मसुदा मतदार यादीतून ६.५९ कोटी मतदार वगळले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशात मतदारयादी सुधारणा मसुदा यादी जाहीर केली आहे. यामुळे १२ राज्यांमध्ये एसआयआरचा पहिला टप्पा संपला. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सुरू झालेली मतदार यादी दुरुस्ती मोहीम २ महिने ११ दिवस चालली. एसआयआरपूर्वी या राज्यांमध्ये ५०.९७ कोटी मतदार होते. पडताळणीनंतर ही संख्या ४४.३८ कोटी झाली. मसुदा मतदार यादीतून अंदाजे ६.५९ […] The post मसुदा मतदार यादीतून ६.५९ कोटी मतदार वगळले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षेतखाली कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्सने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी दिली. संसदेच्या कॅलेंडरनुसार वित्त मंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी २०२६ रोजी म्हणजेच रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सादर करतील. अलीकडच्या काळात रविवारी अर्थसंकल्प सादर करण्याची पहिलीच वेळ आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारीला […] The post यंदा रविवारी बजेट मांडणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विलासरावजी यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान
त्यांच्याबद्दल नितांत आदर, चुकीबद्दल मुख्यमंत्र्यांची जाहीर कबुली फडणवीस यांच्याकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न लातूर : प्रतिनिधी लोकनेते विलासराव देशमुख यांचा महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. पक्षाच्या पलिकडे जाऊन ज्यांनी राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले, त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घेता येईल, हे सांगताना मला अजिबात संकोच वाटणार नाही, महाराष्ट्रातील ते एक महत्त्वाचे नेते […] The post विलासरावजी यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. ठाण्यात एका मुलाखतीत बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांची सगळ्यांची इच्छा होती की आपण स्वतंत्र लढावे. कारण शेवटी असे आहे की, प्रत्येक निवडणुकीनंतर एक पिढी तयार होत असते, ही निवडणूक दहा वर्षांनी आली होती. त्यामुळे ही निवडणूक दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व करते. 2017 मध्ये एक पिढी तयार झाली, 2022 ला निवडणूक झाली नाही मात्र 2022 नंतर एक पिढी तयार झाली. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर आपण युती केली तर आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही. त्यांना लढण्याची संधी मिळणार नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा होते की आपण स्वतंत्र लढवावे, असे म्हणत त्यांनी महायुतीमधील अंतर्गत वादावर भाष्य केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना हे दोनही पक्ष बलशाली आहेत. त्यामुळे आमच्या लोकांना असे वाटत होते की आता आपले बळ वाढलेले आहे. आपण त्या ठिकाणी जास्त नगरसेवक निवडूण आणू शकतो. त्यामुळे आपण तिथे स्वतंत्रपणे लढले पाहिजे. पण मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीसाठी आग्रह धरला. आपण नव्या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांची जी शिवसेना आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत, मी आमच्या येथील टीमचे आभार मानतो की मी आणि रवींद्र चव्हाण यांनी सांगितल्यानंतर ते युतीसाठी तयार झाले. आम्ही इथे कमी जागा घेतल्या परंतु आम्ही इथे सोबत लढत आहोत. पण मला हे माहित आहे की, आमचा हा निर्णय बरोबर आहे, मुंबईतला निर्णय देखील बरोबर आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही जर कल्याण डोंबिवलीचा विचार केला त्या ठिकाणीही आमची अडचण झाली होती, त्या ठिकाणी आम्ही मोठा पक्ष झालो आहोत, मजबूत पक्ष झालो आहोत, मात्र तरी देखील आम्हाला त्या ठिकाणी कमी जागा मिळाल्या. आम्हाला तिथे जास्त जागा हव्या होत्या, मात्र मागच्या वेळी शिवसेनेच्या तिथे जास्त जागा आल्या होत्या, इतरही काही नगरसेवक त्यांच्या पक्षात आले होते. त्यामुळे तिथेही आम्हाला कमी जागा घ्यावा लागल्या तशी परिस्थिती निर्माण झाली. पण रवीजींनी सर्वांना समजावून सांगितले, आणि आम्ही पडती बाजू घेतली. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेते एखादी सीट जास्त निवडूण येते, कधीकधी येत नाही. मात्र केवळ पाच, दहा जास्त सीट जास्त निवडून आणायच्या आहेत, म्हणून अट्टाहास न करता जिथे जिथे एमएमआर रिजनमध्ये आम्हाला एकत्र येणे शक्य आहे, तिथे आम्ही एकत्र आलो. कार्यकर्त्यांची नेहमीच इच्छा असते, मात्र सर्व ठिकाणी परिस्थिती पाहून नेत्यांना निर्णय घ्यावा लागतो. आणि काहीही असले तरी एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. बाळासाहेबांची शिवसेना ते चालवत आहेत, आणि ठाणे ही त्यांची ओळख आहे. आणि त्यांची ओळख असलेल्या ठाणे शहरात त्यांना डिस्टर्ब करावे, मग आम्ही मित्र पक्ष कसले? म्हणून आम्ही निर्णय घेतला की शिंदे साहेब म्हणतील तसे आपण करू, आम्ही आमच्या लोकांना समजावले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ठाकरेंच्या ब्रॅंडचा आम्ही बॅंड वाजवू राजकारणातील 'ब्रँड'वरून सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हा एकमेव मोठा ब्रँड होता, त्यांच्याशिवाय सध्या दुसरा कोणताही ब्रँड नाही, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले. तसेच, आपली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुती अत्यंत भक्कम असल्याचे सांगतानाच, आता आमच्यासमोर कोणीही स्वतःला ब्रँड म्हणून उभे केले, तरी आम्ही त्यांचा बँड वाजवू, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे बंधूंना नाव न घेता खोचक इशारा दिला आहे.
बदलापूर हादरले!:खरवई एमआयडीसीतील केमिकल कंपनीत 10 भीषण स्फोट; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
बदलापूरमधील खरवई एमआयडीसी परिसरात आज भीषण स्फोटांची मालिका घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील 'पॅसिफिक केमिकल' कंपनीत एकापाठोपाठ एक सुमारे 8 ते 10 भीषण स्फोट झाले असून, त्यानंतर परिसरात आगीचे प्रचंड लोट पसरले आहेत. ही आग इतकी रौद्र स्वरूपाची आहे की, तिचे लोट 2 ते 3 किलोमीटर अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत आहेत. या भीषण घटनेमुळे एमआयडीसी आणि आसपासच्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. बदलापूरच्या खरवई एमआयडीसीतील पॅसिफिक केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरला असून, अर्ध्या तासाच्या अंतरात सुमारे 8 ते 10 स्फोट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या स्फोटांची तीव्रता इतकी मोठी होती की, आगीचे लोळ 2 ते 3 किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते. घटनेची माहिती मिळताच बदलापूर अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, या आगीत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. पॅसिफिक केमिकल कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या भीषण स्फोटांनी अवघ्या काही वेळातच रौद्र रूप धारण केले असून, या आगीची झळ शेजारील दोन कंपन्यांनाही बसली आहे. स्फोटांच्या तीव्रतेमुळे परिसरात धुराचे काळे लोट पसरले असून दोन्ही कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी तैनात असून, आग अधिक पसरू नये यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, या स्फोटात कंपनीतील केमिकलचे आणि इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दुपारी नियोजित मार्ग बदलून सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात नाराज जगदीश गुप्ता यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे २५ मिनिटे 'वन टू वन' चर्चा झाली. यानंतर गुप्ता यांनी पुन्हा पक्षात परतण्याचे संकेत दिले आहेत. जगदीश गुप्ता यांनी ३० डिसेंबर रोजी शिवसेनेच्या पश्चिम विदर्भ संघटन प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. तिकीट वाटपावरून महायुतीमध्ये न झालेली एकजूट आणि पक्ष नेतृत्वाबद्दलची नाराजी ही त्यांच्या राजीनाम्याची प्रमुख कारणे होती. आजच्या सभेत गुप्ता मंचावर उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिंदे यांच्या आग्रहाखातर त्यांनी अडीच मिनिटांचे भाषणही दिले. या भाषणात त्यांनी आपण सर्व भगवाप्रेमी असून आगामी निवडणुकीत भगव्यालाच विजयी करण्याचे आवाहन केले. गुप्ता हे दोन वेळा आमदार आणि एकदा विधान परिषद सदस्य राहिले आहेत. ते पूर्वी भाजपमध्ये होते आणि युतीच्या सत्ताकाळात जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते. भाजपमध्ये पुन:प्रवेश करूनही ते रमले नाहीत आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. या राजकीय घडामोडीनंतर 'दिव्य मराठी'शी बोलताना गुप्ता यांनी परतीच्या प्रश्नावर होकारार्थी उत्तर दिले. सभेच्या मंचावर त्यांना शिंदे यांच्या शेजारी मिळालेली खुर्ची आणि त्यांच्या भाषणातील 'भगव्याला विजयी करण्याचे' आवाहन यातून त्यांच्या परतीचे स्पष्ट संकेत मिळाले. जगदीश गुप्ता हे सिपना एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांच्या संस्थेचे चिखलदरा आणि अमरावतीत मोठे शैक्षणिक जाळे आहे. सत्तेच्या जवळ राहणे त्यांच्यासाठी नेहमीच श्रेयस्कर ठरते, हे त्यांच्या जवळच्या मित्रांनी त्यांच्या लक्षात आणून दिले होते. शिवाय, राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः त्यांच्या भेटीला येणे ही एक महत्त्वाची बाब मानली जात आहे.
