भ्रष्टाचाराचा कासरा आवळण्याची हीच योग्य वेळ
निलंगा : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात असताना जिल्ह्यात कोणतेही ठोस विकासकाम झाले नसून अनेक विकास योजना केवळ कागदावरच राबविण्यात आल्या. या योजनांमध्ये भाजप पदाधिकारी व त्यांच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, काँग्रेस नेते धिरज विलासराव देशमुख यांनी केला. निलंगा तालुक्यातील लांबोटा व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड येथील जिल्हा […] The post भ्रष्टाचाराचा कासरा आवळण्याची हीच योग्य वेळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शेतीच्या योजना थेट शेतक-यांपर्यंत पोहोचविणार
चाकूर : प्रतिनिधी ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच ग्रामविकासासाठी प्रयत्नशील राहणार, शेती विकास, आरोग्य, रस्ते आणि रोजगारासाठीचा अजेंडा तसेच थेट आश्वासन, गाव बदलण्यासाठी नियोजन करणार आणि तक्रारी नव्हे तर तोडगा काढणार, असे प्रतिपादन नागनाथ पाटील (एन.आर.) हे कॉर्नर बैठकांतून करीत आहेत. जानवळ गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून, काँग्रेस आघाडीकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी […] The post शेतीच्या योजना थेट शेतक-यांपर्यंत पोहोचविणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
येरोळ गट, गणातील जनता काँग्रेसच्या पाठीशी: बिरादार
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी येरोळ गट व गणात काँग्रेस पक्षाला वाढता पाठिंबा मिळत असून येथील जनतेने विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते योगेश बिरादार यांनी केले. ते येरोळ गणात प्रचारदरम्यान बोलत होते. या प्रसंगी काँग्रेस नेते प्रभाकर बंडगर हे उपस्थित होते. योगेश बिरादार म्हणाले की, गेल्या […] The post येरोळ गट, गणातील जनता काँग्रेसच्या पाठीशी: बिरादार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सर्वांगीण विकासासाठी जि. प., पं. स. निवडणूक महत्वाची
रेणापूर : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका या गावांच्या सर्वांगीण विकासाशी थेट संबंधित असतात मात्र या निवडणुकांमध्ये भाजपचे काही नेते द्वेषाचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी कामखेडा गटातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधताना व्यक्त केला. लातूर जिल्हा परिषद काँग्रेस आघाडीच्या कामखेडा गटातील अधिकृत […] The post सर्वांगीण विकासासाठी जि. प., पं. स. निवडणूक महत्वाची appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माणसांसारखाच झाडांचाही वाढदिवस
लातूर : प्रतिनिधी झाडांशी केवळ नाते नाही तर जिव्हाळा निर्माण व्हावा, या उद्देशातून वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने हिप्परसोगा येथे झाडांचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दि. १ फेब्रुवारी रोजी झालेल्या या उपक्रमाने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले. गतवर्षी लावलेल्या झाडांना फुगे बांधून, केक कापून आणि आनंदी वातावरणात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. […] The post माणसांसारखाच झाडांचाही वाढदिवस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पोलिस दलात अत्याधुनिक सर्व्हेलन्स वाहनांचा समावेश
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक व प्रभावीपणे राखण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या तांत्रिक क्षमतेत महत्त्वपूर्ण भर पडली असून, महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक, बिनतारी संदेश व वाहतूक (कम्युनिकेशन व मोटार ट्रान्सपोर्ट) यांच्या वतीने लातूर जिल्हा पोलीस दलास दोन अत्याधुनिक सर्व्हेलन्स व्हॅन प्राप्त झाल्या आहेत. या अत्याधुनिक सर्व्हेलन्स वाहनांचे उद्घाटन […] The post पोलिस दलात अत्याधुनिक सर्व्हेलन्स वाहनांचा समावेश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मतांचा बाजार मांडून शासकीय योजना हडप करणा-या मंडळींना जनतेने धडा शिकवावा
उदगीर : प्रतिनिधी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या स्थानिक लोकप्रतिनचे धोरण निवडणूक काळात मतांचा बाजार मांडून नंतर शासकीय योजना हडप करणे. या मंडळींना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे आयोजित […] The post मतांचा बाजार मांडून शासकीय योजना हडप करणा-या मंडळींना जनतेने धडा शिकवावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बालविवाह मुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांची सामूहिक शपथ
लातूर : प्रतिनिधी बालविवाह मुक्त भारत अभियान आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याच्या अंतर्गत महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार तसेच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या आशा मोहिमेअंतर्गत लातूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व लातूर येथील संत नामदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी […] The post बालविवाह मुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांची सामूहिक शपथ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औसा रोडवर भरदुपारी दागिन्यांची लूट
लातूर : आम्ही पोलीस आहोत, चार दिवस अंगावर सोन्याचे दागिने घालून फिरण्यास मनाई आहे. म्हणून दोघा तोतयांनी पोलीस असल्याचे बनावट ओळखपत्र दाखवून एका दांपत्याकडून सोन्याचे दागिने लुटल्याची घटना दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी औसा रोडवर घडली. पंचाक्षरी बाबय्या स्वामी वय ६६ वर्षे रा. शिवनगर लातूर व त्यांच्या पत्नीस औसा रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंप, गंधर्व हॉटेल […] The post औसा रोडवर भरदुपारी दागिन्यांची लूट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अधिकारी वडिलाचा मुलानेच केला भोसकून खून
लातूर : येथील आयकर कार्यालयात अधिकारी असलेले कृष्णकुमार सन्मुखराव यांचा त्याच्या मुलानेच राहत्या घरी चाकु पोटात खुपसून खुन केला. ही घटना दि. ३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. या घटनेने लातूरात खडबड उडाली. आयकर विभागातील अधिकारी कृष्णकुमार सन्मुखराव हे अहमदपूर तालुक्यातील मूळ रहिवाशी आहेत. त्यांनी लातूर शहरापासून जवळच असलेल्या खोपेगाव शिवारात प्लॉट घेवुन नुकतेच घर बांधले […] The post अधिकारी वडिलाचा मुलानेच केला भोसकून खून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संसदेच्या चालू अधिवेशनात आज मोठा गदारोळ पाहायला मिळाला. सभागृहाच्या शिस्तीचे उल्लंघन आणि गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत भंडारा-गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोले यांच्यासह विरोधी पक्षाच्या एकूण ६ खासदारांना उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. सभागृहाचे कामकाज सुरू असताना विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून आक्रमक पवित्रा घेतला होता. यादरम्यान काही सदस्यांनी थेट वेलमध्ये धाव घेतली. सभापतींच्या समोरील सचिवांच्या टेबलापर्यंत जाऊन कागद फाडणे आणि ते कागद अध्यक्षांच्या आसनाकडे भिरकावल्याने सभागृहातील वातावरण तापले होते. आणि भंडाऱ्याचे खासदार डाँ. प्रशांत पडोळे यांच्यासह मणिकम टागोर, अमरिंदर सिंह राजा वारींग, गुरजीत सिंह औजला, डीन कुरियाकोस, किरण कुमार रेड्डी या खासदारांना निलंबीत करण्यात आल. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या खासदारांविरुद्ध नियम ३७४(२) अंतर्गत निलंबनाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावात नमूद करण्यात आले की, संबंधित सदस्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या अधिकाराचा अवमान केला असून सभागृहाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहचवली आहे. आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि या सर्व खासदारांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दरम्यान भंडाऱ्यात या घटनेचे पडसाद उमटले असून, नव्याने निवडून आलेले खासदार प्रशांत पडोले यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
खरीप हंगामातील धानाचे थकीत चुकारे, बोनस आणि वीज जोडणी यांसारख्या प्रलंबित प्रश्नांवरून भारतीय किसान संघ, विदर्भ प्रांत (जिल्हा भंडारा) आक्रमक झाला आहे. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मंगळवारला (ता.०३) लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले असून, १५ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. दिलेल्या निवेदनाद्वारे भारतीय किसान संघाने प्रामुख्याने सरकारचे लक्ष वेधले असून, त्यात खरीप हंगाम २०१५-१६ मधील धानाचे चुकारे अद्याप मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, ते तात्काळ देण्यात यावेत. धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलवर बोनस न देता, दरवर्षीप्रमाणे हेक्टरी ३०,००० रुपये बोनस जाहीर करावा. ज्या शेतकऱ्यांनी कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी अर्ज केले आहेत, त्यांना तातडीने कनेक्शन देण्यात यावे. धानाची शासकीय खरेदी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे खरेदीचे उद्दिष्ट वाढवून सर्व धानाची खरेदी करावी. खरीप हंगामातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊनही अद्याप मदत मिळालेली नाही, ती तात्काळ वितरीत करावी. अशा मागण्या केल्या आहेत. शेतकऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे की, खरीप हंगामातील थकबाकी न मिळाल्यामुळे पुढील हंगामासाठी बळीराजाकडे भांडवल शिल्लक नाही. जर प्रशासनाने पुढील १५ दिवसांत या मागण्यांची दखल घेतली नाही, तर भारतीय किसान संघातर्फे मोठे आंदोलन उभारले जाईल आणि याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल. यावेळी भारतीय किसान संघाचे दिनेश कापगते, रूग्वेद येवले यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार यांचे अल्पशा आजाराने आज, 3 फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. एक निष्ठावान पदाधिकारी आणि अभ्यासू नेतृत्व गमावल्यामुळे राजकीय वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पगार यांच्या पार्थिवावर उद्या, बुधवार 4 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता उत्राने (ता. बागलाण, जि. नाशिक) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुमारे 40 वर्षांचा प्रदीर्घ संघटनात्मक अनुभव असलेले ॲड. रविंद्र नाना पगार 2012 पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा सांभाळत होते. शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांसारख्या दिग्गज नेत्यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या पगार यांनी नाशिक महानगरपालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती म्हणूनही कार्य केले होते. तसेच आपल्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीला त्यांनी युवक काँग्रेस आणि 'एनएसयूआय' या विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्षपदही अत्यंत यशस्वीरीत्या भूषविले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि विविध जिल्ह्यांचे निरीक्षक म्हणून अनुभवी नेतृत्व राहिलेल्या ॲड. रविंद्रनाना पगार यांनी, 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस सोडल्यानंतर नाशिकमध्ये त्यांच्या समर्थनार्थ पहिला मेळावा घेत राष्ट्रवादीच्या जडणघडणीत ऐतिहासिक योगदान दिले होते. अलिकडच्या काळात अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही, पगार यांनी जिल्ह्यातील पक्षसंघटना एकसंध ठेवत या नेत्यांना खंबीर साथ दिली होती. अशा या निष्ठावान आणि अनुभवी नेत्याच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्व स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची ११ फेब्रुवारीला होणार घोषणा
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीसंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली असून मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला आहे. ७ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्विकारले जाणार आहेत. तर ११ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची घोषणा केली जाणार आहे. ११ फेब्रुवारी रोजीच दुपारी १२ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. महापौरपादासाठी अर्ज मागे घेण्याची वेळ सभागृह […] The post मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची ११ फेब्रुवारीला होणार घोषणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मोझरीत प्रहार संघटनेचे उपोषण सुरू:एस.टी. बसेस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल, महामंडळाला जाग
तिवसा तालुक्यातील मोझरी येथे प्रवाशांच्या हक्कासाठी प्रहार संघटनेने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आश्रम, महासमाधी, अनेक शैक्षणिक संस्था आणि आयुर्वेदिक रुग्णालये असलेल्या मोझरीमध्ये दररोज हजारो भाविक, विद्यार्थी, व्यावसायिक आणि कामगार प्रवास करतात. मात्र, येथे प्रवाशांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आहे. मोझरी हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, सार्वजनिक प्रवासाचे मुख्य साधन एसटी बस आहे. परंतु, अमरावती बस डेपो अंतर्गत येणाऱ्या अनेक बसेस मोझरी येथे थांबत नाहीत. तसेच, मोझरी आणि तिवसा येथील प्रवाशांना वाहक आणि चालकांकडून सातत्याने हीन वागणूक दिली जाते. अधिकृत थांबे असतानाही अनेक बस मोझरी व तिवसा येथे न थांबवता बायपासने धावतात, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असून, याबाबत वारंवार लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. यामुळे संतप्त झालेल्या प्रहार संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते संजय देशमुख यांनी मोझरी एसटी स्टँडवर बेमुदत उपोषणास सुरुवात केली. उपोषणाची दखल घेत महामंडळाचे विभाग नियंत्रक संदीप रायलवार आणि जयदीप घोडे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. त्यांनी प्रवाशांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका दर्शवली असून, येत्या काळात अनेक सुधारणा दिसून येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी सुरेंद्र देवगडे, कपिल उमप, इर्शाद बेग, योगेश लोखंडे, हेमंत तायडे, प्रेमानंद कांडलकर, अशोकराव लांजेवार, शरद खारोडे, श्याम काळकर, राजाभाऊ आंबेडकर, मोहन लोखंडे, विलास कांदळकर, मंगेश वानखडे, प्रशांत राऊत, नवीन कोचर, अमोल बेलसरे, मनोहर पुरी, नरेंद्र काकडे, अनिल मेश्राम आणि विवेक बेले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्यांची दखल घेत एसटी महामंडळ प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. चालक आणि वाहकांच्या वागणुकीत सुधारणा करण्यासाठी अमरावती आणि तिवसा येथील पंचवटी चौकात जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. प्रत्येक चालकाच्या लॉगशीटवर मोझरी बायपासने न जाता मोझरी व तिवसा थांब्यांवर बस थांबवून प्रवाशांना चढू देण्याबाबत लेखी सूचना दिल्या जातील. तसेच, मोझरी बस स्टँडवर दोन जबाबदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या उपाययोजना त्वरेने लागू केल्या जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) जनजागृती आणि गुणवत्ता वाढीसाठी 'स्कुल कनेक्ट' अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा पहिला प्रयोग मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या पुढाकाराने भानखेडा (बुद्रुक) येथील शाळेत यशस्वीपणे पार पडला. महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि इंग्रजी विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी श्री शिवाजी हायस्कूल, भानखेडाचे मुख्याध्यापक सतीश पाटील प्रमुख उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि रोपे देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सविता ठाकरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) तसेच गुणवत्ता वाढीबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी NEP 2020 ची गरज, विद्यार्थ्यांना विषय निवडीसाठी उपलब्ध असलेल्या संधी आणि भविष्यातील व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक कौशल्यांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना राऊत यांनी केले, तर आभार वऱ्हाडे यांनी मानले. मुख्याध्यापक पाटील यांनी आपल्या भाषणात वक्त्यांचा परिचय करून दिला आणि अशा जनजागृती कार्यक्रमांची भविष्यात गरज असल्याचे अधोरेखित केले. मानवी मूल्यांची शिकवण देणाऱ्या प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. इंग्रजी विभागाच्या प्रीती जवंजाळ आणि महाविद्यालयाचे विद्यार्थीही यावेळी उपस्थित होते. शिक्षक राजूरकर, श्रीमती राऊत, जया ठाकरे आणि इतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी एक संवाद सत्र आयोजित करण्यात आले होते, ज्यात त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बद्दल प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. व्याख्यानानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अभिप्राय सत्राचेही आयोजन करण्यात आले होते, जिथे त्यांनी आपले विचार आणि मते मांडली.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून एका महिन्याच्या आत निवडणूक खर्चाचा अहवाल सादर न केल्याने जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या शंभराहून अधिक उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित नगरपालिकांनी उमेदवारांना अहवाल सादर करण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. या नोटीसनंतरही उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे अंतिम हिशेब सादर न केल्यास, तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्यांना पुन्हा नोटीस बजावण्यात येतील. जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल गेल्या महिन्यात १६ डिसेंबर रोजी घोषित झाला होता. या तारखेपासून एका महिन्याच्या आत सर्व उमेदवारांना आपापल्या निवडणूक खर्चाचे अंतिम हिशेब संबंधित तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात सादर करणे बंधनकारक होते. मात्र, शंभराहून अधिक उमेदवारांनी अद्यापही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. या निवडणुकीत अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चिखलदरा, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड आणि शेंदुरजनाघाट या १० नगरपालिका तसेच नांदगाव खंडेश्वर आणि धारणी या दोन नगरपंचायतींचा समावेश होता. यामध्ये एकूण १२ नगराध्यक्ष आणि २७८ नगरसेवक निवडून द्यायचे होते. नगराध्यक्षपदासाठी ६४, तर नगरसेवकपदासाठी १०४८ उमेदवार रिंगणात होते. यापैकी बहुसंख्य उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च सादर केला आहे, परंतु शंभराहून अधिक उमेदवारांनी अद्यापही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संबंधित नगरपालिका प्रशासनाने त्यांना नोटीस बजावून एक आठवड्याची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीत खर्च सादर न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुन्हा नोटीस पाठवण्यात येतील. नगरपालिका प्रशासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बजावण्यात आलेल्या नोटीसनुसार उमेदवारांनी कार्यवाही न केल्यास, त्यांची माहिती थेट राज्य निवडणूक आयोगाला कळवण्यात येईल. जिल्हाधिकारी संबंधित उमेदवारांवर कारवाईची शिफारस करतील. या शिफारशीनुसार, राज्य निवडणूक आयोग संबंधित उमेदवारांना पुढील ६ वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढवण्यास बंदी घालू शकते.
