सोलापूरच्या एका निःस्वार्थी प्रेमाची कथा आता थेट 70 मिमि सिनेमाच्या पडद्यापर्यंत पोहोचली आहे. आजच्या 'अटेंशन' आणि 'फेक कंटेंट'च्या जमान्यात, एका पतीने आपल्या पत्नीला मृत्यूच्या दाढेतून परत आणले, अशी ही हृदयस्पर्शी कथा आहे. सोलापूरचे आकाश नारायणकर आणि अंजली शिंदे यांच्या अजरामर प्रेमाची ही कहाणी लवकरच चित्रपट रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावरील लोकप्रिय जोडीला नियतीचा धक्का 'अंजलीबाई' या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या रिलस्टार अंजलीचे हसते-खेळते व्हिडिओ तुफान व्हायरल होत असत. सोशल मीडियावर तिचा जोडीदार आकाश नारायणकर सोबत तिची केमिस्ट्री चांगलीच हिट होती. आपल्या मनोरंजक व्हिडिओंच्या माध्यमातून या जोडप्याने मोठा चाहता वर्गही निर्माण केला. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला. अंजलीला ब्रेन ट्यूमर (मेंदूचा कर्करोग) झाल्याचे निष्पण झाले. चेहऱ्यावर कायम हसू असलेली अंजली अचानक अबोल झाली आणि तिच्या आनंदावर दुःखाची गडद छटा पसरली. नियतीने मांडून ठेवलेले हे डोंगराएवढे दुःख पाहून आकाश हादरला खरा, पण तो तिच्यासाठी पहाडासारखा उभा राहिला. मृत्यूच्या दाढेतून परत आणणारी साथ कर्करोगासोबतच अंजलीला अर्धांगवायूचा झटकाही आला होता. अशा गंभीर आणि दुःखद परिस्थितीतही आकाशने तिला भक्कम साथ दिली. त्याने तिला धीर दिला आणि तिच्यासोबत रिल्स बनवणे सुरू ठेवले. आकाशने आपल्या निस्सीम आणि निस्वार्थी प्रेमाचे उदाहरण या 'रिअलवाली रिल्स स्टोरी'च्या माध्यमातून जगासमोर ठेवले. त्यांची ही प्रेमकथा तुफान व्हायरल झाली आणि त्याची दखल थेट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने घेतली. 'लव्ह यू मुड्डू' चित्रपटातून प्रेरणादायी प्रवास करियप्पा आणि क्रिटिकल कीर्तनेगलूच्या केमिस्ट्रीसाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते कुमार यांनी या जोडप्याच्या आयुष्यावर आधारित ''लव्ह यू मुड्डू'' नावाचा चित्रपट बनवला आहे. येत्या 7 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट निखळ प्रेम आणि संयमाचा संदेश देतो. आयुष्य कितीही खडतर असले तरी खरं प्रेम कधीच हार मानत नाही आणि प्रेमात स्वतःला सिद्ध करण्याची ताकद असते, हे अंजली आणि आकाशच्या प्रेमकथेने दाखवून दिले आहे. फेक रिल्सच्या जमान्यात पडद्यावर झळकणारी ही एक रिअल स्टोरी आहे.
डिजिटल व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरी, डिजिटल गोपनीयता हा नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. एका सर्वेक्षणानुसार, ८५ टक्के भारतीय नागरिकांचा वैयक्तिक डेटा असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षभरात सायबर चोरांनी देशभरात तब्बल ७० हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. डेटा असुरक्षिततेबाबत भारत जगात पहिल्या तीन क्रमांकात आहे. डार्क वेबवर फूड डिलिव्हरी, रुग्णालये, बँका, विमा कंपन्या, ई-कॉमर्स आणि हॉटेल्समध्ये दिलेला वैयक्तिक डेटा मोठ्या प्रमाणात सायबर चोरांना उपलब्ध होत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) च्या मदतीने फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, एआयवरील डेटाचा वापर करून सायबर हल्ले सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, क्विक हीलने भविष्यसूचक एआय आणि रिअल टाइम फसवणूक प्रतिबंधासह डिजिटल गोपनीयतेला प्राधान्य देणारी 'टोटल सिक्युरिटी व्हर्जन २६' (Total Security Version 26) उपलब्ध केली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय काटकर आणि स्नेहा काटकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. संजय काटकर यांनी सांगितले की, सुधारित डार्क वेब मॉनिटरिंग २.० आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आणि इतर महत्त्वाच्या वैयक्तिक गोष्टींना अनधिकृत प्रवेशापासून सतत संरक्षण देते. एआय-संचालित सुरक्षा सहाय्यक 'सिया' (Sia) प्रणाली देशातील पहिली फसवणूक प्रतिबंधक सोल्युशन अँटीफ्रॉड.एआय (AntiFraud.AI) द्वारे संरक्षण प्रदान करते. सायबर गुन्हेगार प्रति मिनिट १.५ लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान करत आहेत. देशातील वापरकर्त्यांना दररोज त्रास देणाऱ्या सर्वसमावेशक सायबर धोके आणि अत्याधुनिक फसवणूक प्रयत्नांविरोधात डिजिटल सुरक्षा पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शासकीय स्तरावर विविध एजन्सीकडे डेटाचे काम जाते आणि त्यातून डेटा चोरी किंवा हॅकिंगचे प्रकार वाढतात. सरकारी कार्यालयांमध्येही डेटा सुरक्षेबाबत चिंताजनक परिस्थिती आहे. एआय चॅटबॉट सर्वेक्षणातून असेही दिसून आले आहे की, सायबर चोरटे आता एकाच वेळी अनेकांना फसवणूक करत आहेत. फसवे ॲप्स, वेबसाइट्स, फसव्या यूपीआय विनंत्या आणि बँकिंग फसवणूक करणारे कॉल्स हे धोके वाढले आहेत. संगणक आणि लॅपटॉप अँटीव्हायरसने सुरक्षित केले जातात, परंतु मोबाईलमध्ये अँटीव्हायरस टाकला जात नाही. त्यामुळे सायबर गुन्हेगार त्याचा गैरफायदा घेऊन अनेक गुन्हे करतात. संवेदनशील माहितीचे संरक्षण करण्यासाठी डार्क वेबची सर्वसमावेशक सुरक्षितता देखील महत्त्वाची आहे. एआयचा वापर केलेल्या नागरिकांचा डेटा एकत्रित करून त्याचा देखील आता सायबर फसवणुकीसाठी वापर केला जाऊ लागला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मुंबई, पुणे आणि सोलापूर येथील शासकीय रुग्णालयांसाठी स्मोक डिटेक्टर खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, चार कोटी रुपयांचे काम असताना त्यासाठी तब्बल ८० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने ४ नोव्हेंबर रोजी एक शासन निर्णय (GR) काढला आहे. यानुसार, ऐरालिक्वि टेक्नॉलॉजी इनोव्हेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून 'डेटेक्स स्मोक डिटेक्टर' खरेदीस मान्यता देण्यात आली आहे. ही खरेदी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय वर्षातील राज्य योजनेअंतर्गत केली जाणार आहे. मुंबईतील केईएम आणि संलग्न रुग्णालये, पुण्यातील ससून रुग्णालय आणि सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ही उपकरणे बसवण्यात येणार आहेत. कुंभार यांनी या ८० कोटींच्या खर्चाला केवळ भ्रष्टाचार नसून राज्याच्या तिजोरीवर टाकलेला दरोडा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रार केली आहे. ससून रुग्णालयासाठी ३५० युनिट्स, सोलापूर रुग्णालयासाठी ३५३ युनिट्स आणि केईएम रुग्णालयासाठी १३६ युनिट्स असे एकूण ८३९ स्मोक डिटेक्टर युनिट्स खरेदी केले जाणार आहेत. प्रति युनिट ९ लाख ४२ हजार ८२० रुपये असा दर मंजूर करण्यात आला आहे. कुंभार यांच्या मते, हा दर अत्यंत फुगवलेला असून सार्वजनिक निधीचा गैरवापर आहे. बाजारभावानुसार, प्रत्येक युनिटवर सुमारे अडीच ते तीन हजार टक्के अधिक दर आकारला गेला आहे. यामुळे तब्बल ७५ कोटींपेक्षा अधिक अनावश्यक खर्च होत आहे. या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधित खरेदी तात्काळ स्थगित करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कुंभार यांनी केली आहे. एकूण ८३९ युनिट्ससाठी ९.४३ लाख प्रति युनिट दराने ७९.१० कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. प्रत्यक्षात, बाजारात प्रगत स्मोक डिटेक्टर ४० हजार ते ५० हजार रुपयांना उपलब्ध आहेत, ज्यामुळे हा खर्च केवळ ४.२० कोटींपर्यंत झाला असता. म्हणजेच, हा खर्च सुमारे ७५ कोटी रुपयांनी वाढवण्यात आला आहे. शासन निर्णयात 'तात्पुरता दर' नमूद असूनही बाजारभावाची पडताळणी न करताच मंजुरी देण्यात आली आहे, जे नियमबाह्य आहे. वस्तू बाजारात २० ते ३० पट कमी दराने उपलब्ध असतानाही अशा अवास्तव दराने खरेदी केल्यामुळे राज्याचे गंभीर आर्थिक नुकसान होणार आहे. अशा प्रकारची खरेदी 'एकमेव स्रोत' (single source) पद्धतीने करण्याची आवश्यकता नव्हती. खरेदीदारांचा हेतू पारदर्शक नसतो तेव्हाच अशाप्रकारे खरेदी केली जाते, असे कुंभार यांनी म्हटले आहे. राज्यात शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नसताना अशाप्रकारे राज्याच्या तिजोरीची लूट केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोलापूर : प्रतिनिधी सोलापुरातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. सोलापुरमध्ये २५ प्रवाशांना घेऊन जाणा-या एसटी बसचा अपघात झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने एसटीने डिव्हायडरवर तोडून कारला धडक दिली. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बार्शीतून सोलापूरकडे […] The post सोलापुरात एसटी बसचा ब्रेक फेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
फलटण येथील मृत महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉ. संपदा मुंडे काम करत होत्या, परंतु वरिष्ठांच्या दबावामुळे त्यांनी आत्महत्या केली. या घटनेने महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. अशातच संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे. शनिवारी मनोज जरांगे हे स्वतः मुंडे कुटुंबीयांच्या भेटीला वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे गेले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले होते की संपदाताईला न्याय मिळण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. मुंडे कुटुंबीयांनी चार मागण्या केल्या, त्यातील एक मार्गी लावली, इतर तीन मागण्या आपण मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले होते. तसेच या विषयावर मी अजित पवार यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. मृत डॉ. संपदा मुंडे या मूळच्या बीड जिल्ह्यातल्या होत्या. नोकरीसाठी त्या सातारा जिल्ह्यातील फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या. त्यांच्या आत्महत्येमुळे पोलिस अधीक्षक तसेच रुग्णालयातील काही वरिष्ठांची चौकशी सुरू आहे. परंतु, अद्यापही मुंडे यांना न्याय मिळत नसल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे- सुषमा अंधारे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फलटण पोलिस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्याआधी सुषमा अंधारे यांनी माध्यमांसमोर पुरावे दाखवत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. निंबाळकरांनी आरोपपत्र दाखल करण्यास मदत केली पाहिजे. कुणाला मारण्याचा अधिकार पोलिसांना कुणी दिला? असा सवाल अंधारे यांनी पोलिस स्टेशन बाहेर ठिय्या देत विचारला होता. एपीआने महिला डॉक्टरला टॉर्चर केले, असा आरोप अंधारे यांनी यावेळी बोलताना केला होता.
चंदेरी पापलेटची प्रजाती धोक्यात
मुंबई : प्रतिनिधी चंदेरी पापलेटच्या संवर्धनासाठी आता जनजागृती आवश्यक असल्याचे समोर येत आहे. या माशाला राज्य माशाचा दर्जा प्राप्त आहे. असे असूनही प्रजाती धोक्यात येत असल्याने दंडात्मक कारवाई करावी लागणार आहे. महाराष्ट्र शासनाने अलीकडेच पापलेटला राज्य माशाचा दर्जा दिला आहे. मात्र पालघरमध्ये राज्य मासा संकटात सापडला असून चंदेरी पापलेटची प्रजाती धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. […] The post चंदेरी पापलेटची प्रजाती धोक्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागाला अखेर 'कणखर' नेतृत्व मिळणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी या महत्त्वाच्या पदावर लवकरच आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात स्वारगेट येथे घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. त्या पार्श्वभूमीवर एसटीच्या सुरक्षा यंत्रणेतील ढिसाळपणा उघड झाला आणि हे पद वर्षानुवर्षे रिक्त असल्याचे समोर आले. याचवेळी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात ठामपणे आश्वासन दिले होते की “एसटीला लवकरच आयपीएस दर्जाचा अधिकारी मिळेल!” त्या आश्वासनाची पूर्तता आता प्रत्यक्षात येत असून, एसटी महामंडळाच्या पाठपुराव्याला राज्याच्या गृह खात्याने हिरवा कंदील दाखवला आहे. मुख्यमंत्री महोदयांनीही या नियुक्तीस मान्यता दिल्याने, लवकरच एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाला अनुभवी, शिस्तप्रिय व कुशल आयपीएस अधिकारी प्रमुख म्हणून मिळणार आहेत. या निर्णयामुळे एसटीच्या प्रवाशांचा सुरक्षेवरील विश्वास अधिक दृढ होईल, तर महामंडळाच्या अंतर्गत शिस्तीला नवी धार मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जगप्रसिद्ध वेरूळ हे फक्त ऐतिहासिक लेण्यांसाठीच नव्हे, तर धार्मिक परंपरांसाठीदेखील ओळखले जाते. आज कार्तिकी पौर्णिमेनिमित्त येथे असलेल्या कार्तिकी स्वामी मंदिरात भक्तांचा प्रचंड ओघ पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, वर्षभर कार्तिकी स्वामींचे दर्शन महिलांना मिळत नाही, मात्र कार्तिकी पौर्णिमा अर्थात त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी महिलांसाठी एक दिवस दर्शनाची परंपरा आहे. त्यामुळे आजच्या दिवशी वेरूळ येथे महिलांसह भक्तांनी मोठी गर्दी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ हे धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिर असल्याने वेरूळला “देवांची भूमी” अशी ओळख मिळाली आहे. याच ठिकाणी असलेल्या नागेश्वर मंदिरात कार्तिकी स्वामींची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. जिल्ह्यात कार्तिकस्वामींची एकूण तीन प्रमुख मंदिरे आहेत, त्यापैकी एक वेरूळ येथे असल्याचे सांगितले जाते. वर्षातून एकच दिवस महिलांसाठी दर्शन कार्तिकी स्वामींच्या दर्शनासंदर्भात एक विशिष्ट धार्मिक आख्यायिका प्रचलित आहे. या परंपरेनुसार, महिलांना वर्षभर कार्तिकी स्वामींचे दर्शन घेता येत नाही. मात्र, कार्तिकी पौर्णिमा, म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने, वर्षातून फक्त एक दिवस महिलांना दर्शनाची परवानगी मिळते. या एका दिवशी दर्शन घेतल्यास महिलांना पुण्य प्राप्त होते आणि त्यांचे जीवन सुखकर होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी, आजच्या पावन दिवशी वेरुळ येथील मंदिरात महिला भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. पवित्र पौर्णिमेच्या मुहूर्तावर स्वामींचे दर्शन घेण्याची संधी साधण्यासाठी महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. भक्तांनी कार्तिकी स्वामींचे मनोभावे दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. कार्तिकी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व कार्तिकी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा, हा दिवस हिंदू पंचांगानुसार अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि कार्तिकेय यांची पूजा केली जाते. देशभरात या दिवशी स्नान, दान, दीपदान आणि यात्रा अशा विविध धार्मिक विधींचे आयोजन होते. वेरूळमध्येही आज दिवसभर मंदिर परिसरात कीर्तन, भजन आणि दीपमाळा यांचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक पर्यटनाला चालना वेरुळ हे जागतिक वारसा स्थळ असून, घृष्णेश्वर मंदिरामुळे ते नेहमीच चर्चेत असते. कार्तिकी स्वामी मंदिरासारखी धार्मिक स्थळे वेरुळचे महत्त्व आणखी वाढवतात. या तिन्ही मंदिरांचा योग्य प्रसार झाल्यास वेरुळच्या धार्मिक पर्यटनाला आणखी चालना मिळू शकते, ज्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांच्या संख्येत वाढ होईल.
शेतकऱ्यांची फसवणूक केली ही उद्धव ठाकरे यांची कॅसेटी जुनी झाली आहे. त्यांचे तीच रटाळ कॅसेट व तेच टेप लोकांना दररोज ऐकण्यात काडीचाही रस राहिला नाही, अशा शब्दांत सत्ताधारी शिवसेनेचे खासदार तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या 4 दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यात ते अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या मागे खासदार श्रीकांत शिंदेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेत. स्थानिक पत्रकारांनी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याविषयी प्रश्न केला असता त्यांनी लोकांना उद्धव ठाकरे यांच्या आरोपांची तीच ती टेप ऐकण्यात कोणताही रस राहिला नसल्याचा दावा केला. ते म्हणाले, शेतकऱ्यांची फसवणूक केली ही उद्धव ठाकरेंची कॅसेट जुनी झाली आहे. तीच रटाळ कॅसेट, तीच टेप लोकांना दररोज ऐकण्यात इंटरेस्ट नाही. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना काय दिले? याऊलट राज्यात ओला दुष्काळ उद्भवल्यानंतर महायुती सरकारने तत्काळ 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. यापूर्वी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनीही तेव्हा एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवत शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम केले. पण आता ज्यांनी काहीच केले नाही, ते शेतकऱ्यांशी येऊन बोलत आहेत. त्यांना बोलू द्या. शेतकऱ्यांना माहिती आहे की, त्यांच्यासोबत कोण उभे आहे. शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळाला. त्यामुळे विधानसभेला शेतकरी आमच्या मागे उभे राहिले आणि महायुती सरकार पुन्हा निवडून आले, असे ते म्हणाले. स्थानिक निवडणुका महायुती म्हणूनच लढवणार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीलाच यश मिळणार असल्याचाही ठाम विश्वास व्यक्त केला. महायुतीची निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. आमच्या शिवसेनेनेही जय्यत तयारी केली आहे. आज वैजापूर, दहीसर येथे पक्षाचा कार्यक्रम आहे. कालच निवडणुका जाहीर झाल्या. प्रथम नगरपरिषद व नगरपंचायती आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील. त्यात आम्हाला विधानसभा निवडणुकीसारखेच यश मिळेल. आम्ही महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवू. पण काही स्थानिक पातळीवर वेगळी परिस्थिती असेल तर तिथे विचाराअंती निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. आत्ता पाहू काय म्हणाले उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे यांनी आज दिवसभरात छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव या 3 जिल्ह्यांतील विविध गावांत जाऊन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार विशेषतः अजित पवारांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, अजित पवार बेधडकपणे सांगत आहेत की, आम्हाला निवडणुकीत जिंकायचे होते म्हणून आम्ही कर्जमाफीचे आश्वासन दिले. आमच्यासमोर अडचणी आहेत. तुम्हीही हातपाय हलवा. अहो, अजित पवार तुम्ही कुणाला हातपाय हलवण्यास सांगत आहात? तुम्ही अन्नदात्याला हातपाय हलवायला सांगत आहात? हातपाय हलवूनही त्यांच्यावर संकट ओढवले आहे. आपत्तीच इतकी मोठी आली आहे की, हलवले जाणारे हात कपाळावर मारायची वेळ आली आहे. तुम्ही शेतकऱ्याला हातपाय हलवण्यास सांगत आहात, मग तुम्ही काय करत आहात? तुम्ही सरकार हलवताय ना? हे ही वाचा... उद्धव ठाकरे अन् केंद्राचे पथक शेतकऱ्यांच्या बांधावर:पंतप्रधानांचे महाराष्ट्रापेक्षा बिहारवर अधिक प्रेम, फडणवीसांनीच सांगितली आतली गोष्ट; ठाकरेंचा आरोप छत्रपती संभाजीनगर -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. दगाबाज रे संवाद दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. 5, 6, 7 व 8 नोव्हेंबर रोजी असे 4 दिवस ते मराठवाडयातील शेतकऱ्यांशी थेट गावातील पारावर व बांधावर जाऊन राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीची भरपाई प्रत्यक्षात मिळाली की नाही याची माहिती घेणार आहे. दुसरीकडे, केंद्राचे पथक देखील नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात दाखल झाले आहे. केंद्रीय पथकाने मंगळवारी रात्री मोहोळ भागात पाहणी केली. आज ते सकाळी सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. वाचा सविस्तर
फलटण येथील महिला डॉक्टर च्या आत्महत्या प्रकरणी निलंबित असलेल्या व त्या गुन्ह्यात अटक असलेल्या निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने यास पदास अशोभनीय अशा नैतिक अध:पतन व अशोभनीय अशी गोष्ट केल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक सुनील फुलारी यांनी शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे. फलटण शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या पुण्यातील अटक आरोपी निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने याने पोलिस उपनिरीक्षक पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग यासह समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याची वर्तणूक केली. पोलिस उपनिरीक्षक पदाला अशोभनीय ठरेल असे वर्तन केले. म्हणून त्यास पोलिस खात्यात पदावर ठेवणे हे सार्वजनिक व लोकहितार्थ दृष्टिकोनातून उचित होणार नाही म्हणून निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने यास शासकीय सेवेतून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून बडतर्फ केले आहे, असे प्रसिद्धी पत्रक पोलिस अधीक्षक सातारा यांनी काढले आहे. गोपाळ बदनेवर बलात्काराचा आरोप दरम्यान, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉक्टर महिलेने 23 ऑक्टोबर रोजी रात्री फलटण येथील एका लॉजवर गळफास लावून घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली सापडली, ज्यामध्ये तिच्या तळहातावरील सुसाईड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे होती. पीएसआय बदनेने तिच्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचा आणि प्रशांत 5 महिन्यांपासून छळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर चार पानांची सुसाईड नोट देखील समोर आली असून, त्यामध्ये एका खासदार आणि त्यांच्या पीएवरही आरोप आहेत. रणजितसिंह निंबाळकरांवर आरोप दरम्यान, महिला डॉक्टरने आपल्या तक्रारीत वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव असल्याचे नमूद केले होते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी माजी खासदाराचे सहाय्यक दबाव टाकत असल्याचा उल्लेख तिने केला होता, मात्र पोलिस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. याच दबावामुळे तिने शेवटी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात सुषमा अंधारेंनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव घेतले आहे. फलटणमधील अनेक घटना निंबाळकर आणि त्यांच्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे घडत असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. यासंदर्भात त्यांनी काही पुरावेही समोर आणले आहेत. हे ही वाचा... फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण:मेहबूब शेख यांचा फडणवीसांवर निशाणा; IPS अंजना कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली SIT ची मागणी फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांची एसआयटी प्रमुख म्हणून नेमणूक करण्याची मागणी केली आहे. सविस्तर वाचा... पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदनेवर अनेक गंभीर आरोप:महिलांची छेड काढायचा, डोळा मारायचा; महिलांशी वर्तनाचा इतिहास उघडकीस साताऱ्यातील फलटण शहरात घडलेली तरुण महिला डॉक्टरची आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या या डॉक्टर तरुणीने शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री साडेदहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात आणि पोलिस यंत्रणेत मोठी खळबळ माजली. आत्महत्येपूर्वी डॉक्टर तरुणीने स्वतःच्या हातावरच तिच्या मृत्यूचे कारण लिहून ठेवले होते. या हातावरील मजकुरानुसार पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांनी चार वेळा लैंगिक अत्याचार केला, तर प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीने गेल्या चार महिन्यांपासून मानसिक आणि शारीरिक छळ केला, असे स्पष्टपणे नमूद केले होते. या खुलाशानंतर फलटण शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा...
एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री
मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटर येथील यशोदर्शन (मुख्य) सभागृहात महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे लिखित ‘दाही दिशा’ या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नीलम गो-हे यांनी मोठे विधान केले आहे. या विधानांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नीलम गो-हे यांच्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले, या कार्यक्रमात त्या […] The post एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिरूरमध्ये हैदोस घालणारा नरभक्षक बिबट्या ठार
पुणे : जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या पिंपरखेड येथील नरभक्षक बिबट्याला अखेर मोठ्या प्रयत्नांनंतर ठार करण्यात आले आहे. सहा वर्षीय या बिबट्याने शिरूर लातुक्यातील काही गावांमध्ये हैदोस घालून ठेवला होता. मंगळवारी (ता. ४ नोव्हेंबर) रात्री उशिरा शार्प शूटरने कारवाई करत या अंदाजे सहा वर्षीय बिबट्याला ठार केले आहे. या बिबट्याने आतापर्यंत दोन लहान मुले आणि एका […] The post शिरूरमध्ये हैदोस घालणारा नरभक्षक बिबट्या ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सरकारविरोधात एकवटूया : उद्धव ठाकरे
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी मराठवाड्यातील शेतक-यांशी संवाद साधण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे चार दिवसांच्या मराठवाडा दौ-यावर आहेत. दौ-याच्या पहिल्या दिवशी बुधवारी (ता. ५ नोव्हेंबर) संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या नांदर गावातील शेतक-यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतक-यांना सरकारविरोधात एकवटूया, असे आवाहन केले आहे. मराठवाड्यावर अतिवृष्टीचे संकट ओढावल्यानंतर राज्य सरकारने […] The post सरकारविरोधात एकवटूया : उद्धव ठाकरे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर बुधवारी कोल्हापुरात ऊसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न झाला. यामुळे कोल्हापुरातील ऊस दराचे आंदोलन अधिकच चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 8 कारखान्यांनी मागील हंगामाची एफआरपी थकवल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला होता. तसेच या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले असता उपरोक्त घटना घडली. यासंबंधीच्या माहितीनुसार, काही अज्ञात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या रस्त्याने जाणाऱ्या ताफ्यावर ऊसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ऊसाच्या कांड्यांनी भरलेली पोती रस्त्यावर टाकून आपला निषेध नोंदवला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ऊसाच्या कांड्या बाजूला केल्या. ऊस दराचे आंदोलन चिघळण्याची शक्यता गत काही दिवसांपासून ऊस दराच्या मुद्यावरून कारखानदार, शेतकरी संघटना व प्रशासन यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ऊसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न झाल्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घटनेमुळे काही काळ पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे ही घटना ज्या ठिकाणी घडली तिथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. पण शेतकऱ्यांनी त्यांना कोणताही थांगपत्ता लागू न देता आपले काम फत्ते केले. राजू शेट्टींनी दिला होता जाब विचारण्याचा इशारा उल्लेखनीय बाब म्हणजे माजी खासदार राजू शेट्टी यांनी काही नुकताच ऊस दराच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा इशारा दिला होता. कोल्हापूर जिल्ह्यातील 8 कारखान्यांनी मागील हंगामाची एफआरपी थकवली आहे. पण त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. एफआरपीपेक्षा कमी दर जाहीर करणे हा कायद्याचा भंग आहे. असे करणाऱ्या 3 कारखान्यांना सरकारने नोटीस बजावली नाही. गेल्या हंगामातील आरएसएफ (रेव्हिन्यू शेअरिंग फॉर्म्युला) नुसार 200 रुपये दिले नाहीत. कायदा फक्त शेतकऱ्यांना आहे. तो कारखान्यांना नाही का? आता या प्रकरणी मी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारेल, असे ते म्हणाले होते. गेल्या वर्षीच्या रिकव्हरीवर उसाची एफआरपी ठरवली जाते. बाजारातील साखरेचा दर 42 रुपये झाला, तरी एफआरपी 31 रुपये किलोनुसारच ठरते. त्यामुळे जिल्ह्यातील एफआरपी 4 हजारांच्या वर असली पाहिजे. जोपर्यंत थकीत एफआरपी व आरएफएसप्रमाणे गेल्यावर्षीचे 200 रुपये दिले जात नाहीत, तोपर्यंत एकही कारखाना सुरू करू देणार नाही, असेही ते म्हणाले होते. हे ही वाचा... उद्धव ठाकरे घराबाहेर पडल्याचा आनंद:ठाकरेंचे विकासावर भाषण दाखवा अन् हजार रुपये मिळवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत. त्याचा मला आनंद आहे. पण ते टोमणे मारण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर
राज्य सरकारने मेगा भरतीचे आश्वासन दिल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभागात 3500 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या जाहिरातींमध्ये एनटी प्रवर्गासाठी (A, B, C, D) एकही जागा आरक्षित नसल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी मुद्दा उपस्थित केला आहे. या गंभीर त्रुटीकडे लक्ष वेधण्यासाठी मुंडे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना थेट पत्र लिहिले आहे. तसेच ही जाहिरात रद्द करून नव्याने प्रसिद्ध करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी पत्रातून केली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक 4 नोव्हेंबर, 2025 रोजी समुदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) 1 हजार 974 जागा व वैद्यकीय अधिकारी (गट - अ) 1 हजार 440 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, यातील समूदाय आरोग्य अधिकारी पदाच्या जाहिरातीत एन टी - डी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही. तर दुसऱ्या वैद्यकीय अधिकारी भरतीच्या जाहिरातीत एन टी प्रवर्गातील अ,ब,क,ड या चारही प्रवर्गांसाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही. या दोन्हीही जाहिराती स्थगित करून सर्वसमावेशक पद्धतीने सदर जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात याव्यात, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी पत्रात काय म्हटले? राज्य शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दि. 4 नोव्हेंबर, 2025 रोजी समूदाय आरोग्य अधिकारी (कंत्राटी) या पदाच्या सुमारे 1974 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून, या जाहिराती मध्ये एन टी डी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्र. 01/2025, दि. 4 नोव्हेंबर, 2025 यान्वये एकूण 1440 वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात येत असून या जाहिराती मध्ये एन टी प्रवर्गातील अ, ब, क, ड या चारही प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही. राज्यभरात या प्रवर्गातील लाखो विद्यार्थी असून ते या पदांसाठी प्रयत्न करत आहेत. या पदासाठी इच्छुक असलेल्या एन टी प्रवर्गातील अनेक उमेदवारांनी दूरध्वनी व्दारे तसेच विविध माध्यमातून माझ्याकडे तक्रार केली असून, या दोन्ही जाहिरातीच्या माध्यमातून एन टी प्रवर्गासाठी सुमारे 3500 जागांमध्ये एकही जागा आरक्षित नसले वावत संताप व दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान या दोन्ही जाहिरातीच्या माध्यमातून एन टी प्रवर्गासाठी जागा आरक्षित नसणे हे गंभीर व अन्यायकारक असून, तातडीने या जाहिरातीस स्थगिती देऊन, आरक्षित पदांची फेरतपासणी करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. तरी, आपणास विनंती की कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही यासाठी या दोन्हीही जाहिरातीस स्थगिती देऊन नव्याने जाहिराती प्रसिद्ध करण्यात यावी, ही विनंती, असे धनंजय मुंडे यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. पुढील निर्णयाकडे लक्ष दरम्यान, या प्रकरणात आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, धनंजय मुंडेंच्या पत्रानंतर एनटी प्रवर्गातील उमेदवारांमध्ये आशेची भावना निर्माण झाली आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा पुढील निर्णय आता महत्त्वाचा ठरणार आहे.
दगडूशेठ गणपतीला ५२१ पदार्थांचा महानैवेद्य:त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ट्रस्टतर्फे अन्नकोटाचे आयोजन
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात लाडक्या गणरायाला ५२१ पदार्थांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने या अन्नकोटाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मिठाई, फराळाचे तिखट-गोड पदार्थ, विविध प्रकारची आकर्षक फळे आणि अनेक रसास्वादाचे पदार्थ बाप्पाला अर्पण करण्यात आले. मंदिरामध्ये अन्नकोटाची सुंदर आरास साकारण्यात आली होती. पुणेकरांनी हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी आणि आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिराचा परिसर तोरण, फुले आणि रांगोळ्यांनी आकर्षकपणे सजवण्यात आला होता. ट्रस्टचे विश्वस्त आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अन्नकोटासाठी पदार्थ देण्याचे आवाहन भाविकांना करण्यात आले होते. त्यानुसार ५२१ हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात जमा झाले. बळीराजावरील संकट दूर होऊन महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात सुख-शांती नांदावी, अशी प्रार्थना यावेळी गणरायाच्या चरणी करण्यात आली. दरम्यान, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वेदभवन येथेही विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वेदभवनाच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त हे कार्यक्रम होणार आहेत. श्री घैसास गुरुजी वेदपाठशाळेचे प्रधानाचार्य व प्रधान विश्वस्त मोरेश्वर विनायक घैसास गुरुजी आणि विश्वेश्वर मोरेश्वर घैसास गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता त्रिपुरारीचे पूजन करून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याच दिवशी सायंकाळी ५:३० ते ८ या वेळेत प्रसिद्ध गायक व कीर्तनकार पंडित चारुदत्त आफळे यांच्या नाट्यसंगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.वेदभवनाच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त वेदभवन येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. चतुर्वेदांची पारायणे, ऋग्वेद संहिता स्वाहाकार, विविध देवता याग अशी धार्मिक अनुष्ठाने आणि सायंकाळी कीर्तने, प्रवचने असे कार्यक्रमांचे स्वरूप आहे.
वंदे मातरम निर्मितीला १५० वर्षे पूर्ण:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 'वंदे मातरम' गीताच्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा विशेष कार्यक्रम शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री (माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य) आशिष शेलार यांच्या हस्ते होईल. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडेल. या प्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, वित्त व लेखाधिकारी सीएमए चारुशीला गायके, व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, अधिष्ठाते, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संलग्नित महाविद्यालये/संस्थांचे प्राचार्य आणि विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवासाठी विद्यापीठाने व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा व उपक्रम राबवले जाणार आहेत. यात प्रश्नमंजुषा, सुलेखन, रील मेकिंग, निबंधलेखन, पोस्टर स्पर्धा, राष्ट्रभक्तिपर काव्यलेखन, वक्तृत्व स्पर्धा, “वंदे मातरम” अभिवाचन, पथनाट्य आणि प्रदर्शनी यांचा समावेश आहे. या उपक्रमांचे उद्घाटन मुख्य कार्यक्रमात केले जाईल. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या 'वंदे मातरम' या गीताने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे गीत केवळ स्वातंत्र्यलढ्यातील घोषवाक्य नसून, भारतीय संस्कृतीच्या एकतेचे प्रतीक मानले जाते. या उपक्रमांमुळे तरुण पिढीत राष्ट्रप्रेमाची भावना दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. गोसावी यांनी व्यक्त केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत ब्राझीलच्या एका मॉडेलने एक-दोनदा नव्हे तर तब्बल 22 वेळा मतदान केल्याचे सप्रमाण सिद्ध केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी सरकार व निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवत देशात आता निवडणुका स्वतंत्र व निष्पक्ष राहिल्या नसल्याची खंत व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे आज एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी पुन्हा एकदा मत चोरीचा मुद्दा उपस्थित केला. हरियाणात एग्झिट पोल व पोस्टल बॅलेट काँग्रेसच्या बाजूने होते, पण प्रत्यक्ष निकालात आमचा पराभव झाला. हा पराभव का झाला? याचे पुरावे आमच्याकडे आहेत. हरियाणात 5 श्रेणींमध्ये एकूण 25 लाख बनावट मते पडली. म्हणजेच दर 8 पैकी 1 मतदार खोटा होता. निवडणुकीत 5,21,000 पेक्षा जास्त बोगस मतदार आढळले. या माध्यमातून राज्यात 25 लाख मतांची चोरी झाली, असे ते म्हणाले. आता तरी भाजपचे डोळे उघडतील राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर रोहित पवार यांनी सरकार व निवडणूक आयोगावर निशाणा साधला. बनावट आधार कार्ड कसे बनवले जातात याचा डेमो देताना डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड बनवून दाखवले म्हणून माझ्यावर भाजपने गुन्हा दाखल केला होता. आज राहुल गांधीनी ब्राझिलियन मॉडेल Matheus Ferrero च्या नावाने दहा वेगवेगळ्या बुथवर 22 वेळेस हरियाणामध्ये मतदार नोंदणी झाल्याचे पुराव्यासकट सिद्ध केले. राहुल गांधींचा डेमो बघून माझ्यावर बनावट गुन्हा दाखल करणाऱ्या भाजपचे डोळे उघडतील, ही अपेक्षा, असे ते म्हणाले. राहुल गांधींनी मतचोरी पुराव्यांसकट सिद्ध केली -आदित्य ठाकरे आमदार आदित्य ठाकरे यांनीही या प्रकरणी सरकार व निवडणूक आयोगावर तोंडसूख घेतले. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी भाजपला मतचोरीच्या माध्यमातून विविध राज्य ताब्यात घेण्यास मदत करणाऱ्या निवडणूक आयोगाच्या हेराफेरीचा पर्दाफाश केला आहे. आज संपूर्ण जग भारताची निवडणूक स्वतंत्र व निष्पक्ष राहिली नसल्याचे पुराव्यांसकट पाहत आहे. कुणी राहुल गांधी किंवा इंडिया आघाडीशी सहमत किंवा असहमत असू शकेल, पण ही गोष्ट राजकारण व विचारधारेशी संबंधित नाही. मत चोरीवरील सादरीकरण प्रत्येक भारतीयाने, मग ती कोणत्याही राजकीय विचारसरणीची असो, अवश्य पाहावे असे आहे. हे सादरीकरण तुमच्या मतांच्या मूल्याविषयी आहे. जे मूल्य आता शून्य झाले आहे. कारण, निवडणूक आयोग एका विशिष्ट राजकीय पक्षाला मतदार यादीत बोगस व बनावट मतदार समाविष्ट करण्याची परवानगी देत आहे. गत काही वर्षांत भारतीय निवडणूक आयोगाने जगातील सर्वात मोठ्या भारतातील जीवंत लोकशाहीला एका ढोंगात रुपांतरित केले आहे. निडवणूक कुणीही जिंको किंवा हारो, पण प्रत्येक भारतीयाला त्याच्या मताचे एकसमान मूल्य मिळण्याचा अधिकार आहे. व्होट चोर, गद्दी छोड आदित्य ठाकरे म्हणाले, काही दिवसांपूर्वीच आम्ही वरळी व महाराष्ट्रातील इतर मतदार संघातील मतदारांच्या हेराफेरीचा पर्दाफाश केला. आम्ही त्याविरोधात एक मोठे आंदोलनही केले. पण निवडणूक आयोग त्यावर कोणतीही कारवाई करण्यास नकार देत आहे. राहुल गांधी यांनी हरियाणा निवडणुकीत फसवणूक, बोगस मतदार जोडून व खऱ्या मतदारांना मतदानाची संधी नाकारून हेराफेरी करण्यात आली हे स्पष्टपणे सिद्ध केले आहे. ही लढाई भारत व संपूर्ण भारतातील स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुकांसाठी आहे. ही लढाई लोकशाही व आपल्या संविधानासाठी आहे. व्होट चोर, गद्दी छोड, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 232 आमदार जनादेशातून नव्हे मतचोरीतून आले हे स्पष्ट - काँग्रेस काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचा दाखला देत महाराष्ट्रात महायुतीचे 232 आमदार जनादेशातून नव्हे तर मतचोरीतून आल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा केला आहे. आज या देशातील मोदींच्या टोळीने लोकशाहीवर केलेले आक्रमण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुराव्यानिशी जनतेसमोर आणले आहेत. भाजपा सरकार आणि जनादेश दोन्हींवर कसा दरोडा टाकते हे स्पष्ट झाले. हरयाणा बरोबर महाराष्ट्रातही व्होट चोरी झाली आहे. महाराष्ट्रातही आता 232 आमदार जनादेशातून नव्हे तर चोरीने निवडून आले आहेत हे स्पष्ट आहे. जनतेने या व्होट चोरांना धडा शिकवला पाहिजे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्रात महावितरणच्या वीज बिलामध्ये १२ टक्क्यांनी कपात , सर्वसामान्यांना मोठा दिलासा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वीज बिलामध्ये ऐतिहासिक कपात करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महावितरणाची वीज स्वस्त झाली आहे. महावितरणच्या बिलामध्ये जवळपास १२ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महावितरणच्या वीज बिलामध्ये जवळपास १२ टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. राज्य वीज नियामक […] The post महाराष्ट्रात महावितरणच्या वीज बिलामध्ये १२ टक्क्यांनी कपात , सर्वसामान्यांना मोठा दिलासा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर; लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार
मुंबई : प्रतिनिधी लाडकी बहीण योजनेत महिलांना ऑक्टोबरचा हप्ता देण्यात आला आहे. ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान, आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, महिलांना नोव्हेंबरचा हप्ता न मिळण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत […] The post आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता लांबणीवर; लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मिर्झापूर येथे रेल्वेच्या धडकेत ८ ठार
मिर्झापूर : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील मिर्झापूरच्या चुनार येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चुनार रेल्वे स्टेशनवर बुधवारी कालका एक्स्प्रेसच्या धडकेत ८ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पौर्णिमेच्या स्नानासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. अपघातात भाविकांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या असून त्यांचे मृतदेह ओळखणे मुश्किल झाले आहे. चुनार रेल्वे स्थानकावर बुधवारी सकाळी साडेनऊच्या […] The post मिर्झापूर येथे रेल्वेच्या धडकेत ८ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांची एसआयटी प्रमुख म्हणून नेमणूक करण्याची मागणी केली आहे. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरने 23 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. तिच्या हातावर सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर आरोप केले होते. दोन्ही आरोपींना अटक झाली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांच्या संबंधित लोकांवर, पोलिस अधिकाऱ्यांवर आरोप केले जात आहेत. याच प्रकरणात मेहबूब शेख यांनी पुन्हा आरोप करत, एसआयटी स्थापन करून, आयपीएस अंजना कृष्णा यांना त्या समितीचे प्रमुख करण्याची मागणी केली आहे. नेमके काय म्हणाले मेहबूब शेख? मेहबूब शेख यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी संबंधित लोकांवर आरोप होत असलेल्या या प्रकरणात एसआयटी स्थापन न करण्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला. बीडमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यावर खोटी विनयभंगाची तक्रार झाली, तेव्हा फडणवीस यांनी तातडीने एसआयटी नेमली आणि सुमारे 350 महिलांचे जबाब घेतले. मग फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली असताना, आणि जबाबदार लोकांची नावे माहिती असताना, फडणवीस एसआयटी का स्थापन करत नाहीत? असा थेट आणि तिखट सवाल शेख यांनी केला. अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना दम दिला होता, तरीही त्या मागे हटल्या नव्हत्या. त्यांना फलटण प्रकरणी तपास प्रमुख बनवा अशी मागणी मेहबूब शेख यांनी केली. अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा याचबरोबर, मेहबूब शेख यांनी या प्रकरणाला एक गंभीर वळण दिले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टरने डीवायएसपी राहुल धस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर, एकाच महिन्यात तिच्याविरोधात तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. यावर बोलताना शेख म्हणाले, आधी ती डॉक्टर चांगली होती, पण तक्रार केल्यानंतर ती कशी काय वाईट झाली? 19 जून रोजी त्या डॉक्टरने राहुल धस यांच्याकडे तिच्यावर दबाव असल्याची तक्रार केली. त्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव होता, याचा सविस्तर तपास झाला पाहिजे. त्या तीनही अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. डॉक्टरच्या कुटुंबीयांनी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी तपासाची मागणी केली असताना ती पूर्ण न झाल्याबद्दलही शेख यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
कोरियाचे १८ पदकांसह वर्चस्व, भारताला ७ पदके:आयएफएससी आशियाई किड्स चॅम्पियनशिप २०२५ चा समारोप
पिंपरी चिंचवड येथे आयोजित 'आयएफएससी आशियाई किड्स चॅम्पियनशिप २०२५' स्पर्धेचा नुकताच समारोप झाला. या स्पर्धेत भारताने एकूण सात पदके जिंकली, तर दक्षिण कोरियाने सर्वाधिक १८ पदकांसह आपले वर्चस्व सिद्ध केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन आणि इंडियन माउंटनिअरिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चॅम्पियनशिपमध्ये आशियातील १३ देशांमधून १६० हून अधिक युवा खेळाडूंनी सहभाग घेतला. लीड, बोल्डर आणि स्पीड या तीन प्रकारांमध्ये यू-१३ आणि यू-१५ गटातील मुले व मुलींनी आपले कौशल्य दाखवले. दक्षिण कोरियाने लीड आणि बोल्डर प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत ७ सुवर्ण, ७ रौप्य आणि ४ कांस्य पदकांसह एकूण १८ पदके पटकावली. भारतीय खेळाडूंनी स्पीड प्रकारात चमकदार प्रदर्शन केले. यू-१३ मुले आणि मुलींच्या विभागात भारताने सर्व पदकांवर आपले नाव कोरले. जपाननेही बोल्डर आणि लीडमध्ये चांगली कामगिरी केली. या स्पर्धेत महाराष्ट्र आणि झारखंडमधील खेळाडूंनी विशेष कामगिरी करत भारताच्या युवा गिर्यारोहण क्षमतेची ओळख करून दिली. समारोप प्रसंगी महाराष्ट्र स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र शेळके म्हणाले की, पिंपरी चिंचवडमध्ये उभारलेला क्लाइंबिंग कॉम्प्लेक्स हा देशातील अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रांपैकी एक आहे. या केंद्रामुळे महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्पर्धेत भारताला मिळालेल्या सात पदकांमध्ये पुण्यातील खेळाडूंचाही समावेश असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. आयएफएससीच्या पंच पॅनलचे प्रमुख श्रीकृष्ण कडूसकर यांनी आशियाई स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, मिशन ऑलिंपिक २०३६ च्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. गेली दोन दशके आम्ही महाराष्ट्रात क्लाइंबिंग संस्कृती रुजवली आहे. अण्णासाहेब मागर स्टेडियम (चिंचवड) आणि राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल (शिवाजीनगर) येथील यशस्वी प्रयत्नांनंतर या जागतिक दर्जाच्या कॉम्प्लेक्सपर्यंतचा प्रवास आव्हानात्मक होता. पिंपळे सौदागर येथे जागतिक स्पर्धा घेतल्या जाऊ शकतात, असे परदेशी खेळाडू आणि प्रशिक्षकांनी बोलून दाखवले, ही पुण्याच्या क्रीडा संस्कृतीसाठी अभिमानाची बाब आहे.
तरुणपिढीमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनने राबविलेला 'सर्वांसाठी मोफत पुस्तके' हा उपक्रम स्तुत्य आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करून पुस्तकांची भेट देत 'सूर्यदत्त'ने सामाजिक बांधिलकीचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. या उपक्रमाने वाचनसंस्कृती, ज्ञानवृद्धी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्याने नुकत्याच झालेल्या पुणे पुस्तक जत्रेत 'सूर्यदत्त'तर्फे 'सर्वांसाठी मोफत पुस्तके' व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणाऱ्या खास स्टॉलचा सहभाग लक्षणीय होता. या उपक्रमात सुमारे ८०० हून अधिक मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, पुस्तक जत्रेतील सुमारे ६५ स्टॉलपैकी 'सूर्यदत्त'चा एकमेव स्टॉल होता, जिथे भेट देणाऱ्या प्रत्येक रसिकाला आवडीचे पुस्तक मोफत दिले जात होते. 'सूर्यदत्त'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमामध्ये 'सूर्यदत्त'च्या वतीने २०२४-२५ मध्ये दहावी व बारावीमध्ये ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना 'सर्टिफिकेट ऑफ मेरिट', सुवर्णपदक आणि पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालक-शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला. साहित्य, कला आणि समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी अनेक साहित्यिक, कलाकार आणि समाजसेवकांना 'सूर्यदत्त सुवर्णपदक' आणि पुस्तके देऊन गौरवण्यात आले. 'सूर्यदत्त'च्या जनसंपर्क विभाग व्यवस्थापिका स्वप्नाली कोगजे यांनी उपक्रमाचे यशस्वी संयोजन केले. सोशल मीडिया व दृश्य-श्राव्य सादरीकरण खुशी वाधवानी आणि चिन्मय सागर यांनी केले. प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले.
माझ्या एसबीआय पॉलिसीच्या पैशांचा भरणा केला की नाही? असा प्रश्न करणाऱ्या एका गरीब महिलेला व तिच्या जावयाला गावच्या पोलिस पाटलाने लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना भंडारा जिल्ह्यात उजेडात आली आहे. ही घटना रविवारी 2 नोव्हेंबर रोजी साकोलीच्या सासरा या गावी घडली. याबाबत पीडितेच्या कुटुंबीयांनी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यात मारहाणीची ही घटना कैद झाली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, चंद्रप्रभा भाऊराव गोटेफोडे ह्या त्यांचे जावई रामेश्वर नागरीकर यांना घेऊन रविवार २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता पोलिस पाटील तथा जीवन विमा अभिकर्ता डीगेश श्रीराम नगरकर यांच्या घरी गेले. नगरकर यांनी पीडित आणि गतिमंद मुलाच्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सच्या ४ पॉलिसीचा भरणा केला नव्हता. त्याची माहिती पीडित महिलेला मिळाली होती. महिलेने घरी जाऊन याबद्दल विचारणा केली असता पोलिस पाटलाने तुला बोलण्याचा अधिकार नाही. मी पोलिस पाटील आहे. कशाचे पैसे? असे म्हणून महिला व तिच्या जावयाला शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेने पोलिस ठाणे गाठले व पोलिस पाटलाविरुद्ध तक्रार दाखल केली. या मारहाणीच्या व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. याप्रकरणी साकोली पोलिस ठाण्यात आरोपीवर भान्यासं २०२३ अन्वये कलम ११५ (२), ३५२, ३५१ (२) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे. पीडित विधवा व तिचे जावई सानगडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत. याबाबत महिलेने लेखी तक्रारीत म्हटले आहे की, याआधी फोनद्वारे रकमेची मागणी केली असता नंतर देईन, १५ दिवसांनी देतो अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यापूर्वी गावातील चार ते पाच जणांसोबत हा प्रकार घडला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पीडित तक्रारदार महिला चंद्रप्रभा भाऊराव गोटेफोडे जावई रामेश्वर अमृत नागरीकर व पीडित विमा पॉलिसी धारकांनी केलेली आहे.
भाजपने मतदारयाद्यांमधील कथित घोळावरून महायुती सरकार व निवडणूक आयोगावर तोंडसूख घेणाऱ्या विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. काँग्रेसचं चाक तर यशाअभावी कायमचं रुतलंय, तर उध्दव ठाकरेंच्या रथाचं चाक हिंदुत्वाअभावी कधीचे जमिनीत अडकले आहे. शरद पवारांच्या रथाला विश्वासार्हतेचे ग्रहण लागलंय. राज ठाकरेंचं चाक तर ‘कभी यहां, कभी वहा’ अशा दिशाहीन स्थितीत भरकटून गेलंय, असे भाजपने म्हटले आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग अखेर फुंकले आहे. त्यानुसार, राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होऊन जनतेला नगरसेवकांच्या रुपात आपापले स्थानिक लोकप्रतिनिधी मिळतील. पण विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमध्ये दुबार व तिबार मतदार असल्याचे सांगत ह्या निवडणुका लांबणीवर टाकण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधकांची आतापासूनच रडारड सुरू भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये याविषयी बोलताना म्हणाले की, राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजलाय. 2 डिसेंबर ला मतदान होऊन 3 डिसेंबरला नगरपालिकांना नवे नगरसेवक मिळतील. 1 कोटी 7 लाख मतदार 13335 मतदान केंद्रांतून 6869 नगरसेवकांना निवडणार आहेत, यात 3492 महिला असतील. विरोधकांनी मात्र रडणं सुरूच ठेवलं आहे. 3 डिसेंबरला होणाऱ्या पराभवाची कारणे शोधण्याचे काम आतापासूनच सुरू झाले आहे. त्यांच्या रडारडीवरून महाभारताला प्रसंग आठवतोय… कौरव - पांडव युध्दाच्या वेळी कुरुक्षेत्रावर कर्णाच्या रथाचे जमिनीत रुतलेले चाक बाहेर काढत असताना कृष्ण अर्जुनाला कर्णावर बाण चालवा़यला सांगतो. हे धर्माच्या विरूध्द असल्याचे कर्णाने सांगताच, ‘राधासुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?’ असा प्रश्न कृष्ण कर्णाला विचारतो! तोच प्रश्न आजच्या मविआ व मनसे नेत्यांना विचारायला हवा. राज ठाकरेंचे चाक पुरते भरकटलंय काँग्रेसचं चाक तर यशाअभावी कायमचं रुतलंय, तर उध्दव ठाकरेंच्या रथाचं चाक हिंदुत्वाअभावी कधीचे जमिनीत अडकले आहे. शरद पवारांच्या रथाला विश्वासार्हतेचे ग्रहण लागलंय. राज ठाकरेंचं चाक तर ‘कभी यहां, कभी वहा’ अशा दिशाहीन स्थितीत भरकटून गेलंय! म्हणूनच, कधी बोगस मतदानाचे निमित्त करीत तर कधी मतदारयादीचे गोंधळाचे निमित्त सांगत निवडणूका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करीत भाजपाला धर्म शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकसभेला मुस्लिम- ख्रिश्चनांच्या दुबार मतदानाबाबत गप्प बसताना त्यांचा हा धर्म कुठे गेला होता? विधानसभांतही अनेक ठिकाणी ही दुबार नावे होती त्यावेळी विजयासाठी हवीहवीशी वाटणारी नावे. ’त्या वेळी कुठे गेला होता तुझा धर्म’ असा प्रश्न जनता रूपी कृष्णच पुन्हा एकदा या नेत्यांना विचारत धडा शिकवणार आहे, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. हे ही वाचा... फडणवीसांबद्दल आदर, पण शिंदेच मनातले मुख्यमंत्री:नीलम गोऱ्हे यांचे विधान; काही लोकांची आपल्यावर वाईट नजर, एकनाथ शिंदेही बोलले मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. पण एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत, असे विधान विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे. सत्ताधारी महायुतीतील घटकपक्षांत धुसफूस असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्रातले वातावरण तापले आहे. त्यातच गोऱ्हे यांनी हे विधान केल्यामुळे त्यातून भाजप विरुद्ध शिवसेना असे चित्र उभे राहण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दादर येथे पोहोचण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांच्या प्रवासाची दरवर्षी गैरसोय होत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेल्या अनुयायांच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये यासाठी ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या ५ दिवस आधी येणाऱ्या आणि ६ डिसेंबरनंतर ५ दिवसांनी मुंबईतून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्याची व्यवस्था करावी अशी विनंती विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी थेट केंद्रीत रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवत ही विनंती केली आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबरला येणाऱ्या लाखो अनुयायांमुळे मुंबईत रेल्वेवरील वाढता ताण लक्षात घेता मुंबईत दाखल होणाऱ्या रेल्वे सेवांमध्ये अधिक वाढ करण्याची गरज आहे. लोकांची प्रचंड गर्दी पाहता ये-जा करण्यासाठी रेल्वे प्रवासाच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे असे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी रेल्वे मंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. देशभरातील अनुयायी डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी महापरिनिर्वाण दिनाच्या आधीच मुंबईत दाखल झाला तर मुंबईतील लोकल सेवेवरील भार कमी होईल, प्रवासाची गैरसोय होणार नाही.गर्दी न करता महापरिनिर्वाण दिनाच्या नंतर या अनुयांना सुखरुप प्रवास करता येणे शक्य होईल असे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणालेत.
'शंकर महाराज अंगात येतात आणि ते दुर्धर आजार बरे करतात', अशी थाप मारून एका भोंदूबाबाने फॉरेन रिटर्न इंजिनिअरला तब्बल 14 कोटींचा गंडा घातल्याची थक्क करणारी घटना पुण्यात घडली आहे. अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यामुळे घडलेल्या या घटनेत पीडित कुटुंब आर्थिकदृष्ट्या पार उद्ध्वस्त झाले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, दीपक डोळस असे फसवणूक झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. दीपक व त्यांच्या पत्नी अंजली काही वर्षे इंग्लंडमध्ये नोकरी करत होते. त्यांना 2 दिव्यांग मुली आहेत. त्या नेहमीच आजारी राहतात. दीपक यांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बरीच धावपळ केली. अनेक नामवंत डॉक्टरांना दाखवले. पण फायदा झाला नाही. यामुळे ते निराशेत सापडले होते. हे दाम्पत्य 2018 मध्ये आपल्या मुलींचे व्यवस्थित संगोपन करण्यासाठी मायदेशी परतले. हे दाम्पत्य पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास आहे. तिथे वास्तव्यास असताना त्यांची एका भजनी मंडळाच्या माध्यमातून त्यांची ओळख राजेंद्र उर्फ दीपक खडके नामक व्यक्ती व त्याची शिष्या वेदिका पंढरपूरकर यांच्याशी झाली. या दोघांनी त्यांना त्यांच्या मुलीला आजारातून बरे करण्याचा दावा करत त्यांचा विश्वास संपादन केला. डोळस दाम्पत्याचे पैसे स्वतःच्या खात्यावर वळवले राजेंद्र व वेदिका यांनी शंकर महाराज आमच्या अंगात येतात आणि ते दुर्धर आजार बरे करतात अशी थाप मारली. एवढेच नाही तर वेदिकाने स्वतःच्या अंगात शंकर महाराज आल्याचा खोटा आव आणला. त्यानंतर त्यांनी डोळस कुटुंबीयांना सांगितले की, तुमचे धन आम्ही जपून ठेवल्यास व पूजा केल्यास तुमच्या दोन्ही मुली बऱ्या होतील. याच बहाण्याने या भोंदू जोडीने डोळस दाम्पत्याच्या बँकेतील सर्व ठेवी व बचत निधी स्वतःच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने वळवून घेतल्या. इंग्लंडमधील घर व फार्महाऊसही विकले ही भोंदू जोडी एवढ्यावरच थांबली नाही. त्यांनी दीपक डोळस यांचे इंग्लंडमधील घर व फार्महाऊस विकून त्याचेही पैसे वेदिका पंढरपूरकरच्या खात्यात वळते करून घेतले. हे सर्व करूनही मुलींच्या प्रकृतीत काहीच फरक पडला नाही. त्यामुळे दीपक डोळस यांनी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावर राजेंद्र व वेदिका यांनी त्यांच्या घरात दोष असल्याचे सांगत आणखी पैशांची मागणी केली. त्यासाठी पुण्यातील मालमत्ता विकण्याची सूचना केली. त्यावर डोळस यांनी आपल्याकडे आता विकण्यासाठी काहीच उरले नसल्याचे सांगितले. त्यानंतर भोंदू जोडीने त्यांना पुण्यातील राहत्या घरावर कर्ज काढण्याची सूचना केली. कोथरूडमध्ये विकत घेतला आलिशान बंगला त्यानुसार, दीपक डोळस यांनी स्वतःच्या घरावर वैयक्तिक कर्ज काढले. ते पैसे त्यांनी राजेंद्र खडके व वेदिका पंढरपूरकर यांना दिले. या सर्व घटनाक्रमातून या भोंदूबाबांनी डोळस यांची एक-दोन नव्हे तर तब्बल 14 कोटींची फसवणूक केली. पोलिस तपासानुसार या रकमेच्या मदतीने खडके व वेदिका यांनी कोथरूडमधील महात्मा सोसायटीत एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. ही फसवणूक मागील 2018 पासून सुरू होती. यात दीपक डोळस या उच्चशिक्षित आयटी अभियंत्याचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. सध्या पोलिसांनी राजेंद्र व वेदिका यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली समाजात सुरू असणारी गंभीर आर्थिक फसवणूक समोर आली आहे. हे ही वाचा... फडणवीसांबद्दल आदर, पण शिंदेच मनातले मुख्यमंत्री:नीलम गोऱ्हे यांचे विधान; काही लोकांची आपल्यावर वाईट नजर, एकनाथ शिंदेही बोलले मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. पण एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत, असे विधान विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे. सत्ताधारी महायुतीतील घटकपक्षांत धुसफूस असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्रातले वातावरण तापले आहे. त्यातच गोऱ्हे यांनी हे विधान केल्यामुळे त्यातून भाजप विरुद्ध शिवसेना असे चित्र उभे राहण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
मुंबईच्या मोनोरेलला लागलेले अपघातांचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. चेंबूर ते वडाळा मार्गावर नव्या मोनोरेल गाडीची चाचणी सुरू असतानाच वडाळ्याजवळ आज, बुधवारी सकाळी मोठा अपघात घडला आहे. या अपघातात मोनोरेलचा पहिला डबा थेट ट्रॅक सोडून बाहेर आला, मात्र सुदैवाने तो मोनोरेलच्या खांबांवरच अडकून राहिल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोनो रेलच्या चेंबूर–वडाळा मार्गावर नव्या कोचेसची चाचणी सुरू असताना वडाळा परिसरात हा अपघात झाला. घटनेच्या वेळी मोनोरेलमध्ये चालक आणि एक कंपनीचा अधिकारी उपस्थित होते. मोनोरेलचा डबा ट्रॅकवरून खाली उतरला, परंतु तो खांबांच्या रचनेत अडकल्यामुळे खाली कोसळला नाही. घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि अडकलेल्या चालकाची सुखरूप सुटका करण्यात आली. चाचणीसाठी असलेली ही गाडी असल्यामुळे यामध्ये नियमित प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अपघाताचे कारण काय? अपघातानंतर घटनास्थळी मोनोरेलचे अधिकारी, अभियंते आणि अग्निशमन दल कार्यरत आहेत. मुख्यमार्गावर अडकलेला डबा हटवण्याचे काम सुरू असून, वाहतूक व्यवस्थेवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोनोरेलच्या सिग्नल प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्याने ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मोनोरेल प्रशासनाकडून या संदर्भात अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. अपघातांच्या मालिकेमुळे आधीच बंद सेवा गेल्या अनेक महिन्यांपासून मोनोरेल सेवा सुरळीत नाही. तांत्रिक अडचणी आणि अपघातांमुळे प्रवाशांना वारंवार त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे ही सेवा प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आली. नव्या कोचेससह सध्या या मार्गावर चाचणी सुरू होती, आणि या चाचण्यांनंतर नव्या वर्षात सेवा पुन्हा सुरू करण्याचा मानस होता. आता, नवी आशा घेऊन सुरू केलेल्या 'ट्रायल रन'मध्येही अशा प्रकारचा बिघाड झाल्याने, प्रवाशांच्या मनात पुन्हा एकदा शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या ट्रायल रन दरम्यानच झालेल्या या अपघातामुळे मोनोरेलच्या सुरक्षेबद्दल आणि ती वेळेत सेवेत दाखल होण्याबद्दल पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मोनो रेलमध्ये अडकले होते 450 प्रवासी दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी 19 ऑगस्ट रोजी चेंबूर ते भक्ती मार्ग दरम्यान एक मोनो रेल सायंकाळच्या सुमारास बंद पडली होती. सव्वातासाच्या प्रयत्नांनंतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. दोन-तीन ठिकाणच्या काचा फोडून सुमारे 450 प्रवाशांना मोनो रेलमधून बाहेर काढण्यात आले होते. वाढलेल्या गर्दीमुळे ही परिस्थिती उद्भवली असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले होते. या मोठ्या दुर्घटनेच्या महिनाभरानंतरच 15 सप्टेंबर रोजी वडाळा परिसरात तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलची सेवा अचानक बंद पडली होती. तांत्रिक बिघाडामुळे काही काळ मोनोरेल विस्कळीत झाली होती. एमएमआरडीएने 17 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले होते. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत. त्याचा मला आनंद आहे. पण ते टोमणे मारण्यापलिकडे काहीही करू शकत नाहीत, असे ते म्हणालेत. उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृ्त्त्वातील महायुती सरकावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काढून घेण्यासाठी कर्जमाफीसाठी पुढील वर्षी जून महिन्याची तारीख दिली आहे, असे ते म्हणालेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांच्यावर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडले आहेत. त्याचा मला आनंद आहे. ते टोमणे मारण्यापलिकडे काहीच करू शकत नाहीत. तुम्ही मला त्यांनी विकासावर केलेले भाषण दाखवा आणि हजार मिळवा, असे ते म्हणाले. राज ठाकरेंवरही साधला निशाणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कालच्या पत्रकार परिषदेवर टीका केली होती. आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली असे ते म्हणाले होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या टीकेचाही समाचार घेतला. राज ठाकरे यांना एकच उत्तर पाहिजे. ते म्हणजे निवडणुका पुढे ढकली. त्यांना दुसरे कोणतेही उत्तर अपक्षेति नाही. पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत. त्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही, असे ते म्हणाले. स्थानिक निवडणुकांत महायुतीचाच विजय मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीचाच विजय होण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, निवडणुकांची घोषणा झाली आहे. आम्ही त्या निवडणुकांना सामोरे जाऊ. आमचे तिन्ही पक्ष आपापल्या पातळीवर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही एकच आहोत. एखाद्या ठिकाणी युती झाली नाही, तर त्या ठिकाणी निवडणुकीनंतर युती होईल. त्यामुळे या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल. उल्लेखनीय बाब म्हणजे विरोधी पक्षांनी गत दोन-तीन महिन्यांपासून मतचोरी व मतदारयाद्या स्वच्छ केल्यानंतरच निवडणउका घेण्याचा धोशा लावला आहे. विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याविषयी सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. पण त्यानंतरही राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुप्रतिक्षित निवडणुकांची घोषणा केली. यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. आत्ता पाहू काय म्हणाले होते राज ठाकरे? राज ठाकरे म्हणाले होते, आजच्या निवडणुका आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली ! आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे.. हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे... दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय ? जबाबदारी तर तुम्ही केंव्हाच झटकली आहेत, आत्ता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा... तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन, असे ते म्हणाले होते.
सेनगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी शिवारात पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह वाळू उपसा करणारे यंत्र असा ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. ४ रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. सेनगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून पूर्णा नदीच्या पात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करून त्याची वाहतूक केल्या जात असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तहसील कार्यालयास स्वतंत्र पथके स्थापन करून अवैध वाळू वाहतूक रोखण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. त्यानुसार सेनगावचे तहसीलदार सखाराम मांडवगडे, नायब तहसीलदार देवराव कारगुडे यांनी मंडळ अधिकारी, तलाठी यांची स्वतंत्र पथके स्थापन करून वाळू घाटाची पाहणी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार चार दिवसांपुर्वीच वाळू उपसा करून वाहतूक करणारे टिप्पर पकडून दोघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मंगळवारी ता. ४ पुन्हा एकदा ब्रम्हवाड शिवारात पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करणाऱ्या यंत्राच्या मदतीने वाळू उपसा करून ट्रॅक्टर मध्ये भरली जात असल्याची माहिती महसूल विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून मंडळ अधिकारी देविदास इंगळे यांच्या पथकाने पलाहणी केली असता ब्रम्हवाडी शिवारात वाळू उपसा केली जात असल्याचे दिसून आले. महसूल विभागाच्या पथकाने वाळू उपसा करणारे यंत्र, एक ट्रॅक्टर व वाळू असा ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी नामदेव गडदे (रा. ब्रम्हवाडी) याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, जमादार चाटसे, सुभाष चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आले आहेत. दगाबाज रे संवाद दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. 5, 6, 7 व 8 नोव्हेंबर रोजी असे 4 दिवस ते मराठवाडयातील शेतकऱ्यांशी थेट गावातील पारावर व बांधावर जाऊन राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीची भरपाई प्रत्यक्षात मिळाली की नाही याची माहिती घेणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मुंबईत पुन्हा एकदा भाषेच्या मुद्द्यावरून वादाचा भडका उडाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’बाहेर लावण्यात आलेल्या वादग्रस्त पोस्टरमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर भारतीय सेनेच्या वतीने उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे असा थेट धमकीवजा इशारा या बॅनरमधून देण्यात आला आहे. या बॅनरमुळे नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचे बोलले जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मंगळवारी घोषणा केली. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला होणार आहेत. या सर्व निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होणार आहेत. येत्या 2 डिसेंबरला यासाठी मतदान आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मुंबईत उत्तर भारतीय सेना या संघटनेने लावलेल्या अत्यंत वादग्रस्त बॅनरमुळे पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. बॅनरवरील मजकूर काय? मुंबईतील शिवसेना भवन, शिवाजी पार्क, आणि मातोश्री यांसारख्या शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये हे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर उत्तर भारतीयांना 'सावधान' असा मोठा इशारा देण्यात आला आहे. त्यासोबतच उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे असा थेट धमकीवजा मजकूर पाहायला मिळत आहे. तसेच, महाराष्ट्र से बिहार तक, राजस्थान से यूपी तक असाही यात उल्लेख करण्यात आला आहे. या बॅनरच्या खाली 'उत्तर भारतीय सेना' असे लिहिले असून, संघटनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांचा फोटोही छापण्यात आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाषेचे राजकारण पुन्हा पेटणार? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यामुळे सध्या पक्षांमध्ये मतदारांवर पकड मजबूत करण्याची धडपड सुरू आहे. मुंबई-ठाण्यात उत्तर भारतीय मतदारांचा प्रभाव मोठा असल्याने, हे पोस्टर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आले आहे, हे विशेष लक्षवेधी ठरत आहे. पोस्टरमागचा उद्देश उत्तर भारतीय मतदारांना एकत्र ठेवण्याचा असल्याचे बोलले जात आहे. राज्यात विशेषतः मुंबई-ठाण्यात उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने, निवडणुकीच्या काळात या घोषणांना विशेष महत्त्व प्राप्त होते. पण त्यातील भाषा आणि मजकूर पाहता शहरात तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. सुनील शुक्ला यांची आक्रमक भूमिका चर्चेत ‘उत्तर भारतीय सेना’चे अध्यक्ष सुनील शुक्ला गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील उत्तर भारतीय समाजाच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. विशेषतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यांवर त्यांनी सातत्याने आक्षेप घेतले असून, काही प्रकरणांमध्ये न्यायालयातही दाद मागितली आहे. मात्र, आता मातोश्रीसमोरच वादग्रस्त बॅनर लागल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वादग्रस्त पोस्टरमुळे मुंबई पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शहरात आधीच निवडणुकीचे तापलेलं वातावरण असताना, प्रादेशिक भावना भडकवणाऱ्या अशा पोस्टरवर कोणती कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वसमत शहरातील बसस्थानक परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे गावठी पिस्टल आढळून आले. याप्रकरणी दोघांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. ५ पहाटे गुन्हा दाखल झाला असून दोघांचीही चौकशी सुरु करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शस्त्र बाळणाऱ्यांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे.त्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. या पथकांकडून शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. दरम्यान, वसमत शहरातील बसस्थानक परिसरात दोघे जण गावठी पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार नरेंद्र साळवे, ज्ञानेश्वर गोरे, भुजंग कोकरे, साईनाथ कंठे, आकाश टापरे, गजानन पोकळे,ल हरीभाऊ गुंजकर यांच्या पथकाने मंगळवारी ता. ४ रात्री साडे आकरा वाजता वसमत शहरात जाऊन शोध मोहिम हाती घेतली. यामध्ये दोघे जण वसमत बसस्थानकाजवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बसस्थानक परिसरात जाऊन दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता श्रीकांत उर्फ टिल्या सांडे याच्याकडे गावठी पिस्टल आढळून आले तर सुनील वाघमारे हा त्याच्या सोबत फिरत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी गावठी पिस्टलसह दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी जमादार नरेंद्र साळवे यांच्या तक्रारीवरून श्रीकांत उर्फ टिल्या सांडे , सुनील वाघमारे (रा. वसमत) यांच्या विरुध्द बुधवारी ता. ५ पहाटे वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार शेख नय्यर पुढील तपास करीत आहेत.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड आणि परिसरात तीन निरपराध नागरिकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर ठार करण्यात वन विभागाला यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश दिल्यानंतर, काल रात्री उशिरा ही कारवाई यशस्वी झाली. वन विभागाने पिंपरखेड परिसरात नरभक्षक बिबट्याचा शोध घेण्यासाठी तीन थर्मल ड्रोनचा वापर केला. रात्री उशिरा, 13 वर्षीय रोहन विलास बोंबेचा जीव ज्या ठिकाणी गेला, तिथून सुमारे 400 ते 500 मीटर अंतरावर हा बिबट्या ड्रोनमध्ये दिसला. वन विभागाच्या टीमने बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्न अपयशी ठरला. डार्ट मिस झाल्यामुळे बिबट्या सावध झाला आणि त्याने थेट वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. परिणामी, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, तैनात असलेल्या दोन शार्प शूटरने त्वरित कारवाई करत बिबट्यावर तीन राऊंड गोळीबार केला. या गोळीबारात हा अंदाजे सहा वर्षांचा नर जातीचा बिबट्या रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास जागीच ठार झाला. नरभक्षक असल्याची झाली पुष्टी ठार करण्यात आलेला बिबट्या हाच तिघांचा जीव घेणारा नरभक्षक असल्याचे त्याच्या नमुन्यांवरून आणि ठस्यांवरून स्पष्ट झाले आहे. या बिबट्याने पिंपरखेड आणि परिसरामध्ये 12 ऑक्टोबरपासून शिवन्या शैलेश बोंबे (5.5 वर्षे), भागुबाई रंगनाथ जाधव (82 वर्षे), आणि 2 नोव्हेंबर रोजी रोहन विलास बोंबे (13 वर्षे) या तिघांवर हल्ला करून ठार केले होते. संतप्त नागरिकांकडून जाळपोळ, रास्ता रोको बिबट्याच्या सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी तीव्र आंदोलन केले होते. 2 नोव्हेंबर रोजी संतप्त जमावाने वनविभागाच्या गस्ती वाहनासह बेस कॅम्पची इमारत जाळून टाकली होती आणि 3 नोव्हेंबर रोजी पुणे-नाशिक महामार्ग तब्बल 18 तास रोखून धरला होता. नागरिकांच्या या तीव्र संतापाची आणि मागणीची दखल घेत वन विभागाने अखेर 'दिसताक्षणी बिबट्याला गोळ्या घालण्याचे' आदेश दिले होते. या कारवाईसाठी वनसंरक्षक पुणे आशिष ठाकरे यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांची तातडीने परवानगी घेतली होती. डॉ. सात्विक पाठक (पशु चिकीत्सक), तसेच शार्प शूटर जुबिन पोस्टवाला आणि डॉक्टर प्रसाद दाभोळकर यांच्यासह वन विभागाची टीम या मोहिमेत सहभागी झाली होती. मृत बिबट्याचे शव पिंपरखेड येथील ग्रामस्थांना दाखविण्यात आले आणि त्यानंतर ते शवविच्छेदनासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले आहे. या कारवाईमुळे पिंपरखेड परिसरात अखेर दिलासा पसरला असून, सलग अनेक हल्ल्यांमुळे निर्माण झालेली भीती आणि तणावाची परिस्थिती काहीशी शमली आहे. वन विभागाच्या या निर्णायक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिव्य मराठी अपडेट्स:उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर; शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मागणीवर ठाम
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
रक्ताचा तुटवडा; 4 दिवस पुरेल एवढाच साठा:शहरात दररोज 100 रक्ताच्या बॅगची गरज, उपलब्ध हाेतात 30 ते 40
शहरातील खासगी चार व सरकारी दोन अशा सहा रक्तपेढ्यांमध्ये चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या ई-रक्तकोषवर मंगळवारी नोंदवलेल्या माहितीनुसार शहरात केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचालित सर्वोपचार रुग्णालय आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीमध्येच व्होल ब्लड उपलब्ध होते. परंतु, दररोजची रक्ताची मागणी जास्त असल्याने त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जवळच्या शक्य त्या पेढीत जाऊन रक्तदानाचे आवाहन करण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वी गणेशोत्सव, ईद आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यावेळी रक्तदान केलेल्यांना पुन्हा रक्तदान करण्यासाठी तीन महिन्यांचा गॅप आवश्यक आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासून रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली. त्यातच आता दिवाळीची सुटी आल्याने रक्तदान शिबिरे बंदच होती. त्यामुळे रक्तदात्यांचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे. शहरात अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचालित शासकीय रक्तपेढी, जिल्हा स्त्री रुग्णालयातील रक्त पेढी या दोन शासकीयसह साई जीवन, ठाकरे, हेडगेवार, अकोला ब्लड बँक या चार खासगी रक्तपेढ्या आहेत. त्यातील रक्तसाठाही आता जेमतेमच आहे. रस्ते अपघातासह, प्रसूतीवेळी, गंभीर शस्त्रक्रियांमध्ये रक्त कमी झाल्यास रुग्णाला रक्ताची गरज भासते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करणे आवश्यक आहे. रक्तदान शिबिरासाठी रक्तपेढीशी संपर्क करावा ^रक्तामधील पीआरसी व प्लाझ्मा, प्लेटलेट असे घटक रक्तसंकलनानंतर वेगळे केले जातात. परंतु, सध्या रक्ताचा मोठा तुटवडा आहे. कारण दिवाळीतील सुट्या व अतिवृष्टी यामुळे शिबिराचे कॅम्प झाले नाहीत. नियमित रक्तदाते दर तीन महिन्याला रक्तदान करतात. ज्यांना शक्य आहे, त्यांनी शिबिरे घ्यावीत. जर शिबिर घ्यायचे असेल तर रक्तपेढीशी संपर्क करावा .- वर्षा पाटणकर, संचालिका, साईजीवन ब्लड बँक. सर्वच निगेटिव्ह रक्तगटांचा तुटवडा ^सद्यस्थितीत सिंगल डोनर प्लेटलेट, सिंगल डोनर प्लाझ्मा, आरबीसी एखादं दुसऱ्या ठिकाणी उपलब्ध आहे. व्होल ब्लड केवळ तीन ठिकाणी उपलब्ध असल्याचे नोंदीत दिसून आले. पीआरबीसी (पॅक्ड रेड ब्लड सेल) उपलब्ध आहे. ओ, एबी, ए, बी या निगेटिव्ह गटाच्या रक्ताचा सर्वत्र तुटवडा आहे. निगेटिव्ह गटाच्या रक्ताच्या उपलब्धतेचे प्रमाण अवघे ५ टक्के आहे. - डॉ. सुवर्णा पाटील , रक्त संक्रमण अधिकारी, शासकीय रक्तपेढी, जीएमसी.
सर्व जग काळाच्या अधीन असून काळ हा सर्व प्राणीमात्रावर अधिराज्य गाजवतो. यातून केवळ संतच सुटले असून काळाचा प्रभाव संतांवर पडत नाही. उलट सर्वांवर अधिराज्य गाजवणाऱ्या काळावर संत अधिराज्य गाजवतात. संत हे सकल कल्याणकारी आहेत, असे उद्गार किशोर महाराज ठाकरे यांनी काढले. ते डाबकी रोड येथील आश्रय नगरच्या राजस्थानी नामदेव भवनात सुरू असलेल्या तुकाराम महाराज गाथा पारायण व कीर्तन महोत्सवात मार्गदर्शन करत होते. महोत्सव काकड आरती मंडळाच्या वतीने सुरू आहे. आळंदी येथील युवा कीर्तनकार व शिव चरित्रकार किशोर महाराज ठाकरे यांनी कीर्तनाचे सहावे पुष्प सादर केले. गाथा पारायण व्यासपीठकार आळंदी येथील गुरुवर्य मधुकर महाराज मार्के यांच्या अधिष्ठानात सुरू आहे. किशोर महाराज ठाकरे म्हणाले, काळ म्हणजे शेवटचा काळ येऊन बसला आहे. ज्यात कोणतीही माया, नातेवाईक, राजा किंवा कुणीही मदत करू शकणार नाही. अशा वेळी फक्त आपल्या भक्ती आणि कर्मानेच सोडवणूक होते, हे तुकाराम महाराज सूचित करत असल्याचे किशोर महाराज यांनी सांगितले. सर्वप्रथम किशोर महाराज ठाकरे व त्यांचे यांचे समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. आज काल्याचे कीर्तन : बुधवारी, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता गुरुवर्य मधुकर महाराज मार्के यांच्या गोपालकाला कीर्तनाने या महोत्सवाचा समारोप होणार आहे. या काला कीर्तनाचा भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन काकड आरती मंडळाचे अध्यक्ष सुनील उंबरकर, प्रवीण डिघोळे, नरेंद्र आवारे, श्रीराम खराटे, ज्ञानेश्वर बोदडे, पद्माकर मोरे, सहदेवराव मेसरे, अनिल भिसे, चंद्रकांत वारकरी, राजेश ठोसर, गजानन गोलाईत, शिवाजीराव देशमुख आदींनी तसेच आश्रयनगर काकड आरती भजनी मंडळातील सर्व सेवाधाऱ्यांनी केले आहे. कीर्तनात किशोर महाराज यांनी तुकोबारायाचा नको नको मना, गुंतू मायाजाळी, काळ आला जवळी’ हा आपल्या स्वतःच्याच मनाला केलेल्या उपदेशाचा अभंग सादर केला. तुकोबारायाचा उद्देश स्पष्ट करतांना ते म्हणाले, सांसारिक माया ही एखाद्या मृगजळसारखी आहे. ती कितीही जवळ दिसली तरी प्रत्यक्षात अस्तिवातच नसते, केवळ भास असतो. त्याचप्रमाणे सांसारिक भोगवाद हा भक्तीच्या मार्गात अडसर ठरत असतो. क्रूर काळ त्याला ग्रास बनवितो. त्यामुळे मनाला अशा माया आणि मोहजाळात गुंतवू नका.
शिक्षण क्षेत्रात शिक्षकांवर मोठी जबाबदारी असून, या कार्याची दिशा प्रभावी असावी, असा सूर सेवानिवृत्त शिक्षकांच्या कार्यक्रमात उमटला. आजीवन शिक्षण क्षेत्रात कार्य करीतच राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यानुसार आता कार्य होणार. कार्यक्रमात शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. जि.प. अंतर्गत ऑक्टोबर २०२५ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन ज्ञानेश्वर मांडेकर व जव्वाद हुसेन यांच्या मार्गदर्शनात जि. प. प्राथमिक शाळा उर्दू शाळा ताजनापेठ येथे आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी अथर परवेज होते. प्रमुख अतिथी म्हणून शशिकांत गायकवाड, प्रकाश चतरकर, अजहरउद्दीन, देवानंद मोरे, संजय बरडे, मनोहर तायडे, गोकुळ अंभोरे, मुकुंद देशमुख उपस्थित होते. ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यात प्रताप वानखडे, दिलीप सरदार, विजय जाधव, वसोमोद्दिन, सुनंदा गावंडे, सुनंदा हरणे, प्रल्हाद गिन्हे, फारुख अहमद, यांचा तसेच दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय बरडे यांची जिल्हास्तरीय दिव्यांग सक्षमीकरण समिती सदस्य पदी नियुक्ती झाल्याने सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अख्तर अमिन यांनी तर आभार मुख्याध्यापक जव्वाद हुसेन यांनी मानले.
तालुक्यातील शिराळा येथील जिल्हा परिषद शाळेत ३ शिक्षकांची मंजुरी असतांना सद्यस्थितीत येथे एक शिक्षिका कार्यरत आहे. परंतु, शिक्षण विभागाने २ निलंबित शिक्षकांना येथे कार्यरत केले आहे. परंतु, ते दोन्ही शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत नसल्याची तक्रार पालकांनी केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एकाच शाळेत २ निलंबित शिक्षकांना कार्यरत केल्यामुळे शिक्षण विभागाच्या या अफलातून कारभाराचा पालकांनी तीव्र निषेध केला असून, पालकवर्ग आंदोलनाच्या तयारीत आहेत. तालुक्यातील शिराळा येथील जिल्हा परिषद शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळावे, अशी मागणी पालकांची आहे. याबाबत ४ नोव्हेंबर रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शैक्षणिक सत्र २०२५-२६ सुरू होण्यापूर्वी शिराळा येथील जिल्हा परिषद शाळेला कायमस्वरूपी शिक्षकांची मागणी केलेली आहे. सदर मागणीला अनुसरून तात्पुरत्या स्वरूपात २ शिक्षकांची पूर्तता करण्यात आली आहे. शिराळा येथे वर्ग एक ते पाचपर्यंत शाळा असून, सदर शाळेत एकूण ११८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकूण ३ शिक्षक मंजूर असून, त्यापैकी एक शिक्षिका शिक्षणसेवक म्हणून कार्यरत आहेत तर दोन शिक्षक हे प्रशासनाने निलंबित केलेले असून, निलंबन काळात त्यांना शिराळा येथील जिल्हा परिषद शाळेत पाठविण्यात आलेले आहे. हे दोन्ही शिक्षक नियमित शाळेत येत नाही. त्यामुळे पालक नाराज झाले आहे. प्रशासनाने निलंबित शिक्षकांना शिराळा येथे देऊन विद्यार्थ्यांवर एक प्रकारे अन्याय केलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ३ वर्षांपासून विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात येथे कायमस्वरूपी शिक्षक मिळालेले नाही. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहता येथे कायमस्वरूपी शिक्षक द्यावे, अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर दादाराव ठोंबरे, दशरथ तायडे, डॉ. संतोष हटकर, विकास तायडे, संजय तायडे, मोतीराम ठोंबरे, विष्णू आटोळे, मनेश साळुंखे, रविराज तायडे, प्रकाश तायडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. शिराळा येथील जिल्हा परिषद शाळेत ११८ विद्यार्थी आहेत. या शिक्षिकेला मुख्याध्यापकपद तसेच इतर सर्व कार्यालयीन कामकाज पहावे लागते. तर इतर २ निलंबित झालेले शिक्षक येथे केवळ जागा भरण्यासाठी कार्यरत आहेत. ते नियमित येत नसून, विद्यार्थ्यांना शिकवतही नाहीत. त्यामुळे केवळ एकच शिक्षिका इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. ...तर पंचायत समितीमध्ये विद्यार्थ्यांची शाळा भरवू शिराळा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हा विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. येत्या १० नोव्हेंबरपर्यंत शिक्षकांची पूर्तता न केल्यास गावकरी पंचायत समिती खामगाव येथे मुलांची शाळा भरवू. - दादाराव ठोंबरे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, शिराळा
आकाशातील ग्रह ताऱ्यांचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही. रास-कुंडली पाहून विवाह ठरवणे चुकीचे आहे. विवाहाचे वाढते वय ही आरोग्यविषयक समस्या बनली आहे. लिंगनिदान प्रतिबंधक कायदा लागू होण्यापूर्वी गर्भजल परीक्षणाद्वारे कन्या भ्रूण नष्ट करण्याची प्रवृत्ती वाढल्याने मुलींची संख्या घटली आहे. जे मुलांच्या पालकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. घटस्फोटाचे जे आज प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी युवक-युवतींना मानसिक सजगता आणि कुटुंब मूल्यांची आवश्यक आहे. लग्नसंस्था व कुटुंबव्यवस्था टिकवण्यासाठी उपयुक्त उपाययोजना व मूल्य संस्काराची गरज आहे, असे प्रतिपादन बाळकृष्ण आमले महाराज यांनी केले. संत श्री वासुदेव महाराज ज्ञानपीठ अकोट, मध्यस्थी वधू वर सूचक मंडळ, विदर्भ वैभव मंदिर, मुंबई व कर्मयोगी संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठा-कुणबी समाजाचा उपवधू-वर सूचक व पालक परिचय मेळावा अभियंता भवन, शेगाव नाका येथे उत्साहात पार पडला. या वेळी मध्यस्थी वधू वर सूचक मंडळ शाखा अध्यक्ष बाळकृष्ण आमले, उद्घाटक बाळासाहेब फोकमारे, नंदकिशोर हिंगणकर, सुरेश कराळे, संजय बारब्दे, रवींद्र वानखडे, प्रा. प्रभाकर ठाकरे होते. याप्रसंगी संत श्री वासुदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात १३१ युवक- युवतींनी नोंदणी करून पालकांसमक्ष परिचय सादर केला. तसेच मध्यस्थी परिवाराने त्यांच्या भेटीगाठी घडवून आणल्या. कार्तिक शुद्ध एकादशीच्या औचित्याने उपस्थितांना फळे व चहा फराळ देण्यात आला. गजानन चऱ्हाटे यांनी युवक- युवतींच्या परिचय पत्रांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा ठुसे यांनी केले, तर शांताराम उमाळे यांनी आभार मानले. या वेळी मध्यस्थी अमरावती शाखेचे उपाध्यक्ष दिलीप वाकोडे, डॉ. सुरेश चिकटे, किशोर राऊत व अन्य पदाधिकारी, सेवेकरी उपस्थित होते. मराठा समाज युवक-युवती परिचय व पालक मेळाव्याला समाज प्रबोधनकर्ते व साहित्यिक प्रा. अरुण बुंदेले यांच्याकडून पुणे येथून प्राप्त झालेल्या ऑनलाइन शुभेच्छांचे व्यवस्थापक किशोर राऊत यांनी वाचन केले. प्रा. अरुण बुंदेले म्हणाले, की वधू-वर परिचय मेळावे आज समाजाची गरज आहे. अशा मेळाव्यामुळे वधू - वरांच्या पालकांचे श्रम, अर्थ आणि वेळेची बचत होते. तसेच वर - वधू संशोधन करणे सोपे जाते, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केले आहे. वर-वधू परिचय मेळावे आज समाजाची गरज : प्रा. बुंदेले
क्षयरोग (टीबी) मुक्त भारत अभियानांतर्गत ३१ ऑक्टोबरच्या आधी मनपा क्षेत्रात किती क्षयरुग्ण आहेत किंवा किती रुग्णांमध्ये लक्षणे आढळली. यासंदर्भात कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या. प्रत्यक्षात व खरेच किती काम झाले याबाबत शहरी आरोग्य केंद्रांनी नोंदी करणे अपेक्षित होते. त्या पूर्ण न झाल्याने मुदतवाढ देण्यात आली असून ७ नोव्हेंबरपर्यंत नोंदी पूर्ण करून त्या अद्ययावत कराव्यात. नोंदी अपूर्ण राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शहरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर असेल. त्यांना कामात कुचराई करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. याची गंभीरतेने नोंद घ्यावी, असे निर्देश मनपा आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अधिनस्त डीईओ, आशा सेविका, एएनएम, अटेंडंट यांच्याकडे काम विभागून देण्यात यावे. सर्व प्रलंबित नोंदी ७ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात. त्यानंतर आठवड्याचा एक दिवस निश्चित करून त्या दिवशी क्षयरोगाबाबत काम करावे. सर्व निदेशांची माहिती अद्ययावत करावी. एक्सरे तपासणीबाबत दररोज आरोग्य संस्था निहाय अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सादर करावा. तसेच आठवडी अहवाल आयुक्तांना सादर करावा. एक्सरेसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसोबत सामंजस्य करार करावेत, अशी सुचनाही मनपा आयुक्तांनी केली. मनपा आयुक्तांच्या दालनात झालेल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दिलीप सौंदळे, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, शहरातील १३ ही शहरी आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे,एचडब्ल्यूसी दवाखाने, २३ ओपीडी रुग्णालयांचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. मनपाच्या आयसोलेशन दवाखान्यात फिक्स एक्स रे मशीन व फिरती एक्सरे मशीन वापरून क्षयरोगाबाबत तपासणी केली जात आहे. शहरी आरोग्य केंद्रांमध्ये मायक्रोप्लॅन तयार करण्यात आला असून त्याअंतर्गत जोखीमग्रस्त लोकांना क्षयरोगाच्या स्क्रीनिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरोग्य पथकांद्वारे नियमित क्षयरुग्णांना नियमित भेटी दिल्या जातील. औषधोपचारांचे पालन केले जाते की नाही याबाबत माहिती ठेवली जाईल. पोषण स्थितीचे मुल्यमापन करून निक्क्षय मित्रांमार्फत फुड बास्केट पुरवण्यात येईल. जोखमीच्या गटातील नागरिक क्षय रोगासंदर्भात शहरातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेहाचे रुग्ण, धुम्रपान करणारे, गेल्या पाच वर्षांत क्षयरोग झालेल्या रुग्णांचे कुटुंबिय, जवळचे नातेवाईक, बॉडी मास्क इंडेक्स १८ पेक्षा कमी असलेले, तसेच वृद्धाश्रमात राहणारे, विविध कामगार यांची जोखमीच्या गटातील नागरिकांमध्ये नोंद घेण्यात येणार आहे. या व्यक्तींची आशा सेविकांमार्फत यादी तयार केली जाणार आहे. तसेच शहराच्या एकूण लोकसंख्ये पैकी सुमारे १ लाख ४७ हजार ३०१ लोकांचे सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर १० लक्षणांवर आधारित स्क्रीनिंग केले जाईल. लक्षणे नसलेल्यांची मोफत तपासणी केली जाणार आहे. ज्यांच्यात क्षयरोगाची लक्षणे आढळली, त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील.
