नाशिक : दुपारी ४ वाजता मंगलाष्टक वाजण्यापूर्वीच नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी १० वाजता गंगापूरोडवरील एका रिसोर्टमध्ये घडल्याचे उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दीपक्षिका गोडबोले (२८) असे या नवधूची नाव आहे. या घटनेमुळे लग्नाआधीच आनंदाचा सोहळा अंत्ययात्रेत बदलला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रिसॉर्टमधील खोलीत नववधू बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तत्काळ सिव्हिलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषीत केले. लग्नास आलेल्या पाहुण्यांनी सिव्हिलमध्ये धाव घेतली. वधूचे पिता ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. वधूच्या मृत्यूची बातमी समजताच बांधकाम व्यावसायिक, वकील, न्यायाधीश व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गोडबोलेंचे सांत्वन केले. वधूच्या हातावरील मेहंदी बघून नातेवाई अश्रू अनावर वधूच्या हातावर रंगलेली मेहंदी बघून नातेवाइकांचे अश्रू अनावर झाले. लग्न अवघ्या काही तासात होणार असल्याने आनंदाचे वातावरण होते. त्यासाठी आलेल्या नातेवाईकांना लग्न मंडपाऐव स्मशानभूमीत जावे लागले. नाशिक: उभ्या ट्रकला कारची धडक; ३ वर्षांच्या मुलीसह कुटुंब गंभीर रस्त्याच्या कडेला धोकादायक उभ्या ट्रकला कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ३ वर्षाच्या मुलीसह कारमधील चौघे गंभीर जखमी झाले. ९ वा मैल महामार्गावर हा अपघात घडला. आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश मुळे (रा. जेलरोड) यांनी तक्रार दिली. उपेंद्र गवळी, पत्नी रेश्मा, मुलगी मोहिनी (८) चैताली (३) यांना घेऊन कारमध्ये घेऊन देवदर्शन आटोपून महामार्गाने नाशिककडे येत असताना ९ वा मैल अमृत पंजाब ढाबासमोर रस्त्यावर ट्रक (एमएच १८ बी.जी.८९६८) असुरक्षितपणे अंधारात उभा केलेला होता. कार चालकाला उभा ट्रक न दिसल्याने कार ट्रकला धडकल्याने कारमध्ये पुढच्या सीटवर बसलेले गवळी यांची लहान मुलगी चैताली हिच्या उजव्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले. रेश्मा यांच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली. चालक मुळे आणि गवळी यांना किरकोळ दुखापत झाली. इनसाइड: धोकादायक पार्किंग महामार्गावर अवजड वाहने पार्किंग लाइट न लावता असुरक्षितपणे उभे राहतात. नियम न पाळता वाहने उभी केली जातात. जुना ओझर जकात नाका ते ट्रक टर्मिनल पर्यंत ट्रक महामार्गावर कडेला उभ्या केलेल्या दिसून येतात.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेने ठाकरे गटाने आपली कंबर कसली असून, रविवारी रात्रीपासून उमेदवारांना 'एबी' फॉर्मचे वाटप सुरू झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः 'मातोश्री' निवासस्थानी बोलावून अनेक उमेदवारांच्या हातात उमेदवारीचा अधिकृत कौल दिला. विशेष म्हणजे, पक्षात संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी हे वाटप अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत, त्यांना काल रात्री तातडीने 'मातोश्री'वर पाचारण करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः या उमेदवारांशी संवाद साधून त्यांच्या हातात 'एबी' फॉर्म सुपूर्द केले. काही उमेदवारांना काल रात्रीच फॉर्म देण्यात आले, तर उर्वरित उमेदवारांना आज सकाळी 11 वाजेनंतर बोलावण्यात आले आहे. कोणाला उमेदवारी दिली जात आहे, याची माहिती बाहेर पडू नये यासाठी प्रचंड खबरदारी घेतली जात असून, पक्ष कार्यालयाकडूनही याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर ऐनवेळी होणारी बंडखोरी आणि नाराजी टाळण्यासाठी शिवसेनेने ही विशेष रणनीती आखली आहे. अधिकृत यादी जाहीर करण्यापूर्वीच 'एबी' फॉर्म देऊन उमेदवारांना तातडीने अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे अधिकृत घोषणा होईपर्यंत उमेदवार आपले अर्ज दाखल करतील, जेणेकरून बंडखोरांना संघटित होण्यास वेळ मिळणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली अधिकृत उमेदवारांची यादी आजच जाहीर होण्याची शक्यता असून, यात संभाव्य नावे समोर आली आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी प्रभाग क्र. ५४- अंकित प्रभू प्रभाग क्र. ५९- शैलेश फणसे प्रभाग क्र. ६०- मेघना विशाल काकडे माने प्रभाग क्र. ६१- सेजल दयानंद सावंतप्रभाग क्र. ६२- झीशान चंगेज मुलतानी प्रभाग क्र. ६३- देवेंद्र (बाळा) आंबेरकर प्रभाग क्र. ६४- सबा हारून खानप्रभाग क्र. ४०- सुहास वाडकर प्रभाग क्र. २०६- सचिन पडवळ प्रभाग क्र. ९३- रोहिणी कांबळेप्रभाग क्र. १००- साधना वरस्कर प्रभाग क्र. १५६- संजना संतोष कासले प्रभाग क्र. १६४- साईनाथ साधू कटके प्रभाग क्र. १६८- सुधीर खातू वार्ड प्रभाग क्र. १२४- सकीना शेखप्रभाग क्र.१२७- स्वरूपा पाटील प्रभाग क्र. ८९- गितेश राऊत प्रभाग क्र. १४१- विठ्ठल लोकरे प्रभाग क्र. १४२- सुनंदा लोकरे प्रभाग क्र. १३७- महादेव आंबेकरप्रभाग क्र. १३८- अर्जुन शिंदे प्रभाग क्र. १६७- सुवर्णा मोरे प्रभाग क्र. १५०- सुप्रदा फातर्फेकरप्रभाग क्र. ९५- चंद्रशेखर वायंगणकर प्रभाग क्र. २१५- किरण बालसराफ प्रभाग क्र. २१८- गीता अहिरेकर प्रभाग क्र. २२२- संपत ठाकूर प्रभाग क्र. २२५- अजिंक्य धात्रक
आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी कंबर कसली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत युती देखील केली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. त्यात काही कार्यकर्ते नाराज असल्याचे देखील समोर आले आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पुण्यातील निर्णय दुपारपर्यंत होणार असल्याचे देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊत म्हणाले, आम्ही कामाला लागलो आहोत. कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत. जेव्हा दोन पेक्षा जास्त पक्ष एकत्र येतात आणि जागांची देवाणघेवाण होते, त्यात ज्यांचा जागा जातात, अशा सगळ्याच पक्षांमधले त्या त्या प्रभागातले जे इच्छुक असतात ते अस्वस्थ होणारच. मग ते कोणत्याही पक्षातले असोत, त्यामुळेच अजित पवार वेगळे लढत आहेत. संपूर्ण मुंबईत आणि महाराष्ट्रात आमच्या पक्षातले लोक रस्त्यावर आले नाहीत, जसे शिंदे गटात दिसत आहे. जे नाराज असतील त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करू बंडाची नाराजी कशी दूर करणार, या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, हे कशाचे बंड आहे? देशासाठी, क्रांतीसाठी बंड आहे का? नाही. हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असतो. ज्या पक्षाने आपल्याला इतकी वर्षे सगळे काही दिले आहे. एखाद्या वेळी एखादा पक्ष नाही देऊ शकत. याला बंड म्हणता येत नाही. तसेच जे नाराज असतील त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करू. शिंदे गट म्हणते आम्ही बंड केले, कसला? जाऊन भाजपचे बूटच चाटत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. आम्ही सगळेच स्टार प्रचारक अनेक नेत्यांच्या मुलांना उमेदवारी देण्यात आली आहे. यात प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, अंकित प्रभू गेली अनेक वर्षे काम करत आहे. तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर हा पक्ष पुढे जाणार कसा? आमच्या पिढीने मागे राहून तरुणांना संधी दिली पाहिजे. तसेच स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली नाही, त्यावर संजय राऊत म्हणाले, आम्ही सगळेच स्टार प्रचारक आहोत, आम्ही यादी जाहीर करत नाही. वंचित आणि कॉंग्रेसच्या युतीवर प्रतिक्रिया पुढे बोलताना वंचित आणि कॉंग्रेसच्या युतीवर बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्ही या युतीचे स्वागत केले आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी, ते आमच्यासोबत आले नाही. ठीक आहे. आज कॉंग्रेस आणि वंचित एकत्र येऊन भाजपच्या पराभवाला हातभार लावणार असतील तर नक्कीच आम्ही स्वागत करू. तसेच आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटासाठी जागा सोडल्या आहेत. तसेच त्यांना ज्या जागा पाहिजे होत्या त्यातल्या अनेक जागा आम्ही सोडल्या आहेत. शरद पवारांनीच गौतम अदानीला उद्योजक बनवले गौतम अदानी यांनी शरद पवार यांना आपले गुरु असे म्हटले होते. तसेच सुप्रिया सुळे यांनी देखील गौतम अदानी हे भावा सारखे असल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, हा प्रश्न नव्याने विचारात आहात का आपण? यात नवीन काय आहे? ज्यांनी शरद पवारांचे आत्मचरित्र वाचले आहे, त्यात ब्लॅक अँड व्हाइट आहे. शरद पवारांनीच गौतम अदानीला उद्योजक बनवले आहे. यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. परंतु, गौतम अदानी यांच्यासोबत आमची मुंबई संदर्भातली नैतिक लढाई सुरूच राहील. ज्या पद्धतीने मुंबईचा घास गिळण्याचे काम भाजप अदानीच्या मदतीने करत आहेत, आम्ही त्याच्या विरोधात आमचा लढा कायम ठेऊ, तुमच्या सोबत किंवा तुमच्याशिवाय, असे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे व पिंपरी चिंचवड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी रविवारी रात्रीच यासंबंधीची घोषणा केली होती. त्यानंतर आता शरद पवार गटानेही त्यावर मोहोर उमटवल्यामुळे राष्ट्रवादीच्या कुटुंबाने पुन्हा एकत्र होण्याच्या दिशेने पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. रोहित पवार आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, सध्या वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे समीकरण तयार होत आहे. एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यात काही गोष्टी पटत नाही अशी चर्चा आहे. पण नाशिकमध्ये या दोघांचेही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्या - त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लढावे लागते. आज महापालिकेची निवडणूक आहे. त्यात विलिनीकरणाचा विषयअसता तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात युती केली असती. पण असे काही झाले नाही. फक्त पुणे व पिंपरी चिंचवड येथे आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. शरद पवार या विषयात कुठेच नाहीत. त्यांचे मत एवढेच आहे की, जे लोक आपल्यासाठी लढले त्यांना विश्वासात घ्या. त्यांचे म्हणणे काय? हे समजून घ्या. महापालिकेत कधीही एवढ्या मोठ्या पातळीवरचे नेते कधीही इन्व्हॉल्व्ह झाले नव्हते. शरद पवारांना पूर्वीच्या काळची सवय असल्यामुळे त्यांनी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे सांगितले. त्यानुसार, वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळे समीकरण आपल्याला पहावयास मिळत आहे. पण पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये घड्याळ व तुतारी आपल्याला एकत्र लढताना दिसून येतील. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत...
आई राजा उदो उदो’ च्या जयघोषात रविवारी दुपारीघटस्थापना करून तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. ३ जानेवारीपर्यंत ७दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या शेवटी शाकंभरी पौर्णिमेला दुपारी १२ वाजता होमकुंडात पूर्णाहुती देण्यात येणार आहे. तुळजाभवानी मातेचा छोटा दसरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास रविवारी दुपारी १२ वाजता घटस्थापनेने प्रारंभ झाला. तत्पूर्वी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली मंचकी निद्रा संपवूनरविवारी पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावरप्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर लगेच मातेच्यापंचामृत अभिषेक पुजेस प्रारंभ करण्यात आला. तर रात्री उशिरा छबिना मिरवणूक काढण्यात आली. उद्या मुरली अलंकार पूजा ४ दिवसांत ८ लाख भाविक यावर्षी नाताळात भाविकांच्या गर्दीत वाढझाली असून गुरूवारपासून (दि. २५)रविवारपर्यंत (दि. २८) तब्बल ८ लाखभाविकांनी तीर्थक्षेत्र तुळजापुरात हजेरीलावली. दरम्यान, भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळेप्रशासनाचे नियोजन बिघडले आहे. विशेषम्हणजे यावेळी पहिल्यांदाच नाताळातमहाद्वार बंद करत भाविकांना कुंभार गल्लीमार्गे मंदिरात सोडण्यात आले होते. यजमानपद उपाध्ये मंडळालाधर्मादाय आयुक्तांचा निर्देशानुसारशाकंभरी नवरात्र महोत्सवाचे यजमानपदरोटेशन पध्दतीने देण्यात येत असून, यावर्षी यजमान पदाचा मान उपाध्येमंडळाला असणार आहे. उपाध्येमंडळाच्या वतीने यजमान पदासाठीउल्हास कागदे यांचा नावाची मंदिराकडेशिफारस करण्यात आली. त्यांच्याहस्तेसर्व पुजा विधी करण्यात येत आहेत. प्रत्येक घरात घटस्थापना : मंदिरातील घटस्थापनेनंतर शाकंभरी नवरात्रमहोत्सवानिमित्त तुळजापुरात घरोघरी घटस्थापना करण्यात आली. शाकंभरी नवरात्र वशारदिय नवरात्र महोत्सव अशा दोन वेळा घटस्थापना करण्याची प्रथा आहे. दोन्ही नवरात्रातउपवास धरण्यात येत असून पोर्णिमेला घट उठल्यावर उपवास सोडण्यात येतात. यजमान कागदे यांनी निंबाळकर दरवाजातून घटकलश आणला.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला मोठे भगदाड पडले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत पक्षाचा किल्ला एकहाती लढवणाऱ्या आणि मुंबई जिल्हा अध्यक्षा राखी जाधव या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात शरद पवार गटाच्या वाट्याला केवळ 5 ते 10 जागा आल्याने जाधव या प्रचंड नाराज असून, या नाराजीतूनच त्यांनी तुतारी सोडून कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात संघटनात्मक बांधणी करण्यात राखी जाधव यांचा मोठा वाटा आहे. मात्र, ठाकरे गटासोबतच्या युतीत पक्षाला अत्यंत कमी जागा मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. मिळालेल्या माहितीनुसार, जागा कमी असल्याने पक्षातील इच्छुकांना थेट अजित पवार गटात जाऊन निवडणूक लढवण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या. पक्ष कार्यालयातूनच तसे फोन गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. आपल्याच कार्यकर्त्यांची दुसऱ्या पक्षात पाठवणी कशासाठी? असा सवाल करत राखी जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. अनेक बड्या पदाधिकाऱ्यांचे पक्षांतर राखी जाधव यांच्यापूर्वीच शरद पवार गटातील अनेक महत्त्वाच्या शिलेदारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यामध्ये माजी नगरसेवक धनंजय पिसाळ, हिंदी भाषिक सेलचे प्रमुख मनीष दुबे, यामिनीबेन पंचाल, नितीन देशमुख आणि अशोक पांचाल यांसारख्या बड्या नावांचा समावेश आहे. या गळतीमुळे आणि पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेमुळे दुखावलेल्या राखी जाधव आता सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून, त्यांना घाटकोपरमधील त्यांच्याच वॉर्डमधून उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळत आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत ऐनवेळी जिल्हा अध्यक्षांनीच साथ सोडल्याने मुंबईत शरद पवार गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांची अजित पवार गटाकडे होणारी पाठवणी आणि आता मुख्य नेतृत्वानेच भाजपची वाट धरल्याने, मुंबईतील पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यस्मरण सोहळ्याचा समारोप रविवारी झाला. समारोपीय सत्रात ‘सारा भारत रहे सिपाई’ या विषयावर युवक-युवती संमेलन पार पडले. राष्ट्रसंतांच्या विचारातून सर्वांगीण विकास शक्य आहे, असा सूर संमेलनातून उमटला. समाज व राष्ट्र बदलण्याची अभूतपूर्व शक्ती ही युवा विश्वात समाविष्ट आहे. युवक हे देशाचे भक्कम आधारस्तंभ असून, देशाला विलक्षण कलाटणी देण्याचे सामर्थ्य या युवाशक्तीत आहे. मात्र आजची प्रचलित युवाशक्ती ही भरकटलेली असून दिशाहीन होत आहे. अशा युवाशक्तीला नैतिक अधिष्ठान देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या सारख्या तत्त्ववेत्त्यांची खरी आवश्यकता असून, ही गरज अशा वैचारिक महोत्सवाच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. गत १७ वर्षांपासून महानगरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा जागर करत वैचारिक प्रबोधन करणाऱ्या पुण्यस्मरण महोत्सवाला अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळांतर्गत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीतर्फे शनिवारी प्रारंभ झाला होता. महोत्सव सिव्हिल लाइन परिसरातील जि.प. कर्मचारी भवनात झाला. सचिन बुरघाटे यांच्या अध्यक्षतेत संपन्न या संमेलनात पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर महाराज वाघ, प्रा. नितीन बाठे, धनंजय मिश्रा, प्रा. ममता इंगोले, उज्वला देशमुख, शिवाजी ठाकरे, प्रा. स्वप्निल इंगोले, डॉ. आरतीलता देशमुख, समितीचे अध्यक्ष शिवाजीराव म्हैसने, कार्याध्यक्ष अॅड. संतोष भोरे, डॉ. दीपाली सोसे आदी उपस्थित होते. युवा वक्त्यांनी राष्ट्रसंतांच्या वैचारिक प्रबोधनाचा आपल्या वक्तव्यात उहापोह करत युवाशक्तीवर विचार व्यक्त केले. युवक संमेलनाचे संचालन पवन गवळी यांनी तर आभार संयोजक शुभम वरणकार यांनी मानले. किती जगला यापेक्षा कसा जगाला हे महत्त्वाचे, मात्र यापेक्षाही मृत्यूनंतर किती दिवस जगाच्या स्मरणात राहिलो, हे सर्वात महत्त्वाचे असल्याचे हभप ज्ञानेश्वर महाराज वाघ म्हणाले. खऱ्या अर्थाने संत समाजाला जगवतात. संतच समाजाला कर्तव्याची जाणीव करून देतात, असेही महाराज म्हणाले. प्रा. स्वप्निल इंगोले यांनी कास्तकारांच्या आत्महत्येबाबत विचार व्यक्त केले. राष्ट्रसंतांनी आपल्या ग्रामगीतेत कृषी नीतीचा मोठ्या प्रमाणात उहापोह केला आहे. हा देश केवळ मातीचा तुकडा नसून याच्यासाठी आम्ही मरण्यासाठी तयार असल्याचे महाराज सांगतात. तरुणांना सशक्त विचार देण्यासाठी असे युवक युवती संमेलन ही काळाची गरज असल्याचे प्रा. इंगोले म्हणाले. आदर्श भाव हा संपूर्ण जीवनात जैसे थे राहिला पाहिजे यासाठी, अशा महोत्सवाची खरी गरज आहे, असे अध्यक्षीय मनोगतात शिक्षण तज्ज्ञ सचिन बुरघाटे म्हणाले. युवकांनी अशा कार्याची इतरांना जाणीव करून देणे हेच युवाशक्तीचे प्रथम कार्य आहे. येणाऱ्या पिढीसमोर हाच आदर्श निर्माण झाला पाहिजे. सध्या सर्वात जवळ मोबाईल फोन असून, कोणीच एकमेकांसोबत संवाद साधत नाही. कुटुंब व्यवस्था मर्यादित व घेरबंद होत आहे. परिवार हा कमजोर होत आहे. राष्ट्रसंतांनी सर्वांच्या कल्याण व सन्मान करण्याचे शिकवले असून या शिकवणीची युवकांनी कास धरून इतरांसमोर नवा आदर्श यांचा पायंडा निर्माण केला पाहिजे, असेही ते म्हणाले. संतांची महिमा विशद करत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे खऱ्या अर्थाने कर्मयोगी संत असल्याचे सांगितले शेतकरी नेते प्रकाश पोहरे म्हणाले. कर्जबाजारी कास्तकार व कृषी क्षेत्राच्या पीछेहाटीमागे अनेक कारणे आहेत. मोडकळीस आलेल्या कास्तकारीला जीवनावश्यक वस्तूचा कायदा कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीता ग्रामव्यवस्थेच्या बदलाचे अनेक संकेत दिले आहेत. ग्राम व्यवस्था हे सुरळीत राहिली पाहिजे. यासाठी ग्रामीण क्षेत्रात ग्राम गीतेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. असा झाला समारोप : मौन श्रद्धांजली कार्यक्रमात राष्ट्रसंत भक्तांनी राष्ट्रसंतांना सामूहिक श्रद्धांजली गीत रूपाने वाहली.रात्री संदीपपाल महाराज व रामपाल महाजन यांचा कीर्तन कार्यक्रम होऊन दोन दिवसीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप करण्यात आला. ग्रामीण व्यवस्था जैसे थेच : खेडेकर युवक युवती संमेलनात मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर तथा अशोक पटोकार हेही सहभागी झाले. खेडेकर म्हणाले कि, इतकी वर्ष होऊनही ग्रामीण व्यवस्था ही बदललेली नाही. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेत अभिप्रेत असलेले विचार वास्तविक आचरणात आणणे खऱ्या अर्थाने गरजेचे आहे. राष्ट्रसंतांच्या नावाने विद्यापीठ होतात पण वैचारिक अधिष्ठान युवकांमध्ये होत नाही यावर युवकांनी विचार करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
एकीकडे शिवणी विमानतळाच्या रुंदीकरणाला गती मिळाली असून, दुसरीकडे आता शहरात वैमानिक प्रशिक्षण केंद्रामुळे रोजगारासह अर्थकारणाला बळकटी मिळणार आहे. आगामी वर्षात हे मुद्दे मार्गी लागणार असून, तरुणाईला त्यांच्या कौशल्यानुसार संधी उपलब्ध होणार आहे. विमानतळ िवस्तारीकरणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून रखडला आहे. िवस्तारीणाबाबत स्थानिक प्रशासन-शासन स्तरावर बैठका झाल्या. विधिमंडळाच्या अनेक अधिवेशानांमध्येही लोकप्रतिनिधींकडून चर्चा घडवून आणली. काहींनी सवालही उपस्थित केले होते. मात्र तरीही हा मुद्दा मार्गी लागला नाही. पश्चिम विदर्भातील हवाई वाहतुकीसाठी महत्त्वाचे असलेल्या या विमानतळाच्या धावपट्टीचा मुद्दा एक दशकापेाही जास्त वर्षांपासून रखडला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी निधी मंजूर कण्यासह भूसंपादचा मार्गही मोकळा झाला. आता अकोल्यात पायलट ट्रेनिंग सेंटरही मंजूर झाले असून, याबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे. विमान पायलट प्रशिक्षण केंद्रासाठी भाजपकडून अकोल्यातून मुख्यमंत्री व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. केंद्र मंजूर झाल्याने विदर्भाच्या पश्चिम विदर्भाच्या युवकांना अकोल्यातच दर्जेदार वैमानिक प्रशिक्षणाची सोय होणार आहे. ट्रेनिंगसाठी अकोल्यातील विद्यार्थ्यांना मुंबई, चेन्नई अन्य ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. तसेच अकोल्याचा विकासाला चालना मिळणार आहे. याकडे तरुणाईचे लक्ष शिवणी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भूसंपादन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले भूसंपादन आदेशात आदेश सामान्य प्रशासन विभागाने काही महत्त्वाच्या बाबी नमूद केल्या. धावपट्टीच्या विस्तारासाठी अतिरिक्त २२.२४ हेक्टर आर क्षेत्र संपादित करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस भूसंपादन संस्था म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या जागेच्या संपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भूसंपादन अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले होते. आता पायलट ट्रेनिंगसाठी कोठे जागा मंजूर होते व पुढील प्रक्रिया केव्हा सुरू होते, याकडे तरुणाईचे लक्ष लागले आहे.
