स्फोटाने राजधानी हादरली; मुंबईसह देश अलर्ट
नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट झाला असून त्यामुळे दिल्ली हादरली आहे. त्यामध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो […] The post स्फोटाने राजधानी हादरली; मुंबईसह देश अलर्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सरकारी कर्मचाऱ्यांचा आजचा संप स्थगित:दुपारी निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने घोषित केलेला आज, मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजीचा एक दिवसाचा लाक्षणिक संप स्थगित करण्यात आला आहे. आता कर्मचारी दुपारच्या भोजनावकाशात निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. जिल्हा निमंत्रक डी.एस. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याकामी आणि नगरपालिका-नगरपंचायतीच्या कामकाजासाठी प्रशासकीय यंत्रणा सध्या व्यस्त आहे. प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या संपाच्या स्थगितीचा निर्णय समन्वय समितीचे प्रदेश निमंत्रक विश्वास काटकर आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी, कंत्राटी, रोजंदारी व अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवांचे नियमितीकरण, तसेच अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांचा एक वेळची बाब म्हणून सेवेत समावेश करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, सरकारी, निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षण विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवांतर्गत समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात दर दोन महिन्यांनी बैठक घेणे, सेवानिवृत्तीचे वय ६० करणे, व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करणे आणि १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत आलेल्या कर्मचारी-शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे या मागण्याही आहेत. शासन सेवेतील रिक्त पदे तात्काळ भरणे आणि शिक्षकांवरील अन्यायकारक १५ मार्च २०२४ च्या संच मान्यतेच्या शासन आदेशावर पुनर्विचार करणे, या मागण्यांसाठी संपाची घोषणा करण्यात आली होती. आता संपाऐवजी भोजनावकाशात निदर्शने केली जाणार आहेत. तसेच, विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनावर महामोर्चा काढण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
अमरावती जिल्ह्यात १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवार, १० नोव्हेंबरपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी केवळ आठ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यामध्ये अचलपूरमधून सात तर चिखलदऱ्यातून एका उमेदवाराचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार, दाखल झालेल्या आठ अर्जांपैकी पाच अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आहेत, तर उर्वरित तीन अर्ज नगरसेवक पदासाठी आहेत. अचलपूर नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी चार आणि नगरसेवक पदासाठी तीन अर्ज प्राप्त झाले. चिखलदरा नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज दाखल झाला आहे. भातकुली आणि तिवसा या दोन नगरपंचायतींमध्ये लोकनियुक्त सत्ता असल्याने तेथे निवडणूक होणार नाही. जिल्ह्यातील अचलपूर ('अ' वर्ग), दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, वरुड ('ब' वर्ग) यासह मोर्शी, शेंदुरजनाघाट, चांदूरबाजार, चिखलदरा, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे या १० नगरपालिका आणि नांदगाव खंडेश्वर व धारणी या दोन नगरपंचायतींसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण २७८ नगरसेवक आणि १२ नगराध्यक्ष निवडले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज १७ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील, त्यानंतर त्यांची प्रिंट संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा करावी लागेल. राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या पक्षाचे अधिकृत चिन्ह मिळेल, तर अपक्षांसह सर्व उमेदवारांना २६ नोव्हेंबर रोजी चिन्हांचे वाटप केले जाईल. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाईल. उमेदवारांना वर्गवारीनुसार अनामत रक्कम भरावी लागेल. अचलपूर 'अ' वर्ग नगरपालिकेसाठी ३ हजार रुपये, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर आणि वरुड या 'ब' वर्ग नगरपालिकांसाठी २ हजार रुपये, तर उर्वरित सर्व नगरपालिकांसाठी १ हजार रुपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली आहे. राखीव संवर्गातील उमेदवारांना या रकमेच्या निम्मी रक्कम भरावी लागेल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
1.73 कोटींची फसवणूक, 23 आरोपींना अटक:भागीदारीच्या आमिषाने नागपुरात घडला प्रकार; 53 लाख फ्रीज
नागपूरमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या एका तरुणाची भागीदारीत व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून १ कोटी ७३ लाखांनी फसवणूक करण्यात आली आहे. प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या प्रकरणात गुन्हे शाखा युनिट क्र. ४ ने समांतर तपास करत वेगवेगळ्या राज्यातील २३ आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या बँक खात्यातील ५३ लाखांची रक्कम गोठवण्यात आली आहे. दीपक घनश्याम गायधने (वय २८, गोंदिया) यांनी या फसवणुकीची तक्रार दिली होती. दीपक नोकरीच्या शोधात असताना, त्यांचे मित्र अविनाश राहांगडाले यांच्यामार्फत त्यांची ओळख आरोपी सुमीत राजेश पटले (वय २३, नवरगाव, गोंदिया) याच्याशी झाली. सुमीत पटले गेल्या पाच महिन्यांपासून नागपुरात राहत होता. १० ऑक्टोबर २०२५ रोजी गायधने नागपूरला सुभाष नगर मेट्रो स्टेशन येथे सुमीत पटले याला भेटले. त्यावेळी तिथे रोहित राजेश अहिर हा देखील उपस्थित होता. अहिरनेच गायधने यांच्या राहण्याची व्यवस्था केली आणि त्यांची ओळख वैभव बघेल, स्वप्नील शेंडे, प्रतीक उर्फ कुणाल शेंडे, रोहित कांबळे, सोहेल खान, आनंद उर्फ अमित विश्वकर्मा, अभिषेक सिंह (सर्व राणाप्रताप नगर, नागपूर) या आरोपींशी करून दिली. आरोपींनी गायधने यांना सोबत व्यवसाय करून चांगला नफा मिळवण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपींनी व्यवसाय नोंदणी आणि बँक खाते उघडण्यासाठी गायधनेकडून आधार कार्ड, पॅनकार्ड घेतले. बँक ऑफ बडोदा शाखेत त्यांच्या नावाने खाते उघडले. आरोपी रोहित अहिर याने गायधने यांच्या कार्यालयाचे भाडेपत्र तयार केले, ज्यात कार्यालयाचा पत्ता १, हावरे कॉलनी, न्यू इंदोरा, ललित कलावती भवन जवळ, नागपूर असा नमूद केला होता. तसेच, आरोपींनी गायधने यांच्या नावाने 'दीपक एंटरप्रायझेस' (मशिनरी टूल्स इक्विपमेंट खरेदी-विक्री) नावाने स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये नोंदणी केली. आरोपींनी गायधने यांच्या नावाने सिमकार्ड घेऊन त्यांच्या बँक खात्याचे तपशील स्वतःजवळ ठेवले. दरम्यान, आपण राहत असलेल्या ठिकाणी अनेक मुले येत असल्याचे गायधने यांच्या लक्षात आले. त्यांनी चौकशी केली असता, आपल्याप्रमाणे त्यांचीही फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. आरोपींनी गायधने यांच्या फर्मचा वापर ऑनलाइन गेमिंग, बेटिंग, अवैध सावकारी, हवाला घेणे-देणे इत्यादी अवैध व्यवसायांसाठी करून रकमेचे व्यवहार केले आणि कमिशन घेतल्याचे समोर आले. तेव्हा गायधने यांनी बँकेत जाऊन बँक स्टेटमेंट घेतले असता, आरोपींनी १३ ते २७ ऑक्टोबर दरम्यान १,७३,५१,८७१ रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून आले. या प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 32 गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे लाखो नागरिकांचे हाल होत आहेत. दुसरीकडे, प्रशासन आणि त्यांचे दलाल टँकर लॉबी पोसण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने (आप) केला आहे. याबाबत पुणे शहर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन दिले आहे. समाविष्ट गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने टँकरसाठी 48 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बेनकर यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले की, या कामाचा ठेका रद्द करण्यात यावा आणि या ठेकेदाराने टँकरने केलेल्या पाणीपुरवठ्याची चौकशी करावी. शहरानजीकच्या गावांमध्ये पाणी, रस्ते, कचरा यांसारख्या समस्या दूर करण्यात पालिका प्रशासनाला अपयश आल्याचे बेनकर म्हणाले. धायरी, शिवणेसह नऱ्हे आंबेगाव, लोहगाव आदी ठिकाणी बेकायदेशीर नळ कनेक्शन मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक कामगार दहा-पंधरा वर्षांपासून एकाच जागेवर आहेत. तत्कालीन राजकीय नगरसेवक व अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन दिलेली बेकायदा पाणी कनेक्शनही अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. दाट लोकवस्तीत अनेक ठिकाणी चार-पाच दिवसांत एकदाच पाणी येते, तर निम्म्याहून अधिक भागात पाणी मिळतच नाही. यामुळे या भागात बाराही महिने पाणीटंचाईची समस्या असते. या गावातील काही सोसायट्या, तसेच ठराविक वस्त्यांमध्ये पैसे घेऊन मुबलक पाणी सोडले जात असल्याचा आरोपही 'आप'ने केला आहे. टँकर लॉबी पोसणाऱ्या तथाकथित समाजकंटकांवर तसेच पैसे घेऊन पाणी सोडणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी 'आप'ने केली आहे. समाविष्ट गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी व येणाऱ्या उन्हाळ्याचे नियोजन करून तातडीने आवश्यक उपाययोजना सुरू कराव्यात, अन्यथा तीव्र जनआक्रोश आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पक्षाने दिला आहे.
बीड जिल्ह्यातील परळी येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा आधारस्तंभ असलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना अखेर अडचणींमुळे ओंकार साखर कारखान्याने खरेदी केला आहे. मागील काही वर्षांपासून बँक कर्जबोजा, थकबाकी आणि आर्थिक अडचणींमुळे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर दिवाळखोरीची वेळ आली होती. परिणामी, युनियन बँकेने या कारखान्याची विक्री ओंकार साखर कारखान्याला केली. गोपीनाथ मुंडे यांनी परळी, अंबाजोगाई आणि पांगरी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर ऊस प्रक्रिया सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने हा कारखाना उभारला होता, ज्याचे साडेसात हजारांहून अधिक संस्थापक सभासद आहेत. या कारखान्याच्या मालकी हस्तांतरणानंतरच्या पहिल्या गाळप हंगामाचा शुभारंभ आज राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला कारखान्याचे चेअरमन बोत्रे पाटील, संचालक मंडळ सदस्य आणि परिसरातील स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोपीनाथ मुंडेंच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा वारसा आता ओंकार साखर कारखान्याच्या माध्यमातून पुढे चालवला जाणार आहे. वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या- पंकजा मुंडे गाळप शुभारंभ सोहळ्यात बोलताना पंकजा मुंडे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. त्या म्हणाल्या, आम्ही या ठिकाणी आल्यावर बाबा आम्हाला नेहमी काहीतरी सांगायचे. माझा मुलगा तेव्हा दीड वर्षांचा होता. त्याला त्यांनी साखरेच्या पोत्यात ठेवले होते, अशी आठवण करून देत त्या गहिवरल्याचे पाहायला मिळाले. वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या, अशा भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात क्षणभर भावनिक वातावरण निर्माण झाले होते. कारखाना विक्रीवरून अनेक प्रश्न उपस्थित वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीच्या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या विक्रीला रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जोरदार विरोध केला. संघटनेने आरोप केला होता की, कारखाना विक्रीचा हा निर्णय कोणत्याही सभासद किंवा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेण्यात आला आहे. हा कारखाना 132 कोटी रुपयांना ओमकार ग्रुपला विकण्यात आला असून, याची नोंद 14 ऑगस्ट 2025 रोजी अंबाजोगाई येथील रजिस्ट्री कार्यालयात करण्यात आली. या व्यवहाराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना संघटनेचे कार्यकर्ते कुलदीप करपे यांनी, परळी तालुक्यातील कारखाना अंबाजोगाईमध्ये कसा विकला जाऊ शकतो, असा सवाल केला होता. या विक्रीच्या करारावर कारखान्याच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या आणि पंकजा मुंडे यांच्या सह्या असल्या तरी, त्यांच्या भगिनी यशश्री मुंडे यांची सही नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे यशश्री मुंडे यांनी हा व्यवहार मान्य केला नव्हता का, असा सवालही विरोधी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला होता. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या विक्रीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी केली होती, ज्यामुळे कारखान्याच्या विक्रीच्या प्रक्रियेवर कायदेशीर आणि राजकीय वादंग निर्माण झाला होता.
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील क्रीडा क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम पाडून, त्याच्या जागी १०२ एकर जागेवर एक अत्याधुनिक स्पोर्ट्स सिटी उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या उच्चस्तरीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. या भव्य प्रकल्पासाठी क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी कतार आणि ऑस्ट्रेलिया […] The post दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तिरुपतीत कोट्यवधींचा लाडू घोटाळा
तिरुमला : आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती मंदिराचे व्यवस्थापन पाहणा-या तिरुमला तिरुपती देवस्थानामध्ये लाडू प्रसाद बनवण्यासाठी पुरवण्यात आलेल्या तुपात झालेल्या भेसळीच्या प्रकरणाने संपूर्ण देशाला मोठा धक्का दिला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या विशेष तपास पथकाच्या चौकशीत, उत्तराखंडमधील एका डेअरीने २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या काळात तब्बल ६८ लाख किलोग्राम बनावट तूप टीटीडीला पुरवले असून या […] The post तिरुपतीत कोट्यवधींचा लाडू घोटाळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत काही व्यक्तींकडून सोशल मीडियावर निराधार अफवा पसरवल्या जात आहेत. 'महामंडळाचे कामकाज बंद झाले आहे आणि व्याज परतावा थांबविण्यात आला आहे,' अशा या अफवांना कोणतेही तथ्य नाही. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी ही माहिती दिली असून, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. देशमुख यांनी स्पष्ट केले की, नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याचे काम वगळता महामंडळाचे इतर सर्व कामकाज सुरळीतपणे सुरू आहे. महामंडळाच्या वेब प्रणालीचे १० ऑक्टोबरपासून अपग्रेडेशनचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये वेब प्रणालीचे सिक्युरिटी ऑडिट पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत, महामंडळाने 'एलओआय' (LOI) आणि 'बँक सेक्शन' या दोन सेवा अधिसूचित केल्या आहेत. या सेवा १५ कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांत देण्याचे बंधन महामंडळाने स्वतःवर घालून घेतले आहे. याबाबत आवश्यक ते बदल वेब प्रणालीमध्ये केले जात आहेत. एजंटमार्फत लाभार्थ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी महामंडळाने सीएससी केंद्रांद्वारे केवळ ७० रुपयांत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी करार केला आहे. या अनुषंगाने वेब प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल सुरू आहेत. तसेच, लाभार्थ्यांना महामंडळाच्या सर्व सेवा थेट मोबाईलद्वारे मिळाव्यात यासाठी मोबाईल ॲप विकसित केले जात आहे. राज्यात विविध ठिकाणी एजंटमार्फत लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी नाशिक आणि अहमदनगरमध्ये संबंधितांवर फौजदारी गुन्हे नोंदवले गेले आहेत. असे प्रकार भविष्यात घडू नयेत यासाठी वेब प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीयीकृत बँकांसोबत बँक एपीआय (API) एकत्रीकरण सुरू असून, लाभार्थ्यांना सुरळीत आणि सहजपणे व्याज परतावा मिळणार आहे. लाभार्थ्यांना योजनांबाबत मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी चॅट जीपीटी स्मार्ट बोट प्रणाली विकसित करण्यात आली आहे. योजनांतर्गत काही असे व्यवसाय निदर्शनास आले आहेत की, त्यामधून अपेक्षित स्वयंरोजगार निर्मिती होत नाही. अशा व्यवसायांबाबत अंकेक्षणाबाबत योग्य निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेणे प्रस्तावित आहे. तसेच, मराठा समाजातील युवकांसाठी नवीन व्यवसाय कसे निर्माण करता येऊ शकतील, यावरही विचार सुरू आहे. लाभार्थ्यांसाठी ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम देखील सुरू करण्यात आले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश डी. पाटील यांच्या खंडपीठाने खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू आणि रस्ते सुरक्षेबाबत नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे नागरिकांच्या जीवन आणि सुरक्षिततेच्या अधिकाराचे रक्षण होणार आहे. नागरिकांनी खड्डे किंवा असुरक्षित रस्त्यांबाबत संबंधित प्राधिकरणाकडे तात्काळ तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य आणि इतरांविरुद्धच्या याचिकेवर निकाल देताना, न्यायालयाने भारतीय संविधानाच्या कलम २१ अंतर्गत रस्ते सुरक्षित स्थितीत ठेवणे हे नागरी आणि रस्ते निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे संवैधानिक कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले. खड्ड्यांमुळे होणारे मृत्यू आणि अपघात, विशेषतः पावसाळ्यात, 'एक वारंवार होणारी दुर्घटना' बनली आहे, जी सहन केली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. राज्यातील खड्डे, उघडे मॅनहोल आणि असुरक्षित रस्त्यांच्या परिस्थितीमुळे होणाऱ्या मृत्यू आणि दुखापतीसाठी जबाबदारी निश्चित करण्यासाठी न्यायालयाने व्यापक निर्देश दिले आहेत. सचिव सोनल पाटील यांनी सांगितले की, मृत्यू किंवा जखमी झाल्याबाबत भरपाई मिळवण्यासाठी साध्या कागदावर दावा दाखल करता येईल. दाव्यासोबत वैद्यकीय अहवाल आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्याबाबतचा अहवाल जोडल्यास प्रक्रिया सुलभ होईल. विधी सेवा प्राधिकरण जलदगतीने भरपाई मिळण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पीडितांना न्याय आणि मदत सुनिश्चित करण्यासाठी मोफत कायदेशीर मदत करेल. या निर्णयानुसार, खड्ड्यांमुळे नागरिकांचा मृत्यू झाल्यास मृतांच्या कायदेशीर वारसांना ६ लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी. जखमी झाल्यास, दुखापतीच्या तीव्रतेनुसार ५० हजार ते २ लाख ५० हजार रुपयांदरम्यान भरपाई दिली जाईल. सदरची भरपाई दावा केल्यापासून सहा ते आठ आठवड्यांच्या आत देण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ही भरपाई दिवाणी किंवा फौजदारी कायद्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही कायदेशीर उपायांव्यतिरिक्त असेल. खड्ड्यांमुळे किंवा असुरक्षित रस्त्यांमुळे जीव गमावलेल्या किंवा जखमी झालेल्या पीडित किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय आवार, नवीन इमारत, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे येथे संपर्क साधावा. ईमेल dlsapune2@gmail.com, दूरध्वनी क्रमांक ०२०-२५५३४८८१ आणि भ्रमणध्वनी क्रमांक ८५९१९०३६१२ वरही संपर्क साधता येईल.
साथी फौंडेशनतर्फे पुण्यात 'महाराष्ट्राचा विनोदवल्ली २०२५' या खुल्या राज्यस्तरीय स्टँडअप कॉमेडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ रोजी भरत नाट्य मंदिर येथे होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचे अर्ज सोमवार १० नोव्हेंबरपासून भरत नाट्य मंदिर येथे संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत उपलब्ध होतील. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ५ डिसेंबर असणार आहे. या स्पर्धेची माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि साथी फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष अमर राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आनंद बासा, आनंद जोशी, अनिता कामथे आणि राजीव पुणेकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले. स्पर्धा ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वाजता सुरू होईल. ही स्पर्धा पूर्णपणे मराठी भाषेत होणार असून, सादरीकरणाचा कालावधी ५ ते १० मिनिटे असेल. धार्मिक आणि राजकीय उपहासात्मक विषय स्पर्धेसाठी स्वीकारले जाणार नाहीत. प्रवेश अर्जासोबत सादरीकरणाची संहिता आयोजकांकडे सादर करणे बंधनकारक आहे. स्पर्धेविषयीचे सर्व अंतिम अधिकार आयोजकांकडे राखीव आहेत असे यावेळी सांगण्यात आले. स्पर्धेत स्त्री आणि पुरुष अशा दोन गटांत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र स्वरूपात दिली जातील. प्रथम क्रमांक विजेत्यास 'महाराष्ट्र विनोदवल्ली २०२५' हा किताब देऊन गौरवण्यात येईल. अधिक माहितीसाठी साथी फाउंडेशनचे अध्यक्ष अमर राजपूत यांच्याशी ७०३०१९०१११ या क्रमांकावर किंवा vinodvalli2025@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
भर न्यायालयात बूट फेकण्याच्या एआयनिर्मित व्हीडीओ पाहला
नागपूर : देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या न्यायालयात घडलेल्या बूटफेक प्रकरणाबाबत सोशल मीडियावर फिरणारा बनावट (मॉर्फ) व्हीडीओ त्यांना माहित असून, त्यांनी तो पाहिलाही आहे. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) न्यायव्यवस्थेत कशी वापरावी, यासाठी धोरण […] The post भर न्यायालयात बूट फेकण्याच्या एआयनिर्मित व्हीडीओ पाहला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नव्या टॅरिफ धोरणात आणखी ७०० वस्तु जोडा
न्यूयॉर्क : भारत आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून तणाव बघायला मिळत आहे. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला. आता भारतासाठी अत्यंत वाईट बातमी असून वृत्तानुसार, अमेरिकन कंपन्या राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेल्या मोठ्या शुल्काचा विस्तार करण्याची मागणी करत आहेत, जे भारतासाठी धोक्याचे आहे. याचा परिणाम फक्त भारतच नाही तर इतर देशांवरही होऊ शकतो. या यादीत स्टीलशी संबंधित […] The post नव्या टॅरिफ धोरणात आणखी ७०० वस्तु जोडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विशिष्ट ओळख बाजूला ठेवून आरएसएसमध्ये सहभागी होता येते
बंगळूरू : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. संघ यावर्षी शताब्दी वर्ष साजरं करतोय. या प्रसंगी देशाच्या विभिन्न भागात कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सरसंघचालक मोहन भागवत सहभागी झालेले. या प्रसंगी संघ प्रमुखांना आरएसएसमध्ये मुस्लिमांना सहभागी व्हायला परवानगी आहे का? असा प्रश्न […] The post विशिष्ट ओळख बाजूला ठेवून आरएसएसमध्ये सहभागी होता येते appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठित करावी, असे आव्हान कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केले आहे. नाना पटोले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी विकास खरगेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली आहे. या पद्धतीच्या चौकशीचा आणि कमिटीचा फार्स करून जनतेची जी दिशाभूल चाललेली आहे. महाराष्ट्र रोज लुटण्याचे काम सुरू आहे. तुमच्यात खरोखरच हिंमत असेल आणि दूध का दूध, पाणी का पाणी करायचे असेल तर तुकाराम मुंढेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवा, असे आव्हान केले आहे. पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, पार्थ पवारांच्या 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्यात औद्योगिक नवीन धोरण आणायचे आणि स्टॅम्प ड्युटी वाचवण्याचे धोरण ही फक्त एक पद्धत आहे. मुंबई आणि बीकेसी मधील 500 एकर पेक्षा अधिक जमीन, सी लिंकच्या बाजूची जमीन, रस्ते विकास महामंडळाची जमीन, या सगळ्या जमिनी कशा आणि काय भावाने दिल्या? नवी मुंबईचे मार्केट यार्ड होते, ती जमीन मोदीजींच्या मित्रांना आयटी पार्कच्या नावाने देण्यात आली. असे सगळे सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की ही गंभीर बाब आहे. महाराष्ट्रात अशा अनेक प्रकारच्या जमीन घोटाळ्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याची चौकशी बसवण्याची गरज नाही, ते कागदावरच स्पष्ट होते. शासन तुम्ही चालवत आहात, सरकार तुम्ही चालवत आहात, अशा वेळेस चौकशी बसवायची गरजच काय? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील मुंढव्यातील 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये लाटण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी असलेली 21 कोटींची स्टँप ड्युटीही भरली नाही. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. यावरून नाना पटोले यांनी टीका केली आहे.
