SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
... ...View News by News Source

राष्ट्रपती मुर्मूंकडून महिला क्रिकेट संघाचा गौरव

नवी दिल्ली : वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला संघातील खेळाडू आणि स्टाफ सदस्यांनी गुरुवार दि. ६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं राष्ट्रपतींसोबत ट्रॉफीसह फोटो काढला. राष्ट्रपतींनी संघातील खेळाडूंशी खास गप्पा गोष्टीही केल्या. भारतीय महिला संघाची उप कर्णधार स्मृती मानधनासोबतसह अन्य खेळाडूंचा राष्ट्रपती भवनातील रुबाब एकदम […] The post राष्ट्रपती मुर्मूंकडून महिला क्रिकेट संघाचा गौरव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 5:29 pm

तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमीडिया होल्डिंग्स एलएलपी’ या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले असून या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी या व्यवहारात गंभीर अनियमितता असल्याचा आणि १८०४ कोटी बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटींना विकत घेतल्याचा आरोप केला […] The post तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 5:16 pm

पार्थ पवार कंपनी जमीन व्यवहार प्रकरण:अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका; हिंमत असेल तर अजित पवारांवर कारवाई करा - अंजली दमानिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित पुण्यातील वादग्रस्त जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या निलंबनानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्य सरकारवर आणि थेट अजित पवार यांच्यावर गंभीर हल्लाबोल केला आहे. फक्त अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका. हिंमत असेल तर कारवाई अजित पवारांवर करा, असे थेट आव्हान अंजली दमानिया यांनी सरकारला दिले. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमिनीचा बाजारभाव 1804 कोटी रुपये असताना, पार्थ पवार यांच्या कंपनीने ती केवळ 300 कोटींमध्ये विकत घेतल्याचा आणि त्यासाठी केवळ 500 रुपये स्टॅम्प ड्युटी आकारल्याचा आरोप आहे. विरोधकांच्या तीव्र टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले होते आणि याच चौकशीनंतर तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन करण्यात आले. नेमके काय म्हणाल्या अंजली दमानिया? या कारवाईनंतर अंजली दमानिया यांनी अधिकाऱ्यांना 'बळीचा बकरा' बनवल्याबद्दल संताप व्यक्त केला. पुण्यातील तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन पहिली कारवाई, फक्त अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका. हिंमत असेल तर कारवाई अजित पवारांवर करा, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. ...तर ती माफी फुकट नव्हती का? अंजली दमानिया यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या प्रकरणासंदर्भात काही पोस्ट केल्या आहेत. “शेतकऱ्यांना सारखे फुकट, सारखे माफ लागते म्हणणारे अजित पवार...पण पोराच्या 1804 कोटींचे डील. त्यावर 126 कोटींची स्टँप ड्युटी होते. पण हे डील 300 कोटीचे दाखवून त्यावरचे 21 कोटी देखील माफ! ही माफी फुकट नव्हती का?” असा सवाल दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे. नेमके प्रकरण काय? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीची अमेडिया कंपनी आणि दिग्विजय अमरसिंह पाटील या सहमालकाविरोधात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. या जमिनीची बाजार किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचं कागदोपत्री दाखवलं गेलं, परंतु प्रत्यक्ष किंमत 1800 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेडिया कंपनीने या जमिनीची खरेदी करताना आयटी पार्क उभारणीच्या नावाखाली सरकारकडून स्टँप ड्युटी माफी मिळवल्याचं आरोपात नमूद करण्यात आलं आहे. 22 एप्रिल 2025 रोजी कंपनीनं आयटी प्रकल्पाचा ठराव केला आणि फक्त दोन दिवसांत म्हणजे 24 एप्रिल रोजी उद्योग संचालनालयानं त्यावर स्टँप ड्युटी माफ, असा शेरा नोंदवला. इतक्या वेगाने झालेल्या प्रशासकीय हालचालींनी संशय निर्माण केला आहे. आश्चर्य म्हणजे, या संपूर्ण व्यवहारासाठी फक्त 500 रुपयांची स्टँप ड्युटी भरल्याचं समोर आलं असून, एवढ्या मोठ्या मूल्याच्या जमिनीचा व्यवहार फक्त काही आठवड्यांत पूर्ण झाला. हे सर्व घडत असताना, संबंधित कंपनीला कोणताही पूर्वानुभव नसल्याचं आणि तरीही तीला सरकारी सवलती कशा मिळाल्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महार वतनाची जमीन सदर जमीन ही महार वतनाची असल्यामुळे कायद्यानुसार तिचा व्यवहार करता येत नाही, असा तज्ज्ञांचा दावा आहे. वतनधारक जमीन विकली गेल्यास त्या किमतीचा काही भाग सरकारला नजराण्याच्या स्वरूपात द्यावा लागतो. मात्र, या व्यवहारातील कागदपत्रांमध्ये असा कोणताही उल्लेख नसल्याचे सांगितले जात आहे. कागदोपत्री हा व्यवहार पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर या शीतल तेजवानी यांच्या कंपनीसोबत झाला असल्याचं भासवलं असलं, तरी प्रत्यक्षात अमेडिया कंपनीनं मूळ गायकवाड आणि 274 जमिनमालकांसोबत खरेदी खत नोंदवलं असल्याचं उघड झाले आहे. या प्रकरणातील आर्थिक देवाणघेवाण, चेक, एनईएफटी व्यवहार किंवा बँक पुरावे, हे नोंदणी दस्तावेजात जोडले गेले नाहीत, यावरून या व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. हे ही वाचा... पार्थ पवारांच्या कंपनीचे जमीन व्यवहार प्रकरण:पुणे तहसीलदारांसह उपनिबंधक निलंबित; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने वेगवान कारवाई या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक चौकशीत गैरव्यवहाराचे संकेत मिळाल्यानंतर पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा उलगडा होताच केवळ तहसीलदारच नव्हे, तर दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 5:02 pm

नगराध्यक्षपदासाठी शरद पवार गटाकडून उमेदवार जाहीर:जयंत पाटलांनी केली आनंदराव मलगुंडेंची निवड, नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले

राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी उरुण ईश्वरपूर आणि आष्टा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर करून स्थानिक निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. उरुण ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी पक्षाच्यावतीने माजी नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या घोषणेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे, आष्टा नगरपरिषदेसाठी आष्टा शहर विकास आघाडीकडून विशाल विलासराव शिंदे यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. या दोन्ही नगरपरिषदांमध्ये जयंत पाटील यांच्या पक्षासमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. उरुण ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांच्या विरोधात विकास आघाडी किंवा महायुती म्हणून लढण्याची शक्यता असून, विरोधी गटाचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. तसेच, आष्टा नगरपरिषदेतही आष्टा शहर विकास आघाडी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप मित्र पक्ष हे सर्व एकत्र येऊन आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवार लवकरच घोषित करणार आहेत. जयंत पाटील यांनी उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मलगुंडे हे संपूर्ण महाराष्ट्रात पहिले उमेदवार ठरले आहेत. शरद पवार गटाच्या उरुण ईश्वरपूर कार्यालयात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. आनंदराव मलगुंडे हे जयंतराव पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि त्यांना उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही जागा ओबीसी पुरुष उमेदवारासाठी आरक्षित झाली असून, मलगुंडे हे धनगर समाजातील आणि सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व आहेत. यापूर्वी त्यांनी नगराध्यक्षपद यशस्वीरीत्या सांभाळल्याचा अनुभव असल्याने, आरक्षित जागेवर एका निष्ठावान आणि अनुभवी ओबीसी नेत्याला संधी देऊन जयंतराव पाटील यांनी योग्य निर्णय घेतल्याचे दिसून येते. संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना, जयंत पाटील यांनी उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी आनंद मलगुंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मागील काही महिन्यांपासून सत्ताधारी पक्षाकडून विविध वादग्रस्त वक्तव्ये करून जयंतराव पाटील यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू असताना, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाटील यांनी विरोधकांना प्रत्युत्तर न देता, नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करून आपल्या मुत्सद्दी राजकारणाचे आणि निवडणुकीच्या तयारीतील त्यांच्या अग्रक्रमाने दर्शन घडवले आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 4:58 pm

वीस वर्षे लोकांनी नावे ठेवली, सहन करतोय

संगमनेर : कीर्तनातून लग्नातील अनावश्यक खर्चावर टीका करणारे महाराज स्वत:च्या मुलीच्या साखरपुड्यावर लाखोंची उधळपट्टी करत असल्याचा गंभीर आरोप मुंबई डबेवाला संघटनेच्या अध्यक्षांनी केला. या सगळ्या वादावर इंदुरीकर महाराज स्पष्टीकरण देत म्हणाले, मुलीच्या साखरपुड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या खर्चामुळे टीका होत असली तरी आलेल्या मान्यवरांचा सत्कार सोहळा टाळला असून वीस वर्षे लोकांनी नावे ठेवली तेच सहन करत […] The post वीस वर्षे लोकांनी नावे ठेवली, सहन करतोय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 4:52 pm

जळगावचे राजकारण तापले

जळगाव : राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीसाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच ठिकाणी वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. जागावाटपाबाबत महायुतीमध्ये संघर्ष अटळ आहे. अशी सध्याची एकूणच राजकीय परिस्थिती आहे. या सा-यात भाजपचे मंत्री गिरीश महाजन ज्या जिल्ह्यातून येतात, तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदेसेनेचे आमदार किशोर पाटील […] The post जळगावचे राजकारण तापले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 4:50 pm

पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावर एकनाथ खडसे आक्रमक:चौकशी होईपर्यंत अजित पवार यांनी राजीनामा देण्याची मागणी

पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 40 एकर मोलाच्या जमिनीचा व्यवहार आता राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी या कंपनीने ही जमीन 1800 कोटींच्या बाजारभावाऐवजी केवळ 300 कोटी रुपयांना घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर या व्यवहारावर फक्त 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी आकारण्यात आल्याचं समोर आलं आहे. या जमीन खरेदीत गंभीर अनियमितता झाल्याचं दिसताच राज्य सरकारने चौकशीला सुरुवात केली असून पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या कारवाईचे आदेश दिले असून, चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट मागणी केली आहे की, या जमीन व्यवहाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर बनवाबनवी झाली आहे. ही जमीन महारवतनाची आहे आणि अशा जमिनीच्या खरेदीसाठी महसूल आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. मात्र, या व्यवहारात अशी कोणतीही परवानगी घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे हा व्यवहार बेकायदा असल्याचे स्पष्ट होत असून तो तत्काळ रद्द केला पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केली. खडसे यांनी आणखी गंभीर आरोप करताना सांगितले की, या कंपनीचे भागभांडवल केवळ एक लाख रुपये आहे, मग 300 कोटी रुपयांची जमीन खरेदी करण्यासाठी इतका मोठा निधी आला कुठून? कोणत्या खात्यातून पैसे दिले गेले आणि हे पैसे कोणाच्या खात्यात जमा झाले, हे तपासणं आवश्यक आहे. त्यांनी पुढे म्हटले की, या व्यवहारात दाखवलेली कागदपत्रेही बनावट आहेत. त्यामुळे हा व्यवहार केवळ आर्थिकच नव्हे तर कायदेशीरदृष्ट्याही चुकीचा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने हा व्यवहार तात्काळ रद्द करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तसेच जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कारवाई करावी. चौकशी हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून करण्यात यावी माजी महसूलमंत्री म्हणून आपल्या कार्यकाळाचा दाखला देत खडसे म्हणाले, जेव्हा माझ्या कुटुंबावर आरोप झाले होते, तेव्हा विरोधकांनी मोठा गदारोळ केला होता. पण आता या प्रकरणात अजित पवार यांच्या मुलाचं नाव समोर येत असूनही ते मौन बाळगून आहेत. सरकार आपल्याच सहकाऱ्याच्या मुलाच्या कंपनीची चौकशी करणार आहे, हे लोकांनाही पटणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून करण्यात यावी, आणि संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी होऊन सत्य बाहेर यावं, अशी मागणी त्यांनी केली. सरकार उपमुख्यमंत्र्याच्या मुलावर कारवाई करेल, अशी अपेक्षा ठेवणं व्यर्थ एकनाथ खडसे यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नात्याचाही उल्लेख केला. पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे पुरावे सादर केले होते. त्यांनी त्यांना चक्की पिसिंग पिसिंग, असं म्हटलं होतं. आता त्याच व्यक्तीबरोबर सत्तेत आहेत. मग या चौकशीचं काय होणार? असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, या प्रकरणात न्याय मिळवायचा असेल तर चौकशी सर्वोच्च न्यायालयाचे किंवा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती करायला हवेत. कारण सरकार स्वतःच्याच उपमुख्यमंत्र्याच्या मुलावर कारवाई करेल, अशी अपेक्षा ठेवणं व्यर्थ आहे. विरोधकांचा सरकारवर दबाव सध्या पार्थ पवार आणि अजित पवार या दोघांकडून या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या व्यवहारामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारवर दबाव आणला असून, या चौकशीचा निकाल काय लागतो आणि अजित पवार यांची पुढील भूमिका काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 4:03 pm

राज ठाकरे पुण्यात पदाधिकाऱ्यांवर संतापले:निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पद सोडण्याचा इशारा; म्हणाले- आकडे नकोत, काम दाखवा

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत संताप व्यक्त केला. पक्षातील अनेक पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांकडून अपेक्षित काम होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी थेट इशारा दिला की, काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा. इतके दिवस काय केलं ते दाखवा. पुण्यातील संकल्प हॉलमध्ये झालेल्या या बैठकीत शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शाखाध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, पक्षाचे काम मनापासून करणाऱ्यांनाच आता संघटनेत स्थान मिळेल. निष्क्रिय कार्यकर्त्यांमुळे पक्षाचे नुकसान होत असल्याची तक्रार त्यांनी मांडली. ही बैठक प्रत्यक्षात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आणि संघटनात्मक तयारीवर केंद्रित होती. परंतु राज ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच पदाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर तोफ डागली. त्यांनी काही नेत्यांना थेट नाव घेऊन प्रश्न विचारले, मतदार याद्या पूर्ण का नाहीत? शाखांमध्ये बैठक का होत नाहीत? शहरातील लोकांशी संवाद कुठे आहे? त्यांच्या या प्रश्नांना बहुतेक पदाधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे सभागृहात काही काळ पूर्ण शांतता पसरली होती. राज ठाकरे यांनी सांगितले की, मनसेचा कार्यकर्ता जर लोकांमध्ये दिसत नसेल, तर पक्षाचे नाव टिकणार नाही. तुम्हाला जर पक्षासाठी वेळ नाही, तर ते स्पष्ट सांगा आणि पद सोडा, असा इशाराही त्यांनी दिला. रमेश उर्फ पिट्या परदेशी यांनाही फटकारले या बैठकीत मुळशी पॅटर्न फेम अभिनेता आणि मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश उर्फ पिट्या परदेशी यांनाही राज ठाकरे यांनी फटकारले. काही दिवसांपूर्वी परदेशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा फोटो पाहून राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत विचारले, तुम्ही छाती ठोकून सांगत होतात की मी संघाचा कार्यकर्ता आहे. मग मनसेत का आहात? एकाच ठिकाणी राहा. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात काही क्षण तणावाचे वातावरण निर्माण झाले. राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, मनसेची ओळख आणि विचारधारा वेगळी आहे, आणि कार्यकर्त्यांनी ती जपली पाहिजे. आकडे नकोत, काम दाखवा राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, पक्षाच्या शाखा हे मनसेचे बळ आहे. जर शाखाच निष्क्रिय राहिल्या तर पक्षाची ताकद कमी होते. त्यामुळे प्रत्येक शाखाध्यक्षाने आपल्या भागातील लोकांशी संपर्क ठेऊन स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवावा. त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले, मला आकडे नकोत, काम दाखवा. शाखांमध्ये लोकांची उपस्थिती वाढली पाहिजे, यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घ्या. त्यांनी मतदार याद्यांबाबतही नाराजी व्यक्त केली. मतदार यादी पूर्ण का नाहीत? हे तुमचं मूलभूत काम आहे. निवडणूक आली की शेवटच्या क्षणी धावाधाव सुरू होते, हे बंद झालं पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना दूर करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी बैठकीचा मुख्य उद्देश पुण्यातील स्थानिक प्रश्नांवर चर्चा करणे आणि आगामी निवडणुकांसाठी धोरण निश्चित करणे हा होता. परंतु अपेक्षेप्रमाणे चर्चा पुढे न सरकल्याने राज ठाकरे नाराज झाले आणि त्यांनी बैठक अल्पावधीतच संपवली. बैठकीनंतर अनेक शाखाध्यक्ष गप्पच राहिले, तर काहींनी माना खाली घातल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत पक्षात मोठे फेरबदल होऊ शकतात. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना दूर करून सक्रिय कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांच्या या कठोर भूमिकेमुळे आता मनसेच्या संघटनात्मक कामाला गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 3:54 pm

हिंगोली पालिका निवडणूक:कायदा व सुव्यवस्थेसाठी एसपी उतरले मैदानात, शहरातील विविध प्रभागांमध्ये भेटी, नागरिकांशी संवाद

हिंगोली शहरासह वसमत व कळमनुरी नगर पालिका निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेसाठी खुद्द पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे मैदानात उतरले असून बुधवारी ता. ५ त्यांनी हिंगोली शहरातील विविध प्रभागातील नागरीकांच्या भेटी घेऊन संवाद साधला. निवडणुकीच्या कालावधीत अनुचित प्रकार घडत असल्याचे दिसून येताच तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. हिंगोली शहरासह वसमत व कळमनुरी पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था कायम रहावी तसेच नागरिकांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच मतदारांना प्रलोभने दाखविण्याचे प्रकार घडू नयेत यासाठीही पोलिस विभागाकडून गस्त घातली जात आहे. त्यासाठी पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप मोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप, उपनिरीक्षक राहुल महिपाळे, गंधकवाड, श्रीधर वाघमारे, नागरे यांचे सह ८ पोलिस पेट्रोलींग वाहने व क्युआरटी पथक हिंगोली शहरात तैनात करण्यात आले आहे. त्यानंतर खुद्द पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी हिंगोली शहरातील बियानी नगर, रिसाला बाजार, रिसाला नाका, मेहराजुलुम चौक, सिध्दार्थ नगर, खुशाल नगर, जिजामाता नगर, निरंजन बाबा चौक, वंजारवाडा, एनटीसी, शिवराजनगर, नगर परिषद वसाहत, आजम कॉलनी, हनुमान नगर, गारमाळ, पोस्ट ऑफिस चौक, अंबिका टॉकीज परिसर, महात्मा गांधी चौक या भागात भेटी देऊन नागरीकांशी संवाद साधला. निवडणुका खुल्या व निर्भीड वातावरणात पार पाडण्यासाठी योग्यत्या सुचना दिल्या व कोणत्याही मदतीसाठी हिंगोली पोलिस दल २४ तास सतर्क असल्याचे सांगितले. नागरीकांनीही यावेळी पोलिस अधिक्षक कोकाटे यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. दरम्यान यावेळी नागरीकांनी मांडलेल्या अडचणींची माहिती घेऊन त्यानुसार पोलिस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना हिंगोली शहर पोलिसांना दिल्या आहेत. या सोबतच शहरात येणाऱ्या सर्वच मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 3:39 pm

मुंबईत रूपाली चाकरणकरांविरोधात वंचितचा मोर्चा:आंदोलक महिलांची पोलिसांसोबत झटापट, महिला आघाडीच्या अध्यक्षा जखमी

फलटण महिला आत्महत्या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेल्या स्त्रीविरोधी विधानाचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले. रूपाली चाकणकरांच्या विधानाच्या निषेधार्थ वंचित बहुजन महिला आघाडीने मुंबईत आंदोलन केले. यावेळी मोर्चादरम्यान पोलीस आणि वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनकर्त्या महिला कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली. या घटनेत मुंबई प्रदेश अध्यक्षांसह इतर नेत्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की केल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. यावरून वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारवर लोकशाहीवरील आघाताचा आरोप करत तीव्र निषेध नोंदवला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलेले विधान स्त्रीविरोधी आणि अत्यंत लज्जास्पद असल्याचा आरोप करत वंचित बहुजन महिला आघाडीने मुंबईत जोरदार आंदोलन केले. महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि लैंगिक असमानतेविरोधात आवाज उठवण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आणि महिला कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यावेळी झालेल्या संघर्षात वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा स्नेहल सोहनी या पोलिसांच्या मारहाणीत जखमी झाल्या आहेत. तसेच, राज्य प्रवक्त्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या उत्कर्षा रुपवते यांच्यासोबतही पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे वृत्त आहे. वंचित बहुजन आघाडी आक्रमक या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. महिलांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या महिला कार्यकर्त्यांवरच पोलिसांनी बळाचा वापर करणे, हा लोकशाहीवरील आघात आहे, अशी तीव्र टीका वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. आंदोलनकर्त्या महिलांचे म्हणणे होते की, महिला आयोगाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीनेच असे स्त्रीविरोधी वक्तव्य करणे अत्यंत लाजिरवाणे आहे. या वक्तव्यामुळे महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचली असून, आयोगाचे पावित्र्य धोक्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या मोर्चादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईनंतर वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारकडे तीव्र निषेध नोंदवला आहे आणि काही कठोर मागण्या केल्या आहेत. आंदोलक महिला कार्यकर्त्यांवर बळाचा वापर करणाऱ्या पोलिसांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. शिवाय रूपाली चाकणकर यांनी केलेल्या स्त्रीविरोधी विधानाबद्दल त्यांना त्वरित महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून दूर करण्यात यावे, अशा मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीन करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून झालेल्या या मारहाणीवरून वंचित बहुजन आघाडीने अत्यंत आक्रमक भूमिका घेत, रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करण्याची तयारी दर्शवली आहे. हे ही वाचा... 'मतचोरी'च्या कायदेशीर लढाईत सहभाग का नाही?:आंबेडकरांचा राहुल गांधींना सवाल, म्हणाले - हायड्रोजन बॉम्बची क्षमता वाढली असती हरियाणा निवडणुकीतील मतदार यादीतील कथित हेराफेरीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या 'प्रझेंटेशन'चे कौतुक करतानाच, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना थेट आणि कठोर शब्दांत जाब विचारला आहे. निवडणुकीच्या निकालांना आव्हान देण्यासाठी 'निवडणूक याचिका' हाच एकमेव कायदेशीर मार्ग आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील '76 लाख मतांच्या' वाढीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या लढ्यात काँग्रेसने सहभाग का घेतला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 3:31 pm

पोराच्या डीलमधील स्टॅम्प ड्युटीचे काय?

पुणे : प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी एका भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतक-यांना सुनावले होते. ज्यानंतर आता पार्थ पवारांच्या कंपनीचा जमीन व्यवहाराचा घोटाळा समोर येताच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पवारांना कर्जमाफीच्या मुद्यावरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या अ‍ेंीिं ऌङ्म’्िरल्लॅ२ छछढ नावाच्या कंपनीने, १८०४ कोटींची महार […] The post पोराच्या डीलमधील स्टॅम्प ड्युटीचे काय? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 3:22 pm

पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या ,जमीन व्यवहाराची होणार चौकशी

नागपूर : प्रतिनिधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पार्थ पवारांशी संबंधित जमीन घोटाळा प्रकरणातील मुद्दे अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. त्यांनी महसूल विभाग, आयजीआर आणि भूमी अभिलेख विभाग (लँड रेकॉर्डस्) यांच्याकडून सर्व माहिती मागवली असून, योग्य चौकशीचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी १८०० कोटींची जमीन केवळ ३०० […] The post पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या ,जमीन व्यवहाराची होणार चौकशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 3:17 pm

मनोज जरांगेंच्या हत्येचा कट

बीड : प्रतिनिधी बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे. मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आली आहे. बीडमधील एका बड्या नेत्याचा या कटात हात असल्याचे सांगितले जात […] The post मनोज जरांगेंच्या हत्येचा कट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 3:15 pm

बंदुकीच्या धाकावर अपहरण करून बलात्काराचा आरोप:सबळ पुराव्यांअभावी आरोपीची निर्दोष सुटका, नागपूर न्यायालयाचा निकाल

नागपूर: बंदुकीच्या धाकावर अपहरण करून बलात्कार केल्याच्या आरोपांमधून जिल्हा व सत्र न्यायालयाने एका आरोपीची निर्दोष सुटका केली आहे. सबळ पुराव्यांअभावी न्यायालयाने हा निर्णय दिला. नानक लालताप्रसाद यादव असे निर्दोष सुटका झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. २०१७ मध्ये ही घटना घडली होती, जेव्हा तक्रारदार महिला आपल्या मुलीला डबा देण्यासाठी इटर्निटी मॉलमध्ये गेली होती. मॉलबाहेर पडत असताना एका कारने तिचा पाठलाग केला आणि बंदुकीच्या धाकावर तिचे अपहरण केले, असा आरोप होता. अपहरणांनंतर अज्ञातस्थळी नेऊन कारमध्ये बलात्कार करण्यात आला आणि घटनेची व्हिडिओ चित्रफीत तयार करून समाजात बदनामी करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणी कपीलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी न्या. श्रीमती एस. पी. पोंक्षे यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षाने तक्रारदार महिला, तिची मुलगी, मुलगा, पंच साक्षीदार आणि तपास अधिकारी यांची साक्ष नोंदवली. आरोपीच्या वतीने ॲड. मंगेश डी. राऊत यांनी साक्षीदारांचा उलटतपास घेतला. ॲड. नाझिया पठाण यांनी त्यांना सहकार्य केले. सर्व साक्षपुरावे आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी आरोपीची निर्दोष सुटका केली.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 3:05 pm

पार्थ पवारांच्या कंपनीचे जमीन व्यवहार प्रकरण:पुणे तहसीलदारांसह उपनिबंधक निलंबित; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने वेगवान कारवाई

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर मोक्याची जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये विकल्याचा आणि त्यासाठी केवळ 500 रुपयांची स्टँप ड्युटी आकारण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ही जमीन सुमारे 1800 कोटी रुपयांची असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी सरकारवर तीव्र टीका केली असून, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक चौकशीत गैरव्यवहाराचे संकेत मिळाल्यानंतर पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकरणाची संपूर्ण माहिती महसूल विभाग, आयजीआर आणि लँड रेकॉर्ड विभागाकडून मागवली आहे. प्राथमिक चौकशीत काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्यावर कठोर कारवाई होईल. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, दुपारी चौकशीचे आदेश दिल्यानंतर अवघ्या दोन तासांतच तहसीलदारांना निलंबित करण्यात आले. या वेगवान कारवाईमुळे शासन गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच या प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती सर्व कागदपत्रे आणि जमीन व्यवहारातील प्रक्रियेचा तपशीलवार आढावा घेणार आहे. जमीन व्यवहाराची नोंदणी बेकायदेशीरपणे या प्रकरणाचा उलगडा होताच केवळ तहसीलदारच नव्हे, तर दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत जमीन व्यवहाराची नोंदणी बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे मुद्रांक शुल्क विभागाने रवींद्र तारूंनाही निलंबित केले आहे. चौकशीत असे दिसले की, ही जमीन मूळ मालक आणि सरकारची फसवणूक करून विकली गेली असून, त्यासाठी सरकारी नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. या व्यवहारासाठी फक्त 500 रुपयांची स्टँप ड्युटी भरल्याचे स्पष्ट झाल्याने तो पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राजकीय प्रभाव आणि सत्तेचा गैरवापर - दानवे विरोधकांनी या प्रकरणावरून अजित पवार आणि त्यांच्या पुत्र पार्थ पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हटले की, एक लाख रुपयांच्या भांडवलावर चालणाऱ्या कंपनीने एवढी महागडी जमीन कशी विकत घेतली? हे सर्व राजकीय प्रभाव आणि सत्तेचा गैरवापर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांनीही या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. दुसरीकडे, पार्थ पवार यांनी या आरोपांचे खंडन करत सांगितले की, आम्ही कोणताही गैरप्रकार केलेला नाही. सर्व व्यवहार कायदेशीर रीत्या झाले आहेत. त्यांनी अधिकची माहिती देण्यास नकार दिला आहे. नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होईलच - फडणवीस या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कसारख्या मोलाच्या भागातील जमिनीचा इतक्या कमी किंमतीत आणि संशयास्पद पद्धतीने व्यवहार झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारने सुरू केलेल्या कारवाईनंतर आणखी अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, चौकशी समितीच्या अहवालानंतर पुढील कारवाई ठरेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. नियम तोडणाऱ्यांवर कितीही मोठे व्यक्ती असले तरी कठोर कारवाई होईल. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीच्या निष्कर्षाकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 2:54 pm

निवडणूक आयोग अपंग ; यशोमती ठाकूर यांची टीका

अमरावती : प्रतिनिधी यशोमती ठाकूर यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांवरून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘निवडणूक आयोग अपंग झालेला आहे, पॅरालिटिक आहे, पॅरासाईट म्हणून तो काम करतो. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असूनही, ती व्यवस्थित काम करत नाही, हे आता सिद्ध झाले आहे, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले […] The post निवडणूक आयोग अपंग ; यशोमती ठाकूर यांची टीका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 2:47 pm

ईडी, सीबीआय झोपले आहे का?