संत गाडगेबाबा हे थोर समाजसुधारक होते. त्यांनी आपल्या जीवनातून स्वच्छता, समाजसेवा आणि मानवतावाद यांचा आदर्श घालून दिला. गावोगावी जाऊन त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि दारू, अंधश्रद्धा व सामाजिक दुर्गुणांविरुद्ध जनजागृती केली. भिक्षेतून मिळालेल्या पैशांतून त्यांनी धर्मशाळा, शाळा, रस्ते व विहिरी उभारण्याचे कार्य केले. कर्मकांडाला विरोध करून त्यांनी माणुसकी, समता आणि श्रमप्रतिष्ठेचा संदेश दिला. समाजातील उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी त्यांनी अविरतपणे कार्य केले. स्वच्छता, समाजसेवा आणि समतेचा संदेश देणारे गाडगेबाबांचे कार्य आजच्या समाजासाठी, तरुण पिढीसाठी आणि विषेशतः विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन श्री. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावतीचे सीईओ प्रा. पी. आर. एस. राव यांनी केले.ते तक्षशिला विधी महाविद्यालय येथे संत गाडगेबाबा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्रा. डॉ. श्याम तंतरपाळे, तर अतिथी म्हणून, प्रा. डॉ. राजेश देशमुख, प्रा. ॲड. विशाखा सोनटक्के, प्रा. ॲड. भारत ढोके, ॲड. हरीश निंभाळकर, ॲड. उज्वल सोनवणे, प्रा. स्वप्नील मानकर , प्रा. मेघा चिमणकर, प्रा. ज्योती टाले, प्रा. राधा काळे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रकाश म्हस्के, सहा प्रा. दीपाली पडोळे, प्रा. डॉ. अंभोरे , प्रा. डॉ. खेडकर, प्रा. डॉ. शुद्द्धोधन कांबळे , प्रा. दीपाली गवई आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. राव म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा हे दोघेही राष्ट्राच्या समाज सुधारणेच्या परंपरेतील महत्त्वाचे समन्वयी व्यक्तिमत्त्व होते. बाबासाहेबांनी सामाजिक समता, मानवाधिकार, शिक्षण आणि संविधानिक मार्गाने अन्यायाविरुद्ध संघर्ष केला, तर गाडगेबाबांनी स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि करुणेच्या मूल्यांद्वारे समाजजागृती घडवली. बाबासाहेबांचा विचार बौद्धिक व संघटनात्मक पातळीवर क्रांती घडवणारा होता, तर गाडगे बाबांचे कार्य प्रत्यक्ष कृतीतून जनसामान्यांपर्यंत पोहोचले. त्यामुळे विचारांची दिशा वेगळी असली तरी उद्दिष्ट एकच असल्याने बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्यात वैचारिक व कृतीशील समन्वय स्पष्टपणे दिसून येतो, असेही ते म्हणाले. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी ही यथोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्राध्यापकवर्ग, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी, शिक्षक व शिक्षकेत्तर सर्व सहकारी आदींनी परिश्रम घेतले. अज्ञान व अंधश्रद्धा दूर करण्यास सक्रिय भूमिका अध्यक्षीय भाषणात प्रा. डॉ. तंतरपाळे म्हणाले की,संत गाडगे बाबांचे विचार अत्यंत व्यवहार्य आणि समाजाभिमुख होते. त्यांच्या मते खरे शिक्षण म्हणजे केवळ अक्षरज्ञान नव्हे, तर स्वच्छता, श्रमप्रतिष्ठा, नैतिकता आणि समाजसेवेची जाणीव निर्माण करणारी प्रक्रिया होय. विद्यार्थ्यांनी समाजातील दु:ख, अज्ञान व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असे ते मानत. सामाजिकतेच्या दृष्टीने शिक्षणाने माणूस माणसाशी जोडला गेला पाहिजे, भेदभाव नष्ट झाला पाहिजे आणि सेवाभाव विकसित झाला पाहिजे, हा गाडगेबाबांचा आग्रह होता. विद्यार्थी हा परिवर्तनाचा सक्रिय घटक असावा, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दुर्लक्ष पूर्ण व नियोजनशून्य कामकाजामुळे मोर्शी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेरपिंगळाई गावचा पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून थांबला आहे. अमरावतीला व्यवस्थित आणि पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा, यासाठी नवी पाइपलाइन अंथरणे सुरु आहे. मात्र त्यामुळे काही ठिकाणी जुनी पाइपलाइन फुटली असून नेरपिंगळाईचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. ऐनवेळी उद्भवलेल्या या संकटामुळे नेरपिंगळा वासियांना गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नेरपिंगळाई गावाची पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन पिंगळादेवी गड परिसरातून गावात येते. याच मार्गाच्या समांतर दिशेने सध्या अमरावतीकडे जाणारी नवीन मुख्य पाइपलाइन अंथरण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असतानाच ५० ते ६० वर्षांपूर्वीची नेरपिंगळाईची जुनी सिमेंटची पाइपलाइन वारंवार फुटत आहे. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा वारंवार गेल्या तीन दिवसांपासून खंडित झाला आहे. या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी विनोद मनवर म्हणाले की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अमरावती येथील अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता या दोन्ही अधिकाऱ्यांशी याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला. पाइपलाइन सिमेंटची व अतिशय जुनी असल्याने ती निकामी होण्याची शक्यता त्यांना आधीच कळवण्यात आली होत. शिवाय ती बदलवून देण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, प्राधिकरणाच्या विरोधामुळे सध्या केवळ लिकेज दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ती पाइपलाइन मजीप्रा कशी बदलणार ? पिंगळादेवी गडावरून नेरपिंगळाईपर्यंत पाणी पोहोचवणारी पाइपलाइन ही ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे. त्यासाठीची पाणीपट्टी ही ग्रामपंचायतीलाच मिळते. त्यामुळे ते काम मजीप्रामार्फत करणे शक्य नाही. मजीप्राने सिंभोरा ते अमरावती या नव्या पाईपलाईनसाठी अमृत योजनेअंतर्गत निधी मिळविला आहे. त्यासाठीच्या प्रस्तावात पिंगळादेवी गड ते नेरपिंगळाईपर्यंतची पाइपलाइन बदलवण्याचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे पिंगळादेवी गड ते नेरपिंगळाई गावादरम्यानच्या पाईपलाईनसाठीचा नवा प्रस्ताव तयार करुन त्यासाठी शासनाकडून निधी मिळवून घ्यावा लागणार आहे.
अडूळाबाजार जि.प. उर्दु शाळेत घेतला बोअरवेल:नितेश गावंडे यांचा कौतुकास्पद उपक्रम
तालुक्यातील अडूळा बाजार येथे जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत उर्दु प्राथमिक शाळा कार्यरत आहे. येथील विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या होती. शाळेत पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना नेहमीच पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. यावर उपाय म्हणून शाळेत बोअरवेल व्हावी. असे येथील मुख्याध्यापक शकील व शिक्षकांना वाटत होते. जैनपुर येथील युवा समाजसेवक नितेश गावंडे हे धावून आले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी त्यांनी आमदार गजानन लवटे यांच्या मार्गदर्शनात या शाळेत स्वखर्चाने बोअरवेल तयार करून दिली. यामुळे या लहान चिमुकल्यांची कायमची तहान भागली आहे. नितेश गावंडे यांच्या कार्याचे येथील गावकरी नागरिकांनी व पालकांनी कौतुक केले आहे. या बोअरवेल भूमिपूजन प्रसंगी शिवसेना शाखा प्रमुख जगदीश मोरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष नरेंद कुंडलवाल, जिल्हा परिषद उर्दु शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुबारक पटेल, उपसरपंच रिजवान बेग, माजी सरपंच अश्फाक अली, ग्राम पंचायत सदस्य अयाझ खान, माजी तंटामुक्त अध्यक्ष हमीद खा, फिरोज अली, मेहमूद खा, मुख्याध्यापक अब्दुल शकील तसेच शिक्षक कैसर नियाजी, अब्दुल रफीक,रेहान अहमद, रकत अली, जाबीर शाह, मोहम्मद इम्रान ,रियाज खान, साबीर भाई, इरफान भाई, शामिउल्ला खा,अब्दुल हफीझ राजा, इर्शाद अली, अमोल मोरे, शाहरुख खान, दिलावर अली, अब्दुल मोहसीन, किरण रायबोले व गावकरी उपस्थित होते.
आजचा विद्यार्थी हा देशाच्या उज्वल भवितव्याचा आधार आहे. खेडगी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या माध्यमातून दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला महाविद्यालयीन प्रयोगशाळांमध्ये प्रयोग करण्याची संधी मिळाल्याने त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन व्यापक होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन सोलापूर सायन्स सेंटरचे माजी संचालक डॉ. व्यंकटेश गंभीर यांनी केले. अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचालित सी.बी. खेडगी कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रात्यक्षिक कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सेक्रेटरी सुभाष धरणे, संचालिका शोभाताई खेडगी, प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले, उपप्राचार्य वैदेही वैद्य, पर्यवेक्षक निलप्पा भरमशेट्टी, कार्यशाळेचे समन्वय श्रीकांत जिडीमनी उपस्थित होते. प्रारंभी उप प्राचार्य वैदेही वैद्य यांनी प्रास्ताविकातून विज्ञान कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणातून बोलताना संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी म्हणाले की, केंद्र सरकारच्या पीएम उषा योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ५ कोटी निधीपैकी १ कोटी १० लाख रुपये निधी विज्ञान प्रयोगशाळा आणि अक्कलकोट सारख्या सीमावर्ती ग्रामीण भागात केजी टू पीजी ज्ञानदान करणारी ही शिक्षण संस्था या तालुक्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल करणारी संस्था आहे. अशी कार्यशाळा भरवण्याचा मनोदय संस्थापकांच्या मनात आल्याबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन केले. या प्रात्यक्षिक कार्यशाळेतून अनेक विद्यार्थ्यांना आपल्या करिअरच्या वाटा शोधता येतील, अशा कार्य शाळांमधूनच उद्याचे डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ, संशोधक घडत असतात. असे मत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले यांनीही मनोगत व्यक्त केले. आणि साहित्यांच्या उपलब्धतेसाठी तरतूद केली आहे. सदर प्राप्त निधीचा उपयोग तालुक्याच्या ग्रामीण भागातील शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी झाला पाहिजे, या हेतूने ही विज्ञान प्रात्यक्षिक कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्यास अक्कलकोट विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष शंभूलिंग बशेट्टी, शहाजी प्रशालेचे एम. एम. साळुंखे, नसरीन तांबोळी, मंजूषा भोसले, उर्दू हायस्कूलचे फुरकान मणियार, म्हैसलगे हायस्कूलचे एच. डी. हळी, एस. एच. बिराजदार आदींसह तालुक्यातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक मोठया संख्येने उपस्थित दर्शवली होती. सूत्रसंचालन प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले तर प्रा. श्रीकांत जिडीमनी यांनी आभार मानले.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार हे पक्षातील जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेत नाहीत. केदार यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार घेतल्यापासून त्यांच्या कार्यक्षेत्रात पक्षाला सातत्याने अपयश येत आहे. आजवरच्या सर्व पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या राजश्री नागणे यांनी सांगोला येथे पत्रकार परिषद घेऊन केली. या पत्रकार परिषदेस भारतीय जनता पार्टी किसान सेलचे प्रदेश सदस्य शिवाजीराव गायकवाड, माजी तालुकाध्यक्ष संजय गंभीरे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सावंत, माजी शहराध्यक्ष नवनाथ पवार, महिला आघाडीच्या माजी तालुकाध्यक्ष वैजयंती देशपांडे, नागेश जोशी, मधुकर बनसोडे, भारत गडहिरे, संजय बाबर, शिवाजी ठोकळे आदीसह भारतीय जनता पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना गायकवाड यांनी सांगितले, मी १९९५ पासून पक्षाचे काम करत आहे. २००४ ला सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. आजवर पक्षाचे अनेक पदाधिकारी पाहिले मात्र, चेतनसिंह केदार हे भारतीय जनता पक्षात दाखल झाल्यापासून त्यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या दोन लोकसभा व ५ विधानसभा मतदारसंघात पक्षाला दारून पराभव स्वीकारावा लागला. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात दोन्ही जागेवर पूर्वी भारतीय जनता पक्षाचे खासदार होते. परंतु केदार यांच्या मनमानी कामामुळे सांगोला, करमाळा, अकलूज, कुर्डुवाडी या नगरपालिका निवडणुकीतही पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. प्रतिनिधी | सांगोला आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचा दौरा केला जाईल. प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुखांची बैठक घेतली जाईल. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पक्ष हा कमळ चिन्हावर लढवण्याचा निर्धार केला असल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केले. दरम्यान, युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे हे घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोल्यात भाजपची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, मारुतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, संभाजी आलदर, तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, भाऊसाहेब रुपनर, माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, सचिन देशमुख, बाळासाहेब काटकर, नंदकुमार दिघे, वासूदचे उपसरपंच अनिल केदार, राजू मगर, बाळासाहेब झपके, वसंत सुपेकर, राजश्री नागणे, नवनाथ पवार, शिवाजीराव गायकवाड भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना केदार सावंत म्हणाले, आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी बूथ सक्षमीकरण करून सज्ज होऊन कामाला लागावे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने केलेल्या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवून नागरिकांमध्ये सरकारप्रति आत्मीयता निर्माण करावी. जिल्ह्यात भाजपचा बालेकिल्ला कायम टिकवून ठेवत आगामी काळात पक्ष, संघटना आणखी मजबूत कसे करता येईल, यावर आपण काम करणार आहे. भाजप सरकारच्या योजना तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत पोहोचवून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन केले. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा ताळमेळ साधला पाहिजे जुन्यांना विसरून चालणार नाही, नव्यांबरोबर जुन्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन वाटचाल करावी लागेल. तरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने ते यश मिळू शकेल. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकजूट होत निवडणुका जिंकण्याचा निर्धार करावा असे आवाहन केदार यांनी केले. अन् पक्षाच्या पराभवाची मालिका सुरू झाली यापूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले होते मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार हे भारतीय जनता पक्षात दाखल झाले. त्यांच्या आल्याने पक्षाला पराभवाची मालिका सुरू झाली. ही पराभवाची मालिका थांबविण्यासाठी केदार यांनी राजीनामा देण्याची मागणी माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार यांनी केली.
मोहोळ शहरासह तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या जीवितेस धोका निर्माण होणाऱ्या कन्या प्रशाला चौकामध्ये उड्डाणपूल करण्यात आला. मात्र हा धोका कमी होण्याऐवजी अधिक भर पडली आहे. तसेच शहरासह तालुक्याची वाढती लोकसंख्या पाहता बायपास होणे, आवश्यक बाब बनली आहे. बायपास केल्यास शहरातील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल. बायपास व्हावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती मोहोळ बस स्थानकावर पुणे मुंबई वरून येणाऱ्या एसटी बससह खाजगी प्रवासी वाहतूक गाड्यांची सर्व्हिस रोड वरती मोठी गर्दी होत आहे.तर सोलापूर वरून पुण्याकडे जाणाऱ्या एसटी बस सह खाजगी प्रवासी वाहतूक गाड्यांची सर्व्हिस रोड वरती मोठी गर्दी होत आहे. या दोन्ही सर्व्हिस रोडवरील वाहन वाहतूक वर्दळ कमी करण्यासाठी मोहोळ बस स्थानका समोरील रॅम्प प्रमाणे कुरुल उड्डाणपूल नजीकच्या रिकाम्या जागेमध्ये तर मोहोळ डाग घर समोरील रॅम्प प्रमाणे सोलापूर वरून येणाऱ्या गाड्यांसाठी शुभम हॉटेल समोर अशा दोन्ही ठिकाणच्या बाजूस रॅम्प केल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तर मोहोळ शहराची वाढती लोकसंख्या पाहता मोहोळ शहरातील वाहतूक कोंडीवर आळा बसवण्यासाठी बायपास केल्यास वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल. अशी मागणी सातत्याने शहरासह तालुक्यातील नागरिक करीत आहे. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच प्रशासन वेळकाढूपणाची भूमिका घेत आहे. सदर ठिकाणी एखादा मोठा अपघात होऊन कोणाचातरी बळी गेल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पंढरपूरहून येणारी सर्व वाहने,जड वाहतूक, पुण्याहून येणाऱ्या सर्व एसटी बसेस या मोहोळ शहरातील सर्व्हिस रोडने वळविण्यात आल्याने मोहोळ शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने असलेल्या सर्व्हिस रोडवर कायम वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना रस्ता ओलांडताना त्रास होत आहे. कन्या प्रशाला चौक येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला ४ शाळा व २ महाविद्यालये आहेत. तालुक्यातील अनेक गावांचा शहराला जोडणारा प्रमुख चौक त्याठिकाणी रस्ता ओलांडत असताना अनेक अपघात झाले होते.काही जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या विषयावर मोहोळ शहरातील नागरिकांनी या चौकामध्ये उड्डाणपूल व्हावा, यासाठी पाठपुरावा केला होता. त्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने भुयारी मार्ग केला.परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी सर्व्हिस रोडच्या वाहतूक कोंडीचा कोणताही विचार न करता भुयारी मार्ग करण्यात आला आहे.
नगर- मनमाड महामार्गावरील अपघाताचे दृष्टचक्र थांबता थांबत नसल्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. आठ दिवसांत दुसरा अपघात आणि २ जणांचा मृत्यू तर ३ जण गंभीर जखमी रस्त्यावर तिसऱ्यांदा आंदोलन यामुळे शासनाचे निष्ठूर धोरण आणि प्रशासनाचे बेदरकारपणाचा प्रत्यय या रस्त्यावर चालणाऱ्या वाहनधारकांना येत असताना आज पुन्हा एकदा एकेरी वाहतुकीमुळे एका तरुणाचा बळी गेला. रविवारी दुपारी सुमारे साडे बारा वाजेच्या सुमारास डिग्रस फाटा परिसरात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला, त्याचासहकारी जखमी झाला. नकारात्मक बातमी पण तुमच्या माहितीसाठी मार्च २०२५ ते २८ डिसेंबर २०२५ या २६८ दिवसांत या रस्त्यावर १४५ अपघात झाले, त्यात ७३ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ ते आतापर्यंत या रस्त्यावर ४२५ जणांचा अपघातात मृत्यू झाला . जूनमध्ये एकाच आठवड्याच ४ जणांचा मृत्यू झाला होता. अपघातामुळे संतप्त नागरिकांनी केलेले हे सहा महिन्यातील तिसरे रास्ता रोको आंदोलन झाले. नदीम आदम शेख वय १९ वर्ष व उमर अब्बास शेख दोघे रा. डिग्रस,ता. राहुरी हे दुचाकीवरून राहुरी येथून डिग्रसकडे येत असताना डिग्रस फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात उर्वरित पान ४ २६८ दिवसांत १४५ अपघातात ७३ जणांचा मृत्यू
ज्या शाळेमुळे अक्षरांची ओळख झाली अन् आयुष्याला नवी दिशा मिळाली त्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी पाथर्डीच्या इंदिरानगर भागातील जिल्हा परिषदेचे माजी विद्यार्थी एकवटले. पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांना भौतिक सुविधांसह साधे पिण्याचे पाणीही मिळत नसल्याचे कळताच एक, दोन नव्हे तर १२० वर माजी विद्यार्थी सोशल मीडियाद्वारे एका व्यासपीठावर आले. शाळेच्या प्रांगणात कार्यक्रम आयोजित केला. जे येऊ शकले नाहीत त्यांनी मदतीची तयारी दाखवली आणि आता सर्वांच्या साथीने शाळेचे रुपडे पालटणार आहे. शाळेच्या आठवणी जपणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या शाळेची पायरी चढत आम्ही या शाळेचे देणे लागतो हे कृतीतून दाखवून देत समाजात वेगळा संदेश दिला. राज्य शासनाच्या दत्तक शाळा योजनेअंतर्गत माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये कुणी पोलिस विभागात कार्यरत आहेत, कुणी शिक्षक आहेत तर अनेकजण व्यावसायिकही आहेत. या सर्वांनी त्यांच्या परीने मदतीचे तयारी दाखवली. मेळाव्यातच सर्वांनी एकत्र येत ३५ हजारांवर निधी जमवला. व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून सर्वजण आता इतर कामांसाठी निधी जमवणार आहेत. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते इजाज शेख होते. यावेळी मेळाव्यास नवनियुक्त नगरसेवक प्रतीक नांगरे, मनिषा उदमले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अंजना काटकर, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, दिलीप मिसाळ, बजरंग सोळसे, शैलेश ऊगार, दत्तात्रय डिगे, सचिन तरटे उपस्थित होते. मेळाव्याचे आयोजन व प्रास्ताविक मुख्याध्यापिका ज्योती उनबेग यांनी, तर आभार अनुराधा ओतारी यांनी मानले. शाळेसाठी काय करणार विद्यार्थी . शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. त्याची डागडुजी करणार . इमारतीच्या डागडुजीनंतर वर्गखोल्यांची आतून व बाहेरून रंगरंगोटी केली जाणार . शाळेच्या बाहेर व आत सीसीटीव्ही कॅमेरे लावणार . शाळेला डिजीटल करण्यासाठी साहित्य व उपकरणे देण्याची तयारी . शिक्षण विभागाच्या मदतीने अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्धतेसाठीही प्रयत्न करणार
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांच्या कलात्मक, सांस्कृतिक व नैतिक विकासालाही तितकेच महत्त्व आहे. रयत शिक्षण संस्था ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून समाज घडवणारी चळवळ आहे. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून भारतीय संस्कृती, देशभक्ती, परंपरा आणि सामाजिक मूल्यांचे सुंदर दर्शन घडले, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. केडगाव देवी येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री अंबिका प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला ‘स्नेहतरंग’ हा दोन दिवसीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी दर्शन घडवत भारतीय संस्कृतीचा समृद्ध वारसा सादर केला. या सांस्कृतिक सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपट पवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य राजेंद्र मोरे, संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव भोर, ज्ञानदेव पांडुळे आदी उपस्थित होते. दरम्यान, सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भक्तिगीते, भावगीते, महाराष्ट्राची पारंपरिक लावणी, एकांकिका व नाटिका यांचे अत्यंत प्रभावी सादरीकरण केले. बालकलाकारांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराला उपस्थित पालक, नागरिक व मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली. स्नेहसंमेलनात शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. स्नेहसंमेलमनातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी कलागुणांचे सादरीकरण केले. उपस्थित पालकांनी आणि विद्यालयातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख जयश्री भोस व प्रियंका सातपुते यांनी केले. प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ बोडखे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपमुख्याध्यापक सुखदेव मुरूमकर, पर्यवेक्षक अभयकुमार चव्हाण, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूजा गोरे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहसंमेलनात सांस्कृतिक अन् देशभक्तीपर उपक्रम सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भक्तिगीते, भावगीते, महाराष्ट्राची पारंपरिक लावणी, एकांकिका व नाटिका यांचे अत्यंत प्रभावी सादरीकरण केले. बालकलाकारांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या या कलाविष्काराला उपस्थित पालक, नागरिक व मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली.
कोपरगाव पंचायत समिती व तालुका विज्ञान–गणित संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय गणित, विज्ञान व चित्रकला प्रदर्शन के. जे. सोमय्या वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय येथे पार पडले. या प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलने चित्रकला प्रदर्शनात प्रथम तर विज्ञान-गणित प्रदर्शनात द्वितीय क्रमांक पटकावला, अशी माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली. चित्रकला प्रदर्शनात आदर्श मोरे याने सादर केलेल्या सोशल मीडियाचा अतिवापर व त्याचे दुष्परिणाम' या सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रास तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला. तसेच गणित व विज्ञान प्रदर्शनात समर्थ कुशारे याच्या अॅक्सीडेंटल प्रिव्हेन्शन लिफ्ट' या उपकरणाला तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळाला. प्राचार्य शेख यांनी सांगितले, जानेवारी २०२६ मध्ये नागेश्वर विद्यालय जामखेड येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलचे द्वितीय क्रमांक प्राप्त अॅक्सीडेंटल प्रिव्हेन्शन लिफ्ट हे उपकरण सादर करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात गौतम पब्लिक स्कूलकडून एकूण तीन गणित व विज्ञान उपकरणे सादर करण्यात आली होती. पहिली ते पाचवी गटात विद्यार्थी इनामदार आर्यन याने मॅथेमॅटिकल पार्क (गणितीय उद्यान) हे अभिनव उपकरण सादर केले. या संकल्पनेत खेळ, मनोरंजन आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या माध्यमातून मुलांना भूमिती, अंकगणित, मोजमाप, आकार ओळख अशा विविध गणिती संकल्पना सहजरीत्या समजावून देणारे उपकरण सादर केले. ६ वी ते ८ वी गटात विद्यार्थी शेख मोईन याने पॅराबोलिक सोलर कुकर म्हणजेच सौर ऊर्जेवर चालणारी सौरचूल उपकरण सदर केले. पर्यावरणपूरक व ऊर्जा बचतीचा संदेश देणारे हे उपकरण सूर्यप्रकाशाचा उपयोग करून स्वयंपाक कसा करता येतो हे दाखवून दिले. ९ वी ते १२ वी गटात विद्यार्थी कुशारे समर्थ याने अॅक्सीडेंटल प्रिव्हेन्शन लिफ्ट (अपघात नियंत्रण लिफ्ट) हे अत्यंत उपयुक्त व समाजोपयोगी उपकरण सादर केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला दाद याच प्रदर्शनात आयोजित चित्रकला स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या आदर्श मोरे, गौरव सोनवणे, अथर्व उगले, प्रत्यूष गारे, मुजम्मील पठाण व ओमकार वाघ या विद्यार्थ्यांनी आपली कलात्मक चित्रे सादर केली.
पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ.सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासाचा आराखडा तयार केला आहे. त्यात दैनंदिन शहर स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि प्रक्रियेसह शहरात विविध विकासकामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. आठवड्यातून एक दिवस विविध प्रभागातील नगरसेवकांनी एकत्र जमून शहरात स्वच्छता मोहीम राबवावी असा निश्चय आम्ही केला आहे, अशी माहिती नूतन नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांनी दिली. रविवारी सकाळी पालिकेतील गटनेते मुन्नाभाई शाह, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, नगरसेवक डॉ.विजय सदाफळ, सुयोग शेळके, अरूण आग्रे, प्रदीप बनकर, उदय बोठे आदिंसह नगराध्यक्ष डॉ. गाडेकर यांनी शहरात सकाळी स्वच्छता मोहीम राबवली. पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन, शहरातून जाणाऱ्या नगर कोपरगाव राज्यमार्गावरील दुभाजकांची स्वच्छता केली. त्यापूर्वी त्यांनी या कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. या अडचणी सोडवण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष डॉ.गाडेकर म्हणाले, दैनंदिन शहर स्वच्छतेला आम्ही सर्वजण प्राधान्य देणार आहोत. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या अडचणी आम्ही आज जाणून घेतल्या. स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांसह त्यांच्या जवळपास सर्व मागण्या मार्गी लावण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. पालक मंत्री विखे आणि डॉ.सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ राहाता-सुंदर राहाता ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी पावले उचलणार आहोत. माझ्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीची सुरवात आज स्वच्छता मोहीमेत सहभाग घेऊन केली आहे. दैनंदिन शहर स्वच्छता करण्यात काही छोट्या अडचणी आणि समस्या देखील आहेत. त्या मार्गी लावणे हे आम्ही आमचे पहिले कर्तव्य समजतो. रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिग साठणे हे शहराला भुषणावह नाही याची जाणीव आम्हाला आहे. शहरातील निरंतर स्वच्छतेची यंत्रणा मार्गी लागली की सुशोभिकरणाचे शहरवासियांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही पावले टाकणार आहोत. स्वच्छ राहाता-सुंदर राहाता हे घोषवाक्य प्रत्यक्षात आणणार शहरातील जनतेने विक्रमी मतांनी निवडून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहोत. विकासाचा अनुशेष भरून काढताना स्वच्छ राहाता-सुंदर राहाता हे घोषवाक्य प्रत्यक्षात आणणार आहोत, असे नगराध्यक्ष डॉ.स्वाधीन गाडेकर यांनी सांगितले.
आयुष्मान कार्ड असूनही रुग्णाची आर्थिक लूट:शिरूरमधील हॉस्पिटलमधील प्रकार
शासकीय आयुष्यमान भारत योजना तसेच महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असूनही अपघातग्रस्त रुग्णांना मोफत उपचार नाकारून हजारो रुपये आकारण्यात आल्याचा गंभीर प्रकार शिरूर येथे उघडकीस आला. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे व पत्रकार अमोल बोरगे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे लेखी तक्रार केली. तालुक्यातील ढवळगाव येथील येथील सयाजी तबाजी आडगळे व सारिका सयाजी आडगळे यांना १९ डिसेंबर रोजी ट्रॅक्टरने धडक दिल्याने अपघात झाला. यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. आडगळे यांच्या डोक्याला जबर मार लागून १९ टाके घालावे लागले. जखमींना शिरूर येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने दोन्ही रुग्णांचे मिळून सुमारे ७० हजार रुपयांचे बिल आकारले. विशेष म्हणजे, संबंधित कुटुंबाकडे आयुष्यमान भारत कार्ड आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असूनही कार्ड चालत नाही व या कार्डावर उपचार होणार नाहीत असे सांगून मोफत उपचार नाकारले. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून आकारलेली रक्कम परत मिळवून द्यावी, दोषी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी तसेच आवश्यक असल्यास शासकीय मान्यता रद्द करावी, अशी मागणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात येणार आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे, सागर घोलप, संदीप कडेकर, फिरोज सय्यद, अशोक गुळादे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, माजी नगरसेवक दादाभाऊ लोखंडे यांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता बिलात तफावत असल्याचे समोर आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाचे मुख्य प्रशासकांनी पाचर्णे यांना अरेरावी केली. पाचर्णे यांनी औषधांचे वाढवून लावलेले दर, रुग्ण शासकीय योजनेत बसत असल्याचे दाखवून दिल्याने या हॉस्पिटल प्रशासनाला कान धरून उठाबशा काढण्याची व माफी मागण्याची वेळ आली. याबाबत रुग्णालयाचे व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी मुख्य शाखेशी चर्चा करून पुढील काळात औषधांचे दर व डॉक्टरांच्या तपासणी शुल्कात कपात करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
नव्याने नोकरीत रुजू होणारे अधिकारी आणि ग्रामविकासाचा ध्यास घेणारे सामाजिक कार्यकर्त्यांची जडणघडण हिवरेबाजार मुळे होते. हिवरेबाजार हे आपल्यासाठी ग्रामविकासाचे तीर्थक्षेत्र आहे, असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीचे सहअध्यक्ष आनंद भंडारी यांनी केले. आदर्शगाव हिवरेबाजार येथे जलसाक्षरता केंद्र यशदा,पुणे व यशवंत कृषी, ग्राम व पाणलोट विकास संस्था तथा विस्तार प्रशिक्षण केंद्र हिवरे बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील जलप्रेमी,जलदूत व जलकर्मींसाठी आयोजित पायाभूत प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना भंडारी बोलत होते. आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार,यशदाचे महासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जलसाक्षरता केंद्राचे संचालक आनंद पुसावळे, जलनायक रमाकांत कुलकर्णी, सत्र समन्वयक सुखदेव फुलारी व्यासपीठावर उपस्थित होते. भंडारी म्हणाले, जल साक्षरता असो किंवा कोणतीही योजना असेल ती गावातील शेवटच्या घटकापर्यंत पाझरली पाहिजे. तुकड्या तुकड्यात काम करण्यापेक्षा टीम बिल्डिंग करून काम केले तर त्याची परिणामकारकता अधिक असते. हिवरेबाजार प्रमाणे शेवटच्या माणसाला सुद्धा या चळवळीत जोडून घेतले पाहिजे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांमध्ये कुटुंबातील शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहोचता येईल याचे आम्ही नियोजन करत आहोत. जलसाक्षरता,घनकचरा किंवा सांडपाणी व्यवस्थापन वा कोणतीही थीम असू दे, त्यात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. लोकांना सहभागी करून घेण्यात आपण कमी पडत आहोत. पाण्याचा काटकसरीने वापराबाबत बऱ्यापैकी जनजागृती आहे,परंतु तरीही कळते पण वळत नाही अशी परिस्थिती असल्याने पाणी जाईपर्यंत कोणीही नळाची तोटी बंद करत नाही. समाज हा अनुकरणप्रिय आहे, त्यामुळे अगोदर आपण कृती करणे महत्वाचे आहे. वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. स्वतःही वाचले पाहिजे आणि मुलांना वाचनाची सवय लावण्याची गरज आहे. मास्टर ट्रेनर हा साचेबद्ध न राहता त्याला समोरील समुदायाला प्रेरित करता आले पाहिजे असेही भंडारी म्हणाले. पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यात जलसाक्षरतेची खूप चांगली चळवळ सुरू आहे. या चळवळीत आवड असलेले आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याचा ध्यास असणारी माणसं आहेत. स्वातंत्र्याच्या शंभरी कडे जात असतांना पुढील २५ वर्षात जे द्यायचे आहे ते देण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी व आनंद पुसावळे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
परिसरातील अवजड वाहनांच्या पार्किंगने समस्या आणखी वाढली:वाहनचालक व नागरिकांना धुळीचाही त्रास
अहिल्यानगर नव नागापूर औद्योगिक वसाहतीतील नागापूर- निंबळक रस्त्याचे काम सुरू झाले असले तरी या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक टाकण्यासाठी कच्चा माल टाकण्यात आल्यामुळे या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय याच परिसरात मोठ्या संख्येने अवजड वाहने उभे केली जात असल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडते. उद्योजक व कामगारांसाठी निंबळक-नागापूर हा महत्त्वाचा रस्ता मानला जातो. दोन वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम सुरू झाले होते, मात्र ते काम अर्धवट होते. त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. तसेच पथदिवे व दुभाजक नसल्यामुळे सातत्याने अपघात होत होते. उद्योजकांच्या मागणीनंतर या रस्त्याचे नव्याने काम हाती घेण्यात आले आहे. पंधरा दिवसांपूर्वीची रस्त्याचे काम सुरू झाले आहे. काम सुरू होण्यापूर्वी या रस्त्यावर पहिल्या टप्प्यात दुभाजक टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून, ठिकठिकाणी खड्डे पडल्याने उद्योजक व कामगारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याच परिसरात मोठे उद्योग असल्यामुळे हा रस्ता कायम वर्दळीचा असतो. वर्दळीच्या या रस्त्यावरच मोठ-मोठे कंटेनर जातात. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. विशेष करून कारखान्यातून कामगार परतत असताना ही वाहतूक कोंडी होत असते. सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्यामुळे वाहनचालकांना तोंडाला रुमाल बांधून वाहने चालवावी लागत आहेत. शहरात रस्ते चांगले असावेत अशी मागणी असते. मात्र रस्त्यांचे काम हाती घेताना वाहनचालक आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नागापूर ते निंबळक या रस्त्याचे काम आता सुरू करण्यात आले आहे. मात्र रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक टाकण्यासाठी बांधकामासाठीचा कच्चा माल आणून टाकण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहनचालकांना या रस्त्याने वाहने चालवताना त्रास सहन करावा लागत आहे.
सलग सुट्या आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंग गडावर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दोन दिवसांत सुमारे दीड लाखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज ट्रस्टने वर्तविला आहे. ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता भाविकांचा विना अडचण दर्शन व्हावे यासाठी मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. नाताळ सुट्यांमुळे शुक्रवारी सकाळपासूनच गर्दी सुरू झाली होती. घाटातील रस्त्यांचे काम सुरू असल्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने २ जानेवारीपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. घाटात पंधरा दिवसापूर्वी अपघात झाल्यामुळे धोकादायक ठिकाणी पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे. वाढत्या गर्दीसाठी नियोजन करण्यात येत आहे.
वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच या वृक्षांची लागवड नीलेश देसाई | लासलगाव पर्यावरणाचा ऱ्हास वेगाने होत असलेल्या काळात लासलगाव शहरातील युवकांनी दिलेला हिरवाईचा संदेश आज संपूर्ण शहरासाठी आशेचा किरण ठरत आहे. ‘हरित सेना’ या पर्यावरणप्रेमी समूहाच्या माध्यमातून शहरात तब्बल १,५०० वृक्षांची लागवड करण्यात आली असून, या झाडांचे संगोपन चार वर्षांपासून सातत्याने केले जात आहे. केवळ झाडे लावून थांबायचे नाही, तर ती जगवायची, असा निर्धार हरित सेनेने केला असून त्यासाठी दर शनिवारी कामावरून सुट्टी घेऊन संपूर्ण दिवस झाडांना पाणी देण्यासाठी देतात. त्यांच्या या कामाचे फलीत म्हणून शहर हिरवाईने नटू लागले आहे. या लागवडीत वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, गुलमोहर, कदंब, आकाशनीम, ताम्हण, कांचन, बहावा, स्पेथोडिया, खाया, कोरडिया, बेल, करंज, अर्जुन, बकुळ आणि कैलासपती यांसारख्या दीर्घायुषी व पर्यावरणपूरक वृक्षांचा समावेश आहे. भविष्यात या झाडांमुळे शहराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होणार असून, स्वच्छ हवा आणि निसर्गसंपन्न वातावरण निर्माण होणार आहे. हरित सेनेच्या वतीने शहरात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांना लोकसहभागातून जमा झालेल्या रकमेतून संरक्षण जाळी बसविली जाते. ज्या वृक्षांची लागवड केली जातात ती आणतानाच थोडी मोठी आणली जातात. त्यामुळे अनेक वृक्ष जतन करण्यामध्ये हरित सेनेला यश आलेले आहे. शिव नदी परिसरात मोठ्या प्रमाणात त्यांच्या वतीने लागवड करण्यात आलेले वृक्ष आज डेरेदार झाले आहेत.
रिक्षाचालक, इडली विक्रेता, मेकॅनिक नगरसेवक:इगतपुरीत सामान्यांचा विजय; प्रस्थापितांना जोरदार धक्का
इगतपुरी नगरपरिषद निवडणुकीने स्थानिक राजकारणात नवा इतिहास घडवला आहे. मतदारांनी यावेळी प्रस्थापित नेत्यांना बाजूला सारत सामान्य नागरिकांच्या हातात सत्तेची सूत्रे दिली आहेत. नावं, पदं आणि राजकीय परंपरा गौण ठरवत, कामगिरी, थेट संपर्क आणि उपलब्धता यांना मतदारांनी प्राधान्य दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. रेल्वे स्थानकावर चहा विक्री करणारे सतीश मनोहर, रिक्षा चालक सागर आढार आणि कार मेकॅनिक रोहिदास डावखर यांना नगरसेवकपदी निवडून देत मतदारांनी सामान्य माणसावरचा विश्वास अधोरेखित केला आहे. या विजयामुळे संपूर्ण इगतपुरी तालुक्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर, शुभांगी दळवी यांच्यासह अपर्णा धात्रक, संपत डावखर, नईम खान, रत्नाबाई जाधव आणि राजेंद्र पंचारे यांसारख्या अनुभवी आणि मातब्बर नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अनेक वर्षांपासून नगरपरिषदेच्या राजकारणावर पकड असलेल्या नेत्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी विजय ठरला तो पोलिस दलातील नोकरी सोडून राजकारणात उतरलेल्या मंगेश शिरोळे यांचा. त्यांनी माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून मंगेश शिरोळे यांची थेट उपनगराध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे. या निकालातून मतदारांचा बदलता कौल स्पष्टपणे दिसून येतो. चेहऱ्यांपेक्षा कामाला आणि आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष सहभागाला मतदारांनी महत्त्व दिले आहे. आता चेहरा नाही, तर काम पाहणार हा संदेश इगतपुरीकरांनी या निवडणुकीतून दिल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. इगतपुरी नगरपरिषदेच्या या निकालाने स्थानिक राजकारणाची दिशा बदलली असून, नव्या चेहऱ्यांकडून विकास, पारदर्शकता कारभाराच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. गृहिणीं राजकारणात नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या शिवसेनेच्या शालिनी संजय खातळे या गृहिणी आहेत. शांत आणि संयमी असलेल्या खातळे यांच्यासोबत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या टीममध्येही विकत वसीम सय्यद, भारती मंगेश शिरोळे, आशा थोरात, वैशाली सतीश कर्पे, आशा प्रशांत भडांगे, माला गवळे, नाझनीन खान, अंजुम कुरेशी, ललिता लोहरे या सर्व ९ महिला गृहिणी आहेत. तर मयुरी राहुल पुरोहित या शिक्षिका आहेत. भाजपकडून निवडून आलेल्या वंदना सुनील रोकडे यादेखील गृहिणी आहेत.
येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. शासकीय हमीभावाने सोयाबीन खरेदीस शुक्रवारी (दि. २६) बाजार समितीचे सभापती नितीन आहेर, उपसभापती पंढरीनाथ खताळ, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. केंद्र शासनाने सन २०२५-२६ साठी सोयाबीन शेतीमालास प्रति क्विंटल ५३२८ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. या दराने सोयाबिन खरेदीसाठी यावर्षी प्रथमच बाजार समित्यांना हमीभाव खरेदी केंद्र मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शेतकरी हितासाठी चांदवड बाजार समितीने त्यात सहभाग घेतला. त्यानुसार शुक्रवारपासून सोयाबिन खरेदीस प्रारंभ करण्यात आला. शासनाच्या निर्देशाप्रमाणे बाजार समितीत सोयाबीन शेतीमाल विक्रीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु असून आतापर्यंत २५३ शेतकर्यांनी नोंदणी केली आहे व नोंदणीप्रक्रिया सुरु आहे. सोयाबीन खरेदीसाठी एनसीसीएफमार्फत योगेश सावकार यांची ग्रेडर म्हणून नियुक्ती केलेली असून शुभारंभाप्रसंगी संबंधित ग्रेडर यांनी शेतीमालाचा दर्जा तपासणी केल्यानंतर सोयाबिन खरेदीस सुरुवात करण्यात आली. यावेळी सोयाबिन विक्रेत्या शेतकर्यांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. शेतकरी बांधवांनी ५३२८ हमीभाव दराने सोयाबीन विक्री करण्यासाठी बाजार समितीशी संपर्क करुन आवश्यक दस्तऐवजांची पुर्तता करुन नोंदणी करुन घ्यावी, तसेच माल विक्रीसाठी एसएमएस आल्यानंतर सोयाबीन स्वच्छ व प्रतवारी करुन केंद्रावर विक्रीसाठी आणावे, असे आवाहन सभापती नितीन आहेर व संचालक मंडळाने केले आहे.
चांदवड येथील वनपरिक्षेत्र कार्यालय व एआरइएएस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह येथे मानव-बिबट सहजीवन व शून्य सर्पदंश जनजागृती अभियान राबविण्यात आले. नाशिक पूर्व वन विभागाचे उपवनसंरक्षक राकेश सेपट, सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सहाने, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. वनपाल सुनील खंदारे यांनी बिबट्याच्या नैसर्गिक वावरामागील कारणे, त्याचे निवासस्थान, हालचालीचे मार्ग व मानव- बिबट संघर्ष वाढण्याची सुशांत रणशूर यांनी विविध जातीच्या सर्पाची शास्त्रीय ओळख करून दिली. त्यांनी विषारी व बिनविषारी सर्प यामधील फरक, त्यांचे वर्णन तसेच सर्पदंश झाल्यास घ्यावयाची योग्य पावले याबाबत प्रात्यक्षिक सादर केले. यात सर्पदशानंतर घ्यावयाची तातडीची खबरदारी, चुकीच्या उपचार पद्धतीचे दुष्परिणाम आणि रुग्णालयापर्यंत सुरक्षितपणे पोहोचविण्याची प्रक्रिया त्यांनी समजावून सांगितली. यासह बिबट्या दिसल्यास काय करावे, याविषी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कारणे, मानव-बिबट सहजीवन, बिबट्या दिसल्यास घ्यावयाची काळजी व करावयाच्या उपायोजना तसेच अन्नसाखळीचे महत्त्व याबाबत सविस्तर शास्त्रीय माहिती दिली. तसेच ए.आर.इ.ए.एस. फाउंडेशनचे यावेळी वनरक्षक सुरेखा मरशीवणे, वनसेवक भरत वाघ, अशोक शिंदे, राहुल नाईक, श्रीकांत उपस्थित होते.
तळणी मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद प्रशालेत सहशालेय उपक्रमांतर्गत आयोजित बाल आनंद मेळावा उत्साहात आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. हायस्कूलमध्ये ९१ विविध विविध दुकाने लावण्यात येऊन विद्यार्थ्यांनी ४५ हजारांची उलाढाल केली. मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भाकरवडी, विदर्भ पातळी, रोटी, मोसंबी, पोंगे, कळण्याची भाकरी, धिरडे, बाजरी भाकर, ठेसा, भेळ, मसाला पापड-मुगवडे, मठ्ठा, गुलाबजाबून, चहा, कटलेट, आप्पे, इडली डोसा, पाणीपुरी यांसह उपवासाचे पदार्थ ठेवण्यात आले होते. विविध चविष्ट पदार्थांचे ९१ स्टॉल उभारले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पदार्थांना ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात सुमारे ४० ते ४५ हजार रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती मुख्याध्यापक बी. के. मुंडकर यांनी दिली. कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग जनकवार, ज्ञानेश्वर सरकटे, नितीन सरकटे, ज्ञानेश्वर सरकटे, सुधाकर सरकटे, सुनील लाड, योगेश जोशी, शिवाजी भावसार, दारासिंग चंदेल, किशोर हाणवते आदींची उपस्थिती होती. सदस्यांच्या हस्ते फीत कापून बाल आनंद मेळ्याचे उद्घाटन करण्यात आले. या मेळाव्यास गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, तरुण मंडळी व शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि पदार्थांचा आस्वाद घेतला. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. बी. मुंडकर, डी. एम. ढाकरे, बी. एन. पंदे, एन. बी. पंडागळे, पी. ए. डोईफोडे, ओ. आर. शर्मा, जी. एन. गवई, आर. एल. तापडिया, जी. ए. धातरकार आदींनी विशेष परिश्रम घेतले. जी. एन. गवई यांनी आभार मानले. मंठा तालुक्यातील तळणी येथे बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवर. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देणे गरजेचे याप्रसंगी अध्यक्ष जनकवार यांनी बोलताना सांगितले की, शालेय शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान देणे सध्या गरजेचे आहे. सोशल मीडियाचा होत असलेला अतिवापर यामुळे व्यावहारिक ज्ञानाकडे दुर्लक्ष होत आहे. अशा बाल आनंद मेळाव्यातूनच विद्यार्थ्यांना व्यावहारिक आनंदाची गोडी लागेल. यासाठी शाळा व विद्यार्थी यांच्यात व्यावहारिक ज्ञानासाठीचा समन्वय असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात येत्या २० जानेवारीपासून पोलिस भरतीची मैदानी चाचणी सुरू होत असून भोकरदन शहरातील शेकडो तरुण-तरुणी क्रीडा संकुल मैदानावर कसून सराव करत आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या मैदानाची अवस्था अत्यंत बिकट असून त्याचा फटका सराव करणाऱ्या युवकांना बसत होता. ही बाब लक्षात घेत नवनिर्वाचित नगरसेवक दीपक पाटील मोरे व राजू पाटील सहाणे यांनी स्वतः मैदानात उतरून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. यामुळे भरतीचा सराव करणारे युवक व त्यांच्या पालकांनी या कार्याचे कौतुक होत आहे. भोकरदन येथील तालुका क्रीडा संकुल मैदानावर गेल्या अनेक वर्षांपासून देखभालीचा अभाव होता. धावपट्टीवर जागोजागी खड्डे पडले होते, ठिकठिकाणी दगड-धोंडे असल्याने सराव करताना मुला-मुलींना दुखापत होऊ लागली. मैदानाची अक्षरश: चाळण झाल्याने सराव करायचा कसा? असा प्रश्न युवकांसमोर उभा राहिला होता. यातच पोलिस भरती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता. ही अडचण समजताच नगरसेवक दीपक पाटील मोरे व राजू पाटील सहाणे यांनी शनिवारी सायंकाळी प्रत्यक्ष मैदानाला भेट देऊन पाहणी केली. केवळ पाहणी करून न थांबता त्यांनी मुलांच्या अडचणी समजून घेत मैदानाची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. दिलेल्या शब्दाप्रमाणे तातडीने आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करत मैदानाचे सपाटीकरण सुरू केले. तसेच अडथळे दूर करण्याचे कामही लवकरच हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे पोलिस भरतीसाठी सराव करणाऱ्या शेकडो मुला-मुलींना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिस भरतीच्या ऐन तोंडावर लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या या तत्परतेबद्दल युवकांनी समाधान व्यक्त केले. कृतज्ञता व सत्कार आपल्या समस्यांची दखल घेऊन प्रत्यक्ष धावून आलेल्या दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांचे मुला-मुलींनी आभार मानले तर मैदानावर सराव करणाऱ्या उमेदवारांच्या वतीने दीपक पाटील मोरे व राजू पाटील सहाणे यांचा सत्कार करण्यात आला. निर्णय समाधानकारक नगरसेवक मोरे व सहाणे यांनी स्वतः मैदानावर येऊन आमची अडचण जाणून घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. याबद्दल त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया युवक अमोल जाधव याने दिली आहे. जास्तीत-जास्त तरुण पोलिस दलात भरती व्हावेत पोलीस भरतीची तयारी करणारी ही मुले-मुली शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील असून अहोरात्र मेहनत करून खाकी वर्दीचे स्वप्न पाहत आहेत. मात्र, मैदानाची दुरवस्था झाल्यामुळे त्यांच्या सरावात अडथळे येत होते, शारीरिक दुखापत होण्याची भिती होती. त्यामुळे आम्ही तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. केवळ आश्वासन नाही, तर दर्जेदार मैदान उपलब्ध करून देणे हे कर्तव्य आहे. भोकरदनमधील जास्तीत-जास्त तरुण पोलीस दलात भरती होऊन शहराचे नाव उज्वल करतील, त्यांच्या स्वप्नांच्या आड कोणतीही अडचण येऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे. -दीपक मोरे, नगरसेवक
वैजापूर तालुक्यातील माळीसागज परिसरातील शेतकरी गेल्या पाच दिवसांपासून बिबट्याच्या दहशतीत आहेत. यातच रविवारी (दि. २८) दुपारी बिबट्याने माळीसागज येथील डरे वस्तीवरील २६ वर्षीय शेतकरी प्रथमेश अशोक डरे यांच्यावर हल्ला केला, पण डरे यांनी मोठ्या हिमतीने बिबट्यावर खोऱ्याने प्रतिकार करत त्याला पळवून लावल्याने मोठी दुर्घटना टळली. माळीसागज येथील प्रथमेश डरे रविवारी नेहमीप्रमाणे शेतातील हरभरा पिकाला पाणी देत होते. दुपारी शेजारील मक्याच्या शेतातून बिबट्याने बाहेर येत प्रथमेश यांच्यावर हल्ला केला. यावेळी डरे यांनी खोऱ्याने बिबट्यावर मारा केला. त्याच वेळी शेजारी शेतात काम करत असलेले त्यांचे आई- वडील व शेजारील शेतकरी मदतीला धावून आल्याने बिबट्या पळून गेला. या हल्ल्यात शेतकरी प्रथमेश यांच्या पोटाला व डोळ्याला बिबट्याने पंजा मारल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. वनरक्षक ए. एन. सय्यद यांनी सोमवारी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावणार अशी माहिती दिली. २०२५ वर्षात बिबट्याने वैजापूर तालुक्यात नागरिकांवर हल्ला केल्याची ही घटना तिसरी आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात वळण येथे शेतवस्तीवर खेळत असलेल्या एका तीन वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. यात तिचा मृत्यू झाला होता. यानंतर पुन्हा काही दिवसांतच जिरी या गावातील एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता. यात तिचाही मृत्यू झाला होता. बुधवारी (दि.२४) रात्री टाकळी सागज येथील वाडेकर वस्ती येथील शेतकरी नानासाहेब पवार यांच्या वस्तीवरील गोठ्यात बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला करून गंभीर फडसा पाडला होता. त्यावेळी वन विभागाने हा बिबट्या नसून तरस असल्याचे सांगून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना वन कर्मचऱ्यांनी दिल्या होत्या. वैजापूर तालुक्यातील माळीसागज, टाकळी सागज, भरतवाडी या पारिसरात बिबट्याने गेल्या आठ दिवसांपासून दहशत माजवली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. शेतातील कामे करणे अवघड झाले आहे, तर शेत वस्तीवरील विद्यार्थी शाळेत जाण्यास भीत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. तिसरा हल्ला, दोघींचा झाला मृत्यू राजू डरे म्हणाले, मी व माझा मुलगा आमच्या शेतात १०० फुटांच्या अंतरावर असलेल्या कांद्याच्या पिकाला पाणी भरत असताना बिबट्याने रविवारी आमच्या पुतण्यावर हल्ला केल्याचे आम्ही बघितले. क्षणाचाही विलंब न करता त्याच्या मदतीला धावून गेलो, आरडाओरडा केला. आम्हाला बघून बिबट्या शेजारी असलेल्या मक्याच्या पिकात पळून गेला.
मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध पंचायतराज अभियानातून हळदा ग्रामपंचायतीने विकासाची नवी दिशा घेतली आहे. जिल्हा परिषद शाळेत अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब उभारण्यात आली आहे. या लॅबमध्ये संगणक, इंटरनेटसह डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होणार आहे. शालेय अभ्यासासोबतच संगणक ज्ञान, डिजिटल कौशल्ये आणि स्पर्धात्मक जगासाठी लागणारी तांत्रिक तयारीही करता येणार आहे. शाळेच्या सुरक्षिततेसाठी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरावर सतत नजर राहणार आहे. विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सुरक्षिततेत वाढ झाली आहे. पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे. ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मुख्य चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी कॅमेरे लावले गेले आहेत. त्यामुळे चोरी, अनुचित प्रकार आणि समाजविघातक घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. गावात सुरक्षिततेची भावना वाढली आहे. या सर्व उपक्रमांमुळे हळदा गाव स्वच्छ, सुरक्षित आणि तंत्रज्ञानस्नेही बनत आहे. शिक्षण, सुरक्षितता आणि तंत्रज्ञान या तिन्ही बाबींना ग्रापमंचायतीने प्राधान्य दिले आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गुलाबी थंडीने जोर धरला असला तरी दरवर्षी जायकवाडी धरण परिसरात हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या विदेशी पाहुण्या पक्षी अद्याप आले नाहीत. बदलते हवामान, अधिकचे पर्जन्यमान आणि धरणातील खाद्यपदार्थ केमिकलयुक्त सोडलेले पाणी यामुळे यंदा विदेशी पक्ष्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे चित्र आहे. यात काही स्थानिक पक्षी आहेत, मात्र त्याची संख्यादेखील कमी आहे असे पक्षिमित्र प्रा.संतोष गव्हाणे यांनी सांगितले. नोव्हेंबर महिन्यात जायकवाडी परिसरात दाखल होणारे स्थलांतरित पक्षी यंदा तुरळक दाखल झाले आहेत. तब्बल २१ हजार चौ. किमी परिसर असलेल्या जायकवाडी पाणथळ क्षेत्रात पक्ष्यांसाठी मुबलक अन्नसाठा उपलब्ध असतो. मात्र यंदा अतिवृष्टी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. परिणामी दलदलीच्या भागात पक्ष्यांसाठी आवश्यक खाद्य कमी प्रमाणात उपलब्ध आहे. हे पक्षी दाखल, मात्र संख्या कमी : जायकवाडी पलगसै तलवार बदक, भुवई बदक, कुकरी गरुड, रंगीत करकोचे, तरांग बदक, चक्रवाक बदक, चक्रांग बदक, रोहित, पानघार, माळ भिंगरी, कुरवं, शिरवा सूरय आणि पिनटेल या पक्ष्यांचे आगमन झाले आहे. मात्र दरवर्षी लाखोंच्या संख्येने येणारे हे पाहुणे यंदा तुलनेने कमी संख्येत दिसून येत आहेत. प्रचंड थंडी तरीही पक्षी नाही यंदा प्रचंड थंडी असतानादेखील स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन झालेले नाही. हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेले हे पक्षी थंडी असेपर्यंत जायकवाडी परिसरात मुक्काम करतात,मात्र यंदा थंडी असूनदेखील पक्षी संख्येत वाढ झाली नाही किंवा अधिक प्रमाणात आले नाहीत. {प्रा. संतोष गव्हाणे, पक्षिमित्र जायकवाडी पक्षी अभयारण्यामधे सध्या स्थानिक, स्थलांतरित पक्षी आढळत असून विदेशातून येणारे फ्लेमिंगो (रोहित) आलेले नाहीत, तर स्पूनबिल (चमचा), पेंटेड स्टॉर्क (रंगीत करकोचा), नॉर्दर्न शोव्हेलर, हे कमी प्रमाणात आलेले आहेत. नोव्हेंबर ते मार्च या काळात या ठिकाणी मोट्या प्रमाणावर पक्षी आढळत असत मात्र या वर्षी हे प्रमाण खूप कमी झाले आहे, यास बदललेले हवामान प्रमुख कारण आहे, अशी माहिती पैठण येथील पक्षिमित्र प्रा. संतोष गव्हाणे यांनी दिली आहे. गतवर्षी फ्लेमिंगो येथे मोठ्या प्रमाणात आले होते.
काद्राबाद येथे ७ व ८ जानेवारी रोजी तब्लिगी इज्तेमा होणार आहे. गारखेडा, मुकुंदवाडी, चिकलठाणा, लाडसावंगी, करमाड, पिंप्रीराजा, आडूळ या भागातील मुस्लिम समाजासाठी हा इज्तेमा आयोजित करण्यात आला आहे. ७ जानेवारीला इज्तेमाची सुरुवात होईल. ८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता दुआने सांगता होणार आहे. दोनदिवसीय इज्तेमासाठी १२ डिसेंबरपासून तयारी सुरू आहे. एक लाख स्क्वेअर फुटाचा मंडप उभारण्यात येत आहे. यामध्ये पन्नास हजार भाविक बसू शकतील. सात हजार स्क्वेअर फुटाची तात्पुरती मशीद उभारण्यात येत आहे. २० ते ३० एकर क्षेत्रात वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे. ४०० वजुखाने, १०० शौचालये तयार करण्यात आली आहेत. तीन विहिरींमधून पाणीपुरवठा केला जात आहे. चार जनरेटर आणि नवीन विद्युत मीटरद्वारे वीजपुरवठा केला जाणार आहे. भाविकांना अल्पदरात जेवण मिळावे यासाठी दोन जेवणाचे झोन तयार करण्यात आले आहेत. पन्नास हॉटेल्स आणि इतर दुकानांचे नियोजन झाले आहे. गारखेडा, मुकुंदवाडी, चिकलठाणा, पिंप्रीराजा, आडूळ, काद्राबाद परिसरातील पाचशेहून अधिक स्वयंसेवक रात्रंदिवस काम करत आहेत. या इज्तेमातून २५ ते ३० जमाती ४० दिवसांच्या दौऱ्यावर निघणार आहेत. अनेक विवाहही यामध्ये ठरणार आहेत. दररोज पाचशेहून अधिक स्वयंसेवक श्रमदान करत आहेत. अनेक अन्नदाते अन्नधान्य व आर्थिक मदत करत आहेत. जागा सपाट करण्यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर मोफत चालवले जात आहेत. हिंदू बांधवांनी दिली जागा ः ज्या ठिकाणी इज्तेमा होत आहे ती जागा हिंदू समाजबांधवांची आहे. त्यांनी ही जागा आणि विहिरी मोफत दिल्या आहेत. राजकारणी हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करत असताना सामान्य नागरिक मात्र एकतेचा संदेश देत आहेत. चिकलठाणा, मुकुंदवाडी, गारखेडा, हुसेन कॉलनी, भारतनगर, करमाड, पिंप्रीराजा, गाढेजळगाव, लाडसावंगी, बनगाव, शेकटा, कचनेर, लायगाव, शेंद्रा, ढवळापुरी, आडूळसह दीडशेहून अधिक गावांतील भाविक या इज्तेमात सहभागी होणार आहेत.
विहामांडव्यातील स्वप्निल साळुंखे यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड
कष्ट, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही मोठे यश मिळवू शकतो, हे विहामांडवा येथील स्वप्नील संजय साळुंखे यांनी सिद्ध केले. त्यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली आहे. त्यांची नियुक्ती नांदेड परीक्षेत्रात करण्यात आली आहे. या यशामुळे विहामांडवा गावात आणि परिसरात आनंदाचे वातावरण आहे. स्वप्नील हे सेवानिवृत्त ग्रामपंचायत अधिकारी संजय साळुंखे यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा (विहामांडवा) येथे पूर्ण केले. मर्यादित शैक्षणिक सुविधा, आर्थिक अडचणी आणि स्पर्धा परीक्षांची तीव्र स्पर्धा असूनही त्यांनी हार मानली नाही. सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध दिनक्रम आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती यामुळे त्यांना हे यश मिळाले. निवडीची बातमी समजताच गावात आनंदोत्सव साजरा झाला. फटाके फोडण्यात आले. पेढे वाटण्यात आले. ग्रामस्थांनी शाल, श्रीफळ देऊन स्वप्नील यांचे स्वागत केले. शिक्षक, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. आई-वडिलांचा पाठिंबा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन त्यांच्या यशामागे महत्त्वाचे ठरले. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी ध्येय निश्चित ठेवून प्रामाणिक प्रयत्न केले, तर यश नक्की मिळते,” असा संदेश स्वप्नील साळुंखे यांनी तरुणांना दिला. त्यांच्या यशामुळे विहामांडवा व परिसरातील युवकांना नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली आहे.
डीएमआयसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची महादेव मंदिर परिसरामध्ये २८ डिसेंबर रोजी बैठक झाली. डीएमआयसी प्रकल्पासाठी जमीन संपादित करून बारा वर्षे पूर्ण होत आहेत तरीही आजपर्यंत डीएमआयसी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या प्रलंबितच आहे. विशेष म्हणजे या कामामध्ये अधिकारी वर्गाची उदासीनता असल्याने प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी २ जानेवारीपासून आंदोलन करण्याचे ठरवले आहे. २ जानेवारी रोजी डीएमआयसी प्रकल्प कार्यालयास कुलूप ठोकणार असून डीएमआयसी प्रशासनाच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे प्रकल्पग्रस्तांची बैठक चालू असताना आमदार विलास बापू भुमरे यांनीही या बैठकीस आपली उपस्थिती लावली व शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे खासदार संदिपान भुमरे यांनी विशेष लक्ष देऊन काही प्रश्न उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून सोडवले. मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणाने ती प्रलंबित आहे, अशा अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे असे आमदार विलास भुमरे यांनी याप्रसंगी सांगितले. आपण प्रकल्पग्रस्तांचे पूर्ण प्रश्न मार्गी लागेपर्यंत प्रकल्पग्रस्तांसोबतच आहोत, असेही त्यांनी सांगितले. बिडकीनचे सहायक पोलिस निरीक्षक यांना आंदोलनाबाबतचे निवेदन देतानाही त्यांनी आपली उपस्थिती नोंदवली. विशेष म्हणजे सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होते. मंत्र्यांनी सांगूनसुद्धा कामे केली नाहीत शेतकऱ्यांनी व खासदार संदिपान भुमरे यांनी डीएमआयसी प्रशासन व उद्योगमंत्री सामंत यांच्या भेटी घेतल्या होत्या. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरला झालेल्या बैठकीत एका महिन्यात सर्व प्रश्न मार्गी लागतील, असे जाहीर सभेत सांगितले होते. मंत्र्यांनी सांगूनसुद्धा अधिकारी वर्गाने शेतकऱ्यांची कामे केली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेले DMIC प्रकल्पग्रस्त शेतकरी, बेरोजगार युवक व नागरिक दोन जानेवारीपासून तीव्र आंदोलन छेडणार आहेत. याबाबत सर्वांनीच आपण शांततेमध्ये भूसंपादन प्रक्रिया पार पाडली त्याचा गैरफायदा प्रशासन घेत असून सद्य परिस्थितीत आंदोलन छेडणे हाच त्यावर उपाय असेल असे सांगितले व सर्वांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला. सरपंच अशोक धर्मे, मनोज पेरे, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण, काकासाहेब टेके, उपसरपंच किरण गुजर, ॲड. संचित पातूनकर, मधुकर सोकटकर, प्रवीण चव्हाण, अमोल कोथिंबिरे, शिवाजी गव्हाणे, बाबुराव आगाज, अंकुश धर्मे, राजू कोथिंबिरे, सागर फरताळे व शेतकरी उपस्थित होते. या आहे प्रलंबित मागण्या डीएमआयसी भूसंपादन करताना प्रकल्प शेतकऱ्यांना विकसित करून प्लॉट जमिनीच्या भावातच दिले जातील असे ठरले असताना डीएमआयसी प्रशासन आता प्लॉट देताना झाडे, विहीर,रस्ता याचे पैसे लावत आहे ते लावू नका व प्लॉट जमिनीच्या भावातच द्या, कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना प्राधान्याने काम द्यावे, फळझाडे, पोटखराब जमीन, विहीर, रस्त्यामध्ये गेलेल्या जमिनीचे पैसे द्यावे, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुनर्वसन धोरण लागू करावे, डीएमआयसी प्रकल्पामधील कंपन्यांमध्ये स्थानिक बेरोजगारांना प्राधान्याने काम द्यावे, भूसंपादन प्रमाणपत्र देण्यात यावे.
प्रतिनिधी | करमाड दुधड येथे ३ कोटी ३७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी आमदार अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी या भागाचे माजी आमदार व सध्या राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सुरू केलेल्या विकासकामांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. या भागातील एकही गाव शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला. चव्हाण म्हणाल्या, दुधड हे गाव इतरांसाठी आदर्श ठरावे. गावाच्या विकासासाठी गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून लोकसहभागातून कामे व्हावीत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करावेत. बागडे यांनी सुरू केलेल्या विकासकामांची काटेकोर अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी लहुकी नदीवरील संरक्षक भिंत व घाट बांधकाम, बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत इमारत, आर. आर. आबा स्मार्ट ग्राम बक्षिसातून गट क्रमांक १६८ मध्ये पेव्हर ब्लॉक व भूमिगत गटार, तलाठी भवन, वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेतून सिमेंट रस्ता व लाइट, ग्रामनिधीतून सेफ्टी टँक, चर्चेसाठी संरक्षण भिंत, व्यायामशाळेचे साहित्य अशा विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला दामुअण्णा नवपुते, सजनराव मते, भावराव मुळे, अप्पासाहेब शेळके, सजन बागल, संजयसिंग गोलवाल, विठ्ठल सादरे, अर्जुन गाडेकर, जनार्दन ठोंबरे, अशोक पवार, प्रकाश चांगुलपाये, ऋषी नरवडे, शिवाजी मते, राजू काळे, शेषराव दौंड, राजेश मते, बाबासाहेब घावटे, त्रिंबकसिंग सुलाने, सरपंच गंगासागर चौधरी, उपसरपंच बळीराम बोर्डे, ग्रामसेवक संतोष मरमट, प्रभाकर काकडे, मधुकर बोर्डे, सुदाम घोडके, सुरेश घोडके उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक व आकाराने मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या पिशोर येथील ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची अवस्था दयनीय झाली आहे. पोलिस ठाण्याच्या आवारातील निजामकालीन कौलारू व लोखंडी पत्र्यांचे सरकारी निवासस्थान (क्वार्टर्स) पूर्णपणे जीर्ण झाले आहे. गळती, भगदाडे व असुरक्षित संरचनेमुळे पोलिसांना अक्षरशः जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. पिशोर पोलिस ठाण्यात मंजूर असलेल्या २८ कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने (क्वार्टर्स) असले तरी त्याची अवस्था दयनीय असल्याने सध्या केवळ ५ ते ६ कर्मचारीच ठाण्याच्या परिसरात वास्तव्यास आहेत. उर्वरित २२ ते २३ कर्मचारी गावात व आजूबाजूच्या परिसरात भाड्याच्या घरांमध्ये राहत आहेत. त्यामुळे रात्री-अपरात्री एखादी गंभीर घटना घडल्यास पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास अर्धा ते एक तासाचा विलंब होत असून याचा थेट परिणाम कायदा-सुव्यवस्थेवर होत आहे. पावसाळ्यात निवासस्थानामध्ये (क्वार्टर्स) थेट पाणी शिरते, तर हिवाळ्यात कौलारू व लोखंडी पत्र्यांतील भगदाडांमुळे कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतो. कुटुंबासह राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून कोणत्याही क्षणी अपघात किंवा जीवितहानी होण्याची भीती नाकारता येत नाही. पिशोर हे कन्नड तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव असून तालुका स्तरावरील महत्त्वाचे केंद्रबिंदू आहे. पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिशोर, वासडी, चिंचोली, नाचनवेल, करंजखेड व नागापूर अशा सहा बीट्सअंतर्गत एकूण ९२ गावे, खेडी व वस्त्यांचा समावेश आहे. तब्बल ३० किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या हद्दीत गौताळा अभयारण्याचा डोंगराळ भागही येतो. एवढ्या मोठ्या व संवेदनशील हद्दीचा कारभार अवघे २८ कर्मचारी सांभाळत आहेत. इतक्या मोठ्या हद्दीचा कारभार पाहणाऱ्या पिशोर पोलिस ठाण्यातील पोलिसांच्या निवासाचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास पोलिसांच्या कार्यक्षमतेवर व नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून नवीन व सुरक्षित पोलिस वसाहत उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ठाण्याचा कारभारही निजामकालीन वास्तूतूनच चालत आहे. संबंधित विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार सुरू सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून संबंधित विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार करून नवीन पोलिस निवासाची (क्वार्टर्स) मागणी करण्यात येत आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
अंधानेर ग्रामपंचायतीचा अन्य गावांनी आदर्श घ्यावा:आ. संजना जाधव यांचे प्रतिपादन, कुंडी वाटप
अंधानेर ग्रामपंचायतीने राज्य सरकारचा पर्यावरण पूरक गावाचा दहा लाख रुपयांचा पुरस्कार मिळवला. या यशस्वी वाटचालीचा आदर्श इतर गावांनी घ्यावा, असे आवाहन आमदार संजना जाधव यांनी केले. गावात प्रत्येक कुटुंबाला कचरा कुंडी वाटप करण्यात आले. गावातील नऊ अंगणवाड्यांतील मुलांना बसण्यासाठी खुर्च्या देण्यात आल्या. या उपक्रमांतून आदर्श ग्रामपंचायत उभारण्याचा प्रयत्न झाला. या कार्यक्रमात आमदार संजना जाधव प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, अंधानेरने कोरोनानंतर पाच हजार झाडे लावली. ती झाडे जगवून ऑक्सिजन हब उभा केला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात पुरस्कार मिळवला. गावात एकी, शिस्त आणि जिद्द यांचा संगम आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अशोक दाबके यांनी केले. यावेळी उपसरपंच रिजवाना शेख, सदस्य कैलास मालकर, संदीप गायकवाड, मनोज बागले, सतीश काळे, अर्जुन करवंदे, बाळू वाघ, अहमद पठाण, कमलबाई दाबके, माधुरी करवंदे, मंगलबाई राहणे, अंकुश सोनवणे, प्रा. राजेंद्र शेवडे उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी माणिकराव पगारे यांनी केले. आभार उपसरपंच रिजवाना शेख यांनी मानले.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेसेना यांच्यातील जागावाटपाचा तिढा अधिक गडद होत चालला आहे. दोन्ही पक्ष युती करण्यास तयार असले तरी ‘मोठा भाऊ कोण?’ या मुद्द्यावर एकमत होत नसल्याने निर्णय रखडलेला आहे. असे असतानाच मात्र शहरात हिंदुबहुल असलेल्या ८८ जागांवर उमेदवार द्यायचे हे निश्चित झाले आहे. एवढेच नव्हे तर ४१: ४७ असा फॉर्म्युलादेखील ठरला आहे, परंतु तो कुणी स्वीकारायचा यावर अद्याप एकमत झालेले नाही. भाजप राज्यभरात नगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाच्या जोरावर मोठ्या भावाची भूमिका घेत आहे, तर शिवसेना स्थानिक पातळीवरील वर्चस्व, आमदारांची संख्या आणि शहरावरील पकड दाखवत माघार घेण्यास नकार देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे रविवारी (२८ डिसेंबर) दुपारी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांना फोन करून मंत्री अतुल सावे यांच्याशी बोलून युतीचा तिढा सोडवा असे सांगितले. मात्र अतुल सावे यांनी दिवसभरात सकाळी ११, संध्याकाळी ६ आणि रात्री ९ अशा बैठकीच्या तीन वेळा दिल्या, मात्र बैठकच घेतली नसल्याचे शिवसेनेतील सूत्रांचे म्हणणे आहे. रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू दोन्ही पक्षांमध्ये रात्री उशिरापर्यंत खलबते सुरू होती. आपल्या पदरी जास्तीत जास्त जागा वाढवून घेण्यासाठी नेते चर्चा करीत होते. शिवसेनेने प्रस्थापित नगरसेवक आणि आमदारांच्या मुलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा होती. दरम्यान, रात्री बारा वाजेच्या सुमारास सोशल मीडियावर युती तुटल्याची अफवा पसरल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या वृत्ताला कुठलाही दुजोरा दिला नाही. २०१० : शिवसेनेची सरशीच निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढले होते. शिवसेनेला सुमारे ३० जागा मिळाल्या, तर भाजपला १५ जागांवर समाधान मानावे लागले. २०१५ : भाजपचा स्ट्राइक रेट जास्त शिवसेनेला २८ जागा मिळाल्या, तर भाजपने ३३ जागा लढवून त्यातील २२ जागा जिंकल्या. याच टप्प्यावर भाजपने शहरात आपली ताकद वाढवायला सुरुवात केली. राजकीय गणित कुठे अडले? हिंदुबहुल ८८ जागा लढवण्याचे ठरले आहे. यात ४१ जागा शिवसेना तर ४७ जागा भाजपने लढवण्यास काही अंशी शिवसेना सहमत आहे. मात्र शिवसेनेने कमी जागा घ्याव्यात यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे भाजपचे लोक खासगीत सांगताना शिंदेसेना ४१ सीटांची ऑफर देत असल्याचे सांगत आहे. भाजप नगरपालिका निवडणुकांतील यश दाखवून ‘आता आम्ही मोठा भाऊ’ असल्याचा दावा करत आहे. शिवसेनेतील फूट, आमदार-खासदारांची अदलाबदल, राज्यात होणाऱ्या २९ मनपांपैकी विदर्भातील बहुतांश जागा या भाजपकडे येतील. पश्चिम महाराष्ट्रात भाजप, राष्ट्रवादीची स्थिती तशी चांगली आहे. त्यामुळे संभाजीनगरात मोठा भाऊ होण्याची संधी आत्ताच आहे हे भाजपला कळाले आहे. त्यामुळे ‘अभी नहीं तो कभी नहीं’ हे माहिती असल्यामुळे भाजप जेवढे ताणता येईल तेवढे ताणण्याचा प्रयत्न करीत आहे. शिवसेनेसाठी मात्र मुंबई, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर याशिवाय हे तीनच हक्काचे पर्याय आहेत. त्यात शहरात शिवसेनेचे दोन आमदार, एक खासदार आणि पालकमंत्री असल्यामुळे ‘आम्हीच येथे प्रमुख आहोत’ असा दावा शिवसैनिकांचा आहे. त्यामुळे येथे कमी जागा स्वीकारणे म्हणजे संघटनात्मक आत्महत्या ठरेल, असे शिवसेना नेत्यांचे मत आहे. त्यामुळे हे गणित अधिक अवघड झाले आहे. किशोर शितोळे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी खूप स्पर्धा होती. स्थानिक पातळीवर तिढा सुटत नव्हता. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पॅराशूट निवड करत किशोर शितोळे यांच्याकडे ही जवाबदारी दिली. फडणवीस यांनी टाकलेली जवाबदारी सार्थ करून दाखवावी लागणार आहे. भाजपत वाढत जाणाऱ्या स्थानिक नेतृत्वाच्या स्पर्धेत सक्षम आहोत हे दाखवण्यासाठी शितोळे यांना ही एकमेव संधी आहे. शिरसाट आणि जंजाळ यांच्यात निवडणुकी-पूर्वी वाद झाले होते. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेला जागा कमी आल्यास त्याचा फटका जंजाळ यांना बसू शकतो, तर जास्तीच्या जागा आल्यास जंजाळ यांचे जिल्हाप्रमुखपद आणखी मजबूत होईल. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीचे ते प्रमुख दावेदार ठरू शकतील. मात्र निवडणुकीत इच्छित जागा निवडून न आल्यास त्यांच्या राजकीय ताकदीवर परिणाम होऊ शकतो. भाजपने मोठी जबाबदारी मंत्री अतुल सावे यांच्याकडे दिली. नगरपालिका निवडणुकीतील पिछाडीनंतर मनपात यश प्राप्त करून द्यावे लागेल. भाजपने अनेकांना डावलून सावेंच्या निवडणूक व्यवस्थापनावर विश्वास व्यक्त केला. कोट्यवधींच्या गुंतवणुकीसाठी मनपाच्या चाव्या हाती ठेवाव्या लागतील. अपयश आले तर शिवसेना मोठा भाऊ राहिल्यास अनेक वर्षांच्या मेहनतीवर पाणी फिरेल. संघटनात्मक वर्चस्वाला हादरा बसेल. नगरपालिका निवडणुकीत सिल्लोड-मध्ये आमदार अब्दुल सत्तार आणि पैठणमध्ये खासदार संदिपान भुमरे यांनी त्यांच्या नगरपालिका ताब्यात घेत त्यांचे नेतृत्व दाखवून दिले. आता जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासाठी निवडणूक महत्त्वाची आहे. पालकमंत्री झाल्यानंतर शहरावर वर्चस्व सिद्ध करावे लागेल. शिवसेना तुटल्यानंतर प्रथमच मनपा लढत असल्याने व पालकमंत्री असल्याने यश मिळवणे गरजेचे. महायुतीचा तिढा हा तिढा सुटेल की नाही याबाबत सांशकता असताना दोन्ही पक्षांनी मात्र स्वतंत्र तयारी करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने सोमवारपासून आपले मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे, तर शिवसेनेने भेटीगाठी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. युती केली नाही तर त्याचा फायदा उद्धवसेना आणि एमआयएमला होणार हे युतीतील नेत्यांना चांगलेच माहिती आहे. त्यामुळे ही संधी विरोधकांना द्यायची नाही. शिवाय युती तोडणारे व्हिलन अशी जनतेत प्रतिमा नको म्हणून मॅरेथॉन बैठकीचे हे सत्र सुरू असल्याची चर्चा आहे. २००५ : शिवसेना मोठा भाऊ शिवसेना-भाजप युतीने एकत्रित लढत दिली होती. त्या वेळी शिवसेनेने सुमारे २६ जागा जिंकल्या, तर भाजपला सुमारे २१ जागांवर समाधान मानावे लागले होते.
