समाजातील रूढी-परंपरांमुळे अनेकदा उपेक्षित ठरणाऱ्या एकल, विधवा व परित्यक्त्या महिलांना सन्मानाचे स्थान देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ‘हळदी-कुंकू’ उपक्रमाच्या माध्यमातून एक नवे सामाजिक पर्व सुरू केले आहे. सामाजिक समावेशकतेचा संदेश देणारा हा उपक्रम महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणाला दिशा देणारा आहे. सामान्यतः एकल अथवा विधवा महिलांना समाज हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांपासून दूर ठेवतो. त्यांना मंगलमय धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. अशा एकल महिलांसाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक जिल्हाभर हळदी-कुंकू मेळाव्यांचे आयोजन करून त्यांच्या आत्मसन्मानाला नवे बळ दिले आहे. या माध्यमातून सण-उत्सवांच्या आनंदात त्यांचा सन्मानपूर्वक सहभाग निश्चित करण्यात आला. एकाच छताखाली समन्वय जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा परिषद, महिला व बालविकास विभागंातर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. २५ हजार महिलांचे सर्वेक्षण गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५,७३२ एकल महिला असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने सुनियोजित कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. उमेद अभियानांतर्गत कार्यभांडवल, समुदाय गुंतवणूक निधी व बँक लिंकेजद्वारे स्वयंरोजगारासाठी साहाय्य, संजय गांधी निराधार योजना व इतर माहिती देण्यात आली. मेळाव्यात धनादेशांचे वाटप समाजकल्याण सभागृह, गडचिरोली येथे नुकत्याच झालेल्या गडचिरोली तालुक्यातील मेळाव्यात स्मिता चौधरी, बहिणाबाई आत्राम, विमल मडावी व शशिकला दुमाने या एकल महिलांना त्यांच्या व्यवसायासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.
महापालिकेत मोठा विजय मिळाल्यानंतर निवडणुकीसाठी कायम अॅक्शन मोडवर असलेल्या भाजपने जिल्हा परिषदेची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ६२ गट आणि पंचायत समितीच्या १२६ जागांसाठी तब्बल ९५० जणांनी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष संजय खंबायते आणि उत्तरचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी पक्षाला माहिती सादर केली. इच्छुकांची संख्या मोठी असली तरी भाजप युतीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे प्रयत्न करणार असल्याचे संजय खंबायते यांनी सांगितले. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील न. प. आणि महापालिका निवडणुकीत युती झाली नसल्यामुळे या युतीची शक्यता धूसर वाटत आहे. जिल्हा परिषदेसाठी सर्वच पक्षांनी त्यांच्या बैठका मुलाखती घेत निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यामध्ये सर्वाधिक भाजपकडे उमेदवारी अर्ज आल्याचे चित्र आहे. आघाडी करण्याचे विरोधकांचे प्रयत्न: महाविकास आघाडीत सर्वच पक्षांना जोरदार पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आता वंचितसह महाविकास आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सर्व पक्ष एकत्र आले तरच विजय मिळू शकतो, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. त्यामुळे काँग्रेसनेही यासाठी पुढाकार घेतला असल्याचे सांगण्यात आले. वंचितच्या कार्यालयावर जिल्हा परिषदेसाठी मोठी गर्दी वंचित बहुजन आघाडीला मनपात मिळालेल्या यशानंतर जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. शहर जिल्हा पक्ष कार्यालयामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रभारी अरुंधती शिरसाट यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आल्या. आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ८२ तर पंचायत समितीसाठी १७० उमेदवारांचे अर्ज आले आहेत. या वेळी योगेश बन,रामेश्वर तायडे, रूपचंद गाडेकर, पंकज बनसोडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. एमआयएम १२ जिल्ह्यांत निवडणूक लढणार : नासेर सिद्दिकी छत्रपती संभाजीनगरसह १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय केल्याची घोषणा एमआयएमचे नेते नासेर सिद्दिकी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात परिषद झाली. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत एमआयएमचे १२५ नगरसेवक निवडून आले आहेत. शहरी भागातील या यशाने उत्साहित होऊन पक्षाने आता प्रथमच ग्रामीण भागातील निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पक्ष कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या वेळी माजी जिल्हाध्यक्ष शेख अहमद, शारेक नक्षबंदी आणि माजी नगरसेवक विकास एडके यांची प्रमुख उपस्थिती होती. या माध्यमातून नाराज उमेदवारांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. मनपा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर एमआयएमने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. वंचित आघाडीने काँग्रेसला प्रस्ताव दिला : किरण पाटीलकाँग्रेसने जिल्हा परिषदेसाठी १३६, पंचायत समिती २४५ जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत, तर मंुबईत रविवारी सर्व जिल्हाध्यक्षांना बोलावून आघाडी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आघाडी करण्यासाठी आमचे प्राधान्य असेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उबाठा यांच्यासोबत आघाडी असणार आहे. वंचित बहुजन आघाडीने प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे त्यांंनाही सोबत घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
महानगरपालिकांच्या निकालांनी राज्याला चकित केले आहे. या निवडणुकीत केवळ प्रस्थापित नेत्यांनाच कौल मिळाला नाही, तर विविध गंभीर गुन्ह्यांखाली तुरुंगात असलेल्या उमेदवारांनीही दणदणीत विजय मिळवला आहे. हे पाहिल्यानंतर आजचे राजकारण सज्जनांचे राहिलेच नाही असे वाटते. अर्थात यात गुन्हेगारांची तरी काय चूक? राजकीय पक्षांनी त्यांना तिकिटच दिले नसते तर ते उमेदवार झालेच नसते. राजकीय पक्षांना उमेदवार म्हणून […] The post गजाआडचे महापालिकेत! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विविध संघटना पदाधिकारी यांच्याशी साधला संवाद
लातूर प्रतिनिधी : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रविवार दि. १८ जानेवारी रोजी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेले काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटी घेत संवाद साधला. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत […] The post विविध संघटना पदाधिकारी यांच्याशी साधला संवाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बनावट देशी व परराज्यनिर्मित विदेशी मद्याच्या साठ्यावर धाड
लातूर : प्रतिनिधी गुप्त माहितीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार बनावट देशी मद्याचा व परराज्यातील विदेशी मद्याचा साठा असल्याचे समजल्याने जिल्ह्यातील मौजे पानगाव ता. रेणापूर जि. लातूर येथील एका इसमाच्या पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता देशी दारू भिंगरी संत्रा ९० मि.ली. क्षमतेच्या एकूण ४ हजार ३०० बॉटल प्रथमदर्शनी बनावट मिळून आल्या व गोवा राज्यातील १८० मि.ली. […] The post बनावट देशी व परराज्यनिर्मित विदेशी मद्याच्या साठ्यावर धाड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सरकारकडून ओबीसी आरक्षणाचे लचके तोडले गेले : प्रकाश शेंडगे
लातूर : प्रतिनिधी राज्य शासनाने विविध जीआरच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचे लचके तोडण्याचे काम केले आहे, असा घणाघाती आरोप ओबीसी बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी रविवारी लातुरात पत्रकार परिषदेत बोलताना केला. राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण या आघाडीची स्थापना केल्याचे सांगत शेंडगे म्हणाले की, एकंदर राजकीय […] The post सरकारकडून ओबीसी आरक्षणाचे लचके तोडले गेले : प्रकाश शेंडगे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘जागल’मधून साहित्याची ओळख होऊन रूची वाढेल
अहमदपूर : प्रतिनिधी सद्य: स्थितीत समाजातील तरुण दिशाहीन बनला असून तो सोशल मीडियाकडे ओढला गेल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ग्रामीण भागातील तरुणांना साहित्य माहीत व्हावे, या हेतूने ग्रामीण भागात ‘जागल’ एक दिवसीय साहित्य संमेलनात सहभागी होऊन मराठी साहित्याविषयी रुची वाढेल, असे आग्रही प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले. किनी कदू येथील ‘बसवसृष्टी’, […] The post ‘जागल’ मधून साहित्याची ओळख होऊन रूची वाढेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सर्वच पक्षांकडे इच्छूक उमेदवारांची भाऊगर्दी
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच संपूर्ण ज् ियात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निवडणुकीच्या घोषणेमुळे सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले असून प्रत्येक मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दीर्घ काळानंतर होत असलेल्या या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तर नेत्यांमध्ये रणनीती आखण्याची धावपळ सुरू झाली आहे. जिल्हा व […] The post सर्वच पक्षांकडे इच्छूक उमेदवारांची भाऊगर्दी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वसमत शहरालगत भरधाव कार कालव्यात पडली:दैव बलवत्तर म्हणून कार मधील दोघेही बालंबाल बचावले
वसमत ते परभणी मार्गावर वसमत शहरापासून काही अंतरावर भरधाव वेगाने धावणारी कार कालव्यात पडल्याने रविवारी तारीख 18 रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास मोठा अपघात झाला. दैव बलवत्तर असल्याने कार मधील दोघेही बचावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील खांडेगाव येथील शिवराज रामराव तिमेवार (३०) हे त्यांचा मित्र विनायक जगदीश दवणे (२०) यांच्यासोबत त्यांच्या कारने वसमत कडून खांडेगाव कडे निघाले होते. भरधा वेगाने धावणारी कार वसमत शहरापासून काही अंतरावर असलेल्या कालव्याजवळ आली असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे कार थेट कालव्यात कोसळली. विशेष म्हणजे कालव्याला असलेले कठडे तुटलेले असल्यामुळे कुठेही अडथळा निर्माण झाला नाही. दरम्यान सदरील कार सुमारे पंधरा ते वीस फूट खोल कालव्यात कोसळली. कालव्यामध्ये पाण्याचा प्रवाह कमी असल्यामुळे शिवराज व विनायक दोघांनी प्रसंगावधान राखून कारचा दरवाजा उघडून बाहेर पडले. कार पासून काही अंतरावर येऊन ते कालव्यावर आले. सुदैवाने त्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. मात्र किरकोळ मुक्कामार लागल्यामुळे दोघेही उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर दोघेही रुग्णालयातून निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार गजानन भोपे, बेंगाळ, प्रशांत मुंढे, यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्यामुळे पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान कालव्यात पडलेली कार क्रेनची मदत घेऊन बाहेर काढली जाणार असल्याचे पोलीस विभागाच्या सूत्रांनी सांगितले. रात्री उशीर झाल्यामुळे कार बाहेर काढण्याचे काम सोमवारी तारीख १९ हाती घेतली जाणार असल्याचे पोलीस विभागाच्या सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारची नोंद झाली नसल्याची पोलिसांनी स्पष्ट केले. देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय अपघातातील या दोघांना आज आल्याचे बोलले जात आहे.
12 सौर प्रकल्पांतून 59 मेगावॅट वीज निर्मिती:20,225 शेतकऱ्यांना लाभ, दिवसा सिंचन झाले शक्य
अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार २२५ शेतकऱ्यांना लाभ पोहोचवणारे १२ सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या प्रकल्पांमधून एकूण ५९ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. या मालिकेतील बारावा प्रकल्प नुकताच सुरू झाला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य झाले आहे. चांदूर बाजार तालुक्यातील जवर्डी येथे हा बारावा प्रकल्प उभारण्यात आला आहे. १० मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प ४० एकर जमिनीवर पसरलेला आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महावितरणच्या ३३ केव्ही तोंडगाव उपकेंद्राला जोडण्यात आली आहे. या उपकेंद्रातून निघणाऱ्या चार कृषी वाहिन्यांमुळे अचलपूर तालुक्यातील बेलज, बोरगाव मोहना, रामापूर, नारायणपूर, कविठा, कांडली, विठ्ठलपूर, तळेगाव, पिंपरी, मोचखेडा, आमलापूर, तोंडगाव आणि घोडगाव येथील १ हजार ८७४ शेतकऱ्यांना आता सौर ऊर्जेचा लाभ मिळत आहे. जवर्डी प्रकल्पाचे लोकार्पण महानिर्मितीचे मुख्य अभियंता श्याम राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे आणि धीरज गादे उपस्थित होते. महानिर्मिती कंपनीने महावितरणसाठी विदर्भात उभारलेला हा दुसरा आणि जिल्ह्यातील पहिला मोठा सौर प्रकल्प आहे. मुख्य अभियंता श्याम राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांनी स्पष्ट केले की, डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेंतर्गत ९० विकेंद्रीत सौर प्रकल्प उभारून एकूण ३२८ मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट गाठले जाईल. या सौर ऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना आता दिवसा सिंचन करणे सहज शक्य झाले आहे. पूर्वी विजेच्या अनुपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना वन्यजीवांचा धोका पत्करून रात्री-बेरात्री शेतावर जाऊन सिंचन करावे लागत होते, ज्यामुळे अनेकदा संघर्ष आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होत होते. आता या समस्या दूर झाल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कार्यान्वित झालेल्या इतर सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये कापूसतळणी (५ मेगावॅट), डाबका (५ मेगावॅट), धारणी (११ मेगावॅट), शेंदुरजना बाजार (३ मेगावॅट) आणि भातकुली (४ मेगावॅट) येथील प्रकल्पांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, जळगाव दस्तगीर, अनकवाडी (मोझरी), उसळगव्हाण (देवगाव) आणि पिंप्री निपाणी (पापळ) येथे प्रत्येकी ३ मेगावॅटचे प्रकल्प आहेत.
खासदार बळवंतराव वानखडे यांनी अचलपूर येथे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष खुर्शीदा बानो अताशाह आणि स्वीकृत नगरसेवक अ. मुजीब यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना वानखडे यांनी काँग्रेस पक्ष शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करेल, असा विश्वास व्यक्त केला. काँग्रेस हा नेहमीच जनतेच्या पाठिशी उभा राहणारा आणि सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेणारा पक्ष आहे. याच कारणामुळे जनतेने पक्षाला सक्रिय पाठिंबा देत जिल्ह्यात दोन नगराध्यक्ष आणि चार उपनगराध्यक्ष पदे दिली आहेत, असे वानखडे म्हणाले. हा सत्कार सोहळा खासदार बळवंतराव वानखडे आणि काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंचावर अचलपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्रीकांत झोडपे, परतवाडा शहर अध्यक्ष राहुल गवई, तालुका अध्यक्ष नामदेवराव तनपुरे, माजी नगरसेवक मेहरूलाभाई, आत्ताशाहभाई आदी मान्यवर उपस्थित होते. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसने दर्यापूर आणि चिखलदरा येथील नगराध्यक्षपद जिंकले आहे. याशिवाय धारणी, चिखलदरा, दर्यापूर आणि अचलपूर येथे उपनगराध्यक्ष पदेही प्राप्त केली आहेत. खासदार वानखडे यांनी काँग्रेसच्या ऐतिहासिक योगदानावरही प्रकाश टाकला. ते म्हणाले की, काँग्रेस हा देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असलेला जुना पक्ष आहे. स्वातंत्र्यानंतर देशात अनेक गोष्टींची कमतरता असतानाही काँग्रेसने औद्योगिक क्रांती, धवल क्रांती, कृषी क्रांती आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती साधली. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सांगितले की, काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष विचारधारेवर चालणारा आणि सर्वसमावेशक राजकारण करणारा पक्ष आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने चार नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले होते, त्यापैकी दोन ठिकाणी थेट विजय मिळवला. उर्वरित ठिकाणी सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने उपाध्यक्षपदही काँग्रेसकडेच आले. हे जनतेच्या विश्वासाचे द्योतक असून, दोन नगराध्यक्ष आणि चार उपनगराध्यक्षांसह काँग्रेस हा जिल्ह्यात सर्वाधिक उपनगराध्यक्षपद प्राप्त करणारा पहिला पक्ष ठरला आहे, असे देशमुख यांनी नमूद केले.
युवासेना शहरप्रमुखाचा पदाचा राजीनामा:अंजनगाव सुर्जी स्वीकृत सदस्य निवडीत आर्थिक व्यवहाराचा आरोप
नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीत वरिष्ठांकडून आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करत शिवसेना (उबाठा) युवासेना शहर अध्यक्ष अक्षय गवळी यांनी १८ जानेवारी रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. स्थानिक विश्रामगृह येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही अधिकृत घोषणा केली. नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर तब्बल २५ दिवसांनी अंजनगावमध्ये उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, शिवसेना (उबाठा) कडे पुरेसे संख्याबळ असतानाही स्वपक्षाचा उमेदवार न निवडता उपाध्यक्षपदासाठी भाजपाला समर्थन देण्यात आले होते. या चर्चेनंतर आता स्वीकृत नगरसेवक निवडीतून नव्या वादाला तोंड फुटले आहे. गवळी यांच्या मते, स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांनी स्वतः (अक्षय गवळी), राजेंद्र टांक, राजेंद्र पाटील आणि पंकज मोदी यांनी अर्ज दाखल केले होते. पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शब्द दिल्याने ते निश्चिंत होते. मात्र, ऐनवेळी नव्या नावाचा प्रस्ताव पुढे येत पंकज मोदी यांची निवड झाल्याचे गवळी यांचे म्हणणे आहे. या घडामोडीमुळे पक्षात प्रामाणिक कार्यकर्त्यांची किंमत शून्य झाली असून, या संपूर्ण प्रक्रियेत कुठेतरी आर्थिक व्यवहार झाला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. या घडामोडींनंतर शिवसेना (उबाठा) मध्ये मोठी गळती लागणार का, असा प्रश्न आता उघडपणे उपस्थित झाला आहे. पक्षातील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आल्याने आगामी काळात याचे गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. अंजनगाव सुर्जीच्या स्थानिक राजकारणात नव्या वादळाचा स्पष्ट इशारा या घटनेतून मिळाला आहे. या आरोपांवर युवासेना, शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख अंकुश कवाडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अक्षय गवळी यांना सलग चार वेळा युवा सेनेचे शहर अध्यक्षपद देऊन नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक पदाकरिता उमेदवारी सुद्धा दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला असे म्हणता येणार नाही. त्यांनी राजीनामा देण्यापूर्वी श्रेष्ठींसोबत या विषयावर चर्चा करायला पाहिजे होती. आर्थिक व्यवहाराबाबतचा त्यांचा आरोप निखालस खोटा असून, आमच्या पक्षात असा कुठलाच प्रकार होत नाही.
