सोप्या रक्तचाचणीने फुफ्फुसाच्या कॅन्सरचे निदान
लंडन : वृत्तसंस्था फुफ्फुसांचा कर्करोग हा जगभरातील कर्करोगाच्या सर्वांत सामान्य प्रकारांपैकी एक असून, तो मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे. २०२२ च्या आकडेवारीनुसार सुमारे २५ लाख लोकांना या आजाराचे निदान झाले आणि १८ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आता ब्रिटनमधील संशोधकांच्या एका पथकाने रक्ताच्या चाचणीचे एक नवीन तंत्र विकसित केले आहे. यामुळे रिअल टाईममध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाचे […] The post सोप्या रक्तचाचणीने फुफ्फुसाच्या कॅन्सरचे निदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिक पोलिसांची टीम लीलावती रुग्णालयात, तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा आता मंत्रिपदाचाही राजीनामा स्वीकारला मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांची १३ जणांची टीम रात्री मुंबईत दाखल झाली. नाशिक पोलिसांचे पथक प्रथम वांद्रे पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर हे पथक लीलावती रुग्णालयात दाखल झाले. तेथे कोकाटे यांच्या अटकेची […] The post कोकाटे यांना अटक होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
१६८ ऑटो रिक्षांवर केसेस; १ लाख ३२ हजारांचा दंड
लातूर : प्रतिनिधी लातूर शहरातील वाहनांना शिस्त लावण्यासाठी बुलेट सायलन्स (इंदौरी फटका) तसेच मोटार सायकल वाहनावर ट्रिपल सिट प्रवास करणारे वाहन व अॅटोरिक्षाचालकाविरूध्द ई-चलान मशिनद्वारे दंडात्मक कारवाई बाबत विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत३ १६८ ऑटोरिक्षाचालकावर केसेस करण्यात आल्या असुन १ लाख ३२ हजार ७००रुपये दंड आकारण्यात आला आहे. यावावत अधिक माहिती अशी की, […] The post १६८ ऑटो रिक्षांवर केसेस; १ लाख ३२ हजारांचा दंड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेसकडून इच्छुकांचा मुलाखतींना उदंड प्रतिसाद
लातूर : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाकडून नुकताच राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर लातूर शहर काँग्रेस कमिटीने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार लातुर मनपा निवडणुकीकरिता दि. १७ व १८ डिसेंबर असे दोन दिवस काँग्रेस भवनात इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती अत्यंत उत्साही वातावरणात पार पडल्या ज्याला उदंड, […] The post काँग्रेसकडून इच्छुकांचा मुलाखतींना उदंड प्रतिसाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
यशवर्धन धोंडगेने जिंकले तब्बल २ लाख रुपये रोख बक्षीस
लातूर : प्रतिनिधी नुकतेच गिटहब या संकेतस्थळातर्फ आयोजित हॅकेथॉन स्पर्धत एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक शास्त्र विभागाच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी यशवर्धन धोंडगेने प्रथम व तृतिय पारितोषिक पटकावत तब्बल अनुक्रमे १ लाख ५० हजार व ५० हजार रुपये रोख पारितोषिक जिंकले आहे. ही स्पर्धा प्रोग्रामींग लँग्वेज वापरून प्रोजेक्ट बनवण्याची होती. या स्पर्धेमध्ये इतर देशातील विद्यार्थी […] The post यशवर्धन धोंडगेने जिंकले तब्बल २ लाख रुपये रोख बक्षीस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्याकडून चाकूरकर कुटुंबीयांचे सांत्वन
लातूर : प्रतिनिधी देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांचे नुकतेच निधन झाले. विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी दि. १८ डिसेंबर रोजी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या ‘देवघर’ निवासस्थानी जाऊन चाकूरकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. ‘देवघर’ निवासस्थानी गेल्यानंतर श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रतिमेस पुष्प […] The post श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्याकडून चाकूरकर कुटुंबीयांचे सांत्वन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वेळा अमावस्या : मातीशी नाळ जोडणारा लोकोत्सव आज
लातूर : प्रतिनिधी लातूरच्या ‘वेळ अमावस्येला’ एक परंपरा आहे. हा केवळ एक सण नाही, तर हा मातीशी नाळ जोडणारा एक महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तावेज आहे. मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येला सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत संपूर्ण लातूर जिल्हा शेतात असतो, निसर्गाच्या ऋणाचा हा उत्सव मोठ्या उत्साहात येथे साजरा केला जातो. मातीशी नाळ जोडणारा हा लोकोत्सव आज दि. १९ डिसेंबर रोजी […] The post वेळा अमावस्या : मातीशी नाळ जोडणारा लोकोत्सव आज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नगराध्यक्ष पदासह २३ नगरसेवक पदांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा
निलंगा : प्रतिनिधी सत्ताधा-यांनी निलंगा शहराचा विकास करून जनतेची सोय करण्याऐवजी गैरसोय केली आहे. शहरातील प्रत्येक गल्लीबोळात गेल्यानंतर शहराची दयनीय अवस्था दिसते. काँग्रेस का हात आम आदमी के साथ असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा व गोरगरिबांसाठी लढणारा हा पक्ष आहे. जनतेची सेवा व सोय करण्यासाठी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख यांच्यासह २३ उमेदवारांना […] The post नगराध्यक्ष पदासह २३ नगरसेवक पदांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अचलपूर नगराध्यक्ष निकाल 20 फेऱ्यांनंतर:नांदगाव, धामणगाव, शेंदुरजनाघाटचे निकाल तिसऱ्या फेरीत स्पष्ट
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा निकाल २० व्या फेरीनंतर दुपारी ३ वाजेपर्यंत अपेक्षित आहे. याउलट, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे आणि शेंदुरजनाघाट येथील नगराध्यक्षांचे निकाल अवघ्या तीन फेऱ्यांमध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत स्पष्ट होतील. जिल्ह्यातील ९ नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी झाल्या होत्या, तर अंजनगाव सुर्जी नगरपालिकेची निवडणूक २० डिसेंबरला पार पडली. सर्व १२ नगरपालिका आणि नगरपंचायतींचे निकाल २१ डिसेंबर रोजी घोषित होणार आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. अचलपूर ही जिल्ह्यातील एकमेव 'अ' वर्ग नगरपालिका असून, येथे सर्वाधिक ३९ नगरसेवक आहेत. मतमोजणीचा क्रम नगरसेवक आधी आणि नगराध्यक्ष नंतर असा ठरवण्यात आला आहे. प्रत्येक फेरीअखेर दोन नगरसेवकांचा निकाल जाहीर होईल, ज्यामुळे २० व्या फेरीनंतर सर्व ३९ नगरसेवकांची घोषणा होईल आणि त्यानंतर नगराध्यक्षपदाचा निकाल स्पष्ट होईल. जिल्हा प्रशासनाच्या तयारीनुसार, चांदूर रेल्वेचा निकाल दुपारी २ च्या सुमारास ८ फेऱ्यांनंतर घोषित होईल. दर्यापूरमध्ये सातव्या फेरीअखेर, तर अंजनगाव सुर्जी आणि चांदूरबाजार येथे सहाव्या फेरीअखेर निकाल अपेक्षित आहे. धारणी व चिखलदरा येथे पाचव्या फेरीअखेर, तर मोर्शी व वरुड येथे चौथ्या फेरीअखेर नवे नगरसेवक आणि नगराध्यक्ष स्पष्ट होतील. मतमोजणीसाठी तीन ठिकाणी नगरपालिका कार्यालये आणि चार ठिकाणी तहसील कार्यालये निवडण्यात आली आहेत. नांदगाव खंडेश्वर येथील मतमोजणी शासकीय आयटीआयमध्ये होणार असून, अचलपूरची मतमोजणी कल्याण मंडपम येथे केली जाईल. चिखलदरा येथे मतमोजणीसाठी सर्वात कमी म्हणजे केवळ दोन टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाच्या संख्येनुसार ही व्यवस्था करण्यात आली असून, एका फेरीत दोन ईव्हीएममधील मतांची नोंदणी होईल. पाच फेऱ्यांनंतर येथील नगराध्यक्षांचा निकाल कळेल.
अमरावती जिल्ह्यात बालविवाह झाल्यास संबंधित सरपंचांना अपात्रतेची नोटीस दिली जाईल, तसेच पोलिस पाटलांचे नूतनीकरण थांबवण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी दिले आहेत. अमरावती जिल्ह्याला २०२६ अखेर बालविवाहमुक्त करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. यासाठी कायदेशीर आणि सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवर काम केले जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गेल्या वर्षभरात संबंधित विभागाने २६ बालविवाह उघडकीस आणले आहेत. यापैकी ४ प्रकरणांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे काही प्रमाणात धाक निर्माण झाला असला तरी, अजूनही काही घटना घडत आहेत. त्यामुळे कायद्याचे कठोर पालन करण्यासोबतच समाजाचे प्रबोधनही केले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग एकत्रितपणे प्रयत्न करणार आहेत. सरपंच आणि पोलीस पाटलांवर संभाव्य कारवाईचा बडगा ही त्यापैकीच एक महत्त्वाची उपाययोजना आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईओ बाळासाहेब बायस, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार आदी अधिकारी उपस्थित होते. दोन्ही अधिकाऱ्यांच्या मते, कमी वयात होणारे विवाह हे माता आणि बालमृत्यूंमागील प्रमुख कारण आहे. ते थांबवण्यासाठी शाळांमधील, विशेषतः आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची गळती रोखणे, कमी वयात होणारे विवाह थांबवणे आणि विवाहानंतर दोन अपत्यांमध्ये विशिष्ट अंतर राखण्यासाठी जोडप्यांचे समुपदेशन करणे या तीन मुख्य मुद्द्यांवर काम केले जाईल. सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांच्या मते, बालविवाहाचे प्रमाण आदिवासी आणि कोरकू बहुल मेळघाटात अधिक आहे. तेथे कमी वयात होणाऱ्या विवाहांना वर आणि वधू या दोन्ही कुटुंबांची मान्यता असते. अशा स्थितीत केवळ विरोधाने काही साध्य होणार नाही. मुलाचे वय २१ आणि मुलीचे वय १८ हेच विवाहासाठीचे किमान वय आहे, हे त्यांच्या मनात रुजल्याशिवाय ही प्रथा बंद होणार नाही. त्यासाठी समाजाचे मनोविश्व बदलवण्यासाठीचे प्रयत्न अधिक प्रभावी करावे लागतील.
मुंबई उच्च न्यायालयाने मेळघाटमध्ये माता आणि बालमृत्यू तसेच अंधश्रद्धेच्या घटना रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. न्यायालयाने राज्य सरकारला आठवडाभरात एक बालरोगतज्ज्ञ आणि एक प्रसुतीतज्ज्ञ मेळघाटमध्ये नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, 'खोज'चे ॲड. बंड्या साने आणि इतरांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना गुरुवारी हे आदेश देण्यात आले. न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. या याचिकेची पुढील सुनावणी १६ जानेवारी रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीदरम्यान, मुख्य सरकारी वकील भूषण सामंत यांनी राज्य शासनाच्या चार सचिवांनी मेळघाटला भेट देऊन तयार केलेला अहवाल न्यायालयासमोर सादर केला. या अहवालाची प्रत याचिकाकर्त्यांनाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अहवालावर काही मुद्दे मांडायचे असल्यास ते पुढील सुनावणीदरम्यान सादर करावेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. ॲड. बंड्या साने यांनी अनेक दिवसांपासून मेळघाटातील समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. मेळघाटातील परिस्थितीत सुधारणा न झाल्याने ॲड. साने, पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि 'महान'चे डॉ. आशीष सातव यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्या आहेत. न्यायालयाने या सर्व याचिका एकत्रितपणे सुनावणीसाठी घेतल्या आहेत. आजच्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. बंड्या साने, ज्येष्ठ विधीज्ञ जुगलकिशोर गिल्डा आणि भूषण माळगावकर यांनी युक्तिवाद केला. सरकारतर्फे आदिवासी विभागाचे प्रधान सचिव ऑनलाइन उपस्थित होते. या याचिकांच्या अनुषंगानेच, गेल्या पंधरवड्यात राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव, महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव, एकात्मिक बालविकास विभागाचे आयुक्त आणि आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी मेळघाटचा प्रत्यक्ष दौरा केला होता. त्यांनी गावोगावच्या आदिवासींची भेट घेऊन वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला, जो आज न्यायालयात सादर करण्यात आला.
अमरावती जिल्हा परिषदेचा सध्याचा बांधकाम विभाग जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांचा व्याप सांभाळण्यास अपुरा पडत आहे. विशेषतः, दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील कामांची प्रत्यक्ष पाहणी करताना अधिकाऱ्यांना अनेक अडचणी येतात. त्यामुळे या विभागाचे विभाजन करून मेळघाटसाठी स्वतंत्र दुसरे बांधकाम कार्यालय (डिव्हीजन) निर्माण करण्याच्या प्रस्तावाने आता वेग घेतला आहे. हा प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून शासन दरबारी प्रलंबित होता. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर या प्रस्तावाला नव्याने गती मिळाली आहे. जिल्हा परिषदेने ६ डिसेंबर २०२२ पासून शासनाशी यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू केला आहे. शासनाने वेळोवेळी सुचवलेल्या सुधारणा करून, १२ जून २०२३ आणि २६ सप्टेंबर २०२३ रोजी सुधारित प्रस्ताव पाठवण्यात आले. याच काळात २४ मे २०२३, २४ सप्टेंबर २०२३ आणि ३० सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाचा सक्रिय पाठपुरावा करण्याचे निर्देश दिल्याने, आता अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. या प्रस्तावाची माहिती राज्याचे अवर सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुंबई, जिल्हाधिकारी अमरावती तसेच पालकमंत्र्यांच्या कार्यालयालाही पाठवण्यात आली आहे. जिल्ह्यात तब्बल ७४२९ किलोमीटर लांबीचे ग्रामीण रस्ते आहेत, ज्यासाठी सात उपविभाग तयार करण्यात आले आहेत. मात्र, एवढा मोठा व्याप केवळ एका कार्यकारी अभियंत्यांना नियंत्रित करावा लागतो. रस्ते, इमारती आणि जुन्या इमारतींची डागडुजी यांसारखी मोठ्या प्रमाणावर विकासकामेही त्यांना सांभाळावी लागतात. सध्या केवळ एकच डिव्हीजन असल्याने कामकाज विस्कळीत झाल्याची स्थिती आहे. तांत्रिक तपासण्या, नवीन कामांचे नियोजन आणि रस्ते-इमारतींची देखभाल असे सर्व ओझे एकाच डिव्हीजनवर आहे, ज्यामुळे विकासाच्या गतीवर मर्यादा येत आहेत. नव्या डिव्हीजनमध्ये धारणी, चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर आणि चांदुर बाजार या सहा तालुक्यांचा समावेश असेल. या तालुक्यांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ग्रामीण विकास, रस्ते-सुधारणा आणि पायाभूत सुविधांची कामे होत असल्याने, स्वतंत्र डिव्हीजनमुळे अंमलबजावणीची गती वाढेल आणि तांत्रिक कामकाज अधिक सक्षम होईल. यामुळे कामाची गुणवत्ताही सुधारेल, ज्याचा थेट फायदा नागरिकांना मिळेल.
जिल्हा परिषदेच्या सालोरा येथील पूर्व माध्यमिक शाळेला भेट दिल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी काही काळासाठी शिक्षिकेची भूमिका बजावली. यावेळी प्रश्नोत्तरांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट सहभाग पाहून त्या अत्यंत आनंदी झाल्या. तिवसा तालुक्यातील सालोरा शाळेचे शैक्षणिक व सहशैक्षणिक कामकाज, शिस्तबद्ध वातावरण तसेच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त व आत्मविश्वासपूर्ण प्रतिसाद पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी अत्यंत प्रभावित झाल्या. शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच कौशल्य, सर्जनशीलता आणि मूल्याधारित शिक्षणाची जोपासना होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले उपक्रम, प्रश्नोत्तरांमधील त्यांचा सहभाग, स्वच्छ व नीटनेटका शाळा परिसर, शिक्षकांचे नियोजनबद्ध अध्यापन व व्यवस्थापन यामुळे शाळेची गुणवत्ता अधोरेखित झाली. यावेळी तिवसा येथील गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे, सहायक गटविकास अधिकारी नारायण आमझरे, गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे, विस्तार अधिकारी राठोड व उलेमाल उपस्थित होते. सालोरा बुद्रुक शाळेचा हा गौरव संपूर्ण शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत डॉ. नितीन उंडे यांनी व्यक्त केले. या भेटीदरम्यान सीईओ संजीता महापात्र यांनी विद्यार्थ्यांसोबत भोजनही केले. शिक्षकवृंदाची मेहनत, विद्यार्थ्यांशी असलेले आपुलकीचे नाते व पालकांचा सकारात्मक सहभाग यामुळेच शाळेने ही उंची गाठली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सीईओंनी शाळेच्या कार्याचे मनापासून कौतुक करून विद्यार्थ्यांना पुस्तके व शालेय उपयोगी वस्तू भेट दिल्या. तसेच भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; श्रमप्रधान क्षेत्राला चालना
मस्कत : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक अल सईद यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांवर सविस्तर चर्चा केली. या भेटीदरम्यान भारत आणि ओमान यांच्यात मुक्त व्यापार करार करण्यात आला. या ऐतिहासिक प्रसंगी, द्विपक्षीय संबंध दृढ करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल ओमान सरकारकडून पंतप्रधान मोदींना ‘ऑर्डर ऑफ ओमान’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात […] The post भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; श्रमप्रधान क्षेत्राला चालना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात भाजपचा महापौर होईल, असेही ते म्हणाले. २१ डिसेंबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि काँग्रेसचे फारसे अस्तित्व राहणार नाही, असे मत त्यांनी मांडले. महायुतीतील घटक पक्ष म्हणून शिवसेना आणि भाजप २९ महानगरपालिकांमध्ये एकत्रित निवडणूक लढवतील. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत येईल, तिथे एकत्रितपणे लढू, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार वेगळे असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका आहे. त्यामुळे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढाई होईल, असे संकेत त्यांनी दिले. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र सर्वजण एकत्रितपणे निवडणूक लढवतील. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्या पक्षात कोणाला घ्यायचे किंवा नाही, हे ठरवण्याचा अधिकार आहे. महायुतीतील पक्षांनी राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. युतीमधील पक्षांचे नेते एकमेकांच्या पक्षात घेणार नाहीत, असा कोणताही निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी नमूद केले. सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, माणिकराव कोकाटे यांची केस जुनी आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्याने त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांनी या सरकारमध्ये कोणताही भ्रष्टाचार केला नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मुंढवा येथील जमीन प्रकरणात सरकार कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. आरोपी शीतल तेजवानी हिला १२ दिवसांची पोलिस कोठडी मिळाली असून, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तपासानंतर आणखी आरोपी निष्पन्न होतील आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. या प्रकरणात बुडवलेली स्टॅम्प ड्युटी संबंधित व्यक्तींना नियमानुसार जमा करावी लागेल. तहसीलदार सूर्यकांत येवले यांना केवळ निलंबित केले नसून, त्यांना सेवेतून बडतर्फ का करू नये, याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सरकारी सेवक भ्रष्ट आढळल्यास आणि शासकीय जमीन दुसऱ्याच्या घशात घालण्याचा प्रयत्न केल्यास सरकार त्यांना सोडणार नाही, असेही बावनकुळे यांनी ठामपणे सांगितले. राज्य सरकार पारदर्शकपणे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.
अणुऊर्जा क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले होणार! १०० गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे ध्येय
नवी दिल्ली : प्रतिनिधी अणुऊर्जा क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले करणारे अणुऊर्जा विधेयक (शांती विधेयक) तपासणीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी विरोधकांनी लोकसभेत बुधवारी केली होती, तर सत्ताधारी एनडीए आघाडीतील सदस्यांनी या विधेयकाला संपूर्ण पाठिंबा दिला. या विषयावरील सविस्तर चर्चेनंतर अणुऊर्जा विधेयक अखेर लोकसभेने मंजूर केले. अणुऊर्जा विभागाची जबाबदारी असलेले पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी […] The post अणुऊर्जा क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले होणार! १०० गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे ध्येय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना पुणे महापालिका निवडणूक एकत्र लढणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे जिल्हा निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी शिवसेनेसोबत झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर ही माहिती दिली. राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढण्याचा निर्णय पक्षनेतृत्वाने घेतल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व महापालिका निवडणुका युती म्हणून लढवण्यावर एकमत केले आहे. या निर्णयानुसार, पुण्यात भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये गुरुवारी सकारात्मक चर्चा झाली. ही चर्चा प्राथमिक स्वरूपाची होती. यामध्ये काही प्रभाग, जागावाटप आणि संख्यांबाबतही विचारविनिमय झाला. पुढील टप्प्यात आणखी बैठका घेऊन युतीला अंतिम स्वरूप दिले जाईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले. दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असली तरी, सर्वांना संधी मिळणे अवघड आहे. इच्छुक असणे गैर नाही. आम्ही एकत्रित लढणार असल्याने कुठेही बंडखोरी होण्याची शक्यता नाही, असे मोहोळ यांनी नमूद केले. भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा राजकीय पक्ष असून, लोकशाही पद्धतीने इच्छुकांकडून अर्ज मागवून मुलाखती घेण्यात आल्या आहेत. यापुढील निर्णय कोअर कमिटी आणि पक्ष नेतृत्व घेईल, असेही त्यांनी सांगितले.
