SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
...

भोंदू अशोक खरात प्रकरणात अधिवेशनापूर्वीच SIT:पण अर्धे मंत्रिमंडळ अडकण्याच्या भीतीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, भास्कर जाधवांचा दावा

भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच एसआयटी नेमली. पण निम्मे मंत्रिमंडळ यात अडकण्याची शक्यता असल्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, असा खळबळजनक दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी उपरोक्त दावा केला आहे. ते म्हणाले, रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेतला हे चांगलेच झाले. पण हे प्रकरण केवळ त्यांच्यापुरतेच मर्यादित नाही. या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकारी आहेत. सरकारकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न भास्कर जाधव म्हणाले, अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच एसआयटी नेमण्यात आली. पण निम्मे मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचे नव्हते. केवळ पत्रकार व पीडित महिलेमुळे हे प्रकरण बाहेर आले. अन्यथा हे प्रकरण सरकारने केव्हाच दाबले असते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही एसआयटी केव्हा स्थापन केली? याची माहिती द्यावी. सरकारने अधिवेशन काळात या प्रकरणाची वस्तुस्थिती मांडणे गरजेचे होते. कारण, यात फक्त रुपाली चाकणकर किंवा इतर राजकीय पुढारी आहेत असे नाही. यात उच्चपदस्थ अधिकारीही आहेत. अशोक खरातची उठबस करण्यात ते गुंतलेत. त्यामुळे केवळ चाकणकरांचा राजीनामा घेऊन सरकारने या विषयावरील लक्ष इतरत्र वळवू नये. राजीनामा झाला म्हणजे हे प्रकरण संपणार नाही. सरकारमधील अनेक मंत्री व अधिकारी यात असल्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणात आयएएस, आयपीएस अधिकारी असल्याचे पोलिसांनाही ठावूक होते. आता हे प्रकरण तडीस जावे असा आमचा प्रयत्न आहे. पण सरकारची एकूण वृत्ती पाहता या प्रकरणात काही पुढारी व अधिकाऱ्यांच्या फायली आपल्या बुडाखाली दाबून त्याचा राजकीय स्वार्थासाठी केला जाईल, असे ते म्हणाले. पुढाऱ्यांना अघोरी प्रकार का लागतात? भास्कर जाधव पुढे म्हणाले, राजकीय पुढाऱ्यांना अघोरी विद्या व अघोरी प्रकार का लागतात हे कळत नाही. फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेऊन असे शेण खाणाऱ्या लोकांना चांगला धडा शिकवला पाहिजे. या सरकारकडून आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही. आमचा महाराष्ट्र पुरोगामी असल्याचे आम्ही सांगतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज म्हणून उर बडवतो. अंधश्रद्धा निर्मुलनाचे कायदे करतो. आणि दुसरीकडे हे काय सुरू आहे याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. या प्रकरणाचे धागेदोर खोलवर गुंतले असून, राज्यकर्ते अनेकांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसाळी अधिवेशनात नाशिकच्या हॉटेलचा उल्लेख झाला तेव्हा राज्यकर्त्यांनी मागचा पुढचा विचार न करता त्या प्रकरणात क्लीनचिट दिली. नाशिकचे प्रकरण समजण्यास एवढा उशीर का? असा सवालही भास्कर जाधव यांनी या प्रकरणी उपस्थित केला.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 4:29 pm

डिझेल खरेदीतून एसटीची २४१ कोटींची बचत

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने डिझेल खरेदी प्रक्रिया अधिक पारदर्शक व स्पर्धात्मक केल्यामुळे दरवर्षी सुमारे २४१ कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या निविदा प्रक्रियेत एकूण २५१ डेपोंचा समावेश करण्यात आला होता. मात्र काही पुरवठादारांनी गोवा व गुजरातमधून डिझेल पुरवठ्याचा प्रस्ताव दिल्याने ९१ डेपोंसाठी फेरनिविदा काढण्याचा […] The post डिझेल खरेदीतून एसटीची २४१ कोटींची बचत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Mar 2026 4:28 pm

खरातच्या नवरत्नांसह मंत्र्यांचे सीडीआर तपासा

नागपूर : नाशिकमधील वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात याच्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काल रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात पत्रकारांशी बोलताना सरकारवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या. अशोक खरातच्या संपर्कात आलेल्या सर्व नवरत्नांचे […] The post खरातच्या नवरत्नांसह मंत्र्यांचे सीडीआर तपासा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Mar 2026 4:12 pm

अशोक खरातच्या अटकेची इनसाईड स्टोरी:अटक करणाऱ्या पोलिसांना कोप होण्याचा दिला शाप; चोराचा बनाव करत कसे पकडले? वाचा

भोंदू अशोक खरात प्रकरणाने अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. अशोक खरातची राजकारण्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत उठबस होती. त्यामुळे त्याच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. पण पोलिसांनी एखाद्या सिनेमाला शोभेल अशी गुप्तता पाळत त्याला बेड्या ठोकल्या. यावेळी अशोक खरातने त्याला अटक करणाऱ्या पोलिसांना देवाचा कोप होण्याचा शाप दिला. पण पोलिसांनी कशाचाही विचार न करता त्याला बेड्या ठोकल्या. अशोक खरातला गत बुधवारी अटक झाली. आता त्याच्या अटकेची इनसाईड स्टोरी पुढे आली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, अशोक खरातला अटक करण्यासाठी पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. ही संपूर्ण कारवाई एवढी गोपनीय होती की, त्यात सहभागी असलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांनाही आपण कुणाला पकडण्यासाठी जात आहोत? याचा थांगपत्ता नव्हता. कायदा सु्व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगून पोलिसांची 5 पथके तयार करण्यात आली होती. या पथकातील पोलिसांकडे स्वतःच्या सुरक्षेसाठी काठी व हेल्मेट देण्यात आले होते. लूकआऊट नोटीसीने परदेशात जाता आले नाही अशोक खरातलाही स्वतःच्या अटकेची कुणकुण लागली होती. त्यामुळे त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी देण्याची पोलिसांची तयारी नव्हती. सूत्रांच्या मते, भोंदू खरात परदेशात पलायन करण्याच्या बेतात होता. पण पोलिसांनी 9 मार्च रोजीच त्याच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती. त्यामुळे त्याचा दुसऱ्या देशात पळून जाण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यानंतर नाशिक पोलिस गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने त्याला त्याच्या घरातून अटक करण्याची योजना आखली. तो राहत असलेल्या परिसरात चोर शिरल्याचा बनाव केला. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी परिसरात झडती घेत असल्याचे चित्र उभे केले. त्यानुसार, त्यांनी विविध घरांत शोधाशोध सुरू केली. याचाच एक भाग म्हणून काही पोलिस अशोक खरातच्या घरात शिरले. त्यांनी तिथे शोधाशोध सुरू केली. तेव्हा त्यांना खरात घरातच हजर असल्याची बाब निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी त्याला कोणतीही संधी न देता त्याला अटक केली. या अनपेक्षित कारवाईमुळे भोंदू खरातला पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अटक करणाऱ्या पोलिसांना दिला शाप उल्लेखनीय बाब म्हणजे या प्रकरणी एफआयआर दाखल करणाऱ्यांना अधिकाऱ्यांनाही या अटकेच्या कारवाईपासून दूर ठेवण्यात आले. पोलिसांनी अचानक अटक करताच भोंदू खरात संतापला. त्याने पोलिसांना तुम्ही घोर अपराध करत आहात, तुमच्यावर कोप होईल, असा शाप दिला. एवढेच नाही तर त्याने त्यांच्याशी हुज्जत घालण्याचाही प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करत त्याला आपल्या गाडीत कोंबून ठाण्यात आणले. सध्या 24 मार्चपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहे. छगन भुजबळांची मिश्कील प्रतिक्रिया दुसरीकडे, मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणी अत्यंत मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कुणी म्हणत असेल की, संपूर्ण पोलिस यंत्रणेवर कोप होईल तर हे हास्यास्पद आहे. तंत्रमंत्राने शासन उलथून टाकता आले असते, तर आज देशातील अनेक शासनांची रोज उलथापालथ झाली असती. मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. अशोक खरातने त्याला अटक करणाऱ्या पोलिसांना कोप होण्याचा शाप दिला. पण आता त्याच्यावरच पोलिसांचा कोप झाला आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 3:56 pm

महाराष्ट्रावर दुुहेरी संकट!

नागपूर/पुणे : अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला. पण आता तेवढ्याच दुुपटीने तापमान वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट थांबली असली तरी आता ख-या अर्थाने उकाडा वाढणार आहे. महाराष्ट्रात तापमान वाढायला लागले असतानाच अवकाळी पावसाने डोके वर काढले. तीन दिवस राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपीट झाली. या दुहेरी संकटामुळे […] The post महाराष्ट्रावर दुुहेरी संकट! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Mar 2026 3:39 pm

चाकणकरांना सहआरोपी करा

मुंबई/पुणे : भोंदू बाबा प्रकरणी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा ही राजकीय मागणी झाली. मला त्यांच्या राजीनाम्यात काहीही रस नाही. त्यांना सहआरोपी केले गेले पाहिजे, असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले असून चाकणकरांवर मकोका लागला पाहिजे, हा संघटित गुन्हा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर अंजली दमानिया यांनी चाकणकर आणि तटकरेंना सोडणार नसल्याचा इशारा दिला […] The post चाकणकरांना सहआरोपी करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Mar 2026 3:36 pm

मुंढवा पासपोर्ट केंद्र स्थलांतरावर पुनर्विचाराची मागणी:वाढत्या मागणीमुळे हवाई वाहतूक तज्ञांनी केली केंद्राला विनंती

पुण्यातील मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र बाणेर येथे स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची मागणी केंद्र सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. हवाई वाहतूक तज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी ही मागणी केली असून, पूर्व पुणे परिसरातील वाढती लोकसंख्या, आयटी कंपन्यांची उपस्थिती आणि पासपोर्ट सेवांची सातत्याने वाढणारी मागणी लक्षात घेता, मुंढवा केंद्र कायम ठेवणे अधिक योग्य ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. रांजणगाव, केसनंद, बकोरी, खराडी, मगरपट्टा, हडपसर, मुंढवा, विमाननगर, कोरेगाव पार्क आणि कल्याणी नगर यांसारख्या पूर्व पुण्यातील भागांमध्ये आयटी उद्योग, विविध विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) आणि औद्योगिक प्रकल्प मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. या परिसरात लाखो कर्मचारी, व्यावसायिक आणि उद्योजक वास्तव्यास असून, त्यांना परदेश प्रवासासाठी नियमितपणे पासपोर्टची आवश्यकता असते. याशिवाय, अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांमुळे दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात. प्रस्तावित बाणेर येथील केंद्र पूर्व पुण्यातील नागरिकांसाठी तुलनेने दूर आहे. वाहतुकीच्या गर्दीच्या वेळेत तेथे पोहोचण्यासाठी दीड ते दोन तास लागू शकतात. यामुळे नागरिकांना प्रवासात वेळ, खर्च आणि गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो, असे वंडेकर यांनी स्पष्ट केले. पुण्याचा झपाट्याने विस्तार होत असताना, मुंढवा येथील सध्याच्या केंद्राची क्षमता आणि सुविधा वाढवणे हा अधिक व्यवहार्य आणि जनहिताचा निर्णय ठरू शकतो. यामुळे नागरिकांना सुलभ सेवा मिळेल आणि अनावश्यक प्रवास टाळता येईल. या पार्श्वभूमीवर, पुण्याच्या लोकप्रतिनिधींनी या विषयात हस्तक्षेप करून नागरिकांच्या सोयीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 3:28 pm

एक गाय वाचल्यास एक आत्महत्या थांबेल:अभिनेता प्रवीण तरडे यांचे मत; गौ टेक ग्लोबल समिटमध्ये गोसंवर्धनाचे सांगितले महत्त्व

गाईकडून दूध संपल्यानंतर पुढील दहा वर्षे ती गोमूत्र आणि शेणावर एका कुटुंबाला जगवू शकते. एक गाय वाचल्यास एक आत्महत्या थांबेल आणि त्यातून महाराष्ट्र समृद्ध होईल, असे मत प्रसिद्ध अभिनेता प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले. गाईचा विषय जगभर पोहोचला पाहिजे, तसेच दूध आटले की गाय खाटकाकडे न्या, ही गोष्ट थांबली पाहिजे, असेही ते म्हणाले. दूध ही एक निर्मिती आहे, त्यापुढेही अनेक उत्पादने आहेत. गाईच्या डोळ्यातील कारुण्य शेतकऱ्याला जगण्याची प्रेरणा देईल, असे तरडे यांनी नमूद केले. ते गौ टेक २०२६ या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद व प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. आंतरराष्ट्रीय संस्था ग्लोबल कॉन्फेडरेशन ऑफ काऊ बेस्ड इंडस्ट्रीज (जीसीसीआय) यांच्या वतीने, महाराष्ट्र गो सेवा आयोग आणि आर. आर. काबेल यांच्या सहकार्याने या प्रदर्शनाचे आयोजन कृषी महाविद्यालय मैदान, शिवाजीनगर, पुणे येथे करण्यात आले आहे. या उद्घाटन प्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, गुजरातचे माजी मंत्री भूपेंद्र सिंह चूड़ासमा, उत्तराखंड गोसेवा आयोग अध्यक्ष राजेंद्र अथवाल, जैन आचार्य लोकेश मुनि, आमदार हेमंत रासने, पुणे भाजपा अध्यक्ष धीरज घाटे, गोवा-महाराष्ट्र पोस्ट मास्टर जनरल प्रमुख अमिताभ सिंग, राज देशमुख, राघवन तसेच उद्योजक कृष्णकुमार गोयल, दिलीप काळे, जीसीसीआयचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री तसेच राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया, महाराष्ट्र गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष व गौ टेक २०२६ चे आयोजनाध्यक्ष शेखर मुंदडा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. डॉ. विलास खर्चे यांनी शेतीमध्ये गोमातेचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. रसायनांचा उपयोग शेतीत मोठ्या प्रमाणात होत असल्याने, तो कमी करण्यासाठी प्राकृतिक शेतीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात हे प्रयोग होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जैन आचार्य योगेश मुनि म्हणाले की, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात भारतमाता, जन्मदात्री माता आणि गोमाता या तिन्हीचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाला गोमातेबद्दल आदर असायला हवा. आपण आत्मनिर्भरतेकडे गेल्यास गोसंवर्धन करणे शक्य आहे. डॉ. वल्लभभाई कथिरिया यांनी या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. गौ-आधारित उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागचा हेतू आहे. हे केवळ एक प्रदर्शन नसून गौ-आधारित अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून भारताला आत्मनिर्भर व संस्कारित बनविण्याच्या दिशेने एक व्यापक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अभियान आहे. गौ टेक २०२६ मध्ये धोरणकर्ते, समाजसेवक, शास्त्रज्ञ, उद्योगपती, स्टार्ट-अप्स, गुंतवणूकदार, शेतकरी, गौशाळा, विद्यापीठे, संत समाज, महिला व युवक देश-विदेशातून मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शेखर मुंदडा म्हणाले, तब्बल ३ लाख अभ्यागत, २०० पेक्षा अधिक स्टॉल्स व विविध उपक्रम यामध्ये आहेत. प्रदर्शनामध्ये सेंद्रिय खत व बायो-फर्टिलायझर्स, दूध व मूल्यवर्धित दुग्ध उत्पादने, गौमूत्र व गोबरावर आधारित उत्पादने, नैसर्गिक शेती, पशुवैद्यकीय महाविद्यालये व विद्यापीठे, सीमेन प्रयोगशाळा, सेक्स-सॉर्टेड सीमेन व एम्ब्रियो ट्रान्सफर तंत्रज्ञान, सौर व बायो-एनर्जी, चारा व बियाणे उद्योग, चारागाह विकास यंत्रसामग्री, शासकीय व खासगी बँका, सहकारी संस्था, दुग्ध संघ व फेडरेशन, विविध राज्यांचे गौ सेवा आयोग, अॅनिमल फूड प्रोसेसिंग युनिट्स, इनोव्हेटिव्ह स्टार्ट-अप्स, संशोधन व विकासावर आधारित गौ-उत्पादने, भारतीय देशी गौ-नस्लांचे लाईव्ह प्रदर्शन तसेच नॅचरोपथी, आयुर्वेद व पंचगव्य आधारित उपचार पद्धतींशी संबंधित स्टॉल्स सहभागी झाले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 2:58 pm

भोंदू खरात भक्तांवर कारवाई व्हायलाच हवी:तुम्ही लिंबाच्या लागवडीवर आलात, पण त्याला टाचण्या मारण्याचे काम आमचे नाही - उद्धव ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भोंदू अशोक खरात व त्याला मानणाऱ्या सर्वांवरच कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपण महाराष्ट्र आणखी किती खालच्या पातळीवर नेणार आहोत. राज्यात जादूटोणा विरोधी कायदा आहे. पण कायद्याचे पालन करणारेच भोंदूंच्या नादी लागणार असतील, तर भोंदू भक्तांवर कारवाई झालीच पाहिजे, असे ते म्हणालेत. आम्ही लॉजिस्टिकच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे नेत आहोत. याऊलट तुम्ही लिंबाच्या लागवडीवर आलात. पण लिंबाला टाचण्या मारण्याचे काम आमचे नाही, असेही ते यावेळी म्हणालेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स (FFFAI शिक्षण शाखा) ह्यांच्या संयुक्त सहकार्याने शिवसेना भवन येथे आजपासून सुरु करण्यात आलेल्या एक्स्पोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टीक्स कोर्सचे उद्घाटन उद्धव ठाकरे ह्यांच्या हस्ते करण्यात आले. कस्टम क्लियरन्स, लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स, वेअरहाऊसिंग आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटबाबत स्थानिक भूमिपुत्रांना प्रशिक्षित करुन रोजगाराची हमखास संधी निर्माण करणे हा ह्या उपक्रमाचा उद्देश आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी उपरोक्त विधान केले. लिंबाला टाचण्या मारण्याचे काम आमचे नाही उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही महाराष्ट्र आणखी किती खालच्या पातळीवर नेणार आहात. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आहे. पण कायद्याचे पालन करणारेच भोंदू बाबांच्या नादी लागणार असतील, तर त्यांच्या भोंदू भक्तांवर कारवाई झाली पाहिजे. असे झाले तर महाराष्ट्राला आधुनिक म्हणता येईल. आम्ही लॉजिस्टिकच्या माध्यमातून महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. याऊलट ते लिंबाच्या लागडीवर आलेत. पण लिंबाला टाचण्या मारण्याचे काम आमचे नाही. एपस्टीन फाईलवरून लक्ष हटवण्यासाठी या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. या प्रकरणी अनेक फोटो व नावे समोर येत आहेत. याचा अर्थ लक्षात येतोय का? ज्यांचे कोणतेही कर्तृत्व नाही, त्यांना असे मार्ग अवलंबवावे लागतात. भाकड व भोंदू नेये यांचे कोणतेही कर्तृत्व नाही. जे लोक स्वकर्तृत्वाने काहीही करू शकत नाहीत, तेच लोक अशा भोंदूबाबांच्या नादी लागलेत. ‘ओम फट स्वाहा’ पत्रकारांनी यावेळी महाविकास आघाडीच्या काळातही भोंदू अशोक खरातला मदत झाल्याकडे उद्धव ठाकरेंचे लक्ष वेधले. त्यावर ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी पांघरून मंत्रालय काढले पाहिजे. सर्वांच्या पापांवर पांघरून घालणारे हे खाते त्यांनी स्वतःकडे ठेवले पाहिजे. माझे काहीही म्हणणे नाही. तुम्ही सगळ्यांची चौकशी करा. कारण, पाणी कुठपर्यंत मुरलंय हे सर्वांना कळू द्या. या निमित्ताने गावोगावी असणाऱ्या भोंदूबाबांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्याकडे कोणत्याही पक्षाचा झेंडा असला तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे ते 'ओम फट स्वाहा' म्हणत म्हणाले. दरम्यान, ठाकरे गटाच्या उपक्रमाचा उद्देश कस्टम क्लियरन्स, लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स, वेअरहाऊसिंग आणि सप्लाय चेन मॅनेजमेंटबाबत स्थानिक भूमिपुत्रांना प्रशिक्षित करुन रोजगाराची हमखास संधी निर्माण करणे हा आहे. पाच आठवड्याच्या एक्स्पोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टीक्स कोर्सच्या माध्यमातून आजपासून सेनाभवन येथे पहिल्या 30 जणांच्या बॅचला प्रशिक्षित करण्यात येणार आहे. ह्यावेळी जेष्ठ शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते अंबादास दानवे आदी नेते उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 2:54 pm

सुप्रिया सुळे यांच्या कन्येचा लग्नमुहूर्त ठरला:पवार कुटुंबात सोहळ्याची लगबग; रेवती सुळे 20 जूनला विवाहबंधनात, हाय-प्रोफाइल लग्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रेवती सुळे आणि नागपूरचे उद्योगपती सारंग लखानी यांचा विवाह 20 जून रोजी मुंबईत पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या विवाहसोहळ्यामुळे पवार कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तयारीलाही वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाहसोहळा मुंबईतील एका प्रतिष्ठित ठिकाणी भव्य स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील आणि देशातील अनेक नामांकित राजकीय नेते, उद्योगपती तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पवार आणि लखानी कुटुंबीयांकडून या सोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून प्रत्येक गोष्ट विशेष ठरणार असल्याचे बोलले जात आहे. विवाहानंतरही विविध ठिकाणी स्वागत समारंभांचे आयोजन करण्यात येणार आहे. पहिला रिसेप्शन मुंबईत पार पडेल, तर वरपक्ष नागपूरचा असल्याने तेथेही खास कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. याशिवाय, पवार कुटुंबाचे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्व लक्षात घेता दिल्लीतही एक भव्य स्वागत समारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा केवळ कौटुंबिक न राहता राजकीय आणि सामाजिक दृष्ट्याही चर्चेचा विषय ठरणार आहे. सारंग अरुण लखानी हे नागपूरचे रहिवासी असून ते विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या अरुण लखानी यांचे सुपुत्र आहेत. सारंग हे केवळ उद्योग क्षेत्रातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही सक्रिय असून ते एक कुशल बॅडमिंटनपटू आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या विवाह जुळवण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी महत्त्वाची ठरल्याचे सांगितले जाते. पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण रेवती सुळे यांनीलंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्या शैक्षणिकदृष्ट्या सक्षम असून बारामती लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी प्रथमच आई सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुले सुप्रिया सुळे यांना आहेत. आता रेवती सुळे यांच्या विवाहामुळे पवार कुटुंबात आनंदाचे वातावरण असून हा सोहळा राज्यातील चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 2:46 pm

भोंदू खरात अटकेपूर्वी 3 सनदी अधिकाऱ्यांना भेटला:अटकेची चाहूल शिर्डीत भेटल्याचा दावा; योनी शुद्धीकरणाच्या नावाने लैंगिक शोषण

भोंदू अशोक खरातने आपल्या अटकेची चाहूल लागताच शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलात 3 सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता, असा दावा सूत्रांनी केला आहे. त्यामुळे हे अधिकारी कोण? व त्या बैठकीत काय चर्चा झाली? असे विविध प्रश्न या प्रकरणी उपस्थित होत आहेत. दरम्यान, अशोक खरातने योनी शुद्धीकरणाच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची बाबही आता समोर आली आहे. नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राज्य महिला आयोगाच्या आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. या पार्श्वभूमीवर सूत्रांनी अशोक खरातने आपल्या अटकेपूर्वी 3 आयएएस अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक झाल्याचा दावा केला आहे. विनोद नामक व्यक्तीने आयोजित केली बैठक यासंबंधीच्या वृत्तानुसार, अशोक खरातला बुधवारी अटक झाली. तत्पूर्वी 3 दिवस अगोदर त्यांनी शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज्यातील 3 आयएएस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. ही भेट विनोद नामक व्यक्तीने घडवून आणली होती. हा विनोद नामक व्यक्ती अशोक खरातचा शिर्डी परिसरातील पंटर असल्याची माहिती समोर येत आहे. सदर बैटखीत नेमके काय झाले? कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली? व त्या 3 अधिकाऱ्यांनी अशोक खरातला कोणते आश्वासन दिले? याचा तपशील अद्याप समोर आला नाही. पण या बैठकीत अटक झाल्याच्या स्थितीत पुढे काय करायचे? या मुद्यांवर चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. योनी शुद्धीकरणाच्या नावाने लैंगिक शोषण दुसरीकडे, भोंदू अशोक खरातकडे उच्चशिक्षित महिला येत असल्याचीही बाब समोर आली आहे. यासंबधी पत्रकार दत्तात्रय खेमनार यांनी 'मुंबई तक'शी बोलताना सांगितले आहे की, अशोक खरातकडे येणाऱ्या महिला उच्चशिक्षित, सरकारी अधिकारी व राजकीय कुटुंबातील होत्या. तो या महिलांना म्हणायचा की मी देव आहे. तुझे आयुष्य चांगले करायचे असेल तर मला तुझे योनी शुद्धीकरण करावे लागेल. त्यासाठी तो त्या महिलेला स्वतःची लघवी प्यायला लावायचा. एका व्यावसायिकाला व्यवसायात तोटा झाल्यानंतर तो मार्गदर्शनासाठी अशोक खरातकडे आला होता. त्याला खरातने खोटी रत्ने देऊन फसवले. त्याला प्रथम साडेतीन लाख रुपयांना एक रत्न विकले. त्यानंतर दुसरे रत्न दोन लाखांना विकले. पण ही दोन्ही रत्ने खोटी निघाली. हा व्यक्ती त्याच्याकडे येणाऱ्या स्त्री - पुरुषांनाही एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा. खरातने एका बड्या उद्योजकाचे सूत दुसऱ्या एका महिलेशी जुळवू दिले. त्यानंतर ही महिला गरोदर राहिल्याचे खोटे सांगून त्याने त्या उद्योजकाकडून तब्बल 20 कोटी उकळले, असे खेमनार यांनी सांगितले. कोण आहे भोंदू अशोक खरात? अशोक खरात हा नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो आपण सेवानिवृत्त कॅप्टन असल्याचा दावा करतो. खरात अंकशास्त्रज्ञ म्हणूनही ओळखला जातो. त्याच्या शिवनिका ट्रस्टच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, अशोक खरातने मर्चंट नेव्हीतील आपल्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 154 देशांचे दौरे केले. त्यात त्याने या देशांमधील धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता व नैसर्गिक परिस्थितीचा सखोल अभ्यास केला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी व उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्यासाठी त्याच्या संपर्कात होते.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 2:17 pm

