर, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे दोन दिवसांचे संमेलन होणार आहे. शनिवार दिनांक ३१ जानेवारी रोजी होणाऱ्या युवा साहित्य संमेलनाचा प्रारंभ सकाळी १० वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या 'गाव हा माझा' आणि अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्सच्या 'रागमाला' या कार्यक्रमांनी होणार आहे. तर युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन आणि 'आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश खंडा'चे (उद्योग-अर्थकारण-क्रीडा आणि समाजकारण - राजकारण-पत्रकारिता) प्रकाशन सकाळी ११ वाजता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे भूषविणार आहेत. या कार्यक्रमाला विश्वविजेत्या नेमबाज तेजस्विनी सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 5:16 pm

सोडियम आयन बॅटरी विकसित, लिथियमला पर्याय:डॉ. विलास शेळके यांना यश; ARAI ची मान्यता

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम बॅटरीमुळे होणाऱ्या आगीच्या घटनांवर तोडगा काढण्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय समोर आला आहे. पुण्यातील शास्त्रज्ञांनी सोडियम आयन बॅटरी विकसित केली असून, तिला ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) ची मान्यता मिळाली आहे. यामुळे लवकरच लिथियम बॅटरीऐवजी सोडियम आयन बॅटरीचा वापर शक्य होणार आहे. ही बॅटरी रिचार्जीयन एनर्जी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास शेळके यांनी विकसित केली आहे. मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC) येथे आयोजित ‘सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी’ या प्रदर्शनात ती सादर करण्यात आली. आगामी आठ ते नऊ महिन्यांत ही बॅटरी भारतीय बाजारात उपलब्ध होईल, अशी माहिती डॉ. शेळके यांनी दिली. त्यांची कंपनी पाषाण येथील NCL इनोव्हेशन पार्कमध्ये कार्यरत आहे. ARAI च्या ‘टेक्नोव्हस’ या स्टार्टअपसाठी असलेल्या विशेष व्यासपीठाच्या माध्यमातून रिचार्जीयन एनर्जीला सुरुवातीला तांत्रिक मदत आणि निधी मिळाला. त्यानंतर केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय, इंडो-यूएस प्रोग्राम आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांच्या माध्यमातून सुमारे ४ कोटी रुपयांचा संशोधन व विकास निधी उपलब्ध झाला. डॉ. शेळके यांनी स्पष्ट केले की, लिथियम बॅटरीसाठी लागणारे लिथियम, कोबाल्ट आणि निकेल भारतात उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणावर आयात करावे लागते. याशिवाय, लिथियम बॅटरीचे आयुष्य सहा ते सात वर्षे असते, चार्जिंगसाठी अधिक वेळ लागतो आणि आग लागण्याचा धोका असतो. याउलट, सोडियम आयन बॅटरीसाठी लागणारे सोडियम भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ही बॅटरी ऍग्री वेस्टपासून तयार केली जाते आणि तिची संपूर्ण उत्पादन प्रक्रिया देशातच होणार आहे. ARAI ने १२० अंश सेल्सिअस तापमानावर केलेल्या चाचणीत ही बॅटरी सुरक्षित ठरली आहे. या बॅटरीची चार्जिंग वेळ केवळ ३० मिनिटे आहे, तिचे आयुष्य सुमारे २२ वर्षे असून, किंमत लिथियम बॅटरीपेक्षा २५ ते ३० टक्के कमी असेल. पहिल्या टप्प्यात दुचाकींसाठी, त्यानंतर तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी ही बॅटरी उपलब्ध होईल. भविष्यात पुण्यात उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना असून, त्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचे डॉ. शेळके यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 5:15 pm

ऑनलाईन बेटिंग ॲप्समुळे हजारो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त:नागरिक सोशल फाउंडेशनची कठोर कायदेशीर निर्बंधांची मागणी

भारतात गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन बेटिंग, गॅम्बलिंग आणि फँटसी स्पोर्ट्स ॲप्सच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांचे व्यवहार होत आहेत. या वाढत्या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असली तरी, हजारो कुटुंबांचे आर्थिक आणि सामाजिक आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक सोशल फाउंडेशन, पुणे या संस्थेने या ॲप्सवर कठोर कायदेशीर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. या ॲप्समुळे कर्जबाजारीपणा, मानसिक नैराश्य, कौटुंबिक ताणतणाव आणि आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. विविध राज्य सरकारांच्या नोंदीनुसार, ऑनलाईन जुगाराच्या व्यसनामुळे देशभरात १०० ते १५० पेक्षा अधिक आत्महत्यांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अंदाजानुसार, दरवर्षी सुमारे ₹१५ हजार ते ₹२० हजार कोटी रुपयांचे थेट आर्थिक नुकसान भारतीय नागरिकांना या ॲप्समुळे सहन करावे लागत आहे. तपास यंत्रणांनी या प्लॅटफॉर्म्सचा वापर मनी लॉन्डरिंग, हवाला व्यवहार, आतंकवादी फंडिंग, मानव तस्करी आणि इतर समाजविघातक गुन्ह्यांसाठी होत असल्याचेही स्पष्ट केले आहे. या गंभीर परिणामांवर सखोल अभ्यास करून नागरिक सोशल फाउंडेशनने महाराष्ट्र राज्य सरकार तसेच भारत सरकारच्या गृह मंत्रालय आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे. या निवेदनात ऑनलाईन बेटिंग, गॅम्बलिंग आणि फँटसी स्पोर्ट्स ॲप्सवर कठोर कायदेशीर निर्बंध आणण्याची तसेच त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिक सोशल फाउंडेशनचे अॅड. सर्वेश मेहंदळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नामवंत सेलिब्रिटी आणि क्रीडापटू मोठ्या मोबदल्यात या ॲप्सचे प्रमोशन करत असल्यामुळे युवकांमध्ये या प्लॅटफॉर्म्सबाबत आकर्षण वाढले आहे. यामुळे विद्यार्थी, युवक आणि मध्यमवर्गीय कुटुंबे सर्वाधिक बाधित होत आहेत. त्यामुळे प्रस्तावित ऑनलाईन गेमिंग (प्रमोशन व रेग्युलेशन) कायदा हा केवळ कायदेशीर सुधारणा नसून, समाजाच्या आरोग्यासाठी आणि युवकांच्या भविष्याच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक पाऊल ठरणार आहे. यावेळी नागरिक सोशल फाउंडेशनचे अमेय सप्रे आणि प्रीतम थोरवे आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 5:14 pm

सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ?

मुंबई : प्रतिनिधी अजित पवार यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी सुनेत्रा पवार यांची शनिवारी निवड केली जाणार आहे. त्यानंतर लगेचच त्यांचा शपथविधी पार पडेल, असे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवड करण्यासाठी उद्या, शनिवारी आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ […] The post सुनेत्रा पवार घेणार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 5:12 pm

पुणे मनपा काँग्रेस गटनेतेपदी ॲड. चंदूशेठ कदम यांची निवड:15 नगरसेवकांनी एकमताने घेतला निर्णय; शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पुणे महानगरपालिका काँग्रेस गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे १५ नगरसेवक निवडून आले होते. या निवडीसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवन येथे नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, पुणे शहर काँग्रेस उपाध्यक्ष अजित दरेकर, प्राची दुधाने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यापूर्वी काँग्रेसचे माजी मंत्री व पुण्याचे निरीक्षक सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांशी स्वतंत्र चर्चा करून गटनेतेपदाबाबतचा कल जाणून घेतला होता. त्यावेळीही ॲड. कदम यांच्या नावाला सर्वानुमते पाठिंबा मिळाला होता. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर ॲड. कदम यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्तांकडे जाऊन अधिकृत पत्र सादर केले. ॲड. चंदूशेठ कदम यांना लोकसेवेचा वारसा माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम आणि माजी नगरसेवक स्व. सुबराव कदम यांच्याकडून लाभला आहे. कोथरूड परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात ते अग्रणी मानले जातात. भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोथरूडमध्ये गेली १५-२० वर्षे त्यांनी काँग्रेसचा झेंडा रोवून धरला आहे. २०१२, २०१७ आणि २०२६ च्या निवडणुकांत त्यांनी सातत्याने विजय मिळवत प्रभावी नेतृत्व सिद्ध केले आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सशक्तीकरण, कामगार योजना, पेन्शन आणि लसीकरण यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी हजारो नागरिकांना लाभ मिळवून दिला आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 5:11 pm

भारतीय ग्राहकांचा पाश्चात्यीकरणाचा वेग कमी: दामोदर मॉल:पुणे डिझाईन महोत्सवात रिलायन्स रिटेलच्या सीईओंचे निरीक्षण

रिलायन्स रिटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर मॉल यांनी भारतीय ग्राहकांच्या पाश्चात्यीकरणाच्या गतीबाबत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. जागतिकीकरणानंतर भारतीय ग्राहक आधुनिक आणि विकसित झाला असला तरी, पाश्चात्यीकरणाचा वेग अजूनही कमी असल्याचे त्यांनी म्हटले. असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया (एडीआय) च्या पुणे विभागाद्वारे आयोजित २० व्या पुणे डिझाईन महोत्सवात ते बोलत होते. नगर रस्त्यावरील हयात रिजन्सी येथे दोन दिवसीय पुणे डिझाईन महोत्सवाला सुरुवात झाली. डिझाईन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवाची यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना 'इंडिया लेन्स' होती. महोत्सवात प्रोडक्ट डिझाईन, आर्किटेक्चर आणि ग्राफिक डिझाईन यांसारख्या क्षेत्रातील ३० हून अधिक नामवंत वक्ते आपले विचार मांडणार आहेत. महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात दामोदर मॉल यांच्या भाषणाने झाली. मॉल यांनी 'डिझायनिंग ‘ब्रँडेड स्पेसेस फॉर फुलर इंडिया’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भारतीय ग्राहकांच्या मानसिकतेवर आधारित काही निरीक्षणे नोंदवली. भारतीय ग्राहक बदलत असला तरी तो हळूवारपणे पाश्चात्यीकरणाकडे वळत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन खरेदी करताना परदेशातील ग्राहक खूप जागरूकपणे खरेदी करतो आणि त्याला जेव्हा खरेदी करायची असेल तेव्हाच तो अॅपचा वापर करतो. याउलट, भारतीय ग्राहक अनेकदा 'विंडो शॉपिंग' करताना दिसतो. त्याला आवडलेल्या गोष्टी तो कार्टमध्ये टाकतो, पण खरेदी करताना आजही कुटुंब, संस्कृती आणि समाजाचा प्रभाव त्याच्यावर दिसून येतो. आपल्या जवळच्या व्यक्तींच्या अनुभवावर त्याची खरेदी अवलंबून असते, असे मॉल यांनी नमूद केले. याबरोबरच, भारतीय ग्राहकाला परदेशी ग्राहकांसारखा 'डू इट युवरसेल्फ' प्रकार आवडत नसून, त्यांचा भर 'डू इट फॉर मी' या प्रकारावर आहे. आज भारतीय ग्राहक स्वतःला काय हवे आहे ते मागतोय, पण त्यासाठी आपल्या जुन्या सवयी सोडत नाहीये, असे मॉल म्हणाले. काही वर्षांपूर्वी लक्झरी हॉटेल किंवा विमान प्रवासात भारतीय ग्राहक मसाला चहा मागण्यास कचरत होता, मात्र आज ते कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये किंवा विमान प्रवासात आवडीने मसाला चहा मागवतात. याशिवाय, ग्राहकांनी आपली आवडती पाणीपुरी खाणे अजूनही सुरू ठेवले आहे. फक्त आता बिस्लेरी पाण्यामधील पाणीपुरी खाण्याकडे त्यांचा जास्त कल आहे, असेही मॉल यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 5:11 pm

इन्स्टावर कोहलीचे कमबॅक!

मुंबई : प्रतिनिधी गुरुवारी मध्यरात्री सोशल मीडिया उघडताच विराट कोहलीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. रात्रीच्या वेळी विराट कोहलीचे इन्स्टा अकाऊंट दिसत नसल्याने चाहते संभ्रमात पडले होते. क्रिकेटच्या मैदानानंतर विराटने सोशल मीडियालाही रामराम म्हटले का असा प्रश्न पडला होता. मात्र शुक्रवारी सकाळी कोहलीचे अकाऊंट पुन्हा दिसू लागल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गुरुवारी रात्री अचानक गायब झालेले […] The post इन्स्टावर कोहलीचे कमबॅक! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 5:09 pm

अकोल्यात कमळ फुलले:शहर सुधार आघाडीची सत्ता कायम, शारदा खेडकर अकोल्याच्या नव्या महापौर

अकोला महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत भाजपप्रणित शहर सुधार आघाडीने पुन्हा सत्ता मिळवली आहे. महापौरपदी शारदा रणजित खेडकर यांची निवड झाली, तर अमोल गोगे उपमहापौर बनले. या निवडणुकीत शहर सुधार आघाडीला ४५ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या शिवसेना (उबाठा) गटाच्या उमेदवार सुरेखा मंगेश काळे यांना ३२ मतांवर समाधान मानावे लागले. एमआयएमचे तीन सदस्य तटस्थ राहिले. शहर सुधार आघाडीकडे ४४ सदस्य होते. त्यांना अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी पाठिंबा दिल्याने त्यांचे संख्याबळ ४५ झाले. दुसरीकडे, विरोधी गटात काँग्रेसचे २१, शिवसेना (उबाठा) गटाचे ६ आणि वंचित बहुजन आघाडीचे ५ असे एकूण ३२ सदस्यांनी मतदान केले. शारदा खेडकर या अकोला महापालिकेच्या नवव्या महापौर ठरल्या आहेत. या विजयामुळे महापालिकेत भाजपची सत्ता कायम राहिली आहे. पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही विशेष सभा पार पडली. नवनिर्वाचित महापौर शारदा खेडकर यांनी शहर विकासाला आपले प्राधान्य राहील, असे सांगितले. तर, विरोधकांनी भाजपने मुस्लिम नगरसेवकांना फोडल्याचा आरोप केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 5:05 pm

पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य असलेल्या पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार, श्रीनिवासन यांची ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी त्यांच्या कोझिकोड (केरळ) येथील घरात अचानक तब्येत बिघडली. ते […] The post पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 4:58 pm

राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चे ग्रँड ओपनिंग

मुंबई : प्रतिनिधी राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रावच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर परतणार आहे. राणीचा चित्रपट, ‘मर्दानी ३’ शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ऍडव्हान्स बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘मर्दानी’ आणि ‘मर्दानी २’ हिट झाल्यानंतर आता या चित्रपटाचा तिसरा भाग कसा असेल हे जाणून घेऊयात. स्टेकनिकच्या अहवालानुसार, चित्रपटाने […] The post राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी ३’ चे ग्रँड ओपनिंग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 4:56 pm

धार्मिक विधी झाल्यानंतर निर्णय घेऊ- सुनील तटकरे:जुळून आल्यास उद्याच शपथविधी, उपमुख्यमंत्री पदाबाबत छगन भुजबळांचे सूचक विधान

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असतानाच उपमुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरू झाली आहे. अनेकांचे म्हणणे आहे की सुनेत्रा पवार यांची निवड अजित पवारांच्या पदावर करण्यात यावी. त्यानुसार राजकीय वर्तुळात हालचाली देखील सुरू असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला असून उपमुख्यमंत्री पदाबाबत धार्मिक विधी झाल्यानंतर निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर सगळ्यांचे एकमत झाले तर उद्याच्या उद्या सुनील तटकरे म्हणाले, दादांच्या अकाली जाण्याच्या धक्क्यातून आम्ही कोणीही सावरलो नाहीये. आम्हाला अजूनही असे वाटते की दादा आमच्यातच आहेत. या शोकमग्न अवस्थेतच आम्ही आहोत. आज अजितदादांच्या अनुपस्थितीत कार्यालयात येणे हे माझ्यासाठी क्लेशकारक आहे. या कार्यालयात त्यांनी पक्षाचे संघटन उभे केले, इथे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावे यासाठी मी कार्यालयात आलो. याच भावनेने मी आलो होतो. धार्मिक विधी झाल्यानंतर ठरवू पुढे बोलताना सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यासंदर्भात बोलताना म्हणाले, आज मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हे खरे आहे. सुनेत्रा वहिनी आणि कुटुंब धार्मिक विधीमध्ये आहेत. धार्मिक विधी झाल्यानंतर आम्ही सर्व चर्चा करणार आहोत. आणि त्यानंतर आम्ही ठरवू. जे काही जनतेच्या मनात आहे, कार्यकर्त्यांच्या मनात आहे त्यानुसार निर्णय घेऊ. आज आपण पाहत आहोत की संपूर्ण राज्य शोकात आहे. दादांचे सर्व पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवले आहेत. त्यातच आम्ही आहोत, असे तटकरे यांनी म्हटले आहे. शो मस्ट गो ऑन- छगन भुजबळ यासंदर्भात छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अजित पवार गेले आणि ज्या पद्धतीने गेले आहेत, त्यामुळे झोप उडाल्यासारखी झाली आहे. पण आता असे आहे की शेवटी 'शो मस्ट गो ऑन' असे म्हणतात, त्यामुळे कोणावर तरी जबाबदारी देऊन हे चालवले पाहिजे, पक्ष असेल सरकार असेल. उद्या मला असे वाटते की जे विधानमंडळातले जे नेते आहेत आमचे, त्यांची बैठक बोलावली आहे. त्यात पक्षाचे प्रमुख पद जे अजितदादांकडे होते, ते देण्याच्या संदर्भात निर्णय होईल. पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, लोकांची जी मागणी आहे ती रास्त आहे. सुनेत्रा ताईंकडे पक्ष प्रमुख पद देण्यात यावे. अनेक लोकांची अशी मागणी आहे आणि त्यात काही चूक आहे, असे मला वाटत नाही. पण शेवटी याबाबत जो काही निर्णय होणार आहे तो सीएलपीमध्ये होईल. भुजबळ यांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेविषयी विचारले असता, त्यांनी याबाबत मला फारसे काही माहित नसल्याचे स्पष्ट केले आहे. सगळ्यांचे एकमत झाले तर उद्याच्या उद्या शपथविधी होईल छगन भुजबळ म्हणाले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही याबाबत मला फारसे माहित नाही. पण आता सध्या ही राष्ट्रवादी जी आहे अजित पवारांची, यात जे काही कामे आहेत, त्याकडे आपण लक्ष देत आहोत. उपमुख्यमंत्री पद रिकामे आहे, ते पद सुनेत्रा ताईंच्या माध्यमातून कसे भरता येईल त्यावर आमचे जास्त लक्ष आहे. बाकीचे पुढे बघता येईल. लोक जसे ठरवतील त्यानुसार निर्णय घेता येईल. उद्याच्या बैठकीत सगळ्यांचे एकमत झाले तर, उद्याच्या उद्या शपथविधी होऊ शकतो, असे सूचक विधान भुजबळ यांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 4:54 pm

मराठवाड्यात विज कंपनीकडून विद्युत स्ट्राईक:सात जिल्ह्यात नऊ महिन्यात 1727 विजचोरीच्या घटना उघड, 14.47 कोटी रुपयांचा दंड, मोहिम आणखी गतीमान करणार

मराठवाड्यात विज वितरण कंपनीच्या वतीने मागील नऊ महिन्यात सात जिल्हयात राबविण्यात आलेल्या विद्युत स्ट्राईकमध्ये १७२७ ठिकाणच्या विजचोऱ्या उघडकीला आल्या असून विज कंपनीने या विजचोरांना १४.४७ कोटी रुपयांची दंड लावला आहे. त्यापैकी ८.८० कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती विज कंपनीच्या सुत्रांनी दिली आहे. महावितरण कंपनीच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशीक कार्यालयाकडून सह व्यवस्थापकिय संचालक आदित्य जीवने यांच्या मार्गदर्शनाखाली सात जिल्ह्यात विज पुरवठा तपसणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत संशयास्पद असलेल्या ठिकाणी पथकामार्फत तपासणी केली जात असून त्यातून विज चोरीच्या घटना उघडकीस आणल्या जात आहेत. यामध्ये विशेष पथकामार्फत ३७९९ ठिकाणी विद्युत मिटरची तपासणी व अनियमिततेची पाहणी करण्यात आली आहे. यामध्ये १७२७ विज मिटरमध्ये विजचोरी झाल्याचे आढळून आले आहे. यापथकाने सर्व ठिकाणी विज चोरीची आकडेवारी तपासल्यानंतर १.६० कोटी युनीट विज चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विजचोरीची अदांजे रक्कम १४ कोटी ४७ लाख रुपये एवढी झाली आहे. त्यानुसार संबंधित विज ग्राहकांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्यानंतर त्यापैकी ८.८० कोटी रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली आहे. तर ५५ ठिकाणी विज चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मराठवाड्यात उघड झालेल्या विजचोरी अन दंड मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर शहरात ३६४ ग्राहकांना ३.८२ कोटी रुपये दंड लावण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात २२२ ग्राहकांना २.१६ कोटी रुपये, जालना २४१ ग्राहकांना १.६५ कोटी रुपये, बीड जिल्हयात ९९ ग्राहकांना ९८ लाख रुपये, धाराशिव जिल्हयात २१० ग्राहकांना १.६० कोटी रुपये, लातुर जिल्ह्यात २६८ ग्राहकांना १.९९ कोटी रुपये, नांदेड जिल्हयात २७४ ग्राहकांना १.७१ कोटी रुपये, परभणी ४९ ग्राहकांना ३७ लाख रुपये दंड लावण्यात आला आहे. त्यापैकी ८ कोटी ८० लाख रुपयांचा दंड वसुल करण्यात आला असून अद्यापही दंड वसुलीची कारवाई सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले. विद्युत स्ट्राईक सुरुच राहणार मराठवाड्यात विज चोरी रोखण्यासाठी महावितरण कडून विद्युत स्ट्राईक सुरच राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी अनाधिकृत विजेचा वापर करू नये. अनाधिकृत विज वापरणाऱ्यांवर विद्युत कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. - आदित्य जीवने, सह व्यवस्थापकिय संचालक

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 3:59 pm

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडीकडून चौकशी

मुंबई : प्रतिनिधी दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले. आता या विमान अपघातावरून मतमतांतरे व्यक्त होत आहेत. काहींना हा घातपात वाटत आहे. या चर्चेदरम्यान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू करण्यात आली आहे. बारामती विमानतळाजवळ भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा […] The post अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडीकडून चौकशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 3:23 pm

अकोला महापालिकेमध्ये राडा

अकोला : अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर यांच्या निवडीनंतर सभागृहात राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये सभागृहातच राडा झाला आहे. एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये एकमेकांसोबत शाब्दिक चकमक झाली आहे. दरम्यान अकोला महापालिका सभागृहात काँग्रेसच्या नगरसेवकांनी धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी काँग्रेसच्या नगरसेवकांनी एमआयएमच्या नगरसेवकांवर सभागृहातच बांगड्या फेकल्या आहेत. […] The post अकोला महापालिकेमध्ये राडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 3:16 pm

उजनीच्या पाण्याने प्रदूषणाची पातळी ओलांडली; पाण्यावर हिरवा तवंग

भिगवण : प्रतिनिधी पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी (यशवंत सागर) जलाशयाच्या प्रदूषण पातळीत कमालीची वाढ होत चालली आहे. सध्या उजनीच्या पाण्यावर हिरवा तवंग आलेला असून पाण्याचा उग्र वास येऊ लागला असल्याने पाण्यातील जलचरांचे जीवनमान नष्ट होण्याच्या मार्गावर येऊन ठेपले आहे. तरी देखील या प्रदूषणाकडे प्रशासनाकडून डोळेझाक केली जात आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि […] The post उजनीच्या पाण्याने प्रदूषणाची पातळी ओलांडली; पाण्यावर हिरवा तवंग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 3:14 pm

प्रेमविवाहाच्या वादातून एकाची हत्या

सोलापूर : प्रतिनिधी सोलापुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील बार्शी येथे मेहुण्याने भाऊजीची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे प्रेमविवाहाला विरोध केल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. शिवाय या घटनेतील आरोपी ऋषिकेश क्षीरसागर […] The post प्रेमविवाहाच्या वादातून एकाची हत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 3:12 pm

अकोल्यात कमळ फुलले!

