डोनाल्ड ट्रम्प यांच्या जर्मनीच्या मानद नागरिकत्वाचा तिढा
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था जर्मनीतील उजव्या विचारसरणीचा पक्ष अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) ने ट्रम्प यांना जर्मन जिल्ह्याच्या बॅड डर्कहेमचे मानद नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यावर २९ ऑक्टोबर रोजी निर्णय होणार आहे.एएफडीचे स्थानिक नेते थॉमस स्टेफेन म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प हे या सन्मानास पात्र आहेत. कारण त्यांनी इस्रायल-गाझा संघर्ष संपवण्यास मदत केली आणि आठ इस्रायली आणि […] The post डोनाल्ड ट्रम्प यांच्या जर्मनीच्या मानद नागरिकत्वाचा तिढा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘आयएएफ’च्या रॅँकिंगमध्ये वाढ; घसरणीमुळे चीनचा जळफळाट!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या हवाई दलाने चीनवर मात केली आहे. वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉर्डन मिलिट्री एअरक्राफ्टची नुकतीच रँकिंग जाहीर झाली. त्यात इंडियन एअर फोर्स जगातील तिसरं शक्तीशाली हवाई दल ठरलं आहे. चीन भारताच्या मागे चौथ्या स्थानावर आहे. टॉप पोजिशनवर अजूनही अमेरिकेचा दबदबा कायम आहे. त्यानंतर दुस-या नंबरवर रशियन एअरफोर्स आहे. चीनची घसरण चौथ्या […] The post ‘आयएएफ’च्या रॅँकिंगमध्ये वाढ; घसरणीमुळे चीनचा जळफळाट! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सनाई ताकाईची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान
टोकियो : वृत्तसंस्था जपानच्या राजकारणात एक ऐतिहासिक दिवस उजाडला आहे. जपानच्या संसदेने अल्ट्राकंजरवेटिव्ह नेत्या सनाई ताकाईची यांची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या वर्षभराच्या कार्यकाळानंतर त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ताकाईची यांची निवड झाली आहे. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीने जुलै २०२५ च्या निवडणुकीत पराभवानंतर सत्ता परत मिळवण्यासाठी ओसाका-स्थित जपान इनोव्हेशन पार्टीसोबत […] The post सनाई ताकाईची जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
८ कोटीचा बनावट डाक तिकिट घोटाळा
मुंबई : वृत्तसंस्था देशभर पसरलेल्या एका हाय-प्रोफाइल बनावट डाक तिकिटांच्या घोटाळ्याचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला. दिल्ली आणि बिहारमधून आपले नेटवर्क चालवणा-या या टोळीतील तीन आरोपींना मुंबईतून अटक करण्यात आली असून, त्यांच्या बँक खात्यातून सुमारे ८ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार उघड झाले आहेत. जनरल पोस्ट ऑफिसने दाखल केलेल्या तक्रारीनंतर एमआरए मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. […] The post ८ कोटीचा बनावट डाक तिकिट घोटाळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘आयएमएफ’ने बांगलादेशचे ८०० दशलक्ष डॉलर्स रोखले
ढाका : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने बांगलादेशच्या युनूस सरकारला मोठा धक्का दिला. ‘आयएमएफ’ने घोषणा केली आहे की, बांगलादेशात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत पॅकेजचा सहावा हप्ता दिला जाणार नाही. ही रक्कम सुमारे ८०० मिलियन डॉलर्स इतकी आहे. गेल्या वर्षीच्या सत्तापालटानंतर, बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. पुढील वर्षी देशात निवडणुका होणार आहेत. याचदरम्यान, ‘आयएमएफ’ने ही महत्त्वाची घोषणा […] The post ‘आयएमएफ’ने बांगलादेशचे ८०० दशलक्ष डॉलर्स रोखले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ऑपरेशन सिंदूर २.० ची तयारी सुरू : लष्करप्रमुख
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑपरेशन सिंदूर १.० ही लष्करी कारवाई तात्पुरती थांबली असली, तरी ती थांबलेली नाही. ऑपरेशनचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत कारवाई सुरूच राहील आणि भारतीय लष्कर संभाव्य ऑपरेशन सिंदूर २.० साठी सक्रिय तयारी करत आहे, अशी माहिती लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिली. दिवाळीच्या भेटीदरम्यान सीमावर्ती जिल्हा पिठोरगढ येथे जवानांशी बोलताना जनरल द्विवेदी […] The post ऑपरेशन सिंदूर २.० ची तयारी सुरू : लष्करप्रमुख appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एच-१बी व्हिसा प्रकरणी भारतीयांना मोठा दिलासा
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था एच-वनबी व्हिसाचे शुल्क तब्बल १ लाख डॉलर्स म्हणजेच ८८ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आले होते. त्यामुळे भारताला या निर्णयाचा मोठा फटका बसला होता. दरम्यान, आता ट्रम्प सरकारने याच एच-१बी व्हिसासंदर्भात दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या सिटिझनशीप अँड इमिग्रशन सर्व्हिस विभागाने एच-१बी होल्डर्सना मोठा दिलासा दिला आहे. आता ज्या लोकांकडे एच-१बी व्हिसा […] The post एच-१बी व्हिसा प्रकरणी भारतीयांना मोठा दिलासा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
साताऱ्यात कामगारांची 'काळी दिवाळी':माण तालुक्यामधील टाटा पावर पळसावडे प्रकल्पात कामगारांचा संताप
टाटा पावर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडच्या माण तालुक्यातील पळसावडे प्रकल्पातील भूमिपुत्र कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे कंपनी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज एक अनोखे आंदोलन केले. पारंपरिक आनंदाऐवजी ‘काळी दिवाळी’ साजरी करून कामगारांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. काळी रांगोळी, काळे फडके, काळा फराळ आणि कपाळावर काळा नाम लावून कामगारांनी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर आपली एकजूट दाखवली. “कामगार एकजुटीचा विजय असो” आणि “टाटा पावर प्रशासन जागे व्हा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केले. त्यांनी सांगितले की, कामगारांच्या घामावर कंपनी नफा कमावते, पण त्यांच्या हक्कांकडे मात्र वारंवार दुर्लक्ष करते. आजची काळी दिवाळी म्हणजे अन्यायाविरोधात उभारलेला आवाज आहे. कामगारांना त्यांच्या घामाचा आणि हक्काचा सन्मानजनक दाम न मिळाल्यास यापुढील आंदोलन आणखी तीव्र करू. परंतु कामगारांना संपूर्ण न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही. कामगारांनी या वेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रतीकात्मक ‘काळा फराळ’ भेट दिला आणि मागण्यांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली. या आधी 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते, तर 18 ऑगस्ट रोजी ‘दंडवत आंदोलन’ करूनही लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने टाटा पावर प्रशासनाने 29 ऑगस्ट 2025 पर्यंत कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळेच कामगारांचा रोष पुन्हा उफाळला आहे. कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पगारवाढ, आरोग्य विमा सुविधा, आणि कल्याणकारी योजना तातडीने लागू करणे यांचा समावेश आहे. स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, परिसरात कामगारांच्या प्रश्नांबाबत चर्चा सुरू झाली आहे. टाटा पावर पळसावडे प्रकल्पातील ‘काळी दिवाळी’ने कंपनी प्रशासनाच्या दाव्यांना आणि आश्वासनांना प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, पुढील काही दिवसांत या संघर्षाची दिशा ठरण्याची शक्यता आहे.
पोलीस स्मृतीदिनानिमित्त मंगळवारी (२१ ऑक्टोबर) पुणे पोलिसांनी पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्रात शोक कवायतीचे आयोजन केले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून हौतात्म्य पत्करलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. देशभरात दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृतीदिन पाळला जातो. १९५९ मध्ये याच दिवशी लडाखमधील हॉटस्प्रिंग येथे चिनी सैन्याने केंद्रीय निमलष्करी पोलीस दलाच्या तुकडीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात १० पोलीस कर्मचारी शहीद झाले होते. त्यांच्या शौर्याचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. शोक कवायतीदरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस स्मृतीस्तंभास पुष्पहार अर्पण केला. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदुकीतून फैऱ्या झाडून शहीद जवानांना मानवंदना दिली. या प्रसंगी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद, दळणवळण, माहिती-तंत्रज्ञान, परिवहन विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक दीपक पांडे, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मद्य विक्री दुकानातून दीड लाखांची रोकड लंपास पुण्यातील कोंढव्यात मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी दीड लाख रुपयांची रोकड आणि मद्याच्या दोन बाटल्या असा मुद्देमाल लांबविल्याची घटना घडली.याबाबत मद्य विक्री दुकानातील कर्मचाऱ्याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील पिसोळी रस्त्यावर एअरकिंग वाईन शाॅप आहे. चोरट्यांनी मध्यरात्री मद्य विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यात ठेवलेली एक लाख ५७ हजारांची रोकड आणि बिअरच्या दोन बाटल्या असा मुद्देमाल लांबवून चोरटे पसार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी मद्य विक्री दुकान उघडले. तेव्हा चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी मद्य विक्री दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील तपास करत आहेत.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. फेसबुकवर ओळख झालेल्या एका 38 वर्षीय तरुणाने एका विवाहित महिलेशी जवळीक वाढवून तिला ब्लॅकमेल केले आणि गेल्या अडीच वर्षांपासून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील मैत्रीतून सुरू झालेले हे संबंध नंतर ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक शोषणात बदलले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून, तिची आणि आरोपीची ओळख फेसबुकवर झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने अत्यंत घृणास्पद कृत्य करत शारीरिक संबंधांचे व्हिडीओ आणि खाजगी फोटो मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर पीडितेच्या पतीला आणि मुलाला जीवे मारण्याचीही धमकी दिली. या धमक्यांमुळे घाबरलेल्या महिलेने आरोपीचा अडीच वर्षे चाललेला शारीरिक आणि मानसिक छळ निमूटपणे सहन केला. या अडीच वर्षांच्या काळात आरोपीने पीडितेच्या गोरेगाव येथील राहत्या घरात तसेच मुंबईतील विक्रोळीतील स्वतःच्या निवासस्थानी वारंवार अत्याचार केल्याचे समोर आले आहे. सततच्या त्रासाला कंटाळून पीडिता तीव्र तणावाखाली होती. दीर्घकाळ चाललेल्या या छळानंतर अखेर पीडित महिलेने धैर्य एकवटत महाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 38 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे महाड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. महाड शहर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा शुक्रवारी क्रांतीचौकातून निघून बाबा पेट्रोलपंपाजवळील संघाच्या कार्यालयावर जाईल. संघाच्या मनुवादी विचारसरणीच्या विरोधात आणि फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणीच्या समर्थनार्थ हा शांततापूर्ण मोर्चा काढण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते अमित भुईगळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातून निघणाऱ्या या मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडीने सर्व फुले, शाहू आणि आंबेडकरी संघटना, राजकीय पक्ष तसेच विचारसरणीच्या लोकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी, छत्रपती संभाजीनगर पश्चिम येथील वंचित बहुजन आघाडी युवा आघाडीचे अध्यक्ष राहुल मकासरे यांनी सरकारी तांत्रिक महाविद्यालयासमोर परवानगीशिवाय उभारलेल्या संघाच्या स्टॉलचा निषेध केला होता. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या निषेधानंतर, राहुल मकासरे आणि इतर आठ आंबेडकरी लोकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८९ (२), १९०, २९९, २९६, ३५२, ३५१ (२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला. भुईगळ यांनी सांगितले की, राहुल मकासरे यांच्यावर कोणताही हिंसाचार, सामाजिक अशांतता किंवा सार्वजनिक हानी केली नसतानाही अजामीनपात्र आरोप लावण्यात आले आहेत, ही चिंताजनक बाब आहे. या घटनेच्या विरोधात आणि दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ हे जनआक्रोश आंदोलन असल्याचे अमित भुईगळ यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्ह्यातील लोणीकंद परिसरात एका भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. फुलगाव ते आळंदी रस्त्यावर भरधाव कंटेनरने धडक दिल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडले आणि त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कंटेनर आणि ट्रॅक्टर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव राजेंद्र चंद्रकांत चव्हाण (वय ५३, रा. चव्हाणनगर, देहूगाव, ता. हवेली) असे आहे. त्यांचे भाऊ संजय चव्हाण (वय ५१) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र चव्हाण हे लोणीकंद फाटा परिसरातून आळंदी रस्त्याकडे जात असताना फुलगावनजीक हा अपघात घडला. कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर ते रस्त्यावर कोसळले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली ते सापडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक आणि ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाले. लोणीकंद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण हे तपास अधिकारी आहेत. मुंढवा भागात रिक्षा चोरी पुणे शहरात मुंढव्यातील केशवनगर भागातून एकाची रिक्षा चोरून नेण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत एका रिक्षाचालकाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते मुंढव्यातील केशवनगर भागात राहायला आहेत. १९ ऑक्टोबर रोजी त्यांनी केशवननगरमधील जय महाराष्ट्र चौकात रात्री रिक्षा लावली होती. चोरट्यांनी रिक्षाचे लाॅक तोडून रिक्षा चोरून नेली. चोरीला गेलेल्या रिक्षाची किंमत अडीच लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस कर्मचारी साळुंके तपास करत आहेत. शहर परिसरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण मोठे आहे
पुण्यात दिवाळीच्या काळात एका नामवंत पादत्राणे कंपनीच्या नावाने बनावट उत्पादनांची विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी रास्ता पेठेतील तीन पादत्राणे विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपयांची बनावट पादत्राणे जप्त करण्यात आली आहेत. पादत्राणे निर्मिती करणाऱ्या संबंधित कंपनीच्या स्वामित्व हक्क विभागाचे अधिकारी निखिल पाटील यांनी समर्थ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पाटील यांना माहिती मिळाली होती की, रास्ता पेठेतील काही दुकाने नामवंत कंपनीच्या नावे बनावट पादत्राणांची विक्री करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तीन दुकानांवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत एक लाख दहा हजार रुपयांची बनावट पादत्राणे जप्त करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते आणि गुन्हे शाखेचे निरीक्षक चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली, तर सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे पुढील तपास करत आहेत. सणासुदीच्या काळात नामवंत कपडे आणि पादत्राणे उत्पादकांच्या नावे बनावट उत्पादनांची विक्री करण्याच्या अनेक तक्रारी समोर येतात. अशा बनावट मालाची स्वस्त दरात विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जाते. बनावट टी-शर्ट, जीन्स आणि पादत्राणे परराज्यातून पुणे व मुंबईतील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठवली जातात. यापूर्वीही पोलिसांनी शहरातील विविध भागांतील दुकानदारांवर कारवाई करून लाखो रुपयांची बनावट उत्पादने जप्त केली आहेत. पीएमपी प्रवासी महिलेकडील अडीच लाखांचे दागिने लंपास पीएमपी प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी दोन लाख ५७ हजार रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ४५ वर्षीय महिला वारजे माळवाडी भागात राहायला आहेत. त्या वारजे माळवाडी ते खडकी बाजार या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून दोन लाख ५७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. खडकी बाजार परिसरातील थांब्यावर त्या उतरल्या. तेव्हा पिशवीतून दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला.
माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
चाळीसगाव : चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे चाळीसगाव आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राजीव देशमुख यांनी २००९ ते २०१४ या कालावधीत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. आमदारकीच्या काळात त्यांनी चाळीसगाव […] The post माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपकडून सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरू असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षाचे संपर्क मंत्री व राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी ग्रामीण आणि शहरातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, ग्रामीणची बैठक सकाळी पार पडली आता ही दुसरी बैठक शहराची पार पडली आहे. या बैठकीत आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. तसेच आज ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यांचाही सत्कार करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात सर्वांच्या सूचनेनुसार अजित पवार यांच्याकडे अहवाल देऊन याबाबत ते निर्णय घेतील. आमचे हेच म्हणणे आहे की महायुतीमध्ये येणारी निवडणूक एकत्र लढवायची. परंतु, काही कार्यकर्त्यांची स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भावना आहे. काही लोकांची महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका आहे. परंतु, पक्षाच्या अध्यक्षांच्या सूचनेनुसार सगळ्या प्रभागांवर आपल्या उमेदवारांची चाचपणी करण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची संपूर्ण टीम निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे जे निर्णय घेतील ते आम्ही मान्य करणार असल्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी पक्षात अनेक तरुणांना आपल्याला जबाबदारी मिळावी अशी इच्छा आहे. सगळ्यांना वाटत आहे की पक्षाने आपल्यावर जबाबदारी टाकावी. अनेकांनी पक्षात आज प्रवेश केला आहे. मागे सुद्धा बऱ्याच जणांनी पक्षात प्रवेश केला आहे. येणाऱ्या काळात सुद्धा अनेक मोठे मोठे कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात येण्यास इच्छुक आहेत, मी त्यांचे नाव सांगत नाही. पण अनेकांना पक्षात येण्याची इच्छा आहे. अजितदादांच्या कानावर घालून त्यांचा पक्षप्रवेश निश्चित केला जाणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची संपूर्ण टीम निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे दत्तात्रय भरणे म्हणाले. दत्तात्रय भरणे जरी पक्ष सोडून गेला तरी पक्षाला फरक पडणार नाही राजकारणात काही गोष्टी असतात की ज्यावेळेस जो प्रवेश होईल त्यावेळी ते सांगितले जाते. खूप चांगले नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात येणार आहेत. अजून तरी आमच्या कानावर नाही आले की आमच्या पक्षातून कोणी जात आहे. दत्तात्रय भरणे जर पक्ष सोडून गेला तर पक्षाला आणि अजित दादांना त्याचा फरक पडणार नाही. राष्ट्रवादीची टीम सगळीकडे सज्ज आहे. अनेक नेते आमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. तसेच आजच्या बैठकीला अनेक पदाधिकारी नसल्याचे पत्रकारांनी विचारले, त्यावर बोलताना भरणे म्हणाले, काही लोकांना अडचणी असतात त्यामुळे कदाचित ते आले नसतील. पण त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा एकसंघ आहे. या निवडणुकीत मागच्या वेळेस पेक्षा राष्ट्रवादी पक्षाचे आकडे जास्त दिसतील. महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत, पण यासंदर्भातील निर्णय हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत. एका-एका वॉर्डात 10-10 कार्यकर्ते इच्छुक असतील तर त्या ठिकाणी वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो. आज तरी आम्ही महायुतीमधून निवडणूक लढवणार आहोत. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका होऊ शकतात, असेही दत्तात्रय भरणे म्हणाले. पाऊस उशिरा पडल्याने पंचनाम्याला उशीर राज्यातील अतिवृष्टी संदर्भात बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले, आपल्याकडे सप्टेंबर महिन्यात पाऊस पडला. शेवटी शेवटी पाऊस पडल्याने पंचनाम्याला उशीर झाला आहे. तसेच एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे 2 हेक्टरपर्यंत शासन मदत करते, आता ते 3 हेक्टर करण्यात आले आहे. त्यामुळे एक हेक्टर वाढल्याने पुन्हा पंचनाम्याला सुरू करत असल्याची माहिती भरणे यांनी दिली आहे.
टेम्पोची दुचाकीला धडक, बहीण-भावासह तिघे ठार
कोल्हापूर : प्रतिनिधी चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोने दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत तिघे ठार झाले. कोल्हापूर-राधानगरी रोडवर कौलव येथे आज, मंगळवार सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. ऐन दिवाळीतच अपघातात तिघे ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रीकांत बाबासो कांबळे (तरसबळे, ता राधानगरी), दिपाली गुरुनाथ कांबळे (शेडुर ता. कागल) अशी मृत दोघांची नावे आहेत. तर अथर्व गुरुनाथ […] The post टेम्पोची दुचाकीला धडक, बहीण-भावासह तिघे ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘लाडकी’योजनेत १२,४३१ लाडक्या भावांची घुसखोरी
मुंबई : प्रतिनिधी महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. १२ हजारांपेक्षा जास्त पुरूषांनी खोटी कागदपत्रे देऊन या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे. फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचे १२ हजार पुरूषांनी प्रत्येक महिन्याला १५०० रूपये लाटले आहे. ही माहिती समोर आल्यानंततर ही तर लाडके भाऊ योजना असल्याची […] The post ‘लाडकी’योजनेत १२,४३१ लाडक्या भावांची घुसखोरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे स्टेशन परिसरात प्रवाशांचे मोबाइल हिसकावून घेणाऱ्या चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरट्यांकडून १९ मोबाइल संच आणि एक दुचाकी असा एकूण ३ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोहेल बादशहा खान (वय २०), आयान झाकीर शाह (वय २१) आणि फरहान वसीम शेख (वय २०, तिघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे स्टेशन परिसरातील साधू वासवानी चौकातून या आरोपींनी एका प्रवाशाचा मोबाइल हिसकावून नेला होता. या घटनेनंतर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पथकातील पोलीस हवालदार प्रदीप शितोळे, सारस साळवी आणि प्रकाश आव्हाड यांनी चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोबाइल हिसकावणारे चोरटे कोंढवा येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपींनी बंडगार्डन, मार्केट यार्ड, वानवडी, कोंढवा आणि स्वारगेट पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मोबाइल हिसकावण्याचे एकूण आठ गुन्हे केल्याचे कबूल केले. पोलिसांनी आरोपींनी आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू केला आहे. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक आयुक्त संगीता अल्फान्सो-शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीळकंठ जगताप, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, मोहन काळे, प्रदीप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड, सागर घोरपडे, महेश जाधव, ज्ञानेश्वर बढे, मनीष संकपाळ आणि मनोज भोकरे यांनी या कामगिरीत सहभाग घेतला.