मेळघाटमधील आरोग्य सेवांमधील त्रुटींवरून उच्च न्यायालयाने अलीकडेच जिल्हा आरोग्य विभाग आणि राज्य सरकारला फटकारले होते. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने नवीन उपाययोजनांसाठी जिल्हा नियोजन समिती (DPC) मार्फत शासनाकडे १३६ कोटी १० लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र, शासनाने या मागणीच्या तुलनेत ६४ कोटी रुपये कमी, म्हणजेच केवळ ७२ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) कार्यालय आणि जिल्हा शल्य चिकित्सक (CS) यांनी संयुक्तपणे सन २०२६-२७ साठी आरोग्य सेवांचा आराखडा तयार केला होता. यामध्ये जिल्हा परिषदेने ७७ कोटी ५५ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली होती, तर उर्वरित मागणी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून करण्यात आली होती. अशा प्रकारे दोन्ही यंत्रणांनी मिळून एकूण १३६ कोटी १० लाख ५५ हजार रुपयांची मागणी डीपीसीकडे सादर केली. शासनाने जिल्ह्यातील इतर सर्व यंत्रणांच्या मागण्यांचा हवाला देत केवळ ७२ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच सरकारने दोन्ही यंत्रणांना ८९.५ कोटी रुपये दिले होते. यावर्षी अधिक उपाययोजना करण्याची गरज असताना, किमान गतवर्षीपेक्षा जास्त निधी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली आहे. निधी कपातीमुळे आरोग्य विभाग गोंधळात पडला असून, उपाययोजना कशा कराव्यात असा पेच अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. मागणी केलेल्या रकमेतून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांचे बांधकाम व विस्तारीकरण करायचे होते. तसेच, उर्वरित इमारतींसाठी अग्निसुरक्षा यंत्रणा खरेदी करणे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती करणे, आणि जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांसाठी औषधे व इतर साधनसामग्री खरेदी करणे अपेक्षित होते. याशिवाय, नव्याने सुरू झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी (GMC) आयसीयू, एनआयसीयू, बालरोग विभाग आणि कॅज्युल्टी विभाग अद्ययावत करणे आवश्यक आहे. यासाठी वाढीव निधी मिळणे गरजेचे असून, डीपीसीचे अध्यक्ष या नात्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे किती अतिरिक्त निधी मिळवून देतात, याकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे आज (मंगळवारी) गुरुकुंज मोझरी येथील अस्थीकुंडात विसर्जन करण्यात आले. सोमवारी दिवसभर अमरावतीत अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. विसर्जनापूर्वी राष्ट्रवादीचे सरचिटणीस आमदार संजय खोडके आणि अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांच्या अमरावती येथील जनसंपर्क कार्यालयात सोमवारी अनेकांनी अस्थीकलशाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी आमदार संजय खोडके यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीस्थळी असलेल्या गुरुकुंज मोझरी येथे अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी प्रार्थना मंदिरात काही काळ अस्थीकलश ठेवण्यात आला होता. 'सप्रेम जयगुरुदेव'च्या घोषाने परिसर निनादून गेला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत अजितदादा पवार यांचे नेतृत्व, प्रशासकीय अनुभव, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी असलेली तळमळ यांचा उल्लेख केला. स्व. अजितदादांचे विचार व कार्य महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणारे असून ते सदैव स्मरणात राहतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे, शहराध्यक्ष प्रशांत डवरे, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय सरचिटणीस पद्मश्री जनार्दनपंत बोथे, डॉ. राजाराम बोथे, जिल्हा परिषदेच्या सुरेखाताई ठाकरे, राकाँचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष अविनाश ठाकरे, कार्याध्यक्ष प्रवीण भुजाडे, अविनाश मार्डीकर, निखिल ठाकरे, नवनियुक्त नगरसेवक प्रमोद महल्ले, डॉ रघुनाथ वाडेकर, भोजराज काळे, विशाल खोडके, राहुल मानकर, प्रकाश मक्रमपुरे, नगरसेवक योगेश सवई, यश खोडके, माजी अध्यक्ष भूषण यावले, तालुकाध्यक्ष दिलीप भुयार, कार्याध्यक्ष प्रकाश पडोळे, पोलीस पाटील भालचंद्र पोल्हाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यायव्यवस्थेसाठी अर्थसंकल्पात अपुरी तरतूद:ॲड. असीम सरोदे यांची केंद्र सरकारवर तीव्र टीका
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेसाठी केलेल्या अपुऱ्या तरतुदीवर तीव्र टीका केली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात न्यायव्यवस्थेसाठी कोणतीही ठोस आणि स्वतंत्र तरतूद नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. देशात न्याय मिळवण्याची प्रक्रिया दिवसेंदिवस अधिक खर्चिक होत असताना ही तरतूद चिंताजनक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. न्यायव्यवस्थेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असावी, याबद्दल समाजात आणि राजकीय पातळीवर गांभीर्याचा अभाव दिसतो, असे सरोदे यांनी नमूद केले. आर्थिक तरतुदींच्या कमतरतेमुळे मूलभूत हक्कांशी संबंधित अनेक प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. बाल लैंगिक अत्याचारविरोधी विशेष न्यायालये (POCSO) आणि अॅट्रॉसिटी कोर्ट यांना आवश्यक सुविधा व मनुष्यबळासाठी सातत्याने संघर्ष करावा लागतो. यामुळे पीडितांना वेळेत न्याय मिळत नाही. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात बलात्कार आणि पॉक्सो प्रकरणांसाठी केंद्र सरकारने केवळ २०० कोटी रुपयांची तरतूद केली होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. एकूण राष्ट्रीय अर्थसंकल्पाच्या केवळ ०.०४ टक्के खर्च न्यायव्यवस्थेसाठी राखीव ठेवण्यात येतो, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. न्यायव्यवस्थेसाठी आर्थिक नियोजन केंद्र व राज्य सरकारांनी संयुक्तपणे करणे गरजेचे असताना, केंद्र सरकार हळूहळू आपली जबाबदारी झटकत असल्याचेही सरोदे यांनी म्हटले. ई-कोर्ट संकल्पना देशभर राबविण्यात आली असली, तरी त्यासाठी आवश्यक असलेल्या डिजिटल पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही. ई-कोर्टसाठी केवळ ७ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. डिजिटल पुरावे सादर होत असले, तरी त्यांचे प्रभावी परीक्षण करण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळाचा अभाव आहे. न्यायालयांसोबत काम करणाऱ्या तंत्रज्ञांची आवश्यकता असून, त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद हवी, असे सरोदे म्हणाले. गावपातळीवर लवकर न्याय मिळावा, विशेषतः शेतकऱ्यांचा वेळ वाचावा, यासाठी ग्राम न्यायालयांची संकल्पना अस्तित्वात आणण्यात आली. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत ती अपयशी ठरत आहे. संपूर्ण देशासाठी ग्राम न्यायालयांसाठी केवळ ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, हे खेदजनक असल्याचे त्यांनी सांगितले. देशात व महाराष्ट्रात कोट्यवधी खटले प्रलंबित असून, त्याचा थेट फटका विकासाला बसत आहे. वेळेवर न्याय न मिळणे म्हणजे न्यायप्रक्रियेचेच नुकसान आहे. विकास साधायचा असेल, तर न्यायव्यवस्था आधुनिक, सक्षम आणि तत्पर करणे आवश्यक असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करणे काळाची गरज असल्याचे ॲड. सरोदे यांनी स्पष्ट केले. देशात आणि महाराष्ट्रात कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत. प्रत्येक नागरिक अप्रत्यक्षपणे १५ ते २० खटल्यांचा आर्थिक भार सहन करत असल्याची परिस्थिती आहे. प्रलंबित खटल्यांमुळे देशाच्या विकासाला मोठा फटका बसत आहे. सरकारविरोधी खटल्यांचे प्रमाण अधिक असून, त्यांचे विश्लेषण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद धारणी पंचायत समितीच्या संघाने पटकावले आहे. या संघाने सांस्कृतिक स्पर्धांमध्येही उपविजेतेपद मिळवत सलग दुसऱ्या वर्षी आपला दबदबा कायम ठेवला. क्रीडा स्पर्धा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि किरण नगरातील नरसम्मा हिरय्या महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या. तर सांस्कृतिक कार्यक्रम विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरातील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवात जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांच्या संघांसह जिल्हा परिषद मुख्यालयाचा एक अशा एकूण १५ संघांनी सहभाग घेतला होता. सुमारे ३ हजार खेळाडूंचा सहभाग असलेल्या या क्रीडा स्पर्धेत धारणीच्या संघाने सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी केली. कबड्डी, फुटबॉल, बॅडमिंटन, जलतरण आणि धावस्पर्धेत या खेळाडूंनी अव्वल स्थान पटकावले, ज्यामुळे त्यांना सर्वसाधारण विजेतेपद मिळाले. मेळघाटचे नाव उज्वल करणाऱ्या धारणीने गतवर्षीही क्रीडा स्पर्धेत आपले वर्चस्व राखले होते. विजेत्या संघाला मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, डेप्युटी सीईओ श्रीराम कुळकर्णी, बाळासाहेब बायस, विलास मरसाळे, शिक्षणाधिकारी सतिश मुगल, योजना शिक्षणाधिकारी सुरेश वाघमारे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, बिडीओ स्नेहल शेलार, स्वप्निल मगदुर, अभिषेक कासोदे, सुधीर अरबट, तुषार दांडगे, विनोद खेडकर, प्रफुल्ल भोरखडे व विजय गायकवाड, गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे, संदीप बोडखे, विनोद गाडे, पंकज गुल्हाने आदी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते धारणीच्या सर्व खेळाडू आणि कलावंतांचा सत्कार करण्यात आला. तीन दिवसीय क्रीडा महोत्सवातील सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ, दिव्यांग खेळाडू आणि सांस्कृतिक कार्यक्रमातील कलावंतांना चषक व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. श्रीराम कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले, तर मनीष काळे आणि शैलेंद्र दहातोंडे यांनी सूत्रसंचालन केले. उपशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे प्रमुख, उपप्रमुख, सदस्य तसेच प्रसिद्धी विभागाचे पदाधिकारी विनोद गाडे, राजेश सावरकर, विनायक लकडे, शरद गढीकर, हेमंतकुमार यावले, पूनम उके यांनी विशेष परिश्रम घेतले.
राज्यसभेत खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) च्या आंतरराष्ट्रीय विस्ताराशी संबंधित नियामक, तांत्रिक आणि सुरक्षा आव्हानांवर लक्ष वेधले. भारताची ही डिजिटल पेमेंट प्रणाली सध्या आठ देशांमध्ये कार्यरत असून, तिचा जागतिक वापर वाढत आहे. प्रश्न उत्तराच्या तासात, डॉ. कुलकर्णी यांनी सरकारकडून यूपीआय कार्यरत असलेल्या देशांची माहिती, आंतरराष्ट्रीय व्यवहारांची संख्या व मूल्य, तसेच भारतीय प्रवासी आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी पुढील विस्ताराचा आराखडा काय आहे, याची विचारणा केली. यावर लेखी उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, यूपीआय सध्या भूतान, फ्रान्स, मॉरिशस, नेपाळ, कतार, सिंगापूर, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे कार्यरत आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षांत आंतरराष्ट्रीय यूपीआय व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०२३-२४ मध्ये ३७,०६० व्यवहारांवरून डिसेंबर २०२५ अखेर १४.८६ लाखांहून अधिक व्यवहार झाले आहेत. तसेच, व्यवहार मूल्य १,९७० लाख रुपयांवरून ३३,०४३ लाख रुपयांपर्यंत वाढले आहे. पुरवणी प्रश्नांद्वारे डॉ. कुलकर्णी यांनी यूपीआयला इतर देशांच्या पेमेंट प्रणालींशी जोडताना येणाऱ्या नियामक, तांत्रिक आणि द्विपक्षीय समन्वयाच्या अडचणी स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यांनी डेटा लोकलायझेशन, सायबर सुरक्षा, मनी लॉन्डरिंग आणि दहशतवाद वित्तपुरवठा प्रतिबंध नियमांचे पालन, तसेच सेटलमेंट जोखमींसारख्या मुद्द्यांवर यजमान देशांच्या नियामकांनी व्यक्त केलेल्या चिंतांवरही प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, यूपीआयचा जागतिक विस्तार करण्याची जबाबदारी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) उपकंपनी, NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडकडे आहे. विविध देशांमधील तांत्रिक पायाभूत सुविधा, चलन विनिमय व्यवस्था, पेमेंट स्कीम्सचे मालकी हक्क आणि वेगवेगळ्या नियामक चौकटींमुळे आव्हाने निर्माण होत आहेत. चौधरी यांनी पुढे नमूद केले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भागीदार देशांच्या समन्वयाने या अडचणी, तांत्रिक उपाय आणि द्विपक्षीय सहकार्याच्या माध्यमातून दूर केल्या जात आहेत. या आव्हानांनंतरही यूपीआय आठ देशांमध्ये यशस्वीपणे कार्यरत असल्याने भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांवर जागतिक स्तरावर विश्वास निर्माण झाला आहे. सरकारने भविष्यातही यूपीआयचा आंतरराष्ट्रीय विस्तार वाढवून सुरक्षित, जलद आणि परवडणाऱ्या सीमापार डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याची कटिबद्धता व्यक्त केली.
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा(सी-टीईटी)देणा-या शिक्षकांना निवडणूकीच्या कामातून सूट
मुंबई : प्रतिनिधी ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणा-या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली असून तसे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिका-यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर १२ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदानाच्या तारखेत […] The post केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा(सी-टीईटी)देणा-या शिक्षकांना निवडणूकीच्या कामातून सूट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला असून सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. पुणे हा अजित पवारांचा गृह जिल्हा आहे. त्यांनी गेली अनेक वर्ष पुण्याचे पालकमंत्री […] The post पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय भंडारा मार्फत भंडारा ग्रंथोत्सव 2025 चे आयोजन पाच व सहा फेब्रुवारी रोजी जकातदार माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथोत्सवाच्या आयोजनाच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शन, विक्री तसेच विविध साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या ग्रंथोत्सवाचा ग्रंथ चळवळ रुजवण्यासाठी महत्त्वाचा वाटा असेल. गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता या कार्यक्रमाच ग्रंथ पूजन व ग्रंथ दिंडीने शुभारंभ होणार आहे यावेळी जिल्हाधिकारी सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी तारकेश्वरी बोरीगड्डे , शिक्षणाधिकारी मनीषा गजभिये, शिक्षणाधिकारी प्राथमिक रवींद्र सोनटक्के ,ग्रंथालय संचालक रामदास साठे आणि जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष धनंजय दलाल उपस्थित राहणार आहेत. सकाळी ग्रंथ पूजन व ग्रंथ दिंडी नंतर अकरा वाजता ग्रंथोत्सव उद्घाटन समारंभ व ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न होईल. या उद्घाटन सोहळ्याला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उद्घाटक म्हणून तर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानेश वाकुडकर हे असणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन समारंभा नंतर गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते पाच वाजे दरम्यान दरम्यान चला वाचन करू, या नवीन पिढी घडवूया, हा परिसंवाद आहे. या परिसंवादामध्ये प्राध्यापक नरेश आंबीलकर, डॉ. प्रकाश मालगावे, ग्रंथपाल डॉ. धनंजय गभने आणि तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी विजय निचकवडे व प्राध्यापक अजिंक्य भांडारकर सहभागी होणार आहेत. शुक्रवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 1 वाजे दरम्यान महिला व ग्रंथालय या विषयावर महाचर्चा होणार असून सहभागी वक्त्यांमध्ये समाजसेविका सविता बेदरकर, अधीक्षक सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय, छाया भुसारी ,डॉ. ममता राऊत प्राध्यापिका जे .एम. पटेल महाविद्यालय व शैलजा दांदळे, जिल्हा माहिती अधिकारी भंडारा यांचा समावेश असणार आहे. दुपारी एक ते दोन या दरम्यान मी अहिल्याबाई होळकर बोलतेय हे एकपात्री नाटक जकातदार विद्यालय ची विद्यार्थिनी कुमारी खुशी आदेश तितीरमारे सादर करणार आहे. दुपारी अडीच ते साडेचार वाजे दरम्यान कवी संमेलन होणार असून या कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रमोद कुमार शाहू हास्य कवी तुमसर हे असणार आहेत,तर सहभागी कवींमध्ये विजय बघेले ,तुमसर व शफीकल्ला करीम सय्यद भंडारा हे असणार आहेत. दुपारी साडेचार ते साडेपाच वाजे दरम्यान समारोपीय कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण असतील. तरी या कार्यक्रमांमध्ये ग्रंथ प्रेमींनी,वाचकांनी, नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावी ,असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेन्द्र बोपचे यांनी केले आहे.
भंडारा जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक व युवतींकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करून त्यांना खाजगी क्षेत्रातील नामांकित कंपन्याच्या माध्यमातून अधिक मागणी असलेल्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्या अनूषंगाने, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा, यांच्या तर्फे दिनांक 03 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी. 3.00 या वेळेत या कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय विशेष रोजगार मेळावा संपन्न झाला. सदर रोजगार मेळाव्यामध्ये 04 नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. त्यांचेमार्फत एकूण 75 रिक्तपदांकरीता उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सदर मेळाव्यात एकूण 87 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये पुरूषांची संख्या 42 व महिलांची संख्या 45 इतकी आहे. 65 उमेदवारांनी प्रत्यक्ष आणि 22 उमेदवारांनी गुगलफॉर्मद्वारे नोंदणी केली होती. सदर रोजगार मेळाव्यात 65 उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शविली होती. त्यापैकी 65 उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत. त्यापैकी 17 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. सदर रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनीय कार्यक्रमात उद्घाटक तथा प्रमूख अतिथी म्हणून वि.मा. पांडव कौ.वि.रो. व मार्गदर्शन अधिकारी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा, आशालता वाल्दे क.कौ.वि.मार्गदर्शन अधिकारी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर, वि. मा. पांडव कौ.वि.रो. व उ. मार्गदर्शन अधिकारी यांनी जिल्हयातील युवक व युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कार्यालयामार्फत रोजगार मेळावा आयोजित केले असल्याचे सांगीतले. उमेदवारांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या मुबलक प्रमाणात संधी उपलब्ध असून त्यांचेमार्फतही सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. उमेदवारांनी सुरूवातील कमी मानधन न पाहता मेहनतीने यशाची उंच शिखरे गाठावीत तसेच आवश्यक कौशल्य आत्मसात करून रोजगाराची संधी प्राप्त करावी. उमेदवारांना रोजगार सुरू करण्यासाठी ही सुवर्णसंधी असून या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा याबाबत उमेदवारांना बहूमुल्य मार्गदर्शन केले. सदर रोजगार मेळावाच्या उदघाटनीय कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार श्री अमीत मलोडे ( लीपीक टंकलेखक ) यांनी केले. सदर रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा कार्यालयातील डॉ.सुधाकर झळके, सहायक आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली कार्यालयांतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.