अकोला : प्रतिनिधी राज्यात महापालिका निवडणुका होऊन १० दिवस उलटले आहेत. त्यानंतर आता वेगवेगळ्या महापालिकांसाठी महापौर निवड प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, आता राज्यात पहिल्याच महापालिकेसाठी महापौरांची निवड झाली आहे. अकोल्यात भाजपच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड झाली आहे. शारदा खेडकर प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेविका आहेत. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा […] The post अकोल्यात कमळ फुलले! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 3:10 pm

‘दादां’च्या समर्थकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

नाशिक : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे नाशिकमधील राष्ट्रवादीच्या एका पदाधिका-याचा मृत्यू झाला. अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि पदाधिकारी सुदाम बोडके यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अजित पवारांच्या निधनाचे वृत्त ऐकून सुदाम बोडके यांना मोठा धक्का बसला होता. ते खूपच अस्वस्थ झाले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका […] The post ‘दादां’च्या समर्थकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 3:08 pm

मद्यपान करणा-या एसटी चालकांवर होणार तातडीची कारवाई

मुंबई : प्रतिनिधी एसटी महामंडळातील चालकांच्या मद्यपानाच्या प्रकारांबाबत गंभीर दखल घेत राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाने कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने राज्यातील सर्व आगारांत चालकांची कर्तव्यावर जाण्यापूर्वी ब्रेथ ऍनालायझर चाचणी अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कर्तव्यावर असताना मद्यपान करणा-या चालकांविरुद्ध तातडीने आणि कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यालयाकडून जारी करण्यात […] The post मद्यपान करणा-या एसटी चालकांवर होणार तातडीची कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 3:06 pm

अजित पवारांना अखेरची सलामी देताना मिसफायर:शहा, फडणवीस, शिंदेंसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत गंभीर प्रकार; व्हिडिओ व्हायरल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरची सलामी देताना घडलेल्या एका अनपेक्षित घटनेने शोकाकुल वातावरणात क्षणभर खळबळ उडाली होती. शासकीय इतमामात सलामी देण्याची प्रक्रिया सुरू असताना एका पोलिस कर्मचाऱ्याकडून चुकून मिसफायर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सलामीसाठी बंदूक लोड करतानाच गोळी सुटल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. मात्र, अत्यंत संवेदनशील आणि शिस्तबद्ध मानल्या जाणाऱ्या शासकीय कार्यक्रमात असा प्रकार घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारावेळी राज्य शासनाकडून पूर्ण शासकीय सन्मान देण्यात येत होता. या दरम्यान पोलिस दलाकडून मानक प्रक्रियेनुसार सलामी दिली जात होती. याच वेळी एका पोलिस कर्मचाऱ्याकडून बंदूक हाताळताना चूक झाली आणि गोळी सुटली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बंदूक लोड करतानाच हा मिसफायर झाला. गोळी हवेत सुटल्याने कोणतीही जीवितहानी टळली. मात्र, उपस्थित नागरिक आणि मान्यवर क्षणभर दचकले होते. काही वेळासाठी कार्यक्रमात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी याला केवळ अपघात म्हटले, तर काहींनी पोलिस दलाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शासकीय सलामी ही अत्यंत नियमबद्ध आणि प्रशिक्षणाधारित प्रक्रिया असते. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांसह अनेक प्रमुख नेते उपस्थित असताना अशा कार्यक्रमात चूक होणे हे गंभीर मानले जाते. प्रशासनाकडून या घटनेची अंतर्गत चौकशी केली जाण्याची शक्यता असून, नेमकी चूक कुठे झाली, प्रशिक्षणात त्रुटी होत्या का, की निष्काळजीपणा झाला, याचा तपास केला जाईल, असे संकेत दिले जात आहेत. कायदा काय सांगतो? भारतीय कायद्यानुसार, शासकीय सेवेत असताना शस्त्र हाताळताना अत्यंत काळजी घेणे बंधनकारक आहे. पोलिस दलासाठी लागू असलेल्या सेवा नियमांनुसार आणि शस्त्र अधिनियमानुसार, शस्त्रांचा वापर केवळ ठरवलेल्या उद्देशासाठी आणि ठरलेल्या पद्धतीनेच करणे आवश्यक असते. शासकीय कार्यक्रमात सलामी देताना देखील ठरावीक नियम, तपासणी आणि सुरक्षिततेच्या सूचना असतात. जर निष्काळजीपणामुळे गोळी सुटल्याचे सिद्ध झाले, तर संबंधित कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी, शिस्तभंगाची कारवाई किंवा दंडात्मक कारवाई होऊ शकते. गंभीर निष्काळजीपणा आढळल्यास निलंबनाचीही तरतूद आहे. पोलिस कर्मचाऱ्यावर काय कारवाई होऊ शकते? या प्रकरणात प्राथमिक तपासानंतर संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी सुरू होऊ शकते. चौकशीत निष्काळजीपणा, नियमांचे उल्लंघन किंवा प्रशिक्षणातील त्रुटी आढळल्यास नोटीस देणे, वेतनवाढ रोखणे, बदली, किंवा निलंबन अशी कारवाई होऊ शकते. मात्र, ही चूक अपघाती असल्याचे आणि कोणतीही हानी न झाल्याचे सिद्ध झाल्यास सौम्य कारवाई होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. अंतिम निर्णय चौकशी अहवालावर अवलंबून असेल.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 2:31 pm

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक:नव्याने ओबीसी झालेले 70 मराठा बांधव रिंगणात, सर्वच पक्षांनी दिली उमेदवारांना संधी

मराठा आरक्षणासाठी झालेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर निर्माण झालेला सामाजिक बदल आता थेट जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येत आहे. १९६७च्या कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र मिळालेले जिल्ह्यातील ७० उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवत नशीब आजमवत आहे. १७ ओबीसीच्या जागेसाठी ३१ तर २९ गणासाठी ३९नवीन ओबीसींनी अर्ज दाखल केले आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय पक्षांनीही या नवीन ओबीसींना त्यांच्या पक्षाकडून उमेदवारी देत संधी दिल्या आहेत. राज्यभरात मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा राहीला आहेत. याचा मुद्द्यावर लोकसभा आणि विधासभा निवडणूका पार पडल्या त्यानंतर न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने जुन्या नोंदीचा शोध घेतला. त्यात आॅक्टोंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत १ हजार ८८४ गावांतील नोंदी तपासल्यानंतर मराठवाड्यात २ लाख ५६ हजार ५०५ नोंदी मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्राची वाटप करण्यात आली. आरक्षण मिळालेल्यापैकी अनेकांनी आरक्षणाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत उतरले आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत भाजप, शिवसेना, उबाठा, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस , राष्ट्रवादी शरद पवार यांच्यातर्फे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी नव्याने ओबीसी आरक्षण मिळालेल्या ७० जणांना संधी दिली आहेत. शिवसेनेने १८, भाजपने १६ उमेदवारांना संधी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत ओबीसीच्या गट व गणासाठीच्या जागेसाठी ओबीसीचे प्रमाणपत्र मिळालेले मराठा समाजाच्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहेत. यात शिवसेनेने (शिंदे) १८ उमेदवार तर त्यापाठोपाठ आमचा डिएनए ओबीसी सांगणाऱ्या भाजपने गट व गणासाठी १६ जणांना संधी दिली आहेत. तर अपक्ष म्हणून गटासाठी ३ व गणासाठी ७ नवे ओबीसी रिंगणात आहेत. त्यामुळे पहिल्यांदा ओबीसीतून नशीब आजमावणाऱ्यांना मतदार कशी साथ देणार हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. सर्वांधिक उमेदवार गंगापूर व पैठणमधून जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत गंगापूर तालुक्यातून गटासाठी ६ तर गणासाठी ७ जण रिंगणात आहेत.त्यापाठोपाठ खासदार संदीपान भूमरे यांच्या बालेकिल्ल्यात जिल्हा परिषद गटासाठी ५ तर गणासाठी ३ रिंगणात आहे. विशेष म्हणजे भाजप,सेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने नव्याने कुणबी प्रमाणपत्रे मिळलेल्यांना संधी दिली आहे. ५० जणांची माघार या निवडणूकीत २७ जानेवारीपर्यंत ११९ जण रिंगणात होते.त्यात ४१ अपक्षांनी गण आणि गटातून अर्ज दाखल केले होते. त्यांनी माघार घेतली.यासह सर्व राजकीय पक्षांनी ९ उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावले. त्यामुळे ५० जणांनी माघार घेतल्यामुळे आता ६९ जण रिंगणात आहेत. पुणे-पिंप्रीचिंचवड मनपात ५२ नगरसेवक नव ओबीसी नुकत्याच पार पडलेल्या महानगपालिका निवडणूकीतही ओबीसीचे प्रमाणपत्र मिळालेले नव ओबीसींनी बाजी मारली आहे. पुण्यात १६५ जागापैकी २६ ओबीसी जागांवर मराठा समाजातील उमेदवारांनी कुणबी म्हणून निवडून आले आहे. तर पिंप्रीचिंचवड मधील १२५ मध्ये २६ जागावर नव ओबीसी निवडून आले आहेत. निवडून आलेल्या या ५२ नव ओबीसींना मृणाल ढोले पाटील या‌ंनी दर्शविला आहे. जात पडताळणी विभागाकडे तक्रार केली आहे. जुन्या नोंदीवरून प्रमाणपत्र- विनोद पाटील, मराठा आरक्षण याचिकाकर्ते जुन्या नोंदीच्या आधारे १९६७ नुसार प्रमाणपत्र मिळालेले कुणबी उमेदवार निवडणूक लढवत आहे. कायद्याच्या आधाराने त्यांना हक्क मिळाला आहे. या नोंदी आताच्या नाही, त्या जुन्याच आहेत. परंतु निवडणूकीमुळे ते चर्चेत आले आहे. नुकत्याच झालेल्या मनपाच्या निवडणूकीत खुल्या जागेवर राजकीय पक्षांनी इतर प्रवर्गातील लोकांना उभे केले होते.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 1:52 pm

राष्ट्रवादीच्या भवितव्यावर तातडीने निर्णय घ्यावा लागेल, प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान:फडणवीसांसमोर राष्ट्रवादीची थेट मागणी, संभ्रम नको

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, जनभावनेचा आदर लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे असल्याचे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित पवार यांच्या खात्याबाबत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित निर्णयांबाबत अनिश्चितता कायम राहू नये, अशी आमची भूमिका आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती, कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता आणि जनतेच्या भावना लक्षात घेता विलंब न करता ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आम्ही आमची भूमिका मांडली आहे. ते पुढे म्हणाले की, अजितदादा हे अनुभवी नेते असून त्यांनी राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या खात्याबाबत लवकर निर्णय होणे हे केवळ पक्षासाठीच नव्हे, तर राज्याच्या प्रशासनासाठीही महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही स्पष्ट भूमिका ठरवली जावी, जेणेकरून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम राहणार नाही. येत्या काळात याबाबत लवकरच निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, या भेटीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांच्या खात्याबाबत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवार यांनी नरेश अरोरा यांना बारामतीला बोलावले उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या निधनानंतर, त्यांच्याकडे असलेली खाती कोणाला मिळतील याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली, तसेच अजित पवार यांच्याकडे असलेली अर्थ, क्रीडा आणि उत्पादन शुल्क ही तीन खाती कायम ठेवण्याची मागणीही करण्यात आली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबतही या वेळी चर्चा झाली. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी राजकीय सल्ल्यासाठी नरेश अरोरा यांना बारामतीला बोलावले आहे. नरेश अरोरा आज दुपारी सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी बारामतीला येतील. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत...

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 1:45 pm

शरद पवारांचे कायम मार्गदर्शन : नरहरी झिरवाळ

बारामती : प्रतिनिधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असून, अजित पवार असतानाच यासाठी प्रयत्न सुरू झाले होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. त्यातूनच नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकत्र लढविण्याचा निर्णय झाला आहे. मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, कारण अजित […] The post शरद पवारांचे कायम मार्गदर्शन : नरहरी झिरवाळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Jan 2026 1:38 pm

खराडीत वाहनाच्या चाकाखाली येऊन चिमुरड्याचा मृत्यू:पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिस तपास सुरू

खराडी परिसरात पिकअप वाहनाच्या चाकाखाली आल्याने दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. मयूर अमर माळवे (वय 2) असे मृत बालकाचे नाव आहे. राजू मगन ढोले (वय 66, रा. बाळकृष्ण अपार्टमेंट, ढोले-पाटील रस्ता) या पिकअप वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम अमर माळवे (वय 25, रा. ढोले पाटील वाडा, खराडी) यांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम माळवे यांचा मुलगा मयूर घरासमोरील मोकळ्या जागेत खेळत होता. ढोले यांचा गोठा याच मोकळ्या जागेत असून, ते दूध वाहतूक करणारे पिकअप वाहन घेऊन तेथे आले होते. खेळत असताना मयूर वाहनाच्या चाकाखाली सापडला आणि गंभीर जखमी झाला. मयूरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक गोडसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. टँकरच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू दरम्यान, पुणे-सोलापूर रस्त्यावर टँकरच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना घडली आहे. या अपघातात मृत झालेल्या पादचाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. रमजान इस्माइल शेख (वय 30, रा. रामोशी आळी, हडपसर गाव) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. भरधाव टँकरने हडपसर भाजी मंडईसमोर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक दिली, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी टँकर चालक उद्धव तुकाराम शिंदे (रा. नवनाथ कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 1:22 pm

पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन:76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; राजकीय, सामाजिक क्षेत्रात शोककळा

पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांतीलाल सुरतवाला यांचे आज पहाटे निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते कॅन्सरसारख्या आजाराने ग्रस्त होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे पुणे शहर आणि राजकीय, सामाजिक तसेच व्यापारी क्षेत्रात शोककळा पसरली आहे. शांतीलाल सुरतवाला यांनी 1992 ते 1993 या काळात पुणे महानगरपालिकेचे महापौर म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शहराच्या पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि सर्वसामान्य पुणेकरांच्या समस्यांवर विशेष लक्ष दिले. महापौर म्हणून घेतलेले त्यांचे अनेक निर्णय शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरले. संयमी, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. राजकीय जीवनात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली होती. ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निष्ठावान समर्थक मानले जात होते. पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी, विशेषतः पक्षाच्या आव्हानात्मक काळात, त्यांनी पुण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पुण्याच्या विविध प्रश्नांवर ते वेळोवेळी स्पष्ट भूमिका देखील मांडत होते.तरुण कार्यकर्त्यांसाठी ते नेहमीच मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान होते. राजकारणाव्यतिरिक्त, शांतीलाल सुरतवाला हे एक यशस्वी उद्योजक म्हणूनही परिचित होते. पुण्यातील तंबाखू व्यवसायात त्यांचा मोठा नावलौकिक होता. त्यांनी आपल्या व्यावसायिक अनुभवाचा उपयोग विविध सामाजिक संस्थांच्या कार्यासाठी केला. कौटुंबिक, व्यावसायिक आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी योग्य संतुलन राखत समाजात आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने पुणे शहराने एक अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 1:17 pm

सोशल मीडियावरील अपशब्दांचा उद्रेक; मनसे-शिवसेना कार्यकर्त्यांचा संताप:नालासोपाऱ्यात तरुणाची धिंड, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर राजकीय नेत्यांबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा वापरणे एका तरुणाला चांगलेच महागात पडल्याची खळबळजनक घटना नालासोपारा परिसरात समोर आली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल एकेरी उल्लेख करत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरून पोस्ट करणाऱ्या तरुणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. या घटनेत संबंधित तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली असून, त्याची अर्धनग्न अवस्थेत परिसरात धिंड काढण्यात आल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज महेंद्र शिर्के असे या तरुणाचे नाव असून, तो गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सातत्याने राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करत होता. विशेषतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याबद्दल त्याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. या पोस्टमधून त्याने एकाच नेत्याला मान्य असल्याचे सांगत इतर नेत्यांवर चोर असल्याचे आरोप केले होते. या पोस्टमुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. या तरुणाच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत गेला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वापरलेली भाषा अत्यंत अश्लील आणि अपमानास्पद असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. काही पोस्टमध्ये राज ठाकरे यांच्या भूमिकांवर टीका करताना अपमानजनक शब्द वापरण्यात आले होते, तर उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही अत्यंत अवमानकारक उल्लेख करण्यात आला होता. या प्रकारामुळे ठाकरे कुटुंबीयांचे समर्थक एकत्र आले आणि या तरुणावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली. दरम्यान, मनसेचे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संबंधित तरुण नालासोपारा परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच मनसे आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. कार्यकर्त्यांनी तरुणाला पकडून त्याचा चोप दिला. इतक्यावरच न थांबता, त्याला अर्धनग्न करून रस्त्यावरून सुमारे दीड किलोमीटरपर्यंत फिरवण्यात आले. या घटनेदरम्यान काही नागरिकांनी मोबाईलवर व्हिडिओ शूट केला, जो नंतर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. या प्रकारामुळे नालासोपारा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. काही ठिकाणी गर्दी जमली होती, तर काही नागरिकांनी या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या घटनेची चर्चा राज्यभर पसरली आहे. अनेकांनी या प्रकाराला कायद्याच्या चौकटीबाहेरील कारवाई असल्याचे म्हटले, तर काहींनी सोशल मीडियावरील मर्यादा ओलांडणाऱ्या पोस्टविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मर्यादा ओलांडल्यास याच पद्धतीने उत्तर या घटनेनंतर मनसे पदाधिकारी किरण नकाशे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी लिहिले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या या तरुणाचा आम्ही शोध घेत होतो. तो मराठी असो किंवा अमराठी, आमच्या दैवतांबद्दल बोलताना कोणीही मर्यादा ओलांडल्यास त्याला याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. या भाषेतच अशा लोकांना समजते, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 1:12 pm

दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय:विकासरूपी फुलांच्या बागेत राख सावडण्याची वेळ येईल असं स्वप्नानतही वाटलं नव्हतं - रोहित पवार

'अजितदादांच्या निधनाची दुर्दैवी बातमी आल्यापासून डोकं सुन्न आहे. मन बर्फाप्रमाणे थिजलंय. अजितदादांनी जिथं विकासरूपी फुलांची बाग फुलवली, तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असं स्वप्नानतही वाटलं नव्हतं,' अशी भावनिक प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अजित पवारांच्या निधनानंतर आज त्यांची राख सावडण्याचा विधी सकाळी बारामती येथील विद्याप्रतिष्ठानमध्ये झाला. यावेळी पार्थ पवार, जय पवार, श्रीनिवास पवार, रोहित पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्यांची उपस्थिती होती. या विधीनंतर रोहित पवारांनी सोशल मीडियात एक पोस्ट करून आपल्या भावनांना वाट मोकळी करू दिली. रोहित पवारांची पोस्ट जशीच्या तशी… रोहित पवार आपल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हणतात, 'मा. अजितदादांनी जिथं विकासरूपी फुलांची बाग फुलवली तिथंच त्यांची राख सावडण्याची वेळ येईल, असं कधी स्वप्नातही आलं नाही.. पण नियतीच्या क्रूर खेळापुढं कुणाचं काही चालत नाही.. अजितदादांची ती दुर्दैवी बातमी आल्यापासून अद्यापपर्यंत डोकं सुन्न आहे… मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. काय झालं, कसं झालं आणि का झालं, या विचाराचं मनातलं काहूर थांबत नाहीय… आपल्यात आत्तापर्यंत जे-जे काही संभाषण झालं, चर्चा झाल्या, विशेषतः शेवटच्या काही दिवसांमध्ये झालेल्या भावनिक चर्चा, हे सगळं काही एखादा टेपरेकॉर्डप्रमाणे सारखं सारखं कानात घुमतंय. जणू काही तुम्हीच अदृश्य स्वरूपात बोलत आहात असा भास होतोय. तुमची ती काम करण्याची शैली, प्रशासनावर पक्की मांड, राजकारणावर मजबूत कमांड, परखड स्वभाव, हो ला हो आणि नाही ला नाही न करता जे असेल ते स्पष्ट सांगून समोरच्या व्यक्तीसोबत राजकारण न खेळण्याची पद्धत, कामाचा झपाटा, वेळेचं काटेकोर नियोजन या सगळ्याचं आम्हाला अक्षरशः कौतुक आणि आश्चर्यही वाटायचं. सत्ता असो किंवा नसो, कायम तुमचा दरारा वाटायचा, आदरयुक्त भीती असायची. तुमचा सार्वजनिक वावर बघून तुम्हाला न भेटलेल्या अनेकांना तुम्ही फणसाप्रमाणे कठोर वाटायचात, पण तीच व्यक्ती जेंव्हा तुमच्या संपर्कात यायची तेंव्हा फणासातील रसाळ आणि मधुर गऱ्याप्रमाणे तुमचा स्वभाव पाहून ती तुमच्या प्रेमात पडायची, याचे आम्ही साक्षीदार आहोत. पण अचानक असं काय झालं? दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा गाडा हाकणारा, दररोज भेटणाऱ्या शेकडो माणसांना मदत करणारा, त्यांची कामं करणारा, पहाटेपासून रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या विकासाचाच ध्यास घेणारा, सामान्य माणसासाठी वाऱ्याच्या वेगाने उर फाटेस्तोवर धावणारा पहाडासारखा माणूस असा एका क्षणात कसा निघून जाऊ शकतो? या प्रश्नाने डोक्याचा भुगा झालाय. पण काही प्रश्नांची उत्तरं मिळत नसतात, असं म्हणतात. पण मा. अजितदादांच्या विकासाचा वेगच कदाचित नियतीला आवडला असावा आणि म्हणूनच अजितदादा लोकांसाठी धावत असतानाच त्याच वेगाने नियतीने त्यांच्यावर झडप घातली असावी. या नियतीबाबतच माझी तक्रार आहे.. ती कुठं करायची हे कळत नाही. पण माझा त्या नियतीला प्रश्न आहे, ‘‘आमच्यासारखे लाख नेले असते तरी चाललं असतं, पण आमचा लाखांचा पोशिंदा तू का असा चोरून नेला? एका क्षणात तू लाखो जणांच्या लाखो स्वप्नांची राख का केलीस. दे ना उत्तर.’’ अजितदादा तुमच्याविषयी देखील माझी तक्रार आहे. दोन दिवसांपासून महाराष्ट्र अक्षरशः स्तब्ध आहे.. प्रत्येकाच्या डोळ्यांतला अश्रूचा पूर कमी होत नाहीये.. हुंदके आणि आक्रोश ऐकून काळजात चर्रर्र होतंय.. आपल्या जाण्याने पाठीमागे दुःखाचे असे पाट वाहतील, याची चिंता दादा तुम्ही का केली नाही? एरवी कुणी थोडं जरी चुकलं तर त्याला चार चौघात झाप झाप झापणारे तुम्ही त्या नियतीलाही त्याच जरबेच्या आवाजात का नाही खडसावलं? महाराष्ट्राची अजून कित्येक कामं बाकी असताना वेळ न घेता तू अशी आलीच कशी? दादा, तुमचा आवाज ऐकूणच ती नक्की घाबरली असती. पण तुम्ही तिलाही नाराज केलं नाही. मोकळ्या हाताने तिलाही माघारी पाठवलं नाही. आलेल्या प्रत्येकाचं काम करायचं, हेच तर तुमचं वैशिष्टय होतं. पण दोन दिवसांपासून दुःखाच्या पुरात आकंठ बुडालेला महाराष्ट्र पाहून आता त्या नियतीलाही नक्कीच पश्चात्ताप होत असेल. दादा काय बोलू? आज तुमची राख जमा करत असताना वाटत होतं की फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्ही या राखेतूनही अचानक त्याच रुबाबात उभं रहाल आणि नेहमीच्या खर्जातल्या आवाजात आम्हाला म्हणाल, ‘‘अरे वेड्यांनो, का अश्रू ढाळताय? मी तुमची गंमत करत होतो? एखाद्या संकटाला सामोरं जाण्याची तुमची किती तयारी आहे हे ‘मॉक ड्रील’प्रमाणे चेक करत होतो.. आता उठा, कामाला लागा… महाराष्ट्रासाठी, इथल्या सामान्य माणसासाठी आपल्याला खूप काम करायचंय.. चला, उशीर नका करू…’’ दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय.. Love U दादा!

