SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

36    C
...

साताऱ्यात लोकशाहीचा दिवसाढवळ्या खून:भाजप सत्तेसाठी सख्या मित्रालाही गिळायला मागेपुढे बघत नाही, रोहित पवारांचा घणाघात

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. साताऱ्यात लोकशाहीचा दिवसाढवळ्या खून झाला. भाजप सत्तेसाठी सख्ख्या मित्रालाही गिळायला मागेपुढे पाहात नाही हे यावरून स्पष्ट होते, असे ते म्हणालेत. राज्याच्या राजकारणात सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची गरमागरम चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचे आज विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी भाजप सत्तेसाठी सख्या मित्रालाही गिळायला मागे पुढे पाहत नाही हे आता शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला कळलेच असेल, असा चिमटा काढला आहे. नेमके काय म्हणाले रोहित पवार? रोहित पवार आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, एका जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी गृहखात्याची अफाट ताकद वापरण्यापेक्षा ती अजितदादांच्या अनैसर्गिक पद्धतीने झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी वापरली तर विरोधक असूनही आम्हीही या निर्णयाचं मनापासून स्वागतच केलं असतं, पण त्याऐवजी साताऱ्यात गृहखात्याच्या आशीर्वादाने लोकशाहीचा ढवळ्यादिवसा खून पडतोय, मंत्र्याशीही झटापट करुन त्यांना दुखापत केली जाते आणि याविरोधात खुद्द मंत्र्यांनाच विधीमंडळापुढं आंदोलनही करावं लागतंय. यावरुन भाजपाने कधीकाळी विचारलेला प्रश्न आज नव्याने त्यांनाच विचारण्याची गरज आहे. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? पण काहीही असो, सत्तेसाठी सख्या मित्रालाही गिळायला भाजपा मागंपुढं बघत नाही, हे यानिमित्ताने शिवसेना शिंदे गटाला आणि अजितदादा गटाला कळलंच असेल, असे ते म्हणालेत. सातारा ZP निवडणुकीत काय घडले? मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानपरिषदेत सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नेमका काय घटनाक्रम घडला याची सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, आम्ही 33 सदस्य मतदानासाठी जात होतो. आमची बैठक झाली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हे ठरले. संदीप मांडवे व अनिल देसाई या 2 सदस्यांवर गुन्हा दाखल झाला ते आमच्याबरोबर बैठकीला हजर होते. ज्यांचे अपहरण झाले म्हणून सांगण्यात आले, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य बापूसाहेब शिंदेही आमच्यासोबत होते. बैठकीच्या ठिकाणी साध्या वेशातील पोलिस होते. त्यांनी आम्हाला मारहाण केली. पोलिसांची कृती पाहून या सभागृहातही आम्ही सुरक्षित आहेत की नाही? असे म्हणण्याची वेळ आली आहे. आम्ही चौथ्या मजल्यावर चाललो होतो. मांडवे म्हणत होते की पालकमंत्री आहेत, मला मतदानासाठी जाऊ द्या. त्यावेळी चार-चार पोलिसांनी आमच्या दोन्ही दंडांना, दोघांनी कंबरेला धरून सदस्यांसकट फरपटत घेऊन गेले. खासदार नितीनकाका यांना पायऱ्यांवरून खाली पाडले. साध्या वेशातील शंभर पोलिस होते. ही काय मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, चार लाख लोकांतून निवडून आलो आहोत. पण आमच्यासोबत एवढा मुजोरपणा केला. त्या गोंधळात मला काय लागले माहिती नाही. माझ्या शर्टवर रक्त, संदीप मांडवे यांच्या शर्टवर रक्त होते. ही गोष्ट माझ्या अंगरक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने रुमाल काढून दिला. तोपर्यंत आमच्या दोन्ही सदस्यांना पोलिस पळवत घेऊन गेले. या प्रकरणात पोलिस अधीक्षक एखाद्या घरगड्यासारखे वागले. माझी विनंती आहे की, त्यांना तात्काळ निलंबित करा, सेवेतून बडतर्फ करा. त्यांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत त्यांची चौकशी करा, अशी मागणी शंभूराज देसाई यांनी सभागृहात केली.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 3:05 pm

कोल्हापूरच्या जोतिबा मंदिरात गोंधळ:पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, नारळफेक आणि हुल्लडबाजीमुळे वाद

कोल्हापूरमधील जोतिबा मंदिर येथे भाविकांवर पुजाऱ्यांकडून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जोतिबा मंदिर येथे भाविक आणि पुजाऱ्यांमध्ये झालेल्या या वादामागे दोन वेगवेगळी कारणे समोर आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिर परिसरात गुलाल उधळताना काहींनी नारळ फेकून मारल्याचा प्रकार घडला. या कृत्यामुळे काही भाविकांना त्रास झाला आणि वातावरण तणावपूर्ण बनले. काहींच्या डोक्यालाही नारळ लागल्याची माहिती समोर आली. दरम्यान, दुसऱ्या बाजूने काही हुल्लडबाज तरुणांनी यात्रेदरम्यान गोंधळ घातल्याचेही समोर आले. आरतीच्या वेळी गोंधळ घालणे, पुजाऱ्यांवर गुलाल फेकणे आणि त्यांच्या पारंपरिक टोप्या उडवण्याचे प्रकार करण्यात आले. यामुळे पुजारी आणि उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. मात्र, भाविकांना नेमकी मारहाण कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेली नाही. सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रियाया प्रकारामुळे मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, एक एप्रिलला होणाऱ्या मुख्य यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने भाविकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी पुजाऱ्यांच्या वर्तनाचा निषेध केला आहे, तर काहींनी धार्मिक स्थळी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 3:04 pm

सातारामध्ये दोन राजांना मारले:तुमचे मंत्री मार खात असूनही भाजपचे नाव घ्यायला घाबरता, अनिल परबांनी शिंदे गटाला डिवचले

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून आज विधानसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला, जिथे भाजपने संख्याबळ नसतानाही प्रशासकीय बळाचा वापर करून आपला अध्यक्ष निवडून आणल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी केला. या निवडीसाठी पोलिस अधीक्षकांनी मदत केल्याचा ठपका ठेवत शिवसेना मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आक्रमक पवित्रा घेतला. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सत्ताधारी मंत्र्यांना चांगलेच डिवचले. भाजप तुम्हाला चिरडत आहे आणि तुमचे मंत्री मार खात असूनही साधे भाजपचे नाव घ्यायलाही घाबरत आहेत, अशा शब्दांत टोलेबाजी करत परब यांनी साताऱ्यातील वादावरून सभागृहात सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. अनिल परब म्हणाले, उपसभापती यांनी सकाळी एसपीला निलंबित केले. काही दिवसांपूर्वी खालच्या सभागृहात तालिका अध्यक्ष यांनी एका अधिकाऱ्याला निलंबित केले. पुन्हा त्याला पदावर घेण्यात आले आहे. आता, उपसभापती यांनी निलंबन केले. आता, त्यांच्यावर अविश्वास ठराव आणणार आहात का? कल्याणमध्ये तत्कालीन एसपी परमबीरसिंहने त्रास दिला म्हणून यांच्या मंत्र्याने व्यासपीठावर राजीनामा दिला होता. आता कुठे गेले ते वाघ? असा सवाल परब यांनी उपस्थित केला. मार खाण्यापेक्षा मारा सत्तेला लाथ पुढे बोलताना अनिल परब म्हणाले, मार खाण्यापेक्षा मारा सत्तेला लाथ आणि पडा ना बाहेर. पण, तुम्हाला भाजपचे नाव सुद्धा घ्यायला घाबरायला होत आहे. सातारामध्ये दोन राजांना मारले, दोन राजे मार खातात, साक्षात शंभुराजे देसाई यांना मारले आहे, असे म्हणत परब यांनी भाजप विरुद्ध शिवसेना या वादात ठिणगी पेटवण्याचे काम केले आहे. तसेच महाराष्ट्रात सगळे प्रश्न संपले आहेत आणि समोर काय येत आहे. मंत्री मार खातोय, भोंदू बाबा मोठ्या लोकांना फसवतोय, लैंगिक अत्याचार करतो आणि तुम्ही काहीच करत नाही. महाराष्ट्राच्या या एपस्टिन फाइलबाबत सरकारचे काय धोरण आहे हे स्पष्ट व्हायला पाहिजे, अशी मागणी अनिल परब यांनी केली. आम्ही हतबल नाही- शंभूराज देसाई दरम्यान, अनिल परब यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सातारामध्ये जो प्रकार घडला तो आपल्याला निदर्शनास आणून द्यायचा होता. परब म्हणाले की, आम्ही उठाव केला. पण, त्यावेळी त्यांचे प्रेते येतील, कोथळा बाहेर काढू असे म्हटले जात होते. परंतु काय झाले, आम्ही पुन्हा आलो, सन्मानाने आलो. काय केले यांनी? आम्हाला आता डिवचू नका. आता आम्ही सत्तेत आलो आणि कालसारखे काही कटू अनुभव देखील आले आहेत. याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असा अर्थ काढू नये, असे देसाई म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 2:58 pm

शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने ६५ लाखांची फसवणूक:पुण्यात दोन व्यक्तींची सायबर चोरट्यांकडून आर्थिक फसवणूक

सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ६५ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. याशिवाय, एपीके फाइल पाठवून एका ज्येष्ठ नागरिकाची ३ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. पहिल्या घटनेत, एका ज्येष्ठ नागरिकाला जानेवारी महिन्यात त्यांच्या मोबाईल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संदेश पाठवला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. यानंतर, त्यांनी चोरट्यांच्या खात्यात २० लाख ६० हजार रुपये जमा केले. मात्र, पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना कोणताही परतावा दिला नाही, तसेच मूळ रक्कमही परत केली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या ज्येष्ठ नागरिकाने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. धायरी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी त्यांनाही शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते. या व्यक्तीने चोरट्यांच्या खात्यात ४५ लाख २५ हजार रुपये जमा केले. पोलीस उपनिरीक्षक प्रसाद राऊत या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, एपीके फाइल पाठवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. कोथरूड भागातील एका ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची एपीके फाइल पाठवून ३ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाईलवर एपीके फाइल पाठवून देयक थकीत असल्याची बतावणी केली. ही फाइल उघडताच चोरट्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक ‘हॅक’ केला. मोबाईल क्रमांक बँक खात्याला जोडलेला असल्याने, चोरट्यांनी तांत्रिक फेरफार करून खात्यातून ऑनलाईन पद्धतीने पैसे काढून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 2:25 pm

पुण्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू:ज्येष्ठ नागरिकासह एका पादचारी तरुणाचा समावेश

पुणे शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका ज्येष्ठ नागरिकासह एका पादचारी तरुणाचा मृत्यू झाला आहे. मंगळवार पेठेतील मालधक्का चौक आणि पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर हे अपघात घडले. वाघोली परिसरात नगर रस्त्यावर रस्ता ओलांडताना एका भरधाव वाहनाने धडक दिल्याने ७३ वर्षीय वसंतराव मारोतराव मगरे यांचा मृत्यू झाला. ते यवतमाळचे मूळ रहिवासी असून, मुलाकडे राहण्यासाठी आले होते. २१ मार्च रोजी सकाळी नऊच्या सुमारास गिरीराज ज्वेलर्ससमोर हा अपघात झाला. गंभीर जखमी झालेल्या मगरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक हवाले तपास करत आहेत. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध सुरू आहे. दुसरी घटना मंगळवार पेठेतील मालधक्का चौकात रविवारी मध्यरात्री घडली. एका पादचारी तरुणाला भरधाव वाहनाने धडक दिली, यात त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. अंदाजे २५ वर्षीय हा तरुण फिरस्ता असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक मोहिते पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 2:24 pm

भाजप शिवसेनेवर कुरघोडी करणार?:पोलिस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनावरून रंगले राजकारण; राम शिंदे उपसभातींचा निर्णय फिरवणार

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा वाद आता राज्याच्या विधिमंडळात पोहोचला आहे. सत्ताधारी शिवसेनेने या निवडणुकीवेळी मंत्री व कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप केल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले. पण भाजपने या निर्देशांवर जोरदार आक्षेप घेतला. त्यांनी सभापती राम शिंदे यांच्याकडे दोशींचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. या परस्पर भूमिकांमुळे सत्ताधारी भाजप व शिवसेनेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. त्यातच राम शिंदे यांनी नीलम गोऱ्हेंच्या आदेशांना स्थगिती दिली, तर ती भाजपकडून शिवसेनेवर केलेली राजकीय कुरघोडी ठरेल. त्यामुळे राज्याचे राजकारण पुढील काही दिवसांत चांगलेच तापण्याची शक्यता आहे. या संपूर्ण वादाची सुरुवात सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून झाली. या निवडणुकीत प्रारंभी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवल्याचे चित्र होते. त्यांनी तसा दावाही केला होता. पण निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी संपूर्ण चित्र बदलले. भाजपने विरोधी पक्षांच्या काही सदस्यांना आपल्या गोटात ओढण्यात यश मिळवले. या सदस्यांच्या बळावर भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. यावरून मोठा वाद झाला. सत्ताधारी शिवसेनेने या प्रकरणी आपला मित्र पक्ष असणाऱ्या भाजपवर जोरदार हल्ला चढवला. नीलम गोऱ्हेंचे निर्देश सरकारसाठी ठरणार डोकेदुखी मंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिस अधीक्षक तुषार दोशी हे सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांशी अक्षरशः सरकारच्या घरगड्यासारखे वागल्याचा आरोप केला. त्यांनी हा मुद्दा आज विधान परिषदेत मांडल्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. तसेच जिल्हा परिषद आवारातील सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आणि विभागीय आयुक्तांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालण्याचे निर्देशही त्यांनी दिले. पण आता नीलम गोऱ्हे यांचे हे निर्देश सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे. नीलम गोऱ्हे यांच्या आदेशावर भाजपकडून मंत्री जयकुमार गोरे यांनी तत्काळ आक्षेप नोंदवले. वस्तुस्थिती लक्षात न घेता अशा प्रकारे निलंबनाचे आदेश देणे योग्य आहे का? असे नमूद करत त्यांनी साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली. जिल्हा परिषद निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था का बिघडली? मंत्री जिल्हा परिषद आवारात कसे पोहोचले? हजारो कार्यकर्ते कुणाच्या आदेशाने तिथे जमले? असे विविध प्रश्न मंत्री गोरे यांनी या प्रकरणी उपस्थित केले. याच टप्प्यावर या प्रकरणाला नवे वळण मिळाले. सभापती राम शिंदे हे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देऊ शकतात, या चर्चेने जोर धरला आहे. राम शिंदे यांनी खरेच उपसभापतींच्या आदेशांना स्थगिती दिली, तर त्यांच्या आदेशांचा एक वेगळाच राजकीय अर्थ निघेल. कारण नीलम गोऱ्हे या शिवसेना नेत्या असून स्वतः शिंदे हे भाजपचे पुढारी आहेत. त्यामुळे हा निर्णय महायुतीतील अंतर्गत संघर्षाचे प्रतीक ठरू शकतो. राम शिंदेंनी निलंबन रद्द केले तर काय? विश्लेषकांच्या मते, राम शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या आदेशाला स्थगिती दिली, तर त्याकडे भाजपकडून शिवसेनेवर करण्यात आलेली राजकीय कुरघोडी म्हणून पाहिले जाईल. आधीच सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने विरोधी गटातील सदस्यांना फोडून सत्ता मिळवली असल्याचा आरोप होत आहे. त्यात आता पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाच्या निर्णयावर हस्तक्षेप केल्यास, भाजप आपली राजकीय ताकद दाखवत असल्याचे चित्र निर्माण होऊ शकते. सभापती राम शिंदेंच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष दुसरीकडे, शिवसेनेसाठीही हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यांच्या पक्षाच्या उपसभापतीने दिलेला आदेश जर रद्द किंवा स्थगित झाला, तर तो त्यांच्या अधिकाराला आणि प्रतिमेला धक्का मानला जाऊ शकतो. त्यामुळे शिवसेना या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. परिणामी, आता सर्वांचे लक्ष सभापती राम शिंदे यांच्या निर्णयाकडे लागले आहे. ते उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या आदेशाला स्थगिती देतात की तो कायम ठेवतात, त्यावर पुढील राजकीय घडामोडी ठरणार आहेत.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 2:18 pm

एलपीजी तुटवडा; ऑटोचालकांवर उपासमारीची वेळ

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी युद्धाच्या झळांमुळे राज्यात ऑटो एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा जाणवत आहे. सोलापूर, छ. संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये एलपीजी पंपांवर गॅस उपलब्ध नसल्याने रिक्षाचालकांना लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत किंवा रिक्षा बंद ठेवाव्या लागत आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन कमाईवर होत असून, आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी गॅस पंपांना […] The post एलपीजी तुटवडा; ऑटोचालकांवर उपासमारीची वेळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Mar 2026 1:37 pm

नांदेडची अभिमानास्पद बातमी:भावाच्या अकाली निधनानंतर 2 मुले उघड्यावर; छोट्या भावाने भावजयीशी विवाह करून दिला आधार

मोठ्या भावाच्या अकाली निधनानंतर छोट्या भावाने आपल्या भावजयीशी लग्न करून उघड्यावर पडलेल्या आपल्या पुतण्यांना वडिलांची माया दिल्याची अभिमानास्पद घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. पतीच्या निधनानंतर पत्नीचा आधार हिरावला जातो. मुलांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्रही हरवले जाते. एवढेच नाही तर नातेसंबंधातंही दुरावा निर्माण होतो. मात्र, नांदेड जिल्ह्यातील दुर्गम किनवट तालुक्यात या सर्वांना छेद देणारी एक घटना घडली आहे. प्रस्तुत घटनेत मोठ्या भावाच्या अकाली निधनानंतर छोट्या भावाने भावजयीशी विवाह करून भावाच्या मुलांच्या डोक्यावर पुन्हा पितृछत्र धरल्याची घटना घडली आहे. प्रफुल्ल पाटील असे या धाडसी निर्णय घेणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मार्च महिन्यात झाले होते मोठ्या भावाचे निधन यासंबंधीच्या माहितीनुसार, किनवट तालुक्यातील वझरा (बु.) येथील अष्टपाल पाटील यांचे गत महिन्यात प्रदिर्घ आजाराने निधन झाले होते. अष्टपाल यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांची पत्नी विजयालक्ष्मी यांच्यासह 8 वर्षीय मुलगी व 6 वर्षीय अंध मुलगा उघड्यावर पडला. मुलांच्या डोक्यावरील पितृछत्र हरवल्यामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले. हे पाहून धाकटा भाऊ प्रफुल्ल पाटील यांनी या प्रकरणी एक धाडसी निर्णय घेत आपल्या भावजयीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा प्रस्ताव आपल्या कुटुंबीयांपुढे ठेवला. प्रफुल्ल पाटील यांच्या या निर्णयाला कुटुंबीयांनी साथ दिली. त्यांनी विजयालक्ष्मी यांची समजूत काढली. त्यांच्या आई-वडिलांनाही विश्वासात घेतले. त्यानंतर प्रफुल्ल व विजयालक्ष्मी यांचे एका छोटेखानी कार्यक्रमात लग्न लावून देण्यात आले. वैयक्तिक सुखाचा त्याग करून रक्ताच्या नात्याला व माणुसकीला महत्त्व देणाऱ्या प्रफुल्लच्या या निर्णयाचे ग्रामस्थ तोंडभरून कौतुक करत आहेत. वहिनीला सन्मानाने जगता यावे म्हणून घेतला निर्णय प्रफुल्ल पाटील हे व्यवसायाने ऑटोचालक आहेत. ते ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असतानाही त्यांनी स्वतःच्या संसाराचा विचार करण्यापेक्षा आपल्या भावाच्या मुलांच्या भविष्याला प्राधान्य दिले. माझ्या भावाच्या पश्चात ही मुले अनाथ होऊ नयेत, तसेच वहिनीला समाजात सन्मानाने जगता यावे, हा या विवाहामागील माझा मुख्य उद्देश होता. ही केवळ माझी जबाबदारी नसून, भावाप्रती असलेले माझे कर्तव्यही आहे, अशी भावना प्रफुल्ल यांनी या प्रकरणी व्यक्त केली. विखुरलेलं कुटुंब पुन्हा एकत्र किनवट तालुक्यात घडलेली ही घटना समाजात माणुसकी आणि कुटुंबाच्या नात्यांची जपणूक किती महत्त्वाची आहे, याचा प्रत्यय देणारी ठरली आहे. मोठ्या भावाच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत छोट्या भावाने केवळ कर्तव्य पार पाडले नाही, तर आपल्या पुतण्यांना वडिलांची माया देत त्यांच्या भवितव्यासाठी आधारही निर्माण केला. या निर्णयामुळे एक विखुरलेले कुटुंब पुन्हा एकत्र आले. समाजात या कृतीचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 1:34 pm

अशोक खरात प्रकरणावरून सभागृहात विरोधक आक्रमक:पोलिसांकडून कारवाई सुरू, या प्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही- CM देवेंद्र फडणवीस

विधानसभेत विरोधकांनी अशोक खरात प्रकरणावरून चांगलाच हल्लाबोल केला. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या आक्रमक शैलीत या संदर्भातील घटनेवर गांभीर्याने कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली. तर दुसरीकडे नाना पटोले यांनी अशोक खरातसोबत ज्यांचे फोटो आहेत, त्या सर्वांचेच राजीनामे घेतले जावे, अशी मागणी केली. विरोक्षकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सविस्तर भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, तथाकथित काय तांत्रिक, मांत्रिक, बाबा जे काय असतील, भोंदू बाबा अशोक खरात या व्यक्तीच्या संदर्भात टेक काढणं चाललंय आता... जो विषय घडलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे. या व्यक्तीने आपल्या तथाकथित शक्तींचा दुरुपयोग करून आणि दिशाभूल करून अनेक महिला ज्या आहेत यांच्यासोबत गैरव्यवहार, दुष्कृत्य केल्याचं समोर येतंय. पोलिसांनी प्रो-ॲक्टिव्हली कारवाई केली पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, या संदर्भात मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की, या संदर्भातली कारवाई ही आपल्या पोलिसांनी प्रो-ॲक्टिव्हली केलेली आहे. याचा ट्रॅप तयार करून ती केलेली आहे. यामध्ये महिला इन्व्हॉल्व्हड असल्यामुळे त्या... त्यांची फसवणूकच झाली होती पण त्या समोर यायला तयार नव्हत्या. त्यावेळेस त्यांचं योग्य पद्धतीनं त्यांना धीर देऊन आणि अशा पद्धतीनं आता काही महिलांनी तक्रार केलेली आहे. उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील. मी केवळ आपल्याला एवढंच सांगतो की, या संदर्भात कारवाई जरी आता झाली, तरी देखील याची तयारी आधीपासून सुरू होती. त्यांच्या अटकेच्या अगोदरच म्हणजे साधारणपणे 10 तारखेला, 10/3 ला दुसऱ्या जिल्ह्यातून आपण एका कंप्लेंटचा उपयोग करून त्यांचा एलओसी देखील काढून ठेवला होता की त्यांना बाहेर पळता येऊ नये, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उद्या याचं सविस्तर निवेदन करीन देवेंद्र फडणवीस म्हणाले, या संदर्भात पूर्णपणे कारवाई आपण करतो आहोत. मी या सभागृहामध्ये उद्या याचं सविस्तर निवेदन करीन कारण आजही चौकशी चाललेली आहे संपूर्ण प्रकरणाची. आणि दोन्ही बाजूला माझी विनंती आहे की, हा आपल्या कोणाकरता राजकारणाचा प्रश्न नाहीये, हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे. अशा प्रकारे महिलांचा दुरुपयोग करणं आणि त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीचं भासवून, वेगळ्या शक्ती आहेत असं सांगून आणि जणू काही त्या जे काही समर्पण करतायत, ते करणं हेच त्यांचं इतिकर्तव्य आहे अशा पद्धतीचा त्यांचा ब्रेन वॉशिंग करणं, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. अशोक खरात प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही त्यामुळे निश्चितपणे याचं गांभीर्य लक्षात घेऊन उद्या या संदर्भात मी जे काही तुम्ही ठरवाल पण याचं सविस्तर, अगदी सखोल निवेदन मी करेन. मी नेहमी क्लीन चिट देत नाही, जो क्लीन असतो त्यालाच क्लीन चिट मिळते. अशी कुठलीच चिट माझ्याकडे नाहीये आणि याच्यात तर ज्याचा दुरान्वयानेही संबंध असेल, त्यालाही सोडलं जाणार नाही, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 1:17 pm