नागपूर : प्रतिनिधी मुंढव्यातील जमीन व्यवहार घोटाळा प्रकरणावरून काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा अजित पवार, पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, आता ईडी, सीबीआय झोपले आहे का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स एलएलपी गावाच्या कंपनीने, १८०४ कोटीची महार वतनाची जमीन ३०० […] The post ईडी, सीबीआय झोपले आहे का? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 2:45 pm

मोठी बातमी:मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघड; अडीच कोटींची सुपारी, दोन जण ताब्यात,  मोठ्या राजकीय नेत्याचे नाव

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा एक मोठा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, जरांगे पाटलांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी जालना पोलिस अधीक्षकांना जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी तक्रार दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई केली आणि बीड जिल्ह्यातून दोन संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची नावे दादा गरुड आणि अमोल खुणे अशी आहेत. यापैकी अमोल खुणे हा जरांगे पाटील यांचाच पूर्वीचा सहकारी असल्याचे समोर आले असून, या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, बीड शहरात काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी गुप्त बैठकाही घेण्यात आल्या होत्या. या बैठकीत जरांगे पाटलांच्या ओळखीतील काही जण उपस्थित होते. या बैठकीदरम्यान हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची डील ठरल्याची चर्चा आहे. ही माहिती मिळताच गंगाधर काळकुटे यांनी पोलिसांकडे लेखी निवेदन देऊन तक्रार केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री बीडमध्ये छापा मारून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र, पोलिसांनी अधिकृतरीत्या कोणतेही नाव जाहीर केलेले नाही. आरोपींची कसून चौकशी सुरू या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः रात्री उशिरा जालना पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी पोलिसांना सर्व माहिती देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला कमजोर करण्यासाठी काही शक्ती प्रयत्न करत आहेत. पण आम्ही मागे हटणार नाही. आमच्या जीवावर बेतला तरी आम्ही समाजासाठी लढत राहू. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू केली असून, या कटामागे कोण, कशासाठी आणि किती लोक सहभागी आहेत हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता राज्यात या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कारण मनोज जरांगे पाटील हे सध्या मराठा आरक्षणाच्या चळवळीचे प्रमुख चेहरे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर मोठं आंदोलन झालं आहे. त्यामुळे त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार समोर येणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. पोलिस तपासातून यामागे कोणत्या राजकीय शक्तींचा हात आहे का? हा प्रश्न आता पुढे आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ पोलिसांनी या कटाचा पर्दाफाश केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. जर वेळेवर कारवाई झाली नसती, तर गंभीर घटना घडली असती, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, त्यांना अतिरिक्त पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. राज्यातील राजकीय वातावरणात या प्रकरणामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. विरोधी पक्षांनी यावर सरकारकडे सुरक्षेच्या त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर सरकारने या कटामागील सर्व दोषींना कठोर शिक्षा होईल, असा विश्वास दिला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडलेला हा प्रकार राज्याच्या राजकारणाला हादरवून सोडणारा ठरत आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 2:39 pm

पार्थ पवारांवर १८०० कोटींचा जमीन घोटाळ्याचा आरोप; अजित पवार अडचणीत?

पुणे : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतक-यांना नेहमीच फुकट लागतं असे म्हणतात. पण त्यांच्या मुलाला देताना १८०० कोटींची जमीन फक्त ३०० कोटी रुपयांत कशी दिली जाते. या ३०० कोटी रुपयांवरील स्टँप ड्युटी ४८ तासांत माफ होते. तुम्हाला का सर्व फुकट लागते, असा सवाल करत शिवसेना (ठाकरे) नेते तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी […] The post पार्थ पवारांवर १८०० कोटींचा जमीन घोटाळ्याचा आरोप; अजित पवार अडचणीत? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 2:37 pm

खरवड शिवारातील तलावात आईसह मुलाचा मृतदेह सापडता:चार दिवसांपासून होते बेपत्ता; कळमनुरी पोलिस घटनास्थळी दाखल

कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारात पाच वर्षाच्या मुलासह त्याच्या आईचा मृतदेह गुरुवारी ता. ६ सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे. कळमनुरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसद येथील ज्योती सागर सावळे (३०) व त्यांचा मुलगा राज सावळे (५) हे दोघे जण खरवड येथे दीपावली निमित्त आई वडिलांकडे आले होते. मागील काही दिवसांपासून दोघेही खरवड येथेच राहात होते. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच ज्योती ह्या त्यांचा मुलगा राज याला सोबत घेऊन बाहेर जाऊन येते असे सांगून आई, वडिलांच्या घरून निघाल्या होत्या. मात्र सायंकाळी उशीरापर्यंत त्या घरी आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी चार दिवसांपासून शोध सुरु केला होता. दरम्यान, आज सकाळी खरवड गावाजवळील असलेल्या तलावामध्ये मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, उपनिरीक्षक इंगळे, जमादार देविदास सूर्यवंशी, गुलाब जाधव, अंकुश शेळके यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर मृतदेह ज्योती व त्यांचा मुलगा राज यांचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने या प्रकाराची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर त्यांचे नातेवाईक देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत. या दोघांच्या मृत्यूमागचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 2:36 pm

नागपुरात चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू

नागपूर : प्रतिनिधी नागपूरमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे. चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दोन वेगवेगळ्या घटनांत चौघांनी जीव गमावला आहे. जपालेश्वर मंदिर परिसरात तलावात बुडून मामा-भाचीचा मृत्यू झाला. तर भागीमहारी तलावात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील जपालेश्वर मंदिर परिसरात तलावात बुडून […] The post नागपुरात चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 2:35 pm

आम्ही लिपस्टीक लावून पद मागत नाही; रुपाली ठोंबरेंचे आंदोलन

पुणे : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातील रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे-पाटील या एकमेकींच्या विरोधात उभ्या असल्याचे दिसून येत आहे. त्या दोघींमध्ये वाद नेमका काय आहे, रोष काय आहे, कुठून सुरुवात झाली, याबद्दल रुपाली ठोंबरे पाटील यांनी आम्ही लाली लिपस्टिक लावून पद मागत नाही, मागे फिरून पद मागत नाही. असे सविस्तर भाष्य केले […] The post आम्ही लिपस्टीक लावून पद मागत नाही; रुपाली ठोंबरेंचे आंदोलन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 2:32 pm

रुग्णालयाच्या बेडवरूनही संजय राऊतांचा 'सामना':हात लिहिता राहिला पाहिजे...; प्रकृती अस्वास्थ्येतही ट्वीट करत दिला संदेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक जीवनापासून दूर असले तरी, रुग्णालयाच्या बेडवरूनही त्यांचे कार्य आणि संघर्ष सुरूच असल्याचे दिसून आले आहे. प्रकृती खालावल्यामुळे बुधवारी त्यांना मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज, गुरुवारी त्यांनी रुग्णालयातूनच एक फोटो ट्वीट करत कार्यकर्त्यांना आणि विरोधकांनाही संदेश दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांची प्रकृती ठीक नव्हती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक निवेदन जारी करून आपण वैद्यकीय कारणास्तव काही महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ते तपासणीसाठी रुग्णालयात जात असताना, मंगळवारी त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. तातडीच्या तपासणीदरम्यान, त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी अचानक कमी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर खासगी उपचार सुरू आहेत. राऊतांचा रुग्णालयातून फोटो ट्वीट संजय राऊत यांनी आज दुपारी रुग्णालयाच्या बेडवरूनच एक प्रेरणादायी ट्वीट केले. या ट्वीटमध्ये त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे, जो त्यांच्या कामावरील निष्ठा आणि समर्पणाची ग्वाही देतो. या फोटोमध्ये संजय राऊत यांच्या हाताला सलाईन लावलेली दिसत आहे. मात्र, या अवस्थेतही ते पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'चे संपादकीय लिहित असल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत त्यांनी एक अत्यंत अर्थपूर्ण कॅप्शन दिले आहे. हात लिहिता राहिला पाहिजे. कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र, हा आमच्या पिढीचा मंत्र होता!असे राऊत यांनी फोटोला कॅप्शन दिले आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रिया दरम्यान, संजय राऊत यांनी दिलेल्या या कॅप्शनमधून, शारीरिक अस्वस्थता असूनही आपल्या लेखणीच्या माध्यमातून ते पक्ष आणि कार्यकर्त्यांशी जोडलेले राहण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या या ट्वीटमुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांसह देशभरातील नेटकऱ्यांनीही त्यांच्या फोटोवर प्रतिक्रिया देत, राऊत लवकर बरे होऊन सार्वजनिक जीवनात सक्रिय व्हावेत यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रकृती अस्वास्थामुळे काही काळ थांबलेले राऊत, लवकरच पूर्ण ताकदीने परततील, असा विश्वास त्यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 1:51 pm

पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण:देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले- प्राथमिक चौकशीचे आदेश, अनियमितता आढळली, तर कडक कारवाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन व्यवहार प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी महसूल विभाग, आयजीआर आणि लँड रेकॉर्ड विभागाकडून सर्व कागदपत्रे आणि सविस्तर माहिती मागवली असून, प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भात फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात समोर आलेले मुद्दे गंभीर आहेत. त्यामुळे योग्य ती चौकशी होईल आणि जर कुठे अनियमितता आढळली, तर अतिशय कडक कारवाई केली जाईल. तसेच, उपमुख्यमंत्री अशा प्रकारच्या कोणत्याही गैरप्रकाराला पाठीशी घालतील, असे मला वाटत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे पार्थ पवारांच्या व्यवहारावरून सुरू असलेल्या राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर मोठा आरोप केला आहे. त्यांनी असा दावा केला आहे की, पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतली आणि या व्यवहारासाठी केवळ 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली. एवढेच नव्हे तर ही जमीन कोरेगाव पार्क परिसरात असून, तिथे आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची योजना करण्यात आली आहे. एक लाख रुपयांच्या भांडवलाची कंपनी एवढा मोठा व्यवहार कसा करू शकते? असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे. अंबादास दानवे यांच्या मते, या व्यवहारात अनेक शंका निर्माण करणारे मुद्दे आहेत. उद्योग संचालनालयाने फक्त 48 तासांत स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचा आणि फक्त 27 दिवसांत संपूर्ण व्यवहार पूर्ण झाल्याचा त्यांनी आरोप केला आहे. या प्रकरणात सरकारमधील प्रभावी व्यक्तींचा हात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाने राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. विरोधकांनी पार्थ पवार आणि अजित पवार या दोघांवरही जोरदार टीका सुरू केली आहे. या सर्व घडामोडींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. या संदर्भात माध्यमांना माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मी या व्यवहाराबाबत सर्व माहिती मागवली आहे. महसूल विभाग, लँड रेकॉर्ड आणि आयजीआर या विभागांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. अजून संपूर्ण माहिती मिळालेली नाही, पण प्राथमिक अहवालानुसार काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी सांगितले की, आज पूर्ण माहिती आल्यानंतर शासन पुढील निर्णय घेईल आणि आवश्यक ती कारवाई केली जाईल. अनियमितता आढळली, तर दोषींवर कडक कारवाई मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार अशा कोणत्याही अनियमित व्यवहाराला पाठीशी घालतील, असे मला वाटत नाही. आमच्या सरकारचे या विषयावर स्पष्ट मत आहे, कुठेही गैरप्रकार झाला असेल, तर त्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. त्यामुळे या प्रकरणात जर अनियमितता आढळली, तर दोषींवर अतिशय कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्याने विरोधकांच्या आरोपांना महत्त्व मिळाले असून, सरकार आता दबावाखाली आल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. कोणताही चुकीचा व्यवहार केलेला नाही - पार्थ पवार दरम्यान, पार्थ पवार यांनी स्वतःवरील आरोप फेटाळले आहेत. एका वृत्तवाहिणीशी बोलताना त्यांनी सांगितले की, मी कोणताही चुकीचा व्यवहार केलेला नाही, किंवा कोणताही गैरप्रकार घडलेला नाही. मात्र, त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. या भूमिकेमुळे प्रकरण अधिक गूढ झाले असून, राज्यात यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. पुढील काही दिवसांत सरकारकडून मिळणारा अहवाल आणि त्यानंतर होणारी कारवाई यावर या वादाचे भवितव्य ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 1:50 pm

वाघाच्या हल्ल्यात 297 ग्रामस्थांचा मृत्यू:राज्यात साडेपाच वर्षांत 74.25 कोटी रुपयांची भरपाई

राज्यात गेल्या साडेपाच वर्षांत वाघांच्या हल्ल्यात 297 ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. 2020 पासून ते ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या कालावधीत झालेल्या या मृत्यूंसाठी वनविभागाने मृतांच्या वारसांना एकूण 74 कोटी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांसह संपूर्ण पूर्व विदर्भ सध्या वाघांच्या दहशतीखाली आहे. शेतात कामाला जाणे, मुलांना अंगणात खेळू देणे किंवा जनावरे चरायला नेणे हे दैनंदिन व्यवहारही ग्रामस्थांसाठी धोकादायक बनले आहेत. वाघ थेट शेतशिवार आणि शेतांपर्यंत पोहोचल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या सततच्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी 27 ऑक्टोबर रोजी रास्ता रोको करून वाहतूक थांबवल्याची घटना घडली होती. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये 39 मृत्यूंसाठी 9 कोटी 75 लाख रुपये, 2021 मध्ये 54 मृत्यूंसाठी 13 कोटी 50 लाख रुपये, 2022 मध्ये 80 मृत्यूंसाठी 20 कोटी रुपये, 2023 मध्ये 37 मृत्यूंसाठी 9 कोटी 25 लाख रुपये, 2024 मध्ये 41 मृत्यूंसाठी 10 कोटी 25 लाख रुपये आणि 2025 मध्ये 46 मृत्यूंसाठी 11 कोटी 50 लाख रुपये अशी एकूण 74 कोटी 25 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. राज्यातील रेस्क्यू सेंटर्समध्येही वाघांची संख्या वाढली आहे. वाघांना बेशुद्ध करून चंद्रपूर किंवा नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणले जाते. एकदा एखादा वाघ रेस्क्यू सेंटरमध्ये आल्यानंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडणे कठीण होते. त्यामुळे असे अतिरिक्त वाघ इतर राज्यातील प्राणी संग्रहालयांना दिले जातात. सध्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये 24 वाघ आणि 30 बिबट आहेत. यापैकी 8 वाघ आणि 6 बिबट इतर प्राणी संग्रहालयांना पाठवण्यात येणार आहेत. गुजरातमधील सुरत प्राणी संग्रहालयात 2 वाघ, हिमाचल प्रदेशातील सिरमौर प्राणी संग्रहालयात 1, जमशेदपूर येथील टाटा प्राणी संग्रहालयात 2, मध्य प्रदेशातील इंदूर प्राणी संग्रहालयात 2 आणि नागालँडमधील दिमापूर प्राणी संग्रहालयात 1 वाघ पाठवला जाईल. तसेच, गुजरातमधील सुरत प्राणी संग्रहालयात 4 बिबट आणि संभाजीनगर प्राणी संग्रहालयात 2 बिबट पाठवण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 1:49 pm

महार वतनाच्या जमिनी प्रकरणी अजून तक्रार नाही:पार्थ पवार जमीन प्रकरणात तक्रार आल्यावरच कारवाई- चंद्रशेखर बावनकुळे

महार वतनाच्या जमिनी प्रकरणी माझ्याकडे आतापर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही.मला सकाळी अंजली दमानिय यांचा फोन आला, त्यांनी मला मंगळवारी तक्रार देणार असल्याचे सांगितले आहे. महार वतनासंदर्भात विशेष कायदा आहे, त्या मार्फत हे झाले आहे का नाही हे पाहावे लागेल. मुद्रांक शुल्क कसे माफ करावे यासाठी कायदा आहे, त्या प्रमाणे जमिनीचा व्यवहार झाला का हे पाहावे लागेल, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पार्थ पवार यांच्या प्रकरणात बोलताना म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आयटी पार्कचे धोरणानुसार दिले का हे उद्योग विभाग चेक करेल. अंजली दमानिया यांनी कागदपत्रे दिल्यावर मी त्यात चौकशी करेल. पण मीडियाच्या मार्फत आलेल्या आरोपावर डायरेक्ट काही बोलता येणार नाही, तक्रार आल्यानंतर त्यावर तपास करता येईल. नियमात जमीन दिल्या आहे का हे पहावे लागेल. माझ्याकडे तक्रार आली की मी कारवाई करतो. ..तर तपास करावा लागेल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुद्रांक माफी केली असेल तर मला त्याबद्दल तपास करावा लागेल. मुद्रांक का माफ केले. आणि महार वतन जमीनी कायद्याने दिल्या का या दोन्ही गोष्टी चेक करावे लागेल असे पार्थ पवारांच्या प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी म्हटले आहे. पार्थ पवार यांच्या जमिनीबाबत तक्रार आली आल्यावर कारवाई सुरू करणार आहे. अंजली दमानिया यांनी मला सांगितले की मंगळवारी येणार आहेत. त्यामुळे मंगळवारी या प्रकरणाबद्दल माहिती समजेल. कामठीमध्ये 65 बुथवर दुबार मतदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मतदार यादीवर बोलण्यापूर्वी राहुल गांधी यांनी विचार केला पाहिजे. त्यांनी नुसते झोपेचे सोंग स्वीकारले असेल तर मला माहिती नाही. सर्वात आधी त्यांनी कामठीवर दुबार मतदार असल्याचा आरोप लावला, ते संपूर्ण राज्यात आहे. आशिष शेलार बोलले त्यात काही चूक नाही. कामठीमध्ये 65 बुथ असे आहेत की जिथे मला 2 मते आणि काँग्रेसच्या उमेदवाराला 600 मते आहेत. त्या बुथवर 10-10 लोकं दुबार मतदार आहेत. इतकं त्या ठिकाणी वाईट परिस्थिती आहे. राहुल गांधीचे वेडेपण आहे, त्यांनी तपास केला पाहिजे. दुबार मतदारांवर आम्ही आक्षेप घेतला चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, दुबार मतदारांचे नाव काढण्यासाठी सर्व प्रथम प्रयत्न केला तो देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांनी हायकोर्टात केस केली. मी निवडणूक आयोगाला भेटलो लोकसभेच्या याद्यांमध्ये दुबार,तिबार मतदार आहेत म्हणून. आता एक सत्यता कळली की माझ्या-विरोधात लढलेले सुरेश भोयर ज्यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी येणार होते पण वेळेवर त्यांची सभा रद्द झाली त्यांचे मतदार यादीत दुबार नाव आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 1:44 pm

विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा, थोडक्यात दुर्घटना टळली

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. विमानच लँडिंग होताना विमानाच्या पंखात पतंगाचा मांजा अडकल्याची घटना घडली आहे. मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टाळली आहे. या प्रकरणी नायलॉन मांजाची विक्री करणा-या विक्रेत्यावे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पतंग उडवणा-या मुलांना सुरक्षा रक्षकांनी चांगलाच समज दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर गुरुवारी सकाळच्या […] The post विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा, थोडक्यात दुर्घटना टळली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 1:15 pm

अकोल्यात जेजे मॉलला भीषण आग; लाखोंचे नुकसान

अकोला : प्रतिनिधी अकोल्यातून मोठी बातमी समोर आली आहे. अकोला शहरातील कपडा बाजारातील ‘जेजे मॉल’ मध्ये अग्नितांडव पाहायला मिळाला आहे. आगीचं रौद्ररुप पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होत. काही वेळातच संपूर्ण परिसरात धुराचे लोळ पाहायला मिळाले. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर […] The post अकोल्यात जेजे मॉलला भीषण आग; लाखोंचे नुकसान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 1:11 pm

आतापर्यंत फक्त ८० लाख लाडक्या बहिणींची के-वायसी पूर्ण

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीआधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, यात बोगस लाभार्थी असल्यचे कळल्यानंतर या योजनेवर निर्बंध आणण्यात आले. लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र दोन महिने उलटले तरी अद्याप निम्म्यादेखील लाभार्थी महिलांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही. तांत्रिक अडचणींमुळे २.४० कोटी महिलांपैकी फक्त ८० लाख […] The post आतापर्यंत फक्त ८० लाख लाडक्या बहिणींची के-वायसी पूर्ण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Nov 2025 1:08 pm

मविआ संपली! उद्धव ठाकरेंचा दौरा म्हणजे शेवटचा प्रयत्न:जनता हुशार आहे, ढोंगी नव्हे काम करणाऱ्यांनाच निवडते, भागवत कराडांचा टोला

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले का? किती वेळा दौरा केला. बांधावर जात बियाणे देऊ म्हणाले पण बांधावर गेलेच नाही. आता त्यांना लक्षात आले की महा विकास आघाडी संपत आलेली आहे जसे दिवा विजताना फडफड करतो, तसे त्यांनी आता दौरे करण्यास सुरवात केली आहे, हा त्यांचा शेवटचा प्रयत्न आहे, असे भाजप नेते भागवत कराड यांनी म्हटले आहे. भागवत कराड म्हणाले की, आम्ही महायुतीमधील घटक पक्षांसोबत चर्चा करणार आहोत. जर योग्य रित्या जागा वाटप झाले तर ठीक नाही तर स्वबळावर निवडणूक लढवणार पण त्यामध्ये आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत. महायुतीची सत्तेत येईल भागवत कराड म्हणाले की, भाजप हा शिस्तप्रिय पक्ष असून एक निवडणूक संपली की पुढच्या निवडणुकीसाठी पक्षाचे पदाधिकारी कामाला लागतात.केडर बेस पार्टी असल्यामुळे आमचा विजय होतो, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही विजयी होऊ याची आम्हाला खात्री आहे.विरोधकांना काम करायचे नाही केवळ ढोंग सुरू आहे. जनता हुशार आहे जो काम करतो त्यांनाच जनता निवडून देते. उबाठाची सत्ता होती तेव्हा त्यांनी काहीच काम केले नाही. आगामी निवडणुकीत मविआ दिसणार नाही महायुतीची सत्तेत येईल. ठाकरे जनतेमध्ये अविश्वास निर्माण करताय भागवत कराड म्हणाले की, उद्धव ठाकरे जनतेमध्ये जाऊन अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मतदारांनी मतदान केलेच पाहिजे. कुणाला मतदान करायचे हे जनता ठरवेल. ज्यांच्या माध्यमातून चांगली कामे झाली आहेत जनता त्यांना मतदान करेल. उद्धव ठाकरेंनी जनतेला मतदान करु नका हे सांगणे योग्य नाही. महायुती का मविआ हे जनता ठरवेल. काँग्रेसला मेवा कमावण्यासाठी सत्ता हवी भागवत कराड म्हणाले की, जनतेची सेवा कशी करावी हे विरोधकांना माहिती नाही. सत्तेसाठी पक्ष आणि त्या सत्तेतून मेवा कमवणे हे काँग्रेसचे धोरण आहे, अशा परिस्थिती काम करत असताना निवडणूक आयोगाला काम करू न देण हा प्रकार काँग्रेसकडून सुरू आहे. विरोधकांचा एसआयआरला विरोध भागवत कराड म्हणाले की, राहुल गांधी यांनी मतचोरीवर मोठा आरोप केला आहे. हा आरोप खोटा आहे. पावसाळी अधिवेशनावेळी एसआयआर सुरू होते तेव्हा विरोधकांनी त्याचा विरोध केला. आता सुद्धा आयोगाकडून एसआयआर करत आहे,हे निवडणूक आयोगाचे काम आहे, पण या गोष्टीला विरोधकांचा विरोध आहे. विरोधकांचे असे झाले आहे की नाचता येईना अंगण वाकडे. महायुतीचे चांगले काम सुरू भागवत कराड म्हणाले की, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या काँग्रेस उमेदवाराचे मतदार यादीत दुबार नाव आहे. आता हे नाव काढायचे का नाही काढायचे. कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असो दुबार नाव असले तर ते काढले पाहिजे. हे सर्व निवडणूक आयोग करत असताना विरोधी पक्षाचे लोक त्याला विरोध करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरात चांगले काम सुरू आहे. जनतेचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चांगले काम सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 12:20 pm