बजाजनगर भागात शाळेतून वडिलांसोबत दुचाकीवर घरी परतणाऱ्या एका ५ वर्षांच्या चिमुरडीच्या नाकाला आणि गालाला मांजाचा फास लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तन्वी सचिन वाघमारे असे या बालिकेचे नाव असून या घटनेत तिला तब्बल ६ टाके पडले आहेत. बजाजनगर (पंढरपूर) येथील रहिवासी असलेल्या तन्वीचे वडील सचिन वाघमारे हे नेत्र चिकित्सक आहेत. तन्वी स्थानिक शाळेत ज्युनियर केजीमध्ये शिकते. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास सचिन हे तन्वीला शाळेतून घेऊन दुचाकीवर घरी परतत होते. तन्वी गाडीवर समोर बसलेली असताना अचानक लोंबकळणारा नायलॉन मांजा तिच्या चेहऱ्याला अडकला. काही कळण्याच्या आतच धारदार मांजाने नाकावर आणि गालावर खोल जखम केल्याने तन्वी रक्ताळली. कारवाईचा दावा फोल पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी नायलॉन मांजा विक्रीविरुद्ध मोहीम उघडली असली तरी बजाजनगर आणि वाळूज परिसरात अद्यापही हा जीवघेणा मांजा सर्रास विकला जात आहे. एमआयडीसी वाळूज ठाण्यात या घटनेची नोंद झाली. तातडीने शस्त्रक्रिया वाघमारे यांनी तन्वीला खासगी रुग्णालयात दाखल केले. जखम खोल असल्याने तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करून ६ टाके घालण्यात आले. नायलॉन मांजाच्या या जीवघेण्या प्रकारामुळे वाघमारे कुटुंब पुरते हादरून गेले आहे.
शहरात १९८८ च्या निवडणुकीपासून ‘खान हवा की बाण?’ या घोषणेवर शिवसेनेने राजकारण केले. मात्र, २०२५ च्या महापालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपली रणनीती पूर्णपणे बदलल्याचे चित्र आहे. हिंदुत्वाचा आक्रमक पुरस्कार करणारी ही शिवसेना आता ८ ते १२ मुस्लिम उमेदवारांना तिकीट देण्याच्या तयारीत असल्याची माहिती नेते अंबादास दानवे यांनी दिली. यावरून आता राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला असून धनुष्यबाण गेल्याने खान सोबत घेण्याची वेळ आली, अशी टीका शिंदेसेनेकडून केली जात आहे. अंबादास दानवे यांनी सांगितले की, २०१० मध्ये आम्ही ५० ते ५५ जागा लढवल्या होत्या. यंदा उद्धवसेना इतिहासातील सर्वाधिक जागा लढवणार आहे. आघाडी न झाल्यास यावेळी आम्ही स्वबळावर १०१ पेक्षा अधिक जागा लढवणार आहोत. सध्या खासदार कल्याण काळे यांच्यासोबत यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान काँग्रेसबरोबर आघाडीसाठी रात्री उशिरा खासदार डॉ. कल्याण काळे आणि उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या आघाडीसंदर्भात बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिथून गद्दारी, तिथूनच ताकद दाखवणार शहरातील आमदारांनी गद्दारी केली असली तरी या निवडणुकीत शिवसेना सर्वाधिक उमेदवार निवडून आणेल. गद्दारीचा कलंक पुसून आम्ही आमची खरी ताकद पुन्हा दाखवून देऊ.-चंद्रकांत खैरे, नेते, उद्धवसेना. जाती-धर्मांना प्रतिनिधित्व सर्वसामान्यांना तिकीट देणार आहोत. यात ८ ते १२ मुस्लिम उमेदवारांचाही समावेश असेल. युतीला आमचे हे चोख उत्तर आहे.-अंबादास दानवे, नेते, उद्धवसेना. मुस्लिम समाजाचे मतदान मिळवण्यासाठी प्रयत्न लोकसभा निवडणुकीत मुस्लिमबहुल भागातून महाविकास आघाडीला मोठे मताधिक्य मिळाले होते. छत्रपती संभाजीनगरच्या तिन्ही विधानसभा मतदारसंघांत मुस्लिम मतदारांचा प्रभाव लक्षणीय आहे. एमआयएमची ताकद कमी करणे आणि आपले हक्काचे मतदान वाढवणे या दुहेरी उद्देशाने उद्धवसेनेने हा पवित्रा घेतला आहे. सुरू आहे. दरम्यान काँग्रेसबरोबर आघाडीसाठी रात्री उशिरा खासदार डॉ. कल्याण काळे आणि उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या आघाडीसंदर्भात बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाण गेला, खान जवळ उबाठाचे धनुष्यबाण चिन्ह गेले आहे म्हणून आता खानला सोबत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. -किशनचंद तनवाणी, शिंदेसेना.
मनपा निवडणुकीसाठी ८ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण रविवारी (२८ डिसेंबर) घेण्यात आले. या प्रशिक्षणाला तब्बल २,०१६ अधिकाऱ्यांनी दांडी मारली. त्यांना नोटीस बजवावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे आदेश मनपा आयुक्त, मुख्य निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले. निवडणुकीसाठी १,२६४ मतदान केंद्रे आहेत. कर्मचाऱ्यांना त्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी ४ ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाकडे ६८९ मतदान केंद्राध्यक्षांनी पाठ फिरवली, तर तब्बल १,३२७ मतदान अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाला गैरहजर होते. गैरहजर राहणाऱ्या एकूण २,०१६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश आयुक्त, निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. असे होते प्रशिक्षण केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना ईव्हीएम हाताळणी, ‘सीयू’ला ‘बीयू’ जोडणे, मशीन सील करणे, मतदान प्रक्रिया आदींबाबत पॉवर पॉइंटद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण केंद्रावर १० ईव्हीएम मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या मशीनवर ईव्हीएम हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. एखाद्या मतदाराने चारऐवजी एक किंवा दोन उमेदवारांनाच मत दिले व उर्वरित मते देण्यास नकार दिल्यास मतदान केंद्राध्यक्षाने उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत नोटा बटण दाबून उर्वरित मते देऊन प्रक्रिया पूर्ण करावी. आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या डायरीमध्ये नकार देणाऱ्या मतदारांची नोंद घ्यावी, अशा स्पष्ट सूचनाही या वेळी देण्यात आल्या. ४ मते दिली तरच मत वैध आतापर्यंत महापालिकेच्या निवडणुका या वॉर्डनिहाय झालेल्या आहेत. एकच मत द्यावे लागत होते. यंदा मात्र प्रभागनिहाय निवडणूक होत असून एका मतदाराला ४ उमेदवारांना मतदान करावे लागेल तरच त्याचे मत वैध ठरेल. इतर निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत व्हीव्हीपॅट राहणार नाही, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. तसेच स्वत:ची बुद्धी न वापरता आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे स्पष्ट निर्देश प्रशिक्षणात अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात आले. नगरपालिका निवडणुकीत ३ मते द्यावी लागत होती. तेथे काही गोंधळ उडाला नाही, असा अनुभव अधिकाऱ्यांनी सांगितला.
छत्रपती संभाजीनगरात युतीचे ठरेना:राष्ट्रवादीने 18 उमेदवार केले घोषित, महायुतीतून ‘राष्ट्रवादी’ बाहेर
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाच्या यादीत १८ उमेदवारांचा समावेश आहे. महायुतीतील जागावाटपाबाबत स्पष्टता न झाल्याने आणि प्रतीक्षा करूनही ठोस निर्णय होत नसल्याने राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. भाजप, शिवसेनेसोबत महायुती झाल्यानंतर आमच्यासाठी जागा सोडल्या जातील, असा शब्द देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात महायुतीच अंतिम न झाल्याने राष्ट्रवादीला स्वबळाचा मार्ग स्वीकारावा लागला, अशी चर्चा आहे. महायुतीतील समन्वयाच्या अभावामुळे स्वबळाचा निर्णय महायुतीच्या चर्चांवर अवलंबून न राहता ‘राष्ट्रवादी’ने स्वतंत्रपणे लढल्यास शहरातील राजकीय समीकरणे बदलू शकतील. भाजप, शिवसेनेतील समन्वयाचा अभाव आणि जागावाटपाबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे वाट पाहणे टाळून राष्ट्रवादी काँग्रेसने हे पाऊल उचलले आहे. पक्षाने पहिली यादी जाहीर करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला असून उर्वरित जागांवर कोणती व्यूहरचना आखली जाते याकडे लक्ष आहे. स्वबळाच्या निर्णयामुळे पक्षाच्या जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना ‘न्याय’ देता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारप्रभाग उमेदवार४ डॉ. चारुता सुनील मगरे६ अजीज खान गणी खान७ तुषार रामचंद्र सुरशे८ हेमंत गोविंदराव देशमुख९ अब्बास मेहबूब शेख९ विशाल ओमप्रकाश इंगळे९ फरीन अकबर पठाण१६ डॉ. मधुर मोहनराव सोनवणे१६ वैशाली अनिल निलावार१६ मोहंमद इसा मोहंमद कुरेशी१७ उल्हास वसंतराव नरवडे२१ अंकिता अनिल विधाते२२ ज्योती राजाराम मोरे२२ सदानंद धोंडीबा साळुंखे२२ विशाल बाबासाहेब पुंड२३ दत्तात्रेय सुंदरराव भांगे२६ फिरोज पटेल२८ पल्लवी उत्कर्ष पल्हाळ
प्रभाग क्रमांक नऊमध्ये महापालिकेचे आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांची धावपळ उडते. नागरिकांना थेट मिनी घाटी रुग्णालय गाठावे लागते किंवा खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागते. परिणामी गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे या भागात एका शासकीय रुग्णालयाची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. नारेगाव, उत्तरनगरी, मिसारवाडीच्या काही भागात जलवाहिनीच नसल्याने पाण्याचा प्रश्न भीषण आहे. नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. गरजेच्या वेळी टँकर मिळेलच याची खात्री नसते. जलवाहिनी असलेल्या भागांत नळांना ८ ते १० दिवसांनंतर पाणी येते. जलवाहिनी नसलेल्या भागात पाण्यासाठी वणवण, तर जलवाहिनी असलेल्या भागात पाण्याची प्रतीक्षा करावी लागते, प्रभागात नवीन जलकुंभाचे काम सुरू आहे. त्याचबरोबर नव्या जलवाहिनीचेही काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नागरिकांना पाणी मिळेल, अशी आशा आहे. पथदिवे नाहीत. घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे कचरा पडून राहतो. त्याची दुर्गंधी सुटते आहे. क्र. ९ मिसारवाडी, आरतीनगर, नारेगाव, चिकलठाणा २०१५ : नगरसेवक, पक्ष, मतदानवॉर्ड क्र. उमेदवार, पक्ष मतदान३३ शबनम बेगम, काँग्रेस १२०४३४ संगीता वाघुले, एमआयएम ८९३३६ सुरेखा सानप, अपक्ष १६८३३८ राजू शिंदे,भाजप २७४२प्रभाग आरक्षण : अ-एससी, ब- ओबीसी महिलाक- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण ९० कोटींची कामे प्रभाग क्रमांक ९ मध्ये रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहे. तरीही काही ठिकाणी रस्ते नाहीत. या भागातील मिसारवाडी, आरतीनगर, नारेगाव, चिकलठाणामध्ये ९० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. नारेगावमध्ये छोटे-मोठे ३० पेक्षा जास्त रस्त्यांची कामे केली आहेत. 1. कचरा संकलन : घंटागाडीनियमित नाही, नागरिक त्रस्तघंटागाडीचा प्रश्न मोठा आहे. मिसारवाडी, आरतीनगर भागात घंटागाडी नियमित येत नाही. त्यामुळे स्वत: कचरा नेऊन टाकावा लागतो. परिणामी नागरिक त्रस्त आहेत. 2. पाणीपुरवठा : जलवाहिनीचनसल्याने कायम पाणीटंचाईकाही भागात पाण्याची नेहमी टंचाई असते. अनेक ठिकाणी जलवाहिनी नाही. तेथे जलवाहिनी व जलकुंभाचे काम सुरू आहे. भविष्यात पाणी मिळेल, अशी आशा आहे. 3. रस्ते : पाऊस पडल्यानंतरवाहने चालवणेही कठीणचिकलठाणा भागात रस्ते गुळगुळीत आहेत, परंतु त्यांना भेगा पडल्या आहेत. इतर भागात रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे. पावसाळ्यात नागरिकांना रस्त्यावरून वाहने नेता येत नाहीत.
25 वर्षांनंतर मुंबई मनपात काँग्रेस-वंचित यांच्यात युती:महायुती आणि ठाकरे बंधूंसमोर तगडे आव्हान
मुंबईत तब्बल २५ वर्षांनंतर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येत आहे. दलित आणि मुस्लिम मतांचे समीकरण जुळवत या नव्या आघाडीने भाजप-शिंदेसेनेची महायुती आणि ठाकरे बंधूंसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली. मुंबई मनपाच्या एकूण २२७ जागांपैकी ६२ जागांवर वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे, तर उर्वरित जागांवर काँग्रेस लढणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील इतर २८ महापालिकांमध्येही अशाच प्रकारची युती करण्याचे संकेत सपकाळ यांनी दिले. मतांचे विभाजन रोखणार मुंबईत ठाकरे बंधूंची युती झाल्याने त्यांचा फोकस मराठी मतांकडे असणार आहे. मुंबईत मुस्लिम मते २० ते २२ टक्के तर दलित मते ८ ते १० टक्के आहेत. त्यामुळे दलित, मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतांची एकजूट साधण्याचा प्रयत्न आहे. मुंबईत स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसला वंचितच्या साथीने आपली गमावलेली ताकद पुन्हा मिळवण्याची संधी आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग वाढले आहे. या घडामोडींवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी टीका केली. अशोक चव्हाण यांना हिरवा भाजप करायचा आहे. त्यांचे नेतृत्व अपयशी ठरले आहे. एवढे दिवस सत्तेत राहूनही उमेदवार मिळत नाही ही शोकांतिका आहे, असे चिखलीकर म्हणाले. काँग्रेसचे माजी नगरसेवक एमआयएममध्ये पाठवण्यामागेही अशोक चव्हाण यांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या माजी महापौर शीला भवरे आणि त्यांच्या पती किशोर भवरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत अनेक मुस्लिम कार्यकर्तेही भाजपमध्ये दाखल झाले. चिखलीकरांच्या टीकेला उत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले, एमआयएमशी माझा काहीही संबंध नाही. तुमच्यात ताकद असेल तर उमेदवार थांबवून दाखवा, असे आव्हान त्यांनी चिखलीकर यांना दिले. वंचितसोबत चर्चा : खा. चव्हाण काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांनीही अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. काँग्रेसचे माजी नगरसेवक एमआयएममध्ये पाठवण्यामागे अशोक चव्हाण कारणीभूत आहेत. ते पक्षात असो वा नसो, काँग्रेसवर त्याचा परिणाम होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. वंचितसोबत आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर मधील प्रभाग क्रमांक २५ मध्ये गेलं असता नागरिकांनी समस्यांचा पाढाच वाचला. दिव्य मराठीने सुरु केलेल्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' या टॉक शो ला संभाजीनगरकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक प्रभागात अनेक समस्या आहेत. ज्यावर नागरिक अतिशय कळकळीने बोलताना दिसून येत आहेत. प्रभाग क्रमांक २५ मधील नागरिकांच्या काय समस्या आहेत. जाणून घ्या या रिपोर्टमधून ... शहरातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये गुन्हेगारी इतकी पराकोटीला गेली आहे की, नागरिकांनी समस्या सांगताना हात जोडून विनंती केली. प्रभागातील काही भाग हा गुन्हेगारीने व्यापला आहे. नशा करणारे तरुण, मारामारी, ड्रेनेज लाईन आणि पाणी यासारख्या मुद्द्यांना येथील नागरिकांनी हात घातला. गुन्हेगारी ही मुख्य समस्या प्रभागातील रहिवासी महेंद्र मगरे यांनी सांगितले की, 'आमच्या प्रभागात सर्वात मोठी समस्या म्हणजे वाढती गुन्हेगारी आणि नशाखोरी आहे. मी गेल्या १५ वर्षांपासून या भागात राहतो. इथे ड्रग्स आणि बटन गोळ्या सर्रासपणे विकल्या जातात. त्यामुळे आम्हाला त्याचा त्रास जास्त होतो. आम्ही तक्रार केली तर त्यांच्याकडे राजकीय पाठिंबा असतो आणि ते लगेच बाहेर निघून येतात. त्यामुळे तक्रार करूनसुद्धा काही फायदा नाहीये. एवढंच नाही तर ही पोर पोलिसांना देखील पैसे देतात आणि निघून येतात. कोणी विरोधात बोललं तर गाड्या फोडणं आणि मारामारी करणं असे प्रकार घडतात. त्यामुळे संपूर्ण भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.' प्रभाग २५ म्हणजे ड्रग्स स्मग्लरचा अड्डा... प्रभागातील विठ्ठलनगर मधील नागरिकांशी संवाद साधला असता समजले की, घराच्या पाठीमागे असलेली मोकळी जागा ही ड्रग्स स्मग्लरचा अड्डा आहे. या भागात राहणाऱ्या महिला म्हणाल्या की, 'आम्हाला आमच्याच घरातून बाहेर निघता येत नाही. घराच्या पाठीमागे खूप मोठी जागा आहे पण ती जागा काहीच कामाची नाहीये. एकतर ड्रेनेज लाईन फुटलेली आहे आणि दुसरीकडे नशा करणारे पोरं पोरी येतात. त्यांनी इथे त्यांचा अड्डाच तयार केला होता. आम्ही तक्रार केली तर आम्हाला म्हंटल जात होत की, तुम्हाला काय एकट्यालाच त्रास होतो का? म्हणजे आमच्या समस्येकडे कोणी बघायला सुद्धा तयार नाही. वारंवार तक्रार केल्यानंतर अतुल घडामोडे आले आणि त्यांनी जेसीपीने सगळी झाड तोडली. त्यानंतर फक्त ८ दिवस सगळं चांगल चाललं मात्र त्यानंतर पुन्हा ही पोर येऊन इथे बसायला लागली आहेत. आम्हाला इथे एक कंपाऊंड वॉल तयार करून द्यावी म्हणजे आम्ही आणि आमचे मुलं सुरक्षित राहू.' महिलांनी पुढे सांगितले की आम्ही त्यांना अनेकदा हाकलण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यांच्याकडे हत्यार असतात त्यामुळे भीती वाटते. एकतर नशा केलेली असते आणि त्यांना व्यवस्थित चालता देखील येत नाही. रात्री ३ -४ वाजेपर्यंत या सगळ्या गोष्टी चालू असतात. प्रभागातील वाढती गुन्हेगारी ही खूप गंभीर विषय बनत चालला आहे. त्यामुळे या समस्येला कुठेतरी आळा घालणे गरजेचे असल्याचं येथील स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. महिन्यातुन दोनदा पाणी पुरवठा होतो प्रभागात राहणारे सुरेश जाधव म्हणतात की, 'आमच्याकडे १५ दिवसातून एकदा पाणी येत म्हणजे महिन्यातून फक्त दोन वेळेस पाणी पुरवठा केला जातो. प्रत्येकाकडे पाण्याचा साठा असेलच असं नाही ना. कोणाकडे १००० आहे तर कोणाकडे ५०० लिटरची टाकी असते आणि आम्ही प्रत्येक दिवसाला टँकर बोलावू शकत नाही. म्हणजे आमचेच पैसे घेऊन आम्हालाच पाणी द्यायचं नाही हे चुकीचं आहे. अनेकदा तक्रार केली तर नुसतं कागद घेतात आणि लिहितात. पण अजूनही त्यावर काही कारवाई नाही. तीन दिवसाला पाणी देऊ अशी नुसती घोषणा केली होती. तीन दिवसाला नाही पण कमीत कमी ८ दिवसाला तरी पाणी द्या...' अशी आहे प्रभागाची व्याप्ती प्रभाग क्रमांक २५ मध्ये रामनगर भागशः, प्रकाश नगर, तानाजी नगर, संघर्ष नगर, श्रद्धा कॉलनी, म्हाडा कॉलनी, सदाशिव नगर, तोरणागड कॉलनी, शाहु नगर, कामगार कॉलनी, पुष्पक गार्डन, जय भारत कॉलनी, चिकलठाणा गाव, चिकलठाणा भागशः बौद्धवाडा, मोतिवाला नगर, हनुमान नगर चौक, पायलट बाबा नगरी यांचा समावेश आहे. या भागाची एकूण लोकसंख्या 39847 एवढी आहे.
