राज्याच्या प्रलंबित महापालिका निवडणुकांचा विषय आज मार्गी निघाला. राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची घोषणा केली. त्यानुसार, 15 जानेवारी 2026 रोजी मतदान, तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी आयोगाने उमेदवारी अर्ज ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आयोगावर होणाऱ्या चौफेर टीकेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुबार मतदारांचा पायबंद करण्यासाठीही काही ठोस निर्णय घेतलेत. नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे; परंतु विविध राजकीय पक्ष आणि नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. ‘जातवैधता पडताळणी’बाबत ते पुढे म्हणाले, राखीव जागांवर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. जात प्रमाणपत्र असेल; परंतु जातवैधता प्रमाणपत्र जोडले नसल्यास जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा अन्य कोणताही पुरावा देणे आवश्यक राहील. “सहा महिन्यांच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यात येईल,” असे हमीपत्रदेखील संबंधित उमेदवारांना द्यावे लागेल. या विहित मुदतीत म्हणजे निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या संबंधित उमेदवाराची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल. मतदान केंद्र आणि ईव्हीएम आयोगाच्या माहितीनुसार, महानगरपालिका निवडणुकांसाठी एकूण 3 कोटी 48 लाख 78 हजार 17 मतदार असून त्यासाठी सुमारे 39 हजार 147 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे 10 हजार 111 मतदान केंद्रांसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. संभाव्य दुबार मतदारांबाबत दक्षता वाघमारे म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या विधानसभा मतदारसंघाच्याच मतदार याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकांसाठी वापरल्या जातात. संबंधित कायद्यांतील तरतुदींनुसार राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करून, त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या याद्या महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभागनिहाय विभाजित केल्या आहेत. या याद्यांतील नावे वगळण्याचा किंवा नव्याने नावे समाविष्ट करण्याची बाब राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही; परंतु त्यातील दुबार नावांबाबत मात्र राज्य निवडणूक आयोगाने पुरेपूर दक्षता घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या आज 15 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध झाल्या आहेत. मतदान केंद्राच्या ठिकाणांची (इमारती) यादी 20 डिसेंबर 2025 रोजी; तर मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या 27 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. मतदार याद्यांतील संभाव्य दुबार मतदारांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधित महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त त्यांच्या स्तरावर कार्यवाही करीत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली (ॲप्लिकेशन) विकसित केली आहे. इतरही महानगरपालिकांनी विविध तंत्रांचा वापर करून संभाव्य दुबार नावांबाबत दक्षता घेतली आहे. महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात आले आहे. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात आले. घरोघरी जाऊनही त्यांची पडताळणी केली आणि त्यांच्याकडून असा मतदार कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्यात आला आहे. त्याने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही; परंतु काही कारणाने असा अर्ज भरून घेतला नसल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. त्याचबरोबर त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.
मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महानगपालिका निवडणुकांची घोषणा केली. नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत झालेला गोंधळ, प्रचाराच्या वेळा आणि मतमोजणी पुढे ढकण्याच्या निर्णयाबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना विचारले असता, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या त्या-त्या कायद्यांनुसारच घेतल्या जातात,'' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये झालेला गोंधळ, प्रचाराच्या वेळा आणि मतमोजणी पुढे ढकलण्याच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले आहे. विविध राजकीय पक्षांसह खुद्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही निवडणूक आयोगाच्या या कारभारावर उघड नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्तांनी समोर येत या सर्व आक्षेपांवर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. निवडणुका पुढे का ढकलल्या? काही ठिकाणी निवडणुका ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्याने गोंधळ उडाला होता. यावर स्पष्टीकरण देताना राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, ज्या ठिकाणी न्यायालयांत किंवा इतर स्तरावर अपील दाखल झाले होते, त्यांचे निर्णय येण्यास उशीर झाला. निवडणूक नियम क्रमांक 17 प्रमाणे उमेदवारी मागे घेण्यासाठी उमेदवारांना तीन दिवसांची वैधानिक मुदत मिळणे आवश्यक असते. उशिरा आलेल्या निर्णयांमुळे ही मुदत देणे शक्य नव्हते. त्यामुळे कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी त्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. मतमोजणी 21 डिसेंबरलाच का? मतमोजणीची तारीख पुढे ढकलण्याबाबत बोलताना निवडणूक आयुक्तांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला दिला. ज्या निवडणुका सुरळीत पार पडल्या, त्यांची मतमोजणी आम्ही नियोजित वेळेनुसार 3 डिसेंबरलाच ठेवली होती. मात्र, उच्च न्यायालयाने आदेश दिले की, ज्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्या, 2 डिसेंबरला झालेले मतदान आणि 20 डिसेंबरला होणारे उर्वरित मतदान या सर्वांची मतमोजणी एकाच वेळी घ्यावी. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व ठिकाणची मतमोजणी आता 21 डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले. ब्रिदिंग पीरियडबद्दज काय म्हणाले? मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराला वेळ दिला. तर दुसऱ्या सकाळी सात वाजता मतदान होते. त्यामुळे जो ब्रिदिंग पीरियड दिला, त्यावर राजकीय पक्षांनी आक्षेप घेतले होते. यासंदर्भात विचारले असता, निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही संबंधित अधिनियम आणि कायदे नियमांप्रमाणे घेतो. नगर परिषदच्या कायद्यामध्ये मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत प्रचार करण्याची तरतूद आहे. त्यामुळे प्रचाराची वेळ मतदानाच्या आदल्या दिवशी दहा वाजेपर्यंत ठेवण्यासंदर्भात आदेश काढले होते. मात्र, आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, महानगपालिका अधिनियमात मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर प्रचार संपला पाहिजे, अशी तरतूद आहे. प्रत्येक कायद्यात वेगवेगळी तरतूद आहे आणि त्यामुळे ते प्रोव्हिजन वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी वेगवेगळी लागू होते, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
मुंबई : प्रतिनिधी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिचा एक्सपती शोएब मलिक हा त्याची तिसरी पत्नी सना जावेद हिच्यासोबतही घटस्फोट घेत चौथे लग्न करण्याच्या तयारी असल्याच्या बातम्या पसरल्या आहेत. कारण सना जावेद आणि शोएब मलिक यांच्यातील संबंध ताणले असून वाद वाढला आहे. टेनिस स्टार सानिया मिर्झा हिने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट घेतला. मात्र, […] The post शोएब मलिक करणार चौथे लग्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निवडणूक आयोगाच्या कार्यालयात मोठा राडा
मुंबई : प्रतिनिधी आज १५ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे.ाा पत्रकार परिषदेपूर्वीच संतप्त मनसैनिकांनी मनसे स्टाईलने निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील संगणक फोडले आहेत. यामुळे घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला. मतदार यादी संदर्भात घोळ असल्या प्रकरणी मनसे कार्यकर्ते कळवा मुंब्रा विधानसभेच्या निवडणूक कार्यालयामध्ये गेले होते, यावेळी ही घटना घडली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये […] The post निवडणूक आयोगाच्या कार्यालयात मोठा राडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अनंत गर्जेला पुन्हा अटक; एसआयटीची मोठी कारवाई
बीड : प्रतिनिधी मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी हिने आत्महत्या केली होती. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तपास करण्यासाठी सरकारने एसआयटीची स्थापना केली होती. आता एसआयटीकडून अनंत गर्जेला अटक करण्यात आली असल्याची माहिती आहे. अनंतला दुस-यांदा अटक केली असल्याने गौरीचा घातपात झाल्याची […] The post अनंत गर्जेला पुन्हा अटक; एसआयटीची मोठी कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
२९ महापालिकांसाठी निवडणुका जाहीर
मुंबई : प्रतिनिधी मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल १६ जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. राज्यातील २९ महापालिकांसाठी ३ कोटी ४८ लाख मतदार मतदान करणार आहेत. […] The post २९ महापालिकांसाठी निवडणुका जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी सर्वश्रुत आहेत. त्यांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचे पाहायला मिळते. तसेच आता पुन्हा एकदा गडकरींनी सरकारी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. माझ्या राजकीय आयुष्यात माझ्याकडून आता चांगले रस्ते झाले आहेत, आता मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, किती सस्पेंड करतो याचा रेकॉर्ड माझ्या हातून झाला पाहिजे आणि यासाठी मी देशात हात धुवून मागे लागलो आहे, असे म्हणत नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. नागपूर महापालिकेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी केंद्रीय परिवहन व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर निशाणा साधला. जनतेला शिक्षा होते, पण जे अधिकारी नियमानुसार वेळेत काम करत नाहीत, त्यांचे काय करायचे? असा सवाल गडकरी यांनी उपस्थित केला. तसेच यावेळी बोलताना त्यांनी नागपूर महापालिका आयुक्तांना देखील चिमटे काढले. नितीन गडकरी म्हणाले, आपण जनतेशी प्रामाणिक राहिले पाहिजे, गोड-गोड बोलतात म्हणून कोणाचे ऐकायचे काही कारण नाही, जनता हीच मालक आहे, ह्यांची कामे झाली पाहिजे. जी व्यवस्था न्याय देत नाही, ती उखडून टाकली पाहिजे, असेही गडकरी म्हणाले. जी व्यवस्था सर्वसामान्यांना न्याय देत नाही, त्याला उखडून फेकले पाहिजे. मी काम केले नाही तर मुर्दाबाद करणे तुमचा अधिकार आहे, असे परखड मत गडकारींनी बोलून दाखवले. पुढे बोलताना नितीन गडकरी यांनी नागपूर मनपा आयुक्तांना उद्देशून चिमटा काढला. ते म्हणाले, मी गंमतीने म्हणतो की नागपूर मनपा आयुक्तांना माझ्याविरोधात पुढील लोकसभा निवडणूक लढायची आहे. कारण, नागपूर मनपा आयुक्तांसारखे सहहृदयी माणूस आतापर्यंत इथे आला नाही. नेते अतिक्रमण थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि अधिकारी काढण्याचा. मात्र, इकडे उलटेच आहे, असा चिमटा गडकारींनी काढला.
तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गट शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गट शिवसेना पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्या. महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईतील ही मोठी घडामोड आहे. घोसाळकर कुटुंब हे ठाकरे कुटुंबाशी निष्ठावंत मानले जाते. मनीषा चौधरीहीसर विधानसभेच्या आमदार आहेत. पण त्यांच्याआधी शिवसेना नेते विनोद घोसाळकर दहिसर […] The post तेजस्वी घोसाळकर यांचा भाजपमध्ये प्रवेश; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सचा चेहरामोहरा आता पूर्णपणे बदलणार आहे. रेसकोर्सच्या ताब्यातील 120 एकर जागेवर मुंबई महापालिकेतर्फे भव्य 'सेंट्रल पार्क' उभारण्यात येणार आहे. थेट अमेरिकेतील 'न्यू यॉर्क सेंट्रल पार्क'च्या धर्तीवर हा प्रकल्प साकारला जाणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच ही घोषणा झाल्याने राजकीय वर्तुळात याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सादरीकरण आज मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात पार पडले. या संपूर्ण प्रकल्पाचे डिझाइन सुप्रसिद्ध आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी केले असून, एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. शिंदे म्हणाले, 2022 मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर आम्ही ही संकल्पना मांडली होती. आता तिला मूर्त स्वरूप दिले जात आहे. हे पार्क जागतिक दर्जाचे असेल. काय काय असणार सेंट्रल पार्कमध्ये? या पार्कमध्ये मुंबईकरांना मनोरंजनासोबतच क्रीडा सुविधांची मोठी मेजवानी मिळणार आहे. यात प्रामुख्याने टॉपरी गार्डन, बॉटनिकल गार्डन, सिटी फॉरेस्ट, स्नो पार्क, अम्युझमेंट पार्क, भव्य कन्व्हेन्शन सेंटर असणार आहे, शिवाय, या सेंट्रल पार्कच्या खाली जमिनीखाली तब्बल 10 लाख स्क्वेअर फुटांचे भव्य स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार आहे. यात कबड्डी, खो-खो या आपल्या मातीतल्या खेळांपासून ते स्केटिंग रिंग, ज्युदो, कराटे आणि बॅडमिंटन कोर्ट सारख्या जागतिक स्तरावरील सर्व खेळांच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत रेसकोर्सच्या जमिनीचा करार जुलै 2024 मध्ये रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबने (RWITC) रेसकोर्सची जमीन मुंबई महापालिकेला हस्तांतरित करण्याचा करार केला होता. त्यानुसार 120 एकर जागा पालिकेला मिळाली आहे, ज्यावर हे पार्क उभारले जाईल. तर उर्वरित 91 एकर जागा 31 मे 2053 पर्यंत RWITC कडे भाडेतत्त्वावर राहील. ऐतिहासिक वारसा असलेला हा रेसकोर्स मूळतः सिडनी रेसकोर्सच्या धर्तीवर बांधण्यात आला होता. उद्धव ठाकरेंची संकल्पना, महायुतीची अंमलबजावणी? विशेष म्हणजे, मुंबईत सेंट्रल पार्क उभारण्याची मूळ संकल्पना 2013 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली होती. मात्र, आता महायुती सरकारने याला गती दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांचे पडघम वाजण्याची शक्यता असतानाच ही घोषणा झाल्याने या टायमिंगची चर्चा जोरदार सुरू आहे.
माझाही घटस्फोट प्रलंबित ; महिमा चौधरीने सांगितली आपबिती
मुंबई : प्रतिनिधी मी माझ्या आईवडिलांचे दीर्घकालीन वैवाहिक जीवन आणित्यांचे प्रेम पाहिले आहे. त्यामुळे कधीच घटस्फोटाचा विचार केला नव्हता. जेव्हा मी एखाद्याच्या घटस्फोटाबद्दल ऐकायची तेव्हा मला वाटायचे की कदाचित दोघांपैकी एका व्यक्तीने लग्न वाचवण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. परंतु माझाही घटस्फोट प्रलंबित आहे. पण मी पुन्हा लग्न करण्याबाबत सकारात्मक आहे असे मत एका कार्यक्रमानिमित्त अभिनेत्री […] The post माझाही घटस्फोट प्रलंबित ; महिमा चौधरीने सांगितली आपबिती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार केवायसी
मुंबई : प्रतिनिधी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. आता केवायसी करण्यासाठी शेवटचे १५ दिवस उरले आहेत. केवायसीची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर केवायसी करायचे आहे. अजूनही लाखो महिलांनी केवायसी केली नसल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे. जर लाडक्या बहिणींनी केवायसी केले नाही तर त्यांचा लाभ बंद […] The post अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार केवायसी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गत ९ दिवसांपूर्वी शहरात ५ वर्षीय चिमुकलीवर एका परप्रांतीयाकडून झालेल्या अतिप्रसंगा विरोधात लाखांदूर पेटून उठला असून त्या प्रसंगाविरोधात १५ डिसेंबर रोजी सर्वधर्मीय नागरिकांकडून लाखांदूर बंदचे आयोजन करण्यात आले होते. या बंद च्या सुरुवातीलाच शिवाजी टी पॉइंट येथे उपस्थित गर्दीला संबोधताना काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, लाखांदूर पोलिसांच्या मध्यास्तीने हा वाद संपुष्टात आणून पुढे या मोर्चाचे प्रस्तान झाले. आणि सर्वाशेवटी चिमुकलीवर झालेल्या अत्याचारा विरोधात सर्वधर्मीय नागरिकांकडून काही मागण्यांचे निवेदन लाखांदूर तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक लाखांदूर शहरात ६ डिसेंबर रोजी अंगणात खेळत असलेल्या एका ५ वर्षीय चिमुकलीवर एका विधिसंघरशित परप्रांतियाने अतिप्रसंग केला. त्याचे विरोधात लाखांदूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली असली तरी ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे, या घटनेच्या आणि या प्रसंगाच्या विरोधात लाखांदूर पेटून उठला. याच्या निषेधार्थ आणि काही मागण्या घेवून १५ डिसेंबर रोजी सर्वधर्मीय आणि सर्व पक्षीय लाखांदूर बंद आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. निवेदनातून केलेल्या मागण्या.. विधिसंघर्षग्रस्त आरोपी व त्याच्या कुटुंबियांना लाखांदूर तालुक्यातुन हाकलण्यात यावे व यापूर्वी देखील त्यानी केलेल्या गुन्ह्याच्या संबंधाने तपास करावा. पीडित व तिच्या कुटुंबायाला संरक्षण देण्यात यावे. विधिग्रस्त आरोपी बालक हा सराईत गुन्हेगार असल्याने पोलिसांनी त्याची जमानत होऊ देऊ नये म्हणून जलद गती न्यायालयात सदर प्रकरण चालवावे. व शिक्षा होण्या संबंधाने आवश्यक ती कार्यवाही करावी. विधिग्रस्त आरोपीच्या कुटूंबाचे रहिवासी, आधार व राशन कार्ड हे बेकायदेशिर तयार करण्यात आले ते तात्काळ रद्द करण्यात यावे. व सदर कागदपत्रे तयार करुण देणाऱ्या लोकप्रतिनीधीवर कार्यवाही करण्यात यावी. पीडित कुटुंबाला २५ लक्ष रुपयांची व शासकीय नोकरी देण्यात यावी. रोजगार करणाऱ्या व सामान विकणाऱ्या व्यक्तींची मुशाफरी पोलिसांनी नोंदविण्यात यावी व त्यांची नोंद घ्यावी. ज्या परप्रांतीयांचा लाखांदूरात वावर आहे त्यांची मुळ रहिवासी व अन्य कागदपत्रे मागवून त्यांची माहिती पोलीस स्टेशन ला अद्यावत ठेवावी. व हे बांगलादेशी किंवा रोहीग्यां आहेत काय? याची शहानिशा व्हावी. परप्रांतीयांना शह देणाऱ्याची चौकशी करण्यात यावी. व परप्रांतीयांना लाखांदूर शहरात घर भाड्याणे देण्या अगोदर त्याची माहिती पोलीसांना देण्यात यावी. लाखांदूर शहरातील फुटपाथवर परप्रांतीयांची असलेल्या दुकानांची चौकशी करण्यात यावी. परप्रांतीयांचे रहिवासी दाखले व ईतर शासकिय कागदपत्रे तयार करण्यात येऊ नये यासाठी बंदी घालावी. आदी मागण्यांचा समावेश आहे. या मोर्चात तालुक्यातील सर्व जाती धर्माचे, सर्व पक्षाच्या नेत्या लोकप्रतिनिधींनी हिरीरीने सहभाग नोंदविला, हे मात्र विशेष. शहरातील मुस्लिम संघटनेचा मोर्चाला पाठिंबा आणि निवेदन गत ६ डिसेंबर रोजी लाखांदूर येथे एका ५ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर झालेल्या अतिप्रंगा विरोधात लाखांदूरात सर्धर्मीय नागरिकांकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला स्थानिक लाखांदूर शहरातील जामा मशीद, अरबी मदरसा व कबरस्थान व्यवस्थापन समितीने निवेदनातून जाहीर पाठिंबा दिला असून, काही मागण्यांचे निवेदन पण सादर केले. पीडितेला तात्काळ व निष्पक्ष न्याय मिळावा, दोर्षीना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये. समाजात भीती नव्हे तर न्याय व सुरक्षिततेचे वातावरण निर्माण व्हावे.
