थर्टी फर्स्टचे निमित्त करून दारू पिऊन निघोज गावात फिरण्याचा बेत असेल तर सावधान! कारण झिंगाट होऊन गावात फिरणाऱ्या तळीरामांची गाढवावरून धिंड काढण्याचा निर्णय गावातील महिलांनी घेतला आहे. गावात पूर्णपणे दारूबंदीसाठी गाढवावरून धिंड काढण्याचे पाऊल महिला उचलत आहेत. २०१६ मध्ये महिलांनी मतदान करून निघोजमधील परवानाधारक दारू दुकाने बंद केली होती. त्यानंतरही गावातील हॉटेल व ढाब्यावर सर्रास अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप करत दारूबंदीविरोधी महिला समितीच्या सदस्यांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रारी करूनही दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आता तळीरामांना जरब बसवण्यासाठी वेगळा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर निघोजमधील दारूबंदी चर्चेचा विषय ठरला आहे. कोणतीही कारवाई होत नसल्याने महिलांनी आता तळीरामांना अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. निघोजमधील दारूबंदीबाबत जनजागृती करण्यासाठी व गावातील दारू विक्रेत्यांवर कारवाईसाठी मंगळवारी थर्टी फर्स्टचे निमित्त साधून महिला गावातून फेरी काढणार आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाला तसे निवेदन दिले आहे. पोलिसांकडून मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या जनजागृती फेरीत पोलिसांनीही सहभागी व्हावे, असे साकडे या महिलांनी घातले आहे. दारूबंदीसाठी महिलांचा ८ वर्षांपासूनचा संघर्ष निघोज गावाची लोकसंख्या १५ हजारांच्या पुढे आहे. दारूच्या व्यसनामुळे गावातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. त्यामुळे गावात दारूबंदी व्हावी म्हणून मागील ८ वर्षांपासून महिला संघर्ष करत आहेत. तसा ग्रामसभेत ठराव करून दारूबंदीचा निर्णयही झाला. पण प्रत्यक्षात छुप्या पद्धतीने गावातील काही हॉटेल व ढाब्यांवर अवैध दारू विक्री होतच आहे. पोलिसही यावर कारवाई करत नसल्याने त्यांनी थर्टी फर्स्टला मद्यपींची गाढवावरून धिंड काढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही जनजागृती करणार गावात कुणालाही अवैध दारू विक्री करता येणार नाही. अशा प्रकारे दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही पुढाकार घेतला असून गावातील दारूबंदी कायमस्वरूपी बंद करणार आहोत. याची सुरुवात गावात जनजागृती करून करणार आहे. - कांता लंके, अध्यक्ष, दारूबंदीविरोधी समिती, निघोज.
शिवसेना-भाजप युती भाजपच्या अहंकारामुळे तुटली असून, स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संदेशही डावलले, अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या असहकार आणि अहंकारी भूमिकेमुळे युती संपुष्टात आल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. शिरसाट यांच्या म्हणण्यानुसार, भाजपने युतीचे सूत्र बदलले. जाणूनबुजून शिवसेनेला कमी जागा देऊन युती तोडण्याचे नियोजन स्थानिक भाजप नेत्यांकडून करण्यात आले होते. त्यामुळे भाजप वारंवार वेगळ्या भूमिका घेत होता, असेही त्यांनी नमूद केले. युतीच्या सूत्रामध्ये एकमत होत नसल्यामुळे दोन्ही पक्षांनी इच्छुक उमेदवारांना 'एबी फॉर्म' देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी इच्छुक उमेदवारांना 'एबी फॉर्म' वाटप सुरू झाले आहे. माजी महापौर नंदकुमार घोडेले हे इच्छुक उमेदवारांची यादी तयार करत असून, त्यांना तात्काळ फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीबाबत दहा बैठका होऊनही कोणताही तोडगा न निघाल्याने, शिवसेनेने भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला अमान्य केला आहे. त्यामुळे शिवसेनेने आपल्या सर्व उमेदवारांची यादी तयार करून त्यांना फॉर्म भरण्याबाबत सूचना दिल्या आहेत. दरम्यान, महापौर विकास जैन यांनी नाराजी व्यक्त करत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राजेंद्र जंजाळ यांनीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. आता शिवसेनेच्या आणखी एका नेत्याने हा निर्णय घेतल्याने पक्षातील नाराजी समोर आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. भाजप आणि शिंदे गटामधील जागावाटप जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. भाजप 137 आणि शिंदे गट 90 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा झाल्यानंतर राऊत यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली. शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भाजपने फेकलेल्या जागांवर लढत आहेत, हे केवळ हास्यास्पद नाही तर धक्कादायक आणि लाजिरवाणे आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. या वक्तव्यामुळे मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेच्या इतिहासाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, आतापर्यंत मुंबईमध्ये शिवसेनाच मोठ्या भावाच्या भूमिकेत होती आणि भाजपला जागा देत होती. पण आज परिस्थिती पूर्णपणे उलटली आहे. स्वतःला शिवसेना म्हणवणाऱ्यांना आता भाजपच्या दारात उभे राहून जागा मागाव्या लागत आहेत. अमित शहांची शिवसेना, असल्याचा आरोप करत राऊत म्हणाले की, ज्यांनी कधीही कुणासमोर मान तुकवली नाही, त्या शिवसेनेच्या नावाचा आज अपमान केला जात आहे. गेल्या 60 वर्षांच्या इतिहासात शिवसेना कधीच कुणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. संजय राऊत यांनी शिंदे गटावर अधिक तीव्र शब्दांत टीका करत सांगितले की, युती व्हावी म्हणून एकनाथ शिंदे गटाने थेट अमित शहांच्या दारात धाव घेतली. भाजपने दिलेल्या जागांवर समाधान मानणे ही स्वाभिमानाची नाही, तर लाचारीची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपने जागा दिल्या, त्या स्वीकारल्या आणि त्यावर निवडणूक लढवायची, हे शिवसेनेच्या परंपरेला धरून नाही, असे राऊत म्हणाले. त्यांनी हे दृश्य मराठी माणसासाठी लाजिरवाणे असल्याचे सांगत, हा मराठी अस्मितेचा पराभव असल्याची भावना व्यक्त केली. सन्मानाने, स्वबळावर लढण्याची भूमिका राऊत यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि आम्ही सन्मानाने आघाडी केली आहे. मुंबईत सुमारे 140 जागांवर आम्ही लढत आहोत, असे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या पक्षाकडूनही मोठ्या प्रमाणात जागा लढवल्या जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसला देखील योग्य त्या जागा देण्यात आल्या आहेत. ही सगळी मांडणी परस्पर सन्मान आणि समन्वयातून झाल्याचे त्यांनी नमूद केले. याउलट शिंदे गट भाजपने दिलेल्या जागांवरच निवडणूक लढवत असल्याने जनता याचा निश्चितच विचार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हात पसरून मागणी, राऊतांचा टोला मुंबईत शिंदे गटाला 100 पेक्षा जास्त जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असल्याच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी उपरोधिक उत्तर दिले. मिळाव्यात म्हणजे स्वतःच्या ताकदीवर नाहीत, त्यांनी द्याव्यात, असा टोला त्यांनी लगावला. याचा अर्थ भाजपसमोर हात पसरून जागा मागण्यात आल्या, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी 2017 चा संदर्भ देत सांगितले की, त्या वेळी भाजपने अडेलटट्टूपणाची भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेने स्वाभिमानाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्यालाच स्वाभिमान म्हणतात, असे राऊत यांनी ठामपणे सांगितले. ना दिल्लीत दारात बसलो, ना लाचारी पत्करली संजय राऊत यांनी भाजपसोबतच्या जुन्या संघर्षांचा उल्लेख करत सांगितले की, जेव्हा भाजपने शब्द पाळला नाही आणि पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शिवसेनेने स्वतःहून स्वाभिमानाने बाजूला होण्याचा निर्णय घेतला. आम्ही दिल्लीत जाऊन कुणाच्या दारात बसलो नाही, ना कोणासमोर मान झुकवली, असे त्यांनी ठणकावून सांगितले. जे काही असेल, त्या ताकदीने आम्ही लढलो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम ठेवला, असा दावा त्यांनी केला. मात्र, सध्याचे चित्र वेगळे असून, शिंदे गटाने शिवसेना हे नाव वापरणे थांबवावे, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबई, मराठी अस्मिता आणि भाजपवर गंभीर आरोप राऊत यांनी मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि तिच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमित शहा आणि त्यांच्याशी संबंधित बिल्डर लॉबी मुंबई गिळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही निवडणूक त्याच विरोधातील लढाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या उमेदवार यादीत अमराठी उमेदवार मोठ्या प्रमाणावर असल्याबाबत विचारले असता, भाजपचा मराठी माणसाशी, महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या अस्मितेशी काहीही संबंध नसल्याचा घणाघात त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्या यादीत परप्रांतीय उमेदवार असणे स्वाभाविक असल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शिवसेना - भाजपचे एबी फॉर्म वाटप सुरू:युतीतील एकमत न झाल्याने दोन्ही पक्षांकडून उमेदवारांना फॉर्म
छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना-भाजप युतीमध्ये इच्छुक उमेदवारांना 'एबी' फॉर्म वाटप सुरू झाले आहे. युतीतील जागावाटपावर एकमत होत नसल्याने दोन्ही पक्षांनी हा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी हे फॉर्म वाटले जात आहेत. माजी महापौर नंदकुमार घोडेले इच्छुकांच्या याद्या तयार करत आहेत. गेल्या अनेक बैठकांनंतरही छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही. भाजपने दिलेला फॉर्म्युला शिवसेनेला मान्य नसल्यामुळे, शिवसेनेने आपल्या सर्व उमेदवारांची यादी तयार करून त्यांना फॉर्म भरण्याबाबत सूचना दिल्या आहेत. दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना 'एबी' फॉर्म देण्यास सुरुवात केली आहे. 'एबी' फॉर्म वाटप सुरू असले तरी, युती तुटली आहे की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा कोणीही करत नाहीये. नंदकुमार घोडेले यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी त्यांना इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणतीही जोखीम न घेता, आम्ही इच्छुकांच्या याद्या तयार करून त्यांना 'एबी' फॉर्म देणार आहोत, असे घोडेले म्हणाले. दरम्यान, पक्षाच्या एकूण कामकाजावर नाराजी व्यक्त करत माजी महापौर विकास जैन यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राजेंद्र जंजाळ यांनीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. विकास जैन हे शिवसेनेचे दुसरे नेते आहेत ज्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
संभाजीनगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, महायुती तुटल्याची अधिकृत घोषणा शिवसेना शिंदे गटाचे नेते तसेच मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. भाजपचा हट्ट आणि अंहकार यामुळेच ही युती टिकू शकली नाही, असा थेट आणि तीव्र आरोप शिरसाट यांनी केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये भाजपकडून सातत्याने दबावाचे राजकारण केले जात होते. जागावाटपात शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्न झाला, तसेच स्थानिक नेत्यांचा सन्मान न राखता एकतर्फी निर्णय लादले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शिरसाट म्हणाले की, महायुती ही समानतेच्या तत्वावर उभी असते, मात्र संभाजीनगरमध्ये भाजपने भागीदार पक्षाला गृहित धरले. अनेक बैठका, चर्चा आणि समन्वयाचे प्रयत्न करूनही भाजपकडून कोणतीही लवचिकता दाखवण्यात आली नाही. अखेर स्वाभिमान आणि कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी युती तोडण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला, असे त्यांनी स्पष्ट केले. या घोषणेमुळे संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आगामी महापालिका निवडणुकीत आता थेट आणि तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे. महायुतीतील या महास्फोटामुळे भाजपसह सर्वच पक्षांच्या रणनीतींवर मोठा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. सत्ताधारी महायुतीमधील एक महत्त्वाचा घटक असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णय घेतल्याची अधिकृत घोषणा मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपच्या भूमिकेमुळे आणि सातत्याने दाखवण्यात आलेल्या अहंकारी वृत्तीमुळेच हा निर्णय घ्यावा लागला, असा थेट आणि तीव्र आरोप त्यांनी केला. या घोषणेमुळे संभाजीनगरमधील शिंदेसेना-भाजप युतीला मोठा धक्का बसला असून, आगामी महापालिका निवडणुकीचे राजकीय गणित पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले की, संभाजीनगरमध्ये युती व्हावी, यासाठी राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाकडूनही गंभीर प्रयत्न करण्यात आले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून युतीसाठी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पातळीवर अनेक वेळा बैठका घेण्यात आल्या, चर्चा झाल्या आणि समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरुवातीपासूनच भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांची भूमिका वेगळी असल्याचे जाणवत होते. युतीबाबत बोलण्यात काही आणि प्रत्यक्ष कृतीत काही, अशी परिस्थिती निर्माण होत होती, ज्यामुळे शंका बळावत गेल्या, असे शिरसाट यांनी सांगितले. युती वाचवण्यासाठी आपण स्वतः सातत्याने प्रयत्न केल्याचेही संजय शिरसाट यांनी नमूद केले. स्थानिक नेत्यांशी फोनवरून चर्चा करण्यात आल्या. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही सविस्तर बैठक झाली, असे त्यांनी स्पष्ट केले. या चर्चांमधून काही सकारात्मक संकेत मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, बैठका आणि चर्चांनंतरही भाजपच्या भूमिकेत फारसा बदल झाला नाही. वरवर युतीबाबत सकारात्मक बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात शिवसेनेला कमी लेखणारी भूमिका कायम राहिली, असा आरोप शिरसाट यांनी केला. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर जागावाटप ठरल्याचा दावा पत्रकार परिषदेत बोलताना संजय शिरसाट यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, युतीबाबतचा अंतिम टप्पा आला असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जागावाटपावर सहमती झाली होती. त्या चर्चेनंतर युती निश्चित झाली, अशा समजुतीत शिवसेना होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही सकारात्मक संदेश गेला होता. मात्र, प्रत्यक्षात जागावाटपाची अंमलबजावणी करण्याची वेळ आली, तेव्हा चित्र वेगळेच समोर आले. भाजपकडून शिवसेनेच्या जागाच सोडाव्यात, असा प्रस्ताव पुढे करण्यात आला, असे शिरसाट यांनी सांगितले. शिवसेनेच्या जागांवर गदा, कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध भाजपने मांडलेला प्रस्ताव शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत अपमानास्पद असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या ताकदीच्या जागा सोडण्याची मागणी करण्यात आली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नव्हती. आमच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान आणि पक्षाची भूमिका लक्षात घेता असा निर्णय घेणे शक्य नव्हते, असे त्यांनी ठामपणे सांगितले. एकीकडे युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे शिवसेनेला कमकुवत करणारे प्रस्ताव मांडायचे, ही भाजपची दुहेरी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपकडून सन्मानजनक प्रस्ताव नाही, अहंकारच कारण ठरला संजय शिरसाट यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेवटच्या क्षणापर्यंत भाजपकडून कोणताही नवा किंवा सन्मानजनक प्रस्ताव देण्यात आलेला नाही. उलट भाजपने आपली आग्रही भूमिका कायम ठेवली. आमची ताकद वाढली आहे, आम्ही काहीही करू शकतो, असा अहंकार भाजपच्या भूमिकेतून दिसून येत होता. हा अहंकारच आज युती तुटण्याचे मुख्य कारण ठरला, असे शिरसाट यांनी ठामपणे सांगितले. युती समानतेच्या तत्वावर चालते, मात्र येथे ते तत्व पायदळी तुडवले गेल्याचा आरोपही त्यांनी केला. युतीत फूट, संभाजीनगरच्या राजकारणात नवे समीकरण महायुती तुटल्याची ही घोषणा संभाजीनगरच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी ठरली आहे. शिंदेसेना-भाजप युतीतील हा स्फोट महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने सर्वच पक्षांच्या रणनीतींवर त्याचा परिणाम होणार आहे. आता निवडणुकीत थेट आणि तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय शिरसाट यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय चर्चांना वेग आला असून, येत्या काळात संभाजीनगरच्या निवडणूक रणांगणात आणखी मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांची लगबग वाढली आहे. अनेक ठिकाणी सत्ताधारी महायुतीसह व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीतील घटकपक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची दमछाक होण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांत महायुती व महाविकास आघाडीतील घटकपक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. त्यामुळे या ठिकाणी वेगळेच राजकीय समीकरण दिसून येत आहे. दरम्यान, मुंबईत आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून उर्वरित मनपांमध्ये अर्ज स्वीकारण्याची वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. या लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहूया महापालिका निवडणुकीशी संबंधित अपडेट्स, पण संक्षिप्त स्वरुपात... खालील तक्त्यात पाहा निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल
महापालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली आहे. त्यानुसार भाजप ६६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १४ जागा लढवण्याचे निश्चित झाले आहे. या युतीची घोषणा सोमवारी रात्री ११ वाजता भाजपचे आ. रणधीर सावरकर, खा. अनुप धोत्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक राज्यमंत्री इंद्रनील नाईक,आ. अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आली. तर शिवसेना शिंदे गटाशी रात्री उशिरापर्यंत बोलणी सुरुच असून, त्यात युतीची शक्यता कमीच आहे. काही प्रभागात भाजप आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत आहेत. मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता अवघे काही तासच शिल्लक असतानाही सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा बैठक एका हॉटेलात पदाधिकाऱ्यांची बैठक सुरुच होती. त्यात रात्री ११ वाजता भाजप आणि राष्ट्रवादीचा तिढा सुटला मात्र शिंदे सेनेची जागांबाबत तडजोड होत नसल्याने काही प्रभागात भाजप आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांत मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. उभय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल, महानराध्यक्ष जयंत मसने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष विजय देशमुख, प्रदेश पदाधिकारी मदन भरगड आदी उपस्थित होते. शिंदे सेनेशी झालेल्या चर्चेवेळी शिंदे सेनेचे नेते गोपीकिशन बाजोरिया, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आश्विन नवले, श्रीरंग पिंजरकर आदी उपस्थित होते. भाजपच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी नगरसेवक हरीश आलीमचंदानी यांनी भाजपमध्ये पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला असून, पक्षाने त्यांचे निलंबन मागे घेतले. त्यामुळे पक्षात त्यांचे स्वागत खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवारी स्वागत केले. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष जयंत मसने, संतोष शिवरकर, वसंत बाछुका, गिरीश जोशी, अजय शर्मा, माधव मानकर, डॉ. अमित कावरे, संजय गोटफोडे, आदी उपस्थित होते. पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचे पालन करेल, अशा शब्दात हरीश आलीमचंदानी यांनी आपल्या घरवापसीचे स्वागत केले. माजी नगरसेवक हरीश आलीमचंदानींची ‘घरवापसी’
उबाठा-प्रहार पक्षाची युती; मशाल चिन्हावर लढणार:भाजपला घेरण्याची आखली रणनीती
मनपा निवडणुकीत उमेदवार अर्ज भरण्यासाठी एकच दिवस राहिला असतानाच सोमवारी शिवसेनेच्या (ठाकरे गट) व बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाची युती झाली. मात्र ही युती तूर्तास जुने शहरातील प्रभाग क्रमांक ८ साठीच आहे. अन्य जागांची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, २ जोनवारी रोजी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. प्रहारने शहरातील अनेक मुद्द्यांवर आंदोलन करत लक्ष वेधून घेतले होते. तेथूनच प्रहार महापालिका निवडणुकीत उतरणार असल्याची चुणूक दिसून आली होती. मनपा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला. मात्र मविआधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आता आपला जुना मित्र पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाला जवळ केले आहे. आघाडीबाबत दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. प्रहार मशालवर लढणार ^शिवसेना व प्रहार जनशक्ती पक्ष सोबत लढणार असला तरी उमेदवारांचे चिन्ह मशाल राहील. सध्या एक प्रभागात प्रहारला सोबत घेतले आहे. अन्य जागांचा बोलून निर्णय घेऊ.- आशीष गावंडे, महानगराध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ठाकरे गट भाजपला जुने शहरात घेरण्याची रणनिती आखत असल्याचे दिसून येत आहे. आधी मुस्लिम बहुल भागात थेट उमेदवार न टाकता शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आता प्रहारला सोबत घेत थेट मशालवरच लढवण्याचे निश्चित झाले. तसेही जुने शहरात २०१७च्या निवडणुकीत शिवसेनेचे सात उमेदवार विजयी झाले होते. आता त्यापैकी एकच नगरसेवक शिवसेनेत असला तरी प्रहारला सोबत घेत पक्ष सोडून गेलेल्यांसह भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भाजपला घेरण्याची आखली रणनीती शिवसेनेसोबत युती ^शिवसेना ठाकरे गटासोबत आमची युती झाली आहे. प्रभाग ८मध्ये आम्ही लढणार असून, चिन्ह मात्र मशाल असेल. अन्य जागांवर वेगळे चिन्ह राहील.- मनोज पाटील, महानगराध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष.
देशातील बँका आणि वित्तीय संस्थांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. बँकिंग प्रणाली सुरक्षित, पारदर्शक आणि नियमांनुसार चालावी यासाठी आरबीआय वेळोवेळी तपासण्या करत असते. या तपासण्यांमध्ये जर कोणत्याही प्रकारचं नियमांचं उल्लंघन आढळून आलं, तर संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थांवर कारवाई केली जाते. अशाच कारवाईचा भाग म्हणून आरबीआयनं 29 डिसेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकांमधून तीन बँका आणि एका फायनान्स कंपनीवर आर्थिक दंड ठोठावल्याची माहिती दिली आहे. या यादीत महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचाही समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 22 डिसेंबर 2025 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, कोल्हापूर यांच्यावर 2 लाख 10 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. तपासणीत या बँकेकडून बँकिंग नियमन कायदा 1949 मधील कलम 20 आणि कलम 56 चे उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या उल्लंघनांमुळे आरबीआयनं आपल्या अधिकारांचा वापर करत बँकेवर आर्थिक दंड आकारण्याचा निर्णय घेतला. सहकारी बँकांसाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे असून त्यांचे काटेकोर पालन होणे अपेक्षित असते. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी नाबार्डकडून करण्यात आली होती. ही तपासणी 31 मार्च 2024 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या आधारे करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान बँकेच्या काही कर्ज व्यवहारांमध्ये नियमबाह्य बाबी आढळून आल्या. यानंतर आरबीआयकडून बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल दंड का आकारू नये, याबाबत बँकेकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं होतं. बँकेनं सादर केलेलं उत्तर, दिलेली अतिरिक्त माहिती आणि तोंडी म्हणणं यांचा सखोल विचार केल्यानंतरच आरबीआयनं अंतिम निर्णय घेत दंड ठोठावला. आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्हा बँकेनं एका कंपनीला कर्ज मंजूर केलं होतं, ज्यामध्ये बँकेचा संचालकच जामीनदार होता. बँकिंग नियमन कायद्यानुसार अशा प्रकारच्या व्यवहारांवर स्पष्ट निर्बंध आहेत. संचालकांशी संबंधित कर्ज व्यवहारांमध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक असताना त्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचं तपासणीत स्पष्ट झालं. याच कारणामुळे बँकेवर 2.10 लाख रुपयांचा दंड लावण्यात आल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेसह तेलंगणा राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, वारंगळ यांनाही आरबीआयनं दंड ठोठावला आहे. या बँकेवर एक लाख रुपयांचा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे. वारंगळ जिल्हा बँकेनंही बँकिंग नियमन कायदा 1949 मधील कलम 20 आणि 56 चं उल्लंघन केल्याचं तपासणीत आढळून आलं. विशेषतः कर्ज प्रकरणांशी संबंधित नियमांचं पालन न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं आरबीआयनं सांगितलं आहे. याशिवाय, तामिळनाडूतील द सलेम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवरही आरबीआयनं कारवाई केली आहे. या बँकेला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तपासणीत असं आढळून आलं की, बँकेनं अशा कर्जदाराला अकृषिक कर्ज दिलं होतं, ज्याचं कर्ज खातं याआधी सामोपचारानं बंद करण्यात आलं होतं. नियमानुसार ठरवून दिलेला कुलिंग कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा कर्ज मंजूर करण्यात आलं होतं, जे नियमबाह्य ठरतं. यामुळेच आरबीआयनं बँकेवर दंडाची कारवाई केली. बँकांबरोबरच एका खासगी फायनान्स कंपनीवरही आरबीआयनं मोठा दंड लावला आहे. 23 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार वॅल्यूकॉर्प सिक्यूरिटीज अँड फायनान्स लिमिटेडवर 2 लाख 40 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कंपनीनं क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना ग्राहकांचा आवश्यक डेटा सादर केला नव्हता. तसेच निश्चित मर्यादेपेक्षा जास्त रकमेची कर्ज हस्तांतरणं करण्यात आली होती. यासोबतच ‘केवायसी’ संदर्भातील नियमांचं पालन न केल्याचंही आढळून आलं. या सर्व उल्लंघनांमुळे आरबीआयनं कंपनीवर आर्थिक दंडाची कारवाई केली आहे.