पुढाकार:सामाजिक व वर्तन बदल उपक्रम बळकट करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचा सीआयएफएफ सोबत करार

लोककेंद्रित व अधिक परिणामकारक सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम राबविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने चिल्डरेन्स इन्व्हेस्टमेंट फंड फौंडेशन (सीआयएफएफ), युनायटेड किंगडम सोबत सामाजिक व वर्तन बदल संप्रेषण उपक्रम बळकट करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. राज्यातील राष्ट्रीय आरोग्य उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारासाठी विशेष पुढाकार घेतला. या करारावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, उपसचिव चंद्रकांत विभुते, सीआयएफएफ कडून डॉ. हेमांग शाह व डॉ. अस्मिता जैन, तसेच आय पी आय कडून राघवेश राजन आणि अविधा यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या भागीदारीअंतर्गत सामाजिक व वर्तन बदल उपक्रम अधिक नाविन्यपूर्ण, पुराव्यावर आधारित व संशोधनाधारित पद्धतीने राबविले जाणार असून, समुदाय सहभाग व प्रभावी संवाद यावर विशेष भर दिला जाणार आहे. या सहकार्याचा उद्देश आरोग्यविषयक वर्तनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे आणि राज्यातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राज्यभर पोहोचविणे व त्याची परिणामकारकता वाढविणे हा आहे. हा उपक्रम माता व बाल आरोग्य, पोषण, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि रोग नियंत्रण यांसारख्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीस बळकटी देईल. विशेषतः वंचित व दुर्लक्षित घटकांपर्यंत महत्त्वाचे आरोग्य संदेश व सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. कराराच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक परिणामकारक

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 2:14 pm

रूपाली चाकणकरांनी खरातांना पाठबळ दिले, महिलांना नाही!:संपदा मुंडे, पूजा चव्हाण प्रकरणांत तुम्ही कुणाची बाजू घेतली?- करुणा मुंडे

रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर करत अशोक खरात सारख्या लोकांना पाठबळ दिले. त्यांनी महिला आयोगाच्या पदाचा मान राखला नाही. महिला म्हणून रुपाली चाकणकर यांनी कुणी टार्गेट करत नाहीये. तुम्ही जे केले ते तुम्हाला भोगावे लागत आहे, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. करुणा मुंडे म्हणाल्या की, संपदा मुंडे, पुजा चव्हाण, गौरी गर्जे, करुणा मुंडे, रेणू शर्मा या प्रकरणात तुम्ही कुणाची बाजू घेतली. चाकणकर खरातांना गुरू मानत होत्या आणि त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हते. ज्यांच्याविरोधात तुमच्याकडे तक्रारी आल्या त्यावर तुम्ही काय केले. संपदा मुंडेला न्याय मिळवून दिला का तुम्ही? तुमच्यावर अटकेची तलवार आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेला साथ दिली पाहिजे अशा प्रवृत्तीच्या लोकांना नाही. काम करणाऱ्या महिलेकडे आयोगाचे पद द्यावे करुणा मुंडे म्हणाल्या की, रुपाली चाकणकर यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांनी थोडासा विचार केला पाहिजे की आपण काय करतो आहोत. चुकीचे काम करणाऱ्याविरोधात आम्ही लढत राहणार आहोत. मागच्या वेळी आम्ही धनंजय मुंडे यंचा राजीनाम्यासाठी प्रयत्न केले आणि आता रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. लवकरात लवकर चांगली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्र्यांनी नेमावी अशी मी सीएम फडणवीस यांनी विनंती करते. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या विरोधात 2023पासून त्यांनी पुकारलेल्या युद्धाला अखेर यश आले असून, चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. धनंजय मुंडेंच्या 'त्या' घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी जेव्हा धनंजय मुंडे यांच्या संदर्भात मोठे वादळ उठले होते, तेव्हाही करुणा मुंडे यांनी दिलेली तारीख आणि वेळ खरी ठरली होती. आजही नेमकी तशीच परिस्थिती पाहायला मिळाली. यामुळेच आता राजकीय वर्तुळात 'करुणा मुंडे फॅक्टर'ची दहशत निर्माण झाली आहे. स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेली ही मोहीम आता भ्रष्ट आणि कर्तव्यशून्य व्यवस्थेला हादरा देणारी ठरत आहे. एका स्त्रीने ठरवले तर ती मोठ्या मोठ्या सत्ताधाऱ्यांना जमिनीवर आणू शकते, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 1:56 pm

भोंदू अशोक खरातला कॅप्टन म्हणू नका:संभाजीराजे छत्रपती यांचे आवाहन; अशोक खरातकडे यायच्या उच्चशिक्षित महिला

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातला कॅप्टन म्हणू नका, असे आवाहन माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. अशोक खरात हा देशाच्या सैन्य दलात किंवा नौदलात नव्हता. त्यामुळे त्याच्या नावापुढे कॅप्टन लावू नका, असे ते म्हणालेत. अशोक खरात हा सध्या महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खात आहे. त्याने 100 हून अधिक महिलांना भीती दाखवून, धमक्या देऊन अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे. त्याच्या या दुष्कृत्याचे अनेक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेत. त्यामुळे त्याचा कोठडीतील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हा भोंदूबाबा आपण नौदलातील कॅप्टन असल्याचे सांगायचा. पण संभाजीराजे छत्रपती यांनी हा व्यक्ती सैन्यदल किंवा नौदलात कॅप्टन नव्हता, त्यामुळे त्याला कॅप्टन म्हणण्याची काहीही गरज नाही असे ठणकावून सांगितले आहे. काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती? संभाजीराजे छत्रपती यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “कॅप्टन” हे भारतीय लष्करातील अत्यंत सन्मानाचे पद आहे. या पदापर्यंत पोहोचणारा व्यक्ती अतिशय मेहनतीने, जिद्दीने व प्रखर राष्ट्रभक्तीने इथेपर्यंत पोहोचत असतो. भारतीय सेनादलांत या पदावर सेवा बजावणाऱ्या किंवा या पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्तींनाचा नावासोबत “कॅप्टन” हे पद जोडण्याचा अधिकार असतो. सर्व जनतेला आणि विशेषत: माध्यमांना माझी विनंती आहे की, घृणास्पद कृत्ये करणाऱ्या भोंदूच्या नावापुढे कुठेही हे पद लावू नये. हा भोंदूबाबा कधीही आपल्या सैन्यदलात अथवा नौदलात नव्हता. कधीकाळी व्यावसायिक व्यापारी जहाजांवर कर्मचारी असलेला हा व्यक्ती स्वयंघोषित कॅप्टन आहे. त्याने स्वतःला लावून घेतलेली खोटी पदवी आपण संमत करून नकळत आपल्या सैन्यदलांचा अपमान करू नये, असे ते म्हणालेत. अशोक खरातकडे उच्चशिक्षित महिला यायच्या दुसरीकडे, भोंदू अशोक खरातकडे उच्चशिक्षित महिला येत असल्याचीही बाब समोर आली आहे. यासंबधी पत्रकार दत्तात्रय खेमनार यांनी 'मुंबई तक'शी बोलताना सांगितले आहे की, अशोक खरातकडे येणाऱ्या महिला उच्चशिक्षित, सरकारी अधिकारी व राजकीय कुटुंबातील होत्या. तो या महिलांना म्हणायचा की मी देव आहे. तुझे आयुष्य चांगले करायचे असेल तर मला तुझे योनी शुद्धीकरण करावे लागेल. त्यासाठी तो त्या महिलेला स्वतःची लघवी प्यायला लावायचा. एका व्यावसायिकाला व्यवसायात तोटा झाल्यानंतर तो मार्गदर्शनासाठी अशोक खरातकडे आला होता. त्याला खरातने खोटी रत्ने देऊन फसवले. त्याला प्रथम साडेतीन लाख रुपयांना एक रत्न विकले. त्यानंतर दुसरे रत्न दोन लाखांना विकले. पण ही दोन्ही रत्ने खोटी निघाली. हा व्यक्ती त्याच्याकडे येणाऱ्या स्त्री - पुरुषांनाही एकमेकांशी लैंगिक संबंध ठेवायला सांगायचा. खरातने एका बड्या उद्योजकाचे सूत दुसऱ्या एका महिलेशी जुळवू दिले. त्यानंतर ही महिला गरोदर राहिल्याचे खोटे सांगून त्याने त्या उद्योजकाकडून तब्बल 20 कोटी उकळले, असे खेमनार यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 1:44 pm

देशाला दिशा अन् विचार देणारा महाराष्ट्र दिशाहिन:रोहित पवारांचा भोंदू खरात प्रकरणावर संताप; रोजगारावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नाशिकच्या भोंदू अशोक खरात व त्याच्या नादाला लागलेल्या राजकारण्यांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एआयमुळे रोजगाराचा प्रश्न दिवसागणिक गंभीर होत असताना आपले नेते व राज्यकर्ते भोंदूबाबाच्या व त्याच्या ओश्नो जलाच्या चक्रात अडकलेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल, असे ते म्हणालेत. नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राज्य महिला आयोगाच्या आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपण आपल्या वैयक्तिक कारणांमुळे स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल रोहित पवार म्हणाले, आजच्या AI च्या जमान्यात आहे त्या नोकऱ्या टिकवणं कठीण होत असताना नव्याने पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या 30 टक्के तरुणांना AI मुळं नोकरीही मिळणार नसल्याचं भाकित ServiceNow चे CEO Bill McDermott यांनी केलं. या गंभीर परिस्थितीवर मार्ग काढण्याऐवजी आपले नेते आणि राज्यकर्ते एखाद्या भोंदू बाबाच्या आणि त्याच्याकडून पिण्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘ओश्नो जला’च्या चक्रात अडकत असतील तर युवा शक्ती ज्या बेरोजगारीच्या दुष्टचक्रात अडकत चाललीय त्यांना कोण सोडवणार? कधीकाळी देशाला विचार आणि दिशा देणाऱ्या महाराष्ट्रातील नेते आज दिशाहिन होऊन बाबाबुवा, तंत्र-मंत्र आणि तोडगे यात गुरफटत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैवच म्हणावं लागेल. सुनेत्राकाकी पवारांनी काळजी घ्यावी उल्लेखनीय बाब म्हणजे रोहित पवार यांनी शुक्रवारी या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व त्यांच्या दोन्ही मुलांना सावध राहण्याचा इशारा दिला होता. ते म्हणाले होते, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदुगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही, परंतु आ. अमोल जी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदुबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते. नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदुबाबाबाला भोंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरिवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे. मा. सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही, असे ते म्हणाले होते.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 12:42 pm

घरकामात हातभार लावणे पतीचेही कर्तव्य

नवी दिल्ली : आजचा काळ बदलला आहे. तुम्ही एखाद्या मोलकरणीशी लग्न केलेले नाही, तर तुमच्या जोडीदाराशी लग्न केले आहे. त्यामुळे घरकामात आणि स्वयंपाकात पत्नीला मदत करणे हे पतीचेही कर्तव्य आहे अशा कडक शब्दांत सुप्रीम कोर्टाने एका पतीला फटकारले आहे. पत्नी घरचे काम नीट करत नाही किंवा स्वयंपाक करत नाही, या कारणावरून तिला घटस्फोट देणे किंवा […] The post घरकामात हातभार लावणे पतीचेही कर्तव्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Mar 2026 12:35 pm

हिंगोलीत अंबिकानगर भागात चोरट्यांनी दोन घरे फोडून लाखोंचा ऐवज पळविला:शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल

हिंगोली शहरातील अंबिकानगर भागात चोरट्यांनी एका डॉक्टरचे व सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याचे घर फोडून लाखोंचा ऐवज पळविल्याची घटना शनिवारी ता. 20 सकाळी उघडकीस आली आहे. हिंगोली शहर पोलिस ठाण्याच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्याची तयारी चालवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अंबिका नगर भागात डॉ. विकास देवकरयांचे घर आहे. त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर सेवानिवृत्त बँक अधिकारी दिलीप देशमुख हे राहतात. ता. 6 मार्च रोजी देशमुख कुटुंबिय बाहेरगावी गेले होत. तर दोन दिवसांपुर्वीच डॉ. देवकर हे मुलाच्या उपचारासाठी कुटुंबियांसह मुंबई येथे गेले होते. यावेळी घराला कुलुप होते. दरम्यान, घराला कुलुप असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कुलुप कोयंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातील साहित्याची नासधुस केली त्यानंतर घरातील कपाट तोडून त्यातील सोन्या चांदिचे दागिने व 9 हजार रुपये रोख असा ऐवज पळविला. त्यानंतर चोरट्यांनी देशमुख यांच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. त्यांच्या घरातील दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी पळविले. दरम्यान, आज सकाळी डॉ. देवकर यांचा पुतण्या घराजवळ आला असतांना त्याला घराच्या दरवाजाचा कुलुप व कोयंडा तुटलेला दिसून आला. त्याने तातडीने सदर प्रकार त्यांच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर या घटनेची माहिती हिंगोली शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज वाघमारे, जमादार संजय मार्के, अशोक धामणे, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, शंकर ठोंबरे, जोगे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या पथकानेही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी ठसे तज्ञांना पाचारण केले असून त्यांनी घटनास्थळावरून काही ठसे घेतले आहेत. या शिवाय श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र श्‍वान पथक चोरट्यांचा माग काढू शकले नाही. त्यानंतर आता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. या दोन्ही घटनेमध्ये सुमारे 30 ते 35 तोळे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी पळविल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 12:29 pm

राऊत नार्वेकरांचा राजीनामा घेण्याची हिंमत दाखवा, मगच दुसऱ्यांकडे बोट दाखवा!:तुमचे फोटो समोर आले तर राज्यसभा सोडणार का?- नवनाथ बन

भोंदू बाबासोबत कुणाचे फोटो आहेत म्हणून कोणत्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या असे संजय राऊत म्हणत आहेत. मिलींद नार्वेकरांचे आणि त्या भोंदू बाबाचे फोटो समोर आहेत, तुम्ही हिंमत दाखवत नार्वेकरांचा राजीनामा घ्या, मग इतरांचे राजीनामे मागा, उद्या तुमचे फोटो समोर आले तर तुम्ही राज्यसभेचा राजीनामा देणार का? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी यांनी केला आहे. नवनाथ बन म्हणाले की, वीर सावरकर यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार उबाठा गटाने कधीच गमावला आहे. ज्या राहुल गांधी यांनी सातत्याने सावरकरांचा अपमान केला, नको नको ते शब्द वापरले त्यांच्यासोबत तुम्ही सत्तेसोबत मांडीला मांडी लावून बसले. जनाब राऊत तुमचे कारनामे जनतेने पाहिले आहेत, तुम्हाला सावरकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. सावरकर यांचे विचार धुळीस मिळवण्याचे काम उद्धव ठाकरे, संजय राऊत तुम्ही केले आहे. तुमचे त्यांच्यावर किती प्रेम आहे हे राहुल गांधींसोबत गेले तेव्हाच कळले. राऊतांना भोंदू गिरीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांना हिंदूत्व आणि भोंदू गिरीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कारण तुम्ही कधीच हिंदूत्व सोडले आहे त्यामुळेच तुमच्यावर ही वेळ आलेली आहे. त्या भोंदू बाबाला अटक करत त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत देवेंद्र फडणवीस यांनी दाखवली आहे. हिंदूत्वाच्या नावावर जर कोणी असा बाजार मांडत असेल तर त्याला सोडले जाणार नाही हा संदेश कारवाई करत देवाभाऊ सरकारने दिला आहे. राऊत तुम्ही हिंदूत्व सोडून कोणता धर्म स्वीकारला याचा निकाल विधानसभेला लागला आहे. ठाकरे सरकारचा भोंदूसाठी विशेष जीआर नवनाथ बन म्हणाले की, भोंदू बाबाचे कारनामे समोर आल्यावर त्याला अटक करण्यात आली रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात आला. परंतु उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मविआने याच भोंदू बाबासाठी विशेष जीआर काढला होता. संजय राऊत याबद्दल गप्प का आहेत. सरकारकडून त्यांनी जीबार काढून घेतला तेव्हा उद्धव ठाकरेंचे सरकार होते. देवाभाऊंचे सरकार हे जनतेला फसवणाऱ्यांना साथ देणार नाही हे कारवाईतून स्पष्ट झाले आहे. भोंदूगिरीमुळे सरकार पडत नाही नवनाथ बन म्हणाले की, देवाभाऊंचे सरकार उलथवण्यासाठी भोंदू बाबाकडे विधी झाल्याचा दावा राऊत करत आहे. असे काही विधी करत सरकार पाडता येत नाही, देवाभाऊंचे सरकार हे जनतेने निवडून दिलेले सरकार आहे. भोंदूगिरीमुळे सरकार पडत नाही. तुमचे सरकार विश्वासघातातून आले होते म्हणून ते पडले. कितीही यज्ञ केले किंवा भोंदूगिरी केली तरी सरकार पाडू शकत नाही.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 12:26 pm

नव्या नियमांमुळे करप्रणाली सोपी आणि सुटसुटीत होणार

नवी दिल्ली : सहा दशके जुना आयकर कायदा इतिहासजमा होणार असून केंद्र सरकारने ‘आयकर अधिनियम, २०२५’ अंतर्गत नवीन नियमांची अधिसूचना शुक्रवारी जारी केली. येत्या १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू होतील. नव्या नियमांमुळे करप्रणाली अधिक सोपी आणि सुटसुटीत होणार असली, तरी पारदर्शकता वाढविण्यासाठी काही कडक अटीही घालण्यात आल्या आहेत. या नव्या नियमावलीत नोकरदारांना घरभाडे […] The post नव्या नियमांमुळे करप्रणाली सोपी आणि सुटसुटीत होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Mar 2026 12:26 pm

लिंबू कलरच्या साडीचे क्रेडिट अशोक मामांना

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत तुफान गाजलेला सिनेमा म्हणजे अशी ही बनवाबनवी. हा सिनेमा रिलीज होऊन आज अनेक वर्ष झाली आहेत. मात्र, त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. आज सुद्धा हा सिनेमा प्रेक्षक तितक्याच उत्साहात बघतात आणि एन्जॉय करतात. मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार या सिनेमात झळकले. त्यातलीच एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. या सिनेमातील […] The post लिंबू कलरच्या साडीचे क्रेडिट अशोक मामांना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Mar 2026 12:09 pm

उद्धव ठाकरे सरकारचीही भोंदू खरातवर मेहरबानी:शेतकऱ्यांचा हक्क हिरावत दारणा धरणाचं पाणी राखीव ठेवले; धक्कादायक खुलासा

नाशिकमधील भोंदूबाबा म्हणून चर्चेत आलेल्या अशोक खरात याच्या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत असून, आता त्याच्या राजकीय संबंधांबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. सध्याच्या घडीला विरोधक महायुती सरकारवर टीका करत असले तरी, यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातही खरातला मोठे लाभ मिळाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वळवून त्याच्या संस्थेला देण्यात आल्याचा आरोप आता होत आहे. अशोक खरात हा एका दिवसात प्रभावशाली झाला नाही, तर त्याने वर्षानुवर्षे राजकीय वर्तुळात मजबूत संबंध निर्माण केले होते. अनेक मंत्री, खासदार आणि आमदार त्याच्या संपर्कात असल्याचे फोटो आणि व्हिडिओद्वारे समोर आले आहे. या प्रभावाच्या जोरावर तो प्रशासनात हस्तक्षेप करत होता, अधिकाऱ्यांच्या बदल्या घडवत होता आणि विविध ठिकाणी व्यावसायिक भागीदारीही करत असल्याचे समोर आले आहे. या सगळ्याचा वापर करून त्याने एक प्रकारचे ‘सिंडिकेट’ उभे केल्याची चर्चा आहे. खरातच्या या वाढत्या प्रभावाचा फायदा त्याला थेट शासकीय निर्णयांमध्येही झाल्याचे आता स्पष्ट होत आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या ‘श्री शिवनिका संस्थान’चा अध्यक्ष असलेल्या खरातसाठी दारणा धरणातून 39 लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आले होते. 31 जुलै 2020 रोजी यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला होता. त्या वेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते. शेतकऱ्यांसाठी असलेले पाणी खासगी संस्थानाला वळवण्यात आल्याचा आरोप यामुळे अधिकच बळकट झाला आहे. या प्रकरणामुळे खरातचा मंत्रालयातील दबदबा किती मोठा होता, याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला विरोध करणाऱ्यांना दबाव, धमक्या आणि फोन कॉल्स येत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. त्याच्या संपर्कात असलेल्या प्रभावशाली व्यक्तींमुळे त्याला अनेकदा संरक्षण मिळाले, असेही बोलले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वळवल्याने संताप दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. खरात आणि त्याच्या कथित सिंडिकेटवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वळवण्यात आले असल्याने संताप वाढला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 12:05 pm

भारताच्या आयर्लंड दौ-याचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : घरच्या मैदानात टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ऐतिहासिक जेतेपदानंतर भारतीय संघातील स्टार खेळाडू आता आपापल्या फ्रँचायझी संघाकडून आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी जोर लावणार आहेत. एका बाजूला आयपीएलचा माहोल दिसून येत असताना बीसीसीआयने भारताच्या आयर्लंड दौ-याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघ जूनमध्ये आयर्लंडचा दौरा करणार आहे. विशेष म्हणजे या दौ-यात १९ वर्षांनंतर भारतीय संघ बेलफास्टच्या […] The post भारताच्या आयर्लंड दौ-याचे वेळापत्रक जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Mar 2026 11:56 am

सुनेत्रा पवारांचा निर्णय, चाकणकरांचा राजीनामा स्वीकारत मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार:सद्य परिस्थितीत पदत्याग अपरिहार्य! पोस्ट चर्चेत

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तो स्वीकारल्याची माहिती दिली आहे. सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर निष्पक्ष आणि पारदर्शक तपास व्हावा, या उद्देशाने चाकणकरांनी पदत्यागाचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. त्यांनी हा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला असल्याचेही सांगितले. नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणाशी नाव जोडले गेल्यामुळे चाकणकर यांच्यावर मोठा राजकीय दबाव निर्माण झाला होता. शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना वर्षा बंगल्यावर बोलावून घेतले आणि तत्काळ राजीनामा देण्याचे निर्देश दिले. त्यानंतर रात्री सुमारे नऊच्या सुमारास चाकणकर यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. तेथेही त्यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याने त्यांच्यापुढे पर्याय उरला नाही. या बैठकीदरम्यान चाकणकर यांनी खरात प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावत प्रकरणाच्या गंभीरतेची जाणीव करून दिली. चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करणारे पत्रही फडणवीस यांना दिले, तरीही त्यांना राजीनामा द्यावाच लागेल, असा ठाम संदेश देण्यात आला. परिणामी, त्यांनी रात्री उशिरा आपला राजीनामा सादर केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही नाव न घेता चाकणकरांवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. सार्वजनिक जीवनात वावरताना कोणाशी संबंध ठेवायचे याबाबत सजग राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही दुपारीच चाकणकरांना राजीनामा देण्याचे संकेत दिल्याची माहिती समोर आली आहे. राजीनामा मुख्यमंत्री राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवतील राज्यमंत्री दर्जा असलेल्या या पदाचा राजीनामा चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे लिहून सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. पुढील प्रक्रियेनुसार हा राजीनामा मुख्यमंत्री राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवतील. या संपूर्ण प्रकरणात विरोधकांकडून होत असलेली टीका आणि स्वतःच्या पक्षाकडून मिळत नसलेली पाठराखण यामुळे चाकणकर अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले. अशोक खरातवर असलेल्या गंभीर आरोपांमुळे आणि त्याच्याशी संबंधित संबंधांच्या चर्चेमुळे चाकणकर यांची अडचण वाढत गेली आणि अखेर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 11:37 am

स्वारगेट-कात्रज मेट्रोचा विस्तार खेडशिवापूरपर्यंत:शहर सुधारणा समितीने दिला हिरवा कंदील, मुख्य सभेच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा

पुणे शहरातील वाढत्या वाहतूककोंडीवर उपाय म्हणून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाचा विस्तार आता खेडशिवापूरपर्यंत करण्याचा प्रस्ताव पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समितीने मंजूर केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेपुढे पाठवण्याची शिफारस करण्यात आली आहे. या विस्तारामुळे मेट्रो मार्ग शिवापूर टोलनाका परिसरातून प्रस्तावित रिंगरोडपर्यंत पोहोचेल. कात्रजच्या पुढील भागांसह शिवापूर टोलनाका परिसर आणि रिंगरोडलगत विकसित होणाऱ्या नवीन वसाहतींमधील नागरिकांना याचा मोठा फायदा होईल. यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल. वाहतुकीचा ताण वाढतोय शहराच्या दीर्घकालीन आणि सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. आता या प्रस्तावावर पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभेचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षा स्मिता वस्ते यांनी या संदर्भात माहिती दिली. त्या म्हणाल्या की, दक्षिण पुणे, कात्रज परिसर, शिवापूर टोलनाका आणि प्रस्तावित रिंगरोड परिसरात वेगाने नागरीकरण होत आहे. यामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रोचा विस्तार आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा मिळेल. तसेच, प्रस्तावित रिंगरोडशी मेट्रोचे प्रभावी जाळे तयार झाल्यास शहरातील वाहतुकीचे वितरण अधिक संतुलित होण्यास मदत होईल, असेही वस्ते यांनी नमूद केले. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड मार्फत वाहन चालक चाचण्या आता सकाळी उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड मार्फत मे. आयडीटीआर, कासारवाडी, पुणे येथे घेण्यात येणाऱ्या वाहन चालक चाचण्या आता सकाळी 7 वाजता सुरू करण्यात येणार आहेत. तरी संबंधित नागरिकांनी याची नोंद घेऊन वाहन चालक चाचणीसाठी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 11:36 am