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 1:11 pm

अकोला महापालिकेत पुन्हा भाजपची सत्ता:महापौरपदी शहर सुधार आघाडीच्या शारदा खेडकर; उपमहापौरपदी अमोल गोगे यांची निवड

राज्यातील 29 महापालिकांपैकी अकोला महापालिकेला अखेर महापौर मिळाला असून भाजप प्रणित शहर सुधार आघाडीने महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत महापौरपदी भाजपच्या शारदा रणजित खेडकर तर उपमहापौरपदी अमोल गोगे यांची निवड झाली. महापौरपदाच्या निवडणुकीत शहर सुधार आघाडीच्या शारदा खेडकर यांना 45 मते मिळाली, तर महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) गटाच्या सुरेखा मंगेश काळे यांना 32 मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत एमआयएमचे तीन नगरसेवक तटस्थ राहिले. एमआयएमचे 3 सदस्य तटस्थ शहर सुधार आघाडीचे मूळ संख्याबळ 44 होते. मात्र अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी भाजप प्रणित शहर सुधार आघाडीला पाठिंबा दिल्याने हे संख्याबळ 45 वर पोहोचले. दुसरीकडे विरोधी गटात काँग्रेसचे 21, शिवसेना (उबाठा) चे 6 आणि वंचित बहुजन आघाडीचे 5 अशा एकूण 32 नगरसेवकांनी मतदान केले. एमआयएमचे तीन सदस्य मतदानापासून तटस्थ राहिल्याने विरोधकांचा 36 चा दावा प्रत्यक्षात 32 मतांवरच मर्यादित राहिला. शहर विकासाला प्राधान्य देणार- खेडकर महापौर व उपमहापौर निवडीसाठी ही विशेष सभा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. शारदा खेडकर या अकोला महापालिकेच्या नवव्या महापौर ठरल्या असून या निकालामुळे महापालिकेत भाजपची सत्ता कायम राहिली आहे.नवनिर्वाचित महापौर शारदा खेडकर यांनी शहर विकासाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. दरम्यान, विरोधकांनी भाजपवर मुस्लिम नगरसेवक फोडल्याचा आरोप केला असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 1:05 pm

राष्ट्रवादीत सत्तासंघर्ष:सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, तर पार्थ पवार राज्यभेवर; अंतर्गत बैठकीनंतर नेते फडणवीसांच्या भेटीला; अंतिम निर्णय शरद पवार घेणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमध्ये भीषण अपघातानंतर झालेल्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा धक्का अधिक गंभीर मानला जात आहे. अजित पवार हे केवळ उपमुख्यमंत्रीच नव्हते, तर पक्षातील सर्वांत प्रभावी नेतृत्व मानले जात होते. त्यांच्या जाण्याने पक्षाच्या नेतृत्वाबरोबरच महायुती सरकारमधील महत्त्वाच्या सत्ताकेंद्रांवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि महायुतीत दोन्हीकडेच पुढील दिशा काय असणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासोबत अर्थ खाते, उत्पादन शुल्क आणि क्रीडा खात्याची जबाबदारी होती. ही खाती राज्याच्या कारभाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जातात. त्यामुळे आता ही खाती कोणाकडे सोपवायची, हा प्रश्न सरकारपुढे उभा राहिला आहे. दुसरीकडे, अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्वही प्रभावीपणे सांभाळत होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार, यावरही राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये मंथन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलिनीकरणाची चर्चा जोर धरत असतानाच एक वेगळाच प्रस्ताव पुढे आला आहे. अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व स्वतंत्रच ठेवावे, अशी भूमिका पक्षातील अनेक नेते मांडत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकीकरणाऐवजी स्वतंत्र वाटचाल करण्याचा पर्याय पुढे येत असल्याचे चित्र आहे. अजित पवार हयात असताना सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या चर्चांवर आता पूर्णविराम लागणार की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रफुल पटेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबतही महत्त्वाचा प्रस्ताव चर्चेत आहे. सध्या कार्याध्यक्ष असलेले प्रफुल पटेल यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात यावी, असा सूर पक्षातील नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. प्रफुल पटेल हे अनुभवी नेते असून राष्ट्रीय पातळीवर त्यांचा मोठा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे पक्षाची धुरा त्यांच्याकडे सोपवावी, असा प्रवाह राष्ट्रवादीमध्ये तयार होत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे पक्षातील नेतृत्व रचनेत मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुजबळ, मुश्रीफ, पटेल आणि तटकरे वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्रीपदासाठीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली वेगाने सुरू आहेत. अजित पवार यांच्या पश्चात हे पद सुनेत्रा पवार यांनाच देण्यात यावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पुढे आला आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाहोचले. छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे नेते वर्षा निवासस्थानी पोहोचले असून, उपमुख्यमंत्रीपदावर सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पार्थ पवार राज्यसभेवर अजित पवार यांना विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंतिम निरोप दिल्यानंतर त्यांच्या सहयोग बंगल्यावर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी पार्थ पवारही उपस्थित होते. या बैठकीत पार्थ पवार यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी संधी देण्यात यावी, तर आपल्याला राज्यसभेवर पाठवण्यात यावे, असा प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत समीकरणे अधिक स्पष्ट होत असल्याचे दिसत आहे. विलिनीकरणाच्या चर्चेवर अंतिम निर्णय शरद पवार घेणार एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याची चर्चा, दुसरीकडे नेतृत्वबदलाचे प्रस्ताव आणि महायुतीतील सत्तासंतुलन, या सर्व घडामोडींमुळे राज्याचे राजकारण निर्णायक वळणावर आले आहे. अजित पवार हयात असताना सुरू असलेल्या विलिनीकरणाच्या चर्चेवर अंतिम निर्णय शरद पवार घेणार असल्याची माहितीही पुढे येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस कोणती भूमिका घेते, उपमुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रीय नेतृत्वाबाबत कोणता निर्णय होतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 1:00 pm

अजित पवार NCP एकीकरणासाठी सकारात्मक होते; जयंत पाटलांचा मोठा दावा:अनेक गुप्त बैठका झाल्याचा खुलासा; पुन्हा चर्चा तापली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या एकीकरणाबाबत पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली असून, शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र यावेत, हीच आपली सुरुवातीपासूनची भूमिका होती, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच एकीकरणाच्या मुद्द्यावर इतक्या ठाम शब्दांत प्रतिक्रिया देण्यात आल्याने, राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतरही दोन्ही गट पुन्हा एकत्र यावेत, असा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू होता. या भूमिकेतूनच त्यांनी आणि दुसऱ्या गटातील प्रमुख नेत्यांनी अनेक वेळा बैठका घेतल्या. या बैठका केवळ औपचारिक नव्हत्या, तर त्यामध्ये भविष्यातील राजकीय वाटचाल, निवडणुकांची रणनीती आणि पक्ष एकत्र आणण्याच्या शक्यतांवर सविस्तर चर्चा झाली होती, असेही त्यांनी नमूद केले.जयंत पाटील यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार यांच्यासोबतही या विषयावर अनेकदा सविस्तर चर्चा झाली होती. विलयाच्या मुद्द्यावर अजित पवार सकारात्मक होते, असा ठाम दावा पाटील यांनी केला आहे. दोन्ही गटांमधील गैरसमज दूर करून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध व्हावी, अशी भावना अजित पवारांची होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकींमध्ये कोणताही ताणतणाव न ठेवता खुलेपणाने चर्चा झाली होती, असे पाटील यांनी सूचित केले. या चर्चांदरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला होता, तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. जयंत पाटील यांनी सांगितले की, अजित पवार यांची भूमिका अशी होती की आधी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अन्य स्थानिक निवडणुका आघाडी करून एकत्र लढवाव्यात. या निवडणुकांमधून जनतेचा कौल समजून घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या एकीकरणाबाबत अंतिम निर्णय घ्यावा, असे त्यांचे मत होते. याच भूमिकेच्या अनुषंगाने दोन्ही राष्ट्रवादी गटांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचीही एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत निवडणूक रणनीती, जागावाटप आणि आघाडीच्या शक्यतांवर चर्चा झाली. स्थानिक पातळीवर एकत्र काम केल्यास कार्यकर्त्यांमधील दरी कमी होईल आणि पक्ष संघटन मजबूत होईल, असा विचार या चर्चांमागे होता. निवडणुकांनंतर एकत्र येण्याचा निर्णय घेणे अधिक सोयीचे ठरेल, असे त्यावेळी ठरले होते. मात्र, त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडी आणि अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे हे सर्व प्रयत्न अर्धवट राहिले. जयंत पाटील यांनी स्पष्ट केले की, अजित पवार जिवंत असते तर एकीकरणाबाबतचा निर्णय वेगळ्या टप्प्यावर पोहोचला असता. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील दिशा आणि एकीकरणाच्या शक्यतांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तरीही, पक्षाच्या हितासाठी एकत्र येण्याची भूमिका आपण कधीही सोडलेली नाही, असे पाटील यांनी ठामपणे सांगितले. राजकीय समीकरणांवर पुन्हा एकदा चर्चा जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, की दोन्ही गट स्वतंत्रपणे वाटचाल करणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतरचा निर्णय हा एकीकरणासाठी निर्णायक ठरू शकतो, अशी भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. जयंत पाटील यांच्या स्पष्टीकरणामुळे राष्ट्रवादीतील एकीकरणाच्या प्रयत्नांवर नव्याने प्रकाश पडला असून, येत्या काळात या मुद्द्यावर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 12:46 pm

100 युनिट वीज वापरणाऱ्यांना ‘स्मार्ट’ सोलार:लाभार्थींना फक्त 2,500 भरावे लागणार! अल्प उत्पन्न व बीपीएल कुटुंबांसाठी मोठी संधी

शासनाने तीन महिन्यांपूर्वी स्वयंपूर्ण महाराष्ट्र निवासी रूफटॉप (स्मार्ट) सोलार योजना सुरू केली. यातून दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या अल्प उत्पन्न व बीपीएल कुटुंबांना ९०% ते ९५% अनुदानासह छतावरील सौरऊर्जा संच बसवला जाईल. त्यामुळे २५ वर्षे मोफत किंवा शून्य वीज बिलाचा लाभ मिळेल. स्मार्ट योजनेतून ९० टक्क्यांपर्यंत अनुदान : राज्य शासनाने ऑक्टोबर २०२५ पासून ही योजना अमलात आणली आहे. दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील तसेच बीपीएल कुटुंबांना या योजनेचा प्राधान्याने लाभ दिला जात आहे. १ किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी सुमारे ७० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यामधून केंद्र व राज्य शासनाकडून ४७ हजार ५०० रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. लाभार्थींना केवळ २ हजार ५०० ते १० हजार रुपये इतकाच स्वहिस्सा भरावा लागणार आहे. २५ वर्षांपर्यंत बचत सौर प्रकल्पाचे आयुष्य लक्षात घेता लाभार्थींना पुढील २५ वर्षांपर्यंत वीज बिलाचा खर्च टळणार. घरगुती पातळीवर सौरऊर्जा निर्मिती वाढल्यास महावितरणवरील भारही कमी होण्यास मदत होईल. राज्यभरात ५ लाख वीज ग्राहकांना सोलार बसवण्याचे उद्दिष्ट आहे. छतावरून वीजनिर्मिती महागाईच्या काळात वाढत्या वीजदरांचा फटका सामान्य नागरिकांना बसत असताना, स्मार्ट सोलार योजना घरगुती अर्थसंकल्पाला मोठा दिलासा देणारी ठरणार. सामान्यांच्या छतावरून वीजनिर्मितीचे उद्दिष्ट असलेली ही योजना सौरऊर्जा धोरणात महत्त्वाचा टप्पा आहे. महावितरणची बचत महावितरणला ८ रुपये युनिट एवढा खर्च येतो. सुमारे ६० ते ६५ टक्के १०० युनिट खालील वीज ग्राहक आहेत. त्यांनी सोलार बसवल्यास महावितरणची बचत होईल. महावितरणने टेंडर काढून व्हेंडरची निवड केली जाईल. ग्राहकांना केवळ अर्ज करायचा आहे. लाभार्थींनी अर्ज करावा: दरमहा १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना लक्षात घेऊन ‘स्मार्ट’ सोलार योजना राबवली जाते. लाभार्थींना अर्ज करावा लागेल. टेंडर प्रक्रियेनंतर निवडलेल्या व्हेंडरमार्फत सोलार संच बसवण्यात येतील. -पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, महावितरण

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 12:14 pm

..म्हणून विरोधी पक्षनेता नेमला जात नाही:राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, रेवडी वाटून निवडणूक जिंकण्याचा खेळ- विजय वडेट्टीवार

विरोधी पक्षनेते पदासाठी कायदा करण्याचा अधिकार हा केंद्र सरकारकडे असायला हवा. उपमुख्यमंत्री पद हे देखील घटनात्मक पद नाही ते दोन नेमले जातात. पण घटनेत तरतूद असलेले विरोधी पक्षनेता हे पद रिकामे ठेवता यावर संशोधन करण्याची गरज काय? महाराष्ट्र लुटण्यासाठी अडचण ठरु नये म्हणून विरोधी पक्षनेता निवडला जावू नये ही सरकारची भूमिका असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. चंद्रपूरमधील आमच्या काही नगरसेवकांना चाकू, तलवार, बंदूक यांचा धाक दाखवत शिवीगाळ करण्यात आली त्यांना पळून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्या व्यक्तीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तो धानोरकर यांच्या गटाचा पराभूत उमेदवार आहे असे मी ऐकले आहे, नेमके या प्रकरणी संपूर्ण माहिती नाही, गुन्हेगार कोण आहेत, कुणाच्या जवळचे आहेत याबद्दल मला माहिती नाही, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे विजय वडेट्टीवार म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावे का नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण मला वाटते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत अजित पवार आता नाहीत अशा परिस्थितीत कुठल्याही पक्षाची ताकद एकवटली पाहिजे. जनतेला त्या पक्षाकडून काही अपेक्षा आहेत, त्यांच्या विचारधारेशी अनेक लोकं जोडले गेले आहेत ते जोपासण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे असे मला वाटते. पण तो त्यांचा प्रश्न आहे की कसे एकत्र यायचे आणि कुठल्या प्रश्नावर एकत्र यायचे. शरद पवार यांनी कुटुंबाला एका माळेत बांधण्याचे काम केले आहे. ही जबाबदारी आता युवा पिढीने एकत्र सांभाळली पाहिजे. सुनेत्रा पवारांना मंत्रिपद दिले तरच चांगलेच विजय वडेट्टीवार म्हणाले की, सुनेत्रा पवार यांना जर उपमुख्यमंत्री करायचे हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांच्याकडे असेही एक मंत्रिपद राखीव आहेच. एक महिला जर उपमुख्यमंत्री होत असेत तर पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्री मिळेल याचा आम्हालाही आनंदच आहे. त्यांना पद दिले तर चांगलीच गोष्ट होईल. राज्य दिवाळखोरीत निघाले विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्य दिवाळखोरीत निघाले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी रेवडी वाटल्या जात आहेत. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती न बघता केवळ सत्ता मिळवण्यासाठी राज्याचे वाटोळे करण्याचा अधिकार यांना दिला कोणी? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे सगळे निर्णय होतात आणि निवडणूक जिंकल्या जातात यावेळी निवडणूक आयोग काय करते असा सवालही त्यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने कठोर भूमिका घेतली पाहिजे पण ते कठोर भूमिका घेऊ शकत नाहीत. ते सरकारच्या हातामधील खेळणं झाले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 11:59 am

MUHS च्या कुलगुरूंचे अपंगत्व 52 नव्हे 18 टक्के:डॉ. अजय चंदनवाले म्हणाले- मला दिव्यांग मंडळानेच प्रमाणपत्र दिले, मानेचे 3 मणके झिजलेत

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले यांनी १८ टक्के अपंगत्व असताना ५२ टक्के अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत लाभ घेतल्याची गंभीर तक्रार केंद्र सरकारकडे दाखल झाली आहे. या प्रकरणी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने महाराष्ट्र शासनाला सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. 'दिव्य मराठी' उघड केलेल्या या प्रकरणामुळे वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणी अखेर डॉ. अजय चंदनवाले यांनी मौन सोडून या प्रकरणाचे सारे आरोप फेटाळून लावलेत. डॉ. अजय चंदनवाले यांच्याशी दिव्य मराठीने संवाद साधला तेव्हा ते म्हणाले की, 'मला दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या मंडळानेच हे प्रमाणपत्र दिल्याचे' म्हटले आहे. मात्र, दुसरीकडे त्यांची तीन स्तरावर चौकशी सुरू झालीय. एकीकडे केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारकडून अॅक्शन टेकन रिपोर्ट मागितलाय. तर दुसरीकडे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटकडूनही कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. नेमके प्रकरण काय? बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविल्याने नोकरी गमवावी लागलेल्या पूजा खेडकर यांचे प्रकरण नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे सध्या सुनावणीसाठी आहे. ते काहीसे शांत होत नाही तोच, खोटे-बनावट प्रमाणपत्र सादरीकरणातून शासकीय सेवेत दाखल होण्याचे प्रकरण थेट महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूंच्या रूपाने उघडकीस आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डॉ. दिव्यांश द्विवेदी यांनी प्रधानमंत्री कार्यालयाकडे (पीएमओ) या संदर्भात तक्रार (नोंदणी क्र. PMOPG/E/2025/0202533) केली आहे. कारवाईची टांगती तलवार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले यांनी ५२ टक्के अपंगत्व असल्याचे भासवून दिव्यांग (पीडब्ल्यूडी) कोट्यातून वैद्यकीय शिक्षण आणि प्रशासकीय विभागात वरिष्ठ पदे मिळवली आहेत. मात्र, २१ ऑक्टोबर २०२१ रोजी वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीच्या तपासणीत त्यांचे प्रत्यक्ष अपंगत्व केवळ १८ टक्के असल्याचे समोर आले असल्याचे म्हटले आहे. ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम, २०१६’ नुसार, आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी किमान ४० टक्के अपंगत्व असणे अनिवार्य आहे. डॉ. अजय चंदनवाले यांचे अपंगत्व १८ टक्के आढळल्याने, त्यांनी घेतलेले सर्व लाभ कायदेशीररीत्या अवैध ठरण्याची शक्यता आहे. सोबतच डॉ. चंदनवाले यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन त्यांचे पद सुद्धा धोक्यात येऊ शकते. तीन मणके झिजले- चंदनवाले दिव्य मराठीने या प्रकरणी डॉ. अजय चंदनवाले यांच्याशी संपर्क साधला. सुरुवाती त्यांचा संपर्क झाला नाही. मात्र, त्यांची उशिरा पतिक्रिया मिळाली. ते म्हणाले की, 'माझ्या मानेचे तीन मणके झिजले आहेत. उजवा खुबा व डाव्या हातात कमकुवतपणा आहे. जे प्रमाणपत्र दिले आहे, ते दिव्यांग व्यक्तींसाठी निर्माण केलेल्या मंडळाकडून मिळाले आहे. माझ्याविरोधात चुकीच्या पद्धतीने तक्रारी केल्यास त्यांना कायद्यानुसार उत्तर देईन,' असा इशाराही त्यांनी दिला आहे. तीन स्तरांवरून चौकशी सुरू १. केंद्र सरकार : कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले यांच्या बनावट प्रमाणपत्र प्रकरणाच्या तक्रारीबद्दल केंद्र सरकारने राज्य सरकारला केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच सामाजिक न्याय मंत्रालयाचे सहायक विभाग अधिकारी सुशील कुमार यांनी महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाला पत्र लिहून या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्यास सांगितले आहे. २. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग : एनएमसीने देखील या तक्रारीची दखल घेतली असून, २६ डिसेंबर २०२५ रोजी या विषयावर अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. ३. राज्य शासन : वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी या संदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) प्रतिज्ञापत्र सादर केले असून, विभागातर्फे कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे समजते. पूर्णवेळच्या कुलगुरूंची प्रतीक्षा नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर या ऑक्टोबर २०२५ मध्ये निवृत्त झाल्या. त्यानंतर राज्यपाल तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे सोपविला आहे. मात्र, आता डॉ. चंदनवाले वादाच्या भोवऱ्यात सापडलेत. तर विद्यापीठाला पूर्णवेळच्या कुलुगरूंची प्रतीक्षा आहे. MUHS विद्यापीठाचा व्याप मोठा देशात आरोग्य विज्ञान शिक्षणात समानता आणि या क्षेत्रात विद्यापीठीय श्रेष्ठता येण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने स्वतंत्रपणे आरोग्य विद्यापीठ स्थापन्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने नाशिक येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाची म.आ.वि.वि. कायदा 1998 द्वारे 3 जून 1998 रोजी स्थापना झाली. त्यानंतर अनेक आरोग्य विज्ञान महाविद्यालये जे पूर्वी परंपरागत विद्यापीठाशी संलग्न होते, ते म.आ.वि.वि.नाशिकच्या कार्यक्षेत्रात आले. विद्यापीठ स्थापन करताना 193 आरोग्य विज्ञान महाविद्यालये आणि एकूण 11995 विद्यार्थ्यांच्या जागासहित विद्यापीठाशी संलग्न झालेत. आरोग्य विज्ञान महाविद्यालयांची संलग्नता मेडिकल - 35 डेंटल - 28 आयुर्वेद - 62 युनानी - 06 होमिओपॅथी - 45 विद्यापीठाचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम Medical M.B.B.S. ( Bachelor of Medicine and Surgery) B.P.M.T. ( Bachelor of Paramedical Technology ) M.D. ( Doctor of Medicine) M.S. (Master of Surgery) D.M. (Doctor of Medicine) M.Ch. ( Magister of Chirugie) Dental B.D.S. ( Bachelor of Dental Surgery and Medicine) M.D.S. (Master of Dental Surgery) Ayurved B.A.M.S . (Bachelor of Ayurved Medicine Surgery) M.D. ( Doctor of Medicine) (Ayurved Vachaspati) M.S. ( Doctor of Surgery) (Ayurveda Dhanwantari) Unani B.U.M.S . (Bachelor of Unani Medical Medicine Surgery) M.D. ( Doctor of Medicine) (Mahir-E-Tib) M.S. ( Doctor of Surgery) (Mahir-E-Jarahat) Allied Health Sciences B.P.TH. ( Bachelor of Physiotherapy) M.P.Th. ( Master of Physiotherapy) BOP.TH. ( Bachelor of Occupational Therapy) M.O.Th. ( Master of Occupational Therapy) B.A.S.L.P. ( Bachelor in Audiology and Speech Language Pathology) B.SC. (H.L.S.) ( Bachelor of Science (Hearing, Language and Speech) M.A.S.L.P. ( Master of Audiology Speech and Language Pathology) B.P.O. ( Bachelor of Prosthetics) M.P.O. ( Master of Science (Prosthetics and Orthotics) B.SC. NURSING ( Bachelor of Science in Nursing) BASIC B.SC. NURSING ( Bachelor of Basic Science in Nursing) P.B.B.Sc . Nursing ( Post Basic B.Sc. Nursing) P.B.B.SC. NURSING ( Post Basic Certificate in Bachelor of Science in Nursing) P.C.B.SC. NURSING ( Post Certificate in Bachelor of Science in Nursing) M.Sc. Nursing (Medical Surgical Nursing) संबंधित वृत्त दिव्य मराठी एक्सक्लूझिव्ह-MUHS चे कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले वादात:बनावट अपंगत्व प्रमाणपत्र सादर करून शासकीय सेवेत घेतला लाभ; 'केंद्रा'ने मागवला महाराष्ट्राकडून अहवाल