बहुतेक नगरपालिकांच्या पहिल्या बैठका १३ जानेवारीला:चिखलदरा 12, वरुड 14, तर अचलपूरची सभा 15 जानेवारीला
जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. यानंतर उपाध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यापासून २५ दिवसांच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे बहुतेक नगरपालिकांनी १३ जानेवारी रोजी पहिल्या बैठकीचा मुहूर्त साधला आहे. या बैठकांमध्ये चिखलदरा नगरपालिकेत १२ जानेवारीला, वरुड नगरपालिकेत १४ जानेवारीला, तर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ४१ सदस्यीय अचलपूर नगरपालिकेत १५ जानेवारी रोजी पहिली सभा होणार आहे. चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, धारणी, धामणगाव रेल्वे, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर आणि शेंदुरजना घाट येथील सभा १३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. अंजनगाव सुर्जी येथील सभेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. नगरपालिकांची पहिली सभा ही सभागृहातील सदस्य आणि नगराध्यक्ष यांच्या कार्यकाळाची सुरुवात असते, त्यामुळे तिला विशेष महत्त्व आहे. याच सभेत स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्याची संधी असल्याने राजकीयदृष्ट्याही या बैठकींबाबत उत्सुकता आहे. सर्व सभांचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष भूषवणार असून, त्यांच्याच स्वाक्षरीने सभेच्या नोटीस काढण्यात आल्या आहेत. दरम्यान, दर्यापूर नगरपालिकेची पहिली सभा ९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त डॉ. विकास खंडारे हे या नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत. त्यांच्या देखरेखीखाली आणि नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडेल. पहिल्या सभेत उपाध्यक्षांसोबतच स्वीकृत सदस्यांचीही निवड केली जाते. उपाध्यक्षांची निवड बहुमतावर आधारित असल्याने ज्या पक्षाकडे बहुमत आहे, तेथे ही निवड सहज होईल. मात्र, स्वीकृत सदस्यांची निवड संख्याबळानुसार केली जाते. यासाठी अनेक नगरपालिकांमधील अपक्षांना सोबत घेऊन पक्षीय नगरसेवकांनी गट तयार केले आहेत आणि त्यांना जिल्हाधिकाऱ्यांची मान्यताही मिळवली आहे. अशा प्रकारे स्वतःच्या पक्षाचे संख्याबळ वाढवून स्वीकृत सदस्य निवडून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या या गटांबाबत कमालीची गोपनीयता राखली जात आहे.
पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची २९ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रस्त्यावर राहणाऱ्या ७८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखवण्यात आले. सुरुवातीला, ज्येष्ठाने चोरट्यांच्या खात्यात काही रक्कम जमा केली. चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासवले, मात्र प्रत्यक्षात कोणताही परतावा दिला नाही. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतवण्यास सांगितले. या आमिषाला बळी पडून ज्येष्ठाने वेळोवेळी चोरट्यांच्या बँक खात्यात एकूण २९ लाख ३० हजार रुपये जमा केले. रक्कम गुंतवल्यानंतरही परतावा न मिळाल्याने त्यांनी चोरट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक दरम्यान, शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. कात्रज येथील एका ३४ वर्षीय तरुणाची साडेबारा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. ही घटना १८ ऑगस्ट २०२५ ते १९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन घडली. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले पुढील तपास करत आहेत.