अमरावती शहरात मकर संक्रांतीनिमित्त सुरू असलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांदरम्यान दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावल्याच्या घटना घडल्या आहेत. रविवारी सायंकाळी घडलेल्या या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण १ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी बडनेरा आणि राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयपथनगर, एसओएस शाळेजवळ घडली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास ५७ वर्षीय महिला घराजवळून जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ४ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केल्याने चेनचे पेंडंट खाली पडले, मात्र चोरट्यांनी उर्वरित चेन घेऊन पळ काढला. या चेनची अंदाजे किंमत २० हजार रुपये आहे. दुसरी घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तविहार कॉलनी परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास घडली. ३८ वर्षीय महिला आपल्या मैत्रिणीसोबत हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला जात असताना, काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ६ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लुटला. महिलेने आरडाओरड करून चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पसार झाले. विशेष म्हणजे, या दोन्ही घटना सुमारे अर्ध्या तासाच्या अंतराने घडल्या आहेत. चोरट्यांची कार्यपद्धती समान असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. बडनेरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुमेध सोनोने आणि राजापेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे या प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत. या घटनांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस विभागाने महिलांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हळदी-कुंकू तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रम आणि गर्दीच्या ठिकाणी जाताना सोन्याचे दागिने घालणे टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच, सोबत कुणी नसल्यास महिलांनी एकट्याने प्रवास करणे टाळावे आणि आवश्यक असल्यास अधिक काळजी घ्यावी, असेही पोलीस विभागाने म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टी विकास कामांच्या जोरावर आपले कर्तृत्व सिद्ध करत आहे .अमुक एखादा उमेदवार माझ्याजवळचा म्हणून त्याला तिकीट दिले जाणार नाही .सातारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागामध्ये गटातटाचे राजकारण न पाहता सर्वसमावेशक आणि जिंकण्याची क्षमता असणारा उमेदवार दिला जाईल अशी स्पष्ट ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली . सातारा येथील लेक व्ह्यू हॉटेलमध्ये उमेदवारांच्या मुलाखतीचे दुसऱ्या दिवसाचे सत्र पार पडले दोन दिवसांमध्ये तब्बल बाराशे उमेदवारांनी आपली राजकीय इच्छा जाहीर केली आहे . या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यांमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाने चौदाशे हून अधिक नगरसेवक 25 नगरपालिकांमधून निवडून आणले आहेत त्यात यशाची आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पुनरावृत्ती करावयाची आहे .येथे गटातटाचे कोणतेही राजकारण नाही तसेच कोणी कोणाच्या जवळचा असेही काही नाही .गटातटाच्या राजकारणाला विराम देऊन सर्वसमावेशक आणि जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार दिला जाईल .जो उमेदवार निश्चित होईल त्याच्या मागे सर्वांनी एकजूट पणे उभे राहून भारतीय जनता पार्टीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे आवाहन शिवेंद्रसिंह राजे यांनी केले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आमदार मनोज घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष कराड दक्षिणचे आमदार डॉ अतुल भोसले निवडणूक प्रभारी धैर्यशील कदम, सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, कार्यकारणी सदस्य धनाजी पाटील,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास गोसावी, विठ्ठल बलशेठवार, माजी आमदार मदन भोसले इत्यादी उपस्थित होते . ना. जयकुमार गोरे म्हणाले भारतीय जनता पार्टी आता कोणाच्या सांगण्यावरून थांबणारी पार्टी नाही. कार्यकर्त्यांनी अभेद्य एकजूट दाखवून आपापल्या गटातील उमेदवार निवडून आणावयाचे आहेत पाटण तालुक्यामध्ये मोठ्या शक्तीशी आपला संघर्ष आहे .तेथे निधी कमी पडू दिला जाणार नाही .पालकमंत्री कोणीही असो तेथील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निश्चित ताकद दिली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पाठीशी आहेत असे थेट आव्हान जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दिले . जयकुमार गोरे व शिवेंद्रसिंह राजे यांची कमराबंद बैठक शिवेंद्रसिंह राजे व जयकुमार गोरे या दोन कॅबिनेट मंत्र्यांची लेक व्ह्यू हॉटेलच्या दालनामध्ये कमरा बंद बैठक झाली ही बैठक सुमारे वीस मिनिटे सुरू होती .सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपने कोणती रणनीती राबवायची तसेच गटाचे उमेदवार देताना कशा पद्धतीने परिस्थिती हाताळायची या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे मात्र या माहितीला दुजोरा मिळू शकला नाही .
अडीच वर्षे महापौरपदाचा प्रस्ताव!
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील नगरसेवकांना संपर्क साधला जात असल्याची चर्चा आहे. ठाकरेंच्या संपर्कामुळे शिवसेनेचे नगरसेवक मुंबईतील ताज लँडसमध्ये ठेवण्यात आले आहेत, असे सांगितले जात आहे. त्यातच महायुतीला काठावर बहुमत मिळाल्याने बार्गेनिंग पॉवर वाढल्याने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपकडे अडीच वर्षे महापौरपदाची मागणी करण्यात आल्याच्या चर्चा आहे. […] The post अडीच वर्षे महापौरपदाचा प्रस्ताव! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल १६ जानेवारीला जाहीर झाला. मात्र, महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले नसल्यानं गोंधळाचे वातावरण कायम आहे. नियमित प्रक्रियेप्रमाणे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महापौरपदाचे आरक्षण जाहीर केले जाते. यावेळी आरक्षण जाहीर झाले नसल्याने गोंधळात भर पडली आहे. त्यातच महापौर आरक्षण सोडत आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री […] The post महापौर आरक्षण सोडत लांबली! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारताने सामन्यासह मालिका गमावली
इंदूर : न्यूझीलंड क्रिकेट टीमने इतिहास घडवला आहे. न्यूझीलंडने टीम इंडिया विरूद्धच्या तिस-या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात भारतावर ४१ धावांनी मात केली आहे. न्यूझीलंडने भारतासमोर ३३८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला या धावांचा पाठलाग करताना ५० षटकंही खेळता आली नाहीत. न्यूझीलंडने भारताला २४ बॉलआधी ऑलआऊट केले. न्यूझीलंडने भारताचा डाव ४६ षटकांत २९६ धावांवर गुंडाळला. […] The post भारताने सामन्यासह मालिका गमावली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील 'ताज लँडस् एन्ड' या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. आज त्यांनी या नगरसेवकांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी शिंदेंनी संवाद साधला आहे. शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? शिवसेनेला लोक घाबरतात. नवीन नगरसेवकांना आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी हॉटेलमध्ये एकत्र ठेवले होते. ओळखी पाळखी, बोलणे-चालणे, काम कसे करायचे, जुने नगरसेवक कसे काम करत होते, त्यांचे अनुभव, निधीची तरतूद कशी करायची यावर आम्ही चर्चा केली. मला यांना भेटायचे होते. निवडणुकीत ते व्यस्त होते आणि इकडे जरा त्यांना वेगळा आनंद म्हणून हॉटेलमध्ये बोलावले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबईत 29 नगरसेवक आम्ही निवडून आणले आहेत. जनतेचा हा आशीर्वाद आहे. लोकांनी आमचे काम स्वीकारले आहे आणि उबाठाचे नाकारले आहे. मुंबईचा महापौर महायुतीचा होईल. त्यांना त्यांची भीती आहे, त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत बहुमतासाठी आवश्यक 114 हा आकडा गाठण्यासाठी भाजपकडे 89 जागा असल्याने त्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मदत घेणे अपरिहार्य ठरले आहे. या स्थितीचा फायदा घेत शिंदे गटाकडून महापौरपदाचे अडीच-अडीच वर्षांचे सूत्र आणि स्थायी समितीसह अन्य महत्त्वाच्या समित्यांमध्ये प्रभावी प्रतिनिधित्वाची मागणी केली जाण्याची दाट शक्यता आहे. सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या या अटी-शर्तींच्या राजकारणामुळे आणि संभाव्य वाटाघाटींमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत असून, महायुतीमधील सत्तेचे हे समीकरण नेमके कसे जुळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावरच आता बीडच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. संगीता ठोंबरे यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का बसला आहे. तसेच संगीता ठोंबरे यांच्या पक्षप्रवेशाने बीडमध्ये शिंदे गटाची ताकद वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. संगीता ठोंबरे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मध्यस्थीने शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी संगीता ठोंबरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याची चर्चा सुरू आहे. संगीता ठोंबरे या एकेकाळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी मानल्या जात होत्या. केज मतदारसंघातून संगीता ठोंबरे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी देण्याऐवजी नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे संगीता ठोंबरे नाराज झाल्या होत्या. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिल्यानंतर संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी माघार घेत थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत त्यांनी शरद पवार गटात अधिकृत प्रवेश केला होता, ज्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे मानले जात होते. मात्र, आता संगीता ठोंबरे यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ऐन राजकीय घडामोडींच्या काळात त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शरद पवार गटाला केज मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. ठोंबरे यांच्या या सत्तेतील पक्षासोबतच्या प्रवेशामुळे मतदारसंघातील राजकीय गणिते पुन्हा एकदा बदलली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा कोणाला फायदा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत ७ जवान जखमी
किश्तवाड : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे रविवारी दुपारी झालेल्या दहशतवादी चकमकीत लष्कराचे ७ जवान जखमी झाले आहेत. अधिका-यांच्या माहितीनुसार, ३ जवानांना उपचारासाठी एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना किश्तवाडच्या वरच्या जंगली भागातील सोनार येथील आहे. येथे लष्कराच्या व्हाईट नाईट कोरचे दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन त्राशी-१’ सुरू आहे. याच दरम्यान जवानांची दहशतवाद्यांशी चकमक झाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार […] The post जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत ७ जवान जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी आज झ्युरिक येथे आगमन झाले. 5 दिवसांच्या आपल्या या दौऱ्यासाठी येताच मराठमोळ्या पद्धतीने त्यांचे उत्स्फूर्त पद्धतीने स्वागत करण्यात आले. पारंपरिक वेश, पारंपरिक पद्धती आणि पारंपारिक उत्साहात मराठीजनांनी केलेल्या स्वागताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. महाराष्ट्राचे राज्यगीत सुद्धा यावेळी सादर झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज दावोस येथे आगमन होताच मराठी भाषिक नागरिकांनी त्यांचे मराठमोळ्या पद्धतीने ओवाळून स्वागत केले. स्वित्झर्लंडमधील भारताचे राजदूत मृदुलकुमार यांनी देवेंद्र फडणवीस यांचे प्रारंभी स्वागत केले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि किंजारापू राम मोहन नायडू यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मार्गात आणि इतरही नागरिकांनी त्यांची भेट घेतली तेव्हा प्रत्येक जण महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करत होता. एकूणच महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीची धूम तेथेही पाहायला मिळाली. बृहन्महाराष्ट्र मंडळाकडून झालेल्या कार्यक्रमात 'स्वागत देवाभाऊ' असा फलक लागला होता. 'बृहन्महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड'तर्फे आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. राज्यात आपण महा-एनआरआय फोरम तयार केला असून, त्या माध्यमातून स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे सांगितले. कोणत्याही प्रगतीचा मूलभूत विचार हा सांस्कृतिक वैभव जपण्याचा असतो. त्यातूनच भौतिक प्रगती साध्य होत असते. आता मुंबईच्या विकासाचे आणखी ठोस नियोजन आपण हाती घेतले असून पुढच्या 5 वर्षात विकसित राष्ट्रांच्या राजधानींपेक्षा आपली मुंबई अधिक प्रगत असेल. कोणत्याही देशात जा, तेथे मराठी माणूस आज प्रगती करतो आहे. मेहनती आणि विश्वासार्ह हीच त्याची ओळख आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे समन्वयक अमोल सावरकर यांनी आज झ्युरिक येथे मराठी मंचाने स्वित्झर्लंडमधील विविध शाळांमध्ये मराठी भाषेचा वर्ग सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. या उपक्रमाचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले. दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी प्रवास सुरू, संजय राऊतांचा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या स्वागतावरून खोचक टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले, पंतप्रधान मोदी यांचे परदेशात स्वागत होते अगदी तसेच स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झुरिच येथे करण्यात आले ही प्रत्येक मराठी माणसाला सुखावणारी गोष्ट आहे, महापालिका निवडणुकीत भरघोस विजय प्राप्त केल्यानंतर फडणवीस यांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय!, असे त्यांनी म्हटले आहे.
लातेहार : झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील महुआडांड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ओरसा व्हॅलीत बस उलटून भीषण अपघात झाला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, मोठी जीवितहानी झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच महुआडांड पोलिस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस प्रशासनाकडून […] The post झारखंडमध्ये भीषण अपघात; ५ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
श्रेया पाचपासे हिने राष्ट्रीय पॅरा पावर लिफ्टिंग स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक
हिंगोली : उत्तराखंड राज्यातील रूरकी येथील कोअर विद्यापीठाच्या मैदानावर १६ ते १८ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या राष्ट्रीय पॅरा पावर लिफ्टिंग स्पर्धेत हिंगोलीतील श्रेया इंद्रजित उर्फ संदिप पाचमासे हिने सुवर्ण पदक पटकावले. श्रेया पाचमासे सध्या वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयात नववीमध्ये शिक्षण घेत आहे. राज्य स्तरावर झालेल्या पॅरा पावर लिफ्टिंग स्पर्धेत तिने उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. […] The post श्रेया पाचपासे हिने राष्ट्रीय पॅरा पावर लिफ्टिंग स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराणने केले जहाज जप्त, १६ भारतीय ताब्यात
नवी दिल्ली : इराणने आंतरराष्ट्रीय समुद्रात भारतीय क्रू सदस्य असलेल्या एका जहाजाला ८ डिसेंबर २०२५ रोजी जप्त केले होते. त्या जहाजावर १६ भारतीय क्रू सदस्य होते. या क्रू सदस्यांना इराणने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ८ डिसेंबरनंतर भारतीय क्रू सदस्यांबाबत त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. इराणमधून ६ हजार टन डिझेलची तस्करी केल्याचा आरोप करत […] The post इराणने केले जहाज जप्त, १६ भारतीय ताब्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र भागीदारी वाढवण्याबाबत अमेरिकेशी चर्चा
दावोस : अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अमेरिकेची महाराष्ट्रातील गुंतवणूक तसेच महाराष्ट्रातील व्यवसायांना अमेरिकेत संधी यावर चर्चा झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान व उत्पादन या विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र व अमेरिकेतील भागीदारी अधिक दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी लक्ष केंद्रीत […] The post महाराष्ट्र भागीदारी वाढवण्याबाबत अमेरिकेशी चर्चा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जागांसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर, मसूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक कुलदीप क्षीरसागर यांनी जलमंदिर येथे राजेंची भेट घेऊन आपली दावेदारी मांडली. या भेटीदरम्यान उमेदवारीची मागणी करताना क्षीरसागर यांनी, उमेदवारी द्या, नाहीतर फास घ्यायला दोरी द्या, अशी मिश्कील टिप्पणी केल्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. साताऱ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी ओढाताण सुरू आहे. मसूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक कुलदीप क्षीरसागर यांनी आता आपली दावेदारी प्रबळ केली आहे. यापूर्वी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती, मात्र उदयनराजेंच्या शब्दाखातर त्यांनी माघार घेतली होती. राजेंच्या प्रत्येक निवडणुकीत प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या क्षीरसागर यांनी आता जिल्हा परिषदेसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली उमेदवारी मागितली आहे. उदयनराजेंनाही हासू आवरेना जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे भोसलेंची भेट घेत असताना कुलदीप क्षीरसागर यांनी आपल्या खास शैलीत ही मागणी केली. आता उमेदवारी द्या, नाहीतर फास घ्यायला इथंच दोरी द्या, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी राजेंशी बोलताना केली. त्यांची ही उपरोधिक पण मजेशीर मागणी ऐकून खुद्द उदयनराजेंनाही आपले हसू आवरता आले नाही. निष्ठेची आणि जुन्या त्यागाची आठवण करून देत क्षीरसागर यांनी केलेल्या या विधानाची सध्या सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. एकमत झाले नाही तर स्वतंत्र लढण्यास मोकळे- शिवेंद्रसिंहराजे भोसले साताऱ्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीचे घटक पक्ष एकत्रित लढणार की स्वतंत्र, याबाबत राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यापूर्वी पार पडलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती, त्यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी महायुती काय रणनीती आखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले की, महायुतीत सर्वसहमतीने एकमत झाले तर चांगलीच गोष्ट आहे, मात्र तसे न झाल्यास सातारा जिल्ह्यात प्रत्येक पक्षाची स्वतःची मोठी ताकद असल्याने सर्वजण स्वतंत्रपणे लढायला मोकळे आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बोलावलेल्या समन्वय बैठकीला उपस्थित राहण्याबाबतचा निर्णय पक्षातील सर्व नेते एकत्रितपणे घेतील, असेही शिवेंद्रराजेंनी नमूद केले. मात्र, या बैठकीतून नेमके काय निष्पन्न होईल, याचा अंदाज वर्तवणे सध्या कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. जर जागावाटपाबाबत किंवा अन्य मुद्द्यांवर एकमत झाले नाही, तर प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीवर निवडणूक रिंगणात उतरेल, अशी रोकठोक भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यामुळे साताऱ्याच्या राजकारणात महायुतीमध्ये समन्वय राहणार की पुन्हा एकदा 'स्वबळाचा' नारा दिला जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
बद्रीनाथ, केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल फोनला बंदी
डेहराडून : बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरात परिसरात आता मोबाईल फोन नेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. गढवालचे विभागीय आयुक्तांच्या ध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भाविकांचे मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी मंदिर परिसराबाहेर योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरातील गर्भगृहात दर्शन घेतल्यावर भाविक तिथेच फोटो आणि सेल्फी काढण्यात व्यस्त […] The post बद्रीनाथ, केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल फोनला बंदी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संगमावर जाताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना पोलिसांनी रोखले
वाराणसी : मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर प्रयागराज येथे संगम नगरीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र, येथे एक मोठा वाद निर्माण झाला. पोलिसांनी ज्योतिर्पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या ताफ्याला संगम तीरावर जाण्यापासून रोखले, यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर संबंधित परिसर नो-व्हेइकल झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे, […] The post संगमावर जाताना शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना पोलिसांनी रोखले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भिका-याचे ३ बंगले, कार आणि व्याजाचा धंदा
इंदूर : आपण अनेकदा रस्त्यावर बसलेल्या भिका-यांकडे सहानुभूतीने पाहतो आणि त्यांना चार दोन पैसे देतो. मात्र, मध्य प्रदेशातील इंदूरमधून समोर आलेली बातमी वाचून तुमचा भिका-यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. सराफा बाजारात गेली अनेक वर्षे भीक मागणा-या मांगीलाल नावाच्या भिका-याचा रॉयल थाट उघड झाला असून, त्याच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. महिला व बालविकास विभागाने […] The post भिका-याचे ३ बंगले, कार आणि व्याजाचा धंदा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिवाळ्यात हृदयविकारासाठी आळस कारणीभूत
