गुलाबी मतदान केंद्र व आदर्श मतदान केंद्रास भेट
रेणापूर : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. रेणापूर तालुक्यात गव्हाण येथे गुलाबी मतदान केंद्रास (सखी मतदान केंद्र) व समसापूर येथील आदर्श मतदान केंद्राचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर घुगे व निवडणूक निरीक्षक तथा अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी भेट देवुन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. महिलांमध्ये […] The post गुलाबी मतदान केंद्र व आदर्श मतदान केंद्रास भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औसा तालुक्यात ६४.१९ टक्के मतदान
औसा : प्रतिनिधी औसा तालुक्यातील ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समितीच्या गणांसाठी शनिवारी शांततेत व उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. औसा तालुक्यात सरासरी ६४.१९ टक्के मतदान नोंदवले गेले असून ग्रामीण भागातील मतदार केंद्रांवर मतदारांनी रांगा लावत मतदान केले. २५० मतदान केंद्रावर झालेल्या मतदानात १ लाख ४१ हजार ९४३ मतदारांनी मतदान केले. यात ७६ […] The post औसा तालुक्यात ६४.१९ टक्के मतदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निलंग्यात १०२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
निलंगा : प्रतिनिधी निलंगा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकीत शनिवारी दि ७ फेब्रुवारी शनिवार रोजी ६१.३२ टक्के मतदान झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके यांनी सांगितले. निलंगा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता शनिवारी ७ फेब्रुवारी शनिवार रोजी २६८ मतदान केंद्रावर एक लाख १३ हजार २३९ महिला तर एक लाख २६ हजार […] The post निलंग्यात १०२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
३० शेतकरी महिलांना ‘सखी प्रेरणा’पुरस्कारांचे वितरण
लातूर : प्रतिनिधी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या संस्थापिका प्रेमाताई गोपालन यांचा जन्मदिवस दरवर्षी सखी प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. याच परंपरेनुसार यंदाही १ फेब्रुवारी २०२६ रोजी सखी प्रेरणा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी ग्रामीण भागात महिला सक्षमीकरण, महिला नेतृत्व आणि शाश्वत उपजीविकेसाठी उल्लेखनीय कार्य करणा-या ३० शेतकरी महिलांना ‘सखी प्रेरणा पुरस्कार’ देऊन […] The post ३० शेतकरी महिलांना ‘सखी प्रेरणा’ पुरस्कारांचे वितरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चाकूर तालुक्यात शांततेत ६५ टक्के मतदान
चाकूर : प्रतिनिधी तालुक्यात जि. प. पं. स. च्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडले. जिल्हा परिषद, व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी एकूण ६४.४५ टक्के मतदान झाले. तालुक्यातील १५१ मतदान केंद्रांवर मतदान शांततेत पार पडले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संगिता टकले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार नरसिंग जाधव यांनी दिली. या तालुक्यात एकूण […] The post चाकूर तालुक्यात शांततेत ६५ टक्के मतदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एसटी कर्मचा-यांत नाराजी, तीव्र आंदोलनाचा इशारा मुंबई : प्रतिनिधी एसटी कर्मचा-यांना नियमित वेतन मिळाले असले तरी वाढीव वेतनाचा फरक हप्ता न मिळाल्याने राज्यभर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतरही हप्ता न दिल्याचा आरोप करत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने ३ दिवसांत रक्कम न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस, […] The post वाढीव वेतनाचा हप्ता मिळेना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जळकोट तालुक्यात सरासरी ६३ टक्के मतदान
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यामध्ये जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसाठी दि ७ फेब्रुवारीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. एक-दोन ठिकाणी अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांतते पार पडली. तालुक्यामध्ये जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसाठी सरासरी ६३ टक्के मतदान झाले. जळकोट तालुक्यात २१ हजार १९६ पुरुष मतदारांनी तर १९८१३ स्त्री मतदारांनी अशा एकूण ४१००९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला […] The post जळकोट तालुक्यात सरासरी ६३ टक्के मतदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रेणापूर तालुक्यात ६७.२९ टक्के मतदान
रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४ गटांसाठी व पंचायत समितीच्या आठ गणांसाठी (शनिवारी दि. ७) शांततेत व उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत तालुक्यात एकूण ६७ .२९ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संदिप कुलकर्णी , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत थोरात, तहसिलदार रामेश्वर स्वामी यांनी दिली . रेणापूर तालुक्यातील […] The post रेणापूर तालुक्यात ६७.२९ टक्के मतदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असताना भुदरगड तालुक्यातील नाधवडे येथे शनिवारी दुपारी एकच खळबळ उडाली. निवडणुका बॅलेट पेपरवरच घेतल्या पाहिजेत, अशी मागणी करत एका मतदाराने चक्क ईव्हीएम (EVM) मशीन जमिनीवर आपटून फोडून टाकले. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना (ठाकरे गट) ग्राहक सेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत वायदंडे यांना तातडीने ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कडक कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. नाधवडे येथील मतदान केंद्रावर शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जयवंत वायदंडे हे मतदानासाठी आले होते. त्यांनी सुरुवातीला आपले मतदान केले. मात्र, त्यानंतर अचानक त्यांनी ईव्हीएम मशीन उचलले आणि जोरात जमिनीवर आपटले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे मतदान केंद्रावर उपस्थित असलेले अधिकारी, कर्मचारी आणि इतर मतदारांची मोठी पळापळ झाली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. निषेधाची अनोखी पण बेकायदेशीर पद्धत जयवंत वायदंडे यांनी या कृतीतून निवडणूक आयोग, शासन आणि निवडणूक विभागाचा जाहीर निषेध व्यक्त केला. ईव्हीएम नको, बॅलेट पेपर हवा, अशी त्यांची भूमिका होती. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांनी यापूर्वीच निवडणूक प्रक्रियेसंदर्भात सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या होत्या. त्यामुळे पोलिस त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते, तरीही त्यांनी हे धाडस केल्याने सुरक्षा यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिसांची तत्परता आणि मतदान पुन्हा सुरू घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावर असलेले पोलिस उपनिरीक्षक योगेश गोरे यांनी सहकाऱ्यांसह वायदंडे यांना घटनास्थळीच झडप घालून ताब्यात घेतले. त्यानंतर तातडीने दुसरे ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देण्यात आले आणि काही वेळातच मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून निवडणूक कार्यात अडथळा आणणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. हे ही वाचा… वेळापूर पोलिस ठाण्यात 'पवार' गटाचा एल्गार!:कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी खासदार-आमदारांचे ठिय्या आंदोलन, दोन तासांनंतर माघार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. या दरम्यान, सोलापूरच्या वेळापूरमध्ये मात्र मतदानाच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. पोलिस अधिकाऱ्याने एका तरुणाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी थेट पोलिस ठाण्यात बेमुदत आंदोलन पुकारले. अखेर संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आश्वासन मिळाल्यानंतर दोन तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले. सविस्तर वाचा…
त्यागमूर्ती माता रमाई यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन
लातूर : प्रतिनिधी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३४ वी सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने कृतज्ञतापूर्वक अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्रिसरण व पंचशील ग्रहण करण्यात आली. यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार महादेव […] The post त्यागमूर्ती माता रमाई यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रीय पातळीवरील नीट सुपर स्पेशालिटी परीक्षेत डॉ. लाळे यांचे यश
लातूर : प्रतिनिधी राष्ट्रीय पातळीवरील नीट सुपरस्पेशालिटी परीक्षेत लातूरच्या डॉ. सौरभ मारुती लाळे याने उल्लेखनीय यश संपादन करत देशात ४४ वा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशामुळे लातूरच्या गौरवशाली शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला गेला आहे. देशपातळीवरील अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत मिळालेल्या या यशामुळे वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. सौरभचे कौतुक होत आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि […] The post राष्ट्रीय पातळीवरील नीट सुपर स्पेशालिटी परीक्षेत डॉ. लाळे यांचे यश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
६९ व्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत आयुष तोडकरची चमकदार कामगिरी
लातूर : प्रतिनिधी नांदेड येथे दि. ३१ जानेवारी रोजी झालेल्या ६९ व्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत श्री श्री रविशंरक विद्यामंदीर, लातूरचा विद्यार्थी आयुष ओमप्रकाश तोडकर याने महाराष्ट्र संघात चांगली कामगिरी करुन पहिल्या क्रमाकांचे यश मिळवले. देशातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या ६९ व्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने मध्यप्रदेश संघाला हरवत विजेतेपद मिळवले. या […] The post ६९ व्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत आयुष तोडकरची चमकदार कामगिरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
२५६ केंद्रांवर ९६ हजार विद्यार्थी देणार १२ वीची परीक्षा
लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणा-या इयत्ता १० वी, १२ वी परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून १२ वी परीक्षेला ९६ हजार ५४२ विद्यार्थी तर १० वी परीक्षेला १ लाख १० हजार ९८३ विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार होऊ नयेत म्हणून यंदाही मंडळातर्फे विशेष काळजी […] The post २५६ केंद्रांवर ९६ हजार विद्यार्थी देणार १२ वीची परीक्षा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. या दरम्यान, सोलापूरच्या वेळापूरमध्ये मात्र मतदानाच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. पोलिस अधिकाऱ्याने एका तरुणाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी थेट पोलिस ठाण्यात बेमुदत आंदोलन पुकारले. अखेर संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आश्वासन मिळाल्यानंतर दोन तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले. वेळापूर येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी निलेश (मंगेश) तुपे या तरुणाला मारहाण केल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला. मतदानाच्या दिवशीच ही घटना घडल्याने राजकीय वातावरण तापले. आपल्या कार्यकर्त्याला विनाकारण लक्ष्य केले जात असल्याचे पाहून खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी थेट वेळापूर पोलिस ठाणे गाठले आणि तिथेच ठिय्या मांडला. पोलिस भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना खासदार आणि आमदारांनी स्थानिक प्रशासनावर गंभीर आरोप केले. वेळापूर पोलिस ठाणे आणि येथील अधिकारी सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली काम करत आहेत. विरोधकांच्या कार्यकर्त्यांना जाणूनबुजूण त्रास दिला जात असून निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळा आणला जात आहे, असे ते म्हणालेत. पोलिसाच्या निलंबनाच्या आश्वासनानंतर माघार पोलिस ठाण्यातील हे नाट्य सुमारे दोन तास चालले. कार्यकर्ते आणि नेत्यांचा वाढता दबाव पाहून उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. संबंधित सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांची तात्काळ बदली करून त्यांना निलंबित करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. या प्रकरणाचा सखोल तपास करून त्याचा अहवाल पोलिस अधीक्षकांकडे (SP) पाठवला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानंतरच नेत्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. झेडपी-पंचायत समितीसाठी राज्यभरात शांततेत मतदान दरम्यान, १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेच्या ७३१ गटांसाठी व पंचायत समितीच्या १,४६२ गणांसाठी असे एकुण ७,४३८ उमेदवार रिंगणात आहेत. सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये लहान मुलांना मतदान यंत्रापर्यंत नेल्याच्या गंभीर प्रकरणांची निवडणूक आयोगाने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. रत्नागिरीतील चिपळूणमध्ये ईव्हीएम बंद पडण्याच्या घटना वगळता उर्वरित राज्यात प्रक्रिया शांततेत पार पडली.
किरकोळ घटना वगळता सोलापूर जिल्ह्यात शांततेत मतदान
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडनुकीसाठी शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडले. किरकोळ घटना वगळता जिल्हाभरात शांततेत मतदान पार पडले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४७.६६% मतदान झाले होते. जवळपास सात वर्षानंतर होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मात्र सकाळच्या वेळेत तो इतका […] The post किरकोळ घटना वगळता सोलापूर जिल्ह्यात शांततेत मतदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मध्य रेल्वेच्या एका लोकलमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात बुरखा घालून शिरलेल्या एका संशयित व्यक्तीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. महिला प्रवाशांनी संशय आल्यावर त्याला पकडले आणि त्याचा व्हिडिओही बनवला, परंतु घाटकोपर स्थानक येताच त्याने फिल्मी स्टाईलने धावत्या लोकलमधून उडी मारून पलायन केले. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना CSMT च्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये घडली. घाटकोपर स्थानकात पोहोचण्यापूर्वी महिला डब्यात एक व्यक्ती बुरखा घालून बसल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. बुरखा घातलेली ही व्यक्ती डब्यातील इतर महिलांना जाणूनबुजून स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होती. सदरील व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने महिलांनी त्याला घेराव घातला आणि चौकशी सुरू केली. काही महिलांनी या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. स्वतःचे पितळ उघडे पडल्याचे लक्षात येताच, ट्रेन घाटकोपर फलाटावर पोहोचण्यापूर्वीच त्याने विरुद्ध दिशेला उडी मारली आणि समोर उभी असलेल्या कर्जत फास्ट लोकलमध्ये चढून पळ काढला. रेल्वे पोलिसांचा 'संयुक्त' तपास सुरू या घटनेनंतर रेल्वे पोलीस (GRP) आणि रेल्वे सुरक्षा दल (RPF) सतर्क झाले आहेत. पोलिसांनी तातडीने मुलुंड आणि ठाणे स्थानकांवर शोधमोहीम राबवली, मात्र आरोपी हाती लागला नाही. याप्रकरणी घाटकोपर RPF ने रेल्वे कायद्याच्या कलम १६२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. कुर्ला जीआरपीचे वरिष्ठ अधिकारी संभाजी यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात आंबिवली स्थानकावर बुरखा घालून आलेल्या एका व्यक्तीने चेन स्नॅचिंग केल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणाची एफआयआर कल्याण जीआरपीमध्ये नोंद आहे. पोलीस आता या दोन्ही घटनांमधील व्यक्ती एकच आहे का, याचा तपास करत आहेत.
भारताचे यूएसएला १६२ धावांचे आव्हान
मुंबई : विराट आणि रोहितशिवाय पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक खेळणा-या टीम इंडियाचा डाव डगमगला. अमेरिकेविरुद्ध संघाला २० षटकांत ९ गडी गमावून फक्त १६१ धावा करता आल्या. संघाचे सहा फलंदाज दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरले. कर्णधार सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत ८४ धावा केल्या, कर्णधार म्हणून त्याचे आठवे अर्धशतक झळकावले आणि १००० टी-२० धावा पूर्ण केल्या. सामन्याच्या सुरुवातीपासूनच […] The post भारताचे यूएसएला १६२ धावांचे आव्हान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्हा परिषदेसाठी ६० ते ६२ टक्के मतदान
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणा-या १२५ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज अंदाजे ६० ते ६२ टक्के मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५२ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी लागलेल्या मतदारांच्या रांगा बघता अंतिम टक्केवारी ६० टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. राजकीय कार्यकर्त्यांमधील बाचाबाची, स्थानिक प्रश्नांसाठी […] The post जिल्हा परिषदेसाठी ६० ते ६२ टक्के मतदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये काँग्रेस आघाडीला बहुमत मिळेल
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख, माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, सौ. सुवर्णाताई दिलीपराव देशमुख, रीड लातूर उपक्रमाच्या संस्थापक सौ. दीपशिखाताई धिरज देशमुख यांनी शनिवारी बाभळगाव येथील […] The post लातूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये काँग्रेस आघाडीला बहुमत मिळेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जागतिक सुविधा आता लातूरच्या सरकारी रुग्णालयात
लातूर : प्रतिनिधी अति गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी गोल्डन अवर महत्वाचा मानला जातो. हीच गरज ओळखून येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ६० खाटांचे अद्ययावत मॉड्युलर आयसीयू उभारले जात आहे. विशेष म्हणजे खाजगी रुग्णालयापेक्षाही अधिक अशा जागतिक दर्जाच्या सुविधा येथे मिळणार आहेत. येत्या महिनाभरात हे आयसीयू रुग्णसेवेत दाखल होईल. यामुळे मराठवाड्यातील अति गंभीर रुग्णांना […] The post जागतिक सुविधा आता लातूरच्या सरकारी रुग्णालयात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर जिल्ह्यात अंदाजे ६३.५० टक्के मतदान
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ५९ जागा व जिल्ह्यातील १० पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी दि. ७ फेबु्रवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान झाले. जिल्ह्यात अंदाजे ६३.५० टक्के टक्के झाले. या निवडणुकीसाठी मतदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला होता. लातूर जिल्ह्यामध्ये ६३.५० टक्के मतदान आहे. यात लातूर ६३ टक्के, अहमदपूर […] The post लातूर जिल्ह्यात अंदाजे ६३.५० टक्के मतदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महापौरपद मिळवण्याचे भाजपाचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात येणार आहे. मुंबईचा महापौर मराठीच होईल, असे भाजपाने निवडणुकीच्या प्रचारातच जाहीर केले होते. त्यानुसार भाजपाने महापौरपदासाठी नगरसेविका रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत महापौरपदाचा सस्पेन्स आज संपवला. तर उपमहापौरपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे संजय घाडी यांचे नाव जाहीर केले आहे. या दोघांनीच अर्ज […] The post अखेर मुंबईचे महापौरपद भाजपकडे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शाहू मिल चौकात शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात भाग्यश्री लक्ष्मण गवळी(३०, रा. कसबा बावडा) आणि दीपक महादेव वंशी(६२, रा. सनगर गल्ली, कोल्हापूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शाहू मिल चौकात भरधाव चारचाकीने दुचाकींना उडविले. या […] The post कार उलटून २ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमेरिकेने पीओके-अक्साई चिनला भारताचा भाग सांगितले
वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेने शुक्रवारी एका अंतरिम व्यापार कराराची रूपरेषा(फ्रेमवर्क) जाहीर केली. या घोषणेसोबत अमेरिकेच्या व्यापार कार्यालयाने (यूएसटीआर) भारताचा नकाशा शेअर केला. या नकाशामध्ये संपूर्ण जम्मू-काश्मीर प्रदेश, ज्यात पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि अक्साई चिन (चीनच्या ताब्यात असलेला प्रदेश) यांचा समावेश आहे, तो भारताचा भाग म्हणून दाखवण्यात आला आहे. हा नकाशा सोशल मीडियावर व्हायरल झाला. […] The post अमेरिकेने पीओके-अक्साई चिनला भारताचा भाग सांगितले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हौसिंग सोसायट्यांना अमर्याद स्वातंत्र्य नाही