सातारा जिल्हा परिषद राड्याला नवे वळण:'माझे अपहरण झालेच नाही', दिनकर शिंदेंचा पोलिसांत खुलासा; शंभूराज देसाई धक्काबुक्की प्रकरण

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात पडसाद उमटले असतानाच, या प्रकरणातील केंद्रस्थानी असलेले सदस्य दिनकर शिंदे सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले आहेत. त्यांच्या अपहरणाचा दावा करत शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या समर्थकांची पोलिसांशी मोठी बाचाबाची झाली होती. मात्र, आता दिनकर शिंदे यांनी 'माझे अपहरण झालेच नव्हते' असा धक्कादायक खुलासा केल्याने सातारा पोलिसांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या निवेदनानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. निवडणुकीदरम्यान पोलिसांकडून झालेली धक्काबुक्की आणि मारहाण या मुद्द्यावरून सभागृहात सत्ताधारी आक्रमक झाले असतानाच, राष्ट्रवादीचे सदस्य दिनकर शिंदे यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. या जबाबानंतर संपूर्ण प्रकरणाला एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार नितीन पाटील जबाब नोंदवताना उपस्थित सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी ज्यांच्या कथित अपहरणावरून मोठा राडा झाला, ते राष्ट्रवादीचे सदस्य बापू उर्फ दिनकर शिंदे आज सातारा स्थानिक गुन्हे शाखेमध्ये आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर झाले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार नितीन पाटील हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे, दिनकर शिंदे यांनी माझे अपहरण झालेच नव्हते, असा पुनरुच्चार करत यापूर्वीच वाई पोलिस ठाण्यात आपली भूमिका स्पष्ट केली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या उपस्थितीत आता त्यांचा अधिकृत जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. शंभूराज देसाईंना धक्काबुक्की झाली होती याच कथित अपहरण प्रकरणावरून पोलिसांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचे सदस्य अनिल देसाई आणि संदीप मांडवे यांना ताब्यात घेतले होते. याच गोंधळात पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की व मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दोन दिवसांनंतर आता खुद्द शिंदे यांनीच अपहरणाचे वृत्त फेटाळल्याने, त्या दिवशी झालेली पोलिस कारवाई आणि मंत्र्यांशी झालेली झटापट यावरून सातारा प्रशासमोरील अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 1:00 pm

भोंदू बाबांमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा:भोंदूगिरीच्या बाजाराला मिळणारा राजाश्रय ही लज्जास्पद बाब, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत भोंदू अशोक खरात प्रकरणात हात असणाऱ्या सर्वच मंत्री व अधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. महाराष्ट्रातील भोंदूबाबा अशोक खरातमुळे महिलांचे शोषण झाले. त्यामुळे या प्रकरणातील मंत्री व अधिकाऱ्यांना सहआरोपी करा. त्यांचे राजीनामे घेऊन त्यांच्यावर कारवाई करा, असे ते म्हणालेत. नाशिकच्या भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिसांनी खरातला अटक केली आहे. तसेच त्याच्या ट्रस्टवरील सदस्या रुपाली चाकणकर यांनाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. पण या प्रकरणात अनेक मोठ्या नेत्यांचा हात असल्यामुळे राजकारण तापले आहे. विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडून या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला भोंदूगिरीचा बाजार आणि त्याला मिळणारे राजकीय व प्रशासकीय संरक्षण ही राज्यासाठी अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याने धर्माच्या नावाखाली मांडलेला हैदोस आणि त्याला साथ देणारे उच्चपदस्थ अधिकारी व मंत्री यांना या प्रकरणात सह आरोपी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे ते म्हणाले. खरातचे 100 हून अधिक व्हिडिओ समोर ते पुढे म्हणाले, स्वतःला देवाचा अवतार सांगून आणि ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणाऱ्या अशोक खरातचे 100 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत. अशा भोंदू बाबांमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा जात आहे. या बाबाने महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. या खरात वर कारवाई होऊ नये म्हणून एका हॉटेलमध्ये तीन उच्चपदस्थ अधिकारी बैठक घेत होते, ही माहिती अत्यंत धक्कादायक आहे. महसूल आणि पोलिस अधिकारी देखील खरातची अटक होऊ नये प्रयत्न करत होते. त्यामुळे या प्रकरणात केवळ भोंदू बाबाच नाही, तर त्याला आश्रय देणारे IAS, IPS आणि महसूल विभागाचे अधिकारी सामील आहेत. हे अधिकारी आणि मंत्री संविधानाची शपथ घेतात, मात्र प्रत्यक्षात भोंदू बाबांच्या पाया पडताना दिसतात. हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून यात अनेक महिलांची फसवणूक झाली आहे, असे वडेट्टीवर विधानसभेत म्हणाले.केवळ SIT नेमून हे प्रकरण शांत होणार नाही, तर संबंधित मंत्र्यांचा राजीनामा आणि अधिकाऱ्यांचे निलंबन होणे आवश्यक आहे. संबंधित सर्व आरोपींचे आणि संशयित अधिकाऱ्यांचे CDR तपासावे.ज्या मंत्र्यांनी आणि संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी या भोंदू बाबाला प्रतिष्ठा मिळवून दिली, त्यांना सहआरोपी करावे,अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगनच्या माध्यमातून विधानसभेत केली.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 12:55 pm

आता सिलिंडरमध्ये गॅस १४.२ ऐवजी मिळणार १० किलो

मुंबई : प्रतिनिधी अमेरिका-इराण-इस्राइलमध्ये युद्धामुळे भारतामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिक चिंतेत आहेत. गॅस एजन्सीबाहेर गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. अशातच आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणात मोठा महत्वाचा बदल केला आहे. युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. […] The post आता सिलिंडरमध्ये गॅस १४.२ ऐवजी मिळणार १० किलो appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Mar 2026 12:53 pm

राज ठाकरेंचा भोंदू खरात प्रकरणावर संताप:तर्काला तिलांजली देऊन अजब 'तीर्थ' पिण्यासाठी अशोक खरातच्या भजनी लागणे हे भीषण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंदू अशोक खरात व त्याच्या नादी लागलेल्या राजकारण्यांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा,. पण आज त्याच महाराष्ट्रातील नेते तर्काला तिलांजली देऊन कुठले तरी अजब तीर्थ प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे, असे ते म्हणालेत. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्याची मागणीही राज यांनी केली आहे. खाली वाचा राज ठाकरेंची पोस्ट जशास तशी राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो. ते पुढे म्हणाले, ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे. हा कोडगेपणा राज्यात कुठून आला? राज ठाकरे म्हणाले, हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही. आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे. आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे. आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं. गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही. तर आत्ताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच. पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की, असे राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांवरही साधला निशाणा राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं ? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल. माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका. ..तर महाराष्ट्राचे वाटोळ झाले म्हणून समजा मुळात आज महाराष्ट्रात अनेक मुलींचं अपहरण होत आहे. ज्याची आकडेवारी सरकार विधिमंडळात देत आहे. ड्रग्स राजरोस विकली जात आहेत. स्त्रियांच्या शोषणाच्या घटना सर्रास घडत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदय धोबीपछाड राजकारण बाजूला ठेऊन या प्रकरणाचा छडा लावा. दैवी शक्तीच्या नावाखाली, राजसत्तेच्या आशीर्वादाने जर स्त्रियांचं शोषण होत असेल तर याच्या इतकं गंभीर काहीच नाही. आणि याला जर वेळीच आवर नाही घातला तर महाराष्ट्राचं वाटोळं झालं म्हणून समजा. तेंव्हा या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा, त्यांना ठेचून काढा. तसं केलंत तर आणि तरच तुमच्या भाषणांत तुम्हाला संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे. अन्यथा नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 12:45 pm

शिवसेना मंत्र्यांचा राजीनामा देण्याचा इशारा:भाजपकडून गळचेपी सुरू, दुय्यम वागणूक मिळतेय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसमोर मांडली खदखद

सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमधील वाद एकदम टोकाला जाताना दिसतोय. भाजपकडून आमची गळचेपी सुरू आहे. सत्ताधारी शिवसेनेचे आमदार आणि मंत्री यांना दुय्यम वागणूक मिळतेय. ही बाब आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही राजीनामे देऊ, अशी सडेतोड भूमिका सत्ताधारी शिवेसनेचे मंत्री आणि आमदार यांनी शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत मंत्री शंभूराजे देसाई यांना धक्काबुक्की झाली. त्याचे पडसाद आज सकाळपासून उमटत आहेत. राज्याच्या सत्तेत असणारे शिवसेना आणि भाजप हे मित्रपक्ष या निमित्ताने आमने-सामने आलेत. हा संघर्ष काय वळण घेतो, हे पाहावे लागेल. शिंदेंनी घेतली बैठक सातारा जिल्हा परिषद निवडणूक राड्याचे पडसाद आज विधिमंडळात जोरदार उमटले. सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळासमोर निदर्शने केली. त्यानंतर विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झाले. सातारा जिल्हा परिषदेमधील मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार हा लोकशाहीचा खून आहे, असा घणाघात त्यांनी केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी करू. दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दालनात शिवसेनेच्या विधिमंडळ शिवसेना पक्षाची बैठक घेतली. या बैठकीतही मंत्री आणि आमदार आक्रमक झाले. मंत्री, आमदार आक्रमक शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपली कैफियत मांडल्याचे समजते. सत्ताधारी आणि मित्रपक्ष भाजपकडून आपली गळचेपी सुरू असून, शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांना दुय्यम वागणूक मिळते. हे सतत सुरू आहे. यावर आपण उघडपणे बोला. अन्यथा आम्ही राजीनामे देऊ, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. या प्रकरणावरून आज तरी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत विधिमंडळात भाजपला खिंडीत गाठले. येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यांमधील हा राजकीय संघर्ष कसा वळण घेतो, हे पाहणे रंजक ठरेल. इथेच ठिणगी पडली सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रियेत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच आपली सत्ता प्रस्थापित केली. मात्र, या प्रक्रियेदरम्यान झालेल्या प्रचंड गोंधळात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या डाव्या हाताला जखम झाली. भाजप कार्यकर्त्यांकडूनच धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. गर्दीत सुरुवातीला नेमका धक्का कसा लागला हे समजले नाही. मात्र, जेव्हा रक्त येऊ लागले तेव्हा दुखापतीची जाणीव झाली, अशी पहिली प्रतिक्रिया देसाई यांनी दिली होती. या घटनेनंतर त्यांचे समर्थक कमालीचे आक्रमक झाले. या घटनेचे पडसाद आज विधिमंडळातही उमटले. सकाळी शंभूराज म्हणाले… शंभूराज देसाई म्हणाले, 'मी गेल्या 40 वर्ष राजकारणात आहे. कधीच पोलिसांकडून लोकप्रतिनिधींना हातापायी झाली नाही. अशा पद्धतीने दोन कॅबिनेट मंत्री, पोलिसांचा वापर, म्हणजे साताऱ्याचे एसपी घरगड्यासारखे वागले. आमचे बहुमत असताना देखील भाजपने आमच्या अनेक सदस्यांना नेले. तरीही मतदानाला जाताना एका गाडीतून 33 सदस्य घेऊन तिथे गेलो. मात्र, जे राष्ट्रवादीचे सदस्य आमच्यासोबत आहेत, त्यांचेच अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या मुलावर दबाव टाकून केली. आणि कोणी अपहरण केले, तर आमच्याच सदस्यांनी केले. ते दोन्ही सदस्य आमच्यासोबत होते. बर पोलिसांना अपहरण केलेल्या सदस्यांना खोटा आरोप असलेल्या सदस्यांना ताब्यात घ्यायचे होते, तर आमची पार्टी मीटिंग ज्या हॉटेलमध्ये चालू होती, त्याच्या खाली साध्या वेशात पोलिस होते. पण तिथे ताब्यात नाही घेतले. कारण तिथे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे हजार-2 हजार सैनिक उभे होते. आणि बरोबर मतदानाला जात असताना, मी तिथे होतो, मकरंद पाटील होते, तेव्हा अक्षरशः साध्या वेशातील पोलिसांनी झटापटी केली. मला 100 पोलिसांनी पकडून ठेवले होते. एका बाजूला 302 चा आरोप असलेल्या आरोपींना आपण मतदानाला आणतो आणि इथे मतदानाला आलेले 2 सदस्य आमच्या जवळून नेले. मला त्या दिवशी लागले. धक्काबुक्की झाली.' अवघ्या एका मताने विजय सातारा जिल्हा परिषदेमध्ये संख्याबळाचा विचार करता, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 20, शिवसेनेकडे 15, काँग्रेसकडे 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे 1, भाजपकडे 27 आणि एक अपक्ष सदस्य असे एकूण 65 सदस्य होते. बहुमतासाठी 33 सदस्यांची गरज होती. भाजपच्या बैठकीला 28 सदस्य उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादीचे 2 आणि शिवसेनेचे 2 सदस्य भाजपच्या गळाला लागल्याने भाजपची संख्या 33 वर पोहोचली. या संपूर्ण घडामोडींत अवघ्या एका मताने सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया शिंदे निवडून आल्या, तर उपाध्यक्षपदी राजू भोसले विजयी झाले. निवड प्रक्रियेतील महत्त्वाच्या घडामोडी

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 12:41 pm

भोंदू खरातच्या ट्रस्टसंदर्भात नवा खुलासा:दीड तासांत 24 लाखांच्या जमिनीचे झाले 32 लाख; 8 लाखांचा फरक चाकणकरच सांगतील - कुंभार

एका व्यक्तीने 24 लाखांना विकत घेतलेली जमीन त्याच दिवशी अवघ्या दीड-दोन तासांत तब्बल 32 लाख रुपयांना भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थान ट्रस्टला विकल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हा प्रकार भोंदू खरातच्या अब्जावधी रुपयांच्या काळ्या संपत्तीतला एका थेंबाएवढाही नसल्याचा दावा केला आहे. विशेषतः या व्यवहारात अवघ्या दीड तासांतच 8 लाखांचा फरक कसा पडला? या प्रश्नाचे उत्तर रुपाली चाकणकरच देऊ शकतील, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे चाकणकरांचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिसांनी खरातला अटक केली आहे. तसेच त्याच्या ट्रस्टवरील सदस्या रुपाली चाकणकर यांनाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तेव्हापासून या प्रकरणी दररोज नवनवे खुलासे होत आहेत. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी सोमवारी एका पोस्टद्वारे अशोक खरातच्या शिवनिका संस्थान ट्रस्ट संदर्भात उपरोक्त नवा खुलासा केला आहे. काय म्हणाले विजय कुंभार? विजय कुंभार म्हणाले की, 32 लाख रूपये किमतीची जमिन दान मिळणे हा भोंदू बाबा अशोक खरातच्या अब्जावधी रुपयांच्या काळ्या संपत्तीतला एका थेंबाएवढा सुद्धा भाग नाही. परंतु कागदोपत्री पैशांचा खेळ कसा केला जातो याचे हे उत्तम उदाहरण आहे. नरेंद्र नारायण हेटे नावाच्या एका गृहस्थांनी 2019 साली पाच एकर जागा विकत घेतली. 16 लाख बाजार भाव दाखवलेली ही जमीन त्यांनी 24 लाखाला विकत घेतली. आणि त्याच दिवशी अवघ्या दीड दोन तासात ही जमीन त्यांनी खरातच्या शिवनिका संस्थान ट्रस्टला दान दिली. परंतु दान देताना या जमिनीची किंमत 32 लाख दाखवण्यात आली. अवघ्या दीड दोन तासात 8 लाखाचा फरक कसा पडला? असं का करण्यात आलं ?.कदाचित रूपाली चाकणकर सांगू शकतील. त्या या ट्रस्टचा सदस्य आहेत, असे ते म्हणालेत. कंबरेला पिस्तूल लावून फिरत होता दुसरीकडे, एसआयटीने अशोक खरातची कसून चौकशी सुरू केली आहे. त्याच्या रविवारच्या चौकशीत अनेक नव्या गोष्टींचा खुलासा झाला. एसआयटीसह नाशिकच्या मिरगाव येथील नागरिकांनीही खरातची लाईफस्टाईल एखाद्या सराईत गुंडासारखी असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, अशोक खरात हा दर शनिवारी व रविवारी न चुकता मिरगाव येथील आपल्या आलिशान फार्म हाऊसवर येत होता. त्याची लाईफस्टाईल एखाद्या सराईत गुंडासारखी होती. तो सकाळी 10 ते 12 किलोमटीर सायकलिंग करत. त्यावेळी त्याच्या कंबरेला उघडपणे बंदूक लावलेली असे. बंदुकीचा धाक दाखवत त्याने संपूर्ण मिरगाव परिसरात आपली दहशत पसरवली होती. त्यामुळे कुणीही त्यांच्याविरोधात तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. आपल्या दहशतीचा वापर करून खरातने परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या. ज्या शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला, त्यांना त्याने जाहीरपणे धमकावले. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. एवढेच नाही तर त्यांना न्यायालयीन कचाट्यात अडकवण्याचे कामही त्याने केले, असा आरोप आता हे शेतकरी करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 12:07 pm

FDA ने जप्त केलेला मुद्देमाल सचिवांच्या आदेशाने मोकळा:गुटखा साठवणुकीच्या वैधतेवर कोर्टात संघर्ष; गुटखा निर्मितीला मान्यता द्या, आमदाराची मागणी

राज्यात गुटखा आणि सुगंधित सुपारीवर कडक बंदी असतानाही, जप्त केलेला कोट्यवधींचा माल परराज्यात नेण्यास संमती देण्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांच्या भूमिकेमुळे मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. या वादग्रस्त निर्णयाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, प्रशासकीय वर्तुळात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. १० कोटींचा मुद्देमाल आणि न्यायालयीन संघर्ष हे प्रकरण डिसेंबर २०२५ मधील आहे, जेव्हा भिवंडीतील 'हाय स्ट्रीट इम्पेक्स एलएलपी' आणि पुण्यातील 'सोएक्स इंडिया प्रा. लि.' या कंपन्यांवर धाडी टाकून प्रशासनाने १० कोटी रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त केला होता. प्रयोगशाळेतील तपासणीत या उत्पादनांमध्ये निकोटीन आणि सुकरोस यांसारखे घातक घटक आढळले होते. कनिष्ठ न्यायालयाने आरोपींचा जामीन फेटाळला होता, मात्र उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर अनपेक्षित वळण मिळाले. महाराष्ट्रात आधीच अमली पदार्थांची विक्री वादात असताना आता त्यात शासनमान्य गुटखा आणि हुक्का निर्मितीची भर पडणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी एफ डी ए आयुक्त श्रीधर डुबे-पाटील यांच्या संगनमताने न्यायालयात दाखल शासकीय भूमिकेने हा प्रश्न उपस्थित होत आहे. याच शासकीय भूमिकेचा आधार घेत गुटखा आणि हुक्का व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 'ज्याप्रमाणे केवळ एका हुक्का व्यापाऱ्याला महाराष्ट्र शासनाने सवलत दिली, तशी सवलत सगळ्यांना देऊन शासनमान्य गुटखा आणि हुक्का निर्मिती महाराष्ट्रात करण्यास अनुमती द्यावी', अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली असून त्याची लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. सचिवांच्या पत्राने बदलली तपासाची दिशा नियमानुसार असा प्रतिबंधित माल नष्ट करणे आवश्यक असताना, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी न्यायालयात एक पत्र सादर केले. जप्त केलेला माल पोलीस संरक्षणात परराज्यात नेण्यास हरकत नाही, अशी भूमिका या पत्रात घेण्यात आली. या तांत्रिक पळवाटेमुळे जप्त केलेला साठा सोडण्याचे आदेश देण्यात आले. या निर्णयामुळे राज्यातील इतर गुटखा उत्पादकांनीही आता उत्पादनासाठी परवानगी मागण्यास सुरुवात केली असून, सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे. आमदार हिरामण खोसकर यांचा मुख्यमंत्र्यांना उपरोधिक टोला या प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. खोसकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, जर अधिकारी अशा प्रकारे सोयीची भूमिका घेत असतील, तर राज्याचा महसूल वाढवण्यासाठी महाराष्ट्रात अधिकृतपणे 'शासनमान्य' गुटखा निर्मितीच सुरू करा. खोसकर यांच्या या भूमिकेमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शंभर टक्के निर्यातीसाठी उत्पादनाची मागणी आमदार हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की, जर ५० कोटींचा जप्त साठा मुक्त होऊ शकतो, तर राज्यातील इतर गुटखा कारखान्यांनाही १००% निर्यातीसाठी उत्पादनाची परवानगी देण्यात यावी. यामुळे राज्याच्या महसुली उत्पन्नात मोठी वाढ होईल, असा दावा त्यांनी पत्रात केला आहे. न्यायालयाचे कडक ताशेरे आणि पुढील सुनावणी या प्रकरणी न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, २०१२ आणि जुलै २०२५ च्या अधिसूचनेनुसार राज्यात अशा पदार्थांच्या उत्पादनावर आणि साठवणुकीवर पूर्ण बंदी आहे. तरीही, याचिकाकर्त्या कंपन्यांनी हा माल केवळ निर्यातीसाठी असल्याचा दावा केला आहे. नियम मोडणाऱ्या फॅक्टरी त्वरित बंद कराव्यात, असे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सचिवांचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले की, सदर पत्र हे माननीय महाधिवक्ता यांच्याशी चर्चा करून आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाला अनुसरूनच देण्यात आले आहे. त्यांनी आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ न्यायालयाच्या निर्देशांची प्रतही सादर केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 11:54 am

मतदानापासून वंचित ठेवणे लोकशाहीचा खून:सातारा झेडपीप्रकरणी एकनाथ शिंदे विधानसभेत आक्रमक; CM फडणवीसांकडून कारवाईचे आश्वासन

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्याची विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. आज 23 मार्च रोजी विधान परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी या प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, सभापतींनी सातारा पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाचे तातडीने निर्देश दिले. तसेच विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या घटनेवर आपली भूमिका मांडली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, शंभूराज देसाई यांनी जी काही घटना मांडली आहे, त्याचा मी देखील साक्षीदार आहे. या निवडणुकीची जेव्हा तारीख जाहीर झाली तेव्हा शंभूराज देसाई यांनी मला फोन केला होता. 2 मतदार जे आहेत, त्यांच्यावर काही वर्षांपूर्वीचा गुन्हा मतदानाच्या आदल्या दिवशी दाखल केला गेला. त्यावर मी एसपी तुषार दोषी यांना विचारले आणि त्यांना सांगितले की मतदान आहे तर त्यांना मतदान करू द्या. मतदान करण्यापासून वंचित ठेऊ नका. मतदान झाल्यानंतर शहानिशा करा आणि कारवाई करा. त्यानंतर मी डीजी साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितले की मला जरा शंका आहे. हे मत कमी करण्यासाठी हे सगळे सुरू असल्याचे त्यांना सांगितले. त्यानुसार डीजी साहेबांनी तुषार दोषी यांनी सूचना दिल्या होत्या. मतदानापासून वंचित ठेवणे हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, शंभूराज देसाई, मंत्री असूनही त्यांना तिथे का जावे लागले? कारण त्यांना माहीत होते की असे काही तरी होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या गेटवर त्यांना अडवण्यात आले. तिथे गेल्यावर पोलिसांनी मंत्री बघितले नाही, पदाधिकारी बघितले नाही. आमदार बघितले नाही. आरोपीला जसे पकडतात, तसे पकडून घेऊन गेले आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यावर ते 2 लोकच कसे त्यांनी पकडले? त्यांना निवडणुकीवरून वंचित ठेवले. मी परत डीजींना कॉल केला आणि सांगितले की असे तिथे घडत आहे. निवडणूक पार पडली. या सगळ्यातून जी परिस्थिती निर्माण झाली, अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिली आहे. कुठल्याही परिस्थितीत मतदान करण्यापासून वंचित ठेवणे हे महाराष्ट्रात पहिल्यांदा असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल- देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माननीय एकनाथ शिंदे यांनी जी वस्तुस्थिती मांडली आहे, त्या वस्तुस्थितीच्या आधारावर या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल आणि चौकशीत जे काही निष्पन्न होईल त्यानुसार त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 11:41 am