मतदार याद्यांमधील कथित घोळामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी कळवा स्थित निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वीच ही घटना घडल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य निवडणूक आयोगाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यातील मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कळवा येथील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात तोडफोड केली आहे. मतदार याद्यांमधील कथित घोळांमुळे त्यांनी हे आक्रमक पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. सपाट जमिनीवर इमारती दाखवून मतदारांची नोंदणी यासंबंधीच्या माहितीनुसार, मनसे कार्यकर्ते सकाळी 11 वाजल्यापासून कळवा स्थित निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित होते. तिथे त्यांनी मतदार याद्यांमधील त्रुटींवर आक्षेप घेत आंदोलन सुरू केले होते. मतदार यादीत अनेक मतदारांची नावे दुबार आलेली आहेत. तसेच जे मतदार हयात नाहीत, त्यांची नावेही यादीत आहेत. जिथे सपाट जमिनी आहेत, तिथे इमारती दाखवून मतदारांची नावे नोंदवण्यात आली आहेत, अशा अनेक तक्रारी त्यांच्या होत्या. अधिकाऱ्यांकडून केवळ बोलघेवडेपणा सुरू असल्याने संतापले मनसे कार्यकर्त्यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना अधिकाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अधिकाऱ्यांनी केवळ 'तुमचे प्रश्न सोडवले जात आहेत,' असे दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळी निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाइटही चालत नव्हती. या प्रकारामुळे कार्यकर्त्यांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि त्यांनी कार्यालयात तोडफोड करायला सुरुवात केली. मनपा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेवर आणि कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हे ही वाचा... भाजप सरकारकडून जनतेची फसवणूक:आदित्य ठाकरे यांचा घणाघात; डबल इंजिन सरकार असूनही खोट्या घोषणा सुरू असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्र व राज्यात एकाच विचाराचे सरकार आहे. पण त्यानंतरही भाजप सरकारकडून जनतेची घोर फसवणूक केली जात आहे, असे ते म्हणालेत. राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे. त्यात मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुकांचा आज कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, भाजपने लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. पण दुर्दैवाने अजूनही लाडक्या बहिणींच्या कोात्यात 2100 रुपयांचा हप्ता जमा झाला नाही. वाचा सविस्तर
हिवाळी अधिवेशनात विधानसभेत पोलिसांच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित करताना ‘पोलीस काय हजामत करतात का?’ या शब्दप्रयोगावरून निर्माण झालेल्या वादळानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज तातडीने दिलगिरी व्यक्त केली. हजामत हा शब्द बोलण्याच्या ओघात माझ्याकडून गेला. माझी चूक झाली असून, मी संपूर्ण नाभिक समाजाची जाहीर माफी मागतो, अशा शब्दांत पाटील यांनी या वादावर पडदा टाकला. दरम्यान, त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि घाईगडबडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, सांगली महानगपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीत लढणार असल्याची घोषणा जयंत पाटील यांनी केली. नागपूर हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वाभाडे काढले होते. बीड जिल्ह्यातील राम खाडे यांच्यावर नगर जिल्ह्यात झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा संदर्भ त्यांनी दिला. खाडे यांच्यावर 10-12 जणांनी हल्ला करून हात-पाय तोडले. त्यांना मेले समजून फेकून दिले. या घटनेला 15 दिवस उलटूनही पोलीस एकाही आरोपीला पकडू शकले नाहीत. मग पोलीस काय हजामत करतात का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी संताप व्यक्त केला होता. या शब्दावरून सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेत सभागृहात गोंधळ घातला होता. राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची वेळ आणि तारीख जाहीर झाल्यानंतर जयंत पाटील यांनी आज सांगलीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाला लक्ष्य केले, तसेच नाभिक समाजाची माफी मागितली. जयंत पाटील म्हणाले, माझा उद्देश पोलिसांच्या कामावर टीका करण्याचा होता, कोण्या समाजाचा अपमान करण्याचा नव्हता. मात्र, बोलण्याच्या ओघात मी हजामत हा शब्द बोलून गेलो. त्यामुळे भावना दुखावल्या असतील, तर मी संपूर्ण नाभिक समाजाची दिलगिरी व्यक्त करतो, अशी चूक व्हायला नको होती, ती झाली. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो.'' निवडणूक आयोगाला सवाल राज्य निवडणूक आयोगाकडून आज महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. यावर जयंत पाटील यांनी तीव्र आक्षेप घेतला. राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल येणे बाकी असतानाच महापालिका निवडणुकांची घोषणा करणे हे चुकीचे आहे. निवडणूक आयोगाची ही घाई संशयास्पद आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटलांकडून युतीची घोषणा आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत सांगली महापालिकेसाठी युती करणार असल्याची घोषणा केली. जयंत पाटील म्हणाले की, ''पुढील दोन तीन दिवसांत जागा वाटप निश्चित केले जाईल. विशाल पाटील हे अपक्ष खासदार असले तरी त्यांचा डीएनए हा काँग्रेसचा आहे. आगामी महापालिका निवडणुकीचे नेतृत्व विशाल पाटील हेच करतील. सांगली महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. आमची जागा वाटपावर चर्चा झाली, पण मुर्त स्वरूप आले नाही. जागा वाटपाची घोषणा लवकरच करणार आहोत.'' बिबटे शहरात का येतात? शहरांमध्ये वाढलेल्या बिबट्यांच्या वावराबाबतही जयंत पाटील यांनी भाष्य केले. जंगले कमी झाल्याने वन्यप्राणी शहराकडे वळत आहेत. सरकारने झाडे तोडून त्या जागी नवीन प्रकल्प राबवू नयेत, पर्यावरणाचे संतुलन राखणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्र व राज्यात एकाच विचाराचे सरकार आहे. पण त्यानंतरही भाजप सरकारकडून जनतेची घोर फसवणूक केली जात आहे, असे ते म्हणालेत. राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे. त्यात मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुकांचा आज कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, भाजपने लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. पण दुर्दैवाने अजूनही लाडक्या बहिणींच्या कोात्यात 2100 रुपयांचा हप्ता जमा झाला नाही. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. पण भाजपने दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन अद्याप पूर्ण झाले नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी तर नाहीच, पण सरकारने जाहीर केलेली मदतही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. केंद्रात व राज्यात भाजचे सरकार आहे. पण तरीही सरकार खोट्या घोषणा करत आहे. भाजपच्या सर्वच घोषणा फसव्या आहेत, असे ते म्हणाले. बीएमसी प्रशासनावरही टीका आदित्य यांनी यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून राज्य निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आहे. ते एक जाहिरात पोस्ट करत म्हणाले, वृत्तपत्रांमधील या जाहिरातीद्वारे, मुंबई महापालिकेने घोषणा केली आहे की बीएमसी निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे आणि ती आज बीएमसीच्या केंद्रीय निवडणूक कार्यालयात उपलब्ध असेल. परंतु, सध्या केंद्रीय निवडणूक कार्यालयात कोणतीही अंतिम मतदार यादी उपलब्ध नाही. वेबसाइटवरही काहीही अपलोड केलेले नाही. त्यांचे लाखो घोटाळे आणि चुका उघडकीस आणल्यानंतरही, अंतिम मतदार यादी मशीनद्वारे वाचण्यायोग्य (मशीन रीडेबल) नसेल. अशा फसवणुकीबद्दल बीएमसीमधील निवडणुकीच्या प्रभारी अधिकाऱ्यावर देशविरोधी कारवायांचे आरोप का लावू नयेत? बीएमसीने सर्व राजकीय पक्ष आणि अपक्षांना मतदारांची अंतिम यादी तपासण्यासाठी एक दिवस वाया का घालवला आहे? बीएमसीमधील निवडणुकीचा प्रभारी अधिकारी एखाद्या विशिष्ट पक्षाला मदत करत आहे आणि इतरांना नाही?, असे त्यांनी म्हटले आहे.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. जुन्नर-शिरूर सीमेवर असलेल्या पारगाव तर्फे आळे परिसरात आज पुन्हा एकदा बिबट्याने एका मुलाचा बळी घेतला. आई-वडील शेतात काम करत असताना बाजूला खेळणाऱ्या 8 वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने उचलून नेऊन ठार केले. रोहित काफरे असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहितचे कुटुंब शेतमजूर असून ते पारगाव शिवारातील एका शेतात कांदा लागवडीचे काम करत होते. आई-वडील कामात व्यस्त असताना रोहित शेताच्या बांधावर खेळत होता. त्याचवेळी शेजारील ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने संधी साधत अचानक रोहितवर झडप घातली. काही कळायच्या आतच बिबट्याने त्याला ऊसात फरफटत नेले. आरडाओरडा ऐकून आई-वडील आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या हल्ल्यात रोहितचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार? रोहितच्या मृत्यूने काफरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत या परिसरातील बिबट्याच्या हल्ल्यातील हा चौथा मृत्यू आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. प्रशासन अजून किती निष्पाप जिवांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहे? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, ग्रामस्थांनी तात्काळ पिंजरे लावण्याची आणि रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी लावून धरली आहे. पुण्यातही बिबट्याच्या चर्चा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन एकीकडे ग्रामीण भागात बिबट्याचे हल्ले वाढले असताना, दुसरीकडे पुणे शहरातील खराडी भागातही बिबट्याच्या वावरच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही नागरिकांनी पोलिसांना फोन करून परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, मात्र काही संशयास्पद हालचाल दिसल्यास किंवा बिबट्या दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जुन्नरमध्ये दीड महिन्यात 68 बिबटे जेरबंद दरम्यान, जुन्नर वनविभागात बिबट्यांचा धुमाकूळ रोखण्यासाठी प्रशासनाने 13 कोटींचा निधी वापरून 400 नवीन पिंजरे तैनात केले. या मोहिमेला मोठे यश आले असून, अवघ्या दीड महिन्यात तब्बल 68 बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. मात्र, आता माणिकडोह निवारा केंद्राची क्षमता संपल्याने या बिबट्यांना ठेवायचे कुठे, असा यक्षप्रश्न वनविभागासमोर उभा राहिला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 बिबट्यांना जामनगर येथील वनतारा (गुजरात) येथे हलवण्यात आले असून, जिल्ह्यात 4 नवीन निवारा केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सौर कुंपण, नेक गार्ड वाटप आणि बिबट नसबंदीसारख्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्यात येत आहेत. वनविभागातील 233 अतिसंवेदनशील गावांना ‘संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे. शेतातील घरे आणि गोठ्यांकरिता 150 सौरऊर्जा कुंपण बसविण्यात आले असून, आणखी 550 घरांना देण्याचे नियोजन आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीत स्वतःच्या मालकीचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. PMRDA ने अत्यल्प उत्पन्न गट व अल्प उत्पन्न गट श्रेणीतील नागरिकांसाठी तब्बल 833 सदनिकांची ऑनलाईन सोडत जाहीर केली आहे. यात अर्जदाराची नोंदणी, अर्ज भरणे व अनामत रकमेचे पेमेंट करण्याची सुविधा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाणार आहे. यामुळे अर्जदारांचा शासकीय कार्यालयात खेटे मारण्याचा त्रास वाचणार आहे. PMRDA च्या सोडतीनुसार, पेठ क्रमांक 12 येथे एकूण 340 सदनिका उपलब्ध आहेत. त्यात अल्प उत्पन्न गटासाठी 55 व अल्प उत्पन्न गटासाठी 285 सदनिकांचा समावेश आहे. याशिवाय पेठ क्रमांक 12 मधील अत्यल्प उत्पन्न गटातील पात्र लाभार्थ्यांना केंद्र सरकाच्या महत्त्वकांक्षी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 2.50 लाख रुपयांचे अनुदानही मिळणार आहे. यामुळे घराची किंमत आणखीन कमी होणार आहे. उर्वरित 493 सदनिका पेठ क्रमांक 30-32 येथे उपलब्ध आहेत. त्यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी 306 व अल्प उत्पन्न गटासाठी 187 सदनिकांचा समावेश आहे. PMRDA प्रशासनाने या प्रकरणी अर्ज प्रक्रियेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. ऑनलाईन नोंदणीची सुरुवात आजपासून सुरू झाली आहे. तर ऑनलाईन अर्ज भरण्याची व पेमेंट स्वीकारण्याची प्रक्रिया शुक्रवारी दुपारी 12 वाजेपासून सुरू होईल. अर्जदारांना नोंदणी व अर्ज भरण्यासाठी 27 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्याची अंतिम मुदत 27 जानेवारी रात्री 11.59 पर्यंत असेल. बँक आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर सोडतीसाठी स्वीकारलेल्या अर्जांची प्रारूप यादी 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वा. प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर आक्षेप नोंदवण्याची अंतिम मुदत 12 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहील. तर अंतिम यादी 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वा. जाहीर होणार आहे. त्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. सदनिकांची ऑनलाईन सोडत काढण्यात येईल. त्याच दिवशी सायंकाळी 6 वा. पात्र अर्जदार तसेच प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची नावे पीएमआरडीएच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी housing.pmrda.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन पीएमआरडीएने केले आहे. तसेच सदनिकांच्या संख्येत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे राहतील असेही या प्रकरणी स्पष्ट करण्यात आले आहे.
कौंडण्यपूरमध्ये वाढते अपघात:सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कार्यवाही नाही; गतिरोधकांची मागणी
आर्वी-अमरावती मुख्य राज्य महामार्गावरील कौंडण्यपूर हद्दीत अपघातांची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर, येथे गतिरोधक बसवण्याची मागणी पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. गटग्रामपंचायतीने यापूर्वीही निवेदन दिले होते, मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. गटग्रामपंचायतीच्या नोंदीनुसार, गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिवसा येथील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले होते. त्यानंतर ५ डिसेंबर रोजी स्थानिक तरुणांनी पुन्हा एक निवेदन सादर करत संबंधित अधिकाऱ्यांना येथील अपघातांची आठवण करून दिली. सहा महिन्यांपूर्वीही याच स्वरूपाचे निवेदन देण्यात आले होते, परंतु त्यावरही कोणतीही कारवाई झाली नव्हती. कौंडण्यपूर हे विठ्ठल रुक्माईचे माहेरघर असल्याने येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते. कौंडण्यपूर बस स्टॉप, अंजनसिंगी रोडचे वळण, नवीन बस स्टॉप, मूर्तीजापूर-तरोडा रोड चौफुली, मुख्य गावात येणाऱ्या रोडवरील टी पॉईंट, विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे जाण्याचा मार्ग, ग्रामचौक आणि बाजार परिसर यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात पादचारी, विद्यार्थी व भाविकांची रहदारी असते. संपूर्ण मार्गावर एकही गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगात धावतात. यामुळे अपघातांची मालिका वाढली असून, छोटे-छोटे अपघात नित्याचेच झाले आहेत. तरुणांनी मागणी केली आहे की, कौंडण्यपूरच्या सीमा भागातील मुख्य चौक, शाळा परिसर, तीर्थक्षेत्राचे प्रवेशद्वार आणि वर्दळीच्या भागांत योग्य दर्जेदार गतिरोधक बसवण्यात यावेत. तसेच वेगमर्यादा फलक आणि पथदिवे यांसारख्या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, मोठ्या अपघाताची आणि जीवितहानीची वाट न पाहता, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात. सध्या होत असलेल्या लहान अपघातांवरून भविष्यातील मोठ्या धोक्याची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. निवेदन सादर करतेवेळी चंदू अर्मळ, पवन नागमोते, मंगेश गोरडे, प्रशांत जगताप, प्रमोद उईके, अंकुश देऊळकर, प्रफुल्ल देऊळकर आणि अमोल पुंडेकर आदी उपस्थित होते.
अचलपूरचे चार सिंचन प्रकल्प रखडले:११,९३० हेक्टर वंचित; आमदार तायडे यांची अधिवेशनात मागणी
अचलपूर मतदारसंघातील चार महत्त्वाचे सिंचन प्रकल्प निधीअभावी अनेक वर्षांपासून रखडले आहेत, ज्यामुळे ११,९३० हेक्टर शेती सिंचनापासून वंचित आहे. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत, आमदार प्रवीण तायडे यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडे तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मतदारसंघातील बोर्डी नाला प्रकल्प, राजुरा प्रकल्प, राजनापूर्णा बॅरेज प्रकल्प आणि वासनी मध्यम प्रकल्प हे चार प्रमुख सिंचन प्रकल्प अपूर्ण आहेत. या प्रकल्पांच्या रखडण्यामागे तांत्रिक अडचणी नसून केवळ निधी मंजुरीचा अभाव असल्याचे आमदार तायडे यांनी सभागृहात स्पष्ट केले. हे प्रकल्प पूर्ण झाल्यास मतदारसंघातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. यापैकी बोर्डी नाला, राजनापूर्णा बॅरेज आणि राजुरा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून त्यांना तुलनेने कमी निधीची आवश्यकता आहे. या प्रकल्पांकडे दुर्लक्ष केल्यास आतापर्यंत झालेला कोट्यवधींचा खर्च वाया जाण्याची भीती आमदारांनी व्यक्त केली. अल्प निधी उपलब्ध करून हे प्रकल्प पूर्ण केल्यास मोठ्या क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल, असेही त्यांनी सांगितले. वासनी मध्यम प्रकल्पाच्या बांधकामावर आतापर्यंत ६४३.५१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास ५,०४३ हेक्टर शेती क्षेत्राला कायमस्वरूपी सिंचनाचा लाभ मिळू शकतो. मात्र, सन २०१६-१७ पासून आवश्यक निधी मंजूर न झाल्याने या प्रकल्पाचे काम पूर्णपणे थांबले आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केवळ ६५.६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करणे आवश्यक आहे. सध्या सिंचनाच्या अभावामुळे अचलपूर मतदारसंघातील कोरडवाहू शेती करणारा शेतकरी पूर्णतः निसर्गाच्या लहरींवर अवलंबून आहे. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेती उत्पादनावर मोठा परिणाम होत असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट होत चालली आहे. रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास शेती उत्पादनात वाढ होईल, पीक पद्धतीत बदल घडेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास आमदार प्रवीण तायडे यांनी व्यक्त केला.
शिवसेना ठाकरे गटाशी एकनिष्ठ असलेल्या उत्तर मुंबईतील घोसाळकर घरात आज अधिकृतपणे राजकीय फूट पडली. दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. आपल्या पोटच्या मुलाच्या निधनानंतर सूनबाईंनी विरोधी पक्षात प्रवेश केल्याने ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांना अश्रू अनावर झाले. अभिषेक असता तर हा प्रश्नच उद्भवला नसता. मुलाचे आपण हक्काने कान धरू शकतो, पण सूनबाईंचे कान कसे धरणार? अशा शब्दांत त्यांनी आपली हतबलता व्यक्त केली. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. उत्तर मुंबईतील शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माझ्या प्रभागात विकासाची कामे करण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माझी सगळी कामे होतील, अशी मी अपेक्षा करते, असे तेजस्वी घोसाळकर पक्षप्रवेशानंतर म्हणाल्या. या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार तेजस्वी घोसाळकर यांचे सासरे विनोद घोसाळकर यांना अश्रू अनावर झाले. कुटुंबप्रमुख म्हणून समजावले, पण... सूनबाईंच्या भाजप प्रवेशावर बोलताना विनोद घोसाळकर यांचा कंठ दाटून आला होता. ते म्हणाले, काल संध्याकाळी पत्नी, दोन्ही सुना आणि मी एकत्र बसलो होतो. तेव्हा तेजस्वीने मला 'डॅडी, मी असा निर्णय घेतेय' असे सांगितले. एक कुटुंबप्रमुख म्हणून मला जे सांगायचे होते, ते मी तिला सांगितले. पण आपण कोणावर दबाव आणू शकत नाही. ती स्वतंत्र व्यक्ती आहे आणि तिला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण अभिषेक असता तर हे घडले नसते, अभिषेक आणि सून यात फरक असतोच ना... हे सांगताना घोसाळकर यांना हुंदका आवरता आला नाही. मी आजही शिवसेनेतच! घरात फूट पडली असली तरी आपली निष्ठा 'मातोश्री'शीच असल्याचे विनोद घोसाळकर यांनी स्पष्ट केले. तेजस्वीने निर्णय सांगितल्यानंतर मी तात्काळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली. ती भाजपमध्ये गेली असली तरी मी आजही शिवसेनेतच आहे. बाळासाहेबांनी सत्तेवर लाथ मारायला शिकवले आहे, आम्ही सत्तेसाठी लाचार होणारे लोक नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले. नातवंडांसाठी एकाच घरात राहावे लागेल राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी कौटुंबिक नाते जपावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आजही एकाच घरात राहतो. माझी नातवंडे तिथे आहेत, त्यांच्यापासून मी दूर जाऊ शकत नाही. त्यामुळे मला त्यांच्या खोलीत जावेच लागेल. महाराष्ट्रात पूर्वी उद्योगांमध्ये कुटुंबे विभक्त व्हायची, गेल्या १० वर्षांपासून हे लोण राजकारणात आले आहे. आता एकाच घरात दोन पक्ष ही संस्कृती माझ्याही वाट्याला आली आहे, हे आता स्वीकारावे लागेल, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. मुंबई बँकेचा तो निर्णय अन्... मुंबई बँकेच्या संचालक पदावरूनही विनोद घोसाळकर यांनी भाष्य केले. अभिषेक मुंबई बँकेवर दोनदा निवडून आला होता. त्याच्या निधनानंतर ती जागा तेजस्वीला मिळावी अशी आमची मागणी होती. पण त्यासाठी एक वर्ष लागले. त्यामागे काय कारण होते, कुठून दबाव होता, यावर मला आता काहीच बोलायचे नाही, असे म्हणत त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच शिवसेना वरिष्ठ नेते यांनी दिलेल्या सूचनेनुसार आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेचे पहिले पाऊल म्हणून सोमवारी काँग्रेस भवन येथे काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहरातील सर्व प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक संपन्न झाली. पुणे महानगरपालिकेतील सत्तेच्या माध्यमातून व त्यानंतर प्रशासकांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने केलेली पुणेकरांची लूट थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. या लढ्यात जे समविचारी पक्ष आपल्या सोबत येतील त्यांना घेऊन निवडणुकीला सामोरे गेले पाहिजे या ठरावावर सर्वांचे एकमत झाले. अतिशय सकारात्मक पद्धतीने सुरू झालेली ही चर्चा पुण्यातील आगामी सुशासनाचा पाया रचणारी ठरेल हा मला विश्वास आहे असे मत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केले. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, प्रारूप मतदार यादी मध्ये प्रचंड घोळ असून मतदार याद्या पारदर्शकपणे व्यवस्थित केल्या पाहिजे, त्यानंतरच निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. पुण्यात मनपा अधिकारी आणि भाजपचे नेते यांनी साटेलोटे करून मतदार याद्यांमध्ये काही नावे दुसऱ्या मतदारसंघातील घुसवलेली आहेत, याबाबत आम्ही पुरावे देखील गोळा करून त्याची तक्रार संबंधित यंत्रणांकडे केलेली आहे. मात्र त्याकडे अद्याप डोळेझाक करण्यात येत आहे. पुण्यात महाविकास आघाडी मधील सर्व पक्ष एकत्रित निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.
मेट्रो खांबाला बसची धडक, ट्रकही आदळला:पुणे वाहतूक विस्कळीत, एक मार्गिका बंद, पर्यायी मार्ग जाहीर
पुणे शहरात मध्यरात्री एका खासगी आराम बसने मेट्रो स्थानकाच्या खांबाला धडक दिली. या अपघातानंतर पाठीमागून येणारा एक ट्रक बसवर आदळला. यामुळे आरबीआय मेट्रो स्थानक परिसरातील एक मार्गिका वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना हा अपघात घडला. आरबीआय मेट्रो स्थानकाजवळ घडलेल्या या घटनेमुळे वाहतूक विस्कळीत झाली. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. कार्यालयीन कामकाजाचा पहिला दिवस असल्याने या भागात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ही वाहतूक वळवण्यात आली आहे. चतु:शृंगी वाहतूक विभागाने पर्यायी मार्गांची माहिती दिली आहे. पिंपरी-चिंचवडकडून शिवाजीनगरकडे येणाऱ्या वाहनचालकांनी ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून खडकी भुयारी मार्गातून जावे. तसेच, बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्यांनी अबिल हाऊस येथून डावीकडे वळून रेंजहिल्समार्गे किंवा कॉसमॉस बँकेसमोरील चौकातून सेनापती बापट रस्त्याने जावे, असे पोलीस उपनिरीक्षक सचिन खेतमाळस यांनी सांगितले. दरम्यान, शिवाजीनगर भागातील वेधशाळा चौकात मध्यरात्री एक झाड कोसळल्याची दुसरी घटना घडली. अग्निशमन दलातील अधिकारी कमलेश चौधरी आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन झाडाच्या फांद्या हटवल्या आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून दोन लाखांच्या बांगड्या चोरी पुणे शहरात एरंडवणे भागात एका ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून दोन लाख रुपयांच्या बांगड्या चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला एरंडवणे भागातील अर्चनानगर सोसायटीत राहायला आहेत. ज्येष्ठ महिलेने शयनगृहातील टेबलावर दोन लाख रुपयांच्या साेन्याच्या बांगड्या ठेवल्या होत्या. चोरट्यांनी दोन लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली. ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याच्या संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सोसायटीत कामानिमित्त येणाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश निंबाळकर तपास करत आहेत.
कोंढवा पोलिसांनी बोपदेव घाटातील एका लॉजवर छापा टाकून देहविक्रय प्रकरणी दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी लॉज व्यवस्थापकासह दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये लॉजचा व्यवस्थापक रवी छोटे गौडा (वय ४६, रा. येवलेवाडी, कोंढवा) आणि कामगार सचिन प्रकाश काळे (वय ४०) यांचा समावेश आहे. हे दोघे बांगलादेशी तरुणींना देहविक्रय करण्यास प्रवृत्त करत होते. कोंढवा पोलिसांचे पथक गस्त घालत असताना, पोलीस कर्मचारी अमोल हिरवे यांना बोपदेव घाट परिसरातील एका लॉजमध्ये बांगलादेशी तरुणींकडून देहविक्रय करवून घेतला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या माहितीची खातरजमा करण्यासाठी बनावट ग्राहक पाठवला. खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित लॉजवर छापा टाकला. त्यावेळी तिथे दोन बांगलादेशी तरुणी आढळून आल्या. प्राथमिक चौकशीत, लॉज व्यवस्थापक रवी गौडा याने दलालामार्फत या तरुणींना आणले होते आणि त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांना देहविक्रयासाठी प्रवृत्त केले होते, अशी माहिती समोर आली. परिमंडळ पाचच्या प्रभारी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, पोलीस कर्मचारी अमोल हिरवे, अरुण कीटे, सुषमा हिंगमिरे, सोनाली कांबळे आणि राहुल रासगे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे (ह्युमन ट्रॅफिकिंग) मोठे जाळे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बांगलादेशी तरुणींना आमिष दाखवून भारतात आणले जाते आणि नंतर त्यांना धमकावून देहविक्रय करण्यास भाग पाडले जाते. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणींना बांगलादेशातील दलालांनी किरकोळ पैसे देऊन भारतात आणल्याचे तपासात उघड झाले आहे. कोंढवा पोलीस या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीच्या दृष्टीने अधिक तपास करत आहेत. पुणे पोलिसांनी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई तीव्र केली आहे. यापूर्वी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीतही छापा टाकून बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते. पुण्यातील न्यायालयाने नुकतीच बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी दोन बांगलादेशी तरुणींना दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. शिक्षेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची बांगलादेशात रवानगी करण्याचे आदेशही राज्य शासनाला देण्यात आले होते.