पुण्यात स्वस्त सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक:दोन महिला आरोपींना आंबेगाव पोलिसांनी अटक केली
पुण्यात स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक लाख दोन हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. आशाबेन मंगाभाई सरवय्या (वय ५०) आणि सोनूबेन आकाश सरवय्या (वय ३०, दोघी रा. जुना कोडीत रस्ता, सासवड, ता. पुरंदर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला १५ ऑक्टोबर रोजी दुपारी कात्रजमधील संतोषनगर भागातून जात असताना, आरोपी सरवय्या यांनी त्यांना एका किराणा दुकानासमोर अडवले. आरोपींनी महिलेला सांगितले की, त्यांच्याकडे सोन्याचे मणी आहेत, जे तिच्या मंगळसूत्रापेक्षा जास्त वजनाचे आहेत. 'तुमचे मंगळसूत्र दिल्यास त्या बदल्यात जास्त वजनाचे सोन्याचे मणी देतो, सोने महाग झाले आहे, तुम्हाला स्वस्तात सोने देतो,' असे आमिष दाखवून आरोपींनी महिलेकडील एक लाख दोन हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र घेतले आणि त्या पसार झाल्या. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तक्रारदार महिलेने आरोपी महिलांनी दिलेले मणी तपासले असता ते बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी महिला कात्रजहून सासवडकडे गेल्याचे दिसून आले. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिला सासवडमधील जुन्या कोडित गाव रस्त्यावरील एका पत्र्याच्या खोलीत राहत होत्या. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी कोडित रस्त्यावरील खोलीतून आरोपी सरवय्या यांना ताब्यात घेतले. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले आणि उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन:चटणी-भाकर खाऊन दारातच नोंदवला सरकारचा निषेध
छत्रपती संभाजीनगर येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी निवासस्थानासमोर अर्धनग्न आंदोलन करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले असतानाही ती प्रत्यक्षात न मिळाल्याने शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. या वेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात चटणी-भाकर खाऊन निषेध नोंदवला आणि सरकार जागे व्हा अशा घोषणा दिल्या. आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही ठिकाणी किरकोळ झटापट झाली. पोलिसांनी सुमारे 20 ते 25 शेतकऱ्यांना ताब्यात घेतले असून नंतर त्यांना सोडण्यात आले. घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी, ज्वारीसह अनेक पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने नुकतेच विशेष पॅकेज जाहीर करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत रक्कम जमा होईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, मदत मिळण्यास झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळेच हे आंदोलन करण्यात आले असल्याचा दावा या वेळी करण्यात आला. शासन केवळ घोषणाच करत असल्याचा आरोप या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे म्हणाले की, सरकारने आश्वासन दिले, पण शेतकऱ्यांना प्रत्यक्षात काहीच मिळाले नाही. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घरी अंधार आहे, जनावरांना चारा नाही, आणि शासन केवळ घोषणाच करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. इतर जिल्ह्यांतील आंदोलनाचा इशारा या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे, ज्ञानेश्वर मुळे, दिनकर पवार, प्रकाश बोरसे, राजू बोंगाणे, शिवाजी धरफळे, यादवराव कांबळे, गणपत खरे, पुरण सनान्से यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या अर्धनग्न आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून सरकारने तातडीने मदत वितरित करावी, अशी मागणी होत आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी देखील अशा प्रकारच्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
काली पूजा उत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष:पुणे शहरात बंगाली बांधवांकडून उत्साहात सुरुवात
पुण्यात बंगाली बांधवांच्या श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. या उत्सवाचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी या उत्सवात सहभागी होत काली मातेकडे पुणे शहर भयमुक्त, स्वच्छ आणि सुंदर व्हावे अशी प्रार्थना केली. यावेळी पुणे शहर सार्वजनिक काली पूजा कमिटीचे सेक्रेटरी सुब्रतो मजुमदार, खजिनदार विनोद संतरा, उपसेक्रेटरी अमर माझी, सदस्य अनुप माईती, महादेव माझी, पूनचंद्र दास, संकेत मजुमदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रवींद्र धंगेकर यांनी यावेळी नमूद केले की, हा उत्सव मागील पंचवीस वर्षांपासून साजरा केला जात असून त्यात अनेक बंगाली बांधव सहभागी होतात. महाराष्ट्रात, विशेषतः पुणे शहरात, बंगाली बांधव गेल्या ४५ वर्षांपासून सोन्याचे कारागीर म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्याशी आपले घरगुती संबंध आहेत.काली मातेवर श्रद्धा असलेल्या बंगाली नागरिकांना आवश्यक त्या सुविधा मिळवून देणे हे आपले कर्तव्य असून, त्यांच्या भावनांचा आपण आदर करतो, असेही धंगेकर यांनी यावेळी सांगितले. 'लक्ष्य'... एकल नृत्य रचनांचा कार्यक्रम भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लक्ष्य’ हा शास्त्रीय नृत्यप्रकारांवरील विशेष कार्यक्रम पुणेकर रसिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक प्रसार उपक्रमाच्या अंतर्गत हा कार्यक्रम शास्त्रीय नृत्यसंवर्धन संस्था(पुणे) यांच्या सहकार्याने सादर केला जाणार आहे.हा कार्यक्रम रविवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ५.३० वाजता भारतीय विद्या भवन, सरदार महादेव बळवंत नातू सभागृह( शिवाजीनगर) पुणे येथे होणार आहे. ‘लक्ष्य’ या कार्यक्रमात तीन शास्त्रीय नृत्यशैलींची वैयक्तिक सादरीकरणे होणार असून प्रेक्षकांना भारतीय नृत्यपरंपरेचा अप्रतिम अनुभव घेता येणार आहे. या कार्यक्रमात स्वराली भोपे (कुचिपुडी), स्वरदा भावे (भरतनाट्यम) आणि नृत्यगुरू उमा डोगरा (कथक) या तीन कलाकारांच्या एकल नृत्यसादरीकरणांचा समावेश आहे. तीन भिन्न शैलींतील नृत्य, भावाभिव्यक्ती आणि ताल यांचा संगम या सायंकाळी अनुभवता येणार आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम उपक्रमांतर्गत होणारा हा २६० वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.
संगीतकार श्रीनिवास खळे आणि गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'स्वरयात्री' या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वरानंद आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी सणाचे औचित्य साधून रसिकांना ही स्वरभेट मिळाली. या कार्यक्रमातून खळे यांच्या वैविध्यपूर्ण रचना आणि वर्मा यांनी अजरामर केलेली भावगीते सादर करण्यात आली. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. संवाद, पुणेचे सुनील महाजन यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली होती, तर प्रा. प्रकाश भोंडे यांनी सूत्रसंचालन केले. निकिता मोघे आणि केतकी महाजन-बोरकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. या प्रसंगी स्वरानंद प्रतिष्ठानला ५५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रा. प्रकाश भोंडे यांचा ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगशे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. लोकमान्य मल्टिपर्पज संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक सचिन होडगे यावेळी मंचावर उपस्थित होते. 'जय जय राम कृष्ण हरी'च्या गजराने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यानंतर संत तुकोबाराय यांच्या 'सुंदर ते ध्यान' या भक्तीरचनेने मैफिलीला रंगत आणली. श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेली 'लाजून हासणे', 'श्रावणात घननिळा', 'जेव्हा तुझ्या बटांना', 'एका तळ्यात होती', 'काळ देहासी', 'राजस सुकुमार', 'शुक्रतारा मंदवारा' यांसारखी गाणी सादर झाली. तसेच, माणिक वर्मा यांच्या 'उघड नयन देवा', 'सावळाच रंग तुझा', 'क्षणभर उघड नयन', 'पाण्यातले पहाता', 'हसले मनी चांदणे' यांसारख्या सुप्रसिद्ध रचनांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मधुरा दातार, स्वरदा गोडबोले आणि पार्श्वगायक जितेंद्र अभ्यंकर यांनी आपल्या सुमधूर आवाजात गीते सादर केली. पराग माटेगावकर यांनी संगीत संयोजन केले होते. कलाकारांना केदार परांजपे, अमृता ठाकूरदेसाई, निलेश देशपांडे, अभिजित भदे, डॉ. राजेंद्र दूरकर आणि केदार मोरे यांनी समर्पक साथसंगत केली. प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी संवाद, पुणेच्या वाटचालीचा आढावा घेतला. संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात ५५ वर्षे सातत्याने कार्यक्रम घेणाऱ्या स्वरानंद संस्थेचा पुणेकरांमार्फत सन्मान व्हावा, या उद्देशाने प्रा. प्रकाश भोंडे यांचा सत्कार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. मोहन आगशे यांनी प्रा. प्रकाश भोंडे यांच्या संगीतविषयक कार्याचे कौतुक केले. रसिकांच्या सहभागामुळे स्वरानंद प्रतिष्ठानच्या अनेक कार्यक्रमांना यश मिळाले आणि त्यातून अनेक कलाकार घडले, असेही ते म्हणाले.
बीड : दरवर्षी दिवाळीत चिवड्यासोबत राजकीय फटाकेबाजी होते अशातच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांना दीपावलीच्या मनापासून त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच भुजबळांना कोणत्याच फटाक्याची उपास चालत नाही ते फुसकी आहेत. छगन भुजबळ हे घुरट आणि ठुसका फटाका आहेत, असा टोला जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना लगावला. सरकारने जाहीर केलेल्या […] The post भुजबळ म्हणजे फुसका फटाका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठी संस्कृती जपणा-या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करणार
मुंबई : प्रतिनिधी ग. दि. माडगूळकर, जगदिश खेबुडकर आणि मंगेश पाडगांवकर या शब्दप्रभूंच्या कार्यातून प्रेरणा घेऊन मराठी संस्कृती जपणा-या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येईल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड.आशिष शेलार यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने रसिकांची दिवाळी स्वर संगीताने उजळण्यासाठी आज स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, […] The post मराठी संस्कृती जपणा-या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या रणनीती व मोर्चे ठरवण्याच्या तयारीला लागलेत. पण आता सत्ताधारी महायुतीच्या घटकपक्षांत एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्यावरून राजकीय फटाके फुटण्यास सुरूवात झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या खासदाराने थेट भाजपवर महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा आरोप केला आहे. यामुळे भाजप व शिवसेनेत राजकीय बेबनाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेच्या काही माजी नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावरून शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणी भाजपवर महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, महायुती ही विरोधकांना संपवण्यासाठी अस्तित्वात आली. ज्यांनी हिंदुत्त्वाचे विचार सोडले त्यांचा पराभव करण्यासाठी अस्तित्वात आली. पण आता काही ठिकाणी असे होत आहे की, महाविकास आघाडीमधील लोकांना विरोध न करता महायुतीमधीलच घटकपक्षांचे नगरसेवक फोडले जात आहेत. अंबरनाथ येथील आमचा नगरसेवक असेल, पालघर येथील जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, या सर्वांना फोडून आपल्या पक्षात घेतले जात आहे. हे साफ चुकीचे आहे. भाजप आमच्या महायुतीमधील मोठा भाऊ आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला समजून घेतले पाहिजे. पण तेच आमच्या पक्षातील नगरसेवकांना गळाला लावून त्यांना पक्षात घेत असतील, तर हे काही योग्य नाही. हा महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार आहे. एकमेकांचे माणसे फोडण्याची प्रथा चुकीची नरेश म्हस्के पुढे म्हणाले, राज्यपातळीवर नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर नेत्यांनी गल्लीबोळातल्या राजकारणात पडू नये. त्यांनी आपली महायुती भक्कम ठेवण्यावर भर दिला पाहिजे. आपण मिळून विरोधकांशी दोनहात करूया. पण ते करताना आपल्याच महायुतीमधील मित्रपक्षांचे नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रकार सुरू झालेत. आपण महायुती म्हणून दुसऱ्यांशी लढण्याचे ठरवले आहे. आपण विरोधकांशी लढूया. महायुतीमधील प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी याचे भान ठेवले पाहिजे. एकमेकांचे नगरसेवक फोडण्याची जी प्रथा सध्या सुरू झाली आहे, ती पूर्णतः चुकीची आहे. एकमेकांसोबत लढायचे तर लढूया. आपण स्वबळावर लढलो तरी आपल्या मित्रपक्षांवर टीका करायची नाही. एकमेकांचे माणसे फोडणे योग्य नाही, असेही नरेश म्हस्के या प्रकरणी आपला संताप व्यक्त करताना म्हणालेत. हे ही वाचा... एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य:ठाकरेंची बाजू घटनात्मक पातळीवर अत्यंत मजबूत; विधिज्ञ असीम सरोदे यांचा दावा मुंबई - शिवसेना पक्ष व चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत अंतिम निकाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने येण्याची शक्यता अगदी शून्य आहे. कायदेशीर व घटनात्मक पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागेल, असा ठाम दावा विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी शिवसेनेत एकच खळबळ माजली आहे. सद्यस्थितीत वारंवार तारीख देण्याची प्रक्रिया अतिशय वाईट पातळीला पोहोचली आहे. न्यायाला विलंब होणे हा ही एकप्रकारचा अन्यायच आहे, असेही ते यावेळी म्हणाले. वाचा सविस्तर
‘शुद्धीकरणा’मुळे महायुतीत फूट?
पुणे : प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर, पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या ‘शुद्धीकरण’ प्रकरणावरून महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीत मोठी फूट पडल्याचे चित्र आहे. शनिवारवाड्यात काही महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी आक्रमक होत तिथे जाऊन शुद्धीकरण केले होते. यावेळी त्यांनी शनिवारवाडा परिसरातील मजार काढून टाकण्याची मागणी केली. यावरून एकनाथ […] The post ‘शुद्धीकरणा’मुळे महायुतीत फूट? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात राष्ट्रीय पोषण माह अंतर्गत विविध उपक्रम राबवून त्याच्या नोंदी घेण्याच्या सूूचना असतानाही २२३७ अंगणवाड्यांमधून उपक्रम न राबणविणाऱ्या हिंगोलीसह ३१ जिल्ह्यांतील महिला बाल कल्याण विभागाच्या उप मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना तातडीने खुलासा करण्याचे आदेश बालविकास सेवा योजना आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. राज्यात बालविकास सेवा योजना आयुक्तालयाच्या वतीने सुमारे १.१० लाख अंगणवाड्या चालविल्या जातात. या अंगणवाड्यांमधुन येणाऱ्या बालकांना पुरक पोषण आहार देेणे, पुर्व प्राथमिक अभ्यासक्रम शिकविणे, गरोदर व स्तनदा मातांना आहार पुरवठा करण्याचे काम अंगणवाड्यांमार्फत केले जाते. दरवर्षी ता. १७ सप्टेंबर ते ता. १६ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण माह साजरा केला जातो. यामध्ये पोषण आहाराचे महत्व यासह इतर माहिती दिली जाते. या शिवाय खाद्यपदार्थांची माहितीही दिली जाते. या शिवाय गरोदर, स्तनदा मातांसाठी विविध धान्यांपासून पदार्थ तयार करून दाखविले जातात. अंगणवाडीनिहाय उपक्रमांची ऑनलाईन नोंदणी करणे अपेक्षीत आहे. मात्र राज्यातील २२३७ अंगणवाड्यांमधून कुठलयाही प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले नाही या प्रकारामुळे केंद्र शासनाने तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील तीन अंगणवाड्यांचा समावेश आहे. या शिवाय ठाणे ३०१, छत्रपती संभाजीनगर २२४, बीड १७०, सोलापूर १३५, चंद्रपूर १२९, कोल्हापूर १२६, नंदूबरबार १२४, पुणे १००, अकोला ९८, जालना ९८, नांदेड ८५, धाराशिव ८३, गडचिरोली ७९, नाशीक ७६, बुलढाणा ६८, पभणी ६१, यवतमाळ ५६, पालघर ३१, गोंदिया २९, मुंबई २८, अहिल्यानगर २६, सिंधुदुर्ग १६, मुंबई शहर १४, अमरावती १३, जळगाव १२, लातूर १२, सांगली ९, वाशीम ९, रत्नागिरी जिल्हयातील १ अंगणाडीचा समावेश आहे. या जिल्हयातील उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा खरपूस समाचार घेतला आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे केवळ सत्ता व खुर्चीसाठीच एकत्र आलेत. ठाकरे परिवार हे मजबुरीचे दुसरे नाव झाले आहे, असे त्या म्हणाल्यात. यावेळी त्यांनी आमदारांना कथितपणे मारून टाकण्याची भाषा करणाऱ्या माजी आमदार बच्चू कडू यांच्यावरही निशाणा साधला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बंधू बऱ्याच वर्षांच्या अबोल्यानंतर आता एकत्र आलेत. त्यांच्या युतीची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चर्चा सुरू आहे. पण त्यावर टीकाही होत आहे. भाजपने यापूर्वीच ठाकरे बंधूंच्या युतीचा राज्याच्या राजकारणावर कोणताही परिणाम पडणार नसल्याचा दावा करत त्यांच्या युतीची खिल्ली उडवली आहे. त्यानंतर आता अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी राज व उद्धव ठाकरे हे पैसा अन् तोड्या करण्यासाठीच एकत्र आल्याचा दावा केला आहे. पैसा व तोड्या करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र नवनीत राणा यांनी मंगळवारी आपल्या निवासस्थानी अंध, अपंग व कुष्ठरोगी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच राणा दाम्पत्याच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी नवनीत राणा यांनी ठाकरे बंधू तथा प्रहार संघटनेचे माजी आमदार बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, कुटुंब एकत्र येणे ही आपली संस्कृती आहे. आपण ती जपली पाहिजे. आज संपूर्ण महाराष्ट्र दोन भाऊ एकत्र आल्याचे पाहत आहे. पण ते कुटुंबासाठी नाही तर फक्त सत्ता व खुर्चीसाठी एकत्र आलेत. फक्त पैसा व तोड्या करण्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आलेत. ठाकरे परिवार हे मजबुरीचे दुसरे नाव झाले आहे. बच्चू कडूंनी आपल्या खिशात हात टाकलाच नाही नवनीत राणा यावेळी बच्चू कडूंवर निशाणा साधताना म्हणाल्या, सध्या बरेच लोक नौटंकी करत आहेत. बाहेर फिरून आमदारांना मारून टाका असे सांगत आहेत. पण तुम्ही चारवेळा आमदार होता. दोनवेळा मंत्री राहिला. तेव्हा शेतकऱ्यांसाठी तुमची पोटदुखी बाहेर आली नाही. आज अनेक लोक आजीचे माजी झालेत. कारण, त्यांनी कधीच आपल्या खिशात हात टाकला नाही. फक्त इनकमिंग. आऊटगोइंग नाही. अचलपूरच्या माजी आमदारांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. मी त्यांना दहावेळा म्हणाले की, तुमची संपत्ती मला द्या, माझी संपत्ती तु्म्ही घ्या. आता त्यांना एका शेतकऱ्याच्या मुलाने पाडले आहे, असे त्या म्हणाल्या. हे ही वाचा... एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य:ठाकरेंची बाजू घटनात्मक पातळीवर अत्यंत मजबूत; विधिज्ञ असीम सरोदे यांचा दावा मुंबई - शिवसेना पक्ष व चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत अंतिम निकाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने येण्याची शक्यता अगदी शून्य आहे. कायदेशीर व घटनात्मक पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागेल, असा ठाम दावा विधिज्ञ असीम सरोदे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी शिवसेनेत एकच खळबळ माजली आहे. सद्यस्थितीत वारंवार तारीख देण्याची प्रक्रिया अतिशय वाईट पातळीला पोहोचली आहे. न्यायाला विलंब होणे हा ही एकप्रकारचा अन्यायच आहे, असेही ते यावेळी म्हणाले. वाचा सविस्तर
पुण्यातील जैन बोर्डिग हाऊसच्या कथित जमीन विक्री घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाने आपल्या प्रतिस्पर्धी शिंदे गटाच्या नेत्याला जाहीर पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी या प्रकरणी शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांची बाजू घेत या प्रकरणात त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. भाजप नेत्यांनी या प्रकरणी खालच्या पातळीवरील टीका करून स्वतःची पातळी घालवली आहे. त्यामुळे एक पुणेकर म्हणून मी रवींद्र धंगेकर यांच्या पाठिशी आहे, असे ते म्हणालेत. सत्ताधारी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या विक्री व्यवहाराला जोरदार विरोध केला आहे. त्यांच्या लढ्याला सोमवारी पहिले यश मिळाले. मुंबई येथील धर्मादाय आयुक्तालयाने या प्रकरणी परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला. यामुळे या प्रकरणी वादात सापडलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना जबर झटका बसला. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी रवींद्र धंगेकर यांच्या लढ्याला एक पुणेकर म्हणून पाठिंबा दर्शवला आहे. भाजपच्या लोकांनी स्वतःची पातळी घालवली वसंत मोरे या प्रकरणी बोलताना म्हणाले, मी एक पुणेकर म्हणून रवींद्र धंगेकर यांच्या पाठिशी आहे. ते सत्तेत असूनही एखादा विषय लावून धरत आहेत. यासंबंधी त्यांचे कौतुक करायलाच हवे. त्यांनी हा विषय लावून धरल्यामुळे भाजपचे नेते त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. त्यांचा उल्लेख भटकी कुत्री असा केला जात आहे. हा संतापजनक प्रकार आहे. भाजपच्या नेत्यांनी स्वतःची पातळी घालवली आहे. अशी टीका करून ते स्वतःची पातळी काय आहे हे दाखवून देत आहेत. रवींद्र धंगेकर एखादी खरी बाजू मांडत असतील, तर तुम्ही ती स्वीकारायला हवी. भटकी कुत्री व अन्य कुठलीही खालच्या पातळीवरील टीका भाजपचे लोक करत असतील तर ते स्वतःची पात्रताच दाखवत आहेत. खऱ्याचे समर्थन केले पाहिजे वसंत मोरे पुढे म्हणाले, एखादा व्यक्ती खरे बोलत असेल तर ते तुम्ही ऐकले पाहिजे. रवींद्र धंगेकर खोटे बोलत असते तर धर्मादाय आयुक्तांनी त्या व्यवहाराला स्थगिती दिली नसतसी. याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे. धंगेकर खरे बोलत असावेत. मी स्वतः त्यांना ओळखतो. ते अभ्यासपूर्ण काम करतात. मला त्यांच्या कामाची पद्धत माहिती आहे. एखादा विषय हाती घेतला तर ते लावून धरतात. पुण्यातील एखादी व्यक्ती, एखाद्या पक्षाचा पदाधिकारी या शहराचा नागरीक म्हणून शहरात शांतता राहावी यासाठी प्रयत्न करत असेल, शहरातील जमिनी कुणी बळकावू नये यासाठी प्रयत्न करत असेल तर आपण त्या व्यक्तीचे समर्थन केले पाहिजे. जैन धर्मीय रस्त्यावर उतरत असतील तर त्यात काही चुकीचे नाही प्रस्तुत व्यवहारातील जमीन जैन विद्यार्थ्यांसाठी आहे. त्या जागेवर कुणीतरी गोखले नामक बांधकाम व्यावसायिक येतो. तिथे मॉल बांधण्याचा प्रयत्न करतो. तेथील जैन समुदायाला हटवण्याचा प्रयत्न होत असेल आणि त्याविरोधात जैन धर्मीय रस्त्यावर उतरत असतील, तर त्यात काहीही चुकीचे नाही. एक पुणेकर म्हणून मी धंगेकर यांच्या पाठिशी आहे, असेही वसंत मोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
वाशीसह कामोठे येथे लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू
नवी मुंबई : कामोठे परिसरातील एका इमारतीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली. या आगीत जळून माय-लेकीचा मृत्यू झाला आहे. रेखा शिसोदिया आणि मुलगी पायल शिसोदिया अशी मृत माय-लेकीची नावे आहेत. तर दुसरीकडे नवी मुंबईतील वाशी येथे लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबईत लागलेल्या वाशी आणि कामोठे येथील आगीत एकूण सहा […] The post वाशीसह कामोठे येथे लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिक : प्रतिनिधी ऐन दिवाळीत कोथिंबीर, हिरवी मिरची आणि ढोबळी मिरचीला शंभर रुपये भाव मिळाला. तर गावरान मेथीला तर संपूर्ण वर्षभरात प्रथमच ८० रुपये भाव रविवारी मिळाला. तर मंगळवारी आवक वाढल्याने भावात २० रुपयांची घसरण झाली. कोथिंबिरीने मात्र वर्षभरात दोनदा शंभरी पार केली. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची झळ अजूनही भाजीबाजाराला बसत आहे. दिवाळीत मागणी वाढताच […] The post मेथीच्या जुडीला ८० रुपये भाव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सीना नदीला आलेला पूर ओसरून तब्बल एक महिना उलटला असला, तरी उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे-पाथरीसह परिसरातील अनेक गावांमध्ये अजूनही वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत झालेला नाही. पूरानंतरच्या पुनर्वसनाच्या कामात झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांच्या घरात आजही अंधार आहे. दिवाळीसारखा सण जनरेटरच्या उजेडात साजरा करावा लागत आहे, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. पूर गेल्यानंतर सरकारने तातडीची मदत म्हणून प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला दहा हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. ही मदत काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असली, तरी त्या रकमेने फक्त जनरेटर भाडे आणि डिझेलचा खर्च भागला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरले नाही. या गावातील एका शेतकऱ्याने सांगितले की, पूर गेल्यावर आम्ही वाट पाहत होतो की सरकारकडून काही मदत येईल आणि वीज पुन्हा सुरू होईल. पण अजूनही आमच्या घरात अंधार आहे. जनरेटर लावून दिवे लावावे लागत आहेत. दिवाळीत आकाशकंदील लावायचा तर तोही डिझेलवर लावावा लागत आहे. काही कुटुंबांनी शासनाच्या दिवाळी किट मधील वस्तूंनीच सण साजरा केला, तर काहींना चाऱ्याच्या टंचाईमुळे जनावरांसाठी ऊस कापून खाऊ घालण्याची वेळ आली आहे. पूरानंतर शेतातील पिके वाहून गेल्याने जनावरांसाठी खाद्य मिळवणेही आव्हान ठरत आहे. पूरग्रस्त भागांना भेट दिल्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारवर थेट टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल, अशी घोषणा केली होती. पण अजूनही अनेक गावांमध्ये ती मदत पोहोचलेली नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, पण बँकांनी ती रक्कम होल्ड केली आहे. हे सरकारच्या दुर्लक्षाचे उदाहरण आहे. ओमराजे म्हणाले की, सरकारने दिवाळीपूर्वी मदत मिळेल असे सांगितले, पण आज गावोगावी पाहा, लोक अंधारात आहेत, दिवे नाहीत, वीज नाही, सण नाही. त्यामुळे सरकारने जरा वास्तव बघावे आणि शक्य असेल तर दिवाळीच काही दिवस पुढे ढकलावी. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. वीजपुरवठा विस्कळीत, पुनर्बांधणीला विलंब स्थानिक प्रशासनाच्या मते, पूराच्या पाण्यामुळे वीज खांब आणि ट्रान्सफॉर्मरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे दुरुस्तीची कामे सुरू आहेत, परंतु ग्रामीण भागात उपकरणे आणि तंत्रज्ञांची कमतरता असल्याने प्रक्रिया धीमी आहे. दरम्यान, पूरग्रस्तांनी सांगितले की, आम्हाला सांगितलं जातंय की दोन दिवसात वीज येईल, पण तो दोन दिवसांचा शब्द मागच्या महिन्यापासूनच ऐकत आहोत. आता दिवाळी आली, तरी घरात अंधारच आहे. मदत तत्काळ वितरित करावी पूरामुळे नुकसान झालेली घरे, नष्ट झालेली शेती आणि आता विजेचा अभाव, या सर्वांनी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास डळमळीत केला आहे. आमचे सगळे गेले, आता फक्त थोडे आयुष्य उरलंय तेही जनरेटरच्या आवाजात जगतोय, असं एका वयोवृद्ध शेतकऱ्याने म्हटले आहे. पूर ओसरला, पण सोलापूरच्या तिऱ्हे-पाथरी परिसरात अंधार कायम आहे. सरकारच्या घोषणा आणि जमिनीवरील वास्तव यात मोठी दरी आहे. जनरेटरच्या उजेडात साजरी होणारी दिवाळी ही त्या शेतकऱ्यांच्या संघर्षाची जिवंत साक्ष देते. आता सरकारने वीजपुरवठा सुरळीत करण्यासोबतच पूरग्रस्तांना दिलेली मदत तत्काळ वितरित करावी, अशी मागणी केली जात आहे.
