ढाकुलगावकऱ्यांनी श्रमदानातून पूल बांधला:विदर्भा नदीवरील बंधाऱ्यामुळे गावाला नवी ओळख
धामणगाव रेल्वे जवळील ढाकुलगाव येथे ग्रामस्थांनी लोकवर्गणी आणि श्रमदानातून विदर्भा नदीवर पूल-वजा-बंधारा बांधला आहे. यामुळे गावाला एक नवी ओळख मिळाली असून, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील 'खरे काम निष्काम ही ग्रामसेवा' या ओवीचा प्रत्यय आला आहे. पावसाळ्यात विदर्भा नदीला पूर आल्याने गावातील शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण होत असे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत होते आणि कधीकधी महिनाभर शेतात जाता येत नव्हते. ही गावातील एक मोठी समस्या होती, ज्यावर मात करण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन उपाय शोधला. या समस्येवर मात करण्यासाठी ढाकुलगावातील नागरिकांनी लोकवर्गणीतून आणि श्रमदानातून हा पूल उभा केला. सरपंच प्रभाकर भुरभुरे, उपसरपंच विजय कांडलकर, मंगेश भगत आणि इतर ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. अंदाजे ९० ते ९५ हजार रुपये प्राथमिक खर्च अपेक्षित होता, जो सर्व शेतकरी व गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून जमा केला. गावकऱ्यांच्या श्रमदानातून विदर्भा नदीपात्रात सिमेंटच्या नाल्या टाकून कच्च्या पुलाचे काम पूर्ण झाले. अंजनसिंगी मार्गावर वसलेल्या ८ हजार लोकवस्तीच्या या गावासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. यामुळे गावातील पाण्याची समस्या सोडवण्यासही मदत झाली आहे. या पुलामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या वहिवाटीचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात मिटला आहे. ९ किलोमीटर लांबीचा बंधारा बांधल्याने शेतकऱ्यांचा तेवढ्याच अंतराचा फेरा वाचला आहे. आता शेतकऱ्यांना शेतात जाणे सोपे झाले असून, शेतीचे नुकसान टळले आहे. सध्या हा पूल तात्पुरत्या स्वरूपाचा असल्याने, शासनाने या ठिकाणी कायमस्वरूपी पूल बांधून द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांची कायमस्वरूपी सोय होईल. याशिवाय, गावातील किशोर म्हात्रे आणि कैलास कावलकर यांच्यासह काही युवकांनी 'समाजऋण फेडण्यासाठी' एक अनोखी सेवा सुरू केली आहे. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' अंतर्गत लोकसहभागातून एक यंत्रणा उभी राहिली आहे. या यंत्रणेद्वारे, गावातील कोणत्याही कुटुंबात दु:खद प्रसंग उद्भवल्यास, अंतिम संस्काराच्या शिडीपासून ते पेंडाल, कॅटरिंगचे साहित्य, बिछायत, खुर्च्या आणि इतर आवश्यक साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले जाते. ही सेवा समाजासाठी एक आदर्श ठरली आहे.
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व रद्द
नवी दिल्ली : दिल्ली कार ब्लास्ट प्रकरणाचा तपास सुरू आहे. या तपासात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणात फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित व्यक्तींची नावे समोर येत आहेत. परिणामी, विद्यापीठावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजने अल-फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व रद्द केले. असोसिएशनने एका अधिकृत पत्रात हा निर्णय जाहीर केला. […] The post दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठाचे सदस्यत्व रद्द appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अक्कलकोटचे भाजपचे माजी आमदार आणि सहकार क्षेत्रातील खंबीर नेते सिद्रामप्पा पाटील यांचे गुरुवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. सोलापुरातील खासगी रुग्णालयात वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असलेल्या सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनाने अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात गहन शोककळा पसरली आहे. सिद्रामप्पा पाटील यांची राजकीय कारकीर्द गावच्या सरपंचपदापासून सुरू झाली. त्यांनी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा बँकेचे सलग 35 वर्षे संचालक आणि एकदा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. याव्यतिरिक्त, ते श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, मार्केट कमिटी सभापती आणि अक्कलकोट तालुक्याचे आमदार म्हणूनही विधानसभेत पोहोचले होते. सिद्रामप्पा पाटील यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी, अक्कलकोट तालुक्यातील कुमठे येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
वरुड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि २६ नगरसेवकांच्या निवडीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबरला मतमोजणीअंती निकाल घोषित केला जाईल. या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (एसडीओ) प्रदीपकुमार पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. पवार यांनी सांगितले की, निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. एकूण १३ प्रभागांमध्ये ही निवडणूक होणार असून, त्यासाठी ४५ मतदान केंद्रे आणि तीन स्थिर निगराणी पथके तैनात करण्यात आली आहेत. उमेदवार आणि नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ४ नोव्हेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. १८ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन अर्जांची छाननी केली जाईल आणि त्याच दिवशी दुपारी वैध अर्जांची यादी घोषित होईल. उमेदवारांना २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत असेल. निवडणूक रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांना २६ नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप केले जाईल. यानंतरच प्रचाराला सुरुवात होईल. २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल, तर ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. वरुड नगर परिषदेत एकूण ४० हजार ८९० मतदार आहेत. आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यांवर तसेच राष्ट्रीय महामार्गावरील पुसला चौकातील रामदेवबाबा मंगल कार्यालय, अमरावती मार्गावरील शहापूरजवळ आणि वरुड-वर्धा व वरुड-नागपूर मार्गावरील इंदिरा चौक येथे स्थिर निगराणी, व्हिडीओ निगराणी आणि भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. यावेळी एसडीओ प्रदीपकुमार पवार यांच्यासह सहकारी अधिकारी गजानन भोयर, नायब तहसीलदार नामदेव गडलिंग, गटविकास अधिकारी खुशाल पिल्लारे आणि ठाणेदार अर्जुन ठोसरे उपस्थित होते. उमेदवारांच्या सोयीसाठी सभा आणि मिरवणुकीच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना अंमलात आणली जाणार आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराने नगरपालिकेचा मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरलेली असणे आवश्यक आहे, कारण तो कोणत्याही प्रकारचा थकबाकीदार नसावा. पक्षीय उमेदवाराला एक सूचक तर अपक्ष उमेदवाराला पाच सूचक लागतील. एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्र भरता येतील, परंतु चारही अर्जांवर सूचक वेगवेगळे असणे बंधनकारक आहे.
विधानसभा निवडणुकीत 57 जागा जिंकून बाजी मारलेल्या शिवसेना शिंदे गटात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी 'मेगा भरती' सुरू असल्याचे दिसून येत आहे. कालच जालन्यातील ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांनी प्रवेश केला असताना, आज थेट कोल्हापूर जिल्ह्यातील एक मोठा आणि अनुभवी नेता शिंदेंच्या गळाला लागला आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून शिरोळचे माजी आमदार राहिलेले उल्हास दादा पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. माजी आमदार उल्हास पाटील यांची राजकीय पार्श्वभूमी मोठी आहे. सन 2014 साली ते शिवसेनेकडून शिरोळचे आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी 'स्वाभिमानी शेतकरी संघटनेत' परतत, 2024 ची विधानसभा निवडणूक संघटनेच्या चिन्हावर लढवली होती, ज्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाच्या वाट्याला अवघ्या दोन जागा आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली होती. नगरपालिका आणि महापालिका निवडणुका जवळ आल्या असताना, उल्हास दादा पाटील यांच्यासारख्या अनुभवी आणि मोठ्या नेत्याने शिंदे गटाचा झेंडा हाती घेतल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पाटील यांच्या प्रवेशामुळे कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठे राजकीय बळ मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उल्हास पाटील यांच्याबद्दल थोडक्यात माहिती शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या उल्हास पाटील यांनी लहानपणापासूनच शेतकऱ्यांच्या समस्या जवळून अनुभवल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या मूलभूत प्रश्नांची त्यांना पूर्ण जाणीव होती. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी लढण्याचा निर्णय घेत त्यांनी 1990 च्या दशकात कामाला सुरुवात केली. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आणि याच माध्यमातून ते राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी जोडले गेले. शिरोळ विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सर्वप्रथम स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2014 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवून ते पहिल्यांदाच विधानसभेचे सदस्य म्हणून सभागृहात पोहोचले. उल्हास दादा पाटील यांचे शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना या दोन्ही पक्षांमध्ये मोठे काम राहिलेले आहे. त्यामुळे, इतका अनुभव असलेल्या नेत्याने आता शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, या प्रवेशाकडे लक्ष लागले आहे.
अमरावतीमध्ये भारत सरकारच्या 'आकाश मिसाईल' (भारत डायनॅमिक्स लिमिटेड) निर्मिती प्रकल्पाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. क्रांती ज्योती ब्रिगेडचे प्रदेश समन्वयक आणि भारतीय वायुसेनेतील निवृत्त अधिकारी फ्लाइट लेफ्टनंट रत्नाकर चरडे यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. निवेदनकर्त्यांनुसार, या प्रकल्पाची घोषणा २०११ मध्ये झाली होती. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने नागपूर महामार्गावर ५०० एकर जमीन उपलब्ध करून दिली होती. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले होते. २०१५-१६ पर्यंत उत्पादन सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली होती आणि कोट्यवधी रुपये खर्च करून कुंपण भिंत व अंतर्गत रस्तेही बांधण्यात आले होते. मात्र, त्यानंतर हा प्रकल्प रखडला असून, त्याचे भवितव्य आजही अनिश्चित आहे. औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या अमरावती विभागासाठी हा प्रकल्प अत्यंत आवश्यक असल्याचे चरडे यांनी म्हटले आहे. जर हा प्रकल्प वेळेत कार्यान्वित झाला असता, तर आज अमरावतीत शेकडो पूरक उद्योग निर्माण झाले असते आणि लाखो तरुणांना रोजगार मिळाला असता. यामुळे अमरावती विभागाचा औद्योगिक आणि आर्थिक विकास झाला असता. या संदर्भात, फ्लाइट लेफ्टनंट चरडे यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांनाही निवेदन दिले असून, अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनाही प्रस्ताव सादर केला आहे. निवेदन सादर करताना रत्नाकर चरडे यांच्यासोबत क्रांती ज्योती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नंदेश अंबाडकर, कृषक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रभाकर वानखेडे, प्रदीप गर्गे, अनिल ठाकरे, दिवाकर खरबडे आदी मान्यवर उपस्थित होते. संघटनेने स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, युवक आणि सैनिकांना या प्रकल्पाला पुन्हा सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. यामुळे तरुणांना रोजगार मिळेल आणि मुंबई-पुण्याकडील स्थलांतर थांबेल, असेही नमूद करण्यात आले.
मेळघाटच्या आरोग्य विभागाने नुकतीच एक महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. सिकलसेलची वाहक असलेल्या आणि हिमोग्लोबिनची कमतरता असलेल्या चार दिवसांच्या बाळंतीणीला अथक प्रयत्नांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या प्रयत्नांमुळे बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. ही २५ वर्षीय महिला धारणी तालुक्यातील खापरखेडा येथील रहिवासी आहे. तिचा रक्तदाब वाढलेला होता आणि हिमोग्लोबिन केवळ ५ ग्रॅम होते. प्रसूतीनंतर तिला आणि बाळाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणे आवश्यक होते. प्रसूतीपूर्वी तिला चार बाटल्या रक्तही देण्यात आले होते. प्रसूतीनंतर चार दिवसांनी ही माता कोणालाही न सांगता रुग्णालय सोडून घरी निघून गेली. रुग्णालयात असताना तिचा रक्तदाब वाढलेला होता आणि हिमोग्लोबिन कमी होते, त्यामुळे तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करून उपचार करणे अत्यंत आवश्यक होते. ती निघून गेल्यानंतर साद्रावाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका, समुपदेशक आणि आशा सेविका तिच्या खापरखेडा येथील घरी पोहोचल्या. तिथे पोहोचल्यावर या मातेने शौचास जाण्याचे निमित्त करून सर्वांना चकमा दिला आणि घरातून निघून गेली. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वाट पाहिल्यानंतरही ती परत न आल्याने तिचा शोध सुरू झाला. नंतर असे समजले की, रुग्णालयात दाखल व्हायचे नसल्यामुळे ती ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्यप्रदेशच्या सीमेवरील छिंदवाडा गावातील एका शेतात लपून बसली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला शोधून काढले. त्यानंतर, तिला दोन किलोमीटरपर्यंत चादरीच्या झोळीतून आणि उर्वरित अंतर एका शेतातून उधार घेतलेल्या खाटेच्या आधारे रुग्णालयात पोहोचवण्यात आले.
स्वतःची आर्थिक क्षमता लपवून न्यायालयाची दिशाभूल केल्याने मुंबई उच्च न्यायालयाने एका पीडित पत्नीच्या पोटगीच्या रकमेत अत्यंत महत्त्वपूर्ण वाढ करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पत्नीला मिळणारी पोटगीची रक्कम दरमहा 50 हजार रुपयांवरून थेट 3.5 लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. न्या. बी.पी. कोलबावाला आणि न्या. सोमसेखर सुंदरेसन यांच्या मुंबईतील खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. उच्च न्यायालयाने विभक्त पतीने केलेला दावा हास्यास्पद असल्याचे निरीक्षण नोंदवले. पतीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून सुमारे 1,000 कोटींचे साम्राज्य असूनही आपली मिळकत दरमहा केवळ 6 लाख रुपये असल्याचा दावा केला होता. पतीने आपण अत्यंत गरीब असून मूळ पोटगीची कमी रक्कम देऊ न शकणारा माणूस असल्याचे खोटे दावे न्यायालयात केले, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. सन 1996 साली लग्न झालेले हे जोडपे 16 वर्षांच्या संसारानंतर 2013 मध्ये विभक्त झाले होते. या याचिकेदरम्यान, पत्नीच्या वतीने पुरावे दाखल करण्यात आले. यामध्ये पतीने केलेल्या लक्झरी पार्ट्या, परदेशी सहली, परदेशातील मुलाचे शिक्षण तसेच लक्झरी कपड्यांसारख्या श्रीमंत जीवनशैलीचे दाखले देण्यात आले. हे पुरावे विचारात घेऊन पतीने शपथ घेऊन खोटे सांगितल्याचे आणि तो स्वच्छ मनाने न्यायालयात आला नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. या निर्णयानुसार, विभक्त पतीने पत्नीला वर्षभराची थकबाकी म्हणून 42 लाख रुपये जमा करण्याचे आदेशही दिले आहेत. कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केलेला निर्णय रद्द मुंबई उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाने मंजूर केलेला निर्णय रद्द करत, महिला आणि तिच्या मुलीला सन्मानाने जीवन जगण्यासाठी दरमहा 50 हजार रुपयांची पोटगीची रक्कम अपुरी असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे, न्यायालयाने पतीकडून पत्नीला देण्यात येणाऱ्या पोटगीच्या रकमेत सात पटीने वाढ करण्याचे आदेश दिले.
हिंगोली शहरातील विविध मतदान केंद्रांना गुरुवारी 13 जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी आणि वसमत नगर परिषदेची निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी दि. 2 डिसेंबर, 2025 रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज हिंगोली शहरातील अण्णाभाऊ साठे वाचनालय, इकबाल उर्दू स्कूल पेन्शनपुरा, लोकनेते गोपीनाथ मुंडे शेतकरी भवन, भारती विद्यामंदीर, नगर परिषद शाळा, आजम कॉलनी येथील इकबाल इंटरनॅशनल स्कूल, माहेश्वरी भवन येथील मतदान केंद्राना भेटी देऊन मतदान केंद्रावरील सुविधांची पाहणी केली. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मतदान केंद्रांवर वीजपुरवठा राहील याकडे लक्ष ठेवावे तसेच दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची सुविधा उपलब्ध करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. शहरात आदर्श मतदान केंद्र उभारण्याचीही त्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय कळमनुरी वसमत शहरातील मतदान केंद्रावर स्थानिक महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन उपलब्ध सुविधांची पाहणी करावी. यावेळी मुख्याधिकारी अरविंद मुंढे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पिंटू बोरसे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने आता सर्व मतदान केंद्रांवर पाहणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
मनसेसोबत आघाडीसाठी कोणत्याच जिल्ह्यातून प्रस्ताव नाही
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारमध्ये अंतर्गत वाद पराकोटीला गेले आहेत; पण सत्तेसाठी हे सर्वजण एकत्र आहेत. सत्तेसाठी काहीही व वाट्टेल ते अशी त्यांची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेसाठी लाचार आहेत त्यामुळे सत्ता सोडून ते राहू शकत नसल्यानेच ते सत्तेतून बाहेर पडणार नाहीत असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ […] The post मनसेसोबत आघाडीसाठी कोणत्याच जिल्ह्यातून प्रस्ताव नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
पाटणा : वृत्तसंस्था बिहार निवडणुकीचा निकाल यायला काही तास शिल्लक आहेत. उद्या दि. १४ नोव्हेंबरला बिहारमध्ये मतमोजणी होणार आहे. त्यापूर्वी आलेल्या सर्व एक्झिट पोलमध्ये एनडीए पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. सर्व्हेतून एनडीएला १५० ते १७० जागा तर महाआघाडीला १०० पेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता दाखवली आहे. तर काही सर्व्हेत एनडीए आणि महाआघाडीत […] The post बिहारच्या निकालात उलटफेर होणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लंडनचे ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र सरकार घेणार
मुंबई : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या चळवळीचे लंडनमधील केंद्र राहिलेल्या इंडिया हाऊस या ऐतिहासिक इमारतीची खरेदी राज्य सरकार करणार असून स्मारक म्हणून तिचे जतन करणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी ही माहिती दिली. सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. शेलार हे नागपूरच्या रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौ-यावर होते, तेव्हा त्यांनी इंडिया हाऊसला भेट […] The post लंडनचे ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र सरकार घेणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमेरिकेतील ऐतिहासिक शटडाऊन अखेर स्थगित
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारी निधी विधेयकावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे ४३ दिवसांचा शटडाऊन अखेर स्थगित झाला. हे विधेयक प्रतिनिधी सभागृहाने २२२-२०९ मतांनी मंजूर केले. तथापि, आरोग्य सेवा कार्यक्रम ओबामा केयर सबसिडीसाठी प्रीमियम कर क्रेडिट्स वाढविण्याचे कोणतेही आश्वासन दिले नाही, जे ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपत आहे. हे विधेयक आधीच सिनेट (वरच्या […] The post अमेरिकेतील ऐतिहासिक शटडाऊन अखेर स्थगित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘वर्कप्लेस रोमान्स’मध्ये भारत जगात दुस-या स्थानी!
नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी आजच्या बदलत्या सामाजिक वातावरणात आणि वाढत्या व्यावसायिक वेळेमुळे, कामाच्या ठिकाणी जुळणा-या प्रेमसंबंधांची संख्या वाढत आहे. एका महत्त्वपूर्ण जागतिक सर्वेक्षणातून याची माहिती समोर आली आहे. भारतात अशा ‘रोमान्स’चा प्रसार लक्षणीयरीत्या वाढल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अॅशली मॅडिसन आणि यूगोव्ह या संस्थांनी ११ देशांमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, ऑफिसमधील प्रेमप्रकरणांमध्ये भारत जगात दुस-या […] The post ‘वर्कप्लेस रोमान्स’मध्ये भारत जगात दुस-या स्थानी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून यात अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या अनेक बातम्या आपण पाहत असतो. तसाच काहीसा अत्यंत हृदयद्रावक असा अपघात जळगाव जिल्ह्यात झाला आहे. या अपघातात गर्भवती महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी अधिकची माहिती अशी की, जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली, ज्यात माहेराहून परतणाऱ्या जान्हवी मोरे या गर्भवती महिलेवर काळाने घाला घातला आहे. पतीच्या समोरच तिचा गाडीत जळून होरपळून मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीओच्या तपासणी कारवाईच्या भीतीने हा अपघात घडला. महामार्गावर गाड्यांची तपासणी सुरू असताना, कार चालवणारे पती संग्राम मोरे यांच्याकडे परवाना नसल्यामुळे ते पोलिसांना चुकवण्याच्या प्रयत्नात होते. याच गडबडीत त्यांची गाडी महामार्गावरील दुभाजकाला धडकली आणि या अपघातानंतर लगेचच इंजिनमधून धूर येण्यास सुरुवात झाली व गाडीचे दरवाजे लॉक झाले. ही घटना घडल्यानंतर महामार्गाच्या बाजूला असलेल्या लोकांनी तसेच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गाडीची काच फोडून चालक संग्राम मोरे यांना बाहेर काढले. मात्र, अपघातानंतर गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात धूर झाल्यामुळे बाहेरच्या लोकांना गाडीत आणखी एक व्यक्ती असल्याची कल्पनाच आली नाही. त्यानंतर काही वेळातच गाडीने भीषण पेट घेतला आणि यात गाडीत अडकलेल्या जान्हवी मोरे यांचा होरापळून मृत्यू झाला. विशेष म्हणजे, जान्हवी सहा महिन्यांच्या गर्भवती होत्या आणि त्यांच्या पतीच्या डोळ्यादेखतच हा दुःखद अंत झाला. पुण्यात नवले ब्रीजवर भीषण अपघात पुणे येथील नवले पुलावर दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची एक भीषण अपघात घटना घडली आहे, ज्यात 9 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाल्याचे समजते. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, तसेच अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले पुलावर तातडीने पोहोचल्या. अपघातातील सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाचा सविस्तर
नगरपरिषदेसाठी शनिवारीही उमेदवारी अर्ज स्वीकारणार
मुंबई : प्रतिनिधी नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतेही कागदपत्रे सादर(अपलोड) करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची छापील प्रत(प्रिंटआऊट) घेऊन व त्यावर सही करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिका-याकडे विहित मुदतीत जमा करणे आवश्यक आहे असे स्पष्टिकरण राज्य […] The post नगरपरिषदेसाठी शनिवारीही उमेदवारी अर्ज स्वीकारणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रवादीची स्टार प्रचरकांची यादी जाहीर
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पक्षाच्या प्रवक्ते पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले आमदार अमोल मिटकरी, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान हकालपट्टीची कारवाई झालेले माजी खासदार समीर भुजबळ, शेतक-यांच्या संदर्भात असंवेदनशील विधाने करून वाद ओढवून घेणारे अल्पसंख्याक विकास मंत्री माणिकराव […] The post राष्ट्रवादीची स्टार प्रचरकांची यादी जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिवसेनेकडून निवडणूक प्रभारींची नियुक्ती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने गुरुवारी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली. जिल्हानिहाय नेमण्यात आलेल्या या प्रभारींमध्ये पक्षाचे मंत्री, आमदार आणि पदाधिकारी यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत प्रभारी म्हणून आमदार सुहास कांदे, माजी खासदार हेमंत गोडसे, किशोर दराडे, धनराज महाले यांची नेमणूक […] The post शिवसेनेकडून निवडणूक प्रभारींची नियुक्ती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दस्तनोंदणी करणा-या सहदुय्यम निबंधक निलंबित
मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीचे बेकायदा जमिन खरेदी प्रकरण उघडकीस आल्यानंतर पुण्यातील जमिन गैरव्यवहारांची अनेक प्रकरणे उघड होत आहेत. पुण्याजवळ ताथवडे येथील शासकीय मालकीच्या जमिनीची खरेदी-विक्री करताना नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचेही एक प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणी पुणे येथील हवेली सह दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी सहदुय्यम निबंधक […] The post दस्तनोंदणी करणा-या सहदुय्यम निबंधक निलंबित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघातात ८ ठार
पुणे : राज्यातील वेगाने वाढणा-या पुणे शहरात भीषण अपघाताची घटना घडली असून ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शहरातील नवले पुलावर हा अपघात होऊन दोन ते तीन वाहनांनी पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत २० पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचे समजते, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या गाड्याही नवले ब्रीजवर पोहोचल्या होत्या. अपघातातील जखमींना […] The post पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघातात ८ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले. यामध्ये अजित पवार यांच्या गटाला 'घड्याळ' हे मूळ चिन्ह मिळाले, तर शरद पवार यांच्या गटाला 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह देण्यात आले. मात्र, अपक्ष उमेदवारांना मिळणाऱ्या 'पिपाणी' या साधर्म्य असणाऱ्या चिन्हामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दोन निवडणुकांमध्ये मोठा दणका बसला. याच पार्श्वभूमीवर, आता निवडणूक आयोगाने अपक्षांसाठी असलेले हे 'पिपाणी' चिन्ह कायमस्वरूपी रद्दबातल केले आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आनंद व्यक्त करतानाच निवडणूक आयोगाला खोचक टोला लगावला. शिंदे यांनी ट्विट करत, तुतारी चिन्हाशी साधर्म्य असलेले पिपाणी चिन्ह कायमचे वगळल्याबद्दल आयोगाचे आभार मानले आहेत. पण त्याच वेळी, झालेल्या नुकसानीचा संदर्भ देत त्यांनी निवडणूक आयोगाला खडे बोल सुद्धा सुनावले आहेत. शशिकांत शिंदे ट्विट करत म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या चिन्हामुळे कार्यकर्त्यांना आणि मतदारांना मोठा गोंधळ निर्माण झाला, त्याची राजकीय किंमत पक्षाला चुकवावी लागली होती. हा निर्णय जर आधीच घेतला गेला असता, तर आज महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय चित्र नक्कीच वेगळे असते. शेवटी, उशिरा सुचलेले शहाणपण असे याला म्हणावे लागेल. निवडणूक चिन्हातून ‘पिपाणी (ट्रम्पेट)’ हे चिन्ह कायमचे वगळल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार! हा निर्णय लोकशाही आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रियेसाठी एक सकारात्मक पाऊल आहे, असे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेले 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह आणि अपक्ष उमेदवारांना दिलेले 'पिपाणी' हे चिन्ह यांच्यातील साधर्म्यामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. या चिन्हांमधील साधर्म्यामुळे लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर मते मिळाली आणि थेट निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम दिसून आला. सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना याच पिपाणी चिन्हामुळे पराभवाला सामोरे जावे लागले, तर बीड लोकसभेतही असाच प्रकार घडला होता. सातारा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात जोरदार शड्डू ठोकला होता. मात्र, पिपाणीमुळे मतविभागणी झाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, या संपूर्ण गोंधळावर उदयनराजे भोसले यांनी सुद्धा जाहीरपणे भाष्य केले होते. या गंभीर नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, आता निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह कायमस्वरूपी रद्दबातल करण्याचा निर्णय घेतल्याने, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे येथील नवले पुलावर भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रकला आग लागली असून या दोन्ही ट्रकच्या मध्ये एक कार अडकली असून यात 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन ट्रक एकमेकांना धडकले होते आणि त्यात एक कार अडकली होती, अशी माहिती समोर आली आहे. साताराच्या दिशेने पुण्याकडे येणाऱ्या दोन्ही ट्रकचा अपघात झाला आणि यात एक कार अडकली होती. यावेळी दोन्ही ट्रकला आग लागली असून यात मृतांची संख्या देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या अपघातामुळे नवले ब्रिजवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अग्निशमन दलाकडून ट्रकला लागलेल्या आग विझवण्याचे प्रयत्न करत असून यावेळी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नवले पुलावर अनेक अपघात होत असतात, परंतु हा अपघात सर्वात मोठा असल्याचे बोलले जात आहे. दोन ट्रकचा अपघात झाला असून यात मागच्या ट्रकचा चालक अद्यापही ट्रकमध्येच अडकला असल्याचे दिसून येत आहे. तर सध्या या अपघातात अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. चारचाकी जी या दोन्ही ट्रकच्या मध्ये अडकली होती, या कारमधील प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रकचा ब्रेक फेल झालेला होता आणि त्या ट्रकने पुढच्या ट्रकला धडक दिली. मध्ये एक कार होती, त्यात 4-5 लोक होती, ती संपूर्णपणे जळून खाक झाली आहेत. ट्रक चालक देखील ट्रकमध्येच अडकली असून त्यांना देखील आगीमुळे उतरता आले नाही. त्यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. तसेच मागे एक ट्रॅव्हलर होती, त्याला सुद्धा धडक देण्यात आली, त्यात 17-18 लोक होती. जवळपास 20-25 लोक जखमी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला होता, त्या ट्रकने 20-25 वाहनांना धडक दिली आहे. पंचनामा सुरू असून पुढील कारवाई करण्यात येत आहे. नेमका अपघात कसा झाला? साताराच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक समोर असलेल्या कारला धडकली. त्यानंतर ही कार समोर असलेल्या ट्रकला धडकली. शेवटी दोन्ही ट्रकच्या मध्ये ही कार अडकली. त्यानंतर कारला व दोन्ही ट्रकला भीषण आग लागली. या आगीत कारमधल्या 5 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच दोन्ही ट्रक चालकांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर एकूण 7 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. ही बातमी आम्ही अपडेट करत आहोत व्हिडीओ पाहा
भोंदुगिरी ओळखण्याचे प्रशिक्षण आता एका क्लिकवर:डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठाचे पुणे येथे लोकार्पण
डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठाचे लोकार्पण पुणे येथे १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) द्वारे सुरू करण्यात येणाऱ्या या ऑनलाइन विद्यापीठातून भोंदुगिरी ओळखण्याचे प्रशिक्षण एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ राज्यशास्त्र अभ्यासक सुहास पळशीकर यांच्या उपस्थितीत पत्रकार भवन येथे सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होईल. अंनिसच्या मिलिंद देशमुख, श्रीपाल ललवाणी, राहुल थोरात आणि हमीद दाभोलकर यांनी ही माहिती दिली. या विद्यापीठातील अभ्यासक्रमांमुळे नागरिकांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत होईल. यामुळे भोंदूबाबा आणि बुवा ओळखणे तसेच फसवणूक टाळणे सोपे होईल. अंनिसचे कार्यकर्ते नेहमीच विद्यार्थी आणि नागरिकांशी अंधश्रद्धा निर्मूलनावर संवाद साधतात. मात्र, प्रत्यक्ष भेटींना मर्यादा असल्याने, अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे ऑनलाइन कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणात वैज्ञानिक दृष्टिकोनाला महत्त्व दिले जात असतानाही, अनेक शैक्षणिक अभ्यासक्रमांत अवैज्ञानिक गोष्टींचा समावेश केला जात आहे. डार्विनच्या सिद्धांतासारखे विषय अभ्यासक्रमातून वगळले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणारे अभ्यासक्रम नागरिकांना सहज उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने हे कोर्सेस तयार करण्यात आले आहेत. सुरुवातीला या प्लॅटफॉर्मवर सहा कोर्सेस उपलब्ध असतील: वैज्ञानिक दृष्टिकोन, अंगात येणे, भुताने झपाटणे, भ्रामक वास्तुशास्त्र, छद्म विज्ञान आणि व्यसनमुक्ती. दुसऱ्या टप्प्यात फलज्योतिष फोलपणा आणि मानसिक आरोग्य यांसारखे कोर्सेस सुरू केले जातील. १३ वर्षांवरील कोणताही नागरिक हे कोर्सेस करू शकतो. ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या सहीचे प्रमाणपत्र मिळेल. परीक्षेतील प्रश्न केवळ माहितीवर आधारित नसून, आकलन तपासणारे असतील. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी www.anisvidya.org.in या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. सर्व अभ्यासक्रम आणि परीक्षा पूर्णपणे विनामूल्य आहेत.
अमरावती शहरात लावण्यात आलेल्या 'विचारा इस्लाम' या पोस्टरची महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पालकमंत्री बावनकुळे यांनी पोलीस आयुक्तांकडून यासंदर्भातील सद्यस्थितीची माहिती घेतली. अमरावतीचे सामाजिक वातावरण कोणत्याही परिस्थितीत बिघडता कामा नये, असे निर्देश त्यांनी दिले. असे प्रयत्न करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, असेही ते म्हणाले. काही महिन्यांपूर्वी अमरावतीमध्ये 'आय लव्ह मोहम्मद' अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले होते. आता 'विचारा इस्लाम' आशयाचे पोस्टर दिसत आहेत, हा प्रकार अयोग्य असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले. शहरातील पंचवटी चौक परिसरात हा उपद्रव झाल्याचे समोर आले आहे. या पोस्टरखाली एक टोल-फ्री नंबर असून, तो हैदराबाद आणि चेन्नई येथून ऑपरेट होत असल्याची माहिती मिळाली आहे. पोस्टरवर 'आयसीसी' असे लिहिलेले असल्याने, त्यामागील उद्देशाबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजधानीतील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची पोस्टर्स कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ही पोस्टर्स लावण्यामागे नेमका कोणता हेतू आहे, याचा तपास करण्याचे आदेश त्यांनी दिले. पोलिसांनी किंवा महापालिकेने यासाठी परवानगी दिली होती का, याची चौकशी करून अहवाल सादर करण्यासही पालकमंत्र्यांनी आयुक्तांना सांगितले.
तब्बल ३२ कारने देशभरात घडवायचा होता स्फोट
नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला स्फोटाच्या तपासात एक मोठा खुलासा समोर आला असून ३२ गाड्यांमध्ये बॉम्ब आणि स्फोटके बसवून देशभरात ३२ ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा कट रचण्यात आला होता. १० नोव्हेंबर रोजी स्फोट झालेली आय २० कार या मालिकेतील बदला घेण्याच्या हल्ल्याचा भाग होती. बाबरी मशीद पाडल्याच्या वर्धापन दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी दिल्लीसह अनेक […] The post तब्बल ३२ कारने देशभरात घडवायचा होता स्फोट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशात ६ कोटी मृतांचे आधार कार्ड सक्रिय
नवी दिल्ली : देशातील प्रत्येक नागरिकाला आधार क्रमांक देऊन १५ वर्षे झाली आहेत. या काळात १.४२ कोटींहून अधिक आधार कार्ड जारी करण्यात आले होते, परंतु ८ कोटींहून अधिक धारकांचा मृत्यू होऊनही, केवळ १.८३ कोटी कार्ड निष्क्रिय करण्यात आले आहेत. सुमारे ६ कोटी मृतांचे आधार क्रमांक असलेले नागरिक मृत पावलेले आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया […] The post देशात ६ कोटी मृतांचे आधार कार्ड सक्रिय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुण्यात विविध घटकांशी संवाद साधला. विधानभवन येथे आयोजित या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यक्ती, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, भाषातज्ज्ञ, विचारवंत, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. समितीने त्यांच्या सूचना व प्रतिक्रिया जाणून घेतल्या. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी त्रिभाषा धोरण निश्चित करण्याकरिता ही समिती विभागनिहाय भेटी देऊन विविध घटकांशी संवाद साधत आहे. याच मालिकेतील जनसंवाद कार्यक्रम पुणे विधानभवन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, आमदार बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, समिती सदस्य डॉ. अपर्णा मॉरिस, डेक्कन महाविद्यालयाच्या मराठी भाषा विज्ञान प्रमुख डॉ. सोनल कुलकर्णी जोशी, बालमानसतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल, पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे उपसंचालक संजय डोर्लीकर आणि पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. नरेंद्र जाधव यांनी सांगितले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची राज्यात अंमलबजावणी कशी करावी, यावर शिफारशी करण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सन २०२१ मध्ये आपला अहवाल सादर केला होता. त्या अहवालात त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीचीही एक प्रमुख शिफारस होती, असे डॉ. जाधव यांनी स्पष्ट केले. डॉ. जाधव पुढे म्हणाले की, राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र कोणत्या इयत्तेपासून आणि कशा प्रकारे लागू करावे, या संदर्भात राज्य शासनाने ही समिती गठित केली आहे. विभागनिहाय भेटी देऊन मते व सूचना जाणून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आज पुणे येथे संवाद साधण्यात आला. यावेळी प्राप्त होणाऱ्या सूचनांचा सखोल विचार केला जाईल. तसेच, त्रिभाषा समितीचे https://tribhashasamiti.mahait.org हे संकेतस्थळही विकसित करण्यात आले आहे. नागरिकांनी या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली प्रश्नावली आणि सविस्तर मते मांडण्यासाठीची मतावली भरून सादर करावी, जेणेकरून प्राप्त सूचनांवर विचार करून डिसेंबर अखेरपर्यंत राज्य शासनाला अहवाल सादर करण्याचा प्रयत्न करता येईल.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाची स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर करण्यात आली. प्रवक्ते पदावरून हटवल्यानंतर अमोल मिटकरी यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. यानंतर अमोल मिटकरी यांनी, हकालपट्टी साजरी करणाऱ्यांच्या तोंडावर दिलेली सणसणीत चपराक दिल्याचे म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेली मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा...’ ही शायरी म्हणत हल्लाबोल केला. अमोल मिटकरी म्हणाले, वक्तृत्व कलेमुळेच अजितदादांनी मला पहिली संधी दिली होती. तेव्हापासून मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका ठामपणे मांडत आलो आहे. आजही पक्षाच्या विचारधारेबद्दल माझी निष्ठा अबाधित आहे. असे कोणते वादग्रस्त विधान मी केले ज्यामुळे मला हटवले, हेच समजत नाही. नव्या प्रवक्त्यांच्या यादीत नाव नसल्यामुळे थोडे वाईट वाटले, पण मी दादांशी स्वतः बोललो. दादा म्हणाले की कोणावरही अन्याय होणार नाही. आज स्टार प्रचारकांच्या यादीत माझे नाव आले, तेव्हा स्पष्ट झाले की पक्ष माझ्यावर विश्वास ठेवतो, अशा भावना मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केल्या. ही पक्षाने दिलेली सणसणीत चपराक पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, माझ्या पक्षाने मला जबाबदारी दिली आहे, ती मी पूर्ण जबाबदारीने पार पाडणार आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर या विचारसरणीशी बांधिल राहून मी पक्षाचा प्रचार करणार आहे. हकालपट्टी शब्द वापरल्यानंतर ज्यांना गुदगुल्या झाल्या, त्यांना ही पक्षाने दिलेली सणसणीत चपराक आहे. कोणाचाही अंत पाहू नये, कारण राजकारणात वळणं येतात. पण सत्य आणि निष्ठा कायम एकाच दिशेने उभे राहतात, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी अमोल मिटकरी तसेच रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह आणखी दोन प्रवक्त्यांना पद मुक्त केले होते. त्यानंतर अमोल मिटकरी यांच्या वादग्रस्त विधानांमुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली होती. तसेच अमोल मिटकरी हे सतत भाजपच्या नेत्यांवर टीका करत असतात म्हणून महायुतीमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्यानेच अजित पवारांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात होते. परंतु, आता अमोल मिटकरी यांची स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली असून मोठी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःची आर्थिक स्थिती लपवत कोर्टाची दिशाभूल करणाऱ्या एका घटस्फोटीत व्यक्तीला आपल्या पत्नीला दरमहा 3.5 लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिलेत. प्रस्तुत प्रकरणात पीडित महिलेला दरमहा केवळ 50 हजार रुपयांची पोटगी मिळत होती हे विशेष. यासंबंधीच्या माहितीनुसार, सदर दाम्पत्याचे 1996 साली लग्न झाले होते. त्यांचा संसार 16 वर्षे टिकला. त्यानंतर 2013 मध्ये हे दाम्पत्य विभक्त झाले. पुणे स्थित कौटुंबीक न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला होता. यावेळी झालेल्या सुनावणीत पतीने आपल्या पत्नीला दरमहा पोटगी देण्याची आपली कुवत नसल्याचा युक्तिवाद केला होता. त्याचा युक्तिवाद मान्य करत कोर्टाने महिलेला दरमहा 50 हजार रुपयांची पोटगी मंजूर केली होती. महिलेने या आदेशांना मुंबई हायकोर्टात आव्हान दिले होते. तर विभक्त पतीनेही आपल्या विभक्त पत्नीला एवढी पोटगी देण्याची आपली क्षमता नसल्याचा दावा करत पोटगीची रक्कम रद्द करण्याची मागणी केली होती. विभक्त पतीची कोर्टात लबाडी उघड न्यायमूर्ती बी पी कोलबावाला व न्यायमूर्थी सोमसेखर सुंदरेसन यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यात कोर्टाने विभक्त पतीने स्वतःची आर्थिक क्षमता लपवून कोर्टाची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत पोटगीच्या रकमेत तब्बल 7 पट वाढ केली. तसेच महिलेला दरमहा 3.5 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. सदर व्यक्तीचे 1000 कोटींचे साम्राज्य आहे. पण त्याने कोर्टात आपले मासिक उत्पन्न केवळ 6 लाख असल्याचा दावा केला. त्याची ही लबाडी कोर्टात समोर आली. त्यामुळे कोर्टाने त्याला धारेवर धरले. त्याची कानउघाडणी केली. एवढेच नाही तर विभक्त पत्नीला दरमहा साडेतीन लाखांची पोटगी देण्यासह वर्षभराची थकबाकी म्हणून 42 लाख रुपये देण्याचेही निर्देश दिले. विभक्त पती कोर्टापुढे स्वच्छ मनाने आला नाही. त्याने कोर्टात स्वतःला अत्यंत गरीब व मंजूर केलेली मूळ पोटगीची कमी रक्कम देण्यास असमर्थ असल्याचे दाखवले, असे निरीक्षण कोर्टाने या प्रकरणी नोंदवले. काय केला होता दोन्ही पक्षांनी युक्तिवाद? प्रस्तुत प्रकरणात विभक्त पत्नीने पतीच्या ऐशोआरामात जीवन जगण्याच्या मुद्याकडे कोर्टाचे लक्ष वेधले होते. कनिष्ठ कोर्टाने मला दरमहा 50 हजार रुपयांची पोटगी मंजूर केली. पण तेवढ्या पैशांत माझे व माझ्या मुलीचे भागत नाही. एकटीने मुलीचे संगोपन करण्यात मला अनेक अडचणी येत आहेत. याऊलट माझा विभक्त पती ऐशोआरामात जगत आहे, असे तिने म्हटले होते. त्यावर विभक्त पतीने कोरोना महामारीनंतर आपल्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचा दावा केला होता. कोविडनंतर माझे आर्थिक उत्पन्न घटले. मी यापूर्वीच पत्नीला पुरेशी रक्कम दिली आहे, असे तो म्हणाला. त्यावर पत्नीने विभक्त पतीच्या लाईफस्टाईलशी संबंधित पुरावे कोर्टापुढे सादर केले. त्यानुसार, हायकोर्टाच्या निर्णयात पतीच्या श्रीमंत जीवनशैलीचे दाखले देण्यात आले. विभक्त पतीची जीवनशैली श्रीमंत स्वरुपाची आहे. तो लक्झरी केंझो टी-शर्ट घालतो. वाढदिवासाची पार्टी देतो. परदेशात सहलीवर जातो. त्याचा मुलगा परदेशात शिकतो. यात काही चुकीचे नाही. पण असे असूनही शपथेवर आपण वार्षिक 6 लाख रुपये कमावतो व त्यामुळे विभक्त पत्नीला दरमहा 50 हजार रुपयांची पोटगी देणे परवडत नाही असे म्हणणे हे न पटणारे आहे, असे कोर्टाने या प्रकरणी म्हटले आहे. विभक्त पत्नी व तिच्या मुलीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कौटुंबीक न्यायालयाने मंजूर केलेली दरमहा 50 हजार रुपयांची पोटगी अपुरी आहे, असे कोर्टाने या प्रकरणी नमूद केले. तसेच महिलेच्या पोटगीत 7 पट वाढ करत तिला दरमहा साडेतीन लाख रुपयांची पोटगी मंजूर केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच महापालिकांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार राज्यात निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यात मुंबई महापालिका ही महत्त्वाची निवडणूक मानली जाते, याकडे महायुती तसेच महाविकास आघाडीचे विशेष लक्ष असतानाच आता एमआयएम पक्षाने देखील मोठा निर्णय घेतला आहे. एमआयएम मुंबईच्या पालिका निवडणुकीत 50 पेक्षा जास्त जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. एमआयएम मुंबईचे अध्यक्ष फारूख मक्बुल शाब्दी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयएम कमीत कमी 50 जागांवर आपले उमेदवार देणार आहे. ते म्हणाले, मुंबई महापालिकेसाठी नुकतेच आरक्षण सोडत जाहीर झाली. एससी, एसटी, ओबीसी पवर्गांसाठी काही प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करत असलेल्या आणि निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या आमच्या कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. तरीदेखील आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. कमीत कमी 50 जगा लढवण्याची आमची तयारी आहे, असे हाजी फारुख मक्बुल शाब्दी यांनी सांगितले. पुढे बोलताना फारुख मक्बुल शाब्दी म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांनाच संधी देण्यास आमचे प्राधान्य असेल. निवडणुका लक्षात घेऊन पक्षात आलेल्यांचा आम्ही नंतर विचार करू. तसेच एमआयएम ही भाजपची बी टीम म्हटले जाते, यावर बोलताना ते म्हणाले, आमच्यावरील भाजपची बी टीम हा आरोप काही नवा नाही. परंतु, आम्ही आमच्या ताकदीवर ही निवडणूक लढवणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, एमआयएम मुंबई महापालिका निवडणूक लढवणार असल्याने याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एमआयएम जिथे उमेदवार देते तिथे अप्रत्यक्ष फायदा हा भाजपला किंवा, शिवसेना शिंदे गटाला होत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी यावर कशी तयारी करते याकडे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिरूर कासार न्यायालयाने चित्रा वाघ यांच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या प्रकरणात न्यायालयाने हे वॉरंट जारी केले असल्याची माहिती मेहबूब शेख यांचे वकील अंकुश कांबळे यांनी दिली आहे. चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मेहबूब शेख यांनी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणी न्यायालयाकडून वारंवार समन्स पाठवून देखील चित्रा वाघ हजर झाल्या नाहीत. त्यामुळे आता न्यायालयाने आज त्यांच्या विरोधात वॉरंट काढला असल्याची माहिती अंकुश कांबळे यांनी दिली आहे. काय आहे प्रकरण? भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांच्यावर तरुणीचा छळ केल्याचा आरोप केला होता. चित्रा वाघ यांनी केलेल्या या कथित बदनामीकारक वक्तव्यामुळे पुढे हा वाद वाढला. त्यानंतर मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे आपली प्रतिमा आणि अब्रू धुळीस मिळाल्याचा आरोप करत शिरूर कासार न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने चित्रा वाघ यांना वारंवार समन्स बाजावून देखील त्या न्यायालयात हजर झाल्या नव्हत्या. आज अखेर न्यायालयाने चित्रा वाघ यांच्या विरोधात वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने अनेक वेळा समन्स पाठवले, मात्र चित्रा वाघ यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे न्यायालयाने पुढील प्रक्रिया म्हणून वॉरंट जारी केले असल्याची माहिती शेख यांचे वकील अंकुश कांबळे यांनी दिली आहे. तरुणीवर बलात्कार केल्याचा शेख यांच्यावर केला होता आरोप मेहबूब शेख यांच्यावर एका तरुणीने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेत त्या तरुणीच्या बाजूने लढा देत शेख यांच्यावर अनेक आरोप केले. परंतु, त्यानंतर काही दिवसातच या तरुणीने आपली भूमिका बदलत यू-टर्न घेतला. इतकेच नाही, तर या तरुणीने थेट चित्रा वाघ यांच्याच विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले होते. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, राजकारणात काम करताना अशा घटना किंवा अनुभव नवीन नसतात. आम्ही त्या मुलीला पहिल्या दिवसापासून मदतच केली होती. आम्हाला जिथे-जिथे तपास यंत्रणा बोलावतील तिथे आम्ही गेलो आणि सहकार्य केले. असे काही अनुभव आले म्हणून आम्ही काम करणे थांबवले नाही. आम्ही काम करतच राहिलो. आम्हाला पूर्ण कल्पना होती, ज्या ठिकाणी अशी राजकीय धींड येतात त्या ठिकाणी अशा अडचणी उद्भवणे स्वाभाविक असते. त्यामुळे अशा अडचणींना सामोरे जाण्यास आमची तयारी होती.
बिबट्याच्या दहशतीने तरुण पोरांची सोयरीक जुळेना
पुणे : प्रतिनिधी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या भीतीमुळे तरुणांची सोयरीक जुळता जुळेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेकडो तरुणांची लग्न रखडल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. पोरं आता स्वत:च्या पायावर उभी राहिलेत, आता कधी एकदा त्यांच्या डोक्यावरती अक्षता पडतात या आतुरतेने आई-वडिलांचा जीव व्याकुळला आहे. ही पोरंही लग्नाची स्वप्नं रंगवत आहेत हे खरं. पण […] The post बिबट्याच्या दहशतीने तरुण पोरांची सोयरीक जुळेना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती : प्रतिनिधी राज्यातील वाघांचा नेमका आकडा सांगणा-या वन विभागासाठी बिबट्यांची अचूक आकडेवारी सांगणे आव्हान ठरले आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्रात बिबट्याने, तर विदर्भात वाघाने दहशत निर्माण केली आहे. त्यामुळे बिबटे नियंत्रणात कसे आणायचे, याबाबत वन विभागाचे अधिकारी पेचात पडले आहेत. दरवर्षी वने व वनविभाग वाघ, बिबट्यांसह अन्य सहा वन्यजीवांची प्रगणना करतात आणि दर तीन वर्षांनी […] The post राज्यात बिबट्याची दहशत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या तिकिट दरात वाढ?
पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय आणि वन्यजीव संशोधन केंद्र आता आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने पुणे महापालिकेने तिकिट दरात तब्बल ५० टक्क्यांनी वाढ करण्याबाबतचा विचार सुरू केला आहे. पुढील काळात प्राणिसंग्रहालयात नवीन प्राणी दाखल होणार आहेत त्यामुळे खर्चामध्ये अधिक वाढ होणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, प्राणिसंग्रहालयासाठी महापालिकेकडून होणारा खर्च, मिळणा-या […] The post राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या तिकिट दरात वाढ? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अजित पवारांचा फडणवीसांना सरकारबाहेर पडण्याचा इशारा
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी पुण्यातील भूखंड घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमधून बाहेर पडून सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती, असा खळबळजनक दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातील […] The post अजित पवारांचा फडणवीसांना सरकारबाहेर पडण्याचा इशारा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीसांसह गौतम अदानी एकाच फ्रेममध्ये
सातारा : प्रतिनिधी आयपीएस अधिकारी प्रवीण पवार यांच्या मुलीचा विवाह समारंभ बुधवारी साता-यात पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती गौतम अदानी उपस्थित होते. या दिग्गजांची उपस्थिती चर्चेची ठरली. शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि गौतम अदानी एकाच फ्रेममध्ये आल्याने राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. […] The post शरद पवार, मुख्यमंत्री फडणवीसांसह गौतम अदानी एकाच फ्रेममध्ये appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अकोला : प्रतिनिधी वय वाढत चाललं, पण लग्नाचा योग जुळत नाही. आर्थिक परिस्थितीही दुर्बल, म्हणून कोणीही मुलगी देत नाही. या व्यथेतून त्रस्त झालेल्या अकोल्यातील एका ३४ वर्षीय शेतकरी तरुणाने थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पत्र लिहून आपल्या संसाराचा प्रश्न त्यांच्यासमोर ठेवला आहे. त्याची ही अनोखी विनंती सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. […] The post साहेब मला पत्नी मिळवून द्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मंदाकिनी बनून येणार ‘देसी गर्ल’?
मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी ‘ ग्लोब ट्रोटर’ या चित्रपटाचे नवे पोस्टर नुकतेच रिलीज झाले असून त्यात प्रियंका अगदी राऊडी आणि धाडसी अवतारात दिसत आहे. चाहत्यांनी या लूकला ‘मंदाकिनी मीट्स मॅव्हरिक’ असे म्हणत भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रियांका चोप्राने एक पोस्टर शेअर […] The post मंदाकिनी बनून येणार ‘देसी गर्ल’? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महायुतीच्या पक्षांसोबत कुठेही आघाडी नाही : सपकाळ
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. नगर परिषद, नगर पंचायत यांसारख्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. असे असताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघाडी वा युती करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले असले तरी काँग्रेस पक्ष विचारधारेवर अढळ असून, ही सत्तेची नाही तर विचारांची लढाई आहे. […] The post महायुतीच्या पक्षांसोबत कुठेही आघाडी नाही : सपकाळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शीतल म्हात्रे महापालिकेची निवडणूक लढवणार?
मुंबई : प्रतिनिधी शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी दहिसरमधून २०१२ साली पहिल्यांदा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली. त्या आधी त्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी होत्या. शीतल म्हात्रे यांनी दोनवेळा नगरसेविका म्हणून काम केले. आताही त्यांना महापालिका निवडणुकीसाठी दहिसरमधून तिकिट मिळणार असल्याची चर्चा आहे. पण शीतल म्हात्रे ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत. शीतल म्हात्रे यांनी पक्षश्रेष्ठींना आपली भूमिका […] The post शीतल म्हात्रे महापालिकेची निवडणूक लढवणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उमेदवारांना प्रचारात जेवणावळीचे दरपत्रक ठरले!
मुंबई : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल फुंकले आहे. पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत. इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरुवात केली आहे. दरम्यान, निवडणुकीतील प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांसाठी चहापान, जेवण, सभा, प्रचारासाठी वाहन, रॅली, जाहिरात आदी बाबींवर खर्च करावा लागतो. या खर्चाबाबत निवडणूक आयोगाने दर निश्चित करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना दिले आहेत. खर्चाची […] The post उमेदवारांना प्रचारात जेवणावळीचे दरपत्रक ठरले! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पार्थ पवार यांच्या कथित भूखंड घोटाळ्यामुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले असताना आता पुण्यात आणखी एक घोटाळा समोर आला आहे. त्यात पिंपरी चिंचवडच्या ताथवडे येथील शासनाच्या तब्बल 15 एकर जमिनीची कोट्यवधी रुपयांना परस्पर विक्री करण्यात आली आहे. या प्रकरणी हवेलीच्या सहाय्यक दुय्यम निबंधकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित भूखंड घोटाळ्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द करण्याची घोषणा केली आहे. पण या प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्यामुळे सरकारवरील दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडच्या ताथवडे येथील शासनाच्या जमिनीची परस्पर विक्री केल्याची घटना उजेडात आली आहे. हा व्यवहार जानेवारी 2025 मध्ये झाला. पण तो आता प्रकाशझोतात आला. पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवून विक्री यासंबंधीच्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरात पशुसंवर्धन विभागाची सर्वे नंबर 20 येथे 15 एकर जागा आहे. या जागेची कोट्यवधी रुपयांत पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवून परस्पर विक्री करण्यात आली. हा व्यवहार हेरंब गुपचूप नामक व्यक्तीने जानेवारी 2025 मध्ये केला. मुद्रांक शुल्क विभागाने त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला दिली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी त्याची तक्रार पुण्याच्या विभागीय आयुक्तांकडे केली. त्यानुसार आता पुण्याचे विभागीय आयुक्त व पशुसंवर्धन विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत. सहाय्यक दुय्यम निबंधक निलंबित दुसरीकडे, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी हवेलीच्या सहाय्यक दुय्यम निबंधक विद्या शंकर बडे (सांगळे) यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पुणे जिल्ह्यातील ताथवडे गावातील शाससकीय ताब्यातील जमीन विक्रीस नोंदवण्याच्या प्रक्रियेतील गैरव्यवहारात सहभागी झाल्यामुळे प्रभारी दुय्यम निबंधक विद्या शंकर बडे (सांगळे) यांना निलंबित करण्यात येत आहे, असे यासंबंधीच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. अशी झाली कोट्यवधीच्या जमिनीची परस्पर विक्री ताथवडे येथील सर्वे नंबर 20 मधील 6 हेक्टर 32 आर क्षेत्रफळ असणाऱ्या जमीन विक्रीचा दस्त क्रमांक 685/2025 दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी नोंदवण्यात आला होता. पण नोंदणी करताना अद्ययावत 7/12 उतारा जोडला नव्हता. दस्तासोबत 2023 मधील जुना 7/12 जोडण्यात आला होता. त्यावर शासनाचा ताबा किंवा विक्रीवरील बंदीचा उल्लेख नव्हता. चौकशीत असे निष्पन्न झाले की, फेब्रुवारी 2025 मधील अद्ययावत 7/12 उताऱ्यावर या जमिनीवर 'आयुक्त पशुसंवर्धन यांचा ताबा असून शासनाच्या परवानगीशिवाय विक्रीस बंदी' असा स्पष्ट शेरा होता. त्यानंतरही दुय्यम निबंधकांनी तांत्रिक अडचणीमुळे म्युटेशन होत नव्हते म्हणून 'स्किप ऑप्शन' वापरून दस्त नोंदवला. परंतु यासाठी त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतली नाही. ही गंभीर अनियमितता मानून विद्या शंकर बड़े (सांगळे) यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 अंतर्गत 12 नोव्हेंबर 2025 पासून पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई येथे राहील आणि त्यांनी वरिष्ठांची पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असेही सरकारच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
धार्मिक आणि मानवतावादी भावनांचा गैरवापर करून गाझा आणि पॅलेस्टाईनमधील लोकांना मदत करण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीचा पर्दाफाश दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) छत्रपती संभाजीनगर येथे केला आहे. या प्रकरणी सय्यद बाबर अली सय्यद महमूद अली या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने ऑनलाइन देणग्यांच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला. तसेच धार्मिक आणि मानवतावादी भावनांचा गैरवापर करून नागरिकांची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. दिल्लीत झालेल्या कार स्फोटानंतर महाराष्ट्रात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. एटीएसकडून राज्यभरात ठिकठिकाणी शोधमोहिम सुरू आहे. याच शोधमोहिमेदरम्यान एटीएसने छत्रपती संभाजीनगरमध्ये गाझा आणि पॅलेस्टाईनमधील लोकांना मदत करण्याच्या नावाखाली फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. आरोपी सय्यद बाबर अली याने फसवणुकीसाठी दोन पद्धतींचा वापर केला. या प्रकरणी सय्यद बाबर अली सय्यद महमूद अली या व्यक्तीला बुधवारी रात्री अटक करण्यात आली असून, गुरूवारी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमद राजा फाउंडेशनच्या नावाने निधी संकलन एटीएसच्या तपासानुसार, सय्यद बाबर अलीने ‘अहमद राजा फाउंडेशन’ या नोंदणीकृत नसलेल्या संस्थेच्या नावाने बनावट क्यूआर कोड तयार केला होता. त्याद्वारे नागरिकांकडून ऑनलाइन देणग्या गोळा करण्यात आल्या. तसेच ‘राजा एम्पॉवमेंट फाउंडेशन’ या नोंदणीकृत पण परदेशात निधी पाठवण्याचा अधिकार नसलेल्या संस्थेच्या नावानेही निधी जमा करण्यात आला. गोळा झालेली रक्कम त्याने स्वतःच्या बँक खात्यात वळवून वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचे तपासात समोर आले आहे. यूट्यूब आणि सोशल मीडियाचा वापर सय्यद बाबर अलीने निधी संकलनासाठी युट्युब आणि सोशल मीडियाचा देखील वापर केला. त्याने ‘राजा एम्पॉवमेंट फाउंडेशन’ नावाचा यूट्यूब चॅनल तयार करून त्याच्या माध्यमातून लोकांच्या धार्मिक आणि भावनिक भावना भडकवत ऑनलाइन देणग्या मागवण्याचा प्रयत्न केला. गाझा आणि पॅलेस्टाईनमधील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन करत या मोहिमेतून मोठी रक्कम जमा करण्यात आली. 10.24 लाख परदेशात ट्रान्सफर एटीएसच्या अहवालानुसार, बाबर अलीने आपल्या खात्यात जमा झालेली रक्कम GOFUNDME.COM या आंतरराष्ट्रीय देणगी पोर्टलद्वारे 14 व्यवहारांतून परदेशात पाठवली. या व्यवहारांद्वारे एकूण 10 लाख 24 हजार 220 रुपये इतकी रक्कम विदेशात वळवण्यात आली असल्याचे समोर आले आहे. या पैशाचा नेमका उपयोग कुठे आणि कोणत्या उद्देशासाठी झाला, याचा तपास आता एटीएस आणि स्थानिक पोलिस करत आहेत. पुढील दिवसांत आणखी काही खुलासे होण्याची शक्यता एटीएस आणि स्थानिक पोलिस आता संयुक्तपणे या रकमेचा उद्देश, ती कोणत्या व्यक्ती किंवा संस्थेकडे पाठवण्यात आली आणि यामागे काही राष्ट्रविरोधी हेतू आहे का, याचा कसून तपास करत आहेत. परदेशी निधीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या आणि संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. एटीएसच्या पुढील तपासानंतर आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपकडून सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ आणली जाईल, असा दावा काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी पार्थ पवार भूखंड घोटाळ्यात अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारबाहेर पडण्याचा इशारा दिल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी वरील दावा केला आहे. ते म्हणाले, पुण्यातील जमीन घोटाळ्यात पार्थ पवार जबाबदार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर हा घोटाळा बाहेर काढून भाजपने या प्रकरणी अजित पवार व त्यांच्या पक्षाची कोंडी केली आहे. या माध्यमातून आगामी निवडणुकीत पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, सांगली व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपपुरक भूमिका घ्यावी असा डाव आहे. भविष्यात महायुतीत सर्वात पहिला आघात अजित पवारांच्या पक्षावर केला जाईल. त्यानंतर त्यांच्यावर स्वतःहून सरकार बाहेर पडण्याची वेळ आणली जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया किचकट विजय वडेट्टीवार यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, स्थानिकच्या निवडणुकीत उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट ठेवण्यात आली आहे. उमदेवारी अर्ज 20 पानांचा आहे. हा अर्ज ऑनलाईन भरताना विविध अडचणी येत आहेत. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे हे अर्ज प्रत्यक्ष स्वीकारण्याची मागणी केली आहे. आयोगाने अर्जात उमेदवारांना मागील निवडणुकीत किती मते मिळाली, संबंधिताने किती खर्च केला आदी माहितीही मागवली आहे. प्रत्यक्षात ही माहिती आयोगाकडेही उपलब्ध आहे. ती पुन्हा मागवण्याची काहीच गरज नाही. शेवटच्या क्षणी विरोधकांचे अर्ज स्वीकारले नाहीत अशी स्थिती निर्माण केली जाण्याची शक्यता आहे. काय म्हणाले होते अंबादास दानवे? आमदार अंबादास दानवे पार्थ पवार प्रकरणात म्हणाले होते की, पुण्यातील भूखंड घोटाळ्याची भाजपला पूर्ण माहिती होती. हे सर्व उघड झाल्यानंतर अजित पवार अडचणीत येतील हे त्यांना ठावूक होते. ही एक मोडस ऑपरेंडी आहे. आता अजित पवारांची फाईल तयार केली आहे. उद्या त्यांनी काही केले तर एका मिनिटात पार्थ पवारांना अटक होऊ शकते. हे भाजपचे षडयंत्र आहे. त्यातूनच पार्थ पवार प्रकरण बाहेर आले. वर्षावरील बैठकीत जे घडले त्यावर मला बोलायला वेळ नाही. पण माझ्या माहितीनुसार, त्या दिवशी जी बैठक झाली, त्यात अजित पवारांनी रागाने, त्वेषाने सरकारमधून बाहेर पडून सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यापर्यंत भूमिका घेतली. हे सर्व आमच्या कानावर आले आहे. खरे खोटे लवकरच बाहेर येईल. अजित पवारांच्या या भूमिकेमुळे त्यांना व पार्थ पवार यांना वाचवले जात आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिवत पूजा करून सिंहस्थ कामाचे भूमिपूजन केले. यावेळी आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पहिल्या टप्प्यातील 44 कामांच्या एकूण 5,657.89 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या विकासकामांमुळे नाशिकचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा अधिक तेजस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारच्या भांडवल गुंतवणूकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत 99.14 कोटी खर्चाच्या रामकाल पथ प्रकल्पाची पायाभरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिक येथे करण्यात आली. रामकुंड परिसरात झालेल्या या समारंभाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि क्रीडा मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, आमदार अॅड. राहुल ढिकले, आमदार दिलीप बनकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, तसेच विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंग, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त आयुक्त कल्पना नायर आणि सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रकल्पाच्या संकल्पना आराखड्याचा आणि मॉडेलचा आढावा घेतला. रामकाल पथ उपक्रम रामकुंड मार्गावरील वारसा वास्तूंचे पुनरुज्जीवन आणि जतन करणे, दर्शनी भाग पुनर्संचयित करणे आणि पर्यटक आणि यात्रेकरूंसाठी पायाभूत सुविधा वाढवणे यावर लक्ष केंद्रित करेल. या प्रकल्पाचे उद्दिष्ट रामकुंड, सीता गुफा, काळाराम मंदिर, राम-लक्ष्मण गुफा आणि इतर प्राचीन मंदिरे यासारख्या स्थळांचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणे आहे. आगामी 2027 च्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तयारीसाठी, सरकारने नाशिकचा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जगासमोर आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकास कामे हाती घेतली आहेत. केंद्र सरकारच्या पाठिंब्याने उभारलेला रामकाल पथ प्रकल्प या दिशेने एक मोठे पाऊल आहे. गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर भेट देणाऱ्या भाविकांना ते अधिक समृद्ध आणि संस्मरणीय अनुभव देईल.
नैतिक मूल्ये, संस्कृतीचे रक्षण, राष्ट्रहित आणि वारकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १५ नोव्हेंबर रोजी आळंदी येथे १९ वे वारकरी महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. वारकरी संप्रदायाचे धर्मकार्य आणि राष्ट्रनिष्ठा ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. गेली अनेक शतकांपासून वारकरी संप्रदाय नैतिक मूल्ये, संस्कृती रक्षण आणि देशभक्तीची शिकवण देत आला आहे. हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद, वारकरी संघटना आणि संप्रदाय, गंगागिरी महाराज संस्थान, श्रीक्षेत्र गोदावरी धाम, बेट सरला यांच्या संयुक्त विद्यमाने हे अधिवेशन दुपारी १ ते सायंकाळी ४ या वेळेत सद्गुरू श्री गंगागिरी महाराज मठ, आळंदी (देवाची), पुणे येथे पार पडेल. राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुती शास्त्री तुणतुणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे नागेश जोशी, रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे ह.भ.प. बापू महाराज रावकर, ह.भ.प. रामचंद्र पेनोरे महाराज आणि ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज आदी मान्यवर उपस्थित होते. या संदर्भात ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे यांनी सांगितले की, गेली १८ वर्षे हे अधिवेशन सातत्याने आयोजित केले जात आहे. वारकऱ्यांचे विविध प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जातो. यंदाही वारकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा होणार आहे. ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी माहिती दिली की, या अधिवेशनात महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज, पिठाधीश, बेट सरला, श्री क्षेत्र गोदावरी धाम तसेच ज्येष्ठ वारकरी संत आणि धर्मसंस्थापक उपस्थित राहणार आहेत. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांच्यासह अन्य मान्यवर वक्ते मार्गदर्शन करतील. आयोजकांनी समस्त वारकरी आणि हिंदूंना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुद्रणालयाचा अमृतमहोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. नरेंद्र जाधव यांनी मुद्रणालयाने 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस'सारखी प्रतिष्ठा मिळवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. डॉ. जाधव म्हणाले की, गेल्या ७५ वर्षांतील मुद्रणालयाची वाटचाल अभिमानास्पद आहे. हे मुद्रणालय विद्यापीठाचे अविभाज्य अंग म्हणून अधिक आधुनिक आणि जागतिक स्तरावर नाव मिळवणारे 'पुणे युनिव्हर्सिटी प्रेस' बनावे, अशी त्यांची इच्छा आहे. विद्यापीठात पुन्हा 'स्वगृही परतल्याचा' आनंद व्यक्त करत त्यांनी सर्व विद्यमान व माजी अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, वित्त व लेखाधिकारी सीएमए चारुशीला गायके, अधिष्ठाता डॉ. संजय तांबट आणि सुप्रिया पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. जाधव यांनी २००६ मध्ये कुलगुरूपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुद्रणालयातील जुनी यंत्रसामग्री बदलून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रिंटिंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक विद्यापीठांनी मुद्रणालय आउटसोर्स केले असताना, पुणे विद्यापीठाने स्वतःचे मुद्रणालय कायम ठेवले, हा दूरदृष्टीचा निर्णय ठरल्याचे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानातील बदलांचा संदर्भ देत, 'जो थांबला तो संपला' हा नियम लक्षात घेऊन सातत्याने नवनवीन कल्पना आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आपले पुढचे मराठी पुस्तक पुणे युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये छापण्याचा मानसही व्यक्त केला. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी मुद्रणालयाच्या सात दशकांच्या योगदानाचे कौतुक केले. 'मुद्रणालय हे विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवासाचा साक्षीदार आणि ज्ञानसंवर्धनाचा आधारस्तंभ आहे,' असे ते म्हणाले. विद्यापीठाचे मुद्रणालय आता डिजिटल युगात नवी झेप घेणार असून, 'सॅटेलाइट डिजिटल प्रिंटिंग हब' आणि 'पब्लिकेशन इनोवेशन सेंटर' या संकल्पना राबवण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. क्वांटम कॉम्प्युटिंगसारख्या आधुनिक विषयांवरील मराठी पुस्तके पुणे युनिव्हर्सिटी प्रेसमार्फत प्रकाशित केली जातील, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार तथा उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या स्नुषा श्लोका अंबानी यांनी नक्षलग्रस्त व दुर्गम गडचिरोली जिल्ह्यात 'सोलर शाळा' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद शाळांचे सौरऊर्जीकरण केले जात आहे. यामुळे शाळांमधील अध्यापन आणि डिजिटल शैक्षणिक उपक्रमांना अखंड वीजपुरवठा मिळेल. त्याचा सुमारे १,४७० विद्यार्थ्यांना थेट लाभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'रोझी ब्लू फाऊंडेशन' आणि त्यांच्या स्वयंसेवी प्लॅटफॉर्म 'कनेक्ट फॉर'च्या सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन त्यांचे कौतुक केले. 'कनेक्ट फॉर'च्या संस्थापक श्लोका अंबानी आणि सह-संस्थापक मानिती शाह यांनी गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिली होती. नीती आयोगाने 'आकांक्षित जिल्हा' म्हणून घोषित केलेल्या गडचिरोलीमध्ये शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी श्लोका अंबानी यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत प्रशंसनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी 'सोलर शाळा प्रकल्पा'अंतर्गत 'रोझी ब्लू फाऊंडेशन'ला काम करण्यास मंजुरी दिली. पहिल्या टप्प्यात, फाऊंडेशनने धानोरा तालुक्यातील दहा जिल्हा परिषद शाळांमध्ये सौरऊर्जेवर आधारित युनिट्स उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यात जि. प. प्राथमिक शाळा धानोरा, मुसक्या, सालेभट्टी, रांगी, निमगाव, दुडमला, मुरूमगाव, बन्धोना, तसेच जि.प. हायस्कूल धानोरा आणि मोहली या शाळांचा समावेश आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन महत्त्वाच्या महिला नेत्या रूपाली चाकणकर आणि रूपाली पाटील ठोंबरे यांच्यातील संघर्ष शमण्याऐवजी अधिकच तीव्र होताना दिसत आहे. फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रूपाली चाकणकरांविरोधात घेतलेल्या भूमिकेवरून पक्षाच्या वतीने रूपाली ठोंबरे यांना नोटीस बजावत सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्यास सांगितले होते. मात्र, आता मी नेमका कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे? असा सवाल करत, रूपाली ठोंबरे यांनी पक्षाकडेच खुलासा मागितला आहे. फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केलेल्या 'असंवेदनशील' वक्तव्यावरून दोन्ही रूपालींमध्ये वाद सुरू झाला होता. रूपाली पाटील ठोंबरे यांनी चाकणकरांच्या वक्तव्यावर टीका करत पुण्यात थेट धरणे आंदोलन केले होते. पक्षातील हा वाद वाढू नये म्हणून अजित पवारांनी यावर बोलणे टाळले असतानाच, अलीकडेच पक्षाकडून रूपाली पाटील ठोंबरे यांना 'खुलासा' मागवणारे पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रानंतर आता रूपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षालाच प्रतिप्रश्न केल्यामुळे पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. रूपाली ठोंबरे पत्रात काय म्हणाल्या? आपण दिनांक 07/11/2025 रोजी जावक क्रमांक 1313 द्वारा राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांच्या बाबतीत प्रसार माध्यमांमध्ये केलेले वक्तव्य पक्षशिस्त मंग करणारे आहे व त्यासंदर्भात शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबत खुलासा पत्र मागवले आहे. त्याबाबत आपणास खुलासा येणेप्रमाणे राज्य महिला आयोग अध्यक्ष तसेच प्रदेशाध्यक्ष यांचे बाबत नक्की कोणते वक्तव्य शिस्तभंग करणारे आहे. याविषयी नोटीस मध्ये कोणताही माहिती नसल्याने त्याबाबत खुलासा देणे शक्य नाही. सविस्तर एखादे वाक्य आपण आपल्या नोटीसीमध्ये नमूद केले असते तर त्यावर मला खुलासा करणे योग्य झाले असते. तसेच राज्य महिला आयोग व राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र विभाग आहेत. त्यावर माझे सांगणे की, स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्या प्रकरणी राज्य महिला आयोगाने अध्यक्षा यांनी जे वक्तव्य केले होते त्यामध्ये समाज माध्यमांमध्ये तसेच लोकांमध्ये अत्यंत रोष, असंतोष निर्माण झाला होता. राज्य महिला आयोगाने केलेले वक्तव्याने पक्षालासुद्धा रोषाला सामोरे जावे लागत होते. पक्षाची अत्यंत बदनामी झाली त्यानंतरून मी स्वतः बीड येथे जाऊन डॉक्टर संपदा मुंडे यांचे कुटूंबीय व आपल्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. अजित दादा पवार यांची बोलणे करून दिले होते त्यावेळी देखील मा.दादांनी मी महिला आयोगाच्या मताशी सहमत नसल्याचे सांगितले होते. मी केवळ राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मताचा सन्मान करून माझे म्हणणे मांडले होते. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची बाजू मांडणे हे प्रवक्त्याचे प्रथम कर्तव्य असताना सदरची नोटीस का देण्यात आली याची कल्पना नाही. त्यामुळे कोणताही शिस्त भंग झालेला नाही. तसेच याबाबत हा माझा खुलासा समजावा. दोन रूपालींच्या वादावर अजित पवार काय म्हणाले? दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी देखील दोन्ही रूपालींच्या वादावर प्रतिक्रिया दिली. मी रूपाली (ठोंबरे) ताईंना भेटलो. त्यांच्याशी बोललो त्यावेळी अभय मांढरे देखील माझ्यासोबत होता. मी त्यांना जे काही सांगायचे ते सांगितले आहे. तो आमच्या परिवारातील अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही कुटुंब आणि परिवार म्हणून सगळं पाहातो. त्यामुळे पत्रकारांना खमंग बातम्या मिळतील, अशी अपेक्षा ठेऊ नका. तुमच्यामध्ये वाद झाल्यावर तुम्ही ज्या पद्धतीने मिटवता, त्याच पद्धतीने मलाही माझ्या पक्षातील वाद मिटवावा लागेल. आम्ही पक्षातील निर्णय सर्वजण बसून घेतो, असे अजित पवार म्हणाले होते.