वर्ग-२ ची इनामी जमीन विकण्यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदारांची मान्यता आवश्यक असते. महाराष्ट्र शासनानेच असे नियम केले आहेत. मात्र, छत्रपती संभाजीनगरात वरील पैकी एकाही अधिकाऱ्याच्या मान्यतेशिवाय गंगापूर तालुक्यातील ३१ एकर जमीन अवघ्या २ कोटीत विकली आहे. ‘दिव्य मराठी’च्या इन्व्हेस्टिगेशनमधून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही जमिनीची ऑनलाइन रजिस्ट्री करणे आवश्यक असते. पण दुय्यम निबंधकांनी निवृत्त तलाठी तथा जमिनीचे खरेदीदारांना चक्क ऑफलाइन रजिस्ट्री करून दिली आहे. शिवाय कोर्टाने दिलेले वारसाहक्क प्रमाणपत्रही खरेदी-विक्रीच्या वेळी जोडले नाही. गंगापूर तालुक्यातील मौजे भेंडाळा येथील गट क्रमांक २१४ मधील ३१ एकर १९ गुंठे जमिनीचा हा व्यवहार आहे. अब्दुल गनी फाजल खान यांनी निवृत्त तलाठी अनिल ठोंबरे आणि मयूर टेटवार यांना ही जमीन १७ नोव्हेंबर २०२५ रोजी २.३ कोटीत विकली आहे. गंगापूरच्या दुय्यम निबंधकाने रजिस्ट्री करून दिली. ‘दिव्य मराठी’च्या हाती या व्यवहाराचे लागले दस्तऐवज लागले आहेत. ...तर रजिस्ट्री रद्द करू सातबाऱ्यावर स्पष्ट उल्लेख असताना पूर्वपरवानगीशिवाय वर्ग-२ ची जमीन विकण्यात आली. ऑफलाइन रजिस्ट्रीसाठीही परवानगी नाही घेतली. संबंधित दुय्यम निबंधकावर नियमानुसार कार्यवाही करू. रजिस्ट्री रद्द करू. -विवेक गांगुर्डे, सह निबंधक वर्ग-१, छत्रपती संभाजीनगर 1 अधिकाऱ्याची परवानगी नाही जमीन हैदराबाद इनामे व रोख अनुदान अधिनियम, १९५४ अंतर्गत ‘मदतमाश’ची आहे. सक्षम प्राधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदीचा सातबाऱ्यावर उल्लेख आहे. दिवाणी न्यायालयात खटला असल्याचीही नोंद आहे. तरीही परवानगी न घेता जमीन विकली आहे. 2 ई-म्युटेशनला दिली बगल वर्ग-२ च्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवेळी ऑनलाइन फेरफार म्हणजेच ई-म्युटेशन गरजेचे असते. पण असे केले तर सक्षम अधिकाऱ्यांना ओटीपी जाऊन व्यवहार ब्लॉक होण्याची शक्यता असते. म्हणून ते स्कीप करून या प्रकरणात ई-म्युटेशनला सपशेल बगल देण्यात आली आहे. 3 वारसाहक्क प्रमाणपत्र नव्हते अब्दुल गनी फाजलखान यांचे भाऊ, बहिणी, पाच मुले आणि दोन मुली असे एकूण २४ वारसदारांची व्यवहाराला संमती दाखवली आहे. पण व्यवहार करताना न्यायालयाने दिलेले वारसाहक्क प्रमाणपत्र आवश्यक असते. पण असे प्रमाणपत्र न काढताच कुटुंबीयांची संमती दाखवली. 4 गॅझेटचा काढला सोयीप्रमाणे अर्थ गंगापूरचे दुय्यम निबंधक, खरेदीदार तथा निवृत्त तलाठी अनिल ठोंबरेंनी १७ ऑगस्ट २०१५ च्या गॅझेटचा संदर्भ दिलाय. वर्ग-२ च्या जमिनीसाठी पूर्वपरवानगीची गरज नाही असा गॅझेटमध्ये उल्लेख आहे. प्रत्यक्षात गॅझेट हस्तांतरणास परवानगी नाकारते. नंतर नियमितीकरण आवश्यक आहे. संभाजीनगरात डीडीआरने केला ऑफलाइन रजिस्ट्रीतून घोटाळा परवानगी न घेता इनामी जमीन विक्री-खरेदी करता येत नाही असा स्पष्ट उल्लेख ३१ एकर जमिनीच्या सातबाऱ्यावर आहे. गंगापूरच्या दुय्यम निबंधकाने तरीही रजिस्ट्री करून दिली. ‘दिव्य मराठी’कडे रजिस्ट्री, सातबारा आदी कागदपत्रे आहेत.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक 25 मध्ये वाढती गुन्हेगारी, पाणीटंचाई आणि मोकळ्या मैदानावर सुरू असलेली नशेखोरी या मुद्द्यांवरून काँग्रेस आणि भाजप एकमेकांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.दिव्य मराठी ॲपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या व्यासपीठावर उमेदवारांच्या भूमिकांवर सवाल होत असून शहराच्या विकासासाठी नेमकी जबाबदारी कोणाची, हा प्रश्न थेट जनतेकडून उपस्थित केला जात आहे. काँग्रेसकडून सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप करण्यात आले असून, मैदानात सुरू असलेल्या नशेखोरीला सत्ताधारीच पाठबळ देत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आम्ही हिंदुत्ववादी असून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आरएसएसपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावर भाजपचे नेते भगवान घडामोडे यांनी प्रत्युत्तर देत, आमच्यामुळे काँग्रेसच्या लोकांना हिंदुत्वासाठी काम करावे लागत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे, असा टोला लगावला. दरम्यान, सत्ताधारी पक्षावर मैदानाचा वापर ‘टुकार मुले घडवण्याचा कारखाना’ म्हणून केल्याचा आरोप काँग्रेसच्या राहुल सावंत यांच्याकडून करण्यात आला. यावर सत्ताधारी पक्षाचे मनोज गांगवे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत काँग्रेसवर पलटवार केला. काँग्रेसचे लोक जर मुलांबाबत अशा प्रकारची विधाने करत असतील, तर त्यांनी ती तात्काळ मागे घ्यावीत, असे ते म्हणाले. तसेच या मैदानावर खेळत अनेक मुलांनी पुढे जाऊन चांगल्या ठिकाणी नोकऱ्या मिळवल्याचेही त्यांनी नमूद केले. काँग्रेस अ्न भाजपमध्ये वाद काँग्रेसच्या राहुल सावंत म्हणाले की, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही आरएसएसपेक्षा एक पाऊल पुढे आहोत असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हणताच भाजपचे नेते भगवान घडामोडे म्हणाले आमच्यामुळे काँग्रेसच्या लोकांना हिंदुत्वासाठी काम करावे लागत असल्याचा अभिमान आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून मैदानाचा वापर करत टुकार मुले घडवण्याचा कारखाना म्हणून केल्याचा म्हणतात सत्ताधारी पक्षाचे मनोज गांगवे म्हणाले की, काँग्रेसचे लोकं जर मुलांबद्दल असे बोलत असतील तर त्यांनी ते शब्द मागे घेतले पाहिजे. त्या मैदानावर खेळत अनेक मुलांनी चांगल्या ठिकाणी नौकरी मिळवली आहे. पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवणार भाजपच्या पदाधिकारी उषा कदम म्हणाल्या की, आमच्या प्रभागात महिला सुरक्षेचा प्रश्न आहेच. महिलांना होणाऱ्या त्रासासाठी आम्ही कायम आवाज उठवला आहे. पाण्याचा जो प्रश्न आहे तो अवघ्या दोन महिन्यात सोडवली जाणार आहे. आमच्यामुळे काँग्रेसचे लोकं हिंदुत्ववादी झाले माजी महापौर आणि भाजपचे नेते भगवान घडामोडे म्हणाले की, एक ते दोन महिन्यात पाण्याचा प्रश्न सोडवला जाणार आहे. मागच्या काळातील मुख्यमंत्र्यांनी पाइपलाइनचे काम थांबवल्याने आजपर्यंत जनतेला पाणी यायला वेळ लागला. महिला सुरक्षेसाठी आमची टीम काम करत असते. आमच्याकडे असलेली युवकांची फळी महिला सुरक्षेसाठी काम करत असते. आमच्यामुळे काँग्रेसचे लोकं हिंदुत्वासाठी काम करत आहेत ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या प्रभागातील गुंडे कुणाशी निगडीत आहेत याचा विचार केला पाहिजे. प्रभागात महिला सुरक्षित नाही ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवार वैशाली कोरडे म्हणाल्या की, आमच्या प्रभागात नशेखोरीचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे पाणी कधीच वेळेवचर येत नाही. आमच्याकडे 15 दिवसांनंतर पाणी येते त्यामुळे आम्हाला सर्व काही कामे सोडून पाण्याची वाट पाहावी लागते. आम्ही बाहेर पडल्यानंतर घरी परतेपर्यंत आमच्यासह घरच्यांना आम्ही सुरक्षित आहोत की नाही ही काळजी वाटते. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही RSS पेक्षा एक पाऊल पुढे काँग्रेसचे पदाधिकारी राहुल सावंत म्हणाले की, आमच्या विभागाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा महिला सुरक्षेचा आहे. आमच्याकडे ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनीच व्यसन करणाऱ्या मुलांना शिदोरी देण्याचे काम केले आहे. सत्ताधाऱ्यांना बदलले तरच ही परिस्थिती बदलेल. आम्ही पोलिस चौकी आणायसाठी प्रयत्न केले आहेत. आम्ही हिंदुत्व म्हणून कुठेही आरएसएस पेक्षा मागे राहिलेलो नाही. आम्ही सप्ताहाचे आयोजन करत आहोत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आरएसएसपेक्षा आम्ही एक पाऊल पुढे आहोत. RSS च्या गतीने आम्हीही काम करत आहोत. भाजपच्या लोकांना वॉर्डात काय कामे केली हे माहिती नाही, ते बाहेर राहायला गेले आहेत. याच्याकडे सर्व पदे असताना यांनी कामे केली नाहीत. सर्व प्रश्नांवर मशाल हाच पर्याय ठाकरे गटाचे पदाधिकारी संतोष लिंबेकर म्हणाले की, मशाल या चिन्हावर जर मतदान केले तर महिला असुरक्षित राहणार नाहीत. आम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी काम करत राहू. तर ठाकरे गटाचे विभागप्रमुख म्हणाले की आमच्या परिसरात वेळेवर पाणी येत नाही आमची सत्ता आली की पाणी वेळेवर यावे यासाठी आम्ही प्रयत्न करु. उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनात पाण्याची योजना आली होती पण काही लोकांनी राजकारण केल्याने ही योजना थांबली असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. आमच्या नगरसेवकांनी विकास केला आहे, पण ते भाजपमध्ये गेल्याने आता आमच्याकडे सांगायला मुद्दाच राहिला नाही. महिलांना होणारा त्रास थांबवणे गरजेचे माजी नगरसेवक मनोज गांगवे म्हणाले की, आमच्या परिसरातील महिलांना जो त्रास होत आहे तो आमच्या प्रभागातील तरुणांकडून होत नाही. बाहेरील नशेखोरांमुळे आमच्या माता-बहिणींना त्रास होत आहे. 12 ते 17 वर्षांपर्यंतचे मुले ही नशेखोरी करतात. आम्ही त्यांच्या पालकांना याबद्दल बोललो तर ते आमच्यासोबत भांडतात. हा महिलांना होणारा त्रास थांबवणे गरजेचे आहे. मी प्रभागाच्या विकासासाठीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कामे करुण घ्यायची असेल तर विकासासोबत आपल्याला रहावे लागेल. नागरिकांची गुंठेवारी घेतली जात नाही काँग्रेसचे चंद्रमुनी काळे म्हणाले की, प्रकाशनगरमध्ये नागरिकांची गुंठेवारी घेतली जात नाही. गट नंबर 16 मधील मते चालतात पण त्यांच्यासाठी काम करावे वाटत नाही. तिथल्या लोकांना काहीच सुविधा नाही. तिथे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पाण्याचा वेळ ठरलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाग्यश्री राजपूत म्हणाल्या की, आमच्या प्रभागात पाण्याची वेळ ठरलेली नाही. कधी-कधी अर्ध्या रात्री पाणी येते. परिसरातील कोणीही पाणी, गटार या मुद्यावर बोलत नाही. ड्रेनेज लाइनचा मुद्दा महत्त्वाचा आहे. लोकसंख्या वाढलेली आहे पण ड्रेनेजलाईन बदललेली नाही. अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. प्रभागात काही ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहेत. महिलांना सक्षम करणार ठाकरे गटाच्या पदाधिकारी माधुरी काळे म्हणाल्या की, आमच्या प्रभागात महिलेंची सुरक्षा हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. महिला नोकरीवरुन घरी येताना आंधार पडल्यानंतर त्यांना असुरक्षित वाटते. केवळ कॅमेरे लावत हा प्रश्न सुटणार नाही. मुंगळ सूत्र चोरी होती त्याकडे कुणाचे लक्ष नाही असा आरोप त्यांनी केला आहे. तर महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. प्रभागात या आहेत समस्या छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्र 25 मध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात समस्या आहे ती वाढती गुन्हेगारी, ओपन स्पेसमध्ये बसणाऱ्या नशेखोरांचा आणि महिन्यातून दोन ते 3 वेळेस येणाऱ्या पाण्याची समस्या या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली जाणार असल्याचे दिसून येते. नवीन वसाहत निर्माण झाली त्यावेळी तिथे कोणतेही नवे मैदान देण्यात आलेले नाही. मैदानावर ड्रेनेजचे पाणी साचलेले असते. अशी आहे प्रभागाची व्याप्ती प्रभाग क्रमांक 25 मध्ये रामनगर भागशः, प्रकाश नगर, तानाजी नगर, संघर्ष नगर, श्रद्धा कॉलनी, म्हाडा कॉलनी, सदाशिव नगर, तोरणागड कॉलनी, शाहु नगर, कामगार कॉलनी, पुष्पक गार्डन, जय भारत कॉलनी, चिकलठाणा गाव, चिकलठाणा भागशः बौद्धवाडा, मोतिवाला नगर, हनुमान नगर चौक, पायलट बाबा नगरी यांचा समावेश आहे. या भागाची एकूण लोकसंख्या 39847 एवढी आहे.
१०७ हुतात्म्यांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई ‘हे दोन गुजराती’ गिळायला निघालेत, असा गंभीर आरोप शिवसेनाचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना केला. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट झालो तरी चालेल, पण तुम्ही तुमची निष्ठा विकून नका, असे आवाहनही त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसमोर मुंबई आणि मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आम्ही ज्यांना मोठे केले आज तेच आमच्यावर वार करत आहेत. इतकी वर्ष लढलो, मुंबई कोणीही आमच्यापासून हिसकावू शकला नाही. २ गुजराती आपल्याला गिळायला निघालेले आहेत. अशावेळी जर आपण ‘तुझे-माझे’ करण्यात वेळ घालवला, तर ही मुंबई त्यांना आंदण दिल्यासारखी होईल. मला तुमच्यापैकी एकही माणूस फुटलेला चालणार नाही. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरीही चालेल पण तुम्ही मात्र तुमची निष्ठा विकू नका, असे आवाहन करत ठाकरेंनी शिवसैनिकांना भगव्याची शपथ दिली. शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे मुंबईचा घास घेणे. हे पाप आपल्या हातून घडता कामा नये. धनुष्यबाण चोरला तरी आमचा बाणा चोरता येणार नाही, असेही ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी प्रादेशिक अस्मितेचा हुकमी एक्का बाहेर काढला उद्धव ठाकरेंची ही आक्रमकता केवळ संताप नसून मुंबईवरील पकड कायम ठेवण्यासाठीची रणनीती आहे. आगामी निवडणुकांमध्ये ‘मराठी माणूस विरुद्ध भाजप’ असा टोकाचा संघर्ष उभा करून शिवसैनिकांमधील मरगळ झटकणे हाच यामागील मुख्य उद्देश आहे. ‘दोन गुजराती’ असा थेट उल्लेख करून त्यांनी प्रादेशिक अस्मितेचा जुना हुकमी एक्का बाहेर काढला आहे. ही भावनिक साद मतदारांना भावली तर मुंबईत भाजपची वाट बिकट होईल; मात्र अंतर्गत फूट न थांबल्यास शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.
महाराष्ट्र अमली पदार्थ प्रतिबंधक कृती दलाने (एएनटीएफ) आंतरराज्य अमली पदार्थ निर्मिती व वितरणाचे जाळे उद्ध्वस्त करत बेंगळुरूमधील मेफेड्रोनच्या तीन कारखान्यांवर कारवाई केली. यात ५५.८८ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ आणि यंत्रसामग्री जप्त केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. छाप्यांमध्ये घन व द्रव स्वरूपातील एकूण २१.४ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. राज्यभर सुरू असलेल्या अमली पदार्थांविरोधातील मोहिमेचा भाग असलेली ही कारवाई गेल्या आठवड्यात पुणे–मुंबई महामार्गावर एका व्यक्तीच्या अटकेपासून सुरू झाली. एएनटीएफच्या कोकण युनिटने २१ डिसेंबर रोजी नवी मुंबईतील वाशी गावाजवळ पुणे–मुंबई महामार्गावर आरोपी अब्दुल कादर राशिद शेख याच्याकडून १.४८ कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त केले. तपासादरम्यान बेळगाव येथील रहिवासी प्रशांत यल्लप्पा पाटील याचा ड्रग्ज निर्मितीत सहभाग असल्याचे उघड झाले. तसेच बंगळुरूमध्ये तीन कारखाने सुरू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे एएनटीएफ पथकाने याच आठवड्यात कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे अवैध कारखाने चालवणारे राजस्थानचे रहिवासी सूरज रमेश यादव आणि मलकान रामलाल बिश्नोई यांना अटक केली, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आली असून, आणखी २ मुख्य संशयितांचा शोध सुरू आहे. वर्षभरात १०० किलो मेफेड्रोन ड्रग्ज जप्त २०२५ मध्ये मुंबईतील डोंबिवली, नालासोपारा, वाशी तसेच सातारासह महाराष्ट्रात अातापर्यंत सुमारे १०० किलोपेक्षा अधिक एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. आणि त्यांचे बाजारमूल्य सुमारे १०० ते १५० कोटी रुपयांदरम्यान असल्याचे अहवालांतून दिसून येते.
शरद पवारांना मी तीन दशकांपासून ओळखतो. ते माझे मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन उद्योगपती गौतम अदानी यांनी रविवारी बारामतीतील एका कार्यक्रमात केले. या वेळी शरद पवारांनीही अदानींचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले. तर गौतमभाई माझे मोठे बंधू असल्याचे भावुक वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. राजकारण विसरून या दिग्गजांनी एकमेकांबाबतचा व्यक्त केलेला जिव्हाळा चर्चेचा विषय ठरला आहे. बारामती येथे ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) चे अदानी, त्यांची पत्नी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. या वेळी बोलताना अदानींनी शरद पवारांचा उल्लेख आपले मार्गदर्शक असा केला. ‘या ज्येष्ठ नेत्याने जमिनीवरील वास्तव आणि राष्ट्रीय अजेंडा यांचा उत्तम मेळ घातला आहे. पवार साहेबांना मी तीन दशकांहून अधिक काळापासून ओळखतो, हे माझे भाग्य आहे. त्यांच्याकडून मला जे शिकायला मिळाले, त्याला तोड नाही. त्यांच्याकडील ज्ञान आणि शहाणपण मनावर खोल ठसा उमटवते. शरद पवारांनीही अदानींचा जीवन प्रवास मोठी स्वप्ने पाहणाऱ्या कष्टाळू तरुणांसाठीअत्यंत प्रेरणादायी आहे, असे म्हटले. तर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आमचे अदानी कुटुंबाशी ३० वर्षांपासूनचे संबंध आहेत. मला काही चांगली किंवा वाईट बातमी द्यायची असेल, तर मी एक बहीण म्हणून गौतमभाईंना स्पष्टपणे सांगते. ते माझे मोठे भाऊ आहेत. नातेसंबंधांमधील हा जिव्हाळा जीडीपीच्या आकड्यांमध्ये मोजता येत नाही.‘ कार्यक्रमात काका-पुतण्यासह संपूर्ण पवार कुटुंबिय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. बारामती विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अदानींचे स्वागत केले. अदानींना घेऊन येणाऱ्या वाहन आमदार रोहित पवार यांनी चालवले. तर अजित पवारही चालकाशेजारील सीटवर बसले होते. कार्यक्रमात विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनीही यावेळी हजेरी लावली होती. मनपा निवडणुकीची रणधुमाळीदरम्यान काका-पुतणे एकाच मंचावर एकत्र आले होते. त्यामुळेही गेली काही दिवसांपासून राजकीय चर्चा रंगल्या आहेत. अदानी यांच्याकडून एआय सेंटरसाठी २५ कोटी निधी पवार कुटुंबीयांच्या अधिपत्याखालील ‘विद्या प्रतिष्ठान’ या शिक्षण संस्थेच्या अंतर्गत हे केंद्र उभारण्यात आले आहे. अदानी समूहाने या केंद्रासाठी २५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. कृषी, आरोग्यसेवा, प्रशासन आणि उद्योग या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून प्रगत एआय संशोधन आणि प्रशिक्षणाला प्रोत्साहन देणे हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे.
राज्यातील २९ मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. असे असतानाही काही मनपासाठी महायुतीतील फाटाफुट चव्हाट्यावर आले तर काही ठिकाणी जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अशातच सोलापुरात सोलापुरात जागावाटपाची चर्चा ऐनवेळी थांबवून एकनाथ शिंदेंची शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला बाजुला सारून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्येही या दोन्ही पक्षांच्या भूमिकेमुळे महायुतीची शक्यता धूसर झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, अमरावती, मीरा भाईंदरमध्येही शिंदे गट-भाजप युतीबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच असून हा तिढा निर्णायक वळणावर आलेला आहे. अजित गटाने पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या पक्षासोबत युती जाहीर केली. त्यांचा पक्ष मुंबई व पुण्यासोबत छत्रपती संभाजीनगरमध्येही स्वबळावर लढत आहे. संभाजीनगरमध्ये शिंदेगट व भाजपमध्ये युतीसाठी चर्चा सुरूच आहे. संबधित. दिव्य सिटी सोलापुरात शिंदे गट-अजित गटाचे जागावाटपही ठरले... सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने सन्मानजनक जागा न दिल्याने शिंदेंच्या शिवसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेत भाजपला धक्का दिला. शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. दोन्ही पक्षांचा ५१-५१ जागावाटपाचा फॉर्म्युलाही त्यांनी जाहीर केला. नाशिक : शिवसेना-राष्ट्रवादी युती शक्य नाशिकमध्ये भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद दिला जात नसल्याने शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची स्वतंत्र युती निश्चित मानली जात आहे. रविवारी रात्री शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. शिवसेनेने भाजपकडे ४५ जागा जिंकण्यासारख्या असल्याने त्यांची मागणी केली. त्यावर भाजपकडून केवळ ३० जागांच देण्याची तयारी केल्याने नाराजी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीने २५ जागांची मागणी केलेली असताना केवळ ५ जागा देण्याची तयारी दर्शवल्याने त्यांनीही काढता पाय घेतला आहे. मुंबई : भाजप-शिंदे गट २० जागांचा तिढा मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीमध्ये एकूण २२७ जागांपैकी २०७ जागांवर एकमत झाले आहे. यामध्ये भाजपने १२८ जागा स्वतःच्या वाट्याला ठेवल्या, तर शिंदे गटाला ७९ जागा देऊ केल्या. उर्वरित २० जागांवर अद्याप चर्चा सुरू आहे. ठाकरेंच्या आघाडीपुढे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी किमान ८७ जागा मिळाव्यात म्हणून शिंदे गट सुरुवातीपासून आग्रही आहे. महायुतीतील पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी येथे स्वबळावर लढत भाजप युतीला आव्हान देत आहे. ठाणे, वसई-विरारमध्ये युती, पण मीरा-भाईंदरमध्ये पेच... ठाणे आणि वसई-विरारमध्ये महायुतीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आहे. त्याच वेळी मीरा-भाईंदरमध्ये मात्र शिंदे गट आणि भाजपमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक यांनी युतीसाठी भाजपला ‘२४ तासांचा अल्टिमेटम’ देत निर्णय न झाल्यास आमचा पक्ष सर्व ९५ जागा स्वतंत्र लढायला तयार असल्याचे म्हटले आहे. नगरपालिका व पंचायत निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत महायुतीत आपणच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे महापालिकेतील जागावाटपातही भाजपने आपला दबादबा सुरुवातीपासून ठेवला. तिथे जागावाटप झाले तिथेही पूर्ण जागांचे गणित अद्याप स्पष्ट नाही. कारण काही जागांवर आपलाच उमेदवार निवडणूक आणण्याचा विश्वास किंवा जास्त जागा जिंकत महापालिकेतील बहुमताजवळचा आकडा मिळवण्याचा पवित्रा भाजपने घेतल्याचे एकूण परिस्थितीवरून स्पष्ट होते.
