SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
...

ट्रम्प यांनी इराणला दिला ४८ तासांचा अल्टिमेटम

होर्मुझची सामुद्रधुनी तातडीने खुली करा वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाला ३६ दिवस झाले आहेत. मात्र, अमेरिका किंवा इराण मागे हटण्यास तयार नाही. या दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने दिलेल्या वेळेत होर्मुझची सामुद्रधुनी सुरू न केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी ट्रथ सोशलवर पोस्ट करून […] The post ट्रम्प यांनी इराणला दिला ४८ तासांचा अल्टिमेटम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 5 Apr 2026 1:29 am

सुनेत्रा पवारच राष्ट्रीय पक्षाध्यक्ष

राष्ट्रावादीच्या नव्या ठरावांना निवडणूक आयोगाची मान्यता पटेल, तटकरे यांना मोठा धक्का मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत रचनेत गेल्या २ महिन्यांत मोठे फेरबदल झाले असून, आता पक्षाची धुरा अधिकृतपणे सुनेत्रा पवार यांच्या हाती आली आहे. १६ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ दरम्यान घडलेल्या वेगवान घडामोडींनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाच्या नव्या ठरावांना आणि कार्यकारिणीला मान्यता […] The post सुनेत्रा पवारच राष्ट्रीय पक्षाध्यक्ष appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 5 Apr 2026 1:27 am

ओरियन कॅप्सूलने आता पृथ्वीची कक्षा सोडली

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था आर्टेमिस-२ मोहीम आता चंद्राच्या दिशेने निघाली आहे. एक दिवस आधी शुक्रवारी पहाटे ५:१९ वाजता ओरियन कॅप्सूलने आपले थ्रस्टर्स सुरू केले आणि पृथ्वीची कक्षा सोडली. आता पुढील ४ दिवस ते अंतराळातून प्रवास करेल आणि जिथे आजपर्यंत केवळ २४ मानव पोहोचले, त्या ठिकाणी पोहोचेल. पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी इंजिन सुरू करण्याच्या प्रक्रियेला […] The post ओरियन कॅप्सूलने आता पृथ्वीची कक्षा सोडली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 5 Apr 2026 1:24 am

नांदेडमध्ये गँगवॉर, तिहेरी हत्याकांड

रस्त्यावर एकाला, रुग्णालयात दोघांना संपविले, जिल्हा हादरला नांदेड : प्रतिनिधी नांदेड शहरात शुक्रवारी मध्यरात्री गँगवारचा थरार घडला. या गँगवॉरमधून तिहेरी हत्याकांडाची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका गँगमधील एकाची रस्त्यावर घेरून हत्या करण्यात आली तर मयत युवकाच्या भावाने दुस-या गँगमधील जखमी दोघांची खून का बदला खून म्हणत शासकीय रूग्णालयात जाऊन चाकूने वार करून हत्या […] The post नांदेडमध्ये गँगवॉर, तिहेरी हत्याकांड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 5 Apr 2026 1:23 am

महंत प. पू. मधुसूदन भारती यांचे निधन

भारती माहूरगडाचे महंत, आज अन्त्यसंस्कार नांदेड : प्रतिनिधी तीर्थक्षेत्र माहूरगडावरच्या श्री दत्त मंदिराचे महंत मधुसूदन भारती महाराज (९९) यांना शनिवारी सायंकाळी देवाज्ञा झाली. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. उद्या रविवारी दुपारी ३ वाजता माहूरगडावरच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराजांच्या निधनामुळे माहूरगडावर शोककळा पसरली असून भाविकांनी दु:ख व्यक्त केले. सन १९७८ पासून ते […] The post महंत प. पू. मधुसूदन भारती यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 5 Apr 2026 1:20 am

२०१० पूर्वीच्या शिक्षकांना मिळणार मोठा दिलासा

जळकोट : प्रतिनिधी २०२७ पर्यंत जर शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण नाही केल्यास, सेवा समाप्तीची टांगती तलवार लाखो शिक्षकांवर होती. मात्र आता हजारो शिक्षकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सरकारने बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमन कायदा २००९ हा १ एप्रिल २०२० पासून लागू झाला. हा कायदा लागू होण्यापूर्वी ज्या शिक्षकांची नियुक्ती झाली […] The post २०१० पूर्वीच्या शिक्षकांना मिळणार मोठा दिलासा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 5 Apr 2026 12:08 am

न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने पुढे चला : डॉ. संदीपान जगदाळे

लातूर : प्रतिनिधी ऐकू किंवा बोलता येत नसले तरी आपल्या प्रतिभेच्या जोरावर प्रत्येकजण यशस्वी होऊ शकतो. दिव्यांग विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने पुढे जावे असे आवाहन प्रा. डॉे. संदीपान जगदाळे यांनी केले. रोटरी क्लब लातूरच्या वतीने सौ. सुशिलादेवी देशमुख निवासी मूकबधीर विद्यालय, सिग्नल कॅम्प, लातूर येथील विद्यार्थीनींसाठी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी सायंकाळी करण्यात आले […] The post न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने पुढे चला : डॉ. संदीपान जगदाळे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 5 Apr 2026 12:01 am

लातूर शहराचा पाणीप्रश्न अखेर निकाली 

लातूर : प्रतिनिधी भर उन्हाळ्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे लातूरकरांवर ओढवलेले पाणीसंकट लोकप्रतिनिधींच्या तत्परतेमुळे आणि प्रशासनाच्या युद्धपातळीवरील कामामुळे अवघ्या काही तासांत दूर झाले आहे. मागील ३-४ दिवसांपासून खंडित झालेला पाणीपुरवठा शुक्रवारी दुपारी ४ वाजता पुन्हा सुरळीत झाला असून लातूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या वादळी वा-याने आणि अवकाळी पावसाने धनेगाव येथील मांजरा धरणावरून […] The post लातूर शहराचा पाणीप्रश्न अखेर निकाली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 5 Apr 2026 12:00 am

दररोज १६० मेट्रिक टन कच-याचे संकलन 

लातूर : प्रतिनिधी मानवाच्या रोजच्या कृतीतून तयार होणा-या अनेक टाकाऊ पदार्थांना घन कचरा म्हणतात. योग्य वापर केला तर ‘टाकाऊ पदार्थ’ सुद्धा मौल्यवान स्त्रोत होऊ शकतो. मानवी समाजात घन कचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा -हास आणि आरोग्याच्या समस्या या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्यामुळे हवा, पाणी व जमीन प्रदूषित होऊन मानवी अधिवासाला धोका निर्माण होत आहे. […] The post दररोज १६० मेट्रिक टन कच-याचे संकलन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 11:58 pm

कोल्हापुरात शरद पवारांना धक्का:समरजित घाटगे यांचा पुन्हा 'कमळ' हाती घेण्याचा निर्णय, 8 एप्रिलला होणार पक्षप्रवेश

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP-SP) प्रवेश केलेले समरजीत घाटगे आता पुन्हा एकदा 'स्वगृही' परतणार आहेत. येत्या ८ एप्रिल रोजी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात घाटगे यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार असून, यामुळे कागलसह संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समरजीत घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने घाटगे यांनी शेवटच्या क्षणी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवली होती. मात्र, आता पुन्हा एकदा आपण स्वगृही परतणार असल्याचे स्वतः समरजित घाटगे यांनी सांगितले आहे. नेमके काय म्हणाले समरजित घाटगे? समरजीत घाटगे म्हणाले, भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. विशेषतः नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आमचे अनेक कार्यकर्ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भविष्याचा विचार करून आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच चंद्रकांत दादांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला आहे. आपल्या मूळ पक्षात परत आल्याचे मला मोठे समाधान आणि अभिमान वाटत आहे. फडणवीसांचे 'थोरले बंधू' म्हणून संबोधन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा उल्लेख करताना समरजित घाटगे म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी केवळ नेते नाहीत, तर ते माझ्या थोरल्या भावासारखे आहेत. पक्षातून बाहेर पडल्यानंतरही मी नेहमीच त्यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख केला आहे. पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळत आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले. शरद पवारांना भेटूनच घेतला निर्णय पक्ष सोडताना कोणतीही कटुता ठेवणार नसल्याचे संकेत देत समरजित घाटगे यांनी सांगितले की, मी डिसेंबर महिन्यातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. महापालिका निवडणुकीनंतर मी माझी स्पष्ट भूमिका त्यांना मांडली होती. शरद पवारांना पूर्वकल्पना देऊनच मी ही पुढची पावले उचलली आहेत. राजकीय परिणाम समरजीत घाटगे यांच्या भाजप प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपची ताकद पुन्हा एकदा वाढणार आहे. कागल विधानसभा मतदारसंघात आणि जिल्हा परिषदेच्या राजकारणात घाटगे यांची मोठी पकड असून, त्यांच्या घरवापसीमुळे महाविकास आघाडीला, विशेषतः शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 11:03 pm

नक्षलवाद संपवण्याचे श्रेय भाजपला देणे चुकीचे:काँग्रेस सरकारचेही मोठे योगदान - गोपाळ तिवारी; गृह मंत्रालयाच्या आकडेवारीचा दिला दाखला

नक्षलवादाच्या प्रश्नावर केंद्र सरकार श्रेय घेत असल्याबाबत काँग्रेसने तीव्र टीका केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यांना “बालिश, अहंकारी आणि हास्यास्पद” असे संबोधले आहे. माओवादी-नक्षलवादाच्या खात्म्याचे श्रेय केवळ विद्यमान सरकारला देणे चुकीचे असून, पूर्वीच्या काँग्रेस-प्रणीत सरकारांचे योगदान अधिक असल्याचा दावा त्यांनी केला. गोपाळ तिवारी म्हणाले की, नक्षलवादाविरोधातील लढा हा अनेक दशकांपासून सुरू आहे. काँग्रेसच्या काळातही अनेक नेत्यांनी जीवाची आहुती दिली. नंदकुमार पटेल, विद्याचरण शुक्ला आणि महेंद्र कर्मा यांसारख्या नेत्यांचा नक्षलवादी हल्ल्यांत मृत्यू झाला, याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच झिरम घाटी हत्याकांड प्रकरणात दोषींना शिक्षा देण्यात अपयश आल्याचाही आरोप त्यांनी केला. तिवारींनी दिला आकडेवारीचा दाखला गृह मंत्रालयाच्या आकडेवारीचा दाखला देत तिवारी म्हणाले की, २००४ ते २०१३ या कालावधीत २१६० नक्षलवादी ठार झाले, तर २०१४ ते २०२५ दरम्यान २०८८ नक्षलवादी मारले गेले. यावरून पूर्वीच्या सरकारांनीही प्रभावी कारवाया केल्या असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे विद्यमान सरकारने केवळ श्रेय घेण्याऐवजी सातत्याने चालत आलेल्या धोरणांची कबुली द्यावी, असे त्यांनी म्हटले. नक्षलवाद कमी होण्यामागे केवळ लष्करी कारवाया नव्हे, तर सामाजिक व विकासात्मक उपाय महत्त्वाचे ठरले. यूपीए सरकारने आदिवासी भागात रस्ते, शाळा, आरोग्य सेवा, वीज व मोबाईल नेटवर्क यांचा विस्तार केला. तसेच फॉरेस्ट राइट्स ॲक्ट २००६ आणि जमीन अधिग्रहण कायदा २०१३ यांसारख्या कायद्यांद्वारे आदिवासींचे हक्क मजबूत करण्यात आले. या उपायांमुळे नक्षलवादाबद्दलची सहानुभूती कमी झाली, असा दावा तिवारी यांनी केला. याउलट, विद्यमान सरकारवर त्यांनी आदिवासींचे हक्क कमकुवत करून संसाधने कॉर्पोरेट क्षेत्राकडे वळवण्याचा आरोप केला. छत्तीसगड, ओडिशा व इतर राज्यांतील खाण प्रकल्पांमुळे स्थानिकांचा विरोध वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. “विकास हा कोणासाठी आणि कोणत्या किमतीवर” हा प्रश्न उपस्थित करत, आदिवासींच्या संमतीशिवाय होणारा विकास हा अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नक्षलवाद पूर्णतः संपल्याचा दावा अतिशयोक्तीपूर्ण असून अजूनही अनेक जिल्हे प्रभावित आहेत, असेही त्यांनी सांगितले. अर्बन नक्षलवाद देखील २०१४ पूर्वी कुठे दिसून येत नव्हते, मात्र भाजपच्या काळात अर्बन नक्षलवाद वाढल्याचे दिसून येते हे अपयश भाजपचेच आहे. आदिवासी सक्षमीकरण आणि समावेशक विकासाशिवाय नक्षलवादाचा कायमस्वरूपी अंत शक्य नाही, असा इशाराही काँग्रेसने दिला.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 10:47 pm

बायजीपुरात 10 एमव्हीएचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित:15 ते 20 हजार ग्राहकांना मिळणार अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा

महावितरणने बायजीपुरा उपकेंद्रातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवली आहे. महापौर समीर राजुरकर यांच्या हस्ते शनिवारी रात्री 10 एमव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला. यामुळे परिसरातील सुमारे 15 ते 20 हजार वीजग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे. बायजीपुरा उपकेंद्रात यापूर्वी 10 एमव्हीए आणि 5 एमव्हीए क्षमतेचे प्रत्येकी एक पॉवर ट्रान्सफॉर्मर होते. या उपकेंद्रातून जवळपास 15 ते 20 हजार ग्राहकांना वीजपुरवठा केला जात होता. मात्र, वाढती ग्राहकसंख्या आणि विजेच्या मागणीमुळे सुरळीत वीजपुरवठा करण्यात अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-2.0 अंतर्गत 5 एमव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून तो 10 एमव्हीए करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाला शनिवारी सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. सकाळी 8 वाजल्यानंतर वीजपुरवठा बंद करून जुना 5 एमव्हीएचा ट्रान्सफॉर्मर काढण्यात आला. त्यानंतर सुमारे 11 टन वजनाचा 10 एमव्हीए क्षमतेचा महाकाय ट्रान्सफॉर्मर काळजीपूर्वक बसवणे हे आव्हानात्मक काम होते. महावितरणचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी 10 तास अथक परिश्रम घेऊन सायंकाळी 6 वाजेपर्यंत नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर यशस्वीरित्या बसवला. सुरक्षिततेसाठी उपकेंद्रातील सर्व वाहिन्यांवरील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. सर्व प्रकारच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर नवीन ट्रान्सफॉर्मर सायंकाळी 8 वाजता विद्युतभारित करण्यात आला आणि त्यानंतर सर्व वाहिन्यांवरील ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. आता उपकेंद्रातील दोन्ही पॉवर ट्रान्सफॉर्मरची एकत्रित क्षमता 20 एमव्हीए झाली आहे. यामुळे जिन्सी परिसर, रोशनगेट, शहाबाजार, जुना बाजार, शहागंज, बांबू मार्केट, जाफरगेट, जुना मोंढा, अहिंसानगर, बायजीपुरा, संजयनगर आणि बायजीपुरा परिसरातील ग्राहकांना प्रामुख्याने लाभ होणार आहे. या ट्रान्सफॉर्मरच्या कार्यान्वित प्रसंगी महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये, विरोधी पक्ष नेते समीर साजेद, कार्यकारी अभियंता प्रसाद महातोले, प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड, रवींद्र गायकवाड, सहायक अभियंता अनिल बनसोडे, संतोष कोल्हे, प्रदीप श्रेष्ठ, राहुल चव्हाण, मनीष डिघुळे यांच्यासह स्थानिक नगरसेवक आणि महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 10:29 pm

तंत्रज्ञांनी 20 फूट खोल खदानीत पोहून वीज वाहिनी जोडली:वादळामुळे तुटलेली 11 केव्ही वाहिनी दुरुस्त करत औद्योगिक वीजपुरवठा पूर्ववत

छत्रपती संभाजीनगर येथील चितेगाव परिसरात महावितरणच्या दोन तंत्रज्ञांनी धाडसी कामगिरी करत २० फूट खोल खदानीतील पाण्यात पोहून तुटलेली ११ केव्ही वीज वाहिनी जोडली. वादळी वाऱ्यामुळे तुटलेली ही वाहिनी दुरुस्त करून औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. तंत्रज्ञ योगेश जाधव आणि शंकर करताडे यांनी हे जिकिरीचे काम यशस्वी केले. शुक्रवारी दुपारी चितेगाव परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या विद्युत यंत्रणेत बिघाड झाला होता. औद्योगिक ग्राहकांना वीजपुरवठा करणारी ११ केव्ही इंडस्ट्रियल वाहिनी तुटून रमानगरमागील एका खदानीच्या २० फूट खोल पाण्यात पडली. या बिघाडामुळे एकूण ६६ औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. बिघाडाची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता, रमानगरमागील खदानीत तार तुटून पडल्याचे आढळले. तातडीने ५५ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता सुरू करण्यात आला. मात्र, त्याच वेळी परिसरातील ३३ केव्ही वाहिन्यांतही बिघाड झाल्याने प्रथम त्या दुरुस्तीस प्राधान्य देण्यात आले. उर्वरित ११ औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होता. शनिवारी (४ एप्रिल) सकाळपासून उर्वरित ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले. सुरुवातीला थर्माकोलच्या तराफ्याच्या साहाय्याने पाण्यात उतरून तार जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो अयशस्वी ठरला. ग्राहकांना विजेविना जास्त काळ थांबावे लागू नये यासाठी अखेर तंत्रज्ञ योगेश जाधव आणि शंकर करताडे यांनी स्वतः पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी थेट पाण्यात पोहत जाऊन तुटलेली तार बाजूला काढली. त्यानंतर एका 'फेज'ची नवीन तार पाण्यात नेऊन ती जोडण्याचे अत्यंत कठीण काम यशस्वीपणे पूर्ण केले. या धाडसी प्रयत्नामुळे खंडित झालेला औद्योगिक वीजपुरवठा पूर्ववत झाला.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 10:27 pm

अमरावतीत महिलांसाठी 'गोट प्रोड्युसर कंपनी'ची स्थापना:जिल्हा परिषद राबवणार राज्य शासनाचा 'पायलट प्रोजेक्ट'

अमरावती जिल्ह्यात महिलांच्या उन्नतीसाठी 'गोट प्रोड्युसर कंपनी'मार्फत एक पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) राबवला जाणार आहे. राज्य शासनाच्या कृषी व पशुपालन विभागाने जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि परंपरागत शेती व्यवसाय लक्षात घेता, येथे बकरीपालनाला मोठा वाव असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट महिलांना सक्षम करणे हे आहे. या पायलट प्रोजेक्ट अंतर्गत चांदूर रेल्वे, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर आणि भातकुली या चार तालुक्यांमध्ये बकरीपालन केले जाईल. जिल्ह्यात सध्या ३ लाख ४० हजार ६८१ शेळ्या असून, विशेषतः या चार तालुक्यांमध्ये त्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होण्याची शक्यता राज्य शासनाला वाटते. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा परिषदेवर सोपवण्यात आली आहे. जिल्हा परिषदेने यासाठी डीआरडीए मार्फत स्थापन झालेल्या महिला बचतगटांची निवड केली आहे. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्रा यांनी या प्रकल्पाची संपूर्ण आखणी केली आहे. त्यांनी सध्याच्या व्यवसायातील उणिवा दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा तयार केली आहे. शासनाच्या निरीक्षणानुसार, जिल्ह्यात शेळ्यांचे प्रजनन पुरेसे असले तरी बाजाराची उपलब्धता नाही. तसेच, पशुपालकांना पशुसेवा आणि आरोग्य व्यवस्थापनाची पुरेशी माहिती नाही. बहुतेक पशुपालक हा व्यवसाय वैयक्तिक पातळीवर करतात, ज्यामुळे त्यांचे आकलन मर्यादित राहते. या मर्यादांवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. 'गोट प्रोड्युसर कंपनी' बाजारात स्थिरता आणि मागणी निर्माण करणे, शेतकऱ्यांसाठी आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण, पुनरावृत्तीयोग्य मॉडेल तयार करणे आणि मूल्यसाखळी विकसित करणे यावर काम करेल. या कंपनीचे सर्व भागधारक महिला बचतगटाचे सदस्य असतील. सीईओ संजीता महापात्रा यांनी या व्यवसायामुळे जिल्ह्यात येत्या काळात एक वेगळी क्रांती घडेल, असा विश्वास व्यक्त केला. या पायलट प्रोजेक्टसाठी भूमिहीन, अल्पभूधारक आणि पशुधन आधारित उपजीविका असलेल्या कुटुंबांना प्राधान्य दिले जाईल. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (मुंबई) आणि आजीविका (एनआरएलएम - दिल्ली) यांचे सहकार्य मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली असून, त्यासाठी भागीदार जोडण्याचे काम सुरू झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 10:26 pm

अंजनगाव बारी येथे प्रियंका भोसले यांचे भागवत प्रवचन:पंचक्रोशीतील नागरिक भक्तिरसात तल्लीन, सप्ताहाची उत्साहात सांगता