इतिहास अभ्यासक अमोघ वैद्य यांनी ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराची स्थापत्यशैली पुणेकरांसमोर उलगडली. मंदिरामध्ये सभामंडप (अंतराळ) आणि गर्भगृह आहे. शिवकालीन सभामंडप पूर्णपणे यादवकालीन शैलीत बांधलेला आहे. मंदिराचा बाह्यभाग लाकडी असून, आतील कमानींवर केळ फुलाची मराठा शैलीतील रेखीव नक्षी कोरलेली आहे. स्तंभांवर उलट नाग दिसतात आणि आत गणरायाची स्वयंभू मूर्ती आहे, अशी माहिती वैद्य यांनी दिली. ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानतर्फे दीपावली उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने 'ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर आणि पुरातन मंदिरांच्या स्थापत्यशैलीचा इतिहास' या विषयावर प्रसिद्ध अभ्यासक व व्याख्याते अमोघ वैद्य यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. वैद्य यांनी मंदिराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला. मुरार जगदेवाने पुण्यावर आक्रमण करून शहर बेचिराख केले, तेव्हाही पुण्याचे ग्रामदैवत उभे होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेब यांनी यादव शैलीत हे मंदिर पुन्हा उभे केले, असे त्यांनी सांगितले. मंदिराचा सध्या दिसणारा काही भाग पेशवे काळात जोडला गेला आहे. श्री कसबा गणपती हे मानाचे पहिले ग्रामदैवत असल्याने, कोणताही कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी त्यांना अक्षता दिल्या जात असत. श्रीमंत पेशवे देखील मोहिमेवर जाण्यापूर्वी गणरायाला सन्मान देऊनच निघत असत, अशी माहिती वैद्य यांनी दिली. पुण्यातील इतर पुरातन मंदिरांचाही त्यांनी उल्लेख केला. यामध्ये १२व्या शतकातील श्री केदारेश्वर मंदिर, ज्यात पंचमुखी शिवलिंग आहे (ईशान, सद्यो, जात, तत्वपुरुष, वामदेव आणि अघोर), तसेच श्री तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी आणि काळी जोगेश्वरी या ग्रामदेवता मंदिरांचा समावेश आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा जिल्ह्यात 2023 साली झालेली पोलिस पाटील भरतीची प्रक्रिया रद्दबातल केली कोर्टाने या भरतीच्या मुलाखत प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा ठपका ठेवत ही संपूर्ण निवड प्रक्रियाच रद्द करणे आवश्यक असल्याचे आपल्या निकालात नमूद केले आहे. महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) यापूर्वी भंडारा जिल्हा पोलिस पाटील भरती प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्याला निवड झालेल्या उमेदवारांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अनिल किलोर व न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यात कोर्टाने ही आव्हान याचिका फेटाळून लावत भरती प्रक्रिया रद्द करण्याच्या मॅटच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. काय आहे संपूर्ण प्रकरण? यासंबंधीच्या याचिकेनुसार, भंडारा जिल्ह्यातील विविध गावांमधील पोलिस पाटील भरतीसाठीची जाहिरात 16 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर 8 व 9 एप्रिल 2023 रोजी लिखित परीक्षा तथा त्यानंतर 10 व 11 एप्रिल रोजी मुलाखती घेण्यात आल्या होत्या. 12 एप्रिल 2023 रोजी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. पण काही उमेदवारांनी मुलाखत प्रक्रियेत गोंधळ झाल्याचा आरोप केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या तक्रारींची दाखल घेत मे 2023 मध्ये सादर केलेल्या अहवालात निवड प्रक्रिया बोगस व अपारदर्शक पद्धतीने झाल्याचा ठपका ठेवला होता. या आधारावर 4 जुलै 2023 रोजी निवड प्रक्रिया व नियुक्ती आदेश रद्द करण्यात आले. यशस्वी उमेदवारांनी या निर्णयाला मॅटमध्ये आव्हान दिले होते. पण न्यायाधिकरणाने जुलै 2025 मध्ये राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवला. याविरोधात यशस्वी उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण हायकोर्टाने संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद व अयोग्य असल्याचे निरीक्षण नोंदवत ही निवड प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला. मुलाखती केवळ 1 ते 3 मिनिटांत संपवल्या हायकोर्टाने या प्रकरणी मॅटच्या आदेशावर शिक्कामोर्तब करत उमेदवारांच्या याचिका धुडकावून लावल्या. मुलाखत समिती, प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह मुलाखत घेणाऱ्या समितीची नियुक्ती शासकीय नियमांनुसार झाली नव्हती, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात नोंदवले आहे. समितीत उपविभागीय अधिकारी, पोलिस उपविभागीय अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, आदिवासी प्रकल्प अधिकारी आणि तहसीलदार असायला हवेत. परंतु त्यांच्या जागी त्यांच्या प्रतिनिधींनी मुलाखती घेतल्या. अशा प्रातिनिधिक नियुक्त्या कायद्याने मान्य होत नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले. मुलाखतीच्या प्रक्रियेत गुणांकनातही गोंधळ आढळला. काही समिती सदस्यांनी उमेदवारांना संख्येने गुण दिले, तर काहींना * (स्टार) चिन्हाने दिले. मुलाखती फक्त 1 ते 3 मिनिटांत संपवण्यात आल्या. विशेषतः सीसीटीव्ही रेकॉर्डिंगमध्ये आवाजही नव्हता, असे निरीक्षणही या प्रकरणी उच्च न्यायालयाने नोंदवले.
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या खरेदीला झुंबड ; तब्बल ३ हजार ३०० रुपयांनी महागले
जळगाव प्रतिनिधी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठले आहेत. जळगावमधील सुवर्णनगरीत सोन्याने नवा विक्रम प्रस्तापित केला आहे. २४ कॅरेटचे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति तोळा एक लाख ३४ हजार ४१५ रूपयांवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे दोन दिवसांपासून स्थिर असणा-या चांदीच्या दरात किरकोळ घट पाहायला मिळाली. चांदीचे दर १०० रूपयांनी घसरले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या […] The post लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सोन्याच्या खरेदीला झुंबड ; तब्बल ३ हजार ३०० रुपयांनी महागले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धाराशिवमध्ये दोन कारचा भीषण अपघात, ४ ठार
धाराशिव : प्रतिनिधी ऐन दिवाळीत आक्रित घडले अन् उत्सवावर शोककळा पसरली आहे. धाराशिवमध्ये दोन महागड्या अलिशान कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, कार वेगात होती त्याचवेळी अचानक […] The post धाराशिवमध्ये दोन कारचा भीषण अपघात, ४ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वर्ध्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे
वर्धा : प्रतिनिधी राज्य सरकारकडून शेतक-यांप्रती चांगला निर्णय घेण्यात येत नाही. सरकारला वर्ष झाले असताना देखील अद्याप कर्जमाफी देण्यात आलेली नाही. यामुळे शेतक-यांच्या न्याय मागण्यांसाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महाविकास आघाडीने आंदोलनाचे हत्यार उपसले असून यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आंदोलनाला माजी मंत्री […] The post वर्ध्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. त्यातच चित्रपट अभिनेते तथा दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मुंबईचा महापौर भाजपचाच होईल असे विधान करून हे वातावरण आणखी तापवण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी महेश कोठारेंवर निशाणा साधत ते नक्की मराठीच आहेत ना? असा सवाल केला आहे. तात्या विंचू रात्री येऊन तुमचा गळा आवळेल, असा खोचक टोलाही राऊतांनी यावेळी कोठारेंना हाणला. महेश कोठारे यांनी भाजपच्या मागाठाणे येथील दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. ते मी मोदी भक्त असल्याचे म्हणाले होते. तसेच मुंबईचा महापौर भाजपचाच होणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. भाजप म्हणजे आपले घर आहे. कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भक्त आहे. आपल्याला इथून नगरसेवक निवडून द्यायचा आहे. विशेषतः यावेळचा महापौरही येथूनच निवडून गेलेला असेल. मुंबईत नक्कीच कमळ फुलेल. मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो. तेव्हा मी म्हणालो होतो की, तुम्ही खासदार नव्हे तर मंत्री निवडून देत आहात. आताही या विभागातून नगरसेवक नव्हे तर महापौर निवडला जाईल, असे महेश कोठारे म्हणाले होते. त्यांच्या या विधानाची मराठी सिनेसृष्टीसह राजकारणात खमंग चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिले नाहीत महेश कोठारे हे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्या. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात. तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत. त्यामुळे तुम्ही असे काही बोलला तर तात्या विंचू तुम्हाला चावेल. रात्री येऊन तुमचा गळा दाबेल, असे संजय राऊत मंगळवारी आपल्या नियमित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. महेश कोठारेंनी एकनाथ शिंदे यांचेही केले होते कौतुक उल्लेखनीय बाब म्हणजे महेश कोठारे यांनी अंबरनाथ येथे धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराच्या लोकार्पण सोहळ्यातही सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले होते. आपल्या सर्वांचे लाडके, धडाकेबाज नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमचा झपाटलेला खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून साकार झालेला हा रंगमंच पाहून मी भारावून गेलो आहे. तुम्ही कलाकाराला इथे स्थान दिले. हे पाहून आम्ही खूप खूश झालो आहोत. इथे कलाकारांचे पेंटिंग्स बघून मी भारावून गेलो. श्रीकांतजी, तुम्ही कायम झपाटलेले राहा आणि एकनाथजी, तुम्ही जे काम करता ते धडाकेबाज पद्धतीनेच करता. या नाट्यमंदिराचे उद्धाटनही खूप दणक्यात केले आहे. मी यापूर्वी असे कधीच पाहिले नव्हते. आम्हा कलावंतांसाठी तुम्ही खूप काही कराल, अशी अपेक्षा महेश कोठारे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली होती.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील एक राजकीय किस्सा उघड केला. त्यावेळी मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील शेळके यांनी त्यांना राष्ट्रवादीत येण्याची विनंती केली होती. मोहोळ यांनी सांगितले की, 2019 मध्ये मावळमध्ये बाळा भेगडे यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर आणि शेळके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, शेळके यांनी त्यांना फोन केला होता. पुण्यात चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळाल्याने, शेळके यांनी मोहोळ यांना राष्ट्रवादीत येण्याची गळ घातली. मी भाजपमध्येच सुखी- मोहोळ मोहोळ यांनी शेळके यांना स्पष्ट सांगितले की, 'तू गेलेल्या पक्षात सुखी राहा, मी माझ्या पक्षात थांबणार आहे.' आज शेळके त्यांच्या पक्षात नावारूपाला आले असून, माझेही माझ्या पक्षात भले झाले आहे, असे मत मोहोळ यांनी व्यक्त केले. मोहोळ हे तळेगाव दाभाडे येथील नवीन नगर परिषद (डॉ. केशव बळीराम हेडगेवार) उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, कृषी मंत्री दत्ता भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, आमदार शंकर मांडेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार अमित गोरखे आणि माजी आमदार विलास लांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मोहोळ यांनी मावळमधील 124 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन होत असल्याचे सांगितले. मावळ तालुका हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची भूमी असून, डॉ. हेडगेवार यांच्या नावाने इमारत उभारण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. सुनील शेळके मावळच्या प्रगतीसाठी अनेक विषय मार्गी लावत असल्याचेही ते म्हणाले. पुणे आणि मुंबईला जोडणारा मावळ तालुका भविष्याचा विचार करून विकसित झाला पाहिजे, असे मत मोहोळ यांनी व्यक्त केले. कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी आमदार सुनील शेळके यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, मावळला काम करणारा वेगळ्या प्रकारचा आमदार मिळाला आहे. सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत आहेत आणि ते मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. भरणे यांनी मावळमध्ये क्रीडा खात्याचा निधी नवीन योजनेसाठी दिला जाईल असे आश्वासन दिले. तसेच, बहिणींसाठी आवश्यक ती कामे सरकारच्या वतीने केली जातील असेही ते म्हणाले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांना 31 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर झाली असून, त्यापैकी 8 हजार 200 कोटी रुपये वाटप करण्याचा जी.आर. (सरकारी निर्णय) निघालेला आहे, अशी माहिती भरणे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सलग धक्के बसत आहेत. राज्यभरात अनेक नेते ठाकरे गट सोडून महायुतीत प्रवेश करत आहेत. आता या यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याचं नावही जोडलं जाण्याची शक्यता आहे. राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत दिलेल्या वक्तव्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ माजली आहे. रत्नागिरीत पत्रकारांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीतून ठाकरे गटाकडून लढलेले उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे भाजप प्रवेशासाठी प्रयत्नशील आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सहाय्यकामार्फत त्यांचे हालचाली सुरू आहेत. या वक्तव्यामुळे रत्नागिरीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याचबरोबर सामंतांनी आणखी धक्कादायक दावा करताना सांगितले की, माने भाजपमध्ये प्रवेश करताना माझा अडथळा होऊ नये म्हणून मला देखील संदेश पाठवले गेले. या विधानामुळे ठाकरे गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक पातळीवर मोठ्या उलथापालथीची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीच्या रणनीतीवर सामंतांची भूमिका स्पष्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले की, महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. योग्य वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघे नेते एकत्र येऊन तो फॉर्म्युला जाहीर करतील. ते पुढे म्हणाले की, ही निवडणुका आमच्या कार्यकर्त्यांच्या आहेत. आम्ही स्वबळाचा नारा देणार नाही, तर सर्व घटक पक्षांचा विचार करूनच उमेदवारी व वाटप ठरवले जाईल. स्थानिक पातळीवर काही मतभेद असतील, पण त्यावर तोडगा काढण्याचा अधिकार या तिन्ही नेत्यांकडे आहे. या वक्तव्यातून उदय सामंत यांनी महायुतीतील एकजूट आणि सामंजस्याचे संकेत दिले आहेत. राज ठाकरे–उद्धव ठाकरे भेटींवर टीका गेल्या काही दिवसांत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाढलेल्या गाठीभेटीमुळे राज्यात संभाव्य युतीबाबत चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. जे वीस वर्षे एकत्र नव्हते, ते आता गळ्यात गळे घालून फिरत आहेत, अशी टीका करत सामंतांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या नव्या समीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांची मालिका सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आगामी स्थानिक निवडणुकीसाठी संभाव्य युतीची चर्चा अधिकच जोर धरू लागली आहे. ठाकरे गटासाठी आणखी एक धक्का उदय सामंत हे कोकणातील प्रभावी आणि संघटनशक्ती असलेले नेते आहेत. त्यामुळे त्यांनी केलेला हा गौप्यस्फोट राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जर सुरेंद्र माने खरोखरच भाजपमध्ये दाखल झाले, तर ते ठाकरे गटासाठी रत्नागिरीत मोठं नुकसान ठरू शकतं. ठाकरे गट आधीच राज्यात अनेक नेत्यांच्या निर्गमनामुळे कमजोर होत चालला आहे. अशा वेळी रत्नागिरीसारख्या महत्वाच्या मतदारसंघात आणखी एक गळती झाली, तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का ठरेल, असा राजकीय विश्लेषकांचा दावा आहे.
हिंगोली ते कळमनुरी मार्गावर वसपांगरा शिवारात गोदामाचे शटर तोडून चोरट्यांनी 1.49 लाख रुपये किंमतीची विदेशी दारु पळवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 20 सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेल सुरा येथील राजेश घुगे यांचे हिंगोली ते कळमनुरी मार्गावर युवराज बार असून त्या पाठीमागेच मद्यसाठा ठेवण्याचे गोदाम आहे. नेहमी प्रमाणे राजेश घुगे हे रविवारी ता. 19 रात्री बार बंद करून घरी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बारच्या पाठीमागे असलेल्या गोदामाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी गोदामातील साहित्याची नासधूस केली. त्यानंतर रॉयल-स्ट्राँग नावाच्या विदेशीचा दारुच्या सहा पेट्या व मॅक डॉल नंबर वन या विदेशी दारुच्या सहा पेट्या चोरट्यांनी पळवल्या या दोन्ही मुद्दे मालाची किंमत 1.49 लाख रुपये आहे. दरम्यान, सोमवारी ता. 20 सकाळी राजेश हे बार उघडण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना गोदामाचे शटर उटकटलेले दिसून आले. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता गोदामातील दारुचे बॉक्स पळवण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश गुंजकर, जमादार गजानन होळकर, रवी इंगोले यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी राजेश यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांनी ओळख पटवण्याचे प्रयत्न चालविले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक भिंगारे पुढील तपास करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी शनिवारवाड्यात दारुच्या बाटल्या व इतर अवैध गोष्टी सापडल्या. तेव्हा भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना तिथे जाऊन गोमूत्र शिंपडावे वाटले नाही. भाजपचे हिंदूत्त्व हे कॉर्पोरेट स्टाईलचे असून, ते प्रसंगी धर्माचाही व्यापार करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असा दावा काँग्रेसने केंद्र व राज्यातील सत्ताधारी भगव्या पक्षावर निशाणा साधताना केला आहे. पुण्यातील शनिवारवाड्यात अज्ञात महिलांनी नमाज अदा केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर विरोधकांनी हा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरील भूखंड घोटाळ्याच्या आरोपावरून लक्ष हटवण्याचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने या प्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप धर्माचा व्यापार करण्यास मागेपुढे पाहणार नाही काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत या प्रकरणी बोलताना म्हणाले की, नुकतेच मे महिन्यात 29 युवकांनी शनिवार वाड्याची सफाई केली. त्यावेळी दारुच्या बाटल्या आणि अनेक अवैध गोष्टी सापडल्या होत्या. खासदार मेधा कुलकर्णी यांना त्यावेळी शनिवार वाड्यात गोमूत्र शिंपडावे असे वाटले नाही. भाजपा इतकी दांभिक आहे की द्वेष तिरस्कार पसरविण्यासाठी धर्माचा वापर करतील परंतु त्याच धर्माचा व्यापार करायला मागेपुढे पाहणार नाहीत. मुंबईतील सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाला लोम्बार्ड सिद्धिविनायक , महालक्ष्मी मेट्रो स्थानकाला एचडीएफसी लाईफ महालक्ष्मी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाला कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव यांनीच दिले. आम्ही या कॉर्पोरेट हिंदूत्वाचा जाब विचारला तर भाजप उत्तर देण्यापासून पळ काढत आहे, असे सावंत म्हणाले. गोमूत्र शिंपडल्याने कपाळावर हात मारण्याची वेळ सचिन सावंत पुढे म्हणाले, मुस्लिम महिलांनी शनिवार वाड्यात नमाज पठण केले म्हणून भाजपावाल्यांनी गोमूत्र शिंपडले हे पाहून कपाळावर हात मारायची वेळ आली आहे. शनिवार वाडा म्हणजे यांना तीर्थस्थान, देवस्थान वाटते का? या शनिवारवाड्यात मस्तानीचा बराच काळ वावर राहिला आहे. शनिवारवाड्याच्या दरवाजावर पेशव्यांच्या सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा खाली उतरवून यूनियन जॅक फडकवला होता. त्यामुळे तिथे विधात्याचे नाव घेतले की यांच्या पोटात दुखायला लागते. तुम्हाला तीथे जप करत बसायला कोणी अडवले आहे? नाक अशुद्ध झाले म्हणून नाकातही गोमूत्र घालून घ्या याच शनिवारवाड्याच्या बाजूला व समोर पेशवेकालीन दर्गा आहे. पेशव्यांना त्याची अडचण नव्हती. त्यामुळे तुम्हाला अडचण असेल, तर त्या दर्ग्यांनाच शिवून तिथे हवा येते, जिथे तुम्ही काल उभे होतात. त्यामुळे नाक अशुद्ध झाले म्हणून नाकातही गोमूत्र घालून घ्या. आजही काही पुणेकर असे म्हणतात की, काका मला वाचवा अशा आर्त हाका त्या शनिवारवाड्यातून ऐकायला येतात. आता हा अंधश्रद्धेचा भाग असेल निश्चितपणे. परंतु असा काही लोकांचा समाज असेल तर तिथे जाऊन विधात्याचे नाव घेणे चांगलेच आहे. तीथे जाऊन रामनामाचा जप करा. त्यातून काही लोकांच्या अंधश्रद्धा तरी दूर होतील. गोमूत्र शिंपडून सर्व शुद्ध होत असेल तर संपूर्ण शनिवारवाडा धुवून काढावा लागेल या शनिवारवाड्यात एवढे काही घडून गेले आहे की, तुमच्या समजेनुसार जर गोमूत्र शिंपडून सर्व शुद्ध असेल तर संपूर्ण शनिवारवाडा धुवून काढावा लागेल. तुम्ही करा असे आमचे म्हणणे आहे. हा तुमच्या अंधश्रद्धेचा भाग असला तरी तुम्ही किती बुरसटलेल्या विचारांचे आहात हे ही जनतेला कळून चुकेल, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल कायमच आदर आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मोदींनी कधीही टीका केली नाही. उलट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. तर संजय राऊत हे चिखलफेक करण्याचे काम करत आहेत,असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, राजकारणात चिखलफेक करण्याची सुरवात संजय राऊत यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चिखलफेक करत नाहीत तर स्वच्छ भारत अभियान राबवण्याचे काम करत आहेत.चिखलफेक करणारे तुम्ही आहात. मुंबई मनपाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी तुमच्याकडे कार्यकर्तेच नाहीत. सच्चे शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. आगामी मनपा निवडणूकीत सर्वसामान्य मुंबईकर तुम्हाला ढवळून काढतील. मतदार हे भाजप-शिंदे यांच्यासोबत आहेत. मग तक्रार का केली नाही नवनाथ बन म्हणाले की, पगारी नेते संजय राऊत असे म्हणत आहेत की भाजप काय निवडणूक आयोगाचा वकील आहे का, आम्ही काही निवडणूक आयोगाचे वकील नाहीत तर जनतेची वकिली करण्याचे काम भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. आम्ही जनतेकडून तुम्हाला उत्तर देत आहोत. ज्या प्रमाणे तुम्ही फेक नरेटिव्हची फॅक्टरी निर्माण केली आहे. 96 लाख बोगस मतदारांचा आकडा तुम्ही आणला आहे, पण एकही नाव तुम्ही देऊ शकलेले नाहीत. निवडणूक आयोगाकडे तुम्ही तक्रार देखील दिलेली नाही.केवळ माध्यमांसमोर आम्ही विधानसभेला उद्ध्वस्त केली. आता मनपा निवडणूकीत जनता तुम्हाला आणि फेक नरेटिव्हची फॅक्टरी जनता उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. दुबार नावावर आमचा देखील आक्षेप नवनाथ बन म्हणाले की, मतदान यादीमधील दुबार नावावर आमचा देखील आक्षेप आहे. आमचा त्याला विरोध आहे. परंतू आम्ही ती लढाई कायदेशीर रित्या लढतो तक्रार करतो. फक्त माध्यमांसमोर येऊन बोलत नाही. राऊतांनी मंदा म्हात्रे यांना प्रश्न विचारण्यापेक्षा शरद पवारांना जाऊन प्रश्न विचारला पाहिजे. पवारांनी म्हटले होते की मुंबईत मतदान करा आणि बोटाची शाई पुसून टाका आणि पुन्हा गावाकडे जात मतदान करा. तुम्ही पवारांना प्रश्न करणार का? असा सवाल बन यांनी केला आहे. आम्हाला दुबार मतदान यादीच्या नावाबद्दल शंका आहे त्याबद्दल आम्ही तक्रार करु. पण शरद पवारांनी जे विधान केले त्यावर संजय राऊत त्यांना सवाल करण्याची हिंमत करत नाही त्यांनी एकदा पवारांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.