रुपाली चाकणकरांचा केवळ राजीनामा नको, त्यांना सहआरोपी करा!:त्यांची नार्को टेस्ट करा; चाकणकरांवर मकोका लागला पाहिजे- सुषमा अंधारे

भोंदू बाबा प्रकरणी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा ही राजकीय मागणी झाली. मला त्यांच्या राजीनाम्यात काहीही रस नाही. त्यांना सहआरोपी केले गेले पाहिजे, असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. चाकणकरांवर मकोका लागला पाहिजे, हा संघटित गुन्हा आहे. सुनेत्रा वहिनींनी त्यांना पक्षातील पदावरून हटवले पाहिजे, असे अंधारेंनी म्हटले आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, चाकणकरांना गुन्ह्याच्या कटकारस्थानाचा भाग माहिती होता आणि त्यांनी तरीही गुन्हेगाराची मदत केली. त्यांना सर्व काही माहिती होते. तुम्ही पीडितेला मदत करण्याचे सोडून ज्याने अत्याचार केले त्याचे बाजू घेत धमकावत राहिलात. ही तुमची चूक नाही गुन्हा आहे. तुम्ही पत्रकारांना धमकावले, पदाचा गैरवापर केलात. रजनी सातव, विजया रहाटकर यांच्यासारख्या नेत्या महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या पण कोणालाही इतके ग्लॅमर आले नाही. यांना हे अचानक कसे आले मला कळले नाही. कुणीही राज्यमंत्री दर्जाचे स्तोम माजवले नव्हते ते चाकणकरांनी केले. वैयक्तिक कारण काय? सुषमा अंधारे म्हणाल्या की, रुपाली चाकणकर यांची नाराजी मी समजू शकते. परंतु त्यांना ती नाराजी लोकांसमोर दाखवायची नसेल त्यांना जर वैयक्तिक कारणासाठी राजीनामा द्यायचा होता तर ते काय होते. मुलाचे लग्न, मुलीचे लग्न, शिक्षण, नातवंडाचे संगोपण, आजरपण असे कोणते कारण आहे. जर असेल तर इतकी टीका होईपर्यंत आणि मुख्यमंत्र्यांनी आदेश काढेपर्यंत ते कारण का दिसले नाही. 500 कोटींची माया जमवली सुषमा अंधारे म्हणाल्या की, रुपाली चाकणकर यांनी जे त्यांचे वातावरण निर्माण केले त्यासाठी त्यांना तटकरेंचा आशीर्वाद होता, हे वेगळे सांगायची गरज नाही. कारण त्या तटकरे लॉबीमधीलच एक आहेत. हे अत्यंत गलिच्छपणाचे आहे. त्यांना आरोपी करत अटक केली पाहिजे आणि त्यांची नार्कोटेस्ट केली पाहिजे. कारण त्यांच्या कार्यकाळात जितके प्रकरणे झाली त्यामध्ये त्यांनी अन्याय करणाऱ्यांनाच साथ दिली आहे. त्यांनी किती प्रकरणामध्ये सेंटलमेंट केले हे पाहिले पाहिजे. मी चाकणकरांची चिडचिड समजू शकते. ऐवढे पैसे जमा केले, 400-500 कोटी रुपयांची माया जमवली आहे, तटकरे प्रवृत्तीचा आशीर्वाद आहे, तुम्ही चिडचिड केली नाही तर नवलच. मी यापूर्वी 25 वर्षे लढत आली आहे. तुम्हाला जे करायचे ते करा. प्रदेशाध्यक्षपदावरुन दूर करावे सुषमा अंधारे म्हणाल्या की, रुपाली चाकणकर या पक्षाला दुय्यम स्थानी ठेवतात, त्यांनी आम्हाला नियम सांगायचे का? त्यांचा अहंकार अजून कमी झालेला नाही. अशोक खरातांचे प्रकरण तुम्हाला माहिती होती, पण तुम्ही पदाचा गैरवापर केला. वारकरी संप्रदायात असे काही नसते हे आम्हालाही माहिती आहे. आयोगाच्या पदावर असलेल्या महिलेला गुरू निवडतांना काय ते समजले नाही का? उगाच आम्हाला तोंड कशाला उघडायला लावता आहात. राष्ट्रवादी काँग्रेसने रुपाली चाकणकर यांचे महिला प्रदेशाध्यक्ष पद काढून घेतले पाहिजे.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 11:29 am

महाराष्ट्र केसरीत दिग्गजांचा धडाका:सिकंदर-शिवराज-पृथ्वीराज तिसऱ्या फेरीत; गादी-माती दोन्हीत चुरस, महाराष्ट्र केसरीसाठी मल्ल सज्ज

महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा वाघोली येथे रंगत असून मैदानात दिग्गज मल्लांनी आपल्या दमदार खेळाने प्रेक्षकांना रोमांचित केले आहे. रामकृष्ण सातव पाटील कर्तव्य फाऊंडेशनच्या आयोजनाखाली होत असलेल्या या स्पर्धेत सुरुवातीपासूनच चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे गतविजेते आणि अनुभवी मल्लांनी आपली ताकद दाखवत तिसऱ्या फेरीत दमदार प्रवेश केला आहे, त्यामुळे पुढील फेऱ्यांमध्ये अजून रंगत वाढणार हे निश्चित झाले आहे. गादी विभागातील लढतींमध्ये पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ याने एकतर्फी खेळ करत धाराशिवच्या धीरज बारस्करचा 12-2 असा पराभव केला. सुरुवातीपासून आक्रमक धोरण स्वीकारत त्याने गुणांची आघाडी घेतली आणि सामना सहज जिंकला. त्याचबरोबर नांदेडच्या शिवराज राक्षे याने पुण्याच्या श्रेयस होळकरला 10-0 अशा मोठ्या फरकाने हरवत आपली ताकद दाखवली. या दोन्ही लढतींमध्ये प्रतिस्पर्ध्यांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. दरम्यान, कोल्हापूरचा माजी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यानेही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत सांगलीच्या सत्पाल शिंदेला 10-0 ने नमवले. त्याचवेळी नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने अमरावतीच्या वेताळ शेळकेवर 8-1 अशी मात करत तिसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित केला. या सर्व मल्लांनी गादी विभागात वर्चस्व गाजवत पुढील फेरीसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. माती विभागातही तितकीच चुरस पाहायला मिळाली. गतविजेता सिकंदर शेख याने आपल्या चपळाई आणि अनुभवाच्या जोरावर पुण्याच्या मनीष रायतेचा 8-2 असा पराभव केला. त्याच्या खेळामुळे वाघोलीचे मैदान अक्षरशः दणाणून गेले. मात्र, या विभागात मोठी उलटफेरही पाहायला मिळाली. नाशिकच्या बाळू बोडकेला गडचिरोलीच्या विक्रमसिंह भोसलेने 4-1 अशा चुरशीच्या लढतीत पराभूत करत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. दिग्गजांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला एकूणच, या स्पर्धेत सिकंदर शेख, शिवराज राक्षे, पृथ्वीराज मोहोळ, पृथ्वीराज पाटील आणि हर्षवर्धन सदगीर या दिग्गजांनी तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे आता पुढील फेऱ्यांमध्ये अधिक चुरशीच्या आणि थरारक लढती पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी मल्लांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाली असून, अंतिम फेरीपर्यंत कोण बाजी मारणार याकडे सर्व कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 11:24 am

रुपाली चाकणकरांत कुठेही खेद, विनम्रता नाही:अंजली दमानियांचा घणाघात; सुनील तटकरे कितीही पळाले तरी सोडणार नसल्याचा दावा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला. रुपाली चाकणकर यांनी एखाद्या मॉडेलसारखा राजीनामा दिला. त्यानंतरचे त्यांचे बोलणे ऐकले तर त्यात कुठेही खेद, विनम्रता नव्हती. एक अहंकार होता. यामुळे त्यांना इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज आहे असे वाटते, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. सुनील तटकरे या प्रकरणापासून कितीही पळाले तरी त्यांना सोडणार नाही, असे त्या म्हणाल्या. नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे अवघ्या राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी अडचणीत सापडलेल्या रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री राज्य महिला आयोगाच्या आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपण आपल्या वैयक्तिक कारणांमुळे स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या या राजीनाम्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी एखादे प्रकरण दाबले का? याची चौकशी करण्याचीही मागणी केली. चाकणकरांवर गुन्हा दाखल करून चौकशी करा अंजली दमानिया म्हणाल्या, रुपाली चाकणकरांनी काल राजीनामा दिला. महिला आयोग हा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी असतो. पण त्यांचे अध्यक्षपद अशोक खरातसारख्या भोंदू माणसाला आधार देण्यातच गेले. या प्रकरणी त्यांचा केवळ राजीनामा घेणे पुरेसे नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरूनही कलापट्टी झाली पाहिजे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद हे घटनात्मक पद असते. त्यामुळे त्या पदावर बसून त्यांनी भोंदू खरात विरोधातील केसेस दाबल्या असण्याची शक्यता आहे. त्यावर कडक कारवाई व्हायला हवी. तटकरे कितीही पळाले तरी मी सोडणार नाही त्या पुढे म्हणाल्या, मी काल सुनील तटकरेंची देहबोली पाहिली. ते घाबरल्याचे दिसून आले. ते संतापून पळून गेले. पण ते कितीही पळाले तरी मी सोडणार नाही. हे सर्व जण ओशनो जल घ्यायचे. त्यासाठी भाजपसह सर्वच पक्षांचे राजकारणी खरातकडे गाड्या व हेलिकॉप्टर पाठवायचे. शिर्डीच्या नावाने खरातच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणाऱ्या या सर्वांची नावे जाहीर झाली पाहिजे. या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण घाण झाले आहे. ही घाण आता स्वच्छ करण्याची वेळ आली आहे. सुनेत्रा पवारांवरही साधला निशाणा अंजली दमानिया यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरही निशाणा साधला. सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत. पण त्या गत 3 दिवस हा सर्व प्रकार पाहत राहिल्या. त्यांनी हे प्रकरण उजेडात आल्यानंतर लगेचच ठोस असे काहीतरी करण्याची गरज होती. पण 3 दिवसांनी जेव्हा कळस गाठला, सर्वांनीच पत्रकार परिषदा घेतल्या, त्यानंतर त्यांनी रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला. राजीनामा स्वीकारताना त्यांचा चेहरा गंभीर होता. पण चाकणकर मॉडेलिंग केल्यासारखी पोज देत उभ्या होत्या. त्यानंतरचे त्यांचे बोलणे ऐकले तर त्यात कुठेही खेद किंवा विनम्रता नव्हती. एक अहंकार होता. हे पाहून चाकणकरांना खरेच इंट्रोस्पेक्शन करण्याची गरज असल्याचे वाटते, असे दमानिया म्हणाल्या. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राजकारणी नको रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्यास फार विलंब झाला. हुंडाबळी व महिला अत्याचाराची गंभीर प्रकरणे उजेडात आली तेव्हाच त्यांचा राजीनामा घेणे अपेक्षित होते. कारण वैष्णवी हगवे, संपदा मुंडे, गौरी गर्जे प्रकरणांत त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. पडद्यामागे अशा अनेक तक्रारी आयोगाकडे येतात. पण आयोग त्यावर काहीच करत नाही. आयोगावर बसलेल्या लोकांना केवळ राजकारण करण्यात व मिरवण्यात रस असतो. त्यांना पीडित महिलांच्या प्रश्नांशी कोणतेही देणेघेणे नसते. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षपदी एखाद्या राजकीय व्यक्तीची नियुक्ती न करता एखाद्या महिला आयपीएस अधिकाऱ्याची किंवा निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती करावी, असेही अंजली दमानिया यावेळी बोलताना म्हणाल्या. सुषमा अंधारेंचे केले कौतुक अंजली दमानिया यांनी यावेळी सुषमा अंधारे यांचेही कौतुक केले. त्या म्हणाल्या, सुषमा अंधारे यांनीच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा. त्यांनी फोटो, पुराव्यांसह हे प्रकरण मांडले. आता चाकणकरांनी अनामिका कापल्याच्या दाव्यावर अवमाननेची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी हव्या तेवढ्या डिफेमेशन केस टाकाव्यात. आम्हाला काही फरक पडत नाही. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी खरात जे बोलायचे ते खरे व्हायचे म्हणून लोकांचा त्यावर विश्वास होता असा दावा केला आहे. दमानिया यांनी त्याचाही समाचार घेतला आहे. अशा भोंदूगिरीला खतपाणी घालणाऱ्या मानसिकता निषेध केला पाहिजे. कोणताही माणूस येऊन बोलतो आणि ते खरे व्हायचे असे कसे होईल. अशा गोष्टींना आळा घालण्याची गोष्ट या नेत्यांना समजत नाही का? असा संताप त्यांनी व्यक्त केला. -

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 11:11 am

पुणे पोलिसांकडून 72 किलो गांजा जप्त:19.93 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने लोणीकंद परिसरात मोठी कारवाई करत 72 किलो गांजा आणि एक कार जप्त केली आहे. या कारवाईत एकूण 19 लाख 93 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मदन कांबळे आणि त्यांच्या पथकाला गस्तीदरम्यान पोलिस अंमलदार ऋषिकेश ताकवणे यांच्याकडून गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केसनंद-वाडेबोल्हाई रोडलगत बोल्हाईमाता मंदिराजवळ सापळा रचण्यात आला. संशयित कार थांबवून तपासणी केली असता, तिच्या डिक्कीत चार पोत्यांमध्ये 29 प्लास्टिक पिशव्यांत गुंडाळलेला 58.58 किलो गांजा आढळून आला. याप्रकरणी चार आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, त्यांनी हा गांजा पुण्यात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. यातील प्रमुख आरोपीच्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील धायखिंडी येथील घरातून आणखी 14 किलो गांजा जप्त करण्यात आला. यामुळे एकूण जप्त गांज्याचे वजन 72 किलो इतके झाले आहे. या कारवाईत अंमली पदार्थांसह कार मिळून एकूण 19.93 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. लोणीकंद पोलिस ठाण्यात याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली असून, अंमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 11:04 am

महाराष्ट्र केसरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या आज लढती:गादी, माती विभागात नामांकित मल्लांमध्ये चुरशीचे सामने

महाराष्ट्र केसरी स्पर्धा अंतर्गत आज किताब गटातील गादी व माती विभागातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढती रंगतदार होणार आहेत. राज्यभरातील नामांकित मल्लांमध्ये चुरशीचे सामने पाहायला मिळणार असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गादी विभागात पहिल्या लढतीत अकोल्याचा सिध्दांत गवई आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही मल्ल आक्रमक शैलीसाठी ओळखले जात असल्याने ही झुंज अत्यंत रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. दुसऱ्या सामन्यात साताऱ्याचा दिग्विजय जाधव आणि सोलापूर शहराचा जय पाटील यांच्यात कडवी टक्कर अपेक्षित आहे. तिसऱ्या लढतीत नांदेडचा शिवराज राक्षे कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलविरुद्ध उतरणार असून अनुभव आणि ताकद यांची परीक्षा होणार आहे. चौथ्या सामन्यात नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि सोलापूरचा अक्षय मंगवडे यांच्यातील सामना देखील तितकाच उत्कंठावर्धक ठरणार आहे. माती विभागातही तितक्याच चुरशीच्या लढती रंगणार आहेत. सोलापूर शहराचा रविराज चव्हाण आणि कोल्हापूरचा शुभम शिंदनाळे यांच्यातील सामना विशेष लक्षवेधी ठरणार आहे. दुसऱ्या लढतीत सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि सांगलीचा इम्रान मुजावर आमनेसामने येणार आहेत. हिंगोलीचा सिकंदर शेख आणि गडचिरोलीचा विक्रमसिंग भोसले यांच्यातील सामना ताकदीचा कस लावणारा ठरेल. तर अहिल्यानगरचा सुदर्शन कोतकर आणि भंडाऱ्याचा रामचंद्र कांबळे यांच्यातील सामना देखील तितकाच रोमहर्षक होईल. या सर्व लढतींमधून उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी मल्ल पूर्ण ताकदीने झुंज देणार असून स्पर्धेचा थरार अधिकच वाढणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता फेरी आज सायंकाळच्या सत्रात महाराष्ट्र केसरी किताबाच्या उपांत्यपूर्व फेरींना सायंकाळी ठीक 6.30 वाजता सुरूवात होणार आहे, तर उपांत्य फेरीला (सेमीफायनल) रात्री 8.00 वाजता प्रारंभ होणार आहे. तर महाराष्ट्र केसरी अंतिम फेरी उद्या होणार असून त्याकरीता नामांकित मल्लांनी उपांत्य फेरीत दमदार कामगिरी करण्याचे निश्चित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या अंतिम स्पर्धेचा सोहळा पार पडणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 11:00 am

विनानिविदा कचरा प्रक्रिया प्रस्ताव ठेका अखेर रद्द:पुण्यात आता निविदा काढूनच कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार

पुणे महानगरपालिकेने उरूळी देवाची येथील 500 मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विनानिविदा पद्धतीने देण्यात आलेला प्रस्ताव अखेर मागे घेतला आहे. आता हा प्रकल्प नियमित निविदा प्रक्रियेद्वारेच राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. हा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर कामकाज नियमावलीतील कलम 5:2:2 नुसार मांडण्यात आला होता. यामध्ये भूमी ग्रीन एनर्जी या कंपनीला 500 टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प देण्याचे प्रस्तावित होते. या करारात 10+10 अशा 20 वर्षांसाठी प्रति टन 690 रुपये टिपिंग फी आणि दरवर्षी 10 टक्के वाढ अशी तरतूद होती. या प्रस्तावाला काँग्रेस नगरसेवक प्रशांत जगताप यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. इतक्या दीर्घ कालावधीसाठी विनानिविदा प्रस्ताव आणण्यास त्यांनी आक्षेप घेतला आणि हा विषय कार्यपत्रिकेवरून काढून टाकण्याची मागणी केली. यानंतर हा प्रस्ताव स्थगित झाला आणि प्रशासनावर टीकेची झोड उठली. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि गटनेते चंद्रकांत कदम यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेत आयुक्तांवर राजकीय दबावाखाली काम केल्याचा आरोप केला. भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला लाभ देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला होता. याबाबत आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्टीकरण दिले की, हडपसर परिसरातील उघड्यावर साचणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर असून त्यावर न्यायालयीन सुनावणी सुरू आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया करणे आवश्यक होते. नवीन प्रकल्प उभारण्यास 8 ते 10 महिने लागतील, म्हणून सध्या कार्यरत असलेल्या कंपनीलाच काम देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. आयुक्त राम यांनी पुढे सांगितले की, प्रकल्पाचा कालावधी अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रस्ताव स्थायी समितीकडे जाण्यापूर्वीच तो मागे घेण्याचा निर्णय झाला होता, मात्र त्यापूर्वी स्वाक्षरी झाल्याने तो समितीकडे गेला. त्यांनी या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, अरविंद शिंदे यांनी या प्रकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच स्थायी समितीकडे सादर केलेला प्रस्ताव सार्वजनिक करावा, अशीही त्यांनी मागणी केली. लवकरच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा काढण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 10:58 am

फडणवीस सरकार पाडण्यासाठी विधी:सावरकरांच्या विचारांची प्रतारणा करणाऱ्या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवा, याच 'लफगेगिरी'साठी फोडली का?- संजय राऊत

भोंदू बाबा खरात प्रकरणी सरकारने एका महिलेचा राजकीय बळी घेतला, त्यांचे महिला आयोगाचे पद काढून घेतले, पण मोठे मासे वाचवण्याचा सराकरचा प्रयत्न सुरू आहे. दीपक केसरकर यांची शिंदे गटातून हकालपट्टी केली पाहिजे. तर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रायश्चित केले पाहिजे ते सुद्धा अशोक खरातकडे जात होते. मुख्यमंत्री असताना तुम्ही स्वत: पुजा केली आहे. मुख्यमंत्र्यांना काही अधिका आहे का नाही, असे म्हणत उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना त्यांच्या खात्यातील बदल्या आणि बढत्यांचे व्यवहार तो भोंदू खरात 'बाबा' हॉटेलमध्ये बसून ठरवत होता, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंनी केसरकरांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी सुद्धा राऊतांनी केली आहे. सावरकरांच्या नावाचा जप करणाऱ्यांनी ही 'लफगेगिरी' थांबवावी आणि फडणवीस सरकार उलथवण्यासाठी विधी करणाऱ्या अशा प्रवृत्तींना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा. बळी देणं, अघोरी विधी करणे हे शिवसेनेचे हिंदूत्व नाही, ज्यांचे होते ते आम्हाला सोडून गेले. ही सर्व अंधश्रद्धा आहे, ती आम्ही मानत नाही. एकनाथ शिंदे गटातील जे मंत्री यात सहभागी आहे त्यांच्याबद्दल शिंदेंनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. राज्य मुख्यमंत्री चालवणार का? भोंदू बाबा याकडे फडणवीसांनी लक्ष दिले पाहिजे. शिंदेंचे हे हिंदूत्व आहे का? संजय राऊत म्हणाले की, दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना त्या खात्यातील अनेक बढत्या आणि बदल्यांच्या कामासंदर्भात हे बाबा स्वत: लक्ष घालून दीपक केसरकर यांना तसे करण्यास भाग पाडत होते. ते हॉटेलमध्ये बसून मंत्र्यांना बोलवत ही सर्व कामे करत. त्यावेळी सर्व शिक्षण खाते खरात चालवत होता. याला जर कोणी हिंदूत्व मानत असेल त्यासाठी जर तु्म्ही बाळासाहेबांची शिवसेना फोडली असेल तर आमचा त्यांना साष्टांग दंडवत आहे. काल आपण केसरकर, विखे पाटील, एकनाथ शिंदे यांचे हे हिंदूत्व आहे का? हे ढोंगी हिंदूत्व सुरू केले. असे 9 मंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत. हा बाबा गेला असला तरी दुसरे बाबा आहेत अजून. मंत्र्यांकडून सावरकरांच्या विचारांची प्रतारणा संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी ढोंगी हिंदूत्वाचा पुरस्कार केला नाही. या ढोंगी हिंदूत्वासाठी त्यांनी शिवसेना फोडली. आम्ही वीर सावरकरांचे विचार सोडले म्हणतात. सत्ताधारी सावरकर भक्त आहेत ना मग सावरकरांना ही भोंदू गिरी मान्य नव्हती. वीर सावरकरांना ही लफगेगिरी मान्य नव्हती. तुम्ही ते करत आहात, तुम्ही वीर सावरकरांच्या विचारांची प्रतारणा करणाऱ्या मंत्र्यांना फडणवीस यांनी बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे. त्यांनी काय काय उद्योग केले आहे. फडणवीस सरकार उलथवण्यासाठी त्या खरातकडे काही विधी सुरू होते. देवेंद्र फडणवीस सरकार उलथवण्यासाठी त्या खरातकडे काही विधी सुरू होते. ते उघड झाल्यावर ही धाड पडली आहे. आधीच माहिती होते तर त्यावर तुम्ही आवाल का उठवला नाही. खरात शिक्षण खाते चालवत होता संजय राऊत म्हणाले की, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री भोंदू बाबांच्या सल्ल्याने कारभार करत आहेत. जसे काल नाशिकच्या एका भोंदूला अटक झाली. त्यांनी अनेक जणांच्या बदल्या करण्यासाठी काम केले. दीपक केसरकरांना बदल्या, बढत्या करणाऱ्यांसाठी ते भाग पाडत होते. खरात राज्याचे शिक्षणखाते चालवत होता.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 10:44 am

लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीचा अडथळा:31 मार्चची डेडलाईन जवळ; ई-केवायसी नसेल तर लाभ बंद! महिलांची चिंता वाढली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेली वाढीव मुदत 31 मार्च रोजी संपत असून, अनेक महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अपुरी कागदपत्रे, तांत्रिक अडचणी आणि प्रक्रियेतील गोंधळामुळे अनेक लाभार्थींना वेळेत ई-केवायसी पूर्ण करता येत नाही. त्यामुळे योजनेतून अपात्र ठरण्याची भीती वाढली आहे. जर नाव यादीतून वगळले गेले, तर दरमहा मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यावर पाणी सोडावे लागेल, अशी भीती महिलांना सतावत आहे. ई-केवायसी न झाल्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांनी 31 मार्चपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या केवळ सुमारे 60 टक्के महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असल्याची चर्चा आहे. उर्वरित महिलांसाठी वेळ कमी उरल्याने ई-सेवा केंद्रे, बँका आणि संबंधित कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होत आहे. मुदत संपण्यास अवघे दहा-बारा दिवस शिल्लक असल्याने महिलांची धावपळ वाढली आहे. अनेक महिलांनी अर्ज भरताना शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नातेवाईक असल्याचा पर्याय चुकीने निवडला होता. यामुळे त्या अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही चूक दुरुस्त करण्यासाठी राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत ऑनलाइन ई-केवायसीमध्ये सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 6 फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार, कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यरत असल्यास किंवा निवृत्तिवेतन घेत असल्यास लाभ मिळत नाही. त्यामुळे चुकीची माहिती दुरुस्त करणे आवश्यक ठरले आहे. दरम्यान, अपुऱ्या कागदपत्रांमुळे अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. निकषात बसत नसतानाही लाभ घेतलेल्या काही महिलांची नावे यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. त्यातच तालुका स्तरावरील बँका आणि ई-सेवा केंद्रांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने ई-केवायसी पूर्ण झाली की नाही, याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे. आधार लिंक आणि बँक खाते सक्रिय असूनही चुकीच्या माहितीमुळे सन्मान निधी थांबल्याच्या तक्रारी वाढत आहेत. लाभापासून वंचित राहण्याचा धोका याशिवाय, मदतीसाठी उपलब्ध असलेला हेल्पलाइन क्रमांक हा अनेकदा व्यस्त असल्याची तक्रारही महिलांनी केली आहे. त्यामुळे अडचणी सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. मुदत जवळ येत असताना प्रशासनाने प्रक्रिया सुलभ करणे आणि तांत्रिक अडचणी दूर करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. अन्यथा, हजारो महिलांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 10:23 am