‘सेव्हन सिस्टर्स’च्या सुरक्षेला धोका; भारताला केले अलर्ट
ढाक्का : वृत्तसंस्था बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे पुत्र सजीव वाजेद जॉय यांनी भारतासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. बांगलादेशातील सध्याचे अंतरिम सरकार देशाला कट्टरवादाकडे ढकलत असून, यामुळे भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या (सेव्हन सिस्टर्स) सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. सजीव वाजेद यांनी म्हटले की, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार ‘जमात-ए-इस्लामी’ […] The post ‘सेव्हन सिस्टर्स’च्या सुरक्षेला धोका; भारताला केले अलर्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
५ वर्षात ९ लाख भारतीयांचे परदेशगमन!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दरवर्षी मोठ्या प्रमाणावर भारतीय आपले नागरिकत्व सोडत असल्याचे चित्र समोर आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत ९ लाखांहून अधिक भारतीयांनी नागरिकत्वाचा त्याग केला आहे. विशेष म्हणजे २०२२ पासून दरवर्षी ही संख्या २ लाखांच्या पुढे गेली आहे. २०११ ते २०२४ या कालावधीत एकूण २०.६ लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले […] The post ५ वर्षात ९ लाख भारतीयांचे परदेशगमन! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चीनी ‘स्पाय बर्ड’मुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ
कैगा/कारवार : वृत्तसंस्था कर्नाटकमधील कारवार येथे चिनी जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस लावलेला एक सीगल पक्षी साडल्याने खळबळ उडाली आहे. हा पक्षी कारवारमधील थिम्मका गार्डनच्या मागे आढळला होता. भारताची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचा तळ आणि जवळच कैगा अणुऊर्जा प्रकल्प असल्याने अशा संवेदनशील ठिकाणांजवळ हा पक्षी सापडल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तसेच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वन […] The post चीनी ‘स्पाय बर्ड’मुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘युसीसी’, धर्मांतर विधेयक पुन्हा उत्तराखंड सरकारकडे
डेहराडून : वृत्तसंस्था उत्तराखंडमधील पुष्कर सिंह धामी सरकारसमोर एक मोठा प्रशासकीय पेच उभा ठाकला आहे. राज्य सरकारने विधानसभेत मंजूर केलेली दोन अत्यंत महत्त्वाची विधेयके ‘धर्मांतर विरोधी (सुधारणा) विधेयक २०२५’ आणि ‘समान नागरी संहिता (युसीसी) दुरुस्ती विधेयक’ राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंह यांनी तांत्रिक त्रुटींचे कारण देत पुन्हा सरकारकडे पाठवली आहेत. राजभवन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या […] The post ‘युसीसी’, धर्मांतर विधेयक पुन्हा उत्तराखंड सरकारकडे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपूर अधिवेशनादरम्यान निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने आपले स्पष्टीकरण सादर केल्यावर निलंबन मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल. या पार्श्वभूमीवर सर्व संघटना आपले आंदोलन मागे घेतील, असा विश्वास महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे व्यक्त केला. मंत्रालयातील महसूलमंत्र्यांच्या दालनात राज्यातील विविध महसूल संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत एकूण 13 मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघ या मुख्य महासंघाशी जोडलेल्या महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना, विदर्भ पटवारी संघ (नागपूर-2), विदर्भ (राजस्व निरीक्षक) मंडळ अधिकारी संघ, नागपूर, विदर्भ कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळाधिकारी समन्वय महासंघ, महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चुकीच्या कामाला माफी नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचे काम केले आहे, त्यांच्यावरच निलंबनाची कारवाई झाली आहे. मात्र, नैसर्गिक न्यायानुसार त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जात आहे. पुढील तीन दिवसांत त्यांनी आपले स्पष्टीकरण द्यावे, त्यावर आधारित अहवाल तयार करून पुढील निर्णय घेतला जाईल. अनावधानाने झालेल्या चुकीला एकवेळ माफ करता येईल. पण जाणीवपूर्वक केलेल्या चुकीला माफी मिळणार नाही. ग्रेड-पे आणि पदोन्नतीवर भर कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नायब तहसीलदारांच्या ग्रेड-पेचा विषय मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक आहे. तसेच, महसूल आणि भूमी अभिलेख विभागाचा नवीन 'आकृतीबंध' तयार करण्याचे काम सुरू असून त्यात संघटनांच्या सूचना विचारात घेतल्या जातील. तलाठ्यांसाठी नवीन लॅपटॉप लवकरच दिले जातील. आतापर्यंत सुमारे 750 अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली असून यात अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राधान्य दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
साताऱ्यातील जावळी तालुक्यातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणात नाव गोवल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे आता आक्रमक झाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेले सर्व आरोप प्रकाश शिंदे यांनी आज पुराव्यानिशी फेटाळून लावले. केवळ राजकीय द्वेषापोटी आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी शिंदे कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. हे बिनबुडाचे आरोप मागे न घेतल्यास संबंधितांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, असा सज्जड इशारा प्रकाश शिंदे यांनी दिला आहे. साताऱ्यातील जावळी तालुक्यात मुंबई पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा आणि ड्रग्ज बनविण्याचे साहित्य जप्त करत मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले. सावरी येथे झालेल्या या कारवाईनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. या ड्रग्ज निर्मिती रॅकेटमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भावाचा सहभाग असल्याचा थेट आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केला होता. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया देत, सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. छापा पडलेली जागा माझी नाहीच माध्यमांसमोर आपली बाजू मांडताना प्रकाश शिंदे यांनी जमिनीच्या कागदपत्रांचा तपशीलच जाहीर केला. ते म्हणाले, ज्या ठिकाणी एमडी ड्रग्जचा साठा आणि कारखाना सापडला, ती जागा (गट नं. ४/१) गोविंद शिंदकर या शेतकऱ्याची आहे. या जमिनीशी माझा कोणताही संबंध नाही. माझ्या जमिनीचा सातबारा क्रमांक १७/१ आणि ३०/१० (वडिलोपार्जित) असा आहे. विशेष म्हणजे घटनास्थळ आणि माझी जमीन यात तब्बल १५ किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी आरोप करण्यापूर्वी पूर्ण माहिती घ्यावी. हॉटेल आणि रणजीत शिंदेंबाबत खुलासा 'तेज यश' रिसॉर्ट आणि जमीन व्यवहाराबाबत बोलताना शिंदे म्हणाले, सदर जागा आम्ही रणजीत शिंदे यांना विकली असून त्याचे कायदेशीर पुरावे उपलब्ध आहेत. रणजीत शिंदे दरे गावातच असून ते फरार नाहीत. तसेच त्या ठिकाणी कोणतेही फाईव्ह स्टार हॉटेल होणार नाही. स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी तिथे कृषी पर्यटन केंद्र उभारण्याचा माझा मानस होता. शिंदे कुटुंबाला बदनाम करण्याचा कट? पोलिसांच्या चौकशीतून अनेक बाबी सिद्ध झाल्या आहेत. राजकीय द्वेषापोटी आमच्यावर आरोप केले जात आहेत. आमच्या कुटुंबाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. संबंधितांना कायदेशीर नोटीस बजावणार आहे. तसेच आरोप मागे न घेतल्यास अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार, असा इशाराही प्रकाश शिंदे यांनी दिला आहे., दोषींवर कठोर कारवाई करा या ड्रग्ज प्रकरणात जे कोणी खरे गुन्हेगार असतील, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. आणखी कुणाचा संबंध असेल तर त्यांनाही अटक करा, पण निष्पापांची बदनामी थांबवा, अशी मागणी प्रकाश शिंदे यांनी पोलिसांकडे केली आहे.
विजेचा अनधिकृत वापर केल्याप्रकरणी एका महिलेला नागपूरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने तिला न्यायालय सुटेपर्यंत कोठडीची शिक्षा आणि ₹१० हजारांचा दंड ठोठावला आहे. महिनाभरात अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे, जिथे अनधिकृत वीज वापरणाऱ्या ग्राहकाला शिक्षा झाली आहे. ही घटना २७ सप्टेंबर २०२१ रोजी तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भानखेडा येथे घडली होती. महावितरणच्या पथकाने संबंधित ग्राहकाच्या घरी छापा टाकला असता, सहाय्यक अभियंता शाहरुख मेहमूद्दीन तुराक यांच्या तपासणीत आरोपी महिलेने वीज खांबावरून अनधिकृतपणे वीज जोडणी घेतल्याचे समोर आले. या महिलेवर घरगुती वापरासाठी विजेची चोरी आणि मीटरमध्ये फेरफार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तिच्याविरुद्ध भारतीय विद्युत कायदा, २००३ च्या कलम १३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांच्यासमोर झाली. सुनावणीदरम्यान आरोपी महिलेने आपला गुन्हा कबूल केला. तिने आपण घरातील एकमेव कमावती व्यक्ती असून उदरनिर्वाहासाठी छोटा घरगुती व्यवसाय चालवत असल्याचे सांगत न्यायालयाकडे दयेची मागणी केली होती. न्यायाधीशांनी आरोपीची परिस्थिती आणि तिने प्रथमच केलेला गुन्हा लक्षात घेऊन तिला कारावासाऐवजी दंडात्मक शिक्षा देणे योग्य मानले. त्यानुसार, न्यायालयाने तिला न्यायालय सुटेपर्यंत कोठडीत बसण्याची शिक्षा, महावितरणला नुकसान भरपाई म्हणून ₹१० हजार दंड आणि भविष्यात अशा गुन्ह्याची पुनरावृत्ती न करण्याची ताकीद दिली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. काझी यांनी बाजू मांडली. तीन आठवड्यांपूर्वी याच न्यायाधीशांनी एका विशेष प्रकरणामध्ये अनधिकृत वीज वापरणाऱ्या ग्राहकाला दोषी ठरवून न्यायालयीन कामकाजाच्या समाप्तीपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा आणि ₹१० हजार रुपये दंड ठोठावला होता.
ऊसतोडणीसाठी बहिणीसोबत आलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार
केज : तालुक्यातील एका गावात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ऊसतोडणीसाठी आपल्या मोठ्या बहिणीसोबत आलेल्या एका १२ वर्षीय बालिकेवर एकाने अत्याचार केला. याप्रकरणी युसूफ वडगाव पोलिस ठाण्यात पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी कळंब बसस्थानकावरून जेरबंद केले आहे. पीडित बालिकेचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे. तिचे वडील कर्नाटकात […] The post ऊसतोडणीसाठी बहिणीसोबत आलेल्या बारा वर्षाच्या मुलीवर अत्याचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महानगरपालिकेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीतच शिवसेना ठाकरे गटाला शहरात मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे सेनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आपल्या पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही तडकाफडकी राजीनामा दिला आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराध्यक्षानेच साथ सोडल्याने शहरात ठाकरे गटाची मोठी पडझड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संजोग वाघेरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्या पुढच्या राजकीय प्रवासाचे संकेतही दिले आहेत. येत्या एक-दोन दिवसांत ते भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. 2019 पासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपने निवडणुकांच्या घोषणा होताच हा मोठा डाव खेळला आहे. वाघेरेंच्या भाजप प्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलणार असून, भाजपची ताकद अधिक वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. संजोग वाघेरे यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. मावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांच्यासमोर महायुतीचे श्रीरंग बारणे यांचे आव्हान होते, ज्यात बारणे यांनी बाजी मारली होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर वाघेरे पुन्हा एकदा पक्षबदल करत असून, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा फटका मानला जात आहे. संजोग वाघेरेंची राजकीय पार्श्वभूमी संजोग वाघेरे हे पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर दिवंगत भिकू वाघेरे यांचे पुत्र असून त्यांना मोठा राजकीय वारसा लाभला आहे. त्यांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून महापालिकेत प्रतिनिधित्व केले आहे. या काळात त्यांनी शहराचे महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली असून, महापालिकेतील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवले आहे. केवळ संजोग वाघेरेच नव्हे, तर त्यांच्या पत्नीनेही नगरसेविका म्हणून काम पाहिले असून, वाघेरे कुटुंबाची शहराच्या राजकारणावर मोठी पकड आहे. संजोग वाघेरे यांनी सलग 8 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहिले. या काळात त्यांची ओळख शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय अशी होती. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राजकीय समीकरणे बदलत राष्ट्रवादीतून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाने त्यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, मात्र या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभेच्या पराभवानंतरही ठाकरे गटाने त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, 18 डिसेंबर 2025 रोजी त्यांनी अचानक शिवसेना ठाकरे गटाच्या शहराध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देऊन सर्वांना धक्का दिला. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण असून, ते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपची ताकद वाढणार असून ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे.
राज्यातील नगरपरिषद निवडणुकांचे राजकीय रणांगण आता केवळ प्रचारापुरते मर्यादित न राहता, त्याला अघोरी कृत्यांचे ग्रहण लागल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. धाराशीवमधील परंडा येथील घटनेनंतर आता पैठणमध्येही निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांना लक्ष्य करण्यासाठी 'काळ्या जादू'चा वापर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विरोधी पक्षातील उमेदवारांच्या फोटोंना सुया टोचणे, लिंबू, नारळ आणि बिब्बे अशा वस्तूंच्या माध्यमातून करणी-भानामती करण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पैठण नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ३ मधून निवडणूक लढवत असलेल्या मंगल कल्याण मगरे यांच्या घराबाहेर आज सकाळी जादूटोण्याची एक टोपली आढळून आली. या टोपलीमध्ये नारळ, हळद-कुंकू, लिंबू, गुलाल, अगरबत्ती आणि विशेष म्हणजे उमेदवार मंगल मगरे व त्यांचे पती कल्याण मगरे यांचे सुया खुपसलेले फोटो होते. हा प्रकार केवळ एका उमेदवारापुरता मर्यादित नसून, ठाकरे गटाच्या सर्व २५ उमेदवारांच्या पोस्टरवरचे फोटो कापून त्यांचा वापर अशा अघोरी कृत्यासाठी करण्यात आल्याचा दावा कल्याण मगरे यांनी केला आहे. शिंदे गटाच्या उमेदवारांवर निशाणा या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे यांनी समाजमाध्यमांवर या प्रकाराचा निषेध करत सत्ताधारी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, या नेत्यांना आणि त्यांच्या समर्थकांना लोकशाहीपेक्षा करणी-भानामतीवर जास्त विश्वास आहे. पराभवाच्या भीतीने ते आता अशा खालच्या स्तरावर उतरले आहेत. परांड्यातही उघडकीस आला होता प्रकार यापूर्वी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मतदारसंघ असलेल्या परंड्यातही उमेदवारांच्या चेहऱ्यावर सुया खुपसून भोवती काळी बाहुली ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता पैठणमध्येही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याने शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात अशा अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या प्रकरणी जादूटोणाविरोधी कायद्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगारांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. नेत्यांच्या 'अंधश्रद्धे'ची पुन्हा चर्चा या अघोरी प्रकारांमुळे सत्ताधारी नेत्यांशी संबंधित जुन्या वादांना पुन्हा तोंड फुटले आहे. दिवसांपूर्वी भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मंत्रिपद मिळावे म्हणून त्यांच्या घरात कथितरीत्या काळ्या जादूचा प्रयोग करण्यात आल्याचा दावा त्यावेळी विरोधकांकडून करण्यात आला होता.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून त्यांचे खाते बुधवारी काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आता आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांनी हा राजीनामा पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे. तर दुसरीकडे नाशिक पोलिस कोकाटेंना अटक करण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, अजित पवारांनी ट्विट करत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. अजित पवारांनी ट्विट करत म्हटले की, माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्त्वतः स्वीकारण्यात आला आहे. संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आला आहे. सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, संस्थात्मक प्रामाणिकता आणि न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावे, या मूल्यांवर आमच्या पक्षाची निरंतर वाटचाल राहिली आहे. कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा-व्यवस्थेचे काटेकोरपणे पालन होईल, याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्ये जपली जातील व जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टीकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू, असे पवारांनी ट्विट करत म्हटले आहे. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी कारवाई माणिकराव कोकाटे यांच्यावर नाशिक येथील सदनिका गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे. याच प्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी कोकाटेंविरोधात अटक वॉरंट काढण्याची मागणी करत न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी करत पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले असून त्यानुसार ही कारवाई केली जात आहे. दरम्यान, बुधवारी (दि. 17) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती. राज्यपालांनी त्याला मंजूरी दिल्यानंतर कोकाटे यांचे खाते हे अजित पवारांकडे देण्यात आले. दरम्यान, ऐन निवडणुकीत कोकाटे यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमके प्रकरण काय? नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील 'निर्माण व्ह्यू' अपार्टमेंटमध्ये 30 वर्षांपूर्वी स्वतःचे उत्पन्न कमी दाखवून मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका मिळवल्याप्रकरणी आमदार माणिकराव कोकाटे यांना मोठा धक्का बसला आहे. स्वतःसह भाऊ विजय कोकाटे आणि अन्य दोन सहकाऱ्यांच्या मदतीने बेकायदेशीरपणे या सदनिका लाटल्याचा ठपका ठेवत फेब्रुवारी 2025 मध्ये नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. या निर्णयाविरोधात कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात दाद मागितली होती, मात्र सत्र न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळत जिल्हा न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली आहे.
राज्यात कायद्याला तुडविण्याचे काम सुरू
नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून खाते काढून घेतले आहे. तसेच सदनिका गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर अटकेच टांगती तलवार कायम असून शुक्रवारी यावर निर्णय होणार असल्याची माहिती आहे. यावर कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला असून राज्यात कायद्याला तुडविण्याचे काम सरकाार करीत असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, […] The post राज्यात कायद्याला तुडविण्याचे काम सुरू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नगरपालिकेच्या निवडणुकीत मी अनेक सभा केल्या, पण मी कुठेही कुणावर वैयक्तिक टीका केली नाही. माझ्याकडे विकासाचा स्पष्ट कार्यक्रम आहे. मी जे करून दाखवले आहे आणि जे मी भविष्यात करणार आहे, त्यावरच मी बोलतो. कुठलीही टीका न करता खऱ्या अर्थाने परिवर्तन करण्यासाठी आणि सकारात्मक मत मागायला मी इथे आलो आहे. तुमचं एक सकारात्मक मत या शहराला सातारा जिल्ह्यातील सर्वात आधुनिक शहर बनवू शकतं, असे ठाम प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फलटण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा-राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, बाळासाहेब सोळस्कर, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, यांसह महायुतीचे सर्व उमेदवार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, रणजितदादांकडे विकासाचे व्हिजन आहे आणि समशेरदादांना नगरपालिकेचे कामकाज उत्तम समजते, हे फलटणसाठी एक चांगले समीकरण आहे. मतदानाआधी विरोधकांकडून पुष्कळ चिखलफेक होईल, पण चिखलाने कमळाला काहीच फरक पडत नाही; उलट चिखलामध्येच कमळ अधिक डौलाने उभे राहते. तुम्ही २० तारखेला आमची काळजी घ्या, पुढची ५ वर्षे तुमची काळजी मी घेतो, असे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले. लाडकी बहीण आणि लखपती दीदी योजना महिलांच्या योजनांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, जोपर्यंत तुमचा हा 'देवाभाऊ' जिवंत आहे, तोपर्यंत 'लाडकी बहीण' योजना कोणीही बंद करू शकणार नाही. समशेरदादांनी नगराध्यक्ष झाल्यानंतर लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून फलटणमधील लाभार्थी बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवावी, असे आवाहनही त्यांनी केले. शहराचा कायापालट आणि निधीचा ओघ २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी शहर विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या. राज्यात आपले सरकार आल्यानंतर आपण त्या योजनांना गती दिली. शहराच्या परिवर्तनासाठी दिलेला पैसा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी नगराध्यक्षासह संपूर्ण नगरपालिका महायुतीच्या ताब्यात देणे क्रमप्राप्त आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विनंतीवरून फलटणमधील न्यायालयाच्या इमारती एकाच ठिकाणी आणण्याचे काम लवकरच पूर्ण केले जाईल. तसेच नाईकबोमवाडी एमआयडीसीमध्ये उद्योग आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. डॉक्टर तरुणी प्रकरण : रणजितदादांना क्लिन चिट पीडित डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री कमालीचे आक्रमक झाले. या दुर्दैवी घटनेचे राजकारण करणे अत्यंत अशोभनीय आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे आता हाती आले असून आरोपींना कडक शासन केले जाईल आणि पीडितेच्या कुटुंबाला पूर्ण मदत दिली जाईल. या प्रकरणाशी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा दुरान्वये संबंध नाही, असे त्यांनी ठामपणे स्पष्ट करून विरोधकांचे आरोप खोडून काढले.
एनसीईएलची स्थापना, 16 हजार सहकारी संस्था सदस्य:सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची लोकसभेत माहिती
देशातील सहकारी संस्थांमार्फत कृषी, दुग्ध, मत्स्य आणि सेंद्रिय उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी, तसेच शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, या उद्देशाने २०२३ मध्ये राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित (एनसीईएल) ची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत ही माहिती दिली. देशभरातील सुमारे १६ हजारांहून अधिक सहकारी संस्था एनसीईएलच्या सदस्य झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली २०२३ मध्ये ‘एनसीईएल’ ही बहुराज्यीय सहकारी संस्था स्थापन झाली. एनसीईएलमार्फत विविध राज्यांतील खास पदार्थांची निर्यातही सुरू झाली आहे, ज्यामुळे स्थानिक उत्पादनांना जागतिक स्तरावर ओळख मिळत आहे. गुणवत्तापूर्ण बियाण्यांसाठी भारतीय बियाणे सहकारी समिती मर्यादित (बीबीएसएसएल) आणि सेंद्रिय शेतीसाठी राष्ट्रीय सहकारी ऑरगॅनिक्स मर्यादित (एनसीओएल) यांसारख्या इतर बहुराज्यीय सहकारी संस्थाही कार्यरत आहेत. एनसीईएलसह या तीन संस्थांमार्फत १४ प्रमुख कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी काम सुरू आहे. देशातील ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे १३,९०० सहकारी संस्था एनसीईएलच्या सदस्य झाल्या आहेत. बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंत आवश्यक सर्व सेवा सहकारी संस्थांद्वारे उपलब्ध करून देत एनसीईएल राज्य सरकारे व त्यांच्या नोडल एजन्सींशी समन्वय साधून निर्यात वाढवण्याचे काम करत आहे. आतापर्यंत १५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांशी १७ सामंजस्य करार झाले असून गुजरात व राजस्थानमधून मसाल्यांची निर्यात सुरू झाली आहे, असे मोहोळ यांनी सांगितले. एनसीईएलचे अधिकृत भागभांडवल २ हजार कोटी रुपये असून सदस्यत्व सहा वर्गांत विभागले आहे. प्राथमिक, जिल्हा व राज्यस्तरीय तसेच बहुराज्यीय सहकारी संस्था आणि शेतकरी गट एनसीईएलचे सदस्य होऊ शकतात. निर्यातक्षम उत्पादन असलेल्या सर्व कार्यशील सहकारी संस्थांना सहभागी करून घेण्यावर भर देण्यात येत आहे, असे मोहोळ यांनी विशेषत्वाने नमूद केले.