महापालिका निवडणुकीत उमेदवार अर्ज भरण्यासाठी एक दिवस राहिला असतानाच महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जागा वाटपावर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. काँग्रेस ५५ तर राकाँ २५ जागांवर लढणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वतंत्र लढणार असून, काँग्रेसमधील बंडखोर मशाल हातात घेत ठाकटे गटातून लढण्याच्या तयारीत आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेला वेग आला. अनेक २० प्रभागांमधील ८० जागांवर काँग्रेस, राकाँ (शरद पवार पक्ष) व शिवसेनेच्या ठाकरे गटात अनेक बैठकांमध्ये चर्चा झाली. मात्र अकोला पश्चिममधील अनेक जागांवरून तीनही बाजूने एकमत झाले नाही. उमेदवारी अर्जाची मुदत ३० डिसेंबर रोजी संपणार असल्यानंतरही आघाडीत एकमत झाले नाही. अखेर रविवारी काँग्रेस-राकाँने एकत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला आणि सोमवारी कोण किती जागांवर लढेल, हेही निश्चित केले. बंडोबांना अशीही संधी : शिवसेनेच्या ठाकरे गटाने प्रभाग क्रमांक ८,९,१०, १७, १८मध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. अशातच प्रभाग क्रमांक ८ व ९ मधून कांॅग्रेसमध्ये संधी मिळालेले, जागा न सुटलेले शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे वळत आहेत. त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढणार असल्याने बंडोबांनाही संधी उपलब्ध झाली आहे. ^आघाडीसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. काँग्रेस ५५ जागांवर लढणार असून, उर्वरित जागांवर राकाँचे उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. - डॉ. प्रशांत वानखडे, महानगराध्यक्ष, काँग्रेस. ^महापालिकेतील ८० पैकि २५ जागांवर राकाँ शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार लढणार आहे. आम्ही यापूर्वीच भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्याचे धोरण आखले आहे. - रफिक सिद्दिकी, महानगराध्यक्ष, राकाँ शरदचंद्र पवार पक्ष मतांचे विभाजन होऊ न देण्याचे आव्हान काँग्रेस व शिवसेनेचे पारंपरिक मतदार भिन्न असून, दोन्ही बाजूने आपापल्या हक्काच्या मतपेटीवर नजर ठेवून जागांवर रस्सीखेच झाली. अखेर मविआमध्ये बिघाडी झाली असली तरी काँग्रेस-राकाँमत आघाडी झाल्याने अल्पसंख्यांक मतांचे फारसे विभाजन होणार नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मात्र अल्पसंख्यांक बहुल व अन्य हिंदू बहुल भागातील आपली पारंपरिक मते एकमेकांकडे ट्रान्सफर करण्याचे आव्हान काँग्रेस-राकाँ व शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे राहणार आहे. त्या-त्या भागात संबंधित मतदारांची मोट बांधल्यास भाजपला रोखणे शक्य होणार असून; अन्यथा कमळ फुलण्याचा मार्ग प्रशस्त होईल, असेही राजकीय जाणकारांचे मत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ५५ जागांवर लढणार
तालुक्यातील आसेगाव देवी येथे जगदंबा मित्र परिवार व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ ते २५ डिसेंबर दरम्यान आयोजित तीन दिवसीय भव्य जंगी शंकरपट उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या शंकर पटात विविध गटांतून गोंधळीकरांनी सादर केलेल्या थरारक व पारंपरिक कलेने उपस्थितांची मने जिंकली. शंकरपटाच्या उद्घाटनप्रसंगी माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके अध्यक्षस्थानी होते. आमदार बाळासाहेब मांगुळकर, सरपंच सचिन चव्हाण, पोलिस पाटील आशिष राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झाले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहन भोयर, बंडूभाऊ कापसे, यादवराव घुरडे, अतुल देशमुख यांच्यासह ग्रामस्थ अविनाश गावंडे, गजानन कोळनकर, विजय गेलोत आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत अ' गटात गोंधळीचे मधुरा मोहोड व निलेश काळमेघ यांनी भैरव-फायर सादरीकरणातून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक राज दमाये (कुऱ्हा) यांच्या महाकाल-आनंद सादरीकरणाला, तर तृतीय क्रमांक नासिर पठाण यांच्या देवा-दुर्गा सादरीकरणाला मिळाला. क' गटात शेख अदनान यांनी भैरव-रायफल सादरीकरणातून प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक अभिषेक बाता यांना, तर तृतीय क्रमांक मनीष मोहोड यांच्या सर्जा-छावा सादरीकरणाला मिळाला. उत्कृष्ट धुरकरी म्हणून निवड झालेल्या कलाकाराला छाया गजानन कोळनकर यांच्या हस्ते विशेष पारितोषिक प्रदान करण्यात आले. या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीतील योगेश डहाके, रोशन जुनघरे, हरी भोईर, निलेश राऊत आदींनी विशेष परिश्रम घेतले. बक्षीस वितरण समारंभाने शंकर पटाचा समारोप झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल ग्रामस्थांनी आयोजनकांनी विशेष कौतुक केले.
आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे अमरावती जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर पडणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. सूत्रानुसार मनपा निवडणुकांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्याबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा पहिला टप्पा घोषित केला जाणार आहे. परंतु ज्या संस्थांमधील आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेत आहे, त्याच ठिकाणची निवडणूक घेतली जाणार असल्याने अमरावतीला डच्चू मिळणार आहे. अमरावती जिल्हा परिषदेचे आरक्षण हे ६४ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे अशा संस्था वगळता राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा येत्या एक-दोन दिवसांत केली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगास दिले आहेत. मात्र त्या सर्व संस्थांमधील आरक्षण हे ५० टक्क्यांच्या मर्यादेतच असावे, अशी अटही घातली आहे. राज्यातील ३२ पैकी केवळ १२ जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्केच्या आत आरक्षण असून २० जिल्हा परिषदांमध्ये त्याहून अधिक आरक्षण देण्यात आले आहे. अशाच प्रकारे ३३६ पंचायत समित्यांपैकी १२५ पंचायत समित्यांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या १२ जिल्हा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यात येणार आहे. सूत्रांच्या मते २९ महापालिकेसोबतच या निवडणूका घेण्याची चाचपणी आयोगाने केली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे या निवडणुका स्वतंत्र घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आता महापालिकांची निवडणूक प्रक्रिया १७ जानेवारीपर्यंत संपणार असल्याने जिल्हा परिषदांसाठी निवडणूक कर्मचाऱ्यांची होणारी उपलब्धता लक्षात घेऊन जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात या निवडणुका घेण्याची तयारी आयोगाने केली आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या निवडणुकांबाबतच्या याचिकांवर २१ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. ‘ते’ सूत्रही वापरता आले असते आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ही काही नगरपालिका आणि महापालिकांमध्येही पाळली गेली नाही. मात्र तरीही राज्य निवडणूक आयोगाने तेथील निवडणुकांचे दोन टप्पे न करता त्या एकाच टप्प्यात घेणे सुरु केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी ही तेच सूत्र वापरुन संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल हा न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन ठेवता येऊ शकतो. मात्र मुळात याच चुकीमुळे गत काळात काही जणांनी न्यायालयाचे द्वार ठोठावून या निवडणुका एवढा काळ थांबविण्यात यश मिळविले. त्यामुळे आयोग कदाचित पुन्हा तीच चूक होणार नाही, याची काळजी घेत असावे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मैलाचा दगड ठरणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे तक्षशिला महाविद्यालय, अमरावती येथे पार पडली. या परिषदेच्या माध्यमातून भारताच्या भविष्यातील परिवर्तनात बहुविद्याशाखीय दृष्टिकोनातून एआय, एनईपी, नवोन्मेष आणि उष्मायनाची भूमिका एक्सप्लोर करणे समाज विकासाचा राष्ट्रीय संवाद घडणारा होता. यामध्ये राज्यासह देश विदेशातील सुमारे ५०० पेक्षा अधिक संशोधकांनी आपले प्रोजेक्ट पेपर सादर केले. यामध्ये जपान पासून तर आयआयटीचा समावेश होता. श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तक्षशिला महाविद्यालय आणि श्री संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय मंडळ दाभा संचालित श्री धाबेकर कला महाविद्यालयात खडकी,अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ही एक दिवसीय परिषद घेण्यात आली. परिषदेचे उद्घाटन सकाळी ११ वाजता तक्षशिला महाविद्यालय येथील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उद्घाटनाला अमरावती विद्यापीठ कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते, श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल संस्थेच्या किर्ती अर्जुन, प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून आंध्र प्रदेश येथील आयआयआय टी''चे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. के. वेंकट सतीश, सचिव डॉ. कमलाकर पायस, प्रशासकीय अधिकारी प्रा. सचिन पंडित, अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे, तक्षशिला महाविद्यालय प्राचार्य डॉ माधुरी फुले, धाबेकर कला महाविद्यालय प्राचार्य डॉ. संजय देशमुख, विधी महाविद्यालय प्राचार्य डॉ वर्षा देशमुख, उपप्राचार्य प्रा. प्रितेश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते तथा आंध्र प्रदेश येथील आयआयआय टी''चे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. के. वेंकट सतीश यांनी यावेळी परिषदेला संबोधित केले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. माधुरी फुले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. वर्षा गावंडे तर मान्यवरांचे आभार प्रा. आनंद देशमुख यांनी मानले. यावेळी अध्यक्ष म्हणून तक्षशिला इंजिनियरिंग कॉलेज दारापूर येथील प्राचार्य डॉ. डी. टी. इंगोले, मार्गदर्शक डॉ हरीश मालपाणी उपस्थिती होते. त्यानंतर परिषदेला विविध जिल्ह्यातून, राज्यातून आलेल्या संशोधकांनी आपल्या संशोधन पेपरचे सादरीकरण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती विद्यापीठाच्या डॉ. वैशाली गुडधे यांची उपस्थिती होती. यावेळी दिवसभर चाललेल्या परिषदेला विविध सत्रात संशोधकांची मांदियाळी पाहायला मिळाली. तसेच सायंकाळी सहा वाजता समारोपीय कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितिन कोळी, दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थेचे सचिव डॉ कमलाकर पायस, मार्गदर्शक भारतीय महाविद्यालय प्राचार्य डॉ. आराधना वैद्य, तक्षशिला महाविद्यालय प्राचार्य डॉ माधुरी फुले, दाबेकर कला महाविद्यालय प्राचार्य डॉ. संजय देशमुख, उप प्राचार्य प्रितेश पाटील, डॉ. नवल पाटील, प्रा. राहुल घुगे, डॉ. प्रवीण वानखडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन उद्घाटन कार्यक्रमानंतर द्वितीय सत्राला सुरुवात झाली. यामध्ये द आयडिया ऑफ क्रियेटिव्हिटी इन द एज ऑफ एआय यावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गीविश इंग्रजी विभाग प्रा. डॉ. रविंद्र बोरसे, प्रमुख वक्ते लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय येथील प्रा. ज्ञानेश्वर गटकर उपस्थित होते. त्यांनी एआय तंत्रज्ञानवर मार्गदर्शन केले. तसेच इम्पॉवेरिंग क्लासरूम : मॉडर्न ऍप्लिकेशन ऑफ एआय इन एज्युकेशन याविषयावर मार्गदर्शन झाले.
यंदा मकरसंक्रांतीत केवळ चार दिवसच सुवासिनी महिलांना हळदी कुंकू आयोजित करता येणार असल्याने या कालावधीत सुवासिनींची चांगलीच धावपळ होणार आहे. कारण, पौष अमावस्या १८ रोजी आहे. या दिवशी पौष महिना संपणार असून साधारणत: पौष महिन्यातच संक्रांतीचे हळदीकुंकू व संक्रांतीचे वाण वाटप केले जाते. परंतु, यंदा १४ जानेवारीला मकर संक्रांत असून १७ जानेवारीपर्यंतच पौष महिना असल्याने केवळ चार दिवसच सुवासिनी महिलांना हळदीकुंकू तसेच वाण वाटपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करता येणार आहे. या काळात सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत हळदीकुंकवाचे कार्यक्रम सुरू राहतात. आता केवळ चार दिवसच हळदी कुंकू असल्यामुळे एकाच दिवशी बऱ्याच ठिकाणी सुवासिनींनी वाण, हळदी कुंकू घेण्यासाठी जावे लागणार आहे. वाण देण्यासाठी मर्यादित दिवस संक्रांतीचा सणाला विवाहित महिला एकमेकींना हळद-कुंकू लावून वाण देतात व आनंद साजरा करतात, ज्यामुळे स्नेह आणि समृद्धी वाढते.हा सण सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशानिमित्त साजरा केला जातो. सौभाग्यवती स्त्रिया एकमेकींना हळद-कुंकू लावून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी महिला एकमेकींना हळद, कुंकू, फुले, वाण (धान्य किंवा वस्तू) देतात आणि एकमेकांना ''तिळगूळ घ्या गोड गोड बोला'' असे म्हणून शुभेच्छा देतात. वाणाच्या वस्तुंची करावी लागणार जुळवाजुळवा यंदा संक्रांतीचा सण हा फारच कमी दिवसांचा असल्याने सुवासिनी महिला आतापासूनच वाणाचे साहित्य खरेदी करण्यासोबतच नेमके कोणते वाण वाटायचे याबाबत एकमेकींसोबत विचार विनिमय करीत आहेत. एकाच महिलांच्या गटात एकसारखे वाण नको. वाण हे उपयोगात येणारे असावे, ते पर्यावरण पूरक असावे, गृहिणींच्या दररोज कामी यावे, किमान पुजेत तरी त्याचा उपयोग व्हावा, अशा प्रकारच्या वाणांची खरेदी करण्याचा मनोदय एकमेकींकडे महिला व्यक्त करीत आहेत. त्यामुळे यंदा चार दिवसांत महिलांची वाण लुटण्यासाठी चांगलीच दमछाक होणार हे निश्चित.
शेतीत आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि निर्यातक्षम वाणाची निवड केल्यास कमी क्षेत्रातूनही भरघोस उत्पन्न मिळू शकते, हे येरमाळ्यातील प्रगतशील शेतकरी समाधान तानाजी बारकुल या शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. जानेवारीमध्ये लागवड केलेल्या जी-९ वाणाच्या केळी पिकातून थेट इराक देशात निर्यात करत तब्बल सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. समाधान बारकुल यांचे पदवीनंतर जल आणि भूमी व्यवस्थापण विषयात एमएस्सी केली. नोकरीच्या मागे न लागता घरची पंचवीस एकर शेतीत घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग केला. या वर्षी केळी लागवड करून पावणे दोन एकर क्षेत्रात एकूण २००० रोपे लावली. संपूर्ण पिकासाठी अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपये खर्च आला. योग्य खत व्यवस्थापन, वेळेवर पाणीपुरवठा, रोगकीड नियंत्रण तसेच निर्यात दर्जानुसार फळांची काळजीपूर्वक हाताळणी करण्यात करून जोपासना केल्याच्या श्रामबळावर केळी इराक देशात निर्यात करण्याचे यश प्राप्त केले. या केलेल्या केळी लागवडीतून सुमारे ४० टन उत्पादन अपेक्षित असून, त्यापैकी मोठ्या प्रमाणावर माल इराक देशात निर्यात करण्यात आला आहे. निर्यातीतूनच सुमारे ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात सुमारे साडेपाच लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न शिल्लक राहिले आहे. विशेष बाब म्हणजे, निर्यतीनंतरही उर्वरित माल स्थानिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून, त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.या यशामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही केळी लागवड व निर्यातीकडे वळण्यासाठी प्रेरणा मिळत असून,शेतीतून शाश्वत व फायदेशीर उत्पन्न मिळवण्याचा नवा मार्ग खुला झाला असला तरी बाजार पेठेतील चढउताराचा अभ्यास पाहता पिकांचे योग्य संगोपन केले तर यश मिळू शकते, असे सिद्ध झाले आहे. मुंबईतून जहाजामार्गे इराक येथील बाजारपेठेत : इराक येथील बाजारपेठेत केळीला दर्जेदार व योग्य भाव मिळत असल्याने समाधान बारकुल यांनी टेंभुर्णी येथील व्यापारी बबन देशमुख यांच्याशी संपर्क साधून केळी विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिली. देशमुख यांनी केळीची पाहणी केल्यानंतर केळीची वाढ उत्तम, कोणताही संसर्ग नसलेली व दर्जेदार असल्याचे निदर्शनास आले. यानंतर दिल्ली येथील दीपक चव्हाण यांची ‘फौजी’ कंपनी यांना केळी पुरवठ्याची जबाबदारी देण्यात आली. ही केळी प्रथम टेंभुर्णी येथील जयवंत कोल्ड स्टोरेज येथे दहा दिवसांसाठी साठवण्यात येणार असून, त्यानंतर मुंबई पोर्ट येथून जहाजामार्गे इराक येथील बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवण्यात येणार आहे. दीर्घकाळ टिकावू केळी जी-९ वाणाची केळी आकाराने मोठी, टिकाऊ व निर्यातक्षम असल्याने परदेशी बाजारात याला मोठी मागणी आहे. योग्य नियोजन केल्यास शेतकरी थेट निर्यातीशी जोडले जाऊ शकतात,याचा उत्तम आदर्श समाधान बारकुल याने शेताकऱ्यांपुढे ठेवला आहे. पहिल्यांदाच केसर आंब्याची केली आहे लागवड... ^माझे पदवीव्युत्तर शिक्षण जल आणि भूमी व्यवस्थापन विषयातून झाले असून, मी जैन इरिगेशन कपंनीची नोकरी सोडून झालेल्या शिक्षणातून घरची शेती करण्याचा निर्धार केला. पारंपरिक शेती पिकासह एक एकर केशर आंबा लागवड तर एक एकर कोकण भाडोळी जांभूळची फळबाग लागवड केली आहे. गेल्या वर्षी पहिल्यांदाच केशर आंबा उत्पादनातून अडीच लाखाचा नफा झाला आहे. समाधान बारकुल, शेतकरी
मुंबई महापालिका 2026 च्या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तयारीला वेग दिला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून आतापर्यंत 37 इच्छुक उमेदवारांना संधी देण्यात आली असून, त्यांच्या उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या हालचालींमुळे मुंबईतील राजकीय वातावरण अधिक तापले असून, महापालिका निवडणुकीसाठी मनसे आक्रमकपणे मैदानात उतरत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दीर्घ काळानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेकडून ठोस आणि नियोजित तयारी दिसून येत आहे. राज ठाकरे यांनी स्वतः या उमेदवारांच्या निवडीवर लक्ष ठेवले असून, विविध प्रभागांतील संघटनात्मक ताकद, स्थानिक कामाचा अनुभव आणि जनसंपर्क या निकषांवर उमेदवारांना संधी देण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये यशवंत किल्लेदार यांच्यासह कस्तुरी रोहेकर, शैलेंद्र मोरे, बबन महाडिक, मुकेश भालेराव यांच्यासह एकूण 37 जणांचा समावेश आहे. या उमेदवारांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केले असून, पक्षाची निवडणूक यंत्रणा आता पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे. मनसेच्या या निर्णयामुळे अनेक प्रभागांमध्ये राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व महापालिकांसाठी मतदानाची तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे. 15 जानेवारी 2026 रोजी राज्यभरातील महापालिकांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर अवघ्याच एका दिवसात, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी मर्यादित कालावधी मिळणार असून, प्रत्येक पक्ष आक्रमक प्रचाराची रणनीती आखताना दिसत आहे. मनसेकडून आधीच उमेदवारांची यादी जाहीर करून अर्ज दाखल केल्याने पक्षाने इतर पक्षांपेक्षा एक पाऊल पुढे टाकल्याचे मानले जात आहे. मुंबई महापालिकेसाठी मनसेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्याने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील स्थानिक प्रश्न, मराठी माणसांचे मुद्दे आणि महापालिकेतील प्रशासनावर नियंत्रण या मुद्द्यांवर मनसे निवडणुकीत आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. 37 उमेदवारांच्या घोषणेमुळे मनसेची ताकद दाखवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. येत्या काळात आणखी उमेदवारांची नावे जाहीर होणार का, तसेच मनसे कोणती रणनीती अवलंबणार, याकडे मुंबईसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
सरत्या वर्षाला निरोप व नुतन वर्षाच्या स्वागताकरीता पाश्चिमात्य संस्कृतीच्या चालीरितींना फाटा देत कोल्हापूर, मुंबई व राज्यातील विविध भागातील स्वामी भक्तांची येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात विविध धार्मिक कार्यक्रमांनी हर्षोल्हासात नुतन वर्षाचे स्वागत होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. बुधवार दि. ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व गुरूवार दि. १ जानेवारी रोजी नुतन वर्षाचे स्वागत करण्यासाठी व नविन वर्षाच्या शुभमुहूर्तावर श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर, मुंबई, पुणे, छ.संभाजी नगर, अहिल्यानगर, धुळे, नागपूर, नाशिक, रत्नागिरी, सोलापूर, सातारा, सांगली इत्यादी व राज्याच्या कानाकोपऱ्यातून व देशभराच्या अन्य ठिकाणांहून बरेच स्वामी भक्त येणार आहेत. बुधवार, ३१ डिसेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत ओम स्वामी चैतन्य भजनी मंडळ यांचे यांचे भजन, व विविधरुपी सोंगी भारूड इत्यादी कार्यक्रम देवस्थान परिसरात होतील. रात्री ७:४५ वाजता महाराजांच्या शेजारतीस सुरुवात होईल. रात्री १० ते पहाटे ४ या वेळेत कोल्हापूर, मुंबई, पुणे येथील भजनी मंडळाचे नविन वर्षाच्या स्वागताचे भजन व भावभक्ती गीतांचा कार्यक्रम देवस्थान व परिसरात होतील. दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजता कोल्हापूर व मुंबई येथील स्वामी भक्तांच्या वतीने गोड प्रसादाचे पदार्थ वाटप करुन व फटाक्यांची आतषबाजी करुन असंख्य स्वामी भक्तांच्या मुखाने ‘अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त सदगुरु स्वामी समर्थ महाराज की जय'या जयघोषाने सन २०२६ या नविन वर्षाचे स्वागत करुन उपस्थित सर्व स्वामी भक्त शुभेच्छा व्यक्त करतील व या शुभमुहूर्ताप्रसंगी स्वामींच्या चरणी नतमस्तक होवून येणारे नविन वर्ष सुख समृध्दीने व भरभराटीने व्यतीत व्हावे याकरिता समर्थांच्या चरणी साकडे घालुन पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त भाविकांनी नुतन वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमांचा लाभ घ्यावे, असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे. पुरुष व महिला भक्तांना स्वतंत्र कक्षातून दर्शन दि. १ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ११ यावेळेत भजन भारूड इत्यादी धार्मिक कार्यक्रम होतील. या प्रसंगी सर्व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरीता व सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरीता दिनांक ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी मंदिरात स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नसून स्वामी भक्तांच्या दर्शनाकरीता देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. गर्दीमध्ये पुरुष व महिला स्वामी भक्तांना स्वतंत्र कक्षातून स्वामी दर्शनाचा लाभ होणार आहे.
शरीरावर प्रेम करण्यापेक्षा भगवंतावर प्रेम करा. तो सर्व चिंता दूर करतो. त्यासाठी भाव असणं महत्त्वाचं आहे तेव्हा पांडुरंगा चरणी भाव ठेवून नामस्मरण करावे. देह हा नाशवंत आहे. पण आपण त्यावर प्रेम करतो. तसेच केलेला नियमित सातत्यपूर्ण केले तर त्या प्रयत्नात माणूस निश्चितच यशस्वी होतो, असे प्रतिपादन ज्ञानेशबुवा धानोरकर यांनी केले. करकंब कोष्टी समाज बांधवांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमा नारदीय किर्तनास प्रारंभ झाला असून महोत्सवामध्ये धानोरकर यांनी प्रथम पुष्प गुंफले. सुरुवातीला माता चौंडेश्वरी मातेची पूजा आणि दीपप्रज्वलन ह.भ.प. ज्ञानेशबुवा धानोरकर, बाळासाहेब वास्ते, संजीवकुमार म्हेत्रे, प्रभाकर रसाळ, विठ्ठल साठे, माऊली पिसे यांचे हस्ते झाले. त्यानंतर कीर्तनाला सुरुवात झाली. पूर्वरंगामध्ये संत नामदेव महाराज यांचा ‘देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो' या सुंदर अभंगावर निरुपण करताना सांगितले की, सर्व संतांनी,पोथीपुराणात नामाचे महत्व विशद केले आहे. अतिशय सुंदर दृष्टांत सांगत सुंदर पद गात करकंबकरांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तितकीच सुंदर साथसंगत हार्मोनियम गंगाधर देव,तबला ज्ञानेश्वर दुधाणे, टाळ माऊली पिसे सुंदर करत कीर्तनामध्ये रंग भरला. पहिलाच दिवस असताना सुद्धा रसिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातनाम कीर्तनकारांची कीर्तने असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कोष्टी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवीन वाणाचा अवलंब,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजाराभिमुख शेती या त्रिसूत्री सोबत संशोधन व प्रत्यक्ष शेती यांचा समन्वय साधल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चित वाढू शकते त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे पापरीचे शेतकरी असल्याचे मत पुणे येथील राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ.एस जी भालेकर यांनी पापरी येथे व्यक्त केले. गणेशखिंड,पुणे येथील राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राचे (नार्प) सहयोगी संचालक डॉ.एस.जी.भालेकर यांनी नुकतीच पापरी गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देत विविध फळ व फुलपिकांच्या प्रात्यक्षिक प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी ते बोलत होते. या भेटीदरम्यान डॉ.भालेकर यांनी प्रयोगशील शेतकरी बालाजी भोसले, समाधान भोसले यांच्या शेतातील बॉर्डॉक्स जातीच्या गुलाबाच्या लागवडीचे प्लॉट,तैवान पिंक पेरू, द्राक्ष, डाळींब यासह इतर फळपिकाची लागवड, तसेच बेदाणा निर्मितीसाठी विकसित करण्यात आलेल्या द्राक्ष बागेची सखोल पाहणी केली. याप्रसंगी मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.विशाल वैरागर,डॉ.रवींद्र पवार,शेतकरी बाबुराव भोसले आदी उपस्थित होते. नवीन वाण उपलब्ध करून देण्यात येईल शेतकऱ्यांनी नवीन वाणाचा अवलंब, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजाराभिमुख शेती याबाबत समाधान व्यक्त केले. संशोधन व प्रत्यक्ष शेती यांचा समन्वय साधल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितच वाढू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.तसेच या भागातील शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले गुलछडी व कांदा पिकातील नवीन वाण उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले.
राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर पुण्याच्या राजकारणात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात राजकीय हालचाली गुप्तपणे सुरू होत्या. नेते, पदाधिकारी आणि सूत्रधारांच्या बंद दाराआड बैठका, अचानक गाठीभेटी आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या चर्चांमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या सर्व घडामोडींनंतर अखेर मोठा राजकीय निर्णय समोर आला असून, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडनंतर आता पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याने शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला पुणे महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादींमधील संभाव्य युती जागावाटप आणि काही अंतर्गत मतभेदांमुळे फिस्कटल्याची चर्चा होती. यामुळे दोन्ही गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळत होते. मात्र, पडद्यामागे चर्चा सुरूच होत्या. वरिष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी आणि मध्यस्थांच्या बैठका सातत्याने सुरू होत्या. अखेर या चर्चांना यश आले असून, पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय अंतिम झाला आहे. या निर्णयामुळे पुण्यातील निवडणूक गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या युतीमध्ये जागावाटपाचाही प्राथमिक फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेतील एकूण जागांपैकी अजित पवार गट 125 जागांवर निवडणूक लढवणार असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 40 जागांवर आपले उमेदवार देणार आहे. शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवली जाणार आहे. या जागावाटपाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख पदाधिकारी अंकुश काकडे, विशाल तांबे यांच्यासह इतर नेत्यांची भूमिका महत्त्वाची राहिल्याचे सांगितले जात आहे. जागावाटपाच्या अंतिम चर्चांमध्ये अनेक फेऱ्या झाल्यानंतर हा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात पोहोचला आहे. याचे पहिले संकेत म्हणजे सकाळपासूनच अजित पवार यांच्या निवासस्थानी एबी फॉर्मचे वाटप सुरू झाले आहे. उमेदवारांना अधिकृत उमेदवारीचे फॉर्म देण्यात येत असून, निवडणूक यंत्रणा प्रत्यक्ष कामाला लागल्याचे स्पष्ट झाले आहे. बैठकींच्या माध्यमातून एकत्र येण्याचा निर्णय केवळ चर्चेपुरता न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आधीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी तळवडे येथे झालेल्या कार्यक्रमात याबाबत स्पष्ट भूमिका मांडली होती. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्न एकत्रितपणे सोडवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. याच कार्यक्रमातून त्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडत आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी संयुक्तपणे लढणार असल्याचे स्पष्ट केले होते. पिंपरी-चिंचवडनंतर पुण्यातही तसाच निर्णय झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. काल रात्री उशिरापर्यंत पुण्यात महत्त्वपूर्ण बैठकांचा सिलसिला सुरू होता. या बैठकींमध्ये युतीचा अंतिम निर्णय, जागावाटप, प्रचाराची दिशा आणि पुढील रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली. या चर्चांनंतर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार असल्यावर सर्वांचे एकमत झाले. आज दुपारी याबाबत अधिकृत पत्रकार परिषद घेण्यात येणार असून, त्यात जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला, प्रमुख नेत्यांची भूमिका आणि निवडणूक रणनितीची सविस्तर माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागले आहे. या युतीमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक राजकारणावरच नव्हे, तर राज्याच्या राजकीय समीकरणांवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या रणनीतींवर या निर्णयाचा थेट परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे निवडणुकीची लढत अधिक रंगतदार होणार आहे. ही युती मतदारांवर किती प्रभाव टाकते, स्थानिक मुद्द्यांवर कितपत एकसंध भूमिका घेतली जाते आणि प्रत्यक्ष निकालात याचा कसा परिणाम होतो, याकडे आता सर्व राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
महसूल व पोलीस खात्याच्या दप्तरी राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बार्शी शहरात सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद असलेल्या पोलीस खात्याने कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित ठेवण्यासाठी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभूंच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन जानेवारी २०१८ मध्ये शहरातील विविध भागात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्यानंतर दोनच वर्षात बंद कायमचे बंद पडल्याने सीसीटीव्ही कॅमेर्याच्या रूपाने पोलीसांचा समाजकंटक व गुन्हेगारी प्रवृत्तीवर असलेला धाक कमी झाला आहे. ज्या ठिकाणी हे कॅमेरे बसवले होते ते सर्व कॅमेरे देखील गायब झाल्याने नागरिकांची सुरक्षा आता रामभरोसे असेच म्हणावे लागेल. सोलापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात लोकसहभागातून व लोकवर्गणीतून सुमारे ७१ सीसीटीव्ही कॅमेरे डिसेंबर २०१७ च्या अखेरी बसविण्यात आले होते. हे सर्व कॅमेरे थेट बार्शी शहर पोलीस ठाण्याशी जोडण्यात शहरातील गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी व नागरिकांच्या वर्तनावर लक्ष ठेवण्यासाठी शहर पोलीसांकडून शहरातील उपळाई रोड, लहुजी वस्ताद चौक, बीटीएम परिसर, सोपल बंगला, हिरेमठ हॉस्पिटल, रिंग रोड, कॅन्सर हॉस्पिटल, ऐनापूर मारूती चौक, पोस्ट चौक, सराफ कट्टा, पानखुंट, कोर्ट चौक, पांडे चौक, भोसले चौक, पटेल चौक, आझाद चौक, एकविराई चौक, बस स्थानक चौक, शिवाजी कॉलेज रोड, जुना गांधी पुतळा, दत्ता चौक, परंडा रोड चौक, तेलगिरणी चौक येथे पोलिसांनी ७१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते ते सर्व शहर पोलीस ठाण्यातील कंट्रोल रूमला जोडण्यात आले होते. आले होते. या कॅमेर्याव्दारे शहरातील विविध घटना घडामोडींचा दर महिन्याचा डेटा स्टोअर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या शहर पोलीस ठाण्यातील कंट्रोल रूमचे उदघाटनही तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख प्रभूंच्या हस्ते जानेवारी २०१८ मध्ये समारंभपूर्वक करण्यात आले होते. कॅमेऱ्याच्या धाकामुळे शहरात रात्री अपरात्री फटाके फोडून वाढदिवस साजरा करणे, वाढदिवसानिमित्ताने मोटार सायकल रॅली काढून बेकायदा जमाव जमवून शहरातील कायदा व सुव्यवस्था शांतता बिघडवणाऱ्या अपप्रवृत्तीला आळा बसण्याबरोबरच महिला व मुलींची छेड काढणे, रस्त्यावर होणार्या हाणामार्या घात पात याची माहिती पोलिसांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून उपलब्ध होत होती. बार्शी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार व दक्षिणोत्तर बाजारपेठांना जोडणारी उतार मालाची पेठ आहे. तसेच शहरात शिक्षण व वैद्यकीय उपचारासाठी पर गावातून येण्याची संख्या मोठी आहे. कायदा सुव्यवस्था व शांतता कायम राखण्यासाठी पोलिस प्रशासन व बार्शी नगर परिषद प्रशासन याबाबत संयुक्त बैठक घेऊन पुन्हा सर्व सीसीटीव्ही कॅमेरे नव्याने सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नगर परिषद सूत्रांनी सांगितले. येथे बसविले होते सीसीटीव्ही कॅमेरे
बार्शी तालुका पोलिसांनी रविवारी (दि.२८) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गाडेगाव रोडवर मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग करून एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून गावठी पिस्तूल (कट्टा) आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे व पोलिस पथक गस्तीवर असताना गोपनीय बातमी मिळाली की, दोन व्यक्ती एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून (एम.एच. ०८ झेड ७४७५ ) भूम कडून बार्शी-देवगाव मार्गे येत असून त्यांच्याकडे गावठी पिस्तूल आहे. नागोबाचीवाडी येथील यमाई मंदिराजवळ सापळा रचला. संशयित कार भरधाव वेगाने आली असता पोलिसांनी सरकारी वाहन आडवे लावून ती कार रोखली. पोलिसांना पाहताच कारचा चालक धीरज पवार गाडी सोडून अंधारात पळून गेला, तर त्याच्या शेजारी बसलेला अभिजीत चंद्रकांत जाधव (वय २२, रा. गारभवानी नगर झोपडपट्टी, परांडा, जि. धाराशिव) याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल बालाजी हांगे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी पंचांसमक्ष कारची झडती घेतली असता, ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटसमोरील डॅशबोर्डच्या कप्प्यात एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये तीन जिवंत काडतुसे (गोळ्या) आढळून आली. या कारवाईत ५ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा तिथीनुसार प्रतिष्ठा द्वादशी यंदा ३१ डिसेंबर रोजी आहे. यानिमित्ताने नवी पेठ येथील श्रीराम मंदिर येथे प्रतिष्ठा द्वादशी उत्सव अयोध्या प्रमाणेच मोठ्या भक्तिभावात साजरा होणार आहे. या विशेष दिनानिमित्त श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात आकर्षक बंगाली मंडप, सुंदर विद्युत रोषणाई, सुंदर फुलांची सजावट करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ५.३५ वाजता प्रभू श्रीरामांना जलाभिषेक व दुग्धाभिषेक, सकाळी ७ वाजता मंगल आरती होणार असून त्यानंतर याच दिवशी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत नवी पेठ परिसरात ‘एक सुबह प्रभू श्रीराम के नाम’, संगीतमय महाहनुमान चालीसा व प्रभु श्रीरामांच्या भजनांचा कार्यक्रम होईल. तसेच ज्या वेळेस अयोध्येत ११:४५ वाजता प्रभु श्रीराम आरती होईल त्याच वेळेस येथे म्हणजेच ११:४५ वाजता महाआरती करण्यात येईल. दर्शनासाठी भाविकांच्या होणाऱ्या रांगा तसेच मंदिर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता ट्रस्टच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष प्रितम मुथ्था यांनी दिली. या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे. दरम्यान, प्रतिष्ठा द्वादशी उत्सवानिमित्त मंदिरात आध्यात्मिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी श्रीरामचरित मानस कथेचे आयोजन करण्यात आले असून, ३० डिसेंबर रोजी ‘सुंदरकांड’ गिरीराज व्यास यांच्या सुमधुर वाणीतून होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे उपाध्यक्ष निखील शेटीया यांनी केले आहे. ऐतिहासिक व भक्तीमय परंपरेचा वारसा जपणाऱ्या श्रीराम मंदिरात ३१ डिसेंबर रोजी होणारा प्रतिष्ठा द्वादशी उत्सव हा नगरकरांसाठी एक विशेष आध्यात्मिक पर्व ठरणार असून, भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहून प्रभू श्रीरामांच्या दर्शनाचा व भक्तीसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्ट चे अध्यक्ष प्रितम मुथ्था व उपाध्यक्ष निखील शेटीया यांनी केले आहे. या उपक्रमासाठी आवश्यक पूर्वतयारी मंडळाकडून केली जात आहे. भाविकांची होणारी गर्दी विचारात घेता त्यांना कोणतीही अडचण होणार नाही यासाठी तयारी करण्यात येत आहे.
येथील ध्रुव ग्लोबल स्कूलने सर्व विभागांचा सहभाग असलेल्या भव्य नाट्यकृती साकारुन सांस्कृतिक महोत्सवाच्या पंरपरेत नवीन रंग भरले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमातूनही विद्यार्थ्यांवर संस्कारांचे सिंचन करता येते हे सिद्ध करणाऱ्या शाळेने यंदा आपल्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवात ‘मेवाडची शौर्यगाथा’ या विषयावरील महानाट्यातून मरुभूमीच्या पराक्रमाचा अपरिचित इतिहास उलगडला. माध्यमिक विभागाच्या ३०० विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या महाकलाकृतीतून महापराक्रमी बाप्पा रावल ते महाराणा प्रताप यांच्यापर्यंतचा इतिहास प्रत्यक्ष रंगमंचावर अनुभवताना उपस्थित प्रेक्षक अक्षरशः भारावले होते. राजस्थानच्या इतिहासाची पानं उलगडणारे ‘मेवाड की शौर्यगाथा’ या ऐतिहासिक महानाट्याचे सादरीकरण झाले. गुरुकुलात शिक्षण घेणाऱ्या कालभोजचा सिसोदीया राजवंशाच्या संस्थापक बाप्पा रावलपासून सुरु झालेला शौर्याने भरलेला प्रवास, महाराणी पद्मीनीच्या जौहरचा प्रसंग, पन्नाधाय द्वारा आपल्या मुलाचे बलिदान देवून कुंवर उदयसिंहांना वाचवण्याचा प्रसंग, महाराणा प्रतापांना डावलून झालेला राज्याभिषेक, अकबराचे आक्रमण, महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक, मानसिंहाकडून आलेला संधिप्रस्ताव, सलगच्या युद्धामुळे डबघाईला आलेल्या मेवाड साम्राज्याला सावरण्यासाठी धावलेला राष्ट्रप्रेमी भामाशाह आणि शेवटी दोन दशकांच्या एकामागून एक हल्ल्यांनंतरही अपराजित असलेल्या महाराणा प्रतापांच्या पराक्रमाने हताश झालेल्या बादशहा अकबराच्या दरबारातील प्रसंगाने या महानाट्याचा समारोप झाला. गिरीश डागा यांनी पटकथा लिहिली. खितीश मोहपात्रा यांनी या महानाट्याचे दिग्दर्शन केले. प्रवीण उबाळे व गणेश भांगरे यांनी त्यांना सहाय्य केले. सोनाली मोहपात्रा व गंधर्व पलाई यांनी नृत्य दिग्दर्शकाची भूमिका बजावली. कुलदीप कागडे, प्रशांत भंडारी, सचिन घोडेकर यांनी नेपथ्य सांभाळले. प्रफुल्ल भांडगे, राहुल भालेराव, विक्रांत परदेशी, संदीप भंवर, प्रशांत दवंगे, मारुती मंडलिक, शेखर सातपुते, गिरीश टोकसे व लिना पगारे यांनीही जबाबदाऱ्या पार पाडल्या. या महानाट्यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रत्येकाने मिळालेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली. या महानाट्यावेळी पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कौशल्याला त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. आपली परंपरा म्हणजे आपला इतिहास आपला गौरवशाली इतिहास प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभा करण्यासाठी तशाच प्रसंगाचा आणि वेशभूषेचा वापर व्हायला हवा. ध्रुव ग्लोबल स्कूलने हा प्रयत्न अव्याहत सुरु ठेवला आहे. आपली परंपरा म्हणजे आपला इतिहास आहे, तो पुढील पिढ्यापर्यंत नेण्याची जबाबदारी शिक्षण संस्थांची असते. डॉ.संजय मालपाणी
मिळालेल्या पुरस्काराची जबाबदारी समजून समाजात अधिक जोमाने काम करण्याचा पुरस्कारार्थींनी प्रयत्न करावा, असे आवाहन अहिल्यानगरचे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी केले. नेवासे तालुक्यातील प्रवरासंगम - टोका येथील श्री सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांसह व्यक्तीचा नववर्षाच्या पूर्व संध्येला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. टोका येथील समाज मंदिर प्रांगणात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळयाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे हे होते. तहसीलदार डॉ.संजय बिरादार,माजी सरपंच वसंतराव डावखर, युवा नेते विश्वयन गडाख, माजी सरपंच भारत गवळी,मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप सरोदे, संतोष फिरोदिया, उपसरपंच नितीन भालेराव, दत्ता अमोलिक आदी उपस्थित होते. श्री सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शांतवन खंडागळे यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत करून शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. पुरस्कार वितरण प्रसंगी अहिल्यानगर नेवासा प्रांताधिकारी सुधीर पाटील यांना महसूल प्रशासकीय सेवा कार्य गौरव राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येऊन त्यांच्या कार्याचा गौरव सत्काराद्वारे सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. प्रवरासंगमचे माजी सरपंच सुनीलराव बाकलीवाल (समाजभूषण),युवा नेते उदयन गडाख (शैक्षणिक कार्य गौरव),दीपक आगळे (युवा उद्योजक), नेवासे येथील मंगलताई भाकरे-घोडके व सुवर्णाताई गायकवाड(आदर्श अंगणवाडी सेविका)यांना प्रांत पाटील,तहसीलदार डॉ. बिरादार,बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवले. प्रांत पाटील म्हणाले, सिद्धेश्वर बहुउद्देशीय संस्थेचे घेतलेले विविध उपक्रम समाज हिताचे आहेत. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस त्यांनी दिलेल्या पुरस्कारामुळे पुरस्कार प्राप्त व्यक्तींची जबाबदारी वाढली आहे. त्यांनी नव्या जोमाने समाजाच्या उत्कर्षासाठी काम करावे. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते योगेश आवटी,राजेंद्र खंडागळे, उपसरपंच नितीन भालेराव, किरण खंडागळे, विजय खंडागळे, संतोष खंडागळे,विनायक खंडागळे, मेजर काकासाहेब खंडागळे, रविंद्र खंडागळे, दिलीप खंडागळे, संजय खंडागळे,दीपक खंडागळे, संदीप खंडागळे,सोपान खंडागळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सिद्धेश्वर बहुउद्देशीय संघटनेचे मार्गदर्शक सुधीर चव्हाण यांनी, तर आभार शांतवन खंडागळे यांनी मानले.
वांबोरीत होर्डिंग लावणाऱ्यांना चाप, कारवाईचा दिला इशारा
राहुरी तालुक्यातील वांबोरी गावांत दर्शनी भागात तसेच रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात फ्लेक्स बोर्ड लावले जात आहेत. काही ठिकाणी, बोर्डमुळे वळणावर अपघात होण्याचीही शक्यता वाढली आहे. यापार्श्वभूमीवर वांबोरी ग्रामपंचायतीने अशा ठराविक ठिकाणी फ्लेक्स लावण्यास बंदी घातली आहे. अंमलबजावणी न केल्यास कारवाईचा इशाराही ग्रामपंचायतीने दिला आहे. गावातील सार्वजनिक ठिकाणी शिस्त, स्वच्छता आणि कायद्याचे पालन व्हावे, या उद्देशाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत होत आहे. यापूर्वी ग्रामसभांमध्येही फ्लेक्स लावण्याच्या मुद्द्यावरून चर्चा झाली होती. वांबोरीत प्रवेश करणाऱ्या मार्गांवर तसेच मध्यशहरात फ्लेक्सचे पेव फुटले. ग्रामपंचायतीची पूर्व परवानगी न घेता फ्लेक्स लावले जातात. सार्वजनिक ठिकाणी फ्लेक्स किती दिवस ठेवावेत, तसेच याचे शुल्क वसूल करण्याबाबत तरतूद शक्य आहे का? याबाबतही चाचपणी करून निर्णय घेण्याची मागणी होत आहे. आता ग्रामपंचायतीने फ्लेक्स किंवा बोर्ड लावू नयेत, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तशा सूचनांचे फलक ग्रामपंचायतीने डकवले आहेत. त्यात, शुभेच्छा, शोक संदेश व इतर कोणत्याही प्रकारचे फ्लेक्स लावू नये असे स्पष्ट केले आहे. सरपंच किरण ससाणे, उपसरपंच इश्वर कुसमुडे यांच्यासह सदस्यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतूक होत आहे. वाहतुकीस अडथळा नको ^ आठवडाभरापूर्वी झालेल्या बैठकीत फ्लेक्सबाबत निर्णय घेण्यात आला. वाहतुकीला अडचण ठरतील, अशा ठिकाणी फ्लेक्स लावण्यास मनाई केली. पुढील बैठकीत इतर ठिकाणी आवश्यकतेनुसार फ्लेक्सबाबत बंदीचा निर्णय घ्यायचा किंवा कसे याबाबत निर्णय होईल. नागरिकांच्या जिवालाच धोका होणार असेल, तर मनाई असलेल्या ठिकाणचे बॅनर काढून टाकले. किरण ससाणे, सरपंच, वांबोरी.
जामखेडची बारामती करू म्हणून दोन वेळा सत्ता मिळवली पण बारामती नाही पण भानामती केली हे आता जामखेडकरांच्या चांगले लक्षात आले आहे. त्यामुळे या पराभवाची परतफेड जामखेडकरांनी नगरपरिषद निवडणूक निकालात केली अशी टीका विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विरोधकांवर केले. तसेच आगामी काळात जामखेड शहराचा चेहरामोहरा बदलू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. नगरपरिषद निवडणूकीतील मिळालेल्या यशाच्या पार्श्वभुमीवर आयोजित जाहीर सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात होते. यावेळी तालुकाध्यक्ष बापूराव ढवळे, सभापती शरद कार्ले, जिल्हा उपाध्यक्ष अजय काशिद, प्रविण घुले, विजय चौधरी, शेखर खरमाळे, अशोक खेडकर, गणेश क्षीरसागर, डॉ. भगवान मुरूमकर आदी उपस्थित होते. शिंदे पुढे म्हणाले, आपल्या काही उमेदवारांचा पराभव झाला त्यांना बरोबर घेऊन विकासाची दिशा ठरवू. खेडपासून खर्डापर्यंत सर्व मोठ्या गावचे सरपंच आपले आहेत. ज्यांना माणसे सांभाळता येत नाहीत ते माणुसघाणे आहेत. आता फिरकतही नाहीत. आक्रोश मोर्चा काढणाऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत, अशी खोचक टीका त्यांनी केली. या विजयाने आपली जबाबदारी वाढली आहे. आपल्या उमेदवारांवर विरोधकांनी विखारी टीका केली त्यांच्याकडे विकासाचा मुद्दा नव्हता जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. यावेळी विजयी नगरसेवक उपस्थित होते. त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुमन शेळके, श्रीराम डोके, अॅड. प्रविण सानप, पोपट राळेभात, सिमा कुलकर्णी, विकी घायतडक, प्रांजल चिंतामणी, हर्षद काळे नंदा होळकर, मोहन पवार, वैशाली म्हेत्रे, तात्याराम पोकळे, संजय काशिद, आशाबाई टकले, जया गव्हाळे उपस्थित होते. यावेळी पराभूत उमेदवारांचाही सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी म्हणाल्या, नगराध्यक्ष हे मिरवण्यासाठी पद नाही तर जनतेचा विश्वास आहे. या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी आज नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, उषाताई तनपूरे, रावसाहेब तनपुरे, हर्ष तनपुरे आदी उपस्थित होते. राजकारण बाजूला ठेवत शहराच्या विकासासाठी मी व माझे कार्यकारी नगरसेवक काम करणार आहोत. सामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे हेच आमचे उद्दिष्ट राहील असे मोरे यांनी सांगितले. तनपुरे म्हणाले, निवडणूक प्रचाराच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे सर्वोतोपरी प्रयत्न करतील. मुलींच्या जन्माचे दाखले मोफत दिले जातील. दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबांना नगरपालिकेच्यावतीने ११ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल. अनाधिकृत फलकांमुळे शहरात होणारे विद्रुपीकरण थांबवण्यात येईल. एक तारखेनंतर नगरपालिकेच्या परवानगीशिवाय कोणतेही फलक लावता येणार नाहीत. आठवडे बाजारात स्थानिक शेतकऱ्यांकडून कोणतीही पट्टी घेतली जाणार नाही, असे आश्वासन देत शहराच्या विकासासाठी विरोधी पक्षातील नगरसेवकही सहकार्य करतील असा विश्वास प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला. यावेळी सर्व नगरसेवकांचे मुख्याधिकारी अभिजीत हराळे यांनी सत्कार करून स्वागत केले. याप्रसंगी रावसाहेब चाचा तनपुरे, विजय डौले, आसाराम शेजुळ, भारत भुजाडी, निलेश जगधने, नंदू तनपुरे, सुर्यकांत भूजाडी, ज्ञानेश्वर जगधने, प्रकाश भुजाडी, दशरथ पोपळघट आदी उपस्थित होते.