विद्यार्थीनींनो गुडटच बॅडटच वेळीच ओळखून तक्रार करण्यास पुढे यावे:सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप, डोंगरकडा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यक्रम

विद्यार्थीनींनो गुडटच, बॅडटच वेळीच ओळखून छेडछाड करणाऱ्यां विरुध्द तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन दामीनी पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप यांनी डोंगरकडा येथे केले. डोंगरकडा (ता. कळमनुरी) येथील जिल्हा परिषद शाळेत पोलिस दलाच्या दामीनी पथकाच्या वतीने पोलिस कॅडेट कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक देवानंद मुंडे तर प्रमुख पाहूणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील अडकिने, उपाध्यक्ष गजानन गावंडे , सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप, जमादार आरती साळवे, पोलिस हवालदार हिम्मतराव सरनाईक व पथकातील कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा दामिनी पथक हे उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थीनींची छेडछाड, विनयभंग यासंबंधीच्या कायद्याची माहिती तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या मुलींच्या फसवणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन केले.त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर करतांना विद्यार्थीनींनी सावध राहिले पाहिजे. विनाकारण कोणत्याही फसव्या जाहिरातीला बळी पडू नये तसेच सोशल मीडियाचा गैरवापर विद्यार्थ्यांनी करू नये असे आवाहन त्यांनी केले. यावेळीत्यांनी.डायल 112, तसेच गुडटच बॅड टच याबाबत माहिती दिली. तसेच मुलींना तक्रारी पेटी,पोलिस दीदी बाबत माहिती दिली, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या वर होणारा अन्याय अत्याचार लपवू नका,बालविवाह करू नका, कोणी बळजबरी करत असेल तर त्यांचेवर गुन्हा दाखल होईल,कोणत्याही प्रकारची तक्रार केल्यास तुमचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिरुद्ध बोडले यांनी केले तर सतीष लवांडे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 10:12 am

खरात प्रकरणात नवा स्फोट:चाकणकरांनंतर आणखी एक राजकीय कनेक्शन समोर; जमीन व्यवहारांपासून मंत्रालयापर्यंत धागेदोरे

स्वयंघोषित कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले असून त्याचे पडसाद थेट राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अटकेत असलेल्या खरातला न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणाची व्याप्ती वाढवली असून, अनेक राजकीय आणि व्यावसायिक संबंध उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना आधीच मोठा फटका बसला आहे. खरातसोबतचे संबंध समोर आल्यानंतर विरोधकांनी तीव्र दबाव आणल्यामुळे त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेत पदाचा राजीनामा सादर केला होता. या घडामोडीनंतर आता तपास अधिक वेगाने पुढे सरकत आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी एक नवे नाव समोर आले आहे. मंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे दीपक लोंढे यांची विशेष तपास पथकाने (SIT) कसून चौकशी केली आहे. तपास यंत्रणांना लोंढे आणि खरात यांच्यात काही व्यावसायिक संबंध असल्याचा संशय आहे. विशेषतः सिन्नर परिसरात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये लोंढे सक्रिय असल्याची माहिती पुढे आली असून, या व्यवहारांमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. एसआयटीने लोंढे यांच्याकडून आर्थिक व्यवहारांची सविस्तर माहिती घेतली आहे. या चौकशीतून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे तपास पथक आता खरातच्या इतर संभाव्य भागीदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही अस्वस्थता वाढल्याचे दिसत आहे. मंत्रालयातील आणि राजकीय वर्तुळातील संबंध याचदरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आणखी एक महत्त्वाची बाब पुढे आली आहे. मिरगाव येथील ‘शिवनिका संस्थान’ या ट्रस्टसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्याचा शासन निर्णय 31 जुलै 2020 रोजी घेण्यात आला होता. गोदावरी उजवा तट कालव्यातून पाणीपुरवठ्याला मंजुरी देण्यात आली होती. हा निर्णय त्या काळातील सरकारदरम्यान झाल्याने खरातचे मंत्रालयातील आणि राजकीय वर्तुळातील संबंध किती मजबूत होते, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. एकूणच, या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची चिन्हे दिसत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 10:11 am

भोंदू खरातला राजाश्रय:मंत्र्यांचे सीडीआर तपासा, त्यांचेही राजीनामे घ्या; पुढचे टार्गेट कोण, हे आम्हाला ठाऊक- विजय वडेट्टीवार

भोंदू खरातला राजाश्रय आहे. त्याचे मोठ-मोठ्या नेत्यांसोबत फोटो समोर आले आहेत. मी कोणाचा उल्लेख करणार नाही, पण व्हिडिओ जे व्हायरल होत आहे ते पाहून लाज वाटली पाहिजे असे आहेत. सरकारला खरातांना वाचवणे गरजेचे वाटते आहे, नाहीतर ज्यांनी हे प्रकरण काढले त्यांना अटक करण्याची काय गरज होती, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. दरम्यान विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, खरातच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचे सीडीआर तपासले पाहिजे, त्यांच्या सांगण्यावर, सत्तेतील अनेक मंत्र्यांनी कोणते कोणते कृत्य केले, हे महाराष्ट्राला समजले पाहिजे. त्या सुद्धा मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांन केली आहे. मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले पाहिजे विजय वडेट्टीवार म्हणाले की, रुपाली चाकणकर ज्या पदावर काम करत होत्या त्या पदावर राहून असे अशोभनीय भोंदू बाबाच्या चक्करमध्ये मानसिक गुलामी पत्कारल्याने त्या महाराष्ट्रातील महिलांना न्याय देऊच शकत नव्हत्या. ज्यांचा विश्वास भोंदूगिरी, ज्योतिष्य यावर आहे, त्यांच्याकडून महिलांना न्याय कसा मिळणार. त्यांचा राजीनामा झाला पण खरातांसोबत असलेले नवरत्न जे आहेत त्यांचे फोटो समोर येत आहे. खरातची अफाट संपत्ती असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाचा सीडीआर तपासला पाहिजे. त्याने काय काय संवाद साधला, काय कृत्य केले. सत्तेतील अनेक मंत्र्यांनी कोणते कोणते कृत्य केले, हे महाराष्ट्राला समजले पाहिजे. त्या सुद्धा मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले पाहिजे. खरात प्रकरण सरकारला दाबायचंय विजय वडेट्टीवार म्हणाले की, रुपाली चाकणकर यांचे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी समर्थन केलेले आहे. तो त्यांचा निर्णय असतो. भरणे यांनी त्यांची बाजू घेतली तेव्हा त्यांना किती ट्रोल करण्यात आले हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे. अंधश्रद्धेतून हे जे वागले त्यातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकारची नाचक्की झाली आहे. हे प्रकरण ज्यांनी काढले काल त्यांनाच अटक करण्यात आली आहे. म्हणजे खरात प्रकरण सरकारला दाबायचे आहे. या प्रकरणी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. जे मोठे मासे खरातांच्या जाळ्यात अडकले आहेत त्यांना वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबण्यात येऊ शकते. अधिवेशनात आवाज उठवणार विजय वडेट्टीवार म्हणाले की, रुपाली चाकणकर यांनी का राजीनामा दिला हे सर्वांना माहिती आहे. यामध्ये पुढचे टार्गेट कोण याबद्दल आमच्याकडे सर्व माहिती आहे. सोमवारी अधिवेशनामध्ये या प्रकरणी आम्ही आवाज उठवणार आहोत.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 10:08 am

भोंदूबाबा खरातला प्रशासनातूनच मदत:मुंबईतील तो डेप्युटी कलेक्टर कोण? प्रकरणात धक्कादायक आर्थिक कनेक्शन उघड

स्वयंघोषित कॅप्टन म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात याच्या गैरकृत्यांमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असताना आता या प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे अनेक राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींचे फोटो व्हायरल होत असून, त्याचे संबंध उच्चभ्रू वर्तुळात किती खोलवर होते, हे उघड होत आहे. विशेष म्हणजे, केवळ राजकारणीच नव्हे तर प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकारी देखील त्याच्याशी संपर्कात असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांमुळे मोठी चर्चा रंगली आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, मुंबईत कार्यरत असलेले एक उपजिल्हाधिकारी खरातला आर्थिक मदत करत होते. संबंधित अधिकाऱ्याचे नाव न घेता त्यांनी सांगितले की, तो अधिकारी खरातला पैसे आणि कायदेशीर मदतही पुरवत होता. या आरोपांमुळे या प्रकरणाचे धागेदोरे थेट प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या पथकाचे नेतृत्व आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते करत असून तपास वेगाने सुरू आहे. गुरुवारी एसआयटीने खरातची सुमारे दोन तास कसून चौकशी केली. त्याच्याकडे असलेल्या संशयास्पद पेनड्राइव्हबाबतही तपास अधिकाऱ्यांनी माहिती घेतल्याचे समजते. या तपासातून आणखी अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरात महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी धार्मिक आणि अध्यात्मिक गोष्टींचा आधार घेत असे. तो स्वतःला दैवी शक्ती असलेला व्यक्ती असल्याचे सांगत महिलांना संमोहनासारख्या स्थितीत आणायचा. त्यासाठी तो त्यांना काही पदार्थ किंवा पेय देत असे, ज्यामुळे त्या अर्धबेशुद्ध अवस्थेत जात. त्यानंतर तो त्यांच्यावर अत्याचार करीत असल्याचे आरोप आहेत. या प्रकारामुळे अनेक महिलांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. उपजिल्हाधिकाऱ्याची भूमिका तपासाचा केंद्रबिंदू याचबरोबर, प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या पेयाबाबतही गंभीर आरोप समोर आले आहेत. हे पेय प्रत्यक्षात काही औषधी पदार्थांचे मिश्रण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या सर्व घटनांमुळे खरातचा खरा चेहरा उघड झाला असून, त्याच्या भोवती असलेले प्रभावशाली जाळे आता तपासाच्या कक्षेत आले आहे. विशेषतः मुंबईतील त्या उपजिल्हाधिकाऱ्याची भूमिका तपासाचा केंद्रबिंदू ठरत असून, येत्या काळात या प्रकरणातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 10:05 am

गरज पडल्यास रुपाली चाकणकर यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस:काँग्रेसमध्येच संघर्ष उघड? शिंदे समर्थनात, लोंढे आक्रमक

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागल्यानंतर आता या मुद्द्यावरून काँग्रेसमध्येच मतभेद समोर आले आहेत. पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी चाकणकर यांची बदनामी करू नये, अशी भूमिका घेत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, त्याच वेळी काँग्रेसच्या महिला आघाडीने चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने पक्षात दोन वेगवेगळे मतप्रवाह दिसू लागले आहेत. अरविंद शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, रुपाली चाकणकर यांच्याविषयी नाहक बदनामी केली जाऊ नये. गरज पडल्यास त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी आपण शिफारस करू, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एका बाजूला शहराध्यक्ष चाकणकरांच्या बाजूने उभे राहत असताना दुसरीकडे पक्षाच्या महिला आघाडीने आंदोलनाची भूमिका घेतल्याने काँग्रेसची अधिकृत भूमिका काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, पुणे शहर काँग्रेसच्या महिला आघाडीने चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पक्षात अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. काँग्रेसमध्ये याआधीही गटबाजीचे चित्र अनेकदा समोर आले आहे. उच्चपदस्थ नेत्यांचे एक मत आणि स्थानिक नेतृत्वाची वेगळी भूमिका यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. चाकणकर प्रकरणातही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. अरविंद शिंदे यांच्या भूमिकेनंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे. शिंदे यांनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक असल्याचे सांगत लोंढे यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसची अधिकृत भूमिका चाकणकरांच्या विरोधात आहे. त्यांच्या मते, अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर असून त्यात चाकणकर यांच्यावर नैतिक जबाबदारी येते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईही झाली पाहिजे. काँग्रेसमध्येच मतभेद उघड अतुल लोंढे यांनी सोशल मीडियावरही याबाबत स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या व्यक्तीने या प्रकरणात निष्क्रिय राहणे योग्य नाही. त्यामुळे चाकणकर यांना त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. एकूणच, अशोक खरात प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्येच मतभेद उघड झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 9:28 am

चाकणकरांचा राजीनामा नव्हे, हकालपट्टीच:सुषमा अंधारेंचा जोरदार निशाणा; म्हणाल्या- मोठेमोठे गार केले गंमतमधी, पोस्टची चर्चा

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना, या प्रकरणात आता नवे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राहिलेल्या रुपाली चाकणकर यांना अखेर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र या राजीनाम्यानंतरही वाद थांबलेले नाहीत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून चाकणकरांवर पुन्हा एकदा जोरदार टीका करत राजकीय वातावरण तापवले आहे. सुषमा अंधारे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये चाकणकरांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, जर चाकणकरांना खरोखर नैतिकतेची जाणीव असती, तर त्यांनी हे प्रकरण समोर आल्यानंतर किंवा किमान काही दिवसांपूर्वीच स्वेच्छेने राजीनामा दिला असता. त्या शेवटपर्यंत पद टिकवण्यासाठी प्रयत्न करत राहिल्या, असा आरोप अंधारेंनी केला. हा राजीनामा नसून हकालपट्टी आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी चाकणकरांवर सडकून टीका केली. याशिवाय, अंधारेंनी आणखी कठोर भूमिका घेत चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणीही केली आहे. फक्त राजीनामा देऊन जबाबदारी संपत नाही, तर या प्रकरणात अधिक सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसनेही लक्ष वेधून घेतले आहे. मोठेमोठे गार केले गंमतमधी… असे स्टेटस ठेवत त्यांनी अप्रत्यक्षपणे चाकणकरांना डिवचले आहे. या एका ओळीतून त्यांनी केलेली टीका सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी संपर्कात अशोक खरात प्रकरणाचा विचार केला तर, त्याच्यावर एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर 18 मार्च रोजी पहाटे त्याला ताब्यात घेण्यात आले. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला असून, ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून त्याने ओळख निर्माण केली होती. अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी त्याच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमुळे हे प्रकरण अधिकच गाजत आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 9:16 am

शिरजगाव कसब्यात रामराज्य अवतरले; श्रीराम मंदिराचा शताब्दी महोत्सव संपन्न:नव्याने स्थापित होणाऱ्या कलशासह मूर्तीची काढली मिरवणूक‎

चांदूरबाजार तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शिरजगाव कसबा येथील श्रीराम मंदिराला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गावात भव्य शताब्दी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेली श्रीराम प्रभूंची भव्य मिरवणूक नुकतीच उत्साहात पार पडली. या मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. महोत्सवाच्या निमित्ताने सजवलेल्या रथात प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता माता यांच्या मूर्ती विराजमान करण्यात आल्या होत्या. ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. यावेळी पारंपारिक वाद्ये, मृदंग, ढोल, ताशे यांच्या गजरात टाळ-मृदंगाच्या तालावर भाविक देहभान हरपून नृत्य करीत होते. उपस्थित प्रेक्षकही शोभायात्रा पाहून मंत्रमुग्ध झाले होते. यावेळी ‘जय श्रीराम'च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. ठिकठिकाणी महिलांनी रथातील मूर्तींचे औक्षण केले. ग्रामस्थांनी फुलांची उधळण करून श्रीरामचंद्रांचे स्वागत केले. सोहळ्यासाठी संपूर्ण गावातील रस्त्यांवर सडा टाकण्यात आला होता. त्यावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. घराघरांवर गुढ्या, तोरणे, दीपमाला उजळल्या होत्या. त्यामुळे दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाले होते. शताब्दी महोत्सवानिमित्त केवळ मिरवणूकच नव्हे. विविध आध्यात्मिक कार्यक्रमांची आखणीही करण्यात आली आहे. सोहळ्याच्या कालावधीत अहोरात्र विठ्ठल-नामासह राम-नामाचा गजर सुरू आहे. दररोज सायंकाळी नामांकित कीर्तनकारांचे कीर्तन होत आहे. त्यातून रामायणातील आदर्श आणि सामाजिक प्रबोधन केले जाणार आहे. त्यामुळे समस्त ग्रामस्थ व भाविक भक्तांनी या भव्य-दिव्य कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन श्रीराम मंदिर संस्थेचे अध्यक्ष दिलीप सावरकर यांनी केले आहे. हजारो भाविक ऐतिहासिक क्षणांचे झाले साक्षीदार या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिरजगाव कसब्यासह आजूबाजूच्या परिसरातील हजारो भाविकांनी हजेरी लावली. महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले असून, सर्व जाती-धर्मांचे लोक या उत्सवात आनंदाने सहभागी होत आहेत. शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार आणि सुशोभीकरणामुळे गावाला नवे रूप प्राप्त झाले आहे. मंदिराच्या शुद्धीकरणासाठी आणि लोककल्याणासाठी विशेष महायज्ञ करण्यात येत आहे. विधिवत पूजा-अर्चाही करण्यात येत आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:44 am

व्यावसायिक गॅस सिलिंडर कमतरेमुळे मंगल कार्यालय अन् कॅटर्संना फटका:परिस्थितीमध्ये सुधारणा न झाल्यास कार्यक्रम रद्द होण्याची नामुष्की‎

जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावरही दिसायला लागला. दर्यापूर शहरात मंगल कार्यालय व कॅटर्स व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. महागाई, इंधन दरवाढ, व्यावसायिक सिलिंडर बंदी, घरगुती सिलिंडरचा तुटवडा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमतीमुळे विवाह सोहळ्यांच्या आयोजनावर मोठा परिणाम होत आहे. अनेक कुटुंबियांनी वाढत्या खर्चामुळे नियोजित विवाह सोहळे साध्या पद्धतीने करण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. लग्न समारंभासाठी लागणाऱ्या धान्य, गॅस, डिझेल आणि इतर साहित्याच्या किंमती झपाट्याने वाढल्यामुळे कॅटरिंग व्यवसायिकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मंगल कार्यालय चालकांचे म्हणणे आहे की, उन्हाळ्यात लग्नसमारंभांची मोठी गर्दी असते; मात्र सध्याच्या परिस्थितीत बुकिंग कमी होताना दिसत आहे. ग्राहक खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात असल्याने अनेकांनी साध्या पद्धतीने विवाह करण्याचा पर्याय निवडला आहे. दर्यापूर शहरातील कॅटरिंग धारक व्यवसायकांचे म्हणने आहे की, परिस्थिती अशीच कायम राहिली तर कोरोनाच्या काळात जशी लग्न समारंभांतील उपस्थितींवर मर्यादा आल्या होत्या, तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या काळात जसे मंगल कार्यालये, कॅटरर्स आणि संबंधित व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाले होते. तीच भीती पुन्हा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, परिस्थिती लवकर सुरळीत व्हावी. तसेच लग्नसमारंभांचा हंगाम पूर्ववत सुरू राहावा, अशी अपेक्षा या क्षेत्रातील व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. अन्यथा आगामी काळात या व्यवसायावर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कॅटरिंग व्यवसाय मंदावल्याने कामगारांचे नुकसान होणार आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध होणे आवश्यक कॅटरिंग क्षेत्रात कोरोनासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. आमच्याकडे असलेले व्यावसायिक सिलिंडर संपले आहे. लग्नाच्या तिथी ज्या घेतल्या आहेत, त्यासुद्धा रद्द करण्याची वेळ आली आहे. लाकूड जाळून भट्टीवर स्वयंपाक करणे कठीण झाले आहे. तरी शासनाने कॅटरिंग व्यवसाय धारकांचा सहानुभूतीने विचार करावा. तसेच विवाह सोहळे सुरळीत पार पडण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलिंडर उपलब्ध करून द्यावे. - मनोज येवले , कॅटर्स संचालक, दर्यापूर.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:42 am

शेतकरी वाचला तर देश वाचेल, अन्नत्याग आंदोलनामधून शेतकऱ्यांनी दिला संदेश:शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची निवेदनाद्वारे केली मागणी‎

शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हनुमान मंदिर परिसरात पार पडलेल्या या उपक्रमात शेतकरी, नागरिक व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.शेतकऱ्यांवर ओढवलेले आर्थिक संकट,वाढता उत्पादन खर्च,शेतीमालाला न मिळणारा योग्य दर तसेच नैसर्गिक आपत्ती या पार्श्वभूमीवर सहभागी नागरिकांनी अन्नत्याग करून शेतकऱ्यांच्या वेदनांशी एकात्मता व्यक्त केली. यावेळी“शेतकरी वाचला तर देश वाचेल” हा ठाम संदेश देण्यात आला. या प्रसंगी प्रसिद्ध कीर्तनकार विद्याराज कोरे यांनी गाडगेबाबांच्या वेषात उपस्थितांना मार्गदर्शन करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रभावी भाष्य केले.तसेच डॉ.चंद्रकांत देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकत त्यांच्या अडचणी मांडल्या.आंदोलनाच्या समारोप प्रसंगी प्रा.डॉ. संदिप राऊत यांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले.याशिवाय संजय कोल्हे,संदिप रोडे, मुरलीधर डहाने,सचिन ठोके,बाळासाहेब पुंड,संदिप भदाडे, विजय सिरसाम,नयन लुंगे,अंकुश तेटु, विनोदराव पुंड,निलेश तट्टे,गोंडेकर गुरुजी,नुदुंभाऊ सोमवंशी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन हरिश निशाण यांनी केले. यावेळी उपस्थितांनी शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतीमालाला योग्य भाव,कर्जमाफी व आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशीही भूमिका मांडण्यात आली.कार्यक्रमादरम्या न शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली व त्यांच्या पाठीशी समाज एकजुटीने उभा असल्याचे या आंदोलनातून दाखवून देण्यात आले. या कार्यक्रमात मुरलीधर डहाणे, रघुपती लबडे, राहुल बारस्कर, संदिप रोडे, सचिन चरपे, संदिप भदाडे, रामदास चांगोले, सुधीर राऊत, श्रीकांत यावले, गोपी केळकर, विजय सिरसाम, मिलींद हेडाऊ, नंदकिशोर तिडके, ज्ञानेश्वर तिडके, अनिल लांडे, अंकुश काळमेघ, नितीन कोहळे, प्रफुल्ल चिखले, नरेश झटाले, नितीन केनकर, प्रदीप सोळंके, सुनील झाडे, अतुल झटाले, नामदेव मोहिते, अशोक सुळे, बाबाराव कुचे, प्रफुल्ल कुचे अन्य शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:41 am

शेतकरी आत्महत्येच्या वेदनेला 40 वर्ष पूर्ण; संवेदना सभेचे आयोजन:आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘किसानपुत्रांच्या’वतीने श्रद्धांजली‎

महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील पहिली नोंदवलेली शेतकरी आत्महत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साहेबराव करपे यांच्या बलिदानाला यंदा ४० वर्षे पूर्ण झाली. १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव करपे यांनी नापिकी, वाढते कर्ज आणि शासन धोरणांना कंटाळून त्यांची पत्नी व मुलाबाळांसह सामूहिक आत्महत्या केली होती. या काळ्या दिवसाचे औचित्य साधून ‘किसान पुत्र आंदोलना'च्या वतीने अमरावती येथे शेतकऱ्यांच्यावतीने ‘सहवेदना आणि अन्नत्याग' आंदोलन करण्यात आले. शहरातील पंचवटी चौक भागात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याजवळ जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने एकवटले होते. यावेळी शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या शासनाच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. विशेष म्हणजे, गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आनंदाची गुढी न उभारता, शासनाच्या अपयशाची ‘प्रतिकात्मक गुढी' उभारून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष शरद दसरे होते. त्यांनी आपल्या भाषणात शेतकरी प्रश्नांच्या गुंतागुंतीवर प्रकाश टाकला. यावेळी माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, आयोजक प्रकाश साबळे, हरिभाऊ मोहोड, डॉ. दिलीप काळे, जगदीशनाना बोंडे, गजानन अहमदाबादकर आणि विजय विल्हेकर यांसारख्या मान्यवरांनी उपस्थित राहून शेतकरी पुत्रांच्या लढ्याला पाठबळ दिले. या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी शेखर अवघड, नितीन पवित्रकार, महेश देशमुख, शरद जवंजाळ, ॲड. धनंजय तोटे, निलेश उबाड, समीर जवंजाळ यांच्यासह अशोक वाकोडे, अमोल भारसाकळे, राहुल तायडे, अक्षय साबळे, अमित कुचे, प्रवीण कोल्हे, गजानन भगत, सुनिल पडोळे, अक्षय सरोदे, आकाश गडपाल, मिलींद वंजारी, योगेश बोबडे यांच्यासह तरुण शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. १९ मार्च हा दिवस केवळ शोक करण्याचा दिवस नसून, भविष्यात एकही शेतकरी पुत्र आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा राहणार नाही, यासाठी लढण्याचा निर्धार या निमित्ताने व्यक्त केला. केवळ निषेध नव्हे, तर आत्मक्लेश व सहवेदना आंदोलनाचे स्वरूप केवळ निषेधार्थ नव्हते, तर ते आत्मक्लेश आणि सहवेदनेचेही होते. जिल्ह्यातील सुमारे साडेतीनशे शेतकऱ्यांनी दिवसभर अन्नत्याग करून करपे परिवारासह आजवर आत्महत्या केलेल्या सर्व शेतकरी बांधवांना श्रद्धांजली अर्पण केली. आंदोलनादरम्यान, शेतकरी कार्यकर्ते प्रकाश साबळे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांना साडी-चोळी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले आणि ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, अशी भावनिक साद घातली.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:39 am