राज्यातील न्यायालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी
मुंबई/ नागपूर : मुंबईतील उच्च न्यायालयासह वांद्रे, किल्ला कोर्ट आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी गुरुवार दि. १८ डिसेंबर रोजी देण्यात आली. या धमकीमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. नागपूर आणि मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर एक धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. यात केवळ उच्च न्यायालयच नव्हे, […] The post राज्यातील न्यायालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
साताराच्या ड्रग्ज रॅकेटची मिस्ट्री:मुंबई ते सावरी व्हाया पुणे कसा राहिला प्रवास? जाणून संपूर्ण कहाणी
मुंबईतील मुलुंडमधील एका फूटपाथवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील ड्रग्ज कारखान्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे साताऱ्यातील ड्रग्ज रॅकेटचा 'मुंबई ते सावरी व्हाया पुणे' असा प्रवास झाला असून, या प्रकरणाचे धागेदोरे थेट सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांशी जोडले जात असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. साताराच्या ड्रग्ज रॅकेटची मिस्ट्री काय? या प्रकरणाची सुरुवात ८ डिसेंबर रोजी मुंबईत झाली. मुलुंड पश्चिम येथील विजयनगरमधील गणेश कृपा बिल्डिंगसमोरील फूटपाथवर सलीम शेख (वय ३२) आणि रईस शेख (वय ३७) हे दोन इसम संशयास्पदरित्या फिरताना पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, सलीम शेखकडे असलेल्या एका पिशवीत एक नोटबुक सापडले. विशेष म्हणजे, या नोटबुकच्या पानावर चिकटवलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत १० ग्रॅम मेफेड्रोन (MD) लपवण्यात आले होते. याशिवाय दोघांच्या खिशातूनही मोठ्या प्रमाणात एमडी जप्त करण्यात आले. पुण्यातील राष्ट्रवादीचा पदाधिकारी जेरबंद अटक केलेल्या दोघांनी हे ड्रग्ज पुण्यातील विशाल मोरे याच्याकडून आणल्याचे कबूल केले. पोलिसांनी सापळा रचून १३ डिसेंबरला पुणे-मुंबई हायवेवर विशाल मोरेला अटक केली. विशेष बाब म्हणजे, विशाल मोरे हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विद्यार्थी आघाडीचा पुणे शहरप्रमुख आहे आणि ३ डिसेंबरलाच त्याची या पदावर नियुक्ती झाली होती. सावरीतील 'गोठ्यात' ड्रग्जची फॅक्टरी पोलिसांनी विशाल मोरेची चौकशी केली असता, त्याने ते ड्रग्ज सातारा जिल्ह्यातील सावरी येथून आणण्याले सांगितले. विशाल मोरेच्या माहितीवरून मुंबई पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील सावरी गावात छापा टाकला. तिथे गुरांच्या गोठ्यासाठी उभारलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये मेफेड्रोन बनवण्याचा कारखानाच सुरू असल्याचे उघड झाले. पोलिसांनी येथून अब्बास सय्यद, राजिकूल रेहमान आणि हाबिझुल इस्लाम या तिघांना अटक केली. एकनाथ शिंदेंच्या भावावर गंभीर आरोप या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावावर आरोप केले आहे. सावरीतील फॅक्टरीत काम करणाऱ्या आरोपींना ओंकार डिघे हा स्थानिक युवक जेवण पुरवत होता. हे जेवण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीच्या 'तेज यश' रिसॉर्टमधून येत असल्याचा दावा अंधारे यांनी केला आहे. यामुळे ड्रग्ज माफियांचे कनेक्शन थेट सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. विजय कुंभार यांचा मोठा दावा दरम्यान, साताऱ्यातील सावरी येथील ड्रग प्रकरणाने आता वेगळे वळण घेतलेले दिसतंय. आता ती जागा आपण विकली असे एकनाथ शिंदे यांचे भाऊ प्रकाश संभाजी शिंदे यांचे म्हणणे असले तरी त्या जागेचा नंतर व्यवहार झाला असल्याचे दिसत नाही. एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी 2020 मध्ये ही जागा सुमारे साडेतीन एकर जागा बारा लाख रुपयांमध्ये खरेदी केली आणि त्यानंतर अजून तरी तिचं हस्तांतरण झाल्याची कुठलीही माहिती पुढे येत नाही, असे सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी कागदपत्रे दाखवत म्हटले आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे राज्याचे दोन उपमुख्यमंत्री. दोघेही दबंग राजकारणी. दोघांचेही जिल्हे म्हणजे पुणे आणि सातारा शेजारी शेजारी आहेत आणि या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ड्रग माफिया,जमीन माफिया आणि इतर गुन्हेगारीने थैमान घातले आहे. काय अर्थ घ्यायचा याचा? असा सवालही विजय कुंभार यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रामध्ये मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष आता अत्यंत गंभीर वळणावर पोहोचला आहे. वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीचा आकडा वर्षाकाठी १० हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला असून, जीवितहानीचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी आज राज्यसभेत यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यांनी राज्याच्या ग्रामीण भागातील भयावह परिस्थितीकडे केंद्राचे लक्ष वेधले. प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार, २०२३-२४ या वर्षात वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीच्या तब्बल ४० हजार तक्रारींची नोंद झाली आहे. रानगवे, नीलगायी, रानडुक्कर आणि माकडांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सरकारने दिलेली नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या कष्टाच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ आर्थिकच नव्हे, तर मानवी जीवितहानीचा आकडाही मोठा आहे. गेल्या वर्षभरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ५० हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर ३०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ही आकडेवारी या संघर्षाची भीषणता दर्शवते. राज्यातील नाशिक, पुणे, पालघर, ठाणे, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची दहशत वाढली आहे. यामुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून, जीव वाचवण्यासाठी गळ्याला काट्यांचे पट्टे बांधावे लागत आहेत. अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्याची वेळ आली असून, बिबट्याने आईच्या कुशीतून बाळ ओढून नेण्यासारख्या घटनाही घडल्या आहेत. वन्यजीव मानवी वस्तीत का येत आहेत, याचे विश्लेषण करताना प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी वाढते शहरीकरण, जंगलांचा ऱ्हास आणि विस्कळीत झालेली अन्नसाखळी यावर बोट ठेवले. पुण्यात रस्ता चुकलेल्या रानगव्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा उल्लेख करत त्यांनी वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित केला. मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी त्यांनी सभागृहासमोर काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या. यामध्ये निसर्ग आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अन्नसाखळी सुरक्षित करणे, वनक्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वे आणि राज्य महामार्गांवर वन्यजीवांसाठी 'अंडरपास' आणि 'ओव्हरपास'ची निर्मिती करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, जंगलांच्या सीमांवर सौर कुंपण आणि आधुनिक अलार्म सिस्टिम बसवावी, नुकसानभरपाईसाठी डिजिटल प्रणालीद्वारे तातडीने मदत द्यावी आणि वनविभागाचे 'क्विक रिस्पॉन्स टीम' २४ तास कार्यरत ठेवावे, असेही त्यांनी सुचवले. जंगलांचा ऱ्हास व शहरीकरण थांबवून मानव आणि वन्यजीव दोघांच्याही संरक्षणावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
‘व्हीबी-जी राम जी’ विधेयक लोकसभेत पास
नवी दिल्ली : लोकसभेत कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) बिल, ज्याला व्हीबी-जी राम जी म्हणूनही ओळखले जाते, त्यावर प्रतिक्रिया दिली. यादरम्यान, विरोधकांनी विधेयकाविरुद्ध घोषणाबाजी करीत कागदे सभागृहात फाडून फेकली. शिवराज सिंह चौहान म्हणाले, मनरेगा हे मूलत: महात्मा गांधींच्या नावावर नव्हते. ते मूलत: नरेगा होते. नंतर, २००९ […] The post ‘व्हीबी-जी राम जी’ विधेयक लोकसभेत पास appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपूर : कमतरतेचा फटका आधीच बसत असलेल्या इंडिगो एअरलाइन्सला आता दाट धुक्याचाही फटका बसत आहे. विशेष म्हणजे बुधवारी इतर कोणत्याही एअरलाइन्सची एकही फ्लाइट रद्द झाली नाही किंवा त्यांना विलंब झाला नाही. मात्र, गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संचालित होणा-या कथित वैमानिकांच्या इंडिगोची तीन उड्डाणे रद्द करण्यात आली असून आठ उड्डाणांना […] The post इंडिगोची तीन उड्डाणे रद्द appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हॉटेल तेजयश उपमुख्यमंत्री शिंदेंचे भाऊ प्रकाश शिंदेंचेच
मुंबई : सातारा जिल्ह्यातील सावरी येथील ड्रग्ज रॅकेट प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज खळबळजनक गौप्यस्फोट करत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांना आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत हॉटेल तेजयशचे गुगल लोकेशन ओपन केले. यावेळी त्यांनी दाखवून दिले की, हॉटेलच्या ऑनलाइन बुकिंगसाठी दिलेल्या व्हॉट्सअॅप लिंकवर […] The post हॉटेल तेजयश उपमुख्यमंत्री शिंदेंचे भाऊ प्रकाश शिंदेंचेच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दगडातून इतिहास घडवणारे हात कायमचे विसावले; राम सुतार यांचे निधन
नोएडा : आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय शिल्पकलेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांचे गुरुवारी निधन झाले असून नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री सुमारे १.३० वाजता त्यांनी वयाच्या १०१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये उभारलेल्या त्यांच्या भव्य शिल्पकृतींनी भारतीय शिल्पपरंपरेला जागतिक ओळख मिळवून दिली. स्वातंर्त्योत्तर काळातील अनेक राष्ट्रीय नेत्यांची स्मारके, तसेच […] The post दगडातून इतिहास घडवणारे हात कायमचे विसावले; राम सुतार यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
व्हिट्स हॉटेल प्रकरणाची ‘हाय पॉवर कमिटी’ मार्फत होणार चौकशी
छत्रपती संभाजीनगर : येथील विट्स हॉटेल (धनदा कॉर्पोरेशन) गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने एक हाय पॉवर समिती नियुक्त केली आहे. ही समिती या संपूर्ण प्रकरणाचा ८ दिवसांच्या आत तपास करून आपला अहवाल सादर करणार आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील ११० कोटींचे सुप्रसिद्ध हॉटेल व्हिट्स अवघ्या ६८ कोटींत खरेदी करण्याचा कथित प्रयत्न केल्याचा आरोप […] The post व्हिट्स हॉटेल प्रकरणाची ‘हाय पॉवर कमिटी’ मार्फत होणार चौकशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचे वातावरण सुरू असून महापालिकेच्या निवडणुका देखील अगदी तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सध्या जागावाटपाची बोलणी सुरू आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या आजच्या बैठकीत मुंबईतील प्रभागांच्या जागावाटपाबाबत लोकसभा विभागनिहाय चर्चा झाली असून शिंदे गटाने १२७ जागांवर दावा केला आहे तर भाजपने शिंदे गटाला केवळ ५२ […] The post युतीत जागावाटपाचा पेच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे येथील कोंढवा परिसरात घरकाम करणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉ. साजीद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 7 नोव्हेंबर 2025 ते 12 डिसेंबर या कालावधीत घडली असून, महिलेने कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोंढवा खुर्द येथील ग्रिन एकर्स सोसायटीमध्ये राहणाऱ्या डॉ. साजीद शेख यांच्या घरी पीडित महिला घरकाम करत होती. काम करत असताना डॉ. शेख यांनी विविध कारणांवरून तिला स्पर्श करून विनयभंग केला, असे तक्रारीत म्हटले आहे. महिलेने या प्रकाराला विरोध केला असता, डॉ. शेख यांनी तिला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. एका दिवशी महिला आरोपीच्या घरी पाणी आणि दूध घेऊन आली असताना, आरोपीने तिचा हात पकडला आणि तिच्यासोबत अश्लील चाळे केले. यानंतर पीडित महिलेने तात्काळ कोंढवा पोलिस ठाण्यात धाव घेऊन डॉ. साजीद शेख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. अल्पवयीन मुलीची प्रसुती; डॉक्टर,पोलिसांची दिशाभूल प्रकरणी गुन्हा दाखल अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून ती गर्भवती राहिल्यानंतर नागपूर येथून बनावट जन्माचा दाखला आणला. त्यानंतर ससून रूग्णालयात मुलीची प्रसुती घडवून आणल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांची आणि डॉक्टरांची दिशाभूल केल्याप्रकरणी, बलात्कार, बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन सुर्यकांत आरणे (25, रा. प्रगतीनगर, हडपसर) व पिंकी नितीन डागोरे उर्फ जेंसीटा सेबीस्टीयन (रा. हडपसर) अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी पिडीत मुलगी ही अल्पवयीन नसल्याबाबत नागपूर महानगर पालिकेचा पिडीत मुलीचा बनावट जन्माचा दाखला ससून हॉस्पीटल येथील वैद्यकीय अधिकारी यांना दाखवून अपत्य जन्मास घातले. त्यांनी पोलिस व डॉक्टरांची दिशाभूल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2023 ते 2024 दरम्यान घडला.
ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी 'नवा भारत' समजून घेण्याचे आवाहन केले आहे. भारत महाशक्ती म्हणून उदयास येत असल्याने अनेक देश भारताविरुद्ध विविध षड्यंत्रे रचत असल्याचे ते म्हणाले. 'कौशिक आश्रम' आणि 'अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान' यांच्या वतीने आयोजित 'शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमाले'त ते बोलत होते. डॉ. निरगुडकर म्हणाले की, नवा भारत खूप काही सकारात्मक आणि चांगले घडवत असून लक्षणीय प्रगती करत आहे. मात्र, हे चांगले लोकांपर्यंत पोहोचू नये आणि देशाचे नकारात्मक चित्र उभे राहावे, यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. यातून देशाची प्रतिमा मलिन होत असून अशा खोट्या कथ्यांवर विश्वास न ठेवता त्यांना पराभूत करण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांचे व्याख्यान 'अस्थिरता, फुटीरतावाद आणि भारत' या विषयावर झाले. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ. संजय उपाध्ये यांनी गुंफले. 'वसुधैव कुटुंबकम्' हा मानवतेला शांती देणारा विचार भारताकडे आहे, असे ते म्हणाले. हिंदू सनातन चिंतनातूनच जगाला शांती मिळू शकते, यासाठी सर्व भारतवासीयांनी एकत्र येऊन राष्ट्राच्या उद्धारासाठी काम करावे, असे आवाहन डॉ. उपाध्ये यांनी केले. याच कार्यक्रमात श्रेया रासने हिचा विशेष सन्मान करण्यात आला. तिला मानपत्र आणि अकरा हजार रुपये देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्र राज्य संस्कृत नाट्य स्पर्धेत श्रेयाने लिहिलेल्या 'प्रत्ययलोपे प्रत्ययलक्षणम्' या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचे तसेच दिग्दर्शन आणि लेखनासाठीचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे.श्रेया सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून वेदांत विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत असून तिला नाट्यकलेची विशेष आवड आहे.
एमपीएससी विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन:महाज्योती, सारथी, बार्टीमधील जागा कपातीचा निषेध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यांनी आपल्या विविध मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महाज्योती, सारथी आणि बार्टीमधील जागा कमी केल्याच्या निषेधार्थ तसेच एमपीएससीच्या इतिहासातील सर्वात कमी जागा (१५०) जाहीर केल्याबद्दल त्यांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थी प्रतिनिधी हनुमंत धायगुडे आणि प्रवीण पाटील यांनी सांगितले की, महाज्योती आणि सारथीमध्ये प्रत्येकी ९० टक्के, तर बार्टीमध्ये १० टक्के प्रशिक्षण जागा अचानक कमी करण्यात आल्या आहेत. ही कृती शैक्षणिक आणि सामाजिक अन्यायकारक असून, या जागा पूर्ववत वाढवण्यात याव्यात, अशी त्यांची मागणी आहे. त्यांनी कम्बाईन परीक्षेतील जागा वाढवण्याची मागणी केली. तसेच, पीएसआय परीक्षेची वयोमर्यादा वाढवावी, कारण परीक्षेतील दिरंगाई ही सरकारची चूक असून त्याची शिक्षा विद्यार्थ्यांना मिळायला नको, असे मत त्यांनी व्यक्त केले. २०२५ ची परीक्षा २०२६ मध्ये घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. आरटीओच्या हजारो जागा रिक्त असून, ही पदे तात्काळ भरण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. अन्यथा, अपघात, भ्रष्टाचार आणि गैरकारभाराला शासनच जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक आणि तहसीलदार यांसारख्या पदांच्या जागा हळूहळू कमी केल्या जात असून, ही पदे संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरळ सेवा भरती एकाच दिवशी घेतली जावी आणि त्यातील नॉर्मलायझेशनची अन्यायकारक पद्धत सर्व परीक्षांमधून काढून टाकण्यात यावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि तिथली अनधिकृत अतिक्रमणे हटवण्यासाठी महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात सांस्कृतिक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली असून, उद्यापासूनच यावर कारवाई सुरू होईल, अशी माहिती भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी दिली. या समितीमध्ये महसूल मंत्री, वनमंत्री आणि बंदरे मंत्री यांचा सहअध्यक्ष म्हणून समावेश करण्यात आला असून नितेश राणे स्वतः या समितीचे सदस्य आहेत. मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे म्हणाले की, गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवताना अनेकदा जमाव जमवून अडथळा आणला जातो, काही ठिकाणी तर शस्त्रेही सापडली आहेत. मात्र, आता सरकार तडजोड करणार नाही. या समितीत छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्वाच्या विचारांशी प्रामाणिक असणारे लोक आहेत, त्यामुळे ही कारवाई कडक असेल. मुंबईचा महापौर महादेवाचा भक्तच असेल! मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना नितेश राणे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. मुंबईचा डीएनए हा हिंदुत्व आणि महादेव आहे. येथे 'आय लव्ह पाकिस्तान' म्हणणारे चालणार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंनी ज्याप्रमाणे हिंदुत्व जपले, तसेच विचार असलेला आणि महादेवावर प्रेम करणारा व्यक्तीच मुंबईचा महापौर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मुंबईतील 'घाण' साफ करणे हे आमचे लक्ष्य असल्याचे त्यांनी नमूद केले. पृथ्वीराज चव्हाणांच्या 'ऑपरेशन सिंदूर' वक्तव्याचा समाचार काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी 'ऑपरेशन सिंदूर'बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा नितेश राणे यांनी तीव्र शब्दात निषेध केला. काँग्रेस नेहमीच पाकिस्तानची भाषा बोलणारा पक्ष राहिला आहे. मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकताना आम्ही पाहिले आहेत. चव्हाण यांचे हे वक्तव्य देशाच्या सैन्याचा अपमान करणारे असून, जनता हे विसरणार नाही, असे प्रत्युत्तर राणे यांनी दिले.