राज्यात थंडीचा कडाका; गारठा वाढला
मुंबई : प्रतिनिधी राज्यासह देशात कडाक्याची थंडी आहे. उत्तरेकडे गारठा वाढल्याने राज्यात शीत लहरी येत असल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. संपूर्ण महिनाभर अशीच थंडी राहण्याचा अंदाज आहे. ३१ डिसेंबरपर्यंत हवामान थंड राहील, तापमानाचा पारा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईची हवा पुन्हा एकदा चिंतेचा विषय बनली आहे. धूळ, धुके आणि धुरामुळे श्वास […] The post राज्यात थंडीचा कडाका; गारठा वाढला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विद्यार्थ्यांना मारल्यास होणार शिक्षा
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर निर्देश जारी केले आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार शारीरिक शिक्षा, मानसिक छळ आणि कोणत्याही प्रकारच्या भेदभावास पूर्णत: बंदी घालण्यात आली असून, बालस्रेही वातावरण राखण्यासाठी नवीन नियमांची अंमलबजावणी करणे सर्व शाळांना बंधनकारक आहे. महाराष्ट्र सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना शाळेत आनंदी वाटेल असे वातावरण तयार करण्यासाठी […] The post विद्यार्थ्यांना मारल्यास होणार शिक्षा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद बोलावली असून, त्यामध्ये जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीपर्यंत या निवडणुका घेणे बंधनकारक असल्याने, पुढील महिन्यात राज्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित महापालिका निवडणुका होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच आयोगाने पत्रकार परिषद जाहीर केल्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंकडून हालचालींना वेग आला आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरून आता विरोधकांनी आयोगावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. आयोगाची ही पत्रकार परिषद नेमकी कशासाठी आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मतदार याद्यांमध्ये जो मोठा घोळ घालण्यात आला आहे, तो दुरुस्त कसा केला याची माहिती लोकांना देण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे की थेट निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी? असा प्रश्न पेडणेकर यांनी उपस्थित केला. मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर चुका, दुबार नोंदी आणि अनियमितता असल्याचा आरोप करत, त्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका जाहीर करणे म्हणजे जनतेला फरफटत नेण्यासारखे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आयोगाने आधी झालेल्या चुका मान्य करून त्या कशा दुरुस्त केल्या याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. अन्यथा ही प्रक्रिया निष्पक्ष आणि विश्वासार्ह राहणार नाही - ठाकरे गट किशोरी पेडणेकर यांनी पुढे बोलताना, निवडणूक कार्यक्रम थेट जाहीर केला गेला तर त्याला लोकशाही प्रक्रियेचा अपमान म्हणावे लागेल, असा इशाराही दिला. मतदार यादीतील घोळ काय आहे, हे सांगायचं नाही आणि थेट तारखा जाहीर करायच्या, याचा अर्थ दंडेलशाही सुरू झाली आहे, असा आरोप त्यांनी केला. विरोधकांनी यावर आवाज उठवला तर निवडणुकांना विरोध करणारे, असा ठपका ठेवला जाईल, मात्र आमचा निवडणुकीला विरोध नसून केवळ मतदार यादीतील चुका आधी दुरुस्त करण्याची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किमान 100 पैकी 70 ते 75 टक्के चुका पूर्णपणे दुरुस्त झाल्यानंतरच निवडणुकीच्या तारखा जाहीर कराव्यात, अशी ठाम मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. अन्यथा ही प्रक्रिया निष्पक्ष आणि विश्वासार्ह राहणार नाही, असा दावा त्यांनी केला. ही प्रक्रिया लोकशाहीचे हनन करणारी - काँग्रेस या मुद्द्यावर काँग्रेसनेही निवडणूक आयोगावर कठोर शब्दांत टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत, ही प्रक्रिया लोकशाही मजबूत करण्याऐवजी लोकशाहीचे हनन करणारी असल्याचा आरोप केला आहे. मतदार यादीत स्पष्टपणे घोळ असताना त्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. दुबार मतदानासारख्या गंभीर मुद्द्यांकडे कानाडोळा करणे ही बाब चिंताजनक असून, अशा परिस्थितीत निवडणुका जाहीर करणे म्हणजे लोकशाही मूल्यांना तडा देण्यासारखे असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. आयोगाने आधी पारदर्शकपणे या सर्व मुद्द्यांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी काँग्रेसनेही केली आहे. आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष दरम्यान, आज जाहीर होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमात राज्यातील सुमारे 15 मोठ्या महापालिकांचा समावेश असण्याची माहिती समोर येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहरांतील महापालिका निवडणुका राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या मानल्या जात आहेत. त्यामुळे आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्व राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार आणि सामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाची मुदत, तर दुसरीकडे मतदार यादीतील कथित घोळ यामुळे निवडणूक प्रक्रियेवर वाद निर्माण झाला आहे. आज सायंकाळी आयोग नेमकी कोणती घोषणा करतो, आणि विरोधकांच्या आक्षेपांना कसा प्रतिसाद देतो, यावरच येत्या काळातील राजकीय तापमान अवलंबून असणार आहे.
गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या एका पोलिस पथकावर गुंडांनी हल्ला केल्याची घटना मुंबईच्या मुंबईच्या कांदिवली (पश्चिम) परिसरात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही गुंडांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, कांदिवली येथे रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे. कांदिवली पश्चिम येथील एकता नगरात 2 गटांमध्ये हाणामारी सुरू होती. पोलिसांना त्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एका पथकाने घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. ते एकता नगरमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी दोन्ही गटातील काही गुंडांना आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही गुंडांनी अचानक पोलिसांवरच उलट हल्ला केला. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांनी कॉलर पकडून त्यांना कारवाई करण्यापासून रोखले. काही गुंडांनी कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात हे गुंड पोलिसांच्या अंगावर धावून जात असताना तिथे अनेकजण उपस्थित होते. त्यापैकी काहींनी हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला. पोलिसांनी खबरदारी म्हणून घटनास्थळी आणखी बंदोबस्त वाढवला आहे. एकता नगर व लगतच्या परिसरात गस्त वाढवली आहे. काही व्हिडिओत पोलिस आरोपींना पकडण्यासाठी जात असताना गुंड त्यांना त्यांना पकडत असल्याचेही दिसत आहे. या घटनेमुळे पोलिसांचा धाक उरला किंवा नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी संशयितांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. आज राज्य निवडणूक आयोग मुंबईसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईचे राजकारण तापले असताना थेट मुंबई पोलिसांवरच असा झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. हे ही वाचा... 19 डिसेंबरला कोणता मोठा राजकीय भूकंप होणार?:पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर काँग्रेस, ठाकरे गटाचे सूचक भाष्य; उत्सुकता वाढली येत्या 19 डिसेंबर रोजी देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. त्यात भारताचा पंतप्रधान बदलून एक मराठी माणूस पंतप्रधान होईल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी ठाम विश्वास व्यक्त करत या तारखेविषयी उत्सुकता वाढवली आहे. पृथ्वीराज चव्हाण अनुभवी नेते आहेत. त्यांनी पीएमओमध्येही काम केले आहे. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
धर्म, श्रद्धा आणि देशभक्ती या विषयांवर सुरू असलेल्या चर्चांमध्ये समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत आणि सार्वजनिक मंचावर मांडलेली भूमिका सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. वंदे मातरम संदर्भातील वादाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आझमी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, देशाच्या संसदीय आणि विधानसभेच्या प्रक्रियेत वंदे मातरम वाजवले जाते, तेव्हा मुस्लिम समाज नेहमीच आदराने उभा राहतो आणि अनेक मुस्लिम हे गीत गातातही. मात्र, कोणालाही त्यांच्या धार्मिक श्रद्धेच्या पलीकडे जाऊन काही करण्यास भाग पाडणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. श्रद्धेचा सन्मान राखणे हीच लोकशाहीची खरी ओळख असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. अबू आझमी यांनी इस्लाम धर्मातील मूलभूत तत्त्वांवरही प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, इस्लाममध्ये अल्लाहशिवाय इतर कोणालाही दैवी स्वरूपात मानणे हे अत्यंत गंभीर पाप मानले जाते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने किंवा प्रतीकासमोर धार्मिक भावनेने नतमस्तक होणे, हे इस्लामच्या शिकवणीला धरून नाही. याचा अर्थ देशाचा किंवा राष्ट्रगीताचा अपमान असा होत नसून, हा केवळ श्रद्धेचा प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही अल्लाहशिवाय इतर कोणासमोरही डोके टेकवू शकत नाही, हा आमचा धार्मिक विश्वास आहे, असे सांगत त्यांनी या विषयाला भावनिक नव्हे तर तात्त्विक चौकट दिली. याचवेळी आझमी यांनी देशाबाबतही ठाम भूमिका मांडली. भारत हा कोणाच्याही वैयक्तिक मालकीचा देश नाही, तर तो सर्व नागरिकांचा समान देश आहे, असे ते म्हणाले. मुस्लिम समाजाने देशासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, स्वातंत्र्यलढ्यापासून ते देश उभारणीपर्यंत मुस्लिमांनी मोठे त्याग केले आहेत. त्यामुळे देशभक्तीवर कोणत्याही एका समुदायाचा एकाधिकार असल्याचा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले. देशाच्या एकात्मतेसाठी सर्व धर्म, जाती आणि समुदायांनी परस्पर सन्मान राखणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. धर्माला राजकीय स्वार्थासाठी वापरणे हे अत्यंत चुकीचे धर्म आणि राजकारण यांचा मेळ घालण्याच्या प्रयत्नांवर टीका करताना अबू आझमी यांनी सरकारवरही बोट ठेवले. धर्माला राजकीय स्वार्थासाठी वापरणे हे अत्यंत चुकीचे असून, अशा पद्धतीमुळे समाजात तेढ निर्माण होते, असे त्यांनी म्हटले. प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा वेगळी असते आणि त्या श्रद्धेचा आदर राखणे हे राज्यघटनेचे मूलभूत तत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले. उदाहरण देत त्यांनी सांगितले की, जसे एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने कलमा वाचायला किंवा अल्लाहचे नाव घ्यायला सांगितले, तर तो तसे करणार नाही, कारण त्याची श्रद्धा वेगळी आहे. त्याचप्रमाणे, इतर धर्मीयांच्या भावनांचाही आदर राखला गेला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. श्रद्धा, देशभक्ती आणि संविधानिक अधिकार यांमधील समतोलाचा मुद्दा एकूणच, अबू आझमी यांच्या या वक्तव्यामुळे श्रद्धा, देशभक्ती आणि संविधानिक अधिकार यांमधील समतोलाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यांनी कोणत्याही धर्माचा किंवा प्रतीकाचा अपमान न करता, वैयक्तिक श्रद्धेचा सन्मान राखण्याची भूमिका मांडली आहे. या भूमिकेमुळे काहींनी त्यांना पाठिंबा दिला असून, काहींकडून टीकाही होत आहे. मात्र, लोकशाही व्यवस्थेत मतभिन्नता स्वीकारणे आणि संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्टपणे दिसून येते. पुढील काळात या विषयावर राजकीय प्रतिक्रिया काय स्वरूप धारण करतात, आणि सरकार या संवेदनशील मुद्द्यावर कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजप नेते गिरीश महाजन यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचे पुन्हा एकदा जोरदार समर्थन केले आहे. तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्यावर आमच्यावर ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा आरोप होत आहेत. पण असे पाप कोण करणार? आम्ही तुम्ही म्हणाल तेवढे झाडे लावू. पण साधू गांजा पितात असे म्हणणे योग्य नाही, असे ते या प्रकरणी बोलताना म्हणालेत. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यासाठी तपोवनात साधूग्राम उभारण्यासाठी वृक्षतोड केली जात आहे. पर्यावरणप्रेमींच्या विरोधानंतर राष्ट्रीय हरित लवादाने या वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यानंतर आज सरकारने नाशिकध्ये 15 हजार झाडे लावण्याच्या योजनेला सुरुवात केली. मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी बोलताना तपोवनातील वृक्षतोडीचे जोरदार समर्थन केले. ते म्हणाले, आज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व आनंदाचा दिवस आहे. मागील काही दिवसांपासून वृक्षांचा विषय चर्चेत आहे. आता आपण वृक्षारोपण अॅपही तयार केले आहे. मागील कुंभमेळा काळात जशी व्यवस्था होती, तशीच व्यवस्था तयार केली जाणार आहे. एकही नवीन राहुटी लावली जाणार नाही. पण मागील काही दिवसांत तिथे काही झाडेझुडपे वाडली आहेत. ती तोडण्याचा विषय होता. पण माझे कार्टून तयार करून मला लाकुडतोड्या दाखवण्यात आले. पर्यावरणप्रेमी व काही राजकीय संघटना यात उतरल्या. पण मी त्यावर भाष्य करणार नाही. डाव्या विचारांच्या लोकांचा विरोध महाजन म्हणाले, काही लोक विकासाला आड येत आहेत. काहींना वापी - त्र्यंबकेश्वर रस्ता 6 पदरी होऊ द्यायचा नाही. डाव्या विचारांचे लोक आडवे येत आहेत. काहीजण बोलण्याच्या ओघात बोलून गेले. कुंभमेळ्याची गरज काय? साधू संत गांजा प्यायला येतात. असे बोलणे आम्ही खपवून घेणार नाही. 15 हजार झाडांपैकी एकही झाड मरणार नाही. 1300 किलोमीटरवून आम्ही झाडे आणली. हैदराबादवरून मी राजमुंद्रीला गेलो. आता 2 हजार झाडे आली आहेत, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. नगरपालिका निवडणुकीनंतर मी स्वतः झाडे पाहण्यासाठी गेलो. ही सर्वांची जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक झाड आईच्या नावाने लावण्याचे आवाहन केले आहे. आम्ही आज वृक्षारोपणाला सुरुवात केली. शहरात अजून कुठे जागा असेल तर सांगा तिथेही झाडे लावली जातील. 15 हजार काय 25 हजार झाडे लावली जातील. मी आमदार, नगरसेवकांनाही तुम्ही सांगाल त्या ठिकाणी झाडे लावणार असल्याचे सांगितले आहे. ही झाडे सीएसआर फंडातून लावली जात आहेत. असे पाप कुणीही करणार नाही माझ्यावर ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा आरोप झाला. नाहक आरोप करू नका. असे पाप कुणीही करणार नाही. मागील कुंभमेळ्यावेळी तुम्ही माझे काम पाहिले. त्यावेळीही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होरते. विविध संस्था, संघटना आजच्या वृक्षारोपणात सहभागी झाल्या आहेत. आता तु्म्ही सांगाल तेवढी झाडे लावली जातील. नाशिककर बस झाले म्हणतील, पण आम्ही थांबणार नाही, असेही गिरीश महाजन यावेळी बोलताना म्हणाले.
स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास जाणीवपूर्वक दाबण्याचा प्रयत्न झाला. काल-परवापर्यंत सीबीएसईच्या अभ्यासक्रमात मुघलांच्या, बाबर-अकबरच्या इतिहासाला १७ पाने होती, तर माझ्या राजाला केवळ एका परिच्छेदात गुंडाळले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय बदलला. आता मुघल एका परिच्छेदात आले आहेत आणि शिवरायांच्या इतिहासाला २१ पानांचे सन्मानजनक स्थान मिळाले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. इचलकरंजी येथे धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज पुर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर आज हा भगवा रंग, भगव्या टोप्या आणि फेटे कुठेही दिसले नसते. महाराजांचे आपल्यावरील उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. इचलकरंजी हे भगवे शहर असून येथील तेज शिवरायांच्या प्रेरणेतून आले आहे. औरंगजेबाची कबर मराठ्यांनीच खोदली छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा पाढा वाचताना फडणवीस म्हणाले, संभाजी महाराज हे तळपती तलवार होते. वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत ग्रंथ लिहिणारे ते पंडित होते आणि ११ भाषांचे जाणकार होते. त्यांनी ९ वर्षे औरंगजेबाला झुंजवत ठेवले. १२० लढाया लढूनही ते कधीच हरले नाहीत. जर दगाफटका झाला नसता, तर संभाजीराजांना पराजित करण्याची ताकद कोणत्याही मुघलामध्ये नव्हती. औरंगजेब स्वराज्य संपवायला आला होता, पण मराठ्यांनी त्याची कबर इथेच खोदली. ... तर आपल्या देशाचा इतिहास वेगळा राहिला असता छत्रपती संभाजी महाराज दगाफटक्यात शहीद झाले नसते, तर या देशाचा इतिहास वेगळा राहिला असता. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी पेटवलेल्या क्रांतीच्या ज्योतीमुळे मराठे नंतरही थांबले नाहीत. मुघलांशी झुंजवत मोगली साम्राजाच्या नायनाट करून, पूर्ण भारतासह अफगाणिस्तानपर्यंत हिंदवी स्वराज्य नेण्याचे मराठ्यांनी केले. आपल्यातील हिंदुत्व जागृत ठेवावे लागेल हा पुतळा केवळ दगड-धातूचे स्मारक नाही, तर तो आपल्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. देहाची खांडोळी झाली तरी ज्यांनी धर्म सोडला नाही, त्या संभाजीराजांचा हा वारसा आहे. हा हिंदुस्थान आपल्याल 'हिंदुस्थान' ठेवायचा असेल, तर जातीपातीच्या भिंती तोडून आपल्याला एक राहावे लागेल आणि आपल्यातील हिंदुत्व जागृत ठेवावे लागेल, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. तसेच भिडे गुरुजींसारखे लोक तरुणांमध्ये इतिहास रुजवण्याचे काम करत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीआरटीआय, बार्टी, सारथीतर्फे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीवर मर्यादा घालण्याच्या विधानाचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खरपूस समाचार घेतला आहे. शिष्यवृत्ती कुणाची कृपा, दान किंवा भीक नाही. ती वंचित, कष्टकरी व गुणवंत विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार आहे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे या प्रकरणाचा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत बोलताना काही कुटुंबातील 4-5 जण दरमहा प्रत्येकी 42 हजार रुपयांची फेलोशिप घेतल्याचा दावा करत पीएचडी प्रवेशावर मर्यादा घालण्याचे विधान केले होते. त्यावरून आता राज्याच्या राजकारणात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी अजित पवारांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त करत त्यांच्यावर उपरोक्त शब्दांत टीका केली आहे. शिक्षण प्रत्येक माणसाचा मुलभूत अधिकार रामदास आठवले म्हणाले, अजित पवार हे माझे मित्र आहेत आणि ते फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांशी निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी केलेले हे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात स्पष्टपणे लिहून ठेवले आहे की शिक्षण हा प्रत्येक माणसाचा मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही; ती वंचित, कष्टकरी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार आहे. जर एकाच कुटुंबातील पाच विद्यार्थी पीएचडीपर्यंत पोहोचत असतील, तर त्यावर शंका घेण्याऐवजी समाजाने आणि शासनाने अभिमान व्यक्त केला पाहिजे. ही परिस्थिती म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रत्यक्षात उतरलेला विजय आहे. आत्मसन्मान, समता आणि संविधानाने दिलेला हक्क जपण्यासाठी आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर हात टाकू नका आठवले पुढे म्हणाले, कोणतेही शिक्षण कमी–जास्त नसते. प्रत्येक विषय, प्रत्येक अभ्यासक्रम आणि प्रत्येक ज्ञानशाखा समाजासाठी तितकीच महत्त्वाची असते. कोणता अभ्यास ‘उपयुक्त’ आणि कोणता ‘अनावश्यक’ हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. आज वंचित समाजातील विद्यार्थी पीएचडी, संशोधन आणि परदेशी शिक्षणापर्यंत पोहोचत आहेत हेच खरे सामाजिक परिवर्तनाचे जिवंत उदाहरण आहे. गैरप्रकार असतील तर कारवाई करा; पण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर हात टाकू नका! विद्यार्थ्यांशी चर्चा न करता घेतलेला कोणताही निर्णय आम्ही मान्य करणार नाही, असेही आठवले या प्रकरणी म्हणाले. आत्ता पाहू काय म्हणाले होते अजित पवार? अजित पवार विधानसभेत बोलताना म्हणाले होते, समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल-वंचित घटकांतील, परदेशात शिक्षण घेण्याची क्षमता नसलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्राधान्याने मदत करण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यानुसार, सरकारतर्फे टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यासारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पण काही ठिकाणी एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू आहे. सध्या या शिष्यवृत्तीसाठी या संस्थांचा निम्म्यापेक्षा अधिक निधी खर्च होत आहे. त्यामुळे इतर गरजू विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसाठी निधी उपलब्धतेवर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
येत्या 19 डिसेंबर रोजी देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होईल. त्यात भारताचा पंतप्रधान बदलून एक मराठी माणूस पंतप्रधान होईल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी ठाम विश्वास व्यक्त करत या तारखेविषयी उत्सुकता वाढवली आहे. पृथ्वीराज चव्हाण अनुभवी नेते आहेत. त्यांनी पीएमओमध्येही काम केले आहे. त्यामुळे त्यांचे विधान गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे . पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानपदी एखादा मराठी माणूस विराजमान होणार असल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली होती. अमेरिकेतील एका इस्त्रायलच्या गुप्तहेराने एक मोठे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यात जगभरातील दिग्गज नेत्यांची नावे आहेत. पण ती नावे कुणाची आहेत याची कल्पना अद्याप कुणाला आली नाही. अमेरिकन सरकार एक कायदा करून ही नावे उघड करत आहे. त्याचे जगभरात पडसाद उमटण्याची शक्यता असून, त्याचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताचा पंतप्रधान बदलून एक मराठी माणूस पंतप्रधान होईल, असे ते म्हणाले होते. यासाठी त्यांनी 19 डिसेंबरची तारीख दिली होती. काय म्हणाले वडेट्टीवार अन् भास्कर जाधव? पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्याविषयी पत्रकारांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना छेडले असताना त्यांनी दोन महिने थांबा, काय घडेल ते सर्वांना कळेल असे म्हटले आहे. हा खूप मोठा विषय आहे. त्यावर बोलणे योग्य ठरणार नाही. दोन महिने थांबा. देशात काय घडते ते सर्वांना दिसेल, असे ते म्हणाले. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनीही या प्रकरणी आपले मत व्यक्त केले आहे. पृथ्वीराज चव्हाण अनुभवी नेते आहेत. त्यांनी दिल्लीत व पंतप्रधान कार्यालयात काम केले आहे. त्यामुळे त्यांची वक्तव्ये कधीही उथळ नसतात. ते जे म्हणाले त्याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आशिष शेलारांनी केली टीका दुसरीकडे, भाजप नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान अत्यंत बालिश असल्याची टीका केली आहे. पृथ्वीराज चव्हाण वरिष्ठ नेते आहे. त्यांच्यासारख्या नेत्याने विशेषतः माजी मुख्यमंत्र्याने असे बालिश विधान करावे हे दुर्दैव आहे. ज्यांचे कराडमध्ये स्वतःचे बूड स्थिर नाही, त्यांना तिथे कुणी विचारत नाही. त्यांनी देशाच्या राजकारणावर व पंतप्रधानांवर बोलू नये. त्यांचे विधान म्हणजे देशातील सर्वात मोठा जोक आहे, असे ते म्हणाले. पृथ्वीराज चव्हाणांनी दिला एपस्टीन फाइल्सचा दाखला पृथ्वीराज चव्हाण यांनी अमेरिकेतील जेफ्री एपस्टीन फाइल्सचा दाखला देत वरील दावा केला आहे. ते म्हणाले की, या फाइल्समुळे अमेरिकेत मोठे राजकीय वादळ आले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची बाजूही यामुळे दुबळी झाली आहे. डेमोक्रॅटीक समितीने डोनाल्ड ट्रम्प व जेफ्री एपस्टीन यांचे 19 फोटो सार्वजनिक केल्यामुळे मोठा वाद झाला आहे. या घटनांचे पडसाद भारतापर्यंत उमटण्याची चिन्हे आहेत. भाजपने चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला आहे. अमेरिकेतील घडामोडींचा भारत सरकार किंवा पंतप्रधानांशी कोणताही संबंध नाही, असा दावा भाजप नेते करत आहेत. अमेरिकेत काही दस्तऐवज उघड झाले तर त्यामुळे भारतीय पंतप्रधान कसा बदलेल? असा सवाल भाजपने या प्रकरणी उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अशा अफवा जाणूनबुजून पसरवल्या जात आहेत. हा देशात गोंधळ आणि अस्थिरता निर्माण करण्याच्या एका रणनीतीचा भाग आहे, असेही भाजपने म्हटले आहे. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस समर्थक हे मोठ्या राजकीय बदलाचे लक्षण मानत असताना, भाजप त्याला केवळ अफवा म्हणत आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आता 19 डिसेंबरकडे लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'विश्वगुरू' बनण्याच्या नादात भारताने जागतिक पातळीवर एकही मित्र ठेवलेला नाही. 'ऑपरेशन सिंदूर'च्या चार दिवसांच्या युद्धावेळी एकही देश भारताच्या पाठीशी उभा राहिला नाही. आता येत्या दोन-तीन महिन्यांत पुन्हा युद्ध होण्याची शक्यता आहे, आणि हे युद्ध पाकिस्तानसोबत होईल. मात्र, चिंतेची बाब म्हणजे मोदींच्या धोरणांमुळे अमेरिका, रशिया, चीन आणि इंग्लंड हे सर्व देश आज पाकिस्तानला शस्त्रपुरवठा करत आहेत. त्यामुळे एकाच वेळी आपण चार जणांशी लढणार आहोत, हे लक्षात ठेवा, असा गंभीर इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. रविवारी रात्री उल्हासनगर येथे वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरनाचे वाभाडे काढताना आंबेडकर म्हणाले, आज मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भांडत आहेत, म्हणून ट्रम्प पाकिस्तानला सहारा देत आहेत. पुतीन भारतात येऊन गेले, पण त्याआधीच त्यांनी पाकिस्तानला शस्त्र देण्याचे कबूल केले आहे. इंग्लंड पाकिस्तानला हत्यार देतोय, तर चीन आधीच शस्त्र घेऊन बसला आहे. हे देश भारताच्या किंवा भारतीय जनतेच्या विरोधात नाहीत, तर मोदींच्या अहंकाराविरोधात आहेत. मोदींना धडा शिकवताना भारतीय जनतेला त्याची झळ सोसावी लागत आहे. सनातन्यांना थेट आव्हान देशातील सनातन्यांना उद्देशून आंबेडकर म्हणाले, तुम्ही इथला मुसलमान माजलाय असे सांगता. कदाचित माजलाही असेल, मी नाही म्हणत नाही. पण जग आता पाकिस्तानमधील मुसलमानांना माजवतंय, त्याचं काय?आपण नेहमी म्हणतो, शेजाऱ्याच्या माध्यमातून काटा काढता आला, तर काढला पाहिजे. आता जगातील सगळे देश एकत्र येऊन पाकिस्तानमार्फत भारताचा काटा काढताय. ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ का लावला? रिलायन्स कनेक्शन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ (कर) का लावला, याचे विश्लेषण करताना आंबेडकरांनी रशियाच्या तेल व्यापारातील 'रिलायन्स' कनेक्शन उघड केले. ते म्हणाले, ''एक ऐतिहासिक सत्य आहे. जगातील वेगवेगळ्या देशांमधील लोकसंख्या कमी व्हायला लागलीय आणि भारताची लोकसंख्या आहे तेवढीच आहे. लोकसंख्येचा अर्थ आपल्याला समजायचा असेल, तर तो बाजारपेठेशी संबंधित आहे. जेवढी जास्त लोक, तेवढी मोठी बाजारपेठ. जेवढी कमी लोक, तेवढी बाजारपेठ कमी, अशी असणारी परिस्थिती आहे. डोनाल्ड ट्रम्प हेच म्हणतोय की, भारतातील ४७ टक्के लोक दारिद्र रेषेखाली आहेत. रशियाचे तेल विकून वर्षभराला ४० ते साडेचाळीस हजार कोटींचा होणारा नफा, हा कुणाला जातो? भारताच्या तिजोरीत जातोय की, रिलायन्सच्या तिजोरीत जातोय? तो भारताच्या तिजोरीत जात नसेल, तर आम्ही तुमच्याशी भांडण केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यावर ५० टक्के टॅक्स लावला.'' ''रशियाचे तेल विकून होणारा नफा भारताच्या तिजोरीत जात नसून, तो रिलायन्स कंपनीच्या तिजोरीत जात आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. गरीब देशाच्या सामान्य माणसाला मदत करण्याची संधी तुम्हाला असताना, तुम्ही मदत करत नाहीत. तर एका भांडवलदाराला अजून गब्बर करण्याचा जो मोबादला लागलाय, तो आम्ही सहन करणार नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणतोय,'' असे प्रकाश आंबेडकर म्हणालेत.