अंजनगाव बारी येथे महारुद्र हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित संगीतमय भागवत सप्ताह आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. या सात दिवसीय कार्यक्रमात झी टॉकीज फेम ह.भ.प. प्रियंकाताई भोसले (राजगड, जि. पुणे) यांच्या रसाळ वाणीने श्रीमद भागवत कथेचे निरूपण केले. या सप्ताहात पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. प्रियंकाताई भोसले यांच्या अमृतमय वाणीने कथेला विशेष रंगत आणली. त्यांची मंचावरील उपस्थिती, शास्त्रवाचन आणि बालकृष्णाच्या वेशातील लहान मुलाला घेतलेल्या प्रेमळ दर्शनामुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक तेज प्राप्त झाले. संपूर्ण अंजनगाव बारी गावात आठवडाभर भक्तिमय वातावरण होते. कथा सुरू होताच गावातील मंडपात भाविकांची प्रचंड गर्दी उसळत होती. महिलांचे कीर्तन, आरत्या, भक्तिरसांनी भरलेली दिंडी आणि सौंदर्यपूर्ण सजावट यामुळे मंडप आकर्षक दिसत होता. गावातील सर्वच वयोगटातील भक्तांनी या उत्सवात सहभाग नोंदवला. महिलांची मोठी उपस्थिती, मुलांची सांस्कृतिक मिरवणूक आणि भाविकांच्या टाळ-मृदूंगाच्या निनादाने उत्सव अधिकच वैशिष्ट्यपूर्ण बनला. कथेमध्ये श्रीकृष्ण जन्म, गोवर्धन लीला, रासलीला यांसारख्या प्रसंगांचे वेगवेगळ्या चित्ररथांमधून सुंदर सादरीकरण करण्यात आले. स्थानिक महिला व बालिकांनी साकारलेल्या कृष्ण-राधा, गोपी, देव-देवतांच्या वेशभूषा विशेष आकर्षण ठरल्या. या झाक्यांना उपस्थितांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. समारोपाच्या दिवशी ह.भ.प. प्रियंकाताईंनी भगवद्भक्ती, कर्तव्य, माता-पित्यांचा सन्मान आणि सांस्कृतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. शेवटी, रामगीर महाराज देवस्थान मठाधिपती ह.भ.प. शंकरगीरी महाराज यांच्या हस्ते काल्याचे कीर्तन झाले. शुक्रवारच्या महाप्रसादाने या संगीतमय भागवत सप्ताहाची सांगता झाली.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 10:23 pm

नवे सीईओ सत्यम गांधी पदभार स्वीकारणार:अमरावती जिल्हा परिषदेत सोमवारी रुजू होणार

अमरावती जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी सोमवारी, ६ एप्रिल रोजी आपला पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या रुजू होण्याने जिल्हा परिषदेला नवा प्रशासकीय प्रमुख मिळेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांधी रविवारी रात्री शहरात दाखल होतील आणि सोमवारी सकाळी १० वाजता पदभार स्वीकारतील. सध्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांच्याकडे सीईओपदाचा तात्पुरता कार्यभार आहे, त्यांच्याकडूनच गांधी सूत्रे स्वीकारतील. यापूर्वीच्या सीईओ संजीता महापात्र यांची शासनाने सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या आयुक्तपदी बदली केली आहे. त्यांच्या बदलीमुळे अमरावती जिल्हा परिषदेचे सीईओपद रिक्त झाले होते. महापात्र रजेवर गेल्याने ठमके यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. सत्यम गांधी यापूर्वी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. आता ते अमरावती जिल्हा परिषदेची जबाबदारी सांभाळणार आहेत. दरम्यान, अमरावती महापालिकेतही सोमवारी नव्या आयुक्त रुजू होणार आहेत. प्रसूती रजेवर गेलेल्या आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांच्या सुटीकाळात वरिष्ठ सनदी अधिकारी वर्षा लढ्ढा यांच्याकडे मनपाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. वर्षा लढ्ढासुद्धा सोमवारीच आपली नवी जबाबदारी स्वीकारतील. अमरावतीत येण्यापूर्वी वर्षा लढ्ढा पुणे येथील महाराष्ट्र राज्य कृषी संशोधन व शैक्षणिक परिषदेच्या सदस्य सचिव होत्या. 'दिव्य मराठी'ने शुक्रवारच्या अंकात प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, बदली झालेले दोन्ही नवे अधिकारी येत्या एक-दोन दिवसांत आपापल्या नव्या जबाबदाऱ्या सांभाळतील असे भाकीत केले होते. जिल्हा परिषदेचे नवे सीईओ सत्यम गांधी आणि महापालिकेच्या नव्या आयुक्त वर्षा लढ्ढा हे दोन्ही अधिकारी सोमवारी पदभार स्वीकारणार असल्याने हे भाकीत खरे ठरले आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 10:22 pm

वाढत्या तापमानामुळे माठांना मागणी वाढली 

लातूर : प्रतिनिधी उन्हाळा सुरु झाला की, लोक घर आणि पिण्याचं पाणी कसं थंड ठेवता येईल याचा विचार करतात. या दिवसात थंड पाणी शरीराला खूप आराम देतं. पण ते थंड पाणी फ्रीजमधील आहे की अजून कोणतं हेही तितकंच महत्व.ां आहे. उन्हाळ्यात बहूतांश लोक मातीच्या माठातील थंड पाणी पिण्यावर अधिक भर देतात. या पाण्याचे अनेक फायदेही […] The post वाढत्या तापमानामुळे माठांना मागणी वाढली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 10:20 pm

जिल्हा परिषदेच्या 'वॉल ऑफ फेम'वर तीन कर्मचाऱ्यांची निवड:उत्कृष्ट कामगिरीसाठी चहाकार, बेंडे, पुनसे यांचा गौरव, स्पर्धेला प्रोत्साहन

अमरावती: येथील जिल्हा परिषदेच्या 'वॉल ऑफ फेम'वर मार्च महिन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी तीन कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षण विभागातील वरिष्ठ सहायक शरद चहाकार, मुख्यालयातील बीम्स प्रणाली सांभाळणारे स्वप्नील बेंडे आणि बांधकाम विभागाच्या दर्यापूर येथील कार्यालयात कार्यरत उपअभियंता मंगेश पुनसे यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचा मुख्यालयातील कार्यालय प्रमुखांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्वोत्कृष्ट कामकाजासाठी जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये निरोगी स्पर्धा निर्माण व्हावी, या उद्देशाने सीईओ महापात्र यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्रशासनाने जानेवारी २०२६ पासून हा उपक्रम सुरू केला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये उत्कृष्ट काम करणारे तीन कर्मचारी 'वॉल ऑफ फेम'चे पहिले मानकरी ठरले होते. ही 'वॉल ऑफ फेम' सीईओंच्या दालनाबाहेर दर्शनी भागात उभारण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत ये-जा करणाऱ्या नागरिकांना गेल्या महिन्यात कोणी उत्कृष्ट काम केले, त्यांचा विभाग कोणता आणि त्यांची जबाबदारी काय होती, याची माहिती सहज मिळते. मार्च महिन्याच्या अखेरीस सर्वच विभागांमध्ये कामाची घाई असतानाही, चहाकार, पुनसे आणि बेंडे यांनी आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडून आपल्या कर्तव्यात वेगळा ठसा उमटवला. 'वॉल ऑफ फेम'साठी जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुखांकडून त्यांच्या कामकाजाची माहिती मागवण्यात आली होती. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांमध्ये स्पर्धा घेऊन या तिघांची निवड करण्यात आली. निवडीनंतर तिघांनाही मुख्यालयी बोलावून सीईओ संजीता महापात्र यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. मंगेश पुनसे काही अपरिहार्य कारणांमुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे त्यांच्या वतीने कनिष्ठ अभियंता जगदीश पानसे यांनी सन्मान स्वीकारला. यावेळी अतिरिक्त सीईओ विनय ठमके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड आणि इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शरद महादेवराव चहाकार, वरिष्ठ सहायक, शिक्षण विभाग, यांनी खाजगी शाळा आस्थापनांचे अभिलेखे संगणकीकृत केले. स्वप्नील बेंडे यांनी बीम्स प्रणालीवर उद्दिष्टानुसार शंभर टक्के ध्येयप्राप्ती केली. तर, दर्यापूर येथील बांधकाम विभागात उपअभियंता असलेले मंगेश पुनसे यांनी गेल्या महिन्यात रस्ते आणि बांधकामसंबंधी समस्यांचे निवारण करण्यात उल्लेखनीय भूमिका बजावली.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 10:20 pm

संघर्ष जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यास बळ देतो

लातूर : प्रतिनिधी आयुष्यात यशासोबत अपयशाचाही सामना करावा लागतो; मात्र पराभवानंतर खचून न जाता नव्या जिद्दीने पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा खेळातून मिळते. शिक्षण आणि क्रीडा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, क्रीडांगणावरील संघर्ष विद्यार्थ्यांना जीवनातील विविध आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याची ताकद देतो, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या तथा नगरसेविका प्रेरणा होनराव यांनी केले. […] The post संघर्ष जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यास बळ देतो appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 10:19 pm

अवकाळी पावसामुळे अमरावतीत 620 हेक्टर पिकांचे नुकसान:एकाचा मृत्यू, 35 घरांची पडझड; नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाकडे

अमरावती जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे ६२० हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात गहू, भुईमूग, भाजीपाला आणि फळपिकांचा समावेश आहे. या अवकाळी पावसामुळे एक व्यक्ती झाड पडून मरण पावली असून, एक गोठा आणि ३४ घरांची पडझड झाली आहे. आज, सोमवारी दुपारी चिखलदरा तालुक्यात पुन्हा गारपीट झाल्याने नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी आणि महसूल विभागातील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समोर आलेला नाही. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. आपत्ती निवारण विभागाच्या निकषांनुसार, शेतीपिके आणि पडझडीच्या नुकसानापोटी देय असलेल्या मदतीची मागणी लवकरच शासनाकडे केली जाईल. ३१ मार्चपर्यंत अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर आणि धारणी या चार तालुक्यातील २६ गावांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. यामुळे ४८५.७६ हेक्टर क्षेत्रातील गहू, भुईमूग, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, मेथी, पालक यांसारख्या भाजीपाला पिकांसह लिंबू, संत्रा, मोसंबी, पपई, केळी, आंबा या फळपिकांचे नुकसान झाले. त्यानंतर १ एप्रिल रोजी अमरावती आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ५ गावांमध्ये ११.८० हेक्टरवरील गहू आणि कांद्याचे नुकसान झाले. २ एप्रिलला चार तालुक्यातील ६ गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११३ हेक्टरवरील गहू, भाजीपाला आणि फळपिकांची नासाडी झाली. ३१ मार्च रोजी झाड पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद यंत्रणेने केली आहे. चांदूर बाजार तालुक्यातील खराळा येथील रहिवासी जावेद अली मीर अली कहार असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. कृषी आणि महसूल यंत्रणेने केलेल्या संयुक्त पंचनाम्यात याची नोंद असून, त्यांच्या कुटुंबीयांना देय असलेल्या मदतीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांतील गारपीट आणि अवकाळी पावसामुळे एकूण ३५ घरांची आणि एका गोठ्याची पडझड झाली आहे. ३० मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे चार तालुक्यातील २६ गावांमध्ये १४ घरांची पडझड झाली होती. त्यानंतर ३ एप्रिल रोजी पुन्हा चार तालुक्यातील ६ गावांमध्ये अवकाळी पावसाने कहर केल्याने २१ घरांचे नुकसान झाले.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 10:19 pm

माधव बावगे यांचा आज नागरी सत्कार

लातूर : प्रतिनिधी बाबा आमटे राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे यांचा आज दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार प्रा. जयदेव डोळे यांच्या हस्ते नागरी सत्कार होणार आहे. आहे. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे […] The post माधव बावगे यांचा आज नागरी सत्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 10:19 pm

नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्वीकारला पदभार

लातूर : प्रतिनिधी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दि. ४ एप्रिल रोजी मावळत्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला. श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हेल-विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे […] The post नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी स्वीकारला पदभार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 10:18 pm

खाकी वर्दीतील 'लोहपुरुष'!:'आर्यनमॅन' किताब पटकावणारे विष्णू ताम्हाणे पहिले पोलिस अधिकारी, न्यूझीलंडमध्ये बाप-लेकाची कामगिरी

ताम्हाणे पिता-पुत्रांनी न्यूझीलंडमधील आंतरराष्ट्रीय 'आर्यनमॅन' स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे, अपर पोलिस अधीक्षक विष्णू ताम्हाणे हे ही स्पर्धा पूर्ण करणारे पोलिस दलातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत. त्यांचे सुपुत्र गौरांग ताम्हाणे यांनीही त्यांच्यासोबत ही खडतर स्पर्धा पूर्ण केली. न्यूझीलंडमधील ताउपो येथे नुकत्याच पार पडलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत जगभरातील हजाराहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत ४ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२ किमी धावणे असा एकूण २२६ किमीचा अत्यंत खडतर प्रवास १७ तासांच्या निर्धारित वेळेत पूर्ण करावा लागतो. विष्णू ताम्हाणे (वय ५८) आणि त्यांचे सुपुत्र गौरांग ताम्हाणे यांनी ही स्पर्धा निर्धारित वेळेत पूर्ण करत उल्लेखनीय यश मिळवले. ही कामगिरी एकत्रितपणे पूर्ण करणारी ही पहिलीच पिता-पुत्र जोडी मानली जात आहे. विष्णू ताम्हाणे हे कोल्हापूर परिक्षेत्रात अपर पोलिस अधीक्षक (गुन्हे अन्वेषण विभाग) म्हणून कार्यरत आहेत. याच स्पर्धेत पुण्यातील हडपसर येथील दशरथ जाधव यांनीही १७ तासांच्या आत स्पर्धा पूर्ण केली. तसेच वृषाली ढोणे, सत्यजित जोशी आणि मंदीप भाटिया यांनी ७०.३ आर्यनमॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पार केली. विष्णू ताम्हाणे यांच्या फिटनेस प्रवासाची सुरुवात पोलिस प्रशिक्षणादरम्यान झाली होती. त्यांनी ५ किमी धाव १८ मिनिटांत पूर्ण करत पहिले स्थान मिळवले होते. त्यानंतर १० किमी, हाफ मॅरेथॉन आणि २०१९ मधील टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये ४२ किमी धाव ४ तास ४५ मिनिटांत पूर्ण करत त्यांनी सातत्य टिकवले. ताम्हाणे पिता-पुत्रांची ही कामगिरी क्रीडा क्षेत्रासाठी आणि पोलिस दलासाठी एक महत्त्वाचा आदर्श ठरली आहे. त्यांच्या या यशाने दृढनिश्चय आणि परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 10:14 pm

महिला पतिव्रता दाखवण्यासाठी मोठं कुंकू अन् मंगळसूत्र घालते:माजी आमदाराची जीभ घसरली, संतप्त महिलांचे चिखलीत आंदोलन

बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण एका वादग्रस्त विधानामुळे पुन्हा तापले आहे. चिखलीचे माजी आमदार आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांची जीभ घसरली असून, आपली राजकीय निष्ठा स्पष्ट करताना त्यांनी महिलांचा नामोल्लेख करून दिलेल्या एका उदाहरणावरून नवा वाद ओढवून घेतला आहे. या विधानाचे तीव्र पडसाद चिखली शहरात उमटले असून संतापलेल्या महिलांनी बोंद्रे यांच्या प्रतिमेला 'जोडे मारो' आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवला. गेल्या दोन दिवसांपासून राहुल बोंद्रे हे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्या भेटीमुळे चर्चेत होते. गायकवाड यांनी बोंद्रे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने बोंद्रे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आज आयोजित पत्रकार परिषदेत बोंद्रे यांना विचारले असता, त्यांनी भाजप आणि विरोधकांच्या रणनीतीवर टीका केली. मात्र, टीका करताना त्यांची जीभ घसरली. नेमके काय म्हणाले राहुल बोंद्रे? पत्रकारांनी राहुल बोंद्रे यांना शिवसेनेच्या पक्षप्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता, बोंद्रे यांनी भाजप आणि विरोधकांच्या रणनीतीवर टीका केली. मात्र, आपली निष्ठा सिद्ध करताना त्यांनी महिलांचा उल्लेख करत एक अजब उदाहरण दिले. ते म्हणाले, जी कुणी महिला असते... जीला दाखवाव लागतं की, मी पतिव्रता आहे. ती मोठं कुंकू लावते आणि मोठे मंगळसूत्र घालते'', असे उत्तर त्यांनी दिले. भाजपवर दबावाचा आरोप राहुल बोंद्रे म्हणाले, भाजपवाल्यांची देशभरातील पॉलिसी आहे, त्यांच्याबद्दल चर्चा करत राहायची. कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करायचा आणि त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घ्यायचा. त्यानुसार त्यांची ही सोची समझी चाल आहे, त्यानुसार ते चर्चा करत राहतात. मी एकदाच सांगितलं आहे, परत परत सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. जी कोणी महिला असते.. तिला दाखवावं लागतं किती पतीव्रता आहे, ती मोठ कुंकू लावते, मोठ मंगळसूत्र घालते. प्रत्येकाला तशी आवश्यकता नसते. राजकीय निष्ठेची तुलना 'पतिव्रते'शी राहुल बोंद्रे यांनी आपली काँग्रेसप्रती असलेली निष्ठा सिद्ध करण्यासाठी हे उदाहरण दिले असले, तरी त्यातील सौभाग्यलेण्यांचा संदर्भ आक्षेपार्ह ठरला आहे. मला वारंवार मी काँग्रेसमध्येच आहे हे सांगण्याची गरज नाही, असे त्यांना सुचवायचे होते, पण त्यासाठी त्यांनी महिलांच्या वैयक्तिक श्रद्धेचा आणि चिन्हांचा आधार घेतल्याने जनसामान्यांतून, विशेषतः महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे. चिखलीत बोंद्रेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन बोंद्रे यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होताच चिखलीतील महिला आक्रमक झाल्या. शहरातील ऐतिहासिक शिवाजी चौकात शेकडो महिला एकत्र आल्या आणि त्यांनी राहुल बोंद्रे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त महिलांनी बोंद्रे यांच्या प्रतिमेला आणि बॅनरला जोडे मारून आपला निषेध नोंदवला. राजकीय नेत्यांनी आपली निष्ठा सिद्ध करताना महिलांच्या भावनांचा आणि सौभाग्यलेण्यांचा अपमान करणे थांबवावे, अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे. या वादग्रस्त विधानामुळे जिल्ह्यात काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचे चित्र असून, बोंद्रे यावर आता काय स्पष्टीकरण देतात किंवा माफी मागतात का? हे पाहावे लागणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 10:11 pm

सातारा जिल्हा परिषद सभापती निवडी:भाजपची राष्ट्रवादीचे दोन सदस्य फोडून पुन्हा बाजी, तर फुटीर सदस्यांनाही सभापतीची संधी

सातारा जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य फोडून भाजपाने पुन्हा बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपला पाठिंबा देणाऱ्या लता कर्णे आणि ऋतुजा शिंदे यांना सभापती पदाची संधी देण्यात आली आहे.आज भाजपच्या ऋषीकेश धायगुडे पाटील आणि तेजस्विनी कदम यांना ही सभापती पदाची संधी मिळाली आहे.आज विषय समित्यांच्या निवडीत भाजपचे दोन तर राष्ट्रवादीच्या फुटीर सदस्यांना ही सभापतीची संधी मिळाली. या निवडीच्या बैठकीवर राष्ट्रवादी आणि शिवसेना सदस्यांनी सभागृहात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळेत पोहचू दिले नाही, असा आरोप करत कायदा धाब्यावर बसणाऱ्या प्रशासनाचा व भाजपाचा सभागृहात व जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बैठक ठोकून विरोधी घोषणा देत निषेध केला. काळ्या फिती लावून या निवडीवर बहिष्कार घातला. जिल्हा परिषदेच्या प्रवेशव्दाराच्या पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन केले.त्यामुळे प्रशासनाच्या पक्षपाती पणाचा आणि भाजपने सदस्य फोडून केलेल्या दांडगाईच्या आरोपांमुळे ही निवडणूक पुन्हा गाजली. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीबरोबर विषय समित्यांच्या सभापती पदाची निवडणूकही भाजपा राष्ट्रवादी शिवसेनेने प्रतिष्ठेची केली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत झालेल्या गोंधळात आणि झटापटीनंतर आज शनिवारी होणाऱ्या सभापती निवडीची बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपली रणनीती ठरवली होती. आधीच्या निवडणुकीत सदस्य फोडल्यामुळे यावेळी मात्र सर्वांनी सावध पवित्र घेतला होता.सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी राष्ट्रवादी शिवसेनेने आपले सदस्य सुरक्षित ठिकाणी हलवलेले होते. यावेळी भाजपाने आपले सदस्य हलवले होते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपले सभापती करण्याच्या दृष्टीने ठरवलेली रणनीती यशस्वी ठरली आहे. सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर ऋतुजा शिंदे फुटल्याची कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी दिली. तसेच पोलिसांनी आम्हाला सभागृहात वेळेवर पोहचू नये म्हणून ठिकठिकाणी आमची अडवणूक केली. पोलिसांनी आम्हाला अर्धा तास अडवून ठेवले होते, असा आरोप बापू शिंदे आणि संदीप मांडवे यांनी केला. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांकडे अर्थ व बांधकाम समितीचे सभापतिपद दिले जाते. त्यामुळे शिक्षण व आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन, समाज कल्याण, महिला व बाल कल्याण या चार समित्यांच्या सभापतीपदासाठी भाजपकडून चारच उमेदवारी अर्ज आले होते. छाननीअंती कोणाताही अक्षेप नसल्याने चारही अर्ज वैध ठरल्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून आलेल्या ऋतुजा विराज शिंदे यांनी महिला व बाल कल्याण सभापतिपद देण्यात आले असून ऋषीकेश धायगुडे-पाटील यांच्या समाज कल्याण सभापतिपद सोपविण्यात आलेले आहे. राष्ट्रवादीतून भाजपच्या गोटात दाखल झालेल्या लता अविनाश कर्णे आणि तेजस्विनी विक्रमशील कदम यांनी शिक्षण व आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन यापैकी कोणते सभापतिपद मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऋतुजा शिंदे, ऋषीकेश धायगुडे-पाटील, लता कर्णे, तेजस्विनी कदम या चौघांचेच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. त्याबाबतची घोषणा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केली.शिवसेना-राष्ट्रवादीचे पुरेसे संख्याबळ असतानाही भाजपने कुरघोडी करत जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षासह राष्ट्रवादीच्या फुटीर सदस्यांना संधी देत जिल्हा परिषदेवर आपली आपली सत्ता प्रस्थापित केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 9:43 pm