औषध कंपन्यांना ३१ डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था विषारी कफ सिरपमुळे अलीकडेच मोठ्या प्रमाणात बालकांचे मृत्यू झाले होते. या प्रकारानंतर देशातील औषध उत्पादक कंपन्यांना जागतिक उत्पादन मानके पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंपन्यांनी ही प्रक्रिया जानेवारीपर्यंत पूर्ण करावी. त्यापुढे त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही, असे भारताच्या औषध नियामकांनी स्पष्ट केले आहे. विषारी कफ सिरपमुळे सप्टेंबरमध्ये २४ […] The post औषध कंपन्यांना ३१ डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बंगळुरुच्या तुरुंगात कैद्यांचा डान्स आणि दारू पार्टी
बंगळुरू : बंगळुरूच्या परप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहातून दुसरा व्हीडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये कैदी गाणे गाताना, नाचताना आणि पार्टी करताना दिसत आहेत. तथापि, या व्हीडीओची अद्याप पडताळणी झालेली नाही. ५५ मिनिटांच्या व्हायरल व्हीडीओची सुरुवात खिडकीच्या चौकटीवर दारूच्या चार बाटल्या दाखवण्याने होते. पुढे, काही कैदी जमिनीवर बसून भांडी वाजवत आहेत. पाच-सहा कैदी नाचत आहेत आणि ओरडत […] The post बंगळुरुच्या तुरुंगात कैद्यांचा डान्स आणि दारू पार्टी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन
वॉशिंग्टन : अमेरिकेत शटडाऊनमुळे शनिवारी सुमारे हजाराहून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. जर शटडाउनवर लवकर तोडगा निघाला नाही, तर विमान कंपन्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागेल, अशी भीती अर्थविश्लेषकांनी दिली आहे. शनिवारी अटलांटा, शिकागो, डेनव्हर, न्यू जर्सी येथून निघणा-या सर्व विमानोड्डाणांची सेवा विस्कळीत झाली होती. उत्तर कॅरोलिना राज्यातील शेर्लोट विमानतळावरील १३० उड्डाणे […] The post अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मालीत पाच भारतीय नागरिकांचे अपहरण
नवी दिल्ली : पश्चिम आफ्रिकेतील सर्वात अस्थिर देशांपैकी एक असलेल्या मालीमध्ये पाच भारतीय नागरिकांचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित जिहादी गटांच्या वाढत्या हालचालींमुळे आधीच अस्थिर असलेल्या या देशात ही घटना घडल्याने भारताने याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सोमवार दि. १० नोव्हेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, […] The post मालीत पाच भारतीय नागरिकांचे अपहरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे : निवडणूक आयोगाने राज्यात नगरपंचायत, नगरपालिका निवडणुका जाहीर केल्या असून, सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. करुणा मुंडे यांनी काढलेल्या स्वराज्य शक्ती सेना पक्षानेदेखील निवडणुकीची तयारी केली असून, पुणे जिल्ह्यातील एकूण १४ नगरपरिषद आणि ३ नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पक्षाच्या अध्यक्षा […] The post करुणा मुंडे ‘स्वबळावर’ लढवणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिला डॉक्टरच्या न्यायासाठी मुंबईत काँग्रेस आक्रमक
मुंबई : प्रतिनिधी फटलण येथील महिला वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. तळहातावर एक नोट लिहित संपदा मुंडेंनी आयुष्याचा शेवट केला. आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. साता-यांच्या फलटण येथील वैद्यकीय अधिकारी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली. अत्यंत गंभीर आरोप या प्रकरणात केली जात आहेत. एका खासदाराचे नावही या प्रकरणात आले. […] The post महिला डॉक्टरच्या न्यायासाठी मुंबईत काँग्रेस आक्रमक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिला आघाडी जिल्हा संपर्क कार्यालय चळवळीचे केंद्र बनेल
परभणी : शिवसेना महिला आघाडी सातत्याने महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करते. केवळ प्रश्नच नाही तर त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेत आहे. परभणीत महिलांसाठी सुरू केलेले महिला जिल्हा संपर्क कार्यालय निश्चितच महिलांच्या हक्काचे, चळवळीचे केंद्र बनेल, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या तथा शिवसेना महिला आघाडी मराठवाडा समन्वयक ज्योती ठाकरे यांनी केले. शिवसेना ठाकरे […] The post महिला आघाडी जिल्हा संपर्क कार्यालय चळवळीचे केंद्र बनेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दिशा पतसंस्थेच्या नळदुर्ग शाखेतून पावणेपाच किलो सोने लंपास
धाराशिव : प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील दिशा नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेतून २ कोटी ६१ लाख ४२ हजार २७ रूपये किंमतीचे ४ किलो ७६२ वजनाचे सोन्याचे दागिने व रोख २ लाख २१ हजार २४५ रूपये चोरट्यांनी लंपास केले. ही चोरीची घटना दि. ८ नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी दिशा पतसंस्थेचे व्यवस्थापक उमेश जाधव यांनी दिलेल्या […] The post दिशा पतसंस्थेच्या नळदुर्ग शाखेतून पावणेपाच किलो सोने लंपास appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयं सेवक संघावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत संघाला उद्देशून तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. आरएसएस रजिस्टर्ड संस्था आहे का? नसेल, तर इतके फंडिंग कसे काय मिळत आहे? तसेच संघाने भारतीय तिरंगा स्वीकारला नव्हता, हे खरे आहे की खोटे? असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करत म्हटले की, इकडची तिकडची बकवास बंद करा आणि माझ्या तीन प्रश्नांचे उत्तर द्या. आरएसएस ही नोंदणीकृत संघटना आहे का? जर ती नोंदणीकृत नसेल, तर तिला कोट्यवधी रुपयांचा निधी कसा मिळत आहे? हे खरे नाही का की आरएसएसने भारतीय ध्वज स्वीकारला नाही? हे खरे नाही का की आरएसएसने अनेक दशकांपासून नागपूर येथील मुख्यालयात तिरंगा फडकवला नाही? हे खरे नाही का की गोळवलकर आणि सावरकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले समतावादी, लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष संविधान नाकारले आणि मनुस्मृतीला संविधान बनवण्याची मागणी केली? असे प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केले आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आता आरएसएस आणि मनुवादी शक्तींना तोंड देण्यासाठी एकत्र आले आहेत. तुम्ही आणि तुमच्या अर्ध्या अंतर्वस्त्रांच्या टोळीने एक गोष्ट समजून घेतली पाहिजे, आपला देश मनुस्मृतीने नव्हे तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाने चालेल, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ओबीसींच्या राजकीय लढ्याला सुरुवात दरम्यान, आज प्रकाश आंबेडकर यांची जालना येथे जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. आज धर्म नव्हे तर ओबीसी धोक्यात आहेत. ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही. ओबीसींच्या राजकीय लढ्याला सुरुवात झाली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. जालना येथे जाहीर सभेत ते बोलते होते. जरांगे मुंबईत ठिय्या मांडून बसले आणि कॉंग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे 190 आमदार जरांगेंच्या दर्शनाला गेले. हेच आमदार देवेंद्र फडणवीस यांना भेरले तशी फडणवीस यांची भाषा बदलली, अशी टीका आंबेडकरांनी केली आहे. फडणवीस हा जीआर रद्द करणार आहेत का? पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, जे आमदार जरांगे यांना भेटले तेच आमदार जरांगे काय म्हणतात ते ऐकण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सल्ला दिला आणि कुणबी प्रमाणपत्राचा जीआर निघाल, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हा जीआर रद्द करणार आहेत का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक तरी ओबीसी मतदार हवा आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर म्हणाले, ओबीसींनी मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार जाहीर केले पाहिजेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक तरी ओबीसी मतदार असायला हवा. काही मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव आहेत. काही मतदारसंघ एसटीसाठी राखीव आहेत. एसी आणि एसटी हा वर्ग आरक्षणवादी आहे. हे लक्षात घ्यायला हवे. जे लोक आरक्षणवादी आहेत, त्यांनाच मतदान करायला हवे. आपल मत हे ओबीसीला, आपले मत हे एसटीला असायला हवे, असे आवाहन आंबेडकरांनी केले आहे. ओबीसी नेत्यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातात पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, धर्म नाही तर ओबीसी संकटात आला आहे. ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही. ओबीसी नेत्यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये आहेत. कळसूत्री बाहुल्याप्रमाणे हे ओबीसी नेते नाचवले जात आहेत, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींनी राजकारणात उतरावे, असेही आवाहन केले आहे.
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर
नवी दिल्ली : नुकतेच गुजरात एटीएसने इसिसशी निगडित एक मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. ज्यात रिसिन नावाचे रासायनिक विषाचा वापर करण्याचे षडयंत्र होते. हे विष एरंडीच्या बियांपासून तयार केलेले असते. जे घराघरात सहजपणे मिळते. परंतु हे किती धोकादायक आहे? याच्या अगदी थोड्या प्रमाणातही एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. याच रिसिनचा वापर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष […] The post भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हरियाणात स्फोटकांचा मोठा साठा जप्त
फरिदाबाद : दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील फरिदाबाद शहरात एका डॉक्टरकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके सापडल्याने तपास यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तपास यंत्रणांच्या हाती आणखी एक महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे. पोलिसांनी एका महिला डॉक्टरच्या कारमधून एक असॉल्ट रायफल, एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कार फरिदाबादच्या रुग्णालयात काम करणा-या […] The post हरियाणात स्फोटकांचा मोठा साठा जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सार्वजनिक चलनातील रकमेत दुुपटीहून अधिक वाढ
मुंबई : ८ नोव्हेबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अचानक नोटबंदीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी देशभरातील बँकांसमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नोटबंदीच्या या निर्णयाला यंदा नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या काळात सार्वजनिक चलनातील रकमेत दुपटीहून अधिक वाढ झाल्याचे समोर आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या […] The post सार्वजनिक चलनातील रकमेत दुुपटीहून अधिक वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हसन मुश्रीफ यांच्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापुरातील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी गटाची ऐतिहासिक युती झाली आहे. चंदगड नगर परिषदेमध्ये ही युती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. या राजकीय घडामोडीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने दोन्ही […] The post हसन मुश्रीफ यांच्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर; चाहते चिंतेत
मुंबई : प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्येत अस्वास्थ्यामुळे त्यांना चेकअपसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार आता त्यांची स्थिती गंभीर असल्याचे कळत आहे. धर्मेंद्र आयसीयूमध्ये असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य हे रुग्णालयातच आहेत. शिवाय त्यांची दोन्ही मुलींनाही अमेरिकेहून भारतात परत […] The post अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर; चाहते चिंतेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाज्यांचे दर कडाडले;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
पुणे : प्रतिनिधी पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत घटल्याने काही भाज्यांचे दर वाढले. विशेषत: भेंडी, गवार, काकडी, वांगी, गाजर, घेवडा आणि भुईमूग शेंग यांच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली, तर मटारचे दर घसरले. हिरवी मिरची मात्र स्वस्त झाली असून, इतर भाज्यांचे दर तुलनेने स्थिर राहिले. सोमवारी […] The post भाज्यांचे दर कडाडले;सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्तेपदावरून रुपाली ठोंबरे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून थेट ऑफर आली आहे. रुपाली ठोंबरे यांनी शिवसेनेत यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू, अशी ऑफर सुषमा अंधारे यांनी दिली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, रूपाली ठोंबरे ही माझी चांगली मैत्रीण आहे आणि ती राहील. तिला कोणतीही भीती नाही, ईडी किंवा सीबीआयचा तिला बॅरेज नाही. सर्वार्थाने ती अतिशय क्लीन इमेज असलेली व्यक्ती आहे. अशी महिला कोणत्याही पक्षात येणे कोणालाही आवडेलच. त्यांनी शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त करावी, आम्ही त्याचे स्वागत करू. पण माझ्या पक्षात ती यावी म्हणून तिच्या त्या पक्षात नुकसान व्हावे असा विचार करणारी मी नाही. जर तिच्या पक्षात तिला स्कोप मिळत असेल तर तिने तिथे काम करावे, असा सल्ला देखील अंधारे यांनी दिला आहे. दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांना वगळण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षात अंतर्गत वाद सुरू होते. रूपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यात देखील वाद सुरू आहेत. याचाच फटका रूपाली ठोंबरे यांना बसला असल्याचे बोलले जात आहे. तसेच भाजपवर सतत टीका करणाऱ्या अमोल मिटकरी यांना देखील प्रवक्ते पदावरून वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे मारहाण प्रकरणातील सुरज चव्हाण यांना प्रवक्तेपद पुन्हा देण्यात आले आहे. लातूर येथे सुरज चव्हाण यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर सुरज चव्हाण यांचे प्रवक्तेपद काढून टाकण्यात आले होते. आता नवीन यादी जाहीर झाली असून त्यात सूरज चव्हाण यांची पुन्हा एकदा प्रवक्तेपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
पुस्तक आणि कागदावर लागू असलेला वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दर कमी करण्याची मागणी प्रकाशन आणि शैक्षणिक क्षेत्राकडून जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर, पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना औपचारिक पत्र पाठवून ही मागणी केली आहे. मोहोळ यांनी पत्रात नमूद केले आहे की, कागद आणि संबंधित साहित्यावरील जीएसटी दर १२ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत वाढल्यामुळे पुस्तकांच्या किमतींमध्ये १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. या दरवाढीचा थेट परिणाम विद्यार्थी, पालक, लेखक, तसेच लघु आणि मध्यम प्रकाशन उद्योगांवर होत आहे. कोविड महामारीनंतर सावरत असलेल्या प्रकाशन व्यवसायाला या वाढलेल्या करामुळे पुन्हा संकटाचा सामना करावा लागू शकतो, अशी चिंता मोहोळ यांनी व्यक्त केली. त्यामुळे जीएसटी वाढीचा पुनर्विचार करण्याची विनंती त्यांनी केली आहे. पत्रात पुढे म्हटले आहे की, पुस्तके ही केवळ वस्तू नसून ती ज्ञान, शिक्षण आणि संस्कृतीचा पाया आहेत. अशा परिस्थितीत, पुस्तकांवरील जीएसटी दर कमी करून पुन्हा १२ टक्क्यांवर आणावा किंवा शैक्षणिक वापरासाठी असलेल्या कागद व पुस्तकांना करातून पूर्णतः सूट द्यावी, अशी मागणी मोहोळ यांनी केली आहे. जीएसटी दर कमी केल्यास प्रकाशन व मुद्रण उद्योगाला पुनरुज्जीवन मिळेल, पुस्तके व शैक्षणिक साहित्य सर्वांसाठी परवडणारे राहतील आणि 'विकसित भारत' या ज्ञानाधिष्ठित ध्येयाला चालना मिळेल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. शिक्षण आणि प्रकाशन क्षेत्र ही ज्ञानाधारित समाजाची दोन महत्त्वाची स्तंभ असून, या क्षेत्रावर वाढत्या कराचा बोजा नको, अशी विनंती मोहोळ यांनी केली आहे.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आत्महत्येप्रकरणी युवक काँग्रेसने मुंबईत आज तीव्र आंदोलन केले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर थेट धडक दिली. नरीमन पॉइंट, मरीन ड्राईव्ह व वर्षा बंगला अशा तीन ठिकाणी युवक काँग्रेसने आंदोलन करून भाजपा महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून डॉक्टर फलटण आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व मुंबई युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदन भानू चिब, युवक काँग्रेसचे प्रभारी मनिष शर्मा, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश शर्मा, वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत, युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड गिरगाव चौपाटी येथून सुरु झालेले आंदोलन थेट वर्षा बंगल्यावर पोहचले. युवक काँग्रेसचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी सरकारने पोलिसांच्या मदतीने प्रयत्न केला. अनेक कार्यकर्त्यांना चर्नी रोड स्थानकात अडवून ठेवले. गिरगाव चौपाटी भागातही ठिकठिकाणी बॅरिकेटींग करून कार्यकर्त्यांची धरपकड केली. पण आक्रमक कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियमजवळ मरिन ड्रायव्हवरच रास्ता रोको केला, यामुळे जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांना गुंगारा देऊन वर्षावर धडक पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पण युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तन्वीर अहमद विद्रोही, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रविणकुमार बिराजदार आणि नागपूर ग्रामीण जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिथिलेश कान्हेरे यांनी पोलिसांना गुंगारा देऊन वर्षा बंगल्यावर धडक मारली व जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ताब्यात घेतले. महिला डॉक्टरला भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व पोलिसांच्या अनन्वित छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली असली, तरी यामागचा मुख्य सुत्रधार भाजपचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर मात्र अद्याप मोकाटच आहे. मुख्यमंत्र्यांनी तर निंबाळकरांना कोणत्याही चौकशी आधीच क्लिन चिट देऊन टाकली आहे. काँग्रेस पक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. पीडित डॉक्टरला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुंडे कुटुंबियांना दिली आहे. सरकार चौकशीच्या नावाखाली मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण जोपर्यंत डॉक्टर महिलेला यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा हा लढा सुरुच राहील, असे आंदोलकांकडून सांगण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल सतर्क झाले असून सोमवारी ता. १० पहाटे हाती घेण्यात आलेल्या धरपकड मोहिमेत चार तलवार, तीन खंजरसह वाळू वाहतूक करणारे तीन हायवा पोलिसांनी पकडले आहे. या शिवाय हद्दपार केलेल्या गुन्हेगाराला त्याच्या घरी पकडण्यात आले. या प्रकरणी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीसह कळमनुरी व वसमत पालिकेची निवडणुक होत आहे. या निवडणुका निर्भय वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलिस विभागाने ॲक्शन प्लॅन हाती घेतला असून प्रत्येक प्रभागासाठी एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या शिवाय पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, गुुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह ४० अधिकारी व ३०० कर्मचाऱ्यांनी आज पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत धरपकड मोहिम हाती घेतली. या मोहिमेत गुुन्हेगारांची तपासणी करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये चार ठिकाणी तलवार तर तीन ठिकाणी खंजर आढळून आले असून पोलिसांनी सर्व शस्त्र जप्त केले आहेत. या सोबतच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल घुले, जमादार आकाश पंडीतकर, बाळासाहेब खोडवे, आशिष उंबरकर, अनिल डुकरे, सुधीर ढेंबरे, संतोष वाठोरे यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला आहे. या शिवाय औंढा नागनाथ तालुक्यात दोन ठिकाणी वाळू वाहतूक करणारे हायवा पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय डिग्रस कऱ्हाळे येथील एका गुन्हेगारास हद्दपार केल्यानंतरही तो घरी आढळून आला आहे. त्यामुळे त्याला त्ाब्यात घऊन गुन्हा दाखल करण्यात आल्याचे हिंगोली ग्रामीण पोलिसांनी सांगितले. जिल्हयात नाकाबंदीसह सरप्राईज व्हिटीज व कोंबींग ऑपरेशन राबविले जाणार असून यावेळी गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
नगर पालिका आणि नगर पंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दोन महिन्यात सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्या कशा लढायच्या याचा पेच अद्यापही कायम आहे. कधी स्थानिक नेत्यांना अधिकार दिले आहे तर कधी जिथे फायदा तिथे महायुती करू असे सांगून थेट भूमिका भाजपने जाहीर केली नव्हती. मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढवू, अशा तीव्र भावना कार्यकर्त्यांनी आपल्याकडे व्यक्त केल्या आहे. त्या पाहाता स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहे असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे माध्यमांसोबत बोलताना सांगितले. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात महायुती होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढल्यामुळे स्थानिक निवडणुकाही महायुती एकत्रच लढणार असल्याचे सुरुवातीला भाजपने जाहीर केले होते. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांना याचे अधिकार दिले आहे, त्यात वरिष्ठ नेते हस्तक्षेप करणार नाही, अशी असेही भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केले होते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच ठिकाणी युती होणार नाही, जिथे महायुतीचा फायदा होईल आणि महाविकास आघाडीला फायदा होणार नाही अशा ठिकाणी परिस्थिती बघून निर्णय घेतला जाईल असे सांगितले. वेगवेगळ्या भूमिकांमुळे महायुतीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुती आणि जागावाटपाच्या बोलणीसाठी भाजपने पुढाकार घेतला नाही. आजपासून नगर पालिकाला, पंचायतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात देखील झाली. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बाबनकुळे यांनी माध्यमांसोबत बोलताना भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याला स्वबळावर लढायचे असल्याने तयारीला लागण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या नेत्यांसोबत भेट घेतली. दोघांनी समविचारी पक्ष आणि संघटनांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचे ठरवले आहे. भाजप नेत्यांकडून महायुतीबाबत प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. दुसरीकडे काँग्रेसतर्फेसुद्धा नागपूर ग्रामीणमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेनेसोबत आघाडीचे बोलणी टाळत आहे. हे बघता आता स्थानिकमध्ये सर्वांनाच स्वबळावर लढावे लागणार आहे.
