वैद्यकीय क्षेत्रातील मार्गदर्शक डॉक्टर शिवाजी गणपत बंगाळ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी राजस बंगाळ यांच्यासह दौलत बंगाळ, डॉ. राजेंद्र बंगाळ ही दोन मुले, थोरले बंधू डॉ. बाळकृष्ण बंगाळ, चार पुतणे व नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांचे ते वडील होत. डॉ. शिवाजी बंगाळ यांच्या निधनाबद्दल विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अजय चंदनवाले, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी बोधीकिरण सोनकांबळे, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी परिवाराकडून भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. डॉ. बंगाळ हे काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये स्थायिक झाले होते. अहिल्यानगर जिह्यातील अकोले तालुक्यातील डॉ. शिवाजी बंगाळ हे पहिले एम.बी.बी.एस डॉक्टर होते. प्रवरा नदीचा तीरावर वसलेल्या मेहेंदुरी त्यांचे मूळ गाव. डॉ. बंगाळ यांचा जन्म 18 मार्च 1937 मध्ये झाला. प्रतिकूल परिस्थितीत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांना नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करण्याची अनेकदा संधी मिळाली मात्र ग्रामीण भागातील रुग्णांची सेवा हेच आपले ध्येय मानून त्यांनी आदिवासीबहुल भागात सेवाभावी वृत्तीने चार दशकांपेक्षा अधिक काळ आरोग्यसेवा क्षेत्रात अविरतपणे काम केले. वैद्यकीय सेवेतील सेवाभावीवृती, सामाजिक बांधीलकी व नैतिक मूल्य कायम जपले. रुग्णांशी कसे बोलावे, वागावे याचा आदर्श मापदंडच त्यांनी पाळला. डॉ. शिवाजी बंगाळ पुण्याचे बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये सन 1963 च्या एम.बी.बी.एस. बॅचचे विद्यार्थी होते. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते परदेशातील एज्युकेशन कौन्सिल फोर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र, त्यांनी देशात ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल ऑफिसर म्हणून सेवा दिली. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चोवीस वर्षे अधिकृत मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांनी सेवा दिली. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये मानद मेडिकल ऑफिसर सेवा दिली. एल.आय.सी. चे अधिकृत मेडिकल ऑफिसर, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सदस्य होते तसेच सन 2011 मध्ये रोटरी क्लबच्या वतीने जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. डॉ. बंगाळ यांना वाचनाची प्रचंड आवड होती. वक्तशीरपणा, कामातील शिस्त व सुसंस्कृता तसेच लोकांशी बांधिलकी हे त्यांचे उल्लेखनीय गुण अधोरेखित करणे गरजेचे आहे. त्यांनी 'प्रवरेचे पाणी' हे आत्मकथनपर पुस्तक लिहले असून जीवनातील स्वअनुभव आधारित करणारे व ग्रामीण आदिवासीबहुल भागात राहून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टराची आत्मकथा वाचनीय आहे.
अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाने उडवलेल्या महिलेच मृत्यू
बीड : प्रतिनिधी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्यातील औसा येथे प्रचार सभेसाठी जात असताना तेलगाव-धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे एक मोठी दुर्घटना घडली. अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कुसुम विष्णू सुदे (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या […] The post अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाने उडवलेल्या महिलेच मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘असा मी अशी मी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
मुंबई : प्रतिनिधी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने मालिकांसह चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. नुकताच तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ज्यात ती वयाने तिच्याहून २५ वर्षांनी मोठ्या असलेल्या लोकप्रिय अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. तेजश्री आणि अजिंक्य देव ‘असा मी अशी मी’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच […] The post ‘असा मी अशी मी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अपघाताचा बहाणा करून ट्रक चालकाला लुटले:हडपसर येथील घटना, पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक केली
पुणे शहरातील हडपसर येथील मगरपट्टा परिसरात अपघात झाल्याचा बहाणा करून एका ट्रक चालकाला लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक केली आहे. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी साधुराम दिगंबर मुळे (वय ३३, रा. सलगरा दिवटी, ता. तुळजापूर, जि. सोलापूर) या ट्रक चालकाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुळे हे २४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मगरपट्टा रस्त्यावरून जात असताना आरोपींनी त्यांचा ट्रक अडवला. आरोपींनी अपघात झाल्याची बतावणी करत मुळे यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मामेभावाला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर त्यांनी मुळे यांच्या खिशातून ५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. या घटनेनंतर घाबरलेल्या मुळे यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू करत इरफान इस्माईल सय्यद (वय ३३), शाहरुख आसिफ मणीयार (वय ३३) आणि शुभम विजयशंकर तिवारी (वय २७) या तिन्ही आरोपींना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक एस. शेख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. महाविद्यालयीन युवकाला धमकावून लुटमार प्रयत्न पुणे शहरातील लष्कर भागात महाविद्यालयीन युवकाला धमकावून त्याच्याकडील रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत एका महाविद्यालयीन युवकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार युवक सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात राहायला आहे. तो लष्कर भागातील डेक्कन लायब्ररी परिसरातून निघाला होता. त्यावेळी अनोळखी दोघांनी त्याला अडवून धमकाविले. त्याच्या खिशातील रोख रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. युवकाने त्यांना विरोध केल्यानंतर दोघे जण पसार झाले. घटनास्थळी नागरिक जमा झाल्याचे पाहताच दोघे जण पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे पुढील तपास करत आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण:उत्तर प्रदेशातून मुलीची सुखरूप सुटका, आरोपींना अटक
पुण्यातून विवाहाचे आमिष दाखवून अपहरण केलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीची उत्तर प्रदेशातून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी अपहरण करणाऱ्या तरुणासह त्याच्या सावत्र आईला अटक केली आहे. गेल्या महिनाभरापासून पोलिस या मुलीचा शोध घेत होते. रमेश मसनाजी पिट्टलवाड (वय २५, रा. धनगर वस्ती, ऊरळी देवाची, मूळ रा. नांदेड) आणि मुक्ताबाई मसनाजी पिट्टलवाड (वय ३५, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रमेश हा पुण्यात कामाच्या शोधात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेशची १३ वर्षीय मुलीशी ओळख झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि विवाहाचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. या कृत्यात त्याची सावत्र आई मुक्ताबाई हिने त्याला मदत केली. मुक्ताबाईने त्यांना हैद्राबादला जाण्यासाठी पैसे दिले होते. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान, आरोपी रमेश मुलीला घेऊन हैद्राबादला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मुक्ताबाईला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक हैद्राबादला पोहोचले. मात्र, पोलिस मागावर असल्याची माहिती मिळताच रमेश मुलीला घेऊन तेथून पसार झाला. तांत्रिक तपासाच्या आधारे रमेश मुलीला घेऊन उत्तर प्रदेशातील बामणौली परिसरात एका नातेवाईकांकडे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. तात्काळ पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले आणि त्यांनी रमेशला ताब्यात घेतले. तसेच, अल्पवयीन मुलीची सुटका केली. मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे. परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेश खांडे, सहायक पोलिस निरीक्षक नानासाहेब जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.
ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांना यंदाचा 'महात्मा फुले समता' पुरस्कार जाहीर झाला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या १३५ व्या पुण्यतिथी आणि समता दिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार, २८ नोव्हेंबर २०२५ रोजी पुण्यात होणार आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पुरस्काराचे स्वरूप रुपये एक लाख, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह असे आहे. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता, समता भूमी, फुले वाडा, पुणे येथे हा सोहळा पार पडेल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात खासदार उपेंद्र कुशवाहा आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते डॉ. थोरात यांना पुरस्कार प्रदान केला जाईल. यावेळी हेमंत रासने, रूपाली चाकणकर, बाळासाहेब शिवरकर, कमल ढोले-पाटील, दिप्ती चवधरी यांची प्रमुख उपस्थिती असेल. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी महात्मा फुले पुण्यतिथी समता दिनाच्या निमित्ताने 'महात्मा फुले समता पुरस्कार' दिला जातो. सामाजिक, राजकीय, साहित्य आणि पत्रकारिता यांसारख्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. डॉ. सुखदेव थोरात यांची भारतीय सामाजिक-आर्थिक विचारविश्वात एक अर्थशास्त्रज्ञ, शिक्षक, अभ्यासक आणि धोरणनिर्माते म्हणून विशेष ओळख आहे. सामाजिक न्याय, आर्थिक समानता आणि सर्वांसाठी शिक्षण या दिशेने त्यांनी केलेल्या कार्याची देशव्यापी दखल घेतली गेली आहे. डॉ. थोरात यांनी २००६ ते २०११ या काळात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. उच्च शिक्षणाच्या लोकशाहीकरणावर भर देत त्यांनी प्रवेश, शिष्यवृत्ती आणि मागास समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक धोरणे राबवली आहेत.
काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारुप मतदार यादी २० नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झाली असून यावर हरकती व सूचना घेण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. ब-याच महानगरपालिकांमध्ये प्रारुप मतदार याद्यांवर हरकत व सूचना घेण्यासाठी अवघी ७ दिवसांची मुदत अत्यंत कमी आहे, ती १५ दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र […] The post काँग्रेसचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉ. दीपक शिकारपूर लिखित 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स 2025++' या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. हे पुस्तक राज्यातील अंधशाळांमध्ये वितरित केले जाणार आहे, जेणेकरून दृष्टिहीन विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळेल. यावेळी बोलताना डॉ. माशेलकर म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून अंधारातही भविष्य घडवता येते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यास जीवनातील अंधार ही अडचण न राहता शारीरिक अक्षमतांना क्षमतांमध्ये रूपांतरित करता येऊ शकते. डॉ. शिकारपूर यांचे हे कार्य सामाजिक बांधिलकीचे असून स्पृहणीय आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि डिजिटल साक्षरता कार्यकर्ते डॉ. दीपक शिकारपूर अनेक वर्षांपासून दृष्टिहीन व्यक्तींच्या साक्षरतेसाठी काम करत आहेत. त्यांचे तंत्रज्ञानविषयक साहित्य ब्रेल लिपीमध्ये रूपांतरित करून ते राज्यातील अंधशाळांमध्ये वितरित करतात. दृष्टिहीन व्यक्तींना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारखे आवश्यक कौशल्य आत्मसात करण्यातील मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी या पुस्तकाची ब्रेल आवृत्ती विकसित केली आहे. 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स 2025++' हे डॉ. शिकारपूर यांचे 63वे पुस्तक दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले आहे. पुस्तकाविषयी बोलताना डॉ. शिकारपूर यांनी सांगितले की, यात एआयचे प्रवाह आणि व्यवसायासाठी एआय तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होऊ शकतो, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन ॲडम्स् कोर्ट, बाणेर येथे करण्यात आले होते. यावेळी नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंडच्या प्रवक्त्या सकिना बेदी, फिडेल सॉफ्टच्या व्यवस्थापकीय संचालिका प्राची कुलकर्णी, जागृती स्कूल फॉर ब्लाईंडच्या व्यवस्थापक सविता गायकवाड, कौशल्य विकास मार्गदर्शक ऋजुता भागवत आणि शाळेतील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील एका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. थकीत वेतन मिळवून देण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. याप्रकरणी अनमोल शिवाजी शिंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एका वसतिगृह अधीक्षकाने यासंदर्भात तक्रार दिली होती. अधीक्षकाचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन थकीत होते. हे वेतन मंजूर करून देण्यासाठी लिपिक शिंगे याने तीन हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे मान्य केले. यानंतर एसीबी पथकाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ सापळा रचला. तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना शिंगे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. टोळक्याकडून वाहनांची तोडफोड पुणे शहरात हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. टोळक्याने कोयते उगारून दहशत माजविली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.फरहान ऊर्फ फऱ्या सोहेबलाल शेख, आझाद ऊर्फ अज्जू तालिब खान, कदीर शेख, रेहान जमील खान, यश ऊर्फ चॉकलेट जावळे (सर्व रा. भारत कॉलनी, आदर्श नगर, उरुळी देवाची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत नवाज शरीफ शेख (वय ३६, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आरोपी फरहान शेख याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली आहे. धनंजय मुंडे हे थर्ड क्लास व्यक्ती आहेत. त्यांना अजूनही वाल्मीक कराडची आठवण येत असेल तर माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांची नुकतीच परळीत एक जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला वाल्मीक कराडची आठवण येत असल्याचे विधान केले होते. आज 9-10 महिने झाले. जगमित्र कार्यालय सुरू आहे. कामही सुरू आहे. पण एक व्यक्ती नाही याची मला प्रकर्षाने जाणीव होते, असे ते म्हणाले. अंजली दमानिया यांनी मंगळवारी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. त्या म्हणाल्या, मला धनंजय मुंडे यांचे विधान ऐकून राग आला. संताप आला. ही व्यक्ती थर्ड क्लास आहे. एबसुल्युटली थर्ड क्लास. एवढे सगळे होऊनही त्यांना आठवण येत असेल तर माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. परळीच्या जनतेनेच आता त्यांना पुन्हा निवडून देऊ नये. उल्लेखनीय बाब म्हणजे वाल्मीक कराड हा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी आहे. सध्या तो मकोका अंतर्गत बीड जिल्हा कारागृहात खडी फोडत आहे. त्याच्यावर संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. पार्थ पवारावर अजून गुन्हा का नाही? अंजली दमानिया यांनी यावेळी मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्यात दिरंगाई होत असल्यावरही आगपाखड केली. त्या म्हणाल्या, पुणे भूखंड घोटाळ्यात यंत्रणा पार्थ पवार यांना पाठिशी घालत आहेत. त्यांना वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न होत आहे. इथे आपल्यापैकी कुणी असते तर त्याच्यावर आतापर्यंत एफआयआरही दाखल झाला असता. पण इथे पार्त अजित पवार हे नाव आहे. या नावामुळेच अद्याप त्यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही. एफआयआरमध्ये नावही घेतले जात नाही. मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अॅमेडिया कंपनीला 10 दिवसांची वाढीव मुदत देण्याचे काम सुरू आहे. या असंख्य प्रश्नांनी त्रास होत आहे. मी खर्गे समितीला अनेक पुरावे पाठवलेत. सदर कंपनीचे वीज बीलही पार्थ पवारांच्या नावाने आहे. दिग्विजय पाटील कुठेच नाही. या प्रकरणात त्याच्यावर नाहक अन्याय करण्यात आला आहे. इओडब्ल्यूचे मिसाळ यांच्याकडे शितल तेजवानीचे सर्व पुरावे दिलेत. या सर्वांची चौकशी होण्याची गरज आहे. या प्रकरणी खरा भागीदार कोण आहे? खरा सुत्रधार कोण आहे? हे स्पष्ट झाले पाहिजे. पार्थ पवार यांनी दिग्विजयला सहीचे अधिकार दिले होते. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. अजित पवारांना बोलताना भान राखण्याचा सल्ला अंजली दमानिया यांनी यावेळी मतदारांना मतांच्या मोबदल्यात निधी देण्याच्या विधानाचाही समाचार घेतला. त्या म्हणाल्या की, अजित पवार व रुपाली चाकणकर यांना सांगायचे आहे की, ते पैसे तुमच्या काकांचे नाहीत. ते पैसे जनतेचे आहेत. हा निधी जनतेच्या करांमधून आला आहे. त्यामुळे त्यांनी बोलताना भान राखावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा त्यांची पाठराखण करतात.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आरक्षणासंबंधी सुनावणी पुन्हा लांबली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण प्रकरणी आज (२५ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी वरिष्ठ वकील जयसिंग यांनी निवडणूक प्रक्रिया अधिसूचित झाली आहे. आता ती थांबवता येणार नाही. आरक्षणातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था या आदिवासी क्षेत्रात आहेत, असा युक्ितवाद केला. यावर सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी स्पष्ट […] The post स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आरक्षणासंबंधी सुनावणी पुन्हा लांबली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भांडूप येथील त्यांच्या घरी भेट दिल्यानंतर मोठे विधान केले आहे. राऊत यांची तब्येत मागील काही दिवसांपासून बिघडलेली असल्याने त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून अंतर ठेवले आहे. मात्र, आज झालेल्या भेटीत राऊत यांचा उत्साह पाहून उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. माध्यमांशी बोलताना त्यांनी विनोदी शैलीत सांगितले की, आता मी राऊतांना रोज फोन न करता त्यांच्या भावालाच त्यांची खबरबात घेण्यासाठी त्रास देतो. त्यांनी पुढे सांगितले की राऊत आता प्रकृतीच्या अडचणीतून सावरत असून त्यांचे पुनरागमन लवकरच होणार आहे. फक्त परत येणार नाहीत, तर पूर्वीपेक्षा अधिक जोमाने राजकीय रणांगणात उतरणार, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला. संजय लवकरच पुन्हा मैदानात दिसतील… आणि या वेळी हातात तलवार घेऊन, अशा शब्दांत त्यांनी राऊतांच्या लढाऊ वृत्तीवर मोहोर मारली. ठाकरे यांच्या या विधानामुळे शिवसेना-ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील राजकारणात नेहमीच ठाम भूमिका घेणारे आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या गंभीर समस्यांमुळे घराबाहेर निघू शकले नाहीत. वैद्यकीय तपासणीत त्यांना गंभीर प्रकारचा आजार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगिले आहेत. त्यामुळे 31 ऑक्टोबरपासून त्यांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना ब्रेक दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची सविस्तर विचारपूस केली. या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरे दुपारी भांडूपमधील मैत्री नावाच्या बंगल्यावर पोहोचले तेव्हा राऊत यांचे बंधू, आमदार सुनील राऊत यांनी त्यांचे स्वागत केले. संजय राऊत यांना थेट भेटून त्यांच्याशी काही काळ चर्चा केली. गेल्या काही आठवड्यांपासून प्रकृती ढासळल्यामुळे राऊत यांनी संपूर्ण राजकीय कामकाज थांबवले होते. त्यांनी सोशल मीडियावरून स्वतःच माहिती देत सांगितले होते की, अचानक प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड झाला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना गर्दीपासून आणि ताणतणावापासून दूर राहणे आवश्यक आहे. या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट राऊत कुटुंबासाठी धीर देणारी ठरली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या लवकर बरे होण्याबद्दल पूर्ण खात्री व्यक्त केली. ते म्हणाले, अनेक दिवसांपासून त्यांना भेटण्याचं मनात होतं. आज भेट झाली आणि खूप समाधान वाटलं. संजय आता आधीपेक्षा बरे दिसत आहेत. ते लवकरच राजकीय मैदानात परत येतील आणि नेहमीप्रमाणे आपल्या शब्दांनी आणि भूमिकेने वातावरण तापवताना दिसतील. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लहर पसरल्याचे दिसून आले. जरी डॉक्टरांनी संजय राऊत यांना बाहेर न पडण्याचे आदेश दिले असले, तरी 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी डॉक्टरांचा सल्ला बाजूला ठेवत शिवाजी पार्कवर जाऊन अभिवादन केले होते. मास्क लावून आणि सुनील राऊत यांच्या आधाराने त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केले. यामुळे संकटात असतानाही त्यांचा शिवसैनिक जागा असल्याचे कार्यकर्त्यांना पुन्हा जाणवले. पक्षातील सर्वात प्रभावी आवाजांपैकी एक यापूर्वी पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी स्वतः त्यांच्या घराला भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांना आधार दिला होता. आता पुन्हा एकदा आजारपणाच्या काळात ठाकरे यांनी दाखवलेली ही जवळीक पक्षातील नात्यांची घट्ट बांधणी अधिक स्पष्ट करते. संजय राऊत हे ठाकरे गटाचे प्रमुख रणनीतीकार आणि पक्षातील सर्वात प्रभावी आवाजांपैकी एक असल्यामुळे त्यांची प्रकृती सुधारल्याची माहिती पक्षासाठी आश्वासक मानली जात आहे.
नाशकात भाजप नेत्यांचे सामूहिक राजीनामे
नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये खळबळ राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या २ डिसेंबर रोजी नगर परिषद तसेच नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. दरम्यान, निवडणुकापूर्वी राज्यात पक्षांतराला वेग आला आहे. अनेक उमेदवार एका पक्षातून दुस-या पक्षात जाताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर […] The post नाशकात भाजप नेत्यांचे सामूहिक राजीनामे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ठाण्यातील रुग्णालयात आढळला साप
ठाणे : प्रतिनिधी ठाणे जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांची वर्दळ असते. या वातावरणात रुग्णालयातील कक्षात साप आढळल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. या प्रकाराने रुग्णांसह डॉक्टर आणि नर्स तसेच कर्मचा-यांची एकच पळापळ झाली. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. पण या घटनेनंतर रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे काम गेल्या दोन […] The post ठाण्यातील रुग्णालयात आढळला साप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीए असलेल्या अनंत गर्जे यांना त्यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मध्यरात्री पोलिसांनी अटक केली. गौरी यांनी शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. परंतु या घटनेला गौरीच्या कुटुंबाकडून आत्महत्येऐवजी घातपाताचा आरोप होत आहे. दहा महिन्यांपूर्वीच अनंत आणि गौरी यांचा विवाह झाला होता आणि दोघेही मुंबईतील वरळीत राहात होते. घटनेच्या रात्री गौरी घरी एकट्या असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. गौरीच्या मृत्यूनंतर तिचे वडील अशोक पालवे यांनी वरळी पोलिस ठाण्यात अर्ज देत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, गौरीच्या मृत्यूस जबाबदार फक्त अनंत नव्हे, तर त्याचे भाऊ अजय गर्जे आणि बहिण शितल आंधळे देखील आहेत. त्यांनी आपल्या पत्रात या तिघांची नावे स्पष्टपणे आरोपी म्हणून नमूद केली असून, सध्या फक्त अनंतला अटक होऊन इतर दोघे मोकाट फिरत असल्याचा आरोप पालवे यांनी केला आहे. तसेच घटनेच्या दिवशी बिल्डिंगमधील लिफ्ट, जिना आणि मुख्य प्रवेशद्वाराचे CCTV फुटेज तातडीने जप्त करावे, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. या घटनेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आला आहे. सरकारी वकिलांच्या माहितीनुसार, अनंत गर्जेचे प्रेमसंबंध असल्याची चर्चा लग्नापूर्वीच गौरीच्या कुटुंबीयांना झाली होती. हे दस्तऐवज लातूरमधील रुग्णालयात असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे या कागदपत्रांची तपासणी करणे आणि पालवे कुटुंबाने केलेल्या आरोपांची शहानिशा करणे आवश्यक असल्याचे सरकारी बाजूने सांगण्यात आले. आरोपी अनंत गर्जे तसेच त्याचे नातेवाईक यांच्यावर लागलेले आरोप तपासण्यासाठी त्यांचा शोध घेणे, चौकशी करणे आणि पुरावे मिळवणे आवश्यक असल्याने पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. अनंतने लग्नापूर्वीच प्रेमसंबंधांबाबत माहिती दिली होती अनंत गर्जेच्या वकिलांकडून मात्र पूर्णपणे वेगळी बाजू मांडण्यात आली. त्यांचा दावा असा की, घटनेच्या वेळी गौरी घरी एकट्या होत्या आणि घर आतून बंद होते. त्यामुळे अनंत किंवा त्याच्या कुटुंबीयांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा पुरावा तपासात आढळत नाही. तसेच अनंतने लग्नापूर्वीच गौरीच्या कुटुंबाला आपल्या प्रेमसंबंधांबाबत माहिती दिली होती, असेही वकिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणात अनंतला कोठडीची आवश्यकता नाही, असे ते म्हणाले. मात्र न्यायालयाने सरकारी बाजू मान्य करत अनंत गर्जेला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दहा महिन्यांच्या वैवाहिक आयुष्याचा शेवट या घटनेने दोन कुटुंबांमध्ये मोठा ताण निर्माण झाला आहे. दहा महिन्यांच्या वैवाहिक आयुष्याचा शेवट अशा प्रकारे व्हावा, हे पालवे कुटुंब पचवू शकत नाही. गौरी अत्यंत हुशार आणि व्यावसायिक डॉक्टर होती, असे तिच्या परिचितांचे म्हणणे आहे. तिच्या मृत्यूनंतर उपस्थित झालेले प्रश्न आणखी गंभीर झाले आहेत. तिच्या कुटुंबाचा ठाम आरोप आहे की हा प्रकार आत्महत्या नसून यातून सत्य बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करून प्रत्यक्ष पुरावे सुरक्षित ठेवावेत. दुसरीकडे अनंत गर्जेच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. पुढील तपासात आणखी कोणते तपशील समोर येतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे वैयक्तिक सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या निधनाने संपूर्ण अहमदनगर जिल्हा हदरला आहे. शनिवारी त्यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती समोर आली आणि काही क्षणातच हा प्रकार राज्यभर चर्चेचा विषय ठरला. घटनेनंतर तातडीने पोलिसांनी गौरी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून पती अनंत गर्जे यांच्यावर गुन्हा दाखल केला. रविवारी मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. मूळ गाव मोहोज देवढे येथे नातेवाईक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत गौरी पालवे यांचे अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांच्या वडिलांचा हंबरडा सर्वांना हादरवून गेला. निधनानंतर अनेक ठिकाणी संतापाची लाट पाहायला मिळत आहे. कुटुंबीयांनी गौरी यांच्या मृत्यूला कारणीभूत घटकांवर गंभीर आरोप केले आहेत. पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधांवरून दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होती. या वादाची तीव्रता वाढत जाऊन अखेरीस गौरी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी गर्जे यांच्या कुटुंबातील आणखी काही जणांवरही कारवाई केली असून त्यांच्यावर मानसिक छळाचा आरोप नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे एका सुशिक्षित, व्यावसायिक महिलेला घरगुती कलहाच्या जाळ्यातून बाहेर पडता आले नाही, याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावरून अतिशय कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. विशेषतः जिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे, तिला देखील आरोपी करण्यात यावे, असे त्यांनी स्पष्टपणे लिहिले. ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, एखाद्या घराचा पाया महिला असते. पण तीच महिला एखाद्याचे कुटुंब उद्ध्वस्त करणारी ठरली, तर तिच्यावरही कायदेशीर कारवाई होणं आवश्यक आहे. त्यांनी गौरी यांच्या वडिलांच्या काळजाला पिळवटून टाकणाऱ्या वेदनादायी आक्रोशाचा उल्लेख करत समाजाने अशा घटना थांबवण्यासाठी कुटुंबांत संवाद, समजूतदारपणा आणि मानसिक बळ वाढवण्याची गरज असल्याचे म्हटले. राज्यात महिला सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न तसेच त्यांनी असेही नमूद केले की, नैराश्याच्या क्षणी आत्महत्या हा कधीही पर्याय नसतो. कौटुंबिक समस्या कितीही मोठ्या असल्या तरी संवादाच्या माध्यमातून त्यावर तोडगा काढता येतो. पण पतीचे कथित संबंध, घरातील तणाव, आणि सततची मानसिक यातना यामुळे गौरी यांच्या आयुष्याचा अंत झाला, ही समाजासाठीही जागृतीची आणि वेदनेची बाब आहे. आजही अनेक महिला अशाच परिस्थितीतून जातात पण कुटुंब, समाज किंवा प्रशासनाकडून पुरेशी मदत न मिळाल्याने त्यांची समस्या दडपून राहते. अशा वेळी या घटनेने राज्यात महिला सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. अनैतिक संबंधांचा संपूर्ण तपास करण्याचे संकेत या घटनेची चौकशी वेगाने सुरू असून, अनैतिक संबंधांचा संपूर्ण तपास करण्याचे संकेत मिळाले आहेत. या प्रकरणात विविध पातळीवरून कठोर कारवाईची मागणी वाढत आहे. महिला सुरक्षितता, मानसिक आरोग्य, आणि कौटुंबिक संवाद या मुद्द्यांवर समाजभर चर्चा रंगू लागली आहे. डॉ. गौरी पालवे यांचे अकाली निधन हा केवळ एका कुटुंबाचा नाही तर संपूर्ण समाजाचा धक्का मानला जात आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात नवे तपशील समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि सर्वांचे लक्ष पोलिस तपासावर केंद्रीत झाले आहे.