हिंगोली जिल्हयात मंगळवारी ता. 30 पहाटे 5 वाजून 55 मिनीटांनी भूकंप झाला असून या भूकंपाची 3.5 रिश्टर स्केल तर 10 किलोमिटर खोली असल्याची नोंद झाली आहे. भूकंपाचे केंद्र बिंदू वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसर आहे. या भूकंपाचे हादरे परिसरातील गावांना बसले आहे. साखर झोपेत असलेले गावकरी या भूकंपामुळे चांगलेच भयभीत झाले आहेत. हिंगोली जिल्हयात मागील चार ते पाच वर्षापासून वारंवार लहान मोठे भूकंप होत आहेत. या शिवाय भुगर्भातून आवाज येण्याचे प्रकारही वाढले आहेत. दरवेळी भूकंप झाल्यानंतर प्रशासनाकडून काय करावे अन काय करु नये याची माहिती दिली जाते. या शिवाय भूकंपग्रस्त गावासह परिसरातील गावांमधून जनजागृती केली जात आहे. दरम्यान, आज सकाळी 5 वाजून 55 मिनीटांनी वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावातील गावकरी साखर झोपेत असतांना अचानक जमीन हादरली अन खिडक्यां, टीनपत्रांवर आवाज झाला. सुमारे चार ते पाच सेकंद हा आवाज होता. त्यामुळे गावकरी चांगलेच घाबरले. राष्ट्रीय भूकंपमापक केंद्रामध्ये या भूकंपाची नोंद झाली असून ३.५ रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंप झाल्याचे नोंद आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसर भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, नांदापूर, बोल्डावाडी, रामेश्वरतांडा, दांडेगाव, कोपरवाडी, बोथी, सालापूर, डिग्रस बुद्रूक, पिंपळदरी, राजदरी, सिंदगी, सोनवाडी यासह परिसरातील काही गावांमधून भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे कुठेही जिवीत व वित्त हानी झाली नाही. वारंवार होणाऱ्या भूकंप व जमिनीतील आवाजामुळे परिसरातील गावकरी भीतीच्या छायेत वावरत आहेत. दरम्यान या भूकंपामुळे कुठेही आपत्ती झाली नसली तरी त परिसरातील गावांमधून पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल प्रशासनाला दिल्या आहेत.
तक्रार असल्यास पदाचा राजीनामा घेतला जाईल:पदग्रहण साेहळ्यात आ. सुहास कांदे यांचा इशारा
नांदगाव नगरपरिषदेतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी जनतेची कामे थांबवू नयेत, अन्यथा पदाचा राजीनामा घ्यावा लागेल, असा इशारा आमदार सुहास कांदे यांनी पदग्रहण सोहळ्यात दिला. नगराध्यक्ष सागर हिरे यांच्यासह २० नगरसेवकांच्या पदग्रहणानिमित्त नगरपरिषद इमारतीसमोर आयोजित सभेत ते बोलत होते. आमदार कांदे यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या निवडणुकीत २० पैकी १९ नगरसेवक शिवसेना (शिंदे गट)चे निवडून आले असून, एक अपक्ष नगरसेवकही सत्ताधारी गटात सहभागी झाल्याने पालिकेत विरोधी पक्ष राहिलेला नाही. त्यामुळे शहर विकासाच्या दृष्टीने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यावेळी आमदार कांदे यांनी नांदगाव शहराच्या हद्दवाढीबाबत लवकरच ठोस प्रयत्न केले जातील, असे सांगितले. पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून पुढील सहा महिन्यांत शहरवासीयांना २४ तास नळाद्वारे पाणी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शासनाच्या सर्व योजना नांदगाव शहरात प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. समृद्धी बँकेच्या अध्यक्ष अंजुम कांदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींच्या प्रश्न सोडवणुकीसाठी सहकार्य केले जाईल, असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष सागर हिरे व नवनिर्वाचित नगरसेवकांना जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ देण्यात आली. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते बापुसाहेब कवडे, माजी आमदार अनिल आहेर, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, शिवसेनेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
पैठण तालुक्यातील दावरवाडी शिवारातील गट नंबर ५१७/१ मधील शेतकरी काकासाहेब रामराव तांगडे यांच्या चार एकर क्षेत्रावरील तुरीचे पीक अज्ञात समाजकंटकांनी रविवारी रात्री आग लावून जाळून खाक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या शेतकऱ्यांची आजच मशीनद्वारे मळणी करण्याची तयारी सुरू असतानाच अवघ्या एक दिवस आधी हे अमानुष कृत्य घडले. आगीच्या भक्ष्यस्थानी महिन्यांचे कष्ट, कर्जाचा डोंगर आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार जळून खाक झाला. पहाटे शेतात पोहोचताच संपूर्ण शिवार काळ्या राखेत परिवर्तित झाल्याचे दृश्य पाहून काकासाहेब तांगडे अक्षरशः कोलमडून पडले. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पाचोड पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
फुलंब्रीत नगरपंचायतच्या पायरीचे दर्शन घेऊन ठोंबरे यांनी स्वीकारला पदभार
फुलंब्री येथे नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीला हरवत महाविकास आघाडीने विजय मिळवला व यात महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे हे विजयी झाले. त्यांनी सोमवारी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला असून फुलंब्री नगरपंचायत पायरीवर ते नतमस्तक होऊन पदभार स्वीकारला. शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. सर्व विजयी उमेदवार, महाविकास आघाडीचे सर्व नेते, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचा शहरवासीयांतर्फे नागरी सत्कार करण्यात आला. नगरपंचायतच्या प्रवेशद्वारावर राजेंद्र ठोंबरे यांच्या पत्नी वंदना ठोंबरे यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी त्यांचे स्वागत करत नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचा पदभार सोपवला. यावेळी सूत्रसंचलन नरेंद्र सिमंत यांनी केले, यावेळी संतोष मेटे, संदीप बोरसे अशपाफ पटेल, मंगेश मेटे, असगर पटेल, सुदाम मते, राजेंद्र काळे, अरुणसेठ वयकोस, बापूराव म्हस्के, अंकुश ताठे, मुनतिजीब काझी, उमेश दुतोंडे, पवन घोडके, राजु प्रधान, विष्णू वानखेडे, श्रीराम म्हस्के आदींची उपस्थिती होती.
नाचनवेल गावात 35 वर्षांनंतर भेटले वर्गमित्र:जिल्हा परिषद शाळेत पुन्हा भरली शाळा
जिल्हा परिषद प्रशाला नाचनवेल येथील १९८९-९० मध्ये दहावी शिकणाऱ्या वर्गमित्रांचा स्नेहमिलन कार्यक्रम पार पडला. तब्बल ३५ वर्षांनंतर जवळपास विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र जमले. आपल्या सुख-दुःखांना मोकळ्या वाटा करून दिल्या. शालेय जीवनातील गोष्टींमध्ये रममान झालेले दिसले. गाण्याच्या भेंड्या, विविध खेळ आपलं वय विसरून प्रत्येक जण रममान होताना दिसला. धारेश्वर मंदिरावर निसर्गरम्य वातावरणात जेवणाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बापू अंभोरे, डॉ. सरदार राजपूत, मधुकर भापकर, कैलास थोरात, सुभाष थोरात, संजय मोरे, विजय पिंपळे, अनिल शेवाळे, गणेश शेळके वर्ग मैत्रिणी सुनीता शिंदे, संगीता थोरात, अंजली पिंपळे, अनिता शिंदे, सविता शिंदे, शशिकला राऊत, सुनीता काथार, चंद्रकांत चौतमल, दिनेश पिंपळे, कृष्णा थोरात, महादू राजपूत, आश्रम शहा, गोपीनाथ महाले व अनेक वर्गमित्र एकत्रित जमले होते.
लासूर स्टेशन येथील छत्रपती शाहू महाविद्यालयात सोमवारी राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत“रेड रिबन क्लब व एड्स जनजागृती” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना वानखेडे म्हणाले की,शिस्त, नियमांचे काटेकोर पालन व व्यसनापासून दूर राहिल्यास एड्ससारख्या दुर्धर आजारापासून स्वतःचे संरक्षण करता येते. राष्ट्रीय सेवा योजना विभाग विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सामाजिक बांधिलकी व जबाबदारीची जाणीव निर्माण करतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एन.एस.एस.च्या उपक्रमांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारल्यास व्यक्ती स्वतःची, कुटुंबाची, समाजाची व राष्ट्राची प्रगती साधू शकते, असे त्यांनी ठामपणे प्रतिपादन केले. यावेळी श्रीमती आम्रपाली गायकवाड, मुक्ताई व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, मानसिक आरोग्य विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, एड्स टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. एड्सची भीती मनातून काढून टाकली पाहिजे. तसेच या आजाराने ग्रस्त व्यक्तींना समाजाने तिरस्कार न करता मानसिक आधार व सहकार्य द्यावे, असे अनेक उदाहरणांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. प्राचार्य डॉ. बाळासाहेब पवार यांनी समारोप करताना सांगितले की, कोणतेही व्यसन शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान करते. अति अन्नसेवन हेही एक प्रकारचे व्यसन असून त्यातून अनेक आजार उद्भवतात. सध्याच्या काळात मोबाईलचे व्यसन अनेकांना त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त करत आहे, याची विद्यार्थ्यांनी गंभीर दखल घ्यावी. रक्तदानामुळे शरीरातील संभाव्य आजारांचे निदान होण्यास मदत होते, त्यामुळे रक्तदान करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. उपप्राचार्य व्ही. एस. अहिरे, प्रा. प्रणिता सातदिवे उपस्थित होत्या. प्रास्ताविक प्रा. डी. एस.जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरुण मगरे यांनी केले.
अजिंठा येथील जिल्हा परिषद शाळेच्या २००३-०४ च्या दहावी बॅचचा स्नेहमेळावा व गुरुजन कृतज्ञता सोहळा नुकताच पार पडला. तब्बल २१ वर्षांनंतर माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. शाळेच्या प्रांगणात राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा आणि राज्यगीत सादर करून त्यांनी पुन्हा शाळेत प्रवेश केला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक पी. व्ही. सोन्ने यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली. दहावीनंतर शिक्षण, नोकरी आणि कुटुंब जबाबदाऱ्यांमुळे विद्यार्थी दूर गेले होते. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा संपर्क साधला. त्यानंतर स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिक्षक निळकंठ लोसरवार, विजय चौधरी, राजेंद्र सरदार, अण्णा जगताप, विजय कालभिले, श्रीमती श्रीरामवार, श्रीमती काळे, श्रीमती महाजन, श्रीमती बनकर, श्रीमती वानखेडे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीचा आढावा घेतला. शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. बॅचच्या वतीने सर्व शिक्षकांना भेटवस्तू देण्यात आल्या. काही विद्यार्थ्यांनी खो-खो खेळून जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा गजभारे आणि वैशाली माहोर यांनी केले. प्रास्ताविक रघुनाथ पदमे यांनी केले. आभार संदिप मानकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशासाठी जयराज चौंडीये, अरुण अगवाल, नितीन ढाकरे, निशांत कुलवाल, वर्षा पाटील, कविता गुप्ता, भरत पवार, शंभू देशमुख, किशोर पाटील, दीपक चव्हाण यांनी मेहनत घेतली. या सोहळ्यास बॅचमधील सुमारे ६० विद्यार्थी उपस्थित होते.
सिल्लोड आगारातील वाहक संदीप नारायण इंगळे हे मागील पाच वर्षांपासून बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. मूळचे उंडणगावचे रहिवासी असलेले इंगळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिस्त, ज्ञान आणि सामाजिक जाणीव देण्यासाठी आगळावेगळा उपक्रम राबवत आहेत. इंगळे यांनी बसमध्ये शिस्तीचे नियम लावले. मुले एका बाजूला, मुली दुसऱ्या बाजूला बसतात. महिलांच्या राखीव जागांवर महिलाच बसतात. बसमध्ये मोबाइलवर गाणी लावण्यास बंदी आहे. गेम खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोबाइलमधून गेम डिलीट करून पालकांना सूचना दिल्या जातात. बसमध्ये घाण करणारे, सीट फाडणारे, अश्लील शब्द लिहिणाऱ्यांना प्रेमाने समजावले जाते. त्यांचे मन:परिवर्तन केले जाते. लहान मुलींना कुणी चुकीचा स्पर्श केल्यास काय करावे, कसा प्रतिकार करावा, पोलिस व सरकारी हेल्पलाइनचा वापर कसा करावा हे सांगितले जाते. हेल्पलाइन नंबरही दिले जातात. इंगळे विद्यार्थ्यांना मूलद्रव्यांची नावे, पाढे, वर्ग, सामान्य विज्ञान, शेतीविषयक माहिती, खतांची माहिती, विषारी सापांच्या जाती यांचे ज्ञान देतात. या उपक्रमामुळे काही विद्यार्थ्यांनी दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. सिल्लोड व भोकरदन तालुक्यातील शेकडो विद्यार्थी इंगळे यांच्याकडून शिकत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती आहे.
खुलताबाद तालुक्यातील महिला बचत गटांनी ग्रामीण विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. केवळ बचत न करता, उद्योग आणि व्यवसायांच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक क्रांती घडवून आणली आहे. तालुक्यातील १,१७४ बचत गटांमधील ११,३१५ महिला सदस्यांनी बँकांकडून २८ कोटी ३६ लाखांचे कर्ज घेऊन १०० टक्के परतफेडीचा विक्रम प्रस्थापित केला आहे. दरम्यान, या गटांनी आतापर्यंत ९ कोटी ३६ लाख रुपयांची बचत जमा केली आहे. गावनिहाय यशोगाथा : गदाना येथील सिद्धिविनायक बचत गटाच्या प्रमुख रेखा प्रभाकर चव्हाण आहेत. या गटाने आंब्याच्या लोणच्याच्या निर्मितीचा व्यवसाय सुरू केला आहे. दरमहा १ ते सव्वा लाख रुपयांचा नफा मिळवत आहे. वर्षाकाठी १३ ते १४ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवणारा अवघ्या १० महिलांचा हा गट आज पूर्णतः स्वयंपूर्ण झाला आहे. भडजी येथील राणी लक्ष्मीबाई बचत गटाच्या प्रमुख रत्ना धनसिंग पुसे आहेत. या गटाने शेंगदाणा, तीळ, खोबरे व राजगिरा चिक्कीच्या निर्मितीतून वार्षिक १० लाख रुपयांहून अधिक उलाढाल साधली आहे. मोठ्या शहरांमध्ये या गटाच्या विविध प्रकारच्या चिक्कीला मोठी मागणी आहे. बोडखा येथील गिरजा माता बचत गटाच्या प्रमुख स्वप्नाली अतुल महाले आहेत. या गटाने पापड व शेवयांच्या निर्मिती उद्योगातून दरमहा १२ ते १५ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळत आहे. धामणगाव येथील जीवन ज्योती बचत गटाच्या प्रमुख परिगाबाई दांडेकर आहेत. या गटाने दाळ मिल व्यवसायातून दरमहा २५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे. सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा : महिला बचत गटांमुळे महिलांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. आज त्या ग्रामसभांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, बालविवाह प्रतिबंध आणि व्यसनमुक्ती यांसारख्या सामाजिक विषयांवर पुढाकार घेत आहेत. शासनाचा पाठिंबा व प्रशिक्षण राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (NRLM), पंचायत समिती खुलताबाद तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांना उद्योजकता प्रशिक्षण, बँक कर्ज, आणि बाजारपेठेची जोडणी मिळाली.
सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांनी या वर्षी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून मोठ्या प्रमाणात रब्बीची पेरणी केली. यात गहू पीक आघाडीवर आहे. त्याखालोखाल हरभरा पिकाची लागवड आहे. कृषी विभागाच्या आवाहनानुसार सिल्लोड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी रब्बी हंगामात गहू, हरभरा आणि मका पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. यात गतवर्षीच्या तुलनेत गव्हाचे क्षेत्र दुप्पट झाले आहे. १९ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी केली. यंदा पाऊसमान चांगले असल्याने सिल्लोड तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रब्बीत दरवर्षी कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून हरभरा, गहू, मका या पिकांची लागवड करतात. यात हरभरा पिकाने अनेक शेतकऱ्यांना लखपती केले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा गहू, हरभरा लागवडीकडे कल आहे. यंदा शेतकऱ्यांना खरिपात नुकसान सहन करावे लागले. मात्र, दुसरीकडे मुबलक पाणी असल्याने खरिपातील पोकळी रब्बीत भरून काढण्यासाठी यंदा शेतकऱ्यांनी आतापर्यंत ५५ हजार ०८८.८ हेक्टरवर रब्बीची पेरणी केली. यापैकी २१ हजार २८८ हेक्टरवर हरभरा पिकाला शेतकऱ्यांनी पसंती दिली, तर १९ हजार ६१९ हेक्टर क्षेत्रात गव्हाची आणि १२ हजार ३१२ हेक्टरवर मका पिकांची लागवड केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी हरभरा उत्पादनात दीडपट वाढ व्हावी म्हणून जवळजवळ १८ हजार हेक्टरवर ठिबकवर बेड पद्धतीने हरभरा पिकाची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी स्प्रिंकलरचा वापर केला आहे. यामुळे उत्पन्न वाढणार असून पाण्याची बचत होईल. या लागवडीचा फायदा शेतकऱ्यांना दरवर्षी दिसत असल्याने यंदा दुपटीने बेड पद्धत हरभरा लागवडीत शेतकऱ्यांनी वाढ केली आहे. रब्बी लागवडीचे क्षेत्र १४ हजार हेक्टरने वाढले तालुक्यात सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. यानंतर अहवाल दिलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत दिली. परंतु तरीही शेतकरी न डगमगता रब्बी हंगामासाठी पुन्हा जोमाने उभा राहिला. यामुळे नदीनाल्यांना चांगले पाणी आल्याने यंदा गतवर्षीच्या तुलनेत रब्बी लागवडीचे क्षेत्र १४ हजार हेक्टरने वाढले आहे. सूर्यफुलासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात तेल घाणे ^तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या फरदड घेण्याच्या नादी न लागता मका, हरभरा, सूर्यफूल या पिकांची लागवड करून चांगले उत्पन्न घ्यावे. सूर्यफुलासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात तेल घाणे उपलब्ध आहेत. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होईल. सूर्यफूल व मका पेरणीसाठी अजूनही दोन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे पाण्याची उपलब्धता असणाऱ्या शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड करावी. - संदीप जगताप, तालुका कृषी अधिकारी
पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज समाधी मंदिर परिसराचा कायापालट होत आहे. येथे भाविकांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त असा भव्य १५०० आसन क्षमतेचा कीर्तन हॉल' उभारला जात आहे. या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात असल्याचे अभियंता राजेंद्र बोरकर यांनी सांगितले. मंदिर परिसर आणि मुख्य रस्त्यावर संत एकनाथ महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य शिल्पे साकारण्यात आली आहेत. यामुळे पैठणच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडणार आहे. खासदार संदिपान भुमरे यांच्या संकल्पनेतून व आमदार विलास भुमरे यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या समोर आधुनिक तीनमजली डिजिटल कीर्तन हॉल तयार होत आहे. गोदावरीच्या पात्रालगत उभारल्या जाणाऱ्या या भव्य प्रकल्पामुळे पैठणच्या धार्मिक-सांस्कृतिक वैभवात मोलाची भर पडणार आहे. याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या कीर्तन हॉलमध्ये १५०० भाविकांची आसन क्षमता, तीनमजली गोलाकार गॅलरी, अत्याधुनिक ध्वनिप्रणाली, वातानुकूलन व्यवस्था तसेच डिजिटल एलईडी प्रोजेक्शनची सुविधा असणार आहे. असा आहे कीर्तन हॉल : बेंगळुरू येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ध्यानसाधना केंद्राच्या धर्तीवर या वास्तूची रचना करण्यात आली आहे. १०० फूट व्यास व ८० फूट उंचीची ही भव्य रचना केवळ कीर्तनांसाठीच नव्हे, तर नवोदित कीर्तनकारांच्या प्रशिक्षण व सादरीकरणासाठी एक आदर्श व्यासपीठ ठरणार आहे. वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध होणार समाधी मंदिर परिसरातील विविध शिल्पे आणि कीर्तन हॉलचे काम वेगाने पूर्ण होत आहे. वारकरी आणि भाविकांना जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील, या दृष्टीने याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र बोरकर यांनी दिली.
बजरंग चौक, गुलमोहर कॉलनी, अयोध्यानगर, सत्यमनगर, एमआयडीसी चिकलठाणा, म्हाडा कॉलनी, बजरंग कॉलनी, एन-१ सिडको, विजयश्री कॉलनी, टाऊन सेंटर, गरवारे स्टेडियम, सावरकरनगर आणि अष्टविनायकनगर या भागांत रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांच्या अतिक्रमणांनी रस्ते व पदपथ अडवले आहेत. नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे. या प्रभागात आठवड्यातून एकदा पाणी येते. अनियमित कचरा संकलनामुळे नागरिक त्रस्त आहेत. या प्रभागात मागील दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. यामध्ये प्रामुख्याने रस्ते, ड्रेनेजलाइन आणि स्ट्रीट लाइट लावण्यात आले. मात्र, एकदा लावल्यानंतर मेंटेनन्स करण्याकडे मनपा प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. या प्रभागातील उद्यानाचादेखील विकास झाला आहे. विशेष म्हणजे या भागात रात्री खेळण्यासाठी सुसज्ज असे गरवारे क्रीडा संकुल आहे. येथे आंतरराष्ट्रीय सामने व्हावे, यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहे. आगामी काळात हे मैदान आणखी विकसित होणार आहे क्र. १० गुलमोहर कॉलनी, सत्यमनगर, अयोध्यानगर वॉर्ड क्र. उमेदवार, पक्ष मतदान६४ शिवाजी दांडगे, भाजप १६१९ ३४ सुरेखा खरात, भाजप १२८७८९ ज्योती नाडे, भाजप १३७१प्रभाग आरक्षण : अ- ओबीसी महिला, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण, ड- सर्वसाधारण, २०० कोटींचा खर्च या प्रभागात रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे. ड्रेनेज, रस्ते, स्ट्रीट लाइट, उद्यान आदी ठिकाणी सुमारे २०० कोटींपेक्षा अधिकचा निधी खर्च करण्यात आला आहे. मैदान विकसित करण्यासाठी मनपाने तरतूद करावी, अशी मागणी होत आहे. जाणून घ्या आपला प्रभाग प्रभागाची व्याप्ती : बजरंग कॉलनी, एन-१ सिडको, बजरंग चौक, गुलमोहर कॉलनी, अयोध्यानगर, सत्यमनगर, एमआयडीसी चिकलठाणा, म्हाडा कॉलनी, बजरंग कॉलनी, एन-१ सिडको, विजयश्री कॉलनी, टाऊन सेंटर, गरवारे स्टेडियम, सावरकरनगर. 1. कचरा : परिसरातून अनियमित कचरा संकलनामुळे रस्त्यावर कचराया प्रभागात जागोजागी रस्त्यावर कचरा साचलेला दिसतो. रस्ते चकाचक झाले असले तरी कचऱ्याच्या समस्येने नागरिक हैराण आहेत. घंटागाडी नियमित वेळेवर येत नाही. 2. पाणी : आठवड्यातून एकदाच मिळते पाणी, नागरिकांतून संतापया प्रभागात आठवड्यातून एकदा पाणी येते. मागील वर्षभरापासून कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिक संतापले आहेत. दाट लोकवस्ती असल्याने ४५ मिनिटेच पाणी येते. 3. रस्ते : स्मार्टसिटीचे रस्ते अल्पावधीत उखडलेया प्रभागातून स्मार्ट सिटीच्या निधीतून सर्वाधिक रस्त्यांची कामे झाली. त्यामुळे प्रभागात सर्व ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ते झाले आहेत. कामाचा दर्जा राखला गेला नाही.