झायडस पिंकॅथॉनचे सात वर्षांनंतर पुण्यात पुनरागमन:5 एप्रिल 2026 रोजी एएफएमसी ग्राउंडवर होणार शर्यत
झायडस पिंकॅथॉन सात वर्षांच्या खंडानंतर पुण्यात परत येत आहे. महिलांसाठीच्या या सर्वात मोठ्या धावण्याच्या उपक्रमाची आगामी ५ एप्रिल २०२६ रोजी एएफएमसी ग्राउंड येथे शर्यत होणार आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या पुणे पर्वाचे अधिकृत अनावरण करण्यात आले. यावेळी पिंकॅथॉनचे संस्थापक, अभिनेते व एंड्युरन्स आयकॉन मिलिंद सोमण, इन्व्हिन्सिबल वुमनच्या संस्थापिका अंकिता कोनवर आणि झायडस लाइफसायन्सेसचे अग्रगण्य कर्करोगतज्ञ डॉ. तुषार पाटील उपस्थित होते. या घोषणेसह झायडस पिंकॅथॉनच्या २०२५-२६ देशव्यापी हंगामाची अधिकृत सुरुवात झाली आहे. मुंबई आणि बंगळुरू येथील यशस्वी आवृत्त्यांनंतर पुणे हे या हंगामातील एक महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. पुणे आवृत्तीमध्ये महिलांच्या फिटनेससोबतच प्रतिबंधात्मक आरोग्य आणि स्तनाच्या कर्करोगाविषयी जागरूकता यांवर विशेष भर दिला जाईल. लवकर निदान आणि दरमहा स्व-स्तन तपासणीबाबत जनजागृती करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. या वर्षीच्या पिंकॅथॉनमध्ये विविध गटांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रेरणादायी मॅस्कॉट्सची विशेष उपस्थिती असणार आहे. यामध्ये पारंपरिक नऊवारी साडीत धावणाऱ्या मृणाल इनामदार, दृष्टीहीन धावपटू ललिता पवार, ६१ वर्षीय ईएनटी सर्जन डॉ. नीलम वैद्य, कर्करोगावर मात केलेल्या डॉ. मिताली उपाध्याय, ८७ वर्षीय उषा सोमण आणि बाळासह धावणारी आई मयुरी दास यांचा सहभाग उपक्रमाच्या सर्वसमावेशकतेचे प्रतीक ठरेल. या प्रसंगी बोलताना मिलिंद सोमण म्हणाले, “पुण्यातील धावण्याची संस्कृती नेहमीच मजबूत राहिली आहे. सात वर्षांनंतर येथे परत येणे आनंददायी आहे आणि महिलांच्या धावण्याच्या चळवळीतील वाढ याचे हे उत्तम उदाहरण आहे.” झायडस लाइफसायन्सेसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल यांनी ‘इझिएस्ट एक्झाम’ मोहिमेद्वारे स्तनाच्या कर्करोगाविरोधातील लढ्यात लवकर तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही मागणी केली आहे. यावर भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली जात असून यावर मंत्री पंकजा मुंडे यांना विचारले असता, या योजनेला अजितदादा पवारांचे नाव देण्याबाबत मागणीवर मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्याला आमचे समर्थन राहील, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. लातूर जिल्ह्यातील किनगाव येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. पंकजा मुंडे यांच्या देखील हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. यावर त्यांनी सांगितले की, हे मला सकाळी सांगण्यात आले. काय बिघाड झाला माहीत नाही. मी दौऱ्यावर निघणार होते त्यावेळी मला कळवण्यात आले की हेलिकॉप्टर उडू शकणार नाही. तसेच अजित पवारांच्या मृत्यूवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थित केली होती. यावर बोलताना मुंडे म्हणाल्या, अशा प्रकारची दिशाभूल झाली नाही पाहिजे, राजकारणात हे पथ्य सगळ्यांनी पाळले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. लाडकी बहीण योजनेला 'अजित दादांची लाडकी बहीण' असे नाव द्यावे- अमोल मिटकरी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव देण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, अजित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेला अजित दादांची लाडकी बहीण असे नाव द्यावे. अजित पवार यांच्या स्मृती लाडक्या बहिणींच्या मनात कायम जपल्या जाव्यात, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली असून, ही एक प्रकारची आदरांजली असल्याचे मिटकरी म्हणाले. तसेच हीह योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी आवश्यक असल्यास योजनेत काही बदल करावेत, असेही त्यांनी सूचित केले आहे.
वाहतूक नियम पाच वेळा मोडल्यास वाहनाची नोंदणीच रद्द
नागपूर : केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन कायदा, १९८९ मध्ये दुरुस्ती केल्याने वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणा-यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. नवीन तरतुदीनुसार एका वर्षात पाच वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनाची नोंदणी तसेच चालकाचा वाहनचालक परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल. वाढते रस्ते अपघात आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे जाणारे निष्पाप जीव वाचवण्यासाठी हे […] The post वाहतूक नियम पाच वेळा मोडल्यास वाहनाची नोंदणीच रद्द appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वर्ल्ड बँक अध्यक्षांनी पाकला फटकारले
इस्लामाबाद : पंजाबमधील जालंधर येथे जन्मलेले जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्या स्वागतासाठी पाकिस्तानने अंथरलेले रेड कार्पेट काही कामाचे ठरले नाही. बंगा यांच्या दौ-यादरम्यान पाकिस्तानने त्यांना खूश करण्यासाठी त्यांचे उत्साहात स्वागत केले. तरीही, बंगा यांनी कर्जाच्या मुद्द्यावर पाकिस्तानी मंत्र्यांना चांगलेच फटकारले. जागतिक बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले की, पाकिस्तान कर्ज घेत आहे, पण ही मदत फुकट दिली […] The post वर्ल्ड बँक अध्यक्षांनी पाकला फटकारले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राजपाल यादवला आज शरण येण्याचे आदेश
नवी दिल्ली : चेक बाऊन्स प्रकरणात दिल्लीउच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवविरोधात कडक भूमिका घेतली आहे. न्यायालयाने नाराजी व्यक्त करत, राजपाल यादवला ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत संबंधित तुरुंग अधीक्षकांसमोर सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, वारंवार दिलेल्या संधी आणि आश्वासनांनंतरही राजपाल यादवने ठरलेली रक्कम अदा केलेली नाही. हे न्यायिक […] The post राजपाल यादवला आज शरण येण्याचे आदेश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : एकीकडे अजित पवारांच्या झालेल्या विमान अपघातामुळे सा-यांनाच धडकी भरलेली असताना एअर इंडियाच्या लंडन-बंगळुरू विमानामध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या अहमदाबाद विमान अपघातावेळसारखाच बिघाड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एअर इंडियाने बोईंग ७८७ च्या फ्युअल कंट्रोल स्विचची पुन्हा तपासणी सुरु केली असून बोईंग कंपनीलादेखील याबाबत कळविण्यात आले आहे. लंडन ते बंगळुरू या विमान प्रवासादरम्यान बोईंग […] The post फ्युअल स्वीच आपोआप बंद होतोय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सातारा पोलिस डायरी:गाडीच्या डॅशबोर्डमधून 2 लाखांची रोकड लंपास; तर पोलिसांकडून अवैध दारू जप्त
सातारा तालुका हद्दीतील मौजे आटाळी येथील हेरिटेजवाडी हॉटेलच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या चारचाकी क्रमांक(एम.एच. १२ जे.यु. ५५४९)च्या डॅशबोर्डच्या ड्रॉव्हर मध्ये ठेवलेली २ लाखांची रोख रक्कम तेजश्री संतोष सकटे(रा.६३ दुर्गापेठ, सातारा) हिने संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद रविराज दत्तात्रेय हादगे (वय ३३, व्यवसाय इव्हेंट मॅनेजमेंट. राहणार १४०,रामाचा गोट सातारा) यांनी सातारा तालुका पोलिसांत दि.२ रोजी दिली आहे.अधिक तपास पोलीस हवालदार किरण जगताप करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सातारा तालुका पोलिसांनी दारूच्या बाटल्या केल्या जप्त सातारा तालुका पोलिसांनी मौजे देगाव गावच्या हद्दीत असलेल्या तळ्याजवळ १८० मिलीच्या एकूण ९६ दारूच्या बाटल्या आणि हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस गाडी (एम.एच ११ बी.टी ८८५२) असा एकूण ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अवधूत धर्मराज चव्हाण (वय २६ वर्ष राहणार वेळे कामथी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहेत. माजगावकर माळ शाहूपुरी येथे घरफोडी आकाशवाणी केंद्राजवळ असलेल्या माजगावकर माळ येथून दि ३० रोजी बंद असलेल्या पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील बाजूचा सिमेंटचा दरवाजा अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी साहाय्याने फोडून घरामध्ये प्रवेश केला. यामध्ये ४७ हजार ४०० रुपययांचे सोने-चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोख रक्कम असे ऐकून ६७,४०० रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबतची फिर्याद संगीता अनिल पवार (वय ४५ वर्ष राहणार आकाशवाणी केंद्राजवळ सातारा) यांनी शाहूपुरी पोलिसात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार घोडके करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल सातारा कोरेगाव रोडवर एच. पी.गॅस समोर क्षेत्र माऊली येथे राहणारे सेवानिवृत्त शिक्षक अण्णा शिवाजी पवार(वय ५९) यांच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये कंपाउंडच्या पोर्चमध्ये पार्क केलेल्या चार चाकी गाडीची मागील बाजूची काच फोडून ५० हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी अशोक कुंडलिक खाडे आणि राज दशरथ दास (दोघे राहणार क्षेत्र माहुली,सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात दिनांक २ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी देखील संशयितांनी पवार यांच्या गाडीचे पाच वेळा नुकसान करत जीवे मारण्याची धमकी देखील दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आम्ही काय निर्णय घ्यावा हे लोक ठरवणार का?
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाबाबत दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. विरोधकांनीही या प्रकरणात उडी घेतली असून राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे. यातच शरद पवार यांचा दिल्ली दौरा रद्द झाला असून ते बारामतीला जात असल्याचे म्हटले जात आहे. यावरून काही तर्क-वितर्क सुरू झाल्याचे पाहायला […] The post आम्ही काय निर्णय घ्यावा हे लोक ठरवणार का? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : लोकसभेत आजही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान जोरदार गोंधळ झाला. चीनचा मुद्दा आणि भारत-अमेरिका ट्रेड डीलवर राहुल गांधी बोलत असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. मी लोकसभेतील विरोधी पक्षनेता आहे. मला बोलण्याचा अधिकार आहे, पण तरीही मला बोलू दिले जात नाही असा आरोप राहुल गांधींनी यावेळी केला. या सर्व […] The post पीएम मोदींवर प्रचंड दबाव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नियम पाळायचे नसतील तर देश सोडा
नवी दिल्ली : कुठलीही कंपनी डेटा शेअरिंगच्या नावाखाली देशातील जनतेच्या खासगी अधिकाराशी खेळू शकत नाही. जर भारतातील नियम तुम्हाला पाळायचे नसतील तर तुम्ही देश सोडून जा अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने व्हॉटस् अप आणि मेटाला फटकारले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. ज्यात मेटा आणि व्हॉट्सअप यांनी कॉम्प्टीशन कमिशन ऑफ इंडियाच्या निर्णयाविरोधात […] The post नियम पाळायचे नसतील तर देश सोडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रात ठाकरे सरकारमुळे प्रकल्पाला उशीर
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी २३ हजार ९२६ कोटींची तरतूद करण्यात आली असून सध्या राज्यात १ लाख ७० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ पर्यंत सुरू होणार आहे. बुलेट ट्रेन गुजरातमध्ये पहिल्यांदा धावणार आहे. सुरुवातीला १ ते २ तासांच्या अंतराने आणि […] The post महाराष्ट्रात ठाकरे सरकारमुळे प्रकल्पाला उशीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘त्या’ करारात नेमके काय, कळायला हवे
नवी दिल्ली : बहुप्रतिक्षित भारत-अमेरिका ट्रेड डील जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून यावर टीका आणि प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, काँग्रेस नेते शशि थरूर यांनी या करारावर संतुलित प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय वस्तूंवरील कर ५० टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांपर्यंत कमी केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, गुंतवणूक आणि निर्बंधांबाबत काही महत्त्वाचे सवालही उपस्थित केले आहेत. शशि […] The post ‘त्या’ करारात नेमके काय, कळायला हवे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गोचिडांमुळे ‘मंकी फीवर’ आजाराचा धोका वाढतोय!
बंगळूूरू : कर्नाटकमध्ये ‘क्यासानूर फॉरेस्ट डिसीज’ (केएफडी) म्हणजेच मंकी फीवरमुळे एका २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून या आजाराबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. तिरथहल्ली तालुक्यातील रहिवासी असलेल्या या तरुणाचा २८ जानेवारी रोजी उडुपी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोग्य विभागाचे आयुक्त गुरुदत्ता हेगडे यांनी माहिती […] The post गोचिडांमुळे ‘मंकी फीवर’ आजाराचा धोका वाढतोय! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पिंपरी-चिंचवड शहरातील स्पा सेंटर्स आणि लॉजच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली असून एकूण आठ महिलांची सुटका केली आहे. या धडक मोहिमेत विशालनगर येथील इंटरनल फॅमिली स्पामधून चार, निगडी येथील ईगल स्पामधून दोन, तसेच कृष्णा लॉज आणि आळंदी येथील योगीराज लॉजवर छापे टाकून प्रत्येकी एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनायक कुमार चौबे यांच्या आदेशानुसार, स्पा सेंटर्समधील बेकायदेशीर वेश्याव्यवसायाला आळा घालण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. ही धडक मोहीम पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी या पथकाचे यशस्वी नेतृत्व केले. वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 'इंटरनल फॅमिली स्पा'वर रात्री 10 च्या सुमारास धाड टाकत पोलिसांनी चार पीडित महिलांची सुटका केली असून याप्रकरणी स्पा व्यवस्थापक अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम याला अटक करण्यात आली आहे. या अवैध व्यवसायाचे संचलन करणाऱ्या संबंधित महिलेसह मॅनेजरवर 'पीटा' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. निगडी येथील ईगल स्पा, कृष्णा लॉज आणि आळंदीतील योगीराज लॉजवर पोलिसांनी धडक कारवाई करत पीडित महिलांची सुटका केली आहे. अधिक पैशांचे आमिष दाखवून आणि जबरदस्ती करून महिलांना या बेकायदेशीर वेश्याव्यवसायाच्या दलदलीत ओढले जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. शहरातील अशा अनैतिक प्रकारांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी कठोर पावले उचलली असून, गेल्या एका महिन्यात तीन मोठ्या आस्थापनांवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. यामध्ये चिंचवडमधील निक्की लॉज, काळेवाडीतील लेमन ग्रास थाई स्पा आणि सांगवी येथील औरा थाई स्पा यांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, 2025 सालात आतापर्यंत पोलिसांनी एकूण 25 स्पा सेंटर्सवर छापे टाकून 'पीटा' कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या सातत्यपूर्ण मोहिमेत आतापर्यंत 45 आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल 63 पीडित महिलांची सुरक्षितरीत्या सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कारभार पारदर्शक, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने 'साहित्य संवर्धन आघाडी'ने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. साहित्य चळवळीला व्यापक सामाजिक अधिष्ठान मिळावे, वाचनसंस्कृती बळकट व्हावी आणि नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम प्रभावीपणे व्हावे, यासाठी ठोस कार्यक्रम राबवण्याचा निर्धार या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे. आघाडीने स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा संपूर्ण कारभार घटनात्मक चौकटीत, पारदर्शक आणि सदस्याभिमुख पद्धतीने चालवला जाईल. राज्यभरातील परिषदेच्या जिल्हा शाखांना सक्षम करण्यासाठी दरवर्षी ठराविक आर्थिक मदत दिली जाईल. या निधीतून स्थानिक पातळीवर साहित्यिक उपक्रम, वाचन चळवळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास प्रोत्साहन मिळेल. दरवर्षी एका जिल्ह्यात विभागीय साहित्य संमेलन आयोजित करून स्थानिक लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा जाहीरनाम्यात उल्लेख आहे. युवा लेखकांना योग्य दिशा देण्यासाठी लेखन कार्यशाळा, संवाद सत्रे आणि मार्गदर्शन शिबिरे शाखांमार्फत राबवली जातील. परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या परीक्षांना राज्य शासनाची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी शाळा व महाविद्यालयांशी समन्वय साधला जाईल. परिषदेच्या वास्तूसाठी अधिक जागा मिळवण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, तसेच आर्थिक स्वावलंबनासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यावर भर दिला जाईल. आजीव सदस्यांना ग्रंथप्रकाशन व अन्य उपक्रमांसाठी सभागृह अत्यल्प शुल्कात उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीरनाम्यात आहे. 'साहित्य पत्रिका' पुन्हा मुद्रित स्वरूपात प्रत्येक आजीव सदस्यापर्यंत पोहोचवली जाईल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तो सार्थ ठरेल असे कृतीशील कार्यक्रम राबवले जातील, असेही नमूद करण्यात आले. 'पुणे पुस्तक महोत्सवा'ला मिळणाऱ्या प्रतिसादाचा उल्लेख करत, १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने १०० पुस्तक महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन जाहीर झाले आहे. 'जिथे मराठी तेथे साहित्य परिषद' या संकल्पनेतून जगभरातील मराठी माणसाला मराठीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. साहित्य निर्मितीमध्ये लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवणे, परप्रांतीयांमध्ये मराठीविषयी आस्था निर्माण करणे आणि लेखक, वाचक, प्रकाशक, वितरक व विक्रेते या सर्व घटकांसाठी सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार आघाडीने व्यक्त केला आहे. या निवडणुकीत 'साहित्य संवर्धन आघाडी'कडून अध्यक्षपदासाठी योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदासाठी स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्षपदासाठी प्रदीप निफाडकर हे उमेदवार आहेत.
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ साठी जिल्ह्यात एकूण २९ लाख ७६ हजार ४५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १५ लाख २६ हजार ९८६ पुरुष, १४ लाख ४९ हजार ३७३ स्त्री आणि ९५ इतर मतदारांचा समावेश आहे. येत्या ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक मतदारांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यात २ लाख ६४ हजार ६४२, मावळमध्ये २ लाख ३१६, मुळशीत १ लाख ७३ हजार ४०१, शिरूरमध्ये ३ लाख १ हजार ९५६ आणि हवेली तालुक्यात २ लाख ५१ हजार ५३३ मतदार आहेत. त्याचप्रमाणे, दौंड तालुक्यात २ लाख ७३ हजार १००, इंदापूरमध्ये ३ लाख २१ हजार २, पुरंदरमध्ये १ लाख ८९ हजार ४०३, भोरमध्ये १ लाख ५४ हजार ८१०, वेल्हेमध्ये ५५ हजार २३०, आंबेगावमध्ये १ लाख ८४ हजार ५२, जुन्नरमध्ये ३ लाख ७ हजार २२३ आणि खेड तालुक्यात २ लाख ९९ हजार ७८६ मतदार आहेत. मतदान केंद्रांच्या संख्येनुसार, बारामती तालुक्यात २९९, मावळमध्ये २४३, मुळशीत २२७, शिरूरमध्ये ३३७, हवेलीत २६३, दौंडमध्ये ३१७, इंदापूरमध्ये ४००, पुरंदरमध्ये २३५, भोरमध्ये २३७, वेल्हेमध्ये १०५, आंबेगावमध्ये २३९, जुन्नरमध्ये ३६६ आणि खेड तालुक्यात ३३७ मतदान केंद्रे आहेत. या एकूण मतदान केंद्रांमध्ये प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे १३ आदर्श आणि महिला मतदान केंद्रांचाही समावेश आहे.
गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मेफेड्रोन विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून साडेबारा लाख रुपये किमतीचे २७ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. ही कारवाई नगर रस्ता परिसरात करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोतीसिंह श्रावणसिंह राजपुरोहित (वय २८, रा. धोका बिल्डिंग, लोहगाव रस्ता, वाघोली) आणि हरीश सुजनाराम देवासी (वय २२, रा. बायएफ रस्ता, वाघोली) अशी आहेत. दोघेही मूळचे राजस्थानचे रहिवासी आहेत. खराडी भागात अमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना, हे दोघे मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. हे मेफेड्रोन कोणाकडून आणले आणि ते कोणाला विकणार होते, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहायक आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, तसेच पोलीस कर्मचारी संदीप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनील महाडिक, गणेश गोसावी, संदीप देवकाते, देवीदास वांढरे, शुभांगी म्हाळसेकर आणि दिनेश बास्टेवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटमार दुसऱ्या एका घटनेत, मोटारीतून पुणे स्टेशनला सोडण्याच्या बहाण्याने एका तरुणाला लुटणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मोबाइल संच आणि गुन्ह्यात वापरलेली मोटार जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल किसन सावंत (वय १९, रा. समर्थनगर, खराडी, मूळ रा. अंबाजोगाई, जि. बीड), निशांत झुंबर बागुल (वय २१, रा. चिखलटाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर) आणि महेश रामकिसन सोनटक्के (वय २०, रा. खांदवेनगर, लोहगाव) यांचा समावेश आहे. नगर रस्ता परिसरात पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत थांबलेल्या एका तरुणाला आरोपींनी मोटारीतून सोडण्याची बतावणी केली. वाटेत त्याला मारहाण करून त्याच्याकडील रोकड आणि मोबाइल संच लुटून ते पसार झाले होते. या प्रकरणी येरवडा येथील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट चारकडून पसार झालेल्या चोरट्यांचा शोध सुरू होता. आरोपी खराडी भागातील एका उपाहारगृहात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून तिघांना पकडण्यात आले. सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कांचन जाधव, उपनिरीक्षक वैभव मगदूम, सहायक फौजदार हरीश मोरे, एकनाथ जोशी आणि प्रवीण भालचिम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) कॅडेट, कनिष्ठ अंडर ऑफिसर (जेएनओ) तनू भान हिने नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या प्रतिष्ठित एनसीसी प्रजासत्ताक दिन कॅम्पमध्ये (आरडीसी) सर्वोत्तम कॅडेट होण्याचा बहुमान पटकावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. या कॅम्पमध्ये तनू भानने ३६ महाराष्ट्र बटालियनचे प्रतिनिधित्व करत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. तिच्यासोबत एमआयटी एडीटी विद्यापीठाचा व्यंकटेश अय्यर यानेही एनसीसी ३६ महाराष्ट्र बटालियनमध्ये स्थान मिळवत प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्रातून सर्वोत्तम कॅडेट्स म्हणून निवड झाल्यानंतर, या दोन्ही कॅडेट्सनी देशातील १७ डायरेक्टरेट्समधील २० लाखांहून अधिक कॅडेट्समध्ये सर्वोच्च स्तरावर स्पर्धा केली. त्यामध्ये तनू भानने उत्कृष्ट शिस्त, नेतृत्वगुण आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर व्यंकटेशनेही दाखवलेली जिद्द उल्लेखनीय ठरली. २८ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एका समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तनू भानला हे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. तिची ही ऐतिहासिक कामगिरी महाराष्ट्र डायरेक्टरेट, संपूर्ण एनसीसी तसेच एमआयटी एडीटी विद्यापीठासाठी अभिमानास्पद ठरली आहे. या दोन्ही कॅडेट्सना एमआयटी एडीटी विद्यापीठातील एनसीसी विभागाचे संचालक ब्रिगेडियर मंगेश विटेकर (नि.) तसेच असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट अक्षता परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, प्रा. डॉ. सुनीता कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस. आणि कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी अभिनंदन केले आहे.
अजित पवारांचा होणार नाही दशक्रिया विधी
बारामती :प्रतिनिधी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पारंपरिक धार्मिक विधींबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांच्या बंधू श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. २८ जानेवारी रोजी बारामतीकडे येत असताना झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतरच्या विधींमध्ये ३० जानेवारी हा दिवस निर्णायक […] The post अजित पवारांचा होणार नाही दशक्रिया विधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातानंतर राज्याच्या राजकारणात शोककळा पसरली असतानाच, आता बड्या नेत्यांच्या प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना एक महत्त्वाचा आणि मित्रत्वाचा सल्ला देणार असल्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. अजित पवारांचा अपघात हा संशयास्पद असून, नितीन गडकरी यांनी आता छोट्या आणि खासगी विमानाने प्रवास करणे टाळावे. असे सांगणार आहे. असे अनिल देशमुख म्हणालेत. अजित पवारांच्या निधनामुळे व्यथित झालेल्या अनिल देशमुखांनी सुरक्षेच्या कारणास्तव नितीन गडकरी यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अजित पवारांचा झालेला अपघात मनाला चटका लावणारा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जर मला कधी विमानतळावर भेटले, तर मी त्यांना नक्की सांगेन की, तुम्ही आता छोट्या आणि खासगी विमानाने प्रवास करू नका. अशा विमानांच्या सुरक्षेबाबत आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. धुकं होतं तर व्हिडीओ आलाच कसा? अजित पवारांच्या विमान अपघाताच्या कारणांवर भाष्य करताना अनिल देशमुखांनी प्रशासनाच्या 'धुकं' असल्याच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बारामती विमानतळावर धुकं असल्याने धावपट्टी दिसली नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, अपघाताचा जो व्हिडीओ समोर आला आहे, तो खूप लांबून काढलेला आहे. व्हिडीओमध्ये विमान हवेतच तिरके झाल्याचे दिसते. त्यामुळे केवळ धुक्यामुळे हा अपघात झाला आहे, यावर कोणाचाही विश्वास नाही. जर खरंच तिथे दाट धुकं असतं, तर इतक्या लांबून व्हिडीओ काढणं शक्य होतं का? असा सवाल अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. या कारणांमुळेच, केवळ डीजीसीएची (DGCA) चौकशी पुरेशी नसून उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावावा, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. दोन्ही NCPच्या विलीनीकरणाबाबत मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरही स्फोटक माहिती दिली. विलीनीकरणाच्या चर्चा हवेत नाहीत. आतापर्यंत दोन्ही गटांच्या १४ बैठका झाल्या आहेत आणि त्यातील काही बैठकांना मी स्वतः उपस्थित होतो. कोणत्या बैठकीत काय ठरलं आणि कोण हजर होतं, याची सर्व माहिती अजितदादांचा दुखवटा संपल्यानंतर आम्ही पुराव्यानिशी जाहीर करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राजकारणात काहीही होऊ शकते:महापौर पदाच्या निवडणुकीत पत्ते उघडू, इम्तियाज जलील यांचे सूचक विधान
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत 57 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, बहुमतासाठी अवघ्या एका जागेची कमतरता भासत असल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे 33 जागा जिंकून एमआयएमने दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून मुसंडी मारली आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी इतर सर्व पक्ष एकत्र येणार का आणि एमआयएम नेमकी काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, 10 तारखेला होणाऱ्या महापौर निवडणुकीबाबत राजकारणात काहीही होऊ शकते, असे सूचक विधान करत इम्तियाज जलील यांनी सस्पेन्स अधिकच वाढवला आहे. तसेच 10 तारखेला पत्ते उघडू, असेही त्यांनी म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीसाठी एमआयएमने आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय चुरस वाढली असून, भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी एमआयएम चक्क शिवसेनेसोबतही जाण्याचा विचार करत असल्याचे संकेत इम्तियाज जलील यांनी दिले आहेत. 10 तारखेला होणाऱ्या मतदानावेळी काहीतरी धक्कादायक घडण्याची शक्यता वर्तवत, जलील यांनी सध्या विविध पक्षांशी वाटाघाटी सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी दोन्ही शिवसेना एमआयएमला पाठिंबा देऊन नवीन राजकीय समीकरण उभे करणार का, याबाबतचा सस्पेन्स आता अधिकच गडद झाला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 115 जागांपैकी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 58 च्या आकड्यापासून भाजप (57 जागा) अवघ्या एका पाऊल अंतरावर असून, त्यांना सत्तेपासून रोखण्यासाठी एमआयएम (33), शिंदे यांची शिवसेना (13), ठाकरे यांची शिवसेना (6), वंचित (4), काँग्रेस (1) आणि राष्ट्रवादी शरद पवार गट (1) या सर्व विजातीय पक्षांना एकत्र येऊन 58 ही 'मॅजिक फिगर' गाठावी लागेल. तांत्रिकदृष्ट्या हे समीकरण शक्य असले तरी सध्याच्या राज्यातील महायुतीच्या राजकीय वास्तवामुळे भाजप आणि शिंदे यांची शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची शक्यता अधिक प्रबळ आहे. मात्र राजकारणातील अनिश्चितता पाहता, भाजपला शह देण्यासाठी सर्व विरोधकांची ही अशक्यप्राय वाटणारी युती प्रत्यक्षात येणार का, याबाबतचे औत्सुक्य शिगेला पोहोचले आहे.
राजकारण हे माणसाला किती खालच्या थराला नेऊ शकते, याचा प्रत्यय नांदेडमधील एका घटनेने आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका पित्याने, आपल्या तीन अपत्यांपैकी एका सात वर्षांच्या मुलीला तेलंगणातील कालव्यात जिवंत फेकून देऊन तिचा बळी घेतला. पांडुरंग बाबुराव कोंडमंगले (वय ३२, रा. केरूर, ता. मुखेड) असे या निर्दयी पित्याचे नाव असून, त्याला या कृत्यासाठी चिथावणी देणारा त्याचा मित्र आणि केरूर गावचा विद्यमान सरपंच गणेश शिंदे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी पांडुरंग कोंडमंगले याचे बाऱ्हाळी नाका येथे कटिंगचे दुकान आहे. त्याला तीन मुले असून त्यापैकी दोघे जुळे आहेत. पांडुरंगला गावच्या राजकारणात रस होता आणि त्याला सरपंच पदाची निवडणूक लढवायची होती. मात्र, महाराष्ट्रातील निवडणूक कायद्यानुसार, तीन अपत्ये असणाऱ्या व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवता येत नाही. हेच 'तिसरे अपत्य' त्याच्या स्वप्नातील अडसर ठरत होते. सरपंचाचा 'सैतानी' सल्ला आणि कट पांडुरंगचा मित्र आणि गावचा विद्यमान सरपंच गणेश शिंदे याने त्याला वारंवार टोमणे मारले की, तुला तीन मुले आहेत, त्यामुळे तू निवडणूक लढवू शकणार नाहीस. सुरुवातीला पांडुरंगने पुणे महानगरपालिकेत जाऊन आपल्या जुळ्या मुलींच्या जन्म दाखल्यात फेरफार करण्याचा आणि पित्याचे नाव बदलण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो अपयशी ठरला. त्यानंतर मुलीला दत्तक देण्याचाही विचार झाला. मात्र, जेव्हा काहीच मार्ग उरला नाही, तेव्हा सरपंच गणेश शिंदे आणि पांडुरंग यांनी मिळून एका मुलीचा काटा काढण्याचे भयानक षडयंत्र रचले. अशी केली पोटच्या मुलीची हत्या २९ जानेवारी रोजी पांडुरंगने आपली सात वर्षांची मुलगी प्राची हिला फिरवायला नेतो असे सांगून गाडीवर बसवले. तो तिला थेट तेलंगणा राज्यातील निझामाबाद जिल्ह्यातील एडपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या निजामसागर डॅमच्या एका कालव्यावर घेऊन गेला. तिथे त्याने पोटच्या पोरीला जिवंत कालव्यात फेकून दिले आणि घरी परतला. घरी आल्यावर त्याने मुलगी हरवल्याचा बनाव रचला. तपासात सत्याचा उलगडा काही दिवसांनी मुलीचा मृतदेह कालव्यात आढळल्यानंतर तेलंगणा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मुखेड पोलिसांच्या मदतीने पांडुरंगला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने आर्थिक विवंचनेचे कारण सांगून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. निवडणुकीसाठीच आपण मुलीचा बळी घेतल्याची कबुली त्याने दिली. दरम्यान, सत्तेची हाव माणसाला इतकी आंधळी करते की, तो स्वतःच्या रक्ताच्या नात्याचाही विचार करत नाही, हे या घटनेवरून स्पष्ट होते. एका चिमुरडीचा बळी घेणारे हे राजकारण खऱ्या अर्थाने समाजासाठी घातक आहे.
राज्याच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व, प्रशासनावर मजबूत पकड असलेले जननेते आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे आज भंडारा शहरात आगमन झाले. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात हजारो नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेतले. आज सकाळी ११:०० वाजता बारामतीहून आणलेला अस्थिकलश दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात ठेवण्यात आला होता. यावेळी गुरुदेव सेवा मंडळ, गणेशपूर यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या भजनांनी वातावरण अधिकच भावूक झाले. शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. 'दादां'चे सर्वच क्षेत्रातील लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते या गर्दीतून स्पष्टपणे जाणवत होते. याप्रसंगी आयोजित शोकसभेत उपस्थितांनी दादांच्या कार्याचा गौरव केला. भंडारा जिल्ह्याच्या सिंचन प्रश्नावर दादांनी दिलेले योगदान अविस्मरणीय असल्याचे मान्यवरांनी सांगितले. यात गोसेखुर्द प्रकल्प, सुरेवाडा, सोंड्याटोला, नेरला आणि करचखेडा उपसा सिंचन योजना या सारख्या प्रकल्पांसाठी दादांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला, ज्यामुळे जिल्ह्याचा कायापालट झाला.या शोकाकुल प्रसंगी नाना पंचबुद्धे, आमदार राजू कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार चरण वाघमारे, नगराध्यक्षा सौ. मधुरा मदनकर यांच्यासह धनंजय दलाल, सुनील फुंडे आणि जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी दादांसोबत काम करतानाचे अनुभव सांगून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. वैनगंगा तीरावर अस्थि विसर्जन दुपारी ३:०० वाजता जिल्हा कार्यालयातून अस्थिकलशाची अंतिम यात्रा निघाली. भजन मंडळींच्या सुरावटीत ही यात्रा महाल मार्ग, गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक मार्गे वैनगंगा नदीच्या जुन्या पुलाजवळील घाटावर पोहोचली. तिथे विधिवत पूजा-अर्चा करून अत्यंत भावूक वातावरणात अस्थींचे विसर्जन करण्यात आले. 'अजितदादा अमर रहे'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
मलंगगडावर मोठी दुर्घटना:फ्यूनिकुलर ट्रॉली वाटेतच अडकली, अनेक भाविक अडकल्याने एकच खळबळ
कल्याण येथील मलंगगडावरील फ्यूनिकुलर ट्रॉली मध्येच अडकल्याची माहिती समोर आली आहे. या ट्रॉलीमधून येणारे भाविक मध्येच अडकले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त भाविक घेऊन गेल्यामुळे फ्यूनिकुलर वाटेतच अडकली असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच यात अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मलंगगडावर जाण्यासाठी मागच्या महिन्यात मोठा गाजावाजा करत देशातील सर्वात मोठ्या आणि लांब पल्ल्याच्या फ्यूनिकुलर ट्रॉलीचे लोकार्पण झाले होते. भाजप आमदार किसण कथोरे यांच्या हस्ते या ट्रॉलीचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर मोठ्या संख्येने भाविक मलंगगडावर येण्यास सुरू झाले आहे. आज देखील भाविकांची संख्या जास्त होती. क्षमतेपेक्षा जास्त संख्येने भाविक या फ्यूनिकुलर ट्रॉलीमध्ये बसले त्यामुळे दुपारच्या सुमारास फ्यूनिकुलर ट्रॉली वाटेतच बंद पडली. यामुळे भाविक वाटेतच अडकले असून सर्वत्र गोंधळ उडाला असल्याचे पाहायला मिळत आहे. मलंगगडावर सध्या यात्रा सुरू आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक इथे येत आहेत. सोमवारी देखील मंत्री आणि व्हीआयपी आलेले असताना सुद्धा फ्यूनिकुलर ट्रॉली बंद पडली होती. त्यामुळे मोठा अफाट होऊ शकतो अशी भीती वर्तवली जात होती. अखेर आज क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी ट्रॉलीत बसल्याने ट्रॉली मध्येच अडकली आहे. मलंगगड हे हिंदू आणि मुस्लिम भाविकांचे एक धार्मिक स्थळ आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या या गडावर जाण्यासाठी पूर्वी भाविकांना दोन तासांची कठीण चढ चढून जावे लागायचे. ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना यामुळे जाण्यास त्रास होत होता. भाविकांची ही अडचण लक्षात अंबरनाथचे तत्कालीन आमदार किसन कथोरे यांनी स्वित्झर्लंडच्या धर्तीवर मलंगगडावर फ्यूनिकुलर रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. किसन कथोरे यांनी 2004 साली याबद्दलचा प्रस्ताव मांडला होता. प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या कामाला 2012 साली सुरुवात झाली. पुन्हा विधानसभा क्षेत्राच्या विभाजनानंतर हा प्रकल्प काही काळ रखडला होता. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या प्रयत्नांमुळे नव्याने कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आणि कामाला गती मिळाली. मागील महिन्यात जानेवारी 2026 मध्ये फ्युनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण पार पडले.
सुयोग इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनाने उपस्थित मंत्रमुग्ध
परभणी : येथील सुयोग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच उत्साहात पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विविध गाण्याच्या तालावर नृत्य सादर केले. या नृत्यातून, स्कीट मधून भारतीय संस्कृती, देशभक्ती याचे उपस्थितांना दर्शन करून दिले. या कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. ज्ञानोबा मुंढे, उद्घाटक डॉ. संगीता अवचार, प्रमुख […] The post सुयोग इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनाने उपस्थित मंत्रमुग्ध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणणे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे. विनापरवाना आणि चुकीची माहिती सार्वजनिक केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पियुष गोयल यांची कानउघडणी केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे महायुतीमधील मित्रपक्षाच्या अंतर्गत निर्णयांमध्ये भाजप हस्तक्षेप करत असल्याचा चुकीचा संदेश गेल्याने अमित शाह यांनी पियुष गोयल यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरून तर्कवितर्क लढवले जात असताना, पियुष गोयल यांनी एका मुलाखतीत प्रफुल पटेल हे नवे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे विधान केले होते. सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व देण्याची मागणी पक्षांतर्गत होत असताना, भाजपच्या मंत्र्याने नाव जाहीर केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांनी या मुद्द्यावरून गोयलांना फटकारले असून, कोणत्याही अधिकृत निर्णयाशिवाय मित्रपक्षाच्या धोरणात्मक बाबींवर बोलणे टाळण्याचे आदेश दिले आहेत. पियुष गोयलांचा 'यू-टर्न' आणि माफी दरम्यान, या वादानंतर पियुष गोयल यांनी तात्काळ स्पष्टीकरण देत आपल्या विधानावरून माघार घेतली. दिल्लीतील एका वरिष्ठ पत्रकाराने दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे माझ्याकडून हे वक्तव्य झाले, असे म्हणत त्यांनी या प्रकरणाबद्दल खेद व्यक्त केला आहे. प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदी - शहांची भेट दरम्यान, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पटेल यांनी या दोन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे बंद दरवाज्याआड चर्चा केली. या चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आला नाही. पण ही चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या घटनाक्रमाभोवतीच फिरती होती असे सांगितले जात आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाचा पेचप्रसंग तथा विलीनीकरणाच्या मुद्यावर उलटसुलट चर्चा सुरू असताना प्रफुल्ल पटेल यांनी मोदी व शहांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगाने घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुनेत्रा पवारही दिल्ली दौऱ्यावर जाणार? प्रफुल्ल पटेल यांनी मोदी- शहांची भेट घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. पण त्या केव्हा जाणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. कदाचित ते पुढल्या आठवड्यात दिल्लीत जातील असे सांगितले जात आहे.
सिम्बायोसिसमध्ये SYMSIM 2.0 चे आयोजन:आरोग्य प्रशिक्षण, रुग्ण सुरक्षा आणि कल्याणावर होणार विचारमंथन
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विभागाने सिम्बायोसिस सेंटर फॉर हेल्थ स्किल्सच्या माध्यमातून SYMSIM 2.0 या आंतरराष्ट्रीय सिम्युलेशन महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव पुणे येथील लवळे कॅम्पसमध्ये ०५ ते ०७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. तीन दिवस चालणारा हा आंतरराष्ट्रीय महोत्सव भारत आणि जगभरातील शिक्षक, शैक्षणिक तज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील नेते आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांना एकत्र आणणार आहे. आरोग्य प्रशिक्षण, रुग्ण सुरक्षा आणि रुग्ण कल्याण यामध्ये सिम्युलेशन-आधारित शिक्षणाच्या परिवर्तनकारी भूमिकेवर विचारमंथन करणे हे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या शैक्षणिक कार्यक्रमात अत्याधुनिक सिम्युलेशन उपकरणे आणि टास्क ट्रेनर्सच्या साहाय्याने प्रत्यक्ष कार्यशाळा (हँड्स-ऑन वर्कशॉप्स) आयोजित केल्या जातील. यात सहभागी व्यक्तींना विविध आरोग्य शाखांमध्ये प्रक्रियात्मक कौशल्ये, क्लिनिकल निर्णय क्षमता आणि टीम-आधारित प्रशिक्षणाचा अनुभव मिळेल. तज्ज्ञांची व्याख्याने, पॅनेल चर्चासत्रे आणि नेटवर्किंग सत्रांमध्ये सिम्युलेशन-आधारित शिक्षणामध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा समावेश, तणावपूर्ण क्लिनिकल परिस्थितींमध्ये प्रभावी संवाद आणि पुराव्यावर आधारित पद्धतींचा अवलंब यावर भर दिला जाईल. यामुळे क्लिनिकल व नॉन-क्लिनिकल क्षेत्रांमध्ये आरोग्यसेवा व्यावसायिकांचे कौशल्यवर्धन, पुनःकौशल्य विकास आणि उन्नतीकरण साध्य होईल, परिणामी वैद्यकीय चुका कमी होऊन रुग्ण कल्याण सुनिश्चित होईल. महोत्सवात आरोग्यसेवा सिम्युलेशनच्या सामाजिक आणि नैतिक पैलूंनाही विशेष अधोरेखित करण्यात येणार आहे. समान प्रशिक्षणाच्या संधी, नैतिक वैद्यकीय पद्धती आणि असुरक्षित रुग्ण गटांचे संरक्षण करण्याबाबत संस्थात्मक जबाबदारी यावरही भर दिला जाईल. यूके, यूएसए, सिंगापूर, इस्रायल, ओमान आणि यूएई येथील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातनाम तज्ज्ञ या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून सहभागी होत आहेत. SYMSIM 2.0 च्या तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकताना प्रा. डॉ. राजीव येरवडेकर यांनी सांगितले की, रुग्ण सुरक्षा ही जागतिक प्राधान्याची बाब असली तरी सिम्बायोसिस रुग्ण कल्याणाच्या व्यापक संकल्पनेवर भर देते. सिम्युलेशन-आधारित शिक्षणामुळे रुग्णाच्या सन्मानाला धक्का न लावता आरोग्यसेवा व्यावसायिकांना आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येतात, ज्यामुळे नैतिक, रुग्ण-केंद्रित आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार आरोग्यसेवा प्रदान करणे शक्य होते. SYMSIM 2.0 च्या माध्यमातून सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठ सिम्युलेशन-आधारित प्रशिक्षणाद्वारे अनुभवाधारित शिक्षण, रुग्ण कल्याण आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार आरोग्य शिक्षण याबाबतची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करत आहे.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त 'सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार' आणि 'सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कारां'ची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हे पुरस्कार येत्या शनिवारी (दि. ७) सायंकाळी ५.३० वाजता बंटारा भवन, बाणेर, मुंबई-पुणे महामार्ग येथे वितरित केले जातील. 'सूर्यदत्त'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी 'सूर्यदत्त'च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, जनसंपर्क व्यवस्थापिका स्वप्नाली कोगजे आणि सल्लागार समिती सदस्य जीवराज चोले उपस्थित होते. प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले की, अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनी यांच्या अध्यक्षतेखाली माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल. भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद आणि एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात पद्मश्री आचार्य डॉ. चंदनाजी महाराज (ताई माँ) यांना 'सूर्यदत्त ग्लोबल पीस गांधीयन फिलॉसॉफी अवॉर्ड २०२६' हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यंदाचे 'सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार' माजी सरन्यायाधीश उदय लळीत, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, हास्ययोग चळवळीचे विठ्ठल काटे, माजी सनदी अधिकारी शेखर गायकवाड, अभिनेते राकेश बेदी, बांधकाम व्यावसायिक विलासकुमार पालरेषा, दिग्दर्शक सुभाष सेहगल, शिक्षणतज्ज्ञ अशोककुमार ठाकूर, शास्त्रज्ञ डॉ. आनंद भाडळकर, विधिज्ञ ऍड. प्रमोद आडकर, साहित्यिका प्रा. सुरेखा कटारिया, उद्योजक प्रकाश गांधी आणि जागतिक रणनीतीकर संजय पुरी यांना जाहीर झाले आहेत. 'सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार' श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, योगसद्गुरू डॉ. कृष्णदेव गिरी, अभिनेत्री व स्टँडअप कॉमेडियन उपासना सिंग, भारतीय बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍड. आशुतोष श्रीवास्तव, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुरेंद्रा कुमारी, योग प्रशिक्षक राखी गुगळे, अवकाशशास्त्रज्ञ डॉ. कनक सहा, बासरीवादक पारस नाथ, ग्लोबल युथ अँबेसेडर दारासिंग खुराणा, डॉ. प्रमोद त्रिपाठी आणि गिर्यारोहक आशिष माने यांना प्रदान करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, सीए मोहित धांड, गायिका प्रीती दवे व पिंकी दवे आणि जलतरणपटू हातवी शहा यांना 'सूर्यदत्त नॅशनल यंग अचिव्हर अवॉर्ड' दिला जाईल. तर, मास्टर ऋषी शिव प्रसन्न आणि मास्टर राघव मालपाणी यांना 'सूर्यदत्त लिट्ल मास्टर नॅशनल अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रेमसंबंध तोडल्याने तरुणीचा विवाह मोडणाऱ्या प्रियकराला येरवड्यातील लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने तरुणीच्या नियोजित पतीला आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवून विवाह मोडला, तसेच तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. इम्रान रहमान शेख (वय २२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका २१ वर्षीय तरुणीने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीचे आरोपी इम्रान शेख याच्याशी चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह ठरवल्यानंतर, तिने शेखला प्रेमसंबंध पुढे न ठेवण्यास सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या शेखने तरुणीला शिवीगाळ करून धमकावले. त्याने 'तुझा विवाह जमू देणार नाही, तुझ्या कुटुंबीयांचा खून करेल' अशी धमकी दिली. आरोपीने तरुणीच्या आईला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर आरोपी शेखने तरुणीचा ज्याच्याशी विवाह ठरला होता, त्याला त्यांच्या प्रेमसंबंधाची आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवली. यामुळे नियोजित पतीने तरुणीसोबतचा विवाह मोडला. या घटनेनंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जगताप करत आहेत. टेम्पोवर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू टेम्पोवर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली. अक्षय अजित बोथरा (वय ३५, रा. विष्णू कॉम्प्लेक्स, नवशा मारुती मंदिराजवळ, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई भागीनाथ पवार यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय बोथरा हे व्यावसायिक आहेत. २ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास ते बिबवेवाडीतून अप्पर इंदिरानगरकडे निघाले होते. ईआयसी हॉस्पिटलसमोर दुचाकीस्वार अक्षय यांचे नियंत्रण सुटले आणि टेम्पोला पाठीमागून धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.
खरीप हंगामातील धानाची विक्री करून तीन महिने उलटले तरी हक्काचे पैसे मिळत नसल्याने लाखांदूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाच्या या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी आज, ३ फेब्रुवारी २०२६ रोजी संतप्त शेतकऱ्यांनी लाखांदूर तहसील कार्यालयावर धडक देत 'फटाके फोडो' आंदोलन केले. यावेळी फटाक्यांच्या आवाजाने तहसील परिसर दणाणून गेला होता. शासकीय धान खरेदी केंद्रावर धान देऊन तीन महिने झाले, तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात चुकारे (पेमेंट) जमा झालेले नाहीत. ऐन गरजेच्या वेळी हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. वारंवार विनंती करूनही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. केवळ पैशांचाच प्रश्न नाही, तर अनेक शेतकऱ्यांच्या धानाची 'लिमिट' (खरेदी मर्यादा) संपल्याने त्यांचे धान अजूनही घरातच पडून आहे. शासनाने ही मर्यादा वाढवून द्यावी, जेणेकरून उरलेले धान केंद्रावर विकता येईल, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी (भंडारा), जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले. मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत, धनराज हटवार, गोविंदराव वरडे, लोचन पारधी, बाळू गेडाम, राजू कावळे, होमराज नाकाडे, मनिराम डोंगरवार, वासुदेव तोंडरे, अरुण मेश्राम यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी बांधव सहभागी झाले होते. भारतीय किसान संघाचा सरकारला इशारा खरीप हंगामातील धानाचे थकीत चुकारे, बोनस आणि वीज जोडणी यांसारख्या प्रलंबित प्रश्नांवरून भारतीय किसान संघ, विदर्भ प्रांत (जिल्हा भंडारा) आक्रमक झाला आहे. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मंगळवारला (ता.०३) लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आले असून, १५ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे. निवेदन देतांना भारतीय किसान संघाचे दिनेश कापगते, रूग्वेद येवले यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
पुणे: ज्येष्ठ गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार’ जाहीर झाला आहे. नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार दिला जातो. प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि सुप्रसिद्ध गायक पं. रघुनंदन पणशीकर यांनी ही माहिती दिली. या पुरस्कारांचे हे दहावे वर्ष आहे. याचबरोबर, प्रतिष्ठानने सुप्रसिद्ध गायक पं. राजा काळे यांना ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्याची घोषणा केली आहे. ज्येष्ठ तबलावादक पं. रामदास पळसुले यांना ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर संगतकार गुरु पुरस्कार’ तर युवा संतूरवादक डॉ. शंतनु गोखले यांना ‘गानसरस्वती किशोरी आमोणकर युवा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कलाकारांच्या संगीत सेवेकरिता प्रतिष्ठान दरवर्षी गानसरस्वती महोत्सवात विविध पुरस्कारांचे वितरण करते. ‘गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कारा’चे स्वरूप रोख ७५ हजार रुपये व मानपत्र आहे. ‘जीवनगौरव पुरस्कारा’साठी रोख ५१ हजार रुपये व मानपत्र, ‘संगतकार गुरु पुरस्कारा’साठी रोख २५ हजार रुपये व मानपत्र, तर ‘युवा पुरस्कारा’साठी रोख २० हजार रुपये व मानपत्र दिले जाते. याव्यतिरिक्त, उद्योजक अजित बेलवलकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘अजित बेलवलकर स्मृती युवा पुरस्कार’ यावर्षी आश्वासक गायिका डॉ. राधिका जोशी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून, यामध्ये रोख २० हजार रुपये आणि मानपत्र दिले जाते, असेही पं. पणशीकर यांनी सांगितले. हे सर्व पुरस्कार येत्या १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान प्रदान करण्यात येतील. कर्वेनगर येथील राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे होणाऱ्या १२ व्या गानसरस्वती महोत्सवात हा सोहळा संपन्न होणार आहे.
आध्यात्मिक मार्गदर्शक सरश्रींचे पुण्यात प्रेरणादायी प्रवचन:मन, बुद्धी, देह समन्वयावर केले मार्गदर्शन
पुण्यातील मनन ज्ञान ध्यान केंद्रात तेजज्ञान फाउंडेशनतर्फे आध्यात्मिक मार्गदर्शक सरश्री यांचे प्रेरणादायी प्रवचन आयोजित करण्यात आले होते. जीवनाच्या क्रिकेटमध्ये शतकी खेळी करून एक उत्कृष्ट डाव कसा रचायचा या विषयावर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सरश्रींनी स्पष्ट केले की, 'शतकी खेळी' म्हणजे केवळ शंभर वर्षे जगणे नव्हे, तर दररोज स्वतःचा विकास साधत चेतनेच्या उच्च पातळीवर जीवन व्यतीत करणे होय. समाजमान्यता आणि चुकीच्या धारणांमुळे व्यक्ती स्वतःला एका चौकटीत अडकवून घेतो. यातून बाहेर पडून स्वतःच्या क्षमता ओळखणे अत्यावश्यक आहे. माणूस त्याच्या एकूण क्षमतेपैकी केवळ चाळीस टक्के क्षमताच वापरतो आणि 'मी थकलो' असे म्हणत पुढील वाटचाल थांबवतो, ही एक मानसिक अडचण असल्याचे त्यांनी सांगितले. स्वतःला बेडूक समजून जगाल, तर कूपमंडूक वृत्तीने विहिरीतच जीवन जाईल, असा इशारा देत सरश्रींनी शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. शिस्त ही पिंजरा नसून पिंजऱ्याची चावी आहे. सूर्यासारखे विचार ठेवल्यास मायेच्या बॉलवर सिक्सर मारता येतो, म्हणजेच प्रत्येक आव्हानात्मक प्रसंगाला पूर्ण क्षमतेने सामोरे जाता येते, असा संदेश त्यांनी दिला. शरीरा मध्ये आत्मविश्वास महत्वपूर्ण असून त्याआधारे विविध आव्हानाचा सामना समर्थपणे करता येऊ शकतो. त्यांनी क्रिकेटमधील ग्लोव्हज, स्टम्प, पिच आणि क्रीझ यांची उदाहरणे देत देह, इंद्रिये, मन व बुद्धी यांचा सुंदर समन्वय साधला. कर्मयोग, ध्यानयोग आणि क्षमासाधनेचे महत्त्व विशद करत त्यांनी श्रोत्यांकडून छोट्या ध्यानाचा व क्षमासाधनेचा प्रत्यक्ष सरावही करून घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजज्ञान फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त तेजविद्या यांनी केले.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघात, घातपात असल्याचा संशय शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी संसदेत बोलताना व्यक्त केला होता. त्यांनी केलेल्या या विधानावर भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार यांना जाऊन फक्त चार-पाच दिवस झालेत. त्यावर तरी राजकारण करू नका, एवढा नीचपणा राजकारणात बरोबर नाही, असे राणे यांनी म्हटले आहे. पवार कुटुंबाची अवस्था बघा मंत्री नितेश राणे यांनी बारामती येथे जाऊन पवार कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, अजितदादांना जाऊन आता जेमतेम 3-4 दिवस झाले. त्यावर तरी राजकारण करू नका. त्यांच्या आत्म्याला जरा शांती मिळू द्या. हे सगळे विषय नंतर बोलत येत नाहीत का? काय घाई लागली आहे तुम्हाला? कुठले तर्क लावताय तुम्ही? काय संबंध आहे अमित शहांचा आणि पवार साहेबांच्या पक्षाचा? पवार कुटुंबाची अवस्था बघा, असे राणे यांनी म्हटले आहे. एवढा नीचपणा राजकारणात पण बरोबर नाही पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, मी त्यांच्या घरात जाऊन आलो. तेवढीही माणुसकी संजय राऊतांनी दाखवली नाही. मी घरात जाऊन आलोय. काय अवस्था आहे त्या घराची हे त्यांनी जाऊन बघावे आणि मग टीका करावी. सगळीकडे राजकारण? काहीतरी भान ठेवा. अगोदर आपण माणूस आहोत, मग कोण राजकारणी, कोण खेळाडू आहे. सगळीकडे राजकारण बरोबर नाही. एवढा नीचपणा राजकारणात पण बरोबर नाही. कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजे. महाराष्ट्राच्या कल्चरसाठी पण हे बरोबर नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशी टीका राणेंनी केली आहे. संजय राऊत यांना फिलिंग्स आहेत का कोणाच्या कुटुंबाबद्दल? मी त्या माणसाच्या प्रश्नांना उत्तर का देऊ? आणि कुठली फाईल, कुठे आहे? हे संजय राऊतांना कोण सांगून करतंय का? अशाने संजय राऊत यांना कोण विचारणार नाही, असेही नितेश राणे यांनी म्हटले.
गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आज एकच खळबळ उडाली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे खंबीर नेते अजय कंकडालवार यांच्या अहेरी येथील चार मजली भव्य व्यावसायिक इमारतीवर नगरपंचायत प्रशासनाने आज बुलडोझर चालवला. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या इमारतीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचा ठपका ठेवत, न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. अजय कंकडालवार यांनी अहेरी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला एक चार मजली व्यावसायिक इमारत उभारली होती. मात्र, या बांधकामासाठी नगरपंचायतीची कोणतीही तांत्रिक किंवा प्रशासकीय परवानगी घेण्यात आली नव्हती. या बेकायदेशीर बांधकामाबाबत नगरपंचायतीने कंकडालवार यांना वारंवार नोटिसा बजावल्या होत्या. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात कंकडालवार यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. दीर्घ न्यायालयीन लढाई आणि शेवटचा निकाल या प्रकरणाची सुनावणी अहेरी न्यायालयात पार पडली. न्यायालयाने दोनवेळा संबंधित बेकायदेशीर इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, या निर्णयाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली होती आणि कंकडालवार यांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मुभा दिली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली नाही. अखेर, अहेरी न्यायालयाचा मूळ निर्णय कायम राहिल्याने नगरपंचायत प्रशासनाने आज प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली. पोलिस बंदोबस्तात इमारतीचे 'शिरकाण' आज सकाळी जेसीबी आणि बुलडोझरसह नगरपंचायतीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. माजी जिल्हा परिषद अध्यक्षांची इमारत असल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही तासांतच या इमारतीचे बांधकाम जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली. राजकीय सूडबुद्धीची चर्चा? अजय कंकडालवार हे गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नाव आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. त्यामुळेच, ऐन जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या धामधुमीत आणि राजकीय अस्थिरतेच्या काळात झालेली ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याची चर्चा अहेरीमध्ये रंगली आहे. मात्र, नगरपंचायत प्रशासनाने ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे.