पुणे मार्केट यार्डातील शेवग्याची आवक तब्बल 90 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे शेवग्याने चिकनला मागे टाकत बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सध्या पुण्यात चिकन 220 ते 250 रुपये किलोने मिळतंय, तर शेवगा मात्र 400 ते 500 रुपये किलोने विकला जात आहे. यामुळे शेवगा सर्वसामान्यांना सोन्याच्या पिंजऱ्यातून VIP दर्शन देत असल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यात शेवग्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पण लांबलेला पाऊस व अतिवृष्टीमुळे सोलापूरसह अनेक भागांतील शेवग्यांचे पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे शेवग्याचा यंदाचा हंगाम विलंबाने सुरू होण्याची शक्यता आहे. एरवी घाऊक बाजारात दररोज 4 ते 5 हजार किलो शेवग्याची आवक होत असते. पण सोमवारी केवळ 400 ते 500 किलो शेवगा आला. ही अल्पशी आवक केवळ आंध्र प्रदेशातून आली. यामुळे गत आठवड्यात जो शेवगा 140 ते 150 किलो दराने मिळत होता. तो आता थेट 500 रुपयांवर पोहोचला आहे. घाऊक बाजारात 10 किलो शेवग्याला 3000 चा भाव मिळत आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडत संघटनेचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ आणि ज्येष्ठ व्यापारी रामदास काटकर यांनी ही माहिती दिली. मागणीच्या तुलनेत आवक अतिशय कमी झाल्यामुळे ही दरवाढ झाली. उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईसह राज्यभरातील दाक्षिणात्य उपहारगृह चालकांकडून सांबार, रसमसाठी शेवग्याला वर्षभर मोठी मागणी असते. दररोज मोठी खरेदी करणारे हे व्यावसायिक आता वाढलेल्या दरामुळे चिंतेत सापडले आहेत. शेवगा उष्ण असल्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांत गृहिणींकडून शेवग्याला मोठी मागणी असते. मधुमेह व इतर आजारांसाठीही शेवगा गुणकारी असल्याने त्याचा वापर वाढला आहे. त्यातच आता शेवग्याला सोन्याचा भाव आल्यामुळे ही आरोग्यदायी भाजी आता सर्वसामान्यांच्या ताटातून हद्दपार होण्याची भीती वाढली आहे. संभाजीनगरमध्येही आवक घटली छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडीच्या मंडीमध्येही शेवग्याची आवक घठली आहे. जाधववाडीत गत 9 नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळीपूर्वी 14 क्विंटल शेवग्याची आवक होऊन 3000 ते 6200 रुपये क्विंटलने ठोक विक्री झाली होती, तर गुरुवारी 9 क्विंटल आवक होऊन 7000 ते 11000 रुपये क्विंटलने ठोक विक्री झाली. त्याचाच परिणाम म्हणून शेवग्याची 60 रुपये पाव या दराने किरकोळ विक्री झाल्याचे दिसून आले.
वानवडी येथील 129 व्या अखिल भारतीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी विद्यार्थ्यांना मोबाइलचा गरजेपुरता वापर करून कौशल्ये, बुद्धी आणि कलागुणांचा विकास करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. महात्मा फुले सांस्कृतिक सभागृहात आयोजित या संमेलनाचे उद्घाटन प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या हस्ते झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडले. राज्यभरातील नामांकित साहित्यिक, कवी, संशोधक, कलाकार आणि साहित्यप्रेमींनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला 'महात्मा फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षण संस्था' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील सारस्वत साहित्यिकांच्या उपस्थितीत आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने प्रा. डॉ. चोरडिया यांनी हा सन्मान स्वीकारला. सामाजिक बांधिलकी, शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रम, मूल्य आधारित शिक्षणपद्धती आणि राष्ट्र निर्मितीच्या ध्येयाने केलेल्या कार्याची दखल म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. डॉ. चोरडिया यांनी नमूद केले की, मराठी साहित्य हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आत्म्याचे संवाहक आहे. या परंपरेचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यांनी सांगितले की, सूर्यदत्त संस्थेतही विद्यार्थी संमेलने आयोजित केली जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करता येते. आतापर्यंत एक लाख 27 हजारहून अधिक विद्यार्थी सूर्यदत्त मधून शिक्षण घेऊन बाहेर पडले असून, त्यापैकी ६ हजारहून अधिक विद्यार्थी परदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत. या संमेलनाचे विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध कलावंत किशोर टिळेकर उपस्थित होते. डॉ. शरद गोरे यांनी महात्मा फुले यांच्या प्रबोधनपर आणि प्रखर विचारांची प्रभावी मांडणी केली. तसेच, नंदकिशोर राऊत यांनी आपल्या पत्नीचे लग्नानंतर शिक्षण पूर्ण करून त्यांना उच्चशिक्षित बनवल्याचे प्रेरणादायी उदाहरण सादर केले, ज्या आज सरकारी उच्च पदावर कार्यरत आहेत.
ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सुविधा मिळेल याकडे लक्ष देऊन रुग्णांची हेळसांड होऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी मंगळवारी ता. 25 दिल्या आहेत. जिल्हा परिषदेमध्ये रुजू झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी आज विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प अधिकारी नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप मुळे, समाज कल्याण अधिकारी गीता गुठ्ठे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे यांच्यासह विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी बांधकाम विभागाचा आढावा घेतला. जिल्ह्यात सुरु असलेली बांधकामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्ते, पुल, इमारत बांधकामे दर्जेदार होतील याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी अभियंत्यांनी वारंवार कामाला भेटी देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सध्या मंजूर असलेल्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्याचे आदेशही त्यांनी दिले. आरोग्य विभागांतर्गत असलेल्या रुग्णवाहिका सुस्थितीत असल्याची खात्री करावी. सर्व रुग्णवाहिका ऑन रोड ठेवाव्यात. ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीची आरोग्य सेवा मिळावी यासाठी वैद्यकिय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे. निवीदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश तातडीने द्यावेत. प्रत्येक आरोग्य संस्थेमध्ये मुबलक औषधसाठा राहिल याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या शिवाय समाज कल्याण विभागाने योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करून त्याचा पात्र लाभार्थींना लाभ देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तर औंढा नागनाथ पंचायत समिती अंतर्गत 57 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात अद्याप निलंबनाची कारवाई का झाली नाही असा सवाल त्यांनी केला. पुढील आढावा बैठकीत सर्व अद्ययावत माहिती सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
महाराष्ट्र काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवून महानगरपालिका प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत १५ दिवसांनी वाढवण्याची मागणी केली आहे. हरकती नोंदवण्याची मदत अत्यंत क्लिष्ट व वेळकाढू आहे. त्यामुळे मतदार याद्या तपासण्यासाठी वाढीव वेळ लागण्याची शक्यता असल्यामुळे ही मुदत वाढवून द्यावी, असे काँग्रेसने म्हटले आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारुप मतदार यादी २० नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झाली आहे. या याद्यांवर हरकती व सूचना घेण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. बऱ्याच महानगरपालिकांमध्ये प्रारुप मतदार याद्यांवर हरकत व सूचना घेण्यासाठी मुदत वाढविण्याची आवश्यकता असून अवघी ७ दिवसांची मुदत अत्यंत कमी आहे, ती १५ दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार व विधान परिषद गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेल्या संयुक्त पत्रात असे म्हटले आहे की, बऱ्याच महानगरपालिकांमध्ये प्रारुप मतदार याद्या प्रभागनिहाय योग्य पद्धतीने फोडलेल्या नाहीत, बऱ्याच मतदारांची नावे राहत असलेल्या भागांतून इतर भागांमध्ये गेलेली आहेत, ही संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हरकती घेण्याची पद्धत देखील अत्यंत किचकट असून प्रत्येक व्यक्तीने विहित नमुन्यात अर्ज करावयाचा असून सोबत आधारकार्ड जोडायचे आहे, ही पद्धत किचकट व वेळकाढू आहे. कोणत्याही व्यक्ती वा राजकीय पक्षाने निवडणुकीच्या सक्षम अधिकाऱ्याच्या निदर्शनास योग्य ती हरकत व सूचना आणून दिल्यास अनेक व्यक्तींबद्दलीची तक्रार स्विकारली पाहिजे, आज तसे होताना दिसत नाही. मतदार याद्यांबाबत स्पष्टता व पारदर्शकता येण्यासाठी राजकीय पक्षांच्या व प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेणे आवश्यक आहे. प्रभागातील नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने मतदार याद्या तपासण्यास वेळ लागणार आहे म्हणून वेळ वाढवून द्यावी.
ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे निधन
नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराचा ऐन प्रचारात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मनमाडमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नितीन वाघमारे यांचे आज मध्यरात्री हार्ट अटॅकचा झटका आल्याने निधन झाले आहे. वाघमारे यांच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. २ डिसेंबर रोजी मतदान होणार होते, पण त्याआधीच […] The post ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सनदी अधिकारीचा बनाव करणा-या महिलेस अटक
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी आधार कार्डवर खाडाखोड करून गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिक काळ पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणा-या संशयास्पद महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडे विदेशी नागरिकांचे काही मोबाईल क्रमांक आढळून आले आहेत. काही पासपोर्ट आणि व्हिसाचे फोटोही तिच्याकडे आढळून आल्याची माहिती समोर आलीय. महिलेला न्यायालयात हजर केलं असता २६ नोहेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सिडको […] The post सनदी अधिकारीचा बनाव करणा-या महिलेस अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला त्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिदिनाचा सत्ताधाऱ्यांना विसर पडावा, याचं दुःख वाटतंय अशी X वर पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर केली आहे. रोहित पवारांनी पुढे बोलताना म्हटलंय की, हे सरकार सामान्य माणसाला आणि त्याच्या अडचणींना तर कधीच विसरलं पण ज्यांनी महाराष्ट्राची पायाभरणी केली, राज्याला पुरोगामी विचारांनी दिशा दिली आणि आज ज्यांच्या सुसंस्कृत विचारांची खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला गरज आहे त्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिदिनी त्यांच्या समाधी स्थळावर अभिवादन करण्यासाठी सत्तेतील कुणीही फिरकत नसेल तर हे आश्चर्यजनक आहे. पवारांची X वरील पोस्ट काय? आमदार रोहित पवारांनी X वर पोस्ट करत म्हटलंय की, ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला त्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिदिनाचा सत्ताधाऱ्यांना विसर पडावा, याचं दुःख वाटतं. हे सरकार सामान्य माणसाला आणि त्याच्या अडचणींना तर कधीच विसरलं पण ज्यांनी महाराष्ट्राची पायाभरणी केली, राज्याला पुरोगामी विचारांनी दिशा दिली आणि आज ज्यांच्या सुसंस्कृत विचारांची खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला गरज आहे त्या स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिदिनी त्यांच्या समाधी स्थळावर अभिवादन करण्यासाठी सत्तेतील कुणीही फिरकत नसेल तर हे आश्चर्यजनक आहे. रोहित पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. #यशवंतराव_चव्हाण_साहेब यशवंतराव चव्हाणांचा सन्मान झालाच पाहिजे- सुळे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रशासनाकडून यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी काही हालचाली दिसून येत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहणार आहे. चीनशी जेव्हा आपले सुद्ध झाले त्यावेळी ज्या पद्धतीने पंडित नेहरुंनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर जबाबदारी दिली. त्यांचा जेव्हाही उल्लेख केला जातो तेव्हा अभिमानानेच केला जातो. ते केवळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नाहीतर देशाचे नेते होते. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्याकडील सर्वच पदावर अतिशय चांगले काम केले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज समाधिस्थळी काहीच व्यवस्था करण्यात आली नाही याची मला खंत वाटते. प्रशासन इथे कुठेही दिसत नाही.या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार आहे की चव्हाण यांचा मान सन्मान झालाच पाहिजे. तो पैसा जनतेचा- सुळे सुप्रिया सुळे यांनी यावेळी राज्याच्या तिजोरीची चावी आपल्याकडे असल्याच्या अजित पवारांच्या विधानाचा व त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या चावीचा मालक आमच्याकडे असल्याच्या दाव्याचाही समाचार घेतला. निवडणुकीमुळे अशी विधान केली जातात. पण माझी सर्व नेत्यांना विनंती आहे की, राज्याची तिजोरी ही राज्यातील जनतेकडे असते. तो पैसा जनतेचा आहे. जनता हीच मालक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो हक्क जनतेला दिला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कराड येथे समाधिस्थळी खासदार सुळे यांनी आज अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीच्या जाहीर सभेत संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराडची आठवण काढली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सु्प्रिया सुळे यांनी त्यांच्या पक्षातून हकालपट्टीची मागणी केली आहे. कुणाच्या तरी वडिलांची, महाराष्ट्राच्या लेकाची क्रूर हत्या करणाऱ्यांना फाशी दिली पाहिजे. तसेच अशा लोकांची आठवण काढणाऱ्यांचाही जाहीर निषेध केला पाहिजे, असे त्या म्हणाल्यात. धनंजय मुंडे यांची नुकतीच परळीत एक जाहीर सभा झाली. त्यात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी वाल्मीक कराडचीही आठवण काढली. आज 9-10 महिने झाले. जगमित्र कार्यालय सुरू आहे. कामही सुरू आहे. पण एक व्यक्ती नाही याची मला प्रकर्षाने जाणीव होते, असे ते म्हणाले. सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कराड येथईल समाधीस्थळी अभिवादन करताना धनंजय मुंडे यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला. महाराष्ट्राच्या लेकाची हत्या करणाऱ्यांना फाशी व्हावी सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी धनंजय मुंडे यांच्या विधानाचा जाहीर निषेध करते. ज्या लोकांनी कुणाच्या तरी वडिलांची, महाराष्ट्राच्या लेकाची क्रूर हत्या केली, त्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. पण अशा लोकांची राज्यातील कोणत्याही नेत्याला आठवण येत असेल तर त्याचा जाहीर निषेधच केला पाहिजे. अशा प्रवृत्तीला एखाद्या पक्षातून मदत करण्याची भूमिका घेतली जात असेल तर संबंधितांना पक्षातून काढून टाकले पाहिजे. माझी त्या पक्षाच्या नेत्यांना तशी विनंती आहे. या लोकांना क्रूर हत्याकांडातील लोकांची आठवण येत असेल तर त्यांची विचारधारा काय आहे? यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते. हत्येतील आरोपींना मदत करण्याची भाषा महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी घातक आहे. राज्याती तिजोरी जनतेच्या मालकीची सु्प्रिया सुळे यांनी यावेळी राज्याच्या तिजोरीची चावी आपल्याकडे असल्याच्या अजित पवारांच्या विधानाचा व त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या चावीचा मालक आमच्याकडे असल्याच्या दाव्याचाही समाचार घेतला. निवडणुकीमुळे अशी विधान केली जातात. पण माझी सर्व नेत्यांना विनंती आहे की, राज्याची तिजोरी ही राज्यातील जनतेकडे असते. तो पैसा जनतेचा आहे. जनता हीच मालक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो हक्क जनतेला दिला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आत्ता पाहू काय म्हणाले होते धनंजय मुंडे? आज 9-10 महिने झाले. आमचे जगमित्र कार्यालय चालू आहे. तिथे कामकाजही सुरू आहे. पण हे बोलताना एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीवही होते. काय चुकले, काय नाही हे कोर्ट बघेल. पण ती जाणीव नक्कीच आहे, असे धनंजय मुंडे परळीच्या सभेत वाल्मीक कराडची आठवण काढताना म्हणाले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे वाल्मीक कराड परळीच्या जगमित्र कार्यालयात बसूनच धनंजय मुंडे यांचे कामकाज पाहायचा. तो सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात बीडच्या तुरुंगात बंदिस्त आहे. त्याच्यावर संतोष देशमुखांच्या हत्येसह एका पवनचक्की कंपनीकडून खंडणी उकळल्याचा आरोप आहे.
मनमाड शहरात नगरपरिषद निवडणुकीची धुगधुगी वाढत असतानाच एक मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 10-अ मधून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असलेले नितीन वाघमारे यांचे काल रात्री अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय हालचाली, सभा आणि प्रचारादरम्यान घडलेल्या या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. कार्यकर्त्यांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी वाघमारे हे सक्रिय मार्गदर्शक आणि समर्पित समाजसेवक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र दुःखाची भावना पसरली आहे. नितीन वाघमारे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग 10-अ मध्ये लोकसंपर्क, सार्वजनिक प्रश्नांवर आवाज उठविणे आणि स्थानिक पातळीवरील कामांमध्ये अग्रेसर होते. त्यामुळे या प्रभागाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेकांनी त्यांचे स्वागत केले होते. मात्र अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या आयुष्याचा अंत झाल्याने ठाकरे गटात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर असा अनुभवी आणि लोकप्रिय उमेदवार गमावणे हा पक्षासाठीही मोठा धक्का असल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अनेकांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले असून सोशल मीडियावरही श्रद्धांजलींचा ओघ पाहायला मिळत आहे. दरम्यान, या घटनेचा निवडणूक व्यवस्थापनावर परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रभागातील प्रचार मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली असून भावनिक वातावरणात पुढील रणनीतीबाबत चर्चा सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवाराच्या निधनानंतर त्या प्रभागातील निवडणूक प्रक्रिया नव्याने जाहीर केली जाऊ शकते. त्यामुळे प्रभाग क्रमांक 10-अ मधील मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये पुढील घडामोडींविषयी उत्सुकता आहे. वाघमारे यांनी सुरू केलेल्या विकासकामांबाबत लोकांनी कृतज्ञता व्यक्त केली असून त्यांचे आयुष्य अकाली निघून गेल्याची खंत लोकांमध्ये जाणवते आहे. प्रचाराची गती मंदावली दरम्यान, मनमाड नगर परिषदेच्या 33 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठीची लढत अत्यंत रंगतदार बनली आहे. माघारीनंतर नगराध्यक्ष पदासाठी 9 उमेदवार रिंगणात असून नगरसेवक पदांसाठी 215 उमेदवार उभे आहेत. शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीसोबत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), अजित पवार गट, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्ष आणि अपक्ष उमेदवार अशी बहुरंगी लढत मनमाडमध्ये पाहायला मिळत आहे. शहरात वातावरण तापले असले तरी वाघमारे यांच्या निधनानंतर काही ठिकाणी प्रचाराची गती मंदावली आहे. मनापासून काम करणारा कार्यकर्ता गमावला नऊ वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीमध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात मैदानात उतरला आहे. मतदारांच्या भेटीगाठी, घराघरांतील संवाद, स्थानिक प्रश्नांना महत्त्व देत उमेदवार प्रचार करत आहेत. काही माजी नगरसेवकांना मतदारांचा रोष सहन करावा लागत असला तरी एकूण वातावरण रंगतदार आहे. मात्र नितीन वाघमारे यांच्या निधनामुळे प्रभाग 10-अ मध्ये दुःखाची भावना दाटून आली असून निवडणूक ऊर्मीपेक्षा शोककळा अधिक जाणवत आहे. त्यांची ओळख, कार्यशैली आणि सौम्य वर्तणूक यामुळे ते नागरिकांत लोकप्रिय होते. त्यामुळे मनमाड शहराने एक मनापासून काम करणारा कार्यकर्ता गमावला आहे, अशी भावना मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे.