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 11:50 am

अजित पवारांच्या अस्थी संकलनावेळी पवार कुटुंब एकत्र:शरद पवार स्वतः उपस्थित, अस्थींचे दर्शन घेतले; संपूर्ण वातावरणात शोक आणि शांतता

अंत्यसंस्कारानंतर आज अजित पवारांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरात सकाळी हा विधी पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतः उपस्थित होते. त्यांनी अजित पवारांच्या अस्थींचे दर्शन घेतले. या वेळी पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार, रणजित पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार यांच्यासह पवार कुटुंबातील अनेक सदस्य आणि निकटवर्तीय कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण वातावरणात शोक आणि शांतता जाणवत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असून, गुरुवारी दुपारी बारामतीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर दुपारी 12 वाजता हा अंत्यविधी पार पडला. शासकीय इतमामात बंदुकीच्या सलामीसह त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवार यांच्या जाण्याने राजकीयच नव्हे तर सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून, अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेले वातावरण अत्यंत भावनिक होते. अंत्यसंस्काराच्या वेळी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांना मुखाग्नी दिला. हा क्षण उपस्थित प्रत्येकासाठी अत्यंत वेदनादायक होता. कुटुंबीय, नातेवाईक, कार्यकर्ते आणि राज्यभरातून आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारो लोकांनी डोळ्यात अश्रू ठेवत आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. बारामती परिसरात शोककळा पसरली होती आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया स्पष्ट दिसत होती. दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून या घटनेची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच बारामती पोलिसांना अपघातस्थळावर कोणालाही प्रवेश देऊ नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. फॉरेन्सिक पथकाने यापूर्वीच अपघातस्थळी जाऊन आवश्यक नमुने गोळा केले असून, ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास बारामती पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने केला जाणार आहे. सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार, सदर विमान 28 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजून 18 मिनिटांनी पहिल्यांदा बारामती विमानतळाच्या संपर्कात आले होते. एटीसीकडून वैमानिकांना त्या वेळी वाऱ्याचा वेग कमी असून दृश्यमानता सुमारे 3000 मीटर असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पायलटने आपण रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत असल्याचे कळवले. मात्र, त्यांना रनवे स्पष्टपणे दिसत नसल्याचे त्यांनी एटीसीला सांगितले. यानंतर पायलटने रनवे दिसू लागल्यावर कळवतो असे सांगितले. सकाळी 8.43 वाजता रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी पूर्णतः सज्ज करण्यात आला. मात्र त्यानंतर पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही क्षणांतच धावपट्टीच्या डाव्या बाजूला अचानक ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले. एटीसीवर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली असून, त्यानंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले. फॉरेन्सिक तपासातून उलगडा या अपघातामुळे संपूर्ण राज्य हादरले असून, अजित पवार यांच्या निधनाने निर्माण झालेल्या दुःखात आता या दुर्घटनेच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सीआयडी चौकशी आणि फॉरेन्सिक तपासातून नेमकी दुर्घटना कशी घडली, यात कोणती त्रुटी होती का, याचा उलगडा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बारामती आणि राज्यभरात अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात असून, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 11:50 am

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील!; अजित पवार असतानाच प्रयत्न सुरू होते:आता शरद पवार निर्णय घेतील– नरहरी झिरवाळ

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला असून, अजित पवार असतानाच यासाठी प्रयत्न सुरू झाले होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ यांनी म्हटले आहे. त्यातूनच नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका एकत्र लढवण्याच्या निर्णयानुसार जागावाटप झाले होते, त्यामुळे पवार साहेब आमचा नक्की विचार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, कारण अजित पवार असतानाच त्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. न.प. आणि जि.प, पंचायत समिती यामध्ये एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला त्या अनुषंगानेच जागावाटप झाले. त्यामुळे पवार साहेब आमचा विचार करतील. त्या दृष्टीने आम्ही साहेबांकडे जाण्यापेक्षा साहेब आम्हाला बोलू शकतात किंवा सांगू शकतात, कारण आम्ही आता पोरके झालो आहोत. शरद पवारांचे कायम मार्गदर्शन नरहरी झिरवाळ म्हणाले की, शरद पवार यांची प्रकृती गंभीर झाली किंवा दोन पक्ष वेगळे झाले तरी शरद पवार हे आतून मार्गदर्शन आणि सहकार्य करत होते. अजित पवार यांना शरद पवारांच्या नावाने एक आधार होता. शरद पवार पक्षाच्या भवितव्यासाठी निर्णय घेतील. पवार कुटुंबाने एकत्र राहणे गरजेचे मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले की, सर्व नागरिकांची अशी मागणी आहे की वहिनींना मंत्रिमंडळात समाविष्ट केले पाहिजे. पवार कुटुंब एकत्र आले आहेच. पवार कुटुंबाने एकत्र राहणे गरजेचे आहे हे सर्व सामान्य नागरिकांची मागणी आहे. अनेक नेत्यांना अजित पवार गेल्याने खूप त्रास होत आहे. अजित पवारांच्या आठवणी कायम सोबत राहतील. अजित पवार यांच्यासारखा नेता होऊच शकत नाही. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाळ म्हणाले की, अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे.अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे हे राष्ट्रवादी काँग्रेससमोरील मोठे आव्हान आहे. झिरवाळ यांच्या विधानामुळे हे आव्हान अधिक ठळकपणे समोर आले आहे. येत्या काही दिवसांत पक्षांतर्गत बैठकांमध्ये आणि सत्ताधारी आघाडीत यावर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. ही वेळ यायला नको होती- खोसकर हिरामन खोसकर म्हणाले की, काही बोलण्यासारखे ठेवलेच नाही. पांडूरंगाने तेवढी वेळ टाळायला हवी होती. आम्ही सर्व सर्व जण पोरके झालो आहोत. आम्ही खूप मोठ्या संकटात पडलो आहोत. मी माझ्या आई-वडीलानंतर मी अजित पवारांना मानायचो. एकाच मंगळवारी मी मुंबईत गेलो नाही तर दादांना मला झापले म्हणे तू डॉक्टर होतास का? ही वेळ यायला नको होती.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 11:34 am

अजित पवारांच्या नावावर राजकारण अमानुष; संजय राऊतांचा संताप:म्हणाले- आरोप मागे घ्या, तीच श्रद्धांजली; महापौर निवडीवरही टीका

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून राज्य अद्याप सावरलेले नसताना त्यांच्या नावावर सुरू असलेल्या राजकारणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या नावावर राजकारण करणे अतिशय अमानुष आहे आणि अशा विषयांवर आपण बोलणार नाही. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांना संयम बाळगण्याचे आवाहन करत सध्याच्या दुःखद परिस्थितीत राजकीय चर्चा टाळण्याची गरज असल्याचे नमूद केले.संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांच्या पार्थिवावर नुकतेच अंत्यसंस्कार करण्यात आले असून, महाराष्ट्र अजूनही त्यांच्या जाण्याच्या दुःखातून सावरलेला नाही. अशा परिस्थितीत कोणी त्यांच्या नावावर राजकीय डावपेच खेळत असेल, तर ते अत्यंत चुकीचे आहे. तळागाळातील कार्यकर्तेसुद्धा रडत होते. अशा वेळी किमान 15 ते 20 दिवस तरी राजकीय चर्चा नको. त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषयांवर किंवा त्यांच्या कुटुंबातील निर्णयांवर बोलणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. माध्यमांनाही या विषयावर अनावश्यक चर्चा टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. पवार कुटुंबीयांच्या दुःखाचा उल्लेख करताना राऊत म्हणाले की, प्रत्येक कुटुंबीयाच्या डोळ्यात अश्रू होते आणि वातावरण अत्यंत भावनिक होते. एका महिलेनं आपला पती गमावला आहे, कुटुंबाने कर्ता पुरुष गमावला आहे. त्यांच्या डोळ्यात अजूनही अश्रू आहेत आणि त्यावर कोण नेतृत्व करणार, कोण पदावर येणार यावर चर्चा करणं माणुसकीशून्य आहे. मंत्री असो किंवा आमदार असो, अशा विषयावर बोलणं अमानुष आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. परिस्थिती स्थिरस्थावर झाल्याशिवाय राजकीय चर्चांना फाटा देऊ नये, असा सल्ला त्यांनी सर्व नेत्यांना दिला. बारामती विमान अपघात प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी दोन अराजकीय मागण्या मांडल्याचे सांगितले. त्यांनी अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आणि नागरी विमान वाहतूक संचालन यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले. बारामती विमानतळावर रडार नव्हते, एटीसी नव्हते, आवश्यक यंत्रणा नव्हती. केवळ एअरस्ट्रीप होती आणि तिथे व्हीआयपी विमानं उतरायची. अशा ठिकाणी शरद पवार, अदानीसारखी व्यक्ती येत होती, याची जबाबदारी कोणाची? असा सवाल त्यांनी केला. अजित पवारांचे विमान बराच वेळ आकाशात घिरट्या मारत होते, दृश्यमानता कमी होती, तरी लँडिंगचा संदेश कोणी दिला, अशी विचारणा त्यांनी केली. राऊत यांनी DGCA (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) च्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विमान संचालनासाठी आवश्यक असलेल्या सुविधा देशातील अनेक विमानतळांवर नसतील, तर DGCA काय करत आहे, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी सांगितले की, गेल्या काही काळात अनेक विमान अपघात झाले असून त्यात जीवितहानी झाली आहे. त्यामुळे संपूर्ण प्रणालीची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ही मागणी राजकीय नसून पूर्णपणे सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दादांवर प्रेम असेल, तर त्यांच्यावर केलेले आरोप मागे घ्या संजय राऊत यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. अजित पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी पानभर जाहिराती देण्यात आल्याचे त्यांनी नमूद करत, केवळ जाहिराती देऊन श्रद्धांजली देण्याचा उपयोग नाही, असे म्हटले. भाजपनं दादांवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता आणि तो सिद्ध करू शकले नाहीत. पंतप्रधानांनीही हा आरोप केला होता. जर दादांवर प्रेम असेल, तर त्यांच्यावर केलेले आरोप मागे घ्या, तीच खरी श्रद्धांजली ठरेल, अशी मागणी देखील त्यांनी केली. ही राजकीय मागणी नसून मानवी भावनेतून केलेली विनंती असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर निवडीच्या विलंबावरही नाराजी याचवेळी संजय राऊत यांनी मुंबई महापौर निवडीच्या विलंबावरही नाराजी व्यक्त केली. महापौर निवडीच्या तारखा वारंवार पुढे ढकलल्या जात असल्याचे सांगत, भाजप आणि शिंदे गटातील मतभेदांमुळे मनपा सत्तेचे वाटप अडकले असल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवक निवडून आले असूनही त्यांना काम सुरू करू दिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विरोधी पक्षनेतेपदाबाबत नवा कायदा आणण्याची चर्चा सुरू असल्यावर टीका करत, हे महाराष्ट्राची बदनामी करणारे कृत्य असल्याचा आरोप त्यांनी केला. या सर्व घडामोडींमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे समर्थक असल्याचा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 11:27 am

नाशिकच्या महापौरपदाचा चेहरा 3 फेब्रुवारीला होणार स्पष्ट:पहिल्या दिवशी एकाही इच्छुकाने नेला नाही अर्ज; भाजपच्या 16 नगरसेविका पात्र, अंतिमत: तिघींमध्ये रस्सीखेच

महापौरपदासाठी 6 फेब्रुवारीला निवडणूक होणार असली तरी या पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, याचे चित्र 3 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर स्पष्ट होईल. दुपारी 2 पर्यंत अर्जासाठी अंतिम मुदत आहे. भाजपकडे स्पष्ट बहुमत असून पक्षाच्या 16 महिला नगरसेविका पात्र आहेत. मात्र, यात प्रामुख्याने तीन नावांची सर्वाधिक चर्चा आहे. वरिष्ठ पक्षनेत्यांची पसंती तीनपैकी कोणाला, याविषयीच आता उत्सुकता वाढली आहे. Q : भाजपकडे बहुमत असताना महापौरपदाची निवडणूक होणार का?A : भाजपकडे स्पष्ट बहुमत असले तरी महापौरपदासाठी महिलांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे एकपेक्षा जास्त इच्छुकांनी अर्ज दाखल केल्यास निवडणूक घ्यावी लागेल. मात्र, असे होण्याची शक्यता फारच कमी आहे.Q : भाजपमधूनच एकापेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज भरल्यास काय?A : महापौरपदासाठी भाजप गटनेता पक्षाने ठरवलेल्या उमेदवाराचे नाव देतील. मात्र, अन्य नाराज उमेदवाराने निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास गटनेता त्यांना अर्ज माघारीसाठी पक्षातर्फे व्हिप बजावतील. व्हिप बजावूनही संबंधिताने निवडणूक लढवल्यास त्यांचे नगरसेवकपद रद्द होऊ शकते.Q : अर्ज माघारीसाठी पक्षासोबत काय तडजोडी केल्या जातील ?A : नाराजांच्या मनधरणीसाठी त्यांना पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदाची ऑफर दिली जाईल. यात स्थायी समितीसह 10 समित्या असतील. इनसाइड स्टोरी पालिका निवडणूक भाजपविरोधात लढल्यानंतर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) हे दोन्ही पक्ष सत्तेत सहभागी होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्रात आणि राज्यात तीनही पक्ष महायुतीद्वारेच सत्तेत असल्याने नाशिकमध्येही ते एकत्रच असावे असा विचार राज्यस्तरावरून आहे. त्यादृष्टीने नाशिकमध्येही स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शिंदेसेनेच्या कार्यालयात जाऊन नवनियुक्त गटनेते अजय बोरस्ते तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांची भेट घेत त्यांना सत्तेत सोबत येण्याचे निमंत्रण दिले.कुठली पदे कुठल्या पक्षाला याबाबत अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे समजते. दरम्यान, केंद्रात आणि राज्यात आम्ही सत्तेत आहोतच. मग सिंहस्थ आणि नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने विचार करता नाशिक पालिकेतही तीनही पक्षांनी सोबतच राहावे, असेच वरिष्ठांचेही मत असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 10:49 am

अजित पवार यांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण मांडणार?:फडणवीसांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष; 6 मार्चला अर्थसंकल्प

यंदा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सादर करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणात ही एक अत्यंत दुर्दैवी आणि अनपेक्षित घडामोड ठरली असून, तिचा थेट परिणाम अर्थसंकल्पीय प्रक्रियेवरही झाल्याचे दिसून येत आहे. 23 फेब्रुवारीपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून, 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खात्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे दिली जाणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः ही जबाबदारी स्वीकारून अर्थसंकल्प मांडतील, अशी शक्यता अधिक वर्तवली जात आहे. अर्थ खाते हे राज्यातील सर्वांत महत्त्वाचे खाते मानले जाते आणि या खात्याशी संबंधित निर्णयांचा थेट परिणाम प्रशासन, विकासकामे आणि सामान्य जनतेवर होत असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विलंब टाळण्यासाठी मुख्यमंत्री पुढाकार घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलून दाखवली जात आहे. यापूर्वीही राज्याच्या राजकारणात असाच प्रसंग घडलेला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडेच अर्थ खात्याची जबाबदारी होती. त्या काळात फडणवीस यांनीच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामुळे अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव, प्रशासकीय समज आणि आर्थिक धोरणांची जाण फडणवीस यांच्याकडे असल्याने, यंदाही ही जबाबदारी त्यांच्याकडेच सोपवली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. अजित पवार हे केवळ उपमुख्यमंत्री नव्हते, तर ते राज्याचे अर्थमंत्रीही होते. त्यांच्या अकाली निधनामुळे अर्थ खात्याची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आता हे खाते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याला दिले जाणार की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खाते तात्पुरते स्वतःकडेच ठेवणार, याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र अर्थसंकल्प सादर करण्यासाठी वेळ अत्यंत मर्यादित असल्याने सध्या कोणतेही नवीन फेरबदल न करता मुख्यमंत्रीच ही जबाबदारी पार पाडतील, अशी शक्यता अधिक मानली जात आहे. महाराष्ट्राचा नवा अर्थसंकल्प सादर होण्यासाठी आता अवघा एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, विविध विभागांकडून आवश्यक आकडेवारी, मागण्या आणि प्रस्ताव संकलित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा थेट सहभाग नसल्यामुळे ही प्रक्रिया अधिक आव्हानात्मक ठरत आहे. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अर्थसंकल्पीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता, ही अडचण सरकार सहजपणे हाताळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यंदाच्या अर्थसंकल्पाकडे अनेक अर्थांनी विशेष लक्ष लागले आहे. राज्यातील विकासकामे, पायाभूत सुविधा, शेतकरी कल्याण, सामाजिक योजना आणि औद्योगिक गुंतवणूक याबाबत कोणत्या घोषणा केल्या जाणार, याची उत्सुकता सर्व स्तरांत आहे. त्याचबरोबर आर्थिक शिस्त, खर्चावर नियंत्रण आणि महसूल वाढीच्या उपाययोजनांवरही भर दिला जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत सादर होणारा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने त्याला राजकीय आणि भावनिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. 6 मार्च रोजी सादरा होणार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दरम्यान, राज्यात जाहीर करण्यात आलेला तीन दिवसांचा शासकीय दुखवटा संपल्यानंतर अर्थसंकल्पाशी संबंधित आवश्यक अधिसूचना आणि प्रशासकीय निर्णय जाहीर केले जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अर्थखात्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे राहणार, याबाबत स्पष्टता येईपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सर्व प्रक्रिया हाताळतील, असे संकेत आहेत. त्यामुळे 6 मार्च रोजी सादर होणारा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा केवळ आर्थिक दस्तऐवज न राहता, सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आरसाही ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 10:48 am

पहिल्या टप्प्यात 30 इ-बस येणार पैकी 10 पिंक बसेस महिलांसाठी:सोलापुरात चार्जिंग सेंटरचे काम येत्या आठ दिवसांत होणार पूर्ण

केंद्र सरकारकडून सोलापूर शहराला 100 इ-बस मंजूर झाले. पैकी पहिल्या टप्प्यात 30 बस मिळणार असून, पैकी 10 बस पिंक कलरच्या फक्त महिलांसाठीच असणार आहेत. त्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी गुरुवारी दिव्य मराठीला दिली. त्यासाठी 27 कोटी रुपये खर्चून बस डेपो आणि चार्जिंग सेंटर बांधले जात आहे. याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठ दिवसांत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. बस डेपोच्या जागेत नवीन बस डेपो उभारला जात आहे. तेथे महावितरणच्या उपकेंद्राची उभारणीही सुरू झाली. त्यासाठी 4 हजार चौरस मीटर जागा देण्यात आली. हे उपकेंद्र 33/ 11 केव्ही, क्षमता 10 एमव्हीएचे आहे. त्याच्या उभारणीसाठी 9 कोटी 86 लाख रुपये लागणार आहेत. इतर पायाभूत सुविधांसाठी 15 कोटी रुपये मंजूर झाले असून, त्याचेही काम सुरू आहे. 3 कोटी रुपये खर्च करून विजेची लाईन टाकण्याचे काम सुरू झाले. सर्व बस चार्ज करण्यासाठी 20 चार्जिंग पॉईंट कार्यान्वित केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात बस आल्यानंतर ज्या भागात अत्यंत गरज आहे, त्या भागात पहिल्यांदा बससेवा सुरू होईल. उर्वरित भागात बस जसे येतील तशा पद्धतीने सेवा देण्याचे प्रयत्न राहतील, असे सांगण्यात आले. चार्जिंग सेंटरमध्ये काय? 1 बुधवार पेठेतील बस डेपोच्या जागेत चार्जिंग सेंटर उभारण्याचे युद्धपातळीवर सुरू झाले. त्यात पार्किंग, पी.एस. स्टेशन, काँक्रिटीकरण, हायमास्ट, सुरक्षा भिंत या पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या.2 वर्कशॉप, वॉशिंग परिसर, ॲडमिन बिल्डिंग या तिन्हींचे काम अंतिम टप्प्यात आल्यामुळे महापालिकेने जेबीएम कंपनीला करारासाठी बोलावले आहे. कंपनीचे पथक पाहणी करून गेले आहे.3 येत्या काही दिवसात कंपनीचे विशेष पथक येईल आणि कराराची प्रक्रिया पूर्ण करेल. करार केल्यानंतर पहिल्या टप्प्यात दोन ते अडीच महिन्यांतच बसेस येतील. उर्वरित टप्प्याटप्प्याने येतील. करारासाठी कंपनीला बोलावले आहे इ-बस चार्जिंग सेंटर, बस डेपोचे काम युद्धपातळीवर आहे. येत्या आठ दिवसांत काम पूर्ण होईल. करारासाठी जेबीएम कंपनीला बोलावले आहे. करार करून पुढची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील बसगाड्या येतील. डॉ. सचिन ओम्बासे, आयुक्त

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 10:37 am

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:2017 पूर्वीचे बारकोड जन्म-मृत्यू दाखले‎ आता महिन्याला केवळ 100 मिळणार‎, नवीन जन्म दाखल्यांना अडचण नाही‎