शिवसेनेच्या कार्यालयात महिलांची घोषणाबाजी:घुलेंची बंडाळी, जंजाळांच्या डोळ्यांत पाणी
महापालिका निवडणुकीच्या तिकीटवाटपावरून शिवसेनेच्या (शिंदे गट) मध्यवर्ती कार्यालयात सोमवारी (२९ डिसेंबर) प्रचंड ड्रामा पाहायला मिळाला. महिला महानगरप्रमुख शारदा घुले यांना उमेदवारी नाकारल्याने संतापलेल्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी जिल्हा कार्यालयात धाव घेऊन ठिय्या मांडला. “आजारी असताना प्रचार केला, मग आता डावलले का?’ शारदा घुले यांनी आपला संताप व्यक्त करताना सांगितले की, “आजारी असतानाही मी पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांचा प्रचार केला. मला प्रभाग १ आणि ८ मधून शब्द देण्यात आला होता, मात्र ऐनवेळी माझी उमेदवारी कापण्यात आली. महानगरप्रमुखाची ही अवस्था असेल तर सामान्य महिला कार्यकर्त्याला न्याय कसा मिळणार?’ जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. यामुळे राजकीय नेत्यांची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसून आले. आता यावर पक्षश्रेष्ठी काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जंजाळ यांना रडू कोसळले आक्रमक महिलांची समजूत काढण्यासाठी आमदार प्रदीप जैस्वाल आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ पुढे सरसावले. मात्र, महिलांच्या रोषापुढे त्यांचे काहीच चालले नाही. निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय होत असल्याचे पाहून राजेंद्र जंजाळ भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. ते रडतच कार्यालयातून बाहेर पडल्याचे जैस्वाल यांनी माध्यमांना सांगितले. या घटनेमुळे शिवसेनेत उमेदवारीवरून असलेला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
महापालिकेत आलेल्या नवख्या नगरसेवकांच्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. ठराव कसा मांडायचा, ठराव कशाला म्हणायचं यावर सभागृहात झालेल्या चर्चेचं हे उदाहरण पाहा. रतनकुमार पंडागळे यांनी मांडलेल्या एका विषयावर सभागृहात चर्चा सुरू झाली. अर्थात, विषयपत्रिकेतील मुद्दा असल्यामुळे तो चर्चेला आला. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, शहरापासून जवळच वेरूळ लेण्या, दौलताबाद किल्ला, अजिंठा लेण्यांसह बीबी का मकबरा, पाणचक्की अशा ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यामुळे महापालिकेनं केंद्र सरकारकडे १०० कोटी रुपयांचा विकास निधी मागावा. त्यातून या वास्तूंचा विकास करता येईल... या मुद्द्यावर चर्चा सुरू होताच सर्वांच्या लक्षात आलं की, पंडागळे यांनी प्रस्ताव सादर केलेलाच नाही. हे तर एक निवेदन आहे. मग हे निवेदन विषयपत्रिकेवर कसं आलं... हा दुसरा प्रश्न. अशा पद्धतीनं मागणी करायला हरकत नाही, असं चेनकरण संचेती म्हणाले. त्यांनी त्याबाबत मुंबई महापालिकेचं उदाहरणही दिलं. मुंबई महापालिकेनं केंद्र सरकारकडं शंभर कोटी रुपये मदत मागितल्याचं त्यांनी सांगितलं. आता मुंबई महापालिकेनं कोणत्या नियमात निधी मागितला, कशासाठी मागितला हे काहीच सांगितले नाही. मग चर्चा सुरू असतानाच सुचवलं की, हे निवेदन म्हणजे प्रस्तावच आहे, असे मानून त्याला संमती देण्यात येईल. त्यावर शिवसेना नगरसेवकांनी आक्षेप घेतला. उद्या कुणीही निवेदन देईल आणि मंजूर करून घेईल. त्यातून वाईट पायंडे पडतील. झालं. कोणता विषय कुठं जाऊन पोहोचला बघा. विशेष म्हणजे पंडागळे यांच्या या निवेदनाला अनुमोदकच नव्हते. त्यातून नवाचा वाद निर्माण झाला. महापौर काळे यांनी निवेदनाला प्रस्ताव म्हणून मान्यता देण्याचा विषय मतदानासाठी टाकला. त्या आधी शिवसेना नगरसेवकांनी या मुद्द्यावर सभात्यागही केला होता. अखेर ३० विरुद्ध २७ मतांनी हा ठराव मंजूर झाला. या ठरावाचं पुढं काय झालं हे कुणालाच माहीत नाही. याच सभेत शासकीय रुग्णालयात म्हणजे घाटीत बेवारस मृतदेहांवर अत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत दाहिनीचा ठराव आला होता. त्यावर आक्षेप घेण्यात आला की, अर्थसंकल्पात तरतूद केलेली असताना वेगळा प्रस्ताव मांडण्याची गरज काय. त्यावर ठराव घेता येतो की नाही यावर खूप चर्चा झाली. अखेर सामोपचाराने तो ठराव मंजूर करण्यात आला... तर अशा गमतीजमती घडणाऱ्या महापालिकेत काही वादाचे विषयही हळूच मागे पडले. वंदे मातरम सुरू असताना ते सर्वांनीच म्हटले पाहिजे असं नव्हे, हे काही नगरसेवकांनी याच सभेत मान्य करून घेतलं. त्यामुळे तो विषय पूर्णपणे मागे पडला आणि वादाला दुसरे विषय मिळत राहिले.
अनंत अंबानींची शिर्डीच्या साईसंस्थानला 5 कोटींची देणगी:धूपारतीस उपस्थिती, वर्षातील सर्वात मोठे दान
प्रसिद्ध उद्योगपती तथा रिलायन्स उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी सोमवारी शिर्डीत भेट देत सायंकाळच्या धूपारतीस उपस्थिती लावली. या वेळी त्यांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. धूपारतीनंतर त्यांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन काही काळ ध्यान केले. या प्रसंगी अनंत अंबानी यांनी श्री साईबाबा संस्थानकडे पाच कोटी रुपयांची देणगी डिमांड ड्राफ्टद्वारे सुपूर्द केली. या वर्षात साई संस्थानला एका व्यक्तीने दिलेली ही सर्वात मोठी रोख देणगी आहे. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी अंबानी यांचा शाल व साईबाबांची प्रतिमा देऊन सत्कार केला. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे उपस्थित होते. अंबानी यांनी दिलेली देणगी संस्थानच्या विविध सेवाभावी उपक्रमांसाठी, भाविकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधा, आरोग्य सेवा, अन्नदान तसेच विकासकामांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती संस्थान प्रशासनाने दिली. साईबाबा संस्थानने या देणगीबद्दल अंबानी यांचे आभार मानले. अंबानी कुटुंबीयांचे वर्षातून १० ते १२ वेळा साई दर्शन अंबानी कुटुंब साईबाबांचे निस्सीम भक्त आहे. वर्षातून किमान दहा ते बारा वेळा अंबानी कुटुंबातील सदस्य शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतात. साई संस्थानचे वर्षाचे उत्पन्न ८५० कोटींवर रोख स्वरूपात एका व्यक्तीने दिलेल्या दानामध्ये अनंत अंबानी यांनी केलेले ५ कोटींचे दान हे या वर्षातील सर्वाधिक ठरले. शिर्डीत गुप्तदान करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. २०२४-२५ च्या अहवालानुसार, साई संस्थानला दागिने, रोख, अन्नदान, दक्षिणापेटी, गुंतवणुकीवरील व्याज अशा विविध माध्यमातून वर्षाकाठी ८५० कोटी ६२ लाखांचे उत्पन्न झाले. गतवर्षीच्या तुलनेत हे दान ३१.६२ कोटींनी जास्त आहे.
छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये पावसाळ्यात कंबरेइतके पाणी साचले. प्रभागात स्मशानभूमी नाही. आरोग्य केंद्राचाही पत्ता नाही. खेळायला ग्राउंड, वाचनालय, वॉकिंग ट्रॅक यापैकी येथे काहीही नाही. महापालिकेचे पाणीही नऊ दिवसांनंतर येते. महापालिकेच्या क्षेत्रात असूनही आम्हाला वाळीत टाकले आहे, अशी कैफियत येथील नागरिकांनी दिव्य मराठी ॲपच्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' या टॉक शोमध्ये मांडली. दिव्य मराठी ॲपने सुरू केलेल्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' या टॉक शोला संभाजीनगरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग एकमध्ये गेले असता समजले की, तेथील काही भागात महापालिकेची पाइपलाइनच आलेली नाही. त्याचबरोबर रस्त्याची सर्वात मोठी समस्या असल्याचे नागरिकांनी सांगितले. पावसाळ्यात घरात पाणी शिरते प्रभागातील रहिवासी असणाऱ्या सुरेखा वैष्णव यांनी सांगितले की, 'पावसाळा सुरू झाला की आमच्या घरात पाणी शिरते. समोरचा रस्ता केलाय. मात्र, त्याच्या मध्येच मोठा खड्डा तयार झालाय. त्यामुळे खाली - वर जागा झाली आहे. याचा त्रास असा तर होतोच, पण जेव्हा पाऊस येईल तेव्हा आमच्या घरात पाणी शिरते आणि रस्त्यावर तर कंबरे इतके पाणी असते. आम्ही अनेकदा तक्रार केली आहे. पण त्यास गांभीर्याने घेतलेच जात नाही. आमच्या नगरसेवकाने निवडून आल्यापासून आमच्याकडे नजर वर करून सुद्धा पाहिले नाही. त्यामुळे आम्ही तक्रार करून करून थकलो आहोत. त्यामुळे मतदान करूनसुद्धा काही एक फायदा नाही, असेच म्हणावे लागेल. पैसे घेतात, पण सुविधा नाहीत प्रभागातील राधास्वामी कॉलनी परिसरात राहणाऱ्या 'वैशाली धुपे' यांनी सांगितले की, 'आमच्याकडे पाण्याची खूप मोठी समस्या आहे. आम्ही महानगरपालिकेत येतो मात्र आम्हाला पाण्याची लाईन अजूनपर्यंत आलेली नाही. आम्ही बोअरवेलचे पाणी वापरतो. ते सुद्धा उन्हाळ्यात मिळत नाही. एकता नगर, सहारा कॉलनी मध्ये पाण्याची लाइन आहे मात्र आमची कॉलनी वाळीत टाकल्यासारखी केली आहे. आमच्याकडून बिल तर संपूर्ण घेतात, भरले नाही तर त्याला वेगळे व्याज लावतात. ज्या गोष्टीसाठी एवढे पैसे भरतो त्याच सुविधा आम्हाला मिळत नाहीत. आमच्या खिशाला कात्री बसवण्याची काम केलं जात.' पाण्याचा गॅप कमी करा रस्ते, ड्रेनेजलाइन, कचरा यासारख्या समस्या काही भागात सोडवल्या गेल्या आहेत. मात्र प्रभागात कुठेच आरोग्य केंद्र नसल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. ते म्हणाले की, 'आमच्याकडे माणूस मेल्यानंतर अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नाही. कोणी घरात गेले तर आम्हाला N -११ मध्ये जावे लागत. एवढेच नाही तर या भागात एकही आरोग्य केंद्र नाही. त्यासाठीही आम्हाला खूप दूर जावे लागते. बाकी आमच्याकडे रस्ते, लाइट, ड्रेनेज यासारख्या गोष्टी आम्हाला व्यवस्थित मिळतात. पण मुख्य आरोग्य केंद्र हवे आहे.' प्रभागात पाण्याची समस्या असल्यामुळे नागरिक म्हणतात की आम्हाला एकवेळ स्मशानभूमी नको, पण आम्हाला पाणी द्या. जे पाणी ८ - ९ दिवसाला येत ते पाणी आम्हाला ३-४ दिवसाला यावे अशी मागणी करतात. तसेच नागरिक परिसरात मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड, वाचनालय आणि वॉकिंग ट्रॅकची मागणी करतात. अशी आहे प्रभागाची व्याप्ती प्रभाग १ मध्ये फुलेनगर, खत्रीनगर, जमनज्योती, भगतसिंगनगर, म्हसोबानगर भागशः, हर्सल गाव, बेरीबाग, साफल्यनगर, घृष्णेश्वर कॉलनी, एकतानगर, जहांगीर कॉलनी, राधास्वामी कॉलनी, चेतनानगर, राजनगर, हर्सूल, जय महाराष्ट्र नगर, म्हाडा कॉलनी, रमाई आवास योजना, सईदा कॉलनी, अंबर हिल, सांगळेनगर, यासीननगर, फकीरवाडी, गोरक्षनाथ नगर भागशः यांचा समावेश होतो. प्रभागाची एकूण लोकसंख्या बघायला गेली तर 41080 एवढी आहे.
भांडूप रेल्वेस्थानक परिसरातील बस डेपोजवळ सोमवारी रात्रीच्या सुमारास बेस्टच्या इलेक्ट्रिक बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने १३ प्रवाशांना ठोकरले. या हृदयद्रावक अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश असून त्या कामावरून घरी परतत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री १० च्या सुमारास स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी असताना बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित बसने रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना जोरात ठोकरले. सर्व जखमी प्रवाशांना एम. टी. अग्रवाल रुग्णालयात हलवण्यात आले असता ३ जणांना मृत घोषित करण्यात आले, तर राजावाडी रुग्णालयात एका ३१ वर्षीय अज्ञात महिलेचा मृत्यू झाला आहे. जखमींपैकी ५१ वर्षीय प्रशांत लाड यांची प्रकृती चिंताजनक आहे. तांत्रिक की मानवी चूकॽ घटनेनंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य राबवले. बसखाली अडकलेल्यांना बाहेर काढून उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला की मानवी चुकीमुळे, याचा सविस्तर तपास आता सुरू करण्यात आला आहे.
साहित्यिकांच्या व्यासपीठावर राजकारण्यांचे काम काय, असा सवाल करत दरवर्षी साहित्य संमेलनांमध्ये राजकारण्यांच्या उपस्थितीला विरोध करण्यात येतो. यंदा मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे संमेलन पत्रिकेवर केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठी भाषा विभाग मंत्र्यांसह साताऱ्यातील आयोजक मंत्र्यांचीच नावे असल्याने साहित्यिकांमध्येही आनंद व्यक्त होत आहे. अ. भा. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने यंदाचे ९९ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन पानिपतकार विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १ ते ४ जानेवारीदरम्यान साताऱ्यात होत आहे. जाहीर झालेल्या पत्रिकेत केवळ उद्घाटन समारंभाला आणि समारोपाला यंदा मंत्री दिसणार आहे. उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे दोघे तर स्वागताध्यक्ष असलेले बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रराजे भासले आणि खा. उदयनराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे असणार आहेत. तर समारोपला उपमुखमंत्री एकनाथ शिंदे आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंची उपस्थिती पत्रिकेत दाखविण्यात आली आहे. शासनाकडून कोट्यवधींचा निधी कराडला १९७५ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनावेळी दुर्गा भागवतांनीही राजकारण्यांना विरोध केला होता. तेव्हा यशवंतराव चव्हाण समोर प्रेक्षकांमध्ये बसले होते. त्यानंतर थेट २०२० मध्ये उस्मानाबाद येथील संमेलनातच असे चित्र दिसले. या संमेलनातही राजकारण्यांना व्यासपीठावर स्थान दिले नव्हते. नाशिक, वर्धा, दिल्लीच्या संमेलनातही मुद्दा चर्चेच आला. दिल्लीच्या संमेलनात तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह महाराष्ट्रातील राजकारण्यांची मांदियाळीच होती. प्रत्येकवेळी साहित्यिकांच्या आणि महामंडळातील पदाधिकाऱ्यांच्या एका गटाने राजकारणी व्यासपीठावर आले तर लेखक, साहित्यिक झाकोळला जातो या भूमिकेतून राजकारण्यांना विरोध केला. मात्र, शासनाकडून संमेलनाला २ कोटी आणि दिल्लीतील संमेलनाला तर ४ कोटी दिले. त्यामुळे या निधीखाली दबले जाऊन महामंडळाकडून राजकारण्यांसाठी पायघड्या घातल्या. आमचा लेखक दुय्यम ठरतो राजकारण्यांना जेव्हा संमेलनात वा व्यासपीठावर स्थान दिले जाते तेव्हा लेखक दुय्यम ठरतो. माध्यमांमध्येही तो विचार केला जात नाही. या भूमिकेतून उस्मानाबादचे संमेलन राजकारण्यांविना करून दाखवले होते. आता निवडणुकांमध्ये या संमेलनात मंत्री, राजकारणी कमी असतील तरी ते आहेतच यातच सगळे आले. - कौतिकराव ठाले पाटील, अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद
सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील शेतकरी तुकाराम गव्हाणे पाटील यांचे एका कोटी रुपयांच्या खंडणीसाठी ५ जणांनी अपहरण केले. मात्र नंतर अपहरणकर्त्यांनी पैसे न स्वीकारता शेतकऱ्याचा खून करून मृतदेह कन्नड घाटातील दरीत फेकून दिला. विशेष म्हणजे अपहृत शेतकऱ्याचा परिचित सचिन बनकर यानेच हा कट रचला होता. अपहरणकर्त्यांनी या शेतकऱ्याच्याच फोनवरून त्याच्या कुटुंबीयांकडे खंडणीची मागणी केली. याप्रकरणी ४ अपहरणकर्त्यांना पोलिसांनी समृद्धी महामार्गावर कारसह अटक केली, तर अन्य एका संशयिताला लिहाखेडी (ता.सिल्लोड) गावाहून अटक केली. सचिन बनकर (रा. गोळेगाव, ता. सिल्लोड), अजिनाथ ऊर्फ अजय सपकाळ (रा. पालोद), वैभव रानगोते (रा. गोळेगाव), विशाल खरात (पानवडोद, ता. सिल्लोड) व दीपक जाधव (रा. लिहाखेडी) अशी आरोपींची नावे आहेत. बोदवड येथील शेतकरी तुकाराम माधवराव गव्हाणे पाटील हे शनिवारी सायंकाळी मक्याचे पैसे घेण्यासाठी उंडणगाव येथील व्यापारी मुकेश पंडित यांच्याकडे गेले होते. व्यापाऱ्याकडून १ लाख रुपये घेऊन ते दुचाकीने (एम.एच.२०- जी.एफ.०४४४) बोदवडकडे निघाले. वाटेत रात्री ७ वाजता पाचही संशयितांनी त्यांचे कारमधून अपहरण केले. गव्हाणे पाटील यांना घेऊन छत्रपती संभाजीनगर परिसरात फिरले. मोबाइल टॉवरच्या डंप डेटामुळे आरोपी पोलिसांना सापडले आरोपी वारंवार लोकेशन बदलत असल्याने त्यांचे मोबाइल लोकेशन काढणे पोलिसांना कठीण जात होते. मात्र, आरोपी गव्हाणे पाटील यांच्याच नंबरवरून खंडणीसाठी कॉल करत असल्याने मोबाइल टॉवरचा डंप डेटा पोलिसांनी काढला. टॉवरच्या रेंजमध्ये एका ठराविक वेळेत किती मोबाइल फोन सक्रिय होते आणि फोन कॉल्स, मेसेजेस सुरू होते, याची जी संपूर्ण यादी मिळते, त्यालाच ‘डंप डेटा’ म्हणतात. त्यानुसार गव्हाणे पाटील यांच्या मोबाइलच्या परिसरात जे क्रमांक सुरू होते त्याची यादी पोलिसांना मिळाली. यादीत आरोपींचे दोन मोबाइल सतत गव्हाणे पाटील यांच्याजवळ असल्याचे आढळले. त्यामुळे पोलिसांनी लोकेशन ट्रॅक आरोपींना पकडले. मृत शेतकऱ्याचा परिचितवडिलांना जिवंत बघायचेअसेल तर १ कोटी घेऊन ये तुकाराम गव्हाणे पाटील हे उशिरापर्यंत घरी न पोहोचल्याने कुटुंबीय व गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली होती. दुसऱ्या दिवशी रविवारी तुकाराम गव्हाणे पाटील यांचा मुलगा कृष्णा याला दोन वेळा वडिलांचा आणि नंतर अपहरणकर्त्यांचा फोन आला. वडिलांना जिवंत बघायचे असेल तर १ कोटी रुपये घेऊन ये, अशी धमकी अपहरणर्त्यांनी गव्हाणे यांच्या मोबाइलवरून दिली.