राज्याच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या डॉ. प्रज्ञा सातवांना काँग्रेस कार्यकर्ते चोख प्रत्युत्तर देतील, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन नाईक यांनी गुरुवारी ता. १८ पत्रकार परिषदेत दिला. यावेळी पक्ष निरीक्षक साहेबराव कांबळे यांनीही डॉ. सातवांवर तोफ डागली. हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेस प्रदेश उपाध्यक्ष नाईक, पक्ष निरीक्षक कांबळे यांच्यासह जिल्हाध्यक्ष सुरेश सराफ, डॉ. रमेश शिंदे, महमद जकी कुरेशी, गजानन देशमुख, विनायक देशमुख, मिलींद उबाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना नाईक म्हणाले की, काँग्रेस पक्षाने मानवीय दृष्टीकोन व सहानुभूतीतून डॉ. सातव यांना विधान परिषदेची संधी दिली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा संधी देतांना पक्षासमोर अनेक अडचणी होत्या. अल्पसंख्याक समाज, अनुसुचीत जातीच्या उमेदवाराला संधी देण्याची मागणी होऊ लागली होती. मात्र त्यावेळीही पक्षाने त्यांना संधी दिली. मात्र त्यांनी भाजपात प्रवेश करून पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले असून स्व. राजीव सातव, माजीमंत्री रजनी सातव यांच्या आत्म्यावर खंजीर खूपसल्याचा आरोप त्यांनी केला. स्व. राजीव सातव यांचे विकासाचे स्वप्न साकारण्यासाठी आपण भाजपात प्रवेश केल्याच्या डॉ. सातवांच्या वक्तव्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी विकासासाठी नव्हे तर स्वार्थासाठी भाजपात प्रवेश घेतला असून राज्यातील लोकशाही तुडविण्यासाठी त्यांनी भाजपात प्रवेश करून भाजपाच्या षडयंत्रात त्या सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या या कृतीला काँग्रेस कार्यकर्ते चोख प्रत्युत्तर देतील असा इशारा नाईक यांनी यावेळी दिला. यावेळी पक्ष निरीक्षक साहेबराव कांबळे यांनीही डॉ. सातव यांच्यावर तोफ डागली. काँग्रेस पक्ष वटवृक्ष असून त्यांच्या जाण्याचे जिल्हयात पक्षाला काहीही फरक पडणार नाही. डॉ. सातवांचे स्वकर्तृत्व काहीच नाही. केवळ स्व. राजीव सातव व माजीमंत्री रजनी सातव यांच्यामुळे त्यांना विधान परिषदेची संधी मिळाली. मात्र त्यांनी हिंगोली जिल्हयात काँग्रस पक्ष वाढविण्या ऐवजी पक्षाचे नुकसानच केल्याचा आरोप केला. त्यांच्या पक्ष सोडण्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते मोकळा श्वास घेतली असेही त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकीय समीकरणांनी वेग घेतला आहे. यातच सर्वात मोठी आणि निर्णायक बातमी समोर येत असून, मुंबई-पुण्यापुरती मर्यादित वाटणारी 'ठाकरे बंधूंची' युती आता विदर्भाच्या मैदानातही उतरणार आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या विदर्भातील चार महत्त्वाच्या महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. यामुळे आता राज्यातील एकूण 8 मोठ्या महापालिकांमध्ये 'ठाकरे ब्रँड'ची ताकद एकवटलेली पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी या युतीबाबत अधिकृत दुजोरा दिला आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या चारही महापालिकांमध्ये शिवसेना-मनसे एकत्रितपणे भाजप आणि महायुतीला आव्हान देणार आहेत. विदर्भात ठाकरे ब्रँड एकत्र येत असून, याचा सकारात्मक परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसेल. या युतीला मोठे यश मिळेल, असा विश्वास उंबरकर यांनी व्यक्त केला आहे. तळागाळात जाण्याची तयारी अंतिम टप्प्यात राजू उंबरकर सध्या अकोला जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी आज मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. अकोला महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीही यावेळी घेण्यात आल्या. विदर्भातील जागावाटप आणि प्रचाराची संयुक्त रणनीती आता अंतिम टप्प्यात असल्याचे या हालचालींवरून स्पष्ट होत आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात आधीच चर्चेत असलेली ठाकरे बंधुंची युती आता विदर्भात पोहोचल्याने राजकीय गणिते बदलणार आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यात 'ठाकरें'चे आव्हान नागपूर हे भाजपचे आणि प्रामुख्याने नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांचे शक्तिस्थळ मानले जाते. अशा ठिकाणी राज आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास भाजपपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भातील शहरी मतदारांमध्ये मनसेची ताकद आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संघटन एकत्र आल्यास त्याचा थेट फटका सत्ताधारी महायुतीला बसू शकतो. 8 जिल्ह्यांत 'लढाई' निश्चित मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये आधीच दोन्ही ठाकरे बंधूं एकत्र येण्याचे संकेत मिळाले होते. आता त्यात विदर्भातील 4 शहरांची भर पडल्याने राज्यातील 8 महत्त्वाच्या महापालिकांमध्ये 'ठाकरे बंधुंची युती' प्रत्यक्ष मैदानात दिसणार आहे. 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या मतदानासाठी ही नवी आघाडी किती प्रभावी ठरते आणि मतांच्या विभाजनावर कसा परिणाम करते? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मुंबईसाठी शिवसेना-भाजपचे 150 जागांवर एकमत दुसरीकडे, मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन पक्षात जागावाटपावरून आज दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांकडून 150 जागांवर एकमत झाल्याचे भाजप नेते अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले आहे. तसेच उर्वरित 77 जागांवर लवकरच चर्चा होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मुंबई महापालिकेला विकून खाणाऱ्यांना घरी बसवण्यासाठी महायुती सज्ज असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. उर्वरित 77 जागांसाठी आमची चर्चा सुरू आहे. एकमेकांना आकडेवारी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही सगळी प्रक्रिया येत्या दोन दिवसांत पार पडेल आणि मग आमची चर्चा होईल आणि मग अंतिम निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. त्यानंतर याची जी काही घोषणा असेल ती होईल, असे अमित साटम यांनी सांगितले.
शासकीय सदनिका लाटण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर करून सरकारची फसवणूक केल्याच्या 1995 सालच्या जुन्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांचा पाय चांगलाच खोलात गेला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम ठेवल्याने आणि न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोकाटे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत असल्याने, त्यांना रुग्णालयातूनच अटक होणार का? याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. 1995 साली बनावट कागदपत्रे सादर करून शासकीय सदनिका (फ्लॅट्स) मिळवल्याचा आरोप माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यावर सिद्ध झाला आहे. या प्रकरणात त्यांना दोन वर्षांची शिक्षा आणि दंडाची सुनावणी झाली होती. हे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेल्यानंतर तिथेही ही शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केल्याने माणिकराव कोकाटेंना अटक करण्याचा पोलिसांवरील दबाव वाढला आहे. रुग्णालयात अटकेचा कायदेशीर पेच आमदार माणिकराव कोकाटे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सावध पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी कोकाटे यांच्या वैद्यकीय स्थितीचा अहवाल डॉक्टरांकडून मागवला असून, कायदेशीर बाबींची सखोल पडताळणी सुरू केली आहे. कोकाटे यांची सध्याची प्रकृती आणि कायदेशीर तरतुदी तपासूनच त्यांना रुग्णालयातून अटक करायची की डिस्चार्ज मिळण्याची वाट पाहायची, याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. विजय कोकाटे यांचा शोध सुरू एकीकडे माणिकराव कोकाटे रुग्णालयात असताना दुसरीकडे त्यांचे बंधू आणि या प्रकरणातील सहआरोपी विजय कोकाटे यांचा थांगपत्ता लागत नाहीये. त्यांच्याविरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. ते सध्या कुठे आहेत, याची ठोस माहिती उपलब्ध नसल्याने नाशिक पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक होणार का? दरम्यान, शासकीय सदनिका घोटाळा प्रकरणी दोन्ही कोकाटे बंधूंना 2 वर्षांची शिक्षा कायम झाल्याने त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर आणि प्रतिमेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कायदेशीर पडताळणीनंतर नाशिक पोलिस नेमका काय निर्णय घेतात, माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनच अटक होणार का? आणि विजय कोकाटे पोलिसांच्या हाती लागतात का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर क्रीडा खाते काढले दरम्यान, सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाती काढण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते काढण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती. त्यानंतर आता कोकाटे यांचे खाते हे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे देण्यात आले. त्यामुळे माणिकराव कोकाटे हे सध्या बिनखात्याचे मंत्री आहेत. याआधी कोकाटेंनी गमावले कृषि खाते माणिकराव कोकाटे हे वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी विधीमंडळाच्या सभागृहात चक्क मोबाईलवर 'रम्मी' गेम खेळल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा राजीनामा न घेता केवळ खातेबदल करण्यात आला होता, ज्यामुळे त्यांना आपले तत्कालीन कृषी मंत्रिपद गमवावे लागले होते.
मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या दोन पक्षात जागावाटपावरून आज दुसरी बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही पक्षांकडून 150 जागांवर एकमत झाल्याचे भाजप नेते अमित साटम यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले आहे. तसेच उर्वरित 77 जागांवर लवकरच चर्चा होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच मुंबई महापालिकेसाठी जागावाटपाचा देखील फॉर्म्युला अमित साटम यांनी यावेळी सांगितला. मुंबई महापालिकेला विकून खाणाऱ्यांना घरी बसवण्यासाठी महायुती सज्ज असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना अमित साटम म्हणाले, ज्या 77 उर्वरित जागा आहेत, त्या उर्वरित जागांची चर्चा आमची सुरू आहे. एकमेकांना आकडेवारी देणे, ही सगळी प्रक्रिया येत्या दोन दिवसांत पार पडेल आणि मग आमची चर्चा होईल आणि मग अंतिम निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. त्यानंतर याची जी काही घोषणा असेल ती होईल. 227 जागांवर महायुती लढेल अमित साटम यांना जागा वाटपाचा फॉर्म्युला काय आहे? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, जागावाटपाचा फॉर्म्युला आहे आहे की या मुंबईच्या महानगपालिकेला भ्रष्टाचारविरहित प्रशासन द्यायचे आहे. मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढायचे आहे आणि ही मुंबईकरांची इच्छा आहे. मुंबईकरांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी भाजप, शिवसेना आणि रिपाइं ही महायुती कटिबद्ध आहे. त्यामुळे कोण किती जागा लढणार हे महत्त्वाचे नाही. 227 जागांवर महायुती लढेल आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचा महापौर, मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महापालिकेमध्ये विराजमान होईल. जेणेकरून येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचारविरहित प्रशासन देणे, मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षितता अबाधित ठेवणे आणि काही लोक मतांच्या लांगूलचालनासाठी या मुंबईचा रंग बदलण्याचे काम करत आहे, तो प्रयत्न हाणून पाडण्यावर आमचे एकमत आहे. त्यामुळे मुंबईकरांनी त्यांचा कौल आमच्याकडे देण्याचे ठरवले आहे. मतांच्या लांगूलचालनासाठी मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न पुढे बोलताना अमित साटम म्हणाले, आमचे सूत्र हेच आहे की मुंबई महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त करणे. ज्या लोकांनी 25 वर्ष बसून मुंबई महापालिकेमध्ये बसून भ्रष्टाचार केला, मुंबई विकून खाल्ली आणि आता स्वतःचे संपलेले राजकीय अस्तित्व पुन्हा एकदा जीवंत करण्यासाठी, मतांच्या लांगूलचालनासाठी मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न ते करत आहेत. तो प्रयत्न हाणून पाडणे हे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी महायुती यांना परास्त करण्यासाठी सज्ज आहे. उर्वरित 77 जागांवर आमची चर्चा सुरू शिवसेना शिंदे गट किती जागा लढणार आणि भाजप किती जागा लढणार? या प्रश्नावर उत्तर देताना अमित साटम म्हणाले, 150 जागा ही महायुती लढणार आहे. भाजप, शिवसेना आणि रिपाइं महायुती 227 जागा लढणार आहे. त्यात 150 जागांवर आमचे एकमत झाले आहे. उर्वरित 77 जागांवर आमची चर्चा सुरू असून लवकरच पुढील 2-4 दिवसात या जागा घोषित होतील. तसेच आमच्यासाठी कोणता पक्ष किती जागा लढवणार हे महत्त्वाचे नाही. महायुती 227 जागा लढवेल हे महत्त्वाचे आहे.
मुंबईतील उच्च न्यायालयासह वांद्रे, किल्ला कोर्ट आणि राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आज गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी देण्यात आली. या धमकीमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. एका ई-मेलद्वारे ही धमकी देण्यात आल्याने पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली असून, तातडीने न्यायालये रिकामी करून बॉम्बशोधक पथकाद्वारे (BDDS) कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर एक धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. यात केवळ उच्च न्यायालयच नव्हे, तर 'मुंबईतील सर्व न्यायालये बॉम्बने उडवून देऊ', असा मजकूर होता. यात प्रामुख्याने वांद्रे आणि किल्ला कोर्टाचाही उल्लेख असल्याचे समजते. ही माहिती मिळताच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास तातडीने उच्च न्यायालयाची इमारत रिकामी केली. तसेच वांद्रे न्यायालयातही कामकाज स्थगित करून वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. अंधेरी न्यायालयात बॉम्ब असल्याची निनावी धमकी मिळाली. सुरक्षेच्या कारणास्तव तातडीने संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा करण्यात आला. सध्या न्यायालयाच्या परिसरांना वेढा घालण्यात आला असून, आतून कोणालाही बाहेर जाण्यास आणि बाहेरून कोणालाही आत येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नागपूरच्या कोर्टात दोन आरडीएक्स मुंबईप्रमाणेच नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयालाही सकाळी धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. नागपूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रोशन बागडे यांनी सांगितले की, सिव्हिल लाईन्स परिसरात असलेल्या न्यायालयाच्या इमारतीत दोन आरडीएक्स (RDX) आधारित स्फोटके पेरली असून लवकरच त्यांचा स्फोट होईल, असा दावा या मेलमध्ये करण्यात आला होता. यानंतर नागपूर पोलिसांनी तातडीने सुरक्षा वाढवून तपासणी मोहीम हाती घेतली. सुदैवाने अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. सायबर पोलिसांकडून ई-मेलचा तपास सुरू सदरील धमकीचा ई-मेल नेमका कोणी पाठवला? त्याचा उद्देश काय? याचा शोध घेण्यासाठी मुंबई आणि नागपूर सायबर पोलिसांची पथके कामाला लागली आहेत. धमकीच्या मेलचे आयपी ॲड्रेस ट्रॅक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांनी आणि वकिलांनी घाबरून न जाता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मिरा रोडवरील खासगी शाळेलाही धमकीचा मेल दोन आठवड्यांपूर्वी मिरा रोडवरील एका खासगी शाळेलाही अशाच प्रकारची बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. दिल्लीतील कार स्फोटाच्या घटनेनंतर देशातील काही ठिकाणी अशा धमक्या मिळाल्या होत्या. 1 डिसेंबर रोजी मिरा रोड येथील सिंगापूर इंटरनॅशनल स्कूलला सकाळी सहा वाजता बॉम्ब धमकीचा ई-मेल आला होता. त्यानंतर शाळेची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली होती, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नव्हती.
सुनील वारेंच्या 'यशाचे वारे'चे प्रकाशन:प्रवीण तरडे म्हणाले - वाचनाने तरुणांना योग्य दिशा मिळते
वाचन संस्कृती व वाचनाने आजच्या तरुणांना बविष्याची दिशा आणि मार्ग मिळण्यास मदत होत असते आणि अशा निवडक पुस्तकापैकी सुनील वारे यांच्या यशाचे वारे हे एक पुस्तक असल्याचे मत प्रसिद्ध सिने निर्माता,दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले .भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी सुनील वारे यांच्या यशाचे वारे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पुणे बुक फेस्टिवल मध्ये पार पडला त्यावेळी ते बोलत होते . पुढे ते म्हणाले की ,कथा ,कादंबऱ्या यासह विविध ललित साहित्याबरोबरच आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणांना मार्गदर्शन ठरावे असे फार कमी साहित्य उपलब्ध आहे .त्यामुळे यशाचे वारे या पुस्तकाचा सर्वांना अतिशय उपयोग होईल असे प्रवीण तरडे म्हणाले . सुनील वारे यांनी आपल्या मनोगतात पुस्तकातील संदर्भ देत आजच्या तरुणाला यश संपादन करण्यासाठी लागणाऱ्या विविध गोष्टीचा उहापोह पुस्तकात असल्याचे त्सांगितले . यावेळी प्रमुख मान्यवरांचे स्वागत माय मिरर प्रकाशनाचे प्रकाशक मनोज अंबिके यांनी केले .या प्रकाशन समारंभास सिनेअभिनेते ,दिग्दर्शक प्रवीण तरडे,लेखक सुनील वारे,साहित्यरत्नअण्णाभाऊ साठे अध्यासन पुणे विद्यापीठाचे सुनील भणगे ,आरती वारे ,मनोज अंबिके आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते .
आंदेकर टोळीतील सराईतला कोल्हापुरात अटक:मकोका कारवाईनंतर दोन वर्षांपासून होता फरार
बंडू आंदेकर टोळीतील सराईत गुन्हेगार गणेश उर्फ सूरज अशोक वड्डा (वय ३०, रा. मंगळवार पेठ) याला खंडणी विरोधी पथकाने कोल्हापुरातून अटक केली आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई झाल्यानंतर तो गेल्या दोन वर्षांपासून फरार होता. वड्डा याच्याविरुद्ध मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तो कोल्हापूर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक गौरव देव आणि दिलीप गोरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी तातडीने पथक तयार करून कोल्हापूर परिसरातून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने केली. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, अश्विनी जगताप, अजित जाधव, संतोष सोनवणे, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, उपनिरीक्षक गौरव देव, रामेश्वर पार्वे, राहुल मखरे, नीलेश साबळे आणि अनिकेत बाबर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. लिंकद्वारे ३ लाखांची आर्थिक फसवणूक मोबाईल नंबरवर आलेल्या एका लिंकमुळे पाषाण परिसरातील एकाची ३ लाख ८३ हजार ८२२ रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्मामेंट इस्टेट, पाषाण येखील एका रहिवाशाच्या मोबाईल नंबरवर एक लिंक आली होती. त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तक्रारदाराच्या बँक खात्यातून ३ लाख ८२ हजार रुपये डेबिट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक भजनावळे करत आहेत.
जेजुरी पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदारासह दोघांविरुद्ध वॉरंट रद्द करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली असून, दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार दशरथ शिवाजी बनसोडे (वय ५७, रा. साळुंखे इमात, मोरगाव रस्ता, जेजुरी, ता. पुरंदर) आणि सचिन अरविंद चव्हाण (रा. चव्हाण वस्ती, वाल्हा, ता. पुरंदर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांनी वॉरंट रद्द करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदार हे कापड व्यावसायिक आहेत. २०१९ मध्ये त्यांच्या मुलाने एका व्यक्तीविरुद्ध जेजुरी पोलिस ठाण्यात बेकायदा सावकारी केल्याप्रकरणी फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात तक्रारदार आणि त्यांची पत्नी साक्षीदार होते. हवालदार बनसोडे आणि त्यांचा ओळखीतील चव्हाण यांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन त्यांना सांगितले की, त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध जेजुरी पोलिसांनी वॉरंट बजावले आहे. त्यांना पोलिस ठाण्यात हजर राहावे लागेल. हे वॉरंट जामीनपात्र असून, ते रद्द करण्यासाठी दोन हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून त्यांनी लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता, हवालदार बनसोडे आणि चव्हाण यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त भारती मोरे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून खाते काढून घेतले आहे. तसेच सदनिका गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर अटकेच टांगती तलवार कायम असून शुक्रवारी यावर निर्णय होणार असल्याची माहिती आहे. यावर कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत महायुती सरकारवर टीका केली आहे. पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, माणिकराव कोकाटेंच्या संदर्भातील सरकारची भूमिका कायद्याला धरून नाही. कायद्याला पायदळी तुडवण्याची त्यांची भूमिका आहे. न्यायालयाचे अवमान करण्याची भूमिका आहे. संविधानाला न जुमाणणारी भूमिका आहे आणि ही भूमिका म्हणजे आम्ही न्यायालयापेक्षा मोठे आहोत, कोणालाही जुमानत नाही आणि मन वाटेल ते वाटेल ते करू, अशी ती भूमिका असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेपुढे सरकारची मान झुकलेली पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, जर सुनील केदारे यांची आमदारकी 24 तासांच्या आत रद्द केली जाऊ शकते, राहुल गांधींचे घर खाली केले जाऊ शकते खासदारकी रद्द करून तर जे काही अभय दिले जाते त्यावेळी या सरकारला वाटते की सरकारमधील एक मंत्री गजाआड होताना आमची मान खाली झुकेल. पण महाराष्ट्रातील जनतेच्या पुढे त्यांची मान नक्कीच झुकलेली आहे. यापलीकडे जाऊन मी सांगतो की कोणी कितीही मोठा गुन्हा केल तरी त्याला वाचवण्याचे या सरकारचे प्रयत्न असतील, अशी टीका त्यांनी केली. धनंजय मुंडे - अमित शहा भेटीवर काय म्हणाले वडेट्टीवार? धनंजय मुंडे अमित शहा यांना भेटून आले आणि सुनील तटकरे यांना याबाबत माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. यावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, सगळ्यांना सगळे माहीत असते. खालून वरपर्यंत सगळं माहीत आहे. राहिला धनंजय मुंडे यांचा विषय, तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा का द्यावा लागला, इथून नव्याने सुरुवात करावी लागेल. परंतु, आज तरी त्यांचा नंबर लागतो की नाही या संदर्भात कुठेही स्पष्ट भूमिका नाही. मुंबई महापालिकेसाठी कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, आमच्या मुंबईच्या लोकांना वाटते की आम्ही आघाडी करायची नाही शिवसेना आणि मनसेसोबत. मागच्या निवडणुकांत जी परिस्थिती उद्भवली विधानसभेत त्यामुळे आमच्या लोकांनी भूमिका मांडली आहे. मुंबई प्रदेशाध्यक्ष पद हे वर्षा गायकवाड यांच्याकडे आहे आणि त्यांनी तीन वेळा भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसची भूमिका स्पष्ट आहे.