संपूर्ण राज्यात गाजलेल्या बनावट‎ दाखल्यांच्या प्रकरणानंतर शासनाने‎ अत्यंत कडक पाऊल उचलले आहे.‎ जन्म-मृत्यूच्या सीआरएस पोर्टलवर‎ आता सन 2017 पूर्वीचे बारकोड‎ असलेले दाखले जनरेट करण्यासाठी‎ महिन्याला केवळ 100 दाखल्यांची‎ मर्यादा घालण्यात आली आहे. यामुळे‎ आता सर्वसामान्य नागरिकांना आपल्या‎ हक्काच्या दाखल्यासाठी महिनोंमहिने ‎वाट पाहावी लागणार असून, जळगाव‎ महापालिकेसह राज्यभरात नागरिकांची ‎मोठी गैरसोय होणार आहे.‎ यापूर्वी जळगाव महापालिकेत ‎दररोज सन 2017 पूर्वीचे जन्म-मृत्यूचे‎ 30 ते 50 बारकोड दाखले दिले जात‎ होते. मात्र, नवीन नियमामुळे आता‎ दिवसाला सरासरी फक्त 3 ते 4 दाखलेच दिले जाऊ ‎शकतात. शंभरच्या कोट्यात‎ आपला क्रमांक लागावा यासाठी‎ आता नागरिकांची धावपळ होणार‎ असून, मनपाच्या जन्म-मृत्यू‎विभागात गोंधळ वाढण्याची शक्यता ‎निर्माण झाली आहे. कधी बनावट ‎दाखले तर कधी, कर्मचारी कमी,‎तर दाखल्यांसाठी वशिलेबाजीमुळे‎ हा विभाग नेहमीच चर्चेत असतो.‎परंतू गेल्या काही दिवसांपासून‎ विभागात सुरळीत काम सुरू होते,‎ कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे.‎पण, आता बारकोड दाखल्यांना‎मर्यादा घातल्याने पुन्हा कर्मचाऱ्यांची ‎डोकेदुखी वाढणार आहे.‎ ग्रामपंचायतींना केवळ 10‎ दाखल्यांची कॅप‎ शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील‎ परिस्थिती अधिक गंभीर होणार‎ आहे. ग्रामपंचायतींमध्ये बारकोड‎ असलेले दाखले महिन्याला केवळ ‎10 निघणार आहेत. राज्यात‎ ठिकठिकाणी बोगस दाखले तयार‎ करणारी रॅकेट उघड झाल्याने‎ शासनाने हा निर्णय घेतल्याचे ‎बोलले जात आहे. मात्र, यामुळे ‎ज्यांना तातडीने कामासाठी दाखले‎ हवे आहेत, त्यांची मोठी हेळसांड‎ होणार आहे.‎ साध्या दाखल्यांवरही काम सुरू ठेवण्याच्या आहेत सूचना‎ पोर्टलवर महिन्याला शंभर बारकोड दाखले निघतील, असा मेसेज येत आहे.‎राज्यात बोगस दाखल्यांची प्रकरणे समोर आल्याने शासनाने निगराणी ठेवण्यासाठी‎हे पाऊल उचलले आहे. साध्या दाखल्यांवर काम सुरू ठेवण्याच्या सूचना आहेत.‎नवीन जन्म दाखल्यांना अडचण नाही. जुन्या दाखल्यांसाठी आम्ही सध्या अर्ज‎स्वीकारत आहोत, ज्यांना पुढील महिन्यांच्या कोट्यातून दाखले दिले जातील.‎- मनिषा उगले, प्रमुख, जन्म-मृत्यू नोंदणी विभाग, महापालिका जळगाव तर यांच्यासाठी मर्यादा नसेल‎ शासनाने ही मर्यादा केवळ सन 2017‎ पूर्वीच्या जुन्या नोंदींसाठी लावली आहे.‎2017 नंतरचे म्हणजे 2018 ते 2025 ‎पर्यंतचे आणि नवीन होणारे जन्म-मृत्यू‎ दाखले मिळवण्यासाठी कोणतीही‎ मर्यादा नाही. या कालावधीतील‎ दाखले नागरिकांना नियमितपणे आणि ‎कितीही संख्येने उपलब्ध होणार‎ आहेत. या नागरिकांची मात्र गैरसोय‎ होणार नाही असे सांगण्यात येते आहे.‎ फेब्रुवारी, मार्चची प्रतीक्षा सुरू‎ जळगाव मनपा जन्म-मृत्यू विभागात या‎नवीन नियमाची अंमलबजावणी सुरू ‎आहे. चालू महिन्याचा 100 दाखल्यांचा ‎कोटा पूर्ण झाला असून, आता फक्त‎ अर्ज स्वीकारताहेत. या अर्जदारांना‎ आता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या ‎कोट्यातून दाखले मिळतील. पासपोर्ट,‎ व्हिसा, शाळा प्रवेश, शासकीय कामांना‎बारकोड डिजिटल दाखलाच अनिवार्य‎ असल्याने नागरिकांसमोर पेच आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 10:31 am

सरकारचा मोठा निर्णय:अजित पवार विमान दुर्घटनेच्या CID चौकशीचे आदेश; गूढ उकलणार? अपघातस्थळावर प्रवेश बंदी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी, 28 तारखेला, बारामती येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून, राज्यभर शोककळा पसरली आहे. गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या पार्थिवाला चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थित हजारो समर्थकांनी अजित दादा अमर रहेच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यांच्या निधनानंतर राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर केला आहे. अजित पवार यांच्या अचानक जाण्याने केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवरही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अंत्यसंस्कारानंतर आता या विमान अपघाताच्या तपासाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने या दुर्घटनेची CID चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच बारामती पोलिसांना अपघातस्थळावर कोणालाही प्रवेश देऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तपास प्रक्रियेत कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने याआधीच अपघातस्थळी भेट देऊन आवश्यक नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. विमानाचे अवशेष, जळालेल्या भागांचे नमुने आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी सुरू आहे. हा संपूर्ण तपास बारामती पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या ‘एक्सिडेंटल डेथ रिपोर्ट’च्या अनुषंगाने केला जाणार आहे. CID तपासात फॉरेन्सिक अहवाल, एटीसी लॉग्स आणि प्राथमिक माहिती यांचा सखोल अभ्यास केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारच्या प्राथमिक अहवालानुसार, हे विमान 28 जानेवारी रोजी सकाळी 8.18 वाजता पहिल्यांदा बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संपर्कात आले होते. त्या वेळी वैमानिकांना सांगण्यात आले की हवामान सामान्य आहे, वाऱ्याचा वेग कमी आहे आणि दृश्यमानता सुमारे 3000 मीटर इतकी आहे. यानंतर वैमानिकांनी रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत असल्याची माहिती दिली. मात्र, त्यांना रनवे स्पष्टपणे दिसत नसल्याचे त्यांनी एटीसीला कळवले होते. थोड्या वेळाने पायलटने पुन्हा एटीसीला कळवले की रनवे दिसू लागल्यावर ते माहिती देतील. त्यानंतर सकाळी 8.43 वाजता रनवे क्रमांक 11 लँडिंगसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे एटीसीकडून कळवण्यात आले. मात्र, यानंतर पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला अचानक मोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट उठताना दिसले, अशी माहिती एटीसीवर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने दिली आहे. या दृश्याने नियंत्रण कक्षातही एकच खळबळ उडाली होती. संपूर्ण चौकशी केली जाणार या अपघाताच्या शेवटच्या काही मिनिटांत नेमके काय घडले, याचा उलगडा CID चौकशीतून होण्याची शक्यता आहे. वैमानिकांची भूमिका, तांत्रिक बिघाड, हवामान स्थिती आणि एटीसीशी झालेला संवाद या सर्व बाबी तपासाच्या केंद्रस्थानी असणार आहेत. अजित पवार यांच्यासारख्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्याच्या मृत्यूमुळे हा तपास अत्यंत संवेदनशील मानला जात असून, कोणतीही शक्यता गृहित धरून चौकशी केली जाणार आहे. या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 10:29 am

नाशिक शहरात परदेशी टोळीचा उच्छाद:युवतीसह 10 कुख्यात गुंड अटकेत, पिकअप लुटून जीवघेणे हल्ले करत रात्रभर धुडगूस

कुख्यात कुंदन परदेशी टोळीने शहरात धुडगूस घालत पोलिसांना आव्हान दिले. टोळीतील सदस्यावर रेकॉर्डवरील गुन्हेगाराने काही दिवसांपूर्वी हल्ला केला होता. त्या रागातून टोळीने हे गुन्हेगारी कृत्य केले. सुरुवातीला म्हसरुळमध्ये पिकअप लुटून अंबड गाठले. वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवली. गंगापूररोडवर चहाविक्रेत्यावर हल्ला करत दुकानाची तोडफोड केली. रात्रभर हा धुडगूस सुरू असल्याने नागरिक वेठीस होते. अखेर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे टोळी गजाआड करत म्हसरुळ, गंगापूर, अंबडला 3 वेगवेगळे गुन्हे दाखल केले. मोक्का कारवाई करणार.. टोळीच्या सर्व 10 सदस्यांना पहाटे अटक करण्यात आली आहे. पिकअप लुटीची तक्रार उशिरा दाखल झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सर्वांना अटक केली.यात एक युवती आहे. टोळीवर मोक्का कारवाई करण्यात येणार आहे. गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. - किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त (गुन्हे) इमारतीत घुसून प्राणघातक हल्ला पहाटे 4 वाजता टोळीने पुन्हा येऊन प्रणव शेवाळेचा गेम करण्यासाठी कामटवाडे गाठले. शेवाळेच्या घराचा दरवाजा तोडला. भाऊ विनोद शेवाळेसह पत्नीवर चॉपरने हल्ला केला. वार चुकवत शेवाळे पत्नीसह पळाल्याने वाचले. मात्र, या दरम्यान शेजारील घरातील नागरिक पळापळ करत असताना एक बालिका गरम भाजी सांडल्याने भाजली. दुकानाची हत्यारांनी तोडफोड रात्री 10 वाजता थत्तेनगर आलेल्या टोळीतील संशयितांनी चहा दुकान चालक रितेश चोरघेंकडे सिगारेट मागितल्या, मात्र दुकान बंद करत असल्याने चोरघेंनी नकार दिला. तेव्हा संशयितांनी कोयते, कुऱ्हाडीने हल्ला केला. यानंतर 12 हजारांची रोकड लुटत दुकानाची तोडफोडही केली. दोन वाहनांच्या काचा फोडल्या रात्री 9.30 वाजता अंबड भागातील कमलनगर येथे राहणाऱ्या प्रणव शेवाळेच्या घरी टोळके आले. शेवाळे सापडला नाही म्हणून रस्त्यावर उभ्या एमएच 15 बीएक्स 5063, एमएच 15 एचएफ 0725 या दोन कार फोडून सर्व 10 जण शहराच्या दिशेने पिकअपमधून धिंगाणा घालत निघून गेले. पिकअप लुटून टोळी फरार पूर्वीचा टोळीचा सदस्य प्रणव शेवाळेने परदेशीचा ‘राइट हँड’ कुणाल एखंडेवर चाकू हल्ला केला. याचा वचपा काढण्यासाठी टोळीने पेठरोडहून पिकअपचालकाला चॉपर दाखवून लुटले. 2 हजारांची रोकड घेऊन एमएच 15 जेसी 0002 क्रमांकाची पिकअप घेऊन पळाले. कामटवाडे परदेशी टोळीने गंगापूररोडवर थत्तेनगरमध्ये रात्री 10.05 वाजता कॅफेचालकासह तेथे उभ्या तरुणांवर कुऱ्हाड, कोयते घेऊन जीवघेणा हल्ला केला. त्याचे हे सीसीटीव्ही फुटेज. कुंदन परदेशी, मानसी वाळके, आदित्य पिंगळे, कुणाल एखंडे, राहुल उर्फ हर्षल गवारे, शुभम पवार, रोहित जाधव, कमलेश सुराणा, वेदांत परदेशी, चिक्कू भुजबळ यांना पोलिसांनी मोबाइल ट्रेस करत धुळे येथून अटक केली. टोळीविरोधात खून, दरोडा, खंडणी, प्राणघातक हल्ला, शस्त्र बाळगणे, दहशत निर्माण करणे, संघटितपणे गुन्हे केल्याचे 12 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखेचे विशाल देवरे, विलास चारोस्कर, मनोहर शिंदे, चंद्रकांत गवळी यांनी ‘कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणवून घेत त्यांची धिंड काढली.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 10:22 am

कडोळीत जुगार अड्यावर गोरेगाव पोलिसांचा छापा:9 जुगाऱ्यांना पकडले, 4 मोबाईलसह 40 हजाराचा मुद्देमाल जप्त

सेनगाव तालुक्यातील कडोळी शिवारात गोरेगाव पोलिसांच्या पथकाने जुगार अड्यावर छापा टाकून नऊ जुगाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, चार मोबाईल असा सुमारे 40 हजाराच मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी नऊ जणांवर गुरुवारी ता. 29 रात्री आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हयातील अवैध व्यवसायाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी पथके तैनात केली आहेत. या ठिकाणी प्रत्येक ठाणेदारांना अवैध व्यवसायाची माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे काही जण झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, जमादार अनिल भारती, डाखोरे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने गुरुवारी छापाा टाकला. यामध्ये नऊ जण झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून नऊ जणांना ताब्यात घेतले. तर घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, चार मोबाईल असा 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके यांच्या तक्रारीवरून विजय इंगळे, सय्यद शब्बीर, भागवत इंगळे, नागेश इंगोले, बाळू लोंढे, सोनबा इंगोले, देविदास माहूरकर, काशीनाथ इंगोले (सर्व रा. कडोळी), भिमराव कांबळे (रा. लिंबाळा, ता. हिंगोली) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. जमादार अनिल भारती पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 10:18 am

राज्य सरकारची खर्चावर कात्री:2026-27 च्या बजेटआधी निधी वितरणावर सरकारचे मोठे निर्बंध; फडणवीसांकडून आर्थिक आवळणी

महाराष्ट्र सरकारने प्रशासनावर वाढत चाललेल्या आर्थिक भाराला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आर्थिक शिस्त अधिक काटेकोरपणे पाळण्यासाठी 2025-26 या आर्थिक वर्षातील बजेटमधील निधी वितरणावर मर्यादा आणण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासंदर्भात शासनाकडून परिपत्रक जारी करण्यात आले असून, विविध विभागांना खर्चाबाबत विशेष दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. दरवर्षी अर्थसंकल्पात मंजूर केलेला संपूर्ण निधी प्रत्यक्ष खर्च होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर सरकारने आधीच नियोजन करून खर्च कमी करण्याचा मार्ग स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाच्या या निर्णयानुसार, बांधकामे, वाहन खरेदी, यंत्रसामग्री, जाहिरात आणि इतर प्रशासकीय खर्चावर निर्बंध आणण्यात आले आहेत. अनेक वेळा मंजूर केलेला निधी वेळेत खर्च न होता अखेर परत जातो, त्यामुळे अनावश्यक तरतुदी टाळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. प्रशासनाने निधी मागणी करताना प्रत्यक्ष गरज आणि खर्चाची क्षमता लक्षात घ्यावी, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. आर्थिक शिस्त राखण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, जाहिरात, बांधकाम, वाहन खरेदी, यंत्रसामग्री आणि विविध प्रकारच्या अर्थसहाय्यासाठी निधी वितरणाचे प्रस्ताव सादर करण्यास संधी देण्यात आली आहे. मात्र, हे प्रस्ताव ठोस कारणांसह 12 फेब्रुवारीपर्यंत वित्त विभागाकडे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विनाकारण किंवा अपूर्ण तयारीचे प्रस्ताव स्वीकारले जाणार नसल्याचा संकेत सरकारने दिला आहे. निधी वितरण करताना तो प्रत्यक्षात खर्च केला जाईल, याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय विभागांवर टाकण्यात आली आहे. तथापि, अत्यावश्यक खर्चाच्या बाबतीत सरकारने कोणतीही कात्री लावलेली नाही. वेतन, निवृत्तीवेतन, व्याज भरणा, कर्ज परतफेड आणि आंतरलेखा हस्तांतरण यांसारख्या अनिवार्य खर्चांसाठी 95 ते 100 टक्क्यांपर्यंत निधी वितरण ठेवण्यात आले आहे. यामुळे सरकारी कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि कर्जविषयक देयकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र विकासकामे आणि प्रशासकीय खर्चाच्या बाबतीत काटकसर पाळण्यावर सरकारचा भर आहे. अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस मांडण्याची शक्यता दरम्यान, येत्या काळात राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून, 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अर्थ खात्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांनीच अर्थसंकल्प मांडला होता. काटकसरीचे धोरण कायम राहण्याची शक्यता आगामी 2026-27 च्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आधीच खर्चावर नियंत्रण आणण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक शिस्त, निधीचा योग्य वापर आणि अनावश्यक खर्च टाळणे, हा या धोरणाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. येत्या अर्थसंकल्पातही काटकसरीचे धोरण कायम राहण्याची शक्यता असून, सरकार कोणत्या योजना सुरू ठेवणार आणि कोणत्या खर्चाला कात्री लावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 9:59 am

आंबाळा शिवारातील ढाबा चालकावर सुरीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न:वेटरवर बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली तालुक्यातील आंबाळा शिवारातील ढाब्यावर पैसे देण्याच्या कारणावरून ढाबा चालकावर सुरीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून वेटरवर बासंबा पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 29 गुन्हा दाखल झाला आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ढाबा चालकास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वेटरला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील आंबाळा येथील पांडुरंग इंगोले यांचा आंबाळा फाटा शिवारात ढाबा आहे. या ढाब्यावर रवी जाधव (रा. मौजा) हा वेटर म्हणून मागील काही दिवसांपासून काम करतो. वेटर रवी याने पांडूरंग यांना कामाची उचल देण्याची मागणी केली होती. मात्र पांडूरंग यांनी उचल देण्यास नकार दिला होता. त्यामुळे रवी हा रागातच होता. दरम्यान, ढाबा चालक पांडूरंग हे बुधवारी ता. 28 रात्री नवीन बांधकामाच्या ठिकाणी झोपले होते. यावेळी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास रवी हातात सुरी घेऊनच त्या ठिकाणी आला. त्याने पांडूरंग यांचा गळा धरून त्याच्या डोक्यावर सुरीने वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पांडूरंग घाबरून गेले. त्यांनी सुरी पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात त्यांच्या हाताला, डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर रवी याने त्यांच्या डोक्यात, डोळ्या जवळ सुरीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरडा ओरड झाल्यानंतर इतर काही जण मदतीसाठी धावून आले. त्यानंतर या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पांडूरंग यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक संदीप जमादार, उपनिरीक्षक मदन गव्हाणे, जमादार पोले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पांडूरंग यांच्या तक्रारीवरून रवी जाधव याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. उपनिरीक्षक संदीप जमादार पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 9:51 am

छत्रपती संभाजीनगर महापौरपदासाठी भाजपमध्ये तीन गट:अंतिम निर्णय आता पक्षश्रेष्ठीच घेणार, भाजप धक्कातंत्राचा अवलंब करणार

महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रथमच बहुमताजवळ गेला. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठीच्या आरक्षणाला सुटले आहे. भाजपमध्ये अनेक प्रबळ दावेदार गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. महापौर निवडीवरून भाजपमध्ये तीन गट पडले आहेत. त्यामुळे एकमताने निवड होऊन प्रदेशाकडे नाव पाठवले गेले नाही तर महापौरपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. दरम्यान, इतर राज्यांमध्ये मुख्यमंत्री निवडला त्याप्रमाणे धक्कातंत्राचा वापर पक्ष करू शकतो. छत्रपती संभाजीनगरची महापालिका अस्तित्वात आल्यापासून प्रथमच भाजपने 57 जागांवर बाजी मारली. भाजप संभाजीनगर महापालिकेत मोठा भाऊ असून बहुमतापासून केवळ एक नगरसेवक कमी आहे. भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी यापूर्वीच 5 नगरसेवक संपर्कात असल्याचे सांगितलेले आहे. महापौर निवडीसाठी स्थानिक स्तरावर कॅबिनेट मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस आमदार संजय केणेकर आदी नेतेमंडळी आपला समर्थक नगरसेवक महापौर व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. तिघांच्या पसंतीत उतरेल अशा एकावर एकमत होऊ शकते. दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा निवडून आलेले म्हणतायेत ‘अभी नहीं तो कभी नहीं भाजपचे महापौरपदासाठी सुटलेल्या प्रवर्गातील नगरसेवकांनी आपल्या निवडीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा निवडून आलेले ‘अभी नहीं तो कभी नहीं’ असे समजून तयारी करीत आहेत. पक्षात अनेक वर्षांपासून काम करत असल्याने महापौरपदासाठी प्रवर्गाची विचार केला जाणार नाही. त्यामुळे आपल्याला संधी मिळू शकते, असे अनेकांना वाटते. महापौरसाठी अद्याप बैठक नाही महापौरपदासाठी भाजपच्या कोअर कमिटीची अद्याप बैठक घेतलेली नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला पक्षाचे प्राधान्य आहे. महापौर हा ठरल्याप्रमाणे भाजपचा होणार आहे. ज्या प्रवर्गासाठी महापौरपद सुटले आहे त्यातूनच महापौर दिला जाईल. - अतुल सावे, बहुजन विकास मंत्री तूर्तास लक्ष ‘झेडपी’कडे तूर्तास जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक हे लक्ष्य आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीसंबंधी चर्चा नाही. जिल्हा परिषदेसाठी एकूण 54 जागांवर भाजपने उमेदवार उभे केले आहेत. यातील 12 पुरस्कृत निकालानंतर याकडे लक्ष देऊ. - किशोर शितोळे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप रोष नको म्हणून श्रेष्ठींकडे बोट शहरातील तिन्ही नेत्यांसह शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांना भेटून इच्छुक आपल्या नावाच्या विचार व्हावा यासाठी गळ घालत आहेत. प्रत्येक जण महापौरपदासाठी प्रयत्न करतो असे सांगत असले तरी शेवटी पक्षश्रेष्ठींकडे बोट दाखवत आहे. ऐनवेळी रोष नको म्हणून नेतेमंडळी खेळी करीत आहेत. पक्षीय बलाबल आणि राजकीय समीकरणे नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 57 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 5 फेब्रुवारीनंतर भाजपची गट नोंदणी अपेक्षित आहे. दुसरीकडे 33 जागा जिंकलेली एमआयएम 1 फेब्रुवारीला गट नोंदणी करेल. महापौर निवडणुकीसाठी 4 पासून अर्ज वाटप प्रक्रिया महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. विभागीय आयुक्तालयाने ही तारीख जाहीर केली असून पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची नियुक्ती केली आहे. महापालिका नगर सचिव नंदकिशोर भोंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 व 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत उमेदवारी अर्जांचे वितरण होईल. 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मिळतील, तर याच दिवशी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सचिव कार्यालयात अर्ज स्वीकारले जातील. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभेचे आयोजन केले असून याच सभेत अर्जांची छाननी, माघारीची प्रक्रिया आणि त्यानंतर हात उंचावून मतदान प्रक्रिया पार पडेल.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 9:15 am

लिनेस क्लब ठरतेय समाजातील अंतिम घटकाच्या सेवेचे माध्यम:नूतन प्रांताध्यक्ष कल्पना देशमुख यांचे प्रतिपादन, ‘लिनेस’चा सोहळा‎