नवी मुंबईच्या वाशी परिसरातील सेक्टर 14 मधील एम. जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीत मध्यरात्री भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा वर्षांची चिमुरडी आणि एका 84 वर्षीय आजीचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, मध्यरात्री 12.40 च्या सुमारास इमारतीच्या दहाव्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे आग लागली. काही क्षणांतच आगीने 11 व 12 व्या मजल्यावरही भीषण स्वरूप धारण केलं. या दरम्यान इमारतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. आगीचं स्वरूप आणि बचावकार्य आगीची माहिती मिळताच वाशी, नेरुळ, ऐरोली आणि कोपरखैरणे अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने जवळपास तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली. धुरामुळे संपूर्ण इमारत गुदमरून गेल्याने रहिवाशांना श्वास घेणे अवघड झाले होते. काहींना बचावासाठी क्रेन आणि जिन्यांच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. वाशी अग्निशमन विभागाचे अधिकारी म्हणाले की, प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं दिसत आहे. मात्र, नेमकं कारण समजण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे. मृत आणि जखमींची माहिती या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये – तर 10 जण जखमी असून, त्यांना हिरानंदानी रुग्णालय आणि एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. इमारतीतील रहिवाशांची धावपळ रात्री अचानक लागलेल्या आगीमुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. इमारतीत धूर पसरल्याने रहिवाशांना बाहेर पडणं कठीण झाले. अनेकांनी बाल्कनीतून मदतीसाठी हाका मारल्या. काहींना अग्निशमन दलाने सुरक्षा जाळ्यांचा वापर करून वाचवले. सुदैवाने वेळीच अग्निशमन पथक दाखल झाल्याने आणखी मोठी जीवितहानी टळली. प्रशासनाकडून तपास सुरू नवी मुंबई पोलिसांनी या घटनेचा पंचनामा सुरू केला असून, अग्निशमन दलाकडून प्राथमिक अहवाल मागवण्यात आला आहे. नगरसेवक आणि महापालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, इमारतीतील विद्युत वायरिंग जुनी होती, त्यामुळे शॉर्टसर्किट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेमुळे वाशी परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिक आणि रहिवाशांनी शासनाकडे इमारतींच्या सुरक्षा तपासणीसाठी विशेष मोहीम राबवण्याची मागणी केली आहे. या संदर्भातील आणखी एक बातमी वाचा.... नवी मुंबईतील कामोठ्यात सिलिंडर स्फोटाने लागली आग; आई-मुलीचा होरपळून मृत्यू दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र उजळून निघाला असताना नवी मुंबईत मात्र दुर्देवी घटना घडली आहे. कामोठे येथील सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीत रात्री लागलेल्या भीषण आगीत आई-मुलगी जिवंत होरपळून मरण पावल्या. सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार कामोठे येथील सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा सोसायटीच्या रूम क्रमांक 301 मध्ये रविवारी रात्री अचानक आग लागली. सुरुवातीला काही वेळातच ही आग संपूर्ण घरात पसरली. स्थानिकांनी धूर आणि ज्वाळा पाहताच तात्काळ बाहेर धाव घेतली आणि अग्निशमन दलाला फोन केला. तोपर्यंत सोसायटीतील इतर नागरिकांनी इमारतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पूर्ण बातमी वाचा....
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमध्ये 96 लाख खोटे मतदार घुसवण्यासंबंधी केलेला आरोप धादांत खोटा असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकांतील संभाव्य पराभवाच्या भीतीने 96 लाख खोटे मतदार असल्याचा धादांत कपोलकल्पित आकडा ठोकून दिला. हा आकडा कुठून आणला हे त्यांनाही माहिती नाही, असे भाजपने म्हटले आहे. राज ठाकरे यांनी रविवारी राज्यात 96 लाख मतदार खोटे असल्याचा आरोप केला होता. केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता आपला मोर्चा जिल्हा परिषद व महापालिकांकडे वळवला आहे. या निवडणुकांचा निकाल निश्चित झाला आहे. यासाठी मुंबई, ठाणे, पुणे आदी महानगरांमधील मतदार याद्यांत सुमारे 96 लाख खोटे मतदार घुसवण्यात आलेत. त्यामुळे मतदारयाद्या स्वच्छ होईपर्यंत व त्या सर्वच राजकीय पक्षांना मान्य होईपर्यंत आपण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी या प्रकरणी दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने उपरोक्त आरोप केला आहे. विरोधक घटनात्मक संस्थाविषयी संशय निर्माण करत आहे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये या प्रकरणी बोलताना म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूकीसाठी जी मतदार यादी अद्याप अंतिमतः उपलब्ध नाही त्यावर गदारोळ करून गोंधळ माजविण्याचा गंभीर कट आता उघडकीस येऊ लागला आहे… हेतू स्पष्ट आहे! संवैधानिक संस्थांबाबत संशय निर्माण करणे, लोकांची दिशाभूल करणे आणि होणाऱ्या पराभवासाठी कारणे शोधणे!! मतदार यादीतील खोटे मतदार काढावेत यासाठी विरोधी पक्षातील उध्दव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, राज ठाकरे अशा मातब्बर नेत्यांची फौज निवडणूक आयोगाच्या दारात थडकली. मतदार यादी शुध्द झाल्याशिवाय मतदान घेऊच नये याची जोरदार मागणी करण्यात आली. राज ठाकरे यांनी तर 96 लाख खोटे मतदार असल्याचा धादांत कपोलकल्पित आकडाही ठोकून दिला. तो कुठून आणला त्यांनाही माहीत नाही! केवळ लोकशाही संस्था खिळखिळ्या करून त्यांची बदनामी करण्यापलीकडे कोणताही हेतू नाही आणि त्यासाठीच फेक नॅरेटिव्हची फेकाफेकी सुरू आहे. कारण मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे प्रारूप अद्याप जाहीरच झाले नाही. मतदार याद्यांचे प्रारूप 6 नोव्हेंबरला जारी होणार निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, 29 महापालिकांसाठी ज्या मतदार याद्या वापरण्यात येणार त्याचे प्रारूप 6 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर या यादीवर आक्षेप, हरकती 14 नोव्हेंबर पर्यंत नोंदविण्याची मुदत आहे. या प्रारूपावर घेण्यात आलेले आक्षेप, हरकतीवर तपासून अंतिम यादी 28 नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. हि माहिती जाहीर उपलब्ध आहे. जी मतदार यादी विधानसभेला वापरली गेली ती यादी सुध्दा प्रारूप-आक्षेप-अंतिम यादी याच प्रक्रियेतून गेली आहे. त्यावेळी सुध्दा कुणी आक्षेप घेतला नाही. मात्र पराभवानंतर खापर फोडायला मतदारयादीचे निमित्त शोधले. हे राजकारण लोकशाहीसाठी घातक आहे. ते हाणून पाडले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंचे राजू पाटलांच्या पराभवाप्रकरणी खोटे दावे केशव उपाध्ये यांनी आपल्या अन्य एका पोस्टद्वारे राज ठाकरे यांच्यावर खोटारडेपणाचाही आरोप केला आहे. ते म्हणाले, राज ठाकरे यांनी 30 जानेवारी 2025 रोजी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात जोरदार भाषण केले होते. राजू पाटलांचे एक गाव आहे. तिथे फक्त पाटलांनाच मतदान होते, साधारणतः १४०० मतदारांचे गाव आहे. तिथे फक्त यांनाच मतदान होते. याआधी राजू पाटिलांचे भाऊ उभे होते तेव्हा त्यांना मतदान झाले… जेव्हा हे खासदारकीला उभे होते तेव्हा त्यांनाच मतदान झाले. मात्र यावेळी राजू पाटलांना एक ही मत पडले नाही… अख्ख्या गावातून एकही मतदान झाले नाही. जी 1400 मते आहेत, ती दरवेळी राजू पाटलांना मिळायची, त्या गावात एकही मत पडत नाही? … लोकांनी मतदान केले पण मतदान गायब झाले” ही सगळी विधाने त्या वरळीतील पदाधिकारी मेळाव्यातील राज ठाकरे यांची आहेत… दुसऱ्याच दिवशी लोकांनी खातरजमा केली…प्रत्यक्षात राजू पाटील यांना एकाही गावात शून्य मते नव्हती व ज्या राजू पाटील यांच्या गावाचा उल्लेख राज ठाकरे करीत होते त्या गावात मत तर मनसेला पडलीच पण त्याशिवाय त्या गावातील मताधिक्य हे मनसेला होते. काही नाही नुकतंच राज ठाकरे यांनी गोरेगाव येथे कार्यकर्त्यासमोर बोलताना 96 लाख मते बोगस असल्याचा आरोप केला त्यावरून हा किस्सा आठवला, असे उपाध्ये म्हणालेत.
महायुतीला नेते आहेत का? त्यांचा महाराष्ट्रात विजय झालेला नसून ते मत चोरीच्या माध्यमातून त्यांनी हा विजय मिळवला आहे. नरेटिव्ह सेट करणे हा एक राजकीय भाग आहे, इतकी वर्षे तुम्ही काय वेगळं केले असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस काय करत आहेत. लोकांपर्यंत विचार पोहोचवण्यासाठी आखणी करावीच लागते. संजय राऊत म्हणाले की, महायुतीने निवडणुकीत केलेल्या घोटाळ्याच्या अनुषंगाने लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर नरेटिव्ह सेट करावे लागतो. फेक नरेटिव्हची योजना भाजपने आणली. त्यातून राहुल गांधींविषयी फेक नरेटिव्ह सेट करण्यात आले. भाजपच्या आयटी सेलने उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्याविषयी फेक नरेटिव्ह सेट केले. आम्ही फेक नरेटिव्ह सेट करत नाहीत. तुम्ही मतदार यादीत घोटाळे केले का नाहीत हे आम्ही पुराव्यानिशी सादर केले आहे. तुमच्याकडे उत्तर नाही. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर त्यांनी आम्हाला उत्तर द्यायला हवे. त्यांनी काय भाजपच्या लोकांना वकील म्हणून नेमले असेल तर तसे सांगावे. भाजप आणि निवडणूक आयोगाच्या भागीदारी तून त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला असा टोला राऊत यांनी लगावला आहे. आयोगाच्या कानाचे पडदे फाटले आहेत का? संजय राऊत म्हणाले की, आतापर्यंत आम्ही हजारो दुबार नावे पुढे आणली आहेत. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या मतदारसंघात 70 हजार नावे दुबार आहेत. ती नावे अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन टाकली असे सत्ताधारी पक्षाच्या आमदार म्हणत आहेत. हे मी मते मिळत नाही. नाशिकमध्ये 3 लाख 53 हजार मते आम्ही काढली. सत्ताधारी बोगस लोकांना अक्कल आहे का? असा सवाल त्यांनी केला. पैठणचा भुमरे नावाचा आमदार बाहेरुन 20 हजार मतदान आणले असे सांगतो तेव्हा यांच्या कानाचे पडदे फाटले आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. बुलडाण्यात 1 लाख बोगस मतदार आहेत हे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे, त्यांना यांनी विचारावे. या देशात मुस्लिमांना अधिकार नाही का? भाजपला मतदान करतात तेच मतदार असे काही करायचे आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. मोदी-शहांना महाराष्ट्राने मदत केली संजय राऊत म्हणाले की, राजकारणात तुम्ही कितीही कोणावरही टीका केली तरी सुत्रा संकट काळात सह्याद्री हिमालयाच्या मदतीला जात असतो. ज्या अर्थी शरद पवारांनी हे सांगितले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ज्या घटना घडल्या त्याचा सारांश शरद पवारांनी सांगितला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना ज्या दोन लोकांनी मदत केली ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे मी माझ्या पुस्तकातही लिहले आहे. हे वारंवार झाले आहे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राने अनेकदा केंद्राला मदत केली आहे. पैशाचा अतिरेकी वापर संजय राऊत म्हणाले की, काही लोकं पैशाचा अतिरेकी वापर करत महाराष्ट्र आपल्या हातात ठेवू इच्छित आहेत. आम्ही महाराष्ट्रा विचाराने राज्यात काम करणार आहोत. मनपाच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना ठाम उभे राहण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. आमचे दोन्ही पक्षाचे नेते एकत्र येत कार्यकर्त्यांचा बळ देतील असे राऊत यांनी म्हटले आहे. सोलापूरमध्ये ऑपरेशन लोट्सच्या वर्दीने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, अजित पवार हे भाजपपुढे किस खेत की मुली, ऐसा कोई सगा नही, जिसे भाजपने ठगा नही.
परभणी जिल्हयातील डिग्रस येथून मागील एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात आढळून आला आहे. त्याच्या अंगावरील बनीयन वरून त्याची ओळख पटली आहे. या प्रकरणी मंगळवारी ता. 21 सेनगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा शिवारात पूर्णा नदीच्या पात्रात एक मृतदेह असल्याची माहिती सेनगाव पोलिसांना सोमवारी ता. 20 सायंकाळी मिळाली होती. त्यावरून सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, जमादार सुभाष चव्हाण, टी. के. वंजारे, एकनाथ राठोड यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. पोलिसांनी परिसरातील बेपत्ता व्यक्तीची माहिती घेतली. मृतदेहाच्या अंगावरील बनीयनवर लिहीलेल्या अक्षरांवरून पोलिसांनी माहिती घेतली असता, परभणी जिल्हयातील डिग्रस येथील सुरज अंभोरे (20) हा तरुण बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असता त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता सदर मृतदेह सुरज याचा असल्याचे स्पष्ट झाले. तो मित्रांसोबत एक महिन्यापुर्वी येलदरी धरण येथे आला होता. त्यानंतर धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उडी मारली अन तो बाहेर निघालाच नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. मयत सुरज हा बी. ए. च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहितीही पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी मंगळवारी ता. २१ सेनगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.
मराठवाडा विभागातील अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सरकारने एकूण 346 कोटी 31 लाख 70 हजार रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. मात्र, या निधीचे वितरण दिवाळीनंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी प्रत्यक्ष मदत मिळण्यास उशीर होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. जून ते सप्टेंबर या काळात मराठवाड्यात सलग पावसाने थैमान घातले होते. या काळात अनेक जिल्ह्यांत नदी-नाल्यांना पूर आले, घरं आणि शेतीपिकं वाहून गेली. 3 लाख 58 हजार 612 शेतकऱ्यांचे 3 लाख 88 हजार हेक्टरवरील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. काही भागांमध्ये शेतजमीनही वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले. त्यामुळे राज्य सरकारने गेल्या पंधरवड्यातील हा चौथा मदतनिधीचा अध्यादेश जारी केला आहे. याअंतर्गत मराठवाड्यातील सात जिल्ह्यांना मदत वितरित केली जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक प्रशासनाकडून नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातील. मात्र, प्रशासकीय प्रक्रिया आणि निधी हस्तांतरणाच्या टप्प्यांमुळे ही रक्कम दिवाळीनंतरच उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हानिहाय मदतनिधीचे वितरण राज्य सरकारने जाहीर केलेल्या निधीचे वाटप खालीलप्रमाणे करण्यात आले आहे- या रकमेमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, असा राज्य सरकारचा दावा आहे. मदतीचा उपयोग आणि शेतकऱ्यांची अपेक्षा राज्य शासनाच्या निर्णयानुसार 2 ते 3 हेक्टरपर्यंत पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तथापि, अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, नुकसानीचा अंदाज जास्त असून मंजूर झालेली रक्कम अपुरी आहे. तसेच दिवाळीच्या आधी ही मदत मिळाल्यास खरीप हंगामातील नुकसानीतून बाहेर पडण्यास काहीसा आधार मिळाला असता, अशी खंतही शेतकरी व्यक्त करत आहेत. राज्य प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की, सर्व जिल्ह्यांनी आपापल्या महसूल यंत्रणेकडून शेतकऱ्यांचे तपशील आणि नुकसान अहवाल सादर केले आहेत. आता निधीचे तांत्रिक वाटप व मंजुरी प्रक्रिया सुरू आहे. निधी वितरित करण्यासाठी केंद्र सरकारकडून मंजुरी आणि निधी हस्तांतरणाचे अंतिम टप्पे सुरू आहेत. अंमलबजावणी आणि वेळेवर वितरण हाच खरा प्रश्न अतिवृष्टीमुळे फक्त खरीप पिकांचं नुकसान झालं नाही, तर अनेक ठिकाणी रब्बी हंगामाची तयारीही अडचणीत आली आहे. शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत, बियाणं, खतं आणि मजुरी यासाठी त्यांना अतिरिक्त कर्ज घ्यावं लागत आहे. सरकारकडून मिळणाऱ्या मदतीची प्रतिक्षा आता अधिक वाढली असून, ती दिवाळीनंतर मिळेल या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. राज्य सरकारने मंजूर केलेला 346 कोटी रुपयांचा निधी हा मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरणार असला तरी त्याची अंमलबजावणी आणि वेळेवर वितरण हाच खरा प्रश्न आहे.
भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक रोचक राजकीय किस्सा सांगत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा चर्चेचा विषय निर्माण केला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती, असा खुलासा मोहोळ यांनी केला. हा किस्सा त्यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार इमारतीच्या उद्घाटनावेळी सोमवारी सांगितला. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, शंकर मांडेकर, माजी आमदार बाळा भेगडे, तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक आदी मान्यवर उपस्थित होते. मोहोळ म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान सुनील शेळकेंना भाजपने तिकीट नाकारले आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या उमेदवारीची घोषणा होताच त्यांनी पहिला फोन मला केला. ते मला म्हणाले की, माझं भाजपमधून तिकीट कट झाले, पण राष्ट्रवादीकडून मला उमेदवारी मिळाली आहे. तुझंही तिकीट कट झालंय, तू पण माझ्याबरोबर ये. त्यावर मोहोळ यांनी उत्तर दिले की, मी दिल्या घरात सुखी आहे. मी माझ्या पक्षात राहीन. तू पण विचार कर, घाई करू नकोस. मात्र शेळकेंनी त्यावर उत्तर दिले की, नाही, मी परतीचे दोर कापले आहेत, असे त्यांनी सांगितले. तो त्या पक्षात गेला आणि त्याचे भले झाले. मी माझ्या पक्षात राहिलो आणि माझंही भले झाले. आमचे नाते राजकारणापलीकडचे असल्याचे मोहोळ यांनी म्हटले आहे. संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी- भरणे या उद्घाटन सोहळ्यात उपस्थित असलेले केंद्रीय सहकार राज्यमंत्री सुभाष भरणे यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणांबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर मदत करत आहे. संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. पक्षनिष्ठा आणि राजकीय स्थैर्याचा संदेश मुरलीधर मोहोळ आणि सुनील शेळके हे दोघेही पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचे राजकीय चेहरे आहेत. 2019 मध्ये दोघांचेही भाजप तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मावळ मतदारसंघातून विजय मिळवला. तर मोहोळ यांनी भाजपमध्येच राहून पुण्याचे महापौरपद भूषवले आणि पुढे केंद्रीय मंत्रिपद गाठले. या किस्स्याच्या माध्यमातून मोहोळ यांनी पक्षनिष्ठा आणि राजकीय स्थैर्याचा संदेश दिला. पक्षात राहून काम केलं तर यश आपोआप मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुरलीधर मोहोळ यांचा हा राष्ट्रवादी ऑफर किस्सा विनोदी स्वरात सांगितला.
दिव्य मराठी अपडेट्स:मुंबईत बनावट टपाल तिकीट रॅकेटचा पर्दाफाश; तिघांना बेड्या
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
कमिशनचे आमिष देऊन 11 जणांची 49 लाखाने फसवणूक:चांदूर बाजार ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा
खाद्यतेलाचा व्यवसाय करून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात कमिशन देण्यात येईल, असे आमिष देऊन एका महिलेसह तिचे दहा नातेवाईक अशा ११ जणांची ४९ लाख २० हजार २०० रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी फसगत झालेल्या महिलेच्या तक्रारीवरून चांदूर बाजार पोलिसांनी रविवारी (दि. १९) सहा जणांविरुद्ध फसवणूक तसेच विश्वासघाताच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. साजिद इक्बाल शेख इमाम टेलर (४२), जावेद इक्बाल शेख इमाम, मोहम्मद वाजिद शेख इमाम (४३), मोहम्मद रियाज शेख रमजान (४२) मोहम्मद रिजवान शेख रमजान (४६) आणि एक महिला (सर्व रा. चांदूर बाजार) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झालेल्या महिलेच्या तक्रारीनुसार, गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींनी तक्रारदार महिलेला विश्वासात घेऊन खाद्यतेलाच्या व्यवहारात रक्कम गुंतवल्यास गुंतवणूकदारांना आम्ही कमिशन देवू, असे सागितले. त्यावेळी तक्रारदार महिलेने त्या सहा जणांकडे काही रक्कम दिली. तक्रारदार व आरोपींमध्ये हा व्यवहार एप्रिल २०२३ पासून सुरू झाला. सुरुवातीला तक्रारदार महिलेला गुंतवणुकीतून कमिशनही देण्यात आले. त्यानंतर तक्रारदार महिलेने तिच्या अन्य नातेवाइकांना सुद्धा या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यामुळे महिलेच्या नातेवाइकांनी सुद्धा गुंतवणुकीसाठी त्या सहा जणांकडे रक्कम दिली. या ११ जणांनी सुमारे दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने सुमारे ९४ लाख ३८ हजार २०० रुपये दिलेत. त्या रकमेपैकी ४५ लाख १८ हजार रुपये तक्रारदार महिला व त्यांच्या नातेवाइकांना कमिशन म्हणून सहा जणांनी परत दिलेत. मात्र उर्वरित ४९ लाख २०,२०० रुपये ही रक्कम बरेच महिने होऊनही आरोपी तक्रारदारांना देण्यास तयार नाहीत. इतकेच नाहीतर रक्कम परत मागण्यासाठी तगादा लावल्यास खोट्या प्रकरणांत फसवण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारदार महिलेने पोलिस तक्रारीत नमुद केले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेने चांदूर बाजार पोलिस ठाणे गाठून आरोपींविरुद्ध तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला . या प्रकरणाचा तपास चांदूर बाजारचे ठाणेदार अशोक जाधव, एपीआय उल्हास राठोड व त्यांचे पथक करत आहेत.