नवी दिल्ली : हौसिंग सोसायट्यांना (गृहनिर्माण संस्था) स्वत:चे व्यवहार व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य नक्कीच आहे; परंतु ते स्वातंत्र्य अमर्याद नाही. सहकारी गृहनिर्माण संस्थांनी सभासदत्वाबाबतचा निर्णय घेण्यास नकार दिल्यास किंवा प्रदीर्घ काळ असा निर्णय प्रलंबित ठेवल्यास वैधानिक संस्था किंवा सरकारी अधिकारी त्या प्रकरणात हस्तक्षेप करू शकतात असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. मुंबईतील मालबोरो हाऊस को-ऑपरेटिव्ह […] The post हौसिंग सोसायट्यांना अमर्याद स्वातंत्र्य नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कुवेतमध्ये नांदेडच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
मुखेड(नांदेड) : पोटाची खळगी भरण्यासाठी कुवेतला गेलेल्या मुखेड तालुक्यातील बिहारीपूर येथील शेख जुबेर महंमद(३०) या तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याचा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी केंद्र सरकार आणि भारतीय दूतावासाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी आर्त साद मृताच्या वडिलांनी घातली आहे. शेख जुबेर हा […] The post कुवेतमध्ये नांदेडच्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मध्यान्ह भोजनानंतर मुलांना विषबाधा
मधेपुरा : बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात मध्यान्ह भोजनानंतर मोठी खळबळ उडाली आहे. शाळेत शनिवारी जेवल्यानंतर ७० हून अधिक मुलांची प्रकृती अचानक बिघडली. जेवणानंतर काही वेळातच मुलांना उलट्या, पोटदुखी आणि अस्वस्थता जाणवू लागली. मुलांची प्रकृती बिघडत असल्याचे पाहून शाळा परिसरात एकच गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. शिक्षकांनी तातडीने याची माहिती स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाला दिली. […] The post मध्यान्ह भोजनानंतर मुलांना विषबाधा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमेरिकेच्या कृषी आणि दुग्धजन्य पदार्थांवर बंदी
नवी दिल्ली : भारत आणि अमेरिकेने अंतरिम व्यापार करारासाठी एक चौकट तयार केली आहे, यामध्ये भारतीय वस्तूंवरील अमेरिकेचे शुल्क ५० टक्क्यांवरून १८ टक्के केले आहे. संयुक्त निवेदनानुसार, भारताच्या कृषी बाजारपेठेला संरक्षण देण्यात आले आहे. भारताने संवेदनशील मानल्या जाणा-या कृषी आणि दुग्धजन्य उत्पादनांवर कोणत्याही शुल्कात सूट दिलेली नाही. या अंतरिम करारामुळे व्यापक व्यावसायिक फायदे मिळतात, पण […] The post अमेरिकेच्या कृषी आणि दुग्धजन्य पदार्थांवर बंदी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जमिनीवर कोरियन स्टाईलची काही विचित्र चिन्ह
गाझियाबाद : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे तीन सख्या बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. कोरियन गेमच्या व्यसनामुळे या तिघींनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. जेव्हा त्यांच्या बंद खोलीचा दरवाजा उघडण्यात आला, तेव्हा जमिनीवर कोरियन स्टाईलची काही विचित्र चिन्हे रेखाटलेली होती आणि घरातील वातावरण अतिशय भीतीदायक होते. कुटुंबातील एका नातेवाईकाने अनेक खळबळजनक खुलासे […] The post जमिनीवर कोरियन स्टाईलची काही विचित्र चिन्ह appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पूर्णिया : बिहारच्या राजकारणात शुक्रवारी रात्री उशिरा मोठा राजकीय राडा पाहायला मिळाला. पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना पाटणा पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली. तब्बल ३१ वर्षे जुन्या एका घर बळकावल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून, अटकेपूर्वी खासदार आणि पोलीस यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. हे प्रकरण १९९५ मधील आहे. तक्रारदार विनोद बिहारी […] The post खासदार पप्पू यादव यांना अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विकसित भारतच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल
नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका या दोन जगातील मोठ्या लोकशाही राष्ट्रांनी एका ऐतिहासिक व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधांमधील तणाव निवळला असून भारतासाठी मेक इन इंडिया आणि रोजगाराच्या नव्या संधींची दारे उघडली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराबद्दल आनंद व्यक्त करत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार […] The post विकसित भारतच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सायबर चोरांविरोधात ‘ऑपरेशन सायहॉक’
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी सायबर फसवणूक करणा-या टोळींवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली असून ‘ऑपरेशन सायहॉक’अंतर्गत पोलिसांनी १००० हून अधिक व्यक्तींना अटक केली आहे. पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मोहीम दिल्ली आणि आसपासच्या राज्यांमध्ये पसरलेल्या संघटित सायबर फ्रॉड सिंडिकेट्सना मुळासकट उखडून टाकण्यासाठी राबवण्यात आली. ऑपरेशन सायहॉक ३.० सायबर गुन्ह्यांविरुद्धच्या मोहिमेच्या तिस-या टप्प्यात दिल्ली पोलिसांनी […] The post सायबर चोरांविरोधात ‘ऑपरेशन सायहॉक’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डिजिटल फसवणूक झाल्यास मिळेल २५ हजारांची भरपाई
मुंबई : डिजिटल फसवणुकीचा बळी ठरलेल्या बँक ग्राहकांना आता २५ हजार रुपयांपर्यंतची भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी नुकतीच केली. विशेष म्हणजे, ग्राहकाने चुकून आपला ओटीपी शेअर केला असेल, तरीही ही भरपाई मिळणार आहे. आरबीआयकडील ८५ हजार कोटी रुपयांच्या डीईए फंडातून ही रक्कम दिली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेने जाहीर […] The post डिजिटल फसवणूक झाल्यास मिळेल २५ हजारांची भरपाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली शहरातील दोन हळद व्यापाऱ्यांची २३.५० लाख रुपये किंमतीची ६०६ कट्टे हळद घेऊन ट्रक चालक बेपत्ता झाल्याचा प्रकार उघड झाला असून या प्रकरणी मध्यप्रदेशातील एक ट्रक चालका विरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शनिवारी ता. ७ फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता ट्रक चालकाचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातील संतोष भक्कड व कार्तीक चेपूरवार हे व्यापारी हळद खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी खरेदी केलेली हळद बिहार राज्यातील गया येथील माँ शक्ती ट्रेडर्स या व्यापाऱ्याला हळद विक्री केली होती. त्यानुसार विक्री केलेली हळद नेण्यासाठी मध्यप्रदेशातील बारीगठ येथील ट्रक चालक शिवम बेलदार हा ट्रक घेऊन आला होता. हिंगोली येथील औद्योगिक वसाहतीमधून तसेच आदर्श महाविद्यालयाच्या परिसरातील असलेल्या गोदामातून २३.५० लाख रुपये किंमतीची ६०६ कट्टे हळद ता. २९ जानेवारी रोजी ट्रकमध्ये भरण्यात आली होती. यामध्ये व्यापारी भक्कड यांच्या मालकिची ९.३४ लाख रुपये किंमतीची २०० कट्टे तर व्यापारी चेपूरवार यांच्या मालकिची १४.१६ लाख रुपये किंमतीची ४०६ कट्टे हळदीचा समावेश होता. सदर ट्रकमध्ये हळद भरल्यानंतर ट्रक बिहारकडे निघाला. मात्र किमान चार दिवसांत ट्रक बिहार येथे पोहोचणे अपेक्षीत असतांना अद्यापही ट्रक तेथे पोहोचलाच नाही. त्यामुळे व्यापारी भक्कड व चेपूरवार यांनी ट्रक चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा कुठेही शोध लागला नाही शिवाय मोबाईल देखील बंद होता. काही दिवस वाट पाहिल्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच व्यापारी भक्कड यांनी आज हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी ट्रक चालक शिवम बेलदार (रा. वारीगढ, जि. छतरपुर, मध्यप्रदेश) याच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार अशोक धामणे, संतोष करे, गणेश लेकुळे, शिवाजी ठोंबरे, शेख मुजीब यांच्या पथकाने ट्रक चालकाचा शोध सुरु केला असून त्यासाठी पथकेही रवाना केली आहेत.
देशात स्तन कर्करोग मृत्यू प्रकरणे १३ टक्क्यांनी वाढली
नवी दिल्ली : देशातील महिलांच्या आरोग्यावर कर्करोगाचे संकट अधिक गडद होत आहे. राज्यसभेत आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, २०२१ ते २०२५ या कालावधीत स्तनाच्या कर्करोगाच्या नवीन प्रकरणांमध्ये आणि त्यामुळे होणा-या मृत्यूंमध्ये सुमारे १३% ची मोठी वाढ नोंदवली गेली आहे. २०२५ मध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या नवीन अंदाजित प्रकरणांचा आकडा २.४० लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे, […] The post देशात स्तन कर्करोग मृत्यू प्रकरणे १३ टक्क्यांनी वाढली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रासाठी सात नवीन भविष्योन्मुख धोरणे आणण्याची घोषणा केली आहे. नागपूर येथे आयोजित 'अॅडव्हांटेज विदर्भ' परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राज्याचा आगामी काळात धोरण-आधारित विकासावर भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटद्वारे आयोजित 'अॅडव्हांटेज विदर्भ - खासदार औद्योगिक महोत्सव' अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे जागतिक अध्यक्ष जितेंद्र जोशी, असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांच्यासह २२ देशांचे राजदूत, उच्चायुक्त आणि व्यावसायिक प्रतिनिधी उपस्थित होते. या नवीन धोरणांमध्ये टेक्सटाइल्स अँड अॅपरल, लेदर अँड फूटवेअर, इलेक्ट्रॉनिक्स अँड फॅब, एरोस्पेस अँड डिफेन्स, एमएसएमई, फार्मास्युटिकल बायोटेक अँड मेडिकल डीव्हायसेस, सर्क्युलर इकॉनॉमी आणि बायो प्लास्टिक या क्षेत्रांचा समावेश असेल. ही धोरणे भविष्यातील गरजा, बदल आणि आव्हाने लक्षात घेऊन तयार केली जात आहेत. यापूर्वी राज्य सरकारने जीसीसी, जेम्स अँड ज्वेलरी, बांबू आणि नवीन औद्योगिक धोरणे जाहीर केली आहेत. या परिषदेदरम्यान राज्यामध्ये १०,८३१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे तीन महत्त्वाचे सामंजस्य करार (MoUs) करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, यामुळे धोरणप्रेरित गुंतवणूक, उद्योगवाढ आणि आर्थिक विकास हेच महाराष्ट्राचे प्रमुख सूत्र ठरेल. पहिला करार महामेट्रो आणि केअर हॉस्पिटल यांच्यात झाला. या करारानुसार, कस्तुरचंद पार्कजवळ महामेट्रोच्या जागेवर पीपीपी मॉडेलवर आधारित सुमारे साडेतीनशे खाटांचे बहुविशेषोपचार रुग्णालय उभारले जाईल. यासाठी सुमारे ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. दुसरा करार गॅलक्सी सोलर कंपनीसोबत करण्यात आला. कंपनी १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून सोलर सेल आणि बॅटरी स्टोअरेज सिस्टीमची निर्मिती करेल. या प्रकल्पातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे चार हजार रोजगारांची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. तिसरा करार टेलिकॉम टॉवरची निर्मिती करणाऱ्या जीआर इन्फ्रास्ट्रक्चरने केला, ज्यामध्ये गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली. या सामंजस्य करारांची माहिती मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी दिली. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमने १५० देशांसोबत करार केले असून, त्याचा लाभ विदर्भातील एमएसएमईंना व्यवसाय वाढवण्यासाठी होईल, असे जितेंद्र जोशी यांनी नमूद केले.
पुण्यात मूलनिवासी मुस्लिम मंचाने बजरंग दलवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. उत्तराखंडमधील कोटद्वार येथे एका मुस्लिम दुकानदाराला दुकानाचे नाव बदलण्यासाठी धमकावल्याच्या घटनेनंतर हे आंदोलन करण्यात आले. कोटद्वार येथे एका मुस्लिम दुकानदाराने आपल्या दुकानाला 'बाबा' असे नाव दिले होते. बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी त्याला हे नाव बदलण्यासाठी धमकावले आणि दहशत निर्माण केली, असा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन सादर करण्यात आले. अंजुम इनामदार यांनी सांगितले की, कोटद्वारमध्ये बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर जमाव करून कायदा हातात घेतला. त्यांनी 'नाव बदला, नाहीतर परिणाम भोगा' अशा धमक्या दिल्या. या दहशतीला विरोध करत दीपक कुमार नावाच्या व्यक्तीने 'माझं नाव मोहम्मद दीपक आहे, भारतात नाव आणि धर्मावरून कुणावरही बळजबरी चालणार नाही' असे ठामपणे सांगितले. संविधानाचा आवाज उठवणाऱ्या दीपक कुमार यांच्यावर बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप इनामदार यांनी केला. उत्तराखंडमध्ये यापूर्वीही ख्रिश्चन आणि मुस्लिम अल्पसंख्याक समाजावर अत्याचार, धमक्या आणि मारहाणीच्या घटना घडल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकारकडे बजरंग दलवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली. तसेच, दीपक कुमार यांच्यावर दाखल खोटी एफआयआर त्वरित मागे घ्यावी, त्यांच्या मुलीवर शाळेत लादलेली बंदी हटवावी आणि कोटद्वार येथे पत्रकारांवरील बंदी उठवावी, अशा मागण्याही करण्यात आल्या. या आंदोलनात भोला सिंग अरोरा (अध्यक्ष, गुरुद्वारा गणेश पेठ), राजन नायर (ईसाई महासंघ), सगई नायर, भीम आर्मी संघटनाचे प्रदेश नेते ॲड. तोसीफ शेख, ॲड. क्रांती सहाने, आसमा शेख, हलीमा शेख, सलीम मौला पटेल, इब्राहिम यवतमाळवाला, सत्यवान गायकवाड, सलीम शेख, मोईन शेख, गोविंद साठे आदी सहभागी झाले होते.
ज्येष्ठ तारपा वादक पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांनी तरुणांना आभासी जगात रमण्याऐवजी निसर्गातील संगीताचा शोध घेण्याचे आवाहन केले आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपण्यासाठी निसर्गातील संगीताशी एकरूप होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भारत सरकारने नुकतेच पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत. या निमित्ताने विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने २०२६ च्या पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ कृषी तंत्रज्ञान संशोधक श्रीरंगदादा लाड, ज्येष्ठ तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा आणि प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडला, जिथे पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. सन्मानाला उत्तर देताना भिकल्या धिंडा म्हणाले की, तारपा हे वाद्य पिढ्यानपिढ्या त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. निसर्गातील घटकांपासून बनवलेले हे वाद्य केवळ एक साधन नसून त्यांचे दैवत आहे. श्वास फुंकून तारपाला जिवंत केले जाते आणि त्याचा नाद ऐकताच शरीर डोलू लागते, पाय थिरकू लागतात, असे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी स्वातंत्र्यानंतरही आपली भाषा, संस्कृती, पेहराव आणि विचार विसरत चाललो असल्याची खंत व्यक्त केली. पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीमुळे आपली मूळ ओळख पुसली जात असून, स्वातंत्र्याच्या शंभराव्या वर्षापर्यंत सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळवण्याचे ध्येय ठेवले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. श्रीरंगदादा लाड यांनी संशोधनाधारित शेतीचे महत्त्व स्पष्ट केले. ज्वारी, बाजरी व कपाशीवर केलेल्या प्रयोगांतून प्रती एकरी उल्लेखनीय उत्पादन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. संशोधनाशिवाय शेती कोरडवाहू ठरते, तर संशोधनावर आधारित शेती बागायती बनते, असे त्यांचे मत होते. रघुवीर खेडकर यांनी पद्मश्री पुरस्कारामुळे तमाशा या लोककलेला खरा राजाश्रय मिळाल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमास कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, सीए (डॉ.) केतन जोगळेकर आणि ममता क्षेमकल्याणी यांची उपस्थिती होती.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर आपल्याला प्रचारात रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुका येतात आणि जातात, पण दादा गेल्याचे दुःख आमच्या मनात आहे, असे मोहोळ म्हणाले. पुणे जिल्ह्याचे भाजप पक्षाचे प्रभारी असूनही आपण जिल्हा परिषद प्रचाराला कुठेही गेलो नसल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार जिल्ह्यात ३५ ते ४० सभा घेणार होते, मात्र दुर्दैवी घटनेनंतर परिस्थिती बदलली आहे. राजकारण करायला आयुष्य आहे, अशावेळी प्रचार करणे योग्य वाटले नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. मतदार सुज्ञ असून ते योग्य निर्णय घेतील, असेही मोहोळ म्हणाले. शरद बुट्टे पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवर बोलताना मोहोळ म्हणाले की, ते पहाटे दिल्लीहून आले आहेत. या घटनेमागील नेमके कारण जाणून घेतल्यानंतरच आपण यावर अधिक बोलू, असे त्यांनी नमूद केले. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. हे सगळे भयानक होते, असे सांगत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीबाबत माहिती देताना मोहोळ यांनी सांगितले की, ब्लॅक बॉक्स सापडला आहे. एआयबीची (Aircraft Accident Investigation Bureau) टीम यावर काम करत असून, डेटा डाउनलोड केला जात आहे. संपूर्ण विश्लेषणानंतर लवकरच अहवाल समोर येईल. या विषयावर कोणीही राजकारण करू नये, अशी विनंतीही त्यांनी केली. बजरंग सोनवणे यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना मोहोळ म्हणाले की, राज्याचा आणि पुणे जिल्ह्याचा इतका मोठा नेता गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. अशा दुःखद प्रसंगी राजकारण करणे योग्य नाही. चौकशी होईल आणि अहवाल येतील. मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणात लक्ष घालत असून, सीआयडी, डीजीसीआय आणि एआयबी या यंत्रणा काम करत आहेत. पुणे महापालिकेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या तीन-चार वर्षांपासून शहराला प्रतिनिधी नव्हते. आता नवीन व्यवस्था येत असून, आपली जबाबदारी वाढली आहे. पाणीपुरवठा आणि वाहतूक यांसारख्या समस्यांवर काम करून पुण्याला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आज राज्यभर मतदान पार पडले. महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. प्रशासनाने सुरळीत मतदानासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. या निवडणुकांमध्ये राज्यभरातील कोट्यवधी मतदार सहभागी झाले असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या शेकडो जागांसाठी मतदान पार पडले. याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील कोडोली - धनगवाडी गावाने लोकशाहीबाबत आदर्श उदाहरण घालून दिले. कोडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेतील ११, अंगणवाडी आणि ग्राम पंचायत कार्यालयाच्या ग्रंथालयातील मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. धनगरवाडीच्या सरपंच सुवर्णा अश्रुप शेंडगे यांनी सकाळी ७:३० वाजता सुरूवातीलाच सर्वांत पहिले मतदान केले. निता बळीराम खरात या कोडोली गटाच्या भाजपप्रणीत उमेदवार यांनीदेखील कोडोली जि. प. शाळेच्या मतदान केंद्र क्रमांक २७ वर मतदान केले. कडेवर लहान बाळांना घेऊनदेखील तेजस्वी मतदारमातांनी मतदानाचा हक्क बजावला. दिव्यांग, अपघातग्रस्त आणि वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांनीही जोशपूर्ण वातावरणात मतदान केले. मतदानाचे कर्तव्य पार पाडून वऱ्हाडी लग्नसोहळ्याला रवाना गावात एकीकडे निकिता रंगनाथ माने यांचा विवाह सोहळा उत्साहात सुरू होता, तरी देखील गावकऱ्यांनी मतदानाचे कर्तव्य प्राधान्याने पार पाडले. गलांडे परिवारातील अक्षया संजय गलांडे नामक कन्येचा उद्या विवाहसोहळा देवकरवाडी येथे असून आज देवकार्य आणि अन्य धार्मिक विधींची लगबग असतानाही मतदानाचे कर्तव्य पार पाडून वऱ्हाडी देवकरवाडीला गेले. लग्नाच्या आनंदातही मतदानासाठी नागरिक मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर पोहोचले. पुणे, मुंबईहून मतदान करण्यासाठी नागरिकांनी हजेरी लावली. अंत्यसंस्कारांनंतर लोकशाहीचे कर्तव्य दरम्यान, गावातील कलावती शंकर शेंडगे (८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडल्यानंतरही कोडोलीकरांनी मतदानासाठी हजेरी लावली. दुःखद प्रसंग असतानाही लोकशाही कर्तव्याला प्राधान्य देत गावकऱ्यांनी जागरूकतेचा आदर्श घालून दिला. कोडोलीकरांनी दाखवलेली जबाबदारी प्रेरणादायी लग्नसोहळ्याचा आनंद, दुःखद प्रसंगाची वेदना आणि लोकशाही कर्तव्याची जाणीव अशा वेगवेगळ्या परिस्थितीत कोडोलीकरांनी दाखवलेली जबाबदारी आणि एकजूट प्रेरणादायी ठरत आहे. शेवटची माहिती मिळाली तेव्हा कोडोली केंद्रावरील मतदान ५४ टक्के झाले होते. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान किती महत्त्वाचे आहे, याचा वस्तुपाठ कोडोलीकरांनी, सातारकरांनी घालून दिला.
