सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेत भाजपसह महायुतीला धोबीपछाड दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी या सत्तासंघर्षात पडद्यामागून छुपी मदत केल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला असून, भाजपच्या गोटात सुरू असलेल्या सर्व हालचालींची इत्थंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचत होती, असेही त्यांनी म्हटले आहे. जयंत पाटलांच्या या दाव्यामुळे आता भाजपमध्ये अंतर्गत संशयाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे मंत्री चंद्रकांत पाटलांवर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत मी काही बोलणार नाही, ते माझे 'हितचिंतक' आहेत, असे म्हणत टोला लगावला. जिल्हा परिषदेत भाजपकडे बहुमत नव्हते, तरीही पोलिस यंत्रणेचा वापर करून सत्ता खेचून आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, विरोधकांनी केलेल्या कोणत्याही टीकेकडे लक्ष न देता आम्ही आमच्या उद्दिष्टाकडे वाटचाल केली आणि अखेर यश मिळवले, असेही जयंत पाटील म्हणाले. भाजपचा 'करेक्ट कार्यक्रम' सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम करत सत्ता राखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार संगीता पाटील यांनी भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांचा पराभव करत अध्यक्षपदावर कब्जा केला. या चुरशीच्या निवडणुकीत संगीता पाटील यांना 34 मते मिळाली, तर स्वप्नाली मासाळ यांना केवळ 24 मतांवर समाधान मानावे लागले. आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी आखलेली संयुक्त रणनीती यशस्वी ठरल्याने भाजपच्या मिशन लोटसला सांगलीत मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीने वर्चस्व कायम राखले अध्यक्षपदापाठोपाठ उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीने आपले वर्चस्व कायम राखले. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांनी भाजप-युतीचे उमेदवार हिम्मत जाधव यांचा पराभव केला. या लढतीत लाड यांना 34 मते मिळाली, तर जाधव यांना 25 मते पडली. जिल्हा परिषदेच्या या निकालामुळे सांगलीच्या राजकारणात महाविकास आघाडीची पकड अधिक मजबूत झाली असून, सत्तास्थापनेच्या या संघर्षात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. शिवसेना शिंदे गटामुळे भाजपला फटका आटपाडी तालुक्यातील शिवसेना शिंदे सेनेचे दोन सदस्य, जयदीप भोसले आणि पृथ्वीराज पाटील, मतदानावेळी गैरहजर राहिल्याने भाजप-युतीचे राजकीय गणित पूर्णपणे कोलमडले, ज्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला मिळाला. हे दोन्ही सदस्य युतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात असतानाच, त्यांच्या अनुपस्थितीमुळे महाविकास आघाडीचा विजय अधिक सुकर झाला. विशेष म्हणजे, मतदानाच्या एक दिवस आधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगलीत गुप्त बैठक घेऊन उमेदवार आणि मतदानाची जी सूक्ष्म रणनीती आखली होती, ती या निकालात पूर्णपणे यशस्वी ठरल्याचे दिसून आले.
पुणे महानगरपालिकेत पहलगाम हल्ल्यात वडील गमावलेल्या आसावरी जगदाळे यांना अखेर नोकरी मिळाली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द करण्यात आले. या नियुक्तीमुळे जगदाळे कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आसावरी यांचे मोबाईलवर संपर्क साधून अभिनंदन केले. आसावरी जगदाळे गेल्या अनेक दिवसांपासून पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होत्या. तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय प्रक्रियेमुळे त्यांच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, त्यांनी आपला पाठपुरावा सुरू ठेवला. महापालिकेतील वरिष्ठ पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून अखेर त्यांना महापालिकेच्या सेवेत रुजू करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला. महापालिका भवनात आयोजित एका विशेष कार्यक्रमात महापौर मंजुषा नागपुरे यांनी आसावरी यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी सभागृहनेते गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह अनेक पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौरांनी सांगितले की, पात्र आणि गरजू व्यक्तींना महापालिका प्रशासनात संधी देणे हे आमचे कर्तव्य आहे. आसावरी यांच्या कामामुळे महापालिकेच्या कामकाजात नक्कीच भर पडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नियुक्तीपत्र हातात पडल्यानंतर आसावरी जगदाळे यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले. हा केवळ माझ्यासाठी नोकरीचा प्रश्न नव्हता, तर माझ्या अस्तित्वाचा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा विषय होता, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. महापालिकेच्या सेवेत रुजू झाल्यानंतर दिलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण निष्ठेने पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या यशामुळे संघर्ष करणाऱ्या इतर महिलांनाही एक नवी उमेद मिळाली आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बुधवारी भीषण अपघात झाला. या अपघातात सहा वाहनांचा चक्काचूर झाला असून, इनोव्हा कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात बोरघाटातील खोपोली एक्झिटजवळ घडला. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनर क्रमांक एम एच 43 सी ई 3289 च्या चालकाचे, अवधेश यादव (वय ३७, उत्तर प्रदेश) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने समोरील वाहनांना जोरदार धडक दिली. सर्वप्रथम कंटेनरने टाटा पंच कारला धडक दिली. त्यानंतर कंटेनरने टाटा टिगोर कारला धडक देत तो आयशर टेम्पोवर आदळला. याचवेळी कंटेनरने इनोव्हा कारला पाठीमागून धडक देऊन तिच्यावर पलटी घेतली. पुढील बलकरलाही धडक बसल्याने एकूण सहा वाहनांचा हा साखळी अपघात घडला. या अपघातात इनोव्हा कारमधील श्रीकांत अनंत जाधव (वय ६३, पुणे), अंबादास दामू पेटारे आणि प्रमोद संतोष पवार यांचा जागीच मृत्यू झाला. टाटा टिगारो कारमधील स्वप्नील भुजबळ, नवनाथ भुजबळ, अक्षय गायकवाड, भानुदास गायकवाड तसेच कंटेनर चालक अवधेश यादव हे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदतकार्य करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी खालापूर येथे पाठविण्यात आले आहेत. या अपघातामुळे काही काळ एक्सप्रेसवेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटातून उमेदवारी दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात शरद पवार गट आपला उमेदवार उभा करणार नसल्याची भूमिका मांडली होती. सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असतानाच आता महाविकास आघाडीत यावरून मतभेद समोर आले आहेत. सुप्रिया सुळेंच्या या भूमिकेशी असहमती दर्शवत काँग्रेसने बारामतीत मोठा ट्विस्ट आणला आहे. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य आम्हाला मान्य नाही. जर शरद पवारांची राष्ट्रवादी या जागेवर निवडणूक लढवणार नसेल, तर काँग्रेस स्वतः उमेदवार देण्याबाबत गांभीर्याने विचार करेल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांत येत्या 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून, 4 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, शरद पवार गटाची भूमिका आम्हाला मान्य नाही. जर तिकडे राष्ट्रवादी लढणार नसेल तर आम्ही तिकडे निवडणूक लढायचा विचार करू. पवार विरुद्ध पवार निवडणुका यापूर्वी झाल्या आहेत. ही जागा राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. विलिनीकरण हा विषय होता तेव्हा काँग्रेसशी चर्चा केली नव्हती. आता निवडणुका होत आहेत. सुप्रिया सुळे म्हणाल्या सुनेत्रा वहिनीविरोधात कसा उमेदवार देणार. त्यांची भूमिका महाविकास आघाडी म्हणून मान्य नाही. जर राष्ट्रवादी लढणार नसेल तर काँग्रेसला तिथे उमेदवार देण्याबाबत विचार करावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. बारामती निवडणुकीत आता मोठा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला येथील निवडणूक बिनविरोध होणार असे बोलले जात होते. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कुठलाही उमेदवार देणार नसल्याची भूमिका शरद पवार गटाने घेतली आहे. मात्र आता कॉंग्रेसने उमेदवार देण्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांनी देखील आपण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे येथील निवडणूक ही तिहेरी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काय म्हणाले होते लक्ष्मण हाके? लक्ष्मण हाके यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर घ्यावे, इथे पवार सोडून विधानसभेला उमेदवार द्यावा. आम्ही निवडणूक लढवतो पण काही जणांच्या पोटात दुखते. सुनेत्रा पवार यांना विधान परिषदेवर पाठवा, आम्ही ही निवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, असे हाके यांनी म्हटले होते.
सोलापूर जि. प. अध्यक्षपदी दीपक वैद्य
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड बुधवार दि. १८ मार्च रोजी झाली. अध्यक्षपदी भाजपच्या दीपक वैद्य तर उपाध्यक्षपदी इंद्रजीत पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्याची घोषणा केली. भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी देताना धक्का तंत्राचा वापर करण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बार्शी तालुक्यातील […] The post सोलापूर जि. प. अध्यक्षपदी दीपक वैद्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजप आ. राजेश पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा
नांदेड : प्रतिनिधी भावासोबतच्या शेतीच्या वादावरून नायगाव येथील भाजपचे आ.राजेश पवार, पत्नी पूनम पवार व इतर आठ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करा, असे आदेश नायगाव प्रथम वर्ग न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आ. पवार अडचणीत आले आहेत. नायगावचे भारतीय जनता पक्षाचे आ. राजेश पवार यांचे श्रीराम पवार हे चुलत बंधू आहेत. नायगाव मधील आलूवडगाव येथे […] The post भाजप आ. राजेश पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्राच्या महसूल विभागात मोठा गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. जमिनीच्या सातबारा उताऱ्यातच फेरफार करून तब्बल एक ते दीड लाख शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची कबुली सरकारने दिली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम 155 चा गैरवापर करून महसूल अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर आदेश पारित केल्याने हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यातील कलम 155 चा वापर 7/12 मधील उताऱ्यातील लेखनदोष किंवा शुद्धलेखनातील चुका दुरुस्त करण्यासाठी केला जातो. मात्र, पुण्यातील काही महसूल अधिकाऱ्यांनी या कलमचा गैरवापर करत जमिनीच्या मालकी हक्कतच परस्पर बदल केले आहेत. जुलै-ऑगस्ट 2025 च्या काळात हा गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी या विषयाकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर या घटनेची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात महसूल प्रशासनातील या गैरप्रकारावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. चौकशीत असे समोर आले की अनेक प्रकरणांत मूळ मालकाची संमती नसताना देखील 7/12 मध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीर आदेश पारित करून खाजगी हितसंबंध जपल्याचे समोर आले आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली चुकीची कबुली या घटनेवर विधान परिषदेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत झालेल्या चुकीची कबुली दिली आहे. ते म्हणाले, शुद्धलेखनात बदल करण्याच्या नावाखाली सातबारा बदलले गेले, ही बाब गंभीर आहे. महसूल खात्याच्या इतिहासातील हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच जवळपास एक ते दीड लाख शेतकरी या प्रक्रियेत भरडले गेल्याचेही त्यांनी मान्य केले आहे. अधिवेशन संपायच्या आत दोषींवर कारवाई होणार शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार तसेच सहभागी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणी दोषी तहसीलदार ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत कोणावर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. अधिवेशन संपायच्या आत दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
पुणे येथील हिंजवडी आयटी पार्कमध्ये एक हजार फ्रेशर्स पदवीधारकांना नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या प्रकरणात कामगार विभागाने तत्काळ हस्तक्षेप करून संबंधित प्रकरण पोलिसांकडे वर्ग केले असून आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी विधानसभेत दिली. हिंजवडी आयटी पार्कमध्ये १,००० फ्रेशर्स पदवीधारकांना नोकरीच्या नावाखाली फसवणूक झाल्याने पैसे परत मिळविण्यासाठी विशेष तपास पथकाची मागणी करण्यात आली आहे. तसेच आयटी क्षेत्रातील जबरदस्तीचे राजीनामे, कामावरून कमी करणे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पष्ट नियम व आयटी कर्मचाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्याची आवश्यकता असल्याची लक्षवेधी सदस्य शंकर जगताप यांनी मांडली आयटी क्षेत्रातील प्रश्नांवर नजर ठेवण्यासाठी नियमावली मंत्री ॲड. फुंडकर यांनी लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले की, या प्रकरणात फसवणूक झालेल्या तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. तसेच, आयटी क्षेत्रातील जबरदस्तीचे राजीनामे, कामावरून कमी करणे यासारख्या बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वतंत्र ट्रिब्यूनल स्थापन करण्याचेही संकेत आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रथम कामगार विभागामार्फत सामंजस्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो. तो शक्य न झाल्यास प्रकरण कामगार न्यायालय किंवा औद्योगिक न्यायालयात नेले जाते. याशिवाय केंद्र शासनाच्या नवीन कामगार संहितेनुसार आयटी क्षेत्रासाठी स्वतंत्र ट्रिब्यूनल स्थापन करण्याची तरतूद असून, संबंधित नियम अंतिम झाल्यानंतर राज्यातही त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असेही मंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी नमूद केले.
आज विधानभवन येथे धाराशिवचे आमदार कैलास पाटील व उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार प्रविण स्वामी यांनी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन दि. 17 मार्च 2026 रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे व गारपीटीमुळे झालेल्या शेती नुकसानाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. मंगळवार, दि. 17 मार्च 2026 रोजी धाराशिव–उमरगा–लोहारा मतदारसंघात दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. द्राक्ष, केळी, आंबा तसेच विविध फळबागांसह कांदा, हरभरा, गहू, ज्वारी यांसारख्या पिकांचे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. विशेषतः गारपीटीमुळे अनेक ठिकाणी उभी पिके जमिनीवर आडवी पडली असून, हातातोंडाशी आलेले पीक पूर्णतः नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना विलंब न करता नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदारांनी कृषीमंत्र्यांकडे केली आहे. शासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला. सोलापूरच्या अक्कलकोट येथे तसेच सांगलीच्या मिरजच्या काही भागात गारपीटही झाली. लातूर, धाराशिव, नांदेड, सोलापूर, सांगली तसेच साताराच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. आजही धाराशिवच्या उमरगा-लोहारा तालुक्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ज्योतिषी व तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेचे शोषण केल्याचा आरोप असलेल्या व अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबा अशोक खरातची पाद्यपूजा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. याचसह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील ट्विट करत चाकणकरांवर निशाणा साधला असून बलात्काराचे आरोप असणाऱ्या व्यक्तीचे महिला आयोगाच्या अध्यक्षा पाय धुतानाचे व्हिडिओ? असा सवाल उपस्थित करत टीका केली आहे. अशोक खरातची पाद्यपूजा करणाऱ्या रुपाली चाकणकरांनी आता राजीनामा द्यावा. त्यांना कोणत्याही पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेणार का? असा सवाल त्यांनी केला आहे. विकास लवांडे म्हणाले, अशोक खरातसारख्या सर्वच भ्रष्टाचारी लोकांना भाजपकडून अभय मिळत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरातची पाद्यपूजा करताहेत, त्यांची सेवा करत आहेत. अशोक खरातसोबतचे रूपाली चाकणकरांचे फोटो पाहून खंत वाटते. आता तरी त्या राजीनामा देतील का? रुपाली चाकणकरांच्या अनेक चुका या गंभीर स्वरूपाच्या असून त्या आतापर्यंत दडपल्या आहेत. आता या घटनेनंतर तरी त्यांचा राजीनामा घेणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील रुपाली चाकणकर यांचे फोटो व व्हिडिओ ट्विटवर शेअर करत निशाणा साधला आहे. दमानिया म्हणाल्या, बलात्काराचे आरोप असणाऱ्या अशोक खरातांचे महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा यांचे पाय धुतानाचे व्हिडिओ? खूप वर्ष त्यांना ह्या ओळखतात? त्यांच्या संघटनेवर, त्यावर पदाचा पण उल्लेख आहे. ह्या माणसाची प्रचंड माहिती माझ्यापर्यंत येत आहे. लवकरच खुलासा करेन, असे दमानिया यांनी म्हटले आहे. अंजली दमानिया यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये अशोक खरातच्या संघटनेचे नाव आहे. श्री शिवनिका संस्थान, मिरगांव, असे नाव असून यात रुपाली चाकणकर यांचे नाव असून त्या नावापुढे सदस्या असे पद देखील लिहिले आहे. आरोपांबाबत मला कल्पना नाही- रुपाली चाकणकर रुपाली चाकणकर यांच्यावर झालेल्या आरोपांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, कॅप्टन खरातांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलिस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलिस तपासावर आपला पूर्ण विश्वास आहे, असे चाकणकर यांनी म्हटले आहे. अशोक खरातचे नेमके प्रकरण काय? अशोक खरातच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. अशोक खरातने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 18 मार्च रोजी त्याला पहाटे 3 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. अशोक खरात हा निवृत्त मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाला आहे. काही वर्षांपासून त्याला अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. अनेक मोठे नेते तसेच कलाकार मंडळी देखील त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात. मात्र, आता त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
कार चार्जिंग करताना शॉर्ट सर्किट; ७ ठार
इंदूर : वृत्तसंस्था मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूरमध्ये मंगळवारी रात्री एक अत्यंत भीषण आणि मन सुन्न करणारी घटना घडली. प्रीती नगर भागात इलेक्ट्रिक कार चार्ज करत असताना झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. या आगीत घरात ठेवलेल्या ४ गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ एक स्फोट झाले, ज्यामध्ये ५ निष्पाप मुलांसह कुटुंबातील ७ सदस्यांचा होरपळून मृत्यू झाला. […] The post कार चार्जिंग करताना शॉर्ट सर्किट; ७ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सीट्स निवडण्यासाठी घेतल्या जाणा-या मनमानी शुल्कावर लगाम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था हवाई प्रवास करणा-या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने एअरलाइन्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. सीट निवडताना आकारल्या जाणा-या अतिरिक्त शुल्काबाबत अनेक प्रवाशांकडून तक्रारी येत होत्या. त्याची दखल घेत सरकारने आता एअरलाइन्सना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नव्या नियमांनुसार, प्रत्येक फ्लाईटमध्ये किमान ६० टक्के सीट्स प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त […] The post सीट्स निवडण्यासाठी घेतल्या जाणा-या मनमानी शुल्कावर लगाम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील मुलींची शाळेतील उपस्थिती वाढविणे आणि ड्रॉपआऊटचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतात. राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी शासनाकडून सर्वांगीण उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली. याबाबत लक्षवेधी सूचना सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी मांडली. यावेळी चर्चेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, किशोर दराडे, अभिजीत वंजारी, इद्रिस नाईकवाडी यांनी सहभाग घेतला. ‘उपस्थिती भत्ता’ योजनेला आधुनिक योजनांची जोड मंत्री भुसे म्हणाले, प्राथमिक शाळांमधील मुलींची उपस्थिती वाढविणे आणि गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी १९९२ पासून सुरू करण्यात आलेल्या ‘उपस्थिती भत्ता’ योजनेला काळानुरूप पूरक अशा अनेक आधुनिक योजनांची जोड देण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते चौथीतील आदिवासी व अनुसूचित जाती-जमातीतील दारिद्र्यरेषेखालील मुलींना ७५ टक्के उपस्थितीच्या अटीवर दररोज एक रुपया, कमाल २२० रुपय वार्षिक उपस्थिती भत्ता देण्यात येत होता. सध्या ही योजना १३ मे २०२२ पासून जिल्हा नियोजन समितीकडे वर्ग करण्यात आली असून जिल्हास्तरावर अंमलबजावणी केली जात आहे. प्रत्येक शाळेत मुलींना पिंक रूम मिळणार मंत्री भुसे म्हणाले, विद्यार्थिनींसाठी मध्यान्ह भोजन योजना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश सायकल वाटप योजना बारावीपर्यंत मोफत शिक्षण यांसारख्या अनेक योजना आहेत. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे, महिला शिक्षकांची नियुक्ती, स्वतंत्र व स्वच्छ शौचालयांची व्यवस्था यावर शासन भर देत आहे. तसेच प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र सुविधा कक्ष (पिंक रूम) उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे. जिल्हा नियोजन समितीमार्फत शिक्षणावर किमान ५ टक्के खर्चाची तरतूद असली तरी अनेक जिल्ह्यांमध्ये १० ते १२ टक्क पर्यंत निधी शिक्षणासाठी खर्च केला जात असल्याचे मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले.
शिवालिक, नंदादेवीनंतर आता ‘जग लाडकी’ जहाजही भारतात पोहोचले
नवी दिल्ली : शिवालिक, नंदादेवीनंतर आता ‘जग लाडकी’ जहाजही भारतीय किनारपट्टीवर पोहोचले आहे. स्ट्रेट होर्मुझ या धोकादायक सामुद्रधुनीतून प्रवास करत हे जहाज कच्चे तेल घेऊन गुजरातच्या मुंद्रा पोर्टला दाखल झाले आहे. आज सकाळी १०.३० वाजता मुंद्रा पोर्टच्या बा सागरी क्षेत्र एसपीएम येथे जग लाडकी जहाज पोहोचले. हे खोल समुद्रातील ठिकाण असून तिथून मोठ्या जहाजातून तेल […] The post शिवालिक, नंदादेवीनंतर आता ‘जग लाडकी’ जहाजही भारतात पोहोचले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे रेल्वे विभागाने गेल्या ११ महिन्यांत नियमबाह्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर मोठी कारवाई केली आहे. या कालावधीत तब्बल ४ लाख १७ हजार प्रवाशांकडून २२ कोटी ७० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने सुरक्षित आणि शिस्तबद्ध प्रवासासाठी ही मोहीम राबवली आहे. रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या ११ महिन्यांच्या काळात ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. यामध्ये केवळ विनातिकीट प्रवास करणारेच नव्हे, तर आरक्षित डब्यात अनधिकृतपणे प्रवास करणारे आणि सामानाचे बुकिंग न करता प्रवास करणाऱ्या प्रवाशांचाही समावेश होता. या तपासणी मोहिमेदरम्यान, ३ लाख २२ हजार प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले. त्यांच्याकडून १९ कोटी ४१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर, आरक्षित डब्यात जनरल तिकीट काढून प्रवास करणाऱ्या किंवा चुकीच्या श्रेणीत प्रवास करणाऱ्या ९४ हजार प्रवाशांवर कारवाई करत ३ कोटी २५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. सामानाचे नियमानुसार बुकिंग न करता प्रवास करणाऱ्या ९०० हून अधिक प्रवाशांकडून सुमारे १ लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वेच्या उत्पन्नात घट होऊ नये आणि प्रामाणिक प्रवाशांना त्रास होऊ नये, या उद्देशाने तिकीट तपासणी यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली आहे. पुणे रेल्वे विभागाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, रेल्वेने प्रवास करताना नेहमी वैध तिकीट सोबत ठेवावे आणि रेल्वेच्या नियमांचे पालन करावे. विनातिकीट प्रवास हा गुन्हा असून, अशा प्रवाशांविरुद्ध यापुढेही कठोर मोहीम सुरूच राहील, असा इशारा विभागाने दिला आहे.