राज्य सरकार गर्भवती महिला आणि बाल संगोपनासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवत असले तरी, राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या असंवेदनशील कारभाराचे संतापजनक उदाहरण वारंवार समोर येत आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात नुकताच एक हादरवून टाकणारा प्रकार घडला आहे. एका प्रसूत महिलेला रुग्णवाहिका चालकाने गावाच्या दोन किलोमीटर अलीकडे, घनदाट जंगलाच्या ठिकाणी अर्ध्या रस्त्यात सोडून दिले. रुग्णवाहिका चालकाच्या या मुजोरपणामुळे त्या प्रसूत महिलेला अवघ्या दोन दिवसांच्या बाळाला हातात घेऊन, तिच्या सासू आणि आईसोबत, निर्जन स्थळातून दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली आहे. नेमकी घटना काय घडली? मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या आमला गावातील सविता बारात (सासरचे नाव: सविता बांबरे) या महिलेला बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही कारणास्तव त्यांना नंतर जव्हार कुटीर रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे तिची प्रसूती सुखरूप झाली. रविवार, 24 नोव्हेंबर रोजी प्रसूतीनंतर त्यांना रुग्णवाहिकेने घरी पाठवण्यात आले. मात्र, संबंधित रुग्णवाहिका चालकाने माणुसकी आणि नियमांना तिलांजली देत, महिलेच्या घरापासून दोन किलोमीटर दूर, घनदाट जंगलाच्या ठिकाणी त्यांना उतरवून दिले आणि तातडीने रुग्णवाहिका घेऊन निघून गेला. जीवावर बेतण्याची शक्यता! या धक्कादायक प्रकारानंतर प्रसूत महिला सविता बारात, तिची आई आणि सासूबाई यांना नवजात बाळाला घेऊन तब्बल दोन किलोमीटर पायपीट करावी लागली. या संपूर्ण घटनेमुळे कुटुंबाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. विशेषतः, जव्हार-मोखाडा परिसरात सध्या बिबट्यांचा वावर आणि हल्ले वाढत असताना, एका प्रसूती झालेल्या मातेला आणि तिच्या नवजात बालकाला अशा निर्जन स्थळी सोडून देणे हा प्रकार अत्यंत बेजबाबदार आणि जीवावर बेतणारा होता. जर या प्रसूत महिलेच्या जीवाला काही धोका झाला असता, तर त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर रुग्णवाहिका चालकाने आम्हाला अर्ध्या रस्त्यातच सोडून दिले. यामुळे आम्हाला नवजात बाळासह दोन किलोमीटरची पायपीट करावी लागली, असे प्रसूत महिलेचे पती मनोज बांबरे यांनी म्हटले आहे. स्थानिकांकडून कारवाईची मागणी राज्यातील महिलांच्या आरोग्यासाठी सरकार योजना राबवत असतानाही, ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांमध्ये गर्भवती महिलांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी आणि परत येण्यासाठी आजही जीवाचा आटापिटा करावा लागत आहे. ही घटना आरोग्य यंत्रणेतील असंवेदनशीलतेचे टोक दाखवते. या अत्यंत चीड आणणाऱ्या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांकडून या मुजोर रुग्णवाहिका चालकावर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात सर्वत्र मतदारयाद्यांमध्ये दुबार नावे असल्याचा दावा केला आहे. राज्यात सर्वत्र मतदारांची दुबार नावे आहेत. हा प्रश्न एसआयआर अर्थात मतदार याद्यांचे विशेष गहन पुनरिक्षण होत नाही, तोपर्यंत सुटणार नाही, असे ते म्हणालेत. विरोधकांनी या मुद्यावरून सरकार व राज्य निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली असताना बावनकुळे यांनी हे विधान केले आहे हे विशेष. राज्यात गत काही महिन्यांपासून मतदारयाद्यांमधील मतदारांच्या दुबार नावांवरून चांगलेच रान पेटले आहे. विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाने या प्रकरणी महायुती सरकार व राज्य निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे. भाजप याच दुबार मतदारांच्या मदतीने सातत्याने केंद्र व राज्यात सत्तेत येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात सर्वत्र दुबार मतदार असल्याचा दावा केला. तसेच हा प्रश्न एसआयआर होईपर्यंत सुटणार नसल्याचेही स्पष्ट केले. बावनकुळेंनी एसआयआरचा धरला आग्रह चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, दुबार नावे सर्व महाराष्ट्रात आहेत. नागपुरात आहेत. प्रत्येक मतदारसंघात आहेत. ते रोज अॅडिशन होत असतात. डिलिशनची प्रक्रिया फार कमजोर असल्यामुळे किंवा करत नसल्यामुळे हे अॅडिशन होत असते. व्यक्ती जिकडे राहायला गेला, तिकडे नाव त्याचे यादीत टाकले जाते. त्यामुळे जोपर्यंत एसआयआर होत नाही, तोपर्यंत ही दुबार नावे निघणार नाहीत. पण दुबार नावे असले तरी संबंधितांचे एकच मतदान होऊ शकते. आपण मतदानाला जातो तेव्हा निवडणूक अधिकारी आपल्या बोटाला शाई लावते. त्यामुळे एकच मतदान होते. या प्रकरणी एकच मतदान व्हावे असे मला वाटते. पदाधिकाऱ्यांच्या फोडाफोडीवर निवडणुकीनंतर चर्चा बावनकुळेंनी यावेळी शिंदे गट - भाजपमधील पदाधिकारी एकमेकांच्या पक्षांत जाण्याच्या मुद्यावरही प्रकाश टाकला. काही ठिकाणी असे प्रकार सुरू आहेत. भाजपचा एखादा कार्यकर्ता शिवसेनेत जात आहे, तर शिवसेनेचा एखादा पदाधिकारी भाजपत येत आहे. विदर्भातही अशी 20-25 उदाहरणे घडली आहेत. तिकीट मिळाले नसल्याने लोक दुसरा एखादा पर्याय शोधत राहतात. त्यातून असे प्रकार घडतात. पण भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीची आमची महायुती अत्यंत मजबूत आहे. निवडणुकीनंतर या प्रकरणी सर्वांना विश्वासात घेऊन चर्चा केली जाईल, असे ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन होईल चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सुप्रीम कोर्ट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी जो काही निर्णय देईल त्याचे पालन केले जाईल असेही स्पष्ट् केले. ते म्हणाले, आमचे एवढेच म्हणणे होते की, ओबीसी अठरापगड जाती व बारा बलुतेदार वर्गाचे आहेत. या वर्गाचे 27 टक्के आरक्षण दिले गेले पाहिजे. हे आरक्षण राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देण्यात आले. पण हे ते 50 टक्क्यांच्या वर गेल्यामुळे आता सुप्रीम कोर्ट काय भूमिका घेते हे पहावे लागले. पण सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल त्यानुसार सरकार पुढे जाईल. पण ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळावे. हा समाज अठरापगड जाती व 12 बलुतेदारांचा आहे. त्यालाही आरक्षण मिळावे ही मागणी अत्यंत महत्त्वाची आहे, असे ते म्हणालेत. हे ही वाचा... शरद पवार MNS साठी लावणार ताकद:काँग्रेसची काढणार समजूत, मुंबईत भाजपला हरवण्यासाठी खेळणार मोठी खेळी; काय रणनीती? मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई महापालिकेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी आता दंड थोपटलेत. मनसेच्या मुद्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेसमध्ये तणाव वाढल्यानंतर आता त्यांनी महाविकास आघाडीचे सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. त्यांनी भाजपला मुंबईपासून दूर ठेवण्याचे एकमेव टार्गेट ठेवले आहे. या प्रकरणी त्यांची काँग्रेस हायकमांडशी चर्चा करून मुंबई काँग्रेसची समजूत काढण्याचा निश्चय केला आहे. मनसे विरोधकांच्या तंबूत आली तर मराठी मतांची फाटाफूट टळून मुंबईत महाविकास आघाडीचा विजय सहजसोपा होईल, असा त्यांचा व्होरा आहे. वाचा सविस्तर
लोकं ऑप्शन शोधत असतात याचा अर्थ प्रवेश देणं होते नाही हे चंद्रशेखर बावनकुळे यांना काय ठरलंय हे त्यांनाही माहिती आहे. आम्ही तुमच्याकडून जो संयम शिकलो आहे तो पाळतो आहोत, जर असा पक्ष वाढवायचा असेल तर तो त्यांना लखलाभ,असे शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, महायुतीमध्ये फोडाफोडी करायची नाही मित्रपक्षांच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या पक्षात घ्यायचे नाही हे ठरलेले असताना काही लोकांना छत्रपती संभाजीनगरमध्ये काही लोकांना पैशाची मस्ती आली आहे त्यांच्या जोरावर त्यांनी फोडाफोडी केली आहे. आम्ही याची गांभीर्याने दखल घेतली असून याचा अहवाल आम्ही एकनाथ शिंदे यांना देणार आहोत. महायुतीच्या अंतर्गत जर हे सुरू राहिले तर त्यांचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागेल हे मी स्पष्टपणे सांगत आहे. पदाधिकारी फोडणे हे कितपत योग्य? संजय शिरसाट म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली आहे, त्यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत त्यांनी ठरवल्याप्रमाणे आम्ही कोणत्याही भाजप पदाधिकाऱ्याला प्रवेश देत नाही. पण भाजपने आमचे उमेदवार आणि पदाधिकारी फोडणे हे कितपत योग्य आहे? असा सवाल शिरसाट यांनी केला आहे. आम्ही जर तालुका लेव्हल वरील कार्यकर्ता घेतला तर त्यांना वाइट वाटू देऊ नये. हे मुद्दाम होत आहे की स्थानिक लेव्हलची मस्ती आहे हे एकदा पाहावे लागेल. ही नीती बरोबर नाही मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आम्ही जर एखादे पाऊल उचलले तर त्यांचे वाईट वाटून घेऊ नका. सुरवात त्यांनी केली असली तरी आम्ही अजूनही संयम राखला आहे, पण तो जास्त काळ टिकणार नाही. याचा सर्व निर्णय एकनाथ शिंदे घेतील. प्रत्येकवेळी चुकी करायची आणि त्यावर पांघरुन घालायचे मला वाटते ही नीती बरोबर नाही. यामुळे नाराजी वाढते, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणत्या खुशीने भाजपसोबत गेला त्यांच्यावर काय दबाव होता. गंगापूर, वैजापूर, रत्नपूरमध्येही जर हेच सुरू असेल तर महायुती म्हणून रोल काय? म्हणून हे थांबले पाहिजे. या निवडणुकीचा परिणाम येणाऱ्या मनपा आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर होऊ शकतो असा इशाराही शिरसाट यांनी दिला आहे. ..तर निवडणूक लढवता येणार नाही संजय शिरसाट म्हणाले की, प्रत्येक पक्ष जर पूर्वतयारी म्हणून हे लोक फोडायचे त्या पक्षाचे लोक फोडायचे असे करत असेल तर महायुती म्हणून निवडणूक लढवता येणार नाही. यावर काय व्यक्त व्हायचे याचा निर्णय एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे. रोज जर फोडाफोडी वर बोलायचे की प्रचार करायचा यावर काही ठरले पाहिजे. आम्हाला निधी कमी पडत नाही संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार अर्थमंत्री असल्याने निधीबाबत त्यांना अधिकार असतात. पण मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात. त्यांच्याकडे सर्व अधिकार असतात हे निर्विवाद आहे ते नाकारता येत नाही. तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असो मालक कुणीही असे पण खर्च कसा करायचा हे सर्वांना सोबत घेत ठरवले जाते. तिजोरीतून आम्हाला जे हवे आहे ते आम्ही घेत असतो निधी कमी पडला तर यावर आम्ही भाष्य करु.
ठाणे शहरातील पोखरण रोड नं. 2 परिसरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या किरकोळ वादाने अखेर गंभीर रूप धारण केले. गांधीनगर येथील अनिल वाईन्ससमोर रिक्षा लावण्यावरून सुरु झालेला वाद काही क्षणांतच राजकीय रंग घेत गेला. या वादादरम्यान उत्तर प्रदेशातील शैलेंद्र संतोष यादव या रिक्षाचालकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे–पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याविरोधात अयोग्य, अश्लील आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्या व्हिडिओमुळे ठाण्यात संतापाची लाट उसळली आणि मनसे कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी धावले. परप्रांतीय रिक्षाचालकाने केलेल्या वक्तव्यामुळे तणाव वाढण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेकडून तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली. पोलिसांनीही तत्परता दाखवत शैलेंद्र यादवला ताब्यात घेतले. मात्र त्याला ताब्यात घेतल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. पोलिस स्टेशनमध्येच त्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती पुढे आली. स्वतः अविनाश जाधव यांनीही हा प्रकार सार्वजनिकपणे मान्य केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, जो कोणी राज ठाकरे यांच्याविरोधात बोलण्याची हिंमत करेल, तो कोणत्याही ठिकाणी लपला तरी मनसे त्याला योग्य धडा शिकवेल, असा इशाराही त्यांनी दिला. या संपूर्ण घटनेमुळे ठाण्यातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते. दरम्यान, ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या रिक्षाचालकाची भूमिका पूर्णपणे बदलली. व्हिडिओमधील कृत्य चुकीचे असल्याची कबुली देत तो पोलिस स्टेशनमध्येच हात जोडून माफी मागताना दिसला. एवढेच नव्हे तर त्याने कान धरून उठाबशा काढत केलेल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला. त्याने सांगितले की, तो दारूच्या नशेत होता आणि त्यावेळी नशेमुळे त्याच्या तोंडून चुकीचे शब्द बाहेर पडले. मी रिक्षा चालवणारा साधा माणूस आहे. घर चालवण्यासाठी मेहनत करतो. अशा प्रकारची चूक पुन्हा कधीच होणार नाही, असेही तो व्हिडिओ संदेशात म्हणाला आहे. त्याच्या या भूमिकेमुळे परिसरातील तणाव काही प्रमाणात शमला. कठोर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली घटनेचा उलगडा करताना पोलिसांनी सांगितले की, शैलेंद्र यादव आणि स्थानिक मराठी युवकामध्ये रिक्षा लावण्यावरून आधी किरकोळ वाद झाला होता. त्या वादातूनच यादवने चिडून मनसे नेतृत्वावर शिवीगाळ केल्याचे दिसून आले. त्यानंतर काही परप्रांतीय तरुणांनीही त्याला पाठिंबा देत मराठी युवकाला धमकावल्याचे आरोप आहेत. याचदरम्यान रिक्षाचालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आणि तो मोठ्या चर्चेचा विषय ठरला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधित सर्वांना चौकशीसाठी बोलावले. पुढील काळात अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली आहे. माफी मागत आणि उठाबशा काढत चूक मान्य केली संपूर्ण घटनेमुळे ठाणे शहरात पुन्हा एकदा मराठी-परप्रांतीय वादाचे सावट दिसले. मात्र पोलिसांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे वातावरण बिघडण्यापासून रोखले गेले. माफी मागत आणि उठाबशा काढत शैलेंद्र यादवने आपली चूक मान्य केली असली तरी मनसेने दिलेला इशारा मात्र गंभीरच मानला जात आहे. राजकीय वक्तव्यांच्या नावाखाली अभद्र भाषा वापरल्यास त्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात याची जाणीव या घटनेतून पुन्हा एकदा समोर आली. ठाणे शहरात शांतता राखण्यासाठी नागरिकांनी संयम पाळावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अजित पवार हे जबाबदार नेते आहेत, पण प्रत्येकाने बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे, माझ्या सारखी कार्यकर्ता अजित पवारांना काय सांगणार, असे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मी त्यांच्यासोबत काम केले आहे, त्यामुळे सर्वच कार्यकर्ते अन् नेत्यांनी तारतम्य ठेवून बोलले तर ते जास्त बरे राहील. आमदार चित्रा वाघ म्हणाल्या की, प्रचारसभांमध्ये कोण काय म्हणतंय हे काही महत्त्वाचे नाही. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र प्रगती करतो आहे, त्यामुळे कोण काय बोलतो याला फारसे महत्त्व नाही. निधीच्या चाव्या आमच्या हातात या राष्ट्रवादीच्या प्रचार मुद्द्यावर बोलताना त्यांनी असे म्हटले आहे. लोकांचा विश्वासावर निवडणूक आमदार चित्रा वाघ म्हणाल्या की, निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये प्रत्येकाने आपले काम सांगावे आणि यापुढे काय काम करणार आहे हे सांगावे त्यांचा जास्त फायदा होईल. काही ठिकाणी आम्ही युतीमध्ये तर काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढत आहोत. लोकांसाठी आपण काम केले तर लोकं ती कामे विसरत नाहीत. जनता सुज्ञ असल्याने आपण केलेले काम आणि लोकांचा विश्वास यावर या निवडणूका आहेत. आम्ही मविआसारखे रडलो नाही चित्रा वाघ म्हणाल्या की, निवडणुकीच्या निकाल ज्या वेळी मविआच्या बाजूने लागला तेव्हा त्यांनी जल्लोष केला. त्यावेळी सर्व संस्था चांगल्या होत्या. निवडणुकीचा निकाल त्यांच्याविरोधात लागला की त्यांनी निवडणूक आयोग आणि आमच्यावर टीका करायला सुरवात केली. लोकसभेला आम्ही कमी पडलो तेव्हा आमच्या कोणत्या नेत्याने असे वक्तव्य केले. आम्ही आत्मचिंतन करत कुठे कमी पडलो हे शोधत चूका सुधारल्या आणि विधानसभेला निवडून आलो. ज्या मतदार याद्यांवर विरोधक आक्षेप घेत आहे त्याच मतदार याद्यांनुसार लोकसभेची निवडून झाली आणि हे निवडून आले आहेत. मग हे सर्व जण बोगस आहेत का? असा सवाल वाघ यांनी केला आहे. यांच्या आरोपावर निवडणूक आयोग बघून घेईल. तरुणाचा भाषा वादामुळे बळी गेला चित्रा वाघ म्हणाल्या की, खैरे आत्महत्या प्रकरणी माझ्यावर कारवाई करा ही मागणी करणाऱ्यांनी मी काय केले, माझ्यावर का कारवाई व्हावी, फौजदारी गुन्हा दाखल करण्यासारखे मी काय केले आहे? याचे उत्तर दिले पाहिजे. खैरे नावाच्या तरुणाचा भाषा वादामुळे बळी गेला, मी त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या परिवाराची भेट घेतली. त्यांच्या कुटुंबीयांनी प्रश्न विचारले त्यावर काय बोलावे हेच समजले नाही. तुमच्या भाषेच्या राजकारणापायी आज एका मुलाचा जीव गेला आहे. माझ्यावर कारवाई करा म्हणणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे.
सराईत गुंड श्वेतांग भास्कर निकाळजे (वय 37) आणि त्याचा साथीदार ओम संजय गायकवाड (वय 26) यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मोबाइल टॉवर उभारणीच्या ठेक्याच्या पैशांवरून एका तरुणाचे अपहरण करून त्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण खाद्यपदार्थ विक्रीचा स्टॉल चालवतो आणि तो निकाळजेचा जुना ओळखीचा आहे. मोबाइल टॉवर उभारणीच्या ठेक्याचे काम आणि आर्थिक व्यवहारातून दोघांमध्ये वाद सुरू होता. 8 नोव्हेंबर रोजी निकाळजे आणि त्याच्या साथीदारांनी तरुणाच्या राहत्या घराजवळून त्याचे जबरदस्तीने अपहरण केले. अपहृत तरुणाला भोर तालुक्यातील एका निर्जन भागात नेण्यात आले. तिथे निकाळजेने त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून पैसे दे, नाहीतर जीव घेऊ अशी धमकी दिली. जीवाला धोका असल्याचे लक्षात येताच, तरुणाने संधी साधून आरोपींच्या तावडीतून पळ काढला आणि थेट भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. या गंभीर गुन्ह्याचा तपास भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाकडे सोपवण्यात आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले. माहिती मिळताच पथकाने सापळा रचून निकाळजेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन देशी पिस्तुले आणि काही जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. पुढील चौकशीत निकाळजेने मध्य प्रदेशातील उमराटी येथून मध्यस्थांच्या मदतीने ही पिस्तुले खरेदी केल्याची कबुली दिली. निकाळजे हा पुण्यातील सराईत गुंड असून त्याच्यावर यापूर्वीही खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोघांविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, अपहरण, खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही यशस्वी कामगिरी पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे, पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, महेश बारावकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, मंगेश गायकवाड, किरण साबळे, मितेश चोरमले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, नीलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे आदींनी पार पाडली.
सेलूकाटे परिसरावर काळाने झडप घालून एका सुखी कुटुंबाचा संसारच उद्ध्वस्त केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना सोमवारी रात्री घडली. वर्धा-सेलूकाटे मार्गावर नवोदय विद्यालयाजवळ भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी व त्यांच्या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक 6 वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये सेलूकाटेतील भोयर कुटुंबाचा समावेश आहे. या दुर्घटनेत सोमनाथ भोयर (वय 38), निकिता सोमनाथ भोयर (वय 32) आणि मुलगा पूरब (वय 12) यांचा जागीच मृत्यू झाला. तर लहान मुलगा कान्हा (वय 6) गंभीर जखमी असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. गणेशनगरातून परतताना मृत्यूचा सापळा प्राथमिक माहितीनुसार, भोयर कुटुंब वर्धा गणेशनगर येथील एका कार्यक्रमावरून रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या सेलूकाटे येथील घरी परतत होते. याचदरम्यान वायगाव येथील एक चारचाकी वाहन भरधाव वेगाने येऊन त्यांच्या दुचाकीवर आदळले. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते. चारचाकी चालकाने काढला पळ, परिसरात संताप धडक दिल्यानंतर चारचाकीचालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती असून वाहन वायगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. जखमी मुलगा कान्हाला नागरिकांनी तातडीने सावंगी रुग्णालयात हलविले. मात्र उर्वरित कुटुंबीयांना वाचवण्याचे नागरिकांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. सेलू आणि काटे परिसरात या घटनेने शोककळा पसरली असून गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे. अचानक एका कुटुंबाचा आवाज कायमचा थांबला अशी खंत व्यक्त होत आहे. वाढत्या अपघातांची मालिका आणि प्रशासनाची उदासीनता गेल्या काही महिन्यांत वर्धा-सेलूकाटे मार्गावर वेगामुळे अपघातांची संख्या वाढली असून नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन आणि कठोर अंमलबजावणीची मागणी केली आहे. हे रस्ते वाहनचालकांच्या बेदरकारपणामुळे होत आहे. वाहतूक पोलिसांनी तातडीने वेगमर्यादा आणि तपासणी सुरू करावी, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली. सावंगी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
उमराटी प्रकरणी पुणे पोलिसांकडून सखोल तपास सुरू:बेकायदा पिस्तूल विक्री करणाऱ्या सराईतांची झाडाझडती
पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातील उमराटी गावातील पिस्तूल विक्री प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. स्थानिक कारागिरांनी पुण्यातील गुंड टोळ्यांना मध्यस्थांमार्फत पिस्तुले विकल्याची माहिती समोर आल्यानंतर, यापूर्वी बेकायदा पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या सराईत आरोपींची चौकशी करण्यात येणार आहे. मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील उमराटी गावात पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत पिस्तूल, मॅगझिन, पिस्तूल तयार करण्यासाठी लागणारे सुटे भाग आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी सनीभाई चावला, जसबिरसिंग प्रकाशसिंग चावला, प्रवीणसिंग उत्तमसिंग टकराना, राजपालसिंग प्रधानसिंग जुनेजा, अलोकसिंग जोहरसिंग बर्नाला, नानाकसिंग अजितसिंग बर्नाला आणि गुरुचरणसिंग बर्नाला (सर्व रा. उमराटी, जि. बडवानी, मध्य प्रदेश) यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमराटीतील कारागिरांनी गेल्या सहा ते सात वर्षांत सराईत गुन्हेगारांना 700 ते 800 देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री केली आहे. ही आकडेवारी या बेकायदा शस्त्रास्त्र निर्मिती आणि विक्रीच्या मोठ्या प्रमाणावर प्रकाश टाकते. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी स्पष्ट केले की, पोलिस कोठडीत असलेल्या उमराटीतील कारागिरांची कसून चौकशी सुरू आहे. त्यांनी मध्यस्थांमार्फत पुण्यातील गुंड टोळ्यांतील सराईतांना पिस्तुले विकली आहेत. शरद मोहोळ आणि वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपींनी उमराटीतील कारागिरांनी तयार केलेल्या पिस्तुलाचा वापर केल्याची माहिती मिळाली आहे. शहरात यापूर्वी घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये देशी बनावटीच्या पिस्तुलाचा वापर झाल्याचे समोर आले आहे. या तपासाच्या अनुषंगाने, यापूर्वी बेकायदा पिस्तूल बाळगल्या प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपींची चौकशी करण्यात येणार आहे. उमराटी गावात शनिवारी पहाटे पुणे पोलिसांच्या 100 जणांच्या पथकाने, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकला. यापूर्वी स्थानिक कारागिरांनी पोलिसांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या असल्याने, पोलिसांनी ड्रोन कॅमेरे, गॅस गन, बिनतारी संदेश यंत्रणा आणि शीघ्र कृती दलासह (क्विक रिस्पॉन्स टीम) पूर्ण तयारीने ही कारवाई केली. तपासात असेही समोर आले आहे की, उमराटी गावातील कारागीर पिस्तूल विक्री करण्यापूर्वी खरेदीदारांची समाज माध्यमांद्वारे खात्री करत होते.