पश्चिम महाराष्ट्रातील निसर्गसमृद्ध सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आज ७ फेब्रुवारी रोजी पहाटे एका वाघिणीला निसर्गमुक्त करण्यात आले. 'STR 06' असे शासकीय नाव असलेल्या या वाघिणीला पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणले असून, तिला कोयना वन्यजीव अभयारण्यातील कोअर जंगल क्षेत्रात सुरक्षितरीत्या सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सह्याद्रीतील वाटाड्यांनी (गाईड्स) या वाघिणीचे नामकरण 'हिरकणी' असे केले आहे. 'STR 06 या वाघिणीला गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून पकडण्यात आले होते. त्यानंतर रस्तेमार्गे तिची वाहतूक सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यात आली. शुक्रवारी रात्री तिला बोटीने प्रवास घडवून कोयना अभयारण्यात आणले गेले. येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची कसून आरोग्य तपासणी केली. प्रवासाचा थकवा असतानाही तिने दिलेले पाणी आणि मटण फस्त केले, जे तिच्या सुदृढ प्रकृतीचे लक्षण मानले गेले. आज शनिवारी सकाळी ६ वाजता सर्व सुरक्षा निकषांचे पालन करून तिला जंगलात मुक्त करण्यात आले. 'बाजी' आणि 'हिरकणी'ची जमणार जोडी कोयना अभयारण्यात आधीच 'STR 03' (बाजी) नावाचा एक नर वाघ वास्तव्यास आहे. आता 'हिरकणी'च्या आगमनामुळे बाजीला जोडीदार मिळाला असून, भविष्यात येथे वाघांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत पसरलेल्या ११६५ चौ. किमी क्षेत्रासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे मानले जात आहे. 'PTR 123' ते 'हिरकणी' या वाघिणीला पेंच व्याघ्र प्रकल्पात 'PTR 123' या क्रमांकाने ओळखले जायचे. सह्याद्रीत आल्यावर तिला 'STR 06' हा नवीन शासकीय क्रमांक देण्यात आला. मात्र, स्थानिक गाईड मंडळींनी महाराष्ट्राच्या इतिहासातील पराक्रमाची आठवण म्हणून तिला 'हिरकणी' हे नाव दिले आहे. हे संपूर्ण ऑपरेशन सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. यामध्ये उपसंचालक किरण जगताप, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाक्के, संग्राम गोडसे, अक्षय साळुंखे, विजय बाटे, तुषार जानकर, अक्षय करमळकर यांच्यासह मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, सुनील भोईटे आणि वनपाल, वनरक्षक यांनी मोलाची भूमिका बजावली.
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात महात्मा जोतिबा फुले यांची मूर्ती तोडण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमागे आरएसएसचा हात असल्याचा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. हा केवळ जोतिबा फुलेंवर झालेला हल्ला नसून, तो दलित, आदिवासी, ओबीसी आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीवर झालेला हल्ला आहे, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी आपला संताप व्यक्त केला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएसवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, आरएसएसला महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेशी द्वेष आहे. वंचित आणि बहुजनांच्या समतेच्या आंदोलनाला चिरडण्याचा हा प्रयत्न आहे. आरएसएसला दलित, आदिवासी आणि ओबीसींबद्दल आकस आहे; त्यांना केवळ मनुवाद आणि ब्राह्मणवादाचेच प्रेम आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना विचारला जाब प्रकाश आंबेडकर यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रेवंत रेड्डी, तुमच्या राज्यात महापुरुषांच्या मूर्तींवर झालेला हा काही पहिलाच हल्ला नाही. वारंवार अशा घटना घडत असताना तुम्ही हातवर हात धरून का बसला आहात? सरकार या गुंडांवर कडक कारवाई का करत नाही? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. हा देश केवळ आणि केवळ फुले, शाहू आणि आंबेडकरवादी विचारधारेवरच चालेल, मनुवादाने नाही, असा सज्जड दमही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. मनुवादी भाजपाचा जाहीर निषेध - सचिन सावंत दुसरीकडे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली असून, भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपाचे राजकारण अत्यंत विखारी असून आज तेलंगणा मधील तेल्लापूर मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा ज्या पद्धतीने तोडण्याचा प्रयत्न भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला तो निषेधार्ह असल्याचे सचिन सावंत म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधणारे महाराष्ट्राला आपले कुलदैवत दाखवणारे महात्मा फुले - शिवरायांना कुळवाडी भूषण ही पदवी महात्मा फुले यांनी दिली. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने इथे भाजपा राजकारण करत आहे आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याला विरोध करत आहे. या मूढांना हे ही कळत नाही की ज्योतिबांना शिवरायांपासून वेगळे करता येणार नाही. यांना शिवरायही कळले नाहीत, अशा शब्दांत सचिन सावंत यांनी भाजपबद्दल निषेध व्यक्त केला.
सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? असा प्रश्न करणाऱ्या बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना खडेबोल सुनावलेत. फुकट प्रसिद्धीसाठी सध्या भडक बोलण्याचा उद्योग सुरू झाला आहे. अजितदादांच्या मृत्यूचे कुणीही भांडवल करू नये, असे त्यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी संशय व्यक्त केला होता. अजित पवारांच्या अपघाताविषयी वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. त्या विमानात बॉम्ब होता का? असेही म्हटले जात आहे. त्यामुळे या प्रकरणी अजितदादा घराबाहेर पडण्यापासून विमानात बसेपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जाहीर केले पाहिजे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून 'काय झाडी काय डोंगार' फेम शहाजीबापू यांनी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. काय म्हणाले शहाजीबापू पाटील? शहाजीबापू पाटील यांनी शनिवारी सांगोला तालुक्यातील चीक महूद येथे जिल्हा परिषदेसाठी मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, अजित पवार यांचा विमान अपघात हा तांत्रिक स्वरुपाचा व निव्वळ अपघात आहे. फरक एवढाच आहे की, नेमकी चूक विमानात होती की वैमानिकाची एवढेच समोर यायचे राहिले आहे. देशाचे संरक्षण मंत्री राहिलेल्या व जगातील सर्वात सुंदर व चांगली विमाने पाहिलेल्या शरद पवारांनीही हा निव्वळ अपघात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण अजित पवारांच्या मृत्यूचे भांडवल करू नये. सोलापुरात महायुतीचाच भगवा फडकणार शहाजीबापू पाटलांनी यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात विशेषतः सांगोल्यात महायुतीचाच भगवा फडकणार असल्याचेही स्पष्ट केले. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे व शिवसेनेने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम केले आहे. त्यामुळे यंदा सांगोला पंचायत समितीवर मागील 55 वर्षांपासून असणारी शेकापची सत्ता उलथवून महायुतीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले. आता पाहू काय म्हणाले होते बजरंग सोनवणे? उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी एका विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. तेव्हापासून या घटनेविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यात आता बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची भर पडली आहे. सोनवणे शुक्रवारी या प्रकरणी पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की, अजित पवारांच्या अपघाताविषयी वेगवेगळे निष्कर्ष काढले जात आहेत. या घटनेचा सखोल तपास झाला पाहिजे. अजित पवार घराबाहेर पडल्यापासून विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजे. विमानात 6 लोक होते, मग 5 मृतदेहच का सापडले? ज्या प्रकारे अपघात झाला ते पाहता, त्या विमानात बॉम्ब होता का? हे पाहिले पाहिजे. अंजली दमानिया याच्या प्रश्नांची चौकशी झाली पाहिजे. विमानाचा पायलट कोण होता? याचीही चौकशी झाली पाहिजे. घटनेच्या दिवशीचे सकाळपासूनचे सीसीटीव्ही फुटेज दाखवले गेले पाहिजे. विमान वरच क्रॅश झाले. विमान वर हवेतच ब्लास्ट का झाले? असे वेगवेगळे प्रश्न सोनवणे यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत.
मालेगाव महानगरपालिका इमारतीत आज एका भीषण अपघातातून मोठी जीवितहानी टळली आहे. महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू असतानाच महापालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून १८ प्रवाशांसह असलेली लिफ्ट अचानक खाली कोसळली. सुदैवाने, ही लिफ्ट तळमजल्यापर्यंत न जाता पहिल्या मजल्याच्या दरवाज्यात अडकल्याने मोठा अनर्थ टळला आणि लिफ्टमधील सर्वजण सुखरूप राहिले. आज महापालिकेत नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा उत्साह असताना ही घटना घडली. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भार (१८ नागरिक) झाल्याने आणि अचानक लिफ्टची चैन तुटल्याने ही दुर्घटना घडली. चौथ्या मजल्यावरून लिफ्ट वेगाने खाली येत असताना ती पहिल्या मजल्यावर अडकली. लिफ्ट कोसळल्याच्या आवाजाने आणि नागरिकांच्या ओरडण्याने महापालिका परिसरात एकच खळबळ उडाली. भिंत तोडून करण्यात आली सुटका घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने धाव घेतली. लिफ्ट पहिल्या मजल्यावर अशा ठिकाणी अडकली होती की तिचा दरवाजा उघडणे तांत्रिकदृष्ट्या कठीण होते. अखेर बचाव पथकाने पहिल्या मजल्यावरील भिंत तोडून विशेष प्रयत्नाने अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. लिफ्टची देखभाल नसल्याचे घडला अनर्थ या लिफ्टमध्ये 'इस्लाम पार्टी'चे नेते आसिफ शेख, मुश्तकिन डिग्निटी यांच्यासह काही नवनियुक्त नगरसेवक आणि पाच पत्रकारांचा समावेश होता. सर्वांची सुखरूप सुटका झाल्यानंतर प्रशासनासह राजकीय नेत्यांनी आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. लिफ्ट जर आदळली असती, तर त्यातून स्फोट होण्याचीदेखील शक्यता होती. पण सुदैवाने असे काही झाले नाही. लिफ्टमधील सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. या लिफ्टची देखभाल डागडुजी झाली नव्हती, यामुळे घटना घडल्याचे म्हटले जात आहे. मालेगाव महापालिकेत 'इस्लाम-समाजवादी' आघाडीची सत्ता या अपघाताच्या सावलीतच पार पडलेल्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. महापौरपदी इस्लाम पार्टीच्या उमेदवार शेख नसरीन बानो खालिद यांची निवड झाली. शेख नसरीन बानो खालिद यांनी शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांचा २५ मतांच्या फरकाने पराभव केला. शेख नसरीन बानो यांना ४३ मते मिळाली. उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद यांनीही ४३ मते मिळवून शिवसेनेचे ॲड. निलेश काकडे यांच्यावर निर्णायक विजय मिळवला. या संपूर्ण प्रक्रियेत भारतीय जनता पार्टी आणि एमआयएमच्या (MIM) नगरसेवकांनी तटस्थ राहणे पसंत केले. जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली.
आपल्या जाज्वल्य हिंदुत्ववादी विचारसरणीसाठी आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून मुंबईत 'संवाद' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात शनिवारपासून 'नवे क्षितिज' ही दोन दिवसीय व्याख्यानमाला सुरू झाली असून, याच्या उद्घाटन सोहळ्याला ग्लॅमर जगतातील दिग्गजांनी हजेरी लावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते म्हणजे बॉलिवूड अभिनेता सलमान खान. एरवी राजकीय किंवा वैचारिक व्यासपीठांपासून काहीसा दूर राहणारा सलमान खान जेव्हा संघाच्या कार्यक्रमात दाखल झाला, तेव्हा उपस्थितांमध्ये एकच चर्चा सुरू झाली. सलमान खान सभागृहात येताच सर्व कॅमेऱ्यांचे लक्ष त्याच्याकडे वळाले. त्याच्याभोवती चाहत्यांचा आणि मान्यवरांचा गराडा पडला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या वैचारिक व्यासपीठावर सलमानची उपस्थिती ही या सोहळ्याचा 'शो स्टॉपर' क्षण ठरली. सिनेसृष्टीतील दिग्गज एकाच छताखाली आरएसएसच्या कार्यक्रमाला केवळ सलमान खानच नव्हे, तर बॉलीवूडमधील अनेक बड्या हस्ती या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी आपली उपस्थिती दर्शवली. तरुण पिढीचा सुपरस्टार रणबीर कपूर यानेही या संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. सिद्ध दिग्दर्शक सुभाष घई आणि ज्येष्ठ अभिनेत्री अश्विनी भावे यांनीही या व्याख्यानमालेत हजेरी लावली. याव्यतिरिक्त मुंबईतील विविध क्षेत्रांतील निमंत्रित मान्यवर आणि उद्योजकही या सोहळ्याला उपस्थित होते. डॉ. मोहन भागवतांचे 'नवे क्षितिज' राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले शताब्दी वर्ष मोठ्या भव्यदिव्य स्वरूपात साजरे करत आहे. मुंबईतील हा कार्यक्रम त्याचाच एक भाग असून, विविध क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्तींपर्यंत संघाचा विचार पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. नेहरू सेंटरमधील या कार्यक्रमामुळे वैचारिक शिस्त आणि चित्रपटसृष्टीचे ग्लॅमर यांचे एक वेगळेच मिलन मुंबईकरांना अनुभवायला मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे या दोन दिवसीय व्याख्यानमालेतून उपस्थितांना संबोधित करत आहेत. 'नवे क्षितिज' या संकल्पनेतून संघाची भविष्यातील वाटचाल, राष्ट्रनिर्माण आणि सामाजिक समरसता या विषयांवर ते भाष्य करत आहेत.
'मी छत्रपतींची औलाद आहे, वेळ आली तर कुणालाही सोडणार नाही', अशा शब्दांत विरोधकांविरोधात डरकाळी फोडणाऱ्या मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना काँग्रेसने शिवरायांचा कथित अवमान करणाऱ्या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुरस्काराला विरोध करण्याचे आव्हान दिले आहे. तुम्ही खरेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील असाल आणि तुमचा स्वाभिमान भाजप च्या चरणी अर्पण केला नसेल तर कोश्यारी च्या पुरस्काराला विरोध करा, असे काँग्रेसने म्हटले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी एका प्रचारसभेत बोलताना विरोधकांवर कडाडून हल्ला चढवला होता. मी माझा मतदारसंघ व तालुका सोडून कुठेही जात नाही. काहीजण स्वप्न पाहत आहेत, पण मी त्यांना ठासून सांगतो की, 2029 ची स्वप्ने जावळीत पाहू नका. गरज नसताना कुणी माझ्या नादाला लागले तर मी सुद्धा छत्रपतींची औलाद आहे हे लक्षात ठेवा. वेळ आली तर मी कुणालाच सोडणार नाही, असे ते म्हणाले होते. महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या या विधानाचा दाखला देत त्यांना शिवरायांचा अवमान करणाऱ्या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुरस्काराला विरोध करण्याचे आव्हान दिले आहे. छत्रपतींची औलाद तेव्हा जागी झाली असती तर... महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, आ. शिवेंद्रराजे जी, आपल्यातील “छत्रपतींची औलाद” विकृत कोश्यारी ने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा जागी झाली असती, तर तमाम शिवप्रेमींना बरं वाटलं असतं. आपल्या राजांना शिव्या देणारा छिंदम, प्रशांत कोरटकर, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे म्हणणारा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, राजांच्या आग्रा मोहिमेचं असंबद्ध वर्णन करणारा राज्याचा मंत्री मंगलप्रसाद लोढा, महाराजांच्या पुण्यतिथीला ढोल वाजवणारा तत्कालीन मंत्री विनोद तावडे…या प्रत्येक घटना आणि वक्तव्यावेळी आपल्यातील “छत्रपतींची औलाद” जागी व्हायला हवी होती, शिवप्रेमींनी आपल्याला डोक्यावर घेतलं असतं. आपल्या माहितीसाठी ही सगळी मंडळी भाजप व त्यांच्याशी संबंधित असलेल्या विचारांची आहेत. तुम्ही खरेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील असाल आणि तुमचा स्वाभिमान भाजप च्या चरणी अर्पण केला नसेल तर कोश्यारी च्या पुरस्काराला विरोध करा. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सर्व संघ भाजप नेत्यांचा उघड उघड विरोध करा, असे काँग्रेसने म्हटले आहे. साताऱ्यात सर्वत्र भाजपचा झेंडा - शिवेंद्रराजे उल्लेखनीय बाब म्हणजे शिवेंद्रराजे भोसले यांनी एका प्रचारसभेत बोलताना आज साताऱ्यात प्रत्येक ठिकाणी भाजपचा झेंडा फडकत असल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते, घरातील माणसाला जसं संकटात एकटं सोडलं जात नाही, तसं मी साताऱ्याला कधीही सोडलं नाही. ज्यांनी वर्षानुवर्षे केवळ सत्ता भोगली, त्यांनी साताऱ्याला काय दिलं, हा प्रश्न आज जनतेने विचारायची वेळ आली आहे. नगरपालिका असो, नगरपंचायत असो, सहकारी संस्था असोत किंवा छोट्या-मोठ्या निवडणुका आज साताऱ्यात प्रत्येक ठिकाणी भाजपाचा झेंडा फडकतो आहे. हे यश कुणाच्या भीतीमुळे नाही, कुणाच्या कृपेने नाही; हे यश विकासामुळे आणि भाजपाच्या ताकदीमुळे आहे. सातारा जिल्ह्याचा विकास पाहायचा असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले होते.