छत्रपती संभाजीनगरात चेन स्नॅचिंगचा थरार:हिसका बसून पडल्याने महिलेच्या डोळ्याला गंभीर दुखापत; दोन महिन्यांत 5 घटना

दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढले. मात्र, ते तुटले नाही. त्यामुळे वृद्ध महिला खाली पडली आणि गंभीर जखमी झाली. हा प्रकार मंगळवारी (४ नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास घडला. महिलेवर खासगी उपचार सुरू आहेत. याप्रकरणी २ अज्ञात चोरट्यांवर जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र सोन्याचे नव्हते. या प्रकरणात प्रतीक प्रकाश वेरूळकर (४३, रा. जयविश्वभारती कॉलनी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, प्रतीक यांची आई स्वरूपा प्रकाश वेरूळकर (६३) या ओंकारेश्वर मंदिरात दर्शन घेऊन घरी परतत होत्या. रात्री ८ ते ८.३० यादरम्यान श्रीराम मंदिर रोडवरील कमानीजवळून जात असताना, राम मंदिराकडून चेतक घोड्याकडे जाणाऱ्या दिशेने एका दुचाकीवर २ जण आले. त्यांनी वेरूळकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचण्याचा प्रयत्न केला. मंगळसूत्र तुटले नाही, पण वेरूळकर यांच्या मानेला झटका बसला. त्यामुळे त्या खाली पडल्या आणि त्यांच्या उजव्या डोळ्याजवळ गंभीर जखम झाली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी जखमी वेरूळकर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. नंतर पुढील उपचारासाठी त्यांना मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी २ अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे आणि पुढील तपास सुरू आहे. चोरटे मोकाट, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह सर्वात गंभीर बाब म्हणजे, ज्या ओंकारेश्वर मंदिर परिसरात ही घटना घडली, त्याच परिसरात गेल्या दोन महिन्यांमध्ये चेन स्नॅचिंगच्या ४ ते ५ घटना घडल्या आहेत. प्रत्येक घटनेत आरोपींचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये झाले आहे. तरीही, जवाहरनगर पोलिसांना या अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यात किंवा त्यांना पकडण्यात सतत अपयश येत आहे. यामुळे या भागात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे चोरटे बिंधास्तपणे गुन्हे करत असताना, दुसरीकडे पोलिस आरोपींना पकडण्यात अपयशी ठरत असल्याने नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे. पोलिसांनी तातडीने कठोर पाऊल उचलून या चोरट्यांना अटक करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 11:59 am

‘छत्रपतींसारखे दोषींना लोकशाही पद्धतीने कडक शासन करा’:30 कोटींच्या खोट्या कामांवरून रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत 30 कोटी रुपयांच्या खोट्या कामांचा मुद्दा पुन्हा उचलला आहे. त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांचा आदर व्यक्त करत दोषींवर छत्रपतींसारखे लोकशाही पद्धतीने कडक शासन करण्याची विनंती केली आहे. दक्षता व गुण नियंत्रक विभागाचा अहवालही त्यांनी यासंदर्भात जोडला आहे. रोहित पवारांची पोस्ट काय? रोहित पवारांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटलंय की, आदरणीय शिवेंद्रराजे भोसले साहेब, आपला आदर आहे आणि या सरकारमध्ये बोटावर मोजण्याएवढेच चांगले मंत्री आहेत त्यापैकी एक म्हणून नेहमीच आपल्याकडे बघितलं जातं. मी गेल्या सरकारच्या काळातील मंत्र्यांच्या बंगल्यांवरील 30 कोटींची खोटी कामं दाखवून पैसे लाटल्याचा मुद्दा समोर आणला होता. सरकारच्या दक्षता व गुणनियंत्रक विभागाने देखील या संदर्भातला अहवाल तीन महिन्यापूर्वी म्हणजेच जुलै महिन्यात दिला आहे. हा अहवाल आपणास पाठवत आहे, ज्याप्रमाणे छत्रपती दोषींना कडक शासन करायचे त्याचप्रमाणे आपण देखील या प्रकरणात दोषींना लोकशाही पद्धतीने कडक शासन करावे, ही विनंती! बंगल्याना ग्रॅनाइटचे कंपाऊंड कसे? रोहित पवारांनी म्हटले आहे की, सरकारकडे पैसे नसताना बंगल्यांच्या भिंतींना ग्रॅनाइटचे कंपाऊंड कसे लावले जात आहे. दक्षता आणि गुणनियंत्रक मंडळाने केलेल्या चौकशीतही हा खर्च घोटाळा असल्याचे सिद्ध झाले आहे. बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणे आवश्यक असताना, ती घेतली नसल्याचे अहवालातून समोर आले आहे. या प्रकारात दोषी असलेल्या कार्यकारी अभियंत्यासह इतर अभियंत्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे रोहित पवार यांनी नमूद केले आहे. गुलाबराव पाटील स्पष्टीकरण देणार का? रोहित पवार म्हणाले, केवळ कागदोपत्री काम दाखवून मंत्र्यांच्या बंगल्यावर 30 कोटी रुपये खर्च केल्याचा घोटाळा सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे आणला असता हा मुद्दा मी गेल्यावर्षीच विधानसभेत मांडला होता. आता दक्षता आणि गुणनियंत्रक मंडळाने केलेल्या चौकशीतही हा घोटाळा झाल्याचं सिद्ध झालं आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांवर सरकारी पैशाची कशी उधळपट्टी केली, याची विस्तृत चिरफाड या अहवालात केलेली आहे. एकीकडं सरकारकडे पैसे नाही आणि दुसरीकडं भिंतीना ग्रेनाइट चे कंपाऊंड? विशेष म्हणजे बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असते, परंतु बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांचीही परवानगी घेतली नसल्याचं या अहवालात समोर आलं आहे. गतवर्षी मी हा मुद्दा मांडला असता मध्येच उभं राहून मोठ्या तावातावाने आरोप खोटे असल्याच्या पोकळ डरकाळ्या फोडणारे मंत्री गुलाबराव पाटील आता यावर स्पष्टीकरण देतील का? दोषी कार्यकारी अभियांत्यासह इतर अभियंत्यांवर अजूनही कारवाई झालेली नाही. तत्काळ कारवाई करा अन्यथा हिवाळी अधिवेशनात सरकारची धींड काढल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणालेत. आपण पुराव्यांशिवाय बोलत नाही, अशी पुस्तीही रोहित पवारांनी या प्रकरणी जोडली आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 11:33 am

जमीन घोटाळ्याच्या आरोपावर पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया:एका ओळीत विषय संपवला, म्हणाले - कोणतही चुकीचे काम केले नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडीया होल्डिंग्स एलएलपी' कंपनीने केलेल्या जमीन खरेदी व्यवहारावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले असून, अजित पवार आणि सरकारवर टीकेची झोड उठली आहे. विरोधकांच्या आरोपांवर पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी केवळ एका वाक्यात विषय संपवला आहे. पार्थ पवार यांच्या अमीडीया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने सुमारे 1800 कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन फक्त 300 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. आरोपांनुसार, हा खरेदी व्यवहार झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत स्टँप ड्युटी माफ करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे सरकारी नियमांना पायदळी तुडवून जमिनीची खरेदी झाली असून महसूल विभागाने विशेष सवलत दिली का, असा सवाल विरोधक विचारत आक्रमक झाले आहेत. यावर आता पार्थ पवार यांन प्रतिक्रिया दिली आहे. नेमके काय म्हणाले पार्थ पवार? या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर, पार्थ पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढत, पार्थ पवार यांनी एकाच ओळीत आपले उत्तर दिले आहे. आपण कोणतही चुकीचं काम अथवा घोटाळा केला नसल्याचे पार्थ पवार यांनी सांगितले. मात्र, या व्यवहाराबद्दल अधिक बोलण्यास टाळले. नेमके प्रकरण काय? उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीची अमेडिया कंपनी आणि दिग्विजय अमरसिंह पाटील या सहमालकाविरोधात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. या जमिनीची बाजार किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचं कागदोपत्री दाखवलं गेलं, परंतु प्रत्यक्ष किंमत 1800 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अमेडिया कंपनीने या जमिनीची खरेदी करताना आयटी पार्क उभारणीच्या नावाखाली सरकारकडून स्टँप ड्युटी माफी मिळवल्याचं आरोपात नमूद करण्यात आलं आहे. 22 एप्रिल 2025 रोजी कंपनीनं आयटी प्रकल्पाचा ठराव केला आणि फक्त दोन दिवसांत म्हणजे 24 एप्रिल रोजी उद्योग संचालनालयानं त्यावर स्टँप ड्युटी माफ, असा शेरा नोंदवला. इतक्या वेगाने झालेल्या प्रशासकीय हालचालींनी संशय निर्माण केला आहे. आश्चर्य म्हणजे, या संपूर्ण व्यवहारासाठी फक्त 500 रुपयांची स्टँप ड्युटी भरल्याचं समोर आलं असून, एवढ्या मोठ्या मूल्याच्या जमिनीचा व्यवहार फक्त काही आठवड्यांत पूर्ण झाला. हे सर्व घडत असताना, संबंधित कंपनीला कोणताही पूर्वानुभव नसल्याचं आणि तरीही तीला सरकारी सवलती कशा मिळाल्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महार वतनाची जमीन सदर जमीन ही महार वतनाची असल्यामुळे कायद्यानुसार तिचा व्यवहार करता येत नाही, असा तज्ज्ञांचा दावा आहे. वतनधारक जमीन विकली गेल्यास त्या किमतीचा काही भाग सरकारला नजराण्याच्या स्वरूपात द्यावा लागतो. मात्र, या व्यवहारातील कागदपत्रांमध्ये असा कोणताही उल्लेख नसल्याचे सांगितले जात आहे. कागदोपत्री हा व्यवहार पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर या शीतल तेजवानी यांच्या कंपनीसोबत झाला असल्याचं भासवलं असलं, तरी प्रत्यक्षात अमेडिया कंपनीनं मूळ गायकवाड आणि 274 जमिनमालकांसोबत खरेदी खत नोंदवलं असल्याचं उघड झाले आहे. या प्रकरणातील आर्थिक देवाणघेवाण, चेक, एनईएफटी व्यवहार किंवा बँक पुरावे, हे नोंदणी दस्तावेजात जोडले गेले नाहीत, यावरून या व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 11:29 am

ज्या चिरंजीवांनी व्यवहार केला, त्यांच्या पिताश्रींचाही राजीनामा घेण्यासाठी लढू:सुषमा अंधारे यांचा अजित पवारांवर निशाणा; जमीन खरेदीमुळे राजकीय वातावरण तापले

कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमीन खरेदी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी नियम वाकवून ही जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला जात आहे. या जमिनीची कागदोपत्री किंमत सुमारे 300 कोटी रुपये असली तरी प्रत्यक्ष बाजारभाव हजारो कोटींमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. ही जमीन खरेदी करण्यासाठी अमेडिया कंपनी नावाची संस्था पुढे आली होती. ही कंपनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्या मालकीची असल्याचं वृत्त आहे. ही बाब समोर आल्यानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. ही बातमी उघडकीस आणल्यानंतर अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. सर्वसामान्य लोकांसाठी असलेली सरकारी जमीन इतक्या प्रभावशाली लोकांकडून कशी विकत घेतली गेली, हा प्रश्न आता सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. ही जमीन महार वतनाची असल्याने तिची विक्री करणे कायद्याने शक्य नाही, असं भूमी विषयक तज्ज्ञांचे म्हणणं आहे. पण तरीही ही जमीन अमेडिया कंपनीच्या ताब्यात गेल्याचं समोर आल्याने या प्रकरणावर शंका व्यक्त केली जात आहे. या जमिनीचा खरा व्यवहार कसा झाला, कागदपत्रांमध्ये नेमकं काय नमूद आहे आणि सरकारी महसूल विभागाने हे सर्व कसे मंजूर केले, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, या बातम्या पाहून मी अक्षरशः चक्रावून गेले आहे. जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मुलांकडूनच असे प्रकार होत असतील, तर सामान्य माणसाने सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची? ही बातमी वृत्त संस्थांनी देखील धैर्याने मांडली, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, असेही अंधारे म्हणाल्या आहेत. अंधारे यांनी स्पष्टपणे सांगितले की, आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेली जमीन जर मोठ्या लोकांनी हडप केली असेल, तर हा गंभीर आणि निषेधार्ह प्रकार आहे. ज्या चिरंजीवांनी व्यवहार केला, त्यांच्या पिताश्रींचाही राजीनामा घेण्यासाठी लढू सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, 21 कोटींचा महसूल बुडवणे म्हणजे सरकारची फसवणूक आहे. गोरगरिबांनी प्रामाणिकपणे कर भरायचा आणि मोठ्या लोकांना मोकळं सोडायचं, हे अन्यायकारक आहे. आमचा पक्ष या प्रकरणात भूमिका घेईल आणि योग्य तो न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. गरज पडली तर ज्या चिरंजीवांनी हा व्यवहार केला आहे, त्यांच्या पिताश्रींचाही राजीनामा घेण्यासाठी आम्ही लढू. त्यांनी पुण्यातील जनतेलाही या प्रकरणाविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं. राजकीय वातावरण तापले या सगळ्या घडामोडींमुळे पुण्यातील कोरेगाव पार्क परिसर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. अजित पवारांच्या कुटुंबावर आरोप झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. सरकारी महसूल विभाग आणि उद्योग विभागाकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी केली जात आहे. या आरोपांमागे किती तथ्य आहे हे तपासातूनच स्पष्ट होणार असलं तरी या वृत्तानंतर महाराष्ट्रात एकच चर्चा रंगली आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 11:29 am

निवासी वसतिगृहाच्या आड धर्मांतराचे धडे:गडचिरोलीच्या नागेपल्ली येथील धक्कादायक प्रकार; अधिकाऱ्यांनी केली 91 विद्यार्थ्यांची सुटका

गडचिरोली जिल्ह्यातील एका अनधिकृत निवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांना धर्मांतराचे धडे दिले जात असल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. जिल्हा महिला व बालकल्याम विभागाने कारवाई करत येथील तब्बल 91 विद्यार्थ्यांची सुटका केली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, गडचिरोलीच्या अहेरी शहरालगत असणाऱ्या नागेपल्ली येथे मागील 11 वर्षांपासून फ्रेंड मिशनरी प्रेयर बँड चेन्नई नामक संस्थेमार्फत आशीर्वाद हे मुला-मुलींचे वसतिगृह चालवले जात होते. जिल्हा महिला व बालकल्याण विभागाने बुधवारी या वसतिगृहावर धाड टाकून 49 मुली व 42 मुले अशा एकूण 91 विद्यार्थ्यांची सुटका केली. या तपासणीत या वसतिगृहाला राज्य शासनाच्या कोणत्याही विभागाची मान्यता नसल्याचे निष्पन्न झाले आहे. येथील विद्यार्थी प्रामुख्याने अनुसूचित जाती व जमातीचे आहेत. पण ते सर्रासपणे आपला धर्म ख्रिश्चन असल्याचे सांगत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची शासनमान्य वसतिगृहात तात्पुरती सोय करण्यात आली आहे. काय म्हणाले अधिकारी? प्रस्तुत वसतिगृहात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 600, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना 1 हजार, तर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना 1200 रुपये आकारले जात होते. त्यानंतरही गडचिरोलीसह लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील 91 विद्यार्थी तिथे राहून शिक्षण घेत होते. अधिकाऱ्यांनी या घटनेविषयी बोलताना सांगितले की, तपासणी पथकाच्या चौकशीत विद्यार्थ्यानी सांगितले की, वसतिगृहात सकाळी व सायंकाळी ख्रिश्चन धर्माची प्रार्थना होत होती. तपासणीत सर्वच विद्यार्थ्यांकडे बायबल हा ख्रिश्चन धर्मग्रंथ आढळून आला. वसतिगृहातील भिंतींवरही केवळ ख्रिश्चन धर्माशी संबंधित पत्रके लावण्यात आली होती. प्रस्तुत संस्थेचे राज्यात विविध ठिकाणी असे निवासी शाळा वसतिगृह सुरू आहेत. 2015 मध्ये नाशिक जिल्ह्यातही असाच एक प्रकार समोर आला होता. त्यामुळे संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे, असेही अधिकाऱ्यांनी या प्रकरणी सांगितले आहे. दरम्यान, मागील 11 वर्षांपासून हा प्रकार सुरू असताना तो प्रशासनाच्या कसा काय निदर्शनास आला नाही? जिल्ह्यात आणखी काही असे वसतिगृह आहेत काय? असे विविध प्रश्न या प्रकरणी उपस्थित होत आहेत. असरअल्लीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश, तिघांवर गुन्हा वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार करून त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या तिघांविरुद्ध सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली पोलिस ठाण्यात 4 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तालुक्यातील असरअल्ली गावात करण्यात आली आहे. तब्बल 4 वर्षांपासून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु होता, अशी माहिती चौकशीत समोर आली. शरद बाबू वेग्ग्लम (60), चंद्रया भौथू (39) व गौरीशंकर बैरी (50, सर्व रा. असरअल्ली ता. सिरोंचा) अशी तोतया डॉक्टरांची नावे आहेत. स्थानिक वैद्यकीय व्यावसायिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोग्य विभाग व पोलिसांनी संयुक्तपणे त्यांच्यावर कारवाई केली.--

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 11:28 am

सरकारी जागा विकली कशी?:पार्थ पवारांवर 420 चा गुन्हा दाखल करा, सेल डीड रद्द करा, विजय वडेट्टीवारांची मागणी

पार्थ पवार म्हणतात मी घोटाळा केला नाही. सरकारी जमीन खरेदी करण्याचा कोणता नियम आहे. ही जमीन महार वतानाच्या मालकीच्या वारसदारांच्या नावाने करुण देण्याची त्यांची मागणी आहे. या जमिनीचे मुळ मालक 300 आहेत त्यांच्या नावे ही जमीन केली गेली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या घोटाळेबाजावर गुन्हे दाखल करण्यात यावे असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, या प्रकरणी जी सेल डीड झाली ते रद्द करण्यात यावे, महार वतनाची जमीन मूळ मालकाच्या नावाने जमीन करायला हवी. 3 दिवसांमध्ये पुण्यात जात सर्व माहिती घेत आम्ही निर्णय घेणार आहे. सरकारी जागा विकत घेतली कशी, 300 कोटी रुपये देण्यात आले का? की केवळ कागदावर व्यवहार आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. ही जागा विकली कशी? विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुळ मालकाला विश्वासात न घेता टायटल क्लीअर नसताना या तेजवानीने पॉवर ऑफ ॲटर्नीच्या भरवशावर ही जमीन विकली कशी. सातबारा केंद्रीय ऑफिसच्या नावाने असताना याची सेल डीड झाली कशी. सातबारा नावाने नसताना त्यावर सरकारचे नाव असताना ही जागा विकली कशी? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. दोघांवर 420 चा गुन्हा दाखल व्हावा विजय वडेट्टीवार म्हणाले की, हा व्यवहार रद्द होण्याची गरज आहे. कारण या जमिनीची मालकी ही सरकारकडे आहे, जमिनीची विक्रीच होऊ शकत नाही. हा 420 चा गुन्हा आहे, यांच्यावर 420 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणे ही सरकारची फसवणूक आहे. ईडी, सीबीआय काय झोपले आहे का? त्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. 300 कोटी रुपयांच्या व्यवहारामध्ये आयटी कंपनीच्या नावावर मुद्रांक शुल्क माफ केले जाते ही खूप मोठी गोष्ट आहे. केवळ 500 रुपयांच्या बॉन्डवर हा सर्व व्यवहार केला जातो. फक्त आयटी पार्क टाकतो हा ठराव कंपनीने केला त्या भरवशावर त्याला 21 कोटी रुपयाची सूट दिली जाते. म्हणजेच यामध्ये खूप मोठा गैरव्यवहार सरकारकडून होत आहे. या प्रकरणी उद्योग संचालनालय जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कुठलीही फाईल नसताना परवानगी दिली कशी असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. ..तर 1 लाख कोटी रुपयांचा घोटाळा समोर येईल विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुण्यातील असे 50 प्रकरणे माझ्याकडे आले आहेत. यामध्ये मुद्रांक शुल्कांची चोरी झाल्याची साक्ष आमच्याकडे येत आहे. मुद्रांक शुल्क न भरता शासनाचा महसूल न भरता करोडो रुपयांचा महसूल बुडवला आहे. 1800 कोटी रुपयांची सरकारी मालमत्ता घशात घालण्याचा प्रयत्न सत्तेमधील लोकांच्या आशीर्वादाने सुरू आहे. देवेंद्र फडणवीस या प्रकरणाकडे सत्ता वाचवण्यासाठी दुर्लक्ष करणार का? का यावर कारवाई करणार असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. पुण्यातील या प्रकरणांसाठी एक टीम तयार करण्यात आली तर 1 लाख कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्याशिवाय राहणार नाही. इतकं करुण पार्थ पवार म्हणतात मी घोटाळा केला नाही. सरकारी जमीन खरेदी करण्याचा कोणता नियम आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 11:12 am

गुलाबराव पाटील यांची तुफान फटकेबाजी:म्हणाले- ज्यावर केस नाही, तो शिवसैनिक नाही; पुत्र हो असा, ज्याच्या हातात भगवा झेंडा

राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा त्यांच्या बेधडक बोलण्यामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत त्यांनी थेट अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केले. बताओ कलेक्टर बडा है, या गुलाबराव पाटील बडा है? असं म्हणत त्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. सरकार दोन गोष्टींवर चालते, जीआरवर आणि सीआरवर, आणि आम्ही जीआरही काढतो आणि तुमचा सीआरही काढतो, असं म्हणत त्यांनी आपली ताकद दाखवली. या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की, मी बारावीपर्यंत शिकलो, कॉलेजला गेलो नाही. पण बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला विधानसभेचे तिकीट दिलं. आज मी मंत्री आहे. त्यामुळे शिक्षणापेक्षा माणसातली जिद्द आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. ते म्हणाले की, आमच्यावर केस झाली नाही तर आम्ही शिवसैनिक नाही, अशी आमची संकल्पना होती. एका प्रकरणात मी, माझा लहान भाऊ, मोठा भाऊ आणि माझा वडील, सगळे एकाच बॅरेकमध्ये होतो. त्यांच्या या आठवणींवर उपस्थितांमध्ये हशा पिकला. राऊत ॲडमिट आहेत, ते वाचले पाहिजेत यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दलही भाष्य केले. संजय राऊत ॲडमिट आहेत. ते वाचले पाहिजेत. मी देवाला प्रार्थना केली आहे की त्यांना सद्‍बुद्धी देवो, असं म्हणत त्यांनी राऊत यांच्याविषयी मिश्र भावना व्यक्त केल्या. वो मेरा माल है भाई, माल है, असं म्हणत त्यांनी आपली शैली कायम ठेवली. त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला. देवाने उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या 20 लोकांना बुद्धी दिली, तर ते तिथे टिकतील, असही ते म्हणाले. पुत्र हो असा, ज्याच्या हातात भगवा झेंडा त्यांनी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांचंही कौतुक केलं. आमचे संजय गायकवाड कसे आहेत डॉन! आम्हाला गुंड म्हणतात. पण अरे शंड असण्यापेक्षा गुंड असलेला बरा. पुत्र हो असा, ज्याच्या हातात भगवा झेंडा असेल आणि जो भ्रष्टाचाराविरोधात लढेल, असं म्हणत त्यांनी जमावात उत्साह निर्माण केला. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. जनतेचा आवाज मांडला या संपूर्ण भाषणामुळे बुलढाण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर विरोधकांनी टीका केली असून, अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र समर्थकांच्या मते, पाटील यांनी फक्त जनतेचा आवाज मांडला आहे. त्यांच्या प्रत्येक भाषणाप्रमाणे यावेळीही त्यांनी थेट आणि साध्या भाषेत आपली भूमिका मांडली आणि नेहमीप्रमाणेच ती थेट चर्चेचा विषय ठरली आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 11:03 am

मुंबईत मोनोरेल ट्रेन रुळावरून घसरली आणि हवेत लटकली:3 कर्मचारी जखमी; चाचणीदरम्यान एका बीममधून दुसऱ्या बीमवर शिफ्ट करताना अपघात

बुधवारी सकाळी मुंबईतील वडाळा डेपोमध्ये चाचणी दरम्यान एक मोनोरेल ट्रेन रुळावरून घसरली. ट्रेनचे इंजिन रुळावरून घसरले आणि हवेत लटकले. या अपघातात ट्रेनच्या कॅप्टनसह तीन कर्मचारी जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की ट्रेनच्या अंडरकॅरेजचेही मोठे नुकसान झाले. मोनोरेल चालवणाऱ्या महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) ने सांगितले की, ट्रेन रिकामी होती, त्यात एकही प्रवासी नव्हता. सूत्रांनी सांगितले की, सकाळी ९:३० च्या सुमारास ही घटना घडली जेव्हा ट्रेन एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर हलवली जात होती. बीम बदलण्याच्या कामादरम्यान, ट्रेन घसरली आणि तिचे इंजिन दोन बीममध्ये हवेतच थांबले. सोशल मीडियावरील अपघाताच्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये ट्रेन थोडीशी झुकलेली दिसत होती. संध्याकाळी जड क्रेनच्या मदतीने ट्रेन रुळावरून काढण्यात आली. अपघाताचे फोटो... ३ महिन्यांपूर्वी एक अपघात झाला होता, ज्यामध्ये ८०० प्रवासी एलिव्हेटेड ट्रॅकवर अडकले होतेतीन महिन्यांपूर्वी मुंबईत मोनोरेलचा अपघात झाला होता, ज्यामध्ये रस्त्यापासून काही फूट उंचीवर असलेल्या मोनोरेल ट्रॅकवर सुमारे ८०० प्रवासी दोन तास अडकून पडले होते. दोन्ही गाड्या ७८२ प्रवाशांच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवास करत होत्या. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि गाड्या थांबल्या. एअर कंडिशनर बंद पडल्याने पंधरा प्रवाशांचा गुदमरून मृत्यू झाला आणि काही जण बेशुद्धही झाले. पहिल्या ट्रेनमध्ये सुमारे ५८२ प्रवासी अडकले होते आणि त्यांना स्नॉर्कल शिडी वापरून वाचवण्यात आले. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी खिडक्यांचे काच तोडावे लागले. दुसरी मोनोरेल जवळच्या स्टेशनवर नेण्यात आली आणि २०० प्रवाशांना वाचवण्यात आले. प्रवासी अडीच तास अडकले होते.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 10:26 am

इन्स्टाग्रामवर महिलेचा व्हिडिओ शेअर केल्याचा वाद चिघळला:तरुणास मारहाण, चौघांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इन्स्टाग्रामवर महिलेचा व्हिडीओ शेअर का केला याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या सुरेगाव येथील तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 5 रात्री उशीरा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील सुरेगाव येथे नारायण श्रीरामे याने एका महिलेचा इन्स्टाग्रामवरील व्हिडीओ शेअर केला होता. या बाबतची माहिती मिळाल्यानंतर त्या महिलेचा नातेवाईक असलेल्या मावेश ढेंबरे हे बुधवारी सायंकाळी जाब विचारण्यासाठी गेले होते. यावेळी गावातील नारायण श्रीरामे, धनंजय पोले, अभिषेक पोले, ध्रुपत पोले यांनी मावेश यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या या मारहाणीमुळे मावेश घाबरून गेले. त्यांनी मदतीसाठी आरडा ओरड केली असता त्यांची आई भांडण सोडवण्यासाठी आली. यावेळी चौघांनी त्यांनाही मारहाण करून मुक्कामार दिला. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मावेश यांनी औंढा नागनाथ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी नारायण श्रीरामे, धनंजय पोले, अभिषेक पोले, ध्रूपत पोले यांच्या विरुध्द जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्याचे समजताच चौघेही फरार झाले असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे. त्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. पोलिस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे, पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, जमादार रवीकांत हरकाळ पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 10:00 am

1800 कोटींची जमीन 300 कोटींत खरेदी:अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर आरोप; वाचा नेमके प्रकरण काय?