जनरल प्रॅक्टिशनर्स हे भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा खरा पाया आहेत, असे मत भारतीय सेना वैद्यकीय सेवा माजी महासंचालक लेफ्टनंट जनरल डॉ. ए. के. दास यांनी व्यक्त केले. जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, पुणे यांच्या वतीने आयोजित ३५वे वार्षिक वैद्यकीय अधिवेशन – ‘मेगा जीपीकॉन २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. दास म्हणाले की,जनरल प्रॅक्टिशनर्स आपल्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत.त्यांनी स्वतःला प्रगत आणि व्यावसायिक कौशल्यांचा विस्तार करून भविष्यासाठी तयार ठेवणे आवश्यक आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या आकडेवारीनुसार, सध्या आपल्याकडे १३.५ लाख ॲलोपॅथिक डॉक्टर आणि ७.५ लाख आयुष डॉक्टर नोंदणीकृत आहेत. दोन्ही मिळून आपल्याकडे प्रत्येक ८१० लोकांमागे एक डॉक्टर आहे, जो जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मानकांपेक्षा अधिक चांगला आहे. हे केवळ जनरल प्रॅक्टिशनर्सच्या योगदानामुळेच शक्य झाले आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. अण्णाभाऊ साठे सभागृह येथे पार पडलेल्या या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेला राज्यभरातील तसेच देशभरातील शेकडो डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि संशोधकांचा मोठा प्रतिसाद लाभला. डॉ. ए. के. दास यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला. मोहनभाई पालेशा आणि रुबी हॉल क्लिनिकचे फिजिशियन व विश्वस्त डॉ. सायमन ग्रँट हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. दास यांनी देशातील आरोग्य सेवांमधील आव्हानांवरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, आपली लोकसंख्या प्रचंड असल्याने प्रत्येक व्यक्तीपर्यंत, विशेषतः दुर्गम भागातील लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हे एक अत्यंत कठीण कार्य आहे. सध्या सुमारे ७० टक्के प्राथमिक आरोग्यसेवा सरकारी संस्थांकडून, तर फक्त ३० टक्के सेवा खाजगी क्षेत्राकडून मिळते. याउलट, तज्ज्ञ सेवा ७० टक्के खाजगी रुग्णालयांकडून दिली जाते आणि फक्त ३० टक्के सरकारी रुग्णालये व संस्थांकडून मिळते. सरकारने आयुष्मान भारत योजना सुरू करून विमा कव्हर वाढवण्याचा आणि अधिक लोकांना आरोग्य सेवेच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही आरोग्य कव्हरेज अजूनही अपूर्ण आहे. डॉ. दास यांनी नमूद केले की, आजही देशभरात सुमारे ५ लाख डॉक्टरांच्या तुटवड्याला आपण सामोरे जात आहोत. हा आकडा खूप मोठा असून, सरकारने यावर उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी मानवी संसाधनांचा तुटवडा कायम आहे. डॉ. सुनील भुजबळ यांनी ‘मेगा जीपीकॉन’च्या यंदाच्या संकल्पनेबद्दल माहिती दिली. यंदाची संकल्पना ‘प्रतिबंध, संरक्षण आणि प्रोत्साहन निरोगी भविष्यासाठी’ अशी होती. ‘प्रतिबंध उपचारापेक्षा श्रेष्ठ’ हे केवळ एक वाक्य नसून, आपल्या वैद्यकीय व्यवसायाची नाडी आहे, असे ते म्हणाले. आजचा डॉक्टर फक्त उपचार करणारा नसून समाजाचा आरोग्यदायी मार्गदर्शक आहे, जो तंत्रज्ञान, संशोधन आणि नैतिकता यांचा सुसंवाद राखत समाजाचे आरोग्य जपतो.
नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी अखेर भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. गुरुवारी नाशिक येथील वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या औपचारिक कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कोतवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या सोबत माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, माजी नगरसेविका नंदिनी बोडके, युवा नेते नरेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव गोवर्धने तसेच शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या प्रवेशामुळे नाशिक आणि चांदवड तालुक्यांमध्ये भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. या प्रसंगी आमदार राहुल आहेर, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले आणि भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कोतवाल यांचे स्वागत करताना त्यांचा राजकीय प्रवास आणि अनुभवाचे कौतुक केले. शिरीषभाऊ, आजपासून तुम्ही अधिकृतपणे भाजप कुटुंबाचा भाग झाला आहात. तुम्ही देशाच्या मुख्य राजकीय प्रवाहात सामील झाला आहात. आतापर्यंत तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कार्य केले, अनेक निवडणुका लढवल्या. पण आता हा तुमचा शेवटचा पक्षप्रवेश आहे. भाजपमध्ये तुम्हाला काम करण्यासाठी प्रचंड संधी आहे आणि आम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करू, असे सांगून गिरीश महाजन यांनी कोतवाल यांच्या प्रवेशाचा उल्लेख केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिरीषकुमार कोतवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी कोणत्याही स्वार्थासाठी किंवा पदाच्या अपेक्षेने पक्षात आलेलो नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि देशाच्या विकासासाठी योगदान देण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून नाराजी होती. कार्यकर्त्यांच्या भावना दाबल्या जात होत्या. ती नाराजी दिवसेंदिवस वाढत गेली आणि अखेर भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला, असे कोतवाल यांनी सांगितले. तत्त्वांवर आधारित राजकारण कार्यक्रमादरम्यान आमदार राहुल आहेर यांनी कोतवाल यांच्याबद्दल सकारात्मक भूमिका मांडली. मी तीन निवडणुका शिरीषभाऊंविरुद्ध लढलो, पण आमच्यात वैयक्तिक वैर नव्हते. आम्ही दोघेही तत्त्वांवर आधारित राजकारण करतो. आज ते भाजपमध्ये आले आहेत याचा मला आनंद आहे. या प्रवेशामुळे आमचा नाशिकचा बालेकिल्ला अधिक मजबूत झाला आहे, असे ते म्हणाले. प्रभावी कार्यकर्ते आणि स्थानिक नेते पक्षात दाखल या मोठ्या पक्षप्रवेशामुळे नाशिक आणि चांदवड तालुक्यात भाजपची संघटनात्मक शक्ती वाढली आहे. कोतवाल यांच्यासोबत नाशिकमधील अनेक प्रभावी कार्यकर्ते आणि स्थानिक नेते पक्षात दाखल झाले आहेत. नरेश पाटील, नीलम पाटील, शिवाजी बस्ते, गौरव आग्रवाल, सागर निकम, भागवत जाधव, एकनाथ पगार, दिनेश जाधव, बाळासाहेब शिंदे आदी अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. या प्रवेशामुळे भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत मोठा फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चांदवड आणि नाशिकमधील राजकीय समीकरणे आता नव्याने आकार घेत असून, भाजपसाठी हा प्रवेश एक मोठी राजकीय भरारी ठरू शकतो.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीचे नाव मतदार यादी फायनल झाल्यानंतर त्यात घुसवण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. अंबादास दानवे यांनी गुरूवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी उपरोक्त आरोप केला. ते म्हणाले, निवडणूक आयोग थोतांड आहे. माझ्याकडे एक पुरावा आहे. मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीचे नाव मतदार यादी घोषित झाल्यानंतर त्यात घालण्यात आले. त्याचा अर्ज माझ्याकडे आहे. मी ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातली. त्यांनी चेक करतो म्हणून सांगितले. परंतु या प्रकरणी एका व्यक्तीनेही अर्ज केलेला आहे. त्या अर्जात निवडणूक आयोगावर नियमांचे उल्लंघन करून अंतिम मतदार यादीत नाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अर्जानुसार, 1 जुलै 2025 पर्यंत मतदान असलेल्या किंवा नोंदणी केलेल्या व्यक्तींनाच निवडणुकीत मतदान करण्याचा किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. तसे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने हायकोर्टात दाखल केले आहे. पण 26 ऑक्टोबर 2025 रोजीही या यादीत नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदार यादीत काही बड्या राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांची नावे घालण्याचा प्रयत्न होत आहे. या अर्जासोबत ऑनलाईन पद्धतीने केलेला अर्ज व संजय शिरसाट यांच्या मुलीचे डॉक्युमेंटही जोडण्यात आले आहे. त्यामुळे मतदार यादीत घोळ असल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. निवडणूक आयोग बायस पद्धतीने काम करतो अंबादास दानवे पुढे म्हणाले, मतदार यादीत नाव टाकणे ही प्रक्रिया आहे. ती कधीच बंद होत नाही. पण नाव मतदारयादीत टाकण्याची एक निश्चित मर्यादा ठरली आहे. ही मर्यादा तोडण्याचा प्रयत्न यात झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. पण कारवाई होते किंवा नाही हे मतदार यादी आल्यानंतर स्पष्ट होईल. या प्रकरणात एका बीएलओने राजकीय दबावाखाली हे चुकीचे काम केल्याचे दिसते. त्यामुळे निवडणूक आयोग बायस पद्धतीने काम केल्याचेही सिद्ध होते. भाजपच्या आळंदी येथील एका कार्यकर्त्याच्या घरात 6 मतदार आहेत. पण त्याच्या घरात 160 मतदानांची नोंद आहे. संजय बंडू जाधव यांनी मला हे सांगितले. तुम्हीही हे चेक करू शकता. त्यामुळे कितीही आंदोलने केले तरी हे निर्ढावलेले लोक अशाच पद्धतीने मतदारयाद्यांत घोळ करतात. याला निवडणूक आयोग पाठिंबा देतो, असे दानवे म्हणाले. हे ही वाचा... अजित पवारांचा फडणवीसांना सरकारबाहेर पडण्याचा इशारा:अंबादास दानवेंचा दावा; पार्थ पवार प्रकरणात 'वर्षा'वरील बैठकीचा दिला दाखला मुंबई - पुण्यातील भूखंड घोटाळ्याप्रकरणी अडचणीत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमधून बाहेर पडून सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती, असा खळबळजनक दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. अजित पवार यांच्या या टोकाच्या भूमिकेमुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवार पिता-पुत्रांना वाचवत आहेत, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर
अमरावतीत ‘आय लव्ह मोहम्मद’ वादानंतर आता ‘इस्लामविषयी विचारा?’(Ask About Islam) असा संदेश असलेले होर्डिंग लावल्यामुळे नवीन वाद उभा राहिला आहे. हे होर्डिंग इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर (IIC) कडून पंचवटी चौकात लावण्यात आले असून, भाजपने यावर तीव्र विरोध व्यक्त केला आहे. भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी होर्डिंगवर आक्षेप नोंदवत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. अमरावतीत 10 नगरपरिषद 2 नगरपंचायतींच्या निवडणुकींसाठी आचारसंहिता लागली असून, आयआयसीकडून लावण्यात आलेल्या पोस्टरमुळे निवडणूक काळात नव्या वादाला तोंड फुटण्याचे शक्यता आहे. या होर्डिंगच्या आधी अमरावतीत ‘आय लव्ह मोहम्मद’ पोस्टर लावल्यामुळे देखील वाद झाला होता. दरम्यान, आयआयसीच्या पोस्टरवर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी आक्षेप घेतला आहे. फलकावरील मजकूर काय? अमरावती शहरात पंचवटी चौकासह इतर मुख्य चौकात सध्या इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटर महाराष्ट्राचे (IIC) मोठे फलक लागल्याचे दिसून येत आहे. या फलकावर 'विचारा इस्लामविषयी' असा मजकूर असून, त्याखाली एक संपर्क क्रमांक दिला आहे. संपर्क क्रमांकाच्या खाली आयआयसीचा लोगो आहे. भाजपचे नेते आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी यावर तीव्र आक्षेप घेत, हे धर्मांतराचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे. कुणाची हत्या करणे इस्लाममध्ये वैध आहे का? भाजप खासदार अनिल बोंडे यांनी फलकावर नमूद केलेल्या टोलफ्री क्रमांकावर थेट फोन करून माहिती घेतली. तेव्हा पलिकडून ही संस्था हैदराबाद येथून चालवली जात असून, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत त्यांच्या शाखा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अनिल बोंडे यांनी ‘कुणाची हत्या करणे इस्लाममध्ये वैध आहे का?’ असा स्पष्ट्र प्रश्न विचारला. त्यावर ‘नाही’ असे उत्तर पलीकडून दिल्यानंतर अनिल बोंडे हे आक्रमक झाले. ‘मग हाच प्रचार तुम्ही होर्डिंग्जच्या माध्यमातून का करत नाही? तसेच, दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटांचा निषेध का करत नाही?’असा सवाल अनिल बोंडे यांनी विचारला. मात्र, या प्रश्नांवर त्यांना समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. कायदेशीर कारवाईची मागणी दरम्यान, शहरात शाळा, महाविद्यालय असलेल्या बहुसंख्यांक हिंदू बहुल भागात इस्लाम विषयीचे होर्डिंग लागल्याने अल्पवयीन मुलांमध्ये धर्मांतराचा प्रचार करणे हा अजेंडा या पोस्टरच्या माध्यमातून राबवला जात असल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने दखल घेऊन, फलक लावणारे आणि यामागे असलेल्या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अनिल बोंडे यांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्याशी फोनवरून संवाद केली. हे ही वाचा... अमरावतीत नवरदेवावर स्टेजवरच चाकू हल्ला:लग्नमंडपातील थरार ड्रोन कॅमेरात कैद, आरोपींच्या पाठलागाचा व्हिडिओ व्हायरल अमरावती जिल्ह्यातील बडनेरा तालुक्यात एका विवाह समारंभात अत्यंत धक्कादायक आणि 'मुळशी पॅटर्न' चित्रपटातील दृश्याला शोभेल असा जीवघेणा हल्ला उघडकीस आला आहे. मंगळवारी रात्री लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर दोन आरोपींनी धारदार चाकुने सपासप वार केले. विशेष म्हणजे, हल्लेखोरांनी हल्ला करून पळ काढण्याचा संपूर्ण थरार लग्नाच्या शूटिंगसाठी आणलेल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सविस्तर वाचा...
राज्य शासनाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी काढलेल्या प्राध्यापक भरतीच्या शासन निर्णयाला कडाडून विरोध करत तो रद्द करावा, अशी मागणी बामुक्टो अर्थातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालीयन प्राध्यापक संघटनेने राज्यपालांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. हा शासन निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाशी विसंगत व बेकायदेशीररित्या निर्गमित केला आहे. तो तातडीने रद्द करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने लढा उभारू, असा इशारा दिला आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्राध्यापक भरतीच्या शासन निर्णयामधील काही निकषांमध्ये बदल केलेत. त्यात शैक्षणिक, अध्यापक, संशोधनासाठी ७५ गुण, तर मुलाखतीसाठी २५ गुण निश्चित केलेत. या सूत्राला विरोध होतोय. तसेच विद्यापीठ अनुदान आयोग अर्थातच यूजीसीने मान्यता दिलेले ५०:५० गुणांचे सूत्र अवलंबावे अशी मागणी होतेय. विशेष म्हणजे यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही आपल्याच सरकाच्या निर्णयाला विरोध केलाय. राज्यपाल, मुख्यमंत्री, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, उच्च आणि तंत्रशिक्षणाचे प्रधान सचिव, उच्च शिक्षण संचालनालय यांच्याकडे पत्र पाठवून याबाबतची मागणी केली. त्यासाठी १) उच्च शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक संकिर्ण- २०२५/ई-८६०४२१/विशि-१ दि. ६ ऑक्टोबर, २०२५. २) विद्यापीठ अनुदान आयोग अधिसूचना, दि . १८ जुलै २०१८ आणि ३) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक संकिर्ण-२०१८/प्र.क्र.५६/१८/ विशि-१, दि. ८ मार्च २०१९ असे तीन संदर्भ दिलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संदर्भ क्रमांक १ अन्वये उच्च शिक्षण विभागाने राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील (अकृषी) अध्यापकांच्या भरती प्रक्रीयेच्या अनुषंगाने कार्यपध्दती विहित करणेबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. देशभरातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थामधील अध्यापकांकरीता विद्यापीठ अनुदान आयोगाकडून शैक्षणिक अर्हता आणि अनुषंगिक बाबी विहित करण्यात येतात. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दि. १८ जुलै, २०१८ च्या अधिसूचनेद्वारे उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांकरिता Minimum qualifications for appointment of teachers and other academic staff in Universities and Colleges and Measures for the maintenance of standards in Higher Education निश्चित करण्यात आली आहेत. सदर अधिसुचनेतील तरतूदी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दि. ८ मार्च, २०१९ च्या शासन निर्णयान्वये राज्यात लागू करण्यात आल्या आहेत. प्रस्तुत निवेदनात नमूद करण्यात आलेल्या दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये अध्यापकांची निवड प्रक्रिया राबविण्याबाबत नव्याने कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. सदरील शासन निर्णयाचे अवलोकन केले असता विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दि. १८ जुलै, २०१८ च्या अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केलेल्या अध्यापक निवड प्रक्रियेतील प्रचलित तरतुदींशी विसंगत नियमावलीचा अवलंब करत उच्च शिक्षण क्षेत्रातील नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले उच्च शिक्षित पात्रताधारक राज्यातील सार्वजनिक अकृषि विद्यापीठामधील भरती प्रक्रियेतून वंचित राहतील अशी व्यवस्था निर्माण केली जात असून त्याची कारणमीमांसा खालीलप्रमाणे; राज्य सार्वजनिक विद्यापीठांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविताना शैक्षणिक गुणांकन करतेवेळी शैक्षणिक पात्रता, अध्यापन व संशोधन कार्य(ATR) यासाठी ७५% व मुलाखतीसाठी २५% गुणांकन केले जाणार आहे . तसेच या ATR मध्ये ५० पेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवारच मुलाखतीसाठी पात्र मानले जातील. सर्वात अन्यायकारक बाब म्हणजे ५५ गुणांचे शैक्षणिक गुणांकन करताना संबधित उमेदवाराची पदवी / पदव्युत्तर / M.Phil. / Ph.D. या पदव्या कोणत्या विद्यापीठातून प्राप्त आहेत यावर गुण आधारित राहतील. ज्यामध्ये राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था (IIT, NIT, IISER, IIM इ.) किंवा QS/THE/ARWU रँक २०० मध्ये असलेली परदेशी विद्यापीठे यांमधील पदवी करिता १००% गुण ; केंद्र / राज्य सार्वजनिक विद्यापीठे व NIRF रँक १०० मध्ये / QS/THE/ARWU रँक २००-५०० करिता ९०% गुण; इतर मान्यताप्राप्त सार्वजनिक विद्यापीठे करिता ८०% गुण व उर्वरित UGC मान्यताप्राप्त विद्यापीठे ६०% गुण असे गुणांकन केले जाणार आहे. संशोधन व नवोन्मेष कौशल्य अंतर्गत देय असलेल्या कमाल १५ गुणांचे मूल्यांकन करते वेळी यापुढे केवळ SciFinder / Web of Science / Scopus सूचीतील संशोधन लेख विचारात घेतले जाणार आहेत. तसेच अध्यापन अनुभव करीत कमाल ५ गुण मिळवण्याकरीता विद्यापीठ / पालक संस्थेकडून मान्यताप्राप्त अध्यापन अनुभव, किंवा राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांमध्ये अथवा QS / THE / ARWU (Shanghai World University Rankings) मध्ये अव्वल ५०० क्रमांकातील परदेशी विद्यापीठांमध्ये झालेला पोस्ट-डॉक्टोरल अनुभव यासाठी प्रत्येक वर्षास १ गुण देण्यात येईल. यासोबतच संदर्भ पुस्तके, संपादित पुस्तक, पेटंट व पुरस्कार याकरिता स्वतंत्रपणे गुण देण्यात येतील असे या शासन निर्णयात म्हंटले आहे. उपरोक्त परिच्छेदात नमूद तरतुदी पाहता व सद्यस्थितीतील राज्यातील सार्वजनिक अकृषी विद्यापीठांचे रँकिंग पाहता या विद्यापीठातून पदवी, पदव्युत्तर व पीएच. डी पदव्या संपादन केलेले उमेदवार राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था व केंद्रीय विद्यापीठे यांच्या उमेदवारांना मिळणाऱ्या गुणांकनाच्या स्पर्धेत टिकणार नाहीत. तसेच संशोधन कार्याचे मूल्यांकन करताना विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखा वगळता मानव्य विज्ञान, वाणिज्य व आंतर विद्याशाखा मधील ज्या उमेदवारांचे SciFinder / Web of Science / Scopus सूचीत ज्यांचे संशोधन प्रसिद्ध नाही त्यांना देखील गुणांकण मिळविण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. वास्तविक पाहता विविध कारणांनी अकृषी विद्यापीठांमधील प्रलंबित असलेली ६५९ पदांची शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार असल्याने राज्यातील नेट, सेट व पीएच.डी. धारक उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, या कार्यपद्धतीमुळे हे उमेदवार या भरती प्रक्रियेपासून वंचित राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. परिणामी उच्च शिक्षित पात्रताधारकांमध्ये या नियमावलीवरून प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे. उक्त प्रकरणी प्रस्तुत निवेदनाद्वारे आम्ही आपणांस नम्रपणे विनंती करतो की, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दि. १८ जुलै, २०१८ च्या व उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दि. ८ मार्च, २०१९ च्या शासन निर्णयान्वये अधिसूचित असलेल्या प्रचलित शासन तरतुदींचे काटेकोरपणे अंमलबाजवणी होऊन राज्यातील उच्च शिक्षित पात्रताधारक उमेदवारांना संधीची समानता या घटनात्मक मूल्यानुसार न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठामधील अध्यापकांच्या भरती प्रक्रिया कार्यपध्दती बाबतचा दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजीचा शासन निर्णय रद्द करून समाज मनामध्ये व पात्रताधारक उमेदवारांमध्ये राज्यातील विद्यापीठांच्या दर्जाबाबत कुठेही शंकेची व संशयाची भावना निर्माण होऊ नये. यासाठी योग्य ती कार्यवाही करून सहकार्य करावे ही नम्र विनंती. अन्यथा विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशाशी विसंगत व बेकायदेशीर रित्या निर्गमित केलेल्या या शासन निर्णयाच्या विरोधात आम्हाला नाईलाजस्तव लोकशाही मार्गाने लढा उभा करावा लागेल. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. बप्पासाहेब म्हस्के, सचिव डॉ. मारोती तेगमपुरे, अधिसभा सदस्य डॉ. उमाकांत राठोड, जिल्हा सचिव डॉ. दिलीप बिरूटे, डॉ. जी. जे. दुबाले, प्रा. पी. आर. शेंडगे, प्रा. के. व्ही. केळे यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
अंगणात खेळणा-या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला
अहिल्यानगर : प्रतिनिधी अहिल्यानगरमध्ये अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. रात्री घराच्या अंगणात खेळताना एका चिमुकलीवर शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. धक्कादायक म्हणजे अंधाराचा फायदा घेत बिबट्याने चिमुकलीला घेऊन धूम ठोकली. या घटनेने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी एका गावात घराच्या अंगणात खेळणा-या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला […] The post अंगणात खेळणा-या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सरकारबाहेर पडण्याचा इशारा दिल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. हा निव्वळ खोटारडेपणा आहे. मी स्वतः त्यावेळी वर्षा बंगल्यावर होतो. अजित पवार व त्यांचे सहकारी एका वेगळ्याच कामासाठी तिथे आले होते. त्यावेळी त्यांच्यात दानवे म्हणतात तशी कोणतीही चर्चा झाली नाही, असे ते म्हणालेत. अजित पवारांचा फडणवीसांना सरकारबाहेर पडण्याचा इशारा:अंबादास दानवेंचा दावा; पार्थ पवार प्रकरणात 'वर्षा'वरील बैठकीचा दिला दाखला ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी गुरूवारी अजित पवारांनी पार्थ पवार भूखंड घोटाळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारबाहेर पडण्याचा व सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा इशारा दिल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, हा निव्वळ खोटारडेपणा आहे. अंबादास दानवे तिथे नव्हते. मी स्वतः वर्षा बंगल्यावर होतो. अशी कोणतीही चर्चा झाली नाही. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे वेगळाच विषय घेऊन आले होते. त्यात पुरवणी मागण्या व महायुतीचे काही विषय होते. त्यामुळे मला असे वाटते की, अशी कोणतीही चर्चा झाली नाही. खालच्या अधिकाऱ्यांनी खरी बदमाशी केली अंबादास दानवे यांनी पार्थ पवारांचा घोटाळा भाजपनेच बाहेर काढल्याचाही आरोप केला आहे. बावनकुळे यांनी त्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, ना अंबादास दानवे यांना, ना चंद्रशेखर बावनकुळे यांना किंवा किंवा मुख्यमंत्र्यांना हे माहिती होते. खालच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात खरी बदमाशी केली. एक तहसीलदार, मुद्रांक अधिकारी व देणारे - घेणारे दोन लोक, या लोकांनी केलेली ही चूक आहे. खालचे अधिकारी काय करतात हे सरकारला थोडेच माहिती असते. जेव्हा बातमी येते तेव्हा सरकार त्याची दखल घेते. त्यामुळे रोजच्या व्यवहारात खालचा एखादा तलाठी, एखादा तहसीलदार किंवा एखादा मुद्रांक अधिकारी काय करेल हे सांगता येत नाही. त्यांना आदेश देण्याचा अधिकार आहेत. ते त्यांच्या अधिकारांचा कसा गैरवापर करतात हे सरकारला थोडेच माहिती असते. सरकारला जेव्हा माहिती होते तेव्हा कारवाई होते. 42 कोटींची नोटीस योग्यच चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले, प्रस्तुत प्रकरणात मी नोटीस दिली नाही. आमच्या खालच्या अधिकाऱ्याने दिली. मी आज नियमांची पाहणी केली. केंद्र व राज्याच्या नियमांसह मुद्रांक नियम तपासले. त्यानुसार व्यवहाराला स्टॅम्प ड्युटी घ्यावी लागते. व्यवहार 300 कोटींचा आहे. त्यानुसार आमच्या मुद्रांक अधिकाऱ्यांनी बजावलेली 42 कोटींची नोटीस योग्य आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी माझी भेट घेतली. आम्ही त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. त्यांनी दुसऱ्या दिवशी मला फोन केला. मी प्रतिक्रिया दिली. सरकारने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेत कारवाई केली आहे. कुठेही कुणालाही पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला जात नाही. आम्हाला पार्थ पवार किंवा इतर कुणाला अडकवण्याचा आम्हाला धंदा नाही. आमचा अजेंडा हा महाराष्ट्राचा विकास व विकसित महाराष्ट्राचा आहे. भ्रष्टाचाराच्या अशा प्रकरणांत सोलून काढले जाईल. सरकार महाराष्ट्रात कुठेही भ्रष्टाचार सहन करणार नाही. किमान महसूल खाते. माझ्या खात्यात तरी मी असे काही सहन करणार नाही. ज्यांनी त्या ठिकाणी लुटण्याचे काम केले, त्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले जाईल. महाविकास आघाडीत प्रचंड धुसफूस चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी विरोधकांच्या महाविकास आघाडीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून प्रचंड धुसफूस सुरू असल्याचाही दावा केला. ते म्हणाले, महाविकास आघाडीत फार धुसफूस सुरू आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार यांच्यात प्रचंड धुसफूस सुरू आहे. जाहिरनाम्यावरून त्यांच्यात धुसफूस सुरू आहे. मुंबईचा जाहीरनामा कसा जाहीर करणारे हे ही त्यांना ठावूक नाही. मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर कसे करणार हे ही त्यांना माहिती नाही. मुंबई महापालिका तब्बल 40 वर्षे त्यांच्या ताब्यात होती. त्यांनी मुंबईला खऱ्या अर्थाने मागे ठेवण्याचे काम केले. पुढे काय करायचे हे ही त्यांना ठावूक नाही. पण एक गोष्ट मला नक्की माहिती आहे. मुंबई व महाराष्ट्राची जनता ही महायुतीच्या मागे आहे. मोदी व फडणवीसांचे डबल इंजिन सरकारच मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर करू शकते हे जनतेला ठावूक आहे. जनता ही विकासाच्या बाजूने आहे, असे ते म्हणाले.