बारामती पोटनिवडणुकीसाठी वेळापत्रक जाहीर
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील धक्कादायक निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. या मतदारसंघातील पोटनिवडणूक घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने कंबर कसली असून, निवडणुकीपूर्वीची सर्वांत महत्त्वाची प्रक्रिया म्हणजेच विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम प्रशासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेली […] The post बारामती पोटनिवडणुकीसाठी वेळापत्रक जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा
मुंबई : प्रतिनिधी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. अजितदादांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही यात मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे, अशी मागणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र […] The post सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायम करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून, त्यातून खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या नावाचा उल्लेख होत असल्याचा दावा केला जात आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पैशांचा वापर करण्याबाबत चर्चा ऐकू येत असल्याचा आरोप होत आहे. या ऑडिओमधील संभाषणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. व्हायरल होत असलेल्या या कथित ऑडिओमध्ये कोटी-दोन कोटी खर्च करावा लागला तरी चालेल, अशा आशयाची वाक्ये ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आर्थिक साधनांचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे या क्लिपच्या आधारे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, मतदारांची माहिती आणि शक्यता याबाबतच्या याद्या थेट व्हॉट्सॲपवर पाठवण्याचे निर्देश दिल्याचेही ऐकू येत असल्याचे सांगितले जात आहे. या संभाषणात हिंगणगावसह काही भागांतील मतदारांची संभाव्यता तपासून त्यानुसार काम करण्याबाबत चर्चा झाल्याचा आरोप आहे. पैशावर किती मतदार घेता येतील, त्या याद्या व्हॉट्सॲपवर टाका, अशा स्वरूपाच्या सूचनांचा उल्लेख केला जात आहे. कोणत्याही प्रकारची माहिती बाहेर न जाण्याची खबरदारी घेत फक्त डिजिटल माध्यमातून संपर्क साधण्यास सांगितल्याचेही या क्लिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. तसेच, मुस्लिम आणि दलित वस्त्यांतील मतदारांची स्वतंत्र यादी तयार करून काम सुरू करण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जात आहे. दोन घेऊ, तीन घेऊ, चार घेऊ, अशा शब्दांत मतदारांवर पैशांचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न सूचित होत असल्याचे आरोपातून पुढे येत आहे. निवडणूक संवेदनशील असल्याचे सांगत याद्या तातडीने तयार करण्यास सांगितल्याचेही ऐकू येते, असा दावा करण्यात येत आहे. शिरसाव, हिंगणगाव, जवळा आणि वाकडी या चार गावांमध्ये मागे पडायचे नाही, तिथे कोणताही तडजोडीचा मार्ग स्वीकारायचा नाही, असे स्पष्ट सांगितल्याचे या कथित ऑडिओमध्ये नमूद असल्याचे सांगितले जाते. खर्चाबाबत 50 लाख जावो, कोटभर जावो, दोन कोटी जाऊ देत, असे वाक्य ऐकू येत असल्याचा दावा आहे. त्यामुळे या क्लिपमुळे राजकीय वर्तुळात चर्चा अधिक रंगली आहे. याशिवाय, सभा मोठी झाली म्हणून गाफील राहू नका, लागेल ते मला सांगा, मी बरोबरच आहे, असे सांगत संपूर्ण प्रक्रियेवर थेट लक्ष ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे आरोप होत आहेत. कार्यकर्त्यांना सूचना देताना अत्यंत गोपनीयतेने काम करण्यास सांगितल्याचेही बोलले जात आहे. या सर्व सूचनांमुळे निवडणूक प्रक्रियेत आर्थिक प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळली गेलेली नाही दरम्यान, या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतरीत्या पडताळली गेलेली नाही. तरीही सोशल मीडियावर या क्लिपची जोरदार चर्चा सुरू असून, जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत, तर समर्थकांकडून क्लिप बनावट असल्याचेही म्हटले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या या प्रकरणामुळे पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
माथेरानच्या ई-रिक्षांचा १० तारखेपासून बंद
माथेरान : हातरिक्षाच्या अमानवीय प्रथेतून श्रमिकांना कायमस्वरूपी मुक्ती मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सद्य:स्थितीत सुरू असलेल्या सर्वच हातरिक्षा बंद करून ई-रिक्षांच्या संख्येत वाढ करावी, असे स्पष्ट आदेश दिलेले असताना देखील राज्य सरकारने याबाबत काहीही ठोस उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे श्रमिक रिक्षा संघटनेने दि. १० फेब्रुवारीपासून माथेरानमधील सर्वच रिक्षा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत विविध संबंधित […] The post माथेरानच्या ई-रिक्षांचा १० तारखेपासून बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सर्वांचे एकमत असेल तर एकत्र येऊ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेच्या ६८ तर पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी ही निवडणूक होत असून ६९६ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी मतदान होत असताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आज कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला येथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी […] The post सर्वांचे एकमत असेल तर एकत्र येऊ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अजितदादांच्या खासगी सचिवाची ४ तास चौकशी
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते, माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला, यावर काही नेते आपल्या अकलेचे तारे तोडत असतानाच केंद्रीय गुन्हे शाखेने (सीआयडी)ने या प्रकरणाच्या तपासाला वेग आणला आहे. काल (शुक्रवारी) अजित पवारांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांच्याकडून मंत्रालयात सुमारे ४ तास सखोल माहिती घेतली. सीआयडीच्या तपासाचा सगळा भर हा […] The post अजितदादांच्या खासगी सचिवाची ४ तास चौकशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकरांच्या पुत्रावर बिबट्याचा हल्ला
कराड : कराड तालुक्यातील काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचा नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा चिरंजीव अधिराज पाटील यांच्यावर शुक्रवारी रात्री बिबट्याने हल्ला केला. उंडाळे भागातील शेवाळेवाडी विभागात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन घराकडे परत येत असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात अधिराज यांना दुखापत झाली असून ते जखमी झाले आहेत. कराड तालुक्यातील […] The post राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकरांच्या पुत्रावर बिबट्याचा हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उत्साहात मतदान सुरू आहे. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. मात्र, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी वाळूज परिसरात बोगस मतदान होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४० टक्के मतदान नोंदवले गेले. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे बोगस मतदानासंदर्भात तक्रारी केल्या. शिरसाट यांच्या मते, शहराच्या भावसिंगपुरा परिसरातून लोकांना बसमधून भरून आणण्यात आले होते. काही ठिकाणी मृत उमेदवारांच्या नावानेही मतदान झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्याचे शिरसाट यांनी सांगितले. दुपारी दीड वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ५ लाख २२ हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. सकाळी ११:३० वाजेपर्यंत जिल्ह्यात १९ टक्के मतदान झाले होते, ज्यात ३ लाख ५४ हजार लोकांनी मतदान केले होते. मतदारांमध्ये निवडणुकीबद्दल मोठा उत्साह दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात एका ९३ वर्षीय आजींनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. पालकमंत्री शिरसाट यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन मतदान प्रक्रियेचा आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने राज्यभर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि समर्थक अजूनही सावरू शकलेले नाहीत. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित श्रद्धांजली सभेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दादांसोबतच्या आठवणी सांगताना भावनांना वाट मोकळी करून दिली. चाकणकर म्हणाल्या की, ज्या बालगंधर्व सभागृहात आपण आज श्रद्धांजली अर्पण करत आहोत, त्या ठिकाणी दादांचे असंख्य कार्यक्रम झाले होते. अनेक योजनांचे उद्घाटन, पक्षाचे मेळावे, वर्धापन दिन, सगळे सोहळे याच सभागृहाने पाहिले. इतकेच नव्हे, तर या सभागृहाचा पुनर्विकास करायचा झाला तर लागणारा निधी देण्यासाठीही दादा तयार असल्याचे त्यांनी एकदा जाहीरपणे सांगितले होते. सभागृह तेच आहे, गर्दी तीच आहे, माणसं तीच आहेत; पण आज ज्यासाठी आपण जमलो आहोत, तो माणूस आपल्यात नाही, असे म्हणत त्या भावूक झाल्या. दादांबद्दलच्या आठवणी सांगताना त्यांनी आपल्या कुटुंबाचा प्रवासही उलगडला. 2002 मध्ये प्रभाग पद्धतीत झालेल्या पहिल्या निवडणुकीत त्यांच्या सासूबाई रुक्मिणी चाकणकर यांना दादांनी उमेदवारी दिली. त्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आणि नऊवारी साडीत महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेविका म्हणून ओळखल्या गेल्या. त्या काळापासून चाकणकर कुटुंबाचा दादांशी जवळचा संबंध सुरू झाला. 2009 मध्ये सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी दादांनी सकाळी लवकर फोन करून सुप्रियाच्या कामात सगळ्यांनी झोकून द्या, रूपालीकडे बचत गट आहेत, त्या महिलांना कामाला लावा, असे सांगितल्याची आठवण त्यांनी सांगितली. त्या वेळी आपण सक्रिय राजकारणात नव्हतो, पण दादांच्या सूचनेनंतर आपण कामाला लागलो आणि तिथूनच राजकीय प्रवासाला सुरुवात झाली, असे त्यांनी नमूद केले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर कुटुंबासह दादांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी दिलेला सल्ला आजही कानात घुमतो, असे चाकणकर म्हणाल्या. तुझ्याकडे तक्रार आली की, व्यक्ती कोण आहे, पक्ष कोणता आहे हे पाहू नको. तक्रारदाराचा प्रश्न सोडव. अगदी माझ्याबद्दल तक्रार आली तरी माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची नोटीस दे, असे दादांनी स्पष्ट सांगितल्याचे त्यांनी सांगितले. आयोगाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर महिला प्रश्न हाताळताना अनेक अडचणी जाणवल्या. मर्यादित कर्मचारी, कार्यालयीन सुविधांचा अभाव आणि प्रचंड कामाचा ताण, ही वस्तुस्थिती त्यांनी दादांसमोर मांडली. त्यानंतर केवळ तीन दिवसांत मंत्रालयात सकाळी बैठक बोलावून दादांनी आयोगाच्या कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध, सेवा सुविधा आणि प्रशासकीय बळकटी यासाठी निर्णय घेतले. गेल्या महिन्यात आयोगाला आकृतिबंध आणि टीडीओ मंजूर झाला, हे दादांच्या पाठपुराव्यामुळे शक्य झाले, असे त्यांनी स्पष्ट केले. या काळात टीका आणि आंदोलनांचाही सामना करावा लागला. एका प्रकरणात घरासमोर आणि कार्यालयासमोर दोन दिवस आंदोलन झाले. त्या वेळी दादांनी फोन करून राजकारणात यश वाढलं की टीकाही वाढते; ती सहन करायला शीक, उत्तर देऊ नको, असा सल्ला दिला. त्यानंतर कधीही वैयक्तिक टीका केली नाही आणि टीकेला उत्तरही दिले नाही, असे त्यांनी सांगितले. अडीच वर्षांपूर्वी दादांनी घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयानंतर महिलांना सोबत घेऊन मोठा मेळावा शनमुखानंद सभागृहात आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध वेशभूषांतील महिला उपस्थित होत्या. दादांनी तो उत्साह पाहून, असं लाल वादळ मी कधी पाहिलं नाही, असे कौतुक केल्याची आठवण त्यांनी सांगितली. त्या प्रसंगाने संघटनेला आणि आयोगाला नवी ताकद मिळाली, असे त्यांनी नमूद केले. घरातला माणूस गेल्यासारखं वाटत आहे शेवटी चाकणकर म्हणाल्या की, काटेवाडीच्या मातीतून आलेला हा नेता महाराष्ट्राच्या पटलावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा होता. सर्वसामान्यांमध्ये राहून काम करणारा, पारदर्शक निर्णय घेणारा आणि कार्यकर्त्यांना आधार देणारा नेता म्हणून दादा कायम स्मरणात राहतील. दादांच्या निधनानंतर प्रत्येकाला आपल्या घरातला माणूस गेल्यासारखं वाटत आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुंबई महानगरपालिकेत महापौरपदासाठी भाजपकडून मराठी उमेदवार देण्यात आल्याने ठाकरे गटाने या निवडीवर कोणताही अपशकून न करण्याची भूमिका घेतली आहे. गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, आम्ही आकड्यांची गणिते मान्य करतो आणि ती मान्य केली आहेत. सत्ता कोणाचीही असो, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू, असा ठाम संदेश त्यांनी दिला. दबाव किंवा आमिष यांना बळी न पडता प्रत्येक नगरसेवक आपल्या विभागातील प्रश्न सभागृहात मांडेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले की, विरोधी पक्षाची भूमिका त्यांच्यासाठी नवीन नाही. सत्तेत असतानाही अनेकदा विरोधी पक्षाची भूमिका निभवावी लागली आहे, त्यामुळे आता ही जबाबदारी अधिक सजगपणे पार पाडली जाईल. त्यांनी सांगितले की, ही भूमिका केवळ एखाद्या व्यक्तीची नसून संपूर्ण पक्षाची आहे. शिस्तबद्ध आणि पद्धतशीर काम करत सभागृहात प्रभावी उपस्थिती राखली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. महापौरपदासाठी रितू तावडे आणि शीतल गंभीर या दोन नावांची चर्चा होती; मात्र अंतिम क्षणी रितू तावडे यांच्या नावावर एकमत झाले. यंदा महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असल्याने या निवडीकडे विशेष लक्ष लागले होते. उपमहापौरपदाबाबतही चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेना शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी संजय घाडी यांचा उपमहापौर म्हणून सव्वा वर्षांचा कार्यकाळ असेल, असे जाहीर केले. त्यामुळे मुंबई मनपात भाजप आणि शिंदे गट सत्तेत तर ठाकरे गट विरोधी पक्षाच्या भूमिकेत असे स्पष्ट राजकीय समीकरण उभे राहिले आहे. मराठी उमेदवार महापौरपदी देत भाजपचा संदेश मुंबई मनपाची महापौर निवडणूक 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे. भाजपने प्रथमच महापौरपदी महिला चेहरा देत रितू तावडे यांची निवड केली आहे. त्या भाजपच्या मुंबईतील पहिल्या महिला महापौर ठरणार आहेत. या निवडीमुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी उमेदवार महापौरपदी देत भाजपने एक संदेश दिल्याची चर्चा रंगत आहे. मुंबई महानगरपालिकेत नवे राजकीय चित्र महापौरपदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर रितू तावडे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, महापौरपद मिळाले असले तरी मी स्वतःला मुंबईची सेवक मानते. सभागृहाची गरिमा राखत पक्षभेद विसरून काम व्हावे, हीच अपेक्षा आहे. मुंबईच्या हितासाठी सर्व नगरसेवक निवडून आले असून सर्वांनी मिळून काम करावे, असे त्यांनी आवाहन केले.या घडामोडींमुळे मुंबई महानगरपालिकेत नवे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. एका बाजूला भाजप-शिंदे गट सत्तेत असून दुसऱ्या बाजूला ठाकरे गट सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावण्यास सज्ज आहे. येत्या काळात सभागृहातील कामकाज, प्रश्नांची मांडणी आणि निर्णयप्रक्रियेत या तिन्ही गटांची भूमिका कशी राहते, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. मुंबई महापौर पदासाठी भाजपकडून रीतू तावडे, शिवसेनेकडून संजय खाडी रिंगणात:संघटनात्मक ताकद, राजकीय गणित लक्षात घेऊन निवड कोण आहेत मुंबई महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे:सभागृहात चार माजी महापौरांचे आव्हान; म्हणाल्या- मुंबईची सेवक म्हणून काम करणार भाजपचा गुजराती बालेकिल्ल्यातून मराठी हिंदू चेहरा:भाजपची स्मार्ट चाल यशस्वी; ठाकरे बंधुंना सडेतोड उत्तरासह पक्षाचा डबल फायदा
मुंबई महानगरपालिकेची सत्ता प्रथमच आपल्या ताब्यात आणण्यात यशस्वी ठरलेल्या भाजपने शनिवारी महापौरपदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली. वॉर्ड क्रमांक 132 मधून निवडून आलेल्या नगरसेविका रितू तावडे यांच्यावर महापौरपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महापालिकेत भाजप आणि शिवसेना युतीने 114 चा बहुमताचा आकडा गाठल्याने रितू तावडे यांची महापौरपदी निवड ही औपचारिकता ठरणार, असे स्पष्ट चित्र दिसत आहे. महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाल्यानंतर या पदासाठी कोणाची निवड होणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली होती. या शर्यतीत तेजस्वी घोसाळकर, शीतल गंभीर आणि रितू तावडे अशी नावे चर्चेत होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात भाजपने रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या निवडीला अनेक राजकीय अर्थ जोडले जात आहेत. रितू तावडे यांनी 2017 मध्ये घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 121 मधून प्रथमच महापालिकेत प्रवेश केला होता. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी वॉर्ड क्रमांक 132 मधून विजय मिळवला. त्यांनी शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले असून महिला मोर्चातही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. 18 एप्रिल 1973 रोजी जन्मलेल्या रितू तावडे यांचे शिक्षण एस.वाय.बी.कॉम पर्यंत झाले आहे. त्यांचे पती राजेश तावडे हे उद्योजक आहेत. सामाजिक आणि संघटनात्मक कामातून त्यांनी भाजपमध्ये आपली ओळख निर्माण केली. ईशान्य मुंबईत त्या आक्रमक आणि सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेतील कामाचा अनुभव आणि संघटनातील भूमिका यामुळे त्यांची निवड पक्षासाठी सुरक्षित पर्याय मानली जात आहे. रितू तावडे ज्या वॉर्ड क्रमांक 132 मधून निवडून आल्या आहेत, तो भाग गुजरातीबहुल म्हणून ओळखला जातो. विद्याविहार पूर्व, गारोडिया नगर, सोमय्या कॉलेज आणि राजावाडी रुग्णालय परिसर या वॉर्डमध्ये येतो. येथे गुजराती आणि जैन समाजाची मोठी वस्ती आहे आणि हा भाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील असलेल्या रितू तावडे यांना या वॉर्डमधून निवडून आणत भाजपने महापौरपदासाठी पुढे केले आहे. एकाच वेळी दोन संदेश या निर्णयातून भाजपने एकाच वेळी दोन संदेश दिल्याची चर्चा आहे. मराठी चेहरा महापौरपदी बसवून मराठी मतदारांना संदेश देण्यात आला, तर गुजराती-जैन मतदारांचा विश्वास कायम ठेवण्यात आला. गुजराती मतदारांनी निवडून दिलेल्या मराठी उमेदवाराला महापौर बनवून भाजपने राजकीय समीकरणे चतुराईने जुळवली आहेत. त्यामुळे या निवडीकडे केवळ प्रशासकीय नव्हे तर राजकीय रणनीती म्हणूनही पाहिले जात आहे. पक्षाने संतुलन साधले महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाने मराठी महापौर, हा मुद्दा पुढे करत भाजपवर टीका केली होती. भाजपने सुरुवातीला हिंदू महापौर, असा उल्लेख केला होता. मात्र, त्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपने आता रितू तावडे यांच्या रुपाने मराठी चेहरा पुढे केला आहे. त्यामुळे संभाव्य वाद टाळत पक्षाने संतुलन साधले आहे. तावडे यांची निवड सत्तेची पहिली छाप मुंबईच्या राजकारणात हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भाजपने पहिल्यांदाच महापालिकेची सत्ता मिळवली असून आता महापौरपदी रितू तावडे यांची निवड ही त्या सत्तेची पहिली छाप ठरणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचा कारभार कसा चालतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापौर म्हणून त्या प्रशासन आणि सभागृहात आपली भूमिका कशी निभावतात, यावर पुढील राजकीय समीकरणेही अवलंबून राहणार आहेत. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. मुंबई महापौर पदासाठी भाजपकडून रीतू तावडे, शिवसेनेकडून संजय खाडी रिंगणात:संघटनात्मक ताकद, राजकीय गणित लक्षात घेऊन निवड कोण आहेत मुंबई महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे:सभागृहात चार माजी महापौरांचे आव्हान; म्हणाल्या- मुंबईची सेवक म्हणून काम करणार