पुण्यातील प्रतिष्ठित आणि महागड्या कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरून मोठं वादळ उठलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या मालकीची अमेडिया कंपनी आणि दिग्विजय अमरसिंह पाटील या सहमालकाविरोधात मोठ्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. या जमिनीची बाजार किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचं कागदोपत्री दाखवलं गेलं, परंतु प्रत्यक्ष किंमत 1800 कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अमेडिया कंपनीने या जमिनीची खरेदी करताना आयटी पार्क उभारणीच्या नावाखाली सरकारकडून स्टँप ड्युटी माफी मिळवल्याचं आरोपात नमूद करण्यात आलं आहे. 22 एप्रिल 2025 रोजी कंपनीनं आयटी प्रकल्पाचा ठराव केला आणि फक्त दोन दिवसांत म्हणजे 24 एप्रिल रोजी उद्योग संचालनालयानं त्यावर स्टँप ड्युटी माफ, असा शेरा नोंदवला. इतक्या वेगाने झालेल्या प्रशासकीय हालचालींनी संशय निर्माण केला आहे. आश्चर्य म्हणजे, या संपूर्ण व्यवहारासाठी फक्त 500 रुपयांची स्टँप ड्युटी भरल्याचं समोर आलं असून, एवढ्या मोठ्या मूल्याच्या जमिनीचा व्यवहार फक्त काही आठवड्यांत पूर्ण झाला. हे सर्व घडत असताना, संबंधित कंपनीला कोणताही पूर्वानुभव नसल्याचं आणि तरीही तीला सरकारी सवलती कशा मिळाल्या? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महार वतनाची जमीन सदर जमीन ही महार वतनाची असल्यामुळे कायद्यानुसार तिचा व्यवहार करता येत नाही, असा तज्ज्ञांचा दावा आहे. वतनधारक जमीन विकली गेल्यास त्या किमतीचा काही भाग सरकारला नजराण्याच्या स्वरूपात द्यावा लागतो. मात्र, या व्यवहारातील कागदपत्रांमध्ये असा कोणताही उल्लेख नसल्याचे सांगितले जात आहे. कागदोपत्री हा व्यवहार पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर या शीतल तेजवानी यांच्या कंपनीसोबत झाला असल्याचं भासवलं असलं, तरी प्रत्यक्षात अमेडिया कंपनीनं मूळ गायकवाड आणि 274 जमिनमालकांसोबत खरेदी खत नोंदवलं असल्याचं उघड झाले आहे. या प्रकरणातील आर्थिक देवाणघेवाण, चेक, एनईएफटी व्यवहार किंवा बँक पुरावे, हे नोंदणी दस्तावेजात जोडले गेले नाहीत, यावरून या व्यवहारातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. प्रशासनाच्या जलद गतीने काम करण्यावर प्रश्नचिन्ह दरम्यान, या प्रकरणावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मुद्रांक शुल्कामध्ये सवलत देण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या उपसमितीमार्फत घेतला जातो आणि त्या समितीचे प्रमुख स्वतः मुख्यमंत्री असतात. त्यामुळे यात अनियमिततेची सुतराम शक्यता नाही. तरीदेखील, या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन आवश्यक तपास केला जाईल, असा त्यांनी खुलासा केला. दुसरीकडे, विरोधकांनी मात्र प्रशासनाच्या जलद गतीने काम करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारी ताब्यातील एवढ्या मोक्याच्या जागेचा व्यवहार काही दिवसांत पूर्ण होतो, हेच अनाकलनीय आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. राजकीय दबाव वाढण्याची शक्यता या प्रकरणामुळे पुणे आणि राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील या दोघांचं नाते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कुटुंबाशी संबंधित असल्याने प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या मूल्याच्या व्यवहारात फक्त 500 रुपयांची स्टँप ड्युटी भरली गेली हे पाहता, शासनानेच काही विशिष्ट कंपन्यांना लाभ मिळावा, अशी योजना आखली का? असा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, कागदपत्रांची तपासणी, मूल्यांकन अहवाल आणि धोरणाच्या अंमलबजावणीतील पारदर्शकतेचा तपास करण्याचे संकेत प्रशासनाकडून दिले गेले आहेत. या वादामुळे आगामी निवडणुकांपूर्वी अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबावर राजकीय दबाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:59 am

दिव्य मराठी अपडेट्स:उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आज दुसरा दिवस; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन संवाद साधणार

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:54 am

मनरेगाअंतर्गत वैयक्तिक कामांवर ठेवली आता दोन लाखांची मर्यादा:दोन लाखांत विहीर कशी होणार?, शेतकऱ्यांमध्ये नाराजी‎

अल्पभुधारक शेतकरी व गरिबांच्या उपजीविकेचा आधार बळकट करण्यासाठी मनरेगा योजना सुरू केली. या अंतर्गत सुरू असलेल्या वैयक्तिक लाभार्थी कामांवर केंद्र सरकारने नवीन आर्थिक बंधने लागू केली आहेत. ग्रामीण विकास मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या गाईडलाईननुसार आता वैयक्तिक कामांसाठी प्रति लाभार्थी कमाल खर्चाची मर्यादा दोन लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. दोन लाखांत विहीर, फळबाग लागडीचे कामे कशी होणार, असाही प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. मनरेगा अंतर्गत सध्या २६६ प्रकारच्या कामांना परवानगी आहे. त्यापैकी ६८ कामे वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी राखीव आहेत. या कामांमध्ये जमीन विकास, सिंचन, वृक्षारोपण, जलसंधारण, बायोगॅस निर्मिती, स्वच्छता आणि उपजीविकेच्या साधनांची निर्मिती अशा उपक्रमांचा समावेश आहे. परंतु, आता वैयक्तिक कामांसह मनरेगाअंतर्गत खालीलपैकी कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या कामासाठी अर्ज करू शकता सार्वजनिक कामांवर देखील आर्थिक बंधन लादले आहे. वैयक्तिकरिता २ लाख तर सार्वजनिक कामांवर २० लाखांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. परंतु, वैयक्तिकमध्ये ग्रामीण भागात अनेक कामांसाठी विशेषत: विहिरींच्या बांधकामासाठी पाच लाखांहून अधिक खर्च येत आहे. असे असताना केवळ दोन लाखांच्या मर्यादेमुळे शेतकरी आणि कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासनाच्या निर्णयामुळे अनेक अपूर्ण कामे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्यस्तरावर या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी जोर धरत आहे. विभागीय आयक्तांनी याबाबत शासनाकडे मर्यादा वाढवण्याबाबत पत्राद्वारे मागणी केली आहे. खर्चातील पारदर्शकता रोखण्यासाठी निर्णय? शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन लाखांत ना विहीर होते, ना पाण्याची व्यवस्था उभी राहते. शासनाने प्रत्यक्ष वास्तव पाहून निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. केंद्र सरकारने मात्र या मर्यादेचे कारण खर्चातील पारदर्शकता आणि अनियमितता रोखण्यासाठी आवश्यक आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:51 am

कार्तिक पौर्णिमा उत्सवात विविध कार्यक्रम:भाविकांना महाप्रसाद अन् पालखीधारकांना भोजन

परमहंस श्री समर्थ आडकुजी महाराज यांचा १०४ वा पुण्यतिथि महोत्सव सप्ताह श्री क्षेत्र वरखेड नगरीमध्ये मोठ्या भक्तीमय वातावरणात चालू आहे. गुरुवर्यांच्या दरबारात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत लहानुजी महाराज , श्री संत सत्यदेव महाराज, मंजुळा माता पालखीचे वरखेड नगरीत पदार्पण झाले. यावेळी पालख्यांचे गुरुदेव भाविकभक्तांनी तथा गावकऱ्यांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. समर्थ आडकुजी महाराज यांचे पुण्यतिथि निमित्याने महाराष्ट्रातील साधुसंत, राष्ट्र संतांचे प्रचारक त्यांचे अभ्यासक मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, भाविक भक्तगण संत परंपरेतील मंडळी या पर्वाचे निमित्ताने हजेरी लावत असतात. गुरुदेव सेवा मंडळ गुरूकुंज आश्रमातून सकाळी ९ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पालखी निघाली. त्यानंतर पालखीचे तिवसा शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. तर वरखेड येथे मोहन विठ्ठल बोके यांचे उद्यानात पालखीचे स्वागत करून सोबतचे पालखीधारांना भोजन दान करण्यात आले. तेथून वरखेड येथे सायंकाळी पालखीचे आगमन झाले. संत लहानुजी महाराज, संत सत्यदेव महाराज इत्यादी पालखीचे एकाच वेळी मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. तसेच इतर गावावरून आलेल्या पालख्यांचे स्वागतही करण्यात आले. या वेळी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पालखीचे सद्गुरू चरणी स्थान देण्यात आले. या पालख्यांचे स्वागतासाठी वरखेड नगरीतील महिला नागरिक,सेवाभावी मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. कमानी, देखावे, रोडवर रांगोळी थोर संत महात्म्यांच्या फोटो तर रोषणाईने सर्वत्र लखलखाट होता, तर वरखेड नगरी दीप व रोषणाईने सजली होती. गावकरी महिला भगिनी यांचे हाती सर्वत्र दीप आरती घेऊन महाराजांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी एक किलोमीटर अंतरापर्यंत दीप प्रजलीत असलेल्या आरत्या होत्या. एक दिमाखदार सोहळा जणू दीपावलीच्या स्वरूप पाहायला मिळाले. या पालख्यांचे सोहळ्याचे निमित्याने लेझिम, पताका, दिंडी, महीला वारकरी भक्ताच्या रिंगण सोहळा पार पडला. फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. वारकरी मंडळीचे, भारुड, दिंड्यानी वरखेडनगर भक्तिमय झाले होते. दरम्यान सायंकाळी ६ वाजता श्री समर्थ आडकुजी महाराजांच्या महाद्वाराजवळ पालख्यांचे आगमन होताच पालखीचे पूजन संस्थानचे अध्यक्ष अभिजित बोके, सचिव मनोहर बोके, विश्वस्त अशोक अहेर, विक्रम बोके, दिवाकर दळवी, राजू देशमुख, जीवन देशमुख, योगेश देशमुख, अनुराधा बोके, किशोर विटाळकर इत्यादींनी स्वागत केले. सकाळी ४ ते ५.३० प्रभाती आद्यपूजन, श्रीच्या महासमाधीची महापूजा अभिजित बोके अध्यक्ष आडकुजी महाराज संस्थान वरखेड यांच्या हस्ते झाली. तसेच महाद्वारावर ध्वजारोहण, त्यानंतर ८.३० ते ९.३० प्रवचन सीमा बोके यांच्या वाणीतून, १० ते १२ काला अभंगवाणी मयूर महाराज, प्रासंगिक उद्बोधन जनार्दन बोथे सरचिटणीस अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज संत सचिन देव महाराज, दुपारी १ ते ४.३० पर्यंत काला व महाप्रसाद श्रीचे काला पूजन झाले. या वेळी श्री संत सयाजी महाराज, श्री संत गणेश महाराज, श्री संत शंकर महाराज, तसेच निमंत्रित संत महात्मे व प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार अभिजित बोके यांनी मानले. तसेच सायंकाळी सामुदायिक प्रार्थना व ग्रामगीता वाचन ग्रामगीताचार्य विजय बोके, श्रीची पालखीची शोभायात्रा दहीहंडी व राष्ट्रवंदना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी भाविकांची उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:50 am

कपाशीची बोंडे सडून शेतातच फुटले कोंब; केळीला दराचा फटका‎:पावसामुळे 20 हजार हेक्टर कपाशी अन् दीडशे हेक्टर क्षेत्रावरील केळी धोक्यात

तालुक्यातील वळती गावाजवळील नदीवर गत मे महिन्यात बांधलेल्या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून पुलाच्या दोन्ही बाजुला बनवलेला रोड जमिनीत धसल्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे एक कोटी सत्तर लक्ष रुपये किमतीच्या पुलाची वाट लागली आहे. आमदार श्वेता महाले यांच्या विशेष प्रयत्नातून वळती गावाजवळील नदीवर पुलाच्या बांधकामाचे विकासकाम हाती घेण्यात आले होते. या पुलाचे बांधकाम रा. म. म. ७५३ ए ते वळती–सवना– चांदई–धोडप प्र. क्र. १०९, कि.मी. २/७०० वर करण्यात आले असून, या कामासाठी तब्बल १ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला होता. जून महिन्यात या पुलाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. मात्र काही महिन्यांतच या पुलाचे निकृष्ट काम समोर आले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठमोठे खड्डे पडले असून, या खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पुलाच्या बांधकामासाठी शासनाने मोठी रक्कम मंजूर केली असतानाही काही महिन्यांतच त्याची अशी अवस्था झाली आहे. नाना हिवराळे | खामगाव गेल्या काही दिवसांपासून पडत असलेला सततचा पाऊस खरीप हंगामातील पिकासाठी नुकसानदायक ठरत आहे. सततच्या पावसामुळे खामगाव तालुक्यातील २० हजार हेक्टर क्षेत्रातील कपाशी तर दीडशे हेक्टर क्षेत्रावरील केळी पिके धोक्यात आली आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या वर्षीच्या खरीप हंगामात पावसाचा जोर कायम राहिला आहे हंगाम संपल्यानंतरही परतीचा पाऊस मुसळधार सुरूच असून या पावसामुळे कपाशीच्या बोंडातील सरकीला कोंब फुटले लागले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजल्याने कापसाच्या वाती होत आहेत. सततच्या पावसामुळे कापसाचे पीक शेतात कुजून खराब होतो असल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन पिकानंतर कपाशीवरच शेतकऱ्यांचा जोर आहे .कपाशी हे शेतकऱ्यांचे हमी पीक समजले जाते मात्र पांढरे सोने सततच्या पावसामुळे काळवंडले आहे. खामगाव तालुक्यात यावर्षी २० हजार ७३६ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे. सद्यःस्थितीत कापसाचा हंगाम असून कापूस भिजल्याने बाजारातही पडलेला भाव मिळत आहे. यामुळे उत्पादनात घट होऊन शेतकरी हतबल झाले आहेत. अवकाळीमुळे पेरणीसाठी निघालेला खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. तर दुसरीकडे खामगाव तालुक्यातील सिंचनाची पुरेशी सोय असणाऱ्या भागात केळी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. खामगाव तालुक्यात दीडशे हेक्टर च्या जवळपास केळी लागवड करण्यात आली आहे. श्रावण महिन्यापासून केळी निघायला सुरुवात होत असते. एरवी केळीला एक हजार रुपयांपासून ते दीड हजारा दरम्यान भाव मिळत असतो. मात्र यावर्षी केळीचे भाव सुरुवात पासूनच पडलेले आहेत ४०० ते ४५० रुपये चा भाव सद्यःस्थितीत केळीला मिळत आहे. सततच्या पावसामुळे केळीत पाणी साचून राहिल्याने धोका निर्माण झाला आहे.परिणामी केळीवर करप्या तसेच इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादनात घट होत आहे. केळी लागवडीत गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. सततच्या पावसामुळे निर्माण होणारे दमट आणि ओले वातावरण कीटक आणि रोगाचा प्रसार वाढवत असल्याने यामधून केळीला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ चालली आहे. ठेकेदाराकडून पुनर्बांधणी करण्यात येणार ^पुलाच्या दोन्ही बाजूला दबलेला रस्ता खोदून तो ठेकेदाराकडून पुनर्बांधणी करून घेण्यात येत आहे. या उपर प्रत्यक्ष पॉइंटवर आमचे अभियंता जावून तेथे काय करता येईल ते पाहून ठेकेदाराकडून तेथील काम करून घेण्यात येईल. - गणेश भंगुरे, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, चिखली लागवडीसाठी केलेला खर्चही निघणे कठीण ^यावर्षी समाधानकारक पाऊस असल्यामुळे कपाशीचे चांगले पीक येईल ही आशा होती. सुरुवातीला ते कपाशीला एक पाऊस होत होता मात्र सततचा पाऊस झाल्याने शेतात पाणी थांबले व कपाशीची बोंडे काळे पडली, बोंडी सडून सरकीला कोंब फुटले आहेत. अशा कापसाला बाजारातही पडेल भाव मिळत असल्यामुळे कपाशी लागवड साठी केलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे. - सुरेश गाढवे, कापूस उत्पादक शेतकरी पाळा ता.खामगाव

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:49 am

पटसंख्येच्या आधारावर शाळा बंद केल्यास तीव्र आंदोलन:शिक्षण बचाव समन्वय समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎

पटसंख्येच्या आधारावर शाळा बंद केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा क्षण बचाव समन्वय समितीने दिला असून, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. शासन सामाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या संधी समानतेने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. वेतन, अनुदान, पाठ्यपुस्तके, भौतिक सुविधा, पोषण आहारासह इतरही बाबींवर निधी खर्च करण्यात येतो. मात्र, तरीही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या काही शाळांमधील शैक्षणिक दर्जा काँन्व्हेंटच्या तुलनेने अगदी सुमार आहे. परिणामी शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे या शाळा बंद करण्याची चर्चाही शिक्षण वर्तुळात रंगली होती. काही दिवसांपूर्वी १ ते ५ पटसंख्या असलेल्या शाळांचा आढावा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला. दरम्यान शिक्षण विभागाच्या आदेशामुळे शिक्षण तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पटसंख्येच्या आधारावर शाळा बंद करण्याचा आदेश तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी शिक्षण बचाव समन्वय समितीने केली. कुठलीही शाळा बंद करण्याचा अधिकार शिक्षण उपसंचालक अथवा कुठल्याही अधिकाऱ्यास व मंत्रिमंडळाला नाही. शाळा बंद करण्याबाबतची शिक्षण हक्क कायदा २००९ मध्ये कुठलीही तरतूद नाही. याउलट शाळांचा दर्जा सुधारावा व शाळांची संख्या वाढवावी असे स्पष्ट नमूद आहे. सामाजिक न्यायाचा विचार बाजूला सारून असंवेदनशील शिक्षणहीत विरोधी भूमिका प्रशासनाची आहे. त्यामुळे याचा तीव्र निषेध करण्यात आला. निवेदन देताना शिक्षण बचाव समन्वय समितीचे सूरज मेश्राम, राजेंद्र वानखडे, महेंद्र भोजने, विजय कौसल, अॅड. विलास वखरे, राजेंद्र कवठे, मो. मुजमिल पांडे, नामदेव फाले, बाळू ढोले पाटील, जान्हवी ढोले उपस्थित होते. जिल्हा प्रशासनामार्फत शिक्षण उपसंचालकांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात काही मागण्या करण्यात आल्या. पटसंख्येच्या आधारावर कोणतीही शाळा बंद करू नये. क्लस्टर निर्मितीची प्रक्रिया ताबडतोब थांबवण्यात यावी. शिक्षण हक्क कायद्याच्या निकषाप्रमाणे सर्व शाळांना भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० लागू न करण्याचा निर्णय घ्यावा. शिक्षणावर सकल उत्पन्नाच्या सहा टक्के खर्च करावा. काय आहे आदेशात? पटसंख्येबाबतच्या आदेशावर ९ ऑक्टोबर तारीख असून, यात पुढील बाबींचा उहापोह करण्यात आला आहे. एकाच कॅम्पसमध्ये एकापेक्षा जास्त शाळा असल्यास त्याचे रूपांतरण एकाच शाळेत करण्यात यावे. समावेशन झालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक असल्यास वाहतूक भत्ता दरमाह ६०० रुपये मिळण्याबाबत मिळण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा. शून्य पटसंख्या असलेल्या शाळांचा यु-डाईज क्रमांक बंद करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:46 am

पोलिसांनी दिले 18 गोवंशांना जीवदान:रामदास पेठ पाेलिसांची ताजनापेठेत कारवाई; 4 लाखांचा ऐवज हस्तगत‎

कत्तलीकरिता बांधून ठेवलेल्या १८ गोवंशांना रामदासपेठ पोलिसांच्या तत्परतेमुळे जीवनदान मिळाले. या कारवाईत ४ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ऑपरेशन प्रहार अंतर्गत बुधवारी सकाळी ६:१५ च्या सुमारास रामदास पेठ पोलिसांनी ही कारवाई केली. अकोला येथील रामदासपेठ ठाण्यात पोलिस अंमलदारांना गुप्त बातमीदारांमार्फत गुप्त माहिती मिळाली की, ताजनापेठ परिसरात मच्छी मार्केटसमोर कुरेशी कार्यालयाजवळ गोवंश जातीची काही जनावरे अमानुषपणे कत्तलीकरिता अवैधरीत्या निर्दयतेने बांधुन ठेवली आहेत. तेथे जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी गोवंश जातीचे लहान मोठे १८ गोवंश जातीचे जनावरे कत्तलीच्या उद्देशाने निर्दयतेने बांधून ठेवलेली आढळली. पोलिसांनी ४ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी शेख मोबीन कुरेशी, मोहम्मद अर्शद कुरेशी, शेख जाफर (रा. अकोट फैल, अकोला) यांनी हे गोवंश कत्तलीसाठी आणल्याची कबुली दिली. याप्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सहकलम ११ प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास रामदास पेठ पोलिस करत आहेत. रामदासपेठचे पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे यांच्या नेतृत्वात अंमलदार सुरेश लांडे, संदीप वानखडे, किरण गवई, अनिल धनबर, रोशन पटले, अभिजीत इंगळे, कांचन उईके यांनी ही कारवाई केली.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:45 am

बनावट सोने गहाण ठेवून अडीच कोटींची फसवणूक:बीडमधील विलास ज्वेलर्सचा मालक पुण्यात अटकेत; बँकेतील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय

बीड शहरातील बँक ऑफ बडोदा शाखेत बनावट सोने गहाण ठेवून अडीच कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका सोनाराला अखेर पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्या. विलास उदावंत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो बीड शहरात विलास ज्वेलर्स या नावाने दुकान चालवत होता. जलद श्रीमंत होण्याच्या नादात उदावंतने फसवणुकीचा असा सापळा रचला की दोन महिन्यांच्या आत त्याने बँक आणि नागरिक या दोघांचीही आर्थिक फसवणूक केली. बँकिंग व्यवस्थेतील दुर्लक्षाचा फायदा घेत त्याने बनावट सोने खरे असल्याचे दाखवत बँकेकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम उचलली होती. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी विलास उदावंतने स्वतःच 16 बनावट ग्राहक तयार केले. त्यांच्याकडून बनावट सोने गहाण ठेवण्याचे नाटक करून तो बँक ऑफ बडोदा शाखेकडून कर्ज उचलत होता. सोन्याचे परीक्षण करणारा म्हणून स्वतःचा विश्वास संपादन केल्याने बँकेने त्याच्या मूल्यांकनावर विश्वास ठेवला. बनावट दागिने आणि सोन्याचे बार पाहताना खरे वाटत असल्याने बँकेला संशय आला नाही. अशा प्रकारे काही महिन्यांतच त्याने अडीच कोटी रुपयांचे कर्ज मिळवले. याशिवाय, त्याने सामान्य लोकांनाही जास्त सोन्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे उकळले. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या या रकमा एकत्र करून त्याने बीडमधील मालमत्ता विकून शहर सोडले आणि बेपत्ता झाला. या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मोठा शोध मोहीम सुरू केली. आरोपीचा मोबाईल क्रमांक आणि बँक व्यवहार तपासून त्याचा ठावठिकाणा शोधण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे तो पुण्यातील देहू गाव परिसरात व्यंकटेश ज्वेलर्स या नावाने नवे दुकान चालवत असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी पथक तयार करून पुण्यात धाड टाकली आणि त्याला अटक करण्यात यश मिळवले. अटकेच्या वेळी त्याच्या ताब्यातून 18 किलो सोने-चांदी जप्त करण्यात आली असून त्यातील बहुतांश दागिने आणि वस्तू बनावट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. बँकेतील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय या कारवाईनंतर पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी नोटिसा बजावल्या आहेत. सोन्याच्या परीक्षण प्रक्रियेत झालेल्या त्रुटी, सुरक्षा यंत्रणेतील दुर्लक्ष आणि कर्ज मंजुरीतील बेजबाबदारपणा या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. बँकेतील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरही संशय घेतला जात असून, तांत्रिक तपासासाठी सोन्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, अशा प्रकारच्या फसवणुकीत सोनार स्वतः सोन्याचा तज्ञ म्हणून सादर होतो आणि त्याचा वापर करून बँकेला भ्रमात टाकतो. त्यामुळे बँकांनी सोन्याच्या परीक्षणासाठी बाह्य तज्ञांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. आणखी फसवणुकीचे प्रकार उघड होण्याची शक्यता या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील व्यापारी आणि बँकिंग क्षेत्रात खळबळ माजली आहे. काही वर्षांपूर्वीही जिल्ह्यात अशाच प्रकारची बनावट सोने गहाण ठेवण्याची घटना घडली होती. या प्रकरणानंतर जिल्ह्यातील बँकांना सुरक्षा उपाययोजनांचे पुनरावलोकन करण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी सोन्याची व अस्सलतेची खात्री करून घेण्याचे आवाहन केले आहे. आरोपी विलास उदावंतकडून आणखी मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार उघड होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. बीड पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:42 am