मुंबईत डिजिटल अरेस्ट करून सायबर फसवणूक करण्याच्या अनेक घटना उजेडात येत आहेत. आता मुंबईत फसवणुकीचा एक भन्नाट किस्सा समोर आला आहे. त्यात एका व्यक्तीने आपण मोहम्मद पैगंबर यांचे वंशज असल्याचे सांगून 2 महिलांना तब्बल 11 लाख रुपयांना गंडा घातला आहे. पोलिसांनी या प्रकरणी मोहसीन अली अब्दुल सत्तार कादरी नामक व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. माहीम पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक रहिवाशी अंसार अहमद अब्दुल गनी यांच्या तक्रारीनुसार मोहसीन अली अब्दुल सत्तार कादरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, 2022 मध्ये तक्रारदार व त्याचा भाऊ इसरार फारूकी यांची दक्षिण मुंबईतील एका दर्ग्यावर कादरशी भेट झाली. त्यानंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. काचेच्या बाटतील दाखवला केस त्यानंतर एकेदिवशी कादरी यांनी आपण प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे वंशज असून आपल्याडे त्यांचा केस असल्याचा दावा केला. पोलिसांच्या मते, त्यानंतर कादरीने दोन्ही भावांना माहीम येथील आपल्या घरी बोलावले. तिथे तो एका काचेच्या बाटलीत ठेवलेला केस घेऊन आला. त्यानंतर त्याने हे केस मोहम्मद पैगंबरांचा असल्याचा दावा केला. त्यावर दोन्ही भावांनी ही बाटली काही दिवस आपल्या घरी ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. पोलिसांनी सांगितले की, त्यासाठी कादरीने तयारी दर्शवली. त्यानंतर तक्रारदार व त्याचा भाऊ फारूकी याच्या घरी कादरीने काही पूजाअर्चा केल्या. त्यानंतर त्याने ती काचेची बाटली त्यांच्या घरातील आलमारीत ठेवली. नंतर ती आलमारी बंद केली. त्याने दोन्ही भावांना आपण सांगेपर्यंत हे कपाट न उघडण्याची तंबी दिली. त्यानंतर हे दोन्ही बंधू घरी नसताना कादरी त्यांच्या घरी आला. त्याने दोन्ही भावांच्या पत्नींना त्यांच्या घरातील सर्व दागिने डब्ब्याजवळ ठेवल्यास ते दुप्पट होऊन घरात पैसाअडका येईल असे सांगितले. कशी समोर आली फसवणूक? कादरीच्या सूचनेनुसार दोन्ही महिलांनी आपले सर्व दागदागिने केस असलेल्या काचेच्या बाटलीजवळ ठेवले. त्यानंतर कादरीने त्या दोघींनाही घराबाहेर जाण्यास सांगितले. यासाठी त्याने आपल्याला येथे एक पूजा करायची असल्याचे सांगितले. त्याच्या सूचनेनुसार दोन्ही बायका घराबाहेर गेल्या. त्यानंतर कादरी अलमारीतून जवळपास 11 लाख रुपयांचे दागिने घेऊन लंपास झाला. काही दिवसांनी या महिलांनी झाला प्रकार आपल्या नवऱ्यांना सांगितला आणि फसवणुकीचा विचित्र प्रकार उजेडात आला.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर नगरपरिषद निवडणूक तापू लागली असतानाच, राज्यातील प्रमुख नेत्यांची भाषणेही आता अधिक तीव्र झाली आहेत. सोमवारी जिंतूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका झाली. जिंतूरचा विकास हा बारामती आणि पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर करू, अशा आश्वासनासह पवारांनी भाजप नेत्या व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर थेट निशाणा साधला. हा विकास करणे म्हणजे येड्या-गबाळ्याचे काम नाही, असे वक्तव्य करत अजित पवारांनी जिंतूरमधील लोकप्रतिनिधिंच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांच्या या भाषणानंतर स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून नेत्यांमध्ये आरोप–प्रत्यारोपांचे नवे सत्र सुरू झाले आहे. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर काही तासांतच पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जोरदार पलटवार केला. बारामतीच्या विकासासाठी मिळालेला निधी आणि इतर शहरांमध्ये असणारी स्थिती यांची तुलना करत त्यांनी अजित पवारांना थेट प्रश्न केला. बारामतीला दहा रुपये लागत असतील तर तुम्ही शंभर रुपये निधी देता, पण इतर शहरांचा विकास तसाच का राहिला? यासह जिंतूर नगरपरिषद पूर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यात होती तेव्हा जर निधी दिला होता, तर तो कुठे वापरला, असा रोखठोक सवाल करत बोर्डीकरांनी पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला. जिंतूरच्या विकासाला भाजपच खऱ्या अर्थाने गती देत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. जिंतूर नगरपरिषद निवडणुकीत एकीकडे महायुतीत अंतर्गत मतभेद दिसत असतानाच, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांनीही भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. जिंतूरमध्ये पायाभूत सुविधांवर मोठी कामे झाली असून जनता विकास पाहून मतदान करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भांबळे यांनी भाजप यंत्रणेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहारातून निवडणूक फंड जमा केला जातो, असा घणाघात केला. यामुळे जिंतूरमधील राजकारण आणखी तापले आहे. अजित पवारांनी त्यांच्या भाषणातून इतर नेत्यांवर नाव न घेता टीका दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या भाषणातून इतर नेत्यांवर नाव न घेता टीका करत राजकीय वातावरणाला आणखी रंग दिला. मी आधी काम करतो, मग बोलतो. इतर नेत्यांची शहरं भिकारचोट असतात, असे विधान करत त्यांनी राज्यतील काही वरिष्ठ नेत्यांना थेट लक्ष्य केले. त्यांच्या या विधानाचा संदर्भ राष्ट्रवादी शरद पवार गटाशी जोडला गेल्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. जिंतूरची निवडणूक आता राज्यभर चर्चेत जिंतूर नगरपरिषद निवडणुकीत आता विकास, निधीवाटप, भ्रष्टाचाराचे आरोप, घराणेशाही आणि शहरांच्या तुलना अशा विविध मुद्द्यांवरून वातावरण तापत आहे. अजित पवारांचे आक्रमक भाषण, मेघना बोर्डीकरांचा प्रतिहल्ला, तर विजय भांबळे यांचे भाजपविरोधातील आरोप यामुळे जिंतूरची निवडणूक आता राज्यभर चर्चेत आहे. स्थानिक पातळीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरू लागली असून दोन्ही पक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना जोरदार चढाओढीला उतरवले आहे. येत्या काही दिवसांत अजून अनेक नेते जिंतूरमध्ये सभांसाठी येणार असल्याने राजकीय रंगत शिगेला पोहोचणार, हे निश्चित आहे.
सोलापूर एसटी स्थानकाला परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी अचानक भेट देऊन पाहणी केली होती. अधिकाऱ्यांना खडे बाेल सुनावले होते. तरीदेखील मनमानी सुरूच असल्याचे सोमवारी दिसून आले. स्वच्छतागृह महिलांसाठी खुले असताना त्यांच्याकडून पैसे मागत हाेते. पुरुषांसाठी पैसे तर दुप्पट केले हाेते. मंत्र्यांनी शनिवारी (ता. 22) भेट दिली. त्यानंतरच्या तीन दिवसात काहीही सुधारणा दिसून आलेल्या नाहीत. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी अस्वच्छता होती. तेथे फक्त पेंट मारले. अन्य ठिकाणी घाण तिसऱ्या दिवशीही तशीच आहे. ज्या स्वच्छतागृहात सरनाईक गेले, अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा इशाराही दिला. तिथे वसुली सुरू होती. स्वच्छतागृहात जादा पैशांची मागणी स्वच्छतागृहात पुरुषांसाठी पाच रुपये तर महिलांना मोफत असताना पुरुषांना दहा रुपये आणि महिलांना पाच रुपये आकारणी करण्यात येत असल्याने दिव्य मराठीच्या पाहणीत निदर्शनास आले. याबाबत एसटीचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांना संपर्क करून विचारले असता, तेथे आगार व्यवस्थापकांना पाठवून खात्री करतो असे सांगितले. परंतु कोणीच आले नाहीत. स्वच्छतागृहात पुरुषांना पाच रुपये आकारणी आहे. महिलांना मोफत आहे. तरीही जादा पैसे घेत असतील तर दंडात्मक कारवाई करू. संबंधितांचा मक्ताही रद्द करण्याचा विचार होईल. उत्तर जुंदळे, आगार व्यवस्थापक
हाेटगी रस्त्यावरील नियाेजित आयटी पार्कच्या 50 एकर जमिनीवर 190 फूट उंचीच्या (15 मजली)इमारती बांधू शकताे. विमानतळावरून उडणाऱ्या विमानांना त्याचा धाेका नाही. विमानसेवा प्राधिकरणाने त्याला काहीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय या पार्कवरील आयटी उद्याेगांना स्वस्त दरात वीजपुरवठा करण्यासाठी एनटीपीसीचे अधिकारी येत्या शुक्रवारी (ता. 28) भेटीसाठी येत आहेत. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर वीजदराचा करार हाेऊ शकताे, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी साेमवारी पत्रकारांना सांगितले. नियाेजित आयटी पार्कसाठी हाेटगी रस्त्यावरील जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील 50 एकर जमीन निश्चित केली. विमानतळापासून पाच किलाेमीटर लांब असलेल्या या जमिनीवर बहुमजली इमारती बांधण्यात येतील. त्याला काेणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचा सविस्तर प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे. पुढील महिन्यात हाेणाऱ्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीतनंतर ही जागा एमआयडीसीकडे वर्ग करण्याची प्रक्रिया हाेईल. त्यानंतर एमआयडीसीकडून पायाभूत सुविधा देण्याचे काम हाेणार आहे. 190 फूट उंच म्हणजे 15 मजली व्यावसायिक इमारती असतील 190 फूट उंच म्हणजे 12 ते 15 मजली इमारती बांधता येतील. त्या व्यावसायिक असल्याने त्यांची उंची अधिक असते. माेठी दालने असतात. पार्किंगची सुविधा असते. त्याला काॅर्पाेरेट लूक देण्यासाठी पुरेशी जागा साेडण्यात येते. तिथे पर्यावरणपूरक गाेष्टींचा समावेश असताे. आयटीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि त्याचे बाह्यरूप हे पूर्णत: वेगळे असते. इमारती काचेच्या असतात. त्यामुळे बाहेरून त्याचे मजले दिसणार नाहीत. परंतु आता लक्झरियस दालने, व्हीआयपी रूम्स, कँटीन, रेस्टाॅरंट, विरंगुळा केंद्र अशा सर्व बाबींचा समावेश इमारतीत असताे. जेणेकरून तिथल्या कर्मचाऱ्यांना काेणत्याही गाेष्टीसाठी बाहेर जायची आवश्यकता नसते. विमानतळ परिसरात मांस दुकाने पाहणार विमानतळ परिसरात खुल्या पद्धतीने मांस विक्री हाेत असल्याने पक्षी आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला. त्याचा थेट परिणाम विमानसेवेवर हाेऊ शकताे. त्याची पूर्वदक्षता म्हणून परिसरात मांस विक्रीच्या दुकानांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. 15 दिवसांत संबंधितांवर कारवाईच्या सूचनाही केलेल्या आहेत. शिवाय संपूर्ण परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचे कामही सुरू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. उड्डाणपुलाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन अशी शहरातील दोन प्रस्तावित उड्डाणपूल आहेत. त्यांच्यासाठी भूसंपादन प्रक्रियेत सरकारी इमारतींचा विषय आहे. राज्याच्या अखत्यारीतील कार्यालयांच्या इमारतींना शासनाची ‘ना-हरकत’ (एनओसी) मिळाली. केंद्रीय कार्यालयांचा प्रस्ताव दिल्लीला पाठवल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. दिल्लीहून ना-हरकत मिळण्यासाठी विलंब लागेल, असेही ते म्हणाले.
नाशिकची ओळख बनलेली गोदा आरती आता इतर शहरांतही सुरू होणार आहे. रामतीर्थ गोदा सेवा समितीने तयार केलेल्या आराखड्याच्या आधारे देशभरातील विविध शहरांनी या आरतीसाठी प्रस्ताव पाठविले असून, समितीने यासाठी विशेष प्रशिक्षण मोहीम सुरू केली आहे. नाशिकच्या गोदा आरतीला काश्मीर, विशाखापट्टणम, हैदराबाद,मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नवी मुंबई, गुजरातमधील व्यारा व सुरत, तसेच मालेगाव-झोडगे येथून आमंत्रणे मिळाली आहेत. या आरतीत अध्यात्म, भक्ती, शिस्तबद्ध नियोजन,स्वच्छतेची कास आणि तरुणांना अध्यात्माकडे वळविण्याची दिशा असल्यामुळे ही आरती देशभरातील शहरांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. नाशिकच्या आरतीचे राष्ट्रव्यापी आकर्षण इतर शहरांनीही आदर्श घ्यावा अध्यात्म आणि नदीसेवा हे दोन वारस पुढे चालत रहावेत हा आमचा उद्देश आहे. नाशिकप्रमाणेच इतर शहरांनीही याचा आदर्श घ्यावा. जेथे हवी तेथे मदत करण्यास आम्ही सदैव तयार आहोत. आज देशभरातून येणारी आमंत्रणे पाहून हा अभिमानाचा क्षण आहे.- मुकुंद खोचे, रामतीर्थ गोदा सेवा समिती इतर शहरांमध्ये गोदा आरती सुरू करण्यासाठी समितीचा आराखडा समाज एकत्रीकरण : जाती-धर्मापलीकडे जाऊन समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणे,धर्म-गुरू-संस्कार या विषयांवर मार्गदर्शन करणे आणि अध्यात्माकडे लोकांचा कल वाढवणे.नदी व परिसर स्वच्छता मोहीम : आध्यात्मिक उपक्रमाची पहिली अट म्हणजे स्वच्छता. ज्या शहरात आरती सुरू होणार आहे, त्या ठिकाणच्या नदीची आणि परिसराची मोठी स्वच्छता मोहीम राबवली जाते.समितीच्या म्हणण्यानुसार प्रत्येक नदीतून तब्बल पाच ट्रॅक्टर कचरा बाहेर काढण्यात आला.आरतीचे प्रशिक्षण : रामतीर्थ गोदा सेवा समितीतील 10 प्रशिक्षित तरुण संबंधित शहरांत जाऊन 10 दिवसांचे प्रशिक्षण तेथील तरुणांना देतात. आरतीची शिस्त, मुद्रेचे महत्त्व, आरतीची रचना, स्वच्छतेचा प्रोटोकॉल, शिस्तबद्ध व्यवस्थापन हे सर्व प्रशिक्षणाचा भाग आहे. आरती सुरू करण्यासाठी प्रयत्नशील शहरे गंगाखेड (मराठवाडा)जानोरी आळंदीप्रकाशा (शहादा तालुका) -तापी नदीपैठण
शिवसेना फुटल्यानंतर शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ या निवडणुकीच्या प्रचारापासून दूर राहत आहेत. निवडणुकीच्या प्रचाराताही ते सक्रिय नाहीत. त्यामुळे पक्षात नाराज असलेले जंजाळ भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एकीकडे महिला जिल्हाप्रमुखांनी पक्ष सोडल्यानंतर जिल्हाप्रमुखही पक्ष सोडण्याच्या चर्चेमुुळे शिंदेसेनेत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, मला कुठल्याही निर्णय प्रक्रियेत घेतले जात नाही.त्यामुळे माझा निर्णय मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणारअसल्याचे राजेंद्र जंजाळ यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. निवडणूक प्रक्रियेतून झाले गायब नगरपालिकांच्या निवडणुकीचे नियोजन सुरू असताना जंजाळ मात्र त्यामध्ये कुठेच दिसत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुखांनाच डावलले गेल्यामुळे त्यांना देखील पक्षापासून चार हात दूर ठेवले आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा रंगली आहे. जिल्हाप्रमुखांनी जिल्ह्यातफिरायला हवे कोणालाही निवडणुकीपासून दूर ठेवलेले नाही. ते जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनीच स्वत: जिल्ह्यात फिरले पाहिजे.दौरे काढले पाहिजे.त्यांना सांगण्याची गरज नाही. ते कोअर कमिटीचे सदस्य आहेत. सर्व नेमणुका पक्षश्रेष्ठींनी केल्या आहेत. -संजय शिरसाट, पालकमंत्री. नव्यांना जबाबदारी उद्धवसेनेतून नुकतेच आलेले नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, विकास जैन, त्यानंतर किशनंचद तनवाणी या सर्व उमेदवारांना संधी दिली गेली आहे. हेच पदाधिकारी संजय शिरसाट यांच्यासोबत असतात. त्यामुळे जबाबदारी नसलेल्या लोकांना पुढे केले जात असल्यामुळे जंजाळ नाराज झाले असल्यामुळे ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
दिव्य मराठी अपडेट्स:लाइटर न दिल्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, एक गंभीर जखमी; नागपुरातील घटना
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
शहरातील सेव्हन हिल्स परिसरातील रस्तारुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या मालमत्ता धारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिका न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने निकाली काढल्या आहेत. महापालिकेच्या(मनपा) वतीने कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करूनच रस्ता रुंदीकरण केले जाईल,अशी हमी न्यायालयात देण्यात आली आहे. या हमीच्या आधारावर याचिका निकाली काढताना, याचिकाकर्त्यांना भविष्यात कायदेशीर कार्यवाहीसाठी याचिका दाखल करण्याची मुभा खंडपीठाने दिली आहे. याचिकाकर्त्यांची बाजू काय होती? मे. अबोली ॲडव्हायजर्स (इन्फीनिटी इन्फ्रा बिझनेस सेंटर),मे. एम. डब्ल्यु. मित्रीकोटकर (अरिहंत मोटर्स), मेघदूत रिजॉर्टस् (अतिथी हॉटेल) आणि जितेंद्र जैन (ज्योतीर्मय कॉम्पलेक्स) या याचिकाकर्त्यांकडे बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्रे होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रारूप विकास आराखड्यामध्ये त्यांच्या मालमत्ता रस्तारुंदीकरणाने बाधित होत नव्हत्या. मात्र, शासनास सादरकेलेल्या आराखड्यामध्ये रस्त्याची आखणी बदललेली आढळली. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाच्या कलम 31 प्रमाणे रस्त्याच्या आखणीत बदल करायचा असल्यास सूचना व हरकती मागवणे आवश्यक असते, पण तशी कोणतीही कार्यवाही झाली नाही. मनपाने काय भूमिका घेतली? सेव्हन हिल्स ते ॲम्बेसेडर हॉटेलपर्यंतचा जालना रोडविविध प्राधिकरणे (मनपा, सिडको, एमआयडीसी) 30,45 आणि 60 मीटर रुंद असल्याचा दावा करीत असल्याने संभ्रम निर्माण झाला होता. यावर मनपाने शासनाचा सल्ला घेऊन रस्त्याचा हा भाग नेमका किती रुंदीचा आहे, याचानिश्चित निष्कर्ष काढल्यानंतर शपथपत्र दाखल करू. पुढील सुनावणीपर्यंत याचिकाकर्त्यांच्या मालमत्तांवर कारवाई करणार नाही. त्यानंतर मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनीस विस्तर शपथपत्र सादर केले होते.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्याच्या राजकारणात घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा गाजू लागला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आता अधिकच खोलवर रुजली असल्याचे या निवडणुकीत स्पष्ट दिसून येत आहे. कोणताही पक्ष असो, उमेदवारीच्या वाटपात सामान्य कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांच्या घरातील सदस्यांना अधिक प्राधान्य दिल्याचे वास्तव लपलेले नाही. यामुळे कोणत्याही पक्षाचे नाव पुढे करीत असले तरी प्रत्यक्षात सत्ता आणि नेतृत्व हे काही विशिष्ट कुटुंबांच्या भोवतीच फिरत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर काही नगरपरिषदांमधील उमेदवारीने तर घराणेशाहीचा कळस गाठल्याची चर्चा सुरू झाली आहे. कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत तर हा प्रकार सर्वाधिक चर्चेत आहे. शिवसेना शिंदे गट या पक्षाने शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या संपूर्ण कुटुंबालाच तिकीट देऊन सर्वांचेच लक्ष वेधले आहे. वामन म्हात्रे स्वतः, त्यांची पत्नी, भाऊ, भावजई, मुलगा आणि पुतण्या यांना एकाचवेळी उमेदवारी देण्यात आली आहे. एका कुटुंबातील सहा जण थेट मैदानात उतरल्याने बदलापूर शहरात राजकीय वातावरण तापले आहे. कार्यकर्त्यांच्या नाराजीपासून ते जनतेच्या चर्चांपर्यंत या निर्णयाचे पडसाद उमटत आहेत. 2015 मध्येही म्हात्रे कुटुंबातील चार जणांना तिकीट मिळाले होते, त्यामुळे घराणेशाहीचा हा पॅटर्न पुन्हा उघड झाला आहे. आता या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा इतर नेते काय म्हणतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. फक्त शिवसेनाच नव्हे, तर भाजपमध्येही यावर्षी हा कल दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षानेही एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी देत आश्चर्याचा धक्का दिला आहे. नगराध्यक्षपदासाठी गजानन सूर्यवंशी यांच्या नावासोबतच त्यांची पत्नी, भाऊ आणि इतर नातेवाईकांना नगरसेवकपदासाठी स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपने घराणेशाही विरोधातील आपली भूमिका स्वतःच गोंधळात टाकल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा विरोधकांच्या घराणेशाहीवर टीका केली असतानाच, स्थानिक पातळीवर मात्र अशा प्रकारे तिकीट वाटप होत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पक्षांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता या दोन्ही उदाहरणांमुळे कार्यकर्त्यांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सामान्य कार्यकर्त्यांचे राजकारणात नेमके स्थान काय? अनेक वर्षांची मेहनत, जनसंपर्क आणि संघटन बांधणी केल्यानंतरही पक्षातील मोठ्या पदांसाठी नेत्यांच्या आपल्या घरातील सदस्यांनाच प्राधान्य देण्यात येत असल्याची भावना आता उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी नाराजीही व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये तिकीट वाटप ही कार्यकर्त्यांच्या अंतिम अपेक्षांपैकी एक असते. परंतु ही अपेक्षाच सतत नातेवाईकांनाच दिली जात असल्याने पक्षांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. घराणेशाहीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत राज्यातील अनेक नगरपंचायती आणि नगरपरिषदांमध्ये अशाच प्रकारचे चित्र दिसत असल्याने घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा निवडणुकीचा केंद्रबिंदू बनला आहे. एकीकडे नेते सामान्य कार्यकर्त्यांना संघटना मजबूत करण्याचे आवाहन करतात, तर दुसरीकडे निर्णय मात्र आपल्या परिवारापुरते मर्यादित ठेवतात. या परस्परविरोधी चित्रामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. येत्या काही दिवसांत हे उमेदवारी वाटप पक्षांना कितपत फायद्याचे किंवा तोट्याचे ठरणार, हे मतमोजणीच्या निकालांनंतर स्पष्ट होणार आहे. पण एकूणच, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकांनी घराणेशाहीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे, हे निश्चित.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार व भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यात सध्या राजकीय चिखलफेक सुरू आहे. गिरीश महाजनांनी रोहित पवार हे आपल्या आजोबांच्या कडीखांद्यावर खेळून आमदार झाल्याची टीका केली. त्यांच्या या टिकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवारांनी महाजनांत विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवण्याची हिंमत नसल्याचा घणाघात केला. यामुळे या दोघांतील राजकीय चिखलफेक आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. जळगावच्या जामनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा गोंधळ झाला होता. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना जबरदस्तीने अर्ज मागे घेण्यास भाग पाडले होते. रोहित पवारांनी त्याचे काही व्हिडिओ व्हायरल केले होते. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर महाजनांनी त्यांच्यावर पोस्टल मतांवर जेमतेम विजय झालेल्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये अशी टीका केली होती. त्यानंतर आता रोहित पवारांनी त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. जळगावमध्ये एकतरी उद्योग आणला का? गिरीश महाजन साहेब, आपल्याला आपल्या कर्तृत्वावर एवढा विश्वास होता तर गुंडगिरी करून समोरच्या उमेदवारांना पकडून आणून बळजबरीने अर्ज मागे का घ्यायला लावले? विकासाच्या मुद्द्यावर निवडणुक लढवण्याची हिम्मत का दाखवली नाही? एवढं मोठं मंत्रिपद असूनही आपण उत्तर महाराष्ट्र तर सोडा जळगावसाठी काय केलं, एकतरी उद्योग आणला का? जळगाव आपलं घर असताना आपलं सगळं चित्त फक्त नाशिककडंच का? आपल्या कार्यकाळात भकास असलेला विकास गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण मोटारसायकलवरून जात असतानाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने बघितलाच आहे. आता मंत्रिपद आहे तर किमान आपल्या भागाला, आपल्या जिल्ह्याला तरी फायदा करून द्या, असे ते म्हणाले. कर्जत - जामखेडचे राजकीय वजन वाढले बाबांच्या खांद्यावर कडेवर खेळायला नशीब लागतं आणि आम्ही नाशिबवान आहोत आम्हाला पवार साहेबांसारखे बाबा (आजोबा) लाभले. बाकी तुमच्या 10 खात्यांच्या मंत्र्याला 2019 मधे 40 हजारांनी लोळवलं होतं, यावेळी पण तोच डाव होता पण तुम्ही VoteChori केली. असो, तुम्हाला आणि मुख्यमंत्री साहेबांना तुमच्या सभेत विकासावर बोलण्यापेक्षा माझ्यावर टीका करावी लागते यातच कर्जत-जामखेडचं राजकीय वजन महाराष्ट्रात वाढल्याचं दिसून येतं. बाकी, धार्मिक भावनांच्या नावाखाली आपण करत असलेलं पैसा आणि सत्तेचं राजकारण आणि नाशिक कुंभमेळ्यात आस्थेच्या नावाखाली टेंडर्स फुगवून करत असलेल्या करामती याचा आम्ही योग्य वेळी भांडाफोड करूच, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. आत्ता पाहू काय म्हणाले होते गिरीश महाजन? मंत्री गिरीश महाजन भुसावळच्या सभेत रोहित पवारांना उद्देशून म्हणाले होते, भाजपचा एक साधा कार्यकर्ता इथपर्यंत सहजपणे पोहोचला नाही. आम्ही इतक्या वर्षांपासून जनतेची कामे करत आहोत. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत आहोत. जनतेने उगाच नाही आम्हा पती-पत्नीला 7-8 वेळा निवडून दिले. लोकांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेतो. जामनेरमध्ये माझ्या समाजाची मते फक्त 3 हजार आहेत. इतर समाजाचे लोक आम्हाला आमच्या कामांच्या जोरावर निवडून देतात. तुमच्यासारखे आम्ही आजोबांच्या व काकांच्या पुण्याईने राजकारणात आलो नाही.
सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेसंबंधीची सुनावणी आज होणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेविषयी निर्माण झालेल्या गोंधळामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अनेक शहरांत आरक्षणाची 50 टक्क्यांची कमाल मर्यादा ओलांडली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आधी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला कोणत्याही स्थितीत आरक्षणाची कमाल मर्यादा पाळण्याचे निर्देश दिले होते. तसेच सध्याची निवडणूक प्रक्रिया रोखण्याचाही इशारा दिला होता. यामुळे नगरपंचायत व नगरपरिषदेच्या येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट पसरले होते. पण कोर्टाने यासंबंधीची सुनावणी लांबणीवर टाकल्याने ही निवडणूक प्रक्रिया तूर्त जैसे थे सुरू आहे. गेल्या वेळी काय झाले सुप्रीम कोर्टात? मागील सुनावणीत कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांना जिल्हा परिषद व महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात नोटिफिकेशन काढण्यासाठी काही काळ थांबण्याची विनंती केली. त्यामुळे या प्रकरणी सुनावणीपर्यंत नोटिफिकेशन निघणार नाही हे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकल बॉडीजचे नोटिफिकेशन अद्याप जाहीर झाले नाही. त्यामुळे कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांना नोटिफिकेशन काढण्यासाठी थांबण्याची विनंती केली. त्यानुसार, निवडणुकीची सध्याची प्रक्रिया आहे तशीच सुरू राहील, पण त्याचे निकाल जाहीर होणार नाहीत. या निवडणुकांना कोणतीही स्थगिती नाही. पण ज्या नवीन निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत, त्यावर मात्र निवडणुकीचे नोटिफिकेशन जाहीर होणार नाही. या सुनावणीत जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा उल्लेख झाला नाही. पण महापालिका निवडणुकीचे नोटिफिकेशन आले नसल्याचे सांगण्यात आले. याचा अर्थ असा होतो की, यापुढे जिल्हा परिषदेचे नोटिफिकेशनही निकालापर्यंत जाहीर होणार नाही. याचिकाकर्त्याने आरक्षणावर काय घेतले होते आक्षेप? या प्रकरणी यापूर्वी झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्याने मराठवाड्यातील अनेक पालिकांमध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षण लागू केल्यानंतर आरक्षणाचा टक्का वाढल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. विकास गवळी यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमला बागची यांच्या खंडपीठाने सुनावणीत संताप व्यक्त केला होता. त्यात कोर्ट म्हणाले होते की, त्यांच्या पूर्वीच्या आदेशातच म्हटले होते की, बांठिया आयोगाच्या आधी जी परिस्थिती होती, त्यानुसारच निवडणूक घ्याव्यात. म्हणजेच, ओबीसी आरक्षण नसतानाचा आराखडा वापरला पाहिजे. परंतु सरकारने या आदेशाचा सोयीचा अर्थ काढून आरक्षण वाढवले, अशी कठोर टिप्पणी न्यायालयाने केली. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण गेलं तर निवडणूक प्रक्रियाच थांबणार या सुनावणीत अनेक मुद्द्यांवर तीव्र चर्चा झाली. राज्याचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे आणि काही मुदती वाढवता येणार नाहीत. मात्र, न्यायालयाने त्यांच्या या कारणांवर समाधान व्यक्त केले नाही. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, आमचा आदेश अगदी सरळ होता, पण तुमच्या अधिकाऱ्यांनी गोंधळ केला आहे. 50 टक्क्यांच्या वर आरक्षण गेलं तर निवडणूक प्रक्रियाच आम्ही रोखू शकतो. न्यायमूर्ती जॉयमला बागची यांनीही घटनेतील आरक्षण मर्यादेचा उल्लेख करून सरकारला खबरदारीचा इशारा दिला. राज्य सरकारने अधिक वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने आज पुढील सुनावणी ठेवली असून त्यानंतर निवडणुकीचे भविष्य ठरणार आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा सध्या न्यायालयीन सुनावणीचे पुढील टप्पे निर्णायक ठरणार आहेत. न्यायालयाने आरक्षण मर्यादा पाळण्याचे आदेश पुन्हा कडकपणे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे सरकार आता कोणता निर्णय घेते, बांठिया आयोगाचा अहवाल कसा मांडते आणि न्यायालयाची प्रतिक्रिया काय असते, यावरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वेळेवर होतील की थांबवण्यात येतील, हे अवलंबून आहे. सर्वसामान्य नागरिक, उमेदवार आणि राजकीय पक्ष आता सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा करत आहेत.
जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा वाद आता राजकीय वातावरणात स्पष्ट जाणवू लागला आहे. जळगावसह चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, भुसावळ आणि मुक्ताईनगर या ठिकाणी प्रमुख पक्षांचे नेते व आमदार आपल्या कुटुंबीयांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत असल्याने घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच गाजतो आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांतील मोठ्या नेत्यांनी पत्नी किंवा कन्यांना तिकीट देत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते आणि नागरिक दोघंही आश्चर्य व्यक्त करत आहेत. या घडामोडींवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना जोरदार टोले लगावले आहेत. चाळीसगावमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण मैदानात उतरल्या आहेत. पाचोरामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची पत्नी सुनीता पाटील उमेदवार आहेत. तर जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. भुसावळमध्ये भाजप नेते संजय सावकारे यांच्या पत्नी रंजना सावकारे उमेदवार बनल्या आहेत. मुक्ताईनगर येथे माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांची कन्या रंजना पाटील शिंदेसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उदाहरणांमुळे घराणेशाही हा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणात केंद्रस्थानी आला आहे. सत्ताधारी पक्षातील अनेकांना स्वतःवर होत असलेल्या टीकेची धार आता उलट त्यांच्या दिशेने वळत असल्याचे चित्र दिसत आहे. या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भुसावळ येथील महाविकास आघाडीच्या उमेदवार गायत्री भंगाळे यांच्या प्रचार सभेत बोलताना खडसे म्हणाले की, माझ्यावर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्यांची आता थोबाडं बंद झाली आहेत. खडसे यांच्या मते, जे लोक नेहमी त्यांच्यावरच घराणेशाहीचा ठपका ठेवत होते, त्यांचीच मंडळी आता आपल्या पत्नींना, नातेवाईकांना आणि कुटुंबीयांना तिकीट देतायत. त्यामुळे त्यांच्या आरोपांना आता काही आधार उरलेला नाही, असे ते म्हणाले. त्यांनी सावकारेंपासून ते मंत्र्यांच्या पत्नींच्या उमेदवारीपर्यंत अनेक उदाहरणे समोर ठेवत भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधला. त्यांची भूमिका ढोंगीपणाची ठरते यावेळी खडसे यांनी विशेषत: गिरीश महाजन यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. ते म्हणाले, महाजन साहेब नेहमी म्हणतात की नाथाभाऊ म्हणजे खडसे घराणेशाही करतात. मग आता तुम्ही कोणती शाई लावली? तुमच्या पत्नीला बिनविरोध जिंकवून आणलं. मंगेश चव्हाण, किशोर आप्पा यांनीही बायकोला तिकीट दिलं. मग आता माझ्यावर बोट दाखवणारे कुठे गेले? खडसे यांनी विचारलेल्या या प्रश्नामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला. त्यांनी पुढे सांगितले की, जे लोक घराणेशाहीचा मुद्दा वापरून त्यांच्यावर राजकीय वार करत होते, ते आता स्वतःच त्याच पद्धतीने राजकारण करत आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका ढोंगीपणाची ठरते, असा घणाघात त्यांनी केला. घराणेशाहीचा मुद्दा आणखी पेटला जळगाव जिल्ह्यातील या निवडणुका स्थानिक पातळीवर कितीही छोट्या असल्या, तरी त्या राजकीय प्रतिष्ठेबद्दल अधिक आहेत, असे अनेक राजकीय विश्लेषक सांगत आहेत. सत्ताधारी पक्षाचे नेते स्वतःची ताकद दाखवण्यासाठी कुटुंबीयांना उमेदवारी देत आहेत, तर विरोधक या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ खडसे यांच्या विधानामुळे घराणेशाहीचा मुद्दा आणखी पेटला असून पुढील काही दिवसांत हा विषय राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे. निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली असून, जळगाव जिल्ह्यातील राजकारण आणखी रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
वाहतूक पोलिसांनी थांबण्याचा इशारा देऊनही थेट त्यांच्या अंगावर रिक्षा घालून सुमारे 20 फूट फरफटत नेणाऱ्या रिक्षाचालक युसूफ मोहंमद अन्सारी (रा. मोमीनपुरा, दौलताबाद) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या गंभीर घटनेनंतर शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेत, ज्या ठिकाणी युसूफने पोलिसांवर हल्ला केला त्याच ठिकाणी सोमवारी (24 नोव्हेंबर) त्याची धिंड काढली. त्यामुळे पुन्हा एकदा शहर पोलिसांचा ‘धिंड पॅटर्न’ चर्चेत आला आहे. आरोपी युसूफ अन्सारी यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली. पोलिसांवर हल्ला आणि कारवाई सत्र थेट पोलिसांवर हल्ला झाल्यानंतर शहरात दिवसभर प्रत्येक चौकात शहर पोलिसांच्या पथकाने कठोर कारवाई सत्र राबवले. दिवसभरात एकूण 797 रिक्षांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 32 रिक्षा जप्त करण्यात आल्या, तर एकूण 9 लाख 66 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला असून त्यापैकी 3 लाख 67 हजार रुपयांचा दंड वसूलही करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात दिवसभर प्रत्येक चौकाला छावणीचे स्वरूप आले होते. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी दिली. 3 महिन्यांपूर्वीही पोलिसांशी हुज्जत रिक्षाचालक युसूफ मोहंमद अली अन्सारी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे उघड झाले आहे. साडेतीन महिन्यांपूर्वीही त्याने पोलिसांशी हुज्जत घातल्याची माहिती निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली. 11 ऑगस्ट 2025 रोजी त्याने कामगार उपायुक्त कार्यालयातील एका शासकीय नोकरदार महिलेशी तिकीट (भाड्याच्या) पैशांवरून हुज्जत घातली होती. रेल्वेस्टेशन चौकात हा प्रकार घडला होता. त्या वेळी तेथे गेलेल्या वाहतूक पोलिसाशी त्याने हुज्जत घालत धक्काबुक्की केली होती. याप्रकरणी त्याच्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. रिक्षा दोन महिने जप्त 11 ऑगस्ट रोजी घडलेल्या प्रकारानंतर वाहतूक पोलिसांनी त्याची रिक्षा (एमएच 20 ईके 4632) जप्त केली होती. ती सुमारे दोन महिने जप्त होती. अंदाजे दीड महिन्यापूर्वी त्याने दंड भरून ही रिक्षा सोडवून घेतली होती, मात्र 23 नोव्हेंबरला त्याने पुन्हा पोलिसांना नडण्याचा प्रयत्न केला.
तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातूर येथे ७८ वा एनसीसी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. एनसीसी दिवस हा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा करण्यात येत असतो. जो राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) चा ७८ वा स्थापना दिवस आहे. देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. ज्यात कॅडेट्स विविध माध्यमांतून आपल्या भावना व्यक्त करतात. नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसीस) ही भारतीय सशस्त्र दलाची युवा शाखा आहे. हे सैन्य, नौदल आणि हवाई दल यांचा समावेश असलेली त्रि-सेवा संस्था म्हणून स्वयंसेवी आधारावर शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुले आहे. कॅडेट्सना लहान शस्त्रे आणि कवायतीचे मूलभूत लष्करी प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या हेतूने राष्ट्रीय छात्रसेना म्हणजे एन.सी.सी.ची स्थापना करण्यात आली आहे. एनसीसी दिवसानिमित्त तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एनसीसी कॅडेट्सनी सायकल रॅली काढून पातूर शहरांमध्ये एनसीसी दिवसाचे महत्त्व सांगण्यात आले. प्राचार्य अंशुमान सिंह गहिलोत व इलेव्हन महाराष्ट्र बटालियन एनसीसी अकोलाचे कमांडिंग ऑफिसर विशिष्ट सेवा मेडल यांनी एनसीसी दिवस साजरा करण्याचे आवाहन एनसीसी कॅडेटला केले. त्यानंतर आपल्या देशातील नदी, नाले स्वच्छ व्हावे व त्यामुळे संपूर्ण परिसरात चांगल्या प्रकारचे वातावरण निर्माण व्हावे, यासाठी सुवर्णा नदी परिसर व श्री कवळेश्वर संस्थान येथील परिसर स्वच्छ केला. यावर दिली माहिती सैन्यातील शिपाई भारतासाठी, एनसीसी कॅडेट्सना बोनस गुण मिळतात. एनसीसी कॅडेट्सना अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये, विशेषत: राज्य आणि केंद्रीय पोलिस आणि निमलष्करी दलांमध्ये आरक्षण आहे. याबद्दल शाळेचे सहाय्यक शिक्षक किरण गायकवाड एनसीसी कॅडेट्सला प्रोत्साहनपर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी मुलांना खाद्य पदार्थांचे वितरण करण्यात आले. परिसरातील नागरिक आणि बेरार एज्युकेशन सोसायटी पातूर व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत, सचिव स्नेह प्रभादेवी गहिलोत, प्राचार्य अंशुमान सिंह गहिलोत, उपप्राचार्य एस बी चव्हाण, उप मुख्याध्यापिका आर. एस. ढेंगे, पर्यवेक्षिका पी एम कारस्कर, पर्यवेक्षक एस आर मुखाडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे. एनसीसी कॅडेटला एनसीसी ऑफिसर सुभाष इंगळे व शिक्षक किरण गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
साहित्याचे अनेक प्रकार आहेत. त्यातील कविता प्रकार म्हणजे मुक्या मनातील संवेदना प्रगट करणारे एक सशक्त माध्यम असून, मनातील विचारांना सजीव करणारी ती एक कलाकृती आहे. अतिशय प्राचीन काळापासून ही साहित्यकला अस्तित्वात असून, अनेक महान ग्रंथ व वैचारिक साहित्य तयार करण्यात तिने मोलाचा हातभार लावलेला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रख्यात कवी तथा मराठी रंगभूमी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रा. फ. मु. शिंदे यांनी केले. मराठा सेवा संघातर्फे आयोजित वधू-वर कक्षाचे उद्घाटन तथा गप्पा टप्पा’ या खुमासदार कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रम मराठा सेवा संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हास्य कवी अॅड. अनंतराव खेळकर होते. प्रमुख अतिथी म्हणून किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे, दिलीप सिंग गोसल, प्रख्यात हास्य कवी घनश्याम अग्रवाल उपस्थित होते. तसेच मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. रणजीत कोरडे, माजी अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे, अशोक पटोकार, मनपाचे माजी सभापती डॉ. किशोर मालोकार, पाटील समाजाचे सचिव प्रदीप खाडे, वधू वर कक्षाचे संयोजक रामेश्वर सपकाळ, अप्रतिम जोडीच्या संयोजीका अर्चना पाटील, लीला शिंदे प्रामुख्याने उपस्थित होत्या. प्रारंभी अतिथींच्या हस्ते राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास प्राचार्य सुभाष भडांगे, प्रभुजितसिंग बछेर, अविनाश पाटील, बी.एस. देशमुख, प्रा. मधु जाधव, देवराव हागे पाटील, पंकज साबळे, पंकज जायले, सौरभ भगत, दादाराव पाथरीकर, किसान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिवाकर गावंडे, प्रशांत जानोरकर, कवी नितीन वरणकार, प्रवक्ते प्रदीप चोरे, बाबासाहेब गावंडे, योग गुरु मनोहर इंगळे, गजानन हरणे, प्रा. नितीन ओक, विद्या ओक, पंजाबराव वर, विठ्ठलराव गाढे पाटील आदी उपस्थित होते. आभार रामेश्वर सपकाळ यांनी मानले. फ. मु. शिंदे यांनी आपली प्रख्यात कविता आई’ तसेच त्यांच्या गाजलेल्या काव्यसंग्रहातील काही निवडक कविता सादर केल्यात. त्यांच्या कविता सादरीकरणानंतर गप्पा टप्पा’ कार्यक्रमात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप खाडे यांनी केले. त्यांनी काही दिलखुलास सामाजिक, साहित्यिक व राजकीय प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांची त्यांनी अतिशय खुमासदारपणे उत्तरे दिलीत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, अकोला महापालिकेच्या प्रभाग रचनेत कुठल्याही प्रकारचा बदल झाला नसताना शहरातील प्रभाग क्रमांक १६, १८, ७, १, ११ आणि २ मधून प्रत्येकी सुमारे २ ते ३ हजार एका विशिष्ट समुदायाच्याच मतदारांचे स्थलांतर करण्यात आले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार साजीद खान पठाण यांनी केला आहे. हा मुस्लिम मतदारांवर जाणीवपूर्वक केलेला अन्याय आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे करत, तातडीने प्रभागातील मतदारांची नावे पूर्ववत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सोमवारी मनपा आयुक्तांना दिलेल्या तक्रारवजा निवेदनात करण्यात आला आहे. आमदार पठाण यांनी केलेल्या आरोपानुसार, प्रभाग क्रमांक ७ मध्ये तब्बल ४,८८० मुस्लिम मतदारांना एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात हलवण्यात आले आहेत, तर इतर समाजाच्या मतदारांना मात्र कोणताही ‘स्पर्श' करण्यात आलेला नाही. हे स्थलांतर जाणीवपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे. त्यामुळे हा मुस्लिम समाजावर केलेला अन्याय आहे, असा दावा त्यांनी केला. ही चूक केवळ अकोल्यापुरती मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रात अशा घटना घडल्याचे आयुक्तांनी मान्य केल्याचेही पठाण यांनी सांगितले. अन्यथा ‘मतदान होणार की नाही हे जनता ठरवेल' प्रभागात मतदारांची चुकीची नोंद करून लोकशाही कमकुवत केली जात आहे. मनपा प्रशासनाने ही चूक तत्काळ दुरुस्त करावी, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून ‘माझं मत चोरी झालं' असा आवाज उठवतील, अशी चेतावणी आमदारांनी दिली आहे. आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाने तोडगा न काढल्यास, ‘मतदान होणार की नाही हे जनता ठरवेल', असा स्पष्ट इशारा आमदार साजिद खान पठाण यांनी दिला.
मागील दोन महिन्यांपासून तिवसा तालुक्यातील शिवणगाव येथे भूकंपसदृश्य धक्के जाणवत आहेत. दरम्यान शनिवार व रविवारी मध्यरात्री तर सलग धक्के जाणवले. यातही रविवारी रात्री ११ वाजून १९ मिनिटांनी आतापर्यंतचा सर्वाधिक तीव्रतेचा धक्का जाणवल्यामुळे गावकरी चांगलेच धास्तावले आहेत. रविवारची रात्री अनेक गावकऱ्यांनी जागून काढली. रविवारी मध्यरात्री गावामध्ये तहसीलदारांसह शासकीय यंत्रणा पोहचली होती. तसेच सोमवारी खासदार, आमदारांनी गाव गाठून परिस्थिती जाणून घेतली. शिवणगाव हे सुमारे पाच हजार लोकसंख्येचे नागपूर महामार्गावर गाव आहे. या गावात सुमारे दीड महिन्यांपूर्वी पहिल्यांदा असे सौम्य धक्के जाणवले होते. त्यानंतर आपोआप सामान्य होते. ऑक्टोंबर महिन्यात असेच धक्के जाणवल्यानंतर ‘जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडीआ’ला सुद्धा याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळवण्यात आले होते. त्यामुळे ‘जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया’च्या तज्ज्ञांनी गावात पाहणी केली मात्र महीना उलटला तरी त्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला नाही. दरम्यान शनिवार ते रविवार या रात्रभरात तीनवेळा तसेच रविवारी रात्री ११.१९ वाजता जोरदार धक्के जाणवले, त्यामुळे ग्रामस्थ धास्तावलेले आहेत. दरम्यान घटनेची माहिती मिळताच खासदार बळवंत वानखडे, आमदार राजेश वानखडे, तहसीलदार डॉ. मयूर कळसे, गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे, संजय देशमुख यांनी गावात भेट दिली. शिवणगावात लवकरच भूकंपमापक यंत्र बसवणार ^गावकऱ्यांकडून माहिती प्राप्त होताच रविवारी मध्यरात्री ३ वाजता गावात पोहचलो. दरम्यान सोमवारी याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांचे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या तज्ज्ञांसोबत चर्चा झाली. पाऊस जास्त झाल्यामुळे पाणीपातळी खाली, वर होवू शकते, त्यामुळे असे धक्के जाणवू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खाणीमुळे धक्के बसणे शक्य नाही. गावात भूकंपमापक यंत्र बसवण्यात येणार आहे.- डॉ. मयूर कळसे, तहसीलदार तिवसा.
गेल्या महिनाभरात तब्बल चार वेळा मुदतवाढ मिळालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या मतदार यादीला आणखी एकदा मुदतवाढ देण्यात आली असून आता ही यादी आगामी गुरुवार, २७ नोव्हेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. या नव्या घडामोडीमुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव सु.तु. आरोलकर यांच्या स्वाक्षरीनिशी आज, सोमवारी दुपारी एक पत्र पाठविण्यात आले. त्यामध्ये ही मुदतवाढ देण्यात आली आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या ५९ आणि पंचायत समित्यांच्या ११८ मतदारसंघातील नेमके मतदार किती, याचा उलगडाही आजही होऊ शकला नाही. निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार गेल्या महिन्यातच ही यादी घोषित केली जाणार होती. परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे या घोषणेला मुदतवाढ देण्यात आली. आजच्या मुदतवाढीनुसार आता ही यादी आगामी २७ नोव्हेंबरला घोषित केली जाणार असल्याचे निवडणूक यंत्रणेने स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची मतदान केंद्रनिहाय यादी तयार करण्यासाठी बुथनिहाय मस्टरची माहिती तसेच मतदान केंद्रनिहाय चार्ट अपलोड करावे लागतात. दरम्यान बुथनिहाय मतदार यादी प्रोसेसची प्रक्रिया पूर्ण होत नसून प्रिंट घेण्यातही अडचणी येत असल्याचे काही जिल्हाधिकारी कार्यालयांकडून कळवण्यात आले आहे. त्यामुळे मतदार यादीच्या प्रकाशनाला मुदतवाढ देण्यात आल्याचे आयोगाच्या पत्रात म्हटले आहे. १४ पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच अमरावती जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय पक्ष व समाजकारणात अग्रेसर असलेल्या नागरिकांनी तयारी केली आहे. परंतु आजही अखेर त्यांचा हिरमोड झाला.
