भंडारा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी ८५,६०८ मतदार आपले भवितव्य ठरवणार आहेत. अंतिम मतदार यादीनुसार, यात ७११ दुबार मतदारांचा समावेश आहे. २ डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी या दुबार मतदारांची सखोल पडताळणी केली जाईल, त्यानंतरच त्यांना मतदान करता येईल. भंडारा नगरपरिषद ही 'ब' श्रेणीतील असून, येथे १६ प्रभागांसाठी द्विसदस्यीय रचना आहे. प्रभाग क्रमांक सहासाठी मात्र त्रिसदस्यीय रचना असल्याने, एकूण ३५ नगरसेवक निवडले जातील. ८५,६०८ मतदारांपैकी ७११ मतदारांची नावे दोन प्रभागांमध्ये दुबार आढळली आहेत. मतदार यादीबाबत भंडारा नगरपरिषदेकडे २१५ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतींवर कार्यवाही करत ७,५०० मतदारांना त्यांच्या मूळ प्रभागात हलवण्यात आले आहे. अंतिम यादी ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली, तर प्रभागवार यादी ७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. निवडणुकीसाठी स्ट्राँग रूम मुस्लिम लायब्ररी चौकातील अल्पसंख्याक वसतिगृहात असेल. १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत याच ठिकाणी उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीन ठेवण्याची आणि निकालांची घोषणा करण्याची व्यवस्थाही याच परिसरात करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पाळत ठेवणारी चमू तैनात केली जाईल. तसेच, आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. निवडणुकीची घोषणा होताच उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. काही पक्षांचे आणि काही स्वतंत्र उमेदवार समाजमाध्यमांवर सक्रिय झाले आहेत. रील आणि इतर पोस्टद्वारे ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मतदारयादीत अनेक त्रुटी आढळल्या आहेत. या यादीत साडेचार हजार मृत आणि दुबार मतदारांची नावे समाविष्ट आहेत, तर १ जुलै २०२५ नंतर नाव नोंदवलेल्या ३० हजार ३४३ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. यामुळे सदोष मतदारयादीच्या आधारेच निवडणुका होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. जिल्हा निवडणूक शाखेकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना १ जुलै २०२५ रोजीची मतदारयादी सुपूर्द करण्यात आली आहे. या यादीनुसारच नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. या यादीत मतदारसंघ सोडलेल्या २५ हजार १४४ मतदारांची नावे अजूनही कायम आहेत, तर ४ हजार ६३५ मृत आणि दुबार मतदारांची नावेही समाविष्ट आहेत. मतदारयादीत नाव नोंदवणे, वगळणे किंवा एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात नाव बदलणे ही एक नियमित प्रक्रिया आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या अंतिम तारखेपर्यंत मतदारांना आपले नाव नोंदवता येते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखेपर्यंतचीच मतदारयादी ग्राह्य धरली जाते. या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी माहिती दिली की, १ जुलै २०२५ रोजी प्राप्त झालेल्या मतदारयादीनुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील. त्यानंतर झालेले बदल या निवडणुकीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. १ जुलै २०२५ च्या यादीनुसार जिल्ह्यातील एकूण मतदार ४५ लाख ९७ हजार ३४३ होते, तर २ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ही संख्या ४६ लाख १९ हजार १०६ झाली आहे. १ जुलै २०२५ पासून आतापर्यंत मतदार यादीत ३० हजार ३४३ नवीन मतदारांची नोंद झाली आहे, तर ४ हजार ६३५ मृत आणि दुबार मतदार वगळण्यात आले आहेत आणि २५ हजार १४४ मतदारांनी मतदारसंघ बदलले आहेत. विधानसभा मतदारसंघानुसार मृत आणि दुबार नावांची संख्या खालीलप्रमाणे आहे: काटोल (२१६), सावनेर (३२८), हिंगणा (३४९), उमरेड (४१९), दक्षिण पश्चिम (५२६), दक्षिण (३६५), पूर्व (३५३), मध्य (२१२), पश्चिम (२४३), उत्तर (२९९), कामठी (१०८७) आणि रामटेक (२३८).
भंडारा जिल्ह्यातील चार नगरपरिषद निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर, पक्षविरोधी कारवाया केल्याने भाजपमधून निलंबित करण्यात आलेले साकोलीचे माजी आमदार बाळा काशीवार यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांनी आपल्या राजकीय कौशल्याचा वापर करत काशीवार यांना पुन्हा पक्षात आणले. फुके यांनी आमदार भोंडेकर यांचे निकटवर्तीय जॅकी रावलानी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भगवान बावनकर यांनाही भाजपमध्ये सामील करून घेतले आहे. बाळा काशीवार यांना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अविनाश ब्राह्मणकर यांना साकोलीतून उमेदवारी देण्यात आली होती. यामुळे नाराज झालेल्या काशीवार यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार डॉ. सोमदत्त करंजेकर यांना पाठिंबा दिला होता. या पक्षविरोधी भूमिकेमुळे त्यांना पाच वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. २०१४ च्या निवडणुकीत काशीवार साकोलीतून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते, परंतु २०१९ मध्ये त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यावेळी प्रचारादरम्यान त्यांनी डॉ. फुके यांच्यावर टीका केली होती. मात्र, आता नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी फुके यांच्या मध्यस्थीने पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एका भाजप जिल्हा नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीनंतर मोठे 'गिफ्ट' देण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली होती. डॉ. फुके यांनी काशीवार यांच्या साकोलीतील राजकीय अनुभवाचे महत्त्व ओळखून त्यांना नगरपरिषद निवडणुकीच्या रणनीतीत महत्त्वाचे स्थान देण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. काशीवार यांच्या या घरवापसीचा आगामी निवडणुकीत भाजपला किती फायदा होतो, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 'व्हीव्हीपॅट' (VVPAT) प्रणाली वापरण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून, आयोगाने चार दिवसांच्या आत यावर आपले म्हणणे स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. याचिकेत गुडधे पाटील यांनी म्हटले आहे की, जर निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी व्हीव्हीपॅट सुविधा असलेली मतदानयंत्रे (ईव्हीएम) उपलब्ध करून देऊ शकत नसेल, तर या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात याव्यात. ईव्हीएममध्ये मतदाराला आपले मत योग्यरित्या नोंदवले गेले की नाही, याची खात्री पटत नाही. व्हीव्हीपॅट प्रणालीमुळे मतदाराला काही क्षणांसाठी त्याने कोणाला मत दिले याची पावती पाहता येते, ज्यामुळे पारदर्शकता येते आणि मतदाराचा विश्वास वाढतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाने १ जुलै २०२५ ची मतदारयादी अंतिम केली आहे. या पार्श्वभूमीवर गुडधे पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ते गुडधे यांच्या वतीने ॲड. पवन डहाट आणि ॲड. निहालसिंग राठोड यांनी बाजू मांडली. याचिकेत 'ईव्हीएम'वर सामान्य जनतेचा विश्वास नसल्याचे नमूद करत, मतदारांसाठी खातरजमा करण्याचा 'व्हीव्हीपॅट' हा एकमेव मार्ग असल्याचे म्हटले आहे. लोकशाहीत लोकांचा विश्वास टिकून राहणे महत्त्वाचे आहे, असेही याचिकेत स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणुकीच्या तोंडावर सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊनही त्याचे पालन न करणाऱ्या दगाबाज सरकारचा शेतकऱ्यांनी पंचनामा करावा, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जवळाबाजार व डोंगरकडा येथे केले. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा व जवळाबाजार येथे ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे, खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे, जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत, संदेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, महायुतीचे सरकार दगाबाज सरकार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासन अद्यापही पाळले नाही. खरीप हंगामात पिक, जमिनीसोबतच शेतकऱ्यांचे संपूर्ण आयुष्यच वाहून गेले असून आता त्यांना मदतीची खरी गरज असतांना सरकार जून महिन्यात कर्जमाफी देण्याचे सांगत आहे. जून महिना कशासाठी असा सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही, काही ठिकाणी पंचनामे झाले नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शासकिय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे असे त्यांनी सांगितले. शासनाकडून शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. ८६००० कोटी रुपयांचा महामार्ग पूर्ण होईपर्यंत १.५० लाख कोटी रुपयांचा होईल. त्यासाठी शासनाकडून सुधारीत प्रशासकिय मान्यता काढली जाईल. मात्र शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे आहेत अन शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे का नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शक्तिपीठ महामार्ग कंत्राटदार अन दलालांचे उखळ पांढरे करण्यासाठी असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. राज्यात शेतकरी अडचणीत असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारच्या निवडणुकीत बिझी होते. आता ते पवारांनी बळकावलेल्या जमीनीवर पांघरून घालण्यात बिझी असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना म्हणून आम्ही काम करणारच आहोत पण आता शेतकऱ्यांनी व नागरीकांनीही पुढे येऊन सरकारची वोट बंदी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
राजभवनात ‘वंदे मातरम’चे सूर निनादले
मुंबई : बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम् या गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राजभवन येथे संपूर्ण ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, एडीसी अभयसिंह देशमुख यांसह राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व जवानांनी ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन केले. सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी […] The post राजभवनात ‘वंदे मातरम’चे सूर निनादले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील मुंढवा येथील वादग्रस्त जमीन प्रकरणाला नवी कलाटणी येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी ही जमीन शासनाकडे परत देण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जातेय. या प्रकरणात झालेल्या अनियमिततेबाबत तक्रारी आणि चौकशी सुरू असल्याने, पार्थ पवार यांनी राजकीय वाद टाळण्यासाठी जमीन परत देण्याचा पर्याय निवडण्याची शक्यता आहे. ही जमीन मूळतः दलितांसाठी राखीव असल्याचे सांगण्यात आले होते, त्यामुळे हा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जमीन परत देण्याचा निर्णय घेतल्यास सरकारच्या चौकशी प्रक्रियेलाही नवी दिशा मिळू शकते. मुंढवा जमीन खरेदी प्रकरणात महसूल विभागाने अधिकृत चौकशी सुरू केली असून, त्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आहेत. त्यांच्यासोबत आणखी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीला एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दरम्यान अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती दिल्याचे समजते. राज्य सरकारने या व्यवहाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याने या प्रकरणाचा राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर मोठा प्रभाव पडत आहे. प्रकरण अंगाशी आल्यानंतर जमीन परत करण्याचा प्रयत्न - अंधारे या संपूर्ण वादावर प्रतिक्रिया देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. प्रकरण अंगाशी आल्यानंतर जमीन परत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण इतक्यावर हे प्रकरण संपणार नाही. जमीन परत केल्याने गैरव्यवहार धुतला जाणार नाही. चौकशी पूर्ण झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, असे अंधारे म्हणाल्या. त्यांनी अजित पवारांवरही अप्रत्यक्ष टीका करत विचारले की, वडिलांना मुलाने काय केलंय हे ठाऊक नव्हतं का? पालकमंत्री म्हणून जबाबदारी टाळता येईल का? अंधारे यांच्या या वक्तव्यामुळे या वादाला नवा राजकीय रंग चढला आहे. पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने कोरेगाव पार्कजवळील मुळशी तालुक्यातील मुंढवा येथील सुमारे 40 एकर जमीन शीतल तेजवाणी यांच्याकडून खरेदी केली होती. या व्यवहारात दिग्विजय पाटील हे कंपनीचे एक टक्के भागीदार आहेत, तर उर्वरित 99 टक्के भागीदारी पार्थ पवार यांची असल्याचे सांगितले जाते. या जमिनीचा मूळ हक्क आणि मालकीबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर शीतल तेजवाणी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधक मात्र या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. हा निर्णय घेतल्यानंतरही वाद थांबेल असे दिसत नाही राजकीयदृष्ट्या संवेदनशील अशा या प्रकरणात आता सर्वांचे लक्ष पार्थ पवार यांच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. जर त्यांनी जमीन शासनाकडे परत केली, तर त्यातून प्रकरण शमवण्याचा प्रयत्न म्हणून त्याचा अर्थ घेतला जाईल. परंतु, सुषमा अंधारे यांच्यासारख्या विरोधकांनी आधीच प्रश्न उपस्थित केल्याने हा निर्णय घेतल्यानंतरही वाद थांबेल असे दिसत नाही. राज्य सरकारच्या चौकशी समितीचा अहवाल काय निष्कर्ष देतो, आणि त्यानंतर पार्थ पवार किंवा अजित पवार यांच्याविरोधात पुढील कारवाई होते का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. मुंढवा जमीन प्रकरण केवळ कायदेशीरच नव्हे, तर राजकीय दृष्ट्याही महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत चर्चेचा गाजलेला विषय ठरण्याची शक्यता आहे.
अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील कोंढवा परिसरात ४० एकर जमिनीचा गैरव्यवहार केल्याचे आता उघडकीस आले आहे. त्यावरून, विरोधक आक्रमक झाले असून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, या व्यवहाराशी माझा दुरान्वये संबंध नाही. ३-४ महिन्यांपूर्वीच मला अशी कुण कुण कानावर आली होती, तेव्हाच मी असलं […] The post अजित पवारांकडून कामाच्या व्यापात राहिले असेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठा आरक्षणाच्या नेते मनोज जरांगे पाटील आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या वादाने पुन्हा वाढला आहे. जरांगे पाटील यांनी मुंडेंवर घातपाताचे आणि अन्य गंभीर आरोप केले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन ते आरोप खंडित केले आणि स्वतःची बाजू मांडली. मुंडे म्हणाले की, त्यांचा ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करावी आणि तरीही सत्य बाहेर येत नसेल तर तपास सीबीआयकडे द्यावा. या वक्तव्यांनंतर जरांगे पाटीलही थेट माध्यमांसमोर येऊन पलटवार केला; त्यांनी धनंजय मुंडे यांना धन्या, म्हणून संबोधत ऑडिओ क्लिप ऐकवली आणि त्यातले पुरावे दाखवले. जरांगे पाटील म्हणाले की, त्यांच्या आणि मुंडेंमध्ये वैयक्तिक वैर नाही, पण जे घडले ते चेष्टेचा विषय नाही. त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे पोलिसांच्या अधीक्षकांना दिल्याच्या तक्रारीत आठ-दहा जणांची नावे आहेत आणि त्यात मुंडे यांचे नावही आहे. जरांगे यांनी स्पष्ट केले की, ते राजकीय हेतूने चेष्टा करीत नाहीत, तर सार्वजनिक सुरक्षा आणि आरक्षणाच्या प्रश्नांसंदर्भातील गंभीर बाब आहे. त्यांनी पुढे म्हटले की, जर कोणाच्याही शंका असेल तर तो नार्को टेस्ट करा, आणि ते स्वतःही त्यासाठी तयार आहेत. तांत्रिक तपासणीची मागणी ऑडिओ क्लिप संदर्भात जरांगे पाटील म्हणाले की त्यांच्याकडे काही रेकॉर्डिंग्स आहेत ज्यात धनंजय मुंडेंशी संबंधित काही आरोपींची माहिती आहे. त्यांनी ते क्लिप मीडियाला ऐकवली आणि सांगितले की क्लिपमधील दोन व्यक्ती आरोपी आहेत. जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना थेट विचारले की ते कोणत्या आरोपींना पाठवत होते आणि कोणाच्या माध्यमातून गाडी किंवा इतर सोयी उपलब्ध करून दिल्या जात होत्या. त्यांनी सीडीआर, ड्रोन मॅपिंग आणि इतर तांत्रिक तपासणीची मागणी केली आहे, आणि त्या तपासण्या करूनच सत्य समोर यावे, असे त्यांनी म्हटले. समाजासाठी रक्तही सांडण्यास तयार मनोज जरांगे यांनी पुढे आव्हान केले की ते उद्या गृहमंत्रालय, पोलिस अधीक्षक कार्यालय, कलेक्टर कार्यालय आणि कोर्टात जाऊन नार्को टेस्टसाठी अर्ज करणार आहेत. त्यांनी म्हटले की, जर धनंजय मुंडे सीबीआयची मागणी करत असतील तर तेही चौकशीला तयार आहेत. जरांगे पाटील पुढे म्हणाले की ते समाजासाठी काम करतात आणि समाजासाठी रक्तही सांडण्यास तयार आहेत; त्यामुळे जे काही आरोप आहेत, त्यांची सखोल चौकशी व्हावी, असा त्यांचा आग्रह आहे. धनंजय मुंडे यांनी जरांगेंचे आरोप खोडुन काढले या वादामुळे स्थानिक राजकारणात तणाव वाढला आहे. धनंजय मुंडे यांनी जरांगेंचे आरोप खोडुन काढले असले तरी जरांगे यांनी ठाम भूमिका घेत पुढे विविध सरकारी विभागांमध्ये अर्ज करणार असल्याची आणि तांत्रिक पुरावे सादर करून तथ्य बाहेर काढणार असल्याची घोषणा केली आहे. आता पोलिस आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणती पावले उचलली जातील, नार्को व इतर तपास कसा पुढे जाईल हे महत्त्वाचे आहे. दोन्ही बाजूंचे याचवेळी निवेदन आणि पुरावे सार्वजनिक होत असल्याने हा वाद पुढील काही दिवसांपासून राजकीय आणि कायदेशीर प्रक्रियेत वाढत राहण्याची शक्यता आहे. या संदर्भातील खालील बातम्या देखील वाचा.... धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येचा कट रचला:मनोज जरांगेंचा आरोप, म्हणाले- मला ठार मारण्यासाठी बीडच्या माणसाला अडीच कोटींची सुपारी दिली जरांगेंचे आरोप खोटे, CBI चौकशी व्हावी:मनोज जरांगे राजकीय हेतूने मला टार्गेट करताय, जरांगेंच्या आंदोलनात 500 जणांचे जीव गेले- धनंजय मुंडे
सुविचार गौरव पुरस्कार सोहळा:निवेदिता सराफ, सावनी रवींद्र, सुखदा खांडकेकर यांचा गौरव!
प्रेक्षकांच्या आनंदातच आम्हा कलाकारांचे यश असते. आमच्या यशाचे श्रेय एकट्या व्यक्तीचे नसते. तर लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार यांच्या परिश्रमांतून कलावंत घडत असतो. नाटक, चित्रपट,व मालिकांमधील भूमिकांना प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद व भरभरून प्रेम यातूनच कामाची उर्जा मिळते अशी भावना ज्येष्ठ सिने अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी व्यक्त केली. नाशिक शहरातील गुरुदक्षिणा सभागृहात सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी कला क्षेत्रातील पुरस्कार स्वीकारल्यानंतर निवेदिता सराफ बोलत होत्या. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो. माझ्यासोबत पती अशोक सराफ यांची खंबीर साथ असल्यानेच मी इतकी वर्ष यशस्वीरित्या काम करत असल्याची भावना अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. आयुष्यात पुढे जाण्यासाठी आपल्या जोडीदाराची भूमिका महत्त्वाची असते. जोडीदाराच्या सहकार्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळेच आयुष्यात जोडीदाराचा मोठा वाटा असतो असे देखील निवेदिता सराफ म्हणाल्या. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा सन्मान करण्यासाठी सुविचार गौरव पुरस्कार देण्यात येतात. यंदा कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल चित्रपट अभिनेत्री निवेदिता सराफ, संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांना विशेष सुविचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांना सुविचार नाशिक गौरव या पुरस्काराने गौरविण्यात आले. यंदाचे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे पाचवे पर्व होते. नाशिक ही आपली कर्मभूमी- पार्श्वगायिका सावनी रवींद्र राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रवींद्र यांनी यशाचे श्रेय आई-वडिलांना दिले. नाशिक ही आपली कर्मभूमी असल्याचे सांगतानाच नाशिक शहरासह ग्रामीण भागात देखील अनेक कार्यक्रम केल्याची आठवण त्यांनी सांगितली. यावेळी प्रेक्षकांच्या आग्रहास्तव सावनी रवींद्र यांनी त्यांचे लोकप्रिय असलेले गीत सादर करीत प्रेक्षकांची दाद मिळवली. सुविचार नाशिक गौरव पुरस्काराने जबाबदारी वाढली- अभिनेत्री सुखदा खांडकेकर मी नाशिककर असून स्वताच्या गावी सुविचार नाशिक गौरव पुरस्काराने होत असलेल्या कौतुकामुळे खूप आनंद होत असल्याची भावना यावेळी अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांनी व्यक्त केली. हा एखाद्या भूमिकेचा सन्मान नसून, आजवरच्या कामाची पोचपावती व पुढील कामासाठीचे आशीर्वाद आहेत. तसेच या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढल्याची जाणीव असल्याचे देखील अभिनेत्री सुखदा खांडकेकर यावेळी म्हणाल्या. जेष्ठ नेते श्रीराम शेटे यांना “सुविचार जीवन गौरव” पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच कर्करोग तज्ञ डॉ. शैलेश बोंदर्डे (वैद्यकीय), उद्योजक जितेंद्र शहा (उद्योग), निरुपा तायडे (उद्योग महिला), मनीषा बागुल (शैक्षणिक), सुवर्णा जगताप (सहकार), कैलास देवरे (कृषी), फुटबॉलपटू प्रतीक्षा देवांग (क्रीडा), सुनील मोरे (सामाजिक) यांना सुविचार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुविचार मंच संस्थेचे संस्थापक अॅड.रविंद्र नाना पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या शानदार कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर ६७ वा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका सावनी रविंद्र, अभिनेत्री सुखदा खांडकेकर, खासदार भास्कर भगरे, आमदार पंकज भुजबळ, जेष्ठ उद्योजक हेमंत राठी, पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्रा. डॉ. प्रशांत सूर्यवंशी, डॉ. रवींद्र सोनवणे, डॉ.स्वप्निल तोरणे, रामराव पाटील, महेश फूगट, राहुल अढांगळे, जीत मोरे, दीपा बक्षी, सुनील बच्छाव आदी उपस्थित होते. सुविचार गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन संयोजक आकाश पगार यांनी केले. यावेळी नाशिक शहरातील वेगवेगळ्या कलाकारांनी कथ्थक, गायन, नृत्त्य, बासरी वादन आदींचे सादरीकरण केले. स्थानिक कलाकारांच्या या कलांना देखील नाशिककरांनी भरभरून दाद दिली.