सध्याच्या वातावरणात पावसाळ्याऐवजी हिवाळ्याचा अनुभव येत असताना, थंडीने हजेरी लावली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली आहे. येणारी थंडी हुडहुडी भरवणारी आणि खोबरेल तेल गोठवणारी असेल, असे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. थंडीच्या आगमनामुळे पंख्यांचा वेग कमी झाला असून, अनेक ठिकाणी पंखे बंदही झाले आहेत. सायंकाळी ५ नंतर लवकर अंधार पडू लागतो आणि थंडीचा प्रभाव वाढतो. यामुळे लोकरीच्या कपड्यांची दुकाने सजली असून, कपाटात ठेवलेले स्वेटर, मफलर, कानटोप्या, हातमोजे आणि जर्कीन बाहेर काढले जात आहेत. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यात विदर्भातील अनेक शहरांमध्ये पारा मोठ्या प्रमाणात घसरतो. गेल्या काही वर्षांतील नोंदीनुसार, या महिन्यात किमान तापमान लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून येते. अकोला येथे २९ नोव्हेंबर २०१२ रोजी ५.६ अंश सेल्सिअस, ३० नोव्हेंबर १९७० रोजी ७.६ अंश सेल्सिअस आणि २९ नोव्हेंबर १९७५ रोजी ८.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले होते. अमरावतीमध्ये २९ नोव्हेंबर १८८४ रोजी ८.९ अंश सेल्सिअस, १० नोव्हेंबर २००८ रोजी १०.६ अंश सेल्सिअस आणि २६ नोव्हेंबर २०१६ रोजी ११.०० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बुलडाणा येथे ३० नोव्हेंबर १९९२ रोजी ११.०० अंश सेल्सिअस, २७ नोव्हेंबर १९८४ रोजी ११.१ अंश सेल्सिअस आणि २१ नोव्हेंबर २०२२ रोजी ११.६ अंश सेल्सिअस तापमान होते. ब्रह्मपुरी येथे २४ नोव्हेंबर १९८१ रोजी ६.२ अंश सेल्सिअस, २६ नोव्हेंबर १९९२ रोजी ६.६ अंश सेल्सिअस आणि २५ नोव्हेंबर १९८१ रोजी ६.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. चंद्रपूरमध्ये २३ नोव्हेंबर १९६८ रोजी ६.२ अंश सेल्सिअस, २७ नोव्हेंबर १९८४ रोजी ७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदिया येथे २९ नोव्हेंबर १९९८ रोजी ८.५ अंश सेल्सिअस, ३० नोव्हेंबर १९७० रोजी ९.१ अंश सेल्सिअस आणि २९ नोव्हेंबर १९७० रोजी ९.५ अंश सेल्सिअस तापमान होते. नागपूरमध्ये ३० नोव्हेंबर १९१२ रोजी ६.७ अंश सेल्सिअस, ३० नोव्हेंबर १९७४ रोजी ७.० अंश सेल्सिअस आणि ३० नोव्हेंबर १९७० रोजी ८.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. वर्धा येथे २४ नोव्हेंबर २००९ रोजी ८.५ अंश सेल्सिअस, ३० नोव्हेंबर २००९ रोजी ९.० अंश सेल्सिअस आणि २९ नोव्हेंबर २००९ रोजी ९.२ अंश सेल्सिअस तापमान होते. वाशिममध्ये १८ नोव्हेंबर २०१२ रोजी ११.० अंश सेल्सिअस, १९ नोव्हेंबर २०१२ रोजी ११.८ अंश सेल्सिअस आणि २८ नोव्हेंबर २०१७ रोजी १२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
सामाजिक आणि राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वतः दमानिया यांनीच या बाबत खुलासा करत सांगितले की, काही विश्वसनीय सूत्रांकडून त्यांना ‘तुमचा गेम केला जाणार’ असा इशारा मिळाला आहे. या धमकीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली असून, त्यांनी दमानिया यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. या घडामोडीची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आली आहे. विदेशात असताना मिळाला इशारा अंजली दमानिया म्हणाल्या, मी अमेरिकेत असताना एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मला फोन आला. त्यांनी सांगितले की, त्यांच्या हातात काही इनपुट आले आहेत. काही लोक चर्चा करत आहेत की ‘यांचा गेम करायचाच’. त्यामुळे तुम्ही सावध राहा, असे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, मला सांगण्यात आले की, धमकी देणारे जे लोक आहेत ते सेकंड रँकचे लोक आहेत. तुम्ही काळजी घ्या. प्रवासादरम्यान गाड्या बदलून वापरा, गाडी चालवताना फोन स्विच ऑफ ठेवा. मला स्पष्टपणे सतर्क राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत. धमकी देणारी व्यक्ती कोण? धमकी देणाऱ्या व्यक्तीविषयी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, त्यांच्याबद्दल मला काहीच माहित नाही. त्यांच्या इनपुट बद्दल मला काही माहित नाही. पण मला जे फोन आला होता ते अतिशय मोस्ट सीनियर लेवल वरून फोन आला होता. आणि खात्रीलायकपणे सांगितले होते की यांचे आता अती होत आहे यांचा आता गेम करायचा.’ मुख्यमंत्र्यांनाही दिली माहिती दमानिया यांनी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांनी हा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कळवला आहे. “या इशाऱ्याची गंभीरता लक्षात घेता त्यांनी ताबडतोब महाराष्ट्र सरकारला माहिती दिली आहे,” असे त्या म्हणाल्या. जरांगेंना धमकी येण्याआधीच मिळाला इशारा दमानिया यांनी आणखी एक धक्कादायक बाब उघड केली. त्या म्हणाल्या, सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी मिळाली, त्या फोनच्या आदल्या दिवशीच मला हा इशारा मिळाला होता, असा खुलासा त्यांनी केला. त्यामुळे या दोन घटनांमध्ये काही संबंध आहे का, याबाबत आता चर्चा सुरू आहे. या सर्व घटनांनंतरही अंजली दमानिया यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. त्या म्हणाल्या, “मला सिक्युरिटी घ्यायला सांगण्यात आले. पण मी दोन वेळा लिहून दिले आहे की मला सिक्युरिटी नको आहे. मी माझं सामाजिक काम सुरू ठेवणार.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार व अजित पवार या दोन्ही गटांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपंचायत मिळून लढवण्याची घोषणा केली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणी दोन्ही गटांची यशस्वी मनधरणी केली आहे. राष्ट्रवादीतील बंडाळीनंतर प्रथमच हे दोन्ही गट या निमित्ताने एकत्र आलेत. त्याची राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची नुकतीच एक मुंबईत बैठक झाली होती. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप वगळता सर्वच पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे शरद पवार गट अजित पवारांच्या गटाशी हातमिळवणी करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण आज अखेर या दोन्ही पक्षांनी चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकत्र येण्याची घोषणा करून या चर्चेला पूर्णविराम दिला. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी या आघाडीसाठी यशस्वी मध्यस्थी केली. संयुक्त पत्रकार परिषदेत केली घोषणा यासंबंधीच्या माहितीनुसार, शरद पवार गटाच्या नंदाताई बाभूळकर यांच्या गडहिंग्लज येथील कार्यालयात एक बैठक झाली. या बैठकीला अजित पवारांच्या पक्षाचे राजेश पाटील उपस्थित होते. त्यात दोन्ही नेत्यांनी विस्तृत चर्चा करून चंगडग नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप विरोधात रान पेटवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी शहरविकास आघाडी स्थापन केली आहे. नंदाताई बाभूळकर व राजेश पाटील यांनी सोमवारी एका संयुक्त पत्रकार परिषदेद्वारे या आघाडीची घोषणा केली. या आघाडीमुळे चंदगड नगरपंचायत काबीज करण्याची व्युहरचना आखणाऱ्या भाजपची मोठी अडचण झाली आहे. राज्यात सर्वत्र युती होणार का? अजित पवारांनी 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बंड केले होते. त्यांनी आपल्या 40 समर्थक आमदारांच्या मदतीने शरद पवारांच्या नेतृत्वाला आव्हान देत आपला वेगळा गट स्थापन केला होता. त्यानंतर पक्षावरही दावा सांगितला होता. या प्रकरणी निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीनंतर त्यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील राजकीय वैमनस्य टोकाला गेले होते. पण आता हे दोन्ही पक्ष राजकीय गरजेनुसार एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानुसार, चंदगड नगरपंचायतीतील निवडणूक आघाडी राज्यातील इतर जिल्ह्यांतही पहावयास मिळेल असा दावा केला जात आहे. शरद पवारांनी काय केल्यात सूचना? दुसरीकडे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची रविवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत शरद पवारांनी आगामी निवडणुकांच्या मुद्यावर आपल्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यानुसार, ज्या ठिकाणी ओबीसीसाठी जागा आरक्षित आहेत, तिथे मूळ ओबीसींना संधी देण्यात येणार आहे. पण ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार मिळणार नाही, त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाणार आहे.
रुपाली ठोंबरेसह मिटकरींना प्रवक्ते पदावरून हटवले
मुंबई : प्रतिनिधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि त्याच पक्षातील नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांच्यात अनेकदा वाद होताना दिसतो. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी हे अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करताना दिसतात. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती करताना रुपाली ठोंबरे-पाटील आणि अमोल […] The post रुपाली ठोंबरेसह मिटकरींना प्रवक्ते पदावरून हटवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचे तोंड काळे करणाऱ्याला तब्बल 2 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. हा पदाधिकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा समर्थक आहे. त्यामुळे बच्चू कडू व विखे पाटील यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांविषयी एक वादग्रस्त विधान केले होते. अगोदर कर्जबाजारी व्हायचे आणि त्यानंतर कर्जमाफी मागायची हा प्रकार राज्यात गत अनेक वर्षांपासून सुरू आहे. शेतकऱ्यांना असे करण्याची सवयच लागली आहे, असे ते म्हणाले होते. माजी आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या या विधानाचा समाचार घेत विखेंची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर विखे समर्थक भाजपचे अहिल्यानगरचे ओबीसी जिल्हाध्यक्ष दादासाहेब सोनमाळी यांनी बच्चू कडू यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 2 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. सध्या विखे पाटलांची तिसरी पिढी समाजकार्यात सक्रीय आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी त्यांच्याविषयी बोलताना तोंड सांभाळावे. विखे पाटील अमरावतीचे पालकमंत्री होते. तेव्हा बच्चू कडू स्वतः अनेक कामे घेऊन त्यांच्याकडे येत होते. त्यामुळे यापुढे ते जपून न बोलल्यास त्यांना अहिल्यानगर जिल्ह्यात पाय ठेवणे अवघड होईल, असे दादासाहेब सोनमाळी यांनी याविषयी बच्चू कडू यांना इशारा देताना म्हटले आहे. लोणीच्या व्यक्तीचे 3 लाखांचे बक्षीस लोणी येथील प्रतिम कदम नामक एका व्यक्तीनेही बच्चू कडू यांची गाडी फोडणाऱ्याला किंवा त्यांना काळे फासणाऱ्याला 3 लाखांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. विखे पाटील 208 शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करत आहेत. मी स्वतः शेतकरी आहे. पण बच्चू कडूंसारखा सधन शेतकरी नाही. त्यांनी विखे पाटलांविरोधात बेताल विधान करण्याची गरज नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे. संयमाने घ्या, वाद वाढवू नका - सुजय विखे दुसरीकडे, या वादावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही भाष्य केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या कथित विधानाचा विपर्यास करण्यात आला. त्यामुळे बच्चू कडू यांनी त्यांच्याविरोधात तसे विधान केले. पण ज्येष्ठ नेत्यांविषयी बोलताना त्यांनी भान राखले पाहिजे. असे बोलणे योग्य नाही. प्रक्षोभक विधान करणे संयुक्तिक नाही. आम्ही संयमी राजकारणी आहोत. आम्ही कुठेही कायदा हातात घेत नाही किंवा यापूर्वी कधी घेतला नाही. आम्ही प्रत्येक परिस्थितीचा नेटाने सामना केला आहे, असे ते म्हणालेत. ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीविषयी विस्तृत भाष्य केले आहे. त्यानंतरही या प्रकरणी संशय घेणे योग्य नाही. मला एका कार्यकर्त्याने क्लिप पाठवली. बच्चू कडू यांच्यासोबतच्या संवादाची ही क्लिप होती. माझ्या मते हा वाद आता संपला पाहिजे. केवळ वाद वाढवून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. विखे पाटलांनीही हा वाद सोडून दिला आहे. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही या प्रकरणी संयमाने घेण्याची गरज आहे. आपल्याला शेतकऱ्यांसाठी लढायचे असून, आपला उद्देशही तोच आहे. त्यामुळे हा वाद संपला पाहिजे. या प्रकरणी मी काही बोललो तर त्याचेही पडसाद उमटतील. त्यामुळे कुणीही काहीही बोलू नये. कधी कधी भावनेच्या आहारी गेलेल्या कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणताना त्रास होतो. पण आता निवडणुका तोंडावर आहेत. तुम्हाला भरपूर मटेरियल मिळेल. त्यामुळे आत्ताच वातावरण पेटवू नका, असेही सुजय विखे यावेळी बोलताना म्हणाले.
राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ची सुरक्षा वाढवली
मुंबई : प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानाबाहेर अचानकपणे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही सुरक्षा वाढवण्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काल शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानाबाहेर ड्रोन घिरट्या घालत असल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर […] The post राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ची सुरक्षा वाढवली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वर्धा येथील यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्या वतीने ज्येष्ठ विचारवंत डॉ. भा. ल. भोळे व डॉ. यशवंत सुमंत यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी दीपक गायकवाड (पुणे ), प्रा.वृषाली मगदूम (वाशी- मुंबई ), डॉ. देवकुमार अहिरे (पुणे) यांची निवड करण्यात आली आहे. जीवन गौरव पुरस्कारसाठी ज्येष्ठ संशोधक, विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार (लातूर) यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती निवड समितीचे प्रमुख निमंत्रक ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ (सातारा) व यशवंतराव दाते संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते (वर्धा) यांनी दिली. पुरस्कार वितरण समारंभाची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. डॉ. यशवंत सुमंत कुटुंबीयांने सहा वर्षापासून ज्येष्ठ अभ्यासकासाठी जीवनगौरव पुरस्कार सुरू केला आहे. यावर्षीच्या सहाव्या पुरस्कारासाठी विचारशलाका त्रैमासिक व तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील कामगिरीसाठी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार (लातूर) यांची निवड करण्यात आली आहे. यशवंतराव दाते स्मृती संस्था व डॉ. भा. ल.भोळे कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार्या भोळे स्मृती वैचारिक साहित्य पुरस्कारासाठी दीपक गायकवाड (पुणे) यांच्या 'पेरियार -मिथक आणि वास्तव ' या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. भोळे कुटुंबीय व दाते संस्थेचे संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या डॉ. भा. ल. भोळे स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, प्रा. वृषाली मगदूम (वाशी-मुंबई) यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. यशवंत सुमंत स्मृती युवा संशोधन प्रेरणा पुरस्कारासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे इतिहास विभागातील प्राध्यापक संशोधक डॉ. देवकुमार अहिरे ( पुणे) यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप डॉ. भा. ल. भोळे स्मृती पुरस्कार प्रत्येकी वीस हजार व डॉ. यशवंत सुमंत स्मृती पुरस्कार प्रत्येकी दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल व मानपत्र असे आहे. पुरस्कार निवड समितीमध्ये प्रदीप दाते, डॉ. राजेंद्र मुंढे, प्रा. हाशम शेख (वर्धा ), डॉ . अशोक चौसाळकर (कोल्हापूर), डॉ. चैत्रा रेडकर, विजयाताई भोळे, हिरण्यमय भोळे, माधुरी सुमंत (पुणे) व किशोर बेडकिहाळ (सातारा) आदी मान्यवरांनी काम केले, अशी माहिती दाते स्मृती संस्थेचे संजय इंगळे-तिगावकर व डॉ. राजेंद्र मुंढे यांनी दिली. माधुरी सुमंत, विजयाताई भोळे व दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते यांचे योगदानाद्वारे गेले अनेक वर्षांपासून हा उपक्रम महाराष्ट्रातील वैचारिक, साहित्यक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात रावबिण्यात येत आहे.
रामायण आणि महाभारत हे ग्रंथ केवळ धार्मिक महत्त्वापुरते मर्यादित नसून, ते आपल्या सांस्कृतिक संचिताचा ऐतिहासिक दुवा आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ आणि पुरातत्व तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी सोमवारी केले. ते 'रामायणातील वानरायण' या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. मिहाना पब्लिकेशनतर्फे श्रीराम सदाशिव गोमरकर लिखित 'रामायणातील वानरायण' या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. देगलूरकर यांच्या हस्ते आणि अध्यक्षतेखाली झाले. हा ग्रंथ रामायणातील वानरांची भूमिका स्पष्ट करतो. भांडारकर इन्स्टिट्यूटच्या नवलमल फिरोदिया सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर भांडारकर इन्स्टिट्यूटचे रजिस्ट्रार आणि क्युरेटर डॉ. श्रीनंद बापट, लेखक श्रीराम सदाशिव गोमरकर आणि मिहाना पब्लिकेशनाच्या संचालिका अमृता कुलकर्णी उपस्थित होत्या. डॉ. देगलूरकर यांनी यावेळी सांगितले की, रामायणाचा जेवढा अभ्यास करून तो ग्रंथरूपाने मांडावा, तेवढा कमीच आहे. कितीही बारकाईने अभ्यास केला तरी काहीतरी मांडायचे राहूनच गेल्याचे वाटते, यातच रामायणाचे महत्त्व आहे. अभ्यासकांना आणि साहित्यिकांना आव्हान वाटावे, अशा या घडामोडी आहेत. ते पुढे म्हणाले की, जो युद्ध जिंकतो, त्या युद्धाचे नेतृत्व करणाऱ्याचे कौतुक होते; परंतु प्रत्यक्षात युद्धभूमीवर जे लढले, ते दुर्लक्षित राहतात. वाली आणि सुग्रीव यांच्या बाबतीत दुर्लक्ष झाले नसले तरी, त्यांच्याबद्दल मुबलक संकलित माहिती पुरेशी उपलब्ध नव्हती. रामायणातील अनेक घटना अद्याप अनुत्तरित आहेत. डॉ. श्रीनंद बापट यांनी आपल्या भाषणात सांगितले की, रामायण हा अतिप्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या कथानकातून मांडले गेलेले प्रश्न आणि त्यांची मिळालेली उत्तरे यातून एक तात्विक बैठक तयार झाली आहे. यातून धर्म, तत्वज्ञान आणि राजकारण याचे अनादी अनंत असे संचित आपल्यापर्यंत येऊन पोहोचले आहे.
करुणा मुंडे शर्मा यांच्या स्वराज्य शक्ती सेनेने पुण्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. करुणा मुंडे शर्मा या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी सोमवारी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत आपला पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली. त्या म्हणाल्या, आमचा 'स्वराज्य शक्ती सेना' पक्ष आगामी पुणे आणि राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचा समावेश आहे. दीड वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या पक्षाने राज्याच्या राजकारणातील घराणेशाही आणि सध्याच्या राजकारणामुळे सामान्य नागरिकांना होणाऱ्या त्रासावर भर दिला आहे. मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, वाहतूक कोंडी, शेतकरी समस्या, खराब रस्ते, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा नाश, जमिनीचे गैरव्यवहार आणि वाढता अमली पदार्थांचा प्रभाव यांसारख्या अनेक समस्यांवर पक्ष उपाययोजना करेल. सध्याच्या राजकारण्यांकडून कलाकेंद्रे, दारू कारखाने आणि जमिनी हडपण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. मोठ्या प्रमाणावर होणारा अन्याय आणि अत्याचार पाहूनच निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे सांगितले की, त्यांचा पक्ष नवीन असला तरी संघर्षातून त्याची उभारणी झाली आहे. तुरुंगात असतानाही त्यांच्या सहकाऱ्यांनी लढा दिला. लोकांच्या समस्या सोडवण्याची धमक पक्षात असून, त्यासाठी काम करत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. पुण्यातील मुंढवा आणि बोपोडी येथील जमीन हडपण्याचा प्रयत्न अमेडिया कंपनीने केल्याचा आरोपही त्यांनी केला. राजकारणाचा गैरवापर करून सामान्य लोकांवर अन्याय केला जात असल्याचे आपल्याला चांगलेच माहीत असल्याचे मुंडे म्हणाल्या. यावेळी करुणा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांच्यावरही टीका केली. रूपाली पाटील यांनी कधीही महिलांसाठी लढा दिल्याचे दिसले नाही, असे मुंडे म्हणाल्या. रूपाली पाटील यांच्या पतींनी आपल्या पतीची केस घेऊन आपल्या विरोधात लढा दिला, ज्यामुळे आपल्याला ४५ दिवस कारागृहात राहावे लागले. त्यामुळे रूपाली पाटील यांच्यासाठी आपल्या पक्षात कोणतीही जागा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, त्यांनी आपल्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंतीही मुंडे यांनी केली. जातीपातीच्या राजकारणामुळे राज्याचा विकास थांबला असून, नवीन लोकांना संधी देऊन समाजकारणात सहभागी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी बोपोडी येथील जमिनीच्या मालकी हक्काबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केलेले आरोप निराधार असल्याचा दावा केला आहे. प्रस्तुत जमिनीचा मालकी हक्क १७७५ पासून निर्विवाद आहे. त्यामुळेच कृषी विद्यापीठाने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली होती, असे त्यांनी म्हटले आहे. हेमंत गवंडे यांच्या म्हणण्यानुसार, मौजे बोपोडी येथील सी.टी.एस. नं. ३ व ४, फा. प्लॉट नं. १४ (सर्वे नं. ६२) ही जमीन पेशवे काळापासून विद्वांस कुटुंबाकडे आहे. मोडी लिपीतील कागदपत्रे आणि १९३० पासूनचे सातबारा उतारे विद्वांस यांच्या नावावर आहेत. शेती महाविद्यालय या जागेवर भाडेकरू असून, ते मालक नाहीत. विद्वांस यांचे इनाम हक्क कायम असल्याचेही गवंडे यांनी स्पष्ट केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या जागेवर मालकी हक्क सांगत याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावली, कारण विद्वांस यांची जागेवरील मालकी सिद्ध झाली आहे. कृषी महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात त्यांच्याकडे मालकी हक्काचे कोणतेही पुरावे नसल्याचे कबूल केले होते. यशदा विद्वांस यांचे नाव या जागेवर असून, कृषी महाविद्यालयाला भाडेकरू म्हणून नेमण्यात आले आहे. या जागेवर १९८७ मध्ये बस टर्मिनलसाठी आरक्षण पडले आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी गवंडे यांना जागा मालक म्हणून पत्र पाठवून ही जागा बस टर्मिनलसाठी योग्य असल्याचे नमूद केले आहे. या पत्रात गवंडे यांचा मालकी हक्क स्पष्टपणे नमूद केला असून, त्यांनी बस टर्मिनलसाठी संमती दिली आहे. भूसंपादन मोजणी जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात झाली असून, ती खोटी नसल्याचे गवंडे यांनी सांगितले. प्रॉपर्टी कार्डवरही गवंडे यांचे नाव असून, ते नियमितपणे कर भरत आहेत. कृषी महाविद्यालयाने यावर कधीही आक्षेप घेतलेला नाही. १९७५ पासून कृषी महाविद्यालयाने या जागेबाबत कोणतेही अपील केलेले नाही. तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पदाचा दुरुपयोग करत गवंडे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता. उच्च न्यायालयाने हा गुन्हा खोट्या पद्धतीने दाखल केल्याची नोंद घेतली, ज्यामुळे खडसे यांना मंत्रीपद गमवावे लागले. काही महसूल अधिकारी महसूल मंत्र्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही गवंडे यांनी केला. गवंडे यांनी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी किंवा इतर भागीदारांशी कोणताही व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्याविरुद्धची तक्रार निराधार असून, त्यांनी ही जागा कायदेशीररित्या खरेदी केली असल्याचे सांगितले. त्यांना नाहक बदनामीला सामोरे जावे लागत असल्याचेही ते म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सोमवारी माध्यमांनी कायम विरोधी पक्षाची भूमिका बजावावी, असे मत व्यक्त केले. पुणे येथील गांधी भवन येथे महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने आयोजित 'गांधी दर्शन शिबिरा'त ते 'माध्यम आणि सद्यपरिस्थिती' या विषयावर बोलत होते. निखील वागळे म्हणाले की, देशात लोकशाहीचे अंधारयुग सुरू असून लोकशाही 'आयसीयू'मध्ये आहे. १९५२ ते २०२५ पर्यंत निवडणूक आयोगावर कधीही गुन्हेगारी स्वरूपाचा आरोप झाला नव्हता, तो आता होत आहे. लोकप्रतिनिधी, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग आणि पोलिसांवरील जनतेचा विश्वास कमी होत असताना माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरते. ते पुढे म्हणाले की, पत्रकारांनी प्रश्न विचारायला शिकले पाहिजे. दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश यांसारख्यांनी यासाठी लढा दिला. पत्रकारांना भारतीय घटना शिकण्याची गरज आहे आणि त्यांनी धर्मांधता व जातीयतेला विरोध करायला हवा. नेपाळ किंवा बांगलादेशप्रमाणे हिंसक आंदोलने नको, पण लोकशाही मार्गाने आंदोलने झाली पाहिजेत. चुकीच्या निर्णयांविरोधात मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाड्या अडवणे, उपोषण करणे अशी आंदोलने आवश्यक आहेत. या शिबिरात ज्येष्ठ पत्रकार जयंत माईणकर यांनी 'निवडणूक सुधारणेतील गैरप्रकार आणि अपेक्षित सुधारणा' यावर विचार मांडले. ते म्हणाले की, पंतप्रधानांना प्रश्न विचारता न येणे हे हुकूमशाहीकडे वाटचाल असल्याचे लक्षण आहे. मात्र, नेहरू यांनी लोकशाहीचा इतका मजबूत पाया घातला आहे की, तो कोणीही संपवू शकणार नाही. यंत्रणेचा योग्य वापर केल्यास निवडणुका निःपक्षपाती होऊ शकतात. मनसोपचारतज्ज्ञ डॉ. रूपेश पाटकर यांनी 'गांधी विचार आणि मी' या विषयावर व्याख्यान दिले. भावनिक दारिद्र्य नष्ट करण्यासाठी माणसाने माणसाशी बोलले पाहिजे, असे ते म्हणाले. गांधीजींकडून त्यांना हे समजले की, गरजा संपून जे उरते ते समाजाला द्यावे. गरजेपेक्षा जास्त साठवणे म्हणजे चोरी, असे गांधीजी मानत असत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अन्वर राजन होते. व्यासपीठावर माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची उपस्थिती होती.
हिंगोली जिल्हयातील दांडेगावच्या सर्जाने छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील लखनच्या सोबतीने सांगलीत आयोजित बैलगाडा शर्यंत गाजवली असून या जोडीने फाॅर्च्यूनर गाडी जिंकली आहे. मंगळवारी ता. ११ मुंबई येथे या स्पर्धेचे परितोषीक वितरण होणार आहे. सांगली येथील बोरगाव भागातील श्रीनाथ केसरी मैदानावर महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या वतीने रविवारी ता. ९ तीनफेरी बैलगाडा स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ५०० पेक्षा अधिक बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत दांडेगाव ये्थील साईनाथ कऱ्हाळे व करण कऱ्हाळे यांच्या सर्जाची छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील सर्जेराव पाटील चव्हाण, मनोहर पाटील चव्हाण यांच्या लखन सोबत जोडी झाली होती. या स्पर्धेत सर्जा व लखन या जोडीने तीन फेरी गटात प्रथम क्रमांक मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला होता. त्यानंतर उपांत्य फेरीतही या जोडीने जोरदार कामगिरी करीत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीमध्ये या जोडीने फॉर्च्यूनर जिंकली आहे. मंगळवारी ता. ११ मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फॉर्च्यूनर गाडी दिली जाणार आहे. यावेळी करण कऱ्हाळे यांच्यासह नागोराव इंगोले, बापूसेठ अंबेकर, सुनील चव्हाण, रवी जाधव उपस्थित राहणार असल्याचे साईनाथ कऱ्हाळे यांनी सांगितले. एक वर्षापुर्वी सर्जाला ४.५० लाख रुपयांमध्ये खरेदी केले हिंगोली जिल्हयातील दांडेगाव येथील साईनाथ कऱ्हाळे व करण कऱ्हाळे यांनी सुमारे एक वर्षापुर्वी सर्जाला ४.५० लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. मागील एक वर्षापासून त्याला शंकरपट, बैलगाडा स्पर्धेसाठी तयार केले जात होते. त्यासाठी सर्जा याला दररोज सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी १० लिटर दुध, बदाम, काजू यांचा खुराक दिला जातो. हिंगोली, परभणी, नांदेड, वाशीम भागातील शंकरपट स्पर्धा गाजवून सर्जाने एकाच वर्षात सुमारे ४० पेक्षा अधिक पारितोषीक पटकावले असल्याचे कऱ्हाळे यांनी सांगितले.
गत काही दिवसांपासून वेगवेगळ्या मुद्यांवर बेधडक विधाने करून स्वपक्षाची राजकीय कोंडी करणाऱ्या रुपाली पाटील व आमदार अमोल मिटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. रुपाली पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकरणकर यांच्यावर तिखट हल्ला चढवला होता. तर मिटकरी यांच्या विधानांमुळे सत्ताधारी महायुतीत तणाव निर्माण होताना दिसून येत होता. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसने या दोघांनाही प्रवक्ते पदावरून दूर करून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृ्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी पक्षाच्या 17 नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली. त्यात रुपाली पाटील व अमोल मिटकरी या 2 नेत्यांची नावे नाहीत. या यादीद्वारे राष्ट्रवादीने अनिल पाटील, चेतन तुपे, सना मलिक, हेमलता पाटील, राजीव साबळे, सायली दळवी, रुपाली चाकणकर, आनंद परांजपे, राजलक्ष्मी भोसले, प्रतिभा शिंदे, प्रशांत पवार, शशिकांत तरंगे, ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदिक, सुरज चव्हाण, विकास पासलकर व श्याम सनेर यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. या नव्या नियुक्त्यांसह जुन्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. रुपाली पाटील यांची का उचलबांगडी? रुपाली पाटील यांनी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. या प्रकरणी त्यांनी थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर मृत महिला डॉक्टरचे चारित्र्यहनन करण्याचे आरोप केले होते. चाकणकर या राष्ट्रवादीच्याच नेत्या आहेत. यामुळे रुपाली पाटील यांच्या आरोपांमुळे एकप्रकारे राष्ट्रवादीचीच गोची झाली होती. त्यामुळे पक्षाने रुपाली पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीशीला पाटील यांनी कायदेशीर उत्तर देण्याचे सूतोवाच केले होते. पण त्यांचे उत्तर मिळण्यापूर्वीच पक्षाने त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली. त्यामुळे रुपाली पाटीली या प्रकरणी पुढे काय भूमिका घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अमोल मिटकरी यांना धक्का का? अमोल मिटकरी हे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी पार्थ पवार यांच्या प्रकरणातही पक्षाची जोरकसपणे भूमिका मांडली होती. पण त्यांच्या काही टोकाच्या भूमिकांमुळे सत्ताधारी महायुतीत मतभेद निर्माण होण्याची स्थिती येत होती. त्यामुळे पक्षाने त्यांना प्रवक्तेपदापासून तूर्त दूर ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सुरज चव्हाणांवरही दाखवला विश्वास सुरज चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली होती. या घटनेची राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने सुरज चव्हाण यांची युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. पण आता पुन्हा त्यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करून त्यांना दिलासा दिला आहे.
भांड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत दुकान मालकासह त्याच्या कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सांगलीच्या विटा शहरात घडली आहे. सोमवारी सकाळी 8.30 च्या सुमारास घडलेली ही घटना शॉर्टसर्किटमुळे घडल्याचा अंदाज आहे. पोलिस त्या दृष्टिकोनातून आपला तपास करत आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, विटा येथील सावरकरनगर येथील विष्णू जोशी यांच्या जय हनुमान स्टील सेंटरला आज सकाळी 8.30 च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत दुकान मालक विष्णू पांडूरंग जोशी (47), त्यांची पत्नी सुनंदा विष्णू जोशी (42), मुलगी प्रियंका योगेश इंगळे (25) व नात सृष्टी योगेश इंगळे (2) या चौघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला होता. नेमकी काय घडली घटना? विटा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सावकरनगरात विष्णू जोशी यांचे 3 मजली घर आहे. या इमारतीत ते जय हनुमान स्टील सेंटर नामक दुकान चालवतात. हे दुकान पहिल्या मजल्यावर आहे. तर उर्वरित इमारतीत जोशी कुटुंब राहते. सोमवारी सकाळी 8.30 च्या सुमारास भांड्याच्या दुकानाच्या शटरमधून अचानक धूर येताना दिसला. त्यानंतर काही वेळातच आगीचा मोठा भडका उडाला. त्यात इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर जोशी कुटुंबातील 6 जण अडकले होते. त्यापैकी दोघांनी कशीतरी स्वतःची सुटका करून घेतली. पण वरील चौघे आगीच्या विळख्यात सापडले. त्यांचा जागीच कोळसा झाला. 2 जण जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. यावेळी बघ्यांची घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. त्यापैकी कुणीतरी या आगीची माहिती विटा नगरपालिका अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पण येथे घनदाट लोकवस्ती असल्याने विशेषतः घरे एकमेकांना चिकटून असल्यामुळे ही आग विझवण्याच्या कामात मोठे अडथळे येत होते. सकाळी 10 वाजेपर्यंत कडेगाव नगरपंचायत, कुंडल कारखान्याचा अग्निबंब, उदगिरी कारखान्याचा अग्निबंब, पलुस नगरपालिकाचा बंब, तासगाव नगपालिकेचा अग्निबंद आदी 6 बंबांच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. हे ही वाचा... फडणवीस सरकारचे कोळशाला लाजवणारे काळे कारनामे:श्वेतपत्रिका निघेल तेव्हा हे सरकार इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार ठरेल - पवार मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे कोळशालाही लाजवणारे काळे कारनामे आहेत. त्यामुळे या काळा कारनाम्यांची श्वेतपत्रिका निघेल तेव्हा या सरकारची महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून नोंद होईल, अशी तिखट टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी सरकारवर निशाणा साधताना केली आहे. वाचा सविस्तर
सांगलीत इमारतीला आग, कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू
सांगली : प्रतिनिधी सांगलीमध्ये अग्नितांडवात चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आज सकाळी तीन मजली इमारतीला आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे जवान आणि स्थानिकांनी मदतकार्य तात्काळ सुरू केले. पण आगीमध्ये चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. दोन जण जखमी आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. […] The post सांगलीत इमारतीला आग, कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रत्नागिरी : प्रतिनिधी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून २४६ नगरपरिषद आणि ४२ नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. बच्चू कडूंनी सांगितले की, प्रहार जनशक्ती पक्ष आता रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत ५ ते ६ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. […] The post रत्नागिरीत ‘प्रहार’ची एंट्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर
मुंबई : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र काँग्रेसने मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शविल्याचे याआधी दिसून आले होते. त्यामुळे निवडणुकीत मनसे आणि […] The post मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आलीय. मुंबई येथील त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. मात्र, सुरक्षेत वाढ का करण्यात आली, याचे नेमके कारण अजून समोर आले नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घराभोवती ड्रोन घिरट्या घालत आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यातच ही बातमी समोर आलीय. दर दोन तासांनी गस्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुरक्षेत पोलिसांनी वाढ केल्याचे समजते. पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला. दर दोन तासांनी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाभोवती गस्त घालण्यात येत आहे. विशेषतः स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. वडेट्टीवारांचा सवाल, शिरसाटांचे उत्तर राज ठाकरे यांना भीती आहे म्हणून सुरक्षेत वाढ केली की, सत्ताधाऱ्यांना भीती आहे म्हणून त्यांच्या सुरक्षेत वाढ केली, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर दुसरीकडे मंत्री संजय शिरसाट यावर म्हणाले की, 'कोणाला सुरक्षा द्यायची आणि द्यायची नाही. याची एक समिती असते. या समितीच्या अहवालानंतरच सुरक्षेत वाढ करायचा आणि कमी करायचा निर्णय घेतला जातो. तसा काही रिपोर्ट असेल. त्यामुळे या सुरक्षेत वाढ केली असेल.' अशी असते सुरक्षा? व्हीआयपी सुरक्षा देणे, कपात करणे, वाढवणे किंवा काढून घेण्याचा निर्णय गृह मंत्रालयाच्या अखत्यारित येतो. धोक्याची शक्यता असेल तर सुरक्षेचा दर्जा ठरवला जातो. यासंबंधीची सर्व माहिती ‘यलो बुक’ या गोपनीय दस्तऐवजात नमूद होते. विशेष सुरक्षा, झेड + सुरक्षा, झेड दर्जा, वाय दर्जा, एक्स दर्जा अशी सुरक्षा पुरवली जाते. यात झेड + मध्ये 36 सुरक्षा रक्षक, झेड दर्जात 28 सुरक्षा रक्षक, वाय दर्जात 11 सुरक्षा रक्षक आणि एक्स दर्जात 2 सुरक्षा रक्षक दिले जातात. कोणाला कशी सुरक्षा? पंतप्रधानांना विशेष सुरक्षा देण्यात येते. तर सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच निवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यपाल, महत्त्वाचे नेते व अधिकारी यांना झेड + सुरक्षा असते. (बातमी अपडेट होत आहे.)
राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू झाली असतानाच, नाशिकच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू असतानाच, नाशिकमध्ये मात्र स्थानिक पातळीवर ही युती अधिकृत झाली आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि मनसेच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत एकत्र निवडणुका लढण्याची घोषणा केली. दरम्यान, नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर जाण्यास नकार दिलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांत काही ठिकाणी मैत्रीभाव दिसतोय, तर काही ठिकाणी थेट लढत होण्याची शक्यता आहे. त्यात आता नाशिकमध्ये विरोधी पक्षांनी एकत्र येत आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याचे जाहीर केले आहे. वरिष्ठ स्तरावर काँग्रेसकडून मनसे युतीबाबत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका असतानाही, नाशिकमध्ये मनसे आणि काँग्रेस एकत्र पत्रकार परिषद घेत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. महायुतीचा प्रभाव कमी करण्यासाठी एकत्र माकपचे नेते डॉ. डी. एल. कराड यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आम्ही सर्वांनी आगामी सर्व निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात भ्रष्टाचाराचे थैमान आहे. जाती जातीत भांडण लावण हेच काम सरकारकडून होत आहे. महाराष्ट्रात येत्या निवडणुकांमध्ये महायुतीचा प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. ते पुढे म्हणाले, आम्ही जनतेच्या बाजूने उभे राहणार आहोत. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सगळी सत्ता आहे. त्र्यंबकेश्वर रस्त्यावर हजारो घरांना बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे. जनतेला बरोबर घेऊन यांचा पराभव करणार. मतदार यांद्यांमध्ये प्रचंड दोष आहेत. याद्या दुरुस्त झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. मतदान पत्रिकेवर मतदान झाले पाहिजेल अशी आमची मागणी आहे. मनसेचा 'लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी' सहभाग मनसेचे नेते दिनकर पाटील यांनी या संयुक्त आघाडीच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले, आज संयुक्त बैठक आयोजित करण्यामागे लोकशाही जिवंत ठेवणे हा उद्देश आहे. देशात मत चोरीवर सरकार आल्याचे राहुल गांधी यांनी निदर्शनास आणले आहे. 96 लाख दुबार मतदार असल्याचा मुद्दा आहे आणि शिंदे गटाच्या शिवसेनेनेही मतदार यादीतील घोळ मान्य केला आहे. जनतेला न्याय मिळाला पाहिजे. ओला दुष्काळ, कर्जमाफी यासाठी आम्ही लढतो आहोत. दिनकर पाटील पुढे म्हणाले, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे आम्ही नाशिकमध्ये गुन्हेगारी विरोधात आम्ही मोर्चा काढला. नाशिक गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी आम्ही मोर्चा काढला. आधी दादा भुसे पोलिस आयुक्तांना भेटले, नंतर सगळे आमदार भेटले. आमच्या मोर्चाचा धसका घेतल्याने नाशिक गुन्हेगारी मुक्त झाले आहे. नाशिकमध्ये भाजप-शिंदेंसमोर मोठे आव्हान दरम्यान, नाशिकमधील विरोधकांच्या वज्रमुळीमुळे भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, नाशिक महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळी राजकीय समीकरणे पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपाबाबत अद्याप एकमत झालेले नसताना, प्रहार जनशक्ती पक्षाने मात्र स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी एका वृत्त वाहिणीशी बोलताना रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे. बच्चू कडूंनी सांगितले की, प्रहार जनशक्ती पक्ष आता रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत 5 ते 6 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. या निर्णयामुळे कोकणातील राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. आतापर्यंत कोकणातील राजकारण शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसपुरतेच मर्यादित होते. मात्र, प्रहार पक्षाने थेट नगरपरिषदेच्या रणांगणात उतरण्याची तयारी दर्शवल्याने स्थानिक पातळीवर नवा राजकीय खेळ सुरू होण्याची शक्यता आहे. कडूंनी सांगितले की, रत्नागिरीसह कोकणातील मतदारांनी प्रहारच्या कामाचा आणि भूमिकेचा विचार करावा, कारण प्रहार नेहमी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष आहे. दरम्यान, बच्चू कडूंनी निवडणूक प्रक्रियेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. विशेषतः ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर त्यांनी तीव्र शंका व्यक्त केली. मतदान करताना आपण कोणाला मत दिलं हे आपल्यालाच समजत नाही. प्रामाणिकपणे मतदान करणाऱ्याचं मत कुठे जातं हे समजत नाही. संविधानानं मतदाराला माहितीचा अधिकार दिला आहे, पण तो प्रत्यक्षात नाकारला जातो, असं ते म्हणाले. त्यांनी पुढे आरोप केला की, निवडणूक आयोगाने पारदर्शकता राखली नाही तर लोकांचा विश्वास उडेल. ईव्हीएममधूनच भ्रष्टाचार सुरू आहे. मशीनसमोर लोक उभे करतात आणि मग मतांची चोरी होते, अशी तीव्र टीका त्यांनी केली. बच्चू कडूंनी याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगालाही थेट लक्ष्य केलं. निवडणूक आयुक्तांना नोटांच्या गड्ड्या मिळाल्या असतील, त्यामुळेच गोंधळ सुरू आहे, असा संताप व्यक्त करत त्यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. राज्यभरात मतमोजणीच्या वेळी लोकांच्या भावना दाबल्या जातात. लोकांनी मतदान केलं, पण निकाल वेगळा लागतो. मग लोकशाही कुठे राहिली? असा सवालही त्यांनी केला. या वक्तव्यांमुळे प्रहार पक्षाचा आवाज पुन्हा एकदा आक्रमकपणे राज्यात घुमताना दिसत आहे. आक्रमक भूमिका घेणाऱ्या प्रहार संघटनेला मतदार किती प्रतिसाद देतात रत्नागिरीतील ही निवडणूक स्थानिक राजकारणासाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे. आतापर्यंत महायुतीतील शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातच स्पर्धा अपेक्षित होती. मात्र, बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाच्या प्रवेशामुळे समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. कोकणातील मतदारसंघांमध्ये प्रहारच्या जनाधाराबद्दल विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. सामाजिक प्रश्नांवर थेट आणि आक्रमक भूमिका घेणाऱ्या प्रहार संघटनेला स्थानिक मतदार किती प्रतिसाद देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव एकूणच, रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत आता नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. बच्चू कडूंनी मैदानात उतरण्याची केलेली घोषणा ही केवळ एका निवडणुकीपुरती मर्यादित न राहता कोकणात प्रहार जनशक्ती पक्षाचा पाया मजबूत करण्याच्या दिशेने पहिले पाऊल मानले जात आहे. त्यामुळे आगामी दिवसांत रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील निवडणुकीचे वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी राजकीय हालचाल वेगाने सुरू झाली आहे. विशेषतः अलिबाग नगरपालिकेची निवडणूक यंदा अधिकच लक्षवेधी ठरत आहे. कारण, या नगरपालिकेवर गेल्या दोन दशकांहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्ष म्हणजेच शेकापचे एकहाती वर्चस्व आहे. त्यामुळे अलिबागचा गड, शेकाप टिकवणार की, यावेळी राजकीय समीकरणे बदलणार, याची उत्सुकता सर्व राजकीय पक्षांना आहे. या वेळी नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असल्याने अनेक महिलांनी आपली तयारी सुरू केली होती. मात्र, अखेर शेकापने नगराध्यक्षपदासाठी अक्षया प्रशांत नाईक यांच्या नावाची घोषणा करून निवडणुकीत पहिला निर्णायक टप्पा गाठला आहे. अक्षया नाईक या माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या कन्या असून त्यांचा स्थानिक राजकारणात चांगला प्रभाव आहे. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर अलिबागमध्ये शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अक्षया नाईक यांना त्यांच्या वडिलांच्या कार्याची आणि जनतेशी असलेल्या संपर्काचा थेट फायदा मिळू शकतो. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच, नव्या पिढीतील शिक्षित आणि उत्साही महिला नेतृत्व म्हणून अक्षया नाईक यांच्या उमेदवारीमुळे शेकापने युवती मतदार आणि महिला मतदारवर्गावरही लक्ष केंद्रीत केलं आहे. यामुळे अलिबागमध्ये शेकापविरुद्ध इतर पक्षांची रणनीती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. दुसरीकडे, शिंदे गटाच्या शिवसेनेकडून अलिबाग नगराध्यक्षपदासाठीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे अलिबागमधील निवडणूक शेकाप विरुद्ध शिंदे सेना अशा थेट लढतीत रूपांतरित होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनाही शेकापच्या उमेदवारीमुळे मिळालेल्या बळाचा फायदा होऊ शकतो. अलिबागसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात महिलांसाठी राखीव झालेलं नगराध्यक्ष पद आणि शेकापचा दीर्घकालीन प्रभाव, या दोन्ही गोष्टींमुळे ही निवडणूक अत्यंत रोचक बनली आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते, अक्षया नाईक या निवडणुकीत तरुण नेतृत्वाचं नवं पान उघडू शकतात. पेण नगरपरिषदेत देखील राजकीय चुरस दरम्यान, रायगड जिल्ह्यातील पेण नगरपरिषदेत देखील राजकीय चुरस वाढली आहे. पेण नगरपरिषदेतील एकूण 25 जागांसाठी यावेळी बहु-कोनी लढत अपेक्षित आहे. मनसेने स्वबळावर सर्व 25 जागांवर उमेदवार उभे करण्याचा नारा दिला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. या नगरपरिषदेचा परिसर भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. आमदार रवी पाटील आणि राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील या दोघांचा या भागावर ठसा आहे. मात्र, विरोधक या वेळी भाजपचा हा बालेकिल्ला भेदण्याच्या तयारीत आहेत. शेकापही महाविकास आघाडीसोबत राहून काही महत्त्वाच्या जागांवर उमेदवार देण्याचा विचार करत आहे. शेकापची सत्ता टिकणार की पेणमध्ये भाजपचा बालेकिल्ला डळमळणार? एकूणच, रायगड जिल्ह्यातील अलिबाग आणि पेण या दोन्ही नगरपरिषदा आता निवडणुकीच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. अलिबागमध्ये शेकापने नव्या महिला नेतृत्वावर भर दिला आहे, तर पेणमध्ये भाजप आणि विरोधकांमध्ये थेट सामना रंगण्याची चिन्हे आहेत. दोन्ही नगरपरिषदा जिल्ह्यातील राजकीय दिशादर्शक मानल्या जातात. त्यामुळे या निवडणुकांचे निकाल केवळ स्थानिक स्तरावरच नव्हे, तर जिल्हा आणि राज्यातील आगामी राजकीय समीकरणांवरही परिणाम करणार आहेत. अलिबागमध्ये शेकापची सलग सत्ता टिकणार की पेणमध्ये भाजपचा बालेकिल्ला डळमळणार, याचा निर्णय आता मतदारांच्या हातात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर ड्रोनने टेहळणी केल्याचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. ठाकरे गटाने या प्रकरणी महायुती सरकारवर उद्धव ठाकरेंवर पाळत ठेवल्याचा आरोप केल्यानंतर भाजपने त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. ठाकरे गटाचा ‘पाळत ठेवण्याचा’ आरोप करणे म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न आहे, असे भाजपने म्हटले आहे. एक ड्रोन उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थान परिसरात घिरट्या घालत असल्याचे रविवारी सकाळी उघड झाले. त्यानंतर यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ड्रोनच्या माध्यमातून 'मातोश्री' निवासस्थानावर कुणी टेहळणी करत आहे का? असा संशय या प्रकरणी व्यक्त करण्यात आला. त्यानंतर खेरवाडी पोलिसांनी ही टेहळणी नसून, एमएमआरडीएकडून करण्यात येणारे कामाचे सर्वेक्षण असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रस्तुत ड्रोन पोलिसांच्या परवानगीने उडवण्यात आले. 8 ते 16 नोव्हेंबरपर्यंत 'एमएमआरडीए'कडून सर्वेक्षण होणार आहे, असेही पोलिसांनी या प्रकरणी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरे गटावर पलटवार केला आहे. ये बता तूने मुंबई क्यो लूटा? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये या प्रकरणी म्हणाले की, तु इधर उधर की बात न कर, ये बता तूने मुंबई क्यो लूटा? ड्रोनच्या घिरट्यांवरून पुन्हा भावनिक मुद्दा आणण्याचा प्रयत्न झाला. ठाकरे कुटंबियांची सुरक्षा महत्वाची आहेच, त्यांना ती दिली गेली पाहिजे. पॅाडटॅक्सीसाठी हा सर्वे सुरू असल्याचं एमएमआरडीने सांगितलं असतानाही ‘पाळत ठेवण्याचा’ आरोप करणं म्हणजे परत मुंबई पालिका निवडणूक लक्षात घेऊन केवळ भावनिक मुद्द्यांवर राजकारण करण्याचा प्रयत्न आहे. महापालिकेत वर्षानुवर्षे वर्षे सत्तेवर असूनही मुंबईकरांना विकासापासून वंचित का ठेवलं? उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना मेट्रो प्रकल्प अडवत मुंबईकरांना सुखकर प्रवास का लांबवला? मराठी भाषेवर प्रेम सांगता, मग महापालिका मराठी शाळांची संख्या व पटसंख्या कमी कशी झाली? या व अशा मुख्य प्रश्नांची उत्तरं द्या. भावनांवर नाही, आता हिशोबावर बोला, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. मातोश्रीवर कोणी टेहळणी तर करत नाहीये? -अंबादास दानवे दुसरीकडे, ठाकरे गटाचे आमदार तथा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे. ड्रोन धोरणात मुंबई रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. मग सध्या 'मातोश्री' निवस्थानाबाहेर मात्र असे ड्रोन सर्रास दिसायला लागले आहेत. हाय सेक्युरिटी झोन असलेल्या 'मातोश्री'च्या परिसरात असे ड्रोन दिसणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. मातोश्रीवर कोणी टेहळणी तर करत नाहीये? असा प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे. हे ही वाचा... मुंबई महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार:विजय वडेट्टीवारांची घोषणा, म्हणाले - ठाकरे अन् शरद पवारांचा प्रस्ताव आल्यास विचार करणार मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याची घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच जर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही प्रस्ताव आल्यास त्यावरही विचार करणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याची घोषणा विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच जर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही प्रस्ताव आल्यास त्यावरही विचार करणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. काँग्रेस स्वबळावर लढणार असल्यामुळे महायुतीला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांची रणनीती काय असणार, हे आता पाहावे लागणार आहे. मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये समन्वय साधला जाणार की, दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, यावर आता चर्चा रंगू लागली आहे. काँग्रेस नेतृत्वाने मुंबईत कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे. मित्रपक्षाचा प्रस्ताव आल्यास विचार करू यासंदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, आम्ही हायकमांडबरोबर चर्चा केल्यानंतर आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे. आमच्या लोकांनी सुद्धा तेच ठरवलेले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मित्रपक्षाचा प्रस्ताव आल्यास, त्यावर चर्चा नक्की होईल. शरद पवारांकडून चर्चेचा प्रस्ताव आला, तर त्यावर आम्ही चर्चा करू, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. कार्यकर्त्याला न्याय देणे आमचा उद्देश ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यामुळे त्यांना संधी भेटली पाहिजे. आघाडी आणि युतीमध्ये कार्यकर्त्याला निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. अशावेळी स्वबळावर लढल्यास कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळेल. केवळ जिंकणे हा आमचा उद्देश नाही, तर कार्यकर्त्याला न्याय देणे आमचा उद्देश असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. उद्धव ठाकरे मनसेसोबत युती करत असतील आणि त्यांचा प्रस्ताव आला, तर त्यावर आमचे मुंबईचे स्थानिक नेत्यांची सहमती घेऊन पुढे जाऊ, असे वडेट्टीवार यांनी सांगितले. आमच्या मतांच्या विभाजनाची चिंता कशाला? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्या नेहमी 30-35 जागा निवडून येत असतात. सत्तेमधील तीन पक्षही वेगळे लढण्यास इच्छुक आहे. त्यांच्या मतांचे विभाजन होत नाही, तर आमच्या मतांच्या विभाजनाची चिंता कशाला? अशी विचारणा वडेट्टीवार यांनी केली. मुंबई पालिकेत भ्रष्टाचाराची प्रचंड प्रकरणे मुंबईची तिजोरी खाली झालेली आहे. भ्रष्टाचाराचे प्रकरणे प्रचंड आहेत. खिरापत वाटली जात आहे. मुंबईच्या विकासाला आणि आर्थिक सुबकतेला छेद देणारे सगळे प्रकार आताच्या सरकारच्या काळात होत आहेत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. मुंबई महापालिकेचे डिपॉझिट रिकामे केलेत. शहरात अजूनही पाणी तुंबत आहे, नद्या-नाले स्वच्छ झालेले नाहीत. मुंबई महानगरपालिका ही जगातील सर्वांत मोठी महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेतील आवश्यक प्रश्नाला घेऊन आम्ही लढू, असा निर्धार विजय वडेट्टीवार यांनी केला.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग या गावात झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला वर्ष उलटलं असलं तरी हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण, सोशल मीडियावर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना कथितरित्या 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ही ऑफर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड यांच्या माध्यमातून देण्यात आल्याचा दावा केला गेला आहे. तसेच, ही चर्चा शासकीय अंगरक्षक संतोष जाधव यांच्या उपस्थितीत झाल्याचंही यात सांगितलं जात आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता अजूनही तपासात असून, कोणत्याही वृत्तसंस्थेने त्याची पुष्टी केलेली नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं होतं. 9 डिसेंबर 2024 रोजी त्यांचं अपहरण करून त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह गावाजवळ सापडला होता. तपासादरम्यान धनंजय मुंडे यांचे निकटचे सहकारी वाल्मिक कराड यांच्या खंडणी रॅकेटचा या हत्येत सहभाग असल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणात अनेकांना अटक झाली असून, प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे, तर आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका लागू करण्यात आला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा म्हणून विशेष तपास पथक स्थापन केले होते. SIT च्या चौकशीतून महत्त्वाचे पुरावे समोर आले. त्यामध्ये आरोपींनी केलेल्या अत्याचारांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे यांचा समावेश आहे. फक्त 80 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं, ज्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात तत्परता दाखवली. या घटनेने केवळ बीडचं नव्हे तर संपूर्ण राज्याचं राजकारण हलवून सोडलं. ग्रामीण भागात प्रभावशाली राजकारण्यांचा हस्तक्षेप आणि खंडणी रॅकेटचा संबंध या दोन्ही गोष्टींनी जनतेत संतापाचं वातावरण निर्माण केलं. या प्रकरणाचा राजकीय प्रभाव सर्वाधिक जाणवला तो तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर. तपासात त्यांचं नाव थेट आले नसले तरी त्यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. सुरुवातीला मुंडे यांनी या सर्व आरोपांना फेटाळून लावलं आणि माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही, असा खुलासा केला. पण हत्येतील अत्याचारांचे फोटो आणि व्हिडिओ सार्वजनिक झाल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली. वाढत्या दबावामुळे अखेर धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा नवा अध्याय सुरू आता पुन्हा एकदा 20 कोटींच्या कथित ऑफरचा व्हिडिओ समोर आल्यानं या प्रकरणाची राजकीय धग नव्याने पेटली आहे. बीड जिल्ह्यात आणि राज्यभरात या व्हिडिओबाबत चर्चेला उधाण आलं आहे. पोलिस आणि तपास यंत्रणांकडून या व्हिडिओची सत्यता तपासली जाणार असून, त्यामागचं राजकारण काय आहे यावरही चौकशी होणार आहे. या प्रकरणातील आरोपींवर आधीच गंभीर गुन्हे दाखल असून, तपास सुरू आहे. मात्र, नव्या खुलाशामुळे या हत्येच्या मागील राजकीय आणि आर्थिक संबंधांची साखळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरण अजून संपलेलं नाही, उलट त्याचा नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा बीड जिल्ह्यात रंगत आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, परळीच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. परळी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत, आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशावेळी दीपक देशमुख यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. परळी नगरपरिषदेतील विकास कामे अर्धवट असून, त्यात भ्रष्टाचार झाला आहे. तसेच धनंजय मुंडे हे बोगस मतदानावर निवडून आल्याचा दावा दीपक देशमुख यांनी केला. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात दीपक देशमुख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ फड उपस्थित होते. दीपक देशमुख यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश धनंजय मुंडेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. संध्या देशमुख नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार परळी नगरपरिषदेतील नगराध्यक्ष पदाची जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने दीपक देशमुख यांनी आपल्या पत्नी संध्या देशमुख यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहे. ते म्हणाले, “मी व्यक्तीनिष्ठ माणूस आहे, पक्षनिष्ठ नाही. परळीत आमदार आणि सत्ताधाऱ्यांनी कोणतीही विकासकामे केली नाहीत. आम्ही वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी केल्या, पण काहीच बदल झाला नाही. म्हणून आता मी आणि माझे कार्यकर्ते शरद पवार साहेबांसोबत काम करण्याचा निर्णय घेतला.” पक्ष सोडण्याचे खरे कारण विकासकामे मी पूर्वी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांच्याही निवडणुकीसाठी काम केले. पण परळीत विकासकामांमध्ये भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता पाहून मला निराशा झाली. सहा महिन्यांपासून मी या बदलासाठी काम करत आहे. आता शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली परळीचा विकास पूर्ण करायचा असल्याचे देशमुख म्हणाले. धनंजय मुंडेंनी सगळा मनमानी कारभार केला दीपक देशमुख यांनी यावेळी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत. हजारो कोटींचा निधी परळीत आला, पण कोणतेही काम पूर्ण झाले नाही. तीर्थक्षेत्र विकास योजनेचे काम अर्धवट आहे. धनंजय मुंडे सगळा कारभार बंगल्यावर बसून चालवतात. नगराध्यक्ष असताना आम्हाला काम करु दिले नाही. परळीत करोडो रुपयांच्या टेंडर काढल्या, पण त्या फाईल्स नगरपरिषदेतून गायब झाल्या आहेत. त्यामुळे हजारो कोटींची कामे अर्धवट आहेत. आता ही अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठीच मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धनंजय मुंडे बोगस मतदानावर निवडून आले दीपक देशमुख यांनी निवडणूक प्रक्रियेतही गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, धनंजय मुंडे हे बोगस मतदानावर निवडून आले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकले आणि बोगस मतदान केले. आम्ही हा प्रकार पुन्हा होऊ देणार नाही. आता परळीतील जनता आमच्या पाठीशी आहे.
रायगड जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत नाराजी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री सुनील तटकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. कोलाड येथील एका पक्ष प्रवेश कार्यक्रमात बोलताना दळवी यांनी तटकरे यांना लोकसभेला निवडून देणे ही आमच्याकडून झालेली सर्वात मोठी चूक असल्याचं सांगत ती चूक आता सुधारण्याची वेळ आल्याचा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे रायगडमधील महायुतीतील संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार दळवी म्हणाले की, राज्यातील सध्याची परिस्थिती चिंताजनक आहे. रोज नव्या घोटाळ्यांचे पडसाद उमटताना दिसत आहेत. अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या सिंचन घोटाळ्याची राज्यातील जनता विसरलेली नाही. कोलाड नाक्यावरील सुमारे 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आम्ही पाहिलेला आहे. यापुढे तोच इतिहास पुन्हा घडू नये, यासाठी आम्ही आता अधिक सजग राहणार आहोत. त्यांनी कोणाचं नाव न घेतलं असलं तरी त्यांच्या इशाऱ्याचा बाण थेट तटकरे यांच्यावर होता हे स्पष्ट दिसून आलं. दळवी पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचा घात त्यांच्या स्वतःच्या लोकांनीच केला आहे. काही जण आपले स्वार्थ साधण्यासाठी सतत पक्षांतर आणि नवे व्यवहार करत आहेत. जनतेची दिशाभूल करून तेच पुन्हा निवडून येतात आणि मग राज्यात भ्रष्टाचाराचे नवे अध्याय लिहिले जातात. अशा नेत्यांना आता योग्य जागी बसवण्याची वेळ आली आहे. त्यांनी अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या भूतकाळातील कारभाराचा अप्रत्यक्ष उल्लेख करत युतीतील अस्वस्थता उघड केली. रायगडमधील युतीत तणावाचे वातावरण आमदार दळवी यांनी आपल्या भाषणात नाराजी अधिक स्पष्टपणे मांडत सांगितले की, तटकरे यांना लोकसभेला आम्ही निवडून दिलं, त्यावेळी त्यांना दिलेली माफी आज आमच्या अंगलट आली आहे. आम्ही चुकीला माफ केलं, पण ती चूक पुन्हा होऊ नये म्हणून आता सजग राहण्याची गरज आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जर पुन्हा दगा झाला, तर आम्ही गप्प बसणार नाही. या वक्तव्यामुळे रायगडमधील युतीत तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. हा वाद महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतो या पार्श्वभूमीवर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये स्थानिक स्तरावर वाढत चाललेल्या मतभेदांचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. एकीकडे भाजप आणि शिंदे गटाचे काही नेते एकमेकांवर सूचक टीका करत आहेत, तर आता राष्ट्रवादी सोबतच्या संबंधांमध्येही तणाव वाढताना दिसतो आहे. येणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतो. कोलाडमधील या भाषणानंतर रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे, आणि पुढील काही दिवसांत युतीतील या वादावर कोणते राजकीय पाऊल उचलले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे-फडणवीस सरकारमधील वादग्रस्त वक्तव्ये आणि कथित गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे सातत्याने चर्चेत राहिलेले शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार अडचणीत येण्याची शक्यता आहे. 2014 सालच्या रुग्णवाहिका खरेदी प्रकरणात सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरच अब्दुल सत्तार यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. नेमके प्रकरण काय? आमदार अब्दुल सत्तार यांनी 2014 मध्ये मंत्री असताना प्रत्येकी 16 लाख रुपये खर्चून दोन रुग्णवाहिका खरेदी केल्या होत्या. यासाठी त्यांनी स्वतःच्या आमदार निधीतील पैशांचा वापर केला होता. मात्र, शासकीय नियमांना बगल देत, या दोन्ही रुग्णवाहिका सत्तार यांच्याच मालकीच्या असलेल्या प्रगती शिक्षण संस्थेला देण्यात आल्या होत्या. शासकीय नियमानुसार, कोणत्याही खासगी रुग्णालय किंवा संस्थेला सरकारी पैशाने रुग्णवाहिका देता येत नाहीत. अब्दुल सत्तार यांनी शासकीय नियम धाब्यावर बसवून शासनाची दिशाभूल केली आणि सरकारी संपत्तीचा अपहार केल्याचा आरोप आहे. त्यांनी शासनाची कोणतीही परवानगी न घेता हा व्यवहार मंजूर केला आणि संस्था स्वतःची असल्याची बाब लपवली, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश शंकरपल्ली यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र त्यावर पोलिसांकडून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शंकरपल्ली यांनी सिल्लोड न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिसांना संपूर्ण तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालात पोलिस काय निष्कर्ष मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा अहवाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सादर झाल्यास आणि त्यात पोलिसांकडून एखादी नकारात्मक टिप्पणी असल्यास, अब्दुल सत्तार यांच्या अडचणी खूप वाढू शकतात, अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विरोधक आक्रमक होण्याची शक्यता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे न्यायालयीन निर्देश समोर आल्याने सत्तार यांची राजकीय अडचण वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्तार यांच्यावर टीकेची झोड उठवण्याची तयारी सुरू केली असून, त्यांच्या विरोधकांना यामुळे एक नवीन हत्यार मिळाल्याचे मानले जात आहे. सत्तारांविरोधात भाजपचे आंदोलन दरम्यान, अब्दुल सत्तार यांचे नाव सिल्लोडच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहिले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने नगरपरिषदेच्या मतदार यादीतील कथित हेराफेरीच्या आरोपांवरून त्यांच्याविरोधात आंदोलन केले होते. “मृत व्यक्तींच्या नावाने मतदान घेऊन निवडून आलेला आमदार म्हणजे अब्दुल सत्तार, अशी टीका भाजप नेत्यांनी केली होती.
मुंबई महापालिका निवडणुकीची चाहूल लागल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि पक्ष दोघेही तयारीत व्यग्र झाले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 11 नोव्हेंबर 2025 रोजी ही सोडत पार पडणार आहे. या सोडतीनंतर कोणते प्रभाग महिला, मागासवर्गीय किंवा सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी राखीव राहतील, हे निश्चित होणार आहे. त्यामुळे उमेदवार, पक्षप्रमुख आणि स्थानिक नेत्यांची नजर या सोडतीवर खिळली आहे. निवडणूक आयोगाने आरक्षण प्रक्रियेचे वेळापत्रकही प्रसिद्ध केले असून नोव्हेंबर अखेरपर्यंत अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे. मुंबई महापालिका ही देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली महानगरपालिका मानली जाते. त्यामुळे या निवडणुकीवर सर्वच पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. शिवसेना ठाकरे गट, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांच्यात प्रचंड स्पर्धा आहे. दरम्यान, मनसेनेही या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे गटासोबत युती होण्याची शक्यता लक्षात घेऊन मनसेकडून 227 प्रभागांचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. मुंबईतील माहीम, दादर, परळ, लालबाग, विक्रोळी, भांडुप आणि घाटकोपरसारख्या मराठी मतदारसंख्येने भरलेल्या भागांमध्ये मनसेने आपली ताकद दाखवण्याची तयारी केली आहे. मनसेकडून सव्वाशे प्रभागांची यादी तयार मनसेच्या बैठकींमधून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाने मुंबईतील 125 प्रभागांवर आपली स्थिती मजबूत असल्याचे आढळले आहे. या सर्व जागांवर योग्य उमेदवारांची निवड करण्याचे काम सुरू आहे. राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसेकडून या जागांवर थेट उमेदवार रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. युती झाल्यास जागा वाटपात या प्रभागांना प्राधान्य दिले जाईल, अशी पक्षातील सूत्रांची माहिती आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे आपली ताकद असलेल्या जागांचा अभ्यास सुरू ठेवला असून, युती झाल्यास या जागांवरच मुख्य फोकस राहणार आहे. मनसेच्या मुंबईतील बैठकींना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नव्या जोशाची भावना दिसून येत आहे. आरक्षण सोडतीचं वेळापत्रक जाहीर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 11नोव्हेंबरला प्रत्यक्ष आरक्षण सोडत काढली जाईल. त्यानंतर 14 ते 20 नोव्हेंबरदरम्यान नागरिक आणि पक्षांकडून हरकती, सूचना स्वीकारल्या जातील. 21 ते 27 नोव्हेंबरदरम्यान आयुक्त या हरकतींवर विचार करून अंतिम निर्णय घेतील, आणि अखेरीस 28 नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण जाहीर केले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेवर सर्व पक्षांनी बारकाईने लक्ष ठेवले असून, आरक्षणानंतरच उमेदवार निवडीची आणि युतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू होईल. निवडणुकीपूर्वी युतीचा पेच कायम शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत. मात्र दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे प्रभागनिहाय ताकद मोजण्याचं काम सुरू आहे. ठाकरे गटाला परळ, दादर, शिवडीसारख्या भागांमध्ये मजबूत पकड आहे, तर मनसेने माहीम, लालबाग, घाटकोपर आणि विक्रोळी या भागांमध्ये पुन्हा एकदा संघटन मजबूत केलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप करताना बऱ्याच जागांवर थेट स्पर्धा निर्माण होऊ शकते. दरम्यान, भाजप आणि शिंदे गटानेही स्वतंत्र तयारी सुरू ठेवली असून, मुंबईतील सत्तेची लढाई चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर होताच या निवडणुकीचा खरा राजकीय रंग चढणार आहे.
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा राजकीय हादरा बसला आहे. पक्षाचे निष्ठावान नेते आणि माजी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कठीण काळात ज्या मोजक्या नेत्यांनी साथ दिली, त्यापैकी शंककराव गडाख एक होते. आता ऐन निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनीच ठाकरेंची साथ सोडल्यामुळे अहमदनगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नेवासा मतदारसंघाचे माजी आमदार असलेले शंकरराव गडाख यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडल्यानंतर, आता त्यांनी पुन्हा आपल्या 'क्रांतिकारी शेतकरी पक्षा' कडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचे निश्चित केले आहे. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरही गडाख हे अखेरपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांनी राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. विशेष म्हणजे, गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. आगामी निवडणुकांच्या तोंडावर एका बड्या आणि अनुभवी नेत्याने पक्षाची साथ सोडल्याने, अहिल्यानगरच्या राजकारणावर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर याचे मोठे परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. एका बाजूला सर्वच पक्षांकडून निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षबांधणीला गती मिळत असताना, दुसऱ्या बाजूला नेते मंडळी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याने राजकीय उलथापालथी वाढल्या आहेत. आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात दरम्यान, महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सोमवार, 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून, 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राज्यभरात राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ आठ दिवसांची मुदत असल्याने पक्षांनी उमेदवार निवड आणि प्रचार रणनीतीवर जोर दिला आहे. अशावेळी शंकरराव गडाख यांच्या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून,अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
हिंगोली येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या रुग्णालयाच्या अग्निशमन दलाच्या पाण्याच्या टँक मधून चक्क सहा दगावलेले कुत्रे बाहेर काढण्यात आले आहे. दुर्गंधी सुटल्यानंतर टँकमधे पाहणी केल्यानंतर सदर प्रकार लक्षात आला आहे. या प्रकारामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हिंगोली येथील शासकिय रुग्णालय शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाकडे हस्तांतरीत केल्यानंतर रुग्णालयाचा कारभार सुधारेल अशी अपेक्षा होती. मात्र रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची हि अपेक्षा फोल ठरू लागली आहे. रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा सोडाच पण साध्या तातडीच्या आरोग्य सुविधा मिळणेही कठीण झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांतून केला जात आहे. रुग्णालयाच्या मोठ्या इमारतीमध्ये डॉक्टरांचा शोध घेतांना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची चांगलीच दमछाक होऊ लागली आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या ठिकाणी अग्नीशमनदलाचे कार्यालय उभारण्यात आले आहे. या शिवाय तातडीने पाणी उपलब्ध होण्यासाठी सुमारे एक लाख लिटर पाणी साठवण क्षमतेचा टँक उभारण्यात आला आहे. मात्र या टँकला झाकणच बसविण्यात आले नाही. त्यामुळे धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दोन दिवसापुर्वी या टँकमधून दुर्गंधी सुटत असल्याने काही कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता टँकमधील पाण्यात कुत्रे दगावलेले दिसून आले. त्यानंतर तातडीने धावपळ करून या टँकमधे स्वच्छता कर्मचारी उतरवून पाहणी केली असता त्यात एक दोन नव्हे तर तब्बल सहा कुत्रे मृत झालेले दिसून आले. त्यानंतर या पाण्यातून लहान मोठे सहा कुत्रे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर टँकमधील पाणी काढून नव्याने पाणी भरण्यात आल्यानंतरच दुर्गंधी कमी झाली. या प्रकारानंतर झाकण बसवण्यात आली या प्रकारामुळे रुग्णालयाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुग्णालयाच्या परिसरात मोकाट जनावरांचा तसेच मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ सुरु आहे. मात्र याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने एखादे वेळी गंभीर प्रसंग घडण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू झाली असताना, महायुतीच्या गोटात मात्र मतभेद उफाळून येताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन प्रमुख घटक पक्षांमध्ये अनेक ठिकाणी उमेदवारीवरून तणाव निर्माण झाला आहे. कोकणातील खेड नगरपरिषदेपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांपर्यंत महायुतीमध्ये बेबनाव निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपरिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे वरिष्ठ नेते रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम यांचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, आता नव्याने भाजपमध्ये दाखल झालेल्या वैभव खेडेकर यांनी या वर्चस्वाला थेट आव्हान दिले आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेतून हकालपट्टी झाल्यानंतर वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि प्रवेशानंतर लगेचच ते सक्रिय झाले आहेत. त्यांच्या पत्नी वैभवी खेडेकर यांचा नगराध्यक्ष पदासाठी उल्लेख असलेले फोटो सोशल मीडियावर दिसू लागले आहेत. याउलट, शिंदे गटाकडून माधवी बुटाला यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी पुढे आले आहे. त्यामुळे महायुतीमधील दोन पक्षांकडून वेगवेगळे उमेदवार समोर आल्याने संघर्ष अनिवार्य झाला आहे. रामदास कदम विरुद्ध वैभव खेडेकर- जुना संघर्ष पुन्हा पेटला खेडमधील राजकारणात रामदास कदम आणि वैभव खेडेकर यांच्यातील जुना वाद चांगलाच परिचित आहे. काही दिवसांपूर्वी कदम यांनी सार्वजनिक कार्यक्रमात खेडेकर यांना एकत्र काम करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतर लगेचच खेडेकर यांनी आपल्या पद्धतीने महायुतीत स्वतःचे स्थान निर्माण करण्याची चळवळ सुरू केली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील उमेदवारीची लढाई स्थानिक पातळीवर तीव्र होण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांनी नगराध्यक्ष पदासाठी वेगवेगळ्या महिला उमेदवारांची नावे जाहीर केल्याने महायुतीत 'मिठाचा खडा' पडणार हे स्पष्ट झाले आहे. सिंधुदुर्गातही भाजप–शिवसेना संघर्षाचे वातावरण फक्त खेडच नव्हे, तर शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही महायुतीत तणाव वाढला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात भाजपने स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे शिंदे गट अस्वस्थ झाल्याचे दिसते. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी राणेंवर अप्रत्यक्ष टीका करत कुणाला स्वबळाची खुमखुमी असेल तर आमचे धनुष्यबाणही तयार आहेत, असा इशारा दिला. यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल, तर आम्ही तयार आहोत. राणे यांनी पक्ष कार्यकर्त्यांचा सन्मान राखणे ही भाजप नेत्यांची जबाबदारी असल्याचे सांगून स्पष्ट केले की, स्वबळावर लढणे हे कार्यकर्त्यांच्या मनातले आहे. महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार? कोकणातील या दोन्ही ठिकाणी निर्माण झालेली परिस्थिती महायुतीच्या उच्च नेतृत्वासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि दुसरीकडे भाजप या दोन्ही पक्षांत स्थानिक पातळीवरील वर्चस्वाची लढाई रंगू लागली आहे. परिणामी, महायुतीतील एकता धोक्यात आली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका या स्थानिक स्तरावर पक्षाची ताकद मोजण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे या निवडणुकांमध्ये आघाडीचे गटच परस्परांत लढले, तर त्याचा थेट फटका आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांना बसू शकतो. खेड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील सध्याची स्थिती पाहता, महायुतीतील अंतर्गत संघर्ष थांबवण्यासाठी पक्षश्रेष्ठींना पुढे येऊन समन्वय साधावा लागणार आहे.
महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सोमवार, 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून, 17 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. या निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायती निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राज्यभरात राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ आठ दिवसांची मुदत असल्याने पक्षांनी उमेदवार निवड आणि प्रचार रणनीतीवर जोर दिला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांत काही ठिकाणी मैत्रीभाव दिसतोय, तर काही ठिकाणी थेट लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहण्याची शक्यता आहे. राज्यातील एकूण 247 नगरपरिषदा आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांसाठीची आरक्षण सोडत नुकतीच नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या आरक्षण सोडतीमुळे निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. नगर परिषदा आरक्षण (एकूण 247 पदे) 1. अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी आरक्षित पदे (एकूण 33) 2. अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित पदे (एकूण 11) 3. नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) प्रवर्गासाठी आरक्षित पदे (एकूण 67) 4. खुला प्रवर्ग (General) (एकूण 136 पदे) नगर पंचायतीचे आरक्षण (एकूण 147 पदे) 1. अनुसूचित जाती (SC) प्रवर्गासाठी राखीव (एकूण 18 पदे) 2. अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी राखीव (एकूण 13 पदे) 3. नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) प्रवर्गासाठी राखीव (एकूण 40 पदे) 4. खुला प्रवर्ग (General) (एकूण 76 पदे)
सेनगाव पंचायत समितीमधील कपातीच्या रकमेतील गैरव्यवहार प्रकरणात धनादेश वटलेल्या २८ जणांकडून ४७ लाखांची रक्कम वसुल करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून संबंधितांना नोटीस पाठवल्या जाणार असल्याची माहिती लेखा विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे बँक खात्यात धनादेश वटविणारे अडचणीत सापडणार असल्याचे चित्र आहे. सेनगाव पंचायत समितीमध्ये कपातीच्या रकमेमध्ये सुमारे ४७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे लेखा विभागाच्या चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पंचायत समितीच्या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असून या गुुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहे. दरम्यान, सन २०१८-१९ ते सन २०२४-२५ या आर्थिक वर्षातील चौकशीमध्ये जीएसटी, विमा यासह इतर कपातीची रक्कम कर्मचाऱ्यांनी खाजगी व्यक्तींच्या बँक खात्यात जमा केल्याचे लेखा विभागाच्या चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे. यामध्ये काही रक्कम कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचेही स्पष्ट झाले आहे. या संदर्भातील अहवाल देखील लेखा विभागाकडे सादर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील अपहारीत रक्कम वसुलीसाठी जिल्हा परिषदेच्या ले्खा विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. ज्या व्यक्तींच्या नावे धनादेशाची रक्कम जमा करण्यात आली आहे त्या व्यक्तींची माहिती घेऊन त्यांना नोेटीस बजावली जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची वसुली केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. या संदर्भात लेखा विभागाने पंचायत समितीला पत्र पाठविले आहे. कपातीच्या रकमेचे धनादेश ज्या २८ जणांच्या नांवे वटविण्यात आले आहेत त्यांच्याशी संपर्क साधून वटविण्यात आलेली रक्कम शासन खाती जमा करण्याबाबत कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पुढील काही दिवसांतच या २८ जणांच्या बँक खात्यात वटविण्यात आलेल्या धनादेशाच्या रकमेची वसुली होणार असून रक्कम वसुलीस विरोध करणाऱ्यांचे बँक खाते सील करण्या संदर्भात बँकेला पत्र दिले जाणार असल्याचे लेखा विभागाच्या सुत्रांनी सांगितले. त्यामुळे आता ते २८ जण कारवाईच्या रडारवर आल्याचे चित्र आहे.
प्रतिनिधी | अकोला पर्यटक, निसर्गमित्र व वनप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला नरनाळा पर्यटन महोत्सव पुन्हा सुरू होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. याबाबत दखल संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर आता एक समिती गठित होणार असून, हा रखडलेला मुद्दा मार्गी लागणार आहे. अकोट तालुक्यात वसलेले जिल्ह्याचे एकमेव पर्यटन स्थळ नरनाळा किल्ला आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरणात सातपुड्याच्या रांगेत असलेले आकर्षक व कलात्मकरीत्या परिपूर्ण किल्ला आहे. पूर्ण काम काळ्या दगडात केलेले आहे. या नरनाळा किल्ल्याला चार प्रकारचे प्रवेशद्वार असून, पहिला दिल्ली दरवाजा, दुसरा शिरपूर दरवाजा, तिसरा अकोट दरवाजा व चौथा शहानूर दरवाजा, असे भव्य आकाराचे दगडाचे कोरीव काम केलेल्या शिलांना रचून यांची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान गत १३ वर्षांपासून सतत दरवर्षी नरनाळा महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे या आशयाचे निवेदन ‘दखल’चे संस्थापक प्रदीप गुरूखुद्दे प्रशासनाला देत आहेत. आता विद्यमान जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा मीना, प्रदीप गुरूखुद्दे, अनिता कवडे, डॉ. चंद्रकांत पनपालीया, ठाकूरदास चौधरी, डॉ. छाया देशमुख, सचिन अहिर, पंकज मणियार यांनी चर्चेत सहभाग नोंदवला. नरनाळा महोत्सवाबाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. विविध विभागांचे अधिकारी होणार सहभागी : नरनाळा पर्यटन महोत्सव जानेवारी २०२६ मध्ये आयोजन होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने महसूल , वनविभाग, पाटबंधारे विभाग तथा संबंधित स्वयंसेवी संघटनांनी समिती गठित होणार आहे. दुरुस्ती होणार : नरनाळा किल्ल्याच्या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात येणार असून किल्ल्यावर फेरफटका मारण्यासाठी सफारी, बोटींग, हत्ती सफारी, उंट सफारी, ट्रॅकिंग, पेय-पदार्थाचे स्टॉल उभारले जाणार आहेत. छायाचित्र स्पर्धेसह विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे. अशी आहे: रचना किल्ल्याच्या दरवाजात एक महाकाली दरवाजा आहे. दरवाजा आकाराने मोठा आहे. हा महाकाली दरवाजा कलेचा उत्कृष्ट नमुना असून दरवाजा गोंड आणि मुस्लिम राज्यघटना दर्शवतो. त्यावरील नक्षीकाम सुंदर आहे. या किल्ल्यावर अष्टधातूंच्या तोफ आहेत. त्यातील सर्वांत मोठी नवनाज तोफ सक्कर तलावाजवळ पहावयास मिळते. त्या तोफेची लांबी नऊ गज असून, त्याकाळातील ती सर्वांत लांब तोफ होती. इतर तोफ दक्षिण भागाकडे असून त्याही पहावयास मिळतात. किल्ल्याच्या वरील भागात तलाव असून तो निसर्गाचा एक चमत्कारच आहे. त्या तलावाला सक्कर तलाव असे म्हणतात. त्या तलावाचे पाणी गोड आहे. २००९मध्ये झाला प्रारंभ सन २००७मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी नरनाळा महोत्सवासाठी पुढाकार घेतला होता. नियोजन केल्यानंतर २००९ मध्ये नरनाळा पर्यटन महोत्सव सुरू झाला. या आयोजनाला अकोल्यासह अन्य जिल्ह्याबाहेरील नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र, १३ वर्षांपूर्वी हा नरनाळा महोत्सव बंद करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कलावंत तसेच पर्यटकांचा हिरमोड झाला.
प्रतिनिधी | अकोला शिक्षक पात्रता परीक्षेबाबत (टीईटी) तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, १५ मार्च २०२४ची सुधारीत संचमान्यता रद्द करावी, यासह अन्य मागण्यांसाठी शिक्षकांनी रविवारी सुट्टीच्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शिक्षकांच्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे ९ नोव्हेंबरचा मोर्चा स्थगित करून निवेदन सादर करण्यात आले. न्यायालयाने सर्व आस्थापनेतील कार्यरत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षेची सक्ती करणारा निर्णय दिला होता. याबाबत शिक्षणमंत्री डॉ. पंकज भोयर यांची सर्व आस्थापनेवर काम करणाऱ्या शिक्षक संघटनांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राज्य शासन पुनर्विचार याचिका दाखल करेल अशी ग्वाही सर्व शिक्षक संघटनांच्या देण्यात आली होती. त्यामुळे ४ ऑक्टोबर रोजी नियोजित मूकमोर्चा स्थगित करण्याचा निर्णय सर्व शिक्षक संघटनांनी घेतला होता. मात्र, पुनर्विचार याचिका दाखल न केल्याने ९ नोव्हेंबर रोजी सर्व शिक्षकांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, पोलिसांनी अनेक कारणामुळे मोर्चाला परवानगी दिली नाही. त्यामुळे रविवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. यावेळी यावेळी शिक्षक परिषदेचे प्रकाश चतरकर, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मोहन तराळे, शिक्षक सेनेचे देवानंद मोरे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे विलास मोरे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे शंकर तायडे, प्रहार शिक्षक संघटनेचे प्रमोद करणकर, केंद्र प्रमुख व पदवीधर संघटनेचे परमानंद धोटे, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे संजय बरडे, बहुजन शिक्षक संघटनेचे गौतम तायडे, पुरोगामी शिक्षक संघटनेचे संघर्ष सावरकर, उर्दू शिक्षक संघटनेचे शाहीद इक्बाल खान, शिक्षक प्रतिनिधी सभेचे शंकर डाबेराव, साने गुरुजी शिक्षक सेवा संघाचे रजनीश ठाकरे, सचिन काठोळे, जुनी पेन्शन संघटना अभिजित पांडे, विशाल पाटील, देवेंद्र वाकचवरे, गजानन खरडे, राजकुमार वानखडे, विजय वाकोडे, अमर भागवत, सुरेश बंड, सुधाकर डाबेराव, विजय भांडे, संजय भटकर, राजेश मेश्राम उपस्थित होते. राज्य शासनाने टीईटीबाबत तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी व गरज भासल्यास केंद्र शासनाने आरटीई कायद्यात दुरुस्ती करण्यास पाठपुरावा करावा. १५ मार्च २०२४चा सुधारीत संचमान्यता शासन निर्णय रद्द करावा. सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. सर्व विषय शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी. शिक्षणसेवक योजना रद्द करावी. वस्तीशाळा शिक्षकांची मुळ सेवा सेवा कालावधीसाठी ग्राह्य धरावी. ऑनलाईन सर्व कामे पूर्ण करा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. ७५ टक्के शिक्षकांना द्यावी लागणार टीईटी शिक्षण मंत्र्यांना देण्यात आलेल्या पत्रात काही प्रमुख मुद्यांचा उहापोह करण्यात आला होता. न्यायालयाच्या वरील आदेशाचे अनुपालन करतांना सुमारे ७० ते ७५ टक्के शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागेल. त्याकरता करावी लागणारी तयारी, टीईटी अभ्यासक्रमाबद्दलची अनभिज्ञता, केवळ पाठ्यपुस्तके तसेच संदर्भ ग्रंथाच्या अध्ययनाची सवय आणि अध्ययन, अध्यापन, मुल्यमापन आदी शैक्षणिक आणि अशैक्षणिक कार्याचा अधिभार यांचा विचार करता व्यवसाय पूर्व परीक्षेमध्ये यशापेक्षा अपयशाचीच असलेली शक्यता विचारात घेऊन काही मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशी असे शिक्षकांचे म्हणणे आहे.
प्रतिनिधी | अकोला सेवा संघ ही शिव- शाहू- फुले- आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराने समाजात प्रबोधन करणारी परिवर्तनवादी संघटना आहे. नावात मराठा असले तरी जातीयवादी नसून समस्त बहुजनांना सोबत घेऊन चालणारी प्रबोधनाची चळवळ आहे. विविध कक्षांच्या माध्यमातून कार्यरत मराठा सेवा संघ म्हणजे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आ. अमोल मिटकरी यांनी केले. मराठा सेवा संघाच्या जिल्हा कार्यालयातील जिजाऊ सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या स्नेहमिलन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ पूजन करून सामूहिक जिजाऊ वंदना घेण्यात आली. अंजनगाव येथील मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ नेते, माजी विभागीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र कोकाटे यांचे १ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. प्रास्ताविकात प्रा. प्रदीप चोरे यांनी मराठा सेवा संघाची भूमिका मांडली. मराठा सेवा संघ प्रणित सयाजीराजे गायकवाड मराठा न्यायदान कक्षांतर्गत मोफत न्यायिक मार्गदर्शन व समुपदेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मराठा न्यायदान कक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. अनिल लव्हाळे यांनी या केंद्राचे महत्व सांगितले. याप्रसंगी माँसाहेब जिजाऊ प्रतिमा, सन्मान चिन्ह व ग्रंथभेट देऊन आ. मिटकरी यांचा सत्कार करण्यात आला. मराठा सेवा संघ केंद्रीय कार्यकारिणीत प्रदेश संघटकपदी माजी जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत जानोळकर व जिल्हा प्रवक्ता प्रा. प्रदीप चोरे यांची निवड झाली. त्यानिमित्त त्यांच्यासह अरुण इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. रणजीत कोरडे होते. यावेळी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक डॉ. पुरुषोत्तम तायडे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा रेणुताई गावंडे, इंदूताई देशमुख, व्याख्याते चंद्रकांत झटाले, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष नमन आंबेकर, न्यायदान कक्षाचे जिल्हाध्यक्ष आशिष पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सोयरा अंधारे व आभार ईशान निर्मळ यांनी केले.
प्रतिनिधी | अकोला जुने शहरातील ३२० वर्षे पुरातन विठ्ठल मंदिर संस्थांमध्ये अधिक मासात सुरू झालेल्या काकडा आरतीनिमित्त रविवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हरिमानाच्या जयघोषणा करत वारकऱ्यांनी महाप्रसादाचे वितरण करून ग्रहणही केला. यानिमित्ताने टाळमृदंगाच्या गजरात पांडुरंग भक्त हरिनामात दंग झाले. पांडुरंग भक्तांच्या मांदियाळीने परिसर फुलून गेला होता. जुने शहरातील विठ्ठल मंदिरात १९३३पासून आषाढी एकादशीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहासह इतरही धार्मिक कार्यक्रम, उत्सवांचे आयोजन करण्यात येत असते. ६ ऑक्टोबर रोजी कार्तिक एकादशीनिमित्त काकडा आरतीला प्रारंभ झाला. काकडा आरतीला पहाटे ५.२० वाजता प्रारंभ होत होता. भूपाळी, गवळण, आरती, विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा व पावली होत असे. शनिवारी आरतीचा समारोप झाला. दरम्यान ९ नोव्हेंबर रोजी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. उत्सवासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे श्री विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताह मंडळातर्फे व्यवस्थापक रमेश अलकरी व काकड आरती मंडळाचे प्रमुख नितीन खोत यांनी आभार मानले. असा झाला प्रारंभ : रविवारी दुपारी १२ वाजता विठ्ठल मंदिरात प्रथम महाआरती झाली. त्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ झाला. प्रथम महिनाभर काकडा आरतीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी महाप्रसाद ग्रहण केला. यावेळी श्री विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताह मंडळातर्फे व्यवस्थापक रमेश अलकरी व काकड आरती मंडळाचे प्रमुख नितीन खोत यांनी वारकऱ्यांना औक्षण करून दक्षिणा अर्पण केली. त्यानंतर महाप्रसादाला प्रारंभ झाला. असा झाला श्रीगणेशा आरतीला ६ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजता प्रारंभ झाला. सकाळी ७ पर्यंत काकडा आरतीचे आयोजन करण्यात आले. कार्तिक एकादशीनिमित्त महिला भजनी मंडळांकडून भजन सेवा प्रदान केली केली. सकाळी महाभिषेक, रात्री ८ वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले. महाआरती नंतर प्रसाद वितरण करण्यात आला. शनिवारी नगर प्रदक्षणा, गोपाल काला व रविवारी महाप्रसादानंतर समारोप झाला.
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवारी मूक मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हाभरातून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपसह विविध पक्षांचा मेळावा अन् मुलाखती:मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी गर्दी
प्रतिनिधी |पाथर्डी आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सह विविध पक्षांचा मेळावा व मुलाखतीचा कार्यक्रम मागील चार दिवसांत झाला.यावेळी मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी गर्दी केली होती. विठोबाराजे मंगल कार्यालय येथे आमदार मोनिका राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपाच्या मेळावा झाला.पक्ष निरीक्षक म्हणून विवेक नाईक,सचिन कुसळकर व सचिन वायकर यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. नगराध्यक्ष पदासाठी १४ तर नगरसेवक पदासाठी एकूण ९६ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. काँग्रेसच्या वतीने पक्षाच्या कार्यालयात मुलाखती घेण्यात आल्या. नगराध्यक्ष पदासाठी २ तर नगरसेवक पदासाठी २७ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या वतीने प्रताप ढाकणे व बंडू पाटील बोरुडे यांनी शिक्षक कॉलनी येथे तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार शिवाजीराव गर्जे यांनी पक्षाच्या संपर्क कार्यालय येथे इच्छुकांशी संवाद साधला.तर शिवसेना उबाठा पक्षाच्या मुलाखाती शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठान सभागृहात घेण्यात आल्या.यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत दळवी व तालुका प्रमुख नवनाथ चव्हाण प्रमुख उपस्थित होते.एकूणच या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम अतिशय कमी वेळाचा असल्यामुळे अतिशय गतिमान पणे घडामोडी शहर परिसरात चालू आहेत.विशेष म्हणजे कुठल्याही पक्षाकडून उमेदवाराची घोषणा अद्याप झाली नाही.यामुळे सर्वच प्रभागात जर-तर अशाच पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत.
नेवाशात राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी ५:नगरसेवकपदासाठी ४२ जणांच्या मुलाखती
प्रतिनिधी |नेवासे नेवासे नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वतीने शहरातील प्रणाम हॉल येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सकाळी दहा वाजेपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत एकूण ४२ इच्छुकांनी सहभाग घेतला. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या पक्षप्रवेशानंतर नेवासे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्साह वाढला आहे. या पार्श्वभूमीवर हा मेळावा पार पडला. मुलाखतींचे नियोजन माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर युवा नेते अब्दुल भाई शेख आणि तालुकाध्यक्ष अशोकराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.१७ प्रभागांमधून ४० हून अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवारांनी मुलाखती दिल्या. माजी आमदार मुरकुटे यांनी पक्षाचे ध्येय धोरण स्पष्ट करत, पक्षाचा आदेश सर्वोच्च आहे, असा संदेश दिला. महायुतीसोबत चर्चा करून जागावाटप करण्याचा प्रयत्न होईल, मात्र तसे शक्य न झाल्यास राष्ट्रवादी स्वबळावर लढेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक प्रभागात सक्षम आणि कार्यक्षम उमेदवार उभे करण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रतिनिधी|अकोले वीर राघोजी भांगरे यांचा लढाऊ बाणा हा आदिवासी संस्कृतीतील अभिमान आहे. लोकनेते तथा जलनायक माजी मंत्री मधुकरराव पिचड, साहित्यिक व संशोधक डॉ.गोविंद गारे यांच्या अथक परिश्रम व पाठपुराव्यातून आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचा जीवनाचा संघर्षशील इतिहास समोर आला. अन्याय अत्याचाराने पिचलेल्या उपेक्षितांसाठी जीवाचे रान करणाऱ्या वीर बिरसा मुंडा व राघोजींचा ज्वलंत धगधगता इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अमृतसागर दूध संघाचे अध्यक्ष माजी आमदार वैभव पिचड यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी विश्वस्त पिचड यांचा आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अताएसोकडून अगस्ती महाविद्यालयात सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अताएसोचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव होते. व्यासपीठावर खजिनदार धनंजय संत, कार्यकारिणीतील सदस्य यशवंत आभाळे, शरद देशमुख, रमेश जगताप, शिक्षणाधिकारी संपत मालुंजकर, एमबीएचे संचालक डॉ. प्रशांत तांबे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.राजकुमार पल्हाडे, रजिस्ट्रार सीताराम बगाड, डॉ.सुनील शिंदे, डॉ.संजय ताकटे, शिल्पकार यतीन शेटे, डॉ.अशोक दातीर, डॉ.साहेबराव गायकवाड, प्रा.चांगदेव डोंगरे, डॉ.सचिन पलांडे उपस्थित होते. पिचड म्हणाले, भारतीय स्वातंत्र्य चळवळीत गौरवास्पद योगदान देतानाच आदिवासी व आदिवासीतेर समाजावरील अन्यायाविरुद्ध कणखर व लढाऊ भूमिका घेत आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे, राया ठाकूर, बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले. त्यांच्याच त्यागातून आदिवासींसाठीचा लढा उभा राहिला. यावरील ऐतिहासिक संशोधनातून आदिवासी परंपरेतील ओव्या आल्या. लोकगीतांतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. आदिवासी विकास महामंडळावर संचालकपदी बिनविरोध निवडून आल्यानंतर आपल्याला नवे आव्हान पेलण्याची संधी मिळतेय. आदिवासी विकास महामंडळावर संचालक झाल्याने माझ्यासाठी ही नवे आव्हान पेलण्याची संधी आहे. येथील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून हिरडा, बेहडा आणि वनौषधींच्या उत्पादनास बाजारपेठ उपलब्ध करून देतानाच वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक व भक्कम कराव्या लागतील. मधुकरराव पिचड यांची प्रयत्नवादी प्रेरणादायी शिकवणीतून मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. अगस्ती महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकत असताना डॉ.सुनील शिंदे व डॉ. संजय ताकटे यांच्याकडून लाभलेले शैक्षणिक संस्कार माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत, असेही यावेळी पिचड म्हणाले. गिरजाजी जाधव यांनी वीर राघोजी भांगरे यांच्या संघर्षशील कर्तबगारीचा आलेख मांडतानाच मधुकरराव पिचड यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रांतील कार्याची वैशिष्ट्ये सांगितली. प्राचार्य डॉ. भास्कर शेळके यांनी प्रास्ताविक केले. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा महाविद्यालयीन व संस्थात्मक विकास कामांबाबत दूरदृष्टीचा विवेचक पट स्पष्ट केला. अताएसोचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख यांनी अताएसोचा प्रगती अहवाल सादर केला. अताएसोकडून वैभव पिचड यांना सन्मानित करताना आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचा अर्धाकृती पुतळा, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आदिवासी विकास महामंडळाचे नूतन संचालक वैभव पिचड यांना आद्यक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांचा अर्धाकृती पुतळा, शाल देऊन सन्मानित करण्यात आले. शेतकऱ्यांचा अमृतसागर दूध संघ कर्जमुक्त करण्याचे आव्हान बालकुपोषणापासून ते आदिवासी वाडीवस्यांवरील उत्पादित वनैपज मालास उद्योगधंद्यात गती देताना मधुकरराव पिचड यांनी बहुतांश समस्यांचे निराकरण केले. त्यांचे तेच कार्य आपल्याला पुढे न्यायचे आहे. अमृतसागर दूध संघात विकासात्मक सामाजिक बांधिलकीतून यापूर्वीही अनेक प्रश्न आपण मार्गी लावले. दुधापासून उपपदार्थ निर्मितीतून शेतकऱ्यांचा अमृतसागर दूध संघ कर्जमुक्त करण्याचे आव्हान यशस्वीपणे पेलले, असे वैभव पिचड यांनी सांगितले.
प्रतिनिधी|अहिल्यानगर हिंद सेवा मंडळाच्या ज्युनिअर कॉलेज तसेच भाई सथ्था नाईट हायस्कूलमध्ये शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती व विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती अध्यक्ष प्रा. ज्योती कुलकर्णी व महिला तक्रार निवारण समिती अध्यक्ष उज्वला साठे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत शाळेच्या विविध कार्यांचा आढावा घेण्यात आला. प्राचार्य सुनील सुसरे यांनी रात्रशाळेस इयत्ता ८ वी ते १० वी मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती व कौशल्य विकास, स्वयंरोजगारासाठी सहकार्य करणारी मासूम संस्था (मुंबई) व कौशल्य विकासासाठी मदत करणाऱ्या जनशिक्षण संस्था, मिटकॉन, अरेना फाउंडेशन (मुंबई), रोटरी क्लब या संस्थाबद्दल उपस्थित सदस्यांना माहिती माहिती दिली. रात्रशाळेस सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानण्यात आले. तसेच घरच्या परिस्थितीमुळे तसेच विवाह लवकर झाल्यामुळे शिक्षण सोडलेल्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणून रात्रशाळेत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, शैक्षणिक सुविधा, भौतिक सोयी आणि शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजना यावरही सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीस माजी चेअरमन डॉ. पारस कोठारी, शिक्षक प्रतिनिधी गजेंद्र गाडगीळ, ॲड. आशिष सुसरे, सुनिता गोरे, अशोक खरे आदी उपस्थित होते. डॉ. पारस कोठारी म्हणाले, प्रपंच सांभाळून शिक्षण घेणारे विद्यार्थी आपले भवितव्य घडवत आहेत. त्यांच्या सोयीसाठी शाळेत अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आजच्या काळात शिक्षण हे समाजातील प्रत्येक घटकासाठी आवश्यक आहे. भाई सथ्था नाईट हायस्कूलने अनेक वर्षांपासून कामगार, गृहिणी, कामगार वर्गातील युवकांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. रात्रशाळेच्या माध्यमातून अनेकांना नवी दिशा मिळून त्यांचे भवितव्य घडले आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी भाई सथ्था नाईट हायस्कूलमधील शिक्षक दैनंदिन ज्यादा वेळ देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा फायदा शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शाळेकडून प्रोत्साहन ज्योती कुलकर्णी म्हणाल्या, संपूर्ण राज्यातील रात्रशाळांमध्ये भाई सथ्था नाईट हायस्कूल आघाडीवर आहे. शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. शिक्षण हे केवळ ज्ञानार्जन नसून व्यक्तिमत्व विकासाचे माध्यम आहे. रात्रशाळेत शिकणारे विद्यार्थी मेहनती, जबाबदार असून त्यांच्या प्रगतीसाठी संस्था प्रयत्नशील आहे.
प्रतिनिधी|अहिल्यानगर नगर फुटबॉल सुपर लीगमुळे नगरच्या क्रीडा क्षेत्राला चालना मिळेल आणि नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी काढले. शहरातील नगर क्लबच्या मैदानावर नमोह फुटबॉल क्लबच्यावतीने अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकाश फिरोदिया फाउंडेशनने ही स्पर्धा प्रायोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख छाया फिरोदिया, इंडियन स्पोर्ट्स डिव्हिजनचे हेड ऑफ स्कूल स्पोर्ट्स लॉरेन्स बीज, अभिनेत्री हेमल इंगळे आदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने उद्घाटन समारंभास सुरुवात झाली. नंतर उपस्थित खेळाडूंनी पाहुण्यांना मानवंदना दिली. त्यानंतर अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते नाणेफेकीने स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत आरडीएक्स जूनियर्स, मुनोत स्ट्रायकर्स, जीसी फायटर्स, गुलमोहर चॅलेंजर्स, विद्यादान अल्फा एक्स, गांधी वॉरियर्स, कॉन प्लेक्स सुपरहिरोज, लोढा स्ट्रायकर्सच्या मालकांनी लिलावातून खेळाडूंची संघासाठी निवड केली. या लिलावात एडब्ल्यूजी ग्रुपचे ऋत्विक वाबळे, एनबीएस फ्लेक्झिबल सोल्युशन्सचे सिद्धार्थ मुनोत, गुलाबचंद कार्पेटवालाचे दर्शन भंडारी, गुलमोहर स्पोर्ट्सचे जोहेब खान, विद्याधाम क्लासेसचे रोहित रामदिन आणि भावेश मिश्रा प्रोस्पोस्पर्स चेतन गांधी, कॉन फ्लेक्स थिएटरचे प्रणील मुनोत, राखी लोढा आणि दीपिका लोढा यांचा सहभाग होता. फुटबॉलपटूंना प्रशिक्षण देऊन त्यानंतर त्यांना स्पर्धेत प्रवेश देण्यात आला.