तारकेश्वर गडाच्या महंतांनी स्वतःचे गुप्तांग कापले:तब्बल 7 दिवसांनंतर सांगितले कारण; स्वतःहूनच जननेंद्रियाचा त्याग केल्याचा केला दावा

अहिल्यानगरच्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांनी स्वतःच याची पुष्टी केली आहे. सध्या माजी प्रकृती स्थिर असून, मी लवकरच गडावर परत येईल, असे ते म्हणालेत. महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना गत रविवारी अचानक तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते रक्तबंबाळ अवस्थेत होते. त्यांची ही स्थिती का झाली? हे कुणाच्याही लक्षात येत नव्हते. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला का? अशी चर्चा जनमाणसांत रंगली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. आता या घटनेला 1 आठवडा लोटल्यानंतर स्वतः महाराजांनी आपण जखमी का झालो? याचे उपरोक्त कारण सांगितले आहे. आदिनाथ महाराजांनी काय सांगितले? महंतांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी स्वतःच स्वतःच्या गुप्तांगावर शस्त्राने वार केले होते. त्यानंतर ते त्यांच्या खोलीत पडून होते. कुणीतरी आत गेल्यानंतर ते त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत दिसले. त्यानंतर त्यांना तत्काल रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडे या घटनेविषयी चौकशी केली असता, त्यांनी आपण स्वतःहूनच स्वतःवर वार केल्याचे स्पष्ट केले. मी स्वतःच माझ्या जननेंद्रियांचा त्याग केला. मला कुणाचाही काहीही त्रास नव्हता. सध्या माझी प्रकृती स्थिर आहे. मी लवकरच गडावर परत येईल, असे ते म्हणाले. महाराजांवर काही दबाव होता का?महाराष्ट्रात संत, महंत आणि धार्मिक गुरूंना अत्यंत मानाचे स्थान आहे. त्यामुळे या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या धार्मिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. महंतांनी या प्रकरणी खुलासा केला असला तरी या प्रकरणी अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे आदिनाथ महाराजांवर काही दबाव होता का? त्यांनी कुणाच्या दबावाला बळी पडून स्वतःचे गुप्तांग कापले का? असे ना-ना प्रश्न या प्रकरणी उपस्थित होत आहेत. तारकेश्वर गडावर नेमकी काय घटना घडली होती? तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री 15 मार्च रोजी सायंकाळी आपल्या भक्तांसोबत गडावर बसले होते. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता भक्तांना सोडून ते आपल्या खोलीत निघून गेले. त्यानंतर तिथे त्यांनी स्वतःच्या अंगावर वार करून घेतले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यासह बीड जिल्ह्यात आदिनाथ महाराजांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे या घटनेमुळे त्यांच्यात एकच खळबळ माजली होती.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 11:40 am

चिमण्या पक्षी नसून, त्या पर्यावरण संतुलनाच्या सूचक:डॉ.एस.एस.धांडेंचे आवाहन, दर्यापूरला जे.डी.सांगळूदकर महाविद्यालयात जागतिक चिमणी दिवस‎

प्रतिनिधी । दर्यापूर शहरातील जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालय, येथे प्राणीशास्त्र विभाग, आयक्युएसी सेल व सायन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ मोठ्या उत्साहात आणि पर्यावरणप्रेमी वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.एस.एस.धांडे यांनी चिमण्यांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, ‘चिमण्या या केवळ पक्षी नसून, त्या आपल्या पर्यावरणाच्या संतुलनाच्या सूचक आहेत.’ त्यांनी विद्यार्थ्यांना घराजवळ पाण्याची भांडी ठेवणे, झाडे लावणे आणि चिमण्यांसाठी घरटी तयार करणे यासारख्या छोट्या उपाययोजना करण्याचे आवाहन जागतिक चिमणी दिवस कार्यक्रमात बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अतुल बोडखे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मूर्तिजापूर येथील आर.जी. राठोड आर्ट्स अँड सायन्स कॉलेजचे प्राध्यापक डॉ.एस.एस.धांडे उपस्थित होते. तसेच आयक्युएसी समन्वयक डॉ.मनीष होले, वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा.डॉ.पंकज कास्टे व प्रा.डॉ नंदकिशोर गोपकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दरम्यान यानंतर प्रमुख पाहुणे डॉ.एस.एस.धांडे यांचा शाल, पुस्तक आणि रोप देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर प्राचार्य डॉ.अतुल बोडखे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “लहान पक्ष्यांचे संरक्षण म्हणजे पर्यावरणाचे रक्षण होय. चिमण्यांचे अस्तित्व टिकवणे ही आजच्या काळाची गरज आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. प्रास्ताविकातून प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.प्रीती दिवाण यांनी वर्ल्ड स्पॅरो डेचे महत्त्व, चिमण्यांची घटती संख्या आणि त्यामागील कारणे यावर प्रकाश टाकत या दिवसाचे औचित्य स्पष्ट केले.संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.प्रीती दिवाण, प्रा. निलेश किसवे ,तेजस्विनी येवले व साक्षी मुळे यांचे उपयुक्त मार्गदर्शन लाभले. तसेच प्रयोगशाळा सहाय्यक सांदीपनी मकेश्वर यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीएससी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी विधी पाथरे हिने केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी बीएससी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी अम्रपाली वाकपंजर हिने उपस्थित मान्यवर, प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयीन परिसरात चिमण्यांसाठी कृत्रिम घरटे झाडांवर लावण्यात आले. एकंदरीतच या कार्यक्रमाच्या माध्यमातून “आज चिमण्या वाचवल्या तर उद्या निसर्ग वाचेल” हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला. पोस्टर स्पर्धेत गौरी बावणेने पटकावला प्रथम क्रमांक कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेला विशेष आकर्षण लाभले. पोस्टर कॉम्पिटिशन मध्ये तब्बल ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .बर्ड कन्झर्व्हेशन : डीपर कनेक्शन बिटवीन पीपल अॅण्ड स्पॅरो या विषयावर विद्यार्थ्यांनी सर्जनशील आणि माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केली. या स्पर्धेचे परीक्षण मान्यवरांनी केले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांची घोषणा प्रा.निलेश किसवे यांनी केली व विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सर्वांनी कौतुक केले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक बीएससी तृतीय वर्षाची विद्यार्थिनी गौरी बावणे, द्वितीय क्रमांक बीएससी च्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी वैष्णवी कळमकर हिने प्राप्त केला. बीएससी द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी अक्सा जुजी मोहम्मद शफिक हि तृतीय विजेता मानकरी ठरली. तर बीएससी भाग तीन चा विद्यार्थी सुशांत पाखरे हा उत्तेजनार्थ बक्षीस विजेता ठरला .

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 11:36 am

चैत्र रामनवमी, देवी नवरात्र महोत्सवात विष्णू सहस्त्रनामात भाविकांचा सहभाग:कौंडण्यपूर अंबिका देवी मंदिरात रामनवमीपर्यंत भजनाच्या कार्यक्रमाचे आयाेजन‎

प्रतिनिधी । कुऱ्हा विदर्भाचे राजे भीष्मक यांचे आराध्य दैवत रुक्मिणीचे माहेर घर असलेल्या पुरातन विदर्भाची पंढरी श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री अंबिका देवी संस्थान येथे चैत्र राम नवमीनिमित्त देवी नवरात्र महोत्सवात १९ ते २६ मार्च पर्यंत शेकडो मनोकामना ज्योतींचे प्रज्वलन, प्रवचन, देवी सहस्त्रनाम, विष्णू सहस्त्रनाम, दुर्गा सप्तशती पाठ, भजन, हरिपाठ अशा विविध धार्मिक कार्यक्र‌मांमध्ये शेकडो भाविक उत्साहात सहभागी होत आहेत. दररोज भाविकांना प्रसादाचेही वितरण केले जात आहे. दैनिक कार्यक्रमांमध्ये स. ६.३० ते ५ पर्यंत देवी सहस्त्रनाम, स. ७ ते ८ दरम्यान महापूजा, स. ८.३० वा. महाआरती, स. ते ९ ते दु. १२ पर्यंत दुर्गा शप्तशती पाठ, दु . १२ ते १२.३० धूप आरती नवैध, सायंकाळी ७ ते ७.३० पर्यंत आरती, रात्री ८ ते ९ वा विष्णू सहस्त्रनाम व हरिपाठ त्यानंतर रात्री ९ पासून भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. दररोज विविध मंडळांद्वारे भजनाचे सादरीकरण होत आहे. चैत्र राम नवमी देवी नवरात्र महोसवा निमित्त श्री मनोकामना सिद्धीसाठी अखंड दीप ज्योत व श्रीराम कथा प्रवचन ज्ञानयज्ञ सुरू आहे. स. ९ ते दु. १२ वा. व दु. ३ ते ५ या कालावधीत हभप सुधाकर महाराज ठाकरे (जवरा) यांच्या प्रवचनाचा भाविक आनंद घेत आहेत.१९ मार्च गुढीपाडव्याला स. ८ ते ९ या वेळेत विश्वस्त मंडळातील गिरीधर अग्रवाल (सपत्निक) यांच्या यजमान पदाखाली पूजेला सुरुवात झाली. स.९.३० ते ११ या वेळेत घटस्थापना, दीपज्योतींचे प्रज्वलन करण्यात आले. पूजेचे यजमान रमेशचंद्र राठी आर्वी, भय्या ठाकरे व रमेश सोनी यांनी कुटुंबासह रामायण पूजन केले. त्यानंतर रात्रीचे भजन केले. २० रोजी स. ६.३० ते ८ वा. श्रींची पाद्यपुजा करण्यात आली.रात्रीचे भजन लहानुजी महाराज भजन मंडळ, देऊरवाडा, अंबिका भजन मंडळ (आर्वी) यांनी सादर केले. २१ रोजी महिला भजनी मंडळ (कौंडण्यपूर), २२ रोजी श्री गुरुदेव भजनी मंडळ (अहिरवाडा) यांनी भजन सादर केले. २३ रोजी श्री गुरुदेव सेवा भजनी मंडळ (सर्कसपूर), २४ रोजी जीवन विकास भजन मंडळ (मिर्चापूर), २५ मार्चला देऊरवाडा, कौंडण्यपूर वारकरी भजन मंडळाचा कार्यक्रम होईल. २५ रोजी रात्री होमहवन पूर्णाहूती होणार आहे. त्यानंतर २६ मार्चला दु. १२ ते ३ वा.पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्योत विसर्जन कार्यक्रम २६ मार्चला दुपारी ४ वा.होणार आहे. भाविक भक्तांनी चैत्र रामनवमी देवी नवरात्र महोत्सवात होणाऱ्या मनोकामना सिद्धी अखंड दीपज्योत,श्रीराम कथा प्रवचन ज्ञानयज्ञ आदी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी केले आहे. भाविकांची विशेष श्रद्धा कौंडण्यपूर येथील आई श्री अंबिका माता ही येथील भाविकांचे श्रद्धास्थान असून, येथे शारदीय व चैत्र नवरात्रोत्सवात दर्शनासाठी दररोज भाविक येत असतात. येथे दरवर्षी दोन्ही नवरात्रात मनोकामना पूर्ती ज्योती उजळल्या जातात. यंदा ६५० भाविकांनी या ज्योती उजळल्या असून, संस्थानाद्वारे त्या नवमीपर्यंत तेवत राहाव्यात म्हणून काळजी घेतली जात आहे. या ज्योतींसाठी तेलाची व्यवस्थाही केली आहे. मंदिर प्राचीन असल्यामुळे येथे भाविक कार्यक्रमांना हजेरी लावतात.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 11:35 am

चैत्र नवरात्रोत्सवामध्ये वाढली भाविकांची गर्दी:धार्मिक कार्यक्रमांनाही भाविकांची गर्दी वाढली

प्रतिनिधी । अमरावती चैत्र नवरात्रोत्सवात दरवर्षीच्या तुलनेत यंदा २० टक्क्यांनी भाविकांची गर्दी वाढली आहे. चैत्र नवरात्रात दरवर्षी दिवसाला सुमारे २५०० ते ३ हजार भाविक दर्शनाला यायचे. यंदा ही संख्या ४ हजार ते ४५०० पर्यंत वाढली आहे. पहाटेची काकड आरती, दुपारची मध्यान्न आरती, सायंकाळची संध्या आरती व रात्रीची शेजारती अशा चारही आरतींच्या वेळी मोठ्या संख्येत भाविक उपस्थित राहत, असल्याची माहिती मंदिर संस्थानाद्वारे देण्यात आली. चैत्र नवरात्रोत्सवात सोमवारी २३ मार्चला पंचमी असून, या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवीपुढे गोंधळाचे आयोजन केले जाते. तिला गोंधळाला बोलावले जाते. गोंधळी टेंभ्यावर तेल टाकत देवीची आराधना करणार आहेत. आंबिलचा नैवेद्य देवीला अर्पण केला जाणार आहे. भाविकांद्वारे देवीला मीठ-पीठ, गुळ, तेलाचा जोगवा अर्पण केला जातो. यासाठी भाविकांची विशेषत: महिलांची चांगलीच गर्दी राहणार आहे. पंचमीला पहाटे ५.३० वाजता देवीची काकड आरती, त्यानंतर अभिषेक, भरजरी साडी, फुलांचा हार, गजरा, दागिण्यांनी शृंगार केला जाणार आहे. नवरात्रोत्सवात पहाटे काकड आरतीच्या वेळी देवीचे मूळ रूप बघायला मिळते. त्यामुळेही भाविक गर्दी करतात. नंतर श्री अंबादेवीला सोन्याचा मुखवटा घातला जातो. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता मध्यान्न आरती केली जाते. धार्मिक कार्यक्रमांनाही भाविकांची गर्दी वाढली चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात आयोजित धार्मिक कार्यक्रमांना गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची गर्दी वाढली आहे. सध्या उकाडा कमी असून वातावरणही आल्हाददायक आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी मोठ्या संख्येत भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. सुटीच्या दिवशी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत आहे. विशेषत: मध्यान्न आरती, सांज आरतीला गर्दी वाढली आहे. -डॉ. जयंत पांढरीकर , सचिव, श्री अंबादेवी संस्थान.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 11:34 am

साठ फूट उंच कड्यावरुन आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या गर्भवतीला वाचवले:दोन तरुण, पोलिस अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाच्या जवानासह नागरिकांना यश‎

प्रतिनिधी । अमरावती अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवे लगत सुमारे साठ ते सत्तर फुट उंच अशा टेकड्या आहेत. यापैकीच एका टेकडीच्या सुमारे साठ ते सत्तर फूट उंच कड्यावर एक गर्भवती महिला चढली होती. ही बाब रस्त्याने जाणाऱ्या दोन तरुणांना लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस, अग्निशमन दल व नागरिकांनी प्रयत्न करून त्या महिलेला सुखरूप खाली आणले. ही घटना रविवारी २२ मार्चला दुपारी घडली. सुमारे ३० वर्ष वयोगटातील एक गर्भवती महिला ६० ते ७० फूट उंच टेकडीवरील कड्यावर जाऊन बसली आहे. ही बाब रस्त्याने दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन तरुणांना लक्षात आली. तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ ही माहिती पोलिसांना दिली. त्यांनी हिम्मत करून उर्वरित. पान ४ वैभव आणि अमोलच्या समयसुचकतेने टळला अनर्थ वैभव आणि अमोल हे दोन मित्र दुचाकीने जात असताना त्यांना ही महिला कड्यावर दिसली. यावेळी दोघांनीही कोणतीही तमा न बाळगता थेट पोलिसांना माहिती दिली. त्यामुळेच पोलिस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे जवानसुद्धा आलेत व महिलेला सुखरूप खाली उतरवण्यात यश आले. वैभव आणि अमोलच्या समयसुचकतेमुळे अनर्थ टळला

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 11:32 am

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:प्रशिक्षकाविना वर्ल्ड पॅरा गेम्समध्ये जिंकले रौप्य, कांस्य पदक; दिव्यांग मेळघाट कन्या राजश्री कास्देकरची कामगिरी, शासनाकडून मिळाले नाही स्पर्धा प्रवेश शुल्क‎

प्रशिक्षकांशिवाय स्वत:च युट्यूबच्या मदतीने भालाफेक (जॅवलीन थ्रो), गोळाफेकीचा (शॉटपूट) तांत्रिक सराव केला. मेळघाटात कुठेच सोय नसल्यामुळे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या नवीन अॅथलेटिक्स स्टेडियमवर परवानगी घेऊन स्पर्धेची तयारी केली. यामुळे मी दिल्ली येथे ८ ते १३ मार्च या कालावधीत झालेल्या वर्ल्ड पॅरा ओपन इंटरनॅशनल ग्रॅण्ड प्रिक्समध्ये देशासाठी भालाफेकीत २३ मी. फेक करून रौप्य तसेच ८ मी.गोळा फेकून कांस्यपदक जिंकले. माझ्यातील दिव्यांगत्व, आर्थिक चणचण किंवा प्रशिक्षक नसणे या बाबींना मी विशेष महत्त्व दिले नाही, असे मेळघाटातील धारणी येथील दिव्यांग महिला ॲथलीट राजश्री कास्देकरने सांगितले. मला स्वबळावर इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करून दाखवायचे होते. म्हणूनच मेळघाटातून अमरावती येथे येऊन ‘एचव्हपीएम’मध्ये तयारी केली. येथे भाड्याने खोली करून राहिली. जिमचे शुल्क भरले. वडिलच दरमहा २५ हजार पाठवायचे त्यातून जिम, खोलीचे भाडे व डायटवर सर्व पैसे खर्च व्हायचे, ॲथलीट चांगला डायट हवा असतो, एफ-१२ (अंधूक दृष्टी) या प्रकारात वर्ल्ड पॅरा ओपन इंटरनॅशनलमध्ये मी सहभागी झाली. विशेष बाब म्हणजे याच प्रकारात भुवनेश्वर ओडिशा येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा गेम्समध्ये मी गोळाफेकीत सुवर्णपदक जिंकले. यामुळे पोलिस विभागात कार्यरत माझ्या वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मला थोरली बहिण व धाकटा भाऊ आहे. आमचा खर्च वडिल शंकर कास्देकर मोठ्या हिंमतीने करीत असल्याची जाणीव ठेऊन मी प्रयत्नपूर्वक यश मिळवले. त्यांनी माझ्यासाठी खर्च केलेल्या प्रत्येक पैशाची मी पदक जिंकून परतफेड केली, असे म्हणणार नाही. पण, त्यांना माझा अभिमान वाटावा, अशी कामगिरी केल्याचे समाधान वाटत असल्याचे तसेच त्यांना आनंद दिल्याचा मला अभिमान वाटतो, असेही खेळासोबतच फिजिओथेपीस्टचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या राजश्रीने स्पष्ट केले. एचव्हीपीएमकडून सरावाची परवानगी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने माझ्यातील खेळाबद्दलची जिद्द तसेच माझे क्रीडा कौशल्य बघून मला त्यांच्या अॅथलेटिक्स स्टेडियमवर नि:शुल्क सरावाची संधी दिली. एवढेच नव्हे तर मला जिमचे ७५ टक्के शुल्क माफ केले, त्यांची मी आभारी आहे. तरीही मला आवश्यकता असल्यामुळे मी महिन्याला १ हजार रु. शुल्क देत बाहेरील जिमवरही सराव करते. याचा मला काही प्रमाणात फायदा झाला आहे. डायट कसे घ्यायचे तसेच व्यायाम कोणता करायचा हे मीच ठरवले असल्याचेही राजश्री कास्देकर म्हणाली.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 11:29 am

कर्तव्य खरा परमार्थ; स्वसामर्थ्याची ओळख यशाचा मार्ग -डॉ. फडके:दत्त परंपरेचा अनोखा संगम; नीलेश देव मित्र मंडळातर्फे आयोजन‎

प्रतिनिधी | अकोला कर्तव्य हाच खरा परमार्थ असून, स्व-सामर्थ्याची ओळख हाच यशाचा मार्ग आहे, असा हितोपदेश रामकथाकार डॉ. भूषण फडके यांनी केला. स्वतःच्या सुप्त सामर्थ्याची जाणीव हीच यशाकडे नेणारी खरी गुरुकिल्ली आहे, असेही ते म्हणाले. नीलेश देव मित्र मंडळातर्फे आयोजित रामकथेच्या तिसऱ्या दिवशी डॉ. फडके मार्गदर्शन करत होते. कर्म करून निरपेक्ष राहण्याची वृत्ती म्हणजेच दत्त परंपरेतील अवधूत' अवस्था होय. असेही डॉ. फडके म्हणाले. रामायणातील अरण्यकांड आणि किष्किंधाकांडातील प्रसंगांचा जीवनमूल्यांशी संबंध जोडत, कर्तव्यनिष्ठा, आत्मविश्वास आणि आध्यात्मिक साधनेचा प्रेरणादायी संदेश देणारे निरूपण डॉ. भूषण यांनी केले. त्यांनी अरण्यकांड आणि किष्किंधाकांडातील प्रसंगांचे निरूपण करताना रामकथा आणि दत्त परंपरेतील चार प्रमुख विभूतींच्या शिकवणीचा सुंदर संगम घडवून श्रोत्यांसमोर नवा आध्यात्मिक दृष्टिकोन मांडला. निरूपणादरम्यान डॉ. फडके म्हणाले की, जांबुवंताने हनुमानाला त्याच्या विसर पडलेल्या शक्तीची जाणीव करून दिली. तेव्हाच तो समुद्र पार करू शकला. आपल्या आयुष्यातही अनेकदा नकारात्मक विचार आणि भीतीमुळे आपण स्वतःच्या सामर्थ्याला विसरतो. प्रत्येक वेळी जांबुवंतासारखा गुरु भेटेलच असे नाही; म्हणूनच स्वतःच्या सुप्त शक्तीची ‘खूणगाठ’ बांधली, तर यशाची कोटीच्या कोटी उड्डाणे घेणे शक्य होते, असेही डॉ. फडके म्हणाले. यावेळी गायक निखिल देशमुख यांनी निघालो घेवून दत्ताची पालखी, मन हो रामरंगी रंगले, गुरु एअक जागी त्राता, तरुन जो जाईल सिंधू महान ही भावस्पर्शी गीते सादर केली. वैशाली फडके यांनी “मज आणूनी द्या हो हरीण अयोध्यानाथा, श्रीराम गजर, तर देवाशिष फडके जयोस्तुते, मेरे झोपडिके भाग गुल्जायेगे, वालीवध ना खल निर्दालन हे गीत सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. प्रपंचात राहून कर्तव्य पार पाडणे हाच खरा परमार्थ : सीतेने अनुसूया मातेकडून भौतिक वरदान न मागता केवळ आशीर्वाद स्वीकारले. ही वृत्ती निरपेक्ष भक्ती आणि दत्त परंपरेतील ‘अवधूत’ भावनेचे प्रतीक असल्याचे डॉ. फडके म्हणाले. अरण्यकांडातील अगस्त्य ऋषींनी श्रीरामांना दिलेली दिव्य अस्त्रे ही केवळ युद्धासाठी नसूनल कर्तव्य पार पाडण्याची साधने असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीपाद श्रीवल्लभ महाराज आपल्या भक्तांना नेहमी सांगत की, प्रपंचात राहूनही आपले कर्तव्य चोख पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे.” या उदाहरणातून जीवनातील प्रत्येक जबाबदारी ही ईश्वरसेवाच आहे, असा संदेश त्यांनी दिला. अगस्त्य ऋषींनी श्रीरामांना भविष्यातील कार्याची जाणीव करून देत त्यांना योग्य मार्गदर्शन केले. याचप्रमाणे गुरुचरित्र ग्रंथात श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या शिष्यांना संकटाच्या वेळीही गुरुआज्ञेचे पालन आणि धर्मनिष्ठा सोडू नये, असा उपदेश दिला आहे. जबाबदाऱ्या स्वीकारताना मागे हटू नका : श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज आणि श्री नरसिंह स्वामी महाराजांच्या मध्ये आपल्यातील आळस भिती आणि दुर्बलता या राक्षसांना मारण्यासाठी आपल्या आपल्याला कर्तव्याची तलवार हाती घ्यावी लागेल. ज्याप्रमाणे श्रीरामागे शस्त्र स्वीकारताना संकोच केला नाही तसाच आपणही जबाबदाऱ्या स्वीकारताना मागे हटता कामा नये. जटायूने सीतेच्या रक्षणासाठी प्राण अर्पण केल्याचा प्रसंग सांगताना डॉ. फडके म्हणाले की, “धर्मासाठी उभा राहणाऱ्याच्या पाठीशी परमेश्वर स्वतः उभा राहतो. जटायूचे बलिदान हे भक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचे सर्वोच्च उदाहरण आहे. आजच्या निरुपणात अरण्यकांडमधील श्रीरामांचा दंडकारण्यात प्रवेश, जटायुशी भेट, शूर्पणखेस शासन, कपटाने सीता हरण, शबरी कडून आतिथ्य या घटनां तर किष्किंधा कांडामधील श्रीरामांची आणि सुग्रीवाची भेट, वालीवध, सुग्रीवाला राज्याभिषेक, सीतेच्या शोधासाठी वानरांचे प्रयत्न, हनुमानास विस्मरण, जांबुवंत स्व सामर्थ्याची आठवण करून देतात. हनुमान उड्डाणास सिध्द होतात. या घटनाची गुंफण डॉ.भूषण फडके यांनी केली. रामकथेत वर्णन झालेल्या प्रसंगांना दत्त परंपरेतील महान विभूतींच्या शिकवणीशी जोडत डॉ. फडके यांनी त्यांचा जीवनार्थ स्पष्ट केला. राम हा मर्यादा आणि धर्माचे प्रतीक असून दत्तात्रेय हे ज्ञान आणि गुरुतत्त्वाचे प्रतीक असल्याचे म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 11:22 am