शेती तोटा होत असतानाही हार न मानता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळ्याच्या शेतकऱ्याने चांगलीच शक्कल लढवली. आधी बाजारपेठेचा अभ्यास केला आणि नंतर वडिलोपार्जित ७ एकर शेतीवर एकच पीक घेण्याऐवजी सात वेगवेगळी पिके घेतली. याचा फायदा असा झाला की, आधी तोट्यातील शेती नफ्यात गेली आहे. एखाद्या पिकाला हंगामात कमी भाव मिळाला तर दुसऱ्या पिकाला चांगला भाव मिळतो व तोट्यातील पिकाची भरपाई दुसऱ्या पिकाच्या नफ्यातून होते. वर्षाकाठी विविध पिकातून त्यांना ३ ते ४ लाखांचे हमखास उत्पन्न मिळत आहे. केऱ्हाळ्यातील शेतकरी राजू अजबसिंग बारवाल यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या योग्य वापरातून तोट्यातील शेतीतून फायदा मिळवला. विशेष म्हणजे ही सर्व पिके त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीवर घेतली असून पाणी, खत व खर्चाचे योग्य नियोजन केले आहे. राजू बारवाल यांनी त्यांच्या ७ एकर शेतीत गहू, मका, कपाशी, तूर, कांदा, सीड्स, डॉलर हरभरा, आले, कोथिंबीर यासह एक एकरात फळबाग विकसित केली आहे. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहत त्यांनी पीकनिहाय नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर सुरू केला आहे. पिकांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास राजू यांनी अजित-१०८ या सुधारित गव्हाच्या वाणाची निवड केली आहे. गेल्या चार वर्षांपासून टोकन यंत्राद्वारे गव्हाची पेरणी करून उत्पादन खर्चात बचत करत आहेत. त्यांनी केवळ २० गुंठ्यात ७ किलो बियाणे पेरून तब्बल १२ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेतले आहे. बारवाल यांच्या यशाची पंचसूत्री' राजू बारवाल यांच्या शेतीसाठी पंचसूत्री यशस्वी ठरली. यात त्यांनी एकाच पिकावर अवलंबून न राहता ७ प्रकारची पिके घेतली. दुसरे म्हणजे पाण्याचा प्रत्येक थेंब मोजून वापरल्याने पिकांची जोमदार वाढ झाली. टोकन यंत्रामुळे पेरणीसाठी आधुनिक यंत्राचा वापर केल्याने बियाणे आणि मजुरी खर्चात बचत झाली. योग्य खत व्यवस्थापन झाल्याने विद्राव्य खतांचा वापर थेट मुळाशी केल्याने उत्पादनात वाढ झाली. सर्वात शेवटी म्हणजे कोणत्या पिकाला कधी चांगला भाव मिळेल, याचे आगाऊ नियोजन केल्याने त्यांना यश मिळाले. विविध पिकांचे खर्च उत्पन्नाचे गणित राजू यांनी शेतात कांदा लावला. यात त्यांना ३० हजार बियाणांवर व मजुरीसाठी २० हजार खर्च झाला. तर उत्पन्न २ लाख झाले. खर्च वजा जाता दीड लाखांचा निव्वळ नफा झाला. २० गुंठे अद्रकमधूनही त्यांना १ लाखांचा निव्वळ नफा झाला. असेच गहू, कोथिंबिर, हरभरा, मकापासूनही उत्पन्न मिळत आहे. सरासरी ३ ते ४ लाखांपर्यंत राजू यांना नफा मिळत आहे. या प्रगतिशील शेतकऱ्याकडून जाणून घ्या अधिक माहिती....9923738657
न्यूमोनिया, ‘यूटीआय’सारख्या आजारांमध्ये औषधे ठरतायेत कमकुवत
नवी दिल्ली : आयसीएमआरने नुकत्याच एका अहवालात सांगितले की, न्यूमोनिया आणि यूटीआयसारख्या आजारांमध्ये औषधे कमकुवत ठरत असल्याची माहिती पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी २०२५ वर्षाच्या शेवटच्या ‘मन की बात’ मधून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातच्या १२९ व्या भागात २०२५ मध्ये देशाच्या उपलब्धींवर चर्चा केली. २०२५ च्या शेवटच्या भागात नवीन वर्ष २०२६ च्या आव्हाने, […] The post न्यूमोनिया, ‘यूटीआय’सारख्या आजारांमध्ये औषधे ठरतायेत कमकुवत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. त्यातच आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ ४८ तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र, राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून घोडे अडलेलच आहे. महायुतीमध्ये भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बोलणी सुरु […] The post युती-आघाडीचा ‘घोळात घोळ’! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस पक्षाच्या विविध संघटनांच्या पदाधिकारी, नागरिकांच्या घेतल्या भेटीगाठी
लातूर : प्रतिनिधी रविवार दि. २८ डिसेंबर राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रविवार दि. २८ डिसेंबर रोजी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नागरिक यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समस्या समजून […] The post काँग्रेस पक्षाच्या विविध संघटनांच्या पदाधिकारी, नागरिकांच्या घेतल्या भेटीगाठी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तब्बल ५६ कोटींचे ड्रग्ज बंगळुरातून जप्त
पुणे : महाराष्ट्राच्या अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या पथकाने बंगळूरू येथे कारवाई करीत तब्बल ५५ कोटी ८८ लाख रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले. तसेच या अमली पदार्थाचे तीन कारखानेही नष्ट केले आहेत. या कारखान्यांतील ड्रग्ज देशातील अनेक शहरांत वितरित केले जात होते. त्यातून आरोपींनी मोठ्या प्रमाणात शहरात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. आतापर्यंत […] The post तब्बल ५६ कोटींचे ड्रग्ज बंगळुरातून जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शीतलहरी दक्षिणेकडे सरकतायेत; राज्यात पुन्हा थंडीचा कडाका
पुणे/मुंबई : प्रतिनिधी नवीन वर्ष सुरू होण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील शीतलहरी हळूहळू दक्षिणेकडे सरकत असल्याने महाराष्ट्रातील हवामानात लक्षणीय बदल जाणवत आहेत. राज्यभरातच थंडीचा कडाका वाढला आहे. विशेषत: पहाटे आणि रात्रीच्या सुमारास गारठा अधिक वाढत आहे. दिवसा काही काळ ऊबदारपणा जाणवत असला, तरी एकूणच […] The post शीतलहरी दक्षिणेकडे सरकतायेत; राज्यात पुन्हा थंडीचा कडाका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मॉडीफाय १२ बुलेटवर कारवाईचा बडगा
लातूर : प्रतिनिधी लातूर शहरातील सार्वजनिक शांतता, नागरिकांचे आरोग्य तसेच पर्यावरणाचे संरक्षण या अनुषंगाने लातूर पोलीस प्रशासनाकडून सातत्याने प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शहरात वाढत असलेल्या फटाका सायलेन्सर लावलेल्या बुलेट मोटारसायकलींमुळे होणारे प्रचंड ध्वनी प्रदूषण, नागरिकांची होणारी गैरसोय, रुग्ण, वृद्ध, लहान मुले व विद्यार्थ्यांवर होणारा मानसिक ताण तसेच कायदा व सुव्यवस्थेवर होणारा विपरीत परिणाम लक्षात […] The post मॉडीफाय १२ बुलेटवर कारवाईचा बडगा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निवडणुकीच्या मतदान प्रशिक्षणास १६४ कर्मचा-यांची दांडी
लातूर : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लातूर शहर महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम घोषीत झाला असून या निवडणूकीसाठी प्रत्यक्ष मतदान दि. १५ जानेवारी रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रीमती मानसी यांच्या आदेशाने मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर सभागृह लातूर येथे दि. २८ […] The post निवडणुकीच्या मतदान प्रशिक्षणास १६४ कर्मचा-यांची दांडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सावरीकरांचे कार्य तरूण पिढीसाठी मार्गदर्शक
लातूर : प्रतिनिधी मोठे यश साध्य करण्यासाठी कोणत्याच पदाची गरज नाही, हे अॅड. किशनराव सावरीकर ऊर्फ भाऊ यांच्या कार्यातून आपणाला दिसून येते. या काळात या नेत्यांवर महात्मा गांधी, पंडित नेहरू, स्वामी रामानंद तिर्थ आदींच्या कार्याचा प्रभाव होता. महात्मा गांधी यांनी सांगीतले होते की, खेडयाकडे चला, खेडयाचा विकास म्हणजे देशाचा विकास, हीच संकल्पना आजही कायम आहे. […] The post सावरीकरांचे कार्य तरूण पिढीसाठी मार्गदर्शक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पोलिस अधीक्षकांनी घेतली ‘त्या’ तरुणाच्या परिवाराची भेट
निलंगा : प्रतिनिधी तालुक्यातील औराद शहाजानी येथील एका घरपोडी प्रकरणातील आरोपीने पोलिसांच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याचा व्हिडिओ व्हायरल करीत आत्महत्या केली होती. या प्रकरणी अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान संबंधित तरुणाच्या परिवाराची रविवारी दि २८ डिसेंबर रविवार रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी भेट घेऊन सांत्वन करून सदर […] The post पोलिस अधीक्षकांनी घेतली ‘त्या’ तरुणाच्या परिवाराची भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांचा सत्कार
रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या नूतन नगरसेवकांनी माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, ‘रेणापूरच्या सर्वांगीण विकासासाठी नूतन नगरसेवकांनी एकसंघपणे काम करावे. सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि पारदर्शक कारभार करणे हीच […] The post सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांचा सत्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्मृतीने ओलांडला १० हजार धावांचा टप्पा
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिने रविवारी क्रिकेट जगतात एक नवा इतिहास रचला. श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी २० सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला. हा टप्पा गाठणारी ती जगातील चौथी आणि भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात स्मृतीला […] The post स्मृतीने ओलांडला १० हजार धावांचा टप्पा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास केवळ दोन दिवस शिल्लक असताना भाजपने आपली रणनीती कमालीची आक्रमक केली आहे. उद्या भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहीर होणार असून, तिकीट कापल्यामुळे निर्माण होणारी संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी पक्षाने मास्टर प्लॅन तयार केला आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज होणाऱ्या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी संबंधित विधानसभा क्षेत्रातील आमदारांवर सोपवण्यात आली आहे. मुंबईत भाजपच्या उच्चस्तरीय कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या प्रभागांमध्ये उमेदवारीवरून वाद किंवा पेच नाही, अशा सेफ वॉर्डांची यादी उद्या पहिल्या टप्प्यात जाहीर केली जाणार आहे. मात्र, ज्या ठिकाणी रस्सीखेच आहे, तिथे 'वेट अँड वॉच' धोरण राबवत बंडखोरांना संधी न देण्याची पक्षाची स्ट्रॅटर्जी आहे. जिल्हाध्यक्षांना सर्व उमेदवारांचे अर्ज तांत्रिकदृष्ट्या तपासून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मलबार हिल आणि दहिसरचे 'रणशिंग' फुंकले या निवडणुकीत काही प्रमुख चेहऱ्यांची नावे आता जवळपास निश्चित झाली आहेत. शिवसेना ठाकरे गट सोडून भाजपमध्ये आलेल्या तेजस्विनी घोसाळकर दहिसरच्या प्रभाग क्रमांक 2 मधून नशीब अजमावणार आहेत. दुसरीकडे, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मलबार हिल मतदारसंघात भाजपने आपले चार शिलेदार निश्चित केले आहेत. अजय पाटील, संतोष ढाले, स्नेहल तेंडुलकर आणि सन्नी सानप हे चारही उमेदवार उद्या आपले अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्रितपणे रिंगणात उतरत असली, तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार देऊन आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर, मोठ्या सभांऐवजी छोट्या कोपरा सभा आणि थेट मतदारांच्या घरापर्यंत जाऊन संपर्क साधण्याच्या सूचना आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुढील 48 तास मुंबईच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पिंपरी चिंचवड येथील प्रभाग क्रमांक 12 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला. स्थानिक भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन अजित पवार यांनी या रणांगणात विकासाचा नारळ फोडला. पिंपरी-चिंचवडला कर्जाच्या खाईत ढकलणाऱ्यांना आता बाजूला सारण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. प्रभाग क्रमांक 12 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शरद वसंत भालेकर, चारुलता रितेश सोनवणे, सीमा धनंजय भालेकर आणि पंकज दत्तात्रय भालेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी शहराच्या प्रगतीचा आराखडा मांडताना सांगितले की, कष्टकरी आणि उद्योजकांची नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, रोजगार, पर्यावरण आणि स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस ठोस काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आम्हाला जातीभेदाला थारा न देता सर्वांना न्याय देणारा विकास घडवायचा आहे, असे स्पष्ट करत अजित पवारांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेचा पुनरुच्चार केला. शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नेतृत्वाकडे दूरदृष्टी असणे आवश्यक आहे आणि ती जबाबदारी राष्ट्रवादीचे उमेदवार पूर्ण ताकदीने पार पाडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, पक्षाने नवीन आणि अनुभवी चेहऱ्यांना संधी देऊन सर्व घटकांना प्रतिनिधित्व दिल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजपवर अप्रत्यक्ष टीका यावेळी बोलताना अजित पवारांनी नाव न घेत भाजपवरही अप्रत्यक्ष टीका केली. ते म्हणाले, महापालिकेत रिंग चालली आहे, वारे माप खर्च चालला आहे. जॅकवेल निविदा 30 टक्क्यांनी वाढविण्यात आली. कुदळवाडीत जमिनी बळकावण्यात आल्या आहेत. संत पीठात वारकरी घडवायचे होते, मात्र तिथे संत पिठात सीबीएससी स्कूल सुरू केली आहेत. संत पिठात गीता रामायण शिकवण्यात येत नाही, संत पिठात कंपनी सुरू केली. संत पीठ हे फक्त नावापुरते राहिले असल्याचे म्हणत त्यांनी टीका केली. महापालिकेवर कर्ज झाले आहे, हे पाप कोणाचे? पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, जे ठरले होते ते का थांबवण्यात आले, वेगळ्या पद्धतीच राजकारण जे चालल ते थांबवायला हवे. पिंपरी चिंचवड शहरातील माझ्या 25 वर्षांच्या राजकारणात मी कधी कर्ज काढले नव्हते. आज महापालिकेवर कर्ज झाले आहे, हे पाप कोणाचे? असा सवाल करत अजित पवार यांनी नाव न घेता महेश लांडगे यांच्या कारभाराकडे लक्ष वेधले. कार्यकर्ते हाच पक्षाचा कणा निवडणूक प्रचाराच्या पहिल्याच दिवशी अन्य पक्षांतील अनेक मान्यवरांनी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. नवीन सहकाऱ्यांचे स्वागत करतानाच, कार्यकर्ते हाच पक्षाचा कणा आहेत, त्यांना स्थानिक पातळीवर सर्वतोपरी ताकद दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. भैरवनाथाच्या साक्षीने कोणावरही अन्याय होऊ देणार नाही आणि शहराच्या प्रगतीत कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द त्यांनी यावेळी पिंपरी-चिंचवडकरांना दिला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपले बालेकिल्ले शाबूत राखण्यासाठी कंबर कसली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून आघाडी घेतली असतानाच, आता भाजपनेही आपल्या रणनीतीनुसार उमेदवारांची नावे निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः दहिसर आणि मलबार हिल यांसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांत भाजपकडून उद्या शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. शिवसेना उबाठा पक्षातून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर या दहिसर येथील वॉर्ड क्रमांक 2 मधून उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निमित्ताने दहिसरमध्ये एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, या माध्यमातून भाजप मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन खुद्द घोसाळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना केले आहे. मलबार हिलमध्ये चार उमेदवारांची नावे जाहीर दक्षिण मुंबईतील भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून भाजपने चार जागांसाठी नावे निश्चित केली आहेत. यामध्ये अजय पाटील (वॉर्ड 214), संतोष ढाले (वॉर्ड 215), स्नेहल तेंडुलकर (वॉर्ड 218) आणि सन्नी सानप (वॉर्ड 219) हे चारही उमेदवार उद्या आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दाट शक्यता आहे. भाजपने अद्याप अधिकृतरीत्या संपूर्ण शहराची यादी प्रसिद्ध केली नसली, तरी स्थानिक पातळीवर उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्रितपणे रिंगणात उतरत आहेत, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीचीही यादी कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, अधिकृत उमेदवारी आणि 'एबी' फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुकांनी आपापल्या पक्ष कार्यालयांबाहेर गर्दी केली आहे. येत्या 24 ते 48 तासांत मुंबईतील जागावाटपाचे आणि उमेदवारांचे पूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर:महानगरपालिका निवडणुकीसाठी 20 उमेदवारांचा समावेश
आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली पहिली अधिकृत यादी आज, रविवारी सायंकाळी जाहीर केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही घोषणा करण्यात आली असून, यामध्ये २० उमेदवारांचा समावेश आहे. जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांनी सांगितले की, शिवसेना या निवडणुकीत सुमारे ५५ जागांवर उमेदवार उभे करेल. शिवसेनेची (उबाठा) मनसे, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. या चर्चेनुसार, एकूण ८७ जागांपैकी काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार असून, काही ठिकाणी एकमेकांना थेट पाठिंबा दिला जाईल. यादीत समाविष्ट असलेल्या २० उमेदवारांची नावे आणि त्यांच्या प्रभागांची माहिती खालीलप्रमाणे आहे: प्रदीप विष्णुपंत बाजड, प्रभाग क्र. ३ नवसारी (गट ब-इ मा प्र) प्रवीण वसंतराव हरमकर, प्रभाग क्र. १४ जवाहर गेट-बुधवारा वैशाली आशिष विधाते, प्रभाग क्र. ३ नवसारी (गट क-सर्वसाधारण महिला) शारदा संजय गोंडाने, प्रभाग क्र. १० बेनोडा भीमटेकडी (गट अ-अ.जा महिला) विजय किसनलाल मंडले, प्रभाग क्र. ११ फ्रेजरपुरा-रुख्मिणी नगर (गट ब-इ मा प्र) जयश्री देवराव कुऱ्हेकर, प्रभाग क्र. १२ स्वामी विवेकानंद कॉलनी-बेलपुरा (गट अ-अ. जा) विशाखा प्रवीण हरमकर, प्रभाग क्र. १४ जवाहर गेट बुधवारा पूनम पियूष धोटे, प्रभाग क्र. १३ अंबापेठ-गोरक्षण (गट क-सर्वसाधारण महिला) सुषमा रविकांत काकडे, प्रभाग क्र. १७ गडगडेश्वर (गट क-सर्वसाधारण महिला) संजय नामदेवराव शेटे, प्रभाग क्र. २० सूतगिरणी-सामरा नगर (गट ड-सर्वसाधारण) संजय रामकृष्ण गव्हाळे, प्रभाग क्र. २० सूतगिरणी-सामरा नगर (गट अ-अ.जा.) संगीता सुखलाल कैथवास, प्रभाग क्र. २१ जुनी वस्ती बडनेरा (गट अ-अ. जा) अर्चना बंडू धामणे, प्रभाग क्र. २२ नवीवस्ती बडनेरा (गट अ -अ. जा.) पंजाबराव तायवाडे, प्रभाग क्र. ६ विलास नगर-मोरबाग-गवळीपुरा (गट ड-सर्वसाधारण) बाळकृष्ण आढाऊ, प्रभाग क्र. २ संत गाडगेबाबा-पीडीएमसी (गट ड-सर्वसाधारण) प्रवीणा सिताराम आठवले, प्रभाग क्र. ३ नवसारी (गट अ-अ. जा.) अजय जयसिंग भिलावेकर, प्रभाग क्र. ८ जोग स्टेडियम-चपराशीपुरा (गट ब-अ.ज.) कोकिळा रामकृष्ण सोळंके, प्रभाग क्र. २० सूतगिरणी (गट ब-इ मा प्र महिला) फरजान परवीन सय्यद शकील, प्रभाग क्र. ४ जमील कॉलनी लालखडी (गट ब-सर्वसाधारण महिला) चैतन्य विकास काळे, प्रभाग क्र. २२ नवी वस्ती बडनेरा (गट ब-इ मा प्र)
हिंगोली बसस्थानकामध्ये बसमध्ये चढण्याच्या घाईमध्ये बसच्या समोरील चाकाखाली सापडून एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. २८ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असून चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील राजेश अोमप्रकाश अग्रवाल (५०) हे हिंगोली शहरातील एका हॉटेलवर काम करतात. नेहमी प्रमाणे आज सकाळी ते हॉटेलवर कामासाठी आले होते. रात्रीच्या सुमारास गावाकडे जाण्यासाठी ते हिंगोलीच्या बसस्थानकावर आले होते. दरम्यान,रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कंधारा आगाराची कंधार ते रिसोड बस हिंगोली स्थानकात आली होती. यावेळी बसमध्ये जागा पकडणे व बसण्याच्या घाईमध्ये राजेश धावत बससमोर आले. यावेळी बस थांबण्यापुर्वीच बसमध्ये चढण्याच्या घाईत ते बसच्या समोरील चाकाखाली सापडले. बसचे चालक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप मोदे, जमादार संजय मार्के, अशोक धामणे, शेख महम्मद, अझहर पठाण, रमेश कोरडे, शेख मुजीब यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर मयत राजेश यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केला आहे. हिंगोली आगाराचे निंयत्रण एफ. एम. शेख यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही. तर एसटी महामंडळाकडून मयत राजेश यांच्या कुटुंबियांना तातडीची १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे आगाराच्या सुत्रांनी सांगितले.
उद्योजक नितीन दळवी यांना गाडगेबाबा सेवा पुरस्कार:गाडगेबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवात अमरावतीत सन्मान
मुंबईचे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन दळवी यांना गाडगेबाबा सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अमरावती येथील गाडगेबाबांच्या समाधी मंदिरात आयोजित पुण्यतिथी महोत्सवादरम्यान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे विश्वस्त आणि गाडगे महाराज मिशनचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या हस्ते दळवी यांना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन गौरवण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. अरविंदराव देशमुख, ह.भ.प. संदीप गिरी महाराज, डॉ. राजकुमार लंगडे, ह.भ.प. भरत महाराज रेडे, संस्थेचे व्यवस्थापक प्रकाश महात्मे, नागरवाडी येथील आश्रमाचे गजानन देशमुख, मेळघाटचे रमेश तोटे आणि सुधीर धोंगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नितीन दळवी यांनी गाडगेबाबांच्या सेवा संस्थानच्या विविध उपक्रमांना वेळोवेळी सहकार्य केले आहे. त्यांनी अमरावती जिल्ह्यातील गाडगे महाराज मिशनद्वारे संचालित विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवले असून, गुणवंत विद्यार्थ्यांनाही पुरस्कृत केले आहे.
शाळांमध्ये मोबाईलच्या सक्तीच्या वापरामुळे शिक्षक आणि पालकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. शिक्षक शिकवण्याऐवजी मोबाईलवर व्यस्त असतात, असा चुकीचा संदेश समाजात जात आहे. यासंदर्भात प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे तक्रार नोंदवली असून, शाळेच्या वेळेत मोबाईलचा वापर टाळण्याचा इशारा दिला आहे. समितीच्या मते, शासन शिक्षकांना अशैक्षणिक कामे सोपवून मोबाईल वापरण्यास भाग पाडत आहे. यामुळे शिक्षकांची सामाजिक आणि व्यावसायिक प्रतिमा मलीन होत असल्याचे त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. शासनाकडून सतत येणाऱ्या ऑनलाईन संदेशांमुळे मोबाईल हँग होणे, वैयक्तिक डेटा खर्च होणे आणि मानसिक ताण वाढणे, अशा समस्या शिक्षकांना भेडसावत आहेत. शाळांमधील अध्यापनासोबतच शिक्षकांना विविध शासकीय योजना, उपक्रम, अहवाल आणि माहिती संकलनासाठी स्वतःच्या खाजगी मोबाईलचा वापर करण्यास भाग पाडले जात आहे. याचा अध्यापन प्रक्रियेवर गंभीर परिणाम होत असून, शिक्षकांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्राथमिक शिक्षक समितीच्या म्हणण्यानुसार, शालेय शिक्षण विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून सतत माहिती भरण्याच्या जाचामुळे प्रत्यक्ष अध्यापन बाजूला पडले आहे. निकाल जाहीर झाल्यावर गुणवत्ता संवर्धनाच्या नावाखाली शेवटी शिक्षकांनाच जबाबदार धरले जात असल्याची खंतही या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. या त्रासातून सुटका होण्यासाठी समितीने शासनाला काही पर्याय सुचवले आहेत. यात शाळेच्या वेळेत इंटरनेट बंद ठेवणे, व्हॉट्सॲपवरील 'रीड' पर्याय बंद करणे आणि अध्यापनाच्या वेळेत ऑनलाईन कामास स्पष्ट नकार देणे यांचा समावेश आहे. अत्यावश्यक परिस्थितीत दूरध्वनीद्वारे संपर्क शक्य असल्याने इंटरनेट सतत सुरू ठेवण्याची गरज नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. दरम्यान, शिक्षक संघटनांनी 'छुपा विरोध' करण्याची रणनीती आखली आहे. शासकीय यंत्रणेमार्फत बहुतेक माहिती व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे मागितली जाते. त्यामुळे पर्यवेक्षकीय यंत्रणेने स्वतःच्या सोयीसाठी तयार केलेल्या सर्व अनधिकृत ग्रुपमधून शिक्षक बाहेर पडणार आहेत. संघटनेने खंबीर भूमिका घेतल्याने यापुढे कोणत्याही दबावाखाली शिक्षक त्या ग्रुपमध्ये पुन्हा सहभागी होणार नाहीत. या संदर्भात प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी 'राईट टू डिस्कनेक्ट'ची मागणी केली. शाळेची वेळ संपल्यानंतर कोणतेही प्रशासनिक संदेश पाठवले जाऊ नयेत, असा 'राईट टू डिस्कनेक्ट' वापरणे काळाची गरज बनली आहे. साहेब काय म्हणतील या भीतीपलीकडे जाऊन शिक्षकांनी एकत्रितपणे ठाम भूमिका घेतली पाहिजे, असे सावरकर यांनी म्हटले आहे.