अमरावती हे ६ लाख ते १० लाख लोकसंख्येत देशातील सर्वाधिक शुद्ध हवेचे शहर असल्यामुळे हवेतील प्रदूषण कमी व्हावे, यासाठी महापालिकेने शहरवासीयांना हरित फटाके (ग्रीन क्रॅकर्स) फोडून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. ते बघता अनेक नागरिकांचा यंदा पर्यावरणपूर हरित फटाके फोडण्याकडे कल दिसून आला. सर्वसाधारण फटाक्यांपेक्षा हरित फटाके महागडे असले तरी नागरिकांनी ते खरेदी करण्यास पसंती दर्शवली. त्यामुळे यंदा हरित फटाक्यांना राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था दिल्लीने (नीरी) हरित स्वरुपाच्या फटाक्यांचा शोध लावला आहे. हे फटके पारंपारिक फटाक्यांप्रमाणेच असतात. इकोफ्रेंडली फटाक्यांचा आकार, आवाज आणि प्रकाश हा सामान्य फटाक्यांसारखाच असतो. फक्त त्यामुळे प्रदूषण कमी होतं. सध्या बाजारात असलेले हरित फटाके हे पारंपरिक फटाक्यांपेक्षा ३० टक्के कमी प्रदूषण करतात. २०१९ मध्ये जेव्हा हे फटाके विकसित केले गेले, तेव्हा पारंपरिक फटाके हेच त्यांचे संदर्भ बिंदू होते. यामागील विज्ञान हे ज्वलन नियंत्रणात आहे. फटाक्यांचे ज्वलन हे घन-स्थितीतील ज्वलन प्रक्रिया आहे, जसे कार इंजिनमध्ये इंधन-हवा ज्वलन होते. घन ज्वलनामध्ये, इंधन आणि ऑक्सिजनचे योग्य प्रमाण राखणे कठीण असते, ज्यामुळे जास्त प्रदूषण होते. शास्त्रज्ञांनी हे प्रमाण (ऑक्सिजनची गरज) अनुकूलित केले आहे, ज्यामुळे स्वच्छ ज्वलन होते. तापमान देखील महत्त्वाचे आहे. पारंपरिक फटाके सुमारे ६५० अंश सेल्सिअस तापमानावर जळतात. हे तापमान १००० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त वाढवल्यास ज्वलन सुधारते आणि कणांचे उत्सर्जन कमी होते. त्यांनी झिओलाइट्स सारखे पदार्थ तसेच पॉलिमर-आधारित आणि अजैविक पदार्थ देखील जोडले आहेत, उर्वरित. पान ४ महानगर पालिकेने शहरवासीयांना कमी प्रदूषण करणारे हरित फटाके फोडण्याचे आवाहन केले असून यासाठी शहरात स्थळेची निश्चित करण्यात आली आहे. नागरिकांनी सामूहिक फटाके रात्री ८ ते १० या वेळेत फोडण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे. या कालावधीतच नागरिकांनी फटाके फोडून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, असे मनपाने म्हटले आहे. ग्रीन फटाके म्हणजे नेमके काय? ज्या फटाक्यांमुळे प्रदूषण कमी होतं, जे फटाके पर्यावरणपूरक आहेत, त्यांना ग्रीन क्रॅकर्स किंवा हरित फटाके असं म्हटलं जातं. हे ग्रीन फटाके नेहमीच्या फटाक्यां प्रमाणे दिसतात. यामध्येही फुलबाजी, फ्लॉवरपॉट, स्काय शॉट असे प्रकार मिळतात. हे फटाके काडेपेटीच्या साह्याने उडवले जातात. याशिवाय या ग्रीन फटाक्यांमध्ये सुगंध असणारे फटाकेही असतात आणि वॉटर फटाके असतात. हे फटाके उडवण्याची पद्धत वेगळी असते.
दिवाळीमुळे सध्या सर्वत्र मंगलमय, उत्साही, चैतन्यमयी वातावरण आहे. शुभ दिवाळी, शुभंम करोती कल्याणंम अशा शुभेच्छा सामाजिक माध्यमांवरून तसेच प्रत्यक्ष भेटून दिल्या जात आहेत. दिवाळीनिमित्त विद्युत दीपमाळा, आकाशदीपांसह पणत्यांचा प्रकाश सर्वत्र पसरला आहे. फराळाच्या खमंग दरवळाने मन भरून जात आहे. शहरवासीही मनाप्रमाणे खरेदी करून दिवाळीचा आनंद द्विगुणित करीत आहेत. बहुतेकजण मंगळवारी २१ ऑक्टोबरला सायंकाळी लक्ष्मीपूजन करणार असून, या दिवशी वरदा लक्ष्मी ही घरोघरी प्रवेश करून सुख, समृद्धी, आरोग्य आणते, अशी धारणा असल्यामुळे लक्ष्मीचे मनोभावे पूजन करण्यासाठी नागरिक कोणतीही कसर शिल्लक ठेवण्यास तयार नाहीत. त्यामुळे शहरातील विविध वस्तूंनी सजलेल्या बाजारपेठा, मुख्य चौकांमध्ये लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांगलीच गर्दी दिसून आली. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली तरी दिवाळीचा उत्साह मात्र वाढल्याचे दिसून आले.दिवाळी हा प्रकाशाचा सण असल्यामुळे बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात पणत्यांची खरेदी झाली. विशेषत: आकर्षक सजावटीच्या पणत्या उर्वरित. पान ४ आश्विन मास, कृष्ण पक्ष , मंगळवार , २१ ऑक्टोबर ला लक्ष्मी पूजनाचा दिवस असून, प्रदोष काळ : सायं. ५. ५१ मिनिटांपासून रात्री ८.२१ पर्यंत आहे. रात्री ८ पासून ते ९.३०पर्यंत लाभ वेळेत, रात्री ११ पासून ते १२ .३० वाजेपर्यंत शुभ वेळेत पूजन करावे. वृषभ या स्थिर लग्नाची वेळ सायं. ७.१७ पासून ते रात्री ९.१६ पर्यंत आहे. या काळात लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त आहे.या कालावधीत लक्ष्मीपूजन केले असता लक्ष्मी स्थिर राहून भरभराट होते. यावर्षी शके १९४७ मध्ये २० ऑक्टोबरला चतुर्दशी समाप्ती दु.३.४४ वाजता असून त्यानंतर अमावास्या सुरू होत आहे. २० ऑक्टोबरला प्रदोषकाळात अमावास्येची अधिक व्याप्ती असून दुसऱ्या दिवशी २१ ला लक्ष्मीपूजन दिलेले आहे. तिथि निर्णय, धर्म सिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, व्रत पर्व विवेक ग्रंथांमधील वचनांचा विचार करून दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे आहे. प्रदोष काळात अमावश्येची कमी व्याप्ती असताना त्या दिवशी सायंकाळी व प्रदोष काळी अमावस्या मिळत आहे. अमावस्या, प्रतिपदा यांचे युग्म असल्याने प्रतिपदायुक्त अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे आहे.युग्मास महत्त्व द्यावे असे वचन असल्याने या वचनांची संगती लावून आम्ही २१ ला मंगळवारी लक्ष्मीपूजन दिलेले असल्याचे ज्योतिषाचार्य पं.संजय शाहकर गुरुजी यांनी सांगितले. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला शहरातील जुना कॉटन मार्केट भागात नागरिकांची अशी गर्दी होती. असा आहे लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त; ज्योतिषाचार्य पंडित संजय शाहकर यांची माहिती
तालुक्यातील धानोरा कोकाटे येथील शेतकऱ्यांनी सोमवारी २० ऑक्टोबरला नुकसान भरपाईच्या मागण्यांसाठी गावातील एका मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन केले. गावालगत असलेल्या एका सोलर कंपनीच्या कामामुळे शेत जमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याची नुकसान भरपाई मिळावी, त्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत हे आंदोलन केले. तीन वर्षापूर्वी धानोरा कोकाटे गावालगत एका कंपनीने सोलर प्लँट उभारला आहे. या कंपनीने येथील शेत शिवारात जाण्या - येण्यासाठी रस्ता व पूल बांधले मात्र हे बांधकाम अतिशय निकृष्ट असल्याचा आरोप गावातील काही शेतकऱ्यांनी केला. या कामामुळे येथील काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले. त्यामुळेच गावातील शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन व जलसमाधी आंदोलन काही दिवसांपूर्वी केले होते. त्या आंदोलनानंतर कंपनीने नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले, परंतु ते अजूनही पूर्ण न केल्याने गावातील तीन शेतकऱ्यांनी मंगळवारी टॉवरवर चढून आंदोलन केले. जोपर्यंत नुकसान भरपाई मिळणार नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा आक्रमक पवित्रा या वेळी आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला होता. या वेळी स्वप्नील भुयार, सौरभ कोहळे, गुरुदत्त कोकाटे हे शेतकरी टॉवरवर चढले होते. या वेळी अनेक शेतकरी तसेच माहूली जहागिर पोलिस उपस्थित होते. काळ्या फिती बांधून ७ तास टॉवरवर ^आमच्या न्याय मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही मागील महिण्यात आंदोलन केले होते. जल आंदोलनसुद्धा केले. त्यावेळी आम्हाला आश्वासन देण्यात आले होते मात्र अजूनही त्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने काळ्या फिती बांधून टॉवरवर चढून आंदोलन करावे लागले. आज आम्ही तीन शेतकऱ्यांनी सुमारे सात तास टॉवरवर आंदोलन केले. आता मंगळवारी २८ ऑक्टोबरला कंपनी अधिकाऱ्यांसोबत पुन्हा बैठक आहे, त्या बैठकीतील निर्णयानंतर पुढील निर्णय घेऊ. सौरभ कोहळे, आंदोलक शेतकरी, धानोरा कोकाटे.
जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत इंडिपेंडंट क्लब अमरावतीने पटकावले विजेतेपद
शहराचा क्रीडानगरी म्हणून नावलौकिक असून विविध क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाकरिताही अमरावती शहराची विशेष ओळख आहे. याच धर्तीवर रॉयल रॉकी क्लब अमरावतीद्वारे नुकतेच तीन दिवसीय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे (सेव्हन ए साइड ) अप्रतिम आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत फूटबॉलचा शानदार थरार रंगला. अंतिम सामना इंडिपेंडंट क्लब अमरावती विरुद्ध स्पोर्टिंग क्लब यवतमाळ यांच्यात खेळाला गेला. उभय संघातील आक्रमक खेळामुळे हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. परंतु, या निर्णायक थरारक सामन्यात इंडिपेंडंट क्लब अमरावतीने २-० अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला राष्ट्रवादी युवक काँग्रेस क्रीडा सेल अध्यक्ष सार्थक खोरगडे यांच्याद्वारे ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अन्य वैयक्तिक पुरस्कारही रॉयल रॉकी क्लब अमरावतीच्या वतीने स्पर्धकांना वितरित करण्यात आले. चपराशीपुरा येथील फ्रायडे मार्केटच्या प्रांगणात आयोजित या स्पर्धेत अमरावती जिल्ह्यातील १० संघ तसेच वर्धा, अकोला, वर्धा, वणी (यवतमाळ), बुलडाणा, वाशीम येथील १६ संघ सहभागी झाले होते. लहान मोठ्या स्पर्धेतूनच खेळाडू हा आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवत विजेता ठरत असतो. क्रीडा क्षेत्रात पुष्कळ संधी आहेत, त्यामुळे खेळाडूंनी याकडे करियर म्हणून पाहिले पाहिजे, अशा शब्दात राष्ट्रवादी युवक काँग्रेस क्रीडा सेल अध्यक्ष सार्थक खोरगडे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या वेळी खेळाडू तसेच क्रीडाप्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते.
हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पवित्र हनुमान गढीवर ४० फुट फाउंडेशन व १११ फूट उंच हनुमंताच्या मूर्तीची पूजा व महाआरती करण्यात आली. तसेच अयोध्येतून आलेल्या ज्योतीद्वारे ७ फुटाच्या दिव्यात आ. रवी राणा, भाजप नेत्या नवनीत राणा यांनी अखंड ज्योत लावून दीपोत्सवाला सुरुवात केली. तर समाजसेवक चंद्रकुमार उर्फ लप्पीभैय्या जाजोदिया यांनी आमदारांसह महाआरती केली. ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्राच्या विजयानंतर अयोध्येत आगमनानिमित्त फटाक्यांच्या आतषबाजीत प्रभू रामचंद्राचे स्वागत करण्यात आले त्याच धर्तीवर हनुमान गढी येथेही फटाक्याच्या आतषबाजीने जय श्रीराम, जय श्रीराम जयघोषात दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिवाळीच्या शुभ पर्वावर हनुमान गढी येथे हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत दीपोत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांनी परिसर उजळून निघाला आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. अॅड. सागर देशमुख महाराज, डॉ. संतोषकुमार नवलानी महाराज यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती. या दीपोत्सवाचा शुभारंभ अयोध्येवरून आणलेल्या पवित्र ज्योतीद्वारे करण्यात आला. या पवित्र ज्योतीच्या मदतीने ७ फूट उंच दिव्यामध्ये अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान जय श्रीराम, जय हनुमान या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भक्तांनी एकत्रितपणे २१ वेळा हनुमान चालिसा पठण करून हनुमानाचे स्मरण केले. प्रभू श्री रामचंद्रांच्या विजयानंतर अयोध्येत झालेल्या दिवाळीप्रमाणेच, हनुमान गढी येथेही फटाक्यांच्या आतषबाजीने आणि जयघोषाने दीपोत्सव साजरा करण्यात आला. प्रकाश, भक्ती आणि उत्साहाने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, युवा स्वाभिमान पार्टी, विहिंप, बजरंग दल, पतंजली, आर्ट ऑफ लिव्हींग, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू गोरक्षा दल, गायत्री परिवार, शिवधारा आश्रम, संत कंवरराम धाम, वारकरी संप्रदाय, महानुभाव पंत, विश्व मांगल्य सभा, प्रजापती ब्रम्हकुमारीज इस्कॉन, भारत स्वाभिमान या सर्व धार्मिक संघटनेतील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
विदर्भाची पुरातन राजधानी, भगवान श्रीकृष्णाचे सासर, माता रुक्मिणीचे माहेरघर आणि कुलस्वामिनी अंबिका मातेचे शक्तीपीठ असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील कार्तिक यात्रेत विविध रंगारंग कार्यक्रमांची मेजवानी घेऊन येणाऱ्या ‘महोत्सव विदर्भाचा, विदर्भाच्या पुरातन राजधानी’चा नामक अंबा-रुक्मिणी महोत्सव-२०२५ ची पहिली बैठक नुकतीच अंबिका देवी मंदिर मंगल कार्यालयात झाली. अंबा रुक्मिणी सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष रविराज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत तीन दिवस साजरे होणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती महोत्सव समितीचे सचिव अक्षय पुंडेकर यांनी दिली. या बैठकीत सर्वप्रथम या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करण्यात आली. गेल्या वर्षीही अंबा-रुक्मिणी महोत्सवात विविध कार्यक्रमांचे नियोजनबद्ध व यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते. यात नौकानयन स्पर्धा, दीपोत्सव, मॅरेथॉनचा मुख्यत्वे समावेश होता. यासोबतच संगीत मैफील, लोककलांचे सादरीकरण आणि राज्यभरातील कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम उपस्थित रसिकांच्या पसंतीस उतरला होता. परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले होते. यालाही उत्तम लोकसहभाग मिळाला होता. त्याच अनुषंगाने यंदाही विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून, गेल्या वर्षीपेक्षा यंदा आणखी वेगळे कार्यक्रम आयोजित करून महोत्सव आणखी खुमासदार करण्याचा प्रयत्न आयोजन समितीद्वारे केला जाणार आहे. तसेच बैठकीत उत्सव समितीच्या सभासदांकडून यंदा काही नवीन उपक्रम आयोजित करण्याचे सुद्धा ठरवले आहे. त्याच बरोबर या वर्षीच्या कार्यक्रमाची ८ ते १० नोव्हेंबर ही निश्चित करण्यात आली असून, कार्यक्रम पत्रिका लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. या बैठकीचे सूत्रसंचालन गजानन बांबल यांनी केले. या बैठकीला सत्कार समितीचे अध्यक्ष व श्री अंबिका देवी संस्थानचे पुजारी नरेंद्र महाराज पुरी, नायर (सरपंच कुऱ्हा) यांची विशेष उपस्थिती होती. त्याचबरोबर अमोल शेंडे, संतोष मठिये, दिनेश ठाकरे, शरद तालन, पांडुरंग सराडे, अतुल ठाकरे, विनायक कडू, अमोल पुंडेकर, मुकेश पवार, अंकुश देऊळकर (तंटामुक्ती अध्यक्ष, कौंडण्यपूर), प्रशांत कडू, बाळूभाऊ ठाकरे, प्रदीप डुबे, गजानन सुखदाम, संतोष अंबाडकर, दिलीप मेहकर, गणेश बांबल, आशिष डुबे, संदीप सोटे, मोरेश्वर मुळे, रामप्रभू खापरे, विनोद महल्ले, निखिल ठाकरे, संतोष साठवणे, श्रीराम केवदे, सुभाष खंडारे, सोनाजी खडसे, गोपी वेरुळकर, दादा सर्जे, आकाश ठाकरे, वैभव ठाकरे, आनंद मनोहर, पवन नागमोते, अर्पित डुबे, अक्षय निहाटकर, प्रफुल्ल कडू, शुभम अर्मळ, अभय मेहकर, दक्ष खंडारे, ओम राऊत, रोहित जुमडे, तेजस वानखडे, प्रतीक नेवारे, वैभव हेटे, चेतन नेमाडे, प्रयास भाकरे, राहुल गोहत्रे, सार्थक कदम, संकेत धोटे, हर्षल क्षीरसागर, ओम बोंडाणे, तेजस राजगुरे, यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते. महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोटिंग शो म्हणजेच नयनरम्य नौका स्पर्धा, एक लाख दिव्यांचा दीपोत्सव, संगीत मैफिल, लोककला व सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता अभियान, शासकीय योजना विषयक विविध उपक्रम, विदर्भस्तरीय भव्य एकता मॅरेथॉन स्पर्धा अशा विविध क्षेत्रातील बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे सुद्धा वितरित करण्यात येणार आहे. एक लाख दिव्यांचा दीपोत्सव, नौका स्पर्धा मुख्य आकर्षण
श्री विठ्ठल, रूक्मिणी मातेला अलंकार परिधान
दोन दिवसांपासून सुरू झालेल्या दीपावली सणातील नरकचतुर्दशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला परंपरेप्रमाणे पोशाख आणि श्री माता रुक्मिणीला अलंकार करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली. श्री विठ्ठलाला सोन्याचा मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी एक पदरी, मोत्याची कंठी दोन पदरी, नेकलेस, शिरपेच मोठा १० लोलक असलेला, मस्त्य जोड, तोडे जोडे, सूर्य कळ्यांचा हार, सोन्याचे पैंजण जोड, तुळशीची माळ एक पदरी, नक्ष्मी टोप आदी अलंकार परिधान करण्यात आले. श्री रुक्मिणी मातेला सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवामनी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा आदी अलंकार परिधान करण्यात आले आहेत. परिवार देवतांपैकी असलेल्या श्री. राधिका मातेस नक्षी टोप, ठुशी नवीन, मोत्याचा कंठा मोठा, पुतळ्यांची माळ व सत्यभामा मातेला सिद्धेश्वर टोप, मोत्याचा कंठा, ठुशी नवीन, पुतळ्यांची माळ आदी अलंकार परिधान करण्यात आले. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पारंपरिक अलंकाराच्या वेशातील मनमोहक रुप पाहणे व दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
दिवाळी पहाटेच्या सुमधुर गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध:भारुडाला रसिकांचा प्रतिसाद
दीपावली निमित्त येथील श्री स्वामी समर्थ क्लासेसच्या वतीने ग्रामदैवत श्री भगवंत मंदिरामध्ये दिवाळी पहाट हा सुमधुर अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सुरुवात तुझ्या कृपेने दिन उगवे हा या गणेश स्तवनाने करण्यात आली. मागील २५ वर्षांपासून श्री स्वामी समर्थ संगीत क्लासेसच्या माध्यमातून हा दिवाळी पहाट कार्यक्रम भगवंत चरणी प्रस्तुत होत असून यंदाचे हे २६ वे वर्ष होते. यावेळी क्लासचे विद्यार्थी मधुसूदन चांडक, हेमंत साने, अमोल जोशी, अजित काळे, मनस्वी पालके, दुर्वा जाधव, लावण्या पाटील, काव्या पाटील, काव्या मांजरे, गायत्री महाजन, लक्ष्मी भंडारी, उज्वला कानकात्रे, संगीता महिमाने या कलाकारांनी देव माझा विठू सावळा, चिंधी बांधते द्रौपदी, नको देवराया, बोलावा विठ्ठल, कानडा राजा पंढरीचा, जगी जीवनाचे सार, ऊठ पंढरीच्या राजा, संतांचा हा संग, धन्य ती पंढरी, गुरुवीण नाही दुजा आधार, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, कृष्ण माझी माता, गंगा मैया, सखा माझा ज्ञानेश्वर, अरे कृष्णा अरे कान्हा, यशोमती मैया से, विठु माऊली तु, वृंदावनी वेणू, पाव ना दत्ता, जय गंगे भागीरथी अशी अवीट आणि सुमधुर गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली. दरम्यान संचालिका दीपाली सहस्रबुद्धे यांनी सादर केलेले ‘दाताचं दातवण घ्या गं कुणी’ हे सोंगी भारुड तसेच कैवल्य सहस्रबुद्धे आणि सुहास जोशी यांच्या ढोलकी- तबला जुगलबंदीला रसिकांनी उस्फुर्त दाद दिली. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रसाद सहस्रबुद्धे यांनी केले. तर सूत्रसंचालन माधुरी शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी तुषार गदगी, प्रतिक शर्मा, सुहास जोशी, कैवल्य सहस्रबुद्धे यांनी तबल्याची तर सरिता कुलकर्णी यांनी संवादिनीची उत्कृष्ट साथ केली. कार्यक्रमासाठी बार्शीकर रसिक उपस्थित होते.