पुण्यातील केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आठ वर्षीय मुलावर यशस्वी कॅरोटिड स्टेंटिंग शस्त्रक्रिया केली. डॉ. आनंद आलुरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडली. या शस्त्रक्रियेमुळे मुलाच्या मानेतील रक्तवाहिनीला पडलेले छिद्र आणि त्यामुळे निर्माण झालेला फुगवटा दुरुस्त करण्यात आला. योग्य उपचार न मिळाल्यास ही स्थिती जीवघेणी ठरू शकली असती. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात डिसेंबर महिन्यात घडली. एका बिबट्याने अचानक आठ वर्षांच्या मुलावर हल्ला करून त्याला मानेला पकडून उचलले. मुलाच्या वडिलांनी दुचाकीवरून बिबट्याचा पाठलाग करत सतत हॉर्न वाजवला. त्यामुळे बिबट्याने मुलाला सोडून दिले आणि तो पळून गेला. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलाला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याला प्राथमिक उपचार मिळाले. पुढील उपचारांसाठी त्याला पुण्यातील केईएम रुग्णालयात आणण्यात आले. केईएम रुग्णालयातील इंटरव्हेंशनल न्यूरोलॉजिस्ट डॉ. आनंद आलुरकर यांनी सांगितले की, बिबट्याच्या हल्ल्यामुळे मुलाच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीला फाटल्यामुळे तिथे फुगवटा (स्यूडो ॲन्युरिझम) तयार झाला होता. या स्थितीत धमनीची भिंत कमकुवत होऊन ती फाटण्याचा आणि जीवघेणा रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो. या स्थितीचे निदान डिजिटल सब्ट्रॅक्शन अँजिओग्राफी (DSA) या प्रगत तपासणीद्वारे करण्यात आले. ही तपासणी कॅथलॅबमध्ये मेंदूच्या रक्तवाहिन्यांची अँजिओग्राफी करण्यासाठी वापरली जाते. डॉक्टरांनी कॅरोटिड स्टेंटिंग करण्याचा निर्णय घेतला. ही मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी केली जाणारी बिनटाक्याची शस्त्रक्रिया आहे. ही प्रक्रिया जांघेतील धमनीतून केली जाते. स्टेंटिंगसाठी 'कव्हर्ड स्टेंट ग्राफ्ट' वापरून धमनीतील छिद्र बंद करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसांतच मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॉ. आलुरकर यांनी नमूद केले की, केईएम रुग्णालयात गेल्या दोन दशकांपासून स्ट्रोक आलेल्या प्रौढ रुग्णांमधील ग्रीवा धमनीतील (कॅरोटिड आर्टरी) अडथळा दूर करण्यासाठी कॅरोटिड स्टेंटिंग प्रक्रिया वापरली जाते. मात्र, या रुग्णाचे लहान वय, मानेतील दुखापत आणि त्याला कारणीभूत परिस्थिती यामुळे वैद्यकीयदृष्ट्या हे एक दुर्मिळ आणि महत्त्वाचे यश आहे.
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक
कठुआ : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली आहे. ही चकमक कठुआ जिल्ह्यातील बिलावर तालुक्यातील कमाद नाला (कहोग गाव परिसर) येथे सुरू असून जैश-ए-मोहम्मदचे किमान तीन दहशतवादी या परिसरात लपले असून जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात दहशतवादी हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या एसओजी पथकाने शोध व […] The post जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची हत्या
अकोला : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर अकोट तालुक्यातील मोहाळ येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर बुधवार दि. ७ जानेवारी रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या हत्या प्रकरणात काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप पटेल कुटुंबाने केला असून त्यांच्या अटकेसाठी समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. […] The post काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांची हत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विरोधी पक्षानेतेपद दूरच, प्रतोदांचा मंत्रीदर्जाही गेला
मुंबई : प्रतिनिधी विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी विरोधक संघर्ष करत असताना आता विरोधी पक्षांच्या प्रतोदांना मिळणारा मंत्रीपदाचा दर्जा व त्या अनुषंगाने मिळणा-या इतर सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे. सत्ताधारी पक्षांच्या व्यतिरिक्त ज्या पक्षांच्या विधानसभा आणि विधानपरिषदेतील एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के सदस्य असतील त्यांनाच मंत्रीपदाचा दर्जा आणि विविध सुविधा मिळतील, अशी अट राज्याच्या संसदीय […] The post विरोधी पक्षानेतेपद दूरच, प्रतोदांचा मंत्रीदर्जाही गेला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एमआयएम, काँग्रेससोबतच्या युतीमुळे भाजपची नाचक्की, अभद्र युतीमुळे मुख्यमंत्री फडणवीसही संतापले