अहिल्यानगर : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगरमधील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटामाटात पार पडला होता. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. त्यामुळे व्यथित झालेले इंदुरीकर महाराज कीर्तन सोडण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. २-३ दिवसांत कीर्तन थांबवण्याचा निर्णय ते घेणार आहेत. त्याबाबत विचार सुरू असल्याचे इंदुरीकर महाराज […] The post आता कंटाळलो! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मेळघाटात सहा महिन्यांत कुपोषणामुळे ६५ बालकांचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी एकट्या मेळघाटात कुपोषणामुळे गेल्या सहा महिन्यांत ६५ बालकांचा मृत्यू होणे ही अतिशय गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त करीत हायकोर्टाने आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रातील दुर्गम भागात होणा-या बालमृत्यूंबाबत मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त करत राज्य सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली. संबंधित उच्चपदस्थ अधिका-यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश जारी – कुपोषणामुळे […] The post मेळघाटात सहा महिन्यांत कुपोषणामुळे ६५ बालकांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आता सर्वकाही देवाच्या हातात, प्रार्थना करा
मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या खालावली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ११ दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाला असून सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. त्यानंतर, सुपरस्टार अमिताभ बच्चन ते निर्माता-दिग्दर्शक गुड्डू धनोआपर्यंत कित्येक सेलिब्रिटी आणि सिनेक्षेत्रातील सुप्रसिद्ध निर्मात्यांनी धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी रांग लावली. धर्मेंद्र यांना […] The post आता सर्वकाही देवाच्या हातात, प्रार्थना करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ही यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी प्रसिद्ध केली. या यादीत प्रवक्तेपदी नाकारले गेलेले आमदार अमोल मिटकरी, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि उमेदवारी न मिळाल्याने काही काळ राजकारणापासून दूर राहिलेले नवाब मलिक यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान मराठवाड्यातील आमदार प्रताप पाटील चिखलीकर, सामाजिक सेलचे प्रा.सुनिल मगरे यांच्यासह अभिनेते सयाजी शिंदे यांनाही या यादीत स्थान देण्यात आले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने या स्टार प्रचारकांच्या माध्यमातून आगामी निवडणुकांमध्ये जोरदार मोहीम राबवण्याची तयारी दर्शवली आहे. मुंडे, मिटकरींवर जबाबदारी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर दबाव वाढला आणि त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. पण अजित पवार यांनी त्यांना स्टार प्रचारक पद देऊन त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची सुरुवात केल्याचे दिसते. तर अमोल मिटकरी वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यावर टीका झाली आणि त्यांना प्रवक्ते पदावरून हटवले, अशी चर्चा होती. मात्र, काही दिवसांतच अजित पवार यांनी त्यांच्यावर पुन्हा नवी जबाबदारी सोपवली आहे. मिटकरी यांना दूर केल्याची बातमी फेटाळली आणि अजित पवारांप्रती आपली निष्ठा व्यक्त करताना म्हटले की, अजित दादांचा कार्यकर्ता असायला नशिब लागते तितका नशिबवान मी आहे. यांच्यावर सोपवली जबाबदारी या स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रताप पाटील - चिखलीकर, माजी मंत्री नवाब मलिक, नेते सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक - शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, महेश शिंदे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, नजीब मुल्ला, श्रीमती प्रतिभा शिंदे, विकास पासलकर आदींचा समावेश आहे.
राज्यातील २४६ नगर पालिका व ४२ नगरपंचायतीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु असून या निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहे. तर शनिवारी ता. १५ रोजी देखील उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या बाबत राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाकडे पत्र पाठवून सदर बाब स्पष्ट केली आहे. राज्यात २४६ नगर पालिका व ४२ नगरपंचायतीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. एकाकडे राजकिय पक्षांकडून उमेदवार जाहिर करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या हालचाली सुरु आहेत तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखल करून घेणे, आदर्श अचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणूक प्रक्रिया व प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया राबविणे यासाठी प्रशासनाकडून युध्दपातळीवर तयारी केली जात आहे. दरम्यान, या निवडणूकीत ता. १० नोव्हेंबर ते ता. १७ नोव्हेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. तर ता. १८ नोव्हेंबर रोजी छाननी, ता. २१ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार असल्याचे जाहिर करण्यात आले. मात्र रविवारी ता. १६ सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र शनिवारी ता. १५ या सुट्टीच्या दिवशी उमेवारी अर्ज दाखल करता येणार किंवा नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे बहुतांश जिल्हयांतून विचारणार केली जात होती. तर उमेदवारांमधेही याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने तातडीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठविले आहे. यामध्ये शनिवारी ता. १५ सकाळी आकरा ते दुपारी तीन या वेळेत उमेदवारी अर्ज स्विकारले जावे अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता शनिवारीही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. हे ही वाचा... मोठी बातमी:राज्यातील मतदारांची नवी आकडेवारी जाहीर; 9 कोटी 84 लाखांवर मतदारसंख्या, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक वाढ राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदारांची अद्ययावत यादी जाहीर केली आहे. आयोगाने 1 जुलै 2025 रोजीची अंतिम मतदार यादी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून, या नव्या यादीप्रमाणे राज्यातील एकूण मतदारसंख्या 9 कोटी 84 लाख 96 हजार 626 इतकी झाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही संख्या 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 इतकी होती. त्यामुळे केवळ सात महिन्यांत जवळपास 14.7 लाख नव्या मतदारांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सविस्तर वाचा... शरद पवार गटाला EC चा मोठा दिलासा:'तुतारी' सदृश 'पिपाणी' चिन्ह वगळले; लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बसला होता फटका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हाशी साधर्म्य असलेल्या 'पिपाणी' (ट्रम्पेट) चिन्हामुळे मोठा फटका बसल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार गटाला अखेर निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे. आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी आपल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून 'पिपाणी' हे चिन्ह वगळले आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. सविस्तर वाचा...
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरूवारी पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. धनंजय मुंडे हे शेखचिल्ली आहेत. ते ज्या फांदीवर बसतात, तीच फांदी तोडतात. त्यांनी नार्को टेस्टच्या मागणीवरून मागे हटू नये. या चाचणीतून तरी त्यांनी महादेव मुंडे यांचे काय केले, बापू आंधळेंचे काय केले, गित्तेचे काय केले व संतोष देशमुख प्रकरणात काय केले हे समोर येईल. नार्टो टेस्टमधून त्यांनी अंधारात किती चाली रचल्या हे ही सत्य समोर येईल, असे ते म्हणाले. मनोज जरांगे यांनी गुरूवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी त्यांच्या घातपाताचा कथित कट रचल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, मी लपत नाही. मला लपता पण येत नाही. राजकारणाचा मला नादच नाही. पण समाजाच्या जिवावर उठल्यानंतर मी दम खात नाही. तुम्ही तुमचे राजकारण करा. मोठे व्हा. मराठ्यांवर अन्याय का करता? तुम्ही अन्याय केला. मग मी सोडणार नाही. तुम्ही कितीही जहागीरदार असला तरी मी सोडणार नाही. मला आत्ताच्या प्रकरणातही राजकारण आणायचे नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा, मला खोटे चालत नाही माझ्या घातपाताच्या प्रकरणात मी नार्को टेस्टची मागणी केली नाही. त्या (धनंजय मुंडे) माणसाने केली. आत्ता लपायचे नाही. चला नार्को टेस्टला. जातवान वागायचे. त्यांनी टेस्टची तयारी दर्शवल्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी अर्ज केला. माझा अर्ज चुकीचा असेल, तर तुम्ही कसाही लिहून आणा. कोर्टात चला, हायकोर्टात चला, राज्यपालांकडे चला, राष्ट्रपतींकडे चला, कुठेही चला. तिथे सह्या केल्या नाही तर दोन बापाची अवलाद. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आम्हाला खोटे चालत नाही. घातपाताचा कट स्वतः धनंजय मुंडेंनी रचला मनोज जरांगे म्हणाले, राजकारण सुरूच असते. पाडापाडीही सुरू असते. एकमेकांवर टीका करणेही सुरू असते. पण तुम्ही माझ्या घातपातापर्यंत गेलात. आता तुम्हाला सुट्टी नाही. चल, लपू नको. एका बापाचे असल्यासारखे नार्कोटेस्टला निघायचे. प्रस्तुत प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कांचन साळवी नामक तरुणाची मला ओळखही नाही. त्यांनी त्याला त्याच्या घरी येऊन परळीला नेले. त्याने सांगितले की, आम्ही परळीच्या बैठकीला गेलो होतो. याचा अर्थ खुनाचा कट परळीत शिजला. हा कट स्वतः धनंजय मुंडे यांनी रचला. हे दोन-चार आरोपींनी मिळून रेस्ट हाऊसमध्ये बसून हा कट शिजवला. हेच सत्य आहे. ते समोर येईल. आता फक्त अजित पवारांनी सांभाळून राहावे. त्यांनी खोडा घालू नये. विनाकारण त्यांना बळ देण्याचे काम करू नये. अन्यथा मोठा घोळ होईल. प्रत्येक वेळेस वाचवायचे नाही. तुमची व माझी नार्टो टेस्टची तयारी आहे. मग प्रॉब्लेम काय? मी नार्कोटेस्ट करतो. त्याहून अधिक मोठी चाचणी असेल तर त्यालाही सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. मुंडेंनी या टोकापर्यंत जायला नको होते जरांगे पुढे म्हणाले, हा विनोदाचा भाग नाही. धनंजय मुंडे यांनी या टोकाला जायला नको होते. विरोध करणे सुरूच असते. पण तू मुळावरच उठायला लागला. मी एवढा सोपा आहे का? मला गोळ्या, औषध घालण्यास सांगता. बाया (महिला) जेवणात औषध घालतात. त्यामुळे ते आता महिलांचे धंदे करत आहेत. मराठा जिंकण्यासाठी मी जिद्दीने लढलो. जिद्दीने लढणाऱ्याला त्यांनी हरवायचे प्रयत्न न करता, खून करण्याचे कट रचले. मराठ्यांविषयी कट रचले. मराठ्यांना हलवण्यात कुणाची हिंमत नाही. त्यामुळेच ते कट कारस्थान रचत आहेत. हा (धनंजय मुंडे) अलीबाबा नव्हे तर शेखचिल्ली आहे. ज्या झाडावर बसतो, तेच झाड तोडतो आणि फांदीवरून पडतो. त्यांनी मला नार्को टेस्टचे आव्हान दिले. माझी तयारी आहे. मी मुख्यमंत्र्यांनाही सांगितले, आता यात मागे हटायचे नाही. अन्यथा मी तुम्हाला अडचणीत आणणार. तुम्ही खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करायचे नाही. त्यांनी दिलेल्या आव्हानानुसार नार्को टेस्ट होऊ द्या. माझ्यामुळे त्यांचे सर्वकाही महादेव मुंडे यांचे काय केले, बापू आंधळेला काय केले, गित्तेला काय केले, संतोष देशमुख प्रकरणात काय केले हे समोर येईल. अंधारात बसून किती चाली रचल्या हे ही समोर येईल. धनंजय मुंडेंमुळे वंजारी समाजालाही सूख नाही. एक चांगली जात याच्यामुळे बदनाम होत आहे. आता त्यांना हा रस्त्यावर उतरवत आहे. म्हणजे पुन्हा गरिबांना त्रास झाला. गरिबांच्या झुंजी लावून हा दूर बसणार नाही. आता वंजारी, मराठा, दलित, मुस्लिम, बहुजन आदी कुणीच नको. आपण दोघेच पाहू. तू नार्को टेस्टला चल, असे जरांगे म्हणाले. संपूर्ण मराठवाडा आरक्षणात जाणार यात शंका नाही मराठवाड्यात काही ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र जारी करण्यात अडचणी येत असल्याची बाब पत्रकारांनी यावेळी जरांगेंच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ते म्हणाले, यात तथ्य आहे. या प्रकरणी अनेक तक्रारी येत आहेत. नोंदी असूनही प्रमाणपत्र दिले जात नाहीत. उपसमितीच्या अध्यक्षांनाही आम्ही हे सांगितले. मंत्री संजय शिरसाट यांच्या कानावरही आम्ही ही गोष्ट घातली. त्यांनी आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर कामाला वेग येईल असे आश्वासन दिले आहे. संपूर्ण मराठवाडा आरक्षणात जाणार यात शंका नाही.
औंढा नागनाथ येथे नाकाबंदीमध्ये वाळूची अवैधरित्या वाहतूक करणारे टिप्पर पोलिसांच्या पथकाने पकडले असून या प्रकरणी दोघांवर गुरुवारी ता. 13 पहाटे औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये एकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात पोलिस व महसूल विभागाच्या वतीने वाळूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी महसूल व पोलिस विभागाची स्वतंत्र पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. या शिवाय जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी व वसमत पालिकेची निवडणुक होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाकडून नाकाबंदी करून दिवसा व रात्रीच्या वेळी वाहनांची तपासणी केली जात आहे. यामध्ये दुचाकी वाहनासह चारचाकी तसेच ट्रक व इतर वाहनांचा ही समावेश आहे. दरम्यान, औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार पठाण यांचे पथक बुधवारी ता. 12 रात्री नाकाबंदीसाठी तैनात होते. या पथकाला औंढा नागनाथ येथील बसस्थानकासमोर एक टिप्पर दिसून आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्यात वाळू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चालक रतन साखरे याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी टिप्पर ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात टिप्पर चालक रतन साखरे व नागनाथ कुटे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रतन यास ताब्यात घेतले असून नागनाथचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. कळमनुरी तालुक्यातील गंगापूर शिवारात उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी आनंद काकडे, तलाठी विशाल पतंगे यांच्या पथकाने वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले आहे. या प्रकरणी तलाठी पतंगे यांच्या तक्रारीवरून सोमनाथ शिंदे, विलास धुतडे, कुणाल धुतडे (रा. धानोरा जि. परभणी) यांच्या विरुध्द कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक- 2025 पार्श्वभूमीवर शिवसेनेने (शिंदे गट) जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाने महत्त्वाच्या 'निवडणूक प्रभारी पदांच्या नियुक्त्या' जाहीर केल्या आहेत. शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी ही यादी प्रसिद्ध केली आहे.यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तारांसह संपूर्ण राज्यातील नेतृत्वाला प्रचारात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे 70 हून अधिक नेत्यांवर ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे शिवसेनेने आगामी निवडणुकीसाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेने जाहीर केलेल्या या प्रभारींच्या यादीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यांच्यावर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी या यादीत मंत्री उदय सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण, योगेश कदम, राजन साळवी, आमदार किरण सामंत, आमदार नीलेश राणे, आमदार दिपक केसरकर, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, मंत्री भरत गोगावले, शशिकांत खेडेकर, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, विश्वास नांदेकर, दुष्यंत चतुर्वेदी, संजय राठोड, भसवना गवळी, विप्लव बजोरिया, गोपीकिशन बजोरिया, श्रीकांत देशपांडे, जगदीश गुप्ता, प्रिती बंड, ज्ञानेश्वर धाने पाटील, अभिजीत अडसूळ, आशिष जयस्वाल, आशिष देसाई, मुकेश जिवतोडे, हर्षल शिंदे, शुभम नवले, सहसराम कोरोटे, मनोहर चंद्रिकापुरे, नरेंद्र भोंडेकर, मनिषा कायंदे, राज दीक्षित, किरण पांडव, कृपाल तुमाने , दिपक सावंत, हेमंत पाटील, तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुले, प्रताप सरनाईक, बाबुराव कदम, आनंद बोंडारकर, बालाजी कल्याणकर, हिकमत उडान, अर्जुन खोतकर, संतोष बांगर,आनंदराव जाधव, अब्दुल सत्तार, रमेश बोरणारे, विलास भुमरे, संजना जाधव, संजय मंडलिक, धैर्यशील माने, प्रकाश अबिटकर, जयंतराव जगताप, उत्तमप्रकाश खंदारे,सिद्धराम म्हात्रे, शहाजीबापू पाटील, सुहास बाबर, महेश शिंदे, शंभुराज देसाई, शरद सोनवणे, विजय शिवतारे, श्रीरंग बारणे, अमोल खताळ, सदाशिव लोखंडे, विठ्ठल लंगे पाटील, भाऊसाहेब कांबळे, मंजुळा गावीत, शिरीष चौधरी, चंद्रकांत रघुवंशी, आमश्या पाडवी, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील, चंद्रकांत सोनवणे, किशोप अप्पा पाटील, गुलाबराव पाटील, हेमंत गोडसे, विजय करंजकर, सुहास कांदे, धनराज महाले, किशोर दराडे यांच्यावर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ही यादी पाहता शिवसेनेने स्थानिक पातळीवरील निवडणुका अत्यंत गांभीर्याने घेतल्या असून एकहाती स्पष्ट बहुमत मिळवण्याचे पक्षाचे उद्दिष्ट स्पष्ट होते. या नियुक्त्या शिवसेनेची राज्यातील राजकीय पकड मजबूत करण्याच्या आणि 2025 च्या पालिका निवडणुकीत विजयाचे लक्ष्य साधण्याच्या धोरणात्मक प्रयत्नांचा भाग असल्याचे दिसून येत आहे.