समाधानकारक पाऊस, साखर कारखान्यांनी बिले वेळेत काढली व कामगारांना बोनस मिळाल्यामुळे येथील बाजारपेठेत किराणा साहित्य, सोने व वाहने विक्रीतून सुमारे १०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे. यंदा समाधानकारक पाऊस व सिंचन अवलंबून असलेले तलाव १०० टक्के भरले आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम समाधानकारक जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय तालुक्यातील पाचही साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त ऊस बिल दिले आहेत. कामगारांना बोनस दिला आहे. याशिवाय तालुक्यातील सहकारमहर्षी साखर कारखान्याने २३ टन साखर २७ रुपयांनी, पांडुरंग कारखान्याने १५ टन साखर २५ रुपयांनी, माळीनगर दि सासवड माळी शुगरने ९ टन, श्री शंकर कारखान्याने सुमारे ८०० क्विंटल साखर १८ रुपये दराने तर चांदापुरी येथील ओंकार शुगर कारखान्याने मोफत १४ टन, अशी मिळून सुमारे १४१ टन साखर सवलतीच्या दरात व मोफत स्वरुपात ऊस उत्पादक, कामगारांना वाटप करण्यात आली. त्यामुळे या लोकांना दिवाळीसाठी साखर विकत घ्यावी लागली नाही. या पार्श्वभूमीवर तालुक्यात दिवाळी सण उत्साहात झाला आहे. दिवाळीनिमित्त नागरिकांनी किराण्यासह सोने, कपडे, वाहने, फटाक्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. किराणाची ८५ दुकाने तर फटाक्यांचे ३५ स्टॉल अकलूज शहर व परिसरात किराणा मालाची ठोक व किरकोळ विक्री करणारी लहान- मोठी सुमारे ८५ दुकाने व तीन बाजार आहेत. तेथून नागरिकांनी हरभरा डाळ, डालडा, गोडेतेल, रवा, मैदा, बेसन, साबण आदी साहित्याची खरेदी केली आहे. दिवाळीच्या आठ दिवसात सुमारे ७० कोटींची उलाढाल झाल्याचे किराणा व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. याशिवाय सराफ दुकानातून सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी, ट्रॅक्टर, चारचाकी वाहनांच्या विक्रीतून सुमारे ३० कोटींची उलाढाल झाली. फटाक्यांचे ३५ स्टॉल लावण्यात आले आहेत. याशिवाय फुले, केरसुणी, विविध रंगातील रांगोळ्या, मातीचे दिवे, आकाश कंदिलांच्या विक्रीतूनही कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. हरभरा डाळ, तेल, रवा, मैद्यातून मोठी उलाढाल ^आमच्याकडे अकलूज व यशवंतनगर परिसरात लहान-मोठी ८० ते ८५ दुकाने आहेत. यावर्षी रवा, मैदा, तेल, हरभरा डाळ आदी दिवाळीला लागणाऱ्या किराण्याची सुमारे ६० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. इंद्रराज दोशी, अकलूज.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अलिकडेच एका POCSO प्रकरणात एक महत्त्वाचा निर्णय दिला. खंडपीठाने असा निर्णय दिला की अल्पवयीन मुलाचा थोडासाही लैंगिक संबंधात प्रवेश करणे देखील बलात्कार ठरेल. शिवाय, या प्रकरणात अल्पवयीन मुलाची संमती अप्रासंगिक असेल. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील ३८ वर्षीय ड्रायव्हरची अपील न्यायालयाने फेटाळून लावली, ज्यावर ५ आणि ६ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. निकाल लिहिणाऱ्या न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांनी ड्रायव्हरला १० वर्षांची शिक्षा आणि ५०,००० रुपयांचा दंड कायम ठेवला. मुलींना पेरूचे आमिष दाखवून त्यांचे लैंगिक शोषण केले आरोपी ड्रायव्हरने ५ आणि ६ वर्षांच्या दोन मुलींना पेरू देऊन आमिष दाखवले आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवले. त्याला पोक्सो कायद्याच्या कलम ६ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ५११ सह वाचलेल्या कलम ३७६(२)(i) अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. न्यायमूर्ती मेहता यांनी सांगितले की, मुली आणि त्यांच्या आईच्या जबाबांवर तसेच वैद्यकीय आणि न्यायवैद्यक पुराव्यांवर आधारित सरकारी वकिलांनी आपला खटला सिद्ध केला आहे. १५ दिवसांनंतर झालेल्या वैद्यकीय तपासणीत मुलींच्या गुप्तांगांना जखमा न आढळणे हे आरोपीने केलेला प्रयत्न असल्याचे नाकारता येत नाही, कारण विधाने विश्वसनीय होती. कौटुंबिक कलहामुळे अडकवण्यात आल्याचा आरोपीचा दावा आरोपीने असा दावा केला की कौटुंबिक कलहामुळे त्याला खोटे गुंतवण्यात आले होते, परंतु पुराव्याअभावी न्यायालयाने ते फेटाळून लावले. मुली खूपच लहान होत्या आणि त्यांना आरोपींनी धमकावले होते, असे नमूद करून न्यायालयाने एफआयआर दाखल करण्यास झालेल्या विलंबाचे समर्थन केले. आरोपींनी ट्रायल कोर्टाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने चूक सुधारली आणि शिक्षा सुनावली उच्च न्यायालयानेही ट्रायल कोर्टाने केलेली चूक सुधारली: जेव्हा या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा ती २०१९ च्या सुधारित POCSO कायद्यांतर्गत लागू करण्यात आली. उच्च न्यायालयाने हे चुकीचे ठरवत म्हटले की, हा गुन्हा २०१४ मध्ये घडला असल्याने, शिक्षा त्यावेळच्या कायद्यानुसार असायला हवी होती. हा गुन्हा १९ फेब्रुवारी २०१४ रोजी घडला होता आणि म्हणूनच, शिक्षा त्यावेळच्या कायद्यानुसार असायला हवी होती. न्यायमूर्ती मेहता म्हणाले की, त्या काळातील कायद्यानुसार १० वर्षांची शिक्षा योग्य होती आणि ती बदलण्याची गरज नव्हती. POCSO प्रकरणात पीडितेला पक्षकार बनवणे आवश्यक नाही यापूर्वी, राजस्थान उच्च न्यायालयाने, जोधपूरने, POCSO प्रकरणांमध्ये एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले की, जामीन अर्जांमध्ये पीडित मुलाला किंवा त्यांच्या पालकांना पक्षकार म्हणून समाविष्ट करणे बंधनकारक नाही, परंतु त्यांना सुनावणीचा अधिकार असणे आवश्यक आहे. फौजदारी जामीन अर्जात आरोपींनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती संदीप शाह यांनी हा निर्णय दिला आहे.
उत्तर सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील आगामी पंचायत समिती निवडणुकीत नवे समीकरण आकार घेताना दिसत आहे. मोहोळचे विद्यमान आमदार राजू खरे यांचे निकटवर्ती व कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे संजय कुमार लंबे यांच्या धर्मपत्नी मनीषा संजय लंबे या वडाळा गणांतून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली असून या घडामोडीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. वडाळा गण हा यंदा ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असल्याने मनीषा लंबे या त्या प्रवर्गातून उमेदवारी दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना पाठिंबा देणारा वर्ग वडाळा आणि पंचक्रोशी परिसरात मोठ्या प्रमाणावर असून, त्यांचा प्रचार मोहिमेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संजय कुमार लंबे यांनी गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या कार्यपद्धती आणि लोकसंपर्कामुळे वडाळा गणांत त्यांचे प्रभावी जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे राजू खरे यांच्या पाठबळावर वडाळा गणात परिवर्तन घडवून आणण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जोरदारपणे वर्तवली जात आहे. स्थानिक राजकारणात मनीषा लंबे यांच्या उमेदवारीमुळे आगामी पंचायत समिती निवडणुकीत नवे समीकरण निर्माण होणार असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. वडाळा गणांतील ही निवडणूक आता अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनीषा लंबे
आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने ‘एक पणती वंचितांच्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील गरजू, दिव्यांग बांधवांना दिवाळीचा फराळ आणि भाऊबिजेनिमित्त साड्या देण्यात आल्या. यातून वंचितांना जीवनात दीपोत्सवाचा प्रकाश फुलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आपुलकीचे अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, प्रतिष्ठान दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम राबवत आहे. गत पाच वर्षांपासून ‘एक पणती वंचितांच्या दारी' उपक्रम राबवला जात आहे. समाजात वंचितांना प्रकाशोत्सवाचा आनंद मिळावा, त्यांच्यात उमेदीची ज्योत जागवली जावी, यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींकडून देणगी जमा करत वंचितांना दिवाळी फराळ व भाऊबिजेनिमित्त साडी व कपडे वाटप केले जात आहे. यावर्षी सांगोला शहर व तालुक्यातील गरजू दिव्यांग आणि धुणी-भांडी काम करून प्रपंचाला हातभार लावणाऱ्या गरजू महिलांना दिवाळी फराळ व साड्या देण्यात आल्या. त्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केल्यानंतर शहर, तालुका, जिल्हा, राज्य व देशभरातील देणगीदारांकडून ९१ हजार रुपयांची देणगी जमा झाली. यातून तालुक्यातील ११ गरजू दिव्यांग व धुणी-भांडी काम करून प्रपंचाला हातभार लावणाऱ्या ८५ महिलांना दिवाळी फराळ आणि साडी वाटप करण्यात आले. कार्यक्रमात सांगोला येथील गणपतराव देशमुख सहकारी सूतगिरणीचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी म्हणाले की, समाजातील दबलेल्या घटकाने मदतीसाठी हाक मारली की त्याला ओ देणारी ही आपुलकी संस्था आहे. प्रतिष्ठान वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचे काम करत आहे. कार्यक्रमास मोहन मस्के, विजय सांगलीकर, कृष्णाबाई खटकाळे आदींसह आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी बापूसाहेब ठोकळे, विक्रम होवाळ यांनी विचार मांडले. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी ^राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचाराप्रमाणे भुकेल्यांना अन्न, तहानलेल्याला पाणी व गरजूला वस्त्र, अशी समाजिक बांधिलकीची जाणीव व मानवतेच्या भावनेतून दानशूर व्यक्ती वंचित घटकांसाठी काम करत आहेत. हीच आपुलकी आहे. बापूसाहेब ठोकळे, सांगोला.
अतिवृष्टीच्या सावटाखाली दिवाळी साजरी होत असली तरी शहरात दिवाळीची बाजारपेठ फुलली आहे. ग्राहकांचा खरेदीला संमिश्र प्रतिसाद दिसत आहे. दिवाळीचे मुख्य आकर्षण असलेल्या विविध आकारातील आकर्षक रंगसंगतीचे सुबक आकाशकंदील, आकर्षक पणत्या, अभ्यंस्नानाचे सुगंधी उटणे, साबण, लक्ष्मी पूजनासाठीची पारंपरिक खतावणी, रोजमेळ व रोजनिशींची दुकाने सजली आहेत. चायना आकाशकंदिल व अन्य चिनी साहित्य बाजारपेठेतून नाहीसे झाले आहे. पर्यावरणपूरक पेपर व जूट कापडापासून आकर्षक स्टोन वर्कचे आकाशकंदिल, प्लास्टिक तसेच एलइडी लाइटसह फॅन्सी फ्रेमवर्कचे आकाशकंदिल बाजारात उपलब्ध आहेत. आकार व दर्जानुसार आकाश कंदिलांचे दर ३० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत आहे. तसेच विठू माऊली, पांडुरंग, स्वामी समर्थ, जगदंब, जाणता राजा, शंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा असलेले लाकडी आकाशकंदिलही ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आकाशकंदिलांची अधिक मागणी आहे. डिजिटल युगात व्यावसायिक, विक्रेत्यांसाठी हा उलाढालीचा हंगाम ^बार्शी येथील बाजारपेठेत धाराशिव, कळंब, भूम, परंडा, वाशी येथून दिवाळी साहित्य खरेदीसाठी ग्राहक येतात. दरवर्षी दिवाळीत बार्शी बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होते. विकास भालके, विक्रेते, बार्शी. लहान मोठे व्यापारी, कारखानदार व उद्योजकांचे आर्थिक व्यवहार आता संगणकाद्वारे होते. त्यामुळे लक्ष्मी पूजनासाठी मान असलेल्या पारंपरिक रोजमेळ, खतावणी, रोजनिशीला म्हणावी तशी मागणी नाही. केवळ मान म्हणून पूजेसाठी रोजमेळ कमी प्रमाणात खरेदी केली जाते. रोजमेळ खतावणी १०० पासून ३०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. तसेच पाण्यावर चार्ज होऊन तेवणाऱ्या पणतीला विशेष मागणी आहे. या पणतीचा एक डझनचा दर ९० पासून ३०० रुपयांपर्यंत आहे. एलइडी लाइटसह फॅन्सी फ्रेमवर्कचे आकाशकंदिल बाजारात उपलब्ध आहेत. ‘मेड इन इंडिया'ला ग्राहकांची पसंती यापूर्वी स्वस्त दरात मिळणाऱ्या चिनी बनावटीच्या मालाला ग्राहकांची पसंती मिळत होती. त्यामुळं जवळपास ८० टक्के चिनी बनावटीचा माल विकला जात होता. परंतु, आता ग्राहक जागृत झाले आहेत. भारतीय बनावटीची विद्युत रोषणाई दर्जेदार आणि टिकाऊ असल्यानं ग्राहकांचा कल आता भारतीय बनावटीच्या विद्युत रोषणाईकडं जात आहे.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी काँग्रेसचे पिठलं भाकरी आंदोलन
तालुक्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही नुकसान भरपाई जमा झाली नाही. पीक पाण्यात गेल्याने शेतकरी संकटात असताना सरकार केवळ मदतीच्या घोषणा करत आहेत, असा आरोप करत काँग्रेसच्या वतीने मंगळवेढा तहसील कार्यालयासमोर पिठलं, ठेचा व भाकरी खाऊन आंदोलन करत तहसीलसमोरच दिवाळी साजरी करण्यात आली. मंडळाधिकारी धनंजय इंगोले यांनी निवेदन स्वीकारले. याप्रसंगी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नंदकुमार पवार, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन तात्या पाटील, प्रदेश सचिव ॲड. रवीकिरण कोळेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष राहुल घुले, मतदारसंघाध्यक्ष मारुती बापू वाकडे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टी व पुराने जिल्ह्यात अनेकांची घरे पडली. ढवळसमध्ये अंगावर भींत पडून मृत्यू झाला. पिके वाहून गेली. ज्वारीच्या कोठारात काळ्या जमिनीत पाणी साचून हंगाम वाया जाण्याचा धोका आहे. अशावेळी सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली परंतु ती तुटपुंजी आहे. सरकारने कोरडवाहू, बागायती व खरवडून गेलेल्या जमिनीसाठी जाहीर केलेली मदतही मिळाली नाही. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव, महादेव कोळी, मुबारक शेख, मनोज माळी, आयेशा शेख, पंडित पाटील, सुनीता अवघडे, बापू अवघडे, महादेव साखरे, सुधाकर कांबळे, कादर पटेल आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी | बार्शी बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या बार्शी क्रेडाईने तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. शुक्रवार दि. १७ रोजी बार्शी तहसील येथे तहसीलदार एफ.आर.शेख यांच्या हस्ते ही मदत देण्यात आली. पूरग्रस्त शेतकरी हे प्रामुख्याने धस पिंपळगांव, देवगाव व कांदलगाव या गावातील विधवा, निराधार वयोवृद्ध आहेत. त्याच बरोबर क्रेडाई बार्शी तर्फे तहसीलदार यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून ११ हजारांचा धनादेश देण्यात आला. तहसीलदार शेख, माजी खासदार शिवाजी कांबळे व सर्व क्रेडाई सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत मदत निधी देण्यात आला. तसेच क्रेडाई महाराष्ट्र यांचे वतीने बार्शीचे भूमिपुत्र शांतीलाल कटारिया यांनी पूरग्रस्त भागातील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मदत म्हणून रु.५० हजार एवढा निधी देऊन मोलाचे सहकार्य केले आहे. यावेळी क्रेडाई अध्यक्ष सतीश अंधारे, उपाध्यक्ष नितीन देशमुख, सचिव समाधान पाटील, खजिनदार भरत परमार, रूपेश कांकरिया, आदी मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार शेख म्हणाले की, बार्शीमधून विविध सामाजिक संघटनांनी व वैयक्तीक रित्या आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. सोलापूर जिल्हयातील बार्शी तालुका हा दातृत्वात नं १ ठरला आहे. प्रतिनिधी | कुरूल सीना नदीला आलेल्या महापरामुळे शिरापूर, पिरटाकळी, शिंगोली, तरटगाव, कामती खुर्द, घोडके वस्ती भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा वेळी सातारा येथील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त सुधीर विसापुरे आणि त्यांची पत्नी प्रशाली विसापुरे यांनी पूरग्रस्तांच्या डोळ्यातून अश्रू पुसण्याचे काम केले आहे. वर्तमानपत्र व टीव्हीवरील विदारक दृश्ये पाहून मन व्यथित झालेल्या विसापुरे दांपत्याने स्वतः पूरग्रस्त भागाला भेट देत तेथील विद्यार्थी व पालकांची विचारपूस केली. दिवाळीचा खरा अर्थ केवळ दिव्यांचा उजेड नसून इतरांच्या आयुष्यात प्रकाशाची पेरणी करण्याचे आहे, असे शब्द यावेळी विसापुरे यांनी काढले. त्यांच्याकडून पूरग्रस्त कुटुंबांना शैक्षणिक साहित्य, चादरी, रग, पुरुषांसाठी नवीन कपडे, स्त्रियांसाठी साड्या आणि मुला-मुलींसाठी नवीन कपडे भेट दिले. या अनोख्या भाऊबीजेच्या भेटीने पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. या उपक्रमाचे नियोजन स्व. दाजीकाका गोडबोले विद्यालयाचे प्राचार्य संजय गेंगाणे, केंद्रप्रमुख राठोड, भागवत पाटील, दिगंबर पाटील, बाळासाहेब कोळी, सिद्धेश्वर माने, विलास पाटील, महेश धुमाळ, शंकर पाटील यांनी केले. प्रत्येक गावात वाटपावेळी सरपंच, उपसरपंच, पोलिसपाटील, ग्रामस्थ, जिल्हा परिषद शिक्षकांनी सहकार्य करत समाजसेवेचा संदेश दिला. पूर ओसरल्यानंतर अनेकजण आपापल्या जगण्यात गुंतले असताना सातारकरांच्या या मदतीने ‘माणुसकी अजून जिवंत आहे’, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. प्रतिनिधी | माढा रोटरी क्लब ऑफ पलावाच्या वतीने माढा तालुक्यातील उंदरगाव व केवड येथील २७५ पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंसह दिवाळी किटचे वाटप प्रकल्पप्रमुख डॉ. मनोज पवार यांच्या हस्ते करण्यात आले. हा उपक्रम उंदरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घेण्यात आला. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे बाधित कुटुंबांना दिवाळी किट देत त्यांना आनंद द्विगुणीत करण्यात आला. डॉ. मनोज पवार म्हणाले की, हा मदत प्रकल्प केवळ स्थानिक स्तरावर नव्हे, तर अनेक सहयोगी संस्थांच्या पाठबळावर उभा राहिला आहे. रियासत फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ ठाणे अपटाऊन आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे स्काय लाइन या संस्थांच्या मदतीने तीन लाख ७२ हजार रुपयांची देणगी देण्यात आल्याने ही मदत करणे शक्य झाले आहे. याबद्दल पवार यांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले आहे. यावेळी मुंबई येथील शिक्षण उपसंचालक मनिषा पवार व माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड. मीनलताई साठे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे, जगदाळे फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी जगदाळे, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विजय साठे यांच्यासह रोटरी क्लब ऑफ माढाचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन औदुंबर पवार यांनी केले तर आभार रोटरी क्लब ऑफ पलावाचे माजी अध्यक्ष संदीप होटकर यांनी मानले.
बार्शी सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीत नद्यांना पुरामुळे नदीकाठची गावे बाधित झाली होती. यामुळे घरांमध्ये पाणी शिरुन संसारोपयोगी साहित्यासह विद्यार्थ्यांची पुस्तके व दप्तर भिजून नुकसान झाले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शहरातील शिवाजी महाविद्यालयामधील २००१ च्या तुकडीतील माजी विद्यार्थ्यांनी बार्शी व माढा तालुक्यातील पाच गावांमधील जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. तालुक्यातील खडकलगाव, पिंपळगाव धस, देवगाव, कांदलगाव व माढा तालुक्यातील केवड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये सहा वह्या, एक टिफिन, एक कंपास, अंकलिपी व पेन आदींचा समावेश आहे. अशा सुमारे ३०० शैक्षणिक किटचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांच्या ग्रुपच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात मंडल अधिकारी उमेश डोईफोडे, डॉ. प्रदीप जाधव, डॉ. प्रमोद मांजरे, संजय पाटील, भैरवनाथ पाटील आदी यावेळी गावांमध्ये उपस्थित होते. कांदलगावात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी गटविकास अधिकारी विवेक जमदाडे यांनी शिवाजी महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. संजय सोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिक्षक उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळेतील हे माजी विद्यार्थी सध्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. परंतु त्यांनी शाळेशी नाळ कायम ठेवली आहे. आम्हीही याच जिल्हा परिषद शाळेत शिकलो, असे अभिमानाने नमूद करत शैक्षणिक जीवनातील आठवणी त्यांनी सांगितल्या. गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जि.प. शाळेत शेतकरी, कष्टकरी, मोलमजुरी करणार्या गोरगरिबांची मुले शिक्षण घेत आहेत. ते पालकांचे भविष्य आहेत. त्यामुळे शिक्षकांनी त्यांना जबाबदारीने घडवावे. जि. प. शाळा गुणवत्तेत कमी पडणार नाहीत, याची दक्षता घ्यावी अशी सूचना त्यांनी केली.
अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त झालेल्या हरकतींपैकी शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक श्याम नळकांडे यांची एकमेव हरकत अंशतः मान्य करण्यात आली. त्यानुसार शिंदे शिवसेनेतील माजी महापौरांच्या प्रभाग ९, विद्यमान जिल्हाप्रमुखांच्या प्रभाग १५ व लगतच्या प्रभाग १६ अशा तीन प्रभागात काही प्रमाणात बदल केले आहेत. या बदलासह अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने प्रसिद्ध करण्यात आली आहे. महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अंतिम नकाशे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. नगर विकास विभागाच्या वेळापत्रकानुसार १३ ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होणे अपेक्षित होते. मात्र, सात दिवस उशिराने सोमवारी(२० ऑक्टोबर) अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रभाग ९ मधील कल्याण रोड परिसरातील काही भाग प्रभाग १५ मध्ये समाविष्ट करण्यात आला होता. त्यावर नळकांडे यांनी हरकत घेतली होती. ती अंशतः मान्य करून प्रभाग १५ मधून प्रशांत सोसायटी परिसर व इतर भागाचे दोन ब्लॉक प्रभाग ९ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ ची लोकसंख्या २२ हजार ०९१ झाली आहे. परिणामी, प्रभाग १५ ची लोकसंख्या सरासरीपेक्षा कमी झाल्याने प्रभाग १६ मधील शंकर महाराज मठ परिसर व अरुणोदय मंगल कार्यालय परिसराचा समावेश असलेले दोन ब्लॉक प्रभाग १५ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक १५ ची लोकसंख्या १८ हजार ३०४ व प्रभाग क्रमांक १६ ची लोकसंख्या २१ हजार ०६१ अशी झाली आहे. Q. अंतिम प्रभाग रचनेला विलंब का झाला? A. वेळापत्रक नगरविकास विभागानेच प्रसिद्ध केले होते. त्यांच्याकडून काल आयोगाकडे रचना सादर झाली व आयोगाने त्याला मान्यता दिली. Q. प्राप्त हरकतींपैकी एकच हरकत का स्वीकारण्यात आली? A. एकूण ४३ हरकती प्राप्त झाल्या होत्या. भौगोलिक सलगतेच्या कारणास्तव त्यापैकी एक हरकत अंशतः स्वीकारण्यात आली आहे. Q. ३ प्रभागांच्या रचनेमध्ये बदल का झाले? A. प्रभाग १५ मधून दोन ब्लॉक प्रभाग नऊमध्ये समाविष्ट केल्याने त्या प्रभागाची लोकसंख्या कमी झाली होती. त्यामुळे प्रभाग १६ मधून दोन ब्लॉक कमी करून प्रभाग १५ मध्ये घेण्यात आले. शासनाकडून उशिराने प्रभाग रचना आयोगाकडे सादर राज्य शासनाच्या वेळापत्रकानुसार ९ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची मुदत होती. तत्पूर्वी नगरविकास विभागाने निवडणूक आयोगाकडून मान्यता घेणे आवश्यक होते. प्रत्यक्षात सात दिवस उशिराने २० ऑक्टोबर रोजी अंतिम रचना आयोगाकडे दुपारी १२.४० वाजता सादर झाली. आयोगाकडून तत्काळ त्याला मान्यता देण्यात आली. सात दिवसांच्या विलंबाबाबत शासनाकडून कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. शिवसेना शिंदे गटाच्या दबावाखाली रचना प्रभाग रचना एकनाथ शिंदे गट आणि काही स्थानिक नेत्यांच्या दबावाखाली करण्यात आली आहे. बदल केलेल्या प्रभागात शिंदे गटाचे दोन माजी महापौर आणि माजी नगरसेवक आहेत. त्यांना अनुकूल हा प्रभाग व्हावा अशी रचना केली. त्यामुळे या प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान देण्यात येणार असल्याचे ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी म्हटले आहे. सत्ताधारी महायुतीच्या राजकीय हस्तक्षेपाची कबुली : किरण काळे केवळ प्रभाग ९, १५, १६ मध्ये बदल केले आहेत. ४३ हरकती असताना एकच हरकत तीही सत्ताधारी महायुतीच्या दबावातून मान्य केली. ठाकरे सेनेने घेतलेल्या हरकती फेटाळण्यात आल्या. भौगोलिक सलगता तोडून, मोडून सत्ताधाऱ्यांच्या राजकीय फायद्यासाठीची केलेली रचना महायुतीच्या दबावातून तशीच ठेवली गेली. त्यामुळे ही सत्ताधारी महायुतीच्या राजकीय हस्तक्षेपाची कबुली असल्याची प्रतिक्रिया ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांनी दिली आहे. माजी महापौरांना दिलासा, जिल्हाप्रमुखांची अडचण अंतिम प्रभाग रचना करताना शिंदे गटाच्या माजी महापौर रोहिणी शेंडगे यांच्या प्रभाग नऊची हरकत काही प्रमाणात स्वीकारून जुन्या प्रभागातील जो भाग प्रभाग १५ मध्ये गेला होता, त्यातील काही भाग पुन्हा समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे शेंडगे यांच्यासह शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, या बदलामुळे विद्यमान जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांची अडचण होण्याची शक्यता आहे. प्रभाग १५ ची सरासरी लोकसंख्या कायम ठेवण्यासाठी प्रभाग १६ मधील काही भाग नव्याने प्रभाग १५ मध्ये समाविष्ट झाला आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासह इतर माजी नगरसेवकांची काही प्रमाणात अडचण होण्याची शक्यता आहे. तसेच, प्रभाग १६ मधील काही भाग वगळला गेल्याने येथील शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांचीही अडचण होण्याची शक्यता आहे. मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर चित्र आणखी स्पष्ट होणार आहे.