घड्याळ नव्हे तर कपड्यावरून पटली अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख
पुणे : प्रतिनिधी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांची ओळख त्यांच्या हातावरील घड्याळावरून पटली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पोलिस तपासात नेमकी त्यांची ओळख कशावरून पटली, याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. वरिष्ठ पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला अजित पवारांची ओळख त्यांच्या हातातील घड्याळामुळे पटली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण अजित […] The post घड्याळ नव्हे तर कपड्यावरून पटली अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘धुरंधर २’ चा जबरदस्त टीझर रिलीज
मुंबई : प्रतिनिधी आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट ५ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि संजय दत्त यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. आता ‘धुरंधर २’ चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स अॉफिसवर धुमाकूळ घालत अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करत तुफान […] The post ‘धुरंधर २’ चा जबरदस्त टीझर रिलीज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव द्या; मिटकरी
पुणे : प्रतिनिधी राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लोकप्रिय आहे. अनेक पात्र महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये दिले जातात. या योजनेसंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक मोठी मागणी केली आहे. अजितदादांच्या दूरदृष्टीतून आलेल्या या योजनेला ‘अजितदादांची लाडकी बहीण योजना’ असे नाव देऊन त्यांच्या स्मृती सरकारने वेगळ्या पद्धतीने जपाव्या, अशी विनंती मिटकरींनी मुख्यमंत्री देवेंद्र […] The post लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव द्या; मिटकरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लोकसभेत गोंधळ; ८ खासदारांचे निलंबन
नवी दिल्ली : लोकसभेत आज राहुल गांधी यांच्या भाषणावेळी गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज सुरळीत होण्यास सुरुवात झाली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, तसेच हो, हा चीन आणि पाकिस्तानशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे असे त्यांचे विधान पुन्हा मांडले. संसदीय कामकाज […] The post लोकसभेत गोंधळ; ८ खासदारांचे निलंबन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विमान अपघाताच्या घटनेत काहीतरी गडबड
नाशिक : अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी विमान अपघाताविषयी शंका उपस्थित करत, ‘विमान अचानक पलटी कसे झाले, काहीतरी गडबड आहे,’ असे मोठे विधान करत शंका उपस्थित केली आहे. नाशिक येथे शोकसभेत भुजबळांनी उपस्थित केलेल्या शंकेमुळे विमान अपघाताविषयी शंकांचे गारूड वाढताना […] The post विमान अपघाताच्या घटनेत काहीतरी गडबड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता महापौर आणि उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. अनेक शहरांना नवे कारभारी मिळाले आहेत. ठाणे, पुणे आणि कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे वर्चस्व दिसून आले. या शहरांमध्ये भाजपने आपल्या मित्रपक्षांसोबत सत्ता स्थापन केली असून, अनेक ठिकाणी या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. तर वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीने आपला गड राखला आहे. नाशिक आणि नागपुरात मात्र राजकीय चुरस कायम आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिका मीरा-भाईंदर महानगरपालिकेत भाजपने येथे अमराठी कार्ड खेळत डिंपल मेहता यांना महापौरपदी बसवले आहे. त्यांनी काँग्रेसच्या रुबीना शेख यांचा ७९ विरुद्ध १६ अशा मोठ्या फरकाने पराभव केला. उपमहापौरपदी भाजपचे ध्रुवकिशोर पाटील निवडून आले. पुणे महानगरपालिका पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपच्या नगरसेविका मंजूषा नागपुरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याने निवडणूक औपचारिकता राहिली होती. प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिक बाग येथून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर उपमहापौर पदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिका ३ वर्षे १० महिन्यांच्या प्रशासकीय राजवटीनंतर ठाणे पालिकेला महापौर मिळाले आहेत. ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या शर्मिला पिंपळोलकर यांची महापौर पदी तर, भाजपचे कृष्णा पाटील यांची उपमहापौर पदी बिनविरोध निवड करण्यात आली. वसई-विरार महानगरपालिका वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीने (बविआ) पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. भाजपच्या अॅड. दर्शना त्रिपाठी-कोटक यांचा पराभव करत बविआचे अजीव यशवंत पाटील महापौर बनले. महापौर पदासाठी रिंगणात अनेक उमेदवार होते, मात्र मुख्य लढत बविआ आणि भाजपमध्ये झाली. बविआकडून अजीव यशवंत पाटील, प्रफुल्ल साने आणि निशाद चोरघे यांनी अर्ज भरले होते. त्यांच्या विरोधात भाजपच्या अॅड. दर्शना त्रिपाठी-कोटक रिंगणात होत्या. बविआकडून मार्शल डॉमनिक लोपीस आणि कन्हैया भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपच्या वतीने नारायण मांजरेकर नशीब आजमावत होते. नागपूर महानगरपालिका नागपूर येथील महानगरपालिकेत भाजपानं महापौर पदासाठी प्रभाग क्रमांक 28 मधील नगरसेविका नीता ठाकरे, तर उपमहापौर पदासाठी तर प्रभाग क्रमांक 29 मधील नगरसेविका लीना हाथीबेड यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. सोमवारी (2 फेब्रुवारी) दोन्ही महिला उमेदवारांनी नागपूर महानगरपालिकेच्या कार्यालयात आपले नामांकन अर्ज दाखल केले. नागपूर महानगरपालिकेच्या एकूण 151 जागांपैकी काँग्रेसने 34 जागांवर यश मिळवले आहे. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी भाजपविरोधात काँग्रेसनेही आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. काँग्रेसने महापौर पदासाठी स्नेहल ठाकरे, तर उपमहापौर पदासाठी विवेक निकोसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, संख्याबळ पाहता भाजपचे पारडे जड असून, महापौर आणि उपमहापौर भाजपचाच होईल, हे निश्चित मानले जात आहे. नाशिक महानगरपालिका नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपने हिमगौरी आडके यांना उमेदवारी जाहीर केली, तर उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांचा अर्ज दाखल करण्यात आला. या निवडणुकीत भाजपची मजबूत स्थिती असल्याने त्यांचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता प्रबळ आहे, परंतु विरोधी पक्षांकडूनही जोरदार आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, विरोधी पक्षांनीही या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून (शिवसेना उबाठा) महापौरपदासाठी प्रभाग क्रमांक १५ मधून निवडून आलेल्या सीमा पवार यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे. या अर्जामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून (शिंदे शिवसेना) उपमहापौरपदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, राहुल दिवे आणि विलास शिंदे यांचा समावेश आहे. शिंदे सेनेची ही आक्रमक भूमिका लक्षवेधी आहे. भाजप स्वबळावर सत्तेत असतानाही शिंदे सेनेने महापौर आणि उपमहापौर पदांसाठी उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. कल्याण - डोंबिवली महानगरपालिका कल्याण डोंबिवलीला तब्बल 6 वर्षांनंतर महापौर आणि उपमहापौर मिळाले असून आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. महापौर पदी शिवसेनेच्या ॲड. हर्षाली थविल चौधरी यांची तर उपमहापौर पदी राहुल दामले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कल्याण डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी एकच अर्ज आल्याने ही निवड केवळ औपचारिकता ठरली. अहिल्यानगर महानगरपालिका अहमदनगरचे नाव 'अहिल्यानगर' झाल्यानंतर ज्योती गाडे या पहिल्या महापौर ठरल्या आहेत. त्या भाजपचे दिवंगत नेते शिवाजी कर्डिले यांच्या कन्या आहेत. उपमहापौरपदी विखे-पाटील यांचे निष्ठावंत ॲड. धनंजय जाधव यांची निवड झाली आहे. येथे भाजप-राष्ट्रवादी युतीने शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवले आहे. अमरावतीत 'सव्वा-सव्वा' वर्षांचा फॉर्म्युला अमरावती महापालिकेत भाजपा, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशी महायुतीची सत्ता बसण्याचा मार्ग सोमवारी मोकळा झाला. भाजपाकडून श्रीचंद तेजवानी यांनी महापौर पदाचा तर युवा स्वाभिमानकडून सचिन भेंडे यांनी उपमहापौर पदाचा अर्ज दाखल केला. श्रीचंद तेजवानी पहिले सव्वा वर्ष महापौर राहतील. त्या पुढच्या सव्वा वर्षात आशिष अतकरे महापौर होतील. याच पद्धतीने युवा स्वाभिमान पक्षाचे पाहिले सव्वा वर्ष सचिन भेंडे उपमहापौर असतील. त्या पुढचे सव्वा वर्ष अजय जयस्वाल हे पदभार सांभाळतील. महापौर व उपमहापौर पदाच्या ६ फेब्रुवारीला होणार्या निवडणुकीसाठी प्रत्येकी तीन अर्ज नगरविकास सचिवांकडे आज प्राप्त झाले. त्यात महापौरपदासाठी भाजपाचे श्रीचंद तेजवानी, काँग्रेसचे डॉ. संजय शिरभाते, बसपाचे ईस्माईल लालुवाले यांनी अर्ज दाखल केले आहे. उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे, काँग्रेसच्या लुबना तनवीर, बसपाचे सचिन वैद्य यांनी अर्ज दाखल केले आहे. ६ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत मतदान होते की निवड बिनविरोध होते, याकडे लक्ष लागले आहे.
परभणीतील अॅड. माधवराव भोसले ‘सीनियर लॉयर’ पुरस्काराने सन्मानित
परभणी : येथील जेष्ठ विधीज्ञ अॅड. माधवराव एकनाथराव भोसले यांना मागील ४८ वर्षांपासून सखोल ज्ञान व कौशल्यपूर्ण वकीलीच्या माध्यमातून न्याय क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ऍन्ड गोवा तर्फे देशाचे मा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते ‘सिनीयर लॉयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा तळोजा, मुंबई येथे दि. १ रोजी पार […] The post परभणीतील अॅड. माधवराव भोसले ‘सीनियर लॉयर’ पुरस्काराने सन्मानित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सुशील रहेजा नामक एका मुंबईतील बांधकाम व्यावसायिकाने मराठी तरुणाला मारहाण व शिवीगाळ केल्याची घटना समोर आली आहे. मनसेने या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत आपल्या पद्धतीने न्याय करण्याचा इशारा दिला आहे. केंद्र राज्य व आता मुंबईतही भाजपची सत्ता आल्यामुळे रहेजा नामक बेडकांची डराव - डराव वाढली आहे, असे मनसेने म्हटले आहे. भाजपने मुंबई लगतच्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी एका अमराठी व्यक्तीची निवड केली आहे. मराठी एकीकरण समितीने या प्रकरणी रान पेटवले आहे. हा वाद टोकाला भिडला असतानाच आता मुंबईतील एका अमराठी बिल्डरने मराठी तरुणाला 'तुम घाटी के लोग कशी सुधरोगे नहीं' असे म्हणत मारहाण केल्याची घटना उजेडात आली आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी सत्ताधारी भाजपवर शरसंधान साधत निर्वाणीचा इशारा दिला आहे. मनसे आपल्या पद्धतीने करेलच ते म्हणाले, “तुम घाटी लोग सुधारोगे नही” म्हणत मुंबईतील बिल्डर सुशील रहेजा याच्याकडून मराठी तरुणाला मारहाण आणि शिवीगाळ. भारतीय जनता पक्षाचा महापौर मुंबईत अजून बसला नाही, तर ही अवस्था आहे मुंबईतील मराठी माणसाची. केंद्रात, राज्यात आणि आता मुंबईत सत्ता भाजपची आल्यामुळे रहेजा नावाच्या बेडकांची डराव-डराव वाढली आहे. आता पाहूया आशिष शेलार, अमित साटम आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने सुशील रहेजा तुरुंगात जातो की बाहेर राहतो. मीरा-भाईंदरला मेहता महापौर, तर मुंबईत रहेजा बिल्डरकडून मराठी तरुणाला मारहाण, या घटना सूचक नाही तर धोक्याची घंटा आहेत! असा इशारा काळेंनी दिला आहे. बाकी, रस्त्यावरचा न्याय मनसे आपल्या पद्धतीने करेलच, असा इशाराही गजानन काळे यांनी या प्रकरणी दिला आहे. मीरा भाईंदरच्या महापौरपदी डिंपल मेहता दुसरीकडे, मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता यांचा 79 मतांनी विजय झाला आहे. भाजपने अमराठी चेहऱ्याला उमेदवारी जाहीर केल्याने शहरात पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ मराठी एकीकरण समितीने आज भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. पण त्यानंतरही भाजपने महापौरपदी मेहता यांची नियुक्ती केली. यामुळे हा मुद्दा पुढील काही दिवस चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार पुण्यासह बीडच्या पालकमंत्री; शासन निर्णय जारी
मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे जाणार? याची राजकीय चर्चा सुरू झाली होती. बीड आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. बीड आणि पुण्याचे पालकत्व (३ फेब्रुवारी) आजपासून सुनेत्रा पवार यांच्याकडे […] The post सुनेत्रा पवार पुण्यासह बीडच्या पालकमंत्री; शासन निर्णय जारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात झालेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, सुनेत्रा पवार या पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अल्पावधीतच त्यांच्याकडे दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांची धुरा देण्यात आल्याने प्रशासनातही याची चर्चा सुरू आहे. पुणे जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी जिल्ह्यांपैकी एक मानला जातो, तर बीड जिल्हा मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे. या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आल्याने त्यांच्या भूमिकेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अजित पवार यांच्या कार्यशैलीचा वारसा पुढे नेत, जिल्हास्तरावरील विकासकामांना गती देण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सुनेत्रा पवार यांचे राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय स्थान अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत....
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पारंपरिक धार्मिक विधींबाबत सुरू असलेल्या चर्चांना त्यांच्या बंधू श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. 28 जानेवारी रोजी बारामतीकडे येत असताना झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातात विमान धावपट्टीवर कोसळल्यानंतर स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. पुढील धार्मिक विधी कधी आणि कसे होणार याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात असताना, श्रीनिवास पवार यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. अंत्यसंस्कारानंतरच्या विधींमध्ये 30 जानेवारी हा दिवस निर्णायक ठरल्याचे त्यांनी सांगितले. 29 जानेवारीला विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अस्थी सावडण्याचा कार्यक्रम झाला. त्याच दिवशी सोनगाव येथे कऱ्हा-नीरा संगमावर अस्थी विसर्जन करण्यात आले. याच वेळी आवश्यक असलेले सर्व धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले, असे श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढे दशक्रिया किंवा तेरावा अशा कोणत्याही वेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. परंपरेनुसार मृत्यूनंतर दहाव्या किंवा तेराव्या दिवशी होणाऱ्या विधींची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, कुटुंबीयांनी अस्थी विसर्जनावेळीच सर्व धार्मिक कृत्ये पूर्ण केल्याने अशा विधींची आवश्यकता उरलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे 6 फेब्रुवारीला अपेक्षित असलेला दशक्रिया विधी किंवा त्यानंतर तेरावा असा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाही, हे स्पष्ट झाले. या निर्णयाबाबत अजित पवारांच्या निकटवर्तीयांपैकी कोणीही अद्याप स्वतंत्र प्रतिक्रिया दिलेली नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसली, तरी श्रीनिवास पवार यांनी पवार कुटुंबीयांशी चर्चा करूनच ही माहिती जाहीर केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे धार्मिक विधींवर पडदा पडला असला तरी कुटुंबीयांकडून येणाऱ्या सांत्वनपर भेटींची मालिका मात्र सुरू आहे. आज काटेवाडी येथील ‘सहयोग’ निवासस्थानी पवार कुटुंबीय सांत्वनपर भेटी स्वीकारत आहेत. सुनेत्रा पवार यांनी 3 फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्या कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्या पुन्हा बारामतीत परतल्या. मंगळवारी त्या काटेवाडी येथे उपस्थित राहणार असून दुपारी चार वाजेपर्यंत सांत्वनासाठी येणाऱ्यांना भेटणार आहेत. सकाळपासूनच काटेवाडीत नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पार्थ पवार यांना राज्यसभेवर संधी दरम्यान, या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबातील पुढील राजकीय हालचालींबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची मुदत 4 जुलै 2028 पर्यंत शिल्लक असली तरी, त्या जागेऐवजी सहा वर्षांच्या पूर्ण कार्यकाळाच्या दुसऱ्या जागेवर पार्थ पवार यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यसभेची रिक्त जागा लवकरच भरली जाणार असल्याची माहिती मिळत असून, त्यासाठी पार्थ पवार यांनी हालचाली सुरू केल्याचे सांगितले जाते. धार्मिक विधींना पूर्णविराम देतानाच पवार कुटुंब पुढील राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय होत असल्याचे संकेत या घडामोडीतून मिळत आहेत. अजित पवार यांच्या स्मृतींच्या पार्श्वभूमीवर कुटुंबीयांनी धार्मिक बाबींचा अध्याय संपवला असला तरी, राजकीय अध्याय नव्याने उलगडत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गणेश नाईक यांनी शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना थेट आव्हान दिले आहे. मी परवानगी देतो, तुझ्यात हिंमत असेल तर गणेश नाईकचा टांगा पलटी करून दाखव, अशा शब्दांत नाईकांनी देसाईंना शिंगावर घेतले. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांची साताऱ्यातील पाटणमध्ये सभा पार पडली. या सभेत बोलताना गणेश नाईक यांनी शंभुराज देसाई यांचा उल्लेख 'पालकमंत्री' न करता 'मालकमंत्री' असा करत त्यांच्या कार्यपद्धतीवर तोफ डागली. नाईक म्हणाले की, ज्यांचे हात साफ असतात, तोच खऱ्या अर्थाने जनता दरबार घेऊ शकतो. ज्याला पाकिटे आणि हप्ते मिळतात, तो कसला जनता दरबार घेणार? केवळ सत्तेचा माज दाखवण्यासाठी हे लोक लोकांसमोर जात आहेत. उत्पादन शुल्क खात्यावरून टीका दोन्ही नेत्यांनी उत्पादन शुल्क (दारू) खात्याचे मंत्रिपद भूषवले आहे. त्यावरून वनमंत्री गणेश नाईकांनी शंभुराज देसाईंना सुनावले की, मालकमंत्री पाच वर्षे दारू खात्याचे मंत्री होते, मी दहा वर्षे होतो. म्हणजे सिनीयर मी आहे. पण माझ्या दहा वर्षांच्या काळात मी कधी कुणाची 'चपटी बाटली' सुद्धा घेतली नाही. मात्र, आजच्या मालकमंत्र्यांविषयी लोक काय बोलतात, हे त्यांनी एकदा कान देऊन ऐकावे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून नाईकांनी देसाईंची चांगलीच कोंडी केली. हरामाचे पैसे जनतेने ठोकरले महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा संदर्भ देत नाईक म्हणाले की, या निवडणुका जिद्दीने लढल्या गेल्या. जनतेने भ्रष्ट मार्गाने आलेले 'हरामाचे पैसे' ठोकरून लावले आहेत. पाटणची जनता स्वाभिमानी आहे आणि ती अशा पैशांना हात लावणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. गुंडगिरीला गणेश नाईकांचे चॅलेंज शंभुराज देसाई यांनी गणेश नाईक यांच्या टीकेला उत्तर देताना, राजकारणात कोणीच कोणाला कमी नसते, एखाद्याला संपवायची भाषा केली तर बाकीचे हाताची घडी घालून बसत नाहीत. वेळ आल्यावर आम्ही सुद्धा आमची भूमिका घेणार, आमचा पक्ष सुद्धा तोडीस तोड उत्तर देणार, असे जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यावर संतप्त झालेल्या गणेश नाईक यांनी देसाईंचा एकेरी उल्लेख करत आव्हान दिले. दादागिरी कुणाचीही ऐकून घेतली जाणार नाही. धावरी गावात कुणाला जाऊ दिले जात नाही, असे मी ऐकले आहे. मी सांगतो, जनतेने अर्ज करावा आणि आपल्या उमेदवाराला तिथे घेऊन जावे, कुणी हात लावून दाखवला तर हा गणेश नाईक समर्थ आहे. गुंडगिरी आणि पुंडगिरीचे राजकारण दुसऱ्याला शिकवा, अशा शब्दात नाईकांनी देसाईंना इशारा दिला.
पुणे महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडीसाठी आज उमेदवारी अर्ज भरले जाणार असून, 119 नगरसेवक निवडून आल्यामुळे भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र ही निवड बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेससोबत संवाद साधला गेला असल्याची माहिती समोर येत आहे. पुणे महापालिकेत घड्याळ चिन्ह असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरला असून, या पक्षाचे 27 नगरसेवक निवडून आले आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 3 नगरसेवक निवडून आले आहेत. या दोन्ही गटांतील नेते आज पुणे महापालिकेत भेटणार असून, महापौरपदासाठी भाजपच्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही, यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना महापौर व उपमहापौर निवडीसाठी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण मुख्य सभेला उपस्थित राहण्यासाठी बोलावले जाणार आहे. नगरसचिवांकडून यासाठी कारागृह प्रशासनाला पत्र पाठवले जाणार असून, पुणे महानगरपालिकेकडून त्यासाठी पत्राचा मसुदा तयार करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही या दोघींना सभेस उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्र पत्र देण्यात येणार आहे. 9 तारखेला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मतदानासाठी आंदेकर सासू-सुनेची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघी सध्या आयुष कोमकर खून प्रकरणात शिक्षा भोगत असून कोल्हापूर कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. याआधीही महत्त्वाच्या मतदान प्रक्रियेसाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात बाहेर आणण्यात आले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांना सभेसाठी बोलावले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडीमुळे पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात नवा कलाटणीकारक टप्पा निर्माण झाला आहे. विशेषतः महापौर आणि उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उपस्थितीला निर्णायक महत्त्व प्राप्त होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारागृहाला आवश्यक पत्र पाठवण्याची तयारी 9 तारखेला होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण मुख्य सभेकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. या सभेत होणाऱ्या मतदानातून नेमकी सत्ता कुणाच्या बाजूने झुकते, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महापालिकेकडून कारागृहाला आवश्यक पत्र पाठवण्याची तयारी पूर्ण झाली असून, लवकरच ते कारागृह प्रशासनाकडे रवाना केले जाणार आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय, भाजपचे बिनविरोध प्रयत्न, आणि आंदेकर सासू-सुनेची संभाव्य उपस्थिती, या सर्व घटकांमुळे पुण्याच्या महापौर निवडीची प्रक्रिया अत्यंत नाट्यमय आणि चर्चेची ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
सीआयडी काय चौकशी करते हे मला माहित आहे. मी गृहमंत्री होतो. हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली चौकशी झाली तरच सत्य बाहेर येऊ शकते. संजय राऊत यांनी देखील हायकोर्टच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे, असे शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. त्यांनी अजित पवार गटाच्या कार्यालयात त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि या अपघाताच्या नवी चौकशीची मागणी केली आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असलेल्या खासगी विमानाचा 28 जानेवारी 2026 रोजी अपघात झाला. लँडिंगपूर्वी विमान आकाशात गोल फिरले, एका बाजूला झुकले आणि नंतर ब्लास्ट झाले. लँडिंगनंतरही विमानाचे दोन ब्लास्ट झाले. अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारसह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या परिस्थितीवर अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. त्यावर विश्वास बसत नाही अनिल देशमुख यांनी व्हिजिबिलिटीवर आधारीत कारणांकडे संशय व्यक्त केला. अनिल देशमुख म्हणाले की, व्हिडीओ पाहून दिसते की अपघाताचे कारण फक्त कमी दृश्यता नाही. केंद्रीय मंत्रालयाने व्हिजिबिलिटीचे कारण सांगितले, पण त्यावर विश्वास बसत नाही. त्यामुळे व्यवस्थित चौकशी होणे गरजेचे आहे. अनेक नेत्यांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत, त्यामुळे खाजगी विमानामध्ये प्रवास करताना काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देखील याबाबत सूचना देण्याचा विचार असल्याचे सांगितले. ही चर्चेची वेळी नाही दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्यासंदर्भातही अनिल देशमुख म्हणाले की, सध्या या विषयावर चर्चा करण्याची वेळ नाही. योग्य वेळ आली की त्या बाबत बोलणार आहे. कुठे कुठल्या मिटिंग झाल्या, कोण उपस्थित होते, हे सर्व मी सांगणार. सध्या अपघाताच्या चौकशीसाठी सीआयडी आणि डिजीसीआय कार्यरत आहेत, पण हायकोर्टच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र चौकशी केल्यास अपघाताचे खरे कारण समोर येईल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे. चौकशी करा - ममता बॅनर्जी अजितदादांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी सशंय व्यक्त करत 'कोणीही सुरक्षित नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली योग्य चौकशी आवश्यक आहे. हे अनावश्यक भीती निर्माण करणारे आहे की कट आहे, हे काळच सांगेल. तथापि, सर्वात सोपा मार्ग म्हणजे पायलटला दोष देणे, जसे आपण मागील दोन प्रकरणांमध्ये पाहिले आहे,' असे म्हटले होते. राजकारण नको - शरद पवार शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत यात राजकारण आणू नका, असे आवाहन केले होते. शरद पवार म्हणाले होते की, 'अजित पवार यांचा हा अपघाती मृत्यू आहे. त्याचा महाराष्ट्राला प्रचंड असा धक्का आहे. एक कर्तृत्ववान, निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र मुकला आहे. जे काही नुकसान झाले ते भरून निघणारे नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. हा अपघात आहे. यामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका मांडली गेली. मात्र, याच्यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपा करून इथे राजकारण आणू नये,' असे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र, त्यानंतरही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. अजित पवारांचा विमान अपघात ऑपरेशन लोटसचा भाग आहे का?:संजय राऊत म्हणाले- भाजपच्या विरोधात जाणारा एकतर जेलमध्ये जातो, नसता जीव जातो अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात विविध दावे-प्रतिदावे वेगाने पुढे येत आहेत. विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना काही गंभीर मुद्दे उपस्थित केले. अजित पवार हे भाजपच्या कथित भ्रष्टाचाराबद्दल खुलेपणाने बोलत होते, असे सांगत त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत कुत्र्यांच्या नसबंदीच्या कामातील गैरव्यवहाराची माहिती दादांना असल्याचा दावा केला. अनेक वर्षे अर्थमंत्री म्हणून काम केल्यामुळे भाजपशी संबंधित अनेक बाबींची कागदपत्रे अजित पवार स्वतःकडे ठेवत, असा आरोपही राऊतांनी केला. वाचा सविस्तर
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर आपण पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर कोण? काय? ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही, असे ते म्हणालेत. आज आमच्यापुढे विलीनीकरणाचा कोणताही प्रश्न नसल्याचेही त्यांनी यावेळी प्रामुख्याने अधोरेखित केले. त्यामुळे अजित पवारांच्या पश्चात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत सुरू असणारी विलीनीकरणाची कथित चर्चा पुढे सरकणार नसल्याचे हे आता स्पष्ट झाले आहे. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत...
मुंबई : प्रतिनिधी राज्याचा आगामी अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाणार आहे. यावर्षी अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करतील असे सांगितले जात आ गेल्या वर्षी मंजूर झालेल्या अर्थसंकल्पातील मोठा हिस्सा अजूनही कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, मंजूर तरतुदींपैकी निम्म्याहून थोडाच अधिक निधी विभागांना देण्यात आला असून प्रत्यक्षात खर्च झालेला निधी त्याहूनही कमी आहे. त्यामुळे […] The post राज्यावर वाढला कर्जाचा बोजा! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राणा जोडप्याचा भाजपकडून करेक्ट कार्यक्रम
अमरावती : प्रतिनिधी महापालिकेच्या सत्ताकारणात भाजपने संख्याबळ जुळवताना ‘युवा स्वाभिमान’ला जवळ केले असले तरी राष्ट्रवादी अजित पवार गटालाही सोबत घेतले आहे. सार्वत्रिक निवडणुकीत भाजपसोबत राहून विरोधात काम केल्याने आलेली नाराजी दूर करण्यासाठी महापौर भाजपचा, असा प्रचार निवडणुकीपश्चात राबविणा-या युवा स्वाभिमानला त्यांच्याच शैलीत राष्ट्रवादीला जवळ करून चेकमेट दिला आहे. अमरावती महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रभावक्षेत्रात युती धाब्यावर […] The post राणा जोडप्याचा भाजपकडून करेक्ट कार्यक्रम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मिरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौर; मराठी एकीकरण समिती आक्रमक
ठाणे : प्रतिनिधी मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजप ७८, शिवसेना शिंदे गट तीन, काँग्रेस १३ आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आल्यानंतर भाजपचा महापौर होणार हे निश्चित झाले होते. फक्त महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हाच प्रश्न होता. त्याचेही उत्तर आज मिळाले, भाजपकडून डिंपल मेहता यांना महापौरपदाच्या निवडणुकीत ७९ मते मिळाली. डिंपल मेहता या मिरा-भाईंदरच्या महापौर झाल्या […] The post मिरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौर; मराठी एकीकरण समिती आक्रमक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सुप्रीम कोर्टाने एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सदस्य नोंदणीवर तीव्र आक्षेप नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना खडेबोल सुनावलेत. एवढी बेकायदा कामे करण्याची हिंमत होतेच कशी? असा खडा सवाल कोर्टाने या प्रकरणी रोहित पवार यांना केला आहे. कोर्टाच्या या भूमिकेनंतर रोहित पवार यांनी यासंबंधीची आपली याचिका मागे घेतली आहे. रोहित पवार यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह 400 जणांची एमसीएवर आजीवन सदस्य म्हणून नोंदणी केली होती. त्यावर माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी आक्षेप घेतला होता. त्यांच्या मते, बीसीसीआयच्या निकालानंतर सदस्य नोंदणीला सुप्रीम कोर्टाची परवानगी लागते. तत्पूर्वी, एमसीएच्या घटनेतही तसा बदल करावा लागतो. पण त्यानंतरही रोहित पवार यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह 400 जणांची एमसीएवर आजीवन सदस्य नोंदणी केली. केदार जाधव यांनी या प्रकरणी रोहित पवारांच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने आज रोहित पवारांना खडेबोल सुनावले. कोर्टाच्या दट्ट्यानंतर रोहित पवारांनी याचिका घेतली मागे बेकायदा कामे करण्याची हिंमतच होते कशी? तुम्ही प्रकरण मागे घेता की आम्हीच ती डिसमिस करू, अशी विचारणा कोर्टाने या प्रकरणी रोहित पवारांना केली. कोर्टाच्या या इशाऱ्यानंतर रोहित पवारांनी आपली याचिका मागे घेतली. काय होता केदार जाधव यांचा आरोप? माजी क्रिकेटपटू तथा भाजप पदाधिकारी केदार जाधव यांनी रोहित पवारांवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची सत्ता टिकवण्यासाठी संघटनेची सदस्यसंख्या मनमानी पद्धतीने वाढवल्याचा आरोप केला होता. रोहित पवारांनी आपल्या बाजूने मतदान व्हावे यासाठी एमसीएच्या सदस्यसंख्येत 154 वरून 571 पर्यंत वाढ केली. त्यांनी आपली पत्नी कुंती, सासरे सतीश मगर यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांच्यासह अनेकांचा संघटनेत समावेश केला. एवढेच नाही तर विविध राजकीय नेते व शैक्षणिक संस्थांसह आपल्या कंपन्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही त्यांनी सदस्य म्हणून नोंदणी केली, असे ते म्हणाले होते. या प्रकरणी केदार जाधव यांच्यासह लातूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन, एमसीएचे सदस्य अनंत माटे, पुण्यातील एस पी महाविद्यालय यांनी या निर्णयाला हायकोर्टात स्वतंत्रपणे धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने 6 जानेवारी रोजी होणारी निवडणूक स्थगित केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 फेब्रुवारीला होणार आहे. तत्पूर्वी, रोहित पवार यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
सरपंचपदाची लालसा; पोटच्या मुलीची हत्या
नांदेड : प्रतिनिधी सध्याच्या काळात माणसांना राजकारणातील पद प्रतिष्ठेचा एवढं व्यसन लागलं आहे की त्यामुळे त्याला रक्ताची नाती देखील दिसत नसल्याचं चित्र नांदेडमधील एका घटनेमुळे उघडकीस आलं आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाच्या निकषासाठी अडसर ठरणा-या पोटच्या सहा वर्षाच्या मुलीची एका पित्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावचा […] The post सरपंचपदाची लालसा; पोटच्या मुलीची हत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रोख पैशांच्या स्वरूपात लाभ देण्याच्या योजनांवरील वाढत्या अवलंबित्वामुळे राज्यांची अर्थव्यवस्था अस्थिर होण्याचा धोका आहे, असा इशारा 16 व्या वित्त आयोगाने संसदेत सादर केलेल्या आपल्या अहवालात दिला आहे. या इशाऱ्यामुळे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात एखादा ठोस निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुलै 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. राज्यातील लाखो महिलांना सध्या डीबीटीद्वारे हा लाभ दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर 16 व्या वित्त आयोगाने महाराष्ट्र, ओडिशा व झारखंड या राज्यांचा दाखला देत उपरोक्त इशारा दिला आहे. अरविंद पनगडिया यांच्या नेतृत्वातील वित्त आयोगाने संसदेत सादर केलेल्या 2026-31 च्या आपल्या पंचवार्षिक अहवालात म्हटले आहे की, अशा योजनांमुळे राज्यांच्या अनुदान खर्चाच्या पद्धतीत मोठा बदल झाला. 21 राज्यांमध्ये रोख हस्तांतरण योजनांद्वारे पैशांच्या वापरावरील अटींशिवाय लाभार्थ्यांना थेट पैसे दिले जातात. सद्यस्थितीत अशा सर्वात मोठ्या योजनांमध्ये महाराष्ट्राची माझी लाडकी बहीण योजना (पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये), कर्नाटकची गृहलक्ष्मी योजना (कुटुंबप्रमुख असलेल्या महिलांना दरमहा 2 हजार) व पश्चिम बंगालची लक्ष्मी भंडार योजना (एससी/एसटीच्या महिलांना दरमहा 1200 व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांना 1 हजार रुपये) यांचा सामेवश आहे. विशेषतः महाराष्ट्राचा रोख हस्तांतरण योजनांवरील खर्च 2023-24 मधील एकूण महसुली खर्चाच्या 0.6 टक्क्यांवरून 2025-26 मध्ये 6.2 टक्क्यांपर्यंत (अंदाजपत्रकीय अंदाज) वाढला आहे. आर्थिक स्थिती दीर्घकाळासाठी अस्थिर होईल झारखंडमध्ये याच कालावधीत असा खर्च 0.8 टक्क्यांवरून 13 टक्क्यांपर्यंत वाढला असून, ओडिशातही याच कालावधीत शून्यावरून 5.1 टक्क्यांपर्यंत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रमुख राज्यांनी महसुली खर्च अशा योजनांसाठी सुरू ठेवला, तर त्यामुळे राज्यांच्या अर्थसंकल्पावर केवळ मोठा भारच पडणार नाही, तर दीर्घकाळात त्यांची आर्थिक स्थितीही अस्थिर होईल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. वित्त आयोग एक घटनात्मक संस्था वित्त आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे. ती घटनेच्या कलम 280 अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. केंद्र व राज्यांची आर्थिक परिस्थिती तपशीलवार समजून घेणे, त्यांच्यात करांच्या वितरणाची शिफारस करणे व राज्यांमध्ये करांच्या वितरणाची चौकट ठरवणे हे त्याचे महत्त्वाचे काम असते. याशिवाय केंद्र सरकार इतरही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी वेळोवेळी वित्त आयोगावर सोपवू शकते. दरम्यान, या आयोगात 1 अध्यक्ष व 4 सदस्य असतात. या 4 पैकी 1 सदस्य हायकोर्टाचा सदस्य असतो. याशिवाय एका सदस्याची निवड संसदेद्वारे केली जाते. या आयोगाचा कार्यकाळ साधारणतः 5 वर्षांचा असतो.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र अजूनही शोकसागरात बुडालेला असताना आणि त्यांच्या अस्थींचे विसर्जन होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडली आहे. नाशिक महानगरपालिकेतील 'गटनेते' पदावरून हा वाद उफाळून आला असून, ज्येष्ठ नगरसेविका हेमलता पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सही-शिक्यावरच संशय व्यक्त केला आहे. अजितदादांच्या अस्थी विसर्जित होण्याआधीच इतके घाणेरडे राजकारण होत असेल, तर मला काहीच नको, अशा शब्दांत त्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली आहे. नाशिक महापालिकेत राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सीमा ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ही नियुक्ती हेमलता पाटील यांना मान्य नाही. त्यांच्या मते, अजित पवार यांनी स्वतः त्यांना गटनेतेपदाचा शब्द दिला होता. सीमा ठाकरे यांच्या नावाची जी अधिकृत पत्रे प्रसिद्ध झाली आहेत, त्यावर हेमलता पाटील यांनी शंका उपस्थित केली आहे. सुनील तटकरे यांच्या नावाने कुणी बनावट पत्र, बनावट सही आणि शिक्के मारून हे पत्र दिले आहे का? असा मला दाट संशय आहे. प्रदेशाध्यक्षांनी स्वतः या प्रकरणाचा खुलासा करावा आणि मला पुढील आदेश द्यावेत, अशी मागणी हेमलता पाटील यांनी केली आहे. …तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही अजित पवार यांच्या निधनाला अद्याप आठवडाही पूर्ण झालेला नाही. सध्या त्यांचा अस्थीकलश महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात दर्शनासाठी नेला जात आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय कुरघोड्यांबद्दल बोलताना हेमलता पाटील भावूक झाल्या. अजितदादांसारखा कर्तृत्ववान नेता आपण गमावला आहे. त्यांच्या मृत्यूचे दुःख अजून ताजे असताना काही लोक जर एवढ्या खालच्या थराचे राजकारण करत असतील, तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून नाही, असे त्यांनी सुनावले. कोण आहेत हेमलता पाटील? हेमलता पाटील नाशिकच्या राजकारणातील एक अनुभवी चेहरा आहेत. त्या ३० ते ३५ वर्षे काँग्रेसमध्ये होत्या आणि त्यांनी सहा टर्म नगरसेवक पद भूषवले आहे. यंदाची त्यांची ही सातवी टर्म आहे. विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेस सोडली आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, दीड महिन्यातच शिंदेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत त्यांनी अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सुनील तटकरेंच्या खुलाशाकडे लक्ष अजित पवारांच्या जाण्यानंतर अवघ्या तीन दिवसांत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पक्षात आता नवीन नेतृत्व आकाराला येत असताना, नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहरात जुन्या आणि ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये नाराजी पसरणे हे पक्षासाठी चिंतेची बाब ठरू शकते. सीमा ठाकरे यांची नियुक्ती खरंच तटकरे यांनी केली आहे की, स्थानिक पातळीवर काही वेगळ्या हालचाली झाल्या आहेत, हे सुनील तटकरे यांच्या खुलाशानंतरच स्पष्ट होईल.
उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत ऑपरेशन लोटसचा भाग आहे असे म्हणतील. स्वतः शरद पवारांनीही अजितदादांचा घातपात नसल्याचे सांगितले आहे. संजय राऊत यांनी आता नेटफ्लिक्सच्या वेबसीरिज लिहिण्याचे काम करावे, असे उत्तर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी दिले. उद्धव ठाकरे यांच्या शिवेसनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या घातपातावर संशय व्यक्त केला होता. अजित पवारांचा विमान अपघात ऑपरेशन लोटसचा भाग आहे का?, असा सवाल राऊत यांनी केला होता. तसेच भाजपच्या विरोधात जाणारा एकतर जेलमध्ये जातो, नसता जीव जातो, असा आरोपही त्यांनी केला. याला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले. काही पुरावे आहेत का? नवनाथ बन म्हणाले, ‘उद्या भूकंप झाला तरी संजय राऊत ऑपरेशन लोटसचा भाग आहे असे म्हणतील. उद्या जर त्सुनामी आली तरी संजय राऊत ऑपरेशन लोटसचा भाग म्हणतील. उद्या पूर आली तरी संजय राऊत ऑपरेशन लोटसचा भाग म्हणतील. त्यांनी ऑपरेशन लोटसचे नाव घेण्याऐवजी त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते सादर केले पाहिजे,’ असे आव्हान त्यांनी दिले. राऊत वेबसीरिज लिहा नवनाथ बन म्हणाले की, ' शरद पवारांनीही अजितदादांचा घातपात नसल्याचे सांगितले आहे. संजय राऊत प्रत्येक गोष्टीचा संबंध भाजपसोबत लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी उद्यापासून खासदारकी आणि राजकारण सोडून स्क्रिप्ट लिहण्याचे काम केले पाहिजे. त्यांनी नेटफ्लिक्ससाठी वेबसीरिज लिहिण्याचे काम करावे. जनतेमधून एकदाही निवडून न येता खासदारकी भूषवायची आणि खोटे आरोप करण्याचे काम संजय राऊत यांच्याकडून सुरू आहे.' काही लोकांना ‘एनडीए’त घ्याचे होते नवनाथ बन म्हणाले की, 'अजित पवार स्वगृही परतण्यासाठी प्रयत्न करत होते असा दावा संजय राऊत करत आहेत त्यांच्याकडे त्याचा काही पुरावा आहे का? तुमच्याकडे त्याबद्दलची माहिती आहे का? ते खोटे बोलत असतात. अजित पवार स्वगृही परतण्यात इच्छूक नव्हते, तर त्यांचे काही लोकांना एनडीएमध्ये घेण्याची इच्छा होती का हे बघितले पाहिजे. राऊत हे सातत्याने खोटे बोलत असतात. राऊतांचे काही अजित पवारांशी बोलणे झाले होते का? उगाच उठून पत्रकार परिषद घेत खोटी माहिती द्यायची हे काम राऊतांकडून सुरू आहे. त्यांना दुसरे काही काम नाही. अजित पवारांशी तुमचे कधी बोलणे झाले? तुमचा अजित पवारांशी काही संबंध नव्हता.' राऊत पवारांपेक्षा मोठे आहेत का? नवनाथ बन म्हणाले की, ‘संजय राऊत यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सादर केले पाहिजे. उगाच काही आरोप करू नये. मुळात भाजप असो की देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे. त्या प्रकरणी सीआयडी चौकशी सुरू आहे. तर केंद्रीय मंत्रालयाकडून सुद्धा सुरू आहे. कुठलीही चौकशी केली तरी काही हरकत नाही. हा दुर्दैवी अपघात होता. या अपघाताबद्दल शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे की हा घातपात नाही अपघात आहे. संजय राऊत हे शरद पवार यांच्यापेक्षा मोठे आहेत का?’ असा सवाल बन यांनी केला आहे. राऊतांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही नवनाथ बन म्हणाले की, 'राऊतांचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, ते काही जरी म्हणत असतील तरी कोर्टाच्या निर्णयानंतरही ते म्हणतील कोर्ट विकले गेले आहे. त्यामुळे त्यांनी पाकिस्तान किंवा बांगलोदशाच्या कोर्टात जावे आणि तिथे चौकशीची मागणी करावी. केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या चौकशीतून सर्व काही बाहेर येईल. राऊत दोन भूमिका एकाच वेळी मांडतात नवनाथ बन म्हणाले की, अजित पवार यांचा पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष होता ते मविआमध्ये पुन्हा जाणार नव्हते. गेल्या साडेतीन वर्षांमध्ये अजित पवार यांच्याशी राऊतांचे काही बोलणं झाले होते का? तुम्ही त्यांच्यावर किती टीका केली आज अचानक तुम्हाला त्यांचा पुळका का आला? तुम्ही मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम करत आहात. तुम्ही उबाठा गट खड्यात घालवला आहे. तुम्ही आता वेबसिरजसाठी काम केले तर तुमचे दुकान सुरू राहील. अजित पवारांच्या जाण्यामुळे राज्यासह भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. राऊतांनी जनतेबद्दल काही बोलू नये ते जनतेचे नेते नाहीत. ते केवळ फेक नरेटिव्ह पसरवत आहेत. एकाच पत्रकार परिषदेत तुम्ही दोन भूमिका मांडतात किमान स्वत:चा मुद्दा तरी चांगला लिहून घेत जा. ..म्हणून राहुल गांधींची गुलामगिरी सुरू नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे आता राहुल गांधी यांची चाटूगिरी करण्याचे काम सुरू आहे. त्यांना उबाठामधून आता खासदाराकी मिळणार नाही, म्हणून काँग्रेसकडून खासदारकी मिळावी यासाठी ते लांगूनचालन करत आहेत याच्यापलीकडे त्याला बघता येणार नाही. राहुल गांधीची गुलामी केली तर पुन्हा राज्यसभा मिळेल या अपेक्षेपोटी ते राहुल गांधींचे गुणगाण गात आहेत. चौकशी करा - ममता बॅनर्जी अजितदादांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी सशंय व्यक्त करत 'कोणीही सुरक्षित नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली योग्य चौकशी आवश्यक आहे. हे अनावश्यक भीती निर्माण करणारे आहे की कट आहे, हे काळच सांगेल. तथापि, सर्वात सोपा मार्ग म्हणजे पायलटला दोष देणे, जसे आपण मागील दोन प्रकरणांमध्ये पाहिले आहे,' असे म्हटले होते. राजकारण नको - शरद पवार शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत यात राजकारण आणू नका, असे आवाहन केले होते. शरद पवार म्हणाले होते की, 'अजित पवार यांचा हा अपघाती मृत्यू आहे. त्याचा महाराष्ट्राला प्रचंड असा धक्का आहे. एक कर्तृत्ववान, निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र मुकला आहे. जे काही नुकसान झाले ते भरून निघणारे नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. हा अपघात आहे. यामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका मांडली गेली. मात्र, याच्यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपा करून इथे राजकारण आणू नये,' असे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र, त्यानंतरही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
एटीएममधून पैसे काढणाऱ्या तरुणाला लुटले:पुण्यातील गणेशखिंड रस्त्यावर २८ हजार रुपयांची रोकड हिसकावली
पुण्यात गणेशखिंड रस्त्यावरील वीर चापेकर चौकात एटीएममधून पैसे काढून बाहेर पडलेल्या एका तरुणाला मारहाण करून २८ हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली. ही घटना १ जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा पेठेत राहणारा ३२ वर्षीय तक्रारदार तरुण आणि त्याचा मित्र श्री म्हसोबा मंदिराजवळील एटीएममधून पैसे काढून निघाले होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीत तरुणाच्या खिशातील २८ हजार रुपयांची रोकड हिसकावून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक पांढरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. शहरात पादचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडील रोकड, मोबाईल हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच, पादचारी महिलांकडून दागिने हिसकावण्याचे प्रकारही वाढले आहेत. यापूर्वी नगर रस्त्यावर बसची वाट पाहत थांबलेल्या एका तरुणाला पुणे स्टेशनपर्यंत सोडण्याची बतावणी करून मोटारचालक आणि त्याच्या साथीदारांनी लुटल्याची घटना नुकतीच घडली होती. दरम्यान, कर्वे रस्त्यावर पादचारी ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगरमधील लोणी प्रवरा गावचा रहिवासी असलेल्या तक्रारदार तरुणाच्या आईसोबत ही घटना घडली. १ जानेवारी रोजी ही महिला कर्वे रस्त्यावरून जात असताना, दुचाकीवरील चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले आणि पळ काढला. पोलीस हवालदार सावंत या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पंकजा मुंडे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
बीड : प्रतिनिधी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रवासादरम्यान मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून त्या हेलिकॉप्टरने लातूरकडे जाणार होत्या. मात्र उड्डाण सुरू होण्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे पायलटच्या निदर्शनास आले. खबरदारी म्हणून उड्डाण तत्काळ थांबवण्यात आले आणि त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. पंकजा मुंडे सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात […] The post पंकजा मुंडे हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सांगलीच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगली महापालिकेच्या सत्तावाटपाबाबत दिवंगत अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेची आठवण सांगितली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सांगली महापालिका निवडणुकीपूर्वी अजितदादांशी सविस्तर चर्चा झाली होती. त्या वेळी अजित पवार यांचे काही पदाधिकारी बाहेर थांबले होते आणि दादांनी त्यांना बाहेरच थांबवून खासगीपणे सांगली महापालिकेच्या राजकारणावर चर्चा केली होती. निवडणुकीदरम्यान झालेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबत अजितदादांनी त्या वेळी बोलावं लागतं, असे सांगितल्याचे पाटील यांनी नमूद केले. त्यावर आपण दादांचा हात हातात घेऊन रात गई बात गई, असे म्हणालो होतो, अशी आठवण त्यांनी शेअर केली. सांगलीच्या राजकीय भविष्यासंदर्भात ती चर्चा सकारात्मक दिशेने झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सांगली महापालिकेत सत्ता स्थापनेबाबत कोणता पक्ष कोणासोबत जाणार आणि महापौरपदावर कोण बसणार, याबद्दल स्पष्ट संकेत देण्यास पाटील यांनी टाळाटाळ केली. आधी पत्ते उघडणं याला गेम म्हणत नाहीत, ती अपरिपक्वता असते, असे सूचक विधान करत त्यांनी राजकीय समीकरणे अजून खुली असल्याचे दर्शवले. उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल होणार असून पुढील घडामोडींवर लक्ष ठेवावे, असे त्यांनी माध्यमांना सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सांगलीतील राजकीय वातावरणात उत्सुकता अधिक वाढली आहे. कोणती आघाडी तयार होणार, कोण कोणाच्या संपर्कात आहे, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. दरम्यान, सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबतही पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. महायुती म्हणूनच जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळेल, असा ठाम दावा त्यांनी केला. सांगली जिल्ह्यात भाजपने 39 जागांवर विजय मिळवला असल्याचे सांगत, स्थानिक पातळीवर भाजपची पकड मजबूत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. काँग्रेसला 18 जागा मिळाल्या असून, जिल्हा परिषदेत महायुतीचे वर्चस्व राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर सांगलीत भाजप आणि महायुतीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील आकडेवारीही या सत्तासमीकरणात महत्त्वाची ठरत आहे. भाजपकडे 39 जागा आहेत, तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडे 2 जागा आहेत. काँग्रेसला 18 जागा मिळाल्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 16 जागा असून, शरद पवार गटाकडे 3 जागा आहेत. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 40 हा बहुमताचा आकडा आवश्यक आहे आणि भाजप केवळ एका जागेवर थांबले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत कोणत्या पक्षासोबत हातमिळवणी होते, कोण महापौरपदावर विराजमान होतो, आणि सांगलीतील सत्तेचे गणित कसे जुळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे या राजकीय समीकरणांना नवा ट्विस्ट मिळाला असून सांगलीतील राजकारण अधिक रंगतदार झाले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे नांदेड येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय शालेय नेटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने विजेतेपद पटकावले. छत्रपती संभाजीनगरच्या जिज्ञासा चौहान हिने 17 वर्षांखालील मुलींच्या गटात तर विरोचन शिंदे याने 14 वर्षांखालील मुलांच्या गटात उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत विजयात मोलाचा वाटा उचलला. नांदेड येथे गुरू गोविंदसिंग क्रीडांगणावर 27 ते 31 जानेवारीदरम्यान 14 वर्षांखालील मुले व मुली तसेच 17 वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय शालेय नेटबॉल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. तिन्ही गटांत महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले. हा विजय दिवंगत उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांना समर्पित करण्यात आला. महाराष्ट्र ॲमेच्युअर नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश इंगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, स्पर्धा निरीक्षक प्रीती सोपनीस, पंचप्रमुख लक्ष्मण दातीर, जिल्हा सचिव प्रवीण कुपटीकर यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना सुवर्णपदक, प्रमाणपत्र आणि विजेतेपदाचा करंडक देण्यात आला. मुलांच्या गटात उत्कृष्ट कामगिरी करणारा विरोचन शिंदे हा पद्मश्री शंकरबापू आपेगावकर शाळेचा विद्यार्थी आहे. पीएसबीए शाळेच्या प्रशासक समृद्धी भोसेकर, महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, उपमुख्य संबंध अधिकारी विश्वास पाटील, नेटबॉल असोशिएशनचे हर्ष मगरे, आकाश सरदार, शिक्षक अभिजित देशमुख, गजानन दीक्षित यांनी त्याचे अभिनंदन केले. विरोचन हा महावितरणच्या 33 केव्ही शेंद्रा एमआयडीसी उपकेंद्रातील यंत्रचालक तथा राज्य शासनाचा ‘गुणवंत कामगार पुरस्कार’प्राप्त कर्मचारी रमेश काकासाहेब शिंदे यांचा सुपुत्र आहे.
स्वच्छ भारत मिशन व आणि जल जीवन मिशनअंतर्गत कार्यरत असलेल्या सुमारे 1200 पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी थकीत मानधन व विविध मागण्यांसाठी बुधवारपासून ता. 4 कामबंद आंदोलन केले जाणार आहे. त्यामुळे राज्यभरात स्वच्छभारत मिशन व जल जीवन मिशनची कामे ठप्प होणार असल्याचे चित्र आहे. त्यानंतर साखळी उपोषण सुरु केले जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. राज्यात स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 1200 पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. स्वच्छ भारतमिशन मध्ये मागील 10 ते 15 वर्षापासून हे कर्मचारी कार्यरत असून त्यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र तुटपुंजा मानधनावर देखील हे कर्मचारी आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. यामध्ये प्रामुख्याने योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, क्षेत्रीय तपासणी, लाभार्थी समन्वय, ऑनलाईन नोंदी आणि अहवाल सादरीकरण यासह इतर कामांचा समावेश आहे. दरम्यान, या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील चार ते पाच महिन्यापासून मानधन थकले आहे. त्यामुळे हे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कर्मचाऱ्यांचे मानधन तातडीने अदा करावे या मागणीसाठी कर्मचारी संघटनेकडून वेळोवेळी आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनाची शासनपातळीवर दखल घेण्यात आली नाही. याप्रकारामुळे कर्मचाऱ्यांमधून असंतोष निर्माण झाला आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन व इतर प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून (ता.4) कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास ता. 9 फेब्रुवारी पासून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांचे निवासस्थान, स्वच्छता मिशन कार्यालय परिसरात आणि मुंबईतील आझाद मैदान उपोषण केले जाणार आहे. आंदोलनामुळे कामे होणार ठप्प राज्यभरात या विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे स्वच्छ भारत मिशनचा आगामी वर्षाचा कृती आराखडा, योजनांची क्षेत्रीय तपासणी, अहवाल सादरीकरण, ऑनलाईन नोंदी आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाज ठप्प होणार आहे.
पुणे शहरात चोरट्यांचा धुमाकूळ:कोथरूड, भवानी पेठ, शिवणे, हडपसरमध्ये घरफोडी; 11 लाखांचा ऐवज चोरी
पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. कोथरूड, भवानी पेठ, शिवणे आणि हडपसरमधील महंमदवाडी या चार भागांत चोरट्यांनी सदनिकांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ११ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. भवानी पेठेतील गुरुनानकनगर भागात भरदिवसा घरफोडी झाली. एका व्यावसायिकाच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चार लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरली. तक्रारदार व्यावसायिक २ फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या सुमारास कुटुंबीयांसह सदनिका बंद करून बाहेर गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास ते परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक कुदळे तपास करत आहेत. कोथरूड गावठाणातील तेजसगनगर परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाच्या सदनिकेतून चोरट्यांनी कपाटातील एक लाख ६७ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेची फिर्याद कोथरूड पोलिस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत. तसेच, वारजे-एनडीए रस्त्यावरील शिवणे भागातही एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४८ हजार ८०८ रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस उपनिरीक्षक चेतन धनवडे पुढील तपास करत आहेत. हडपसरमधील महंमदवाडी भागात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख ८३ हजार रुपयांचे दागिने चोरले. या घटनेबाबत एका तरुणाने काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक विनायक गुरव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसचा अंतर्गत वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. अशा पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज व्हॉट्सॲपवर टाकलेले सूचक स्टेटस राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. जंग मे जाने वाले घोडे, बारातो मे नही नाचा करते… असा आशय असलेल्या या स्टेटसमुळे अनेक राजकीय अर्थ काढले जात असून, काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिक उघड झाला आहे. दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पेचावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 नंतर ही बैठक पार पडणार असून, यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री सुनील केदार तसेच राज्याचे सहप्रभारी कुणाल चौधरी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. पक्षातील गटबाजी, त्याचा सत्तास्थापनेवर होणारा परिणाम तसेच शिवसेना (उबाठा) कडून महापौर पदाबाबत घालण्यात आलेली अट या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. वडेट्टीवार-धानोरकरात उफाळला वाद चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आल्यानंतर काँग्रेसची सत्ता निश्चित मानली जात होती. मात्र निकालानंतरपासूनच आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद उफाळून आला. धानोरकर गटातील 13 नगरसेवकांनी 23 जानेवारी रोजी नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात स्वतंत्र गट नोंदवला. त्याच दिवशी वडेट्टीवार गटाने याला आक्षेप घेत काँग्रेसची एकत्रित गटनोंदणी करावी, अशी मागणी केली होती. नगरसेवकांना मतदान करता येणार का? या प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रस्ताव शासनाकडे पाठवून नियमानुसार निर्णय घेण्याची शिफारस केल्याचे समजते. दरम्यान, 10 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक होणार आहे. तोपर्यंत काँग्रेसच्या गटनोंदणीचा वाद सुटला नाही, तर नोंदणी न झालेल्या नगरसेवकांना मतदानाचा अधिकार मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काँग्रेस नगरसेवक दोन गटात विभागले सध्या काँग्रेसचे नगरसेवक दोन गटांत विभागले गेले असून, आमदार वडेट्टीवार गटाकडे 20 तर खासदार धानोरकर गटाकडे 7 नगरसेवक असल्याची माहिती आहे. अशातच वडेट्टीवार गटाचे नगरसेवक राजेश अडूर यांनी काँग्रेसच्या सर्व 27 नगरसेवकांची बैठक बोलावली. मात्र या बैठकीची नोटीस धानोरकर गटातील नगरसेवकांच्या प्रत्यक्ष हाती न देता त्यांच्या निवासस्थानी लावण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

28 C