महिला सशक्तिकरण, आरोग्य परीक्षण, शिक्षण, पर्यावरण, सामुदायिक सेवा हे पाच सूत्री सेवा यावर भर देत लिनेस क्लब केवळ संघटन नसून सेवा व संवेदनशीलतेच्या माध्यमातून समाजातील अंतिम घटकाच्या सेवेचे माध्यम ठरत आहे, असे प्रतिपादन लिनेस क्लबच्या नूतन प्रांताध्यक्ष कल्पना देशमुख यांनी येथे केले. ऑल इंडिया लिनेस क्लब ‘डिस्ट्रिक्ट एमएच पाच हिरकणी मल्टिपल चतुर्भुजा वर्ष २०२६’ चा प्रांतीय पदग्रहण सोहळा ‘कल्पवृक्ष' शुभकर्ता लॉन्स येथे उत्साहात झाला. यावेळी त्या बोलत होत्या. लिनेस क्लबच्या पुढाकारात पार झालेल्या या सोहळ्यात उद्घाटक म्हणून ऑल इंडिया लिनेस क्लब पॅटर्न इंदू मेहता, शपथविधी अधिकारी ऑल इंडिया लिनेस क्लब संस्थापक अध्यक्ष मंजिरी कुलकर्णी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित बहुप्रांताध्यक्ष अलका डोंगरे, माजी बहुप्रांताध्यक्ष सुनीला नरप्पनवार, कुमकुम वर्मा, प्रांताध्यक्ष साधना पळसकर, सचिव सुवर्णा महाजन समवेत मार्गदर्शक माजी प्रांताध्यक्ष हरविंदर कौर सेठी, उषा बाहेती, डॉ. तारा माहेश्वरी, आशा वीरवाणी, सुनंदा गुप्ता, स्वाती झुंझुनवाला, लता बनवट, बिना चावला, भारती वर्मा, तेजल चौधरी, आशा वळवी, कंचन शाह, अपर्णा बावस्कर, उपप्रांताध्यक्ष सुलभा देशपांडे आदी उपस्थित होते. या सोहळ्यात नूतन प्रांताध्यक्ष म्हणून कल्पना देशमुख, सचिव रिंकू खंडेलवाल, कोषाध्यक्ष शीतल अग्रवाल यांनी पदभार ग्रहण केले. यावेळी डिस्ट्रिक्टमधील रिजन एकच्या ममता सूर्या, रिजन दोनच्या सुनंदा कुलकर्णी, रिजन तीनच्या डॉ. राखी अग्रवाल, कॅबिनेट ऑफिसर व सर्व पदाधिकाऱ्यांना शपथ प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलन, गणेश वंदना, संस्कृती समूहाच्या नृत्य सादरीकरणाने करण्यात आला. ध्वजवंदना रत्नमाला रुईकर यांनी, स्वागतगीत रचना खंडेलवाल यांनी तर लिनेस प्रार्थना आशा पटेल यांनी सादर केली. यावेळी ऋतुजा ग्रुपने स्वागत नृत्य सादर केले. शपथविधी अधिकाऱ्यांचा परिचय सुनंदा गुप्ता यांनी, इंदू मेहता यांचा परिचय स्वाती झुनझुनवाला यांनी केला. सोहळ्यात किट वितरण व कॅबिनेट सेवा कार्य उमा बाजोरीया, सुलेखा गुप्ता, प्रेमा मुंदडा यांनी सांभाळले. तर हळदीकुंकू वाण सेवा राजश्री समनपुरे, अलका उमाळे, इंद्रायणी देशमुख, नीता अग्रवाल यांनी सांभाळले. यावेळी पीएसटी प्रशिक्षण कार्यक्रमही घेण्यात आला. सोहळ्याच्या यशस्वितेसाठी उमा बाजोरीया, सुलेखा गुप्ता, क्लब अध्यक्ष राजश्री समनपुरे, अलका उमाळे, इंद्रायणी देशमुख, रत्नमाला रुईकर, शीतल अग्रवाल, रिंकू खंडेलवाल, प्रेमा मुंदडा आदींनी परिश्रम घेतले. या लिनेस प्रांतीय पदग्रहण सोहळ्यात परभणी, शिरपूर, अकोला, खामगाव, अंबेजोगाई, नंदुरबार, भुसावळ, अमळनेर, मंगरूळपीर, मानोरा येथील लिनेसच्या माजी अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, कॅबिनेट ऑफिसर समवेत बहुसंख्य लिनेस महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले. महिलांसाठी विविध स्पर्धा या सोहळ्यात पदग्रहण समवेत कॅबिनेट मीटिंग, पीएसटी सेमिनार व अनेक स्पर्धा झाल्या. तसेच नियमावली सार्थक, लिनेस डिरेक्टरी संकल्पना तथा लिनेस पिन यांचे विमोचन करण्यात आले. डिरेक्टरी एडिटर अनिता उपाध्याय, अरू‌धती शिरसाट उपस्थित होत्या. यावेळी घेण्यात आलेल्या तीळ साहित्य स्पर्धेत ज्योती चरखा (वाशीम), नम्रता अग्रवाल (अकोला), सुलेखा पावली (परभणी) या विजेत्या ठरल्या. तर पतंग डेकोरेशन स्पर्धेत श्रद्धा जोशी, प्रेमा मुंदडा, ममता राठी विजेत्या घोषित करण्यात आल्या. तोरण बनवा स्पर्धेत श्रद्धा जोशी, नम्रता अग्रवाल, सुनिता शर्मा, निशा चांडक विजेत्या ठरल्या.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:50 am

टायर फुटल्याने धावती कार उलटली; दांपत्य जागीच ठार:पाच जण जखमी, बोरगाव मंजूजवळ अपघात‎

राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा नवीन बायपास पॉइंट-नजीक धावत्या कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात कारमधील दांपत्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सुमारास घडली. खुशरंग भिलुजी मायवाड (५०) व अनिता खुशरंग मायवाड (४८) असे अपघातातील मृतांची नावे आहेत. अन्य पाच प्रवासी जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार नाशिक येथून बैतुल (मध्य प्रदेश) येथे परतीच्या प्रवासाला कार क्रमांक एमपी ४८ झेडएच४८२२ ने सात प्रवासी मोनू मुरली हारोळे, शिवा मुरली हारोळे, रोहित खुशरंग मायवाड, बामी मायवाड, अनिता खुशरंग मायवाड, खुशरंग भिलुजी मायवाड प्रवास करत होते. धावत्या कारचे टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार रोडच्या कडेला दहा फूट खोल खड्ड्यात उलटली. या अपघातात कारमधील खुशरंग भिलुजी मायवाड (५०), अनिता खुशरंग मायवाड (४८), रा. बैतूल, मध्य प्रदेश या दांपत्याचा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला. पुढील तपास ठाणेदार अनिल गोपाळ, पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे व पोलिस करत आहेत. दरम्यान, माँ चंडिका आपत्कालीन पथक, ग्रामस्थांनी मदत केली. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार आजूबाजूला शेतात काम करणारे गजानन देशमुख, गजानन तिडके, नितीन बोपुलकर व अन्य शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. हेड कॉन्स्टेबल प्रमोद डोईफोडे, किशोर सोळंके, शुभम फलके, ज्ञानेश्वर जामोदे यांनी घटनास्थळी रोडच्या कडेला उलटलेल्या कारमधून जखमींना बाहेर काढत अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:46 am

अकोला महापौर निवडीसाठी आज विशेष सभा:भाजपच्या शारदा खेडकर-उबाठाच्या सुरेखा काळेंमध्ये लढत

ठाकरे गटाच्या सुरेखा मंगेश काळे यांनी महापौर पदासाठी अर्ज केला. उपमहापौर पदासाठी भाजपकडून अनिल गोगे यांनी उमेदवारी दाखल केली, तर काँग्रेसकडून आझाद खान अलीयार खान यांनी व अपक्ष म्हणून नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या शहर सुधार आघाडी गटाकडे ४४ सदस्यांचे बहुमत असल्याने निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे की ऐनवेळी काँग्रेस-उबाठा आघाडी काही चमत्कार घडवणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही पदाच्या निवडणुकीपूर्वी माघार घेण्यासाठी शुक्रवारी सभेत मतदानापूर्वी १० मिनिटांची मुदत देण्यात येणार आहे. भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवण्यासाठी इतर पक्षांसोबत बोलणी करून समीकरण जुळवण्याची काँग्रेसने धडपड केली. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपला रोखण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोट बांधली. मात्र, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ३ सदस्यांना सोबत घेत शहर सुधार आघाडी नावाने ४४ नगरसेवकांचा गट स्थापन स्थापन करून विरोधकांचे प्रयत्न उधळून लावले. आघाडीकडे ४४ नगरसेवकांचे बहुमत आहे. विरोधकांनी भाजपला रोखण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी दुपारी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, वंचित व ‘एआयएमआयएम’ च्या नगरसेवकांची बैठक झाली. यावेळी भाजपला लढत देण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्याकडे ४१ नगरसेवक असून आमचाच महापौर बनेल, असा दावा आमदार साजिद खान पठाण यांनी केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:46 am

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आंतरराष्ट्रीय ज्ञानाचा स्त्रोत:श्री शिवाजी शिक्षण संस्था व अँडरसन विद्यापीठात सामंजस्य करार‎

श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्याद्वारा संचालित बाभूळगाव (अकोला) येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत ते जगाच्या पाठीवर ठसा उमटवणारे ज्ञान अर्जित करण्याची संधी उपलब्ध करुन देत आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती व साऊथ कॅलिफोर्निया (युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका) येथील अँडरसन युनिव्हर्सिटीत झालेल्या सामंजस्य करारानुसार अँडरसन युनिव्हर्सिटीद्वारे एआय तंत्रज्ञानाचे क्रेडिट बेस्ड कोर्सेस येथील अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आधुनिक जगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर बघता भविष्याची गरज म्हणून एआयकडे पाहिले जाते. हे तंत्रज्ञान संगणक व मशिनला मानवी आकलन, समस्या सोडवणे, निर्णय घेणे, सर्जनशीलतेचे अनुकरण करण्यास सक्षम करते. एआयने सज्ज अप्लिकेशन व उपकरणे वस्तू पाहू व ओळखू शकतात. ते मानवी भाषा समजू शकतात व प्रतिसाद देऊ शकतात. संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गजाननराव पुंडकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. संगणक विभागप्रमुख डॉ. एस. एल. सातारकर यांनी आभार मानले. प्रा. शर्वरी दीक्षित यांनी संचालन केले. डॉ. कॅरोलिन बिशॉप यांनी प्रशंसा प्रमाणपत्र देत हेमंत काळमेघ यांचा सन्मान केला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, स्थानिक व्यवस्थापन समितीचे नवोपक्रमांसाठी नियमित मार्गदर्शन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून जयवंत पाटील, केशवराव मेतकर, केशवराव गावंडे, सुरेश खोटरे, सुभाष बनसोड, विजय ठाकरे, विजय ठोकळ, महाविद्यालयाचे संचालक डॉ. अनंत मराठे, नितीन सरदार, अभिजीत परागे, प्रशांत गुलालकरी, विभागप्रमुख, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. एआयमुळे नोकऱ्यांच्या क्षेत्रात क्रांती होत आहे. काही पारंपरिक नोकऱ्यांवर संकट असले तरी एआयमुळे नव्या संधी उपलब्ध झाली आहे. ही विद्यार्थ्यांसाठी करिअर डेव्हलपमेंटच्या उद्धेशाने सुवर्णसंधी ठरणार आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, स्थानिक व्यवस्थापन समितीचे नवोपक्रमांसाठी नियमित मार्गदर्शन होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. थोरात नवनवीन आव्हानांची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत आहेत. एआयमळे नव्या संधी उपलब्ध; विद्यार्थ्यांना मिळेल संधी

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:43 am

शासन निधीचा नियमबाह्य वापर; चाैकशी समिती गठित‎:आश्वासनानंतर उपसरपंचांचे उपोषण स्थगित; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले हाेते उपोषण‎

अकोला मोरगाव भाकरे येथे शासन निधीचा वापर नियमबाह्य पद्धतीने करून बेकायदेशीर देयके काढण्यात आल्याचा आरोप उपसरपंच अर्चना गजानन चोपडे यांनी उपोषण केले. अखेर याप्रकरणी जिल्हा परिषदेने चौकशी समिती गठित केल्यानंतर रविवारी उपोषण स्थगित करण्यात आले. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली होती. ऑडिट न झालेल्या किंवा अपूर्ण अहवालांच्या आधारे देयके अदा करण्यात आल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. शासन निधीच्या वापरात गंभीर अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्या व उपसरपंच अर्चना गजानन चोपडे यांनी २४ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. सन २०२१–२२ पासून आजतागायत शासनाकडून प्राप्त झालेला तसेच ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचा निधी नियमबाह्य पद्धतीने खर्च करण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. याबाबत १५ जून २०२५ पासून वारंवार तक्रारी व निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई झालेली नसल्याचा दावा त्यांनी केला. . १५ जून २०२५, १ ऑगस्ट २०२५, १७ ऑगस्ट २०२५, १० ऑक्टोबर २०२५, २१ नोव्हेंबर २०२५, २५ डिसेंबर २०२५ व २९ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या लेखी तक्रारींची दखल न घेतल्याने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे उपसरपंच अर्चना चोपडे यांचे म्हणणे होते. या उपोषणाला राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे, युवा प्रदेश कार्याध्यक्ष रामा उंबरकर, जिल्हा महासचिव सुनील गवई, महानगर अध्यक्ष शिवलाल इंगळे, प्रशांत भटकर व अर्जुन खिरोडकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. दरम्यान प्रशासनाने चौकशी समितीबाबतचा आदेश जारी केला. उपोषण स्थगित करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, पांडुरंग भाकरे, शिवशंकर वंजारे, चंद्रभान जंजाळ, गोपाल भाकरे, गोपाळ भटकर, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे आदी होते. जिल्हा परिषदेने चौकशी समिती गठित केल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. उपोषणाचा दखल घेत जिल्हा परिषद उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीचे प्रमुख ​उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत पवार आहेत. सदस्य म्हणून सहाय्यक गट विकास अधिकारी मीनाक्षी वाढे, सहाय्यक गट विकास अधिकारी सुभाष काळे, विस्तार अधिकारी ​​व्ही. डी. कीर्तने, शाखा अभियंता बलदेव झटाले, सहाय्यक लेखाधिकारी वसंत साबळे यांचा समावेश आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:43 am

वाघाचा हल्ला; पित्याचा मुलासमोरच झाला मृत्यू:धारणी तालुक्यातील हिराबंबई जंगलातील घटना‎

धारणी तालुक्यातील हिराबंबई गावातील एका ३७ वर्षीय शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. हा शेतकरी त्याच्या १४ वर्षीय मुलासह जंगलात बैल शोधायला गेला होता. त्यावेळी मुलासमोरच वाघाने पित्यावर हल्ला करुन त्यांना जंगलात नेले. या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. समाजमन सुन्न करणारी ही घटना धारणी तालुक्यातील हिराबंबई येथे बुधवारी २८ जानेवारीला सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीताराम बन्सीलाल गुथऱ्या (३७, रा. हिराबंबई ता. धारणी) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. सीताराम गुथऱ्या यांचा बैल दिसत नव्हता. त्यामुळे सीताराम गुथऱ्या हे गावापासून काही अंतरावर असलेल्या जंगलात बैल शोधण्यासाठी बुधवारी २८ जानेवारीला सकाळी घरातून बाहेर पडले. या वेळी त्यांच्यासोबत त्यांचा १४ वर्षीय मुलगा तसेच भाचा होता. हिराबंबई जंगलात ते बैलाचा शोध घेत असतानाच सकाळी साडेसात वाजता एका वाघाने सीताराम गुथऱ्या यांच्यावर हल्ला केला. या वेळी त्यांचा मुलगा आणि भाचा काही अंतरावर बैलाचा शोध घेत होते. मुलाच्या डोळ्यादेखतच वाघाने सीताराम गुथऱ्या यांच्यावर झडप घेतली आणि त्यांना जंगलात ओढत नेले. या वेळी त्यांच्या मुलाने आणि भाच्याने आरडाओरड केली मात्र वाघ त्यांना बऱ्याच दूर जंगलात घेवून गेला. दरम्यान या दोन्ही मुलांनी गावात येऊन घडलेला घटनाक्रम गावकऱ्यांना सांगितला. गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती दिली. त्यांनतर गावकरीसुद्धा तत्काळ सीताराम यांचा शोध घेण्यासाठी जंगलात गेले. काही वेळातच वनविभागाचे जवानसुद्धा आलेत. काही वेळानंतर सीताराम यांचे धड जंगलात आढळले.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर धारणी पोलिसांनीसुद्धा घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. हिराबंबई जंगल परिसरात गस्त वाढवली ^हिरांबबई जंगल परिसरात बुधवारी २८ जानेवारीला घडलेल्या घटनेनंतर आम्ही गस्त वाढवली आहे. तसेच गुरूवारी २९ जानेवारीला मृतक ग्रामस्थाच्या कुटूंबियांना शासकिय मदत दिली आहे संदीप शिरसाठ, एसीएफ. हिरांबबई.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:32 am

अमरावती अंध विद्यालयाने 19 धावांनी निवासी चिखलदरा संघावर केली मात:स्व. आबासाहेब देवस्थळेंच्या स्मृती प्रित्यर्थ दृष्टीहिनांच्या विदर्भस्तरीय क्रिकेट स्पर्धा‎

डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयाद्वारे स्व.आबासाहेब देवस्थळे स्मृती प्रित्यर्थ आयोजित दृष्टीहिनांच्या विदर्भस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात अंध विद्यालय अमरावतीने निवासी अंध विद्यालय चिखलदराचा १९ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. चिखलदरा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अंध विद्यालय अमरावतीने जोरदार फलंदाजी करत निर्धारित १० षटकांत ९७ धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात चिखलदरा अंध विद्यालयाच्या फलंदाजांना सूर गवसला नाही. एका फलंदाजाने धीरोदात्तपणे लढत देण्याचा प्रयत्न केला तरी या संघाला १९ धावांनी पराभव सहन करावा लागला. या सामन्याचे धावते वर्णन योगेश चौधरी यांनी केले. ब्लाईंड वेल्फेअर असोसिएशन अमरावतीद्वारे संचालित डॉ.नरेंद्र पिवापूरकर अंध विद्यालय व आश्रित मंद कर्मशाळा यांच्या संयुक्त सहकार्याने संस्थेचे संस्थापक कोषाध्यक्ष व आबासाहेब श्री.गो. देवस्थळे स्मृती प्रित्यर्थ विदर्भ स्तरीय नेत्रहिन विद्यार्थ्यांच्या आंतर शालेय क्रिकेट स्पर्धा २७ रोजी छकडा मैदान गुरुकृपा कॉलनी, वडाळी नाका अमरावती येथे घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९ वाजता डॉ.गोविंद कासट ज्येष्ठ समाजसेवक यांच्या हस्ते झाले. प्रवीण मालपाणी यांचे अध्यक्षतेत प्रमुख अतिथी रायसिंग वरठे, अॅड. प्रदीप श्रीवास्तव, मुख्याध्यापक गणेश इंगोले, व्यवस्थापकीय अधीक्षक पंकज मुद्गल यांच्या उपस्थितीत झाले. डॉ. गोविंद कासट यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात ज्याप्रमाणे भारत सरकारने क्रिकेटपटू रोहित शर्मा व हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री देऊन गौरवले. अंध मुलांनीही भारताला दृष्टीहिनांच्या क्रिकेटमध्ये विश्वचषक जिंकून दिला आहे. अंध मुलांच्या संघातील कर्णधारालाही पद्मश्री देऊन गौरवण्यात यावे. पद्मश्री पुरस्कार देऊन अंध विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा सन्मान केला तर इतरांनाही प्रेरणा मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. सोबतच दृष्टीहिनांद्वारे सादर केले जाणारे, सांस्कृतिक संगीत डोळसांपेक्षा अधिक उत्साहवर्धक असतात, अशी पावतीही त्यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप इंगोले, आभार एन. एस. इंगोले व संचालन पंकज मुद्गल यांनी केल. मैदानावरील सर्व जबाबदारी रमेश राठोड, प्रशांत गाडगे,योगिता राऊत यांनी सांभाळली. पंच म्हणून अमरावती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांनी पार पाडली या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले. दृष्टीहिन असूनही ते खेळाडू क्रिकेट कसे खेळतात, असा प्रश्न साहजिकच कोणाच्याही मनात येईल. दृष्टीहिन खेळाडूंच्या क्रिकेटसाठी वापरला जाणारा चेंडू हा महत्त्वाचा घटक आहे. या चेंडूच्या आत छर्रे असतात. त्यामुळे गोलंदाजाने तो अंडरआर्म फलंदाजाच्या दिशेने टाकला की, आवाज करीत तो फलंदाजापर्यंत पोहोचतो. या आवाजाचा वेध घेत फलंदाज त्याची बॅट फिरवून धावा करतो. सातत्याने सराव करून हे कौशल्य दृष्टीहिन क्रिकेटपटू आत्मसात करीत असतात. यात फलंदाजाचे टायमिंगही महत्त्वाचे आहे. तेव्हाच त्याला चेंडू अगदी अचूक फटकारता येतो. फटकारलेल्या चेंडूच्या आवाजाने तो कोणत्या दिशेने येत आहे. याचा अंदाज मैदानावरील दृष्टीहिन क्षेत्ररक्षक घेतात. अचूक अंदाज घेऊन क्षेत्ररक्षण करतात किंवा तो ज्या दिशेने सीमेकडे जात आहे, त्या दिशेला धाव घेत चेंडू अडवतात. दृष्टीहिन खेळाडूंचे हे क्रिकेट बघणे प्रेक्षकांसाठी रोमांचक अनुभव असतो.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:28 am

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा:मराठी भाषा ही विकास, विचार अन् परिवर्तनाचे माध्यम व्हावे- डॉ. चिमोटे, विद्यापीठात विद्यार्थ्यांचे कवी संमेलनाचे आयोजन‎

मराठी भाषा ही केवळ भावनिक अभिमानाची किंवा संवादापुरती मर्यादित न राहता ज्ञाननिर्मिती, सामाजिक परिवर्तन आणि विकासाचे प्रभावी माध्यम बनली पाहिजे. कवितेमध्ये माणसाच्या अंतर्मनातील भाव, समाजातील अस्वस्थता आणि परिवर्तनाची आस व्यक्त करण्याची ताकद असते. कवी आपल्या शब्दांमधून समाजाची चेतना जागृत करू शकतो, असे असे प्रतिपादन अधिष्ठाता प्रा. डॉ. मोना चिमोटे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथील पदव्युत्तर मराठी विभाग आणि विदर्भ साहित्य संघ, शाखा अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ अंतर्गत कविसंमेलनात अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षीय मार्गदर्शनात पुढे बोलताना डॉ. चिमोटे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी केवळ कविता लिहिण्यावरच थांबू नये, तर संत साहित्यातील काव्य आणि विविध भाषांतील कवितांचे वाचन करावे. मराठी साहित्यपरंपरेतील विविध आकृतिबंध, काव्यप्रकार आणि शैली यांचे वेगळेपण समजून घ्यावे. स्वतःचे अनुभव केवळ थेट मांडण्याऐवजी प्रतिमा, प्रतीक आणि सुचक भाषेतून व्यक्त करण्याची सवय लावावी. बहुभाषिकता ही मराठीच्या विरोधात नसून ती भाषिक समृद्धीची प्रक्रिया आहे, त्यामुळे भाषांवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदव्युत्तर मराठी विभागाचे प्रा. डॉ. माधव पुटवाड यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा केवळ औपचारिक कार्यक्रमांचा भाग नसून तो विद्यार्थ्यांच्या सर्जनशील क्षमतेला व्यासपीठ देणारा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कविसंमेलनासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा साहित्याशी थेट संवाद वाढतो आणि नवोदित लेखकांना आत्मविश्वास मिळतो, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. डॉ. हेमंत खडके यांनी कवितेतील विचार हा भावपूर्ण, सौंदर्यपूर्ण आणि आशयघन असावा, असे सांगितले. कवितेतील शब्दांचा नाद, आशयाची तीव्रता, कवीचे सादरीकरण घटकांतूनच कविता रसिकांपर्यंत पोहोचते, असे त्यांनी नमूद केले. या कविसंमेलनात विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यात रोशन नकाशे, भाविका मनोहर, तेजस्विनी टारपे, पूज्यनी गायकवाड, संध्या काळे, सुमित अग्रवाल, सारिका वनवे, अभिजित इंगळे, सचिन अवचार, प्रणाली भिलंगे, तेजस भागवत, नेहा राठोड, रुचिता निकम, अपेक्षा निमकर्डे, साक्षी धुळे, ऋषिकेश पाडर आदी नवोदित कवींनी स्वरचित कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली. सामाजिक भान, समकालीन राजकीय प्रश्न, कौटुंबिक नातेसंबंध आणि प्रेम यांसारख्या विषयांवरील कवितांनी संमेलनाला वैचारिक, भावनिक उंची प्राप्त करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उस्फूर्त व प्रभावी पद्धतीने मराठी विभागाचे विद्यार्थी ऋषिकेश पाडर, साक्षी धुळे यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.अभिजित इंगळे यांनी केले. या वेळी प्रा. डॉ. माधव पुटवाड यांच्यासह अंशदायी शिक्षक, संशोधक विद्यार्थी, विभागातील कर्मचारी उमाशंकर ठाकूर मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील प्राध्यापक, अंशदायी शिक्षक, संशोधक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विविध कवींनी मांडले कवितेतून वास्तव कवी नितीन भट यांनी कविता आकाराने लहान असली तरी तिचा प्रभाव जनमानसावर खोलवर उमटतो, असे मत व्यक्त करत विविध नामवंत कवींच्या कवितांचे दाखले दिले आहेत. ज्येष्ठ पत्रकार माधव पांडे यांनी आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात साहित्यिकांनी डिजिटल माध्यमांचा सकारात्मक आणि सर्जनशील वापर करण्याचे कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. तसेच सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि नव्या वाचनसंस्कृतीच्या पार्श्वभूमीवर कवी व साहित्यिकांची भूमिका बदलत चालल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, ‘ट्रेंड’ आणि ‘व्ह्यूज’च्या स्पर्धेत कविचा प्रभाव हळूहळू कमी होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:27 am

ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव:शेतकरी चिंतेत, कांदा, गहू, लसूण, चारा पीक रोगाच्या विळख्यात, नुकसानाची भिती‎

गतवर्षीच्या अतिवृष्टी व पूर स्थितीमुळे खरीप हंगाम वाया गेला. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकेही विविध रोगाच्या विळख्यात सापडली आहेत. परिणामी उत्पादन खर्च वाढणार असून, उत्पन्न मात्र घटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीमुळे सर्वत्र पाण्याची उपलब्धता असल्याने सध्या हजारो हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिके डोलत आहेत.अनुकूल वातावरण व मुबलक पाणी यामुळे पिके मोठ्या जोमात आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत वातावरणात अचानक बदल झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वाढलेले धुके व ढगाळ हवामानामुळे पिकांना विविध रोग ग्रासत आहेत. जोमात असलेली पिके अशाप्रकारे रोगांच्या विळख्यात सापडल्याने शेतकरी एका नव्या दुष्टचक्रात अडकला आहे. महागड्या औषधांची फवारणी व खतांचा वापर करून गेल्या महिन्यात त्याने पिकांना कसेबसे वाचवले. परंतु गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यासमोर नवे संकट उभे ठाकले आहे. मान्सून दरम्यान तालुक्यात सर्वदूर अतिवृष्टी झाल्याने सर्व तलाव, बंधारे, नाले तुडुंब भरले होते. पुढे खरीप हंगाम अतिवृष्टीनेच वाया गेला. दरम्यान खरीप हंगामाची भरपाई रब्बी हंगामात होईल या अपेक्षेवर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रब्बी पिकांची पेरणी केली. परंतु वातावरणातील बदलामुळे गावरान कांदा, गहू, हरभरा, लसूण, चारा पिके मोठ्या प्रमाणात अडचणीत आली आहेत. यावर्षीच्या रब्बी हंगामात हरभरा व गव्हाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. त्याचबरोबर गावरान कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. गुलाबी थंडी व पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिके मोठ्या जोमात आहेत. परंतु हवामानाचा फटका सर्वच पिकांना बसत असल्याने हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग पसरले आहेत. गहू पिकावर मावा व तांबेरा आणि ज्वारीवर चिकटा, मावा रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्याचवेळी हरभऱ्यावर घाटे अळी आणि मर तर कांदा / लसूणवर मावा, तुडतुडे, मर, करपा, डाऊनी या रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. मका पिकावर अमेरिकन लष्करी अळी, भाजीपाल्यातील टोमॅटोवर अळी, डाऊनी, भेंडीवर नागअळी, लाल कोळी आणि अळीचा प्रादुर्भाव होत आहे. कोथिंबीरवर भुरीचा प्रादुर्भाव होत असून वांगी पिकावर अळीचा, मेथीवर मावा तर कोबीवरदेखीलअळीचा प्रादुर्भाव होत आहे. गहू पिकावर मावा व तांबेरा आणि ज्वारीवर चिकटा, मावा रोगांचा प्रादुर्भाव

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:26 am

गोंधळीचे फायर-चिक्या, बैतुलचे गोविंदा-एक्का धुरंधर:घुईखेड येथे 2 दिवसीय शंकरपट उत्साहात, 107 बैल जोड्यांचा सहभाग, ग्रामस्थांची माेठी उपस्थिती‎

संत बेंडोजी बाबा संस्थान व गावकरी मंडळ,घुईखेड यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित शंकरपट मंगळवारी २७ व बुधवारी २८ जानेवारीला झाला. या बैलगाडा शर्यतीत ‘अ' गटात गोंधळीची बैलजोडी फायर-चिक्या तर ‘क' गटात बैतुलची बैलजोडी गोविंदा-एक्का धुरंधर ठरली. या शंकरपटात १०७ जोड्यांनी सहभाग नोंदवला. मंगळवारी २७ जानेवारीला घुईखेड येथील बेंडोजी बाबा एमसीव्हीसी महाविद्यालया मागील मैदानावर शंकरपटाला सुरुवात झाली.स्पर्धेचे उद्घाटन संस्थानचे विश्वस्त प्रवीण घुईखेडकर व डॉ. आशिष सालनकर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत अ गटात गोंधळी येथील नीलेश काळमेघ (७.७३ से.) यांची जोडी प्रथम, नसीम खाँ पठाण, (७.७४से.) यांची जोडी द्वितीय, ज्ञानेश्वर पाटील, (७.७७ से.) यांची जोडी तृतीय, सावन राठोड, (७.८३ से.) यांची जोडी चतुर्थ, मिसू राठोड, (७.८९ से.) यांची जोडी पाचवी, साईनाथ कऱ्हाळे, (७.९० से.) यांची जोडी सहावी, नसीम खाँ पठाण, हातखेडा (७.९२ से.) यांची जोडी सातवी, मिसू राठोड, बैतुल (७.९६ से.) यांची जोडी आठवी, गजू पांडे, विरखेड (८.०२ से.) यांची जोडी नववी, गणेश कावलकर, वाढोणा (८.०८) से. यांची जोडी दहावी व यवतमाळ येथील रुद्रा ग्रुपच्या जोडीने (८.०८ से.) ११ वी आली. क गटात मिसू राठोड, (७.८३ से.) यांच्या जोडीने प्रथम , धीरज कदम, देऊरवाडा (७.९६ से.) यांच्या जोडीने द्वितीय , डॉ. शुभम सरोकार, (७.९९ से.) यांच्या जोडीने तृतीय क्रमांक, माऊली ग्रुप, असदपूर (७.९९ से.) यांच्या जोडीने चौथा , मोहम्मद फैजान, तळेगाव (८.०८ से.) यांच्या जोडीने पाचवा , जी.एस.के. ग्रुप, गोसेवाडी (८.०८ से.) यांच्या ग्रुपने सहावा , अशोक टेकाडे, देऊरवाडा (८.१७ से.) यांच्या जोडीने सातवा , शरद खरात, (८.२७ से.) यांच्या जोडीने आठवा , अतुल जाधव, (८.३६ से.) यांच्या जोडीने नववा , अमोल भैसे, (८.४० से.) यांच्या जोडीने दहावा , तर संत भास्कर महाराज, विरूळ रोंघे (८.४० से.) येथील जोडीने अकरावा प्राप्त केला. या स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता पट कमिटीचे नंदकिशोर काकडे, मनोहर कोल्हे, अरुण गावंडे, हरिचंद्र काकडे, प्रशांत घुईखेडकर, शेख रफीक शेख गफुर, संजय गिरूळकर, कैलास सावनकार, अमोल बेंद्रे, वैभव काकडे, शंतनू काकडे, वेदांत सावनकार, अंशुमन काकडे, वंश गिरुळकर, प्रफुल घड्डीनकार, प्रसाद धामणकर, शशांक काकडे, पार्थ फिस्के, मोहन घुसळीकर, सुरज काकडे यांच्यासह संत बेंडोजी बाबा संस्थान, शंकरपट कमिटी, व्यवस्थापन कमिटी व गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले. शुक्रवारी ३० जानेवारीला संत बेंडोजी महाराज संस्थान, घुईखेड येथे गोत आंबिलच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रसाद येथील मुख्य वैशिष्ट्य आहे. भाविकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष वसंत घुईखेडकर, विश्वस्त प्रवीण घुईखेडकर व इतरांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:25 am

माघ एकादशीसाठी अडीच लाख भाविक,‎श्री विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा सुरू‎:वारकरी दिंड्यासह प्रदक्षिणा मार्गावर संतांचे अभंग म्हणत प्रदक्षिणा पूर्ण‎

माघ शुध्द एकादशी निमित्त तीन लाख वारकऱ्यांची मांदियाळी जमली होती. श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा मंदिर समिती सदस्य ह. भ. प. शिवाजी मोरे महराज तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदीर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांच्या हस्ते पहाटे सपत्नीक संपन्न झाली. यावेळी सदस्या शकुंतला नडगिरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, लेखाधिकारी मुकेश अनेचा व विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते. माघी एकादशी निमित्त विठ्ठल- रक्मिणीच्या दर्शनासाठी सुमारे अडीच लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते. यामुळे पंढरीनगरी भाविकांनी गजबजून गेली होती. माघी एकादशी निमित्त मंदीरात विविध फुलांची सजावट करण्यात आली आहे. भाविकांना सुलभ दर्शन व्हावे, यासाठी मंदीर समितीच्यावतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दर्शन रांगेत दशमीच्या दिवशी (२८ जानेवारी) रोजी गर्दी होती. दर्शन रांग ८ पत्रा शेड पार करून गोपाळपूर रोडने विष्णुपद मंदिर मार्गापर्यंत लांब गेली होती. सायंकाळनंतर दर्शन रांगेतील भाविकांची संख्या कमी झाल्याचे दिसून आहे.तर एकादशी दिवशी सहाव्या पत्रा शेडमध्ये दर्शन रांग आलेली होती. आणि दर्शनासाठी तीन ते चार तासाचा अवधी लागत होता. पोलीस प्रशासन व मंदिर समितीच्यावतीने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. हरिनामाच्या जयघोषात चंद्रभागा वाळवंट, भक्तीसागर ६५ एकर, मंदिर परिसर, पंढरीनगरी दुमदुमून गेली आहे. पहाटेपासून चंद्रभागेचे पवित्र स्नान करून परंपरेनुसार शेकडो वारकरी दिंड्यासह प्रदक्षिणा मार्गावर विविध संतांचे अभंग म्हणत प्रदक्षिणा पुर्ण केली. भाविकांनी चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा, कळस दर्शन तसेच श्री.विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पददर्शन व मुख दर्शन घेतल्याचे दिसून आले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने माघी यात्रेनिमित्त वाखरी येथील पालखी तळावर जनावरांचा बाजार आयोजित करण्यात आला होता. या बाजारात जेमतेम ८०० जनावरे दाखल झालेली होती. राज्यभर सुरू असलेल्या निवडणुका आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधनाची सावट यंदा जाणाऱ्या बाजारावर दिसून आले. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्के जनावरांची आवक कमी असल्याचे दिसून आले, तसेच बाजारातील आर्थिक उलाढाल ही कमी झाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:21 am

मोत्याचं शेत आलं राखणीला, सोन्याचं घुंगरू गोफणीला:ज्वारीच्या राखणीला वेग; गोफणीचे स्वर आणि पाखरांच्या थव्यांनी माळरान गजबजले‎

मोत्याचं शेत आलं राखणीला.. सोन्याचं घुंगरू गोफणीला... या गाण्याच्या ओळींप्रमाणे सध्या पापरी (ता. मोहोळ) आणि परिसरात ज्वारीच्या राखणीला वेग आला आहे. गेल्या महिनाभरापासून ज्वारी उत्पादक शेतकरी पहाटे आणि सायंकाळच्या वेळी गोफणीच्या सहाय्याने पाखरांपासून पिकाचे रक्षण करताना दिसत आहेत. शिवारात सध्या शेतकऱ्यांच्या आरोळ्यांनी वातावरण दुमदुमून गेले आहे. ​पापरी आणि पेनूर परिसरात यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावली होती. ओढे, नाले आणि शेततळी तुडुंब भरल्यामुळे जमिनीत पाणी साचून राहिले होते. 'वाफसा' उशिरा झाल्याने यंदा ज्वारीचा हंगाम काहीसा लांबणीवर पडला आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांची शेती माळरानावर किंवा मुरमाड भागात आहे, तिथे पेरणी लवकर झाली होती. आता ही ज्वारी हुरड्याच्या स्वरूपात असून कणसात टपोरे दाणे भरू लागले आहेत. साहजिकच चिमण्या, पोपट आणि इतर पक्ष्यांनी आपला मोर्चा पिकाकडे वळवला आहे. पारंपरिक गोफणीची जागा घेतली तंत्रज्ञानाने पूर्वी शेतकरी बांबूच्या उंच 'आटोळ्यावर' बसून पाखरांची राखण करत असत. मात्र, काळानुसार यात बदल झाला आहे. आजच्या तरुण पिढीला गोफण चालवता येत नसल्याने, अनेक शेतकरी आता सुतळी बॉम्ब, गलोल किंवा 'ब्लूटूथ स्पीकर'वर आवाजाच्या क्लिप लावून पाखरे पळवून लावत आहेत. पूर्वी केरसुणी विक्रेते 'वाक' किंवा 'केकत' (केतकी) पासून तयार केलेल्या गोफणी धान्य घेऊन शेतकऱ्यांना देत असत. मात्र, आता केकत दुर्मिळ झाल्याने आणि बनवणारे कारागीर कमी झाल्याने पारंपरिक गोफणी दिसेनाशा झाल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:20 am

वक्तृत्वात विचार मांडण्याची व समाजाला दिशा देण्याची ताकद:बार्शीत कवी रवींद्र केसकर यांचे प्रतिपादन‎

वक्तृत्व हे केवळ बोलण्याचे कौशल्य नसून, त्यात विचार मांडण्याची आणि समाजाला योग्य दिशा देण्याची ताकद आहे. वक्त्याने समाज बदलासाठी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन कवी रवींद्र केसकर यांनी केले. येथील शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे हे होते. यावेळी प्राचार्य डॉ. अब्दुल शेख, समन्वयक डॉ. सोमनाथ यादव, कला समन्वयक डॉ. बिरा पारसे, डॉ. रविकांत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कवी केसकर म्हणाले की, वक्त्याच्या अंगी उत्तम ऐकणे, उत्तम वाचन याबरोबर परिस्थितीची जाणीव असल्यास वक्तृत्व उत्तम होते. स्वतःच्या मनातील चांगले विचार प्रकट केल्याने श्रोत्यांचे लक्ष केंद्रित करता येते. मनातल्या प्रत्येक गोष्टी अर्थासह प्रकट करण्याची संधी वक्तृत्व देत असते, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. सोमनाथ यादव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विजया जगताप यांनी केले तर आभार डॉ. विजयश्री गवळी यांनी मानले. वक्तृत्व स्पर्धेतून उमटू शकते नवे नेतृत्व वक्तृत्व स्पर्धेतून नव नेतृत्व निर्माण होत असतात. आपले वक्तृत्व चांगले होण्यासाठी चांगले विचार ऐकले पाहिजेत. भाषण कौशल्य आत्मसात करण्यासाठी वाचनाबरोबर योग्य असे हावभाव करता आले पाहिजेत, असे प्रतिपादन खजिनदार जयकुमार शितोळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:18 am

टोलनाक्यावर वाहनांची झाडाझडती सुरू; संशयास्पद हालचालींवर आयोगाची नजर:निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालखी महामार्ग ते मंद्रुप रोडपर्यंत नाकाबंदी‎

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. या अंतर्गत तालुक्यातील सावळेश्वर टोलनाक्यासह तीन महत्त्वाच्या ठिकाणी 'स्थिर सर्वेक्षण पथकांकडून' वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती आचारसंहिता कक्षाचे सहाय्यक नोडल अधिकारी अविचल महाडीक यांनी दिली. ​सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर व तहसीलदार सचिन मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली, 'लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१' च्या कलम १५९ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ​या पथकाचे सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून अविचल महाडिक काम पाहत असून, त्यांच्या पथकात गजानन मारडकर, हर्षल निगडे, बळीराम बंडगर, अजित जगताप, अविनाश बाबर, प्रवीणकुमार सोनटक्के या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. येथे आहे पथकांचा 'वॉच' ​निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी मोहोळ तालुक्यातील खालील तीन ठिकाणी तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. ​सावळेश्वर टोलनाका (पुणे-सोलापूर महामार्ग) , ​कामती पोलीस स्टेशनसमोर (मोहोळ-मंद्रुप रस्ता) ​पेनूर टोलनाका (संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग)

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:18 am

स्नेहसंमेलनातून टिपले पर्यावरण संवर्धन अन् वन्यजीवांचे महत्व:पोदार स्कूलमधील वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात, विद्यार्थ्यांचा सहभाग‎

पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट कर्नल हेमंत मॅडम, डॉ. बलराजू कारी उपस्थित होते. या स्नेहसंमेलनात प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी जंगल, वन्यजीव, पर्यावरण संवर्धन याविषयी मनोरंजनासोबत संदेश देणारी गीते व नृत्ये सादर केली. माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी जीवनकौशल्ये, आत्मविश्वास, आत्मजागृती व जीवनमूल्ये यावर आधारित नृत्य, गीते, नाट्य व विनोदी सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. तसेच सन २०२४–२५ मध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इयत्ता पहिली ते दहावीतील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाही सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. लेफ्टनंट कर्नल हेमंत मॅडम यांनी ‘ओडिसी–जीवन कौशल्ये’ या संकल्पनेचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन ते जबाबदार व सुसंस्कृत नागरिक बनतील, असा विश्वास व्यक्त केला. पालकांनीही कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे व शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी केले तर आभार विद्यार्थी प्रतिनिधींनी मानले. स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य शगुफ्ता काझी, सहायक व्यवस्थापक प्रशासन आशुतोष नामदेव, नितीन गावंडे आदींसह नृत्य शिक्षक तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:11 am

विद्यार्थ्यांनी दिला एकता आणि भारतीय संस्कृती जपण्याचा संदेश:गॅलेक्सी नॅशनल स्कूलच्या स्पोर्ट्स डे मध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

वडगाव गुप्ता येथील गॅलेक्सी नॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्स डे निमित्त एरीयल सिल्क, कमांडो नेट रॉक्स क्लाईबिंग, स्केटिंग यांसह मराठमोळ्या लेझीम, मल्लखांब, पिरॅमिड, योगासने अशा नव्या व जुन्या पारंपरिक खेळांची अनोखी सांगड घातली. यावेळी सादर केलेल्या विविध प्रात्यक्षिकांमधून विद्यार्थ्यांनी एकता व भारतीय संस्कृती जपण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणास उपस्थितांनी भरभरून दाद दिली. हलगीच्या तालावर लेझीम डावाच्या उत्कृष्ट सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी एकात्मतेचा संदेश दिला तर झांज पथकाने तालबद्ध झांज वादन केले. संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांच्या एरियल सिल्क व मल्लखांबाच्या चित्तथरारक प्रत्याक्षिकांनी उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. गॅलेक्सी नॅशनल स्कूलच्या स्पोर्ट्स डेचे उद्घाटन नगरसेवक करण कराळे यांच्या हस्ते व क्रिकेट प्रशिक्षक संदीप आडोळे, नगरसेविका वर्षा सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले . यावेळी दीपक देशमुख मेडिकल अँड एज्युकेशनल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, संस्थापिका उषा देशमुख, सम्राट देशमुख, देविका देशमुख व डॉ. हर्षवर्धन तन्वर, प्रिन्सिपल क्षितीजा हडप, राजू पवार उपस्थित होते. विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांनी पदकांनी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नगरसेवक कराळे म्हणाले, गॅलेक्सी नॅशनल स्कूलच्या स्पोर्ट्स डे मध्ये विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणातून त्यांनी भारतीय सनातन संकृतीचे जतन केले आहे. लेझीम, मल्लखांब, योगासने सारखे खेळ येथे शिकवले जात असल्याने विद्यार्थ्यांची शारीरिक व बौद्धिक प्रगती होत आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल आहे. शाळेचा विद्यार्थी शौर्य देशमुख यांची १६ वर्षाखालील महराष्ट्राच्या संघात झालेली निवड अभिमानास्पद असून विद्यार्थ्यांनी याचे अनुकरण करावे. यावेळी क्रिकेट प्रशिक्षक संदीप आडोळे म्हणाले, मुलांनी मोबाइलवर गेम खेळण्यापेक्षा प्रत्यक्ष मैदानावर उतरून खेळ खेळावेत असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:10 am

सय्यद यांच्या संस्कारांमुळे परिसरात घडली संस्कारक्षम पिढी:मोहम्मद सय्यद यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान, नगराध्यक्ष डॉ. गाडेकर यांचे प्रतिपादन‎

राष्ट्रप्रेम देशभक्ती व कर्तव्यनिष्ठता जपत शिस्त संस्कार व गुणवत्तेचे धडे देऊन राहाता पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवून त्यांना सुज्ञ नागरिक बनवणारे गुरुवर्य मोहम्मद सय्यद सर शिक्षण क्षेत्रातील ऋषितुल्य व दीपस्तंभ आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व संस्कार रुजवल्याने आज या परिसरात संस्कारक्षम पिढी घडू शकली, असे प्रतिपादन राहाता नगरपरिषदेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी केले. सेवानिवृत्त आदर्श शिक्षक गुरुवर्य मोहम्मद सय्यद सर यांना नगराध्यक्ष डॉ. गाडेकर राहाता नगरपरिषदेच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, नगरसेवक हाजी मुन्नाभाई शाह, प्रवीण सदाफळ, अजय आग्रे, राहुल सदाफळ, दशरथ तुपे, संदीप मुर्तडक, ॲड. मयूर पाळंदे, नितीन गाडेकर, नगरसेविका पुजा गिधाड, रविना माळी, पुष्पा आरणे, अर्चना निकाळे, सविता सदाफळ, मंगल डांगे, अंजली सदाफळ, अनिता शेळके, शीतल बनकर, नीता गाडेकर मुख्याधिकारी वैभव लोंढे उपस्थित होते. नगराध्यक्ष डॉ. गाडेकर, उपनगराध्यक्ष सदाफळ नगरसेवक व इतर मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कारानंतर माध्यमांशी संवाद साधताना नगराध्यक्ष डॉ. गाडेकर म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात कर्तव्यनिष्ठ राहून त्याग व समर्पण देणारे सय्यद शिक्षण क्षेत्रातील ऋषितुल्य व आदर्श आहेत प्रेरणादायी व कडक शिस्तीचे भोक्ते म्हणून सुपरीचीत असणारे मोहम्मद सय्यद सर यांनी वर्षानुवर्ष स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन यासह इतरही कार्यक्रमांच्या माध्यमातून देशभक्ती राष्ट्रप्रेम शिस्त व संस्कार याचे धडे देऊन हजारो विद्यार्थी सुसंस्कारित केले आहे. त्यांनी घडवलेली पिढी आजही संस्कार व शिस्तीपासून दूर गेली नाही. अत्यंत तळमळीने व प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून तसेच मैदानी खेळ कवायत व शिस्तीचे धडे दिले आहेत. पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांना घडवणारे निष्कलंक व ऋषितुल्य असणाऱ्या सय्यद सरांचं कार्य शिक्षण क्षेत्रासाठी राहता परिसरातच नव्हे तर राज्यात दिशादर्शक व दीपस्तंभ प्रमाणे अनेकांना वाटचाल करण्यासाठी प्रेरणादायी आहे ऋषितुल्य असणाऱ्या सरांना जीवनगौरव सन्मान प्रदान करण्याचे भाग्य मला लाभले हा माझ्या दृष्टीने जीवनातील अनमोल व अविस्मरणीय क्षण आहे आजही मोहम्मद सय्यद यांचे क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील योगदान अतुलनीय असल्याचे नगराध्यक्ष डॉ स्वाधीन गाडेकर यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:09 am

आठ दिवसांत कांद्याचे दर 300 रुपयांनी घसरले:एकनंबर कांदा अवघा 1300 ते 1700 रु. क्विंटल, कांदा उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले‎