निशांत' अंकाने आपला वेगळा ठसा उमटवला- प्रा. राम शिंदे
अहिल्यानगर जिल्ह्यातून अखंडपणे २५ वर्षे विविध विषयांवर प्रकाशित होणाऱ्या निशांत दिवाळी अंकाने वाचकांच्या मनावर राज्य केले आहे. कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही संपादक निशांत दातीर यांनी महाविद्यालयीन जीवनात सुरु केलेल्या निशांत दिवाळी अंकाचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण होत असल्याने या वाटचालीचा अनेकांना हेवा वाटतो. राज्यातून अनेक दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या निशांत दिवाळी अंकाने राज्यात आपला वेगळा ठसा उमटवत एक प्रकारे जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रातील प्रतिनिधीत्व केले आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. निशांतच्या रौप्य महोत्सवी दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, बांधकाम व्यावसायिक रोहन मांडे, डॉ. सतीश सोनवणे, शहाजीराजे भोसले, संपादक निशांत दातीर आदी उपस्थित होते. प्रा. शिंदे म्हणाले, ग्रामीण भागातील एखाद्या तरुणाने सुरु केलेल्या रोपटयाचे मोठ्या वृक्षात पदार्पण होत असल्याची भावना या अंकाच्या २५ वर्षाच्या वाटचालीवर व्यक्त केली तरी वावगे ठरणार नाही. संपादक दातीर म्हणाले, निशांत दिवाळी अंकाच्या रौप्य महोत्सवी विशेषांकात दीपक शिकारपूर, रेणु गावस्कर, रमेश पानसे, वरुण भालेराव, शमसुद्दीन तांबोळी, माजी पोलिस महासंचालक प्रविण दिक्षीत, स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी, अॅड. शाम असावा, सुनील कडासने आदी मान्यवरांचा समावेश आहे.
नव्या पिढीतील प्रतिभावंत गायक प्रथमेश लघाटे व शाल्मली सुखटणकर या युवा गायकांनी प्रर्थना, भजन, नाट्य, भावगीत, गझल, लावणी, हिंदी गीते व भैरवी अशा अनेकविध गाण्यांनी रंगवलेली दीपावली सरगम संगीत मैफल नगरकर रसिकांना मंत्रमुग्ध करून गेली. गगन सदन तेजोमय... प्रथम तुज पाहता जीव वेडावला... गोमू संगतीनं माझ्या तू येशील का...शुक्रतारा मंद वारा...केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली... या अवीट गोडीच्या गीतांनी ते अवघा रंग एक झाला...या भैरवीने नगरकरांची पहाट सुरमई झाली. भल्या सकाळी रंगलेल्या या मैफलीस विविध क्षेत्रातील रसिक नागरिकांनी उपस्थिती लावली. दीपावलीनिमित्त येथील विचार भारती संस्था व चैतन्य फाउंडेशन आयोजित एक दिवाळी पहाट वेळी या संगीतमय मैफिलीत प्रथमेश व शाल्मली या गायकांनी नगरकरांचा दीपावलीचा आनंद द्विगुणित केला. माऊली सभागृहात झालेल्या मैफलीत अनेकविध प्रकारातील मराठी गाण्यांसह काही गाजलेली हिंदी गाणीही त्यांनी सादर केली. आकाशवाणी कलावंत अभिजीत कुलकर्णी यांनी निवेदन केले. अखंड भारताच्या नकाशाभोवती दीप प्रज्वलित करून यावेळी दिपोत्सव साजरा करण्यात आला. गायक प्रथमेश लघाटे व शाल्मली सुखटणकर यांनी दिवाळी पहाट मैफलीत गगन सदन तेजोमय या प्रार्थनेने सुरू झालेल्या मैफिलीत नाट्य संगीतातील १४५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जय शंकरा गंगाधरा हे पद विशेषतः सादर करण्यात आले. तसेच अरे अरे ज्ञाना झालासी पावन, इंद्रायणी काठी, दत्त दर्शनाला जायाचं, काळ देहासी आला, माझे माहेर पंढरी... अशी भक्तीगीते रसिकांकडून टाळ्यांची दाद मिळवून गेली. यावेळी नगर शहरातील ठिकठिकाणच्या नागरिकांनी सभागृहात मोठी गर्दी केली होती. नगरकर झाले मंत्रमुग्ध कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकातील सुरत पिया की..या गाण्याने वन्स मोर मिळवला. प्रथम तुझं पाहता, केव्हा तरी पहाटे, शुक्रतारा मंद वारा, हे सुरांनो चंद्र व्हा, गोमु संगतीनं, माझे माहेर पंढरी... या गीतांसह बुगडी माझी सांडली गं व उगवली शुक्राची चांदणी...या लावण्या व त्यासोबतचा ढोलकीच्या ठेका शिट्ट्यांची दाद मिळवून गेला. मै जिंदगी का साथ निभाता चला गया, ओ सजना बरखा बहार आई, झुमका गिरा रे...या हिंदी गाण्यांनी मैफलीची रंगत वाढवली.
राहात्यात भाजप वार्ता फलकाचे मंत्री विखे यांच्या हस्ते अनावरण
राहाता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या वार्ता फलकाचे अनावरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आले. या वार्ताफलकाचे माध्यमातून शासनाच्या विविध योजना, स्थानिक घडामोडी आणि सामाजिक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करा, असे मंत्री विखे म्हणाले. पक्षाच्या कार्यपद्धतीचा माहितीचा प्रसार आणि प्रसार यासाठी तसेच संवाद या मूल्यांना बळकट करण्यासाठी हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास यानिमित्त मंत्री विखे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य नितीन कापसे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, ॲड. रघुनाथ बोठे, गणेशचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ, वीरभद्र देवस्थान चे अध्यक्ष जबाजी मेचे, उपाध्यक्ष विजय सदाफळ, गणेशचे माजी संचालक मोहनराव सदाफळ, राहाता तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे साहेबराव निधाने, माजी उपनगराध्यक्ष संजय सदाफळ, सागर सदाफळ, अनिल बोठे, सुरेश गाडेकर, दशरथ तुपे, स्वप्नील बावके, मिलिंद बनकर, दत्ता सदाफळ, प्रवीण सदाफळ, संजय भालेराव, हरी गाडेकर आदी उपस्थित होते. या वार्ता फलकासाठी भाजपचे राहाता मंडल अध्यक्ष स्वाधीन गाडेकर, उपाध्यक्ष संतोष सदाफळ, चेतन गाडेकर, कोषाध्यक्ष पंकज कुलकर्णी, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष सागर कापसे, विजय सदाफळ , अतुल बोटे किरण लांडगे,सचिन बोठे नवनाथ मुजमुले चेतन रनमाळे, मनीष चितळकर, गणेश म्हसे, रवींद्र जाधव, वैभव करणोर आदींनी पुढाकार घेतला. भाजप वार्ता फलकाचे अनावरणप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे.
मुक्ताईनगर पं.स.च्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया सोमवारी नव्याने राबवण्यात आली. सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात ईश्वरी संदीप झांबरे या पाच वर्षीय बालिकेच्या हस्ते ईश्वर चिठ्ठ्या काढण्यात आल्या. दरम्यान, सभापतीपद नामाप्र महिलेसाठी राखीव आहे. नवीन सोडतीनुसार अंतुर्ली, उचंदे गणाला संधी आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या नियम २०२५ नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षित जागा निश्चित करण्यात आल्या. या आधी १३ ऑक्टोबर २०२५ रोजी पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. पण, त्यात झालेल्या तांत्रिक त्रुटींमुळे राज्य निवडणूक आयोगाने नव्याने सोडत काढण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार सोमवारी तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. त्यात ६ पैकी ३ जागा महिलांसाठी राखीव झाल्या. २० ऑक्टोबर रोजीच्या सोडतीनुसार आरक्षण असे अंतुर्ली : नागरिकांचा मागास प्रवर्ग, उचंदे : सर्वसाधारण (स्त्री), कुऱ्हा : अनुसूचित जाती (स्त्री), वढोदे : अनुसूचित जमाती (स्त्री), हरताळे : सर्वसाधारण, रुईखेडे : सर्वसाधारण. एकूण सहापैकी तीन जागा महिला राखीव निघाल्या. त्यामुळे महिलाशक्ती वाढेल. कुऱ्हा गणात आधीच एससी महिला, तर वडोदा गणासाठी एसटी आरक्षण होते. वडोदा गणात ते एसटी महिला करावयाचे होते. सोमवारच्या सोडतीत ते एसटी महिला झाले. तसेच एक गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव करायचा होता. ईश्वर चिठ्ठीने उचंदा गण सर्वसाधारण महिला राखीव झाला. नियोजन फक्त एससी, एसटी दोघी जागा महिला राखीव करणे असे होते. त्यामुळे इतर दोन गण हरताळे आणि रुईखेडे सर्वसाधारण महिला असल्याने तेथील आरक्षण बदलले. ते आता फक्त सर्वसाधारण असे झाले.
शहरातील साडेतेरा कोटींची पाणीपुरवठा योजना जुनी झाली आहे. या योजनेच्या जलवाहिनीला वारंवार गळती लागून शहराच्या तोंडचे पाणी पळते. सोमवारी पहाटे नागेश्वर रोडवरील पुलाजवळ मुख्य पाइपलाइन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. यामुळे ऐन दिवाळीत मकरंद नगर, वामन नगर या पाच हजार लोकवस्तीचा पाणीपुरवठा ठप्प झाला. मंगळवारी सायंकाळपर्यंत दुरुस्तीनंतर ही समस्या सुटेल. तपतकठोरा (ता.भुसावळ) येथील तापीनदी काठावरील जॅकवेलमधून वरणगाव शहरासाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, जुनी झालेली पाइपलाइन अडचणीची ठरत आहे. सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मुख्य पाइपलाइनला गळती लागल्याचे सकाळी पालिका कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तत्काळ दुरुस्ती हाती घेण्यात आली. त्यासाठी गळती लागलेल्या भागात जेसीबीने खोदकाम सुरू करण्यात आले. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे मुकादम मुख्तार यांच्याशी संपर्क साधला असता पाइपलाइन जोडणीचे काम सुरू आहे. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत व्हावा असे प्रयत्न असल्याचे सांगितले. दरम्यान, दिवाळीच्या दिवशी अचानक पाणीपुरवठा बंद झाल्याने अडचणी आल्या. काही भागांमध्ये रहिवाशांनी खासगी टँकर मागवून पाण्याची गरज भागवली. यासाठी आर्थिक भुर्दंड सहन केला. शहरात चार ते पाच दिवसांआड पाणीपुरवठा होतो. सोमवारी पहाटे जी पाइपलाइन फुटली त्यावरून रेल्वे स्थानकाजवळील जलकुंभ भरला जातो. त्यातून मकरंद नगर, वामन नगरात पाणीपुरवठा केला जातो. गळतीमुळे हा जलकुंभ भरला नाही. परिणामी सुमारे पाच हजार लोकसंख्येच्या भागातील पाणीपुरवठा ठप्प झाला. ^ पाइपलाइन दुरुस्तीसाठी लागणारा मॅकेनिकल जॉइंट जळगाव जिल्ह्यात कुठेही उपलब्ध होत नाही. हे साहित्य पुणे येथून मागवले आहे. ते मंगळवारी दुपारी उपलब्ध होऊन सायंकाळपर्यंत दुरुस्ती होईल. यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकेल असा अंदाज आहे. - ज्ञानेश्वर पवार, पाणीपुरवठा अभियंता नागेश्वर मंदिर रोडला लागून गेलेल्या पाइपलाइनला वारंवार गळती लागले. यामुळे शेजारी राहणाऱ्या सतीश इंगळे यांचे प्रचंड हाल होत आहेत. दरवेळी गळती लागली की पाणी थेट त्यांच्या घरात शिरते. यामुळे घरात ओलावा, दुर्गंधी आणि भिंतींचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पालिकेकडे कायमस्वरुपी उपाययोजनेची मागणी केली. गळतीचे पाणी घरात शिरते पुण्याहून मागवले आवश्यक साहित्य
मराठा परिवारातर्फे रामशेज किल्ल्यावर एक दिवा स्वराज्याच्या देवासाठी उपक्रम
रामसेज किल्ल्यावर दिवाळीनिमित्त सकल मराठा परिवाराच्या वतीने एक दिवा स्वराज्याच्या देवासाठी हा उपक्रम राबविण्यात दीपोत्सव साजरा करण्यात आला. नाशिक सकल मराठा परिवार टीमने किल्ले रामशेज येथे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व स्वराज्यासाठी देह ठेवणाऱ्या आपल्या लाख मावळ्यांना दिवा अर्पण करून दिवाळीची सुरवात केली. या संकल्पात १०१ टेंभे ५१ मशाली व १००१ दिवे प्रज्ज्वलीत करून दीपोत्सव साजरा केला, याकरिता दुपारी ३.४५ वाजता किल्ल्याच्या पायथ्याशी शिवप्रेमी एकत्र आले. गडावर गेल्यावर प्रथम सफाई करण्यात आली. रांगोळी काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेची पालखीची मिरवणूक, ध्वजपूजन. गडपुजन, करण्यात आले. महाद्वार साफसफाई करून तोरण बांधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी दिवे लावून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. शिवचरित्रकार साक्षी ढगे, समाधान हेगडे पाटील यांचे शिव व्याख्यान झाले. कार्यक्रमासाठी सह्याद्री प्रतिष्ठान यांच्या मावळ्यांनी सहभाग घेतला.
शहराजवळील भाक्षी ग्रामपंचायत हद्दीतील ले आऊटमध्ये वहीवाट रस्ते सोडलेले असतांना शिवनाल्यावर चुकीचे ले आऊट करून रहिवाशांचे रस्ते बंद करण्यात आले, असा आरोप करीत सदर शिवनाला व रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरीकांसह महिलांनी सटाणा तहसील कार्यालया समोर पाच तास आत्मदहन आंदोलन केले. अखेर मंञी दादा भुसे यांनी मध्यस्थी केल्याने तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले. भाक्षी ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ३०, गट क्रमांक ६७/२ व ६७ येथील शिवनाल्यावर चुकीच्या एनओसी जोडून लेआऊट जोडून शासनाची व जनतेची दिशाभुल करून फसवणुक केल्याने रामनगर शिवारातील नागरीकांना येजा करण्यासाठी रस्ता नाही.त्यामुळे रामनगर पारीजात कॉलनी रस्ता हा सटाणा भाक्षी रोड या मुख्य रस्त्याला जोडून मिळावा अशी मागणी करीत सोमवार दि २० रोजी महीला पुरषांसह शेकडो रहीवाश्यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले. शासकीय सुटी उर्वरित. पान ४ सदर प्रकरणी प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. दि. ३० रोजी होणाऱ्या बैठकीत योग्य निर्णय घेऊन रस्ता मोकळा न केल्यास बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील. - चेतन वनीस, सरपंच भाक्षी
इंधन दरवाढ, फटाक्यांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे वाढलेले भाव यामुळे यंदा दिवाळीत फटाक्यांचा आवाजही महागला आहे. फटाक्यांची बाजारपेठ सज्ज झाली असली, तरी किमतींमध्ये मात्र १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. या सणाचे मुख्य आकर्षण म्हणजे फटाके, परंतु गतवर्षीप्रमाणे यंदाही फटाक्यांवर महागाईचे सावट असल्याचे दिसून येते. सर्वच प्रकारच्या फटाक्यांच्या दरामध्ये सरासरी १० ते १५ टक्के वाढ झाली असल्याचे विक्रेते सांगतात. मात्र सध्या ग्रामीण भागात आणि शहरी भागातील बाजारपेठेत फटाक्यांचा दर्जा आणि आवाजाच्या बाबतीत शिवकाशीच्या फटाक्याला ग्राहकांची सर्वाधिक मागणी असते. गेल्या आठ दिवसांपासूनच या स्टॉलवर गर्दी असल्याचे दिसून येते. किटकॅट, पेन्सिल (स्मॉल) व बिगसह रॉकेट बिग, क्रॅक्लिंग स्पार्कलला बाजारात ग्राहकांडून मागणी आहे. १२ सेंटिमीटरमध्ये ४ कलर स्पार्कल आहेत. याचबरोबर १ हजार नग असलेली फटाक्यांची माळ ही २५० रुपये, दोन हजारांची माळ ५०० रुपये, तीन हजारांची ९०० रुपये व ५ हजारांची १२०० ते १४०० रुपयांना आहे. दिवाळीसाठी फटाक्यांची विक्री जोराने सुरू होईल, ती भाऊबीजेपर्यंत असेल, पण मालाची आवक कमी आहे. मात्र दिवाळीसाठी अनेक प्रकारचे फटाके बाजारामध्ये उपलब्ध आहेत. हिंदू-धर्मीयांचा पवित्र सण दिवाळीसाठी बाजारात खरेदीची लगबग सुरू झाली असून आबालवृद्धांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तालुक्यात यंदा अतिवृष्टीने खरीप हंगाम वाया गेला असून, दरवर्षी लाखोंची उलाढाल दिवाळीच्या पर्वावर बाजारपेठेवर होत असते. यंदा ती गर्दी हरवल्याचे चित्र आहे. दिवाळीच्या मोसमात हरभरा डाळीला अधिक मागणी असते. ऑनलाइन शॉपिंगद्वारे रेडिमेड कपडे, बूट, चप्पल, घड्याळ, सुका-मेवा, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा सर्वांचाच कल वाढल्याने त्याचाही फटका बाजारपेठेला बसला आहे. पारंपरिक टेलरिंग व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतर विक्रेत्यांवर ऐन दिवाळीत अडचण आली आहे. खरेदीचे प्रमाणही घटले दिवाळी सणाला दुकानांमध्ये खरेदीसाठी गत वर्षाच्या तुलनेत गर्दी कमी असून खरेदीचे प्रमाणही घटले असल्याच्या प्रतिक्रिया व्यापारी वर्गाने व्यक्त केल्या आहेत. शेतमालाचे ढासळत चाललेले भाव हे यामागचे प्रमुख कारण समजले जात आहे.
सर्व सणांमध्ये सर्वात मोठ्या असलेल्या दीपावली सणाच्या पूर्वसंध्येला नरक चतुर्दशीच्या दिवशी लागणारे फटाके, केरसुणी, लक्ष्मीच्या मूर्ती, आकाशकंदील, दाराला लावायचे तोरण, झेंडूची फुले, पणती, बोळके, लाह्या, बत्तासे, मिठाई, कपडे अशा विविध वस्तू खरेदी करण्यासाठी घाटनांद्रा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असलेल्या बाजारपेठेत ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आसपासच्या खेड्यापाड्यांवरून आलेल्या व्यावसायिकांनी थाटलेल्या या स्टॉलवर खरेदी करताना ग्राहकांची मोठी झुंबड उडाल्याचे बघायला मिळाले. यावर्षी ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. वर्षातील सर्वात मोठ्या असलेल्या या सणाच्या निमित्ताने उधार-उसनवार करून दिवाळी सण साजरा करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पिकांचे झालेले दुःख बाजुला सारून नागरिकांनी दीपावलीची खरेदी केली. तीन दिवसांपासून ओस पडलेल्या बाजारपेठेत मात्र रविवार व सोमवार रोजी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लक्ष्मीच्या मूर्ती तीस रुपयांपासून ते दीडशे रुपयांपर्यंत विक्रीसाठी होत्या, तर पणत्या, बोळके वीस रुपयांना पाच याप्रमाणे विक्री होत होत्या. फटाक्यांची दुकानेही मोठ्या प्रमाणावर थाटण्यात आली होती. या वर्षी फटाक्यांच्या भावातही मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळाले. तसेच मांगल्याचे प्रतीक असलेल्या झेंडूच्या फुलांचीही आवक मोठ्या प्रमाणावर झाली होती. सर्वच वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या असल्याने खरेदी करताना नागरिक मात्र हात आखडता घेत असल्याचे बघायला मिळत होते. केरसुणीला मोठी मागणी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा करण्याची परंपरा असल्याने आजही केरसुणी बाजारात आपले अस्तित्व टिकवून आहे. आधुनिक काळातही नागरिक केरसुणी खरदेसाठी विशेष पसंती दाखवत आहेत. ही केरसुणी साठ ते सत्तर रुपयांना विक्री करण्यात येत होती.
१५ दिवसांपूर्वी दसरा सणानिमित्त झेंडूच्या फुलांना ८० ते १०० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला होता. तीच फुले आता दिवाळीत ३० ते ४० रुपये किलोने पैठण शहरातील बाजारपेठेत विकली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य मार्केटमध्ये फुलांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गुलाब आणि इतर फुलांना चांगले दर मिळाले. पूजेचे साहित्य यंदा महागले आहे. आज लक्ष्मीपूजन आहे. त्यामुळे सध्या पैठणमध्ये खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. घराघरात दिव्यांची रोषणाई, सजावट आणि देवपूजेची तयारी सुरू झाली आहे. या सगळ्यात फुलांचे महत्त्व सर्वात जास्त असते. म्हणूनच सध्या बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, या गर्दीसोबतच झेंडूचे दर वगळता इतर फुलांचे दर चांगलेच वाढले आहेत. झेंेडूचे दर घसरल्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लागवडीवर झालेला खर्चदेखील निघत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. आधीच शेतकरी दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत आहे. त्यातच आता झेंडू ३० रुपये किलोने विकल्याने मोठे नुकसान झाले आहे. पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने अधिक दिवाळीच्या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंचे दरही निश्चित झाले आहेत. कमळ फुले ५० रुपयांना ३ आणि ६० रुपयांना १२ अशा दराने मिळतात. नरक चतुर्दशीला फोडण्यासाठी वापरले जाणारे कडू कारळ २० रुपयांना ४ मिळतात. भाताच्या लोंब्या २० रुपयांना एक आणि ५० रुपयांना ३ उपलब्ध आहेत. झाडू ३० ते ५० रुपयांना मिळत असून त्याचीही मागणी वाढली आहे. गजरे, तोरणाला मागणी हार, गजऱ्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. झेंडूचा मध्यम हार १० रुपयांना मिळतो, तर मोठा हार २०० रुपयांना मिळत आहे. साधे हार सुमारे ५० रुपये आणि गजरा ६० रुपये दराने मिळत आहे. घर सजावटीसाठी लागणारे मोठे तोरण ७० रुपये मीटर विकत आहे, असे फुलविक्रते योगेश भुजबळ यांनी सांगितले.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांवर आक्षेप घेऊन उपोषण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार सतीश सोनी यांच्या लेखी आश्वासनानंतर तीन तासांनंतर उपोषण मागे घेतले. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवले असून, यात मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे इतर प्रभागात गेलेली असल्याबाबत व ग्रामीण भागातील मतदारांची नावे सिल्लोड शहरातील मतदार यादीत असल्याबाबतचे नमूद केले होते. हेच आक्षेप नगर परिषद व निवडणूक विभागाकडे नोंदवले आहेत. यावर २८ ऑक्टोबर रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष मनोज मोरेलू यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सोमवारी सकाळी उपोषणाला सुरुवात केली. दुपारी तहसीलदार सतीश सोनी यांनी दाखल घेऊन मतदार याद्या सुरळीत करून मतदान घेतले जाणार असल्याचे आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले. या उपोषणात भाजपचे शहराध्यक्ष मनोज मोरेलू, सुनील पाटील मिरकर, कमलेश कटारिया, विष्णू काटकर, स्वप्निल शिनगारे, अतुल साळवे, मधुकर राऊत, किरण शिरसाठ, मोतीराम मिसाळ, राजेंद्र शिरसाठ, दिलीप पैठणकर, प्रकाश भोजवानी आदी सहभागी झाले होते. उपोषणस्थळी सुरेश पाटील बनकर, इद्रिस मुलतानी,ज्ञानेश्वर मोठे आदींनी भेट दिली होती.