प्रतिनिधी | अहिल्यानगर नेप्ती रोडवरील ‘दया पवार साहित्यनगरी’त आयोजित सेनापती बापट साहित्य संमेलनात रविवारी सकाळी १० वाजता खुल्या काव्य मैफिलीने संमेलनात रंगत आणली. शेतकऱ्यांचे प्रश्न, ग्रामीण लोकांचे रोजचे जगण्याचे प्रश्न, स्त्री जीवनाची महती सांगणाऱ्या कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कवी दशरथ शिंदे यांनी ‘ऐका सत्यशोधकाची सत्यकथा’ या महात्मा फुलेंचा संपूर्ण जीवनपट उलगडून सांगणारी कवितेने सर्वांची वाहवा मिळवली. नगर जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या सुमारे ४५ कवींनी यामध्ये आपल्या कविता सादर केल्या. या सत्राच्या अध्यक्षस्थानी कवयित्री स्वाती ठुबे होत्या. कवी किसन आटोळे, गोकुळ गायकवाड, इंद्रकुमार झांजे आदी यावेळी उपस्थित होते. तर शनिवारी रात्री उशिरा आयोजित काव्य संमेलनाच्या सत्रात डॉ. कैलास दौंड, चंद्रकांत पालवे, शर्मिला गोसावी, शशिकांत शिंदे, सुभाष सोनवणे, डॉ. संजय बोरुडे आदींनी मार्गदर्शन केले. पेशाने शिक्षक असलेले कवी मुंतोडे यांनी ‘लाखात एक माझा खेडेगाव’ या कवितेतून गावाचं गावपण वर्णन केले. कवी आनंदा साळवे यांनी ‘खेळ उन सावलीचा, घराच्या घरपणासाठी झुंजणाऱ्या माऊलीचा’ या कवितेतून भटक्या विमुक्त समाजबांधवांच्या घरात राहणाऱ्या आईचा रोजचा जगण्याचा संघर्ष मांडला. प्रा. डॉ. सूर्यकांत वरकड यांनी ‘मह्या माईच्या लुगड्याला चार चिंध्यांचा पदर’ या कवितेतून मायमराठीही महती सांगितली. कवयित्री उर्मिला शिंदे यांनी ‘माय माझी सांजवेळ, उजेड दिवा देणारी’ या कवितेतून आईची महती सांगितली. कवसित्री स्वाती अहिरे यांनी ‘स्त्री जीवनावर आधारीत कविता सादर केली. तर कवी सोनवणे यांनी ‘साऱ्या जगाचा पोशिंदा’ ही शेतकऱ्यांच्या जीवनसंघर्षावर आधारित कविता सादर केली. स्वातंत्र्य सैनिक सेनापती बापट साहित्य संमेलनातील काव्य संमेलनाला उपस्थित रसिक श्रोते. रसिकांची उस्फूर्त दाद ‘चातु:वर्णांची उतरंड होती, जातीभेदाची चालरीत होती.. ज्योतीराव पेटता क्रांती घडवितो आता.. ऐका सत्यशोधकाची सत्यकथा’.. या कवी दशरथ शिंदे यांच्या काव्यपंक्तींतून महात्मा फुलेंचा संपूर्ण जीवनपट उलगडून सांगितला. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती ऐकताना रसिकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
प्रतिनिधी | अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील इमामपूर घाटातील खड्ड्यांमुळे रविवारी दुपारनंतर तब्बल ४ तास वाहतूक कोंडी झाली. घाटात सुरू असलेल्या खड्डे बुजवण्याच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू होती. त्यात अवजड वाहनांची गर्दी वाढल्याने आणि पांढरी पूल परिसरात रस्त्याच्या कडेला बेशिस्त पार्किंगमुळे परिस्थिती चिघळली. परिणामी, घाटापासून पांढरी पुलापर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडी वाढल्यानंतर काही वाहनचालकांनी उलट दिशेने वाहने चालवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडली. तब्बल साडेतीन ते चार तास महामार्गावरील रहदारी ठप्प होती. माहिती मिळताच सोनई आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आणि अखेर चार तासांनंतर रस्ता मोकळा करण्यात यश आले. रविवारी सुटीचा दिवस असल्याने शनिशिंगणापूरला जाणाऱ्या भाविकांची वर्दळ वाढली होती. त्यातच पांढरी पुलाजवळील काही व्यावसायिकांच्या दुकानांपुढील बेकायदा पार्किंगमुळे कोंडीत अधिक भर पडली. दरम्यान, शनिवारीच घाटाच्या उतारावर एका वाहनाचा अपघात होऊन ते रस्त्यातच अडकल्याने वाहतुकीत अडथळा होता. महामार्गावरील इमामपूर घाटातील खड्ड्यांमुळे या भागात वारंवार वाहतूक कोंडी होत असून, प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी घाटातील खड्डे तातडीने बुजवावेत, अन्यथा मोठा अपघात होऊ शकतो, अशी मागणी केली आहे. पांढरीपूल परिसरात रविवारी दुपारी झालेली वाहतुकीची कांेडी.
प्रतिनिधी | जळगाव उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे शहराचे किमान तापमान तीनच दिवसांत १२.६वरून १०.५ अंशांपर्यंत घसरले आहे. रविवारपासून त्यात पुन्हा एक ते दोन अंशांनी घसरण होईल. त्यामुळे पारा आठ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता स्थानिक हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. वातावरणात गुलाबी थंडी जोर धरत आहे. प्रामुख्याने गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात घसरण झाली. आगामी काळात पारा पुन्हा कमी होऊन किमान तापमानात घसरण होऊन गारठ्यात वाढ होईल. आठ अंशांपर्यंत घसरेल पारा : ^उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे तसेच बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत होत असल्यामुळे वातावरणात बदल झालेला आहे. रविवारपासून पुढील तीन दिवसांत किमान तापमान आठ अंशांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. - नीलेश गोरे, हवामान अभ्यासक
प्रतिनिधी | वणी आजच्या ह्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये पालकांचा सहभाग महत्त्वाचा असून पालकांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष महेंद्र बोरा यांनी केले. वणी येथील श्री किसनलालजी बोरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या २० वा वार्षिक क्रीडा महोत्सव पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. महासैनिक कॅडेट फाउंडेशन कॅम्पद्वारे विविध प्रकारच्या खेळांनी पालकांना खिळवून ठेवले. झिप लाइन, योगा, पोल मल्लखांब, लाठी, ढाल, तलवार, दांडपट्टा, स्टिक फाइट, रोप मलखांब, रॅपलिंग, फायर जंम्प स्पर्धा झाल्या. उपसरपंच विलास कड म्हणाले, ग्रामीण भागात शहरी भागाप्रमाणे शिक्षण व आधुनिक सुविधा देणारी संस्था आहे. आजपर्यंत शंभर टक्के निकालाची परंपरा संस्थेने जोपासली असून भविष्यात राज्य पातळीवर व देश पातळीवर विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये यश मिळतील असे त्यांनी नमूद केले. ग्रामपालिका सदस्य किरण गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे व व्यायामाचे महत्त्व सांगितले. प्रा. आर. एल. पाटील यांनी विद्यार्थ्यांना खेळाबरोबरच शारीरिक दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी व्यायाम करणे देखील गरजेचे असल्याचे सांगितले. सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, पोलिस उपनिरीक्षक गणेश कुटे, आबासाहेब देशमुख, प्रा. आर. एल. पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रावणी रायजादे, आदित्य सोनवणे, पलक खाबिया, आर्या पवार यांनी केले.
जुना गंगापूरनाका, गंगापूर रोड येथील ६० हजार स्वे.फूट मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 'सहारा आर्ट अॅण्ड क्राफ्ट सिल्क आणि कॉटन एक्स्पो' ला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. देशातील १४ राज्यांतील हस्तकला आणि कापड उद्योगातील वस्तूंचे १२५ स्टॉल्स प्रदर्शनात उभारले आहेत. काश्मीरची उबदार शाल, राजस्थानी कोटा साडी, आंध्र प्रदेशची कलमकारी साडी, बरेलीचे जरी वर्कचे ड्रेसेस, बनारसी साडी, कोल्हापूरचे शर्ट्स आणि बागपतचे बेडसीट्स यांसारख्या विविध वस्तू उपलब्ध आहेत. महिलांसाठी राजस्थानी आणि गुजरातच्या आकर्षक बॅग्ज आणि पुरुषांसाठी व मुलांसाठीचे कपडेही येथे आहेत. क्रेशिया साडी, ज्यूट सिल्क, कोलकत्ता साडी आणि टेराकोटा शूज यांसारख्या अनेक वस्तूंचे प्रदर्शन आहे. सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन खरेदीसाठी खुले असते. सर्व उत्पादने अगदी कमी किमतीत उपलब्ध असल्याने नाशिककर मोठ्या उत्साहाने खरेदीचा आनंद घेत आहेत. विविध राज्यांच्या पारंपारिक कलाकृतींचा अनुभव घेण्यासाठी नाशिककर या संधीचा लाभ घेत आहेत. हा एक्स्पो थोड्याच दिवसांसाठी असल्याने नाशिककरांनी त्वरित भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
प्रतिनिधी | टाकळी जिवरग सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग आणि कायगाव परिसरात सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मशागती आणि रब्बी पेरणीसाठी वाफसा मिळत नाही. विहिरीचे पाणी उपसा करून ओढ्यांना सोडून शेत कोरडे करण्याची धडपड सुरू आहे. मात्र, रात्री पुन्हा विहिरी भरल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत. सततच्या पावसाने शेतामध्ये पाण्याचा निचरा होत नसल्याने मशागतीसह पेरणीची कामे लांबणीवर पडत आहेत. शेतात वाफसा येण्यासाठी विहिरीचे पाणी उपसा करून ओढ्यांना सोडले जात आहे. रब्बीचा हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. विहिरींतून दिवसभर उपसा केलेले पाणी रात्रीत पुन्हा काठोकाठ भरत असल्याने शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. यंदा पावसामुळे भुईमूग आणि सोयाबीन पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. बदलत्या हवामानामुळे ऊस पिकावर तांबेरा पडला. हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उसाचे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे सरी भरून राहिल्याने याचा पांढऱ्या मुळ्यांवर परिणाम झाला. उसाची वाढ खुंटली. शेतीचे अतोनात नुकसान झाले. पावसाचा हंगाम संपल्यानंतरही थांबूनथांबून कोसळत असलेल्या या पावसामुळे रब्बीचा पेराही लांबणीवर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतात सातत्याने पाणी भरून राहत असल्याने ही बाब शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीची बनली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. पाण्याचा निचरा झाल्यानंतर पेरणीपूर्व मशागतीची कामे रब्बीचा पेरा वेळेत व्हावा यासाठी शेतात मशागतीची कामेही करावी लागणार आहेत. अशा स्थितीत ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहिरी आहेत त्यांनी नामी शक्कल लढवली आहे. विहिरीतील पाणी मोटरीच्या साह्याने उपसा करून ते ओढ्यांना सोडण्यात येत आहे. जेणेकरून शेतातील पाण्याचा निचरा होऊन पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात होईल.
लासूरच्या नागरिकांना त्रास:नदीवरील फरशी पुलाचा मोठा भाग तुटला; नागरिकांना त्रास
शिवना नदीवरील फरशी पुलाचा मोठा भाग तुटल्याने नागरिकांना त्रास हेातो. पैठण शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा तसेच निवासी भागांमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग वाढत आहेत. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाकडून नियमितपणे कचरा उचल होत नसल्याने दुर्गंधी पसरत असून नागरिकांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. दिव्य मराठीचे वाचक ऋषी भगत यांनी घेतलेले छायाचित्र. तुम्हालाही सार्वजनिक हिताची समस्या सांगायची असेल तर आम्हाला 9340061657 या व्हॉट्सॲप क्रमांकावर नाव, पत्ता, फोटो, व्हिडिओ पाठवा. लासूर स्टेशन | मागील दोन महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शिवना टाकळी धरणातून वारंवार सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विर्सगामुळे शिवनानदीला सातत्याने पूर परिस्थिती निर्माण होत होती. त्यामुळे वैजापूर तालुक्यातील लासूरगाव जवळच्या शिवना नदीवरील फरशी पुलाचा मोठा भाग या पाण्याच्या विर्सगामुळे तुटुन गेला. तेव्हापासून इथून चारचाकी दुचाकी सारखे वाहने प्रवास करणे कठीण बनले आहेत. याचा सर्वात जास्त फटका विद्यार्थ्यांना बसतो. त्यामुळे तात्काळ या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे प्रा. अशोक म्हस्के यांनी निवेदनाद्वारे केली आहे. कामाच्या आश्वासनाकडे लागले स्थानिकांचे लक्ष : लासूरगाव येथील श्री देवी दाक्षायणी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवात वैजापूरचे तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या आग्रहाखातर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सपत्नीक मंदिरात पूजा केली होती. या वेळी उपसरपंच रितेश मुनोत यांनी फरशी पुलाची कैफियत मांडली असता पुलाचे काम करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. आता हे काम केव्हा सुरू होणार याकडे स्थानिकांचे लक्ष लागून आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांना जास्तीचा फेरा लासूरगाव जवळील शिवना नदीकाठी असलेल्या श्री देवी दाक्षायणी मातेचे मंदिर आहे. येथे देवी दाक्षायणी मातेच्या दर्शनासाठी वाहनांना या तुटलेल्या फरशी पुलावरील प्रवास बंद झाल्याने नाईलाजाने जास्तीचा फेरा मारून सावंगी चौकातून जुन्या नागपूर मुंबई मार्गाने जावे लागत आहे.
३५ वर्षांनंतर लाडसावंगीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा:अनोख्या भेटीमुळे वातावरण भावुक
प्रतिनिधी| लाडसावंगी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी जिल्हा परिषद हायस्कूलच्या १९९०-९१ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल ३५ वर्षांनी एकत्र आलेल्या वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. बालपणीच्या गमती-जमती सांगितल्या. एकमेकांच्या सुख-दुःखाची चौकशी केली. या अनोख्या भेटीमुळे वातावरण भावुक झाले होते. शाळेतील शिस्त, शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच आयुष्यात यश मिळाले, असे मत अनेकांनी व्यक्त केले. मैत्रीचे नाते अधिक घट्ट झाल्याची भावना माजी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली. केवळ नोकरी, व्यवसायापुरते न थांबता समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्धारही यावेळी सर्वांनी केला. शक्य तेवढा वेळ समाजकारणासाठी देण्याचा संकल्प त्यांनी केला. स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी विठ्ठल बहुरे, प्रेमचंद पचलोरे, राजु लष्कर, नारायण पवार, बाबासाहेब पवार, प्रभाकर शिंदे, राधाकिसन पडुळ, कृष्णा डांगरे, संजय दिलवाले, दिलीप दाभाडे, राजेंद्र पवार, नारायण शिहिरे, ज्योती कोंडके, कीर्ती तरटे, इंदू हिवराळे, कल्पना पवार, सुनीता वानखेडे, संगीता पुंड, प्रतिभा यांनी पुढाकार घेतला होता.
प्रतिनिधी | लासूर स्टेशन गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथील पुजा योगेश जारवाल बहुरे यांची राज्यसेवा परीक्षा २०२४ मधून राजपत्रित क्लास वन अधिकारी पदावर निवड झाली. या यशानंतर शनिवारी सायंकाळी गावात फुलांनी सजवलेल्या गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवाजीराव चंदेल, प्रभु बागुल, गणेश कजबे, जनार्दन गवळी, धरमसिंग बिमरोट, किरण पानकर, ज्ञानेश्वर वाघचोरे, अभय जारवाल, महंत पुरणदास आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर वाघचोरे यांनी केले. आभार प्रदर्शन पळसकर यांनी केले. कवी ज्ञानेश्वर वाघचोरे यांनी सांगितले की, यश मिळवण्यासाठी सातत्य, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. संघर्षाच्या काळात संयम ठेवला तर यश नक्की मिळते. पुजा जारवाल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अभ्यासासाठी सोशल मीडियापासून राहिले दूर पूजा जारवाल यांनी सांगितले की, प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न होते. पती, आई-वडील, सासू-सासरे यांनी सतत प्रोत्साहन दिले. अभ्यासासाठी सोशल मीडियापासून दूर राहिले. सार्वजनिक आयुष्य टाळले. कुटुंबाला वेळ देता आला नाही, तरीही त्यांनी कुठलीही तक्रार केली नाही. या यशात बहुरे आणि जारवाल कुटुंबाचे मोठे योगदान आहे, असे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
महायुती सरकार नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले:जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील
प्रतिनिधी | सिल्लोड सिल्लोड तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) केला आहे. पक्षाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याच्या सूचना दिल्या. शहरातील शिक्षक सोसायटी येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. तांगडे पाटील म्हणाले, महायुती सरकार जनतेच्या प्रश्नांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे जनतेत रोष आहे. हा रोष आगामी निवडणुकांमध्ये दिसून येईल. महाविकास आघाडीला सोबत घेऊन निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. सिल्लोड तालुक्यातील दंडेलशाहीच्या राजकारणाला संपवण्यासाठी मतदारांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. सिल्लोड ग्रामीणचा आढावा तालुका अध्यक्ष प्रा. राहुलकुमार ताठे यांनी मांडला. शहराचा आढावा शहराध्यक्ष शेख शाकीर यांनी दिला. सूत्रसंचालन प्रदेश उपाध्यक्ष शेख शफिक यांनी केले. आभार माजी तालुकाध्यक्ष अजित पाटील यांनी मानले. या वेळी संभाजी ब्रिगेडचे योगेश गोराडे, विलास शिंदे, रफिक पठाण यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) प्रवेश केला. कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ काळे, द्वारकादास पाथ्रीकर, हरिश्चंद्र लघाने, महिला जिल्हाध्यक्ष छाया जंगले, अंभोरे मामा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी | वेरूळ जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या ३६ व्या पुण्यस्मरणानिमित्त वेरूळला २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान ओम जगद्गुरू जनशांती धर्म सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीचा शुभारंभ रविवारी ध्वजारोहणाने झाला. कार्यक्रमाचे मार्गदर्शन जगद्गुरू स्वामी शांतीगिरी महाराज करत आहेत. ध्वजारोहण सोहळ्यास महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब, देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज, हभप मेटे महाराज, सेवागिरी महाराज, उद्योजक मनोज पवार, अनिल चोरडिया, घृष्णेश्वर देवस्थानचे अध्यक्ष विकी दांडगे, उपाध्यक्ष योगेश टोपरे, माजी सभापती गणेश अधाने यांच्यासह नाशिक, जळगाव, धुळे, जालना, पुणे, ठाणे, बीड, परभणी येथील जय बाबाजी भक्त परिवाराचे पदाधिकारी उपस्थित होते. वेरूळ आश्रमातून बाबाजींची पालखी व स्वामी शांतीगिरी महाराज यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये बाबाजींच्या शाळेतील विद्यार्थी व भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. शोभायात्रेनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. पुण्यस्मरण सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ७५१ कुंडी यज्ञ आहे. आठ दिवस मौनव्रती पुरुष व महिला ११ हजार वेळा बाबाजींनी दिलेला गुरुमंत्र जपणार आहेत. यज्ञ, नंदादीप, महिला जप, नामस्मरण, कीर्तन, एकनाथी भागवत पारायण, अखंड अन्नदान असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
परमार्थ करा, अन्यथा जीवन निरर्थक:आळंदमधील हरिनाम सप्ताहामध्ये भुजंग महाराज पंढरपूरकर यांचा हितोपदेश
प्रतिनिधी |आळंद ‘‘जीव आणि शिवाचे मिलन हाच आयुष्याचा खरा काला आहे. माणसाने परमार्थ करताना संतांच्या संगतीत राहून परमार्थ केला पाहिजे. तुम्ही जन्माला येऊन संतांच्या व भगवंताच्या सान्निध्यात गेला नाहीत, तर हे जीवन निरर्थक आहे. त्यामुळे जीवनाचा काला देवासोबत झाला पाहिजे’’, असा हितोपदेश भुजंग महाराज पंढरपूरकर यांनी दिला. फुलंब्री तालुक्यातील आळंदमध्ये सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद् संगीत भागवत कथा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची रविवारी (दि. ९) भक्तिमय वातावरणात सांगता झाली. यावेळी कल्याण महाराज भुजंग (पंढरपूरकर) यांचे काल्याचे कीर्तन झाले. यावेळी आळंद नगरी विठ्ठलनामाच्या जयघोषात न्हाऊन निघाली. महाराजांनी आपल्या कीर्तनातून श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या पवित्र मैत्रीचे तसेच ‘गोपाळांचा काला' या आध्यात्मिक कथेचे महत्त्व विशद केले. ‘प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे' हा प्रेम आणि भक्तीचा संदेश देत त्यांनी उपस्थितांना भक्तीरसात तल्लीन केले. या सोहळ्यादरम्यान सातही दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. दररोज पहाटे ४ ते ६ वाजेदरम्यान जागृत हनुमान मंदिरात काकडा भजन झाले. त्यानंतर सकाळी ६ ते १० या वेळेत ज्ञानेश्वरी पारायणाचे पठण, तर १० ते ११ गाथा भजन पार पडले. दुपारी ११ ते ३ या वेळेत भागवत कथेची मंगलमय वाणी उपस्थितांना श्रवण करायला मिळाली. सायंकाळी ६ ते ८ हरिपाठ आणि रात्री ९ वाजता दैनंदिन कीर्तनाचा कार्यक्रम झाला. समारोपाच्या दिवशी रविवारी सकाळी ९ ते १० या वेळेत गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली, ज्यात भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. कीर्तन व प्रवचनानंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. ज्यामध्ये हजारो भाविकांनी सहभागी होऊन प्रसाद घेतला. २५ वर्षांची परंपरा कायम ः या सोहळ्याला श्री श्री १००८ महामंडलेश्वर दयानंद महाराज यांच्यासह परिसरातील अनेक संत, महंत आणि आळंद तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. २५ वर्षांची परंपरा जपणाऱ्या या सप्ताहामुळे आळंद गावाचे धार्मिक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कीर्तनानंतर महाप्रसादाने या धार्मिक पर्वणीची परिपूर्ती झाली.

28 C