सार्वजनिक जेवणावळींसाठी स्टील ताट, ग्लास उपलब्ध:संकल्प मित्र परिवाराकडून प्लास्टिक पत्रावळ्या ‘वापरा-फेका’ संस्कृतीला दिला जातोय पर्याय‎

प्रतिनिधी | अकोला सार्वजनिक भोजनदान व भंडारा, वाढदिवस, लग्न समारंभामधून निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास व जनावरांच्या जीवावर आलेले संकट लक्षात घेता, संकल्प मित्र परिवार पुढे सरसावला आहे. ‘वापरा आणि फेका’ या संस्कृतीला पर्याय देत स्टीलच्या ताट-ग्लासचा पर्यावरणपूरक उपक्रम राबवला जात आहे. सध्या विविध धार्मिक, सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर पत्रावळी, द्रोण आणि प्लास्टिक ग्लासचा वापर केला जातो. कार्यक्रमानंतर निर्माण होणारा हा कचरा रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी साचत असल्यामुळे शहरात अस्वच्छतेचे मोठे चित्र निर्माण होते. याहूनही गंभीर बाब म्हणजे, या कचऱ्यातील अन्नाचे अंश खाण्यासाठी मोकाट जनावरे पुढे येतात आणि नकळत प्लास्टिक गिळल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर संकल्प मित्र परिवार यांनी समाजहिताचा विचार करत स्टीलची ताटे व ग्लास मोफत उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे प्लास्टिकचा वापर लक्षणीयरीत्या कमी होणार असून, पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच शहरातील स्वच्छता राखण्यासही या उपक्रमाचा हातभार लागणार आहे. रविवारी जवाहर नगर चौकातील मैदानात या उपक्रमाचे लोकार्पण उत्साहात पार पडले. या लोकार्पण सोहळ्यास जयेश सदावर्ते, निकेश गुप्ता, मनीष कलोरे, शशांक धुळे, डॉ. योगेश पालीवाल, डॉ. मनीषा पालीवाल, मनीष गावंडे, दिनेश बडगुजर, तुळशीदास खिरोडकर, वीरेंद्र सपकाळ, योगेश देशमुख, डॉ. डी. टी. देशमुख, भगवान राणे, गजानन आसोलकर, विजेंद्र वरोकार, अमोल पाचकवडे, भालचंद्र विरघट आदी उपस्थित होते. ४०० ताटे, ४०० ग्लास दिले उपक्रमासाठी दान या उपक्रमासाठी भालचंद्र सदावर्ते व निकेश गुप्ता यांच्याकडून तसेच स्व. हरिभाऊ मोतीसा पाचकवडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रत्येकी १०० ताटे व १०० ग्लास अशा स्वरूपात एकूण ३०० ताटे व ३०० ग्लास संकल्प मित्र परिवाराकडे लोकार्पित करण्यात आले. या योगदानामुळे उपक्रमाला भक्कम बळ मिळाले आहे. सार्वजनिक भोजनदान किंवा भंडारा कार्यक्रम आयोजित करताना या स्टील ताट-ग्लास सुविधेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन संकल्प मित्र परिवाराने केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 11:21 am

श्रीगोंद्यात ५० हजारांची खंडणी मागत महिला व्यावसायिकेवर रॉडने हल्ला:आरोपींना अटक न झाल्यास ग्रामस्थांची उद्यापासून बंदची हाक

प्रतिनिधी | श्रीगोंदे श्रीगोंदे शहरातील महात्मा फुले उद्यानासमोर एका महिला व्यावसायिकेवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने ५० हजार रुपयांची खंडणी मागत लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित महिला जखमी झाली. तिने श्रीगोंदे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, बाहुल्या काळे आणि त्याच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, अद्याप आरोपींना अटक न झाल्यामुळे शहरातील नागरिक, व्यापारी तसेच विविध राजकीय व सामाजिक पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. श्रीगोंदे शहरातील महात्मा फुले उद्यानासमोर एक महिला आइस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करते. या नगरपरिषदेच्या इमारतीत अतिक्रमण करून राहत बाहुल्या काळे आणि त्याचे काही साथीदारांनी या महिलेस ५० हजार रूपये खंडणी दे, असे म्हणत तिला लोखंडी रॉडने मारहाण केली. या पार्श्वभूमीवर संत शेख महंमद बाबा दर्गा येथे शहरातील व्यापारी, गावकरी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. यासंदर्भात श्रीगोंदे पोलिस ठाण्याला निवेदन देण्यात आले आहे. श्रीगोंदे नगरपालिकेने उभारलेल्या इमारतीत काही व्यक्तींनी अतिक्रमण केल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला.ते अतिक्रमण तत्काळ हटवावे, अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान, आरोपींना लवकरात लवकर अटक न झाल्यास मंगळवारपासून २४ मार्च श्रीगोंदे शहर बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 11:12 am

दुसऱ्यांचे अश्रू पुसता आले तरच कळेल जीवनाचे मर्म:प्रा.गणेश लोळगे यांचा विश्वास, वास्तववादी जगात जगता आले पाहिजे‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर आपण वस्तूंसाठी नाही तर वस्तू आपल्यासाठी आहेत, याचे भान असले पाहिजे. स्वतःवर प्रेम करायला शिकले पाहिजे. आई, वडील आणि मातृभूमीवर प्रेम केले तरच आयुष्याचे उत्तर सापडून जीवन समाधानी, सुखी, आनंदी होईल. दुसऱ्यांचे अश्रू पुसता आले तरच आपल्याला जीवनाचे मर्म कळेल, असा विश्वास प्रा.गणेश लोळगे (कोल्हापूर) यांनी व्यक्त केला. राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदॠषिजी महाराजांच्या ३४ व्या पुण्यस्मृतीदिनानिमित ्त जैन सोशल फेडरेशनतर्फे पूज्य आदर्शऋषिजी यांच्या प्रेरणेने येथील आनंदधाममध्ये आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेचा शुभारंभ करताना आयुष्याला द्यावे उत्तर या विषयावर ते बोलत होते. सिमा मुनोत यांनी स्वागत केले. प्रा.प्रसाद बेडेकर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. इमरतबाई मुनोत (नेवासावाला) यांच्या हस्ते प्रा. लोळगे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुरेश कटारिया, संतोष गांधी, सिमरन मुनोत उपस्थित होते. प्रा. लोळगे म्हणाले, दुसऱ्यांशी तुलना करत आपण आपला आनंद हरवत चाललो आहोत. दिवसातील दहा ते अठरा तास स्क्रीन टाईममध्ये घालवणारे रीडिंग टाईमसाठी किती वेळ देतात? हा प्रश्न आहे. पुस्तक वाचायला शिकल्याने माणसं समजणे शिकता येते आणि आयुष्याचे उत्तर हाती येते. आपण वर्तमानात जगायचे विसरून गेल्याने जीवनात समस्या, ताण-तणाव निर्माण होत चालले आहेत. सकारात्मक भूमिकेतून वास्तववादी जगात जगता आले पाहिजे, असे सांगताना त्यांनी विविध प्रसंगाआधारे केलेले काव्य वाचन श्रोत्यांची दाद मिळवणारे ठरले. भगवान महावीरांची पंचसूत्री आयुष्याचे उत्तर शोधण्यास उपयुक्त अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य आणि अपरिग्रह ही भगवान महावीर यांची पंचसूत्री आपल्याला आयुष्याचे उत्तर शोधण्यासाठी उपयुक्त ठरणारी तसेच मन:शांती मिळवून देणारी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रश्न वेगवेगळे असतात. प्रत्येकाच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका वेगळी असते. आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्यालाच शोधावे लागते. आपण उत्तर कसे शोधतो? यावर समाधान अवलंबून असते. आपल्याला जे क्षेत्र आवडते त्या क्षेत्रात जीवनभर काम करावे. लोक माझ्याबद्दल काय विचार करतात? यापेक्षा मी माझ्या आयुष्यासाठी काय करू शकेल? हे समजले तर आयुष्याचे उत्तर निश्चित सापडते, असे प्रा. लोळगे यावेळी म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 11:12 am

भावी पिढीला भौतिक सुखसुविधांपेक्षा चांगले संस्कार देणे अधिक महत्त्वाचे:महंत भास्करगिरी महाराज यांचे प्रतिपादन, वृद्धांची सेवा करणे हेच खरे कर्तव्य‎

प्रतिनिधी |नेवासे भावी पिढीला केवळ भौतिक सुखसुविधा देण्यापेक्षा चांगले संस्कार देणे अधिक महत्त्वाचे आहे. मातृ-पितृ पूजनासारखे सोहळे कुटुंबातील नातेसंबंध दृढ करून पुढील पिढीला योग्य मार्ग दाखवतात, असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे भास्करगिरी महाराज यांनी केले. भगवान गुरु दत्ताच्या छायेखाली कौटुंबिक जडणघडण झालेल्या गयाबाई पोपटराव कारले यांच्या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. रामनाथ कारले व कारले कुटुंबीयांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रकाशानंदगिरी महाराज, वेदांताचार्य भगवानजी महाराज जंगले शास्त्रीजी (श्रीराम कृष्ण आश्रम, गोणेगाव), विद्या हारदे, पंचगंगा उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब शिंदे, कृषी उपसंचालक दीपक गवळी, उपविभागीय कृषी अधिकारी अश्विनी पठारे, जनाबाई जंगले, रोहिदास चौधरी, डॉ. शशिकांत विप्रदास, संतोष भामरे, विक्रम गोसावी, सतीशकुमार संचेती आदी उपस्थित होते. या सोहळ्यास कारले कुटुंबीयांचे नातेवाईक, कृषी क्षेत्रातील अधिकारी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमात गयाबाई कारले यांच्यासह खुपटी येथील शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. भास्करगिरी महाराज म्हणाले, वृद्धाश्रमांचा अभिमान बाळगण्यापेक्षा घरातील वृद्धांची सेवा करणे हेच खरे कर्तव्य आहे. मातृ-पितृ पूजनासारखे कार्यक्रम भावी पिढीला संस्कार देणारे ठरतात. पालकांनी मुलांना भौतिक सुविधा देण्याबरोबरच संस्कारांची शिदोरी दिली तरच आपली संस्कृती टिकेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवन्नाथ पवार यांनी केले, तर रामनाथ कारले यांनी आभार मानले. मुलांना संस्कारांनी समृद्ध बनवा : प्रकाशानंदगिरी वृद्ध आई-वडिलांची सेवा म्हणजे सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतल्याइतके पुण्य मिळवण्यासारखे आहे. मुलांना केवळ पैसा कमावणारी यंत्रे बनवण्यापेक्षा संस्कारांनी समृद्ध बनवावे, असे आवाहन श्रीक्षेत्र देवगडचे उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरी महाराज म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 11:11 am

अकोलेतील भंडारदरा धरण व परिसर म्हणजे, निसर्गाला पडलेले गोड स्वप्न:राजूर न्यायालयाचे न्यायाधीश एस. यू. न्याहारकर यांचे मत, हा परिसर प्लास्टिकमुक्त, सुंदर, स्वच्छ ठेवून पर्यावरणपूरक उपाय राबवून समतोल राखावा‎

प्रतिनिधी|अकोले तालुक्यातील आदिवासीबहुल भागांतील भंडारदरा धरण व परिसर म्हणजे, निसर्गाला पडलेले गोड स्वप्न आहे. या मनमोहक निसर्गरम्य परिसराचे संवर्धन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. सरकारबरोबर निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ही संस्था कार्यरत आहे. इथला सुंदर, स्वच्छ, अप्रतिम निसर्ग सौंदर्य लाभलेला परिसर पाहिल्यावर स्वर्गात आल्याचाच भास मला झाला. भंडारदरा धरण परिसरातील वृक्षवल्ली, जलाशय, प्रदूषणमुक्त वातावरण व निसर्गाने नटलेला हा प्रदेश अप्रतिमच आहे, असे मत राजूर न्यायालयाचे दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एस. यू. न्याहारकर यांनी व्यक्त केले. अकोले तालुक्यातील पिंपरकणे येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य यांनी एक दिवसीय कार्यशाळा व अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले. या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश न्याहारकर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमोद मोरे होते. याप्रसंगी निवृत्त सहाय्यक वन संरक्षक प्रभाकर म्हस्के, विशेष सरकारी वकील अॅड सुरेश लगड, सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळ, रामनाथ भोजणे, वनपाल शंकर लांडे, शोभा लांडगे, शोभा काळे उपस्थित होते. चिमणी वाचवा अभियानांतर्गत 'पक्षांना एक घास अन्न व घोटभर पाणी द्या', अशी घोषणा देत पिंपरकणे गावातून वृक्ष दिंडी काढली. यानिमित्त उपस्थितांचा सन्मान करताना त्यांना आंबा रोपे देऊन वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. न्यायमूर्ती न्यायहारकर म्हणाले, या परिसरातून पर्यटकांनी आपल्यासोबतचे शिल्लक खाद्य पदार्थ, त्यांचे रॅपर, प्लास्टिक व इतर कचरा इतस्ततः न टाकता तो कचरापेटीतच टाकावा. पर्यावरण रक्षणासोबत इथला नयनमनोहर निसर्गरम्य परिसर हा प्लास्टिकमुक्त, सुंदर, स्वच्छ ठेवून पर्यावरणपूरक उपाय राबवून समतोल राखण्याची काळजी घ्या. वनपरिक्षेत्र अधिकारी पडवळ यांनी पर्यटकांनी प्लास्टिक व कचरा होणार नाही म्हणून प्रयत्नशील रहावे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, वृक्षसंवर्धन व वन्यजीव संरक्षणाचे कार्य करावे, असे आवाहन केले. प्रमोद मोरे यांनी भविष्यात सर्वांसाठी आवश्यक ऑक्सिजन कमी पडणार नाही, याची जाणीव ठेवून किमान प्रत्येकाने एक झाड लावून वृक्षारोपण चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. स्वागत महेश पाडेकर यांनी,तर प्रास्तविक मुख्याध्यापक विलास सावंत यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 11:11 am

बेवारस असलेल्या १०० वासरांना मिळाले जीवदान:राहुरीचे नगरसेवक सागर तनपुरे यांचा अनोखा उपक्रम‎

राहुरी| शहरात बेवारस सोडून दिलेल्या नवजात वासरांना जीवदान देत नगरसेवक व गोरक्षक सागर तनपुरे यांनी मानवतेचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. ज्या वासरांना जन्मानंतर काही दिवसांत मृत्यूची छाया होती, त्यांना आज सुरक्षित आश्रय मिळत आहे. महिन्याभरापूर्वी फेरफटका मारत असताना तनपुरे यांना या परिसरात १५ ते २० नवजात वासरे आढळली. काही वासरांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले सुरू होते. ही हृदय पिळवटून टाकणारी परिस्थिती पाहून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मित्र परिवाराच्या मदतीने सर्व वासरांना आपल्या घरालगत आणले. त्याठिकाणी सुरक्षित कंपाऊंड तयार करून, स्वतः च्या खर्चातून त्यांना दूध व चारा देत त्यांनी त्यांचे प्राण वाचवले. आज या वासरांची संख्या तब्बल १०० च्या पुढे गेली आहे. दररोज सुमारे १०० लिटर दुधाचा खर्च, दीड ते दोन हजार रुपयांचा चारा, वैद्यकीय खर्च आणि कामगारांचा खर्च मिळून दररोज १५ ते २० हजार रुपये खर्च होत आहे. आता इथे जवळपास १०० वासरे आहेत. दररोजचा खर्च १५ ते २० हजार रुपये आहे. काही शेतकरी नवजात वासरांना सोडून देतात, त्यामुळे ती काही दिवसांत मृत्युमुखी पडतात. शेतकऱ्यांनी किमान १५ ते २० दिवस वासरांना दूध पाजून मग आमच्याकडे आणावे, असे आवाहन सागर तनपुरे यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 11:10 am

ना दिल्ली, ना कोचिंग; सेल्फ स्टडीतून यूपीएससी क्रॅक:६१० वी रँक मिळवून केडगावच्या अभिषेक टेकाळे यांनी पूर्ण केले आयआरएस होण्याचे स्वप्न‎

यूपीएससीची तयारी म्हणजे दिल्ली किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांत जाऊन महागड्या कोचिंगचा आधार घेणे आवश्यक, अशी सर्वसाधारण समजूत आहे. मात्र केडगावच्या अभिषेक अशोक टेकाडे यांनी ही धारणा मोडीत काढत कोणत्याही कोचिंगशिवाय आणि मोठ्या शहरांचा आधार न घेता केवळ स्वअभ्यासाच्या (सेल्फ स्टडी) जोरावर यूपीएससी परीक्षेत देशात ६१० वी रँक मिळवत आयआरएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे. केडगावातील पाच गोडाऊन परिसरात राहणाऱ्या अभिषेक यांचे शालेय शिक्षण अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झाले. शालेय जीवनातच पारितोषिक स्वीकारताना त्यांना सिव्हिल सेवेत जाण्याची प्रेरणा मिळाली आणि तेव्हाच त्यांनी अधिकारी होण्याचा निर्धार केला. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ यूपीएससीच्या तयारीकडे लक्ष केंद्रित केले. २०२० मध्ये पहिल्यांदा परीक्षा दिली तेव्हा अवघ्या सात गुणांनी अपयश आले. त्यानंतर सलग चार प्रयत्नांत अपयश आले, मात्र त्यांनी हार मानली नाही. प्रत्येक वेळी स्वतःच्या चुका ओळखून त्यांनी अभ्यासात सुधारणा केली. नोट्स तयार करणे, मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि सातत्यपूर्ण सराव यावर त्यांनी भर दिला. अखेर पाचव्या प्रयत्नात त्यांनी ६१० वी रँक मिळवत यश संपादन केले. अनेक विद्यार्थी दिल्लीला जाऊन लाखो रुपये खर्च करून कोचिंग घेतात; मात्र अभिषेक यांनी घरातूनच अभ्यास करत ही परीक्षा उत्तीर्ण केली. “मोठी स्वप्नं पूर्ण करायची असतील, तर स्वतःवर विश्वास, सातत्य आणि मेहनत आवश्यक आहे. दिल्लीला जाण्याची गरज नाही; योग्य दिशेने अभ्यास केला, तर कुठेही राहून यश मिळवता येते', असा सल्ला अभिषेक यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला. अभिषेक यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवा मार्ग खुला झाला असून, स्वअभ्यासावरही मोठं यश मिळवता येतं, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. रणनीती, दिशा अन् स्वत:वरील विश्वासाने यश जेव्हा तुमची रणनीती, दिशा आणि स्वत:वर आत्मविश्वास हे तिन्ही घटक एकत्र येतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने यश प्राप्त होते, असे मत अभिषेक टेकाडे यांनी व्यक्त केले. अभिषेक यांनी पाच वर्षे दररोज सात तास अभ्यास यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न फक्त जिवंत ठेवले नाही, तर ते यशस्वीरित्या पूर्णही केले. त्यांची ही यशोगाथा कधीही हार न मानण्याची वृत्ती, कठोर परिश्रमाचे महत्त्व' आणि आपल्या ध्येयाचा पाठलाग करण्याचा अढळ निश्चय याचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे. मोबाइलचा असाही केला सकारात्मक वापर सोशल मीडियाचा अनावश्यक वापर पूर्णपणे टाळत मोबाईलचा केवळ अभ्यासासाठी उपयोग करत अभिषेक टेकाडे यांनी तयारी अधिक प्रभावी केली. यूट्यूबवरील टॉपरच्या मुलाखती, अभ्यासाच्या रणनीती, ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि मागील प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास त्यांनी मोबाइलवरूनच केला. एआय'च्या मदतीने कठीण संकल्पना समजून घेत सातत्यपूर्ण सराव करत त्यांनी स्वअभ्यास अधिक सक्षम बनवला आणि त्यातूनच यूपीएससीत यश मिळवले.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 11:08 am

गतवर्षी केळी, कपाशी उद्ध्वस्त, आता गहू आडवा:वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी''ने दहिगाव ने च्या शेतकऱ्यावर संकट‎

शेवगाव तालुक्यात १९ मार्चच्या रात्री आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. दहिगाव ने मध्ये शेतात उभे राहून बोलताना शेतकरी अरुण आसाराम मुंगसे यांच्या डोळ्यांत हतबलता स्पष्ट दिसत होती. वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे त्यांच्या शेतातील गहू आडवा झाला. गेल्या वर्षीही अतिवृष्टीमुळे सहा एकरातील केळीची बाग उद्ध्वस्त झाली होती. निसर्गाने एकदा नव्हे तीन वेळेस मुंगसे यांचा घात केला. त्यांच्याप्रमाणे शेवगाव तालुका आणि जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. गतवर्षी उर्वरित पान ४ जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ११ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.यात सर्वाधिक गहू, कांदा, हरभरा, मका, भाजीपाला या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे सुरु केले असून, मंगळवार पर्यंत या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होणार आहेत. अंतिम नुकसानीचा अहवाल विभागीय आयुक्तालया मार्फत राज्य सरकारकडे पाठवला जाईल. दरम्यान १९ मार्चला झालेल्या अवकाळीमुळे सर्वाधिक २० हजार हजार ५५१ शेतकरी बाधित झाले आहेत. सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करतेय मागील वर्षी दहिगाव ने परिसरात केळी बागेचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वतः उभे राहून पंचनामे केले. परंतु आजपर्यंत शासकीय मदत मिळाली नाही. हे सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करीत आहे असे दिसत आहे. प्रा. काकासाहेब घुले, सरपंच, रांजणी.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 11:05 am