संत नामदेवांच्या पालखीची 50 दिंड्या, 3 हजार भाविकांसह आळंदी वारी:प‌ंढरी नगरीचा निरोप घेत पालखी‎सोहळा वारकऱ्यांसह मार्गस्थ‎

चला आळंदीला जाऊ। ज्ञानदेवा डोळा पाहू॥ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी तिर्थक्षेत्र पंढरी नगरीतून श्रीसंत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याने पौर्णिमे दिवशी बुधवारी तिर्थक्षेत्र आळंदीकडे प्रस्थान केले.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आयोजित या पालखी सोहळ्यामध्ये सुमारे ५० दिंड्यांसह ३ हजार वारकरी, भाविक सहभागी झाले आहेत. सकाळी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त गोपाळपूर येथे होणार्‍या गोपाळ काल्यासाठी संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा गोपाळपूर येथे गेला, त्याठिकाणी ह.भ.प. नामदास महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले. भाविकांनी एकमेकांना काल्याचा प्रसाद देवून गोपाळकाला साजरा केला. त्यानंतर पालखी सोहळा श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी विठ्ठल मंदिरात गेला आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीची भेट घेतली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने पादुकांचे दर्शन घेवून ह.भ.प. नामदास महाराज यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पालखी सोहळा पुन्हा मंदिरात आला. दुपारचे भोजन व विश्रांती घेतल्यानंतर पालखी सोहळ्याने आळंदीकडे प्रस्थान ठेवले. श्री केशवराज व संत नामदेव महाराजांची आरती करण्यात आली. पंढरपूरहून निघालेला हा पालखी सोहळा भंडीशेगाव, वेळापूर, माळशिरस, नातेपुते, फलटण, जेजुरी, सासवड, पुणेमार्गे सुमारे ८ दिवसांचा पायी प्रवास करून आळंदी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या यात्रेत हा पालखी सोहळा सहभागी होणार आहे. यावेळी श्री केशवराज संस्थेच्यावतीने पालखी सोहळ्यासाठी ११ हजार रुपयांची देणगी विश्वस्त राजेश धोकटे, जयवंत कांबळे यांच्या हस्ते नामदास महाराजांकडे देण्यात आली. बुधवारी पालखी सोहळा मंदिरातून निघून संत नामदेव पायरी येथे पालखी आल्यानंतर मानाचे अभंग व आरती म्हणण्यात आली. महाद्वार, पश्चिमद्वार,शिवाजी चौक, अर्बन बँक, सरगम चौक, केबीपी कॉलेज मार्गे हा सोहळा विसावा मंदिर इसबावी येथे आला. यावेळी सेवक राजाभाऊ जवंजाळ, किशोर काकडे यांच्यासह वारकरी व शिंपी समाज बांधव उपस्थित होते. सोहळ्यात सर्वात प्रथम नगारखाना त्यानंतर पताका घेतलेले वारकरी, टाळकरी, अश्व, घोडेस्वार, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला असा लवाजमा होता. या पालखी सोहळ्यासमवेत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांनी पाण्याचा टँकर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे जिल्हा व स्व. तात्या बापट स्मृती समिती चिंचवड यांच्या वतीने भाविकांसाठी मोफत फिरत्या दवाखान्याची (रुग्णवाहिका) सोय करण्यात आली आहे. अनेक वर्षापासून त्यांची ही सेवा सुरू आहे. पालखीसोबत नगरखाना, वारकरी, घोडेस्वार, तुळशीवृंदावन घेतलेल्या महिला पंढरपूर ते आळंदी ८ दिवसांचा प्रवास

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:35 am

आसमानीनंतर आता शेतकऱ्यांवर सुलतानी संकट‎:उद्धव ठाकरे यांनी बार्शी तालुक्यात भरपाई न मिळाल्यामुळे सरकारवर साधला निशाणा‎

आपल्या आपापसातील भांडणे, मतभेद बंद खोलीत ठेवा. जनतेसमोर व्यासपीठावर ते आणू नका, झपाटून कामास लागा. विद्यमान सरकारच्या विरोधात लढा देऊन कार्य करणाऱ्या सर्वसामान्य व नवीन कार्यकर्त्यास नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत संधी देण्याचे शरद पवार यांनी धोरण ठरविले आहे. प्रामाणिकपणे लढा देत विजयाचा झेंडा आपणच रोवू, असा विश्वास खासदार धैर्यशील यांनी मोहोळ येथे दिला. गेल्या पंधरवड्यात जयसिंह मोहिते पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते यांच्या पाठीशी मोहिते कुटुंब उभे राहणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर धैर्यशील मोहिते यांनी भाजपला दिलेली ललकारी महत्वाची मानली जात आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपरिषद,पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी प्राथमिक स्वरूपात राष्ट्रवादी शरद पवार गटाची बैठक मोहोळ येथे बुधवारी झाली. या बैठकीत खासदार मोहिते-पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख, मोहोळ तालुकाध्यक्ष विनय पाटील, संजय क्षीरसागर, पवन गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शरद पवार गटाची महत्वाची सभा असतानाही गटाचे विद्यमान आमदार राजू खरे मात्र या बैठकीस अनुपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यात येवून गेले. त्यांनी शेतकऱ्यांबद्दल अवाक्षर काढले नाही. पंतप्रधान राज्याचा प्रस्ताव आला नसल्याचे सांगतात. मग हे काय करतात असा प्रश्न त्यांनी विचारला. शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे देण्याबाबत विमा कंपन्यांना तंबी दिली. शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. शिवसेना त्यांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली. नंदकुमार काशीद म्हणाले, भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी ठेवल्या आहेत. तुरीची पेंडी भाजपा सरकारला पोहोच करा. कांदा उत्पादक शेतकरी विजय कागदे, पद्माकर काटमोरे आदींनी शेतमालाला भाव नाही. उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही. नुकसान भरपाईची अत्यल्प रक्कम खात्यावर आली आहे, आदी व्यथा मांडल्या. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी भरडला जात असल्याची टीका खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली. अतिवृष्टीनंतर सरकारने ३१,८०० कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. परंतु अद्यापही ७० टक्के शेतकऱ्यांना लाभ झालेला नाही. व्यापाऱ्यांचे १५ लाख कोटींचे कर्ज माफ करणारे केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाही. एवढया पैशात शेतकऱ्यांची २२ वेळा कर्ज माफी झाली असती. आमदार दिलीप सोपल म्हणाले, सरकारने जाहीर केल्याप्रमाणे मदत शेतकऱ्यांना पोहोचली नाही. मला तर हे खरे वाटेना झाले. यावेळी बोलताना माजी आ.रमेश कदम म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या असतात, त्यांना यात संधी मिळाली पाहिजे, त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलण्याचेच काम करायचे का? या निवडणुकीत आम्ही त्यांच्यामागे उभे राहत त्यांचा विजय होण्यास कटिबद्ध राहिले पाहिजे. या निवडणुकीत ओरिजनल दाखले असलेल्यांनाच संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका मांडली. पुढे बोलताना मोहिते-पाटील म्हणाले, मोहोळ तालुक्याची राजकीय परिस्थिती फार विचित्र झाली आहे. मुंबईतील बैठकीत माझ्यावर शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली असून प्रत्येक तालुकानिहाय प्रत्यक्ष भेटी देऊन मी काम करणार आहे. कार्यकर्त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पदे घेऊ नयेत. सामान्य कार्यकर्त्यास पाठबळ देण्याचे पक्षाचे धोरण आहे. निवडून येण्याचा निकष चालणार नाही कार्यकर्ता व नवीन चेहऱ्यांना संधी देण्यावर भर आहे. इच्छुकांनी विहित नमुन्यात आपापले अर्ज तालुकाध्यक्षांकडे सुपूर्द करावेत. प्रत्येक तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांची कोअर कमिटी नेमलेली आहे. Share with facebook पवार यांनी माझ्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिली पीक विम्यासाठी, कंपन्यांना तंबी उपमुख्यमंत्री पवारांवर शेलक्या शब्दात टीका कोणतेही सरकार आले तरी अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतात. अखंड उपमुख्यमंत्री भव असा आशिर्वाद लाभलेले उप असा टोमणा त्यांनी अजित पवार यांना लगावला. सामान्यांनी काय फक्त सतरंज्याच उचलायच्या? शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:35 am

बचत गटातून बावीस महिला बनल्या व्यावसायिक:महिलांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण, व्यवसाय उभारणीसाठी रागिणी संस्थेकडून केली जाते मदत‎

मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्र, शेटफळ व्यवस्थापक नितीन साठेसह सहकारी स्टाफच्या माध्यमातून रागिणी महिला बचत गटाची स्थापना केली. रोहिणी पवार यांनी बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचा धवल पापड उद्योग सुरु केला आहे. या व्यवसायातून आर्थिक फायदा निर्माण करून आष्टी गावातील महिलांना व्यवसाय करण्यास मार्गदर्शन करत आतापर्यंत २२ महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन प्रति दिवस प्रति महिला ५०० रुपये रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महिला सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर अंतर्गत तालुका बँक कक्ष मोहोळ यांच्या माध्यमातून बचत गटाची स्थापना करण्यात येत आहे. याबरोबरच महिलांची शाश्वत उपजीविका निर्माण होण्यासाठी महिलांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण अर्थसहाय्य, व व्यवसाय उभारणीसाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे. याच माध्यमातून सिद्धेश्वर लोकसंचलित साधन केंद्र, शेटफळ बचत गटाची स्थापना करण्यात आली. तसेच आपला ग्रामीण भाग त्यामुळे शेतीमधील रोजगार सोडून इतर कुठेही रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी बचत महत्वाची आहे. नुसतं बचतच नाही तर विविध व्यवसायासाठी ही चालना देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये शिवणकाम, ब्युटी पार्लर यासारख्या अनेक व्यवसाय महिलांनी करण्यास सुरू केले. स्वतःच व्यवसाय चालू झाल्यामुळे महिलांमध्ये व्यावहारिक ज्ञान वाढू लागले. महिला दूध व्यवसाय, शेळीपालन कुक्कुटपालन याचबरोबरच लोणच्याचे पापड, शेवया, चिप्स, शिलाई मशीन अशा प्रकारची व्यवसाय करू लागला. महिन्यातून एकदा महिला ग्राम संघाची बैठक घेतली जाते. त्या बैठकीत महिन्याभरातील सर्व खर्चाची व ग्रामसंघाच्या कामकाजाची माहिती मंडळी जाते. तसेच हा बचत गट तांदूळ, नाचणी, ज्वारी, उडीद यासारखी विविध धान्याच्या माध्यमातून पापड बनविण्याचे काम केले जाते. ही उत्पादने स्थानिक बाजारपेठे बरोबरच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर यासारख्या शहरात या पापडाची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. उत्कृष्ट चव, उत्पादनाची सातत्यता यामुळे त्यांच्या उत्पादनाला चांगली मागणी आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ, मोहोळ अंतर्गत बचत गटातील महिलांना व्यवसाय उभारणीसाठी प्रशिक्षण,अर्थसहाय्य केले जात आहे. ^महिला सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर अंतर्गत तालुका बँक कक्ष मोहोळ यांच्या माध्यमातून बचत गटाची स्थापना करण्यात येत आहे. याबरोबरच महिलांची शाश्वत उपजीविका निर्माण होण्यासाठी महिलांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण अर्थसहाय्य,व व्यवसाय उभारणीसाठी सर्वतोपरी मदत केली जात आहे. योगेश बोडके, विकास सल्लागार ^महिला आर्थिक विकास महामंडळ, मोहोळ अंतर्गत बचत गटातील महिलांना व्यवसाय उभारणीसाठी प्रशिक्षण, अर्थसाहाय्य मिळाले. पापड बनवण्यासाठी उद्योग उभा केला. आज गावातील अनेक महिलांना ५०० रुपयाप्रमाणे रोजगार मिळवून देण्याचे काम केले. महिलांनी शेती बरोबरच शेतीपूरक व्यवसाय केल्यास नक्कीच आपल्यासह इतर महिलांना देखील रोजगार उपलब्ध करून देण्यास संधी मिळते. रोहिणी पवार, बचतगट आष्टी महिलांना विविध व्यवसायांचे दिले जातात प्रशिक्षण

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:31 am

वैकुंठ चतुर्दशी दिवशी बार्शीत रंगला हरिहर भेटीचा सोहळा:हरिहर भेट सोहळा हा उत्सव शैव आणि वैष्णव भक्तांच्या परस्पर ऐक्याचे प्रतिक

बार्शी परंपरेनुसार वैकुंठ चतुर्दशी दिवशी सोमवारी (दि.३) रात्री १२ वा. हरि-हर भेटीचा अनोखा पौराणिक सोहळा शहरातील मंगळवार पेठेतील प्राचीन श्री. उत्तरेश्वर मंदिरात हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीतील धार्मिक वातावरणात पार पडला. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि हर म्हणजे भगवान शिव. बार्शीत होणारा हरिहर भेट सोहळा हा उत्सव शैव आणि वैष्णव भक्तांच्या परस्पर ऐक्याचे प्रतिक आहे. या दिवशी भगवान शिव सृष्टीची जबाबदारी भगवान विष्णूंकडे सोपवतात अशी आख्यायिका आहे. वैकुंठ चतुर्दशी दिवशी सोमवारी रात्री १० वा. श्री उत्तरेश्वर मंदिरांमधून बेलांचा हार व आहेर घेऊन शिवभक्त वाजत- गाजत बार्शीचे ग्रामदैवत श्री. भगवंत मंदिर येथे आले व भगवान विष्णूच्या नाम गजरामध्ये बेलांचा हार भगवान विष्णूंना अर्पण केला. तसेच भगवंत मंदिरांमधून विष्णू भक्त तुळशीचा हार व आहेर घेऊन उत्तरेश्वर मंदिर येथे येऊन भगवान शिवाच्या नाम गजरामध्ये तुळशीचा हार भगवान शिवांना अर्पण करून रात्री १२ वा भगवान शिवाची आरती केली. यावेळी हजारो शिव व वैष्णव भक्त उपस्थित होते. विशेषत महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ‘उत्रेश्वर भगवान की जय’चा जयघोष बार्शी येथील संपूर्ण विश्वातील एकमेव प्रसिध्द श्री भगवंत- लक्ष्मी मंदिरात येथील प्रसिध्द श्री उत्रेश्वर महादेव मंदिरातील गुरव पुजारी यांच्या तर्फे श्री भगवंत- लक्ष्मीस वस्त्र, श्रीफळ बेलांचा हार अर्पण केल्यानंतर भगवंताचे पुजारी बडवे मंडळी तर्फे श्री. उत्रेश्वरास वस्त्र, श्रीफळ, तुळस, अर्पण करुन श्री हरी-हर भेटीचा सोहळा, अंबरीष वरद श्री भगवान, ‘उत्रेश्वर भगवान की जय...’, अशा जयघोषात भक्त गणांच्या उपस्थितीत भक्तिभावाने पार पडतो. हरिहरांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात ^आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात, ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात, असे म्हटले जाते. विष्णूच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. याबद्दल कृतज्ञता म्हणून श्रीविष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात, तर महादेव विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात. हे हरिहर ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहोंची उपासना करावी, हा वैकुंठ चर्तुदशी मागील हेतू आहे. महेश गुरव, पुजारी श्री.उत्तरेश्वर मंदिर बार्शी.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:30 am

अकोल्यात कपडा बाजारातील जेजे मॉलला पहाटे भीषण आग:सुदैवाने जीवितहानी टळली, 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान; व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण

अकोला शहरातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या कपडा बाजारात आज पहाटे भीषण आगीची घटना घडली. सकाळी अंदाजे तीनच्या सुमारास जेजे मॉल मध्ये लागलेल्या या आगीने काही मिनिटांतच विक्राळ रूप धारण केले. पहाटेच्या शांत वातावरणात अचानक उठलेल्या आगीच्या लोटांनी परिसरात गोंधळ उडाला. आग इतकी प्रचंड होती की काही क्षणांतच संपूर्ण इमारतीतून धुराचे लोट उठले आणि आकाश काळवंडून गेलं. या घटनेने व्यापाऱ्यांत भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, अनेकांनी आपली दुकाने वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, मात्र ते व्यर्थ ठरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यासाठी पाच अग्निशमन गाड्यांचा वापर करण्यात आला. जवळपास दोन तासांच्या कठोर प्रयत्नानंतर दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. अग्निशमन विभागाच्या मते, आग मॉलच्या वरच्या मजल्यावरून सुरू झाली आणि काही क्षणांतच ती संपूर्ण इमारतीत पसरली. मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात कपड्यांचा साठा, फर्निचर आणि इतर साहित्य असल्याने आगीने जोर पकडला. दरम्यान, परिसरातील काही व्यापाऱ्यांनी स्वतःच्या दुकानांतील माल सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला, पण आगीच्या तीव्रतेमुळे आत प्रवेश करणे अशक्य झाले. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. जेजे मॉलमधील अनेक दुकाने संपूर्णपणे जळून खाक झाली आहेत. काही ठिकाणी धातूंची चौकट आणि फर्निचरचे अवशेषच उरले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागली तेव्हा मॉलमधील सर्व दुकाने बंद होती आणि परिसरात फार कमी लोकांची वर्दळ होती. यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असली तरी जीवितहानी टळल्याने व्यापाऱ्यांनी दिलासा व्यक्त केला आहे. अनेकांनी मात्र आपले संपूर्ण भांडवल आणि साठा आगीत गमावल्याची खंत व्यक्त केली आहे. शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून तांत्रिक तपासणी सुरू आहे. स्थानिक पोलिसांनी मॉलमधील वीजजोडणी, वायरिंग व्यवस्था आणि सर्किट पॉईंट्स तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच, जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही मागवण्यात आले आहेत, ज्यातून आगीच्या मूळ कारणाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे. शहराच्या सुरक्षा व्यवस्थेतील उणिवा पुन्हा समोर दरम्यान, या दुर्घटनेने पुन्हा एकदा अकोला शहरातील अग्निसुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शहरातील व्यापारी संकुलांमध्ये फायर सेफ्टी उपकरणे कार्यरत आहेत का? याचा सखोल तपास करावा अशी मागणी होत आहे. अलीकडच्या काळात शहरातील व्यापारी संकुलांमध्ये वाढत्या शॉर्टसर्किटच्या घटना पाहता, विद्युत यंत्रणांचे नियमित ऑडिट आणि फायर सेफ्टी प्रशिक्षण अनिवार्य करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे. जेजे मॉलच्या घटनेनंतर प्रशासनाकडून परिसरातील इतर मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्समध्ये अग्निशमन नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे. सुदैवाने ही आग जीवितहानीविना आटोक्यात आली, परंतु तिच्या ज्वाळांनी शहराच्या सुरक्षा व्यवस्थेतील उणिवा पुन्हा समोर आणल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:30 am

27 वर्षांनी एकत्र माजी विद्यार्थी रमले आठवणीत:शिवचलेश्वर प्रशालेतील 1997- 98 च्या माजी विद्यार्थ्यांकडून कृतज्ञता व्यक्त

अक्कलकोट मैंदर्गी येथील श्री शिवचलेश्वर प्रशालेतील सन १९९७-९८ च्या कन्नड माध्यमातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व गुरुवंदना कार्यक्रम अक्कलकोट येथील अजिंक्यतारा हॉटेलमधील सभागृहात उत्साहात पार पडला. प्रारंभी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सांगणप्पा होळीकट्टी व शिवशंकर आलमेल यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री शिवचलेश्वर व सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. यानंतर नवनगर (हुबळी) मठाचे मठाधिपती श्री राजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुने दिवस आठवत २७ वर्षांनी पुन्हा एकदा वर्ग भरवला. सर्व गुरुजनांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सिद्धारुढ धूतरगी, रामचंद्र हिरस्कार सर व जयदेवी उकली यांच्या छडीमाराचा अनुभवही पुन्हा स्मरणात आणण्यात आला. सकाळी ११ वाजता झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात उषा गोब्बूर, दीपा धूतरगी, महादेवी हुववे, पार्वती कोरचगाव आदींनी स्वागतगीत सादर केले. शिवचल कुमार सालीमठ व मल्लिनाथ मठपती यांनी प्रास्ताविक करताना शिक्षकांनी दिलेल्या शिक्षण व संस्कारांनी आमचे जीवन उज्ज्वल केले, असे मत व्यक्त केले. यावेळी एस. एम. जाधव, एस.एस.अळोळी, गु.गु. मठ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उद्योजक सिद्धाराम मोरे व किरण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात श्रीराजशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री शिवचलेश्वर प्रशालेतील एकूण २२ गुरुजनांचा मैसूर फेटा, मोत्यांचा हार, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास सविता धनळी, महानंदा सरसंबी, नागाम्मा अळगुंडगी, महादेवी जुळजुळे, सविता निंगदळी या माजी विद्यार्थ्यांनी आयोजन केले. या कार्यक्रम यशस्वितेसाठी माजी विद्यार्थी, व सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. या माजी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सहभाग या कार्यक्रमास मधुमती सालीमठ, प्रेमा सिंदगी, सुषमा मुलगे, कमला शिवणगी, लक्ष्मी देगाव, जगदेवी पाटील, धानाम्म हसरमानी, सोनाबाई सुतार, शिला गोब्बुर, नीलम्मा सिंदगी, शिवम्मा कोळी, राजश्री जमणे, बसम्मा गोब्बुर, सुष्मा मुलगे, शिवचलप्पा नडगेरी, मल्लय्या नंदीकोल, संतोष वच्चे , संतोष गोब्बूर, अशोक हिरतोट, गिरीश साबा, गुरुनाथ म्हेत्रे, मळप्पा बुरुड, मलकण्णा हडलगी, महादेव हावळगी , भीमलिंग यळसंगी, आदी मित्रवर्ग शाळेतील जुन्या आठवणीत रमले.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:30 am

केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी:संवाद न साधल्यामुळे शेतकऱ्यांचा संताप,जिल्हाधिकारी यांनी शेती, रस्ते, वीज वितरण व नुकसानीची दिली माहिती‎

अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या शेती, पायाभूत सुविधा व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची केंद्रीय पथकाने आज बुधवारी सकाळी पाहणी केली. मात्र या पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतीच्या नुकसानी साधी विचारपूस केली नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. केंद्र सरकारच्या या पथकात केंद्रीय ग्राम विकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार, ऊर्जा विभागाचे उपसंचालक करण सरीन, वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल, आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग यांचा समावेश होता. या पथकाने तालुक्यातील वडकबाळ व हत्तूर येथे सकाळी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे व शिवणी या गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. वडकबाळ येथील सीना नदीवरील बंधाऱ्याची स्थिती, शेतीचे झालेले नुकसान व वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनच्या नुकसानीची माहिती घेतली. हत्तूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. त्यानंतर हत्तूर- आनंदनगर या वाहून गेलेल्या रस्त्याची पाहणी केली. रस्त्यावर उभारूनच शेतीच्या नुकसानीची कृषी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शेती, रस्ते, वीज वितरण, शाळा व स्मशानभूमीच्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने व सुमित शिंदे, तहसीलदार किरण जमदाडे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित उपस्थित होते. सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच अतिवृष्टीची भर पडल्याने सर्वच भागातील शेतीला फटका बसला. पूर ओसरल्यानंतर एक महिन्यांनी केंद्रीय पथकाने आज पाहणी केली. मात्र यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची विचारपूस केली नाही. एकाही शेतकऱ्याकडून माहिती घेतली नाही. या दौऱ्याची अनेकांना माहितीच नव्हती. अधिकाऱ्याकडूनच माहिती घ्यायची होती तर पाहणीचे नाटकच कशाला करता असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी व्यक्त केला. ^हत्तूर येथे केंद्रीय पथक नेमके कशासाठी आले होते हेच कळलं नाही. कारण त्यांनी एकाही पूरग्रस्त शेतकऱ्याची व्यथा जाणून घेतली नाही. फक्त पाहणी करून प्रशासनाचेच ऐकायचे होते तर मग आलातच कशाला. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. प्रशांत सलगरे, ग्रामस्थ हत्तूर ^केंद्रीय पथकाने पूरग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करून माहिती का घेतली नाही. अधिकाऱ्यांकडून माहिती घेत कागदावरची पाहणी योग्य आहे का? कारण माझी एक दीड एकर नदीकाठची शेती वाहून गेली. आठ एकर ऊस सपाट झाला. सात एकर शेतातील माती खरडून गेली. पण अजून नुकसानीचा एक रुपया खात्यात जमा नाही. परमेश्वर पुजारी, शेतकरी वडकबाळ पूरग्रस्त शेतकऱ्यांशी का बोलला नाहीत

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:29 am

जिद्द, चिकाटीने अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत यश:क्लास वन अधिकारी झालेल्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थिनी चाकूरकर, टोम्पे यांचा सत्कार‎

शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमासोबतच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणे गरजेचे आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांनी कमी वयात अधिकारी पदावर पोहोचायचे असल्यास जिद्द, चिकाटी आणि परिश्रम यांच्या जोरावर अभ्यास करावा. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून क्लास वन अधिकारी होण्याचा मार्ग अधिक सुकर होतो, असे प्रतिपादन गणेश हाके पाटील बोलत होते. अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून गणेश हाके पाटील बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या रेखाताई तरडे हाके, प्राचार्य शोभाताई टोम्पे, संचालक सुरेंद्र चाकूरकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. एस. बी. कुलकर्णी, मुख्याध्यापक सौ. आशा रोडगे, सौ. मीना तोवर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी शाळेच्या दोन माजी विद्यार्थिनींचा विशेष सत्कार करण्यात आला.सौ. साक्षी चाकूरकर यांची राज्य सरकारच्या सेवेत क्लास वन (राजपत्रित अधिकारी वर्ग अ) पदावर निवड झाल्याबद्दल, तसेच,डॉ. अपर्णा शोभा पांडुरंग टोम्पे यांना हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून रेडिओलॉजी विषयात फेलोशिप प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पहार, मानाचा फेटा आणि ग्रंथ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सौ. आशा रोडगे-तत्तापुरे यांनी केले. सूत्रसंचालन सौ. शारदा तिरुके यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. मीना तोवर यांनी मानले. या कार्यक्रमाला सुजाता चाकूरकर, डॉ. अश्विनी टोम्पे तसेच इतर मान्यवर, शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेतील संस्कारांमुळे आजचे यश मिळवता आले या वेळी साक्षी चाकूरकर व डॉ. अपर्णा टोम्पे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यांनी शिक्षणात परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित करत, “शाळेने दिलेल्या संस्कारांमुळेच आज आम्ही या उंचीवर पोहोचलो,” असे सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:22 am

उदगीरमध्ये नो पार्किंग रिक्षा, 3 चालकांवर गुन्हे दाखल:रेल्वे पोलिसांची स्थानक परिसरात कारवाई‎

उदगीर शहरातील रेल्वे स्टेशन प्रवेशद्वार समोर परळी रेल्वे पोलीसांनी ३ नोव्हेंबर रोजी ठरवून दिलेल्या ऑटोरिक्षा स्टँडवर न थांबता नो पार्किंगमध्ये थांबविण्यात आलेल्या तीन ऑटोरिक्षा चालकाविरुद्ध नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मंगळवारी (४ नोव्हेंबर) परळी रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये रेल्वे कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उदगीर रेल्वे स्टेशन प्रवेशद्वार समोर ऑटोरिक्षा चालकांनी बेशिस्तीपणे आपली ऑटोरिक्षा थांबवून रेल्वे प्रवाशांच्या वाहतूकीस अडथळा निर्माण करुन त्रास देत असल्या कारणाने परळी रेल्वे पोलीस व रेल्वे अभियंता बिदर यांनी उदगीर रेल्वे स्टेशन परिसरात ३ नोव्हेंबर रोजी भेट देऊन उदगीर रेल्वे स्टेशन परिसरात ऑटोरिक्षा स्टँडची जागा दाखवून दिली होती. रेल्वे स्टेशनकडे येणारी ऑटोरिक्षा प्रवासी सोडून स्टँडवर थांबावे अशी सक्त ताकीद करण्यात आली होती. व अन्य ठिकाणी थांबल्यास कारवाई करण्यात येईल अशी स्पष्ट सूचना देण्यात आली होती. मात्र ४ नोव्हेंबर रोजी रेल्वे पोलीसांचे नियमांचे दुर्लक्ष करून नो पार्किंग मध्ये ऑटोरिक्षा क्र.एम एच २४ ए टी ७८०४, एम एच २४ ए टी ३७९८, एम एच २४ ए टी ५८४४ या ऑटोरिक्षा विरोधात परळी रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. दररोज नियमित कारवाई उदगीर रेल्वे स्टेशन परिसरात परळी रेल्वे पोलीस स्टेशन मधील रेल्वे सुरक्षा बलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय लांडगे यांच्या देखरेखीखाली कर्मचाऱ्यांसह, उदगीर रेल्वे स्थानकावरील ''नो पार्किंग'' क्षेत्रात वाहने पार्क करणाऱ्या आणि मुख्य प्रवेशद्वारावर अडथळा आणणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध नेहमी विशेष मोहीम राबवून अशा उल्लंघन करणाऱ्या ऑटो चालकांविरुद्ध दररोज नियमित कारवाई केली जाणार आहे. संतोष कांबले, पोलीस निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बल परळी

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:20 am

यशवंतवाडी ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांना सायकल:आमदार रमेश कराड यांच्या हस्ते 10 सायकल वाटप, मुलांच्या चेहऱ्यावर हास्य‎

गावातील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते प्रवासाची कसलीही सुविधा नसल्याची अडचण लक्षात घेऊन रेणापूर तालुक्यातील यशवंतवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने दहा शालेय विद्यार्थ्यांना आ. रमेश कराड यांच्या हस्ते सायकलीचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन सायकल वाटपाचा अभिनव उपक्रम हाती घेतल्याबद्दल यशवंतवाडी ग्रामपंचायतचे अनेकांनी कौतुक केले आहे. रेणापूर तालुक्यातील मौजे यशवंतवाडी येथे शिक्षणाची सोय नसल्याने गावातील मुला मुलींना कारेपूर येथे शाळेकरीता जावे लागत असे मात्र शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रवासाची कुठलीच नियमित सोय नसल्याने पायी चालत जाऊन शिक्षण घ्यावे लागत होते. शालेय विद्यार्थ्यांची ही मोठी गैरसोय लक्षात घेऊन यशवंतवाडी ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकली खरेदी करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या १० सायकलीचे वाटप लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते बुधवारी सकाळी लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात करण्यात आले. यावेळी अनुष्का चव्हाण, राधा सूर्यवंशी, जागृती सूर्यवंशी, भक्ती चव्हाण, मोहिनी सूर्यवंशी, सार्थक मोरे, माऊली जाधव, गजानन चव्हाण, जानवी चव्हाण, नक्ष चव्हाण या शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. पालकांमधून समाधान सायकल वाटप प्रसंगी यशवंतवाडीचे सरपंच ओम चव्हाण यांच्यासह महेंद्र गोडभरले, अभिषेक आकनगिरे, दशरथ सरवदे, वसंत करमुडे, विजय काळे यांच्यासह पालक व इतर अनेक जण होते. यावेळी आ. रमेश कराड यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधून शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. यशवंतवाडी ग्रामपंचायतीने सायकली वाटपाचा अभिनव उपक्रम हाती घेतल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:20 am

एकाच झाडाला गळफास घेऊन पाथर्डीत दांपत्याने संपवले जीवन:पाथर्डी तालुक्यात एकाच दिवशी चार जणांच्या आत्महत्या‎

तालुक्यात बुधवारी चार आत्महत्यांच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. तालुक्यातील घाटशिरस येथे नवविवाहित दांपत्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पाथर्डी शहरातील इंदिरानगर भागात एका २८ वर्षीय महिलेने राहत्या घरात गळफास घेतला, तर साकेगाव येथील ३० वर्षीय युवकाने काही दिवसांपूर्वी विष प्राशन केल्यानंतर बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घाटशिरस येथील भाऊसाहेब शिवराम माळी (२५) आणि त्यांची पत्नी प्रियंका भाऊसाहेब माळी (१९) या नवविवाहित दांपत्याने एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या दोघांचा विवाह वर्षभरापूर्वी झाला होता. बुधवारी सकाळी गावच्या शिवारात दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे हे तपास करत आहेत. दरम्यान,पाथर्डी शहरातील इंदिरानगर भागात संजना सुनिल खुडे (२८, रा. नाथनगर) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संजनाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. पुढील तपास सुरू आहे. विष घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू साकेगाव येथील अंबादास पाराजी वाघ (३०) या युवकाने दि. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १.१० वाजता विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले होते. पाच दिवस उपचार सुरू होते. बुधवारी (५ नोव्हेंबर ) पहाटे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे हे करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:19 am

नगरमधील बुद्धीबळ स्पर्धेत राज्यासह देशातील 270 बुद्धीबळपटूंचा सहभाग:अखिल भारतीय खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचे नगरमध्ये उद्घाटन‎

शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्यावतीने आयोजित अखिल भारतीय खुली आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळ स्पर्धा अहिल्यानगर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, स्टेशन रोड येथे उत्साहात सुरू झाली. या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि अनुप देशमुख यांच्या हस्ते बुद्धिबळ पटावर चाल देऊन करण्यात आले. यावेळी बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, शाम कांबळे, पारुनाथ ढोकळे, प्रकाश गुजराथी, स्वप्निल भगुरकर, नवनीत कोठारी, दत्ता घाडगे आदींसह खेळाडू, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत इंटरनॅशनल मास्टर राहुल संगमा (गुजरात), अनुप देशमुख (महाराष्ट्र) यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग आहे. त्यामुळे ही स्पर्धा दर्जेदार आणि रोमहर्षक ठरणार आहे. यावेळी अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे आयोजित या क्लासिकल फेडरेशन चेस टूर्नामेंटमध्ये सर्व वयोगटातील खेळाडू सहभागी होत आहेत. साडेपाच वर्षांचा सर्वात लहान बुद्धिबळपटू आणि ८३ वर्षांचे ज्येष्ठ खेळाडू या स्पर्धेत आपली बुद्धी आणि कौशल्य आजमावणार आहेत. जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा मानस म्हणजेच शहरातून जास्तीत जास्त ग्रँडमास्टर घडवणे आणि होतकरू व तरुण बुद्धिबळ खेळाडूंना प्रोत्साहित करणे. या दर्जेदार खेळाडू सहभागी झाले आहेत असे त्यांनी सांगितले. स्पर्धेचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले तर प्रकाश गुजराथी यांनी आभार मानले. जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या या उपक्रमांमुळे जिल्ह्यातील तरुण खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार असून नगर जिल्हा बुद्धिबळाच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू झाले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. स्पर्धेत जिल्ह्यासह देशातील २७० खेळाडूंचा सहभाग स्पर्धेचे प्रस्ताविक सचिव यशवंत बापट यांनी केले. त्यांनी सांगितले की या स्पर्धेत देशभरातील खेळाडू सहभागी झाले आहेत. आतापर्यंत अहिल्यानगर, पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, जालना, वर्धा, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, चंद्रपूर, रायगड तसेच आंध्र प्रदेश, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल येथून मिळून २७० खेळाडूंचा सहभाग निश्चित झाला आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:18 am

आधुनिक अन् पारंपारिक कौशल्यांनी मुलांनी साधली एकाग्रता:इंट्यूशन प्रोग्राममध्ये अंतर्ज्ञान व निर्णयक्षमता वाढवण्यावर भर, शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेतर्फे आयोजित ‘चिल्ड्रन इंट्यूशन प्रोग्राम’ (वय ५ ते १८ वर्षे) हा उपक्रम अहिल्यानगरमध्ये उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत गावडे मळा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात ५० हून अधिक मुलांनी सहभाग नोंदवला. या चार दिवसीय शिबिरात प्रज्ञा योगा, सुदर्शन क्रिया, प्राणायाम तसेच ब्लाइंडफोल्ड (डोळ्यांवर पट्टी बांधून) केले जाणारे इंट्युशन क्रियाकलाप अशा विविध सत्रांचा समावेश होता. या उपक्रमाद्वारे मुलांची एकाग्रता, अंतर्ज्ञान (इंट्युशन) आणि निर्णयक्षमता वाढविण्यावर भर देण्यात आला. प्रशिक्षित प्रशिक्षकांनी या कार्यक्रमाचे संचालन केले. मुलांना डोळ्यांवर पट्टी बांधून वस्तू ओळखणे, आसपासच्या गोष्टींचा अंदाज घेणे, टीमवर्क आणि शांततेत कार्य करण्याची कौशल्ये शिकवली गेली. या क्रियाकलापांमुळे मुलांची लक्ष केंद्रीकरण क्षमता २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याचे पालकांनी सांगितले. एका पालकाने सांगितले, “माझ्या मुलाला आता परीक्षेच्या तणावातही शांत राहता येते आणि तो अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेतो.” आणखी एका पालकाने नमूद केले की या कार्यक्रमामुळे मुलांची स्मरणशक्ती आणि अभ्यासात रुची वाढली आहे. या शिबिरात उत्कर्ष योगा (८–१२ वर्षे), इंट्युशन प्रोसेस (५–१८ वर्षे) आणि मेधा योगा (१३–१८ वर्षे) अशा तीन गटांमध्ये मुलांना प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमानंतर ऑनलाइन प्रॅक्टिस सत्रांचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कार्यक्रमादरम्यान मुलांचा उत्साह, जिज्ञासा आणि आनंदमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर सकारात्मक उर्जेने भारला होता. पालकांच्या अभिप्रायानुसार अनेक मुलांमध्ये आमूलाग्र बदल दिसून आले असून पुढील सत्रासाठी पालकांकडून उत्स्फूर्त मागणी होत आहे. पालकांच्या आग्रहास्तव पुढील बॅचसाठी नोंदणी सुरू करण्यात आली असून १८ वर्षांवरील युवकांसाठी ‘इंट्युशन प्रोग्राम’ लवकरच आयोजित होणार असल्याची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली. मुलांच्या विकासात मदत मुलांना डोळ्यांवर पट्टी बांधून वस्तू ओळखणे, आसपासच्या गोष्टींचा अंदाज घेणे, टीमवर्क आणि शांततेत कार्य करण्याची कौशल्ये शिकवली गेली. यातून मुलांची लक्ष केंद्रीकरण क्षमता २० ते ३० टक्क्यांनी वाढल्याचे पालकांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:17 am

शेतकऱ्यांच्या नावे ट्रॅक्टर घेऊन फसवणूक करणारी टोळी जेरबंद:9 ट्रॅक्टर सह 2 मोटारसायकल असा 71 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त‎

श्रीरामपूर / संगमनेर/अकोले शेतकऱ्यांच्या नावे ट्रॅक्टर घेऊन त्यांची फसवणुक करुन ट्रॅक्टर पळवणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ९ ट्रॅक्टरसह २ मोटारसायकल असा ७१ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. भालचंद्र अशोक साळवी (रा.वनकुटे, ता. पारनेर) व त्याचे साथीदार यांनी अनेकांना तुम्हाला ट्रक्टर घेण्यास मदत करतो असे सांगून नवीन ट्रक्टरचे डाऊन पेमेंट १ लाख रुपये मी भरतो तसेच सदरचे ट्रक्टर तुमचे नावावर घेऊन देतो, ट्रॅक्टर माझ्याकडे कामाला लावा. मी तुम्हाला त्या मोबदल्यात ८० हजार रुपये देतो. तसेच पुढील ६ महिन्यांचा हफ्ता देखील भरतो आणि सहा महिन्यांसाठी ट्रॅक्टर वापरण्याचे मोबदल्यात ३० हजार रुपये महिना देतो असे अमिष देत होता. अनेकांचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडे त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकेचे पासबूक, त्यांचे नावावर असलेल्या शेतीचे उतारे, रेशनकार्ड असे घेऊन त्यांना एका कंपनीचे फायनान्स कंपनीचे लोन करुन ४ जून २०२५ रोजी ट्रॅक्टर घेऊन दिले होते. सदरचे ट्रक्टर ६ जून रोजी आरोपी यांनी फसवणूक करून स्वतःकडे घेऊन गेले. ठरल्याप्रमाणे ८० हजार रुपये दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हिरामण खाडे यांनी राजूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सदर आरोपी हा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार येथे नेहमी ये जा करत असतो अशी माहिती मिळाली. तो मंगळवारी नगर येथे आल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेण्यासाठी श्रीरामपूर कार्यालयातील पोहेकॉ सचिन धनाड, संदीप दरंदले, राजेंद्र विरदवडे, सहदेव चव्हाण, अशोक गाढे आदींसह संगमनेर, राजूर व श्रीगोंदा पोलिसांची पथके तयार करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अमलदार समांतर तपास करत असताना भालचंद्र अशोक साळवी ,अभिजित सुनिल भांडवलकर (वय ३२, रा. सिव्हिल हाडको अहिल्यानगर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. ट्रॅक्टर आम्ही सिल्लोडमधील एकाला ४ लाख रुपये किंमतीला विकल्याचे सांगितले. याप्रकरणी भालचंद्र अशोक साळवी, अभिजित सुनिल भांडवलकर यांना अटक करण्यात आली. या ठिकाणी विकले ट्रॅक्टर त्यांनी इतर शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे. ९ ट्रॅक्टर व २ मोटारसायकल विकल्याची माहिती समोर आली. सदर ९ ट्रॅक्टरपैकी १ शिर्डी, ३ अहिल्यानगर, २ श्रीगोंदा, २ नारायणगाव, १ सिन्नर, जि. नाशिक तसेच मोटार सायकल पैकी १ श्रीगोंदा व १ नारायणगाव या ठिकाणी विकले असल्याचे सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:16 am

आनंदात संयम अन् दुःखात आधार देणारी भगवतभक्ती हीच खरी संपत्ती:महंत उद्धवजी महाराज यांचे निरुपण, भगवंताची सेवा करा आणि जीवन परमार्थमय बनवा‎

नेवासे जीवाला काळाच्या तडाख्यातून सोडवण्यासाठी परमार्थ व संतसंगती हाच मुख्य पर्याय आहे. भगवंताच्या नामस्मरणाने मन शुद्ध होते, तर संतांच्या सहवासाने जीवनाला दिशा मिळते. आनंदात संयम आणि दुःखात आधार देणारी भगवतभक्ती हीच खरी संपत्ती आहे. म्हणून संतसंगतीत राहा, भगवंताची सेवा करा आणि जीवन परमार्थमय बनवा, असे निरुपण सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले. कार्तिकी एकादशीचा मंगल सोहळा आणि भक्तीच्या रंगांनी न्हाऊन निघालेली नेवासाची भूमी अशा अध्यात्मिक वातावरणात संत, महंत आणि वारकरी भाविकांचा भावस्पर्शी सहभाग लाभला. वारकरी संप्रदायातील सेवेकरी शारदादेवी नन्नवरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त हा किर्तन सोहळा आराध्या मंगल कार्यालयात झाला. त्यावेळी ते बोलत होते. मंडलिक महाराज म्हणाले, स्व. शारदादेवी नन्नवरे यांनी अखेरच्या श्वासापर्यंत धर्मकार्याचा दीप उजळता ठेवला. महिलांना भजन व नामस्मरणाच्या माध्यमातून एकत्र करून त्यांनी वारकरी परंपरेत मोलाचे योगदान दिले. अन्नदान, भजनसेवा आणि भक्तीची शिकवण देत त्यांनी धर्मकार्यात निष्ठा ठेवली. या सोहळयाच्या प्रसंगी नेवासे येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के, श्रीराम साधना आश्रमाचे महंत श्री सुनीलगिरी महाराज, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज, रामकृष्ण आश्रमाचे भगवान महाराज जंगले शास्त्री, रामायणाचार्य नंदकिशोरजी महाराज खरात, भागवताचार्य अंकुश महाराज जगताप, रामनाथ महाराज पवार, माऊली आश्रमाचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज हजारे, कृष्णा महाराज हारदे, युवराज महाराज देशमुख, गहिनीनाथ महाराज आढाव, दीपक महाराज देशमुख, रामजी महाराज काळे हे संत-महंत उपस्थित होते. संतांचे पूजन भागवताचार्य अंकुश महाराज जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. किर्तन सोहळयाचे संयोजक संतसेवक प्रा. रामनाथ नन्नवरे, प्रा. विवेक नन्नवरे, कृष्णा महाराज मोरे, बाळासाहेब महाराज झिने यांनी उपस्थित संतांना वस्त्र व परमार्थ दशकोटी पुस्तिका भेट देऊन सन्मानित केले. या सोहळयात श्री ज्ञानेश्वर कॉलेजचे माजी प्राचार्य रघुनाथराव आगळे, प्राचार्य गोरक्षनाथ कल्हापुरे, म्हाळसा-खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष प्रा. डॉ. मुरलीधर कराळे, विश्वस्त प्रभाकरराव बोरकर, किशोर गारुळे उपस्थित होते. उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धव महाराज मंडलिक.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 9:16 am

वराड परिसरामध्ये कपाशीच्या झाल्या वाती; मजूरटंचाईने शेतकरी हतबल:वराड परिसरात शेतात तुंबलेले पाणी बनले शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी‎‎

आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वराड परिसरात थोडी विश्रांती घेतली आहे. मात्र, शेतकऱ्यांची चिंता काही कमी झालेली नाही. शेतात अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्यात मक्याची कणसं तरंगताना दिसत आहेत. तर कपाशी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. पिक काढणीच्या अवस्थेत असताना आलेल्या अवकाळी पावसामुळे वराड परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कपाशीला झाडावर कोंब फुटले असून तीनशे ते साडेतीनशे रुपये रोज देऊन सुद्धा मजूर मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या चिंतेमध्ये आहेत. सोयाबीन, कपाशी, मका, ज्वारी पिकाला मोठा फटका बसला असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. वराड परिसरात मुसळी, एकलग्न व चिंचपूरा, पोखरी तांडा, पिंपरी, पिंपळकोठा हा परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाण्याखाली गेलेल्या मक्याच्या कणसांना कुजण्यास सुरुवात झाली आहे. शेतकरी ही कणसं बाहेर काढून वाळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मजूर मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. अधिक मजूरी देऊनही मजूर मिळत नाहीत. त्यामुळे कणसं शेतातच सडण्याची वेळ आली आहे. काही शेतकऱ्यांनी सांगितले की, या पावसाने पिकांचे नुकसान तर केलंच, पण मजूर टंचाईमुळे आर्थिक फटका बसतो आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 8:33 am

गटारीवरील अतिक्रमणामुळे पाणी थेट रस्त्यावर‎:कजगाव येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे

प्रतिनिधी | कजगाव भडगाव तालुक्यातील बाजारपेठेचे गाव म्हणून कजगाव प्रसिद्ध आहे असे मोठे गाव असून सुद्धा गावात खराब रस्ते तसेच नादुरुस्त गटारी ,अस्वच्छतेचा कहर अशा अनेक समस्यांना गावातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील मुख्य बाजारपेठेचे गाव अजून सुद्धा गाव अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. गावातील मुख्य रस्ता व बसस्थानक ते जुने गाव जोडणारा हा रस्ता खड्डेमय झाला असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून पाणी साचत आहे. या रस्त्या लगतच जिल्हा परिषदेची शाळा असून या शाळेतील विद्यार्थ्यांना चिखलातून व खड्ड्यांमधून मार्ग काढत शाळा गाठावी लागत आहे. या मुख्य रस्त्यावर पाण्याच्या निचरा होत नसल्याने पाणी हे रस्त्यावर साचत आहे, यामुळे या डबक्यांमध्ये साचलेल्या पाण्याने शाळेजवळ व परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच या साचलेल्या पाण्यात मच्छर तयार होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या कडेला गटारी असून नसल्यासारखे आहेत या गटारी पूर्णपणे बंद पडल्या अवस्थेत आहे तसेच या गटारीवर अनेक ठिकाणी अतिक्रमण करून त्या झाकण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने हे पाणी रस्त्यावर साचत आहे. या पाण्याचा त्रास गावातील नागरिकांसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनाही येजा करताना होत आहे तरी स्थानिक ग्रामपंचायतीने व संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे, या समस्येचे लवकरात लवकर निदान करण्याची मागणी कजगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 8:31 am

उगावला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे सांत्वन:शासनाने कर्ज माफ करण्याची शेतकरी संघटनेची मागणी‎

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक व बँक ऑफ महाराष्ट्र आणि खासगी देणे यांचा तगादा असल्याने उगाव येथील शेतकरी कैलास यादवराव पानगव्हाणे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांचे शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे, शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन बोराडे, मोती नाना पाटील, केदू पाटील बोराडे, किरण गवारे आदींनी सांत्वन केले. कैलास पानगव्हाणे यांच्याकडे जिल्हा बँकेचे नऊ ते दहा लाख रुपये, महाराष्ट्र बँकेचे नऊ ते दहा लाख रुपये व खासगी देणेदारी दहा लाख रुपये असे २४ ते २५ लाख रुपये कर्ज होते. वारंवार बँकेने व खासगी देणेदारांनी तगादा लावल्याने त्यांनी आत्महत्या केली, असे त्यांच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. नाशिक जिल्हा बँकेने सामोपचार कर्ज फेड योजना सुरू केल्याने कैलास पानगव्हाणे यांनी दोन लाख रुपये दहा टक्के रक्कम भरली होती. त्यांना इतर बँकेकडून कर्ज घ्यायचे होते. मात्र विकास संस्थेने ना हरकत दाखला न दिल्याने मानसिक स्वास्थ्य बिघडले आणि त्यांनी आत्महत्या केली. शासनाने त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी व त्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकरी संघटना नेते व कार्यकर्त्यांनी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 8:20 am

गोदाकाठचा 5 हजार हेक्टर ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत:निफाडचे कारखाना बंद‎पडल्याने शेतकरी चिंतेत‎

निफाड तालुक्यातील सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने तालुक्यातील ऊस उत्पादकांची चांगलीच गोची निर्माण झाली आहे. निफाड सहकारी साखर कारखाना अनेक वर्षांपासून बंद आहे. या गळीत हंगामातही कारखाना सुरू न झाल्याने तालुक्याबरोबरच गोदाकाठ भागातील शेतकरी अडचणीत आले आहे. एकेकाळचा महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अव्वल स्थानावर पोहोचलेला आणि निफाड तालुक्याच्या राजकारण व अर्थकारणाचा केंद्रबिंदू असलेला, सभासद तसेच कामगारांबरोबरच येथे छोटे-मोठे व्यावसायिक, शिक्षण संस्थाच्या विकासाच्या पायाभरणीत मोलाची भूमिका बजावणारा, लाखोंचा पोशिंदा तर ज्याच्या हाती कारखान्याची दोरी, तोच तालुक्यातील सत्तेचा कारभार अशी एक प्रतिमा तयार झालेल्या निसाकाला गेल्या अनेक वर्षांपासून उतरती कळा लागली आहे. सहकाराला राजकारणाच्या लागलेल्या वाळवीणे शिखरावर पोहचलेला निसाका सध्या मरण यातना भोगत आहे. तर तालुक्यातील रासाका सुरू होण्याची शक्यता धूसर असून गोदाकाठ भागात असलेल्या केजीएसची अजूनही चिमणी पेटली नसल्याने ऊस उत्पादक चिंतेत आहे. ऊसक्षेत्र मोठ्या प्रमाणात असलेल्या गोदाकाठ भागातील सर्व मदार असलेला निसाका गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. यामुळे ऊस उत्पादकांना बाहेरील कारखान्यांना ऊस देण्याची वेळ येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 8:19 am