शेतामध्ये उभारली ‘कृत्रिम बुद्धिमत्तेची गुढी’:वरूड तालुक्यात कृषी विभाग व ‘एआय’ कंपनीचा अभिनव उपक्रम‎

भारतीय संस्कृतीत गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आणि समृद्धीचा सण मानला जातो. या सणासोबतच वरूड तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या संत्रा बागेत केवळ परंपरेचीच नाही, तर ‘तंत्रज्ञानाची गुढी' उभारण्यात आली. या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हा अनोखा आणि भविष्यदर्शी उपक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. सिट्रस इस्टेट, वरूड कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत ‘एआय पीक प्रात्यक्षिक’ प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत एका कंपनीच्या सहकार्याने अनुराग यावलकर यांच्या शेतात ‘कृत्रिम बुद्धिमत्तेची गुढी’ उभारण्यात आली. पारंपरिक गुढीपाडव्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत साजरा करण्यात आलेला हा उपक्रम उपस्थितांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, मोर्शीचे उपविभागीय कृषी अधिकारी मोर्शी उज्वल आगरकर, वरूडचे तालुका कृषी अधिकारी रेहान मुजावर, सिट्रस इस्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय तळेगावकर, संबधित एआय कंपनीचे कर्मचारी, तसेच शेतकरी उपस्थित होते. यावेळी बोलताना एसएओ राहुल सातपुते म्हणाले, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक शास्त्रशुद्ध व अचूक बनविता येणार आहे. हवामानातील बदल, पाण्याचे व्यवस्थापन आणि मातीची स्थिती याबाबत शेतकऱ्यांना तात्काळ व योग्य माहिती मिळाल्यास उत्पादनात निश्चित वाढ होईल. वरूड तालुक्यात सुरू झालेला हा प्रयोग राज्यातील इतर भागांसाठी मार्गदर्शक ठरेल. गुढीपाडव्याच्या पारंपरिक सणाला तंत्रज्ञानाची जोड देत ‘शेतकऱ्याच्या शेतात कृत्रिम बुद्धिमत्तेची गुढी’ हा उपक्रम ग्रामीण भागात नवे परिवर्तन घडवून आणणारा ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:38 am

सोलापुरातील केळी उत्पादनाला एआयची जोड मिळाल्यास उत्पन्न वाढेल:सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभागाने आधुनिकीकरणासाठी पुढाकार घ्यावा,

ज्वारीचे कोठार आणि राज्यातील सर्वाधिक साखर कारखान्यांसाठी ओळखला जाणारा सोलापूर जिल्हा आता केळी उत्पादनामुळे ही राज्याच्या नकाशावर ठळकपणे झळकत आहे. निर्यातीत घेतलेली आघाडी आणि वाढते उत्पादन पाहता येथील केळी पिकाला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळावी, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे. जळगाव जिल्हा परिषद कृषी विभागाने २०२६-२७ या वर्षासाठी ‘एआयच्या मदतीने निर्यातक्षम केळी उत्पादन प्रात्यक्षिके’ ही विशेष योजना जाहीर केली आहे. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी, दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादन वाढविण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जात आहे. सोलापूरमध्येही अशाच प्रकारची योजना राबवण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जळगावमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या संकल्पनेतून ही योजना आकारास आली आहे. त्याच धर्तीवर सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभागाने पुढाकार घेतल्यास येथील केळीला जागतिक बाजारपेठेत अधिक भक्कम स्थान मिळू शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बारामती आणि जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. निवडक शेतांवर प्रात्यक्षिके राबवून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला जाईल. यामध्ये कार्यशाळा, प्रशिक्षण सत्रे, तांत्रिक सल्ला व नियमित फॉलोअप यांचा समावेश असेल. एआय प्रणालीद्वारे तयार होणारे अहवाल शेतकऱ्यांना मोबाईल संदेशाद्वारे देण्याचाही विचार आहे. या योजनेमुळे उत्पादनातील अनिश्चितता कमी होऊन गुणवत्तेत सुधारणा होईल. निर्यात निकषांनुसार फळांचा आकार, रंग, वजन व साठवण क्षमता सुधारण्यास मदत होईल. उत्पादन . अचूक सिंचन : हवामान अंदाज आणि मातीतील आर्द्रतेनुसार पाण्याचे नियोजन. . लक्ष्यित फवारणी : आवश्यक त्या भागातच औषध फवारणी करून खर्चात बचत. . प्रिसिजन फार्मिंग : माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन आणि ठिबक सिंचनाचा प्रभावी वापर. . निर्यातक्षम दर्जा : बंच स्प्रे, स्कर्ट बॅग, बड इंजेक्टरसारख्या आधुनिक साधनांनी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार उत्पादन. खत व पाण्यावरील खर्चात बचत, कीड-रोगांचे वेळीच निदान व नियंत्रण, उत्पादनात वाढ आणि दर्जा सुधारणा, निर्यातीत चांगला दर मिळण्याची संधी, टिश्यूकल्चर व मल्चिंगमुळे बागेचे आयुष्य वाढ, आदी लाभ होतो. ^सोलापूर जिल्ह्यात एकूण सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आहे. तसेच एकट्या करमाळा तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडी खाली आहे. केळी उत्पादनात आणखी वाढ व्हावी. तसेच जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादनासाठी कृषी अवजारे व यंत्रसामग्री योजनेतून एआय किट उपलब्ध करावे. तसेच विषेश योजना राबवण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषद कृषी विभागाने पुढाकार घ्यावा. किरण कवडे, केळी उत्पादक केळी बागांमध्ये एआयचे असे होतील फायदे सोलापूर जिल्हा परिषदेने याबाबत पुढाकार घ्यावा शेतकऱ्यांना होणारे लाभ

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:26 am

हॉटेल बंदची अफवा; स्वामींच्या प्रकटदिनी गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याने भाविक घटले:अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचा वटवृक्ष मंदिरात प्रकटदिनी पाळणा सोहळा‎

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. आखाती देशातील युद्धाच्या परिणामामुळे गॅसटंचाई आहे. त्यामुळे हॉटेल बंद असल्याच्या अफवेमुळे भाविकांची संख्या गतवर्षीच्या एक लाख भाविकांनी दर्शन घेतले होते. तर यंदा ५० हजार भाविकच दर्शनासाठी आले होते. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त शुक्रवारी पहाटे ४ वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुरोहित मोहनराव महाराज, मंदार महाराज, व्यंकटेश महाराज यांच्या हस्ते व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्तिथीत झाली. त्यानंतर श्री. स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित नगर प्रदक्षिणेचा प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते प्रारंभ करून स्वामीनामाचा जयघोष करत भक्तिभावाने नगर प्रदक्षिणा मार्गस्थ झाली. प्रकटदिनी श्री स्वामींचे भक्तांना सुलभपणे दर्शन होण्यासाठी स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवले होते. अभिषेकाची पावती करणाऱ्या स्वामी भक्तांना श्रीफळ, खडीसाखर प्रसाद देण्यात आले. सकाळी १० ते १२ या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानच्या विश्वस्त उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या वतीने भजन होऊन गुलाल पुष्प वाहण्यात आले. त्यानंतर पाळणा झाला. प्रतिनिधी | अक्कलकोट येथील बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठात श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी दिवसभर दर्शन घेऊन या सोहळ्याचा लाभ घेतला. या वेळी राजश्री धनंजय मुंडे (परळी), उद्योगपती चंद्रकांत पाटील (मुंबई), संजय पाठक, नगराध्यक्ष मीलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, नगरसेवक रमेश कापसे आदी उपस्थित होते. प्रकट दिनानिमित्त विविध फुलांनी सजावट केलेल्या मठात पहाटे ५ वाजता काकडा आरतीने कार्यक्रमांची मंगलमय सुरुवात झाली. त्यानंतर भाविकांसाठी मठ दर्शनासाठी खुला करण्यात आला. सकाळी १० वाजता महाअभिषेक सोहळा पार पडला. दुपारी १२.३५ वाजता हजारो भक्तांच्या उपस्थितीत पाळणा सोहळा व महाआरतीने स्वामींचा जन्मोत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी स्वामी समर्थ महाराजांचे पट्टशिष्य श्री चोळप्पा महाराज यांच्या वंशज यांच्या मार्गदर्शनाखाली भजनी मंडळाने भजन सेवा सादर केली. स्वामींच्या चरित्रावर आधारित विविध भक्तिगीते गायकांनी सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत रंगलेल्या या भजन कार्यक्रमामुळे मठ परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.भजन सेवा सादर झाली. यानंतर मठात महाप्रसादाचे नैवेद्य दाखवून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. सुमारे दहा हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. स्वामी भक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिराच्या उत्तरेकडील बाहेरील परिसरातील नवसाच्या मारुती मंदिरापर्यंत रस्त्याच्या लगत कापडी मंडप दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याची सोय, वयोवृद्ध भाविकांना विशेष दर्शन व्यवस्था, आपत्कालीन परिस्थीतीचा विचार करून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, शरणमठाचे विश्वस्त बसवराज आलमद, प्रदीप हिंडोळे उपस्थित होते. दुपारी पाळणा सोहळा भक्तिभावात दुपारी १२ वाजता पुरोहित मंदार महाराज, मोहित महाराज यांच्या मंत्रोच्चारात मंदिर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पाळणा सोहळा झाला. आरती होऊन जन्म सोहळा व पाळणा इत्यादी पारंपरिक धार्मिक कार्यक्रमांनी स्वामींचा प्रकट दिन भक्तिभावात संपन्न झाला.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:25 am

40 हजार स्वामीभक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ:अन्नछत्र मंडळात ‘श्री स्वामी दत्तात्रय..., दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष‎

‘श्री स्वामी दत्तात्रय... दिगंबरा दिगंबरा.... श्री गुरु दत्ता.... श्रीपाद वल्लभ दिगंबरा...’च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात शुक्रवारी श्रींच्या प्रकट दिनानिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व विश्वस्त अलकाताई जनमेजयराजे भोसले आणि कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली व विश्वस्त अर्पिताराजे अमोलराजे भोसले व विश्वस्त अनुयाताई संदीप फुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. न्यासाकडून महाप्रसादाच्या उत्कृष्ठ व्यवस्थेने भक्तातून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी ६० हजार स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दरम्यान न्यासाच्या महाप्रसाद गृहात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनानिमित्त पाळणा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी १२ वाजता पार पडले. या प्रसंगी न्यासाच्या विश्वस्त अर्पिताराजे अमोलराजे भोसले, विश्वस्त अनुयाताई संदीप फुगे, जयश्रीताई मगर, ज्योतीताई मगर, स्वाती निकम, तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, स्वामिनीराजे अमोलराजे भोसले यांच्या व स्वामी भक्तांच्या उपस्थितीत पाळणा कार्यक्रम पार पडला. पाळणा गीताबरोबरच मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व विश्वंभर पुजारी यांच्या हस्ते विधिवत पूजा, धार्मिक कार्यक्रम भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्रींना नैवेद्य दाखविण्यात आले. स्वामी भक्तांनी अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या श्री शमी-विघ्नेह गणेश मंदिर, ब्रह्मांडनायक उभी स्वामींची मूर्ती, नियोजित महाप्रसादगृह इमारत, सध्याचे अद्यावत तात्पुरते महाप्रसादालय, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, कार्यरत यात्री निवास-१, यात्रीभुवन-२, वाहनतळ, टेकडीवरील श्री समर्थ वाटिका, शिवचरित्र प्रदर्शन हॉल, नवीन सुरु असलेले महाप्रसादालयाचे बांधकामसह हाती घेतलेल्या विविध उपक्रम व व्यवस्थेचे स्वागत करुन न्यासाचे कौतुक केले. महाप्रसादाचा संकल्प अर्पिताराजे अमोलराजे भोसले यांच्या हस्ते सोडण्यात आल्यानंतर महाप्रसादास सुरुवात करण्यात आले. प्रकट दिनानिमित्त सकाळच्या वेळी महाप्रसादालयात सोलापूरच्या भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी फुलांची व गुलालाची उधळण करण्यात आली. श्री स्वामी समर्थ महाराज की जयच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. चांदीच्या पाळण्यासह श्रींच्या पूजेच्या ठिकाणास आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. ^श्रींच्या प्रकट दिनाच्या दिवशी श्रीक्षेत्र अक्कलकोटला आलो असता, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात शेकडो स्वामी भक्त महाप्रसादाकरिता आलेले होते. त्याठिकाणी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली महाप्रसादाचे उत्कृष्ठ नियोजन होते. मोहन जोशी, जेष्ठ अभिनेते पाळण्यास आकर्षक फुलांची सजावट महाप्रसादाचे उत्कृष्ठ व्यवस्थापन केले

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:24 am

पोटे परिवाराच्या मानाच्या कावडीचा उत्सव; आजपासून भक्तिभावात प्रारंभ

नातेपुते येथील श्री शंभू महादेवाच्या मानाच्या कावडींपैकी पोटे परिवाराची तिसऱ्या पिढीत अखंड सुरू असलेली मानाच्या कावडीचा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महापूजा व महाआरतीने मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. चैत्र शुद्ध गुढीपाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत चालणारा हा पंधरा दिवसांचा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभाव, परंपरा आणि धार्मिक उत्साहाचे अनोखे दर्शन घडवत आहे. या कावडीद्वारे भगवान शंभू महादेवाला चार वेळा पवित्र जलाभिषेक (धार) अर्पण केला जातो. पहिली धार गुढीपाडव्यादिवशी, दुसरी धार चैत्र शुद्ध अष्टमीला देवाच्या विवाह सोहळ्यावेळी, तिसरी धार चैत्र शुद्ध द्वादशीला तर चौथी व अंतिम धार चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘हर हर महादेव’च्या गगनभेदी घोषात अर्पण केली जाते. यावेळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होते. सध्या सागर पोटे, धनंजय पोटे, सचिन पोटे, माऊली पोटे व विठ्ठल पोटे हे नव्या पिढीचे प्रतिनिधी ही परंपरा जतन करत आहेत. उत्सव काळात दररोज महापूजा, महाआरती, महानैवेद्य व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सर्व भाविकांसाठी पंधरा दिवस अखंड महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होत आहेत. भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारी व नपोटे परिवार कावडीचे मुख्य मानकरी असून नातेपुते येथील धनगर समाज, खाटीक समाज तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने खांदेकरी व मानकरी म्हणून सहभाग घेतात. गुढी पाडव्यादिवशी कावडीस नवीन वस्त्र परिधान करून विधिवत महापूजा केली जात असते. महाप्रसादाची व्यवस्था

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:22 am

जेऊरमध्ये संभाजी ब्रिगेडतर्फे इफ्तार पार्टी:संभाजी ब्रिगेडच्या इफ्तार पार्टीत हिंदू- मुस्लिम ऐक्याचा दिला संदेश‎

करमाळा तालुक्यातील जेऊर येथे संभाजी ब्रिगेड तर्फे रमजान पवित्र महिन्यानिमित्त अलिफ मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, भरत अवताडे तथा पंचायत समिती सदस्य म्हणाले संभाजी ब्रिगेड ही संघटना सर्व जाती धर्मातील लोक एकत्रित घेऊन चालणारी आशी एकमेव संघटना आहे. जाती-जातीत तेड निर्माण न करता सर्व जातीतील लोकांना एकत्रित घेऊन काम करणारी व शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर सर्व समाज बांधवांचे संघटन करणारी संघटना आहे. काही समाजकंटक जाती जातीमध्ये तेढ निर्माण करीत आहेत. तसेच स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजकंटकांचा वापर करीत आहे. तरी काही समाजबांधवांनी अशा चेतावणी कोर लोकांपासून सर्व समाज बांधवांनी सावध राहावे. हा द्वेष रोखण्याचे काम व जातीय सलोखा राखण्याचे काम गेली कित्येक वर्षापासून मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड ही संघटना काम करत आहे. यावेळी या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत अवताडे व पंचायत समिती सदस्य लिंबोरेचे सरपंच रवींद्र वळेकर, मयुर रोकडे, सोमनाथ रोकडे, संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके कार्यकर्ते व सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:21 am

वैशाली तनपुरे ठरल्या पैठणीच्या मानकरी:अमोल विद्यालय करकंब येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात‎

जवळपास चार तास चाललेल्या वेगवेगळ्या गेम्स, संगीत खुर्ची, उखाणे, नृत्य, तळ्यात मळ्यात इत्यादी मध्ये शेवटपर्यंत बाजी मारत वैशाली तनपुरे यांनी मानाची पैठणी तर निकिता शिंदे यांनी सोन्याची नथ पटकावली. करकंब येथील अभिछाया प्रतिष्ठानच्या वतीने अमोल पब्लिक स्कूलच्या प्रांगणात खेळ पैठणीचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जवळपास ६०० महिलांनाही यात सहभाग घेऊन आपले कलाकौशल्य दाखविले. यामध्ये उखाणे, संगीत खुर्ची, बॉल टाकणे, ग्रुप डान्स, तळ्यात मळ्यात इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेण्यात आले. यासाठी निवेदिका मोनिका जाजू यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रमात रंगत वाढवली. तसेच विजेत्या स्पर्धकांना सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार प्रीतम भंडारे, प्राची पालवे-भंडारे संस्थेचे अध्यक्ष अमोल शेळके, माजी संस्थेच्या सचिवा सुरेखा शेळके, स्नेहप्रभा शेळके, शुभांगी शेळके व सुरैय्या आतार यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक उंबरदंड तर आभार प्रा. किसन सलगर यांनी मानले. यावेळी महिला उपस्थित होत्या. उपस्थित महिलांमधून चिठ्ठीद्वारे अश्विनी बाबर, शाहिस्ता मुलानी, निर्मला पिसे, अश्विनी शेटे आणि सुवर्णा भुसनर, सुनिता कोरके, भारती आखाडे यांना विशेष गिफ्ट देण्यात आले. उपस्थित महिलांना संस्थेच्या सचिवा सुरेखा शेळके यांनी मार्गदर्शन करुन येथून पुढे असेच वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतील असे सांगितले. विशेष म्हणजे पाहुण्यांसोबतच अभिछाया शैक्षणिक संकुलात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या २८ रणरागिणी महिला शिक्षकांचाही या दिनाचे औचित्य साधून विशेष सन्मान करण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:20 am

चैत्री यात्रेसाठी वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर कुलर, सरबताची सोय:यात्रेदरम्यान समितीशी संबंधित सर्व प्रथा-परंपरांचे होणार काटेकोर पालन‎

चैत्र शुद्ध एकादशी यात्रेचा कालावधी दि.२३ मार्च ते दि.०२ एप्रिल असा राहणार आहे. यात्रेस येणाऱ्या भाविकांसाठी व्यापक सोई- सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. शुक्रवारी श्री विठ्ठल-रूक्मिणी भक्तनिवास येथे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंदिर समितीची सभा संपन्न झाली. सभेस समिती सदस्य प्रणिता भालके, शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक संदेश भोसले, लेखा अधिकारी मुकेश अनेचा आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य अपघाती निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. सभेमध्ये चैत्री यात्रेच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यात्रेदरम्यान मंदिर समितीशी संबंधित सर्व प्रथा-परंपरांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. वाढते तापमान लक्षात घेऊन दर्शनरांगेतील भाविकांसाठी थंड व शुद्ध पिण्याचे पाणी, लिंबू सरबत, पंखे व कुलर व्यवस्था, आरोग्य सेवा स्टॉल तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराच्या जतन, संवर्धन व जीर्णोद्धार कामाचा आढावा घेण्यात आला. श्री पांडुरंगाचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र अरण येथे नेण्याबाबत सल्लागार परिषदेचा सल्ला घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रणिताताई भालके या मंदिर समितीच्या पदसिद्ध सदस्य असून त्यांची ही पहिलीच बैठक असल्याने सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मंदिर समितीचे सदस्य शिवाजीराव मोरे यांना राजा शिवछत्रपती समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव सभेत पारित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी शेळके यांनी दिली. मंदिराच्या संवर्धन व जीर्णोद्धार कामाचा घेतला आढावा

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:19 am

सांगोल्यात डाळिंब, आंब्याचे नुकसान‎:आंबा, डाळिंब, द्राक्ष व मका पिकांचे मोठे नुकसान; तातडीच्या मदतीची शेतकऱ्यांनी केली मागणी‎

सांगोला तालुक्यातील राजुरी, जुनोनी, कोळा, गौडवाडी आदी गावात निसर्गाचा मोठा कोप झाला असून परिसराला जोरदार गारपिटीने झोडपून काढले. कोळा ,नाझरे सर्कलमध्ये सुमारे दीड तास दगडासारख्या गारांचा पाऊस झाला. या भागातील आंबा, डाळिंब, गहू ,ज्वारी इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे काढणीला आलेला हंगाम डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाला आहे, याची तातडीने दखल घेत आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, तहसीलदार बाळूताई भागवत या अधिकाऱ्यासह नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शासनाने तातडीने पंचनामे करून भरघोस मदत करावी अशी मागणी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी शासनाकडे केली आहे. विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मदत लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. आमदार बाबासाहेब देशमुख व सदस्य नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दौरा केल्याने जनतेतून शेतकरी वर्गाकडून कौतुक होत आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी डाळिंब, आंबा, गव्हाचे विक्रमी पीक घेतले आहे, मात्र यंदा गाराच्या पावसाने गाठल्याने उभी पिके आडवी झाली आहेत. गहू पीक डाळिंबाची झाडे भुई सपाट झाली. आंब्याचा मोहर गळून पडल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. गव्हाची प्रत खालावणार असल्याने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक गणित कोलमडले आहे. नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेता महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. जुनोनीचे पोपट तंडे यांचे तर आंब्याचे झाडावरचे आंबे खाली गळून पडले होते. अंकुश होनमाने यांच्या डाळिंबाच्या बागावर वेगवेगळ्या प्रकारचे डाग पडून डाळिंब खाली पडून डाळिंबाचे मोठे नुकसान झाले. दत्ता होनमाने यांच्याही डाळिंबाच्या बागेची नुकसान झाले. बापू देशमुख, दत्तू देशमुख, दत्ता माने यांचा गहू संपूर्ण भुईसपाट होऊन मोठे नुकसान झाले आहे असल्याचे दिसून आले. काढणीला आलेल्या ज्वारीवरही पाणी फिरल्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. यावेळी कोळा जिल्हा परिषद गटाचे सदस्य किरण पांढरे, पंचायत समिती सदस्य अमृत पाटील, सोपान कोळेकर, सरपंच राजू पाटील यांच्यासह नेतेमंडळी शेतकरी वर्ग पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी |देगाव मोहोळ तालुक्यातील देगाव, वाळूज, भैरवाडी,मनगोली,नरखेड , डिकसळ,मसले चौधरी, एकुरके, बोपले, मलिकपेठ, भोयरे भागात गुरुवारी दुपारनंतर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यामुळे द्राक्ष,आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या ज्वारी, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आठवडाभर कडाक्याच्या उन्हानंतर गुरुवारी दुपारनंतर सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत कमी जास्त प्रमाणात कोसळत होता. विजांच्या कडकडाटासह देगाव परिसरात अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वारे व गारपिटीने शेतातील उभी पिकं भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तर देगाव येथील पोपट आदिनाथ आतकरे यांच्या घराच्या समोर असलेल्या नारळाच्या झाडावरती वीज कोसळली असून नारळाच्या झाडावरती मोठ्या प्रमाणात आग चालू होती. वीज विशेषतः गावामध्ये वीज कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अगोदरच अतिवृष्टीमुळे द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने द्राक्षे,आंबा बागांचे तर ज्वारी,गहू, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मानेगाव | परिसरात अवकाळी वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बागेला फटका बसला आहे. जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे द्राक्षबाग वाकली असून काही प्रमाणात द्राक्षे झडल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली. द्राक्ष पिकांचे नुकसान आमदार देशमुखांकडून तत्काळ मदतीची मागणी यावेळी आमदार देशमुख यांनी घटनास्थळावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय (मामा) भरणे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नुकसानीची माहिती दिली. तात्काळ मदतीची मागणी केली. शासनाकडून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून आगामी विधानसभेच्या अधिवेशनात हा प्रश्न मांडून शेतकऱ्यांना जास्तीत- जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:19 am

मानेगाव परिसरात वादळी वाऱ्याचा तडाखा; द्राक्ष-आंब्याचे नुकसान:7 ते 8 गावातील शेतकरी संकटात; 50 टक्के बागा आधीच निष्फळ‎

मानेगाव परिसरातील ७ ते ८ गावांमध्ये यंदाचा हंगाम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण ठरत आहे. हंगामाच्या सुरुवातीपासूनच प्रतिकूल हवामानामुळे सुमारे ५० टक्के द्राक्ष बागांमध्ये उत्पादन झाले नाही. अनेक बागा पूर्णतः निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांच्या आशा आधीच मावळल्या होत्या.अशा परिस्थितीत उरलेल्या उत्पादनावर आधार ठेवून काही शेतकऱ्यांनी द्राक्षापासून बेदाणा तयार करण्याचा मार्ग स्वीकारला. मेहनत घेऊन वाळवणीसाठी ठेवलेला बेदाणा चांगला दर मिळवून देईल, अशी अपेक्षा होती. मात्र काल अचानक बदललेल्या हवामानाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरवले. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे वाळत घातलेला बेदाणा पूर्णतः भिजला. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना माल सावरण्याची संधीही मिळाली नाही. परिणामी तयार झालेला माल खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भिजलेल्या बेदाण्याला बाजारात योग्य दर मिळणार नाही, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. यंदा आधीच उत्पादन घटल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा ठरला आहे. खर्च वाढलेला, उत्पादन कमी आणि त्यातच तयार मालाचे नुकसान अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी करत आहे. अन्यथा आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेडमधील १० ते १२ टन तिन्ही बेदाणा भिजला अचानक आलेल्या पावसामुळे तिन्ही बेदाणा शेडमधील सुमारे १० ते १२ टन माल पूर्ण भिजला. भिजल्यानंतर बेदाणा काळपट पडतो व बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे मोठा आर्थिक तोटा झाला. नितीन नागणे, शेतकरी

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:17 am

माळशिरस तालुक्यात 825 शेतकऱ्यांचे नुकसान:गुरुवारी रात्री सोसाट्याचा वारा, 32 गावात अवकाळी पाऊस व गारपीट झाली‎

माळशिरस तालुक्यात गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या सोसाट्याच्या वारा,अवकाळी पाऊस व गारांच्या माऱ्याने ऊस, केळी, आंबा या नगदी पिकांसह चारा पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये मका,गहू,हरभरा आदी ३६५ हेक्टर तर आंबा, केळी,पेरू आदी २५७ हेक्टर क्षेत्रातील फळ पिकांचे नुकसान झाले असून अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी बाधित शेतकरी वर्गातून होत आहे. पंचायत समिती सभापती दत्ता मगर यांनी तातडीने या बाधित शेतकऱ्यांच्या क्षेत्राला भेटी देऊन पाहणी केली आहे. गेली आठवडाभर तालुक्यात तापमान खूप वाढले होते,फेब्रुवारी अखेरीस तापमानाने चाळिशी गाठली होती,दिवसभर व रात्री उशिरापर्यंत प्रचंड उकाडा व पहाटे थंडी जाणवत होती. सायंकाळी ७ च्या सुमारास अचानक हवेत बदल झाला, विजांचा गडगडाट त्याचबरोबर सोसाट्याचा वारा सुरू झाला, त्यापाठोपाठ छोट्या छोट्या गारांचा तडतडाट सुरू झाला. अगदी १५/२० मिनिटात तो थांबला, मात्र पुन्हा रात्री १०.३० चे सुमारास पुन्हा सुरू झालेल्या पावसाने व गारपिटीने ऊस, केळीची पाने चिरली असून वाऱ्याने काढणीस आलेले गहू, चारा पिके असणारी मका, कडवळ ही पिके जमीनदोस्त झाली. तालुक्यातील महाळुंग व लवंग या दोन मंडळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे बाग वाकली. याचा उत्पादनावर परिणाम होईल अशी भीती आहे, असे संबंधित शेतकऱ्याने सांगितले. महापूरातून नुकतेच सावरत असताना पुन्हा आलेल्या या संकटामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. ^गुरुवारी रात्री अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने,त्याबरोबर आलेल्या अवकाळी पावसाने व गारपीट ने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या गहू,मका, हरभरा,ऊस या पिकांबरोबरच आंबा, केळी,पेरूचे मोठे नुकसान झाले आहे.मी ताबडतोब कृषी व महसुली अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली. तसेच पंचनामे करण्यास सांगितले असून तसे पंचनामे सुरू झाले आहेत. दत्ता मगर, सभापती पंचायत समिती तालुक्यातील एकूण बाधित क्षेत्र ६२१.१० हे. बागायत क्षेत्र ३६४.७०, फळपीक क्षेत्र २५६.४०,शेतकरी संख्या ८२५, बाधित गावे संख्या ३२. बाधित क्षेत्राची पाहणी , पंचनामे करण्यास सुरुवात

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:17 am

144 गावांत 11 हजार 649 हेक्टरवर नुकसान:काढणीला आलेला गहू भुईसपाट, 20,551 शेतकरी बाधित, जिल्ह्यात 24 तासांत 1.1 मिमी पावसाची नाेंद‎

मागील २ दिवसांत जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे ११ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात सर्वाधिक गहू, कांदा, हरभरा, मका, भाजीपाल्यासह अन्य पिके भुईसपाट झाली. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे सुरु केले आहे. १९ मार्चला झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले. २० हजार हजार ५५१ शेतकरी बाधित झाले असून, जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १.१ मिमी पावसाची नोंद झाली. उन्हाळ्याचा हंगाम सुरु झालेल्या मार्च महिन्यातच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवार व गुरुवारी जिल्ह्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने अनेक भागात काढणीला आलेल्या रब्बी हंगामातील गव्हासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. बुधवारी ( १८ मार्च) जिल्ह्यातील राहुरी, पाथर्डी, नेवासे, राहाता, अकोले तालुक्यातील ४१ गावांत अवकाळी पाऊस झाला. यात ३ हजार ५५८ हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरबरा, कांदा, मका, टरबूज, आंबा, डांळिब, संत्रा, टॉमटो, द्राक्षे या पिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका ७ हजार ३५२ शेतकरी वर्गाला बसला आहे. यात राहुरी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. येथील २ हजार ८१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. ५ हजार १५ शेतकरी या तालुक्यातील बाधित झाले. गुरुवारीही (१९ मार्च) जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. जिल्ह्यातील पारनेर, श्रीरामपूर,पाथर्डी, नेवासे, शेवगाव, संगमनेर, राहाता या तालुक्यातील १०३ गावांत अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे ८ हजार ९१ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली. १२ हजार ९९९ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. तर, पारनेर तालुक्यात सर्वाधिक ३ हजार २०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्याचा फटका या तालुक्यातील ५ हजार ६९२ शेतकऱ्यांना बसला. सप्टेंबरमधील अतिवृष्टी, रब्बीच्या नियोजनावर काय झाला परिणाम गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या १०५ मिमी पावसामुळे जमिनीत चांगला ओलावा होता. मात्र, रब्बी हंगामाची तयारी सुरू होत असतानाच सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात परतीच्या पावसाने रौद्र रूप धारण केले आणि अतिवृष्टी झाली. यामुळे शेतात पाणी साचल्याने गव्हाच्या पेरण्यांना मोठा विलंब झाला. सप्टेंबरमधील या पावसामुळे वाफसा मिळण्यास उशीर झाला असला, तरी या ओलाव्याचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी गव्हावर भर देण्याचे ठरवले, ज्यामुळे पेरण्या लांबूनही पिकाची स्थिती सुरुवातीला आशादायक राहिली. सरासरी ओलांडून गव्हाच्या क्षेत्रात झालेली मोठी वाढ अतिवृष्टीमुळे पेरण्या उशिरा झाल्या तरी मुबलक उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यामुळे यंदा जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र विक्रमी स्तरावर पोहोचले. अहिल्यानगरचे गव्हाचे सरासरी क्षेत्र साधारणपणे १ लाख २८ हजार हेक्टर असते. मात्र, गेल्या वर्षीच्या समाधानकारक पावसामुळे यंदा हे क्षेत्र १ लाख ५४ हजार हेक्टरपर्यंत वाढले. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २६ हजार हेक्टरने गव्हाची लागवड वाढली. मजुरांची टंचाई आणि आता अवकाळी पावसाचा बसलेला तडाखा क्षेत्र वाढले आणि पीकही जोमात आले, पण ऐन काढणीच्या वेळी शेतकऱ्यांसमोर मजुरांच्या टंचाईचे मोठे संकट उभे राहिले. मजूर मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी गहू काढणीच्या यंत्राची (हार्वेस्टर) प्रतीक्षा केली, मात्र यंत्रे वेळेवर उपलब्ध न झाल्याने सोंगणी रखडली. अशातच अचानक आलेल्या अवकाळी पावसाने तयार झालेल्या गव्हाचे सर्वात मोठे नुकसान केले आहे. सोंगणीला आलेला गहू भिजल्यामुळे दाणा काळा पडणे आणि प्रत घसरणे अशा आव्हानांमुळे गव्हाचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याच्या उंबरठ्यावर आहे. ^गारपीट व अवकाळीचा पावसामुळेगव्हाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्षांना व आर्द्रतेमुळे तडे जातात, त्यासाठी अगोदरच फवारणी करुन घेणे गरजेचे आहे. आंब्याचा मोहर गळण्याची शक्यता अधिक असते. तसेच पालेभाजल्यावर अवकाळीचा परिणाम होऊन त्यावर किडीचा रोग येण्याची शक्यता असते, त्यामुळे किटकनाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे. प्रा.डॉ.उत्तम होले, किटकशास्त्रज्ञ. . अहिल्यानगर : ९३० हेक्टर .पाथर्डी : ४१ हेक्टर .राहुरी : २ हजार ८१ हेक्टर .नेवासे : ४५२ हेक्टर .अकोले : ३८ हेक्टर .राहाता : १६.५ हेक्टर .पारनेर : ३ हजार २०९ हेक्टर .पाथर्डी : २७ हेक्टर .शेवगाव : ३० हेक्टर .संगमनेर : १२५ हेक्टर .राहाता : ६११ हेक्टर अवकाळी पाऊस, वादळ अन् गारपीटीमुळे शेतकऱ्यांसमोर उभे राहिले नवे संकट

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:08 am

हनुमान चालीसाचे पठण-सुरेल भजनांच्या तालावर भाविक तल्लीन:सुयोग पार्कमध्ये भाविकांनी धरला ठेका, सोहळ्याला लाभला अभूतपूर्व प्रतिसाद‎

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ (ट्रस्ट), श्रीराम मंदिर, नवी पेठ' यांच्या वतीने शहरात ४० दिवसीय सामूहिक हनुमान चालीसा पठण आणि भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत सुयोग पार्क येथे कानडे परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याला भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. मागील दोन वर्षांपासून राजेंद्र रामदास कानडे व किरण रामदास कानडे आणि त्यांच्या परिवाराला या पवित्र सेवेचा मान मिळत आहे. या वर्षी देखील सुयोग पार्क येथे अत्यंत मंगलमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. जय श्रीराम...'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. यामध्ये नगरसेविका सुजाता महेंद्र पडोळे, नगरसेवक दत्ताभाऊ गाडळकर, उद्योजक दत्ताशेठ जाधव, माजी नगरसेवक विपुल भाई शेटीया, उद्योजक प्रदीप शेठ पंजाबी आणि विजूशेठ कोथंबीरे यांचा समावेश होता. तसेच सपना वेलनेस' परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यासाठी परिसरातील नागरिक आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभू श्रीराम व माता सीतेच्या वेशभूषेत चिमुकले. भक्ती आणि आनंदाचा ओघ या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे भजनांच्या तालावर तल्लीन झालेले भक्त. महिलांनी मोठ्या उत्साहात फुगडी खेळत आपला आनंद व्यक्त केला, तर इतर भाविकांनी भजनांच्या सुरांवर ठेका धरत मंत्रमुग्ध होऊन नृत्य केले. भक्तीच्या या महाकुंभात अबालवृद्धांपासून ते तरुणांपर्यंत सर्वच जण तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहण्यास मिळाले. भजनांच्या वेळी हरिनामाच्या गजरात परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात विविध भजने सादर करण्यात आली. या भजनांच्या तालावर उपस्थित असलेले भाविक तल्लीन झाले होते. या सोहळ्यासाठी परिसरातील ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारचे धार्मिक उपक्रम सातत्याने आयोजित केले जावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:05 am

नगर जिल्हा बाल विवाहमुक्त करण्याचा व्यक्त केला निर्धार:नवजीवन ग्रामोदय प्रतिष्ठानच्यावतीने जिल्ह्यात जनजागृती मोहीम‎

भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालय यांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या 'बालविवाहमुक्त भारत' अभियानाची जनजागृती मोहीम अहिल्यानगर महिला व बालविकास कार्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली नवजीवन ग्रामोदय प्रतिष्ठानच्यावतीने नगर जिल्ह्यात राबवण्यात आली. प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यात २३ हजार ५०० हून अधिक प्रतिज्ञापत्र / शपथपत्र जिल्हा परिषद शाळा, हायस्कूल, कॉलेज, बचतगट, ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, कार्यालय आदी ठिकाणी शपथ घेण्यात आली. प्रतिष्ठानच्या संगीता पवार, सुदीप पडवळ, दीपक बत्तीशे यांच्या मार्गदर्शनात ईश्वरी पवार, विश्वास जावळे, ऋषिकेश राऊत, सूरज मिसाळ, रोहन सोनवणे, अमोल गावडे, सोनल डोळझाके, सतीश चितलकर, प्रतीक्षा गायकवाड, अभिषेक मिसाळ, विक्रम हारदे, शीतल डगळे आदींनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. लहान मुलींच्या लग्नाच्या चर्चा सुरू होताच त्या संबंधित कुटुंबांशी संवाद साधून समुपदेशन केले जाईल. बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगतील आणि कोणत्याही परिस्थितीत अशा घटना घडू देणार नाहीत. आपले गाव बालविवाहमुक्त करून संपूर्ण जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा निर्धार नवजीवन ग्रामोदय प्रतिष्ठानच्यावतीने व्यक्त केला. संस्थेच्यावतीने जिल्ह्यातील सुमारे १०० पेक्षा जास्त गावांमधून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, पिण्याचे व शेतीसाठीचे पाणी, बचतगट विकास, अपारंपारिक उर्जेचा सुयोग्य वापर, एकलपालक मुलांसाठी बालसंगोपन योजना, बेघरांसाठी निवारागृह, निराधार मुलांसाठी बालगृह इत्यादी बाबींवर काम करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:05 am

गुढीपाडवा यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी घेतले शनीदर्शन:सायकल कावड यात्रेचे जल्लोषात स्वागत, शनिदेवाच्या जयघोषाने दुमदुमला परिसर‎

नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील शनिभक्तांनी काशी व प्रवरासंगम येथून कांगोणीसह अन्य कावडीधारकांनी प्रवरासंगम येथून श्रीराम संघ सायकल जल कावड यात्रा शनिशिंगणापुरात दाखल झाले. प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी परंपरेनुसार या कावडयात्रेचे स्वागत केले. यावेळी परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. टाळ मृदंगाचा निनाद आणि ढोल ताशांचा गजरही सुरू होता. दुपारी बारा वाजता शनी आरती करण्यात आली. भजन मंडळांनी सादर केलेल्या भजनांत उपस्थित भाविक तल्लीन झाले होते. दिंडीचे स्वागत मंदिर परिसरात आल्यानंतर डीजे वाजून स्वागत करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे मंदिरापर्यंत डीजे असायचा पण यावर्षी शासकीय मिरवणूक असल्यामुळे डीजेला प्रवेश बंदी करण्यात आली होती. काशी व प्रवरासंगम येथून आणलेल्या गंगाजलाने शनिदेवाला, तसेच शनी मंदिर परिसरातील ४ समाधी व स्व. बाबुराव बानकर यांच्या पुतळ्यासह व कांगोणी येथील पुरातन मंदिरातील देवदेवतांना गंगाजल अर्पण करून जलाभिषेक करण्यात आला. कांगोणी येथील ६० सायकल कावड यात्रेचे शिंगणापुरात आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आले. शिवहरी उद्योग समूहाच्यावतीने टी शर्ट, डॉ. सुकाळकर (उस्थळ दुमाला), हॉटेल सद्गुरू कृपा, अॅड.भुसारी, नानासाहेब शिंदे, पंकज कर्डीले, बाबासाहेब कोकाटे यांच्यावतीने चहा, भोजन, पाण्याची व्यवस्था केली होती. कावड यात्रेकरुंसाठी वैद्यकीय सेवा कांगोणी येथील डॉ. बडे व कैलास चौधरी यांनी दिली. शिंगणापुरात उन्हामुळे भाविकांची गर्दी कमी होती. शनिमंदिर व परिसरात फुलांच्या सजावटीसह आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. मिठाई, खेळणीची दुकाने, प्रसादालय, पूजा साहित्य दुकाने येथे होती. भाविकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात होती. पोलीस प्रशासनाने बंदोबस्तही तैनात केला होता. दिवसभरात लाखो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. शनिशिंगणापुरात मोठ्या उत्साहात, भाविकांच्या उपस्थितीत गुढीपाडवा यात्रा पार पडली. शनिशिंगणापूर येथे कावड यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:04 am

शंभर वर्षांहून अधिक जुनी चिंचेची झाडे तोडण्यात येत असल्याने नाराजी

श्रीगोंदे-मांडवगण या रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून २१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र या रस्त्याच्या कामादरम्यान शंभर वर्षांहून अधिक जुनी असणारी चिंचेची झाडे तोडण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या ३२ किमी लांबीच्या रस्त्यावर अनेक ऐतिहासिक व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाची झाडे असून काशीबाग येथील चिंचेची भलीमोठी झाडे ही त्या परिसराची ओळख मानली जातात. परंतु संबंधित ठेकेदाराकडून ही झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आल्याने स्थानिक शेतकरी व नागरिकांनी याला विरोध दर्शवला आहे. काशीबाग येथील शेतकरी सुनील पवार म्हणाले, काशीबागेतील चिंचेची शंभर वर्षांहून अधिक जुनी झाडे ही आमच्या भागाची ओळख आहेत. विकासाच्या नावाखाली ही झाडे तोडणे चुकीचे असून ती जतन करणे आवश्यक आहे. झाडे तोडू नयेत, अशी आमची मागणी आहे. दरम्यान, रस्ते विकासाच्या कामांमध्ये झाडांच्या पुनर्वसनाचे आश्वासन दिले जाते; मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणातही कोणताही ठोस निर्णय न घेता झाडे तोडली जात असल्याने संताप वाढत आहे. संबंधित ठेकेदार कोणतीही दखल न घेता झाडांच्या मुळावर घाव घालत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाने याची दखल घेऊन ठेकेदाराला समज देणे व झाडांच्या संरक्षणाबाबत योग्य निर्णय घेणे गरजेचे असल्याची मागणी नागरिक व शेतकरी करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:04 am

निघोज ते देवीभोयरे फाटा रस्त्याचे काम मळगंगा यात्रेपूर्वी पूर्ण करा'

जिल्ह्यासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मळगंगा मातेचा यात्रोत्सव तोंडावर आलेला असतानाही गव्हाणेवाडी–बेल्हे या महामार्गावरील निघोज ते देवीभोयरे फाटा दरम्यानच्या रस्त्याचे काम वर्षभरापासून अर्धवट अवस्थेत आहे. यामुळेनिघोज पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. धूळ, खडी आणि ठिकठिकाणी सुरू असलेल्या खोदकामामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यात्रेपूर्वी रस्ता पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. गव्हाणेवाडी ते बेल्हे मार्गाचे काम मागील वर्षी सुरू झाले होते. मात्र,वर्ष उलटूनही रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही. जागोजागी खोदलेला रस्ता, अपूर्ण पुलांची कामे आणि खडीमुळे मार्ग धोकादायक बनला आहे. प्रशासन व कंत्राटदाराच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.या रस्त्यासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनींच्या मोबदल्याचा मुद्दा पुढे करून निघोज बसस्थानकावर झालेल्या आंदोलनानंतर कंत्राटदाराने काम थांबवून बरेच दिवस झाले. त्यामुळे मुलिकादेवी विद्यालय ते निघोज गावठाण या मार्गावर विद्यार्थी आणि ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुढारी पुढे येत नसल्याने नागरिकांत नाराजी जमिनीच्या मोबदल्याच्या विषयावर लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये यापूर्वीच चर्चा झाल्याचे सांगितले जाते. मात्र, आंदोलनामुळे काम ठप्प झाले आणि त्याचा फटका नागरिकांना बसला. काम बंद झाल्यापासून या परिसरात पन्नासहून अधिक अपघात घडल्याची माहिती समोर आली. अनेक कुटुंबांना उपचारासाठी लाखोंचा खर्च सहन करावा लागला आहे. काम पुन्हा सुरू करण्यासाठी आंदोलनाची आवश्यकता आहे. मात्र पुढारी पुढे येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:03 am

विकासकामांचे भूमिपूजन:केवळ फलक लावणे नव्हे, तर दर्जेदार कामे करणे हेच आमचे ध्येय, आमदार काशिनाथ दाते यांचे जवळे येथे प्रतिपादन‎

विकास कामांबरोबरच पारनेर - अहिल्यानगर मतदारसंघात शांतता व सुव्यवस्था राखण्यास आपण नेहमीच प्राधान्य दिले. केवळ भूमिपूजनाचे फलक लावणे हे आमचे काम नाही. तर प्रत्यक्षात दर्जेदार कामे पूर्ण करणे हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार काशिनाथ दाते यांनी केले.मतदारसंघातील जनता शांततापूर्ण आणि सुरक्षित जीवन जगत असेल तरच विकासाला अर्थ प्राप्त होतो. विकास आणि शांतता ही प्रगतीची दोन चाके आहेत, असे आमदार दाते म्हणाले. जवळे (पारनेर ) येथील १ कोटी ५७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार दाते यांच्या हस्ते पार पडले.या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, कार्याध्यक्षा सुधामती कवाद, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुषमा रावडे, आर. एस. कापसे, भास्कर उचाळे,सरपंच पंकज कारखिले, सुरेश बोऱ्हुडे, सुभाष दुधाडे आदी उपस्थित होते. आमदार दाते म्हणाले, जवळे गावाला विकासाच्या बाबतीत मी नेहमीच झुकते माप दिले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती असताना कोट्यवधी रुपयांचा निधी जवळे येथील विविध विकास कामांसाठी दिला होता. आता पुन्हा १ कोटी ५७ लाख रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन आपण करत आहोत. जनतेच्या सेवेसाठी, पायाभूत सुविधांसाठी विकासकामांची ही नवी सुरुवात आहे. मतदारसंघातील शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठीही आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. कुकडी डाव्या कालव्यातून वेळेवर आवर्तन मिळावे यासाठी वेळोवेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरूच असतो. पारनेर तालुक्यातील शेतीच्या सिंचन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विविध पाणी योजनांच्या मंजुरीसाठीही सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विकासासाठी ग्रामीण भागातील दळणवळण हे महत्त्वाचे नुकत्याच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात पारनेर - अहिल्यानगर मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांसाठी ४१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.मतदारसंघाच्या विकासासाठी ग्रामीण भागातील दळणवळण महत्त्वाचे आहे.त्यामुळे अर्थसंकल्पात रस्त्यांच्या कामांसाठी भरीव निधी मिळवण्यात यश आले,ही समाधानाची बाब आहे असल्याचे आमदार दाते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:03 am

काँक्रिटीकरणाच्या जंगलात चिमण्यांच्या अधिवासावर परिणाम:पक्षीमित्र अनिकेत चांडोले यांचे निरीक्षण, ‘चिऊ वाचवा’ उपक्रमातून चिमणी संवर्धनाचा संदेश‎

पर्यावरणपूरक विकासात प्राणी व पक्ष्यांचे महत्त्व अधोरेखित आहे. सर्वांनाच माहिती असलेले पक्षी चिमणी आहे. चिमण्यांना पिण्यासाठी व अंघोळीसाठी पाण्याची तसेच धुळीचीही आवश्यकता असते. दिवसेंदिवस वाढत असलेल्या काँक्रिटीकरणाच्या जंगलात चिमण्यांच्या नैसर्गिक अधिवासावर विपरित परिणाम होत आहेत. यातूनच आजच्या आधुनिक युगात एकेकाळी घरी, अंगणात चिवचिवाट करणाऱ्यां चिमण्या आता शहरांसह ग्रामीण भागातूनही लुप्त होताना दिसत आहेत. अनेक लोक चिमण्या पिलांना प्रथिनयुक्त अन्नाऐवजी घरातील उरलेले शिळे अन्न देतात. त्याचे दुष्परिणाम चिमण्यांसह त्यांच्या पिलांच्या शारीरिक वाढीवर होतात, असे निरीक्षण पक्षीमित्र अनिकेत चांडोले यांनी नोंदविले. हा चिवचिवाट परत आणण्यासाठी चिमण्यांसह पक्षी वाचवा मोहीम हाती घेण्याची गरज आहे, असे चांडोले यांनी केले. राजूर (ता.अकोले) येथील श्री समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शुक्रवारी (२० मार्च) चिमणी दिनानिमित्त पर्यावरणातील प्रत्येक जीवांचे अस्तित्व महत्त्वाचे असल्याची जाणीव ठेवून ‘पक्षी वाचवा, चिमणी वाचवा’ अभियान राबवण्यात आले. या अभियानांतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी पर्यावरणपूरक विविध उपक्रमांचे आयोजन केले. यातच पक्ष्यांसाठी, घरटी तयार करणे, पाणी पात्र ठेवणे, धान्य पात्र ठेवणे असे उपयुक्त कार्यक्रम राबविण्यात आले. याप्रसंगी रजनी टीभे, निसर्गप्रेमी रमाकांत डेरे, आदिवासी संघटना अध्यक्ष काशिनाथ साबळे, प्राचार्य किरण भागवत, सतीश काळे, विनायक साळवे, सुनीता पापळ, सोमनाथ पंडित उपस्थित होते. प्राचार्य मंजूषा काळे यांनी पर्यावरणपूरक विकासात देशी, गावरान व आयुर्वेदिक वृक्ष लागवड करणे, सेंद्रिय शेतीचा अवलंब करणे हे चिमण्यांचे संरक्षण करण्यास उपयुक्त उपाय असल्याचे सांगितले. अनिकेत चांडोले यांनी अल्पदरात पर्यावरणपूरक चिमणी घरटे तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन पक्षी संवर्धनाचा अभिनव प्रयोग राबविला. सूत्रसंचालन किरण भागवत यांनी, तर आभार कांचन माळवे यांनी मानले. विविध उपक्रमांतून पक्षी वाचवा अभियानाबाबत जागरूकता ‘उठा उठा चिऊताई’, ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ अशा कवितांपासून ते पंचतंत्र गोष्टींमधून व विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पक्षी वाचवा अभियानाबाबतची जागरूकता निर्माण करण्यात आली. विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तूंपासून पक्षांसाठी उपयुक्त घरटी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. छायाचित्रांवरून पक्षी ओळखण्याचे खेळ खेळले. चिमणी दिनानिमित्त ‘जीवदया व स्वामी समर्थ शिक्षण संस्थेतर्फे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त चांडोले व विवेक जगदाळे यांनी शाळा व मंदिरांना घरटी वितरण केले. या उपक्रमांत सुमारे १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:02 am

सायंकाळची वीज कपात तत्काळ थांबवा, अन्यथा कार्यालय बंद करू:भारनियमनाविरोधात खा. नीलेश लंके आक्रमक, महावितरणला इशारा‎

जिल्ह्यात सुरू असलेल्या सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंतच्या भारनियमनाविरोधात खासदार नीलेश लंके यांनी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. वाढत्या वीज कपातीमुळे शेतकरी, विद्यार्थी व महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. सायंकाळच्या वेळेतील भारनियमन तात्काळ बंद करा, अन्यथा महावितरणचे कार्यालय बंद करण्यास भाग पाडू, असा इशारा त्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिला. खा. लंके यांनी महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्याशी चर्चा केली. या आंदोलनात प्रा. सिताराम काकडे, रामेश्वर निमसे, श्रीकांत जगदाळे, अमोल खाडे, एकनाथ गांगर्डे, भाऊसाहेब काळे, पोपट पुंड, उद्योजक अल्ताफ शेख आदी उपस्थित होते. खासदार लंके म्हणाले, भारनियमनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. तसेच महिलांच्या स्वयंपाकाच्या वेळेत वीज नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. ग्रामीण भागात बिबट्याच्या भीतीमुळे अंधारात राहणे धोकादायक ठरत आहे. सरकारवर टीका करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, भारनियमन करून शेतकऱ्यांची मुले गुरांमागे पाठवायची का? त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे का? जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांनी स्वतः पाहणी करून प्रशासनाला पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जाणीवपूर्वक राजकारण करून माळीवाडा वेस पाडण्याचा प्रयत्न अहिल्यानगर शहराला दिल्लीगेट व माळीवाडावेसची पारंपरिक ओळख आहे. जाणीवपूर्वक राजकारण करून माळीवाडा वेस पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप खासदार लंके यांनी केला. शहरातील सामाजिक संघटनांनीही या निर्णयाला विरोध केला. आपणही त्यांच्यासोबत उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर आपण राजकारण करत आहे. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे पुतळे उभारले जावेत, अशी मागणी त्यांनी केली. भारनियमन कमी करण्यासाठी उपाययोजना करणार : लटपटे या प्रश्नावर अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली. दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आरडीसी योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर २४ तास वीज पुरवठा शक्य होईल, असे खा. लंके म्हणाले. तर वीज चोरी हा गंभीर प्रश्न आहे. तो नियंत्रणात आल्यानंतर २४ तास वीज पुरवठा देणे शक्य होईल. शक्य तितक्या प्रमाणात भारनियमन कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 8:01 am

श्री दत्त मंदिराची आजपासून प्राणप्रतिष्ठापना:मानूरला 25 मार्चपर्यंत सुरू राहणार साेहळा; शाेभायात्रेसह विविध धार्मिक कार्यक्रम‎

तालुक्यातील मानूर येथे डॉ. जे. डी. पवार यांनी स्वखर्चाने बांधलेल्या गुरुदेव दत्त मंदिराचा भव्य दिव्य कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. २१ ते २५ दरम्यान होणार आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी स्थान बेट, कोपरगाव मठाचे मठाधिपती स्वामी रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते, गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या सोहळ्यासाठी काही मंत्र्यांसह, खासदार, आमदार यांच्यासह पंचक्रोशीतील २५ हजार नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती गुरुदत्त शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेश पवार यांनी दिली. या पाच दिवसांत पौरोहित शेखर शुक्ल गुरुजी नाशिक, नितीन धर्माधिकारी (ग्रामाचार्य) मानूर व प्रसाद उपासनी कळवण यांच्या हस्ते, २१ जोडप्यांच्या साथीने सर्व पूजाविधी होणार आहेत. यामध्ये दि. २१ रोजी सकाळी दत्त मंदिर परिसरात देवदिवाळी आणि मांडव टाकण्याचा कार्यक्रम होणार आहे. दि. २२ रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान प्रायचित्त विधी व संकल्प, सायंकाळी मानूर ते गणेशनगर कळवण दरम्यान शोभायात्रा, नगरप्रदक्षिणा. दि. २३ सोमवार रोजी सकाळी ९ ते १२ देवदेवता पूजन, सायंकाळी ८ वा. ह. भ. प. गोविंद महाराज गायकवाड आळंदीकर यांचे सामाजिक व आध्यात्मिक भारुड. दी. २४ रोजी सकाळी ९ वा. गुरुदत्त मूर्ती स्थापना पूजन, महाभिषेक. सायंकाळी ८ वा. शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील व्याख्यान. दि. २५ रोजी सकाळी ९ वा. गुरुदत्त मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा, दु. १ वाजता महाआरती व भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. रात्री ८ वा. सामूहिक भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महिला बँकेच्या संस्थापक मीनाक्षी पवार, गुरुदत्त शिक्षण संस्थेचे सचिव अनुप पवार यांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 7:54 am

सटाण्यातील मोफत कॅन्सर निदान शिबिरामध्ये 94 महिलांची तपासणी

सटाणा नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालकल्याण समिती व मानवता कॅन्सर सेंटर, नाशिक यांच्या वतीने आयोजित मोफत कॅन्सर निदान शिबिरात ९४ महिलांची तपासणी करण्यात आली. नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांच्या हस्ते शिबिरचे उद्घाटन झाले. यावेळी मानवता कॅन्सर सेंटरच्या तज्ञ डॉ. श्वेता नेहे यांनी उपस्थित महिलांना कॅन्सरविषयी मार्गदर्शन केले. एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती करून महिलांनी आरोग्याविषयी अधिक सजग राहण्याचे आवाहन केले. तालुका आरोग्य कार्यालयाचे अधिकारी किरण शेवाळे यांनी विविध प्रकारच्या रक्त चाचण्यांविषयी माहिती दिली. सटाणा पोलिस दलातील बेनुस्कर यांनी सायबर गुन्हेगारी संदर्भात महिलांनी डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाच्या खबरदारीबाबत माहिती दिली. मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत कर्करोग प्रतिबंक लसीकरण मोहिमेबाबत मार्गदर्शन केले. यावेळी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण परीक्षार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष सुमित वाघ, देवमामलेदार गटनेता मनिषा पवार, महिला व बालकल्याण सभापती कल्पना सोनवणे, बांधकाम सभापती मुल्ला रऊफ खलील, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापती चेतन मोरे, आदींसह सर्व नगरसेवक विभागप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सटाणा नगरपरिषदेच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात बोलातांना नगराध्यक्ष हर्षदा पाटील व उपस्थित मान्यवर.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 7:52 am

वाचन संस्कृती संवर्धनासाठी शिक्षक लेखकांनी पुढाकार घेणे आवश्यक:सटाणा येथे साहित्यायन संस्थेच्या वर्धापन दिनी राजेंद्र दिघे यांचे प्रतिपादन‎

वाचन संस्कृती संवर्धनासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असा आग्रह कवी राजेंद्र दिघे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, वाचनाची सुरुवात वर्तमानपत्रांपासून केली तरी चालते, त्यानंतर पुस्तकांकडे वळणे उत्तम ठरते. यामुळे वाचनाची गोडी वाढते. मराठी भाषा आणि वाचन संस्कृती संवर्धनासाठी कवी व लेखकांनी कृतीशील राहावे, असे ते म्हणाले. येथील साहित्यायन संस्थेच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कवी संमेलनात दिघे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. किरण दशमुखे होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून संत साहित्याचे अभ्यासक प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. एकनाथ पगार, आणि डॉ. शुभदा माजगावकर उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांच्या गुढीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करून कवी संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रत्येक कवीने इतर कविंच्या कविता वाचायला आणि ऐकायला हव्यात. कविता आवडल्यास दाद द्यायला हवी. नव्याने लेखन करणाऱ्यांनी लेखणीत प्रामाणिकपणा ठेवावा. प्रसिद्धीपेक्षा संवेदनशीलता आणि सत्य यांना अधिक महत्त्व द्यावे. वाचनाची सवय जोपासावी, कारण चांगला वाचकच उत्तम लेखक बनतो, असे दिघे यांनी सांगितले. यावेळी डॉ. धोंडगे यांचा विश्व मराठी साहित्य संमेलनात डॉ. अशोक केळकर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच डॉ. पगार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक किरण दशमुखे यांनी तर सूत्रसंचलन किरण कुवर यांनी केले. आभार शैलेश चव्हाण यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 7:52 am

लासूर स्टेशनच्या 170 एकरांतील पिकांचे नुकसान‎:हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी संकटात; आडत व्यापाऱ्यांची उडाली होती धांदल

प्रतिनिधी | लासूर स्टेशन लासूर स्टेशन, सावंगी, सुलतानाबाद, शिरेगाव, महेबुबखेडा, शिल्लेगाव, गाजगाव, खादगाव, देरडा परिसरात बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याने अवकाळी पाऊस झाला. यात काढणीला आलेला उभा गहू आडवा पडला असून, पीक भिजले. गहू, हरभरा, मका पिकांचे मोठे नुकसान झाले. परिसरात १५० ते २०० एकरांवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अनेक शेतकऱ्यांची गहू काढणी सुरू होती. अनेक ठिकाणी हार्वेस्टर मिळत नसल्याने गहू शेतात उभा होता. वादळी वाऱ्याने पीक आडवे झाले. पावसात भिजल्याने नुकसान वाढले. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी संकटात सापडला. लासूर स्टेशन येथील अडत व्यापाऱ्यांचीही धांदल उडाली होती. बाजारपेठेत सध्या ५ ते ७ हजार क्विंटल गहू विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडे येत आहे. खरेदी केलेला गहू उघड्यावर पडून होता. अवकाळी पावसाचा फटका त्यांनाही बसला. रात्री जोरदार वारा, विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली होती. दीड ते दोन तास हा वादळी पाऊस सुरू होता. वादळी वाऱ्याने सावंगी येथील वीजपुरवठा रात्रभर बंद होता. भरपाई द्या, अन्यथा आंदोलन करू ः ^गुरूवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर केली नाही, तर शेतकऱ्यांसोबत आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. शासनाने तातडीने पावले उचलणे हाच खरा शेतकरी हिताचा मार्ग ठरणार आहे. -संतोष पाटील- जाधव, शेतकरी नेते

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 7:35 am

जप्त केलेल्या वाळूच्या राखणीसाठी ‘महसूल’ने भवनला उभारली चौकी:800 ब्रास साठ्यातून 150 ब्रासची चोरी, शिल्लक वाळूचा 23 मार्चला लिलाव‎

तालुक्यातील भवन येथे छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरालगत आढळलेल्या ८०० ब्रास वाळूसाठ्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. तहसीलदार संजय देवराये यांनी १४ मार्च रोजी छापा टाकून हा साठा जप्त केला होता. जप्तीनंतरही अज्ञात वाळू तस्करांनी जेसीबी, हायवा, ट्रॅक्टरच्या मदतीने सुमारे १०० ते १५० ब्रास वाळू चोरून नेल्याची माहिती समोर आली. सदर प्रकार उघड होताच महसूल विभागाने घटनास्थळी तातडीने चौकी उभारली. कर्मचारी, पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात केला. तीन आठवड्यांपूर्वी सिल्लोड शहराजवळील खोडकाई वाडी परिसरात तहसीलदार देवराये यांनी काही शेतकऱ्यांच्या शेतातील वाळूचे साठे जप्त केले होते. त्यानंतर तातडीने त्या शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा टाकण्यात आला. भवन येथील वाळूसाठा जप्त करून आठवडा उलटला तरी ठोस निर्णय झालेला नाही. नेमके गौडबंगाल काय, याची तालुक्यात चर्चा सुरू आहे. आठवडा उलटला, तरीही अजून ठोस निर्णय नाही

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 7:34 am

तब्बल 17 वर्षांनी वैजापूरला मिळाले जि.प.चे अध्यक्षपद:महालगावातील अविनाश गलांडे यांची निवड, गाव परिसरात कौतुक‎

वैजापूर तालुक्यातील महालगाव जिल्हा परिषद गटातून जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले भाजपचे उपजिल्हाध्यक्ष अविनाश अशोकराव गलांडे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यांच्यामुळे महालगाव गटाला तब्बल २४ वर्षांनंतर तर वैजापूर तालुक्याला १७ वर्षांनंतर अध्यक्षपद मिळाले. अविनाश गलांडे पाटील यांच्या रूपाने महालगाव गटाला आक्रमक चेहरा मिळाला असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी महालगाव गटातून २००२ मध्ये रंजना सातुरे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळाले होते. त्यानंतर वैजापूर तालुक्याला २००७ मध्ये अघुर गटातून लता पगारे यांच्या रूपाने अध्यक्षपद मिळाले होते. आता १७ वर्षांनी तालुक्याला, २४ वर्षांनी महालगाव गटाला अविनाश गलांडे पाटील यांच्या रूपाने मराठा चेहरा अध्यक्षपदी मिळाला. भाजपने वैजापूरला अध्यक्षपद देऊन शिवसेनेला शह देण्याचे काम केल्याची चर्चा आहे. आता वयाच्या ४१ व्या वर्षी अविनाश पाटील गलांडे यांनी वैजापूरचे नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली मार्च २०२६ मध्ये भाजपकडून महालगाव जिल्हा परिषद गटातून तिसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्याने निवड मिळवली होती. सलग तिसऱ्यांदा जि.प.मध्ये प्रवेश

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 7:32 am

घाटनांद्रात बुकिंग 71, प्रत्यक्षात सिलिंडर मिळाले 56 जणांनाच:गॅस वितरणामध्ये एजन्सीचा गोंधळ‎, अनेकांची सणासुदीत गैरसोय‎

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे सिल्लोड येथील एका गॅस एजन्सीमार्फत बसस्थानकावर गॅस सिलेंडर वाटप करताना बुधवारी (१८ मार्च) मोठा गोंधळ उडाला. दुपारी १२ वाजता सिलिंडरची गाडी पोहोचली; मात्र बुकिंगच्या तुलनेत टाक्यांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यामुळे एजन्सीच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. घाटनांद्रा गावातील ७१ गॅसधारकांनी बुकिंग केले होते, तर प्रत्यक्षात गाडीत फक्त ५६ गॅस टाक्या आणण्यात आल्या होत्या. याशिवाय अनेक ग्राहकांच्या मोबाईलवर ‘गॅस सिलेंडर प्राप्त झाला’ असा संदेश आधीच प्राप्त झाला होता; मात्र त्यांनी प्रत्यक्षात गॅस घेतलेलाच नसल्याचे सांगितले. त्यांच्या गॅस कार्डवरही कोणतीही नोंद नसल्याने परिस्थिती अधिकच गोंधळाची झाली. सकाळी ११ वाजल्यापासून नागरिकांनी नंबर लावून प्रतीक्षा केली होती. रमजान ईद व गुढीपाडवा हे सण असल्यामुळे गॅसची तातडीची गरज असताना अशी परिस्थिती निर्माण झाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. काहींनी एजन्सीकडून काळाबाजार होत असल्याचा संशयही व्यक्त केला. गोंधळ वाढताच सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल ज्ञानदेव ढाकणे घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच पुरवठा अधिकारी मुंडे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्यात आला. त्यांनी ‘ज्यांचे बुकिंग आहे त्यांनाच गॅस द्यावा’ असे निर्देश दिले. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती नियंत्रणात येण्यास वेळ लागला. दरम्यान, या घटनेमुळे घाटनांद्रा परिसरात गॅस वितरण व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गॅस न मिळाल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. साडेपाच वाजता पोलिस बंदोबस्तात वितरण अखेर पोलिस बंदोबस्तात सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान ‌गॅस वाटप सुरू करण्यात आले, आणि उपलब्ध असलेल्या ५६ टाक्यांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे उर्वरित १५ गॅसधारकांना नाराज होऊन रिकाम्या हाताने घरी परतावे लागले. संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना पुढील वितरणात गॅस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 7:32 am

नादरपूरला जलजीवन, तलाव कामाची पाहणी

कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे हास्य जत्रा फेम कलाकार शिवाली परब, पृथ्वीक प्रताप यांनी भेट देऊन केली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची जनजागृती केली. ग्रामपंचायतच्या वतीने जल जीवन मिशन, पाझर तलावातील गाळ काढणे, पाणी आडवा पाणी जिरवा या उपक्रमाची पाहणी करून त्यांनी कौतूक केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जनजागृतीसाठी महाराष्ट्र फेम कलाकार शिवाली परब, पृथ्वीक प्रताप यांनी १३ मार्च रोजी नादरपूर ग्रामपंचायतीला भेट देऊन जनजागृती केली. यावेळी जिल्हा परिषद पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रहार ढोकणे, पंचायत समिती सभापती सुप्रिया घुगे, उपसभापती माया सुराशे, पंचायत समिती सदस्य मीनाबाई पाडसवान, कैकश्या पठाण, सविताताई जंगले व कन्नड तालुक्याचे गटविकास अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक डॉ. ओम प्रकाश रामावत, सहाय्यक गट विकास अधिकारी साहेबराव चव्हाण, विस्तार अधिकारी पंचायत संतोष दारकुंडे, विस्तार अधिकारी डॉ . संजय वाघ यांच्यासह नागरिक उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती ग्रामपंचायतीच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाची पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या वतीने पाझर तलावातील गाळ काढून पाणी साठवणुकीची क्षमता वाढविणे, नदीच्या दोन्ही बाजूला तयार केलेली संरक्षण भिंत या केलेल्या कामाची पाहणी केली. ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या पाणी विषयक जनजागृतीबाबत कौतुक केले.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 7:31 am

संभाजीनगर उद्धवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर:सभापतीच्या निवडणुकीत ‘त्यांनी’ पक्षनिष्ठा सिद्ध करून दाखवावी- कृष्णा डोणगावकर

जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि शिवसेनेचे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांनी आम्हाला विचारण्याचे काही कारण नव्हते. आमच्या पक्षाचे सदस्य सोनवणे यांचा सहा सदस्य फोडून कुणासोबत तरी जाण्याचा प्लॅन होता. संजय निकम हे त्यांच्यासोबत होते. आमचे इतर सदस्यांना त्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी भाजप किंवा शिवसेनेसोबत जाऊ नये असे आदेश होते. आम्ही त्यांच्या आदेशाचे पालन केले. अंबादास दानवे यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. आता हा खेळ थांबणार नाही. सभापतींच्या निवडणुकीत त्यांनी पक्षनिष्ठा सिद्ध करून दाखवावी, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य कृष्णा डोणगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. शुक्रवारी (२० मार्च) परिषदेसाठी विद्या रमेश गायकवाड, सुनंदा चव्हाण, मनोज पेरे, केतन काजे, मनोज गायके आदींची उपस्थिती होती. उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यावर त्यांचेच जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी दानवे यांच्यावर उद्धवसेनेचे सदस्य विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्याचा खुलासा करण्यासाठी सर्व सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. आम्हाला सत्तेत सहभागी होण्याची संधी मिळणार होती या वेळी बोलताना कृष्णा डोणगावकर म्हणाले की, शिवसेना आणि भाजपला अध्यक्ष स्वतंत्रपणे बसवायचा होता. त्यासाठी त्यांनी आम्हाला विनंतीदेखील केली होती. दोघांच्या भांडणांमध्ये आम्हाला नक्कीच सत्तेत बसण्याची संधी मिळणार होती. सत्तेत सहभागी झालो असतो तर आम्हाला विकासकामे करता आली असती. त्यामुळेच आम्हालादेखील सत्तेत सहभागी व्हायचे होते. दोघांच्या भांडणात आम्हालाच सर्व पदे मिळाली असती. मात्र संजय निकम आणि सोनवणे हे फुटले. आम्ही सत्तेत सहभागी होण्याच्या निर्णयामध्ये अंबादास दानवे यांचा कोणताही रोल नाही.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 7:20 am

सीएमचा आदेश:ज्योतिष्यामुळे ग्रह फिरले; चाकणकरांचा राजीनामा, मुंडे, काेकाटेंनंतर राष्ट्रवादीच्या तिसऱ्या पदाधिकाऱ्यावर फडणवीसांना करावी लागली कारवाई

महिला अत्याचारप्रकरणी अटकेतील भोंदू कॅप्टन अशोक खरात याच्या शिष्या रूपाली चाकणकर यांनी ७२ तासांनंतर महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासाठी आदेश द्यावे लागले. फडणवीस सरकारला अडचणीत आणणाऱ्या चाकणकर या राष्ट्रवादीच्या तिसऱ्या नेत्या ठरल्या आहेत. दरम्यान, एसआयटीने खरातचा ऑफिसबॉय नीलेश जाधव याला ताब्यात घेतले. माजी मंत्री केसरकरांचा निकटवर्तीय दीपक लोंढे याची कसून चौकशी केली. सरकारवरचा दबाव वाढल्यावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर चाकणकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा दिला. ‘खरात पती-पत्नी माझे गुरू होते. व्हायरल व्हिडिओ ५-६ वर्षांपूर्वीचे आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला माहिती नाही,’ असा खुलासा चाकणकर यांनी राजीनाम्यानंतर केला. उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीसह खरातच्या पत्नीची सामाईक मालमत्ता नीलेश अमृतकर |उत्तर महाराष्ट्रात अनेक वर्षे सेवा बजावलेल्या आणि सध्या मुंबईत वरिष्ठ पदावर असलेल्या एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीने खरातच्या कुटुंबीयांसोबत नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्या आहेत. पाथर्डी आणिगौळाणे या शहरानजीकच्या परिसरातकोट्यवधी किमतीच्या या मालमत्ता आहेत. त्यांचे ‘दिव्य मराठी’च्या हाती लागलेले हे सातबारा उतारे. खरातची पूर्ण मालमत्ता, भागीदारी, जमिनीच्या व्यवहारांची आयकर विभागाने चौकशी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत विकृत भोंदू कॅप्टन खरातला पोहोचवणारा सिन्नरचा दीपक लोंढे हा माजी मंत्री दीपक केसरकरांचे निकटवर्तीय आहे. एसआयटीने त्याचीही चौकशी केली. लोंढे सिन्नरमध्ये जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायात अग्रेसर आहे. लोंढेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथक कॅप्टन खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचणार आहे. दरम्यान, एसआयटीच्या महिला अधिकाऱ्यांनी नाशिक, अहिल्यानगरमध्ये पीडितांचे जबाब नोंदवून घेतले.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 7:15 am

अवकाळी:मराठवाड्यात 11,572 हेक्टर पिकांचे नुकसान, वीज पडून 2 बळी, 41 पशूही दगावले

मागील तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे ११ हजार ५७२ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले. संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ८,४५५.७८ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, मक्यासह फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. देशाच्या उत्तर भागातील हवामानातील अनपेक्षित बदलांचा परिणाम महाराष्ट्रासह मराठवाड्यात दिसतो आहे. हवामान विभागाने १७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट, जोरदार वाऱ्याची शक्यता व्यक्त केली होती. १७ रोजी छत्रपती संभाजीनगर वगळता इतर जिल्ह्यांत पाऊस झाला. १८ आणि १९ रोजी संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या माहितीनुसार, १६ मार्चपासून झालेल्या पावसामुळे ५३३ गावांतील २० हजार ८९६ शेतकरी बाधित झाले. एकूण ११ हजार ५७२.१३ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. वीज पडून दोघांचा मृत्यू हिंगोली, नांदेडात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. गुलाब मसाराव मारकड ( ३३, रा. पातोंडा, ता. जि. हिंगोली) यांचा वीज पडून मृत्यू झाला. दीपिका संजय राठोड (१६, रा. शिळवणी, ता. देगलूर, जि. नांदेड) यांचाही वीज पडून मृत्यू झाला. शासनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख नुकसानभरपाई प्रस्तावित आहे. विभागात एकूण ४१ जनावरे मृत्युमुखी पडली. यात १८ मोठी, १५ लहान दुभती जनावरे आहेत. भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काय करणे आवश्यक नुकसानभरपाई मिळावी यासाठी काय करावे?- बाधित शेतकऱ्यांनी तत्काळ कृषी विभाग किंवा महसूल विभागाशी संपर्क साधून आपल्या पिकांचे पंचनामे करून घ्यावेत, जेणेकरून शासकीय मदत मिळेल. पीक विमा काढलेला असल्यास क्लेम कसा करावा ?- ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे त्यांनी ७२ तासांच्या आत विमा कंपनीला ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्वरूपात नुकसानीची पूर्वसूचना देणे अनिवार्य आहे. पाऊस किंवा हवामानाबाबत अपडेट्स कुठे मिळतील ?शेतकऱ्यांनी ‘दामिनी’ किंवा ‘मेघदूत’ यांसारख्या ॲपचा वापर करून हवामानाचा रिअल-टाइम अंदाज घेता येईल. वीज पडून मृत्यू झाल्यास तातडीची मदत कशी मिळेल ?- व्यक्ती किंवा जनावरांचा मृत्यू झाल्यास पोलिस पाटील, तलाठ्यांना कळवून स्थळ पंचनामा, शवविच्छेदन करून घ्यावे. अहवाल आणि रीतसर अर्ज प्रशासनाला सादर करावा, जेणेकरून मदत निधी वेळेत मिळेल. कुठे किती शेती बाधितजिल्हा बाधित शेती (हे.)संभाजीनगर ८४५५. ७८जालना १३६४. २०नांदेड ३४. २५बीड १५६. ००लातूर ५२. ००धाराशिव १५०९. ९०एकूण ११५७२. १३ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशजिल्ह्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार करावी. तलाठी, मंडळ अधिकारी यांनाही नुकसानीबाबत माहिती द्यावी. - दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 6:53 am

शाळा-कॉलेजच्या 100 मीटरमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरूच:9 महिन्यांत 23 हजार गुन्हे, 3.77 कोटी दंड वसूल- झिरवाळ

राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. गेल्या नऊ महिन्यांत पोलिसांनी कोफ्टा कायद्यांतर्गत तब्बल २३ हजारांहून अधिक गुन्हे दाखल केले असून सुमारे ३.७७ कोटी रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. दरम्यान, शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असतानाही शासनाचा आदेश धाब्यावर बसवत छुप्या पद्धतीने आजही विक्री सुरूच असल्याचे यातून दिसून येत आहे. आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही आकडेवारी सादर केली आहे . मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, शाळांच्या परिसरात प्रतिबंधित अन्नपदार्थ विकणाऱ्या ६७ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६ ठिकाणी प्रतिबंधित साठा आढळल्याने १ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून सर्व प्रकरणांत एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान केलेल्या कारवाईत तंबाखूजन्य पदार्थाबरोबरच महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम ३३,२२१ केसेस आणि महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम: १,२३,०३३ केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. पुणे, सांगली, ठाण्यात कारवाई; पिंपरी चिंचवडमध्ये ६ गुन्हे दाखल पिंपरी-चिंचवड परिसरात शाळा आणि शासकीय कार्यालयांच्या परिसरात ६ गुन्हे आणि २३९ खटले दाखल. सुमारे १.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सांगली येथे ४३ जणांवर गुन्हे दाखल करून ८,६०० रुपयांचा दंड आणि लेखी नोटीस बजावण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे एकाच कारवाईत ९८ हजार ४०० रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा मनपाला जबाबदार धरले जावे शाळा परिसरातील टपऱ्यांवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास त्यासाठी संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका प्रशासनाला जबाबदार धरले जावे. नियमांचे उल्लंघन करून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांचे ‘शॉप ॲक्ट’ अंतर्गत असलेले परवाने तातडीने रद्द केले पाहिजेत. शाळा परिसरात अनधिकृतपणे उभारलेल्या टपऱ्यांवर स्थानिक प्रशासनाने त्वरित निष्कासनाची कारवाई केली पाहिजे. शाळा प्रशासनाने आणि विशेषतः मुख्याध्यापकांनी या विषयावर धाडसी भूमिका घेणे गरजेचे आहे. शिक्षक, पालक आणि स्थानिक नागरिक यांनी एकत्रितपणे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना व्यसनापासून रोखण्यासाठी मोहिमेचे आयोजन केवळ कारवाईवर न थांबता सरकारने जनजागृतीवरही भर दिला आहे. विद्यार्थ्यांना सकस आहाराच्या सवयी लावणे आणि व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक पोलिस स्टेशन स्तरावर अँटी नार्कोटिक्स स्क्वॉडची स्थापना करण्यात आली असून शाळा-कॉलेजांमध्ये ‘नशामुक्त अभियान’ राबवले जात आहे, असे झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 6:42 am

हॉटेल बंदच्या अफवेमुळे स्वामींच्या प्रकटदिनी भाविकांची संख्या घटली:अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचा वटवृक्ष मंदिरात प्रकटदिनी पाळणा

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला. आखाती देशातील युद्धाच्या परिणामामुळे गॅसटंचाई आहे. त्यामुळे हॉटेल बंद असल्याच्या अफवेमुळे गतवर्षीच्या एक लाख भाविकांच्या तुलने यंदा ५० हजार भाविकच दर्शनासाठी आले होते. गर्दी नसल्यामुळे काही वेळातच भाविकांना दर्शन मिळत होते. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त शुक्रवारी पहाटे ४ वाजता श्रींची काकड आरती मंदिराचे पुरोहित मोहनराव महाराज, मंदार महाराज, व्यंकटेश महाराज यांच्या हस्ते व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित नगर प्रदक्षिणेचा प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते प्रारंभ करून स्वामीनामाचा जयघोष करत भक्तिभावाने नगर प्रदक्षिणा मार्गस्थ झाली. प्रकटदिनी श्री स्वामींचे भक्तांना सुलभपणे दर्शन होण्यासाठी स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवले होते. अभिषेकाची पावती करणाऱ्या स्वामी भक्तांना श्रीफळ, खडीसाखर प्रसाद देण्यात आले. सकाळी १० ते १२ या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानच्या विश्वस्त उज्ज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या वतीने भजन होऊन गुलाल पुष्प वाहण्यात आले. त्यानंतर पाळणा झाला. दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील देवस्थानच्या भक्त निवास भोजनकक्ष येथे सर्व स्वामीभक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन प्रसाद देण्यात आला. यावेळी भाविकांनी परिसरातून मोठ्या प्रमाणात खरेदी केली. दर्शनरांगेमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्वामीभक्तांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिराच्या उत्तरेकडील बाहेरील परिसरातील नवसाच्या मारुती मंदिरापर्यंत रस्त्याच्या लगत कापडी मंडप दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, वयोवृद्ध व विकलांग भाविकांना विशेष दर्शन व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याचे दिसत होते.

दिव्यमराठी भास्कर 21 Mar 2026 6:39 am

जिल्हा बँकेतून शेतक-यांना मदत करणार

तरुणाई, महिलांना काम देण्याचा प्रयत्न, सहकारमंत्री पाटील यांची ग्वाही औसा : प्रतिनिधी देशातील तरुणाई व महिलांना सहकाराच्या माध्यमातून काम देण्याचा प्रयत्न सरकार करीत असून सेवा सोसायटी आता केवळ शेती पुरत्या मर्यादित न राहता विविध प्रकारचे ५१ व्यवसाय या माध्यमातून उभा करता येतात, यासाठी आता प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील […] The post जिल्हा बँकेतून शेतक-यांना मदत करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 21 Mar 2026 2:24 am

ऐसे कैसे झाले भोंदू…!

स्वत:ला नौदलाचा माजी ‘कॅप्टन’ म्हणवून घेणा-या सिन्नर तालुक्यातील श्री शिवनिका संस्थानचा अध्यक्ष अशोक खरात याला महिलेवरील अत्याचार प्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने अटक केली. बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या कार्यालयातून ५८ आक्षेपार्ह चित्रफिती जप्त केल्या. खरात हा भविष्य सांगत असल्याने त्याच्याकडे अनेक बड्या राजकीय नेत्यांसह इतर सर्वच क्षेत्रांतील मातब्बरांचा राबता होता. २०२२ मध्ये […] The post ऐसे कैसे झाले भोंदू…! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Mar 2026 11:42 pm

गारपिटीने २०० हेक्टरवरील पिके बाधीत

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हयात दि. १७ व २० मार्च रोजी देवणी, निलंगा तालुक्या बरोबरच इतर तालुक्यात झालेल्या गारपिटीच्या पावसाने सुमारे २०० हेक्टरवरील रब्बी हंगामातील पिके, भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानीचे पंचानामे करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. लातूर जिल्हयात रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू आदी पिके सध्या काढणीच्या आवस्थेत आहेत. कांही […] The post गारपिटीने २०० हेक्टरवरील पिके बाधीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Mar 2026 11:38 pm

जळकोट-उदगीर महामार्गावर गाव तिथे गतिरोधक बसवा 

जळकोट : प्रतिनिधी नांदेड ते बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर जळकोट ते उदगीर दरम्यान अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महिनाभरातून या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे तर अनेक जण जखमी होत आहेत. याला कारणीभूत वाहनांची अतिरिक्त गती हे असून, गावाजवळ गतिरोधक नसल्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहत नाही. यामुळे […] The post जळकोट-उदगीर महामार्गावर गाव तिथे गतिरोधक बसवा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Mar 2026 11:31 pm

लातूर शहरात स्वच्छता व आरोग्याचा जागर

लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा लातूर शहराचे आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर शहरात ‘स्वच्छता आणि आरोग्य’ यांचा जागर करण्यात आला. विलासराव देशमुख फाउंडेशन आणि लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक १२ मध्ये ‘माझा प्रभाग, स्वच्छ प्रभाग’या अभिनव संकल्पनेचा औपचारिक […] The post लातूर शहरात स्वच्छता व आरोग्याचा जागर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Mar 2026 11:29 pm

महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त पाणपोयीचे उद्घाटन

लातूर : प्रतिनिधी सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यातील क्रांतीचा महत्त्वाचा अध्याय, महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन लातूरनगरीच्या महापौर जयश्रीताई भालचंद्र सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर जयश्रीताई भालचंद्र सोनकांबळे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला महाड चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी नव्हता, […] The post महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त पाणपोयीचे उद्घाटन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Mar 2026 11:28 pm

आज शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा 

लातूर : प्रतिनिधी लातूरच्या सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड रिसर्चच्या द्विदशकपूर्तीचे औचित्य साधून शिक्षकांसाठी ‘विद्यार्थ्यांची मानसिकता : शिक्षकांना काय माहिती असायला हवे’, या विषयावरील विशेष कार्यशाळेसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. मिलिंद पोतदार, डॉ. मुग्धा पोतदार यांनी दिली. आज शनिवार दि. २१ मार्च २०२६ रोजी दुपारी अडीच वाजता लातूर आणि परिसरातील शिक्षकांसाठी […] The post आज शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Mar 2026 11:27 pm

सकाळी ९.३० वाजता ईद-उल-फित्रची नमाज

लातूर : यंदा १९ फेबु्रवारी रोजी पवित्र रमजान महिन्यास प्रारंभ झाला होता. संपूर्ण महिना रोजा (उपवास), नमाज, ईबादतमध्ये मुस्लिम बांधव राहिले. दि. २० मार्च रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने आज दि. २१ मार्च रोजी रमजान ईद (ईद-उल-फित्र) साजरी केली जाणार आहे. आज सकाळी ९ वाजता येथील ईदगावर मुफ्ती ओवेस यांचे ईदच्या संदर्भाने बयान(प्रवचन) होईल. त्यानंतर ९.३० […] The post सकाळी ९.३० वाजता ईद-उल-फित्रची नमाज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Mar 2026 11:25 pm

भादा-औसा परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही

लातूर : भादा व औसा परिसरात भूगर्भातून आवाज आल्याची माहिती दि. २० मार्च रोजी स्थानिक प्रशासनास प्राप्त झाली होती. सदर घटनेची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत तात्काळ ठं३्रङ्मल्लं’ उील्ल३ी१ह्याङ्म१ री्र२ेङ्म’ङ्मॅ८ (ठउर), नवी दिल्ली यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली. त्यांच्या तपासणीनुसार भादा-औसा परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे सदरील घटना भूगर्भातील नैसर्गिक हालचालींमुळे निर्माण […] The post भादा-औसा परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Mar 2026 11:25 pm

‘स्थायी’च्या सभापतीपदी बंडापल्ले यांची निवड निश्चित

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेत सर्वात महत्वाची समिती मानल्या जाणा-या स्थायी समिती सभापतीपदासह परिवहन समिती सभापतीपदाच्या उमेदवारांचे अर्ज दि. २० मार्च रोजी नगरसचिवांकडे दाखल करण्यात आले. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सचिन बंडापल्ले यांनी स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी तर काँग्रेसचेच फैसलखान कायमखानी यांनी परिवहन समितीच्या सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगरपालिकेत काँग्रस-वंचित बहुजन आघाडीचे बहूमत असल्याने […] The post ‘स्थायी’च्या सभापतीपदी बंडापल्ले यांची निवड निश्चित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 20 Mar 2026 11:24 pm

भोंदूबाबा अशोक खरातचे 200 कोटींचे 'बेनामी' साम्राज्य:पाथर्डीत 150 कोटींची जमीन अन् आलिशान फार्महाऊस, बेकायदेशीर संपत्ती उघड

अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत असलेल्या अशोककुमार एकनाथ खरात उर्फ 'कॅप्टन' याच्या संपत्तीचे आणि बड्या ओळखींचे धागेदोरे आता वेगाने समोर येत आहेत. त्याच्या आश्रमात अनेक दिग्गज राजकारणी आणि उद्योजकांची नियमित ये-जा असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत असतानाच, आता खरातच्या अफाट मालमत्तेचाही उलगडा झाला आहे. नाशिक आणि शिर्डी परिसरातील शेतजमिनी, प्लॉट्स आणि भागीदारीतील अनेक मालमत्तांची कागदपत्रे तपासयंत्रणांच्या हाती लागली असून, ही संपत्ती त्याने स्वतःच्या कुटुंबीयांच्या आणि नातेवाईकांच्या नावावर दडवून ठेवल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासामुळे खरातच्या आर्थिक व्यवहारांचे आणि बेकायदेशीर साम्राज्याचे धक्कादायक वास्तव आता प्रकाशात येत आहे. महिला अत्याचार प्रकरणातील संशयित अशोक खरात याने अंकशास्त्राच्या नावाखाली सुमारे 200 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जमवल्याची खळबळजनक माहिती समोर आली असून, काही कागदपत्रांनुसार या संपत्तीचा आकडा त्याहूनही मोठा असण्याची शक्यता आहे. या अफाट मालमत्तेत नाशिकच्या गोविंदनगरमधील एक आलिशान बंगला, कॅनडा कॉर्नर येथील कार्यालय, पाथर्डी परिसरातील 30 एकर जमीन, तसेच सिन्नर, ओझर विमानतळ आणि शिर्डी परिसरातील कोट्यवधींच्या जमिनींचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. 150 कोटी रुपये किमतीची 30 एकर शेतजमीन अशोक खरातचे सिन्नरमधील मिरगाव येथे आलिशान फार्महाऊस असल्याचे समोर आले आहे. खरातची सर्वाधिक संपत्ती नाशिकमधील पाथर्डी गावात एकवटली असून, या भागात त्याच्या मालकीची 20 हून अधिक ठिकाणी मालमत्ता आहे. ज्यामध्ये बाजारभावानुसार सुमारे 150 कोटी रुपये किमतीची 30 एकर शेतजमीन समाविष्ट आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या जमिनींपैकी एक शेतजमीन अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या पत्नी प्रिती आणि अशोक खरातची मुलगी तृप्तीबाला यांनी एकत्रितपणे खरेदी केल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले असून, यामुळे या प्रकरणाला आता नवीन प्रशासकीय वळण प्राप्त झाले आहे. पत्नी कल्पनाच्या नावे 273 चौरस मीटरचा भूखंड पाथर्डी येथील 40 गुंठे जमिनीचा काही हिस्सा अशोक तर उर्वरित भाग पत्नी कल्पना खरात हिच्या नावावर आहे. तसेच याच भागात भाऊ दत्तात्रय खरातच्या नावे 5 एकर आणि मुलगी सृष्टीच्या नावेही जमीन आढळली आहे. नाशिक शहरात पत्नी कल्पनाच्या नावे 273 चौरस मीटरचा भूखंड असून, गोळावणे गावात 2 एकर आणि आडगावमध्येही तिच्याच नावे मालमत्तांची नोंद आहे. याव्यतिरिक्त, विल्होळी गावात सुरेखा दिलीप खरातच्या नावावर एक बिनशेती भूखंड असल्याचे समोर आले असून, खरातच्या या अफाट बेनामी संपत्तीचा तपास आता अधिक तीव्र झाला आहे. शिर्डीमध्ये कल्पना खरातच्या नावे 30 गुंठे जमीन शिर्डीमध्ये कल्पना खरातच्या नावे 30 गुंठे जमीन असून, राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथे अशोक खरातच्या नावे एक बिनशेती प्लॉट आहे. तसेच, राहाता तालुक्यातीलच निघोजमध्ये या दोघांच्या नावे 1 हेक्टर 60 गुंठे इतकी मोठी शेतजमीन आढळली आहे. याव्यतिरिक्त, सिन्नरमध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी आणि कुंदेवाडीमध्ये तीन ठिकाणी खरात कुटुंबाचे भूखंड असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, खरात, त्याची पत्नी, दोन्ही मुली, आई आणि इतर नातेवाईकांच्या नावे एकूण 50 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असल्याचे समोर आले आहे. 'कॅप्टन' पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर अंकशास्त्राच्या नावाखाली भविष्य सांगण्याचा व्यवसाय आणि भोंदूगिरीच्या माध्यमातून त्याने हे अफाट आर्थिक साम्राज्य उभे केल्याचे दिसून येत आहे. ही संपत्ती केवळ आतापर्यंत उघड झालेल्या कागदपत्रांवर आधारित असून, पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास या भोंदूबाबाचे आणखी अनेक काळे कारनामे आणि बेनामी संपत्ती उजेडात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 20 Mar 2026 9:34 pm

रामकथा केवळ ऐकण्यासाठी नाही:श्रीरामांच्या आदर्श मार्गावर चालण्याचा संदेश देते, प. पूज्य रमेशभाई ओझा यांचे प्रतिपादन

भागवत कथा श्रवण केल्यानंतर मानवाचे जीवन पवित्र होते, तर रामकथा केवळ ऐकण्यासाठी नसून प्रभू श्रीरामांच्या आदर्श मार्गावर चालण्याचा संदेश देते असे प्रतिपादन प. पूज्य रमेशभाई ओझा यांनी शुक्रवारी ता. २० येथे केले. येथील रामलीला मैदानावर गजराज बाल गणेश मंडळाच्या वतीने आयोजित श्रीमद्‌ भागवत कथा कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रमेशभाई ओझा यांनी अनेक दाखले देत भागवत कथा मानवाच्या जीवनात काय परिवर्तन घडवून आणते यांचे स्पष्टीकरण दिले. रामायण व महाभारतातील उदाहरणे देत सांगितले की, भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांसारख्या अवतारांनाही जीवनात अनेक दुःख व संकटांचा सामना करावा लागला. त्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींचे फारसे मोल नाही, तर त्यातून मार्ग काढण्याची शिकवण महत्त्वाची आहे. भगवान श्रीरामांनी आपल्याला संकटांशी लढण्याची प्रेरणा दिली, तर भगवान श्रीकृष्णांनी जीवनातील संघर्षात कसे झुंजायचे, याचे तत्त्वज्ञान दिले असल्योच सांगत त्यांनी दोन्ही अवतारांच्या जीवनातील गुढ अर्थ उलगडून सांगितला. भागवत कथेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, भागवत कथा हीच सर्वोत्तम साधना आहे. भागवत आणि रामकथेचे आयोजन आपण का करतो? त्यामागचे खरे प्रयोजन काय आहे?” यावर त्यांनी उत्तर देताना सांगितले की, केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर आत्मपरिवर्तनासाठी कथा ऐकणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे हि देखील एक प्रकारची भक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 20 Mar 2026 9:29 pm

'कफ सिरपमध्ये कुटून कुटून व्हायग्रा टाकायचा':भोंदूबाबा अशोक खरात ओशने जल बनवायचा, अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने मंत्र-तंत्र आणि संमोहनाच्या जोरावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत असतानाच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. खरात हा 'व्हायग्रा' मिश्रित एक विशेष 'जल' तयार करत असे आणि ते मिळवण्यासाठी अनेक बड्या राजकीय व्यक्तींची त्याच्याकडे रांग लागायची, असा दावा दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणाच्या वाढत्या व्याप्तीमुळे त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली असून, या नव्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, अशोक खरात हा एक ओशनो जल बनवायचा. एका कफ सिरपमध्ये पाणी टाकायचा आणि त्यामध्ये कुटून कुटून व्हायग्रा टाकायचा आणि हे ओशने जल बनवायचा. हे ओशने जल घेण्यासाठी अनेक राजकारणी त्यांच्या गाड्या आणि हेलिकॉप्टर पाठवायचे. त्यामध्ये एक व्यक्ती तर तिरूपति बालाजी मंदिराचा ट्रस्टी आहे, असा आरोप दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत याला 'महाराष्ट्राची एपस्टीन फाईल' असे संबोधले असून, सर्वपक्षीय नेते त्याच्याकडून सल्ला आणि 'ओशनो जल' मागवत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगतानाच, दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांचा एक जुना व्हिडिओ समोर आणला आहे, ज्यामध्ये त्यांनी खरातची तुलना थेट पांडुरंगाशी केली होती. या पार्श्वभूमीवर, चाकणकर यांचा राजीनामा का घेतला जात नाही आणि त्यांना कोणाचे संरक्षण लाभत आहे, असा संतप्त सवाल विचारत दमानिया यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

दिव्यमराठी भास्कर 20 Mar 2026 9:09 pm

रमजान ईदनिमित्त पुण्यात वाहतूक बदल:गोळीबार मैदान चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

रमजान ईदनिमित्त पुण्यात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. लष्कर भागातील गोळीबार मैदान चौकातील ईदगाह मैदानावर शनिवारी (२१ मार्च) होणाऱ्या सामुहिक नमाज पठणामुळे सकाळी ६ ते ११:३० वाजेपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. या नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे. गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या जड वाहनांना पुणे-सोलापूर रस्त्यावरील भैरोबा नाला चौकातून वानवडी आणि लुल्लानगर चौकातून इच्छितस्थळी जावे लागेल. तसेच, गोळीबार मैदान चौकातून स्वारगेट किंवा शहरात येणाऱ्या वाहनांनी भैरोबा नाला चौकातून एम्प्रेस गार्डन आणि घोरपडीमार्गे प्रवास करावा. लष्कर भागातील मम्मादेवी चौक ते गोळीबार चौक दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. सीडीओ चौकातून गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. या वाहनांनी खटाव बंगला चौकातून नेपियर रस्तामार्गे बिशप स्कूल रस्त्याचा वापर करावा. खटाव बंगला चौकातून उजवीकडे वळण्यास तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. स्वारगेटकडून सोलापूर रस्त्याने हडपसरकडे जाणाऱ्या वाहनांनी शंकशेठ रस्त्यावरील चिमणराव ढोले पाटील चौकातून (सेव्हन लव्हज चौक) गुलटेकडी मार्ग सॅलिसबरी पार्क चौकाकडे जावे. खटाव बंगला चौकातून नेपियर रस्त्याने किंवा लुल्लानगरमार्गे सोलापूर रस्त्याकडे जाता येईल. सोलापूर बाजार पोलीस चौकी ते गोळीबार मैदान चौक दरम्यानची वाहतूक देखील बंद ठेवण्यात येणार आहे. लुल्लानगर चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे येणाऱ्या जड वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 20 Mar 2026 8:03 pm

शहीद भगत सिंग मानवतावादी, समतावादी होते:किरणजीत सिंग यांचे पिंपरी येथे 'शहीद भगत सिंग आणि आर्य समाज' विषयावर व्याख्यान

शहीद भगत सिंग हे मानवतावादी आणि समतावादी होते. केवळ बंदूक आणि तलवारीच्या जोरावर ब्रिटिशांना भारतातून हाकलून खरे स्वातंत्र्य मिळणार नाही, तर संपूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे, असे मत भगत सिंग यांचे पुतणे किरणजीत सिंग यांनी पिंपरी येथे व्यक्त केले. त्यांनी 'शहीद भगत सिंग आणि आर्य समाज' या विषयावर व्याख्यान दिले. सध्याचे स्वातंत्र्य भगत सिंग, सुखदेव, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद यांसारख्या क्रांतिकारकांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य नाही. त्यांना जातवाद, धर्मवाद, प्रांतवाद आणि भ्रष्टाचार मान्य नव्हता. आजच्या शेतकरी आत्महत्यांमुळे ते व्यथित झाले असते, असेही सिंग म्हणाले. भगत सिंग यांच्या तीन पिढ्यांना बलिदानाचा इतिहास आहे. त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १९०७ रोजी झाला होता. बालपणी त्यांच्यावर गुरुगोविंद सिंग, आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांचा प्रभाव होता. आजच्या पिढीने अशा महान क्रांतिकारकांचे चरित्र अभ्यासावे आणि महर्षी दयानंद सरस्वती यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त आर्य समाजाचे विचार पुढे न्यावे, असे आवाहन किरणजीत सिंग यांनी केले. पिंपरी कॅम्प येथील आर्य समाज भवन येथे हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पिंपरी आर्य समाज अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, मंत्री हरेश तिलोकचंदानी, सचिव संजय वासवानी, समन्वयक उत्तम दंडीमे, डॉ. नयनकुमार आचार्य, नलिनी देशपांडे, राजाभाऊ गोलांडे, मारुती भापकर, अतुल आचार्य आणि सुहास पोफळे आदी उपस्थित होते. भगत सिंग १२ वर्षांचे असताना, ब्रिटिश सरकारने १३ एप्रिल १९१९ रोजी मार्शल लॉ लागू केला होता. त्यावेळी जालियनवाला बाग येथे जनरल डायरने हजारो निरपराध नागरिकांवर बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर भगत सिंग लाहोरहून जालियनवाला बाग येथे आले आणि तेथील माती स्वतःच्या घरी घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याची शपथ घेतली. कानपूर येथे एका वृत्तपत्रात काम करत असताना, चंद्रशेखर आझाद आणि इतर क्रांतिकारकांशी त्यांचा संपर्क झाला. ब्रिटिशांनी नेमलेल्या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय प्रतिनिधी नव्हता. याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, ज्यात लाला लजपतराय यांच्यासारख्या ज्येष्ठ क्रांतिकारकांचा बळी गेला. या घटनेमुळे भगत सिंग खूप व्यथित झाले. बलिदानाशिवाय संघर्ष पूर्ण होणार नाही, यावर त्यांचा विश्वास होता. एका भगत सिंगाला फाशी दिली, तरी लाखो भगत सिंग जन्म घेतील आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देतील, असे त्यांना वाटत होते. भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू या क्रांतिकारकांना २४ मार्च १९३१ रोजी फाशी देण्याची आणि त्यांच्यासोबतच्या इतर १५ क्रांतिकारकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामुळे देशभरात तीव्र आंदोलन सुरू झाले. यानंतर ब्रिटिश सरकारने घाबरून भगत सिंग यांना एक दिवस अगोदरच फाशी दिली.

दिव्यमराठी भास्कर 20 Mar 2026 8:03 pm