गॅस डीलर्सचा संप:शुक्रवारी सिलिंडरचा तुटवडा भासणार
घरपोच सेवा आणि प्रशासकीय शुल्कात ७५ रुपयांची वाढ करण्याच्या मागणीसाठी गॅस डीलर्स असोसिएशनने गेल्या काही दिवसांपासून आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार, ६ नोव्हेंबरला ते आपली मागणी नोंदवणार नाहीत. परिणामी शुक्रवारी ७ नोव्हेंबरला शहरात सिलिंडरचा तुटवडा जाणवून घरपोच वितरणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात अमरावती गॅस डीलर्स असोसिएशनने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनानुसार घरपोच सेवा आणि प्रशासकीय शुल्कात वाढ ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार केली जात आहे. परंतु शासन त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे देशभरातील गॅस वितरकांनी साखळीबद्द आंदोलनाची हाक दिली असून पहिल्या टप्प्यात गेल्या २४ ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लावून काम करण्यात आले. त्यानंतर २९ ऑक्टोबरला काही ठिकाणी शासनाच्या निषेधस्वरुपात मेणबत्त्या पेटवून हा मुद्दा लोकदरबारात मांडण्यात आला. त्यानंतर आता ६ नोव्हेंबरला ‘नो मनी, नो इंडेंट’ ही भूमिका घेण्यात आली असून त्यादिवशी एकही वितरक त्यांच्याकडील बुकींग कंपनीला कळविणार नाही. परिणामी दुसऱ्या दिवशीचे वितरण अडचणीत येऊ शकते. या आंदोलनाची माहिती जिल्हाधिकारी यांना देण्यात आली. यावेळी अमरावती गॅस डीलर असोसीएशनचे अध्यक्ष संजय देशमुख, सचिव अखिलेश यादव, कोषाध्यक्ष सागर राठी, कार्यकारिणी सदस्य राजेश डागा, बबलू शेखावत, किशोर भांबुरकर, मुफद्दल हसनजी व विलास तायवाडे यांच्यासह सचिन देशमुख, निखिल भन्साली, जितेश दम्मानी, यश राऊत, कपिल खेरडे, गजू राजगुरे, असलम सिद्दिकी, सुनील माळवे, उमेश इंगळे, प्रवीण वाडेकर, गिरीश राठी, ओमप्रकाश परतानी, निलेश रडके, मनोज कटारिया, जितेंद्र गोरे, कमलेश इवनाते, सतीश परदेशी, भावेश बावनकुळे, सारंग देशमुख, निखिल इंगळे, उमेश चव्हाण, रुपेश चौबे, मयुरी पटोकार, दीपक खंडारे आदी उपस्थित होते.
खुटीया, एकताई, सिमोरी, हातरू येथील रस्ते, वीज, पुल आदींच्या व्यवस्थेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील. प्रामुख्याने या भागातील रस्त्यांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी रस्त्यांचे अंदाजपत्रक सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवारी ४ रोजी दिले. मेळघाटातील नागरिकांनी विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते. त्यानुषंगाने मागण्यासंदर्भात गावातील नागरिकांशी आज जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपवनसंरक्षक अर्जुना के.आर., कीर्ती जमदाडे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते. कुटीदा ते सिंभोरी आणि सोमिथा ते कुटीदा या रस्त्यांचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारे अंदाजपत्रक तातडीने तयार करण्यात येईल. या रस्त्यांची कामे रोजगार हमी योजनेतून करण्याची शक्यता पडताळून पाहता येईल. मेळघाटातील हातरू ते करंजखेड मार्गाचा संपर्क तुटत असल्याने याबाबतही योग्य ती कारवाई करण्यात येईल. पुलाच्या कामांना सुमारे १५ कोटींचा निधी लागणार आहे. त्यामुळे पुलाच्या बांधकामासाठी शासनस्तरावर मागणी करण्यात येणार आहे. ही कामे व्हावीत, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे, जिल्हाधिकारी येरेकर म्हणाले. विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी जरिदा उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागला आहे. येत्या काळात २२ गावांतील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. विजेच्या समस्येमुळे मोबाईलचे नेटवर्क राहत नाही. याबाबत विजेची सोय असणाऱ्या ठिकाणी नेटवर्क कायम करण्याच्या सूचना देण्यात येतील. आदिवासी क्षेत्रातील मक्याची खरेदी आदिवासी विभागाकडून करण्यात येते. ही खरेदी सुरू करावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. तसेच नागरिकांच्या रस्ते, वीज, पुलाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. ही कामे होण्यासाठी शासनस्तरावर तातडीने कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
अमरावती जन्म- मृत्यू प्रमाणपत्र रद्द केल्यानंतरही ते परत केले नाही. अशा ५०४ जणांचा आमच्या यंत्रणेने शोध घेतला मात्र ते मिळाले नाहीत. यातील १५५ जण दिलेल्या पत्त्यांवर मिळून आले नाही तर ३४९ जणांनी पत्ताच चुकीचा दिला, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी पोलिसांत दिली. त्यामुळे पोलिसांनीही तत्काळ ५०४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र या ५०४ जणांपैकी काही जण आता समोर येत आहेत. मागील चार दिवसांत ३५ जण पोलिसांसमोर उपस्थित झाले. दरम्यान दोघांनी प्रमाणपत्र परत करून पोचपावतीही मनपाकडून घेतली आहे. या प्रकारावरून मनपाने या व्यक्तींचा सर्व्हे गंभीरतेने केला नसल्याचे समोर येत आहे. २०२३ ते जानेवारी २०२५ या काळात मनपा हद्दीतील १८०० जणांना जन्म- मृत्यू प्रमाणपत्र मनपाकडून मागणीअंती देण्यात आले. दरम्यान जानेवारी २०२५ ला निघालेल्या शासन निर्णयानुसार या दोन वर्षात दिलेले सर्व दाखले रद्द करण्यात आले. त्यामुळे मनपाने संबंधितांना दाखले परत करण्याबाबत सूचित केले होते. त्यावेळी काहींनी दाखले परत केले. मात्र ५०४ जणांचे पत्ते मिळत नाही किंवा ते दिलेल्या पत्त्यावर उपलब्धच नाही. अशा अहवालावरून मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी कोतवाली पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी ३० ऑक्टोबरला ५०४ जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. वास्तविकता यातील काही व्यक्ती शहरातच वास्तव्याला आहेत. त्यांचा पत्ताही तोच आहे. मात्र या प्रक्रियेत त्यांचा पत्ता मनपा पथकाला दिसला नाही, म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे दोन जणांनी तीन महिन्यांपूर्वीच मनपाकडे दाखला परत केला. तसेच मनपाकडून त्यांनी दाखला परत मिळाल्याची पोहोचपावती घेतली, तरीही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ५०४ पैकी अनेक जण स्वत:हून येताहेत समोर : क्षेत्रीय झोन अधिकाऱ्यांना आपापल्या झोनमधील या व्यक्तींबाबत माहिती घेण्याबाबत मनपाकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यांच्या सर्वेक्षणाअंती कोण पत्त्यावर मिळाले, कोण मिळाले नाही, कोणी दाखले परत केले, कोणी केले नाहीत, असा संपूर्ण तपशील तयार करून डॉ. फिरोज खान यांनी प्रमाणपत्र मनपाला परत केल्यावर महापालिकेनेच पोहोच दिल्याचा कागद. मी जन्म प्रमाणपत्र काढले होते. मात्र प्रमाणपत्र रद्द झाल्याचे कळल्यावर स्वत:हून मनपात जाऊन ५ ऑगस्ट २०२५ ला ते रितसर परत केले. तसेच मनपाकडून पोचसुद्धा घेतली आहे. तरीही गुन्हा दाखल यादीत माझे एक नाहीतर दोनवेळा नाव आहे. माझ्याचप्रमाणे अन्य काही व्यक्तीसुद्धा दाखले परत करणारे आहेत. त्यांचेही यादीत नाव आहे. हा प्रकार गंभीर आहे. याबाबत आम्ही मनपा व पोलिस आयुक्तांनाही भेटलो आहे. मनपाचे कोणतेही कर्मचारी घरी आले नाहीत - नरेंद्र वैजापूरकर, नवाथे. मी सहा महिन्यांपूर्वी वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र काढले आहे. आम्ही जन्मापासून नवाथे परिसरातच राहतो. याच परिसरात व्यवसाय करतो. त्यामुळे या परिसरातील अनेक लोकं आम्हाला ओळखतात. मात्र मागील कालावधीत महापालिकेचे कोणतेही कर्मचारी आमच्यापर्यंत किंवा घरी सर्वेक्षणासंबंधात आले नाही. वैध कागदपत्रे असणाऱ्यांनी घाबरू नये ^ज्यांच्याकडे कागदपत्र आहेत, त्यांनी ते घेऊन पोलिसांकडे यावे. या प्रकरणात ज्यांच्याकडे वैध कागदपत्रे आहेत, त्यांनी या गुन्ह्यात नाव असेल तरीही घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. प्रकरणाची संपूर्ण चौकशी, तपास केल्याशिवाय आम्ही कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचणार नाही. -अरविंद चावरिया, पोलिस आयुक्त. सहायक क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालावरून पोलिसांत तक्रार नोंदवली ^सहायक क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अहवालासोबत जी नावांची यादी दिली, त्या आधारे पोलिसांत तक्रार दिली. प्रत्यक्ष पाहणीचे काम सहायक क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर झालेले आहे. काहींनी दाखले परत करूनही त्यांचे नाव तक्रारीत आले तर संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देणार आहे. -डॉ. विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी. ३ महिन्यांपूर्वीच प्रमाणपत्र मनपाकडे परत केले -डॉ. फिरोज खान हमीद खान वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे अहवाल देण्यात आला. त्या अहवालाच्या आधारे आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. वास्तविकता आता ‘आम्ही अस्तित्वातच आहे’ असे म्हणून गुन्हे दाखल झालेल्यांपैकी काही व्यक्ती समोर येत आहेत.
सावकार गंडवतात म्हणत आदिवासी धडकले डीडीआर कार्यालयावर
भोळाभाबडा स्वभाव आणि शिक्षणाचा पुरेसा अभाव यामुळे सावकार आम्हाला गंडवतात, असा आरोप करत मेळघाटातील आदिवासी शेतकरी व नागरिकांनी मंगळवारी दुपारी येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर धडक दिली. या वेळी जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे सहायक निबंधक राऊत व सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे निवेदन स्वीकारले. डीडीआर यांच्यासमक्ष त्यांची मागणी मांडून आदिवासी बांधवांना न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासनही या अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहे. मेळघाटमधील धारणी आणि अचलपूर परिसरातील आदिवासी आणि अन्य समाज बांधव आणि महिला हे शेती व व्यवसायासाठी त्या भागातील खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतात. रक्कम घेताना त्यांना दागिने गहाण ठेवावे लागतात. परंतु या व्यवहारात नियमाप्रमाणे व्याज आकारले जात नाही. वार्षिक व्याजदर हा दरमहाच्या हिशेबाने वसूल केला जातो, असे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच काही पावत्या देखील संबंधित अधिकाऱ्यांना या वेळी दाखवण्यात आल्या. त्यामुळे हा मुद्दा जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्याशी चर्चेअंती सोडवला जाईल, असे आश्वासन दिले. या वेळी उषा बेलसरे, सोनू भुसारे, अविनाश बेलसरे, मेळघाटमधील आरोग्य विभागाच्या गाभा समितीचे सदस्य ॲड. बंड्या साने, दशरथ बावकर आदी शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
रस्ते, वीज, पूल आदी पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी दिवाळीच्या एक दिवस आधी जिल्हाकचेरीवर ‘शिदोरी आंदोलन’ करत मुक्काम ठोकणाऱ्या आदिवासींच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत संबंधित यंत्रणा प्रमुखांना उपाययोजनेचे आदेश देण्यात आले. मेळघाटमधील खुटीया, एकताई, सिमोरी, हातरू येथे रस्ते, वीज, पूल आदींच्या अडचणी आहेत. त्यामुळे त्यांनी ऐन दिवाळीत आंदोलन केले होते. त्यावेळी सर्व विभागप्रमुखांना एकत्रित करून तोडगा काढणे शक्य नसल्याने जिल्हाधिकारी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत त्या आदिवासींसोबत सकारात्मक संवाद साधला होता. सध्या हा प्रश्न तातडीने सोडवता येणार नाही. त्यामुळे ४ नोव्हेंबरला याबाबत बैठक घेतली जाईल, असे त्यावेळी आंदोलकांना सांगण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी सर्व संबंधित विभागप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान ‘खोज’ संस्थेचे प्रमुख ॲड. बंड्या साने, दशरथ बावनकर व संबंधित आदिवासींच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. त्याचवेळी त्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या, प्रामुख्याने या भागातील रस्त्यांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी रस्त्यांचे अंदाजपत्रक सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहेत. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपवनसंरक्षक अर्जूना के. आर., किर्ती जमदाडे, साबांविचे अभियंता, जि. प.च्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी येरेकर म्हणाले, पुलाच्या कामांना सुमारे १५ कोटींचा निधी लागणार आहे. त्यामुळे पुलाच्या बांधकामासाठी शासनस्तरावर मागणी करण्यात येणार आहे. ही कामे व्हावीत, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. आदिवासी क्षेत्रातील मक्याची खरेदी आदिवासी विभागाकडून करण्यात येते. ही खरेदी सुरू करावी, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. तसेच नागरिकांच्या रस्ते, वीज, पुलाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कालावधी लागणार आहे. ही कामे होण्यासाठी शासनस्तरावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही येरेकर यांनी स्पष्ट केले. कुटीदा ते सिमोरी, सोमिथा रस्त्याला प्राथमिकता कुटीदा ते सिमोरी आणि सोमिथा ते कुटीदा या रस्त्यांचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारे अंदाजपत्रक तातडीने तयार करण्यात येईल. या रस्त्यांची कामे रोजगार हमी योजनेतून करण्याची शक्यता पडताळून पाहावी. मेळघाटातील हातरू ते करंजखेड मार्गाचा संपर्क तुटत असल्याने याबाबत कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.
वैराग दक्षिण काशी म्हणून समजले जाणारे ब दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणजे बार्शी तालुक्यातील सासुरे हे गाव. येथील जागृत देवस्थान श्री महांकाळेश्वर यात्रेस बुधवार, ५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. ही यात्रा पाच दिवस चालणार आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी श्री महांकाळेश्वर हे एक दैवत असून ते मूळ देवस्थान उज्जैन येथील आहे. परंतु दयाळराजे या अवतारी पुरुषांच्या भक्तीस पावन होऊन ते सासुरे येथे प्रकट अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेस येथे पाच दिवस यात्रा उत्सव भरतो. यावर्षी ५ नोव्हेंबर रोजी पहाटे यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला टोपाचा छबिना निघणार आहे. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून रात्री २ वाजता दुसरा टोपाचा छबिना निघणार आहे. गुरूवार, ६ रोजी सकाळी ९ वाजता भागवताचार्य हभप संतोष महाराज लहाने यांची किर्तन सेवा होणार आहे. तर दुपारी चार वाजता सार्वजनिक कुस्तीचा फड होणार आहे. या फडात श्री महांकाळेश्वर केसरी १ लाख इनामाची कुस्ती पैलवान विजय वारा विरुध्द अबु चाऊस यांच्यात लढली जाणार आहे. यात्रा कालावधीत तानाजी आवारे, मोरे यात्रा कमेटी, बाळासाहेब पाटील, महांकाळेश्वर भक्त, विठ्ठल इंगळे, काशीनाथ जाधव यांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली. सास ऋषींच्या नावावरून या गावाला सासुरे हे नाव पडले आहे. येथे नागझरी नदीकाठी श्री महांकाळेश्वराचे पुरातन हेमाडपंती मंदिर आहे. मंदिराच्या ५० फुट उंच शिखरावर अनेक शिल्पकला कोरल्या आहेत. प्राचीन बांधकामाचा उत्कृष्ठ नमुना मुस्लिम बांधवही श्रद्धेने सहभागी होतात अध्यात्माचे अधिष्ठान असलेल्या सासुरे गावात वर्षभरातील २ महिने संपूर्ण गाव मांसाहार व्यर्ज करतो. श्रावण आणि कार्तिक महिन्यात गावातील एकही व्यक्ती मांसाहार करत नाही. यामध्ये मुस्लीम बांधवही श्रद्धेने सहभागी होतात, हे विशेष. अज्ञातवासात असताना पाच पांडव सासुरेत आले होते, असा उल्लेख ग्रंथात आढळतो. श्री महांकाळेश्वर देव ही १९६५ पासून देवस्थान ट्रस्ट अतिशय पारदर्शकपणे काम पहात आहे. नमुना येथे पाहायला मिळतो. मंदिरात शिवभक्त दयाळराजेंची संजीवन समाधी आहे. तसेच मंदिरात १२ ज्योर्तिलिंगासह अष्ठ भैरवांच्या पिंडी आहेत. मंदिरातच शेषशायी नागनाथाचा फणा आहे. त्याच बरोबर ऐतिहासिक प्रसंगाची साक्ष देणारे अनेक विरगळ येथे पहावयास मिळतात. यात्रेनिमित्त मंदिरावर नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली. ५ दिवस चालणाऱ्या या यात्रा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री महांकाळेश्वर देव टस्टच्यावतीने मार्गदर्शक विश्वस्त डॉ. अजयकुमार करंडे, अध्यक्ष सज्जन दळवी यांनी केले आहे.
मंगळवेढ्यात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण:प्रा. शिवाजी काळुंगे यांचे मार्गदर्शन
शहरात चार महापुरुषांचे पुतळे उभे रहात आहेत. मंगळवारी (दि.४) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. महापुरुषांना मर्यादित करू नका, असे प्रतिपादन प्रा. शिवाजी काळुंगे यांनी येथील शिवप्रेमी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय भवानी जय शिवाजी...च्या जयघोषात मंगळवेढा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उद्घाटन झाले. याप्रसंगी विचारपीठावर आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे, युटोपीयन शुगरचे कार्यकारी संचालक रोहन परिचारक, धनश्री परिवाराचे प्रा. शिवाजीराव काळुंगे, डिव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष अमर पाटील, भगीरथ भालके, माजी नगराध्यक्षा अरुणा माळी, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीचे अध्यक्ष अजित जगताप, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण उपस्थित होते. प्रास्ताविकात पुतळा समिती अध्यक्ष अजित जगताप म्हणाले की, अनेक अडचणीवर मात करत पुतळ्याचे अनावरण झाले. सकल मराठा समाजाचे जिल्हा समन्वयक माऊली पवार म्हणाले की, संत दामाजीपंतांचा वारसा या नगरीने जपला आहे. भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत म्हणाले की, अनावरणप्रसंगी आज आनंद होत आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, तेजस्विनी कदम, प्रियदर्शनी कदम-महाडिक, प्रा. येताळा भगत, रामभाऊ वाकडे, विष्णूपंत आवताडे, ॲड. नंदकुमार पवार, अर्जुन चव्हाण, शेकडो शिवप्रेमींच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. जरांगे पाटलांच्या फोनवरुन शुभेच्छा मनोज जरांगे पाटील यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवरायांच्या पुतळा अनावरणप्रसंगी यायचे होते, परंतु प्रकृती ठिक नसल्याने मी येऊ शकलो नाही. मी मंगळवेढ्याला आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होणार. त्यांच्या शुभेच्छा शिवप्रेमींना माइकवरून ऐकवण्यात आल्या.