मकर संक्रांतीला साजऱ्या होणाऱ्या पतंगोत्सवास महिनाभराचा अवकाश असताना शहरात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाच्या चेहऱ्याला नायलॉन मांजा अडकल्याने गालाला गंभीर जखम झाली. जखमेवर तब्बल २१ टाके घालण्यात आले. उच्च न्यायालयाने नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घातलेली असतानाही त्याची सर्रास विक्री सुरु असल्याने असे अपघात घडत आहेत. विंचूर रोड परिसरात अक्षय नहाटा (३०) दुचाकीवरून दुकानात जात असताना ही घटना घडली. पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांचा शोध घेण्याची मोहिम सुरु केली आहे. परंतु, अद्याप विक्रेते पोलिसांना सापडले नाहीत. नायलॉन मांजाच्या विक्री व वापरावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पालकांनी मुलांना नायलॉन मांजा वापराचे धोके समजावून सांगावे, दुचाकीस्वारांनी गळ्याभोवती स्कार्फ किंवा मांजापासून बचाव करणारे गार्ड वापराचे आवाहन करण्यात येत आहे. पंधरा दिवसांत २ जखमी गेल्या १५ दिवसांत २ तरुण नायलॉन मांजा अडकल्याने गंभीर जखमी झाले आहेत. १० पक्षीही जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. रक्तबंबाळ अवस्थेत घरी, भावाने दवाखान्यात नेलेपंधरा दिवसापूर्वीच पीकअपने धडक दिल्याने झालेल्या अपघातातून वाचलो. रविवारी (दि.१४) सकाळी नेहमीप्रमाणे दुचाकीवरून दुकानाकडे निघालो होतो. थोड्या अंतरावर जाताच अचानक नायलॉन मांजा चेहऱ्यावर अडकला. जखम दाबून रक्तबंबाळ अवस्थेत घरी पोहचलो. भावाने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. थेट सवाल- भास्कर शिंदे, सहा. पोलिस निरीक्षक३५ ठिकाणी छापे, विक्रेत्यांचा शोध सुरु बंदी असतानाही नायलॉन मांजा विक्री सर्रास सुरु आहे? - शहरात गेल्या पंधरा दिवसांपासून तपासणी सुरू आहे. अद्याप विक्रेते हाती लागले नाहीत. किती ठिकाणी कारवाई करण्यात आली? - लासलगावमध्ये २० तर विंचूर येथे १५ असे ३५ ठिकाणी पतंग विक्रेत्यांकडे छापे टाकण्यात आले. मात्र त्यांच्याकडे नायलॉन मांजा मिळाला नाही. शहरात नायलॉन मांजा कुठून येतो? - नायलॉन मांजा इतर ठिकाणावरून आणला जात असावा अशी शक्यता आहे. पोलिसांची सातत्याने गस्त सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 दिवसांपूर्वी अशीच घटना घडली. नायलॉन मांजाने 3 वर्षांच्या चिमुकल्याचा गळा चिरला गेला. त्याला 20 टाके पडले. वाचा संपूर्ण बातमी
पुण्यातील मुंढवा परिसरातील बहुचर्चित जमीन गैरव्यवहार प्रकरणाने आता राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवली आहे. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर गंभीर आरोप होत असतानाही, त्यांच्यावर कोणतीही थेट कारवाई न झाल्यामुळे सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवार यांची 99 टक्के मालकी असल्याचे स्पष्ट असतानाही, कारवाई केवळ 1 टक्का भागीदार असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यापुरती मर्यादित असल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत या चौकशी प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून या प्रकरणातील कथित दुटप्पीपणावर बोट ठेवले आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुण्यातील हे जमीन प्रकरण म्हणजे आरोपींच्या सोयीने चालणाऱ्या चौकशीचा फार्स आहे. अशा प्रकारची चौकशी यापूर्वी कधीच पाहायला मिळाली नाही. दानवे यांनी पुढे नमूद केले की, न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतरही अमेडिया कंपनीतील 99 टक्के भागीदार असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल होत नसेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. सरकार कोर्टाच्या आणखी कोणत्या विशेष निर्देशांची वाट पाहत आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर संशयाची सुई रोखली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात अमेडिया कंपनीचा 1 टक्का भागीदार असलेला दिग्विजय पाटील यांना पुणे पोलिसांनी चौकशीसाठी पुन्हा एकदा बोलावले आहे. मात्र, आजपर्यंत तीन वेळा चौकशीसाठी समन्स देऊनही ते पोलिसांसमोर हजर राहिलेले नाहीत. प्रत्येक वेळी त्यांनी वेगवेगळी कारणे देत चौकशी पुढे ढकलल्याचे समोर आले आहे. कधी कौटुंबिक कार्यक्रमाचे कारण, तर कधी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्यांनी चौकशी टाळल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, अजित पवारांचे पुत्र जय पवार यांच्या लग्नाचा दाखला देत एका वेळेस त्यांनी गैरहजेरी लावली होती. आज, सोमवारी, ते चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती समोर येत असली, तरी प्रत्यक्षात ते येणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, संबंधित जमीन पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमेडिया कंपनीला पॉवर ऑफ अटर्नीच्या माध्यमातून देण्यात आली होती. या प्रक्रियेत प्रमुख अधिकारपत्रधारक म्हणून शीतल तेजवानी यांची भूमिका होती. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानी यांना अटक केली असून, त्यांची कसून चौकशी सध्या सुरू आहे. त्यांची पोलिस कोठडी आज संपणार असून, त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या चौकशीतून अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असून, व्यवहारातील आर्थिक प्रवाह आणि निर्णयप्रक्रियेबाबत पोलिसांकडून माहिती गोळा केली जात आहे. मात्र, या सर्व कारवाईतून पार्थ पवार यांचे नाव थेट पुढे न येणे, हेच विरोधकांच्या टीकेचे मुख्य कारण ठरत आहे. अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची नीट पडताळणी करणे अपेक्षित होते - अजित पवार या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अनौपचारिक चर्चेत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी असे म्हटले की, जमीन व्यवहार सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची नीट पडताळणी करणे अपेक्षित होते. व्यवहारात काही त्रुटी किंवा गैरप्रकार आढळून आले असते, तर त्या वेळीच अधिकाऱ्यांनी कारवाई केली असती, तर पुढील घडामोडी टाळता आल्या असत्या. अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी या प्रकरणाची जबाबदारी अप्रत्यक्षपणे प्रशासनावर ढकलल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याच कारणामुळे विरोधकांचा संताप अधिक तीव्र झाला असून, जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न, असा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला जात आहे. एकूणच, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण आता केवळ कायदेशीर नव्हे, तर राजकीय संघर्षाचे केंद्रबिंदू बनले असून, पुढील काळात या चौकशीची दिशा आणि कारवाईची व्याप्ती काय असणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अंबादास दानवे यांची पोस्ट देखील पहा.... पुण्यातील जमीन प्रकरण हे बहुदा पहिलेच असे प्रकरण मी पाहिले ज्यात 'आरोपींच्या सोयी'ने चौकशीचा फार्स सुरू आहे. पत्र-पत्र खेळण्याची कारणे आजही संपतील, याची शक्यता शून्य वाटते. न्यायालयाने ऐकवल्यावरही 99 टक्के भागीदार असलेल्या पार्टनरवर गुन्हा दाखल होत नाही. सरकार कोर्टच्या विशेष निर्देशांची वाट पाहत आहे का?
कळमनुरी तालुक्यातील पोतरा शिवारात दोन शेळ्या, एका वासराची शिकार केलेल्या बिबट्याचा चौथ्या दिवशी याच भागात वावर असल्याचे दिसून आले असून या ठिकाणी एका एका कुत्र्याची शिकार केल्याचे सोमवारी ता. १५ सकाळी स्पष्ट झाले. तर ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये दोन बिबटे आल्याचे दिसून आले मात्र ते पिंजऱ्यात गेलेच नाहीत. आता त्यांना पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी वन विभागाने आणखी दोन शेळ्या पिंजऱ्यात बांधून ठेवण्याची तयारी चालवली आहे. कळमनुरी तालुक्यातील पोतरा व तेलंगवाडी शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेलंगवाडी शिवारात काशीराम मोदे यांच्या शेतातील दोन शेळ्यांचा फडशा पाडल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी ता. १३ बिबट्याने पोतरा शिवारातील गजानन पतंगे यांच्या शेतातील वासराची शिकार केली. त्यानंतर रविवारी ता. १४ एका कुत्र्याची शिकार केल्याचे दिसून आल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने, वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल शिवाजी काळे, वनरक्षक सुधाकर कऱ्हाळे, खंडागळे, योगीता सहारे यांच्या पथकाने शेतकऱ्यांच्या मदतीने रविवारी ता. १४ पोतरा शिवारातील टेकड्यावर तीन पिंजरे बसविले आहेत. त्याच परिसरात सुमारे १५ ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दरम्यान, या ठिकाणी दोन बिबटे आले असल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यातून स्पष्ट झाले. दोन्ही बिबटे पिंजऱ्याच्या जवळ आले होते मात्र ते पिंजऱ्यात गेलेच नाहीत. त्यानंतर आता तीनही पिंजऱ्यामध्ये आणखी एक शेळी वाढविली जाणार असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. दोन दिवसांत बिबटे जेरबंद होतील पोतरा शिवारात मागील चार दिवसांपासून एकाच परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तीन पिंजरे पुरेसे आहेत. रविवारी रात्री दोन बिबटे आले होते मात्र ते पिंजऱ्यात गेले नाहीत. या बिबट्यांना जेरबंद करण्याचे वन विभागाचे युध्दपातळीवर प्रयत्न आहेत. दोन दिवसांत बिबटे जेरबंद होतील अशी अपेक्षा आहे. - राजेंद्र नाळे, विभागीय वन अधिकारी हिंगोली शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक या भागात एक बिबट्या व दोन बछडे शेतकऱ्यांच्या नजरेस पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. शेतात जातांना काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी घराचे दरवाजे बंद ठेवावे. जनावरे उघड्यावर बांधू नयेत. त्यांना गोठ्यात बांधून त्या ठिकाणी विजेचा प्रकाश राहिल याची व्यवस्था करावी ज्यामुळे बिबट्या जनावरांवर हल्ला करणार नाही.
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्याला हादरवून सोडणारी अत्यंत धक्कादायक घटना खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथे घडली आहे. येथील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये शिक्षक शिकवत असतानाच एका विद्यार्थ्याने आपल्याच सहअध्यायी मित्राचा गळा चिरून निर्घृण खून केला आहे. दहावीच्या वर्गात घडलेल्या या खुनाच्या घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले असून, विद्यार्थ्यांमधील गँगवॉरमधून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर शहरात आज भल्या पहाटे दहावीच्या विद्यार्थ्यांचा खासगी क्लास सुरू होता. वर्गात शिक्षक शिकवत असताना अचानक विद्यार्थ्यांच्या दोन गटांत वाद उफाळून आला. याच वेळी एका विद्यार्थ्याने रागाच्या भरात आपल्या बॅगेतून धारदार चाकू काढला आणि बेंचवर बसलेल्या मित्रावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. वर्गाबाहेर गाठून चिरला गळा अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वर्गात एकच खळबळ उडाली. जिवाच्या आकांताने पीडित विद्यार्थी बचावासाठी वर्गाबाहेर पळाला. मात्र, हल्लेखोर विद्यार्थ्याने त्याचा पाठलाग सोडला नाही. त्याने क्लासच्या बाहेरच त्याला गाठले आणि त्याचा गळा चिरला. या हल्ल्यानंतर संबंधित विद्यार्थी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. हल्लेखोर दुचाकीवरून पसार हा भयानक प्रकार घडवून आणल्यानंतर आरोपी विद्यार्थी घटनास्थळावरून आपल्या दुचाकीवरून फरार झाला. दरम्यान, उपस्थित नागरिक आणि क्लासचालकांनी जखमी विद्यार्थ्याला रक्ताच्या थारोळ्यातून उचलून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्राव झाल्याने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुष्कर दिलीप शिंगाडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पालक धास्तावले; आरोपींना अटक या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी, हे प्रकरण विद्यार्थ्यांमधील आपसी वाद किंवा गँगवॉरचे असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. हल्ला करणारा विद्यार्थी आणि त्याच्या साथीदाराने स्वतः पोलिस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. दोन्ही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अभ्यासासाठी क्लासला गेलेल्या मुलांचा अशा प्रकारे बळी जात असल्याने पालकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्रतिनिधी | अमरावती समाजातील आत्मविश्वास आणि राष्ट्रनिष्ठा बळकट होण्याचा संदेश दिला. आतंकवाद्यांना उत्तर देण्यासाठी घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील. असे प्रतिपादन मंत्री कपिल मिश्रा यांनी केले. दिल्ली येथे भारत मंडपम्मध्ये आयोजित सनातन राष्ट्र शंख नाद महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात दिल्लीचे सांस्कृतिक कार्यमंत्री कपिल मिश्रा यांनी आतंकवाद विरोधात भूमिका मांडली आहे. भारत मंडपम्’ येथे ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशन’ प्रस्तुत आणि सनातन संस्था आयोजित सनातन राष्ट्र शंख नाद महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाच्या प्रारंभी रामनामाचा सामूहिक जप करण्यात आला. शंख नाद आणि वेदमंत्र पठण झाल्यानंतर शांति गिरी महाराज, सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, बिंदा सिंगबाळ आणि अंजली गाडगीळ, सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाउंडेशनचे अध्यक्ष उदय माहूरकर, पत्रकार सुरेश चव्हाणके, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी समारंभात सनातन संस्था निर्मित संकल्प रामराज्य का या हिंदी ग्रंथाचे, तर संरक्षण मंत्रालयाचे अपर सचिव वेदवीर आर्य लिखित क्रॉनोलॉजी ॲन्ड ओरिजिन्स ऑफ इंडो युरोपियन सिविलाइजेशन या इंग्रजी पुस्तकाचे हस्ते प्रकाशन करण्यात आले.
प्रतिनिधी | अकोला सहकारी पतसंस्था संचालक- सेवकांच्या सहकार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सहकार कार्यातील जबाबदाऱ्या आणि कर्तव्याचे प्रशिक्षणाबाबत अतिथींनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात २२ हजार सहकारी नोंदणीकृत संस्था आहेत. मात्र त्यापैकी त्यापैकी १२ फक्त हजारच अस्तित्वात आहेत. बुडालेल्या संस्था म्हणजे सहकाराचे संविधानातील उपविधींचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांच्या वास्तव जाणींवाकडे संचालकांकडून झालेली सहकार धर्माविरुद्ध झालेली वाटचाल आहे. या क्षेत्रातील सहकार संचालकांनी ठेवी, गुंतवणुक आणि कर्जवितरण प्रक्रियेतील दक्षता समजून घेऊन त्यानुसार काटेकोर वाटचाल करावी.स्थानिक मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाचे त्यानुसार सुरू असलेले कार्य ही सहकारातील आदर्श वाटचाल आहे, असे प्रतिपादन अकोला-वाशिम जिल्हा सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक आर. एस. बोडखे यांनी याप्रसंगी केले. शासनाच्या सहकार विभागाच्या निर्देशानुसार अकोला येथील काकासाहेब दिक्षीत सहकार प्रशिक्षण केंद्राकडून आयोजित ३ दिवसीय सहकार प्रशिक्षण संपन्न झाले. सहकार प्रशिक्षण केंद्राचे सहकार विकास अधिकारी सुहास कांबे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मानवधर्म पतसंस्थेचे अध्यक्ष जानकीराम वाकोडे होते. यावेळी सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक विकासातील महापुरुष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे बाबा व मानवधर्म पतसंस्था संस्थापक व माजी अध्यक्ष स्व. स्वामी शांतानंद सरस्वती महाराज यांना वंदन करण्यात आले. प्रास्ताविकात बोलतांना सुहास कांबे यांनी महाराष्ट्र राज्य सहकार संघाकडून सहकार प्रशिक्षणासाठी राज्यात १३ प्रशिक्षण केंद्र कार्यरत असल्याचे सांिगतले. सहकारातून योग्य अशी सामाजिक उन्नती साधण्यासाठी उपविधींचे पालन हा सहकारी संस्थांना यशाच्या दालनांना उघडणारी नेऊन सोडणारी संवैधानिक गुरूकिल्ली असल्याचे ते म्हणाले. प्रशिक्षण कार्यक्रमात उपाध्यक्ष दिनकर घोरड, सचिव डॉ. रणजीत देशमुख, खजिनदार भास्कर काळे, संजय एम. देशमुख, सुधीर वाकोडे, माणिकराव सरदार, देविदास घोरळ, विजय बाहकर, शोभा तेलगोटे, जयश्री बोचरे, प्रा. विजय काटे, सुरेश तिडके, व्यवस्थापक नरेंद्र डंबाळे, कुंदा पवार, विकी क्षीरसागर उपस्थित होते. सूत्रसंचालन खजिनदार भास्कर काळे यांनी केले. आभार संजय देशमुख यांनी मानले.
करेंगे या मरेंगे’; ईपीएस पेन्शनधारक आक्रमक:सरकारवर दबाव वाढवणार
प्रतिनिधी | अकोला प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी पेन्शनधारकांनी ‘करेंगे या मरेंगे’ अशी घोषणा दिली आहे. ईपीएस पेन्शनधारकांच्या विविध संघटनांची अखिल भारतीय कृती समितीची स्थापना करण्यात आली असून लवकरच आता पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येणार असल्याचे ईपीएस ९५ पेन्शनधारक संघर्ष समितीचे अध्यक्ष देवराव हागे यांनी कळवले आहे. ईपीएस ९५ पेन्शनरांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. प्रमुख मागणी ही वाढीव पेन्शनची आहे. यासाठी अनेकदा धरणे आंदोलन, मोर्चे काढण्यात आले. निवेदनही सादर करण्यात आले. अनेक मोठ्या शहरांमध्ये मोर्चेही काढण्यात आले. मात्र मागण्या मंजूर झाल्या नाहीत. ईपीएस ९५ पेंशनधारक संघर्ष समितीने मागण्यांसाठी बैठक आयोजित केली होती. दरम्यान दिल्ली येथे ऑल इंडिया युनायटेड अॅक्शन कमिटी ऑफ ईपीस पेन्शनर असोसिएनतर्फे आंदोलन करण्यात आले. यात अकोला येथून अध्यक्ष कॉ. देवराव पाटील, अंबादास भरणे, गोपाल मांडेकर ,अरुण इंगळे, देविदास धनबाद यांनी आंदोलनात सहभाग घेतला. जाणीवपूर्वक पेन्शनरांवर अन्याय : ज्यांच्या श्रमातून देशाची संपत्ती निर्माण होते त्यास श्रमिक म्हणतात, असे देवराव पाटील म्हणाले. ईपीएस पेन्शनरांनी परिश्रमातून देशाला जागतिक पातळीवर नेत महासत्ता बनवले. आयुष्यभर केलेल्या कमाईतून दर महिना वृद्धापकाळासाठी तरतूद म्हणून केंद्र सरकारजवळ पेन्शन फंडात रक्कम जमा केली. ३ सप्टेंबर २०१३ रोजी केंद्र सरकारने गठीत केलेल्या कोशियारी समितीने ८.३३ बजेटरी तरतूद करण्याचे सरकारला सुचवले. केंद्र सरकारने कोशियारी समितीने सुचवल्याप्रमाणे तरतूद केली नाही. उलट पेन्शन फंडावर येणारे व्याज किमान आठ लाख कोटी असून व्याजापैकी केवळ २५ टक्के रक्कम पेन्शनरांना देण्यात येते. पूर्ण व्याज पेन्शनरांच्या पदरी टाकल्यास किमान आठ हजार ५०० रुपये पेंशन मिळू शकते. परंतु सरकार जाणीवपूर्वक पेन्शनरांवर अन्याय करीत आहे, असेही कॉ. हागे यांचे म्हणणे आहे. ईपीएस ९५ पेंशनधारक संघर्ष समितीकडून पुढील प्रमुख मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. पेन्शन किमान ९ हजार व त्यानुसार महागाई भत्ता देण्यात यावा. वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात यावी. राशन दुकानामार्फत जीवनावश्यक वस्तु पुरवठा करण्यात यावा. प्रवासात सुविधा देण्यात यावी. संपूर्ण पगारावर पेन्शन मिळावी, यासाठी सॉफ्टवेअर उपलब्ध करुन देण्यात यावे. तसेच आवश्यक कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत. पेन्शन फंडाची शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करु नये. तसेच आतापर्यंत शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या रकमेची केंद्र सरकारने काउंट गॅरंटी द्यावी. पेन्शनरांची केंद्राकडून थट्टा प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने पेन्शनरांची केंद्र सरकार क्रूर थट्टा करत असल्याचा आरोप अध्यक्ष देवराव हागे यांनी केला. गत ११ वर्षात पेन्शनरांच्या पेन्शनमध्ये एक कवडीचीही वाढ न करता समित्यांवर समित्या नेमून पेन्शनरांची फसवणूक करण्यात येत आहे. आमच्या पेन्शन फंडावर मिळणाऱ्या व्याजाचा वाटाही देण्याची मानसिकता केंद्र सरकारची नाही. त्यामुळे फसवणुकीची परतफेड करण्याची वेळ आली असून केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आपली ताकद उपद्रव मूल्यांमार्फत दाखवून देण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, अशा शब्दात त्यांनी हल्लाबोल केला.