नेरपिंगळाई, मोर्शी तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक असलेल्या नेरपिंगळाई गावात गेल्या तीन दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. अमरावतीसाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना जुनी जलवाहिनी फुटल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) कथित दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नेरपिंगळाई गावासाठी पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी पिंगळादेवी गड परिसरातून येते. याच मार्गाला समांतर अमरावतीसाठी नवीन मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामादरम्यान ५० ते ६० वर्षांपूर्वीची नेरपिंगळाईची जुनी सिमेंटची जलवाहिनी वारंवार फुटत आहे, ज्यामुळे पाणीपुरवठा खंडित होत आहे.ग्रामपंचायत अधिकारी विनोद मनवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात मजीप्राच्या अमरावती येथील अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला होता. जुनी सिमेंटची जलवाहिनी निकामी होण्याची शक्यता आधीच कळवून ती बदलण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र, प्राधिकरणाने या मागणीला विरोध करत केवळ लिकेज दुरुस्ती करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. सुमारे एक महिन्यापूर्वीच ग्रामपंचायतीने अमरावतीला जाणाऱ्या जलवाहिनीचे काम सुरू करण्यापूर्वी नेरपिंगळाईची जुनी व निकामी जलवाहिनी बदलून नवीन टाकण्याची स्पष्ट भूमिका घेतली होती. मात्र, मजीप्राने या मागणीकडे दुर्लक्ष करत नवीन जलवाहिनी टाकण्यास नकार दिला. मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले की, ते कंत्राटदाराद्वारे लिकेजची दुरुस्ती करून देण्यास बांधील आहेत.दरम्यान, मजीप्राने ठेकेदाराला केवळ लिकेज दुरुस्तीचे निर्देश दिले आहेत. परंतु, संबंधित ठेकेदार वेळेवर काम करत नसून ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागत असल्याचा आरोप आहे. आम्ही आमच्या वेळेनुसार काम करू, तुम्हाला जे करायचे ते करा, अशी भाषा वापरली जात असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. या गंभीर प्रश्नाकडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दाट धुक्याच्या विळख्याने इंडिगोची ५७ उड्डाणे रद्द; १० फेब्रुवारीपर्यंत धुक्याचा काळ घोषित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर भारतासह देशाच्या अनेक भागांत थंडीचा जोर वाढला असून, त्याचा थेट परिणाम आता विमान वाहतुकीवर होऊ लागला आहे. खराब हवामान आणि दाट धुक्यामुळे प्रसिद्ध विमान कंपनी ‘इंडिगो’ने तब्बल ५७ उड्डाणे रद्द केली आहेत. अचानक विमान फे-या रद्द झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, विमानतळांवर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. […] The post दाट धुक्याच्या विळख्याने इंडिगोची ५७ उड्डाणे रद्द; १० फेब्रुवारीपर्यंत धुक्याचा काळ घोषित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमेरिकेचा तैवानला शस्त्रपुरवठा; चीनकडून २० कंपन्यांवर निर्बंध
नवी दिल्ली : वृत्तसंस्था चीनने अमेरिकेतील मोठ्या संरक्षण कंपन्यांसह एकूण २० कंपन्यांवर निर्बंध घालण्याची घोषणा केली आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाने अमेरिकन कंपन्यांनी तैवानला शस्त्रांची विक्री करण्याच्या आरोपामुळे १० व्यक्तींवर आणि २० अमेरिकन संरक्षण कंपन्यांवर कारवाई केली आहे. या निर्बंध घातलेल्या कंपन्यांमध्ये बोईंगच्या सेंट लुइस ब्रँचचा देखील समावेश आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाच्या या निर्णयानंतर अमेरिकेच्या कंपन्यांच्या […] The post अमेरिकेचा तैवानला शस्त्रपुरवठा; चीनकडून २० कंपन्यांवर निर्बंध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरत्वाचे अब्जाधिशांना वेड! दीर्घायुष्यासाठी कोट्यवधींचा चुराडा
न्यू यॉर्क : वृत्तसंस्था जगातील बडे नेतेच नाही तर उद्योगपती, श्रीमंतांना सुद्धा अमरत्वाची भुरळ पडली आहे. सिलिकॉन व्हॅलीतील बडे उद्योगपती, श्रीमंत त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. त्यांना मृत्यूवर मात करायची आहे. त्यासाठी विविध प्रयोग सुरू आहेत. वृद्धत्व येऊच नये आणि आलेच तर ते अगदी उशीरा यावे यासाठी हे प्रयोग सुरू आहेत. जीवन अधिक काळ […] The post अमरत्वाचे अब्जाधिशांना वेड! दीर्घायुष्यासाठी कोट्यवधींचा चुराडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शरद पवार हे माझे मेंटॉर : अदानी; बारामतीत ‘एआय’ सेंटरचे उद्घाटन
बारामती : प्रतिनिधी उद्योजक गौतम अदानी हे भारतातील उद्योग विश्वातले एक अग्रगण्य नाव आहे. दुसरीकडे महाराष्ट्र तसेच भारताच्या राजकारणात शरद पवार यांचाही मोठा दबदबा आहे. गौतम अदानी यांच्या उद्योगांमुळे आज लाखो हातांना काम मिळते तर शरद पवार यांच्या धोरणामुळे महाराष्ट्र तसेच भारतात अनेक आमूलाग्र बदल झालेले आहेत. दरम्यान, हे दोन्ही दिग्गज आज एकाच मंचावर दिसून […] The post शरद पवार हे माझे मेंटॉर : अदानी; बारामतीत ‘एआय’ सेंटरचे उद्घाटन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विद्यार्थ्यांचे आरक्षण आंदोलन; बडे काश्मिरी नेते नजरकैदेत
जम्मू : वृत्तसंस्था सध्याच्या आरक्षण धोरणाविरुद्ध विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता या आंदोलनात सामील न होण्यासाठी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार आगा सय्यद रुहुल्लाह मेहदी यांच्यासह अनेक नेत्यांना निवासस्थानीच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. अधिका-यांनी सांगितले की, मेहबूबा मुफ्ती, त्यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती, श्रीनगर लोकसभा खासदार […] The post विद्यार्थ्यांचे आरक्षण आंदोलन; बडे काश्मिरी नेते नजरकैदेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर:50 टक्क्यांहून अधिक आरक्षणामुळे पहिल्या टप्प्यात डच्चू
अमरावती जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर पडणार आहे. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे अमरावती जिल्हा परिषदेला पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमधून वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अमरावती जिल्हा परिषदेतील आरक्षण 64 टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्य निवडणूक आयोग महानगरपालिका निवडणुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा पहिला टप्पा घोषित करणार आहे. मात्र, ज्या संस्थांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेत आहे, त्याच ठिकाणी निवडणुका घेतल्या जातील. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगास दिले आहेत. परंतु, या निवडणुकांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेत असावे, अशी अटही न्यायालयाने घातली आहे. राज्यातील एकूण 32 जिल्हा परिषदांपैकी केवळ 12 जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्क्यांच्या आत आरक्षण आहे, तर 20 जिल्हा परिषदांमध्ये ते अधिक आहे. त्याचप्रमाणे, 336 पंचायत समित्यांपैकी 125 पंचायत समित्यांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा पाळण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार, 50 टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यात येणार आहे. आयोगाने सुरुवातीला 29 महापालिकांसोबतच या निवडणुका घेण्याचा विचार केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे या निवडणुका स्वतंत्रपणे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकांची निवडणूक प्रक्रिया 17 जानेवारीपर्यंत संपणार असल्याने, जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात या निवडणुका घेण्याची तयारी आयोगाने केली आहे. आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या निवडणुकांबाबतच्या याचिकांवर 21 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे अमरावतीसारख्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा मार्ग न्यायालयाच्या निर्णयानंतरच स्पष्ट होईल. काही नगरपालिका आणि महापालिकांमध्ये 50 टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा पाळली नसतानाही आयोगाने तेथील निवडणुका घेतल्या होत्या, ज्यांचा निकाल न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन ठेवण्यात आला होता. जिल्हा परिषदांसाठी हे सूत्र वापरले असते, तर निवडणुका थांबल्या नसत्या. मात्र, याच चुकीमुळे पूर्वी काही निवडणुका थांबल्या होत्या, त्यामुळे आयोग यावेळी अधिक काळजी घेत असल्याचे दिसते.
दोन सरपंच, तीन उपसरपंचांसाठी आज मतदान:अमरावती जिल्ह्यातील 5 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक
अमरावती जिल्ह्यात आज (सोमवार, २९ डिसेंबर) दोन सरपंच आणि तीन उपसरपंचांसाठी निवडणूक होणार आहे. दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा आणि भातकुली तालुक्यातील नांदेड (खुर्द) येथील सरपंचपदासाठी मतदान होईल. तसेच, दर्यापूर तालुक्यातील घडा, अचलपूर तालुक्यातील वासनी (बु) आणि लोतवाडा येथील उपसरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. या निवडणुकांसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी संबंधित तीनही तालुक्यांच्या तहसीलदारांना प्राधिकृत केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ वाजता त्या-त्या ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. लोतवाडा ग्रामपंचायतीत आठ सदस्य आहेत, त्यापैकी सध्या सहाच कार्यरत आहेत. एक पद राजीनाम्यामुळे तर दुसरे अपात्र ठरल्याने रिक्त झाले आहे. नांदेड (खुर्द) येथील सरपंचपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे, तर लोतवाडा येथील सरपंचपद कोणत्याही संवर्गातील महिलेसाठी खुले आहे. उपसरपंच पदासाठी कोणतेही आरक्षण नसते. लोतवाडा, घडा आणि वासनी (बु) येथील उपसरपंचांनी विविध कारणांमुळे राजीनामे दिल्याने ही तिन्ही पदे रिक्त झाली आहेत. आजच्या बैठकीदरम्यान या पदांसाठीही नवीन प्रतिनिधींची निवड केली जाईल.
राज्यभरात महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. महायुतीपासून फारकत घेत मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेणाऱ्या राष्ट्रवादीने आज 37 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. या निवडणुकीची संपूर्ण धुरा नवाब मलिक आणि आमदार सना मलिक यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून, पक्षाने एकूण 100 जागा लढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. जाहीर झालेल्या पहिल्या यादीतील उमेदवारांना उद्यापासूनच अधिकृत एबी फॉर्मचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. या पहिल्या यादीत नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यात त्यांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक 165 मधून, तर बहीण डॉ. सईदा खान यांना प्रभाग क्रमांक 168 मधून मैदानात उतरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कप्तान मलिक यांचा मूळ प्रभाग 168 हा महिलांसाठी राखीव झाल्याने, त्यांनी स्वतःसाठी नवीन प्रभाग निवडला असून त्यांच्या जागी आपली सून बुशरा नदीम मलिक यांना प्रभाग 170 मधून उमेदवारी दिली आहे. आमदार सना मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत एकूण 100 उमेदवार उभे करणार आहे. पहिल्या 37 उमेदवारांची घोषणा झाली असून, उद्यापासूनच या उमेदवारांना 'एबी फॉर्म' चे वाटप केले जाणार आहे. महायुतीतील इतर मित्रपक्षांपासून फारकत घेत राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे उमेदवार देण्यास सुरुवात केल्यामुळे मुंबई महापालिकेच्या रणधुमाळीत आता चुरस वाढली आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या युत्या आणि आघाड्यांचे चित्र पूर्णपणे बदलले असून राजकीय समीकरणे कमालीची गुंतागुंतीची झाली आहेत. विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 52 जागांची मागणी केली होती, परंतु ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये त्यांच्या पदरात केवळ 10 ते 12 जागाच पडल्या आहेत. या अल्प जागावाटपामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची तिकिटे कापली गेल्याने पक्षात मोठी नाराजी पसरली असून, या संधीचा फायदा उठवत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मुंबईत 100 जागांवर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप-शिवसेना शिंदे गटात 20 जागांचा पेच दुसरीकडे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना शिंदे गट युतीचे जागावाटप आता अंतिम टप्प्यात आले असून, एकूण 227 जागांपैकी 207 जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 128 तर शिवसेना 79 जागा लढवणार असून, उर्वरित 20 जागांचा पेच राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या चर्चेनंतर लवकरच सुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपकडून निवडणुकीची तयारी वेगवान करण्यात आली असून उद्या तेजस्वी घोसाळकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर पक्षाने आणखी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. जागावाटपाचा हा अंतिम तोडगा निघाल्यानंतर पुढील काही तासांतच उमेदवारांची संपूर्ण अधिकृत यादी जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे वेगाने बदलत असून, जागावाटपाच्या पेचामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबईत मोठे खिंडार पडले आहे. ठाकरे बंधू यांच्याशी शरद पवारांनी केलेल्या युतीत राष्ट्रवादीला अवघ्या 10 ते 12 जागा मिळाल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली असून, मुंबईत स्वतंत्रपणे लढणाऱ्या अजित पवार गटाने तब्बल 100 जागांवर उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष आणि माजी नगरसेवक धनंजय पिसाळ यांनी आज आपल्या शेकडे समर्थकांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. विक्रोळीतील प्रभाग क्रमांक 111 मधून पिसाळ लढण्यास इच्छुक होते, मात्र ठाकरे-मनसे युतीमध्ये ही जागा संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांच्यासाठी सुटण्याची दाट शक्यता असल्याने पिसाळ यांनी पक्षाला सोडचिट्टी दिली. पिसाळ यांच्यापाठोपाठ माजी नगरसेविका मनीषा रहाटे आणि दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष आरिफ सय्यद हे देखील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची दाट चर्चा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या युत्या आणि आघाड्यांचे चित्र पूर्णपणे बदलले असून राजकीय समीकरणे कमालीची गुंतागुंतीची झाली आहेत. विशेषतः शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 52 जागांची मागणी केली होती, परंतु ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये त्यांच्या पदरात केवळ 10 ते 12 जागाच पडल्या आहेत. या अल्प जागावाटपामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची तिकिटे कापली गेल्याने पक्षात मोठी नाराजी पसरली असून, या संधीचा फायदा उठवत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मुंबईत 100 जागांवर स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार गटातील अनेक नाराज नेते आता अजित पवार गटात प्रवेश करत असून, त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे. दुसरीकडे, काँग्रेसने 'वंचित बहुजन आघाडी'सोबत नवी युती करत आपली स्वतंत्र चूल मांडली आहे. या सर्व राजकीय उलथापालथीचा केंद्रबिंदू आता विक्रोळीचा प्रभाग 111 ठरण्याची चिन्हे असून, येथे संदीप राऊत विरुद्ध धनंजय पिसाळ असा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नितीन गडकरींचा पर्यायी इंधनावर भर:'दंडुका घेऊन बसलो आहे', युरो 6 नियमांचा दिला इशारा
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पर्यायी इंधनाचा अवलंब करण्यावर भर दिला आहे. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी वाहनचालकांना कठोर उत्सर्जन नियम लागू करण्याचा इशारा दिला. पर्यायी इंधनांचा वापर आता अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडकरी म्हणाले, मी वाहतूक मंत्री आहे, दंडुका घेऊन बसलो आहे. पर्यायी इंधनाचा वापर न केल्यास युरो ६ सारखे कठोर उत्सर्जन नियम लागू केले जातील, असा दम त्यांनी भरला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पर्यायी इंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आर्थिक मदत करत आहे. ट्रॅक्टर कंपन्यांनी १००% इथेनॉल आणि सीएनजीवर चालणारे फ्लेक्स इंजिन ट्रॅक्टर विकसित केले आहेत. भविष्यात, बांधकाम उपकरणांना वित्तपुरवठा करणाऱ्या लोकांनी पर्यायी इंधन आणि जैवइंधन पर्याय निवडल्यास, त्यांना पाच टक्के अनुदान दिले जाईल. या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त प्रचार करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. अलीकडेच तीन ट्रक बाजारात आणले आहेत. यापैकी दोन ट्रकमध्ये डिझेल आणि पेट्रोल इंजिनमध्ये हायड्रोजन मिसळून वापरले जात आहे, तर एक ट्रक पूर्णपणे हायड्रोजन इंधनावर चालतो. बांधकाम आणि कृषी उपकरणांमध्येही असेच प्रयोग केले जात आहेत. देशाचे भविष्य पर्यायी इंधन आणि जैवइंधनाशी जोडलेले आहे. येणाऱ्या काळात भारताला प्रगतीपथावर नेणारा हाच मार्ग आहे, असेही गडकरींनी नमूद केले.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच सोलापूरमध्ये एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दि यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यानंतर शाब्दि हे राज्यातील एमआयएमचे दुसरे सर्वात मोठे आणि वजनदार नेते मानले जात होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शाब्दि यांनी घेतलेली ही माघार पक्षासाठी मोठी हानी मानली जात आहे. फारुख शाब्दि यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडणूक लढवली होती. या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला असला, तरी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मोठी मते मिळवून आपली भक्कम पकड सिद्ध केली होती. त्यांच्याकडे सोलापूर शहराध्यक्ष, मुंबई शहराध्यक्ष आणि प्रदेश कार्याध्यक्ष अशा अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी अखेर पक्षाला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. सोलापुरातील कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवार एमआयएममध्ये कॉंग्रेस पक्षाने सोलापूर आणि कोल्हापूर येथील उमेदवारांची यादी जाहीर केली असून कोल्हापुरात 48 तर सोलापूरमध्ये 20 उमेदवारांची पहिली यादी कॉंग्रेसने जाहीर केली होती. मात्र, सोलापूरमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या यादीतील उमेदवाराने थेट एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या फिरदोस पटेल यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सोलापूरच्या प्रभाग क्रमांक 16 च्या कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी आज एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. इच्छुकांची मुलाखत घेताना अपमानास्पद वागणूक दिल्याचे कारण फिरदोस पटेल यांनी पुढे केले आहे. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारूख शाब्दि आणि निरीक्षक अन्वर सादात यांच्या उपस्थितीत फिरदोस पटेल यांनी प्रवेश केला आहे. फिरदोस पटेल या कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात. 2017 मध्ये सोलापूर महापालिकेत त्या निवडून आल्या होत्या.
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील लाखो महिला सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांचे पैसे अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत, ज्यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या प्रक्रियेसाठी फक्त ३ दिवस उरले असून, ३१ डिसेंबरपूर्वी या प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ बंद होण्याची गंभीर […] The post ४० लाख बहिणी होणार अपात्र? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दोन गुजराती मुंबईला गिळायला निघालेत
मुंबई : प्रतिनिधी भाजपाचा वाईट अनुभव आला आहे. त्यामुळे काही करून आता भाजपाला हरवायचे आहे. माझ्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरीही चालेल; पण, तुम्ही तुमची निष्ठा विकू नका. भाजपाने फक्त युती तोडली नाही तर ते आपल्याला संपवायला निघाले आहेत. दोन गुजराती आपल्याला गिळायला निघालेले असताना आपण जर तुझे-माझे करत बसलो तर माझे म्हणणे आहे […] The post दोन गुजराती मुंबईला गिळायला निघालेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काका-पुतण्याने एकाच गाडीतून अदानींचे केले स्वागत
पुणे : प्रतिनिधी अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या हस्ते शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या केंद्राचे उद्घाटन बारामती येथे करण्यात आले. या सोहळ्याने केवळ तंत्रज्ञानाचा नवा टप्पा गाठला नाही, तर गेल्या अनेक महिन्यांपासून विखुरलेले पवार कुटुंब एकाच मंचावर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावेळी पवार कुटुंबियांकडून गौतम अदानी यांचे […] The post काका-पुतण्याने एकाच गाडीतून अदानींचे केले स्वागत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गंभीर यांना प्रशिक्षकपदावरून हटवण्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार
मुंबई : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याभोवती सुरू असलेल्या अटकळींवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले की, गंभीर यांना प्रशिक्षकपदावरून हटवण्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार आणि तथ्यहीन आहेत. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभवानंतर, बीसीसीआयमधील एका अधिका-याने माजी भारतीय फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याशी […] The post गंभीर यांना प्रशिक्षकपदावरून हटवण्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवत असताना, अमरावतीमध्ये मात्र या 'महायुती'ला सुरुंग लागला आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमधील चर्चेचा अडसर दूर होऊ शकला नाही, परिणामी अमरावती महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेना शिंदे गटाने अमरावती महापालिकेच्या एकूण ८७ जागांपैकी २५ जागांची आग्रही मागणी भाजपकडे केली होती. मात्र, भाजपने हा प्रस्ताव पूर्णपणे नाकारला. भाजप केवळ १५ ते १६ जागा शिवसेनेला सोडण्यास तयार होती. जागांच्या या आकड्यावरून दोन्ही पक्षांत एकमत होऊ शकले नाही. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच युती तुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. अभिजीत अडसूळ यांच्या भूमिकेकडे लक्ष या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते अभिजीत अडसूळ आज सायंकाळी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत ते युती तुटण्याचे नेमके कारण स्पष्ट करण्याची आणि पक्षाची पुढील रणनीती जाहीर करण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. फडणवीसांनी दर्शवली होती सकारात्मकता दरम्यान, अमरावती महानगरपालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले होते. जागा वाटपाबाबत स्थानिक नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा अंतिम टप्प्यात असून, लवकरच याबाबत निर्णय जाहीर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, आज जागावाटपाच्या तिढ्यामुळे अमरावतीत भाजप शिवसेना युती तुटली. 2017 चा निकाल: भाजपचे होते वर्चस्व 2017 च्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर मुसंडी मारत बहुमत मिळवले होते. 45 जागा भाजपने जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने 15, शिवसेनेने 7, असदुद्दीनं ओवैसी यांच्या एमआयएमने 10, मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीने 5, रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानचे 3 जागांवर विजय मिळवला होता. शिवाय आरपीआय आठवले गटाने एका जागेवर आणि अपक्ष उमेदवाराने एका जागेवर विजय मिळवला होता. मतांच्या विभाजनाचा फटका कोणाला? अमरावतीत 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढल्यास हिंदुत्वाच्या मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. याचा थेट फायदा काँग्रेस किंवा एमआयएम यांसारख्या विरोधी पक्षांना मिळू शकतो. सत्ता राखण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपसाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी लढणाऱ्या शिवसेनेसाठी आता ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
अफगाणिस्तानमधून तस्करी केलेला बेदाणा थेट महाराष्ट्राच्या तासगाव आणि सांगली जिल्ह्यात आयात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सांगली व तासगाव येथील काही कोल्ड स्टोरेज मालकांनी चीनचा बेदाणा अफगाणिस्तान मार्गे सांगली जिल्ह्यात आयात केल्याचे उघडकीस आले आहे. या कोल्ड स्टोरेज मालकांचा हा भंडाफोड बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच बेदाणा आयात करणाऱ्या व्यापऱ्यांना बदडून काढू, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. अफगाणिस्तानमधून तस्करी केलेला बेदाणा थेट सांगली आणि तासगावच्या कोल्ड स्टोरेजवर असल्याची माहिती मिळाल्यानंतर द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्ड स्टोरेज आणि वॉशिंग सेंटरवर धाडी टाकल्या. अनेक ठिकाणी अफगाणिस्तानचा बेदाणा आढळून आला. तसेच वॉशिंग सेंटर आणि कोल्ड स्टोरेज चालकांनी बेदाणाबाबत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, देशांतर्गत बेदाण्याचे दर पाडण्याचे षडयंत्र सुरू असल्याचे बोलले जात आहे. देशातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना 300 ते 350 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. तेच चीनचा बेदाणा 150 ते 200 रुपये प्रति किलोने मिळत आहे. चीनचा बेदाणा आयात करून इथले दर पाडले जात आहेत. या संदर्भात माहिती मिळाल्यावर द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बटेजा आणि राधेय कोल्ड स्टोरेजवर धाड टाकून परदेशी बेदाणा आयात केल्याचे सिद्ध केले आहे. इतकेच नव्हे तर आयात केलेला स्वस्त आणि दर्जाहीन बेदाणा प्रोसेस करून भारतीय असल्याचे बनाव करून तो 350 ते 400 रुपये प्रति किलोने विकण्याचा डाव देखील उधळून लावण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यापऱ्यांना आम्ही बदडून काढू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी थेट इशाराच दिला आहे. ते म्हणाले, पुढील काळात स्वाभिमानी गप्प बसणार नाही. चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यापऱ्यांना आम्ही बदडून काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. महेश खराडे म्हणाले, जिल्ह्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांना झळ बसत असेल ती खपवून घेतली जाणार नाही. अगोदरच दोन वर्षे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. द्राक्ष बागा काढून टाकण्याचे सत्र सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांकडे द्राक्ष आणि बेदाणा आहे त्यांना मात्र चांगला दर मिळत आहे. कारवाई करावी, अन्यथा आंदोलन पुढे बोलताना महेश खराडे म्हणाले, अशा परिस्थितीत तासगांव आणि सांगलीचे व्यापारी च त्यांच्या अन्नात माती मिसालण्याचा उद्योग करत असतील, तर आम्ही खपवून घेणार नाही. सांगली सोलापूर आणि विजापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवावर हे व्यापारी गब्बर झाले आणि त्यांच्याच जीवावर आता उठत असतील तर संघटना ते कदापी सहन करणार नाही. एका एकाला स्टोरेज मधून ओढून मारू पण शेतकऱ्यांना न्याय देऊ. बेकायदेशीरपणे बेदाणा आयात करून केमिकलची प्रक्रिया करून भारतीय पॅकिंगमध्ये विक्री केली जात आहे. यामुळे फसवणूक होत असून त्याचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसत आहे. त्यामुळे या रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा खराडे यांनी दिला आहे. मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील कपासवाडी परिसरात बनावट दूध तयार करणाऱ्या एका धक्कादायक रॅकेटचा स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी पर्दाफाश केला असून, डिटर्जंट पावडर, युरिया आणि रिफाईंड तेलाच्या साहाय्याने मानवी आरोग्यास घातक असे 'पांढरे विष' बनवले जात असल्याचे उघड झाले आहे. या कारवाईदरम्यान नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या रिकाम्या पिशव्याही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. तथापि, या व्हायरल व्हिडिओची दखल घेत डी.एन. नगर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, हा व्हिडिओ जुना असून संबंधित प्रकरणावर यापूर्वीच कठोर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे.

27 C