येथील एका विशेष कोर्टाने भोसरी एमआयडीसीतील कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी खडसेंवर निशाणा साधत कुकर्माची फळे याच जन्मात भोगावी लागतात, अशी टीका केली आहे. एकनाथ खडसे व मंदाकिनी खडसे यांच्यावर भोसरी येथील जमीन खरेदी व्यवहारात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी व सुनावणी गत अनेक वर्षांपासून येथील सत्र न्यायालयात सुरू आहे. शुक्रवारी या प्रकरणात आरोप निश्चिती होणार होती. पण खडसे दाम्पत्य या सुनावणीला गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याचे कठोर आदेश दिले. यामुळे खडसे दाम्पत्याच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. काय आहेत खडसे दाम्पत्यावर आरोप? प्रस्तुत प्रकरणात ईडीने आमदार एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व त्यांचे जावई गिरीश चौधरी यांच्याविरोधात मनी लॉन्डरिंगच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे 1 हजार पानांचे हे आरोपपत्र असून, त्यात खडसे कुटुंबीयांसह 3 खासगी कंपन्यांचाही समावेश आहे. या सर्वांवर भोसरी येथील जमीन खरेदी व्यवहारात काळ्या पैशांचा वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. 2016 साली खडसेंनी माझ्यावर तब्बल 32 बदनामीचे खटले सहा जिल्ह्यांत केले. एकाच वेळी सगळ्या कोर्टांत हजर राहणं मानवी दृष्ट्या अशक्य होतं. केवळ तारीख चुकली म्हणून माझ्यावर Non-Bailable Warrant काढून दहशत निर्माण केली गेली. त्या काळात मानसिक छळ आणि न्यायव्यवस्थेचा गैरवापर मी शांतपणे सहन केला. कुकर्मांचे फळ चुकत नाही आज, वर्षानुवर्षांच्या संघर्षानंतर, त्यातले बहुतांश खटले संपुष्टात आले आहेत. आणि आता, यांच्यावरच Non-Bailable Warrant कोर्टाने काढला आहे. कुकर्मांचे फळ चुकत नाही. ह्याच जन्मात, ह्याच न्यायव्यवस्थेत, कर्मांची फळं भोगावीच लागतात. भोगा आपल्या कर्मांची फळं, असे दमानिया यांनी या प्रकरणी म्हटले आहे. दरम्यान, एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना भाजपला तुम्ही ED लावली तर मी CD लावेल असा इशारा दिला होता. आता अजामीनपात्र वॉरंट आल्याने खडसे पुढचे पाऊल काय उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
झाडीपट्टीत 'पिरतीचा' धुमाकूळ:व्हॅलेंटाईन विकचा राडा अन् गुलाबी थंडीत मायेचा पाडा
फेब्रुवारी महिना सुरू झाला की शहरात गुलाबांच्या फुलांची चर्चा होते, पण आपल्या झाडीपट्टीत मात्र या 'व्हॅलेंटाईन' सणाचे वारे जरा वेगळ्याच ढंगात वाहू लागले आहेत. झाडीच्या मातीत आता फक्त नाटकांचे प्रयोगच नाही, तर 'पिरतीचे' प्रयोगही रंगताना दिसत आहेत. शहरात पोरं महागडी गुलाबं देऊन 'प्रपोज' करत असली, तरी झाडीपट्टीतल्या पोरानं आपल्या 'गळमट्या' (प्रियकर/प्रेयसी) साठी रानातली रानफुलं आणि रसरशीत बोरांची पिशवी साठवून ठेवली आहे. व्हॅलेंटाईन-बॅलेंटाईन आम्हाले समजते न्हाई बापा, पण पिरतीचा हप्ता हाये म्हणून ऐकलं, अशी भावना पुयारच्या एका तरुणाने बोलून दाखवली. झाडीपट्टीचा मुख्य कणा म्हणजे 'नाटक'. या आठवड्यात होणाऱ्या नाटकांच्या प्रयोगातही प्रेमाचे संवाद जोरात गाजत आहेत. नटांनीही स्टेजवरून पिरतीचा रंग चढला म्हणत ‘व्हॅलेंटाईन डे’च्या शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. तरुण मंडळी 'व्हॉट्सॲप'वर स्टेटस ठेवण्यात दंग आहेत, तर वयस्कर मंडळी आमच्या काळात हे चोचले नव्हते म्हणत मिश्किलपणे हसत आहेत. सावधान! 'काका-काकूं'चा पहाराही कडक एकीकडे प्रेमवीर आनंदात असले, तरी गावातील पारावर बसलेले 'तज्ज्ञ' काका आणि ओट्यावरच्या काकूंची नजर मात्र चोख आहे. कोणाची पोरगी कोणासोबत फिरून राहिली, यावर सीसीटीव्हीपेक्षाही कडक वॉच ठेवला जात आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन साजरा करताना झाडीतल्या पोरांना जरा 'हुशारीने' वागावे लागत आहे. एकूणच काय, तर झाडीपट्टीतला हा व्हॅलेंटाईन आठवडा म्हणजे केवळ पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण नसून, त्यात झाडीचा आपुलकीचा आणि गावरान प्रेमाचा तडका आहे! आजकालची पोरं मेसेजवर प्रेम करतात प्रेम तं आमच्या रक्तांत आहे. झाडीपट्टीच्या नाटकांत आम्ही जेव्हा 'प्रेम' मांडतो, तेव्हा लोकं ढसाढसा रडतात अन् हसतातही. आजकालची पोरं मेसेजवर प्रेम करतात, पण खरं प्रेम तं नाटकाच्या 'वन्समोअर' मध्ये अन् त्या गुलाबी थंडीतल्या प्रयोगात असते. आमचा व्हॅलेंटाईन तं स्टेजवरच साजरा होते - युवराज प्रधान (प्रसिद्ध झाडीपट्टी कलावंत, गायक, निर्माता) रानातल्या मधासारखं प्रेम गोड असतं शहरातल्या पोरींना वाटते की गुलाबाचं फूल दिलं म्हणजे प्रेम झालं. पण आमच्या झाडीत, रानातल्या मधासारखं गोड प्रेम असते. नाटकाच्या दौऱ्यावर असताना घरच्यांची माया आणि प्रेक्षकांचं प्रेम हेच आमचं व्हॅलेंटाईन. व्हॅलेंटाईनच्या दिवशी एखादा रोमँटिक प्रयोग असला की प्रेक्षकांची गर्दी पाहण्यासारखी असते. तोच आमचा खरा आनंद - करिश्मा मेश्राम, (सुप्रशिद्ध युवा नाट्य कलावंत) झाडीत 'मजनू' जिवंत आहेत मी मुंबईची असली तरी, झाडीपट्टीतल्या माय-बाप प्रेक्षकांनी आम्हाला जो मान दिला, तेच आम्हच खर प्रेम. नाटकाच्या ऐन तारखेवर जेव्हा कुणीतरी गुपचूप 'गुलाबाचं फूल' स्टेजवर फेकून मारते ना, तेव्हा समजते की झाडीत 'मजनू' जिवंत आहेत.! शहरातल्या कॅडबरीपेक्षा इकडच्या 'बोरांच्या' आदानानेच प्रेम वाढते. - सोनाली साळुंखे, मुंबई (अभिनेञी क्राईम पेट्रोल) झाडीची पोरं आता लै हुशार झालीत 'व्हॅलेंटाईन' म्हणजे आमच्यासाठी 'प्रपंचातला गोंधळ' हाये! बायको म्हणते मला हॉटेलत न्या, अन् तिकडं नाटकाचा प्रयोग हातात असते. पिरती करायची तं वाघासारखी करावी, लपून-छपून कायले? झाडीची पोरं आता लै हुशार झालीत, व्हॅलेंटाईनच्या दिवशी नाटकाच्या पासेस मागून 'डेट'वर नेऊन राहिलीत. - दुधराम कावळे, विनोदी कलावंत झाडीपट्टी
मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या (IP) शेख नसरीन बानो खालिद, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान - ए - हिंद यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजप व एमआयएमने तटस्थ भूमिका घेतली. त्याचा लाभ थेट इस्लाम पार्टीला झाला. मालेगाव महापालिकेत आज जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वात महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात महापौरपदासाठी एकूण 5 नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. पडताळणीत इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद, शेख ताहेरा रशीद व शिवसेनेच्या लता सखाराम घोडके यांचा अर्ज वैध ठरला. त्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला. त्यात इस्लाम पार्टीच्या शेख ताहेरा शेख रशीद यांनी आपला अर्ज मागे घेतला. परिणामी, शेख नसरीन बानो व लता घोडके यांच्यात थेट लढत झाली. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत शेख नसरीन बानो खालिद यांना 43 मते मिळाली. तर शिवसेनेच्या उमेदवार लता सखाराम घोडके यांना केवळ 18 मतांवर समाधान मानावे लागले. यामुळे नसरीन बानो यांचा 25 मतांच्या फरकाने दणदणीत विजय झाला. भाजप - एमआयएमची तटस्थ भूमिका महापालिका सभागृहात झालेल्या आजच्या निवडणुकीसाठी इस्लाम पार्टीचे 35, समाजवादी पार्टीचे 5, काँग्रेसचे 3, शिवसेनेचे 18, भाजपचे 2 व एमआयएमचे 21 नगरसेवक उपस्थित होते. भाजप व एमआयएमने या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतल्यामुळे त्याचा थेट लाभ इस्लाम पार्टीच्या उमेदवाराला झाला. सप व काँग्रेसची मतेही या पक्षाला मिळाली. उपमहापौरपदी शान - ए - हिंद दुसरीकडे, उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या शान - ए - हिंद यांचा विजय झाला आहे. त्यांना शिवसेनेच्या अॅड. नीलेश काकडे यांनी आव्हान दिले होते. या निवडणुकीसाठी एकूण 8 अर्ज दाखल झाले होते. पडताळणीनंतर शान-ए - हिंद यांच्यासह, एमआयएमचे हाफीज अब्दुल्ला मुफ्ती इस्लाईल, शिवसेनेचे नरेंद्र जगन्नाथ सोनवणे, नीलेश काकडे, सपचे मोहम्मद मुश्तकीन मोहम्मद मुस्तफा यांचे अर्ज वैध ठरले. पैकी हाफीज अब्दुल्ला मुफ्ती इस्माईल, मोहम्मद मुश्तकीन मोहम्मद मुस्तफा व नरेंद्र सोनवणे यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शान - ए - हिंद यांना 43 मते पडली, तर नीलेश काकडे यांना अवघ्या 18 मतांवर समाधान मानावे लागले. सपच्या उमेदवाराला इस्लाम पार्टी व काँग्रेसचाही पाठिंबा मिळाला. हिरव्या अन् भगव्या पोशाखाची चर्चा उल्लेखनीय बाब म्हणजे या निवडणुकीसाठी इस्लाम पार्टी, सप व काँग्रेसचे नगरसेवक लक्झरी बसमधून एकत्रितपणे महापालिकेत दाखल झाले होते. महिला सदस्यांनी काळ्या बुरख्यावर फेटे, तर पुरुष सदस्यांनी डोक्यावर हिरवे फेटे व अंगावर इस्लाम पार्टीचा गमच्छा परिधान केला होता. त्याची स्थानिक राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. शिवसेनेचे नगरसेवकही भगवे शर्ट, साड्या व भगवे फेटे घालून सभागृहात आले होते. या निवडणुकीसाठी महापालिका परिसरात जोरदार बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खालील तक्त्यात पाहा मालेगाव मनपातील पक्षीय बलाबल : : : :: :
देशाची आर्थिक राजधानी आणि देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपने आपल्या महापौरपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजपकडून रितू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी अधिकृत घोषणा केली. त्याचबरोबर उपमहापौरपदी शिंदे गटाकडून संजय शंकर घाडी यांची निवड जाहीर झाली आहे. पुढील सव्वा वर्षे घाडी उपमहापौर म्हणून काम पाहणार आहेत. यंदा महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाल्याने मुंबईची महापौर महिला असणार हे आधीच स्पष्ट झाले होते. भाजपमध्ये रितू तावडे आणि शीतल गंभीर या दोन नावांची जोरदार चर्चा होती. अखेरीस रितू तावडे यांनी बाजी मारली. मात्र महापौरपद मिळाल्यानंतर त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. अनेक वर्षे मनपात सत्ता चालवलेल्या ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांचा त्यांना सभागृहात सामना करावा लागणार आहे. मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत. या गटात मिलिंद वैद्य, किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव आणि विशाखा राऊत या चार माजी महापौरांचा समावेश आहे. मनपाच्या कारभारातील प्रत्येक बाबीची सखोल माहिती असलेले हे नेते सभागृहात आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे रितू तावडे यांना अनुभवसंपन्न विरोधकांच्या प्रश्नांना आणि टीकेला समर्थपणे उत्तर द्यावे लागेल. महापौरपदी निवड झाल्यानंतर रितू तावडे यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि पक्ष जो निर्णय घेतो तो आम्हाला मान्य असतो. माझ्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. मी सर्वांचे आभार मानते. महापौरपद मिळाले असले तरी मी मुंबईची सेवक म्हणून काम करणार आहे. सभागृहाची गरिमा राखून सर्वांनी पक्षभेद विसरून मुंबईच्या हितासाठी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोण आहेत रितू तावडे रितू तावडे या प्रभाग क्रमांक 132 मधील भाजपच्या नगरसेविका आहेत. त्या मुंबई महापालिकेत दोन वेळा निवडून आल्या आहेत. घाटकोपरमधील गुजराती बहुल भागात मराठी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वी त्यांनी शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले असून स्थापत्य समितीच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ईशान्य मुंबईतील भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांची प्रतिमा आहे. वीज दरवाढीविरोधात त्यांनी आक्रमक आंदोलन केले होते. स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या नगरसेविका म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. मनपातील कामकाजाची माहिती आणि प्रशासनातील अनुभव यामुळे त्यांना महापौरपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजपने या निवडीद्वारे अनुभव आणि आक्रमक नेतृत्व यांचा संगम साधण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या महापौरांसमोर अनुभवी विरोधक आता मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात नव्या महापौरांसमोर अनुभवी विरोधक असणार आहेत. चार माजी महापौरांसह ठाकरे गटाचे नगरसेवक सभागृहात सक्रिय राहतील. या पार्श्वभूमीवर रितू तावडे यांची भूमिका, त्यांचा संयम आणि प्रशासनातील निर्णयक्षमता यांची खरी परीक्षा होणार आहे. मुंबईच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करावे, असे आवाहन त्यांनी केले असले तरी सभागृहातील राजकीय वातावरण किती सौहार्दपूर्ण राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी शेख नसरीन बानो खालिद
मालेगाव : मालेगाव महापालिकेच्या महापौरपदावर इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. महापौरपदासाठी झालेल्या थेट लढतीत शेख नसरीन बानो यांना एकूण ४३ मते मिळाली, तर शिवसेनेच्या उमेदवार लता सखाराम घोडके यांना १८ मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे शेख नसरीन बानो यांनी २५ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. आज मालेगाव महापालिकेत महापौर […] The post मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी शेख नसरीन बानो खालिद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अपघाताविषयी महाराष्ट्र पुरावा मागतोय : अमोल मिटकरी
अकोला : प्रतिनिधी बारामती येथील विमान अपघाताची थातूर-मातूर चौकशी अहवाल येत आहेत. अजितदादा पवार इतकी सामान्य व्यक्ती नव्हते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सुनावले आहे. महाराष्ट्र पुरावा मागतोय, असे देखील ते म्हणाले. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत २८ जानेवारीला निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. त्यानंतर […] The post अपघाताविषयी महाराष्ट्र पुरावा मागतोय : अमोल मिटकरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सुनेत्रा पवारांनी बारामती जिल्हा परिषदेसाठी केले मतदान
बारामती : प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. अजित पवार यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनवर साध्या पद्धतीने झाला. यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी अजितदादांची परंपरा कायम राखली. सकाळी […] The post सुनेत्रा पवारांनी बारामती जिल्हा परिषदेसाठी केले मतदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात वाहनांची तोडफोड करणारा मुख्य आरोपी जेरबंद:तीन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे शहरात घोरपडीतील बी. टी. कवडे रस्त्यावर वाहनांची तोडफोड करून दहशत माजविणाऱ्या एका मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्यासोबत असलेल्या तीन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. राजरत्न कुलदीप खरे (वय 20, रा. एसआरए वसाहत, भीमनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 31 जानेवारी रोजी खरे आणि त्याचे अल्पवयीन साथीदार दुचाकीवरून बी. टी. कवडे रस्ता परिसरात आले होते. त्यांनी शस्त्रे उगारून परिसरात दहशत निर्माण केली. एका दुकानात शिरून तोडफोड केली, तसेच अनेक वाहनांचेही नुकसान केले होते. या घटनेनंतर पोलिसांनी पसार झालेल्या आरोपींचा शोध घेतला. पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे आणि सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक, सहायक निरीक्षक गणेश पिंगुवाले, उपनिरीक्षक युवराज पोमण, राजू कदम, शिवाजी जाधव, योगेश जाधव आणि राहुल मोरे यांच्या पथकाने ही कारवाई करत खरे याच्यासह अल्पवयीनांना ताब्यात घेतले. मकोका गुन्हा दाखल झालेला आरोपी अटक दरम्यान, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले चार महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय 28, रा. कदम चाळ, संतोषी माता मंदिराजवळ, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ठोंबरे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गेल्या वर्षी 'मकोका' कारवाई केली होती. कारवाईनंतर ठोंबरे फरार झाला होता आणि पोलिस त्याचा शोध घेत होते. ठोंबरे हा सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, महेश बारावकर, मंगेश गायकवाड, मितेश चोरमले, सागर बोरगे, सचिन सरपाले, मंगेश पवार, नीलेश खैरमोडे आणि किरण साबळे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले.
बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीवर कारवाई न केल्याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यातील महिला पोलिस हवालदार मनीषा पुकाळे यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी हे आदेश दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती न देणे आणि तरुणीकडून पैसे घेतल्याचा आरोप पुकाळे यांच्यावर आहे. महिला पोलिस हवालदार मनीषा पुकाळे या फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकात कार्यरत होत्या. पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी शुक्रवारी रात्री उशिरा याबाबतचे आदेश जारी केले. शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यापूर्वीच सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत. संबंधित बांगलादेशी तरुणी 2023 मध्ये दलालामार्फत बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत आली होती, त्यावेळी ती अल्पवयीन होती. नुकतीच तिने फरासखाना पोलिस ठाण्यात वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी फिर्याद दिली होती. या फिर्यादीनुसार, दलाल आणि कुंटणखाना मालकासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यापूर्वी बांगलादेशी तरुणीने पोलिस हवालदार मनीषा पुकाळे यांची भेट घेतली होती. नियमानुसार, पुकाळे यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवणे बंधनकारक होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. उलट, त्यांनी तरुणीकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी तरुणीवरही कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित होते, परंतु पुकाळे यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लपवून ठेवली. बुधवार पेठेतील सामाजिक कार्यकर्त्यांनी ही गंभीर बाब वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन बांगलादेशी तरुणीची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यानच महिला पोलिस हवालदाराच्या गैरकारभाराचा प्रकार उघडकीस आला.
काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे या देशाचे विभाजन झाले आहे. आज देखील काँग्रेस यातून सुधारलेले नाही. वारंवार ते तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. यावर आमचे स्पष्ट शब्दात म्हणणे आहे की, कोणताही जात, धर्म न पाहता, सर्वांसाठी न्याय मिळायला हवा. मात्र तुष्टीकरण कोणासाठीही नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला फटकारले आहे. तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात लांगुलचालन करण्याचं काम तिथल्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. या देशांमध्ये जेव्हा जेव्हा तुष्टीकरणाचे, लांगुलचालन करण्याचे राजकारण झाले, त्या-त्या वेळी या देशाला त्याचे नुकसान भोगावे लागले आहे. तरी देखील काँग्रेस पक्ष मतदानाकरता लांगुलचालन करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, लोक त्यांना साथ देणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मुस्लिमांना दिलेल्या चार टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाचे नेते अमित शहा यांना दिलेला आव्हानाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
पुण्यातील कर्वेनगर भागात खरेदीच्या बहाण्याने सराफी दुकानातून 2 लाख 35 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सराफी दुकानाच्या मालकांनी वारजे पोलिस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिला कर्वेनगरमधील दुकानात दागिने खरेदी करण्याच्या निमित्ताने शिरल्या. दुकानदाराचे लक्ष नसताना त्यांनी 2 लाख 35 हजार रुपयांची कर्णफुले चोरून नेली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक एस. भांबरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, प्रवासात ज्येष्ठ महिलांचे दागिने लंपास करण्याच्या आणखी दोन घटना उघडकीस आल्या आहेत. स्वारगेट एसटी स्थानक आणि पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर भागात या घटना घडल्या आहेत. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील ४० हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फलटण येथील तरड गावच्या रहिवासी असलेल्या तक्रारदार महिला 5 फेब्रुवारी रोजी फलटणहून स्वारगेट एसटी स्थानकात आल्या होत्या. बसमधून उतरताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून नेले. सहायक पोलिस निरीक्षक शिरसाठ या प्रकरणाचा तपास करत आहेत. पुणे-सातारा रस्त्यावर पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेच्या हातातील 90 हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी कापून नेली. या घटनेप्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. गोखलेनगर भागात राहणाऱ्या तक्रारदार महिला धनकवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत असताना, चोरट्यांनी कटरचा वापर करून त्यांच्या हातातील बांगडी कापून नेली. सहायक फौजदार बापू खुटवड पुढील तपास करत आहेत.
राज्यातील १२ जिल्ह्यांत मतदानाला सुरूवात
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील शेवटचा टप्पा म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका. या निवडणुकीच्या मतदानाला शनिवार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. आज राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणा-या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. राज्यातील ग्रामीण भागासाठी महत्त्वाची मानली जाणा-या […] The post राज्यातील १२ जिल्ह्यांत मतदानाला सुरूवात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समितींसाठी आज (7 फेब्रुवारी) सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. अलिबागमध्ये ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारींमुळे मतदानाची प्रक्रिया प्रभावित झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी मतदान करताना त्यांच्या लहान मुलालाही सोबत उभे केले. विशेष म्हणजे, त्यांच्या बोटांवर शाई लावली गेल्यानंतर मुलाच्या बोटावरही कर्मचाऱ्यांनी शाई लावली, ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर, अकलूजच्या यशवंतनगर मतदान केंद्रावर जिल्हा परिषद उमेदवार अर्जुन सिंग मोहिते पाटील यांच्या लहान मुलाने ईव्हीएमचे बटन दाबल्याची घटना घडली. अर्जुन सिंग मोहिते पाटील म्हणाले की, मुलाला मतदान कसे होते हे पाहायचे होते, मात्र अधिकाऱ्यांच्या समक्ष हा प्रकार घडला असल्याने कोणतीही तक्रार नोंदवली गेली नाही. या प्रकारामुळे मतदारांमध्ये आश्चर्य व्यक्त झाले आहे आणि नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोंडी मतदान केंद्रावर काही उमेदवारांकडून मतदान केंद्राची पूजा करण्यात आली. शिवसेना (ठाकरे गट) चे उमेदवार सोमनाथ राऊत यांनी देखील मतदान केंद्राची पूजा केली. सोलापुरात झेडपीच्या 68 गट आणि पंचायत समितीच्या 136 गणांसाठी मतदान सुरू आहे. सिल्लोडमध्ये मतदानाच्या दिवशी भाजप उमेदवाराला गालबोट; पोलिसांनी सुरक्षा वाढवली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये मतदानाच्या दिवशीच भाजप उमेदवाराला धक्काबुक्की करून गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नायगाव येथील मतदान केंद्रावर घडल्याचे सांगितले जात आहे. यामुळे काही काळ मतदान केंद्रावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. धक्काबुक्कीच्या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला, तर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. निवडणुकीच्या शांततामय वातावरणात घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी अजित पवारांच्या अपघाती निधनावरून पुन्हा एकदा भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवारांच्या मृत्यूवर लोकांनी संशय घेतला तर तुम्ही का अस्वस्थ होता? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधक आंदोलन करताना त्यांच्यावर हत्येच्या कटाचा संशय घेतला जातो. पण आम्ही अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूवर काहीही बोलायचे नाही, ही मुस्कटदाबी नाही का? त्यात तुमचा काही हात आहे का? असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी संसदेतील विरोधकांची मुस्कटदाबी, अजित पवारांचा संशयास्पद मृत्यू, राष्ट्रवादी काँग्रेसचे कथित विलीनीकरण आदी विविध मुद्यांवरून सत्ताधारी भाजपला खडेबोल सुनावले. ते म्हणाले, आमदार रोहित पवार हे दिवंगत अजित पवार यांचे पुतणे आहेत. पवार कुटुंबाचे घटक आहेत. त्यामुळे त्यांनी विलीनीकरण व अजित पवार यांचा अपघात याविषयी बोलणे अधिक विश्वासार्ह असेल. म्हणून ते जे काही बोलतात ते तुम्ही ऐका. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही अजित पवारांच्या मृत्यूविषयी आणखी दाट संशय व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री आपल्याच आमदारांवर डाफरत आहेत अजित पवारांच्या विमानात कुणी बॉम्ब ठेवला होता का? कारण विमान आकाशात होते व लँडिंगवेळी त्यात स्फोट झाला. आमदार अमोल मिटकरी यांनीही काही शंका उपस्थित केल्या आहेत. छगन भुजबळ यांनाही संशय येत आहे. आमच्या कुटुंबातील माणूस गेला आहे आणि तुम्ही गप्प राहण्यास सांगता. बजरंगबाप्पा सोनवणे, छगनराव भुजबळ, अमोल मिटकरी हे जबाबदारीने बोलत असतील ना? आता आपल्याच आमदारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डाफरत आहेत. गप्प बसण्यास सांगत आहेत. हे काही योग्य नाही, असे राऊत म्हणाले. भाजपच्या नेतृत्वाला वेदना होण्याचे कारण काय? ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी संशयाचे निराकरण करण्याची गरज आहे. पण तेच दम देत अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करणाऱ्यांना धमकावत आहेत. तुमचा काय संबंध? तुम्ही कशासाठी धमकावत आहात? अजित पवारांचे कुटुंबीय, मित्र परिवार व सहकारी यांच्या मनात काही शंका असतील तर मुख्यमंत्री फडणवीस व भाजपच्या नेतृत्वाला वेदना होण्याचे कारण काय? अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राला वेदना झाल्या. लोक शोकमग्न आहेत. त्यांना दुःख आहे. असे काही घडू शकेल यावर लोकांचा विश्वास बसत नाही. अशा घटना घडतात, तेव्हा त्यातून विविध कंगोरे निर्माण होतात. पण राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगतात की राजकारण करू नका. पण राजकारण करतंय कोण? नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. ते संसदेत बसतात. विरोधी पक्षाचे खासदार आतमध्ये आंदोलन करतात, तेव्हा तुम्हाला त्यांच्या हत्येचा कट होता वगैरे असा संशय येतो. हे राजकारण नाही का? तुमचे ओम बिर्ला (लोकसभेचे अध्यक्ष) व भाजपचे लोक काहीतरी अघटित घडण्याची शक्यता होती असा संशय व्यक्त करतात. इथे आमचा एक माणूस अपघातात महत्त्वाचा मृत्यू पावला, त्याच्याविषयी कुणाला शंका वाटत असेल तर तुम्ही अस्वस्थ का होता? तुमचा त्यात काही हात आहे काय? सगळ्यांचा हाच संशय आहे, असे संजय राऊत म्हणाले. रोहित पवारांना सुनेत्रा पवारांत अजितदादा दिसतात ते याविषयी बोलताना पुढे म्हणाले, रोहित पवार म्हणाले की, मला सुनेत्रा काकींमध्ये अजितदादा दिसतात. अजितदादांकडे उपमुख्यमंत्रीपद होते. सर्व खाती होती. या सर्व गोष्टी सुनेत्राकाकींना मिळाल्या पाहिजेत. आता रोहित पवार वेगळ्या पक्षाचे आमदार आहेत. पण त्यानंतरही कुटुंब म्हणून ते अशी भूमिका व्यक्त करत असतील तर ती त्यांची भूमिका आहे. त्यावर इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी बोलू नये.
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर सुरू असलेल्या चर्चांमध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी ठाम भूमिका मांडली आहे. दादांच्या अचानक जाण्याने मीटिंग कोणी बोलवायची? जर सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष असतील, तर त्यांनी जबाबदारी उचलली तर ते व्हिलन कसे ठरू शकतात? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष असल्याचे अधोरेखित करत, बाहेरील हस्तक्षेपाची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही दुःखात असताना विनाकारण टीका का केली जाते? असा भावनिक सूरही त्यांच्या वक्तव्यात उमटला. मुश्रीफ यांनी सांगितले की, अपघातानंतर कुटुंबीयांची स्पष्ट इच्छा होती की सुनेत्रा पवार यांनी लवकरात लवकर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी. पवार कुटुंब पुरोगामी विचारांचे असल्याने तिसऱ्या दिवसाचे विधी पूर्ण झाल्यानंतर चौथ्या दिवशी शपथविधी पार पडला, असे त्यांनी नमूद केले. ज्या नेत्याने मला 30-40 वर्षे सांभाळले, त्यांच्या निधनानंतर मी जे घडले तेच सांगितले, असे म्हणत त्यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले. या प्रक्रियेला राजकीय रंग देणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सूचित केले. विलीनीकरणाच्या चर्चांबाबत विचारले असता मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, त्या चर्चांमध्ये मुख्यत्वे अजित पवार सहभागी होते. आम्ही कोणीही प्रमुख व्यक्ती नव्हतो, असा दावा त्यांनी केला. पुढे ते म्हणाले, जर सुनेत्रा वहिनी, कुटुंबीय आणि पक्षातील सर्व नेते एकत्रीकरणाच्या मताचे असतील, तर अडथळा येण्याचे कारण नाही. पक्ष जो निर्णय घेईल, तीच माझी भूमिका असेल. विमान अपघाताच्या चौकशीसंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारने सुरू केलेल्या तपासावर विश्वास व्यक्त केला. ब्लॅक बॉक्स सापडला आहे. त्यातून चित्र स्पष्ट होईल. शंका उपस्थित करणाऱ्यांसाठी चौकशी हाच एकमेव मार्ग आहे, असे ते म्हणाले. अपघातावर राजकीय अंदाज बांधण्याऐवजी अधिकृत तपासाच्या निष्कर्षांची वाट पाहावी, असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिला. अजित पवार यांच्या निधनाने मतदार आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसल्याचेही मुश्रीफ यांनी नमूद केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील प्रभाव लक्षात घेता, या निवडणुकीत सहानुभूतीची लाट दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दादांबद्दल लोकांच्या मनात असलेले प्रेम मतांतून उमटेल, असे ते म्हणाले. कार्यकर्त्यांमध्येही भावनिक वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. भावनिक वातावरणातही राजकीय संयम राखावा दहा वर्षांनंतर जिल्हा परिषद स्तरावर मतदान होत असल्याने मतदारांमध्ये आणि उमेदवारांमध्ये उत्साह दिसत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या निमित्ताने जिल्हा परिषदांमध्ये पुन्हा लोकशाहीची चक्रे फिरतील, असे ते म्हणाले. निवडणूक प्रक्रियेबद्दल सकारात्मक दृष्टीकोन व्यक्त करत त्यांनी शांततेत मतदान पार पाडण्याचे आवाहन केले. एकूणच, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीपासून विलीनीकरणाच्या चर्चांपर्यंत आणि अपघात चौकशीपर्यंत सर्व मुद्द्यांवर हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट भूमिका मांडत सुरू असलेल्या वादांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षांतर्गत निर्णयांवर बाह्य टीका नको, चौकशीच्या निष्कर्षांवर विश्वास ठेवावा आणि भावनिक वातावरणातही राजकीय संयम राखावा, हा संदेश त्यांच्या वक्तव्यातून उमटला.
पुणे शहर पोलिस दलातील भरती प्रक्रिया 16 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यामध्ये 1633 पोलिस शिपाई, 105 वाहनचालक आणि 33 बँडमन या पदांसाठी 1 लाख 39 हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. याव्यतिरिक्त, कारागृहातील 133 शिपायांच्या भरतीसाठी 46 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. ही भरती प्रक्रिया शिवाजीनगर पोलिस मुख्यालय आणि रामटेकडी येथील राज्य पोलिस दलाच्या मैदानावर पार पडेल. 16 फेब्रुवारीपासून शारीरिक चाचणी सुरू होईल, त्यानंतर लेखी परीक्षा घेतली जाईल. अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. मैदानी चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होईल. भरती प्रक्रियेचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने अधिकृत संकेतस्थळ आणि संदेशांद्वारे जाहीर केले जाईल. शारीरिक चाचणीमध्ये उमेदवारांची छाती, उंची मोजली जाईल. तसेच, 100 मीटर, 1600 मीटर धावणे (महिला उमेदवारांसाठी 800 मीटर) आणि गोळाफेक या घटकांचा समावेश असेल. गैरप्रकार टाळण्यासाठी 'आरएफआयडी' (RFID) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असेल, ज्यामुळे उमेदवारांची धावण्याची वेळ आणि चाचणीतील कामगिरी अचूकपणे नोंदवली जाईल. मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले. लेखी परीक्षेच्या टप्प्यातही विशेष उपाययोजना केल्या जातील. परीक्षा घेणाऱ्या अधिकाऱ्यांना मोबाईल वापरण्यास मनाई असेल आणि परीक्षा केंद्रांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात येईल. गैरप्रकारांवर बारीक नजर ठेवली जाईल. उमेदवारांनी कोणत्याही मध्यस्थांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय पाटील यांनी केले आहे. गैरप्रकार आढळल्यास तात्काळ 7391082611 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुंबईच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस अखेर आला आणि त्याचवेळी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महानगरपालिकेत आज भाजपकडून अधिकृत अर्ज दाखल केला जाणार असून, उमेदवाराचे नाव शेवटच्या क्षणापर्यंत गोपनीय ठेवण्यात आले होते. मात्र अर्ज सादर करण्याच्या काही वेळ आधीच भाजपने रीतू तावडे यांचे नाव महापौर पदासाठी जाहीर केले. दुसरीकडे, शिवसेनेकडून संजय खाडी यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेची महापौर पदाची निवडणूक येत्या 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. त्यासाठी शनिवारी 7 फेब्रुवारी हा अर्ज भरण्याचा दिवस निश्चित करण्यात आला होता. भाजपने सकाळी सुमारे 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपचा उमेदवार महापौर होणार, अशी चर्चा आधीपासून होती; मात्र उमेदवार कोण, याबाबत पक्षाने शेवटपर्यंत उत्सुकता कायम ठेवली. यंदाचे महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने भाजपमध्ये अनेक नावांची चर्चा सुरू होती. राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर, आशा कोळी आणि रीतू तावडे या नावांचा कार्यकर्त्यांमध्ये विशेष उल्लेख होत होता. यापैकी कोणाची निवड होणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर पक्षाने रीतू तावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम दिला. महिला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक ताकद आणि राजकीय गणित लक्षात घेऊन ही निवड केल्याचे मानले जात आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत.....
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव येथील एका मतदान केंद्रावर शनिवारी सकाळी महंत राधाकृष्ण स्वामी व मतदान केंद्र अधिकारी यांच्यात वाद झाल्याची घटना घडली. मतदान ओळखपत्र दाखवण्याच्या किरकोळ मुद्यावरून हा वाद झाला. पण यामुळे येथे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. राज्यात आज 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांसाठी शांततेत मतदान सुरू आहे. अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या आहेत. त्यात काही वादाच्याही किरकोळ घटना घडत आहेत. असाच एक प्रकार परभणीच्या राणी सावरगाव येथील मतदान केंद्रावर घडला. येथे महंत राधाकृष्ण स्वामी व निवडणूक अधिकाऱ्यांत मतदान ओळखपत्र दाखवण्याच्या मुद्यावरून चांगलाच वाद झाला. यामुळे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया काहीकाळ रखडली होती. पण वेळीच हा वाद मिटल्यानंतर ही प्रक्रिया पुढे सरकली. नेमकी काय घडली घटना? यासंबंधीच्या माहितीनुसार, महंत राधाकृष्ण स्वामी आज मतदानासाठी संबंधित मतदान केंद्रावर गेले होते. तिथे अधिकाऱ्यांनी ओळख पटवण्यासाठी त्यांच्याकडे अधिकृत ओळखपत्र सादर करण्याची सूचना केली. त्यांना आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार इतर कोणताही वैध पुरावा दाखवण्याची सूचना करण्यात आली. पण त्यांच्याकडे त्यावेळी एकही ओळखपत्र नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या मोबाईलमधील छायाचित्र दाखवण्याचा प्रयत्न केला. पण निवडणूकी आयोगाच्या नियमानुसार मोबाईल मतदान केंद्रात नेण्यास मनाई आहे. मोबाईलमधील छायाचित्र ग्राह्यही धरता येत नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना मतदान करण्यास परवानगी नाकारली. यामुळे संतप्त झालेल्या महंत राधाकृष्ण स्वामी यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर पक्षपातीपणा व आपल्याला मतदानाचा हक्क बजावण्यापासून रोखल्याचा आरोप केला. यावेळी अधिकारी व त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. पण अधिकारी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. यामुळे मतदान केंद्रावर काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पण उपस्थिती कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. ईसीच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य दुसरीकडे, निवडणूक अधिकाऱ्यांनी यावेळी मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट केले. मतदारांना मतदान करण्यासाठी आयोगाने निश्चित केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणताही वैध पुरावा सादर करणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याने योग्य त्या कागदपत्रांशिवाय मतदानास परवानगी देता येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. हे ही वाचा… अजितदादांची इच्छा पूर्ण करणार? रोहित पवारांचे वक्तव्य चर्चेत:म्हणाले - पवार कुटुंब एकत्र येण्याची वेळ; काकींमध्ये अजितदादा दिसतात पुणे - बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी पवार कुटुंबाच्या एकजुटीबाबत आणि सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. सगळ्या पवार कुटुंबाने एकत्र यावे, ही अजितदादांची मनापासूनची इच्छा होती. अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; मात्र एक परिवार म्हणून मला सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांचेच प्रतिबिंब दिसते, असे ते म्हणाले. पुढे त्यांनी स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदासह अजितदादांकडील सर्व खाती मिळावीत, ही त्यांची इच्छा होती आणि आता त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली. वाचा सविस्तर
राज्यभरात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदानाची रणधुमाळी सुरू असताना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. आंबेठाण पाईट येथील जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे यांच्या पतीवर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मतदान सुरू असतानाच घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले शरद बुट्टे पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच माजी गटनेते म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपतून बाहेर पडत अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या राजकीय वाटचालीतील हा बदल आणि निवडणुकीच्या तोंडावर घडलेला हल्ला यामुळे या प्रकरणाला अधिक संवेदनशीलता प्राप्त झाली आहे. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने वासुली फाटा येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. प्राथमिक माहितीनुसार, शरद बुट्टे खासगी कामानिमित्त बाहेर गेले असताना दबा धरून बसलेल्या काही हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांचा वापर केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हल्ल्यानंतर परिसरात अफरातफर उडाली आणि नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेत त्यांना रुग्णालयात हलवले. त्यांच्या डोक्याला तसेच शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले जात असून त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत असली तरी वैद्यकीय पथक सतर्क आहे. या घटनेनंतर आंबेठाण पाईट आणि आसपासच्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक काळात अशा प्रकारची घटना घडल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा निषेध करत दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मतदानाच्या दिवशी घडलेल्या हिंसक घटनेमुळे मतदारांमध्येही भीतीचे वातावरण पसरल्याचे दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर तांत्रिक साधनांचा आधार घेतला जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला जुन्या वादातून किंवा राजकीय कारणातून झाला असावा, असा कयास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी सखोल तपास आवश्यक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मतदान केंद्रांवर बंदोबस्त असतानाही मतदानाच्या दिवशीच अशा प्रकारची घटना घडल्याने प्रशासनाच्या तयारीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नागरिकांकडून निवडणूक काळात अधिक कडक सुरक्षा व्यवस्था राबवावी, अशी मागणी होत आहे. विशेषतः संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. शांतता टिकवण्यासाठी प्रशासनाकडून पुढील पावले एकूणच, खेड तालुक्यातील या घटनेने जिल्हा परिषद निवडणुकीवर सावली टाकली असून पुढील काही तासांत परिस्थिती कशी राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद बुट्टे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना, हल्लेखोरांना तातडीने अटक करून कायद्यापुढे आणावे, अशी जोरदार मागणी राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून केली जात आहे. निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता आणि शांतता टिकवण्यासाठी प्रशासनाकडून पुढील पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी पवार कुटुंबाच्या एकजुटीबाबत आणि सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. सगळ्या पवार कुटुंबाने एकत्र यावे, ही अजितदादांची मनापासूनची इच्छा होती. अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; मात्र एक परिवार म्हणून मला सुनेत्रा काकींमध्ये अजितदादांचेच प्रतिबिंब दिसते, असे ते म्हणाले. पुढे त्यांनी स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदासह अजितदादांकडील सर्व खाती मिळावीत, ही त्यांची इच्छा होती आणि आता त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडली. रोहित पवारांनी सांगितले की, अजितदादांचे स्वप्न हे पवार कुटुंब एकत्र राहावे, असेच होते. या दिशेने दादांकडून प्रयत्न सुरू होते. सुप्रिया ताई, पवार साहेब आणि आम्ही सर्वजणही तसाच प्रयत्न करत होतो, असे त्यांनी नमूद केले. दुर्दैवी घटनेनंतर गेल्या 13 दिवसांत कुटुंब एकत्र असल्याचेही त्यांनी सांगितले. कुठलाही पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना काटेवाडीत श्रीनिवास पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र मतदानासाठी आले, हे त्या एकजुटीचे उदाहरण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पवार साहेबांनी (शरद पवार) अलीकडेच जय पवार आणि कुटुंबातील इतर सदस्यांना मार्गदर्शन केल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले. हे मार्गदर्शन भावनिक स्वरूपाचे होते आणि अजितदादांच्या स्मरणार्थ काही गोष्टी पुढील काळात करण्याबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पवार साहेबांच्या मनात एखादी गोष्ट आली की, ते आम्हाला बोलावून मार्गदर्शन करतात, असे ते म्हणाले. या संवादादरम्यान सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर रोहित पवार यांनी भाष्य करण्याचे टाळले. मात्र, त्यांनी दोन महत्त्वाच्या तारखा जाहीर करत सूचक संकेत दिले. 10 फेब्रुवारीला मी अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातील काही शंका मांडणार आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेऊन दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत काय ठरले होते, हे सविस्तर सांगणार आहे, असे त्यांनी जाहीर केले. रोहित पवार यांनी पुढे स्पष्ट केले की, अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यामुळे कुटुंबीय कोणतेही राजकीय विचार करू शकत नव्हते. आमच्या मनात राजकारणाचा विचारच आला नाही. आता या धक्क्यातून सावरत आम्ही राजकीय दृष्टीने विचार करायला सुरुवात करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. पवार कुटुंबात आतापर्यंत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. पवार कुटुंबाच्या एकजुटीचा संदेश 9 फेब्रुवारीनंतर या चर्चांना सुरुवात होईल, असे संकेत देत रोहित पवार यांनी पुढील घडामोडींविषयी उत्सुकता वाढवली. त्यांच्या विधानांमुळे सुनेत्रा पवार यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य घडामोडींविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. एकूणच, रोहित पवार यांच्या वक्तव्यांमधून पवार कुटुंबाच्या एकजुटीचा संदेश देण्याचा प्रयत्न दिसून आला. त्याचवेळी आगामी दिवसांत होणाऱ्या खुलास्यांमुळे राज्याच्या राजकारणात नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता 10 आणि 12 फेब्रुवारीला रोहित पवार नेमके काय मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सोबत कर्तव्य बजावत असलेले अंगरक्षक विदीप जाधव यांचाही दुर्दैवी अंत झाला. या पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी केली आहे. जाधव कुटुंबावर आलेल्या संकटाची दखल घेत मानवतावादी दृष्टिकोनातून तातडीने निर्णय घ्यावा, अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे. 28 जानेवारी 2026 रोजी घडलेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासोबतच त्यांचे निष्ठावान अंगरक्षक विदीप जाधव यांचेही निधन झाले. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अनिल देशमुख यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जाऊन जाधव कुटुंबीयांची भेट घेतली. सांत्वनपर भेटीदरम्यान कुटुंबाने विदीप यांच्या पत्नीच्या नोकरीबाबतची व्यथा मांडली. त्यावेळी संध्या जाधव यांनी स्वतःचे निवेदन देशमुख यांना दिले होते. संध्या जाधव सध्या ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती 2020 मध्ये कोविड काळात तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली होती. कोविडसारख्या कठीण परिस्थितीत त्यांनी दिलेली सेवा आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करून त्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावे, अशी देशमुख यांनी मागणी केली आहे. पत्रात विशेषतः नमूद करण्यात आले आहे की, विदीप जाधव यांनी राज्यासाठी दिलेले बलिदान आणि त्यांच्या कुटुंबाची ढासळलेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, ‘विशेष बाब’ म्हणून शासनाने निर्णय घ्यावा. संध्या जाधव यांची पात्रता, अनुभव आणि रुग्णसेवेतील योगदान यांचा सकारात्मक विचार करून त्यांना सेवेत स्थैर्य देणे आवश्यक असल्याचे देशमुख यांनी अधोरेखित केले आहे. या पत्राच्या प्रतिलिपी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर तसेच ठाणे महानगरपालिका आयुक्त यांनाही देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा गांभीर्याने पाठपुरावा व्हावा आणि लवकरात लवकर निर्णय व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. स्व. विदीप जाधव यांनी दिलेली दीर्घकालीन सेवा आणि त्यांच्या कुटुंबावर आलेला हा आघात पाहता, शासनाने त्यांना आधार देणे हे कर्तव्यच आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि निष्ठावान अधिकारी म्हणून ओळख मुंबई पोलिस दलातील 2009 बॅचचे कॉन्स्टेबल असलेले विदीप जाधव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते. कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि निष्ठावान अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. कर्तव्य बजावत असतानाच विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने पोलिस दलातही शोककळा पसरली. विदीप जाधव हे मूळचे सातारा जिल्ह्यातील लोणंद गावचे रहिवासी होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीकडे जात असताना ही दुर्घटना घडली. या अपघाताने केवळ राज्यातील एक मोठा नेता गमावला गेला नाही, तर एका कर्तव्यनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्याचे कुटुंबही उद्ध्वस्त झाले. आता सरकार या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दर्यापूर ‘ मुलींनी आपले ध्येय निश्चित करावे व ध्येयप्राप्तीसाठी परिश्रम घ्यावे. विद्यार्थिनींनी समाजात वावरताना कोणी जाणीवपूर्वक त्रास देत असेल, तर अशी घटना सहन करु नका व ताबडतोब त्याबाबत आपले पालक किंवा शिक्षक यांना सांगा, तसेच पोलिसांकडे तक्रार करा. कारण आपण ते सहन केले. तर त्रास देणाराचे मनोबल वाढत जाते,’ असे प्रतिपादन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यवान डोके यांनी केले. तालुका विधि सेवा समिती व दर्यापूर वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने शहरातील प्रबोधन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. या वेळी शिबिराचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर वकील संघाचे अध्यक्ष ॲड.धर्मेंद्र आठवले, पंचायत समिती गटविकास अधिकारी सी.जे. ढवक, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.संतोष धर्माधिकारी, ॲड.दिलीप अग्रवाल, ॲड. संतोष कोल्हे, ॲड.जितेंद्र नळकांडे, ॲड.एस.पी.गाडे व ॲड.आदित्य धर्माधिकारी, प्राचार्य नरेंद्र गोंडाणे उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते आद्यशिक्षीका क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले व शिक्षण संस्थेच्या संस्थापकांच्या प्रतिमेचे पुजन करुन शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिर दरम्यान ॲड. उषा अग्रवाल यांनी आजच्या काळातील बालिकांसमोरील आव्हाने व शिक्षणाचा प्रसार या विषयावर मार्गदर्शन केले. ॲड.लिना गहरवाल यांनी लैंगिक असमानता संपुष्टात आणने कसे गरजेचे आहे. या विषयावर मार्गदर्शन केले. ॲड. आम्रपाली चोरपगार यांनी समाजातील स्त्रियांचे स्थान व कायद्यातील तरतुदी यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून ॲड.जगदीश विल्हेकर यांनी शिबिर घेण्याचा उद्देश सांगीतला. तसेच शिक्षण घेवुन व अभ्यास करून मोठ्या पदावर जावे असे सांगीतले. सोशल मिडियाच्या नादाला लागून आपले नुकसान करुन घेवु नका. असे मत व्यक्त केले. प्रबोधन विद्यालयाचे प्राचार्य नरेंद्र गोंडाने यांनी उपस्थितांचे स्वागत व सत्कार केला. तसेच मुलींसाठी अशा प्रकारचे कायदेविषयक जनजागृतीपर शिबिरे आयोजित करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षक निखिल बुंदेले यांनी सदर कार्यक्रमाचे संचालन केले. प्रबोधन विद्यालयात आयोजित कायदेविषयक शिबीर प्रसंगी उपस्थित मान्यवर मंडळी.
महापालिकेत महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार महापौर व उपमहापौरपदी विराजमान झाले. एकूण ८७ पैकी प्रत्येकी ५५ मते मिळवून भाजपचे श्रीचंद तेजवानी अमरावतीच्या १७ व्या महापौरपदी तर वायएसपीचे सचिन भेंडे उपमहापौर पदी निवडून आले. मनपा सभागृहात महायुतीचे एकूण ५४ सदस्य असताना एमआयएमचे एक मत वाढल्याने दोन्ही उमेदवारांना ५५ मते मिळाली. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे डॉ. संजय शिरभाते १६ मतं मिळवून दुसऱ्या तर बसपचे इब्राहिम कासम लालुवाले यांना ३ मते मिळाली. त्याचप्रमाणे उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या उमेदवार लुबना तनवीर सय्यद मखदुम यांना १६ तर बसपच्या सचिन वैद्य यांना ३ मते मिळाली. महापालिकेतील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या विशेष सभेत विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेत निवडणूक झाली. या वेळी मनपा आयुक्त सौंम्या शर्माही उपस्थित होत्या. सर्वप्रथम उमेदवारी परत घेण्यासाठी महापौर व उपमहापौर पदाच्या उमेदवारांना १५ मिनिटांची वेळ देण्यात आली. या वेळेत कोणीही माघार घेतली नसल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. महापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत श्रीचंद तेजवानी यांना सर्वाधिक ५५ मते मिळल्याने त्यांना उर्वरित. पान ४ मी माझ्या मनाचे ऐकले : मीरा कांबळे महायुतीचे महापौर पदाचे उमेदवार श्रीचंद तेजवानी, उपमहापौर पदाचे उमेदवार युवा स्वाभिमान पक्षाचे सचिन भेंडे हे निश्चितच शहराचा विकास करतील, असे मला मनातून वाटले. म्हणून मी माझ्या मनाचे ऐकत दोघांनाही मत दिले. माझ्या विरोधात पक्षाने कारवाई केली तरी पुढे अनेक मार्ग आहेत. मी कारवाईला घाबरत नाही. मी कोणाच्याही दबावाला बळी पडले नाही. किंवा कोणाविरुद्ध माझ्या मनात नाराजीही नाही. हा माझा पूर्णपणे स्वत:चा निर्णय होता. पक्षाचा आदेश (व्हीप) माझ्यापर्यंत पोहोचलाच नाही, अशी प्रतिक्रिया एमआयएमच्या नगरसेवक मीरा कांबळे यांनी व्यक्त केली. उपमहापौर पदाची निवडणूक मतदानात सहभागी सदस्य ८७ अनुपस्थित सदस्य ०० तटस्थ सदस्य १३ सचिन भेंडे ५५ लुबना तनवीर सैयद मकदुम १६ सचिन वैद्य ०३ मीरा कांबळे यांचे सदस्यत्व रद्द करा ः शेख हमीद शेख वाहेद एमआयएमचे मनपातील गटनेते शेख हमीद शेख वाहेद यांनी तत्काळ या प्रकरणी रोष व्यक्त करून भाजप व एमआयएम हे नदीच्या दोन किनाऱ्यांसारखे असून, दोघांचे विचार जुळत नसल्याने दोघांमध्ये मेळ नाही. अशात पक्षाचा आदेश झुगारून मीरा कांबळे यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून पक्षविरोधी कारवाई केली. त्यामुळे निश्चितच पक्षाद्वारे त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. त्यांन पक्षातून निष्कासित केले जाऊ शकते. त्यांची नगरसेवक पदाची सदस्यता रद्द करण्याची मागणी पत्राद्वारे मनपा आयुक्तांकडे करण्यात आल्याचे शेख हमीद शेख वाहेद यांनी सांगितले. महापौर पदाची निवडणूक मतदानात सहभागी सदस्य ८७ अनुपस्थित सदस्य ०० तटस्थ सदस्य १३ श्रीचंद तेजवानी ५५ डॉ. संजय शिरभाते १६ इस्माईल कासम लालुवाले ०३
भारत-अमेरिकेत झालेल्या व्यापार करारामुळे कृषी क्षेत्रावर गंभीर दुष्परिणाम होणार असून, हा करार रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली. काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. याबाबत निवेदन सादर करत यात कराराचा शेती व्यवसायावर कसा दुष्परिणाम होईल, हेही नमूद केले आहे. कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी होते. शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेने उत्पन्न अल्प होत असून, शेती परवडत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच भारत-अमेरीकेत झालेल्या व्यापार करारामुळे शेतीवर गंभीर दुष्परिणाम होणार असल्याचे देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कांँग्रसेचे म्हणणे आहे. मात्र करारामुळे अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफ मध्ये मोठी कपात झाली असून, टॅरिफ २५ टक्केवरुन १८ टक्के झाल्याचे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. हा करार भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नूतन आणि उत्साहवर्धक संधींचे द्वार खुले करेल आणि ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर अशी बाब ठरेल. महाराष्ट्र हे कायम निर्यातीत अग्रेसर असलेले राज्य आहे. त्यामुळे हा करार आपल्या राज्यातील व्यवसायासाठी नवे क्षितिज खुले करेल, असा दावाही करण्यात येत आहे. दरम्यान हा करार रद्द करण्याची मागणी करीत काँग्रेसने अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, विजय देशमुख, अविनाश देशमुख,महेश गणगणे, पूजा काळे, अतुल अमानकर, प्रा. दिनकर पाटील, मुश्ताक अहमद, अनिस इकबाल, सोनाली मोरे, मो. खालीद मो. जाकीर, सै. अजरोद्दिन आदी होते. शेतकरीविरोधी निर्णय घेणे अयोग्य; करारासाठी भारतावर दबाव : भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात काही गंभीर मुद्दांकडे लक्ष वेधून घेतले आहे. व्यापार करार हा भारतीय शेतकऱ्यांच्याहिताविर ुद्ध आहे. या कराराद्वारे अमेरिकन कृषी मालासाठी भारतीय बाजापरपेठ मुक्तपणे खुली करण्यात आली असून, त्याचे गंभीर दुष्परिणाम शेतीवर होणार आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. भारतील शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे. सोयाबीन, कापूस, दुध व मका या प्रमुख पिकांना कोणेतही प्रभावी अनुदान मिळत नाही. आधारभूत किंमत जाहीर होते; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी ती मिळणे कठीण असते. वाढता, उत्पादन खर्च, बाजारातील अस्थिरता व सरकारी अनास्थेमुळे शतेकरी संकटात सापडला आहे. चीनने अमेरिकन कृषी मालाची आयात थांबवल्यानंतर अमेरीकन शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी भारतावर दबाव टाकून हा करार करण्यात असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. भारतीय शेतकऱ्यांच्या भविष्याशी ही तडजोड आहे. त्यामुळे शेतकरी विरोधी निर्णय घेण्यात येऊ नये, असे काँग्रेसने निवेदनात नमूद केले आहे. जिल्ह्यात गतवर्षी विविध कारणांमुळे १६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. गत वर्षी अतिवृष्टीमुळे एकूण ३ लाख २५ हजार ४६५ शेतकऱ्यांच्या स्वप्नांना अतिवृष्टीचा फटका बसला होता. जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सात हजार ५७७ शेतकऱ्यांचे चार हजार २१५ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले होते. जुलै महिन्यात ११ हजार ५९७ शेतकऱ्यांच्या सात हजार ३१० हेक्टरवरील शेती पिकांची हानी झाली होती. ऑगस्टमध्ये एक लाख २७ हजार ५९८ शेतकऱ्यांचे एक लाख १२ हजार ४०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. सप्टेंबरमध्ये दोन लाख नऊ हजार ४५७ शेतकऱ्यांचे एक लाख ९९ हजार ५६५ हेक्टरवरील पिकांची हानी झाली होती. परिणामी शेतमालाचे उत्पादन घटले होते. अशातच सरकारने उशिरा शासकीय शेतमाल खरेदी केंद्र सुरु केले. परिणामी शेतकऱ्यांनी कमी किंमतीत खुल्या बाजारात शेतमाल िवकावा लागला होता. आता या व्यापार करारामुळेही शेतकरी आर्थिक संकटात सापडतील, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
येथील डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने अक्षय ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करत वीजबिलात वार्षिक ५२ लाख रुपयांची बचत केली आहे. यामुळे कृषी विद्यापीठाला ऊर्जा विकास अभिकरणाकडून (मेडा) राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) पुणे द्वारा ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापनातील उत्कृष्टतेसाठी १८ व्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यात आले होते. या पुरस्काराचे सादरीकरण विद्यापीठ गटासाठी १९ सप्टेंबरला महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणात झाले होते. ऊर्जा विकास अभिकरणाकडून (मेडा) राज्यस्तरीय पारितोषिकांची घोषणा झाली असून यात विद्यापीठ गटातून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना सलग तिसऱ्या वर्षी प्रथम पारितोषिक मिळाले आहे. या पुरस्कारांच्या माध्यमातून उद्योग, संस्था, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था, इमारतींमध्ये येथे ऊर्जेचा कार्यक्षम वापर, व्यवस्थापन व ऊर्जा संवर्धनाच्या उपक्रमांना गौरवण्यात येते. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या नेतृत्वात सौर ऊर्जेच्या प्रभावी वापरातून ऊर्जा संवर्धनात विद्यापीठाने चांगली कामगिरी केल्याने हा पुरस्कार मिळाला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला विद्यापीठ गटातून प्रथम पारितोषिक मिळाले आहे. या स्पर्धेत विद्यापीठाकडून कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात सादरीकरण केले होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आतापर्यंत १९५ किलोवॅट व ४०० किलोवॅट ऊर्जा क्षमतेचे छतावरील वीज वाहक सोलर पी. व्ही. ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. याद्वारे २०२४-२५ या आर्थिक वर्षात विद्यापीठाची वीज बिलावरील वार्षिक ५२ लाख रुपयांची बचत झाली आहे. बायोगॅस, पवन-सोलर ऊर्जा आधारित विद्युत निर्मिती डॉ. सुरेंद्र काळबांडे यांच्या मार्गदर्शनात ६ किलो वॉट बायोगॅस आधारित विद्युत निर्मिती युनिट, ३ किलो वॉट पवन -सोलर ऊर्जा हायब्रीड युनिट, ३ किलो वॉट ऑफ ग्रीड ऊर्जा निर्मिती युनिट विद्यापीठ परिसरात कार्यान्वित आहेत. नवीकरणीय ऊर्जा अभियांत्रिकी विभागात शेतमालाच्या मूल्यवर्धनासाठी विविध सोलर टनेल ड्रायर, सोलर कॅबिनेट ड्रायर उपलब्ध आहेत.