प्रतिनिधी | अकोला अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील दोन सुवर्णकारांच्या ज्वेलर्समध्ये ग्राहक म्हणून जाऊन फसवणूक करणाऱ्या अकोला येथील चोरट्या महिलांच्या चौकडीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्हे उघडकीस आणून ७३ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाजमीन परवीन अजीजोद्दीन (वय ४५, रा. जीरा बावडी, ईस्लाम चौक, खदान,अकोला), मेहरुनीसा अब्दुल शफी (वय ६८, रा. गंगानगर , संकल्प कॉलनी, अकोला), नसरिन परवीन मो. शकील (वय ४९, रा. सोनटक्के प्लॉट, जुने शहर, अकोला) आणि रुकसाना परवीन शेख अजीज (वय ३०, रा. सोनटक्के प्लॉट, जुने शहर, अकोला)अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील महिलांची नावे आहेत. धामणगाव रेल्वे येथील रहिवासी महेश वर्मा यांच्या प्रथम ज्वेलर्समध्ये २८ नोव्हेंबरला सायंकाळी तीन बुरखाधारी महिला ग्राहक बनून गेल्या. त्यांनी हातचलाखीने ट्रेमधून ४८ हजार ,६०० रुपयांची ४ ग्रॅमची सोन्याची अंगठी काढली. त्याचवेळी त्यांनी सोबत आणलेली बेनटेक्सची अंगठी ट्रेमध्ये ठेवून तेथून पळ काढला. अशाच प्रकारे प्रमोद भगत यांच्या शारदा ज्वेलर्समधून चार बुरखाधारी महिलांनी १४० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैजण हातचलाखीने लांबवले होते. या प्रकरणी महेश वर्मा यांच्या तक्रारीवरून ३० नोव्हेंबरला दत्तापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. तपासात सदर गुन्हा हा अकोला येथील मेहरुनीसा अब्दुल शफी व तिच्या साथीदारांनी केला असल्याचे समोर आले. त्या पुन्हा सराफा व्यावसायिकाला फसवण्यासाठी धामणगाव रेल्वे स्टेशन येथे आल्या असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. १३ डिसेंबर २०२५ रोजी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने दत्तापूर ठाण्यातील महिला पोलिस स्टाफसह फसवणूक करणाऱ्या महिलांचा रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून ४ ग्रॅम सोन्याची अंगठी व चांदीचे पैजण असा ७३ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर जप्त मुद्देमाल व महिलांना पुढील कारवाईसाठी दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक किरण वानखडे, उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर व सोनाली राठोड, अमोल देशमुख, सुधीर बावणे, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजीया, शिवा शिरसाठ, पूनम मेश्राम व हर्षद घुसे यांनी केली. अकोल्यातही गुन्हा करण्याची पद्धत सारखीच दरम्यान, मागील महिन्यात अकोल्यातील दोन सराफांच्या दुकानात अशाच प्रकारे ग्राहक बनून आलेल्या महिलांनी सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याचे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. अकोला पोलिस आता या महिलांना ताब्यात घेऊन त्या दिशेने शोध घेणार असल्याचे सांगण्यात आले. अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचा त्या दृष्टिने तपास सुरु होता.
प्रतिनिधी | अकोला सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची ११३ वी जयंती वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय सचिव तथा जिल्हा समन्वयक माजी आमदार अॅड. नतिकुद्दीन खतीब होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे उपस्थित होते. फुले शाहू आंबेडकरी चळवळीसह भारतीय बौद्ध महासभेचे कार्य देश विदेशात पोहोचवण्यात महत्वपूर्ण भूमिका भैयासाहेब आंबेडकरांची होती, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला कलीम खान पठाण, हाजी मजहर, गजानन गवई, मनोहर बनसोड, किशोर जामनिक, आनंद डोंगरे, मनोहर वानखडे, डॉ. अशोक मेश्राम, रमेश सरकटे, वासिफ खान, नीलेश वाहूरवाघ, शंकरराव इंगोले, सुरेश कलोरे, नितीन सपकाळ, पराग गवई, प्रदीप पळसपगार, सतीश चोपडे, संजय किर्तक, सुरेंद्र सोळंके, बंटी बागडे, नीलेश लोणागरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोहर बनसोड यांनी केले तर आभार सुरेश कलोरे यांनी मानले.
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थ, माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा:दीपमाला भटकर
प्रतिनिधी | अकोला येथून जवळ असलेल्या भोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ११३ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शाळा स्थापना दिन व माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, लोकप्रतिनिधी, माजी विद्यार्थ्यांची तळमळ दिसून येते, असे प्रतिपादन विस्तार अधिकारी दीपमाला भटकर यांनी केले. गावाची शाळा व विद्यार्थ्यांप्रती आपुलकी पाहून भारावून गेलो, असे विस्तार अधिकारी गौतम बडवे म्हणाले. भोड येथील जिल्हा परिषदेची स्थापना १२ डिसेंबर १९१२ रोजी झाली. ब्रिटिशकालीन असलेल्या शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा पार पडला. ग्राम पंचायत भोड, शाळा व्यवस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना सिरसाट होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रिया उंबरकर, स्मिता इंगळे, दीपाली गव्हाळे, संध्या सिरसाट, रावसाहेब देशमुख, शंकरराव देशमुख, भास्करराव देशमुख, गजानन देशमुख हे शाळा स्थापना करणाऱ्या व्यक्तींचे वारसदारही कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाला पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकारी गौतम बडवे, दीपमाला भटकर,अलीम देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी लक्ष्मणराव पदमने, विजय देशमुख, नीलकंठ वजीरे, रामकृष्ण पदमने, रामेश्वर सोनाग्रे, उत्तम सिरसाट, ज्ञानेश्वर पदमने, सदाशिव सोनाग्रे, गटसमन्वयक शशिकांत गायकवाड, केंद्र प्रमुख गजानन साटोटे, मुख्याध्यापक देवानंद मोरे, प्रकाश चतरकर, शंकर तायडे, मो. अझहरोद्दीन, शाहिद परवेज, परमानंद धोटे आदी होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक देवानंद मोरे यांनी केले. आभार रंजना टापरे यांनी केले मानले. भोड येथील जि.प. शाळेत १९५६ मध्ये पहिल्या वर्गात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांपासून ते २०१९-२०२० मध्ये दाखल विद्यार्थ्यांपर्यंत माजी विद्यार्थी उपस्थित होते. शासन निर्णय शालेय शिक्षण विभागानुुसार माजी विद्यार्थी संघ प्रत्येक शाळेत स्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजनाबरोबरच शाळा स्थापनेला ११३ वर्षे झाल्याने दुग्ध शर्करा योग घडून आला. ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला. शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्न शाळेमध्ये असलेल्या सुविधा, ग्रामपंचायत व शाळा समितीचे शाळेला असलेले सहकार्य आणि समन्वय वाखाळण्यासारखा असल्याचे अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शशिकांत गायकवाड म्हणाले. तसेच गाव शाळेच्या प्रगतीसाठी घेत असलेला पुढाकार अनुकरणीय असल्याचे विस्तार अधिकारी अलीम देशमुख म्हणाले.
प्रतिनिधी | अकोला विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा जोपासण्यासाठी तसेच त्यांची कल्पकतेतून बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध ६५ प्रयोग सादर केले. टाकाऊ वस्तूपासून दर्जेदार विज्ञान प्रतिकृती बनवण्यात आल्या. डवले पब्लिक स्कूलमध्ये पार पडलेल्या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. नितीन ओक यांनी केले. शाश्वत ठाकरे यांनी अपघातापासून बचाव करण्यासाठी एक सेन्सर ॲप तयार केला. ज्यात गाडीचा अपघात झाल्यास सेन्सर कार्यान्वित होवून अपघात विभागाला आपोआप मॅसेज जाऊन रस्त्यावर वाहने चालत असतांना सर्व लाईट सौरउर्जेवर लागतील. वाहन गेल्यानंतर ते लाईट आपोआप बंद होतात असे मॉडेल तयार केले. या प्रसंगी गोपाल सुरे, विकास राठोड यांनी परिक्षण केले. डॉ. ओक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश डवल, प्रा. कविता बलिंगे, मृणाली डवले उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका मेघा नालट यांनी केले. सूत्रसंचालन भूषण गायकवाड यांनी केले. या िवज्ञान प्रतिकृतींचा समावेश : प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती ठेवल्या होत्या. पाणी आणि हवेपासून विद्युत निर्मिती उपकरण मयूर भरणे, साहिल काळसारे, कृष्णा किनेकर यांनी तर मानवी शरीर उपक्रम रुद्र गोमासे, प्रिन्स गवई, अनिकेत तालोट, तन्मय उमाळे यांनी आग नियंत्रणात आणणारे यंत्र उपक्रम तरंग इंगळे, तेजस विरघट यांनी व स्वयंचलित रस्त्यावरील दिवे उपक्रम कुणाल बेले, नैतिक वानखेडे, अखिलेश वेते, हर्षल मिरगे यांनी, पाण्याचा योग्य वापर करून शेती उपक्रम पूजा गावंडे, रुद्राशी चव्हाण यांनी, पावसाचा अलार्म कार्यक्षम उपक्रम, संस्कृती लाहुपचांग,नीलम शिरसाठ यांनी, विद्युत नियंत्रित जहाज उपक्रम गौरव काळमेघ, नकुल पाठमासे, मयांक तायडे यांनी साकार केला. चंद्रयान-३चे आकर्षण विद्यार्थी, पालक यांचे चंद्रयान-३ या रॉकेट लॉन्चरकडे लक्ष लागले होते. चंद्रयानाची संकल्पना पल्लवी मनसुटे, नेहा काकड, मयूर भरणे, साहिल काळसारे यांनी साकार करून पाणी आणि हवेपासून चंद्रयानाला इंधन पुरवले. रॉकेट लॉन्चर आकाशात जाताच टाळ्यांचा कडकडाहट झाला. चंद्रयान ३ विज्ञान उपक्रमची माहिती नेहा काकड यांनी दिली. यास ऑपरेट करणारे विद्यार्थी मयूर भरणे, साहिल काळसारे होते.
अनियंत्रित कार घरात घुसल्याने मोठे नुकसान:जुन्या आरटीआे रोडवर घटना; जीवितहानी नाही
प्रतिनिधी | अकोला शहरातील जुन्या आरटीआे रोडवर गिरीनगरात शनिवारी रात्री उशिरा भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या एका घरात शिरून उलटली. या भीषण अपघातात सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच कारच्या एका दुचाकीचेही नुकसान झाले. प्राथमिक माहितीनुसार, चालकाने मद्यपान केले होते आणि मद्यधुंद अवस्थेत ही घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तसेच या रस्त्याच्या कडेला बांधकामाची वाळू पडलेली होती. त्यावरून कार घसल्याचे चालकाचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र कारचालक तसेच दुचाकी व घरमालक यांच्या नुकसान भरपाई देण्याची आपसात तडजोड झाल्याने या अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला नाही. रस्त्यावरील बेदरकार ड्रायव्हिंगचा धोका पुन्हा एकदा नागरिकांच्या समोर आला आहे. शहरातील जुन्या आरटीआे रोडसह गोरक्षण रोड, मलकापूर चौक, कौलखेड रिंगरोड परिसरातील रस्ते सिमेंट क्राँक्रिटचे झाल्याने या रस्त्यांवरून दुचाकीसह चारचाकी वाहनचालक सुसाट आपली वाहने दामटत असल्याने वाहनांचे अपघात घडत आहेत.
प्रतिनिधी | अकोला बसस्थानकातील स्वच्छता आणि प्रवाशांना मूलभूत सोयीसुविधा पुरवणे ही आगार व्यवस्थापकांची जबाबदारी आहे. त्यात कोणत्याही प्रकारची हलगर्जी यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असे निर्देश त्यांनी राज्यातील सर्व एसटीच्या आगार प्रमुखांना दिले आहेत. तशा आशयाचे परिपत्रक राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अकोला आगार प्रमुखांनाही प्राप्त झाले आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवासी संख्या वाढीसाठी विविध माध्यमांतून प्रयत्न होत आहेत. अलीकडच्या काळात आगारांना नवीन एसटी बसेसही देण्यात येत असून, एसटी बस, बसस्थानक, आगार परिसर स्वच्छतेकडेही लक्ष दिले जात आहे. स्वच्छतागृहांची रंगरगोटी, शुद्ध पाण्याची सुविधा ^दरवाजे तुटलेले, साफसफाई नसल्याने स्वच्छतागृहात पाय ठेवताच दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. असे चित्र आता पालटले आहे. स्वच्छतागृहांची रंगरंगोटी,स्वच्छता करण्यात आली असून, नवीन भांडी बसवण्यात आली आहेत.शुद्ध पाण्यासाठी आरआे बसवण्यात आले आहे. - सुभाष भिवटे, आगार व्यवस्थापक क्र.२.
बिबट्यांच्या वावर वाढल्याने मागणी:श्रीरामपुरातील खासगी व सरकारी जागेतील बाभळींचे जंगल काढा
प्रतिनिधी |श्रीरामपूर सध्या ऊसाची तोडणी सुरू असल्याने बिबटे लपण्याचे नवीन ठिकाण शोधत आहे, त्यामुळे श्रीरामपूर परिसरात बिबटे फिरताना दिसतात. शहरात म्हाडा कॉलनी, पाटनी मळा, मोरगे वस्ती, गोंधवणी परिसर तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये तसेच रहदारीच्या रस्त्यावर बिबट्याचे दर्शन दररोज होत आहे. बिबटे लपण्यासाठी झाडांचे जंगल शोधत आहे, शहराच्या मध्यभागी असलेल्या अनेक भागांमध्ये खाजगी व सरकारी जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर वेड्या बाभळीचे झाडे वाढली आहेत ते काढण्याची मागणी होत आहे. या झाडांमुळे बिबटे शहरात दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे, रात्री घरासमोर अथवा रस्त्यावर खेळणारी लहान मुले यांना पालक घराच्या बाहेर जाऊ देत नाही, ऊस शेतीच्या परिसरात बिबट्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. ऊस क्षेत्रात पाण्याचे साठे, ऊसामुळे वास्तव्यासाठी, प्रजननासाठीची अनुकुलता आणि ऊसालगतच शिकारीसाठी शेळी, मेंढी, वासरे, कोंबड्या आदींची उपलब्धता. या सर्व प्रकारच्या अनुकुलतेमुळे बिबटे बागायती भागात स्थिरावले आहेत. बिबटे पुन्हा जंगलाकडे जातील अशी स्थिती नाही. त्यामुळे बिबटे यापुढील काळात नागरी वसाहतीत मुक्कामी राहणार असल्याने ही कायमची समस्या ठरणार आहे. भक्ष्य शोधण्यासाठी बिबट्यांनी शहरी भागातील नागरी वसाहतीत मुक्त फिरताना दिसत आहे. बिबट्यांना पकडण्यासाठी राज्य सरकारने मोहीम हाती घेतली आहे, स्थानिक पातळीवर काही जागरूक नागरिकांनी आमदार हेमंत ओगले, श्रीरामपूर नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण पाटील सावंत, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्याशी संपर्क करून भविष्यात जीवित हानी टाळण्यासाठी व बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी शहरात खाजगी व सरकारी जागेवर तयार झालेले झाडाचे जंगल त्वरित काढावे, अशी मागणी केलेली आहे.
प्रतिनिधी | शेवगाव हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युद्धनीतीत महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांना वेगळेच महत्त्व होते. हे अभेद्य आणि अजेय किल्ले आजही मराठेशाहीच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या अद्वितीय कार्याची, त्यांच्या पराक्रमाची आणि संस्कारमूल्यांची जाणीव व्हावी यासाठी येथील संवेदना योगा सेंटरच्या माध्यमातून नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बारा महिने – बारा किल्ले’ ही उपक्रम मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला सर्व वयोगटातील योगप्रशिक्षकांचा उत्साहपूर्ण सहभाग असतो. पुरुष व महिला दोन्ही गटातील सहभागी किल्ले चढाईसोबत शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य आणि सामूहिकता यांचा अनुभव घेत आहेत. निरोगी शरीरात निरोगी मनाचा वास असावा या संकल्पनेतून संवेदना योगा सेंटर विविध उपक्रम राबवत असून, ‘बारा महिने – बारा किल्ले’ उपक्रम त्यातील अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. नियमित योगाभ्यास, चालण्याची शिस्त आणि निसर्गातील पर्यटनाचा मिलाफ यामुळे सहभागींच्या उत्साहात रोज नवी भर पडत असल्याचे प्रा. अरुण चोथे, अशोक नरोडे यांनी सांगितले. स्थापत्यकलेचे ज्ञान असलेला राजा शिवरायांनी दुर्गबांधणीत वेगवेगळे प्रयोग केले. स्थापत्यकेलेचे कसलेही औपचारिक शिक्षण न घेतलेला या महान राजाने अफाट कल्पनाशक्तीच्या जोरावर शत्रूंच्या ताब्यात असलेले किल्ले जिंकले, राखले आणि काही नवे बांधले. महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात शिवरायांचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवलेले आहे. कर्तृत्व, साहस, संघटनकौशल्य, मुत्सद्देगिरी, शासन कौशल्य, अलौकिक बुद्धिमत्ता, चारित्र्य, नीतिमत्ता असे सर्व गुण असलेल्या छत्रपती शिवरायांची मोहिनी आजही मराठी मनावर कायम आहे. या उपक्रमाचा उद्देश केवळ किल्ले सर करण्यापुरता मर्यादित नाही, तर या मोहिमेत सहभागींना छत्रपतींचे वैशिष्ट्ये, त्यांची दूरदृष्टी कळावी हा उद्देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली दुर्गसंपदा म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा आहे. या उपक्रमामुळे युवकांमध्ये इतिहासजाण आणि फिटनेस संस्कृती वाढीस लागली आहे. मोहिमेच्या आगामी टप्प्यांबाबतही सर्वांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे.
भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी विधानसभेत हक्कभंग आणि कारवाईची मागणी केल्यानंतर वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अखेर मौन सोडले आहे. मी झुकलो नाही, म्हणून माझ्यावर खोटे आरोप करून सातत्याने कट रचले जात आहेत. चौकशीत 'क्लीन चिट' मिळूनही तेच तेच आरोप उकरून काढणे, ही एका प्रामाणिक अधिकाऱ्याची मानसिक छळवणूक नाही का?, अशा शब्दांत तुकाराम मुंढे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुकाराम मुंढे यांनी नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नसतानाही नियमबाह्यपणे प्रकल्पाचा प्रभार स्वतःकडे घेतला. तसेच, 20 कोटींहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार केल्याचा दावा, शिवाय पाच दिवसांचे बाळ असलेल्या एका महिला अधिकाऱ्याला सक्तीने कामावर बोलावणे आणि नस्तीवर सही न केल्याने दुसऱ्या एका महिला अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत सुनावणे, असे आरोप भाजपचे आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके आणि प्रताप अडसड यांनी केले होते. याप्रकरणी आमदारांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान, लक्षवेधी मांडत तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. या सर्वांवर तुकाराम मुंढे यांनी आपली भूमिका मांडली. माझ्यावर वारंवार जुनेच आरो तुकाराम मुंढे म्हणाले, मला नागपूरच्या माझ्या कार्यकाळात काम करू दिले नाही. काहींनी अनेक अडथळे आणले. खोटे आरोप करून विविध चौकश्या माझ्या मागे लावल्या. चौकशीत मी निर्दोष आढळलो. तरी माझ्यावर तेच आरोप वारंवार करण्यात आले. कामासाठी एका नेत्याचा दबाव महापालिकेत अनेक वर्षांपासून बेकायदेशीररीत्या नोकरी करत असलेल्या 17 कर्मचाऱ्यांच्या 2001 पासूनच्या प्रलंबित वेतनाच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी एका नेत्याने माझ्यावर प्रचंड दबाव आणला होता. मात्र, हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने मी सही करण्याऐवजी त्याची खात्यांतर्गत चौकशी लावली. आमदाराच्या नातेवाईकावर कारवाई केल्यानेच कट शासनाच्या नियमाप्रमाणे केलेल्या या चौकशीत या 17 जणांची नोकरी बेकायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आणि मी त्यांना बडतर्फ केले. विशेष म्हणजे, यात एका स्थानिक आमदाराच्या जवळच्या नातेवाईकाचाही समावेश होता. त्यामुळेच त्या आमदाराचा ईगो दुखावला गेला आणि त्यांनी माझ्याविरोधात मोहीम उघडली, असे तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. महिलांना पुढे करून बदनामीचा कट तुकाराम मुंढे पुढे म्हणाले, मी दबावाला बळी पडलो नाही, म्हणून काही महिलांना हाताशी धरून माझ्यावर खोटे आरोप लावण्यात आले. ज्या प्रकरणांमध्ये मला आधीच 'क्लीन चिट' मिळाली आहे, तीच जुनी प्रकरणे उकरून काढून मला त्रास दिला जात आहे. नागपुरात काम करताना मी कोणाचीही मनमानी चालू दिली नाही, याचीच ही शिक्षा मला दिली जात आहे. एका प्रामाणिक अधिकाऱ्याला नक्की किती त्रास द्यायचा, याला काही मर्यादा आहेत की नाही? असा उद्विग्न सवालही त्यांनी उपस्थित केला. नेमके प्रकरण काय? आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके आणि प्रताप अडसड यांनी मुंढे यांच्यावर आरोप केले होते की, त्यांनी नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नसतानाही नियमबाह्यपणे प्रकल्पाचा प्रभार स्वतःकडे घेतला. तसेच, २० कोटींहून अधिक रकमेचा भ्रष्टाचार केल्याचा दावाही आमदारांनी केला होता. त्यांनी मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. तत्कालीन सत्तापक्ष नेत्यांनी सर्व कागदपत्रांसह सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र मुंढे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही. या लक्षवेधीवर झालेल्या चर्चेदरम्यान, प्रभारी नगर विकास मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले की, कोरोना काळात मुंढे यांनी स्मार्ट सिटीची कामे पाहिली होती आणि त्याला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली होती. मुंढे यांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून काही केल्याचे स्पष्ट झालेले नाही. २० कोटींच्या देयकासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखा आणि पोलिसांनी दोनदा चौकशी केली असून, दोन्ही विभागांनी त्यांना क्लिनचीट दिली आहे. विजय वडेट्टीवारांनी घेतली मुंढेंची बाजू सभागृहात हा मुद्दा उपस्थित झाल्यावर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी तुकाराम मुंढे यांची बाजू घेतली. तुकाराम मुंढे हे प्रामाणिक अधिकारी आहेत. नागपूर महापालिकेत असताना त्यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये त्यांना आयुक्तांनी 'क्लीन चिट' दिली आहे, हे रेकॉर्डवर आहे. ज्या महिलेने त्यांच्यावर आरोप केले, तिलाच महिला आयोगाने दंड ठोठावला होता. केंद्रीय महिला आयोगानेही त्यांना दोषमुक्त केले आहे. त्यामुळे कोणाच्या तरी स्वार्थापायी किंवा दबावाखाली येऊन मुख्यमंत्र्यांनी कारवाई करू नये. सत्य परिस्थिती तपासूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
कर्जत (रायगड) आगाराच्या बसचे श्रीक्षेत्र मोहटादेवी मंदिर येथे स्वागत:धार्मिक पर्यटनात वाढ होणा
प्रतिनिधी |पाथर्डी शहर कर्जत ( रायगड ) आगाराच्या बसचे श्रीक्षेत्र मोहटादेवी मंदिर येथे उत्साहात स्वागत. कर्जत (रायगड) आगारातून श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थानासाठी सुरू झालेल्या विशेष बस सेवेचे आज श्रीक्षेत्र मोहटादेवी मंदिर येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे कर्जत, कामोठे, वाशी, मुंबई परिसर, पुणे परिसर इ. आसपासच्या परिसरातील भाविकांसाठी धार्मिक स्थळे जोडली जाणार असल्यामुळे या भागातील धार्मिक पर्यटनात वाढ होणार आहे. गर्भगिरी डोंगर पट्ट्यातील बहुतांश नागरिक कर्जत, कामोठे, वाशी, मुंबई परिसर महानगरामध्ये उद्योग व कामांसाठी स्थलांतरीत झालेले आहेत. त्यांना परिसरात येजा करण्यास याद्वारे सुलभ होणार आहे. तसेच आसपासच्या परिसरातील भाविकांना मोहटादेवी व श्रीक्षेत्र कानिफनाथ मढी दर्शन घेण्यासाठी थेट आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध झालेली आहे. यामुळे मोहटादेवी देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांना सोय उपलब्ध झाली आहे. ज्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होऊन आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होईल. तसेच औद्योगिक, प्रशासकीय, शैक्षणिक कार्यासाठी परिसरातील नागरिकांना शहराकडे येजा करण्यास सुलभता येणार आहे. श्री मोहटादेवी देवस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने विश्वस्त बाबासाहेब दहिफळे व श्रीकांत लाहोटी यांच्या हस्ते एसटी बसची पूजा करण्यात आली. चालक अजीम पठाण, वाहक आशीर पठाण यांचे देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात आले. कर्जत आगाराचे अधिकारी व कर्मचारी यांचे देवस्थानच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, ग्रामस्थ, कर्मचारी, भाविक उपस्थित होते. या बस सेवेचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री मोहटादेवी देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे यांनी केले आहे.