राज्यस्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा २०२५ बारामती, जि. पुणे येथे सुरू आहे. या स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करताना बडनेरा येथील राजेश्वर युनियन हायस्कूलचा दीप संतोष निमगडे या विद्यार्थी खेळाडूने १४ वर्षांखालील मुलांच्या गटात चपळ व अप्रतिम खेळ करून सुवर्णपदक पटकावले. परिणामी या अमरावतीकर कराटेपटूची इंदूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाली आहे. राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेत दीप महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. दीपने जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम स्थान मिळवले. त्यानंतर त्याने विभागीय स्पर्धेतही अप्रतिम कामगिरी करून पाचही जिल्ह्यातील प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. अंतिम फेरीत देखणी कामगिरी करून प्रथम क्रमांकावर ताबा मिळवला. त्यामुळे दीपची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. राज्यस्तरीय स्पर्धेतही त्याने राज्यभरातील प्रतिस्पर्धी विद्यार्थी खेळाडूंना नमवून राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारली. कराटे हा ऑलिम्पिक दर्जाचा खेळ असून या खेळात अमरावतीच्या खेळाडूने राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणे ही ऐतिहासिक कामगिरी आहे. या कामगिरीमुळे दीपकडून मोठ्या अपेक्षा करता येतील. दीपने मेहनत व चिकाटीच्या जोरावर प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्याचे प्रभारी क्रीडा उपसंचालक व जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने, त्याच्या प्रशिक्षकांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देत त्याचे अभिनंदन केले आहे.
पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल वाढते. तसेच आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या पीक स्पर्धेत विभागातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. वंचित, दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पीक स्पर्धांमध्ये सहभागी होतील, या दृष्टीकोनातून रब्बी हंगाम २०२३ पासून तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर पीक स्पर्धा योजना राबवण्यात येत आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम २०२५ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रब्बी पीक अंतर्गत ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा एकूण पाच पिके स्पर्धेत असतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पीक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थींच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे, याप्रमाणे पात्रतेचे निकष राहतील. विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक,पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील. रब्बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. अर्ज दाखल करण्याच्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी. शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. पीक स्पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी शेतकरी बंधू-भगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच कृषी विभागाच्या www.krishi.maharasht ra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन केले आहे. प्रथम येणाऱ्यांना १० हजार रुपयांचे बक्षीस विजेत्या शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकालानुसार प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धेत विजेता ठरलेल्या शेतकऱ्यांना सर्वसाधारण व आदिवासी गटात तालुका पातळीवर पहिले, दुसरे व तिसरे अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये बक्षीस दिले जाईल. जिल्हा पातळीवर पहिले १० हजार, दुसरे ७ हजार, तिसरे ५ हजार रुपयांचे बक्षीस दिल्या जाणार. तसेच राज्यपातळीवर पहिले ५० हजार, दुसरे ४० हजार व तिसरे बक्षीस ३० हजार रुपयांचे दिले जाणार.
सोमवारी सकाळची ८ वाजेची वेळ. करकंबच्या सोमवार पेठेत व्यापारी व ग्रामस्थांची गर्दी. नेहमी टिळक चौकात भरणारा आठवडी बाजार आज सोमवारपेठेत भरतोय, हे पाहून तेथील व्यापाऱ्यांना आनंद झाला. जवळपास २३ वर्षांनी पूर्वीच्या ठिकाणी आलेला बाजार पहाण्यासाठी प्रत्येकजण थांबून चौकशी करत होता. परगावहून येणारे व्यापारी व ग्राहकांना करकंबच्या उपसरपंच ज्योती शिंगटे यांचे पती विवेक शिंगटे हे प्रत्येकाला व्यवस्थित जागा उपलब्ध करून देत होते. निमित्त होते श्री खंडोबा यात्रेचे. अनेक वर्षांपासून खंडोबाचे भक्त शिवाजी भगत व भक्तगण मागणी करीत होते. त्यांच्या मागणीनुसार दोन बाजार सोमवारपेठेत भरणार असल्याचे सांगण्यात आले. आतार चौक ते काळा मारुती आणि श्रीराम मंदिरापर्यंत भाजी विक्रेते, फळ विक्रेते, मेवा मिठाई व इतर दुकानांची चांगली व्यवस्था झाल्याचे दिसून आले. करकंब व्यापारी कमिटी व ग्रामपंचायतीच्या वतीने आलेल्या व्यापाऱ्यांचे गुलाबपुष्प देत स्वागत करण्यात आले. यावेळी व्यापारी कमिटीचे भारत जयकुमार शहा, विवेक शिंगटे, संतोष पवार, सचिन देवळे, श्रेणीक शहा, दुधाणे, बागवान आदी उपस्थित होते. अनेकांना येथे हवी तशी जागा मिळाली तर काही जणांनी जेथे जागा मिळेल तेथे आपला विक्री व्यवसाय मांडला. ग्रामपंचायतीकडे केली होती मागणी, लेखी विनंतीला मान ^आम्ही अनेक दिवसांपासून श्री खंडोबा यात्रेनिमित्त सोमवार पेठेत बाजार भरवण्याची मागणी करत होतो. ग्रामदैवत श्री कनकंबा माता यात्रेनिमित्त शुक्रवार पेठेत बाजार भरतो. त्याचप्रमाणे खंडोबा यात्रेनिमित्त या भागात बाजार भरवला जावा, अशी लेखी मागणी करकंब ग्रामपंचायतीला केली होती. त्यांनी त्यास परवानगी दिल्याने देवच पावला असे वाटले.- दत्तात्रय वसेकर व शिवाजी भगत, पुजारी सोमवार पेठेतून टिळक चौकात गेला होता, आता मागणी पूर्ण ^पूर्वी या ठिकाणीच सोमवारचा आठवडी बाजार भरत होता. परंतु जागेची कमतरता व राजकीय चढाओढीमुळे हा बाजार सोमवार पेठेतून टिळक चौकात गेला. आता जवळपास २२-२३ वर्षांनी हा बाजार श्री खंडोबा यात्रेनिमित्त तेथील भक्तांनी मागणी केल्याने ग्रामपंचायतीने इकडे बाजार भरवण्याचा निर्णय घेतला. पुढील सोमवारी एक बाजार येथेच भरणार. नंतर नेहमीप्रमाणे टिळक चौकात आठवडी बाजार भरवला जाईल.- ज्योती विवेक शिंगटे, उपसरपंच, करकंब.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा बँकेचे राजकारण नेहमीच माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच मंत्री राधाकृष्ण विखे केंद्रीत राहिले आहे. निवडणूक कोणतीही असली तरी या दोन्ही गटांच्या खेळ्यांकडे राजकीय धुरंधरांचे लक्ष असते. बँकेच्या संचालक मंडळाची अध्यक्ष निवड सभा, बँकेच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सभागृहात सोमवारी झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे होते. अध्यक्षपदाच्या नावाची सूचना बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांनी मांडली तर अनुमोदन संचालक प्रशांत गायकवाड यांनी दिले. चंद्रशेखर घुले पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची रितसर निवड झाल्याची घोषणा सभेचे अध्यक्ष मंगेश सुरवसे यांनी केली. नूतन अध्यक्ष घुले यांचा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. बँकेच्या संचालक मंडळाच्यावतीने बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे यांनी घुले पाटलांचा सत्कार व स्वागत केले. मंत्री विखे म्हणाले, श्रेष्ठींच्या सल्याने व सहकार्याने बँकेच्या चेअरमनपदी घुले पाटील यांची निवड झाली. बँक नेहमीच शेतकरी व सहकारी साखर कारखान्यांचे प्रश्न सोडवण्यात अग्रेसर असते. नुतन अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या अनुभवाचा फायदा उर्वरित पान ४ असे जुळले घुलेंचे समीकरण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर, माजी आमदार चंद्रशेखर घुले हे दादांच्या राष्ट्रवादीत सहभागी झाले. पर्यायाने महायुतीबरोबर गेले. त्यातच सोमवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले होते. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी थोरातांशी संपर्क केल्याची चर्चा आहे. दरम्यान, निवडणूक बिनविरोध करण्यात थोरातांनीही सहकार्य केल्याबद्दल विखेंनी आभार मानले.
मी मुख्यमंत्री असेपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाहीत- देवेंद्र फडणवीस
सगळ्या योजना बंद होणार, लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार पण त्यांच्या नाकावर टिच्चून एक वर्ष झालं तरीदेखील लाडक्या बहिणींचे पैसे सुरूच आहे आणि बहिणींना जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तुमचे पैसे कोणीच बंद करू शकत नाही, आम्ही घेतलेला निर्णय आजही सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नगरपालिकेतील भाजपच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, मी येथे कोणावरही टीका करण्यासाठी आलेलो नाही. कोपरगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित असावे, हीच आमची इच्छा आहे. त्यासाठी मूलभूत सोयीसुविधा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कचरा व्यवस्थापन, सांडपाण्याची योग्य व्यवस्था, उत्तम शिक्षण आणि आरोग्य सुविधा हे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडवायचे आहेत. येथील सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावले पाहिजे. आपल्या मनातल्या, स्वप्नातल्या कोपरगाव शहरातील विकासाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मतांच्या रूपाने आशीर्वाद देण्याची मागणी त्यांनी केली. सभेला पालकमंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री गिरीश महाजन, माजी आ. स्नेहलता कोल्हे, आ. विक्रम पाचपुते, संजीवनी समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, विवेक कोल्हे, ॲड.रवींद्र बोरावके, दिलीप दारुणकर, नगराध्यक्षपदाचे, नगरसेवकपदाचे उमेदवार उपस्थित होते. राजकारणात उतावीळपणा नको : पालकमंत्री विखे सभेत पालकमंत्री विखे यांनी कोल्हे यांचे नाव न घेता त्यांना व्यासपीठावरून सुनावले. ते म्हणाले, मला आका, बोका म्हटले जाते. पण राजकारणात उतावीळपणा चालत नाही. राजकीय वातावरण चांगले ठेवले पाहिजे. संयमाने यश मिळते. माझा स्वभाव शांत आहे. बोलताना संयमाने बोला. मी जर ठरवले तर काय करू शकते, हे सर्वांना माहिती आहे.'
आज प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रतिकारशक्ती वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.त्यासाठी नियमित व्यायाम व मैदानी खेळ खेळले पाहिजे. सध्या मोबाइलमुळे मुलांचे मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे मुलांनी अभ्यासबरोबर जास्तीत जास्त वेळ मैदानी खेळ खेळले पाहिजेत. शरीर स्वास्थ्य व एकाग्रतेसाठी मैदानी खेळ उत्तम पर्याय आहे. संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांना सहभागी केले जाते. विद्यार्थीही उत्कृष्ट प्रदर्शन करत जिल्हा व विभागीय, राज्य पातळीवर यशस्वी होत आहेत, याचा संस्थेला अभिमान आहे, असे प्रतिपादन शिशु संगोपन संस्थेचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा यांनी केले. संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या वार्षिक क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन गुंदेचा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सचिव र.धों.कासवा, सहसचिव राजेश झालानी, अॅड.विजय मुनोत, विनोद कटारिया,मुख्याध्यापि का योगिता गांधी आदी उपस्थित होते. राजेश झालानी म्हणाले, विद्यार्थ्यांना अभ्यासबरोबरच मैदानी खेळासाठी नेहमीच प्रोत्साहित केले जाते. मैदानी खेळाने शारीरिक क्षमतेबरोबरच बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना प्रोत्साहन देऊन ते विकसित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. खजिनदार अॅड. मुनोत म्हणाले, विद्यांर्थ्यानी फक्त स्पर्धेपुरते मैदानावर न राहता कायम स्वरूपी मैदानी खेळ खेळले पाहिजेत. त्यामुळे विद्यार्थी हा चांगला खेळाडू म्हणून घडू शकतो. सहकार क्रीडा मंडळाने या स्पर्धा घेण्यासाठी शाळेसाठी हे मैदान उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत पटविण्यात आली. विद्यार्थ्यांनी परेड सादर केली. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच क्रीडा महोत्सवाचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा गोरे यांनी तर आभार जयश्री कोदे यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. शाळेतील व्यवस्थापनाने या स्पर्धांचे नियोजन केले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत. मैदानी खेळांमुळे बौद्धक क्षमतेतही वाढ मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत असल्याने मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मैदानी खेळ खेळल्याने शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते. शरीराचे स्वास्थ्यही चांगले राहते. त्यामुळे अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी मैदाने खेळ खेळले पाहिजेत. याचा आणखी एक फायदा म्हणजे शारीरीक क्षमतेबरोबरच बौद्धिक क्षमता वाढण्यासही यामुळे मदत होत असल्याचे उपस्थितांनी यावेळी स्पष्ट केले.
गॉडविन कप २०२५ या प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेला भुईकोट किल्ला येथील मैदानावर रविवारपासून सुरुवात झाली. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. गॉडविन डिक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन व आकाशात फुगे सोडून या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष खालिद सय्यद, सचिव रोनाप फर्नांडिस, प्रदीप जाधव, सदस्य व्हिक्टर जोसेफ, पल्लवी सैंदाणे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात बाटा एफसी संघाने फिरोदिया संघाचा पराभव केला. यंदा जिल्ह्यातील एकूण १२ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून एक आठवडाभर फुटबॉलचे सामने रंगणार आहेत. जिल्ह्यातील अनेक उद्योन्मुख खेळाडूंना ही स्पर्धा आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. रविवारी पहिला सामना राठोड एफसी विरुद्ध डॉन बॉस्को एफसी यांच्यात झाला. फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी या स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. पहिल्या उद्घाटनच्या सामन्यात एनएफसीने युनिटी एफसीला ३-२ (टायब्रेकर) ने पराभूत करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला. तर दुसरा सामना बाटा एफसी विरुद्ध फिरोदिया एफसी (ब) यांच्यात अटातटीचा रंगला होता. शेवटपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही, टायब्रेकरने बाटा एफसी संघ विजेता ठरला. यंदा या स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले आहेत. एक आठवडाभर सामने होणार आहेत. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नवोदित खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून या फुटबॉलपटूंना आपले कौशल्य सिद्ध करण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी सांगितले. या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंना एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी या स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेत नवोदित फुटबॉलपटूंना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेतून अनेक गोष्टी, सामन्यातील बारकावे त्यांना शिकता येतील. या स्पर्धेतून मिळालेला अनुभव त्यांना भविष्यात नक्कीच मदतीला येईल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी अभिषेक सोनवणे, राजेश अँथनी, श्रेया सागडे, सचिन पठारे, ज्येष्ठ खेळाडू मयूर गोरखा आदी उपस्थित होते. स्पर्धेत उदयोन्मुख खेळाडूंचा सहभाग यंदा जिल्ह्यातील एकूण १२ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून एक आठवडाभर फुटबॉलचे सामने रंगणार आहेत. जिल्ह्यातील अनेक उद्योन्मुख खेळाडूंना ही स्पर्धा आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानामुळे संगमनेर तालुक्यातील डोंगरराई नव्या हिरवाईने नटू लागली आहे. पर्यावरण जपण्याची संस्कृती समाजात रुजत असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सायखिंडी येथे जयहिंद लोकचळवळ, अमृत उद्योग समूह आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दंडकारण्य अभियानाच्या २० व्या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. विद्यार्थ्यांकडून पाच एकरांत ५७० रोपांची लागवड आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी ४००आंबा आणि १७० चिकू रोपांची लागवड करून परिसर अधिक हिरवागार करण्याचा संकल्प केला. गायक विनोद राऊत यांच्या नेतृत्वाखाली २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी पर्यावरणगीतांद्वारे जनजागृती केली. ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट’ संस्थेने ५० एकर क्षेत्रासाठी ड्रिप, रोप, खते व पाईपलाइनसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. माजी मंत्री थोरात म्हणाले, पिंपळगाव कोझीरा, हरमन हिल, मोरया डोंगर, देवगड, खांडगाव आदी डोंगरपट्ट्यांतील वृक्षारोपणामुळे हे भाग आकर्षक पर्यटनस्थळांमध्ये रूपांतरित होत आहेत. पावसाळ्याचे प्रमाण सुधारण्यासाठी व्यापक वृक्षसंवर्धन हाच एक विश्वासार्ह मार्ग आहे. कृषी महाविद्यालयातील आधुनिक इमारती, प्रयोगशाळा, क्रीडांगणे आणि ९ ते १३ जानेवारीदरम्यान होणाऱ्या भव्य कृषी प्रदर्शनाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक दशरथ वर्पे यांनी, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी, तर आभार मोहनराव करंजकर यांनी मानले. कृषी महाविद्यालयात रेशीम उद्योग व ट्यूलिप गार्डन कृषी महाविद्यालयात रेशीम उद्योग सुरू करण्यात आला आहे. २०० शेतकऱ्यांनी तुती लागवड केली आहे. काश्मीरच्या धर्तीवर ट्यूलिप गार्डन उभारण्याचे काम सुरू असून हा परिसर नव्या पर्यटन आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. संगमनेरातील सहकारी व शिक्षण संस्था राज्यात आदर्शवत कार्य करत असून दंडकारण्य अभियानाने सह्याद्री ते सातपुडा पर्वतरांगांपर्यंत व्याप्ती वाढवली आहे. सप्तशृंगी डोंगरावर ५५ एकर आणि तालुक्यातील ३१ डोंगरांवर वृक्षसंवर्धन सुरू असल्याची माहिती आमदार डॉ. तांबे यांनी दिली.
डॉ. बाळासाहेब विखे पाटील स्कूल येथे ‘गोविंदगाथा’ या विषयावर आधारित सुमारे दीड तासांचे महानाट्य सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनय, सुसंस्कृत नृत्यरचना, भावपूर्ण संवाद आणि नेत्रदीपक दृश्यांमुळे संपूर्ण कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. कृष्णचरित्रातील निवडक प्रसंगांना विद्यार्थ्यांनी दिलेली प्रभावी अभिव्यक्ती पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. प्रत्येक सादरीकरण इतके परिणामकारक होते की पालकांनी मुलांचे कौतुक केले. राहाता पंचक्रोशीत प्रथमच महानाट्य सादर करण्याचे धाडस एका शाळेने केले आणि हा उपक्रम यशस्वी ठरला. कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे डॉ. वी. एन. मगारे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. अध्यक्षस्थानी शालीनी विखे या होत्या. स्पेशल ऑलिम्पिक्स भारतच्या अध्यक्ष व शाळेच्या संचालिका धनश्री विखे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाला कॅम्पस संचालक प्रदीप दिघे, उपप्राचार्य संजय लहारे, आयटीआयचे प्राचार्य कसबे, ब्रिलियंट बर्ड स्कूलच्या प्राचार्या दीपाली कुऱ्हे उपस्थित होते. प्राचार्य किशोर निर्मळ म्हणाले, विद्यार्थ्यांनी सादर केलेली ‘गोविंदगाथा’ ही केवळ एक कलाकृती नाही, तर त्यांच्या श्रमांची आणि सृजनशीलतेची झलक आहे. त्यांच्या तयारीतील निष्ठा, मंचावरचा आत्मविश्वास आणि सादरीकरणातील भावस्पर्शी अभिव्यक्ती पाहून आम्हाला अभिमान वाटतो. अशा उपक्रमांमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो व मूल्यनिष्ठ प्रवृत्ती अधिक दृढ होते. महानाट्याचे नृत्यदिग्दर्शन रूपेश सर व राकेश सर यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. त्यांच्या अभिनव नृत्यरचनेमुळे प्रत्येक दृश्य अधिक उठावदार झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थिनी भूमी शाह रितिका लोखंडे वेदिका निमसे शरयू देशमुख तन्वी निर्मळ सबुरी डोळस काव्य बावके सई पोकळे स्वरा सातपुते आरोही भुसाळ यांनी स्पष्ट व प्रभावी पद्धतीने करत संपूर्ण कार्यक्रम अधिक सुसूत्र बनवला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री विजय गाढवे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या नजरेसमोर राष्ट्र -हृदयात महाराष्ट्र या राज्यव्यापी विशेष प्रकल्पासाठी अ. र. भा. गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी येथील करिअर संसद मुख्यमंत्री भूमिका मंगेश जोशी हिची निवड झाली आहे. राज्यभरातून निवडण्यात येणाऱ्या केवळ ११ विद्यार्थ्यांमध्ये भूमिका निवडली जाणे ही अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे. या प्रकल्पांतर्गत दिल्लीमध्ये कार्यरत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी भूमिकाला सोपवण्यात आली आहे. तिचे नेतृत्वगुण, वक्तृत्वकौशल्य आणि प्रभावी संवादक्षमता यांचा योग्य गौरव म्हणून ही निवड पाहिली जात आहे. या दिल्ली दौऱ्याचे आयोजन समन्वयक डॉ. योगिता चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून, त्या भूमिकेला संपूर्ण प्रकल्प काळात दिशादर्शन करणार आहेत. भूमिकाच्या या उल्लेखनीय निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संजय भोळे यांनीही अभिनंदन केले. या कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सागरमलजी जैन दीपक गरुड तसेच सर्व संचालक मंडळाने भूमिकाचे आणि महाविद्यालयाचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
ओझरला उद्या बारागाड्या ओढणार:खंडेराव महाराजांच्या चांदीच्या मुकुटाची पालखी मिरवणूक निघणार गुरुवारी
येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवाला बुधवारी (दि. २६) प्रारंभ होत आहे. जेजुरी गड देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडकर व त्यांच्या पत्नी मनीषा खेडकर, प्रतिजेजुरी पाचोरे येथील योगेश महाराज गवारे आणि ओझर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या हस्ते अभिषेक करून यात्रेचा प्रारंभ होईल. पहिल्या दिवसाचे आकर्षण म्हणजे अश्व बारागाड्या ओढतो. पंचक्रोशीतील बारा वाड्यांतील बारागाड्या असतात. त्यामध्ये देवाचा गाडा प्रथम असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी हजेऱ्या होतात. दुपारी कुस्त्यांची विराट दंगल होईल. तसेच खंडेराव महाराजांच्या चांदीच्या मुकुटाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येते. पंचक्रोशीतील बारा वाड्यांतील बारागाड्या असतात. यात्रेच्या पहिल्या दिवशी बारागाड्या कार्यक्रमात असतात. मानाचा मोंढा गाडा शेजवळवाडी, भडके वस्ती, पगार-गवळी, वरचा माळी वाडा, मधला माळी वाडा, क्षत्रिय मराठा समाज, समस्त कदम , मराठा समाज, शिंदे-चौधरी वस्ती, सावतानगर, सायखेडारोड, अण्णासाहेब भडके वस्ती आदी वाड्यांतील गाड्यांचा यात समावेश असतो. हा थरार अनुभवण्यासाठी त्यावेळी भाविकांची मोठी गर्दी होते. खंडेराव महाराजांचा जयघोष व गाण्यांच्या तालावर हा उत्सव रंगतो.