ब्राह्मण समाजाविरोधात भडकाऊ लेखन केल्याप्रकरणी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम सूर्यभान खेडेकर (वय ७७) आणि प्रकाशक किशोर साहेबराव कडू (वय ४२) यांची पुणे येथील प्रथम वर्ग न्यायाधीश पी. बी. पाटील यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. खेडेकर यांनी 'शिवरायांच्या बदनामीचे केंद्रे' या शीर्षकाखाली एक पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर छत्रपती शिवाजी महाराज आणि विधानसभेचे छायाचित्र होते. पुस्तकात ब्राह्मण पुरुष षंढ असतात आणि ब्राह्मण स्त्रिया मराठा समाजातील पुरुषांकडून स्वतःच्या इच्छा पूर्ण करून घेतात, अशा आशयाचे लेखन केल्याचा आरोप होता. या पुस्तकामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन दंगली होण्याची शक्यता असल्याचा दावा करत भाजपाचे माजी नगरसेवक शाम ज्ञानदेव सातपुते (रा. पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात खेडेकर आणि प्रकाशक कडू यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. या खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी सरकारच्या वतीने विशेष आणि ज्येष्ठ सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली होती. खेडेकर आणि कडू यांच्या वतीने ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी न्यायालयात बाजू मांडली. खेडेकरांच्या वतीने काय झाला युक्तिवाद? या प्रकरणात जेम्स लेन या अमेरिकन लेखकाने पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमधून माहिती घेऊन 'शिवाजी; द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' नावाचे पुस्तक लिहिले होते. त्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता यांच्याविषयी चुकीची आणि त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारी माहिती भांडारकर इन्स्टिट्यूटमधील काही ब्राह्मण समाजातील लोकांनी जाणीवपूर्वक पुरवली होती, असे जेम्स लेन यांनीच जाहीर केले होते. छत्रपती शिवाजी महाराज व मा जिजाऊ यांच्या विषयी अतिशय घाणेरडे लिखाण जेम्स लेन या अमेरिकन लेखकाने केले व त्याला पुण्यातील ब्राह्मणांनी मदत केली त्या द्वेषातून शिवरायांच्या बदनामीचे केंद्रे या पुस्तकाचे या शीर्षकाखाली त्या रोषातून पुरुषोत्तम खेडेकर यांनी ते पुस्तक लिहिले असे पोलिस तपासात पुरुषोत्तम खेडेकर यांनी पोलिसांना सांगितले होते. खेडेकरांवरील आरोप सिद्ध करण्यात अपयश पुणे येथील न्यायालयामध्ये शिवरायांच्या बदनामीचे केंद्रे हे पुस्तक पुरुषोत्तम खेडेकर यांनीच लिहिले व किशोर कडू यांनीच ते प्रकाशित केल्याचे सरकार पक्षाला सिद्ध करण्यास अपयश आले. लिखाणाचे स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे त्या पुस्तकावरून कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण झाली किंवा दंगली झाल्या असे काही घडलेले नाही. फक्त त्रास देण्याच्या उद्देशाने खोटी फिर्याद व खोटा खटला पुरुषोत्तम खेडेकर व प्रकाशक किशोर कडू यांच्या विरोधात दाखल केला. खटला गंभीर नसताना किंवा कुठलेही संयुक्तिक कारण नसताना फक्त सत्तेचा गैरवापर करून या खटल्यात जाणीवपूर्वक मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या विरोधात विशेष सरकारी वकीलांची नेमणूक केली असल्याचा युक्तिवाद ॲड. मिलिंद पवार, ॲड. हर्षवर्धन मिलिंद पवार, ॲड. सुयोग गायकवाड, ॲड सारंग बहिरट, ॲड. ज्ञानेश्वरी जाधव यांनी केला. सदर युक्तिवाद ग्राह्य धरून पुरुषोत्तम खेडेकर व किशोर कडू यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केली.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे मंगळवारी (१७ मार्च) दुपारी एका १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अज्ञात नराधमाने ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून, याचे तीव्र पडसाद आज राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनातही उमटले. पीडित मुलीवर सध्या लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये उपचार सुरू असून, तिची प्रकृती गंभीर असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. वडगाव पान येथील सहावीत शिकणारी ही विद्यार्थिनी मंगळवारी दुपारी आपल्या घराकडे जात असताना अज्ञात इसमाने तिच्यावर अचानक ॲसिड फेकले. या हल्ल्यात मुलीचा चेहरा आणि शरीर गंभीररीत्या भाजले आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून, स्थानिक पोलिसांनी तातडीने तपास चक्रावे फिरवली आहेत. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे आरोपीचा शोध घेण्यात अडचणी येत असल्या तरी, संशयित व्यक्ती गावातच दडून बसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. विधानसभेत विरोधक आक्रमक या घटनेवरून विरोधकांनी आज विधिमंडळ अधिवेशनात सरकारला धारेवर धरले. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. राज्यात पोलिसांचा धाक उरला आहे का? आरोपींना पळून जाण्याची हिंमत होतेच कशी? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. तर काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी पीडित मुलीच्या उपचाराचा सर्व खर्च शासनाने उचलण्याची मागणी केली. राज्याच्या गृहमंत्रालयाने या प्रकरणाचा तपास जलद गतीने करून आरोपींना फासावर लटकवावे, अशी मागणी यावेळी विरोधकांनी केली. गृहराज्यमंत्री पंकज भोयर काय म्हणाले? विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले की, अशा घटनांना आळा घालण्यासाठी आणि ॲसिडचा पुरवठा नेमका कोठून होतो, याचा शोध घेण्यासाठी एक विशेष समिती स्थापन केली जाईल. ॲसिड विक्रीवर कडक निर्बंध आणण्याचा सरकारचा विचार आहे. दोषींवर कठोर कारवाई होणार - विखे पाटील तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत माहिती दिली की, पीडित मुलीवर प्रवरा मेडिकल केअर सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या मुलीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असून, तिला सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातील. आरोपी कितीही प्रभावशाली असला तरी त्याला सोडले जाणार नाही, असा विश्वास त्यांनी सभागृहाला दिला.
अजित पवारांसारख्या राज्यातील एका प्रमुख नेत्याच्या संशयास्पद अपघाती मृत्यूवर विधिमंडळात चर्चा करू दिली जात नाही. याचा अर्थ काय? यावरून या अपघातामागे एक मोठी शक्ती असल्याच्या आमच्या संशयाची एकप्रकारे पुष्टीच झाली आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्यात या अपघातामागील 'ती मोठी शक्ती कोण?' असा प्रश्न विचारला जात आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथील एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा आरोप केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित केला आहे. विशेषतः आमदार रोहित पवार व अमोल मिटकरी यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करून त्यावर चर्चा करण्याची मागणी केली होती. रोहित पवार यांनी मंगळवारीच या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या मुद्यावर विधिमंडळाच्या पटलावर चर्चा करण्याची मागणी केली होती. पण राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात यासंबंधी मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला. काय म्हणाले रोहित पवार? रोहित पवार यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला. ते एका पोस्टद्वारे म्हणाले, अजितदादांसारख्या राज्यातील एका प्रमुख नेत्याचा विमान अपघातात मृत्यू होतो आणि त्यांच्या या अपघातावर विधिमंडळात चर्चाही करु दिली जात नाही. याबाबत विस्तृत चर्चेची मागणी कालच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांच्याकडं केली होती. आज हा स्थगन प्रस्ताव स्वीकारून अजितदादांच्या अपघातावर विस्तृत चर्चा होईल अशी अपेक्षा होती. पण अध्यक्षांनी हा स्थगन प्रस्ताव नाकारला आणि विधानसभेत इतर विषयांवर बोलण्याची अनुमती दिली. या ज्वलंत विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला असता बोलूही दिलं गेलं नाही, याचा अर्थ काय? यावरुन या अपघातामागे नक्कीच कोणती तरी एखादी मोठी शक्ती असल्याचा आमचा संशय असून या निर्णयामुळं आमच्या संशयाला एकप्रकारे पुष्टीच मिळत आहे. सरकारने अजितदादांच्या अपघाताच्या विषयाला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मात्र हा विषय सोडणार नाही… अजितदादांना न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करतच राहू, असे त्यांनी म्हटले आहे. आमचा आवाज दाबला जात आहे रोहित पवार यांनी या प्रकरणी पत्रकारांशीही संवाद साधला. त्यातही त्यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, आमचा आवाज दाबला जात आहे. अजितदादांविषयी आम्ही जेव्हा केव्हा बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्हाला बोलू दिले जात नाही. त्यावरून आपल्याला समजून घ्यावे लागेल की, सत्तेतल्या लोकांनाच यावर चर्चा करायची नाही. हा अपघात का घातपात? यावर चर्चा होऊ दिली जात नसेल तर सत्ताधाऱ्यांपैकीच कुणीतरी एक असा व्यक्ती आहे जो दादांच्या अपघाताला जबाबदार असू शकतो. या व्यक्तीचे नाव बाहेर येऊ नये, त्याबद्दलची चर्चा होऊ नये, यासाठीच आम्हाला एफआयआर करू दिला जात नाही. आम्हाला चर्चाही करू देत नाही. या प्रकरणी सीबीआयकडे अजून प्रस्ताव पाठवला गेला नाही. पण सत्ताधाऱ्यांपैकी एक पक्ष (राष्ट्रवादी) स्मरणपत्रावर स्मरणपत्र पाठवत आहे. अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याला न्याय देता नसेल, तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवाल रोहित पवार यांनी या प्रकरणी उपस्थित केला.
१ एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्पादनासाठी लागणा-या कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक्स तसेच वाहन क्षेत्रातील अनेक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अलीकडील काळात […] The post १ एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दिल्लीत अग्निकांड; ९ जणांचा होरपळून मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या दक्षिण-पश्चिम भागातील पालम परिसरामध्ये एका व्यावसायिक आणि निवासी इमारतीला अचानक मोठी आग लागल्याची भयंकर घटना घडली. या दुर्दैवी दुर्घटनेत निष्पाप तीन बालकांसह एकूण ९ जणांना आपला जीव गमवावा लागला. सध्या अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमाने आग विझविण्यात आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, साध नगरमधील या बहुमजली इमारतीच्या सर्वांत […] The post दिल्लीत अग्निकांड; ९ जणांचा होरपळून मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरून राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात दुःखद निधनानंतर निवडणूक बिनविरोध करण्याची कोणतीही परंपरा नाही. अपवादात्मक परिस्थिती वगळता राजकीय भूमिका घेऊनच निवडणुका लढवल्या जातात, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे. सपकाळ यांच्या या भूमिकेमुळे बारामतीची निवडणूक बिनविरोध होणार की गाजणार, याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी एका विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या बारामतीत विधानसभा मतदारसंघात 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तीन दिवसांपूर्वीच या निवडणुकीची घोषणा केली. अजित पवारांच्या दुर्दैवी निधनामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असा दावा केला जात होता. तसे सर्वच राजकीय पक्षांनी संकेतही दिले होते. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसने येथून अजित पवार यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विधानसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमके काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? महाराष्ट्रात दुःखद निधनानंतर बिनविरोध निवडणूक करण्याची कुठलीही परंपरा नाही. अपवादात्मक काही किरकोळ गोष्टी सोडल्या, तर सर्वसाधारणपणे ज्या ज्या ठिकाणी पोटनिवडणुका होतात, त्या ठिकाणी दोन्ही बाजुंनी निवडणूक लढली जाते. नांदेडमध्ये खासदार म्हणून वसंतराव चव्हाण हे निवडून आले होते. त्यांच्या मृत्युनंतर ज्या निवडणुका झाल्या, त्यात भाजपने आपला उमेदवार उतरवला होता. त्यामुळे अशा पद्धतीची परंपरा नाही, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत. निवडणुका झाल्यास त्यात वावगे काही नाही अजितदादांचा मृत्यू हा दु:खद आणि धक्कादायक नक्कीच आहे. मात्र निवडणुकीच्या अनुषंगाने यामध्ये अशी परंपरा नसल्यामुळे आणि हा एक राजकीय परिस्थिती असल्यामुळे यामध्ये निवडणुका होण्यामध्ये कुठल्या प्रकारची हरकत नसावी. सर्वसाधारणपणे राजकीय भूमिका घेऊनच निवडणुका होतात. यावेळी देखील निवडणुका झाल्या तर त्यात चुकीचे किंवा वावगे काही नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत. शरद पवार गटाशी कोणतीही चर्चा नाही विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बारामती पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहेत. यावर भाष्य करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, राष्ट्रवादी शरद पवार गटाशी थेट स्वरुपात तशा पद्धतीची चर्चा झालेली नाही. ऐकीव माहितीच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. निवडणूक बिनविरोध होण्याला विरोध असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अशापद्धतीची परंपरा नाही. शेवटी राजकीय भूमिका यामध्ये महत्त्वाची आहे. आता राजकारण बरेच पुढे चालले गेलेले आहे. त्यामुळे पक्ष म्हणून काही भूमिका घ्याव्या लागतात.
२१ एप्रिलपासून राज्यातील १७ लाख कर्मचारी संपावर
मुंबई : प्रतिनिधी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेसह आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या २१ एप्रिलपासून राज्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचारी, शिक्षकांसह १७ लाख कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. याबाबत आजच सरकारला नोटीस देण्यात आल्याची माहिती समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिली. सरकारी कर्मचारी-शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्मचारी संघटनांसोबत वेळोवेळी झालेल्या चर्चेत अनेक मागण्या […] The post २१ एप्रिलपासून राज्यातील १७ लाख कर्मचारी संपावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
युद्धामुळे भाजीपाला-फळांचे दर घसरले
ठाणे : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धस्थितीचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठांवरही दिसून येऊ लागला आहे. राज्यातील मुख्य भाजी बाजारात याचे स्पष्ट परिणाम जाणवत असून काही भाज्यांच्या दरांमध्ये लक्षणीय घसरण झाली आहे. निर्यातीसाठी जाणारा भाजीपाल्याचा माल सध्या मोठ्या प्रमाणात थांबला असल्याने काकडी, दुधी भोपळा, कारली यांसारख्या भाज्यांचा साठा स्थानिक बाजारात वाढला आहे. परिणामी या भाज्यांचे दर साधारण […] The post युद्धामुळे भाजीपाला-फळांचे दर घसरले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्यामागे उबाठा खासदारांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे गटातील जवळपास निम्माहून अधिक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत हालचालींना वेग आला आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन आगामी रणनीतीवर चर्चा केली आहे. या भेटीचा मुख्य अजेंडा ठाकरे गटाच्या खासदारांचा शिंदे गटात प्रवेश हाच असल्याचे बोलले जात आहे. संसदेत आपले संख्याबळ वाढवणे आणि संघटनात्मक मजबुतीसाठी शिंदेंनी हे विशेष मिशन हाती घेतल्याचे बोलले जात आहे.केवळ चर्चाच नव्हे, तर शिंदेंनी या खासदारांच्या नावांची यादी तपासून कायदेशीर तज्ज्ञांशीही सल्लामसलत केली आहे, जेणेकरून पक्षांतराच्या वेळी कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये अशी माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, या चर्चेवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. आमचे निष्ठावान लोकप्रतिनिधी कुठेही जाणार नाहीत. ज्यांनी घोटाळे केले आहेत, तेच ईडी-सीबीआयच्या भीतीने तिकडे गेले आहेत. आमच्या खासदारांना विकासनिधी दिला जात नसल्याने अडवणूक केली जात आहे, असा आरोप राऊतांनी केला आहे. ठाकरे गटाचे 'हे' 9 खासदार रडारवर जर हे पक्षांतर झाले, तर ठाकरे गटाला लोकसभेत मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे 2024 मध्ये 9 खासदार निवडून आले आहेत. अरविंद सावंत (दक्षिण मुंबई),अनिल देसाई (दक्षिण मध्य मुंबई),संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई),संजय जाधव (परभणी),ओमराजे निंबाळकर (धाराशिव),भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी), राजाभाऊ वाजे (नाशिक), संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम), नागेश पाटील-आष्टीकर (हिंगोली) यापैकी नेमके कोणते खासदार शिंदेंच्या रडारवर आहेत हे नेमके समोर आलेले नाही. शिंदे सेनेचे हे खासदार आलेत निवडून डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (कल्याण), नरेश गणपत म्हस्के(ठाणे), रवींद्र दत्ताराम वायकर (मुंबई उत्तर पश्चिम), श्रीरंग अप्पा चंदू बारणे (मावळ), प्रतापराव गणपतराव जाधव – (बुलढाणा) संदीपनराव आसाराम भुमरे –(संभाजीनगर),धैर्यशील संभाजीराव माने(हातकणंगले), हे खासदार शिंदेंच्या नेतृत्वात निवडून आले आहेत. जर उबाठाचे खासदार शिंदेंसोबत आले तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची दिल्लीत ताकद वाढू शकते.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शासकीय संगणक टायपिंग परीक्षेचा (जीसीसी-टीबीसी) विद्यार्थ्यांना सराव करता येण्यासाठी पहिल्यांदाच लर्निंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअरची (एलएमएस) निर्मिती करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना त्यांनी प्रवेश घेतलेल्या संस्थेत सराव चाचण्या (मॉक टेस्ट) देता येणार आहे. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी याबाबत माहिती दिली. आयुक्त महेश चोथे, उपसंचालक प्रिया शिंदे या वेळी उपस्थित होत्या. या प्रणालीद्वारे ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्न, संगणक टंकलेखन सराव आणि परीक्षा, ऑनलाइन शिक्षण, उपस्थिती प्रणाली नोंद, विद्यार्थ्यांचा प्रगती अहवाल आणि कामगिरीचे विश्लेषण, त्वरित निकाल, अनाधिकृत प्रवेश टाळणे शक्य होणार आहे. डॉ. बेडसे म्हणाले, संगणक टायपिंग परीक्षेसाठी राज्यभरात सुमारे 3 हजार केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये ही संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्रचालकांच्या प्रतिसादानुसार विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीने शिकता येणार आहे. प्रणालीमध्ये सराव केल्यामुळे विद्यार्थ्यांची गती आणि अचूकता, लेखन आणि संवादकौशल्य वाढण्यास मदत होईल. सराव चाचण्यांमुळे परीक्षेची भीती कमी होईल. परिणामी निकालाची टक्केवारी वाढण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर त्यांना प्रणालीचा लॉगीन आणि पासवर्ड दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना संबंधित केंद्रात जाऊनच त्याचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे गैरप्रकारांनाही चाप बसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' याला बलात्कार आणि भोंदूगिरी प्रकरणी अटक झाल्यानंतर आता या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या 'छत्रछाये'खालीच अशा भामट्यांचे उद्योग सुरू आहेत, असा घणाघाती आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची अप्रत्यक्ष मागणी देखील केली आहे. एका ३५ वर्षीय महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट १ ने अशोक खरातला अटक केली. खरातच्या ताब्यातून पोलिसांनी एक पेनड्राइव्ह जप्त केला असून, त्यात ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी अशोक खरात याच्याकडे जात होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या अशोक खरात याच्या संस्थेवर पदाधिकारी म्हणून आहेत. यावरून सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नेमके काय म्हणाल्या सुषमा अंधारे? सुषमा अंधारे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या, कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली खरात याच्यावर बलात्कार योन शोषण यासारखे आरोप आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर तटकरे चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे... अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचे लोक चर्चा करत आहेत. सुषमा अंधारे म्हणाल्या, विशेष यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता. विशेष; खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीने आवभगत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते. आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे, पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रूपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार? कारण अशा भामट्या ज्योतिष्यासाठी स्वतः छत्री घेऊन चाकणकर उभ्या आहेत, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी विराजित आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंगपिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे...? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई : प्रतिनिधी राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झाला असून गारपीटने मोठे नुकसान झाले. भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा मोठा इशारा दिला. पुढील काही तास धोक्याचे असणार आहेत. काल राज्यातील अनेक भागात मोठी गारपिट झाली. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सतत मोठे बदल होताना दिसत आहेत. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. […] The post राज्यात गारपीटचे संकट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विधानसभेत आज एक वेगळाच प्रसंग घडला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी मनरेगाच्या मुद्यावर बोलताना सरकारला धारेवर धरले. त्यात त्यांनी सरकारला तुम्ही लोकांचे जय श्रीराम करायचे ठरवले आहे का? अशी मिश्कील कोपरखळी मारली. त्यावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी त्यांच्याकडे जय श्रीराम बोलण्याचा आग्रह धरला. यामुळे सभागृहात काही वेळ चांगलाच तणाव निर्माण झाला. त्याचे झाले असे की, आमदार भास्कर जाधव यांनी आज सभागृहाच्या कामाजाला सुरूवात झाल्यानंतर मनरेगा योजनेतील मजुरांच्या थकीत पगारावरून सरकारला धारेवर धरले. मनरेगाच्या मजुरांचे पैसे 4-4 वर्षे का रोखले जातात? तुम्ही लोकांचे जय श्रीराम करायचे ठरवले आहे काय? असा खडा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला. त्यांचे हे विधान ऐकताच मागच्या बाकावर बसलेल्या भाजप आमदार देवयानी फरांदे तत्काळ पहिल्या बाकावर येऊन बसल्या. त्यांनी भास्कर जाधव यांच्या भाषणात व्यत्यय निर्माण करत त्यांना जय श्रीराम बोलण्याचा आग्रह धरला. पहिल्या रांगेत बसल्याने पहिल्या रांगेचे अधिकार मिळत नाहीत - नार्वेकर यावेळी भास्कर जाधव यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरही त्यांनी आपले म्हणणे पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. जाधवांच्या भाषणात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर जाधवांनी संरक्षण मागितल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फरांदे यांना चांगलेच खडेबोल सुनावले. देवयानी फरांदे ताई, तुम्ही जागेवर जाऊन बसा. तुम्ही पहिल्या रांगेत येऊन बसलात म्हणजे तुम्हाला पहिल्या रांगेचे अधिकार मिळालेले नाहीत. तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा, असे ते म्हणाले. मॅडम, तुमच्याकडून शिक्षण घेण्याची माझी प्रज्ञा नाही - जाधव विधानसभा अध्यक्षांनी आमदार फरांदे यांना फटकारल्यानंतर भास्कर जाधव यांनीही त्यांना जोरदार टोला हाणला. मॅडम, तुमच्याकडून शिक्षण घेण्याची माझी प्रज्ञा नाही. तुमची विद्वत्ता एवढी मोठी आहे की, ती मला परवडणारी नाही, असे ते म्हणाले. त्यानंतर मजुरांच्या प्रश्नावर सरकार समाधानकारक उत्तर देत नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला. सरकार मजुरांच्या कल्याणासाठी कटिबद्ध या गदारोळातच संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी सरकार मजुरांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून या योजनेसाठी निधी प्राप्त झाला आहे. आता एका महिन्याच्या आत सर्व मजुरांची देणी दिली जातील. सरकार मजुरांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. विरोधक या प्रकरणी केवळ राजकारण करत आहेत, असे ते म्हणाले.
पुण्यात सदाशिव पेठेत इमारतीचा भाग कोसळला:अग्निशमन दलाकडून दहा रहिवाशांची सुटका
सदाशिव पेठेतील जुन्या तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळून दहा रहिवासी अडकल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तासाभराच्या प्रयत्नानंतर दहा रहिवाशांची सुटका केली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. सदाशिव पेठेतील चारुदत्त अपार्टमेंट या तीन मजली इमारतीतील सीमा भिंत, गॅलरी, जिन्याचा काही भाग मध्यरात्री कोसळला. या इमारतीत पाच महिलांसह दहा रहिवासी अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर भवानी पेठेतील मुख्य अग्निशन केंद्रातून रेस्क्यू व्हॅन, जनता वसाहत अग्निशमन केंद्रातील बंब, तसेच जवान घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस, महापालिकेच्या घरपडी विभागाचे अभियंता घटनास्थळी पोहोचले. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर आणि जवानांनी मदतकार्य सुरू केले. शिडी, सुरक्षा पट्टा (सेफ्टी बेल्ट), दोरीचा वापर करुन जवानांनी सीताबाई बागल (वय 70), शुभम बागल (वय 23), वनमाला बागल (वय 45), सुनंदा निरगुणे (वय 52), संकेत बागल (वय 23), सुरेश बागल (वय 60), स्वप्नील बागल (वय 24), चारुशीला कुलकर्णी (वय 52), रुपाली माने (वय 49), कमलाकर माने (वय 55) यांनी सुटका केली, तसेच जेनी नावाच्या श्वानाची सुटका करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर यांनी दिली आहे.
पुणे कँटोन्मेंट बोर्डातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीत विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळात माजी नगरसेवक दिलीप गिरमकर, भारतीय जनता पार्टी पुणे कॅंटोन्मेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष विनायक काटकर, उपाध्यक्ष शशी पूरम आणि चिटणीस विशाल ओव्हाळ यांचा समावेश होता. केंद्रीय मंत्र्यांनी पुणे कँटोन्मेंटमधील नागरिकांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकार सकारात्मक भूमिका घेईल, असा विश्वास शिष्टमंडळाला दिला. या बैठकीत कँटोन्मेंट क्षेत्रातील नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. यामध्ये वाढीव चटई क्षेत्र (एफएसआय) किमान २.५ पर्यंत वाढवण्याची प्रमुख मागणी होती. यामुळे नागरिकांना बांधकामासाठी मोठा दिलासा मिळेल, असे शिष्टमंडळाने स्पष्ट केले. तसेच, केंद्र व राज्य सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना आणि शहरी गरीबांसाठीच्या योजनांसारख्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ कँटोन्मेंटमधील नागरिकांना मिळावा, यासाठीही पाठपुरावा करण्यात आला. कँटोन्मेंट बोर्डाच्या विकासासाठी जीएसटीचे थकीत सुमारे १००० कोटी रुपयांचा परतावा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. ही रक्कम मिळाल्यास प्रलंबित विकासकामे गतीने पूर्ण होऊ शकतील, असे नमूद करण्यात आले. याव्यतिरिक्त, २०१९ पासून थकीत असलेले कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्ती वेतन, ग्रॅच्युटी तसेच सातव्या वेतन आयोगाचे हप्ते तातडीने देण्याची गरज असल्याचे प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी अधोरेखित केले. प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी कँटोन्मेंटमधील जमिनींच्या वारसाहक्क हस्तांतरणाचे प्रलंबित प्रश्न, पुढील पिढ्यांकडे जागा हस्तांतरित करताना येणाऱ्या अडचणी, भाड्याने दिलेल्या जागांची वक्फ जमिनी म्हणून झालेली नोंदणी, तसेच अनेक जागांमधील पोटभाडेकरू आणि अनधिकृत बांधकामे यावर प्रकाश टाकला. शाळेच्या बांधकामासाठी परवानगी न मिळणे आणि घरांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून लष्कर विभागाकडे ढकलले जाणे, यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित राहत असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्र्यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांशी बोलून तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी-337 व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी श्री क्षेत्र तुळापूर येथील समाधीस्थळी जावून अभिवादन केले आणि समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, बापुसाहेब पठारे, जिल्हा परिषद सदस्य किरण साकोरे, मोनिका हरगुडे, पंचायत समिती सदस्य, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपविभागीय अधिकारी यशवंत माने, अपर तहसीलदार तृप्ती कोलते, शिरुरचे तहसील बाळासाहेब म्हस्के, वढू.बु. चे सरपंच कृष्णा आरगडे, तुळापुरच्या प्रशासक संरपच ॲड. गुंफा इंगळे आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुळापूर येथे आयोजित मुकज्योत पदयात्रेत गावकऱ्यांसोबत सहभागी झाल्या.तुळापूर येथील संगमस्थळी जावून संगमेश्वराचे दर्शन घेतले. तुळापूर स्मारकाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या विविध विकासकामांबाबत माहिती घेवून ही कामे दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या पवार यांनी सूचना दिल्या. स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त वाहतूक बदल वढू बुद्रुक येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. 17 मार्च 2026 रोजी रात्री 10 ते दि. 18 मार्च 2026 रोजी रात्री 10.00 पर्यंत परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 115 अन्वये दिले आहेत. कोरेगाव भिमा बाजूकडून चाकण-पाबळकडे जाणारी अवजड वाहतूक कोरेगाव भिमा-सणसवाडी-शिक्रापूर-गॅस फाटा-वाजेवाडी चौफुला मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच चाकण-पाबळकडून पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक वाजेवाडी चौफुला-गॅस फाटा-शिक्रापूर-सणसवाडी-कोरेगाव भिमा मार्गे वळविण्यात येईल. कोरेगाव भिमा बाजूकडून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना संस्थेजवळील ठरविण्यात आलेल्या स्टॉपेज पॉईंटच्या पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच चाकण व पाबळ मार्गे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना वढू-वाजेवाडी चौफुला मार्गावरील पार्किंग स्टॉपेज पॉईंटच्या पुढे जाण्यास परवानगी राहणार नाही. मात्र व्ही.व्ही.आय.पी., व्ही.आय.पी. तसेच शासकीय वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मोदी कुटुंबाची सून होणार श्रद्धा कपूर?