प्रतिनिधी |श्रीरामपूर सर्व महत्त्वाची शासकीय कार्यालये, तसेच आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी श्रीरामपुरात आहेत. यासोबतच शेती महामंडळाच्या जागा देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण हे श्रीरामपूर हेच आहे, अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात केला. आमदार ओगले यांनी सभागृहात जिल्हा विभाजनाचा प्रश्न उपस्थित करुन श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा, अशी मागणी केली आहे. सभागृहात बोलताना आ. ओगले म्हणाले, अहिल्यानगर हा भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा आहे. जिल्ह्याचे विभाजन होणे आवश्यक आहे. नैसर्गिक न्याय तत्त्वाचा विचार करता श्रीरामपूर हेच जिल्ह्याचे ठिकाण आहे. श्रीरामपूरमध्ये सर्वच महत्त्वाची शासकीय कार्यालय त्यात अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, नगररचना कार्यालय असे महत्त्वाचे सर्वच कार्यालय श्रीरामपुरात आहेत. आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी श्रीरामपूर मध्ये आहे तसेच शेती महामंडळाच्या जागा देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही जुनी मागणी आहे. त्यामूळे श्रीरामपूर हेच जिल्हा मुख्यालयाचे योग्य ठिकाण आसल्याचे ओगले यांनी म्हटले आहे. दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव शासन दरबारी गेल्या ४० वर्षांपासून प्रलंबित आहे. आकाराने १७ हजारांवर चौरस किमी एवढा प्रचंड मोठा असलेला हा जिल्हा राज्यातील आकाराने सर्वाधिक मोठा आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना प्रस्तावित जिल्हा मानूनच श्रीरामपूर येथे राबविण्यात येत आहेत. त्यात विभागीय पोस्ट कार्यालय, तार व पासपोर्ट कार्यालय आदींचा समावेश आहे. श्रीरामपूर जिल्हा मुख्यालय व्हावे, ही येथील प्रत्येक नागरिकांची तसेच राजकारण्यांची गेली ४० वर्षांपासूनची इच्छा आहे. गेली ४० वर्षे हा विषय असाच रखडलेला आहे. श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी अनेकांनी प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु अद्यापही यश आलेले नाही, आता आ. ओगले यांच्या मागणीला यश यावे, अशीच प्रत्येक श्रीरामपूरकरांची इच्छा आहे. प्रशासकीय दृष्ट्या सर्व सुविधा उपलब्ध श्रीरामपूर येथे प्रशासकीय दृष्ट्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत, तसेच सर्वांसाठी सोयीचा आणि मध्यभागी असल्याने विभाजनानंतर श्रीरामपूर हेच ठिकाण जिल्ह्यासाठी योग्य आहे. तसेच गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर या शहराचीच शिफारस जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त नाशिक यांनी राज्य सरकारकडे केलेली आहे. केवळ राजकीय ईच्छाशक्ती आणि श्रेयवादामुळे हा प्रश्न गेले ४० वर्षे अडकून पडला आहे.
प्रतिनिधी | आळेफाटा वाचनामुळे आमच्या मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन कमी झाले, त्यांचे भाषा कौशल्य वाढले आणि मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची सवय वाचनामुळे निर्माण झाली, अशा प्रतिक्रिया बेल्हे ग्रामस्थ देत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये हा विधायक बदल घडला आहे तो बेल्हे मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या वाचन उपक्रमामुळे. डिजिटल स्क्रीनच्या युगात मुलांना पुस्तकाकडे वळवणे हे आव्हान मानले जात असताना बेल्हे मॉडर्न स्कूलमध्ये दर रविवारी 'शांतता मॉडर्न वाचत आहे' हा एक तास सामूहिक वाचन उपक्रम राबवला जातो. हा उपक्रम फक्त शाळेपुरता न राहता गावाची संस्कृती बनू लागला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून परिपाठानंतर रोजचा एक तास फक्त वाचनासाठी राखून शाळेने एक वेगळाच प्रयोग सुरू केला. लहान मुलांना चित्रपुस्तकांपासून सुरुवात केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागली. त्यामुळे मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांना कथा-कादंबऱ्यांकडे नेणारी ही प्रक्रिया प्रभावी ठरली आहे. यामुळे मुलांच्या वाचन कौशल्यात स्पष्ट सकारात्मक बदल दिसू लागले आहेत. शाळेत मिळणाऱ्या मोकळ्या वेळातही विद्यार्थी स्वतःहून पुस्तक वाचताना दिसतात. घरीसुद्धा स्वतःहून वाचनाची सवय लागल्याचे पालक सांगू लागले आहेत. पुस्तकांभोवती अशी उत्सुकता तयार होणे हे ग्रामीण भागासाठी मोठे पाऊल मानले जात आहे. नियमित वाचन केल्याने मुलांच्या अभ्यासात प्रगती तर होतेच, पण मानसिक तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि सामाजिक जाण अधिक विकसित होते. हा उपक्रम फक्त पुस्तके वाचण्यापुरता नसून गावात वाचनसंस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, असे प्राचार्या विद्या गाडगे यांनी सांगितले. संस्थेचे संस्थापक सीए सावकार गुंजाळ, चेअरमन गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे आणि विश्वस्त दावला कणसे यांनी या उपक्रमाचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या वाढत्या सहभागाचे कौतुक केले.
प्रतिनिधी|अहिल्यानग र प्रत्येकाला आपले हक्क मिळावे यासाठी न्यायाची स्थापना झाली. आपले अधिकार मिळविण्यासाठी आपण न्यायालयात येतो. मात्र हे अधिकार मिळविण्यासाठी आपण आपापसांतील वाद सामंजस्यानेही मिटवू शकतो. चांगला समाज घडविण्यासाठी आपण चांगली वृत्ती जोपासावी व किरकोळ, तडजोडपात्र प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याची तयारी ठेवावी. लोकअदालतमध्ये प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बार असोसिएशन व सेंट्रल बार असोसिएशन अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये करण्यात आले होते. राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा न्यायाधीश-३ एम. एस. लोणे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर, जिल्हा सरकारी वकील सतिश पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश कातोरे, सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोठारी उपस्थित होते. न्यायिक अधिकारी एस. आर. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. न्यायिक अधिकारी डी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर योगेश पैठणकर यांनी आभार मानले.
प्रतिनिधी|अहिल्यानगर जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांचे आयोजन जिल्हा आरोग्य विभागाने स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने केले होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी पथनाट्ये, जनजागृती रॅली, कँडल मार्च आणि महाविद्यालयांत व्याख्यानांच्या मदतीने एचआयव्ही एड्स आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. १ डिसेंबर या जागतिक एड्स दिवशी शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हातात फलक घेत, घोषणा देत त्यांनी शहरातील मुख्य मार्गांवरुन जनजागृती रॅली काढली. जिल्हा रुग्णालयात विद्यार्थ्यांनी पथनाट्याचे सादरीकरण केले. यानंतर २ डिसेंबर रोजी शहरातील पुणे बसस्थानकात कँडल मार्च काढण्यात आला होता. यावेळी स्नेहालय संस्थेच्या मदतीने जनजागृती करण्यात आली. बसस्थानकातील प्रवाशांना एकत्र करत त्यांनी माहिती देण्यात आली. शेवगाव, नगर शहरातील जिल्हा रुग्णालय, संगमनेर आणि श्रीरामपूर या ठिकाणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. या पथनाट्यांतून एचआयव्ही एड्स आजाराबाबत माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विखे पाटील इंजिनिअरिंग, नर्सिंग आणि कृषी महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आर्किटेक्चर महाविद्यालय आणि कंपनीतही व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील कारागृहात कैद्यांसाठी जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी कैद्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. तसेच समाजकल्याण आणि वनविभागातील अधिकारीक कर्मचाऱ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिनिधी|अहिल्यानगर ज्ञानमार्ग असो किंवा भक्तिमार्ग खरा मी कोण हे ओळखण्यासाठीच सर्व साधने असतात. संकट, दु:ख, नैराश्य आणि अस्थिरता या सर्वांवर रामनाम प्रभावी औषध आहे. मन, बुद्धी आणि आत्मा शुद्ध ठेवण्यासाठी नामस्मरण अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन हभप डॉ.अनिकेत घोटणकर यांनी केले. सावेडी उपनगरातील शिलाविहार परिसरात असलेल्या श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे रुद्राभिषेक, प्रवचन असे कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी आयोजित प्रवचन कार्यक्रमात घोटणकर यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. घोटणकर महाराज यांनी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या जीवनावर आधारित सखोल मार्गदर्शन केले. आपल्या प्रवचनात त्यांनी महाराजांचे अध्यात्मिक विचार, साधना आणि समाजप्रबोधनाचे कार्य उलगडून सांगत श्रीराम नामाच्या महत्त्वावर विशेष भर दिला. रामनाम हे केवळ उच्चार करण्यापुरते मर्यादित नसून ते आचरणात आणण्याचे साधन आहे. संकट, दुःख, नैराश्य आणि अस्थिरता या सर्वांवर रामनाम हे प्रभावी औषध आहे. मन, बुद्धी आणि आत्मा शुद्ध ठेवण्यासाठी नामस्मरण अत्यंत आवश्यक असून रामनामामुळे माणसाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडते, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी हभप सुंदरदास रिंगणे महाराज तसेच हभप रेखाताई रिंगणे यांनीही प्रवचन केले. त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या त्याग आणि भक्तीपर जीवनावर प्रकाश टाकला. दुपारी १२ वाजता महाआरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविक उपस्थित होते.
प्रतिनिधी|अहिल्यानगर विद्यार्थ्यांना भारतीय परंपरा, संस्कृती जोपासत काळाबरोबर चालत आधुनिक पद्धतीने शिक्षण देणे सध्याच्या काळात आवश्यक आहे. ही परंपरा गॅलेक्सी नॅशनल स्कूलच्या मध्यापातून योग्य प्रकारे जोपसली जात असल्याने ही शाळा उत्तम आहे. स्नेहसंमेलनात लहान विद्यार्थ्यांनी खूप उत्कृष्ट व हृदयस्पर्शी सादरीकरण करत सर्वांची मने जिंकली, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी काढले. सावेडी येथील गॅलेक्सी नॅशनल स्कूलच्या प्री प्रायमरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनातील सादरीकरण, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्यासह उपस्थित पालकांना भावले. दोन ते पाच वर्षाच्या चिमुकल्यांनी, भारतीय संस्कृती व देशभक्तीपर नृत्य आणि छोट्या नाटुकल्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी केलेली पारंपरिक वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधत होती. गॅलेक्सी नॅशनल स्कूलच्या प्री प्रायमरीच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.रवींद्र साताळकर, प्रमुख पाहुणे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, डॉ.सुचित तांबोळी, गॅलॅक्सिच्या संस्थापिका उषा देशमुख, सचिव सम्राट देशमुख, देविका देशमुख आदी उपस्थित होते. ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण जन्माचा देखावा व राधा कृष्ण नृत्य सादर करून पालकांची मने जिंकली. तसेच लांडगा आला रे आला.. ही गोष्ट सुंदर अभिनयाने सादर केली. यावेळी सर्व शिक्षकांनी पालकत्वावर एक नाटक सादर केले हे कार्यक्रमाचे खास वैशिष्ठ्य ठरले. मोना आशिया म्हणाल्या, गॅलेक्सी नॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा योग्य पद्धतीने बौद्धिक विकास होत आहे. शाळेतील विविध उपक्रमांमुळे मुलांचा कलागुणांना चालना मिळत आहे. सर्व शिक्षक उत्कृष्ट मार्गदर्शन करून छोट्या विद्यार्थ्यांना घडवत आहेत, असे सांगून संस्थेचे आभार मानले. यावेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. सुचित तांबोळी यांनी लहान मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी पालकांना मार्गदर्शन केले. महेंद्र गंधे व अध्यक्ष डॉ.रवींद्र साताळकर, संस्थापिका उषा देशमुख यांनी उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात देविका देशमुख यांनी स्कूलच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन प्रगतीचा वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी गॅलेक्सी नॅशनल स्कूलमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि नागरिक या स्नेहसंमेलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला दाद शाळेतील छोट्या विद्यार्थ्यांनी प्रबोधनात्मक विषयावर सादरीकरणातून मोठ्यांचा व वृद्धांचा आदर, भांगडा, शेतकरी नृत्य व बॉलीवूड स्टाइल नृत्य प्रकारांनी कार्यक्रमात उत्साह आणला. तसेच नाटकातून अग्निशामक दलाच्या कार्याची माहिती दिली.
दीपक कांबळे | अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात विविध विभागातील अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांची दालने आहेत. ही दालने चकचकीत करण्यावर मागील पाच वर्षात सुमारे ४७ लाख खर्चास मान्यता दिली होती. सध्या प्रशासकांच्या हातात कारभाराची सुत्रे असली, तरी कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला नवे कारभारी मिळतील. यापार्श्वभूमीवर त्यांची दालने व निवासस्थाने चकचकीत करण्यासाठी प्रशासनाने २७ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर मार्च २०२२ मध्ये प्रशासक म्हणून सर्वप्रथम तत्काली मुख्यकार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी सूत्र हाती घेतली होती. पुढे प्रशासक म्हणून आशीष येरेकर यांनी कारभार पाहिला. सद्यस्थितीत विद्यमान मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद भंडारी प्रशासक आहेत. आता पुढील कालावधीत जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे नूतन सदस्य सभागृहात निवडून येतील. तीन वर्षांपासून पदाधिकाऱ्यांची दालने बंद आहेत, त्यामुळे आता या दालनांच्या डागडुजीसाठी २०२५-२०२६ या वर्षांत सुमारे २७ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या निधीतून जिल्हा परिषद अध्यक्ष व इतर पदाधिकारी, लालटाकी येथील निवासस्थानांची दुरुस्ती केली जाणार आहे.
श्रीरामपुरात चायना मांजाने तरुणाचा गळा कापला:गळ्याला वरच्यावर जखम झाल्याने थोडक्यात बचावला
प्रतिनिधी |श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती येथील अक्षय कॉर्नर जवळून रस्त्याने जात असताना शहरातील तरूण सौरभ लोणकर हे चायना मांजामुळे जखमी झाले. या चायना मांजाने या तरुणाच्या गळ्याला वरच्यावर जखम झाल्याने थोडक्यात बचावला. मकर संक्रांतीच्या काळात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले जातात, मात्र काही व्यापारी नायलॉन व चायनीज धाग्याची विक्री करतात. हा मांजा धारदार असल्याने पतंग उडवणाऱ्यांच्या हाताला इजा होण्याची, तसेच तुटलेला मांजा रस्त्यावर पडल्यास दुचाकीस्वार, पादचारी आणि लहान मुले अडकून गंभीर जखमी होण्याची शक्यता असते. हा मांजा विद्युत वाहिन्यांवर पडल्यास शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या आणि मालमत्तेचे नुकसान होण्याच्या घटनाही घडतात. पशू-पक्ष्यांच्या जीविताला या मांजामुळे मोठा धोका निर्माण होऊन पर्यावरणाची हानी होते. पतंग उडवणारा वयोगट हा शाळा महाविद्यालयीन आहे.पतंग उडवायला हरकत नाही मात्र चायना मांजाला पर्याय वापरला पाहिजे.त्याचे दुष्परिणाम काय होतात याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. उत्तर मुंबईतील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या घोसाळकर घराण्यातील महत्त्वाच्या सदस्या, दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर या आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. ठाकरे गटातील असंतुष्ट नेत्यांना आणि प्रभावी चेहऱ्यांना गळाला लावण्याचे धोरण भाजपने अवलंबले असल्याचे दिसून येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेले हे पक्षांतराचे सत्र ठाकरे गटाची डोकेदुखी वाढवणारे आहे. त्यातच मातोश्रीशी एकनिष्ठ समजल्या जाणाऱ्या 'घोसाळकर' कुटुंबातील तेजस्वी घोसाळकर यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. दादरमध्ये पक्षप्रवेश सोहळा दादर येथील भाजपचे मुख्य कार्यालय असलेल्या 'वसंत स्मृती' येथे आज सकाळी 10 वाजता हा महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या साक्षीने तेजस्वी घोसाळकर हाती 'कमळ' घेतील. एका कट्टर शिवसैनिक कुटुंबातील महत्त्वाची व्यक्ती, जिचा स्थानिक राजकारणात मोठा प्रभाव आहे, तीच प्रतिस्पर्धी पक्षात गेल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई बँकेच्या निवडीने दिले होते संकेत गेल्या काही काळापासून तेजस्वी घोसाळकर ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. या नाराजीच्या चर्चेवर शिक्कामोर्तब तेव्हा झाले, जेव्हा नुकतीच भाजपची सत्ता असलेल्या 'मुंबई बँके'च्या संचालकपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड म्हणजे त्यांच्या भाजप प्रवेशाची पहिली पायरी मानली जात होती. अखेर आज त्यावर अधिकृत मोहोर उमटवण्यात आली आहे. घोसाळकर कुटुंबाचा दहिसर आणि उत्तर मुंबई पट्ट्यात मोठा जनाधार आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने आगामी निवडणुकीत भाजपला मोठी ताकद मिळणार आहे, तर शिवसेनेला आपला बालेकिल्ला राखण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. कोण आहेत तेजस्वी घोसाळकर? तेजस्वी घोसाळकर या मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका आहेत. त्याशिवाय ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या त्या सून आहेत. एक वर्षापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांच्या पतीचे गोळीबारात निधन झाले होते. यंदाच्या महापालिका निवडणुकीत तेजस्वी घोसाळकर या निवडणूक लढणार नाहीत. वार्ड क्रमांक 1 हा ओबीसी राखीव झाल्याने निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. परंतु पालिकेच्या वार्ड क्रमांक 7, 8 किंवा 2 मधून त्या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहतील असे बोलले जात होते. निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतराचे सत्र सध्या संपूर्ण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, येत्या 20 डिसेंबरला उर्वरित मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुका पार पडताच जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबईसह इतर महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरू झालेले हे पक्षांतराचे सत्र ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
सटाणा ते नस्तनपूर ९० किमी सायकल वारी:बागलाण सायकल फाउंडेशनचा संदेश
प्रतिनिधी |सटाणा बागलाण सायकल फाऊंडेशनच्या वतीने सटाणा ते नस्तनपूर सायकल वारीद्वारे साडेसहा तासात ९० किलोमीटर अंतर पार करीत सायकल चालवा पर्यावरण वाचवाचा संदेश दिला. या सायकलवारीत ७० सदस्यांनी सहभाग घेतला होता. दि. ७ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता येथील शिवतिर्थापासून सायकल राईडचा शुभारंभ करण्यात आला. कडाक्याच्या थंडीतही राईडमध्ये मोठ्या संख्येने सदस्यांनी सहभाग नोंदवला. संकष्टी चतुर्थी निमित्ताने दाभाडी येथे चिंतामणी गणपतीचे दर्शन घेत पहीला थांबा घेतला. तर दुसरा थांबा मालेगाव येथे मनमाडरोडवर घेत चहा, नाष्टा घेऊन थेट नांदगाव चौफुली गाठत. दुपारी १२:१५ वाजता नस्तनपूर गाठत श्री शनि महाराजांचे दर्शन घेतले. हास्यविनोद व पर्यावरणाचा संदेश देत सायकल राईडचा आंनद घेतला. यावेळी शनिमंदिर ट्रस्टचे विश्वस्त माजी आमदार अनिल आहेर यांनी सायकल फाउंडेशनच्या उपक्रमाबाबत कौतुक केले. यावेळीरायडर्सना फिट इंडिया मुंबई यांचे तर्फे टी-शर्ट चे वाटप करण्यात आले. नस्तनपूर सायकल वारीत दीपक सोनवणे, मोहन सूर्यवंशी, रवींद्र भदाणे, योगेश सोनवणे, मोहन सोनवणे, प्रभाकर सोनवणे, आदींसह सर्व सदस्य सहभागी झाले होते. सायकल राईड सहकुटुंब असल्याने कुटुंबातील महीलांनीही सहभाग नोंदविला.
अतिवृष्टीग्रस्त ५ शेतकऱ्यांना मदतीचा आधार:आश्रमाच्या मदतीमुळेमोठा आधार मिळाला
प्रतिनिधी | कळवण कळवण परिसरात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाच शेतकऱ्यांना तालुक्यातील निवाणे येथील प्रेम भक्ति साधना केंद्र, श्री सिद्धारुढ आश्रम यांच्या वतीने प्रत्येकी अकरा हजार रुपयांचा धनादेश देऊन आर्थिक आधार देण्यात आला. मनीषा दीदी यांनी आजच्या परिस्थितीत जगाचा पोशिंदा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सेवा व साधना आहे. त्यामुळे परिसरातील गरजू आणि आर्थिक परिस्थिती असलेल्या पाच शेतकऱ्यांना छोटीशी मदत करून आधार देण्याचा प्रयत्न केला असून या कामाचा आदर्श घेऊन समाजातील आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या नागरिकांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले. यावेळी तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी या उपक्रमामुळे शेतकरी बांधवांच्या मनात आशा व धैर्य निर्माण झाले असून आश्रमाने केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून शासकीय योजनांच्या माध्यमातून कायदेशीर जी काही मदत करणे शक्य असेल त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमासाठी आश्रमाचे ज्येष्ठ सेवेकरी प्रभाकर आहेर, बाळासाहेब आहेर, बाळासाहेब बोरसे, शिवसेना जिल्हाअध्यक्ष जितेंद्र वाघ, श्रामा पाटील, विलास रौंदळ, अतिवृष्टीग्रासित शेतकरी बांधव व आश्रमाचे सेवेकरी उपस्थित होते. या ५ शेतकऱ्यांना मदत : हौसाबाई पांडु चव्हाण - रा. वरवंडी, सरला विलास रौंदळ - रा. भेंडी, बारकू नथू सोनवणे - रा. निवाणे, तानाजी पुंडलिक पाटील - रा. दह्याने, विलास दत्तू देवरे - रा. कुंडाणे ^दोन महिन्यात अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते झाले. मका पिकासह कांदा रोपाचे नुकसान केले. त्यामुळे शासनाकडून मदतीची अपेक्षा होती. मात्र अद्यापही काहीही मदत न आल्याने प्रचंड नैराश्य होते. सिध्दारूढ आश्रमाच्या वतीने मिळालेली मदत ही मोठा आधार असून कुटुंबासाठी संजीवनी मिळाली आहे. - विलास देवरे, शेतकरी
प्रतिनिधी | इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रिया पार पडून आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरच्या मतमोजणीकडे लागले आहे. मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्यात आलेल्या इगतपुरी शहरातील तळेगाव परिसरातील आयटीआय येथे स्ट्रॉंग रूमवर प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे. कडाक्याच्या थंडीतही पोलिस व सुरक्षा यंत्रणा सज्ज आहे. अहोरात्र खडा पहारा देण्यात येत आहे.स्ट्रॉंग रूमच्या परिसरात एसआरपीएफ, इगतपुरी पोलिस ठाण्याचे जवान, नगरपरिषदेचे कर्मचारी तसेच अग्निशमन दल यांचा संयुक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. थंडीचा कडाका वाढला असतानाही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शेकोटी करत मतदान यंत्रांच्या सुरक्षेसाठी पहारा सुरू ठेवला आहे. संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवण्यासाठी १३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, या कॅमेऱ्यांद्वारे चोवीस तास निरीक्षण केले जात आहे.
प्रतिनिधी | नाशिक नुकत्याच काशी येथे झालेल्या ऐतिहासिक ‘दंडक्रम पारायण' विक्रमाच्या पार्श्वभूमीवर, नाशिककरांना आपल्या शहराच्या प्राचीन वैदिक वारशाची नव्याने ओळख करून देण्यासाठी ‘इरा सेंटर फॉर इंडिक स्टडीज'कडून ‘गोदा संवाद' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. वेद पठण परंपरा विशेष, या संकल्पनेवर आधारित या निःशुल्क वारसा फेरीत अनेक नाशिककरांनी आपल्या शहराची समृद्ध गुरु-शिष्य परंपरा आणि वेद्घोषाचा अनुभव घेतला. वेद हे भारतीय संस्कृतीची गंगोत्री असून, मौखिक परंपरेतून हजारो वर्षे जतन केलेले हे ज्ञानभांडार युनेस्कोने ‘मानवतेचा अमूर्त सांस्कृतिक वारसा' म्हणून घोषित केले आहे. वैदिक पाठशाळांच्या वारशावर प्रकाश टाकण्यासाठी आणि वेदांमागील शास्त्रीयता समजून घेण्यासाठी या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘इरा सेंटर'चे प्रसाद गर्भे, अनिकेत गाढवे, डॉ. स्नेहल दंताळे उपस्थित होते. या विशेष फेरीदरम्यान वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय या वेद स्मार्त चुडामणी शांताराम शास्त्री भानोसे यांच्या पाठशाळेस भेट देण्यात आली. यावेळी पाठशाळेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांसमोर यजुर्वेदातील मंत्रांचे प्रत्यक्ष सादरीकरण केले, ज्याने वातावरण मंत्रमुग्ध झाले. महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान या पाठशाळेत जाऊन वेदाचार्य रवींद्र पैठणे यांच्या नेतृत्वाखालील संस्थेचे कार्य उपस्थितांनी अनुभवले. दरम्यान भारतीय विद्या अभ्यासक विनय जोशी आणि अनिता जोशी यांनी वेदांचे भारतीय संस्कृतीतील स्थान आणि महत्त्व उलगडून सांगितले. दरवर्षी होणाऱ्या उपक्रमात यंदा यावेळी नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी | जाफराबाद शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, नवनवीन कल्पना सुचाव्यात, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात लिटल स्टार इंग्लिश स्कूल वडाळा या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील जवळपास ६० शाळांमधील ८३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून तयार केलेले विविध वैज्ञानिक प्रयोग आणि मॉडेल या प्रदर्शनात सादर केले. यामध्ये पर्यावरण पूरक तंत्रज्ञान, जलसंधारण आणि दैनंदिन जीवनातील समस्यावर आधारित उपायांचा समावेश होता. या प्रदर्शनात लिटल स्टार इंग्लिश स्कूलने लाईन ट्रान्समिशन फॉल्ट (आपत्ती व्यवस्थापन) हा प्रयोग प्रदर्शित केला होता. प्रयोगाचा प्रमुख फायदा असा होता की, शाश्वत शेती करणे व ती करत असताना जीवितहानी टाळणे आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान न होऊ देणे. प्रयोगाचे सादरीकरण व मांडणी बघून उपस्थित निवड समितीने या प्रयोगास प्रथम क्रमांक जाहीर केला. प्रयोगाच्या यशस्वितेसाठी शाळेचे विज्ञान विषयाचे शिक्षक शिवशंकर उबाळे, ऋषिकेश कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी सार्थक लहाने, निखिल शेजोळ यांनी परिश्रम घेतले. या यशासाठी प्राचार्या अनिता नवले यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
प्रतिनिधी | जालना जे हरवले त्याचे रडणे किंवा जे शिल्लक आहे, त्याचा आनंद साजरा करणे. हे जीवन जगण्याचे दोन मार्ग आहेत. तुम्ही कोणते जीवन जगायचे हे तुम्हालाच ठरवायचे आहे. जे माझे आहे, ते कधी जाणार नाही आणि जे गेले ते माझे नव्हतेच. या सिद्धांतानुसार जीवन जगणारा माणूस कधीही दुःखी होत नाही. सुख आले तर हसा आणि दुःख आले तर हसून टाळा हाच जीवनाचा मूलमंत्र आहे. जे गेले त्याचे दुःख करत बसण्यापेक्षा जे आहे, त्याचा आनंद घ्यायला शिका, असा मौलिक हितोपदेश राष्ट्रसंत महोपाध्याय श्री ललितप्रभसागरजी महाराज यांनी दिला. आत्मकल्याण सत्संग समिती आणि सकल जैन समाजाच्या वतीने जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील श्री गुरु गणेश सभा मंडपात आयोजित ३ दिवसीय विराट सत्संगास शनिवारी प्रारंभ झाला. राष्ट्रसंतांच्या आगमनानिमित्त जालना शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शेकडो भाविकांनी राष्ट्रसंतांचे स्वागत आणि अभिनंदन केले. महिलांनी मंगल कलश धारण करत सहभाग घेतला. सभामंडपात प्रारंभी सुदेशकुमार सकलेचा, संजय बंब, अजित छाबडा, ॲड. अनिल संचेती, त्रिभुवनराज सिंगी, सुरेश मुथा, घनश्यामदास गोयल, विजय राठी, सुनील रायठठ्ठा, डॉ. राजकुमार सचदेव, जयप्रकाश श्रीमाली यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महिला मंडळाने स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन दीपक मोदी यांनी केले तर धर्मेश मेहता यांनी आभार मानले. उपस्थित हजारो भाविकांना मार्गदर्शन करताना ललितप्रभसागरजी म्हणाले की, ५० वर्षांपूर्वी लोकांकडे भौतिक सुख कमी होते, पण मनःशांती होती. तेव्हा माणूस शांत झोपायचा. आज सुखसुविधा असूनही लोकांना शांत झोप लागत नाही. अशी अवस्था असल्याचे त्यांनी सांगितले. दगडातही मूर्ती दडलेली असते, फक्त ती घडवण्याची गरज असते. जिद्द, उमेद आणि उत्साह असेल तर मातीपासून मंगल कलश आणि बांबूपासून बासरी बनते. हे जीवन परमेश्वराने दिलेला प्रसाद आहे. आपणही त्याचे सुंदर रूप घडवू शकतो. जीवनातील प्रत्येक क्षण आनंद आणि उत्साहाने भरून टाका. प्रेम, आनंद, उल्हासाने जगता आले तर माणूस जिवंतपणीच स्वर्ग अनुभवू शकतो, असा हितोपदेश ललितप्रभसागरजी यांनी दिला. यावेळी परभणी, नांदेड, बोरी, संभाजीनगर, कामारेड्डीसह अनेक शहरांतून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. चिंतेवर मात करता येते मनात उगाच चिंता पाळू नका. जास्त ताण घेऊ नका. मुले-सुनांना सतत टोका-टोकी, अडवाअडवी केल्यास तुम्ही त्यांना ओझे वाटू लागाल. त्यांना जबाबदारी द्या आणि स्वतः मुक्त व्हा. मोठ्यांनी लहानांच्या चुका दुर्लक्ष कराव्यात आणि लहानांनी मोठ्यांचे बोलणे सहज स्वीकारावे. असे केल्याने चिंता जळून जाईल आणि घरात आनंदाचे फुलं बहरतील. घराचे वातावरण स्वर्गासारखे होईल. संपत्ती, सौंदर्य, रूप, पद कायमस्वरूपी नसून बदलतात. काही मिळाले तर अहंकार करू नका आणि गेले तर दुःख करू नका, असे डॉ. मुनिश्री शांतीप्रिय सागरजी महाराज यांनी याप्रसंगी बोलताना नमूद केले.
प्रतिनिधी | खुलताबाद गृहरक्षक दलाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त खुलताबाद येथे वृक्ष लागवड व स्वच्छता अभियान राबवण्यात आले. भद्रा मारुती मंदिर परिसर आणि पोलिस स्टेशन (खुलताबाद) येथे हा उपक्रम पार पडला. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता. अभियानात परिसराची स्वच्छता करण्यात आली. देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात गृहरक्षक दलाचे अधिकारी व जवान मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ केला. वृक्ष लागवडीतही सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाला भद्रा मारुती मंदिर संस्थानचे अध्यक्ष मिठू बारगळ, पोलिस ठाण्याचे अंमलदार खटके, तालुका समादेशक अधिकारी दगडू भेंडे, लिपिक गजानन गिरनारे उपस्थित होते. पलटन नायक बाबूभाई पठाण, राजू फुलारे, नईम शेख, भिकन अल्हाड, शाफीयुद्दिन मुजावर, इस्माईल पटेल, शालू विधाटे, सरुबाई भालेराव यांचाही सहभाग होता. या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ व सुंदर झाला. उपस्थित मान्यवरांनी गृहरक्षक दलाच्या कार्याची प्रशंसा केली. कायदा व सुव्यवस्थेबरोबरच समाजसेवा, शिस्त आणि पर्यावरण रक्षणासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त केले. गृहरक्षक दल केवळ सुरक्षा व्यवस्थेपुरते मर्यादित नसून सामाजिक जबाबदारीतही सक्रिय असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले.
योग्य नियोजन, पिकाची शास्त्रशुद्ध काळजी आणि बाजारभावाचा अचूक अंदाज घेतल्यास शेतीतून मोठे यश मिळू शकते, याचे उत्तम उदाहरण घाटनांद्रा येथील कारभारी मोरे या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. अवघ्या विस गुंठ्यांत त्यांनी घेतलेल्या टोमॅटो लागवडीमधून अवघ्या चारच महिन्यांत खर्च वजा जाता तब्बल दोन लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. घाटनांद्रा येथील शेतकरी कारभारी भिका मोरे यांनी आपल्याकडे असलेल्या शेत जमीनीत पारंपरिक पिक लागवडीबरोबरच विस गुंठ्यांत त्यांनी यावर्षी टोमॅटोची लागवड केली होती. लागवडीनंतर पहिल्या काही आठवड्यांत बाजारात दर कमी असल्याने प्रारंभी भाव कमी मिळत होता. मात्र मोरे यांनी धीर न सोडता पिकाची निगा वाढवली. योग्य वेळी रोगनियंत्रण, ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन आणि सेंद्रिय तसेच रासायनिक खते यांचा संतुलित वापर करून त्यांनी टोमॅटोचे पिक तगडे केले. पुन्हा बाजारात टोमॅटोला मागणी वाढली व क्रेटला तब्बल एक हजार रुपये असा दर मिळाला. त्याचा थेट फायदा मोरे यांना झाला. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय आयात सुरू केल्याने सध्या टोमॅटोचे पुन्हा भाव कमी झाले असून सध्या ४०० रुपये क्रेट असा दर मिळू लागला आहे. सुयोग्य काळजी, कमी उत्पादन खर्च आणि चांगल्या गुणवत्तेमुळे त्यांची मालविक्रीही सुरळीत सुरू आहे. टोमॅटोची लागवड त्यांनी ऑगस्टमध्ये केली होती. लागवडीसाठी रासायनिक खते, औषधे, फवारणी, कामगार मजुरी, देखभाल, टोमॅटोचे झाड उभे राहण्यासाठी काड्या यावर सुमारे आठ हजार रुपये खर्च आला असल्याचे त्यांनी सांगितले. अजून एक ते दीड महिना तरी टोमॅटोचे उत्पादन निघणार आहे. जळगाव, संभाजीनगर, भुसावळमध्ये विक्री शेतकरी कारभारी मोरे म्हणाले, भाव कमी असतानाही मी पिकाची काळजी सोडली नाही. सातत्याने मशागत व नियोजन यामुळे टोमॅटो चांगल्या दराने विक्री होत आहे. सध्या दर कमी झाले आहे. मात्र टोमॅटोची विक्री जोरात सुरू आहे. मी हे टोमॅटो जळगाव, भुसावळ, छत्रपती संभाजीनगरसह पाचोरा आदी शहरांमध्ये विक्री करत आहे.
पिंपळदरी परिसरात दुहेरी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल:उत्पन्नामध्ये वाढ
प्रतिनिधी| पिंपळदरी जिल्ह्यात पारंपरिक पिकांसोबत दुहेरी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. पूर्वी पारंपरिक शेतीवर अवलंबून असलेले शेतकरी आता भाजीपाला आणि फुलशेतीकडे वळले आहेत. या बदलामुळे उत्पन्नात वाढ होत असून आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळत आहे. गेल्या काही वर्षांत मिरची, टोमॅटो, वांगी, गवार, फ्लॉवर, दुधी, गिलके, भेंडी, काकडी यांसारख्या भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही शेतकरी फुलशेतीही करत आहेत. भाजीपाला पिके दीड ते दोन महिन्यांत उत्पादन देतात. त्यामुळे अल्पावधीत परतावा मिळतो. यामुळे शेतकऱ्यांची भाजीपाला लागवडीला पसंती मिळत आहे. पारंपरिक शेतीसह भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. पिकांवर होणाऱ्या रोग व कीड नियंत्रणासाठी लागणारी खते व औषधे स्थानिक पातळीवर सहज मिळत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च नियंत्रणात ठेवता येतो. शेतकऱ्यांनी स्वीकारलेल्या या नव्या बदलामुळे परिसरातील कृषी क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. शेतीत नवनवीन प्रयोग जिल्हातील शेतकरीही आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. विशेष म्हणजे, कमी पाण्याच्या जमिनीवरही भाजीपाला लागवड करून शेतकरी अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत. भाजीपाला लागवडीमुळे अतिरिक्त उत्पन्न मिळू लागले आहे. कृषी विभागाचे मार्गदर्शनही मिळत आहे.
प्रतिनिधी | लासूरस्टेशन बदलत्या काळाला शेती आणि शेतकऱ्यांनी सामोरे जाण्यासाठी आपण ‘आत्मा’ च्या माध्यमातून विविध संकल्पना शेतकरी गटामार्फत राबवण्याचा प्रयत्न केला असुन, यामध्ये कनकोरीचे बेबीकॉर्न, शेंदूरवाद्याची भेंडी परदेशात पाठवण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी केल्यानंतर आता शेतकरी गटामार्फत “कार्बन क्रेडिट” ही संकल्पना आत्माच्या गटामार्फत राबवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिलीप मोटे यांनी प्रतापुरवाडी येथील भेटी दरम्यान दिव्य मराठी कडे दिली आहे. शेतकरी गट प्रमुख यांच्या बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले, आत्माच्या माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण बाबी राबवताना जिल्हा आधीक्षक कृषि अधिकारी प्रकाश देशमुख, आत्माच्या प्रकल्प संचालक धनश्री जाधव, उपसंचालक अभयकुमार पडीले, उपविभागीय कृषि अधिकारी आनंद गंजेवार, तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाय यांच्या मार्गदर्शनाखाली कार्बन क्रेडिट या संकल्पनेवर काम करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये विशेषतः नैसर्गिक शेती करणारे शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना सहभागी करुन घेत नैसर्गिक शेतीस कार्बन क्रेडिटशी जोडत शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. असे संकल्पना विषद करताना त्यांनी सांगितले. कार्बन क्रेडिट ही एक पर्यावरणीय आर्थिक संकल्पना असुन ती हवामान बदल कमी करण्यासाठी तयार केलेली आहे. एक कार्बन क्रेडिट म्हणजे सुमारे एक टन कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन टाळणे किंवा शोषून घेणे. याचे प्रमाणिकरण वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून करण्यात येते. आणि हेच कार्बन क्रेडिट जगाच्या बाजारात वेगवेगळ्या कंपन्या विकत घेतात. त्यातून शेतकऱ्यांना फायदा होतो. आत्माच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व्यासपीठ एक टन co2 कमी केल्यास एक कार्बन क्रेडिट मिळते. एखाद्या गटाने 500 टन co2 कमी केल्यास 500 कार्बन क्रेडिट मिळतील. 1 कार्बन क्रेडिट चा दर बाजारात ठरत असतो. बाजारातील दरा प्रमाणे विक्रीचा करार झाल्यास शेतकरी गटाना त्याचा फायदा होईल. हे प्रमाणिकरण करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था काम करतात. आपण आत्माच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दिलीप मोटे यांनी सांगितले.
प्रतिनिधी | लासूर स्टेशन येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, छत्रपती शाहू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ. बाळासाहेब पवार यांची प्राचार्यपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या दीर्घ शैक्षणिक अनुभव, नेतृत्वगुण आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. पवार यांनी अनेक वर्षे अध्यापन, संशोधन, विद्यार्थी विकास व संस्थात्मक प्रगती या क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले आहे. नवीन प्राचार्यांच्या नियुक्तीमुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक उन्नतीला नवे बळ मिळेल, असा विश्वास महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विश्वास दादा पाटील यांनी व्यक्त केला आहे. याबद्दल न्यू हायस्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सुनील सोमवंशी, ज्येष्ठ लिपिक अविनाश गायकवाड यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन नवनियुक्त प्राचार्य डॉ. पवार यांचे स्वागत केले आहे. याप्रसंगी श्रीकृष्ण दवणे, कृष्णा गवळी, रितेश बैसये, डी. पी. धोत्रे, दिपक भिसे, शिक्षक गायके, सुयोग चव्हाण आदींसह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी आदींची उपस्थिती होती. नव्याने रूजू प्राचार्य पवार यांचे स्वागत करण्यात आले ( छाया ः मकसूद शेख ).
प्रतिनिधी | नाचनवेल कन्नड तालुक्यातील जवखेडा बु. येथील राशेश्वर महादेव मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पाचवी कीर्तन सेवा माऊली महाराज शेलूदकर यांच्या कीर्तनाने पार पडली. त्यांनी रसाळ शैलीत भगवान राशेश्वर महादेवाचे चरित्र उलगडले. शिवमहापुराणातील विविध प्रसंग श्रोत्यांसमोर सादर केले. महादेवाचे जीवन हे आदर्श, समरसता आणि करुणेचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या तरुणांनी त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी. व्यसनमुक्त जीवन स्वीकारावे, असे आवाहन त्यांनी केले. अनेक तरुण व्यसनांच्या आहारी जात आहेत. याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. घरातील एक सदस्य व्यसनाधीन असला, तरी संपूर्ण कुटुंबाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. माऊली महाराज शेलूदकर यांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीचा मुद्दा अधोरेखित केला. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून सुसंस्कृत आणि सकारात्मक जीवन जगावे, ही आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. कीर्तनादरम्यान त्यांनी महादेवाचा निरागस स्वभाव, भक्तांशी असलेले नाते, भक्तवत्सलत्व आणि जीवात्म्यांवरील प्रेम प्रभावी शब्दांत मांडले. गाय ही केवळ जनावर नसून संस्कृतीचे रक्षण करणारी माता आहे, असे सांगत त्यांनी सांस्कृतिक मूल्यांचे महत्त्वही अधोरेखित केले. या कीर्तन सेवेसाठी गावकरी आणि तरुणांनी विशेष परिश्रम घेतले. गावासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखंड हरिनाम सप्ताहातील सर्व कार्यक्रम भक्तिभावपूर्ण आणि शांततेत पार पडले. उद्या होणार सांगता जवखेडा बुद्रुक येथे अखंड हरिनाम सप्ताहास मंगळवारी (दि. ९) सुरूवात झाली असून, हा सप्ताह १६ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. शिव महापुराण कथेचे वाचन हभप महादेव महाराज निपाणीकर करीत आहे. मंगळवारी (दि. १६) निपाणीकर महाराज यांचे सकाळी ११ ते १ दरम्यान काल्याचे किर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
आयशरची दुचाकीला जोराचीधडक, तरुणाचा जागीच मृत्यू:अपघातग्रस्त आयशर चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू
प्रतिनिधी | सिल्लोड दुचाकीवरून सिल्लोडकडून सारोळा गावाकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक चालकाने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. हा अपघात जळगाव- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर स्वस्तिक लॉनजवळ रविवारी दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास झाला. अक्षय मोठेबा वराडे (२७, रा. सारोळा) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अक्षय हा दुचाकीने (एमएच २० ईव्ही ६०४२) छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रोडने सिल्लोडकडून सारोळा येथे त्याच्या गावाकडे जात होता. पाठीमागून भरधाव येणाऱ्या आयशर ट्रक (एमएच २० इजी ५५८४) चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने मोटारसायकलस्वारास पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात अक्षय जागीच ठार झाला. अपघात करून ट्रक चालक पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी मृतास सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. शोकाकुल वातावरणात रात्री उशिरा सारोळा येथे मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बिबट्याला पकडण्यासाठी नांगरे बाभुळगावला पिंजरा:परिसरात भीतीचे वातावरण
प्रतिनिधी | लासूर स्टेशन नांगरे बाभुळगाव परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शेतकऱ्यांना दोन बिबटे दिसत आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. नागरिक आणि शेतकरी सतत बिबट्याच्या हालचाली पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर रविवारी वनविभागाने नांगरे बाभुळगाव शिवारात पिंजरा लावला. उपविभागीय अधिकारी श्री. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी श्री. गवळी यांनी ही कारवाई केली. पिंजरा लावल्यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. गंगापूर तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी सातत्याने वनविभागाशी संपर्क साधला होता. रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, नांगरे बाभुळगावसह लासूर परिसरातील दहा ते वीस गावांमध्ये गेल्या महिनाभरात बिबटे दिसले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. पण बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याने चिंता कायम आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पिंजरा लावण्यात आला आहे. शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.
प्रतिनिधी | कन्नड कन्नड शहरातील सव्वाशे पथदिवे दोन वर्षांपासून बंद आहेत. हा आकडा नगरपालिकेने दिला आहे. परंतु प्रत्यक्षात हा आकडा पाचशेंच्या आसपास आहे. नगरपालिकेवर प्रशासक राज आहे. मुख्याधिकारी व प्रशासक यांच्यात समन्वय नसल्याने शहरावर अंधाराचे साम्राज्य पसरले असल्याची चर्चा सुरू आहे. नगरपालिकेचे विद्युत अभियंता राहूल करडे म्हणाले, पालिका हद्दीत ३५६५ पथदिवे आहेत. त्यातील १२५ पथदिवे बंद आहेत. काही विद्युत खांबावर दोन दिव्यांऐवजी एका दिव्यावर काम भागवत आहोत. अंधाराचा ब्लॅक स्पॉट होईल, असे स्पॉट फार कमी आहेत. ग्रामीण रुग्णालय, हिवरखेडा रोड या भागांमधील ग्रामीण रुग्णालय, त्रिशरण बुद्ध विहार, म्हाडा कॉलनीचा काही भाग या वसाहतीत गडद अंधार आहे. मुख्याधिकारी रवी लांडे म्हणाले, शासनाने पथदिव्यांसाठी नेमलेल्या कंपनीचे टेंडर संपले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी स्थानिक स्तरावर निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने नुकतेच राज्यातील पालिकांसाठी एसएल कंपनीला टेंडर मंजूर केले आहे. सदर कंपनीकडून विद्युत दिवे पुरवठ्याचे काम सुरू होण्यासाठी दोन महिने लागणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालतात पालिका प्रशासनाला करारनामा करून द्यावा लागतो. त्यासाठी दि. ३ डिसेंबरला व्हीसी झाली. पथदिव्यांच्या सर्व साहित्याचा पुरवठा सुरळीत सुरू झाला तर ही समस्या सुटेल. शासनाने यापूर्वी सगळ्या नगरपालिकांना पथदिवांसाठी एसएल या कंपनीला टेंडर दिले होते. या कंपनीची टेंडर मुदत दोन वर्षांपासून संपलेली आहे. त्यामुळे दिव्यांचा व साहित्याचा पुरवठाही ठप्प आहे. जे पथदिवे बंद पडले आहेत, त्याचे साहित्य स्थानिक मार्केटला मिळत नाही. त्यामुळे पथदिव्यांची दुरूस्ती रखडलेली आहे.
मनपा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील जागावाटपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. शिंदेसेना आणि भाजप यांच्यात स्पष्ट मतभेद समोर आले आहेत. शिवसेनेने २०१५ मधील नगरसेवकांच्या संख्येवर आधारित फॉर्म्युल्यानुसारच युतीत जागावाटप व्हावे, अशी भूमिका आमदार प्रदीप जैस्वाल यांनी घेतली, तर दुसरीकडे तातडीचा निर्णय न घेता कोअर कमिटीत सविस्तर चर्चा करूनच पुढील भूमिका ठरवली जाईल, असे मंत्री अतुल सावे म्हणाले. शहरात एकूण २९ प्रभागांतून ११५ नगरसेवक निवडणूक मैदानात उतरणार आहेत. यातील ६५ हिंदूबहुल जागांवर भाजप-शिवसेनेचा मतदार समान असल्याने युती झाली नाही तर मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे युती होणार की स्वबळावर लढणार, यावरच सध्या राजकीय हालचाली केंद्रित झाल्या आहेत. उद्धवसेनेच्या मुलाखती १७ ला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्धवसेनेने मनपा निवडणुकीसाठी स्वतंत्र निवडणूक समिती जाहीर केली आहे. १७ डिसेंबर रोजी मुलाखती होणार आहेत. शिंदेसेनेच्या निवडणूक समितीत ५ जण एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने शिवसेनेने महापालिका निवडणूक नियोजनासाठी समन्वय समिती आणि निवडणूक समित्या जाहीर केल्या आहेत. ५ जणांची प्रमुख समिती आहे. आज शिंदेसेनेच्या मुलाखती होणार आहेत. संख्याबळावर शिवसेनेचा भर २०१५ मध्ये शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले होते, तर ९ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे या ३८ जागांवर दावा केला जाईल. भाजपचे २३ नगरसेवक वगळून उरलेल्या जागांचे वाटप करावे हे सूत्र शिवसेना मांडणार असल्याचे मानले जाते. सन्मानजनक तोडग्याची भाजपला अपेक्षा निवडणूक स्वबळावर लढण्याचाही पर्याय भाजपने खुला ठेवला आहे. ‘युतीबाबत घाई केली जाणार नाही. दोन्ही पक्षांच्या कोअर कमिटीत चर्चा होईल. सन्मानजनक तोडगा निघाला तरच पुढचा निर्णय घेतला जाईल असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. दहा वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असे किशोर शितोळेंनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या मुलाखती आज वंचित बहुजन आघाडीमार्फत १५ डिसेंबर रोजी पक्ष कार्यालयात मनपा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची अनुषंगाने मुलाखती घेण्यात येणार आहेत. दिव्य मराठी इनसाइड स्टोरी - ‘राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलता येणार नाही’ भाजपने मागील १० वर्षांत संघटनात्मक बांधणी मजबूत केली असून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत त्याचा फायदा झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ‘राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलता येणार नाही’ अशी भूमिका भाजप जिल्हाध्यक्षांकडून मांडली जात आहे. शिवसेना आपल्या पूर्वीच्या ताकदीच्या आधारे अधिक जागांची मागणी करीत आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आपल्या स्वकीयांसाठी जागा सोडून घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राज्यातील कारखान्यांमध्ये कामाचे तास ८ वरून १२ तास करण्याच्या राज्य सरकारच्या वादग्रस्त निर्णयाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या “व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता-२०२०’ मुळे आता कामगारांना दिवसाला केवळ ८ तास आणि आठवड्याला ४८ तास काम करावे लागणार आहे. विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी ही माहिती दिली. विधान परिषदेत आमदार राजेश राठोड, सतेज ऊर्फ बंटी पाटील, अभिजित वंजारी, अशोक ऊर्फ भाई जगताप, डॉ. प्रज्ञा सातव, धीरज लिंगाडे, उमा खापरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, ॲड. निरंजन डावखरे, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, डॉ. परिणय फुके आणि अरुण लाड यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा कळीचा मुद्दा उपस्थित केला होता. ३ सप्टेंबर २०२५ रोजी मंत्रिमंडळाने घेतलेला १२ तास कामाचा निर्णय हा केवळ उद्योगपतींच्या फायद्याचा असून यामुळे कामगारांचे शारीरिक आणि मानसिक शोषण होणार असल्याची भीती या सर्व आमदारांनी व्यक्त केली होती. कामगार संघटनांच्या विरोधानंतर हा निर्णय रद्द करण्याची मागणी या सदस्यांनी लावून धरली होती. कामगार मंत्र्यांनी लेखी उत्तरात मान्य केले की, कारखाना अधिनियम १९४८ मध्ये सुधारणा करून कामाचे तास वाढवण्याबाबतचा अध्यादेशाचा मसुदा ३० सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, दरम्यानच्या काळात २१ नोव्हेंबर २०२५ रोजी केंद्र सरकारने नवीन कामगार संहिता लागू केली. तासांमधील अनिश्चितता संपुष्टात केंद्राच्या नवीन संहितेमध्ये दैनंदिन कामाचे तास ८ आणि आठवड्याचे तास ४८ अशी स्पष्ट तरतूद आहे. त्यामुळे राज्य सरकारचा पूर्वीचा १२ तासांचा प्रस्तावित निर्णय आता मागे पडला असून केंद्राच्या नियमावलीनुसारच कामगारांचे हित जोपासले जाईल. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून कामाच्या तासांमधील अनिश्चितता संपुष्टात आली आहे. कामाच्या तासांचा नियम असा नियमांमधील तरतूद दैनंदिन कामाचे तास ८ तास, साप्ताहिक कामाचे तास ४८ तास, ओव्हरटाइम जर कामगारांना ८ तासांपेक्षा किंवा आठवड्याला ४८ तासांपेक्षा जास्त काम करावे लागले तर त्यांना दुपटीने वेतन मिळण्याचा हक्क आहे. तिमाही ओव्हरटाइम मर्यादा एका तिमाहीत ओव्हरटाइमची कमाल मर्यादा १२५ तास इतकी निश्चित केली जाऊ शकते.
विघ्नहर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने जास्त व्याजाच्या आमिषाने ठेवीदाराची १ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या पतसंस्थेने छत्रपती संभाजीनगरमधील ५० हून अधिक नागरिकांची ५ कोटींची फसवणूक केल्याची शक्यता प्राथमिक तपासात समोर येत आहे. या ठेवीदारांनी ३ महिन्यांपूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. संचालक मंडळाने ठेवीदारांचे पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला, असे ठेवीदार व तक्रारदार तौफिक शेख यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. फिर्यादी शेख तौफिक मोहंमद शफी (रा. टाइम्स कॉलनी, कटकट गेट, छत्रपती संभाजीनगर) हे भुसा तयार करतात. विघ्नहर मल्टिस्टेट सोसायटीत एक वर्षासाठी ठेवी ठेवल्यास १०% ते १२% व्याजाचा परतावा मिळतो, असे शफी यांना संस्थेचे मुख्य सल्लागार मथुरादास देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे तौफिक यांनी १० मे २०२३ पासून टप्प्याटप्प्याने संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर शाखेत एकूण १ कोटी ५ हजार ५०० जमा केले. पैसे मागताच टाळाटाळ तौफिक शेख व इतर ठेवीदार १ जून २०२५ रोजी संस्थेच्या उल्कानगरीतील कार्यालयात गेले. यावेळी मॅनेजरने देशमुख यांना कॅन्सर झाल्याने उपचार सुरू असल्याचे सांगितले. नंतर ठेवीदारांनी वारंवार संचालक डॉ. क्याटमवार, वीरसिंहजी आणि आर. जी. बाहेती यांच्याशी संपर्क साधूनही पैसे देण्यास टाळाटाळ केली. संचालकांची मालमत्ता जप्त करणे शक्य एका कोटीहून अधिक रकमेची फसवणूक असल्याने हे प्रकरण केवळ भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३१८ (फसवणूक) आणि ३१६(गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात) एवढेच नव्हे, तर ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण अधिनियम अंतर्गत कलमे लागू केली आहेत. यामुळे संचालकांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना पैसे परत करणे शक्य.
राज्य सरकारने कर्जमाफीचे वचन दिले आहे. त्याची पूर्तता करण्यासंदर्भात एक समिती तयार केली आहे. कर्जमाफीचा लाभ फक्त शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे यावर भर देण्यात येईल. १ जुलैपर्यत कर्जमाफीच्या योजनेसंदर्भातील घोषणा करू. सिंचनाचा अनुशेष १३ लाख ८३ हजार हेक्टरचा होता. त्यापैकी १३ लाख ३४ हजार हेक्टरचा सिंचनाचा अनुशेष पूर्ण करण्यात आला. आता फक्त अकोला, बुलडाणा व हिंगोली या जिल्ह्यातील ४९ हजार हेक्टरचा सिंचनाचा अनुशेष बाकी आहे. सिंचनाच्या योजना पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात दुष्काळ हा भूतकाळ होईल. २०३५ चा अमृतमहोत्सवी महाराष्ट्र घडवण्याचे प्रयत्न आहे. एकत्रितपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याकरिता प्रयत्न करू. मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही आहे आणि चंद्र, सूर्य असेपर्यत मुंबई महाराष्ट्राचीच राहील. सीबीएसईच्या पुस्तकात यापूर्वी मराठा साम्राज्य एक पानाचा आणि मुघलांचा इतिहास १७ पानांचा होता. आता मराठा साम्राज्याचा इतिहास २१ पानांचा आहे. लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज आदी सर्व योजना संपूर्ण पाच वर्षे सुरू राहतील. व्हिजन डाॅक्युमेंट तयार केले आहे. २०४७ चा विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप तयार केला आहे. आपल्या तिजोरीत खूप पैसे आहे असे म्हणणार नाही. सर्व निकषांवर पात्र होणारी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना सांगितले.१२ ते १३ हजार मेगावॅट वीजनिर्मिती २०२६ मध्ये मोफत विजेसाठी २६ हजार ६८१ कोटी खर्च सीसीआयने उत्पादकतेवर आधारित कापूस खरेदीचा निर्णय घेतला होता. केंद्राशी चर्चा करून २३ किलाे प्रति हेक्टर उत्पादकतेनुसार कापूस खरेदीचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी २६ हजार ६८१ कोटी खर्च करीत आहोत. १६ हजार मेगावॅट सौर वीजनिर्मिती करीत आहोत. यासाठी वेगळी सौर वीजनिर्मिती कंपनी स्थापन केली आहे. आतापर्यंत ३ हजार मेगावॅट निर्मिती पूर्ण झाली आहे. १२ ते १३ हजार मेगावॅट वीजनिर्मिती २०२६ मध्ये पूर्ण करू शकू. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल. यामुळे महावितरणची १० हजार कोटींची बचत होईल. पी. एम. कुसुम योजनेत देशात ११ लाख ९० हजार सौर पंप लावण्यात आले. त्यापैकी ७ लाख ३८ हजार एकट्या महाराष्ट्रात दिले. आतापर्यत विजेचे दर दरवर्षी ९ टक्क्यांनी वाढत हाते. पुढचे पाच वर्षे दरवर्षी २ टक्क्यांनी कमी होणार आहेत. मराठवाड्यावर अन्याय नाही विदर्भ वैधानिक मंडळाची पुनर्स्थापना करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे. त्याचा पाठपुरावा करू. पण, मंडळे नाही म्हणून विदर्भ-मराठवाड्यावर अन्याय होऊ देणार नाही. मराठवाड्यातील दुष्काळी भागाचे चित्र बदलेल. १८ तासांचा प्रवास आठ तासांवर येणार आहे. सर्वात मोठी हवाई प्रशिक्षण संस्था अमरावतीत होत आहे. ३४ विमाने आणत आहेत. २ विमाने पोहोचली आहेत. अमरावतीच्या अर्थ व्यवस्थेला कलाटणी मिळेल. अकोला धावपट्टी वाढवण्यासाठी पैसे दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील दोन तरुण शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. महाबळेश्वरसारख्या थंड हवामानाच्या भागात होणारे हे पीक आता फुलंब्रीतही फुलले आहे. समाधान बलांडे आणि योगेश बलांडे या दोघा तरुण शेतकऱ्यांनी प्रत्येकी पाच गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. सध्या रोज दहा किलो स्ट्रॉबेरी मिळत असून, ४०० रुपये किलोप्रमाणे दोघांना प्रत्येकी २ हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. पुढील चार महिने हे पीक चालणार आहे. तालुक्यात स्ट्रॉबेरीची लागवड नसल्याने ताजी स्ट्रॉबेरी खरेदीसाठी जिल्ह्यातून ग्राहक फोनवर ऑर्डर देत आहेत. समाधान बलांडे यांच्याशी संपर्क साधून थेट ग्राहक त्यांच्याकडून माल घेत आहेत. शेतीतील तोट्यांवर मात करत या तरुणांनी नवा मार्ग दाखवला आहे. स्थानिक पातळीवरच माल विकला जात असल्याने त्यांचा वाहतूक खर्च वाचला. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य झाले. आगामी काळात स्ट्रॅबेरीचे क्षेत्र वाढवण्याचा दोन्ही शेतकऱ्यांचा मानस आहे. महाबळेश्वरहून आणली रोपे महाबळेश्वरहून त्यांनी दहा रुपये प्रतिरोप दराने पाच हजार रोपे विकत घेतली. लागवडीसाठी ५० हजार रुपये खर्च आला. चार फूट रुंदीचे बेड तयार करून एक फूट अंतरावर रोपे लावली. लागवडीनंतर दोन महिन्यांत उत्पादन सुरू झाले. रोज सकाळी ६ ते ७ वाजेच्या दरम्यान स्ट्रॉबेरी तोडून अर्धा किलो व एक किलोचे बॉक्स तयार केले जातात. हे बॉक्स ४०० रुपये दराने विकले जात आहेत. अल्पावधीत मिळते उत्पन्न स्ट्रॉबेरीची लागवड केल्यानंतर फार काळ देखभाल करावी लागत नाही. हे पिक लागवडीनंतर केवळ दोनच महिन्यात उत्पादन निघायला सुरूवात होते. सिंचन, खतांची योग्य मात्रा देऊन वेळोवेळी आवश्यक फवारणी करावी लागते. सिल्व्हर ब्लॅक मल्चिंगचा वापर थंड हवामान नसतानाही स्ट्रॉबेरीचे पीक टिकवण्यासाठी समाधान बलांडे यांनी विशेष तंत्रज्ञान वापरले. काळ्या मल्चिंगऐवजी सिल्व्हर ब्लॅक मल्चिंग पेपर वापरला. यामुळे सूर्यप्रकाश परावर्तित होऊन उष्णता कमी झाली. रोपांच्या खाली बारीक कुट्टीचा चारा अंथरून मातीला थंडावा दिला. ठिबक सिंचन आणि सेंद्रिय खतांचा वापर करून पाने सुकून काळे पडणे आणि पिवळेपणा येणे असे प्रकार टाळले. शेतकरी समाधान बलांडे यांचा मोबाईल क्र. - 8999082526
राज्यात रस्ते अपघातांचा थरार:चालकाचा स्वतःच्याच गाडीखाली चिरडून दुर्दैवी अंत, घटनेने अमरावती हादरले
राज्यात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या भीषण अपघातांनी अमरावती आणि नाशिक जिल्हा हादरला आहे. अमरावतीच्या चिखलदरा घाटात गाडी वाचवण्याच्या नादात चालकाचा स्वतःच्याच गाडीखाली चिरडून मृत्यू झाला, तर इकडे सिन्नरजवळ समृद्धी महामार्गावर टायर फुटल्याने झालेल्या अपघातात कल्याणमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा घाटात एक मनाला चटका लावणारी घटना घडली. पर्यटकांनी भरलेली एक ट्रॅव्हलर बस घाटातून जात असताना, एका प्रवाशाला मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याने गाडी एका उतारावर थांबवण्यात आली. सर्व प्रवासी खाली उतरले असतानाच, उतारावर उभी असलेली बस अचानक दरीच्या दिशेने सरकू लागली. हे पाहताच, बस दरीत कोसळू नये यासाठी चालकाने जिवाची बाजी लावत गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगात असलेल्या बसखाली चालकच चिरडला गेला आणि त्याचा जागीच दुर्दैवी अंत झाला. त्याला मदत करण्यासाठी धावलेले इतर दोन प्रवासीही यात जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. लग्नासाठी आले, पण काळाने गाठले दुसरी घटना सिन्नर तालुक्यातील पाटोळे शिवारात समृद्धी महामार्गावर घडली. कल्याणवरून सिन्नर तालुक्यातील फर्दापूर येथे लग्नासाठी आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. दोन खाजगी बस आणि एका 'किया करेन्स' कारमधून हे वऱ्हाड प्रवास करत होते. कारमध्ये 3 प्रौढ आणि 8 लहान मुले असे एकूण 11 जण होते. गाडी वेगात असताना अचानक टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार उलटून एका ट्रकला जाऊन धडकली. या भीषण अपघातात एक पुरुष आणि एक महिला यांचा मृत्यू झाला असून, 9 जण जखमी आहेत. विशेष म्हणजे जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश अधिक असल्याने वातावरण शोकाकुल झाले आहे. दुपारी 1 वाजता हा अपघात घडला, मात्र अपघातग्रस्त वाहनांच्या ताफ्यातील खाजगी बस तब्बल 4 वाजेपर्यंत घटनास्थळी किंवा रुग्णालयात पोहोचू शकल्या नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. जखमींवर सिन्नर आणि नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सिन्नर पोलिस करत आहेत.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. उत्तर मुंबईतील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या घोसाळकर घराण्यातील महत्त्वाच्या सदस्या, दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर या उद्या, सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दादर येथील भाजपचे कार्यालय 'वसंत स्मृती' येथे सकाळी 10 वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत तेजस्वी घोसाळकर अधिकृतपणे भाजपचे कमळ हाती घेतील. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आणि कट्टर शिवसैनिक कुटुंबातील सदस्या भाजपमध्ये जात असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी घोसाळकर पक्षात नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. त्यातच नुकतीच भाजपची सत्ता असलेल्या मुंबई बँकेवर त्यांची संचालक म्हणून निवड झाली होती. या निवडीनंतरच त्या भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळाले होते, ज्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे राज्यात सध्या नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. येत्या 20 डिसेंबरला उर्वरित मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. यानंतर लगेचच जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि बहुप्रलंबित महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरू झालेले हे पक्षांतराचे सत्र ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. 'सन्मान मिळाला तरच युती'; 50-50 च्या फॉर्म्युल्यावर प्रताप सरनाईक ठाम मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, महायुतीमधील जागावाटपावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्हाला महायुती हवीच आहे, पण ती सन्मानपूर्वकच व्हायला हवी. भाजपला जितक्या जागा, तितक्याच जागा शिवसेनेलाही मिळाल्या पाहिजेत, असा '50-50' चा रोखठोक फॉर्म्युला राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मांडला आहे. वाचा सविस्तर
लग्न सोहळ्यात’वंदे मातरम’चे गायन
अहमदपूर : प्रतिनिधी प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना जागवणारे ‘वंदे मातरम ‘लग्न सोहळ्याच्या सुरुवातीस म्हणून लातूर येथे सूर्यवंशी व मोरे कुटुंबीयांनी लग्न सोहळा पार पडला. एका सुरात उपस्थित दीड ते दोन हजार व-हाडींनी वंदे मातरम म्हटले आणि लग्न मंडपात देशभक्तीची भावना जागविण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळाला. मराठवाड्याचे भाग्यविधाते तथा मन्याडची बुलंद तोफ, तत्त्वशील राजकारणी, श्री शिवाजी […] The post लग्न सोहळ्यात’वंदे मातरम’चे गायन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तिरुपती-पंढरपूर साप्ताहिक रेल्वेसेवा २० डिसेंबरपासून
लातूर : प्रतिनिधी येत्या दि.२० डिसेंबर २०२५ पासून तिरुपती – पंढरपूर व्हाया लातूर साप्ताहिक रेल्वेसेवा सुरु होणार आहे. यापूर्वी ही सेवा १३ डिसेंबरला सुरु होणार होती, मात्र ही रेल्वेसेवा आता २० तारखेपासून सुरु होत असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगांवकर यांनी दिली. तिरुपती – पंढरपूर ही गाडी लातूरमार्गे सुरु करण्यात […] The post तिरुपती-पंढरपूर साप्ताहिक रेल्वेसेवा २० डिसेंबरपासून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे औसा शहरात ‘खिळेमुक्त झाड’ अभियान
लातूर : प्रतिनिधी निसर्ग संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे औसा शहरात ‘खिळेमुक्त झाड’ अभियान राबविण्यात आले. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठ परिसर तसेच धार्मिक व शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील झाडांवर मारलेले खिळे, लोखंडी तारा, जाहिरात फलकांचे अवशेष काढून टाकण्यात आले. या अभियानामुळे झाडांना होणा-या जखमा थांबविण्याबरोबरच नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत संवेदनशीलता निर्माण झाली. […] The post वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे औसा शहरात ‘खिळेमुक्त झाड’ अभियान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर-कल्याण-मुंबई ‘जनकल्याण’ द्रुतगती महामार्गाला सरकारची मंजुरी
लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासात नवा मैलाचा दगड ठरणा-या लातूर-कल्याण-मुंबई ‘जनकल्याण’ द्रुतगती महामार्गाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. ‘इन्फ्रामॅन’ अशी ख्याती असलेल्या मुख्यमंत्र्याच्या या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे लातूर-मुंबई हा दीर्घकाळाचा प्रवास आता फक्त ५ तासांत पूर्ण होणार असून, यामुळे मराठवाड्याच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळणार आहे. सुमारे ४४२ किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती महामार्गासाठी […] The post लातूर-कल्याण-मुंबई ‘जनकल्याण’ द्रुतगती महामार्गाला सरकारची मंजुरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, महायुतीमधील जागावाटपावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्हाला महायुती हवीच आहे, पण ती सन्मानपूर्वकच व्हायला हवी. भाजपला जितक्या जागा, तितक्याच जागा शिवसेनेलाही मिळाल्या पाहिजेत, असा '50-50' चा रोखठोक फॉर्म्युला राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मांडला आहे. पुढील आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज शहरात शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. परिस्थिती बदलली, आता वाटाही वाढ हवा मिरा-भाईंदरमधील राजकीय परिस्थिती आता आठ वर्षांपूर्वीसारखी राहिलेली नाही, असे स्पष्ट करत सरनाईक यांनी भाजपला सूचक इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहरासाठी प्रचंड निधी उपलब्ध झाला असून, गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. त्यामुळे युतीत शिवसेनेला बरोबरीचा वाटा आणि योग्य सन्मान मिळणे आवश्यक आहे, असे सरनाईक यांनी यावेळी अधोरेखित केले. गीता जैन समर्थकांची सेनेत 'इनकमिंग' एकीकडे युतीबाबत कठोर भूमिका मांडतानाच दुसरीकडे शिवसेनेने आपली संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात माजी आमदार गीता जैन यांच्या खंद्या समर्थकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये माजी नगरसेविका नयना वसानी, नारायण नंबियार, मिलन भट, प्रमोद दर्जी, संतोष शेट्टी, विजय इंजिनिअर आणि परवाना कुरेशी यांसारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेशामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे पारडे जड झाल्याचे मानले जात आहे. मिरा-भाईंदरच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असून, जनतेशी नाळ असलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत असल्याचे मत यावेळी सरनाईक यांनी व्यक्त केले.
अचलपुरात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा:नागरिकांना 350 रुपये अधिक मोजून खरेदी करावी लागत आहे
अचलपूर-परतवाडा या जोड शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, त्यांना सिलिंडरसाठी ३५० रुपये अधिक मोजावे लागत आहेत. ९०० रुपयांचे सिलिंडर १२५० रुपयांना खरेदी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार, शहरात दोन गॅस एजन्सीज आहेत, परंतु दोन्ही वितरकांकडून वेळेवर सिलिंडर मिळत नाहीत. गेल्या १५ दिवसांपासून गॅस पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काही ठिकाणी काळाबाजार सुरू आहे, मात्र प्रशासन या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांची सर्रास लूट होत आहे.अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांना दोन गॅस एजन्सींमार्फत एच.पी. गॅसचा पुरवठा केला जातो. धनज प्लांटवरून गॅस सिलिंडरचा पुरवठा होत असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात अनियमितता कशी निर्माण झाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी यावर अद्याप ठोस भूमिका घेत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. विश्वसनीय माहितीनुसार, शहरातील काही अवैध विक्रेत्यांकडून ९०० रुपयांचे घरगुती गॅस सिलिंडर १,२५० ते १,३०० रुपयांना विकले जात आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे. अचलपुरातील दोन व्यक्तींची नावेही या काळाबाजारात चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे दोन्ही गॅस एजन्सीकडील सिलिंडर साठ्याची तत्काळ तपासणी करावी, पुरवठा अपुरा का पडतो याची सखोल चौकशी करावी आणि अवैध गॅस विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.या संदर्भात एजन्सी संचालकांच्या म्हणण्यानुसार, नागपूर येथून अपेक्षित प्रमाणात सिलिंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे. काही एजन्सीकडे स्वतःचे ट्रक नसल्यामुळेही वितरणात अडथळे येत असल्याचे कारण त्यांनी पुढे केले आहे.
राष्ट्रीय बाजार कायद्याला मंजुरी
नागपूर : प्रतिनिधी शेतमालाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होण्याकरिता फडणवीस सरकारने क्रांतिकारी पाऊल उचलले असून राज्यातील पणन व्यवस्थेत क्रांतिकारी परिवर्तन करणारा राष्ट्रीय नामांकित बाजार कायदा दोन्ही सभागृहात मंजूर झाला आहे. हा कायदा राज्यातील पणन व्यवस्थेला अधिक पारदर्शक, स्पर्धात्मक,अत्याधुनिक संसाधनांनी युक्त व शेतकरी-केंद्रित बनविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. […] The post राष्ट्रीय बाजार कायद्याला मंजुरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सचिन-मेस्सीच्या नावाने वानखेडे स्टेडियम दुमदुमले
मुंबई : प्रतिनिधी फुटबॉल विश्वातील दिग्गज अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारत दौ-यावर आला आहे. शनिवारी त्याने कोलकाता आणि हैदराबाद येथे हजेरी लावली. त्यानंतर आज मुंबईत दाखल झाला आणि विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी फुटबॉलचा जादूगार म्हणून ओळख असलेला दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेला […] The post सचिन-मेस्सीच्या नावाने वानखेडे स्टेडियम दुमदुमले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धर्मशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी टी २० मॅच धर्मशाला येथे सुरु आहे. भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवचा हा निर्णय अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा या दोघांनी सार्थ ठरवत सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेला धक्के दिले. आफ्रिकेचे फलंदाज यातून शेवटपर्यंत सावरु शकले नाहीत. दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी […] The post आफ्रिकेला ११७ धावांवर रोखले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

32 C