नवी दिल्ली : हिवाळ्यात आळस आणि आळशीपणामुळे लोकांची शारीरिक हालचाल कमी होते. याशिवाय या ऋतूत लोक अनेकदा गाजराची खीर, पराठे आणि पकोडे यासारखे पदार्थ जास्त खातात आणि व्यायाम करत नाहीत, ज्यामुळे शरीराची चयापचय क्रिया मंदावते, वजन वाढते आणि रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होऊ लागते. हिवाळयात, रक्त गोठण्याचा धोका ब-याचदा वाढतो. खरं तर, शरीरात हार्मोनल बदलांमुळे […] The post हिवाळ्यात हृदयविकारासाठी आळस कारणीभूत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईच्या महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, 'डॉन' अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी यांना मात्र या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निकालानंतर त्यांचे पती आणि प्रसिद्ध अभिनेता अक्षय वाघमारे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत योगिता यांच्या जिद्दीचे व त्यांनी दिलेल्या लढ्याचे मनापासून कौतुक केले आहे. पराभवाने खचून न जाता योगिता यांनी केलेल्या कष्टाचा आणि जनसेवेचा आपल्याला अभिमान असल्याचे अक्षयने या पोस्टमध्ये नमूद केले आहे. योगिता यांना भाजपचे उमेदवार रोहिदास लोखंडे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. योगिता यांच्या पराभवानंतर त्यांचे पती अभिनेते अक्षय वाघमारे यांनी पोस्ट लिहिली आहे. ते म्हणाले, प्रिय बायको, सर्वप्रथम तुझे मनापासून आभार आणि मला तुझा प्रचंड अभिमान आहे. प्रेग्नन्सी आणि त्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या मुलीची आई असताना, एवढी मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन तू ज्या धैर्याने ही निवडणूक लढवलीस, ते खरंच थक्क करणारं आहे. पुढे अक्षय लिहितात, सत्ताधारी असो किंवा विरोधक, भाजप, शिंदे गट, ठाकरे गट किंवा मनसे...कोणाच्याही तुलनेत वैयक्तिक पातळीवर तुला सर्वाधिक 6300 मतं मिळाली. तुझ्या आसपासही कुणी नाही, हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलं आहेस. मम्मी, पप्पा, तू आणि अखिल भारतीय सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रामाणितक कष्टाची ही पावती आहे. भायखळाच्या जनतेनं तुला भरभरून प्रेम दिलं. हे प्रेम पाहून स्पष्ट होतं की, लोकांसाठी तू आधीच निवडून आली आहेस. जनतेनं जातीपातीच्या राजकारणापेक्षा तुझ्या कामावर अन् विकासावर विश्वास ठेवला आहे. गेल्या काही महिन्यांत तू घेतलेले कष्ट आणि तुला होणाऱ्या वेदना मी जवळून पाहिल्या आहेत. आपली मोठी मुलगी आणि नुकतंच जन्मलेलं बाळ.. या दोघींना सोडून तू 12-12 तास काम करायची. कधी कधी तुझी आणि मुलींची भेट व्हायची नाही. तरीही तू फोनवरून त्यांची काळजी घ्यायची. तुझ्यातली हळवी आई मी अनुभवली आहे तुला बऱ्याचदा शारीरिक वेदना झाल्या. परंतु, तू कधीही याची तक्रार केली नाहीस. चिडली नाहीस, किंवा रागावली नाही. तुझा शांत अन् संयमी स्वभाव हीच तुझी खरी ताकद आहे. जनतेने तुझ्यावर आणि डॅडी यांच्या कतृत्वावर मोहोर उमटवली आहे. हा पराभव नक्कीच तुझा नाही. तर, तुझी ही राजकारणातील धमाकेदार एन्ट्री आहे. मला तुझा खूप अभिमान आहे. आता आणखी जिद्दीने कामाला लागूया. लव्ह यू आलवेस, असे अक्षय वाघमारे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचे अतुलनीय योगदान
परभणी : हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी मानवतेच्या रक्षणासाठी व धार्मिक स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करून संपूर्ण जगाला सहिष्णुतेचा, सत्याचा व त्यागाचा मार्ग दाखविला आहे. भारत ही संत, थोर महापुरुष आणि वीर योद्ध्यांची भूमी आहे. या योद्ध्यांनी भारताचे अनेक पातळ्यांवर रक्षण केले आहे. त्यामधील एक अत्यंत महत्त्वाचे कार्य हिंद की चादर […] The post हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचे अतुलनीय योगदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असले, तरी हे बहुमत काठावरचे असल्याने राजकीय वर्तुळात 'घोडेबाजारा'ची चर्चा सुरू झाली आहे. फोडाफोडीच्या भीतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्या 29 नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. महापालिकेत महापौर आणि स्थायी समिती सभापती यांसारखी महत्त्वाची पदे मिळवण्यासाठी आपली 'बार्गेनिंग पॉवर' वाढवण्याचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. या अनपेक्षित हालचालीमुळे आगामी काळात सत्तास्थापनेसाठी महायुतीमध्ये अंतर्गत रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींवर राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या असताना, शिवसेना शिंदे गटाच्या महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी या कृतीमागचे नेमके कारण स्पष्ट करत विरोधकांचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. नवख्या नगरसेवकांसाठी हॉटेलमध्ये शिबिर शीतल म्हात्रे म्हणाल्या, आम्ही महायुती म्हणून लढलो आणि जिंकलो आहोत, पाठीत खंजीर खुपसण्याची आमची भूमिका नाही. आम्ही महायुती म्हणूनच सत्तेत येणार आहोत. तसेच नगरसेवकांना हॉटेलवर ठेवण्यात आल्यासंदर्भात त्या म्हणाल्या, आमचे जवळपास 20 नगरसेवक नवखे आहेत, त्यांना मनपाचे कामकाज माहित नाही. त्यामुळे त्यांच संदर्भाने दोन दिवसीय शिबिर घेतले आहे. त्यासाठीच हे नगरसेवक हॉटेलमध्ये आहेत. हे उबाठाच्या नगरसेवकांना हरवून आले आहेत, असेही म्हात्रे म्हणाल्या. इतकेच नव्हे तर महायुती ही बाळासाहेब यांनी केलेली नैसर्गिक युती आहे. बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठीचा हा विषय नसल्याचेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊतांवर बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाश्ता करण्यासाठी हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये जाणार आहेत, यावर शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देताना बोचरी टीका केली आहे. त्या म्हणाल्या, संजय राऊत म्हणजे चाकरी सिल्व्हर ओकची आणि भाकरी मातोश्रीची असे आहे. सगळ्यांना खड्ड्यात घातले, खासदारकी संपत आली आहे. तीही शिंदेंच्या कृपेमुळे आली होती. नगरसेवकांना मस्का मारायला येणार असतील नाहीतर मला शिंदेंकडे घेऊन चला म्हणायला येतील, असा टोलाही म्हात्रे यांनी लगावला आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत बहुमतासाठी आवश्यक 114 हा आकडा गाठण्यासाठी भाजपकडे 89 जागा असल्याने त्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मदत घेणे अपरिहार्य ठरले आहे. या स्थितीचा फायदा घेत शिंदे गटाकडून महापौरपदाचे अडीच-अडीच वर्षांचे सूत्र आणि स्थायी समितीसह अन्य महत्त्वाच्या समित्यांमध्ये प्रभावी प्रतिनिधित्वाची मागणी केली जाण्याची दाट शक्यता आहे. सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या या अटी-शर्तींच्या राजकारणामुळे आणि संभाव्य वाटाघाटींमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत असून, महायुतीमधील सत्तेचे हे समीकरण नेमके कसे जुळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त देखील ठरला असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. पक्षप्रवेश ही फक्त टेक्निकल बाब आता राहिलेली आहे, ती पण लवकरच पूर्ण होईल, असे विधान पाटील यांनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समरजित घाटगे हे शरद पवार गटाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. घाटगे हे पुन्हा एकदा भाजपच्या ब्रॉड कोल्डमध्ये आलेले आहेत. पक्षप्रवेश ही फक्त टेक्निकल बाब आता राहिलेली आहे, ती पण लवकरच पूर्ण होईल, असे विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच घाटगे यांचे कार्यकर्ते जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढवणार असल्याची माहिती देखील चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. तसेच समरजित घाटगे हे महायुतीच्या बैठकीला देखील उपस्थित असल्याचे समजते. विधानसभेच्या वेळी केला होता शरद पवार गटात प्रवेश कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर, समरजितसिंह घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. मुश्रीफ यांच्या विरोधात त्यांनी आक्रमकपणे निवडणूक लढवली, मात्र या थेट लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणुकीतील या पराभवानंतर घाटगे यांची पुढची राजकीय वाटचाल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच स्थानिक राजकारणात एक अनपेक्षित वळण पाहायला मिळाले. अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष बाजूला सारून, कागल नगरपरिषद निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांनी ऐतिहासिक आघाडी केली. या नव्या समीकरणाने निवडणुकीत मोठी किमया साधली असून, शिवसेना शिंदे गटाचा दारुण पराभव करत मुश्रीफ-घाटगे आघाडीने 23 पैकी 23 जागांवर विजय मिळवून पूर्ण 'व्हाईट वॉश' केला आहे. नगराध्यक्षपदी सविता प्रताप माने यांची निवड झाली असून, या एकतर्फी विजयामुळे कागलमधील दोन्ही दिग्गज नेत्यांच्या एकत्र येण्यावर मतदारांनी मोहोर उमटवल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सोमनाथाचे मंदिर गजनीच्या मेहमुदने उद्धवस्थ केले त्याचपद्धतीने भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला आहे. भाजप व नरेंद्र मोदी यांना अहिल्यादेवींच्या स्मृती पुसून टाकायच्या आहेत, म्हणूनच अत्यंत निर्दयी व विकृतपणे घाट व घाटावरील मूर्ती नष्ट करण्यात आल्या आहेत, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, अहिल्यादेवींचा 300 वा जन्मशताब्दी उत्सव साजरा करण्यासाठी भाजप सरकार एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करत आहे तर दुसरीकडे मात्र अहिल्यादेवींच्या स्मृती पुसण्याचे पाप करत आहे. हिंदुत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपचा हा दुटप्पीपणा जनतेच्या समोर उघड झाला आहे. नरेंद्र मोदींच्या अंगात गजनीचे भूत शिरले आहे, असा हल्लाबोल सपकाळ यांनी केला आहे. अहिल्यादेवींचा अपमान महाराष्ट्राची जनता कदापी सहन करणार नाही. भाजप व मोदींच्या या कृतीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल, असा इशाराही सपकाळ यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेत ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे म्हणाले, अहिल्यादेवींनी 1771 मध्ये वाराणसी मणिकर्णिका घाट बांधला, या घाटावर 10 जानेवारी रोजी भाजप सरकार व नरेंद्र मोदी यांनी बुलडोझर चालवला. यावेळी अहिल्यादेवींच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली, हे सर्व धनगर समाजाचा स्वाभिमान दुखवणारे आहे. 27 तारखेपर्यंत मोदींनी जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपच्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या घाटावर बुलडोझर चालवून धनगर समाजाचा घोर अपमान केल्यानंतरही भाजपा आमदार गोपीचंद पडळकरसारखे धनगर समाजाचे नेते म्हणवणारे गप्प कसे बसले, असा सवालही यशपाल भिंगे यांनी केला आहे.
बीडमध्ये अधिका-याचा संशयास्पद मृत्यू
बीड : बीडमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. जीएसटी विभागातील अधिका-याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सचिन जाधवर असे मृत अधिका-याचे नाव आहे. ते मागील २४ तासांपासून बेपत्ता होते. सोलापूर-धुळे महामार्गालगत कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. धक्कादायक म्हणजे कारमध्ये पोलिसांना कोयता आणि मडकं आढळल्याने खळबळ उडाली आहे. जाधवर यांच्या कारमध्ये एक पत्रही मिळाले […] The post बीडमध्ये अधिका-याचा संशयास्पद मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. २८ जानेवारी ते रविवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणि पुरस्कार चित्रपट संगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ भारतीय संगीतकार, पद्मविभूषण श्री. इलयाराजा (राज्यसभा सदस्य) यांना जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम व महोत्सवाचे मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी केली आहे. पद्मपाणि पुरस्कार निवड समितीने श्री. इलयाराजा यांची निवड केली असून या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर तर सदस्यपदी चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर व चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप पद्मपाणि सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व दोन लक्ष रूपये असे आहे. पद्मपाणि पुरस्कार प्रदान सोहळा मान्यवरांच्या हस्ते महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तर महोत्सव पुढील पाच दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ इलयाराजा यांनी भारतीय चित्रपटसंगीतात सातत्यपूर्ण आणि सर्जनशील योगदान दिले आहे. आतापर्यंत त्यांनी ७,००० हून अधिक गाणी तसेच १,५०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संगीत निर्मिती केली आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, मराठी आदी विविध भारतीय भाषांमधील त्यांच्या संगीतरचनांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. कर्नाटकी संगीत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व लोकसंगीताच्या बाजावर आधारलेले, तसेच पाश्चात्त्य सिम्फनीची शिस्त लाभलेले संगीत ही त्यांची प्रमुख ओळख आहे. चित्रपटातील प्रसंगांना भावनिक खोली देणारे पार्श्वसंगीत आणि कथानकाला पूरक ठरणारी संगीतरचना हि इलयाराजा यांची प्रमुख ओळख आहे. कला, करुणा आणि सर्जनशील साधनेचे प्रतीक मानल्या जाणार्या पद्मपाणि पुरस्कारासाठी इलयाराजा यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या संगीतातील आध्यात्मिकता, शिस्त आणि मानवी संवेदनशीलतेमुळे ते जनमानसात ‘इसैग्नानी’ (संगीतक्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व) म्हणून ओळखले जातात. नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. सॉलीटेअर टॉवर्स, कालिका स्टील, डेली हंट हे या महोत्सवाचे सह आयोजक आहेत. मराठवाड्याचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्या या महोत्सवात देशभरातील नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, सतीश कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, सहसंचालक जयप्रद देसाई व ज्ञानेश झोटींग, डॉ. अपर्णा कक्कड, श्वेता कागलीवाल, डॉ.आशिष गाडेकर, कला संचालक डॉ.शिव कदम, डॉ.रेखा शेळके, डॉ.प्रेरणा दळवी, शिव फाळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, सुबोध जाधव, अमित पाटील, निखील भालेराव आदींनी केले आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; ५ जणांचा जागेवरच मृत्यू
सोलापूर : प्रतिनिधी पनवेलवरून अक्कलकोटला देवदर्शनाला जाताना काळाने घाला घातला. पुणे-सोलापूर महामार्गावर मोहोळमध्ये एका कारचा शनिवारी रात्री भयंकर अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेवर मोहोळमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये ३ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. सर्वजण पनवेलहून एर्टिका कारने अक्कलकोटला देवदर्शनला […] The post पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; ५ जणांचा जागेवरच मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अकोल्यात बंडखोर आशिष ठरणार गेम चेंजर
अकोला : अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. अकोला महापालिकेत एकूण ८० जागा आहेत. बहुमतासाठी ४१ चा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सत्तेच्या चाव्या दोन अपक्ष, शिंदे आणि शरद पवारांच्या प्रत्येकी एका नगरसेवकांच्या हाती आहेत. दोनपैकी एक अपक्ष भाजपचे बंडखोर आशिष पवित्रकार आहेत. भाजपाचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित […] The post अकोल्यात बंडखोर आशिष ठरणार गेम चेंजर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नामनिर्देशित नगरसेवकांसाठी इच्छुकांची लॉबिंग
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. निवडणूकपूर्व त्यांची शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती होती. आता दोन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापन करतील. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई महापालिकेचा महापौर ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत ज्यांना पक्षाने तिकिट नाकारले, तिकिटाच्या चढाओढीत ज्यांना मागे थांबावे लागले अशा नेत्यांना आता स्वीकृत सदस्यपदाची […] The post नामनिर्देशित नगरसेवकांसाठी इच्छुकांची लॉबिंग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कल्याण-डोंबिवलीत फोडाफोडीचे राजकारण?
कल्याण : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला, अनेकांना पक्षांनी तिकिट दिले नाही म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवली. आता ते नगरसेवक पुन्हा आपल्या जुन्या पक्षाकडे परत जाणार का? अशी चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे कल्याण-डोंबिवलीमधील रात्री झालेल्या गाठीभेटी… कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले. यातील प्रभाग […] The post कल्याण-डोंबिवलीत फोडाफोडीचे राजकारण? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत अखेर तांत्रिक बिघाडांमुळे रखडलेले दोन निकाल 'पाडू' (PADU - Printing Auxiliary Display Unit) या यंत्राच्या सहाय्याने निकाली काढण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी या यंत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र, निवडणूक आयोगाने या यंत्राचा आधार घेत कुर्ला आणि घाटकोपरमधील दोन प्रभागांतील निकाल घोषित केले असून, येथे अनुक्रमे भाजप आणि शिंदे गटाने बाजी मारली आहे. मतदान यंत्रात (EVM) तांत्रिक बिघाड झाल्यास मतमोजणीत अडथळा येऊ नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने 'पाडू' यंत्राचा पर्याय निवडला होता. मात्र, मतदानाच्या काही तास आधीच या यंत्राचा वापर होणार असल्याचे जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले होते. हे यंत्र म्हणजे ईव्हीएममधील डेटा चोरण्याचा किंवा त्यात फेरफार करण्याचा प्रकार आहे, अशी टीका करत दोन्ही ठाकरे बंधूंनी याला कडाडून विरोध केला होता. मात्र, प्रशासनाने तांत्रिक पेच सोडवण्यासाठी या यंत्राचा वापर करणे अपरिहार्य असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. कुर्ला प्रभाग १५९: प्रकाश मोरे यांची सरशी सर्वात मोठी चुरस कुर्ला येथील 'एल' वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १५९ मध्ये पाहायला मिळाली. येथे भाजपचे प्रकाश मोरे आणि काँग्रेसचे प्रल्हाद शेट्टी यांच्यात काटाजोड लढत होती. दुसऱ्या फेरीत एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोजणी थांबवण्यात आली होती. इतर सर्व मशिनची मोजणी पूर्ण झाल्यावर मोरे आणि शेट्टी यांच्यात केवळ ४८३ मतांचा फरक होता. बिघडलेल्या मशिनमध्ये ५३१ मते होती, ज्यामुळे जय-पराजयाचे पारडे कोणत्याही बाजूला झुकू शकले असते. अखेर 'पाडू' यंत्राच्या सहाय्याने या ५३१ मतांची मोजणी करण्यात आली, ज्यामध्ये प्रकाश मोरे यांना अधिक मते मिळाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आले. घाटकोपर प्रभाग १२५: शिंदे गटाचे सुरेश आवळे विजयी असाच तांत्रिक पेच घाटकोपर येथील 'एन' वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १२५ मध्ये निर्माण झाला होता. येथेही ईव्हीएम सुरू होत नसल्याने मतमोजणीमध्ये अडथळा निर्माण झाला होता. उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण असताना प्रशासनाने 'पाडू' यंत्राचा आधार घेतला. या यंत्राद्वारे आकडेवारी स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार सुरेश आवळे यांनी विजय संपादन केल्याचे जाहीर करण्यात आले. भविष्यातील राजकीय संघर्षाची नांदी तांत्रिक अडथळ्यांमुळे रखडलेले कुर्ला आणि घाटकोपर येथील निकाल 'पाडू'मुळे मार्गी लागले असले, तरी या यंत्राच्या वापरामुळे विरोधकांच्या हाती नवीन कोलीत मिळाले आहे. ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होतोच कसा आणि त्यात 'पाडू'सारख्या बाह्य यंत्राचा हस्तक्षेप का केला जातो? असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत या यंत्राच्या विश्वासार्हतेवरून न्यायालयीन लढाई किंवा मोठे राजकीय आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई : राज्यात भाजपने दणदणीत यश मिळवले आहे. आता महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अशी विविध पदे निवडून आलेल्या नगरसेवकांना खुणावत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून प्रशासक राज होते. त्यामुळे अनेकांनी या पदासाठी फिल्डिंग, लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. पण या सगळ्यांच्या अपेक्षांवर सध्या पाणी फेरले गेले आहे. ही सर्वच प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे समोर येत आहे. राज्यात […] The post राज्यात महापौर निवड लांबणीवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मॅरेथॉनमध्ये आमिर खानने घेतला भाग
मुंबई : प्रतिनिधी रविवार, १८ जानेवारी रोजी मुंबई मॅरेथॉनमध्ये ६५ हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. या गोल्ड लेबल इंटरनॅशनल शर्यतीची एकूण बक्षीस रक्कम जवळपास ३.५४ कोटी रुपये आहे. ४२ आणि २१ किलोमीटरच्या या शर्यतीत सहभागी होणा-या धावपटूंना कोस्टल रोडवर धावण्याची संधी मिळाली आहे. मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात पहिल्यांदाच कोस्टल रोडचा समावेश करण्यात आला आहे. सर्वसामान्यांसह या […] The post मॅरेथॉनमध्ये आमिर खानने घेतला भाग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागांमधील १७५ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांचा 'शाळा परिवर्तन प्रकल्प' (स्कूल ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्प) अंतर्गत कायापालट करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा प्रकल्प, शासन आणि खासगी भागीदारीतून गुणवत्तापूर्ण, समावेशक आणि भविष्यमुखी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरत आहे. या प्रकल्पाची सुरुवात ८ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI) आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करारानंतर झाली. राष्ट्रीय देयके महामंडळ या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य पुरवत असून, लर्निंग लिंक्स फाउंडेशनमार्फत त्याची अंमलबजावणी केली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हा परिषद, शालेय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांचा सक्रिय समन्वय आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जात आहे. डिसेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पहिल्या ते चौथ्या टप्प्यात एकूण १२५ शाळांचा विकास करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या पाचव्या टप्प्यात (जून २०२५ ते नोव्हेंबर २०२६) आणखी ५० शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आरमोरी, आहेरी, चामोर्शी, देसाईगंज (वडसा), धानोरा, गडचिरोली, कोरची आणि कुरखेडा या आठही तालुक्यांमधील एकूण १७५ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांपर्यंत प्रकल्पाची व्याप्ती वाढली आहे. या प्रकल्पांतर्गत शाळांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. यामध्ये माहिती व तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट वर्गखोल्या, अद्ययावत ग्रंथालये, विज्ञान प्रयोगशाळा, गणित व क्रीडा शिक्षण साधने यांचा समावेश आहे. तसेच, 'इमारतच शिक्षणाचे साधन' (Building as Learning Aid) या संकल्पनेनुसार शैक्षणिक भित्तीचित्रे, शाळा परिसर व दर्शनी भागांचे सौंदर्यीकरण, आधुनिक स्वच्छतागृहे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची (जलशुद्धीकरण यंत्रणा) व्यवस्था केली जात आहे. याव्यतिरिक्त, शिक्षक प्रशिक्षण व क्षमता वृद्धी कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य व तंदुरुस्ती उपक्रम, शाळा व्यवस्थापन समित्यांचे बळकटीकरण आणि समुदाय सहभागाला प्रोत्साहन दिले जात आहे.
देवाभाऊ हे तुमच्यासारखे घरात बसणारे मुख्यमंत्री नाहीत. त्यांना महाराष्ट्राला नंबर एकवर न्यायचे आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्षे घरात बसले होते साधे मंत्रालयात जाण्याची त्यांची हिंमत नव्हती. देवाभाऊ हे जनतेत सुद्धा असतात आणि दावोसला जाऊन गुंतवणूक सुद्धा आणतात हे त्यांचे काम आहे, घरात बसून पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी हे काय कळणार. तुम्ही स्वत:च्या घरात तुमचा पक्ष क्र एकचा करु शकले नाही याचे भान ठेवा, असे म्हणत मुंबई मनपाचे नगरसेवक तथा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नवनाथ बन म्हणाले की, मुंबईचा महापौर कोण होणार हे संजय राऊत यांनी ठरवायची गरज नाही. मुंबईकरांनी ठरवले आहे की भाजपा आणि महायुतीचा महापौर होणार आहे. राऊतांनी आपल्या पक्षाकडे लक्ष दिले पाहिजे. मुंबई आमचा गड असे जे तुम्ही सांगत होतात तो तुमचा गड महायुतीने सर केला आहे. तुमच्या पक्षाचे नगरसेवक तुमच्याकडे राहतील का? पक्षाचे काय होईल याकडे लक्ष द्या. तुमच्या पक्षाला उतरती कळा लागलेली आहे. उगाच दिवा स्वप्न पाहू नका. उबाठा गटाला घसरगुंडीकडे संजय राऊत यांनी नेले आहे हे उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवले पाहिजे. राहुल गांधी यांचे अंतर्वस्त्र आहात का? नवनाथ बन म्हणाले की, एकनाथ शिंदे हे अंगवस्त्र नाहीत तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सच्चे शिवसैनिक आहेत. तुम्हीच राहुल गांधी यांचे अंतर्वस्त्र आहात का हा माझा सवाल आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी यांची तुम्ही गुलामी करतात. तर शिंदेंनी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम केले आहे तर उद्धव ठाकरे हिरव्या मतांसाठी गुलामी करण्याचा प्रयत्न करत आहे. पवार- काँग्रेसला धोका दिला नवनाथ बन म्हणाले की, बहुमत कधीच अस्थिर नसते ते कायमच एकजूट असते. अस्थिर काय असते तर ती तुमची भूमिका असते. तुम्ही ज्या पद्धतीन भूमिका बदलत आहात ते महाराष्ट्राने पाहिले आहे.बहुमत मजबूत असते. त्यामुळे आमचा झेंडा मुंबई मनपावर फडकणार आहे. तुम्ही शरद पवार आणि काँग्रेसला धोका दिला आहे, आता तुम्ही काहीही केले तरी तुम्हाला राज्यसभेची खासदारकी मिळणार नाही. ठाकरेंच्या अहंकाराला कंटाळून लोकं गेली नवनाथ बन म्हणाले की, देवाभाऊ हे भयाचे नाही तर कायद्याचे आणि विकासाचे नाव आहे. त्याच्यामुळे कोणाला घाबरण्याची गरज नाही. संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षाची काळजी घेतली पाहिजे. भाजपा आणि महायुती अतिशय भक्कम आहे, आमचाच महापौर मुंबई मनपामध्ये होणार आहे. देवाभाऊ हे विकासाने मुंबईला पुढे घेऊन जाण्याचे काम करत आहेत, त्यामुळेच सर्वाधिक मनपा निवडून आणल्या. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्व गहान ठेवले त्या संजय राऊत यांनी इतरांवर टीका करु नये. तुमचे आमदार हे काही ईडी सीबीआयला घाबरून गेले नव्हते ते उद्धव ठाकरेंच्या अहंकाराला कंटाळून निघून गेले. नगरसेवक फोडण्याची भीती कुणालाही नाही, एकनाथ शिंदेंना देखील नाही, उलट तुमचे किती नगरसेवक तुमच्यासोबत राहतात याकडे लक्ष द्या, हा अहंकार ठेवलात तर नगरसेवकही तुम्हाला सोडून जातील.
महाराष्ट्रात भाजप आणि एमआयएम हे दोन जातीयवादी विचारांचे पक्ष आहे. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांची दोघांची युती आहे. एमआयएम आणि भाजप हे महाराष्ट्र धर्मासाठी बाधक आहेत, त्यांनी फिक्स करत ही निवडणूक लढवली, यामुळे त्यांच्या दोघांची ताकद वाढलेली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. जिन्ना आणि हिंदू महासभेची युती होती. बंगालमध्ये मुस्लीम लीगचा मुख्यमंत्री, तर जनसंघाचे मुखर्जी हे उपमुख्यमंत्री होते. ही दोघांची नैसर्गिक युती आहे, जी या निवडणुकीत समोर आली. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता जर वेळीच सावध झाली नाही तर ही लोकं राज्याचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे औवेसी(एमआयएम) आणि देवेंद्र फडणवीस(भाजप) यांची जी मैत्री आहे एकाच विचाराने ते दोघे पुढे वाटचाल करत आहेत, हे आपण ओळखले पाहिजे. हा काय नवीन विषय नाही. वंचितसोबत सत्तेसाठी नाही विचारांसाठी युती हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस आणि शिवसेना गेली अनेक वर्षे मुंबई मनपा एकमेकांच्या विरोधात लढत आहे. मुंबईमध्ये काँग्रेसने वंचितसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.आमच्यावर होणारी टीका ही चुकीची आहे. वंचित आघाडीच्या नेत्यांची भावना आम्ही जाणून घेणार आहोत. वंचितचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. पण जय-पराजय नाही तर आमच्यासाठी विचारांचा मेळ आहे. गांधी-आंबेडकर पॅटर्नने आम्हाला पुढे जायचे आहे त्या दृष्टीने आम्ही युती केली. गायकवाड-जगताप यांच्यात समन्वय घडवणार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे पक्षांतर्गत आहे त्यावर कारवाई सुरू आहे. भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्यातील अंतर्गत संघर्षावर लवकरच समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सर्व काँग्रेस नेते एकत्रित काम करत आहोत. या टीम वर्कच्या माध्यमातून आम्ही एकत्र येत पक्ष पुढे नेणार आहोत.
२०२५ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी कोविडनंतरचे सर्वात यशस्वी वर्ष ठरले आहे. तिकीट खिडकीवरील कमाईत वार्षिक आधारावर १३ टक्क्यांनी वाढ झाली. या वाढीमध्ये तिकीट दरातील २० टक्के वाढीचाही मोठा वाटा आहे. हिंदीत या वर्षी कमी चित्रपट आले असले तरी 'धुरंधर 'सारख्या चित्रपटामुळे हिंदी सिनेमाने पॅन इंडिया स्तरावर मोठी झेप घेतली. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने देशात ९५० कोटी आणि जगभरात १३०० कोटींहून अधिक व्यवसाय केला. यामुळे हा हिंदी चित्रपट इतिहासातील (या संदर्भात) सर्वात यशस्वी चित्रपट मानला जात आहे. याव्यतिरिक्त 'छावा', 'सैयारा' आणि 'वॉर-२' सारख्या हिंदी चित्रपटांनीही टॉप-१० मध्ये स्थान मिळवले. देशभरात ३७ चित्रपटांनी १०० कोटींहून अधिक कमाई केली. २०२४ मध्ये ही संख्या केवळ २२ होती. मल्याळम चित्रपटांचा व्यवसाय २०२४ मधील ५७२ कोटींवरून वाढून १,१६५ कोटींवर पोहोचला. तमिळ सिनेमाच्या तिकीट विक्रीत १७ टक्के, तर तेलुगू सिनेमात १५ टक्क्यांनी घट झाली. ९ वर्षांत चौथ्यांदा हिंदी चित्रपट कमाईत अव्वल
महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईच्या महापौरपदावरून रंगलेल्या चर्चेत आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. उद्धव ठाकरे सध्या डिप्रेशनमध्ये गेले असून ते जे बोलतात त्याला वास्तवाचा कोणताही आधार नाही. ज्यांच्याकडे संख्याबळ नाही, त्यांचा महापौर काय आकाशातून पडणार का? अशा बोचऱ्या शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने यश मिळवत बहुमत प्राप्त केले आहे. ठाकरे बंधुंना केवळ ७२ जागांवर समाधान मानावे लागले. महापौरपदाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केले. आपला महापौर व्हावा, हे स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असे म्हणत त्यांनी आशा कायम असल्याचे संकेत दिले. उद्धव ठाकरेंच्या या सूचक विधानावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी उपरोक्त विधान केले. नेमके काय म्हणाले नारायण राणे? उद्धव ठाकरे यांनी 'देवाच्या इच्छेने महापौर आमचाच होईल' असे विधान केले होते. त्यावर टोला लगावताना राणे म्हणाले, उद्धव ठाकरे आता देवावर विसंबून राहत आहेत, पण त्यांनी देवाला आतापर्यंत कधी जोडलेच नाही. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत आहे. मग तुमचा महापौर कसा होणार? एकदा संख्याबळ तपासून बघा. एवढा मोठा फरक तुम्ही कसा भरून काढणार? त्यांचा महापौर काय आकाशातून पडणार का? ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवरही नारायण राणेंनी निशाणा साधला. सुरुवातीला जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र होते, तेव्हा ते काही करू शकले नाहीत. वेगळे झाल्यावरही त्यांना काही करता आले नाही आणि आता पुन्हा एकत्र येऊनही ते काही करू शकले नाहीत. आम्हाला बाहेरचा मार्ग दाखवल्यामुळे आता नफा-तोटा काय असतो, याचा अनुभव उद्धव ठाकरेंना येत आहे. त्यांची शिवसेना आता फक्त नावाला उरली आहे, असे राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंना दिला घरी बसण्याचा सल्ला राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना घरी बसण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे आता देवावर विसंबून राहताय का? पण देवाला आतापर्यंत कधी जोडले नाहीत. त्यांनी संख्या बघावी. त्यांचा महापौर कसा होणार? त्यामुळे उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत. ते बोलतात ते वास्तव नाही. भाजप, शिवसेना शिंदे युतीची महाराष्ट्रातील जवळपास २५ महानगरपालिकांमध्ये सत्ता आली आहे. आता तरी शहाणे बनून घरी बसावे आणि जे ऑपरेशन करायचे ते करून घ्यावे”, असा बोचरा सल्ला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे आज मोठ्या शिष्टमंडळासह स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या ‘जागतिक आर्थिक परिषदेसाठी’ रवाना होत आहेत. 19 ते 23 जानेवारीदरम्यान होणाऱ्या या पाच दिवसीय दौऱ्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मात्र, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर टीका करत गुंतवणुकीच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये जागतिक कंपन्या महाराष्ट्राऐवजी इतर राज्यांना पसंती देत असल्याची उदाहरणे दिली आहेत. मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘डिस्ने’ आणि सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील ‘हनीवेल’ यांनी विस्तारासाठी बंगळुरूची निवड केल्याचे त्यांनी नमूद केले. डिस्नेने बंगळुरूमध्ये 1.74 लाख चौरस फूट, तर हनीवेलने 4 लाख चौरस फूट जागा भाड्याने घेतली आहे. तसेच, डेलॉइटने मंगळुरूमध्ये 50 हजार नोकऱ्यांची घोषणा केली असून, मारुती सुझुकीने 35 हजार कोटींची गुंतवणूक करून गुजरातमध्ये नवीन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचे आर्थिक इंजिन असलेल्या महाराष्ट्राला जागतिक कंपन्यांची गुंतवणूक का मिळत नाही, असा थेट सवाल करत रोहित पवार यांनी सरकारच्या गुंतवणूक धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दावोस दौऱ्यात मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांनी प्रत्यक्ष गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत आणि राज्यातील बेरोजगार तरुणांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. केवळ कागदावरचे सामंजस्य करार न करता प्रत्यक्ष उद्योग उभे राहावेत, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडताना मागील वर्षीच्या दावोस दौऱ्याचे यश अधोरेखित केले आहे. गेल्या वेळी झालेल्या सामंजस्य करारांपैकी सुमारे 72 टक्के करार प्रत्यक्षात उतरल्याचा दावा त्यांनी केला आहे. मागील वर्षी 16 लाख कोटी रुपयांचे करार झाले होते आणि यंदाही तितकीच गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी राजकीय वादाच्या घटना समोर येत आहेत. नाशिकमध्ये विजयाचा जल्लोष करताना एका भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला करून आग लावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरीकडे, नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या एकमेव नगरसेविका आभा पांडे यांनी भव्य रॅली काढत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये राजकीय वाद विकोपाला गेला आहे. येथील शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका पूजा नवले आणि त्यांच्या समर्थकांवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रभागातील भाजपच्या पराभूत उमेदवार पुष्पा ताजनपुरे यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुष्पा ताजनपुरे यांच्या दाव्यानुसार, विजयाची रॅली काढत असताना नवले यांच्या कार्यकर्त्यांनी ताजनपुरे यांच्या घरात शिरून अश्लील कृत्य केले आणि घरावर ज्वलनशील पदार्थ फेकून आग लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी नवनिर्वाचित नगरसेविका पूजा नवले, त्यांचे पती प्रवीण नवले यांच्यासह १५ ते २० संशयित समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. एकटी लढली अन् जिंकली, आभा पांडेंचे शक्तीप्रदर्शन नागपूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला मोठा धक्का बसला असला तरी, प्रभाग २१ मधून निवडून आलेल्या आभा पांडे यांनी पक्षाची अब्रू राखली आहे. आज त्यांनी शांती नगर परिसरातून भव्य 'आभार रॅली' काढून मतदारांचे आभार मानले. रॅली दरम्यान बोलताना आभा पांडे म्हणाल्या की, माझ्या विरोधात स्थानिक आमदारांनी हिंदी भाषक कार्ड आणि पैशांचा वारेमाप वापर केला होता. मात्र, जनतेने माझ्या कामावर विश्वास दाखवला. अजित पवार यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला होता, तो मी सार्थ ठरवला आहे. आता यापुढेही जनतेच्या प्रश्नांसाठी मी कटिबद्ध राहीन. निकालानंतर शिंदे समर्थकाच्या कारला आग दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये देखील महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर शिंदे समर्थकाच्या कारला आग लावल्याची घटना समोर आली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री एका कारला जाणीवपूर्वक आग लावण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही कार आकाश बारणे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. आकाश बारणे हे शिंदे शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराचे चुलत भाऊ असून, प्रभाग क्रमांक 23 म्हणजेच थेरगाव परिसरात ही घटना घडली. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानेच त्यांची कार पेटवल्याचा आरोप आकाश बारणे यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत आज दावोसकडे (स्वित्झर्लंड) रवाना झाले आहेत. 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या (WEF) वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला असून, राज्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक खेचून आणणे हे या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १९ ते २३ जानेवारी २०२६ पर्यंत दावोसमध्ये असतील. त्यांच्यासोबत वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळही उपस्थित राहणार आहे. मागील वर्षी राज्य सरकारने दावोसमध्ये १६ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) केले होते. त्यापैकी जवळपास ७२ टक्के करार प्रत्यक्षात उतरले असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला होता. यंदा हा आकडा पार करून १६ लाख कोटींहून अधिकच्या गुंतवणुकीवर राज्य सरकारचा भर असणार आहे. मुंबईच्या महापौर निवडीसाठी प्रतिक्षा राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. मात्र, मुख्यमंत्री पुढचे पाच दिवस विदेश दौऱ्यावर असल्याने आणि शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्ये असल्याने, महापौर निवडीची प्रक्रिया आता मुख्यमंत्र्यांच्या पुनरागमनानंतरच म्हणजेच २३ जानेवारीनंतरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर राऊतांची टीका दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री दावोसमधून गुंतवणूक आणतात असे म्हणतात. ते अनेक वर्षांपासून दावोसला जात आहेत, पण महाराष्ट्र गुंतवणूक काही दिसत नाही. त्यांची सगळी गुंतवणूक नगरपालिकांपासून बीएमसीपर्यंतच्या निवडणुकीत असते. त्यामुळे परदेशातून जी गुंतवणूक यायला पाहिजे, ती आम्हाला कधीच दिसली नाही. दावोसमध्ये बसून देखील ते महानगरपालिकेचेच राजकारण करणार आहेत. त्यापेक्षा इथे बसून दावोसमधील गुंतवणूक इकडे आणा, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. हे ही वाचा… आमदारांना पळवणारे आता नगरसेवकांसाठी का घाबरले?:शिंदेंना फडणवीसांच्या राजवटीचीही भीती वाटतेय, राऊतांचा बोचरा प्रहार महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौर कोणाचा होणार? यावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ज्यांनी स्वतः शिवसेनेचे आमदार फोडले, त्यांना आज स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटतेय, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी 'हास्यजत्रा' आहे, अशा शब्दांत राऊतांनी उपरोधिक टोला लगावला. सविस्तर वाचा…
महापालिका निवडणुकीत 87 जागा घेऊन भाजपने सोलापुरात इतिहास रचला. आता महापौर कोण याची उत्सुकता लागून राहिली. त्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या गटातील विनायक कोंड्याल, प्रथमेश कोठे यांच्या नावांची चर्चा आहे. दुसरीकडे आमदार विजयकुमार देशमुख गटाचे किरण देशमुख, अनंत जाधव, अमर पुदाले, राजश्री कणके, शिवानंद पाटील यांच्या नावांची चर्चाही सुरू झाली आहे. पक्षीय पातळीवरच त्याचा निर्णय होईल. परंतु भाजपमध्ये आता दोन गट कायम असतील. एक कोठे गट आणि दुसरा देशमुख गट. त्यामुळे महापौर कोठे गटाचा की देशमुख गटाचा याची उत्सुकता लागली आहे. कोठे गटाच्या सर्वाधिक जागा आल्याने त्यांच्याच गटाला महापौर पदाची संधी मिळेल, असे सांगण्यात येते. तसे झाल्यास कोठे यांचे भाऊजी विनायक कोंड्याल अथवा त्यांचे चुलत बंधू प्रथमेश कोठे यांची वर्णी शक्य आहे. नाराज देशमुखांना जवळ करण्याच्या हेतूने काही हालचाली झाल्यास डॉ. किरण देशमुख, अमर पुदाले, राजश्री कणके, शिवानंद पाटील आणि अनंत जाधव यांच्या नावांचा विचार होऊ शकेल. पालकमंत्री घेणार उद्या बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे सोमवारी (ता. 19) सोलापुरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत नूतन नगरसेवकांची बैठक होईल. सर्वांचा सत्कार, संवाद असा कार्यक्रम आयोजित केला आहे. नरेंद्र काळे : पक्षात उत्तम संघटक, हिंदुत्वाचा चेहरा. विरोधी पक्षनेत्याचा अनुभव, अभ्यासपूर्ण मुद्दे आणि प्रभावी चेहरा. प्रथमेश कोठे : माजी महापौर स्व. महेश कोठे यांचे चिरंजीव. आमदार कोठे यांच्या शब्दावरून भाजपमध्ये आले. किरण देशमुख : उच्च शिक्षित, भाजप युवा मोर्चाचे पद सांभाळले होते. गेली पाच वर्षे नगरसेवक म्हणून उत्तम कामगिरी. विनायक कोंड्याल : सर्वाधिक मतांनी विजयी. तीनवेळा सलग निवडून आले. आमदार देवेंद्र कोठे यांचे समर्थक. विरोध झाला तर...डॉ. देशमुख यांना आमदार कोठे गटाकडून तर काळेंना आमदार सुभाष देशमुखांकडून विरोध. देशमुख आणि कोठे यांच्या गटातच असणार मोठी रस्सीखेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांचे पेढा भरवून अभिनंदन करताना फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही शुभेच्छा दिल्या. विमानसेवा, आयटी पार्क यामुळे सर्वाधिक जागा मिळाल्याचे गोरेंनी सांगितले. आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या सहकार्याने जिंकल्याचे म्हणाले. आठ दिवसांत पदाधिकाऱ्यांच्या निवडी 39 व्या महापौर निवडीसाठी आता आठ दिवस राहिले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कौन्सिल हॉलमधील सभागृह सजले आहे. महापौरांच्या खुर्चीसह सदस्यांच्या बाकांचे नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे सभागृहाचे रूपडेच पालटून गेले. सभागृहासह महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभागृह, पक्षनेता, विरोधी पक्षनेता, महिला व बालकल्याण समिती सभापती आदींच्या कक्षांची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यावर 70 लाख रुपयांचा खर्च होत आहे. पुढील आठ दिवसांत सुशोभीकरणाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 1964 मध्ये पहिले महापौर होण्याचा मान स्व. पारसमल जोशी यांना मिळाला होता. 1997 मध्ये शेवंता पवार या पहिल्या महापौर ठरल्या होत्या. 1964 ते 2022 पर्यंत 38 महापौर होऊन गेले. पुढील आठ दिवसांत 39 वे महापौर विराजमान होतील. महापौर निवासही तयारीत रेल्वेलाइन्स परिसरातील महापौर बंगल्यातही काही कामे करण्यात आली. प्रशासकीय कारकिर्दीत आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे काही काळासाठी या बंगल्यात वास्तव्यास होते. नव्या महापौरांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार काही कामे होणार आहेत.
सिल्लोड–सोयगाव 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवार असलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रचाराच्या शेवटच्या जाहीर सभेत तालुक्यातील मतदारांना उद्देशून धमकीवजा वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ज्या मतदारांनी आपल्याला मतदान करणार नाही, त्यांची नावे गुप्तपणे चिठ्ठीद्वारे कळविण्याचे आवाहन करत अशा मतदारांवर “रामबाण उपाय” केला जाईल, अशी भाषा वापरण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. यामध्ये गोळ्या देणे, इंजेक्शन देणे, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी किंवा बायपास शस्त्रक्रियेचा उल्लेख केल्याचा आरोप आहे. या कथित धमकीपूर्ण भाषणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरलाल शंकरपेल्ली यांनी सी-विजिल ॲपद्वारे तसेच सिल्लोड येथील निवडणूक अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, आदर्श आचारसंहिता पथकाचे तत्कालीन प्रमुख दादराव श्रीपत अहिरे यांनी आमदार अब्दुल सत्तार यांचा बचाव करत तक्रार फेटाळल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तक्रार फेटाळल्याचा शंकरपेल्लींचा आरोप या कथित धमकीपूर्ण वक्तव्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरलाल शंकरपेल्ली यांनी दुसऱ्याच दिवशी सी-विजिल ॲपद्वारे तसेच सिल्लोड येथील निवडणूक अधिकारी श्री. लतीफ पठाण यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, आदर्श आचारसंहिता पथकाचे तत्कालीन प्रमुख दादराव श्रीपत अहिरे यांनी आमदार अब्दुल सत्तार यांचा बचाव करत तक्रार फेटाळल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.यानंतर तक्रारदारांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले. सुमारे एक वर्ष पाठपुरावा करूनही जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर तक्रारदारांनी सिल्लोड न्यायालयात पार्टी इन पर्सन म्हणून खाजगी फौजदारी तक्रार दाखल केली. काय म्हणाले गणेश शंकरपेल्ली यानंतर तक्रारदारांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले. मात्र, सुमारे एक वर्ष पाठपुरावा करूनही जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई अथवा निर्णय घेण्यात न आल्याने अखेर तक्रारदारांनी सिल्लोड न्यायालयात पार्टी इन पर्सन म्हणून खासगी फौजदारी तक्रार दाखल केली. अब्दुल सत्तारांचे वक्तव्य काय? या प्रकरणी सिल्लोड येथील प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयाने आमदार अब्दुल सत्तार, तत्कालीन आचारसंहिता पथक प्रमुख दादराव श्रीपत अहिरे, सिल्लोड निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याबाबत नोटीस बजावली आहे.
छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीत एमआयएमने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील कमालीचे उत्साहात आहेत. मुंबईत मनसे आणि राष्ट्रवादीपेक्षाजास्त जागा जिंकणे असो वा संभाजीनगरमध्ये 33जागांचा टप्पा गाठणे, इम्तियाज यांनी या यशाचे विश्लेषण करताना विरोधकांवर सडकून टीका केली. या विजयानंतर त्यांच्याशी साधलेला हा संवाद... प्रश्न: भविष्यातील मजलीस'' चीवाटचाल कशी असेल? इम्तियाज जलील: आम्ही एक मोठीशक्ती म्हणून उदयास आलो आहोत.सोलापूर, मुंब्रा, अमरावती अशा सर्वच ठिकाणी आमचे प्रतिनिधित्व वाढले आहे.आम्ही केवळ 7-8 जागा अतिशय कमी फरकाने हरलो, नाही तर हा आकडा आणखी मोठा असता. एमआयएम हा आता केवळ एक पक्ष नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा किरदार''बनला आहे. प्रश्न: आता महापालिकेत तुमची भूमिका काय असेल? भाजपला साथ देणार का? इम्तियाज जलील : आमची भूमिका स्पष्ट आहे. शहराच्या विकासासाठी चांगले निर्णय असतील, तर आम्ही भाजपला नक्कीच साथ देऊ. पण, जर कुणी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हिडन अजेंडा घेऊन येत असेल, तर आम्ही खंबीर विरोध करू. जसा आम्ही समांतर पाणी योजनेला केला होता. मी सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन करतो की, आता निवडणुका संपल्या आहेत, एकमेकांवरची चिखलफेक थांबवून शहराच्या प्रगतीसाठी एका प्लॅटफॉर्मवर या. प्रश्न: महाराष्ट्रात एमआयएमने मोठी मुसंडी मारली आहे, या निकालाकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण कसा अर्थ लावता?इम्तियाज जलील : हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. बेटर लेट दॅन नेव्हर'' महाराष्ट्राच्या जनतेने आता एमआयएमला मनापासून स्वीकारले आहे. लोकांना जाणीव झालीआहे की केवळ एमआयएमच त्यांच्यासाठी लढू शकते. आज संपूर्णमहाराष्ट्रात आमचे 125 नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईत आमचे 8 नगरसेवक आहेत, ही संख्या राज ठाकरेंची मनसे आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षाही जास्त आहे. प्रश्न: एमआयएम पक्षावर नेहमीच जातीयवादी असल्याचा शिक्का मारला जातो, यावर तुमचे काय म्हणणे आहे? इम्तियाज जलील : गेल्या 70 वर्षांपासून हेच आरोप ऐकतोय. हे आरोप करणारे कोण आहेत? तेच लोक जे मुस्लिम समाजाला आपली जहागीर समजायचे. निवडणुका आल्या की भाजप आणि शिवसेनेची भीती दाखवून मते लाटायची, हा यांचा धंदा होता. स्वतःला सेक्युलर म्हणवणारे नेते आज भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.आम्ही काहीही झाले तरी भाजपसोबत जाणार नाही, हे आता जनतेला उमजले आहे. म्हणूनच एमआयएम आज मालेगाव (21), धुळे (10),नांदेड (14) अशा सर्वच ठिकाणी निर्णायक भूमिकेत आहे. प्रश्न: संभाजीनगरमध्ये पक्षांतर्गत बंडाळी आणिआरोप झाले, तरीही यश कसे मिळाले? इम्तियाज जलील: शहराच्या जनतेचे मी आभार मानतो. गेल्या वेळी 25 जागा होत्या,या वेळी 33 जागा जिंकून आम्ही ताकदीने मुख्य विरोधी पक्ष म्हणून समोर आलो आहोत. माझ्यावर भ्रष्टाचाराचे, पक्षविकल्याचे आरोप झाले. पण गंमत पाहा,जोपर्यंत या लोकांना उमेदवारीची आशा होती,तोपर्यंत इम्तियाज जलील जगातील सर्वात चांगला माणूस होता. तिकीट कापले गेल्यावर मी लगेच भ्रष्ट झालो? बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसींचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ दिलेला नाही, हे निकालांनी सिद्ध केले.
महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौर कोणाचा होणार? यावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ज्यांनी स्वतः शिवसेनेचे आमदार फोडले, त्यांना आज स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटतेय, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी 'हास्यजत्रा' आहे, अशा शब्दांत राऊतांनी उपरोधिक टोला लगावला. नगरसेवकांना मुंबईतील हॉटेल्समध्ये ठेवण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवताना राऊत म्हणाले की, आमदारांना घेऊन ते सुरतला सुरक्षित ठिकाणी गेले होते. मग नगरसेवकांनाही सुरत किंवा अहमदाबादला न्यायला हवे होते. त्यांना मुंबईतच का कोंडून ठेवले आहे? स्वतःच्या राज्यात उपमुख्यमंत्री असतानाही जर नगरसेवक पळवले जातील किंवा त्यांचे अपहरण होईल अशी भीती वाटत असेल,तर ही महाराष्ट्राच्या राजकारणीतील फार मोठी हास्यजत्रा आहे. मराठी अस्मितेची मशाल अजूनही धगधगतेय हॉटेलमध्ये असलेल्या नगरसेवकांबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, तुम्ही या नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार? हे नगरसेवक मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांच्या मनात आजही मराठी अस्मितेची मशाल धगधगत आहे. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, हे जवळजवळ सर्वांनीच ठरवले आहे. येणाऱ्या काळात काय होते ते बघुयात. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
नाशिक महापालिकेवर 2017 च्या तुलनेत सहा अधिक जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता मिळवताना मतांमध्येही 1,07,155 ने वाढ नोंदवली आहे. 2017 नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये पडलेल्या फुटींनंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक होती. दोन्ही शिवसेनेला नाशिकमध्ये पडलेल्या एकत्रित मतांची बेरीज गेल्या वेळच्या तुलनेत अडीच लाखांनी जास्त आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची एकत्रित मते गत निवडणुकीच्या तुलनेत अवघ्या 6 हजार 687 ने वाढली आहे. दुसरीकडे मनसेच्या मतांमध्ये तब्बल 1 लाख 61 हजार 278 मतांची तर काँग्रेसच्या 56 हजार 500 मतांची घट झाली आहे. मागील निवडणुकीनंतर भाजपचा जनाधार वाढल्याचे दिसत असून मूळच्या शिवसेनेचे तसेच राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्यानंतर त्यांच्या मतांमध्येही वाढ झाली आहे. दोन्ही सेनेच्या एकूण जागा वाढल्या मागील मनपा निवडणुकीत शिवसेनेला 35 जागा मिळाल्या होत्या. पक्ष फुटीनंतर यंदाच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेनेने एकत्रित 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीला मागील निवडणुकीत 6 जागा मिळाल्या होत्या, मात्र यंदा त्यात दोन जागांची घट झाली आहे. पंचवटी विभागात भाजपला सर्वाधिक मतदान पंचवटी विभागातील प्रभाग एक ते सहामध्ये भाजपला मतदारांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. या सहाही प्रभागांमध्ये 2 लाख 95 हजार 242 मतदारांनी भाजपला मतदान करत त्यांचे उमेदवार विजयी केले. मनसे, काँग्रेसला सर्वाधिक फटका या निवडणुकीत मतदार राजाने मनसे व काँग्रेसला नाकारले. मनसेच्या 4 तर काँग्रेसच्या 3 जागा घटल्या आहेत. (संदर्भ : राज्य निवडणूक आयोग)
मुंबई भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आणि दक्षिण मुंबईतील प्रभावशाली नेते राज के. पुरोहित (७१) यांचे आज मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू, अनुभवी आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. राज के. पुरोहित यांचे पार्थिव उद्या, रविवार दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या वेळेत राजहंस बिल्डिंग, जी रोड, मरीन ड्राइव्ह, मुंबई येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. दक्षिण मुंबईतील अजेय नेतृत्व राज के. पुरोहित हे मुंबई भाजपमधील एक सामर्थ्यशाली नाव होते. विशेषतः दक्षिण मुंबईत त्यांचा मोठा राजकीय दबदबा होता. मुंबईतील उत्तर भारतीय समुदायाचे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. विधिमंडळातील त्यांचा अभ्यास आणि प्रशासनावरील पकड यामुळे त्यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रीपदही भूषविले होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी अत्यंत मजबूत केली होती. राजकीय वारसा आणि प्रवास नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांचे चिरंजीव आकाश पुरोहित यांनी वॉर्ड क्रमांक २२१ मधून विजय मिळवून आपला राजकीय वारसा पुढे सुरू ठेवला आहे. आपल्या मुलाच्या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच राज पुरोहित यांचे जाणे हे त्यांच्या कुटुंबासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही वर्षांत कुलाबा मतदारसंघात राहुल नार्वेकर यांच्या वाढत्या प्रभावामुळे राज पुरोहित राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर झाले होते. मात्र, तरीही पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत आणि मार्गदर्शनासाठी ते नेहमीच सक्रिय राहिले. त्यांच्या निधनानंतर भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आणि मुंबईतील जनतेने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवडी पाटीजवळ रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल (जि. रायगड) येथून सहा मित्र एर्टिगा कारने (क्रमांक MH-46 Z 4536) अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघाले होते. शनिवारी (१७ जानेवारी २०२६) रात्री ११:३० च्या सुमारास ही कार मोहोळ जवळील देवडी पाटी परिसरात आली असता, चालकाचा वाहनावरील ताबा अचानक सुटला. भरधाव वेगातील ही कार महामार्गापासून सुमारे १० ते १५ फूट दूर झुडपांमध्ये जाऊन एका मोठ्या झाडावर जोरात आदळली. पाच जणांचा जागीच मृत्यू हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. धडकेचा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये ३ पुरुष आणि ३ महिला असे एकूण ६ प्रवासी होते. यापैकी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह वाहनामध्ये पूर्णतः अडकलेल्या अवस्थेत होते. या अपघातातून ज्योती जयदास टाकले (रा. सेक्टर ७, पनवेल) या महिला सुदैवाने बचावल्या आहेत. पोलिस मदत आणि बचावकार्य घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. जखमी ज्योती टाकले यांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रात्रीची वेळ आणि वेगाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत व्यक्तींची सविस्तर नावे आणि पत्ते शोधण्याचे काम सध्या पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. हे सर्व जण पनवेल परिसरातील रहिवासी असून ते एकमेकांचे मित्र होते, असे समजते. महामार्गावर झुडपांमध्ये ही कार अडकल्याने रात्रीच्या वेळी मदतकार्यात काही अडचणी आल्या होत्या.
औंढा नागनाथ तालु्क्यातील जवळाबाजार शिवारात कालव्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल चार दिवसानंतर रविवारी ता. 18 घटनास्थळापासून चार किलो मिटर अंतरावर वडद शिवारात सापडला आहे. औंढा पोलिस व महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. विशेष म्हणजे तरुणाच्या मृतदेह शोधण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी तीन ते चार वेळा रास्ता रोको केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील तरुण दीपक काळे (28) हा बुधवारी ता. 14 सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास जवळाबाजार शिवारातील कालव्यात पडला होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे नातेवाईक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कालव्यात दीपक याचा शोध सुरु केला होता. मात्र कालव्यात पाणी जास्त असल्यामुळे तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे मृतदेह शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान, दीपक यांचा मृतदेह शोधावा या मागणीसाठी त्याच्या कुटुंबियांनी तसेच नातेवाईकांनी जवळा बाजार येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. पोलिस विभागाने पाटबंधारे विभागाला कळवून कालव्याचे पाणी बंद करून दीपकचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र कालव्याचे पाणी कमी झाले नसल्याने अडचणी कायम होत्या. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी रविवारी ता. 17 थेट महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले होते. यावेळी पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत यांनी आंदोलकांशी संवाद साधल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिस, गावकऱ्यांनी कालव्यात शोध मोहिम सुरु केली. दरम्यान, आज सकाळी घटनास्थळापासून चार किलो मिटर अंतरावर वडद शिवारातील कालव्यात दीपक याचा मृतदेह आढळून आला. यावेळी पोलिस निरीक्षक राहिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत, जमादार राजू ठाकूर, आंबादास बेले, रामा गडदे, शेख इम्रान, माजी सरपंच राजू पवार, हनुमान काळे, गोविंद काळे, बालाजी काळे यांची वडद शिवारातील कालव्यातून मृतदेह बाहेर काढला आहे. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत दीपक यांचा घातपात केल्याचा आरोप मयत दीपक यांना बुधवारी कोणीतरी बोलावून नेले त्यानंतर त्याता घातपात करून मृतदेह कालव्यात फेकल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला असून काही जणांची चौकशी केली जात असल्याचे सुत्रांनी सांगितले.
महानगरपालिका निवडणुकीच्या विजयाचा गुलाल उधळताना सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीच कायद्याचे धिंडवडे काढल्याचा प्रकार घडला, शिंदेसेनेकडून विजयी झालेल्या उमेदवार आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांच्यासह राजू राजपूत आणि अभिजित जीवनवाल यांनी भररस्त्यात तलवारी नाचवली. याप्रकरणी अभिजित जीवनलाल यांच्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली. तलवारी भिरकावत कायद्याला चॅलेंज मिळालेल्या माहितीनुसार, विजयानंतर हर्षदा शिरसाट आणि त्यांच्या समर्थकांनी शहरात मोठी विजयी मिरवणूक काढली. या वेळी वाहनावर उभे राहून नवनिर्वाचित नगरसेविका हर्षदा शिरसाट, राजू राजपूत आणि अभिजित जीवनवाल यांनी हातात तलवारी घेऊन त्या हवेत भिरकावल्या. कायदा हातात घेणाऱ्या नवनिर्वाचित नगरसेवकांवर पोलिस प्रशासन काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे भाजप उमेदवाराच्या घरासमोर दोन तास थरार भाजपचे उमेदवार संजय बारवाल यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. बारवाल कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार, अभिजित जीवनवाल आणि त्यांच्या समर्थकांनी बारवाल यांच्या दारासमोर दोन तास धुमाकूळ घातला. तलवारी नाचवून दहशत निर्माण केली. इतकेच नव्हे तर आमच्या मुलालाही मारहाण करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप चारवाल कुटुंबाने केला आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक प्रभागांमध्ये पक्षांतर्गत बंडखोरी उफाळून आली होती. ही बंडखोरी रोखण्यासाठी आणि अधिकृत उमेदवारांचा मार्ग मोकळा करण्यासाठी सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी अनेक इच्छुकांना निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवक म्हणून तुमची वर्णी लावू, असा शब्द दिला होता. यामध्ये प्रामुख्याने भाजपने 15 ते 20, शिवसेनेकडून 12 ते 15, एमआयएमकडून 8 ते 10, उबाठाकडून 8 ते 10 तर काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित यांनीदेखील आपल्या कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्यपदी घेण्याचा शब्द दिलेला आहे. स्वीकृत सदस्यांची संख्या 5 वरून 10 झाली असली तरी इच्छुकांची गर्दी पाहता नेत्यांचा मोठा कस लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या महापालिकांमध्ये स्वीकृत सदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10 टक्के किंवा 10 सदस्य (यापैकी जी संख्या कमी असेल) इतके स्वीकृत नगरसेवक निवडले जाऊ शकतात, असे राजपत्र 23 मार्च 2023 रोजी काढलेले आहे. यामुळे काहीशा प्रमाणात नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सध्याच्या संख्याबळानुसार 5 जागांवर भाजप, 3 जागा एमआयएमला तर शिंदेसेनेला एक स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहे. उद्धवसेना, वंचित यांच्याकडे त्या तुलनेत संख्याबळ नाही. स्वीकृत नगरसेवक पदावर संधी मिळावी यासाठी पराभूत उमेदवारांकडूनही फील्डिंग लावली जात आहे. स्वीकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार नसतो ज्या अनुभवी कार्यकर्त्यांना किंवा ज्येष्ठ नेत्यांना काही कारणास्तव प्रत्यक्ष निवडणुकीत उतरता आले नाही, त्यांच्यासाठी हे पद राजकीय पुनर्वसन करण्याचे प्रमुख साधन आहे. स्वीकृत नगरसेवक निवडण्यासाठी महापालिका प्रशासनाचा अनुभव, सामाजिक कार्याचा किमान 5 वर्षांचा अनुभव किंवा डॉक्टर, वकील, इंजिनिअर यांसारख्या क्षेत्रातील विशेष पदवी असणे आवश्यक आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्याबळाच्या प्रमाणात प्रत्येक राजकीय पक्षाला स्वीकृत नगरसेवक पदे दिली जातात. स्वीकृत नगरसेवकांना महापालिकेच्या सभांमध्ये चर्चेत सहभागी होता येते. मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नसतो आणि ते महापौर पदासाठी उभे राहू शकत नाहीत. शब्द पूर्ण करताना पत्करावा लागणार रोष या निवडणुकीत भाजपकडे 1400 पेक्षा अधिक उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती. शिवसेनेकडे देखील 900 पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज सादर केले. एमआयएमकडे 700 पेक्षा अधिक, उद्धवसेनेकडे 600 पेक्षा अधिक उमेदवारांनी तिकिटाची मागणी केली होती. यातील उमेदवारी न मिळालेल्या शेकडो लोकांनी बंडखोरी केली. भाजपच्या विरोधात तर मोर्चे, निदर्शने आणि आंदोलन झाले. या सर्वांना पक्षांतील नेत्यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून घेऊ, असा शब्द दिला आहे. यामुळे आता हा शब्द पूर्ण करताना नेत्यांना पुन्हा एकदा रोष पत्करावा लागणार आहे.
मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा यांच्या वतीने संचालित यशवंतराव चव्हाण विद्यालय, मंगरूळपीर येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ओ. एस. गोरे होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून मोटार वाहन निरीक्षक, वाशीम येथील विनोद घनवट उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जे. व्ही. इंगोले, चोपडे यांनीही उपस्थिती लावली. मार्गदर्शन करताना विनोद घनवट यांनी इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. पॉवर पॉईंट सादरीकरण व अपघातांचे चित्रीकरण दाखवून वाहतूक नियमांचे पालन न केले. त्यामुळे होणाऱ्या दुर्घटनांची तीव्रता त्यांनी प्रभावीपणे विद्यार्थ्यांसमोर मांडली. हेल्मेट वापर, सीट बेल्ट, वेगमर्यादा, चुकीची ओव्हरटेकिंग व मोबाईल वापर यासारख्या बाबींमुळे जीविताला निर्माण होणाऱ्या धोक्याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करणे म्हणजे स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारणे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सूत्रसंचालन संतोष राऊत यांनी केले तर आभार पोहाणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वाढदिवसानिमित्त आणलेला केक खराब:केक शॉपवर कारवाई करण्याची केली मागणी
शहरातील पातूर ते बाळापूर महामार्गावरील माँ भवानी बिकानेर स्वीट अँड बर्थडे केक शॉपमधून वाढदिवसानिमित्त आणलेला केक सडलेला निघाला. त्यात अळ्या पडलेल्या दिसून आल्या. यामुळे सागर इंगळे याच्यासह युवकांनी अकोला येथील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) तक्रार करत संबंधित माँ भवानी बिकानेर स्वीट्स अँड बर्थडे केक शॉपवर कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, सदर दुकानात निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले जात आहे. यापूर्वी दिवाळीतही भेसळयुक्त निकृष्ट पदार्थांची विक्री केल्याने नागरिकांना आजारांनी ग्रासले होते. हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असून या दुकानावर कठोर कारवाई करावी. मंगळवारी (दि.१३) वाढदिवसानिमित्त सदर दुकानातून केक विकत घेतला असता तो सडलेला निघाला. तक्रारदार दुकानमालकाला विचारणा करण्यासाठी गेले असता चुकीच्या भाषेत बोलून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तक्रारदाराकडे सदर दुकानातील सडलेला केक, त्याचे फोटो आणि व्हिडिओ आहेत. संबंधित दुकानदारावर तत्काळ कारवाई करावी, असे बुधवारी (दि.१४) दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीच्या सत्यप्रती आमदार अमोल मिटकरी तथा जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा पाठवण्यात आल्या आहेत. भेसळयुक्त निकृष्ट पदार्थांची विक्री केल्याने आता अन्न व औषध प्रशासन विभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. चौकशी केल्यावर कारवाई करणार ^मी सध्या निवडणुकीनिमित्त कर्तव्यावर आहे. त्यानंतर फोन करतो. तसेच याप्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई केली जाईल. - रवींद्र सोळंके, अन्न व औषध प्रशासन अधिकारी, अकोला.
येथून थोड्याच अंतरावर असलेल्या मौजे सवडद गंगाभारती जन्मभूमी येथील सिध्दविनायक मंदिरावर २० जानेवारी पासून गणेश जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात कथाकार अशोक महाराज घायाळ यांच्या त्रिदिवसीय गणेश पुराण कथेसह सकाळी साडेदहा मोफत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अमित आरसोडे, डॉ. उमेश गुंजकर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी, नारायणा नेत्रालय शाखा मेहकरच्या वतीने मोफत चष्मा वाटप व नेत्र तपासणी, रक्त तपासणी, दुपारी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी याबाबत पोलिस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांचे व्याख्यान, सायंकाळी संत दुनियादास बाबा भजनी मंडळाचा सांगीतिक कार्यक्रम, २१ रोजी दुपारी तीन वाजता शाळा आणि विद्यार्थ्यांचे कर्तव्य यावर दिलीपराव खंडारे यांचे व्याख्यान, सायंकाळी महाराष्ट्रातील पहिले तृतीय पंथी कीर्तनकार समा महाराज दौंडकर उर्फ (समा माय) अहिल्यानगर यांचे कीर्तन होणार आहे. दुसऱ्या दिवशी दि. २२ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता कीर्तन केसरी भरत महाराज जाधव दुधा ब्रम्हपुरी यांचे काल्याचे कीर्तन तद्नंतर श्रीमज्जगद्गुरु पलसिध्द महास्वामी मठाचे मठाधिपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, आमदार मनोज कायंदे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब गावंडे, आमदार श्वेता महाले, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार सिद्धार्थ खरात, ठाणेदार गजानन करेवाड, मुकूंद दंडे, रावसाहेब देशपांडे, रवी पाटील, बाबुराव मोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाराज वितरण रात्री शिवशाहीर देवानंद वानखेडे मेहकर यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. अशी माहिती संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त संतोष गाडेकर यांनी दिली आहे कालांतराने येथे वटवृक्ष असल्याने येथे एक चौथरा उभारण्यात आला. दरम्यान, गावात गणेशोत्सवाची प्रचंड अहमहमिका असल्याने येथेही छत्रपती गणेश मंडळाच्या वतीने गणेश स्थापना केली जायची. पाच वर्षे या ठिकाणी गणेश स्थापना होत असल्याने शेवटच्या दिवशी मिरवणुकी दरम्यान वादाची ठिणगी पडायची. त्यामुळे येथे भाविकांनी थेट मंदिर उभे केले आहे.. अशी आहे परंपरा सवडद गावात उकिरडा आणि त्यातच दारूचे बॉक्स पुरून ठेवले जायचे. गावातला हा दारूचा अड्डाच होता. मात्र ग्रामस्थांनी वाढते तंटे बघता या ठिकाणी १२ डिसेंबर २०१२ रोजी गणरायाचे प्रशस्त मंदिर उभे केले. आता ते परिसरातील गणेश भाविकांचे हे जागृत देवस्थान झाले आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान:सीईओ संजीता महापात्रा यांची सांगवा बुद्रूक ग्रामपंचायतीला भेट
दर्यापूर पंचायत समिती दर्यापूर अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील सांगवा बुद्रुक ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत अमरावती जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी भेट दिली. भेटीदरम्यान ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत केलेल्या विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम, मकर संक्रांति निमित्त महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम, स्वयंरोजगारा बाबत महिलांचे विशेष प्रशिक्षण शिबीर, प्रधानमंत्री आवास अंतर्गत घरकुलाचे उद्घाटन, अनेक उपक्रमांस भेटी दिल्या व केलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. दरम्यान गावकऱ्यांसोबत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मध्ये लोकसहभाग वाढवणे लोकवर्गणी तसेच अभियानातील निकषांबाबत मार्गदर्शन केले. तसेच उमेद अंतर्गत ग्राम संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी दर्यापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सी.जे.ढवक, विस्तार अधिकारी पंचायत संदीप देशमुख,विस्तार अधिकारी राजकुमार चांदुरकर, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ, गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे, तसेच दर्यापूर पंचायत समीतीमधील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सांगवा बुद्रुक सरपंच श्रीकृष्ण कराळे, उपसरपंच विजय सगणे, ग्रामपंचायत अधिकारी सुरज भोपसे गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनशी संवाद साधताना सीईओ संगिता महापात्रा व उपस्थित ग्रामस्थ व महिला.
इतिहासकार प्रा. डॉ. रामचंद्र श्रीराम मोरवंचीकर (८८) यांचे शनिवारी (१७ जानेवारी) अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर रविवारी सकाळी ११ वाजता प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी प्रमुख, तसेच पर्यटन प्रशासन विभागाचे माजी संचालक म्हणून कार्य केलेले डॉ. मोरवंचीकर यांनी सुमारे ४० वर्षे अध्यापन केले. राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल २०० संशोधनात्मक निबंध, तर इतिहास व इतर विषयांतील १६ ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी संशोधन केले. पैठण येथील उत्खननात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. भारतीय जल संस्कृती मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी योगदान दिले. काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
अंजनगाव बारीतून जाणारा राजमार्ग झाला अपघात मार्ग:एक किलोमीटर पर्यंतच्या अंतरात नाही एकही गतिरोधक
नजिकच्या अंजनगाव बारी गावातून जाणाऱ्या नागपुर-मुंबई राजमार्गावर १ किलोमीटर अंतरापर्यंत सिमेंट क्राँक्रीटीकरण करण्यात आले आहे. परंतु या अंतरामध्ये कोठेही गतिरोधक नसल्याने सुसाट जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची भीती वाढली आहे. सध्या या मार्गाचे सौंदर्यींकरण होत आहे. त्यादरम्यान या बाबीकडे लक्ष पुरवले जावे, अशी नागरिकांची मागणी आहे. आजतागायत या मार्गावर अनेक किरकोळ अपघाताबरोबरच गंभीर अपघातही झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या रबरी गतिरोधकाचे नियोजन केले होते. परंतु या गतिरोधकांनी अवघ्या ३ महिन्यातच मार्गासोबतचा आपला संबंध तोडला. यामुळे दोन्ही बाजुंनी येणारी वाहने सुसाटपणे धावतात. या मार्गावर बस स्टॉप, शाळा, महाविद्यालय, आरोग्य केंद्र, पशु चिकित्सालय, तीर्थक्षेत्र कोंडेश्वर, आठवडी बाजार, स्मशान भूमी, भिवापूर तलाव, अनेक मंदिरे आहेत. त्यामुळे मार्ग ओलांडताना पायी चालणाऱ्यांची, तसेच वाहनधारकांची गैरसोय होत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व रुग्णांना अतिशय दक्षता बाळगावी लागते. मार्गावर दुतर्फा झाडाझुडपांचे प्रमाण वाढत असून, या झुडपांच्या काटेरी फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. या फांद्या बसच्या खिडक्यांवर आघात करित असल्याने प्रवाशांची शारीरीक हानी होण्याची शक्यता आहे. शिवाय यापासुन इतर वाहनचालकांचीही गैरसोय होत आहे. सौंदर्यीकरणाचा एक प्रमुख भाग म्हणून १ हजार मीटरपर्यंत या मार्गाचे मधोमध रस्ता दुभाजक बांधून त्यावर पथदिव्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पूर्वीच्या अर्ध्या खांबावरिल पथदिवे गेल्या ४ महिन्यांपासुन बंद करण्यात आले आहे. तालुका क्रीडा संकुलचा परिसर वगळता या राजमार्गाच्या दुतर्फा नागरीकांनी अतिक्रमण केल्याने, रोडवरील पाणी वाहून जाण्यासाठी नालीचे नियोजन करणे कठीण झाले आहे. वरिल सर्व बाबी लक्षात घेता अपघातावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने आणि नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या अनुषंगाने या मार्गावर मजबूत व टिकाऊ गतिरोधक, झाडा- झुडपांची छाटणी, पथदिव्यांची दुरुस्ती आवश्यक झाली आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार दिली असून सदर विभागाने या सर्व बाबींची दखल घ्यावी, अशी मागणी पुढे आली आहे. या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. मार्गात दुतर्फा झाडा-झुडपांचे वाढते प्रमाण, गतीरोधकांचा अभाव, पथदिवे असूनही सध्या अंधार, आदी अडचणी आहेत. रस्त्याच्या बाजूने नागरी अतिक्रमणही वाढत आहे. त्यामुळे हा मार्ग अपघात प्रवर्ण मार्ग बनला आहे. हा राजमार्ग अमरावतीवरून अंजनगावबारी मार्गे वर्धा- नागपूर, यवतमाळ- हिंगणघाटला जोडला आहे. त्यानुसार या मार्गावरुन परिवहन महामंडळाच्या बससेही सुरु झाल्या आहेत. त्यामुळेच या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष पुरवणे गरजेचे आहे.
बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील चांदणी नदीमध्ये दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचा मूळ रहिवासी असलेला परकीय ‘सकर माउथ कॅटफिश’ आढळून आला आहे. या माशाच्या शिरकावामुळे नदीच्या नैसर्गिक परिसंस्थेवर मोठे संकट ओढावले असून, स्थानिक माशांच्या अस्तित्वासाठी तो घातक ठरत आहे. वेगाने वाढणारा आणि अत्यंत सहनशील असलेल्या या माशामुळे चांदणी नदीची जैवविविधता कायमची नष्ट होण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ‘सकर माउथ कॅटफिश' हा मासा आपल्या तोंडाच्या सक्शन कपसारख्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे नदीच्या तळाशी आणि खडकांना घट्ट चिकटून राहतो. हा मासा मोठ्या प्रमाणात शेवाळ, सूक्ष्म जलचर आणि प्रामुख्याने स्थानिक माशांची अंडी खातो. यामुळे रोहू, कटला, मृगल यांसारख्या देशी प्रजातींच्या प्रजननावर विपरीत परिणाम होऊन त्या नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, नदीतील संपूर्ण अन्नसाखळी विस्कळीत होत आहे. चांदणी नदी ही परिसरातील शेती, पशुधन आणि पारंपरिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे. मात्र, या परकीय माशाच्या वाढत्या संख्येमुळे नदीतील नैसर्गिक समतोल ढासळत आहे. याचा फटका केवळ माशांपुरता मर्यादित नसून, जलचर वनस्पती, पक्षी आणि संपूर्ण जलपरिसंस्थेवर याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. लोकांच्या अज्ञानातून ओढावलेले संकट पर्यावरण अभ्यासकांच्या मते, हा मासा अनेकदा घरगुती अॅक्वेरियममध्ये शोभेसाठी पाळला जातो. मात्र, माशाचा आकार मोठा झाल्यानंतर अनेक नागरिक तो नदी, ओढा किंवा तलावात सोडून देतात. नागरिकांच्या अशा निष्काळजी कृतीमुळेच हे परकीय मासे भारतीय नद्यांमध्ये पसरत असून, आता चांदणी नदीलाही त्याचा फटका बसला आहे.
वर्षभरानंतर उजळले मुरूडमधील खड्ड्यांचे भाग्य:दुरूस्ती सुरू, खड्डा बुजवल्याने गैरसोय दूर होणार
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते अंबेजोगाईला जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामास प्रारंभ झाल्याने तब्बल वर्षभरानंतर खड्ड्यांचे भाग्य उजळले आहे. शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी ही सुरुवात झाली. अर्धा फुट ते एक फूट खोल तसेच लांबी रुंदीला दोन ते तीन फूट असणाऱ्या व मोजदाद सुद्धा होऊ शकणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात हे खड्डे आहेत.या खड्ड्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत होते. सतत गजबजलेल्या या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात खड्ड्यामुळे वाहनधारक हैराण झाले होते . लातूर टेंभुर्णी महामार्ग तसेच या महामार्गावरून आंबेजोगाई ला जाणाऱ्या वाहनांची वर्दळ या ठिकाणी असते. आंबेजोगाईला जाणाऱ्या या चौकापासून अहिल्यादेवी होळकर चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती ते नायगावला वळण घेणाऱ्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना, दुचाकीस्वारांना तसेच चारचाकी असणाऱ्या वाहनधारकांनाही कसरत करत मार्गक्रमण करावे लागत होते. खड्डे चुकवत असताना कधी कधी विरुद्ध बाजूनेही जावे लागत होते.त्यामुळे वाहन चालवण्याची कसरत करता करता अपघाताला निमंत्रण मिळत होते. नुकताच या खड्ड्यांमुळे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या चार चाकी वाहनावर पडून नुकसान झाले होते. या अपघातात दोघेजण प्रसंगावधान राखल्यामुळे वाचले होते. ही समस्या सोडवण्यासाठी अनेकदा वृत्तपत्रांच्या माध्यमातून बातम्याही प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.या प्रश्न संदर्भात संबंधित विभागाला निवेदनही दिले गेले होते. या रस्त्यावरील हे खड्डे बुजवण्यास प्रारंभ झाल्यामुळे हैराण झालेल्या वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे. रस्त्याची दूरास्था झाल्याने नागरिकांना येता जाता त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांची कसरत होत होती. आता दुरुस्ती सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. चौकात असणाऱ्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह नागरिक ही हैराण झाले होते. हे खड्डे बुजवण्यास सुरुवात झाल्यामुळे रस्ता प्रवास करण्यायोग्य होईल व वाहनधारकांची गैरसोय दूर होईल.. संतोष लाड, नागरिक
येथील ऋतुजा संजय धनेश्वर हीने अखंड साधना, शिस्त आणि श्रद्धेच्या बळावर इतिहास घडवला आहे. तिच्या भरतनाट्यम साधनेचा २५ वर्षांचा रौप्यमहोत्सव शहरातील साई गोल्ड इन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. ऋतुजा हीने वयाच्या चौथ्या वर्षापासून भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती. सन २००८ मध्ये सह्याद्री वाहिनीवरील दम दमा दम या कार्यक्रमात तिला कारकिर्दीतील पहिले पारितोषिक मिळाले होते. तिने राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर भरतनाट्यमच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि भरतनाट्यमच्या सर्व परीक्षा ती डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाली. या तपश्चर्येचे फलित म्हणजे ‘मास्टर्स इन भरतनाट्यम’ ही पदवी आणि भारत सरकारची प्रतिष्ठित ‘सीसीआरटी स्कॉलरशीप’ या सोहळ्याप्रसंगी लेखक रवींद्र जोशी यांनी ऋतुजाच्या नृत्यकलेचे कौतुक केले. ऋतुजाचा समावेश भारतातील पहिल्या ३० दिग्गज भरतनाट्यम नृत्यकांमध्ये झाला आहे. या यशामागे ऋतुजाबरोबरच तिच्या कुटुंबाचा त्याग आणि समर्पण तितकेच महत्त्वाचे आहे. तिचे वडील संजय धनेश्वर यांनी आपले संपूर्ण आयुष्य साईचरणी अर्पण केले आहे. आई सुनिता धनेश्वर आणि बहीण पल्लवी यांनी २५ वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आज साकारताना पाहून संपूर्ण सभागृह भावूक झाले होते. ब्राह्मण एकता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय पाटील यांनी ऋतुजाला ‘समाजभूषण रत्न’ पुरस्कार देऊन गौरविले. या कार्यक्रमासाठी ऋतुजाचे गुरु मुठाळ, खेडकर मॅडम, डुबल, चौरे आणि आरती भणगे यांचे देखील यावेळी अनेकांनी कौतुक केले आहे.
राहुरी राज्यात नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक संधी निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे असून आधुनिक काळात शेतीक्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यभवनाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. कृषी महाविद्यालय, पुणे येथे विकसित करण्यात येत असलेल्या वसुंधरा नैसर्गिक शेती आधारित प्रात्यक्षिक प्रक्षेत्र व देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. प्रशांत नारनवरे बोलत होते. याप्रसंगी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, राजभवनातील उपसचिव डॉ. राममूर्ती व नियंत्रक डॉ. नितीन देशपांडे, डॉ. महानंद माने, डॉ. सुभाष भालेकर आदी उपस्थित होते. डॉ. नारनवरे पुढे म्हणाले, नैसर्गिक शेतीच्या यशासाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधनांची निर्मिती होणे अत्यावश्यक आहे. कृषी विद्यापीठातील नामवंत प्राध्यापकांनी पायाभूत विषयांवरील आपली व्याख्याने सुलभ व शेतकरी सुलभ पद्धतीने तयार करून याचे व्हिडिओ माध्यमातून थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रातील विविध विषयांमधील ज्ञान व कौशल्य यांच्या आधारे उद्यमशील कृषी उद्योजक घडविणे ही आजच्या काळाची गरज आहे. कृषी पदवीधरांना अधिक प्रात्यक्षिकाधिष्ठित शिक्षण देणे आवश्यक असून पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीमुळे निर्माण झालेली ज्ञान व कौशल्यतील तफावत दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासूनच व्यापक कार्यक्षेत्रातील लोकाभिमुख ज्ञान व कौशल्य विकसित करण्याच्या तंत्राचा समावेश अभ्यासक्रमात करावा असे त्यांनी स्पष्ट केले. आपली पारंपारिक भारतीय शेतीपद्धती ही पशुपालनावर आधारित असल्यामुळे अधिक सुरक्षित होती मात्र वाढती लोकसंख्या आणि रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीची सुपीकता घटत चालली आहे ही चिंतेची बाब आहे. कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी सचिवांनी मांडलेल्या मुद्द्यानुसार विद्यापीठ कार्यरत असून विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या उद्यमशीलतेला चालना देऊन त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. तसेच विद्यापीठाच्या विविध प्रक्षेत्रांवर नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक संसाधन निर्मितीचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर विकसित करून त्यांचा प्रभावी प्रचार व प्रसार केला जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या भेटीप्रसंगी या केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी प्रकल्पामध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय, पुणे येथील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकपीक पद्धतीने जमिनीचे आरोग्य बिघडते एकपीकपद्धतीमुळे जमिनीचे नैसर्गिक आरोग्य बिघडत असून त्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. मातीचा दर्जा टिकून ठेवण्यासाठी पीक फेरपालट अत्यावश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यातील दरी कमी करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या एसटी महामंडळाची मुहूर्तमेढ अहिल्यानगरमध्ये रोवली गेली होती. पहिल्या बसपासून ते आताच्या इलेक्ट्रिक वातानुकुलीत बसगाडीपर्यंतचा प्रवास राज्याने पाहिला आहे. टप्प्याटप्प्याने जुन्या बसची जागा आता, नव्या गाड्या घेत आहेत. परंतु, दहा ते बारा वर्षे जुन्या खिळखिळ्या गाड्यांची दुरावस्था झाली आहे. अहिल्यानगर विभागांतर्गत ११ आगार आहेत. कोरोनापूर्वी जिल्ह्यात सुमारे ७३० बसमार्फत सेवा दिली जात होती. परंतु टप्प्याटप्प्याने कालबाह्य झालेल्या गाड्यांचे निर्लेखन करण्यात आले. त्यामुळे ही संख्या कमी होऊन ६५० पर्यंत घसरली. रस्त्यावर ज्या जुन्या गाड्या धावत आहेत, त्यांची अवस्था बिकट आहे. दिव्य मराठीने मागील काही दिवसांत केलेल्या पाहणीत प्रवासी घेऊन निघालेल्या बस रस्त्यात बंद पडलेल्या आढळून आल्या. तर काही बसमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत असल्याने प्रदूषण निर्माण होत आहे. दरम्यान, राज्यातली पहिली इलेक्ट्रिक बस १ जून २०२२ रोजी अहिल्यानगर ते पुणे मार्गावर धावली होती. आता या बसची संख्या वाढत आहे. त्यासाठी तारकपूर स्थानकांत स्वतंत्र चार्जिंग स्टेशनची उभाण्यात आले आहे. एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत अहिल्यानगर विभागाकडे १९ शिवाई बसमार्फत सेवा दिली जात आहे. परंतु, वारंवार बंद पडणाऱ्या बसच्या जागेवर नव्या लालपरी द्याव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खैरेवाडी गावाकडे जाणारा चिंचलेखैरे - खैरेवाडी या तीन किमी रस्त्याच्या कामासाठी प्रस्थाव पाठवण्यात आला होता. त्यापैकी प्रशासनाकडून ८०० मीटर रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. मात्र आठ महिने उलटूनही अद्याप रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या आदीवासी बांधवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामाचा कालावधी १२ महिने असताना अद्यापही रस्त्याचे काम अपूर्णच आहे. यामुळे येथील आदिवासी बांधवांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रस्त्याअभावी आठवडाभरापूर्वी ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष कायम आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम न केल्यास बेमूदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.या रस्त्याची पाहणी तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली होती. मात्र त्यानंतरही रस्त्याच्या कामाला कोणतीही गती आठ महिने उलटूनही केवळ ७०० मीटर रस्त्यावर फक्त मातीचा भराव टाकण्यात आला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदारांनी या रस्त्याचे उद्घाटन केले होते. मात्र प्रत्यक्षात काम कासवगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यात या मार्गावरून महिला, विद्यार्थी व रुग्णांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रस्त्याच्या प्रश्नामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. गोरगरीब आदिवासी बांधवांकडे शासनाचे लक्ष नाही. खैरेवाडीकडे जंगलातून जावे लागते. जाताना ३ ओहळ लागतात. पावसाळ्यात तर फारच अडचण आहे. रस्त्याची समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. - पांडूरंग पारधी, अध्यक्ष, आदिवासी राया ठाकर संघटना. चिंचलेखैरे ते खैरेवाडी हा ८०० मीटरचा रस्ता आदिवासी उपाययोजनेतून मंजूर करण्यात आला आहे. १ मार्च २५ ते १ मार्च २६ पर्यंत १ वर्ष कामाची मुदत आहे. वन विभागाच्या विविध परवानग्यांमुळे रस्त्याचे काम रखडले होते. अजून ४ महिने शिल्लक आहेत. मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे. साधारणत: १ महिन्यात काम करण्याचे उद्दिष्ट असून, संबंधित ठेकेदाराला काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - अनिल बैसाने, उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
प्लास्टिकच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी सटाणा नगरपरिषदेतर्फे कागदी व कापडी पिशव्या निर्मिती केंद्र सुरु करण्यात आले असून स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी नगरपरिषदेने कागदी व कापडी पिशव्यांचे निर्मिती केंद्राचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या अभिनव उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या सहभागावर भर देण्यात आला असून, घराघरांतून उपलब्ध असलेले पुनर्वापरयोग्य कागद, कापड आदी साहित्य उपयोगात आणले जाणार आहे. नागरिकांनी त्यांच्या घरी असलेले वापरात नसलेले स्वच्छ कपडे व कागद संकलन करण्यासाठी नगरपरिषदेने संकलन केंद्र सुरु केले असुन नागरिकांनी आपल्याकडे असलेले कागद व कपडे येथे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हे साहित्य नागरिकांनी विनामूल्य स्वरूपात सटाणा नगरपरिषद कार्यालयात किंवा नेमलेल्या संकलन केंद्रात जमा करावेत. जमा झालेल्या साहित्यापासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक पिशव्या नगरपरिषद कार्यालयाजवळील केंद्रावर, तसेच शहरातील बाजारपेठा व विविध दुकानांमध्ये नाममात्र दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी नांदगाव रेल्वे स्थानकाला भेट देत रेल संचलना संबंधित महत्वाच्या असणाऱ्या सर्व तांत्रिक प्रणालींचा आढावा घेतला. स्थानकावर अमृत भारत योजने अंतर्गत झालेल्या कामांना आणि निर्माणाधिन कामांना भेट देत स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शनिवारी (दि.१७) पथकाने येथील ऑटोमेटेड संचलित कृ लॉबी, सिग्नल यंत्रणा, तिसरी मार्गिका, बुकिंग ऑफिस या नियमित रेल संचलनाच्या दृष्टीने महत्वाच्या विभागांना भेटी दिली. तसेच येथील कामकाज सुरक्षित मापदंडांच्या निकषानुसार होत आहे का ? हे सुनिश्चित केले. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याला भाविकांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे. ऐनवेळी प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी नांदगाव रेल्वे स्थानक महत्वाचे असल्याने येथील प्रवासी सुविधांचाही अधिकारी वर्गाने आढावा घेत संबंधितांना सूचना केल्या. दरम्यान, महाप्रबंधकांनी कामकाजाची पाहणी केल्याने प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोविड काळात तात्पुरत्या स्वरुपात येथील प्रवासी गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते. हे थांबे पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी शिवसेना व सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली. युवा फाउंडेशनने महाप्रबंधक गुप्ता यांचे जनसंपर्क अधिकारी यांची भेट घेऊन येथील मोकळ्या भूखंडाचा विकास, अंडरपासमध्ये कायम पाणी तुंबत असल्याने फुट ओव्हर ब्रीज बांधून देण्याची मागणी केली.
कर्करोग संशोधन आणि उपचार प्रगतीवर मार्गदर्शन:आबड होमिओपॅथिक महाविद्यालयात चर्चासत्र
अलिकडच्या वर्षांत कर्करोगाच्या अभ्यासात आणि उपचारांमध्ये प्रगती झाली आहे. याबाबत येथील के. बी. आबड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयामार्फत विद्यार्थी व शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर ‘कर्करोग संशोधन आणि उपचारातील अलीकडील प्रगती' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात कर्करोग तज्ज्ञ डॉ. मुकुल घरोटे यांनी या चर्चसत्रात कर्करोगाचे निदान, उपचार तसेच आहारासंदर्भात सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, प्रबंध समिती अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, अरविंदकुमार भन्साळी, सचिव जवाहरलाल आबड, महाविद्यालयाचे समन्वयक नंदकुमार ब्रम्हेचा, डॉ. सुनीलकुमार बागरेचा, सुमतीलाल सुराणा, डॉ. विवेक जैन, डॉ. आकाश जैन, पंकज चोपड़ा यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय दहाड, उपप्राचार्य डॉ. संगीता दोषी यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. मुकेश पारेवाल, डॉ. अर्पणा पारिक, डॉ. मृगेश शाह यांनी सूत्रसंचालन केले. चर्चसत्रास शिक्षक व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
आदिवासी विद्यार्थ्यांना मिळाली माणुसकीची ऊब:इगतपुरीत लखोटिया फाउंडेशनकडून शाळांत ब्लँकेट वाटप
तालुक्यातील अतिशय दुर्गम व आदिवासी बहुल परिसरात वसलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गांगडवाडी व कारावाडी येथे ऊषा आणि परमेश्वर स्नेहलता लखोटिया फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी स्नेहिल सहाय्य उपक्रम राबविण्यात आला. हिवाळ्यातील तीव्र थंडीचा विचार करून फाउंडेशनकडून दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांना ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ शारीरिक उबच मिळाली नाही, तर त्यांच्या मनात आपुलकी, सुरक्षितता व आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली. दुर्गम डोंगराळ भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी ही मदत मायेचा आधार ठरली. हा सामाजिक उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षक प्रमोद परदेशी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे ही मदत योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पोहोचू शकली. कार्यक्रमाचे नियोजन गांगडवाडी शाळेचे मुख्याध्यापक कैलास चित्ते, कारावाडी शाळेच्या मुख्याध्यापिका जिजा खाडे यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी दोन्ही गावांतील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी लखोटिया फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले. भविष्यातही अशा समाजोपयोगी व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे जीवन अधिक सशक्त व उज्ज्वल व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
गंगापूरला उपनगराध्यक्षपदी अमोल जगताप यांची निवड:स्विकृत सदस्यपदी जाधव, गंगवाल यांची निवड
गंगापूर नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी अमोल सुभाषराव जगताप यांची बिनविरोध निवड झाली. स्वीकृत सदस्य म्हणून सुवर्णा संजय जाधव आणि शीतल संदेश गंगवाल यांची निवड करण्यात आली. नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. उपाध्यक्षपदासाठी अमोल जगताप यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. सूचक फैसल चाउस आणि अनुमोदक संतोष अंबिलवादे यांनी अर्जावर सह्या केल्या. ठरलेल्या वेळेपर्यंत दुसरा अर्ज न आल्याने अमोल जगताप यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. स्वीकृत सदस्यपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून गटनेते सुवर्णा जाधव यांचे नाव सुचवले. भाजपकडून गटनेते विजय पानकडे यांनी शीतल गंगवाल यांचे नाव दिले. पीठासीन अधिकारी संजय जाधव यांनी दोन्ही नावांची घोषणा केली. मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी नवीन सदस्यांचे स्वागत केले. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
अजिंठा घाटात केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. शुक्रवारी रात्री ११.३० वाजता ही घटना घडली. ट्रक रस्त्यावर आडवा पडला. ट्रकमधील २९ टन केमिकलचे ड्रम २०० फूट खोल दरीत कोसळले. ट्रकचे मोठे नुकसान झाले. विशाखापट्टणम येथून टाईल्स बनवण्यासाठी लागणारे केमिकल घेऊन ट्रक (एपी. १६ टीक्यू २२५६) निघाला होता. अजिंठा घाट उतरताना ब्रेक निकामी झाले. चालकाचा ताबा सुटला. एका अवघड वळणावर ट्रक उलटला. ड्रम दरीत पडले. केमिकल सर्वत्र पसरले. अपघातात चालक शेक करीम मुल्ला (४६, विजयवाडा) किरकोळ जखमी झाला. क्लिनर तिरुपतीराव रघुपतीराव (५२, विजयवाडा) याचा उजवा हात निकामी झाला. दोघांवर फर्दापूर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले.
शिवना येथील अजिंठा-बुलढाणा महामार्गावरील पेट्रोल पंपाच्या मागे राहणाऱ्या मानकर कुटुंबाचे घर गॅसचा भडका उडाल्याने जळून खाक झाले. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. सुदैवाने घरात असलेल्या पाच जणांचे प्राण वाचले. मात्र संपूर्ण संसार उपयोगी वस्तू आगीत भस्मसात झाल्या. अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. मगन पुंडलिक मानकर हे गेल्या अनेक वर्षांपासून टिन पत्र्यांच्या घरात राहत होते. शुक्रवारी दुपारी चहा बनवताना गॅस पेटवण्यात आला. त्यावेळी गळतीमुळे बर्नरजवळ मोठा भडका उडाला. नळीने जोरात पेट घेतल्याने आग वेगाने पसरली. त्याच वेळी मुलगा आकाश याने पत्नी, लहान मुलगी, आई संगीता आणि बहिणीला बाहेर काढले. शेजाऱ्यांनी मदतीचा प्रयत्न केला. पण आग आटोक्यात आली नाही. या आगीत घरातील सोफासेट, फ्रिज, टीव्ही, कुलर, फॅन आणि अन्नधान्य जळून गेले. स्फोट होईल या भीतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी आल्या. कुटुंब उघड्यावर पडले आहे. नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. शनिवारी मंडळ अधिकारी विजय शेळके यांनी पंचनामा करून प्राथमिक अहवाल सादर केला.
राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती ढोरकीनमध्ये साजरी
ढोरकीन पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षिका दीपाली जाधव व प्रमुख पाहुणे म्हणून सहशिक्षक होरकटे प्रामुख्याने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याविषयी भाषणे केली. यावेळी शिक्षक शिंदे यांनी स्वामी विवेकानंद यांच्याविषयीचे विश्वबंधुत्वाचे विचार मांडले, तर औटी यांनी आपल्या मार्गदर्शनातून मुलींना जिजाऊंच्या ममत्व, शौर्य, दृढनिश्चयी रुपाचे दर्शन घडविले. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र कोलते व उपक्रमशील तथा सांस्कृतिक विभागप्रमुख सिराज पठाण यांनी कार्यक्रमाच्या आयोजक विद्यार्थ्यांचे व वर्गशिक्षिकांचे कौतुक केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी उपस्थित होते. ढोरकीन येथील जिल्हा परिषद शाळेत प्रतिमांना पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवर.
पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी पुरवले जात आहे. नागरिकांनी जारचे पाणी घेऊ नये, असे आवाहन मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी शनिवारी केले. पाणी पिण्यास अयोग्य असल्याची अफवा चुकीची आहे. नागरिकांनी अशा अंधश्रद्धेतून बाहेर यावे, असेही त्यांनी सांगितले. लांडे यांनी जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन पाणीपुरवठा, वितरण आणि शुद्धीकरण प्रक्रियेचा आढावा घेतला. कन्नड शहराची लोकसंख्या ५० हजारांहून अधिक आहे. शहराला अंबाडी प्रकल्पातून पाणी पुरवले जाते. १९९२ आणि २००५ मध्ये दोन जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आल्या. जुन्या यंत्रणेची क्षमता साडेचार एमएलडी आणि नव्या यंत्रणेची साडेतीन एमएलडी आहे. एकूण क्षमता आठ एमएलडी आहे. सध्या पाचव्या किंवा सहाव्या दिवशी पाणीपुरवठा होतो. हे अंतर कमी करून दोन दिवसांवर आणण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, पंपिंग यंत्रणा १५ ते २० वर्षे जुनी आहे. त्यामुळे पंपिंग क्षमता कमी झाली आहे. विद्युत पॅनल बोर्डही जुने असल्याने वारंवार बिघाड होतो. पंपही पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत. कन्नड शहरात सध्या ६ हजार ४५४ नळ जोडण्या आहेत. शहराची रोजची पाण्याची गरज ६० लाख लिटर आहे. मात्र, चार जलकुंभांमध्ये एकूण ३२ लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. इंदिरा नगर जलकुंभाची क्षमता साडेपाच लाख लिटर, गिरणी ग्राउंडची सात लाख लिटर, विश्रामगृहाची साडेतीन लाख लिटर आहे. विश्रामगृहातील जलकुंभ १९५६ चा असून दुसरा जलकुंभ १९७२ चा आहे. हे दोन्ही जलकुंभही जुने झाले आहेत. विज पुरवठ्याची डीपी क्षमता १०० केव्ही आहे. प्रत्यक्षात २०० केव्ही क्षमतेची गरज आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियमित होण्यासाठी सुधारणा आवश्यक आहेत. या वेळी पाणीपुरवठा प्रमुख बाजीराव थोरात, शुभम मगर, रोहित कामतीकर, भैय्या साळवे उपस्थित होते. जलशुद्धीकरण केंद्रावर अशी होते प्रक्रिया अंबाडी धरण शहरापासून तीन किलोमीटरवर आहे. तेथून पाणी पंप करून जलशुद्धीकरण केंद्रावर आणले जाते. फाउंटनमध्ये पाणी ढवळले जाते. नंतर तुरटी आणि क्लोरीन टाकून शुद्धीकरण होते. तुरटीने माती आणि गाळ वेगळा होतो. क्लोरीनने निर्जंतुकीकरण होते. त्यानंतर ट्यूब सेटलरमधून पाणी स्थिर केले जाते. नंतर नर्मदा वाळूतून गाळून जलकुंभात साठवले जाते. तेथून नागरिकांना वितरित केले जाते.
अनुदानासाठी गोदावरी पुलावर शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
अतिवृष्टी नुकसानभरपाईत तफावत झाल्याने शेतकऱ्यांनी नागमठाण येथील गोदावरी नदीच्या पुलावर जलसमाधी आंदोलन सुरू केले. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर १७ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान मिळावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. सध्या प्रशासनाने फक्त ६,५०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणेच मदत दिली आहे. शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. अजित काळे आणि तालुका अध्यक्ष गणेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन गुरुवारी १५ जानेवारी रोजी सकाळपासून सुरू झाले. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी आणि ई-केवायसीची अट रद्द करून तात्काळ अनुदान थेट खात्यात जमा करावे, अशीही मागणी केली. याआधी अनेक वेळा उपोषण करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. . या आंदोलनात साहेबराव चोरमळ, नामदेव अदिक, शरद असणे, सचिन वेताळ, पंडित अण्णा शिंदे, वैभव सावंत, वाल्मीक गिरी, महेश तांबे, किरण सावंत, देविदास शिरसाठ, सुरेश शिरसाठ, राजू खुर्द, गणेश वाडेकर, रोहित साबदे, दत्ता नरहरे, रमेश अण्णा सवाई, सुनील गायकवाड, कैलास सवाई, विकास तांबे, बाबुराव तांबे, गणेश गायके, शरद वाडे, मोहन दिवटे, बाबासाहेब सोनवणे यांचा सहभाग होता. पोलीसांनी मध्यस्थी केली. आमदार रमेश बोरणारे आणि माजी सभापती अविनाश गलांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन काही काळासाठी स्थगित केले. या आंदोलनाला आमदार रमेश पाटील बोरणारे, बाजार समितीचे अध्यक्ष रामहरी जाधव, भागिनाथ मगर, माजी सभापती अविनाश गलांडे, माजी जिप अध्यक्ष लताताई पगारे, संजय बोरणारे, शिवसेना उपतालुका प्रमुख डॉ. प्रकाश शेळके, बाळासाहेब जानराव, आदींचा पाठिंबा मिळाला.
खुलताबाद शहरालगत असलेल्या शेकडो वर्षे जुन्या धरम तलावाच्या सुशोभीकरणातून नव्या उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. या पुलामुळे बनी बेगम बाग व वेरूळ महामार्ग थेट शहराशी जोडले जाणार आहेत. तलावातील साचलेले पाणी बाहेर काढल्याने ‘धरम तलाव फुटला’ अशी अफवा पसरली होती. मात्र, ही केवळ सुशोभीकरणाची पूर्वतयारी असल्याचे स्पष्ट झाल्याने संभ्रम दूर झाला आहे. तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने ‘धरम तलाव फुटला’ अशी चर्चा वेरूळ परिसरात झाली होती. डमडम तलाव परिसरातील शेतकऱ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. राज्य शासनाच्या ५४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून बनी बेगम बागेचा विकास प्रकल्प सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून धरम तलावाचे सौंदर्यीकरण व उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. तलावातील जुनी पाळ काही अंशी तोडून पाणी बाहेर काढण्यात आले. गाळ काढणे, पाळीची भिंत उंच करणे व जलसाठा क्षमतेत वाढ करणे ही कामे सुरू आहेत. पाळ उंच झाल्याने अधिक पाणी साठवता येणार आहे. तलावावर असलेला जुना अरुंद पूल पाडण्यात आला आहे. त्या जागी मोठा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलामुळे पर्यटकांना थेट चारचाकी व दुचाकी वाहनांनी बनी बेगम बागेत जाता येणार आहे. खुलताबादेतील निम्म्याहून अधिक भागासाठी शहरात येण्याचा सोपा मार्ग तयार होणार आहे. वेरूळ महामार्ग व शहर यांची जोडणी अधिक सुलभ होणार आहे. यापूर्वी पर्यटकांना वेरूळ-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून बनी बेगम बागेत पायी जावे लागत होते. वाहनांसाठी शहरातील गर्दीतून फेरी मारावी लागत होती. हा अडथळा आता दूर होणार आहे. धरम तलावातून खुलताबाद शहरासाठी नवा मार्ग केला जात असून, सुरू असलेले काम. तलावाची साठवण क्षमता वाढेल नगर परिषदेचे नगर अभियंता ऋषिकेश जोशी यांनी सांगितले की, शहरालगत असलेल्या धरम तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी पाणी बाहेर काढण्यात आले आहे. वेरूळ महामार्ग ते खुलताबाद शहर जोडणारा नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार असून तलावातील गाळ काढून पाळची भिंत उंच करण्यात येईल. यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता वाढेल. अर्थकारणाला चालना पर्यटकांची संख्या वाढून शहराच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे. धरम तलावाचा कायापालट आणि नव्या उड्डाणपुलामुळे खुलताबाद व बनी बेगम बागेला ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या नवे रूप मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
घाटनांद्रा परिसरात शाळांमध्ये प्लास्टिकमुक्तीसाठी मार्गदर्शन
प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम आणि कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्नेहल संतोष सोनवणे हिने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत तिने इंद्रगडी प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्रशाला, जोगेश्वरी विद्यालय तसेच चिंचवण आणि शिंदेफळ येथील शाळांना भेट दिली. विद्यार्थ्यांना प्लास्टिकचा कमी वापर, ओला-सुका कचरा वेगळा करणे आणि स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. फास्ट फूड, फास्ट फॅशन, वाहनांचा वापर आणि विजेच्या वाढत्या वापरामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साइड वाढतो. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. त्यातून ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदल घडतो, हे उदाहरणांसह स्पष्ट केले. अलीकडच्या काळात महापूर, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आणि पिकांचे नुकसान ही बदलत्या हवामानाची ठळक उदाहरणे असल्याचे तिने सांगितले. विद्यार्थ्यांनी शाळेत गोळा केलेला प्लास्टिक कचरा ती स्वतः येऊन घेऊन जाणार असल्याचेही तिने सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत उत्साह निर्माण झाला. मुख्याध्यापक कृष्णा दहेतकर, भरत सुपेकर आणि जितेंद्र गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सत्कार केला. यावेळी कृष्णा दहेतकर, भरत सुपेकर, जितेंद्र गायकवाड, दामोधर मोरे, सोमनाथ घोडके, विनय ज्ञाने यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत बाळापुरात तालुकास्तरीय कार्यशाळा
पिंपळदरी राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा मौजे बाळापुर, तालुका सिल्लोड येथे प्रगतशील शेतकरी अशोक सूर्यवंशी यांच्या शेतात पार पडली. कार्यशाळेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी बहुपीक पद्धतीचे महत्त्व सांगितले. कार्यशाळेचे आयोजन तालुका कृषी अधिकारी डॉ. संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्यांनी तालुक्यातील विविध कृषी योजना, अनुदान, तांत्रिक सहाय्य आणि उपलब्ध सुविधा यांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. कार्यशाळेदरम्यान शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी थेट शेतात जाऊन उत्तरे दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना बहुपीक पद्धत, केसर आंबा शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान याबाबत नवी दिशा मिळाली. या कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी परीक्षित पाटील, नंदू जटोटे, संभाजी पाटील, उमेश सरोदे, स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या गावसखी, पिंपळदरीच्या मास्टर ट्रेनर पूजा गव्हाणे, कृषी विभागाचे कर्मचारी आणि पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीआयएसएच, लखनऊ येथील शास्त्रज्ञ डॉ. राजीव जयस्वाल आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील डॉ. मुजफ्फर सय्यद यांनी वैज्ञानिक शेती पद्धतींची माहिती दिली. उत्पादन खर्च कसा कमी करावा आणि नफा कसा वाढवावा, यावर मार्गदर्शन केले. केशर आंबा शेतीवर सखोल मार्गदर्शन कार्यशाळेत केशर आंबा शेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांनी केसर आंब्याच्या लागवडीपासून ते दर्जेदार व निर्यातक्षम उत्पादन घेण्यापर्यंतच्या यशस्वी तंत्राबाबत सखोल मार्गदर्शन केले. योग्य जातींची निवड, छाटणी, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच बाजारपेठेतील संधी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
मतमोजणी केंद्रात शुक्रवारी (१६ जानेवारी) पोलिसांनी माजी महापौर विकास जैन यांच्यावर केलेल्या मारहाणी प्रकरणाने शनिवारी वेगळी कलाटणी मिळाली. याप्रकरणी शुक्रवारी सहायक पोलिस आयुक्तांच्या फिर्यादीनुसार, जैन यांच्यासह तिघांवर पोलिसांना धक्काबुक्की व शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले ओळखपत्र पाहूनच मतमोजणी केंद्रावर शुक्रवारी सर्वांना आत सोडले जात होते. या वेळी विकास जैन यांनी ओळखपत्र न दाखवता पोलिसांशी हुज्जत घातली. मी कोण आहे हे माहीत नाही का, असे म्हणत त्यांनी गेट ढकलून आत जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी जैन यांनी निरीक्षक प्रमोद कठाणे आणि सहायक निरीक्षक मिरधे यांना धक्काबुक्की करून त्यांचा गळा धरला. हा वाद सोडवण्यासाठी सहायक आयुक्त सागर देशमुख पुढे आले असता जैन यांनी त्यांनाही मागे ढकलले. त्यांच्यासोबतच्या शिवा राजपूत आणि अभिषेक जीवनवाल यांनीही गेट ढकलून आत प्रवेश केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला, असे या तक्रारीत नमूद केलेले आहे. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, कोर्टात दाद मागू मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या प्रकरणात चर्चा केली आहे. या प्रकरणात कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या प्रकरणात पोलिस आयुक्त व अन्य पोलिस अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. -संजय शिरसाट, पालकमंत्री निलंबनाच्या धास्तीने माझ्याविरुद्ध तक्रार मी ६१ वर्षांचा ज्येष्ठ नागरिक आहे, पोलिसांनी मला ज्या पद्धतीने मारले, ती वागणूक सराईत गुंडासारखी होती. अधिकारी सागर देशमुख त्या वेळी माझ्यापासून बरेच दूर होते. निलंबनाच्या भीतीने त्यांनी तक्रार दिली आहे. मारहाणीची घटना कॅमेऱ्यात कैद आहे. मी पोलिस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. -विकास जैन, माजी महापौर
महापालिका निवडणुका होताच मित्रपक्षांव्यतिरिक्त इतर पक्षांतील ५ नगरसेवक येऊन भेटल्याचे भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. शहराचा विकास करण्याची क्षमता भाजपमध्ये आहे. केंद्र आणि राज्याच्या निधीतून शहराच्या विकासाचे स्वप्न भाजप साकारेल, असे सांगत ५ नगरसेवकांनी बिनशर्त पाठिंबा देण्याचे निश्चित केल्याचे शितोळे यांनी स्पष्ट केले. मात्र, शिंदेसेनेसोबत युती करण्याबद्दल त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. भाजपला निवडणुकीत ५७ जागा मिळाल्या असून, बहुमतासाठी केवळ एक नगरसेवक आवश्यक आहे. शिवसेना शिंदे गटाचे १३ नगरसेवक विजयी झाले आहेत. स्वबळावर महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचा सभापती करायचा झाल्यास भाजप शिंदेसेनेला खो देऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. यातच आता भाजप शहर जिल्हाध्यक्ष शितोळे यांनी सूचक इशारा दिला आहे. इतर पक्षाच्या ५ नगरसेवकांना घ्यायचे की नाही, यासंदर्भातील आपण निर्णय करू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोअर कमिटी प्रथम विचार करेल आणि त्यानंतर प्रदेश भाजपकडे अहवाल सादर केला जाईल. प्रदेशाकडून यासाठी हिरवा कंदील मिळाला तरच पुढे जाता येईल, असेही शितोळे यांनी या वेळी बोलताना सांगितले. मित्रपक्षांवर दबाव आणण्याची खेळी भाजपला बहुमतासाठी केवळ एकाच जागेची गरज असल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. महापौरपदाचे आरक्षण अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे पुढील कोणताही निर्णय घेण्यासाठी आणखी १०-१२ दिवसांचा अवधी आहे. अशा स्थितीत राज्याच्या सत्तेत सोबत असलेल्या शिंदेसेनेने महापालिकेतही साथ द्यावी. मात्र, युती करताना फारशा अटी घालू नयेत. पदांच्या मागण्या करू नयेत म्हणून भाजपकडून दबावतंत्राची खेळी म्हणून शितोळे यांच्या वक्तव्याकडे पाहिले जात आहे. आप्तस्वकीयांना उमेदवारी देणाऱ्यांचे बेहाल भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपने महापालिका निवडणुकीत जाणीवपूर्वक मंत्री, खासदार, आमदार यांच्या पुत्रांना उमेदवारी नाकारली. पक्षासाठी आयुष्यभर राबणारा कार्यकर्ता सर्वतोपरी आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत आप्तस्वकीयांना उमेदवारी देणाऱ्या पक्षांचे बेहाल झाले असल्याची प्रतिक्रिया भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिली. उमेदवारी न मिळाल्यामुळे अरविंद डोणगावकर यांनी आपल्या पत्नी सविता यांच्यासाठी क्रांती चौक प्रभागातून बंडखोरी केली. त्यांनीही किशोर शितोळे यांची भेट घेऊन यशाबद्दल अभिनंदन केले.
जि. प.साठी भाजपने युतीचा निर्णय आताच घ्यावा:शिवसेनेची भूमिका, शेवटपर्यंत चर्चा चालणार नाही- शिरसाट
जिल्हा परिषदेची निवडणुकीसाठी युती करायची की नाही, याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने येत्या २ ते ३ दिवसांत घ्यावा. अन्यथा शिवसेना स्वबळावर लढणार आहे, असे शिंदेसनेने सूचित केले आहे. मनपा निवडणुकीत शेवटच्या दिवसापर्यंत युती करायची की नाही, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, शेवटच्या दिवशी युती तुटली. त्याचा फटका शिवसेनेला बसला. या पार्श्वभूमीवर पक्षाने ही भूमिका घेतली आहे. पैठणमध्ये शिवसेनेचे आमदार विलास भुमरे आणि खासदार संदिपान भुमरे यांनी तयारी केली आहे. शनिवारी मेळावादेखील घेण्यात आला. याबाबत दिव्य मराठीशी बोलताना खासदार संदिपान भुमरे यांनी सांगितले की, स्वबळाच्या निवडणुकीसाठी आम्ही तयारी केली आहे. मात्र, याचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. त्यासाठी बैठक होणार आहे. आमची तयारी सुरू जिल्हा परिषदमध्ये भाजपसोबत युती व्हावी यासाठी आम्ही अनुकूल आहोत. मात्र, मनपासारखी शेवटपर्यंत चर्चा करता येणार नाही. दोन ते तीन दिवसांत काही िनर्णय झाल्यास चर्चा होईल, अन्यथा आम्ही तयारी सुरू केली आहे. - संजय शिरसाट, पालकमंत्री

22 C