बंडू आंदेकरच्या वकिलांविरोधात गुन्हा:सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका; पिस्तूल जप्तीची कारवाई
बंडू आंदेकरच्या नातवाच्या घरात झडती घेत असताना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोन वकिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन पिस्तूल, एक एअर गन, रोकड आणि चांदीचे दागिने जप्त केले आहेत. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार प्रफुल्ल चव्हाण यांनी समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी मयूर भोकरे आणि अमोल आवाड हे नाना पेठेत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना आंदेकर टोळीतील तन्मय गणेश कांबळे (रा. राजेवाडी, नाना पेठ) याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कांबळेला ताब्यात घेतले असता, त्याने एका अल्पवयीनाकडे पिस्तूल ठेवण्यास दिल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांचे पथक नाना पेठेतील डोके तालीम परिसरात गेले. डोके तालमीजवळ असलेल्या चार मजली इमारतीत आंदेकरची मुलगी वृंदावनी वाडेकर राहतात. तिच्या मुलगा स्वराज वाडेकर याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी घराची झडती घेतली असता, त्यांना दोन पिस्तुले, एक एअर गन, १७ लाख १५ हजार २६० रुपये रोख रक्कम आणि १८ लाख ८४ हजार रुपयांच्या चांदीच्या वस्तू असा मुद्देमाल जप्त केला. याच इमारतीतील भाडेकरु प्रभू मारुती लोकरे यांच्या घराचीही झडती घेण्यात आली. पोलिस ई-साक्ष ॲपद्वारे चित्रीकरण करत असताना, दोन वकील तेथे आले. त्यांनी 'बंडू आंदेकर आमचे अशील आहेत. तुम्ही महिलेच्या घराचे कुलूप तोडून आत शिरलात,' असे पोलिसांना सांगितले. यावेळी खंडणी विरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप तेथे उपस्थित होत्या. त्यांनी वकिलांना 'आमची कारवाई कायदेशीर असून, पोलिसांना काम करू द्या,' असे सांगितले. मात्र, वकिलांनी घरझडतीची परवानगी आहे का, अशी विचारणा करत अरेरावी केली आणि सरकारी कामात अडथळा आणला, असे पोलीस हवालदार प्रफुल्ल चव्हाण यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
काँग्रेसच्या विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या घटनेवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया देत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपला सत्तेचा माज आला असून, सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि त्या पैशातून आमदारांची खरेदी, असा नवा 'आयाम' आणि अमित शहांचा ट्रेंड भाजपने महाराष्ट्रात सुरू केला आहे, अशा शब्दांत पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यावर बोलताना पटोले म्हणाले, भाजप लोकशाही आणि संविधान मानायला तयार नाही. कुणाला पैशांचे तर कुणाला पदाचे प्रलोभन दाखवून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. जनतेच्या पैशांची लूट करून आमदार विकत घेण्याचा अमित शाह यांच्यापासून सुरू झालेला हा 'ट्रेंड' आता महाराष्ट्रातही राबवला जात आहे. प्रज्ञा सातव यांना भाजपने नेमके काय प्रलोभन दिले, हे लवकरच समोर येईलच, पण ही घटना चुकीची आहे. काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपच्या वाटेवर? प्रज्ञा सातव यांच्यानंतर काँग्रेसचा आणखी एक विधान परिषद आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना पटोले यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या नीतीवर बोट ठेवले. काँग्रेस आपले नेते सांभाळू शकत नाही, अशी टीका भाजप करत आहे, पण हे त्यांच्या सत्तेच्या माजापोटी येत असलेले बोल आहेत, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. भारत काँग्रेसमुक्त करताना भाजप काँग्रेसयुक्त केली काँग्रेस विचारधारा कधीच संपू शकत नाही. नरेंद्र मोदी यांनी देखील त्या काळात काँग्रेसमुक्त भारत करण्याचा प्रण घेतला होता. पण शेवटी त्यांनी काँग्रेसयुक्त भाजप निर्माण केली. त्यामुळे काँग्रेस कधी संपू शकत नाही. उद्या आम्ही सत्तेत आलो, तर भाजप पूर्ण खाली होईल. भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठा उद्रेक आहे, असा दावा नाना पटोले यांनी केला. विरोधी पक्षनेतेपदावरून सुनावले प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस विधान परिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे आता काँग्रेसला हव्या असणाऱ्या विरोधीपक्ष नेते पदावर परिणाम होणार आहे. याबाबत नाना पटोले यांना विचारले असता, भाजपला विरोधी पक्षनेते पद द्यायचे नव्हते. जनतेचे प्रश्न मांडायचे आणि सोडवायचे ही लोकशाहीतील व्यवस्था आहे. पण भाजपला लोकशाही आणि संविधान मान्य नाही. यंदाचे हिवाळी अधिवेशन देखील विरोधीपक्ष नेत्याशिवाय चालले. काँग्रेसने इंदिरा गांधींच्या काळात विरोधकांचे दोन खासदार असताना विरोधीपक्ष नेतेपद दिले होते. लोकशाहीत सत्तेची आणि विरोधकाची अशी दोन चाके असतात. ही परंपरा भाजपने मोडकळीस काढलेली आहे. त्यामुळे संख्याबळ हा प्रश्न नसतो. काँग्रेसने विरोधकांचे दोन आमदार असताना सुद्धा विरोधीपक्ष नेते पद दिले होते. त्यामुळे काँग्रेसने ठेवलेली लोकशाहीची जाण भाजपकडे नाही. त्यामुळे एक आमदार कमी झाला किंवा जास्त झाला याची चर्चा होऊ शकत नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
मुंबई : १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील सेमीफायनलचे चार संघ पक्के झाले आहेत. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ‘अ’ गटातील सर्वच्या सर्व सामने जिंकत दिमाखात सेमीफायनल गाठली होती. याच गटातून टीम इंडियापाठोपाठ पाकिस्तानचा संघानेही सेमीत धडक मारली आहे. ‘ब’ गटातून श्रीलंका आणि बांगलादेश या संघांनी फायनलच्या दिशेने एक पाउल पुढे टाकले आहे. अंडर १९ आशिया […] The post आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘धुरंधर’मुळे निर्मात्यांना धडकी?
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘इक्कीस’ची रिलीजआधीपासूनच खूप चर्चा होती. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आधी ख्रिसमसच्या मुहूर्तावर २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, निर्मात्यांनी आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर सुरू असलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या अफाट यशामुळे […] The post ‘धुरंधर’मुळे निर्मात्यांना धडकी? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी आमदार प्रज्ञा सातव यांना पक्षात घेऊन भाजपने आपला मित्रपक्ष असणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेचा साखरेच्या सुरीने गळा कापल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी भविष्यात हिंगोलीत प्रज्ञा सातव ह्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना आव्हान देताना दिसतील, असा दावा केला आहे. प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी भाजप प्रदेश कार्यालय गाठून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला जोरदार झटका बसल्याची चर्चा सुरू आहे. पण आमदार रोहित पवार यांनी हा काँग्रेसला नव्हे तर सत्ताधारी शिवसेनेला खरा झटका असल्याचा दावा केला आहे. भाजपने साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा कापला रोहित पवार म्हणाले, साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा कापण्यात भाजपचा हात कुणीही धरणार नाही. याच अनुषंगाने कळमनुरी मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात उभा करण्यासाठी भाजपाने आपल्या निष्ठावंतांना अंगावरील माशी झटकावी तसं बाजूला सारलं आणि आगामी उमेदवार म्हणून प्रज्ञाताईंना पक्षात प्रवेश दिला. यावरून 2029 मध्ये मित्रपक्षांना संपवून भाजप स्वबळावर निवडणूक लढेल, हे मी अनेकदा केलेलं भाकित हळूहळू सत्यात उतरताना दिसतंय. बाकी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रज्ञाताई सातव यांचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या या निर्णयाने स्व. राजीव जी सातव यांच्या आत्म्यास नक्कीच दुःख झालं असेल, असे ते म्हणालेत. मंत्री शिरसाट यांच्याही विकेटची प्रतीक्षा रोहित पवारांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरूनही सरकारवर निशाणा साधला आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्याने नाईलाजाने घेतलेला हा निर्णय आहे. वास्तविक नैतिकतेच्या आधारावर कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा ठोठावली तेंव्हाच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने तरी त्यांचा राजीनामा घेऊन सरकार खऱ्या अर्थाने ‘वेगवान’ आहे हे दाखवून द्यायला हवं होतं. यामुळं किमान कायद्याचा सन्मान तरी राखला गेला असता आणि ‘कायदा व न्याय हे सर्वांसाठी समान आहे,’ असा चांगला संदेशही समाजात गेला असता. पण तशी अपेक्षा माणिकराव कोकाटे यांच्याकडून करणंच चुकीचं आहे! असो! या राजीनाम्यातून अनेकजण धडा घेतील, ही अपेक्षा! आम्ही मात्र मंत्री शिरसाठ यांच्याही विकेटची वाट पहात आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. प्रज्ञा सातवांनी काँग्रेस सोडून चूक केली दरम्यान, काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी प्रज्ञा सातव भाजपच्या प्रलोभनाला बळी पडल्याचा आरोप केला आहे. प्रज्ञा सातव या भाजपच्या प्रलोभनाला बळी पडल्या आहेत. माझ्या मते त्यांनी काँग्रेस सोडून मोठी चूक केली आहे. 21 तारखेच्या बैठकीत प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यावर पक्षात चर्चा केली जाईल. गटबाजी सगळीकडेच असते. त्यामुळे पक्ष सोडायचा नसतो, असे त्यांनी म्हटले आहे.
देशासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानात लक्षणीय घट झाल्याने नागरिकांना सकाळ-संध्याकाळ हुडहुडी भरू लागली आहे. राज्यात सध्या बहुतांश भागात कोरडे वातावरण राहणार असून पुढील काही दिवस हवामानात मोठा बदल होणार नसल्याचे संकेत हवामान अभ्यासकांकडून दिले जात आहेत. मात्र, येत्या दोन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होईल, त्यानंतर पुन्हा एकदा तापमान 2 ते 3 अंशांनी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हिवाळ्याचा कडाका आणखी तीव्र होणार असल्याचे चित्र आहे. राज्यातील विदर्भ विभागात थंडीचा प्रभाव सर्वाधिक जाणवत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 12 अंशांच्या खाली घसरले आहे. यवतमाळ जिल्ह्यात आज किमान 9.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून अकोला आणि नागपूर येथे तापमान थेट 10 अंशांवर आले आहे. पहाटेच्या वेळी गारवा जाणवत असल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात तर थंडीचा फटका अधिक तीव्र असून शेतकरी, शेतमजूर आणि सकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांना या थंडीचा मोठा सामना करावा लागत आहे. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पहाटे दव मराठवाड्यातही थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. नांदेडमध्ये किमान तापमान 8.9 अंशांपर्यंत खाली आले असून हा या हंगामातील आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा मानला जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथे तापमान 11 अंशांवर नोंदवण्यात आले, तर परभणीत पारा थेट 10.8 अंशांवर घसरला आहे. मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पहाटे दव पडत असून रस्त्यांवर गार वारे वाहत आहेत. थंडीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी गारठा अधिक वाढण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो आहे. जळगाव जिल्ह्यातील जेऊर येथे किमान तापमान थेट 7 अंश सेल्सियसपर्यंत खाली आले असून हा राज्यातील सर्वात कमी तापमानांपैकी एक आहे. नगरमध्ये 8.5 अंश तापमानाची नोंद झाली असून नागरिकांना तीव्र थंडीचा अनुभव येत आहे. नाशिकमध्ये तापमान 9.8 अंशांवर गेले आहे, तर पुण्यात किमान तापमान 10.4 अंशांवर नोंदवण्यात आले. सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये तापमान 11 ते 13 अंशांच्या दरम्यान आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर राज्यात पावसाची शक्यता नसून कोरडे वातावरण कायम राहील. मात्र, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे रात्री आणि पहाटेच्या वेळी गारठा अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत उबदार कपडे वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यात सावरी या गावात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टजवळ एका शेडमध्ये जवळपास 145 कोटींचे ड्रग्स आढळून आले. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यासह प्रकाश शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अंधारे यांनी केली. तसेच यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारे यांच्या आरोपांवर पलटवार केला आहे. शंभूराज देसाई म्हणाले, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्यावर जे बेछूट आरोप केले आहेत, त्यावर मी कालच प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आज पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारे यांनी त्याच आरोपांचे रीपीटेशन केले आहे. केवळ राज्यात निवडणुका सुरू आहेत म्हणून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सनसनाटी निर्माण करण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न अंधारे करत आहेत. पुढे बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, मागे सुद्धा दोन वर्षांपूर्वी जेव्हा एकदा नाशिकमध्ये ड्रग्स प्रकरण घडले होते, तेव्हा उत्पादन शुल्क मंत्री मी होतो आणि माझा थेट संबंध आहे अशा पद्धतीचे बेछूट आरोप त्यावेळी सुषमा अंधारे यांनी केला होता. ज्यावेळी मी या आरोपांच्या विरोधात जाहीरपणे सांगितले की तुमचे हे विधान 48 तासांत मागे घ्या, माफी मागा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा आणि ही कायदेशीर कारवाई न्यायालयात सुरू असल्याची माहिती देसाई यांनी दिली आहे. काय म्हणाल्या सुषमा अंधारे? सातारा जिल्ह्यातील सावरी येथील ड्रग्ज रॅकेट प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज खळबळजनक गौप्यस्फोट करत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. हॉटेल तेजयश माझे नाही, मी ती जागा चालवायला दिली आहे, असा दावा प्रकाश शिंदे यांनी केला होता. मात्र, आज भर पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी गुगल मॅप आणि व्हॉट्सॲप लिंकचा 'लाईव्ह डेमो' दाखवत, हॉटेल तेजयश प्रकाश शिंदेंचेच आहे आणि अजूनही तेच चालवत आहेत, असा सणसणीत आरोप पुराव्यानिशी केला. वाचा सविस्तर
हिंगोली जिल्ह्यात मतमोजणी तसेच मतमोजणीनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाभरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार असून ५७ पोलिस अधिकारी, ४९० पोलिस कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव दलाचे जवान कार्यरत राहणार आहेत. कुठेही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न झाल्यास तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी व वसमत पालिकेची निवडणूक प्रक्रिया होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी रविवारी ता. २१ होणार आहे. मतमोजणीच्या काळात तसेच मतमोजणी नंतर कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिस दल सतर्क झाले आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दोन पोलिस उपाधीक्षक, ५७ पोलिस अधिकारी, ४९० पोलिस कर्मचारी, ६०० गृहरक्षक दलाचे जवान, दोन दंगा काबू पथक, राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली जाणार आहे. या शिवाय जिल्हाभरात गस्तीसाठी ४४ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे स्वतंत्र पथक हिंगोली शहरात तैनात केले जाणार आहे. जिल्ह्यातील तीनही पालिकांच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात तसेच शहरातील संवेदनशील भागात पोलिसांंची गस्त राहणार आहे. तसेच मतमोजणी केंद्राच्या बाहेर हुल्लडबाजांना रोखण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने छायाचित्रीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यात मतमोजणी नंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर तसेच अनुचीत प्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आपल्याला तिकीट मिळावे यासाठी अनेकजण आपआपल्या परीने तयारी करत असतात. त्यातच आता सोलापूरमधून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. मला उमेदवारी मिळायलाच हवी, अन्यथा माझ्या जीवाचे बरे-वाईट झाल्यास त्याला पक्ष जबाबदार असेल, असा इशाराच इच्छुक उमेदवार अनंत धुम्मा यांनी दिला आहे. सोलापूर महानगरपालिकेत निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या 40 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते अनंत धुम्मा यांनी उमेदवारी मिळावी यासाठी थेट भाजप पक्षाच्या नेत्यांनाच इशारा दिला आहे. मला उमेदवारी न मिळाल्यास जीवाचे बरे-वाईट करून घेईल आणि याला पक्ष जबाबदार असेल, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण 102 जागांवर निवडणूक होणार आहे. या जागांसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाली असून तब्बल 1200 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. यात जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनंत धुम्मा हे मागील 40 वर्षांपासून भापचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. तसेच त्यांना या निवडणुकीत संधी मिळावी म्हणून ते आग्रही आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात त्यांनी उमेदवारी नाही मिळाली तर थेट आत्महत्येचा इशारा दिल्याचे दिसून येत आहे. अनंत धुम्मा नेमके काय म्हणाले? व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनंत धुम्मा म्हणतात की, मी गेल्या 40 वर्षांपासून भाजपचे काम करत आहे. पक्ष स्थापन झाल्यापासून मी काम करत आहे. भाजप पक्षावर विश्वास ठेऊन मी पक्षाचे काम करत आहे. मला यावेळी 100 टक्के न्याय मिळेल, असे मला वाटत आहे. तसेच मी भाजपला सांगू इच्छितो की माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यासोबत जर तुम्ही चुकीचे करत असाल आणि माझ्या जीवाचे बरे-वाईट काही झाले तर त्याला मी जबाबदार नाही, असे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. पुढे बोलताना अनंत धुम्मा यांनी म्हटले की, मी नगरसेवक नसतानाही एक कार्यकर्ता म्हणून आज केंद्राच्या योजना, राज्य सरकारच्या योजना घराघरात पोहोचवल्या आहेत. मी इतके सर्व काम करून जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर स्वतःला काहीतरी करून घेण्याशिवाय पर्याय नाही. जे निष्ठावंत आहेत, जे काम करतात त्यांना 100 टक्के न्याय देण्याचे प्रयत्न करा, असे आवाहन धुम्मा यांनी केले आहे. तसेच हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर आपण ते विधान भावनेच्या भरात केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर काय म्हणाल्या? या संपूर्ण प्रकरणावर सोलापूरच्या भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, सर्वच कार्यकर्त्यांना आपल्याला न्याय मिळावा असे वाटते, मात्र पक्षाला काही निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतात. तसेच कोणत्याही कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन शहराचे वातावरण बिघडवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. एकंदरीतच जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला तडवळकर यांनी दिला आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी दिल्लीत जाऊन केंद्रीय अर्थमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमुळे त्यांचा राज्य मंत्रिमंडळात चंचूप्रवेश होणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर तीव्र आक्षेप घेत मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले तर मी बीडमध्ये जाऊन उपोषण करेन, असा इशारा दिला आहे. सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नाशिक कोर्टाने सदनिका घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. यामुळे त्यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याचवेळी धनंजय मुंडे यांनी काल अचानक दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यामुळे धनंजय मुंडे यांचा कोकाटे यांच्या जागी मंत्रिमंडळात प्रवेश होणार का? अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना उपरोक्त इशारा दिला आहे. मुंडेंना मंत्री केले तर आम्ही स्वस्थ बसणार नाही - सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली याचे मला वाईट वाटते. ज्या नेत्यावर टोकाचे आरोप झाले आहेत, त्यांना अमित शहा कशी काय भेट देतात? धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध झाले नसले तरी, आरोपांमध्ये तथ्य असल्याशिवाय राज्य सरकारने त्यांचा राजीनामा घेतला का? आता पुन्हा त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचे प्रयत्न होत असतील तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. मुंडेंना पुन्हा मंत्री केले तर आम्ही बीडला जाऊन उपोषण करू आणि राज्यभरात मोठे आंदोलन छेडू, असे त्या म्हणाल्या. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला पर्यायाने महायुती सरकारला कायदेशीर झटका बसला आहे. त्यातच आता धनंजय मुंडे यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशावरून शरद पवार गटाने थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात सत्ताधारी व विरोधकांत मोठा संघर्ष दिसून येण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द उल्लेखनीय बाब म्हणजे राज्याचे क्रीडा व युवककल्याण, अल्पसंख्याक विकास व वक्फ मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार त्यांची आमदारकी आपोआप रद्द झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंची खाती काढून ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवा, असे पत्र बुधवारी रात्री राज्यपालांना दिले. त्यानुसार राज्यपालांनी कार्यवाहीदेखील केली आहे.
प्रज्ञा सातव यांचा विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश
मुंबई : काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. प्रज्ञा सातव या गत काही महिन्यांपासून सातत्याने काँग्रेसवर नाराज होत्या. त्यामुळे त्या काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील […] The post प्रज्ञा सातव यांचा विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचे वातावरण सुरू असून महापालिकेच्या निवडणुका देखील अगदी तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सध्या जागावाटपाची बोलणी सुरू आहे. दोन्ही पक्षात जागावाटपावरून झालेल्या पहिल्या बैठकीत भाजपने शिवसेना शिंदे गटाला फक्त 52 वॉर्ड देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, या प्रस्तावाला शिंदे गटाकडून नाकारण्यात आले. त्यानंतर आज पुन्हा एकदा दोन्ही पक्षात जागावाटपावरून दुसरी बैठक होत आहे. दरम्यान, या बैठकीपूर्वीच शिवसेना शिंदे गटाने मुंबईतील 127 प्रभागांवर दावा केला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या आजच्या बैठकीत मुंबईतील प्रभागांच्या जागावाटपाबाबत लोकसभा विभागनिहाय चर्चा होणार असल्याची माहिती आहे. ही बैठक दादरच्या वसंतस्मृती कार्यालयात पार पडणार आहे. यावेळी प्रत्येक वॉर्डमधील राजकीय समीकरण, पक्षीय बलाबल आणि यापूर्वीच्या निवडणुकीत ही जागा कोणी लढवली होती, यावर सविस्तर चर्चा होणार आहे. शिवसेनेची आधीपासूनच मुंबईत पकड असली तरी भाजपने देखील प्रत्येक प्रभागात आपली मोर्चेबांधणी करत ताकद वाढवली आहे. त्यानुसार भाजपने प्रत्येक वॉर्डनुसार नियोजन केले असून जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपचा महापौर बसवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे सध्याच्या घडीला मुंबईत आजी-माजी असे सगळे मिळून 127 नगरसेवक आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने 2017 च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढवण्यात आलेल्या सर्वच जागांवर दावा केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून अर्ध्याहून अधिक जागांवर दावा करण्यात आला आहे. यावर दोन्ही पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या आजच्या बैठकीनंतर प्रत्येक वॉर्डमधील दोन्ही पक्षांच्या ताकदीचा अहवाल तयार करून वरिष्ठांकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतरच जागावाटपासंदर्भातील पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठाच्या स्थापनेला दिलेले आव्हान सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावत न्यायप्रवेशाच्या मूलभूत संकल्पनेला बळ दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांना सुलभ, जलद आणि परवडणारा न्याय मिळावा, या संविधानिक तत्त्वाशी कोल्हापूर खंडपीठाची स्थापना पूर्णतः सुसंगत असल्याचे स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील लाखो नागरिकांना दिलासा मिळाला असून न्यायालयीन लढाईसाठी मुंबईपर्यंत जाण्याची अडचण आता कायमची दूर झाली आहे. कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत खंडपीठाची गरज नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत स्पष्ट केले की, न्यायालये ही केवळ प्रशासकीय सोयीसाठी नसून नागरिकांच्या न्यायहक्कासाठी असतात. भौगोलिक अंतर, आर्थिक अडचणी आणि वेळेची मर्यादा यामुळे न्यायापासून वंचित राहणाऱ्या घटकांना जवळच्या ठिकाणी न्यायालय उपलब्ध करून देणे ही राज्याची आणि न्यायव्यवस्थेची जबाबदारी आहे, असे न्यायालयाने नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात संविधानातील समानता, न्यायप्रवेश आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा सविस्तर उल्लेख केला. न्याय मिळवण्यासाठी नागरिकांना शेकडो किलोमीटर प्रवास करावा लागू नये, हीच लोकशाही व्यवस्थेची खरी भावना असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. कोल्हापूर खंडपीठामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि परिसरातील जिल्ह्यांतील प्रकरणांची सुनावणी जलद होईल, यामुळे उच्च न्यायालयावरील ताणही कमी होणार आहे. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील वकील संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेक वर्षांपासून कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी आंदोलनं, निवेदने आणि पाठपुरावा सुरू होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे त्या संघर्षाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. न्यायप्रणाली ही केंद्रित न राहता विकेंद्रित असावी, जेणेकरून सामान्य माणसाला न्यायालय आपलेसे वाटेल, हा संदेश या निर्णयातून अधोरेखित झाला आहे. कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा कौल केवळ एका खंडपीठापुरता मर्यादित नसून, भविष्यात देशातील इतर भागांमध्येही न्यायप्रवेश अधिक सुलभ करण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. हा निर्णय म्हणजे संविधानिक मूल्यांचा विजय असून, न्याय सर्वांसाठी, या तत्त्वाची प्रभावी अंमलबजावणी असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार असल्याचा ठाम दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याचा दाखला देत भाजपने मनसेवर ठाकरे गटाच्या केवळ पालख्या वाहन्याचा आरोप केला आहे. मुंबईत ठाकरे बंधूंची सत्ता आली तर शिवसेना मनसेला महापौर देणार का? नाही तर मग मनसे त्यांच्या केवळ पालख्या वाहणार का? असे कटू प्रश्न भाजपने या प्रकरणी उपस्थित केलेत. संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मुंबईचा महापौर केवळ शिवसेनेचाच होणार असल्याचा पुनरुच्चार केला. मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूंचाच असेल तो अस्सल मराठी माणूस असेल, असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाचा दाखला देत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. म्हणजे मनसे फक्त पालख्या वाहायला? समजा, मुंबईत सत्ता आलीच तर महापौरपद मनसेला देणार का? महापौर मनसेचा की शिवेसनेचा? या थेट प्रश्नावर संजय राऊतांचे ठाम उत्तर - “महापौर शिवसैनिकच होणार!” इतिहास सांगतो - शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करण्याचे वचन बाळासाहेबांना दिल्याचे सांगत खुर्चीवर मात्र उद्धव ठाकरेच बसले. मग महापौरपदासाठी “शिवसैनिक” नेमका कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वर्षानुवर्षे मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या उबाठाकडून मुंबईकरांना काय मिळालं? सध्या शहरात रस्ते नव्हे तर खड्ड्यांचे जाळे आहे, नियोजनाअभावी पावसात मुंबई ठप्प होते, नालेसफाईत कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला, कचरा उचलण्यातही दलाली घेण्यात आली. ठाकरेंनी मुंबईला आपल्या मर्जीनुसार चालवले व मुंबई सहन करत राहिली, असेही ते म्हणालेत. 3 महिन्यांत येतो म्हणाले अन् एका महिन्यातच आले - आशिष शेलार दुसरीकडे, मंत्री आशिष शेलार यांनी एका कवितेद्वारे संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. खाली वाचा त्यांची कविता जशास तशी... मी तीन महिन्यांनी पुन्हा येईन म्हणाले...एक महिन्याच्या आतच ते परत आले..विश्वविख्यात प्रवक्त्यांना ठणठणीत पाहून आम्हाला ही बरेचं वाटले ! त्यांचापुन्हा सकाळचा भोंगा सुरु झालामहाराष्ट्राचा सकाळी सकाळी चॅनल बदलण्याचा हंगाम परत आला..यांना ऐकण्यापेक्षा महाराष्ट्राची हास्यजत्रा बरीविनोदी असली तरी ती विचारांवर नेहमीच खरी ! हे बोलतात... खूप बोलतात..खूपच बोलतातकुणाचा बाप काढतात... उखाड दियाची गर्जना करुनस्वतःच्या पक्षालाच उखडून टाकतात...कुणाची अक्कल काढतात...अधिकार नसला तरी अनाहूत सल्ले देतात..महाराष्ट्राचे तुफान मनोरंजन मात्र करतात ते म्हणे त्यांच्या पक्षाचे हूकमाचे एक्केविश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के !!