सिल्लोड बाजारपेठ ग्राहकांनी फुलली
दीपावलीनिमित्त सिल्लोड बाजारपेठेत दोन दिवसांत ५० कोटी रुपयांची उलाढाल झाली. यंदा ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. कापड, सुवर्ण, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसली. सोन्याचे दर वाढले असतानाही ग्राहकांनी सोन्याला प्राधान्य दिले. दुचाकी आणि ट्रॅक्टरसह वाहन खरेदीतही वाढ झाली. कापड दुकाने गर्दीने फुलून गेली. किराणा, मिठाई, फराळाच्या दुकानांतही ग्राहकांची वर्दळ होती. पुढील दोन दिवस अशीच गर्दी राहील, असा विश्वास काही दुकानदारांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील ग्राहकांचा सिल्लोड बाजारावर अजूनही विश्वास असल्याचे व्यापारी संघाचे अध्यक्ष दुर्गेश जयस्वाल यांनी सांगितले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पैठणमध्ये सोने- चांदी खरेदीला ग्राहकांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये ३ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. मागील १५ दिवसांत सोन्याचे दर १० ग्रॅममागे १२ हजारांनी वाढले आहेत. चांदीचा दरही प्रतिकिलोने ४५ हजारांनी वाढला असल्याची माहिती सोने-चांदीचे व्यापारी बलराम लोळगे यांनी दिली. दिवाळीला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मोठे मुहूर्त असते. या मूहूर्तावर सोने-चांदीची खरेदी करणे लाभदायक मानले जाते. यातच मागील काही दिवसांपासून सोने- चांदीच्या दरात रोज चढ-उतार होत आहे. असे असताना देखील आज सोने-चांदी खरेदीला महिला वर्गाने पसंती दिल्याचे दिसून आले. दिवाळी पाडव्याला देखील सोने-चांदी खरेदीचा उत्साह कायम असणार आहे. यामुळे प्रचंड भाव वाढून देखील सोने-चांदी खरेदी वाढल्याचे दिसून येत आहे. सोमवारी सोन्याचे दर १ लाख ३१ हजार ५०० तर चांदीचा दर १ लाख ७० हजार होता. सध्या दागिन्यांमधील नवनवीन डिझाइन खरेदीला महिलांकडून प्राधान्य दिले जात आहे. टेम्पल मंगळसूत्र , राणीहार, गळ्यातील चेन, टेम्पल झुंबर, चोकर खरेदीला महिलांनी अधिक पसंती दिल्याचे दिसून आले. येथील सोन्याची शुद्धता अधिक मानली जाते. त्यामुळे येथे नेहमीच खरेदीदारांची गर्दी असते. ^दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत सोने १२ हजारांपेक्षा जास्त महाग झाले आहे. भाववाढ, लग्नसराई, सण, उत्सव यामुळे ग्राहकांची पावले सोने खरेदीकडे वळत आहेत. पुढील दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव आणखी वधारणार आहेत. त्यामुळे सोने खरेदी होत आहे. -बलराम लोळगे, व्यापारी, सोने-चांदी सोन्याची शुद्धता अधिक
दिवाळी म्हणजे सोने खरेदीचे दिवस. आता तर सोने किमतीचा इतका उच्चांक गाठते आहे की इतरत्र पैसा गुंतवणारेदेखील सोन्यात पैसे गुंतवायला लागले आहेत. त्यामुळे सोने खरेदीसाठी झुंबड उडताना दिसते आहे. आपण सोने दुकानात जातो, दोन-चार दागिने पाहून त्यातला एक निवडतो आणि पैसे देऊन तो घरी घेऊन येतो. जशी एखादी साडी किंवा वस्तू खरेदी करतो; पण सराफांचा व्यवसाय इतका सोपा नाही. सोन्याच्या लगडीपासून तुमच्या पर्सपर्यंतच्या सोन्याच्या या प्रवासाची गोष्ट काही औरच आहे. जळगावचे साेन्याचे दागिने देशभर प्रसिद्ध असले तरी इथे सोने येते ते मुंबईतूनच. पूर्वी मुंबईतून जळगावपर्यंत सोने आणणे म्हणजे जिकिरीचे काम होते. या क्षेत्रातले एक जुने व्यापारी सांगतात की, त्याकाळी रेल्वे किंवा खासगी वाहन याशिवाय पर्याय नव्हता. त्यासाठी खास माणसे नियुक्त असत. ते केव्हा मुंबईला जात आहेत आणि केव्हा येणार आहेत याविषयी प्रचंड गुप्तता पाळावी लागे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आर.सी. बाफना ज्वेलर्स हे सध्याचे जळगावमधील सर्वात मोठे व्यावसायिक. त्यांचे जनसंपर्क प्रमुख मनोहर पाटील यांना मुंबईतून सोने कसे आणतात, हे विचारल्यावर त्यांनी सांगितले की, ती आता आमच्या चिंतेची बाब राहिलेली नाही. त्यासाठी एक एजन्सी काम करते. या एजन्सीकडे सोने वाहतुकीसाठी हजारो वाहने आहेत. त्या वाहनांमध्ये अत्यंत मजबूत अशी तिजोरी असते. आम्ही मुंबईतून सोने खरेदी केले की ते या एजन्सीकडे सोपवले जाते. त्यांना सोने मोजून दिले की पुढची जबाबदारी त्यांची. ही गाडी थेट आमच्या दारापर्यंत येते. इथे आल्यावर संबंधित व्यक्ती त्यांच्या बंगळुरूच्या कार्यालयाशी संपर्क साधतो. तिथली व्यक्ती गाडीतील जीपीएसद्वारे ती खरोखरच आमच्या दाराशी पोहोचली आहे की नाही याची खात्री करते आणि तिकडूनच तिजोरी उघडून देते. त्यानंतर ते सोने आमच्या ताब्यात दिले जाते. ही वाहने इतकी अत्याधुनिक आहेत की काही शंका आलीच तर हे वाहन देशात कुठेही असो, जागेवरच बंद करायची सोयही बंगळुरूच्या कार्यालयात आहे. शिवाय या सोन्याचा विमा काढलेला असतो. त्यामुळे एक ग्रॅमही सोने बिना पावतीचे या गाडीत स्वीकारले जात नाही. शोकेसमधून रोज तिजाेरीत मनोहर पाटील यांनी सांगितले की, शोकेसमध्ये लावलेले हजारो आकर्षक दागिने रोज रात्री तिथून काढून तिजोरीत ठेवले जातात आणि पुन्हा सकाळी ग्राहक यायच्या आधी शोकेसमध्ये स्टॅण्डला (शोकेस बस्ट) लावून ठेवले जातात. त्यासाठी प्रत्येक शोरूमला प्रत्येक मजल्यावर एक स्वतंत्र मजबूत अशी तिजारी असते. हे दागिने शोकेसमधून काढून तिजोरी ठेवायला आणि पुन्हा शोकेसमध्ये ठेवायलाही साधारण अर्धातास लागतो. त्यासाठी दुकानाचे शटर उघडायच्या आधीच तासभर आतमध्ये काम सुरू झालेले असते. दागिना नाकातल्या चमकीसारखा अत्यंत छोटा असला तरी त्याला डिजिटल टॅग असतो. स्टाॅक घेताना आणि बिल बनवतानाही तो स्कॅन केला जातो. बिल बनले की कोणता दागिना आता विकला गेला आहे हे त्या क्षणी व्यवस्थापनाला मोबाइल अॅपद्वारे समजते. त्यामुळेच एका शहरात बसून अनेक शहरांत शाखा चालवणे सहज शक्य होते, असेही मनोहर पाटील म्हणाले. कारखान्यातील सुरक्षा आणि मेहनत आर.सी. बाफना ज्वेलर्सचे दागिने ज्या कारखान्यात बनवले जातात तिथेही प्रत्यक्ष पाहणी केली. त्या कारखान्याचे मालक अशोक सोनी आणि राजेश सोनी या भावांनी ४० वर्षांपासून हा कारखाना सांभाळला आहे. ते म्हणाले की आमच्याकडे असलेले कारागीर २०-२५ वर्षांपासून काम करत आहेत. त्यातले बहुतांश पश्चिम बंगालचे आहेत. प्रत्येकाचे काही वैशिष्ट्य असते. एक मोठे मंगळसूत्र बनवायचे असेल तर किमान सात ते आठ टप्प्यात प्रक्रिया केल्या जातात. उदा. पहिल्यांदा त्यात विशिष्ट प्रमाणात तांबे आणि अलाई मिसळले जाते. त्यासाठी इलेक्ट्रिक भट्ट्या आहेत. मग त्याचा बार बनवला जातो. तार करण्यासाठी त्यानंतर प्रक्रिया चालते. पत्रा बनवण्यासाठीही वेगळी प्रक्रिया होते. नंतर साच्यांमध्ये टाकून वेगवेगळ्या नक्षीचे तुकडे केले जातात. मणी केले जातात. काही डिझाइनमध्ये एम्बाॅसिंग केले जाते. त्यात काळे किंवा वेगवेगळ्या रंगांचे मणी जोडले जातात. एक मोठे मंगळसूत्र बनवायला १० ते १५ दिवस लागतात आणि तेवढ्याच माणसांच्या हातातून ते गेलेले असते. या कारखान्यातच कारागिरांची राहण्याची व्यवस्था केली जाते. जागेवरच जेवण मिळते. एक कारागीर सलग १२ ते १५ तास काम करतो. असेही राजेश सोनी यांनी सांगितले. सगळ्यात कमी नफा आणि पारदर्शी व्यवसाय हा व्यवसाय सर्वात कमी नफ्यावर चालणारा व्यवसाय आहे. उलाढाल मोठी असेल तर नफा मिळतो. पण या व्यवसायाइतकी पारदर्शकता कुठेही नाही. दर जगजाहीर असतात. शुद्धता अत्यंत कमी पैशात कुठेही नेऊन तपासता येते. हा व्यवहार ग्राहकाला कधीच तोट्यात टाकत नाही. - सुशीलकुमार बाफना, संचालक, आर.सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव आता एजन्सीकडे सोने वाहतुकीची जबाबदारी आल्याने सुरक्षितता वाढली मुंबईहून आलेले सोने मग जळगावातील दागिने घडवणाऱ्या कारखान्याकडे सोपवले जाते. ते मग अर्धा किलोपासून चार-पाच किलोही असू शकते. या सोन्याबरोबर कोणते दागिने किती वजनाचे आणि किती संख्येने घडवायचे आहेत याची यादी असते. नव्या नक्षीच्या दागिन्यांचे रंगीत फोटोही सोबत दिले जातात. ते दागिने तयार झाले की ते वजन करून विक्रेत्याकडे सोपवले जातात. हे बनून आलेले दागिने तुम्ही दिलेल्या सोन्याचेच आहेत आणि सांगितले त्याप्रमाणे १८, २२ किंवा २४ कॅरेटचेच आहेत हे तुम्हाला कसे कळते? म्हणजे कोणी त्यात एखादा खोट्या सोन्याचा दागिना टाकून दिला तर तुम्हाला कसे कळेल? हा माझा प्रश्न होता. त्यावर मनोहर पाटील म्हणाले, ‘समजा कारखान्याकडून सोन्याच्या अंंगठ्या बनवून आल्या आहेत. त्या हजार अंगठ्यांमधली कोणतीही एक अंगठी उचलून आम्ही ती तपासून घेतो. खूप मोठ्या दागिन्यांबाबत मात्र ते घासून आणि कॅरेटोमीटरवर तपासून स्वीकारले जातात.’ दागिने नंतर हाॅलमार्कसाठी पाठवले जातात. त्याला हाॅलमार्कचा नंबर आणि इतर माहितीचा डिजिटल बारकोड लावला जातो. सध्या कोणत्या दागिन्यांची क्रेझ आहे, ग्राहकांना कोणती डिझाइन अधिक आवडते आहे, हे कसे ठरते? तर काउंटरवरील सेल्सवुमन, सेल्समन स्टाॅक किपरला त्यांचे फीडबॅक देत राहतात. त्यानुसार कारखान्याला ऑर्डर दिली जाते.
युतीच्या 3 माजी नगरसेवकांचा दिवाळी फराळ कारागृहात:शिंदेसेनेतील दाेन माजी नगरसेवकांचे शहरातून पलायन
भाजपाचे दोन माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि जगदिश पाटील तसेच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाईचे प्रकाश लोंढे यांचा दिवाळी फराळ यंदा कारागृहातच हाेणार आहे. उद्धव निमसे धोत्रे खुन प्रकरणात तर जगदीश पाटील गोळीबार प्रकरणात निकम टोळीच्या कटात सहभागी आणि लोंढे सातपूर येथील गोळीबार प्रकरणात अटकेत आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या मोहिमेचा धसका घेत शिंदेसेनेच्या दोन माजी नगरसेवकांनी शहरातून पलायन केले आहे. पोलिस आयुक्तांनी क्लिन सिटी मोहिमे अंतर्गत भाई, दादा, बाॅस, मार्गदर्शक, आण्णा, आप्पा या कथिक भाई विरोधात कडक धोरण अवलंबत कारवाई सुरु केली आहे. विसे मळा गोळीबार प्रकरणात सुनिल बागुल यांचा पुतण्या अजय बागुल, मामा राजवाडे कारागृहात असल्याने माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची दिवाळी आता कारागृहात साजरी होणार आहे. पोलिस आयुक्तांनी अनेक वर्षापासून राजकीय पक्षाच्या आड गुंडगिरी करत असलेल्या या नेत्यांसह माजी नगरसेवकांना धडा शिकवल्याने नागरीकांसह,उद्योजक, व्यावसायीक, आणि या बाहुबली नेत्यांकडून त्रास असलेल्या पिडीत नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरु केलेल्या कारवाईचे नागरीक आता खुले समर्थन करत आहे. पवार, शेवरे, नागरे फरारच आज पर्यंत भाजपाचे पदाधिकारी सुनील बागुल, माजी नगरसेवक मुकेश शहाणे, या दोघांसह अन्य पदाधिकाऱ्यांची चौकशी झाली. तर फलक बाजी प्रकरणात शिंदेसेनेचे माजी नगरसेवक पवन पवार, योगेश शेवरे,पदाधिकारी विक्रम नागरे फरार झाले आहेत.
राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी सर्व नोंदी पूर्णपणे डिजिटल करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत ‘महा ई-ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टिम’ या नव्या प्रणालीअंतर्गत प्रशासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांच्या भौतिक सेवापुस्तिकांचे डिजिटायझेशन करण्यास सुरुवात करत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे नियुक्तीपासून सेवानिवृत्तीपर्यंतचे सर्व सेवाविषयक व्यवहार एकाच प्रणालीद्वारे एका क्लिकवर उपलब्ध होतील. ही प्रक्रिया डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. पहिल्या टप्प्यात मंत्रालयीन प्रशासकीय विभागांतील अधिकारी व कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात विभागांच्या अधिनस्थ क्षेत्रीय कार्यालयांतील राज्य कर्मचारी आहेत. सेवापुस्तिकांचे डिजिटायझेशनही ४ टप्प्यांतून होणार आहे. राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी एकूण ५ लाख ७० हजार असून जिल्हा परिषद स्तरावरील कर्मचारी मिळून १४ लाख ५० हजार आहेत. मुंबई-पुण्यात स्वतंत्र डेटा सर्व्हर हा डेटा मुंबई आणि पुणे या दोन्ही भूकंपप्रवण क्षेत्रात तसेच स्वतंत्र सर्व्हरवर संग्रहित केला जाणार आहे. तसेच या डिजिटल रेकॉर्डमध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार शक्य नसेल, त्यामुळे पारदर्शकता आणि विश्वासार्हता अत्युच्च दर्जाची राहील. पेन्शन प्रकरणांचे निराकरण अधिक वेगाने होणार असून सेवानिवृत्तीविषयक लाभ वेळेवर आणि सुलभ पद्धतीने मिळतील. डिजिटायझेशन अत्यावश्यक राज्य शासनाचा हा निर्णय अत्यंत स्तुत्य असून यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचा संपूर्ण सेवाविवरण रेकॉर्ड एकत्रितपणे व सुलभपणे पाहता आणि वापरता येईल. २००७ मध्ये मंत्रालयाच्या आगीत काही कर्मचाऱ्यांच्या सेवा नोंदवह्या जळून खाक झाल्या होत्या. त्या पुन्हा तयार करताना अडचणी आल्या होत्या. म्हणूनच रेकॉर्डचे डिजिटायझेशन हे अत्यावश्यक व दूरदृष्टीपूर्ण पाऊल आहे. -समीर भाटकर, सरचिटणीस, राजपत्रित महासंघ समन्वय आणि पर्यवेक्षण... प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी सामान्य प्रशासन विभागाने ४ सहसचिव/उपसचिवांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केले. त्यांच्या अधिपत्याखाली विभागनिहाय कक्ष अधिकारी, सहायक अधिकारी व हेल्प डेस्कची नेमणूक केली आहे. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांची माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरक्षितपणे उपलब्ध होईल. प्रणालीत गोपनीयतेचीही काळजी ३ नोव्हेंबर २०२५ पासून प्रणालीवर डेटा एन्ट्रीची प्रक्रिया सुरू होईल. मंत्रालयीन विभागांनी अद्ययावत सेवापुस्तिकांच्या प्रती स्कॅन करून ‘महा ई-ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टिम’वर अपलोड कराव्यात. प्रत्येक कर्मचाऱ्यास त्याच्या ई-सेवापुस्तिकांची पीडीएफ प्रत उपलब्ध करून दिली जाईल. ई-सेवापुस्तिकांतील माहिती तपासल्यानंतर कर्मचाऱ्याच्या स्वाक्षरीने प्रमाणीकरण करण्यात येईल. संवेदनशील डेटाच्या सुरक्षेसाठी सर्व लॉगिन आयडी आणि पासवर्डची गोपनीयता काटेकोरपणे राखण्याचे निर्देश दिले आहेत.
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, विकासनगर, लेबर कॉलनी परिसरात आधुनिक आणि भव्य ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारक व इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी संग्रहालय’ उभारण्यासाठी ९२.९२ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. सोमवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. ही उभारणी सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंमलबजावणीखाली करण्यात येणार आहे. अंदाजपत्रकानुसार एकूण बांधकाम क्षेत्र सुमारे १०,६९६ चौ.मी. इतके असून त्यावर इमारतीसाठी २८.४७ कोटी, वीज व पाणीपुरवठा यांसाठी ३.०३ कोटी, परिसर विकासासाठी ४.३२ कोटी आणि इतर खर्च, कर व सल्लागार मानधन यांसह एकूण ९२.९२ कोटी खर्चाचा अंदाज आहे. यासाठी आवश्यक जागा मिळवण्याची आणि अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांची राहील. विजयस्तंभ, प्रदर्शनगृह, फूड प्लाझा असणार स्मारक संकुलात भव्य प्रदर्शनगृह, विजयस्तंभ, फूड प्लाझा, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एअर कंडिशनिंग, सीसीटीव्ही व्यवस्था, पर्जन्यजल साठवण टाकी आणि अत्याधुनिक इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी विभागाचा समावेश असेल. स्मारकाच्या ठिकाणी पुरेशी वाहने पार्किंग आणि वाहतूक नियंत्रण सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ऐतिहासिक घटना तंत्रज्ञानाच्या मदतीने होतील जिवंत “इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी संग्रहालय” म्हणजे ‘अनुभवात्मक तंत्रज्ञानावर आधारित संग्रहालय’. जेथे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इतिहास, विज्ञान, संस्कृती किंवा निसर्ग जिवंत अनुभवता येतो. “इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी संग्रहालय ” म्हणजे असा संग्रहालयाचा प्रकार, जिथे प्रदर्शन फक्त पाहायचे नसते, तर त्यात ‘अनुभव’ घ्यायचा असतो. म्हणजेच प्रेक्षकांना तिथल्या वस्तू, कथा किंवा ऐतिहासिक घटना आपल्या डोळ्यांसमोर जिवंत झाल्यासारख्या अनुभवता येतात.
पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील ‘जैन बोर्डिंग होस्टेल’ची जागा बेकायदेशीरपणे विकल्याच्या मुद्द्यावरून वातावरण ढवळून निघालेले असताना, आता धर्मादाय आयुक्तांनी पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत जे व्यवहार झाले, ते जैसे थे ठेवण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले असून, एचएनडी जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीविरोधातील याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्यात धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणावर ‘स्टेटस्को’ म्हणजेच परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला आहे. जैन बोर्डिंग होस्टेलची जागा शिवाजीनगर येथे आहे, जिथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि शेतांबर जैन बोर्डिंग सुरू आहे. १९५८ साली हिराचंद नेमचंद दोशी यांनी या वसतिगृहाची उभारणी केली होती. विद्यमान विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छुक होते. समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करून तिची विक्री केल्याचा आरोप आहे. गोखलेसोबत भागीदारी नाही मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गोखले बिल्डरसोबत प्रकल्पात त्यांचा सहभाग २०२३ मध्येच होता. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यामधून बाहेर पडलो. माझा या व्यवहाराशी कोणताही संबंध २०२४ नंतर आला नाही. जैन बोर्डिंग हाऊसची खरेदी आणि विक्री गोखले एलएलपीद्वारेच झाली. त्यापूर्वीच मी बाजूला झालो होतो. माझे नाव त्या व्यवहारात नाही, असे मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यावरून आता राजकारण होण्याची शक्यता आहे. मोहोळ यांनी मांडली बाजू केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जमीन व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते. याबाबत मंत्री मोहोळ यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली. राजू शेट्टी यांनी काही आरोप केले, पण ते सत्य परिस्थितीशी जुळत नाहीत. मी पुणेकरांच्या विश्वासासाठी स्पष्ट करतो की, मी जैन बोर्डिंग हाऊस व्यवहारात सहभागी नव्हतो. मी गोखले बिल्डरचा पार्टनर होतो. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात सर्वकाही माहिती दिली असल्याचेदेखील मोहोळ यांनी स्पष्ट केले आहे.
२९ मनपांत रोबोटिक सीवर-क्लिनिंग मशीन!
मुंबई : प्रतिनिधी सीवर साफ करताना जीव धोक्यात घालणा-या मॅन्युअल स्कॅव्हेंजर्ससाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, महाराष्ट्र सरकारने १०० कोटी रुपयांच्या खर्चाने १०० वाहन आधारित रोबोटिक सीवर-क्लिनिंग मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. या आधुनिक यंत्रांमुळे हाताने विषारी सांडपाणी साफ करण्याची अमानवी प्रथा संपवण्याचा प्रयत्न होणार आहे. या उपक्रमामुळे गटारे किंवा सांडपाणी साचलेल्या टाक्यांमध्ये उतरून काम […] The post २९ मनपांत रोबोटिक सीवर-क्लिनिंग मशीन! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहाराला स्थगिती
तातडीने सुनावणी, धर्मादाय आयुक्तांचा आदेश मुंबई : प्रतिनिधी पुण्यातील शिवाजीनगर भागातील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या (एसएचएनडी) जैन बोर्डिंगच्या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी सोमवारी मुंबईत तातडीची सुनावणी घेऊन ‘स्टेटस को’ म्हणजेच सध्याची परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहाराला स्थगिती मिळाली आहे. पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने […] The post जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहाराला स्थगिती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अतिवृष्टीग्रस्त, पूरग्रस्तांना मिळणार मदत मुंबई : प्रतिनिधी राज्यात मागाली काही दिवसांत अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात अनेक जिल्ह्यांतील शेती, घरे, पायाभूत सुविधा आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर बाधितांना मदतीचा ओघ सुरू असून, राज्य सरकारने आज ६४८ कोटी रुपयांचा आणखी निधी मंजूर केला. राज्य सरकारने या निधीच्या वितरणाला मान्यता दिली. विविध महसूल विभागांनुसार संबंधित जिल्ह्यांना […] The post आणखी ६४८ कोटींचा निधी मंजूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जहाजातील २३ भारतीय खलाशांना वाचविले
एमवी फाल्कन जहाजाला आग साना : वृत्तसंस्था येमेनच्या किना-याजवळ एमवी फाल्कन जहाजाला आग लागल्याची मोठी दुर्घटना घडली. एमवी फाल्कन जहाज आफ्रिकेतील देश जिबूतीकडे जात होते. शनिवारी जहाजात मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आग लागली. या जहाजावर बहुतांश भारतीय खलाशी होते. सुदैवाने एमवी फाल्कनवरील २३ भारतीय खलाशांना वाचवण्यात यश आले. या सर्वांना सुरक्षितपणे जिबूती तटरक्षक दलाच्या […] The post जहाजातील २३ भारतीय खलाशांना वाचविले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .