वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुडपाड परिसरात कॅनलच्या पाण्यात पट्टेदार वाघाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. कॅनलमध्ये पाण्यात तरंगत असलेला वाघाचा मृतदेह पाहून शेतकऱ्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत वाघाचा परिसर सील करून पंचनामा करण्यात आला. प्राथमिक पाहणीत वाघाच्या शरीरावर बाह्य जखमा स्पष्टपणे दिसून न आल्याने मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला की शिकार अथवा विजेचा धक्का, विषबाधा किंवा अन्य कारणामुळे मृत्यू झाला, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच वाघाच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, वन्यजीव जंगल सोडून पाण्यासाठी किंवा भक्ष्यासाठी मानवी वस्त्यांच्या जवळ येत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे वन्यजीव व्यवस्थापनाबाबत वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जंगलातील पाणी, खाद्यसाखळी आणि अधिवासाची योग्य व्यवस्था न झाल्यास अशा घटना वाढण्याची शक्यता असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, तसेच परिसरात गस्त वाढवण्यात येईल, असे आश्वासन वनविभागाकडून देण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असली, तरी अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप युतीबाबत कोणतेही चित्र स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमीवर पुण्यात निर्माण झालेला भाजप-शिवसेना युतीचा पेच आणि मुंबईच्या महापौराबाबत भाजप नेत्यांकडून होणारी विधाने यावर मंत्री उदय सामंत यांनी आज माध्यमांशी बोलताना पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. पुण्यामध्ये युती असल्याचे उदय सामंत काल म्हणाले होते. तर आम्ही अर्ज मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा रवींद्र धंगेकर यांनी घेतला आहे. यावर उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, धंगेकर हे पक्षाची भूमिका मांडणारी व्यक्त नाही. ते महानगरप्रमुख आहेत. काल मी एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाने पुण्यात गेलो होतो. त्यावेळी मी धंगेकर आणि नीलम गोरे यांच्याशी चर्चा केलेली आहे. फॉर्म ठेवायचा की नाही, यासंदर्भातील निर्णय एकनाथ शिंदे घेतील. धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाने मला देखील दिलेले नाहीत. त्यामुळे पुण्याच्या संदर्भात आमची सगळ्यांची एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा होईल. त्यानंतर निर्णय होईल. स्थानिक नेत्यांच्या विधाने अधिकृत मानू नका उदय सामंत म्हणाले की, मी काल पुण्यातही सांगितले की, युती तुटली ही एका महानगरपालिकेची बातमी महाराष्ट्रभर होऊन उपयोग नाही. आज आम्ही युती म्हणून सरकारमध्ये काम करतोय. त्यामुळे स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या रोषामुळे, माध्यमांमध्ये केली जाणारी वक्तव्ये अधिकृत मानू नये. ज्यावेळी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने भूमिका स्पष्ट करतील, तीच भूमिका पक्षाची असल्याची मानावी. यशस्वी युतीची चर्चा करा, वादाची नको पुण्यातील वादावरच चर्चा होत असल्याबद्दल उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. युती तुटली ही एका शहराची बातमी पूर्ण महाराष्ट्रात पसरवून उपयोग नाही. आपण सकारात्मक बाजूही पाहिली पाहिजे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पनवेल, कोल्हापूर आणि इचलकरंजी अशा अनेक महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती यशस्वी झाली आहे, असे उदय सामंत म्हणालेत. कृपाशंकर सिंगांच्या विधानाचा तीव्र विरोध उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणा म्हणजे उत्तर भारतीय महापौर होईल, असे वक्तव्य भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मिरा-भाईंदरमध्ये केले होते. यावर सामंत यांनी कडक भाषेत प्रतिक्रिया दिली. भाजपमध्ये पक्षाची भूमिका मांडण्याचे अधिकार कृपाशंकर सिंग यांना दिले असतील असे मला वाटत नाही. मुंबईचा किंवा कोणत्याही पालिकेचा महापौर कोण असावा, याचे धोरण कृपाशंकर सिंग ठरवू शकत नाहीत. त्याचा निर्णय महायुतीतील सर्व प्रमुख नेते चर्चा करूनच घेतील, असे सांगत त्यांनी हे विधान फेटाळून लावले.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचा रंग भगवा होता. पण उद्धव ठाकरे यांच्या काळात तो हिरवा झाला. त्यांच्या काळात मराठी मुंबई मुस्लिम मुंबई झाली आहे, अशी तिखट टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना केली आहे. भाजप मुस्लिम मुंबई करण्याचे कारस्थान केव्हाही यशस्वी होऊ देणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीने सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. या निमित्ताने सत्ताधारी व विरोधी बाकावरील राजकीय पक्षांत सातत्याने चिखलफेक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेद्वारे ठाकरे बंधू विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, मराठी मुंबई आता मुस्लिम मुंबई झाली आहे. किरीट सोमय्या किंवा अमित शहा यांचा नव्हे तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा हा रिपोर्ट आहे. 2025 मध्ये हिंदू लोकसंख्या 54 टक्क्यांखाली व मुस्लिम लोकसंख्या 30 टक्क्यांवर जाईल. मुंबईत हिंदूंचा जन्मदर 1.3 टक्के, तर मुस्लिमांचा जन्मदर 2.6 टक्के म्हणजे दुप्पट आहे. ठाकरे बंधूंचे मुस्लिम मुंबई बनवण्याचे कारस्थान उद्धव ठाकरेंचा सहकारी एमआयएम पक्ष म्हणतो, मुंबईचा महापौर खान, पठाण किंवा बुरखाधारी व्हावा. हे आमचे लक्ष्य आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यावर एक शब्दही बोलत नाहीत. मुंबईत बांगलादेशींचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यावरही ते चकार शब्द बोलत नाहीत. मुंबईतून माफिया कंत्राटदारांकडून तुम्हाला पैसे मिळतात. त्यामुळे एमआयएम, उद्धव ठाकरे व राज ठाकरे मुस्लिम मुंबई बनवण्याचे कटकारस्थान रचत असतील. पण महायुती त्यांचे कट कारस्थान कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असे सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या पुढे म्हणाले, सध्या मोठ्या ठाकरेंसोबत छोटे ठाकरे एकत्र आलेत. ते मुंबई ही मराठी माणसांची असल्याचा दावा करतात. पण प्रत्यक्षात मुस्लिम मुंबई करण्याच्या कारस्थानात सहभाग घेतात. माझ्याकडे जनगणनेची आकडेवारी आहे. 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा मुंबईत मुस्लिम लोकसंख्या 8.8 टक्के होती. 2011 मध्ये हा आकडा 20.68 टक्क्यांवर पोहोचला. 2025 मध्ये हा आकडा 24.98 टक्क्यांवर पोहोचला. मुस्लिम जन्मदर झपाट्याने वाढत आहे. गत काही वर्षांत बांगलादेशींचे आक्रमण वाढले आहे. जगातील राजधानीच्या मोठ्या शहरांत असेच षडयंत्र सुरू आहे. लंडन व न्यूयॉर्कचा महापौर पाहा. बल्गेरियातही तेच सुरू आहे. बांगलादेशात हिंदूंना मारले जात आहे आणि इथे बांगलादेशींना घुसवले जात आहे. त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व मुंबई महापालिकेला अधिक जागरूक रहावे लागेल. 2026 माझी बांगलादेशी घुसखोरावर बारीक नजर असेल, असे ते म्हणाले. ठाकरेंनी मुस्लिमांपुढे शरणागती स्वीकारली सोमय्या म्हणाले, गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी व्होट जिहाद केला. त्यांनी धारावीत 25 हजार मुस्लिमांचे नेतृत्व करत अनधिकृत मशिदींसाठी पुढाकार घेतला. बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या हिंदुत्त्वामुळे 1992 मध्ये मुंबई वाचली. पण उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांपुढे सपशेल शरणागती स्वीकारली. उत्तर भारतीय असो, गुजराती असो, राजस्थानी असो, हिंदू हा हिंदूच आहे. पण उद्धव ठाकरेंना मुंबईचा महापौर नाही तर महापालिकेतील माफिया कंत्राटदारांवर त्यांचे नेतृत्व हवे आहे. याऊलट भाजपचे लक्ष मुंबईच्या विकासावर आहे.
धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व विमानतळांच्या विकासकामांमध्ये तसेच धोरणनिर्मितीमध्ये सुसूत्रता राहावी,या उद्देशाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.केंद्र शासनाची ‘उडान’ योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण केंद्र शासनासाठी नोडल एजन्सी म्हणून काम पाहते,तर राज्यात ही योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा […] The post धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर विराजमान होईल. या ठिकाणी उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू, असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना डिवचले आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजकारण मुंबई, मराठी माणूस आणि उत्तर भारतीयांना विरोध करूनच सुरुवात झाले. उत्तर भारतीयांना अनेकदा या पक्षांनी वेगवेगळी कारणे पुढे करत मारझोडही केली. आता ऐन निवडणुकीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध उत्तर भारतीय हा मुद्दा मुंबईत पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठी माणसा जागा हो, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कृपाशंकर सिंहाना उत्तर दिले आहे. नेमके प्रकरण काय? कृपाशंकर सिंह यांनी विशेषतः मीरा-भाईंदर महानगरपालिकेबाबत मोठा दावा केला आहे. उत्तर भारतीय समाजातील व्यक्तीला महापौरपदावर बसवण्यासाठी आवश्यक तेवढे नगरसेवक निवडून आणले जातील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. उत्तर भारतीय मतदारांची संख्या आणि त्यांचा राजकीय सहभाग लक्षात घेता, हा समाज निर्णायक ठरू शकतो, असा संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळतो. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करून महापौरपदापर्यंत मजल मारण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्राबाबत अंदाज कृपाशंकर सिंह यांनी केवळ एका महानगरपालिकेपुरता मुद्दा न ठेवता, संपूर्ण महाराष्ट्राबाबत भाकीत केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होईल, असा ठाम दावा त्यांनी केला. या विधानामुळे महायुतीकडून निवडणुकांची तयारी जोरात सुरू असल्याचे संकेत मिळतात. विशेषतः मुंबई महानगरपालिका, मीरा-भाईंदरसारख्या शहरी भागांमध्ये सत्ता मिळवण्याचा निर्धार महायुतीने केल्याचे या वक्तव्यातून स्पष्ट होते. निवडणूक रणनीतीचा भाग महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांची एकत्रित ताकद आणि विविध समाजघटकांवर असलेली पकड लक्षात घेता, सिंह यांचे विधान केवळ राजकीय घोषणा नसून निवडणूक रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे. विशेषतः उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना राजकीय प्रतिनिधित्वाची भावना देण्यासाठी हा मुद्दा पुढे आणल्याचे चित्र दिसून येत आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू दरम्यान, कृपाशंकर सिंह यांच्या या विधानामुळे मुंबई आणि राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या प्रभावाखाली असलेल्या मुंबईत उत्तर भारतीय महापौराचा दावा केल्याने आगामी निवडणुकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना वेग येण्याची चिन्हे आहेत. महायुतीची ही भूमिका प्रत्यक्ष निवडणुकांत कितपत प्रभावी ठरते, आणि उत्तर भारतीय मतदारांचा कौल कोणत्या दिशेने जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वीच या वक्तव्याने राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाल्याचे स्पष्ट होत आहे. मनसेचे प्रत्युत्तर कृपाशंकर सिंह यांच्या या विधानावर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील प्रत्यत्तर दिले आहे. या संदर्भात मनसेने म्हटले की, मुंबईसह सर्वत्र आम्ही इतके उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणू की, महापौर उत्तर भारतीयच असेल... हे विधान आहे भारतीय जनता पक्षाच्या कृपाशंकर सिंग यांचं... चरितार्थासाठी आलेल्या, उत्तर भारतीयांना मराठी माणसाने आश्रय दिला आणि याच उत्तर भारतीयांनीच आज मराठी माणसाच्या डोक्यावर थयथय नाचायला सुरुवात केली आहे. मराठी माणसा आतातरी जागा हो..!
हातात भाजपचे तिकीट असूनही एका उमेदवाराला आपली उमेदवारी दाखल करता आली नसल्याची विचित्र गोष्ट मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 212 मध्ये घडली आहे. यामुळे भाजपला निवडणुकीपूर्वीच एका जागेचा फटका सहन करावा लागला आहे. वेळ खरोखरच फार मौल्यवान असतो. तो कुणासाठीही थांबत नाही. याची अनेकांना प्रचिती येते. हीच प्रचिती मंगळवारी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराला आली. मंगळवारी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यासाठी सर्वच उमेदवारांची ठराविक वेळेत अर्ज भरण्यासाठी पळापळ सुरू होती. पण वॉर्ड क्रमांक 212 मधील भाजपच्या उमेदवार मंदाकिनी खामकर यांना 15 मिनिट उशीर झाल्यामुळे हातात भाजप सारख्या बलाढ्या पक्षाचा फॉर्म असूनही तो भरता आला नाही. वेळेचे व्यवस्थापन करण्यात चूक अन् जन्माची अद्दल त्याचे झाले असे की, भाजपने मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 212 मध्ये मंदाकिनी खामकर यांना उमेदवारी दिली होती. पक्षाने वेळेत त्यांना एबी फॉर्मही दिला होता. पण निवडणूक अर्जासोबत जोडाव्या लागणाऱ्या नवीन बँक खात्याच्या कामासाठी त्या बँकेत गेल्या होत्या. दुर्दैवाने बँकेतील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. बँकेतील काम आटोपून मंदाकिनी खामकर जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचल्या, तेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच होती. पण मंदाकिनी खामकर 15 मिनिटे उशिरा प्रभाग कार्यालयात पोहोचल्या. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपली असून, खिडकी बंद झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. त्यामुळे हातात भाजपसारख्या बलाढ्य पक्षाचे तिकीट असूनही त्यांना वेळ पाळण्यात झालेल्या अक्षम्य चुकीमुळे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावे लागले. यामुळे मुंबई महापालिकेच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपला निवडणुकीपूर्वीच एका जागेचा फटका सहन करावा लागला. सध्या वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपचा एकही अधिकृत उमेदवार नाही. त्यामुळे पक्षापुढे कुणाला पाठिंबा द्यायचा? हा पेच उभा टाकला आहे. दरम्यान, वेळ फार मौल्यवान असते, ती कुणासाठीही थांबत नाही हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हे ही वाचा... ठाकरे गटाने मनसेचा आवळा देऊन कोहळा काढला:भाजपचा आरोप; काँग्रेसने वंचितचे जे केले तेच उद्धव यांनी राज ठाकरेंचे केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला आवळा देऊन कोहळा काढल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. ठाकरे गटाने सन्मानाच्या नावाने राज ठाकरेंना घरी बोलावले व तसेच त्यांच्या घरी फेऱ्याही मारल्या. पण प्रत्यक्षात 50 जागांवरच मनसेची बोळवण केली, असे भाजपने म्हटले आहे. वाचा सविस्तर
नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज!
मुंबई : प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. सध्या राज्यात महापालिकेच्या निवडणुकांचे वातावरणही आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. २०२५ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सध्या मुंबई, पुणे, नागपूर यांसह बहुतांश ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. […] The post नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सातारा जिल्ह्यातील कराड नगरपालिकेतील सत्तास्थापनेनंतर एक भावनिक आणि तितकाच राजकीय अर्थ लावला जाणारा प्रसंग मध्यरात्री पाहायला मिळाला. भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची घेतलेली गळाभेट राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे राजेंद्रसिंह यादव हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते असून त्यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. तरीही उदयनराजेंनी वैयक्तिक मैत्रीपोटी घेतलेली ही भेट आणि त्यावेळी त्यांच्या डोळ्यांतून ओघळलेले आनंदाश्रू अनेक राजकीय संकेत देणारे मानले जात आहेत. कराड नगरपालिकेत शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या युतीने सत्ता स्थापन केली असून राजेंद्रसिंह यादव यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. या विजयानंतर मध्यरात्री उदयनराजे भोसले थेट यादव यांच्या भेटीसाठी पोहोचले. गळाभेट घेताच उदयनराजेंना भावना आवरता आल्या नाहीत. पार्टी पाहिजे, पार्टी, असे मिश्कील शब्द उच्चारत मित्राला शुभेच्छा देताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू स्पष्टपणे दिसत होते. हा क्षण उपस्थितांसाठी अनपेक्षित आणि भावूक करणारा ठरला. राजेंद्रसिंह यादव आणि त्यांचे बंधू विजय यादव हे दोघेही उदयनराजे भोसले यांचे जुने मित्र असल्याची माहिती आहे. वैयक्तिक मैत्रीचे नाते जरी घट्ट असले, तरी याच नगरपालिकेच्या निवडणुकीत यादव बंधू आणि भाजप आमनेसामने होते. त्यामुळेच या निवडणूक प्रक्रियेत खासदार उदयनराजे भोसले मुद्दामहून लांब राहिले होते. पक्षीय भूमिका आणि वैयक्तिक संबंध यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे बोलले जात होते. मात्र निकालानंतर मित्र नगराध्यक्ष झाल्याचे कळताच उदयनराजेंनी कोणताही राजकीय विचार न करता थेट भेट घेतल्याचे चित्र समोर आले. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने नगराध्यक्षपद पटकावल्यानंतर, भाजप खासदाराने त्याची गळाभेट घेणे हा केवळ भावनिक क्षण नसून त्याचे राजकीय अर्थही काढले जात आहेत. सातारा जिल्ह्यातील राजकारणात उदयनराजे भोसले यांचे वजन मोठे आहे. अशा परिस्थितीत ही भेट केवळ वैयक्तिक मैत्रीपुरती मर्यादित आहे की त्यामागे भविष्यातील काही राजकीय संकेत दडले आहेत, यावर चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या भेटीदरम्यान उदयनराजेंनी राजेंद्रसिंह यादव यांचे मनापासून अभिनंदन केल्याचे सांगितले जाते. मित्राच्या यशाचा आनंद व्यक्त करताना त्यांनी कोणताही पक्षीय रोख न ठेवता मोकळेपणाने संवाद साधल्याचे उपस्थितांनी सांगितले. मित्र जिंकला, एवढंच महत्त्वाचं आहे, अशी भावना त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट होत होती. निवडणुकीच्या राजकारणात क्वचितच पाहायला मिळणारा हा भावनिक क्षण असल्याने तो अधिकच लक्षवेधी ठरला. दरम्यान, या गळाभेटीनंतर साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत असतानाही उदयनराजेंनी घेतलेली ही भूमिका अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरली आहे. आगामी स्थानिक राजकारणात या मैत्रीचे प्रतिबिंब कसे उमटते, आणि याचा कोणता राजकीय परिणाम होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी मित्र नगराध्यक्ष झाल्याचा आनंद, हीच या भेटीची अधिकृत ओळख असली, तरी राजकारणात अशा भेटी कधीच केवळ भावनिक राहत नाहीत, हेही तितकेच खरे आहे.
भाजपने निष्ठावंतांना डावलून उपऱ्या लोकांना तिकीट दिल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या संयमाचा उद्रेक झाल्याची भावना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी व्यक्त केली आहे. भाजपचे सध्याचे धोरण वापरा व फेकून द्या असे आहे. त्यामुळे संभाजीनगरात इच्छुक उमेदवारांचा आक्रोश दिसून येत आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी आमच्या पक्षातही काही ठिकाणी उपरे लोक घेतल्याच्या तक्रारी येत असल्याची कबुली दिली. महायुती तुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून सुरू झालेला गृहकलह आता जवळपास नियंत्रणाबाहेर गेला आहे. मंगळवारी रात्री भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयापुढे संतप्त कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गोंधळ घाला. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची गाडी रोखून धरली. तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला काळे फासून आपला निषेध नोंदवला. यावेळी प्रशांत भदाने नामक इच्छुक उमेदवाराने आपल्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी सावे व कराड यांनी पोलिस संरक्षणात तेथून काढता पाय घेतला. भाजपमध्ये राडा तर होणारच या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या अंतर्गत कलहावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, भाजमध्ये राडा तर होणारच आहे. कारण, सर्वच पक्षांमध्ये, आमच्याही पक्षामध्ये काही ठिकाणी उपरे लोकं घेतल्याच्या तक्रारी येत आहेत. भाजपमध्ये हे प्रमाण सर्वात जास्त आहे. भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याची ओरड होत आहे. निष्ठावंतांना डावलण्यात आल्याची चर्चा जोरात आहे. त्यातून हा उद्रेक झाला आहे. खरे तर भाजपचे धोरण वापरा आणि फेकून द्या असे आहे. त्यामुळे संभाजीनगरात जो आक्रोश दिसत आहे, तो बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी दिल्यामुळे होत आहे. पूर्वी काँग्रेसची जी स्थिती होती ती स्थिती आता भाजपची झाली आहे. ते पुढे म्हणाले, संभाजीनगरमध्ये भाजप - शिवसेनेची युती होण्याचे शेवटपर्यंत संकेत होते. पण काल त्यांनी वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांना जागा देण्याचा स्कोप होता. परंतु त्यांनी तसे केले नाही. सध्या जे वातावरण तयार झाले ते त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मला त्यावर अधिक भाष्य करणे चुकीचे वाटते. पण एक गोष्ट नक्की आहे की, काँग्रेस वैचारिक दृष्टिकोनातून लढत आहे, तर भाजप हा सत्ता मिळवण्यासाठी निष्ठा बाजूला ठेवून निवडणूक लढवत आहे व त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी तिकीट वाटप केले हे स्पष्ट होते, असे वडेट्टीवार म्हणाले. काय म्हणाले भाजपचे इच्छुक उमेदवार? भाजपचे इच्छुक उमेदवार प्रशांत भदाने आपल्या पक्षावर संताप व्यक्त करताना म्हणाले की, मी सर्वेक्षणात आघाडीवर होतो. रात्रंदिवस पक्षासाठी झटलो, पण साहेबांनी त्यांच्या पीएला तिकीट देऊन माझा घात केला. मला अंधारात ठेवले गेले. आता मला काही झाले तर त्याला नेतृत्व जबाबदार असेल.
नवीन वर्षाची सुरुवात आणि शेवट गुरुवारने होणे हे बृहस्पती ग्रहाच्या प्रभावामुळे शुभ मानले जाते. हिंदूनववर्षाचा शुभारंभ १९ मार्च (चैत्र)२०२६ रोजी गुरुवारनेच तर इंग्रजी नवीन वर्षाचा शुभारंभ १ जानेवारी २०२६ रोजी गुरुवारनेच होत आहे. २०१५ नंतर म्हणजेच १० वर्षांनी असायोग जुळून आला आहे. गुरुवार हाभगवान विष्णू, गुरू व ज्ञान-समृद्धीयांना समर्पित आहे. तसेच गुरुवारी सुरू होणारे नववर्ष ज्ञान, धर्म व आर्थिक स्थिरतेचे सूचक मानले जाते. अंकशास्त्रानुसार विचार केलातर २०२६ या वर्षाच्या आकड्यांची बेरीज (२+०+२+६) १० येते. म्हणजे या वर्षाचा मुलांक १ असेल. १ क्रमांक हा नेतृत्वगुण दर्शवतो. अंकशास्त्रानुसार १ या क्रमांकाचाअधिपती सूर्यदेव असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य हा ऊर्जेचा सर्वातमोठा स्त्रोत आहे. त्यामुळे आगामीनवीन वर्ष देश व समाजाला नवीन ऊर्जा देणारे ठरेल, अशी आशा देखील आहे. मंगळ व शनी ग्रहाच्या योगामुळे काही नैसर्गिक व रस्ते अपघातासारख्या दुर्घटनांचे संकटही ओढावू शकते. ज्योतिषाचार्यांच्यामते हे नवीन वर्ष देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरेल. आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंध मजबूत होतील. यातून देशाचा मान वाढेल. मार्चमहिन्यात गुरू जेव्हा मिथुन राशीतथेट प्रवेश करेल तेव्हा उद्योग, व्यापार व शिक्षण क्षेत्राला लाभमिळू शकेल. पूर्व व उत्तरेत कृषी वव्यवसायाच्या संधी वाढतील. शनीव राहूच्या प्रभावामुळे शेअर बाजारातही तेजी येण्याची आशाआहे. सध्या दिवसेंदिवस महाग होतचाललेल्या चांदीचे दर नवीन वर्षातकाही प्रमाणात कमी होऊ शकतात.मंगळाच्या प्रभावामुळे भूखंड व रिअल इस्टेटमध्ये खरेदीचे प्रमाणवाढेल. नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारने होण्याचा १०० वर्षांतील हा १३ वा योग आहे. गुरुवारने नववर्षाची सुरुवात होणे हिंदूच नाहीतर जैन, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, मुस्लिम धर्मातही आस्था, ज्ञान, दानव शुभकार्याचे प्रतीक मानले गेले असल्याचे ज्योतिष-पुरोहितांनी‘दिव्य मराठी’ला सांगितले. दिव्य मराठी नॉलेज - १ ते ९ मूल्यांक असणाऱ्यांवर परिणाम १ कार्यक्षेत्रात प्रगती,मान- सन्मान वाढेल. २ धार्मिक क्षेत्रातीललोकांशी भेटीगाठीवाढतील. भाग्याचे योग. ३ सामाजिक प्रतिष्ठावाढेल. प्रवासाचे योग. ४ कार्यक्षेत्रात अडचणीयेतील, खर्चही वाढेल. ५ कुटुंबीय, स्वकीयांच्यामदतीने अपूर्ण राहिलेलेकार्य पूर्ण होतील. ६ गुप्त शत्रूंपासून सावधान राहणे गरजेचे. ७ जागा आणि वास्तूखरेदीचे योग येतील. नवीन खरेदीला प्राध्यान. ८ भागीदारांसोबत कुरबुरींमुळे व्यवसायात अडचणी येऊ शकतात. ९ बुद्धिचातुर्यामुळे नवीनकार्यात यश मिळेल.धनप्राप्तीचे यंदा चांगले योग येणार आहे. सर्व धर्मात असे आहे गुरुवारचे महत्त्व जैन : जैन परंपरेत हादिवस गुरुवंदना, ज्ञान, स्वाध्याय, संयमाशी जोडलेला आहे. अनेकदागुरुवारी धर्मप्रवचन, शास्त्र अध्ययन होते. बौद्ध : गुरुवार ध्यान,करुणा व प्रज्ञा याचे प्रतीकमानले जाते. या दिवशीबौद्ध विहारात धम्मदेसना,ध्यान सत्र व प्रार्थना होते. शीख : शीख धर्मातगुरुवारला गुरू परंपरा वज्ञानाशी संबंधित दिवसमानला जातो. मुस्लिम : मुस्लिमबांधवात गुरुवार(जुमेरात)ला पूर्वजांच्याकबरीवर फातेहा(प्रार्थना) म्हणतात.तसेच त्यांच्या आठवणीतदानही देतात. ख्रिश्चन : ख्रिश्चनधर्मात गुरुवार हा मॉडीथर्सडे (होली थर्सडे) चेविशेष महत्त्व आहे. हादिवस येशूंच्या अंतिमभोजनाशी संबंधित आहे.या दिवशी सेवाकार्यालाअधिक प्राधान्य देतात. पहिल्याच दिवशी चतुर्ग्रही योग, कुंडलीत सूर्य-मंगळ फलदायी ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार,नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्य धनूराशीत आणि मंगळ, बुध व शुक्राचेचतुर्ग्रही योग आहेत. जेव्हा एकाच राशीतचार ग्रह एकत्र येतात तेव्हा तयार होणारीशक्तिशाली ग्रहस्थिती म्हणजे चतुर्ग्रहीयोग. सूर्य- चंद्राच्या प्रभावामुळे देशप्रगतिपथावर जाईल. लष्कराचे शौर्यवाढेल व खेळांतही देशाचा नावलौकिकवाढेल. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य वमंगळाची स्थिती चांगली आहे, त्यांनाविशेष लाभ मिळू शकेल. आता पुढील गुरुवारचा संयोग हा २०४३ वर्षालाच येणार सन १९२६ ते २०२५ या १०० वर्षांत आतापर्यंत १२ वेळा वर्षाची सुरुवातगुरुवारने झाली आहे. यात १९३१,१९४२, १९५३, १९५९, १९७०, १९७६,१९८१, १९८७, १९९८, २००४, २००९ व१०१५ या वर्षात नवीन वर्षाचा पहिलादिवस गुरुवारी आला होता. २०२६या वर्षानंतर आता नवीन वर्षाचीगुरुवारने सुरुवात होण्याचा संयोग हा२०४३ मध्ये येईल. यंदाच्या २०२६मध्ये आलेला गुरुवारचा योग हा खूपच फलदायी असा आहे. दिव्य मराठी एक्सपर्ट- विनोद त्रिपाठी, ज्योतिष तज्ज्ञ गुढीपाडवा शालिवाहन शकाचा प्रारंभदिवस, तो ७८ इसवी सनात सुरू झाला इंग्रजी वर्ष २०२६ आणि भारतीय वर्ष शके १९४८ चीसुरुवात गुरुवारी आहे. हा योग अतिशय दुर्मीळ असून, हेवर्ष सर्वांसाठी लाभप्रद आहे. गुढीपाडवा हा शालिवाहनशकाचा प्रारंभ दिवस आहे, जो सुमारे ७८ इसवी सनातसुरू झाला तर विक्रम संवत याच दिवशी सुरू होते; हेदोन्ही विक्रम (शालिवाहन शक आणि विक्रम संवत)हिंदू कालगणनेतील महत्त्वाचे संवत्सर आहेत.गुढीपाडवा हा चैत्र शुक्ल प्रतिपदेला येणारा मराठी व हिंदूनववर्षाचा पहिला दिवस असतो. त्यामुळे तो जल्लोषातसाजरा करण्याची प्रथा देखील आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला आवळा देऊन कोहळा काढल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. ठाकरे गटाने सन्मानाच्या नावाने राज ठाकरेंना घरी बोलावले व तसेच त्यांच्या घरी फेऱ्याही मारल्या. पण प्रत्यक्षात 50 जागांवरच मनसेची बोळवण केली, असे भाजपने म्हटले आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू व मनसेची युती झाली आहे. यामुळे सत्ताधारी महायुतीचे मुंबईतील राजकीय समीकरण बिघडल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली आहे. काँग्रेसने वंचित सोबत जे केले तेच उद्धव यांनी राजसोबत केले भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये या प्रकरणी म्हणाले की, आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं तेच केलं, जे काँग्रेसने वंचितसोबत केलं आहे. पडेल जागा देत काँग्रेसने मुंबईत वंचितशी आघाडी केली, तर किरकोळ जागा देत उबाठाने मनसेला गुंडाळलं. सन्मानाच्या नावाखाली बोलावणं, वारंवार राज ठाकरेंच्या घरी फेऱ्या मारण… ठाकरे ब्रॅन्डच्या घोषणा करण हे सगळं उबाठा ने केलं, पण प्रत्यक्षात मर्यादित जेमतेम ५० जागांवर समाधान मानायला लावलं. यालाच आवळा देऊन कोहळा काढणे म्हणतात, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंचा 2019 नंतर भाजप विरोध हाच केंद्रबिंदू केशव उपाध्ये यांनी नुकतीच एका लेखातूनही उद्धव व राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते, उद्धव ठाकरेंनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यापासून आजवर एकदाही महाराष्ट्राचा व मुंबईचा विकास करण्यासंदर्भातील आपल्या दृष्टिकोनाचा एकदाही परिचय करून दिलेला नाही. 2019 नंतर त्यांनी आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू भाजपच्या विरोधात स्थिर करताना काँग्रेस, शरद पवार, कम्युनिस्ट, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल अशा राष्ट्रीय राजकारणातील म्होरक्यांबरोबर पाट लावला. उद्धव ठाकरेंना सक्रिय राजकारणात येऊन 25 वर्षे होऊन गेली आहेत. या काळात मुंबई महापालिका ताब्यात ठेवताना आणि अडीच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम पाहताना उद्धव ठाकरेंना मुंबई, महाराष्ट्र व मराठी माणसाच्या कल्याणाचे काहीच देणे-घेणे नाही, हे अनेकदा दिसले आहे, असे ते म्हणाले होते. ते पुढे म्हणाले होते, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाल्यानंतर उद्धव ठाकरेंना आपणच घरातून बाहेर काढलेल्या चुलत-मावस भावाची आठवण झाली. ज्या मनसेची संपलेला पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंनी हेटाळणी केली होती, त्याच राज ठाकरेंच्या दारात जाण्याची वेळ नियतीने त्यांच्यावर आणली. आता मनोमिलनानंतरही ठाकरे बंधू मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, यासारख्या घासून घासून गुळगुळीत झालेल्या मुद्यावरच बोलू लागले आहेत. मुंबापुरीचा विस्तार होत असताना मुंबईकरांपुढे दररोजच्या जगण्यातील हजारो प्रश्न तयार झाले आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल, याविषयी गांभीर्याने बोलण्याऐवजी ठाकरे बंधू पुन्हा मुंबई, मराठी या भावनात्मक विषयामध्ये मराठी मतदाराला गुंतवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.
महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये बंडाळीचा वणवा पेटला आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचा आरोप करत आज कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आज भाजप कार्यालयात आले असता, संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला. भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी अनेक जुन्या नगरसेवकांचे आणि दिग्गजांचे पत्ते कट केल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. आज सकाळी डॉ. भागवत कराड आज सकाळी प्रचाराबाबत चर्चा करण्यासाठी भाजप कार्यालयात पोहोचले. मात्र, तेथे आधीच जमलेल्या नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला वेढा घातला. कार्यकर्त्यांचा संताप इतका अनावर झाला होता की, काहींनी कराडांच्या गाडीवर हात मारत आपला संताप व्यक्त केला. निष्ठावंतांना डावलल्याचा गंभीर आरोप ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, आंदोलने केली आणि पक्षाला शहरात मोठे केले, त्यांनाच आज उमेदवारी नाकारण्यात आली आहे, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. अनेक प्रभागांमध्ये विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापून तिथे नवख्या किंवा बाहेरून आलेल्यांना संधी दिल्याने निष्ठावंतांनी आता आरपारची लढाई पुकारली आहे. कालही दिव्या मराठे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी असाच पवित्रा घेतला होता, आज दुसऱ्या दिवशी हा संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. यंदा भाजप-शिवसेनेला रोखण्यासाठी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी युती टिकवण्यासाठी मोठे मन दाखवत वंचितला 62 जागा देऊ केल्या होत्या. मात्र, अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर समोर आलेल्या माहितीने काँग्रेस नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. वंचितला दिलेल्या 62 जागांपैकी तब्बल 16 जागांवर पक्षाने उमेदवारच उभे केलेले नाहीत. त्यामुळे आता काँग्रेससमोर मोठी नामुष्की ओढावली आहे. मुंबईत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडून 62 जागा मागून घेतल्या. मात्र, मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितने 62 जागांच्या कोट्यापैकी केवळ 46 जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. उर्वरित 16 जागांवर पक्षाला उमेदवारच मिळाले नसल्याची चर्चा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्याकडे उमेदवार नाहीत याची पुसटशी कल्पनाही वंचितने काँग्रेसला दिली नाही. जर काँग्रेसला वेळीच माहिती मिळाली असती, तर त्यांनी त्या 16 जागांवर आपले प्रबळ उमेदवार उभे केले असते. मात्र, मुदत संपल्यानंतर ही बाब समोर आल्याने काँग्रेसला आता तिथे 'एबी' फॉर्म देता येणे अशक्य झाले. आता बंडखोरांना पाठिंबा देण्याची नामुष्की ज्या 16 जागांवर वंचितने उमेदवार दिलेले नाहीत, त्यातील अनेक प्रभागांत काँग्रेसची ताकद चांगली आहे. युतीमध्ये मिठाचा खडा पडू नये म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठे मन करत, या जागा वंचितला सोडल्या होत्या. आता या जागांवर काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसल्याने, पक्षाला तिथे बंडखोरी करून अपक्ष उभ्या राहिलेल्या स्वपक्षीय कार्यकर्त्यांनाच पाठिंबा देण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाईल. मुंबईत वंचितने दिलेल्या या अनपेक्षित धक्क्यामुळे काँग्रेसच्या गोटात तीव्र संताप व्यक्त होत असून, आगामी प्रचाराच्या काळात या युतीचे भवितव्य काय असेल? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 1999 नंतर काँग्रेसचा सर्वाधिक जागांवर लढणार जागावाटपातील हा गोंधळ सोडला तर, काँग्रेसने यंदा राज्यात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. 1999 नंतर पहिल्यांदाच काँग्रेस महापालिका निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वबळावर आणि आघाडी करून मैदानात उतरली आहे. काँग्रेस कोणत्या शहरात किती जागा लढवत आहे? काँग्रेसचा स्वबळाचा नारा कोणत्या शहरांत? नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या महापालिकांमध्ये काँग्रेस पूर्णपणे स्वबळावर निवडणूक लढवत आहे. तर लातूर महानगरपालिका निवडणुकीत 5 जागा वंचितला सोडण्यात आल्या असून बाकी सर्व जागा काँग्रेस लढत आहे. नांदेडमध्ये 20 जागा वंचितला बाकी सर्व ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने मुंबई वगळता राज्यभरातील महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत मतदारांकडून एखाद्या उमेदवाराला मतदान करण्यास होणारा विरोध व त्यामुळे मतदान प्रक्रियेत होणारा गोंधळ व विलंब टाळण्यासाठी मतदान यंत्रावरील (ईव्हीएम) ईएनडी बटण बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एखाद्या मतदाराने पसंतीच्या उमेदवाराला किंवा वरीलपैकी कुणीही नाही अर्थात नोटाला मत देण्यास नकार दिल्यास मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्राधिकाऱ्याने उपस्थित मतदान प्रतिनिधींसोबत नोटाचे बटन दाबून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश आयोगाने दिलेत. राज्यात मुंबई महापालिका वगळता अन्य निवडणुकांत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेतली जाते. त्यानुसार प्रत्येक मतदाराला प्रभागाप्रमाणे 4-5 मते देण्याचा अधिकार आहे. या तरतुदींचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विकसित केलेल्या ईव्हीएमच्या बॅलेट युनिटवर शेवटचे (16 वे) बटण ईएनडीचे ठेवले आहे. आयोगाने का घेतला बटन बंद करण्याचा निर्णय? राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2022 च्या आदेशान्वये मतदान यंत्रावरील ईएनडी बटण कसे वापरायचे याविषयीचे आदेश दिले होते. या निर्णयानुसार, मतदारांकडून त्यांच्या प्रभागात 5 उमेदवारांना मत देणे अभिप्रेत असतानाही ते केवळ 2 उमेदवारांना मत देतात. त्यानंतर नोटा बटन दाबून निवडणूक प्रक्रिया संपल्याचे निर्देशित करावे लागते. पण मतदार हे बटन दाबत नाहीत. यामुळे त्याची मतदान प्रक्रिया पूर्ण होत नाही. परिणामी मतदान केंद्राधिकाऱ्यांनाच नोटाचे किंवा ईएनडी बटनाचा वापर करून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. स्थानिक पातळीवर या बटनाविषयी येणाऱ्या विविध अडचणी तथा मतदानास होणारा विलंब पाहता क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत आयोगाने या निवडणुकीत ईएनडी बटन पांढऱ्या मास्किंग टॅबने बंद करण्याचे आदेश दिलेत. आयोगाने काय दिले आहेत आदेश? जे मतदार मतदान कक्षात आल्यानंतर आपले मतदान पूर्ण करणार नाहीत, तसेच नोटाचे बटही दाबण्यास नकार देतील, त्या ठिकाणी मतदान यंत्र पुढील मतदाराच्या मतदानासाठी सज्ज ठेवण्यासाठी आयोगाने पुढीलप्रमाणे प्रक्रिया सूचवली आहे. एखादा मतदार आपले मतदान पूर्ण न करता मतदान कक्षातून बाहेर पडला तर मतदान अधिकारी किंवा मतदान केंद्राध्यक्षांना कंट्रोल युनिटवरील लाल दिवा न विझल्यामुळे व बिप साऊंड न वाजल्यामुळे मतदाराने मतदान पूर्ण केले नाही ही गोष्ट लक्षात येईल. त्या स्थितीत मतदान केंद्र प्रमुखांनी संबंधित तदाराला त्याचे मतदान पूर्ण न झाल्याची कल्पना देऊन पसंतीच्या उमेदवाराला मत देऊन अथवा नोटा बटन दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती करावी. त्यानंतरही मतदाराने मत देण्यास अथवा नोटा या पर्यायासमोरील बटन दाबण्यास नकार दिला तर मतदान केंद्र प्रमुखांनी बॅलेट युनिटवरील उमेदवारांच्या नावापुढील दिवे एखादा एखादा पुठ्ठा किंवा पुस्तक ठेवून झाकावेत. त्यानंतर मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या सर्व मतदान प्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांच्या साक्षीने ज्या मतपत्रिकेवरील मतदान अपूर्ण राहिले आहे, त्या मतपत्रिकेवरील नोटा या पर्यायासमोरील बटन दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच ही प्रक्रिया करताना मतदाराने केलेल्या मतदानाची माहिती कुणालाही मिळणार नाही याची पुरेशी खबरदारी घ्यावी, असे आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
निष्ठावंतांना वर्षानुवर्षे पक्षासाठी झटूनही उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागतो, मग दुसऱ्या पक्षातून गेलेल्यांना लगेच तिकीट कसं मिळतं? असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले की, सध्या शिंदे गटात उमेदवारीसाठी प्रचंड गर्दी झाली असून त्यामागे केवळ विचारसरणी नव्हे, तर आर्थिक व्यवहार आहेत. उमेदवारीसोबत पाच कोटी रुपये दिले जात असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळेच तिकडे अचानक इच्छुकांची रांग लागली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. ही राजकारणाची नव्हे तर बाजाराची प्रक्रिया असल्याचे सांगत त्यांनी शिंदे गटाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, निष्ठा, त्याग आणि संघर्ष याला किंमत न उरता पैशाच्या जोरावर तिकीट मिळत असेल, तर ते लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे राऊत म्हणाले. मतदार हुशार असून अशा प्रवृत्तींना योग्य उत्तर देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज ठाकरे यांच्या पक्षाने जास्तीत जास्त जागा जिंकाव्यात, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे स्पष्ट वक्तव्य संजय राऊत यांनी केले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी ठाकरे गट आणि मनसेमधील समन्वयाबाबत महत्त्वाचे संकेत दिले. मुंबईसह राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेला भक्कम यश मिळावे, यासाठी दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर राहिलेल्या व्यक्तींनी पुन्हा निवडणूक लढवू नये, असा अलिखित संकेत पूर्वी काही प्रमाणात पाळला जात होता. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा संकेत कोणताही पक्ष गांभीर्याने पाळताना दिसत नसल्याचे राऊत यांनी नमूद केले. आज सर्वच पक्षात जुने संकेत मोडले जात आहेत. त्यामुळे निवडणुका आता केवळ परंपरेवर नाही, तर राजकीय गणितांवर लढवल्या जात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मनसेच्या कामगिरीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने किमान 80 टक्के जागा जिंकाव्यात, यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मतांचे विभाजन टाळून मराठी मतदारांची ताकद एकत्र आणणे, हा या प्रयत्नांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे मुंबईसह अन्य महापालिकांमध्ये मराठी नेतृत्व अधिक मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य संयुक्त सभेबाबतही माहिती दिली. लवकरच ठाकरे बंधू संयुक्त सभा घेतील. त्याचबरोबर संयुक्त जाहीरनाम्याचंही प्रकाशन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. ही संयुक्त भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरेल, असा दावा करत राऊत यांनी येत्या निवडणुकांमध्ये नवे राजकीय समीकरण आकाराला येणार असल्याचे संकेत दिले.
सन २०२५ हे वर्ष वैजापूर तालुक्याच्याइतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेजाणारे ठरले आहे. तब्बल तीनदशकांपासून डोक्यावर असलेलेकर्जाचे ओझे अखेर उतरले आणिरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचनयोजनेतील १४ गावांतील शेतकऱ्यांनाखऱ्या अर्थाने दिलासा मिळाला. २६मार्च २०२५ रोजी ६३ कोटी ६७ लाखरुपयांच्या कर्जमाफीवर अधिकृतशिक्कामोर्तब झाले आणिपिढ्यान्पिढ्या चालत आलेल्यासंघर्षाची सांगता झाली. या योजनेपोटी तालुक्यातील १४ गावांतील २ हजार ११७ शेतकऱ्यांच्या डोक्यावर तब्बल २१० कोटी रुपयांचे कर्ज होते. सुरुवातीला जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांच्या सातबारावर ३४ कोटीरुपये कर्ज घेऊन योजना सुरू झाली.मात्र जायकवाडी धरणासाठी पाणीसाठा आरक्षित करणे, ढिसाळ नियोजन आणि भ्रष्टाचारामुळे ही योजना बंद पडली आणि शेतकरी कर्जाच्या गर्तेत अडकले. राज्यशासनाने १८ जून २०२४ रोजी योजनेच्या थकीत मुद्दल रकमेची म्हणजेच ६४ कोटी २६ लाख ५९हजार रुपयांची कर्जमाफी जाहीरकेली. मात्र व्याजाचा डोंगर कायमहोता. अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेत १६ जुलै२०२४ रोजी १४५ कोटी २७ लाखरुपयांची कर्जमाफी मंजूर केली.नागपूर हिवाळी अधिवेशनात निधीची घोषणा झाल्यानंतर २०२५ मध्ये प्रत्यक्ष धनादेश सुपूर्द झाला आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्याचा मार्ग मोकळा झाला. ही कर्जमाफी केवळ आर्थिक निर्णय नसून वैजापूरच्या शेतकऱ्यांच्या संयम, संघर्ष आणि न्यायाच्या लढ्याला मिळालेली ऐतिहासिक पावती ठरली. लाभार्थी गावेमहालगाव, भगूर,पानवी, टेंभी, सिरसगाव, बल्लाळीसागज, एकोडीसागज, खिर्डी, माळीसागज, कनकसागज, टाकळीसागज, गोळवाडी, पालखेड, दहेगाव या गावांतीलशेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. नॉलेज: १९९१-९२ मधील योजना रामकृष्ण गोदावरी योजनेची स्थापना १९९१-९२ मध्ये झाली. एकूण २,११७ शेतकऱ्यांकडे सुमारे व्याजासह २१० कोटींचे कर्ज होते. यात शासनाकडूनमुद्दल माफी ६४.२६ कोटी रुपये होती. जिल्हा बँकेकडून कर्जमाफी १४५.२७ कोटींची झाली. १९९५ मध्येजायकवाडीचे पाणी आरक्षण पडले.या वेळी ढिसाळ नियोजन व भ्रष्टाचारामुळे योजना बंद झाली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ रशीद मामू यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयामुळे ठाकरे गटातील दोन प्रभावी नेते, चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या उमेदवारीने केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरही अस्वस्थता निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम निवडणुकीत शिवसेनेच्या कामगिरीवर होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने रशीद मामू यांचा मुंबईतील शिवसेना भवनात पक्षप्रवेश पार पडला होता. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशाकडे केवळ एक पक्षप्रवेश म्हणून पाहिले गेले नाही, तर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने एक रणनीतिक पाऊल म्हणूनही त्याकडे पाहण्यात आले. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुंबईसह राज्यभर मुस्लीम मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, छत्रपती संभाजीनगरमध्येही हे मतदारसंघीय गणित मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात होते. त्यामुळेच रशीद मामू यांचा प्रवेश आणि नंतर उमेदवारी हा अंबादास दानवे यांचा महत्त्वाकांक्षी राजकीय डाव असल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र, हा पक्षप्रवेश सहज पार पडलेला नव्हता. शिवसेना भवनाबाहेरच चंद्रकांत खैरे आणि रशीद मामू यांची थेट आमनेसामने भेट झाली आणि तिथेच तणावाचे चित्र स्पष्ट झाले. रशीद मामू यांनी खैरेंशी गळाभेट घेऊन वातावरण सौम्य करण्याचा प्रयत्न केला असतानाच, चंद्रकांत खैरे यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत झिडकारले. गळाभेट घेतली तरी उमेदवारी मिळणार नाही, असा ठाम इशारा देत खैरेंनी सर्वांसमोर आपला विरोध जाहीर केला होता. इतकेच नव्हे, तर रशीद मामू यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेचे सुमारे पन्नास हजार मतांचे नुकसान होईल, असा दावा करत खैरेंनी या निर्णयावर तीव्र टीका केली होती. त्या घटनेनंतरही अंबादास दानवे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. खैरेंच्या उघड विरोधानंतरही दानवे यांनी रशीद मामू यांना उमेदवारी मिळवून देत आपली राजकीय ताकद दाखवून दिली. यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाले आहेत. रशीद मामू यांना उमेदवारी दिल्यास मी पाहतो काय करायचं ते, असा सूचक इशारा चंद्रकांत खैरे यांनी यापूर्वीच दिला होता. त्यामुळे आता खैरे पुढील काळात नेमकी कोणती भूमिका घेतात, बंडखोरी करतात की, पक्षातच राहून विरोधाची धार कायम ठेवतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या संघर्षामुळे ठाकरे गटासाठी छत्रपती संभाजीनगरची निवडणूक अधिक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. एका बाजूला मुस्लीम मतदारांचे समर्थन टिकवून ठेवण्याचा अंबादास दानवे यांचा प्रयत्न आहे, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक शिवसैनिक आणि जुने नेते नाराज होण्याची भीती चंद्रकांत खैरे व्यक्त करत आहेत. हा अंतर्गत वाद प्रचारात कितपत उफाळून येतो आणि मतदारांपर्यंत कोणता संदेश जातो, यावरच निवडणुकीतील यशापयश अवलंबून राहणार आहे. शिवसेनेची एकसंघ प्रतिमा या वादामुळे डागाळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, रशीद मामू यांच्या उमेदवारीने छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ निवडणूक लढतच नाही, तर ठाकरे गटातील अंतर्गत शक्तीप्रदर्शनही सुरू झाले आहे. अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे हा संघर्ष उघडपणे समोर येत असताना, याचा थेट फटका मतपेटीत बसणार का? की ठाकरे गट शेवटच्या क्षणी एकत्र येऊन नुकसान टाळणार, हे येणारे दिवसच ठरवतील.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला असून, उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस सर्वच पक्षांसाठी कसोटीचा ठरला. इच्छुकांची संख्या मोठी, वेळ कमी आणि अंतर्गत समीकरणे गुंतागुंतीची असल्याने उमेदवार निवडताना प्रत्येक पक्षाची दमछाक झाल्याचे चित्र दिसून आले. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसमोर मुंबईत उमेदवार निवडताना मोठे आव्हान उभे राहिले. अनेक प्रभागांत इच्छुकांची गर्दी असल्याने कोणाला संधी द्यायची आणि कोणाला डावलायचे, या निर्णयामुळे पक्ष नेतृत्वाला नाराजी पत्करावी लागली. काही ठिकाणी निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना उमेदवारी न मिळाल्याने असंतोष निर्माण झाला, तर काही ठिकाणी जुने चेहरे पुन्हा उमेदवारी मिळाल्याने नव्या इच्छुकांमध्ये नाराजी पसरली. मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये उमेदवारीवरून अस्वस्थता दिसून आली असली, तरी प्रभाग क्रमांक 202 मधील घडामोडींनी सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली. प्रभागातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी नेतृत्वाकडे थेट मागणी केली होती की, यावेळी श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देऊ नये आणि त्यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी द्यावी. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करत पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा श्रद्धा जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आणि त्यांना एबी फॉर्म दिला. या निर्णयामुळे मातोश्रीबाहेर संतप्त शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ मातोश्रीबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले होते. साहेबांनी असं का केलं?, तिलाच पुन्हा तिकीट का दिलं? अशा सवालांनी परिसर दणाणून गेला. विशेष म्हणजे शिवसेनेतील फायर आजी, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिक महिलांनीही या निर्णयाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यांनी नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत सांगितले की, आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे थेट जाऊन श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देऊ नका, असे स्पष्टपणे सांगितले होते. त्यांच्या तीन-चार टर्म झाल्या आहेत, आता नव्या चेहऱ्याला संधी देणे गरजेचे आहे, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, तरीही त्याच उमेदवाराला पुन्हा तिकीट देण्यात आल्याने निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रभागात शाखाप्रमुख विजय इंदुलकर हेही उमेदवारीसाठी इच्छुक होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्याचे काम करत असून, यंदा पक्षाने आपल्याला संधी द्यावी अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांनी तयारीही केली होती आणि कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, फॉर्म भरण्याच्या अगदी शेवटच्या दिवशी पक्षाने श्रद्धा जाधव यांनाच एबी फॉर्म दिल्याने विजय इंदुलकर समर्थकांमध्ये नाराजी पसरली. पक्षाच्या या निर्णयामुळे केवळ एका व्यक्तीचीच नव्हे, तर स्थानिक पातळीवर मेहनत करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची निराशा झाल्याचे चित्र आहे. मुंबईपुरतेच नव्हे, तर राज्यभरात उमेदवारी निश्चितीच्या प्रक्रियेत अशीच अस्वस्थता पाहायला मिळाली. बंडखोरी टाळण्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवार निश्चितीपासून ते एबी फॉर्म वाटपापर्यंत कमालीची गुप्तता पाळली. उमेदवारांची नावे शेवटच्या क्षणापर्यंत जाहीर न करता, ऐनवेळी निर्णय घेण्यात आले. काही ठिकाणी तर उमेदवार बदलण्यात आले, तर काही ठिकाणी दुसऱ्या पक्षातून आलेल्या उमेदवारांना तातडीने संधी देण्यात आली. या सगळ्या निर्णयांचा उद्देश एकच होता, पक्षांतर्गत बंडखोरी रोखणे. अनेक प्रभागांमध्ये एकाच जागेसाठी दोन किंवा त्याहून अधिक इच्छुक असल्याने उमेदवारी जाहीर होताच नाराजीचे नाट्य घडणे स्वाभाविक होते. त्यामुळे पक्ष नेतृत्वाने शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय लांबवण्याची रणनीती स्वीकारली. काही ठिकाणी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासांपर्यंत उमेदवार निश्चित करण्यात आले. परिणामी, कोणाला एबी फॉर्म देण्यात आला आणि कोण अधिकृत उमेदवार आहे, याची संपूर्ण यादी वेळेत तयार होऊ शकली नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि अनेक ठिकाणी गैरसमजही पसरले. या पार्श्वभूमीवर अधिकृत उमेदवारांच्या अंतिम याद्या जाहीर करण्यास उशीर का होत आहे, याचे कारणही स्पष्ट झाले आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि उद्या दुपारी तीन वाजता अर्जांची पडताळणी झाल्यानंतरच ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना आपल्या अधिकृत अंतिम याद्या जाहीर करतील, अशी माहिती पुढे आली आहे. तोपर्यंत कोण अधिकृत उमेदवार आहे, यावरून राजकीय सस्पेन्स कायम राहणार आहे. हा विलंब पक्षांतर्गत असंतोष कमी करतो की आणखी वाढवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकूणच, महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर उमेदवारी निवडीचा प्रश्न शिवसेनेसाठी मोठे आव्हान ठरला आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा की अनुभवी चेहऱ्यांवर पुन्हा विश्वास ठेवायचा, या द्वंद्वात नेतृत्व अडकलेले दिसते. श्रद्धा जाधव प्रकरणामुळे हे द्वंद्व अधिक ठळकपणे समोर आले आहे. येत्या काळात या नाराजीचा निवडणूक प्रचारावर आणि पक्षाच्या अंतर्गत एकजुटीवर काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणुकीत उमेदवार अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून पक्षांतर्गत घमासान झाले. भाजपकडून उमेदवारी न मिळालेल्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह थेट निवडणूक प्रमुखांच्या घरीच धाव घेतली. तेथे त्यांच्या अश्रूंचा बांधच फुटला. एक महिला तर भोवळ येऊन पडली. त्यांनी थेट पैशांचा आरोप करत आपल्यावरील अन्यायाचा पाढाच वाचला. भाजपने २१ माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. मात्र उमेदवारी न दिलेल्या या २१ पैकी १० माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देत रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. तसेच काँग्रेसनेही दोन माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली नाही. परिणामी उमेदवारी न मिळालेल्या समर्थकांनी आमदारांचा फोटो असलेल्या फलकाला काळे फासत संताप व्यक्त केला. एकूणच निष्ठावानांना बाहेरचा रस्ता अन् आयारामांना ‘रेट कार्पेट’ असे काहीसे चित्र होते. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला. युती-आघाडीसाठी त्या-त्या घटक पक्षांमध्ये चर्चेच्या फैरी झडल्या. मात्र महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात युती झाली तर शिवसेनेच्या शिंदे गटाला स्वबळावर लढावे लागत आहे. तसेच महाविकास आघाडीतील महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी झाली असून, शिवसेनेने (ठाकरे गट) एकला चलोरे'चा नारा दिला. परिणामी ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वाधिक घमासान सत्ताधारी भाजप व विरोधक असलेल्या काँग्रेस, शिवसेनेत झाले. स्वपक्षाने उमेदवारी नाकारलेल्यांनी अन्य पक्षातून उमेदवारी अर्ज भरला. आता राजकीय व अधिकृत उमेदवारांसमोर बंडोबांना शात करत त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी समजूत काढण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. आम्हाला हे फळ मिळत आहेत : महायुतीमध्ये राकाँच्या वाट्याला प्रभाग सुटल्याने उर्वरित पान ४ शिवसेना ठाकरे गट : ५५ उमेदवार असून, यात काँग्रेसचे २ , भाजपच्या दोघांनाही संधी दिली आहे. भाजपने ठाकरे गटातील एका माजी नगरसेविकेला तिकीट दिल्याने हिशेब चुकता केला. वंचित बहुजन आघाडी : पक्षाने ५७ ठिकाणी उमेदवार उभे केले असून, एका माजी नगरसेविकेला तिकिट नाकारले आहे. मुंबईत काँग्रेससोबत आघाडी असली तरी शहरात नाही. निवडणुकीपूर्वी भाजपमधील दुरावलेल्यांकडून तिसरी आघाडीची तयारी करण्यात आली. काहींनी थेट जनतेमध्ये जात बैठकही घेतली. यात माजी नगरसेवक हरिश आलीमचंदानी, डॉ.अशोक ओळंबे, आशिष पवित्रकार, गिरीश गोखले आदींचा समावेश होता. मात्र मंगळवारी यापैकी प्रतुल हातवळणे, गिरीश गोखले यांचे निलंबन परत घेऊन पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला; परंतु त्यापैकी केवळ हरिश आलीमचंदानी यांनाच उमेदवारी देण्यात आली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षापासून दुरावलेल्या काहींना जवळ करीत मोट बांधूच द्यायची नाही, अशी खेळी भाजपकडून खेळण्यात आली. काँग्रेस : पक्षाने १३ पैकी ११ माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली असून दोन जणांना उमेदवारी नाकारली आहे. पक्षाने एकूण ५५ उमेदवार उभे केले आहेत. शरद पवार गटासोबत आघाडी आहे. भाजपचे १९९४ ते २०१९पर्यंत आमदार असलेले दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्या जुने शहरातील अनेक इच्छुकांना उमेदवारी नाकारण्यात आली. आ. शर्मा यांनी जुने शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातून आपली राजकीय कारकिर्द १९८५मध्ये सुरू केली. याच भागातून ते नगर परिषद निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. मात्र आता मनपामध्ये याच भागातील प्रभागातून उमेदवारी जाहीर झालेल्या चारपैकी दोन जण मूळचे काँग्रेसचे तर एक उमेदवार शिवसेनेच्या ठाकरे गटाची आहे. आयात उमेदवारांना संधीत देत निष्ठावानांना मात्र डावलण्यात आले. तसेच गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही दिवंगत आ. शर्मा यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न देता माजी महापौरांना संधी देण्यात आली. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ३० वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ काँग्रेसने खेचून आणला. आता मनपा निवडणुकीतही आ. शर्मा यांच्या समर्थकांनाही घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. राकाँ शरद पवार पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकूण ८० पैकी २४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यात सर्व नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस : राकाँ अजित पवार गटाची भाजपसोबत युती आहे. राकाँने १४ ठिकाणी उमेदवार उभे केले असून, यात माजी महापौरांच्या कुटुंबातील महिलेला संधी दिली आहे. शिवसेना शिंदे गट : शिवसेनेने ७४ जणांना उमेदवारी दिली. उपजिल्हा प्रमुख, एक विद्यमान नगरसेवक व उपशहर प्रमुखाला उमेदवारी नाकारून अन्य पक्षातील इच्छुकांना संधी दिली. पक्षांतर्गत विरोधकांना शह देण्याची आखली रणनिती भाजप : उमेदवारीसह अन्य मुद्द्यांसाठी भाजपने सर्वेक्षण केल्याचा दावा केला. मनपामध्ये सत्ता असताना अनेक मुद्द्यांवर काही नगरसेवकांनी स्थानिक पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाला विरोध केला. प्रभागात विकास कामे मंजूर करण्यावरून अर्थात ‘रसद’वरुनही वाद झाले. विधानसभा, राज्य पातळीवरील नेत्यांनी मनपाच्या राजकारणात फार ढवळाढवळ करू नये, असे त्यांचे म्हणणे होते. तसेच त्यापैकी काहींनी अकोला पश्चिमच्या विधानसभा निवडणुकीत ‘काम’ दाखवले. परिणामी भाजपचा पराभव झाला. त्यामुळे आता स्थानिक नेतृत्वाकडून अनेकांना उमेदवारी नाकारून पक्षांतर्गत काहींचा हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेस : मनपामध्ये १३ पैकी अल्पसंख्यांक बहुल भागातील २ नगरसेवकांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीतील उमेदवाराला पक्षांतर्गत विरोध झाला. तसेच काही जण एमआयएमच्याही संपर्कात होते. परिणामी काँग्रेसमध्येही कुरघोडीचे राजकारण रंगले. तिसऱ्या आघाडीतील हवाच काढली सत्ताविरोधी लाट थोपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप रस्ते, पथदिवे, काही भागात भूमिगत नाली बांधण्याचा दावा करत असले तरी सध्या अवाढव्य मालमत्ता कर व अवाजवी पाणी कर, हे दोन मुद्दे प्रचंड तापले आहेत. त्यामुळे सत्ताविरोधी लाट थोपवण्याच्या नावाखाली २१ माजी नगरसेवकांना संधी नाकारण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी विरोधी पक्षांतील माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली. जेणे करुन विरोधक आणखी कमकुवत होईल आणि आयात केलेला उमेदवारच जनतेला फेस करेल. मात्र हे करताना त्या-त्या भागातील बंडखोरांना शांत करण्याचे आणि संधी न मिळूनही पक्षात कायम राहिलेल्यांना सक्रिय करण्याचे आव्हान पक्षासमोर उभे ठाकणार आहे. दिवंगत आमदार शर्मा यांच्या समर्थकांना डावलले
माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा अखेर शिवसेना शिंदे गटाला ‘जय महाराष्ट्र’
सुमारे सात महिन्यांपूर्वीच शिवसेनेत (शिंदे गट) आलेले माजी पालकमंत्री जगदिश गुप्ता यांनी मंगळवारी (दि. ३०) राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे पक्षाने पश्चिम विदर्भ संघटक प्रमुख अशी जबाबदारी दिली होती. त्यांनी पक्षाचा व आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे. अशी माहीती जगदिश गुप्ता यांनीच पत्रकार परिषदेत दिली. जगदिश गुप्ता यांनी सांगितले कि, अलीकडे सर्व राजकीय पक्ष सारखेच झाले आहे. या पक्षांमध्ये नेत्यांच्या समोर मुजरा केल्याशिवाय कोणत्याही कार्यकर्त्याचे भले होत नाही, येथेही हीच परिस्थिती बघितल्याने निराश झालो. माझ्यासोबत अनेक ‘कमिटमेंट’ करण्यात आल्या, त्या काही वैयक्तिक नव्हत्या. ज्या लोकांनी मला अनेक वर्षांपासून साथ दिली, त्यांच्यासाठी मी या ‘कमिंटमेंट’ स्वीकारल्या होत्या. पण, बोलणी झाल्यानंतर लगेच गोष्टी बदलत होत्या. पक्षात प्रवेश घेतल्यापासून ते आतापर्यंत वारंवार हे होत असल्याने आपण शिवसेना पक्ष ( शिंदे गट) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोणत्याही राजकीय पक्षावर माझा विश्वास राहिलेला नाही. आता कोणत्याही पक्षात जायचे नाही, हा निर्णय मी घेतला आहे. त्या निर्णयावर मी ठाम आहे. आता अपक्ष म्हणून लढण्याची तयारी असलेल्या हिंमतबाज कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम मी करणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
3 जानेवारीला दिसणार सुपरमून:नववर्षात अवकाश नवलाई; खगोलप्रेमींसाठी वर्षभर घडामोडींची पर्वणी
जेव्हा पृथ्वी आणि चंद्रातील अंतर सर्वात कमी असते, तेव्हा सुपरमून होतो. यामुळे चंद्र मोठा आणि उजळ दिसतो. ३ जानेवारी रोजी पौर्णिमेच्या दिवशी सूपरमून दिसणार आहे. या दिवशी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर कमी राहिल. त्यामुळे चंद्र या दिवशी मोठा व प्रकाशमान दिसेल. सरासरी पृथ्वी-चंद्र हे अंतर ३ लाख ८५ हजार कि.मी. असते. जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३ लाख ७० हजार कि.मी.च्या आत असते त्याला सुपरमून असे म्हणतात. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तिव्रता वाढणे, वादळ यासारख्या घटना घडू शकतात. पृथ्वीवरुन आपण नेहमी चंद्राचा ५९ टक्के भाग पाहता येतो. चंद्रावरुन पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते. चंद्रावरुन पृथ्वीवर प्रकाशकिरण येण्यास १.३ सेकंद लागतात. चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षाला ३.८ सेंटीमिटर लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होईल व १०० वर्षांनी दिवस हा २ मिली सेकंदने मोठा होईल. चंद्रावर ३० हजार विवरे व १२ पर्वत आहे. पर्वत व विवरे दुर्बिणीमधून अगदी चांगल्या प्रकारे पाहता येतात. ३ जानेवारीला संध्याकाळी दिसणारा सूपरमून खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी अवश्य बघावा. नवीन वर्षातील ही पहिली संधी आहे. हा सूपरमून अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येईल, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली आहे. सुपरमून काय आहे? सुपरमून ही एक खगोलीय घटना आहे. ज्यामध्ये चंद्र त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा दिसतो. वर्षातून तीन ते चार वेळा सुपरमून दिसतात. सुपरमून दिसण्याचे कारण खूपच रंजक आहे. या काळात, चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना त्याच्या अगदी जवळ येतो. या अवस्थेला पेरिजी म्हणतात. दरम्यान, जेव्हा चंद्र पृथ्वीपासून दूर जातो तेव्हा त्याला अपोजी म्हणतात. ज्योतिषी रिचर्ड नोले यांनी पहिल्यांदा १९७९ मध्ये सुपरमून हा शब्द वापरला. चंद्र दर २७ दिवसांनी पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. दर २९.५ दिवसांनी एकदा पौर्णिमा देखील येते. प्रत्येक पौर्णिमा हा सुपरमून नसतो, परंतु प्रत्येक सुपरमून पौर्णिमेला येतो. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो, म्हणून पृथ्वी आणि चंद्रातील अंतर दररोज बदलते. जुलैच्या सुपर मूनला बक मून असेही म्हणतात.
प्रवाहाविरुद्ध काम करण्यासाठी मोठ्या हिमतीची गरज असते आणि ती छाया देशमुख यांनी दाखवली आहे. त्यामुळे त्या खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत. सध्या समाजापुढे विधवा, विधुर, घटस्फोटित व प्रौढांचे विवाह हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. पुनर्विवाह ही काळाची गरज असूनही यासाठी पुढाकार घेणारे हात कमी आहेत. अशा परिस्थितीत छाया देशमुख व त्यांच्या सावली ग्रुपचे कार्य अत्यंत वाखाणण्यासारखे आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या विषयात पुढाकार घ्यायला हवा, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले. सावली ग्रुपच्या वतीने मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात मराठा, कुणबी, पाटील देशमुख समाजातील विधवा, विधुर, घटस्फोटित व प्रौढांचा पुनर्विवाह परिचय मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत देशमुख, सावली ग्रुपच्या अध्यक्ष छाया देशमुख, चिंतामण देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हेमंत काळमेघ यांनी मार्गदर्शन केले. जिथे चालीरीती, रूढी व परंपरा बदलण्याची भीती अनेकांना वाटते, अशा ठिकाणी हा कार्यक्रम होणे कौतुकास्पद आहे. तसेच मातोश्री विमलाबाई देशमुख यांच्या नावाने असलेल्या सभागृहात हा मेळावा होणे हे अत्यंत औचित्यपूर्ण आहे. असे मत व्यक्त केले. सलग चौथ्या वर्षी घेण्यात आलेल्या या पुनर्विवाह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सावली ग्रुपच्या छाया देशमुख यांच्यासह मनाली तायडे, वैशाली गुडधे, पूजा देशमुख, शीतल देशमुख, कल्पना देशमुख, पल्लवी देशमुख, वैशाली देशमुख, स्वाती देशमुख, सुचिता देशमुख यांचे सहकार्य लाभले. मेळाव्याचे प्रास्ताविक छाया देशमुख यांनी केले. मेळाव्याचे संचालन मंजुषा उताणे-देशमुख यांनी तर आभार कल्पना देशमुख यांनी मानले. या मेळाव्यास परभणी, नांदेड, अहमदनगर, नाशिक, मुंबई, बुलढाणा, यवतमाळ आदी जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने विधवा, विधुर, घटस्फोटित, प्रौढ व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. पुस्तकाचे विमोचन मेळाव्यादरम्यान सावली ग्रुपच्या अध्यक्ष छाया देशमुख लिखित दुसऱ्या लग्नाची गोष्ट या दुसऱ्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या पुस्तकात त्यांनी आतापर्यंतचे अनुभव कथन केले आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख महान कृषी क्रांतिकारक:शिक्षक साहित्य संघातर्फे जयंती साजरी
जोपर्यंत शेतकरी आणि बहुजन समाज शिक्षित होत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. केवळ पुस्तकी ज्ञान न देता शेतीवर आधारित तांत्रिक शिक्षण मिळावे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी पुढाकार घेतला. मध्य प्रांताचे शिक्षणमंत्री असताना प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी महत्त्वाचे कायदे केले. ज्यांच्या हातात नांगर आहे, त्यांच्या मुलांच्या हातात पुस्तक हवे, हे भाऊसाहेबांचे ब्रीदवाक्य होते. भाऊसाहेब महान कृषी क्रांतिकारक होते. असे विचार जयदीप सोनखासकर यांनी व्यक्त केले. शिक्षक साहित्य संघाच्या राज्य शाखा व अमरावती शाखेतर्फे शिक्षणमहर्षी - कृषिमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंती शिक्षक साहित्य संघाच्या श्याम नगर येथील कार्यालयात साजरी करण्यात आली. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते. यावेळी जयदीप सोनखासकर, प्रमुख वक्ते प्रा.अरुण बुंदेले, प्रमुख अतिथी अरविंद चौधरी, सुरेश मडावी, प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे, प्रा.सुशीला मळसणे, गजेंद्र पाथरे, छाया पाथरे, प्रा.विशाल देशमुख, आशीष इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वक्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी, डॉ.पंजाबराव देशमुख कृषिमंत्री असताना त्यांनी जे कृषकांसाठी कायदे केले ते कृषकांच्या विकासासाठी वरदान ठरले. श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून जशी शैक्षणिक क्रांती केली. तशीच त्यांनी कृषी क्रांती सुद्धा केली. असे विचार व्यक्त केले. यावेळी प्रा.अरुण बुंदेले यांनी भाऊ ज्ञानदीप या स्वरचित अभंगाचे गायन केले. आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे यांचा शिक्षक साहित्य संघ व कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालक प्रा.सुशीला मळसणे तर आभार गजेंद्र पाथरे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक साहित्य संघाचे, कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. शैक्षणिक क्रांती आणि तसेच कृषी क्रांती याबद्दल अनेकांनी विचार व्यक्त केले.
भावी पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी आणि जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या तालुका स्तरीय पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांसाठी तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था कार्यशाळा घेण्यात आली. शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ‘तंबाखू मुक्त पिढी : शाळांसाठी आव्हान’ या विषयाच्या अनुषंगाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये उपशिक्षणाधिकारी, महानगरपालिका शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण, शाळा केंद्र प्रमुख आणि विषय साधन व्यक्ती उपस्थित होते. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराच्या दुष्परिणामांबाबत समाजात आणि विशेषतः लहान मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी शासन स्तरावर निरंतर प्रयत्न सुरू आहेत. ज्यामध्ये शाळा आणि शैक्षणिक संस्था केंद्र व राज्य शासनाच्या निकषांनुसार तंबाखूमुक्त करण्यासाठी रॅली, पोस्टर, घोषवाक्ये, कविता आणि पथनाट्ये यांसारखे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्री करणे हा दंडात्मक गुन्हा असून १८ वर्षांखालील मुलांना तंबाखू विकणे किंवा तसे करण्यास भाग पाडणे, हा कठोर शिक्षेस पात्र गुन्हा आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील शाळांकरिता विशेष पोस्टर्स, बॅनर्स आणि बोर्ड्सचे वाटप करण्यात येत आहे. हे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षक डॉ. मंगेश गुजर यांनी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या निकषांची माहिती दिली, तर मंगेश गायकवाड यांनी तंबाखू नियंत्रण कायदा २००३ बाबत मार्गदर्शन केले. या मोहिमेत मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, संभाजी नगर यांनी संयुक्त सहभाग नोंदवला असून, कार्यशाळेतील प्रशिक्षित अधिकारी आता शाळा स्तरावर मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन व पर्यवेक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहेत.
सेनगाव येथे घुरुन पाहण्याच्या क्षुल्लक कारणावरून एकास चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून या प्रकरणी ९ जणांवर बुधवारी ता. ३१ सकाळी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला असून त्यापैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव शहरातील धुमाळगल्ली भागातील दिलीप हरण हे कडाक्याची थंडी असल्यामुळे मंगळवारी ता. ३० रात्री शेकोटी करून शेकत बसले होते. यावेळी त्यांचा करण हरण याच्यासोबत वाद झाला. माझ्याकडे घुरून का बघतो या कारणावरून करण याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. शाब्दिक चकमकीनंतर वादाला तोंड फुटले. यावेळी भांडण होत असतांना करण याच्या सोबत इतर आठ जण आले. त्यांनीही दिलीप यांना मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक होत असलेल्या मारहाणीमुळे दिलीप प्रतिकार करू शकला नाही. यामध्ये दिलीप यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. त्यांच्या पोटात, पाठीत, हातावर चाकूचे वार झाल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, सेनगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार सुभाष चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दिलीप यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दिलीप हरण यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी करण हरण, प्रकाश हरण, गणेश हरण, केशव हरण, अर्जुन हरण, शंकर हरण यांच्यासह अन्य तिघांवर बुधवारी ता. ३१ गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने आरोपींची शोध मोहिम सुरु केली असून केशव व शंकर या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर अन्य आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार झाले असून तरुणाई सज्ज झाली आहे. परंतु थर्टी फर्स्टच्या दिवशी ड्रंक अँड ड्राईव्ह करणे मद्यपींना महागात पडणार आहे. दर्यापूर शहर पोलिस नववर्षाच्या निमित्ताने ठिक-ठिकाणी बॅरिकेड्स लावून नाकाबंदी मोहीम राबवणार असून मद्यपी चालकांना तपासण्यासाठी ब्रेथ अनालायझरचा वापर करणार आहे. त्यामुळे मद्यपिंनो सावधान,अशी म्हणण्याची वेळ आली आहे. दरवर्षी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार असते. काहीजण तर नववर्षाची सुरुवात चांगली व्हावी, यासाठी नियोजन करत असतात. तर दुसरीकडे थर्टी फर्स्टच्या दिवशी उत्साही तरुण मद्यपानासह पार्टी करण्याचा बेत आखतात. नववर्षाच्या धुंदीत दारू पिऊन वाहन चालवताना लहान-मोठे अपघात घडू नये तसेच रस्त्यावर कोणताही वाद होऊ नये, यासाठी शहर पोलिसही सज्ज झाले आहे. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याने ड्रंक अँड ड्राईव्ह करणे चांगलेच महागात पडणार आहे. विशेष म्हणजे नशेत वाहन चालवताना पोलिसांच्यावतीने अपघात रोखण्यासाठी व मद्यपी चालकांना तपासण्यासाठी ब्रेथ ॲनालायझरचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे सुसाट वेगाने वाहन चालविणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. शहरातील एस.टी.आगार चौक, गांधी चौक, अकोला-अंजनगाव-अकोट टी.पाईंट, अमरावती-आसेगाव रोड यासोबतच बुटी चौक, बाभळीसह चौका-चौकात मद्यपी चालकांना चाप लावण्यासाठी शहर पोलिस तैनात राहणार आहे. बेकायदेशीर कृत्य करणारे तसेच सर्वच वाहनधारकावर पोलिसांची करडी नजर राहणार असून थर्टी फर्स्टचा आनंद आपल्याच आवाक्यात घ्यावा, दुसऱ्यांना त्रास होणार नाही व शांतता अबाधित राहील, याची काळजी तरुणाईने घेणे गरजेचे झाले आहे. सुनील वानखडे, ठाणेदार, दर्यापूर. तर सहा महिण्यांची शिक्षा २०२५ या वर्षाला निरोप व नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मध्यरात्री अनेकजण विशेषतः हौशी तरुणाई मद्यपानासोबतब सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, ट्रिपल सीट, लायसन्सशिवाय ड्रायव्हिंग, रॉग साइड इत्यादी नियमांचे उल्लंघन करतात. असे केल्यास पोलीस प्रशासनाकडून चालकांविरोधात मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये दंड किंवा सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांच्या नेतृत्वात स्थानिक नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्र व कचरा डेपोची पाहणी केली. तेथे आढळलेल्या अव्यवस्था दूर करण्याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचनाही देण्यात आल्या. त्यांच्या या भेटीमुळे पदभार स्वीकारण्याआधीच पदाधिकारी ॲक्शन मोडवर आल्याचे स्पष्ट झाले. या भेटीवेळी मुख्याधिकारी मात्र सुटीवर होते. मंगळवारी सकाळी १० वाजताच नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर व नगरसेवक नगरपंचायत कार्यालयात पोहोचले. त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला. दरम्यान विनापरवानगी गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश दिले. त्यांच्या या अचानक भेटीमुळे नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे. स्वत: मुख्याधिकारी सुट्टीवर असल्याने न.पं. कार्यालयातील अनेक कर्मचारी विनापरवानगी गैरहजर आढळून आले. अशा सर्व कर्मचाऱ्यांना लगेच कारणे दाखवा नोटीस देऊन योग्य कारवाईचे निर्देश दिले. लाखो रुपये खर्च करूनही कचऱ्याच्या नियोजनासाठी अद्याप जागा तयार करण्यात आली नाही, याबाबत नगराध्यक्षांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने डम्पींग ग्राउंड निर्माण केले. मात्र सदर डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे अस्तव्यस्त झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यावेळी आधुनिक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट करण्याचे निर्देशही नगराध्यक्षांमार्फत देण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी यावेळी नांदगाव शहराला पाणीपुरवठा करणोऱ्या जलशुद्धीकरण केंद्राचीही पाहणी केली. जल शुद्धीकरण केंद्रात योग्य त्या सुधारणा करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले. या भेटीदरम्यान पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य इत्यादी विभागाचा आढावा घेण्यात आला. बस स्थानक परिसरातील शौचालयाची दुर्गंधी पाहून नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी नगरसेवक प्रकाश मारोटकर, प्रीती इखार, कांता लोमटे, वासुदेव लोखंडे, राष्ट्रवादीचे मो.साजिद इत्यादी उपस्थित होते. जलशुद्धीकरणची मशीन नादुरुस्त नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली असता पाणी स्वच्छ करणाऱ्या बहुतांश मशीन नादुरुस्त होत्या. मशीन नादुरुस्त असल्यामुळे पाणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात शुद्ध होत नाही, असाही मुद्दा पुढे आला. याबाबत नगराध्यक्षांनी पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली. परंतु मुख्याधिकारीच उपस्थित नसल्याने ते निरुत्तर झाले. दरम्यान मशीनची दुरुस्ती तत्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले.
एमआयडीसी परिसरात 25 लाखांचे 11,820 किलो प्लास्टिक जप्त:मनपाच्या पथकाची आजवरची सर्वात मोठी कारवाई
शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या मनपा प्रशासनाच्या ठोस व कठोर निर्देशांनुसार एमआयडीसी परिसरात बंदी असलेल्या सिंगल युज प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान एका गोदामातून ३९४ पोते प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला असून त्याचे एकूण वजन ११ हजार ८२० किलो आहे. जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिकची अंदाजे किंमत २५ लाख रु.आहे. बंदी असलेल्या प्लास्टिक विरोधातील ही मनपा पथकाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. सदर ठिकाणी पंचनामा करून प्लास्टिक बंदी नियमांनुसार संबंधितावर रु. ५ हजाराचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई सोमवारी २९ रोजी उशिरा रात्री १२.३० वाजेपर्यंत सुरू होती. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरात प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठवणूक व वापर करणाऱ्यांना या कारवाईमुळे मोठा इशारा मिळाला असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईच्या वेळी प्लास्टिक कारवाई नोडल अधिकारी विनोद टांक, स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक श्वेता बोके, स्वास्थ निरीक्षक सचिन सैनी, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, बिटप्युन नरेंद्र दुगलज तसेच अतिक्रमण विभागाची संपूर्ण टीम उपस्थित होती. शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. याआधी २८ रोजी १२७० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करून नियमभंग करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. शहरात कुठेही कितीही मोठा प्लास्टिकचा साठा पहिल्यांदा जप्त करण्यात आला तर त्या साठेबाजाविरोधात फार मोठी कारवाई होत नाही. त्याला केवळ ५ हजाराचा दंड आकारला जातो. अर्थात एक किंवा दोन किलो बंदी असलेले प्लास्टिक आढळले तरी ५ हजार व ११ हजार किलो प्लास्टिक आढळले तरी ५ हजार रुपयेच दंड करून त्या गोदामाला सील ठोकले जाते. यामुळेच बंदी असलेले प्लास्टिक विकणाऱ्यांना कोणताही वचक बसत नाही. एक गोदाम सील झाले तरी ते दुसऱ्या ठिकाणावरून त्यांचा व्यावसाय करीत आहेत. दुसऱ्यांदा तोच साठेबाज बंदी असलेले प्लास्टिक विकताना आढळला तर १० हजाराचा दंड होतो. तिसऱ्यांदा त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामुळे शहरातून सिगल युज प्लास्टिकचे समूळ उच्चाटन होत नसल्याचा ठपका सुज्ञ नागरिकांनी ठेवला आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तीव्र मतभेदांमुळे चांगलाच गाजला. 165 नगरसेवकांची संख्या असलेल्या पुणे महापालिकेत सत्ता स्वबळावर मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या भाजपने शिंदेसेनेला केवळ 15 जागा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, या 15 जागांच्या बदल्यात शिंदेसेनेने भाजपसमोर ज्या उमेदवारांची यादी ठेवली, ती पाहून जागावाटपाची चर्चा करणारे भाजपचे नेते अक्षरशः अवाक झाले. या एका यादीने पुण्यातील शिवसेना-भाजप युतीचे गणित पूर्णपणे बिघडवले आणि अखेर दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र स्पष्ट झाले. पुण्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून सलग बैठका सुरू होत्या. सोमवारी रात्री साडेबारा वाजता शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचा संदेश प्रसारमाध्यमांना पाठवण्यात आला होता. त्या परिषदेत युती तुटल्याची औपचारिक घोषणा होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, पाऊण वाजता अचानक ही पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम वाढला. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच पुण्यात भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही गटातील उमेदवारांनी स्वतंत्रपणे अर्ज भरण्यास सुरुवात केली आणि युती जवळपास संपुष्टात आल्याचे संकेत मिळाले. भाजपच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, शिंदेसेनेने त्यांच्याकडे 15 उमेदवारांची अधिकृत यादी सुपूर्द केली होती. मात्र, या 15 जागा सोडणे भाजपसाठी अशक्य असल्याचे स्पष्ट झाले. भाजपला केवळ 15 जागा देण्याची तयारी होती, पण त्या बदल्यात शिवसेनेने मागितलेल्या जागा आणि उमेदवार भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रभागांमधील होते. त्यामुळे हा प्रस्ताव भाजपच्या जिव्हारी लागला. परिणामी, पुण्यात युतीत निवडणूक लढवण्याचा विचार भाजपने पूर्णपणे सोडून दिला आणि आपल्या सर्व इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश दिले. दुसरीकडे, भाजपशी युती शक्य नसल्याचे लक्षात येताच एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईहून पुण्यासाठी 165 एबी फॉर्म पाठवून दिले. या घडामोडीनंतर नाना भानगिरे आणि रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना-भाजप युती तुटल्याची स्पष्ट भूमिका माध्यमांसमोर मांडली. मात्र, काही वेळातच विजय शिवतारे यांनी यू-टर्न घेत अजूनही भाजपशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. तरीही अंतर्गत चर्चांमधून समोर आलेली माहिती पाहता, शिंदेसेनेच्या पुण्यातील शिलेदारांनी ज्या पद्धतीने भाजपला 15 जागांवरून अडचणीत आणले, त्यामुळे युती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. या वादामुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपने शिवसेनेला केवळ 15 जागा देण्याची तयारी दर्शवली असली, तरी शिंदेसेनेने त्या 15 जागांसाठी जी नावे पुढे केली, ती भाजपला मान्य होणे शक्यच नव्हते. या यादीत प्रभाग क्रमांक 41 ब मधून प्रमोद नाना भानगिरे, 41 क मधून स्वाती अनंत टकले, 24 ड मधून प्रणव रवींद्र धंगेकर, 23 क मधून प्रतिभा रवींद्र धंगेकर, 26 ड मधून उल्हास उर्फ वसंतराव बागुल, 37 क मधून गिरीराज तानाजी सावंत, 37 ड मधून रूपाली रमेश कोंडे, 38 क मधून वनिता जालिंदर जांभळे, 38 इ मधून स्वराज नमेश बाबर, 39 क मधून मनिषा गणेश मोहिते, 6 ड मधून आनंद रामनिवास गोयल, 3 क मधून गायत्री हर्षवर्धन पवार, 16 ड मधून उल्हास दत्तात्रय तुपे, 40 ड मधून दशरथ पंढरीनाथ काळभोर किंवा गंगाधर विठ्ठल बधे आणि 11 क मधून वैशाली राजेंद्र मराठे यांच्या नावांचा समावेश होता. विशेष म्हणजे या यादीतील एक मागणी भाजपसाठी अत्यंत डिवचणारी ठरली. प्रभाग क्रमांक 24 ड मधून शिंदे गटाने रवींद्र धंगेकर यांच्या पुत्र प्रणव धंगेकर यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली होती. याच प्रभागातून भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर रिंगणात असल्याने ही मागणी मान्य करणे भाजपसाठी अशक्य होते. परिणामी, भाजपने या 15 जागा सोडण्यास ठाम नकार दिला आणि त्याचाच थेट परिणाम शिवसेना-भाजप युती तुटण्यात झाला. आता पुणे महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने स्वतंत्रपणे लढवली जाणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पंढरपूर शहरालगत असलेल्या लक्ष्मी टाकळी हद्दीतील टाकळी बायपास मार्गावर रेल्वेचा उड्डाण पूल बांधला जात आहे. मात्र मागील १ वर्षांपासून पुलाचे काम ठप्प आहे. कारण उड्डाण पुलाचे खांब उभा राहत असतानाच बाजूच्या जमीन धारकांनी ते खांब आमच्या हद्दीत उभा राहत आहेत, आणि आमची जागा बाधित होत आहे, अशी तक्रार केली. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया सुरु झाली असून ती प्रक्रियासुद्धा रखडल्याने या मार्गावर दररोज शेकडो वाहनांची कोंडी होत आहे. धुळीने परिसरातही नागरिक त्रस्त झालेले आहेत. मात्र यावर मार्ग निघण्याची शक्यता दिसत नाही. पंढरपूर - मिरज रेल्वे मार्गावर क्रॉसिंग नंबर २४ वर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. राज्य मार्ग १५१ टाकळी बायपास मार्गावरून दररोज हजारो अवजड आणि हलकी वाहने ये- जा करीत असतात. त्यामुळे रेल्वेच्या रहदारीमुळे गेट बंद करून वाहतुक थांबवणे गैरसोयीचे होत आहे. वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत, आणि हा भाग वेगाने नागरीकरण होणारा आहे. त्यामुळे रेल्वेच्या वतीने या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम हाती घेतले होते. सुमारे २ वर्षे झाली काम सुरु झाले आहे. मात्र अद्याप खांब उभारणीचे कामही पूर्ण झालेले नाही. दरम्यान, या पुलाचे काम सुरु असतानाच रस्त्याच्या बाजूच्या मालमत्ता धारकांनी पुलाचे खांब आमच्या जागेत उभा राहत आहेत, सेवा रस्त्यासाठी आमच्याच जागेतून भूसंपादन होणार असल्याची तक्रार करून काम बंद पाडले. त्यानंतर रेल्वे विभागाने भूसंपादन प्रक्रिया सुरु केली. परंतु या दरम्यान संबंधित जागेच्या मालकी हक्क बद्दलही तांत्रिक अडथळे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भूसंपादन प्रक्रिया संथ गतीने सुरु आहे. भूसंपादन होत नसल्याने काम रखडले आहे. गेल्या सुमारे ६ महिन्यापासून उड्डाणपुलाचे काम जाग्यावर ठप्प असून एक इंच ही काम उंचावलेले नाही. महारेल, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर उपविभागीय अधिकारी, आणि मालमत्ता धारक यांच्यात समन्वय नाही, कामातील गुंतागुंत कशी सोडवायची यावर मार्ग निघत नाही. त्यामुळे हा उड्डाणपूल रखडलेला आहे. ^रेल्वे उड्डाणपुलासाठी ज्या जमिनीचे संपादन केलेले आहे. त्या जमीन मालकांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही. या संदर्भात मी प्रांताधिकारी यांच्याशी बैठका घेतल्या. परंतु अद्यापही तो विषय सुटलेला नाही. दुसरीकडे ठेकेदार वेळेवर काम करत नाही. ठेकेदाराच्या कार्यपद्धतीमुळे बाजूचे शेतकरी हैराण आहेत, काम रखडलेले आहे. रेल्वेकडून ही त्या कामासाठी वारंवार रस्ता बंद केला जातो. संजय साठे, माजी सरपंच, टाकळी ^रेल्वेने अलाइन्मेंट बदलली आहे. त्यामुळे अगोदर जे भूसंपादन झाले आहे, त्याला परत भूसंपादन करावे लागू नये. यासाठी सातबारावर नोंद करण्यासाठी तलाठ्यास पत्र दिले आहे. अलाइन्मेंट बदल फायनल झाल्यानंतर संयुक्त मोजणी करावी लागेल, त्यानंतर महिन्या भरात आमच्याकडील प्रक्रिया पूर्ण होईल. सचिन इथापे, प्रांताधिकारी २०१८ साली झालेल्या सर्व्हेक्षणावर या पुलाचे डिझाईन केले गेले, मात्र त्यानंतर वाढलेली वाहन संख्या लक्षात घेता हा उड्डाणपूल वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुरेसा नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. या ठिकाणी मार्गाची रुंदी ८.५० मीटर्स एवढी आहे, तर पुलाची वाहतूकयोग्य रुंदी १०.५ मीटर एवढी असून कमी आहे, तर दोन्ही बाजूनी सहा मीटर रुंदीचे दोन सेवा रस्ते अज्ञात आलेले आहेत. या उड्डाण पुलासाठी एकूण १३ खांब असणार आहेत काम रखडल्याने उभा मार्गावरून दररोज होणारी वाहतूक प्रचंड प्रभावित झालेली आहे. उड्डाण पुलाच्या भागात एक दे दीड फुटांचे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे अवजड वाहने चालवणे सर्कस झालेली आहे. शिवाय कार आणि दुचाकी सारखी हलकी वाहने याच मार्गावरून जीव मुठीत घेऊन ये-जा करीत असतात. २०१८ चे सर्वेक्षण, पुलाची रुंदी अपुरी ठेकेदाराच्या कार्यपद्धतीमुळे हैराण उड्डाण पुलाच्या भागात एक, दीड फुटांचे खड्डे
सोलापूर जिल्ह्यातील शेती सध्या दुहेरी संकटात सापडली आहे. एकीकडे वाढता उत्पादन खर्च आणि दुसरीकडे रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे कमी होत चाललेली जमिनीची सुपीकता. या पार्श्वभूमीवर रानमसले गावात लोकमंगल कृषी महाविद्यालय, वडाळा येथील कृषी दूतांनी गांडूळ खत निर्मितीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा ठोस संदेश दिला आहे. श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचालित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील कृषी दूतांनी ग्रामीण जागरूकता कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत हा उपक्रम राबवला. राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधत ब्रह्मा गायत्री विद्यामंदिर व छत्रपती शिवाजी महाराज चौक, रानमसले येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गांडूळ खतामुळे जमिनीची रचना सुधारते, ओलावा टिकतो, सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि दीर्घकालीन उत्पादन क्षमता वाढते, हे मुद्दे शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचे ठरले. रासायनिक खतांवर अवलंबून राहण्यापेक्षा सेंद्रिय खतांचा वापर केल्यास शाश्वत शेती शक्य असल्याचा विश्वास या प्रात्यक्षिकातून निर्माण झाला. या कार्यक्रमास ब्रह्मा गायत्री विद्यामंदिरचे प्राचार्य महादेव गवळी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी तसेच जमीन जिवंत ठेवायची असेल तर तिला रसायनांपासून मुक्त करावे लागेल, हा ठळक संदेश कृषी दूतांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला. कृषीदूत अभिषेक पवार यांनी गांडूळ खत निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवत त्याचे शास्त्रीय फायदे समजावून सांगितले. कमी खर्चात घरच्या घरी गांडूळ खत कसे तयार करता येते, कोणते सेंद्रिय अवशेष वापरावेत, तसेच तयार खताचा पिकांच्या वाढीवर होणारा सकारात्मक परिणाम यावर भर दिला. तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक अमोल गरड आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषीदूत प्रतीक नांगरे, सुमित जाधव, सूरज अनपट, ओम साई लिंगायत आणि गणेश केदार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्मितीविषयी विचारलेल्या प्रश्नांमधून त्यांची बदलत्या शेतीकडे असलेली उत्सुकता स्पष्ट झाली. कृषी दूतांनी सर्व शंकांचे निरसन केले. एकूणच, रानमसले येथे झालेला हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरताच मर्यादित न राहता सोलापूर जिल्ह्यात सेंद्रिय शेतीच्या दिशेने सुरू असलेल्या बदलाचा ठळक दाखला ठरला आहे.
कडाक्याच्या थंडीत विदेशी पाहुण्यांचे आगमन:अनेक देशांतून सफर करत ‘रोझी स्टर्लिंग’ पक्षी माढ्यात दाखल
माढा थंडीचा कडाका हुडहुडी भरवणारा असल्याने अगदी दुपारच्या वेळी सुद्धा गारठा जाणवत आहे. कडाक्याच्या थंडीत मात्र माढ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या शेतात व फळबागांमध्ये परदेशी पाहुण्यांचे आगमन झाले आहे. हे पाहुणे आहेत सुमारे १०-११ देशांना पार करून आलेले परदेशी पक्षी ज्यांना रोझी स्टर्लिंग किंवा मराठीत गुलाबी मैना''पळसमैना' किंवा भोरड्या' असे म्हटले जाते.हे पक्षी पाहण्यासाठी पक्षी प्रेमी गर्दी करीत असून पक्ष्याचे फोटो कॅमेरात कैद करण्यासाठी पक्षी प्रेमी कॅमेरामन देखील येताना पहायला मिळत आहेत. या पक्षांचे मूळ स्थान तसे पूर्व युरोप व पश्चिमी जगतात व मध्य आशियात आहे. रोमानिया, युक्रेन, ग्रीस, इराण, तुर्कस्त ान, मंगोलिया, कझाकस्ता न, उझबेकिस्तान, पाकिस्तान , चीन, नेपाळ इ. देशांतून हजारो कि.मी. प्रवास करत हे पक्षी लाखोंच्या संख्येने भारतात येतात. मे ते जुलै हा यांचा विणीचा काळ संपल्यानंतर ते स्थलांतर करतात. या पक्षांच्या शरीराची ठेवण मनमोहक असते. डोके व मान काळीभोर असते तर पोटावर व पाठीवर चमकदार गुलाबी रंगाची झालर शोभून दिसते. पंख निळसर- हिरवट- तपकिरी असतात, डोक्यावर आकर्षण तुरा असतो, मादीचा डोक्यावरील तुरा आखूड असतो. भोरड्यांच्या विष्ठेतून पडलेल्या बिया पावसाळ्यात लवकर रूजून मोठमोठे वृक्ष निर्माण होतात व वनस्पतींची पुन निर्मिती होऊन परागकणांची देवघेव होते. या पक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे हे पक्षी हजारोंच्या संख्येने आकाशात विहंगम समूहनृत्य करतात,यावेळी त्यांची विष्ठा ज्या जमीनीवर पडते ती शेतीसाठी सुपीक जमीन समजली जाते यावर जागतिक पातळीवरील अनेक शास्रज्ञांनी संशोधने केली आहेत.या पक्षांची विष्ठा नैसर्गिक खत म्हणून काम करते.त्यांचे मुख्य खाद्य किटक,फळे व धान्य आहे. माढा महाविद्यालयाच्या शेतीत असलेल्या फळबागांमध्ये व परिसरातील वृक्षांवर विहार करताना हे पक्षी आढळून आल्याने महाविद्यालयाचा परिसर जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पोषक ठरत आहे. गावखेड्यातील दुर्मिळ पक्षांचे पक्षीप्रेमींना ठरले आकर्षण गावखेड्यांतून आता दुर्मिळ होत चाललेल्या रानपिंगळा, मधुबाज, तिर ंगी मुनिया, माळकरी वटवट्या, सुलतान बुलबुल, ससाणा, तांबट, चष्मेवाला, यासारखे अनेक पक्षांचा आढळ या परिसरात दिसत आहे.
भूमिपूजनाचा नारळ कशासाठी फोडला:आ. राजू खरे यांचा राजन पाटील यांना टोला
कोन्हेरी गावचा रस्ता तुम्हाला करायचाच नव्हता तर चार वेळा भूमिपूजनाचा नारळ कशासाठी फोडला, असा सवाल करत पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्ष त्यानंतर काँग्रेस पुन्हा शरद पवार यांची राष्ट्रवादीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आता भाजपामध्ये प्रवेश केला. जरी तुम्ही भाजपामध्ये प्रवेश केला असला तरी मोहोळ नगर परिषदेमध्ये तुमचा पराभव आम्ही केला असल्याचा टोला आमदार राजू खरे यांनी अनगरचे राजन पाटील यांचे नाव न घेता लगावला. कोन्हरे ते चिखली ग्रामा मार्ग- ८२ रस्ता सुधारणा करणे कार्या आमदार स्थानिक विकास निधी सन- २०२५-२६ अंतर्गत मंजूर झालेल्या ५० लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजन समारंभा संपन्न झाला. प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आ. राजू खरे म्हणाले, या रस्त्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर करून त्याचे भूमिपूजन करण्यासाठी आलो आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील म्हणाले की, पूर्वी निधी यायचा सगळं अनगरला जायचा ५० वर्षापासून अनगरकरांची सत्ता आहे. ती मंडळी आम्हाला एक वर्षात किती निधी आणला म्हणून विचारतात तुम्हाला काय विचारण्याचा अधिकार आहे असा सवाल त्यांनी केला. याप्रसंगी राजकुमार पाटील, सुनील पाटील, दीपक पुजारी, दीपक गवळी, अण्णासाहेब पाटील, बालाजी खुर्द, नितीन निळे, दत्तात्रेय मुळे, भिवाजी कांबळे, अतुल गाडे, शंकर शेळकेसह पदाधिकारी उपस्थित होते.
बुधवारी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केले जाणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. अशा ठिकाणी दारू पिण्यासाठी मद्यपींनी एक दिवसाचा परवाना काढला आहे. जिल्ह्यातील मद्य विक्रेत्यांना ११ हजार मद्य सेवन परवान्यांची राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्री केली आहे. यामुळे विदेशी दारूचा परवाना घेऊन एक दिवस मद्य प्राशनचा आनंद घेता येणार आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री व मध्यरात्री (१ जानेवारी २०२६) विदेशी, देशी मद्य विक्री (वाइन शॉप, बिअर शॉपी) पहाटे १ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तर परमीट बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. ३१ डिसेंबरला नियमबाह्य पध्दतीने मद्यप्रशान केल्याचे आढळल्यास थेट ‘ब्रेथ अनालायजर’द्वारे आहे त्या जाग्यांवर तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक प्रमोद सोनाने यांनी दिली. नवीन वर्षांच्या स्वागताची सर्वत्र तयारी सुरु झाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट व्यावासायिक देखील सज्ज झाले आहेत. नवीन वर्ष साजरे करत असताना अवैद्य मद्य विक्री व वाहतुकीवरही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यासाठी ८ विशेष पथके स्थापन करण्यात आली आहे.या पथकात प्रथमच अकार्यकारी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.हे पथक अवैद्य मद्य विक्री, वाहतूक, निर्मिती तसेच विनापरवाना हॉटेल,ढाब्यांवरील अवैद्य मद्यावर कारवाई करणार आहेत.ज्या नागरिकांना एक वर्षासाठी व कायमस्वरुपी मद्य सेवन परवाने लागत असतील त्यांनी ऑनलाइन संकेतस्थळावरुन घ्यावेत, असे आवाहन सोनाने यांनी केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ ते २९ डिसेंबर या कालावधीत ३ हजार १५२ मद्य विक्रीसह अन्य प्रकरणांत ३ हजार १५२ गुन्हे दाखल केले. यात ३ हजार २६५ संशयित आरोपींना अटक केली. ११६६ वाहने जप्त केली.या प्रकरणांत ६ कोटी ९९ लाख ९९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवघ्या दोन वर्षात वर्धमान महावीर नॉलेज हे शैक्षणिक संकुल उभे राहिले आहे. ही गुरु देवांची कृपा आहे. या शैक्षणिक उपक्रमास भगवान वर्धमान महावीर यांचे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे येथील शिक्षा कार्य नेहमीच बहरत राहील. शिक्षणामुळेच राष्ट्र निर्माण होण्यास मदत होईल. येथे शिक्षण घेतलेले विद्यार्थी मोठे कार्य करण्यास सक्षम होतील, असे प्रतिपादन प्रबुध्द विचारक पूज्य आदर्शऋषीजी महाराज यांनी केले. नगर-कल्याण रोडवर जैन सोशल फेडरेशनमार्फत उभारण्यात आलेल्या वर्धमान महावीर नॉलेज पार्क अंतर्गत ऑप्टेमेट्री कॉलेज, नर्सिंग कॉलेज व सीबीएसई स्कूलचे लोकार्पण रविवारी साधूसाध्वीजींच्या सान्निध्यात व आशीर्वादाने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अहिल्यानगर शहरात उच्च दर्जाच्या शिक्षणाची कवाडे या नॉलेज पार्कच्या माध्यमातून खुली झाली आहेत. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर मूल्यशिक्षण, व्यावहारिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळावेत या उद्देशानेच या तीनही संस्था कार्यरत असणार आहेत. हा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषीजी, युवाचार्य पूज्य महेंद्रऋषीजी,प्रबुद्ध विचारक आदर्शऋषीजी, उपप्रवर्तक तारकऋषीजी, गौरवमुनीजी, सत्यप्रभाजी, श्रुतीदर्शनाजी, विपुलदर्शनाजी आदी साधू साध्वीजींच्या सान्निध्यात व उद्योजक प्रकाश धाडीवाल, दिना धाडीवाल, आदित्य धाडीवाल, पेमराज बोथरा, मनिषा बोथरा, जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी, हस्तीमल मुनोत, सीए रमेश फिरोदिया आदींच्या उपस्थितीत झाला. पूज्य महेंद्रऋषीजी महाराज म्हणाले, आयुष्य स्थिरस्थावर असावे असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. हेच ज्ञान देण्याचे काम वर्धमान महावीर नॉलेज पार्क येथे होणार आहे. भविष्यात या शिक्षण संस्थेचा नावलौकिक भारतभर होईल यात शंका नाही. सुनील मालू म्हणाले, याठिकाणी र्धमान महावीर नर्सिंग कॉलेज मध्ये बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम उपलब्ध आहे.वर्धमान महावीर ऑप्टोमेट्री कॉलेजमध्ये दोन वर्षांचा ‘डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री' अभ्यासक्रम सुरू केला आहे. वर्धमान महावीर सीबीएसई स्कूलमध्ये अहिल्यानगरमध्ये प्रथमच इस्रो ट्यूटर-संचलित सॅटेलाइट व रॉकेटरी स्पेस लॅब, तसेच ट्रिपल आयटी अलाहाबादच्या तज्ज्ञांनी डिझाइन केलेली रोबोटिक्स व एआय लॅब आणि हॅलो ब्रिटानिका लँग्वेज लॅब आहे. आधुनिकतेसोबतच मुलांचे बालपण जपण्यासाठी ही शाळा डे-बोर्डिंग आणि बॅगलेस व टिफिनलेस स्वरूपाची असेल. स्वागत डॉ.प्रकाश कांकरिया यांनी, तर आभार निखिलेंद्र लोढा यांनी मानले. या शैक्षणिक संकुलामुळे नगरची वेगळी ओळख आचार्यश्रींच्या कृपाशीर्वादाने नगर परिसरात सेवा, श्रद्धा आणि शिक्षा या तीन तत्त्वांवर १९९२ पासून निरंतर कार्यरत असलेल्या जैन सोशल फेडरेशनमार्फत दर्जेदार व सुसंस्कारित शिक्षणासाठी वर्धमान महावीर नॉलेज पार्कची स्थापना केली आहे. याठिकाणी २ लाख स्क्वेअर फूट जागेत शैक्षणिक इमारती उभारल्या जात आहेत. भविष्यात येथे हायटेक शिक्षण सुविधा वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत आणखी अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. आरोग्य सेवेनंतर आचार्यश्रींचे आणखी एक स्वप्न साकार होत असल्याचा आनंद आहे. आगामी काळात शैक्षणिक गुणवत्तेमुळे नगरची एक वेगळी ओळख या शैक्षणिक संकुलामुळे होईल, असा विश्वास आहे, असे संतोष बोथरा म्हणाले.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने ‘हॅपी मॉडेल स्कूल प्रकल्प’ आणि ‘नेशन बिल्डर पुरस्कार’ वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेत कार्यरत राहून उल्लेखनीय योगदानाबद्दल ११ आदर्श शिक्षकांना सन्मानित करण्यात आले, ११ जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. रोटरीच्या 'हॅपी मॉडेल स्कूल' प्रकल्पांतर्गत ११ शाळांना भौतिक सुविधा पुरवल्या. यात शाळांसाठी ऑफिस कपाट, आरओ वॉटर प्युरिफायर आणि वाचनालयासाठी दर्जेदार पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी आणि वाचनाची गोडी लागावी, या उद्देशाने हे साहित्य देण्यात आले. जिल्हा परिषद शाळेत कार्यरत राहून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११ शिक्षकांना ‘नेशन बिल्डर’ (राष्ट्र उभारणीचे शिल्पकार) पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात नारायण चंद्रकांत मंगलारम (डोंगरगण - राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी), बाबा भीमराज पवार (दैठणे गुंजाळ), योगेश जनार्दन सूर्यवंशी (यशवंत नगर), मंगेश खिल्लारे (टाकली धोकेश्वर), खिल्लारे मॅडम (पारनेर), खरदास मॅडम(श्री मार्कंडेय विद्यालय) यांच्यासह ११ शिक्षकांचा समावेश होता. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी रोटरीचे माजी प्रांतपाल रोटेरियन प्रमोद जेजुरीकर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शिक्षक हे समाजाचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांनी नेहमी मोठी स्वप्ने पहावी आणि ती पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करावे. असिस्टंट गव्हर्नर मधुरा झावरे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष सुनील कटारिया यांनी केले. त्यांनी रोटरीच्या सेवाकार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन नेशन बिल्डर अवॉर्डचे चेअरपर्सन रो. राजेश परदेशी यांनी, तर आभार सचिव रो. अमर गुरप यांनी मानले. या प्रसंगी कोषाध्यक्ष धीरज मुनोत व रोटरीचे पदाधिकारी, सदस्य आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल रोटरी क्लबतर्फे ११ आदर्श शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
खान्देशच्या साहित्य विश्वाला स्त्री साहित्यिकांनी भरीव योगदान देत ते समृद्ध केले आहे, असे गौरवोद्गार धुळे येथील साहित्यिक व समीक्षक डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी काढले. खान्देशातील स्त्री साहित्यिकांचे योगदान या विषयावर आयोजित परिसंवादात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळातर्फे आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय ग्रामीण युवा मराठी साहित्य संमेलनाचा मंगळवारी समारोप झाला. प्रा. बी. एन. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. जिल्हाभरातून आलेल्या कवींनी मोठ्या संख्येने आपल्या कविता सादर केल्या. याप्रसंगी झालेल्या परिसंवादात डॉ. रमेश माने (कविता, धुळे), साहेबराव मोरे (कथा, चाळीसगाव),लतिका चौधरी (आत्मचरित्र, दोंडाईचा), अ. फ. भालेराव (कादंबरी) तसेच रमेश धनगर (बालसाहित्य, गिरड) यांनी खान्देशातील स्त्री साहित्यिकांच्या साहित्य प्रतिमेचा सखोल आढावा घेत नवोदित स्त्री साहित्यिकांनी लेखन क्षेत्रात सक्रिय व्हावे, असे आवाहन केले. संमेलनाच्या यशस्वितेसाठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डी. डी. पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस. आर. महाजन, सचिव गोरख सूर्यवंशी, विश्वस्त सुखदेव महाजन, रुपेश बिऱ्हाडे, नागनंदा मघाडे, पी. डी. पाटील यांच्यासह सर्व साहित्यिकांनी सहकार्य केले. दोन दिवसीय या साहित्य संमेलनाचा जिल्हाभरातल्या साहित्यिकांनी लाभ घेतला. गझल गायन सत्राने उपस्थित मंत्रमुग्ध पहाडी आवाजातील तुकाराम ढिकले यांच्या गझल गायनाने श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. समारोपप्रसंगी काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन डॉ. फुला बागुल यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
वनतस्कराला सिंगरमाळ येथून अटक:बाऱ्हे वनविभागात वृक्षतोडीच्या वेगवेगळ्या चार प्रकरणांत संशयित
सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे वनविभागात वृक्षतोडीच्या वेगवेगळ्या चार प्रकरणात हवा असलेला संशयित भरत ऊर्फ गोरख शिवा ढाढर (२६, रा. भानवळ, ता. धरमपूर) यास दिंडोरी न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. गुन्हे वनविभाग व एफडीसीएमच्या संयुक्त पथकाने गुजरातमधील धरमपूर तालुक्यातील सिंगरमाळ येथे लपलेल्या संशयितास मंगळवारी (दि. ३० डिसेंबर) पहाटे २ वाजता सापळा रचत ही धडक कारवाई करत ताब्यात घेतले होते. मंगळवारी संशयित भरत ढाढर यास दिंडोरी न्यायालयात हजर केले असता १४ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. संशयित आरोपी सासऱ्यांच्या घरात असल्याची गोपनीय माहिती मिळताच बाऱ्हे वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी तसेच एफडीसीएम वनक्षेत्र पेठच्या पथकाने संयुक्तरित्या छापा टाकला. अटकेनंतर मोठ्या सुरक्षेसह गुजरातहून महाराष्ट्रातील बाऱ्हे वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आले. आरोपीवर महाराष्ट्रात चार गुन्हे दाखल आहेत.
मूळचे नांदगाव तालुक्यातील परधाडी येथील रहिवासी व सध्या ओझर येथे वास्तव्यास असलेले जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक रमेश पुरकर यांनी गावातील चार एकर बागायत जमीन जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज संस्कारित बाणेश्वर महादेव मंदिर संस्थान, ओझर यांना दान केली आहे. सोमवारी दुपारी नांदगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पुरकर दांपत्य, संस्थेचे अध्यक्ष शांतीगिरी महाराज, येथील भक्त परिवाराचे तालुका सेवक हरेश्वर सुर्वे यांच्या उपस्थितीत कायदेशीर सोपस्कार पार पडले. संत जनार्दन स्वामी यांनी १९६६ मध्ये पुरकर यांना दीक्षा दिली होती. तेंव्हापासून ते स्वामींचे निस्सीम भक्त आहेत. आतापर्यंत त्रंबकेश्वर, नाशिक, पिनाकेश्वर आणि बाणेश्वर ओझर असे पाच वेळा सलग सात दिवस अन्न पाण्याविना पारायण केले आहे. स्वामी कृपेने आयुष्यात खूप काही मिळाल्याने मूळ गावी संस्थेचे बालसंस्कार केंद्र व गोशाळा व्हावी, यासाठी जमीन दान करण्याचा निर्णय घेतला, निर्णयाला संपूर्ण कुटुंबाचीही साथ लाभली. बागायती जमिनीला सरासरी २० ते २५ लाख रुपये एकर असा दर मिळतो. शिक्षक दांपत्याने विहीर असलेली बागायती जमीन दान केली.
शहराचा पाणीप्रश्न करंजवण योजनेमुळे कायमस्वरूपी सुटला असून, एमआयडीसीलाही मंजुरी मिळाली आहे. भूमिगत गटार योजनेसारखी लोकोपयोगी कामे सुरू असून, यापुढे मनमाडला गतीशील व प्रगतीशील शहर म्हणून विकसित करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी दिली. जनतेने प्रचंड विश्वासाने पालिकेची सत्ता महायुतीच्या हाती दिली असून, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. निवडून दिलेले प्रतिनिधी गैरवर्तन करत असतील, तर प्रसंगी त्यांचे राजीनामे घेण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. नुकत्याच झालेल्या मनमाड नगरपालिकेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीचे थेट निवडून आलेले नगराध्यक्ष योगेश पाटील आणि २४ नगरसेवकांनी प्रचंड बहुमत मिळवून विजय संपादन केला. यानिमित्त सोमवारी रात्री एकात्मता चौकात नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सर्व नवनिर्वाचित नगरसेवक-नगरसेविका, युतीचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. नक्षीदार रांगोळ्या, सनई-चौघडा, तुतारी, ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत योगेश पाटील यांनी नगराध्यक्षपदाची शपथ घेऊन पदभार स्वीकारला. पाणी व विकासाअभावी शहर सोडून गेलेले नागरिक पुन्हा मनमाडमध्ये स्थायिक होत असून, व्यापार-उद्योग वाढावा आणि स्वच्छ, सुंदर मनमाड घडावे यासाठी नगरपालिकेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार कांदे यांनी केले. प्रारंभी मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांनी आमदार सुहास कांदे, अंजूम कांदे, फरहान खान, नूतन नगराध्यक्ष योगेश पाटील व सर्व नगरसेवकांचे सत्कार केले. ब्रह्मवृंदांच्या विधीनंतर शपथविधी पार पडला. माजी नगराध्यक्ष, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी पोलिस सतर्क झाले असून, शहर व परिसरातील हॉटेल, लॉज, रिसॉर्ट, व्हिला, खासगी बंगले, रो-हाऊसेस, धाबे व रेस्टॉरंट चालकांना अमली पदार्थ, हुक्का व इतर नशेच्या पदार्थांवर कडक बंदी घालण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी दिला. इगतपुरी पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत त्यांनी आस्थापनांच्या मालक व प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. सर्व रजिस्टर अद्ययावत ठेवणे, सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवणे, शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच आस्थापना सुरू व बंद करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. विनापरवाना हुक्का, मादक पदार्थांची विक्री किंवा मद्यपानास परवानगी देऊ नये. लाउडस्पीकरचा वापर परवानगीप्रमाणेच करावा व डीजे, साऊंड सिस्टिममुळे ध्वनीप्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले. इगतपुरी हे पर्यटनस्थळ असल्याने नववर्षानिमित्त मोठी गर्दी होते. मागील काही वर्षांत रेव्ह पार्टी व अमली पदार्थांच्या प्रकरणांमुळे गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे यापुढे अशा प्रकारांना अजिबात थारा दिला जाणार नाही, अशी तंबी उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधिकारी सागर इंगळे यांनी दिली. बैठकीच्या शेवटी गोपनीय विभागाचे पोलिस कर्मचारी नीलेश देवराज यांनी आभार मानले. इगतपुरीत नववर्षाच्या रात्री पूर्वी काही ठिकाणी बेकायदा रेव्ह पार्टी आणि हुक्क्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यातून पोलिसांना कठोर कारवाई करावी लागली होती. याच अनुभवातून यंदा पोलिसांनी आधीच आस्थापनांवर बंधने घालत शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली. पूर्वी घडलेल्या गुन्ह्यांमुळे पोलिसांकडून दक्षता
पेंच व्याघ्र प्रकल्प येथून ११ डिसेंबरला झेपावलेले गिधाड १७ दिवसात ७०० किलोमीटरचा प्रवास करून नाशिक जवळील अंजनेरी येथे दाखल झाले.वनविभागाकडून पाठीवर ट्रान्समीटर लावलेले तसेच पायात १३२ नावाने टॅगिंग करून सोडलेले हे गिधाड निफाड तालुक्यातील दारणा सांगवी या गावात आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. सोमवारी (दि.२९) दारणा सांगवी येथे ए.आर. इ. ए. एस. फाउंडेशन व निफाड बचाव पथकाने गिधडाला सुरक्षित रेस्क्यू केले. नाशिक पूर्व वन विभागाचे उपवनसंरक्षक राकेश सेपट, सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली ए.आर.इ.ए.एस. फाउंडेशन संस्थेचे संचालक व वन्यजीव अभ्यासक अमोल सोनवणे, मंगेश चारोस्कर, करण पवार, साहिल कदम यांच्यासह आधुनिक बचाव पथकाने ही मोहीम यशस्वीपणे राबविली. नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, जालना, संभाजीनगर मार्गे हे गिधाड नाशिक मध्ये दाखल झाले. प्रवास १७ दिवस ७५० किलोमीटर डोंगर कड्यांवर मुक्काम करत प्रवासात दोन वेळा भोजन घेतले.
मिक्सर हायवा- दुचाकीची समोरासमोर धडक, 1 ठार:बिडकीनजवळ अपघात, एक जण गंभीर जखमी
मिक्सर हायवा आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार झाला. दुचाकीवरील दुसरा युवक गंभीर जखमी झाला. ही दुर्घटना मंगळवारी (दि. ३०) सकाळी दुर्गा हायस्कूलसमोर घडली. यामध्ये विशाल भगवान राठोड (२२, रा. सहयोगनगर, बिडकीन) याचा मृत्यू झाला. सचिन जाधव (२१, रा. खंडाळे, ता. अहमदपूर) याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. मिक्सर हायवा (एमएच २०-ईजी ८०३३) बिडकीन येथून चित्तेगावकडे जात होता. दरम्यान, दुचाकी (एमएच २० जीएम ७९५७) यांच्यात धडक झाली. दुचाकीचा चक्काचूर झाला. घटना घडताच अनेक नागरिकांनी धाव घेऊन ॲम्ब्युलन्स बोलावली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदपाठक यांनी विशाल राठोड यास मयत घोषित केले. जखमी सचिन जाधव यास प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशाल राठोड हा मूळचा परळी येथील होता. त्याने बिडकीन येथे मैत्र चहाचा कट्टा दुकान चालू केले होते. विशालचे वडील भगवान राठोड हे लेबर कॉन्ट्रॅक्टर असून ते बिडकीन येथेच राहतात. विशाल हा एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी असून एक विवाहित आहे. विशालने बिडकीन येथे मैत्र चहाचा कट्टा दुकान थाटले होते. त्याच्या स्वभावामुळे दुकानही चांगल्या प्रकारे चालू होते. अशातच बिडकीन येथे घराचे बांधकामही त्यांनी चालू केले होते. विशाल हा सकाळी सहा वाजताच चहाचे दुकान उघडायचा. मंगळवारी त्याला उशीर झाल्याने वडिलांनी दुकान उघडले. नंतर तो दुकानाकडे दुचाकीवरून जात होता. घरी होता एकुलता एक
थर्टी फर्स्टच्या आदल्या दिवशी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला ४,२०० पर्यटकांनी भेट दिली. विदेशी पर्यटकांकडून ६०० रुपये, तर भारतीय पर्यटकांकडून ४० रुपये शुल्क घेतले जाते. तरीही लेणीत पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. फिल्टर मशीन असूनही त्याची साफसफाई आणि दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे पर्यटकांना कुंडाचे पाणी प्यावे लागत आहे. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. थंडीच्या दिवसांत सोयगाव आगाराकडून एसी बसेस जास्त चालवल्या जातात. एसी बसचे भाडे २५ रुपये, तर नॉन एसीचे १५ रुपये आहे. थंडीत एसी बस का, असा सवाल पर्यटक करत आहेत. अजिंठा लेणीला आलेल्या शालेय सहलींना कोणतीही सवलत दिली जात नाही. सर्वसामान्य भाडे आकारले जाते. त्यामुळे सहलीचे बजेट बिघडते. एका शाळेच्या शिक्षकांनी दोन बसेसमधील सुमारे ७० विद्यार्थ्यांना अजिंठा टी पॉइंटपासून लेणीपर्यंत ४ किमी पायी नेले. निदान विद्यार्थ्यांना तरी बसची सुविधा द्यावी, अशी मागणी होत आहे.
बाजार समिती सभापतिपदाची माळ अखेर श्रीराम शेळके यांच्या गळ्यात
छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदासाठी मंगळवारी दुपारी संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत श्रीराम शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. एकूण १८ संचालकांपैकी १७ संचालक उपस्थित होते. सर्वांनी एकमताने श्रीराम शेळके यांना पाठिंबा दिला. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व उपस्थित संचालकांनी सभापतिपदासाठी एकमुखी पाठिंबा दिला. श्रीराम शेळके हे भाजपचे जिल्हा सरचिटणीस आहेत. बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक २०२३ मध्ये झाली होती. त्या वेळी भाजपचे ९, काँग्रेसचे ३, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गटाचे प्रत्येकी १, व्यापारी २ आणि हमाल मापारी मतदारसंघातून १ संचालक निवडून आले होते. काँग्रेस वगळता इतर सर्वांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मंगळवारी काँग्रेसचे तीन संचालक वगळता उर्वरित १५ संचालक सकाळी राजस्थानमधून परतले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी उपनिबंधक समृद्ध जाधव होते. त्यांना सचिव विजय शिरसाट यांनी सहकार्य केले. विजयानंतर आ. अनुराधा चव्हाण यांनी श्रीराम शेळके यांचा सत्कार केला.
आळंद परिसरात सोमवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्गावर रात्री ९ वाजेच्या सुमारास बिबट्या आपल्या पिल्लांसह रस्ता ओलांडताना काही प्रवाशांना दिसला. मंगळवारी सकाळी वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वनरक्षक अजीम शेख आणि विजय कुंटे यांनी परिसरात पाहणी केली. यावेळी त्यांना ओल्या मातीत मादी बिबट्या आणि तिच्या १ पिल्लाचे पाऊलखुणा (ठसे) आढळून आले. यामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्याचे अधिकृतरीत्या स्पष्ट झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाताना समूहाने जावे. हातात बॅटरी आणि काठी ठेवावी. तसेच मोबाइलवर गाणी लावावीत, जेणेकरून आवाजामुळे वन्यप्राणी दूर निघून जातील. आम्ही या भागावर लक्ष ठेवून आहोत, अशी माहिती फुलंब्रीचे वनरक्षक अजीम शेख यांनी दिली. रात्रीच्या वेळी शेतात समूहाने जा
जि.प. कें.शाळेत राजमाता जिजाऊ विद्यार्थी बचत बँकेचे केले उद्घाटन
दशसूत्री उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सोयगाव येथे विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक नव्हे, तर प्रत्यक्ष व्यावहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने ‘राजमाता जिजाऊ विद्यार्थी बचत बँक' हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन तिरुपती अर्बन पतसंस्थेचे व्यवस्थापक विकास देसाई यांच्या शुभहस्ते पार पडले. या वेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागवत गायकवाड, उपाध्यक्षा राधाबाई सोनवणे, माजी विद्यार्थी संघाचे रवींद्र काळे, एच. के. काळे, शिक्षणप्रेमी राजेंद्र दुतोडे, सुनील ठोंबरे, दुर्गाबाई निकुंभ, रवींद्र साखळे, रामेश्वर शिरसाठ, वैशाली सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे या बँकेत खऱ्या बँकेप्रमाणेच संपूर्ण व्यवहार प्रक्रिया विद्यार्थी स्वतः करून प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत. या संपूर्ण उपक्रमामागे शाळेचे कृतिशील व दूरदृष्टी असलेले मुख्याध्यापक किरण कुमार पाटील यांची संकल्पना व मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकवण्यावर भर देणारा हा उपक्रम त्यांच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. कार्यक्रमास पंकज रगडे, मंगला बोरसे, रामचंद्र महाकाळ, सुरेखा चौधरी, प्रतिभा कोळी, गणेश बाविस्कर, बिलाल बागवान आदी उपस्थित होते. सर्व व्यवहार बँकेप्रमाणे : शाळेने या उपक्रमासाठी छापील बँक चेक, विड्रॉल स्लिप (रक्कम काढण्याचे अर्ज), नोंदवही व आवश्यक कागदपत्रे तयार करून आणली होती. प्रत्यक्ष बँकेत जसे चेक भरून पैसे काढले जातात, त्याच पद्धतीने रक्कम काढण्यासाठी विड्रॉल स्लिप व रक्कम भरण्यासाठी भरणा स्लिप विद्यार्थ्यांच्या बचत बँकेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळे जणू शाळेच्या आवारातच एक स्वतंत्र बँक सुरू असल्याचा अनुभव विद्यार्थ्यांना येत आहे. या व्यवहारात विद्यार्थी कॅशियर, लिपिक व व्यवस्थापक यांनी पैसे मोजणे, नोंद करणे, चेक तपासणे, जमा–खर्चाची नोंद घेणे अशी सर्व कामे मोठ्या जबाबदारीने पार पाडत आहेत.
अतिवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या घाटनांद्रा घाटातील रस्त्याची डागडुजी पूर्ण झाली आहे. तब्बल चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारपासून या मार्गावर एसटी बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे. सिल्लोड आगाराच्या पाचोरा मार्गावरील सर्व बसेस सुरू झाल्याने प्रवासी, विद्यार्थी आणि नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे घाटनांद्रा घाटातील रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणी मोठे खड्डे, भगदाडे व उखडलेला मुरूम यामुळे अपघाताचा धोका वाढला होता. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने या घाटातील वाहतूक बंद केली होती. परिणामी सिल्लोड, पाचोरा व सोयगाव या आगारांच्या बसेस चार महिन्यांपासून बंद होत्या. याचा फटका प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार व व्यापाऱ्यांना बसत होता. खाजगी वाहनांद्वारे किंवा पर्यायी मार्गाने अधिक खर्च करून प्रवास करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल कन्नड–सोयगाव तालुक्याच्या आमदार संजना जाधव यांनी घेतली. त्यांनी १९ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष घाटाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीचे निर्देश दिले. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. पाच ते सहा दिवसांत घाटातील डागडुजी पूर्ण करण्यात आली. यामध्ये वळण रस्ते मोकळे करणे, रस्त्यावर पडलेले मुरूमाचे ढिग बाजूला करणे, दोन वाहने एकाच वेळी जाऊ शकतील अशी रुंदीकरण करणे तसेच भगदाडे बुजवण्याचे काम करण्यात आले. विभागीय प्रमुखांच्या पाहणीनंतर हिरवा कंदील : रस्त्याची डागडुजी पूर्ण झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एसटी महामंडळाच्या विभागप्रमुखांनी घाटाची पाहणी केली. रस्ता सुरक्षित असल्याचा अहवाल प्राप्त होताच मंगळवारपासून बस सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला.
खुलताबाद सोनखेडा गावातील ९ सिंचन विहिरींच्या कामात मोठ्या अपहाराचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते संतोष अंबादास लाटे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारपासून (दि. २९) आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. दोषींवर गुन्हे दाखल न झाल्यास उपोषण थांबवणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर विहिरींच्या कामात लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप लाटे यांनी केला आहे. कागदोपत्री कामे पूर्ण दाखवून निधीचा गैरवापर झाल्याचे त्यांनी सांगितले. चौकशी जाणीवपूर्वक दडपली जात असल्याचा आरोप करत त्यांनी पंचायत समितीसमोर ठाण मांडले आहे. गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी नेमलेल्या चौकशी समितीमधील पदाधिकारी उपोषणस्थळी आले होते. त्यांनी चौकशी अहवाल सादर केला. मात्र लाटे यांनी अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “चार महिन्यांपूर्वी अर्ज दिल्यानंतरही अहवाल रखडला. अर्जानंतरच जेसीबीने खड्डे खोदले. माती अजूनही ताजी आहे. तरीही अहवालात विहिरी ढसळल्या, असे कसे नमूद केले?” असा सवाल त्यांनी केला. मंगळवारी दुपारी खिर्डी ग्रामपंचायत सदस्य आकाश हिवर्डे, साईनाथ मातकर, दरेगावचे राजेंद्र गायकवाड, सोनखेडा उपसरपंच नवनाथ खिल्लारे, माजी सरपंच शेषराव वाकळे, सुभाष वाकळे यांच्यासह अनेक सदस्यांनी लाटे यांची भेट घेतली. खोटा आरोप असल्यास मला शिक्षा द्या ः संतोष लाटे दोन महिन्यांत विहीर कशी पडू शकते? शासन निधी विहीर पडण्यासाठी देतो का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. “कामे बोगस असतील तर दोषींवर गुन्हे दाखल करा. कामे खरी असतील तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी खोटा आरोप केला असेल तर शिक्षा भोगण्यास तयार आहे,” असे लाटे यांनी स्पष्ट सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामासाठी राजकीय घडामेाडींना वेग आला आहे. मुंबईवर आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी उबाठा आणि मनसे यांची युती झाली असतानाच आता ठाकरे बंधूंच्या या नव्या युतीला राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटानेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात एक नवीन “पॉवर गेम’ पाहायला मिळणार आहे. एकूण २२७ जागांसाठी या नव्या समीकरणाने कंबर कसली आहे. मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी राज ठाकरे यांच्या मनसेने ५२ जागांवर उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. तर सर्वात मोठा वाटा उचलत शिवसेना (उद्धव ठाकरे) गट १६४ जागांवर निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने ११ उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसने मविआतून बाहेर पडत “स्वबळाचा’ नारा दिला आहे. इतकेच नव्हे तर, काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या “वंचित बहुजन आघाडी’सोबत युती करून निवडणुक रिंगणात उतरले आहेत. मुंबईत मराठी मतांचे होणारे विभाजन ही नेहमीच शिवसेनेसाठी चिंतेची बाब राहिली आहे. मात्र, आता दोघे भाऊ एकत्र आले आहेत. शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार! ठाणे महापालिकेत महायुतीचे काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. महायुतीचा अधिकृत फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. ठाण्यातील या जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सेनेने आपला वरचष्मा कायम राखला आहे. ठाण्यात शिंदेसेना ८७ आणि भाजप ४० जागांवर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. दरम्यान, ठाकरे बंधू यांनीही दंड थोपाटले आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत कोणाला किती यश मिळते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. भाजप- शिंदेसेनेला ठाकरेंचे आव्हान भिवंडी- निजामपूर महायुतीमध्ये भाजप ३० जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) २० जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. उर्वरित जागांवर मित्रपक्ष किंवा स्थानिक अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला जाऊ शकतो. ठाकरे गट आणि मनसे येथे एकत्र लढणार असल्याने चित्र स्पष्ट झाले आहे. मनसे बहुजन विकास आघाडीसोबत काँग्रेस आणि मनसेने बहुजन विकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. वसई-विरारमध्ये ठाकरे गट सुमारे ८० जागांवर निवडणूक लढेल, तर बविआ देखील येथे लढत देईल. तसेच येथे भाजप आणि शिंदेसेना एकत्र लढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शिंदेंना ६६, भाजपला ५६ जागा कल्याण डोंबिवली महापालिका ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जाते. खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकूण १२२ जागा आहेत. शिंदे गट ६६ जागा लढणार आहेत. तर भाजपच्या वाट्याला ५६ जागा लढेल. एकनाथ शिंदे - गणेश नाईक सामना रंगणार नवी मुंबईत शिवसेना आणि भाजप युती तुटल्याने दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे नवी मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक असा सामना रंगणार आहे. तर दुसरीकडे भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मागितलेल्या १३ जणांना उमेदवारी न मिळाल्याने म्हात्रे संतप्त झाल्या असून, त्यांनी नाईकांना थेट आव्हान दिले आहे. नवी मुंबई महापालिकेत एकूण १११ जागा आहेत. मात्र भाजपकडून शिंदे गटाला अवघ्या २० जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. शिंदे गटाला हा प्रस्ताव मान्य नसल्याने नव्हता. भाजप आणि शिंदेसेना आमनेसामने मीरा भाईंदर हा भाजपचा मजबूत गड मानला जातो. माजी आमदार नरेंद्र मेहता आणि विद्यमान आमदार गीता जैन (ज्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे) यांच्यातील अंतर्गत वाद मिटवून भाजप येथे स्वबळावर लढत आहे. शिवसेना (शिंदे गट): प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाने या शहरात आपली ताकद वाढवली आहे.
प्रभाग क्रमांक ११ हा सुखवस्तू मध्यमवर्गीयांचा प्रभाग आहे, पण पथदिवे, पाणीपुरवठा आणि अतिक्रमणासारख्या समस्यांचा विळखा आहे. गणेश कॉलनी, आविष्कार कॉलनी, एन-६, चिश्तिया कॉलनी, जिव्हेश्वर कॉलनी या भागांमध्ये नवी बाजारपेठ वसली असल्याने या ठिकाणी व्यावसायिक प्रतिष्ठानांची अतिक्रमणे, घरांची अतिक्रमणे, यामुळे रस्त्यावरच होणारी पार्किंग आणि वाहतूक कोंडीची समस्या आहे. याशिवाय पथदिव्यांकडे नियमित लक्ष दिले जात नाही. यामुळे टवाळखोर तरुण, दारुडे अंधार पडल्यावर सर्रास फिरतात. यामुळे सायंकाळी परिसरात फिरणाऱ्या नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतो. शहरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यांच्या घटना लक्षात घेता, नागरिकांना अंधार पडल्यावर घराबाहेर पडणे भीतिदायक वाटते. याशिवाय पाण्याची समस्या आहे. ६ दिवसांनी येणारे पाणी अनेकदा ९ ते १० दिवसांनी येते. पाणी येण्यास उशीर होत असल्यास टँकर पाठवले जात नाही. क्र. ११, गणेश कॉलनी, आविष्कार कॉलनी, रहेमानिया कॉलनी २०१५ : नगरसेवक, पक्ष, मतदानवॉर्ड क्र. उमेदवार, पक्ष मतदान४०. मकरंद कुलकर्णी, शिवसेना २,१५०६२. शीतल गादगे, शिवसेना १,७६९६३. अब्दुल रहीम, एमआयएम १,७१९४१. इर्शद खान, एमआयएम २,१७९ या प्रभागात मकरंद कुलकर्णी यांच्या वॉर्डात सर्वाधिक ११ कोटींची कामे झाली आहेत. याशिवाय १२ कोटींचा सावरकर संग्रहालयाचा प्रकल्प प्रस्तावित आहे. बॉटनिकल गार्डन संपूर्ण प्रभागाच्या नागरिकांसाठी जमेची बाजू आहे. शीतल गादगे यांनीही १२ कोटींची कामे केली आहेत. 1. पथदिवे: बंद दिव्यांमुळे रात्री घराबाहेर पडणे कठीणया भागातील नागरिकांना बंद पथदिव्यांमुळे रात्री घराबाहेर पडताना भीतीचा सामना करावा लागतो. असुरक्षित वातावरण असल्याची भावना निर्माण होते. 2. पाणीपुरवठा: १० दिवसांनंतर पाणी येत असल्याने नागरिक त्रस्तप्रभागात ८ ते १० दिवसांनंतर नळावाटे पाणी येते. पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. अनियमित पाणीपुरवठ्यामुळे प्रभागातील नागरिक त्रस्त आहेत. 3. अतिक्रमण: चौकांमध्ये कायम वाहतुकीची कोंडीपरिसरातील बाजारपेठांमध्ये सातत्याने होणाऱ्या अतिक्रमणांवर नियंत्रण नाही. आझाद चौक, बजरंग चौक, आविष्कार चौकांत वाहतूक कोंडी कायम होते.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत ८ माजी महापौरांच्या प्रवेशाची चर्चा कायम केली जात होती. मात्र, शिंदेसेनेने ५ महापौरांना उमेदवारी दिली नाही. केवळ माजी महापौर अनिता घोडेले आणि त्र्यंबक तुपे यांनी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेत गेल्या काही वर्षांत सर्वाधिक चर्चेच्या राहिलेल्या नंदकुमार घोडेले यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. माजी महापौर विकास जैन, विमल राजपूत, कला ओझा, नंदकुमार घोडेले, अनिता घोडेले, गजानन बारवाल, किशनचंद तनवाणी, त्र्यंबक तुपे हे उद्धवसेनेतून शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले होते. मात्र, आता निवडणुकीत केवळ दोनच माजी महापौर दिसणार आहेत. दरम्यान, माजी महापौर बारवाल यांनी शिंदेसेनेत उमेदवारी मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उद्धवसेनेशी संपर्क साधला. उद्धवसेनेने त्यांना ए, बी फॉर्म दिले. मात्र उशीर झाल्याने बारवाल यांच्या पत्नी प्रभावती बारवाल यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. जैन यांनी नाकारली उमेदवारी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर पक्षातील काही नेत्यांनी आरोप केल्यामुळे विकास जैन यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. जैन ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले की, पालकमंत्री शिरसाट हे पक्षाचे पालक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षातीलच नेत्याने आरोप केले. त्यामुळे मी दुखावलो आहे. त्यामुळे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेत काही जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. मात्र, पुन्हा तिकीट घेतले. मी लढवणार नाही. काही लोकांनी तिकिटासाठी आंदोलन केले. मला तसे करायचे नाही. नव्यांना संधी द्यावी लागेल नव्या लोकांना संधी द्यावी लागेल. माजी महापौर विकास जैन यांनी पक्षाची शिस्त पाळत आमच्यावर आरोप झाले म्हणून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. - संजय शिरसाट, पालकमंत्री
सर्वसाधारण सभेत अनेक गमतीजमती घडतात. अनेक वादग्रस्त विषय पुढं येतात. आपण आज काही गमतीदार विषयांवर बोलणार आहोत. मी सांगते काही किस्से. बऱ्याच वेळा ठराव करताना काही त्रुटी राहून जातात. मग त्या दुरुस्त करण्याची मागणी होते. अशीच एक मागणी सभागृहात झाली, पण त्याआधी आपण हे पूर्ण प्रकरण समजून घेऊयात. हा विषय होता नगरसेवकांच्या स्वेच्छानिधीचा. मागील सभेत त्याबाबत एक ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यात प्रशासनानं नियमानुसार दुरुस्ती केली आणि तो विषय सभेपुढे आणला. आता ही दुरुस्ती करताना नेमकं काय चुकलं होतं तेच लिहिलेलं नव्हतं. त्यात म्हटलं होतं की, मागील सभेतील विषय क्रमांक ६२ पृष्ठ क्रमांक ३५ वरील मुद्दा क्रमांक ४ नुसार नगरसेवक आपल्या स्वेच्छानिधीतून एखाद्या नोंदणीकृत खासगी संस्थेला १५ हजार रुपयांपर्यंतचे खेळणी किंवा इतर साहित्य देऊ शकतात. त्यासंबंधीची देयकं अर्थात बिलं पुढील ३ महिन्यांत सादर करावीत. आता हे वाचून नगरसेवकांना काहीच कळेना. त्यावर थोडा वेळ चर्चा झाली. मग अलफखान हुसैनखान उभे राहिले, ते म्हणाले, ‘कोणत्याही ठरावात दुरुस्ती करायची असल्यास ती मुद्देसूद असली पाहिजे. म्हणजे मी जर म्हणालो की, मला जेवण करायचे आहे. आणि जर तुम्हाला सांगायचंय की, तुम्ही जेवण करू नका... तर ते सविस्तर आलंच पाहिजे.’ यावर सभागृहात एकच हशा पिकला. अधिकाऱ्यांनाही त्यांची चूक कळली. ही दुरुस्ती पुढे ढकलण्यात आली. अर्थात १५ हजारांच्या साहित्याचा विषय असल्याने फार ताणाताणी कुणी केली नाही. शासकीय भाषेची सवय लागलेल्या अधिकाऱ्यांकडून काय चूक होईल याचा नेम नसतो. एकदा महात्मा गांधी यांच्याबाबत महापालिकेनं प्रसिद्धीस दिलेल्या मजकुरावरून असाच वाद पुढं आला. महात्मा गांधी यांच्याबाबत लिखित स्वरूपातील तो मजकूर वर्तमानपत्रात प्रसिद्धदेखील झाला. हा मुद्दा सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी लावून धरला आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास भाग पाडलं. ही झाली काही उदाहरणं, पण पांडुरंग पैठणकर यांचं नावच चुकीचं लिहिलं गेल्यामुळे त्यांनी सभेत आक्षेप नोंदविला. नगरसेवकांच्या नावाचा चुकीचा उल्लेख अशा पद्धतीनं का करण्यात आला, हा मुद्दा त्यांनी लावून धरला. त्यावर संबंधित अधिकाऱ्याला माफी मागावी लागली. या चुकांमुळे अधिकारी हैराण व्हायचे. एक तर इतिवृत्त मराठी आणि उर्दूतून दिले जायचे. अनेक प्रस्तावात ‘संभाजीनगर’ असा उल्लेख असायचा. तो काढण्याची मागणी झाली की उर्दूतील इतिवृत्त बंद करण्याची मागणी यायची. त्यात अधिकाऱ्यांची दमछाक तर होणारच ना...
मनपा निवडणूक:वंचित बहुजन आघाडीचे 80 उमेदवारांना ‘बी फाॅर्म’, काँग्रेसमुळे आघाडी नाही- बन
वंचित बहुजन आघाडी पक्षाने ८० उमेदवारांना बी फॉर्म दिले. ४८ उमेदवारांनी दुपारी ३ पर्यंत अर्ज भरले होते. उर्वरित उमेदवार मात्र निवडणूक कार्यालयात रांगेत रात्री ८ वाजेपर्यंत अडकून पडले होते. येणाऱ्या महापालिकेत वंचितची दावेदारी दखल घेण्याइतकी महत्त्वाची ठरेल, असा दावा निरीक्षक योगेश बन यांनी केला. क्रांती चौकातील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात अवघे ५ कार्यकर्ते अन् योगेश बन बसून होते. प्रत्येक ठिकाणचे अपडेट ते घेत होते. काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे आमची युती होऊ शकली नाही. मात्र, विविध पक्षांची सद्य:स्थिती पाहता वंचित यंदाच्या निवडणुकीत दुसरा महत्त्वाचा पक्ष ठरेल, असे ते म्हणाले. फुलंब्री मतदारसंघात काँग्रेसचा हट्ट आम्हाला मान्य होता. पण, आमचे प्राबल्य असलेल्या ठिकाणांवर दावा सांगणे आम्हाला मान्य नव्हते. शेवटच्या २४ तासांत आमच्याकडे दलित आणि मुस्लिम प्राबल्य असलेल्या क्षेत्रात उत्तम काम असलेले अनेक उमेदवार आले, ते नक्की निवडून येतील. युती न होणे आमच्या पथ्यावर पडेल, असेही ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसबरोबर युती करण्यासाठी चर्चा सुरू केली होती. मात्र, उभय पक्षांतील जागावाटप यशस्वी होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्यात मुंबई मनपाप्रमाणे युती होऊ शकली नाही.
केंद्र आणि राज्य सरकारचे १.७५ कोटी कर्मचारी आणि १.४४ कोटी पेन्शनधारकांसाठी २५ जुलै २०१६ पासून लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगाची मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपत आहे. १ जानेवारी २०२६ पासून नवीन वेतनश्रेणी लागू होणे अपेक्षित होते, परंतु ती अद्याप तयार नाही. त्यामुळे जानेवारी २०२६ पासूनही या सर्व कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी (स्लॅब) पूर्वीप्रमाणेच राहील. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी स्थापन करण्यात आलेल्या आठव्या वेतन आयोगाला आपल्या शिफारशी मे २०२७ पर्यंत केंद्र सरकारला सादर करायच्या आहेत. सरकारच्या मंजुरीनंतर, हे नवीन वेतनमान २०२७ च्या अखेरीस किंवा २०२८ च्या सुरुवातीला लागू केले जाऊ शकते. जोपर्यंत या शिफारशी येत नाहीत, तोपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच वेतन आणि महागाई भत्ता मिळत राहील. विशेष म्हणजे, आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासूनच लागू झाला असे मानले जाईल. त्यामुळे, हा वेतन आयोग लागू होण्यास जो काही विलंब होईल, त्या कालावधीची थकबाकी सर्व कर्मचाऱ्यांना दिली जाईल.
मोफत योजना व सबसिडी हा सत्ता मिळवण्याचा ‘खात्रीशीर मार्ग’ बनला आहे. मात्र, राज्यांची खालावलेली आर्थिक स्थिती या मार्गाचा मोठा ‘साइड इफेक्ट’ म्हणून समोर येत आहे. राज्यांकडे वीज, रस्ते आणि घरांसाठी पैसाच शिल्लक नाही. राज्यांच्या कमाई आणि खर्चाचा ताळेबंद सांगतो की, सबसिडी, वेतन, पेन्शन आणि व्याजाचा परतावा यांसारख्या महत्त्वाच्या खर्चांनंतर राज्यांच्या हाती त्यांच्या कमाईचा केवळ २०-२५% हिस्साच उरत आहे. पंजाबसारख्या राज्याच्या हाती तर खर्चासाठी केवळ ७% रक्कम उरली आहे. कर्जावरील व्याजाचा परतावा हा एक ‘प्रतिबद्ध खर्च’ मानला जातो. मात्र, या वर्षी राज्यांना वर्षांनुवर्षांपासून घेतलेल्या प्रचंड कर्जाची मूळ रक्कमही फेडायची आहे. अनेक राज्यांकडे तर त्यासाठी निधीच उपलब्ध नाही. राजस्थानला या वेळी १.५० लाख कोटींच्या कर्जाची मूळ रक्कम फेडायची आहे. बिकट अवस्था: बंगालवर व्याजाचा बोजा शिक्षण बजेटपेक्षा जास्त, मप्रवर कर्ज वाढतेय हे रेड सिग्नल आहेत ... उत्पन्नाचे सोर्सही पाहावे मोफत योजना किंवा सबसिडीची घोषणा करताना उत्पन्नाची साधने किती आहेत हे पाहणे गरजेचे आहे. नवीन योजनांसह सत्तेत आलेली सरकारे जुन्या सरकारची योजना बंद करत नाहीत. लोक नाराज होतील अशी भीती त्यांना वाटते. आसाम सरकारने जुन्या सरकारची योजना बंद केली होती. इतर सरकारांनीही अशी पावले उचलली तर काही प्रमाणात बोजा कमी होऊ शकतो. -अजित केसरी, निवृत्त आयएएस (तज्ज्ञ, स्टेट फायनान्स)
विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून तक्रारदार पीडित महिलेच्या पतीवर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना नायगाव तालुक्यातील बेंद्री येथे सोमवारी (२९ डिसेंबर) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत पीडितेचा पती ५० टक्के भाजला असून त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी माधव बेंद्रीकर व शिवकुमार बेंद्रीकर या दोघांना ताब्यात घेतले आहे, परंतु मुख्य संशयित संतोष बेंद्रीकर पसार झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बेंद्री गावात भीती व संतापाचे वातावरण पसरले असून आहे. बेंद्री येथील संशयित संतोष बेंद्रीकर याची परिसरातील महिलेवर गेल्या अनेक दिवसांपासून वाईट नजर होती. पीडित महिलेला अश्लील शेरेबाजी करणे, छेड काढण्याचा प्रकार २२ डिसेंबर रोजी घडला होता. संशयितांच्या वडिलांची पीडितेच्या पतीला अरेरावी विनयभंगाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर संशयिताचे वडील माधव बेंद्रीकर यांनी सोमवारी पहाटे ५.३० वाजता पीडित महिलेच्या पतीला गाठले. तुझ्या बायकोने माझ्या मुलावर विनयभंगाचा गुन्हा का दाखल केला, असा जाब विचारला. या वेळी संशयित संतोष बेंद्रीकर व त्याचा भाऊ शिवकुमार बेंद्रीकर हे घटनास्थळी हजर होते. गुन्हा नोंद करण्यावरून वादावादी झाली. अचानक तिघांनी पीडित महिलेल्या पतीवर पेट्रोल ओतून आग लावली.
भोलेश्वर मार्केटमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाई करणाऱ्या महापालिकेनेच अतिक्रमण केले आहे. आमचा माणूस मरणाच्या दारी असतो, अनेकदा ॲम्ब्युलन्स येते. मात्र, जागाच नसल्यामुळं ती घरापर्यंत येऊच शकत नाही. त्यामुळंच इथं घंटागाडीही येत नाही. त्यामुळे कचरा नाल्यात फेकतो. ड्रेनेजच मिक्स होऊन पिण्याचं पाणी येतं. इथं रहायचं तरी कसं? असा प्रश्न पडतो. दिव्य मराठी ॲपच्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा'मध्ये प्रभाग क्रमांक 15 मधल्या नागरिकांनी पोटतिडकीने आपल्या समस्या मांडल्या. ना रस्ते, ना जागा, ना पाणी...आम्हाला हे सारे प्रश्न कधी सुटतील असे वाटते. आम्हाला हा प्रश्न सोडवणारा नगरसेवक हवाय. चार-चार पिढ्यांपासून येथे असलेले रहिवासी सांगतात की, 'पूर्वीचा आमचा भाग चांगला होता आता मोकळा परिसर बघायलाच मिळत नाही.' या लोकांना कोणत्या समस्यांना सामोर जावं लागतं, जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून... घराच्या बाजूला नाला... प्रभागात राहणारे लोक जागा नसल्यामुळं इतके परेशान आहेत की, प्रभागात राहणारी रितिका रिडलॉन म्हणते 'रस्ते एवढे छोटे - छोटे झाले आहे की, आमच्या भागात जर कोणाला इमर्जन्सी आली तर आमच्याकडे ॲम्ब्युलन्ससुद्धा येऊ शकत नाही. म्हणजे लोक मरणाच्या दारात असतात पण इथे गाडी येऊच शकत नाही.' या भागात केवळ जागेचा नाही तर पावसाळयात येथील नागरिकांच्या घरात गुडघा इतके पाणी शिरते. यावर बोलताना रितिका म्हणते 'आम्ही इथे खूप वर्षांपासून राहतो. यामुळं जो भाग वाढला आहे तो वरच्या भागात गेलाय आणि आमच्या घरासमोर सगळं उतार करून टाकला आहे. त्यामुळं जेव्हा - जेव्हा पाणी येत किंवा पावसाळा सुरू होतो तेव्हा सगळं ड्रेनेजच पाणी आमच्या दारात येतं. त्याचा एवढा वास सुटतो की, आम्ही तो सहनच करू शकत नाही. घराच्या बाजूलाच नाला आहे. त्यामुळे तिथला सुद्धा वास. म्हणजे समोरून, पाठीमागून नुसती दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे जो कोणी निवडून येईल त्याने एवढा रास्ता नीट करावा आणि इथले अतिक्रमण हटवावे. घंटागाडी येत नाही, कचरा नाल्यात... अंगुरी बागेजवळ असलेल्या भागात राहणारे श्याम मोईम म्हणतात की, 'आमच्याकडे घंटा गाडी येत नाही. त्याचं कारण म्हणजे पूर्वी आमच्याकडे जागा खूप मोठी होती. पण आता अतिक्रमण एवढं वाढला आहे की, आमची टू - व्हीलरसुद्धा काढायला त्रास होतो. मग घंटागाडीवाले कसे येणार? ते येतात मुख्य रस्त्यावर, आम्ही राहतो आतल्या भागात. त्यामुळं गाडी कधी आली, कधी गेली काही समजत नाही. म्हणून मग आमच्याकडं काहीच पर्याय उरत नाही. आम्हाला पाठीमागच्या नाल्यात कचरा फेकावा लागतो. त्यात आमचा काय दोष आहे. आम्ही अनेकदा महानगरपालिकेत फोन केले, तक्रार दाखल केली. त्यांनी काही ॲक्शन घेतली. मात्र, अजूनही इथले रस्ते छोटे - छोटे होत चालले आहेत.'येणाऱ्या नगरसेवकांकडून हीच अपेक्षा आहे की, त्यांनी एकदा यावं बघावं की आम्ही कसे राहतो.' पहिले १५-२० मिनिट घाणच पाणी येत भागात राहणाऱ्या शमीम बेगम म्हणतात की, 'आमच्या भागाला १०-१५ दिवसाला, तर कधी २० दिवसाला पाणी येते. जेव्हा पाणी येतं, तेव्हा पहिलं १५-२० मिनिट इतकं घाण पाणी येत की त्याचा वास सुद्धा सहन होत नाही. तेच पाणी आम्हाला प्यावं लागतं. रस्त्यावर चढ - उतार असल्यामुळं सगळं पाणी जिथे जिथे खड्डे तयार झाले आहेत तिथे तुंबतं. सगळं ड्रेनेजेच पाणी आणि पिण्याचं पाणी मिक्स होऊन आमच्यापर्यंत पोहोचतं. आमची लेकरं त्या साचलेल्या पाण्यात खेळतात. आलेल्या घाण पाण्यामुळे पोटदुखीसारखे आजार होऊ नयेत म्हणून आम्ही पाण्यात औषध टाकून टाकून त्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो.' रस्त्याच्या मधोमधच पार्किंग! प्रभागातील रहिवासी सुधीर नाईक म्हणतात की, 'मी जगात अशी पार्किंग कुठेच पाहिली नाही. जिथे मधोमध गाड्या लावल्या जातात. गुलमंडी येथील सुपारी हनुमान मंदिरासमोर अगदी मधोमध पार्किंग केली जाते. त्याचा एवढा त्रास होतो की, लावलेली गाडी काढता सुद्धा येत नाही. त्या जागेवर प्रचंड अतिक्रमण आहे. भोलेश्वर मार्केटमध्ये महापालिकेचेच अतिक्रमण आहे. त्यांनी जर ते काढलं, तर गाड्या व्यवस्थित बसतील. तर ते काढायला तयार नाहीत. प्रभाग पंधरामध्ये जर बघायला गेलं तर लोकांच्या घरापर्यंत रस्ते आहेत. मात्र, त्याच रस्त्यांमुळं त्यांचं जीवन धोक्यात येतंय. असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. ड्रेनेज, पाणी, कचरा आणि अतिक्रमण या येथील मुख्य समस्या असून अनेकवेळा तक्रार करून सुद्धा त्यास दाद मिळत नाही हीच गोष्ट या नागरिकांना गेली अनेक वर्ष त्रास देत आहे. अशी आहे प्रभागाची रचना प्रभाग क्रमांक पंधरामध्ये नारळीबाग, सिटी चौक, कुंभारवाडा, मछली खडक, दिवान देवडी, केळी बाजार, खाराकुँवा, अंगुरी बाग, राजाबाजार, कुआरफल्ली, जाधवमंडी भाग,लक्कडमंडी, मोतीकारंजा, किराणा चावडी,सराफा, शहागंज भाजीमंडी, नवाबपुरा, धावणी मोहल्ला, न्यू मोंढा, कबीर मंदिर, काली मस्जिद, बारुदगर नाला, गुलमंडी भागशः, पानदरीबाग, गांधीनगर, खोकडपूरा भागशः या भागांचा समावेश होतो. या भागाची एकूण लोकसंख्या 41796 एवढी आहे.
कुणाला संशय येऊ नये म्हणून अपहरण केलेले शेतकरी तुकाराम पाटील गव्हाणे यांना अपहरणकर्त्यांनी शनिवारी रात्रभर तसेच रविवारी दिवसभर शेतकऱ्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावून तसेच हात बांधून ब्रिझा कारमध्ये दोन दिवस कोंबून ठेवले होते. मात्र गुन्ह्याची सर्वत्र चर्चा झाल्याने बदनामी होऊ नये म्हणून रविवारी रात्री आरोपींनी शेतकरी गव्हाणे पाटील यांना बेदम मारहाण करून त्यांचा खून केला व मृतदेह कन्नड घाटात फेकून दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली.आरोपींकडून एक छऱ्याची पिस्तूल, दोनचाकू, चिकटपट्टी, तीन मोठे रॉड, एकलहान रॉड, ब्रिजा कार, तसेच रोखरक्कम ८० हजार ५०० रुपये जप्त केले. या दरम्यान आरोपींनी तुकाराम पाटीलयांच्या तोंडाला चिकटपट्टी, हात बांधूनलोखंडी रॉडने मारहाण करून गंभीरजखमी केले होते. कारण तुकाराम पटेलयांच्या हातावर छातीवर मारहाणकेल्याची निशाणी दिसत होती. दुसऱ्यादिवशी अजिंठा पोलिस मृतशेतकऱ्याच्या दुचाकीचा शोध घेत होते.मात्र, उशिरापर्यंत दुचाकी सापडलीनाही. अपहरणच्या घटनेनंतर स्थानिकव्यापारी व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराटपसरली आहे. बदनामी टाळण्यासाठी खून शेतकरी अपहरणाची माहितीमिळताच आम्ही लगेच सर्व यंत्रणाकामी लावली. सर्वत्र सर्चऑपरेशन केले. मात्र तरी शेतकरीतुकाराम गव्हाणे पाटील हे वाचूशकले नाही याचे आम्हाला दुःखआहे. बदनामी होऊ नये आपलीओळख पटू नये म्हणूनचआरोपींनी शेतकरी तुकारामगव्हाणे पाटील यांचा खून केला,अशी माहिती अजिंठा येथीलसहायक पोलिस निरीक्षक अमोलढाकणे यांनी दिली. दुचाकी लपवल्याचा संशय उंडणगाव-बोदवड रस्त्यावर शेतकरी गव्हाणेपाटील हे दुचाकीने जात होते. त्याचवेळीअपहरणकर्त्यांनी त्यांची दुचाकी अडवूनत्यांना कारमध्ये कोंबले. या घटनेनंतरसंशयितांनी त्यांची दुचाकी लपवून ठेवल्याचासंशय आहे. बुधवारी दुसऱ्या दिवशीपोलिसांनी या दुचाकीचा परिसरात शोधघेतला. मात्र, दुचाकी सापडली नाही. पाचआरोपींपैकी एकाने आपल्या घरी दुचाकीलपवल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसमाहिती घेत आहेत. तसेच मृताचामोबाइलदेखील आरोपींनी कुठे फेकला,याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवार (३० डिसेंबर) ही अंतिम तारीख असून सर्वच राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी लपवाछपवीचा मार्ग स्वीकारला आहे. कारण त्यांच्यासमोर बंडोबांचे आव्हान कायम आहे. विशेष म्हणजे ही बंडखोरी सर्वपक्षीय आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही तेच चित्र आहे. सोमवारी उमेदवारांची यादी जाहीर होऊ लागल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांत बंडखोरी उफाळून आली. त्यामुळे बंडखोरांची नाराजी […] The post बंडोबांचे आव्हान ! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
साठोत्तरी साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी अभिजात मराठी भाषेला समृद्ध इतिहासाचा वारसा लाभला आहे.इस.पू.२२२० चा नाणेघाट, दोन हजार वर्षांपूर्वीचा ‘गाथासप्तशती’,’बृहत्कथा’,’कुवलयमाला’ या ग्रंथामुळे भाषेचे प्राचीन सामर्थ्य स्पष्ट होतेच, परंतु अभिजात मराठी भाषेला खरी प्रतिष्ठा व सन्मान साठोत्तरी मराठी साहित्याच्या भाषेने प्राप्त करून दिला आहे, असे प्रतिपादन शिवाजी महाविद्यालय रेणापूर येथील डॉ. जयद्रथ जाधव यांनी केले. मराठी विभाग महाराष्ट्र […] The post साठोत्तरी साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चाकूरचे साईंनंदनवनम बनले कृषी पर्यटन आणि हुरडा पार्टीचे केंद्र
चाकूर : प्रतिनिधी चाकूर येथील सुप्रसिध्द साईनंदनवनम मध्ये हूरडा पार्टीची जोरदार सुरूवात झाली असून हे स्थळ कृषी पर्यटकांसाठी अस्सल गावरान मेजवानी ठरत असल्याची माहिती साईनंदनवनचे संचालक विशाल उत्तमराव जाधव यांनी दिली आहे. शेतात ज्वारीची कणस डौलात डोलायला लागली की सर्वांना वेध लागतात ते हुरडा पार्टीचे, ज्वारीचा दाणा कोवळा हिरवा असला की सुरुवात होते ती हुरड्याची. […] The post चाकूरचे साईंनंदनवनम बनले कृषी पर्यटन आणि हुरडा पार्टीचे केंद्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वर्षभरात स्थानिक गुन्हे शाखेचा गुन्हेगारांवर प्रभावी वचक
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीला आळा घालणे आणि क्लिष्ट तसेच गंभीर गुन्ह्यांचा वेगवान तपास करणे, हे कोणत्याही सक्ष्म पोलीस प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असते. या दृष्टीने लातूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा ही जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या थेट मार्गदर्शनाखाली कार्यरत असून, गुन्हेगारीविरोधात एक प्रभावी, विश्वासार्ह आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम यंत्रणा म्हणून ओळखली जाते. […] The post वर्षभरात स्थानिक गुन्हे शाखेचा गुन्हेगारांवर प्रभावी वचक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
१०० टक्के मतदानाचा विद्यार्थ्यांचा निर्धार
लातूर : प्रतिनिधी आगामी लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर ‘स्वीप’ मोहीम तीव्र करण्यात आली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून येथील दयानंद महाविद्यालयात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी विशेष मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘मतदार प्रतिज्ञा’ आणि ‘संकल्प पत्र’ वितरणाद्वारे युवकांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात […] The post १०० टक्के मतदानाचा विद्यार्थ्यांचा निर्धार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मनपा आयुक्तांकडून मतदान केंद्राची पाहणी
लातूर : प्रतिनिधी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी विविध मतदान केंद्रांची पाहणी पाहणी केली. बुथवर मतदारांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. श्रीमती मानसी यांनी मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक १३ मधील प्रकाशनगर भागात ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन, विशालनगर भागातील निर्मलादेवी प्राथमिक व माध्यमिक शाळा, प्रभाग क्रमांक ८ मध्ये […] The post मनपा आयुक्तांकडून मतदान केंद्राची पाहणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अंतर्गत कलह; बंडखोरीने लातूर भाजपात नाराजी उफाळली
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपामध्ये गोंधळाची स्थिती पहावयास मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाने असंख्य निष्ठावंतांना डावलून इतर पक्षांतून नूकतेच आलेल्या उप-यांना उमेदवारी बहाल केल्याने अंतर्गत कलह आणि बंडखोरीने भाजपा हतबल झालेली दिसत आहे. लातूर भाजपात प्रचंड नाराजी उफाळुन आल्याचे दिसून येत आहे. लातूर शहर महानगरपालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन […] The post अंतर्गत कलह; बंडखोरीने लातूर भाजपात नाराजी उफाळली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
७० जागांसाठी एकूण ७५९ नामनिर्देशनपत्र दाखल
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या तिस-या सार्वत्रिक निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सूरु आहे. दि. २३ ते दि. ३० डिसेंबरपर्यंत ७० जागांसाठी एकुण ७५९ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी ५३४ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. या नामनिर्देशनपत्रांची आज छाननी होणार आहे. प्रभाग क्रमांक १, २, ३ मधील अ-१६, ब-६, क-११, ड-११, एकुण ११९, प्रभाग […] The post ७० जागांसाठी एकूण ७५९ नामनिर्देशनपत्र दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
टीम इंडियाकडून श्रीलंकेचा ५-० ने सुपडा साफ
तिरुवनंतपुरम : वूमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात २०२५ या वर्षाचा अफलातून शेवट केला आहे. टीम इंडियाने तिरुवनंतपुरममधील पाचव्या आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेवर १५ धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर १७६ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र श्रीलंकेला २० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून १६० धावाच करता आल्या. यासह भारताने हा सामना जिंकला. भारताचा हा […] The post टीम इंडियाकडून श्रीलंकेचा ५-० ने सुपडा साफ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भाजपने विजयाचे खाते उघडत मोठी बाजी मारली आहे. प्रभाग क्रमांक 18 (अ) मधून भाजपच्या उमेदवार रेखा राजन चौधरी यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला असून, या विजयामुळे भाजप गोटात उत्साहाचे वातावरण आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षित जागेसाठी विहित मुदतीत केवळ रेखा चौधरी यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला असून, इतर कोणत्याही पक्षाने किंवा अपक्ष उमेदवाराने येथून अर्ज भरलेला नाही. परिणामी, या प्रभागात निवडणूक न होताच भाजपने आपला पहिला विजय नोंदवला असून, अधिकृत घोषणेनंतर रेखा चौधरी या महापालिकेच्या पहिल्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका ठरतील. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानापूर्वीच भाजपने विजयाचा श्रीगणेशा केला असून, प्रभाग क्रमांक 18 (अ) मधून भाजपचे खाते उघडले आहे. या प्रभागातील 'नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला' या राखीव जागेसाठी विहित मुदतीत केवळ रेखा राजन चौधरी यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याची अधिकृत माहिती निवडणूक अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी दिली आहे. इतर कोणत्याही पक्षाने किंवा अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल न केल्यामुळे रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड आता निश्चित झाली असून, निकालाआधीच मिळालेल्या या मोठ्या यशाचे श्रेय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांना आणि निवडणूक नियोजनाला दिले जात आहे. रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत. रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय असल्याची अधिकृत प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. भाजपच्या कल्याण विभागाच्या महिला मोर्चाच्या चौधरी या जिल्हाध्यक्ष आहेत.
तिकीट कापल्यामुळे नाराज असणाऱ्या प्रभाग क्र.20, गादीया विहारच्या भाजप कार्यकर्त्या दिव्या मराठे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. पक्षाच्या सर्वेक्षणात नाव असताना निष्क्रीय कार्यकर्त्याला तिकीट देण्याचा जाब त्यांनी विचारला. आता स्विकृत नगरसेवक पदावर नियुक्तीचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या भाजप प्रचार कार्यालयात हाय व्होल्टेज ड्रामा झाला. दिव्या मराठे यांनी याबाबत पक्षश्रेष्ठींना जाब विचारण्यासाठी प्रचार कार्यालय गाठले. यावेळीच त्यांनी तिकीट मिळेपर्यंत उपोषणाचा इशारा दिला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 वाजेची वेळ संपल्यावर भाजप कार्यालयात शुकशुकाट होता. मात्र, दिव्या मराठे एकट्याच येथे उपस्थित होत्या. कार्यालयातील स्टेजवर असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली सतरंजी टाकून त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. दिवसभरात मंत्री अतुल सावे, खासदार डॉ.भागवत कराड, आमदार संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे किंवा अन्य कोणाकडूनही फोन आला नाही. कोणी विचारणा केली नाही. मुंबईहून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कार्यालयातून विचारणा झाली. मात्र, स्विकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. रात्री 10 वाजेपर्यंत त्यांचे उपोषण सुरू होते. दिव्या मराठे 18 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहे. अतुल सावे यांनी त्यांचे सर्वेक्षणात नाव आल्याचे सांगितले होते. मात्र, शितोळे नाव नसल्याचे सांगतात. पक्षातील नेत्यांमध्येच समन्वय नसल्याचा आरोप त्यांनी केला. 2010 मध्येही ऐनवेळी त्यांना एबी फॉर्म नाकारला होता. यावेळीही त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिवसभर झालेल्या 'एबी' फॉर्मच्या वाटपात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना मिळालेल्या संधीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. कुख्यात गजा मारणेची पत्नी आणि आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी सोनाली व लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर, आता दीपक मारटकर हत्या प्रकरणातील जामीनावर असलेला आरोपी बापू ऊर्फ या कुमार प्रभाकर नायर यालाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक 39 मधून मैदानात उतरवले आहे. गुन्हेगारांना टायरमध्ये घालू, अशा आक्रमक वल्गना करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत मात्र आपली सर्व तत्त्वे धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसत आहे. पुण्याला गुन्हेगारीमुक्त करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजकीय फायद्यासाठी चक्क कुख्यात टोळ्यांशी संबंधित व्यक्तींना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे अजित पवारांच्या शब्दांत आणि प्रत्यक्ष कृतीत मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाले असून, निवडणुकीच्या रिंगणात 'तत्वे' बाजूला ठेवून केवळ 'निवडून येण्याची क्षमता' या निकषावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना झुकते माप देण्यात आल्याचे दिसत आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी दिली असून, या दोघी आता जेलमधूनच निवडणूक लढवणार आहेत. यासोबतच कुख्यात गजा मारणे याच्या पत्नीलाही उमेदवारी देऊन पवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या घराण्यांवर सढळ हाताने मेहेरनजर दाखवली आहे. एका बाजूला गुन्हेगारांविरुद्ध कठोर भाषेचा वापर करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांनाच उमेदवारी देऊन राजकीय प्रतिष्ठा मिळवून द्यायची, अशा दुटप्पी भूमिकेमुळे 'पालकमंत्री' म्हणून अजित पवारांच्या विश्वासार्हतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच, मीरा-भाईंदरमध्ये दोन अत्यंत धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एबी फॉर्म मिळवण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची प्रचंड झुंबड उडालेली असतानाच, मिरा रोड येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. याच तणावपूर्ण वातावरणात भाईंदरमध्ये भाजपच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने यांनाही हृदयविकाराचा झटका आल्याने खळबळ उडाली आहे. निवडणूक अर्जाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या दुःखद घटनांमुळे मीरा-भाईंदरमधील राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आपली कन्या श्रद्धा बने हिला भाजपकडून उमेदवारी नाकारली गेल्याच्या धक्क्याने माजी महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने यांची प्रकृती खालावली असून त्यांना तातडीने मिरा रोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली, तरी रुग्णालयातून त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया अत्यंत भावूक होती. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी असलेली निष्ठा आणि पक्षकार्यासाठी अंगावर घेतलेले खटले यांचा विचार न करता, ऐनवेळी डावलले गेल्याची भावना त्यांनी अश्रू अनावर होत व्यक्त केली. पक्षासाठी आयुष्य वेचूनही आज आपल्याकडे दुर्लक्ष झाले, अशा शब्दांत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली. मीरा भाईंदरमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटाची युती तुटली मीरा-भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती अखेर अधिकृतरीत्या तुटली असून, यावरून दोन्ही पक्षांतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन मेहता यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नरेंद्र मेहता यांचा अहंकार आणि घमेंडीमुळेच ही युती तुटली आहे. भाजपला सुरुवातीपासूनच शिवसेनेला सोबत घ्यायचे नव्हते. शहरात स्वतःचेच वर्चस्व राखणे आणि शिवसेनेला सातत्याने कमी लेखणे हीच भाजपची रणनीती होती, असा गंभीर आरोप सरनाईक यांनी केला. युतीसंदर्भातील चर्चेचा तपशील सांगताना सरनाईक यांनी भाजपच्या वागणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला. चर्चेसाठी बोलावून आपल्याला तब्बल 50 मिनिटे ताटकळत ठेवले गेले आणि केवळ 13 जागांची अपमानास्पद ऑफर देण्यात आली, असा दावा त्यांनी केला. शिवाय, भाजपने सहकार्य केले तरच तुमच्या या 13 जागा निवडून येतील, असे अहंकारपूर्ण विधान करून शिवसेनेचा अपमान करण्यात आल्याचेही ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेने आता स्वतंत्रपणे लढण्याचा पवित्रा घेतला असून मीरा-भाईंदर महापालिकेच्या 95 पैकी 81 जागांवर शिवसेना आपले उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
टीम इंडियाकडून श्रीलंकेला १७६ धावांचे आव्हान
तिरुवनंतरपुरम : वूमन्स टीम इंडियाने तिरुवनंतरपुरममधील पाचव्या आणि अंतिम टी २० क सामन्यात श्रीलंकेसमोर १७६ धावांचे आव्हान ठेवले आहे. टीम इंडियाने २० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून १७५ धावा केल्या. श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर भारताची अडखळत सुरुवात झाली. श्रीलंकेने भारताला सुरुवातीपासून ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे टॉप ऑर्डरमधील फलंदाजांना काही खास करता आले नाही. मात्र त्यानंतर कॅप्टन हरमनप्रीत […] The post टीम इंडियाकडून श्रीलंकेला १७६ धावांचे आव्हान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आमदार-खासदारांच्या नातेवाईकांना तिकीट नाकारण्याची घोषणा भाजपने केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र पक्षाला मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याच कुटुंबात तब्बल तीन जणांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांचे बंधू मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर आणि चुलत बहीण गौरवी शिवलकर-नार्वेकर रिंगणात आहेत. याव्यतिरिक्त भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा भाऊ आणि मुंबई भाजप अध्यक्षांच्या मेहुण्यालाही तिकीट मिळाल्याने, स्वतःचेच नियम धाब्यावर बसवणाऱ्या भाजपविरोधात कार्यकर्त्यांमध्ये आता नाराजीचा सूर उमटत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी उफाळून आल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. वॉर्ड क्रमांक 225 मध्ये भाजपच्या हर्षिता नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या सुजाता सानप यांचे आव्हान असतानाच, आता भाजपचे मुंबई उपाध्यक्ष कमलाकर दळवी यांनीच बंडखोरी करत शड्डू ठोकल्याने नार्वेकर यांच्या मतांच्या विभाजनाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. केवळ वॉर्ड 225 मध्येच नव्हे, तर प्रभाग क्रमांक 7 मध्येही शिवसेनेचे भूपेंद्र काशिनाथ कवळी यांनी बंडखोरी केल्याने तेथील भाजप उमेदवारासमोर पेच निर्माण झाला असून, मुंबईतील अशा वाढत्या बंडखोरीमुळे राजकीय गणिते बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत. गोरेगाव आणि चेंबूरमध्येही बंडखोरीचा फटका गोरेगाव आणि चेंबूरमध्येही भाजपला मोठ्या बंडखोरीचा फटका बसला आहे. गोरेगावच्या प्रभाग क्रमांक 54 मध्ये उमेदवारी न मिळाल्याने संतापलेले भाजप महामंत्री संदीप जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 155 मध्ये अवघ्या दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या श्रीकांत शेटे यांना तिकीट देण्यात आल्याने 'आयात' उमेदवारांविरुद्ध निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. शेटे यांच्या उमेदवारीमुळे नाराज झालेल्या भाजपच्या तीन इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केल्याने जुन्या कार्यकर्त्यांमधील असंतोष आता चव्हाट्यावर आला असून, यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. भाजपमधील बंडखोरीचे सत्र सुरूच असून आता घाटकोपर आणि चेंबूरमध्येही निष्ठावंतांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. चेंबूरमध्ये उमेदवारी न मिळाल्याने माजी नगरसेविका जयश्री खरात, हर्षा साळवे आणि शशिकला कांबळे यांनी अपक्ष अर्ज भरून पक्षाला आव्हान दिले आहे. तसेच, घाटकोपर वॉर्ड क्रमांक 29 मध्ये शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या माजी नगरसेविका अश्विनी मते यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून भाजपचे माजी नगरसेवक सूर्यकांत गवळी यांच्या भावजय सुरेखा गवळी आणि पदाधिकारी प्रकाश पाटील यांच्या पत्नी मालती पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आयात उमेदवारांना झुकते माप दिल्यामुळे निष्ठावंतांनी पुकारलेल्या या बंडामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
पुण्यातील प्रसिद्ध भारत फोर्ज लिमिटेडने भारतीय संरक्षण क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठत संरक्षण मंत्रालयासोबत लहान शस्त्रांच्या श्रेणीतला आतापर्यंतचा सर्वात मोठा करार केला आहे. या कराराअंतर्गत भारत फोर्ज भारतीय सैन्याला 2,55,128 स्वदेशी बनावटीच्या CQB कार्बाइन (5.56 x 45 मिमी) पुरवणार आहे. या कराराची एकूण किंमत 1,661.9 कोटी रुपये असून, मंगळवारी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. करारानुसार पुढील पाच वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने या कार्बाइनचा पुरवठा करण्यात येणार आहे. ही 5.56 x 45 मिमी CQB कार्बाइन ही पूर्णतः स्वदेशी डिझाइन, विकसित आणि उत्पादित शस्त्र प्रणाली असून ती डी आर डी ओ अंतर्गत आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (एआरडीई) आणि भारत फोर्ज, पुणे यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. ही कार्बाइन आधुनिक युद्ध परिस्थितीसाठी उपयुक्त, हलकी, कॉम्पॅक्ट आणि अधिक अचूक असल्याचे सांगितले जाते. ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेच्या उद्दिष्टांशी सुसंगत राहून, भारत फोर्ज लिमिटेड आणि त्यांची पूर्ण मालकीची संरक्षण उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टम्स लिमिटेड भारतीय सशस्त्र दलांना ‘मेड इन इंडिया’ प्रगत संरक्षण उपकरणे आणि प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. हा करार भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेला मोठी चालना देणारा मानला जात आहे. भारत फोर्ज लिमिटेड वतीने करण्यात आलेल्या या कराराच्या माध्यमातून नवीन रोजगार निर्मिती देखील उपलब्ध होऊ शकणार आहे.
जालन्यात नवा इतिहास!:अजित पवार गट-मनसे-वंचितची महायुती; पवार, ठाकरे आणि आंबेडकर पहिल्यांदाच एकत्र
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत जालन्यात एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक राजकीय समीकरण पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात वर्षानुवर्षे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेले पक्ष आणि घराणी जालन्यात एकत्र आली आहेत. जालना महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, राज ठाकरे यांची मनसे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी यांनी अभूतपूर्व युती जाहीर केली आहे. 'अंबेडकर, ठाकरे आणि पवार' हे तीन मोठे राजकीय वारसा असलेले पक्ष पहिल्यांदाच एकाच झेंड्याखाली आल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष जालन्याकडे लागले आहे. जालना महापालिका अस्तित्वात आल्यानंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची बनवली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीतून बाहेर पडत सर्वांना धक्का दिला. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्यावर अजित पवार गटाने तातडीने मनसे आणि वंचित बहुजन आघाडीशी संधान साधले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी या नव्या आघाडीची अधिकृत घोषणा केली आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित या नव्या आघाडीत जागावाटपाचे समीकरणही स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 50 जागांवर आपले उमेदवार उतरवणार असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 6 जागा देण्यात आल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या समावेशामुळे या आघाडीची ताकद अधिक वाढल्याचे मानले जात आहे. पहिल्या महापौराच्या खुर्चीवर आपलाच झेंडा फडकवण्यासाठी या तीनही पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यातील 29 महापालिकांमध्ये स्थानिक नेत्यांना निर्णयाचे स्वातंत्र्य दिल्यामुळे अनेक ठिकाणी कुठे शत्रू तर कुठे मित्र असे चित्र दिसत आहे. जालन्यात मात्र भाजप आणि शिंदे सेना स्वतंत्र लढत असल्याने आणि अजित पवार गट नव्या मित्रांसोबत मैदानात उतरल्याने ही निवडणूक चौरंगी आणि चुरशीची ठरणार आहे. जालन्याच्या पहिल्या महापौरपदाचा मान कोणाला मिळणार आणि हे 'पवार-ठाकरे-आंबेडकर' समीकरण यशस्वी ठरणार का, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
भाजपने वेळ संपल्यानंतर ‘एबी फॉर्म’ दिले
सोलापूर : उमेदवारी अर्ज भरण्याच्या करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी भाजपच्या वतीने आपल्या उमेदवारांचे ‘एबी फॉर्म’ अगदी शेवटच्या क्षणी वेगवेगळ्या निवडणूक कार्यात आणण्यात आले. मात्र भाजपने वेळ संपल्यानंतर एबी फॉर्म सादर केले. लोकशाहीची हत्या केली असा आरोप करत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. वेळेत एबी फॉर्म पोहोचवण्यासाठी भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष रोहिणी […] The post भाजपने वेळ संपल्यानंतर ‘एबी फॉर्म’ दिले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली शहरासह जिल्हाभरात थर्टीफर्स्टच्या पार्श्वभुमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून शहरातील सर्वच चौकांमध्ये वाहनांचील तपासणी केली जाणार आहे. या शिवाय ५४ पोलिस अधिकारी, ४५० पोलिस कर्मचाऱ्यांचा तफा रस्त्यावर उतरणार आहे. त्यांच्या मदतीला गृह रक्षक दलाचे जवान देखील तैनात केले जाणार आहेत. अनुचीत प्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. हिंगोली जिल्हयात थर्टीफर्स्टचे जल्लोषात स्वागत करण्याची नागरीकांकडून तयारी केली जात आहे. यावर्षी थर्टीफर्स्टच्या निमित्ताने शाकाहरी भोजनासाठी मांसाहरी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी हॉटेल्स, ढाब्यांवर विशेष पदार्थ तयार ठेवण्याची तयारीही चालवली असल्याचे चित्र आहे. तर तळीरामांचा उच्छाद वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दरम्यान, शहरासह जिल्हाभरात हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. कुठेही अनुचीत प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. पोलिस अधिक्षक निलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक कुंदनकुमार वाघमारे, राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले हे अधिकारी देखील बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. जिल्हयातील मोठ्या शहरांमध्ये येणाऱ्या रस्त्यांवर दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकी वाहनांची तपासणी केली जाणार आहे. या शिवाय २६ ब्रिथॲनालायझरद्वारे वाहन चालका्ंची तपासणी होणार असून ध्वनी मर्यादेचे पालन होण्यासाठी २७ नाॅईल लेव्हल मिटर ठेवण्यात येणार आहेत. या शिवाय धार्मिकस्थळ, महापुरुषांच्या पुतळा परिसरात बंदोबस्त राहणार आहे. जिल्हयात मद्य प्राशनकरून वाहन चालविणाऱ्यांवर तसेच कायदा व सु्व्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सूुत्रांनी सांगितले. नागरीकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
बंगालमधील घुसखोरी संपवणार; प्रत्येकाला शोधून काढणार : शाह
कोलकाता : वृत्तसंस्था पश्चिम बंगालच्या दौ-यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकात्यात पत्रकार परिषद घेऊन तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या १५ वर्षांत बंगाल भीती, भ्रष्टाचार आणि घुसखोरीचा बळी ठरल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. २०२६ मध्ये भाजपाचे सरकार आल्यास घुसखोरी संपवणार, घुसखोरांना शोधून बाहेर काढले जाईल, विकासाला गती दिली जाईल आणि बंगालचा सांस्कृतिक वारसा […] The post बंगालमधील घुसखोरी संपवणार; प्रत्येकाला शोधून काढणार : शाह appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इंडिगो-एअर इंडियात चुरस; ५० लाखांची ऑफर!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय विमान वाहतूक क्षेत्र सध्या एका अभूतपूर्व संकटातून जात आहे. एकीकडे प्रवाशांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे अनुभवी वैमानिकांच्या कमतरतेमुळे इंडिगो आणि एअर इंडिया या दोन दिग्गज कंपन्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, प्रतिस्पर्धी कंपनीच्या अनुभवी कॅप्टन्सना आपल्याकडे खेचण्यासाठी एअरलाईन्स चक्क ५० लाख रुपयांपर्यंतच्या ‘जॉइनिंग बोनस’ची ऑफर देत […] The post इंडिगो-एअर इंडियात चुरस; ५० लाखांची ऑफर! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सुनेच्या नावे मृत्युपत्राला भाडेकरू विरोध करू शकत नाही : हायकोर्ट
बंगळूरु : वृत्तसंस्था सासूने आपल्या सुनेच्या नावे केलेल्या मृत्युपत्राला आव्हान देण्याचा अधिकार भाडेकरूला नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. विशेषत: जेव्हा संबंधित भाडेकरूच्या ताब्याला जमीन मालकिणीने तिच्या हयातीतच विरोध केला असेल, अशा परिस्थितीत भाडेकरू मृत्युपत्राच्या कायदेशीर प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सुमारे १ एकर २८ गुंठे […] The post सुनेच्या नावे मृत्युपत्राला भाडेकरू विरोध करू शकत नाही : हायकोर्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुतीन यांच्या निवासस्थानी युक्रेनचा ९१ ड्रोनने हल्ला
मॉस्को/कीव्ह : वृत्तसंस्था रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग दरम्यान असलेल्या निवासस्थानावर युक्रेनने ९१ ड्रोन हल्ले केल्याचा खळबळजनक दावा रशियाने केला. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी ही माहिती दिली असून, या हल्ल्यानंतर रशिया आता युक्रेनवर निश्चित ठिकाणावर हल्ले करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शांतता प्रक्रियेला मोठी खीळ बसणार आहे. लावरोव्ह यांच्या […] The post पुतीन यांच्या निवासस्थानी युक्रेनचा ९१ ड्रोनने हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पहिली कार्बन डायऑक्साईड साठवणूक विहीर निर्मिती पूर्ण
मुंबई : वृत्तसंस्था आयआयटी मुंबई आणि एनटीपीसी लि. यांनी संयुक्तपणे देशातील पहिली कार्बन डायऑक्साइड साठवणूक चाचणी विहीर यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. आयआयटी मुंबई पृथ्वी विज्ञान विभागाने एकत्र येत देशातील प्रमुख कोळसाक्षेत्रांमध्ये कार्बन साठवणुकीची शक्यता तपासली. या अभ्यासातून चार मोठ्या कोळसाक्षेत्रांचा सविस्तर आढावा घेत पहिल्यांदाच भूवैज्ञानिक साठवण नकाशा तयार करण्यात आला. त्यानंतर झारखंडमधील उत्तर करनपुरा कोळसाक्षेत्रातील […] The post पहिली कार्बन डायऑक्साईड साठवणूक विहीर निर्मिती पूर्ण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सोमालीलॅँड : इस्रायल विरूद्ध २१ मुस्लिम देशांची आघाडी
तेलअवीव : वृत्तसंस्था इस्रायलने २६ डिसेंबर रोजी सोमालीलँडला एक स्वतंत्र देश म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली. असा निर्णय घेणार इस्रायल हा पहिला देश ठरला आहे. इस्रायलच्या या निर्णयानंतर मुस्लिम देशांचा संताप वाढत आहे. जगभरातील २१ देशांनी या निर्णयाविरोधात संयुक्त निवेदन जारी करून विरोध दर्शवला आहे. सोमालीलँड आफ्रिकेच्या हॉर्न प्रदेशात स्थित आहे. या देशाने १९९१ मध्ये सोमालियापासून […] The post सोमालीलॅँड : इस्रायल विरूद्ध २१ मुस्लिम देशांची आघाडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गुन्हेगारांना टायरमध्ये घालू, अशा आक्रमक वल्गना करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत मात्र आपली सर्व तत्त्वे धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसत आहे. पुण्याला गुन्हेगारीमुक्त करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजकीय फायद्यासाठी चक्क कुख्यात टोळ्यांशी संबंधित व्यक्तींना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे अजित पवारांच्या शब्दांत आणि प्रत्यक्ष कृतीत मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाले असून, निवडणुकीच्या रिंगणात 'तत्वे' बाजूला ठेवून केवळ 'निवडून येण्याची क्षमता' या निकषावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना झुकते माप देण्यात आल्याचे दिसत आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी दिली असून, या दोघी आता जेलमधूनच निवडणूक लढवणार आहेत. यासोबतच कुख्यात गजा मारणे याच्या पत्नीलाही उमेदवारी देऊन पवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या घराण्यांवर सढळ हाताने मेहेरनजर दाखवली आहे. एका बाजूला गुन्हेगारांविरुद्ध कठोर भाषेचा वापर करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांनाच उमेदवारी देऊन राजकीय प्रतिष्ठा मिळवून द्यायची, अशा दुटप्पी भूमिकेमुळे 'पालकमंत्री' म्हणून अजित पवारांच्या विश्वासार्हतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरवत महायुतीमध्ये स्वतःचे वजन वाढवले आहे. राष्ट्रवादीने मुंबईत एकूण 96 उमेदवार उभे केले असून शिंदे सेनेचे 90 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. राष्ट्रवादीच्या या 96 उमेदवारांमध्ये 56 मराठी, 23 मुस्लिम, 11 उत्तर भारतीय, 3 ख्रिश्चन, आणि तेलगू, तमिळ व बोहरा मुस्लिम समाजाच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश करून 'सोशल इंजिनिअरिंग' साधण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, पक्षाने पुरुषांच्या तुलनेत महिलांना (50 महिला, 46 पुरुष) झुकते माप दिले असून, यात 12 अनुसूचित जाती आणि 17 ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना संधी देत सर्वसमावेशक चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. ठाकरे गटाने सर्वाधिक 163 जागांवर आपले उमेदवार उतरवले मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर स्पष्ट झाला असून, यामध्ये ठाकरे गटाने सर्वाधिक 163 जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवत वर्चस्व राखले आहे. या नव्या युती समीकरणात मनसेला 53 जागा देण्यात आल्या आहेत, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 11 जागा मिळाल्या आहेत. अशाप्रकारे मुंबईतील एकूण जागांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सर्वाधिक असल्याने, या निवडणुकीत ते मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
पिंपरी-चिंचवड येथे आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शितल तेली उगले यांच्या हस्ते झाले. युवक-युवतींना नेतृत्वगुण सिद्ध करण्यासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे, तसेच राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हा महोत्सव २९ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत निगडी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात सुरू आहे. यावेळी बोलताना आयुक्त उगले यांनी युवक-युवतींना एआय (AI) तंत्रज्ञानाचा सकारात्मक व सर्जनशील वापर करून आपल्या कला व करिअरमध्ये यश मिळवण्याचे आवाहन केले. एआयसारखे आधुनिक तंत्रज्ञान युवकांसाठी समान संधी घेऊन आले असून, त्याचा नावीन्यपूर्ण वापर करून कौशल्ये सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले. आजची पिढी ऊर्जावान असून, त्यांच्या क्षमतांचा उपयोग नवोपक्रम आणि कलागुणांच्या विकासासाठी व्हावा. महोत्सवातून केवळ फोटो आणि प्रमाणपत्र नव्हे, तर उज्ज्वल भविष्य घडविणारी सकारात्मक ऊर्जा सोबत घेऊन जा, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सतिश राउत यांनी युवकांना प्रेरणा देणारी उदाहरणे देत यशस्वी होण्यासाठी चिकाटी व सातत्याचा कानमंत्र दिला. भावी लेखक व कवींनी दर्जेदार साहित्यनिर्मिती करून मराठी साहित्य समृद्ध करावे, असेही त्यांनी अधोरेखित केले. उद्घाटनप्रसंगी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहायक संचालक मिलिंद दिक्षित, चंद्रशेखर साखरे, अर्णव महर्षी, राष्ट्रीय बाल पुरस्कारार्थी गोपाल देवांग, अर्जुन पुरस्कारार्थी (बॉक्सिंग) हितेंद्र सोमाणी आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे क्रीडा व युवक कल्याण विभागाचे उपसंचालक युवराज नाईक यांनी महोत्सवाची पार्श्वभूमी विशद करत निवास, भोजन, किट आदी सुविधांची माहिती दिली. या राज्यस्तरीय युवा महोत्सवात पुणे, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नाशिक व मुंबई या आठ विभागांतून १५ ते २९ वयोगटातील एकूण ३१२ युवक-युवती सहभागी झाले आहेत. लोकगीत, लोकनृत्य, कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व व काव्यलेखन अशा विविध कला प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन या महोत्सवात करण्यात आले आहे.
पुणे येथील ऐतिहासिक ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरातील मूर्तीवरील शेंदूर कवच काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यानंतर १५ व्या शतकातील मूळ मूर्ती समोर आली असून, ३१ डिसेंबरपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. मंदिरातील मुख्य दैवत श्री जयति गजानन कसबा गणपती मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेला सोमवार, १५ डिसेंबर रोजी सुरुवात झाली होती. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. मूर्तीवरील शेंदूर कवच गळून पडत असल्याने भविष्यात कोणताही अनपेक्षित प्रसंग उद्भवू नये, यासाठी हे कवच काढणे आवश्यक होते. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंदिराच्या उपलब्ध इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहीर ठकार, मंदार ठकार, तेजस ठकार आणि हर्षद ठकार उपस्थित होते. मूर्तीतज्ञ आणि पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार, समोर आलेल्या मूळ मूर्तीचा कालावधी थेट १५ व्या शतकातला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संबंधित विभागांकडून सविस्तर अहवाल मिळाल्यावर यावर शिक्कामोर्तब होईल. श्री जयति गजानन यांची मूळ मूर्ती साधारण २ फूट उंच असून चतुर्भुज आहे. तिच्या डाव्या हातांपैकी एक अभय मुद्रेत, तर उजव्या हातांपैकी एक आशीर्वाद मुद्रेत आहे. दुसऱ्या डाव्या हातात मोदक असून त्यावर सोंड ठेवलेली दिसते. उजव्या बाजूला खाली मूषक वाहन आहे. ही मूर्ती डाव्या सोंडेची असून अर्ध पद्मसनाच्या बैठकीत आहे. लंबकर्ण आणि लंबोदर ही मूर्तीची इतर वैशिष्ट्ये आहेत. सुमारे ९०० किलो वजनाचा शेंदूर लेप काढल्यावर ही मूळ मूर्ती समोर आली आहे. या प्रक्रियेमुळे मूर्तीचे तत्कालीन कोरीव काम केलेले दगडी सिंहासन आणि प्रेक्षणीय गाभाराही आता भाविकांना पाहता येणार आहे. शेंदूर कवच काढण्यासाठी पुरातत्व विभाग, विविध मूर्तीतज्ञ आणि धार्मिक क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने तज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली सुमारे दोन आठवड्यांत पार पडली. आता गणेशभक्तांना शिवपूर्वकाळातील या ऐतिहासिक मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे.
पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 9 जागा:भाजपसोबतच्या युतीत महानगरपालिका निवडणुकीसाठी वाटप
पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) यांची युती असून पक्षाला पुणे महानगरपालिका निवडणुकीत ९ जागा मिळाल्याची माहिती शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी दिली आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये राहुल भंडारे, प्रभाग २ अ - रेणुका चलवादी, प्रभाग २ ब - सुधीर वाघमारे, प्रभाग ६ संतोष आरडे, प्रभाग ७ निशा मानवदकर, प्रभाग ८ परशुराम वाडेकर, प्रभाग १३ निलेश आल्हाट, प्रभाग १४ हिमाली कांबळे आणि प्रभाग २२ मधून बापू कांबळे यांना उमेदवारी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांच्या नेतृत्वात निवडणुकीला उमेदवार सामोरे जाणार आहे. पुढे त्यांनी सांगितले आहे की, भाजपकडे आम्ही १५ जागांची मागणी केली होती, वाटाघाटी मध्ये भाजपाने आम्हाला ९ जागा दिल्या आहेत. यामध्ये ६ पुरूष आणि ३ महिलांचा समावेश असून सामजिक संतुलन राखण्यात आले आहे, आरपीआयच्या उमेदवारांमध्ये ५ बौद्ध, ३ मातंग आणि एक धनगर उमेदवार आहे. मागील निवडणुकीत देखील भाजप आणि आरपीआय यांची मनपा युती होती त्याचप्रमाणे आता सुद्धा आम्ही युती म्हणून महापालिका निवडणुका लढवणार असून पुणे महापालिकेवर भाजप - आरपीआयची सत्ता येईल असा विश्वास शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, परशुराम वाडेकर, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, मोहन जगताप, महिला अध्यक्ष हिमाली कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे जिल्ह्यातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि इतर संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पुणे शहर पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रात जागतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी, विविध विद्यापीठे, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरु युवा केंद्र, क्रीडा संघाचे सदस्य तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते. जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, पुणे हे एकेकाळी 'सायकलीचे शहर' म्हणून ओळखले जात होते. सध्या पुण्यात ५० हजारपेक्षा अधिक नागरिक दररोज सायकल चालवतात आणि १० हजारहून अधिक सायकलपटू जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेतात. पुणे शहराचा सायकलीचा इतिहास, येथील भौगोलिक परिस्थिती आणि जैवविविधता लक्षात घेऊन 'टूर द फ्रान्स' स्पर्धेच्या धर्तीवर या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 'बजाज पुणे ग्रँड टूर २०२६' ही स्पर्धा १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेचा युसीआय सायकलिंग कॅलेंडरमध्ये अधिकृतपणे समावेश करण्यात आला असून, तिचे थेट प्रक्षेपण जगभरात केले जाईल. ही स्पर्धा चार टप्प्यांत असून, जिल्ह्यातील एकूण नऊ तालुक्यांतून ती जाणार आहे. एकूण ४३७ किलोमीटर लांबीच्या या स्पर्धेत ४० देशांतील १७६ सायकलपटू सहभागी होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना आपले विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून पाठवण्याचे आवाहन केले. तसेच, ग्रामीण भागातील सरपंचांनी गावातील गणेश मंडळाचे सदस्य, राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेचे महत्त्व सांगून त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि गावपातळीवर पारंपरिक व सांस्कृतिक पद्धतीने सायकलपटूंचे स्वागत करावे, असेही ते म्हणाले. या बैठकीत उपस्थित प्रतिनिधी आणि सरपंचांनी काही सूचना केल्या. त्या सूचनांवर सकारात्मक विचार करून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.
प्रसूतिपूर्व गुंतागुंतीमुळे अवघ्या २३ आठवड्यात जन्मलेल्या ५५० ग्रॅम वजनाच्या बाळाने मृत्यूशी यशस्वी झुंज दिली आहे. पुण्यातील लुल्लानगर येथील मदरहूड हॉस्पिटलमध्ये १०० दिवसांच्या उपचारानंतर हे बाळ सुखरूप घरी परतले. डिस्चार्जवेळी बाळाचे वजन २.२ किलो झाले असून ते पूर्णपणे स्तनपान करत आहे. रीमा मिश्रा (३३) आणि कमल मिश्रा (३७) (नावे बदलली) या पहिल्यांदा पालक होणाऱ्या दाम्पत्याची गर्भावस्था सामान्य होती. मात्र, अचानक गर्भजल पिशवी फुटल्याने कोंढवा येथील एका खाजगी रुग्णालयात तातडीने प्रसूती करावी लागली. जन्मावेळी बाळाला श्वसन समस्या, संसर्ग आणि हृदयाच्या गुंतागुंतीसह अनेक धोके होते. बाळाला तातडीने प्रगत एनआयसीयूची गरज असल्याने, मदरहूड हॉस्पिटलच्या 'एनआयसीयू ऑन व्हील्स' पथकाने विशेष रुग्णवाहिकेतून बाळाला सुरक्षितपणे रुग्णालयात हलवले. नवजात शिशु तज्ज्ञ डॉ. प्रशांत रामटेककर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळावर उपचार सुरू झाले. बाळाची फुफ्फुसे अविकसित असल्याने त्याला पहिले सात दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर नॉन-इन्व्हेसिव्ह सपोर्ट देण्यात आला. संसर्गामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची प्रक्रिया बिघडली होती, तरी डॉक्टरांच्या टीमने हृदयातील पीडीए (पेटंट डक्टस आर्टेरियोसस) समस्या टाळली. मेंदू, डोळे आणि कानांच्या तपासण्याही करण्यात आल्या. सुरुवातीला शिरेद्वारे पोषण, नंतर ट्यूबद्वारे आईचे दूध आणि कांगारू मदर केअरद्वारे भावनिक बंधन वाढवण्यात आले. याबाबत बोलताना डॉ. प्रशांत रामटेककर म्हणाले, २३ आठवड्यांचे आणि ६०० ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे 'मायक्रो-प्रीमी' बाळ जगण्याचे प्रमाण कमी असते. मात्र, प्रगत तंत्रज्ञान आणि टीमवर्कमुळे हे शक्य झाले. डिस्चार्जनंतर नियमित फॉलोअपचा सल्लाही त्यांनी दिला. वरिष्ठ नवजात तज्ज्ञ डॉ. तुषार पारीख यांनी सांगितले की, भारतात अकाली प्रसूतीचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. २०२० मध्ये देशात ३० लाखांहून अधिक प्रीटर्म बाळे जन्माला आली, जी जगातील एकूण अकाली जन्माच्या २० टक्क्यांहून अधिक आहेत. अशा बाळांना विशेष काळजी आवश्यक असते. त्यामुळे हे प्रकरण अकाली जन्मलेल्या बाळांच्या जगण्याच्या आशेला बळ देते, असे डॉ. पारीख यांनी नमूद केले.

28 C