मुंबई : प्रतिनिधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपाने काँग्रेसबरोबर युती केली. तर अकोला जिल्ह्यातील अकोट मध्ये थेट एमआयएम बरोबर हातमिळवणी केल्याने भाजपावर चौफेर टीका होत आहे. या अनैसर्गिक युतीमुळे पक्षाच्या वैचारिक भूमिकेची लक्तरें निघाल्याने अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर झालेल्या या युतीबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. […] The post एमआयएम, काँग्रेससोबतच्या युतीमुळे भाजपची नाचक्की, अभद्र युतीमुळे मुख्यमंत्री फडणवीसही संतापले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्य निवडणूक आयोगाचा भगवा शब्दाला आक्षेप
मुंबई : प्रतिनिधी भाजपाने मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी तयार केलेले प्रचारगीत निवडणूक आयोगाने नाकारले आहे. या गीतातील भगवा या शब्दाला निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे.यामुळे भाजपाचा तिळपापड झाला असून, धर्मनिरपेक्ष निवडणूक आयोग रंगनिरपेक्षही असायला हवा, निवडणूक आयोगाला भगव्याच वावडे का? असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी एक […] The post राज्य निवडणूक आयोगाचा भगवा शब्दाला आक्षेप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी फोफावली
मुंबई/अमरावती : प्रतिनिधी राज्यात कोयता गँग, ड्रग्ज माफिया, रेती माफिया, लँड माफिया, आका यांचे पेव फुटले आहे. गावागावात गुन्हेगारीचे लोण पसरले असून अकोल्यातील काँग्रेस नेते हिदायत पटेल यांची झालेली हत्या हे राज्यातील कायदा सुव्यवस्था किती रसातळाला गेली आहे, याचे उदाहरण आहे. राज्याला पूर्ण वेळ गृहमंत्री नसल्याचा हा परिणाम आहे, असा आरोप करून या हल्ल्यातील सर्व […] The post राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने गुन्हेगारी फोफावली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या कर्मचा-यांवर कडक कारवाई करा
मुंबई : प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचा-यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या अधिकारी- कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान व मतमोजणीची तयारी आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात सर्व २९ […] The post प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या कर्मचा-यांवर कडक कारवाई करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
म्हाळुंगे गावाचा विकास आराखडा लवकरच मंजूर होणार:मंत्री चंद्रकांत पाटील यांचा म्हाळुंगेकरांना शब्द
पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक ९ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी म्हाळुंगे गावात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हाळुंगे गावाचा विकास आराखडा लवकरच सर्वानुमते मंजूर होईल, असा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या आराखड्यासाठी आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले. या पदयात्रेला म्हाळुंगेवासियांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भैरवनाथांचे आशीर्वाद घेऊन या पदयात्रेला सुरुवात झाली. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रभाग क्रमांक ९ चे उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, मयूरी कोकाटे, भाजपचे निवडणूक प्रमुख प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, शरद भोते, राकेश पाडाळे, विनायक चिवे, शांताराम पाडाळे यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चौफेर विकास आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गतिमान कार्यपद्धती यामुळे भाजपने अनेक निवडणुकांमध्ये यश मिळवले आहे. २०१७ ते २०२१ या काळात पुणे महापालिका क्षेत्रात मेट्रो, नदीसुधार आणि समान पाणीपुरवठा यांसारखे अनेक प्रकल्प पूर्ण झाल्याने शहराचे चित्र बदलले आहे. म्हाळुंगे गावाच्या विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विशेष आग्रही आहेत. गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सातत्याने अधिकाऱ्यांशी संवाद साधत असून, नागरिकांच्या मतांचाही यात समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत, असे पाटील यांनी नमूद केले. त्यामुळे हा विकास आराखडा सर्वानुमते मंजूर होऊन गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पुणे महापालिका निवडणुकीत एकूण ४२ जणांना उमेदवारी नाकारावी लागली, पण त्यांनी कोणतीही तक्रार न करता पक्षाच्या उमेदवारांसाठी काम केले. प्रल्हाद सायकर यांच्या पत्नी स्वप्नाली सायकर या विद्यमान नगरसेविका असूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही, तरीही त्या पक्षाचा आदेश मान्य करून काम करत आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती, पण नाईलाजाने त्यांना नाकारावे लागले. हे सर्व कार्यकर्ते आज भाजप उमेदवारांच्या विजयासाठी मेहनत घेत आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.
राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी पक्षातील हे दोन मित्रपक्षच एकमेकांवर जोरदार टीका करत असल्याने, निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडी आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्याचे चित्र पाहता ही निवडणूक विरोधकांविरुद्ध नसून सत्ताधाऱ्यांमध्येच अंतर्गत सुरू असल्याचे भासत आहे. या वाढत्या राजकीय संघर्षावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी भाष्य करत पडद्यामागचे राजकारण उघड केले आहे. अजित पवार आणि भाजप नेत्यांमधील ही टीका-टीपण्णी म्हणजे केवळ दाखवण्यापुरती आहे की त्यामागे काही वेगळी रणनीती आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच, अजित पवारांकडून वारंवार 'पवार कुटुंब' पुन्हा एकत्र येण्याबाबत जी विधाने केली जात आहेत, त्यावरूनही पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांना टीकेचा स्पेसच मिळू नये असा प्रयत्न सत्तेत असूनदेखील दोन पक्षातील नेते एकमेकांविरोधात टीका करतात, अगदी जोरात बोलत आहेत. भाजप नेते आणि अजित पवार यांच्यामध्ये होत असलेली वक्तव्य पाहता विरोधकांना स्पेसच मिळू नये, यासाठी हा प्रयत्न असावा, असे जयंत पाटील म्हणाले. परंतु, अजित पवार या षड्यंत्रयात सहभागी होणार नाहीत असे मला वाटते, असेही पाटील म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू असून, अजित पवार यांनीही आपल्या भाषणांतून तसे संकेत दिले आहेत. मात्र, या संदर्भात राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये अद्याप संभ्रम असल्याचे दिसून येते. यावर भाष्य करताना जयंत पाटील यांनी सावध भूमिका घेतली असून, राज्यस्तरावर अशा कोणत्याही हालचाली किंवा चर्चा सुरू असल्याची मला कल्पना नाही, असे म्हणत या विषयावर अधिक बोलणे टाळले. विलासरावांच्या बाबतीत केलेले विधान लातूरकर कधीही मान्य करणार नाहीत लातूरमधील प्रचारसभेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, असे विधान केल्यावर जयंत पाटील यांनी त्यावर कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. विलासरावांचे नाव विसरायला लावण्याचे धाडस जर भाजपचे नेते जाहीरपणे करत असतील, तर त्यांच्यात खासगीत कोणत्या दर्जाची चर्चा होत असेल याचा अंदाज येतो, अशी टीका पाटील यांनी केली. तसेच, लोकनेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेले असे वादग्रस्त वक्तव्य लातूरची जनता कधीही मान्य करणार नाही, असे ठाम मतही त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र पोलिस दलातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले 25 वर्षीय साहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज मराठे यांनी पुण्यातील एका लॉजमध्ये विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. तरुण आणि कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सूरज मराठे हे गेल्या काही काळापासून गुडघ्यांच्या तीव्र व्याधीने त्रस्त होते. याच शारीरिक त्रासावर उपचार घेण्यासाठी त्यांनी रजा घेतली होती आणि ते पुण्यात आले होते. पुण्यातील डेक्कन परिसरातील एका लॉजवर वास्तव्यास असताना, उपचारांनंतर परतल्यावर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. गंभीर आजार आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सूरज मराठे यांनी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी टोकाचे पाऊल उचलल्याने सांगली आणि पुणे पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. मूळचे पुणे जिल्ह्यातील देहू येथील रहिवासी असलेल्या सूरज यांनी अत्यंत कमी वयात अधिकारी पदापर्यंत झेप घेतली होती. मात्र, गेल्या काही काळापासून सोसाव्या लागणाऱ्या शारीरिक व्याधीमुळे एका कर्तबगार अधिकाऱ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, जिथे त्यांना एक 'सुसाईड नोट' सापडली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपल्या आजारपणाचा आणि त्यातून निर्माण झालेल्या त्रासाचा उल्लेख केला असून, आजारपणाला कंटाळूनच हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू आहे. एका जिद्दी अधिकाऱ्याने अशा प्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने पोलिस वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