वडिलांसोबत जाणारी 2 चिमुकली मुले ठार:कुटुंबासह गेली होती मावशीच्या लग्नाला
मावशीच्या लग्नानंतर वडिलांसोबत गावाकडे जाणाऱ्या दोन चिमुकल्यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. ही दुर्दैवाची घटना गंगापूर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर सोमवारी (दि. २४) दुपारी घडली. विराट (५) व खुशी (३) अशी मृत चिमुकल्यांची नावे असून प्रदीप जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. प्राप्त माहिती अशी की, महालगाव येथे पत्नीच्या बहिणीचे लग्न असल्याने शेकटा (ता. पैठण) येथील प्रदीप रमेश जाधव (३५) हे कुटुंबासह गेले होते. लग्न झाल्यामुळे प्रदीप दुचाकीने (एमएच १६ एझेड ७७६५) सोमवारी दुपारी आपल्या शेकटा येथील मूळ गावी जात होते. गंगापूरपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल विराजसमोर दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास आयशर टेम्पो (एमएच २५ एजे ७४०२) व दुचाकीत जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये त्यांची मुले विराट आणि खुशी ही जागीच ठार झाली तर प्रदीप जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत लहान मुले आपल्या मावशीच्या लग्नासाठी तीन दिवसांपूर्वी महालगावला गेली होती. सोमवारी मुले आजी-आजोबाबरोबर चारचाकी वाहनाने आपल्या गावाकडे येणार होती. परंतु, ती लहान मुले दुकानात गेल्याने आजीबरोबर आली नव्हती. आई माहेरी थांबली होती
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नागद शाखेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे पैसे खात्यावर जमा झाल्याने शेतकरी सकाळी लवकरच बँकेबाहेर रांगा लावतात, पण दोनच कर्मचाऱ्यांवर बॅँकेची सगळी जबाबदारी असल्याने शेतकऱ्यांना तासन््तास बॅँकेत थांबावे लागत आहे. राष्ट्रीयीकृत बँकेपेक्षा नागद शाखेत अधिक खातेदार आहेत. त्यामुळे रोजच बँकेत गर्दी असते. अनुदान, पगारी, ठेवी, कर्ज व्यवहार यासाठी गोरगरीब वर्ग बँकेवर अवलंबून आहे. शेतकरी म्हणाले, सकाळी लवकर आलो तरी काम वेळेवर होत नाही. बँकेत फक्त दोनच कर्मचारी आहेत. त्यामुळे कामकाजात विलंब होतो. शाखाधिकारी संजय सोनवणे आणि कॅशियर पी.एस. पाटील यांनी सांगितले की, आम्ही दोघेच बँक चालवत आहोत. रोजची कामे मोठ्या प्रमाणावर असतात. उशिरा का होईना, सर्वांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मात्र ग्राहक समाधानी नाहीत. बँकेला तत्काळ अतिरिक्त कर्मचाऱ्यांची गरज आहे. कर्मचारी वाढले तर वेळेत सेवा देता येईल, असे सोनवणे आणि पाटील यांनी सांगितले. शेतकरी नाना पाटील म्हणाले, कै. सुरेश पाटील ४५ वर्षे बँकेचे अध्यक्ष होते. त्यांच्या काळात असा त्रास झाला नाही. त्यांना शेतकऱ्यांची जाण होती. त्या वेळी बँकेत विलंब होत नसे.
गावकऱ्यांची इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसते. याचे उत्तम उदाहरण गंगापूर तालुक्यातील सावंगी गावातील नागरिकांनी दिले आहे. गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून तब्बल दोन कोटींचे भव्य भैरवनाथ बाबांचे मंदिर बांधले आहे. येत्या २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पंचक्रोशीतील हजारो भाविकांच्या उपस्थितीत भैरवनाथांच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर विधिवत प्राणप्रतिष्ठा कलशारोहण सोहळ्याचे गावकऱ्यांनी आयोजन केले आहे. विशेष म्हणजे गंगापूर तालुक्यातील भाविकांच्या नवसाला पावणारे प्रसिद्ध जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री भैरवनाथ बाबांचे सावंगी येथे सुमारे शंभर वर्षांहून अधिक जुन्या मंदिराचा नुकताच गावकऱ्यांकडून जीर्णोद्धार करण्यात आला. शुक्रवारी दि.२१ रोजी श्रीक्षेत्र देवगड आश्रमाचे स्वामी नंदगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली जुनी श्री भैरवनाथ मूर्ती उत्थापन मुहूर्तानुसार विधिवत कार्यक्रम झाले. नंतर सायंकाळी ७ ते ९ दरम्यान कीर्तन व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. भैरवनाथांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नोव्हेंबर अखेर तीन दिवस विविध धार्मिक विधिवत कार्यक्रम आणि कीर्तनसेवा पार पडणार आहे. येथील प्रसिद्ध भैरवनाथ बाबांचे मंदिर नवसाला पावतात, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने यात्रेच्या दिवशी पंचक्रोशीतील लाखो भाविक सावंगीला येऊन रोडग्यांचा नैवेद्य नवसापोटी करतात. सावंगी गावातील भैरवनाथ देवस्थान हे एक जागृत देवस्थान असुन येथे साप, विंचूू चावलेला माणूस बरा होतो, अशी मान्यता आहे. मंदिराचा इतिहास बघितला तर एक शतकापूर्वी साधारणत: १९१३-१४ च्या दशकात त्या वेळचे विश्वस्त पांडुरंग भावडूनाथ इंगळे यांनी मंदिराची स्थापना केलेली आहे. हे देवस्थान सोनारी (ता.परांडा, जी.उस्मानाबाद) येथील असून गावातील काही सहकारी पंढरपूर दर्शनासाठी जात असताना त्यांनी रस्त्यात असलेल्या सोनारीत भैरवनाथांचे दर्शन घेतले, तेव्हापासून त्यांना गावामध्ये भैरवनाथांचे मंदिर असावे, असे वाटू लागले. याच कल्पनेतून त्यांनी आपल्या शेताच्या कोपऱ्यावर मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत येथे अखंडितपणे यात्रा उत्सव चालू आहे. मंदिर बांधकामासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन एक नीती ठरवून प्रत्येक घरातील एका जोडप्याला ५१०० रुपये प्रमाणे देणगी ठरवण्यात आली. यापेक्षा कितीतरी पटीने जास्त देणगी देऊन अनेकांनी आपली श्रद्धा टिकवली. याव्यतिरिक्त भैरवनाथ बाबांच्या पंचक्रोशीतील भक्तांनी देखील गावागावात पावती बुकव्दारे देणगी देऊ केली आहे. आम्ही मंदिराच्या कामासाठी लकी ड्रॉ योजना काढून त्यामध्ये देखील ३९ लाख रुपयांची मदत झाली, अशी माहिती मंदिर बांधकाम समितीचे उपाध्यक्ष संजय पांडव यांनी दिली. दरम्यान, सावंगी येथील विविध गावांमध्ये लग्नानंतर गेलेल्या लेकीबाळीकडून देखील भैरवनाथ बाबांच्या मंदिरावरील कलशारोहणासाठी देणगी देण्यास येथील लेकीबाळीसुद्धा पुढे सरसावल्या. त्यांनी तीन लाखांपर्यंत देणगी जमा केली आहे ३ दिवस असे होतील कार्यक्रम दि.२८ रोजी भव्य मूर्ती व कलश मिरवणूक , गणपती पूजन व इतर धार्मिक कार्यक्रम , रात्री भागवताचार्य ह.भ.प. संदीप महाराज खंडागळे श्रीक्षेत्र पैठण यांचे कीर्तन होईल. दि.२९ रोजी स्थापित देवता पूजन, हवन व इतर कार्यक्रमानंतर रात्री धर्माचार्य ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे तुर्काबाद खराडी यांचे कीर्तन होईल. दि.३० रोजी सकाळी ह.भ.प. अभयानंदगिरीजी महाराजांच्या हस्ते स्थापित देवता पूजन.श्री भैरवनाथ मूर्ती स्थापना, कलश स्थापन, त्यानंतर सकाळी १० ते १२ ह.भ.प.महाराज सपूर यांचे हरिकीर्तन होईल नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरातील चार ते पाच गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या केळगाव मध्यम प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीला (पाळूला) वेड्या बाभळींसह काटेरी झाडाझुडपांनी वेढा घातला असून प्रकल्पाची संरचना धोकादायक बनली आहे. या संदर्भात स्थानिक जागरूक नागरिकांनी सिंचन विभागाला वारंवार माहिती दिली असतानाही विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने झुडपांची वाढ प्रचंड प्रमाणात झाली आहे. यंदा परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने केळणा नदीला चांगला पाऊस झाला आहे. यामुळे प्रकल्पात सध्या पाणीसाठा आहे. त्यामुळे संरक्षण भिंतीवर आधीपासून लक्ष देणे आवश्यक होते, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. झुडपे आणि मोठ्या झाडांच्या मुळ्या संरक्षण भिंतीत खोलवर गेल्याने पाळू कमकुवत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी भिंतीतून पाणी झिरपत असल्याचीही माहिती समोर आली आहे. भूतकाळात पाळूवरील झाडांची कापणी केली असली, तरी मुळांपासून पुन्हा पालवी फुटल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. प्रकल्पालगतच वस्ती असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी पाळूवरील झाडे मुळासकट काढून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली असून विभागाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा प्रकल्पासह परिसरातील अनेक गावांना धोक्याची संभावना आहे, अशी भीती वर्तवली जात आहे. केळगाव येथील धरणाच्या पाळूवर मोठ्या प्रमाणात वाढलेली झुडपे संरक्षण भिंत धोकादायक स्थितीत असल्याने जवळपासच्या परिसरातुन देखिल चिंता व्यक्त होत असुन यावर उपाययोजनाची मागणी होत आहे.
पैठणच्या ढोरकीन ते वडाळा रस्ता खड्ड्यांनी भरला:परिसरातील शेतकरी अन् नागरिक त्रस्त
पैठण तालुक्यातील ढोरकीन ते वडाळा मार्गावरील तीन किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खड्ड्यांनी भरला आहे. अतिवृष्टीमुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. या रस्त्यावरून शेतात जाणे, शेतमाल वाहून नेणे अशक्य झाले आहे. वाहनधारकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गणेशनगर ते ववा-वडाळा मार्गाचे काम अद्याप झालेले नाही. पाणंद रस्त्याची जबाबदारी संबंधित विभागाची होती. मात्र किरकोळही दुरुस्ती झाली नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना किंवा जिल्हा परिषद फंडातून हा रस्ता आधीच तयार व्हायला हवा होता. अनेकदा मागणी करूनही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या चार महिन्यांपासून रस्ता बंद आहे. ठिकठिकाणी गटार साचले आहेत. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. फुटलेला कापूस घरी आणताना शेतकऱ्यांना हाल सोसावे लागले. सोयाबीन, मका, बाजरी काढणीसाठी मळणीयंत्र शेतात न्यायलाही अडचणी येत आहेत. ऊस वाहतूकही अशक्य झाली आहे. ढोरकीन, ववा आणि वडाळा या तिन्ही गावांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र आजपर्यंत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. आमदार विलास भुमरे यांच्याकडे तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. पण अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. शेतकरी आणि ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा रस्ता तात्काळ दुरुस्त न झाल्यास उपोषण, धरणे आणि रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. शासन आणि प्रशासनाने शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूर जिल्ह्याची देशात ओळख. परंतु गेल्या काही वर्षांत या कोठाराला गळती लागल्याचे चित्र आहे. अलीकडील पाच वर्षात झालेल्या सिंचनाच्या सुविधांमुळे शाश्वत उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. त्यामुळे ज्वारीच्या पेरणीत मोठी घट होत आहे. मागील पाच वर्षांचा विचार केल्यास ज्वारीचे सरासरी पेरणी क्षेत्र तब्बल २ लाख हेक्टरने कमी झाले आहे. ३.१८ लाख हेक्टर ज्वारीचे सरासरी क्षेत्र आहे. यावर्षी मात्र केवळ १.२१ लाख हेक्टरवर पेरणी झाली. मागील वर्षीच्या तुलनेत ती तब्बल १ लाख ४६ हजार हेक्टरने कमी आहे. परिणामी, यावर्षी ज्वारीचे उत्पादन घटून पुन्हा दर वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, जिथे अन्य पिकांना पर्याय नाही, तिथेच कोरडवाहू क्षेत्रावर ज्वारीचे उत्पादन घेतले जात आहे. पण, मागील पाच वर्षात सोलापूर जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा विस्तारल्या आहेत. त्यामुळे ऊसासह केळी, पेरू, सिताफळ आणि आंबा लागवडीकडेही शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र कमी होत आहे. नसल्याने शेतकरी इतर पिकांकडे वळले ज्या प्रमाणे कडधान्ये आणि तेलबियांच्या उत्पादनात वाढ झाली, त्याप्रमाणात मागील २५ वर्षात ज्वारीच्या उत्पादनात वाढ झालेली नाही. शिवाय ज्वारी काढणे हे मेहनतीचे काम आहे. त्यासाठी मजुरांची उपलब्धता होईनासी झाली आहे. लोकांचे गहू खाण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्वारीचे क्षेत्र घटण्याची ही प्रमुख कारणे आहेत. सिंचनाच्या सुविधा वाढल्याने शाश्वत उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकरी वळले आहेत. बार्शी व मंगळवेढ्यामुळे ज्वारीचे क्षेत्र टिकून आहे. उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिवाय शेतकऱ्यांमध्येही जागरुकता आणण्याची गरज आहे. ३ जिल्ह्यातून ४२ टक्के उत्पादन राज्यात रब्बी हंगामात ज्वारी ३१ लाख हेक्टरवर घेतली जाते. त्यापासून १५ लाख मेट्रिक टन धान्याचे उत्पादन होते. ज्वारीच्या एकूण उत्पन्नातील ४२ टक्के वाटा सोलापूर, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याचा आहे. परंतु मागील पाच वर्षात ज्वारीचे कोठार समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात उत्पादन घटले आहे. भौगोलिक मानांकनामुळे देशभरातून मागणी सोलापूरच्या ज्वारीला भौगोलिक मानांकन (पेटंट) मिळालेले आहे. जागतिक बाजारपेठेत सोलापुरी ज्वारीचा ब्रॅण्ड वर्षानुवर्षे कायमच आहे. सोलापुरातील ज्वारीच्या भाकरीची चव जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे ज्वारीला जगभरातून मोठी मागणी आहे. कृषी संशोधन संस्था व शेतकऱ्यांनी आजवर ज्वारीचे तब्बल २१ प्रकारचे वाण विकसित केले आहेत, त्यातूनच ज्वारीचे महत्त्व वाढलेले आहे आणि केंद्राने भरड धान्याला चालनाही दिली.
महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अलीकडे सोलापूरपर्यंत खेडेगावात उसाच्या शेतात बिबटे आढळून येत आहेत. जंगल क्षेत्र नष्ट होत आहे. म्हणून मादी बिबटे हे ऊस शेतालाच जंगल समजून तिथेच प्रसूती करत आहेत. हे फार धोकादायक आहे. यावर बिबट्यांचे ट्रान्सलोकेशन हा अजिबात उपाय नाही. मोठ्या बिबट्यांना आहे तिथेच राहू देणे आणि लहानांचे प्रजनन लांबवणे हाच एकमेव उपाय असल्याची माहिती वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे वरिष्ठ वैज्ञानिक प्रा. बिलाल हबीब यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली. उसाचे क्षेत्र जितके वाढत जाईल तितकी बिबट्यांची संख्याही वाढत जाईल, असे डाॅ. बिलाल हबीब यांनी स्पष्ट केले. चार ते पाच वर्षांचे स्वत:ची हद्द म्हणजे टेरिटरी असलेले आणि दोन ते अडीच वर्षांचे स्वत:ची टेरिटरी नसलेले असे दोन प्रकारचे बिबटे असतात. टेरिटरी बिबट्यांचा दुहेरी दबाव स्वत:ची हद्द म्हणजे टेरिटरी असलेल्या बिबट्यांपेक्षा टेरिटरी नसलेल्या बिबट्यांकडून शिकार जास्त होते. टेरिटरी नसलेल्या बिबट्यांवर लोक आणि टेरिटरी असलेल्या बिबट्यांचा दुहेरी दबाव असतो. बिबट्यांबाबत अनेक गैरसमजुती बिबट्यांबद्दल गैरसमजुतीच जास्त आहे. उसाच्या मळ्यातील आणि जंगलातील बिबटांची वेगळी पिढी काही नसते. बिबट्या सगळीकडे जाऊन येऊन राहतो. बिबट्यांच्या आकारमानामध्ये बरेच वैविध्य आढळते. मोठ्यांची जागा लहान घेतो पिंजरे लावून बिबट्याला पकडले जाते. पण बहुतांश वेळा पिंजऱ्यात मोठे बिबट अडकतात. कारण ते त्यांच्या हद्दीत फिरत राहतात. तर टेरिटरी नसलेले बिबट फिरत नाही. त्यामुळे एक मोठा बिबट पकडला गेला तरी त्याची जागा दोन ते अडीच वर्षांचे दोन बिबट घेतात. गळ्याभाेवती गमछा ओढणी गुंडाळा माणसांनी गमछा वा उपरणे आणि महिलांनी ओढणी, स्टोल वा स्कार्फ, साडीचा पदर गळ्याभोवती गुंडाळल्यास बिबट ताबडतोब गळा सोडून देईल असे एका फाॅरेस्ट गार्डने सांगितले. गळ्याभोवती गुंडाळलेली माणसे बिबट्याच्या हल्ल्यातून वाचलेली आहे. इम्युनोकॉन्ट्रासेप्शन ही प्राण्यांसाठी असलेली गर्भनिरोधक पद्धत गर्भधारणा रोखण्यासाठी उपयुक्त उसाच्या शेतात बिबट्यांची घनता ८ बिबट प्रति स्क्वेअर मीटर इतकी आहे. ती किमान २ बिबट प्रति स्क्वेअर मीटर इतकी आणणे हाच उपाय आहे. दोन ते अडीच वर्षांच्या बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी मादी बिबट्यांचे व्हॅक्सिनेशन हाच एकमेव उपाय आहे. बिबटे साधारणपणे वर्षभर मेटिंग करतात. ९० ते १०५ दिवसांच्या गर्भधारणेनंतर दोन ते तीन पिल्ले जन्माला घालतात. हे लांबवण्यासाठी इम्युनोकॉन्ट्रासेप्शनचे व्हॅक्सिनेशन करणे हाच उपाय आहे. इम्युनोकॉन्ट्रासेप्शन ही प्राण्यांसाठी असलेली गर्भनिरोधक पद्धत आहे. ती गर्भधारणा रोखण्यासाठी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीचा वापर करते. बिबट्याचे वजन वेगवेगळे दक्षिण आफ्रिकेतील, श्रीलंकेतील व तुर्कस्तानातील बिबट्यांचे वजन ९० किलोपर्यंत असते, तर मध्यपूर्व वाळवंटी भागातील बिबट्यांचे वजन २० किलोपर्यंत असते. ही वैविध्यता भक्ष्याच्या उपलब्धतेवर असते.
मनपा निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध झालेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांमध्ये गोंधळ उघड झाल्याने इच्छुक उमेदवारांचे गणित बिघडले आहे. एका प्रभागातील दोन ते साडेतीन हजार मतदार शेजारील प्रभागात गेल्याचे दिसताच इच्छुकांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे निवडणूक विभागात आक्षेप नोंदवण्यासाठी दिवसभर मोठी गर्दी उसळली. दिवसभरात आक्षेपांचा सोमवारी (२४ नोव्हेंबर) आकडा ३०० पर्यंत गेला आहे. दरम्यान, आक्षेप घेतलेल्या प्रत्येक ठिकाणी स्थळ पाहणी करणार असल्याचे आश्वासन मनपाने दिले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून विधानसभा मतदार याद्या महापालिकेला देण्यात आल्या. त्यांचे प्रभागनिहाय विभाजन करताना प्रत्यक्ष क्षेत्र पाहणी न केल्याने सीमावर्ती वस्त्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचा आरोप इच्छुकांकडून होतो आहे. एका वस्तीतले काही मतदार एका प्रभागात, तर उरलेले दुसऱ्या प्रभागात गेल्याचे दिसून आले. टायपिंगच्या चुकीमुळे गोंधळ मतदार याद्यांमध्ये टायपिंग आणि प्रिंटिंगच्या चुका आढळल्या. प्रभाग २४ मधील मतदार चुकीने प्रभाग २६ मध्ये, तर प्रभाग १८ मधील काही मतदार २८ मध्ये गेले. निवडणूक विभागाने ही चूक टाइप मिस्टेक असल्याचे सांगितले. ही चूक लक्षात येताच मनपाने ती स्वीकारली.ती दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे अनेक आक्षेपांचा निपटारा होईल. गोंधळाची कारणे आक्षेपांची संख्या जास्त आमच्या प्रभागातील सुमारे तीन हजार मतदार हे प्रभाग दहामध्ये गेले आहेत. एवढ्या लोकांचे आक्षेप दोन दिवसांत कसे भरायचे, हा मोठा प्रश्न आहे. -काकासाहेब काकडे, आक्षेपकर्ता आक्षेप कसे नोंदवावे मतदाराचा स्वतंत्र अर्ज आवश्यकएकगठ्ठा अर्ज स्वीकारणार नाहीतआक्षेप मुदत : २७ नोव्हेंबरअंतिम यादी : ५ डिसेंबरचुकीच्या प्रभागात नाव, नाव वगळले जाणे, पत्ता चुकीचा असणे या कारणांसाठी हरकत घेता येईल.आक्षेपावर मनपा स्थळपाहणी करेल.जेवढे आक्षेप दाखल होतील, त्या सर्वांची स्थळ पाहणी करूनच अंतिम मतदार यादी निश्चित केली जाणार आहे. ही यादी प्रारूप आहे. चुका दुरुस्त करण्यासाठीच ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. -विकास नवाळे, उपायुक्त.