न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या सामान्य नागरिकांना हादरवून टाकणारी घटना माझगाव येथे घडली आहे. येथे दिवाणी सत्र न्यायालयातील निकाल आपल्या बाजूने देण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. यापैकी 15 लाख रुपयांची लाच स्वीकारताना न्यायालयातील लिपिक चंद्रकांत वासुदेव (40) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांचाही थेट सहभाग असल्याचे तपासात उघड झाल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधीत एका तक्रारदाराने माझगाव दिवाणी सत्र न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. ही याचिका कोर्ट क्र. 14 मध्ये चालू होती. या प्रकरणातील निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी लिपिक वासुदेव यांनी अमरीश यांच्याकडे थेट पैशांची मागणी केली. त्यांनी स्वतःसाठी 10 लाख आणि न्यायाधीशांसाठी 15 लाख रुपये मागितले. एवढ्या मोठ्या रकमेमुळे तक्रारदाराला संशय आला आणि त्यांनी लाच देण्याऐवजी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात धाव घेतली. तक्रारीची प्राथमिक चौकशी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला. नियोजित सापळा यशस्वी ठरला. तक्रारदाराकडून ठरलेली 15 लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना चंद्रकांत वासुदेव यांना ACB पथकाने रंगेहाथ पकडले. चौकशीदरम्यान वासुदेव यांनी कबुली दिली की, ही रक्कम त्यांनी न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांच्या माहितीसह स्वीकारली होती. वासुदेव यांनी पकडले गेल्यानंतर लगेचच न्यायाधीश काझी यांना फोन करून रक्कम मिळाली आहे, अशी माहिती दिली होती. त्यावर न्यायाधीशांनी ठीक आहे, अशी प्रतिक्रिया दिल्याचे पुरावे तपासात आढळले. या संभाषणाचे ध्वनीदृश्य पुरावे ACB कडे आहेत. न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांच्या भूमिकेचा तपास सुरू यानंतर विभागाने दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. चंद्रकांत वासुदेव यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी या प्रकरणाची गांभीर्यपूर्ण स्वरूप लक्षात घेऊन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करत वासुदेव यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तर न्यायाधीश एजाजुद्दीन काझी यांच्या भूमिकेचा तपास सुरू असून, त्यांच्या अटकेचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी होण्याची मागणी या प्रकरणामुळे न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सामान्य नागरिकांना न्याय देणाऱ्या संस्थांमध्येच जर अशा प्रकारे लाचलुचपत होत असेल, तर न्याय प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास धोक्यात येईल, अशी प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. या प्रकरणात ACB ने त्वरित कारवाई करत मोठा गैरप्रकार उघड केला असला, तरी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी होण्याची मागणी कायदा क्षेत्रातील जाणकारांकडून केली जात आहे. या घटनेमुळे न्यायालयीन प्रक्रियेतील पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक, अशी बॅनरबाजी मनसेकडून करण्यात आली आहे. शिवसेना भवन याठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही डिवचण्याचा प्रयत्न मनसेने केला. या बॅनरवरून भाजपने ठाकरे बंधुंवर निशाणा साधला आहे. हीच सरंजामशाही मानसिकता असून, ठाकरेंकडे केवळ सेवक असाव तरच नेत्यांना उमेदवारी मिळते, अशी टीका भाजपने केली आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहु लागले आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेचीही निवडणूक होणार आहे. त्यासाठी नुकतीच आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. मागील काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत; मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. अशात मुंबईत दादर येथील शिवसेना भवन परिसरात मनसेच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरमुळे मुंबईतील राजकारण तापण्याची शक्यता आहे. बॅनरवर मजकूर काय? मनसेचे कुर्ला विधानसभा उपविभाग सचिव लक्की वामन कर्डक यांनी हा बॅनर लावला आहे. मनसेच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनरवर शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र असलेला जुना फोटो लावलेला आहे. या फोटोत राज आणि उद्धव दोघेही बाळासाहेबांच्या बाजुला उभे असून, बाळासाहेबांनी दोघांच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे. या फोटोखाली ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक असा आशय लिहिलेला आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेचा फोटोदेखील या बॅनरवर पाहायला मिळतो. बॅनरवरून भाजपचा ठाकरे बंधुंवर साधला निशाणा दरम्यान, मनसेच्या या बॅनरवरून भाजपचे प्रवक्ते केशप उपाध्ये यांनी ठाकरे बंधुंवर टीका केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडिया पोस्ट केली असून, ही सरंजामशाही मानसिकता असल्याचे संबोधले आहे. केशव उपाध्ये यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरे आदित्य ठाकरेच्या पाया पडत आहेत असा फोटो viral झाल्यावर बरीच चर्चा झाली होती मात्र… तुम्ही सगळे सेवक… हीच सरंजामशाही मानसिकता… ठाकरेंचे कार्यकर्ते का नाहीत? भाजपात व इतर पक्षात हाच फरक भाजपात कार्यकर्ते असतात. इथे नेत्यांचे केवळ सेवक असाव तरच उमेदवारी. आम्ही नेते म्हणजे पक्षाचे मालक आणि बाकी सगळे सेवक. लोकशाहीने राजेशाही संपवली पण ही नवी सरंजामशाही मानसिकता मात्र उदयास आली. नेत्यांचे पक्ष खाजगीच असल्यावर वेगळे काय होणार?
राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांचा भाजपमध्ये होणारा अपेक्षित प्रवेश अखेर पुढे ढकलण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रवेशाच्या हालचालींना वेग आला होता. मात्र, शेवटच्या क्षणी हा निर्णय स्थगित करण्यात आल्याने सोलापूरसह संपूर्ण राज्यात नवे राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे, सावंत हे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. त्यामुळे या घडामोडीला केवळ राजकीय नव्हे तर कौटुंबिक रंगही प्राप्त झाला आहे. भाजपकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडवण्याच्या हालचाली सुरू होत्या. शिवाजी सावंत हे स्थानिक पातळीवर प्रभावी नेते मानले जातात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा गट सोलापूर, पंढरपूर आणि अकलूज परिसरात सक्रिय आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्यांना आपल्या गोटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे यांनी सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. या बैठकीनंतर सावंत यांचा प्रवेश निश्चित झाल्याची माहिती स्थानिक स्तरावर देण्यात आली होती. भाजप कार्यालयात या कार्यक्रमाची तयारीही सुरू झाली होती. मात्र, आज नियोजित कार्यक्रमाच्या दिवशी अचानक सावंत यांचा प्रवेश थांबवण्यात आला. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. काही सूत्रांच्या मते, या प्रवेशावर तानाजी सावंत यांच्या नाराजीचा प्रभाव पडला आहे. दोघांमधील मतभेद अनेक दिवसांपासून उघडपणे दिसत आहेत. तानाजी सावंत हे राज्यातील शिंदे गटाचे प्रभावी मंत्री असून, त्यांच्या राजकीय भूमिकेला भाजप नेतृत्वाचा पाठिंबा आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्या नाराजीला गांभीर्याने घेत तात्पुरता ब्रेक दिला, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सत्तांतर प्रक्रियेदरम्यान तानाजी सावंत यांनी भाजपसोबत दृढ संबंध प्रस्थापित केले होते, त्यामुळे पक्षाने त्यांचा मान राखत कोणताही विवाद निर्माण होऊ नये यासाठी सावंत बंधूंच्या वादात हस्तक्षेप केल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह या घडामोडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे वारे वाहू लागले आहेत. स्थानिक पातळीवर सावंत बंधूंचा प्रभाव मोठा असल्याने त्यांच्या मतभेदांचा थेट परिणाम कार्यकर्त्यांवर दिसू लागला आहे. शिवाजी सावंत हे दीर्घकाळ शिंदे गटाशी निष्ठावंत राहिले असले तरी अलीकडेच त्यांनी काही बैठकींमध्ये नाराजी व्यक्त केल्याचे समजते. त्यांच्या संभाव्य पक्षांतरामुळे शिवसेनेच्या जिल्हा संघटनेत चिंतेचे वातावरण आहे. भाजपने सोलापूरमध्ये संघटन विस्तारासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे आणि अशा वेळी शिवाजी सावंत यांचा प्रवेश हा मोठा राजकीय सिग्नल ठरला असता. मात्र, आता हा निर्णय थांबवल्याने भाजपच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सावंत बंधूंचा राजकीय संघर्ष नव्या अध्यायाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या सावंत बंधू ही चर्चा प्रमुख ठरली आहे. दोघेही आपल्या-आपल्या पद्धतीने राजकारणात प्रभाव राखून आहेत. तानाजी सावंत हे सरकारमधील प्रभावी मंत्री म्हणून ओळखले जातात, तर शिवाजी सावंत यांचा स्थानिक पातळीवर जनसंपर्क आणि संघटनशक्ती प्रबळ आहे. पुढील काही दिवसांत भाजप या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि सावंत बंधूंचा मतभेद कोणत्या टप्प्यावर पोहोचतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. राजकीय निरीक्षकांचे मत आहे की, जर शिवाजी सावंत यांचा पक्षप्रवेश झाला, तर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय गणितात मोठे बदल दिसू शकतात. परंतु सध्या तरी हा निर्णय पुढे ढकलल्याने परिस्थिती अधिकच गोंधळलेली बनली आहे आणि सावंत बंधूंचा राजकीय संघर्ष नव्या अध्यायाकडे वाटचाल करत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये मूळ ओबीसी उमेदवारांना तिकीट न दिल्यास संबंधित पक्षांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी ओबीसी नेते मंगेश ससाणे उपस्थित होते. लक्ष्मण हाके म्हणाले की, ग्रामीण भागातील ओबीसी समाज दुय्यम स्थानी आहे. नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या असून, नगर परिषदेत ओबीसींसाठी 77 जागा राखीव आहेत. यापैकी मूळ ओबीसींना किती जागा मिळतात, यावर आम्ही लक्ष ठेवणार आहोत. याबाबत पक्षांना जाब विचारून जनजागृती केली जाईल आणि संबंधित पक्षा विरोधात काम केले जाईल. ..तर ओबीसींनी बंडखोरी करावी लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसींनी आपले उपद्रव मूल्य दाखवले नाही, तर शिक्षण आणि नोकरीतील राजकारणाप्रमाणे राजकारणातील उरलेली पदेही गमावतील. ओबीसींना डावलून बोगस कुणबी किंवा धनदांडग्यांना तिकीट दिले जात असेल, तर ओबीसींनी बंडखोरी करून निवडणूक लढवावी, असे आवाहनही हाके यांनी केले. ..तर ओबीसी राजकारण संपुष्टात येईल. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना हाके यांनी, राज्य शासनाने 2 सप्टेंबर रोजी काढलेला जी आर आम्हाला मान्य नाही, असे स्पष्ट केले. यामुळे ओबीसी राजकारण संपुष्टात येईल. शरद पवार यांनी त्यावेळी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. पंचायतराज निवडणुकीत ओबीसी नेतृत्व तयार झाले नाही, तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही ओबीसी नेतृत्व दिसणार नाही. आम्हाला भीक नको, तर हक्क हवा आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. भूमिका स्पष्ट करावी मंगेश ससाणे म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार ओबीसींना निवडणुकीत डावलू नका असे म्हणत असतील, तर ओबीसींमध्ये बोगस कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर लढणाऱ्यांबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी. पुण्यात 44 तर पिंपरी चिंचवडमध्ये 31 जागा ओबीसींसाठी राखीव आहेत. या पदांवर मूळ ओबीसींना विविध पक्ष जागा देणार आहेत का, हे स्पष्ट झाले पाहिजे. ओबीसींच्या न्यायासाठी शरद पवार मैदानात उतरणार का, हे त्यांनी स्पष्ट करावे. 27 हजार जागा खाल्ल्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी संघटना समितीचे अध्यक्ष असून, त्यांना भाजपचे राज्य प्रभारी केले आहे. त्यामुळे ओबीसी समिती श्वेतपत्रिका कधी काढणार आहे, हे त्यांनी सांगावे. अनेक सर्वसाधारण प्रवर्गातील नेते ओबीसी जागेवर अतिक्रमण करून कुणबी प्रमाणपत्र काढत आहेत. ओबीसी प्रमाणपत्रांमुळे आम्हाला पाळण्यातच मारले जात आहे, असे ससाणे यांनी म्हटले. ओबीसींसाठी ज्या जागा नियमानुसार राखीव आहेत, त्याचे प्रमाण योग्यप्रकारे काढले जात नसल्याने राज्यात 27 हजार जागा निवडणूक आयोगाने खाल्ल्या आहेत. सर्वच पक्षांनी ओबीसींची फसवणूक करत त्यांची शिकार केली आहे, असा गंभीर आरोपही ससाणे यांनी केला.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच नव्या राजकीय समीकरणांच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाचे बदल घडू शकतात, असे संकेत बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी दिले आहेत. पालघर नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महत्त्वाच्या वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी (मविआ), बहुजन विकास आघाडी (बविआ) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालघर जिल्हा आणि वसई-विरार महानगरपालिकेत महाविकास आघाडी-बहुजन विकास आघाडी-मनसे युतीच्या शक्यतेवर चर्चा सुरू असल्याचे स्थानिक नेत्यांनी सांगितले. या संभाव्य युतीबद्दल बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीसोबत चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. पालघर जिल्ह्यातील नगरपरिषदा, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसोबत येण्याचा प्रस्ताव बहुजन विकास आघाडीला देण्यात आला असून, त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याने हितेंद्र ठाकुर यांनी स्पष्ट केले. पालघरमध्ये 'छोटा' तर वसई-विरारमध्ये 'मोठा भाऊ' पालघर जिल्ह्यातील नगर परिषद, जिल्हा परिषदेत बहुजन विकास आघाडी छोट्या भावाच्या भूमिका निभावेल; मात्र, वसई-विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडी ही मोठा भाऊ असेल. वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी मविआ आणि मनसेशी आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले आहे. सगळ्या पक्षांची दोन पावले मागे घेण्याची तयारी हितेंद्र ठाकूर यांनी युतीसाठी सकारात्मकता दर्शवताना सर्व पक्षांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. सध्या शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. नगरपालिकेत निवडून येणारे उमेदवार, कोणतेही रुसवे-फुगवे, हट्ट, मान-सन्मान टाळून युती करावी. जिकडे स्वबळावर लढायचे आहे, तिथे स्वबळावर लढा, अशी सूट देण्यात आलेली आहे. दोन पावले मागे घेण्याची तयारी सगळ्या पक्षांनी घेतली आहे. सन्मानजनक तोडगा कसा काढता येईल, हे बघावे. मला कुणाचीही ॲलर्जी नाही. कोणत्याही जाती-धर्माला सोबत घेऊन जाणाऱ्या पक्षाशी युती करण्यात माझी कोणतीही हरकत नाही. सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळू शकतो, ते पाहावे, असेच उमेदवार असले पाहिजेत, असे हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले. निवडणुकीचे चित्र बदलणार का? हितेंद्र ठाकुर यांच्या वक्तव्यावरून वसई-विरार आणि पालघरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला टक्कर देण्यासाठी मविआ, बविआ आणि मनसे एकत्र येऊन निवडणुकीचे चित्र बदलू शकतात, असा राजकीय कयास बांधला जात आहे.
पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीने घेतलेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबत चौकशी समिती गठित करण्यात आली असून, त्या समितीला सखोल तपास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतरच वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतला जाईल, तोपर्यंत मी कोणतेही भाष्य करणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पार्थ पवार प्रकरणी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मेघदूत बंगल्यावर भेट घेतली. दोघांमध्ये या प्रकरणावर सविस्तर चर्चा झाली. भेटीनंतर दमानिया म्हणाल्या की, अजित पवार यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही वाचवू शकणार नाहीत,असे दमानिया यांनी म्हटले होते. सिंचन, बँक घोटाळा उघड करणार अंजली दमानिया पुढे बोलताना म्हणाल्या की, मी सिंचन घोटाळा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा उघड करणार आहे आणि या सर्व प्रकरणांत उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. अजित पवार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, माझ्या सद्सद्विवेकबुद्धीप्रमाणे मला योग्य वाटेल ते मी करेन. शेतकऱ्यांसाठी 40 हजार कोटींचे पॅकेज अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना मदतीसाठी आम्ही 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. नंतर पुन्हा पाऊस झाल्याने आणखी 8 हजार कोटी रुपयांची वाढ करून एकूण 40 हजार कोटी रुपयांचे पॅकेज करण्यात आले आहे. अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळताय अजित पवार म्हणाले की, 14 ते 15 वर्षे वयातील मुलेही गुन्हेगारीकडे वळत आहेत. काही लोक आपले हेतू साधण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर करत आहेत, कारण त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात अडचणी येतात. अल्पवयीन वयाची मर्यादा सध्या 18 वर्षे आहे; ती कमी करण्याची बाब आम्ही केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिली असून, केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे. पार्थ पवारांना व्यवहार रद्द करता येणार नाही- दमानिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुणे जमीन गैरव्यवहारप्रकरणी बुधवारी पत्रकार परिषदेद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच या प्रकरणातील कायदेशीर तरतुदींचा आधार घेत त्यांनी ठामपणे स्पष्ट केले की, हा जमीन व्यवहार पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीस किंवा शीतल तेजवानीस स्वतःहून रद्द करता येणार नाही. हा व्यवहार रद्द करण्याची प्रक्रिया केवळ राज्य सरकारला दिवाणी न्यायालयात दाद मागूनच पूर्ण करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दमानिया यांनी कायद्यातील तरतुदींवर बोट ठेवत महसूल विभागाच्या सध्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी सांगितले की, ज्या व्यक्तीने किंवा कंपनीने घोटाळा केला आहे त्यांना स्वतःहून व्यवहार रद्द करण्याचा अधिकार नाही. सरकारने 42 कोटी रुपये देऊन हा व्यवहार रद्द करण्याची काढलेली नोटीस मुळात चुकीची आहे. हा व्यवहार रद्द आणि विषय संपला अशा पद्धतीने होणार नाही.
बार असोसिएशनचे सदस्य असलेल्या 32 वर्षीय वकिलाने राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावर छताच्या हुकला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना विजापूर रोड एसआरपीएफ कॅम्प जवळील समर्थ सोसायटीमध्ये बुधवारी सायंकाळी घडली आहे. ॲड. सागर श्रीमंत मंद्रूपकर (वय 32) असे त्या वकिलाचे नाव आहे. आत्महत्या केलेल्या बेडरूममध्ये पोलिसांना चिठ्ठी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रात्री विजापूर नाका पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ॲड. सागर सोलापूर न्यायालयात प्रॅक्टिस करत होते. मंगळवारी रात्री जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये गेले. सकाळी उठलेच नाहीत. बुधवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास नातेवाईक वरच्या मजल्यावर गेले. त्यावेळी दोरीच्या सहाय्याने स्लॅबच्या छताला असलेल्या लोखंडी हुकला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. विजापूर नाका पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर खाली उतरवले. पोलिस अंमलदार घुगे यांनी बेशुद्धावस्थेत सायंकाळी सातच्या सुमारास सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉ. पूजा लवटे यांनी सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. ॲड. सागर यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे. विजापूर नाका ठाण्यात ॲड. सागरला मारहाण झाली होती ॲड. मंद्रूपकर यांना विजापूर नाका पोलिस स्टेशनमध्ये मारहाण झाली होती. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात बार असोसिएशनने तातडीची विशेष सभा बोलावली होती. त्याला उपस्थित असलेल्या वकिलांनी पोलिसांच्या वर्तनावर संताप व्यक्त करून घटनेचा निषेध केला होता. बैठकीत विजापूर नाका पोलिस स्टेशनमधील संबंधित दोषी पोलिस अधिकाऱ्याचे तत्काळ निलंबन करण्यात यावे. घटनेची स्वतंत्र, पारदर्शक व निःपक्ष चौकशी व्हावी, मागणी करण्यात आली होती. चिठ्ठीतील मजकूर... मी ॲड. सागर श्रीमंत मंद्रूपकर, माझ्या मृत्यूला माझी आई कारणीभूत आहे. तिला कडक शिक्षा व्हावी, ती मला व माझ्या मुलाला नीट वागणूक देत नाही. बहिणीच्या मुलांना चांगली वागणूक देते. मला टोमणे मारते. तिच्या अशा वागण्यामुळे त्रास होत आहे. म्हणून आत्महत्या करत आहे.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदारांची अद्ययावत यादी जाहीर केली आहे. आयोगाने 1 जुलै 2025 रोजीची अंतिम मतदार यादी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असून, या नव्या यादीप्रमाणे राज्यातील एकूण मतदारसंख्या 9 कोटी 84 लाख 96 हजार 626 इतकी झाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही संख्या 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 इतकी होती. त्यामुळे केवळ सात महिन्यांत जवळपास 14.7 लाख नव्या मतदारांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही महिन्यांत मतदार नोंदणीसाठी नागरिकांचा उत्साह वाढलेला दिसतो. या कालावधीत 18 लाख 80 हजार 553 नव्या मतदारांची नोंदणी झाली आहे, तर 4 लाख 9 हजार 46 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. राज्यातील मतदारसंख्या वाढीचा हा कल आगामी स्थानिक निवडणुकांवर परिणाम करणारा ठरू शकतो, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे. विशेष म्हणजे तरुण मतदार आणि प्रथमच मतदानाचा अधिकार मिळवणाऱ्या युवकांची संख्या या वर्षी लक्षणीयरीत्या वाढली असून, निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नव्या मतदारांची नोंदणी सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात झाली आहे. ठाणे जिल्ह्यात 2 लाख 71 हजार 666 नव्या मतदारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्याच वेळी, या जिल्ह्यात 45 हजार 800 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यात 1 लाख 82 हजार 490 नवमतदारांची नोंदणी, तर मुंबई उपनगरात 95 हजार 630 नव्या मतदारांची भर पडली आहे. मुंबई उपनगरातील 44 हजार मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. ग्रामीण भागात मात्र मतदार नोंदणीचा वेग तुलनेने मंदावलेला दिसतो. निवडणूक आयोगाच्या मते, अनेक नागरिकांनी डिजिटल पद्धतीने आपले अर्ज सादर केले असून, ऑनलाइन प्रणालीच्या वापरामुळे नोंदणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद झाली आहे. परदेशातील नागरिकांचे फॉर्म क्रमांक 6-अ द्वारेही काही अर्ज राज्य निवडणूक आयोगाकडे मतदार नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्जांची नोंद झाली आहे. फॉर्म क्रमांक 6 द्वारे 16 लाख 83 हजार 573 नागरिकांनी नावे नोंदवण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. तसेच परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी असलेल्या फॉर्म क्रमांक 6-अ द्वारेही काही अर्ज आले आहेत. या सर्व अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच मतदार यादी अंतिम करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्यभरात मतदारांच्या नाव, पत्ता, वय किंवा इतर तपशीलांतील त्रुटी दूर करण्याचेही काम निवडणूक आयोगाने हाती घेतले आहे. राज्याचा मतदार वर्ग अधिक सजग आणि सक्रिय राज्यातील मतदारसंख्या वाढीमुळे आणि निवडणूक आयोगाच्या या नव्या निर्णयांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिक रोचक ठरण्याची चिन्हे आहेत. नव्या मतदारांचा कल, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे, तसेच चिन्हांच्या स्पष्टतेमुळे मतदारांमध्ये निर्माण होणारा गोंधळ, या सर्व घटकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्याचा मतदार वर्ग अधिक सजग आणि सक्रिय होत आहे, आणि त्याचा थेट परिणाम येणाऱ्या निवडणूक निकालांवर दिसून येईल, अशी अपेक्षा आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 'तुतारी वाजवणारा माणूस' या चिन्हाशी साधर्म्य असलेल्या 'पिपाणी' (ट्रम्पेट) चिन्हामुळे मोठा फटका बसल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरद पवार गटाला अखेर निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे. आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी आपल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून 'पिपाणी' हे चिन्ह वगळले आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 'तुतारी' (राष्ट्रवादी) आणि 'पिपाणी' (अपक्ष) या दोन्ही चिन्हांमध्ये नावाचे व दर्शनाचे साधर्म्य असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या नामसाधर्म्यामुळे पक्षाला मिळणारी मते अपक्ष उमेदवारांना मिळाली. तसेच विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 9 उमेदवार याच चिन्हामुळे पडल्याचा दावा पक्षाने केला होता. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाकडून 'पिपाणी' हे चिन्ह निवडणुकीच्या चिन्हांच्या यादीतून त्वरित वगळण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. निवडणूक आयोगाने अखेर राष्ट्रवादीची मागणी मान्य करत आपल्या 194 मुक्त चिन्हांच्या यादीतून 'पिपाणी' (ट्रम्पेट) हे चिन्ह गोठवले आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला मोठा दिलासा मिळाला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांचा संभ्रम टळणार आहे. लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हाला मिळालेली मतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे पक्षाने मानले निवडणूक आयोगाचे आभार दरम्यान, निवडणूक चिन्हातून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पिपाणीचा खूप मोठा फटका आम्हाला सहन करावा लागला. हाच निर्णय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत घेतला असता तर आजचे चित्र खूप वेगळे असते. पण असो! देर आए दुरुस्त आए..! असे म्हणत रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाला चिमटा काढला आहे. पिपाणी चिन्ह हटवल्याने अपक्ष नाराज दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांनंतर विधानसभा निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवारांनी ‘पिपाणी’ हे चिन्ह मिळवण्यासाठी मोठी मागणी केली होती. विशेषतः शिरूर, बारामती, सातारा, भिवंडी, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, बीड या मतदारसंघांत या चिन्हाला मोठी पसंती मिळाली होती. तसेच जिंतूर, घनसावंगी, शहापूर, बेलापूर, अणुशक्तीनगर, आंबेगाव, पारनेर, केज, परांडा या मतदारसंघांत शरद पवार गटाचे उमेदवार जितक्या मतांनी पराभूत झाले, त्यापेक्षा अधिक मते ‘पिपाणी’ चिन्हावरील अपक्षांना मिळाली होती. जर ही मते विभाजित झाली नसती, तर राष्ट्रवादीचे 19 आमदार निवडून आले असते, असा दावा करण्यात आला होता.
1979 च्या तुकाराम विरुद्ध महाराष्ट्र राज्य खटल्यात पीडित तरुणीच्या सन्मानाचे संरक्षण करणे सुप्रीम कोर्टाचे कर्तव्य होते. पण कोर्ट त्या पीडितेच्या सन्मानाचे रक्षण करण्यात अपयशी ठरले, अशी खंत सरन्यायाधीश बी आर गवई यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. इंडिया इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित 30 व्या न्यायमूर्ती सुनंदा भंडारे स्मृती व्याख्यानात बोलताना सरन्यायाधीश बी आर गवई यांनी उपरोक्त खटल्यावर भाष्य करताना खंत व्यक्त केली. तुकाराम विरुद्ध महाराष्ट्र राज्य, 1979 नामक या प्रकरणात एका तरुण आदिवासी मुलीवर पोलिस ठाण्यात बलात्कार करण्यात आला होता. कोर्टाने या प्रकरणी 2 पोलिसांची निर्दोष सुटका केली होती. नेमके काय म्हणाले सरन्यायाधीश? सरन्यायाधीश या प्रकरणी म्हणाले, प्रस्तुत निर्णय भारताच्या घटनात्मक व न्यायिक इतिहासातील सर्वात वेदनादायी क्षणांपैकी एक आहे. तो संस्थात्मकदृष्ट्या लाजिरवाणा प्रसंग होता. 1975 नंतर राष्ट्रीय पातळीवर लिंग समानतेवर चर्चा औपचारिक हक्कांच्या प्रश्नांच्या पलीकडे होत होती. ती समानतेचा अविभाज्य घटक म्हणून प्रतिष्ठेच्या सखोल कल्पनेकडे वळली. पुढे ही चर्चा कायदेशीर समानतेपासून महिलांच्या स्वायत्तता व शारीरिक अखंडता व त्यांच्या जीवनातील अनुभवनांना आकार देणाऱ्या सामाजिक वास्तवांच्या मान्यतेकडे वळली. या परिवर्तनातील एक निर्णायक क्षण शोकांतिका व संस्थात्मक अपयशातून जन्माला आला. हा क्षण तुकाराम विरुद्ध महाराष्ट्र राज्य (1979) मधील सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल होता. त्याला मथुरा खटला म्हणूनही ओळखले जाते. संस्थात्मकदृष्ट्या लाजिरवाणा प्रसंग माझ्या मते, हा निर्णय भारताच्या घटनात्मक व न्यायिक इतिहासातील सर्वात वेदनादायी क्षणांपैकी एक आहे. मी त्याला संस्थात्मकदृष्ट्या लाजिरवाणा प्रसंग म्हणतो. जिथे कायदेशीर व्यवस्था ज्या पीडितेचे रक्षण करण्यासाठी होती, ती त्या पीडितेच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरली. पण त्यानंतरही हा निकाल बऱ्याच अंगाने महत्त्वाचा ठरला. कारण, या निर्णयानंतर निर्माण झालेला जनआक्रोश व देशभरातील महिला संघटना, विद्यार्थी व कायदेविषयी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांनी आधुनिक भारतातील महिला हक्क चळवळीला नवा वेग दिला, असे सरन्यायाधीश म्हणाले. नेमके काय आहे मथुरा बलात्कार प्रकरण 'मथुरा बलात्कार प्रकरण' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम विरुद्ध महाराष्ट्र राज्य (1979) या ऐतिहासिक खटल्याने भारतातील बलात्कार कायद्यांच्या उत्क्रांतीत महत्त्वाची भूमिका बजावली. या खटल्यामुळे कलम 376 अंतर्गत कोठडीतील बलात्कारासाठी तरतुदी लागू करण्यात आल्या आणि भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 114(अ) अंतर्गत बलात्कार प्रकरणांमध्ये पुराव्याचे ओझे बदलण्यात आले. हा निर्णय महिला हक्क चळवळीतील एक महत्त्वाचा क्षण होता आणि भारतातील बलात्कार पीडितांना चांगले संरक्षण आणि न्याय देण्याच्या दिशेने एक बदल होता.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसे राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदावरून घडामोडींना वेग आला असून, पक्षांतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला आहे. पक्षाने आम्हाला कोलले, तर आम्हीही कोलल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी इंदापूर येथून दिला आहे. दरम्यान इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून इंदापुरात मोठा पेच प्रसंग निर्माण झाला आहे. इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देण्याला गारटकर समर्थकांचा विरोध आहे, त्यातून त्यांनी हे वक्तव्य केले आहे. शेवटपर्यंत पक्षासोबत राहू पण.. प्रदीप गारटकर म्हणाले की, जर पक्षाने आपल्या विरोधी निर्णय घेतला तर स्थानिक आघाडी करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरू, उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू आणि राजीनामा देऊ. जर पक्षाने आमचे ऐकले, योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळावरती आहोत, पक्षाने जर आम्हाला कोलल तर आम्ही सुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही. एकत्र पॅनल उभे करू प्रदीप गारटकर म्हणाले की,आपण आपली ताकद आणि उद्या आपल्या बरोबर येणाऱ्या लोकांची ताकद एकत्र मिसळली तर या शहरांमध्ये एकतर्फी निवडणूक होऊन जाईल. एवढी मी तुम्हाला खात्री देतो. या दृष्टीने माझी सगळ्यांशी बोलणी सुरू आहे. त्या पद्धतीने लोक आपल्या विचाराला आपल्याला पाठिंबा देण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यांनी पाठिंबा देत असताना त्यांचा काय म्हणणं आहे ते मला फक्त ऐकून घ्यायचे आहे. ते मी ऐकून घेतो आणि त्यामध्ये सन्मानाने मार्ग काढून सगळे मिळून एकत्रित पॅनल उभा करूयात. ..तर पदाचा राजीनामा देऊ प्रदीप गारटकर म्हणाले की, आमच्या ताकदीकडे आणि आमच्याबरोबर असलेल्या लोकांच्या शक्तीकडे कोणी दुर्लक्ष करू नये. आम्ही स्थानिक आघाडी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी ठेवली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही वाट पाहू; मात्र त्यानंतरही परिस्थितीत बदल झाला नाही, तर मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देईन.सर्वांचे विचार ऐकून, सन्मानाने मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. पक्षासाठी आमची प्रायोरिटी कायम आहे, पण सन्मान नसेल तर आम्हालाही पर्याय शोधावा लागेल.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुण्यातील भूखंडाच्या श्रीखंडावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या सुपुत्राच्या खिशाला चटका बसणार नाही याची जबाबदारी मेवाभाऊ अर्थात देवाभाऊंनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातील कथित भूखंड घोटाळ्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समितीही नियुक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनीही या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. यामुळे सरकारवरील दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सरकार विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अजित पवार व त्यांच्या मुलाला पाठिशी घालण्याचा आरोप केला आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही ठाकरे गटाचे आमदार तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या प्रकरणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उद्देशून म्हणाले की, तुमच्या विभागाच्या अधिकारी दुप्पट दंड भरा म्हणून सांगतात, आणि महसूलमंत्री बावनकुळे तुम्ही म्हणता की 'तपासावे' लागेल! अधिकाऱ्यांचा बळी द्यायचा होता तेव्हा तासाभरात निलंबनाची कागदे थेट बाजारात आणली गेली. आता पार्थ पावरांशी निगडित निर्णय घ्यायची वेळ आली की यांचा 'अभ्यास' सुरू झाला.. 'काका मला वाचवा', या हाकेला ओ दिला आहे बावनकुळे यांनी! अजित दादांचा राजीनामा घेणे तर दूरच. आता त्यांचे सुपुत्राच्या खिशाला चटका बसणार नाही, याची जबाबदारी मेवाभाऊंनी बावनकुळेंना दिलेली आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. शिंदेंचे बिस्किटचे चिंधी पुडे वाटून फोटो काढायचे धंदे अंबादास दानवेंनी अन्य एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. 'आपण मराठवाड्यात फिरलात'.. असे आपण परभणीत सपशेल खोटे बोललात. पूरग्रस्तांना भेटण्यासाठी निघालेल्या एकनाथ शिंदेंच्या गाडीची चाके सोलापूर कडून येऊन धाराशिवच्या काही गावांतच रुतली होती. बहुदा ऍनाकोंडाने पुढे जाण्याची परवानगी दिली नसावी! बिस्किटचे चिंधी पुडे वाटून फोटो काढायचे धंदे तुमच्या धाराशिव जिल्ह्यातील एका आमदाराचे आहेत. लोक त्याला खेकडा म्हणतात! आम्ही केलेली मदत सांगत नसतो. आमची मदत लोक प्रेमाने स्वीकारतात, तुमच्यासारखं गावाचा वेशीपासून हाकलून देत नाहीत, असे ते म्हणाले. यंत्रणेला डावलून सूर्यकांत येवलेंची बदली केली? दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणी पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले व त्यांना राजाश्रय देणाऱ्या कथित राजकारण्यांवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवलेच्या निमित्ताने पुन्हा सिद्ध झालं की अधिकारी जितका भ्रष्ट, तितका तो राजकारण्यांचा लाडका. अशा माणसाला नागपूरहून पुण्यात कुणी आणि का आणलं? इतके गंभीर आरोप असूनही त्याला कार्यकारी पद का देण्यात आलं? त्याच्यामागे कोणाचं राजकीय छत्र आहे?. सर्वोच्च न्यायालयाने अशा पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा होऊ नये, राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी महाराष्ट्रासह सर्व राज्यांमधे नागरी सेवा मंडळ नावाची यंत्रणा स्थापन करणे बंधनकारक केले आहे . ती यंत्रणा येवले प्रकरणात काय करत होती? की त्या यंत्रणेला डावलून येवलेंची बदली केली? केली असेल कोणी केली? नागरी सेवा मंडळाने शिफारस केली असेल तर त्यांच्या सदस्यांवर कोण आणि कधी कारवाई करणार? येवलेंचे काही पराक्रम पुढील प्रमाणे... येवले यांनी 2001 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली. 361 गुण आणि अपंग (कर्णबधिर) कोट्यातून पास झाल्याने त्यांना नागपूर विभागात 2004 मध्ये नायब तहसीलदार पद देण्यात आले. पण खरंच कर्णबधिर आहेत का? नसतील तर हे थेट महाराष्ट्रातील पूजा खेडकर प्रकरण ठरेल !त्याआधी येवलेंनी सर्वसाधारण गटातून परीक्षा दिली होती असे म्हणतात. 2001 चा MPSC घोटाळा गाजला होता . 398 उमेदवारांच्या उत्तरपत्रिका बदलल्या,प्रत्येकाकडून ₹3-₹5 लाख घेतल्याचे आरोप झाल्यानंतर मुंबई HC ने सर्व नियुक्त्या रद्द केल्या होत्या. आता ज्याची सेवेत रुजू होतानाची कारकीर्द अशी असेल त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा कशी करता येईल ? येवले यांना 2011 मध्ये उमरेड (नागपूर) येथे ₹10,000 ची लाच घेताना पकडले. 6 दोषारोपपत्रं ठेवण्यात आली, पण चौकशीचा पत्ता नाही. त्यानंतर गडचिरोलीला हजर न राहिल्यामुळे त्यांचं निलंबन करण्यात आलं पण सेटिंग लावून परत रुजू झाले. 2014 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सिरोंचा कोतवाल भरती प्रकरणात प्रत्येकाकडून ₹2 - ₹ 2.5 लाख लाच घेतल्याचा आरोप . हा प्रकार कानावर येताच नक्षलवाद्यांनी अशा अधिकाऱ्यांना सोडणार नाही असे जाहीर केले. 2016 मध्ये पुणे विभागात बदली. पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी - मंत्रालयातून “सेटिंग” करून पोस्टिंग. 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप 2016 मध्येच इंदापूर तहसीलदार म्हणून रुजू 58 सरकारी जमिनींचं अनियमित वाटप,वाळूमाफियाकडून संगनमत यामुळे जिल्हाधिकारी पुणे यांनी निलंबन केलं. 14 वर्षांत 7 वेळा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, पण प्रत्येक वेळी “सेटिंग” लावून बचाव. मोबोज हॅाटेल जमीन घोटाळा प्रकरणी त्यांच्याविरुद्ध आरोप करण्यात आले, आंदोलने झाली परंतु पुढे काहीच झाले नाही. येवले मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अमेडिया कंपनीला फायदा पोहोचवण्यासाठी प्रचंड सक्रिय होते, असे विजय कुंभार यांनी म्हटले आहे.
प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मात्र यावेळी कारण त्यांच्या कीर्तनातील एखाद्या वक्तव्याचे नसून, त्यांच्या लेकीच्या साखरपुड्याचे आहे. लेक ज्ञानेश्वरीच्या शाही थाटात पार पडलेल्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इंदुरीकर महाराजांवर वारकरी संप्रदायासह अनेकांकडून टीकेचा भडिमार झाला. कीर्तनातून साधेपणाचा संदेश देणारे महाराज लेकीच्या समारंभात ऐषआरामाचा थाट दाखवत असल्याची टीका सुरू झाल्यानंतर इंदुरीकर महाराज नाराज झाले आहेत. त्यांनी अखेर या सर्व वादावर थेट भाष्य केले. “मी आता फेटा खाली ठेवण्याच्या विचारात आहे” असे मोठे विधान करत कीर्तन सेवा सोडण्याचे संकेत दिले आहेत. नुकत्याच झालेल्या इंदुरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरीच्या शाही साखरपुड्यावरून महाराजांवर सर्व स्तरांतून, विशेषतः वारकरी संप्रदायाकडून तीव्र टीका झाली. कीर्तनात साधेपणाचा उपदेश करणारे महाराज, स्वतःच्या लेकीच्या समारंभात 2000 लोकांची उपस्थिती आणि गाड्यांचा भलामोठा ताफा घेऊन आलेल्या मुलीचा 'शाही थाट' पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी महाराजांना टीकेचे धनी केले. सतत होत असलेल्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज नाराज झाले असून, त्यांनी आता यावर थेट भाष्य करत, एक मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. नेमके काय म्हणाले इंदुरीकर महाराज? आम्ही संसार कसा केला, किती कष्ट करत इथपर्यंत पोहोचलो, याची लोकांना अजिबात माहिती नाही. माझ्यापर्यंत ठीक होते... पण आता माझ्या मुलीलाही बोलले जात आहे. तिच्या कपड्यांबद्दल बोलले जात आहे. लोक किती खालच्या पातळीवर गेले हे कळते. मला लावा ओ घोडे, माझा पिंड गेला, पण माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे? असा सवाल इंदुरीकर महाराजांनी उपस्थित केला. इंदुरीकरांचे कीर्तन सेवा थांबवण्याचे संकेत मी गेल्या तीस वर्षांपासून फक्त टीकाच सहन करत आलोय. मात्र, विषय आता माझ्या घरापर्यंत आला. माझ्यापर्यंत सर्व टीका ठीक पण कुटुंबापर्यंत गेले आहे आणि हे अजिबात ठीक नाहीये. त्यामुळे मला अक्कल आली पाहिजे. मी आता फेटा खाली ठेवण्याच्या विचारात आहे. थोडक्यात काय तर इंदुरीकर महाराज यांनी थेट कीर्तन सेवा थांबवण्याचे मोठे संकेत दिले आहेत. सर्व सहन करण्यापलीकडे गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंदुरीकर महाराजांनी पुढील काही दिवसांमध्ये व्हिडीओ तयार करणार असल्याचेही म्हटले आहे. खरंच कीर्तन सेवा थांबवणार का? सध्या सुरू असलेली टीका सहन करण्यापलीकडची असल्याचे सांगत महाराजांनी आपण पुढच्या तीन ते चार दिवसांमध्ये एक व्हिडीओ क्लिप टाकून आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या वक्तव्यामुळे इंदुरीकर महाराज खरोखरच कीर्तन सेवा थांबवणार का? याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.
अकोला जिल्ह्यातील एका तरुणाने स्वतःच्या आयुष्यातील एकाकीपणाने हैराण होऊन थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच पत्र लिहून भावनिक साकडे घातले आहे. “माझे लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या; तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही,” अशी विनंती या तरुणाने केली आहे. ग्रामीण भागातील अविवाहित तरुणांच्या वाढत्या समस्येचे हे पत्र ज्वलंत उदाहरण ठरले आहे. शनिवारी (8 नोव्हेंबर) अकोल्यात शरद पवार यांचा शेतकरी संवाद कार्यक्रम पार पडला. शेतकऱ्यांच्या समस्या आणि निवेदनांमध्ये एक पत्र असेही होते, ज्याने सर्वांनाच थक्क केले. “लग्न होत नाही, मदत करा,” अशा आशयाचे हे निवेदन पाहून पवार आणि त्यांच्यासमवेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख काही क्षण स्तब्ध झाले. दुसऱ्या दिवशी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पवार यांनी हे पत्र माजी मंत्री जयंत पाटील यांनाही दाखविले. तिघांमध्ये या घटनेवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मी कोणत्याही समाजातील मुलीशी लग्नासाठी तयार या तरुणाने पत्रात स्वतःचा पत्ता आणि मोबाइल क्रमांक देत लिहिले आहे, “माझे वय वाढत चालले आहे. भविष्यात लग्न होणार नाही, अशी भीती वाटते. कृपया माझ्या आयुष्याचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायलाही तयार आहे. संसार नीट चालवेन, ही हमी देतो. पत्राच्या शेवटी त्याने लिहिले, मला जीवनदान द्यावे. तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही. हे वाचून उपस्थित सर्वच जण काही काळ स्तब्ध झाले. अजूनही ग्रामीण तरुणांना शरद पवारांसारख्या नेत्यांकडूनच मदतीची आशा वाटते, याचे हे प्रतीक असल्याचे निरीक्षक सांगतात. सामाजिक वास्तवाची वेदनादायी झलक या घटनेने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील “बिनलग्नाचे तरुण” या गंभीर सामाजिक प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. शिक्षणातील मागासलेपणा, बेरोजगारी, गरिबी आणि बदलते सामाजिक अर्थकारण यामुळे ग्रामीण तरुणांच्या संसाराची स्वप्ने अपुरीच राहतात. मुलामुलींच्या लिंग गुणोत्तरात झालेला बदल, तसेच मुलींच्या वाढत्या अपेक्षा यामुळे गावातील अनेक तरुण विवाहयोग्य वय ओलांडत आहेत. सोलापूरच्या ‘नवरदेव मोर्चा’ची पुनःआठवण डिसेंबर 2022 मध्ये सोलापूर येथे 25 हून अधिक अविवाहित तरुणांनी ‘नवरदेव मोर्चा’ काढून जिल्हाधिकाऱ्यांना विवाहासाठी मुली मिळवून द्याव्यात, अशी मागणी केली होती. फेटे, मुंडावळ्या आणि वाजंत्रीसह हा मोर्चा काढण्यात आला होता. त्या वेळीही ग्रामीण युवकांच्या विवाहाच्या अडचणींचा मुद्दा चर्चेत आला होता. ही घटना केवळ एका तरुणाची भावनिक विनंती नाही, तर ग्रामीण भारतातील बदलत्या सामाजिक वास्तवाचे प्रतीक आहे. रोजगार, शिक्षण आणि आर्थिक स्थैर्याचा अभाव ग्रामीण तरुणांना केवळ जगण्याच्याच नव्हे तर ‘संसाराच्या हक्काच्या स्वप्नां’पासूनही वंचित ठेवत आहे. विवाहसंस्था अडचणीत आली असून, नव्या प्रकारची सामाजिक विषमता आकार घेत आहे.
आज सोन्या चांदीच्या दागिन्यांचा अर्थात ज्वेलरीचा व्यवसाय अत्यंत जिकरीचा व धाडसाचा होत असून, ज्वेलर्स व्यावसायिकांनी व्यवसाय करताना काळजीपूर्वक दाग दागिने पारखून व त्याचे योग्य मूल्यांकन करून व्यवसाय करावा, असा सूर सुवर्ण ज्वेलरी मूल्यांकन कार्यशाळेत ज्वेलरी तज्ञांनी व्यक्त केला. गोल्ड वेलूअर्स असोसिएशन महाराष्ट्र, अकोला सराफ असोसिएशन, इंडिया बुलीयन ज्वेलर्स असोसिएशन व जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सीलच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक व्हिनस सभागृहात बुधवारी सुवर्ण ज्वेलरी व्यवसाय व सुवर्ण मूल्यांकन कार्यशाळा झाली. कार्यशाळेचा प्रारंभ चांद रतन जांगिड, रमेश भगत, अर्चना पांडे, शीतल केसरकर, संजय खडके, जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल,असोसिएशनचे बाबुराव हिवराळे, अकोला सराफ असोसिएशनचे अध्यक्ष शैलेश खरोटे, पुरुषोत्तम काळे, संजीव खडके, जीजेईपीसीचे संचालक मिथिलेश पांडे, आयबीएचे उपाध्यक्ष विजय लष्करे आदींच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आला. यावेळी खडके यांनी सहकारी बँक,पतसंस्था व व्हॅल्युएशन करणाऱ्या सोनारांच्या समस्यावर मार्गदर्शन केले तर मिथिलेश पांडे, विजय लष्करे यांनी प्रचलित सुवर्ण व्यवसायाची स्थिती यावर मार्गदर्शन केले. ‘एमसीएक्स’च्या सादरीकरणाने या सत्राचे समापन झाले. दुपारी प्रथम सत्राची कार्यशाळा पुरुषोत्तम काळे यांच्या अध्यक्षतेत तथा कार्याध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर, उपाध्यक्ष चेतन राजापूरकर,सचिव संजय वाघ, सचिन वडनेरे, किशोर जडे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी अकोला सराफ संघाचे उपाध्यक्ष राहुल भगत, सचिव मधुर खंडेलवाल, कोषाध्यक्ष अमित शहा, राजकुमार वर्मा, अमोल पाचकवडे, राजेश जांगिड, विनोद माथने, विकास विसपुते, मुन्ना आडगावकर, गोटू माळीवाले, सुधीर देशमुख,सुनील शर्मा,सुशील शहा, निहार अग्रवाल, गोल्ड व्हॅल्यूवर असो.चे तज्ञ मार्गदर्शक भरतभाई ओसवाल, उपाध्यक्ष राजाभाऊ वाईकर,प्रशासकीय सचिव सतीश पितळे, सह कोषाध्यक्ष कालिदास कांदळगावकर सदस्य समीर शहा समवेत गोल्ड वेलूअर्स असो.महाराष्ट्र, अकोला सराफ असो.,इंडिया बुलीयन ज्वेलर्स असो.व जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कॉंसीलचे पदाधिकारी,सदस्य व सोनार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक अकोला सराफ संघाचे अध्यक्ष शैलेश खरोटे यांनी केले. संचालन मनीष हिवराळे यांनी तर आभार सुनील अडगावकर यांनी मानले. बोगस हॉलमार्कच्या फसवणुकीपासून सावध रहा बोगस हॉलमार्क कळला पाहिजे. सोने तारण ठेवताना अथवा बँकांशी सोने व्यवहार करताना करार काळजी पूर्वक करा. करारपत्र नीट वाचा,गुगलची मदत घ्या .तरच या संदर्भात समस्या निर्माण होणार नाहीत. आज फसवणूक करणारे ९ कॅरेटचे दागिने बनवून त्यावर ३३ मायक्रोनचा जाड थर देऊन तो दागिना हॉलमार्क करून फसवणुकींचे प्रकार घडत आहेत. यापासून आपण सावध राहण्याची गरज असल्याचे मत यावेळी काळे यांनी व्यक्त केले.
चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, बाजार समितीचे माजी सभापती आणि पैठण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी डॉ. सत्येंद्र भुसारी यांचे बुधवारी सायंकाळी कसारा रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने चिखली तालुका तसेच संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ नोव्हेंबर रोजी पक्षाची बैठक संपल्यानंतर डॉ. भुसारी हे मुंबईवरून चिखलीकडे परत येत होते. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नाशिकजवळील कसारा घाटात धावत्या रेल्वेतून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ नाशिक येथील रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. संबंधित रेल्वेगाडी कासारा स्टेशनवर थांबत नसल्याने नेमका अपघात कसा घडला? याचा तपास पोलिस करत आहेत. जिल्हा परिषद निवडणूक लढवणार होते डॉ. भुसारी यांनी मराठा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्याची वाटचाल सुरू करत समाजसेवेत आपले स्थान निर्माण केले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्य केले. नुकतेच काँग्रेस पक्षाने त्यांची पैठण विधानसभा मतदारसंघ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काँग्रेसचे निरीक्षक म्हणून त्यांनी संभाव्य उमेदवारांची बैठक घेतली होती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ते इसोली जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढणार होते. बुधवारी सायंकाळी मुंबईवरून परत येत असताना कसारा घाटात ही दुर्घटना घडली राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ डॉ. सत्येंद्र भुसारी यांच्या अपघाताची माहिती माजी आमदार राहुल बोंद्रे मुंबईहून घटनास्थळी रवाना झाले. उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर यांनीही तत्काळ तेथे पोहोचून परिस्थितीची माहिती घेतली. चिखलीच्या आमदार श्वेता महाले-पाटील यांचे पती विद्याधर महाले यांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक मदतीच्या सूचना दिल्या. डॉ. भुसारी यांच्या निधनाने चिखली तालुका तसेच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली असून त्यांच्या योगदानाची आठवण सर्वच क्षेत्रांत कायम राहील, अशी भावना विविध नेत्यांनी व्यक्त केली आहे.
सातपुड्यात वसलेल्या मेळघाटचे वनवैभव, आदिम संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी जिल्ह्यात नरनाळा महोत्सव ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान घेण्याचे नियोजन असून, त्या दृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बुधवारी दिले. महोत्सवाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांची ऑनलाईन बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत झाली. जिल्ह्यातील अकोट तालुक्यात वसलेले जिल्ह्याचे एकमेव पर्यटन स्थळ नरनाळा किल्ला आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरणात सातपुडयाच्या रांगेत असलेले आकर्षक व कलात्मकरित्या परिपूर्ण किल्ला आहे. पूर्ण काम काळ्या दगडात केलेले आहे. या नरनाळा किल्ल्याला चार प्रकारचे प्रवेशद्वार असून, पहिला दिल्ली दरवाजा, दुसरा शिरपूर दरवाजा, तिसरा अकोट दरवाजा व चौथा शहानूर दरवाजा, असे भव्य आकाराचे दगडाचे कोरीव काम केलेल्या शिलांना रचून यांची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान गत १३ वर्षांपासून सतत दरवर्षी नरनाळा महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे या आशयाचे निवेदन ‘दखल’चे संस्थापक प्रदिप गुरूखुद्दे, अनिता कवडे, डॉ चंद्रकांत पनपालीया, ठाकूरदास चौधरी, डॉ. छाया देशमुख, सचिन अहिर, पंकज मणीयार जिल्हाधिकारी वर्षा मिना यांची भेट घेतली होती. त्यांनी नरनाळा महोत्सवबाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. दरम्यान बुधवारी महोत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. ऑनलाईन बैठकिला जि. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अकोटचे उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर उपस्थित होते. स्थानिकांना प्रोत्साहन महोत्सवाच्या अनुषंगाने जागा निश्चिती, तसेच परिपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करून तसा प्रस्ताव तत्काळ पाठवावा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करावा. स्थानिक कलावंतांनाही प्रोत्साहन देण्यात येईल. असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी बैठकित दिले.
महावितरणने खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. अनेक महिला व पुरुष खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. कोणत्याही सांघिक खेळ प्रकारात खेळाडूंमधील परस्पर सहकार्य, समन्वय व विश्वास या त्रिसुत्रीशिवाय विजय शक्य होत नाही. त्यामुळे खेळाडूंमध्ये प्रथम संघभावना निर्माण होणे आवश्यक आहे. महावितरणच्या दरवर्षी होणाऱ्या राज्य क्रीडा स्पर्धा या महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी एकजुटीचा व संघभावनेचा संस्कार आहे असे प्रतिपादन संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी बुधवारी केले. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक म्हणून संचालक पवार बोलत होते. स्पर्धेत अकोल्यातील कर्मचारी सहभागी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता अशोक साळुंके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कोकणचे सहव्यस्थापकीय संचालक . दिलीप जगदाळे, कार्यकारी संचालक श्री. प्रसाद रेशमे, पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंते सुहास रंगारी, दिलीप दोडके, स्वप्नील काटकर, चंद्रमणी मिश्रा, संजय पाटील, राजेश नाईक, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे तसेच प्राचार्य श्रीनिवास देशपांडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले. सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर, विजय पांडे यांनी केले तर उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी आभार मानले. यांनी मारली बाजी १०० मीटर धावस्पर्धेत प्रिया पाटील, गुलाबसिंग वसावेंची बाजी – अतिशय चुरशीच्या १०० मीटर धावस्पर्धेत पुरुष गटात श्री. गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) यांनी सुवर्णपदक तर साईनाथ मसाणे (सांघिक कार्यालय-भांडूप) यांनी रौप्यपदक पटकावले. तर महिला गटात प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप) यांनी सुवर्णपदक तर श्वेतांबरी अंबादे (नागपूर-चंद्रपूर-गों दिया) यांनी रौप्य पदक मिळवले. विजेत्यांना संचालक राजेंद्र पवार यांच्याहस्ते सुवर्ण व रौप्यपदक प्रदान केले.
नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी थंडीच्या दिवसातही राजकीय वातावरण तापले असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू आहे. गेल्या तीन दिवसात खामगाव नगर परिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही त्यामुळे पहिला उमेदवारी अर्ज कधी दाखल होणार याकडे खामगाव वासीयांचे लक्ष लागले आहे. तब्बल चार वर्षानंतर नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षांनी नगर परिषद निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी योग्य उमेदवार दिला पाहिजे या अनुषंगाने राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या शोधात आहेत. इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांच्या वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली असून आपल्याला तिकीट मिळेल या आशेने उमेदवार उमेदवारी मिळण्याची वाट पाहत आहेत. प्रमुख राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठका घेऊन स्थानिक नेत्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. नगराध्यक्ष तसेच नगरसेवक कसे निवडून येतील याबाबत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दमदार उमेदवार देण्यासाठी सर्वच पक्षांनी उमेदवारांचा शोध घेतला आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर पासून सुरू झाली असून १७ नोव्हेंबर पर्यंत मुदत आहे मात्र गेल्या तीन दिवसापासून खामगाव नगरपालिकेत एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झाला नाही. तिसऱ्या दिवशीही नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याने खामगाव नगर परिषद निवडणुकीत पहिला उमेदवारी अर्ज कोण दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक पक्षाने निवडणूक जिंकण्यासाठी तयारी चालवली असून पक्षश्रेष्ठी कडून उमेदवार निश्चित झाले नसल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विलंब होत आहे. नगर परिषदेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवा यासाठी सक्षम उमेदवारांचे उमेदवारी दाखल होणार असल्याचे समजते. यामुळे ऐन थंडीच्या दिवसातही राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणु कीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १० नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे. खामगाव नगर परिषद निवडणु कीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके तसेच इतर अधिकारी व कर्मचारी निवडणूक विभागाची धुरा सांभाळत आहेत. खामगाव नगर परिषदेत १७ प्रभागातून ३५ नगरसेवक निवडून येणार आहेत. एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसल्याने तिसरा दिवसही निरंक राहिला आहे. त्यामुळे उमेदवार निवडणुकीसाठी सज्ज आहे.
यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दारोमदार आता रब्बी पिकावर आहे. परंतु यंदा सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीच्या पेरणीला उशिरा सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ३४ हजार ७३१ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी १०.५९ टक्के आहे. रब्बीची पेरणी उशिरा होत असल्यामुळे या पिकांच्या उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. दरवर्षी शेतकरी रब्बी पिकाची पेरणी सप्टेंबरच्या अखेरपासून ते ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करण्यात येते. परंतु यंदा जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांची शेत जमीन ओली असल्यामुळे रब्बीचे उत्पादन घेण्यासाठी ते शेतजमीन पेरणी योग्य करू शकले नाहीत. त्यामुळे यंदा रब्बीच्या पेरणीला उशिरा झाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीपासून शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीला सुरूवात केली आहे. जिल्ह्यात ११ नोव्हेंबरपर्यंत केवळ १०.५९ टक्के पेरणी झाली आहे. मागील वर्षीची व यंदाची आकडेवारी पाहता यंदा कमी क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच तारखेपर्यंत जिल्ह्यात ४० ते ४५ टक्केच्यावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. परंतु यंदा पेरणीला उशीर होत असल्याने याचा फटका उत्पादनावर होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. सध्या काही शेतकरी रब्बीचे उत्पादन घेण्यासाठी शेती तयार करण्यास व काही शेतकरी पेरणीच्या गडबडीत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. शेती कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नाइलाजास्तव काही शेतकऱ्यांच्या परिवारातील सदस्य शेतात राबताना दिसून येत आहेत. जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात २५ हजार ७३० हेक्टरवर रब्बीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी केवळ ६ हजार १३८ हेक्टरवर पेरा झाला आहे. त्यात शेगाव तालुक्यात ५ हजार ११ हेक्टर, मलकापूर तालुक्यात ६०० हेक्टर, नांदुरा तालुक्यात ९०५ हेक्टर, लोणार तालुक्यात १५३९ हेक्टर, सिंदखेडराजा तालुक्यात २६३ हेक्टर, मेहकर तालुक्यात २१३० हेक्टर, देऊळगाव राजा तालुक्यात ७६८ हेक्टर, बुलडाणा तालुक्यात १७८० हेक्टर, चिखली तालुक्यात ७ हजार २६२ हेक्टर, संग्रामपूर तालुक्यात ४८६६ हेक्टर व जळगाव जामोद तालुक्यात १८०९ हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला आहे. शेतकऱ्यांचा हरभरा पिकाकडे कल कृषी विभागातर्फे जिल्ह्यात ३ लाख २९ हजार ४०३ हेक्टरवर रब्बी पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात ११ नोव्हेंबरपर्यंत केवळ ४३ हजार ७३१ हेक्टरवर प्रत्यक्ष रब्बीचा पेरा झाला आहे. त्यामध्ये २७ हजार १०१ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली असल्याने शेतकऱ्यांचा यंदाही कल हरभऱ्याचे उत्पादन घेण्याकडे दिसून येत आहे. त्या खालोखाल ३७ हजार ६ हेक्टरवर गव्हाचा पेरा झाला आहे. बियाणे भेटल्यामुळे रब्बीची पेरणी करतोय सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा रब्बी पेरणीच्या हंगामाला उशीर झाला आहे. परंतु आता आम्हाला अभिनव शेतकरी बचत गटाद्वारे हरभरा बियाणे देण्यात आले. त्यामुळे आता आम्ही हरभरा, गहू, कांदा, व मक्याची पेरणी करत आहोत.- वीरेंद्रसिंग बोराडे, शेतकरी, पोरज.
शिवभोजन’ केंद्रांना घरघर, 39 पैकी 15 केंद्र बंदच:अनुदान 4 महिन्यांपासून थकीत, नागरिकांची गैरसोय
अनुदानाअभावी जिल्ह्यातील शिवभोजन थाळी योजनेची ३९ पैकी १५ केंद्रे बंद पडली आहेत. उर्वरित २४ केंद्रे कशीबशी सुरू आहेत. लाडकी बहीणसारख्या नवनवीन योजनांमुळे केंद्रांचा निधी अडवून ठेवण्यात आल्याचा आरोप केंद्र चालकांनी केला आहे. गरीब मजूर, कामगारांची उपासमार टाळण्यासाठी शासनाने अवघ्या १० रुपयात शिवभोजन थाळी या नावाने २०२० मध्ये लोककल्याणकारी योजना सुरू केली होती. परंतु शिवभोजन थाळी केंद्रांना आता घरघर लागली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडला आहे. त्याचा फटका शिवभोजन थाळीला बसत आहे. २४ केंद्रांनासुद्धा मागील ४ महिन्यांचे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे केंद्रचालक अडचणीत सापडले आहेत. कोरोना काळात तत्कालीन शासनाकडून ही थाळी मोफत दिली जात होती. आता पुन्हा ही थाळी दहा रुपयांत देण्यात येत आहे. यासाठी केंद्र चालकांना ४० रुपये अनुदान देण्यात येते. मात्र हे अनुदान महागाईमुळे अपुरे पडत आहे. या योजनेअंतर्गत, लाभार्थ्यांना १० रुपयांच्या सवलतीच्या दरात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी डाळ आणि एक वाटी तांदूळ असे एक वेळचे जेवण देण्यासाठी जिल्ह्यात एकूण ३९ शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात आली. सध्या यापैकी फक्त २५ केंद्रे कार्यरत आहेत. जिल्ह्यात दरदिवशी सरासरी १२०० लाभार्थी या थाळीचा लाभ घेत आहेत. शिवभोजन केंद्र चालवण्यासाठीचे अनुदान वेळेत न मिळाल्याने १५ केंद्र बंद पडली, तर दुसरीकडे सुरु असलेल्या केंद्रांचे अनुदान प्रलंबित आहे. त्यामुळे केंद्रांच्या चालकांकडून अन्न व पुरवठा विभागाला सदर केंद्र बंद करण्याबाबत कळवण्यात आले आहे. त्यामुळे अनुदान देण्याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेतला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चार महिन्यांपासून अनुदान नाही ^मागील चार महिन्यांपासून अनुदान देण्यात आले नाही. त्यामुळे केंद्र चालवण्यासाठी जवळचे पैसे वापरत आहे. शासन स्तरावर अनुदानाची मागणी केली आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून ठाम उत्तर मिळाले नाही. - राजाभाऊ माने, संचालक शिवभोजन केंद्र, आसेगाव पूर्णा
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचे आजोळ आणि माता रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपुरात शुक्रवार, १४ नोव्हेंबरपासून तीन दिवसीय ‘अंबा-रुक्मिणी महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत बोटिंग शो, बैल बंडी सजावट व बँड स्पर्धा आणि एक लाख दिव्यांचा दीपोत्सव यासारखे विशेष कार्यक्रम घेतले जाणार आहेत. श्री अंबा रुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष रविराज देशमुख यांनी सांगितले. देशमुख म्हणाले की, पूर्वी हा उत्सव काही छोट्याखानी होत आहे. मात्र आता भाविकांची संख्या वाढू लागली आहेत. दूरवरून नागरिक या महोत्सवात सहभागी होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘महोत्सव विदर्भाचा, विदर्भाच्या पुरातन राजधानीचा’ अशी थीम प्रसिद्ध झाली आहे. हा महोत्सव तीन दिवसीय करण्यात आला आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी दुपारी ३ वाजता डोळ्याचे पारणे फेडणारा बोटिंग शो (नौका स्पर्धा) घेण्यात येणार असून ४ वाजता वर्धा नदीला सप्तसिंधू जल अर्पण केले जाईल. त्यानंतर एक लाख दिव्यांचा दीपोत्सव आणि उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण केली जाईल. उद्घाटनासाठी भाजपसह इतर राजकीय पक्ष आणि धार्मिक संस्थांच्या संत-महंतांना निमंत्रित करण्यात आले आहे. गतवर्षीचा दीपोत्सव व बोटिंग शो, दरम्यानच्या काळात वर्धा नदीला करण्यात आलेला साडीअर्पण सोहळा, गंगा आरती, आषाढी एकादशीची यात्रा यामुळे कौंडण्यपुरात समृद्धी नांदत आहे. तोच धागा पकडून यावर्षीच्या महोत्सवात दुसऱ्या दिवशी पाच किलोमीटर अंतराची विदर्भस्तरीय खुली मॅराथॉन स्पर्धा, नदी घाट सफाई, बैल बंडी सजावट स्पर्धा आणि सुप्रसिद्ध गायक राहुल तायडे, संच यांची संगीत संध्या रंगणार आहे. तर तिसऱ्या दिवशी प.पू. जितेंद्रनाथ महाराज यांच्या उपस्थितीत विश्वमांगल्य संस्कार ‘कॉरिडोर’चा आराखडा तयार; पर्यटन वाढणार गेल्या काही वर्षामध्ये महोत्सवाला पर्यटनाची साथ देण्यात आल्याने आता उपस्थितांची संख्या अडीच लाखांवर जाऊन पोहोचली आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढणार असल्याने याठिकाणी ‘कॉरिडॉर’ विकसित करण्याचे ठरवले आहे. श्री क्षेत्र कौंडण्यपुरसह शेजारचे धामंत्री, अहीरपूर, हनुमानजींचे जागृत देवस्थान असलेले जहागीरपूर आणि राजराजेश्वर माऊली सरकारचा आश्रम अशा स्थळांचा प्रस्तावित कॉरिडोरमध्ये समावेश करण्यात आला आहे.
महावितरणने खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. अनेक महिला व पुरुष खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. कोणत्याही सांघिक खेळ प्रकारात खेळाडूंमधील परस्पर सहकार्य, समन्वय व विश्वास या त्रिसुत्री शिवाय विजय शक्य होत नाही. त्यामुळे खेळाडूंमध्ये प्रथम संघभावना निर्माण होणे आवश्यक आहे. महावितरणच्या दरवर्षी होणाऱ्या राज्य क्रीडा स्पर्धा या महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी एकजुटीचा व संघभावनेचा संस्कार आहे, असे प्रतिपादन संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले. अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता अशोक साळुंके, प्रमुख पाहुणे म्हणून कोकणचे सहव्यस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे, प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंते सुहास रंगारी, दिलीप दोडके, स्वप्नील काटकर, चंद्रमणी मिश्रा, संजय पाटील, राजेश नाईक, अरविंद बुलबुले, संजीव भोळे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, महाव्यवस्थापक राजेंद्र पांडे, प्राचार्य श्रीनिवास देशपांडे यांची उपस्थिती होती. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत महावितरणच्या १६ परिमंडलाच्या संयुक्त आठ संघातील सुमारे ११७० महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले आहेत. या खेळाडूंनी संचलन करून पाहुण्यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजन समितीचे अध्यक्ष व मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी केले. संचालन क्षिप्रा मानकर व विजय पांडे यांनी केले तर मधुसूदन मराठे यांनी आभार मानले. या क्रीडा स्पर्धेत २२ खेळ प्रकारातील सामने रंगणार आहे. १०० मीटर स्पर्धेत प्रिया पाटील, वसावेंची बाजी अतिशय चुरशीच्या १०० मीटर धावस्पर्धेत पुरुष गटात गुलाबसिंग वसावे (पुणे-बारामती) यांनी सुवर्ण पदक तर साईनाथ मसाणे (सांघिक कार्यालय-भांडूप) यांनी रौप्यपदक पटकावले. तर महिला गटात प्रिया पाटील (सांघिक कार्यालय-भांडूप) यांनी सुवर्णपदक तर श्वेतांबरी अंबादे (नागपूर-चंद्रपूर-गों दिया) यांनी रौप्यपदक मिळवले. विजेत्यांना संचालक राजेंद्र पवार यांच्याहस्ते सुवर्ण व रौप्यपदक प्रदान करण्यात आले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमल रामकृष्ण गवई यांना डी.लीट. ही सर्वोच्च पदवी घोषित करण्यात आली आहे. डॉ. कमल गवई यांनी मानव विज्ञान विद्या शाखेतील राज्यशास्त्र विषयात ‘विपश्यना : एक चिकित्सक अभ्यास’ यावर संशोधन केले आहे. या उपलब्धीबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी डॉ. कमल गवई यांच्या निवासस्थानी जावून त्यांचा विद्यापीठाच्या वतीने सत्कार केला. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी, आचार्य कक्षाच्या उपकुलसचिव मिनल मालधुरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर पायस, दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष किर्ती अर्जुन आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या येत्या दीक्षांत समारंभामध्ये डॉ. कमल गवई यांना डी.लीट. पदवी देवून त्यांना सन्मानित केले जाणार आहे. डॉ. कमल गवई या ज्येष्ठ आंबेडकरी नेते, महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी उपसभापती, माजी खासदार, माजी आमदार तसेच बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे माजी राज्यपाल दिवंगत रा.सु. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या धर्मपत्नी आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश न्या. भूषण गवई यांच्या त्या मातोश्री आहेत. डॉ. कमल गवई यांनी राज्यशास्त्र विषयात एम.ए. केले आहे. २००७ मध्ये राजकारण व प्रशासन विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी डी.एड., बी.एड., शिलाई, हस्तकला, पशु दुग्ध व्यवसाय व शेती व्यवसाय आदी व्यावसायिक शिक्षण सुद्धा घेतले आहे. त्यांचे पुढील शिक्षण पती रा.सु. गवई यांच्या प्रेरणेने लग्नानंतर झाले आहे. त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, खेळ व क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय सहभाग राहिला आहे. त्यांनी विविध क्षेत्रात अनेक महत्वपूर्ण पदे भूषवली आहेत. त्या विविध व्यवस्थापन समित्यांवर अध्यक्ष, सभासद व संचालक म्हणून कार्य करीत आहेत. राष्ट्रीय सेवेमध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला आहे. त्यांनी अमेरिका, इंग्लंड, रशिया, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, जपान, जर्मनी, श्रीलंका, विएतनाम, थायलंड, स्विझरलँड, हाँगकाँग आदी देशात शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी दौरे केले आहेत. डॉ. कमल गवई यांनी मूल्यातून निपजलेले रत्न, कल्याणी महिला विकास प्रबोधिनी, कमलांजली, दिपस्तंभ, आंबेडकरी चळवळीतील एक संघर्ष पर्व, राजकीय परिपक्वतेचे प्रतिक, महाराष्ट्र भूषण रा.सु. गवई आदर्श आणि कर्तृत्व, साप्ताहिक रिपब्लिकन संदेशाच्या माध्यमातून अनेक विशेषांक, जनजागरण उपक्रम, माजी लेडी गव्हर्नर बिहार, सिक्कीम, केरळ, कुटुंबश्री उपक्रम, बिहार स्वच्छता अभियान आदी पुस्तके लिहिली आहेत. त्यांना १९६९ चा साहित्य अकादमी पुरस्कार, कृषी शेती पुरस्कार, वृक्षमित्र पुरस्कार, कृषीमित्र पुरस्कार, २००७ चा महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले पुरस्कार, डॉ. कमल गवई यांना डी.लीट. पदवी घोषित झाल्याबद्दल त्यांचे सार्वत्रिक अभिनंदन होत आहे.
केंद्र शासनाने घोषीत केलेल्या दरानुसार मका खरेदी केंद्र सुरू केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ही केंद्र सुरू झाली नाहीत. त्यामुळे मेळघाटमधील मका उत्पादकांनी बुधवारी आदिवासी विकास विभागाच्या धारणी येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनाच्या शेवटी प्रकल्प संचालकांना निवेदन देण्यात आले. मका पिकाला हमी भाव मिळण्यासाठी सरकारी खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून हे शेतकरी आंदोलन करत होते. वेगवेगळ्या टप्प्यांवर आंदोलने केल्यानंतर प्रशासनाने पाठपुरावा करुन दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार चुर्णी, गौलखेडा बाजार येथे केंद्र सुरू केल्याचे दर्शवण्यात आले. परंतु प्रत्यक्षात ना नोंदणी ना खरेदी यामुळे आदिवासींना पुन्हा खुल्या बाजारातच कमी दराने मक्याची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे आज अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत धारणी येथे आंदोलन केले. या आंदोलनात ॲड. बी. एस. साने, राजू चिमोटे, जवाहर मावस्कर, अविनाश बेलसरे, रामदास भिलावेकर व इतर शेतकरी सहभागी झाले होते. धारणी तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी हे आदिवासी व अल्पभूधारक असून ते प्रामुख्याने मका शेतीवर अवलंबून आहेत. यावर्षी मका उत्पादन चांगले झाले असले तरी शासनाने खरेदी केंद्र सुरु न केल्याने शेतकऱ्यांना मका व्यापाऱ्यांकडे कमी दराने विकावा लागत आहे. केंद्र शासनाने मका पिकाला २४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना तो दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. म्हणून धारणी व चिखलदरा तालुक्यात तात्काळ मका खरेदी केंद्र सुरु करून शेतकऱ्यांना हमी भावाने मका विक्रीची संधी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय जी केंद्र सुरु केल्याचे कागदावर दर्शवण्यात आले, तीही सुरळीत करावी, याचाही आग्रह यावेळी धरण्यात आला. मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची सोय उपलब्ध आहे. परंतु ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांना राहुटी भत्ता दिला जातो. परंतु गेल्या काही महिन्यांपासून हा भत्ता न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शिवाय वसतिगृहात राहणारे व वसतिगृहाबाहेर राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कमही मिळाली नाही, अशी संबंधितांची तक्रार आहे. यासंदर्भात त्यांनी आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्तांना निवेदन दिले आहे.
मजीप्राचे सेवानिवृत कर्मचारी वेतनापासून वंचित:कर्मचारी महासंघाने दिले निवेदन
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथील कार्यरत तसेच सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांचा मागील महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील महिन्याचे वेतन तत्काळ द्यावे. या मागणीला घेऊन बुधवारी महाराष्ट्र जलसेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण येथील मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आक्टोबर २०२५ च्या वेतन व भत्त्यांची आजवर अदायगी झालेली नाही. दिवाळीचे पगार व १२ नोव्हेंबर यामध्ये साधारणतः ४० दिवसांचा कालावधी लोटून गेलेला आहे. यामुळे सेवानिवृत्त व कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना आर्थिक झळ पोहचत आहे. त्यामुळे या परिस्थितीचा विचार करता वेतनाची अदायगी तात्काळ करावी. यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठपुरावा करावा. ज्यामुळे पुढे अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. अन्यथा महासंघाला संपूर्ण राज्यभर आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल. असा इशाराही महासंघाने निवेदनातून दिला आहे. यावेळी अरविंद परदेशी, विजय गाडगे, सुरेश चारथळ, अशोक टाले, गणेश बीजागरे, अरविंद हिरुळकर, गजानन साखरे, सतीश बोरेकर, मुजफ्फर हुसेन, एस. बी. पाटील, आर. के. डागा, बी. एस. खेडकर, साहेबराव राठोड, रामदास बोबडे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.

29 C