फसवणुकीचा नवा फंडा:रेल्वेच्या जीआरपीचा एसएचओ असल्याचे सांगत 5 हजार रुपयांची फसवणूक, कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

खंडवा रेल्वेच्या जीआरपीचा एसएचओ असल्याचे सांगून कळमनुरी तालुक्यातील एका महिलेचा मृतदेह नेण्यासाठी नातेवाईकांकडे पैसे नसल्याने पाच हजार रुपये पाठविण्याची मागणी केली. पैसे पाठवून अधिक चौकशी केल्यानंतर संबधित व्यक्ती बोगस असल्याचे स्पष्ट झाल्याने कळमनुरी पोलिस ठाण्यात शनिवारी ता. ४ फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रेमकुमार माकोडे यांना शुक्रवारी ता. ३ दुपारी मोबाईल आला. यामध्ये संबंधित व्यक्तीने त्याचे नाव मनोजकुमार गुप्ता असून खंडवा रेल्वेच्या जीआरपीचा एसएचओ असल्याचे सांगितले. तुमच्या तालुक्यातील रामवाडी येथील खुशबु मोहन पाटील या महिलेचा रेल्वेने कटून मृत्यू झाला आहे. त्यांचे नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती बेताची असून त्यांना मृतदेह नेण्यासाठी आईस बॅगची गरज आहे. त्यासाठी त्यांना पाच हजार रुपये पाठविण्याची विनंती केली. दरम्यान, सदर प्रकार पोलिस निरीक्षक माकोडे यांनी सामाजिक कार्यकर्ते वैभव चौधरी यांना सांगितला. यावेळी चौधरी यांनी गुप्ता याने पाठविलेल्या सीताराम कुर्मी नावाचा क्यूआर कोड पाठविला. त्यानंतर चौधरी यांनी त्या क्यूआर कोडवर पाच हजार रुपयांची रक्कम पाठविली. मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी रामवाडी गावात खुशबू पाटील नावाची महिला आहे काय याचा शोध घेतला. मात्र त्या नावाची महिलाच गावात नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मनोजकुमार गुप्ता याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल लागला नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीने बनावट नांव सांगून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. यावरून पोलिस निरीक्षक माकोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिसांनी मनोजकुमार गुप्ता याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 9:36 pm

बारामती पोटनिवडणुकीसाठी अभिजित बिचुकलेंचा अर्ज:सुनेत्रा पवारांविरोधात ठोकला शड्डू, आतापर्यंत 12 जणांचे अर्ज दाखल

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणे सुरू आहे. या निवडणुकीसाठी आतापर्यंत १२ जणांचे अर्ज आले आहेत. त्यात 'बिग बॉस' फेम आणि नेहमीच चर्चेत राहणारे अभिजित बिचुकले यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकला आहे. बारामती पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रमही जाहीर झाला असून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल असून, अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 9 एप्रिल आहे. तर या निवडणुकीसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यात अभिजित बिजकुले यांनी देखील बारामती पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नेमके काय म्हणाले अभिजीत बिचुकले? कोणतीही निवडणूक असो, उमेदवारी अर्ज भरण्यात अभिजीत बिचुकले नेहमीच आघाडीवर असतात. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर होणारी पोटनिवडणूक आपण पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. मी अपक्ष अर्ज का भरला आणि माझी पुढील रणनीती काय असेल, हे लवकरच पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करेन, असे बिचुकले यांनी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची मांदियाळी बारामतीच्या रिंगणात आतापर्यंत १२ अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये अभिजीत कांबळे, दादा एकनाथ थोरात, संकेत गावडे, अनिल तपे, रझ्जाक उर्फ अब्दुलरौफ जफर मुलाणी, विलास होळकर, संदीप जनार्दन खरात, मिथुन सोपानराव आटोळे, अरुण नितुरे, दत्तात्राय रावसाहेब बेडरे, दिलीप प्रभाकर अलोनी, त्रिशला कांबळे, गजानान उत्तम गवळी, रघू येताळा घुटूकडे, सागर शरद भिसे आणि सतिश कदम यांचा समावेश आहे. विरोधकांचा आक्रमक पवित्रा दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. “आम्ही आमचा उमेदवार उभा करणारच. मी स्वतः उभा राहणार की अन्य कोणी, हे लवकरच स्पष्ट करू,” असे त्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी पवार कुटुंबीयांवर टीकाही केली. “निवडणुकीत आश्वासने दिली जातात, पण ती पाळली जात नाहीत,” असा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच काँग्रेस देखील बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्यावर ठाम आहे. राजकीय समीकरणे आणि मोठे प्रश्न या पोटनिवडणुकीत केवळ एक जागा भरली जाणार नाही, तर सहानुभूतीची लाट निर्णायक ठरणार का? विरोधक एकत्र येऊन लढत देणार का? की शेवटच्या क्षणी बिनविरोधाचा मार्ग मोकळा होणार? असे अनेक मोठे प्रश्नही उपस्थित झाले आहेत. बारामती केवळ एक मतदारसंघ नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा ‘पॉवर सेंटर’ मानली जाते. त्यामुळे येथील प्रत्येक हालचाल राज्यभर परिणाम घडवू शकते. सध्या तरी 30 अर्जांनी निवडणुकीत रंगत आणली आहे. पुढील काही दिवसांत माघारी, उमेदवारी आणि राजकीय चर्चांच्या फेऱ्यांमुळे चित्र अधिक स्पष्ट होईल. बिनविरोध असो किंवा थेट लढत— बारामतीचा निकाल आता संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 8:31 pm

नापिकी अन् कर्जाचा विळखा:पिंपरी येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, गावातील सप्ताहाच्या पंगतीनंतर घरी जाऊन घेतला गळफास

कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येथे कर्ज व नापिकीला कंटाळून तरूण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शनिवारी ता. ४ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिले्ल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येथील तरुण शेतकरी सचिन धांडे (२७) यांना पिंपरी शिवारात अडीच एकर शेती आहे. या शेतीवरच त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्या वडिलांच्या नांवे बँकेचे सुमारे १० लाख रुपयांचे कर्ज आहे. सचिन हेच घरातील कर्ता पुरुष असल्याने त्याच्यावरच सर्व कुटुंबाची जबाबदारी होती. वडिलांच्या नावे असलेले कर्ज कसे फेडावे यांची चिंता त्यांना लागली होती. दरम्यान, सचिन यांनी त्यांच्या शेतात घेतलेले खरीप व रब्बी हंगामाचे पिक वाया गेले. शेतातून उत्पन्न मिळालेच नसल्यामुळे कर्ज कसे फेडावे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असे ते सतत बोलून दाखवत होते. मात्र आज ना उद्या कर्जाची फेड होईल असे त्यांचे कुटुंब समजावून सांगत होते. पिंपरी गावात सप्ताह असल्यामुळे शुक्रवारी ता. ३ रात्रीच्या वेळी भोजनाची पंगत होती. पंगत वाढल्यानंतर रात्रीच्या सुमारास ते घरी गेले. यावेळी त्यांनी घरातील छताला साडीने गळफास घेतला. काही वेळानंतर त्यांची पत्नी कामासाठी घरात आली असतांना सचिन यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यांनी आरडा ओरड केल्यानंतर सचिन यांना खाली काढून रुग्णालयात नेले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले. या प्रकरणी गणेश धांडे यांच्या माहितीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश घोटके पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 7:30 pm

पुणे विमानतळावर 33.60 लाखांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त:बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला अटक, कस्टम विभागाची कारवाई

पुणे विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई करत बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून तब्बल 33.60 लाख रुपये किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी अंजिल मुथिप्पलाथिंकल मजीद (वय 20, रा. त्रिशूर, केरळ) याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अंजिल मजीद बँकॉकहून एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाने पुण्यात आला होता. विमानतळावर उतरल्यानंतर कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून तपासणी केली. सुरुवातीला वैयक्तिक झडती घेतली असता काहीही आढळले नाही, मात्र त्यानंतर त्याच्या सामानाची सखोल तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान, आरोपीच्या बॅकपॅकमध्ये कपड्यांमध्ये लपवून ठेवलेली दोन पारदर्शक पॅकेट्स सापडली. ही पॅकेट्स कार्बन पेपरमध्ये गुंडाळून व्हॅक्यूम सील करण्यात आली होती. यामुळे गांजाचा वास बाहेर येऊ नये आणि स्कॅनिंग यंत्रणेतूनही तो सहज सुटावा, असा आरोपीचा प्रयत्न होता. मात्र, कस्टम अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा डाव फसला. पॅकेट्स उघडून पाहिल्यानंतर त्यात हिरव्या रंगाचा पदार्थ आढळला. ड्रग टेस्ट किटद्वारे तपासणी केली असता तो हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या गांजाचे वजन सुमारे 960 ग्रॅम असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची अंदाजित किंमत 33.60 लाख रुपये आहे. प्राथमिक तपासात आरोपी हा गांजा भारतात तस्करी करून विक्री करण्याच्या उद्देशाने आणत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 6:49 pm

चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त रिपाइंकडून विविध कार्यक्रम:केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची पुण्यात घोषणा

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी घोषणा केली आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील चवदार तळे आंदोलनाच्या शताब्दी वर्षानिमित्त रिपब्लिकन पक्षाकडून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. दलित समाजावरील अन्याय दूर करून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी हे आंदोलन महत्त्वाचे ठरले होते. पुण्यात रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारिणी आणि प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत चवदार तळे आंदोलन शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या स्वरूपावर चर्चा झाली. यावेळी राजाभाऊ सरोदे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य), अविनाश महातेकर (प्रदेश सरचिटणीस), गौतम सोनवणे (सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य), बाबूराव कदम (प्रदेश कार्याध्यक्ष), आशाताई लांडगे (राष्ट्रीय सरचिटणीस), बाळसाहेब जानराव (प्रदेश सचिव), परशुराम वाडेकर (प्रदेश संघटन सचिव), संजय सोनवणे (पुणे शहराध्यक्ष), चंद्रकांता सोनाकांबळे (महिला प्रदेशाध्यक्षा) आणि पप्पू कागदे (युवक आघाडी अध्यक्ष) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या शताब्दी वर्षानिमित्त राज्यव्यापी 'समता परिवर्तन यात्रे'चे आयोजन करण्यात येणार आहे. ही यात्रा १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई यांच्या सातारा येथील स्मारकापासून सुरू होईल. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या यात्रेचा समारोप १० नोव्हेंबर रोजी पुण्यात होईल, अशी माहिती आठवले यांनी दिली. याशिवाय, राज्यातील प्रत्येक विभागात सामाजिक समता परिषदांचे आयोजन केले जाईल. या परिषदांमधून दलित समाजाचा विकास आणि सवर्ण व दलित यांच्यातील समता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक कार्यक्रमांवर विचारमंथन केले जाईल. समतावादी विचारवंत आणि साहित्यिकांची संमेलनेही आयोजित केली जातील. आठवले यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले की, सध्याच्या काळात अस्पृश्यता संपुष्टात आली असली तरी जातीभेद पूर्णपणे नष्ट झालेले नाहीत आणि दलितांवर अत्याचारांच्या घटना अजूनही घडत आहेत. या वर्षात १५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरात महिला समता परिषदा, आंबेडकरी चळवळीतील शाहीर कलावंतांच्या स्पर्धा आणि क्रीडा स्पर्धा यांसारखे अनेक उपक्रमही राबविण्यात येणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. आपल्याला तीन वेळा लोकसभा आणि तीन वेळा राज्यसभेत जाऊन समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. आंबेडकरी विचारांचा प्रचार, प्रसार आणि रिपब्लिकन पक्षाचा देशव्यापी विस्तार यासाठी या संधीचा उपयोग करणार असल्याची ग्वाही आठवले यांनी दिली. लोकसभेच्या जागांमध्ये वाढ होऊन त्या 816 होणार आहेत. अर्थातच महिलांसाठी राखीव असलेल्या जागांमध्येही 273 पर्यंत वाढ होणार आहे. त्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना वेगळे आरक्षण असणार आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी 16 तारखेपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली. महिलांसाठी आरक्षित असलेल्या राखीव जागांचा लाभ इतर मागास प्रवर्ग व भटके विमुक्त प्रवर्ग यातील महिलांना मिळणार नाही. कारण या प्रवर्गांना अद्याप राजकीय आरक्षण दिले गेलेले नाही. मात्र, अनुसूचित जाती, जमातींप्रमाणेच इतर मागासवर्गीय आणि भटके विमुक्त यांना देखील राजकीय आरक्षण मिळावे, अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 6:48 pm

सावकाराला 1 लाखाचे 74 लाख दिले, किडनीही विकली:सर्व काही गमावले, 'इच्छामरणा'ची परवानगी द्या; चंद्रपूरच्या शेतकऱ्याची मागणी

अवैध सावकारीचा विळखा आणि प्रशासकीय अनास्था माणसाला मृत्यूच्या दारापर्यंत कशा प्रकारे नेऊ शकते, याचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात समोर आला आहे. नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी सावकाराच्या जाचातून सुटण्यासाठी चक्क कंबोडियामध्ये जाऊन आपली 'किडनी' विकली. मात्र, एवढे करूनही सावकारांचा छळ थांबलेला नाही. अखेर न्याय मिळत नसल्याने हतबल झालेल्या या शेतकऱ्याने आता जिल्हाधिकाऱ्यांकडे 'इच्छामरणाची' परवानगी मागितली असून, मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. रोशन कुडे यांची व्यथा ऐकून सुन्न व्हायला होते. त्यांनी केवळ १ लाख रुपयांचे कर्ज उचलले होते. त्या बदल्यात त्यांनी आतापर्यंत सावकारांना तब्बल ७४ लाख रुपये चुकते केले आहेत. तरीही सावकाराची भूक मिटलेली नाही. पैशांसाठी सतत होणारा तगादा आणि मानसिक छळामुळे कुडे यांनी स्वतःचे अवयव विकण्याचा टोकाचा निर्णय घेतला. मात्र, किडनी विकून आलेले पैसे देऊनही त्यांचे कर्ज फिटलेले नाही आणि त्यांची हक्काची शेतीही सावकारांनी बळकावली आहे. प्रशासनाची 'ढिम्म' भूमिका - शेतकरी कुडे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवैध सावकारांची नाकेबंदी करण्याचे आणि त्यांची संपत्ती गोठवण्याचे कडक आदेश दिले होते. या निर्णयामुळे रोशन कुडे यांना आपली शेती परत मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेला दीड महिना आणि कुडे यांनी तक्रार देऊन चार महिने उलटले, तरी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. प्रशासकीय यंत्रणा ढिम्म असून सावकार आजही उजळ माथ्याने फिरत आहेत, अशी संतप्त भावना कुडे यांनी व्यक्त केली आहे. न्याय द्या, अन्यथा मरू द्या गेल्या चार महिन्यांपासून रोशन कुडे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. शेतीवर सावकारांनी ताबा मिळवल्याने त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मी सर्व काही गमावले आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. माझे वडील अपंग आहेत. मला मदतीची गरज आहे. नाहीतर मला माझ्या कुटुंबासह इच्छामरण पत्करण्याची परवानगी द्यावी, असे हृदयद्रावक निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे. प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष एकीकडे सरकार शेतकरी कल्याणाच्या योजना जाहीर करत असताना, दुसरीकडे स्वतःची किडनी विकूनही न्यायासाठी वणवण फिरणाऱ्या या शेतकऱ्याच्या आक्रोशाकडे डोळेझाक होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. आता या निवेदनानंतर तरी यंत्रणा जागी होणार का, की कुडे यांना टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 6:06 pm

राष्ट्रीय शिक्षण रत्न, समाजरत्न, जीवन गौरव पुरस्कारासाठी आवेदन पत्र पाठविण्याचे आवाहन

परभणी : एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्रच्या वतीने मागील २७ वर्षापासून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय शिक्षण रत्न, समाजरत्न, राष्ट्रीय एकता रत्न आणि जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. या पुरस्कारासाठी शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक, कृषी, कला, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य, उद्योग, बचतगट आदी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य व्यक्तींना सिने कलावंतांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार […] The post राष्ट्रीय शिक्षण रत्न, समाजरत्न, जीवन गौरव पुरस्कारासाठी आवेदन पत्र पाठविण्याचे आवाहन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 5:48 pm

सीमा हैदरच्या मुलाचे झाले बारसे!

नवी दिल्ली : पाकिस्तानातून भारतात पळून आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा आई झाली. तिने मुलाचे नाव ‘भारत’ असे ठेवले. नोएडातील रबपूरा येथील घरी बारशाचा कार्यक्रम झाला. नामकरण सोहळ्यापूर्वी सीमाने घरी गोंधळ-जागरण कार्यक्रम आयोजित केला. हिंदू धर्मात जेव्हा मुलाचा जन्म होतो, तेव्हा त्याचे नामकरण करण्यात येते. घरात जागरण घालण्यात येते. माझ्या घरात परंपरेनुसार या सर्व गोष्टी […] The post सीमा हैदरच्या मुलाचे झाले बारसे! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 5:45 pm

पाकिस्तानात तेलासोबत वीज संकट!

कराची : वृत्तसंस्था एलएनजी पुरवठ्यात मोठी घट आणि कोळशाच्या कमतरतेमुळे देशाच्या सुमारे ३० टक्के वीज उत्पादन क्षमतेवर धोका निर्माण झाला आहे. स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, परिस्थिती हाताळण्यासाठी पाकिस्तान सरकारला लोडशेडिंग, वीजदरवाढ आणि ऊर्जा बचतीसारखे उपाय करावे लागू शकतात. कराचीस्थित बिझनेस रेकॉर्डरच्या अहवालानुसार, पुढील महिन्यापासून पाकिस्तानचा एलएनजी पुरवठा जवळपास शून्याच्या जवळ पोहोचू शकतो. सध्या देशाच्या एकूण वीज […] The post पाकिस्तानात तेलासोबत वीज संकट! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 5:40 pm

भारताची सागरी ताकद वाढली

नवी दिल्ली : आखाती देशातील परिस्थिती दिवसेंदिवस तणावपूर्ण होत असताना भारताने आपल्या लष्करी सामर्थ्याची ताकद वाढवली आहे. भारतीय नौदलाने आज (३ एप्रिल) विशाखापट्टणम येथे आयएनएस तारागिरी आणि आयएनएस अरिधमन यांना अधिकृतपणे नौदलात दाखल केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे या समारंभाला उपस्थित होते. भारताची सागरी सुरक्षा आणि आण्विक प्रतिबंधक क्षमता मजबूत करण्यासाठी आयएनएस तारागिरी […] The post भारताची सागरी ताकद वाढली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 5:37 pm

दलबदलू आमदारांना मिळणार नाही पेन्शन; हिमाचलात विधेयक मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्र ठरलेल्या आमदारांना यापुढे निवृत्तिवेतनाचा लाभ मिळणार नाही. दलबदलू आमदारांना निवृत्तिवेतन नाकारण्याची तरतूद करणारे विधेयक हिमाचल प्रदेश सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मंजूर केले. त्यामुळे स्वत:च्या स्वार्थासाठी एका पक्षातून दुसरया पक्षात उडी मारणा-या आमदारांना दणका बसणार आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ‘हिमाचल प्रदेश विधानसभा (सदस्यांचे भत्ते […] The post दलबदलू आमदारांना मिळणार नाही पेन्शन; हिमाचलात विधेयक मंजूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 5:35 pm

'पिंकाथॉन'ची मुंबई ते पुणे 160 किमी धाव पूर्ण:महिलांच्या फिटनेस, मानसिक ताकद आणि सक्षमीकरणाचा संदेश

'स्पिरिट ऑफ पिंकॅथॉन'च्या सहाव्या पर्वांतर्गत महिलांनी मुंबई ते पुणे अशी १६० किलोमीटरची धाव यशस्वीपणे पूर्ण केली. मुंबईतील शिवाजी पार्क येथून सुरू झालेली ही आव्हानात्मक धाव तीन दिवसांत पुण्यातील एएफएमसी ग्राउंड येथे संपली. या उपक्रमातून महिलांच्या शारीरिक सुदृढता, मानसिक ताकद आणि सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. या धावेचे नेतृत्व ४९ वर्षीय अल्ट्रा-मॅराथॉनर कॅप्टन पूजा मेहरा (निवृत्त) आणि ४५ वर्षीय एन्ड्युरन्स रनर पूनम करंजकर यांनी केले. त्यांच्या चिकाटी, शिस्त आणि जिद्दीमुळे ही कठीण धाव यशस्वीरित्या पूर्ण झाली. महिलांना स्वतःच्या मर्यादा ओलांडण्यास आणि आरोग्याला प्राधान्य देण्यास प्रेरित करणे, हेच 'पिंकॅथॉन'चे मुख्य उद्दिष्ट आहे. 'पिंकॅथॉन'चे संस्थापक मिलिंद सोमण यांनी याविषयी बोलताना सांगितले की, शारीरिक सुदृढता केवळ शरीरापुरती मर्यादित नसून ती मन आणि भावनांशीही संबंधित आहे. महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवून त्यांच्या क्षमतेची नवी व्याख्या निर्माण करावी, असा संदेश या धावेतून दिला जातो. कॅप्टन पूजा मेहरा आणि पूनम करंजकर यांची जिद्द इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. इन्व्हिन्सिबल विमेनच्या संस्थापिका अंकिता कोनवार यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, अशा सहनशक्तीच्या यात्रा केवळ अंतर पूर्ण करण्यापुरत्या नसून त्या शिस्त, सातत्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहेत. महिलांना भीतीवर मात करून पुढे जाण्याची प्रेरणा अशा उपक्रमांतून मिळते, असेही त्यांनी सांगितले. कॅप्टन पूजा मेहरा यांनी ही धाव स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याचा आणि क्षमतेवर नव्याने विश्वास ठेवण्याचा प्रवास असल्याचे म्हटले. पूनम करंजकर यांनी हा अनुभव त्यांच्या धावण्याच्या दशकपूर्तीशी जोडलेला एक खास क्षण असल्याचे नमूद केले. गेल्या काही वर्षांपासून 'पिंकॅथॉन' ही केवळ एक धाव नसून ती एक देशव्यापी चळवळ बनली आहे. महिलांच्या आरोग्य, आत्मविश्वास आणि सशक्तीकरणासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्रत्येक स्त्री स्वतःची नायिका बनू शकते, हा संदेश यातून अधिक ठामपणे पोहोचवला जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 5:34 pm

टोल प्लाझावर आता ‘कॅश’ला ‘नो एन्ट्री’!