मुंबईतील भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी रात्री उशिरा एका बसने 13 पादचाऱ्यांना चिरडले. या अपघातात 3 महिलांसह 4 जणांचा मृत्यू झाला. 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई पोलिसांनी सांगितले की, हा अपघात रात्री 9:35 वाजता बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) च्या बसमुळे झाला. प्राथमिक माहितीनुसार, बेस्टची बस रिव्हर्स घेताना अनियंत्रित झाली आणि रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना तिने धडक दिली. अपघातानंतर बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेनंतर रुग्णवाहिका, मुंबई अग्निशमन दल आणि बेस्टची टीम घटनास्थळी पोहोचली. जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेच्या मदतीने राजावाडी आणि एम.टी. अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे 4 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बसने एका विजेच्या खांबालाही धडक दिली, ज्यामुळे तो कोसळला. यामुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला. प्रत्यक्षदर्शीने सांगितले- बसने एका व्यक्तीचे डोके चिरडले घटनास्थळी उपस्थित एक प्रत्यक्षदर्शी, फार्मासिस्ट सैमिनी मुदलियार यांनी सांगितले की त्या जवळच्या बस स्टॉपवर त्यांच्या बसची वाट पाहत होत्या. तेव्हाच एका मोठ्या स्फोटासारखा आवाज ऐकू आला. मुदलियार म्हणाल्या- पुढच्याच क्षणी मी लोकांना बसला धडकून उडून खाली पडताना पाहिले. बस थोड्या वेळाने थांबली. मुदलियार यांनी सांगितले की, बसखाली लोक अडकले होते. लोक बस उचलण्याचा आणि ढकलण्याचा प्रयत्न करू लागले. बसजवळ सर्वत्र रक्त पसरले होते. अनेक लोक जखमी अवस्थेत पडले होते. एका व्यक्तीचे डोके वाईट रीतीने चिरडले गेले होते, जणू काही बस त्याच्यावरून गेली होती, तर दुसऱ्याच्या मांडीजवळ दुखापत झाली होती. पदपथावरील अतिक्रमणामुळे लोक रस्त्यावर होते एका प्रत्यक्षदर्शीने पदपथावरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाला अपघाताचे कारण सांगितले आहे. त्यांच्या मते, पदपथावर जागा नसल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागले, ज्यामुळे अपघात झाला. प्रत्यक्षदर्शीनुसार, हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. स्वस्त भाज्या मिळत असल्यामुळे येथे लोकांची संख्या आणखी वाढते, ज्यामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होते. प्रचंड गर्दीमुळे बसेसना यू-टर्न घेण्यास अडचण येते. अपघाताची 4 छायाचित्रे... बस चालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची तयारी डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितले की, बस चालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बसची यांत्रिक आणि तांत्रिक तपासणी केली जाईल. तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल. अपघातात सामील असलेली मध्यम आकाराची बस ‘वेट लीज’ मॉडेलवर ओलेक्ट्रा ग्रीनटेककडून घेण्यात आली होती. प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बेस्टचाच चालक बस चालवत होता. अपघातानंतर एक तासापर्यंत बेस्टच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना ₹5 लाखांच्या मदतीची घोषणा केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना ₹5 लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, ही घटना अत्यंत दुःखद आहे. त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. बेस्टने बसगाड्यांच्या कमतरतेमुळे मिनी बसेस सुरू केल्या होत्या बेस्ट ही मुंबईतील सार्वजनिक बस वाहतुकीची प्रमुख सेवा आहे, जी शहर आणि उपनगरीय भागांना जोडते. तिच्याकडे सुमारे 2,700-3,200 पेक्षा जास्त बसगाड्या आहेत. यात सामान्य, लिमिटेड, एसी आणि इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे. बेस्ट बस सेवा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अखत्यारीत येते. एका वरिष्ठ नागरी अधिकाऱ्याने सांगितले की, या वर्षाच्या सुरुवातीला भांडुप स्टेशनपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत, दाट लोकवस्तीच्या वस्त्यांना जोडणाऱ्या मार्गांवरून मिनी बस सेवा बंद करण्यात आली होती. बसच्या कमतरतेमुळे, बेस्टने मर्यादित वळण त्रिज्या (टर्निंग रेडियस) सारख्या कार्यात्मक अडचणी असूनही भांडुप स्टेशनच्या मार्गांवर ओलेक्ट्राच्या मिडी बस सुरू केल्या होत्या.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रभाग क्रमांक 1 मधील मूलभूत प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. वाढती पाणीटंचाई, कचऱ्याची समस्या आणि नागरी सुविधांचा अभाव हे मुद्दे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेले असल्याने निवडणुकीत त्यावरच सर्वाधिक चर्चा रंगताना दिसत आहे. दिव्य मराठी ॲपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या विशेष टॉक शोमध्ये या प्रभागातील समस्या आणि त्यावर विविध पक्षांचे दावे-प्रतिदावे उघडपणे मांडले गेले. या चर्चेत सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि नव्या राजकीय शक्तींनी एकमेकांवर आरोप करतानाच नागरिकांना आश्वासने दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रतिनिधी संजय हरणे यांनी प्रभाग क्रमांक 1 साठी शिक्षण, आरोग्य आणि मुलांसाठीच्या सुविधा या मुद्द्यांवर विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की, या परिसरात महानगरपालिकेची एक सर्वोत्कृष्ट शाळा उभारण्याचा त्यांचा मानस आहे. नागरिकांना दर्जेदार आणि परवडणारे शिक्षण मिळावे, यासाठी महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर, या भागात सरकारी दवाखाना उभा करण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. लहान मुलांसाठी खेळण्याच्या सुविधा नसल्याकडे लक्ष वेधत, या प्रभागात एकही उद्यान नसल्याने मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे उद्यान उभारणी ही देखील त्यांच्या प्राधान्यक्रमात असल्याचे हरणे यांनी स्पष्ट केले. भाजपचे पदाधिकारी राजू राठोड यांनी या चर्चेत पाण्याच्या प्रश्नाला अग्रक्रम दिला. प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरिकांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याची तक्रार सातत्याने येत असल्याचे त्यांनी मान्य केले. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी भाजप प्रयत्नशील राहील, असा दावा त्यांनी केला. यासोबतच, या प्रभागात महानगरपालिकेची डिजिटल शाळा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. आरोग्य सुविधा, रस्त्यांची अवस्था आणि पायाभूत सोयीसुविधांवर भर देणार असल्याचे सांगताना, हर्सूल परिसरातील तलावाच्या भागात नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्याचा मानस असल्याचेही राठोड यांनी नमूद केले. आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी अशा सुविधा आवश्यक असल्याचा त्यांचा दावा होता. भाजपचेच दुसरे पदाधिकारी बाबासाहेब ढवळे पाटील यांनी प्रभागातील वास्तव परिस्थिती मांडताना पाण्याची तीव्र टंचाई आणि कचरा डेपोमुळे होणाऱ्या त्रासावर भर दिला. त्यांच्या मते, या भागात पाण्याचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कचरा डेपोमुळे परिसरात दुर्गंधी पसरते आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. हा कचरा डेपो हटवण्यासाठी किंवा त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मिलिंद बोर्डे यांनी मात्र सत्ताधारी शिवसेना आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, गेली चार दशके महानगरपालिकेवर सत्ता उपभोगणारेच आता नागरिकांच्या समस्या सोडवण्याची भाषा करत आहेत. इतकी वर्षे सत्ता असूनही मूलभूत प्रश्न सुटले नाहीत, याची जबाबदारी कोणाची, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करताना मराठी शाळा बंद केल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे स्थानिक भाषेतील शिक्षणावर परिणाम झाला असल्याचे बोर्डे म्हणाले. पाणीपुरवठा योजनेवर गंभीर आरोप करत, केवळ कमिशनसाठी 700 कोटींची योजना 3000 कोटींपर्यंत नेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला, ज्यामुळे नागरिकांवर आर्थिक बोजा पडल्याचे ते म्हणाले. एमआयएम पक्षाचे पदाधिकारी अय्युब पटेल यांनीही प्रभागातील परिस्थितीवर गंभीर आरोप केले. त्यांनी सांगितले की, त्यांनी पूर्वी शिवसेना आणि भाजपसोबत काम केलेले असून, हर्सूल गावाची पाण्याची गरज विहिरी आणि बोअरिंगद्वारे भागवली जाते. मात्र, तळ्याच्या अगदी जवळ कचरा डेपो उभारण्यात आल्याने परिसरात दररोज संध्याकाळी तीव्र दुर्गंधी पसरते. या कचऱ्यामुळे बोअरिंग आणि विहिरींचे पाणी दूषित झाले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. एवढेच नव्हे, तर हे दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी हरसिद्धी देवीच्या कुंडात साचत असल्याने धार्मिक आणि पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. माजी नगरसेवक बन्सी जाधव यांनी हर्सूल गावातील रस्ता रुंदीकरणाच्या मुद्द्यावर लक्ष वेधले. सुरुवातीला रस्ता रुंदीकरणासाठी नागरिकांना मोबदला देण्यात आला, मात्र आता पुन्हा एकदा रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली इमारती पाडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मात्र योग्य आणि पूर्ण मोबदला देण्यात आलेला नसल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकांना योग्य पैसे दिल्यानंतरच इमारती पाडण्यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेऊ, अशी ठाम भूमिका जाधव यांनी मांडली. अन्यथा अन्याय सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रतिनिधी बाळासाहेब औताडे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. संभाजीनगर शहराला पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा करण्यात सत्ताधारी अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. प्रभागातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत, वारंवार निवेदन देऊनही कचरा उचलला जात नसल्याकडे औताडे यांनी लक्ष वेधले. कचरा डेपोमुळे परिसरातील विहिरी आणि बोरिंगचे पाणी दूषित झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा आरोप त्यांनी केला. आमदार, खासदार आणि प्रशासन सर्व सत्ताधारी पक्षाचे असतानाही नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नसल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर आम्ही महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढून पाण्याच्या टाकीसाठी मंजुरी मिळवली, असे औताडे यांनी सांगितले. मात्र, श्रेयवादातून त्या कामालाही विरोध करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तरीही नागरिकांच्या हितासाठी आम्ही पुन्हा पाठपुरावा करून ते काम पूर्ण करून घेतले असल्याचा दावा त्यांनी केला. एकूणच, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 हा पाणी, कचरा, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांमुळे चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. विविध पक्षांचे दावे, आरोप-प्रत्यारोप आणि आश्वासनांमुळे राजकीय वातावरण तापले असले, तरी या सगळ्याच्या केंद्रस्थानी नागरिकांचे मूलभूत प्रश्न असल्याचे या चर्चेतून स्पष्ट झाले आहे. अशी आहे प्रभागाची व्याप्ती प्रभाग १ मध्ये फुलेनगर, खत्रीनगर, जमनज्योती, भगतसिंगनगर, म्हसोबानगर भागशः, हर्सल गाव, बेरीबाग, साफल्यनगर, घृष्णेश्वर कॉलनी, एकतानगर, जहांगीर कॉलनी, राधास्वामी कॉलनी, चेतनानगर, राजनगर, हर्सूल, जय महाराष्ट्र नगर, म्हाडा कॉलनी, रमाई आवास योजना, सईदा कॉलनी, अंबर हिल, सांगळेनगर, यासीननगर, फकीरवाडी, गोरक्षनाथ नगर भागशः यांचा समावेश होतो. प्रभागाची एकूण लोकसंख्या बघायला गेली तर 41080 एवढी आहे.
शिवराज पाटील चाकूरकर स्थितप्रज्ञ नेतृत्व
चाकूर : प्रतिनिधी लोकनेते शिवराज पाटील चाकूरकर हे एक स्थितप्रज्ञ नेतृत्व होते. चाकूरसह संपूर्ण देश लोकनेतृत्वाला मुकला असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी चाकूर येथे केले. चाकूर येथे चाकूरकरांच्या वतीने लोकनेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या शोक सभेची सुरुवात शिवराज पाटील चाकूरकर […] The post शिवराज पाटील चाकूरकर स्थितप्रज्ञ नेतृत्व appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
साकोळ ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा कथित भ्रष्टाचार
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून १५ वा वित्त आयोगाचा निधी व ग्रामनिधीचा अपहार झाल्याबाबत राजकुमार कल्याणराव बरगे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे गावात खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात […] The post साकोळ ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा कथित भ्रष्टाचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सोमवारी १५६ नामनिर्देशनपत्र दाखल
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या तिस-या सार्वत्रिक निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सूरु आहे. दि. २३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्रपांची विक्री व भरलेले नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सोमवारी ७५७ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली असून १५६ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. आजपर्यंत एकुण २२४ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. प्रभाग क्रमांक १,२, ३ मधील अ-३, ब-३, क-६, ड-३ […] The post सोमवारी १५६ नामनिर्देशनपत्र दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मानवी तस्करीविरोधात लातूर पोलिसांचा निर्णायक लढा
लातूर : प्रतिनिधी मानवी तस्करी हा केवळ कायद्याचा प्रश्न नसून तो समाजाच्या नैतिकतेला, मानवतेला आणि सुरक्षिततेला दिलेले गंभीर आव्हान आहे. महिला, बालके आणि दुर्बल घटकांना आमिष, फसवणुक, बळजबरी, आर्र्थिक गरिबी किंवा अज्ञानाचा फायदा घेऊन लैंगिक शोषण किंवा वेश्याव्यवसायाच्या दलदलीत लोटले जाते, अशा अमानवी, क्रुर आणि संघटीत स्वरुपाच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची […] The post मानवी तस्करीविरोधात लातूर पोलिसांचा निर्णायक लढा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देत महायुतीने मुंबई आणि ठाणे महानगरपालिकांसाठी आपला जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी आज संयुक्तपणे या युतीची घोषणा केली. मुंबईत भाजपने आपल्याकडे अधिक जागा घेतल्या आहेत, तर मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात शिवसेनेला झुकते माप देण्यात आले आहे. मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. 2017 च्या निवडणुकीत भाजपने 82 जागा जिंकून शिवसेनेला (अविभाजित) जोरदार टक्कर दिली होती. यंदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना शिंदे गटासोबत युती करताना जास्त जागा स्वत:कडे ठेवल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवस बाकी असताना भाजप आणि शिवसेनेचे जागा वाटप निश्चित झाले आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण 227 जागांसाठी भाजप 137 जागा, तर शिवसेना 90 जागांवर निवडणूक लढवणार आहे. अमित साटम काय म्हणाले? भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी स्पष्ट केले की, यापूर्वी 207 जागांवर आमची चर्चा झाली होती, ती आता 227 पर्यंत पूर्ण झाली आहे. भाजप 137 आणि शिवसेना 90 जागांवर मैदानात उतरतील. आरपीआयसह इतर घटक पक्षांना या जागांमधूनच सामावून घेतले जाईल. कोणामध्येही नाराजी नाही, सर्वांना योग्य स्थान देण्यासाठी थोडा वेळ लागला. मुंबईवर मराठीच महापौर माजी खासदार राहुल शेवाळे यांनी यावेळी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, आम्ही सकारात्मक चर्चेतून हा सुवर्णमध्य काढला आहे. महायुती 150 पेक्षा जास्त जागा जिंकून मुंबईवर आपलाच मराठी महापौर बसवेल. केंद्र आणि राज्यात आमची सत्ता असल्याने मुंबईचा विकास केवळ महायुतीच करू शकते, असा विश्वास मुंबईकरांना आहे. आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार आहोत. रिपब्लिकन सेनेला किती जागा मिळणार? या प्रश्नावर बोलताना राहुल शेवाळे यांनी सांगितले की, घटक पक्षांना सामावून घेण्याचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे वरिष्ठ नेते आपापल्या कोट्यातून घेतील. ठाणे महानगरपालिका : शिंदे सेनेचे वर्चस्व मुंबईत जरी भाजप मोठा भाऊ असला, तरी ठाण्यात मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली ताकद कायम ठेवली आहे. ठाणे महापालिकेच्या 127 जागांपैकी शिवसेना 87 जागांवर, तर भाजप 40 जागांवर निवडणूक लढवणार आहे. उपनमुख्यमंत्र्यांच्या प्रभावक्षेत्रात भाजपने सामंजस्याने घेतलेली ही भूमिका युतीसाठी महत्त्वाची मानली जात आहे. भाजपच्या 66 उमेदवारांची नावे जाहीर दरम्यान, आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या 66 उमेदवारांची नावे आज जाहीर करण्यात आली आहेत. भाजपकडून युवा मोर्चा अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना मुंबईतील वॉर्ड क्रमांक 47 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांना वॉर्ड क्रमांक 9 मधून, माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना वॉर्ड क्रमांक 10 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन हेदेखील मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सविस्तर वाचा..
सत्ताधा-यांनी सत्तेचा गैरवापर करुन रस्ता केला गायब
लातूर : प्रतिनिधी शहरातील जुना औसा रोड ते जय तुळजाभवानीनगरमधून रिंग रोडकडे जाणारा २०११ पासून अस्तित्वात असलेला रस्ता सत्ताधा-यांनी सत्तेचा गैरवापर करुन गेल्या दीड वर्षांपासून रस्ता गायब केला आहे. सत्ताधा-यांनी जागा मालक व विकासकाच्या हितासाठी हा रस्ता अडवला असून त्यामुळे जय तुळजाभवानीनगरमधील नागरिकांची गैरसोय होत आहे. जुना औसा रोड ते रिंगरोडपर्यंत नकाशाप्रकाणे, गुगल मॅपप्रमाणे २०११ […] The post सत्ताधा-यांनी सत्तेचा गैरवापर करुन रस्ता केला गायब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज प्रतिष्ठानतर्फे ५० क्षय रुग्णांना फुड बास्केटचे वाटप
लातूर : प्रतिनिधी प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियान मोहिमे अंतर्गत राज प्रतिष्ठानच्या वतीने ५० क्षयरुग्णाना सोमवार दि. २९ डिसेंंबर रोजी फूड बास्केट किट वाटप करण्यात आले. येथील जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड होत्या. आयएमए लातूरचे अध्यक्ष डॉ. अभय कदम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुमित्रा तांबारे, […] The post राज प्रतिष्ठानतर्फे ५० क्षय रुग्णांना फुड बास्केटचे वाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर मनपा निवडणुकीत ‘जी-२४’ संघटनेचा काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर
लातूर : प्रतिनिधी फुले- शाहू -आंबेडकर विचारधारेवर काम करणा-या ‘जी-२४’ या परिवर्तनवादी विचाराच्या संघटनेची बैठक दि. २५ डिसेंबर रोजी येथील डॉ. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात समाजवादी नेते शिवाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ‘जी-२४’ ने पाठींबा जाहीर केला. यावेळी लातूर शहर महानगरपालिकेची होऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूक […] The post लातूर मनपा निवडणुकीत ‘जी-२४’ संघटनेचा काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चांदूरबाजार तालुक्यातील परसोडा देवी-वलगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी परसोडा देवी येथील गावकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंता (एसडीई) यांना निवेदन दिले आहे. परसोडा देवी ते वलगाव या रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून आतील दगड बाहेर आले आहेत. तसेच, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खराब रस्त्यामुळे दुचाकी चालवणे अत्यंत अवघड झाले आहे. हा रस्ता परिसरातील शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि रुग्णवाहिकांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील दगड बाहेर आल्याने वाहने घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होते. ग्रामस्थांनी गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक निवेदने दिली आहेत. निवेदन सादर करतेवेळी मुन्ना बोंडे, रणजित टेकाडे, अभी निंभोरकर, नाना भोंडे, राहुल निंभोरकर, कैलास लगड, शरद निंभोरकर, नंदू निंभोरकर, नंदकिशोर गुबरे, दीपक टेकाड आणि अनिल निंभोरकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
बहिरम यात्रेतील दवाखाना शनिवारी बंद:भाविकांना उपचारांविना गैरसोयीचा सामना करावा लागला
चांदूर बाजार तालुक्यातील प्रसिद्ध बहिरम यात्रेतील दवाखाना शनिवारी (२७) बंद होता. यामुळे यात्रेकरूंना वैद्यकीय उपचारांविना गैरसोयीचा सामना करावा लागला. गेल्या दोन आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या या यात्रेत अवघ्या काही दिवसांतच गैरव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक बहिरम यात्रेसाठी येतात. मात्र यावर्षी पार्किंगसाठी जास्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आहेत. आरोग्य सेवाही अनियमित असल्याने मूलभूत सुविधांबाबत भाविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ठरवून दिलेल्या दरांपेक्षा जास्त पैसे आकारले जात असतानाही पंचायत समिती अधिकाऱ्यांचे यावर नियंत्रण नसल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. यात्रा अधीक्षक रामेश्वर रामागडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी समाधानकारक माहिती दिली. मात्र, त्यांनी दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठी तफावत असल्याचे दिसून आले. यामुळे यावर्षीच्या यात्रा व्यवस्थापनाकडे पंचायत समिती अधिकाऱ्यांचे पुरेसे लक्ष नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यात्रेच्या पहिल्याच शनिवारी (२७) दवाखाना बंद असल्याने अनेक यात्रेकरूंचा हिरमोड झाला. दरवर्षी यात्रेत छोटी-मोठी पडझड, अचानक आजारी पडणे, चक्कर येणे, भाजणे किंवा जखम होणे अशा घटना घडतात. त्या दिवशीही अशाच काही घटना घडल्या, परंतु गरजूंना उपचार मिळू शकले नाहीत. शनिवार हा सुटीचा दिवस असल्याने दवाखाना बंद असावा, असे काहींचे म्हणणे असले तरी, नेमक्या सुटीच्या दिवशीच भाविकांची सर्वाधिक गर्दी असते. अशावेळी दवाखाना बंद असणे ही चिंतेची बाब असल्याचे भाविकांनी म्हटले आहे. यात्रा व्यवस्थापनाने पार्किंग दरांवर नियंत्रण ठेवावे आणि आरोग्य सुविधांवर विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे. दूरवरून प्रवास करून येणाऱ्या भाविकांना अनेकदा वातावरणातील बदलामुळे किंवा बाहेरचे अन्न खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या येतात. अशा परिस्थितीत, यात्रा व्यवस्थापनाने दरवर्षीप्रमाणे आरोग्यविषयक सुविधा अखंडित ठेवणे आवश्यक आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची घाई सुरू असताना, शिवसेना ठाकरे गटासमोर दक्षिण मुंबईतील मराठी बहुल प्रभागांमध्ये उमेदवारांची निवड करण्याचे मोठे आव्हान होते. विशेषतः वॉर्ड क्रमांक 199 मध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात निष्ठावंत शाखाप्रमुख गोपाळ खाड्ये यांच्या पत्नी अबोली खाड्ये यांनी दावा सांगितल्याने पेच निर्माण झाला होता. अखेर, उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही आक्रमक महिला नेत्यांना एकमेकांच्या शेजारील प्रभागांतून उमेदवारी देऊन 'मातोश्री'वरील ताण हलका केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नुकतीच 75 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र, त्या यादीत किशोरी पेडणकेरांचे नाव नसल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यांना पुन्हा संधी मिळणार की त्यांचा पत्ता कट होणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आज सायंकाळी पक्षाकडून किशोरी पेडणेकर यांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी जाहीर करण्यात आली. वॉर्ड क्रमांक 199 मध्ये पेडणेकर, तर 198 मध्ये खाड्ये किशोरी पेडणेकर या वॉर्ड क्रमांक 199 चे प्रतिनिधित्व करतात आणि याच प्रभागातून निवडून येत त्या मुंबईच्या महापौर झाल्या होत्या. मात्र, याच भागात गेली 35 वर्षे कार्यरत असलेले शाखाप्रमुख गोपाळ खाड्ये यांच्या पत्नी अबोली खाड्ये यांनीही यंदा याच जागेवर हक्क सांगितला होता. हा पेच सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी किशोरी पेडणेकर यांना त्यांच्या मूळ प्रभाग 199 मधून, तर अबोली खाड्ये यांना शेजारील प्रभाग 198 मधून उमेदवारी जाहीर केली आहे. अबोली खाड्ये यांच्या उमेदवारीला 'निष्ठेचे फळ' म्हणून पाहिले जात आहे. याशिवाय, प्रभाग 196 मधून आशिष चेंबूरकर यांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. फॉर्म मिळाल्यानंतर जबाबदारी वाढली - पेडणकेर एबी फॉर्म मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. वॉर्ड क्रमांक 199 मध्ये मी काम केले आणि अभिमानाने ते मतदारांना सांगू. जनतेने त्यांचा आशीर्वाद कायम ठेवावा. कोरोनाच्या संकटात सगळ्या जगाचे लक्ष आपल्या महापालिकेकडे होते. आम्ही सज्ज आहोत, आम्ही जागृत आहोत, असे पेडणकेर म्हणाल्या. माझ्याबद्दल वेट अँड वॉचची भूमिका नव्हती. काही वॉर्ड सेन्सिटिव्ह असतात, उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. आताही मला टेन्शन आहे, फॉर्म मिळाल्यानंतर जबाबदारी वाढली आहे, असेही त्यांनी म्हटले. कोण आहेत अबोली गोपाळ खाड्ये? बोली खाड्ये या लोअर परेल आणि करी रोड भागातील कट्टर शिवसैनिक व शाखाप्रमुख गोपाळ खाड्ये यांच्या पत्नी आहेत. गोपाळ खाड्ये गेल्या 35 वर्षांपासून जनसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतरही गोपाळ खाड्ये यांनी डगमगून न जाता उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा कायम ठेवली. प्रभाग 199 महिलेसाठी राखीव झाल्याने, गोपाळ खाड्ये यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्या पत्नीला संधी दिली आहे. उमेदवारीसाठी चुरस आणि ठाकरेंचा कस दादर, माहीम, लालबाग-परळ आणि वरळी यांसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी आजी-माजी पदाधिकाऱ्यांची मोठी रांग लागली होती. गेल्या दोन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठकांनंतर अखेर आज एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले. फोडाफोडीच्या राजकारणात जे पदाधिकारी पक्षासोबत ठामपणे राहिले, त्यांना प्राधान्य देण्याचे धोरण उद्धव ठाकरे यांनी राबवल्याचे दिसून आले.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे 24 तास शिल्लक असताना, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच चिघळला आहे. भाजपच्या पाचव्या प्रस्तावात शिवसेनेच्या ताब्यातील 7 महत्त्वाच्या जागा भाजपकडे गेल्याची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांचा संयम सुटला. जर कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असेल, तर मी निवडणूक लढणार नाही, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत जंजाळ यांना अश्रू अनावर झाले. या नाट्यमय घडामोडींनंतर शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाकडे कूच केली असून, शहरात राजकीय तणाव निर्माण झाला आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपासाठी आतापर्यंत नऊ बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही. भाजपच्या ताज्या प्रस्तावानुसार, जंजाळ समर्थकांचे वर्चस्व असलेले आणि शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जाणारे 7 प्रभाग भाजपला देण्याचे प्रस्तावित करण्यात आले. हे तेच प्रभाग आहेत ज्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळवून दिले होते. हा अन्याय सहन न झाल्याने राजेंद्र जंजाळ कार्यालयातून रडत बाहेर पडले. त्यांचे अश्रू पाहून कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट युती तोडा, स्वबळावर लढा अशा घोषणाबाजी करत, भाजपला जास्त जागा सोडण्यापेक्षा युती तोडून स्वतंत्र लढण्याची मागणी केली. शिरसाटांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा वेढा उद्या (मंगळवारी) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने कार्यकर्त्यांमध्ये घबराट आणि संताप आहे. जंजाळ आपल्या समर्थकांसह पालकमंत्र्यांच्या घरी पोहोचले. यावेळी शिरसाटांना अंतर्गत नाराजीचे मोठे आव्हान पेलावे लागत आहे. एकीकडे भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी शेवटचा प्रस्ताव देऊन चेंडू शिवसेनेच्या कोर्टात टाकला आहे, तर दुसरीकडे आपल्याच सैनिकांची मनधरणी करताना शिरसाटांची दमछाक होत आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, शिरसाटांची ग्वाही वाढता तणाव पाहून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घराबाहेर येत संतप्त कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपचा प्रस्ताव आला आहे, हे खरे आहे. मात्र, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मी सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करेन. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. शिवसैनिक हा लढणारा असतो, त्यामुळे मनात गैरसमज ठेवू नका. आपण सर्व मिळून सन्मानजनक मार्ग काढू. लाडकी बहीण म्हणता, मग न्याय का नाही? प्रभाग क्रमांक 8 मधून इच्छुक असलेल्या शारदा घुले यांचे तिकीट ऐनवेळी कापण्यात आल्याचे समजताच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला.एकनाथ शिंदे साहेब आम्हाला 'लाडकी बहीण' म्हणतात, पण एका लाडक्या बहिणीला पक्षात न्याय मिळत नाही का? पैसे घेऊन तिकीटं विकण्यात आली आहेत, असा खळबळजनक आरोप घुले यांनी केला. यावेळी शारदा घुले पक्ष कार्यालयात तीन-चार तास ठाण मांडून बसल्या होत्या. माझे काही बरे-वाईट झाले, तर हे कार्यालय जाळून टाका. मला हार्ट अटॅक आला, तर त्याला हे नेतेच जबाबदार असतील, असा इशारा त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला. राजेंद्र जंजाळ यांची निवडणुकीतून माघार दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी भाजपसोबतच्या जागावाटपावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून भाजपला जागा सोडल्या जात आहेत, असे म्हणत त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. त्यांनी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर सुरू असलेल्या युतीच्या अंतिम बैठकीकडेही पाठ फिरवली असून, त्यांना या बैठकीचे साधे निमंत्रणही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बांगलादेशच्या आखाड्यात ९१ जागांवर हिंदू टक्कर देणार!