विधानपरिषदेत शिवसेना शिंदे गट-भाजपची खडाजंगी:सातारा जिल्हा परिषद निवडणुकीची गंभीर दखल, पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्याची विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. आज 23 मार्च रोजी विधान परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी या प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर, सभापतींनी सातारा पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाचे तातडीने निर्देश दिले. तसेच, पुण्याच्या विभागीय आयुक्तांना या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रशासकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. निवडणुकीदरम्यान साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना आपल्याच सदस्यांना सभागृहापर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिस व प्रशासनाशी मोठी झुंज द्यावी लागली. या झटापटीत शंभूराज देसाई जखमी झाले, तर मकरंद पाटील यांना 20-25 पोलिसांनी वेढले होते. अखेर, मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बळाचा वापर करून भाजपने आपला अध्यक्ष निवडून आणण्यात यश मिळवले, परंतु या राड्यामुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. आम्ही सुरक्षित आहोत की नाही?- शंभूराज देसाई आम्ही सुरक्षित आहोत की नाही? असा सवाल शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. पोलिसांकडून आम्हाला धक्काबुक्की केली गेली. मला आज हे रेकॉर्डवर आणायचे आहे. 100 पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की केली. आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? तो एसपी जो वागला आहे, एका घरगड्या सारखा वागला आहे. त्याची चौकशी लावा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. मंत्र्यांवर अरेरावी करणाऱ्या त्या तुषार दोषीवर कारवाई करण्यात यावी अन निलंबित करण्यात यावे, अशी मागणी देसाई यांनी केली आहे. पोलिस चुकीचे असतील तर कारवाई होईल- मंत्री जयकुमार गोरे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, जिल्हा परिषद निवडणूक जेव्हा चालू होती, तेव्हा पोलिसांना दमदाटी करून आत कोण गेले, याची चौकशी झाली पाहिजे. कोण चुकीचा आणि कोण बरोबर हे कोर्ट ठरवेल. तसेच पोलिस जर चुकीचे असतील तर कारवाई होईल. पुढे बोलताना गोरे म्हणाले, निवडणूक सुरू असताना मंत्री कसे आत जातात? या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. माहिती घेतल्याशिवाय कारवाई करणे उचित नाही.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 10:59 am

सातारा ZP निवडणुकीचे विधिमंडळात पडसाद:मला 100 पोलिसांनी रोखले, आम्ही सुरक्षित आहोत की नाही? शंभूराज देसाई यांचा सवाल

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चांगलाच राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. साताऱ्याचे पालकमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांना धक्काबुकी देखील झाली होती व यात त्यांच्या हाताला दुखापत झाल्याचेही समोर आले होते. त्यानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गट असा वाद निर्माण झाला होता. आज या संपूर्ण घटनेवर शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाची बैठक होणार आहे. यावर शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना भाष्य केले आहे. लोकांच्या भावना तीव्र आहेत, अधिवेशन झाल्यावर याचे तीव्र पडसाद पाहायला मिळतील, असा इशारा देखील देसाई यांनी दिला आहे. शंभूराज देसाई म्हणाले, जवळजवळ आपल्या सर्व माध्यमांचे साताऱ्यात जे प्रतिनिधी होते, त्यांनी ते सगळे वृत्तांकन पाहिले आहे. सुरुवातीला आमचे चांगले बहुमत असताना देखील भाजपने आमच्या अनेक सदस्यांना नेले. मतदानाला जाताना आम्ही 33 सदस्य घेऊन गेलो होतो. तरी सुद्धा मतदानाला जाताना एका गाडीतून 33 सदस्य घेऊन तिथे गेलो. आपल्या सगळ्यांना माहीत आहे एक खोटा गुन्हा, म्हणजे जे राष्ट्रवादीचे सदस्य आमच्यासोबत आहेत, त्यांचेच अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या मुलावर दबाव टाकून केली. आणि कोणी अपहरण केले, तर आमच्याच सदस्यांनी केले. ते दोन्ही सदस्य आमच्यासोबत होते. साध्या वेशातील पोलिसांनी झटापट केली पुढे बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, बर पोलिसांना अपहरण केलेल्या सदस्यांना खोटा आरोप असलेल्या सदस्यांना ताब्यात घ्यायचे होते, तर आमची पार्टी मीटिंग ज्या हॉटेलमध्ये चालू होती, त्याच्या खाली साध्या वेशात पोलिस होते. पण तिथे ताब्यात नाही घेतले. कारण तिथे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे हजार-2 हजार सैनिक उभे होते. आणि बरोबर मतदानाला जात असताना, मी तिथे होतो, मकरंद पाटील होते, तेव्हा अक्षरशः साध्या वेशातील पोलिसांनी झटापटी केली. मला 100 पोलिसांनी पकडून ठेवले होते. एका बाजूला 302 चा आरोप असलेल्या आरोपींना आपण मतदानाला आणतो आणि इथे मतदानाला आलेले 2 सदस्य आमच्या जवळून नेले. मला लागले त्या दिवशी. धक्काबुक्की झाली. हे सगळे पाहिल्यानंतर आज शिवसेना पक्षाच्या विधिमंडळ शिवसेना पक्षाची बैठक होणार आहे. एकनाथ शिंदे साहेब असतील. व्हीपचे उल्लंघन केले महेश शिंदे यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या आहेत, म्हणजेच भाजपचा अध्यक्ष तिथे आहे. महेश शिंदेंच्या भूमिकेविषयी काय मत आहे? असा प्रश्न विचारला असता तेव्हा शंभूराज देसाई म्हणाले, जे 2 सदस्य शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले, महेश शिंदे यांच्या मतदारसंघातले, ज्यांना एबी फॉर्म शिवसेनेने दिला. त्या 2 सदस्यांना जशी उमेदवारी जाहीर झाली तसे महेश शिंदेंच्या लोकांनी त्यांना नेले. म्हणजे एका बाजूला पक्षाच्या सदस्यांना न्यायचे काय कारण? त्यांच्या सौभाग्यवती भाजपच्या चिन्हावर निवडून आले, त्यावर आमचे दुमत नव्हते. पण शिवसेनेच्या सदस्यांना नेऊन जिथे भाजपचे सदस्य बसले होते, तिथे नेऊन बसवले. इथे व्हीपचे उल्लंघन केले आहे. यावर आम्ही आमचे मत मांडणार आहोत. साताराचे एसपी घरगड्यासारखे वागले मला जखम झाली याबद्दल जेव्हा माध्यमांमधून एकनाथ शिंदे यांना समजले तेव्हा त्यांचा कॉल अल आणि काळजी घेण्यासाठी सांगितले होते. त्यानंतर रात्री मी सविस्तर फोन करून त्यांना माहिती दिली असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. हे बघा मी 40 वर्ष राजकारणात आहे. कधीच पोलिसांकडून लोकप्रतिनिधींना हातापायी झाली नव्हती. अशा पद्धतीने दोन कॅबिनेट मंत्री, पोलिसांचा वापर, म्हणजे साताराचे एसपी घरगड्यासारखे वागले आहेत, असा आरोप देसाई यांनी केला. अधिवेशन झाल्यावर तीव्र पडसाद उमटणार पुढे बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, लोकांच्या भावना तीव्र आहेत. जे भोगले आहे ते लोकांना समजले पाहिजे, संपूर्ण जिल्ह्यात तीव्र भावना आहेत. सगळे कार्यकर्ते आम्ही इकडे अधिवेशनात आहोत म्हणून शांत आहेत. अधिवेशन झाल्यानंतर आम्ही जेव्हा यांच्या जिल्ह्यात जाऊ तेव्हा उद्रेक नक्की बघायला मिळेल, असा इशाराही देसाई यांनी दिला आहे. पोलिस चुकीचे असतील तर कारवाई होईल- मंत्री जयकुमार गोरे मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, जिल्हा परिषद निवडणूक जेव्हा चालू होती, तेव्हा पोलिसांना दमदाटी करून आत कोण गेले, याची चौकशी झाली पाहिजे. कोण चुकीचा आणि कोण बरोबर हे कोर्ट ठरवेल. तसेच पोलिस जर चुकीचे असतील तर कारवाई होईल.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 10:33 am

विधिमंडळ कामकाज:विधानपरिषदेत सातारा पोलिस आधीक्षकांच्या निलंबनाची मागणी, आम्ही सुरक्षित आहोत की नाही?- शंभूराज देसाई

विधानपरिषदेचे कामकाज सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या गोंधळावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी सातारा जिल्ह्याच्या पोलिस आधीक्षकांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सवाल उपस्थित केला की आम्ही सुरक्षित आहोत की नाही?

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 10:22 am

हर्षवर्धन महाराष्ट्र केसरी, भगूरला जल्लोष:ढोल ताशांच्या गजरात लहानमुलांसह तरुणांनी जल्लोष साजरा केला

६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकचा हर्षवर्धन सदगीर याने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा ४-३ ने रोमहर्षक विजय मिळवला. या विजयाचा भगूर येथील बलकवडे व्यायामशाळेसमोर ढोल ताशांच्या गजरात लहानमुलांसह तरुणांनी जल्लोष साजरा केला. भविष्यात येथून अनेक गुणवंत मल्ल राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकतील, असा विश्वास पहिलवान गोरख बलकवडे यांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 10:04 am

एकसारखे रुद्राक्ष माळेचे गंडे, हा निव्वळ योगायोग:रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरेंचा फोटो शेअर करत सुषमा अंधारेंनी डिवचले

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे शंभर पेक्षा अधिक व्हिडिओ समोर येत आहेत. तसेच त्याचे अनेक कारनामे सुद्धा आता उघडकीस येताना दिसत आहेत. यावरून विरोधकांनी अशोक खरात तसेच त्याच्याशी संबंधित सर्वच राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आणखी एक फोटो शेअर करत खोचक टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या फोटोंनी राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे. या फोटोंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या हातातील एकसारख्या 'रुद्राक्ष माळेच्या गंड्या'कडे लाल रंगाने मार्क करून लक्ष वेधण्यात आले असून, 'हा निव्वळ योगायोग आहे,' अशी उपरोधिक टिप्पणी अंधारे यांनी केली आहे. आधीच विविध शंका आणि चौकशीच्या मागण्या होत असताना, या फोटोंमुळे आता या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महाडमधील एका कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सुनील तटकरे यांना माध्यम प्रतिनिधींनी अशोक खरात प्रकरण आणि रुपाली चाकणकर यांच्या संदर्भातील वादावरून प्रश्न विचारला असता, ते चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. ही जागा बोलायची नाही, मला घटनेने अधिकार दिला आहे आणि मी योग्य वेळी बोलेन, असे स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगत तटकरे यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले आणि तिथून निघून जाणे पसंत केले होते. अशोक खरातचा 'दैवी अवतार' पोलिसांनी उतरवला:'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' म्हणत लंगडत आला बाहेर दरम्यान, अशोक खरातने अनेक महिलांवर दैवी शक्ती असल्याचे सांगत उपचारांच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भात अनेक व्हिडिओ देखील आता समोर आले आहेत. तसेच अशोक खरात स्वतःला दैवी अवतार देखील समजायचा. परंतु, त्याचा दैवी अवतार नाशिक पोलिसांनी चांगलाच उतरवल्याचे पाहायला मिळत आहे. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात अशोक खरातला नीट चालताही येत नाहीये, तसेच 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' अशा घोषणा वेदनादायी आवाजात देत असल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 9:45 am

तू मागील जन्मातील अप्सरा, तुझा घटस्फोट विधिलिखित:अशोक खरातचा आणखी एक कारनामा; घटस्फोटीत महिलेसोबत नको ते कृत्य

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला असून, त्याच्याविरोधात आता सरकारवाडा पोलिस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून मार्ग काढण्यासाठी आलेल्या एका विवाहित महिलेला तू मागील जन्मातील अप्सरा आहेस आणि तुझा घटस्फोट विधिलिखित आहे, असे सांगून खरातने तिचा विश्वास संपादन केला. स्वतःला त्रिकाळ ज्ञानी आणि अवतारी पुरुष भासवून त्याने या महिलेच्या वैयक्तिक अडचणींचा गैरफायदा घेतला आणि तिला आपल्या जाळ्यात ओढले. धार्मिक विधी, भविष्यकथन आणि तांत्रिक उपायांच्या नावाखाली खरातने या पीडित महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. महिलेच्या मनात भविष्याबद्दल भीती आणि आमिषे निर्माण करून त्याने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. तांत्रिक विधींच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि शोषण करणाऱ्या या भोंदूबाबाच्या कृष्णकृत्यांचे एकामागून एक पदर आता नाशिक पोलिसांच्या तपासामुळे उलगडू लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे शोषणादरम्यान पीडित महिला गर्भवती राहिली असता, खरातने तिला स्वतःच्या कार्यालयात बोलावून गर्भपाताची औषधे दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर माझ्या नशिबात दोन विवाह आहेत, तू माझ्याशी लग्न कर, मी तुला आणि तुझ्या मुलांना सुखात ठेवेन असे आमिष दाखवून तो सातत्याने तिची फसवणूक करत होता. 2027 मध्ये लग्न करण्याचे खोटे आश्वासन देऊन त्याने पीडितेच्या भावनांशी खेळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अशोक खरातचा 'दैवी अवतार' पोलिसांनी उतरवला:'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' म्हणत लंगडत आला बाहेर नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांवर दैवी शक्ती असल्याचे सांगत उपचारांच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भात अनेक व्हिडिओ देखील आता समोर आले आहेत. तसेच अशोक खरात स्वतःला दैवी अवतार देखील समजायचा. परंतु, त्याचा दैवी अवतार नाशिक पोलिसांनी चांगलाच उतरवल्याचे पाहायला मिळत आहे. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात अशोक खरातला नीट चालताही येत नाहीये, तसेच 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' अशा घोषणा वेदनादायी आवाजात देत असल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 9:00 am

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत सातवीच्या विद्यार्थ्यांना दिला निरोप:उंडणगाव येथे नवोदित आयपीएस व पीएसआय अधिकाऱ्यांचा सत्कार‎

प्रतिनिधी | उंडणगाव उंडणगाव येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. याच कार्यक्रमात नुकतेच आयपीएस पदावर निवड झालेले भिकन जगन रोजेकर (जळगाव सपकाळ) तसेच एमपीएससीद्वारे पीएसआय पदावर निवड झालेले अनिकेत बाजीराव वाघ (खुल्लोड) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुधीर महाजन होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत शाळेतील आठवणींना उजाळा दिला. सत्काराला उत्तर देताना आयपीएस भिकन रोजेकर यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाची कहाणी सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. “आज मी या पदापर्यंत केवळ शिक्षणाच्या जोरावर पोहोचलो आहे. निकालापूर्वीचा आणि निकालानंतरचा माझ्यातील बदल खूप मोठा आहे. सालगड्याचा मुलगा किंवा रिक्षाचालकाचा मुलगा आयपीएस-आयएएस होऊ शकतो, तर तुम्ही का नाही? मोठी स्वप्ने बाळगा आणि जिद्दीने अभ्यास करा,” असे त्यांनी सांगितले. पीएसआय अनिकेत वाघ यांनीही आपल्या साध्या परिस्थितीतून केलेल्या प्रवासाची माहिती देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “माझी परिस्थिती सर्वसाधारण होती, पण मनात जिद्द होती. सातत्याने अभ्यास करत मी एकामागून एक परीक्षा उत्तीर्ण होत गेलो आणि तलाठी पदावरून आज एमपीएससीमार्फत पीएसआय पदावर माझी निवड झाली. तुम्हीही ठरवून जिद चिकाटीने अभ्यास केल्यास नक्की यश मिळवू शकता,” असे त्यांनी सांगितले. ओंकार पाटील, नानाभाऊ सनान्से, खुशालराव शिनगारे, नारायण अहिरे, भीमराव हिवाळे, पद्माकर कुलकर्णी, बाबूराव लांडगे, अजित पाटील, मुख्याध्यापक अनिल लांडगे, मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघमोडे यांच्यासह दोन्ही शाळांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 8:54 am

फुलंब्रीत ईद उत्साहात:२ ठिकाणी नमाज अदा

प्रतिनिधी | फुलंब्री शहरात ईद शांततेत, हर्षोल्लासात साजरी झाली. यंदा पवित्र रमजान महिन्यात पाच शुक्रवार आले होते. रोजे ठेवणाऱ्यांचे ३० रोजे पूर्ण झाले. ३० तरावीहची नमाजही पूर्ण झाली. दरवर्षी असे होत नाही. बहुतांश वेळा २९ रोजे होतात. महिनाभरात अनेक लहान मुलांनी आयुष्यातील पहिले रोजे ठेवले. शहरातील ईदगाह मैदानावर नगरपंचायतीचे जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, उपनगराध्यक्ष जमीर पठाण यांनी नमाजासाठी विशेष लक्ष दिले होते. शहरातून ईदगाह मैदानापर्यंत रस्त्यावर मुरूम टाकला. रस्ता स्वच्छ केला. वजूकरिता पाण्याचा टँकर ठेवला. बकेटची व्यवस्था केली. ईदगाह मैदानावर नमाजासाठी चटईची व्यवस्था केली. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी येणारे पोलिस कर्मचारी, विविध पक्षांचे नेते यांच्यासाठी पेंडॉल, आसन व्यवस्था केली. ही सर्व व्यवस्था नगरपंचायतीतर्फे प्रथमच करण्यात आली. नमाजाची व्यवस्था करण्यात नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, उपनगराध्यक्ष जमीर पठाण, नगरसेवक जावेद खान पठाण, पवन घोडके, हाजी फेरोज पठाण, आरेफ पटेल, शौकत सय्यद, कैफ पठाण, रिजवान खान, आसेफ शेख, रेहान शेख यांनी पुढाकार घेतला होता. स्वच्छता करणारे विजय ताठे, स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही काम केले. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, जगन्नाथ काळे, भाजप जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, अतुल चव्हाण, राजेंद्र पाथ्रीकर, देवगिरी साखर कारखान्याचे संचालक योगेश मिसाळ, पोनि. संजय सहाने, पोउपनि. सुग्रीव चाटे आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 8:48 am

स्मशानभूमी शेडसाठी ५० हजारांची मदत‎:सुरेश वर्मा यांचा पुढाकार; खा. भुमरेंकडून बोरकर कुटुंबीयांचे सांत्वन‎

प्रतिनिधी | लासूर स्टेशन दायगाव (ता. गंगापूर) येथील आध्यात्मिक क्षेत्रात विणेकरी म्हणून परिचित असलेले लक्ष्मण पाटील बोरकर यांचे नुकतेच निधन झाल्याने बोरकर कुटुंबियांना भेट देवून खासदार संदीपान भुमरे यांनी सांत्वन केले. यावेळी लासूर स्टेशन येथील सराफा व्यापारी सुरेशशेठ वर्मा यांनी दिवंगत लक्ष्मण दगडू पाटील बोरकर यांच्या स्मरणार्थ स्मशानभूमीच्या शेड सावलीकरीता ५० हजार रुपयांची मदत दिली आहे. यावेळी माजी आमदार अण्णासाहेब पाटील माने, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप निरफळ, संदीप आढाव, विभाग प्रमुख नितीन कऱ्हाळे, लासूरचे शहरप्रमुख मयुर जैस्वाल व शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दायगाव येथील स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी सावलीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने लासूर स्टेशन येथील सुरेशशेठ वर्मा यांनी नगदी ५० हजार रुपये दिले. याप्रसंगी लासूरचे शहरप्रमुख मयुर जैस्वाल व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी येथील स्मशानभूमीच्या दुरवस्था संदर्भात शेडसह इतर सुविधांची कामे मंजूर असल्याची बाब खासदार भुमरे यांच्या लक्षात आणून दिले असता श्री. भुमरे यांनी स्वतः लक्ष घालून काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यासाठी कल्याण बोरकर यांना पाठपुरावा करण्याचे सांगितले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 8:47 am

‘वैद्यकीय’साठी सामाजिक चळवळ उभी करावी:इंदिरा आयव्हीएफ सेंटरच्या संचालिका डॉ. रोहीणी पतंगे

प्रतिनिधी | कन्नड वैद्यकीय क्षेत्राला स्पर्धा, राजकीय धोरण यामुळे व्यावसायिक स्वरूप आले आहे. प्रत्यक्षात हे सेवाभावी क्षेत्र आहे. वैद्यकीय क्षेत्राला मानवी चेहरा देण्यासाठी सामाजिक चळवळ उभी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन इंदिरा आयव्हीएफ सेंटरच्या संचालिका डॉ. रोहीणी पतंगे यांनी केले. कृषिभूषण डॉ. सिताराम जाधव यांच्या पुढाकारातून कन्नड येथे वंध्यत्व निवारण शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन डॉ. पतंगे यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक डॉ. रविराज जाधव यांनी केले. जाधव नर्सिंग होमच्या वतीने सातत्याने आरोग्यविषयक उपक्रम राबवले जातात, असे ते म्हणाले. आरोग्य साक्षरता वाढली तर नुकसान कमी होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. शिबिरात डॉ. मेघा सूर्यवंशी, डॉ. प्रदीप गायकवाड यांनी रुग्णांची तपासणी केली. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अण्णा शिंदे उपस्थित होते. अशी शिबिरे आरोग्यविषयक जनजागृती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात, असे डॉ. प्रवीण पवार म्हणाले. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्षा फरीन बेगम अब्दुल जावेद, नगरसेवक अब्दुल जावेद, डॉ. सिताराम जाधव, बाजार समितीचे संचालक साईनाथ अल्लाड, शिवाजी थेटे, अॅड. किरण पाटील मगर, प्रकाश काचोळे, गोकुळ राठोड, शेख याकूब, सलमान शेख, नंदकुमार मोरे, डॉ. विलास पाटील, राजू शेख कमिटी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 8:47 am

जमिनीच्या आतमध्ये मंदिर असलेल्या आळंदच्या आसरा माता यात्रेस प्रारंभ:संस्थानाला ब दर्जा मिळाला, राज्यासह परराज्यातील भाविकांची होतेय गर्दी‎

प्रतिनिधी | आळंद फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे हजारो वर्षांपूर्वीचे आसरामातेचे हेमाडपंती मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून ४० ते ४५ फूट खोल चिऱ्यामध्ये हे पुरातन मंदिर उभारले आहे. जागृत देवस्थान असलेल्या आसरामाता देवीच्या यात्रेस गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रारंभ झाला आहे. ही यात्रा १३ दिवस चालते. यात्रेत भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर फुलंब्री-सिल्लोड या दोन्ही तालुक्यांच्या हद्दीवर आळंद गाव वसलेले आहे. येथे जागृत आसरामाता पुरातन मंदिर आहे. राज्य व परराज्यांतूनही भाविक लाखोंच्या संख्येने येतात. मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी आसरामातेच्या चरणी प्रार्थना करतात. आसरामाता देवस्थान पूर्ण पाषाणातून साकारलेले आहे. इतर मंदिरे जमिनीच्या वर आहेत. आसरामाता मंदिर जमिनीच्या आत गाभाऱ्यात साकारलेले आहे. देवस्थानामध्ये सात परकोट मणिदीप म्हणजे बारव आहे. पाषाणी पायऱ्या आहेत. त्यातच पाषाणरूपी मंदिर साकारलेले आहे. मात्र, त्यामध्ये मूर्ती नाही. येथे आल्यानंतर देवस्थान पाहून प्रत्येक जण आश्चर्य व्यक्त करतो. पूर्वी देवस्थानाचे नियोजन गावकऱ्यांकडून देखरेखीमध्ये केले जात होते. २०१२ पासून भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पारदर्शक कारभारासाठी नोंदणी करण्यात आली. आसरामाता संस्थान आळंद या नावाने कामकाज सुरू झाले. विधिवत पूजापाठ, स्वच्छता, सोयीसुविधा यासाठीही व्यवस्था करण्यात आली. संस्थानच्या नियोजनामुळे परिसर स्वच्छ ठेवला जातो. देवस्थानचा समावेश तीर्थक्षेत्र विकासामध्ये झाल्याने संरक्षक भिंत, सिमेंट रस्ता, पथदिवे, परिसरातील सिमेंटीकरण अशी कामे पूर्ण झाली आहेत. भक्तनिवास, वृक्षलागवड, आकर्षक फुलझाडांमुळे परिसर सुंदर झाला आहे. परिसर सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आहे. भाविकांकडून दिल्या जाणाऱ्या देणग्या संस्थानकडे जमा होतात. त्यातून विकासकामे केली जातात. आता विकासकामांना गती मिळणार लक्ष्मणराव चोपडे पाषाण दगडात कोरीव, अत्यंत आकर्षक असलेले हे बांधकाम कोणत्या काळात झाले याचा पुरावा नाही. नवरात्रोत्सवात मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविकांची गर्दी होते. नवरात्रोत्सवात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. काही दिवसांपूर्वी संस्थानला शासनाचा ब दर्जा मिळाला आहे. त्यामुळे विकासकामांना गती मिळणार आहे, अशी माहिती अध्यक्ष लक्ष्मणराव चोपडे यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 8:46 am

प्रतीकची अंधत्वावर मात; भालाफेकमध्ये रौप्य:कठोर सराव आणि जिद्दीच्या जोरावर अल्पावधीतच मिळविले यश‎

येथील २२ वर्षीय खेळाडू प्रतीक पाटील याने अंधत्वावर मात करत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. हल्ली मोबाइलसारख्या तंत्रज्ञान युगातही या खेळाडूने भालाफेक या मैदानी स्पर्धेत विशेष यश संपादन करत शिवन्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दृष्टी कमी झाली तरी स्वप्न मोठी असली तर ती नक्की पूर्ण होतात, हे प्रतीक याने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे. शिवना येथील गजानन विद्यालयात शिक्षण घेत असताना प्रतीक सुरुवातीला विद्यार्थी गटात कबड्डी खेळाडू म्हणून खेळला. दहावी-बारावीचे शिक्षण पूर्ण झाले. मात्र वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यास स्टारगार्ड हा दुर्मिळ डोळ्यांचा आजार असल्याचे निदान झाले. या आजारामुळे त्यांची दृष्टी हळूहळू कमी होत गेली. अचानक आलेल्या या परिस्थितीने त्याचे आयुष्य बदलले, पण त्याने जिद्द सोडली नाही. दृष्टी कमी होत असतानाही प्रतीकने वैद्यकीय उपचारासोबत खेळाची आवड कायम ठेवली. पुढे त्याने पॅरा अॅथलेटिक्समधील एफ १३ जॅव्हलिन थ्रो (भालाफेक) या प्रकारात प्रवेश केला. कठोर सराव आणि जिद्दीच्या जोरावर अल्पावधीतच तो कबड्डी ते भालाफेकफेकपटू झाला. शिक्षक असलेले वडील अमृतराव यांनीही प्रतीकला प्रोत्साहित केले. २०२५ मध्ये झालेल्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत प्रतीक पाटील याने रौप्यपदक पटकावले. त्यानंतर त्याच वर्षी झालेल्या खेलो इंडिया २०२५ स्पर्धेत त्याने कांस्यपदक जिंकत आपली प्रतिभा सिद्ध केली. या वर्षी ८ ते १३ मार्च २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक पॅरा अथलेटिक ग्रँडप्रिक्स २०२६ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतीक पाटीलने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. ही त्याची पहिली आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याची कामगिरी ठरली आहे. आशियाई खेळाकडे लक्ष ^गल्लीपासून दिल्लीपर्यंत मैदानी खेळ गाजवला असून आता आशियाई (एशियाड) स्पर्धेसाठी निवड चाचणी मे महिन्यात हैदराबाद येथे होणार आहे. या स्पर्धेत भाग घेणे व भारताचे प्रतिनिधित्व करणे हे ध्येय आहे. स्वप्नांना पंख मिळाले तर जिद्दीने उडाण भरायला वेळ लागत नाही. माझे पहिले पदक देशाच्या, आई-वडिलांच्या व ग्रामस्थांच्या चरणी अर्पण. -प्रतीक पाटील, भालाफेकपटू

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 8:46 am

शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाहीत- आ. चव्हाण:फुलंब्रीत नुकसानग्रस्त पिकांची केली पाहणी‎

प्रतिनिधी | फुलंब्री तालुक्यात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर रविवारी आ. अनुराधा चव्हाण, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतात पाहणी केली. यावेळी अनुराधा चव्हाण यांनी एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असे शेतकऱ्यांना आश्वासन दिले. पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, जिल्हा परिषद सदस्य गोपाल वाघ, पंचायत समिती सदस्या सविता भगवान कोलते, तहसीलदार योगिता खटावकर, तालुका कृषी अधिकारी पंकज वाळके उपस्थित होते. सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. नुकसान अहवाल लवकर सादर करण्यास सांगितले. केंद्र, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे आमदार चव्हाण म्हणाल्या.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 8:45 am

ट्रकच्या धडकेत वाकोळणीमधील‎एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी‎:पाचोड येथील काम आटोपून गावाकडे जाताना भोकरवाडी शिवारात अपघात

प्रतिनिधी | पाचोड धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भोकरवाडी शिवारात एचपी पेट्रोल पंपासमोर अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात शनिवारी सायंकाळी घडली. यात कल्याण बापूराव कोळकर (५०, रा. वाकोळणी, ता. बदनापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. बप्पासाहेब पराडे (४५, रा. वाकोळणी, ता. बदनापूर) हे किरकोळ जखमी झाले. वाकोळणी येथील दोघे मित्र पाचोड येथे खासगी कामानिमित्त आले होते. काम आटोपून ते दुचाकीने (एमएच २१ बीपी ६०३४) परत निघाले होते. भोकरवाडी शिवारातील एचपी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले. महामार्गावर वळण घेत असताना समोरून भरधाव येणाऱ्या अज्ञात ट्रकने धडक दिली. घटनेनंतर स्थानिकांनी रुग्णवाहिकेला माहिती दिली. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. दोघांना पाचोड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे यांनी कोळकर यांना मृत घोषित केले. पराडे यांच्यावर प्राथमिक उपचार झाले. पाचोड, मुरमा फाटा, आडुळ, रजापूर, जामखेड फाटा, रोहिलागड फाटा येथे वारंवार अपघात होतात. येथे स्पिड ब्रेकर उभारण्याची गरज आहे. तसेच काही ठिकाणी दिशादर्शक फळक तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेकदा रात्री वाहनधारकांना अंदाज येत नाही. शिवाय रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविण्याच्या नादातही अनेकदा अपघात घडतात. खड्ड्यांची दुरूस्ती करणे गरजेचे आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 8:44 am

अशोक खरातचा 'दैवी अवतार' पोलिसांनी उतरवला:'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' म्हणत लंगडत आला बाहेर, VIDEO व्हायरल

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांवर दैवी शक्ती असल्याचे सांगत उपचारांच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भात अनेक व्हिडिओ देखील आता समोर आले आहेत. तसेच अशोक खरात स्वतःला दैवी अवतार देखील समजायचा. परंतु, त्याचा दैवी अवतार नाशिक पोलिसांनी चांगलाच उतरवल्याचे पाहायला मिळत आहे. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात अशोक खरातला नीट चालताही येत नाहीये, तसेच 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' अशा घोषणा वेदनादायी आवाजात देत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सखोल चौकशीनंतर, अशोक खरातला काल युनिट 1 च्या स्वाधीन करण्यात आले. अनेक बडे नेते आणि उद्योजकांना शक्तीवर्धक सिरपचे वाटप करणारा हा 'कॅप्टन' काल गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडताना पूर्णपणे हतबल दिसला. चौकशीच्या फेऱ्यामुळे त्याची अवस्था इतकी केविलवाणी झाली होती की त्याला साधे स्वतःच्या पायावर चालणेही कठीण झाले होते. यावेळी अशोक खरातला दोन पोलिसांच्या मदतीने चालत गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर यावे लागले. दोन्ही बाजूने दोन पोलिसांनी त्याला पकडले होते. अशोक खरात लंगडत आणि कण्हत चालत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या अवस्थेत अशोक खरातची वरातच काढली, जी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे कैद झाली आहे. यावेळी त्याने अत्यंत कष्टाने नाशिक पोलिसांचे ब्रीदवाक्य 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असे कसेबसे पुटपुटले आणि गाडीत बसतानाही स्वतःची मान शेजारच्या पोलिसाच्या खांद्यावर टाकून दिली होती. खरातची ही कमालीची हतबलता दर्शवणारा व्हिडिओ सध्या सर्वत्र जोरदार चर्चेचा विषय ठरत आहे. अशोक खरात प्रकरणात 100 नव्हे, 200 व्हिडिओ!:विजय वडेट्टीवार यांचा दावा, पटोले म्हणाले - विधिमंडळात 'स्थगन प्रस्ताव' आणणार दरम्यान, नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण केले आहे. या प्रकरणात आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. अशोक खरातचे 100 नव्हे तर 200 व्हिडिओ असून त्यातील 90 व्हिडिओ अत्यंत आक्षेपार्ह आहेत, असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर या प्रकरणावरून विधिमंडळात स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 8:42 am

वाळूचे फोटो काढले, म्हणत बाबऱ्यात तरुणाला मारहाण:वडोद बाजार ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल‎

प्रतिनिधी | खामगाव बाबरा येथील बाबर नदीत वाळू वाहतुकीचे व्हिडिओ, फोटो काढून व्हायरल केल्याच्या कारणावरून वाळू तस्करांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे नदीकाठचे शेतकरी भयभीत झाले असून वाळू तस्करांना अभय कुणाचे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. वडोदबाजार हद्दीत भरधाव ट्रॅक्टर, हायवा भरदिवसा बिनबोभाट वाळू वाहतूक करत असल्याचा आरोप आहे. अवैध धंद्यांबाबत वरिष्ठांना पुरावे दिल्यावर प्रशासकीय कर्मचारी, पोलिस तक्रारदाराची ओळखच उघड करतात. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांची मस्ती वाढल्याचा आरोप तक्रारीत आहे. कुणाल चव्हाण याने दिलेल्या तक्रारीनुसार १८ मार्च रोजी रात्री ९ वाजता विनोद बोलकर याने मोबाइलवर संपर्क केला. “तू आमच्या ट्रॅक्टरची वाळूची व्हिडिओ क्लिप फुलंब्री तहसीलदारांना का पाठवली, त्यामुळे आम्हाला तहसीलमध्ये दंड भरावा लागला,” असे तो म्हणाला. कुणालने “मी क्लिप पाठवलेली नाही. उद्या बाबरा येथे येऊन भेटतो. खरे काय ते सांगतो,” असे सांगून फोन बंद केला. तक्रारीनुसार १९ मार्चला बाबरा शिवारात कुणाल उभा असताना शंकर बोलकर, अक्षय मैंद, विनोद बोलकर तेथे आले. त्यांनी पुन्हा क्लिप पाठवल्याचा आरोप करत शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच कुणालला ८ ते १० जणांनी अडवून मारहाण केल्याचाही आरोप आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 8:41 am

महाराष्ट्रात भोंदूगिरीचा विळखा; तेरा वर्षांत जवळपास 2 हजार गुन्हे दाखल:सर्वाधिक महिला शोषण; जादूटोणा कायद्याने गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले

महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरुद्ध ‘जादूटोणाविरोधी कायदा २०१३’ लागू होऊन १३ वर्षे उलटली आहेत. या काळात राज्याने भोंदूगिरीविरुद्ध मोठी लढाई लढली असून आतापर्यंत सुमारे २ हजारहून अधिक भोंदूबाबा आणि मांत्रिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दशकात दरवर्षी सरासरी ७० ते १०० महिलांनी या भोंदूबाबांकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक शोषणाविरुद्ध तक्रारी नोंदवल्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि महाराष्ट्र पोलिसांच्या आकडेवारीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवले गेले आहेत. आजार बरे करणे, गुप्तधनाचा मोह, अपत्यप्राप्ती किंवा कौटुंबिक कलह दूर करण्याच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढले जाते. त्यानंतर ‘दैवी शक्ती’ किंवा ‘कोपा’ची भीती दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केले जाते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो आणि महाराष्ट्र पोलिसांच्या आकडेवारीनुसार, सुरुवातीच्या काळात या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होते, परंतु जनजागृतीमुळे तक्रार करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. इनसाइट स्टाेरी - आजच्या काळात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे अंधश्रद्धा केवळ ग्रामीण किंवा अशिक्षित भागात असते असे सहसा मानले जाते. परंतु, शहरातील उच्चशिक्षित लोकदेखील मानसिक ताण, करिअरमधील स्पर्धा आणि कौटुंबिक वादांमुळे ‘शॉर्टकट’ म्हणून भोंदूबाबांकडे वळत आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील पुसट रेषा ओळखून नागरिकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. कोणत्याही बाबा-बुवांच्या आहारी न जाता कायद्याचा आधार घ्यावा. कायद्याचा धाक, पण शिक्षेचे प्रमाण कमी महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा २०१३ मुळे पीडितांना तक्रार करण्याचे बळ मिळाले आहे. मात्र, पुराव्यांचा अभाव आणि साक्षीदार फितूर होण्यामुळे शिक्षेचे प्रमाण अजूनही आव्हानात्मक आहे. कायद्यात ६ महिने ते ७ वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद असली तरी सामाजिक भीतीपोटी आजही अनेक महिला तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. प्रत्यक्षात घडणाऱ्या घटनांची संख्या ही नोंदवलेल्या गुन्ह्यांपेक्षा ३ ते ४ पटीने जास्त असण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दिव्य मराठी एक्स्पर्ट - अॅड. मुक्ता दाभोलकर, सामाजिक कार्यकर्त्या, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे नियम झालेले नाहीत : महाराष्ट्रात जादूटोणा कायदा २०१३ रोजी तयार झाल्यानंतर अनेक केसेस उजेडात येत आहेत. मागील १२-१३ वर्षात जवळपास २ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये महिलांच्या शोषणाच्या गुन्ह्याचे प्रमाण मोठे आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांकडे दररोज तक्रारी येत असतात. पण लोक तक्रार दाखल करायला तयार नसतात. या कायद्यात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. पण काही वेळा पोलिसदेखील तक्रारदार व्हायला तयार नसतात. महाराष्ट्रात नरबळी होतात हे कोणीच मान्य केले नसते, पण या कायद्याने समोर आले. कायदा झाला असला तरी कायद्याचे नियम झालेले नाहीत.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 7:34 am

घर खरेदीदारांची फसवणूक केल्यास बिल्डरांच्या मालमत्ता होणार जप्त:792 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी राज्य सरकारने उचलली आता कडक पावले

राज्यात घर खरेदीदारांची फसवणूक करणाऱ्या आणि महारेराच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या विकासकांविरुद्ध ( बिल्डर) आता राज्य सरकारने कडक पाऊले उचलली आहेत. गृहखरेदीदारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विकासकांच्या मालमत्तांचा लिलाव करणे, बँक खाती सील करणे आणि मालमत्ता जप्तीची प्रक्रिया राबवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आमदार अमोल मिटकरी, विक्रम काळे व इतर सदस्यांन परिषदेती विचारलेल्य तारांकित प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात हे स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले की, महारेरा स्थापन झाल्यापासून (१ मे २०१७) घराचा ताबा न देणाऱ्या बिल्डरांविरुद्ध १,२९१ तक्रारदारांच्या बाजूने ७९२ कोटींच्या वसुलीचे आदेश डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत काढण्यात आले आहेत. यामध्ये जेव्हिपीडी (जुहू विलेपार्ले डेव्हलपमेंट) आणि मार्वेल ग्रुप सारख्या मोठ्या नावांचाही समावेश आहे. मार्वेल ग्रुपविरुद्ध ३३ वॉरंटद्वारे ९८ कोटींच्या वसुलीचे आदेश होते. त्यापैकी २७ कोटी वसूल झाले असून, उर्वरित ३८ कोटींच्या वसुलीसाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारवाई सुरू आहे. जुहू विलेपार्ले येथील या विकासकाच्या मालमत्तेचा लिलाव काढण्यात आला होता, मात्र सध्या न्यायालयीन स्थगितीमुळे ही प्रक्रिया थांबली आहे असे शिंदे यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयांकडून लिलाव यशस्वी न होणे किंवा मालमत्ता न सापडणे अशा तांत्रिक कारणांमुळे वसुलीस विलंब होत होता. मात्र, आता हे वॉरंट गांभीर्याने राबवण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. घराचा ताबा वेळेवर न मिळाल्यामुळे व्याजासह परतावा मिळण्याच्या तक्रारींची संख्या अधिक जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मुंबई शहर, उपनगर, पुणे, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये रेरा वॉरंट वसुलीसाठी ‘जिल्हा समन्वय अधिकारी’ आणि ‘समर्पित महसूल वसुली अधिकारी’ यांची नियुक्ती २२ एप्रिल २०२५ च्या शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे. जे विकासक दंडाची रक्कम किंवा परतावा देण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांच्या मालमत्ता जप्त करणे, बँक खाती सील करणे आणि मालमत्तांचा लिलाव करून पैसे वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. क्षेत्रफळ कमी दिल्याच्या तक्रारींचे काय? करारानुसार कमी चटई क्षेत्र दिल्याबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात नसल्याचे सरकारने स्पष्ट केले. मात्र, घराचा ताबा वेळेवर न मिळाल्यामुळे व्याजासह परतावा मिळण्याच्या तक्रारींची संख्या अधिक असल्याचे सांगण्यात आले. इनसाइट स्टाेरी- मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांची लूट सामान्य माणूस आयुष्याची पुंजी, पीएफ मधील पैसे आणि बँकेचे कर्ज काढून ‘पै-पै’ जमा करतो. बिल्डर या भावनेचा फायदा घेऊन सुरुवातीला आकर्षक जाहिरातींद्वारे जाळ्यात ओढतात आणि नंतर ताबा देण्यास वर्षे न् वर्षे विलंब करून ग्राहकाला दुहेरी आर्थिक फटका देतात. करारात नमूद केलेले ‘कार्पेट एरिया’ प्रत्यक्षात देताना तांत्रिक नियमांच्या नावाखाली कमी दिले जाते. प्रत्येक चौरस फुटासाठी हजारो रुपये मोजणाऱ्या ग्राहकाची अशा प्रकारे लूट केली जाते.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 7:30 am

तीन दिवस तुळजाभवानी मातेचे 22 तास दर्शन‎:31 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत सुविधा, चैत्र पौर्णिमेत छबिन्याचे आकर्षण‎

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक‎असलेल्या आई तुळजाभवानीचा‎चैत्र पौर्णिमा उत्सव ३० मार्च ते ३‎एप्रिल या कालावधीत साजरा‎होणार अाहे. या कालावधीत ३१‎मार्च ते २ एप्रिलदरम्यान‎तुळजाभवानीचे मंदिर ३ दिवस‎दररोज २२ तास दर्शनासाठी खुले‎राहणार आहे. या तीन दिवसांत‎छबिन्याचे आकर्षण असणार आहे.‎ तुळजाभवानी मातेच्या चैत्र‎पोर्णिमा उत्सव कालावधीत‎राज्यभरासह कर्नाटक, आंध्र प्रदेश,‎तेलंगणा या राज्यातून १५ लाख‎भाविक दर्शनासाठी येणार आहेत.‎यंदा भाविकांची संख्या गतवर्षीच्या‎तुलनेत यंदा तीन लाखांची वाढ‎होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने‎भाविकांसाठी पिण्याचे पाणी,‎सावलीची व्यवस्था करण्यात येत‎आहे. देवस्थानच्या वतीने‎दिवसभराचे दर्शन झाल्यानंतर‎रात्रीच्या वेळी परिसराची स्वच्छता‎केली जाते. या शिवाय हळदी-‎कुंकू, खेळणी, पाळणीचे स्टाँल‎लावण्यात येत आहेत. पौर्णिमा‎उत्सवादरम्यान उन्हाचा पारा‎वाढण्याची शक्यता लक्षात घेता‎मंदिरात शेडनेट टाकून सावलीची‎व्यवस्था करण्यात येत आहे.‎जागोजागी भाविकांना रांगेतच‎ओआरएस उपलब्ध करुन दिले‎जाईल. त्यासाठी स्वयंसेवक‎नियुक्त केले जाणार आहेत.‎ उत्सवाच्या काळात २४ तास वीजपुरवठा‎ दर्शनासाठी राज्यभरासह परराज्यातील भाविकांची मोठी‎गर्दी होणार आहे. त्यात २२ तास मंदिर दर्शनासाठी खूले‎राहणार असल्याने २४ तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे‎आदेश प्रशासनाने महावितरणला देण्यात आले आहेत.‎ शहराबाहेर वाहने लावून दर्शनाला जावे‎ वाहतूक कोंडी व पार्किंगची होणारी अडचण लक्षात घेता‎घाटाच्या खालून वाहतूक बायपासने वळविण्यात येणार‎आहे. त्यामुळे भाविकांना शहराबाहेर वाहने लावून‎दर्शनासाठी यावे लागणार आहे.‎ उत्सवात असे असतील‎दैनंदिन कार्यक्रम‎ दोन लाखांपेक्षा अधिक‎भाविकांना ओआरएस‎ चैत्र पोर्णिमा यात्रा उत्सव कालावधीत‎किमान १५ लाख भाविक दर्शनासाठी‎येणार आहेत. वाढणारा उष्मा पाहता पाच‎दिवस दररोज ४० हजार याप्रमाणे २ लाख‎भाविकांना ओआरएस देण्यात येणार‎आहे. त्यानुषंगाने प्रशासनाने नियोजन‎केले आहे. या शिवाय भाविकांना थंड‎पाण्याचीही व्यवस्था करण्यात येईल.‎

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 7:23 am

मागास प्रवर्गात जातीच्या समावेशासाठी 250 पैकी किमान 125 गुण आवश्यक:आतापर्यंत फक्त 37 गुणांवर केला जात होता समावेश, 46 प्रकरणे प्रलंबित

आरक्षणाच्या पात्रतेसाठी आता केवळ सामाजिक मागासलेपण पुरेसे ठरणार नाही. राज्य मागासवर्ग आयोगाच्या नव्या निकषांनुसार, मागास प्रवर्गात कोणत्याही जातीचा समावेश होण्यासाठी २५० गुणांपैकी किमान ५० टक्के म्हणजेच १२५ गुण मिळवणे अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत ३७ गुणांवरही समावेश केला जात होता. नव्या नियमामुळे मागास प्रवर्गात समावेशावर सुनावणीसाठी प्रलंबित असलेल्या ४६ प्रकरणांचा निकाल रखडू शकतो. अनेक जातींच्या समावेशाचा मार्ग खडतर होण्याची चिन्हे आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केला. गेल्या वर्षभरात आयोगाच्या प्रशासकीय कामावर ३ कोटी ३७ लाख ७६ हजार ३५२ रुपये खर्च झाले, मात्र निकालाचा वेग मात्र कासवाच्या गतीने सुरू आहे. खर्च कोटींत, निकाल मात्र ८ आयोगाकडे सुनावणीसाठी एकूण ५४ प्रकरणे होती. त्यापैकी वर्षभरात केवळ ८ निकाली निघाली असून, ४६ प्रकरणे अजूनही प्रलंबित आहेत. यामध्ये कुणबी पोटजाती (झाडे, तिलोरी, खैरे), बंजारा, लबाना आणि मुस्लीम उपजातींचा समावेश आहे. विशेष म्हणजे १८ प्रकरणांची क्षेत्रपाहणी रखडली आहे. दिव्य मराठी नॉलेज - न्यायालयात आव्हान शक्य पूर्वीच्या मागासवर्ग आयोग, समितीचे जात आरक्षणाचे निकष (खत्री आयोग- २० गुण, बापट आयोग - २५ गुण, गायकवाड आयोग- ३७ गुण) मर्यादित होते. नव्या २५० गुणांच्या पॅटर्नमध्ये सामाजिक (१००), शैक्षणिक (८०) आणि आर्थिक (७०) अशा तिन्ही स्तरांवर सूक्ष्म आकडेवारीची अट टाकण्यात आली आहे. यामुळे केवळ ‘हो-नाही’ या उत्तरावर गुण मिळणार नाहीत, तर ठोस पुराव्यांची गरज असेल. एकुणात १२५ गुणांची अट पार करणे आता तांत्रिकदृष्ट्या अधिक आव्हानात्मक झाले असून यामुळे पात्रतेचा दर्जा उंचावला आहे. मात्र, २५० गुणांच्या निर्णयाला समानतेचे तत्त्व, मागील आयोगाचे निकष, आकडेवारी तसेच नैसर्गिक न्याय या मुद्द्यावर न्यायालयात आव्हान देता येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 7:16 am

साबणाच्या बुडबुड्यांना दिला 3-डी आकार!:नागपूरचे संशाेधक डॉ. अजिंक्य कोत्तावार यांचे संशोधन, कन्येच्या नावे पेटंट

एरवी साबणाचे बुडबुडे हा लहान मुलांचा मनोरंजनाचा खेळ म्हणून आपण सहज हवेत उडवून सोडून देतो. पण त्यालाही गणितीय परिमाणे असतात. महाराष्ट्राचे क्रियाशील संशोधक असलेले डॉ. अजिंक्य कोत्तावार यांनी साबणाच्या बुडबुड्यांना त्रिमितीय (३-डी) आणि विविध भौमितिक आकार देण्याचा अद्भुत शोध लावला. विशेष म्हणजे त्याचे पेटेंट त्यांनी आपल्या तीन वर्षीय चिमुकल्या कन्येच्या नावे नोंदवले. त्यामुळे त्यांची कन्या गोजिरी अजिंक्य कोत्तावार ही जगातील सर्वात लहान वयाची आंतरराष्ट्रीय पेटंटधारक बनली आहे. गोजिरी एकेदिवशी साबणाचे बुडबुडे हवेत उडवत असताना वडिलांनी बघितले. सहसा ते गोल आकाराचे असतात. मात्र तिच्या वडिलांनी संशोधक दृष्टीने लक्ष देऊन त्यात आकार शोधले. नंतर या संशोधनाचे पेटंट त्यांनी आपली मुलगी गोजिरीच्या नावे नोंदवले. या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी जर्मनी सरकारकडून २० नोव्हेंबर २०२५ रोजी तिला अधिकृत पेटंट प्रदान करण्यात आले. त्याची “ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने देखील जागतिक विक्रम म्हणून नोंद घेतली आहे. डॉ. अजिंक्य कोत्तावार हे स्वतः नामवंत संशोधक आहेत. त्यांच्या नावावर तब्बल ४८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट्स आहेत. शिक्षण आणि शेती क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे “पद्मश्री’ पुरस्कारासाठी देखील त्यांचे नामांकन झाले आहे. यवतमाळ येथे त्यांनी ‘ऊबुंटू’ नावाची प्रयोगशील शाळा सुरू केली असून तिथे मुलांना ‘प्रयोगातून शिक्षण’ दिले जाते. बुडबुडे गोल नाही, त्रिकोणी, चौकोनी आकार धारण करतात लहान मुलांना साबणाचे बुडबुडे उडवायला खूप आवडतात. मात्र, सहसा हे बुडबुडे गोल आकाराचेच असतात. गोजिरीच्या या संशोधनामुळे या बुडबुड्यांना थ्रीडी स्वरूप प्राप्त झाले आहे. या संशोधनात एक खास आकाराचा बेस तयार करण्यात आला. या बेसच्या साहाय्याने हवेत बुडबुडे सोडल्यास ते गोल न राहता विज्ञानातील थ्रीडी आकार धारण करतात.

दिव्यमराठी भास्कर 23 Mar 2026 6:49 am

आयकर विभागाकडून खरातची चौकशी

चौकशीचा ससेमिरा, अमाप संपत्तीचा पर्दाफाश होणार? नाशिक : प्रतिनिधी लैंगिक अत्याचार प्रकरणातील अशोक खरातच्या चौकशीत आता आयकर विभागाचीही एन्ट्री झाली आहे. त्याच्या मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि उत्पन्नाचे स्रोत यांची सखोल चौकशी केली जात आहे. देणगीदार, भागीदार आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यात येणार असल्याने यातून मोठा आर्थिक घोटाळाही समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात […] The post आयकर विभागाकडून खरातची चौकशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Mar 2026 1:28 am

सामाजिक ऐक्यासाठी सम्यक विचार गरजेचे

लातूर : प्रतिनिधी अनेक प्रख्यात साहित्यीकांनी, विचारवंतांनी, महापुरुषांनी आपल्या साहित्य संपदेतून पोक्त समाज निर्मिती व सामाजिक ऐक्यासाठी सम्यक विचारांची मांडणी केली आहे. सम्यक विचारधाराच सामाजिक विचारांचे व्यापकत्व प्रतीत करीत असते, असे प्रतिपादन प्रसिध्द समिक्षक, विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले. सम्यक साहित्य विचारमंच, लातूर यांच्यावतीने ‘साहित्य, समाज, सम्यक विचार आणि परितर्वन’ या विषयावर जाहीर व्याख्यानाच्या […] The post सामाजिक ऐक्यासाठी सम्यक विचार गरजेचे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 11:21 pm

‘हिरकणी हाट’ चे उद्घाटन

लातूर : प्रतिनिधी जिल्हा स्तरीय बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘हिरकणी हाट’ या विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन लातूर जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील याच्या हस्ते मोठया उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, राज्य कृषी मूल्य अध्यक्ष पाशा पटेल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार […] The post ‘हिरकणी हाट’ चे उद्घाटन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 11:19 pm

जि. प. सेसमधून २ बालकांवर कॉक्­लीअरइम्­प्­लांट शस्­त्रक्रिया

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग व दिव्यांग सक्षमीकरण विभागाअंतर्गत वैयक्तीक लाभाच्या अनेक योजना राबविल्या जातात. याअंतर्गत कर्णबधिर, दिव्यांग व्यक्तींना कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यासाठी अर्थसहाय्य ही योजना राबविण्यात आली. सदर योजनेअंतर्गत लातूरच्या गोरे कान, नाक, घसा हॉस्पिटलमध्ये २ बालकांवर कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी […] The post जि. प. सेसमधून २ बालकांवर कॉक्लीअरइम्प्लांट शस्त्रक्रिया appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 11:18 pm

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवीन गुळ मार्केट येथे १०१ वृक्ष लागवड

लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कृषि उत्पन्न बाजार समितीचे नविन गुळ मार्केट जनावर बाजार आवारात विविध प्रकारच्या १०१ वृक्षांची लागवड शनिवारी बाजार समितीचे सभापती जगदिशराव बावने यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण पाटील, युवराज जाधव, श्रीनिवास शेळके, आनंद […] The post कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवीन गुळ मार्केट येथे १०१ वृक्ष लागवड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 11:17 pm

बारावीनंतर करिअरची निवड करताना आवड, क्षमता, संधीचा संगम साधा

लातूर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी-निवडी, क्षमता आणि भविष्यातील उद्दिष्टे लक्षात घेऊन करिअरची निवड करणे अत्यावश्यक आहे. योग्य मार्गदर्शन, तज्ज्ञांचे सल्ले तसेच विविध क्षेत्रांबाबतची सखोल माहिती यांचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य दिशा निश्चित करता येते, असे प्रतिपादन एमआयटी करिअर गाईडन्स सेलचे प्रमुख बळीराम हांडगे यांनी केले. एमआयटी शिक्षण संस्था समूह, लातूर यांच्या […] The post बारावीनंतर करिअरची निवड करताना आवड, क्षमता, संधीचा संगम साधा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 11:16 pm

उद्धव ठाकरेंसह 9 जणांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपणार:उद्या सभागृहात दिला जाणार निरोप, 13 मे रोजी टर्म होणार पूर्ण

महाराष्ट्र विधानपरिषदेतील राजकीय समीकरणे आता बदलण्याच्या उंबरठ्यावर आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधानपरिषदेच्या एकूण ९ सदस्यांचा कार्यकाळ येत्या १३ मे रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर, उद्या या सर्व सदस्यांना सभागृहात अधिकृतपणे निरोप दिला जाणार आहे. हे सर्व सदस्य विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिले गेले होते. उद्या सभागृहात निरोप दिला जाणाऱ्या सदस्यांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या निरोपामुळे शिवसेना (यूबीटी) ची विधानपरिषदेतील उपस्थिती आणि मांडणीत बदल होणार आहे. तसेच विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचाही कार्यकाळ संपत असल्याने, या रिक्त होणाऱ्या जागांवर आता कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उद्या निरोप देण्यात येणाऱ्या आमदारांमध्ये भाजपचे चार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर काँग्रेसचा एक सदस्य निवृत्त होणार आहे. या नऊ आमदारांची निवड 14 मे 2020 रोजी करण्यात आली होती. उद्या निरोप दिले जाणारे विधानपरिषदेचे आमदार १) उद्धव ठाकरे - शिवसेना (UBT) २) नीलम गोऱ्हे - शिवसेना (शिंदे) ३) अमोल मिटकरी - राष्ट्रवादी (अजित पवार) ४) शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी (शरद पवार) ५) राजेश राठोड - काँग्रेस ६) संदीप जोशी - भाजप ७) दादाराव केचे - भाजप 8) रणजितसिंह मोहिते-पाटील - भाजप ९) संजय केनेकर - भाजप पुढील राजकीय वाटचाल कशी? येत्या १३ मे रोजी या सदस्यांचा कार्यकाळ अधिकृतपणे संपल्यानंतर या ९ जागा रिक्त होतील. हे सर्व सदस्य विधानसभा कोट्यातून निवडून आलेले असल्याने, आगामी काळात विधानसभेतील पक्षीय बलाबलानुसार या जागांचे वाटप होणार आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला सर्वाधिक ४ जागा आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेत्यांची गणिते आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरणार आहेत.

दिव्यमराठी भास्कर 22 Mar 2026 11:10 pm

अशोक खरात प्रकरणात 100 नव्हे, 200 व्हिडिओ!:विजय वडेट्टीवार यांचा दावा, पटोले म्हणाले - विधिमंडळात उद्या 'स्थगन प्रस्ताव' आणणार

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण केले आहे. या प्रकरणात आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी सरकारवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. अशोक खरातचे १०० नव्हे तर २०० व्हिडिओ असून त्यातील ९० व्हिडिओ अत्यंत आक्षेपार्ह आहेत, असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर या प्रकरणावरून उद्या विधिमंडळात स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, ज्यांच्या हातात जनतेने विकासाची दोरी दिली, ते आज भोंदूबाबासोबत ज्योतिषाची दोरी ओढत आहेत. अशा प्रकारची भोंदूगिरी जोपासण्यासाठी केवळ भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. या २०० व्हिडिओंमध्ये अनेक मंत्री आणि आयएएस (IAS) दर्जाचे अधिकारी अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. केवळ महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊन भागणार नाही, तर या सर्व दोषींची तातडीने गच्छंती झाली पाहिजे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली. महिला असल्यानेच चाकणकरांना टार्गेट केले का? नाना पटोले यांनी या प्रकरणात लैंगिक भेदभावाचा मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरले. रूपाली चाकणकर महिला असल्याने त्यांना टार्गेट केले जात आहे का? ज्या मंत्र्यांचे फोटो आणि संबंध समोर आले आहेत, त्यांचे राजीनामे सरकार कधी घेणार? असा सवाल पटोले यांनी विचारला. मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांचाही यात समावेश असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला. तो' पेनड्राईव्ह मुख्यमंत्र्यांनी का लपवला? नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मागच्या अधिवेशनात मी नाशिकच्या एका मुद्द्यावर विधानसभेत एक पेनड्राईव्ह दिला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी तो का लपवून ठेवला? जर तेव्हाच कारवाई झाली असती, तर आज महाराष्ट्र इतका बदनाम झाला नसता. अशोक खरात प्रकरणात कोणत्याही मागणीशिवाय सरकारने तातडीने एसआयटी (SIT) का स्थापन केली? हे प्रकरण दाबण्यासाठी तर हा प्रयत्न नाही ना? अशी शंका नाना पटोले यांनी व्यक्त केली. उद्या सभागृहात रणकंदन होण्याची चिन्हे उद्या विधानसभेत या प्रकरणी 'स्थगन प्रस्ताव' आणून सरकारकडून सविस्तर खुलासा मागणार असल्याचे नान पटोले यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्याच्या भूमीत असे प्रकार घडणे दुर्दैवी आहे. गरज पडल्यास या नैतिक जबाबदारीवरून आम्ही सरकारचा राजीनामा मागू, असा थेट इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे. अधिकारीच खरातला वाचवायचा प्रयत्न करताहेत दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही अशोक खरात प्रकरणावरून अनेक मोठे दावे केलेत. राज्य सरकारमधील उच्च पदावर बसलेले अधिकारीच लिंगपिसाट अशोक खरातला वाचवायचा प्रयत्न करत आहेत, सर्व कायदेशीर मदत करत आहेत अशी माहिती समोर येत असल्याचे सपकाळ म्हणाले. तसेच त्या उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या अभिजीत भांडे पाटील यांच्या पत्नीची महाराष्ट्राचा एपस्टीन अशोक खरातच्या पत्नीबरोबर जमिनीत भागीदारी असल्याची ही माहिती असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. राज्य शासनातील अधिकारी असलेल्या व्यक्तिच्या पत्नीच्या नावावर कंपन्या, रिअल इस्टेट फर्म्स, स्टार्टअप…आणि भोंदू बाबा अशोक खरात सोबत उघड भागीदारी. सत्तेत बसलेल्यांचा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य तरी आहे का? यांनी कागदपत्रांमध्ये दिलेला पत्ता ही ठाण्याचा आहे, हा खरंतर योगायोगच म्हणावा लागेल, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत.

दिव्यमराठी भास्कर 22 Mar 2026 10:46 pm

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधी पक्षांचे ७ आरोप

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी संसदेत विरोधी खासदारांनी नोटीस दिली आहे. लोकसभा-राज्यसभेत आणलेल्या नोटीसमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांवर ७ आरोप लावण्यात आले आहेत. ते सरकारच्या इशा-यावर काम करतात असे म्हटले आहे. ज्ञानेश कुमार यांनी रकफ द्वारे लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला, असा विरोधकांचा आरोप आहे. नोटीसमध्ये त्यांच्या नियुक्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित […] The post मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात विरोधी पक्षांचे ७ आरोप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 10:00 pm

डॉ. जनार्दन वाघमारे सरांचे स्मारक लातुरात व्हावे

लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, सुप्रसिद्ध साहित्यिक, नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू, माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी नांदेडच्या नरहर कुरुंदकर स्मारकाच्या धर्तीवर लातूर येथे त्यांचे स्मारक उभे राहिले पाहिजे, त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीचीही गरज आहे, असा सूर लातूर येथे शुक्रवारी आयोजित डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या श्रद्धांजली सभेत अनेक मान्यवर […] The post डॉ. जनार्दन वाघमारे सरांचे स्मारक लातुरात व्हावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 9:55 pm

विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन

नागपूर : विदर्भातील ज्येष्ठ नेते, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक दत्ता राघाबोजी मेघे यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४० वर्षांहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या दत्ता मेघे यांनी राजकारण, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर आपली छाप पाडली. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे […] The post विदर्भातील ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 9:53 pm

लातूरच्या दिशा प्रतिष्ठानतर्फे १६ विद्यार्थ्यांना धनादेश वाटप

लातूर : प्रतिनिधी एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने कार्यरत असलेल्या दिशा प्रतिष्ठानच्या वतीने १६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क करिता २ लाख ५३ हजार रुपयांचे धनादेश (चेक) वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. संजय शिवपूजे, राजेश मित्तल, विजय पस्तापुरे, अग्रवाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या […] The post लातूरच्या दिशा प्रतिष्ठानतर्फे १६ विद्यार्थ्यांना धनादेश वाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 9:49 pm

भारतातील दहशतवादी घटनांमध्ये ४३% घट

नवी दिल्ली : भारतात गेल्या एका वर्षात दहशतवादी घटनांमध्ये ४३% घट नोंदवली गेली आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०२६ च्या यादीत भारत १३ व्या स्थानावर आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत भारत दोन स्थानांनी खाली आला आहे. यापूर्वी भारत ११ व्या स्थानावर होता. त्याचबरोबर, यादीनुसार दक्षिण आशिया सलग दहाव्या वर्षी दहशतवादाने सर्वाधिक प्रभावित क्षेत्र राहिले आहे. पहिल्यांदाच […] The post भारतातील दहशतवादी घटनांमध्ये ४३% घट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 9:48 pm

हिंगोलीत भागवत कथा वाचन:खऱ्या अन् खोट्या साधूंमधील फरक ओळखणे आवश्‍यक; प. पू. रमेशभाई ओझा यांचे प्रतिपादन

सध्या काही लोक केवळ साधूंच्या वेशभूषा आणि दिखावा करून लोकांना फसवतात व पैशावर डल्ला मारतात. त्यामुळे खऱ्या आणि खोट्या साधूंमध्ये फरक ओळखणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत प. पू. रमेशभाई ओझा यांनी रविवारी ता. २२ येथे व्यक्त केले. येथील रामलिला मैदानावर गणराज गणेश मंडळाच्या वतीने आयोजित भागवत कथा वाचन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलतांना रमेश भाई ओझा म्हणाले की, संसारात दिसणारे सुख हे अनित्य आहे. परिवारात अशांतता, कलह आणि तणाव निर्माण होणे हीच संसाराची खरी ओळख आहे. तरीही माणूस या दुःखमय अवस्थेलाच सुख समजून त्यात अडकून राहतो. खरा आनंद हा बाह्य वस्तूंमध्ये नसून अंतर्मनात आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनात आहे. सद्गुरूच माणसाला योग्य दिशा दाखवतात, असे त्यांनी स्पष्ट केले. कर्ममार्ग आणि भक्तीमार्ग यातील फरक स्पष्ट करताना ते म्हणाले की, कर्ममार्गावर चालणाऱ्या व्यक्तीला सुख हवे असते, तर भक्तीमार्गातील व्यक्तीला ‘आनंद’ हवा असतो. स्वर्गातील सुख उच्च असले तरी तेही अनित्यच आहे, मात्र भक्तीतून मिळणारा आनंद नित्य आणि शाश्वत असतो. जीवनातील विषमता मांडताना त्यांनी एखादा माणूस झोपडीत जन्म घेतो तर दुसरा श्रीमंत घराण्यात का जन्म घेतो याचे याचे उत्तर देताना त्यांनी कर्मसिद्धांत स्पष्ट करत प्रत्येकाच्या जीवनातील परिस्थिती ही त्याच्या कर्मांवर आधारित असल्याचे सांगितले. भागवत कथा हीच माणसाला योग्य मार्ग दाखवणारी आहे, असे सांगत त्यांनी प्रथम स्कंधातील धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांचे सविस्तर विवेचन केले. यावेळी मौनी बाबांच्या कथेद्वारे खोट्या साधूंचा पर्दाफाश करत त्यांनी सांगितले की, काही लोक केवळ वेशभूषा आणि दिखावा करून लोकांना फसवतात व पैशावर डल्ला मारतात. त्यामुळे खऱ्या आणि खोट्या साधूंमध्ये फरक ओळखणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भागवत कथेतून दिलेल्या या जीवनमूल्यांनी उपस्थित भाविकांना आत्मचिंतनाचा नवा दृष्टिकोन दिला. यावेळी हजारो भविकांनी कथेचा लाभ घेतला.

दिव्यमराठी भास्कर 22 Mar 2026 9:42 pm

इराणच्­या हल्ल्याने लिटिल इंडिया दिमोना हादरले

जेरुसलेम : या शहरातील गल्ल्यांमध्ये मराठीसह हिंदी शब्दही कानावर पडतात. येथेही क्रिकेटचे चाहते मोठे आहेत. येथील दुकानांमध्ये सोहनपापडी, गुलाबजाम, पापडी चाट आणि भेळपुरी सारखे भारतीय पदार्थ सहज मिळतात. हे वर्णन भारतातील एखाद्या शहराचे नसून इस्रायलमधील दिमोना शहराचे आहे. इस्रायलच्या अण्वस्त्र साठ्यापासून २० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असलेल्या या शहरात भारतीय वंशाच्या नागरिकांची मोठी वस्ती आहे. शनिवारी […] The post इराणच्या हल्ल्याने लिटिल इंडिया दिमोना हादरले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 9:36 pm

हर्षवर्धन सदगीर ठरला सातवा डबल महाराष्ट्र केसरी

पुणे : पुण्यातील वाघोली, तालुका हवेली येथे महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात पार पडला. हर्षवर्धन सदगीर याने महेंद्र गायकवाड याला ४-२ असे पराभूत केले. या विजयासह हर्षवर्धन सदगीर सातवा डबल महाराष्ट्र केसरी झाला. महेंद्र गायकवाड यानं पहिल्या हाफमध्ये १ गुण मिळवत आघाडी घेतली. यानंतर हर्षवर्धन सदगीर याने एक गुण मिळवत […] The post हर्षवर्धन सदगीर ठरला सातवा डबल महाराष्ट्र केसरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 9:25 pm

हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा विजेता:अंतिम लढतीत महेंद्र गायकवाडचा 4-2 ने पराभव; सातवा 'डबल महाराष्ट्र केसरी' होण्याचा बहुमान

पुणे जिल्ह्यातील वाघोली (ता. हवेली) येथे पार पडलेल्या ६६ व्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने आपला दबदबा कायम राखत विजेतेपदावर नाव कोरले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत हर्षवर्धनने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा ४-२ असा पराभव केला. या विजयासह हर्षवर्धनने दुसऱ्यांदा 'महाराष्ट्र केसरी'ची गदा उंचावत 'डबल महाराष्ट्र केसरी' होण्याचा बहुमान मिळवला. अशी कामगिरी करणारा तो महाराष्ट्रातील सातवा मल्ल ठरला आहे. महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यातील हा अंतिम सामना तांत्रिक आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा ठरला. सामन्याच्या सुरुवातीला महेंद्र गायकवाडने आक्रमक पवित्रा घेत १ गुण मिळवून आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर हर्षवर्धनने चपळाईने १ गुण मिळवत विश्रांतीपर्यंत धावसंख्या १-१ अशी बरोबरीत आणली. दुसऱ्या सत्रात महेंद्रला 'ॲक्टिव्हिटी टास्क' देण्यात आला, मात्र तो गुण मिळवण्यात अपयशी ठरल्याने हर्षवर्धनला तांत्रिकदृष्ट्या १ गुण मिळाला. त्यानंतर हर्षवर्धनने पकड मजबूत करत आणखी २ गुण मिळवले आणि ४-१ अशी निर्णायक आघाडी घेतली. शेवटच्या क्षणी हर्षवर्धन मॅटच्या बाहेर गेल्याने महेंद्रला १ गुण मिळाला, मात्र वेळ संपली तेव्हा ४-२ अशा फरकाने हर्षवर्धन विजयी झाला. अंतिम फेरीपर्यंतचा रस्ता महाराष्ट्र केसरीच्या अंतिम गदेसाठी 'माती' आणि 'गादी' अशा दोन विभागांतून विजेते मल्ल आमनेसामने आले होते. सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने माती विभागाच्या अंतिम फेरीत हिंगोलीच्या तडाखेबंद सिकंदर शेखचा ३-० असा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. नाशिकच्या हर्षवर्धनने मॅट (गादी) विभागाच्या अंतिम फेरीत सोलापूर शहराच्या जय पाटीलचा १०-० अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. हर्षवर्धनवर कौतुकाचा वर्षाव हर्षवर्धन सदगीरने यापूर्वीही महाराष्ट्र केसरीची गदा जिंकली होती. आता पुन्हा एकदा त्याने आपल्या कौशल्याच्या जोरावर हे यश मिळवल्याने नाशिकसह संपूर्ण कुस्ती वर्तुळातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वाघोलीच्या मैदानावर जमलेल्या हजारो कुस्तीप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात या नव्या 'डबल महाराष्ट्र केसरी'चे स्वागत केले.

दिव्यमराठी भास्कर 22 Mar 2026 9:24 pm

मित्रांना पिस्तूल दाखवताना सुटली गोळी:अल्पवयीन गंभीर जखमी, मुंढव्यातील घटना; तिघांना अटक, एक विधीसंघर्षित ताब्यात

मुंढव्यातील केशवनगर भागात मित्रांना पिस्तूल दाखवताना झालेल्या गोळीबारात एक अल्पवयीन युवक गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना १८ मार्च रोजी रात्री घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. १८ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी गायकवाड, मुंडे आणि एक अल्पवयीन युवक मुंढव्यातील केशवनगर भागातील गुरुकृपा सोसायटीजवळ मोकळ्या जागेत थांबले होते. आरोपी मुंडे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल होते. ते एकमेकांना पिस्तूल दाखवत होते आणि हाताळत होते. यावेळी जखमी अल्पवयीन मुलानेही पिस्तूल हाताळले. त्यानंतर आरोपी मुंडे याने पिस्तूल घेतले आणि अल्पवयीन मुलाच्या दिशेने रोखले. पिस्तूलाचा चाप ओढल्यानंतर गोळी सुटली आणि ती अल्पवयीन मुलाच्या कमरेत शिरली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. याबाबत एका अल्पवयीन मुलाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सक्षम युवराज गायकवाड (वय १९), ओम दुर्गा गायकवाड (वय १९, दोघे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) आणि सोनू उर्फ सोन्या मुंडे उर्फ सुमित सुजित बर्णवाल (वय २१, रा. मांजरी, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे आणि मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सहायक निरीक्षक पिंगुवाले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शहरात बेकायदा पिस्तूल बाळगण्याचे प्रकार वाढले आहेत. दहशत माजवण्यासाठी सराईत गुन्हेगारांकडून पिस्तूल बाळगले जाते. दोन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील उमराटी गावात छापा टाकून देशी बनावटीची पिस्तुले तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला होता. उमराटीतून मध्यस्थांमार्फत पुण्यात पिस्तुले विक्रीसाठी पाठवली जात असल्याचे तपासात उघड झाले होते. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये उमराटीतील देशी बनावटीच्या पिस्तुलांचा वापर झाल्याचे तपासात समोर आले होते. पोलिसांनी या प्रकरणी देशी बनावटीची पिस्तुले तयार करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे आणि यंत्रसामग्री जप्त केली होती.

दिव्यमराठी भास्कर 22 Mar 2026 9:03 pm

21 व्या शतकातील युद्ध दुर्दैवी - रामदास आठवले:म्हणाले - मोदींचा 'युद्ध नको, बुद्ध हवा' संदेश जगासाठी महत्त्वाचा

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सध्या जगभरात सुरू असलेल्या युद्धग्रस्त परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. एकविसाव्या शतकात सुरू असलेली युद्धे दुर्दैवी असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'युद्ध नको, बुद्ध हवा' हा संदेश जगासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. आठवले यांच्या हस्ते पद्मपाणी फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागामार्फत आयोजित दुसऱ्या पाली साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे पाली विभागाचे प्रमुख आणि संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. बिमलेन्द्र कुमार, गगन मलिक, भदंत हर्षबोधि महाथेरो, डॉ. योजना भगत, उपमहापौर परशुराम वाडेकर, धम्मदीप वानखेडे, डॉ. करुणा जाधव, डॉ. नीरज बोधी, सारंग आव्हाड, स्वागताध्यक्ष डॉ. सिद्धार्थ धेंडे, डॉ. गौतम चाबुकस्वार, संयोजक राहुल डंबाळे, सुवर्ण डंबाळे आणि आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आठवले म्हणाले की, पाली भाषेने जगाला विज्ञानवाद, समानता, मानवता आणि शांततेचे ज्ञान दिले आहे. बौद्ध तत्त्वज्ञान याच भाषेतून जगभर पोहोचले. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण प्रयत्न केले असून, यापुढेही तिच्या प्रचार आणि प्रसारासाठी शासकीय पातळीवर सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जगभरातील युद्धस्थिती, सामाजिक असमानता आणि हिंसाचार दूर करण्यासाठी पाली भाषेचा प्रसार आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. बिमलेन्द्र कुमार यांनी सांगितले की, गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आणि समृद्ध भारतीय परंपरेचे भांडार पाली भाषेत उपलब्ध आहे. दुःखातून बाहेर पडून समाधान प्राप्त करण्याचा आणि चित्तशुद्धीचा मार्ग पाली भाषेने दाखवला आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात पाली भाषेचा ऐच्छिक भाषा म्हणून समावेश होणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले की, बौद्ध तत्त्वज्ञानासोबतच सामाजिक, आर्थिक, राजनैतिक अशा सर्व विषयांवरील व्यापक साहित्य पाली भाषेत उपलब्ध आहे. पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी, तिच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी कोणतेही ठोस कार्यक्रम हाती घेण्यात आलेले नाहीत. राष्ट्रीय संस्कृत संस्थानच्या धर्तीवर पाली भाषेच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय विद्यापीठ किंवा संस्थेची स्थापना करावी आणि महाविद्यालयांमधील पाली भाषेच्या प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या. सध्याच्या काळात केवळ पाली भाषाच नव्हे तर बौद्ध धम्म धोक्यात आला असल्याची भीती गगन मलिक यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. सर्वसामान्यांना ज्ञान देण्याची जबाबदारी असलेल्या प्रथम पाली भाषेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. बौद्ध धर्माचे संवर्धन व प्रसार करणाऱ्या भिक्षूची संख्या मर्यादित आहे. समाजातील सुशिक्षित आणि कर्तृत्ववान युवक भिक्षू होण्यास तयार नाहीत, अशी खंत व्यक्त करतानाच मलिक यांनी भिक्षू होण्याची तयारी असलेल्या युवकांच्या थायलंड मधील पंधरा वर्षाच्या प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी देखील दर्शविली. पाली भाषा ही माणसांना जोडणारी, मैत्रीची आणि परिवर्तनाची भाषा असल्याचे भदंत हर्षबोधी महाथेरो यांनी नमूद केले. बौद्ध धर्माचा, गौतम बुद्धांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा, विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भिख्खू संघाने एकत्र येऊन पुढाकार घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. पाली भाषेतील समृद्ध साहित्य सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवादित केले जावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे चिवर धारण न केलेले संन्यासी होते, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.पाली भाषेच्या प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी हाती घेतली पाहिजे, असे आवाहन सुवर्ण डंबाळे यांनी प्रास्ताविकात केले. यावेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पाली भाषेच्या प्रसारासाठी निधी मिळावा आणि प्राथमिक शिक्षणात पाली भाषेचा समावेश करावा, अशा मागण्या केल्या. राहुल डंबाळे यांनी पाली भाषेच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याची तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्य पालीमध्ये अनुवादित करण्याची घोषणा यावेळी केली. साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. महेश देवकर यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. त्याचप्रमाणे पाली भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणारे गायक पावा, गगन मलिक, अतुल भोसेकर आणि संमेलन अध्यक्ष बीमलेन्द्र कुमार यांचाही सत्कार करण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 22 Mar 2026 9:01 pm

अशोक खरातच्या ओशनोलॉजीला शास्त्रीय आधार:युरोपमध्ये पोलिसांकडून ओशनोलॉजीचा वापर केला जातो, पोपटराव पवार यांचे वक्तव्य

नाशिकचा स्वयंघोषित 'कॅप्टन' अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर, आता त्याच्या समर्थनासाठी सामाजिक क्षेत्रातील मोठी व्यक्तिमत्त्वे पुढे येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हिवरे बाजारचे सरपंच आणि पद्मश्री पोपटराव पवार यांचा खरातसोबतचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला असून, खरातच्या 'ओशनोलॉजी' या तथाकथित शास्त्राला वैज्ञानिक आधार असल्याचे प्रमाणपत्रच पवारांनी दिले आहे. विशेष म्हणजे, खरात सध्या गजाआड असताना त्याचे कुटुंबीय हिवरे बाजारात वास्तव्यास असल्याची माहिती समोर येत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, पोपटराव पवार आणि अशोक खरात यांचे संबंध २०११ पासूनचे आहेत. हिवरे बाजार येथील मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने खरात तेथे तीन दिवस मुक्कामास होता. गावात पाणी येण्यासाठी खरात यांनी काही उपाय सांगितले होते. गावच्या देवीची पूजा केल्यानंतर मोठा फरक पडला, असे खळबळजनक वक्तव्य पवारांनी या व्हिडिओमध्ये केले आहे. खरातच्या 'ओशनोलॉजी'चा वापर युरोपमधील पोलीस तपासासाठी करतात, असा अजब दावाही त्यांनी यावेळी केला. खरातच्या कुटुंबाला हिवरे बाजारात आश्रय? अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर नाशिकमध्ये त्याच्याविरुद्ध संतापाची लाट आहे. अशा परिस्थितीत खरातचे कुटुंबीय सध्या हिवरे बाजार येथे पोपटराव पवार यांच्या आश्रयाला असल्याची माहिती समोर येत आहे. केवळ आश्रयच नव्हे, तर खरातला लागणारी कायदेशीर मदत आणि आर्थिक रसद देखील पोपटराव पवार पुरवणार असल्याचे बोलले जात आहे. सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच म्हणून देशभरात ओळख असलेल्या पोपटराव पवारांसारखी व्यक्ती एका भोंदू बाबाच्या चमत्कारांचे समर्थन कशी करू शकते? असा सवाल आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे. खरातच्या 'अध्यात्मिक' जाळ्यात केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर ग्रामीण विकासाचे मॉडेल उभे करणारे नेतृत्वही अडकल्याने या प्रकरणाची व्याप्ती किती खोलवर आहे, हे स्पष्ट होत आहे. हे ही वाचा… अशोक खरात प्रकरण:अजितदादांना सत्य माहीत होते, त्यांनी चाकणकरांचा राजीनामा मागितला; पण तटकरेंनी थांबवला - रूपाली ठोंबरे नाशिकच्या भोंदू 'कॅप्टन' अशोक खरात प्रकरणाने आता केवळ सामाजिकच नव्हे, तर राजकीय क्षेत्रालाही हादरवून सोडले आहे. खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी आता थेट चाकणकर यांच्यावर अशोक खरातच्या 'सेक्स रॅकेटच्या मास्टरमाईंड' असल्याचा गंभीर आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच अजितदादांनी चाकणकरांचा राजीनामा मागितला होता. पण सुनील तटकरेंनी तो थांबवला, असा मोठा दावाही ठोंबरे पाटील यांनी केलाय. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 22 Mar 2026 8:52 pm

दोन दुचाकीच्या अपघातात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू:सागद ते पातोंडा मार्गावरील घटना, बासंबा पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी

हिंगोली तालु्क्यातील सागद ते पातोंडा मार्गावर धानापूर शिवारात दोन दुचाकीच्या धडकेमध्ये पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. २२ सायंकाळच्या सुमारास घडली आहे. बासंबा पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्हयातील खंडाळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी अरविंद भिमराव पवार (४०) हे आज दुपारच्या सुमारास खंडाळा पोलिस ठाण्यात कामकाज करून दुचाकीवर सिरसम मार्गे हिंगोलीकडे निघाले होते. त्यांचे दुचाकी वाहन हिंगोली तालुक्यातील सागद ते पातोंडा मार्गावर धानापूर शिवारात आले असतांना एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात अरविंद हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास आडे, उपनिरीक्षक मदन गव्हाणे, नामदेव हाके, कैलास गुंजकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने अरविंद यांना रुग्णवाहिकेद्वारे हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात दाख केल. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. दरम्यान, मयत पोलिस कर्मचारी अरविंद पवार हे सन २००७ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील आयआरबी गटात भरती झाले होते. त्या ठिकाणावरून त्यांची बदली हिंगोलीच्या राज्य राखीव दलात झाली होती. राखीव दलात कार्यरत असतांना त्यांनी महाराष्ट्रासह बाहेर राज्यातही निवडणुक, सण, उत्सव बंदोबस्त केले. तर नक्षलग्रस्त भागातही त्यांनी बंदोबस्त केला आहे. सुमारे एक वर्षापुर्वीच त्यांनी यवतमाळ जिल्हा पोलिस दलात बदली झाली होती. त्यानंतर त्यांना खंडाळा पोलिस ठाणे देण्यात आले होते. सहा महिन्यापासून ते खंडाळा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर होते. शिस्तप्रिय कर्मचारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. या शिवाय महत्वाचे गुन्हे निकाली काढण्यात त्यांनी महत्वाची भुमीका बजावली होती. त्यांच्या अपघाती निधनाने खंडाळा पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. मयत अरविंद यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या पत्नी हिंगोली जिल्हा पोलिस दलात कार्यरत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत बासंबा पोलिस ठाण्यात नोंद झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 22 Mar 2026 8:03 pm

…तर मुंबई, दिल्लीवर हल्ला करू

इस्लामाबाद : जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला, तर आम्ही कोणताही विचार न करता भारत, मुंबई आणि नवी दिल्लीवर हल्ला करू. आम्ही त्यांना सोडणार नाही, पुढे काय होईल ते नंतर पाहू अशा शब्दांमध्ये पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी गरळ ओकली आहे. एकीकडे पाकिस्तानचे शेजारील देश अफगाणिस्तानसोबतचे संबंध ताणलेले असताना बासित यांच्यासारख्या व्यक्तीने भारतातील महत्त्वाच्या शहरांवर […] The post …तर मुंबई, दिल्लीवर हल्ला करू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 7:24 pm

शत्रु राष्ट्रे वगळता होर्मुझ सर्वांसाठी खुले

तेहरान : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील ४८ तासांत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली न केल्यास इराणच्या वीज प्रकल्पांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. या इशा-यानंतर काही तासांतच इराणने आपली भूमिका मवाळ केली आहे. शत्रू देशांशी (प्रामुख्याने अमेरिका आणि इस्रायल) संबंधित जहाजे वगळता इतर सर्व जहाजांसाठी हा जलमार्ग खुला राहील असे इराणच्या वरिष्ठ प्रतिनिधीने स्पष्ट […] The post शत्रु राष्ट्रे वगळता होर्मुझ सर्वांसाठी खुले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 7:23 pm

सर्वांधिक काळ प्रमुखपद भूषवणारे मोदी ठरले पहिले नेते

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. देशातील कोणत्याही निवडून आलेल्या सरकारचे सर्वाधिक काळ प्रमुख म्हणून पद भूषवणारे ते पहिले नेते ठरले आहेत. सत्तेच्या सर्वोच्च पदावर आज त्यांचे ८,९३१ दिवस पूर्ण झाले आहेत. या कामगिरीसह पंतप्रधान मोदींनी सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांचा सर्वाधिक काळ प्रमुखपद भूषविण्याचा(८,९३० […] The post सर्वांधिक काळ प्रमुखपद भूषवणारे मोदी ठरले पहिले नेते appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 7:18 pm

इराण युद्धाचा एअर इंडियाला मोठा फटका

नवी दिल्ली : इराणमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे एअर इंडियाने गेल्या तीन आठवड्यांत पश्चिम आशियातील सुमारे २,५०० उड्डाणे रद्द केली आहेत. सध्या या भागात एअर इंडियाच्या नियमित वेळापत्रकाच्या तुलनेत केवळ ३० टक्के उड्डाणे सुरू असल्याची माहिती एअरलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी कर्मचा-यांना पाठवलेल्या पत्रात दिली आहे. विल्सन यांनी पत्रात नमूद केले आहे की, मध्यपूर्वेतील […] The post इराण युद्धाचा एअर इंडियाला मोठा फटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 7:17 pm

हेलिकॉप्टर अपघातात ६ ठार

दोहा : मध्यपूर्वेत सध्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. या भागातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, कतारमधून एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर येत आहे. कतारच्या प्रादेशिक जलक्षेत्रात रविवारी पहाटेच्या सुमारास एका हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण बेपत्ता आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या हेलिकॉप्टरमध्ये एकूण सात […] The post हेलिकॉप्टर अपघातात ६ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 7:09 pm

फरसावाले बाबांनंतर ड्रायव्हरचा मृत्यू

मथुरा : मथुरेत झालेल्या एका भीषण अपघातात गोरक्षक फरसावाले बाबा यांचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या ट्रक चालकाचाही आता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोसीकला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे दोन ट्रकची धडक झाली, ज्यामध्ये गोरक्षक चंद्रशेखर ऊर्फ फरसेवाले बाबा यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पसरलेल्या […] The post फरसावाले बाबांनंतर ड्रायव्हरचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 7:08 pm

चीनच्या अर्थव्यवस्थेची पिछेहाट

बीजिंग : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य तणावाचा सर्वाधिक तडाखा आता जगाची मॅन्युफॅक्चरिंग हब असलेल्या चीनला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मॉडर्न डिप्लोमसीच्या ताज्या अहवालानुसार कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि कच्च्या मालाची टंचाई यामुळे चीनच्या उत्पादन क्षेत्राची कंबर मोडली आहे. यामुळे चीन कॉस्ट-पुश इन्फ्लेशन म्हणजेच उत्पादन खर्च वाढल्यामुळे येणा-या महागाईच्या जाळ्यात अडकण्याची भीती व्यक्त होत […] The post चीनच्या अर्थव्यवस्थेची पिछेहाट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 7:06 pm

चीन देणार भारतीय व्यापा-यांना पक्की दुकाने

नवी दिल्ली : चीनने भारतीय व्यापा-यांना मोठे सरप्राइज दिले असून आपल्या अधिपत्याखालील तिबेट भागातील तकलाकोट येथे आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, चीनने भारतीय व्यापा-यांसाठी पक्की दुकाने तयार केली आहेत. यामुळे, आता भारतीय व्यापा-यांना इतिहासात पहिल्यांदाच अशा पक्क्या आणि सुसज्ज दुकानांमध्ये बसून व्यापार करण्याची संधी मिळेल. सीमावर्ती भागातील स्थानिक व्यापा-यांना चीनच्या या निर्णयाचा फायदा होऊ शकतो. […] The post चीन देणार भारतीय व्यापा-यांना पक्की दुकाने appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 7:03 pm

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ३ ठार

जिंतूर : प्रतिनिधी जिंतूर तालुक्यातील चारठाणा जवळील गणेशपुर शिवारात रविवार दि. २२ मार्च रोजी सकाळी भरधाव ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील एकाच कुटुंबातील ३ जागीच ठार झाले असून अन्य ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर ५० ते ६० फूट अंतरावर फेकल्या गेलेल्या कारचा चुराडा झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, […] The post भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ३ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 7:00 pm

नोव्हेंबरमध्ये अजित पवारांच्या घराजवळ अघोरी पूजा:भोंदू खरात आणि दादांचा अपघात याच्यात संबंध आहे का? अमोल मिटकरींचा सवाल

नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांनी महाराष्ट्र हादरलेला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी खरातचे धागेदोरे थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताशी जोडले असून, यामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त केला आहे. अजितदादांच्या निवासास्थानाजवळ झालेली अघोरी पूजा आणि त्यांचा अपघात यांचा काही संबंध आहे का? असा खळबळजनक सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली. ते म्हणाले की, अशोक खरातचे कृत्य महाराष्ट्राच्या संत परंपरेला काळीमा फासणारे आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अजितदादांच्या निवासस्थानाजवळ आणि कार्यालयाजवळ अघोरी पूजा करण्यात आली होती. तसेच सप्टेंबर महिन्यात 'करंगळी कापण्याचा' एक प्रकार झाला होता, जो अघोरी कृत्यांचाच भाग होता. या सर्व घटना आणि दादांचा अपघात यात काही साम्य आहे का? याचा तपास होणे गरजेचे आहे. खरातला ज्या तत्परतेने अटक केली, तशीच तत्परता अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीत का दाखवली जात नाही? असा सवालही त्यांनी केला. अशोक खरातच्या संपत्तीचा स्रोत काय? अशोक खरातच्या अवाढव्य मालमत्तेवर बोट ठेवत अमोल मिटकरी म्हणाले, एका साध्या भोंदू बाबाकडे २००० कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती येते कुठून? यामागे कोणते अधिकारी आणि मंत्री आहेत, हे आता समोर आले पाहिजे. खरातचे एका व्हीएसआर कंपनीच्या मालकासोबतही संबंध असल्याचा संशय असून, यामध्ये अनेक साक्षर लोक आणि अधिकारी आहारी गेले आहेत, हे राज्याचे दुर्दैव आहे. पोलिसांना मिळालेले व्हिडिओ ५७ नाहीत, तर ५०० पेक्षा जास्त असू शकतात, असा आमचा अंदाज आहे. ज्यांना दादांनी मोठं केलं, ते अधिवेशनात गप्प का? पक्षांतर्गत आणि महायुतीमधील राजकीय स्थितीवर भाष्य करताना अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली. अजितदादा हे शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचे नेते आहेत, मात्र त्यांना संपवण्याचे मोठे षडयंत्र रचले जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात दादांच्या अपघाताच्या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही. ज्यांना दादांनी मोठे केले, ते आज मूग गिळून गप्प का आहेत? असा टोला त्यांनी स्वपक्षीय आणि मित्रपक्षातील नेत्यांना लगावला. अंनिस आणि सरकारी भूमिकेवर प्रश्न राज्यात जादूटोणा विरोधी कायदा असतानाही असे प्रकार उघडपणे कसे घडतात, यावर अमोल मिटकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरातला कोणाच्या काळात पाणी आरक्षित करून मिळाले आणि त्याला कोणकोणत्या मंत्र्यांचे सहकार्य लाभले, याची सखोल चौकशी व्हावी. महायुती असो वा महाविकास आघाडी, जो कोणी दोषी असेल त्याला सरकार पाठीशी घालणार नाही, असा मला विश्वास आहे, अशी आशाही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली.

दिव्यमराठी भास्कर 22 Mar 2026 6:59 pm

भोंदूबाबा अशोक खरात याचे एन्काऊंटर होणार?

मुंबई : प्रतिनिधी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी अशोक खरात प्रकरणाबाबत गंभीर शंका उपस्थित केली आहे. त्यांच्या मते, या प्रकरणात काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता असून अशोक खरातला संपवण्याचा कट रचला जाऊ शकतो. २४ मार्च रोजी त्याला न्यायालयात हजर करताना एन्काऊंटर होण्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात राजकीय वातावरण […] The post भोंदूबाबा अशोक खरात याचे एन्काऊंटर होणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 6:47 pm

मानवतच्या पेठ मोहल्ल्यात दोन दुचाकी जाळल्या

परभणी : मानवत येथील पेठ मोहल्ला परिसरातील नगरेश्वर मंदिरासमोर उभ्या असलेल्या दोन स्प्लेंडर मोटारसायकली दि. २१ मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली. गेल्या १५ दिवसांतील ही तिसरी घटना आहे. सातत्याने होणा-या वाहन जाळपोळीच्या मालिकांमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मानवत येथील नागेश्वर मंदिरासमोर राहणारे पुरुषोत्तम शिवाजी भायेकर […] The post मानवतच्या पेठ मोहल्ल्यात दोन दुचाकी जाळल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 6:35 pm

दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने डॉ. संजीवनी मगर सन्मानित

परभणी : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त नाशिक येथे आयोजित सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल जिल्ह्यातील पहिल्या महिला नवजात शिशूतज्ञ डॉ.संजीवनी मगर यांना दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.महेंद्र देशपांडे, डॉ.अमित केले, उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आशा पाटील, मिस इंडिया अश्विनी […] The post दामिनी राष्ट्रीय पुरस्काराने डॉ. संजीवनी मगर सन्मानित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 6:33 pm

ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन

जालना : ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनचे नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे आज निधन झाले. जालना येथील राहत्या घरी आज दुपारी साडेबारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनावर ओबीसी नेत्यांकडून शोक व्यक्त केला जात असून ओबीसी चळवळीच्या आठवणी जागवल्या जात आहेत. सुरुवातीला मुस्लिम ओबीसी आरक्षणासाठी […] The post ओबीसी नेते शब्बीर अन्सारी यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 6:00 pm

मुंबईतील बिट्टू बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : मुंबईतील बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये ठेवण्यात आलेल्या ‘बिट्टू’ या ६ वर्षांच्या नर बिबट्याचा दीर्घकालीन आजारामुळे २१ मार्च २०२६ रोजी मृत्यू झाला. या घटनेमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. बिट्टू हा ८ डिसेंबर २०१९ रोजी ठाणे वनविभागाच्या येऊर परिसरातून बचाव करण्यात आलेला बिबट्या होता. काही दिवस उपचार आणि निगराणीनंतर त्याला […] The post मुंबईतील बिट्टू बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 5:56 pm

पतीला केबिनबाहेर बसवून गर्भवती महिलेवर अत्याचार

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्याविरोधातील प्रकरण अधिकच गंभीर बनत चालले आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये आधीच अटकेत असलेल्या खरातविरुद्ध आता आणखी एक नवीन गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाणे येथे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीनुसार, पीडित महिला गर्भवती असताना ‘पूजा विधी’च्या नावाखाली खरातने तिच्यावर लैंगिक अत्याचार […] The post पतीला केबिनबाहेर बसवून गर्भवती महिलेवर अत्याचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 22 Mar 2026 5:50 pm