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणा-या वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. येत्या १० एप्रिलपासून देशातील सर्व टोलनाक्यांवरील रोख (कॅश) व्यवहार पूर्ण बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे आता टोल प्लाझावर केवळ फास्टॅग, ‘यूपीआय’द्वारेच व्यवहार करता येतील. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी व टोल नाक्यांवरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. देशातील सुमारे […] The post टोल प्लाझावर आता ‘कॅश’ला ‘नो एन्ट्री’! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 5:32 pm

‘होर्मुझ’नंतर आता इराणकडून आणखी एक सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा

तेहरान : अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यात लष्करी संघर्ष सुरू झाल्यानंतर इराणने तेल वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असलेली होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी केली. त्यानंतर संपूर्ण जगावर ऊर्जा संकट ओढवले. शत्रू जहाजांसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. आता इराणच्या संसदेच्या अध्यक्षांनी सुचवले आहे की, तेहरान जगातील आणखी एक अत्यंत महत्त्वाची बाब एल मंडेब सामुद्रधुनी लक्ष्य करू शकतात. […] The post ‘होर्मुझ’नंतर आता इराणकडून आणखी एक सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 5:21 pm

छत्रपतींशी तुलना नको, फडणवीसच पुढील 25 वर्षे मुख्यमंत्री:जैन मुनींच्या विधानावर नीतेश राणेंची नाराजी व्यक्त करत स्पष्टोक्ती

आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे मंत्री नीतेश राणे यांनी आज विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. जैन मुनी निलेशचंद्र यांनी त्यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने राणे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. महाराजांशी तुलना कुणाचीही होऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी हे विधान अमान्य असल्याचे स्पष्ट केले. तसेच, मुंब्रा शहराचे नाव 'मुंबादेवी' करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला. एका कार्यक्रमादरम्यान जैन मुनी निलेशचंद्र यांनी नीतेश राणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. नीतेश राणे यांची उंची छत्रपती शिवाजी महाराजांसारखीच आहे. मालेगाव किंवा मालवणमध्ये तणाव निर्माण झाल्यावर ते सर्वात आधी तिथे पोहोचतात. त्यांची आक्रमकता बाळासाहेब ठाकरेंची आठवण करून देते. नीतेश राणे यांनी केवळ मंत्रीच नाही, तर राज्याचे मुख्यमंत्री व्हायला हवे, अशी इच्छा मुनींनी व्यक्त केली होती. पुढची २५ वर्षे फडणवीस हेच मुख्यमंत्री मुनींच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असतानाच, नितेश राणे यांनी यावर स्पष्टीकरण दिले. नीतेश राणे म्हणाले की, कोणी आपली भावना व्यक्त केली असली, तरी आम्हाला ती मान्य नाही. राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा कर्तबगार मुख्यमंत्री लाभला असून पुढची २५ वर्षे तेच राज्याचे नेतृत्व करतील. मुनीजींच्या वक्तव्यानंतर मी स्वतः त्यांच्याकडे या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अशोक खरात प्रकरण आणि 'एसआयटी' सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपांना नीतेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या तपासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एसआयटी' (SIT) नेमली आहे. पोलीस प्रत्येक बारकाव्याचा अभ्यास करत आहेत. हा प्रश्न अनेक महिलांच्या भविष्याशी संबंधित असल्याने अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणाला काही आरोप करायचे असतील, तर त्यांनी थेट 'एसआयटी'शी संपर्क साधावा, असा सल्लाही त्यांनी दिला. मुंब्राचे नामांतर 'मुंबादेवी' करण्याचा निर्धार नितेश राणे यांनी यावेळी मुंब्रा शहराच्या नामांतराबाबत महत्त्वाचे विधान केले. मुंब्राचे नाव बदलून 'मुंबादेवी' करावे, ही तिथल्या स्थानिक लोकांची तीव्र भावना आहे. ही लोकभावना मी माझ्या भाषणातून मांडली असून, आता राज्य सरकारकडे याचा पाठपुरावा करून मुंब्राचे नाव मुंबादेवी करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत राणे यांनी संवेदनशील भूमिका मांडली. अजितदादांचे सर्वच राजकीय पक्षांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनानंतरची ही निवडणूक राजकारण करण्याची वेळ नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी सर्वच स्तरातून होत असून ती रास्त आहे, असे राणे म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 5:18 pm

विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूलबसच्या धडकेत 1 ठार:तोंडापूर शिवारातील घटना, शालेय प्रशासनाने तासाभरानंतर दुसरी बस पाठवून विद्यार्थ्यांची केली सोय

आखाडा बाळापूर ते वारंगाफाटा शिवारात स्कुलबसच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी ता. ४ दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातांनतर शाळा प्रशासनाने तब्बल एक तासानंतर दुसरी बस पाठवून विद्यार्थ्यांना घरी सोडले. या प्रकारामुळे पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वारंगाफाटा येथील साई इंग्लीश स्कूलची बस नेहमी प्रमाणे आज दुपारी विद्यार्थी घेऊन त्यांच्या गावाकडे निघाली होती. या बसमध्ये तब्बल ५० ते ५५ विद्यार्थी बसविले होते. सदर स्कूलबस तोंडापूर, दांडेगाव, डिग्रस, रामेश्‍वर येथील विद्यार्थी सोडण्यासाठी निघाली होती. सदर बस आखाडा बाळापूर ते वारंगाफाटा मार्गावर तोंडापूर शिवारात आली असताना चालकाने समोरून पायी येणाऱ्या व्यक्तीला जोरदार धडक दिली. या अपघातात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग यांच्यासह गावकरी घटनास्थळी धावले. त्यांनी सदर जखमीला तातडीने उपचारासाठी नांदेडला हलविले. मात्र त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. रामराव गोपाळराव कपाळे (६५) असे मयताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या अपघातानंतर बसमधील विद्यार्थी घाबरून रडू लागले. त्यानंतर काही गावकरी व चालकाने विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांशी बोलणे करून दिले. शाळा प्रशासनाकडे तातडीने दुसरी बस पाठविण्याची विनंती करण्यात आली. मात्र गांभीर्य नसलेल्या शाळा प्रशासनाने तब्बल एक तासानंतर दुसरी बस पाठवून विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी नेऊ सोडले. या प्रकारामुळे पालक व नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. एकाच बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसविणाऱ्या शाळा प्रशासनावरही कारवाई केली पाहिजे अशी चर्चा सुरु होती. या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 5:16 pm

शशी थरूर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न

मलप्पूरम : काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या वाहनांना घेरून त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यूडीएफ उमेदवार ए. पी. अनिल कुमार यांच्या प्रचारासाठी शशी थरूर जात होते. त्यावेळी सात ते आठ जणांनी ताफा अडवत हल्ला करत थरूर यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […] The post शशी थरूर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 5:14 pm

सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत?

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना नवे वळण मिळाले असून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्राचा थेट परिणाम १६ फेब्रुवारी रोजी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावर झाला. त्या पत्राच्या आधारेच पार्थ पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यासंदर्भातील कागदपत्रेही […] The post सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 5:11 pm

नाशिकमध्ये महिलांच्या शोषणासंबंधी आणखी एक धक्कादायक घटना समोर

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमधील भोंदू अशोक खरातचे प्रकरण संपूर्ण देशभर चर्चेत आहे. एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच नाशिकमध्ये अशाच प्रकारे महिलांच्या लैंगिक शोषणासंबंधी आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘खरात पार्ट २’ अशी चर्चा नाशिकमध्ये या प्रकरणाविषयी सुरू आहे. शहराच्या सातपूर परिसरात घडलेल्या या प्रकरणाने नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे. स्वत:ला पत्रकार […] The post नाशिकमध्ये महिलांच्या शोषणासंबंधी आणखी एक धक्कादायक घटना समोर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 5:10 pm

परळगव्हाण येथे ऊस विकास परिसंवादास प्रतिसाद

परभणी : राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील परळगव्हाण येथे ऊस उत्पादक शेतक-यांसाठी विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. एफएमसी आणि ट्वेंटीवन शुगर्स, सायखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगतिशील शेतकरी भास्करराव शिंदे यांच्या शेतावर पार पडलेल्या या कार्यक्रमात ऊस पिकाचे एकात्मिक कीड, रोग व अन्नद्रव्य व्यवस्थापनावर मार्गदर्शन करण्यात आले. […] The post परळगव्हाण येथे ऊस विकास परिसंवादास प्रतिसाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 5:03 pm

उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील, त्याला आमचा पाठिंबा:शरद पवार करणार राज्यसभा निवडणुकीतील मदतीची परतफेड; ठाकरेंना शब्द

राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या निमिताने महाविकास आघाडीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना खंबीर पाठिंबा दिला होता. आता या पाठिंब्याची शरद पवार 'परतफेड' करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील, त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असेल, असा शब्द शरद पवार यांनी दिला आहे. या निर्णयामुळे विधानपरिषदेची महाविकास आघाडीची एकमेव जागा आता 'ठाकरे गटा'च्या वाट्याला जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीच्या वाट्याला ८ तर महाविकास आघाडीला केवळ १ जागा मिळण्याची शक्यता आहे. या एका जागेसाठी आघाडीत रस्सीखेच सुरू होती, मात्र शरद पवारांच्या भूमिकेमुळे हा मार्ग मोकळा झाला आहे. या एका जागेवरून आघाडीत ओढाताण सुरू असतानाच शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे. नेमके काय म्हणाले शरद पवार‌? पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना साधताना शरद पवार म्हणाले, माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी मोलाची मदत केली. आता विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील, त्याला आमचे पूर्ण सहकार्य राहील. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तीनही पक्ष एकत्रितपणे निर्णय घेतील. कोणताही निर्णय सामूहिक पद्धतीने घेतला जाईल, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेत? शरद पवार यांच्या विधानामुळे ही एकमेव जागा आता 'ठाकरे गटा'च्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे. पुढील महिन्यात खुद्द उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपत असल्याने, ते स्वतः मैदानात उतरणार की एखाद्या निष्ठावान सहकाऱ्याला संधी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेच्या या सदस्यांचा कार्यकाळ संपणार विधान परिषदेच्या एकूण ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. यामध्ये भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर, शिवसेना शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे, अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांचा समावेश आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 4:39 pm

अशोक खरातचे वजन घटले; बारावा गुन्हा दाखल

नाशिक : प्रतिनिधी दुस-यांचे भविष्य सांगणा-या भोंदू अशोक खरातचे स्वत:चे भविष्यच आता अंध:कारमय झाले आहे. एसआयटी चौकशीत त्याच्या काळ्या कारनाम्यांची वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येत आहे. सततची चौकशी, त्यात असणारे विविध आजार यामु्ळे त्याचे वजन मागच्या काही दिवसांत ६ ते ७ किलोंनी कमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले […] The post अशोक खरातचे वजन घटले; बारावा गुन्हा दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 4:22 pm

राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस?

बारामती : प्रतिनिधी राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षानंतर अजित पवार यांच्या गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. अजित पवार गटातील अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली […] The post राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफूस? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 4:16 pm

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनी

पुणे : प्रतिनिधी राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील ४०५ शासकीय शाळा आता ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. तसेच, खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एका आदर्श शाळेत ‘क्रीडा प्रबोधिनी’ निर्माण केली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे […] The post राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 4:12 pm

मराठी न बोलता येणा-या रिक्षाचालकांचा परवाना रद्द होणार?

मुंबई : प्रतिनिधी रिक्षा परवाना घेतल्यानंतरही मराठी बोलता येत नसलेल्या चालकांची पुन्हा खातरजमा करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. त्यामुळे मराठी येत नसलेल्या रिक्षाचालकांच्या परवान्यांवर गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यात विविध शहरांमध्ये शासनाकडून रिक्षाचालकांना परवाने (परमीट) देण्यात आले असून, त्याच आधारे वाहतूक पोलिसांकडून रिक्षा चालवण्यास परवानगी […] The post मराठी न बोलता येणा-या रिक्षाचालकांचा परवाना रद्द होणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 4:07 pm

दमानियांना 'सीडीआर' पुरवतंय कोण?:अशोक खरातच्या सीडीआरमध्ये भाजपचा एकही माणूस कसा नाही? सुषमा अंधारेंचा सवाल

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्रात मोठे 'राजकीय युद्ध' सुरू झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स (CDR) बाहेर काढल्याने खळबळ उडाली असली, तरी विरोधकांना न मिळणारी गोपनीय माहिती दमानियांपर्यंत पोहोचतेच कशी? आणि या यादीत भाजपच्या एकाही नेत्याचे नाव का नाही? असा टोकदार सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. शनिवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकार आणि तपास यंत्रणांना धारेवर धरले. सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला. अंजली दमानियांनी खरातचे सीडीआर रेकॉर्ड बाहेर काढले ही चांगली गोष्ट आहे. पण ही गुप्त माहिती त्यांना पुरवतंय कोण? असा सवाल अंधारे यांनी केला. दमानिया म्हणतात की तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी खरातला १७ कॉल केले होते. त्यांचा रोख एकनाथ शिंदेंच्या दिशेने आहे. मात्र, ज्यांनी खरातच्या 'इशान्येश्वर' मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आणि १ कोटींचा निधी मंजूर केला, त्यांच्या कॉलचा रेकॉर्ड का समोर आला नाही? या यादीत भाजपच्या एकाही नेत्याचे नाव नसणे ही मोठी 'गडबड' वाटते, असेही सुषमा अंधारे म्हणाल्या. एसआयटीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह अशोक खरातच्या संपत्तीची आणि त्याच्या संपर्कातील लोकांची चौकशी करण्यासाठी स्थापन झालेल्या एसआयटीकडून (SIT) अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर का आली नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आश्वासन दिले होते, मग अद्याप गमे, आवारे आणि पोफळे यांना ताब्यात का घेण्यात आले नाही? एसआरए खात्यातील अधिकारी भांडे तिथे काय करत होते? सरकारला हे प्रकरण तडीला न्यायचे आहे की फक्त काही लोकांना राजकीयदृष्ट्या 'डॅमेज' करायचे आहे? असा घणाघात अंधारे यांनी केला. रूपाली चाकणकरांवर पुन्हा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यावरही सुषमा अंधारे यांनी बोचरी टीका केली. चाकणकर यांना चौकशीचे समन्स निघाल्याची चर्चा असताना त्यांनी तीन दिवस मौन का बाळगले? मात्र, आता त्यांना कंठ फुटला आहे. या तीन दिवसांत त्यांनी तपास यंत्रणा 'मॅनेज' केल्या का? 'तपास यंत्रणा माझ्या हातात आहेत', असा संदेश त्या देऊ पाहत आहेत का? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. केवळ चाकणकर यांना लक्ष्य करून चालणार नाही, तर या संपूर्ण प्रकरणामागील सुत्रधारांना शोधणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. लेकींच्या अब्रूशी खेळू नका अशोक खरातने महाराष्ट्रातील अनेक लेकींच्या अब्रूशी खेळ मांडला आहे. अशा प्रवृत्तीला गजाआड पाठवणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे. मात्र, सध्या ज्या प्रकारे गोपनीय माहिती बाहेर येत आहे, त्यावरून हे प्रकरण एका ठराविक दिशेने वळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय येतो, असेही अंधारे यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 4:06 pm

माझे मुद्दे रोहितदादांनी ऑलरेडी मांडलेत:रोहित सिंगला अजून अटक का नाही? जय पवारांचा सवाल; कुटुंब म्हणून एकत्र राहण्यावरही भर

अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी मला जे मुद्दे मांडायचे होते, ते मुद्दे रोहित पवारांनी ऑलरेडी मांडलेत, अशी भावना दिवंगत अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. एखादी इमारत पडली तर त्या इमारतीच्या मालकाला अटक करतात, त्या इमारतीच्या इंजिनिअर्सना नाही. रेस्टॉरंटला आग लागली, तर रेस्टॉरंटच्या मालकाला अटक करतात. मग एवढा मोठा अपघात झाला असताना रोहित सिंगला (विमान कंपनीचे मालक) अजून का अटक झाली नाही? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. जय पवार यांनी शनिवारी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारला झाल्या नुकसानीचा तत्काळ पंचनामे करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना त्यांनी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा आग्रह धरला. ते म्हणाले, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. शरद पवारांनीही आजच अशी भूमिका व्यक्त केली आहे. अजितदादांचे काम व प्रेम सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे बारामतीकरांचीही तीच इच्छा आहे. काँग्रेसने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी अजून आपला उमेदवार दिला नाही. विरोधकांना बारामती लढवायची असेल तर लढवावी या प्रकरणी खूप घडामोडी घडत आहेत. या प्रकरणी आमचे ज्येष्ठ नेते त्यांच्याशी बोलतील. गरज पडली तर आम्हीही त्यांच्याशी संवाद साधू. पण बारामतीकरांचे पवार कुटुंबीयांवर खूप प्रेम आहे. जनता अजूनही खूप भावनिक आहे. त्यामुळे विरोधकांना लढायचे असेल तर लढावे, पण बारामतीकर या निवडणुकीत काय करणार आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आम्ही अजित पवारांशिवाय निवडणूक लढवण्याची कल्पनाही केली नव्हती. मी यावर फार बोलणार नाही. मी फार भावनिक आहे. मी सर्वांपुढे याविषयी बोलणार नाही, असे ते म्हणाले. माझे मुद्दे रोहितदादांनी ऑलरेडी मांडलेत पत्रकारांनी यावेळी जय पवार यांना विमान अपघातावर तुम्ही एक पत्रकार परिषद घेणार होता, ती अजून का घेतली नाही, असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, ही पत्रकार परिषद न घेण्याचे काहीही कारण नाही. जे मुद्दे मला बोलायचे होते, त्या मुद्यातील काही मुद्दे ऑलरेडी रोहित पवारांनी सांगितले आहेत. मला जे मुद्दे बोलायचे होते ते मुद्दे रोहितदादांच्या पत्रकार परिषदेत कव्हरअप झाले. त्यामुळे या प्रकरणी जोपर्यंत फायनल अहवाल येत नाही, तोपर्यंत मी त्यावर बोलून उगीचच संभ्रम पसरवू नये. आम्हाला वैयक्तिक पातळीवर जे वाटते ते वाटते, पण जेव्हा अंतिम अहवाल येईल तेव्हा तुमच्यापुढे येऊन सर्वकाही स्पष्ट करेन. रोहित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा आहे का? पत्रकारांनी यावेळी जय पवार यांना तुमचा रोहित पवारांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा आहे का? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, मी तसे नाही बोललो. तुम्ही माझ्या मुद्द्यांचा चुकीचा उल्लेख करू नका. मी बोललो, माझे जे मुद्दे होते ते त्यांनी कव्हरअप केलेत. यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता. त्यात रोहित सिंग व्हिडिओत झोपलेले होते. तेव्हा मी आग्रह धरला की, जर असा अपघात झाला तर काय? एखादी इमारत पडली तर त्या इमारतीच्या मालकाला अटक करतात, त्यांच्या इंजिनिअर्सना करत नाहीत. रेस्टॉरंटला आग लागली तर रेस्टॉरंटच्या मालकाला अटक करतात. मग जेव्हा असा मोठा अपघात होतो तेव्हा त्यांनाही अटक झाली पाहिजे ही माझी मागणी आहे. पवार कुटुंब एकत्र राहावे असे वाटते जय पवार यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या मुद्यावरही भाष्य केले. या प्रकरणी माझे वैयक्तिक काहीही नाही. मी खूप छोटा आहे. या प्रकरणी वहिनी असतील, पार्थ दादा असेल, बाकीचे ज्येष्ठ नेते असतील ते ठरवतील. मला वाटते की, आम्ही कुटुंब म्हणून सर्वजण एकत्र राहावे. कारण, तुम्हाला माहिती आहे की, जेव्हा दादा आपल्याला सोडून गेले तेव्हा सर्व पवार कुटुंब एकत्रित होते. आजही आम्ही एकत्र आहोत. आजही आम्ही एकमेकांशी बोलतो. राजकारणाच्या भागावर जास्त संभाषण करणे मला योग्य वाटत नाही. ते आपल्या पक्षातील वरिष्ठ नेते बोलतील, असे जय पवार म्हणाले. खाली पाहा व्हिडिओ

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 4:04 pm

मजुराच्या लेकीची पोलिस शिपाई पदाला गवसणी

पुर्णा : हालाखीच्या परिस्थितीत संसाराचा गाडा हाकत दिवसरात्र मजुरी करून मुलांना शिकवणा-या बापाच्या कष्टाला अखेर गोड फळ मिळाले आहे. पुर्णा तालुक्यातील अजदापुर येथील मजूर काम करणा-या नामदेव हिवरे यांची मुलगी सीमा हिवरे हिने प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर परभणी पोलिस भरतीत यश संपादन करत महिला पोलिस शिपाई पदाला गवसणी घातली आहे. तिचे हे यश […] The post मजुराच्या लेकीची पोलिस शिपाई पदाला गवसणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 3:43 pm

रात्र कोणासोबत घालवली? एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर निशाणा:गुन्हा दाखल झाल्यानंतर आक्रमक भूमिका; महाजन यांचाही पलटवार

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील जमीन खरेदी प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नवे वादळ निर्माण झाले आहे. या प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बोधवड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव टाकला जात असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, पूर्वी मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता, पण आता तसं होणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खडसे यांनी नाव न घेता जामनेरमधील एका बड्या मंत्र्यावर टीका केली. माझ्या राजीनाम्याची भाषा करणाऱ्यांनी आधी स्वतःच्या कारवायांचा विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला. पुढे बोलताना त्यांनी अशोक खरात प्रकरणाचा संदर्भ देत अधिकच खळबळजनक विधान केले. जे खरातकडे गेले असतील, त्यांच्यासोबत रात्र घालवली असेल, त्यांना जाऊन विचारा, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे काही नेत्यांवर गंभीर आरोपांचे संकेत दिले. खडसे यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांच्या वक्तव्याचा रोख जामनेरकडे असल्याची चर्चा रंगली आहे. मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्ही समजून घ्या, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे गिरीश महाजन यांच्याकडे इशारा केल्याचे मानले जात आहे. या सूचक वक्तव्यामुळे दोन्ही नेत्यांमधील वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जमीन खरेदी प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे खडसे यांच्यावर दबाव वाढल्याचे बोलले जात आहे. भुसावळ तालुक्यातील व्यवहारावरून हा गुन्हा दाखल झाला असून त्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून खडसेंवर टीका होत असताना त्यांनी मात्र संघर्षाची भूमिका घेतली आहे. खोट्या गुन्ह्यांना मी घाबरणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गिरीश महाजन यांचा पलटवार दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणावर पलटवार केला आहे. आम्ही कोणत्याही भोंदू बुवा-बाबाकडे जात नाही. अशा बाबकडे जाण्याची आम्हाला गरज नाही. कोणालाही हाथ दाखवून भविष्य पाहण्याची मला आवश्यकता नाही. माझा माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे. असे म्हणत महाजन यांनी खडसे हे बुवा-बाबाकडे जात असल्याचे म्हटले आहे. आमचे सरकार पडणार? असा दावा ते करत असतील तर त्यांना मंत्रीपदासाठी आमच्या शुभेच्छा, असे म्हणत महाजन यांनी खडसे यांना टोला लगावला आहे. नाथाभाऊ विरुद्ध गिरीशभाऊ वाद एकंदर पाहता, या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यातील नाथाभाऊ विरुद्ध गिरीशभाऊ, हा वाद पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. खडसे आणि महाजन यांच्या आक्रमक वक्तव्यामुळे राजकीय संघर्ष अधिकच वाढण्याची शक्यता आहे. येत्या काळात या प्रकरणावर कोणती राजकीय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 3:42 pm

राज्यात १.३१ लाख हेक्टर रबी पिकांचे नुकसान

पुणे : प्रतिनिधी राज्यात मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने मोठा कहर केला असून, तब्बल १ लाख ३१ हजार ४६५ हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. गहू, हरभरा पिकांसह फळपिके आणि भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मार्च महिन्यात राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये १ लाख २२ हजार ९९७ […] The post राज्यात १.३१ लाख हेक्टर रबी पिकांचे नुकसान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 3:26 pm

अनिल देशमुख-परमबीर सिंह एकाच व्यासपीठावर

जामठा : प्रतिनिधी विदर्भातील ज्येष्ठ नेते दिवंगत दत्ता मेघे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवार, ४ एप्रिल रोजी जामठा येथे सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला महाराष्ट्रातील राजकारणातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. मात्र, या शोकसभेमध्ये उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी. एकाच […] The post अनिल देशमुख-परमबीर सिंह एकाच व्यासपीठावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 3:25 pm

सरकारचे परराष्ट्र धोरण चुकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आखाती देशात युद्ध सुरू असल्याने शेतक-यांवर मोठा परिणाम होत आहे. भारत-अमेरिका कराराचा मोठा फटका शेतक-यांना बसणार आहे. भारताचे परराष्ट्र धोरण १०० टक्के चुकले आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारवर केली आहे. शेतकरी संघटनेची पुढची रणनीती काय असावी, यावर शुक्रवार, ३ एप्रिल रोजी बैठक पार पडली. देशभरातील शेतकरी […] The post सरकारचे परराष्ट्र धोरण चुकले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 3:24 pm

भोंदू खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर नाही:बदली नव्हे सेवेतून थेट बडतर्फ करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बदली नव्हे तर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिला. बावनकुळे यांच्या या इशाऱ्यामुळे भोंदू खरात प्रकरणात नाव येण्याची शक्यता असणाऱ्या अधिकारी वर्गात एकच खळबळ माजली आहे. भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेत. यापैकी 8 गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक व जादूटोण्याशी संबंधित आहेत. तर इतर 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. या सर्वच प्रकरणांची एसआयटी अर्थात विशेष तपास पथक कसून चौकशी करत आहे. या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी खरातला मदत केल्याची माहितीही पुढे येत आहे. यात मंत्रालयापासून स्थानिक पातळीपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपरोक्त इशारा दिला आहे. सर्वच अधिकाऱ्यांवर होणार कारवाई चंद्रशेखर बावनकुळे या प्रकरणी बोलताना म्हणाले, अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची केवळ बदली केली जाणार नाही. त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली जाणार. मग हे अधिकारी कोणत्याही खात्याचे असले तरी काही फरक पडणार नाही. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. एसआयटी या प्रकरणी योग्य पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे यासंबंधी कुणाकडे काही पुरावे असतील तर ते एसआयटीला द्यावेत. नाशिकच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे जे काम झाले आहे, त्या लोकांवर अत्यंत कडक कारवाई केली जाईल. आमच्या अधिकाऱ्यांनी खरातला मदत केली असेल तर त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारला जाईल. एसआयटी टीमकडून आमच्याकडे नाव आल्यानंतर त्यांना नोकरीवर ठेवले जाणार नाही. भोंदू अशोक खरात प्रकरणात कुणीही सुटणार नाही. या प्रकरणी खरातच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार आहे. त्यात जे दिसून येतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अशोक खरातला जमिनी मालमत्ता जमा करण्यासाठी मदत करणाऱ्यांनाही सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले. सीएमओने बावनकुळेंना माहिती पुरवली नाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना मुख्यमंत्री कार्यालय माहिती पुरवत असल्याचा आरोपही फेटाळून लावला. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालय अशी माहिती देणार नाही. त्यांनी स्वतः ही माहिती काढली असेल. त्यांनी त्यांच्याकडे असणारी माहिती एसआयटीला द्यावी. शिर्डी प्रकरणात माझ्याकडे सुनावणी लावली तर मी त्यावर निर्णय घेतो. दुष्कृत्यामध्ये सहभागी असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल, असे ते म्हणाले. हे ही वाचा... बावनकुळेंच्या कुटुंबीयांच्या नावे 1147 एकर जमीन?:सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती, गुन्हा दाखल; केवळ 28.44 एकर जमीन सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे हजारो एकर जमीन असल्याप्रकरणी सोशल मीडियावर चुकीची माहिती दिल्याप्रकरणी नागपूरच्या कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार हेक्टर आणि आर मोजण्यात गल्लत झाल्यामुळे झाल्याचा दावा केला जात आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 3:20 pm

मोठे मन दाखवण्याची मागणी काँग्रेसने फेटाळली:सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणारच; सपकाळ यांनी स्पष्ट केली भूमिका

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवारी देण्याबाबत काँग्रेस पक्ष ठाम असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. या आधी पक्षाची जी भूमिका होती, त्याच भूमिकेवर काँग्रेस पक्ष ठाम असल्याचे देखील त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. वास्तविक या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तसेच अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीने ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. मात्र तरी देखील काँग्रेस पक्षाची भूमिका ठाम असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवार देणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणूक संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांना आमची भावना कळवली असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. यासंदर्भात चर्चा जरी सुरू असली तरी पक्षाने दोन्ही ठिकाणी उमेदवारांची चाचपणी केलेली आहे. उद्यापर्यंत उमेदवाराच नाव काँग्रेस पक्षाच्या वतीने अंतिम करणार असल्याचं हर्षवर्धन सपकाळ सांगितले आहे. या पोटनिवडणूक संदर्भाची जी भूमिका होती त्या भूमिकेवर काँग्रेस पक्षात ठाम आहे. या संदर्भात राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीय स्तरावर देखील सर्व नेत्यांशी चर्चा झाली असल्याचे सपकाळ यांनी सांगितलं. त्यामुळे या संदर्भात उद्या दुपारपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे देखील ते म्हणाले. मन मोठे करून पाठिंबा दिला पाहिजे:फडणवीसांचे आवाहन या संदर्भात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वच पक्षांनी सुनेत्रा ताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की, ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीने परिस्थित होईल. यापूर्वी अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणूक केलेली आहे. मला आठवतं की, ज्या वेळेस आर. आर. आबांचे दुःखद निधन झालं होतं. त्यावेळी आपण पोटनिवडणूक बिनविरोध केली होती. भाजपने ठरवले होते की, निवडणूक लढणार नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी मन मोठे करून बिनविरोध निवडणूक करायला हवी, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 3:15 pm

बावनकुळेंच्या कुटुंबीयांच्या नावे 1147 एकर जमीन?:सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती, गुन्हा दाखल; केवळ 28.44 एकर जमीन

सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे हजारो एकर जमीन असल्याप्रकरणी सोशल मीडियावर चुकीची माहिती दिल्याप्रकरणी नागपूरच्या कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार हेक्टर आणि आर मोजण्यात गल्लत झाल्यामुळे झाल्याचा दावा केला जात आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे तब्बल 1147 एकर जमीन असल्याचा आरोप रामेश्वर दरेकर नामक व्यक्तीने एका फेसबूक पोस्टद्वारे केला होता. यामुळे एकच खळबळ माजली होती. ही पोस्ट राज्यात चांगलीच व्हायरल झाली होती. त्यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. परिणामी, बावनकुळे कुटुंबीयांविषयी समाजात चुकीची प्रतिमा निर्मिती झाली होती. अखेर या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा कोराडी पोलिस ठाण्यात रामेश्वर दरेकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 78 (1) (ii) आणि 356 (2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराने काय केला दावा? निखिल रामचंद्र इंगळे यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेसबुकवर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये रामेश्वर दरेकर याने महसूल मंत्री बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर 1147 एकर जमीन असल्याचा दावा केला होता. हा व्हिडिओ 31 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला. या दाव्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊन बावनकुळे कुटुंबाची बदनामी झाली, असे निखिल इंगळे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या नेतृत्वात तपास सुरू केला आहे. तहसीलदार, कामठी कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत प्रमाणपत्रानुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर एकूण जमीन केवळ 28.44 एकर आहे. ही जमीन विविध गावे व सर्वे क्रमांकांमध्ये नोंद आहे. परिणामी, 1147 एकरचा दावा पूर्णपणे चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. हेक्टर आणि आर मोजण्यात गल्लत झाल्याने झाली गफलत दुसरीकडे, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी हेक्टर व आर मोजण्यात गल्लत झाल्यामु्ळे हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे हजारो एकर जमीन असल्याबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी अखेर कोराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर या संदर्भात हेक्टर आणि आर मोजण्यात काहीतरी गल्लत झाली असावी असे सकृतदर्शनी वाटते. चुकून आर ऐवजी हेक्टर वाचल्याने हे घडले असावे, असे विजय कुंभार यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 2:43 pm

सातारा ZP मध्ये भाजप, NCP चे प्रत्येकी 2 सभापती:बंडखोर सदस्यांमुळे बिनविरोध निवड, पोलिसांचा आडमुठेपणा कायम

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीवेळी झालेल्या राड्यानंतर आज 4 सभापतींची निवड प्रक्रिया पार पाडली. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर जिल्हा परिषद सदस्यांमुळे बिनविरोध झाली. यावेळीही पोलिसांनी केवळ पत्रकारच नव्हे तर जिल्हा परिषद सदस्यांविषयीही आपला आडमुठेपणा दाखवला. सातारा जिल्हा परिषदेत आज समाज कल्याण सभापती, महिला व बालकल्याण सभापती तथा दोन विषय समित्यांच्या सभापतीची निवड प्रक्रिया पार पडली. त्यात समाज कल्याण सभापतीपदी भाजप सदस्य ऋषिकेश धायगुडे यांची निवड झाली, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी राष्ट्रवादीच्या ऋतुजा शिंदे यांची निवड झाली. याशिवाय विषय समित्यांच्या सभापतीपदी भाजपच्या तेजस्विनी कदम व राष्ट्रवादीच्या लता कर्णे यांची निवड झाली. तत्पूर्वी, कालपासून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व संदीप मांडवे हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण आज हे दोघेही काळ्या फिती लावून शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांसोबत एकत्र आले. पण राष्ट्रवादीचे सदस्य कामेश कांबळे ऐनवळी गैरहजर राहिले. त्यामुळे अनिल देसाई व संदीप मांडवे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. शिवसेना - राष्ट्रवादीने केला निषेध दुसरीकडे, जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य फोडल्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे पक्षाच्या सदस्यांनी सभापती निवडीच्या वेळी दंडाला काळ्या फिती बांधून आपला निषेध व्यक्त केला. या सर्वांनी निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. त्यानंतर ते आपला निषेध नोंदवण्यासाठी जिल्हा परिषद इमारतीच्या पायऱ्यांवर ठाण मांडून बसले होते. यावेळी त्यांनी पोलिसांच्या आडमुठेपणाविरोधातही जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते जमावबंदीचे आदेश उल्लेखनीय बाब म्हणजे सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याचे राज्य विधिमंडळात तीव्र पडसाद उमटले होते. या घटनेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दुखापत झाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यामुळे आजच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत ह्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी खबरदारी म्हणून जमावबंदीचे आदेश जारी केले होते.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 2:15 pm

अशोक खरात प्रकरणात रोहित पवारांचा मोठा दावा, ED चौकशीची मागणी:हवाल्याद्वारे कोट्यवधींची मनी लॉन्डरिंग? राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा

भोंदू अशोक खरात प्रकरणाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरचे गंभीर स्वरूप प्राप्त होत असल्याचे आरोप समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करत धक्कादायक दावे केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, खरात हा केवळ भोंदू नसून मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांच्या जाळ्याचा भाग आहे. ऑस्ट्रेलिया, दुबईसह चार-पाच देशांमध्ये हवाल्याच्या माध्यमातून पैशांची उलाढाल करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रोहित पवार यांनी सांगितले की, या व्यवहारांमध्ये केवळ वैयक्तिक फसवणूक नाही, तर भ्रष्ट अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांचेही पैसे परदेशात पाठवले गेल्याची शक्यता आहे. हजारो कोटी रुपयांची रक्कम या मार्गाने बाहेर गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून त्याकडे केवळ एका गुन्हेगारी घटनेप्रमाणे न पाहता व्यापक आर्थिक आणि राजकीय संदर्भात तपास करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय यंत्रणांकडून सखोल चौकशीची मागणी केली आहे. विशेषतः अंमलबजावणी संचालनालय (ED) सारख्या संस्थांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कारण हवाल्याच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांचा संबंध थेट मनी लॉन्डरिंगशी जोडला जातो. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केवळ राज्य स्तरावर न होता राष्ट्रीय पातळीवर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवार यांनी या मुद्द्याला राष्ट्रीय सुरक्षेशीही जोडले आहे. परदेशात मोठ्या प्रमाणावर पैसा पाठवला गेला असल्यास त्याचे परिणाम देशाच्या आर्थिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर ठरू शकतात. त्यामुळे राज्य सरकारकडे यासंबंधी पुरावे उपलब्ध असतील, तर गृह विभागानेही या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नको, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. धागेदोरे परदेशापर्यंत एकंदर पाहता, अशोक खरात प्रकरण आता केवळ स्थानिक गुन्ह्यापुरते मर्यादित राहिलेले नसून त्याचे धागेदोरे परदेशापर्यंत पोहोचत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक पातळीवर करण्याची गरज निर्माण झाली आहे. केंद्रीय यंत्रणा आणि राज्य सरकार या दोन्हींकडून येत्या काळात काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 2:11 pm

संजय राऊत हे दुसरे अशोक खरात:सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने केली तुलना; स्वतःच्या पक्षाकडे पाहण्याचाही हाणला टोला

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे भोंदू अशोक खरातसारखेच असल्याची टीका सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार अनिल पाटील यांनी केली आहे. अनिल पाटील यांनी केलेल्या या तुलनेमुळे राष्ट्रवादी व ठाकरे गटातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊत शुक्रवारी जळगावच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पारोळा, पाचोरा व मुक्ताईनगर येथील शिंदे गटातील आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अंमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी संजय राऊत यांची तुलना भोंदू अशोक खरातशी केली आहे. भोंदूबाबा अशोक खरात ज्या प्रकारे खोटे भविष्य सांगून लोकांची दिशाभूल करत होता. त्याचप्रमाणे संजय राऊत सध्या राजकीय भविष्यवाणी करत आहेत. त्यांची भविष्यवाणी ही खरातच्या भविष्यवाणीसारखीच भ्रामक आहे, असे ते म्हणालेत. महाराष्ट्रात सध्या संजय राऊत यांच्यासारखे नेते स्वतःला मोठे भविष्यकार समजत आहेत. पण त्यांनी इतर पक्षांविषयी अंदाज व्यक्त करण्याऐवजी स्वतःच्या पक्षातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे. सध्या त्यांच्याच पक्षातील अनेक आमदार व खासदार इतर पक्षांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी अगोदर स्वतःचे घर सांभाळावे व नंतर इतरांवर भाष्य करावे, असे ते म्हणाले. अनिल पाटील यांच्या या विधानावर ठाकरे गटाकडून तीव्र प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. परिणामी, पुढील काही दिवस राज्याचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. अंजली दमानियांना CMO ने माहिती पुरवली - संजय राऊत दुसरीकडे, संजय राऊत यांनी अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना मुख्यमंत्री कार्यालयातूनच माहिती पुरवली जात असल्याचा आरोप करून एकच खळबळ उडवून दिली आहे. ते म्हणाले, अंजली दमानिया या रॉ (RAW) च्या प्रमुख नाहीत. त्यांच्याकडे महाराष्ट्राचे गुप्तहेर खातेही नाही. याचा अर्थ त्यांना ही सगळी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून दिल्याशिवाय मिळणार नाही. ही एवढी गुप्त माहिती आहे की, ती कोणताही व्यक्तिगत माणूस देऊ शकत नाही. आता त्यांचे व मुख्यमंत्र्यांचे संबंध आहेत हे तुम्ही अमान्य करू शकत नाही. ही एकूण परिस्थिती पाहता सरकारच्या टार्गेटवर कुणीही आहे हे स्पष्ट होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक नेम धरला आहे. तो नेम काय आहे? ते तुम्हाला कळेल. जेव्हा बाह्यशक्तीकडून धक्कादायक माहिती बाहेर काढली जाते, ती जनतेपर्यंत पोहोचवली जाते, तेव्हा सरकारच्या निशाण्यावर स्वकीय टार्गेटवर आहेत असा त्याचा अर्थ होतो, असे संजय राऊत म्हणाले. हे ही वाचा...

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 1:54 pm

सर्वच पक्षांनी मन मोठे करुन सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे:फडणवीसांची मागणी; आर. आर. आबांच्या पोटनिवडणुकीची आठवण

बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणूक संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच पक्षांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. सर्वच पक्षांनी मन मोठे करून त्यांना पाठिंबा द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या पोटनिवडणुकीची आठवण काढत, ती निवडणूक देखील बिनविरोध केली असल्याचे सांगितले. या संदर्भात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वच पक्षांनी सुनेत्रा ताईंना पाठिंबा दिला पाहिजे. माझी अशी सर्वांना विनंती असेल की, ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीने परिस्थित होईल. यापूर्वी अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणूक केलेली आहे. मला आठवतं की, ज्या वेळेस आर. आर. आबांचे दुःखद निधन झालं होतं. त्यावेळी आपण पोटनिवडणूक बिनविरोध केली होती. भाजपने ठरवले होते की, निवडणूक लढणार नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी मन मोठे करून बिनविरोध निवडणूक करायला हवी, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सुनेत्रा पवारांनी शिवसेनेचा पाठिंबा मागितला या निवडणुकीत सुनेत्रा पवार मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यांनी याआधी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आता आमदारकीसाठी त्या बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या फोन संभाषणात सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचा पाठिंबा मागितला आहे. तसेच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीही त्यांनी चर्चा केल्याची माहिती पुढे येत आहे. सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेस उमेदवार देणारच काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाने दोन्ही जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. बारामतीत संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या असून, इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतिम उमेदवार निवडताना पक्ष नेतृत्व काळजीपूर्वक निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे. राहुरी मतदारसंघातही उमेदवार निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दोन्ही ठिकाणी उमेदवारांची नावे जाहीर करण्यापूर्वी मित्रपक्षांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. महाविकास आघाडीतील जागावाटप आणि रणनीती यावरही या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. बारामतीसाठी सहा अर्ज तर राहुरीसाठी चार अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच, इच्छुक उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखतीही पार पडल्या आहेत. येत्या दोन दिवसांत निवडणुकीबाबत अधिकृत भूमिका जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 1:46 pm

कार कालव्यात बुडाली; ३ ठार

पंढरपूर : नाशकात कार विहिरीत पडल्याने मोठा अपघात झाला, त्या अपघातात ९ जण ठार झाले, ही घटना ताजी असतानाच इरटीका कार कालव्यात पडल्याने ३ जणांचा मृत्यू झाला. ही घटना पंढरपूरच्या नातेपुते निरा उजव्या कालव्यादरम्यान घडली. पंढरपूरच्या नातेपुते जवळ निरा उजवा कालव्याच्या पुलावरून एक ईरटीका गाडी अचानक कालव्यात पडली. ही कार मुंबईवरून फोंडशिरसकडे जात असताना थेट […] The post कार कालव्यात बुडाली; ३ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 12:55 pm

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक:वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर

राहुरी विधानसभा‎ पोटनिवडणुकीच्या रिंगणात ‎सुरूवातीला बिनविरोध'' ‎‎निवडणुकीची चर्चा झाली. पण ‎‎जसजशी निवडणूक जवळ येत‎ आहे तसे इच्छुकांची भाऊगर्दी‎ वाढताना दिसत आहे. भाजपकडून ‎‎अक्षय कर्डिले यांना उमेदवारी‎ देण्यात आली. पक्षश्रेष्ठींकडून ‎‎निवडणूक बिनविरोध व्हावी‎ यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. पण ‎‎निवडणुकीच्या मैदानात‎ विरोधकांची संख्या वाढत असून ‎‎भाजपपुढे आव्हान उभे राहण्याची ‎‎चिन्हे दिसत आहेत. राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार जाहीर केला आहे. यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. वंचितकडून अहिल्यानगर कार्यकारिणीच्या बैठकीत अनिल भिकाजी जाधव या आदिवासी तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब, कष्टकरी आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काँग्रेससुद्धा निवडणूक लढण्यास इच्छूक राहुरीच्या या रणांगणात आता पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. एकीकडे वंचितने आपला उमेदवार जाहीर केला असताना, दुसरीकडे काँग्रेसनेही राहुरी आणि बारामतीमध्ये निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे काँग्रेसकडूनही स्वतंत्र उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे हे देखील निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याने ही लढत बहुरंगी आणि चुरशीची ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे. प्रयत्न बिनविरोध''साठी,‎पण चर्चा विरोधकांची''!‎ अर्ज भरण्याच्या तिसऱ्या ‎‎दिवसापर्यंत 50 इच्छुकांनी तब्बल 103 अर्ज नेले. तर गोविंद मोकाटे ‎यांनी आपला अपक्ष अर्ज दाखल‎ करत श्रीगणेशा केला आहे. 6‎ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत‎ असून, 9 एप्रिलच्या माघारीनंतरच‎ निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल.‎ केवळ कर्डिले आणि तनपुरेच नव्हे,‎ तर काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष ‎बाळासाहेब आढाव, शिंदे यांच्या‎ शिवसेनेकडून राजुभाऊ शेटे आणि‎ शिवसेना (उद्धव बाळासाहेब‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ठाकरे) गटाचे जिल्हाध्यक्ष ‎रावसाहेब खेवरे यांनीही उमेदवारी‎अर्ज नेल्याने महायुती आणि ‎महाविकास आघाडीतील‎ मित्रपक्षांची भूमिका गुलदस्त्यात‎ आहे. याशिवाय मनसे, वंचित‎ बहुजन आघाडी, एमआयएम,‎ बसपा, आरपीआय (आठवले‎गट) आणि प्रहार जनशक्ती ‎पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही दंड‎ थोपटले आहेत. वरवर पाहता ही निवडणूक सोपी ‎वाटत असली तरी, मित्रपक्ष ‎असलेल्या शिवसेना (शिंदे गट)‎ आणि राष्ट्रवादीच्या काही गटांना ‎शांत ठेवणे भाजपसाठी कठीण जात‎ आहे. निवडणूक बिनविरोध'' ‎करण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न ‎केले होते, मात्र इच्छुकांची वाढती ‎संख्या पाहता आता या नेत्यांना ‎थांबवून निवडणूक एकतर्फी करणे हे ‎भाजपसमोर मोठे आव्हान ठरणार ‎आहे. 9 एप्रिलपर्यंत किती जणांचे‎ मन वळवण्यात भाजपला यश येते,‎ यावर निवडणुकीची गणिते‎ अवलंबून असतील.‎

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 12:48 pm

नांदेड गँगवॉरने हादरले, मध्यरात्री 3 जणांचा मर्डर:अगोदर टोळीच्या म्होरक्याचा मर्डर, नंतर रुग्णालयात जाऊन 2 जखमींची केली हत्या

गत काही महिन्यांपासून वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असणारे नांदेड शहर शुक्रवारी पुन्हा एकदा रक्तरंजित गँगवॉरने हादरले. ताज्या घटनेत 3 जणांची निर्घृण हत्या झाली असून, 3 जण गंभीर जखमी झालेत. दोन टोळ्यांतील जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली. पण रस्त्यावर झालेला हा वाद नंतर थेट रुग्णालयापर्यंत पोहोचला आणि परिस्थिती आणखी चिघळली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, नांदेड शहरातील डी मार्ट परिसरात असलेल्या ई-स्वेअरलगत शुक्रवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास 2 टोळ्यांत वाद झाला. त्यावेळी अरिजितसिंग चव्हाण हा धुरंधर-2 चित्रपट पाहून घराकडे जात होता. त्याच्यावर सय्यद आवेज सय्यद खलील, घनश्याम रेड्डी, मोहम्मद अरबाज व इतर काही हल्लेखोरांनी तलवार व खंजीरने हल्ला केला. त्यात 25 वर्षीय अरिजितसिंग चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या घटनेत जखमी झालेल्या सय्यद आवेज, सय्यद खलील व इतर एकाला तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले. तिकडे हल्लेखोरांना सरकारी दवाखान्यात दाखल केल्याची गोष्ट अरिजितसिंग चव्हाणच्या भावाला समजली. त्यानंतर त्याने तत्काळ रुग्णालयाच्या धाव घेतली. तिथे त्याने जखमी सय्यद आवेज सय्यद खलील (27) व मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख (23) या दोघांवर धारदार चाकूने हल्ला केला. त्यात या दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालयात एकच हल्लकल्लोळ माजला. पोलिसांनी काय दिली माहिती? पोलिसांनी या घटनेविषयी सांगितले की, शुक्रवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास ही घटना घडली. घटनेतील दोन्ही टोळ्यांची मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. एका टोळीचा सदस्य अनिल पंजाबी हा सध्या तुरुंगात आहे. तर साहिल 2 महिन्यांपूर्वीच तुरुंगाबाहेर आला होता. त्याच्यावर यापूर्वीही कारवाई झाली होती. दुसरीडे, मृत अरिजितसिंग चव्हाणवर तब्बल 9 गुन्हे दाखल होते. त्याच्यासोबत आणखी एक जण होता. त्याला आम्ही ताब्यात घेतले आहे. प्रस्तुत घटनेत अरिजितसिंग चव्हाणसह अरबाज व आवेज या दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अरबाज, आवेजसह इतर एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याला गंभीरावस्थेत विष्णुपुरी स्थित सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. अरिजितचा मृतदेहही तिथेच होता. त्यामुळे त्याचा भाऊ व वडिल तिथेच होते. त्याच्या भावाने तिथेच जखमींवर चाकू हल्ला केला. त्यात दोघेही ठार झाले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात दोन्ही टोळ्यांनी एकमेकांवर गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 12:46 pm

दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून कुटुंबातील ९ ठार

नाशिक: प्रतिनिधी जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये मध्यरात्री झालेल्या अपघाताने अक्षरश: काळीज पिळवटले आहे. शिवाजीनगर परिसरात एका मंगल कार्यालयात खासगी क्लासचे स्रेहसंमेलन आटोपून घरी इर्टीका कारने परतत असताना सदर कार जवळ असलेल्या शेतातील विहीरीमध्ये कोसळल्याने एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.३) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. मृतामध्ये ६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी […] The post दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून कुटुंबातील ९ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 4 Apr 2026 12:38 pm

हडपसरमध्ये विद्यार्थी बसचा अपघात:25 ते 30 जखमी, विजेच्या खांबाला धडक; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, हडपसर येथील काळेपडळ परिसरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात झाला आहे. विजेच्या खांबाला धडकल्याने झालेल्या या अपघातात 25 ते 30 विद्यार्थी जखमी झाले. या प्रकरणी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अमोल विनायक बोराटे (रा. महादेव मंदिराजवळ, काळेबोराटेनगर, हडपसर) या बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसकर्मचारी नंदकुमार जावळे यांनी काळेपडळ पोलिसठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बस चालक हडपसरमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जात होता. काळेपडळ परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळली. या धडकेत बसमधील 25 ते 30 विद्यार्थ्यांना दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. भरधाव वेगाने बस चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बसच्या धडकेने विजेचा खांब पूर्णपणे वाकला होता. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलिस उपनिरीक्षक पूजा पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. महिलेवर लैंगिक अत्‍याचार प्रकरणी गुन्‍हा दाखल महिलेचा वारंवार पाठलाग करून तिच्यावर लैंगिक अत्‍याचार करून फोटो व्‍हायरल करण्याची धमकी देणाऱ्या एकावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. निहाल लतिफ शेख (33, रा. कात्रज नवीन वसाहत, कात्रज) असे गुन्‍हा दाखल करण्यात आलेल्‍याचे नाव आहे. याबाबत एका 33 वर्षीय महिलेनी याबाबत फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2017 ते ऑक्‍टोबर 2025 दरम्‍यान घडला.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 12:26 pm

बिबवेवाडीत अल्पवयीन मुलीचा बालविवाह; गुन्हा दाखल:जिल्हा महिला-बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पुणे शहरातील बिबवेवाडी येथील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुधीर ढाकणे तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. बालविकास प्रकल्प कार्यालयातील मुख्यसेविका स्वाती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाइल्ड हेल्पलाइन 1098 कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या घटनेचा उलगडा झाला. सुपरवायझर मोनिका जाधव आणि संबंधित पथकाने घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली असता मुलीचा विवाह झाल्याचे आढळून आले. त्यानंतर मुलीचे वय निश्चित करण्यासाठी शाळेचा दाखला तपासण्यात आला असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. संबंधितांनी जाणीवपूर्वक बालविवाह घडवून आणल्याचा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी नोंदवला. या प्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील कलम 9, 10 आणि 11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांची भूमिका तपासण्यास सुरुवात केली असून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल माने करत आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना आढळल्यास नागरिकांनी तत्काळ 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक अली अख्तर अन्सार यांनी केले आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येते, असेही त्यांनी स्पष्ट केले

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 12:25 pm

पुतळ्यांच्या आडून मराठ्यांविरुद्ध षडयंत्र?:आपल्यापासून दलित-मुस्लिम-धनगर समाज तुटता कामा नये! पुतळ्यांच्या वादामागे नेमकं कोण? जरांगे पाटील घेणार शोध!

मराठा समाजापासून दलित, मुस्लीम, धनगरसमाज तुटला नाही पाहिजे. मराठा समाजापासून इतर समाज तोडण्याचे कुणाचे काही षंड्यत्र आहे का हे सुद्धा मराठा समाजाने बघितले पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी प्राण आहेत, पुतळे बसवा पण त्याच्याआडून दुसरे काही सुरू नाही ना? याकडे लक्ष दिले पाहिजे. मनोज जरांगे म्हणाले की, वाद होतील अशा ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे उभारू नका. आपल्या राजांनी आपल्यासाठी खूप काही केले आहे. त्यांनी जे केले ते कुणीही करु शकलेले नाही. छत्रपती शिवराय यांचा पुतळा वाद होईल अशा ठिकाणी बसवू नये. हे काही षंड्यत्र आहे का हे पाहिले पाहिजे. षंड्यत्र झाले की झाल्या जातीय दंगली सुरू. मराठ्यापासून दलित, मुस्लीम, धनगर तुटू नये याची काळजी घेतली पाहिजे. शिवाजी महाराज यांचे पुतळे देतंय कोण? मनोज जरांगे म्हणाले की, शिवाजी महाराज यांचे पुतळे देतंय कोण? ते लावण्यास सांगत मराठा समाजाच्या विरोधात इतर सर्व समाज करण्याचा प्रयत्न कोण करतंय का? यात मी लक्ष घालणार आहे. कारण विनाकारण दलित-मराठा वाद होत आहे. माझा समाज आणि मी यामध्ये बदनाम होत आहोत. मराठा समाज पुतळे बसवत नाहीये, आम्ही असे काही कोणाला सांगत नाही. बाहेर वेगळे मेसेज जात आहेत असे मला समजले. मराठ्याच्या अंगावर दलित, मुस्लीम, धनगर घालायचा पुतळ्याच्या आडून हे कोणी करतंय का याची माहिती घ्यावी लागेल. कोणाची प्रामाणिक इच्छा सुद्धा यामागे असू शकते. जागा विकत घेत आपण पुतळे बसवू, पण वाद होतील अशा ठिकाणी पुतळे बसवू नका. वाद मिटला ही चांगली गोष्ट मनोज जरांगे म्हणाले की, सोलापूरच्या अंजनगावमधील वाद मिटला ही चांगली गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या सर्व समाजाला एकत्र ठेवले आहे.त्याच विचाराने आपण पुढे चालणं गरजेचे आहे. या गोष्टीच्या मागे कोण होते हे पोलिस शोधून काढतील आणि दोन्ही समाज तिथे एकत्र राहतील. दोन-चार लोकं वाद निर्माण करत असतात त्यामुळे सर्व समाजाने वाद वाढवायचा नसता. जर प्रकरण मिटले नसते तर तोडगा काढण्यासाठी तिथे जाणार होतो. आता तिथे जाण्याची गरज नाही. वाद नाही, तो लावला जात आहे का? हे शोधले पाहिजे. पुतळा कोणी विकला हे शोधणं गरजेचे आहे. माझ्यासोबत फोटो काढत मी त्यांच्यासोबत आहे असे म्हणत मला कोणी बदनाम करू नये.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 12:20 pm

सांगलीत पहाटे शंभूराजेंचा पुतळा उभारला:पोलिसांनी हस्तक्षेप करत काढला; महापालिका प्रशासन पुतळा त्रिकोणी बागेत बसवणार होते

सांगली शहरातील राम मंदिर चौकात आज पहाटे अचानक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. हा पुतळा रविवारी शहरातील त्रिकोणी बागेत बसवण्यात येणार होता. पण तत्पूर्वीच तो राम मंदिर चौकात बसवण्यात आल्याने काहीसा तणाव निर्माण झाला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा पुतळा तेथून काढला. यासंबंधीच्या माहितीनुसार, शहरातील त्रिकोणी बागेत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार होते. त्याचे भूमिपूजन आयुक्त सत्यम गांधी यांच्या हस्ते होणार होते. पण तत्पूर्वीच शिवतेज सावंत, आदित्य नाईक, आशिष खिचडे, अमित पाटील, सुजल कांबळे, राहुल माने, ऋषिकेश भोई आदी 60-70 जणांनी एकत्रित येऊन शनिवारी पहाटे 4.30 वा. हा पुतळा राम मंदिर चौकातील चबुतऱ्यावर उभारला. कार्यकर्त्यांचा युक्तिवाद काय? या कार्यकर्त्यांनी सांगितले की, प्रस्तुत पुतळा राम मंदिर चौकातील चबुतऱ्यावर बसवण्यासाठी 16-17 वेळा आंदोलने करण्यात आली. त्यासाठी अनेक निवेदने दिली. त्यानंतरही प्रतापसिंह उद्यानात पुतळा बसवण्याचे मनपाने मान्य केले. पण त्यानंतर अचानक हा पुतळा त्रिकोणी बागेत बसवण्याचा ठराव घेण्यात आला. ज्या लोकांनी पुतळ्यासाठी पाठपुरावा केला, त्यांना विचारात न घेता पुतळ्याचे ठिकाण बदलण्यात आले. रणभूमीत लढलेल्या योद्ध्याचा पुतळा बागेत बसवणे हे आम्हाला मान्य नव्हते. त्यामुळे आम्ही हा पुतळा राम मंदिर चौकात बसवला. ते पुढे म्हणाले, शहारातील सिव्हिल हॉस्पिटल व बस स्थानकाकडे जाणारा मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. त्यामुळे आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा सणही चांगल्या पद्धतीने साजरा करता येणार नाही. काही नेत्यांच्या हट्टामुळे हा पुतळा त्रिकोणी बागेत बसवण्याचा घाट घालण्यात आला. त्याला आमचा विरोध आहे. काय म्हणाले पोलिस अधिकारी? दुसरीकडे, छत्रपती संभाजी महाराजांचा उद्या त्रिकोणी बागेत उभारण्यात येणारा पुतळा शनिवारीच राम मंदिर चौकात बसवण्यात आल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत हा पुतळा तेथून हटवला. पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी या प्रकरणी सांगितले की, राम मंदिर चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याची बाब अवघ्या 10 मिनिटांतच आमच्या गुड मॉर्निंग पथकाच्या निदर्शनास आली. त्यानंतर डीवायएसपी संदिप भागवत यांनी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी चर्चेचे आश्वासन दिल्यानंतर सकाळी 6.40 वा. संबंधितांनीच पुतळा काढून घेतला. या प्रकरणी आता मनपात बैठक होईल. दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकाने तत्काळ धाव घेतली होती.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 12:18 pm

राष्ट्रवादीत मोठा स्फोट, सुनेत्रा पवारांसाठी धोक्याची घंटा?:अजित पवार गटातील 15 ते 20 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात; अंतर्गत असंतोष वाढला

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षानंतर अजित पवार यांच्या गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांना मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटातील 15 ते 20 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. अजित पवार गटातील अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली असून भविष्यातील राजकीय दिशा काय असेल, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर काही आमदारांनी थेट शरद पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अजित पवार गटातील एका विद्यमान मंत्र्याने गुप्तपणे शरद पवार यांची भेट घेतल्याचे समजते. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पक्षातील वाढत्या अस्थिरतेमुळे आणि अंतर्गत वादांमुळे काही नेते पुन्हा एकत्र येण्याचा पर्याय तपासत असल्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, पक्षातील सततच्या संघर्षाचा थेट परिणाम आमदारांच्या मतदारसंघावर होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असून मतदारांमध्येही नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आपले राजकीय नुकसान होईल, अशी भीती अनेक आमदारांना वाटत आहे. त्यामुळे काही जण शरद पवार गटाकडे झुकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अंतर्गत असंतोष उघडपणे समोर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सलोखा होण्याची शक्यता कमी दिसत असली, तरी अंतर्गत असंतोष मात्र उघडपणे समोर येत आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काळात अजित पवार गटातील आमदारांचा अंतिम निर्णय काय होतो, यावरच पुढील राजकीय दिशा ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 12:05 pm

समग्र शिक्षा अभियानाच्या निधी खर्चात हिंगोलीचा शिक्षण विभाग नापास:29 लाखांचा निधी अभियानाकडे वळविला, परिक्षेमुळे नियोजन झाले नसल्याचे कारण