फार्मर आयडी नसल्याने 14 हजार शेतकरी वंचित‎:सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टीचे 21 कोटी 92 लाख रुपये बॅँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात‎

तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होत आहे. २२६५५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना पैसे मिळाले असल्याची माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली. चार दिवसांपूर्वीच अनुदानाची रक्कम शासनाकडून प्राप्त झाली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास उशीर झाला. तालुक्यातील १९० गावांतील शेतकऱ्यांसाठी १०१ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. पंचनामे पूर्ण झालेल्या आणि यादीत समाविष्ट शेतकऱ्यांच्या खात्यातच पैसे जमा होत आहेत. ज्यांनी केवायसी व फार्मरआरडी पूर्ण केले आहे, अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. इतरांच्या खात्यांवरही अनुदान जमा होत आहे. तालुक्यात ८८८३२ शेतकरी अनुदानास प्राप्त आहेत. अतिवृष्टीमुळे तालुक्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. रवींद्र सोनवणे | सिल्लोड सिल्लोड तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शासनाच्या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. असे असले तरी यात फार्मर आयडी नसलेल्या १५ हजार शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सप्टेंबर महिन्यात सिल्लोड तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली, विहिरी खचल्या, जनावरे वाहून गेली. यामुळे प्रचंड अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा होती. या नुकसानीनंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार कृषी व महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार तालुक्यातील जवळपास ८० हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. यासाठी ८२ हजार २३५ शेतकऱ्यांना ६९ कोटी रुपयांची मदत मिळावी म्हणून महसूल प्रशासनाच्या वतीने शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार मागील दोन दिवसांपासून पोर्टलवर अपलोड झालेल्या ६५ हजार ७९४ शेतकऱ्यांना ४५ कोटी रुपयांची शासनाकडून मदत पाठवण्यात आली. यापैकी दोन दिवसांत ३१ हजार ६६७ खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यावर २१ कोटी ९२ लाख रुपये अनुदान जमा झाले. याद्या अपलोड केलेल्यांपैकी उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर आगामी दोन दिवसांत अनुदानाचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. पण, ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनलेले आहेत किंवा ज्यांचा डाटा ॲग्रिस्टॅकला मॅच झाला आहे, अशा सर्वांना पैसे येतील. मात्र उर्वरित इतर शेतकऱ्यांच्या मदतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. १४ हजार ४४१ शेतकऱ्यांचे फॉर्मर आयडी बनलेले नसल्याने त्यांच्या अनुदानाबाबत निश्चित सांगता येत नाही. नुकसान होऊन दोन महिने उलटले. शासनाने मदत देण्यास फार विलंब केला. त्यातही अनेक अडचणी उभ्या राहत असल्याने नुकसानीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना महसूल प्रशासनाने मदतीसाठी वेठीस धरू नये. -मुक्ताराम गव्हाणे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना फार्मर आयडी न काढलेल्या शेतकऱ्यांनी तत्काळ आपले फार्मर आयडी काढून घ्यावेत, याशिवाय शासनाची मदत त्यांच्या खात्यावर जमा करता येणार नाही. मदतीस पात्र असलेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, असा महसूल प्रशासनाचा प्रयत्न आहे. -सतीश सोनी, तहसीलदार, सिल्लोड मदतीसाठी वेठीस धरू

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 8:07 am

वर्षामधून एकदाच उघडणारे कार्तिक स्वामींचे मंदिर खुले:आज खुल्लोड‎ला भाविकांना दिवसभर घेता येणार दर्शन‎

श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने न्हालेल्या खुल्लोड येथील खोलेश्वर महादेव देवस्थान परिसरातील कार्तिक स्वामींचे पवित्र मंदिर आज, गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता भक्तांसाठी खुले होणार आहे. हे मंदिर वर्षातून फक्त एकदाच कार्तिकी पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी उघडले जाते. त्यामुळे परिसरात भक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मंदिर सकाळी साडेपाच ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत दर्शनासाठी खुले राहणार आहे. या वेळेत भाविकांना स्वामींच्या दर्शनाची सुवर्णसंधी मिळणार आहे. खोलेश्वर मंदिर देवस्थान समितीने नागरिक आणि परिसरातील भक्तांना या दुर्मिळ संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. गावात येणाऱ्या भक्तांसाठी तसेच गावकऱ्यांसाठी गावभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने हा भंडारा होणार आहे. ग्रामस्थ भक्तिभावाने तयारी करत आहेत. खुल्लोड गाव गोळेगाव - अंभई रोडवर पश्चिम दिशेला ८ किलोमीटर अंतरावर आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 8:05 am

सिल्लोड प्रवेशद्वार कामावरून सुरू झालेले उपोषण दुसऱ्या दिवशी मागे

सिल्लोड शहरातील प्रवेशद्वाराच्या कामाला स्थगिती द्यावी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटवून चिल्ड्रन पार्कसाठी जागा मोकळी करावी, या मागण्यांसाठी माजी आमदार सांडू पाटील लोखंडे आणि श्री स्वामी सर्वानंद सरस्वती महाराज यांनी मंगळवारी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. बुधवारी आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. नगरपरिषद प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रवेशद्वाराचे काम थांबवले आहे. उर्वरित कारवाई लवकरच केली जाईल, असं लेखी पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले. तरीही उपोषण सुरूच होते. बुधवारी भोकरदनचे आमदार संतोष दानवे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता मंगळवारपासून लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहितेचे पालन करण्यासाठी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवेशद्वाराचं काम थांबवण्याची मागणी मान्य केल्याचंही त्यांनी सांगितले. यानंतर आमदार दानवे यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन उपोषणाची सांगता झाली. या वेळी भाजपचे राज्य सचिव सुरेश पाटील बनकर, माजी सभापती अशोक गरुड, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव दाणेकर, किसान मोर्चाचे राज्य सरचिटणीस मकरंद कोरडे, सुनील पाटील मिरकर, कमलेश कटारिया, विलास पाटील, प्रा. शिवराम साखळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 8:05 am

संविधान, बुद्धाच्या तत्त्वांवरच भारत भूमी चालते:फर्दापुरातील अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत दक्षिण कोरियाचे माजी राज्यपाल किम डू क्वान यांचे मत

भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. ती संविधान आणि बुद्धाच्या तत्त्वांवर चालते. या पवित्र भूमीत आयोजित २० व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत सहभागी होता आल्याचा मला आनंद आहे, असे दक्षिण कोरियाचे माजी राज्यपाल किम डू क्वान यांनी सांगितले. बुधवारी अजिंठा लेणीच्या सान्निध्यातील फर्दापूर येथील धम्माचल येथे ही परिषद झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझमच्या वतीने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० वाजता दक्षिण कोरियन राष्ट्रपती कार्यालयातील मुख्य सूचना मास्टर भदंत ली मायोन बे यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण झाले. दुपारी १२ वाजता कोरियातील बौद्ध धम्माचे मुख्य मास्टर ली चांग बे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. या वेळी धम्म स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी परिषदेला भेट दिली. त्यांनी अध्यक्ष, उद्घाटक आणि देश-विदेशातून आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड, सचिव भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, दक्षिण कोरियन बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. ली चॅन रॅन, भदंत मास्टर लीम मुसोंग, भदंत डॉ. फ्रा अचान सिट्टीचोक सोमवरण, थायलंड येथील सिड्स फाउंडेशनचे अध्यक्ष सिरीयक फाट्राफसीट मैथाई, भदंत धम्मसेवक महाथेरो, भदंत शनानंद महाथेरो, एन. आनंद महाथेरो उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 8:04 am

घाटनांद्रा परिसरातील शेकडो कुटुंबांचे घरकुल योजनेसाठीचे अनुदान रखडले:अनुदानाच्या पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याने घरकुलाची कामे अर्धवट अवस्थेत‎

घाटनांद्रासह परिसरातील चारनेर, पेंडगाव, धारला, वाडी व परिसरातील इतर गावांमध्ये पीएम आवास योजनेअंतर्गत बांधकाम सुरू असलेल्या हजारो घरकुलांपैकी अनेकांची कामे मागील दोन महिन्यांपासून ठप्प झाली आहेत. लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान रखडले असून अनेकांनी नवीन घरांचे स्वप्न पाहून व्याजाने, नातेवाईकांकडून उसनवारीत पैसे घेऊन कामे सुरू केली. मात्र अनुदानाच्या पैशांचा तुटवडा निर्माण झाल्याने आता कामे अर्धवट अवस्थेतच थांबली आहेत. या योजनेत केंद्र व राज्य सरकारकडून मिळून अंदाजे १ लाख ६० हजार रुपये अनुदान टप्प्याटप्प्याने देण्यात येते. बांधकाम सुरू करण्यापूर्वी पहिला १५ हजारांचा हप्ता मिळतो. त्यानंतर तीन ते चार टप्प्यात उर्वरित रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाते. परंतु दोन ते तीन महिन्यांपासून निधी न मिळाल्याने शेकडो घरांची कामे अपूर्णावस्थेत ढासळू लागली आहेत. घर बांधकामाची पातळी पाहण्यासाठी व पुढील हप्ता मंजूर करण्यासाठी कनिष्ठ अभियंत्याकडून फोटो काढले जातात. मात्र हे अधिकारी फोटो काढण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. “फोटो नाही, हप्ता नाही… आणि घर स्वप्नातच,” असे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, तातडीने निधी उपलब्ध करून देऊन घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्याची मागणी लाभार्थ्यांनी सरकारकडे केली आहे. निधी आल्यानंतरच हप्ता केंद्राकडून घरकुल योजनेसाठीचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. निधी मिळाल्यानंतर तत्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात येईल. फोटो काढणेही तात्पुरते थांबविण्यात आले आहे. - सा.अभियंता हसे, सिल्लोड

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 8:03 am

33 वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; पुन्हा उजाळले आठवणीतले सोनेरी क्षण:हास्य, उत्साह आणि मैत्रीने भारावले महात्मा फुले हायस्कूलचे प्रांगण‎

कन्नड क्षण सोनेरी आठवणींच्या, शाळेच्या दारी भेटलो पुन्हा, वाटलं काळ थांबला जणू, पुन्हा बालहोत चाललो आम्हीना…या उक्तीप्रमाणे काळ बदलला, चेहरे बदलले, जबाबदाऱ्या वाढल्या; पण शालेय मैत्रीचं नातं तसूभरही बदललं नाही. अगदी याच भावनेने 1992-93 साली दहावी उत्तीर्ण झालेले पिशोर येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे विद्यार्थी तब्बल ३३ वर्षांनंतर पुन्हा एकवटले आणि जुने दिवस आठवत एक अविस्मरणीय स्नेहमेळावा साजरा केला. ज्या शाळेत बालपण साकारले, जे प्रांगण खेळण्यांनी, आनंदाने भरून गेलं, त्याच जागी पुन्हा जमल्यावर आनंद, उत्साह, ओलावा आणि हुरहुर अशा अनेक भावना मनात दाटून आल्या. वर्गखोल्या, शाळेचे मैदान आणि त्या काळच्या खोडकर व निरागस आठवणींनी सर्वांना भूतकाळात नेले.प्रत्येक क्षण हास्य उत्साह आणि मैत्रीने भारवलेला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित तत्कालीन सर्व शिक्षक गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. शिक्षकांप्रती कृतज्ञता आणि आदर व्यक्त करत विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तूही सुपूर्द केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एन.आर. नवले होते. प्रमुख अतिथी म्हणून क.रा. नवले गुरुजी, एम.एच. सुर्वे, श्रीमती एन.एम. सुर्वे , ए.बी. जाधव, यू.एल. नवले , पी.एम. डहाके , एन.ए. जाधव , एस.एस. गवई , डी.डी. निळ, के.एम. हळदे आदी शिक्षक उपस्थित होते. दरम्यान, भूतकाळात डोकावत आज पुन्हा बालपणाचा, मैत्रीचा क्षण अनुभवायला मिळाला आयुष्यातील हा दिवस प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात घर करून राहील या भावनेने सर्वानी निरोप घेतला. कार्यक्रमासाठी विजय पाटील, लक्ष्मण नवले, विनोद कुमार शिंदे, प्रशांत नवले यांच्यासह स्थानिक मित्रानी विशेष परिश्रम घेतले. प्रशांत नवले यांच्या सूत्रसंचलणाने रंगत वाढली.कार्यक्रमाच्या शेवटी पुन्हा भेटू या अशा निर्धाराने आणि मनात अनंत आठवणींचा खजिना घेऊन सर्वांनी एकमेकांना निरोप दिला.आभार किरण सुर्वे यांनी मानले. ३३ वर्षांनंतर महात्मा जोतीबा फुले विद्यालय, पिशोरचे १९९२-९३ बॅचचे सर्व माजी विद्यार्थी आणि शिक्षक. भावना केल्या व्यक्त विद्यार्थ्यांनी जीवनप्रवासातील आठवणी सांगत आपापली मनोगते व्यक्त केली. व्यापारी, डॉक्टर, अधिकारी, शिक्षक, राजकीय व्यावसायिक अशा क्षेत्रात स्थिरावलेल्या मित्रमैत्रिणींची विचारपूस केली.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 8:02 am

एसआरटी शेती शिकण्यास इंजिनिअरिंगच्या 45 विद्यार्थ्यांनी घेतले शेतात प्रशिक्षण:बाजारसावंगी येथे एसआरटी पद्धतीने शून्य मशागत शेतीचे धडे‎

बाजारसावंगी खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे एसआरटी पद्धतीने शून्य मशागत शेतीचे प्रशिक्षण सुरू आहे. रामचंद्र पुंड यांच्या शेतात हे प्रशिक्षण दिले जात आहे. ते स्वतः गेल्या चार वर्षांपासून एसआरटी पद्धतीने शेती करतात. त्यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. मशागतीचे कष्टही शून्य झाले. छत्रपती संभाजीनगर येथील बाजार समिती हायटेक कॉलेजमधील इंजिनिअरिंगचे ४५ विद्यार्थी एकदिवसीय प्रशिक्षणासाठी आले होते. त्यांच्यासोबत प्राध्यापक डॉ. भगले आणि डॉ. कोंडेकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन गादीवाफा, कायमस्वरूपी बेड तयार करणे, वेगवेगळी पिके घेणे यांचे प्रात्यक्षिक पाहिले. शून्य मशागत शेतीत ट्रॅक्टरचा खर्च लागत नाही. मजुरांची गरज कमी होते. शेतकऱ्यांचे कष्टही कमी होतात.या उपक्रमासाठी त्रिंबक ढाले (जालना), नितीन चाके (बुलडाणा), प्रताप पाटील (धुळे), शांताराम डोके (परसोडा), एकनाथ शिंदे, अरुण पटेल (सिंदखेडराजा) हे शेतकरीही प्रशिक्षणासाठी आले होते. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी या पद्धतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी येत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह बघावयास मिळाला. विद्यार्थ्यांनी नवनवीन गोष्टींबद्दल माहिती जाणून घेतली आणि प्रश्न देखील विचारले. राज्यभरात शालेय विद्यार्थ्यांना एसआरटी शेतीचे प्रशिक्षण रामचंद्र पुंड हे कृषिरत्न, कृषिभूषण पुरस्कार विजेते चंद्रशेखर दादा भडसावळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. ते संपूर्ण महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना एसआरटी शेतीचे प्रशिक्षण देतात. प्रत्यक्ष शेतात जाऊन एसआरटी शेतीचे प्रशिक्षण घेतांना विद्यार्थी .

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 8:01 am

अवकाळीमुळे ओला कापूस सुकवण्याची वेळ:सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांचा वेचणीला आलेला संपूर्ण कापूस शेतात भिजला

सिल्लोड तालुक्यासह टाकळी जिवरग व कायगाव, गव्हाली, तलवाडा या गावातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले असून हातातोंडाशी आलेले पांढरे सोने म्हणजेच कापूस पीक पावसामुळे अक्षरशः मातीमोल झाले आहे. कापूस वेचणीचा हंगाम सुरू असतानाच पावसाने तब्बल आठवडाभर हजेरी लावल्यामुळे वेचणीला आलेला संपूर्ण कापूस शेतात भिजून गेला आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. दिवाळीच्या काळात अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने कापसाची लागवड केली होती आणि यंदा चांगले उत्पादन मिळण्याची आशा होती. मात्र अवकाळी पावसाच्या जोरदार हजेरीमुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. पावसात भिजल्यामुळे कापसाची प्रत मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. ओला चिंब झालेला कापूस आता शेतकरी उन्हामध्ये वाळवण्याचा प्रयत्न करत असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सततच्या पावसामुळे झाडावरच कापूस खराब झाल्याने कापूस उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता शेतकरी बांधवांनी वर्तवली आहे. एकीकडे नैसर्गिक संकट तर दुसरीकडे कर्जाचा डोंगर, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाला आता शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे. दिवाळी सणानिमित्त मजूर वर्ग उपलब्ध झाला नाही. यामुळे ऐन कापूस वेचणी करण्याच्या वेळी अवकाळी पावसाने डाव साधला. यामुळे लावलेले भांडवलही गेले आणि येणारे उत्पादनही गेले. यातून वेचणीचा खर्चदेखील निघणार नाही.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 7:59 am

हिंगोली नगरपालिकेच्या रणधुमाळीस सुरुवात:71 हजार मतदारांचा निर्णय ठरणार निर्णायक, 35 हजार महिला मतदाराचा समावेश

हिंगोली नगर पालिकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी राजकीय हालचाली गतीमान झाल्या असून शहरातील 71 हजार मतदार नवीन नगराध्यक्षांसह 34 नगर सेवकांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. विशेष म्हणजे यामधे पुरुष मतदारांच्या बरोबरीने महिला मतदारांची संख्या आहे. हिंगोली नगर पालिकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. शिंदे सेना, भाजपा, ठाकरे गट, राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्याकडून राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार गट) अद्यापही बॅकफूटवर आहेत. या पक्षांच्या नेत्यांकडून उमेदवारांचा शोध सुरु करण्यात आला आहे. या निवडणुकीत वर्चस्वासाठी सर्वच पक्षांनी हालचाली सुरु केल्यामुळे महायुती किंवा महा विकास आघाडी होणार की नाही याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. दरम्यान, पालिकेच्या 17 प्रभागातून 34 नगरसेवकांची निवड होणार असून नगराध्यक्षपदही थेट जनतेतून निवडले जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांना आपापल्या प्रभागात आपल्या सोबतच नगराध्यक्षपदासाठीही मतदान मागावे लागणार आहे. त्यातही क्रॉस मतदान होऊ नये याची पुरेपुर काळजी घेतले जात असल्याचे चित्र आहे. हिंगोली पालिकेत 71880 मतदार असून यामध्ये 36696 पुरुष मतदार तर 35184 महिला मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे 71880 मतदार नवीन नगराध्यक्ष व 34 नगरसेवकांच्या राजकीय भवितव्याचा फैसला करणार आहेत. यावेळी निवडणुकीत पुरुष मतदारांच्या बरोबरीने महिला मतदारांची संख्या असल्यामुळे महिला मतदारांना डावलून चालणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुरुष मतदारांसोबतच लाडक्या बहिणी असलेल्या मतदारांसोबत उमेदवारांना संपर्क करावा लागणार आहे. सध्या तरी राजकीय रणधुमाळी सुरु असली तरी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार तसेच कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार यावरच सर्व बाबी अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे आगामी एक महिन्याच्या कालावधीत राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे चित्र आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 7:51 am

डॉ. आंबेडकरांबद्दल अमित शाह आक्षेपार्ह बोलल्यामुळे राजीनामा:माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी भाजप सोडली

आंबेडकर चळवळीचे नेते, माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी ऐन मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजपास सोडचिठ्ठी दिली.शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्याकडे बुधवारी त्यांनी सदस्यपदाचा राजीनामा सादर केला.‘केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरून अपमान केला, त्यामुळे आपण हे पाऊल उचलत आहोत,’ असे कारण गायकवाड यांनी राजीनामा पत्रात नमूद केले. पण त्यांची नाराजी स्थानिक नेत्यांवर असल्याचे सूत्रांनी सांगितले.गायकवाड हे बुधवार पेठेतून निवडून आले होते. भाजपमध्ये आधीच गटबाजीला उधाण असताना एका माजी नगरसेवकाने राजीनामा दिल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. उत्तर मतदारसंघातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या समर्थकांनी अलीकडेच भाजप कार्यालयात जाऊन इनकमिंगबाबत जाब विचारला होता. गायकवाड यांचा प्रभागही उत्तर मतदारसंघातील असून त्यांच्या प्रभागातून गेल्या वेळी चारही नगरसेवक भाजपचेच निवडून आले होते, हे विशेष. मात्र आता काही माजी नगरसेवकांना तिकीट न मिळण्याची धास्ती आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 7:32 am

तुम्ही दागिने खरेदीनंतर त्यांचे टॅग रस्त्यावर टाकता:‎तेच उचलून महिलेने तिघा मोठ्या सराफांना गंडवले‎, पु. ना. गाडगीळसह बाफना ज्वेलर्स, भंगाळे गोल्डमधील प्रकार उघड

सराफा दुकानावर दागिने खरेदी केल्यानंतर‎नागरिक दागिन्याला लावलेले टॅग काढून ते‎रस्त्यावर फेकून देतात. एका महिलेने तेच टॅग‎उचलून बनावट अंगठ्यांना लावून शहरातील‎तीन मोठ्या सराफांना गंडवल्याचा‎धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. रिंगरोड‎येथील पु.ना. गाडगीळ शोरूममध्ये २७‎ऑक्टाेबर राेजी बनावट अंगठी ठेवून‎सोन्याची १ लाख ४० हजारांची एक अंगठी‎लांबवणाऱ्या चोरट्या महिलेने या एकाच नव्हे‎तर आर. सी. बाफना व भंगाळे गोल्ड‎शोरूममध्येही डल्ला मारल्याचे उघड झाले‎आहे. या महिलेने चलाखीने आर. सी. बाफना‎ज्वेलर्समधून साेन्याचा दाेन अंगठ्या, भंगाळे‎गोल्ड ज्वेलर्समधून साेन्याची एक अशा सुमारे‎३ लाख ३० हजार रुपये किमतीच्या तीन‎अंगठ्या चाेरी केल्या आहे. याप्रकरणी‎मंगळवारी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची‎नोंद करण्यात आली आहे. या सर्व घटना २७‎ऑक्टाेबर राेजी एकाच दिवशी दीड तासात‎घडल्या आहेत.‎ आर. सी. बाफना ज्वेलर्समध्ये २७ ऑक्टोबर‎रोजी सायंकाळी ५ वाजता हिरव्या रंगाचा‎पंजाबी ड्रेस परिधान केलेली, रंगाने गोरी आणि‎अंदाजे ५ फूट ६ इंच उंचीची एक महिला‎ग्राहकाच्या वेशात शिरली. या महिलेने‎सेल्समन गिरीश जैन यांच्याकडे १० ते १२ ग्रॅम‎वजनाच्या अंगठ्या मागितल्या. सेल्समनने‎अंगठ्यांचे दोन ट्रे दाखवले. तेव्हा महिला ही‎अंगठ्या बोटात घालून बघत होती. सेल्समन‎इतर डिझाइनचे ट्रे काढण्यासाठी खाली‎वाकल्यानंतर तिने आपल्या हातातील बनावट‎टॅग लावलेली (इमिटेशन/बँटेक्स) अंगठी‎ट्रेमध्ये ठेवली आणि त्या बदल्यात दोन‎सोन्याच्या (१०.२०० ग्रॅम आणि ८.१८० ग्रॅम)‎अंगठ्या घेऊन पळ काढला. या दोन‎अंगठ्यांची किंमत १ लाख ८५ हजार रुपये‎आहे. ४ नोव्हेंबर रोजी जैन यांना ट्रे मधील‎अंगठी बनावट असल्याचे लक्षात येताच त्यांनी मॅनेजर गणेश काळे‎यांना सांगितले. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे‎तपासल्यावर संपूर्ण प्रकार समोर आला. २७‎रोजी बाफना ज्वेलर्समध्ये चोरी केल्यानंतर‎महिलेने आपला मोर्चा भंगाळे गोल्ड‎ज्वेलर्सकडे वळवला. शोरूमबाहेर पडलेले‎टॅग उचलून त्या महिलेने बनावट अंगठीला‎लावला. त्यानंतर सायंकाळी ५:३० वाजता‎मैत्रिणीला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने‎सेल्समनला अंगठी मागितली. त्यानंतर‎लगेच महिलेने हातचलाखी करत १ लाख‎४५ हजार रुपये किमतीची (१३.५४० ग्रॅम)‎एक सोन्याची अंगठी चोरी केली. नंतर‎तेथून सायंकाळी ६.३० वाजता पु. ना.‎गाडगीळ शाेरूम येथे चोरी केली.‎ स्टॉक तपासणीत शंका आल्यानंतर चोरी उघड‎ १. या एकाच दिवशी झालेल्या चोऱ्यांचा‎तपास लागण्याची प्रक्रिया अत्यंत रंजक‎आहे. सर्वप्रथम शहरातील रिंगराेड येथील‎पु.ना. गाडगीळ शाेरूममध्ये स्टॉक तपासताना‎एक बनावट अंगठी आढळून आली. दरम्यान‎या शोरूममध्ये प्रत्येक दागिन्यांची स्टॉक‎माहिती तपासली जाते. बनावट अंगठी‎सापडताच त्यांनी तत्काळ जिल्हापेठ पाेलिस‎ठाण्यात तक्रार दाखल केली; मात्र याच‎महिलेने इतरत्रही चोरी केल्याचे तोपर्यंत‎समोर आले नव्हते.‎ २. घटनेच्या तीन ते चार दिवसांनंतर आर.‎सी. बाफना शोरूममध्ये ट्रेमधील स्टॉक‎तपासला गेला. दोन अंगठ्यांचे टॅग वेगळे‎दिसले. तसेच त्या बनावट अंगठ्यांचा‎स्टीलसारखा आवाज येत असल्याने शंका‎बळावली. त्यानंतर अंगठी बनावट असल्याचे‎समोर आले. एवढेच नव्हे तर तत्काळ‎सीसीटीव्ही तपासण्यात आले. फुटेजमध्ये‎हिरव्या पंजाबी ड्रेसमधील महिलेची अंगठी‎बदल करण्याची हातचलाखी स्पष्टपणे‎दिसली आणि संपूर्ण प्रकरण समोर आले.‎ ३. आर. सी. बाफना ज्वेलर्समध्ये चोरी उघड झाल्यावर शनिपेठ पोलिस स्टेशनला भंगाळे‎गोल्ड ज्वेलर्सचे व्यवस्थापक संतोष चव्हाण हेदेखील तक्रार देण्यासाठी आले होते. त्यांच्या‎दुकानातील स्टॉक तपासत असतानाही अंगठी बनावट असल्याचे लक्षात आले. अंगठीला‎टॅग लावल्यामुळे सुरुवातील शंका आली नाही; मात्र हातात अंगठी घेतल्यावर ती बनावट‎असल्याचे स्पष्ट झाले. तिन्ही दुकानामधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर‎तिन्ही दुकानांमध्ये अंगठी चोरी करणारी महिला एकच असल्याचे सिद्ध झाले.‎ आणखी एका माेठ्या शोरूममध्ये साेने चोरीचा केला प्रयत्न‎ शहरातील तीन शोरूममध्ये अंगठ्या‎लांबवल्यानंतर चोरट्या महिलेने‎शहरातील आणखी एका दागिन्यांच्या‎शोरूममध्ये अंगठी चोरण्याचा प्रयत्न‎केला. मात्र त्या ठिकाणी महिलेला यश‎आले नाही. बाफना ज्वेलर्स व भंगाळे‎गाेल्ड येथील चाेरी प्रकरणी मंगळवारी‎शनिपेठ पोलिसांत फिर्याद देण्यात‎आली आहे. तर पु. ना. गाडगीळ अॅन्ड‎सन्स शाेरूममधील चाेरीप्रकरणी १‎नाेव्हेंबर राेजी जिल्हापेठ पाेलिस‎ठाण्यात गुन्हा दाखल आहे.‎