साताऱ्यातील सावरी येथे उघडकीस आलेल्या ड्रग्ज प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा पोलीस प्रशासनावर आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ड्रग्ज रॅकेटमधील आरोपी ओंकार डिघे घटनास्थळी सापडला असतानाही त्याला का सोडून देण्यात आले? एमएच ११ पासिंगच्या पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा गाडीतून त्याला कोणी जाऊ दिले? असे तिखट सवाल उपस्थित करत अंधारे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. तसेच, घटनास्थळी पुन्हा सापडलेल्या ४० लिटरच्या कॅनवरून सावरी भागात अजूनही ड्रग्ज फॅक्टरी सुरू असावी, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंधारे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले. त्या म्हणाल्या, ओंकार डिघे हा स्पॉटवर असताना त्याला अटक का झाली नाही? तो नंतर रात्री उशिरा स्वतःहून मुंबईच्या युनिट नंबर ७ कडे हजर होतो, हे संशयास्पद आहे. याचा अर्थ, सत्ताधाऱ्यांशी संबंधित लोकांना पोलीस अटक करत नाहीत, तर ते स्वतःच्या सोयीने हजर होतात. वाल्मीक कराड, प्रशांत कोरटकर ही याचीच उदाहरणे आहेत. ४० लिटर लिक्विडचे रहस्य पोलीस तपासातील हलगर्जीपणा उघड करताना अंधारे यांनी सावरी येथील घटनाक्रमाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, काल आमची पत्रकार परिषद आटोपल्यानंतर अवघ्या दोन तासांत सातारा पोलिस सावरीला पोहोचले होते. त्यांच्या पाठोपाठ एक वृत्तवाहिनी पोहोचली. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्याला विचारले असता, आमच्याकडे काही तपास नाही, मी सहज आलो असे सांगितले जाते. जर सातारा पोलिसांकडे तपास नाही, तर इतक्या तत्परतेने सातारा पोलिस तिकडे का पोहोचले? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. पोलिसांनी तिथे काहीतरी सामान उचचले, तर त्याचा काही गैरवापर होऊ नये, यासाठी ते उचलल्याचे पोलिस सांगतात. दार उघडल्यानंतर आत एक चाळीस लीटर निळ्या रंगाची कॅन दिसते. याबाबत पोलिसांना विचारले असता, ते म्हणतात की, हे राहिलेले सामान होते, चुकून राहिले असेल. जर सावरीला एवढी मोठी कारवाई झाली होती, तर ती कॅन चुकून कशी राहील? आणि जर चुकून राहिली असेल, तर हा कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचा अक्षम्य हलगर्जीपणा आहे. गृहमंत्र्यांनी अशा अधिकाऱ्यांची ताबडतोब चौकशी लावली पाहिजे. एवढे मोठे लिक्वीड चुकून कसे राहील?असेही सुषमा अंधारे म्हणाल्या. फॅक्टरी अजूनही सुरू? पोलिसांनी आधी सर्व परिसर 'क्लिन' केला होता, मग आता अचानक तिथे पुन्हा कॅन कसा सापडतो? यावर बोट ठेवत अंधारे यांनी गंभीर शंका उपस्थित केली. याचा दुसरा अर्थ असा होतो की, त्या भागात अजूनही फॅक्टरी सुरू आहे किंवा ड्रग्ज माफियांचा वावर तिथे आहे, असा आरोप त्यांनी केला.
हिंगोली जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होत आहे. काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिकृत स्वरूप मिळालं आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असून, हिंगोलीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज त्यांनी विधानभवन सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला असून, आजच त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या घडामोडीमुळे काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. या पक्षांतरामागे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. मात्र, अशोक चव्हाण यांनी या आरोपांचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. एका वृत्तवाहिणीशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, प्रज्ञा सातव यांच्या पक्षप्रवेशात माझा कोणताही संबंध नाही. माझा आणि त्यांचा अनेक दिवसांपासून संपर्कही नाही. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीवरही गंभीर टिप्पणी करत म्हटले की, अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांना काँग्रेसमध्ये आपले भवितव्य सुरक्षित वाटत नाही. पक्षातील नेतृत्व कमकुवत झालं असून, मेहनत करणारे कार्यकर्ते डावलले जातात आणि त्यामुळेच अंतर्गत असंतोष वाढतो आहे. स्थानिक पातळीवर पर्याय शिल्लक राहत नसल्याने अशा निर्णयांना चालना मिळते, अशी खंतही चव्हाण यांनी व्यक्त केली. दरम्यान, डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदारकीचा औपचारिक राजीनामा दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदावरही होत्या. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर 2021 साली त्या विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024 मध्ये काँग्रेसकडून त्या दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्या होत्या आणि त्यांचा कार्यकाळ 2030 पर्यंत होता. मात्र, आता अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विशेषतः हिंगोलीसारख्या जिल्ह्यात जिथे काँग्रेसचा प्रभाव मानला जात होता, तिथे या पक्षांतरामुळे भाजप अधिक बळकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजीव सातव हे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे डॉ. प्रज्ञा सातव या दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे मानले जात होते आणि त्यांनी राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रातून काँग्रेसचे केवळ दोन खासदार निवडून आले होते, त्यात राजीव सातव यांचा समावेश होता. त्यांनी पंचायत समिती सदस्य ते राज्यसभा खासदार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस आणि काँग्रेस कार्य समिती सदस्य अशी अनेक महत्त्वाची पदे भूषवली होती. त्यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांनी राजकारणात प्रवेश करत काँग्रेसमध्ये सक्रिय भूमिका घेतली. मात्र आता त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेससाठी हा केवळ एक पक्षांतराचा विषय न राहता, नेतृत्व, विश्वास आणि भवितव्याच्या प्रश्नावर मोठं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आल्याचं राजकीय विश्लेषक मानतात.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील माणिक मोती गळाले असा उल्लेख करत त्यांनी सत्ताधारी मंत्रिमंडळावर टीकेची झोड उठवली. महायुतीतील दोन घटक पक्षांना इशारा देत राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टप्प्याटप्प्याने राजकीय खेळी खेळत असून शेवटी त्याचा फटका शिंदे गटालाच बसेल. पुढे शिंदेंचा पक्ष अस्तित्वात राहील का? असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत संघर्ष उघड केला. फडणवीस हे राजकारणात दीर्घ खेळ खेळतात आणि अखेरचा घाव हा मिंध्यांवरच घालतील, असा टोला राऊतांनी लगावला. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मोठा दावा केला. आपण आज शरद पवार यांची भेट घेणार असून आघाडीबाबत चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्याशी संवाद सुरू असून काँग्रेसकडूनही सकारात्मक संदेश आल्याचे राऊत म्हणाले. मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूंचाच असेल आणि तो अस्सल मराठी माणूस असेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकांमध्ये मुंबईवर ठाकरे गटाचाच झेंडा फडकणार, असा आत्मविश्वास दाखवत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले. धनंजय मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यावरही संजय राऊतांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. वाल्मिक कराड अजूनही तुरुंगात असून प्रकरणाचा खटला पूर्ण झालेला नाही, अशा परिस्थितीत गंभीर आरोप असलेल्या व्यक्तींना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देणे हे पाप ठरेल, असे त्यांनी म्हटले. भ्रष्टाचार आणि गुंडगर्दीच्या आरोपांमुळे फडणवीस मंत्रिमंडळातील एकाच गटाचे दोन मंत्री गेले, हीच या सरकारवर लागलेली मोठी काळीमा असल्याचे त्यांनी नमूद केले. शिंदे गटात असे अनेक मंत्री असल्याचा दावा करत त्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली. पैशांच्या बॅगा, संशयास्पद व्यवहार आणि इतर गंभीर मुद्दे सर्वांना दिसत असतानाही सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राऊतांनी केला. माणिकराव कोकाटे प्रकरणावर बोलताना संजय राऊत यांनी सरकारवर थेट संरक्षण दिल्याचा आरोप केला. कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत सुरू असून त्यातून आम्ही भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी आहोत, असा संदेश दिला जात असल्याचे ते म्हणाले. आमदार, खासदार किंवा मंत्री कोणीही भ्रष्ट असेल तर त्यांनी आमच्याकडे यावे, पूर्ण संरक्षण दिले जाईल, असा संकेत सत्ताधारी देत असल्याचा आरोप त्यांनी केला. याच पार्श्वभूमीवर अमित शहा आणि धनंजय मुंडे यांची भेट ही देखील याच संदेशाचा भाग असल्याचा दावा राऊतांनी केला. महाराष्ट्रात हा संदेश देवेंद्र फडणवीस देत असून दिल्लीतून अमित शहा तोच सूर आळवत असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्या आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. प्रज्ञा सातव या गत काही महिन्यांपासून सातत्याने काँग्रेसवर नाराज होत्या. त्यामुळे त्या काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानुसार, त्यांनी आज सकाळीच त्यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. प्रज्ञा सातव यांचे पती राजीव सातव हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी जबर झटका असल्याचे मानले जात आहे. प्रज्ञा सातव आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी त्यांचे कार्यकर्ते हिंगोलीहून मुंबईला पोहोचलेत. प्रज्ञा सातव यांनी का घेतला टोकाचा निर्णय? राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला होता. विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी डॉ. प्रज्ञा सातव यांचे नाव चर्चेत असताना हिंगोलीच्या तत्कालीन पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी त्यांना डावलून इतर नावांना पसंती दिली होती. त्यावरून डॉ. सातव व वर्षा गायकवाड यांच्यात कथित वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाही. यामुळे पक्षाच्या बैठकांत गटबाजी उफाळून आली होती. काँग्रेसच्या नेत्यांकडूनच पक्षात समन्वय साधण्यासाठी प्रयत्न झाले नसल्याने अखेर डॉ. सातव यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली असा दावा केला जात आहे. हिंगोलीच्या राजकारणावर किती पडणार फरक? डॉ. प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशाने हिंगोली जिल्ह्यातील राजकारणावर मोठा असा परिणाम होणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र कळमनुरी तालुक्यात भाजपाला काही प्रमाणात बळ मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. गत 4 महिन्यांत हिंगोलीत मोठी उलथापालथ उल्लेखनीय बाब म्हणजे हिंगोली जिल्ह्यात मागील 4 महिन्यांत मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या आहेत. काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिंदेसेनेला सेनगाव व हिंगोली तालु्क्यात मोठे बळ मिळाले. त्यानंतर पालिका निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) काही माजी नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. या शिवाय शरद पवार गटाचेच जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह माजी नगरसेवकांनीही नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोण आहेत प्रज्ञा सातव? डॉक्टर प्रज्ञा सातव या काँग्रेस दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव 2014 ते 2019 या कालावधीत हिंगोलीचे खासदार होते. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे म्हणून त्यांची ख्याती होती. पण 2021 मध्ये आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. त्यानंतर प्रज्ञा सातव राजकारणात आल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली. सध्या त्या महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षा म्हणून काम करत आहेत. तत्पूर्वी, 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतही त्या विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ 2030 मध्ये संपणार आहे. कोण होते राजीव सातव? राजीव सातव राहुल गांधी यांच्या अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जात होते. 2014 च्या मोदी लाटेत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे केवळ 2 खासदार निवडून आले होते. त्यामध्ये राजीव सातव यांचा समावेश होता. त्यामुळे राजीव सातव प्रचंड चर्चेत आले होते. त्यानंतर राजीव सातव यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्तुळात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. राजीव सातव यांनी पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. तर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, गुजरातचे प्रभारी आणि काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या आणि पदे भूषवली होती.
छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेल (धनदा कॉर्पोरेशन) गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने एक हाय पॉवर समिती नियुक्त केली आहे. ही समिती या संपूर्ण प्रकरणाचा 8 दिवसांच्या आत तपास करून आपला अहवाल सादर करणार आहे. परिणामी, या प्रकरणी अडचणीत आलेल्या मंत्री संजय शिरसाट यांचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या समितीच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील 110 कोटींचे सुप्रसिद्ध हॉटेल व्हिट्स अवघ्या 68 कोटींत खरेदी करण्याचा कथित प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर शिरसाट यांनी या सौद्यातून काढता पाय घेतला. पण आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमल्यामुळे मंत्री शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सरकारच्या परिपत्रकानुसार, प्रस्तुत समिती धनदा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालमत्तेच्या लिलावामध्ये निविदा प्रक्रिया राबवताना त्यामधील अटी, शर्ती किंवा इतर प्रक्रियेत कुठे अनियमितता झाली आहे काय? याबाबत व सदर मालमत्तेच्या मूल्यांकनाबाबत सखोल चौकशी करणार आहे. समितीत कुणाचा समावेश? छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील या समितीत संभाजीनगरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, सहसंचालक लेखा व कोषागारे, उपायुक्त कामगार विभाग, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, सह जिल्हा निबंधक, सहाय्यक संचालक नगर रचना विभाग आदींचा सदस्य म्हणून समावेश आहे. या व्यतिरिक्त समिती अध्यक्षांना जे अधिकारी सदर समितीत आवश्यक वाटतील त्यांची नियुक्ती करण्याचे अधिकारही देण्यात आलेत. सदर समितीला धनदा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालमत्तेच्या लिलावात निविदा प्रक्रिया राबवताना त्यामधील अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झाली आहे काय? याबाबत व सदर मालमत्तेच्या मूल्यांकनाबाबत सखोल चौकशी अहवाल समितीच्या शिफारशी व अभिप्रायांसह तसेच आवश्यक कागदपत्रांसह 8 दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश दिलेत. या पत्रकावर छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांची स्वाक्षरी आहे. सरकारचा प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न - दानवे दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी या समितीवरून सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, ज्या कार्यालयातुन विट्स हॉटेल (धनदा कॉर्पोरेशन) गैरव्यव्हार प्रकरणाच्या फाईली फिरल्या, त्याच कार्यालयांचे अधिकारीच आता या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचा आदेश निघाला आहे. ही कसली 'हाय पॉवर कमिटी' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी? हे तर प्रकरणावर स्पष्टपणे पांघरूण घालणे झाले! वरिष्ठ, सचिव पदाचे सनदी अधिकारी किंवा न्यायाधीश या समितीचे अध्यक्ष आणि जिल्ह्याबाहेरील अधिकारी समितीवर नेमले असते तर आपल्यातील न्यायप्रिय मुख्यमंत्री दिसला असता. आता ही समिती निव्वळ देखावा आहे, असे ते म्हणालेत. नेमके काय आहे प्रकरण? छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत खरेदी करण्याचा आरोप मंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री शिरसाट यांच्यावर हे हॉटेल कमी किंमतीत विकण्यासाठी संबंधितांवर दबाव टाकल्याचा आरोप केला होता. तसेच हे हॉटेल खरेदी करण्यासाठी शिरसाट यांच्याकडे पैसे आले कुठून? असाही सवाल त्यांनी केला होता. या आरोपांनंतर संजय शिरसाट यांनी लिलाव प्रक्रियेतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आचारसंहितेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ७३ प्राध्यापकांचीभरती प्रक्रिया लांबणीवर गेली आहे.प्राध्यापकांच्या नियुक्ती कार्यपद्धतीबाबत स्पष्टता, प्रक्रियेबाबत पुढील सूचनानसल्याने प्रक्रिया थांबलेली आहे.महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जानेवारी अखेरपर्यंत सुरू राहणार आहे.त्यामुळे निवडणुकांनंतरच प्रक्रियेबाबत स्पष्टता येईल, अशी चर्चा आहे. विद्यापीठात शिक्षक प्रवर्गातील एकूण २८९जागा मंजूर आहेत. मात्र, मागील काहीवर्षांत अनेक प्राध्यापक सेवानिवृत्त झालेआहेत. सध्या विद्यापीठातील विविधविभागातील १६० पेक्षा अधिक प्राध्यापकांचीपदे रिक्त आहेत. त्यापैकी ७३ जागाभरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रियेची नवीन कार्यपद्धती जाहीर करण्यात आली. कार्यपद्धतीला राज्यभरात विरोध होतअसल्याने सुधारित कार्यपद्धतीवर विचारसुरू झाला. संबंधित समितीने राज्यशासनाला अहवाल ही सादर केला. परंतु, कार्यपद्धती अद्याप निश्चित नाही. त्यातआता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली. त्यामुळेही प्रक्रिया लांबणीवर जाणार असल्याची चर्चा आहे. सध्या महापालिकेच्या निवडणुका सुरूअसून आचारसंहिता लागू आहे. त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची शक्यताआहे. ३१ जानेवारीपर्यंत निवडणुकांचीप्रक्रिया चालेल असे सांगण्यात येते. तोपर्यंतकार्यपद्धतीबाबत स्पष्टता नसल्यानेप्राध्यापक भरती प्रक्रियेवर त्याचा परिणामझाल्याची चर्चा आहे. इनसाइड स्टोरी- निकषांना विरोधामुळे विलंब प्राध्यापक पदासाठीच्या पात्रतेलादिलेल्या गुणांकनामध्ये परदेशातीलविद्यापीठात पीएचडी, पदव्युत्तरपरीक्षेतील गुण, स्टेट रँकिंग,एनआयआरएफ रँकिंग यांना प्राधान्यदिले आहे. हे निकष स्थानिकउमेदवारांसाठी अडचणीचे आहेत.त्यामुळे या निकषांना सर्व स्तरांतूनविरोध होत आहे. या प्रक्रियेत २० गुणमुलाखतीसाठी व ८० गुण शैक्षणिक,संशोधन आदींसाठी होते. त्यातसरकारने बदल केले आहेत. आतामुलाखतीसाठी ४० आणि संशोधन,शैक्षणिक पात्रतेसाठी ६० गुण केलेआहेत. त्यालाही विरोध होत आहे.नियमात बदलाचे अधिकार केवळविद्यापीठ अनुदान आयोगाला आहेत.त्यामुळे ही प्रक्रिया रखडली आहे.झालेल्या विरोधामुळे शासन यानियमात बदल करणार असल्याच्याहालचाली सुरू आहेत. त्यासाठी वेळलागणार आहे. त्याच वेळी निवडणुकाआल्या आहेत. सरकारलाआचारसंहितेचे कारण मिळाले आहे. दुसऱ्यांदा प्रक्रियेला विलंब : सरकारने भरतीला मान्यता दिल्यानंतरविद्यापीठाने गेल्या वर्षी अर्ज मागवले होते. मात्र, ही प्रक्रिया रखडली होती.त्यानंतर भरतीची नवी नियमावली सरकारने निश्चित केली. त्यामुळे नव्याने अर्जमागवण्यात आले आहेत. पहिल्या प्रक्रियेत सुमारे ४,५०० पर्यंत अर्ज सादरकरण्यात आले होते. नव्या नियमांमुळे ही संख्या ३,५०० पर्यंत कमी झाली आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वेग घेताना दिसत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडनंतर आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्व पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांबाबत मुंबईत नवी राजकीय समीकरणं आकाराला येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादीला अपेक्षित जागावाटप मिळण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत असून, भाजप आणि शिवसेनेकडूनही राष्ट्रवादीला सामावून घेण्याबाबत फारसा उत्साह नसल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुंबईत राष्ट्रवादी स्वतंत्र मार्ग किंवा पर्यायी आघाडीच्या शक्यता तपासत असल्याचे दिसते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मुंबईतील निवडणुकीसाठी महत्त्वाचा राजकीय संकेत दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बुधवारी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात शहर व प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देण्याचे निर्देश दिल्याचे समजते. महायुतीमध्ये अडचणी वाढत असताना, मुंबईत एकत्र येण्याचा पर्याय राष्ट्रवादीकडून गांभीर्याने विचारात घेतला जात असल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होते. जर हा प्रस्ताव पुढे प्रत्यक्षात आला, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडनंतर मुंबईतही दोन राष्ट्रवादी पक्ष एकत्र निवडणूक लढवताना दिसू शकतात. मात्र, या समीकरणाला दुसरी बाजूही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेसोबत आघाडी करून निवडणूक लढवण्यास अधिक इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शरद पवार गट नेमका कोणता मार्ग स्वीकारतो, यावर मुंबईतील अंतिम चित्र अवलंबून राहणार आहे. दरम्यान, मुंबईत राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची ठरत आहेत. एकीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत जाण्याची शक्यता तपासत आहे. नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपकडून माघार येण्याची शक्यता कमी असल्याने राष्ट्रवादीसाठी महायुतीतील मार्ग अधिक कठीण झाला आहे. तसेच, मुंबईतील अल्पसंख्यांक मतांचा विचार करता नवाब मलिक हे राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचे मानले जात असल्याने पक्षाकडून इतर पर्यायांचीही चाचपणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे सुरू असलेल्या बैठकीत राष्ट्रवादीकडून विविध राजकीय शक्यतांवर चर्चा केली जात आहे. महायुतीसोबत राहायचे, स्वबळावर लढायचे की शरद पवार गटासोबत एकत्र यायचे, याबाबत अंतिम निर्णय अजून झालेला नाही. मात्र, मुंबईतील बदलती राजकीय गणिते पाहता राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक निर्णायक ठरणार असून, येत्या काही दिवसांत या संदर्भात मोठा राजकीय निर्णय जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना शिंदे गट महायुती म्हणून लढवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले असून, या संदर्भात आज पुण्यात दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ आणि शहराध्यक्ष गणेश बिडकर सहभागी होणार आहेत. तर शिंदे गटाकडून उद्योगमंत्री उदय सामंत, उपनेत्या निलम गोऱ्हे, माजी आमदार विजय शिवतारे आणि संपर्कप्रमुख नाना भानगीरे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जागावाटप, प्रचार रणनीती आणि युतीतील समन्वय यावर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र या महत्त्वाच्या बैठकीतून शिंदे गटाचे पुणे महानगरप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना डावलण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजप नेत्यांच्या विरोधामुळे शिंदे गटाकडून धंगेकरांना निर्णय प्रक्रियेतून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी धंगेकरांनी पुणे महापालिकेतील सर्व 165 जागा शिवसेना स्वबळावर लढवण्याची तयारी असल्याचा दावा केला होता. मात्र आता याच बैठकीत भाजपला 35 ते 40 जागा देण्याचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याने धंगेकरांच्या भूमिकेला छेद गेला आहे. पुणे जैन बोर्डिंग हाऊस प्रकरणात त्यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधार मोहोळ यांच्यावर केलेले आरोपही आता त्यांच्या अडचणी वाढवणारे ठरत असल्याची चर्चा आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून 15 जानेवारी रोजी मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला असून, सत्ताधारी आणि विरोधकांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. पुणे महापालिका निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची ठरणार असल्याने भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बैठकीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही - रवींद्र धंगेकर या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया देताना, बैठकीबाबत आपल्याला कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. माध्यमांमधूनच याबाबत कळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिवसभरात निमंत्रण येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली असून, आज शिवसेनेच्या मुलाखती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीनंतर नेमके काय चित्र स्पष्ट होते, हे पाहावे लागेल, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली. घराणेशाही आणि सत्तेच्या दबावावरून राजकीय वाद दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेतही राजकीय घडामोडींना वेग आला असून, घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला आहे. विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित पवारांचे विश्वासू अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ यंदा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. मात्र, ज्या प्रभागात ते वास्तव्यास आहेत ती जागा अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव असल्याने सिद्धार्थला इतर प्रभागातून उमेदवारी घ्यावी लागणार आहे. यासाठी दुसऱ्या प्रभागात अतिक्रमण करून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याची चर्चा आहे. अण्णा बनसोडे यांनी सिद्धार्थ शंभर टक्के निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले असून, कोणत्या प्रभागातून हे अद्याप जाहीर केलेले नाही. यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये घराणेशाही आणि सत्तेच्या दबावावरून राजकीय वाद अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
वसमत तालुक्यातील हापसापूर येथे ९९ हजार रुपयांचे कर्ज व नापिकीमुळे तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. १७ अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील हापसापूर येथील नरहरी सवंडकर (४०) यांचे हापसापूर शिवारात दोन एकर शेत आहे.या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. घरी पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सध्या शेतामध्ये गहू व काही क्षेत्रावर ऊसाचे पिक आहे. या शेतीवर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून ९९ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यान, खरीप हंगामात घेण्यात आलेले पिक अतिवृष्टीमुळे हातचे गेले आहे. त्यामुळे आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा तसेच पिककर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. नापिकी व कर्जफेडीची बाब त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह भावांनाही बोलून दाखवली होती. त्यानंतर शनिवारी ता. १३ दुपारी घरी कोणी नसतांना त्यांनी राहत्या घरी गळफास घेतला. काही वेळानंतर त्यांचे कुटुंबिय बाहेरून घरी आले असतांना नरहरी यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. ्त्यांनी आरडा ओरड करून मदत मागितली. शेजारी तातडीने घटनास्थळी धावले. तर या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार सुर्यवंशी यांच्या पथकाने घटनास्थळी भेट घेतली. पोलिस व गावकऱ्यांनी नरहरी यांना तातडीने टेंभूर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. या प्रकरणी साहेबराव सवंडकर यांच्या माहितीवरून हट्टा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जमादार सुर्यवंशी पुढील तपास करीत आहेत.