ढाका : वृत्तसंस्था बांगलादेशात सध्या हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समाजावर होणारे हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. दीपू चंद्र दास आणि अमृत मंडल यांच्यासारख्या तरुणांची जमावाने केलेली हत्या असो किंवा मंदिरांची विटंबना, या घटनांमुळे तिथला हिंदू समाज दहशतीखाली आहे. मात्र, आता याच अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बांगलादेशच्या निवडणुकीत एका नव्या पक्षाने शड्डू ठोकला आहे. ‘बांगलादेश माइनॉरिटी जनता पार्टी’ […] The post बांगलादेशच्या आखाड्यात ९१ जागांवर हिंदू टक्कर देणार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दिल्लीचे शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी
नवी दिल्ली : प्रतिनिधी दिल्लीमधील सरकारने शहरातील भटक्या कुत्र्यांची मोजणी करण्याचे काम शिक्षकांकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी आणि खाजगी अशा दोन्हीकडच्या शिक्षकांना भटक्या कुत्र्यांची मोजणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने हे आदेश दिले आहेत. तसेच हे काम जनतेच्या सुरक्षेशी संबंधित असून, सर्वोच्च न्यायालयाच्या ७ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशान्वये करण्यात येत असल्याने ते […] The post दिल्लीचे शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चीनने तैवानला घेरले; सरावात युध्दाचे संकेत
बिजींग : वृत्तसंस्था चीनने तैवानच्या आसपास लष्करी अभ्यास सुरू केला आहे. तैवानकडून बेटाचे प्रमुख भाग ताब्यात घेऊन नाकेबंदी करण्याचा सराव चीनद्वारे केला जात आहे. सैन्य, नौदल, हवाई दल आणि रॉकेट फोर्स हा सराव करत आहे. या सरावात लाईव्ह फायरिंग देखील केली जात आहे. अमेरिकेने तैवानला शस्त्रे विकण्याची घोषणा केली, त्यानंतर चीनने या सरावाला सुरूवात केली […] The post चीनने तैवानला घेरले; सरावात युध्दाचे संकेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मेक्सिकोत रेल्वे घसरली; १३ ठार; ९८ प्रवासी जखमी
चिवेला : वृत्तसंस्था मेक्सिकोच्या दक्षिणेकडील ओअक्साका राज्यात आंतरसागरीय रेल्वे रुळावरून घसरली, त्यानंतर रुळावरून इंजिन, अनेक डबेही उलटले. यात १४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ९८ लोक जखमी झाले आहेत. ही रेल्वे मेक्सिकोचे आखात आणि प्रशांत महासागर यांना जोडणा-या एका नवीन रेल्वेमार्गावर धावत होती. या रेल्वे मार्गाचे संचालन मेक्सिकन नौदल करते. मेक्सिकन नौदलाच्या माहितीनुसार, रेल्वेमध्ये २५० लोक […] The post मेक्सिकोत रेल्वे घसरली; १३ ठार; ९८ प्रवासी जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘एसआयआर’ने भाजपच खड्ड्यात; यूपीमध्ये २.८९ कोटी नावे वगळली
लखनौ : वृत्तसंस्था यूपीमध्ये ‘एसआयआर’ म्हणजेच मतदार यादी पडताळणीचे काम पूर्ण झाले आहे. २.८९ कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मात्र, ही यादी ३१ डिसेंबर रोजी सार्वजनिक केली जाईल. जर या आकडेवारीला ४०३ विधानसभा मतदारसंघांनी भागले, तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून सुमारे ७२ हजार मते कमी होण्याचा अंदाज आहे. भाजपच्या अनेक प्रयत्नानंतरही ‘एसआयआर’ मध्ये मतदारांची संख्या […] The post ‘एसआयआर’ने भाजपच खड्ड्यात; यूपीमध्ये २.८९ कोटी नावे वगळली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नगरपालिका निवडणुकीत एकाच कुटुंबातील सहा जणांना संधी देणाऱ्या भाजपने महापालिका निवडणुकांसाठी मात्र आपली रणनीती पूर्णपणे बदलली आहे. पक्षासाठी राबणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने विद्यमान आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या पत्नी किंवा मुलांना उमेदवारी न देण्याचा धोरणात्मक निर्णय पक्षाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत प्रकर्षाने दिसून आली. मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित होणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस आहे. भाजपच्या उपरोक्त निर्णयामुळे आज अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी भाजपच्या आमदार आणि खासदार पुत्रांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. नाशिकमध्ये दोन आमदारांच्या वारसांची माघार नाशिकमध्ये भाजपच्या दोन आक्रमक महिला आमदारांच्या मुलांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. आमदार देवयानी फरांदे यांच्या मुलाने भरलेला उमेदवारी अर्ज पक्ष धोरणानुसार मागे घेण्यात आला. पक्षाच्या या निर्णयामुळे सामान्य कार्यकर्त्यांना बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया फरांदे यांनी दिली. तर आमदार सीमा हिरे यांच्या मुलीनेही नाशिक महापालिका निवडणुकीतून आपले नाव मागे घेतले आहे. कोल्हापुरात महाडिक पुत्राची माघार खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनीही कोल्हापुरातून माघार घेतली आहे. कृष्णराज यांनी सुरुवातीला वरिष्ठांच्या परवानगीने अर्ज भरला होता, मात्र राज्य पातळीवर 'घरातील व्यक्तींना उमेदवारी नाही' हा नियम ठरल्यानंतर त्यांनी तत्काळ माघार घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही पक्षाचे आदेश मानणारे शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत, असे धनंजय महाडिक यांनी यावेळी स्पष्ट केले. नार्वेकर कुटुंबीय ठरले अपवाद दरम्यान, भाजपच्या या कडक नियमावलीमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कुटुंब मात्र अपवाद ठरले आहे. नार्वेकर यांच्या भावाला आणि वहिनीला पक्षाने उमेदवारी जाहीर केली असून, यामुळे राजकीय वर्तुळात काही प्रमाणात उलट-सुलट चर्चाही सुरू आहेत. नाराजांची समजूत काढण्याचे आव्हान तिकीट न मिळाल्यामुळे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचे पक्षासमोर मोठे आव्हान असणार आहे. याबाबत खासदार महाडिक म्हणाले की, महायुतीची सांगड घालताना काही ठिकाणी अन्याय झाला असू शकतो, मात्र आम्ही दोन दिवसांत सर्व नाराजांची समजूत काढू. अनेक काँग्रेसचे इच्छुक आमच्या संपर्कात आहेत, मात्र आमची यादी आता निश्चित झाली आहे. हे ही वाचा... चंद्रपुरात दोन 'वारांच्या' भांडणात तिसऱ्याचा लाभ?:भाजपमधील नाराजांवर काँग्रेसचा डोळा; वडेट्टीवार म्हणाले - तडजोड करून उमेदवारी देण्यास तयार चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित करण्यावरून भाजपचे दोन दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यात सुरू झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. या दोन 'वारांच्या' भांडणामुळे भाजपमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, याचाच फायदा घेण्यासाठी काँग्रेसने आपली दारे उघडली आहेत. दोन 'वारांच्या' भांडणात भाजपमधील अनेक इच्छुक आता काँग्रेसकडे डोकावून पाहत आहेत, असा खोचक टोला लगावत, आम्ही तडजोड करून नाराजांना उमेदवारी देण्यास तयार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. सविस्तर वाचा...
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असतानाच, शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद आता विकोपाला गेला आहे. भाजपकडून सन्मानजनक जागा मिळत नसल्याचा ठपका ठेवत शिवसेनेने आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 35 ते 40 जागांचा प्रस्ताव देत, युतीसाठी प्रयत्न केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात भाजप आणि शिवसेना युतीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू आहे. भाजपने शिवसेनेसमोर 15 अधिक 1 अशा 16 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, शिवसेना किमान 25 जागांवर ठाम आहे. वारंवार विनंती करूनही भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेना नेत्यांनी थेट अजित पवारांची भेट घेतल्याचे समजते. जर भाजप सन्मान देणार नसेल, तर आम्ही राष्ट्रवादीसोबत जाऊ, असा स्पष्ट इशाराच शिंदे गटाने या कृतीतून दिला आहे. एकनाथ शिंदेंचा उद्याच 25 अर्ज भरण्याचा आदेश महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ 24 तासांचा अवधी शिल्लक आहे. युतीची अधिकृत घोषणा रखडलेली असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी आपल्या 25 इच्छुक उमेदवारांना उद्याच (मंगळवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ऐनवेळी भाजपने धोका दिल्यास पक्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी ही 'बॅकअप' प्लॅनिंग असल्याचे बोलले जात आहे. भाजपच्या निर्णयाकडे लक्ष पुण्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा असतानाच, आता शिंदेंच्या शिवसेनेने अजित पवारांना दिलेली साद पुण्याच्या राजकारणाला कोणत्या वळणावर नेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तोपर्यंत भाजप नमती भूमिका घेणार की पुण्यात महायुतीचे तीन शकले होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा... तिकिटासाठी कुठे अश्रू तर कुठे दंडवत!:जळगावात महिला इच्छुकाचा टाहो, पुण्यात मंत्र्याच्या पायावर डोके; मातोश्रीसमोरही आंदोलन राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या प्रक्रियेत निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत असून, जळगाव आणि पुणे या दोन शहरांतून उमेदवारीवरून दोन वेगवेगळी चित्रे समोर आली आहेत. जळगावमध्ये तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका महिला कार्यकर्तीला रडू कोसळले, तर पुण्यात भाजप नेत्याने उमेदवारी मिळाल्यावर चक्क मंत्र्यांच्या चरणी लोटांगण घातले. सविस्तर वाचा...
99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे 1 ते 4 जानेवारी 2026 कालावधीत होणार आहे. साहित्य संमेलनाशी सबंधित उर्वरित कामे 31 डिसेंबरपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 1 ते 4 जानेवारी कालवधीत शाहू स्टेडियम, सातारा येथे होणार आहे. या अनुषंगाने सुरु असलेल्या कामांची पहाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी केली. या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. साहित्य संमेलनातून सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती व्हावी यासाठी पर्यटनस्थळांच्या माहितीची गॅलरी तयार करावी, अशा सूचना देवून सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले, साहित्य संमेलन सातारा येथे होत असल्याने जगभरातील नागरिक येणार आहेत. नगर परिषदेने साहित्य संमेलन कालावधीत शहर स्वच्छ ठेवण्याबरोबर सुशोभीकरणाची कामे तात्काळ पूर्ण करावीत. पोलीस विभागाने शहरात कुठेही वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. साहित्य संमेलनासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने विना अडथळा पार्कींग होतील यासाठी नियोजन करावे. साहित्य संमेलनाच्या स्थळी कचरा होणार नाही यासाठी अधिकचे मुनष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे, अशा सूचनाही सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी दिल्या.
नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. मागील २-३ दिवसांपासून जागावाटपासाठी बैठकांचे सत्र सुरू होते. मात्र जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. त्यामुळे अखेर महायुतीत फूट पडली असून, सोमवारी (२९ डिसेंबर) राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले की, महायुती म्हणून एकत्र लढण्याची आमची इच्छा होती, परंतु भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे आता आम्हाला स्वतंत्र विचार करावा लागत आहे. आपल्याला महायुतीत लढायचे ठरवले होते. त्यामुळे आमच्यात जागांचा विषय आलेला नव्हता. परंतु, आता आमची (शिंदे गट आणि राष्ट्रवादी) चर्चा सुरू झाली असून, आज रात्रभरात पूर्ण जागांबाबत विचार करून, सामंजस्याने प्रश्न सोडवू आणि निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. जागावाटपासंदर्भात प्रश्न विचारला असता, आमच्यात मेरिटनुसार जागावाटप होणार असल्याचे झिरवाळ यांनी सांगितले. ज्याला इलेक्टीव मेरिट असेल, अशांना उमेदवारी देणार आहोत. तसेच आमच्यासोबत वंचितला तसेच आनंद आंबेडकर यांच्या गटाला घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे, असेही झिरवाळ यांनी सांगितले. 'मविआ'ची वज्रमुठ, मनसेचीही एन्ट्री एकीकडे महायुतीत बिघाडी झाली असताना, महाविकास आघाडीने मात्र कमालीची एकजूट दाखवली आहे. विशेष म्हणजे, नाशिकमध्ये मनसे देखील महाविकास आघाडीच्या सोबतीने निवडणूक लढवणार आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना या आघाडीत 'मोठ्या भावा'च्या भूमिकेत असेल. शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या कोट्यातून मनसेला जागा दिल्या जाणार आहेत. अद्याप १० ते १२ जागांवर चर्चा सुरू असून आज रात्रीपर्यंत त्यावर शिक्कामोर्तब होईल. भाजपला रोखण्यासाठी मतांचे विभाजन टाळणे, हाच आमचा मुख्य उद्देश आहे, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुनील भुसारा यांनी सांगितले. भाजपपुढील आव्हाने भाजपने 'स्वबळा'ची घोषणा केली असली तरी, त्यांच्याच आमदारांमध्ये 'आयारामां'मुळे मोठी नाराजी आहे. बाहेरील नेत्यांना पायघड्या घातल्या जात असल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. यामुळे भाजपला आता केवळ विरोधकांशीच नाही, तर अंतर्गत बंडाळीशीही लढावे लागणार आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे आणि मनसे यांच्यात ऐतिहासिक युती झाली असली, तरी या युतीमुळे कार्यकर्त्यांमधील धुसफूस आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. मनसेच्या ज्येष्ठ नेत्या आणि पक्षाच्या सरचिटणीस स्नेहल जाधव यांनी आपल्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. वॉर्ड क्रमांक 192 मध्ये उमेदवारी देताना विश्वासात न घेतल्याचा ठपका ठेवत त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे, ज्यामुळे मुंबईतील मनसेच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. स्नेहल जाधव या मुंबईतील मनसेचा एक प्रबळ चेहरा मानल्या जातात. वॉर्ड क्रमांक 192 मधून उमेदवारी जाहीर करताना पक्षाने त्यांना अंधारात ठेवल्याचा त्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे, स्नेहल जाधव यांनी १९९२ ते २००७ असे सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून या भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर त्यांचे पतीही याच वॉर्डमधून निवडून आले होते. सलग अनेक वर्षे या प्रभागावर पकड असतानाही ऐन निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने आणि साधी चर्चाही न केल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. मनसेला धक्क्यावर धक्के गेल्या काही दिवसांपासून मनसेला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी पक्षाला रामराम ठोकून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. आता मुंबईतील ज्येष्ठ नेत्या स्नेहल जाधव यांच्या राजीनाम्याने मनसेच्या संघटनात्मक बांधणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेत उत्साहाचे वातावरण असेल असे वाटत असतानाच, या एकामागून एक बसणाऱ्या धक्क्यांमुळे पक्षाची चिंता वाढली आहे. युती आणि आघाड्यांमुळे इच्छुकांची कोंडी राज्यात सध्या महापालिका निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर युती आणि आघाड्यांचे राजकारण सुरू आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यामुळे अनेक प्रभागांत जागावाटपाचे गणित जुळवताना जुन्या आणि दिग्गज नेत्यांची तिकिटे कापली जात आहेत. वॉर्ड 192 मध्येही युतीचा उमेदवार ठरवताना स्नेहल जाधव यांना डावलण्यात आल्याचे बोलले जात आहे. ही केवळ एका पक्षाची समस्या नसून, सर्वच राजकीय पक्षांमध्ये 'इच्छुकां'चे नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. हे ही वाचा... तिकिटासाठी कुठे अश्रू तर कुठे दंडवत!:जळगावात महिला इच्छुकाचा टाहो, पुण्यात भाजप नेत्याने मंत्र्यांच्या पायावर ठेवले डोके राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या प्रक्रियेत निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत असून, जळगाव आणि पुणे या दोन शहरांतून उमेदवारीवरून दोन वेगवेगळी चित्रे समोर आली आहेत. जळगावमध्ये तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका महिला कार्यकर्तीला रडू कोसळले, तर पुण्यात भाजप नेत्याने उमेदवारी मिळाल्यावर चक्क मंत्र्यांच्या चरणी लोटांगण घातले. सविस्तर वाचा...
काँग्रेसने मुंबई महापालिकेसाठी आपल्या 87 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजे माहिम विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 192 मध्ये दीपक भिकाजी वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे येथील सामना अधिक चुरशीचा होण्याची शक्यात आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारीला निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित होणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज आपल्या 87 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक - 2026 साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येत आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. आपली मुंबई घडवूया, मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया, असे काँग्रेसने ही यादी जाहीर करताना आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. खालील फोटोंमध्ये पाहा काँग्रेसची यादी
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या (मंगळवार) शेवटचा दिवस आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची मांदियाळी मैदानात उतरवली असताना, ठाकरेंच्या शिवसेनेची 'तोफ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोरी पेडणेकर अजूनही पक्षाच्या 'वेटिंग लिस्ट'वर असल्याचे चित्र आहे. पक्षाने जाहीर केलेल्या 75 उमेदवारांच्या पहिल्या यादीत किशोरी पेडणकेरांचे नाव नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले असून, त्यांना पुन्हा संधी मिळणार की त्यांचा पत्ता कट होणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र येण्याचे संकेत मिळाले होते, तेव्हा किशोरी पेडणेकर यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आपली भूमिका मांडली होती. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यावर आम्ही 130 हून अधिक जागा जिंकू, असा दावा करतानाच त्यांनी स्वतःच्या उमेदवारीबाबतही सकारात्मक संकेत दिले होते. मात्र, प्रत्यक्षात पहिल्या यादीत नाव न आल्याने आणि 'एबी' फॉर्मसाठी ताटकळत राहावे लागल्याने किशोरी पेडणेकरांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 2017 मध्ये वॉर्ड क्रमांक 199 मधून विजयी किशोरी पेडणेकर या दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक 199 मधून 2017 मध्ये निवडून आल्या होत्या. त्यांच्या याच कार्यकाळात त्यांनी मुंबईचे महापौरपदही भूषवले. त्यांच्या अनुभवामुळे त्यांना यावेळेस सहज तिकीट मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, आता याच वॉर्डमध्ये पक्ष एखादा तरुण चेहरा देण्याच्या विचारात आहे की काय? अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे. पेडणेकरांना तिकिट मिळणार का? दरम्यान, आता केवळ काही तासांचा अवधी शिल्लक असून, किशोरी पेडणेकर यांना पुन्हा रणांगणात उतरवले जाते की पक्ष नवीन रणनीती आखतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दक्षिण मुंबईतील या प्रभागाचा निकाल मुंबईच्या राजकारणावर मोठा परिणाम करणारा ठरू शकतो. हे ही वाचा... तिकिटासाठी कुठे अश्रू तर कुठे दंडवत!:जळगावात महिला इच्छुकाचा टाहो, पुण्यात भाजप नेत्याने मंत्र्यांच्या पायावर ठेवले डोके राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या प्रक्रियेत निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत असून, जळगाव आणि पुणे या दोन शहरांतून उमेदवारीवरून दोन वेगवेगळी चित्रे समोर आली आहेत. जळगावमध्ये तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका महिला कार्यकर्तीला रडू कोसळले, तर पुण्यात भाजप नेत्याने उमेदवारी मिळाल्यावर चक्क मंत्र्यांच्या चरणी लोटांगण घातले. सविस्तर वाचा... चंद्रपुरात दोन 'वारांच्या' भांडणात तिसऱ्याचा लाभ?:भाजपमधील नाराजांवर काँग्रेसचा डोळा; वडेट्टीवार म्हणाले - तडजोड करून उमेदवारी देण्यास तयार चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित करण्यावरून भाजपचे दोन दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यात सुरू झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. या दोन 'वारांच्या' भांडणामुळे भाजपमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, याचाच फायदा घेण्यासाठी काँग्रेसने आपली दारे उघडली आहेत. दोन 'वारांच्या' भांडणात भाजपमधील अनेक इच्छुक आता काँग्रेसकडे डोकावून पाहत आहेत, असा खोचक टोला लगावत, आम्ही तडजोड करून नाराजांना उमेदवारी देण्यास तयार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. सविस्तर वाचा...
आनंदराव अडसूळ यांची प्रकृती बिघडली
अमरावती : प्रतिनिधी राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. अशातच आता अमरावतीतून महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटी दरम्यान शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना आता रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अमरावती महानगर पालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असताना शिवसेनेचे नेते […] The post आनंदराव अडसूळ यांची प्रकृती बिघडली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या 2,869 जागांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या 78 जागांसाठी होणारी निवडणूक विशेष चुरशीची ठरण्याची चिन्हे असतानाच, भाजपला आता अंतर्गत बंडाळीचा सामना करावा लागत आहे. उमेदवारी वाटपात डावलले गेल्यामुळे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी भाजपवर प्रचंड नाराज झाले असून, त्यांनी अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडाचे निशाण फडकावत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. या धारकऱ्यांनी भाजप नेतृत्वावर गंभीर आरोप केले असून, लव जिहाद, गोरक्षण आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर सातत्याने रस्त्यावर उतरून कार्य करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा विचार करण्यात आला नसल्याची त्यांची तक्रार आहे. जनमानसात ओळख नसलेले आणि अपरिचित उमेदवार लादून पक्षाने कार्यकर्त्यांच्या भावनांशी खेळ केल्याची भावना यावेळी धारकऱ्यांनी व्यक्त केली. धारकरी राहुल बोळाज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आम्ही वर्षानुवर्षे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी काम करत आहोत. मात्र, निवडणुकीच्या वेळी भाजपने आमची उपेक्षा केली. ज्यांना कोणी ओळखत नाही, अशा लोकांना तिकिटे दिली गेली. त्यामुळे आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाणार असून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहोत, अशी प्रतिक्रिया बोळाज यांनी दिली आहे. दरम्यान, सांगली महापालिकेत सध्या महायुतीमध्ये जागावाटपावरून मतभेद सुरू आहेत. महाविकास आघाडीमध्येही बंडखोरी होण्याची शक्यता आहे. अशात आता हिंदुत्ववादी मतांची बँक मानल्या जाणाऱ्या धारकऱ्यांनी बंड पुकारत भाजपच्या चिंतीत वाढ केली आहे. त्यामुळे भाजपच्या हककच्या मतांमध्ये फुट पडण्याची शक्यता असून, याचा नेमका फायदा कोणाला होणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू
नाशिक : नाशिक शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून, लग्नसोहळा सुरू होण्याच्या काही तास आधीच नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. गंगापूर रोडवरील एका खासगी रिसॉर्टमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत वधू मुंबईतील दादर-माटुंगा परिसरातील रुपारेल कॉलेजजवळ वास्तव्यास होत्या. रविवारी सकाळी त्यांचा विवाह गंगापूर गावाजवळील एका […] The post नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित करण्यावरून भाजपचे दोन दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यात सुरू झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. या दोन 'वारांच्या' भांडणामुळे भाजपमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, याचाच फायदा घेण्यासाठी काँग्रेसने आपली दारे उघडली आहेत. दोन 'वारांच्या' भांडणात भाजपमधील अनेक इच्छुक आता काँग्रेसकडे डोकावून पाहत आहेत, असा खोचक टोला लगावत, आम्ही तडजोड करून नाराजांना उमेदवारी देण्यास तयार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. चंद्रपूर महापालिकेच्या निवडणुकीत कोणाचे पारडे जड राहणार, यावरून मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुप्त संघर्ष सुरू होता. नुकत्याच झालेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा वाद उघडपणे समोर आला. शहरातील विविध प्रभागांमध्ये उमेदवारी देताना दोन्ही नेत्यांनी आपापल्या समर्थकांची आणि कट्टर कार्यकर्त्यांची नावे रेटून धरली. बहुतांश प्रभागांमध्ये दोघांनीही वेगवेगळ्या नावांसाठी शिफारस केल्यामुळे उमेदवारांची यादी अंतिम होऊ शकली नाही. वादावर कोणताही तोडगा न निघाल्याने पक्षाने आता पुढील दोन दिवसांत सर्व इच्छुक उमेदवारांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणाच्या निकालानंतरच अंतिम नावे निश्चित केली जाणार आहेत. वडेट्टीवारांची 'मेरिट'वर आधारित खेळी भाजपमधील या अंतर्गत कलहावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, भाजपमध्ये सध्या प्रचंड अस्वस्थता आहे. जे इच्छुक तिकिटासाठी आमच्याकडे संपर्क करत आहेत, त्यांच्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. मात्र, उमेदवारी देताना आम्ही संबंधित इच्छुकाची प्रतिमा आणि कामाचा आवाका असे महत्त्वाचे निकष लावणार आहोत. निवडून येण्याची क्षमता. ज्या ठिकाणी काँग्रेसची स्थिती थोडी कमकुवत आहे किंवा जिथे आम्हाला विजयाची खात्री कमी आहे, अशा ठिकाणी आम्ही भाजपच्या इच्छुकांसोबत तडजोड करून त्यांना उमेदवारी देण्यास तयार आहोत. राजकीय गणिते बदलणार? विजय वडेट्टीवार यांनी उघडपणे 'तडजोड' आणि 'इच्छुकांचे स्वागत' करण्याची भाषा केल्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. भाजपमधील जुन्या निष्ठावंतांना डावलले गेल्यास किंवा जोरगेवार-मुनगंटीवार वादात कोणाचा पत्ता कट झाल्यास, ते उमेदवार काँग्रेसचा हात धरण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे संपूर्ण गणित बदलू शकते. हे ही वाचा... तिकिटासाठी कुठे अश्रू तर कुठे दंडवत!:जळगावात महिला इच्छुकाचा टाहो, पुण्यात भाजप नेत्याने मंत्र्यांच्या पायावर ठेवले डोके राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या प्रक्रियेत निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत असून, जळगाव आणि पुणे या दोन शहरांतून उमेदवारीवरून दोन वेगवेगळी चित्रे समोर आली आहेत. जळगावमध्ये तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका महिला कार्यकर्तीला रडू कोसळले, तर पुण्यात भाजप नेत्याने उमेदवारी मिळाल्यावर चक्क मंत्र्यांच्या चरणी लोटांगण घातले. सविस्तर वाचा...
भाजपला मुंडे-महाजनांची गरज नाही : प्रकाश महाजन
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रवक्तेपदी राहिलेल्या प्रकाश महाजन यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी दिली.त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेनेकडून त्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारीही देण्यात आली. शिवसेनेचे प्रवक्ते बनताच प्रकाश महाजन यांनी अपेक्षेप्रमाणे ठाकरे बंधू आणि भाजपवर हल्लाबोल केला. भाजपला आता मुंडे-महाजनांची गरज राहिली नाही, अशा शब्दात त्यांनी सुनावलं. प्रकाश महाजन पुढे बोलताना […] The post भाजपला मुंडे-महाजनांची गरज नाही : प्रकाश महाजन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रात सध्या सर्वत्र महापालिका निवडणुकीचे वातावरण झाले असून कार्यकर्ते आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते कैलास शिंदे यांनी पत्राद्वारे थेट हकालपट्टी करण्याची विनंती केली आहे. शिवसेना पक्षातून माझी हकालपट्टी करण्यात यावी ही नम्र विनंती. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेबांचा शिष्य म्हणून त्यांना अपेक्षित असा निष्ठावान 24 तास गोर गरिबांकरिता कार्य करणारा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारा, अनुभवी सुशिक्षीत निष्कंलक 20 वर्ष निःस्वार्थपणे कुष्ठ रुग्णांची सेवा करणारा अशा कार्यकर्त्याची पक्षाला गरज नसल्याने शिवसेना पक्षातून माझी हकालपट्टी करण्यात यावी ही नम्र विनंती, अशा शब्दांत माजी सभागृह नेते, गटनेते कैलास शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. पैसा असेल तरच निवडणूक लढवण्यास पात्र कैलास शिंदे यांनी त्यांच्या पत्रात म्हटले की, साहेब सध्या देशात राज्यात जिल्ह्यात-शहरांत तसेच गावात ज्या प्रकारे राजकारण सुरु आहे. तर हल्ली तुमच्या एकनिष्ठ असणे, किती कार्य केले, तुमचा अनुभव, शिक्षण, यांना शुन्य महत्त्व असून तुम्ही आर्थिक किती मजबूत आहात याला महत्त्व आहे. तुमच्याकडे फक्त पैसा असेल तरच तुम्ही निवडणूक लढवण्यास पात्र आहात असा अधोरेखीत नियम झाला आहे, असे शिंदे यांनी म्हटले. आर्थिक सक्षम असणे हा महत्त्वाचा गुण माझ्याकडे नाही पुढे कैलास शिंदे लिहितात की, त्यामुळे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि गुरुबंधू एकनाथ शिंदे साहेब यांना एक कट्टर कार्यकर्ता म्हणून सर्वगुण असताना राजकारणात निवडणुकीसाठी लागणारा आर्थिक सक्षम असणे हा महत्त्वाचा गुण माझ्याकडे नाही. त्यामुळे मी कल्याण डोंबिवली महानगरपालिच्या निवडणुकीत तिकीट मिळवण्यास पात्र नाही. माझ्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ नये म्हणून माझी पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, ही नम्र विनंती. तसदी बद्दल क्षमस्व आणि आपणांस शुभेच्छा, अशा शब्दांत कैलास शिंदे यांनी आपल्या भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत.
राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या प्रक्रियेत निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत असून, जळगाव आणि पुणे या दोन शहरांतून उमेदवारीवरून दोन वेगवेगळी चित्रे समोर आली आहेत. जळगावमध्ये तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एका महिला कार्यकर्तीला रडू कोसळले, तर पुण्यात भाजप नेत्याने उमेदवारी मिळाल्यावर चक्क मंत्र्यांच्या चरणी लोटांगण घातले. जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये राजकीय नाट्य पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या कलाबाई शिरसाठ यांनी उमेदवारी अर्ज तर दाखल केला, मात्र पक्षाकडून 'एबी' फॉर्म मिळण्याची चिन्हे कमी दिसताच त्यांना भररस्त्यात रडू कोसळले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून एबी फॉर्म मिळण्याची शक्यता कमी असल्याने कलाबाई यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला. मी मागासवर्गीय असल्यामुळेच कुलभूषण पाटील माझ्या उमेदवारीला विरोध करत आहेत, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. प्रभाग 10 मध्ये शिवसेना राष्ट्रवादीला एकही जागा सोडायला तयार नसल्याचे सांगत, कलाबाई यांनी अपक्ष लढण्याचा आणि उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. जळगावात काँग्रेसची स्वबळाची तयारी? महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र असल्याचे भासवत असले, तरी काँग्रेसच्या भूमिकेने संभ्रम वाढला आहे. आघाडीचा अधिकृत निर्णय होण्यापूर्वीच काँग्रेसने आज जळगावात आपले सहा उमेदवारी अर्ज दाखल करून एक प्रकारे शक्तीप्रदर्शन केले आहे. पुण्यात तिकीट मिळताच नेत्याने डोके टेकवले दुसरीकडे, पुण्यातील भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी आपल्या कृतीने सर्वांच्या भुवया उंचावल्या. भाजपने यंदा उमेदवारांची यादी जाहीर करण्याऐवजी थेट फोन करून उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे भाजपचे पुणे शहराचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी आज अर्ज दाखल केला. गणेश बिडकर अर्ज भरण्यासाठी भवानी पेठ विभागीय कार्यालयात आलेले असता, त्यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील तिथे उपस्थित होते. फॉर्म भरण्यापूर्वी गणेश बिडकर यांनी आपली चप्पल काढली आणि थेट गुडघ्यावर बसून चंद्रकांत पाटील यांच्या पायावर डोके टेकवले. गणेश बिडकर हे प्रभाग क्रमांक 24 (ड) मधून निवडणूक लढत आहेत. गणेश बिडकर यांच्या या कृतीने खुद्द चंद्रकांत पाटील आणि उपस्थित आमदार हेमंत रासने हे देखील अचंबित झाले. उमेदवारी मिळाल्याचा आनंद बिडकर यांनी अशा प्रकारे व्यक्त केला.
धनुष्यबाणाचे बटन दाबणा-यांना स्वर्गातच जागा : शहाजीबापू पाटील
सोलापूर : प्रतिनिधी शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटलांनी अजब वक्तव्य केले आहे. शिवसेनेला मतदान करणारे स्वर्गात जाणार असल्याचे विधान त्यांनी केले आहे. ज्यांनी धनुष्यबाणाचे बटन दाबले त्याला स्वर्गातच जागा आहे, तो नरकात जाणारच नाही अस विधान करत शहाजीबापू पाटलांनी अकलेचे तारे तोडले आहेत. सांगोल्याच्या सभेत बोलताना बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, मी खात्रीने सांगतो, ज्यांनी […] The post धनुष्यबाणाचे बटन दाबणा-यांना स्वर्गातच जागा : शहाजीबापू पाटील appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात एका मराठी तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा तरुण स्थलांतरीत मजूर होता. या घटनेत तो जबर जखमी झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात हा नृशंस घटनेची दाहकता दिसून येत आहे. तामिळनाडूचे भाजप उपाध्यक्ष के अन्नामलाई यांनी या घटनेचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात 4 अल्पवयीन तरुण सूरज नामक मराठी तरुणावर ऊस तोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कत्तीसारख्या शस्त्राने हल्ला चढवला. सूरज असे 34 वर्षीय जखमी तरुणाचे नाव आहे. तो कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. पण तामिळनाडू पोलिसांनी अद्याप स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला नसल्याने त्याची पुष्टी होऊ शकली नाही. तामिळनाडूच्या थिरुथानी रेल्वे स्थानकालगत ही घटना घडली. पीडित तरुण रेल्वेस्थानकाच्या भिंती पलीकडे गंभीर स्थितीत पडला होता रिल तयार करण्यावरून झाला हल्ला यासंबंधीच्या माहितीनुसार, हल्लेखोर तरुणांनी सूरजच्या गळ्याला कत्ती लावून रिल तयार करण्याचा प्रयत्न केला. सूरजने त्यांना त्याचे कारण विचारले असता त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी कत्तीने त्याचा चेहरा, डोके, गळा, मान, पाठ, पोट, हात, पाय आदी सर्वांगावर वार केले. त्यात तो रक्तबंबाळ झाला. यावेळी त्याने मारकऱ्यांना आपल्याला सोडून देण्याची विनंतीही केली. पण मारेकऱ्यांना कोणतीही दयामाया न दाखवता त्याच्यावर हल्ला करणे सुरूच ठेवले. एवढेच नाही तर त्यांनी या संपूर्ण मारहाणीचा एक व्हिडिओही तयार केला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. काय म्हणाले तामिळनाडू पोलिस? थिरुथानी पोलिसांच्या माहितीनुसार, सूरज चेन्नईहून एका इलेक्ट्रिक रेल्वेतून प्रवास करत होता. तेव्हा थिरुवलंगडू स्टेशनवर हल्लेखोर तरुण त्याच्या डब्ब्यात शिरले. त्यांनी कथितपम सूरजच्या मानेवर कत्ती ठेवून रिल तयार केली. त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. सूरजने यावेळी त्यांचा विरोध केला असता त्यांनी त्याला रेल्वेबाहेर खेचून अत्यंत क्रूरपणे त्याच्यावर हल्ला चढवला. सहप्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन सूरजला थिरुथानी सरकारी इस्पितळात दाखल केले. तिथे त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला तिरुवल्लूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. तिथे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज व व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारावर पोलिसांनी काही तासांतच चारही अल्पवयीन आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर लगेचच त्याच्या मुसक्या आवळल्या. नंदगोपाल (17), संतोष (17), विकी (17) व संतोष (17) अशी आरोपींची नावे आहेत. हे चौघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. भाजपची द्रमुक सरकारवर टीका दुसरीकडे, या घटनेवरून भाजप नेते के अन्नामलाई यांनी तामिळनाडूच्या द्रमुक सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. थिरुथानी येथे काम करणाऱ्या महाराष्ट्रातील सूरज नामक एका स्थलांतरीत मजूरावर गांजाच्या नशेत असलेल्या टोळीने क्रूर हल्ला केला. त्याच्या मानेवर कत्ती ठेवून रिल बनवण्यास त्याने विरोध केला होता. हा विरोध त्याचा गुन्हा ठरला. ही आजच्या द्रमुक शासित तामिळनाडूची विचलित करणारी वास्तविकता आहे. पोलिसांनी गुन्हेगारांना अटक केली असली तरी मूळ समस्या तशीच कायम आहे. या राजवटीत अमली पदार्थांची सहज उपलब्धता, हिंसेचे उघडपणे उदात्तीकरण, स्थलांतरीत मजुरांविरोधात राजकीय प्रचार व तलवारींसारखी प्राणघातक शस्त्रांचा वापर ही सर्वसाधारण गोष्ट झाली आहे. एकेकाळी सुव्यवस्थित असणाऱ्या राज्याला जंगलराजमध्ये रुपांतरीत करण्यासाठी द्रमुक सरकारला जबाबदार धरले पाहिजे, असे ते म्हणालेत.
सांगोल्याच्या सभेत बोलताना शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटलांनी अजब वक्तव्य केले आहे. शिवसेनेला मतदान करणारे स्वर्गात जाणार असल्याचे विधान त्यांनी केले आहे. ज्यांनी धनुष्यबाणाचे बटन दाबले त्याला स्वर्गातच जागा आहे, असेही शहाजीबापू पाटलांनी म्हटले आहे. सभेत बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, मी खात्रीने सांगतो, ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाण दाबला त्यांना त्यांना स्वर्गातच जागा आहे. नरकात तुम्हाला देव घेत नाही. स्वर्गात तुम्ही गेल्याशिवाय राहत नाही. देव तुम्हाला नरकात जाऊच देत नसतो. मात्र, ज्यांनी विरोधकांची बटणं दाबली त्यांचे काय खरे नाही त्यांच्यात रामच उरला नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. तसेच यावेळी बोलताना शहाजीबापू पाटलांनी विधानसभेतल्या पराभवावरून देखील दीपक साळुंखेंवर टीका केली. ते म्हणाले, मी भाकरीत साप पाळला होता म्हणूनच मला विधानसभेला पराभवाचा फटका बसला, असे ते म्हणाले. तसेच आपण आजही महायुतीत आहे. आपल्याला युतीचेच काम करायचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपला लगावला टोला पुढे शहाजीबापू पाटील म्हणाले, हा मतदारसंघ 2014 पासून शिवसेनेचा आहे. तुम्ही आमचा सन्मान ठेवा आम्ही तुमचा कोणताही शब्द खाली पडू देणार नाही. पण तुम्ही तसे केले नाही, तर आम्ही पुन्हा एकट्या वाटेने जाऊ, असा इशारा त्यांनी यावेळी भाजपला दिला. शिवाय तुम्ही आताच्या निवडणुकीत ऐकले असते तर तुम्ही सत्तेत निम्मे भागीदार झाला असता, असा टोलाही त्यांनी लगावला. दीपक साळुंखेंवर टीका माजी आमदार व शहाजीबापू पाटलांचे कट्टर विरोधक समजले जाणारे दीपक साळुंखे यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले, दीपक साळुंखे स्वतःला किंग मेकर म्हणतात. मी जिथे जाईल त्याचा गुलाल असतो असे ते सांगतात. मात्र, ते पांढऱ्या पायांचे असल्यामुळे ते ज्यांच्याकडे जातील त्यांचा पराभव नक्की, अशी जहरी टीका पाटलांनी केली.
‘भाबीजी’ वर आली हॉटेलमध्ये राहण्याची वेळ
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शिंदे चांगलीच चर्चेत आहे. शिल्पा आता पुन्हा एकदा ‘भाबीजी घर पर हैं’ या मालिकेत दिसत आहे. पण मुंबईत तिच्याकडे सध्या राहण्यासाठी घर नाही. छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘भाबीजी घर पर हैं’ पाहिली जाते. या मालिकेचा ‘भाबीजी घर पर हैं २.0’ हा नवा […] The post ‘भाबीजी’ वर आली हॉटेलमध्ये राहण्याची वेळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूड अभिनेता आमिर खान कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत असतो. आता आमिर खानची दुसरी बायको किरण रावला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरण राववर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. किरण रावची अपेंडिक्स सर्जरी करण्यात आली आहे. किरण रावने हॉस्पिटलमधून तिचे हेल्थ अपडेट्स दिले आहेत. किरण रावने तीन फोटो आणि एक व्हिडीओ […] The post किरण राव रुग्णालयात दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक असताना, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच एकत्र आलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्यास सुरुवात झाली असून, मनसेचे मुंबई शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार हे या युतीचे पहिले अधिकृत उमेदवार ठरले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः किल्लेदार यांना एबी फॉर्म सुपूर्द केला. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 192 ची जागा युतीमध्ये कुणाकडे जाणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून प्रचंड रस्सीखेच सुरू होती. हा वॉर्ड सध्या ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो आणि तिथे त्यांचे विद्यमान नगरसेवक होते. मात्र, दोन्ही पक्षांतील प्रदीर्घ चर्चेनंतर ही जागा मनसेला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. या जागेवरून आता यशवंत किल्लेदार नशीब आजमावणार आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी यादी जाहीर करण्याऐवजी थेट फॉर्म देण्याची रणनीती दोन्ही पक्षांनी अवलंबली आहे. अनेक वर्षांच्या निष्ठेची आणि कामाची ही पोचपावती उमेदवारी मिळाल्यानंतर यशवंत किल्लेदार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज साहेबांच्या हस्ते पहिला एबी फॉर्म मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत भावनिक आणि आनंदाची गोष्ट आहे. अनेक वर्षांच्या निष्ठेची आणि कामाची ही पोचपावती आहे, असे ते म्हणाले. राज ठाकरेंनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून या वॉर्डात 100 टक्के विजय मिळवू, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठाकरे बंधू एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, बहुमताने उमेदवार निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला. कोण आहेत यशवंत किल्लेदार? यशवंत किल्लेदार हे दादर-माहीम परिसरातील मनसेचे विभाग अध्यक्ष असून राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. मनसेच्या स्थापनेपासून पक्षाच्या बांधणीत आणि विविध सामाजिक आंदोलनांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन महानगरपालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते, मात्र पक्षाकडून तिकीट न मिळूनही त्यांनी कोणतीही नाराजी व्यक्त केली नाही. उलट, त्यांनी पक्षाप्रती आपली निष्ठा कायम राखत 'मातोश्री' आणि 'शिवतीर्थ' या दोन्ही विचारांच्या प्रवाहात स्वतःचे स्थान टिकवून ठेवले. किल्लेदार यांनी स्वतःला उमेदवारी नसतानाही प्रकाश पाटणकर आणि संदीप देशपांडे यांना नगरसेवक म्हणून निवडून आणण्यासाठी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली होती. कालांतराने राजकीय गणिते बदलली. प्रकाश पाटणकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला, तर संदीप देशपांडे यांना पक्षाने विधानसभेच्या रिंगणात उतरवले. या सर्व घडामोडींत किल्लेदार डगमगले नाहीत आणि त्यांनी पक्षसंघटनेचे काम सुरूच ठेवले. अखेर त्यांच्या या प्रदीर्घ संयमाची आणि निष्ठेची दखल घेत, राज ठाकरे यांनी त्यांना आगामी निवडणुकीत उद्धवसेना-मनसे युतीचे अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरवले असून, त्यांच्या रूपाने एका हक्काच्या कार्यकर्त्याला कामाची पोचपावती मिळाली आहे.
शिवसेनेचे माजी उपमहापौर आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी आज दुपारी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. कार्यकर्त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. जंजाळ यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या जागावाटपात युती होणार की नाही, याबाबत कोणतीही निश्चिती नाही. भाजपसोबत जागावाटपाबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तसेच, शिवसेनेला अत्यंत कमी जागा मिळत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. या परिस्थितीमुळे आपण कालपासून जागावाटप प्रक्रियेतून बाजूला झालो आहोत, असे जंजाळ यांनी सांगितले. कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये आणि त्यांना न्याय मिळावा, यासाठी आपण उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. आमच्या वाट्याला येणाऱ्या जागा अतिशय कमी आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या छातीवर बसून मला निवडणूक लढायची नाही, असे जंजाळ म्हणाले. या कारणास्तव त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, इतक्या दिवसांपर्यंत मी युतीच्या जागावाटप प्रक्रियेत सहभागी होतो, मात्र कालपासून मी या प्रक्रियेत नाही. त्यामुळे आता नेमके काय सुरू आहे, याची माहिती मला किंवा खासदार संदिपान भुमरे आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांनाही नाही.
मनसेला सोडचिठ्ठी देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रकाश महाजनांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपने मला 3 महिने ताटकळत ठेवले. त्यामुळे भाजपला आता मुंडे, महाजनांची गरज उरली नसल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत. प्रकाश महाजन यांनी गत आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. पक्ष प्रवेशानंतर लगेचच त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता त्यांनी शिवसेनेचा मित्रपक्ष असणाऱ्या भाजपवरही शरसंधान साधले आहे. ते म्हणाले, मी भाजपमध्ये गेलो नाही. कारण, त्यांनी मला तब्बल 3 महिने ताटकळत ठेवले. मी त्यांची प्रवेश परीक्षा पास झालो नाही. पण ज्यांनी भाजपवर टीका केली, ते सर्वजण आज भाजपमध्ये आहेत. दिनकर पाटील भाजपवर बोलले, ते आज भाजपत आहेत. भाजपच्या घराला दार नाही, पण पहारेकरी आहेत हे सांगण्यासाठी मी सुधीर मुनगंटीवार यांना फोन केला. पण त्यांनी तो उचलला नाही. मी तीन महिने वाट पाहिली. कारण, मला हिंदुत्त्वावर काम करायचे होते. ठाकरे बंधूंवरही साधला निशाणा प्रकाश महाजन यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, ठाकरे बंधूंनी केव्हाच हिंदुत्त्व सोडले. त्यांना केवळ मुंबईतील आपले अस्तित्व टिकवायचे आहे. मोठ्या लोकांनी निष्ठा बदलली की विचार, देशहित असे म्हटले जाते. उलट गरिबांवर शेण खाल्ल्याचा आरोप होतो. मी 5 वर्षे मनसेत होतो. तिथे तपश्चर्या केली. आता माझ्यावर पैशांसाठी पक्ष सोडल्याची टीका करणारे लोक जनावरांच्या बाजारात दलाली करतात. आमच्यावर विठ्ठलाचे प्रेम नव्हते. विठ्ठलाच्या नातवाचे काम करायचे. मी म्हणालो होतो विठ्ठल बदलणार नाही, पण विठ्ठलाने लक्ष दिले पाहिजे की नाही? चंदूमामा सोडा, रशीद मामू आला छोट्या कार्यकर्त्याने निष्ठा सोडली की त्यांना गद्दार म्हटले जाते. मी आता अस्तित्व आहे तोपर्यंत शिवसेनेत राहणार. मी दोन्ही भावांना एकत्र येण्याचे आवाहन केले. पण ते मराठी माणसांपासून दूर जाताना दिसले. ते मला खटकले. चंदूमामा सोडा, रशीद मामू आला. पण ते राज ठाकरे यांना खटकले नाही. आता एकत्र आल्यानंतर अनेकजण आठवत आहेत. शिवेसना - मनसे युतीत मनसेला ज्या जागा पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे अनेकजण नाराज झालेत. ठाकरे गट व मनसेची युती झाली तेव्हा बाळा नांदगावकर कुठे गेले होते? असा सवालही प्रकाश महाजन यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नामुळे बाळा नांदगावकर मनसेत नाराज आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबईच्या जिल्हाध्यक्षा राखी जाधव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेश केल्यानंतर यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे राखी जाधव यांच्यासह उपस्थित होते. यावेळी प्रवीण दरेकर यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी मोदी आणि ईव्हीएमच्या जोरावर भाजप माज करत असल्याची टीका केली होती. यावर प्रवीण दरेकर यांनी पलटवार केला आहे. ठाकरेंवर टीका करताना प्रवीण दरेकर म्हणाले, ठाकरेंचा विश्वास आता मराठी माणसावर राहिलेला नाही, हिंदू मतांवर राहिलेला नाही. त्यांना मराठी माणसाची आणि हिंदूंच्या मतांची परवा नाही. तसेच राज ठाकरे यांनी मोदींवर व भाजपवर टीका केली होती, यावर बोलताना दरेकर म्हणाले, मुंबईकडे आमचे लक्ष आहे, देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष मुंबईकडे आहे, त्यामुळे वैफल्यातून आलेले हे विधान असल्याची टीका दरेकरांनी केली आहे. उमेदवारी मिळावी म्हणून कोणी भाजपमध्ये येत नाही प्रवीण दरेकर म्हणाले, केवळ उमेदवारी मिळावी म्हणून कोणी भाजपमध्ये येत नाही. तर विकासाचे राजकारण जे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस करत आहेत. तसेच मुंबईचा चेहरा-मोहरा जे काही बदलत आहे. राखी जाधव या कुठल्याही पक्षातल्या असल्या तरी त्या ग्राउंडवरच्या कार्यकर्त्या आहेत. हे आपण बघितले आहे की त्या जनतेमध्ये राहिलेल्या कार्यकर्त्या आणि नेत्या आहेत. पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, राखी जाधव यांना खात्री होती की, माझ्या घाटकोपरचा विकास करायचा असेल, मुंबईचा विकास करायचा असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत विकासाचे राजकारण करूया. कारण शेवटी पक्ष नेते, हे विकासासाठी असतात आणि त्यातून मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची अध्यक्षा आज मुंबई अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार आणि पराग शहा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ज्या ज्या पक्षात चांगली लोक आहेत, ज्यांना राष्ट्रभक्तीवर विश्वास आहे, ज्यांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे, ती सगळी लोक भाजपमध्ये येत आहेत, असे प्रवीण दरेकर म्हणाले. तसेच विकास कोण करू शकते तर भाजप करू शकते, त्यामुळेच भाजपमध्ये प्रवेश होत आहेत.
पुणे : प्रतिनिधी माहापालिका निवडणुकीत आमदार, खासदार किंवा आजी-माजी नगरसेवक यांच्या नातलगांना उमेदवारी देऊ नये, अशा प्रकारचा आदेश भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिला आहे. त्यामुळे पुण्यात इच्छुक असलेल्या आमदार किंवा नगरसेवक यांच्या नातेसंबंधातील दावेदारांची पंचायत होणार आहे. काँग्रेसच्या घराणेशाहीवर भारतीय जनता पक्षाने सातत्याने टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा गेल्या काही […] The post भाजपमध्ये घराणेशाहीला चाप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

26 C