हिंगोली जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग निधी खर्चात सपशेल नापास झाला असून विभागाचा तब्बल 29 लाखांचा निधी समग्र शिक्षा अभियानाकडे परत करण्यात आला आहे. इयत्ता दहावी व बारावी परिक्षा असल्यामुळे निधी खर्चाचे नियोजन झाले नसल्याचे कारण शिक्षण विभागाने दिले आहे. यामध्ये अविष्कार अभियान व विद्यार्थ्यांच्या अभ्यास दौऱ्याच्या निधीचा समावेश आहे. राज्यात समग्र शिक्षा अभियानांकडून शिक्षणाधिकारी कार्यालयास विविध उपक्रमांसाठी निधी दिला जातो. यामध्ये शाळा दुरुस्ती, शाळा बांधकामे, संयुक्त शाळा अनुदान, दिव्यांग समावेशीत शिक्षण या शिवाय विद्यार्थ्यांसाठी अभ्यास दौरा तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी अविष्कार अभियान राबविण्यासाठी निधी दिला जातो. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून उपलब्ध निधीतून शाळा दुुरस्ती व बांधकामाच्या कामासोबतच विद्यार्थ्यांच्या दैाऱ्यासाठी मिळालेल्या निधीचे नियोजन करणे अपेक्षीत असून सदर निधी खर्च करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या जातात. निधी खर्च न त्याची कारणे नमुद करून निधी समग्र शिक्षा अभियानाकडे परत पाठविणे आवश्‍यक आहे. मात्र शिक्षण विभागाचे योग्य नियोजन असल्यास उपलब्ध निधी परत जात नाही. मात्र हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या कुचकामी नियोजनामुळे तब्बल 29 लाख रुपयांचा निधी परत गेला आहे. यामध्ये काही निधी खर्च होऊन शिल्लक राहिल्यामुळे परत गेला तर विद्यार्थ्यासाठी प्राप्त झालेल्या निधीचे दहावी व बारावीच्या परिक्षेमुळे नियोजन करता आले नसल्याचे कारण देत निधी परत करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय अविष्कार अभियान तसेच अभ्यास दौऱ्याला विद्यार्थी मुकले असल्याचे चित्र आहे. समग्र शिक्षा अभियान कार्यालयाने विद्यार्थी अभ्यास दौऱ्यासाठी 2.87 लाख रुपये तर अविष्कार अभियानासाठी 5.75 लाखांचा निधी उपलब्ध केला होता. सदर दोन्ही निधी परत करण्याची वेळ शिक्षण विभागावर आली. या शिवाय इयत्ता आकरावी व बारावीच्या प्रयोगशाळेसाठी मिळालेला 4 लाखांचा निधी जिल्हा परिषद शाळेत सदर वर्ग नसल्याचे कारण दाखवत परत करण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 11:51 am

ऐषारामातून थेट कोठडीत, अशोक खरातची प्रकृती खालावली:भविष्य सांगणाऱ्याचे भविष्य अंधारात; तब्येत बिघडली, वजन घटले

लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपांमुळे अटक झालेल्या अशोक खरात याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांना फसवून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या खरातला 18 मार्च रोजी अटक करण्यात आली. त्यानंतरपासून तो पोलिस कोठडीत असून विशेष तपास पथकाकडून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान त्याचे अनेक काळे कारनामे उघड झाले असून हे प्रकरण केवळ अत्याचारापुरते मर्यादित नसून ब्लॅकमेलिंग, अश्लील व्हिडीओ तयार करणे आणि आर्थिक फसवणूक यासारख्या गंभीर बाबीही समोर आल्या आहेत. दरम्यान, खरातच्या प्रकृतीबाबतही चिंताजनक माहिती समोर आली आहे. अटकेनंतर त्याचे वजन सुमारे 6 ते 7 किलोने घटल्याचे समजते. अटकेच्या वेळी त्याचे वजन 79 किलो होते, मात्र सध्या त्यात मोठी घट झाली आहे. त्याला पाच विविध आजारांनी ग्रासल्याची माहिती असून सतत औषधोपचार सुरू आहेत. आजारांमुळे तो अशक्त झाला असून त्याची तब्येत साथ देत नसल्याचे दिसून येत आहे. अटक होण्यापूर्वी ऐषारामी जीवन जगणारा खरात आता पूर्णपणे वेगळ्या परिस्थितीत सापडला आहे. काही दिवसांपूर्वी ताठ मानेने फिरणारा आणि लोकांना भविष्य सांगण्याचा दावा करणारा हा व्यक्ती आता गजाआड आहे. 17-18 दिवसांपूर्वी मोकळेपणाने फिरणाऱ्या खरातला आता छोट्याशा कोठडीत दिवस काढावे लागत आहेत. त्याच्या आयुष्यात झालेला हा अचानक बदल त्याच्यासाठी धक्कादायक ठरत असून मानसिकदृष्ट्याही तो खचल्याची माहिती समोर येत आहे. चौकशीदरम्यान उघड झालेल्या माहितीमुळे पोलिस आणि तपास अधिकारीही चक्रावले आहेत. महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे शोषण करणे, त्यांचे अश्लील व्हिडीओ तयार करून धमकावणे आणि वारंवार अत्याचार करणे, तसेच इतर भक्तांना फसवून आर्थिक फायदा मिळवणे अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व प्रकारांमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले असून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी त्याला पॅरालिसिसचा झटका एकीकडे आजारपण आणि दुसरीकडे पोलिसांची सततची चौकशी या दुहेरी ताणामुळे खरात पूर्णपणे हवालदिल झाल्याचे चित्र आहे. काही वर्षांपूर्वी त्याला पॅरालिसिसचा झटका आला होता आणि त्याचा परिणाम अजूनही जाणवत आहे. एका हाताची हालचाल व्यवस्थित होत नसल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत त्याच्यावर औषधांचा मारा सुरू असताना चौकशीचाही दबाव कायम आहे. एकंदर पाहता, स्वतःच्या कृत्यांमुळेच खरात आज गंभीर अडचणीत सापडला असून त्याचे भविष्य पूर्णपणे अनिश्चित झाल्याचे स्पष्ट होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 11:49 am

मुंबई पोर्टवर कोट्यवधींचा शेतीमाल सडतोय!:सरकारचे धोरण चुकले, शेतकरी संकटात, इराणशी मैत्री असती तर इंधंनाचा तुटवडा जाणवला नसता- राजू शेट्टी

मुंबई पोर्टमध्ये कांदा, तांदुळ, साखर, द्राक्षासारखा मोठ्या प्रमाणात शेती माल तिथे अडकून पडला आहे. काही माल खराब झाला आहे.कोल्ड स्टोरेजचे भाडे वाढत आहे. दुसऱ्या बाजूला होणारी निर्यात थांबली आहे. मार्च-एप्रिलमध्ये आंबा मोठ्या प्रमाणात अखाती देशामध्ये जात असतो तो सुद्धा थांबला आहे, शेतकऱ्यांना यातून मोठे नुकसान होत आहे, सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. राजू शेट्टी म्हणाले की, अखातीदेशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्यामुळे शेती व्यवसायावर मोठे संकट निर्माण झाले आहे. इराणशी मैत्री असती तर इंधंनाचा तुटवडा जाणवला नसता. भारत-अमेरिका व्यापार करारामुळे शेतीवर होणारे दुष्परिणाम यासंदर्भात शेतकरी संघटनांनी काय भूमिका घेतली पाहिजे म्हणून काल खासदार राजाराम सिंह यांच्या घरी शेतकरी नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती शेट्टी यांनी दिली. ..तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडेल माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांनी अखाती देशात माल पाठवण्यासाठी हवाई मार्गाचा विचार केला पण त्यासाठी मोठा खर्च लागतो. विमान कंपन्याशी सरकारने संवाद साधत शेतकऱ्यांचा विचार करायला हवा होता. ट्रमप यांनी जर दबाव आणत आपल्या देशात करार केला आणि तिथून आयात झाली तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम होईल. याविरोधात ठोस भूमिका आम्ही घेऊ. ..निवडणुकीनंतर इंधंनाचे दर वाढणार राजू शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी डिझेलची गरज असते पण निवडणुकीनंतर देशात इंधंनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. रासयनिक खतांचे भाव वाढू शकतात, त्यावर सरकारने काहीच उपाययोजना केल्या नाहीत. आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण चुकले आहे. जो देश आपल्या काहीच कामाला आला नाही, केवळ काही नेते जाऊन तिथे शेती बघून आले आहेत अशा इस्रायलचा आपल्याला फायदा झाला नाही. अमेरिकेच्या आपल्याला झाला तर उपद्रवच होईल. इराणसोबत जमवले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. सरकारचे परराष्ट्र धोरण कुठे तरी चुकले हे मान्य करावे लागेल. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान राजू शेट्टी म्हणाले की, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचा यामध्ये काहीच दोष नाही, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. सरकार आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जी नुकसान भरपाई म्हणून मदत करतो ती अगदी तोकडी आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 11:47 am

सोशल मीडियावर फसवे संदेश:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सलमान खान यांच्या नावाने ‘ग्राम वैद्यकीय सहायता निधी’ची अफवा

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक संदेश वेगाने पसरत असून, त्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले आहे. संबंधित संदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता सलमान खान यांच्या नावाचा वापर करून मंत्रालयात ‘ग्राम वैद्यकीय सहायता निधी’ नावाचा कक्ष सुरू केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच गरजू रुग्णांना २५ लाखांपर्यंत आर्थिक मदत, ‘शेटे साहेब’ यांचा संपर्क क्रमांक, ‘Being Human’ संस्थेचा ईमेल, दादरमधील ‘HOPE SPECIALITY PHARMA’ आणि नाशिकमधील ‘आरोग्यदूत’ संस्थेमार्फत स्वस्त औषधे व मोफत उपचार मिळतील, असेही नमूद करण्यात आले आहे. मात्र, या सर्व दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसून संबंधित संदेश पूर्णपणे खोटा व दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. मंत्रालयात ‘ग्राम वैद्यकीय सहायता निधी’ नावाचा कोणताही कक्ष किंवा योजना अस्तित्वात नाही. सातव्या मजल्यावर केवळ ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष’ अधिकृतपणे कार्यरत आहे. अशा प्रकारचे संदेश समाजमाध्यमांवर वेगाने पसरत असल्याने नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज आहे. विशेषतः वैद्यकीय मदतीसारख्या संवेदनशील विषयांमध्ये अफवांवर विश्वास ठेवल्यास गरजू रुग्णांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची खातरजमा करणे आवश्यक आहे. वैद्यकीय आर्थिक मदतीसाठी केवळ अधिकृत माध्यमांचा वापर करावा, असे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करणे गरजेचे आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, “राज्यात सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सलमान खान यांच्या नावाने ‘ग्राम वैद्यकीय सहायता निधी’ आदींबाबत फिरणारे संदेश पूर्णपणे खोटे व दिशाभूल करणारे आहेत. मंत्रालयात अशा प्रकारची कोणतीही योजना किंवा कक्ष अस्तित्वात नसून, सातव्या मजल्यावर केवळ ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष’ अधिकृतरीत्या कार्यरत आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिक माहितीसाठी रुग्णांनी १८००१२३२२११ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. नागरिकांनी अशा फसव्या संदेशांपासून सावध राहावे आणि गरजू रुग्णांना खरोखर मदत हवी असेल तर फक्त अधिकृत चॅनेल्सचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 11:34 am

दुसऱ्यांचे भविष्य सांगणाऱ्या अशोक खरातचे भविष्य अंधकारमय:कोठडीत वजन घटले, प्रकृतीही खंगली; कुकर्म अंगाशी

दुसऱ्यांचे भविष्य सांगणाऱ्या भोंदू अशोक खरातचे स्वतःचे भविष्यच आता अंधकारमय झाले आहे. एसआयटी चौकशीत त्याच्या काळ्या कारनाम्यांची वेगवेगळी धक्कादायक माहिती समोर येत आहे. सततची चौकशी, त्यात अंगी असणारे विविध आजार यामु्ळे त्याचे वजन घटले आहे. तसेच प्रकृतीही खंगली आहे. भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेत. यापैकी 8 गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक व जादूटोण्याशी संबंधित आहेत. तर इतर 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. या सर्वच प्रकरणांत एसआयटी अर्थात विशेष तपास पथक त्याची कसून चौकशी करत आहे. पण अशोक खरातचे दररोज व्हायरल होणारे व्हिडिओ पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर आता कोठडीत त्याचे वजन कमी होऊन प्रकृती खंगल्याची बाब समोर आली आहे. कोठडीत औषधोपचार, पण प्रकृती साथ देईना भोंदू अशोक खरात 17-18 दिवसांपूर्वी उघडपणे समाजात वावरत होता. पण आज त्याच्यावर छोट्याशा कोठडीत आपले आयुष्य काढण्याची वेळ आली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, अशोक खरातचे पोलिस कोठडीत झपाट्याने वजन कमी झाले आहे. विविध आजारांमुळे त्याचे शरीरही खंगले आहे. त्यातच त्याला सततच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तो सध्या प्रचंड तणावाखाली आहे. त्याला जवळपास 5 आजार असल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रकरणी त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत. पण सध्या तो हवालदिल झाल्यासारखे वर्तन करत आहे. मागच्या काही दिवसांत अशोक खरातचे वजन 6 ते 7 किलोंनी कमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. 18 मार्च रोजी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली तेव्हा त्याचे वजन 79 किलो होते. पण आता त्यात बरीच घट झाल्याची माहिती आहे. यावरून त्याची प्रकृती त्याची साथ देत नसल्याचे स्पष्ट होते. खरातला काही वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हा त्याच्यावर उपचार झाले होते. पण त्याचा फटका त्याला आज बसत आहे. त्याच्या एका हाताची हालचाल सध्या नीट होत नसल्याचे समजते. कांदा व्यापाऱ्याने दाखल केला 12 वा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत अशोक खरातविरोधात बारावा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा एका कांदा व्यापाऱ्याने दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू खरातने कांदा व्यापाऱ्याला प्लॉट विक्री व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवले होते. त्याने व्यापाऱ्याकडून 60 लाख रुपये किंमत असलेली जागा वृद्धाश्रमाच्या नावावर केवळ 22 लाख 25 हजार रुपयांत खरेदी केली. इतकेच नाही, तर वृद्धाश्रमाच्या जागेच्या बदल्यात चांगल्या लोकेशनवर जागा मिळवून देण्याचे आश्वासन आरोपीने दिले होते. यातून त्याने व्यापाऱ्याकडून तब्बल 85 लाख रुपये उकळले, परंतु कोणतीही जागा दिली नाही. ...अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल आरोपी खरातने कांदा व्यापाऱ्याची केवळ आर्थिक फसवणूकच केली नाही, तर त्याने व्यापाऱ्याला मानसिक त्रासही दिला. व्यापाऱ्याने आपल्या पैशांचा किंवा जागेचा तगादा लावला, तेव्हा 'जागेसाठी तगादा लावू नकोस, अन्यथा तुझ्यावर देवाचा कोप होईल आणि तुझे वाईट होईल,' असा शाप त्याने त्या व्यापाऱ्याला दिला. मागील अनेक दिवसांपासून खरात या व्यापाऱ्याचा असा छळ करत होता. शिंदेंचे खरातला 17, चाकणकरांचे 177 कॉल सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भोंदू अशोक खरात यांच्यात तब्बल 17 वेळा फोनवरून बोलणे झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. एकनाथ शिंदे व अशोक खरात यांच्यात 17 वेळा फोनवरून बोलणे झाले. एवढेच नाही तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही खरातला एक-दोन नव्हे तर तब्बल 177 वेळा फोन केले होते. हे एवढे कॉल त्यांनी का केले होते? याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे दमानिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री आशिष शेलार व शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर हे ही वेळोवेळी भोंदू खरातच्या संपर्कात होते, असे दमानिया यांनी स्पष्ट केले आहे. नीलम गोऱ्हेंनी घेतली होती खरातची भेट - तृप्ती देसाई भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भोंदू अशोक खरातची भेट घेतल्याचा पुनरुच्चार केला आहे. नीलम गोऱ्हे यांनी अनेकदा भोंदू अशोक खरातची भेट घेतली. या भेटीवेळी उपस्थित असलेल्या लोकांनीच मला माहिती दिली होती. याचे पुरावे योग्य वेळी व योग्य ठिकाणी सादर केले जातील, असे त्या म्हणाल्यात. दरम्यान, रुपाली चाकणकरांनी स्वतःहून एसआयटीच्या चौकशीला सामोरे जावे, असेही त्या म्हणाल्यात. महिलांना गर्भपाताची औषधी दिल्याचा संशय उल्लेखनीय बाब म्हणजे अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केले. पण त्यापैकी एकही महिला गरोदर झाली नव्हती. त्यामुळे अशोक खरात महिलांना एखादी गर्भनिरोधक औषधी देत होता काय? या प्रश्नाचे उत्तर एसआयटी शोधत आहे. या प्रकरणी एसआयटी नाशिकमधील काही डॉक्टरांची चौकशी करण्याचीही चौकशी आहे. हे डॉक्टर अशोक खरातच्या नियमित संपर्कात होते. एसआयटी या प्रकरणी बुधवारी कोर्टात एखादी नवी माहिती सादर करण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 11:19 am

AI शिक्षण अन् समाजात मोठे परिवर्तन घडवते:भारती विद्यापीठात 'रिस्पॉन्सिबल एआय' परिषदेचे उद्घाटन

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात 'रिस्पॉन्सिबल, रिस्क-अवेयर अँड रेग्युलेटेड एआय' या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. डॉ. नीरज सक्सेना यांच्या हस्ते झालेल्या या परिषदेत त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण आणि समाजात मोठे परिवर्तन घडत असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाला डॉ. नीलांजन डे, डॉ. अस्मिता जगताप आणि कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दोन दिवसीय या परिषदेत जगभरातील दहा प्रमुख तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रगती, आव्हाने आणि नियामक चौकटींवर सखोल चर्चा हे परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. परिषदेसाठी 800 हून अधिक संशोधन लेख प्राप्त झाले असून, त्यापैकी 368 निवडक लेख विविध नामांकित आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध केले जातील. उद्घाटनप्रसंगी डॉ. सक्सेना यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षण आणि समाजात मोठे बदल होत असल्याचे सांगितले. पारंपरिक अभ्यासक्रम, वर्गखोल्या आणि परीक्षांचे महत्त्व कमी होत असून, कौशल्याधारित शिक्षण, चिकित्सक विचार आणि समस्या सोडविण्याच्या क्षमतेला अधिक प्राधान्य मिळत आहे, असे ते म्हणाले. शिक्षणाचे भविष्य केवळ उत्तरांमध्ये नसून विचारक्षमतेमध्ये आहे, यावर त्यांनी भर दिला. डॉ. अस्मिता जगताप यांनी एआयच्या नैतिकतेवर भर दिला. जबाबदारीशिवाय नवकल्पना धोकादायक ठरू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. आरोग्य, शिक्षण आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात मानवी संवेदनशीलता जपण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. डॉ. नीलांजन डे यांनी 'डार्क डेटा'च्या जोखमींबाबत इशारा दिला. चुकीच्या माहितीमुळे चुकीचे निष्कर्ष निघू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. विवेक सावजी यांनी एआयचा जबाबदारीने आणि नियमनबद्ध वापर करण्याचे महत्त्व सांगितले. अशा परिषदांमुळे ज्ञानविनिमय, संशोधन आणि व्यावहारिक उपाययोजनांना चालना मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 10:39 am

28 व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा पुणे येथे प्रारंभ:अभयसिंह वाघचौरे, कृष्णा साळुंखे यांच्या शास्त्रीय गायन, पखवाज वादनाने श्रीगणेशा

पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात 28 व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा प्रारंभ झाला. युवा शास्त्रीय गायक अभयसिंह वाघचौरे यांच्या सुमधुर गायनाने आणि पं. नानासाहेब पानसे यांच्या पखवाज घराण्याचे युवा वादक कृष्णा साळुंखे यांच्या दमदार पखवाज वादनाने महोत्सवाचा श्रीगणेशा झाला. गुरुकुल कलाश्री संगीत मंडळातर्फे दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा हा महोत्सव पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात संपन्न होत आहे. महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार शंकर जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत शितोळे, चंद्ररंग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य लक्ष्मण जगताप, उद्योजक विजू शेठ जगताप, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक पं. सुधाकर चव्हाण, कलाश्रीचे विश्वस्त सच्चिदानंद कुलकर्णी, संतपीठाचे संचालक राजू महाराज ढोरे, बासरीवादक दीपक भानुसे, गायक पं. रघुनाथ खंडाळकर आणि वास्तू उद्योजक अजित घुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले की, संगीत आपल्या जीवनात हवेची हळुवार झुळूक घेऊन येते. पं. सुधाकर चव्हाण आणि कलाश्री संगीत मंडळाने पिंपरी चिंचवड शहरात ही समाधानाची झुळूक आणण्याचे काम केले आहे, यासाठी रसिक त्यांचे ऋणी आहेत. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान विकास दिनासोबतच विरासत दिन साजरा करून संस्कृती आणि संगीताला चालना देत आहेत. राज्याचे मुख्यमंत्रीही कलागुणांना प्रोत्साहन देतात. कै. लक्ष्मण जगताप यांनी कोरोना काळात कलाकारांना मदत केली होती आणि ग. दि. माडगूळकर नाट्यगृह तसेच नटसम्राट निळू फुले नाट्यगृह उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. भविष्यातही संस्कृतीला चालना देण्याचे काम असेच सुरू ठेवणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. काळाच्या ओघात मागे पडत चाललेले अखिल भारतीय शास्त्रीय संगीत कलाश्री महोत्सवांसारख्या उपक्रमांमुळे पुन्हा रसिकांना अनुभवता येत आहे, याचा आनंद आहे. मानसिक त्रास कमी करण्यासाठी प्रत्येकाने शास्त्रीय संगीताकडे वळावे, ज्यामुळे डॉक्टरांची गरज भासणार नाही, असेही जगताप यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 10:38 am

पुण्यात बांधकाम वादातून नागरिकाला धमकी:राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल

बांधकाम वादातून एका नागरिकाला धमकावल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाणेर पोलीस ठाण्याबाहेरच ही घटना घडली असून, सचिन रघुनाथ चाकणकर (वय 46, रा. बाणेर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सचिन चाकणकर यांचा त्यांच्या चुलत भावांशी मालमत्तेवरून वाद सुरू आहे. या वादग्रस्त जागेवर सुरू असलेल्या बांधकामाला पुणे महानगरपालिकेने 'स्टॉप वर्क' नोटीस बजावली होती. असे असतानाही बांधकाम सुरूच असल्याने चाकणकर कुटुंबीयांसह या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक बाबुराव चांदेरे तेथे आले. त्यांनी चाकणकर यांच्याशी वाद घालत, माझ्या कार्यकर्त्यांचे काम थांबवतोस का? तुझे घरही पाडून टाकतो, तू कसा जगतोस ते बघतो, अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. तसेच, नगरसेवकाने आपल्या चालकाला 'बांबू काढ' असे सांगत मारहाणीची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली. प्लॉट विक्रीमध्ये फसवणूक प्रकरणी गुन्‍हा दाखल दोन हजार स्केअर फुटचा मोकळा प्लॉट दाखवून त्‍या बदल्‍यात 48 लाख रूपये घेऊन प्लॉट न देता फसवणूक केलयाप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात चौघांवर फसवणुकीचा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. हरिष गिरीधरीलाल चौधरी (48), दिनेशकुमार गिरीधरीलाल चौधरी (45), सुरेश गिरीधरीलाल चौधरी (42रा) आणि उर्मिला सुरेश चौधरी (35, रा. वाल्‍हेकर वाडी, चिंचवड) यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरेशकुमारता राजी चौधरी (41, रा. स्वामी रेसिडेन्सी, वाल्‍हेकरवाडी, चिंचवड) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात 48 लाखांच्‍या फसवणूक प्रकरणी तक्रार दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 10:36 am

नाशिकमध्ये बांधकामाधिन इमारतीत बालिकेवर अत्याचार:बांधकाम मजूर ताब्यात, खोडेनगरमधील इमारतीतील घटना; संशयिताला पोलिसांनी केली अटक

नाशिकमध्ये बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कुटुंबातील 5 वर्षीय मुलीवर 24 वर्षीय कामगाराने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. 3) रात्री साडेआठ वाजता उघडकीस आला. मुंबईनाका पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी माहिती दिली. खोडेनगर येथील एका बांधकाम साईटवर मध्य प्रदेशातील कुटुंब काम करत आहेत. याच साईटवर संशयितही कामाला आहे. पीडित मुलीचा भाऊ सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने वडील आणि मुलगी सिव्हीलच्या आवारातच राहतात. शुक्रवारी सकाळी 9 वाजता वडील मुलीला कामावर घेऊन गेले. दुपारी 12 वाजता इमारतीच्या वरच्या मजल्यावर काम करण्यास गेले होते. खाली मुलगी खेळत होती. संशयिताने मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष देत तिला इमारतीच्या एका खोलीत नेत तिच्यावर अत्याचार केला. रक्तस्त्राव झाल्याने मुलीच्या आईला लक्षात आली घटना मुलीच्या शरीरीतून रक्त आल्याचे आईच्या लक्षात आले. तिला सिव्हीलमध्ये दाखल केले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समजले. रुग्णालयाने पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी रात्रीच परिसरात संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. पीडित कुटुंब रोजगाराकरिता नाशिकमध्ये आले आहे. मजुरी करत हलाखीचे जीवन जगत आहे. मुलीवर अत्याचार झाल्याचे समजताच तिच्या आईला भोवळ आली होती. डोंबिवलीत तरुणीवर सामूहिक अत्याचार डोंबिवली शहरात महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवली जवळील खंबाळपाडा परिसरात दोन दिवसांपूर्वी एका 22 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित तरुणीच्या ओळखीच्या असलेल्या तीन रिक्षाचालकांनीच हे घृणास्पद कृत्य केले आहे. आरोपींनी पीडित तरुणीला खंबाळपाडा येथील एका सदनिकेमध्ये (फ्लॅट) मेजवानीच्या बहाण्याने बोलावून घेतले होते. ओळखीचे असल्याने तरुणी तिथे गेली. मात्र, मेजवानी सुरू असताना या तिन्ही रिक्षाचालकांनी संगनमत करून पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केले.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 10:30 am

सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना थेट फोन:काँग्रेसच्या निर्णयानंतर राजकीय समीकरणे बदलणार? आघाडीत नव्या हालचाली

राज्यातील राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत असून सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना केलेल्या फोनमुळे नवा राजकीय रंग चढला आहे. बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा अधिक महत्त्वाची मानली जात आहे. काँग्रेसने या दोन्ही मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा केल्याने बिनविरोध निवडणुकीची शक्यता संपुष्टात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत नव्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दिवंगत अजितदादांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. त्यांनी याआधी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आता आमदारकीसाठी त्या बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या फोन संभाषणात सुनेत्रा पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचा पाठिंबा मागितला आहे. तसेच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठीही त्यांनी चर्चा केल्याची माहिती पुढे येत आहे. काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यामुळे स्पर्धा अटळ झाली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीत याबाबत काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला दिल्लीहून हिरवा कंदिल मिळाल्याचे सांगितले जात आहे. बारामतीसाठी सहा इच्छुकांनी उमेदवारी मागितली असून राहुरीसाठी चार जणांनी अर्ज केले आहेत. या सर्वांची ऑनलाइन मुलाखत घेण्यात आली आहे. आता काँग्रेस मित्रपक्षांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक लढवली नाही, तर काँग्रेस स्वतः उमेदवार उभा करेल, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. राजकीय वर्तुळाचे लक्ष या सगळ्या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. काँग्रेसला राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीसारख्या पक्षांचा पाठिंबा मिळाल्याने लढत अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेनंतर पुढील दिशा काय ठरणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 10:23 am

सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे राष्ट्रवादीत खळबळ; पार्थ पवार अडचणीत?:राज्यसभा उमेदवारीवर प्रश्न; पक्ष- चिन्हाच्या प्रकरणावरही परिणाम

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना नवे वळण मिळाले असून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आयोगाला पत्र पाठवून 28 जानेवारी ते 10 मार्च या कालावधीत झालेला सर्व पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, अशी विनंती केली होती. मात्र, या निर्णयामुळेच आता पार्थ पवार यांच्यासह पक्षालाच अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. या पत्राचा थेट परिणाम 16 फेब्रुवारी रोजी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावर झाला. त्या पत्राच्या आधारेच पार्थ पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यासंदर्भातील कागदपत्रेही सादर करण्यात आली होती. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या पत्रामुळे हा संपूर्ण पत्रव्यवहार रद्द ठरण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे पार्थ पवार यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय, या कालावधीत पक्षात झालेल्या महत्त्वाच्या नियुक्त्यांवरही परिणाम होऊ शकतो. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड, प्रफुल पटेल यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड तसेच सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी झालेली नियुक्ती या सर्व निर्णयांचा तपशील आयोगाकडे पाठवण्यात आला होता. जर 28 जानेवारी ते 10 मार्च दरम्यानचा सर्व पत्रव्यवहार रद्द ठरवला, तर या सर्व निवडींवरही प्रश्न निर्माण होऊ शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांनी हे पत्र पाठवताना पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली नव्हती. या निर्णयामागे पार्थ पवार यांची भूमिका असल्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र, या पत्रामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणींची जाणीव झाल्यानंतर आता सुनेत्रा पवार हेच पत्र मागे घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. काही नेत्यांनी ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलण्याचा विचार सुरू केला आहे. पक्ष आणि चिन्हाबाबतच्या प्रकरणावरही परिणाम या संपूर्ण घडामोडींचा परिणाम सध्या सुरू असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतच्या प्रकरणावरही होऊ शकतो. त्यामुळे या मुद्द्याचे गांभीर्य अधिक वाढले आहे. आता सुनेत्रा पवार निवडणूक आयोगाला पत्र निरस्त करण्याची विनंती करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयावरच पुढील राजकीय समीकरणे अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 10:16 am

राज्यात पावसाचा कहर सुरूच:मध्य महाराष्ट्र-विदर्भ- मराठवाड्यात सतर्कतेचा इशारा; 15 जिल्ह्यांना हाय अलर्ट, पुढील 24 तास धोक्याचे

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून अजूनही विश्रांती मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. भारतीय हवामान विभाग यांनी पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. आजही सकाळपासून अनेक भागांत ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा प्रभाव कायम असून वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याने राज्यातील 15 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. यात अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच काही ठिकाणी विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता आहे. सतत सुरू असलेल्या या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. रब्बी हंगामातील हाताशी आलेली पिके वाया जात असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. नांदेड शहरासह अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यांत पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. या भागासाठीही हवामान खात्याने येलो अलर्ट दिला होता. पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. टोकावडे, मोरोशी, शिरोशी आणि धसई परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबा, चिकू आणि इतर फळबागांचे नुकसान झाले आहे. झाडांवरील फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दोन बैलांवर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू तसेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात विजेच्या कडकडाटामुळे गंभीर घटना घडली. अहिल्यापूर शिवारात झाडाखाली उभ्या असलेल्या दोन बैलांवर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर जनावरांचेही नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच राज्यभरात अवकाळी पावसाचा कहर सुरूच असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 9:55 am

शिक्षणामधून सृजनशील समाजाची निर्मिती- प्रा. मुंद्रे:श्री तुळशीरामजी जाधव कला, विज्ञान महाविद्यालयाचा पदवी वितरण समारंभ‎

ज्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात त्याचप्रमाणे शिक्षण हे सुद्धा मानवाची मूलभूत आणि महत्त्वाची गरज आहे. कारण शिक्षणामधूनच भावी सृजनशील समाजाची निर्मिती होते, असे मत श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय वाशीम येथे पदवी वितरण समारंभ कार्यक्रमांमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. रवींद्र मुंद्रे यांनी व्यक्त केले. स्थानिक श्री तुळशीरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय वाशीम येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत दि.३० मार्च रोजी पदवी वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष जाधव उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिनेट सदस्य डॉ. रवींद्र मुंद्रे, अजिंक्य भाऊ जाधव, संचालक वेंकटेश सेवा समितीचे गायकवाड, प्रा. डॉ. संतोष इंगोले, प्रा. डॉ. दत्तात्रय ढवारे हे उपस्थित होते. या पदवी वितरण प्रसंगी डॉ. रवींद्र मुंद्रे यांनी विद्यार्थी हा समाजाचा देशाचा अत्यंत महत्त्वाचा क्रियाशील घटक आहे. त्यामुळे शिक्षण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी सामाजिक व देशाच्या जबाबदारीची भावना सतत मनामध्ये तेवत ठेवली पाहिजे. शिक्षण म्हणजे माणसाच्या जीवनाचा सर्वांगीण विकास आहे. या माध्यमातून मानवाने आपले जीवन परिपूर्ण करावे, त्याचबरोबर शिक्षणामधून बुद्धीप्रमाणेवाद विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक कला शाखाप्रमुख प्रा.डॉ. संतोष इंगोले यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश कथन केला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अजिंक्य भाऊ जाधव यांनी ज्या विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त झाली, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, परंतु त्याचबरोबर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत.कार्यक्रमाचे आभार विज्ञान शाखाप्रमुख प्रा.डॉ. दत्तात्रय ढवारे यांनी मानले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्याप्रसंग ी बीए, बीएससी, एमए, एमएससीच्या ३३ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या.या कार्यक्रमाची संचालन प्रा. डॉ. पद्मानंद तायडे यांनी केले तर या कार्यक्रमाला प्रा. डॉ. संतोष धामणे, प्रा. डॉ. विजय जाधव, प्रा.डॉ.रिंकू-रुके, प्रा. भारती राणे, प्रा. साक्षी काबरा, प्रा. मयुरी कुटे, प्रा. खान, प्रा.लहाने आदींसह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 9:22 am

शेतातील तण व्यवस्थापनाच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याची मागणी:दिल्लीत एचटीबीटी कापूस तंत्रज्ञानावर परिषदेेमध्ये मंथन, लवकरच उपाय सुचवू‎

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या तण व्यवस्थापनाच्या गंभीर समस्येवर तोडगा काढावा. तसेच तणनाशक सहिष्णू व कीटक प्रतिरोधक एचटीबीटी कापूस बियाणे तंत्रज्ञान स्वीकारण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे खासदार संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, प्रशांत पडोळे, शेतकरी संघटनेचे मिलिंद दामले यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. देशातील कापूस उत्पादन २०१३-१४ मध्ये ४० दशलक्ष गाठींच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता सुमारे ३१ दशलक्ष गाठींवर घसरले आहे. दरम्यान, देशातील वस्त्रोद्योगाला सुमारे ४५ दशलक्ष गाठींची गरज भासणार असल्याने मागणी-पुरवठ्यातील तफावत वाढत आहे. उत्पादकता देखील जागतिक सरासरीपेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यवतमाळसारख्या कापूस पट्ट्यात तण नियंत्रणासाठी प्रचंड मजुरांची गरज भासत आहे. उपलब्ध मनुष्यबळ अपुरे पडत आहे. तणनाशक सहिष्णू एचटीबीटी तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास मजुरीवरील अवलंबित्व कमी होऊन तण व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल, असा दावा करण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, तणांमुळे कापूस पिकाचे ४० ते ६० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. अशा परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होईल. तसेच शेतीतील कामे वेळेत पूर्ण होऊन महिलांचा सहभाग वाढण्यास आणि तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्यास चालना मिळेल. २०२३ मध्ये कृषी भवन येथे झालेल्या चर्चासत्रात मांडण्यात आलेल्या अनेक शिफारसी अद्याप प्रलंबित असल्याने त्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. एचटीबीटी कापूस तंत्रज्ञानाला मान्यता द्यावी, अशी एकमुखी भूमिका यावेळी मांडण्यात आली. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्वरित निर्णय घेतल्यास तण व्यवस्थापनाची समस्या कमी होऊन कापूस क्षेत्र अधिक सक्षम, शाश्वत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 9:21 am

दर्यापूर तालुक्यामध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा:लांबच लांब रांगा; ऑनलाइन बुकिंग करूनही सिलिंडर मिळत नाही‎

तालुक्यात सध्या घरगुती गॅस सिलिंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दर्यापूरमध्ये एकच गॅस एजन्सी असल्याने सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांची एकाच ठिकाणी गर्दी होत आहे. घरगुती वापरासाठी सिलिंडर उपलब्ध नसल्याने महिलांसह कुटुंबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांना पहाटेपासूनच एजन्सीसमोर आणि दर्यापूर पासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या गोदामापर्यंत रिकाम्या सिलिंडरसह जाऊन लांबच लांब रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र आहे. घरगुती एलपीजी सिलिंडर ही दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक घटक आहे. मात्र, आखातात सुरूच असताना देशभरात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर बुकिंग केल्यावरही ७ ते १० दिवस प्रतीक्षा केल्यानंतही सिलिंडर मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका गृहिणींना बसत असून, स्वंयपाकाची गैरसोय वाढली आहे. दुसरीकडे तुटवड्याचा फटका हॉटेल व खानावळ, फूटपाथवरील व्यावसायिकांनाही बसला आहे. व्यावसायिक सिलिंडर मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्राहकांना सेवा देणेही कठीण होत असल्याने त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असताना गॅस सिलिंडरची कमतरता अधिकच तीव्र झाली आहे. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांवरही याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. आयोजकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आधीच वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांच्या अडचणीत या गॅस सिलिंडर तुटवड्याने अधिक भर घातली आहे. संबंधित गॅस एजन्सी व प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून गॅस पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सिलिंडरचा काळाबाजार दर्यापूर तालुक्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा गेल्या महिनाभरापासून निर्माण झाला आहे. जास्ती पैसे दिल्यास सिलिंडर उपलब्ध होत आहे. राजरोसपणे काळाबाजार सुरू असून, त्याकडे तालुका प्रशासन डोळेझाक करीत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. - सोनल प्रमोद तायडे, गृहिणी, दर्यापूर दर्यापूर तालुक्यात सध्या गॅस सिलिंडरची निर्माण झालेली टंचाई ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. सर्वसामान्यांना पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागत आहे. महिलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती तात्काळ सुधारण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलणे अत्यावश्यक आहे. - अंकुश कावडकर, जिल्हाध्यक्ष, युवा सेना

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 9:20 am

अ.भा.श्री गुरूदेव सेवामंडळाच्या प्रचारकांची प्रशिक्षण कार्यशाळा;माध्यमांचा केला वापर

अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ, श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम अंतर्गत केंद्रीय प्रचार विभागातर्फे आयोजित दोन दिवसीय श्रीगुरुदेव प्रचारकांची प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरीत्या झाली. गुरुकुंज आश्रम येथे झालेल्या या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून प्रांत, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील सेवाधिकारी आणि प्रचारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी सर्वाधिकारी प्रकाश वाघ होते, तर सरचिटणीस जनार्दन बोथे यांनी उद्घाटन केले. प्रमुख अतिथी म्हणून आजीवन प्रचारक लक्ष्मणदास काळे उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. दोन दिवसीय कार्यशाळेत प्रचारकांचे व्यक्तिमत्त्व विकास, संस्थेची उद्दिष्टे, सामाजिक बांधिलकी, शाखा विस्तार, महिलांची भूमिका, ग्राम व राष्ट्रनिर्माणातील योगदान, तसेच आधुनिक प्रचार माध्यमांचा वापर अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. लक्ष्मणदास काळे, अॅड. दिलीप कोहळे, प्रकाश वाघ, गोपाल कडू, पौर्णिमा सवाई, प्रा. सुभाष लोहे, अमोल बांबल आणि निलेश गावंडे यांनी विविध सत्रांत मार्गदर्शन केले. मुक्तचर्चा सत्रात प्रचारकांना अनुभव मांडण्याची संधी मिळाली. या संवादात्मक उपक्रमामुळे त्यांच्या शंकांचे निरसन होऊन कार्यातील अडचणींवर उपाय शोधण्यास मदत झाली. सहभागी प्रचारकांनी कार्यशाळेतून मिळालेल्या मार्गदर्शनाचा उपयोग करून आपल्या कार्यक्षेत्रात अधिक नियोजनबद्ध आणि जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. समारोप सत्रात उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील यांनी मार्गदर्शन करत प्रचारकांना शुभेच्छा दिल्या. प्रचार प्रमुख गोपाल कडू यांनी सर्व मान्यवर, सेवाधिकारी, प्रचारक आणि आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. या कार्यशाळेमुळे प्रचार कार्याला नवी ऊर्जा मिळून संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सूत्रसंचालन अमोल बांबल यांनी केले. सरचिटणीस जनार्दन बोथे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार सरचिटणीस जनार्दन बोथे यांना केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पद्मश्री पुरस्काराबद्दल यावेळी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात राष्ट्रसंतांच्या विचारांचा समाजात व्यापक प्रसार करण्यासाठी सुसूत्र आणि प्रभावी प्रचार यंत्रणेची गरज अधोरेखित केली. बदलत्या काळानुसार प्रचारकांनी आधुनिक साधनांचा वापर करून समाजाशी सुसंवाद साधावा, असेही त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 9:20 am

काँग्रेस भवनाच्या आत चर्चा, बाहेर वाद अन् धक्काबुक्की:अंतर्गत वाद, मनपा निवडणुकीत तिकीट न दिल्याने नाराजी‎

काँग्रेसच्या सृजन संघटन अभियानासाठी आलेल्या पक्ष निरीक्षक आफताब अहमद व भाई जगताप यांची काँग्रेस भवनातील सभागृहात शुक्रवारी ३ रोजी दु. १२.१५ दरम्यान बैठक सुरू असतानाच बाहेर काही आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक हमरीतुमरी सुरू होती. यावेळी धक्काबुक्कीचाही प्रकार घडला. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माजी नगरसेवकांनी उघडपणे पदाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत काही माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली. हेच या वादाचे मूळ कारण होते. माजी नगरसेवक सलीम बेग यांनी शहराध्यक्ष बबलू शेखावत व विरोधी पक्षनेते विलास इंगोले यांच्यासोबत वाद घातला, दरम्यान फिरोज खान यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केल्याने वाद चिघळून धक्काबुक्कीपर्यंत गेला. त्यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी, नेत्यांनी वाद घालणाऱ्यांना शांत केले. त्याचवेळी अन्य एका घटनेत माजी नगरसेवक शोभा शिंदे तसेच विद्यमान नगरसेविका अर्चना आत्राम यांच्यातही जोरदार शाब्दिक चकमक झाली. माजी नगरसेविका उर्वरित. पान ४ मध्यस्थीचा प्रयत्न केल्याने वाद चिघळून धक्काबुक्कीपर्यंत गेला. दिलीप एडतकर यांचा राजीनामा नामंजूर; वयक्तिक कारण समोर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार दिलीप एडतकर यांनी त्यांच्या पदाचा नुकताच राजीनामा दिला. त्यांनी आपल्याला दिलेले पद हे नाममात्र असल्यामुळे या पदावर काम करण्याची इच्छा नसल्याचे राजीनाम्यात म्हटले होते. ते का नाराज आहेत, असे विचारले असता त्याबद्दल आम्हाला काहीच माहीत नाही, असे उत्तर माजी पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिले. ते नाराज नाहीत तर मग ते पत्रपरिषदेला का उपस्थित नाहीत? असा प्रश्न विचारला असता त्यांना पत्रपरिषदेचे आमंत्रण देण्यात आले होत. परंतु, काही वैयक्तिक कारणामुळे ते आले नसावेत. ते अजुनही काँग्रेसमध्येच आहेत, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या अॅड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 4 Apr 2026 9:19 am