मुंबई : प्रतिनिधी अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धाच्या लग्नाच्या जोरदार चर्चा आहेत. पटकथालेखक राहुल मोदीला ती डेट करत असून हे दोघे लग्नाचा विचार करत असल्याचे म्हटले गेले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रद्धाची मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी दिलेले उत्तर […] The post मोदी कुटुंबाची सून होणार श्रद्धा कपूर? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ठाणे पोलिसांनी बुधवारी कुख्यात गँगस्टर रवी पुजारी याला बंगळुरूतून ताब्यात घेतले. त्याच्यावर खंडणी उकळण्यासह इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला लवकरच कोर्टात दाखल करण्यात येणार आहेत. 1989 मध्ये गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवणारा गँगस्टर रवी पुजारी याने 1995 मध्ये भारतातून परदेशात पळ काढला होता. तो तेथूनच आपल्या हस्तकांमार्फत भारतातील विविध शहरांत गुन्हेगारी कारवाया करत होता. येथील हस्तक त्याला माहिती पुरवत होते. या माहितीच्या आधारावर रवी पुजारी बांधकाम व्यवसायिकांना खंडणीसाठी धमकावत होता. काही वर्षांपूर्वी त्याने मुंबईलगतच्या ठाण्यातील एक नगरसेवकाला खंडणीसाठी धमकी दिली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी पुजारीच्या अनेक हस्तकांना अटक केली होती. त्यानंतर आता त्यालाही ताब्यात घेतले आहे. आफ्रिकेतील सेनेगल येथून झाली होती अटक भारतीय तपास यंत्रणांनी रवी पुजारी याला 2019 मध्ये पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक केली होती त्यानंतर त्याला भारतात आणले होते सध्या तो बंगळुरू येथील एका कारागृहात शिक्षा भोगत होता. ठाणे पोलिसांनी बंगळुरूला जाऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर हे पथक आज ठाण्यात दाखल झाले. आता पोलिस लवकरच त्याला न्यायालयात हजर करणार आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, ठाण्यातील कासारवडवली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या एका जुन्या प्रकरणात चौकशीसाठी रवी पुजारीला ताब्यात घेतले आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत रवी पुजारी याच्या विरोधात 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने काही वर्षांपूर्वी रवी पुजारीच्या दिल्ली स्थित दोन बहिणींनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर काही दिवस खंडणीसत्र थांबल्याचे चित्र होते. रवी पुजाराविरोधात 2016 मध्ये रेड कॉर्नर नोटीसही काढण्यात आली होती. त्याच्यावर मुंबईसह गुजरात, कर्नाटक, दिल्ली आदी ठिकाणी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गत महिन्यात अडकला होता लिफ्टमध्ये दुसरीकडे, रवी पुजारी याला गत महिन्यात मुंबई पोलिसांनी कोर्टात हजर केले होते. तेव्हा तो मकोका कोर्टाच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकला होता. पोलिस पथक रवी पुजारी याला चौथ्या मजल्यावरून पाचव्या मजल्यावर घेऊन जात असताना, अचानकच न्यायालयाच्या इमारतीमधील लिफ्ट बंद पडली. ती चौथ्या व पाचव्या मजल्यादरम्यान थांबली. यावेळी पोलिस पथक व रवी पुजारी हे लिफ्टच्या आत अडकले होते. काही क्षणांसाठी परिस्थिती तणावपूर्ण बनली होती; परंतु पोलिसांनी तत्परता दाखवत, त्वरित न्यायालय परिसरातील लिफ्ट ऑपरेटरला पाचारण केले. त्यानंतर तांत्रिक पथक व लिफ्ट ऑपरेटरने लिफ्टला हळूहळू पाचव्या मजल्याच्या दिशेने वर उचलले. लिफ्टचे दरवाजे अंशतः उघडता यावेत, यासाठी त्यांनी तिला साधारणपणे अर्ध्या उंचीपर्यंत वर सरकवले. पोलिसांनी आपल्या सुरक्षा व्यवस्थेची अत्यंत काटेकोरपणे आखणी केली. त्यानंतर लिफ्टच्या आत अडकलेल्या प्रत्येकाला, एकामागून एक, काळजीपूर्वक बाहेर काढले. लिफ्टमध्ये उपस्थित असलेल्या सशस्त्र पोलिस कर्मचाऱ्यांनी यावेळी परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण राखले होते. यामुळे सुरक्षेत कोणत्याही प्रकारची कसूर झाली नाही.
राज्यात महिला आणि लहान बालिकांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नसून, संगमनेरमध्ये सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुरडीवर झालेला ॲसिड हल्ला हा अत्यंत संतापजनक आहे. राज्यात पोलिसांचा धाक उरला आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात उपस्थित केला. स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या घटनेचे गांभीर्य आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने चर्चा करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, संगमनेरमधील ज्या चिमुरडीवर हल्ला झाला ती गंभीर आहे. इतकी मोठी घटना घडूनही आरोपी अजूनही मोकाट कसा? आरोपींना पळून जाण्याची हिंमत मिळतेच कशी? हे गृहखात्याचे आणि स्थानिक पोलिसांचे अपयश आहे. पोलिस अधीक्षक भ्रष्टाचारात गुंतलेले यावेळी वडेट्टीवार यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. संबंधित पोलीस अधीक्षक हे गुन्हेगारांना पकडण्याऐवजी भ्रष्टाचारात गुंतले आहेत. ते रायगडमध्ये असतानाचे त्यांचे 'कर्तृत्व' सर्वांना माहित आहे. जेव्हा रक्षकच भ्रष्ट होतात, तेव्हा गुन्हेगारांचे धाडस वाढते आणि अशा क्रूर घटना घडतात, असा आरोप त्यांनी केला. सरकारची केवळ बघ्याची भूमिका गृहखात्याचा पोलिसांवर वचक राहिलेला नाही. राज्यात लहान मुलींच्या शोषणाच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे, मात्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे,अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभा अध्यक्षांनी या घटनेची दखल घेतली. दिलेली माहिती अत्यंत गंभीर असून शासनाने या प्रकरणाची तातडीने नोंद घेऊन सभागृहात सविस्तर निवेदन करावे,असे निर्देश अध्यक्षांनी सरकारला दिले आहेत.
दगडूशेठ गणपती मंदिराचा 42 वा वर्धापनदिन:गुढीपाडव्यापासून संगीत महोत्सव, दिग्गज कलाकारांची उपस्थिती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या 42 व्या वर्धापनदिनानिमित्त संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्यापासून, म्हणजेच 19 ते 23 मार्च या कालावधीत हा महोत्सव पुणेकरांसाठी खुला असेल. हा संगीत महोत्सव दररोज सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. या महोत्सवात दिग्गज कलाकारांसह युवा कलाकारांचे सादरीकरण अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली. गुढीपाडव्याला, 19 मार्च रोजी सायंकाळी 4.45 वाजता गणेशपूजनाने कार्यक्रमाला प्रारंभ होईल. त्यानंतर सायंकाळी 6.45 वाजता महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. पहिल्या दिवशी सायंकाळी 5 वाजता पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा आणि तारपा पथकाचा तारपा वादन व नृत्याचा कार्यक्रम सादर होईल. तर, दुसऱ्या सत्रात सायंकाळी 7 वाजता ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके व सहकाऱ्यांचा 'फिटे अंधाराचे जाळे' हा कार्यक्रम रसिकांना अनुभवता येईल. शुक्रवार, 20 मार्च रोजी पं. उपेंद्र भट आणि सहकाऱ्यांचा 'गुरु गणेश' हा सांगीतिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर नंदेश उमप आणि 75 कलाकारांचे सादरीकरण असलेला 'मी मराठी' हा विशेष कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. शनिवार, 21 मार्च रोजी खंडेराव मुळे आणि सहकाऱ्यांचा 'स्वरायात्रा' हा कार्यक्रम सादर होईल. दुसऱ्या सत्रात कुणाल गांजावाला लाईव्ह इन कॉन्सर्टचा आनंद पुणेकरांना घेता येणार आहे. रविवार, 22 मार्च रोजी नटरंग अॅकॅडमीतर्फे 'त्रिपुंड' हा कार्यक्रम सादर होईल. त्यानंतर माणिक वर्मा फाऊंडेशन निर्मित 'अमृताहुनी गोड' या कार्यक्रमात राणी वर्मा, वंदना गुप्ते, भारती आचरेकर, शैला दातार, सावनी दातार, निलाक्षी पेंढारकर, दीपिका जोग आणि ह्रदया दातार यांचे सादरीकरण पुणेकरांना अनुभवायला मिळेल. महोत्सवाची सांगता सोमवार, 23 मार्च रोजी होणार आहे. पहिल्या सत्रात स्वरप्रज्ञा पं. मिलिंद रायकर आणि यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन जुगलबंदीने कार्यक्रमाची रंगत वाढेल. तर, दुसऱ्या सत्रात पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या 'भावसरगम' या स्वरमैफलीने महोत्सवाची यशस्वी सांगता होईल. रसिकांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटर समोरील नू.म.वि. मराठी शाळा येथे करण्यात आली आहे. हा संगीत महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, पुणेकरांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
अंध महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार गंगा कदम यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शासकिय सेवेत सामावून घेण्याची गुड न्यूज मिळणार आहे. त्यासाठी उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आमदार संतोष बांगर, आमदार राजेश नवघरे, गंगा कदम यांनी भेटली. त्यांनीही अधिवेशनानंतर पाहूत असा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अंध महिलांचा विश्वचषक विजेच्या भारतीय संघाची उपकर्णधार गंगा कदम यांचा राज्यभरात ठिकठिकाणी गौरव झाला. त्यांच्या घरची परिस्थिती लक्षात घेता त्यांना शासकिय नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार हेमंत पाटील यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार क्रिडा विभागाने गंगा कदम यांच्या शासकि सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव दोन महिन्यापुर्वीच शासनाकडे सादर केला आहे. मात्र अद्यापही या प्रस्तावावर निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यानंतर मुंबई येथे उपमु्ख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आमदार संतोष बांगर, आमदार राजेश नवघरे, उपकर्णधार गंगा कदम यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी गंगा कदम यांनी अंध महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत विश्वचषक जिंकण्यासाठी महत्वाची भुमीका बजावली असून त्या संघाच्या उपकर्णधार असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांना सांगितले. राज्यातील इतर खेळाडू प्रमाणेच त्यांनाही शासकिय सेवेत सामावून घ्यावे यासाठी प्रस्ताव क्रीडा विभागामार्फत शासनाकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी गंगा कदम यांचे कौतूक करून त्यांच्या शासकिय सेवेच्या प्रस्तावाबाबत अधिवेशनानंतर निर्णय घेतला जाईल असा सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे पुढील काही दिवसांतच गंगा कदम यांना शासकिय सेवेत सामावून घेतल्याचे पत्र मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पूर्णा पाटबंधारे विभागाच्या येलदरी व सिध्देश्वर धरणातून पाणी पुरवठा योजनेसाठी देण्यात आलेल्या पाण्यापोटी तब्बल 74.39 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. त्यामुळे आता पाटबंधारे विभागाने परभणी, हिंगोली, वसमतसह सहा पाणी योजनांचा पाणी पुरवठा खंडीत करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे शहरी भागातील नागरीकांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्णा पाटबंधारे विभागाच्या येलदरी व सिध्देश्वर धरणातून परभणी, पूर्णा, जिंतूर, हिंगोली, वसमत, सेनगाव शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी दिले जाते. यामध्ये परभणी, जिंतूरसाठी येलदरी धरणातून तर पूर्णा, हिंगोली, सेनगाव, वसमतसाठी सिध्देश्वर धरणातून पाणी दिले जाते. त्यासाठी परभणी महानगर पालिका व इतर नगर पालिका प्रशासनाने पाणीपट्टीचा भरणा करणे अपेक्षीत आहे. मात्र मागील सहा ते सात वर्षापासून परभणी महानगर पालिकेसह नगर पालिकांनी 100 टक्के पाणीपट्टीचा भरणा केलाच नाही. दरम्यान, पूर्णा पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी पाणी पट्टी भरणा करण्यासंदर्भात नोटीस दिल्या जातात. त्यानंतर कार्यालयाकडून पार्ट पेमेंट करून उर्वरीत रक्कमेचा मात्र भरणा करणे टाळले जाते. त्यामुळे दरवर्षी थकीत व चालु पाणीपट्टी याचा आकडा कोट्यवधींच्या घरात गेला आहे. सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टीच्या रकमेतून प्रकल्पाच्या सिंचन व्यवस्थेचा खर्च भागवावा अशा सूचना असतांना पाणीपट्टीची शंभर टक्के वसूली होत नसल्याने व्यवस्थापनाचा खर्च कसा करावा असा प्रश्नही पाटबंधारे विभागासमोर उभा राहिला आहे. या प्रकारानंतर पूर्णा पाटबंधारे विभागाने परभणी पालिकेसह नगर पालिकांना नोटीस पाठविली असून तातडीने पाणीपट्टीची रक्कम भरावी अन्यथा पाणी योजनेचा पाणी पुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसांतच पालिका प्रशासनाने पाणीपट्टीचा भरणा न केल्यास नागरीकांना निर्जळीचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे. पाणी योजनांकडे असलेली थकबाकी परभणी महानगर पालिका (रहाटी बंधारा) 48.55 कोटी, येलदरी जलाशय 10.43 कोटी, पूर्णा नगर पालिका 9.36 कोटी, हिंगोली 2.74 कोटी, जिंतूर 1.95 कोटी, वसमत 1.05 कोटी तर सेनगाव नगर पंचायतीकडे 31.81 लाख रुपयांची पाणीपट्टी थकली आहे. 100 टक्के वसुली मिळणे अपेक्षीत ः पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता रुखमानंद गरुड म्हणाले की, येलदरी व सिध्देश्वर जलाशयातून पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी दिले जाते. मात्र महानगर पालिका व नगर पालिकांकडून दरवर्षी 100 टक्के पाणीपट्टी भरलीच जात नाही. त्यामुळे प्रशासनाला अडचणी येत आहेत. यावर्षी सर्वांनाच नोटीस पाठविण्यात आल्या असून 100 टक्के वसूली मिळणे अपेक्षीत आहे. पाणीपट्टीचा भरणा न केल्यास पाणी पुरवठा खंडीत केला जाणार आहे.
स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र-तंत्र आणि धार्मिक विधींच्या नावाखाली महिलेवर अत्याचार करणाऱ्या अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' याला नाशिक पोलिसांनी बुधवारी (१८ मार्च) पहाटे अटक केली. मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी आणि प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातच्या या कृत्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संशयित खरात याला आज जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. विशेष म्हणजे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी अशोक खरात याच्याकडे जात होते पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, अशोक खरातने आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा केला होता. मंत्र-तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला ऑफिसमध्ये बोलावून गुंगीकारक पदार्थ खायला दिले आणि तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार २०२२ पासून ते डिसेंबर २०२५ पर्यंत सातत्याने सुरू होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने अशोक खरातला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील साहित्याची झडती घेतली. यावेळी पोलिसांच्या हाती एक पेनड्राइव्ह लागला असून, त्यात तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटींच्या संदर्भातील चित्रीकरण असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस आता या व्हिडीओंच्या सत्यतेची पडताळणी करत आहेत. राजकीय वलय आणि 'शिवनिका' संस्थान अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील 'श्री ईशान्येश्वर मंदिर' (शिवनिका संस्थान) चा अध्यक्ष आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना या मंदिराला भेट दिली होती, तेव्हापासून अशोक खरात प्रसिद्धीच्या झोतात आला होता. विशेष म्हणजे, या संस्थेच्या विश्वस्त पदावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नाव असल्याचे समजते.अनेक मोठे राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी आणि चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी भविष्य जाणून घेण्यासाठी त्याच्याकडे जात असत. आता आपल्याच संस्थेच्या अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने रूपाली चाकणकर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोण आहे हा 'कॅप्टन' अशोक खरात? अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असून त्याने २२ वर्षांच्या कारकिर्दीत १५४ देशांचा प्रवास केल्याचा दावा केला आहे. 'कॉस्मॉलॉजी'च्या नावाखाली तो लोकांचे भविष्य सांगत असे. त्याच्याकडे अनेक बडे राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी, सेलिब्रिटी आणि नामवंत उद्योजक मार्गदर्शनासाठी जात असत. विज्ञानाचा आधार घेत तो लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत असल्याचे आता पोलिस तपासात स्पष्ट होत आहे.
नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज सभागृहात केला. चंद्रपूर मधील ब्रम्हपुरी मतदारसंघात तस्करांना पकडणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना एका नेत्यांकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जाते आणि तस्करांना सोडवण्यासाठी दबाव टाकला जातो, असे धक्कादायक वास्तव वडेट्टीवार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तर काळात मांडले. चंद्रपूर येथील सागवान तस्करी बाबत वडेट्टीवार यांनी सभागृहात एका ताज्या घटनेचा दाखला देताना सांगितले की, चार दिवसांपूर्वी माझ्या मतदारसंघात वनविभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्याने सागवान लाकडाने भरलेले दोन ट्रॅक्टर पकडले होते. मात्र, एका स्थानिक नेत्याने थेट वनविभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना आई-बहिणीवरून घाणेरड्या शिव्या दिल्या. या दबावाखाली अधिकाऱ्यांना जप्त केलेले ट्रॅक्टर आणि आरोपींना सोडावे लागले. ही साधी चोरी नसून शस्त्रांसह फिरणाऱ्या संघटित टोळ्यांचा हा धंदा आहे असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला. नक्षलग्रस्त भागात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी त्यांना शस्त्रे पुरवण्यात यावीत. तसेच या तस्करांचे, संबंधितांचे मोबाईल CDR तपासल्यास राज्यातील मोठ्या सागवान तस्करी रॅकेटचा उलगडा होईल अस वडेट्टीवार म्हणाले. वनमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन याची दखल घेत वनमंत्री यांनी ज्या अधिकाऱ्यांनी दबावाखाली येऊन तस्करांना सोडले, त्यांची चौकशी करून त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल हे स्पष्ट केले. तसेच या घटनेतील परिसरातील CCTV फुटेज आणि संशयितांचे CDR तपासून या रॅकेटचा शोध घेतला जाईल. जर यामागे एखादी टोळी किंवा गुंडांच्या फौजा असतील, तर त्यांचा बंदोबस्त करून हे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त केले जाईल, असे उत्तर वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांत अध्यक्षपद कुणाला द्यायचे? यावर एकमत होत नसल्याने भाजप-सेनेत ठरत नसल्याने आपल्याकडे अध्यक्षपद रहावे यासाठी राजकारण सुरू झाले आहे. यातच शिवसेना उबाठा नेते अंबादास दानवे यांनी आज मोठे विधान केले आहे. आमच्या पक्षाचे काही सदस्य आमच्या संपर्कात नाहीत, हे मी कबूल करतो; पण या निवडणुकीत ठाकरे गट पूर्णपणे तटस्थ राहणार असल्याचे जाहीर केले आहे. या अंबादास दानवे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत ठाकरे गट तटस्थ राहणार आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत आम्ही कुणालाही मतदान न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही सदस्य आमच्या संपर्कात नाहीत हे ही मी कबुल करतो, त्यांना मी व्हीप तर पाठवला आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्यास कारवाई पक्षविरोधी कारवाई केल्यास अपात्रतेची कारवाई करण्यात येईल. - अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, उबाठा सदस्यांना अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासन भाजप आणि शिवसेनेने फोडलेल्या सदस्यांना सभापतीपदासह विविध समित्यांवर घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. काही सदस्यांना अतिरिक्त निधी देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. काही सदस्यांना त्यांच्या व्यवसायात व्यत्यय निर्माण करण्याच्या धमक्याही दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदस्यांना आपल्याकडे घेण्यासाठी या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्यात आला आहे. अध्यक्षपदासाठी भाजप-सेनेत वाद जिल्हा परिषदमध्ये सर्वाधिक जागा निवडून आणत भाजप मोठा भाऊ ठरला. त्यामुळे युतीमध्ये भाजपलाच सुरुवातीची अडीच वर्षे अध्यक्षपद मिळावे यासाठी भाजप आग्रही होता. शिवसेनेनेही पहिल्या अडीच वर्षांसाठी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे युतीची चर्चा फिस्कटली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंगळवारी रात्री मध्यस्थीचे प्रयत्न केले. हे प्रयत्न यशस्वी झाल्यास महायुतीचा अध्यक्ष बसेल. अन्यथा दोन्ही पक्षांनी फोडलेल्या सदस्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2017 मध्ये भाजपच्या सर्वाधिक 23 जागा निवडून आल्या होत्या. भाजपने स्वतःचा अध्यक्ष बसवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले होते. त्याचीच पुनरावृत्ती यावेळीही होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपचाच अध्यक्ष बसणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर चर्चा सुरू आहे. महायुतीमध्ये भाजपचाच अध्यक्ष बसणार आहे. युती झाली नाही तर भाजपने स्वबळावर अध्यक्ष बसवण्यासाठी तयारी केलेली आहे. - आ. अनुराधा चव्हाण, भाजप शिंदेंचे आदेश अंतिम पक्षनेते एकनाथ शिंदेंचा निर्णय अंतिम असेल. युतीबाबत चर्चा सुरू आहे. स्वबळावर अध्यक्ष बसवण्यासाठीही आम्ही पूर्ण तयारी करून ठेवली आहे. पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. ते जे आदेश देतील त्याप्रमाणेच आमची भूमिका असेल. - आमदार विलास भुमरे, शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर विधिमंडळात चर्चा होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणावर चर्चा रोखण्यामागे कोणीतरी प्रभावशाली शक्ती असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. अजित पवारांच्या अपघात आणि घातपाताबद्दल आज दुपारी १२ वाजता आमचे स्थगन येणार आहे. आता विधानसभा अध्यक्ष या स्थगनवर चर्चा होऊ देतात का? हे बघावे लागणार आहे, असे रोहित पवार म्हणालेत. अजित पवार यांच्या विमान अपघातावर विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चा व्हावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. याबाबत रोहित पवार यांनी काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट देखील घेतली होती. यासंदर्भात ते म्हणाले, काल विधानसभा अध्यक्षांना भेटून अजितदादांच्या अपघाताबद्दल चर्चा अशी विनंती केली. तसेच लक्षवेधी लावण्याची विनंती केलेली आहे. विधिमंडळाकडे प्रस्ताव गेलेला आहे, परंतु अजून तो मान्य झालेला नाही. रोहित पवार म्हणाले, आज दुपारी १२ वाजता अजित पवारांच्या अपघात आणि घातपाताबद्दल आमचं स्थगन येणार आहे. आता विधानसभा अध्यक्ष या स्थगनवर चर्चा होऊ देतात का? हे बघावे लागणार आहे. जर पूर्ण अधिवेशनात हे सरकार अजित पवारांच्या अपघातावर चर्चा करू देणार नसेल, तर मग कुणीतरी पॉवरफुल व्यक्ती, एखादी मोठी संघटना किंवा ताकद अजित पवारांच्या अपघातामागे आहे. ही चर्चा होऊ नये याची दक्षता सत्ताधारी मुद्दामहून करत आहे, असे आपल्याला म्हणावे लागेल. अल्पकालीन चर्चेसाठी सुद्धा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. त्या चर्चेबद्दल देखील काय होते? हे बघावे लागेल. विधिमंडळात आमदारांना रस उरला नाही रोहित पवार म्हणाले, या अधिवेशनामध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला पाहिजे, ती होत नाहीये. ती चर्चा होत नसल्यामुळे आमदारांना इथे येऊन चर्चा करण्यामध्ये रसच राहिला नाही. आपले विधिमंडळ सर्वात मोठे न्याय देणारे विधिमंडळ आहे. पण आमदारांनाच इथे यावे वाटत नसेल, त्यांचा आवाज दाबला जात असेल किंवा त्यांना बोलू देत नसतील, तर मग या महाराष्ट्रावर अन्याय होतो असे आपल्याला म्हणावे लागेल. एकदा मंत्री नाही म्हणून कामकाज तहकूब होते. नंतर दोन तीन मंत्री आहेत, पण बोलण्यासाठी कुणी नाही म्हणून तहकूब होते. अशी या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची परिस्थिती आहे. व्हीएसआरला वाचवण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्या विमान अपघातावर विधिमंडळात चर्चा व्हावी अशी मागणी केली जात आहे. मात्र, विधानसभेसह विधान परिषदेतही याबाबत चालढकल केली जात असल्याचे दिसून येत आहे. याचा अर्थ व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न काही सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. ज्या पद्धतीने व्हीएसआरला वाचवले जात आहे, त्यावरून आमच्या मनात जी शंका होती की कुणीतरी सत्ताधारीच अजितदादांच्या घातपाताच्या मागे आहे. ही शंका दृढ होत चालेली आहे. अजितदादांच्या अपघाताचा तपास सरकारलाच नकोय? आम्हाला साधा एफआयआर करायचा होता, पण या महाराष्ट्रात तो देखील करू दिला नाही. सीबीआयला प्रस्ताव द्या अशी मागणी अजित पवारांच्या पक्षाने केली. दुर्दैवाने तो पक्ष सत्तेत असून सुद्धा सीबीआयच्या चौकशीबद्दल काय झाले? याबाबत स्मरणपत्र द्यावे लागले. आम्ही दिल्लीत चर्चा केली असता, आम्हाला कळाले की महाराष्ट्राकडून दादांच्या अपघाताबद्दल तपास करण्याची विनंती सीबीआयला करा असे सांगण्यात आले होते, तसं कुठलेही पत्र महाराष्ट्र शासनाकडून सीबीआयकडे गेलेले नाही. म्हणजे महाराष्ट्रातील सरकारलाच अजितदादांच्या अपघाताचा तपास योग्य पद्धतीने व्हावा, अशी कदाचित इच्छा नाहीये, असे आपल्याला म्हणावे लागेल.
अहिल्यानगर येथे इयत्ता 6 वीत शिकणाऱ्या चिमुरडीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याने महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्य सरकारकडे कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. जरी केंद्र सरकारने 'भारतीय न्याय संहितेत' (BNS) शक्ती कायद्यातील काही तरतुदींचा समावेश केला असला, तरी ॲसिड हल्ला आणि सायबर क्राईमसारख्या गुन्ह्यांसाठी महाराष्ट्राचा स्वतंत्र 'शक्ती' कायदा अस्तित्वात असणे आवश्यक आहे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. घटनेचा आढावा घेताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, स्थानिक महिलांच्या तक्रारीनुसार छोट्या रस्त्यांवर मुला-मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे शाळांच्या परिसरातील रस्त्यांवर सीसीटीव्ही बसवणे आणि 'दामिनी पथकाची' गस्त वाढवणे अनिवार्य आहे. ॲसिडच्या विक्रीवर आणि उपलब्धतेवर कडक निर्बंध आणण्याबाबत सभागृहातही चर्चा झाल्याचे त्यांनी नमूद केले. 'सेफ्टी ऑडिट' आणि प्रशासकीय जबाबदारी सार्वजनिक ठिकाणी महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी गृह, शिक्षण, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने एकत्रितपणे 'सेफ्टी ऑडिट' करणे गरजेचे आहे. या संदर्भात वेळोवेळी सूचना देऊनही अशा घटना घडणे चिंताजनक असल्याचे नीलम गोऱ्हेंनी सांगितले. विकृत मानसिकतेचा निषेध अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याशी चर्चा करून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश गोऱ्हे यांनी दिले आहेत. सूड भावना किंवा समाजात भीती निर्माण करण्यासाठी शाळकरी मुलीला लक्ष्य करणे ही विकृती आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. सत्ताधारी ही घटनाच नाकारतील संजय राऊत म्हणाले की, अहिल्यानगरमध्ये जो ॲसिड हल्ला झाला तो झालाच नाही असे मुख्यमंत्री सभागृहात सांगतील. आमच्या काळात लेकीबाळी सुरक्षित आहेत, त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही, विरोधक खोटा प्रचार करता आहेत असे उत्तर सत्ताधारी पक्षाकडून येतील. देवेंद्र फडणवीस यांचा अर्धावेळ हा दिल्लीत जातो. त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांचा वेळ हा दिल्लीत जातो त्यांना राज्यात लक्ष घालायला वेळ कुठे आहे. नेमके काय घडले? शाळा सुटल्यानंतर सायकलने घराकडे निघालेल्या इयत्ता सहावीतील 12 वर्षीय विद्यार्थिनीवर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने ॲसिड फेकून गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना सोमवारी तालुक्यातील एका गावात घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून विद्यार्थिनी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 12 वर्षीय विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात होती. त्याच वेळी हा हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी मुलीला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तेथून तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. पक्ष म्हणून थेट न लढता केवळ सदस्य फोडण्याचे किळसवाणे राजकारण मध्यरात्री भिवंडी बायपासला सुरू होते. खोक्यांच्या 'साव'लीत घेण्याचा 'अतुलनीय' प्रयत्न अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी नाव न घेत भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे यांच्यावर निशाणा साधला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बसवण्यासाठी शिवसेना, भाजपने उद्धवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य फोडले आहेत. पहिल्या अडीच वर्षांत अध्यक्षपद कुणाला द्यायचे? यावर एकमत होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही पक्षांनी आपल्या सदस्यांसह फोडलेले सदस्य दौऱ्यावर नेले आहेत. आज निवडणुकीच्या वेळेपूर्वी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत सत्ताधाऱ्यांकडून दुसऱ्या पक्षाचे सदस्य फोडले जात असल्याचा आरोप केला आहे. अंबादास दानवे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये रोहन कुलकर्णी नामक एका अधिकाऱ्याचा थेट उल्लेख केला आहे. एरव्ही अपारंपरिक ऊर्जेची एजंटगिरी करताना दिसणारा हा अधिकारी काल भिवंडी बायपासला आमच्या पक्षाचे शिलेदार शोधत फिरत होता. त्याच्या पोतडीत ईडी (ED), खोके आणि आश्वासनांचे गारूड अशा अनेक गोष्टी होत्या, अशी बोचरी टीका अंबादास दानवे यांनी केली. सदस्य फोडण्याचा भाजपचा किळसवाणा प्रकार सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना अंबादास दानवे म्हणाले की, एककडे ३० खोक्यांचा विकास आणि तीन खोके अधिक देऊन साहेबांनी एका सदस्यावर 'प्रहार' केला, तर दुसरीकडे कोणाला आश्वासनांचे चॉकलेट देत ही टोळी फिरत होती. पक्ष म्हणून थेट बोलायचे नाही आणि केवळ सदस्य फोडत सुटायचे, हाच किळसवाणा प्रकार 'भाडोत्री' जनता पार्टी काल रात्रीही करत होती. 'अशा निवडणुका नकोतच' फोडाफोडीच्या या गलिच्छ राजकारणामुळे अंबादास दानवे यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. अशा पद्धतीने जर निवडणुका लढवल्या जाणार असतील, तर नको ती निवडणूक आणि नको ती जिल्हा परिषद! अशा शब्दांत त्यांनी आपली हतबलता आणि संताप व्यक्त केला. सावेंनी प्रहारच्या सदस्याला ३० कोटींची काम दिले दरम्यान, भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे यांनी प्रहारच्या एका सदस्याला मतदानासाठी ३० कोटी रुपयांचे काम दिल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी नुकताच केला होता. अंबादास दानवे म्हणाले, खरं खोटे मला माहीत नाही. अतुल सावेंनी प्रहारच्या एका सदस्याला एका मतासाठी ३० कोटी रुपयांच्या कामाचे पत्र दिले. २ कोटी, ३ कोटी घ्या असे सांगत भाजपचे कित्येक सदस्य आमच्या लोकांकडे आले. हे लोक जिल्हाध्यक्ष किंवा तालुकाध्यक्षांकडून न येता मंत्र्यांकडून येतात. एकेका माणसाला २ कोटी, ३ कोटी एवढे पैसे कुठून देतात? हा माझा प्रश्न आहे. अतुल सावेंचे दानवेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर मंत्री अतुल सावे यांनी देखील अंबादास दानवे यांच्या आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले, आमचा कोणताही माणूस त्यांना भेटलेला नाही. आमची कुणाशीही चर्चा नाही. माझा कोणता माणूस किंवा अधिकारी त्यांना भेटतोय, त्याचे नाव अंबादास दानवे यांनी सांगितले पाहिजे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एका 6 वीत शिकणाऱ्या चिमुकलीवर भरदिवसा ॲसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना या मुलीवर हा भ्याड हल्ला करण्यात आला. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. . या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. एकीकडे, घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक (SP) स्वतः घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी 10 विशेष पथके तैनात केली आहेत. आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी दिले आहे. तर दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेवरून सरकारवर बोचरी टीका केली आहे. राज्याचे गृहमंत्री दिल्लीवारीमध्ये व्यस्त असल्याने लेकीबाळी सुरक्षित नाहीत, असा टोला लगावत त्यांनी सत्ताधारी हा हल्लाच नाकारतील किंवा विरोधकांचा खोटा प्रचार म्हणतील, अशी भीती व्यक्त केली आहे. सरकारचे 'झिरो टॉलरन्स' धोरण या प्रकरणावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक (SP) स्वतः घटनास्थळी दाखल झाले आहेत. आरोपीला लवकरात लवकर बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी 10 विशेष पथके तैनात केली आहेत. आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या संपूर्ण प्रकरणावर वैयक्तिक लक्ष ठेवून आहेत. बालकांच्या सुरक्षेबाबत सरकारची भूमिका ही 'झिरो टॉलरन्स'ची आहे. मी स्वत: पीडितेच्या आईशी संवाद साधला आहे. पीडित मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेच्या कुटुंबाला शासनाकडून सर्वतोपरी मदत आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्यात येतील. सत्ताधारी ही घटनाच नाकारतील- राऊत संजय राऊत म्हणाले की, अहिल्यानगरमध्ये जो ॲसिड हल्ला झाला तो झालाच नाही असे मुख्यमंत्री सभागृहात सांगतील. आमच्या काळात लेकीबाळी सुरक्षित आहेत, त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही, विरोधक खोटा प्रचार करता आहेत असे उत्तर सत्ताधारी पक्षाकडून येतील. देवेंद्र फडणवीस यांचा अर्धावेळ हा दिल्लीत जातो. त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांचा वेळ हा दिल्लीत जातो त्यांना राज्यात लक्ष घालायला वेळ कुठे आहे. नेमके काय घडले? शाळा सुटल्यानंतर सायकलने घराकडे निघालेल्या इयत्ता सहावीतील 12 वर्षीय विद्यार्थिनीवर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने ॲसिड फेकून गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना सोमवारी तालुक्यातील एका गावात घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून विद्यार्थिनी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 12 वर्षीय विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात होती. त्याच वेळी हा हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी मुलीला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तेथून तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. रस्त्यात अडवून विचारले घर येथेच आहे का? मी नेहमीप्रमाणे माझी शाळा सुटल्यानंतर घराकडे जात होते. तेव्हा ओढ्याजवळ पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या एका मुलाने मला अडवून तुझे घर येथेच आहे का, असे विचारले. आणि मला काही कळायच्या आत हल्लेखोराने चेहऱ्यावर ॲसिड फेकले. त्यानंतर माझा ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील अनेक नागरिक मदतीसाठी धावले, मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाला होता. - पीडिता. आरोपीला अटक करून कठोर कारवाईची मागणी घटनेची माहिती मिळताच कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी प्रवरा रुग्णालय, लोणी येथे भेट देऊन जखमी विद्यार्थिनीची विचारपूस केली. तसेच मुलीच्या आई व नातेवाइकांना धीर देत आरोपीस लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
नमस्कार! राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत आजही विविध महत्त्वाचे कामकाज व चर्चा होणार आहे. त्यात सत्ताधारी व विरोधकांत वेगवेगळ्या मुद्यांवरून आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत राज्याच्या आर्थिक धोरणांवर महत्त्वपूर्ण चर्चा रंगत आहे. या अधिवेशनातील प्रत्येक क्षणावर आमची नजर असून, सर्वात वेगवान व अचूक अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. खाली वाचा अधिवेशनाशी संबंधित आमचे विशेष लाईव्ह अपडेट्स...
जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे वेगात पूर्ण करण्यासाठी अपूर्ण कामांना गती देण्यात येईल, यासाठी विभागीय आयुक्तांना अतिरिक्त अधिकार देण्यात येत असल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. मंत्रालयात राज्याच्या विविध भागांतील पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, आमदार बालाजी किनीकर, आमदार सुहास बाबर, आमदार अतुल भोसले, आमदार सत्यजित देशमुख (दूरदृश्यप्रणालीद्वारे), तसेच अंबरनाथच्या नगराध्यक्ष तेजश्री करंजुले-पाटील उपस्थित होत्या. याशिवाय प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव रंगा नायक आणि मुख्य अभियंता प्रशांत भामरे हेही उपस्थित होते. गळती रोखण्यासाठी विशेष पथक अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा मिळावा यासाठी गळती रोखण्यासाठी विशेष पथक नेमण्याचे, अनधिकृत नळजोडणी व पाण्याचा अपव्यय रोखण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पाणीपुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उपअभियंत्यांच्या नियुक्त्या करण्याचेही आदेश देण्यात आले. अंबरनाथ शहरातील पाणीपुरवठा नियमित व पुरेसा करण्यासाठी त्रुटी शोधून तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील 467 पाणी पुरवठा योजनांपैकी 197 योजना पूर्ण झाल्या असून 138 योजना 75 टक्के पूर्णत्वास आल्या आहेत. या योजनांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून अपूर्ण कामांना गती देण्यासाठी विभागीय आयुक्तांना अतिरिक्त अधिकार देण्यात आले आहेत. महावितरणची कारवाई टाळण्यासाठी उपाययोजना दरम्यान, पाणी पुरवठा योजनांची वीज बिले थकीत असल्यामुळे महावितरणकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत, जेणेकरून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ नये. यासाठी राज्यस्तरावर स्वतंत्र धोरण आखले जाणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. शिराळा तालुक्यातील योजनांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि तासगाव तालुक्यांतील पाणी पुरवठा योजनांची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कामांचा वेग वाढविण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व निधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेच्या 6 व्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून, यामुळे 54 हून अधिक गावांना पाणी मिळणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. उंडाळे पाणी पुरवठा योजनेतील त्रुटी दूर करणार सातारा जिल्ह्यातील उंडाळे पाणी पुरवठा योजनेबाबत तातडीने कार्यवाही करून त्रुटी दूर करण्याचे निर्देश देण्यात आले. या योजनेतून काले, धोंडेवाडी, जखिणवाडी, कोयना वसाहतसह 50,000 हून अधिक लोकसंख्येला शाश्वत पिण्याचे पाणी मिळणार आहे. उर्वरित 20 टक्के निधी मिळाल्यास ही योजना लवकरच पूर्ण होणार आहे. जलजीवन मिशन अंतर्गत अंबरनाथ, दापोली, शिराळा, मंडणगड, खेड, कराड, उंडाळे तसेच सांगली जिल्ह्यातील आटपाडी, तासगाव आणि खानापूर येथील पाणी पुरवठा योजनांबाबत संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सविस्तर आढावा घेण्यात आला.
देशभरातील विरोधी पक्षातील खासदारांची कोंडी केल्या जात आहे. ओडिसामध्ये निवडणूक झाली तिथे भाजपने कोणाला निवडून आणले तर दिलीप रे ज्यांनी घोटाळ्यामध्ये शिक्षा भोगली त्यांना तुम्ही निवडून आणत आहात, पण ज्यांना लोकांनी निवडून आणले त्यांची कोंडी करण्यात येत आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, आमच्या पक्षाच्या आमदारांना-खासदारांना कोणत्याही प्रकारचा निधी दिला जात नाही. संविधान वापरणाऱ्या लोकशाहीत केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रशासनाला स्पष्ट सूचना आहेत की विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीच्या कामांची दखल घ्यायची नाही. जसे काय यांच्या बापाचा पैसा आहे त्यांनी भांडी घासून हा पैसा जमा केला आहे तिजोरीमध्ये, जनतेच्या पैसा आहे, विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी असलेल्या भागाचा सुद्धा विकास झाला पाहिजे. पण मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यात की विरोधी पक्षाच्या लोकांना निधी द्यायचा नाही. सत्ताधारी ही घटनाच नाकारतील संजय राऊत म्हणाले की, अहिल्यानगरमध्ये जो ॲसिड हल्ला झाला तो झालाच नाही असे मुख्यमंत्री सभागृहात सांगतील. आमच्या काळात लेकीबाळी सुरक्षित आहेत, त्यांच्या केसाला धक्का लागणार नाही, विरोधक खोटा प्रचार करता आहेत असे उत्तर सत्ताधारी पक्षाकडून येतील. देवेंद्र फडणवीस यांचा अर्धावेळ हा दिल्लीत जातो. त्यांच्या उपमुख्यमंत्र्यांचा वेळ हा दिल्लीत जातो त्यांना राज्यात लक्ष घालायला वेळ कुठे आहे. घोटाळे करणारेच त्यांच्याकडे जातील संजय राऊत म्हणाले की, भाजप आणि त्यांच्या पक्षाच्या गळाला केवळ घोटाळे केलेले लोकप्रतिनिधी लागू शकतात. ज्यांच्यावर खून, दरोडे असे आरोप आहेत तेच लोकं यांच्या गळाला लागू शकतात. शिंदे, पवारांचे मार्गदर्शक दिल्लीत संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचे नेते दिल्लीमध्ये नेहमीच येत असतात. हे दोन्ही पक्ष अमित शहांनी स्थापन केलेले पक्ष आहेत. ते भाजपचे अंगवस्त्र आहेत. अजित पवारांचा पक्ष हा काही शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष नाही, किंवा शिंदेंचा गट हा काही बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष नाही. नरेंद्र मोदी अमित शहा, निशिकांत दुबे हे त्यांचे मार्गदर्शक आहेत, म्हणून त्यांना दिल्लीत यावे लागते. शहा आणि मोदी यांनी या लोकांचे मांजरं केली आहेत. शिंदे गटाचत ऑपरेशन सुरू संजय राऊत म्हणाले की, भाजपकडे सत्ता आणि मोठ्या प्रमाणात पैसा आहे, तपास यंत्रणा, निवडणूक यंत्रणा आहे, याचा गैरवापर करत ही लोकं आमिष दाखवतात हे फार काळ चालत नाही. दिल्लीला मोघल काळापासून फार मोठा इतिहास आहे. या ठिकाणी जी जी लोकं काही ऑपरेशन करायला आली त्यांना निर्वस्त्र होत आपल्या राज्यात परतावे लागले. या दिल्लीतून कधीना कधी प्रत्येकाला जावे लागते, ही दिल्ली कुणाची नाही. हे ऑपरेशन टायगर करायला येणाऱ्या लोकांनी समजून घेतले पाहिजे. त्यांच्या गटात ऑपरेशनचे काम सुरू आहे, ते दिल्लीतून सुरू आहे. कुणावर राजकीय चिखलफेक करणं योग्य नाही, पण काहीतरी घडतंय, त्यांचा स्फोट होऊ शकते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात राणे कुटुंब आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात वितुष्ट निर्माण करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहेत. अशा प्रकारे 'काड्या' लावून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्यांनी वेळीच सावध व्हावे, असा इशारा राज्याचे मंत्री नीतेश राणे यांनी विरोधकांना दिला आहे. कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेत राणे कुटुंबाच्या एकजुटीचा पुनरुच्चार केला. कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी कुडाळ येथील एसटी डेपो मैदानात भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो समर्थकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यात बोलताना नीतेश राणे यांनी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. आपल्या भाषणात नीतेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विशेष कौतुक केले. रवींद्र चव्हाण हे अतिशय स्वच्छ मनाचे गृहस्थ आहेत. मात्र, काही लोक सातत्याने आमच्या कुटुंबामध्ये आणि चव्हाण यांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करत आहेत. नगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या काळात अशा 'कॉमन' लोकांचा वावर वाढतो, जो जिल्ह्याच्या विकासासाठी घातक आहे. ही दरी निर्माण करण्याचे प्रयत्न आता थांबले पाहिजेत, असे नीतेश राणे यांनी स्पष्टपणे सांगितले. कणकवलीतील लढतीवर मिश्किल भाष्य कणकवली नगरपरिषदेच्या निकालावर बोलताना नीतेश राणे यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. निवडणुकीत पराभव झाला की दुःख होतेच, पण माझा पराभव नीलेश राणेंच्या समोर झाला, त्यामुळे मला त्याचे काहीच वाटत नाही. शेवटी राणेंच्या समोर राणेच जिंकले आहेत, असे मिश्किल भाष्य त्यांनी केले. सिंधुदुर्गची जनता आणि खासदार नारायण राणे यांचे नाते अतूट असून ते अधिक घट्ट करण्याचे काम आम्ही करत आहोत, असेही त्यांनी नमूद केले. विकासाचा हिशोब अन् भविष्यातील रणनीती गेल्या चार वर्षांत खासदार नारायण राणे, आमदार नीलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापालट झाला आहे. निवडणुकीच्या काळात विरोधक केवळ गैरसमज पसरवण्याचे काम करतात, पण येत्या काळात त्यांचा हिशोब चुकता केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. विकासकामे आणि जनसंपर्काच्या जोरावर आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच बाजी मारेल, असा विश्वास नीतेश राणे यांनी व्यक्त केला. हे ही वाचा… तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर लक्ष:आधी काम करा, मगच पदाची अपेक्षा ठेवा; एकनाथ शिंदेंच्या खासदारांना कानपिचक्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. मात्र, या भेटीपेक्षाही सोमवारी रात्री दिल्लीत पार पडलेल्या शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीतील खलबतं अधिक चर्चेत आली आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या काही खासदारांची उपमुख्यमंत्र्यांनी कडक शब्दांत कानउघडणी केल्याची माहिती मिळत आहे. तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्या कामगिरीवर माझे बारीक लक्ष आहे; आधी काम सिद्ध करा आणि मगच पदाची अपेक्षा ठेवा, अशा सज्जड शब्दांत शिंदेंनी आपल्या सहकाऱ्यांना सुनावले. सविस्तर वाचा…
मुंबई पोलिस दलात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली. प्रेयसीच्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासाला आणि आत्महत्या कर, नाहीतर तुझी नोकरी घालवू अशा स्वरूपाच्या धमक्यांना कंटाळून या पोलिस शिपायाने पोलिस प्रशिक्षण केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केली. भैयासाब भीमराव व्हावळे असे पोलिस शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली प्रेयसीच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळचे नांदेड जिल्ह्यातील असलेले भैयासाब व्हावळे यांची ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई पोलिस दलात चालक पदावर निवड झाली होती. नव्या नोकरीचा आनंद असतानाच ते कलिना येथील केंद्रात आपले प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करत होते. मात्र, १५ मार्च रोजी सकाळी त्यांनी केंद्रातच गळफास घेतल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त केली असून, त्यामध्ये त्यांनी प्रेयसीच्या आई-वडिलांकडून सुरू असलेल्या मानसिक छळाबद्दल लिहिले आहे. सुसाईड नोटमधून छळाचा खुलासा मिळालेल्या माहितीनुसार, भैयासाब यांचे नांदेडमधील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांचा या नात्याला कडाडून विरोध होता. चिठ्ठीतील मजकुरानुसार, प्रेयसीच्या वडिलांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, तर तिच्या आईने त्यांचा मानसिक छळ करून त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले होते. तू जीव दे, नाहीतर तुझी नोकरी घालवू, अशा शब्दांत प्रेयसीच्या आईने त्यांना वारंवार धमकावले होते. या सततच्या तणावामुळे आणि नुकतीच मिळालेली नोकरी जाण्याच्या भीतीने भैयासाब व्हावळे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. प्रेयसीच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल भैयासाब यांचे वडील भीमराव व्हावळे यांनी वाकोला पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी प्रेयसीच्या पालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक अधिक तपास करत आहे. जप्त केलेली सुसाईड नोट ही भैयासाब यांच्याच हस्ताक्षरातील असल्याची प्राथमिक खात्री त्यांच्या वडिलांनी केली आहे. तरीही, अधिकृत पुरावा म्हणून पोलिसांनी ती फॉरेन्सिक लॅबकडे पाठवली आहे. हस्ताक्षराचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपींविरुद्ध अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
निवृत्त प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांच्या हत्येचा कट जानेवारी महिन्यातच रचला होता, अशी माहिती आता तपासात समोर आली आहे. आरोपी विशाल राठोडने लोंढे यांना अहिल्यानगरहून परतताना दारू पाजून त्यांचा काटा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्या दिवशी लोंढे यांना दारू चढली नाही म्हणून ते वाचले. नाही तर तेव्हाच घटना घडली असती. या खुनाच्या नियोजनासाठी आरोपीने आधीच वकिलांच्या भेटीगाठी घेऊन कायदेशीर पळवाटा शोधण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी (१७ मार्च) जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. आर. उबाळे यांच्यासमोर सुनावणी झाली. या वेळी आरोपींनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. न्यायाधीशांनी तपासणी केली. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी घाटीत पाठवले. या प्रक्रियेत तब्बल ५ तास विलंब झाला. प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे या गुन्ह्यात ॲट्रॉसिटीचे कलम वाढवण्यात आले. आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त अशोक राजपूत यांच्याकडे दिला आहे. न्यायालयात सरकार पक्षातर्फे सहायक लोकाभियोक्ता कैलास पवार यांनी बाजू मांडली. सुनावणीनंतर विशाल यास २२ मार्चपर्यंत पीसीआर तर दुसऱ्याला एमसीआर सुनावला. रीलस्टार महिलेसोबत लोंढे यांचे २५ लाखांचे व्यवहार या प्रकरणाला आता एका रीलस्टार महिलेच्या एन्ट्रीने वेगळे वळण मिळाले आहे. पोलिसांनी या महिलेला चौकशीसाठी बोलावले असता, तिचे बँक खाते तपासून मोठे धागेदोरे हाती लागले आहेत. २०२४ मध्ये प्राध्यापक लोंढे आणि या महिलेमध्ये तब्बल २५ लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलिस या आर्थिक व्यवहाराचा हत्येशी असलेला संबंध शोधत आहेत.
एमआयडीसी चिकलठाणापरिसरातील शहानगर, मसनतपूरयेथे पत्र्याच्या शेडमध्ये कारखाना उभारून एमडी ड्रग्ज तयारकरण्याचा कट एएनटीएफनेउधळला. सोमवारी १६ रोजी धडक कारवाई झाली. पोलिसांनी दोघांना अटक केली. ६५ ग्रॅम एमडीसहविविध रसायने, असा सुमारे ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त साहित्यावरून तब्बल २ किलोएमडी तयार करण्याचा त्यांचा डाव असल्याचे उघड झाले. रोशन रवींद्र कदम (३२), मयूर दीपक जाधव (२३), दोघेही रा.कोपरी, ठाणे पूर्व, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने दोघांना २३ मार्चपर्यंत पोलिसकोठडी सुनावली. ही माहिती उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी मंगळवारी दिली. पोलिस निरीक्षकगीता बागवडे यांना मसनतपूर येथीलगल्ली क्रमांक ५ मध्ये जावेद शेखयांच्या घरासमोरील मोकळ्या जागेतउभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्येबाहेरगावाहून आलेले दोघेजणएमडी तयार करत असल्याचीमाहिती मिळाली होती. दुपारीसाडेतीनच्या सुमारास पथकाने छापाटाकला. दोघेही डिस्टिलेशनप्रक्रियेद्वारे ड्रग्ज तयार करतानाआढळले. घटनास्थळावरून ६५ग्रॅम एमडी, राऊंड बॉटम फ्लास्क,कंडेन्सर, मिक्सर मशीन, प्लास्टिकड्रम व कॅन, लेबल नसलेल्यारसायनांच्या १२ बाटल्या, पावडरस्वरूपातील तीन बॉक्स, तीनमोबाइल फोन, इतर साहित्य जप्तकेले. चक्क केमिकल लॅबचा उभारला शेडमध्ये सेटअप छाप्यावेळी उभारलेली व्यवस्थापाहून पोलिसही चक्रावले.बाष्पीभवनासाठी चुलीवर ठेवलेलीभांडी, काचेचे कंडेन्सर, मिक्सरड्रिल मशीन, रसायनांचे ड्रम असाकेमिकल लॅबचा सेटअप होता. हेड्रग्ज बाजारात पोहोचले असते, तरशहरातील अनेक तरुणांचे आयुष्यधोक्यात आले असते. रॅकेटचेआणखी धागेदोरे शोधण्यासाठीएएनटीएफकडून तपास सुरू आहे.ही कारवाई विशेष पोलिसमहानिरीक्षक शारदा राऊत, पोलिसअधीक्षक अजित टिके,उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्यामार्गदर्शनाखाली निरीक्षक गीताबागवडे, एपीआय विजय जगदाळे,दीपाली पाटील या पथकाने केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. मात्र, या भेटीपेक्षाही सोमवारी रात्री दिल्लीत पार पडलेल्या शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीतील खलबतं अधिक चर्चेत आली आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या काही खासदारांची उपमुख्यमंत्र्यांनी कडक शब्दांत कानउघडणी केल्याची माहिती मिळत आहे. तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्या कामगिरीवर माझे बारीक लक्ष आहे; आधी काम सिद्ध करा आणि मगच पदाची अपेक्षा ठेवा, अशा सज्जड शब्दांत शिंदेंनी आपल्या सहकाऱ्यांना सुनावले. येत्या काही दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर, मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी शिवसेनेच्या काही खासदारांनी लॉबिंग सुरू केले आहे. मात्र, खासदारांच्या या भूमिकेवर एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, प्रत्येकाच्या कामाचे शास्त्रशुद्ध विश्लेषण केले जात आहे. पक्षाची आणि सरकारची बाजू सभागृहात किती प्रखरपणे मांडली जाते, यावरच पुढील सन्मान अवलंबून असेल. केवळ दिल्लीत उपस्थित राहणे पुरेसे नसून, सभागृहाच्या कामकाजात पूर्णवेळ सहभागी होऊन जनतेचे मुद्दे मांडण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. दुसरीकडे, शिवसेनेचे ज्येष्ठ खासदार राहुल शेवाळे यांच्या नाराजीची चर्चाही आता चव्हाट्यावर आली आहे. पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान असलेल्या शेवाळे यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, त्यांच्या मनात असलेल्या काही शंकांमुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थीची भूमिका घेतली. मंगळवारी रात्री सामंत हे स्वतः राहुल शेवाळे यांना सोबत घेऊन दिल्लीला रवाना झाले. तिथे त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. या महत्त्वपूर्ण भेटीनंतर शेवाळे यांची नाराजी दूर झाली आहे का, याबाबत अद्याप समजू शकले नाही. हे ही वाचा… संभाजीनगर जि.प.अध्यक्ष बसवण्यासाठी शिवसेना अन् भाजपने फोडले उद्धवसेना, रा.काँ.चे सदस्य:युतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मध्यस्थी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बसवण्यासाठी शिवसेना, भाजपने उद्धवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य फोडले आहेत. पहिल्या अडीच वर्षांत अध्यक्षपद कुणाला द्यायचे? यावर एकमत होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही पक्षांनी आपल्या सदस्यांसह फोडलेले सदस्य दौऱ्यावर नेले आहेत. आज निवडणुकीच्या वेळेपूर्वी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…
सद्गुरु हे भक्तांमध्ये आत्मिक शांती व आनंद निर्माण करतात. सद्गुरूच्या कृपेच्या दिव्य प्रकाशाने जीवनातील अज्ञानाचा काळोख दूर होऊन ज्ञानाच्या प्रकाशाची निर्मिती होत असते. त्यामुळे शाश्वत आनंदाच्या प्राप्तीसाठी सदगुरूची कृपा जीवनात आवश्यक असल्याचा हितोपदेश माजी प्राचार्य डॉ. वसुधा देव यांनी केला. भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानात ही सुरेख रचना करण्यात आली असून आपली संस्कृती ही अधिकार सांगणारी नसून दायित्व व कर्तव्य दर्शवणारी आहे, असेही त्या म्हणाल्या. त्या रामदासपेठ परिसरातील श्रीनाथ दत्त मंदिरात सोमवार पासून सुरू झालेल्या माधवनाथ महाराज जन्मोत्सव सोहळ्यात मार्गदर्शन करीत होत्या. डॉ. देव यांनी माधवनाथ महाराज यांचे तत्त्व विचार यावर प्रवचन देतांना ग्रंथाबाबत विवेचन केले. आपल्या प्रथम पुष्पात त्यांनी माधवनाथ महाराज यांच्या लोकनाथ सूत यांनी लिहिलेल्या दीपप्रकाश ग्रंथाबाबत मार्गदर्शन केले. सदगुरूकडे नेणारी वृत्ती ही पुण्य मार्गाकडे नेते तर त्यापासून परावृत्त करणारी वृत्ती पाप मार्गाकडे नेते. त्या म्हणाल्या, भगवंत व संताच्या अवताराचे काही प्रयोजन असते. सज्जनांचे रक्षण, दुष्टांचा नाश व धर्माचे पुनर्वसन प्राप्त करणे, समाजातील या संदर्भातील सुरू असलेले मत मतांतरे, अराजकता समाप्त करून पुन्हा संत व भगवंताचे आगमन होण्यासाठी ही रचना करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीच्या अधिष्ठानात ही सुरेख रचना करण्यात आली असून आपली संस्कृती ही अधिकार सांगणारी नसून दायित्व व कर्तव्य दर्शवणारी आहे असेही त्यांनी नमूद केले. आज भजन : १९ मार्चपर्यंत चालणाऱ्या जन्मोत्सवात बुधवार, १८ मार्च रोजी दुपारी ३ वाजता डाबकी रोड येथील स्वरादीती महिला भजनी मंडळाचे भजन होऊन सायंकाळी ७ वाजता वसुधा विनोद देव यांचे माधवनाथ महाराजांवर प्रवचन होणार आहे. या उत्सवात गुरुवार, १९ मार्च रोजी श्री माधवनाथ महाराज जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या दिनी सकाळी ६ वाजता पंचांग पूजन, वाचन व ध्वजारोहण होऊन माधवनाथ महाराज जन्मोत्सव गुलाल कार्यक्रम होणार आहे. सकाळी ७ वाजता श्री राज राजेश्वर रुद्र मंडळाचा लघु रुद्र सोहळा होणार आहे. दुपारी १२ वाजता आरती कार्यक्रम होऊन सायंकाळी ६ वाजता श्रीनाथ गीतांजली पूर्णारती भजन होणार आहे. उत्सव दरम्यान सायंकाळी ५.३० वाजता दैनिक उपासना करण्यात येणार आहे. ग्रंथ वाचन, चिंतनाने शाश्वत सुखाची अनुभूती मिळते गुरुभक्तीसाठी माधवनाथांचा हा ग्रंथ वाचून त्यावर चिंतन करून शाश्वत सुखाची अनुभूती प्राप्त करण्याचे आवाहन डॉ. देव यांनी केले. पूज्य माधवनाथ यांच्या आरती पसायदानाने या सत्राची सांगता झाली. दुपारी उत्सवात स्वरार्चना महिला भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम संपन्न झाला. सूत्रसंचालन श्रीनाथ दत्त मंदिराचे व्यवस्थापक वैभव धडाधडी यांनी केले.
संजय गांधी, श्रावण बाळ योजनेचे अनुदान डीबीटीद्वारे आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होत असल्याने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन लाभार्थींना आता आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आल्याने लाभार्थींनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन अकोट तहसीलदार सुनील चव्हाण व संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार सुधीर थेटे यांनी केले आहे. या योजनेत विधवा महिला, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, निराधार, सिकलसेलग्रस्त व्यक्तींना रोख अनुदान बँक खात्यामार्फत वितरित करण्यात येते, लाभार्थी हयात असल्याचे प्रमाणपत्र विहित नमुन्यात तहसील कार्यालयात किंवा ज्या बँकेतून अनुदान मिळते त्या बँकेत देण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे, अन्यथा पुढील अनुदान वितरित होणार नसल्याचे नायब तहसीलदार सुधीर थेटे यांनी सांगितले. या प्रमाणपत्रासोबत एक फोटो, आधार कार्डाची झेरॉक्स प्रत देणे आवश्यक आहे. ऐनवेळेवर होणारी धावपळ टाळण्यासाठी २८ मार्च पूर्वीच ही कारवाई पूर्ण करावी असेही थेटे यांनी सांगितले. राज्य सरकारने जानेवारीपासून प्रमाणीकरण केलेल्या लाभार्थ्यांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका आधार प्रमाणीकरण नसलेल्या लाभार्थींना बसला आहे. अकोट तालुक्यात मार्च २०२५ अखेर शासनाचे पोर्टलवर संजय गांधी योजनेचे १६ हजार ५५० तर संजय गांधी व इंदिरा गांधी योजनेचे ४ हजार ३० लाभार्थींचे आधार नोंदणी झाली असून शासनाचे पोर्टलवर आधार नोंदणी झालेल्या लाभार्थींचे आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात शासनाकडून मार्च अखेर थेट लाभ जमा करण्यात आला आहे. आधार, मोबाइल खात्याशी संलग्न करा आता आधार प्रमाणीकरण बंधनकारक केले असल्याने इथून पुढे आधार प्रमाणीकरण केलेल्या लाभार्थ्यांच्याच बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार आहे. तरी ज्या लाभार्थींनी अद्याप आधार कार्ड व मोबाईल बँक खात्याशी संलग्न केले नाही अशा लाभार्थींनी तत्काळ आधार कार्ड व मोबाईल बँक खात्याशी संलग्न करून आधार प्रमाणीकरण करण्यासाठी अकोट तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेत संपर्क साधावा, असे आवाहन नायब तहसीलदार सुधीर थेटे यांनी केले आहे. प्रमाणपत्र आवश्यक ^हयातीचे प्रमाणपत्र लाभार्थींनी ३१ मार्चपर्यंत जमा करायचे असल्याने ते ज्या बँकेतून पैसे मिळतात त्या बँकेत किवा तहसील कार्यालयात जमा करावे. ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र व आधार कार्ड जमा करण्याबाबत निर्देश असल्याने २४ मार्चपर्यंत तलाठी किवा तहसील कार्यालयात विशेष सेल उघडण्यात आला आहे. अन्यथा मानधन जमा होणार नाही . - सुधीर थेटे, नायब तहसीलदार, संजय गांधी विभाग.
आलेगाव तालुक्याच्या मातीतून घडलेल्या दोन मुलींच्या उल्लेखनीय यशाने संपूर्ण परिसर अभिमानाने भारावून गेला आहे. पातूर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची मुलगी रेणुका दिनेश केकन हिने यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले. आलेगाव येथील कष्टकरी शेतकऱ्याची मुलगी निशा गणेशराव ढोणे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून जिल्हा कृषी अधीक्षक या वर्ग-१ पदावर नियुक्ती मिळवली आहे. ग्रामीण भागातील या दोन कन्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल आलेगाव येथे मिरवणूक काढून जाहीर सत्कार करण्यात आला. पातूर तालुक्यातील दोन मुलींनी स्पर्धा परीक्षेत मिळवलेल्या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पातूर येथील जिल्हा परिषद शिक्षकाची मुलगी असलेल्या रेणुका दिनेश केकन यांनी परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर भारतीय प्रशासकीय सेवेत स्थान मिळवले. आलेगाव येथील निशा गणेशराव ढोणे हिने जिल्हा कृषी अधीक्षक या वर्ग-१ पदावर नियुक्ती झाली आहे. शेतकरी कुटुंबातील मुलीने कृषी विभागातील उच्च पद मिळवल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या दोघींच्या यशाचा गौरव करण्यासाठी आलेगाव ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात दोन्ही मुलींना बग्गीत बसवून शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी फुलांच्या वर्षावात आणि जयघोषात त्यांचे स्वागत केले. या मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणालाही कोणताही त्रास झाला नाही आणि वाहतूकही पूर्णपणे सुरळीत ठेवण्यात आली होती. यानंतर आयोजित जाहीर सत्कार समारंभात दोन्ही मुलींना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते विनोद वाघ होते, तर प्रमुख अतिथी म्हणून वाशीम येथील अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी सांगितले की, अधिकारी झाल्यानंतर जबाबदारी मोठ्या प्रमाणात वाढते. पद मिळवणे ही मोठी गोष्ट असली तरी त्या पदावर राहून जनतेला न्याय मिळवून देणे हेच खरे कर्तव्य असते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा, कोणालाही आपल्या वर्तनामुळे दुखावले जाऊ नये आणि प्रशासनाविषयी जनतेचा विश्वास अधिक दृढ व्हावा, याची अधिकारी म्हणून नेहमी जाणीव ठेवणे आवश्यक आहे. एकदा उच्च पदावर पोहोचल्यानंतर समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. लोकांच्या अपेक्षा वाढतात आणि त्यांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी ठरते. प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, कर्तव्यनिष्ठा या गुणांच्या आधारावर काम करत जनतेला न्याय देणे हे प्रत्येक अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे.
येथील महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेच्या (विवाहबंधन) महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्थानिक संत सांस्कृतिक भवन येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या महिला आघाडी प्रमुख निलीमा दीपक लोखंडे होत्या, तर उद्घाटन प्रादेशिक महिला आघाडी प्रमुख विजयश्री गणोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना निलीमा लोखंडे यांनी सांगितले कि, समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान महत्वाचे आहे. या कार्यक्रमात एपीआय प्रियंका कोठावार आणि ‘माहेर साहित्यरत्न' पुरस्कार प्राप्त डॉ. अश्विनी मडघे (वऱ्हेकर) यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच निलीमा लोखंडे, नगरसेविका वंदना मडघे, राजश्री जढाळे, अर्चना पाटील आणि कल्याणी तायडे यांचाही महिला आघाडीच्या वतीने गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा भुसारी यांनी केले, संचालन डॉ. सपना सिनकर यांनी तर आभार प्रदर्शन निलांबरी हाडोळे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. सोनाली भगत यांनी स्वागतगीत सादर केले. याप्रसंगी महिला आघाडीच्या सदस्यांनी महाराष्ट्रातील विविध उत्सवांचे अत्यंत देखणे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये ॲड. छाया मिश्रा (घाटोळ), मंगला चांदुरकर, वर्षा भुसारी, सविता घाटोळ, अर्पणा डहाके, मंदा धनोकार, भाग्यश्री टवलारे, शुभांगी फसाटे, वंदना कांडलकर, पल्लवी ओंकार, निलांबरी हाडोळे, माया खरबडे, जया खाजबागे, संगीता मालधुरे, सपना सिनकर, योगिता बुले, छाया दिंडेकर, सोनाली भगत, अंजली सारडे, सोनाली होले, जयश्री कडू, भारती बनकर, सुनीता जोल्हे आणि मिनल हरणे व इतर महिलांनी सहभाग नोंदवला. कलागुणांना वाव देण्यासाठी सहभाग सहभागी सर्व महिलांना संस्थेच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी सामूहिक नृत्य, एकल नृत्य, लावणी, नाटिका आणि वेशभूषा यांसारख्या कलाप्रकारांतून आपल्या सुप्त गुणांचे दर्शन घडवले. यावेळी बोलताना अध्यक्षीय भाषणात निलीमा लोखंडे यांनी समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान अविभाज्य असल्याचे नमूद केले. महिलांनी संघटित होऊन समाजात आपले स्थान निर्माण केले असून, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्था महिला दिन, विवाह-बंधन युवक-युवती परिचय मेळावा यांसारखे उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिनिधी | मोर्शी येथील नळा नदीवरील अर्धवट पुलाचे बांधकाम तत्काळ पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी १७ मार्चला स्थानिक नागरिक व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. आंदोलनादरम्यान वरुड-अमरावती मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेवटी प्रशासनाने हे काम आगामी १७ एप्रिलपर्यंत पूर्ण केले जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे सदर आंदोलन मागे घेण्यात आले. सदर पुलाच्या बांधकामासाठी काँग्रेसचे मोर्शी विधानसभाप्रमुख क्षणीत राऊत यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरुआहे. अखेर या आंदोलनाची दखल घेत आज जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान संबंधित प्रशासनाने १७ एप्रिलपर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या कामासाठी १६ मार्च २०२६ रोजी एलओए (लेटर ऑफ ॲक्सेप्टंस) निर्गमित करण्यात आले असून करार प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. पुलाच्या अपूर्ण बांधकामामुळे आतापर्यंत सुमारे १५ अपघात घडले असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी होती. दरम्यान दिलेल्या मुदतीत काम पूर्ण झाले नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा काँग्रेस पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात माजी पालकमंत्री ॲड. यशोमतीताई ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी नगरसेवक भूषण उर्फ सुनील कोकाटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मुरलीधर डहाणे, श्यामभाऊ कासार, अल्पनाताई बडोले, रमाताई इंगोले, मिलिंद कांबळे, समीरराव काळे, सचिन कोल्हे, आशिष गाडगे, मनीष ठाकरे, संजय कडूळकर, चंदू जाधव, श्याम ठाकरे, महेश राऊत, गजानन ढवळे, विजय झाडे, संदीप रोडे, डॉ. गजानन चरपे, निलेश तट्टे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. याच मागणीसाठी वर्धेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) खासदार अमर काळेही आक्रमक आहेत. दिल्लीत सुरु असलेल्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान त्यांनी हा मुद्दा लावून धरला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांना पत्र लिहले असून विशिष्ट वेळेच्या आंत हे काम पूर्ण करावे, अशी मागणी त्यातून केली आहे. पुलासोबतच निंभी येथील टोल नाका हटविला जावा, यासाठीही त्यांनी गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे. निंभीचा टोल नाका हा वरुड आणि मोर्शी या दोन्ही शहरातील नागरिकांसाठी केवळ भुर्दंड ठरला आहे. याकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष यावेळी ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, सरकार नको तिथे पैसे देत आहे. परंतु मुख्य मुद्द्यांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अजिबात लक्ष नाही. अमरावती जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे आजोळ आहे. पण त्यांचे इकडे लक्ष नाही. त्यांचे लक्ष केवळ नागपुरात आहे. आठ-आठ वर्षं या ठिकाणी कामे होत नाहीत, त्यामुळे आम्ही या सरकारचा निषेध करतो, या शब्दात त्यांनी सरकारचे वाभाडे काढले.
जिल्हा नियोजन व विकास समितीमधील संपूर्ण निधीचे वितरण करण्यात आले आहे. तसेच आवश्यक असलेल्या सर्व मान्यता देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंत्रणांनी २५ मार्चपूर्वी निधी खर्च करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा नियोजनाच्या खर्चाबाबत अंतिम बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, उपवनसंरक्षक अर्जूना के. आर., जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांच्यासह कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी येरेकर यांनी यावर्षीच्या जिल्हा वार्षिकच्या निधीमधून एकही रुपया परत करू नये. व्यपगत होणारा निधी तातडीने जिल्हा नियोजनला कळवण्यात यावा. तसेच हा निधी परत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. तसेच यंत्रणांना निधीची आवश्यकता असल्यास त्याची माहिती सर्व मान्यतासह सादर करण्यात यावी. या कामांच्या गरजेनुसार निधी देण्यात येईल. या यंत्रणेचा उपयोगाने निधी एक वर्षापर्यंत उपयोगात आणू शकता येणार आहे. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी वर्षा भाकरे यांनी जिल्हा नियोजनाचा निधी व्यपगत होऊ नये, यासाठी तातडीने निधी आहरित करण्यात यावा, असे सांगितले. जिल्हा कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी व्हीपीडीए पद्धतीची माहिती दिली. जिल्हा नियोजन समितीने दिलेला निधी अखर्चिक राहिल्यावरून पहिल्याच बैठकीत पालकमंत्र्यांनी विभाग प्रमुखांची चांगलीच कानउघडणी केली होती. तुम्हाला निधीची आवश्यकता नसेल तर तो इतरांना देण्यात येईल. मात्र, यानंतर मागाल तर निधीही मिळणार नाही. विकास झाला नसतानाही निधी खर्च का केला जात नाही, अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी सर्व विभाग प्रमुखांना खडसावले होते. ते बघता जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ २५ मार्चपूर्वी निधी खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्यावेळी पालकमंत्र्यांनी केली होती कानउघाडणी
तामिळनाडूच्या चेन्नई येथील सत्यभामा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ॲन्ड टेक्नॉलॉजी येथे पार पडलेल्या ३९ व्या अखिल भारतीय राष्ट्रीय युवा महोत्सव स्पर्धेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या चमूने तब्बल १३ पारितोषिके जिंकली. या यशाबद्दल सिनेटच्या बैठकीत संबंधित विद्यार्थ्यांसोबतच विद्यापीठाच्या अधिकारी व शिक्षकांचा अभिनंदन प्रस्ताव पारित करण्यात आला. प्रा. डॉ. संतोष कुटे यांनी याबद्दलचा प्रस्ताव मांडला होता. पुढे या प्रस्तावाचे सर्वांनी अनुमोदन करित विद्यापीठाचे अभिनंदन केले. रांगोळी, हिंदी वक्तृत्व स्पर्धा, मिमिक्री, वेस्टर्न व्होकल सोलो या कलाप्रकारात प्रथम पारितोषिक, भारतीय समूहगान, शास्त्रीय नृत्य, वेस्टर्न इन्स्टुमेंट्रल सोलो या कलाप्रकारात व्दितीय तर माईम, कल्चरल प्रोसेशन या कलाप्रकारात तृतीय तसेच लोकनृत्य, फोक ऑर्केस्ट्रा, गृप साँग वेस्टर्न या कलाप्रकारात चवथे आणि क्ले मॉडेलिंग या कलाप्रकारात पाचवे स्थान केले आहे. या यशासाठी चमू व्यवस्थापक डॉ. शितलबाबू तायडे यांच्यासह डॉ. जयश्री कुळकर, डॉ. निखिलेश नलोडे, प्रशांत ठाकरे, अमोल अढाऊ, प्रकाश मेश्राम, अभिजित भावे, अवधुत पाटील यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. या घवघवीत यशाबद्दल कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांचेही सिनेटने अभिनंदन केले आहे. सदस्याकडून कौतुक विद्यार्थी विकास विभागांतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यामधून अनेक प्राविण्यप्राप्त विद्यार्थी कलाक्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन अमरावती विद्यापीठाचा नावलौकीक करीत आहे. ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून सर्व विद्यार्थी कलावंत, साथीदार व चमू व्यवस्थापक यांच्या परिश्रमाने अखिल भारतीय राष्ट्रीय युवामहोत्सव स्पर्धेत अमरावती विद्यापीठाला घवघवीत यश मिळाले आहे, अशा शब्दात सिनेट सदस्यांनी विद्यापीठाचे कौतुक केले.
लोहारा प्रशासकीय इमारतीच्या परिसरात माळरानावर झाडे जगवली आहेत. भर उन्हाळ्यात ही हिरवीगार झाडी उन्हाळ्याच्या रणरणत्या उन्हात त्रासलेल्या जीवाला आल्हाददायक थंडावा देत असते. परंतु यावर्षी हिरव्यागार झाडांची थंडगार सावली अनावश्यक झाडाझुडपांनी व पालापाचोळ्याने व्यापली आहे. लोहारा येथील प्रशासकीय इमारत २०११ मध्ये बांधकाम पूर्ण होवून तहसिल कार्यालय व पंचायत समिती हे दोन कार्यालये स्थलांतरित करण्यात आले.त्यावेळी या प्रशासकीय इमारतीचा परिसर माळरान व भकास दिसत होता. २०१३-१४ या वर्षात या माळरानावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काळी माती टाकून वृक्ष लागवड करण्यात आली. मोठ्या मेहनतीने ती जपली. जगवली. त्यामुळे उजाड असलेला प्रशासकीय इमारतीचा परिसर हिरवळीने फुलून गेला आहे. भर उन्हाळ्यात प्रशासकीय कामकाजासाठी येथे येणाऱ्या नागरिकांसह प्रशासकीय कर्मचारीही रणरणत्या उन्हात या थंडगार झाडीच्या सावलीत आश्रय घेत होते. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरूवातीला या झाडांतील अनावश्यक झाडेझुडपे- पालापाचोळा काढून टाकले जात असत. परंतू या वर्षी या झाडांतील अनावश्यक झाडेझुडपे-पालापाचोळा काढलेला नाही. त्यामुळे या थंडगार सावलीचा ताबा अनावश्यक झाडेझुडपे-पालापाचोळ् याने घेतला आहे.त्यामुळे उन्हाळ्याच्या झळा जाणवत असताना नागरिक थंडगार सावली असताना या सावलीचा लाभ घेवू शकत नाहीत. त्यामुळे लोहारा तहसिलदार रणजितसिंह कोळेकर व गटविकास अधिकारी जगदेव वग्गे यांनी स्वतः लक्ष घालून या झाडीतील अनावश्यक झाडेझुडपे-पालापाचोळा काढून घ्यावा अशी मागणी होत आहे. पालापाचोळ्यामुळे आगीचा धोका महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लावलेल्या या हिरव्यागार झाडांमध्ये अनावश्यक झाडेझुडपे-पालापाचोळा वाढला आहे. त्यामुळे एखाद्यावेळी आग लागली तर या झाडांचे मोठे नुकसान होऊ शकते. आगीचा धोका टाळण्यासाठी हे अनावश्यक झाडेझुडपे-पालापाचोळा काढून टाकते आवश्यक आहे. इमारतीच्या पश्चिम बाजूला जात वाळलेले गवत,झाड झुडपे आहेत. तेथे आगीचा धोका अधिक असल्याचे बोललेले जात आहे. झाडे-झुडपे वाढल्याने झाडाखाली विश्रांती घेता येईना ^सध्या तहसीलसमोरील झाडांची चांगली सावली असतानाही तेथे झाडे-झुडपे वाढली असल्याने तेथे बसता येत नाही. तेथील अडचण काढल्यास नागरिकांना कडाक्याच्या उन्हात चांगलाच दिलासा मिळणार आहे. -नीकेश बचाटे, भाजपा, तालुका सरचिटणीस. पालापाचोळा काढण्याच्या सूचना देण्यात येतील ^मी स्वतः लक्ष घालून अनावश्यक झाडेझुडपे-पालापाचोळा काढण्याच्या सूचना देणार आहे. लवकरच स्वच्छता होईल. नागरिकांना सावलीत बसण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाईल. - रणजितसिंह कोळेकर , तहसिलदार,लोहारा.
सोलापूर सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड बुधवारी (ता. १८) दुपारी होणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपला स्पष्ट बहुमत असूनही नावांबाबत पक्षनेतृत्वाने कमालीची गोपनीयता ठेवली. आेबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या पदासाठी बार्शीतील दीपक वैद्य यांचे नाव आघाडीवर आहे. पण, त्यासोबतच मोहोळच्या विमल खरात, दक्षिणचे रामप्पा चिवडशेट्टी, माढा येथील वंदना कांबळे यांचीही नावे चर्चेत आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण ६८ जागांपैकी भाजपने सर्वाधिक ३८ जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला. अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी १५ दिवसांपूर्वी मुंबई येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या समवेत भाजपचे आमदार, स्थानिक नेतेमंडळींची बैठक झाली. सोलापूर अन् माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारास संधी देण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. त्यासोबतच ज्या तालुक्यामध्ये भाजपचा आमदार नाही, तेथे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अध्यक्षपद द्यायचे की अध्यक्षपदापासून वंचित असलेल्या दक्षिण सोलापूर, बार्शी, सांगोला, अक्कलकोट येथील उमदेवारांना संधी द्यायची, याबाबत काथ्याकूट झाला. पण, पक्षांतर्गत शीतयुद्ध भडकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पालकमंत्री गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अध्यक्षपदाचे नाव जाहीर करतील, असे सांगून शीतयुद्ध थोपवले. मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षांची खुर्ची अशी प्रतीक्षेत होती. निवडीची प्रक्रिया पूर्वी यशवंतनगर (रंगभवन) येथील अधिकारी-पदाधिकारी निवसास्थानच्या ‘नंदादीप’ बंगल्यात होत होती. यावेळी हॉटेल बालाजी सरोवर येथून सूत्रे हलणार आहेत. भाजपच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक सकाळी ९ वाजता होईल. त्याच ठिकाणी पालकमंत्री अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या उमदेवाराचे नाव जाहीर करून त्यास अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा परिषदेत पाठवणार आहेत. सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक होईल. अध्यासी अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद काम पाहणार आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी बार्शीचे दीपक वैद्य यांचे नावाची चर्चा आहे. मात्र ऐनवेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व भाजपच्या गोटातून कोणाचे नाव पुढे येईल याचा थांग पत्ता भाजप सदस्यांनाही नाही. सत्तेत पहिल्यांदाच आल्याने भाजपकडून सामाजिक व राजकीय समतोल राखत या निवडी होतील अशी चर्चा आहे. अध्यक्षपदासाठी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यांनी आपण अध्यक्षपदासाठी इच्छुक नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वळसंग जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले रामप्पा चिवडशेट्टी यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे येऊ शकते. ^आम्ही कोणतेही दबावाचे, भीतीचे अगर आमिषाचे राजकारण केले नाही. त्यामुळे कमी जागा मिळाल्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेणार नाही. मात्र आमचे सदस्य विरोधात राहूनही सत्ताधाऱ्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यास भाग पाडतील. धैर्यशील मोहिते- पाटील, खासदार
आईच्या मासिक श्राद्धास निघालेला मुलगा ठार:सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर दुचाकीला धडक
मंगळवेढा-सोलापूर रस्त्यावर शहराजवळील रानवारा हॉटेलजवळ मंगळवारी दुचाकीला अज्ञात वाहनाने मागून धडक दिली. यात एक जण जागीच ठार झाला. तर वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. आईच्या पाचव्या मासिकासाठी निघालेले शिवाजी घुले (वय ५७ , रा. मंगळवेढा) हे जागीच ठार झाले. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला ( एमएच १३ एडब्ल्यू ०५२७) पाठीमागून धडक दिली. याबाबत फिर्याद मृताचा पुतण्या अल्पेश घुले यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार चालकाच्या ताब्यातील चारचाकी वाहन हयगयीने, अविचाराने, बेदरकारपणे, रस्त्याचे परिस्थितीकडे दूर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवून शिवाजी घुले (वय- ५५, रा.मंगळवेढा) यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक देवून त्यांना गंभीर जखमी करुन त्यांचे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी व सिमाबाई शिवाजी घुले (वय- ५०) हीस अपघातामध्ये गंभीर जखमी केले. अपघाताची खबर न देता तसेच जखमीस उपचारांकरिता घेऊन न जाता निघून गेला आहे. त्यामुळे अज्ञात चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्याद मयताचा पुतण्या अल्पेश घुले यांनी फिर्याद दिली. त्यात ते गंभीर जखमी करुन त्यांचे मृत्यूस कारणीभुत झाला आहे. चुलती सीमाबाई घुले या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्या. अज्ञात चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात केला. अधिक तपास पो.ना ईश्वर दुधाळ करत आहेत. शिवाजी घुले हे मूळचे मोहोळ तालुक्यातील सोहाळे गावचे असून सध्या ते कामानिमित्त त्यांचे कुटुंबासह कारखाना रोड, पाणी फिल्टरजवळ, मंगळवेढा येथे राहण्यास आहेत. त्यांची आई पार्वती महादेव घुले ही ५ महिन्यापूर्वी मयत झाली असून तिचे मासिकासाठी सोहाळे येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यानंतर उमाटे वस्ती येथे येत असताना दुचाकीला धडक दिली.
उन्हाळी वाळवण पदार्थ स्पर्धा:नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी केले मार्गदर्शन
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित उन्हाळी वाळवण पदार्थ स्पर्धा शनिवार, १४ मार्च रोजी येथील योगभवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. महिलांच्या पाककलेच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि लुप्त होत चाललेल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन करण्यासाठी या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष प्रणिता भालके, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रियांका तारापूरकर आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात वाळवण पदार्थांची लगबग सुरू होते. याच परंपरेला स्पर्धेचे स्वरूप दिल्याने पंढरपूर शहरातील महिलांनी आपल्या कौशल्याचा सुंदर आविष्कार सादर केला. स्पर्धेत विविध प्रकारचे पापड, खुसखुशीत कुरडया, सांडगे, शेवया, साबुदाणा चकल्या तसेच विविध प्रकारचे घरगुती मसालेदार वाळवण पदार्थ प्रदर्शनासाठी आणि स्पर्धेसाठी ठेवण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांचे नगरपरिषदेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. शहरातील महिला भगिनींनी या प्रदर्शनाला आणि स्पर्धेला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ^महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला उन्हाळी खाद्यपदार्थ तयार करण्याच्या स्पर्धां हा एक वेगळा उपक्रम आहे. अशा उपक्रमांमुळे महिलांच्या घरगुती कौशल्याला योग्य व्यासपीठ मिळते. आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली ही खाद्यसंस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. प्रणिता भालके, नगराध्यक्ष महिलांच्या कौशल्यास व्यासपीठ
मोहोळ- बार्शी मुख्य रस्त्यावर मानेगाव परिसरात अरुंद रस्त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या मार्गावरून दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याने वाहनचालक व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मानेगाव हे मोहोळ व बार्शी तालुक्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावर असल्यामुळे या रस्त्यावर दिवसभर वाहतुकीची वर्दळ असते. गावाची लोकसंख्या वाढत असल्याने वाहतुकीचाही ताण वाढत चालला आहे. मात्र गावातील मुख्य भागात रस्ता अरुंद असल्याने दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहतूक ठप्प होण्याची वेळ येते. त्यामुळे काहीवेळा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून प्रवाशांना कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. या मार्गांलगत शाळा असल्याने शाळकरी मुला-मुलींना रस्त्याच्या कडेला सुरक्षितपणे ये-जा करणे कठीण होत आहे. रस्ता अरुंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त होत आहे. तसेच रस्त्यालगत काही ठिकाणी अतिक्रमण होण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी आणखी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सकाळी व संध्याकाळी वर्दळीच्या वेळी रस्त्यावर डम्पर, टिपर, क्रेन, फोर ^मोहोळ- बार्शी मुख्य रस्त्यावर मानेगाव येथे रस्ता अरुंद असल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनचालकासह शाळकरी मुला-मुलींनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्याचे रुंदीकरण करावे. हनुमंत राऊत, ग्रामस्थ, मानेगाव क्लिप, मोठी काँक्रीट मिक्सर वाहने वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. दरम्यान या समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेकदा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करून लक्ष वेधले आहे. मात्र अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे मानेगाव परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे
शहराच्या पुढील ३० वर्षाच्या आराखड्यानुसार सुमारे १३० किमी लांबीची भुयारी गटार योजना दोन टप्प्यात राबवण्यात येत असून पहिला टप्पा असणाऱ्या शहराच्या विस्तार भागातील भुयारी गटारीचे काम सुरु झाले असल्याचे नगर अभियंता डी.व्ही.भगनुरे यांनी सांगितले. नगरोत्थन महाअभियानांतर्गत ही कामे सुरू झाली आहेत. मात्र या सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना रस्त्याची अडचण येत आहे. अकलूज शहरातील सांड पाणी मल निस्सारणासाठी शहराचा पुढील ३० वर्षाचा विस्तार लक्षात घेऊन तयार केलेल्या योजनेनुसार नगर परिषदेच्या हद्दीत सुमारे १३० कि.मी.लांबीची ही भुयारी गटार योजना असून ती दोन टप्प्यात होणार आहे. मूळ अकलूज ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील नागरिकांचे सांडपाणी उघड्या गटारीव्दारे ओढ्यातून निरा नदी पात्रात सोडण्यात येत होते.त्यामुळे नदीचे पाणी दुषित झाले होते. सन २०२१ मध्ये या नगरपरिषदेची निर्मिती झाल्यानंतर शहरातील सांडपाणी विसर्जनासाठी नगरोत्थन महाअभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे १२१ कोटी रु.च्या शहरातील सर्वच भागात भुयारी गटार योजना राबवण्यास सुरुवात झाली आहे.त्याची सुरुवात शहराच्या विस्तार भागातून करण्यात आली. याअंतर्गत शहर विस्तार भागातून पाइपलाइन टाकण्यात येत असून त्यात नागरिकांचे घरातील सांडपाणी सोडले जाणार आहे. त्यासाठी ठिकठिकाणी चेंबर काढले आहेत. या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ४.५ एमएलडी क्षमतेचा सांडपाणी दुसऱ्या टप्प्यात शहरातील सर्व मलजल एकत्रित करून त्यावर ८ एमएलडी क्षमता असणारा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प तसेच दोन पंपिंग स्टेशनद्वारे सांडपाणी एकत्रित करुन त्यावर प्रक्रियेद्वारे सांडपाणी शुद्धीकरण करुन शुध्द पाणी पुर्नवापरासह ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.भुयारी गटार योजनेत सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रीया करण्यात येणार असल्यामुळे निरा नदी पात्रात पाणी स्वच्छ राहणार आहे. त्यामुळे शहरातील वातावरण शुध्द राहणार आहे. व्यवस्थापन प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शहरातील सर्व मलजल एकत्रित करून त्यावर ८ एमएलडी क्षमता असणारा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प तसेच दोन पंपिंग स्टेशनद्वारे सांडपाणी एकत्रित करुन त्यावर प्रक्रियेद्वारे सांडपाणी शुद्धीकरण करुन शुध्द पाणी पुर्नवापरासह ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे.भुयारी गटार योजनेत सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रीया करण्यात येणार असल्यामुळे निरा नदी पात्रात पाणी स्वच्छ राहणार आहे.त्यामुळे शहरातीलही वातावरण शुध्द राहणार आहे. शिवाय नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होणार असल्याचे भगनुरे म्हणाले. भुयारी गटारीचे काम दोन टप्प्यात सुरू ^शहरातील मलजल निस्सरणासाठी नगरोत्थन महाअभियानांतर्गत २ टप्प्यात सुमारे १३० किमी लांबीच्या भुयारी गटारीचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम शहराच्या विस्तार भागात सुरू केले आहे. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ४.५ एमएलडी क्षमतेचा तर दुसऱ्या टप्प्यात ८ एमएलडी क्षमता असणारा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पा केला जाणार आहे. डी.व्ही.भगनुरे नगर, अभियंता
अक्कलकोट बसस्थानक तात्पुरते बीएसएनएल कार्यालयासमोर वर्ग:आठवडा बाजारमुळे प्रवाशांची तारांबळ
अक्कलकोट येथील राजा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राज्य परिवहन महामंडळाचे बसस्थानक हे सोमवार दि. १६ मार्च २०२६ पासून सोलापूर रस्त्यावरील बीएसएनएल कार्यालय समोरील रा.प.अक्कलकोट आगारातील खुल्या मैदानात तयार करण्यात आले आहे. तात्पुरते प्रवाशी शेड येथे हलवण्यात आले असल्याची माहिती आगार व्यवस्थापक रणजीत साळवे यांनी दिली. श्री क्षेत्र अक्कलकोटचे बसस्थानक हे ५० वर्षापूर्वी बांधलेले बसस्थानक होते, तालुक्याची वाढती लोकसंख्या पाहता सर्व सोयींयुक्त अद्यावत बसपोर्ट होण्याकामी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नातून शहराच्या वैभवात भर टाकणारी अशी वास्तू उभारत असून, याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र सध्या नवीन बसस्थानक मैदानाचे कॉक्रीटीकरणाचे काम,व रंग रंगोटी,करण्या करिता सदरच्या नवीन बसस्थानकाच्या शेजारी असलेले वाहतूक हे पुढील ३ महिन्यासाठी अक्कलकोट आगाराच्या मैदानात निर्माण करण्यात आलेल्या तात्पुरत्या शेड मध्ये बस स्थानकाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याठिकाणी तात्पुरते शेड उभारण्यात आले आहे. सध्या येथे महिलांसाठी शौचालय व इतर सुविधा नाही. सगळ्या गावासाठी वेगळे प्लॉट फार्म नाही. त्यामुळे येथे थोड्या दिवसासाठी प्रवाशांची काही प्रमाणात होणारी अडचण, गैरसोय होणार असल्याचे मत आगर प्रमुखांनी व्यक्त केले आहे. आज अक्कलकोटचा आठवडा बाजार असल्यामुळे बस स्टँड कोठे हलविले याचा थांग पत्ता लागला नसल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.या करिता अक्कलकोट आगार प्रशासन दिलगिरी व्यक्त केले आहे.
तापमान 42 अंशावर, रसवंतीगृह, थंड पेयांना मागणी:चक्कर कमजोरी वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन
शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ झाली असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत कडक उन्हामुळे नागरिक सावलीचा आधार घेत आहेत. वाढत्या तापमानामुळे रसवंतीगृह, कोल्ड्रींग दुकाने आणि थंड पेय विक्रेत्यांकडे ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. तर दुसरीकडे मात्र डॉक्टरांनी नागरिकांना उन्हामुळे विशेष काळजी घेण्यास देखील आव्हान केले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोलापूर जिल्ह्यात उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून तापमानाने ४२ अंशाचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात ही दाहकता अधिक वाढण्याची शक्यता असून, वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर, विशेषतः मेंदूवर होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. उष्णतेमुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊन (डिहायड्रेशन) रक्त घट्ट होते, विशेषता लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी. ज्यामुळे मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा येत असल्याचे सांगितले आहे. ^मार्च ते मे महिन्यात उन्हाळा असल्याने उष्माघात ,डीहायड्रेशन व त्वचा रोगाचे प्रमाण वाढते. त्यामुळे दररोज अडीच ते तीन लिटर पाणी पिणे, लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे नैसर्गिक शीत पेये घेणे उपयुक्त ठरतात. कडक उन्हात बाहेर पडणे शक्यतो टाळावे. डोकेदुखी, चक्कर येणे, ताप मळमळ, अशी उष्माघाताची लक्षणे असून ती जाणवल्यास लगेच सावलीत विश्रांती घ्यावी. नंतर वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घ्यावा. विशेषता लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी. डॉ. रणजीत मोहिते, एमडी मेडिसीन अशी घ्या काळजी : उष्माघाताची लक्षणे दिसल्यास प्रथमोपचार, रुग्णाला सावलीत किंवा थंड जागेत घ्या, घट्ट कपडे सैल करा, थंड पाण्याने शरीर थंड करा, पाणी किंवा ओआरएस द्या, शक्य तितक्या लवकर रुग्णालयात दाखल करा, योग्य उपचार घेतल्यास गंभीर परिणाम टळतात.रोज चार लिटर पाणी प्या, दिवसातून ४ ते ५ लिटर पाणी प्या दुपारी ११ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळा ,हलके आणि सैल कपडे वापरा. टोपी, छत्री किंवा सनग्लास वापरा. वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. उन्हात बाहेर पडणे टाळावे
जिल्हा परिषद अहिल्यानगर च्या शिक्षण विभागामार्फत कुसुमाग्रज वाचन अभियान उपक्रमांतर्गत नेवासे तालुक्यातील भालगाव जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी दरमहा खाऊचे पैसे एकत्र करत विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी ज्ञान किरण वर्तमानपत्र वाचनालय सुरू केले. त्यातून विद्यार्थ्यांना विविध बातम्या,लेख वाचत जगाची वाचन सफर घडत आहे. भालगाव शाळेत कुसुमाग्रज वाचन अभियान सुरू झाले. त्या अंतर्गत पदवीधर शिक्षक राहुल आठरे यांनी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी अथवा चौकात असलेली वर्तमानपत्र वाचनालय,पेपर कट्टा संकल्पना स्पष्ट केली. भालगावात सकाळी वर्तमानपत्र येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर वाचायला मिळत नव्हता.ही समस्या सोडवत शिक्षक आठरे यांनी पुढाकार घेत अल्पखर्चिक असे भिंतीला खिळे व तार ठोकून पेपर ठेवण्याची व्यवस्था करत वर्तमानपत्र वाचनालय सुरू करण्याची संकल्पना मांडली. यास पालकांनी प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊच्या पैशातून वर्तमानपत्र वाचनालय सुरू करायचे ठरवले. यासाठी दरमहा एक विद्यार्थी प्रतिनिधी नेमत वाचनालयाचा जमा खर्च वहीत नोंदी ठेवल्या जातात. यासाठी वर्गशिक्षकांनी पुढाकार घेत दररोज एक किंवा दोन वर्तमानपत्रे विकत घेऊन वर्गासाठी उपलब्ध केली. यातून इयत्ता सहावीचे विद्यार्थी नियमाने मधल्या सुट्टीनंतर वर्तमानपत्रांचे वाचन नियमित करू लागली. वाचलेल्या बातम्या,माहिती व लेखांचे सारांश पर टिपणे लिहितात. या ज्ञान किरण वर्तमानपत्र वाचनालयाचे उद्घाटन उपसरपंच बाळासाहेब आहेर यांच्या हस्ते झाले. या उपक्रमास भालगाव शाळा माजी विद्यार्थी संघाचे प्रगतशील शेतकरी व उद्योजक गणेश काळे यांनी एक हजार रुपये दिले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक दादासाहेब खरात,ग्राम विकास अधिकारी वैशाली सानप,माजी विद्यार्थी संघाचे गणेश काळे, सदस्य रवींद्र आहेर,अरुण खरात,सतिश निमसे,ज्ञानेश्वर पवार,रेखा कोरडे,मुख्याध्यापिका सरस्वती लोंढे, शिक्षिका जनाबाई जाधव, शितल झरेकर, पल्लवी तरवडे,शिक्षक अमोल तुपे उपस्थित होते. नेवासे पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी डॉ. संजय कळमकर म्हणाले, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीच्या जतनासाठी विविध वर्तमानपत्रातून जगभरात चाललेल्या घडामोडी समजून सामान्य ज्ञानात भर पडेल. व त्यातून विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेस फायदा होईल. वर्तमानपत्र वाचनामुळे सामान्य ज्ञानात भर ^आमच्या गावात,घरी पेपर येत नव्हता. आम्ही सहावीच्या विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून बचत करत नियमित वर्तमानपत्र वाचनालय सुरू केले. वर्तमानपत्र वाचल्यामुळे आम्हाला आपल्या सभोवती परिसरातील,जिल्ह्यात, राज्य आणि देशात सुरू असलेल्या विविध क्षेत्रातील घडामोडी,बातम्या,जहिर ाती समजतात. वर्तमानपत्र वाचनाने आमच्या सामान्य ज्ञानात भर पडत आहे. - दिव्या भागवत, विद्यार्थिनी इ.सहावी
विवाहानिमित्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिली देणगी:सौंदाळ्यातील विजय, वैष्णवी नवले यांचा उपक्रम
स्वतःच्या आनंदाच्या क्षणी समाजाचाही विचार करणारी माणसे खऱ्या अर्थाने आदर्श ठरतात. अशाच सामाजिक जाणिवेचे प्रचिती तालुक्यातील सौंदाळा या गावात आली. गावातील विजय नवले आणि वैष्णवी नवले यांनी त्यांच्या शुभमंगल प्रसंगी गावातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि शाळेच्या विकासासाठी देणगी देत सामाजिक बांधिलकी जपल्यामुळे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे जनतेतून स्वागत केले जात आहे. लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण असतो अशा प्रसंगी केवळ व्यक्तिगत आनंद न साजरा करता समाजातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मदतीचा हात पुढे करणे ही एक प्रेरणादायी बाब असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या देणगीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून शाळेच्या सर्वांगीण विकासालाही चालना मिळणार आहे. या उपक्रमातून गावातील इतर नागरिकांनाही शिक्षणासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळेल,असा विश्वास ग्रामस्थ व शिक्षकवर्गाने व्यक्त केला. लग्न समारंभा सारख्या आनंदाच्या क्षणी शाळेची आठवण ठेवून केलेले हे कार्य समाजासाठी आदर्श निर्माण करणारे असल्याचे मत ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केले या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी ,ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी नववधुंचे आभार मानले.
मद्यधुंद ट्रक चालकाची दुचाकी, दुभाजकाला धडक; गुन्हा दाखल
बुरुडगाव रस्त्यावरील चाणक्य चौक परिसरात सोमवारी रात्री मद्यधुंद ट्रक चालकाने रस्त्यावरील दुभाजक व दुचाकींना धडक दिली. दारूच्या नशेत ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. नागरिकांनी मद्यधुंद चालकाला पकडून कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले. अमोल बापुराव विघ्ने (मूळ रा. शिरूर कासार, जि. बीड, हल्ली रा. माळीवाडा, अहिल्यानगर) असे चालकाचे नाव असून, त्याच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून शेंडी, डीएसपी चौकमार्गे ट्रक चालक शहरात दाखल झाला. त्यानंतर यश पॅलेस ते कोठी रोडवरील बुरुडगाव रस्त्यावरून भरधाव वेगात जात असताना चाणक्य चौकात त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व त्याने रस्त्यावरील दुभाजकांना जोरदार धडक दिली. यात दहा ते बारा दुभाजकांचे नुकसान झाले. तसेच, काही दुचाकी व एका चारचाकी वाहनाचे किरकोळ नुकसान झाले. अपघातानंतर नागरिकांनी चालकाला पकडले असता तो मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यधुंद चालकामुळे मागील वर्षीही झाला होता अपघात यश पॅलेस ते कोठी रस्त्यावरील महात्मा फुले चौकात मागील वर्षी एका मद्यधुंद चारचाकी चालकाच्या धडकेत तिघे जखमी झाले होते. तर एकाच मृत्यू झाला होता. याच रस्त्यावर काही अंतरावर सोमवारी पुन्हा अपघात झाला. अवजड वाहनांना शहरातील रस्त्यांवरून रात्री दहा वाजेपर्यंत बंदी असतानाही शेंडी बायपास चौक व डीएसपी चौकातून ट्रक चालक शहरात दाखल झाला. त्यामुळे या दोन्ही चौकातील बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा समोर आला आहे.
चोरीच्या मोटारसायकलसह 1 लाख 17 हजारांचा मुद्देमाल हस्तगत, दोघांना अटक
पल्सर मोटारसायकलवर शिर्डी येथुन दर्शन करुन श्रीरामपूर मार्गे त्यांच्या राहते गावी जात असताना त्यांना श्रीरामपूर नेवासा रोडवरील पोस्ट ऑफिस समोर, श्रीरामपूर येथे तीन अनोळखी इसमांनी मोटारसायकलवर येऊन गाडी अडवली. चाकूचा धाक दाखवून त्यास मारहाण करत ९२ हजारांचा मुद्देमाल चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील पानसंगवी तालुक्यातील गुंजमूर्ती येथील विलास चंद्रभान वलेकर हे पल्सर मोटारसायकलवर शिर्डी येथून दर्शनकरुन श्रीरामपूर मार्गे त्यांच्या राहते गावी जात असताना त्यांना श्रीरामपूर नेवासा रोडवरील पोस्ट ऑफिस समोर, श्रीरामपूर येथे तीन अनोळखी इसमांनी मोटारसायकलवर येवुन चाकूचा धाक दाखवत मारहाण करत त्यांची मोटरसायकलसह मोबाईल व रोख रक्कम असा ९२ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरच्या गुन्ह्याचा तपास करताना शहर पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हुसेन नगर येथील सौरभ संजय शिंदे, अरबाज आयुब पठाण व त्याचा साथीदार वॉर्ड न.१, गोंधवणी, पोस्ट कॉलनीतील जुबेर हारुण शेख या तिघांनी सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सौरभ संजय शिंदे व जुबेर हारुण शेख या दोघांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून ८० हजाराची पल्सर मोटारसायकल, १० हजाराचा मोबइल, २ हजार रुपये रोख, २५ हजार रुपयांची मोटार सायकल असा एकूण १ लाख १७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नामपूर येथे स्वतंत्र पोलिस ठाणे उभारा:आमदार दिलीप बोरसे यांची विधानसभेत मागणी
नामपूर येथे स्वतंत्र पोलिस ठाणे उभारावे, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देताना आमदार दिलीप बोरसे. या मागण्यांकडेही वेधले राज्य शासनाचे लक्ष द्राक्षबागांसाठी क्रॉप कव्हर योजनांना गती देण्याची गरज असल्याचे आमदारांनी सांगितले. लखमापूर येथील डाळींब संशोधन केंद्रात आवश्यक मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली. तसेच हरणबारी डावा-उजवा कालवा आणि केळझर चारी क्रमांक ८ या सिंचन प्रकल्पांसाठी जलसंपदा विभागामार्फत आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी विधानसभेत मांडली. प्रतिनिधी | नामपूर बागलाण तालुक्यातील वाढता भौगोलिक विस्तार आणि कायदा-सुव्यवस्थेची गरज लक्षात घेऊन नामपूर येथे स्वतंत्र पोलिस ठाणे स्थापन करावे, अशी मागणी आमदार दिलीप बोरसे यांनी विधानसभा अधिवेशनात केली. यासोबतच साल्हेर परिसरात पोलिस चौकी उभारणे आणि कांदा-द्राक्ष उत्पादकांसाठी ठोस उपाययोजना करण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागण्या मांडताना बोरसे यांनी तालुक्यात सध्या ब्रिटिशकालीन सटाणा व जायखेडा येथेच पोलिस ठाणे कार्यरत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तालुक्याचा विस्तार मोठा असून, लोकसंख्या व गुन्हेगारीत वाढ होत असल्याने नामपूर येथे स्वतंत्र पोलिस ठाणे उभारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित व सुसज्ज निवासस्थाने उपलब्ध करून देण्याची मागणीही केली. साल्हेर किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यानंतर परिसरात पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी साल्हेर परिसरात स्वतंत्र पोलिस चौकी उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रातील प्रश्नांकडे लक्ष वेधताना बोरसे यांनी सांगितले की, बागलाण तालुक्यात सुमारे ७० हजार हेक्टरवर कांद्याची लागवड होते आणि अंदाजे ११ लाख क्विंटल उत्पादन घेतले जाते. मात्र, सध्या कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. कांद्याच्या आयात-निर्यात धोरणाबाबत केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
इगतपुरीत नगरपरिषद तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर:मुलाच्या मृत्यूनंतर सुरक्षा उपायांची मागणी
इगतपुरीतील बारा बंगला परिसरातील नगरपरिषद तलावात १६ वर्षीय मुलाचा शनिवारी बुडून मृत्यू झाल्यानंतर तलावाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिसरात कोणत्याही मूलभूत सुरक्षाव्यवस्था नसल्याने नागरिकांकडून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. तलाव परिसरात सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक फिरण्यासाठी येतात. मात्र, येथे सुरक्षारक्षक, धोक्याची सूचना देणारे फलक किंवा तलावाभोवती संरक्षक कुंपण यांचा अभाव आहे. तलाव पूर्णपणे खुला असल्याने तरुण पोहण्यासाठी तसेच भटकंतीसाठी येथे येतात. तलावाची खोली अधिक असल्याने अपघाताचा धोका कायम आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, दरवर्षी येथे बुडण्याच्या घटना घडतात. ताज्या घटनेनंतर पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या शाळा व महाविद्यालयांच्या सुट्ट्या सुरू होण्याचा काळ असल्याने तलाव परिसरात तरुणांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने तातडीने सुरक्षारक्षक नेमणे, मजबूत कुंपण उभारणे आणि इशारा फलक लावणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मंठ्यातील मशिदीवर सजावट, विद्युत रोषणाई:बाजारपेठेमध्ये अत्तराच्या सुगंधाने दरवळ
मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असल्याने मंठा शहरातील बाजारपेठेत महिला, नागरिकांची खरेदीसाठी मोठी लगबग दिसत आहे. या महिन्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत रोजा ठेवतात. त्यामुळे शहरात विविध साहित्य विक्रीसाठी आले आहे. रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी गर्दी होत आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील मशिदीची सजावट झाली आहे. विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. ईदला तीन ते चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक परिसरात खरेदीची धावपळ वाढली आहे. बाजारपेठेत कपडे, पादत्राणे, सुकामेवा यांची खरेदी वेगाने सुरू आहे. ईदसाठी विशेष अत्तर बाहेर जिल्ह्यासह राज्यातून व्यापाऱ्यांनी मागवले आहे. मोगरा, गुलाब, शनाया, पॉन्ड्स, केवडा, सीआर सेवन अशा विविध अत्तरांचा सुगंध बाजारात दरवळत आहे. त्याची खरेदीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. रमजान महिन्यात उपवास सोडण्यासाठी खजुराला विशेष महत्त्व आहे. उपवास सोडताना खजूर सेवन करतात. त्यामुळे अनेक मोठ्या शहरांतून मंठ्यातील व्यापारी रमजान महिन्यात विविध प्रकारच्या खजुराची आयात करतात. कापड दुकानांमध्ये चांगली वर्दळ दिसत आहे. शहरातील आठवडी बाजारासह काही प्रमुख ठिकाणी शेवया, घिवर, फेण्या, खजूर आदी सुकामेवा, फळे, अत्तर, टोप्या, कपडे उपलब्ध झाले आहेत. मंठा बाजारपेठेत सुकामेव्याच्या दरात वाढ झाली आहे. काजू-बदाम ८०० ते १६०० रुपये प्रतिकिलो, किसमिस ६०० रुपये प्रतिकिलो, शेवया १०० ते २०० रुपये, खोबरे ३५० रुपये, खजूर २०० रुपये, चारोळी २ हजार रुपये प्रतिकिलो, अंजीर १२०० रुपये, पिस्ता २४०० रुपये प्रतिकिलो, वेलची ३२०० ते ४ हजार रुपये प्रतिकिलो असे दर असल्याचे व्यापारी सय्यद हारून अली यांनी सांगितले.
अजिंठा घाटात भराडीहून अद्रक घेऊन झाशीकडे जाणाऱ्या ट्रकचा ( आर.जे. २० जीसी २७७५) ब्रेक फेल झाल्याने डोंगराला धडकून अपघात झाला. हा अपघात सोमवारी रात्री १२ वाजेदरम्यान झाला. सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातामुळे एकाच बाजूने वाहने सुरू असल्याने घाट पार करण्यासाठी वेळ लागत होता, तर यात १२.३० ते २ वाजेदरम्यान सुमारे दीड तास रात्री वाहतूक ठप्प होती. नंतर पोलिसांनी सुरळीत करून पुन्हा एका बाजूने वाहने सुरू केली होती. जगप्रसिद्ध अजिंठा घाटात नवीन वर्षात जवळपास अजिंठा-फर्दापूर हद्दीत एकूण २० अपघात झाले. काही किरकोळ तर काही मोठे अपघात झाले. रस्ता अरुंद असल्यामुळे घाटात कोणत्याही अवजड वाहनाचा अपघात झाला की तासन््तास अजिंठा घाट जाम होत आहे. २७ फेब्रुवारी रोजी दोन ट्रकच्या अपघाताच्या वेळेस जवळपास दोन दिवस अजिंठा घाटात वाहतूक ठप्प होती. तरी प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली सुरू केल्या नसल्याने संताप व्यक्त होत आहे. घाटातील रस्ता अरुंद आहे तसेच १० किलोमीटर घाटात ७ अवघड वळणे आहेत. अवजड वाहने या वळणावर बंद पडल्यास वाहतुकीची कोंडी होते. घाट चढताना अवजड ट्रकचे इंजिन गरम होऊन वाहने बंद पडतात. दिनांक कारण कोंडी १७ जानेवारी अपघात २ तास जाम, १ फेब्रुवारी ट्रक नादुरुस्त ६ तास ४ फेब्रुवारी ट्रक नादुरुस्त ४ तास १६ मार्च ट्रक अपघात १ तास १७ मार्च ट्रक अपघात दीड तास {सागर कळम कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिल्लोड Q. अजिंठा घाटात वारंवार अपघात होण्याचे कारणॽ A. घाटात वळण रस्ता असल्याने कुठे १२ तर कुठे ५ मीटर रस्ता झालेला आहे. अरुंद रस्त्यामुळे अपघात होतात. Q. रस्त्याची रुंदी वाढणार का? A. नाही. आम्ही घाटातील डोंगर फोडून नवीन ३० मीटरचा बायपास रस्ता तयार करणार आहोत. Q. या घाटातील कामाला सुरुवात कधी होणारॽ A. सध्या आम्ही डीपीआर केला असून प्रस्ताव पाठवला आहे. मंजूर होताच कामाला सुरुवात होईल. अंदाजे एक वर्षाचा कालावधी लागेल. मंजूरी आली की त्वरीत काम सुरू होईल. बेशिस्त वाहनधारकांवर नियंत्रणासाठी तसेच अजिंठा घाटात अपघात टाळण्यासाठी दोन्ही बाजूला पोलिस हवेत. तसेच क्रेनसेवा लगतच उपलब्ध असल्यास त्वरीत अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवता येईल. अजिंठा घाटा लगतच क्रेनसेवा हवी अजिंठा घाटात पहिले नाल्या आणि संरक्षण कठडे नसल्याने रस्त्याची रुंदी जवळपास ४० फूट होती त्यामुळे मोठे अवजड वाहने सहज पार व्हायचे, परंतु आता घाटात नालीचे काम आणि संरक्षण कठडे मोठमोठे बांधल्याने काही ठिकाणी फक्त १८ ते २० फूट रस्ता राहिला आहे. दोन महिन्यांत पाच वेळा घाट जाम बोगद्याचा डीपीआर तयार घाटात ७ अवघड वळणे
पिकअपने स्कूटीला 100 फूट फरफटत नेले:डॉक्टर ठार, सिल्लाेड शहराजवळ डाेंगरगाव फाट्यावर अपघात
पालोद येथुन सिल्लोड येथे कामानिमित्त स्कुटीवर जाणाऱ्या एका डॉक्टरला सिल्लोड येथून डोंगरगावला जाणाऱ्या भरधाव बोलेरो पिकअपने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने या अपघातात डॉक्टर जागीच ठार झाले. ही घटना दि १७ मंगळवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव डॉ. विश्वास शेषराव पालोदकर (४८) रा. पालोद ता. सिल्लोड असे आहे. डॉ. विश्वास हे पालोद येथून सिल्लोड येथे काही कामानिमित्त त्यांच्या स्कुटी क्र एमएच २० एफई ३२८४ वरून येत होते.अत्यातच शहरातील डोंगरगाव फाट्याजवळ सिल्लोडकडून डोंगरगाव येथे भरधाव वेगाने जात असलेली बोलेरो पिकअप क्र एमएच ४८ बीएम २९५६ ने स्कूटीला जबर धडक दिली. या धडकेत डॉ. विश्वास हे जागीच ठार झाले. धडक इतकी भीषण होती की पिकअपने स्कुटीस सुमारे १०० फूट फरपटत नेले यातच डॉ. विश्वास यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षण शेषराव उदार घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टर विश्वास पालोदकर हे नियमित हेल्मेट वापरत होते. परंतु मंगळवार रोजी पालोद येथून सिल्लोडला येताना त्यांनी हेल्मेट परिधान केलेले नव्हते. या अपघातानंतर काही प्रत्यक्षदर्शनी त्यांनी हेल्मेट घातलेले असते तर त्यांचा जीव वाचला असता असे सांगितले. सकाळी पालोद येथे झालेल्या एका अंत्यविधीच्या कार्यक्रमात डॉक्टर विश्वास यांनी श्रद्धांजलीपर दोन शब्द बोलून श्रद्धांजली अर्पण केली. तेथून दुपारी सिल्लोडला येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला या घटनेने पालोद गावात शोककळा पसरली. सकाळी अंत्यसंस्काराला हजेरी, दुपारी अपघातात मृत्यू
बेमोसमी व ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांचा गहू मळणीकडे ओढा
चालू वर्षी पावसाळा चांगला झाल्याने विहिरींमध्ये पाणी वाढले. शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. आता गहू काढणीच्या कामाला वेग आला आहे. खामगाव, बाबरा, निधोना, वडोद बाजार, बोधेगाव, विरमगाव परिसरात हरियाना, पंजाब येथून हार्वेस्टर मशीन दाखल झाली. गहू काढणी जोरात सुरू आहे. वडोद बाजार परिसरात पारंपरिक शेती करणारे शेतकरी गव्हाची लवकर मळणी व्हावी म्हणून हार्वेस्टरचा वापर करत आहेत. पूर्वी अल्प बागायती शेती होती. शेतीच्या कामासाठी मजूर सहज मिळत. खळे पद्धतीने गहू कापणी झाल्यावर मळणी करून काढला जात असे. मळणीनंतर उरलेला खुटार जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरला जात असे. आता ट्रॅक्टरच्या साह्याने शेती वाढली. शेतकऱ्यांकडील बैलांची संख्या कमी झाली. मध्यंतरी गहू काढणी विजेवर व ट्रॅक्टरवर चालणाऱ्या यंत्रावर होत होती. आता बागायती शेती वाढली. गव्हाचा पेरा वाढला. शेतीच्या कामासाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे उभा वाळलेला, काढणीला आलेला गहू हार्वेस्टरने काढला जात आहे. काही तासांत काढणी होते. वेळ व खर्च कमी होत असल्याने शेतकऱ्यांचा कल हार्वेस्टरकडे वाढला आहे. दिवसभरात ८ ते १० एकर गहू काढणी होते. एका एकरासाठी हार्वेस्टर चालक २ हजार रुपये प्रति एकर दर घेत आहे. एकरी २००० ते २१०० रु. इतका खर्च : • गव्हाला एकरी ९ ते १० हजार रुपये खर्च झालेला आहे. गहू मळणीसाठी शेतकऱ्यांना येणारा खर्च गहू सोंगणी २००० हजार, मळणी यंत्र २००० हजार, एकूण एकेरी खर्च ४००० हजार • हार्वेस्टरने मळणी केल्यास एकरी २००० ते २१०० रुइतका खर्च येतो. कमी वेळेत गहू काढून मिळाल्याने फायदा ^गहू सोंगणीस एक मजूर ३०० रु. रोजाप्रमाणे एकरी ३००० रुपये खर्च येतो. तसेच मळणी यंत्राद्वारे मळणीसाठी वेगळा ३००० हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे हार्वेस्टरने मळणी केल्याने २००० रुपयांत कमी वेळेत व कमी पैशात गहू काढून मिळत असल्याने आम्ही हार्वेस्टरनेच गहू मळणी करतो. - गजानन केशवराव सोनवणे, शेतकरी
लासूर येथील शिबिरास 700 व्यावसायिकांचा सहभाग:नियमांचे पालन करावे- आयुक्त विवेक पाटील
हॉटेल व्यावसायिक, किराणा आडत व्यापारी तसेच भाजीपाला विक्रेते व्यवसायिकांनी अन्न व औषधी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्ह्याचे अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांनी केले आहे. लासुरस्टेशन येथील जैन मंगल कार्यालयात सोमवारी अन्न व औषधी प्रशासनाकडून अन्न व्यावसायिकांना अन्न हाताळणी प्रशिक्षण मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित विविध व्यवसायिकांना मार्गदर्शन करतांना अन्न औषध आयुक्त विवेक पाटील बोलत होते. व्यासपीठावर वैजापूर मर्चंट बँकेचे संचालक तथा युवा उद्योजक प्रीतमकुमार मुथा,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष चंपालाल लोढासह व्यापारी विविध व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिर यशस्वीसाठी किराणा व्यापारी सचिन पाटणी,शैलेश मुथा व मनोज आप्पा हिंगमिरे आदींनी पुढाकार घेतला. दरम्यान लासूर स्टेशनची बाजारपेठ मोठी असल्याने येथे किराणा आडत व्यापारी भाजीपाला विक्रेते हॉटेल नाष्टा व्यवसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने सुमारे सातशे व्यापाऱ्यांनी या अन्न व्यवसायिक हाताळणी शिबिरास उत्स्फूर्त सहभाग घेतला. दरम्यान लासूर स्टेशनच्या इतिहासात अन्न व औषध त्याबाबत नियम अन्न हाताळणी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आल्याने येथील युवा उद्योजक प्रीतमकुमार मुथा यांनी अन्न-औषध सहाय्यक आयुक्त विवेक पाटलांचे आभार व्यक्त केले. या शिबिरात जवळपास ७०० व्यावसायिक लोकांनी प्रशिक्षण पूर्ण केले या शिबिरासाठी अन्न व औषधी प्रशासनाचे प्रताप घोडेस्वार व शर्मा यांनी प्रशिक्षण दिले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बसवण्यासाठी शिवसेना, भाजपने उद्धवसेना आणि राष्ट्रवादीचे सदस्य फोडले आहेत. पहिल्या अडीच वर्षांत अध्यक्षपद कुणाला द्यायचे? यावर एकमत होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही पक्षांनी आपल्या सदस्यांसह फोडलेले सदस्य दौऱ्यावर नेले आहेत. आज निवडणुकीच्या वेळेपूर्वी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात येणार आहे. जिल्हा परिषदमध्ये सर्वाधिक जागा निवडून आणत भाजप मोठा भाऊ ठरला. त्यामुळे युतीमध्ये भाजपलाच सुरुवातीची अडीच वर्षे अध्यक्षपद मिळावे यासाठी भाजप आग्रही होता. शिवसेनेनेही पहिल्या अडीच वर्षांसाठी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे युतीची चर्चा फिस्कटली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंगळवारी रात्री मध्यस्थीचे प्रयत्न केले. हे प्रयत्न यशस्वी झाल्यास महायुतीचा अध्यक्ष बसेल. अन्यथा दोन्ही पक्षांनी फोडलेल्या सदस्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०१७ मध्ये भाजपच्या सर्वाधिक २३ जागा निवडून आल्या होत्या. भाजपने स्वतःचा अध्यक्ष बसवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले होते. त्याचीच पुनरावृत्ती यावेळीही होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंचायत समितीतील फुटीचा बदला घेण्याचा उद्धवसेनेचा आहे प्रयत्न छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीमध्ये भाजपने सभापती बसवला. या वेळी उद्धवसेनेचे दोन सदस्य गैरहजर ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. याचा बदला घेण्यासाठीच उद्धवसेनेने शिवसेनेला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. उबाठाचे काही सदस्य भाजपच्या बाजूने फुटणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. भाजपचाच अध्यक्ष बसणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर चर्चा सुरू आहे. महायुतीमध्ये भाजपचाच अध्यक्ष बसणार आहे. युती झाली नाही तर भाजपने स्वबळावर अध्यक्ष बसवण्यासाठी तयारी केलेली आहे. - आ. अनुराधा चव्हाण, भाजप पक्षविरोधी भूमिका घेतल्यास कारवाई कुणाला पाठिंबा द्यायचा, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. आम्ही आमची भूमिका स्पष्ट करून आमच्या सदस्यांना व्हीप बजावणार आहोत. पक्षविरोधी कारवाई केल्यास अपात्रतेची कारवाई करण्यात येईल. - अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, उबाठा शिंदेंचे आदेश अंतिम पक्षनेते एकनाथ शिंदेंचा निर्णय अंतिम असेल. युतीबाबत चर्चा सुरू आहे. स्वबळावर अध्यक्ष बसवण्यासाठीही आम्ही पूर्ण तयारी करून ठेवली आहे. पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. ते जे आदेश देतील त्याप्रमाणेच आमची भूमिका असेल. - आमदार विलास भुमरे, शिवसेना सदस्यांना विकासकामांच्या नावावर अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासन भाजप आणि शिवसेनेने फोडलेल्या सदस्यांना सभापतीपदासह विविध समित्यांवर घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. काही सदस्यांना अतिरिक्त निधी देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. काही सदस्यांना त्यांच्या व्यवसायात व्यत्यय निर्माण करण्याच्या धमक्याही दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदस्यांना आपल्याकडे घेण्यासाठी या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने येत्या १ एप्रिलपासून ‘मुख्यमंत्री महाफंड फॉर आंत्रप्रेन्युअरशिप अँड इनोव्हेशन’ ही योजना सुरू करण्याचे जाहीर केले. कौशल्य, उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत सोमवारी हीघोषणा केली. शासनाकडून नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी कर्जावर ५० टक्के व्याज सवलत दिली जाणार आहे. यातून राज्यात ३० लाखांवर रोजगार उभा राहू शकतो, अशी अपेक्षा मंत्री लोढा यांनी व्यक्त केली. या योजनेत १ लाखांवर नवउद्योजकांना १० लाखांपर्यंतच्या कर्जावर ५ टक्के व्याज सवलत देण्याची योजना आहे. आमदार विक्रांत पाटील, प्रसाद लाड, उमा खापरे यांनी विधान परिषदेत राज्यातील तरुणांच्या बेरोजगारीच्या मांडलेल्या सूचनेवर उत्तर देताना मंत्री लोढा यांनी या योजनेचीघोषणा केली. यावेळी मंत्री लोढा म्हणाले की, महाफंड ही योजना १ एप्रिलपासून सुरू होईल. एआय परिक्षा,मुल्यांकन करून यात पात्र लाभार्थ्यांची पारदर्शकपणे निवड केली जाईल. बँक कर्जावर डिबीटीद्वारे व्याज परतावा दिला जाणार आहे. त्याशिवाय त्यांच्या विभागाकडून राज्यातील २५०७ प्रशिक्षण केंद्रांमधून तब्बल ३.८४ लाख युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. २०२४ ते २०२६ दरम्यान ११३९ रोजगार मेळाव्यांतून ६२,६१३ युवकांना नोकरी मिळाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. ३० लाखांवर लोकांना रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न आहेत.एसटी महामंडळात १७७४२ कंत्राटी कर्मचारी भरणार : एसटी महामंडळात १७,७४२ चालक, वाहक व कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती केली जाणार आहे. नव्याने येणाऱ्या ८,३०० बसेस चालवण्यासाठी ही भरती करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली. स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र अव्वल राज्यात फेब्रुवारी २०२६ अखेर ३४,४७६ स्टार्टअप्स कार्यरत असून, त्यातून सुमारे ३.७९ लाख रोजगार निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेत १.३२ लाख प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना ८१५ कोटी रुपयांचे विद्यावेतन दिले. सरकारी स्टार्टअप फंडात १०% आरक्षण देण्याचा निर्णय २० फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आला आहे. तीन टप्प्यांत उद्योजकतेचा प्रवास पहिल्या टप्प्यात नोंदणी आणि एआय परीक्षा, दुसऱ्या टप्प्यात प्रगत मूल्यमापन आणि तिसऱ्या टप्प्यात थेट बँकांकडून कर्ज वितरण व ‘डीबीटी’ द्वारे व्याज परतावा दिला जाईल. महाराष्ट्र राज्य नावीन्यता संस्था या योजनेची नोडल संस्था म्हणून काम पाहणार आहे. २५,००० हून अधिक नवीन स्टार्टअप्स ही योजना एआयआधारित पारदर्शक निवड प्रक्रियेतून खऱ्या गुणवत्तेला शोधणारी एक डिजिटल इकोसिस्टिम तयार करेल. राज्यभरातील सुमारे ३० लाख तरुणांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आणि ५०% व्याज सवलत यामुळे ग्रामीण व शहरी भागांतील नवोन्मेषकांसाठी (इनोव्हेटर ) भांडवलाची अडचण दूर होईल. तंत्रज्ञान, बँक समन्वय आणि इन्क्युबेशन (मार्गदर्शन) यांची सांगड घातल्यामुळे महाराष्ट्रात २५,००० नवीन नोंदणीकृत स्टार्टअप्सद्वारे मोठ्या प्रमाणावर शाश्वत रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे, असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. योजना काय देणार... ५०% व्याज सवलत : भांडवलाचा अडथळा दूरडिजिटल पोर्टल : अर्ज ते कर्ज मंजुरी एकाच ठिकाणीमेंटॉरशिप : तज्ज्ञांकडून मार्गदर्शन AI टेस्ट + मूल्यांकन : पारदर्शक निवडवाढवण बंदर : 1 ते 1.5 लाख रोजगार‘महिमा’ संस्था : परदेशी नोकऱ्यांची संधी देणार‘बिरसा’ योजना : आदिवासी भागात स्टार्टअप उभारणार. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये व्याज सवलत: निवडक उद्योजकांना राज्य सरकारकडून ५०% व्याज सवलत दिली जाणार आहे. डिजिटल प्रशासन: अर्जापासून ते कर्ज मंजुरीपर्यंतची सर्व प्रक्रिया एकाच समर्पित ऑनलाइन पोर्टलवर पूर्ण होईल. पात्रता: १८ ते ४५ वयोगटातील महाराष्ट्र रहिवासी तरुण यासाठी पात्र असतील. मेंटरशिप: तज्ज्ञांकडून व्यवसाय मार्गदर्शन, इन्क्युबेशनची सोय केली जाईल.
वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाने मानवी वीर्याची (स्पर्म) बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. विरारमधील एका नामांकित गृहनिर्माण संस्थेत ‘लॅमिनार फ्लो’ यंत्रसामग्री बनवण्याच्या नावाखाली हा काळाबाजार सुरू होता. मनपाच्या भरारी पथकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये ४० हून अधिक स्पर्म सॅम्पल्स आणि अनेक संशयास्पद कागदपत्रे हस्तगत करण्यात आली. या प्रकरणाचे धागेदोरे अनेक राज्यांपर्यंत पसरल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांच्या नेतृत्वाखालील टीमने विरारमधील जीवदानी को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील एका कंपनीवर छापा टाकला. ही कंपनी तांत्रिकदृष्ट्या आयव्हीएफ (IVF) केंद्रांसाठी लागणारे ‘लॅमिनार फ्लो’ (तापमान आणि हवा नियंत्रण यंत्र) बनवण्याचे काम करत होती. या यंत्रांच्या आडून मानवी सॅम्पल्सचा बेकायदेशीर पुरवठा केला जात होता. विरार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आरोग्य विभागाकडून ३ तासांचे स्टिंग ऑपरेशन आरोग्य विभागाच्या टीमने ग्राहक बनून या ठिकाणी प्रवेश केला. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी केवळ सुटे भाग बनवत असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने तीन तास कसून तपासणी केल्यानंतर धक्कादायक पुरावे हाती लागले. तपासणीदरम्यान एका विशेष वेसलमध्ये साठवलेले मानवी वीर्याचे सॅम्पल्स सापडले. असे ४० हून अधिक सॅम्पल्स सापडले.
सहावीतील विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला:अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रकार, चेहरा 7% भाजला
शाळा सुटल्यानंतर सायकलने घराकडे निघालेल्या इयत्ता सहावीतील १२ वर्षीय विद्यार्थिनीवर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने ॲसिड फेकून गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना सोमवारी तालुक्यातील एका गावात घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून विद्यार्थिनी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १२ वर्षीय विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर सायकलवरून घरी जात होती. त्याच वेळी हा हल्ला केला. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी मुलीला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तेथून तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. रस्त्यात अडवून विचारले घर येथेच आहे का? मी नेहमीप्रमाणे माझी शाळा सुटल्यानंतर घराकडे जात होते. तेव्हा ओढ्याजवळ पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या एका मुलाने मला अडवून तुझे घर येथेच आहे का, असे विचारले. आणि मला काही कळायच्या आत हल्लेखोराने चेहऱ्यावर ॲसिड फेकले. त्यानंतर माझा ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील अनेक नागरिक मदतीसाठी धावले, मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाला होता. - पीडिता. आरोपीला अटक करून कठोर कारवाईची मागणी घटनेची माहिती मिळताच कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी प्रवरा रुग्णालय, लोणी येथे भेट देऊन जखमी विद्यार्थिनीची विचारपूस केली. तसेच मुलीच्या आई व नातेवाइकांना धीर देत आरोपीस लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
दहावीच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे कुलूप तोडून भूगोल विषयाच्या ५० प्रश्नपत्रिकांची चोरी करण्यात आली. सांगोला (जि. सोलापूर) येथील सांगोला विद्यामंदिर केंद्रावर मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. सकाळी शिपाई स्टेशनरी पाहण्यासाठी गेल्यानंतर स्ट्राँगरूमचे सील तुटलेले दिसले. त्यानंतर मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी आले. त्यांनी पाहणी केल्यानंतर भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे दोन गठ्ठे (प्रत्येकी २५ प्रश्नपत्रिका) गायब झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दिली. त्यावरून सांगोला पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. बोर्डाने यंदा प्रत्येक परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही लावणे सक्तीचे केले आहे. त्यानुसार सांगोला विद्यामंदिर प्रशालेत एकूण ४७ वर्गांमध्ये सीसीटीव्ही आहेत. परिसरातही सुमारे २० कॅमेरे आहेत. मात्र स्ट्राँगरूमच्या परिसरात किंवा स्ट्राँगरूमध्ये कॅमेरा नाही. त्याचा फायदा घेऊन ही चोरी झाल्याचे सांगितले जाते. या निष्काळजीपणाबद्दल मुख्याध्यापक तथा प्राचार्य अमोल गायकवाड यांना निलंबित करण्यात आले, तर प्रभारी गटशिक्षण अधिकारी सुयोग नवले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले. जास्त क्षमतेचे सर्व्हर नसल्याने रात्री कॅमेरे बंद होते, असे मुख्याध्यापकांनी सांगितले. पण ते उत्तर संयुक्तिक नसल्याचे ते म्हणाले. बंदोबस्तावर तैनात पोलिसावरही निलंबनाची कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दहावी बोर्ड परीक्षेतील शेवटचा भूगोल विषयाचा पेपर बुधवारी सकाळी ११ वाजता आहे. सांगोल्यातील सांगोला विद्यामंदिर प्रशाला केंद्रावर तालुक्यातील सर्व केंद्राच्या प्रश्नपत्रिका ठेवण्यासाठी स्ट्राँगरूम केली आहे. पेपरच्या दोन दिवस अगोदर सोमवारी रात्रीच स्ट्राँगरूम फोडून प्रश्नपत्रिकेचे दोन गठ्ठे चोरीस गेल्याचे उघड झाले. स्ट्राँगरूममधील चोरट्यांनी पेटी क्रमांक ५४४९ मधील इयत्ता दहावीच्या सामाजिक शास्त्र पेपर क्रमांक २ (भूगोल) विषयाच्या २५-२५ अशा दोन पॅकेटमधील एकूण ५० प्रश्नपत्रिका लंपास केल्या आहेत. या प्रकरणी प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांनी फिर्याद दिली आहे. अपर पोलिस अधीक्षक डॉ. प्रीतमकुमार यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. सुरक्षेसाठी पोलिस, दोन होमगार्ड तैनात, तरी चोरी झालीच कशी? प्राथमिक तपासात स्ट्राँगरूम परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे चोरीचा कोणताही व्हिडिओ पुरावा उपलब्ध झाला नाही. या ठिकाणी सुरक्षा म्हणून एक पोलिस कर्मचारी व दोन होमगार्ड नियुक्त होते. मात्र, चोरीच्या वेळी ते नेमके कुठे होते याची चौकशी सुरू आहे. ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पोलिसावरही निलंबनाची कारवाई होणार आहे. पेपर व्हायरल न झाल्यामुळे आज परीक्षा होणारच : पुणे बोर्ड अध्यक्ष प्रश्नपत्रिका चोरीला गेल्यामुळे पुणे बोर्डाचे अधिकारी सांगोला विद्यामंदिरमध्ये दाखल झाले. त्यामुळे बुधवारी पेपर होणार की नाही याबाबत साशंकता होती. परंतु हा पेपर व्हायरल झालेला नाही. तसेच प्रश्नपत्रिकांचा पुरेसा संच उपलब्ध आहे. त्यामुळे परीक्षा वेळेवरच होईल, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप व पुणे बोर्डाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी स्पष्ट केले. दहावी बोर्ड परीक्षेतील शेवटचा भूगोल विषयाचा पेपर बुधवारी सकाळी ११ वाजता आहे. सांगोल्यातील सांगोला विद्यामंदिर प्रशाला केंद्रावर तालुक्यातील सर्व केंद्राच्या प्रश्नपत्रिका ठेवण्यासाठी स्ट्राँगरूम केली आहे. पेपरच्या दोन दिवस अगोदर सोमवारी रात्रीच स्ट्राँगरूम फोडून प्रश्नपत्रिकेचे दोन गठ्ठे चोरीस गेल्याचे उघड झाले. स्ट्राँगरूममधील चोरट्यांनी पेटी क्रमांक ५४४९ मधील इयत्ता दहावीच्या सामाजिक शास्त्र पेपर क्रमांक २ (भूगोल) विषयाच्या २५-२५ अशा दोन पॅकेटमधील एकूण ५० प्रश्नपत्रिका लंपास केल्या आहेत. या प्रकरणी प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांनी फिर्याद दिली आहे. अपर पोलिस अधीक्षक डॉ. प्रीतमकुमार यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तहसीलदार बाळूताई भागवत व प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली.
केंद्र शासनाने शिल्लक व्यावसायिक गॅस वाटपाचे अधिकार राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गरजा ओळखून प्राधान्य क्षेत्रांना पुरवठ्याची कार्यवाही जिल्हाधिकारी करणार आहेत. त्यामुळे येत्या ८ ते १० दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत होईल. पेट्रोल पंपांवर ६१ रुपये लिटर दराने केरोसिन (रॉकेल) वाटपाची तयारी राज्य सरकारने केली आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली. पुरवठा सुरळीत करण्यासाठी विशेष जिल्हा समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. केरोसिन वाटप नियमावली राज्य शासनाने जारी केली नाही सूत्रांनुसार केरोसिन वाटपाची नियमावली शासनाने जारी केलेली नाही. त्यामुळे रेशन कार्डधारकांनाच केरोसिन मिळेल का? किती लिटर मिळेल? आठवड्यातून एकदा की दोनदा वितरण होणार? ग्रामीण भागात मिळेल की शहरी भागांमध्येही मिळणार. ही योजना किती कालावधीसाठी आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
राज्यातील ग्रामीण भागात स्वतःचे घर बांधू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी राज्य सरकारने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना (एमआरटीपी) कायद्यात लवकरच सुधारणा करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली. यामुळे घरांच्या नकाशांना मंजुरी मिळण्याची प्रक्रिया आता जिल्हा मुख्यालयाऐवजी ग्रामपंचायत आणि तहसील स्तरावरच पूर्ण होणार आहे. भाजप आमदार विक्रांत पाटील यांनी नियम ९७ अन्वये हा मुद्दा उपस्थित केला होता. “ग्रामीण भागातील जनतेला घर बांधण्यासाठी जिल्हा पातळीवर धावपळ करावी लागते. ही प्रक्रिया अत्यंत किचकट आणि त्रासदायक असल्याने अनेक नागरिक परवानगी न घेताच अनधिकृत बांधकामे करतात असे पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ऑनलाइन प्रक्रियेचे अडथळे दूर करण्यासाठी निर्णय यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, “मुंबई महानगर क्षेत्रासह (एम एम आर रिजन) संपूर्ण राज्यात घरांच्या मंजुरीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. मात्र, जिल्हा मुख्यालयांकडे अर्जांचा ओघ प्रचंड असल्याने मंजुरी मिळण्यास मोठा विलंब होतो. सर्वसामान्यांची ही अडचण लक्षात घेऊन सरकार एमआरटीपी कायद्यात दुरुस्ती करून हे अधिकार स्थानिक पातळीवर सोपवणार आहे. नेमका बदल काय होणार? ग्रामपंचायत स्तरावर : एका ठरावीक चौरस फुटापर्यंतच्या छोट्या घरांना मंजुरी देण्याचे अधिकार थेट ग्रामपंचायतीला देण्याबाबत सरकार विचार करत आहे. तहसील स्तरावर : मोठ्या घरांच्या बांधकामासाठी आता जिल्हा मुख्यालयात न जाता तहसील कार्यालयातूनच परवानगी मिळवता येईल. अनधिकृत बांधकाम वैध झाल्याने महसूल वाढेल एमआरटीपी कायद्यातील प्रस्तावित सुधारणा ही ‘प्रशासकीय विकेंद्रीकरणाची’ मोठी पाऊलवाट आहे. यामुळे जिल्हास्तरावरील कामाचा ताण कमी होऊन नागरिकांचाही त्रास कमी होणार आहे. वेळ व पैशाची बचत होणार आहे. किचकट नियमांमुळे होणारी अनधिकृत बांधकामे आता कायदेशीर चौकटीत येतील, ज्यामुळे ग्रामीण नियोजनाला शिस्त लागेल आणि सरकारचा महसूलही वाढेल.
मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावर अदानी टोटल गॅसचे समृद्धीवरील पहिले सीएनजी फिलिंग स्टेशन मे महिन्यापासून कार्यान्वित होत आहे. मुंबईकडे जाताना अमरावती जिल्ह्यातील शिवणीजवळील ‘एचपीसीएल’ पंपावर ही सुविधा वाहनचालकांना मिळणार आहे. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या समृद्धी महामार्गावर दररोज लाखो वाहनांची ये-जा सुरू आहे. या वाहनांसाठी समृद्धी महामार्गावर ठराविक अंतरावर पेट्रोल, डिझेलची सुविधा उपलब्ध आहे. मात्र मुंबई ते नागपूर या ७३८ किलोमीटरमध्ये एकही सीएनजी फिलिंग स्टेशन नाही. पेट्रोल व डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त आहे. तो पर्यावरणपूरकही असल्याने सीएनजीची मोठी मागणी आहे. या स्टेशनवर वाहनांना २४ तास सीएनजी पुरवठा केला जाईल. या ठिकाणी चांदूर रेल्वे तालुक्यातील बोरी येथील मदर स्टेशनवरून सीएनजीचा पुरवठा करण्यात येणार आहे. बोरी ते एचपीसीएल फिलिंग स्टेशन हे अंतर कमी आहे. अमरावती व परिसरात सीएनजीचा सध्या दर सरासरी ९४ रुपये प्रतिकिलो आहे. २२ स्टेशन्स कार्यान्वित सध्या अमरावती, वाशिम, अकोला, हिंगोली आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये समृद्धी महामार्ग वगळता जिल्ह्यातील अंतर्गत व अन्य मार्गांवर सध्या सीएनजीचे २२ फिलिंग स्टेशन्स सुरू झाले आहेत. यामध्ये अमरावती ८, यवतमाळ ३, अकोला ३, हिंगोली ७ आणि वाशिममधील एका स्टेशनचा समावेश आहे. २४ तास उपलब्ध राहणार सीएनजी मेच्या पहिल्याच आठवड्यात समृद्धीवरील पहिले सीएनजी फिलिंग स्टेशन शिवणीजवळ ‘एचपीसीएल’ पंपावर सुरू होणार आहे. येथे २४ तास गॅस उपलब्ध राहणार आहे. पुढील सहा महिन्यांत आणखी ५ फिलिंग स्टेशन सुरू करण्याचे नियोजन आहे. -योगेशकुमार पारधी, विदर्भ प्रमुख, अदानी टोटल गॅस. नागपूर-बुलढाणादरम्यानही सोय तूर्तास मे महिन्यापर्यंत सीएनजीचे एक फिलिंग स्टेशन सुरू होणार आहे. त्यानंतर पुढच्या सहा महिन्यांत नागपूर ते बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेपर्यंत समृद्धीवर दोन्ही बाजूंनी पाच सीएनजी फिलिंग स्टेशन सुरू होणार आहेत.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यू प्रकरणावरून मंगळवारी विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. “अजितदादांच्या मृत्यूबाबत संशयाचा धूर येत असताना सरकार चर्चा का टाळत आहे?’, असा जळजळीत सवाल करत विरोधी आमदारांनी सभागृह डोक्यावर घेतले. अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीमुळे ही चर्चा लांबणीवर पडली आहे. येत्या सोमवारी (किंवा बुधवारी) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रकरणावर विशेष चर्चा घेतली जाईल, असे आश्वासन सभापती राम शिंदे यांनी दिल्यानंतर वातावरणातील तणाव निवळला. २८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक साशंकता असल्याचा मुद्दा उपस्थित करत, या तपासाबाबत सत्यता महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावी यासाठी विधान परिषदेत चर्चा करावी. त्याबाबत सरकारने निवेदन करावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार) आमदार शशिकांत शिंदे यांनी केली होती. सभापती राम शिंदे यांनीही त्याबाबत आश्वासन दिले होते. परंतु, तीन आठवड्यांचा कालावधी उलटून गेला, तरी चर्चा होत नसल्याने विरोधक आक्रमक झाले होते. सातत्याने तारीख पे तारीख दिली जाते. महाराष्ट्राला या मृत्यूबाबत उत्तर हवे आहे, असा मुद्दा अमोल मिटकरी यांनी मांडला. कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी या मुद्द्याला समर्थन देत, महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांचा असा मृत्यू होणे, हा कंपनीचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप केला. तर शशिकांत शिंदे यांनी सत्य बाहेर येऊ नये म्हणून चर्चा टाळली जात आहे का, असा सवाल केला. आमदार सचिन अहिर यांनी केवळ शोक प्रस्ताव पुरेसा नाही तर सखोल चर्चा केल्यास चौकशीची दिशा स्पष्ट होईल, असे म्हटले. आमदार संतापल्याने गोंधळ निर्माण झाला. सभापतींच्या निवेदनातून कोणत्या दिशेने तपास सरकला याची स्पष्टता येईल अजितदादांच्या विमान अपघाताला दीड महिना उलटला तरी तपासाबाबत अद्याप गूढ कायम आहे. या प्रकरणाची केंद्राकडून समांतर चौकशी सुरू असतानाच, आता राज्य सरकारच्या तपासाचा ‘स्टेटस रिपोर्ट’ काय आहे, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. म्हणूनच, विधान परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे आगामी निवेदन अत्यंत महत्वाचे आहे. या निवेदनातून तांत्रिक बिघाड, घातपात की मानवी चूक, यापैकी नेमक्या कोणत्या दिशेने तपास सरकला आहे, याचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे. चर्चेसाठी रोहित पवारांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट दरम्यान, राष्ट्रवादीचे (शप) आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूवर विधिमंडळ अधिवेशनात सभागृहात सविस्तर चर्चा करण्याची विनंती करणारे एक निवेदन त्यांनी नार्वेकर यांना दिले. या मुद्यावर विधिमंडळात साधी चर्चाही न होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे आपण नार्वेकरांना भेटून विनंती केली, असे रोहित म्हणाले.
धर्मस्वातंत्र्याचे विधेयक मंजूर
धर्मस्वातंत्र्याचे विधेयक मंजूरविधान परिषदेतही शिक्कामोर्तब, लवकरच कायदा मुंबई : प्रतिनिधी धर्मपरिवर्तन करण्यापूर्वी ६० दिवस नोटीस देणे अपेक्षित आहे, हा नियम कशासाठी तर धर्मांतर बळजबरीने तर होत नाही ना, याची खात्री करण्यासाठी हा नियम आहे. विरोधक आम्हाला विचारत आहेत की, आकडेवारी आहे का, तर त्यांना सांगणे आहे की जिथे कायदा नाही, तिथे तुम्ही आकडेवारी कुठून आणणार, […] The post धर्मस्वातंत्र्याचे विधेयक मंजूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रात आज अनेक भागांमध्ये गारांचा पाऊस पडला. अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसही झाला आहे. सांगलीच्या मिरजमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. मिरजच्या बेडग आणि आरगसह येथील परिसरात पाऊस पडला आहे. हवामान विभागाने सांगली जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा जो अंदाज वर्तवला होता, तो आज तंतोतंत खरा ठरला असून जिल्ह्याच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि जोरदार गारपीट झाली आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवनावर परिणाम झाला असून, पावसासोबतच झालेल्या मोठ्या गारपीटीमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्येही गारपीट झाली. यामुळे तालुक्यातील गहू, ज्वारी आणि द्राक्षे या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्यातील तीन जिल्ह्यांना गारपीटीने झोडपून काढले आहे. यात सांगली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांचा समावेश आहे. भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी 'हाय अलर्ट' जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज असून, या काळात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामानातील या बदलाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे आणि विजांपासून संरक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

29 C