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 7:24 am

निवडणुकीचे पडघम:गेल्या 10 वर्षांत मनपा हद्दीत 3 लाखांवर नवे मतदार, प्रभागांमुळे उमेदवार निवडताना राजकीय पक्षांचा कस

मुदत संपल्यानंतर ५ वर्षांनी छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर दशकभरात शहराची लोकसंख्या आणि मतदारसंख्या दोन्ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील निवडणुकीत ७ लाख १९ हजार ०४३ मतदार होते, तर या वेळी ही संख्या ११ लाखांच्या आसपास पोहोचली आहे. वाढलेले मतदार आणि प्रथमच प्रभाग पद्धतीमुळे होत असलेल्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण घुसळून निघेल. प्रभागात विजयासाठी राजकीय पक्षांना दांडगा लोकसंपर्क असलेले उमेदवार रिंगणात उतरावे लागणार आहेत. त्यासाठी राजकीय पक्षांचा कस लागणार आहे. राज्य शासन आणि निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर प्रभागरचना अंतिम करण्यात आली आहे. शहरात २९ प्रभागांतून ११५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. यात २८ प्रभाग ४ नगरसेवकांचे, तर १ प्रभाग ३ नगरसेवकांचा असेल. प्रत्येक प्रभागाची सरासरी लोकसंख्या ३८ ते ४० हजार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्यांची विधानसभा मतदारसंघनिहाय विभागणी करण्यात आली असून १४ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. मूळ नियोजन ६ नोव्हेंबरचे होते, पण आयोगाच्या आदेशानुसार तारीख पुढे ढकलली आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांतील राखीव जागांचे चित्र असे दिसेल प्रवर्ग एकूण जागा महिला राखीव राखीव जागांचा तपशीलअनुसूचित जाती २२ ११ (महिला) जास्त लोकसंख्या असलेल्या २२ प्रभागांत आरक्षणअनुसूचित जमाती ०२ ०१ (महिला २ प्रभागांमध्ये आरक्षणइतर मागासवर्गीय ३१ १६ प्रत्येक प्रभागात १ व २ प्रभागांत २ नगरसेवकमहिला ५८ ०० प्रत्येक प्रभागात २ महिला नगरसेवक अनिवार्य महिलांसाठी ५० टक्के आरक्षण महानगरपालिकेत ५० टक्के महिला आरक्षण असेल. एकूण ११५ नगरसेवकांपैकी ५८ महिला नगरसेवक असतील. ३ किंवा ४ जागांच्या प्रभागात २ जागा महिलांसाठी राखीव असतील. निवडणुका जानेवारीनंतर होण्याची शक्यता आयोगाच्या वेळापत्रकानुसार सर्वप्रथम नगरपालिकांची निवडणूक होईल. मनपाच्या मतदार याद्या अंतिम होण्यास डिसेंबर महिना उजाडेल. त्यानंतर हिवाळी अधिवेशन, पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडतील त्यामुळे मनपा निवडणुका जानेवारीपूर्वी होण्याची शक्यता कमी आहे. संपूर्ण प्रक्रिया फेब्रुवारीपर्यंत जाऊ शकते, त्या वेळी शालेय परीक्षा सुरू असल्याने निवडणुकांना उशीर होऊ शकतो. वेळापत्रकानुसार कामकाज निवडणूक आयोग आणि शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार सर्व कामकाज सुरू आहे. आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसारच पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल. - जी. श्रीकांत, मनपा आयुक्त ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नाही २०२५ च्या शासन नियमांनुसार कोणत्याही प्रभागात ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण राहणार नाही. आरक्षण चक्रानुक्रमे फेरवाटपाच्या पद्धतीने केले जाईल. १० वर्षांत वाढलेले मतदार, बदललेली प्रभागरचना आणि नव्या आरक्षण पद्धतीमुळे यंदाची मनपा निवडणूक नवे मतदार, नवे संतुलन आणि नवी राजकीय दिशा ठरवणारी असेल. निवडणुकीसाठी ७ हजार कर्मचारी मनपा निवडणुकीसाठी सुमारे ७ हजार कर्मचारी लागणार आहेत. शहरात १,२०० ते १,३०० मतदान केंद्रे राहतील आणि प्रत्येक केंद्रावर किमान ६ कर्मचारी नियुक्त केले जातील. सोमवारी आरक्षण सोडत राज्य शासनाच्या २० मे २०२५ च्या नव्या नियमांनुसार आरक्षणाचे फेरवाटप होणार आहे. १० नोव्हेंबर रोजी (सोमवार) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आरक्षण सोडत काढण्याचे नियोजन असून त्यानंतर ११ नोव्हेंबरला आयोगाकडे अहवाल सादर केला जाईल. आरक्षणासाठी २०११ ची जनगणना ग्राह्य धरली आहे. त्यानुसार शहराची एकूण लोकसंख्या १२ लाख २८ हजार ०३२ असून त्यात अनुसूचित जातीची २ लाख ३८ हजार १०५, तर अनुसूचित जमातीची १६ हजार ३२० लोकसंख्या आहे.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 7:11 am

पिंपरखेडला नरभक्षक बिबट्याचा अखेर 2 शार्प शूटरनी केला खात्मा:2022 मध्येही वन विभागाने करमाळ्यात मारला होता बिबट्या

पिंपरखेड आणि परिसरात गेल्या २० दिवसांत तीन जणांचे जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला वन विभागाच्या शार्प शूटरनी बुधवारी पहाटे ठार केले. या बिबट्याने पाच वर्षांची शिवन्या बोंबे, ८२ वर्षांच्या भागुबाई जाधव आणि १३ वर्षांचा रोहन बोंबे यांचे बळी घेतल्यावर संतप्त ग्रामस्थांनी पंचतळे आणि मंचर येथे महामार्ग रोखला होता. त्याची दखल घेऊन वनसंरक्षक आशिष ठाकरेंनी मुख्य वन्यजीव रक्षक नागपूर यांची परवानगी घेतली. त्यानंतर पुण्याच्या रेस्क्यू संस्थेचे डॉ. सात्त्विक पाठक (पशुचिकित्सक), शार्प शूटर डॉ. जुबीन पोस्टवाला, डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी सलग २४ तासांच्या थरारक मोहिमेनंतर या बिबट्याला ठार केले. यापूर्वी २०२२ मध्येही वन विभागाने करमाळा येथे बिबट्या मारला होता. या नर बिबट्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्षे आहे. त्याचे शव ग्रामस्थांना दाखवून नंतर माणिकडोह येथील निवारा केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. तत्पूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा जीव गेल्यानंतर जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील लोकांकडून तीव्र आंदोलने केली गेली. वन विभागाचे वाहनही जाळण्यात अाले. पिंपरखेड गावची प्रस्थापित परिस्थिती पाहून मानव जीविताच्या संरक्षणासाठी ठराविक बिबट्याला ठार मारण्याचा आदेश देण्यात आला असल्याचे नागपूरचे मुख्य वन्यजीवरक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास रेड्डी यांनी पत्राद्वारे म्हटले हाेते. नागपूरहून परवानगी आल्यानंतर मोहीम सुरू या नर बिबट्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्षे आहे. त्याचे शव ग्रामस्थांना दाखवून नंतर माणिकडोह येथील निवारा केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. तत्पूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा जीव गेल्यानंतर जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील लोकांकडून तीव्र आंदोलने केली गेली. वन विभागाचे वाहनही जाळण्यात अाले. पिंपरखेड गावची प्रस्थापित परिस्थिती पाहून मानव जीविताच्या संरक्षणासाठी ठराविक बिबट्याला ठार मारण्याचा आदेश देण्यात आला असल्याचे नागपूरचे मुख्य वन्यजीवरक्षक व प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास रेड्डी यांनी पत्राद्वारे म्हटले हाेते.आदेश प्राप्त होताच हालचाली करण्यात आल्या. शार्प शूटर्सनी बिबट्याचा पाठलाग सुरू केला. २४ तासांच्या शोधानंतर नरभक्षक नजरेच्या टप्प्यात आला. प्रतिहल्ला करताच १२ बोअरच्या बंदुकीने त्याला गोळ्या घालण्यात आल्या. २३ वर्षांत ठार केलेला चौथा नरभक्षक बिबट्या २००२ मध्ये पुण्यातील तळेगाव दाभाडे रोडवर, २०१८ मध्ये चाळीसगाव तर २०२२ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे बिबट्याला गोळ्या घालण्यात आल्या. पुण्याच्या पथकाने मंगळवारी दिवसभर कॅमेरा ट्रॅप लावून ठसे तपासले. मंगळवारी रात्री तीन थर्मल ड्रोनना तो घटनास्थळापासून ४००-५०० मीटरवर दिसला होता.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 6:55 am

सोलापुरात लँडिंगवेळी विमानाच्या पंखामध्ये अडकला पतंगाचा दोरा:पायलटच्या प्रसंगावधानाने 34 प्रवाशांचा जीव वाचला, युवक पोलिसांच्या ताब्यात

मुंबई-सोलापूरची विमानसेवा आठवड्यातून चार दिवस सुरू आहे. बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास स्टार एअरचे विमान मुंबईहून आले. नई जिंदगी वस्तीच्या बाजूने विमानतळावर लँडिंग करताना विमानाच्या विंगमध्ये (पंख) पतंगाचा दोरा अडकला. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत सुरळीतपणे विमानाचे लँडिंग केल्याने मुंबईहून आलेल्या तब्बल ३४ प्रवाशांचा जीव वाचला. विमानतळ प्रशासनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नई जिंदगी परिसरातून पतंग उडवणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले. सोलापूर विमानतळावर नई जिंदगीकडील बाजूने सर्वच विमानांचे लँडिंग होते. तर सिद्धेश्वर साखर कारखान्याकडील बाजूने टेकऑफ होते. बुधवारी दुपारी नई जिंदगी भागात काही जण पतंग उडवत होते. त्याचवेळी विमान लँडिंग करत असताना पतंगाचा दोरा विमानाच्या विंगमध्ये अडकला. ही बाब वैमानिकाच्या लक्षात आली. अचानक निर्माण झालेल्या समस्येवेळी न घाबरता किंवा गोंधळून न जाता वैमानिकाने सुरळीतपणे लँडिंग केल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. बंदी असलेल्या नायलाॅन मांजाची नई जिंदगी परिसरात विक्री करणारा बिलाल इब्राहिम शेख ( ३४, रा.आनंद नगर १, मजरेवाडी) याच्याविराेधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बिलाल शेखचे या भागात फारुख किराणा दुकान आहे. त्याच्या दुकानामध्ये नायलॉन मांजाची सर्रास विक्री हाेत आहे. विमानतळ परिसरात पतंग उडवणाऱ्यांची वाढती संख्या व त्यामुळे विमान दुर्घटनेची शक्यता निर्माण झाल्यानंतर पाेलिसांनी ही कारवाई केली. त्याच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. मोठा अनर्थ टळला दरम्यान, स्टार एअरच्या विमानाच्या विंगमध्ये लँडिंगवेळी पतंगाचा दोरा अडकल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. हा दोरा इंजिनमध्ये अडकला असता तर मोठी घटना घडली असती. असे सोलापूर विमानतळाच्या व्यवस्थापक अंजनी शर्मा यांनी सांगितले. दिल्लीत एअर इंडियाच्या सर्व्हरमध्ये बिघाड नवी दिल्ली |एअर इंडियाच्या सर्व्हरमध्ये दुपारी अचानक बिघाड झाला. त्यामुळे दिल्ली विमानतळावर बोर्डिंग करणाऱ्या प्रवाशांच्या रांगा लागल्या. अनेक प्रवाशांचे विमानही हुकले. एअरलाइन्सने किती विमानतळावर याचा फटका बसला याची माहिती दिली नाही. परंतु अनेक देशांतर्गत विमानतळावरील चेक इन प्रणाली सुमारे तासभर ठप्प झाली होती.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 6:51 am

ऑक्टोबरमधील अतिवृष्टीने 12 जिल्ह्यांत 1.19 लाख हेक्टरवर खरीप पीक उद्ध्वस्त:परभणी, बुलडाणा, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगावात नुकसान

राज्यात सप्टेंबर २०२५ महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुराने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले असतानाच, ऑक्टोबर महिन्यातही झालेल्या अतिवृष्टीमुळे परभणी, बुलडाणा, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे या १२ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, सुमारे १,११,१९९ हेक्टर (२,९७,९९७.५ एकर) क्षेत्रावरील प्रामुख्याने खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. सप्टेंबरमध्ये पंचनाम्याच्या अहवालानुसार ३४ जिल्ह्यांत नुकसान सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीत ३४ जिल्ह्यांत ६८ लाख १३ हजार २३२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून एकूण ८३ लाख १२ हजार ९७० शेतकरी बाधित झाले आहेत. १ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर कालावधीत ७९ तालुक्यांना फटका भात, नाचणी, वरई, कापूस, सोयाबीन, कांदा, मका, कडधान्य, ऊस, तूर, केळी, ज्वारी, मिरची, भुईमूग, भाजीपाला व फळपिके यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ६० लाख शेतकऱ्यांना ३१ हजार ६२८ कोटी जून ते सप्टेंबरमधील खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत १२ हजार १८७ कोटी ८४ लाख १५ हजार रुपयांच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात शेतजमिनीच्या नुकसानीसाठी १५७ कोटी ९२ लाख २६ हजार निधी मंजूर करण्यात आला आहे. ६० लाख शेतकऱ्यांना ३१ हजार ६२८ कोटी रुपयांची विशेष मदत जाहीर करण्यात आली आहे. डीबीटी पोर्टलद्वारे निधी वितरणाचे काम सुरू आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले राज्यामध्ये १२ हजार १८७ कोटींच्या निधी वितरणास दिली मान्यता बीड ६,३२,५४९ हे.अहिल्यानगर ५,७६,८७९ हे.संभाजीनगर ५,०८,६८८ हे.सोलापूर ४,२९,०६१ हे.जालना ३,८०,९३४ हे.बुलडाणा३,३३,६९४ हे.यवतमाळ२,९९,१३१ हेनाशिक२,७९,२२० हे.धाराशिव २,५३,४३५ हे.परभणी२,१०,३१४ हे.लातूर२,०३,९६६ हे.जळगाव१,७६,९७१ हे. सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेडसाठी १६५६ कोटी ३० लाख तर छत्रपती संभाजीनगर, जालना, वर्धा या विभागासाठी ९१३ कोटी ४१ लाख मदत निधी मंजूर नाशिक ४८,३२४ हेक्टरधुळे ४८,२८० हेक्टरठाणे १४,४६२ हेक्टररायगड २८०८ हेक्टरपालघर१३९२ हेक्टररत्नागिरी ३५५ हेक्टरसिंधुदुर्ग १२७१ हेक्टरजळगाव ९१३ हेक्टरनंदुरबार ८३२ हेक्टरपुणे ३५० हेक्टरपरभणी २०२ हेक्टरबुलडाणा ०८ हेक्टर

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 6:45 am

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ऊस कांड्या फेकण्याचा प्रयत्न:कोल्हापुरात आंदोलन चिघळले; पोलिसांची उडाली धावपळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर बुधवारी कोल्हापुरात उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न झाला. यामुळे कोल्हापुरातील ऊस दराचे आंदोलन अधिकच चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ८ कारखान्यांनी मागील हंगामाची एफआरपी थकवल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला होता. तसेच या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले असता ही घटना घडली. काही अज्ञात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या रस्त्याने जाणाऱ्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उसाच्या कांड्यांनी भरलेली पोती रस्त्यावर टाकून आपला निषेध नोंदवला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांची धावपळ उडाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन उसाच्या कांड्या बाजूला केल्या. ऊस आंदोलन चिघळण्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून ऊस दराच्या मुद्द्यावरून कारखानदार, शेतकरी संघटना व प्रशासन यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर उसाच्या कांड्या फेकण्याचा प्रयत्न झाल्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घटनेमुळे काही काळ पुणे - बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे ही घटना ज्या ठिकाणी घडली तिथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. पण शेतकऱ्यांनी त्यांना कोणताही थांगपत्ता लागू न देता आपले काम फत्ते केले.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 6:41 am

न्यायमंदिर’ हवे, पंचतारांकित हॉटेल नव्हे- गवई:मुंबई उच्च न्यायालयाच्या भव्य डिझाइनवर स्पष्ट भूमिका

मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कोनशिला समारंभात बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी वास्तूची भव्यता आणि लोकशाही मूल्यांच्या सुसंगततेवर भर दिला. सरन्यायाधीश म्हणाले, “मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की, न्यायाधीश आता सरंजामदार नाहीत. न्यायाधीश, मग ते ट्रायल कोर्टाचे असोत, उच्च न्यायालयाचे असोत की सर्वोच्च न्यायालयाचे असोत, ते सर्व किंबहुना आपल्या सर्व संस्था - न्यायपालिका, विधिमंडळ, कार्यपालिका या देशाच्या शेवटच्या नागरिकाची सेवा करण्यासाठी, समाजाला न्याय देण्यासाठी संविधानानुसार काम करतात. आणि म्हणूनच इमारतीची भव्यता आणि आयकॉनिक रचना टिकवून ठेवताना त्यात कोणताही अवास्तवपणा नाही याची खात्री केली पाहिजे. कारण ते अंतिमतः न्यायाचे मंदिर आहे, पंचतारांकित हॉटेल नाही. त्यांनी आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर आणि समितीला डिझाइनचे पुनरावलोकन करण्याची स्पष्ट विनंती केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेचा पुनरुच्चार करत गवई म्हणाले की, इमारतीने शाही संरचनेचे प्रतीक न बनता संविधानाने जपलेल्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत असावे. केवळ न्यायाधीशांच्या गरजांवर लक्ष केंद्रित न करता अलाहाबाद किंवा औरंगाबाद खंडपीठाप्रमाणे इमारतीचा मोठा भाग रिकामा राहू नये याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले. नवीन इमारतीचे कामही ठरलेल्या वेळेत होणार : फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला जुने हायकोर्ट कसे बांधले गेले याची आठवण करून दिली. ते म्हणाले की, ती इमारत आवंटित केलेल्या खर्चापेक्षा कमी रकमेत बांधली गेली होती. त्याचप्रमाणे नवीन इमारतीचे कामही ठरलेल्या वेळेत आणि निश्चित केलेल्या बजेटमध्येच पूर्ण करावे, अशी सूचना त्यांनी केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या प्रकल्पासाठी पूर्वीच्या ३७५० कोटी रुपयांच्या तुलनेत ४१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मुंबईच्या वैभवात भर घालणारी ही नवीन वास्तू ५० लाख स्क्वेअर फुटांची असेल. ही वास्तू अतिशय दर्जेदार असेल.

दिव्यमराठी भास्कर 6 Nov 2025 6:40 am

इंदूरीकर महाराजांच्या लेकीच्या राजेशाही साखरपुड्यावरून टीका

मुंबई : राज्यातील प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रभोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे आपल्या आगळ्यावेगळ्या किर्तन शैलीमुळे चर्चेत असतात. किर्तनांच्या माध्यमातून इंदुरीकर महाराज समाजात जनजागृतीचे काम करतात. शेतक-यांची स्थिती, लग्न, घरात होणारी सासू-सुनेचे भांडणे या प्रश्नांवर ते आपले परखड मत मांडत असतात. अलिकडेच इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला. यावरून डब्बेवाला संघटनेने इंदुरीकर […] The post इंदूरीकर महाराजांच्या लेकीच्या राजेशाही साखरपुड्यावरून टीका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 5 Nov 2025 11:59 pm

तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ

गडचिरोली : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (माओवादी) तेलंगणा राज्य समितीने युद्धबंदीला आणखी सहा महिन्यांसाठी वाढविण्याची घोषणा ५ नोव्हेंबरला केली आहे. मागील सहा महिन्यांपासून राज्यात प्रशासन, राजकीय पक्ष, तसेच सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शांततेचे वातावरण निर्माण झाले असल्याने हा निर्णय घेतल्याचे माओवाद्यांच्या तेलंगणा समितीचा प्रतिनिधी जगन याने तेलुगुतून जारी केलेल्या पत्रकात नमूद केले आहे. एप्रिल ते जूनदरम्यान राज्यातील […] The post तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 5 Nov 2025 11:50 pm

मंत्री शेलारविरोधात नितीन राऊत यांची पोलिसात तक्रार

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व मंत्री आशिष शेलार यांच्या सांप्रदायिक वक्तव्यावरून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमदार डॉ. नितीन राऊत यांनी नागपूर येथील जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शेलार यांनी रविवार रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर नागपूरमधील मुस्लीम मतदारांविषयी केलेल्या विधानावरून डॉ. राऊत आज जास्तच आक्रमक दिसून आलेत. डॉ. राऊत यांनी […] The post मंत्री शेलारविरोधात नितीन राऊत यांची पोलिसात तक्रार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 5 Nov 2025 11:48 pm

६६ बोगस घरकुल लाभार्थ्यांकडून वसुली

लातूर : योगिराज पिसाळ लातूर जिल्हयातील भटक्या विमुक्तांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून घरकुलाचा लाभ देताना प्रत्येक कागदपत्राची बारकाईने, कसून तपासणी होते. तर दुसरीकडे याच योजनेतून अहमदपूर व जळकोट तालुक्यात ६६ बोगस लाभार्थी तयार करून बिनधास्तपणे त्यांच्या खात्यावर ७९ लाख २० हजार रूपये वर्ग होतात. सदर प्रकरणाची कुणकुण लागताच या ६६ बोगस घरकूल लाभार्थ्यांकडून ७९ […] The post ६६ बोगस घरकुल लाभार्थ्यांकडून वसुली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 5 Nov 2025 11:35 pm

ट्रॅक्टरच्या धडकेत नळगीर येथील २ तरुण ठार

उदगीर : प्रतिनिधी तालुक्यातील मोर्तळवाडी (नळगीर) गावाजवळ मंगळवार दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दुचाकी व ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार चालक युवक जागीच ठार झाला आहे. तर दुचाकीवरील दुसरा युवक गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी लातूरला पाठविण्यात आले होते. लातूरला पोहोचताच त्याचाही रात्री पावणे दहा वाजता मृत्यू झाला. या दोघाच्या मृतदेहावर बुधवारी नळगीर येथे […] The post ट्रॅक्टरच्या धडकेत नळगीर येथील २ तरुण ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 5 Nov 2025 11:33 pm

बाप-लेकाच्या खुनातील आरोपी अटकेत

अहमदपूर : प्रतिनिधी तालुक्यातील रुद्धा येथील शेत शिवारात दि. ३ नोव्हेंबरच्या रात्री स्वत:च्या आखाड्यावर झोपण्यासाठी गेलेल्या बाप-लेकावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून दुर्दैवी निर्घृन खून केलेल्या प्रकरणातील दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास अवघ्या बारा तासात उलगडला आहे. यातील दोन आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश […] The post बाप-लेकाच्या खुनातील आरोपी अटकेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 5 Nov 2025 11:33 pm

बापूसाहेब पाटील विद्यालयाने डॉक्टर, इंजिनियर घडविले

चाकूर : प्रतिनिधी विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, ग्रामीण भागातील वडवळच्या कै. बापूसाहेब पाटील विद्यालयात उच्चशिक्षीत शिक्षकवृंद असल्यानेच शाळेने सेवकापासून, शिक्षक, पोलीस, अधिकारी, डॉक्टर, इंजिनीयर घडवले असल्याचे प्रतिपादन माजी उपसरपंच विश्वासराव पाटील यांनी माजी विद्यार्थ्यांच्या स्रेह मेळाव्यात बोलताना केले. तालुक्यातील वडवळ ना. येथील कै. बापूसाहेब पाटील विद्यालयाच्या प्रांगणात शुभांगी बेरकिळे – राघो […] The post बापूसाहेब पाटील विद्यालयाने डॉक्टर, इंजिनियर घडविले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 5 Nov 2025 11:31 pm