सूतगिरणी चौकातील कार-ऑटो अपघातातील जखमीला मदत करण्यासाठी गेलेले माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांना मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी (17 डिसेंबर) रात्री अकराच्या सुमारास घडला. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण होते. सूतगिरणी चौकात कार आणि ऑटोरिक्षाचालकाचा रात्री साडेदहाच्या सुमारास अपघात झाला. अपघातात रिक्षातील एका व्यक्तीला मार लागला होता. त्या वेळी तेथून जात असलेले माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी अपघातस्थळी जखमींना मदत करण्यासाठी धावले. जखमी प्रवाशाला उपचारासाठी नेत असताना एका अज्ञात व्यक्तीने हातातील लोखंडी कडे मारत धक्काबुक्की केली. त्या वेळी तेथे जमाव जमला, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले. याबाबत सुरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, आम्ही या अपघातात जखमीला मदत करत असताना काहीही संबंध नसलेली व्यक्ती अचानक आली आणि तिने गोंधळ घातला. या व्यक्तीला जवाहरनगर ठाण्यात आणले होते. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर भाजपचे नेते दिलीप थोरात, विकास कुलकर्णी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. संबंधित व्यक्तीचे नातेवाईकही जमा होऊन शिवीगाळ करत होते. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर रात्री उशिरा जवाहरनगर पोलिस ठाण्यात आले.
भाजपतील नाराज नेत्यांकडून तिसऱ्या विकास आघाडीचे संकेत:डोकेदुखी वाढणार, की पेल्यातील वादळ शमणार
महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले असतानाच, निवडणुकीच्या निमित्ताने भाजपतील नाराजांनी वेगळी मोट बांधून उभारलेला नागरिक मंच अकोल्याच्या राजकारणाला नवी दिशा देणार, भाजपची डोकेदुखी वाढवणार की पक्षावर दबावतंत्राचे माध्यम ठरणार, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. शिस्तभंगाची कारवाई झालेल्या माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी, भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते डॉ. अशोक आेळंबे या शहरातील दोन मातब्बर नेत्यांसह पक्षातील नाराज आजी- माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘नागरिक संवाद मंच’च्या बैठकीत भाजपतील नाराजांनी वेगळी मोट बांधली आणि महापालिकेत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर भाजपने शिस्तभंगाची कारवाई केलेल्या नेत्यांसह पक्षाच्या नाराज गटावर टीकेची झोड उठवली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते व तब्बल ३० वर्षे नगरसेवक राहिलेले हरीश अलीमचंदानी यांनी पक्षाला रामराम ठोकत निवडणूक लढवली. तसेच भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक ओळंबे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून भाजपविरोधात निवडणूक लढवली. या दोन्ही बंडखोर उमेदवारांमुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले आणि त्याचा थेट फटका भाजपला बसला. अखेर भाजपला या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला होता. या दोघांचे संबंधित प्रभागातील वर्चस्व पाहता जर हे सर्व नाराज नेते आणि कार्यकर्ते प्रत्यक्षात एकत्र आले, तर भाजपची डोकेदुखी निश्चितच वाढणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यात पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची घरवापसी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अकोल्यात हा घरवापसीचा पॅटर्न अपयशी ठरताना दिसत आहे. उलट, हा अपवादच पक्षासाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. नवे राजकीय समीकरणासाठी नाराजांनी शहरातील बंधन लॉनवर मंगळवारी सायंकाळी नागरिक संवाद घेऊन तिसऱ्या आघाडीची मोट बांधली. यावेळी हरीश अलीमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे, माजी नगरसेवक गिरीश गोखले, आशिष पवित्रकार, हरिभाऊ काळे, चोटमल सारडा, पांडुरंग काळणे, विठ्ठलराव गाढे, मधुकर रगडे आणि प्रा. गणेश बोरकर आदी उपस्थित होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या अकोला पश्चिम मतदारसंघातील पराभवानंतर भाजपने पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत अनेक आजी- माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. शिस्तभंग कारवाईनंतर त्यांनी ‘नागरिक संवाद मंच’ची स्थापना केली. या संवादातून अप्रत्यक्षपणे भाजपला थेट आव्हान देण्यात आल्याचे चित्र आहे. कारण या नाराज गटाकडे हिंदुत्ववादी एकगठ्ठा मते आहेत. त्याचा फटका भाजपच्या उमेदवारांना बसू शकतो. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघात झालेली चूक पुन्हा होऊ नये, या दृष्टीने भाजपचे वरिष्ठ नेते भाजपमधील नाराज बंडोबांना थंड करण्यासाठी कोणते तंत्र वापरतात, याकडे लक्ष लागले आहे. विधानसभेची चूक टाळण्यासाठी भाजपचे प्रयत्न?
बुलंद आवाजाचे जादूगार गायक आदर्श शिंदे यांच्या सुरांनी अकोलेकर मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते तिक्ष्णगत महोत्सवाचे. गौरक्षण संस्थानमागील मैदानावर झालेल्या ‘आदर्श शिंदे कॉन्सर्ट’ला अकोल्यातील तरुणाईने अभूतपूर्व प्रतिसाद दिला. मंगळवारी (दि.१६) सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला प्लेबॅक सिंगर जनार्दन धात्रट यांनी ‘चंद्रभागेच्या तीरी’ हे भक्तीगीत सादर केले. त्यानंतर अमित पगारे यांनी ‘आता तरी देवा मला पावशील काय’ आणि प्रबुद्ध जाधव यांनी ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ ही भक्तिगीते सादर केली. जसा आदर्श शिंदे यांचा रंगमंचावर प्रवेश झाला, तसा उपस्थित हजारो तरुणांनी एकच जल्लोष केला. त्यांनी आजोबा प्रल्हाद शिंदे आणि वडील आनंद शिंदे यांची ‘तूच सुखकर्ता’, ‘पार्वतीच्या बाळा’ ही गाणी सादर करून कार्यक्रमाची उंची गाठली. ‘मोरया मोरया’ गाणे सुरू होताच संपूर्ण मैदानात टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी आदर्श शिंदे म्हणाले की, आज येथे अंकुश चौधरी असता, तर नक्कीच नाचला असता. त्यानंतर ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला’, ‘अरे भावा माझा जयभीम घ्यावा’, ‘माझ्या शिवबारं’ यांसारख्या गाण्यांनी अकोलेकरांना मंत्रमुग्ध केले. तर, ‘नव्हतं मिळत पोटाला, आता कमी नाही नोटाला. माझ्या भीमाची पुण्याई, अंगठी सोन्याची बोटाला’ या गाण्यावर उपस्थित तरुणाई बेधुंदपणे थिरकली. मुंबईहून आलेल्या विशेष वाद्यवृंदाने संगीताची साथ दिली, तर निवेदिका माधुरी भारती, पल्लवी डोंगरे व आकांक्षा गोमासे यांनी बहारदार निवेदनाने प्रेक्षकांची मने जिंकली. तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेलफेअर सोसायटी व अजिंक्य भारत परिवाराचे डॉ. सुगत वाघमारे, तनुजा सुगत वाघमारे व तिक्ष्णगत वाघमारे यांनी अकोलेरांना ही पर्वणी उपलब्ध करुन दिली. आदर्श शिंदे म्हणाले की, अकोल्यात बोलावल्याबद्दल मी डॉ. सुगत वाघमारे यांचा ऋणी आहे. आज प्रथमच मला अकोल्याच्या भूमीत आजोबा व वडिलांची गाणी गाण्याचे भाग्य लाभले, अशी भावना आदर्श शिंदे यांनी व्यक्त केली. लावणीने रंगवली मैफल कार्यक्रमात अबोली गिऱ्हे यांनी ‘खेळताना रंग बाई होळीचा’ ही लावणी सादर केली. त्यांच्या नृत्याविष्काराला युवक-युवतींनी प्रचंड दाद दिली.
खासगी भंगार बसेस सातपुड्यातील रस्त्यांवर धावत असल्याने आदिवासी बांधवांचा जीव टांगणीला लागला आहे. भंगार बसमुळे वायुप्रदूषण वाढत असून वाहतूक कोंडीही होत आहे. परमिट नसलेल्या व कालबाह्य बस अकोटच्या रस्त्यावर धावत आहेत. अशा भंगार बसवर परिवहन विभाग व स्थानिक पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे. सातपुड्याच्या कुशीत राहणाऱ्या आदिवासींच्या अगतिकतेचा फायदा घेत, त्यांची प्रवासी वाहतूक कालबाह्य झालेल्या, कधीही अपघात होऊ शकणाऱ्या खासगी बसेसमधून सुरू आहे. या कालबाह्य बसेसच्या वापराकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जीवघेण्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सातपुड्याच्या कुशीत राहणारे आदिवासी, अमरावती जिल्ह्याचे रहिवासी आहेत परंतु भौगोलिकदृष्ट्या त्यांना अकोट जवळचे पडते. त्यामुळे बाजारहाट व दवाखाना आदी कामांसाठी त्यांना अकोटला यावे लागते. घाटातून वाहतूक, अपघाताची भीती : अकोट ते सावलीखेडा मार्ग डोंगराळ असून घाटाचा रस्ता आहे. या मार्गावर तीव्र उतार व जीवघेणी वळणे आहेत. यापूर्वी या मार्गावर जुनाट बसमुळे अपघात घडल्याची उदाहरणे आहेत. बऱ्याच वाहन चालकांजवळ गाडी चालवण्याचा परवाना सुद्धा नाही. तरी हे वाहनचालक घाटातून गाडी चालवतात, अशीच वाहतूक सुरू राहिली तर मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिनी बस सुरू करा : या मार्गावर एसटी महामंडळाने दोन किंवा तीन मिनी बस सुरू कराव्यात. मिनी बस सेवा सुरू केल्यास आदिवासी बांधवांचा जीवघेणा प्रवास संपेल. या मार्गावरील वाहतूक पाहता एसटी बसला तोटा होणार नाही, याचीही खात्री बाळगता येईल. नादुरुस्त वाहने तसेच धावतात रस्त्यावर : एसटी महामंडळ व खासगी वाहतूकदारांच्या अनेक बसेस भंगारावस्थेत असून त्या रस्त्यावर धावतात. यामुळे इंजिनमधून काळा धूर निघून प्रदूषण होते. प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात: अशा बसेसमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. आरटीओंनी कालबाह्य झालेल्या बसेसवर कारवाई करणे अपेक्षित आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही. वाहतूक कोंडी व नियमभंग: अनेक खासगी बसेस ठरलेल्या थांब्यांवर न थांबता रस्त्यावरच प्रवाशांना चढवतात आणि उतरवतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते आणि नियमभंग होतो. ^या मार्गावर चालणाऱ्या बसेस शासनाचे सर्व नियम पाळून चालतात की नाही, याची तपासणी करणार आहोत. काही गैरकायदेशीर आढळले तर अशा बसेसवर कारवाई केली जाईल. - किशोर जुनघरे, पो. निरीक्षक, ग्रा. पो. स्टे, अकोट. तपासणी: परिवहन विभागाने सर्व बसेसची विशेषत: खासगींची कठोर व नियमित तपासणी करावी. कारवाई: नादुरुस्त, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसेसवर दंडात्मक कारवाई, त्यांचे परवाने रद्द करावे. जागरूकता मोहिम: वाहनचालक व मालकांसाठी वाहतूक नियमांबद्दल जागरूकता निर्माण करावी. रेल्वेचा पर्याय बंद मीटर गेज रेल्वे लाइन सुरू होती तेव्हा प्रवासी तुकईथड येथून रेल्वेद्वारे अकोटला येत होते. परंतु ब्रॉड गेज रुपांतरणासाठी हा रेल्वे मार्ग बंद झाला. अकोटपर्यंतच ब्रॉड गेजचे काम सुरू झाले. अशा स्थितीत आदिवासींना खासगी बसेसशिवाय पर्याय नाही. बसेसची तपासणी करू कालबाह्य भंगार बसेस या मार्गावर चालणाऱ्या बसेस कालबाह्य व भंगार झाल्या आहेत. त्यांची तपासणी केली तर त्या वाहतुकीतून बाद ठरू शकतात. परंतु त्या बसेस अकोट ते सावलीखेडा या मार्गावर बिनदिक्कतपणे राजरोसपणे सुरू आहेत. या बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. बसच्या टपावरून प्रवास एका ट्रीपमध्ये अधिकाधिक प्रवासी नेण्यासाठी आणि त्यातून अधिकची कमाई व्हावी यासाठी गोरगरीब आदिवासींना बसच्या टप्पावर सुद्धा बसायला भाग पाडले जाते. बसच्या आत सुद्धा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबले जातात. जीवघेणी वाहतूक डोंगराळ भागातून सुरू होते. प्रवाशांनाही दुसरी सोय नसल्याने आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
तालुक्यातील घाटपुरी येथील शेतकरी तुकाराम गोकुळ चोपडे यांनी अर्ध्या एकरात लागवड केलेल्या अद्रक मधून दोन लाख रुपयाचे उत्पन्न घेतले आहे. अद्रकचे उत्पादन घेण्यासाठी त्यांना बेणे विकत घेण्यापासून ते अद्रक घरात येईपर्यंत १ लाख रुपये खर्च आला आणि १ लाख रुपयाचा नफा झाल्याने त्यांनी पुन्हा मागील जून महिन्यात एक एकर शेतात अद्रकची लागवड केली आहे. तालुक्यातील शेतकरी हा मागील आठ ते दहा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला पसंती देत उत्पादन घेत होते. परंतु आज रोजी हे पीक घेणे त्यांना परवडत नसल्याने व बाजारात पाहिजे तेवढा भाव मिळत नसल्याने हळूहळू शेतकरी पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचे उत्पादन कडे वळले. परंतु सोयाबीन पीक सुध्दा दोन- तीन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा व त्यावर होणाऱ्या रोगाच्या आक्रमणात वाढ होत असल्याने उत्पादन कमी होत आहे. उत्पादन जरी कमी होत असले तरी त्याला व्यापाऱ्यांकडून ३ ते ४ हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात येत आहे. हा भाव उत्पादन खर्चाचा आधारावर परवडत नसल्याने शेतकरी आता हळूहळू मसाला पीक वर्गात येणाऱ्या हळद व अद्रक या पिकांकडे वळू लागल्याचे दिसत आहेत. तालुक्यातील वझर येथील भागवत आखरे यांनी पारंपारिक पीक घेण्याऐवजी अद्रकची लागवड करा, मी तुम्हाला माझ्या शेतातील बेणे देतो असे सांगितले. त्यानुसार चोपडे यांनी ५५ हजार रुपये किंमतीचे ६ क्विंटल बेणे विकत घेत त्याची अर्धा एकर शेतात ५ जून रोजी लागवड केली. येथील संत कृपा बीज भंडारचे सोपान चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी बेड तयार करून अद्रकची लागवड केली. त्याला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी दिले. लागवड करण्यापूर्वी त्यांनी शेतात शेणखत टाकले होते. चोपडे यांनी या अद्रकची विक्री बाजारात केली असता त्यातून त्यांना २ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. कमी खर्चात जास्त उत्पन्न व जनावरे या पिकाची नासाडी करीत नाहीत. आणि ते पीक खात नसल्याने शेतकरी चोपडे यांनी घरच्याच बेण्यांची १ एकरात लागवड केली आहे. ही लागवड त्यांनी मागील जून महिन्यात केली.या पिकाला ठिबक सिंचन द्वारे पाणी व खत दिले आहे. त्यामुळे हे पीक चांगलेच बहरले आहे.
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय शिल्पकलेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. नोएडा येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री सुमारे 1.30 वाजता त्यांनी वयाच्या 101व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दीर्घायुष्य लाभलेले राम सुतार हे अखेरपर्यंत सृजनशीलतेशी नाते जपणारे व्यक्तिमत्त्व होते. भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये उभारलेल्या त्यांच्या भव्य शिल्पकृतींनी भारतीय शिल्पपरंपरेला जागतिक ओळख मिळवून दिली. स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक राष्ट्रीय नेत्यांची स्मारके, तसेच एकता आणि प्रेरणेचे प्रतीक ठरलेले पुतळे ही त्यांची अमूल्य देणगी मानली जाते. त्यांच्या निधनामुळे भारतीय कला, संस्कृती आणि शिल्पकलेच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, कला क्षेत्रातून तसेच विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. जगभरात 200 हून अधिक शिल्पांची निर्मिती करणारे राम सुतार हे नाव केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आदराने घेतले जात होते. दिल्लीतील संसद भवन परिसरात उभारलेली त्यांची शिल्पे आजही भारतीय लोकशाहीची साक्ष देतात. राम सुतार यांना त्यांच्या योगदानाबद्दल पद्मश्री, पद्मभूषण तसेच महाराष्ट्र भूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन हा पुरस्कार त्यांच्या हाती सोपवला होता. या भेटीदरम्यान राम सुतार यांनी महाराष्ट्र अभिमान गीत गायले होते, तो क्षण अनेकांसाठी भावूक ठरला. धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावात जन्म अलीकडेच अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले होते, तो पुतळादेखील राम सुतार यांच्या कलाकृतीचा भाग होता. त्यांच्या शिल्पांमधील सूक्ष्म बारकावे, भावभावना आणि वास्तववादी मांडणी ही त्यांच्या कलेची ओळख होती. राम वनजी सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर या गावात झाला. प्रारंभी त्यांनी श्रीराम कृष्ण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकलेचे धडे घेतले आणि पुढे मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून औपचारिक शिक्षण पूर्ण केले. 1959 साली त्यांनी दिल्लीत माहिती व दूरसंचार मंत्रालयात नोकरी स्वीकारली, मात्र काही वर्षांतच त्यांनी शासकीय सेवा सोडून पूर्णवेळ शिल्पकार म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीमध्ये स्वतःचा स्टुडिओ उभारून त्यांनी आपल्या कलेचा स्वतंत्र प्रवास सुरू केला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सर्वात भव्य आणि ऐतिहासिक प्रकल्प जगातील सर्वात उंच, 182 मीटर उंचीचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा राम सुतार यांच्या आयुष्यातील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक प्रकल्प मानला जातो. या शिल्पाच्या संकल्पनेपासून ते डिझाइनपर्यंत संपूर्ण सर्जनशील वाटचाल त्यांनीच केली. सुमारे 60 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 50 हून अधिक भव्य शिल्पांची निर्मिती केली. संसद भवनातील महात्मा गांधी यांची मूर्ती, तसेच तिच्या प्रतिकृती इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया येथे पोहोचल्या. 1953 साली मेयो गोल्ड मेडल मिळवणारे राम सुतार हे केवळ शिल्पकार नव्हते, तर भारतीय संस्कृतीचे जागतिक प्रतिनिधी होते. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्राचे अपूरणीय नुकसान झाले असून, त्यांची कलाकृतीच आता त्यांची ओळख जपत राहणार आहे.
राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात त्यांच्याच खात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनास्त्र उगारले आहे. ७२ तासांत समेट न घडल्यास आगामी शुक्रवार, १९ डिसेंबरपासून अमरावतीसह राज्यभर ‘कामकाज बंद’चा निर्णय तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने घेतला आहे. पुण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच काम बंद आंदोलन सुरु केले आहे. त्याचे लोण आता अमरावतीसह राज्यभरही पसरले आहे. संबंधित मंत्र्यांचा कारभार हा ''बेभान'' आणि ''बेलगाम'' असल्याचा आरोप महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लावला आहे. त्यांच्यामते मंत्री महोदय कोणतीही योग्य चौकशी न करता, अधिकाऱ्यांवर एकतर्फी निलंबनाची कारवाई करीत आहेत. या असंतोषामुळेच कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यासाठीचे निवेदन आज, बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय लोखंडे, कार्याध्यक्ष अक्षय मंडवे, उपाध्यक्ष अरविंद माळवे आणि सचिव अशोक काळीवकर यांच्या नेतृत्वात देण्यात आलेले हे निवेदन अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी स्वीकारले. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनानुसार महसूल मंत्री हे नैसर्गिक न्यायाची कोणतीही संधी न देता थेट विधिमंडळात निलंबनाची घोषणा करतात, हे योग्य नाही. अर्धन्यायिक कामकाजाच्या प्रकरणात तहसीलदारांनी दिलेले आदेश, तसेच महसूल हक्क नोंदीवरील व ज्या प्रकरणात अपिलाची तरतूद आहे, अशा प्रकरणात किंवा प्रशासकीय कामकाजात चूक झाल्यास विभागीय चौकशीच्या तरतुदी आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १५८ नुसार सदर कामकाजाबाबत दाव्यास प्रतिबंध करुन अधिकारी व कर्मचाऱ्यांना संरक्षणही देण्यात आले आहे. पण त्याचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. त्यामुळेच अशा प्रशासकीय त्रुटींसाठी महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे विरुध्द थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात येऊ नयेत, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, शिवाजी शिंदे, निनाद लांडे, तहसीलदार पूजा माटोडे, संघटनेचे ब्रिजेश वस्तानी, ज्ञानेश गुर्जर, सौरभ वानखडे, कमल गाठे आदी उपस्थित होते. विक्रमी निलंबन बावनकुळे यांच्या कार्यकाळात केवळ एका वर्षात महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विक्रमी संख्येने निलंबने झाली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महसूल अधिकारी, कर्मचारी संघटनेने घेतलेल्या नोंदीनुसार जानेवारी २०२५ पासून आजपावेतो एकूण २८ नायब तहसीलदार व तहसिलदार, ४ उपजिल्हाधिकारी, ८ मंडळ अधिकारी, ४ ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक महसूल अधिकारी आणि महसूल सहाय्यक यांना निलंबित करण्यात आले आहे. कामकाज होणार ठप्प महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून तोच राज्य सरकारचा चेहरा आहे. यास्तव सदर आंदोलनातून नैसर्गिक आपत्ती आणि निवडणूक कामकाज सांभाळणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले आहे. याशिवाय विभागीय आयुक्त, उपायुक्त, जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी हेही या आंदोलनात नाहीत. त्यामुळे संप झाल्यास एसडीओ, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, महसूल अधिकारी, महसूल सहायक, तलाठी यांच्या स्तरावरील कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित होईल. कर्मचारी प्रचंड तणावात मंत्री महोदयांद्वारे केल्या जाणाऱ्या सततच्या निलंबनामुळे अधिकारी व कर्मचारी प्रचंड तणावात असून ते दहशतीखाली काम करीत आहेत. आता केवळ आपल्यावरच आमचा विश्वास असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना, महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना, विदर्भ पटवारी संघटना, विदर्भ मंडळ अधिकारी संघटना तसेच विदर्भ कर्मचारी संघटना व म.रा. महसूल कर्मचारी संघटना यांनी स्थापन केलेल्या म.रा. महसूल कर्मचारी व अधिकारी समन्वय महासंघानेही यात उडी घेतली आहे.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेला एक जण जागीच ठार:तिवसा तालुक्यातील वाठोडा गावाजवळील घटना
तिवसा तालुक्यातील कुऱ्हा ते तिवसा मार्गावरील वाठोडा गावाजवळ नॅनो कार व दुचाकीमध्ये धडक झाली. त्यानंतर घटनास्थळी मदतकार्यासाठी थांबलेल्या ७ ते ८ जणांसह स्विफ्ट डिझायर कारला मागून भरधाव आलेल्या स्कोडा कारने जबर धडक दिली. एकाच ठिकाणी झालेल्या या दोन अपघातात जखमींच्या मदतीसाठी गेलेला एक जण ठार झाला असून अन्य सहा जण जखमी झाले आहेत. तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द गावाजवळ मंगळवार १६ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार घोटा येथील तीन मित्र हे एमएच २७ बीए १०५६ क्रमांकाच्या युनिकॉन दुचाकीने गावी जात होते. दरम्यान कुऱ्हा गावाकडून येणाऱ्या एमएच २७ एआर ३५०२ क्रमांकाच्या नॅनो कार व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात घोटा येथील तिन्ही मित्र जखमी झाले. यावेळी मदतीसाठी वाठोडा खुर्द येथील युवक काँग्रेसचे लुकेश केणे हे घटनास्थळी दाखल झाले. इतक्यात तिवसाकडून येणाऱ्या एमएच ३४,एएम ५४७७ क्रमांकांच्या भरधाव स्कोडाने केणे यांच्या स्विफ्ट डिझायर कारला व मदतीसाठी उभ्या ७ ते ८ जणांना जबर धडक दिली.ज्यात अनिल खारकर व नीलेश लोंदे हे गंभीर जखमी झाले. यात खारकर यांचा घटनास्थळी मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी धाव घेत सर्व जखमींना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींची स्थिती बघता डॉक्टरांनी सर्व जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय पाठवले. मृतक अनिल खारकर यांच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून दोन्ही कार चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातील सहा जखमी या अपघातात अनिल शेषराव खारकर (वय ६६ रा. वाठोडा खुर्द) यांचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील अजय बबन चव्हाण, वय ३०,रोशन श्रीधर चव्हाण, वय २९,शुभम विजय इंगोले, वय ३०,सर्व रा. घोटा, नॅनो कार चालक चंद्रशेखर मनोहर ठाकूर वय ५४ रा. सातरगाव, तसेच स्कोडा कार चालक दीपक सुभाष पडोळे, वय ३६ रा. कुऱ्हा, नीलेश केशवराव लोंदे वय ४२ रा. वाठोडा खुर्द अशी सहा जखमीची नावे आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिंचोना येथील विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी २० गुंठ्यांवर परसबाग फुलवली. यात लावलेल्या भाजा पाल्यापासून विद्यार्थी शाळेला दिवसाकाठी १५०० रुपयांची कमाई करून देत आहेत. विद्यार्थ्यांच्या सहभागातून हा सेंद्रिय भाजीपाला बाजार हा “शिकत-शिकत कमवा” या संकल्पनेचा उत्तम नमुना ठरला असून इतर शाळांसाठीही तो प्रेरणादायी ठरत आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व, व्यवहारज्ञान, आर्थिक साक्षरता होत आहे. ६० शिक्षकांकडून भाजीपाला खरेदी ^शिक्षण परिषदेला उपस्थित असलेल्या ६० शिक्षकांनी या बाजारातून खरेदी केली. कमी दरात भाजीपाला व फळे उपलब्ध करून दिल्यानंतरही या उपक्रमातून शाळेला सुमारे १२०० ते १५०० रुपये उत्पन्न प्राप्त झाले.हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित शिक्षण देणारा तसेच सेंद्रिय शेतीबाबत जागृती निर्माण करणारा ठरला. सुभाष वानखडे, मुख्याध्यापक, चिंचोना. सेंद्रिय शेतीला चालना देण्याचा लक्षवेधी प्रयोग शिक्षण परिषदेसाठी आलेल्या शिक्षकांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाचे व कौशल्याचे विशेष कौतुक केले.विद्यार्थ्यांच् या सहभागातून भरवलेला हा सेंद्रिय भाजीपाला बाजार हा केवळ विक्रीपुरता मर्यादित न राहता “शिकत-शिकत कमवा” या संकल्पनेचा उत्तम नमुना ठरला असून इतर शाळांसाठीही तो प्रेरणादायी ठरत आहे.
अमरावती सर्वाधिक काळ चालणारी विदर्भातील प्रसिद्ध बहिरम यात्रेच्या पूर्वतयारीसाठी तेथील मंदिर कार्यालयामध्ये विशेष नियोजन व आढावा सभा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व विभागांना महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले. यामध्ये वाहतूक नियंत्रण, पार्कींगस्थळ, खाद्य पदार्थ आणि पाण्याची शुद्धता, फिरते दवाखाने आदींचा समावेश आहे. येत्या शनिवारपासून यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. तब्बल दीड महिन्यांपर्यंत ही यात्रा चालते. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व विभागांच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला आणि भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, यादृष्टीने समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले. मंदिर परिसरात सीसीटीव्ही आणि स्वच्छता राखण्यावरही यावेळी विशेष भर देण्यात आला. बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बाळासाहेब बायस, गटविकास अधिकारी डॉ नीलेश वानखडे, उपविभागीय महसूल अधिकारी बळवंत अरखराव, एबीडीओ गणेश घोगरकर, यात्रा व्यवस्थापक रामेश्वर रामागड, शिरजगाव कसबाचे ठाणेदार गवई यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, बांधकाम उपअभियंता, पाणीपुरवठा उपअभियंता, ग्रामपंचायत, मंदिर प्रशासन, विद्युत व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बहिरम यात्रेच्या नियोजन बैठकीला मार्गदर्शन करताना जि.प. च्या सीईओ संजीता महापात्र. {अन्न व औषधी प्रशासन विभागाने सर्व खानावळींची नियमित तपासणी करावी आणि स्वच्छतेचे नियम पाळले जातील, याची खात्री करावी, अशा सूचना दिल्या. {वाहतूक व पार्किंग- शनिवार आणि रविवारी यात्रेत मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, यासाठी पोलीस विभागाला विशेष पार्किंग व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. {माकडांचा बंदोबस्त व सुरक्षा- यात्रेचे ठिकाण जंगल परिसराजवळ असल्याने माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. वीज आणि पाणीपुरवठा- यात्रेच्या काळात अखंडित वीजपुरवठा रहावा, यासाठी विद्युत विभागाने खबरदारी घ्यावी तसेच पाणीपुरवठा विभागाने शुद्ध पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. {आरोग्य सुविधा- यात्रा काळात आरोग्य विभागाने तात्पुरते दवाखाने आणि २४ तास रुग्णवाहिका तैनात ठेवावी. ''स्वच्छ बहिरम'' अभियानांतर्गत कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र पथके नेमण्याच्या सूचना दिल्या. यात्रेच्या काळात कुठेही अस्वच्छता होणार नाही आणि प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
शहरातील साफसफाईची सद्यस्थिती, रस्त्यांची अवस्था, सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा तसेच वाहतूक व नागरिकांच्या दैनंदिन वर्दळीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. तसेच काही ठिकाणी साफसफाईची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देत स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसून, कोणाचीही गय केली जणार नसल्याचे मनपा आयुक्त सौंम्या शर्मा यानी स्पष्ट केले. शहर स्वच्छ, सुंदर व अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्तांनी सकाळी शहरातील प्रमुख भागांची सविस्तर पाहणी केली. या पाहणीदरम्यान जयस्तंभ चौक ते जुना कॉटन मार्केट, चौधरी चौक, विलास नगर, गाडगेनगर परिसराचा आयुक्तांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. विशेषतः गाडगेनगर परिसरात उभे असलेले कंटेनर तत्काळ हटवण्याचे आदेश दिले. या कंटेनरमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून परिसरातील नागरिकांना गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पाहणीदरम्यान शहरातील विविध भागांत अतिक्रमणाची समस्या गंभीर असल्याचे आढळून आले. यावर कठोर भूमिका घेत आयुक्तांनी संबंधित विभागांना कोठेही अतिक्रमण आढळून आल्यास त्वरित व प्रभावी कारवाई करून अतिक्रमण हटविण्याचे स्पष्ट निर्देश दिले. अतिक्रमणामुळे शहराचे सौंदर्य व शिस्त बाधित होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी आयुक्तांनी नागरिकांना स्वच्छतेबाबत जाणीवपूर्वक सहभाग घेण्याचे आवाहन केले. शहर स्वच्छता, सुयोग्य नियोजन व अतिक्रमणमुक्त वातावरण राखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असून, यापुढेही अशा प्रकारच्या नियमित पाहण्या व कठोर कारवाया करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पाहणीमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक मजबूत होणार असून, अतिक्रमणावर नियंत्रण मिळविण्यास प्रशासनाला बळ मिळणार असल्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या पाहणीदरम्यान वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, स्वास्थ्य अधीक्षक विजय बुरे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक राजू डिक्याव, श्रीकांत डवरे, स्वास्थ्य निरीक्षक तसेच मनपा कर्मचारी उपस्थित होते. सुका, ओला कचरा वेगवेगळा द्यावा “शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ महानगरपालिकेची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, ओला व सुका कचरा घंटागाड्यांना वेगळा करून द्यावा, तसेच अतिक्रमणास प्रोत्साहन देऊ नये. स्वच्छ व शिस्तबद्ध शहरासाठी प्रशासनास सहकार्य करावे,” असे आवाहन आयुक्तांनी नागरिकांना केले.
सध्या थंडीने अक्कलकोट तालुका गारठला असून सर्वत्र थंडीने हुडहुडी भरली आहे. या कडाक्याच्या थंडीमुळे ज्वारीसह गहु, हरभरा पिकांना पोषक वातावरण मिळत असल्याचे कृषी विभागाकडून बोलले जात आहे. यंदा अक्कलकोट तालुक्यात केवळ १९% ज्वारीची पेरणी झाली आहे. अतिवृष्टीमुळे पेरणी युक्त वाफसा न मिळाल्यामुळे ज्वारीच्या पेरणीत घट झाली असून गहू व हरभरा क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे या थंडीच्या पोषक वातावरणात ज्वारी, गहु, हरभरा पिक बहरला आहे. यंदा ज्वारीचे सरासरी क्षेत्र ३३ हजार १९३ हेक्टर असून यात पेरणी झालेली क्षेत्र ६ हजार ४५२ हेक्टर ज्वारी पेरणी पूर्ण झाली आहे. या हंगामात मका सरासरी १६८६ हेक्टर असून त्यापैकी केवळ ३९ हेक्टर पेरणी झाली आहे. म्हणजे मका २. ३१ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. या रब्बी हंगामात गहु पिक सरासरी क्षेत्र ९६ ८५ हेक्टर असून 3४९हेक्टर पेरणी पूर्ण झाली होती. ही पेरणी नोव्हेंबर महिन्यातील असून आणखीन १०% टक्के पेरणी नोव्हेंबर अखेर व डिसेंबर महिन्यापर्यंत चालु असल्याचे कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे यांनी म्हटले आहे. या घटलेल्या पेरणी मुळे यंदा शेतकरी उदासीन दिसून येत आहे. कारण येत्या शुक्रवार दि, १९ डिसेंबर २०२५ रोजी वेळअमावश्या हा शेतकऱ्यांचा उत्साहाचा सण येत आहे. या वेळअमावश्या सणाला ग्रामीण भागात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. या सणादिवशी शेतकरी सहकुटुंब बैलगाडीने शेतात जाऊन शेतात विधिवत पूजन करून आपला पूर्ण दिवस शेतात घालवतात. यंदा अमावस्येला गावंच्या गांव संपूर्ण अबाल वृद्धांसह शेतात जात असल्याने गांव ओसाड पडलेला दिसून येतो, त्यामुळे गावात शांतता दिसून येते. दिवसभर रानात मौजमजा, सणानिमित्त बनवलेली,कडक बाजरी भाकर, शेंगा पोळी, पूरण पोळी, दुध, दही, यासह पंचपक्वान बनवलेली जेवणाची मेजवानी असते, यामुळे दिवसभर शेतकरी शेतात व्यस्थ असतो. मागील चार- पाच दिवसांपासून कडाका वाढला आहे. चिदानंद खोबण, कृषी सहाय्यक सध्याचे हवामान सर्व पिकांना उपयुक्त ^यावर्षी ज्वारी ऐवजी हरभरा, गहु, ऊस इत्यादी पिके रानात असल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. यंदा अतिवृष्टीमुळे शेतात सर्व विहिरी तुडुंब भरलेली असून बोरींना देखील भरपूर पाणी आहे. पण या कडाक्याच्या थंडीमुळे विहिरी भरलेल्या असून सुद्धा शेतकरी पिकांना पाणी सोडताना दिसून येत नाही. सध्याचा हवामान सर्व पिकांना उपयुक्त आहे.
प्रतिनिधी | सोलापूर तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडील २०१६ ते २०१९ या दरम्यान उपलब्ध झालेले लॅपटॉप व प्रिंटर आता कालबाह्य झाले आहेत. त्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने ते बदलून नव्याने देण्याची मागणी शासनाकडे केली. पण, त्याकडे दुर्लक्ष केल्याने तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. सलग तीन दिवसांपासून आंदोलन सुरूच असल्याने महसूलची शेकडो प्रकारची कामे ठप्प झाली आहेत. ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्याकडे १० वर्षांपूर्वी उपलब्ध झालेले लॅपटॉप व प्रिंटर आहेत. ते लॅपटॉप व प्रिंटर कालबाह्य झालेले आहेत. ७/१२, ८ अ व फेरफार यांच्या नक्कल वितरणाची ठरवून दिलेली फी ही ग्राम महसूल अधिकारी दरमहा शासन जमा करत आहेत. एक ऑगस्टनुसार अशा उपकरणांचे आयुष्यमान पाच वर्षे इतके निश्चित करण्यात आले. तेंव्हापासून आजपर्यंत सहा ते नऊ वर्षांचा कालावधी लोटलेला असून बहुतांश उपकरणे पूर्णतः कालबाह्य, नादुरुस्त व निकृष्ट अवस्थेत आहेत. काही उपकरणे चालू असली तरी त्यांची सिस्टम व्हर्जन, स्पीड व क्षमता ही अद्ययावत शासन प्रणालींच्या किमान निकषांनाही पूरक नाही. काही उपकरणे चालू असली तरी त्यांची कार्यगती इतकी कमी आहे की ई-फेरफार, ई-हक्क, ई-पिकपाहणी, ई-पंचनामा यासारख्या सुधारीत प्रणालींवर काम करणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य झाले आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रणालीतील नोंदी करणे, प्रस्ताव मंजूर करणे व आवश्यक सेवा वेळेत देणे अशक्यप्राय झाले आहे. ही स्थिती ई-शासन प्रणालीवरील शासनाच्या विश्वासार्हतेलाही तडा पोहोचवणारी असल्याचे कर्मचाऱ्यांचे मत आहे.

25 C