अहिल्यानगर जिल्ह्याला आता कांद्याचे आगार म्हणूनही ओळखले जाते. परंतू, यंदा अतिवृष्टीनंतर कांद्याच्या दरातील घसरण झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यानंतर महिनाभरापूर्वी या दरांत अचान तेजी येऊन प्रतिक्विंटलचा दर चार हजार रुपयांपर्यंत गेला होता. त्यामुळे कांदा लागवडीकडे कल वाढला. मात्र, एकदा कांद्याच्या दरात सातत्याने घसरण पहायला मिळत आहे. आठ दिवसांपूर्वी दोन हजार रुपये दराने विकला गेलेला एक नंबर कांदा आता अवघा १३०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. दराच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी दिलासादायक दरवाढ पहायला मिळाली होती. त्यानंतरमात्र दरात मोठ्या प्रमाणात घसरण होऊन हजार ते बाराशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत कमी झले. त्यातच अतिवृष्टीने शिल्लक राहिलेला कांदा वाहून नेला. कांद्याचे नुकसान झाल्यामुळे पुरवठा कमी होऊन वाचलेल्या कांद्याला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती. तो अंदाजही चुकला, पण १५ डिसेंबर २०२५ रोजी एक नंबर कांदा २ हजार ७०५ ते ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. दोन नंबर कांद्याला २००५ ते २७०० रूपयांचा भाव मिळाला. अपवादात्मक अवघ्या ४१ गोणीलाच ४ हजारांचा भाव मिळाला होता. पण दहा दिवसांतच हा दर पुन्हा घसरला. गुरूवारी २५ डिसेंबरला प्रतिक्विंटल सुमारे एक हजार रुपयांची घसरण होऊन दर १८०० ते २५००रुपयांवर पोहोचले. सद्यस्थिती बाजारात लाल कांद्याची आवक सुरू आहे. वांबोरी उपबाजारात २९ जानेवारी २०२६ रोजी एक नंबर कांदा १३०० ते १७००, दोन नंबर ९०५ ते १३००, तीन नंबर कांदा १०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. या घसरणीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, भुसार मालाच्या भावात मात्र काही अंशी तेजी पहायला मिळत आहे. असे आहेत भुसार मालाचे भाव बाजरी प्रतिक्विंटल १७५०, गहू २८०० ते २९००, मका १८४१, तूर ७९०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटल तर सोयाबिन प्रतिक्विंटल ५४०० रुपये दराने बाजार समितीत विकली जात आहे. तुरीचे भाव वाढणार असल्याचा अंदाज व्यापारी वर्गातून व्यक्त झाल्यामुळे, हे दर नऊ हजारांवर जाऊ शकतील अशी चर्चा आहे. परंतू, दरात नेहमीच चढउतार असल्याने, हे भाव वाढतीलच याबाबत फक्त अंदाज लावले जाऊ शकतात. प्रत्यक्षात जो भाव मिळेल तेवढेच पैसे शेतकऱ्याच्या हातात येतात.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:08 am

मानधनासाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन:घरकुल योजना कामावर परिणाम, निवेदन दिले तरी उपयोग नाही‎

जामठी राज्यातील ग्रामीण भागातील गरजूंसाठी विविध घरकुल योजना राबवण्यात येतात. या योजनांची तांत्रिक अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी प्रलंबित मानधनाच्या मागणीसाठी २१ जानेवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मानधन वेळेत मिळत नसल्याने या विषयाकडे अनेकवेळा लक्ष वेधण्यात आले. पण शासनस्तरावर ठोस कार्यवाही होत नसल्याने हे आंदोलन होत आहे. गृहनिर्माण अभियंते गेल्या ९ ते १० वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर तुटपुंज्या मानधनावर काम करता आहे. ते दुर्गम डोंगराळ भागासह पाडे, तांडे व वसाहतींमध्ये जाऊन घरकुलांची तपासणी करतात. तसेच शासनाला अहवाल सादर करतात. पण त्यांच्या मानधनात कोणतीही वाढ झालेली नाही. तसेच अभियंत्यांना वेळेवर मानधन मिळत नाही. थकीत मानधन तातडीने द्यावे, मानधन वितरण प्रणाली सुलभ करावी, या मागणीसाठी राज्यभरात काम बंद आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाचा परिणाम ग्रामीण भागातील घरकुल योजनांवर झाला आहे. मानधनाच्या मागणीसाठी ग्रामीण गृहनिर्माण अभियंता संघटनेने २० जानेवारीला मंत्रालयातील अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. पण निवेदनाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. मानधनाअभावी अभियंत्यांची आर्थिक कोंडी अभियंत्यांचे मानधन देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली लागू झाली आहे. त्यानंतरही मानधन वेळेत मिळत नाही. मानधनासाठी तालुका स्तरावरून जिल्हास्तर, त्यानंतर संबंधित संस्थेकडे अहवाल जातो. इन व्हॉइस निर्मिती, निधी वर्ग होणे आणि प्रत्यक्ष मानधन वितरण या संपूर्ण प्रक्रियेला ३ ते ४ महिने किंवा त्याहून अधिक कालावधी लागत असल्याने अभियंत्यांची आर्थिक कांेडी होते आहे. त्यामुळे हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होते आहे. या योजनांची आहे जबाबदारी गृहनिर्माण अभियंते ग्रामीण विकास विभागामार्फत राबवण्यात येणारी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना, अटल बांधकाम योजना, आदिम आवास योजनेची तांत्रिक अंमलबजावणी तालुकास्तरावर करतात. प्रलंबित मागण्यांसाठी अंादोलनात सहभागी झालेले अभियंते.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 8:06 am

परसूलला दोन दुचाकींचा अपघात; दोन तरुण ठार

चांदवड-निफाड मार्गावर गणूर ते परसूल दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दोन तरुण जागीच ठार तर अन्य तीन तरुण गंभीर जखमी झाले. गुरुवारी (दि. २९) दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातातील सर्व जखमींना रुग्णवाहिकेने चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात व तेथून वेगवेगळ्या दवाखान्यात हलविण्यात आले आहे. ऐन तारुण्यात दोन मुलांचा मृत्यू झाल्याने देवरगांव आणि आसरखेडे परिसरात शोककळा पसरली आहे. चांदवडकडून देवरगावकडे जात असलेली पल्सर दुचाकी (एमएच १५ केडी ३०२४) व चांदवडच्या दिशेने येणारी दुचाकी (एमएच १५ जीजी ७६२४) यांच्यात गणूर गावाच्या पुढे असलेल्या तीव्र उताराच्या वळणावर अंदाज न आल्याने गुरुवारी (दि. २९) गणेश बर्डे दुपारी १ वाजेच्या सुमारास समोरासमोर अपघात झाला. यात दुचाकीवरील प्रसाद विनायक शिंदे (२२, रा. देवरगांव) व गणेश बंडु बर्डे (२३, रा. आसरखेडे) हे तरुण जागीच ठार झाले तर अजिंक्य अण्णासाहेब शिंदे (२२, रा. देवरगांव), बाळू सखाराम गोधडे (२१, रा. गोईपुल, चांदवड) व पायी जाणारा संकेत अरुण ठाकरे (२१, रा. गणूर) हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींमधील दोघांना उपचारासाठी चांदवड येथील खासगी रुग्णालयात तर एकास उपचारासाठी पिंपळगाव बसवंत येथे पाठविण्यात आले. या अपघातात दोन्ही दुचाकींच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. प्रसाद शिंदे

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 7:48 am

जिल्ह्यात स्वंयस्फूर्तीने बंद पाळत पवारांना श्रद्धांजली‎‎:येवला, सटाणा, सिन्नर, दिंडोरी, इगतपुरी, वणीत सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आठवणींना उजाळा‎

शहरात व्यापारी संघटनांच्या वतीने गुरुवारी शहर बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला व्यापारी व नागरिकांकडून शंभर प्रतिसाद मिळाला. नेहमी गजबजलेली इगतपुरीतील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई पूर्णपणे बंद होती. तर परिसरात शांतता पसरली होती. शहरातील जुना मुंबई–आग्रा महामार्ग, रेल्वे स्थानक परिसर, बसस्थानक, खालची पेठ, बाजारपेठ आदी प्रमुख भागांमध्ये व्यावसायिक आस्थापने बंद ठेवण्यात आली होती. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प राहिले. व्यापारी वर्गासह नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग नोंदवून उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रतिनिधी | सटाणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे सटाण्यात दुखवटा पाळण्यात आला. शहरातील व्यापाराची बांधवांनी सर्व आस्थापने गुरुवारी (दि.२९) दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात रमाकांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली भगवत गितेच्या पंधराव्या आध्यायाचे पठन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी अजित पवारांच्या आठवणी व बागलाण तालुक्यासाठी केलेल्या मदतीबाबत माहिती दिली. पवारांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रातील विद्यार्थीं, गोर-गरीब जनतेसह सर्वांचीच मोठी हानी झाली आहे. मात्र येणाऱ्या काळात त्यांच्या या स्मृतींच्या आठवणीतूनच आपल्याला मार्गक्रमण करावे लागेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रामदास सोनवण, तुषार वाघ, नंदराज देवरे, संदिप भामरे, अशोक भामरे, आदीसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी | वणी वणीत एक दिवसांचा कडकडीत बंद पाळत येथील ग्रामसचिवालयात उपमुख्यमंत्री अजीत पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. उपसरपंच विलास कड यांनी अजीत पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्यासोबतचे अनुभव कथन केले. प्रशासनावर वचक असणारे निर्भीड व्यक्तिमत्व हरवल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. शिस्तप्रिय व्यक्तिमत्व, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे नेते, सर्व समाजाला घेवून जाणारा नेता आपल्यातून हिरावला गेला असल्याचा विश्वास बसत नसल्याने ते म्हणाले. पवार यांनी राजकारणात अनेक चढउतार बघितले. मात्र राजकारणात गडबडले नाहीत. त्यांच्या जाण्याने न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राचा व्हिजन असेलेला नेता, दुरदृष्टी असेलेेला नेता हरपला असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. यावेळी कृउबा दिंडोरीचे सभापती प्रशांक कड, सरपंच मधुकर भरसठ, उपसरपंच विलास कड, गोकुळ झिरवाळ, महेंद्र बोरा आदींसह हजारो नागरिक उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 7:46 am

कळवणला 5,606 लाभार्थ्यांना घरकुल:प्रजासत्ताक दिनी आमदार नितीन पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्त‎

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), तसेच विविध राज्य व केंद्रपुरस्कृत घरकुल योजनांतर्गत कळवण तालुक्यात बांधकाम पूर्ण झालेल्या ५,६०६ नागरिकांच्या घरकुलांची स्वप्नपूर्ती झाली आहे. प्रजासत्ताकदिनी तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमध्ये घरकुल वितरणाचा कार्यक्रम पार पडला. ग्रामपंचायत साकोरे येथे प्रातिनिधिक स्वरूपात आयोजित कार्यक्रमात आमदार नितीन पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलांच्या चाव्या व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (टप्पा-२) अंतर्गत कळवण तालुक्यात एकूण १३ हजार ७८७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी ५६०६ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या पूर्ण झालेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पार पडला. बांधकाम पूर्ण झालेल्या सर्व लाभार्थ्यांना संबंधित ग्रामपंचायतीमार्फत गृहप्रवेश करून घरांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संखे, तहसीलदार रोहिदास वारुळे, गटविकास अधिकारी वंदना सोनवणे, विस्तार अधिकारी युवराज सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, सरपंच साहेबराव गांगुर्डे, उपसरपंच जयराम पवार आदींसह घरकूल लाभार्थी व नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होते. साकोरे येथे लाभार्थी जयवंत आहेर, अलका आहेर यांना घरकुलाची चावी सुपुर्द करताना आमदार नितीन पवार, सहा. जिल्हाधिकारी डॉ. संखे आदी.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 7:44 am

णमोकार तीर्थावर अद्यात्मिक ‘ गुरु मिलन’ सोहळा:1500 किमीची पदयात्रा करून आलेल्या शिष्यांचे वाद्यांच्या गजरात स्वागत‎

फेब्रुवारीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पंचकल्याणक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर णमोकार तीर्थावर गुरुवारी (दि.२९) भक्तीचा महापूर उसळला. राष्ट्रसंत आचार्य कुंथुसागरजी महाराज यांचे शिष्य आचार्य गुणधर नंदिजी महाराज, आचार्य सूर्यसागरजी महाराज आणि उपाध्याय विभंजन सागरजी महाराज यांचे ससंघ आगमन झाले. कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश आणि वरुर येथून सुमारे १००० ते १५०० किलोमीटरची पदयात्रा करून हे मुनीसंघ जयघोषात येथे पोहोचले. गुरुदेवांच्या स्वागतासाठी परिसरात जयजयकार झाला. महिलांनी मंगल कलश घेऊन स्वागत केले. वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. मंदिरात प्रवेश करताच भाविकांनी पुष्पवृष्टी केली. पादप्रक्षालन करून आशीर्वाद घेतला.या वेळी झालेल्या ‘गुरु मिलन’ सोहळ्यात आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळाली. राष्ट्रसंत आचार्य श्री देवनंदीजी महाराज, आचार्य श्री सूर्यसागरजी महाराज, आचार्य श्री पद्मनंदीजी महाराज, आचार्य श्री विद्यानंदीजी महाराज, आचार्य श्री कर्मविजयनंदीजी, आचार्य श्री कुमुदनंदीजी आणि युगल मुनि अमोघकीर्ती व अमरकीर्ती महाराज यांनी प्रवचने दिली. १०० हून अधिक महाराज आणि माताजींचे पावन सानिध्य लाभले. या वेळी महोत्सवाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष पेंढारी, उपाध्यक्ष महावीर गंगवाल, मांगीतुंगीजी ट्रस्टचे अध्यक्ष सुमेर काले, विश्वस्त पवन पाटणी, प्रचार-प्रसार संयोजक विनोद पाटणी यांच्यासह भाविक उपस्थित होते. आचार्य संघाने सांगितले की, हा महोत्सव केवळ भव्य नव्हे तर ऐतिहासिक ठरावा. पंचकल्याणक महोत्सव आत्मकल्याण आणि धर्मप्रभावनेसाठी महत्त्वाचा असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. बालब्रह्मचारी वैशाली दिदी यांनी गुरुदेवांचे स्वागत केले.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 7:44 am

सुविधांकडे दुर्लक्ष:खुलताबाद तालुक्यात 87 शाळांत सीसीटीव्ही नसल्याने सुरक्षा वाऱ्यावर, कॅमेरे बंधनकारक असतानाही शाळा, प्रशासनाचा निरुत्साह‎

राज्य शासनाने शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले असतानाही, खुलताबाद तालुक्यात हा आदेश अक्षरशः धाब्यावर बसवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तालुक्यातील एकूण २०० जिल्हा परिषद व खासगी शाळा-महाविद्यालयांपै की तब्बल ८७ शाळांमध्ये आजही सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नाहीत. ही बाब म्हणजे केवळ प्रशासकीय दुर्लक्ष नसून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी थेट केलेला विश्वासघात असल्याची संतप्त प्रतिक्रिया पालक, सामाजिक कार्यकर्ते व सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वाढणाऱ्या अनुचित घटना, बाहेरील व्यक्तींचा मुक्त वावर, मुलींच्या सुरक्षिततेबाबत निर्माण होणारे प्रश्न आणि आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता सीसीटीव्ही कॅमेरे ही ‘ऐच्छिक सुविधा’ नसून अत्यावश्यक सुरक्षा यंत्रणा आहे. तरीही शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही, शिक्षण विभाग, पंचायत समिती आणि संबंधित प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. जिल्हा परिषद शाळा : १०९, सीसीटीव्ही असलेल्या : फक्त ३९ आहेत. सीसीटीव्ही नसलेल्या : ७० आहेत. खासगी शाळा/महाविद्यालयांची स्थिती खासगी शाळा/महाविद्यालये ९१ आहेत. यात सीसीटीव्ही असलेल्या : ७४, सीसीटीव्ही नसलेल्या : १७ शाळा आहेत. हे आकडे म्हणजे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर लावलेले थेट प्रश्नचिन्ह आहे. संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करावी पालक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून पुढील मागण्या जोर धरू लागल्या आहेत. सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची अंतिम मुदत तातडीने जाहीर करावी. दोषी व जबाबदार अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड करणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करावी. केवळ बैठकांऐवजी प्रत्यक्ष अंमलबजावणी करून अहवाल जाहीर करावा. उर्वरित शाळांसाठी पाठपुरावा सुरू ^खुलताबाद तालुक्यातील ११३ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित ८७ शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या अनुषंगाने संबंधित शाळांशी तात्काळ लेखी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तसेच ही प्रक्रिया विहित कालावधीत पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही व पाठपुरावा सुरू आहे. -सचिन वाघ, गटशिक्षणाधिकारी

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 7:27 am

वडाळा येथील अल्पवयीन मुलगी, तरुणाची आत्महत्या:एकाच दिवशी घटना घडल्याने शोककळा‎

सिल्लोड तालुक्यातील वडाळा येथे अल्पवयीन मुलगी व २० वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (२९ जानेवारी) सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेत अल्पवयीन मुलीने राहत्या घरी, तर युवकाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अजिंठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार १६ वर्षीय आकांक्षा व जीवन संजय मानकर (२०, दोघे रा. वडाळा, ता. सिल्लोड) यांनी आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आकांक्षाने राहत्या घरामध्ये गळफास घेतल्याचे निदर्शनास आले, तर युवकाने शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने दोघांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून अजिंठा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल ढाकणे, फौजदार धम्मदीप काकडे व सहकारी करीत आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. दोघांच्या मृतदेहाचे इन कॅमेरा शवविच्छेदन ^एकाच दिवशी व एकाच वेळी दोघांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. नेमके त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध पोलीस घेत असून सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दोघांचे इन कॅमेरा शवविच्छेदन सुरू आहे. तपासाअंती खरा काय प्रकार आहे हे समोर येईल. -अमोल ढाकणे, सहायक पोलीस निरीक्षक, अजिंठा

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 7:26 am

जि. प. शाळा शिवराई येथे रंगला गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा:आनंदनगरी, क्रीडा अन् विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मिळाली बक्षिसे‎

कन्नड तालुक्यातील शिवराई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. पहाटे गावातून काढलेल्या प्रभातफेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. भारत माता की जय आणि वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी मतदान, असाक्षरमुक्त गाव आणि तंबाखूमुक्तीच्या शपथा घेतल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयराम थोरात होते. प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड येथील पॉलिटेक्निकल कॉलेजचे प्राचार्य प्रमोद मतसागर, प्रमोद गडपायले आणि अरुण साबळे उपस्थित होते. मुख्याध्यापक एन. के. देशपांडे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत उपस्थितांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांचा गौरव हा कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरला. इयत्ता १० वीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. 'आनंद नगरी' क्रीडा स्पर्धा आणि विविध स्पर्धा परीक्षांतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. प्रमुख पाहुणे संतोष मतसागर यांनी शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले. त्यांनी शाळेसाठी ३ कॉम्प्युटर्स आणि ५००१ रुपयांची रोख देणगी जाहीर केली. अरुण साबळे यांनी ग्रामीण भागातील शिक्षणातून मिळालेल्या यशाचे अनुभव सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. माजी विद्यार्थिनी श्रुती पगारे हिनेही आपले अनुभव शेअर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेली सामूहिक संगीत कवायत लक्षवेधी ठरली. सर्व पालकांचे आभार मानण्यात आले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात प्रजासत्ताक दिनाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक देशपांडे, रामराव सोनवणे आदींनी मेहनत घेतली. मतसागर यांनी शाळेसाठी दिली तीन संगणकांची भेट प्रमुख पाहुणे संतोष मत्सागर यांनी शाळेसाठी ३ संगणक आणि ५००१ रुपयांची रोख देणगी यावेळी जाहीर केली. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांनी शुभेच्छा दिल्या.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 7:25 am

सोयगाव संत ज्ञानेश्वर महाविद्यालय करिअर कट्टा उपक्रमात छत्रपती संभाजीनगर विभागातून प्रथम

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात करिअर कट्टा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना वर्षभर ॲपच्या माध्यमातून करिअर विषयक मार्गदर्शन केले जाते. महाविद्यालयाच्या वर्षभराच्या उपक्रमाचा आढावा घेऊन दरवर्षी गणराज्य दिनाच्या दिवशी महाविद्यालयांना पुरस्कार जाहीर केला जात असतो. यावर्षी छत्रपती संभाजीनगर विभागातून सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालय करियर कट्टा उपक्रमात प्रथम आले आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून उत्कृष्ट करिअर संसद म्हणून महाविद्यालयाचा प्रथम क्रमांक आला आहे. प्राचार्य डॉ. शिरीष पवार यांना उत्कृष्ट प्राचार्य तर करिअर कट्टा समन्वयक डॉ.मनोजकुमार चोपडे यांना उत्कृष्ट समन्वयक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयाचे यशाबद्दल प्राचार्य डॉ. शिरीष पवार, समन्वयक डॉ. चोपडे, समन्वयक डॉ. पडघन, रंगनाथनाना काळे, सचिव प्रकाशदादा काळे, संचालक रोहितभैया काळे, मुकुल काळे, उपप्राचार्य डॉ. बारोटे, पदव्युत्तर समन्वयक डॉ. सी.यु. भोरे, पदव्युत्तर समन्वयक डॉ. रामेश्वर मगर, करिअर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ. श्रीकृष्ण परिहार, डॉ. उल्हास पाटील, पंकज साबळे यांनी अभिनंदन केले.

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 7:24 am

आर्य चाणक्य शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले शेतकरी-कामगार सहायक यंत्र:53 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला डॉ. कॅरोलिन बिशप यांनी दिली भेट‎

नागपूर येथे झालेल्या ५३ व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला अमेरिकेच्या कन्सोर्टियम फॉर ग्लोबल एज्युकेशनच्या अध्यक्षा डॉ. कॅरोलिन बिशप यांनी नुकतीच भेट दिली. प्रदर्शनात आर्य चाणक्य प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला “शेतकरी व कामगार सहाय्यक यंत्र” हा प्रकल्प त्यांच्या विशेष लक्षात राहिला. या प्रकल्पाचा उद्देश शेतकरी व कामगारांचे श्रम कमी करून कामाची कार्यक्षमता वाढवणे असा होता. प्रकल्पातून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक भान दिसून आले. डॉ. बिशप यांनी प्रकल्पाची प्रतिकृती आणि संकल्पना बारकाईने पाहिली. त्यांनी विद्यार्थी शिवेंद्र काकडे याचे नाविन्यपूर्ण विचार, स्पष्ट मांडणी आणि आत्मविश्वास याचे कौतुक केले. शेतकरी व कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी सोपे आणि प्रभावी तंत्रज्ञान वापरल्याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. शिक्षक सर्फराज अंबेकर आणि मनोज शिंगारे यांच्या मार्गदर्शनाचेही त्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक कुतूहल निर्माण करण्यात या शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. बिशप यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचा अभ्यास जिज्ञासा आणि समर्पणाने सुरू ठेवण्याचे प्रोत्साहन दिले. शिक्षकांनी प्रकल्पाधारित आणि अनुभवात्मक शिक्षणावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. डॉ. बिशप यांच्या भेटीमुळे अंबाजोगाई शिक्षण संस्था संचलित आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिरसाठी हा क्षण प्रेरणादायी ठरला. त्यांच्या कौतुकामुळे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण विचार करण्याची नवी प्रेरणा मिळाली. शाळेचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करत प्रयोगास शुभेच्छा दिल्या. प्रकल्पाधारित आणि अनुभवात्मक शिक्षणावर भर द्यावा शिक्षकांनी प्रकल्पाधारित आणि अनुभवात्मक शिक्षणावर भर द्यावा.विद्यार्थ्यां ना विज्ञानाचा अभ्यास आणि जिज्ञासा समर्पणाने सुरू ठेवावी. आजचे विद्यार्थी हेच उद्याचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांनी अनुभव घेत शिकायला पाहिजे. - डॉ. कॅरोलिन बिशप , अमेरिकेच्या कन्सोर्टियम फॉर ग्लोबल एज्युकेशन अध्यक्षा

दिव्यमराठी भास्कर 30 Jan 2026 7:23 am