आपल्या पाल्यांवर चांगले संस्कार हेच त्यांच्या आयुष्याच्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन प्रबोधनकार संदीपपाल महाराज यांनी कीर्तनातून बेलखेड येथे केले. ते संत श्री गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवानिमित्त आयोजित कीर्तनात बोलत होते.इ संदीपपाल महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. बेलखेड येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवानिमित्त दररोज महाराष्ट्रातील मान्यवरांची कीर्तनसेवा सुरू आहे. या महोत्सवातील दुसरे पुष्प गुंफताना संदीपपाल महाराजांनी जोरदार प्रबोधन केले. सन १९९५ ते २००५ या दोन दशकांच्या काळात मुलगी नको, या अट्टाहासापाई अनेकांनी आईच्या पोटातच मुलींचा बळी घेतला. तेव्हा केलेले हे पाप आता त्रासदायक ठरत असून प्रत्येक गावात उपवर मुलांसाठी मुली मिळणे कठीण झाले आहे; पण अशाही परिस्थितीत सर्वांनी योग्य मार्ग काढावा, युवकांनी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, युवतींनी आई-वडिलांच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलू नये, असे संदीपपाल महाराज म्हणाले. संपत्ती गेली तर ती पुन्हा मिळवता येत; पण एकदा का माणसाचे चारित्र्य खराब झाले तर ही न भरून निघणारी हानी असते, म्हणून प्रत्येकाने आयुष्यात वागताना, बोलताना संस्काराचे भान ठेवायला हवे, असे आवाहनही संदीपपाल महाराज यांनी कीर्तनातून केले. महापुरुषांचा आणि संतांच्या वचनांचा दाखला देत त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा विचारच हा ग्राम विकासासाठी तारक ठरणारा आहे. त्यासाठी सत्यपाल महाराजांच्या मार्गदर्शनात आपण खंजिरी वादनातून महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्र बाहेरही प्रबोधन करत आहोत, असेही संदीपपाल महाराज म्हणाले. उद्या महाप्रसाद : बेलखेड येथे आयोजित महोत्सवात १ फेब्रुवारी रोजी विठ्ठल महाराज तेल्हारकर यांचे कीर्तन पार पडले. ३ फेब्रुवारी रोजी संतोष महाराज मनसुटे यांचे कीर्तन झाले तर ४ फेब्रुवारी रोजी योगेश महाराज पाचपोर यांची कीर्तन सेवा पार पडली. ५ फेब्रुवारी रोजी शुकदास महाराज गाडेकर आणि सहा रोजी वैष्णवी किशोरीदीदी राऊत यांचे कीर्तन पार पडले. या सर्व कीर्तनांचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. समर्थ सद्गुरु सेवा समिती शिवणी यांच्या वतीने संचालित शिवणी येथील श्री गजानन महाराज मंदिरात संत श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त ८ फेब्रुवारीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण शिवणी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघत आहे. या उत्सवाची सुरुवात गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी झाली असून, यावेळी रुक्मिणी महिला भजन मंडळ, मलकापूर यांच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय झाले. श्रींच्या नामस्मरणाने भाविक मंत्रमुग्ध झाले होते. शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८ वाजता श्री गजानन महाराजांच्या ग्रंथाचे सामूहिक पारायण होणार आहे. रात्री ८ वाजता श्री संत मोतीराम बाबा भजन मंडळ, अकोला यांच्या भजन सेवेने भक्तिरसाची उधळण होणार आहे. शिवणी येथे प्रगट दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ आता अंतिम टप्प्यात आली असून या निवडणुकीसाठी मंगळवेढा स्थानिक प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ओसवाल व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी दिली आहे. मतदान घेण्यासाठी सर्व केंद्र मिळून एकूण १२६४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून एकूण २१७ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये केंद्राध्यक्ष २१७,मतदान अधिकारी क्रमांक १- २१७, मतदान अधिकारी क्रमांक २-२१७, मतदान अधिकारी क्रमांक ३-२१७, केंद्रावरील पोलीस कर्मचारी -१८९,शिपाई -२०७ अशा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शासकीय धान्य गोदाम येथून मशीन व साहित्य वितरण केले. मतदान पथकांना केंद्रावर घेऊन जाण्यासाठी २४ एस टी बसेस व ३ क्रूझरची सोय करण्यात आली होती. तसेच क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी १६ वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी राहुल पाटील यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३०ते सायंकाळी ५:३० या वेळेत होणार असून या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने निष्पक्ष व निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ओसवाल व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मदन जाधव यांनी केले आहे. तालुक्यात एकूण ४ जिल्हा परिषद गट असून ८ पंचायत समिती गण आहेत. १ लाख ६९ हजार ५३९ मतदार १८९ केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये ८७९९७ पुरुष मतदार ८१५३८ स्त्री आणि इतर ४ असा समावेश आहे. मतदान केंद्र मतदान प्रक्रियेसाठी सज्ज करण्यात आली आहेत.
निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेकदा राजकीय चढाओढ पाहायला मिळते, पण कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे एक अतिशय आगळावेगळा आणि आनंदी योग जुळून आला आहे. कुंभारी जिल्हा परिषद गटातील माकपच्या उमेदवार प्रियंका दोंतुल आणि कुंभारी पंचायत समितीचे शिवसेनेचे उमेदवार रोहित बिराजदार हे उद्या (शनिवारी) 'हळदीच्या' अंगाने मतदानाचा हक्क बजावणार आहेत. विशेष म्हणजे, प्रियंका यांचे रविवारी लग्न आहे तर रोहित उद्या मतदानानंतर गोरजमूहूर्तावर विवाहाच्या बंधनात अडकणार आहे. आज मतदानाच्या आदल्या दिवशी या भावी वधू व वराचा हळदीचा कार्यक्रम पार पडला. अंगाला हळद लागलेली असतानाच उद्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. आधी मतदान आणि नंतर लग्न असा निर्धार या दोन्ही उमेदवारांनी केला असून, मतदानाच्या दिवशी ते हळदीच्या अंगानेच मतदान केंद्रावर जाऊन आपला हक्क बजावणार आहेत. कुंभारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत या दोन उमेदवारांच्या आयुष्यात एक अनोखा 'दुग्धशर्करा योग' जुळून आला आहे. माकप उमेदवार प्रियंका दोंतुल आणि शिवसेनेचे उमेदवार रोहित बिराजदार हे दोघेही बोहल्यावर चढणार आहेत. एकीकडे विजयाची ओढ आणि दुसरीकडे नव्या आयुष्याची सुरुवात, अशा दुहेरी आनंदात हे दोन्ही उमेदवार आहेत. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या निर्णयाचे व विवाह सोहळ्याचे कुंभारी परिसरातून कौतुक होत आहे. तसेच मतदारांमध्येही हा चर्चेचा विषय ठरला आहे. उद्या कुंभारीकर या 'नवरदेव व नवरीला' मतपेटीतून काय आशीर्वाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक मैदानातून थेट लग्नाच्या मांडवात रंगणार कुंभारी गटातील माकपच्या उमेदवार प्रियंका दोंतुल यांचा विवाह शितलकुमार वडलाकोंडा यांच्याशी रविवारी ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. दोघेही वधू-वर उच्चशिक्षित आहेत. कुंभारी पंचायत समितीचे शिवसेनेचे उमेदवार रोहित बिराजदार यांच्या विवाह घनश्याम महाजन यांची सुकन्या दिशा यांच्याशी होत आहे. उद्या शनिवारी मतदानाच्या दिवशीच गोरज मुहूर्तावर त्यांची लग्नगाठ बांधली जाणार आहे. पंचायत समितीच्या माजी उपसभापती मीनाक्षी बिराजदार यांचे ते सुपुत्र आहेत. ओढ विजयाची नि सहजीवनाची
वडिलांकडून घेतली समाजसेवेची प्रेरणा:आमटे दाम्पत्यांचा समाज परिवर्तन पुरस्काराने केला गौरव
बाबा आमटे यांचे कार्य महान होते त्यांच्याकडून समाजसेवेची प्रेरणा घेतली. त्यांनी श्रमाचे संस्कार केले. माणुसकीतून सेवा केली म्हणूनच आदिवासींची भीती व कुतूहल यांच्याशी मिळते जुळते घेऊन कार्य करु शकलो. या कार्यात डॉ. मंदाकिनी आमटे यांनी बरोबरीने साथ दिली, असे प्रतिपादन थोर समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी काढले. कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने शुक्रवारी (दि. ६) कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांना संयुक्तपणे लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. सोमनाथ रोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी.टी. पाटील, सहसचिव ए.पी.देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, कार्यकारिणी सदस्य डॉ. कृष्णा मस्तुद उपस्थित होते. डॉ.आमटे म्हणाले आदिवासी व कुष्ठरोग्यांची सेवा केली. संसाराबरोबर सामाजिक व आरोग्य सेवा केली. अंधारमय जीवनात प्रकाश देण्याचे कार्य केले. अज्ञान व अंधश्रद्धा यांनी ग्रासलेल्या समाजात शिक्षणाद्वारे क्रांती केली. आदिवासी, अनाथ व वंचित यांना मुख्य प्रवाहात आणले. सध्या आमटे परिवाराची चौथी पिढी आदिवासींच्या सेवेत आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. तसेच पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी डॉ. यादव यांनी कर्मवीर मामांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती दिली. संस्थेच्या लोकसहभागातून केलेल्या कार्याची माहिती विशद केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नंदन जगदाळे यांनी स्वागतपर भाषण केले. डॉ. मस्तुद यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. मंदाकिनी आमटे म्हणाल्या काहीतरी वेगळे कार्य करावे, असा सुरुवातीलाच संकल्प केला. दोघांनीही बरोबरीने काम केले. रस्ते, पाणी, वीज, अन्न, आरोग्य सेवा आदींचा अभाव असलेल्या क्षेत्रात काम केल्याचे समाधान आहे. आदिवासींची संस्कृती व परंपरा खूप चांगली आहे. शिक्षण व आरोग्य याद्वारे आदिवासींचे आयुष्य समृद्ध झाले आहे. प्रा. रोडे अध्यक्षीय भाषणात म्हणाले श्रम मूल्य जपण्याचा संदेश मामांनी दिला. बाबा आमटे यांनी आदिवासींना माणसात आणले. बाबा व मामा यांच्या कार्यशैलीत एकवाक्यता आहे. मामांनी ज्ञान व आरोग्य मंदिर उभा केले. वेदना हीच जीवनाची साधना आहे असे बाबा म्हणत. शिक्षणातून माणूस निर्माण झाला पाहिजे. मूल्यधिष्टीत, चारित्र्यवान व श्रम संस्काराचा माणूस शिक्षणातून घडविला पाहिजे. शिक्षण आणि आरोग्य याद्वारे आदिवासींचे आयुष्य बनले समृद्ध
अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलली आहे. या पार्श्वभूमीवर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. आयोगाकडून या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, या प्रक्रियेमुळे मतदारयादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक राहावी, हा प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनांनंतर बारामतीतील आमदारपद रिक्त झाले असून, पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी निवडणूक आयोगाने कायदेशीर चौकटीत पावले उचलली आहेत. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मधील कलम 21 अंतर्गत हा विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमानुसार 1 जानेवारी 2026 पर्यंत नाव नोंदणीकृत असलेले मतदारच पोटनिवडणुकीत मतदानासाठी पात्र असतील. त्यामुळे ज्यांची नावे अद्याप मतदारयादीत नाहीत किंवा दुरुस्ती आवश्यक आहे, अशा नागरिकांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे. मतदारयादीतील त्रुटी दूर करून प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी एकत्रित प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 9 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या कालावधीत मतदारांकडून दावे आणि हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. या टप्प्यात मतदारांना नाव समाविष्ट करणे, चुकीची माहिती दुरुस्त करणे किंवा वगळलेल्या नावांबाबत हरकत नोंदवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. प्राप्त दावे व हरकतींची सखोल छाननी करून त्या 6 मार्च 2026 पर्यंत निकाली काढण्यात येतील. या प्रक्रियेनंतर मंगळवार, 10 मार्च 2026 रोजी अंतिम मतदारयादी जाहीर केली जाईल. या अंतिम यादीच्या आधारे बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचा मार्ग अधिकृतपणे मोकळा होईल. दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच बारामती मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर विशेष बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत मान्यता प्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून कार्यक्रमाची सविस्तर माहिती देण्यात येईल आणि त्यांच्या सूचनांचाही विचार केला जाईल. स्थानिक पातळीवरील सुसूत्रता मतदान केंद्रांची यादी, स्थानिक पातळीवरील सुसूत्रता, तसेच मतदारांपर्यंत माहिती पोहोचविण्याबाबत प्रशासन विशेष काळजी घेत असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे. बारामतीतील पोटनिवडणूक पारदर्शक, सुव्यवस्थित आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोगाने उचललेली ही पावले निर्णायक ठरणार असल्याचे मानले जात आहे.
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून वंचित समाजातील मुला मुलींना शिक्षणाची द्वारे खुली केली. त्यामुळे सामाजिक परिवर्तन जलद गतीने झाले, त्यांनी गरीब, दुर्बल व गरजू लोकांना मदत व्हावी म्हणून हॉस्पिटल सुविधा उपलब्ध करून दिली. धैर्य, संयम दृढनिश्चय या आपल्या गुणांच्या बळावर अविरत कष्ट करून नव समाजाची उभारणी केली, त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य वंदनीय आहे, असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले. महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचालित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे त्यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ.एस.आर.लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते. प्रारंभी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. शीतल झिंगाडे भस्मे यांनी केले. संस्थेत शिकलेला विद्यार्थी स्वावलंबी झाला पाहिजे. या आपल्या विचारसरणीतून मामासाहेबांनी कौशल्याभिमुख शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. महिलांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून भरतकाम, फॅशन डिझाईन, विणकाम आदींचे शिक्षण दिले. त्यामुळे त्यांच्या अर्थार्जनाची सोय झाली. बार्शी परिसरातील शेतकरी शेतमजूर व सामान्य नागरिकांसाठी आरोग्य मंदिर हे हॉस्पिटल सुरू केले.
sसाडे (ता. करमाळा) येथे शहीद मेजर अमोल निलंगे स्मारक समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला शहीद मेजर अमोल निलंगे स्मृतिदिन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना कर्नल कुलदीप करपे यांनी सुरक्षा, देशसेवेसाठी शिस्तबध्द तरुणांची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय सेनाधिकारी कर्नल कुलदीप करपे यांनी केले. या कार्यक्रमास भारतीय सेनेचे अधिकारी कर्नल केदार भिडे व कर्नल कुलदीप करपे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी भूषवले. प्रास्ताविकातून मान्यवरांचा परिचय प्रा. गणेश करे- पाटील यांनी करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी शहीद मेजर अमोल निलंगे यांच्या स्मृतिस्थळी पुष्पचक्र अर्पण करून एन.सी.सी. कॅडेट्ससह भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आगामी काळात देशाच्या सुरक्षेसमोर उभ्या राहणाऱ्या आधुनिक आव्हानावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला. तंत्रज्ञानाधारित युद्धपद्धती, सायबर सुरक्षा, दहशतवाद व सीमा सुरक्षेतील बदलती परिस्थिती यांचा सामना करण्यासाठी सक्षम, शिस्तबद्ध व देशभक्त तरुणांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षणासोबतच शारीरिक तंदुरुस्ती, नैतिक मूल्ये आणि राष्ट्रनिष्ठा जोपासण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यावेळी संस्थापिका डॉ. प्रचिती पुंडे यांनी शहीद मेजर अमोल निलंगे स्मारक समितीस पोडियम भेट स्वरूपात प्रदान केले. या पोडियमचा उपयोग भविष्यातील विविध कार्यक्रमांमधून सक्षम व प्रभावी वक्ते घडवण्यासाठी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या उपक्रमशील योगदानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाचे आयोजन साडे ग्रामस्थ, आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ करमाळा आणि यश कल्याणी सेवाभावी संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्मृतिदिन सोहळ्यास पुणे, सातारा, धाराशिव येथून आलेले विशेष निमंत्रित, आजी-माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता-पिता तसेच उपस्थित होते. या समारंभात सामाजिक दायित्वासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शहीद स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक रणजित माने, तहसीलदार शिल्पा ठोकडे, गुलाबराव देवकते, प्रसिद्ध पक्षी अभ्यासक प्रा. कल्याणराव साळुंके, प्रगतशील बागायतदार संभाजी भोसले, आदर्श सैनिक किरण ढेरे आणि आदर्श कला शिक्षक सचिन शिंदे यांचा समावेश होता. तसेच पीएमश्री साधनाबाई नामदेवराव जगताप, मुलींची शाळा क्र. १ यांना प्रदान करण्यात आला. शहीद स्मृती पुरस्कार देऊन केला सन्मान
‘बोलो हनुमान की जय’च्या जयघोषात येथील बासलेगाव रस्त्यावरील कोहिनूर मंगल कार्यालय लगत दिशा विहारमध्ये अवघ्या १० महिन्यात लोकवर्गणीतून उभारण्यात आलेल्या श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कळसारोहण समारंभास गुरुवारी सवाद्य मिरवणुकीने उत्साहपूर्ण आणि मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. गुरुवारी सकाळी १० वाजता फुलांनी सजवलेल्या मिनी ट्रॉलीवरून श्री हनुमान मूर्ती आणि कळस यांची बासलेगाव रस्त्यावरील मुख्य मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हनुमानाची जयघोष करण्यात आला. नवीन बांधकाम केलेल्या या मंदिराची स्थापना वर्ष २०२५ मध्ये पायाभरणी झाली होती. आता ती परिसरातील नागरिकांसह मंगल कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी विधिवत पूजा करून खुला होणार आहे. या सोहळ्यात मंदिरासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले महाराज यांच्या तर्फे सुबक हनुमान मूर्ती भेट दिली. तर कळस व आरती संच भेट सेवा माजी सैनिक अनिल हत्ते यांनी केले आहे. आणि सुहासिनी महिलांच्या ओटी भरणे सेवा चन्नवीरप्पा दसले बंधू परिवार यांनी केले आहे. सदरची मिरवणूक वेदमूर्ती संगय्या स्वामी (शास्त्री) यांच्या नेतृत्वाखाली निघालेली होती. या सवाद्य मिरवणुकीत शेकडो महिलांनी पारंपरिक वेश परिधान करून डोक्यावर कलश घेतले होते. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी मार्गावरील महिलांनी स्वागत करून हनुमान मूर्ती आणि कळस यांचे औक्षण करून दर्शन घेतले. परिसरातील सर्व स्त्री-पुरुष यांनी हनुमान मूर्ती आणि कळस यांचे दर्शन घेतले. मिरवणुकीवेळी ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मिरवणुकीच्या वेळी परिसरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. यानिमित्ताने शुक्रवारी सकाळी हुबळी मठाचे मठाधिपती राजशेखर शिवाचार्य व अक्कलकोटचे बसवलिंग महास्वामी, कल्लप्पावाडीचे वेदमूर्ती रुद्रय्या स्वामी महाराज यांच्या हस्ते व आमदार सचिन कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळेसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मिरवणुकीनंतर आरती होऊन प्रसादाचा वाटप करण्यात आले. या मिरवणुकीत नगरसेविका भागुबाई कुंभार, नागराज कुंभार, माजी नगरसेवक मारुती आळवीकर, शांतमल पाटील, कृष्णात सुतार, जयंत शिंदे, विजयकुमार हौदे, गुरुपादप्पा मदरी, वीरशैव महिला मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणुकीनंतर आरती होऊन प्रसादाचा वाटप करण्यात आले. तसेच सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री वटवृक्ष दक्षिणमुखी हनुमान मंदिर पंच कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. महिलांनी पारंपरिक वेश परिधान करून डोक्यावर कलश घेतले

27 C