मोहोळ तालुक्यातील सीना नदीवरील आष्टे कोळेगाव बंधारा लगत देशमुख वस्तीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक मंगळवारी सांजवेळी ७ वाजता पोहोचले. टॉर्चच्या प्रकाशात पथकाने आष्टे कोळेगाव येथील बंधारा व महापूर काळातील पाण्याच्या खुणांची पाहणी केली. शेतकऱ्यांसह अधिकाऱ्याकडून पूरस्थितीची माहिती जाणून घेतली. अर्धा तास चाललेल्या पाहणी वेळी शेतक-यांनी आपलं गाऱ्हाणं मांडलं. राज्य शासनाने दिलेली मदत तुटपुंजी आहे. पुरात पीक नव्हे आमचं जगणं हरवलय. आम्हाला भरघोस मदत मिळावी अशी आशा व्यक्त केली. अधिका-यांनी जास्तीत जास्त मदत करणार असल्याचे सांगत धीर दिला. सीना नदीला आलेल्या महापुरामध्ये शेती पिके वाहून गेल्याची व्यथा मांडली. नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक नेमके रात्री आले. बॅटरीच्या प्रकाशात दिसेल तेवढी त्यांनी पाहणी केली. जनावरांना चारा नाही शेतकऱ्यांनी राज्याकडून जाहीर निधी पुरेसा नाही, पुन्हा शेतीसाठी भक्कम निधी हवा. जनावरांना चारा नाही. बंधाऱ्याची दुरावस्था झाली. कोल्हापूर बंधाऱ्याऐवजी बॅरेजसची मागणी केली. पथकाने केंद्राकडून निधी देण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे सांगून धीर दिला. मोबदला देण्याचा प्रयत्न ^ गायरानामध्ये पुनर्वसनाची प्रक्रिया वेळखाऊ आहे. शासन आदेशाने मागणीचा विचार करु. खरडून गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. काही अडचणी निर्माण झाल्यास माझ्याशी संपर्क साधावा.- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी
यंदा उष्णतेच्या मे महिन्यापासून सुरु झालेल्या अवकाळी पावसानंतर मान्सूनचे ३ महिने व त्यानंतर सप्टेंबर,ऑक्टोबरम ध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पावसानंतर ( ६ महिन्यानंतर) गुरुवारपासून पाऊस थांबणार आहे. ७ नोव्हेंबरपासून उत्तरेकडून वाऱ्याचा वेग वाढणार असल्यामुळे मध्यरात्रीच्या तापमानात ३ अंशांनी घसरण होऊन ते तापमान १६ अंशावर जाणार आहे. दरम्यान, मंगळवारी शहराचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदवले. यात शुक्रवारपासून आणखी घट होणार आहे. यंदा हवामानात मोठे बदल होताना दिसले. तीव्र उष्णतेच्या मे महिन्यात यंदा जिल्ह्यात २२० मिमी अवकाळी पाऊस झाला होता. त्यानंतर मान्सूनच्या जून-जुलै महिन्यात मात्र जिल्ह्यात मध्यम-हलक्या स्वरुपाचा पाऊस होऊन ५ लाख हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त पेरण्या झाल्या होत्या. मात्र सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीपाच्या पेरण्या वाया गेल्या होत्या. यंदा जिल्ह्यात मान्सून पुर्व, मान्सून व परतीच्या पावसाचा सहा महिने मुक्काम होता. जिल्ह्याचा वार्षिक सरासरी पाऊस ४४८ मिमी आहे. मात्र यंदा १ जून ते ५ नोव्हेंबरपर्यंत ६६४ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात परतीचा पाऊस दोन आठवड्यापुर्वीच परतला असताना देखील गेल्या सहा दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात तुरळक व मध्यम पाऊस सुरु आहे. त्यामुळे थंडी लांबणीवर पडली असतानाच गुरुवार (६ नोव्हेंबर) पासून पाऊस थांबणार आहे.त्यानंतर उत्तरेकडून वाऱ्याचा वेग वाढणार असल्यामुळे मध्यरात्रीच्या तापमानात ३ अंशांनी घसरण होऊन ते तापमान १६ अंशावर जाणार आहे. रवी आंधळे, शास्त्रज्ञ { २८ ऑक्टोबर ३१ { २८ ऑक्टोबर २९ { ३० ऑक्टोबर २९ { ३१ ऑक्टोबर ३१ { १ नोव्हेंबर २८ { २ नोव्हेंबर ३० { ३ नोव्हेंबर ३० { ४ नोव्हेंबर ३०
नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेऊन देशाच्या ऐक्याचा संकल्प केला. निमित्त होते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे. यानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन निमगाव वाघा ग्रामपंचायत, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, हॅपी हेल्दी कम्युनिटी, वैष्णवी ऑप्टीकल, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय आणि नवनाथ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवनाथ विद्यालयात विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. मंदा साळवे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच उज्वला कापसे यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नाना डोंगरे, ग्रामसेवक प्रविण पानसंबळ, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, अतुल फलके, केशव जगदाळे, रविंद्र काळोखे, डॉ. आकाश जरबंडी, डॉ. ओमकेश कोफ्लडा, मंदा साळवे, तेजस केदारी, प्रमोद थिटे, तृप्ती वाघमारे, दिपाली ठाणगे, तुकाराम पवार, स्वाती इथापे, निकिता रासकर, आप्पा कदम, प्रशांत जाधव आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक कांडेकर व नाना डोंगरे म्हणाले, आजच्या काळात, देशांतर्गत मतभेद, सामाजिक सलोखा बिघडवणारे प्रयत्न आणि विघटनकारी शक्तींचे आव्हान उभे आहे. अशा परिस्थितीत, सरदार पटेलांनी दिलेला ‘एकता आणि अखंडतेचा महामंत्र’ अधिक महत्त्वाचा ठरतो. राष्ट्रीय एकता दिवस आपल्याला शिकवतो की, वैयक्तिक मतभेद किंवा क्षुल्लक गोष्टींपेक्षा देशाचे हित आणि राष्ट्रीय एकात्मता नेहमीच सर्वोच्च असली पाहिजे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय योगदान देणे आवश्यक आहे, असे म्हणत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. नाना डोंगरे म्हणाले, देशाचे स्वातंत्र्य आणि एकात्मता टिकविण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. त्यांनी गृहमंत्री म्हणून अनेक संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारताची बांधणी केली. त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. डोळ्यांची तपासणी करून गरजू रुग्णांना चष्मे वाटप ग्रामस्थांनी आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी विविध रोगांची तपासणी करण्यात आली. नागरिकांना संतुलित आहार, व्यायाम व निरोगी जीवनशैलीबद्दल मार्गदर्शन देण्यात आले. डोळ्यांची तपासणी करून गरजू रुग्णांना चष्मे वाटप करण्यात आले. तसेच मोतीबिंदू व काचबिंदू शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय टीमने दिली.
दीड सेंटीमीटर पेक्षा ही लहान असलेल्या खडू शिल्पावर व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव स्पष्ट दिसतात. इतकी लहान खडूशिल्पे म्हणजे एक आश्चर्यच आहेत, असे प्रतिपादन शिवशाहीर आचार्य हेमंतराजे मावळे यांनी केले. सावेडी उपनगरातील अशोका आर्ट गॅलरीस शिवशाहीर आचार्य मावळे यांनी भेट दिली. यावेळी खडूशिल्पाचे अवलोकन करताना ते बोलत होते. बुद्धाच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य तर छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या चेहऱ्यावरील करारीपणा, राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या सोबत अहमदनगरची ओळख असणारे साईबाबा व आनंद ऋषीजी यांची शिल्पे खडूशिल्पे त्यांना विशेष भावली. त्या - त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वासंबंधी उर्वरित खडूवर सांकेतिक आकार कोरलेले पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. नेवासे येथील पैस खांब व त्या छोट्या शिल्पाच्या खालच्या बाजूस संपूर्ण लिहिलेले पसायदान विशेष आवडले. जगातील ही सर्वात छोटी व्यक्ती शिल्पे असावी असे त्यांनी सांगितले. भारत व संपूर्ण जगातील नामांकित, विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या व्यक्ती शिल्पा सोबत कलात्मक व सामाजिक संदेश देणाऱ्या खडू शिल्पांचे देखील त्यांनी मनापासून कौतुक केले. या अनोख्या शिल्पकलेचा आनंद आम्हाला या भेटीत मिळाला असे त्यांच्या कुटुंबाने सांगितले. शिवनेरी किल्ल्याच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शाहिरी चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर अध्यापनाच्या माध्यमातून नेणारे, आपल्या शाहिरीतून संपूर्ण महाराष्ट्रासह, भारतात प्रसिद्ध असणारे संस्कार भारती पश्चिम प्रांत चे अध्यक्ष शिवशाहीर आचार्य मावळे यांनी नगर दौऱ्यात कुटुंबासह कलादालनास भेट दिली. खडूशिल्पांसोबत विविध माध्यमात साकारलेल्या व्यक्तिचित्रांचे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचे तसेच नगर शहरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष केलेल्या निसर्गचित्रांचे मनापासून कौतुक केले. याप्रसंगी हर्षदा डोळसे यांनी शाहीर व त्यांच्या कुटुंबाचे स्वागत केले. खडूशिल्पाचे पुस्तक व शाहिरांचेच पेन्सिल स्केच भेट देऊन अशोक डोळसे यांनी सन्मान केला.
संगमनेर तालुक्यात औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीसाठी पुढील आठवड्यात मंत्रालय बैठक घेणार आहे. याबाबतचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. जेष्ठ तमाशा कलावंत स्व.कांताबाई सातारकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावर्षीचा पहिला पुरस्कार सातारा जिल्ह्याच्या वाई येथील तमाशा कलावंत कोंडीराम आवडे मास्तर यांना मानपत्र स्मृतीचिन्ह २१ हजारांचे मानधन देऊन सन्मानित करण्यात आले. व्यासपीठावर पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. गणेश चंदनशिवे, शाहीर विठ्ठल उमप यांच्या कन्या संगीता आणि कविता उमप, प्रा. एस. झेड. देशमुख, बापुसाहेब गुळवे, नाट्यकलावंत डॉ. सोमनाथ मुटकुळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते, बाबूशेठ टायरवाले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार आदी उपस्थित होते. मंत्री उदय सामंत म्हणाले, आमदार अमोल खताळ यांनी कलावंताची दखल घेवून एका कलावंताचा गौरव करण्याचा कार्यक्रम घेऊन आमच्या पुढे एक आदर्श निर्माण केला आहे. हा सन्मान एकट्या आवळे मास्तर यांचा नसून राज्यातील सर्व लोक कलावंताचा आहे. औद्यगिक वसाहतीच्या संदर्भात पुढील आठवड्यातच बैठक घेण्याचे आश्वासित करून मंत्री सावंत म्हणाले या तालुक्यातील युवकांच्या रोजगारासाठी अमोल खताळ यांची धडपड पूर्णत्वास नेवून तरूणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नसल्याचे यावेळी मंत्री सामंत यांनी सांगितले. आमदार अमोल खताळ यांनी या पुरस्काराच्या निमिताने तालुक्यात नव साहित्य सांस्कृतिक पर्व निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. दरवर्षी तालुक्यातील एका लोक कलावंताच्या नावाने आम्ही पुरस्कार देण्याचे नियोजन केले आहे.तालुक्यात रोजगार निर्माण करून देण्याच्या दृष्टीने यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औद्यगिक वसाहतीची केलेल्या घोषणेला मंत्री उदय सामंत यांनी मूर्त स्वरूप देण्याची मागणी केली. पुरस्कार्थी कोडीराम आवळे मास्तर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना माझ्या ऐंशी वर्षाच्या वाटचालीतील हा पहिला पुरस्कार असून ज्या भूमीत कलावंताची घडलो तिथै झालेला सन्मान मोठा आहे. आ.खताळ यांनी यासाठी घेतलेल्या कष्टाने उर भरून आला असल्याची भावना व्यक्त केली.सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन स्मिता गुणे यांनी केले.तमाशा कलावंत कोंडीराम आवडे मास्तर यांचा गौरव करताना मंत्री उदय सामंत. तालुक्याची नवी ओळख निर्माण करणारा सोहळा संगमनेर तालुका कलावंताची खाण आहे.यापूर्वी कोणत्याच कलाकराचा असा सन्मान झाला नाही.परंतू खताळ यांच्या माध्यमातून झालेला हा सन्मान सोहळा तालुक्याची नवी ओळख निर्माण करणारा ठरला आहे. यापुढे तालुक्यात कॉ.दत्ता देशमुख, भास्कराराव दुर्वे, शाहीर विठ्ठल उमप, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे सोहळे मोठ्या उपक्रमाने आयोजित करणार असल्याचे पालकमंत्री विखे यांनी सांगितले.
मांगीतुंगी दिगंबर जैन तीर्थक्षेत्रावर सोमवारपासून यात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. यात्रेसाठी नाशिक, जळगाव, संभाजीनगर, धुळे, अहिल्यानगर आदी जिल्ह्यातून आलेल्या भाविकांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सकाळी आठ वाजता भगवंताची अभिषेक पूजा करण्यात आली. सकाळी दहा वाजता पदयात्रेने आलेल्या १२०० भाविकाचे बँड पथकाद्वारे स्वागत झाले. दुपारी साधूवर्गाकडून धर्मोपदेश करण्यात आला. तर सायंकाळी मंगल आरती तसेच स्वाध्याय, भजन आधी धार्मिक विधी पार पडले. पहाटे पाच वाजता आलेल्या सर्व भाविकांनी मांगीतुंगीच्या डोंगरावर चढण्यासाठी यात्रा प्रारंभ केली. मांगी आणि तुंगी डोंगराच्या ३५०० पायऱ्या चढल्यावर मांगी आणि तुंगी पर्वतावर असलेल्या दिगंबर जैन प्रतिमांचे प्राचीन परंपरेनुसार अभिषेक आणि पूजा करण्यात आली. मांगीतुंगी तीर्थक्षेत्रावर भगवान पार्श्वनाथ यांचे पूजन करताना भाविक. सकाळी ९ वाजता पायथ्याशी असलेल्या मूलनायक चिंतामणी पार्श्वनाथ भगवंताच्या श्री चरणी अष्टद्रव्य सहित भव्य पूजा व नंतर अभिषेक, दुपारी २ वाजता श्री पार्श्वनाथ भगवंताची प्रतिमा रथावर विराजमान, तद्नंतर रथपूजा, रथ प्रस्थान, पांडुकशीलावर भगवंताची स्थापना, पंचामृत अभिषेक, कलशाभिषेक, मुनींश्री महिमा सागरजी महाराजांचे मंगल प्रवचन, सायंकाळी ७ वाजता मंगल आरती, शास्त्र प्रवचन होईल.
येथील श्री नेमिनाथ जैन विद्यालयात भगवान बिरसा मुंडा जन्मशताब्दी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये विद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आल्याची माहिती प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विद्यालयात जनजाती गौरव पंधरवडा निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने चांदवड शहरातील आदिवासी मोर्चा अध्यक्ष संजय पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत या पंधरवड्याचा प्रारंभ झाला. यावेळी प्रमुख अतिथी संजय पाडवी यांनी भगवान बिरसा मुंडा यांचे स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक म्हणून केलेले कार्य, आदिवासी लोकजीवन, आदिवासी जनजातीसाठी केंद्र व राज्य शासनाने कार्यान्वित केलेल्या विविध योजना यांविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन उपप्राचार्य देवेंद्रराज जैन, पर्यवेक्षक रामचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक रोशन नेरकर व आभार प्रदर्शन रोहिणी आथरे यांनी केले. जनजाती गौरव पंधरवडा निमित्त विद्यालयात भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या अनुषंगाने चित्रकला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, नाटिका सादरीकरण, नृत्य स्पर्धा, आदिवासी आहार विषयक ओळख कार्यक्रम, आदिवासी वसतिगृहात भेट देणे, भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत दाखविणे आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. चित्रकला व निबंध स्पर्धा
लासलगाव लासलगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्णसेवेचा बोजवारा उडाला असून रात्रीच्या वेळी चारपैकी एकही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने आपत्कालीन रुग्णसेवा रामभरोसे असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला असून एक वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याने रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसताना तेथील कर्मचाऱ्यांकडून कसेबसे उपचार सुरू असल्याचे धक्कादायक चित्र आहे. उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त असलेल्या लासलगाव ग्रामीण रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णसेवेचा बोजवारा उडाला आहे. एक वैद्यकीय अधीक्षक आणि तीन वैद्यकीय अधिकारी अशी नियुक्ती असताना रात्रीच्या वेळी गेल्या पाच दिवसांपासून एकही अधिकारी उपलब्ध नसल्याने आपत्कालीन रुग्णसेवा पूर्णतः ठप्प झाल्याचे चित्र असून कर्मचाऱ्यांकडून आणि आरोग्यसेविकांमार्फत उपचार केले जात आहेत. सध्या शेतातील अंतिम टप्प्यातील मशागतीचे कामे सुरू असल्याने सर्पदंश तसेच इतर निफाड येथे जाण्याचा सल्ला सोमवारी रात्री गंभीर मार लागल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आले होते. मात्र जवळपास तीन तास कुठल्याही प्रकारचे उपचार मिळाले नाहीत. तसेच डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे निफाड येथे जाण्याचा सल्ला दिला. त्यासाठी रुग्णवाहिका मिळणार नाही, असे सांगण्यात आले. मात्र शहरातील काही प्रतिष्ठित नागरिक आल्यानंतर त्यांनी ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने पुढील उपचार करता आले. - जायेदा शेख, रुग्ण, लासलगाव अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही लासलगाव ग्रामीण रुग्णालयात कधी औषधांचा तुटवडा तर कधी डॉक्टरांची कमतरता यासंदर्भात वारंवार जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून सुधारणा करण्याबाबत अनेकांनी मागणी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. आणि कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामीण रुग्णालय अत्यंत बिकट अवस्थेत आहे. लासलगाव ग्रामीण रुग्णालयात रात्रीच्यावेळी डॉक्टर उपलब्ध नसल्याने आपत्कालीन रुग्ण आल्याने उडालेला गोंधळ. नवीन डॉक्टर कधी? रुग्णालयात दोन शिकाऊ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिल्याचे सांगण्यात येते. मात्र रुग्णसेवा करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्यामुळे या दोन डॉक्टरांच्या जागी नवीन डॉक्टर येणार कधी आणि रुग्णसेवा सुरळीत होणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आजारांचे देखील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात जातात. मात्र, वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने त्यांना इतर खासगी रुग्णालयात जाऊन आपले उपचार करावे लागत असल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या कामकाजाबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ८ महिला प्रसूतीसाठी, डॉक्टरच नाही लासलगाव ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी अनेक महिला येत असतात. सोमवारी रात्रीच्या सुमारास या ठिकाणी आठ महिला उपचारासाठी दाखल होत्या. त्यामधील दोन महिलांची तेथील पुरुष कर्मचारी आणि महिला आरोग्यसेविका यांनी डॉक्टर नसताना देखील प्रसूती केली. रात्रीच्या सुमारास अपघात व सर्पदंश रुग्ण या ठिकाणी येतात. अशा परिस्थितीत डॉक्टर नसल्यामुळे त्यांना निफाड उपजिल्हा रुग्णालयाकडे धाव घेऊन उपचार करून घ्यावे लागत आहेत.
नाशिकमध्ये पंचवटीतील अमृतधाम परिसरातील बळी महाराज मंदिरात बलिप्रतिपदेच्या दिवशी जमा झालेली मिठाई व नागरिकांनी दिलेले नवीन व जुने कपडे सुरगाणा तालुक्यातील तीन पाड्यांवर वाटप करण्यात आले. याचा लाभ शेकडो आदिवासी बांधवांना मिळाला. पंचवटीतील अमृतधाम परिसरातील सुप्रसिद्ध बळी महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी बलिप्रतिपदा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होती. या दिवशी परिसरातील महिलांनी देवाच्या औक्षणासाठी आणलेला प्रसाद व नागरिकांनी दिलेले नवीन व जुने कपडे यांचे वाटप सुरगाणा तालुक्यातील मुरूमदरी, साबरदरा, हेमाडपाडा, मनखेड येथील नागरिकांना करण्यात आले. याप्रसंगी बळी महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळूमामा शिंदे, उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी, संजय सूर्यवंशी, विलास सूर्यवंशी, राजू मगर आदींनी परिश्रम घेतले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी मनखेड आश्रमशाळेचे प्राचार्य नसीर मणियार आदींचे सहकार्य लाभले. यावेळी स्थानिक नागरिकांसह मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
खुलताबाद रासायनिक खतांच्या दरात १ नोव्हेंबरपासून २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे आधीच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला आहे. शासनाने दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिवाळी उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही. त्यामुळे खुलताबाद तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सतीश देवेंद्र लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मे ते नोव्हेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. उत्पन्न शून्य झाले. अनेक शेतकरी कर्जात बुडाले. शिक्षण, लग्न, घरखर्च यामुळे ते अडचणीत आले. त्यात खत दरवाढीने त्यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. त्यामुळे ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाने दिवाळीपूर्वी अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र दहा दिवस उलटूनही शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना तेल, मीठ खरेदी करणेही कठीण झाले आहे. अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी करण्यात आली. खुलताबाद तालुक्यातील सहजपूर येथील गट क्रमांक २२ मधील वर्ग दोन जमिनीला वर्ग एकचा दर्जा द्यावा. या भागातील शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. वेरूळ शिवारातील तलाववाडी व डमडम तलावाच्या बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी तातडीने अधिग्रहित कराव्यात. त्यांना योग्य मोबदला द्यावा. यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करावा. या सर्व मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सतीश लोखंडे यांनी दिला. यावेळी राजेश इंगळे, रमेश माळी, विनोद गायके, किशोर जाधव, नामदेव बकाल, भगवान मडकर, अमोल गुमलाडू, मनेश पेंढारे, कारभारी औटे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.शासनाने हमीभावाचा केवळ खेळ न करता खरे हमीभाव मिळवून द्यावा. अनुदान तातडीने द्यावे. खतांचे दर कमी करावेत, अशी मागणी प्रगतिशील शेतकरी राजेश इंगळे यांनी केली. तहसील कार्यालय खुलताबाद येथे निवेदन देताना शेतकरी व कार्यकर्ते अनुदान न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा शासनाने आधीच अतिवृष्टीची तुटपुंजी मदत जाहीर केली. त्यात दिवाळीपूर्वी अनुदान देण्याचे सांगितले. मात्र आजपर्यंत एक छदामही खात्यात जमा झालेला नाही. त्यात खत दरवाढ करून शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे. आठ दिवसांत अनुदान न मिळाल्यास आंदोलन छेडले जाईल. असा इशारा लोखंडे यांनी दिला. योग्य मोबदल्याची मागणी डमडम तलावाच्या बुडीत क्षेत्रात माझी शेती आहे. पेरणी झाल्यावर पाऊस येतो. संपूर्ण शेत पाण्याखाली जाते. वर्षानुवर्षे नुकसान होत आहे. मानसिक त्रासही वाढला आहे. माझे वय २३ वर्षे असून डोक्यावर पाच लाखांचे कर्ज आहे. शासनाने आमच्या जमिनी अधिग्रहित करून योग्य मोबदला द्यावा. - अमोल गुमलाडू (तरुण शेतकरी)
वेरूळ लेणी मार्गावरमोठा अपघात टळला:घाबरून प्रवाशांनी टाकल्या रोडवर उड्या
वेरूळ लेणी परिसरात सुरतहून संभाजीनगर कडे जाणारी एस. टी. महामंडळाची बस व रिक्षा एकमेकांसमोर आल्याने पाच प्रवासी थोडक्यात बचावले. रिक्षेतील प्रवासी हे खुलताबादहून वेरूळकडे जात होते. खुलताबाद जात असताना सुरत होऊन संभाजीनगर कडे जाणारी बस क्रमांक एम. एच. १३ सी. यु. ६८७० ही भरधाव वेगाने विरूद्ध दिशेने संभाजीनगर कडे जात असताना वेरूळ लेणी जवळील चढावर रिक्षाच्या एकदम समोरासमोर आली. परंतु रिक्षा चालकाच्या सावधगिरीमुळे बस व रिक्षाचा अपघात थोडक्यात वाचला. रिक्षा व बस यांची धडक होणार म्हणून रिक्षेत बसलेल्या प्रवाशांनी रोडावर उड्या घेतल्या. रोडावर जास्त गर्दी नसल्यामुळे पाच प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. याबद्दल बस चालकाला विचारपूस करण्यास गेले असता बस चालकाने अरेरावी करून बस तेथुन सुसाट वेगाने संभाजीनगरकडे पळवली. परंतु मंगळवारी लेणी बंद असल्याकारणाने रहदरी कमी होती, म्हणून मोठा अपघात होण्यापासून वाचला.
बहुचर्चित अक्षय नागलकर खून प्रकरणातील मुख्य आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेल्या देशी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस पाेलिसांनी जप्त केले आहेत. डाबकी रोड पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असलेले सर्व नऊ आरोपी पोलिस कोठडीतआहेत. ४ नाेव्हेंबर राेजी गुन्ह्याच्याकटातील मुख्य आरोपी चंद्रकांतमहादेव बोरकर याच्याकडून अक्षयनागलकर याच्या हत्येमध्येआरोपींनी वापरलेले देशी बनावटीचेअग्निशस्त्र दोन जिवंत काडतुसांसहजप्त करण्यात आले असून गुन्ह्यातअद्याप देशी बनावटीचे एकूण तीनअग्निशस्त्रे (कट्टे) आणि १० जिवंतकाडतूस जप्त करण्यात आलेआहेत. दरम्यान, अक्षय नागलकर याचाखून करताना चंद्रकांत बाेरकर यानेथंड डाेक्याने कटकारस्थानरचल्याने आणखी काही गाेष्टीपाेलिस तपासात अटकेत असलेल्याअन्य आराेपींकडून समाेर येऊशकतात, असा अंदाज तपासअधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. यागुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिसअधिकारी सुदर्शन पाटील करतअसून तपासात डाबकी रोड पाेलिसठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायकपाेलिस निरीक्षक अभिषेक अंधारे,उपनिरीक्षक अनिल चव्हाण,अंमलदार दीपक तायडे, प्रवीणइंगळे, मंगेश इंगळे, मुन्ना ठाकूरयांनी सहकार्य केले.
अनैतिक संबंधाच्या संशयातून एकाने आपल्या मित्राची लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून हत्या केली. खून उघड होऊ येऊ नये म्हणून मैत्रिणीच्या मदतीने मृतदेह रस्त्यावर फेकला. अपघाती मृत्यू निष्पन्न होईल, असा त्यांचा कयास होता. मात्र, सीसीटीव्हीमुळे खुनाचा प्रकार उघड झाला. जवाहरनगर पोलिसांनी आरोपी सुधाकर शेषराव ढेपे (४८, रा. काबरानगर) अटक केली. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह आरोपीची मैत्रीण पसार झाली. विशाल बंडू पाचकोर (३२) असे मृताचे नाव आहे. घटनेच्या दिवशी आरोपी सुधाकर घरी मद्यपान करत होता. त्याची मैत्रीणही तेथे होती. त्या वेळी त्यांचा मित्र विशाल तेथे आला. त्या वेळी सुधाकर कामासाठी बाहेर गेला. घरी परतल्यावर त्याला आपली मैत्रीण व विशाल हे आक्षेपार्ह अवस्थेत दिसले. त्यामुळे संतापलेल्या सुधाकरने विशालला लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. मृतदेह रस्त्यात फेकला सुधाकर व त्याच्या मैत्रिणीने मृतदेह रस्त्यावर फेकून दिला. त्यानंतर घरातील रक्त साफ केले. त्यांना एका अल्पवयीन मुलाने मदत केली. जखमी विशालला पाहून एका नागरिकाने रुग्णवाहिकेला फोन केला. त्यानंतर त्याला घाटीत दाखल केले. सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्याने प्रकार उघड मृताच्या शरीरावरील जखमा पाहून पोलिसांना संशय आला. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले, त्या वेळी दोन व्यक्ती एकाला आणून रस्त्यावर टाकून देत असल्याचे दिसले. त्याआधारे पोलिस सुधाकरपर्यंत पोहोचले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबूल केला.
मैत्रिणीची वाट पाहत उभ्या असलेल्या १७ वर्षांच्या तरुणीला ट्रकचालकाने अश्लील इशारे करत छेडले. या प्रकाराने संतापलेल्या धाडसी तरुणीने त्याच्या कानाखाली सलग तीन थापडा लगावल्या. चौकात ड्यूटीवर असलेले पोलिस हा प्रकार पाहून धावत तरुणीजवळ गेले. त्यानंतर त्याने तरुणीची पाया पडून माफी मागितली. मात्र तिने बाजूला सरकत त्याची माफीही स्वीकारली नाही. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. मोंढ्यात माल उतरवला, नंतर मद्यपान करून तरुणीला छेडले शिवराम तानाराम देवासी (४८, रा. हुबळी, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. तो दारूच्या नशेत तरुणीकडे अश्लील इशारे करत होता. दामिनी पथकाच्या निर्मला अंभोरे यांच्या हस्तक्षेपानंतर क्रांती चौक पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तो कर्नाटकातून माल घेऊन मोंढा नाका भागात आला होता. तेथे माल उतरवल्यावर त्याने मद्यप्राशन केले. तेथून क्रांती चौकात जाऊन या तरुणीची छेड काढली.
वीज दरवाढीचा आदेश हायकाेर्टाकडून रद्द:ग्राहकांचे म्हणणे ऐकून न घेता निर्णय घेणे पडले महागात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजेचे दर कमी होणार अशी घोषणा केली होती. मात्र, त्याचबरोबर महावितरणने वीज नियामक आयोगाने नवीन वीज दराबाबत पुनर्विचार प्रस्ताव सादर केला होता. त्यावर ग्राहकांचे म्हणणे ऐकून न घेता आयोगाने तो पारित केला. वीज दर कमी होण्याऐवजी वाढले होते. याविरोधात नागपूर, मुंबई आदी ठिकाणांवरून याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी झाली. वीज दरवाढीचा आदेश न्यायालयाने ३ नोव्हेंबर रोजी रद्द केला. यामुळे पुन्हा जनसुनावणी घेऊन ग्राहकांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील तीन कोटींवरील ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महावितरणने त्यानुसार मार्च २०२५ मध्ये नवीन वीज दराचा स्लॅब तयार केला होता. त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी त्यानंतर पुनरावलोकन दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे दाखल केला होता.त्याला आयोगाने मान्यता दिल्याने प्रचंड वीज दरवाढ झाली होती. यात ग्राहकांचे म्हणने एकूण घेतले नव्हते. या विरोधात विविध शहरातून तीव्र संताप व्यक्त केला. ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी, एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशन, कमलेश्वर इंडस्ट्रियल आसोसिएशन, विदर्भ कॉटन असोसिएशन, मध्य भारत ऑइल मिल, विदर्भ कॉम्प्युटर आणि मीडिया डीलर्स वेलफेअर असोसिएशन, फेडरेशन इंडस्ट्रीज आसोसिएशन, लघु उद्योग भारती, वर्धा डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीयल असोसिएशन आदींनी न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती फिरदोस पी पुनीवाला आणि बी. पी. कोलाबावाला यांच्या समोर एकत्रित सुनावणी झाली. सोमवारी (३ नोव्हेंबर २०२५ रोजी) न्यायालयाने वीज नियामक आयोगाचे आदेश रद्द केले आहेत. तसेच ग्राहकांचे म्हणने एकूण निर्णय घेण्याचे आदेश पारित केले आहेत.सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतील : उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात वीज नियामक आयोग व एमएसइडीसीएल चार आठवड्यांत सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने स्टे न दिल्यास महावितरणला २८ मार्च २०२५ च्या आदेशानुसार वीज दर लावावे लागतील. सौरऊर्जा वापरावरील निर्बंधांना स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (एमएसईडीसीएल) च्या बँक केलेल्या नूतनीकरणीय ऊर्जेच्या सौर तासांच्या वापरावरील निर्बंधांना स्थगिती दिली आहे. पिक अवर्स वगळता कधीही नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर करण्यास परवानगी देणारे जुने मल्टी-यिक टॅरिफ फ्रेमवर्क कायम राहील असा निर्णय दिला. - विलासचंद्र काबरा, अध्यक्ष, ऊर्जा सहयोगी संस्था.
पुण्यातील काेंढवा परिसरात वास्तव्य करणारा जुबेर हंगारगेकर याच्या माेबाईलचे सीडीआरचे विश्लेषण केले असता त्याचा जुना माेबाईल एका साथीदाराच्या घरातून जप्त करण्यात आला आहे. त्याची तपासणी केली असता, पाकिस्तान, ओमान, साैदी अरेबिया, कुवेत येथील पाच आंतरराष्ट्रीय क्रमांक सेव्ह केल्याचे दिसून आले आहे. तसेच त्याचे जप्त करण्यात आलेल्या माेबाईल मध्ये एक ओमान व ४ साैदी अरबियाचे क्रमांक सेव्ह असल्याचे दिसून आले. त्यांचे आंतरराष्ट्रीय क्रमांकासाेबत काॅलींग सीडीआर मध्ये दिसून येत नाही मात्र, ते क्रमांक सेव्ह असल्याने त्याबाबत तपास सुरु करण्यात आला आहे. तसेच अल-कायद या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी जाेडण्यासाठी तरुणांना प्राेत्साहित करण्याचे काम जुबेर करत असल्याचे दिसून आले आहे. त्याच्याजवळील इलेक्ट्राॅनिक साहित्यातून एक टीबी इतका माेठया प्रमाणात डेटा दहशतवाद विराेधी पथकास (एटीएस) मिळून आल्याची माहिती तपास यंत्रणांनी माेठया पाेलिस बंदाेबस्तात जुबेर यास मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकारी सहाय्यक पाेलिस आयुक्त अनिल शेवाळे यांनी त्यास १४ दिवसांची पाेलिस काेठडी मिळावी अशी मागणी न्यायालयात केली. न्यायालयाने आराेपीस १४ नाेव्हेंबर पर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे जुबेरला २२ लाखांचे पॅकेज जुबेर हा उच्चशिक्षित असून त्याला खासगी आयटी कंपनीत २२ लाख रुपयांचे पॅकेज आहे. त्याचे जे साथीदार आहे त्यांच्यावर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंध कायद्यानुसार यापूर्वी गुन्हे दाखल आहे. तसेच इतर साथीदार हे सतत बेकायदेशीर हालचाल करत असल्यामुळे ते तपास यंत्रणेच्या रडारवर आहे. जुबेर हा देखील त्यांचे संर्पकात असून ताे अल कायदा या बंदी घातलेल्या संघटनेच्या विचारांनी प्रभावित हाेऊन तपास यंत्रणेस समजून न येता बेकायदेशीर हालचाली कशा करता येतील हे पाहत हाेता त्याबाबत तपास करणे आहे. ताे काेंढवा येथील दर्सच्या ठिकाणावरुन त्याचे नावाचे क्युआर काेड वापरुन तसेच मशीदीजवळ क्युआर काेड लावून त्याद्वारे स्वत:चे खात्यात पैसे घेत असल्याचे निष्पन्न झाले. गतआठवड्यात सोलापूरच्या दोघांना चौकशी करून सोडले पुण्यातील एटीएस पथकाने जुबेरच्या सीडीआरवरून सोलापूरच्या दोन भावांना ताब्यात घेतले होते. त्यातील एक जण सोलापुरातील मनपा शाळेत शिक्षक असून त्याला बुधवारी ताब्यात घेऊन पुण्याला नेण्यात आले. दुसऱ्या भावाला एटीएसने आधीच पुण्यातून ताब्यात घेतले होते. दोघांचीही चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले. जुबेर वळसंग येथील शिबिरासाठी आला होता.
पर्वती पायथ्याजवळील जनता वसाहतीतील टोळीयुद्धाचा उद्रेक झाला असून त्यातून मंगळवारी ( दि. ४) भरदुपारी तीन वाजता बाजीराव रस्त्यावरील नातूबाग परिसरात एका किशोरवयीन मुलाचा कोयत्याचे वार करून निर्घृण खून करण्यात आला. यासदंर्भात तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहराच्या मध्यवस्तीत ऐन रहदारीच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी वेगवान तपास करत तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या हल्ल्यात मयंक नावाचा १७ वर्षीय युवक जागीच मरण पावला. हा हल्ला एवढा भयंकर होता, की रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचा थरकाप उडाला. ऐन वर्दळीच्या रस्त्यावर झालेल्या या खुनानंतर मध्यवस्तीतील वाहतूक विस्कळीत झाली होती. मयंक हा मूळचा जनता वसाहत परिसरातील रहिवासी आहे. त्याची आई पुणे महापालिकेत नोकरीला असून त्यांना काही महिन्यांपूर्वी पुणे महापालिकेच्या साने गुरुजी वसाहतीत खोली मिळाली. त्यामुळे हे कुटुंब या वसाहतीत वास्तव्याला आले. मात्र, मयंकचा वावर जनता वसाहतीतच अधिक होता. त्या परिसरात गेल्या दोन वर्षांपासून गुंडगिरी वाढली असून तेथील टोळीयुद्धात गेल्या दोन वर्षांत तीन जणांचा बळी गेला. तसेच दहाहून अधिक जण जायबंदी झाले आहेत. तेथील काही गुंडांशी मयंक याची भांडणे झाली होती. त्यातून दोन दिवसांपूर्वी मयंकच्या मित्रांनी एकाला मारहाण केली होती. त्यामुळे तेथील काही जण त्याच्या मागावर होते.
मतदार याद्यांवरून विरोधक आक्रमक
आयोग सत्ताधा-यांच्या हातचे बाहुले : राज ठाकरे मुंबई : प्रतिनिधी मतदार याद्यांच्या घोळावरून विरोधकांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरलेले असताना आणि त्यासंबंधी पुरावे दिलेले असतानाही त्याची दखल न घेता निवडणूक आयोगाने राज्यात नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यामुळे विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तर निवडणूक आयोग सत्ताधा-यांच्या हातचे बाहुले बनली […] The post मतदार याद्यांवरून विरोधक आक्रमक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून कंत्राटदारांची खरडपट्टी
वेळ मागू नका, मुदतीत काम करण्याचे आदेश मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ठेकेदारांवर संताप व्यक्त करीत कंत्राटदारांची चांगलीच खरडपट्टी काढली. राज्यातील प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत. ५ वर्षांची वेळ मागू नका, अडीच वर्षांत प्रकल्प पूर्ण करा, जगात इतक्या […] The post बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून कंत्राटदारांची खरडपट्टी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पानचिंचोली येथील युवकाचा अपघाती मृत्यू
निलंगा : प्रतिनिधी तालुक्यातील पानचिंचोली येथील अतुल भरत दिवे वय २८ वर्षे हा पानचिंचोली येथून निटूरकडे जात असताना मंगळवारी दि ४ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान कवठापाटी च्या पुढे निटूरहून लातूरकडे जाणा-या भरधाव आयशर टेम्पोने रॉंग साईड येऊन त्याच्या दुचाकीस जोरदार टक्कर दिली. यात युवकाचा जागीच मृत्यू झाला. कांहीं आठवड्या पूर्वीच त्याच्या मोठ्या भावाचे अल्पशा […] The post पानचिंचोली येथील युवकाचा अपघाती मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रुद्धा शिवारात बाप-लेकाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून
अहमदपूर : प्रतिनिधी तालुक्यातील रुद्धा येथील शेत शिवारात (स्वत:च्याच आखाड्यावर) सोमवार-मंगळवारच्या रात्री बाप आणि एकुलत्या मुलाचा अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील रुद्धा येथील शिवराज निवृत्ती सुरनर वय ७० वर्षे आणि त्यांचा एकुलता एक मुलगा विश्वनाथ शिवराज […] The post रुद्धा शिवारात बाप-लेकाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माय-लेकीवर एकाच चितेवर अन्त्यसंस्कार
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील मर सांगवी येथे दि ३ नोव्हेंबर रोजी शेताकडे कापूस वेचण्यासाठी जात असताना माय व लेकीचा पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला होता . सुलाळी येथील उच्च पातळी बंधा-याची अचानक दारे उघडल्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला व दोघीही वाहून गेल्या. कुठलीही पूर्वक कल्पना मिळता दारे उघडून नदीमध्ये पाणी सोडल्यामुळे सदरील मायलेकीचा मृत्यू झाला. […] The post माय-लेकीवर एकाच चितेवर अन्त्यसंस्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वाहनांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांची धडक कारवाई
लातूर : प्रतिनिधी लातूर शहरातील वाहनांना शिस्त लावण्यासाठी वाहन पार्कीग करणारे वाहनावर, मोठे आवाज करणारे बुलेटला सायलेन्सर बसवणे व अॅटोरिक्षाचालकाविरूध्द ई-चलान मशिनव्दारे दंडात्मक कारवाई केलेले दंडाची पूर्ण १०० टक्के रक्कम भरून घेणेबाबत विशेष मोहिम वाहतूक पोलीसांकडून राबविली जात असून या मोहीमे अंर्तगत बेशिस्त वाहनधारकावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. दिनांक ३ नोव्हंबर रोजी अॅटोरिक्षा यांच्या […] The post वाहनांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांची धडक कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कव्हा येथील तलावात तरुणाची आत्महत्या!
लातूर : प्रतिनिधी शहरापासून जवळच असलेल्या कव्हा येथील तलावात एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली असून तरुणाचा मृतदेह दुपारच्या वेळी मृतदेह पाण्याबाहेर काढला. तरुणाने आत्महत्या का केली याबाबत मात्र उशिरापर्यंत समजू शकले नाही. शहरातील मयूर साठे हा काल दुपारपासून घरातून निघून गेला होता, तो उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून शोधा शोध सुरू होता, […] The post कव्हा येथील तलावात तरुणाची आत्महत्या! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्ह्यातील १४५ पैकी १४० प्रकल्प पूर्ण भरलेले
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील २ मोठे, ८ मध्यम तर १३५ लघु प्रकल्प, असे एकुण १३५ प्रकल्पांपैकी १४० प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे. मांजरा व निम्न तेरणा हे दोन्ही मोठे प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत. ८ मध्यम प्रकल्पांत ८९.८७ टक्के तर १३५ लघू प्रकल्पांत ९८.२२ टक्के, असे एकुण १४५ प्रकल्पांत ९७.४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला […] The post जिल्ह्यातील १४५ पैकी १४० प्रकल्प पूर्ण भरलेले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अचलपूर-चांदूरबाजारचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी मंगळवारी चांदूर बाजार येथील जलसंपदा कार्यालयात विविध विभागप्रमुखांची आढावा बैठक घेतली. सिंचन, शहरातील पथदिवे, ग्रामीण भागातील पूल आणि रस्त्यांच्या अर्धवट कामांची माहिती यावेळी घेण्यात आली. आमदारांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची कामे करून त्यांचे समाधान करावे लागेल, अशी सूचनावजा ताकीद दिली. या बैठकीला जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत उमप, उपविभागीय अभियंता अनुप खवणे, प्रज्वल वंजारी, कुलदीप गौरखेडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मुरली माकोडे, विलास तायवाडे, मनीष नांगलिया उपस्थित होते. आमदार तायडे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांनी अर्ज देऊनही अधिकाऱ्यांकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी मांडली. ही व्यथा ऐकून आमदार तायडे यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. काम करायचे नसेल तर स्पष्ट सांगा, त्यांच्या बदलीची व्यवस्था आम्ही करू, असे ते म्हणाले. मतदारसंघात राहायचे असेल तर आलेल्या शेतकऱ्यांचे समाधान करून त्यांची कामे करावीच लागतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. शेतीसंबंधी काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत, ज्यात पिकांची नासाडी, अतिवृष्टीची न मिळालेली मदत, वन्यजीवांचा त्रास आणि अनियमित वीजपुरवठा यांचा समावेश आहे. हे मुद्दे वारंवार लक्षात आणून दिल्यानंतरही संबंधित विभाग शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत नसल्याने ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमुळे आता शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली असून, शेतकरी वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तालुक्यात पूर्णा आणि चारघड असे दोन प्रकल्प आहेत. या हंगामात शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता असल्याने दोन्ही धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या. तसेच, शेतीला कालव्याद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची, त्या रस्त्यावरील पुलांची आणि कालव्याच्या पाइपलाइनची अर्धवट कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कालव्याला लागून असलेल्या रस्त्याची समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, ती दूर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
रस्ते, वीज आणि पुलासारख्या पायाभूत सुविधांच्या मागणीसाठी दिवाळीपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर 'शिदोरी आंदोलन' करणाऱ्या मेळघाटातील आदिवासींच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत संबंधित यंत्रणा प्रमुखांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. मेळघाटातील खुटीया, एकताई, सिमोरी आणि हातरू या गावांमध्ये रस्ते, वीज आणि पुलांच्या समस्या आहेत. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासींनी दिवाळीच्या एक दिवस आधी आंदोलन केले होते. त्यावेळी सर्व विभागप्रमुखांना एकत्र करून तोडगा काढणे शक्य नसल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी ४ नोव्हेंबर रोजी विस्तृत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार, मंगळवारी सर्व संबंधित विभागप्रमुखांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीदरम्यान 'खोज' संस्थेचे प्रमुख ॲड. बंड्या साने, दशरथ बावनकर आणि संबंधित आदिवासींच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी या समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, विशेषतः या भागातील रस्त्यांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी रस्त्यांचे अंदाजपत्रक सादर करावे, असे निर्देश दिले. जिल्हाधिकारी येरेकर यांनी सांगितले की, पुलांच्या कामांसाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यामुळे पुलांच्या बांधकामासाठी शासनस्तरावर मागणी करण्यात येणार असून, ही कामे पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी जरिदा उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागला असून, येत्या काळात २२ गावातील विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. विजेच्या समस्येमुळे मोबाईल नेटवर्क राहत नसल्याने, विजेची सोय असलेल्या ठिकाणी नेटवर्क उपलब्ध होण्यासाठी सूचना देण्यात येतील. आदिवासी क्षेत्रातील मक्याची खरेदी आदिवासी विभागाकडून सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. नागरिकांच्या रस्ते, वीज आणि पुलाच्या मागण्या पूर्ण होण्यास काही कालावधी लागणार असून, ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही येरेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपवनसंरक्षक अर्जूना के. आर., किर्ती जमदाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते. कुटीदा ते सिमोरी आणि सोमिथा ते कुटीदा या रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असलेले अंदाजपत्रक तातडीने तयार करण्यात येईल.
अमरावती जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि २ नगरपंचायतींच्या बहुप्रतीक्षित निवडणुका अखेर मंगळवार, ४ नोव्हेंबर रोजी घोषित झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाईल. मनपा आणि ग्रामीण भाग वगळता जिल्ह्यातील शहरी भागांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून संबंधित तहसील कार्यालयांमध्ये सुरू होईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर आहे. त्यानंतर, १८ नोव्हेंबर रोजी प्राप्त सर्व अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख अपील नसल्यास २१ नोव्हेंबर, तर अपील असल्यास २५ नोव्हेंबर असेल. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांना चिन्हे वाटप केले जातील. त्यानंतर, उमेदवारांना प्रचारासाठी एक आठवड्याचा कालावधी मिळेल. २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. जिल्ह्यात अचलपूर 'अ' वर्ग, तर वरुड, दर्यापूर आणि अंजनगाव सुर्जी या 'ब' वर्ग नगरपालिका आहेत. याशिवाय, मोर्शी, शेंदुरजनाघाट, चांदूर बाजार, चिखलदरा, धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे या 'क' वर्ग नगरपालिकांचा समावेश आहे. या सर्व नगरपालिकांसाठी एकूण २८२ नगरसेवक आणि १० नगराध्यक्षांची निवड केली जाईल. याव्यतिरिक्त, धारणी आणि नांदगाव खंडेश्वर या दोन नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी १७ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष, असे एकूण ३६ लोकप्रतिनिधी निवडले जातील. अशाप्रकारे, एकूण ३१६ नगरसेवक आणि १२ नगराध्यक्ष मिळून ३२८ लोकप्रतिनिधींसाठी जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ८६८ मतदार मतदान करतील. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे मंत्री, खासदार, आमदार यांना मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या घोषणा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व १० नगरपालिकांचा कार्यकाळ सुमारे अडीच वर्षांपूर्वीच संपला होता. या दीर्घकाळामुळे अनेक ठिकाणी विकासात्मक कामे रखडली आहेत. या काळात प्रशासक नियुक्त करण्यात आले होते, परंतु त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, अशी नागरिकांची भावना आहे. आगामी मतदानाच्या वेळी हे मुद्दे चर्चेत येण्याची शक्यता आहे.
आदिवासींचा डीडीआर कार्यालयावर मोर्चा:सावकारांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप
मेळघाटातील आदिवासी शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी मंगळवारी अमरावती येथील जिल्हा उपनिबंधक (DDR) कार्यालयावर मोर्चा काढला. सावकारांकडून फसवणूक होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. भोळेपणा आणि शिक्षणाचा अभाव यामुळे सावकार आपल्याला गंडवत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे सहायक निबंधक राऊत आणि सहकार अधिकारी सुधीर मानकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यांनी आदिवासी बांधवांचे निवेदन स्वीकारले आणि डीडीआर यांच्यासमक्ष त्यांची मागणी मांडून न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन दिले. मेळघाटातील धारणी आणि अचलपूर परिसरातील आदिवासी व अन्य समाज बांधव शेती आणि व्यवसायासाठी खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतात. रक्कम घेताना त्यांना दागिने गहाण ठेवावे लागतात. मात्र, या व्यवहारात नियमाप्रमाणे व्याज आकारले जात नाही. वार्षिक व्याजदर हा दरमहाच्या हिशोबाने वसूल केला जातो, असा आरोप निवेदनकर्त्यांनी केला. यासंदर्भात काही पावत्याही अधिकाऱ्यांना दाखवण्यात आल्या. या गंभीर मुद्द्यावर जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्याशी चर्चेअंती तोडगा काढला जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी उषा बेलसरे, सोनू भुसारे, अविनाश बेलसरे, मेळघाटमधील आरोग्य विभागाच्या गाभा समितीचे सदस्य ॲड. बी. एस. साने (बंड्या) आणि दशरथ बावकर यांच्यासह अनेक शेतकरी व नागरिक उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाने सणस मैदानावर १० वर्षांखालील बालक्रीडापटूंना सरावास बंदी घातल्याने पुणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुणे शहराचे प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका बाजूला नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या 'खासदार चषक २०२५' स्पर्धेसाठी ८ वर्षांखालील मुलांचा सहभाग मान्य केला जातो, तर दुसऱ्या बाजूला सामान्य स्थानिक पुणेकरांच्या १० वर्षांखालील मुलांना मैदानात प्रवेश नाकारला जातो, असे घरत यांनी म्हटले. घरत यांच्या मते, क्रीडा विभाग एका बाजूला 'बालक्रीडेला चालना' देण्याचे नाटक करतो आणि दुसऱ्या बाजूला त्याच बालकांना मैदानाबाहेर ठेवण्याचे अन्यायकारक निर्णय घेतो. क्रीडा विभागाची ही दुटप्पी भूमिका शिवसेना कधीही सहन करणार नाही. सणस मैदान हे काही निवडकांसाठी राखून ठेवलेले नसून ते सर्वसामान्य पुणेकरांचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी घरत यांनी सिंथेटिक ट्रॅकच्या दुरुस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दोन वर्षांपूर्वी तब्बल ८ कोटी रुपये खर्च करून बनवलेला सिंथेटिक ट्रॅक फक्त दोन वर्षांतच दोनदा खराब झाला, ही गंभीर बाब असून चौकशीस पात्र आहे. खासदार सुरेश कलमाडी यांच्या काळातील ट्रॅक १५-१७ वर्षे टिकला, परंतु नव्याने बनवलेला ट्रॅक इतक्या लवकर निकामी ठरतो, यामागे भ्रष्टाचाराची शक्यता त्यांनी वर्तवली. क्रीडा विभागाने 'सिंथेटिक ट्रॅक लहान मुलांमुळे खराब होतो' हे कारण देऊन गेल्या सहा महिन्यांपासून १० वर्षांखालील बालक्रीडापटूंना सणस मैदानावर सरावास बंदी घातली आहे. हा निर्णय केवळ अन्यायकारकच नाही, तर बालक्रीडेच्या मूलभूत तत्त्वांच्याही विरोधात आहे, असे घरत यांनी नमूद केले. खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या 'खासदार चषक २०२५' स्पर्धेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'खेलो इंडिया' आणि 'फिट इंडिया' संकल्पनेला अनुसरून विविध वयोगटांसाठी क्रीडा स्पर्धा होत आहेत. मात्र, मनपा क्रीडा विभागाचा हा निर्णय पंतप्रधानांच्या क्रीडा-विकास स्वप्नालाच धक्का देणारा आहे, असे घरत म्हणाले.
हडपसर ते लोणी काळभोर, हडपसर बस डेपो ते सासवड रोड या मेट्रो उपमार्गिकांना शासनाची मान्यता
मुंबई : प्रतिनिधी पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत खडकवासला-स्वारगेट -हडपसर- खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मेट्रो रेल्वे प्रकल्पांच्या अंमलबजावणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री तथा […] The post हडपसर ते लोणी काळभोर, हडपसर बस डेपो ते सासवड रोड या मेट्रो उपमार्गिकांना शासनाची मान्यता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सोलापूरच्या ३० हजार असंघटित कामगारांच्या घरांचा मार्ग मोकळा
मुंबई : प्रतिनिधी सोलापूर येथील असंघटित कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे उभारण्यात येणा-या ३० हजार घरांच्या प्रकल्पासाठी अनर्जित, नजराणा रक्कमेसह अकृषिक वापर शुल्कातून सूट देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मौजे कुंभारी येथील दक्षिण सोलापूर येथील रे नगर फेडरेशन आणि संलग्न गृहनिर्माण संस्थांना एकूण २१ हे. […] The post सोलापूरच्या ३० हजार असंघटित कामगारांच्या घरांचा मार्ग मोकळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विरार-अलिबाग मार्गिकेच्या भूसंपादन कर्जास हमी
मुंबई : प्रतिनिधी विरार ते अलिबाग या बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हुडकोकडून घ्याव्या लागणा-या दोन हजार कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी देण्यास मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे विरार-अलिबाग मार्गिकेच्या भूसंपादनाला गती येणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यापूर्वीच्या हुडकोमार्फत निधी उभारण्यासाठीच्या शासन निर्णयात सुधारणा करण्यासही मान्यता […] The post विरार-अलिबाग मार्गिकेच्या भूसंपादन कर्जास हमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचे काम
मुंबई : प्रतिनिधी मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ असताना त्या दुरुस्त न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर करणे हे योग्य नाही. निवडणूक आयोग दुबार तिबार मतदारांच्या नावासमोर ‘स्टार’ करणार हे सांगत असले तरी ती नावे वगळून मतदार याद्या निर्दोष का करत नाही? याचे उत्तर मात्र ते देत नाहीत. आयोगाचा हा कारभारच ‘दस नंबरी’ असून ते सरकारच्या […] The post सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचे काम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शहराजवळील रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नागरी भागातील तसेच प्रादेशिक योजनांमधील बिगर शेती क्षेत्रावरील जमिनींसाठी तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात आला आहे. याबाबत राज शासनाने नुकताच एक अध्यादेश जारी केला असून या अध्यादेशामुळे १५ नोव्हेंबर १९६५ पासून तुकडेबंदी कायद्यामुळे अडकलेली घरे आणि प्लॉट कायदेशीर करण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात पत्रकार परिषदेत दिली. […] The post शहराजवळील रहिवासी क्षेत्रासाठी तुकडेबंदी कायदा रद्द appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
फडके स्मारक दिव्यांनी उजळले:आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जयंतीनिमित्त दिपोत्सव सोहळा संपन्न
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकावर दिपोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मएसो सिनियर कॉलेज आणि फडके स्नेहवर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संगमवाडी येथील राज्य अन्वेषण गुन्हे विभागाच्या जुन्या कार्यालयाजवळील स्मारकात पार पडला. यावेळी विविधरंगी रांगोळी, फुलांची आकर्षक सजावट आणि शेकडो तेजोमय दिव्यांची देखणी आरास करण्यात आली होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेकडो दीप प्रज्वलीत करून आद्य क्रांतीकारक वासुदेव फडके यांना अभिवादन करण्यात आले. या सोहळ्याला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा आनंदी पाटील, सहसचिव सुधीर भोसले, सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, प्रा. डॉ. रवींद्र वैद्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. रवींद्र गोरे उपस्थित होते. तसेच, फडके स्नेहवर्धिनी संस्थेचे दिगंबर फडके, दत्तात्रय फडके, सुभाष फडके, चंद्रकांत फडके, सुलभा लिमये, लहुजी क्रांती दलाच्या समन्वयक समितीचे अध्यक्ष अण्णाभाऊ घोलप, समितीचे पदाधिकारी आशुतोष जोशी, सुभाष सावर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मएसो सिनिअर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. ६ नोव्हेंबर रोजी ‘अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धा दरम्यान, ६ नोव्हेंबर रोजी ‘अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धा पर्व-५’ आणि ‘पर्व-६’ चा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. डॉ. शामकांत देवरे (संचालक: राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता लोकमान्य सभागृह, केसरी वाडा, पुणे येथे हा कार्यक्रम होईल. मॅप एपिक कम्युनिकेशन प्रा. लि. चे संचालक मंदार नामजोशी यांनी ही माहिती दिली. शिक्षकांसाठीच्या गणित विषयक व्हीडिओ निर्मिती स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि पुणे महानगरपालिका शाळांमध्ये आयोजित पाढे स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील या कार्यक्रमात होणार आहे. पाढे स्पर्धेत ३१ हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते, तर गणित विषयक व्हीडिओ निर्मिती स्पर्धेत ११० स्पर्धकांनी भाग घेतला होता.
प्रशांत पडोळे बालिश, बावनकुळे यांचा आरोप:खासदारांनी तारतम्य बाळगावे; महसूलमंत्र्यांचा सल्ला
भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांनी महायुती सरकारकडे शेतकऱ्यांसाठी पैसे नसल्याचा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता. यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पडोळे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. पडोळे हे अपघाताने खासदार झाले असून, सरकारवर कोणताही आरोप करण्यापूर्वी त्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि प्रगल्भता दाखवावी, असे बावनकुळे म्हणाले. त्यांनी खासदारांचा उल्लेख 'बालिश' असा केला. खासदार पडोळे यांनी बोलताना तारतम्य बाळगावे आणि आरोप करण्यापूर्वी किमान आपल्या नेत्यांचा सल्ला घ्यावा, अशी सूचना बावनकुळे यांनी केली. सरकारने पूरग्रस्तांसाठी ३२ हजार कोटी रुपये राखून ठेवले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपांचाही समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्तावच पाठवला नसल्याचा दावा केला होता. यावर बावनकुळे यांनी, 'प्रस्ताव पाठवला नसता तर केंद्रीय पथक मदत देण्यासाठी आले तरी असते का?' असा सवाल केला. केंद्रीय पथक महत्त्वाचे असून, ते शेतकरी आणि पूरग्रस्तांना संपूर्ण संरक्षण देऊन मदत करणार आहे. केंद्र आणि राज्याची भूमिका महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्याची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांना केवळ आरोपच करता येतात आणि ते राजकीय वेळ मारून नेण्याचे काम करत आहेत. लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही विरोधकांना घरी बसावे लागणार आहे, असे बावनकुळे म्हणाले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. 'कोणत्याही राज्याची निवडणूक संपली आणि पराभव झाला की काँग्रेसचे नेते राहुल गांधी विदेशात निघून जातात. बिहार निवडणुकीच्या निकालानंतरही हेच बघायला मिळणार आहे. त्यांनी विदेशात जाण्याचे तिकीटही आत्तापासूनच काढून ठेवावे,' असा टोला बावनकुळे यांनी काँग्रेसला लगावला. शेतकऱ्यांना दोन-चार रुपयांच्या मदतीच्या पावत्यांवरही महसूलमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 'काहीही झाले तरी हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचा चेक देऊ शकत नाही. याची चौकशी झाली पाहिजे. चूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांची थट्टा करणे योग्य नाही. ही थट्टा कोणी केली हे तपासावे लागेल,' असा इशाराही त्यांनी दिला.
फलटण येथील डॉ संपदा आत्महत्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोपांच्या फैरींनी फलटण तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी अप्रत्यक्षपणे 'मास्टरमाइंड' म्हणून केलेल्या उल्लेखाला विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले. मी कोणताही मास्टरमाइंड नाही, माझी आणि फलटण तालुक्याची बदनामी थांबवा, असे ठणकावतानाच रामराजे यांनी तत्कालीन डीवायएसपी राहुल धस यांच्या कार्यकाळाची एसआयटी चौकशी करण्याची जोरदार मागणी केली आहे. 'मास्टरमाइंड'च्या आरोपांना प्रत्युत्तर रामराजे यांनी सुरुवातीलाच 'मास्टरमाइंड' हा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले, माझ्यावर आरोप केला जातो की मी मास्टरमाइंड आहे. देवेंद्र फडणवीस यांची सभा रद्द व्हावी, यासाठी मी हे केल्याचे म्हटले जाते. पण असले उद्योग आम्ही करत नाही. ज्या हॉटेलमध्ये ही घटना घडली, त्याचाही मास्टरमाइंड मीच आहे का? या जिल्ह्यात पोलिसांना एका विशिष्ट व्यक्तीकडून 'डायरेक्शन' (निर्देश) जातात आणि त्याप्रमाणे सर्व गोष्टी घडतात, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. माजी डीवायएसपी धस यांच्या एसआयटी चौकशीची मागणी या प्रकरणातील मुख्य मुद्दा मांडताना रामराजे यांनी तत्कालीन डीवायएसपी राहुल धस यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पीडित महिला डॉक्टर यांनी फलटण ग्रामीण पोलिसांविरुद्ध त्यांच्या डिपार्टमेंटकडे तक्रार केली होती. मात्र, डीवायएसपी धस यांनी ती तक्रार दाबून टाकली, अशी माझी माहिती आहे, असा गौप्यस्फोट रामराजे यांनी केला. माझी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पष्ट मागणी आहे की, जशी या मुलीच्या मृत्यूची एसआयटी लावली आहे, तशीच डीवायएसपी धस यांच्या कारभाराचीही वेगळी एसआयटी लावली पाहिजे. '२७७ केसेस' आणि हायकोर्टात जाण्याचा इशारा धस यांच्या कार्यकाळावर गंभीर आरोप करताना रामराजे म्हणाले, धस यांच्या काळात वाळूचे किंवा इतर नंबर दोनचे धंदे करणाऱ्यांकडून हप्ते घेतले गेले नाहीत, असा एकही व्यक्ती नाही. याच काळात २७७ केसेस दाखल झाल्या. आमची माहिती अशी आहे की, एकाच फॉरमॅटमुळे फक्त नावे बदलून या केसेस दाखल केल्या गेल्या. या सर्व २७७ केसेस आपण वकिलांचा सल्ला घेऊन हायकोर्टात नेणार असून, त्याच्या एसआयटी चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. विरोधकांवरही साधला निशाणा रामराजे यांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावरही टीका केली. आगवणे नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत, हा आगवणे १४ आणि १९ साली भाजपचा जर कार्यकर्ता होता. त्याला व्हिडिओ काढून 'हे रामराजेंनी करायला लावले' असे सांगण्यासाठी भाग पाडले गेले, असा आरोप त्यांनी केला. २०२२ सालच्या एका घटनेचा उल्लेख करत ते म्हणाले, मला किडनॅपिंग आणि खंडणीच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. त्यांनी पुणे कमिशनरला सांगून 'राजकीय माणसाला धक्का लागता कामा नये' असे बजावले आणि तो विषय थांबला. मग आता सांगा, खरा मास्टरमाइंड कोण आहे?. रामराजे यांनी स्पष्ट केले की, त्यांचा लढा हा भाजप पक्षाविरुद्ध नसून, सत्तेचा गैरवापर करणाऱ्या 'विकृत' मनोवृत्तीविरुद्ध आहे. या सर्व प्रकारांमुळे फलटण तालुक्याची बदनामी होत असून, आपण केवळ विकासाचे राजकारण करत आलो आहोत, असेही त्यांनी नमूद केले. दुग्धाभिषेक व रडण्याचे नाटक रणजितसिंह निंबाळकर यांनी केले - संजीव राजे निंबाळकर फलटणला काल नाटकाचा एक अंक झाला. त्यामध्ये दुधाने अभिषेक आणि रडण्याचे नाटक झाले. त्यांचा तो अभिनय ‘ऑस्कर’ देण्यासारखा होता’’, अशी मिश्किल टीका सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केली. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरुन रोज नवीन राजकीय आरोप होत असताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी काल दि. 3 रोजी फलटणच्या गजानन चौकात जाहीर पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावर होणार्या आरोपांमागे विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असल्याचा जाहीर आरोप रणजितसिंह यांनी केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आ. रामराजे नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. संजीवराजे म्हणाले, महिला डॉक्टरांचे घडलेले प्रकरण दुर्दैवी आहे. त्यावरुन सुरु असलेले आरोप - प्रत्यारोपही दुर्दैवी आहेत. हे प्रकरण झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा रामराजेंनीच पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी केवळ सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर सदर महिला डॉक्टरांचे काही लेखी खुलासे माध्यमांनी समोर आणले. त्यानंतर माजी खासदारांवर आरोप सुरु झाले. ते पत्रकारांनी बाहेर काढले आणि ते आता रामराजेंना यासाठी जबाबदार धरत आहेत. त्यांनी या प्रकरणात रामराजेंना मास्टरमाईंड म्हणणे मूर्खपणाचे आहे.’
लातूर : एजाज शेख भारतीय रेल्वे प्रशासनांतर्गत येणा-या लातूर शहरातील मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्यांतर्गत स्थापन केलेला मॅन्युफॅक्चरिंग युनिट सध्या रश्यिाातील कीनेट रेल्वे सोल्युशन लि. या ‘जेव्ही’मार्फत गेल्या दीड वर्षांपासून चालविण्यात येत आहे. परंतु, मागील दीड वर्षांपासून या प्रकल्पात स्थानिक तंत्रज्ञान पदविका आणि पदवीधर(अनुभवी/विनाअनुभवी) उमेदवारांना डावलून कीनेट प्रशासनाकडून गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश तसेच दक्षीण भारतातील उमेदवारांना […] The post स्थानिक युवकांना पहिला झटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र असून, आज पुन्हा शहराच्या मध्यवर्ती भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. बाजीराव रोडवर भरदिवसा, वर्दळीच्या रस्त्यावर, तीन तरुणांनी मिळून मयंक खराडे (वय 17) या तरुणाचा निर्घृण खून केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी खुनाची घटना असल्याने पुणे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हत्येमागे नव्याने उदयास आलेल्या 'माया टोळी'चे कृत्य असल्याचा संशय आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यात मयंक खराडे (वय 17) या तरुणाचा मृत्यू झाला. आज दुपारी सव्वा तीनच्या सुमारास (3:15 मि.) बाजीराव रोडवरील महाराणा प्रताप उद्यानाजवळ, दखनी मिसळसमोर ही घटना घडली. या खून प्रकरणात अभिजीत पाटील उर्फ माया, अमन उस्मान शिवलकर आणि अक्षय मारुती पाटोळे या तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. कोयत्याने हल्ला मयंक खराडे आणि त्याचा मित्र अभिजीत इंगळे दुचाकीवरून जात असताना, जनता वसाहतमधील मास्क लावलेल्या तीन तरुणांनी त्यांना पाठीमागून गाठले. आरोपींनी धारदार शस्त्रांचा, विशेषत: कोयत्याचा वापर करत मयंक खराडे याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात आरोपींनी मयंक खराडेचे केस कोयत्याने छाटले आणि बोटही कापले. कापलेले बोट रस्त्यावर पडल्याचे दृश्य पाहायला मिळाले. आरोपींच्या या क्रूर हल्ल्यात मयंक खराडे याचा जागीच मृत्यू झाला. गुन्हेगारांनी शहराच्या मध्यवर्ती भागात दिवसाढवळ्या अशा प्रकारे खून केल्याने पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून, या घटनेमुळे पुणे शहर हादरले आहे.
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा फेटाळले
टोरंटो : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची कित्येक भारतीय विद्यार्थ्यांना इच्छा असते. अमेरिका आणि कॅनडा यांसारख्या देशांत दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. यादरम्यान कॅनडाने असंख्य भारतीयांचे व्हिसा (पारपत्र) अर्ज नाकारल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ऑगस्ट २०२५ मध्ये जवळपास चारपैकी तीन भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज रद्द केल्याचे इमिग्रेशनच्या आकडेवारीतून समोर आले आहे. कॅनडाने […] The post कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा फेटाळले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

29 C