शहरातील एका शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. पालकांनी आरोपीला रंगेहाथ पकडून चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी आरोपी शिक्षकावर पोक्सो व अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (२४ नोव्हेंबर) दुपारी शाळेच्या मधल्या सुटीमध्ये फिर्यादी पालकाची मुलगी वर्गात एकटी जेवण करीत होती. या वेळी संशयित शिक्षक राहुल बळीराम चव्हाण याने तिच्याशी लगट करून अश्लील वर्तन केले. हा प्रकार नेहमी करीत असल्याचे तिने पालकांना सांगितले होते. पालकांनी शिक्षकाच्या मदतीने रंगेहाथ पकडून आरोपीला जोरदार चोप देऊन गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीने फिर्यादी मुलीच्या इतर वर्गमैत्रिणींशीदेखील अनेकदा असेच वर्तन केले असल्याची तक्रार फिर्यादीत केल्यावरून राहुल चवााणविरोधात कलम ७४/७५, ८, १२ पोक्सो ३ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. तपास पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड करीत आहेत. लोकप्रतिनिधींची ठाण्यात भेट- घटनेची माहित्ती आमदार प्रशांत बंब यांनीदेखील पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शाळेत हा प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू असल्याच्या तक्रारी असूनही संबंधितांनी तो दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून आरोपीसह संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. तर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. या शाळेत चार-पाच वेळा अशा प्रकारच्या घटना झाल्याचे सांगून त्या दाबण्यात आल्याचे सांगितले. ५ वर्षीय मुलीवर १६ वर्षांच्या मुलाचा अत्याचार बीड जिल्ह्यातील शिरूर कासारजवळील एका गावात पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या एका ५ वर्षांच्या मुलीवर गावातीलच एका १६ वर्षांच्या मुलाने अत्याचार केला. याविषयी पोलिसात तक्रार करू नये मुलाच्या कुटुंबीयांनी दबाव आणला. परंतु मुलीला त्रास होत असल्याने अखेर गुन्हा दाखल केला.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५०% मर्यादा ओलांडल्याच्या मुद्द्यावर मंगळवारी सुप्रीम कोर्ट महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नामनिर्देशन प्रक्रिया सुरू असल्याने निवडणूक स्थगित करू नये, असा युक्तिवाद राज्य सरकारने आधी केला होता. त्यावर याचिकाकर्त्यांचे आक्षेप मंगळवारी कोर्ट ऐकून घेईल. कोर्टाच्या निर्णयावरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे भवितव्य अवंलबून आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होत आहे. यापूर्वी १७ आणि १९ नोव्हेंबर रोजीच्या सुनावणीत खंडपीठाने अत्यंत कठोर भूमिका व्यक्त केली होती. ओबीसींना २७% आरक्षणाची शिफारस करणारा २०२२ सालचा जे. के. बांठिया आयोगाचा अहवाल न्यायप्रविष्ट असल्याने या अहवालापूर्वी अस्तित्वात असलेल्या आरक्षण स्थितीनुसारच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, असे खंडपीठाने म्हटले होते. आरक्षण मर्यादा ओलांडल्यास निवडणुका स्थगित करण्याचा इशाराही खंडपीठाने दिला होता. आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे कुठे उल्लंघन? महाराष्ट्रातील २४६ न.प. आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबरला होतील. मतमोजणी ३ डिसेंबरला होईल. ४४ नगर परिषदा, ११ नगरपंचायती, २० जि. प. आणि २ मनपामध्ये (नागपूर व चंद्रपूर) ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याची आकडेवारी आहे. कोर्टाकडून फेरनिवडणुकीचे आदेश शक्य न्यायालय-निवडणूक आयोगासमोर इतर काय पर्याय? ओबीसी आरक्षणाचा तिढा कायमचा कसा सुटेल?त्यासाठी ‘ट्रिपल टेस्ट’ निकषांची पूर्तता करण्याचा मार्ग आहे. यासाठी आवश्यक पर्याय : आकडेवारी : राज्य मागास आयोगाने माहिती गोळा करून स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार ओबीसी लोकसंख्या व मागासलेपण सिद्ध करणे. आरक्षण निश्चिती: आयोगाच्या शिफारशीतील माहितीच्या आधारे, आरक्षण मर्यादा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाचे प्रमाण निश्चित करणे. आरक्षण मर्यादा : एकूण आरक्षण (एससी/एसटी/ओबीसी) ५०% हून जास्त होणार नाही, याची दक्षता घेणे.संवैधानिक प्रक्रिया: आयोगाच्या अहवालानुसार नवीन कायद्याद्वारे त्रुटी नसलेला आणि कायदेशीरदृष्ट्या निर्दोष आरक्षणाचा फॉर्म्युला लागू करणे. ॲड. नितीन सातपुते, ज्येष्ठ विधिज्ञ, सुप्रीम कोर्ट
बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना ‘अल-कायदा’शी संबंधित असल्याच्या संशयावरून दहशतवादविराेधी पथकाने पुण्यातील काेंढवा परिसरातील संगणक अभियंता जुबेर हंगरगेकर याला काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. त्याच्या चाैकशीदरम्यान त्याने महाराष्ट्रात पुणे, मुंबई, ठाणे, साेलापूर, अकाेल्यासह विविध ठिकाणी कुराण, हदीस, खिलाफत या विषयांवर आक्रमकरीत्या दर्स म्हणजे शिकवण दिली आहे. चेन्नई येथे त्याने एका हाॅटेलमध्येदेखील हाॅल बुकिंग करून विविध ठिकाणांवरून आलेल्या ३५ जणांचा एक मेळावा घेतला. यामध्ये पुण्यातील सहा जणांचा समावेश हाेता. त्यामुळे यात सहभागी झालेल्या सदस्यांचादेखील एटीएसकडून शाेध घेतला जात आहे. आतापर्यंत एटीएसने जुबेरशी संबंधित ३० ते ४५ जणांचे जबाब नाेंदवले आहेत. जुबेर हा उच्चशिक्षित असून त्याला वार्षिक २२ लाखांचे पॅकेज नाेकरी करत असलेल्या कंपनीत हाेते. मात्र, त्यानंतरही ताे देशात बंदी घालण्यात आलेल्या अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या विचारधारेने प्रेरीत हाेऊन मागील ७ वर्षांपासून सक्रिय झाल्याचे एटीएसच्या तपासामधून दिसून आले आहे. कराचीच्या संस्थेतून शिक्षण देण्याच्या नावाखाली हेरत असे जुबेर हा पाकिस्तानच्या कराचीतील एका शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून इस्लामी शिक्षण देण्याच्या नावाखाली लाेकांना हेरत असे. वहादते इस्लामीच्या माध्यमातून वर्षातून एकदा सिरत उन नबीची प्रश्नमंजूषा चाचणी घेतली जात असे. त्यासाठी ताे व त्याचे साथीदार पेपरदेखील काढत हाेते. धार्मिक रूढी,परंपरा आदींबाबत प्रश्न त्यात असत. त्यातून निवडून येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून ट्रॉफी व लॅपटाॅप, टॅब, स्मार्टवाॅच अशा वस्तू आणि शालेय साहित्याचे बक्षीस दिले जात. त्यातून किती कट्टरपंथीय मुले याबाबत खातरजमा करून त्यांना अल कायदा या संघटनेचे सदस्य बनवण्यासाठी रॅडिकल कसा करता येईल याचा अंदाज घेत असे. पुण्यामध्ये जुबेरच्या नावाचे क्यूआर कोडही सापडले पुण्यातील काेंढवा येथील दर्सच्या ठिकाणावरून त्याच्या नावाचे क्यूआर काेड असलेले कागद सापडले आहेत. ताे स्वत:च्या नावाचे क्यूआर काेड विविध मशिदींच्या ठिकाणी लावून त्याद्वारे रक्कम स्वत:च्या खात्यावर घेत हाेता. नेमकी किती रक्कम त्याच्या बँक खात्यावर अशा पद्धतीने जमा झाली याबाबतची सविस्तर माहिती एटीएसने काढली आहे. कुराण, हदीस, खिलाफत या विषयांवर आक्रमक दर्स देऊन ताे ४ टक्के जकातदेखील लाेकांकडून याप्रकारे गाेळा करत हाेता. त्याच्या अत्यंत जवळच्या संपर्कातील पाच ते सहा साथीदारांचा त्याच्या ‘सुरा कमिटी’ मध्ये समावेश हाेता.
शहरातील पंचतारांकित हॉटेल ॲम्बेसेडरमध्ये ६ महिन्यांपासून वास्तव्य करणाऱ्या कल्पना भागवत (४५) या महिलेच्या चौकशीत तिचा बॉयफ्रेंड अशरफ खलील हा अफगाणिस्तानमध्ये वास्तव्यास असून त्याचा भाऊ आबेद पाकिस्तानात वास्तव्यास असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. या दोघांच्या खात्यातून मोठ्या रकमा या महिलेच्या खात्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या दोघा भावांचे पासपोर्ट व व्हिसाचे फोटोही महिलेच्या मोबाइलमध्ये आहेत. पाकिस्तानातील आबेदने भारतात येण्यासाठी तयार केलेल्या अर्जाचा फोटोही तिच्या मोबाइलमध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकार संशयाच्या भोवऱ्यात आहे. सोमवारी (२४ नोव्हेंबर) तिची एटीएस (दहशतवादविरोधी पथक) व आयबीकडून चौकशी करण्यात येत आहे. ती परदेशी गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचा संशय आहे. सिडको पोलिसांच्या तपासणीत कल्पना भागवतच्या आधार कार्डमध्ये खाडाखोड आढळली होती. तिने पोलिसांच्या प्रश्नांवर उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तिला अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीतील चौकशीत तिच्या खात्यात गेल्या वर्षभरात तब्बल ३२ लाख रुपये जमा झाले आहेत. त्यातील आता केवळ ११०० रुपये तिच्या खात्यात शिल्लक आहेत. तिच्या मोबाइलमध्ये अफगाणिस्तानसह अन्य काही देशांतील फोन नंबर आहेत. याबाबत पोलिस यंत्रणेने वरिष्ठ पातळीवर अहवाल दिल्यावर एटीएस व आयबीने तिची चौकशी सुरू केली आहे. तसेच प्रभारी पोलिस आयुक्त व विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनीही तपासाचा आढावा घेतला. राष्ट्रपती, गृहमंत्र्यांसोबतही फोटो पोलिसांनी कल्पनाचा मोबाइल जप्त केला असून त्यामध्ये देशातील मोठ्या नेत्यांसोबत फोटो तसेच त्यांचे संपर्क क्रमांक आढळून आले. विशेष म्हणजे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबतही तिचे फोटो आहेत. कल्पनाची यापूर्वीही एटीएसने चौकशी केली होती. २०२१ मध्ये शरद पवार यांच्या ताफ्यात कल्पना विनापरवाना शिरल्याने तिला एटीएसने ताब्यात घेतले होते. चौकशी करून तिला सोडून दिले होते. अफगाणिस्तानहून अशरफ आला होता शहरात काही दिवसांपूर्वी एसएफएस मैदानावर ड्रायफ्रूट्सचे प्रदर्शन भरले होते. त्या वेळी अशरफनेही स्टॉल टाकला होता. त्या वेळी कल्पना त्याला भेटल्याचे तपासात समोर आले आहे. तिने २०१३ मध्ये विद्यापीठात पदवी आणि टायपिंगच्या आधारावर आस्थापना विभागात काम केले. तसेच विद्यार्थी कल्याण विभागातही काही काळ काम केले. परंतु न सांगता गैरहजर राहिल्याने विद्यापीठाने कामावरून काढले होते. वर्किंग स्टेटससाठी बड्या हॉटेलात वास्तव्य कल्पनाचे घर पडेगावातील चिनार गार्डनमध्ये आहे. सी विंगमध्ये १३ नंबरच्या वन बीएचके फ्लॅटमध्ये ती राहत होती. २००५ मध्ये कल्पनाच्या वडिलांनी ते घर खरेदी केले होते. वडील जिल्हा परिषद शाळेतून निवृत्त झाले होते. वडिलांच्या निधनानंतर कल्पना व तिची आई दोघी चिनार गार्डन येथे राहत होत्या. २०२० नंतर कल्पना व तिची आई घर सोडून शहरामध्ये भाड्याने रूम करून राहत होत्या. तिला बडेजाव करण्याची सवय होती. काही मोठ्या लोकांच्या संपर्कातही होती. वर्किंग स्टेटस राखण्यासाठी तिने पंचतारांकित हॉटेल ॲम्बेसेडरचा पर्याय निवडल्याची प्राथमिक माहिती आहे. सहा महिन्यांत तिने हॉटेल स्टाफ किंवा हाऊसकीपिंगलाही आत येऊ दिले नव्हते. पोलिसांनी तिच्या रुमची झडती घेतल्यावर मोठ्या प्रमाणात कचरा व अस्वच्छता दिसून आली. पोलिस व्हॅनमध्ये बसताना म्हणाली, ‘मी पुढे बसणार’ सिडको पोलिस ठाण्यातून महिलेला पडेगाव परिसरातील तिच्या घराच्या झडती करण्यासाठी नेण्यात येत होते. त्या वेळी आरोपीला मागच्या सीटवर बसवतात, मात्र या महिलेने थेट ‘मी पुढे बसणार’असे फर्मान सोडले. त्यामुळे सर्वच पोलिस अवाक् झाले. तिच्या डोक्यात अधिकारी असल्याचे बसलेले दिसून येत होते.
मुलभूत सुविधांसाठी लातूर महानगरपालिकेवर धडक मोर्चा
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभारा विरोधात हडको कॉलनी, प्रभाग क्रमांक ११ मधील नागरीकांनी मुलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून सोमवारी लातूर महानगर पालिकेवर धडक मोर्चा काढून आंदोलन केले. नागरीकांच्या घोषणांनी मनपाचा परिसर दणाणून गेला होता. प्रभाग क्रमांक ११ हडको वसाहत एमआयडीसी येथील जनतेचा मूलभूत समस्या सोडवण्यासाठी लातूर महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करण्यात आले. या […] The post मुलभूत सुविधांसाठी लातूर महानगरपालिकेवर धडक मोर्चा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर : प्रतिनिधी खरीप हंगामात सुरूवातीला हवा-हवा असणारा पाऊस शेवटच्या टप्यात नकोसा झाला होता. खरीप हंगामात अनेक मंडळात झालेल्या अटीवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतक-यांच्या डोळया देखत सोयाबीनचे ढिगारे नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. खरीप हंगामातील कांही अंशी पिके हाती लागली असली तरी बहूतांश पिकांचे अतिवृष्टीच्या पाससाने अधिक नुकसानच केले. त्यामुळे रबी हंगामातील पिकांच्याकडून शेतक-यांच्या […] The post दोन लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इतिहास विभागाच्या वतीने किल्ले औसा येथे हेरिटेज वॉक
लातूर : प्रतिनिधी हेरिटेज वॉक म्हणजे आपल्या स्थानिक परिसरात असणा-या ऐतिहासिक वास्तूंना भेटी देणे व तेथील परिसराची निगा राखणे, त्या वास्तूंचे संवर्धन करणे. वास्तविक पाहता ही संकल्पना सर्वात प्रथम पाश्च्यात्य देशांमध्ये उदयास आली आहे. मात्र लातूर शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या इतिहास व एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांनी किल्ले औसा येथे ही आगळीवेगळी संकल्पना प्रत्यक्षात राबवली. महाराष्ट्र राज्य […] The post इतिहास विभागाच्या वतीने किल्ले औसा येथे हेरिटेज वॉक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशातील ‘जेन-झी’ला अराजक नव्हे तर शांती हवी
नागपूर : बांगलादेश, नेपाळमधील ‘जेन-झी’चे आंदोलन हा तेथील संवैधानिक समस्येंतून निर्माण झालेला मुद्दा होता. भारतातील ही पिढी अराजकतावादी नसून महत्वाकांक्षी आहे. काही देशविरोधी तत्व देशातील ‘जेन-झी’ला भडकविण्याचे षडयंत्र करत आहेत. मात्र काश्मीर असो किंवा छत्तीसगड, देशातील ‘जेन झी’ला शांती हवी आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी केले. नागपुरात […] The post देशातील ‘जेन-झी’ला अराजक नव्हे तर शांती हवी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
यज्ञाला श्रद्धांजली म्हणून सराफापेढी एक दिवस बंद
लातूर : प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मौजे डोंगराळे या गावात सुवर्णकार समाजातील केवळ तीन वर्षांची चिमुरडी यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली. त्यामुळे संपूर्ण सुवर्णकार समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या भयानक घटनेने समाजासह सर्वसामान्य नागरिकही हादरले आहेत. या निष्पाप बालिकेला न्याय मिळावा आणि दोषींना कठोरातली कठोर […] The post यज्ञाला श्रद्धांजली म्हणून सराफापेढी एक दिवस बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पोलिस दंड वसुलीत, नागरिक वाहतूककोंडीत
लातूर : प्रतिनिधी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी लातूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दंडात्मक कारवाईचा फंडा पुढे आणला. या माध्यमातून दररोज लाखावर दंड वसुल करण्यात शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस गुंतले आहेत तर शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीत नागरिक अडकले आहेत. शहरातील डालडा फॅक्टरीसमोरील नांदेड रोडवर सोमवारी दुपारी २.१० मिनीटांपासून तब्बल ३० मिनीटांचा ब्लॉक पडला. प्रचंड […] The post पोलिस दंड वसुलीत, नागरिक वाहतूककोंडीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रेणापूर येथे प्रभाग ४, ५, ६ मधील काँग्रेसच्या उमेदवारांची रॅली
रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागातील उमेदवार हे चारित्र्य संपन्न व जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले उमेदवार दिले आहेत. निवडणूक प्रचारामध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी घेतली असून जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास रेणापूरकर व्यक्त […] The post रेणापूर येथे प्रभाग ४, ५, ६ मधील काँग्रेसच्या उमेदवारांची रॅली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यामध्ये यंदा तुफान पाऊस झाला या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतक-यांना सोयाबीन तसेच मूग व उडीद त्यांच्या उत्पन्नामध्ये ५० टक्के घट झाली आहे. यासोबतच कापूसही एका वेचणीमध्येच संपला. यामुळे शेतक-यांना अशा होती ती तूर या पिकावर परंतु तूरही आता शेतक-यांच्या हातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या हवामानातील […] The post कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून सुर्यकांत यांनी घेतली शपथ
नवी दिल्ली : देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सोमवार दि. २४ नोव्हेंबर रोजी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सूर्यकांत यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याकडे पुढील १५ महिने सरन्यायाधीशपदाचा कार्यभार असणार आहे. मावळते सरन्यायाधीश भूषण गवई हे रविवारी (२३ नोव्हेंबर) सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आता सूर्य कांत यांची सरन्यायाघीशपदी नियुक्ती […] The post देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून सुर्यकांत यांनी घेतली शपथ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अवकाश विज्ञान आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देते, ज्यामुळे देशांमध्ये शांततापूर्ण संबंध निर्माण होण्यास मदत होते, असे मत स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, इस्रोचे माजी संचालक पद्मश्री डॉ. प्रमोद काळे यांनी व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे आयोजित ३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृहात याचे उद्घाटन झाले. यावेळी नवी दिल्ली येथील आध्यात्मिक शास्त्रज्ञ डॉ. सी.के. भारद्वाज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड अध्यक्षस्थानी होते. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, माईर्सचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी आणि व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पात्रे यांचीही उपस्थिती होती. या प्रसंगी पद्मश्री डॉ. प्रमोद काळे यांना मान्यवरांच्या हस्ते 'समर्पित जीवन गौरव पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रमोद काळे यांनी पुढे सांगितले की, अवकाशातून पृथ्वीचे अवलोकन करताना जमीन आधारित, हवाई आणि उपग्रहांच्या माध्यमातून पाणी व वायुमंडलाची माहिती एकत्रित केली जाते. नैसर्गिक घटना, संकटे आणि मानवी गतिविधींवर लक्ष ठेवले जाते. अंतराळ संप्रेषणामध्ये संप्रेषण उपग्रह, ग्राउंड स्टेशन आणि डीप स्पेस नेटवर्कसारख्या तंत्रज्ञानाचा वापर होतो. अंतराळातील वेगवेगळ्या बिंदूंमधील किंवा पृथ्वी आणि अवकाशातील माहिती व डेटाचे प्रसारण केले जाते. अंतराळातील वातावरण पृथ्वीवरील वातावरणापेक्षा पूर्णपणे वेगळे असून, त्यात हवा नाही, व्हॅक्यूम आहे, तसेच प्रचंड तापमान आणि रेडिएशनसारखे अनेक धोके आहेत. हे वातावरण गुरुत्वाकर्षण, रेडिएशन आणि सूक्ष्म उल्कापिंडांपासून बनलेले आहे. डॉ. सी.के. भारद्वाज यांनी आपल्या भाषणात सध्या संपूर्ण जगात अध्यात्म आणि शांतीची गरज असल्याचे नमूद केले. अध्ययन क्षेत्रामध्ये अध्यात्म आणि विज्ञानाची संकल्पना रुजविणे आवश्यक आहे. मानवजातीच्या आणि स्वतःच्या उत्थानासाठी युनिव्हर्सलमधील ऊर्जेचा योग्य वापर करावा. कोणत्याही रचनात्मक निर्मितीसाठी व कार्यासाठी ऊर्जा अत्यंत आवश्यक असते. शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, असेही ते म्हणाले.
भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव २०४७ मध्ये साजरा होणार आहे. तोपर्यंत भारताची विश्ववंदित राष्ट्र अशी प्रतिमा उभारण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व शिक्षण पद्धतीत संतसाहित्याचा समावेश करणे गरजेचे आहे, असे मत शिवथर घळ येथील श्री सुंदर मठ सेवा समितीचे विश्वस्त डॉ. विजय लाड यांनी व्यक्त केले. निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनीमधील मनोहर सभागृहात मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या राज्यस्तरीय संत साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष नितीनभाई कारिआ, कार्यवाह डॉ. मनोज देवळेकर, उपाध्यक्षा शारदा चोरडिया, उपक्रम संयोजक सुधीर कुलकर्णी आणि सुभाष देशपांडे उपस्थित होते. डॉ. विजय लाड पुढे म्हणाले की, संतांनी मानवी जीवनातील सूक्ष्म व्यवहाराचा साक्षेपाने विचार केला आहे. 'ज्ञानेश्वरी' आणि 'दासबोध' या ग्रंथांमध्ये विज्ञानाचे अनेक दाखले आढळतात. संतांनी संपन्नता किती असावी याबाबतही मार्गदर्शन केले आहे. संतांची शिकवण तळागाळात पोहोचवणे आणि त्यांचे विचार समाजात रुजवणे आवश्यक आहे. तरुणांनी संत साहित्य वाचायला हवे. सुधीर कुलकर्णी यांनी सांगितले की, गेल्या २७ वर्षांपासून राज्यभरात संत साहित्य पुरस्कारांचे वितरण केले जात आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी प्रथमच लेखक आणि प्रकाशक या दोघांनाही पुरस्कार दिला जात आहे. संत साहित्याचा प्रसार आणि त्यावरील लेखन अधिक व्हावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाची सुरुवात बोलावा विठ्ठल... या भक्तिगीताने झाली, तर समारोप रत्नाकरा... या प्रार्थनेने करण्यात आला. याप्रसंगी समीक्षक राधा गोडबोले आणि डॉ. रजनी पत्की यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिलेखा शिंदे यांनी केले, तर सुभाष देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
भाविकांची बस कोसळून महाराष्ट्रातील एकासह ५ जणांचा मृत्यू
टिहरी : उत्तराखंडमधील टिहरी येथे भाविकांनी भरलेली बस ७० मीटर खोल दरीत कोसळली, ज्यात ५ लोकांचा मृत्यू झाला आहे. टिहरीचे एसपी आयुष अग्रवाल यांनी याची पुष्टी केली. दुपारी सुमारे साडेबारा वाजता झालेल्या या अपघातात गुजरात, हरियाणा, बिहार, उत्तरप्रदेश, पंजाब, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश आहे. बस ऋषिकेशमधील दयानंद आश्रमातून २९ लोकांना कुंजापुरी मंदिरात घेऊन गेली होती, येथून […] The post भाविकांची बस कोसळून महाराष्ट्रातील एकासह ५ जणांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
यूपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ सोमवारी सायंकाळी एका धमकीच्या पत्रामुळे हादरली. शहरातील लुलु मॉलच्या बाथरुममध्ये एक पत्र सापडले, ज्यात २४ तासांत अनेक शाळा, सरकारी इमारती, चारबाग, विधानसभा, विमानतळ, रेल्वे स्टेशन यांसारख्या प्रमुख स्थळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. पत्र मिळताच सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. दिल्लीतील अलीकडील स्फोटानंतर सुरक्षा आधीच कडक करण्यात आली […] The post यूपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सध्या राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे. या दरम्यान महायुतीमध्ये तणाव असल्याचे चित्रदेखील पाहायला मिळत आहे. यातच आता शहाजी बापू पाटील यांनी सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. शहाजी बापू पाटील म्हणाले की, निवडणूक खरी स्वाभिमानाची आहे, पण आपल्याला गुलाम बनविले. त्यापेक्षाही जास्त मोठी गुलामगिरी आपल्यावर आल्याचे बापू सांगोल्यात बोलतांना म्हणालेत. भाजपने माझे कंबरडे मोडले- शहाजी बापू दीपक साळुंखे आणि जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना शहाजी बापू म्हणाले की- स्वाभिमानाची निवडणूक आहे. आपल्याला गुलाम बनविले, त्यापेक्षा जास्त मोठी गुलामगिरी आली आहे. गणपतराव देशमुख 75 वर्षे आणि मी 51 वर्षे इथे आहे, स्वाभिमानी जनता होती. आता हेलिकॉप्टर घेऊन येत धाड धाड गुंडशाही सुरू केली. निवडणुकीपूर्वी मला माहीत होते भाजपने कंबरडे मोडले. मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली. भाजपसोबत इतका प्रामाणिक वागून माझ्यासोबत का असे वागले? असा प्रश्नही शहाजी बापूंनी उपस्थित केला. कुत्री मांजरं मला घाबरवायला लागलेत पुढे बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, ही लढणारी औलाद आहे. पैशावर तालुका विकत घेण्याचा नाद करू नका. महाराष्ट्र मला घाबरतो, अन् आता ही कुत्री मांजरं मला घाबरवायला लागले आहेत. या तालुक्यात दोनच राजे आहेत. एक म्हणजे गणपतराव देशमुख आणि दुसरा तो म्हणजे शहाजी बापू. आता गणपतराव देशमुख यांच्या समाधीला पूजनाचा अधिकारी यांचा नाही. शहाजी बापूंचा भाजपला सवाल शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही शब्द मी मोडला नाही. लोकसभेला मी आजारी असतानाही भाजप उमेदवाराला पंधरा हजाराचं मताधिक्य दिलं. मी माझ्या आजारपणाचा कोणताही विचार न करता काम करत राहिलो, याचं फळ मला दिलयं का? असा प्रश्नही शहाजी बापू पाटील यांनी उपस्थित केला आहे.
सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. १५ कुख्यात नक्षलवाद्यांनी सोमवारी सुरक्षा दलांसमोर शरणागती पत्करली, यापैकी ९ जणांवर एकूण ४८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. आत्मसमर्पण करणा-यांमध्ये ५ महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे. सुकमाचे पोलिस अधीक्षक किरण चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार या नक्षलवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिका-यांसमोर नियंत्रण केंद्रात आत्मसमर्पण केले. […] The post १५ नक्षलवाद्यांचे आत्मसर्पण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एका युगाचा अंत : बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड!
मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ आज काळाच्या पडद्याआड गेला. याचसोबत एका बॉलिवूडमधील एका युगाचा अंत झाला. यानिमित्ताने अनेक मान्यवरांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. अमिट छाप सोडणारे धर्मेंद्र : शरद पवार १९६० च्या दशकात भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करून चित्रपटात सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करणा-या कथानकांमधून उठावदार भूमिका साकारणारे आणि भारतीय प्रेक्षकांची मने जिंकून सिनेजगतात आपली स्वतंत्र […] The post एका युगाचा अंत : बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

31 C