माझी आणि जरांगेंची नार्को टेस्ट करा
परळी : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट)नेते धनंजय मुंडे यांवर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आरोपांना उत्तर देण्यासाठी धनंजय मुंडेंनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जरांगेंचे आरोप फेटाळले आणि नार्कोटेस्टची मागणी केली. […] The post माझी आणि जरांगेंची नार्को टेस्ट करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गरीब वीज ग्राहकांना मिळणार २५ वर्षे मोफत वीज
मुंबई : आर्थिकदृष्ट्या दुुर्बल आणि दारिद्र्यरेषेखालील वीज ग्राहकांना घरांवर एक किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून तब्बल २५ वर्षे वीज मोफत मिळणार आहे. ही सुविधा उपलब्ध करण्यासाठीच्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप(स्मार्ट) योजनेच्या अंमलबजावणीकरिता महावितरणने काम सुरू केले आहे. दारिद्र्यरेषेखालील १.५४ लाख तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल ३.४५ लाख अशा महिना १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणा-या […] The post गरीब वीज ग्राहकांना मिळणार २५ वर्षे मोफत वीज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘अमेडिया’चा आणखी एका सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा
पुणे : शहरात सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताब्याचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. बोपोडी परिसरातील ९ हेक्टर शासकीय जमीन खासगी व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या आपल्या नावावर दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. बोपोडी येथील सुमारे ९ हेक्टर जमीन सन १८८३ पासून राज्याच्या कृषी विभागाच्या ताब्यात आहे. ही जमीन सरकारी वहिवाटीत असून तिचा मालक म्हणून कृषी विभागाचे […] The post ‘अमेडिया’चा आणखी एका सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर गंभीर आरोप करत राज्य सरकारवर थेट हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी दावा केला आहे की दलितांसाठी राखीव असलेली 1800 कोटी रुपयांची सरकारी जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीला विकण्यात आली. याचबरोबर या व्यवहारावर लागणारे स्टॅम्प ड्युटीचे शुल्क देखील माफ करण्यात आले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी या प्रकाराला थेट जमीन चोरी असं नाव देत सरकारवर तीव्र टीका केली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, महाराष्ट्रात 1800 कोटी रुपयांची सरकारी जमीन, जी दलितांसाठी राखीव होती, ती फक्त 300 कोटी रुपयांत एका मंत्र्याच्या मुलाच्या कंपनीला विकण्यात आली. वरून स्टॅम्प ड्युटीही माफ करण्यात आली, म्हणजे लूट आणि त्यावर कायदेशीर शिक्का. असा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आणि विरोधकांमध्ये शब्दयुद्ध पेटलं आहे. राहुल गांधी यांनी यावर पुढे म्हटलं की, ही केवळ जमीन चोरी नाही, तर ही त्या सरकारची ओळख आहे जी स्वतः मतदान चोरी करून सत्तेत आली आहे. या सरकारला ना लोकशाहीची किंमत आहे, ना जनतेच्या हक्कांची, आणि ना दलितांच्या अधिकारांची. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केलं आणि विचारलं, मोदीजी, तुमची ही शांतता बरेच काही सांगते. तुम्ही शांत आहात कारण हे सरकार त्या लुटारूंच्या आधारावर उभे आहे, जी दलित आणि वंचितांचा हक्क हिसकावून घेत आहेत का? कंपनीचा संपूर्ण व्यवहार सार्वजनिक करण्याची मागणी या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणावर सत्ताधारी आघाडीवर टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्रातील विरोधकांनी राहुल गांधी यांच्या विधानाला पाठिंबा देत पार्थ पवारांच्या कंपनीचा संपूर्ण व्यवहार सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. तर सत्ताधारी पक्षाकडून हा सर्व आरोप राजकीय हेतूने केला जात असल्याचं म्हणत काँग्रेसवर पलटवार करण्यात येत आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे की, हा व्यवहार कायदेशीररीत्या करण्यात आला असून त्याचा दलित आरक्षणाशी काहीही संबंध नाही. सरकारकडून यावर काय भूमिका घेतली जाईल दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाने राज्यातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. पार्थ पवारांच्या कंपनीला जमीन विक्री हा व्यवहार आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात होता. आता राहुल गांधी यांच्या आरोपांमुळे या प्रकरणाला राष्ट्रीय स्तरावरचं वळण मिळालं आहे. सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी विरोधकांनी हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात मांडण्याची तयारी सुरू केली आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाची चौकशी होईल का आणि सरकारकडून यावर काय भूमिका घेतली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राहुल गांधी यांच्या या थेट हल्ल्यामुळे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले एकंदरीत, राहुल गांधी यांच्या या थेट हल्ल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आहे. दलितांसाठी राखीव जमीन, सरकारी यंत्रणांची भूमिका आणि सत्ताधाऱ्यांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप, या तिन्ही गोष्टींनी या प्रकरणाला राजकीय स्फोटक रूप दिलं आहे. आता सरकार चौकशीसाठी पुढे येतं का, की या प्रकरणावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची नवी मालिका सुरू होते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पुण्यातील कोंढवा जमीन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव चर्चेत आल्यानंतर आता राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही खोचक प्रतिक्रिया दिली आहे. अजित दादांना जेव्हा या प्रकरणाची कुणकुण लागली होती, तेव्हाच त्यांनी हा व्यवहार थांबवला असता तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून लवकरच सत्य समोर येईल, असं सांगत त्यांनी विरोधकांकडून होत असलेल्या सततच्या राजीनाम्याच्या मागणीवर पलटवार केला. पुण्यातील कोंढवा परिसरातील 40 एकर जमीन व्यवहारावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या जमिनीचा बाजारभाव सुमारे 1800 कोटी रुपये इतका असल्याचे सांगितले जाते. मात्र, ही जमीन केवळ 300 कोटी रुपयांत खरेदी करण्यात आल्याचा आणि त्यासाठी केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. या प्रकरणात पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचा सहभाग असल्याची माहिती समोर आली असून, या व्यवहारामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल तोटा झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी स्पष्ट केलं की, या व्यवहाराशी माझा दुरान्वयेही संबंध नाही. ते म्हणाले की, माझ्या कानावर तीन-चार महिन्यांपूर्वी या व्यवहाराबाबत कुजबुज आली होती. तेव्हा मी स्पष्ट सांगितले होते की, माझ्या नावाने किंवा माझ्या कुटुंबाच्या नावाने असले काही झाले, तर मला ते मान्य नाही. आता या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतल्यानंतरच मी काही बोलेन. अजित पवारांच्या या भूमिकेनंतरही विरोधक मात्र त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी 300 कोटींच्या सौद्यात शासनाला कोट्यवधींचा तोटा झाला, आणि एवढ्या मोठ्या जमिनीवर 500 रुपयांचीच स्टॅम्प ड्युटी भरली गेली, हे शक्यच नाही, असा आरोप केला आहे. अंबादास दानवे यांनी पुढे म्हटलं की, कोरेगाव पार्क परिसरात पार्थ पवार आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याच्या तयारीत होते. पण ज्या कंपनीचे भांडवल फक्त 1 लाख रुपये आहे, त्या कंपनीने 300 कोटींचा व्यवहार कसा केला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दानवेंच्या म्हणण्यानुसार, या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने अवघ्या 48 तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केली आणि केवळ 27 दिवसांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली, हा वेग शासनाच्या हस्तक्षेपाशिवाय शक्यच नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे विरोधकांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे. दरम्यान, या प्रकरणावर राज्याचे वरिष्ठ मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अजित दादांना जेव्हा या प्रकरणाची कुजबुज कळली होती, तेव्हाच त्यांनी हा व्यवहार थांबवला असता, तर अशी परिस्थिती उद्भवली नसती. मात्र, त्यांच्या कामाच्या व्यापामुळे काही निर्णय त्यांच्या नकळत परस्पर घेतले गेले असतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. विखे पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी आधीच चौकशीचे आदेश दिले आहेत. लवकरच संपूर्ण सत्य समोर येईल. मात्र, विरोधकांना सध्या कोणतेही काम उरले नसल्याने ते कोणत्याही कारणावरून राजीनाम्याची मागणी करत आहेत, असा पलटवार त्यांनी केला. राजकारण सुपारीपर्यंत पोहोचले, ही अत्यंत चिंताजनक बाब - विखे पाटील या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी सध्याच्या राजकारणातील वातावरणावरही भाष्य केले. ते म्हणाले की, आज राजकारणातील प्रगल्भता आणि वैचारिक लढाई संपली आहे. आता राजकारण सुपारीपर्यंत पोहोचले आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. अशा प्रवृत्तीचा निषेध करावा तेवढा कमी आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, जर या प्रकरणात काही तथ्य असेल, तर चौकशी व्हायलाच हवी. पण आरोप करण्यापूर्वी पुरावे सादर करणे आवश्यक आहे. भागीदारांवर कारवाई, पण मुख्य व्यक्तीवर नाही राज्य सरकारकडून या संपूर्ण जमीन व्यवहाराची चौकशी सुरू आहे. महसूल विभागाने प्राथमिक अहवाल सादर करताना काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नोंदणी प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांनी मुद्रांक अधिभार आणि कराची योग्य वसुली केली नाही, अशी तक्रार करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील, जमीन विक्रेती शीतल तेजवानी आणि काही सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तथापि, अजित पवार किंवा पार्थ पवार यांच्या नावावर थेट गुन्हा नोंद झालेला नसल्याने विरोधकांनी भागीदारांवर कारवाई, पण मुख्य व्यक्तीवर नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी सध्या या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र चौकशी समिती गठित केली असून, पुढील काही दिवसांत त्यांचा प्राथमिक अहवाल येण्याची शक्यता आहे. दरम्यान, विरोधक मात्र अजित पवारांच्या भूमिकेवर ठाम आहेत. सत्ता असताना गैरव्यवहार झाकण्याचा प्रयत्न केला जातोय. राज्याच्या तिजोरीला हजारो कोटींचा फटका बसला आहे, त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. दुसरीकडे, अजित पवार गटाने हे आरोप राजकीय षड्यंत्र असल्याचे सांगून विरोधकांवरच निशाणा साधला आहे. महायुती घटक पक्षांमध्येही अंतर्गत तणाव राज्यात आधीच मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि रोजगार या मुद्यांवरून अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा वेळी अजित पवारांच्या कुटुंबाशी संबंधित हा जमीन व्यवहाराचा वाद उफाळल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे. सरकारमधील महायुती घटक पक्षांमध्येही या प्रकरणामुळे अंतर्गत तणाव वाढल्याचे दिसते. आता चौकशी अहवालात काय निष्कर्ष येतात आणि त्यानंतर अजित पवार कोणती भूमिका घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.
पुण्यातील मुंढवा भागातील 1,800 कोटींच्या बाजारभावाची जमीन केवळ 300 कोटींना खरेदी केल्याच्या प्रकरणात मोठा नवा खुलासा समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित या व्यवहारात शासनाचं आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पार्थ पवारांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह आतापर्यंत आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वादग्रस्त जमीन व्यवहारात फक्त 500 रुपयांची स्टँप ड्युटी भरल्याचं उघड झाल्यानंतर प्रशासन आणि राजकारण दोन्ही ठिकाणी खळबळ माजली आहे. या प्रकरणात आता आणखी एक महत्त्वाचा पुरावा समोर आला आहे. 22 एप्रिल 2025 रोजी पार्थ पवार यांनी आपल्या भागीदार दिग्विजय पाटलांना सहीचे अधिकार देण्याचा ठराव अमेडिया कंपनीच्या बैठकीत मंजूर केला होता. या ठरावाची प्रत आता तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागली आहे. या ठरावानंतर अवघ्या महिनाभरात, म्हणजेच 20 मे 2025 रोजी वादग्रस्त जमिनीचा दस्त तयार झाला, आणि त्यावर दिग्विजय पाटलांनी सही केली. विशेष म्हणजे या दस्ता सोबत पार्थ पवारांच्या सही अधिकाराच्या पत्राची प्रतही जोडलेली असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे या संपूर्ण व्यवहारात पार्थ पवारांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. बावधन पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. पोलिसांनी अमेडिया कंपनीचा मूळ दस्त ताब्यात घेतला असून, या दस्तावर पार्थ पवारांची सही आहे का, ते दस्ताच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित होते का, याचा शोध घेतला जात आहे. शिवाय जमीन विक्रेती शीतल तेजवानीकडून घेतलेलं कुलमुखत्यार पत्र पोलिसांनी जप्त केलं आहे. गेल्या दोन तासांपासून दुय्यम निबंधक कार्यालयात चाललेल्या छापेमारीत पोलिसांना काही महत्त्वाची कागदपत्रे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या छाप्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्टॅम्प ड्युटी महसूल तोटा दरम्यान, या प्रकरणात शासनाच्या तिजोरीला 5 कोटी 89 लाख रुपयांचा स्टॅम्प ड्युटी महसूल तोटा झाल्याचं नोंद झालं आहे. त्याचप्रमाणे नोंदणी प्रक्रियेत सहभागी असलेल्या काही अधिकाऱ्यांनी मुद्रांक अधिभार आणि कर वसूल केला नाही, अशी तक्रार महसूल विभागाने केली आहे. या कारणास्तव शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील, आणि नोंदणी अधिकारी रविंद्र तारू यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा नोंद झालेला नसल्याने विरोधकांनी भागीदारावर कारवाई, पण मुख्य व्यक्तीवर नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिल्याचा ठराव उघड सरकारकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. महसूल विभागाने प्राथमिक अहवालानुसार काही अधिकाऱ्यांना निलंबित केले असून, विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती एक महिन्याच्या आत तपास अहवाल सादर करणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणावरही पूर्वग्रहाने निर्णय घेण्यात येणार नाही. मात्र, पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिल्याचा ठराव उघड झाल्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, माहिती नाही
पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित जमीन खरेदी व्यवहारामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पुणे परिसरातील महार वतनाच्या ४० एकर जमिनीच्या व्यवहारात शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आणि आर्थिक अफरातफर केल्याचा थेट आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तर या प्रकरणावरून थेट अजित पवारांना […] The post अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, माहिती नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील मुंढवा परिसरातील 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीशी संबंधित या व्यवहारात शासनाच्या मुद्रांक शुल्कात मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, या प्रकरणात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जमीन विक्रेता शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीचा भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रविंद्र तारू यांचा समावेश आहे. या प्रकरणात पार्थ पवारांचे नाव तक्रारीत नसल्याने विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचे विधान करत, चौकशी सुरू आहे आणि रिपोर्ट आल्यानंतरच पुढील कारवाई होईल, असं स्पष्ट केलं आहे. महसूलमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की, प्राथमिक चौकशीत जे लिहून देणारे, सही करणारे आणि नोंदणी प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होते, त्यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पार्थ पवारांचे नाव प्राथमिक टप्प्यात आढळलेलं नाही. मात्र, पुढील चौकशीत कोणतेही नवीन पुरावे समोर आल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. त्यांनी सांगितलं की, खरेदी-विक्रीच्या वेळी कंपनीच्या दस्तऐवजांवर कोणी सही केली, व्यवहाराचे कागद कोणी तयार केले आणि नोंदणी प्रक्रियेत कोण सहभागी झाले, याची नोंद शासनाकडे आहे. अजितदादांनीही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे आरोपांवर चर्चा करण्याऐवजी चौकशीचा निकाल येऊ द्यावा, असं बावनकुळे म्हणाले. या प्रकरणात एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती पुणे पोलिस आयुक्तांनी दिली आहे. तक्रारीनुसार, शीतल तेजवानी यांनी जागेची पॉवर ऑफ एटर्नी असल्याचं सांगून जमीन विक्री केली. दिग्विजय पाटील यांनी पार्थ पवारांचे भागीदार म्हणून दस्तावर सही केली आणि शासनाचे पाच कोटी 89 लाख रुपयांचं मुद्रांक शुल्क बुडवल्याचा आरोप आहे. रविंद्र तारू हे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकारी असून, त्यांनी व्यवहाराच्या वेळी आवश्यक अधिभार आणि कर वसूल केला नाही. या सगळ्या प्रक्रियेत शासनाला आर्थिक तोटा झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. पार्थ पवारांच्या सही अधिकार पत्राची प्रतही दस्तासोबत दरम्यान, या प्रकरणातील एक महत्त्वाचा दस्तऐवज आता समोर आला आहे. 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीने एक ठराव पारित केला होता, ज्यात पार्थ पवार यांनी व्यवहाराशी संबंधित सहीचे अधिकार त्यांच्या भागीदार दिग्विजय पाटलांना देण्याचा निर्णय घेतला होता. या ठरावानंतर अवघ्या महिनाभरात, म्हणजेच 20 मे 2025 रोजी वादग्रस्त जमिनीचा दस्त झाला. हा दस्त दिग्विजय पाटलांच्या सहीने झाल्याचं स्पष्ट होतं, आणि पार्थ पवारांच्या सही अधिकार पत्राची प्रतही दस्तासोबत जोडण्यात आली होती. त्यामुळे चौकशीत पार्थ पवारांची भूमिका अप्रत्यक्षपणे का होईना, पण महत्त्वाची ठरणार आहे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोषींना वाचवण्याचा प्रश्नच येत नाही महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितलं की, प्राथमिक अहवालानुसार जे दोषी दिसले त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील चौकशी खारगे समिती करत आहे. विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती गठित करण्यात आली असून, ती महिनाभरात अहवाल सादर करेल. महसूल विभागाने निलंबनाची कारवाई केली असून, पुढील टप्प्यात सखोल तपास होणार आहे. सर्व पुरावे आणि व्यवहारातील प्रत्येक टप्प्याची चौकशी केली जाईल. दोषींना वाचवण्याचा किंवा निर्दोषांवर अन्याय करण्याचा प्रश्नच येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
बेकायदा बांधकामांबाबत राज्यातील सर्वच महापालिका निद्रावस्थेत
मुंबई : राज्यभरातील वाढत्या बेकायदा बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा संताप व्यक्त केला. तसेच ही समस्या वाढत असताना राज्यातील महापालिका प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचे ताशेरेही न्यायालयाने ओढले. पोलिस ठाण्यासाठी तसेच कर्मचारी निवासस्थानांच्या बांधकामासाठी राखीव असलेल्या जागेवरील अतिक्रमणांविरुद्ध कारवाई न करणा-या मालेगाव महानगरपालिकेच्या निष्क्रियतेवर न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने बोट ठेवताना […] The post बेकायदा बांधकामांबाबत राज्यातील सर्वच महापालिका निद्रावस्थेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी आरोप झाल्यानंतर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी प्रतिक्रिया याआधी अजित पवारांनी दिली होती. यानंतर आता अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. जमीन घोटाळ्याच्या प्रकरणात अजित पवारांवर देखील गंभीर आरोप होत […] The post अजित पवार राजीनामा द्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कंपनीत ९९ टक्के शेअर असलेल्या पार्थ पवारला सूट का?
पुणे : अमेडिया कंपनीत पार्थ पवारांचे ९९ टक्के शेअर्स असून केवळ १ टक्के शेअर असणारे त्यांचे पार्टनर दिग्विजय पाटील यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला. याचा अर्थ पार्थ पवारला वाचविण्यात येत आहे असा होतो तर पार्थला सूट का देण्यात येत आहे असा सवाल सर्वसामान्यांतून उभा राहत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुण्यातील जमीन खरेदीच प्रकरण गाजत आहे. […] The post कंपनीत ९९ टक्के शेअर असलेल्या पार्थ पवारला सूट का? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे पुण्यातील जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात नाव आल्यानंतर चहूबाजूंनी टीका सुरु झाली आहे. अजित यांचे विरोधक तुटून पडले आहेत. व्यक्तिगत पातळीवरची अत्यंत बोचरी टीका सुरु आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 1800 कोटीची जागा पार्थ पवार यांच्या कंपनीला 300 कोटी रुपयात दिल्याचा आरोप आहे. ओबीसी नेते लक्ष्मण […] The post अजित पवार दरोडेखोर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुलगा ३०० कोटी खर्च करतो आणि बाप झोपेत
पुणे : मुलगा ३०० कोटी खर्च करतो आणि बापाला माहितही नाही असे शक्य आहे का? आणि तुमचे तुम्हाला तरी पटते का? असा सवाल अजित पवारांना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी विचारला आहे. पुण्यातील कथित जमीन व्यवहार प्रकरणाशी आपला दुरान्वयानेही संबंध नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. परंतु, त्याचवेळी मागे तीन-चार महिन्यांपूर्वी अशा प्रकारच्या […] The post मुलगा ३०० कोटी खर्च करतो आणि बाप झोपेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्राच्या राजकारणात पार्थ पवार यांचे जमीन खरेदी प्रकरण गंभीर वाद निर्माण करत आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी या प्रकरणावर टीका करत, ही जमीन बेकायदेशीर पद्धतीने खरेदी झाल्याचा आरोप केला आहे. खडसे म्हणाले की, ज्यांनी या व्यवहारात सहकार्य केले आहे, ते गुन्हेगार ठरतील, तसेच प्रस्तुत केलेली कागदपत्रे चुकीची आहेत. पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या जागेवर बनावट कागदपत्रांचा उपयोग करून जमीन दुसऱ्या नावावर दाखविण्यात आली असल्याचेही खडसे यांनी उघड केले. या प्रकरणावर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. खडसे म्हणाले की, ही जमीन मूळत: ‘महार वतन’ जमीन आहे, जी 1955 मध्ये सरकारकडे जमा झाली होती. खाते उतारा बंद असल्यास ही जमीन खरेदी करता येऊ शकत नाही. तरीसुद्धा बेकायदेशीर पद्धतीने ही खरेदी करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. बेकायदेशीर खरेदी फौजदारी गुन्हा एकनाथ खडसे यांनी पुढे सांगितले की, मी महसूल मंत्री असताना फाईल माझ्याकडे परवानगीसाठी आली होती. तपासणी केल्यानंतर मला कळले की 2013 मध्ये बाळासाहेब थोरात मंत्री असताना देखील ही फाईल त्यांच्या कडे होती आणि बिल्डर्स व डेव्हलपर्स कडून दबाव आणण्यात आला होता. ही सरकारची जमीन आहे. बेकायदेशीर खरेदी हा फौजदारी गुन्हा आहे, ज्यांनी यात सहकार्य केले ते गुन्हेगार ठरतील. प्रस्तुत केलेली कागदपत्रे चुकीची आहेत. शहरांमध्ये अशा प्रकारचे भूखंडाचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत, हेही गंभीर बाब आहे. हा राजकीय खेळ असू शकतो भाजपच्या शीर्ष नेतृत्वावरही टीका करत खडसे म्हणाले की, मुख्यमंत्री पदाचे दावेदार असताना काही घटना घडल्यावर राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होतो, असा विरोधी पक्ष ठरवतो तसा सत्ताधारी पक्ष ठरत असतो. हे राजकीय खेळ देखील असू शकतो. पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणात बेकायदेशीरता स्पष्ट आहे आणि त्यात सहकार्य करणाऱ्यांवर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि प्रशासनाने योग्य ती पावले उचलली पाहिजेत, असा त्यांनी इशारा दिला.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित जमीन खरेदी व्यवहारामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरातील महार वतनाच्या जागेच्या व्यवहारात महसुलाची अफरातफर झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घेतली सखोल चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी […] The post मुलाचा व्यवहार बाप अनभिज्ञ? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मलठण : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड व जांबूत परिसरातील बिबट्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीनही कुटुंबीयांच्या दुर्दैवी घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केले. या घटना अतिशय दुर्दैवी आणि दु:खद असल्याचे सांगतानाच, पीडित कुटुंबांना सांत्वन भेट दिली. वनविभागाला तातडीने परिसर बिबट्यामुक्त करण्याचे आदेश देतानाच, ग्रामस्थांच्या इतर मागण्यांनाही प्रतिसाद दिला. पिंपरखेड (ता. शिरूर) परिसरात गेल्या […] The post सर्व बिबट्यांचे रेस्क्यू करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धनंजय मुंडेंनी दिली हत्येची सुपारी
जालना : मराठा आरक्षणासाठी राज्यात मोठे आंदोलन उभे करणारे नेते मनोज जरांगे यांच्या हत्येचा २.५ कोटी रुपयांचा कट उघडकीस आल्यानंतर, आता या प्रकरणाला मोठा राजकीय वळण मिळाले आहे. जरांगे यांनी थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. जरांगे यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगताना, मराठा समाजाने शांत राहण्याचे आणि राज्यातील सर्व […] The post धनंजय मुंडेंनी दिली हत्येची सुपारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील मुंढवा भागातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. या प्रकरणात पार्थ पवारांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह शितल तेजवानी आणि रविंद्र तारू या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाचे मुद्रांक शुल्क बुडवल्याचा आरोप या तिघांवर करण्यात आला आहे. मात्र पार्थ पवारांवर अद्याप कोणतीही गुन्हेगारी कारवाई झालेली नाही, आणि हाच मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे. या खरेदी व्यवहारात पार्थ पवारांच्या कंपनीने बाजारभावाने 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये घेतल्याचा आरोप आहे. यासाठी फक्त 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क भरल्याचेही समोर आले आहे. या खरेदी प्रक्रियेत शासनाचे नियम मोडून उद्योग संचालनालयाने केवळ 48 तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचे उघड झाले आहे. संपूर्ण व्यवहार केवळ 27 दिवसांत पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात पार्थ पवारांवर थेट गुन्हा दाखल झाला नसला तरी त्यांच्या कंपनीचा आणि भागीदारांचा सहभाग स्पष्टपणे दिसून येत असल्याने प्रशासनाची भूमिका प्रश्नचिन्हाखाली आली आहे. गृह खात्याने उलटी गिनती सुरू केली आहे का? या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी दिग्विजय पाटील हे पार्थ पवारांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार आहेत. त्यांच्यावर जाणूनबुजून गुन्हा दाखल केल्याचा आरोप दिग्विजय पाटील यांच्या वडिलांचे मित्र बिभीषण लोमटे यांनी केला आहे. फक्त 1 टक्का भागीदारी असतानाही दिग्विजय यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि उरलेल्या 99 टक्के भागीदारांना वाचवण्यात आलं. गृह खात्याने उलटी गिनती सुरू केली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. लोमटे यांच्या मते, दिग्विजय पाटील हे शिकणारे आणि निष्पाप युवक असून त्यांना राजकीय कारणांमुळे टार्गेट केले जात आहे. बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे प्राथमिक निष्कर्ष गुन्हा दाखल झालेल्या तिघांमध्ये शितल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निबंधक कार्यालयातील अधिकारी रविंद्र तारू यांचा समावेश आहे. शितल तेजवानी यांनी जागेची पॉवर ऑफ एटर्नी असल्याचे सांगत जमीन विकली, तर रविंद्र तारूंनी नोंदणी प्रक्रियेदरम्यान 2 टक्के अधिभार आणि कर वसूल केला नाही. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने या सर्व प्रकरणाचा तपास सुरू केला असून समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणात बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत, त्यामुळे आणखी काही नावं लवकरच या प्रकरणात समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येण्याची शक्यता दरम्यान, या संपूर्ण घोटाळ्याबाबत विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक लाख रुपयांच्या भांडवलाची कंपनी एवढा मोठा व्यवहार कसा करू शकते? असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीने शासनाचे नियम धाब्यावर बसवून मोठा फायदा करून घेतल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी वाढत चालली आहे. प्रशासनाने तपास जलद गतीने सुरू ठेवला असून या प्रकरणातील अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बांगलादेशच्या महिला कर्णधाराचे सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचे आरोप
ढाका : बांगलादेशच्या महिला क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जहानारा आलम हिने माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी सदस्य मंजुरुल इस्लाम यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. सध्या मानसिक आरोग्याच्या कारणास्तव संघाबाहेर असलेली जहानारा हिने खुलासा केला की, २०२२ महिला वनडे विश्वचषकादरम्यान राष्ट्रीय संघ व्यवस्थापनातील काही लोकांकडून तिला अशोभनीय प्रस्ताव देण्यात आले होते. तिने सांगितले […] The post बांगलादेशच्या महिला कर्णधाराचे सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचे आरोप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विक्की-कतरिना झाले मुलाचे आई-बाबा
मुंबई : बॉलिवूडचे स्टार कपल विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या घरी गोड गोडुल्या चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. जोडप्याने आपल्या बाळाचे स्वागत केले आहे. वयाच्या ४२ व्या वर्षी कतरिना कैफने मुलाला जन्म दिला आहे. विक्की कौशलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन गूड न्यूज शेअर केली आहे. विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांनी सोशल मीडियावर […] The post विक्की-कतरिना झाले मुलाचे आई-बाबा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील मुंढवा परिसरातील सरकारी जमिनीच्या खरेदी व्यवहारावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने 1800 कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत खरेदी केली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारात शासनाची 152 कोटी रुपयांची फसवणूक झाली असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. या व्यवहारात सामील असलेल्या सह निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे. बावधन पोलिसांनी दुय्यम निबंधक कार्यालयात छापा टाकत सर्व कागदपत्रे जप्त केली असून, तपासात अनेक नवीन बाबी समोर येण्याची शक्यता आहे. मुंढव्याच्या या वादग्रस्त जमिनीचा इतिहासही तितकाच गुंतागुंतीचा आहे. ब्रिटिश राजवटीपूर्वी ही जमीन महार समाजातील लोकांना वतन म्हणून दिली होती. ब्रिटिश काळात येथे समृद्ध जैवविविधता आणि दाट झाडी पाहून एक बोटॅनिकल गार्डन उभारण्यात आलं होतं. या परिसरात सुमारे 400 प्रकारच्या वनस्पतींपैकी 50 दुर्मीळ जातींच्या आहेत. स्वातंत्र्यानंतर ही जमीन सरकारने ताब्यात घेतली आणि महसूल विभागाकडे तिची नोंद केली गेली. 1973 साली ही जमीन बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या संस्थेला 15 वर्षांच्या करारावर देण्यात आली, जो 1988 मध्ये 50 वर्षांसाठी म्हणजे 2038 पर्यंत वाढवण्यात आला. मात्र, 2006 मध्ये शितल तेजवानी या महिलेनं वतनदारांच्या वंशजांकडून पॉवर ऑफ अॅटर्नी घेतली आणि नंतर तीच जमीन अमेडिया कंपनीला विकली गेली. त्यामुळे सरकारी जमीन खासगी मालकीत गेल्याचा आरोप होत आहे. कंपनीने दिलेलं पत्र आणि सादर केलेले कागद यात तफावत या प्रकरणात अनेक अनियमितता झाल्याचं नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक राजेंद्र मुठे यांनी मान्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, या व्यवहारात मुद्रांक शुल्क चुकवलं गेलं असून खोटे कागदपत्र तयार करण्यात आले आहेत. या सर्व बाबींची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. सात दिवसांत समितीचा अहवाल सादर केला जाईल. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मुठे यांनी पुढे सांगितले की, 2023 च्या उद्योग धोरणानुसार डेटा सेंटर आणि आयटी पार्कसाठी काही प्रमाणात मुद्रांक शुल्कात सूट असते, मात्र कंपनीने दिलेलं पत्र आणि सादर केलेले कागद यात तफावत आहे. या आधारे पुढील चौकशी केली जात आहे. कागदपत्रांमध्ये खोटेपणा असल्याची शक्यता मुठे यांनी आणखी एक महत्वाची बाब स्पष्ट केली, या व्यवहारात मेट्रोसिस आणि एलबीटी सेसचा सहा कोटींचा रकमेचा भरणा झाला नाही. त्यामुळे नोटीस बजावण्यात आली आहे. व्यवहारात अनियमितता झालेली आहे, आणि कंपनीने सादर केलेल्या काही कागदपत्रांमध्ये खोटेपणा असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या कंपनीवर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत सखोल तपास सुरू केला आहे. जमीन खासगी कंपनीला देण्यासाठी संगनमत दरम्यान, या जमिनीच्या व्यवहारात तहसीलदार सूर्यकांत येवले, शितल तेजवानी आणि दिग्विजय पाटील (संचालक, अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी) यांच्या विरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार प्रांत अधिकाऱ्यांनी दाखल केली असून, सरकारी जमीन खासगी कंपनीला देण्यासाठी संगनमत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात अनेक शासकीय कागदपत्रांचा गैरवापर झाल्याचं निदर्शनास आणलं आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली असून, विरोधकांनी या प्रकरणात अजित पवार आणि महायुती सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई या संपूर्ण घोटाळ्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी पार्थ पवार यांच्या कंपनीविरुद्ध कारवाईची मागणी करत, सरकारी जमिनींच्या बाबतीत दोन कायदे असू नयेत, असा सवाल उपस्थित केला आहे. दुसरीकडे, शासकीय यंत्रणा या प्रकरणात कसून तपास करत असून, समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल, अशी माहिती मिळाली आहे. हा व्यवहार नेमका कायदेशीर आहे की भ्रष्टाचाराच्या माध्यमातून घडवण्यात आला आहे, याचं उत्तर आगामी तपासात स्पष्ट होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावेळी त्यांच्या दोन्ही मुलांवर गंभीर आरोप झाले असून, राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पार्थ पवार यांच्या अमेडीया होल्डिंग्ज एलएलपी या कंपनीने 1800 कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणामुळे अजित पवार अडचणीत सापडले असतानाच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलावर म्हणजेच टँगो दारू कंपनीशी संबंधित भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत आरोप करताना म्हटलं की, अजित पवार स्वतःची संपत्ती लपवण्यासाठी आणि तुरुंगवास टाळण्यासाठी भाजपात गेले आहेत. पण पक्ष बदलल्यानंतरही त्यांचे कारनामे सुरूच आहेत. दोन्ही मुलांना ते नंबर दोनचे धंदे करायला लावतात आणि स्वतः दस नंबर बनून उपमुख्यमंत्रीपदाची खुर्ची घट्ट पकडून बसले आहेत. सपकाळ म्हणाले की, अजित पवार यांच्या एका मुलाचे नाव भ्रष्टाचारात आलंय, तर दुसऱ्याचा दारू व्यवसायात. त्यांच्या एका मुलाची कंपनी पुण्यातील सरकारी जमिनीच्या व्यवहारात अडकली आहे, तर दुसऱ्याची टँगो नावाची दारू कंपनी आहे, ज्याला अजित पवार यांनी अबकारी मंत्री म्हणून निर्णय घेत संरक्षण दिलं, असा आरोप त्यांनी केला. अजित पवार यांना भस्म्या आजार झाला सपकाळ यांनी पुढे म्हटलं की, टँगो कंपनीला थेट फायदा मिळावा म्हणून अजित पवारांनी अबकारी खातं आपल्या ताब्यात ठेवलं आहे. या खात्याशी संबंधित महत्त्वाचे निर्णय ते स्वतः घेतात, ज्यामुळे टँगोला आर्थिक लाभ मिळतो. त्यामुळे राज्यात डबल गेम, डबल भ्रष्टाचार सुरू आहे. एकीकडे जमिनीचे व्यवहार, तर दुसरीकडे दारू कंपनीला मिळालेलं संरक्षण, हा डबल धमाकाच आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली. त्यांनी अजित पवार यांना भस्म्या आजार झाला असल्याचं सांगत म्हटलं की, हा असा आजार आहे की कितीही खाल्लं तरी अजून खावंसं वाटतं. आधीच एवढं खाल्लंय, तरी अजून किती खाणार? मुलगा 300 कोटी रुपयांचा व्यवहार करतो आणि वडिलांना माहिती नसते? दरम्यान, पार्थ पवार यांच्या कंपनीच्या जमीन खरेदी प्रकरणानंतर विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, मुलगा पुण्यात 300 कोटी रुपयांचा व्यवहार करतो आणि वडिलांना काहीच माहिती नसते, हे कसं शक्य आहे? बाजारभावापेक्षा कमी दरात जमीन विकत घेतली गेली आहे, त्यामुळे या प्रकरणात चौकशी आवश्यक आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, खडसेंच्या काळात असाच आरोप झाला होता, आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. मग अजित पवारांनीही नैतिकतेचा आधार घेत राजीनामा द्यावा. कोरेगाव पार्क प्रकरणात न्यायमूर्ती झोटिंग समितीप्रमाणे चौकशी समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमावी, अशी मागणी त्यांनी केली. अजित पवार यांच्या प्रतिक्रियेची उत्सुकता या सर्व आरोपांमुळे अजित पवार आणि त्यांचा परिवार राजकीय संकटात सापडला आहे. विरोधकांनी या प्रकरणाला भ्रष्टाचाराचा डबल डोस म्हटलं असून, राज्यभरात या विषयावर चर्चा सुरू आहे. अजित पवार यांच्या प्रतिक्रियेची सर्वत्र उत्सुकता आहे, मात्र त्यांनी अद्याप या आरोपांवर मौन बाळगले आहे. दरम्यान, भाजप नेते मात्र अजित पवार यांच्या बाजूने बचावात्मक भूमिका घेत असून, हे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं सांगत आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणाचा तपास आणि अजित पवारांची भूमिका राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करू शकते, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
हिंगोली शहरात साडेचार हजाराच्या बनावट नोटा सापडल्या:विधी संघर्षग्रस्त बालकासह दोघे ताब्यात
हिंगोली शहरात एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह दोघांच्या तपासणीमध्ये 4500 रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या असून या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 7 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांची चौकशी सुरु केली आहे. हिंगोली शहरात पालिका निवडणुका सुरु असून या निवडणुकीच्या निमित्ताने शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या शिवाय रात्री दहा वाजल्यानंतर फिरणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. त्यासाठी हिंगोली शहर पोलिसांनी स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून शहरात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, हिंगोली शहरात गुरुवारी ता. 6 रात्रीच्या सुमारास पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, शेख मुजीब, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, शंकर ठोंबरे, जोगे यांचे पथक गस्तीवर होते. सदर पथक इंदिरा गांधी चौकात आल्यानंतर त्या ठिकाणी दोघे जण संशयास्पदरीत्या फ़िरतांना दिसून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी करण्यास सुरवात केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. या प्रकारामुळे पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यामध्ये एका विधी संघर्ष ग्रस्त बालकांसोबत देवानंद उर्फ सोनू जाधव याचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांची पंचा समक्ष तपासणी केली असता त्यांच्याकडे 4500रुपयांच्या प्रत्येकी पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी सदरील नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी जमादार शेख मुजीब यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. ७ गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांची सखोल चौकशी केली जात असून त्यांनी या नोटा कोठून आणल्या होत्या याची माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
राज्यात पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणावरून राजकीय तापमान वाढले आहे. या प्रकरणावर उबाठाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत प्रशासनालाही सवाल केला आहे. तर पार्थ पवारांना नेमके कशामुळे वाचवले जात आहे, याचे उत्तर आता प्रशासनाने द्यायला हवे. संविधानाची भाषा सर्वांसाठी एक आहे, पण कृतीत फरक दिसत असल्याने सामान्य नागरिकांमध्येही प्रश्न निर्माण होत आहेत, असेही अंधारेंनी म्हटले आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, अजित पवार यांनी सांगितले की, पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहाराबद्दल त्यांना काहीही माहिती नाही. त्यांच्या या विधानावर आम्हाला विश्वास आहे. आम्ही मानतो की त्यांना या प्रकरणाची माहिती नसावी. मात्र त्यांनी स्वतःच म्हटले आहे की जे काही व्हायचे आहे ते संविधानाप्रमाणे होऊ द्या. संविधानाच्या प्रकरण 3, कलम 14 मध्ये स्पष्ट सांगितले आहे की कायद्यासमोर सर्वजण समान आहेत. नेमके अंधारेंचे वक्तव्य काय? सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पार्थ पवार यांनी केलेल्या जमीन व्यवहाराबद्दल काहीही माहिती नाही, या त्यांच्या विधानावर आमचा विश्वास आहे. त्यांना या व्यवहाराची काही माहिती नाही अशी आमची धारणा आहे. अजित पवार असे म्हणाले की जे काही व्हायचे आहे ते संविधानाप्रमाणे होऊ द्यात. संविधानाच्या प्रकरण 3 कलम 14 मध्ये सांगितले आहे की कायद्यासमोर सर्व जण समान आहेत. तर मग ज्या जमिनीची किंमत बाजार भावाप्रमाणे 294 कोटी 65 लाख 89 हजार रुपये आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की,300 कोटी रुपयांची देय आहे. मुद्रांक अधिनियमाचे अनुच्छेद 25 ब प्रमाणे 5 टक्के तथा स्थानिक संस्था कर 1 टक्का, मेट्रो कर 1 टक्का असे एकूण 21 कोटी मुद्रांक शुल्क होते. इरादा पत्रात हे जोडलेले आहे. यामध्ये पार्थ पवार आणि पाटील यांची सही आहे. या प्रकरणातील सर्व अधिकाऱ्यांच्या त्यांचे निलंबन प्रक्रिया सुरू आहे. यात शीतल तेजवाणी आणि पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सर्व काही जर संविधानाने करायचे आहे आणि कायद्यात जर सर्व जण समान आहेत तर मग पाटलांवर गुन्हा दाखल होतो तेजवाणीवर गुन्हा दाखल होतो पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही हे न्यायप्रिय अजित पवार यांना मानवणारे नसेल, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. त्यामुळे पार्थ पवारांना नेमके कशामुळे वाचवले जात आहे याचे उत्तर प्रशासनाने द्यायला हवे.
पुणे शहरात आणखी एक सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताब्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बोपोडी परिसरातील 9 हेक्टर शासकीय जमीन खासगी व्यक्तींनी बेकायदेशीररीत्या आपल्या नावावर दाखवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी नायब तहसीलदार प्रवीणा चव्हाण यांच्या तक्रारीवरून खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह नऊ जणांवर फसवणूक, सरकारी मालमत्तेचा अपहार आणि संगनमताचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना 12 फेब्रुवारी 2024 ते 1 जुलै 2025 दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बोपोडी येथील सुमारे 9 हेक्टर जमीन सन 1883 पासून राज्याच्या कृषी विभागाच्या ताब्यात आहे. ही जमीन सरकारी वहिवाटीत असून तिचा मालक म्हणून कृषी विभागाचे नाव महसूल नोंदवहीत नोंदलेले आहे. तरीदेखील आरोपींनी संगनमत करून ही जमीन खासगी मालकीची असल्याचे दाखवून तिचा बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 हा कायदा पुणे महानगरपालिका क्षेत्रात लागू नसतानाही, त्याचा दाखला देत कागदपत्रांची बनावट निर्मिती करण्यात आली. नायब तहसीलदारांनी दिलेल्या तक्रारीत या प्रकाराला संगनमताने घडवून आणलेला सरकारी जमिनीचा अपहार असे म्हटले आहे. शितल तेजवाणी आणि दिग्विजय पाटील यांच्यावरही गुन्हे दाखल या गुन्ह्यात मुख्य आरोपी म्हणून तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं नाव पुढे आलं आहे. त्यांच्यासह व्हिजन प्रॉपर्टीचे अर्जदार हेमंत गवंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे, शितल तेजवाणी आणि दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. दिग्विजय पाटील हे अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपीचे संचालक असून, याच कंपनीचे नाव याआधी पुण्यातील कोरेगाव पार्कमधील वादग्रस्त जमीन प्रकरणातही समोर आले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात, आरोपींनी संगनमत करून बनावट आदेश आणि पत्रे तयार केली आणि त्याद्वारे शासनाची दिशाभूल करत बेकायदेशीररीत्या जमीन आपल्या ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. शासकीय आदेशांसारखी दिसणारी खोटी कागदपत्रं तयार केली आश्चर्य म्हणजे, या प्रकरणातील काही आरोपी याआधीही अशाच प्रकारच्या जमीन फसवणूक प्रकरणात अडकलेले आहेत. सूर्यकांत येवले, शितल तेजवाणी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर यापूर्वीही सरकारी जमिनीच्या गैरव्यवहाराचा आरोप ठेवण्यात आला होता. या वेळी मात्र बोपोडीतील प्रकरण अधिक गंभीर स्वरूपाचं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपींनी शासकीय आदेशांसारखी दिसणारी खोटी कागदपत्रं तयार केली आणि ती दाखवून संबंधित जमिनीवर मालकी हक्क सांगितला. या कृतीमुळे सरकारचं मोठं नुकसान झालं असून, जमिनीचा बाजारभाव कोट्यवधी रुपयांत असल्याचं तपासात समोर आलं आहे. लवकरच अटकेची शक्यता हा घोटाळा उघड झाल्यानंतर प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सरकारी जमिनींच्या सुरक्षेसाठी कडक पावलं उचलण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक), 409 (सरकारी मालमत्तेचा अपहार), 467, 468 (कागदपत्रांची बनावट निर्मिती) आणि 120 (B) (संगनमत) अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. सर्व आरोपींचा तपास सुरू असून, लवकरच अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणामुळे पुणे जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महसूल विभागातील भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
एकीकडे सत्तेचा मिस युज केला जातो आणि दुसरीकडे अजित पवार किती चांगले असतील त्यांच्या चांगलेपणाविषयी मी बोलणार नाही. तुम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदी असताना मुलाची चौकशी निष्पक्ष कशी होऊ शकते? असा सवाल उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तर अजित पवार यांनी नैतिकदृष्ट्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर जात काही दिवस राजीनामा दिला मला वाटते मला वाटते अजित पवारांनी चौकशी होईपर्यंत बाजूला व्हावे आणि दूध का दूध पानी का पानी होऊ द्यावे. अंबादास दानवे म्हणाले की, एखादा मुलाला साधा पेन जरी खरेदी करायचा असला तरी तो वडीलांना सांगतो. हा कोरेगाव पार्क सारख्या ठिकाणी 1800 रुपये किंमत असलेली 40 एकर जमीन खरेदी करतो आणि वडीलांना माहिती नाही, हे कुणाला तरी खरे वाटेल का? याच्याशी माझा संबंध नाही हे अजित पवार कसे म्हणू शकतात.म्हणून नैतिकदृष्ट्या अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे. सुप्रिया सुळे काय बोलतात याच्याशी मला काही देणघेण नाही. माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. मी हे सर्व पुरावे देईल. फक्त अजित पवारांनी हे खोटे आहे हे सांगावे मग मी पुरावे देईल. त्यांचा पक्ष वेगळा त्यांनी भूमिका घ्यावी अंबादास दानवे म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार हा निर्णय दोन्ही भावांनी घेतला आहे. यानंतर कोणत्या पक्षाला काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. येणाऱ्या काळात सर्व भूमिका स्पष्ट होतील. आमची महा विकास आघाडी म्हणून लढावे अशी मानसिकता आहे. आम्हाला गरज आहे म्हणून नाही तर सत्ताधाऱ्यांना आलेली मस्ती जिरवण्यासाठी एकत्र येत लढले पाहिजे. काँग्रेस आणि शिवसेनेचा विचार एक नसला तरी आम्ही सोबत आहोत ना? मग मनसेचा विचार वेगळा असला म्हणून काय झाले? असा सवाल दानवेंनी केला आहे. 99 टक्के मालक असून पार्थ पवारांवर गुन्हा नाही अंबादास दानवे म्हणाले की, अजित पवार यांचा सख्या मुलगा असा व्यवहार करतो तर वडीलांच्या पदाचा जबाबदारीचा प्रभाव मुलाच्या निर्णयावर होत असतो. ज्या अर्थी कोरेगाव पार्क परिसरात 40 एकर जमीन पार्थ पवारच्या कंपनीला मिळते आणि त्यांत पार्थ पवारांचा 99 टक्के शेअर आहे 1 टक्के शेअर त्या पाटीलचा आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पण पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही. खडसेंप्रमाणे या प्रकरणी न्याय करावा अंबादास दानवे म्हणाले की, एकनाथ खडसेंचे असेच एक प्रकरण झाले होते त्यामध्ये एमआयडीसीच्या जमिनीची किंमत जास्त होती आणि त्यांनी ती कमी भावात खरेदी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांनी झोंटिग कमिटी नेमली होती आता पण अशीच समिती नेमली जावी. जो न्याय एकनाथ खडसेच्या प्रकरणी लागला होता तोच न्याय पार्थ पवारांच्या कंपनीप्रकरणी आता लावला जावा. माझ्याकडे सगळ्या फाईल्स अंबादास दानवे म्हणाले की, पार्थ पवार जमीन प्रकरणी माझ्याकडे सगळ्या फाईल्स आहेत. यामध्ये कोर्टाचे पेपर, महसूल मंत्र्यांचे बाळासाहेब थोरात यांच्या सहीचे 2013 चे पत्र आहे. विलासराव देशमुख यांचे पत्र आहे. यावर मी दोन दिवसांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे.तो पर्यंत काय काय होते बघूयात.
पुण्यातील वादग्रस्त जमिनीच्या खरेदी प्रकरणाने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजवली आहे. या प्रकरणात पार्थ पवारांचे व्यावसायिक भागीदार आणि मामेभाऊ दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शासनाचा 5 कोटी 89 लाख 31 हजार 800 रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवल्याचा आरोप आहे. मात्र, पार्थ पवारांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे जेथे एका भागीदारावर गुन्हा दाखल झाला, तेथे दुसऱ्यावर नाही का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये शितल तेजवानी आणि रविंद्र तारू यांचा समावेश आहे. शितल तेजवानी यांनी पॉवर ऑफ अॅटर्नीच्या आधारावर कोट्यवधींची जमीन विकल्याचा आणि तारूंनी मुद्रांक शुल्क व कर वसूल न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या जमिनीचा व्यवहार अनेक कारणांनी संशयास्पद मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 16.19 हेक्टर जमीन केवळ 300 कोटी रुपयांना विकत घेतली गेली, पण तिची बाजारातील किंमत 1800 कोटी रुपयांच्या आसपास होती. या व्यवहारावर केवळ 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क भरल्याचे समोर आले आहे. एवढंच नव्हे, तर या व्यवहाराशी संबंधित सूची 2 या दस्तऐवजात अनेक चुका आढळल्या आहेत. उदाहरणार्थ, जमीन प्रत्यक्षात पुणे शहरातील मुंढवा भागात असताना ती सोयीसाठी मुळशी तालुक्यात दाखवण्यात आली. त्याचबरोबर अमेडिया एंटरप्रायजेस या कंपनीच्या नोंदणीकृत भागधारकांच्या माहितीत दिग्विजय पाटलांचे लिंग स्त्री असे दाखवण्यात आले आहे. या सर्व तपशिलांमुळे दस्तऐवजांमध्ये फेरफार झाला का? असा संशय वाढला आहे. या प्रकरणातील सर्वात मोठा वादाचा मुद्दा म्हणजे पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्यातील भागीदारी. अमेडिया एंटरप्रायजेस या कंपनीत पार्थ पवारांचा 99 टक्के हिस्सा आहे, तर दिग्विजय पाटील यांचा हिस्सा केवळ 1 टक्का आहे. तरीसुद्धा, या प्रकरणात दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, पण पार्थ पवार मात्र तपासाच्या कक्षेबाहेर आहेत. त्यामुळे कायदा सर्वांसाठी सारखा आहे का? असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, दिग्विजय पाटील हे अजित पवार यांचे मेव्हणे अमरसिंह पाटील यांचे पुत्र असून मूळचे धाराशिव जिल्ह्यातील तेर गावचे रहिवासी आहेत. सध्या ते पुण्यात वास्तव्यास असून, आपल्या कौटुंबिक कार्यक्रमांसाठी आणि शेतीसाठीच अधूनमधून तेरला जातात. त्यांच्या कुटुंबातील कुणीही सध्या तेरमध्ये राहत नाही. शितल तेजवानींनी सर्वात मोठी भूमिका बजावल्याचा आरोप या प्रकरणात शितल तेजवानींनी सर्वात मोठी भूमिका बजावल्याचा आरोप आहे. त्यांनी संबंधित जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी घेतली आणि तिच्या आधारे जमीन विक्रीचा करार केला. त्यानंतर हा व्यवहार अमेडिया एंटरप्रायजेस कंपनीच्या नावाने पूर्ण झाला. या प्रक्रियेदरम्यान शासनाचे 5 कोटी 89 लाख रुपये मुद्रांक शुल्क व 2 टक्के अधिभार वसूल न केल्याचा आरोप रविंद्र तारू या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. यामुळे सरकारी महसुलाचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या तिघांवर गुन्हा दाखल केला असून, दस्तऐवजांच्या तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. कंपनी इतका मोठा व्यवहार कसा करू शकते? या प्रकरणाचा उलगडा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला. त्यांनी सांगितले की, 1800 कोटी रुपयांची जमीन केवळ 300 कोटींमध्ये विकत घेतली गेली आणि स्टॅम्प ड्युटी म्हणून फक्त 500 रुपये भरले गेले. एवढंच नव्हे, तर या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासांच्या आत स्टॅम्प ड्युटी माफ केली आणि अवघ्या 27 दिवसांत पूर्ण जमीन व्यवहार पार पडला. दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला की, एक लाख रुपयांच्या भांडवलाची कंपनी इतका मोठा व्यवहार कसा करू शकते? त्यांच्या मते, या प्रकरणामागे मोठे राजकीय हात असून तपास स्वतंत्र यंत्रणेकडून व्हायला हवा. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, प्रशासनाकडून मिळालेल्या वेगवान मंजुऱ्या आणि कागदपत्रातील तफावत लक्षात घेता, आणखी काही नावं पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोण आहेत दिग्विजय पाटील? पार्थ पवारांसोबत व्यावसायिक भागीदारी असलेले दिग्विजय अमरसिंह पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक आहेत. दिग्विजय हे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे भाऊ अमरसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. मूळचे धाराशिव जिल्ह्यातील तेर गावचे रहिवासी असलेले दिग्विजय पाटील सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांच्या कुटुंबाचा शेतीशी संबंध असला तरी दिग्विजय यांनी शिक्षणानंतर व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले. ते लहानपणापासूनच आपल्या आत्या सुनेत्रा पवार यांच्या देखरेखीखाली वाढले. एमआयटी कॉलेज, पुणे येथून बी.ए. पदवी घेतल्यानंतर त्यांनी पार्थ पवार यांच्यासोबत व्यावसायिक भागीदारी सुरू केली. दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार हे फक्त नातेवाईकच नाहीत, तर दोघांमधील व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंधही अतिशय घनिष्ठ असल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोटे एमआयडीसी परिसरात शिंदे गटाच्या युवासेना पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोटे एमआयडीसीतील एका कंपनीच्या बांधकामाच्या ठेक्यावरून दोन्ही गटांमध्ये वाद झाला. हा वाद चिघळत जाऊन त्याचे रूप शिवीगाळ आणि मारहाणीमध्ये झाले. याप्रकरणी विक्रांत जाधव यांच्यासह अन्य दहा जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही शिवसेना गटांमधील कार्यकर्त्यांमध्ये हा संघर्ष झाल्याने स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. स्थानिकांना रोजगार देण्याच्या विषयावरून या दोन गटांमध्ये जुंपल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. नेमके काय घडले? मिळालेला माहिती नुसार, लोटे MIDC मध्ये कामावरून दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपल्याचे यावेळी बघायला मिळाले. तर स्थानिकांना काम देण्यावरून यात दोन गटात जुंपली. दरम्यान हा सर्व प्रकार घडत असताना उद्धव गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांचा शिवीगाळ करत मारहाण करतानाचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाला असून तो आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल होतो आहे. कदमांच्या कार्यकर्त्याला मारहाण तर तुमचा मंत्री आहे म्हणून तुम्ही वाट्टेल ते करणार का? असं म्हणत योगेश कदम यांचा कार्यकर्ता असलेल्या सचिन कातेला विक्रांत जाधव यांनी प्रश्न केला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत विक्रांत जाधव यांच्यासह अन्य दहा जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोटे एमआयडीसीतील मारहाण प्रकरणात विक्रांत जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जाधव यांच्यासह आणखी दोन जण शिवाय सात ते आठ अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यामध्ये भारतीय न्याय संहिता 189(1), 189( 2 ), 190, 191 (2) 115 (2) 352, 351 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क या उच्चभ्रू भागातील 40 एकर जमिनीच्या खरेदी-विक्रीवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीचे नाव समोर आले असून, फक्त 300 कोटींमध्ये 1800 कोटींच्या जमिनीचा सौदा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. इतकंच नव्हे, तर या व्यवहारावर लागणारी 21 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी काही कागदोपत्री प्रक्रियेने माफ करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. एवढ्या मोठ्या मूल्याच्या जमिनीचा व्यवहार फक्त 500 रुपयांमध्ये नोंदवला गेल्याचं दस्तऐवजांत नमूद आहे. त्यामुळे या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली असून, विरोधकांनी या प्रकरणावर अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबावर हल्लाबोल सुरू केला आहे. या प्रकरणात चर्चेत असलेली कंपनी म्हणजे पार्थ पवार यांच्या नावाची अमेडिया होल्डिंग्ज कंपनी. या कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या आयटी धोरणाचा आधार घेत स्टॅम्प ड्युटीपासून सूट मिळवली. त्या धोरणानुसार, प्रकल्पात एकूण गुंतवणुकीच्या किमान 25 टक्के इतकी अतिरिक्त गुंतवणूक केल्यास स्टॅम्प ड्युटी माफ केली जाऊ शकते. 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीच्या बैठकीत आयटी पार्क उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आणि दोनच दिवसांनी, म्हणजे 24 एप्रिलला, उद्योग संचालनालयाकडून स्टॅम्प ड्युटी माफीची मंजुरीही देण्यात आली. त्यानंतर अवघ्या 27 दिवसांत संपूर्ण जमीन व्यवहार पूर्ण झाला. सरकारी फाइल्सना मंजुरी मिळायला महिन्यांचे महिने लागतात, पण या प्रकरणात मंजुऱ्या वाऱ्याच्या वेगाने मिळाल्या, यामुळेच व्यवहाराबाबत संशय अधिकच गडद झाला आहे. या जमिनीचा इतिहासही तितकाच महत्त्वाचा आहे. कोरेगाव पार्क परिसरातील ही जमीन मूळतः बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात होती आणि ती सरकारने संशोधन प्रकल्पासाठी दिली होती. मात्र, प्रकल्प सुरू न झाल्याने आणि जमीन वापरात न आल्याने ती पुन्हा मूळ मालकांना परत देण्याचा प्रस्ताव आला. याच पार्श्वभूमीवर पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपनीने 273 मूळ जमीनमालकांना शोधून त्यांच्याकडून कायमस्वरूपी पावर ऑफ अॅटर्नी (POA) घेतली. त्यामुळे त्या कंपनीला जमीन विक्रीचे आणि सरकारी ताब्यातून सोडवून घेण्याचे अधिकार मिळाले. त्यानंतर जवळपास 19 वर्षांनी हीच जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने विकत घेतली. विशेष म्हणजे, अमेडिया कंपनीचा व्यवसाय वाहन दुरुस्तीचा असून, तिचं भागभांडवल अवघं 1 लाख रुपये इतकं आहे. तरीसुद्धा 300 कोटींचा व्यवहार करण्याची तिची आर्थिक क्षमता कुठून आली, हा मोठा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या गतीने सरकारी प्रक्रिया पूर्ण होणं अत्यंत दुर्मिळ या व्यवहारात अनेक अनियमितता असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सरकारी ताब्यातील जमीन खरेदी करताना काही विशिष्ट अटी लागू असतात. उदाहरणार्थ, वतनाच्या जमिनीवर सरकारला नजराणा द्यावा लागतो, तसेच अशा जमिनींच्या विक्रीसाठी महसूल विभाग आणि कायदे विभागाची स्वतंत्र मंजुरी आवश्यक असते. पण या प्रकरणात अशा कोणत्याही प्रक्रियेचा ठोस उल्लेख न करता सर्व मंजुऱ्या एका मागोमाग एका फाइलवर काही दिवसांत मिळाल्या. स्टॅम्प ड्युटी माफी, जमीन हस्तांतरण, आणि मालकी हक्कांचे सर्व दस्तऐवज एका महिन्याच्या आत पूर्ण करण्यात आले. अशा गतीने सरकारी प्रक्रिया पूर्ण होणं अत्यंत दुर्मिळ असल्याचं प्रशासनातील सूत्रांनी सांगितलं आहे. मोठ्या अधिकाऱ्यांची आणि राजकीय व्यक्तींची नावंही समोर येऊ शकतात या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. अजित पवारांवर याआधीच सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते, आणि आता त्यांच्या सुपुत्राचे नाव नवीन जमीन घोटाळ्यात आल्याने विरोधकांनी टीकेचा धुरळा उडवला आहे. सरकारकडून मात्र या प्रकरणात कोणतीही अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही. दरम्यान, संबंधित जमीन व्यवहाराचे दस्तऐवज आणि आयटी धोरणाचा गैरवापर करून झालेल्या माफीच्या मंजुऱ्या आता तपास यंत्रणांच्या चौकटीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास पुढे गेला, तर अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची आणि राजकीय व्यक्तींची नावंही समोर येऊ शकतात, असं सूत्रांचं म्हणणं आहे. एकंदरीत, कोरेगाव पार्कच्या 40 एकर जमिनीचा हा कथित घोटाळा पुढील काही आठवड्यांत महाराष्ट्राच्या राजकीय चर्चांचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडचे भाजपचे कार्यकर्ते खत जिहाद करत असल्याचा आरोप उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे म्हणाले की, डुप्लिकेट खतांची बॅग जिची किंमत 250 रुपयांच्या आसपास आहे, त्यातील बोगस खत शासकीय खतांच्या बॅगांमध्ये भरण्याचा कार्यक्रम सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्ते सर्रास करत आहेत. वोटचोरी नंतर सादर आहे भाजपचा 'खतचोरी'चा एपिसोड, असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली आहे. अंबादास दानवे म्हणाले की, इथे भाजपच्या रूपाने कुंपणच शेत खात आहे! पावसाच्या अस्मानीने लुटलेल्या गेलेल्या शेतकरी बांधवाना आता भाजपचे लोक अश्या 'सुलतानी' (की मुलतानी )पद्धतीने लुटत आहेत. मेवाभाऊंची खंबीर साथ..बोगस धंद्यात घालू हात. अंबादास दानवे यांची X वरील पोस्ट काय? उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी X वर पोस्ट करत म्हटलंय की, वोटचोरी नंतर सादर आहे भाजपचा 'खतचोरी'चा एपिसोड..मतांची घाऊक चोरी पकडली जात असताना आता सिल्लोडमधील भाजपच्या कार्यकर्त्यांची खतचोरी पहा. डुप्लिकेट खतांची बॅग जिची किंमत 250 रुपयांच्या आसपास आहे, त्यातील बोगस खत शासकीय खतांच्या बॅगांमध्ये भरण्याचा कार्यक्रम सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्ते सर्रास करत आहेत. मुलतानींवर टीका अंबादास दानवे म्हणाले की, सरकारी बॅगला बाजारात साधारण 1150 रुपये एवढा भाव आहे. इथे भाजपच्या रूपाने कुंपणच शेत खात आहे! पावसाच्या अस्मानीने लुटलेल्या गेलेल्या शेतकरी बांधवाना आता भाजपचे लोक अश्या 'सुलतानी' (की मुलतानी )पद्धतीने लुटत आहेत. ही खत चोरी करणाऱ्या एका एका माणसाचे नाव मला माहिती आहे. हा खत'जिहाद' करणारा भाजप कार्यकर्त्या नक्की कोण जो धरलं जात असताना कृषी विभागाच्या लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. शेतकऱ्यांप्रती थोडी जरी आत्मीयता शिल्लक असेल तर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने हे नाव सांगावे! मेवाभाऊंची खंबीर साथ..बोगस धंद्यात घालू हात..असे म्हणत सिल्लोडच्या स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांवर टीका केली आहे.
मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आशियाना सोसायटीतील एका 27 वर्षीय मोलकरणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत महिलेचे नाव च्योईसंग तमांग असून ती मूळची दार्जिलिंग येथील होती. तमांग गेल्या दोन वर्षांपासून आशियाना सोसायटीतील एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी घरकाम करत होती. ती त्या दाम्पत्याच्या घरीच वास्तव्यास होती. मंगळवारी सकाळी ती आपल्या राहत्या घराच्या बाल्कनीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. ही घटना उघड होताच परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना तत्काळ घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तमांग हिला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तमांग गेल्या दोन वर्षांपासून त्या दाम्पत्याच्या घरी काम करत होती आणि तिचं वर्तन नेहमी शांत आणि नम्र असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. मात्र काही दिवसांपासून ती मानसिकदृष्ट्या तणावात असल्याचं शेजाऱ्यांनीही निरीक्षण केलं होतं. पोलिसांच्या माहितीनुसार, ती ज्या घरात काम करत होती, त्या घरातून काही मौल्यवान दागिने गायब झाल्याचे कळताच तिच्यावर संशय घेतला गेला. सुमारे दहा लाख रुपयांचे दागिने गायब झाल्याची तक्रार संबंधित दाम्पत्याने केली होती. या संशयामुळे तमांग प्रचंड मानसिक दबावाखाली आली होती, आणि त्याच तणावातून तिने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेमागील नेमका दुवा शोधण्यासाठी तपास सुरू या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अँटॉप हिल पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपमृत्यूची नोंद केली आहे. तमांगच्या नातेवाइकांशी संपर्क साधून त्यांच्या जबाबांची नोंद घेण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितलं की, प्राथमिक चौकशीत कोणताही संशयास्पद प्रकार आढळलेला नाही. मात्र चोरीचा संशय, त्यानंतर निर्माण झालेला मानसिक तणाव आणि आत्महत्येच्या घटनेमागील नेमका दुवा शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या दाम्पत्याने तमांगवर संशय का घेतला आणि तिच्यावर थेट आरोप करण्यात आले होते का, याचाही तपास केला जात आहे. तमांगच्या मोबाईल फोन आणि वैयक्तिक वस्तूंचीही तपासणी करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून उदास दिसत होती आशियाना सोसायटीतील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, तमांग अत्यंत कर्तव्यदक्ष आणि विश्वासू कर्मचारी होती. ती त्या दाम्पत्यासाठी परिवारातील सदस्यासारखीच होती. ती नेहमी हसतमुख असायची, पण गेल्या काही दिवसांपासून ती काहीशी उदास दिसत होती, असं एका शेजाऱ्याने सांगितलं. घटनेच्या दिवशी सकाळी ती नेहमीप्रमाणे कामात व्यस्त होती, मात्र काही वेळानंतर ती खोलीत गेली आणि बराच वेळ बाहेर आली नाही. घरातील मालकिणीने तिचा आवाज न आल्यामुळे पाहिलं असता, ती बाल्कनीत गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. ही घटना पाहून घरच्यांचा आणि सोसायटीतील लोकांचा थरकाप उडाला. सखोल चौकशी केल्यानंतरच अंतिम निष्कर्ष या घटनेनंतर समाजमाध्यमांवर घरकाम करणाऱ्या महिला कामगारांच्या मानसिक आरोग्याबद्दल आणि त्यांना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. घरकाम करणाऱ्या महिलांवर संशय घेण्याची सवय अनेक कुटुंबांत आहे. पण अशा आरोपांमुळे त्यांच्यावर किती मानसिक ताण येतो, हे कोणी समजून घेत नाही, असा सूर नागरिकांमध्ये दिसून आला. पोलिसांनी मात्र स्पष्ट केलं आहे की, सध्या ही आत्महत्येची घटना आहे, मात्र दागिने चोरीप्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतरच अंतिम निष्कर्ष काढला जाईल. तमांगच्या मृत्यूनंतर तिच्या गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. ती एकटीच मुंबईत कामाला गेली होती, आता तिचं प्रेत परत जात आहे, असं तिच्या नातेवाइकांनी अश्रूंनी भरलेल्या शब्दांत म्हटले आहे.
अजित पवार यांच्या कुटुंबाशी संबंधित जमीन व्यवहार प्रकरणाने मोठं वादळ निर्माण केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून 1,800 कोटी रुपये किंमतीची जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या व्यवहारामुळे शासनाची सुमारे 152 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे या व्यवहारात केवळ 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले गेले. या प्रकरणात गंभीर अनियमितता आढळल्याने सरकारने कारवाईचा बडगा उगारला असून, दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी बावधान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील या जागेच्या विक्रीत अनेक नियमांचा भंग झाल्याचे आरोप आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अमेडिया कंपनीचा भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, जमीन विक्रीसाठी मुखत्यार असणारी शीतल तेजवानी आणि निलंबित दुय्यम निबंधक आर.बी. तारू यांच्याविरोधात गुन्हे नोंदवले आहेत. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक), 409 (विश्वासघात), 334 आणि 316(5) तसेच इतर कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, पार्थ पवार किंवा त्यांच्या कंपनीचं नाव या एफआयआरमधून वगळण्यात आलं आहे, ही बाब विरोधकांच्या रोषाचं कारण ठरली आहे. तक्रारीनुसार, 6 कोटींच्या मुद्रांक शुल्काचा भरणा न केल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन होणार आहे. पार्थ पवारांना वाचवले जात आहे - सुषमा अंधारे या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकार आणि चौकशी यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये या व्यवहाराशी संबंधित कागदपत्र शेअर करत म्हटले आहे की, पार्थ पवार यांनी स्वतः या व्यवहारावर सही केली आहे, तरीदेखील त्यांचं नाव एफआयआरमध्ये नाही. एकच दस्त वापरून जमीन नोंदणी करण्यात आली आणि जिल्हा इंडस्ट्री बोर्डाच्या मुद्रांक माफीच्या ठरावावर पार्थ पवारांची सही आहे, हे चौकशी अहवालात नमूद आहे. तरीदेखील त्यांचं नाव घेण्यापासून यंत्रणा का दूर राहिली? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी पुढे म्हटले की, अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांचा 99 टक्के हिस्सा आहे आणि दिग्विजय पाटील फक्त एक टक्का भागीदार आहेत. तरीही दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून पार्थ पवारांना वाचवले जात आहे. समितीत जनतेचे प्रतिनिधित्व करण्यास तयार - अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणात सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी एक्सवर लिहिले की, एफआयआर झाला, पण त्यातही स्कॅम! पार्थ अजित पवारचं नाव नाही आणि कंपनीचंही नाव नाही? ही कोणती चौकशी? जर सरकार खरंच पारदर्शक असेल, तर दोषींना संरक्षण देऊ नका, कठोर कारवाई करा. दमानिया यांनी पुढे मागणी केली की, चौकशीसाठी स्थापन होणाऱ्या समितीत फक्त शासकीय अधिकारी न ठेवता जनतेचे प्रतिनिधीही असावेत. मी स्वतः या समितीत जनतेचे प्रतिनिधित्व करण्यास तयार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून, अनेकांनी त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. सरकारचं जादूचे प्रयोग - अंबादास दानवे दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावर अधिक थेट हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटलं की, कोरेगाव पार्क प्रकरणात गुन्हा दाखल झाला, पण पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीचं नाव स्वच्छ वगळण्यात आलं. म्हणजे सरकारचं जादूचे प्रयोग, सुरू झाले आहेत. एवढ्या गंभीर प्रकरणात केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करून विषय झाकला जातोय. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून म्हटलं की, या चौकशीसाठी विकास खारगे नक्कीच प्रामाणिक अधिकारी आहेत, पण या प्रकरणातील गंभीरतेमुळे चौकशी समितीत एक निवृत्त न्यायमूर्ती नेमणे गरजेचे आहे. विरोधकांच्या या सर्व प्रतिक्रियांमुळे पार्थ पवार आणि अजित पवार यांच्याभोवतीचा राजकीय दबाव वाढताना दिसत आहे. जमीन व्यवहारामुळे राज्यातील राजकारणाला नवीन वळण या संपूर्ण प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या भूमिकेवर आता विरोधकांनी जोरदार आक्रमण चढवलं असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानुसार चौकशी सुरू झाली असली तरी विरोधकांचा आरोप आहे की, मोठ्या लोकांवर कारवाई टाळण्यासाठी यंत्रणा हेतुपुरस्सर चालवली जाते. आगामी दिवसांत या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सध्या मात्र पार्थ पवारांच्या कंपनीच्या जमीन व्यवहारामुळे राज्यातील राजकारणाला नवीन वळण मिळालं आहे.
घरकुलचा लाभ मिळेना; पुंगी बजाओ आंदोलन:एमआयएमने केला प्रशासनाचा अनोखा निषेध
प्रधानमंत्री आवास योजनेत (घरकुल) अन्याय होत असल्याचा आरोप करीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने (एआयएमआयएम) गुरुवारी प्रशासनाच्या शांततेवर म्हशीसमोर पुंगी बजाओ आंदोलन केले. अभिनव पद्धतीने निषेध नोंदवत एमआयएमने यंत्रणांचे लक्ष वेधून घेतले. अनेक गरजू, गरीबांकडे हक्काचे राहते घर नाही. केंद्र सरकारकडून सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाने महत्वाचे धोरण राबवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) जिल्ह्याला उद्दिष्ट प्राप्त झाले होते. दरम्यान शहरातील इतर झोपडपट्टी भागातील गरीब नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ दिला जात नाही. लाभ मिळण्यासाठी लाभार्थी प्रशासनाकडे प्रचंड पाठपुरावा करतात. कार्यालयांचे उंबरठे झिजवतात. गतवर्षी तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चाही काढण्यात आला होता. दरम्यान आता घरकुलाच्या मुद्द्यावर एमआयएमने आंदोलन सुरू केले आहे. या उपोषणाचे नेतृत्व मोहम्मद मुस्तफा, आसिफ अहमद खान आणि जावेद पठाण यांनी केले. आंदोलनात शेख वसीम, अब्दुल नासिर, रियाज अहमद, चाँद खान, रहमत खान, मोहम्मद इलियास, उजैर खान लोधी, शेख एजाज कादरी, अयाज कुरैशी, सादिक खान, फिरोज खान, अब्दुल साजिद यासारखे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न प्रशासन बहिरे बनले आहे असा आरोप करत आता आम्ही पुंगी वाजवून त्यांना जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे एमआयएमचे पदाधिकारी म्हणाले. जोपर्यंत गरीबांना प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल) अंतर्गत त्यांचा न्याय्य हक्काचा लाभ मिळत नाही, तोपर्यंत हा लढा दिवसेंदिवस तीव्र करण्यात येईल, असा इशाराही एमआयएमने दिला.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व सुजात आंबेडकर यांच्यावर समाज माध्यमांवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या ट्रोलर्सवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गुरुवारी वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच धरणे देत ट्रोल करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. सध्या नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक जाहीर झाली असून, आगामी काळात अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांनी ट्रोल करणाऱ्यांना अटक करावी; अन्यथा पुढील आंदोलन अघोषित असेल, असा निर्वाणीचा इशाराही देण्यात आला. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर समाज माध्यमांवर आक्षेपार्ह टीका करण्यात येत आहे, असे वंचितने यापूर्वी दिलेल्या निवेदनात नमूद केले होते. दोन समाजात तेढ निर्माण होईल, या उद्देशाने ‘एक्स्पोज सिरीज’ या नावाने व्हीडीओ तयार करून ते प्रसारित करण्यात येत आहेत. धार्मिक व सामाजिक भावना दुखावल्या गेल्यामुळे दोन समाजामध्ये किंवा गटामध्ये वाद होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्व पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्या आहेत. संबंधित फेसबुक पेज अॅडमिन यांच्यावर फौजदारी तथा सायबर, अॅक्ट्रासिटी अॅक्ट नुसार गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी वंचिततर्फे करण्यात आली. दरम्यान सोमवारी ट्रोलर्संवर कठोर कारवाईची मागणी करत वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे, महासचिव मिलिंद इंगळे, रामकुमार गव्हाणकर, शोभा शेळके, मनोहर बनसोड, कलीम खान पठाण, गजानन गवई, वंदना वासनिक, मनोहर पंजवानी, सचिन शिराळे, पराग गवई, जय तायडे, नागेश उमाळे, आशिष रायबोले, सुगत डोंगरे, मंतोषताई मोहोड, सविता आढाऊ, गौतम सिरसाट, आदी उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनसह सर्व विंग च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. अॅड. प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्यावर ट्रोलर्स हे ट्रोल करत होते. या संतापजनक प्रकाराला विरोध करण्यासाठी व ट्रोलर्सला अटक होण्यासाठी वंचितने आंदोलन केले. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे वंचितकडून मोर्चा काढण्यात आला. रा. स्व. संघाची नोंदणी नसणे, विना परवाना शस्त्र पूजन करणे आदीवरून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर ट्रोलर्सकडून ट्रोलचा प्रकार घडला. हे प्रकार तातडीने रोखण्यात यावे; अन्यथा संघ, भाजपच्या कार्यकर्त्यांना धडा शिकवण्यात येईल, असा इशारा वंचितच्या कार्यकर्त्यांनी दिला. ट्रोलर्सला अटक करत नसाल तर आम्ही त्यांना आमच्या स्टाइलने ठोकून काढू. जिल्ह्यात निवडणूक प्रकिया सुरू असून निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी ट्रोलर्स अटक करावे, अन्यथा पुढील आंदोलन अघोषित असेल असा निर्वाणीचा इशारा देखील देण्यात आला. आक्षेपार्ह व्हीडीओ समाज माध्यमातून प्रसारीत होत आहेत. यात द पॉलिटिकल आर्किटेक्ट कंपनी', विदर्भाचं राजकारण फेसबुक पेज', महाराष्ट्राचा विश्वास फेसबुक पेज', देवाभाऊ फेसबुक पेज', वर्धा लाईव्ह' या माध्यामातून ही टीका होत आहे. असे वंचितचे म्हणणे आहे. ट्रोलचा प्रकार न थांबल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपच्या कार्यकर्त्यांना धडा शिकवणार
मूर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून, नगरपालिका निवडणुकी दरम्यान नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी नगरपरिषद हॉलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. निवडणूक आयोगाने निश्चित केल्या नुसार १० ते १७ नोव्हेंबरच्या दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र वेबसाईटवर भरता येणार आहे. तर नामनिर्देशन पत्र नगर परिषद कार्यालयात दाखल करता येतील. वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारांची यादी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम १९ ते २१ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. वैधरीत्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल. निवडणूक चिन्ह नेमून देणे व अंतिम रीत्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी २६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत घेण्यात येणार असून मतमोजणी व निकाल ३ डिसेंबरच्या सकाळी १० वाजेपासून सुरू होणार आहे. मतमोजणी नगरपरिषद नवीन इमारत क्र.४ मध्ये होणार आहे निवडणुकी करिता महिला मतदारांची संख्या २०,२१४ तर पुरुष मतदारांची संख्या १९,८३१ व इतर ४ मिळून ४० हजार ४९ एवढी आहे .नगराध्यक्ष जनतेतून थेट निवडल्या जाणार आहे. यावेळी तहसीलदार शिल्पा बोबडे तसेच नगरपरिषदेचे पवन धुमाळ यांची उपस्थिती होती.
गाडगेनगर हद्दीतून चोरी गेलेल्या एका ऑटोचा गुन्हे शाखा पोलिस शोध घेत होते. दरम्यान पोलिस शोधात जमिल कॉलनी भागात पोहोचले. त्यावेळी पोलिसांना त्या ठिकाणी शोध घेण्यासाठी गेलेल्या ऑटोसह अन्य एक ई रिक्षा या दोन वाहनांसह अनेक वाहनांचे सुटे भाग सापडले आहे. पोलिसांनी एका भंगार व्यावसायिकाच्या घरातून चोरी गेलेल्या लाल रंगाच्या ऑटोचे सुटे भाग ताब्यात घेतले असून उर्वरित सुटे भाग ज्या वाहनांचे आहे, त्याचाही तपास सुरू केला आहे. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी दुपारी केली आहे. अब्दुल मुफिज अब्दुल मुजीब (२५, रा.जमील कॉलनी, अमरावती) असे ताब्यात घेतलेल्या भंगार व्यावसायिकाचे नाव आहे. गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी ऑटो चोरीचा गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना एका भंगारच्या दुकानात एक वाहन स्क्रॅप करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्याआधारे भंगार दुकान मालक अब्दुल मुफिस अब्दुल मुजिद याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घरातून कोतवाली पोलिस ठाण्यात नोंद चोरीच्या गुन्ह्यातील ऑटोची बॅटरी व काही सुटे भागदेखील मिळून आले. तेथून महावितरणच्या वीज वाहिनीचे ॲल्युमिनियम तार व इतर साहित्य सुद्धा मिळून आल्याने आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारचे आणखी कोणी स्क्रॅप व्यावसायिक आहेत का, याचा गुन्हे शाखा सखोल तपास करत आहे. दोन दिवसांपासून गुन्हे शाखेच्या पथकाकडून स्क्रॅप घेणाऱ्या लोकांची तपासणी सुरू केली आहे. त्यातून चोरीचे बरेच गुन्हे उघडकीस येत आहेत. शहरातील चोरी जाणारे वाहने बेकायदेशीर स्क्रॅप करणाऱ्या काही लोकांकडून खरेदी करून त्याची विल्हेवाट लावत असल्याचे निष्पन्न होत आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पीआय संदीप चव्हाण, एपीआय अमोल कडू, एपीआय मनीष वाकोडे व त्यांच्या पथकाने केली आहे.
युवकांमधील कौशल्य विकसित करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. कौशल्य विकास योजनेतून प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येते. या वर्षीच्या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यात मागणी असणाऱ्या रोजगारक्षम प्रशिक्षणाची निवड करावी, असे निर्देश गुरुवारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षण लक्ष्य वाटप करण्याबाबत जिल्हास्तरीय समिती सभा पार पडली. या वेळी कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून या वर्षी प्रशिक्षणावर १ कोटी रुपये खर्च केला जात आहे. युवकांचे कौशल्य वाढवण्यासाठी प्रशिक्षण हे आवश्यक असून आवश्यकतेप्रमाणे निधी देण्यात येईल. जिल्ह्यात मागणी असणाऱ्या मनुष्यबळाची माहिती घेऊन प्रशिक्षण कार्यक्रम ठरवण्यात यावेत. यासाठी चांगल्या दर्जाच्या प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यात यावी. प्रशिक्षणानंतर प्रामुख्याने रोजगाराचा प्रश्न येत असल्याने यातील प्रशिक्षणार्थींना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. यासाठी त्यांना बँकांशी संलग्न करून द्यावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्हा नियोजनमधून या वर्षी बचत गटांना एक लाख रुपये देण्यात येणार आहे. त्यामुळे किसान ड्रोनच्या प्रशिक्षणामध्ये महिलांना प्राधान्य द्यावे. प्रशिक्षणानंतर बचत गटाच्या माध्यमातून ड्रोन खरेदी केल्यास महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध होऊ शकेल. जिल्ह्यात प्रामुख्याने कृषी आधारीत उद्योगासाठी प्रशिक्षण देण्यात यावे. यासाठी कृषी विकास केंद्रांना सहभागी करून घ्यावे. यात कमी खर्चात उद्योग सुरू करता येतील, असे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात यावे. शहरी भागात उद्योजकांना प्रशिक्षित लेखापालाची गरज आहे. त्यामुळे यात कार्यरत संस्थांच्या मदतीने प्रशिक्षण दिल्यास युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. या वेळी जागर करिअरचा, अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम आदींचा आढावा घेण्यात आला.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही देशातील स्थिती बदलली आहे, असे म्हणता येत नाही. मात्र धर्म परिवर्तनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन १९५६ मध्ये उचललेल्या त्या ऐतिहासिक प्रसंगामुळेच अर्थात धम्मचक्र प्रवर्तनामुळेच आज माणूस ताठ मानेने उभा आहे. हे प्रखर विचार आहेत पांढरकवडा येथील शिवराम मोघे महाविद्यालयातील इतिहास विभागाचे डॉ. राहुल दखने यांचे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित ‘धम्मचक्र प्रवर्तनाची वर्तमान काळातील प्रासंगिकता’ या विषयावर व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रवींद्र कडू आणि डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते. डॉ. दखने म्हणाले, वैदिक काळात यज्ञपद्धती सर्वदूर पोहोचली होती. अशाही काळात बुद्धांनी समतेचा विचार मांडला. आत्मा आणि ईश्वराचे अस्तित्व बुद्धाने नाकारले. सारनाथ येथे बुद्धांचे पहिले प्रवचन झाले. बुद्धांचे चरित्र वाचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धांच्या धम्माबद्दलचे आकर्षण वाढले. त्यांनी लिहिलेल्या लेखामध्येही बुद्धांच्या धम्माचा उल्लेख आढळतो. भारतीय संविधान देखील बुद्धांच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या धम्म तत्त्वज्ञानावर आधारित आहे. माणसाला माणूसपण, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता देणारा धम्म डॉ. बाबासाहेबांना पाहिजे होता व बुद्धांच्या धम्मात या सर्व बाबी त्यांना दिसल्या, त्यामुळे त्यांनी बुद्धांच्या धम्माचा स्वीकार केला, असेही ते म्हणाले. डॉ. रवींद्र कडू म्हणाले, सर्व धर्मांचा अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला. समता, बंधुता, न्याय यावर आधारित बुद्धाचा धम्म आहे. सारनाथ येथे बुद्धांनी पहिल्यांदा दीक्षा दिली आणि तेथूनच प्रवर्तनाची सुरुवात झाली. संत गाडगे बाबा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण आणि मेणबत्ती प्रज्वलित करून विद्यापीठ गीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी बौद्ध धम्म प्रचार समिती, भीमटेकडीच्या वतीने कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांचा शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. संतोष बनसोड यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रत्नशील खोब्रागडे यांनी केले, तर आभार सूरज मंडे यांनी मानले. व्याख्यानाला विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, अमरावती शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते म्हणाले, दीक्षाभूमी हे देशवासीयांचे श्रद्धास्थान आहे. दीक्षाभूमी ही माझ्या मूळ निवासस्थानापासून जवळच असल्याने लहानपणापासूनच मला दीक्षाभूमीविषयी बाळकडू मिळाले. वर्तमान काळाची स्थिती पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निर्णय योग्यच होता व त्याची प्रासंगिकताही जाणवते. परंतु डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण झाले काय, हे देखील पाहावे लागेल. अनुयायांनी जातीअंताची लढाई पुढे न्यावी. विशेषत: जे उद्याचे भविष्य आहेत, त्या विद्यार्थीवर्गाने प्रकर्षाने ही जबाबदारी पार पाडली पाहिजे, असेही कुलगुरू म्हणाले. दीक्षाभूमी हे देशवासीयांचे श्रद्धास्थान : कुलगुरू बारहाते
पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव हा स्तुत्य उपक्रम आहे, अनिल अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र परिवाराने हा कार्यक्रम घेऊन यशवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यामुळे त्यांना सन्मान मिळाला आहे. त्यांच्या यशात हा सन्मान मैलाचा दगड ठरेल, असे प्रतिपादन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार अनिल अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. अनिल बोंडे, पोलिस आयुक्त अरविंद चावरिया आणि सुनील राणा उपस्थित होते. यावेळी अनिल अग्रवाल यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, पत्रकारांच्या मुलांनी एमपीएससी, यूपीएससी, अभियांत्रिकीसारख्या उच्च शिक्षणात प्राविण्य मिळवणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. यश मेहनत आणि जिद्दीनेच मिळते, त्यामुळे प्रत्येकाने आपले कार्य प्रामाणिकपणे आणि सातत्याने करत राहावे, हेच खरे यशाचे रहस्य आहे. पत्रकार समितीच्या बैठकीत अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सन्मान सोहळा घ्यावा, असा प्रस्ताव झाला आणि त्यामुळे हा उपक्रम राबवण्यात आला, असे ते म्हणाले. अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, उच्च शिक्षण मिळाल्यानंतर आई-वडिलांचे कोणतेही कार्य लहान समजू नये. प्रत्येक कामात सन्मान आणि मोल आहे. समाजासाठी काम करताना नम्रता आणि प्रामाणिकपणा कायम राखला पाहिजे. त्यांनी महाराष्ट्रातील पत्रकारितेचं विशेष कौतूक करत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियातील आपले अनुभवही कथन केले. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया म्हणाले की, पत्रकारांच्या मुलांचा सन्मान करणे ही अत्यंत प्रशंसनीय गोष्ट आहे. पत्रकार देखील पोलिसांप्रमाणेच दिवसरात्र काम करतात, अशा परिस्थितीत आपल्या मुलांना उच्च शिक्षण देणे कौतुकास्पद आहे. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा म्हणाले की, “पत्रकारांच्या मुलांचा सन्मान करणारा हा सोहळा प्रेरणादायी आहे. अनिल अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला ही अभिमानाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे इतरांनाही प्रेरणा मिळते. या सोहळ्यात प्राविण्य मिळवलेल्या पत्रकारांच्या पाल्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रा. डॉ. लोभस घडेकर यांनी केलं, सूत्रसंचालन प्रफुल्ल घवळे यांनी तर आभारप्रदर्शन संजय बनारसे यांनी केलं. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत पत्रकार बांधव कुटूंबियासह उपस्थित होते. या पत्रकार पाल्यांचा करण्यात आला सन्मान समिक्षा संजय शेंडे, भक्ति शशांक नागरे, प्रणय विजय धामोरिकर, पियुष प्रणय निर्बाण, गिरीजा संजय काथोडे, खुशी सुधीर केणे, रिधिमा पुरुषोत्तम चंदन, अथर्व संजय बनारसे, क्षितीज मंगेश वानखडे, विजया बंडू आठवले, जाई शशांक लावरे, प्रतीक गोपाल डहाके, सोहम मंगेश तायडे, वेदश्री अरुण जोशी, आर्यव्रत दिनेश खडसे, गौरी सुधीर भारती, आरुषी व वेदांत शशिकांत निचत, काव्या हेमंत निखाडे, सागर पुरोहित, आयुष प्रदीप बहुरूपी, श्रेया सचिन शेगोकार, अदिती आनंद रेलकर, प्राची विनोद इंगले, रोहित राजेश मालवीय, तनीशा राजेश मालवीय यांचा समावेश होता.
ट्रान्सपोर्ट नगर परिसरात अतिक्रमणांवर कारवाई:मनपाद्वारे 125 अनधिकृत दुकाने हटवली, व्यवस्थेत सुधारणा
शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर आळा घालण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलले आहे. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार गुरुवार ६ रोजी ट्रान्सपोर्ट नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत अनधिकृत बांधकामे, टिनशेड दुकाने आणि खोके यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. ट्रान्सपोर्ट नगर हा परिसर दीर्घकाळापासून विविध व्यापाऱ्यांनी व्यापलेला असून, येथे साधारणतः ३०० दुकाने आहेत. त्यापैकी अनेक दुकाने व टिनशेड रचना परवानगीशिवाय उभारण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यात आज सुमारे १२५ अनधिकृत दुकाने आणि टिनशेड पाडण्यात आले. या कारवाईदरम्यान अनधिकृत खोके व शेड हटविण्यात आले असून, ही कारवाई पुढील काही दिवस सतत सुरू राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. कारवाईसाठी अतिक्रमण विभाग, बाजार परवाना विभाग आणि पोलीस विभाग यांनी संयुक्तपणे पथके तयार केली होती. संपूर्ण कारवाईदरम्यान तीन जेसीबी मशीन आणि तीन मोठे ट्रक सतत कामावर तैनात होते. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त ठेवत कारवाईदरम्यान कोणताही अनुशासनभंग होऊ नये याची काळजी घेतली. कोणीही अनधिकृतबांधकामे करू नयेत, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मनपा आयुक्तांनी दिला आहे. उर्वरित १७५ दुकानेही हटवणार पुढील काही दिवसांत ट्रान्सपोर्ट नगर परिसरातील उर्वरित १७५ अनधिकृत दुकाने देखील हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. नागरिक व व्यापाऱ्यांनी स्वतःहून अनधिकृत बांधकामे दूर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.या कारवाईमुळे परिसरातील रस्ते मोकळे होऊन वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होणार आहे.
स्क्रब टायफसचा विळखा आणखी घट्ट:जगतपुरात वाढले 2 रुग्ण; तपासणी सुरू
गेल्या आठवड्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जगतपूर बेड्यावर ‘स्क्रब टायफस’ चा पहिला रुग्ण आढळला होता. तीन-चार दिवसांच्या उपचारानंतर त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने भीती वाढली होती. दरम्यान त्याच गावातील आणखी दोन रुग्णाचा अहवाल पॉझीटिव्ह आला असून अचलपुर तालुक्यातील चौसाळाजवळच्या येसुर्णा व दर्यापुर तालुक्यातील दारापुरचाही एक रुग्ण पॉझीटिव्ह असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे. यापैकी येसुर्णा येथील रुग्ण ही महिला असून त्यांच्यावर येथील एका रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यानच्या काळात पोटाचा आणखी एक विकार पुढे आल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपुर येथे पाठविण्यात आल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. त्याचवेळी दारापुर येथील रुग्ण हा पुरुष असून त्यांच्यावर डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय रुग्णालयात (पीडीएमएमसी) उपचार केले जात आहेत, तर जगतपुर येथील दोघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्यामते जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांना येत्या काही दिवसांत सुटी दिली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी यांच्यामते जगतपुर येथे तैनात केलेली आरोग्य चमू अजूनही त्याच ठिकाणी असून परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आणखी कोठेही या रोगाचा फैलाव झालेला नसला तरी नागरिकांनी काळजी बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असेही कळवण्यात आले आहे. ‘त्या’ मायलेकींना सुटी जगतपूर येथील टिरलिंग पवार या व्यक्तीचा स्क्रब टायफसने मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ त्यांच्या पत्नी मंदा आणि धाकटी मुलगी राशी यांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी राशीचा अहवाल पॉझीटिव्ह तर मंदा यांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला होता. दरम्यान प्रकृती बरी झाल्याने या दोघी मायलेकींना बुधवारी सायंकाळी सुटी देण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सौंदळे यांनी ‘दिव्य मराठी’ ला सांगितले.
विदर्भातील सुपरिचित व्यक्तिमत्व तसेच वैद्यकीय क्षेत्रातील सेवेसाठी नावलौकीक प्राप्त असे डॉ. रमेशपंत गोडबोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी यावर्षी येथील प्रज्ञा प्रबोधिनीची निवड करण्यात आल्याची माहिती आयोजक संस्थेच्या विश्वस्तांनी आज, गुरुवारी येथे माध्यमांना दिली. श्रमिक पत्रकार भवनात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना उपाध्यक्ष मोहन काटे म्हणाले, यावर्षीच्या पुरस्काराचे वितरण रविवारी २३ नोव्हेंबर रोजी, स्थानिक श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्व. सोमेश्वर पुसतकर सभागृहामध्ये सायंकाळी ५ वाजता प.पू. आचार्य जितेंद्रनाथ महाराजांच्या शुभहस्ते केले जाणार आहे. पुरस्काराचे स्वरुप १ लाख रुपयांची गौरव राशी, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे. मागील वर्षीचा पुरस्कार संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पीटला देण्यात आला होता. तर यावर्षीचा पुरस्कार अमरावती येथील सेवा प्रकल्प प्रज्ञा प्रबोधिनीला देण्याचे निवड समितीने एकमताने ठरविले आहे. प्रज्ञा प्रबोधिनी ही संस्था अमरावती जिल्ह्यातील पारधी समाजासाठी मागील २२ वर्षापासून सेवा कार्य करते आहे. पुरस्कारासाठी निवड करताना संबंधित व्यक्ती अथवा संस्थेला तशी निकड असावी, हे आवर्जून पाहिले जात असून त्या व्यक्ती किंवा संस्थेचे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचले जावे, हा उद्देश बाळगला जातो, हेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी डॉ. रमेश गोडबोले स्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मोहन काटे, सहसचिव सोपान गोडबोले, विश्वस्त अतुल गायगोले, अनंत कौलगीकर, अभय देव आदी उपस्थित होते. डॉ. रमेशपंत गोडबोले हे येथील जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष होते. वैद्यकीय क्षेत्रासह ते आध्यात्मिक प्रांतही जपायचे. त्यांची किर्तने ही अजरामर झाली आहेत. त्यांनी झिरी येथील श्री दत्त मंदिर, बडनेरा जुन्या वस्तीतील श्रीराम मंदिर, अंबापेठमधील श्री गोपाळकृष्ण मंदिर, श्री अंबादेवी मंदिर, श्री एकवीरा देवी मंदिरात कीर्तन सेवा दिली आहे. बडनेरा येथील जुन्या वस्तीतील त्यांचे रुग्णालयात समाजातील सर्व स्तरातील रुग्णांना उत्तम वैद्यकीय उपचार मिळायचे. त्यांनी तहहयात अत्यल्प दरात रुग्णसेवा केली. त्यांच्या प्रदीर्घ वैद्यकीय कारकिर्दित त्यांचा देशभरातील अनेक तज्ज्ञांशी निकटचा संपर्क होता. बडनेरा येथे त्यांच्या पुढाकारानेच अद्ययावत अशी संत गाडगेबाबा रक्तपेढी सुरु करण्यात आली आहे. या रक्तपेढीद्वारे रुग्णांना गुणवत्तेच्या सर्व पातळ्यांवर उत्तम सेवा देणे अविरत सुरु आहे.
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींना रोजगाराच्या नव्या दिशेने वाटचाल करता यावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या राज्य संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत ड्रोन पायलटसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवणे आणि स्वावलंबनासाठी नवी दिशा उपलब्ध करून देणे, हा प्रमुख उद्देश आहे. अमरावती जिल्ह्यात हा कार्यक्रम राबवण्यात येणार असून, या अंतर्गत दहा दिवसांचे डीजीसीएकृत मान्यताप्राप्त प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाद्वारे ड्रोन उड्डाण, नियंत्रण, सर्व्हेक्षण व तांत्रिक बाबींचे प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जाईल. या प्रशिक्षणामुळे तरुणांना विविध क्षेत्रांतील संधींचे दरवाजे खुले होतील. सदर प्रशिक्षणात एकाच वेळी अनेक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून ड्रोन उड्डाण, देखभाल, मोजणी, छायाचित्रण विविध क्षेत्रांतील ड्रोन वापराबाबत सखोल माहिती देण्यात येईल. प्रशिक्षण अमरावती शहरासह जिल्ह्यातील इतर प्रमुख ठिकाणी आयोजित केले जाईल. खुल्या प्रवर्गातील ज्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, अशा समाज घटकांतील युवक-युवती या प्रशिक्षणासाठी पात्र आहेत.अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा, वय १८ ते ५५ वर्षे दरम्यान असावे, तसेच दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अर्जासोबत छायाचित्र, ओळखपत्र, अधिवास व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावीत. फिटनेस प्रमाणपत्र व अर्जाची प्रत अमृत संस्थेच्या स्थानिक कार्यालयात सादर करावी. या ठिकाणी करावा संपर्क पहिल्या टप्प्यातील अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ नोव्हेंबरअसून, प्रशिक्षणाचा प्रारंभ १० नोव्हेंबरपासून अमरावती येथे होणार आहे.अमृत कार्यालय, आशीर्वाद , टोपे नगर,मालटेकडी समोर, येथे तसेच जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर ९११२२२७६३५, अमरावती जिल्हा उप व्यवस्थापक ऋषीकेश कथलकर ७२४९५११५२ तसेच अश्विनी कोळेश्वर ९५२७३१७०६८ यांचेशी संपर्क करावा.
चंद्राकार भीमा नदीच्या काठावर वसलेले, पंचक्रोशीचे श्रद्धास्थान श्री दर्लिंग देवस्थाव व तालुक्याच्या राजकारणात दबदबा असणाऱ्या पुढाऱ्यांचे गाव म्हणून पंढरपूर तालुक्यातील चळे हे गाव प्रसिद्ध आहे. राजकीय, शैक्षणिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या या गावाची उसाचे कोठार म्हणूनही ओळख आहे. चळे गावची लोकसंख्या सुमारे नऊ हजार आहे. चळे गाव पंढरपूरपासून १५ किलोमीटरवर पूर्व दिशेला वसले आहे. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन भास्करप्पा गायकवाड यांच्या नावाचा तालुक्याच्या राजकारणात दबदबा होता. दिवंगत माजी आमदार सुधाकरपंत परिचारक याचे अत्यंत निकटवर्तीय म्हणूनही भास्कर अप्पांचा राजकीय प्रभाव होता. त्याचवेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक ज्ञानेश्वर गायकवाड, संतोष गायकवाड, अण्णासाहेब मोरे, पांडुरंग सहकारीचे माजी चेअरमन दिनकारभाऊ मोरे, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती हरीशदादा गायकवाड, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक तुकाराम माने, पंचायत समितीच्या सभापती वर्षाराणी बनसोडे अशी मातब्बर नावे तालुक्याच्या राजकारणात चळे गावचा वारसा घेऊन उभी आहेत. राजकीय दृष्टीने संपन्न असलेल्या चळे गावची आणखी एक महत्त्वाची ओळख आहे ती म्हणजे उसाचे कोठार. गावाचे क्षेत्रफळ १९३८ हेक्टर आहे, त्यापैकी ८५ टक्के क्षेत्रावर उसाचे पीक आहे. लिफ्ट इरिगेशन पद्धत पद्धतीच्या वापरातून नदीपासून गाव सीमेच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी आणून येथील शेतकऱ्यांनी उसाचे फड उभारले आहेत. एकेकाळी जीप गाडीच्या हौद्यात पोत्यात भरून ऊस बिलाची रक्कम आणल्याच्या रंजक कथा तालुकाभर सर्वश्रुत आहेत. गावात चार सोसायट्या, आठ पतसंस्था तर १० दूध डेअरी राजकीय दृष्ट्या गाव अतिशय संवेदनशील आहे, एकेकाळी राजकीय गट-तट पाहूनच सोयरिकी जुळवल्या जायच्या. गावात चार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या आहेत. आठ पतसंस्था असून १० दूध डेअरी आहेत. शिवाय पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण गावातच मिळते.
अतिवृष्टीने बार्शी तालुक्यातील खरीप पूर्ण वाया गेले. आणि आत्ता परतीच्या सततच्या पावसाने रब्बीची पेरणी करण्यासाठी शेतात वाफशा होईना. वाफशा झालेल्या शेतात पेरणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही मिळेल. सरकारची घोषणा ही दिवाळीच्या फटाका सारखी झाली आवाज येईल तेव्हा वाजेल. खरीप हंगामात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पेरणीसाठी हातभार लागावा, म्हणून बियाणे खरेदीसाठी हेक्टरी १० हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. बार्शी तालुक्यात कृषीमंत्री, ग्रामविकास मंत्री आल्यानंतर नुकसान भरपाईसाठी चांगलाच गोंधळ घातला होता. पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली आहे. बार्शी तालुक्यात आत्तापर्यंत २० टक्के पेराही झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांना पेरणीसाठी जाहीर केलेली मदत अद्याप मिळाली नाही. खरीप हंगामात अतिवृष्टी, पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामात बियाणे खरेदीसाठी हेक्टरी १० हजार रुपये देण्याची शासनाने घोषणा केली होती. मात्र, घोषणा केल्यानंतर कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे करून यादी शासनाकडे पाठवली आहे. शेतकऱ्यांचे ९८ हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठवला होता. मात्र, ^शेतकरी गटांना कृषी विभागाकडून बियाणे व खत देण्यात येत आहे. आपल्या भागातील कृषी सहाय्यक अधिकारी यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांनी बियाण्याची माहिती घेऊन बियाणे घ्यावी. शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून हेक्टरी १० हजार रुपयाप्रमाणे शासनाकडे बियाणे पेरणीसाठी मागणी केली आहे, निधी उपलब्ध होतात. शासन आदेशानुसार निधी वाटप करण्यात येईल. संतोष कोयले, तालुका कृषी अधिकारी ^अतिवृष्टीमुळे खरीप सोयाबीन पूर्ण वाया गेले, ५ क्विंटल देखील उतार पडला नाही. सोयाबीनचे भाव ४ हजारावर आले. हमी भावाची गोष्ट नाही हवेतच घोषणा आहे. पेरणीसाठी जाहीर केल्याप्रमाणे लवकर अनुदान देण्यात यावे. तरच रब्बीची पेरणी करता येईल. अन्यथा उसनवारी किंवा व्याजाने पैसे काढून पेरणी करावी लागेल. आमची भिस्त आता रब्बीवरच आहे. अर्जुन गरड, शेतकरी गौडगाव मात्र, शासनाकडून अद्याप निधीच देण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हात उसनवारी, कर्ज काढून पेरणी करण्याची वेळ आली आहे. १५ हजार हेक्टर पेराही झाला. गेल्यावर्षी बार्शी तालुक्यात ७० हजार हेक्टरवरती रब्बीची पेरणी झाली होती. त्यानुसार आत्तापर्यंत यावर्षी २० टक्के पेरणी झाली आहे. शेती वाफशांवर जशी येईल, तशी रब्बीची पेरणी होईल. अतिवृष्टीमुळे खरीप सोयाबीन पूर्ण वाया
तालुक्यातील डोणगाव ते सोलापूर रस्त्याचे काम खूप दिवसांपासून काम बंद आहे. यासंबंधी डोणगाव ग्रामस्थांच्या वतीने भारत साळुंके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे १८ अॉक्टोबर रोजी तक्रार केली होती. त्यावर बांधकाम विभागाचे (उत्तर) उपविभागीय अभियंत्यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना २७ अॉक्टोबरला उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन नरोटेवाडी यांना ८ सप्टेंबर रोजी कार्यारंभ आदेश दिला होता. त्यात या रोडवरील खड्डे भरण्यास सांगितले होते. रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत ठेकेदाराला पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार रोडवरील खड्डे मुरूम व खडीने बुजवले आहेत असे म्हटले आहे. तसेच निधीअभावी हे काम रेंगाळले आहे. रस्त्याचे काम करुन घेण्यासाठी ठेकेदाराकडे पाठपुरावा सुरू असून त्यांनी तोंडी आश्वासन दिल्याचे पत्रात म्हटले आहे. परंतु वास्तवात डोणगाव ते सोलापूर रोडवर जागोजागी मोठमोठे खड्डे दिसून येत आहेत. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे डोणगाव ते सोलापूर रस्त्याने काम त्वरित चालू करण्याची मागणी डोणगाव ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
शहरातील जैन मंदिर ट्रस्टची जागा व त्या ठिकाणी असलेले मंदिर विकण्याचा घाट घातला जात आहे. तो प्रयत्न आम्ही हाणून पाडणार आहोत. जैन समाजातील काही ट्रस्टींनी चुकीच्या पद्धतीने कारभार करत ही जागा विक्रीला काढल्याचा आरोप करत ट्रस्टींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, या जागेत निवासी वापराची नोंद तत्कालीन नगरपालिकेच्या काळातील कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहे. त्याचा कार्यालय म्हणून वापर होत आहे. त्या बांधकामालाही परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे बांधकाम तत्काळ पाडावे, अशी मागणीही त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली. धंगेकर, खासदार निलेश लंके, ठाकरे शिवसेना शहरप्रमुख किरण काळे यांनी गुरुवारी सायंकाळी मनपात आयुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी युवा सेनेचे राज्य सहसचिव उर्वरित पान ४ रवींद्र धंगेकर, खासदार लंके, किरण काळेंनी मनपा आयुक्तांची भेट घेतली. ट्रस्टच्या अध्यक्ष, विश्वस्त विरोधात फिर्याद देणार या प्रकरणात फौजदारी कारवाई व्हावी. तेथे सात भाडेकरू होते. तर इतर कुठे गेले? असा सवाल करत कोणत्याही परिस्थितीत जैन मंदिर व जागा वाचवलीच पाहिजे, अशी भूमिका किरण काळे यांनी स्पष्ट केली. येत्या एक दोन दिवसात ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा व अन्य ट्रस्टींविरुद्ध फिर्याद देणार असल्याचे काळे यांनी सांगितले.
लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, स्टेशन रोड येथे सुरू झालेल्या शांतीकुमार फिरोदिया स्मृती अखिल भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या फेरीतील लढतीत रंगतदार सामने पाहायला मिळाले. या फेरीत आंतरराष्ट्रीय मास्टर राहुल संगमा व अनुप देशमुख हे विजयी झाले आहेत. पहिल्या पटावर विहान देशमुख (रेटिंग १४५८) याने गुजरातच्या अव्वल मानांकित अंगत कर्तव्य (२१५८) विरुद्ध मॉर्फी डिफेन्सने डावाची सुरुवात केली. दीर्घकाळ तगडी झुंज दिल्यानंतर ५० चालीनंतर अंगत कर्तव्यने विजय मिळवला. दुसऱ्या पटावर आंतरराष्ट्रीय मास्टर राहुल संगमा (२१३६) यांनी रेल्वेच्या राजेंद्र कोल्हे यांच्याशी रुई लोपेज ओपनिंगने डाव सुरू केला. ३८ चालींच्या संघर्षानंतर राजेंद्र कोल्हे यांनी मात नोंदवली. तिसऱ्या पटावर बीडचा तृतीय मानांकित इंद्रजीत महिंद्रकर (२१३३) याने काळ्या सोंगट्यांनी मोहित पाटील याच्यावर ४८ चालीनंतर विजय मिळवला. चौथ्या पटावर आंतरराष्ट्रीय मास्टर अनुप देशमुख (२११६) यांनी अथ्रिय दास यांचा ४० चालींत पराभव केला. तर पाचव्या पटावर सोलापूरचा श्लोक शरणार्थी याने काळ्या सोंगट्यांनी स्वानिधी वर ५० चालींनंतर मात केली. या आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्यावतीने ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे नियोजन पारदर्शक पार पडण्यासाठी श्रद्धा विंचवेकर, पवन राठी, शार्दुल तपासे, शिशिर इंदुलकर, देवेंद्र ढोकळे, विजय चोरडिया, प्रवीण जोशी आदी आर्बिटर म्हणून काम पाहत आहेत. या स्पर्धेत अनुभवी आणि नवोदित खेळाडू एकाच मंचावर भिडत असल्याने खेळाडूंचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होत आहे. पुढील काही फेऱ्यांमध्ये अव्वल खेळाडूंमध्ये होणारे सामने अधिकच रोमहर्षक ठरणार असून बुद्धिबळप्रेमींना उत्कृष्ट खेळींचा आनंद घेता येणार आहे. दरम्यान, स्पर्धेत महाराष्ट्रासह सर्वच राज्यातील खेळाडू सहभागी झाल्याने या स्पर्धेला चांगलीच रंगत आली आहे. पुढील काही दिवस या स्पर्धेचा आनंद घेता येणार असल्याचे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. शहरातील बुद्धीबळ स्पर्धेत देशभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. २७० खेळाडू सहभागी या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश अशा एकूण १७ राज्यांमधून तब्बल २७० खेळाडू सहभागी झाले आहेत.
नगर-मनमाड राज्य मार्गांवरील राहुरी शहरातून जाणारा विशेषतः पाण्याची टाकी ते राहुरी फॅक्टरी दरम्यानचा रस्ता १० दिवसांत पूर्ण करून देण्याचा शब्द राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प अधिकारी ज्ञानेश स्वामी यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना दिला. शहरातील खोदलेल्या रस्त्याच्या साईड गटारीचे काम पूर्ण होताच तोही रस्ता तातडीने करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता ज्ञानेश स्वामी यांची अहिल्यानगर येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी तनपुरे म्हणाले, राहुरी शहरातून राहुरी फॅक्टरीपर्यंतचा रस्ता खोदून ठेवल्याने या दरम्यान पुन्हा अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याने चारचाकी, दुचाकीवरून जाणाऱ्या प्रवाशांचे खूप हाल होत असून प्रवाशांना कसरत करून रस्त्याने जावे लागते. या रस्त्यावर वाहतूक जास्त असून आता साखर कारखाने सुरु झाल्याने ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्यांनी उसाची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे खूप मोठी अडचण व गैरसोय होणार आहे. आम्ही फक्त आमच्या मागण्या घेऊन आलो नाही तर तुम्हाला व ठेकेदारालाही काही अडचणी असतील, त्याही आम्ही आमच्या परीने सोडविण्याचा प्रयत्न करू. या रस्त्यावर जेव्हा खूप पाऊस होतो तेव्हा रस्त्यावरील पाणी एका बाजूला साठून तिथे नदीचे स्वरूप होते व हे पाणी रस्त्या नजीक असलेल्या घरात शिरते व शेतात साचते त्याचेही व्यवस्थित काम व्हावे. रस्त्याचे नजीक असलेले ओढे, नाले यांबाबत आराखडा आम्हास दाखवावा. या कामामध्ये खा. निलेश लंके यांचाही सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. अहिल्यानगर-संभाजीनगर रस्त्याच्या दुरुस्तीची गरज नगर-मनमाड राज्य मार्गांवर सातत्याने अपघात होत आहे म्हणून जड वाहतूक नगर संभाजीनगर मार्गे वळवल्याने तो रस्ता खूप खराब झाला आहे. हा रस्ताही दुरुस्त करणे राज्य शासनाच्या अधीन असल्याने त्यांनी पाऊस थांबल्याने तातडीने निधी उपलब्ध करून देऊन रस्ता दुरुस्त करण्यासाठी मीही पाठपुरावा करीत आहे. यासाठी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भेटीसाठी गेले होते. या शिष्टमंडळात विजय डौले, प्रकाश भुजाडी, नंदकुमार तनपुरे, सागर तनपुरे, संतोष आघाव, ज्ञानेश्वर बाचकर, महेश उदावंत, बाळासाहेब गिरमे, रवी आहेर आदी सहभागी होते.
साहेब, माझा मुलगा रोहन फार हुशार होता. परीक्षेत २० पैकी १८ मार्क मिळवले होते. पण बिबट्याने माझ्या डोळ्यासमोर त्याच्यावर झडप टाकली. वाचवायला गेलो, पण माझ्यावरही तो गुरगुरला. रक्ताच्या उलट्या झाल्या... आणि माझ्या डोळ्यांसमोर त्याने माझ्या पोटच्या गोळ्याला शेतात ओढून ठार मारलं...' अश्रूंनी डोळे भरून ‘आता हा परिसर बिबटमुक्त करा’ अशी आर्त हाक रोहनचे वडील विलास बोंबे यांनी दिली. या हृदयद्रावक प्रसंगानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भेट देत बोंबे कुटुंबाचे सांत्वन केले. भिऊ नका, आपण गाभीर्याने मार्ग काढू. हा परिसर कायमस्वरूपी बिबटमुक्त करू,' असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले. गेल्या वीस दिवसांत पिंपरखेड आणि जांबूत परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यांत तीन जणांचा बळी गेला आहे. त्यात शिवन्या बोंबे (५), भागुबाई जाधव (७०) आणि रोहन बोंबे (१३) या निरपराधांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या कुटुंबांच्या घरी भेट देऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाले. यावेळी ते म्हणाले, या भागातील बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दिवसा ढवळ्या हल्ले होत आहेत, ही गंभीर बाब आहे. यापुढे एकही जीव बिबट्याच्या हल्ल्यात जाणार नाही, यासाठी शासन पातळीवर ठोस उपाययोजना केल्या जातील. वनविभागाने सर्व यंत्रणा वापरून हा परिसर बिबटमुक्त करावा, असे निर्देश दिले आहेत.' तसेच, या भागात पानंद रस्त्यांची गरज असल्याचे सांगत, शेतकऱ्यांनी जागा दिल्यास रस्त्यांची कामे हाती घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री शिरसाट यांना या भागाचा दौरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही शिंदे म्हणाले. या भेटीवेळी आमदार शरद सोनवणे, माजी आमदार पोपटराव गावडे, माजी चेअरमन देवदत्त निकम, वनविभागाचे वरिष्ठ उपसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक उपसंरक्षक स्मिता राजहंस, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, उपविभागीय अधिकारी पूनम आहिरे, पोलिस निरीक्षक संदीप केंजळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बोंबे कुटुंबाचे सांत्वन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. छाया : सुरेश भुजबळ.
भोळ फाट्यावर डंपरने मोटारसायकल चिरडली:शेतकऱ्याच्या परिवाराने भरपाईसाठी केला राडा
इंदूर - हैदराबाद ७५३ एल महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम मुक्ताईनगर तालुक्यातील भोळ फाट्याजवळ सुरू आहे. यावेळी शेतीलगत उभ्या असलेल्या दुचाकीला डंपरने चिरडले. ही घटना ६ रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली. इंदूर - हैदराबाद ७५३ एल या महामार्गाचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या महामार्गालगतच धाबे येथील विकास पानपाटील यांच्या मालकीचे शेत आहे. शेतालगत त्यांनी हिरोहोंडा शाइन (क्र.एमएच.१९-सीएस.८२ ६६) ही दुचाकी उभी केली होती. या दरम्यान डंपर (एमएच.१९-सीएक्स.२०३१ ) मधून खडीडांबर वाहतूक सुरू होती. हे डंपर रिव्हर्स घेताना विकास पानपाटील यांच्या दुचाकीला चाकाखाली चिरडले. यात संपूर्ण गाडी चक्काचूर झाली. शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी संबंधित चालकाला गाडीची भरपाई देण्याची मागणी केली. मात्र, बी.एन.अग्रवाल कंपनीचा सुपरवायझर व नातेवाईकांमध्ये भरपाईवरून राडा झाला. गाडीची भरपाई केल्याशिवाय या ठिकाणाहून डंपर व गाड्या जाऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करत नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या नातेवाईकांना व कंपनीच्या सुपरवायझर यांना समज देत सलोखा घडून आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव विश्वनाथ मोरे यांनी भरपाईची मागणी केली.
अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी हिरापूर (दरसवाडी) येथे संदीप चव्हाण यांनी सुरु केलेले उपोषण शिवसेना उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे यांच्या मध्यस्तीनंतर मागे घेतले. हिरापूर येथील तलाठी कार्यालयासमोर संदीप चव्हाण यांनी चार दिवसांपासून उपोषण सुरु केले होते. त्यांना ग्रामस्थांनी पाठिंबा दिला होता. शिवसेना उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे यांनी उपोषणकर्ते चव्हाण यांची भेट घेऊन उपोषणाचे मुद्दे व बाबी समजून घेऊन, प्रशासन व उपोषणकर्ते यांच्यात यशस्वी संवाद घडवून आणला. हिरापूर ग्रामपंचायत हद्दीत एकूण ९०० खातेदार असून त्यापैकी ८१५ खातेदारांचे शासननियमाप्रमाणे पंचनामे करून त्यापैकी ४०५ शेतकरी खातेदार यांना पीक नुकसानभरपाईची रक्कम वर्ग करण्यात आली. तर उर्वरित खातेदारांपैकी ३६५ खातेदारांचे पंचनामे पूर्ण करून यादी तहसीलदार यांना देण्यात आली आहे. या सर्व खातेदारांची नुकसान भरपाईची रक्कम दोन दिवसात शेतकर्यांच्या खात्यावर प्रशासन वर्ग करणार आहे व ४५ खातेदारांचे पंचनामे पूर्ण झाले असून त्यांचा आधारकार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांक यांची यादी तयार करून सोमवारपर्यंत तहसीलदार यांना देण्यात येणार आहे. व तीही नुकसान भरपाईची रक्कम पुढील आठवड्यात शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. यासंदर्भातील कागदपत्रे उपोषणकर्ते संदीप चव्हाण व हिरापूर ग्रामस्थांसमोर शासन प्रतिनिधी जगताप यांनी सादर केली. या सर्व बाबींमुळे संदीप चव्हाण व हिरापूर ग्रामस्थांचे समाधान झाल्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख शांताराम ठाकरे यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. ३९ लाख इतकी भरीव मदत हिरापूर परिसरातील शेतकर्यांना शासनाच्या माध्यमातून करण्यात आल्याबद्दल ग्रामस्थ व उपोषणकर्ते यांनी समाधान व्यक्त केले.
महिला व बालविकास मंत्रालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजना (आयसीडीएस) यांच्या सहकार्याने पोषण भी पढ़ाई भी या उपक्रमांतर्गत बागलाण प्रकल्पात तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. ३ ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दोन बॅचमध्ये प्रत्येकी १०० अंगणवाडीसेविकांना प्रशिक्षण देण्यात आले असून टप्प्याटप्प्याने १३ नोव्हंेबरपर्यंत एकूण ५०५ सेविकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन असल्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी अर्जुन झरेकर यांनी सांगितले. या प्रशिक्षणात बागलाण प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविकांना ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना संतुलित पोषण आहार, आरोग्य आणि प्रारंभिक शिक्षण यांचा समन्वित विकास साधणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान बालकांचे पोषण सुधारणा, खेळातून शिक्षण तसेच आधुनिक शिक्षण तंत्र या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. पर्यवेक्षिका उषा निकम व प्रतिभा अहिरे यांनी मास्टर ट्रेनर म्हणून मार्गदर्शन केले. बालविकास प्रकल्प अधिकारी अर्जुन झरेकर यांनी सेविकांना प्रकल्पाच्या उद्दिष्टाबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान, मुलांचे आरोग्य आणि दर्जेदार शिक्षणासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुलांचे आरोग्य व दर्जेदार शिक्षणासाठी उपक्रम पोषण भी पढ़ाई भी अभियानाद्वारे अंगणवाडीत येणाऱ्या लहान मुलांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षण या तीनही गोष्टींवर समान भर देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे. कुपोषण कमी करणे, योग्य आहार व आरोग्य तपासणी सुनिश्चित करणे, शिक्षणास प्रोत्साहन देणे, अंगणवाडी सेविकांचे आधुनिक प्रशिक्षण, तसेच पालकांमध्ये जागृती निर्माण करणे हे या अभियानाचे प्रमुख हेतू आहेत. एकूणच मुलांचे आरोग्य चांगले ठेवून त्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. - अर्जुन झरेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी
बोरगाव चंपाबेन बालचंद शाह महिला महाविद्यालय, सांगली येथे १९ वर्ष वयोगटातील मुलींच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. राज्यातील ८ विभागांतील संघ सहभागी झाले होते. नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व मविप्र आश्रमशाळा मोहपाडा (ता. सुरगाणा) या शाळेच्या मुलींच्या संघाने केले. पहिल्या सामन्यात लातूर संघाला ३ - ० अशा सरळ सेट मध्ये पराभूत केले. तृतीय सामन्यात मुंबई संघाला २६ - २४ व २५ - १६ अशा फरकाने पराभूत करुन राज्यात तिसरा क्रमांक पटकवला. शाळेची विद्यार्थिनी हर्षाली बाळू चव्हाण हिची राष्ट्रीय स्तर स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली. सर्व यशस्वी खेळाडूंना शिक्षक कैलास चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. या दैदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे कळवण सुरगाणा तालुका संचालक रविबाबा देवरे, सरचिटणीस नितीन ठाकरे व शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर लोखंडे, मा.भास्कर ढोके, मुख्याध्यापक दीपक कणसेपाटील व संतोष गौळी आदींनी शुभेच्छा दिल्या. व्हॉलीबॉल स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना मान्यवर
एक कार दुसऱ्या कारवर जाऊन धडकल्याने ८ जण गंभीर जखमी झाले. हा दुर्दैवी अपघात खुलताबाद तालुक्यातील वेरूळमध्ये सोलापूर- धुळे महामार्गावरील माटेगाव चौफुलीवर गुरुवारी (दि. ६) घडला. जखमींमध्ये एक लहान मुलाचाही समावेश आहे. जखमींमध्ये मध्य प्रदेश व पुणे येथील काही जणांचा समावेश आहे. या अपघाताची नोंद खुलताबाद पोलिस ठाण्यात करण्यात आली. गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वॅगन आर कार (एमपी ०९ एएन ३४५८) सोलापूर-धुळे महामार्गावरील छत्रपती संभाजीनगर मार्गाकडून वेरूळकडे जात होती. वेरूळजवळ आल्यानंतर माटेगाव चौफुली येथून वॅगन आर कार ही वेरूळकडे जाण्यासाठी वळली. यावेळी कन्नड मार्गाकडून येणारी कार (एमएच १२ क्यूटी ०५३७) वेरूळकडे जाणाऱ्या वॅगन आर कारवर जोरात धडकली. या दोन्ही कारच्या अपघातामध्ये वॅगन आरचा चक्काचूर झाला. वॅगन आरमध्ये बसलेले अमन तवर (२७), रोहित शर्मा (२१), रणजित तवर (५०), शुभम तवर (२१), चंदन राठोड (२१, सर्व रा. खंडवा, मध्य प्रदेश) हे गंभीर जखमी होते, तर १ लहान मुलांचाही जखमीत समावेश आहे. दुसऱ्या कारमधील रणजित पाटील व संकिता पाटील (४१, रा. शिरूर, पुणे) हे जखमी झाले आहेत. दोन्ही कारमधील जखमींवर वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथम उपचार केले. नंतर पुढील उपचारासाठी वॅगन आरमधील जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले होते. दुसऱ्या कारमधील दोघा जखमींना चाळीसगाव येथील रुग्णालयात नेले होते. माटेगाव चौफुली अपघाताचे केंद्र सोलापूर- धुळे महामार्गावरील वेरूळजवळ असलेली माटेगाव चौफुली आता अपघाताचे केंद्र बनली आहे. दर आठवड्यात येथे मोठा अपघात होतो. आजवर झालेल्या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या चौफुलीवर वाहनचालकांना गाड्यांचा अंदाज येत नसल्याने वारंवार येथे अपघात घडतात. यामुळे या चौफुलीवर उड्डाणपूल उभारण्याची मागणी होत आहे.
सिल्लोड तालुक्यातील निल्लोड पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत सध्या जनावरांमध्ये लम्पीच्या आजार बळावत चालला आहे. दुभत्या गाई, बैल मृत्युमुखी पडत आहेत. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसमोर आणिखी एक संकट उभे ठाकले आहे. एकीकडे शेतकऱ्यांची झोप उडालेली असताना दुसरीकडे मात्र राजकीय पुढारी व प्रशासन निवडणुकीच्या लगीनघाईत व्यग्र आहेत. निल्लोड पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत असलेल्या गावांमध्ये ४० हून अधिक जनावरे सध्या बाधित आहेत. टाकळी जिवरग, कायगाव, गव्हाली ताडा, तलवाडा, बोरगाव कासारी, वरखेडी, बाभूळगाव येथील शेतकरी शेतीपूरक जोडधंदा म्हणून दुग्धव्यावसाय करतात. परंतु, लम्पीने हाही व्यवसाय धोक्यात आला आहे. निल्लोड पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत टाकळी जिवरग, कायगाव, बोरगाव कासारी, तलवाडा, गव्हाली, वरखेडी, बाभूळगाव ही गावे येतात. या आठ गावांत एकूण ६०८७७ जनावरे आहेत. सध्या लम्पीबाधित ३९ जनावरे आढळून आली असून ८ जनावरे दगावली आहेत. ‘लम्पी’वर थेट उपचार नाही, बाधितांना वेगळे ठेवा ^लम्पी हा विषाणुजन्य रोग असल्याने त्यावर थेट उपचार नाही, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. वेळीच पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने इतर प्राथमिक उपचार करावे लागतात. ते असे : डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दुय्यम संसर्ग रोखण्यासाठी जनावरांना अँटिबायोटिक्स किंवा इतर औषधे द्यावीत. जनावरांना ठेवण्याची जागा आणि उपकरणे नियमितपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करावीत. -डॉ. श्याम चव्हाण, पशुधन विकास अधिकारी, सिल्लोड
येथील तरुण शेतकरी दीपक शिवाजीराव बुढाळ यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर गावातील केळी थेट इराणपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवले आहे. पारंपरिक शेतीसोबत नवीन प्रयोग करण्याची वृत्ती आणि निर्यातक्षम उत्पादनावर दिलेला भर यामुळे सावळदबारा या छोट्याशा गावाचे नाव आंतरराष्ट्रीय बाजारात झळकले आहे. दीपक बुढाळ यांनी या वर्षी सुमारे ५,००० केळीच्या झाडांची लागवड केली होती. परंतु या वर्षी बाजारात केळीचे दर प्रतिक्विंटल ३८० रुपयांपर्यंत घसरल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा कठीण परिस्थितीत बुढाळ यांनी उच्च दर्जाच्या केळीचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या पिकाला निर्यातदारांनी पसंती दिली असून या केळीचा थेट इराणला निर्यात करण्यासाठी व्यवहार झाला आहे. आतापर्यंत २६ टन केळी प्रतिक्विंटल ८०० रुपये दराने थेट इराणमध्ये गेली आहे. सावळदबारा परिसरात काही वर्षांपूर्वी तयार झालेल्या साठवण तलावामुळे अनेक शेतकऱ्यांना बागायती शेतीचा लाभ झाला. या सुविधेमुळेच दीपक बुढाळ यांना केळी लागवडीचा प्रयोग करणे शक्य झाले. शिवाजीराव बुढाळ पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांनी परिस्थितीमुळे खचून न जाता, आपल्या जमिनीचा प्रकार आणि साधनसंपत्ती ओळखून विविध पिकांवर प्रयोग करावेत. अशा नव्या पद्धतींनी शेतीला नवे मार्ग मिळतील. मुलांमुळे झाले शक्य, मेहनतीला आले फळ माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव बुढाळ म्हणाले, “आमच्या मर्यादित साधनांमध्ये आणि हलक्या जमिनीत ही केळी लागवड एक प्रयोगात्मक पद्धतीने केली होती. मुलांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन इराणला जाणाऱ्या दर्जेदार केळीची निर्मिती केली, याचा आम्हाला प्रचंड आनंद आणि अभिमान वाटतो.”
पैठण तालुक्यातील सानपवाडी या छोट्या गावाने संपूर्ण जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे. गावातील प्रत्येक घरातील किमान एक व्यक्ती नोकरीला लागली आहे. त्यामुळे सानपवाडीला ‘संपूर्ण रोजगाराचं’ गाव म्हणून ओळख मिळाली आहे. पाचशेंहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावातील प्रत्येक घरातील एक ते दोन व्यक्ती सरकारी नोकरीत आहेत. त्यामुळे इतर गावांसाठीही ही प्रेरणादायी बाब ठरली आहे. गावातील युवकांनी शिक्षणासाठी आठ-दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जळगाव, पाचोड येथे जाऊन शिक्षण पूर्ण केले. गावात केवळ चौथीपर्यंत जिल्हा परिषद शाळा आहे. तरीही तरुणांनी शिक्षणात खंड न पडू देता सरकारी नोकरी मिळवली. डीवायएसपी, पोलिस निरीक्षक, पोलिस कर्मचारी, फौजी, शिक्षक अशा विविध सरकारी सेवांमध्ये सानपवाडीतील युवक कार्यरत आहेत. गावात आज दीडशेहून अधिक युवक सरकारी नोकरीत आहेत. काही वर्षांपूर्वी केवळ काही कुटुंबांतील तरुण नोकरीत होते. आता मात्र प्रत्येक घरात एक-दोन व्यक्ती नोकरीत आहेत. गावात एकही घर असे नाही, जिथे नोकरी करणारा व्यक्ती नाही. गावातील सेवानिवृत्त डीवायएसपीपासून अनेकांनी सरकारी नोकरीचे स्वप्न पाहिले. युवकांनी पायी शाळा करत ‘एक घर-एक नोकरी’ ही मोहीम स्वतःहून राबवली. त्यामुळे गावाचा चेहरामोहरा बदलला.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त बाबरा सर्कल परिसरात ‘जितेंद्र जैस्वाल मित्रमंडळा’तर्फे तीन दिवसांचा शालेय साहित्य वाटप उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमातून आळंद, उमरावती, नायगव्हाण, चिंचोली नकिब, विरमगाव, ममनाबाद येथील जिल्हा परिषद शाळा आणि खामगाव येथील गोरक्ष महाविद्यालयातील एकूण २,५०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र बाबा जैस्वाल यांच्या पुढाकाराने झाला. सरदार पटेल यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना जागवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांनी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावली. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मदत करणारे हे पाऊल प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. जितेंद्र जैस्वाल यांनी सांगितले की, सरदार पटेल यांच्या देशाच्या एकीकरणासाठीच्या कार्यातून प्रेरणा घेत हा उपक्रम हाती घेतला. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना जबाबदार नागरिक बनवणे, हाच यामागचा उद्देश आहे. कार्यक्रमाला अनेक गावांचे सरपंच, उपसरपंच, माजी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सांडू जाधव, मोहन सोनवणे, विठ्ठल पाथरे, तारु मेटे, हौसाताई काटकर, शोभाताई कापसे, जगन्नाथ दाढे, लक्ष्मण चोपडे, रामेश्वर चोपडे, सुनिल तायडे, कैलास गायके, कैलास काकडे, खुशालराव पवार, धनंजय महाजन यांचा समावेश होता. या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि ग्रामस्थांनी मित्रमंडळाचे आभार मानले. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त झालेला हा उपक्रम राष्ट्रीय एकात्मता आणि समाजसेवेचा आदर्श ठरला.
अजय बंडीचा खून हर्षद पाटणकरच्या इशाऱ्यावर झाल्याच्या संशयातून गोवर्धन येथील राहुल पवार टोळीने हर्षदचा गेम करण्याचा प्लॅन आखला होता. तर पाटणकर टोळीकडून अजय चौरेच्या खुनाचा बदला घेण्याकरिता टोळीप्रमुख राहुल पवारचा काटा काढण्याचा कट रचला गेल्याचे तपासात उघडकीस आले. दोन्ही टोळीप्रमुख फरार असून पथक त्यांच्या मागावर आहे. पवार टोळीच्या भूषण पवारने तक्रार दिली की, ३ रोजी रात्री ८.३० वाजता मित्र अजय देवरे, भारत कुऱ्हाडे, विक्की गुंजाळ, प्रेम जगताप, अोम जगताप आदी पाटणकरला समाजावून सांगण्यास त्याच्या घरासमाेर गेले. संशयित पाटणकरने ‘तू राहुल्याला साथ देतो, आता तुझीच विकेट पाडतो’ अशी धमकी देत मानेवर कुकरीने वार केला. पवार टोळीच्या सदस्यांना कोठडी पथकाने पवार टोळीचे अजय देवरे, भारत कुऱ्हाडे, विक्की गुंजाळ, प्रेम जगताप, अोम जगताप यांना अटक केली. ६ अल्पवयीनांना ताब्यात घेतले. काेर्टाने संशयितांना १० पर्यंत कोठडी दिली. खंडणी घेत असल्यास वाहनचालकांनी करावी तक्रार श्रमिक रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रकचालक मालक सेना पदाधिकाऱ्यांकडून युनियन फी, पट्ट्यावर वाहने चालविण्याकरता पैशांची मागणी होत असल्यास पोलिसांत तक्रार करा, असे आवाहन गुन्हे शाखेने केले आहे. खंडणी, अवैध कब्जा, टॅक्सीचालकांकडून खंडणीच्या २ गुन्ह्यांत पाठक फरार आहे. या गुन्ह्यात संस्थापक अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. पाटणकर-पवार टाेळीत उडाला भडका, दाेन्ही टाेळींचे प्रमुख फरार प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सीचालकांकडून खंडणी घेणारा श्रमिक सेनेचा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठकचे पंटर इप्पा भाऊ उर्फ इरफान युसूफ पठाण, आसिफ उर्फ फायटर अमीन कादरी (दोघे रा. बागवानपुरा), आबिदभाई उर्फ धोबी इस्माईल शेख (रा. शालिमार) या खंडणीखोरांना गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने कसारा, शिरोळे फाटा येथे अटक केली. संशयिताना गुन्हे शाखा युनिट १ मध्ये हजर करत दिवाळीचा फराळ देण्यात आला. न्यायालयात जाताना त्यांनी स्वत:हून ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ अशा घोषणा दिल्या. वरिष्ठ निरीक्षक अंचल मुदगल यांच्या पथकाचे प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, मिलिंदसिंग परदेशीयांना बाळासाहेब पाठक याचे समर्थक कसारा येथे आहे. पथकाने हाॅटेल टर्निंग पाॅइंट येथे सापळा रचून वरील संशयितांना अटक केली. संशयितांची कसून चौकशी केली असता युनियन फीच्या नावाखाली रिक्षा, टॅक्सीचालक-मालकांकडून प्रवासी वाहने पट्ट्यावर चालवण्याकरता खंडणी घेत असल्याची कबुली दिली. युनियनचा कार्याध्यक्ष पठाणसह वरील संशयितांच्या विरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात संशयित फरार होता.
मराठवाडा आणि विदर्भाला बससेवेने जोडणाऱ्या सिडकोतील बसस्थानकाचा कायापालट होणार आहे. सध्या असलेल्या एकमजली स्थानकाच्या जागेवर आठ मजली स्थानक उभारण्यात येणार आहे. या कालावधीत स्थानकाचे चिकलठाणा येथील कार्यशाळेत स्थलांतर करण्यात येणार आहे. तेथून बस सोडण्यात येणार आहेत. या ठिकाणी विमानतळाच्या धर्तीवर अत्याधुनिक, सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी ८ मजली भव्य इमारत उभी राहणार आहे. हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर उभारला जाणार आहे. उभारले जाणारे फक्त बसस्थानक नसून विविध कॉर्पोरेट कार्यालये, भव्य ॲम्फिथिएटर, हॉटेल, स्पा पार्लर अशा सुविधांनी युक्त एक ‘इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट आणि कमर्शियल हब’ असणार आहे. एकाच वेळी शंभरावर बसेस थांबू शकतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. हा प्रकल्प ४५० कोटी रुपये खर्चून साकारला जाईल आणि त्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर २९ वर्षांसाठी करार निश्चित करण्यात आला आहे. बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतर बांधकाम पूर्ण होण्यास ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागणार असल्याने, यादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सिडको बसस्थानक चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमधील एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत तात्पुरते स्थलांतरित करण्यावर प्रशासकीय स्तरावर विचार सुरू आहे. या स्थानकावरही एकाच वेळी १०० हून अधिक बस थांबणार आहेत. आर्थिक आणि वाहतुकीचे केंद्र सिडको बसस्थानक हे मराठवाडा, विदर्भ तसेच पुणे, मुंबई आणि कोकणकडे जाणाऱ्या बसेससाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. शहराची जवळपास पन्नास टक्के लोकसंख्या या स्थानकावर अवलंबून आहे. मध्यवर्ती बसस्थानकापेक्षा मोठी जागा उपलब्ध असल्याने हा नवीन प्रकल्प शहराच्या दळणवळण व्यवस्थेची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवेल. प्रकल्पाला तीन वर्षे मुदत काझी-सिंघानिया-बंब- जबिंदा इन्फ्रास्ट्रक्चरच्या वतीने तीन वर्षांत विमानतळाच्या धर्तीवर सिडको बसस्थानक उभारले जाईल, असे बांधकाम व्यावसायिक तथा क्रेडाई महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. दोनशे आणि शंभर प्रेक्षक क्षमतेेची दोन स्वतंत्र थिएटर उभारण्यात येणार आहेत. महापालिकेची बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर तीन वर्षांत काम पूर्ण केल्यानंतर २९ वर्षांचा करार एसटी महामंडळासोबत केला जाईल. केवळ पर्यावरणासाठी एकमेव परवानगी अद्याप मिळालेली नाही. संबंधित परवानगी काही दिवसांत प्राप्त होणार आहे. काही भागात एसटी महामंडळाची कार्यालये राहतील तर इतर भागाचा व्यावसायिक वापर करण्यात येईल.
अमेरिकनांना गंडवणाऱ्या टोळीचा सूत्रधार पसारच:अन्य आरोपींची केली न्यायालयीन कोठडीत रवानगी
शहरातील चिकलठाणा एमआयडीसीमधील बोगस कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक सुरू असल्याचा ठपका ठेवत तब्बल ११८ आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील ११२ जणांची पहिल्याच दिवशी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्या वेळी पोलिस कोठडीत असलेल्या ६ आरोपींचीदेखील गुरुवारी (६ नोव्हेंबर) न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र, नेमकी किती रुपयांची फसवणूक केली हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिस तपासासाठी गुजरातपर्यंत गेले, पण त्यांच्या हाती काहीही लागलेले नाही. २९ ऑक्टोबर रोजी बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकासह छापा टाकत बनावट कॉल सेंटरचा भंडाफोड केला. येथून अमेरिकेतील नागरिकांना ऑनलाइन गंडा घातल्याचे रॅकेट उघडकीस आले. या प्रकरणात अहमदाबादचा राजवीर वर्मा हा कॉल सेंटरचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले आहे. स्थानिक पातळीवर आर्थिक व्यवहारांची जबाबदारी अब्दुल फारुक ऊर्फ फारुकी मकदुम शाह याच्याकडे होती. तसेच व्यवस्थापनाचे कामकाज पाहणारे भावेश चौधरी, भाविक पटेल, सतीश लाडे, वलय व्यास (सर्व रा. अहमदाबाद), अजय ठाकूर आणि मनवर्धन राठोड या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे. राजवीर वर्मा आणि फारुक शाह वगळता इतर सर्व आरोपींच्या पोलिस कोठडीचा कालावधी गुरुवारी संपला. बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश फसवणूक किती रुपयांची झाली?किती जणांची फसवणूक झाली ?अमेरिकी यंत्रणेकडून माहिती येण्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्यांच्याकडून काहीही उत्तर का आले नाही ?मुख्य आरोपी राजवीरने त्याच्या काकासह हा कारनामा केला. त्याला अटक का नाही? तो विदेशात पळून गेला आहे का ?फसवणुकीतील पैसा कोठे गेला? डॉलरचे रुपयांत रूपांतर कोण कसे करत होते?
आमच्या आंदोलनामुळे सरकारने कर्जमाफीची घोषणा आणि ३० जूनची तारीख अशा दोन्ही गोष्टी करून घेतल्या आहेत. सरकारची आता खरी कसरत असून आपण फसलो नसून स्वत:च सरकार फसले आहे. त्याच्या तारखेमुळे ते अडचणीत आले आहे, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिली. दरम्यान, कर्जमाफी न केल्यास एक जुलैला रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नागपूर येथे हजारो शेतकऱ्यांची एकजूट केल्याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शेतकरी एकता झिंदाबाद चिंतन बैठक पुण्यातील गांजवे चौकातील पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे गुरुवारी (६ नोव्हेंबर) घेण्यात आली होती त्या वेळी कडू बोलत होते. या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जाणकर, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर, फीनिक्स अकॅडमीचे संचालक नितेश कराळे, शरद जोशी विचार मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठलराजे पवार, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील देवरे, स्वराज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर, हनुमंत गायकवाड आदी उपस्थित होते. कडू म्हणाले की, आमच्या एकूण २२ मागण्या होत्या. त्यामुळे चर्चेतून प्रश्न काढणे गरजेचे होते. आंदोलन करताना सरकारवर दबाव महत्त्वाचा असतो. मात्र, पाऊस, कोर्टाच्या अडचणी आणि पोलिसांनी केलेल्या जिल्हा नाकेबंदीमुळे आम्ही चर्चेसाठी गेलो होतो. कर्जमाफी करताना चालू वर्षी झालेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आला असताना त्यांची कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसता. त्यामुळे पुन्हा ते शेतकरी वंचित राहिले असते, म्हणून ३० जूनची तारीख घेतली आहे. परंतु सरकारने ३० पर्यत सरकार कर्जमाफी केली नाही तर एक जुलैला रेल्वे रोको करण्यात येईल. हे सरकार जनतेच्या रेट्यापुढे घाबरते : महादेव जानकर रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले, हे सरकार जनतेच्या रेट्यापुढे घाबरते. म्हणून आंदोलनकर्त्यांना कोर्टाच्या नोटिसा देतात. आम्ही फकीर असून कुणालाही भीत नाही. आला तर आडवा केल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडियावर ट्रोल केले जात असले तरी त्याकडे लक्ष देऊ नये. त्यामुळे ३० जूनपर्यंत कर्जमाफी केली नाही तर पुन्हा आंदोलन पेटेल. चर्चेने प्रश्न सोडवण्याची भूमिका आम्ही घेतली होती. लोकांनी आम्हाला साथ दिली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या या एकाच वेळी पूर्ण होणार : तुपकर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले की, आंदोलन सुरू असताना अनेक शेतकरी टीव्हीवर आंदोलन पाहत होते. काही जण आंदोलनस्थळी आले होते. शेतकऱ्यांच्या मागण्या या एकाच वेळी पूर्ण होणार नसून टप्प्याटप्प्याने मागण्या पूर्ण करून घ्याव्या लागणार आहेत. आज सोयाबीन, कापसाच्या दराचा प्रश्न आहे. त्यासाठी भविष्यात पुन्हा मोठे आंदोलन उभे करावे लागणार आहे. शेतकऱ्यांचा आपला सक्रिय सहभाग आंदोलनात असणे अपेक्षित आहे. परंतु तसे झाले नाही.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे. पक्षाच्या आदेशानंतर काही दिवसांतच तिकिटासाठी ११५० हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. हा विक्रमी आकडा मानला जात आहे. मुंबईतील सहाही जिल्ह्यांमधून इच्छुकांनी दाखवलेल्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मुंबई काँग्रेसमध्ये उत्साहाचे वारे वाहत आहेत. मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी या घडामोडींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “महापालिकेची आरक्षण सोडत लवकरच अपेक्षित आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांना आणखी संधी मिळावी, या उद्देशाने मुदतवाढ देण्यावर विचार सुरू आहे.” इच्छुकांच्या या महापुरामुळे पक्षात तिकीट मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष, खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या तयारीला “सुपरफास्ट’ गती मिळाली आहे. पक्षाने शहरातील २२७ वॉर्डांसाठी स्वतंत्र “इन्चार्ज’नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून वॉर्डस्तरावर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आता लवकरच मोर्चेबांधणीलाही सुरुवात होणार आहे. कार्यकर्त्यांचा ‘एकला चलो’चा नारा! राजहंस म्हणाले, “बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे की, पक्षाने ही निवडणूक स्वबळावर लढावी. याच भूमिकेतून आमचे सर्व कार्यकर्ते निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.’ महाविकास आघाडीसोबत युती करायची की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठी घेतील. मात्र, खासदार वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत, असेही राजहंस यांनी ठामपणे सांगितले.
पार्थ पवार यांच्या भूखंड घोटाळा प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवलेंवर निलंबनाची कारवाई झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यानंतर नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक सुहास दिवसे यांनी हवेली क्रमांक ४, पुणे शहर येथील सह दुय्यम निबंधक वर्ग-२ आर. बी. तारू यांनाही निलंबित केले. दरम्यान, आपल्याला बळीचा बकरा करण्यात आले आहे. माझी कुठल्याही फाइलवर सही नाही, माझ्याकडे जमिनीचा प्रस्ताव आलाच नाही, असा दावा येवले यांनी केला आहे. मात्र, सूत्रांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी येवले यांनी या भूखंडावरील आरक्षण हटवण्याविषयी पत्रव्यवहार केला होता. तारू यांच्या निलंबनाविषयीच्या आदेशात म्हटले आहे की, या व्यवहाराच्या कागदपत्रांत भूखंडाचे बाजारमूल्य २९४.६५ कोटी तर विक्री मोबदला ३०० कोटी रुपये नमूद आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या अनुच्छेद २५ (ब) नुसार, ३०० कोटींवर ५% मुद्रांक शुल्क (१५ कोटी), १% स्थानिक संस्था कर (३ कोटी) व १% मेट्रो कर (३ कोटी) मिळून एकूण २१ कोटी शुल्क देय होते. मात्र, जिल्हा उद्योग केंद्राच्या ‘लेटर ऑफ इंटेंट’ व महसूल विभागाच्या १ फेब्रुवारी २०२४ च्या अधिसूचनेचा आधार घेऊन केवळ ५०० रुपयांवर दस्त नोंदविला गेला. अधिसूचना सवलत देऊ शकते, परंतु स्थानिक संस्था कर व मेट्रो कराला माफी नाही. व्यवहार कागदपत्रांसोबतच्या ७/१२ उताऱ्यावर भोगवटाधारक म्हणून ‘मुंबई सरकार’ नमूद असून, उतारा बंद झाल्याचे दिसते. दिग्विजय पाटलांच्या नावापुढे स्त्री उल्लेखाचा आराेप अमेडिया कंपनीचे दुसरे भागीदार दिग्विजय पाटील हे पार्थ पवारांचे मामेभाऊ आणि माजी मंत्री तथा भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे चुलतभाऊ आहेत. या जागेवर आयटी पार्क उभारण्याचा प्रयत्न हाेत आहे. आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी खरेदी खताची नक्कल पाेस्ट करीत आराेप केला आहे की, मुंढवा भाग मुळशी तालुक्यात असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच अमेडियाचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्या नावापुढे चक्क स्त्री लिहिले आहे. या चुका वरकरणी किरकाेळ वाटत असल्यातरी त्या तशा नाहीत.
जे जबाबदाऱ्या पार पाडत नसतील त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा. तसेच जमत नसेल तर पद सोडा, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी संताप व्यक्त केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान गुरुवारी पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. मात्र, या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांवर प्रचंड नाराज दिसले. या वेळी मनसेचे वरिष्ठ नेते तसेच शहरातील सर्व शाखा उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांना मतदार यादीची पडताळणी करण्याचे स्पष्ट काम सांगितलं होते. आज जेव्हा या मतदारयाद्यांबाबत विचारणा केली, तेव्हा एकाही पदाधिकाऱ्यांकडे याबाबत उत्तर नव्हते. इतके दिवस काय काम केले ते दाखवा, मतदार याद्या का पूर्ण केल्या नाहीत. जे पदाधिकारी काम करणार नाहीत, किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणार नाहीत, अशा शब्दांत ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. ही बैठक एक-दोन तास चालणे आवश्यक होते. सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन हे या बैठकीचे मूळ उद्देंश होता. मात्र, शहरातील नेत्यांकडून तसेच पदाधिकाऱ्यांकडूनच निराशाजनक उत्तर मिळाल्यामुळे राज ठाकरे यांनी ही बैठक संपवून निघून जाणे पसंत केले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू असल्याचे दिसून आले आहे.
वाघामुळे चंद्रपूरच्या 2 गावांत 5 वाजताच दारे बंद:अतिरेकी पर्यटन आणि घुसखोरीही जबाबदार असल्याचा दावा
जंगलाचा राजा असलेला वाघ जंगल सोडून बाहेर पडत आहे. कोअरपेक्षा बफरमध्ये जास्त वाघ फिरत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात गावकरी वाघाच्या दहशतीत वावरत आहेत. एकट्या मे महिन्यात ९ लोकांचा बळी गेला. मात्र, वनखाते ढिम्म असल्याने लोकांमध्ये रोष आहे. वाघाच्या दहशतीमुळे दोन गावांतील लोक सायंकाळी ५ वाजताच आपल्या घराचे बंद करून घेतात. वाघाला ट्रँक्युलाइज करून जेरबंद करण्याचे आदेश अशा वेळी वनखाते देते. मात्र, मानव वन्यजीव संघर्ष टाळून दोघांचेही सहअस्तित्व कायम राहावे, अशी उपाययोजना करण्यात वनखाते नेहमीच कमी पडत आले, हे खरे असले तरी यासाठी अतिरेकी पर्यटन, रिसाॅर्टवाले, ग्रामस्थ, गाइड यांचीही चूक आहे. वाघाला माणसांची सवय पडू नये यासाठी वनखाते काळजी घेते. पण त्यात दीर्घकालीन उपाययोजनेत परिणामकारक लोकसहभागही तितकाच आवश्यक आहे. वाघ सांभाळणे फक्त वनखात्याचीच जबाबदारी नसून ती तितकीच लोकांचीही आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असे मानव वन्यजीव प्रश्नाचे अभ्यासक मंदार पिंगळे यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या गणेशपिपरी येथील अलका पांडुरंग पेंदोर, चेकपिपरी येथील भाऊजी पाल यांच्या वाघाने बळी घेतला. बळी घेणारा वाघ शेतशिवारात ठाण मांडून आहे. वाघाची दहशत या दोन्ही गावांत पसरली आहे. कधी रात्रीचे बारा वाजेपर्यंत जागे असणाऱ्या या गावात सायंकाळी पाच वाजता स्मशानशांतता पसरत आहे. शेतात कापूस, धान पीक शेवटचा टप्प्यावर आले असताना शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केल्याचे चित्र आहे. २०२६ मध्ये व्याघ्रगणनेत किती राहू शकतात वाघ प्रकल्प २०२२ २०२६टीएटीआर ९५ ११०ब्रह्मपुरी ६६ ८५चंद्रपूर ५२ ७८मध्य चांदा ३६ ५२एकूण २५० ३२५ वाघाच्या हल्ल्यामध्ये बळी जाण्याची ही आहेत कारणे लोकांचे जंगलावरील अवलंबित्व कमी न होणे. सरपण, जळतण वा गुरे राखण्यासाठी जाताता काळजी न घेणे. वन विभागाच्या सूचनांचे नीट पालन न करणे. लोकांचा वाघांच्या अधिवासातील वाढता हस्तक्षेप.
मतदानाचे स्वातंत्र्य आणि मतदानाचा हक्क हे दोन्ही वेगवेगळे आहेत. प्रत्येक व्यक्तीने वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली, तर पडताळणीच्या कामामुळे अधिकाऱ्यांवर ताण येईल आणि अर्जांचा महापूरच येईल असे मत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीचा समावेश मतदार यादीच्या प्रत्येक पुनरावलोकनामध्ये केला जाईल असे नमूद करुन मुंबईत मतदार म्हणून नावनोंदणी करू इच्छिणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणीचा अर्ज सहा आठवड्यांत निकाली काढावा, असा आदेश उच्च न्यायालयाने निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांना दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ ही नोंदणीची अंतिम तारीख म्हणून अधिसूचित करण्यात आली आहे, म्हणजेच केवळ १ जुलै २०२५ पर्यंत ज्या युवा नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट असतील, त्यांनाच मतदानाची परवानगी दिली जाणार आहे.त्यामुळे यावर्षी एप्रिलमध्ये १८ वर्षे पूर्ण झालेल्या रुपिका सिंग हिने या तरुणीचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकारला नाही. या निर्णयास तिने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा संदर्भ देत न्यायमूर्ती रियाज छागला आणि न्यायमूर्ती फरहान दुबाश यांच्या खंडपीठाने मतदान स्वातंत्र्य व हक्क यातील फरक स्पष्ट केला. १८ वर्षांचे झालात की, मतदानाचा हक्क मिळतो. परंतु अधिकाऱ्यांकडून मतदार यादीचे पुनरावलोकन केले जाते तेव्हाच हक्क मिळतो,असे खंडपीठ म्हणाले. मतदार याद्यांत आता बदल होणार नाही : आयोग ठाम मुंबई | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आता मतदार याद्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही. निवडणुकीसाठी अत्यल्प वेळ असल्याने याद्यांचे पुनरीक्षण करणे शक्य नसल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने स्वीकारलेल्या याद्यांनुसारच आता मतदान प्रक्रिया पार पडेल. ‘दुबार मतदार याद्यां च्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी निवडणुका पुढे ढकलण्याची किंवा मतदार याद्यांचे पुनर्निरिक्षण करण्याची मागणी लावून धरली आहे. या संदर्भात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतली. तेव्हा ते म्हणाले की, मतदार यादी पुनरीक्षणासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो. अतिशय वेगाने काम केल्यास दोन महिने लागतीलच. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुनरीक्षण शक्य नाही. दोनदा मतदानाचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई हाेणार राज्य निवडणूक आयोगाकडून आता दुबार मतदारांना शोधून त्यांच्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. असे मतदार कोणत्या मतदारसंघात मतदान करणार आहेत, किंवा ते दुबार मतदान करणार नाहीत यासाठी त्यांच्याकडून लेखी हमीपत्र घेण्यात येणार आहे. त्यानंतरही जर कोणी दोनदा मतदानाचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे दुबार मतदारांचा प्रश्न काही प्रमाणात निकाली निघू शकेल, असा विश्वासही चोक्कलिंगम यांनी व्यक्त केला.
मुंब्रा अपघात प्रकरणी दोन रेल्वे अभियंत्यांवर गुन्हा दाखल केल्याने संतप्त झालेल्या सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन (सीआरएमएस) या संघटनेने गुरुवारी सायंकाळी सीएसएमटी स्थानकात अचानक आंदोलन सुरू केले. या आंदोलनात मोटरमनदेखील सहभागी झाल्याने मध्य रेल्वेमार्गावरील लोकल सेवा ऐन गर्दीच्या वेळी तासभर ठप्प झाली. या आंदोलनामुळे लोकल सेवा खोळंबली आणि अनेक प्रवाशांनी रेल्वे रुळावरून चालण्यास सुरुवात केली. दरम्यान, सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान अंबरनाथ लोकलने रुळावरून चालणाऱ्या चार प्रवाशांना धडक दिली. चारही प्रवाशांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डाॅक्टरांनी यापैकी दोघांना मृत घोषित केले. मृतांमध्ये हेल्ली मोहामाया या १९ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. तर अन्य मृत प्रवाशाची अजून ओळख पटलेली नाही. जखमी असलेल्या २२ वर्षीय कैफ चोघळे आणि ४५ वर्षीय खुशबू या दोन प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. ४० मिनिटे रेल्वे वाहतूक ठप्प राहिल्याने गर्दी ‘नॅशनल रेल्वे मजदूर युनियन’च्या नेतृत्वाखाली ५० ते ६० मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. यामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल ४० ते ५० मिनिटे स्थानकातच खोळंबल्या. त्यामुळे सीएसएमटी स्थानकावर प्रचंड गर्दी झाली आणि त्यातच ही दुर्घटना घडली आहे. तब्बल एक तास लोकल बंद राहिल्याने कल्याण, पनवेलच्या दिशेने जाणारी लोकलची वाहतूक विस्कळीत झाली. टिटवाळा, कसारा, कर्जत, खोपोली, अंबरनाथ, पनवेल, वाशी, वांद्रे लोकलचे वेळापत्रक बिघडले. आंदोलक कामावर रुजू, तासाभरानंतर लोकल सुरू लोकल सेवा ठप्प झाल्याने रेल्वे प्रशासनाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत तात्काळ चर्चा सुरू केली. या चर्चेंनतर आंदोलनकर्ते कर्मचारी कामावर परतू लागताच वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली. सायंकाळी ५.५० वाजता ठप्प झालेली लोकल सेवा सायंकाळी ६.४५ वाजता पुन्हा सुरू करण्यात आली, असे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी स्पष्ट केले. त्यासोबत इतर लोकल गाड्यांचे वेळापत्रकही सुरळीत होईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. रेल्वे मजदूर युनियनचे आंदोलन कशामुळे होते? हे आंदोलन मुंब्रा येथे ९ जुन रोजी झालेल्या रेल्वे अपघातप्रकरणी दोन अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ होते. अपघाताच्या अंतर्गत चौकशीत, सिनियर सेक्शन इंजिनियर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोळस यांनी पावसाने रुळाखालील माती खचल्याची माहिती असूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. याच दुर्लक्षामुळे ५ प्रवाशांचा बळी गेल्याचा ठपका या तक्रारीत केला आहे. ‘गटबाजी’मुळे निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला दिसला.
प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका सुलक्षणा पंडित काळाच्या पडद्याआड
मुंबई : बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले आहे. गुरुवार दि. ६ नोव्हेंबर रोजी त्यांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पंडित गेल्या काही काळापासून खूप आजारी होत्या. तसेच त्या गेल्या १६ वर्षांपासून अंथरुणावर होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपट आणि संगीत क्षेत्रात शोककळा पसरली […] The post प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका सुलक्षणा पंडित काळाच्या पडद्याआड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोटामध्ये स्लीपर वंदे भारत ट्रेन १८० किमी वेगाने धावली
कोटा : येथे स्लीपर वंदे भारत ट्रेन ताशी १८० किमी वेगाने धावली. या प्रवासादरम्यान, लोको पायलटच्या डेस्कवरील पाणीदेखील सांडले नाही. ही पूर्णपणे स्वयंचलित ट्रेन आहे. स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेल्या या ट्रेनच्या २ ते १७ नोव्हेंबर दरम्यान चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांचा उद्देश ट्रेनची तांत्रिक कार्यक्षमता, ब्रेकिंग, स्थिरता, कंपन आणि विद्युत प्रणाली तपासणे आहे.ही चाचणी लखनौच्या रिसर्च […] The post कोटामध्ये स्लीपर वंदे भारत ट्रेन १८० किमी वेगाने धावली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा ‘लाल सलाम’
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी संघाच्या निवडणुका पार पडल्या. मंगळवारी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली होती. सायंकाळी मतमोजणी पूर्ण झाली. विद्यार्थी संघाच्या चारही जागा डाव्या संघटनांनी जिंकल्या. मागच्या निवडणुकीत एक जागा कमी मिळाली होती. विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला कामगिरी उंचावता आली नाही आणि मानहानीकारक […] The post जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा ‘लाल सलाम’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल
पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांच्या कंपनीने बाजारभावापेक्षा कितीतरी पट कमी किंमतीत ४० एकर भूखंड खरेदी केल्याचे प्रकरण समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये पार्थ पवारांचे नाव नाही. पोलिसांनी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू […] The post भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्ह्यातील भुमिपुत्र युवकांनी केला धिरज देशमुख यांचा सत्कार
लातूर : प्रतिनिधी स्पर्धा परीक्षांची तयारी करुन नोकरी मिळवणा-या बेरोजगार युवकांची संख्या मोठी आहे. त्या तुलनेत नोकर भरतीमध्ये रिक्त जागांची संख्या खूप कमी आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोकर भरतीत स्थानिक जिल्ह्याचे रहिवाशी असलेल्या युवकांना ७० टक्के जागा राखीव ठेवण्यासाठी लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी प्रभावी […] The post जिल्ह्यातील भुमिपुत्र युवकांनी केला धिरज देशमुख यांचा सत्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘दगाबाज’ सरकारला शेतक-यांनो धडा शिकवा
अहमदपूर : प्रतिनिधी शेतक-यांना फक्त आश्वासने देणा-या दगाबाज सरकारला शेतक-यांनी धडा शिकवावा, असे आवाहन शिवसेना (उबाठा) प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आवाहन केले.अहमदपूर तालुक्यातील थोरेलेवाडी येथील शेतक-यांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शेतक-यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर गैरसोयीचा व तक्रारींचा पाढाच वाचला. उध्दव ठाकरे म्हणाले की, या सरकारने शेतक-यांची नेहमीच फसवणूक करून […] The post ‘दगाबाज’ सरकारला शेतक-यांनो धडा शिकवा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पार्थ प्रकरणावरून अण्णा हजारे कडाडले
राळेगण सिद्धी : पुण्यातील कोरेगावमधील ४० एकर जमिनीच्या खरेदीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजिव पार्थ पवार अडचणीत सापडले आहे. तब्बल १८०४ कोटी रुपये किंमतीची ही जमीन केवळ ३०० कोटी खरेदी झाल्याचा समोर आले आहे. याच मुद्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या मंत्र्याचा मुलगा चुकीचे वागत असेल तर तो मंत्र्याचा दोष आहे. त्यासाठी […] The post पार्थ प्रकरणावरून अण्णा हजारे कडाडले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतक-याचा मृत्यू
वर्धा : जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील भिडी येथील एका दुचाकी चालकाचा पतंगीच्या नायलॉन मांजामुळे गळ्याला फास लागून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास भिडी येथील रस्त्यावर घडलेल्या या दुर्घटनेत एका निष्पाप शेतक-याला आपला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, दुसरीकडे सोलापूर विमानतळ परिसरातही नॉयलॉन मांजामुळे विमान वाहतुकीला अडथळा निर्माण […] The post नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतक-याचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
युद्धविराम काळात पाकचा अफगाणिस्तानवर गोळीबार
काबुल : काही दिवसांपूर्वी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव सुरू होता. दोन्ही देशांमध्ये हल्ले झाले, यामध्ये दोन्ही दोन्ही देशांचे नुकसान झाले. यानंतर दोन्ही देशात युद्धविराम करण्यात आले. गुरुवारी युद्धबंदी असूनही पाकिस्तानने अफगाणिस्तानवर गोळीबार केला. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर गोळीबार करण्यात आला. नाजूक युद्धबंदी मजबूत करण्यासाठी तुर्कीमध्ये दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानने ही कारवाई केली. पाकिस्तानने हलक्या […] The post युद्धविराम काळात पाकचा अफगाणिस्तानवर गोळीबार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाक पंतप्रधानांच्या जवळच्या मंत्र्याने घेतला दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे जवळचे एक मंत्री सध्या चर्चेत आहेत.ते दहशतवादी हाफिज सईदच्या बंदी घातलेल्या संघटनेच्या जमात-उद-दावाच्या राजकीय शाखेच्या कार्यालयाला त्यांनी काही दिवसापूर्वी भेट दिली होती. यामुळे ते चर्चेत आले आहेत. शाहबाज शरीफ यांचे जवळचे सहकारी तलाल चौधरी यांनी पंजाबमधील पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीगच्या कार्यालयाला भेट दिली, हे हाफिज सईदच्या जमात-उद-दावाची राजकीय […] The post पाक पंतप्रधानांच्या जवळच्या मंत्र्याने घेतला दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

31 C