इंटास फार्मास्युटिकल्स लिमिटेडने इंटिग्रीमेडिकलसोबत विशेष भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारी अंतर्गत, आयव्हीएफ (IVF) आणि स्त्रीरोग उपचारांसाठी भारतातील पहिली सुई-मुक्त इंजेक्शन प्रणाली (N-FIS) सादर करण्यात आली आहे. ही प्रणाली देशभरात उपलब्ध होणार असून, महिलांच्या आरोग्यसेवेत हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. इंटिग्रीमेडिकलचे एमडी सर्वेश मुथा आणि इंटास फार्मास्युटिकल्सचे उपाध्यक्ष दुर्गा सत्यपथी यांनी ही माहिती दिली आहे. सत्यपथी यांच्या मते, या सहकार्यामुळे इंटास ही आयव्हीएफ आणि स्त्रीरोग उपचारांमध्ये सुई-मुक्त इंजेक्शन तंत्रज्ञान प्रदान करणारी भारतातील पहिली आणि एकमेव कंपनी बनली आहे. हे तंत्रज्ञान उपचारांदरम्यान होणाऱ्या वेदना, अस्वस्थता आणि इंजेक्शनची भीती कमी करून रुग्णांना अधिक आरामदायक आणि विश्वासार्ह अनुभव देईल. यामुळे रुग्ण-केंद्रित नाविन्यपूर्ण औषध वितरण प्रणालीसाठी एक नवीन मापदंड स्थापित झाला आहे. इंटिग्रीमेडिकलच्या मालकीच्या औषध-वितरण तंत्रज्ञानाचा वापर करून, एन-एफआयएस प्रणाली उच्च दाबाच्या जेट स्ट्रीमद्वारे त्वचेतील सूक्ष्म छिद्रांमधून औषध पोहोचवते. सुयांचा वापर टाळल्याने ऊतींवरील आघात कमी होतो, औषध साचण्याची शक्यता टळते आणि क्रॉस-ककंटॅमिनेशनचा धोकाही कमी होतो. मुथा यांनी सांगितले की, भारत हा जागतिक स्तरावर वेगाने वाढणाऱ्या आयव्हीएफ बाजारांपैकी एक आहे. सध्या दरवर्षी सुमारे 3 ते 3.5 लाख आयव्हीएफ सायकल्स केल्या जातात, जो आकडा 2027 पर्यंत 5 ते 6 लाखांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर, सुई-मुक्त इंजेक्शन तंत्रज्ञानामुळे दरवर्षी हजारो महिलांसाठी उपचारांचा अनुभव अधिक सुलभ आणि कमी तणावपूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, इंटास आणि इंटिग्रीमेडिकलचे हे सहकार्य महिलांच्या आरोग्यसेवेत मानवी दृष्टिकोनातून नवीन कल्पना आणणारे ठरेल.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरी समस्यांवर बोट ठेवण्यासाठी 'एक अलार्म, पाच कामे' हे विशेष कॅम्पेन सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत एका रॅप सॉंगच्या माध्यमातून शहरातील खड्डे, कचरा, वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडी आणि पाणीटंचाई या पाच प्रमुख मुद्द्यांवरून प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आली आहे. महापालिकेत मोजक्याच कंत्राटदारांना टेंडर दिले जात असल्यामुळे कामाचा दर्जा खालावला असून, त्याचा थेट फटका सामान्य नागरिकांना सोसावा लागत असल्याचा आरोपही या मोहिमेद्वारे करण्यात आला आहे. या संदर्भात स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले की, हे कॅम्पेन केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारापुरते मर्यादित आहे. या रॅप सॉंगचा केंद्र किंवा राज्य सरकारच्या कामकाजाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर रखडलेली विकासकामे आणि प्रशासकीय त्रुटींकडे लक्ष वेधणे हाच यामागचा मुख्य उद्देश असून, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर या माध्यमातून 'अलार्म' वाजवून टीका करण्यात आली आहे. तुमचे सगळे प्रश्न सोडवून दाखवू अजित पवार म्हणाले, पुणे आणि पिंपरीमधील काम समोर आणण्यासाठी, दोन्ही महापालिका अपयशी ठरल्या आहेत. लोकांचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे गाण लाँच केले आहे. नागरिकांना आवाहन आहे की माझा जो प्रशासनातील अनुभव आहे, मी काम करतो. तुमचे सगळे प्रश्न सोडवून दाखवू. एक अलार्म लावू आणि लक्ष वेधून घेऊ. लोकांच्या अडचणी सुटल्या पाहिजेत. तिथल्या लोकांना अलार्म कळला पाहिजे. समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. महत्त्वाच्या पाच गोष्टी दूर केल्याशिवाय नागरिकांना जीवन जगता येणार नाही, असे पवार म्हणाले. चुकीचे पाणीवाटप, कचरा व्यवस्थापन नीट नाही पुणे आणि पिंपरी मध्ये नागरी समस्या खूप आहेत. अनेक प्रभागात रोड शो केला आहे. त्या त्या प्रभागातली उमेदवार सोबत होते. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आज त्याचे रुपांतर मतदानामध्ये झाले पाहिजे, असे आवाहन अजित पवारांनी केले आहे. पुणे आणि पिंपरीमध्ये नागरी समस्या आ वासून उभ्या आहेत. कचरा, आरोग्य सेवा, वाहतुकीची कोंडी, रस्त्यावर खड्डेच खड्डे आहे, पाण्याची अडचण आहे यावर काम करायचे आहे. टँकर माफियाची गँग आहे. कचरा वेळेवर उचलला जात नाही. रोज अनुभव आपल्या नागरिकांना येत आहे. कागदावर अनेक योजना आहेत. पुणे शहरातले नागरिक भरडले जात आहेत. चुकीचे पाणीवाटप केले जात आहे, कचरा व्यवस्थापन नीट नाही, असे पवार म्हणाले. महापालिकेची बिघडलेली अवस्था दुरुस्त करू पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सगळ्या गोष्टी कोलमडल्या आहेत. 12350 लोक पुणे स्वच्छ करण्यासाठी काम करतात. मात्र रस्त्यावर कचरा दिसत आहे. पुण्यात हवेची गुणवत्ता ढासळत आहे. प्रदूषित श्वास आपले लोक घेत आहेत. कुत्र्यांची नसंबंदी केली मात्र 20 हजार कुत्री लोकांना चावली आहेत. या सगळ्या समस्येतून पुणेकरांना बाहेर काढण्यासाठी आणि पुणे महापालिकेची बिघडलेली अवस्था दुरुस्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सहकारी पक्ष एक अलार्म 5 काम या संकल्पनेवर हा उपक्रम सूर करत आहोत, अशी माहिती पवारांनी दिली आहे. पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिले जातात काम करुन पाठवण्याची आणि थांबलेली कामे सुरू करण्याची ताकद आमच्यात आहेत. एक अलार्म पाच कामे हा जाहीरनामा जाहीर करणार आहोत. 10 तारखेला जाहीरनामा तुमच्यासमोर आणू असे अजित पवार म्हणाले. नुसत्या उणिवा दाखवणार नाही तर आम्ही काय करू हे देखील सांगू. पुणेकरांना विश्वास देणार आहे. काही कामे करू हे देखील सांगू. पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिले जाते त्याचा फटका नागरिकांना बसतो असे अजित पवार म्हणाले.
ॲड. असीम सरोदे यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने पैसे, दहशत आणि सत्तेचा गैरवापर करून मोठ्या संख्येने बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याचे षड्यंत्र रचल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी काँग्रेस शहर उपाध्यक्ष अजित दरेकर, सरचिटणीस प्राची दुधाने आणि तक्रारदार समीर गांधी उपस्थित होते. या बिनविरोध निवडणुकीच्या विरोधात समीर गांधी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. ॲड. सरोदे यांनी सांगितले की, संसदीय लोकशाहीच्या ७० वर्षांच्या इतिहासात केवळ ३० ते ३२ खासदार बिनविरोध निवडून आले आहेत. मात्र, राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध निवडून येणे संशयास्पद असून लोकशाही मूल्यांना धक्का देणारे आहे. ते म्हणाले की, अपवादात्मक परिस्थितीतच बिनविरोध निवड होऊ शकते, जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात अन्य कोणताही उमेदवार उभा राहत नाही. परंतु, सध्याच्या प्रकरणात ही परिस्थिती नाही. पैशाचा गैरवापर, दहशतीचा दबाव आणि पदाचा दुरुपयोग करून उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. अनेक घडामोडी रात्रीच्या अंधारात घडल्याने त्याचे थेट पुरावे उपलब्ध नसले तरी, परिस्थिती स्वतःच बोलकी आहे, असे सरोदे यांनी नमूद केले. बिनविरोध निवड झाली म्हणजे संबंधित उमेदवार प्रत्यक्ष निवडून आलेला नसतो, ही बाब लक्षात घेतली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मतदानाचा हक्क कायदेशीर असला तरी तो मूलभूत अधिकार नसल्याने अडचणी निर्माण होतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. मताधिकाराला मूलभूत हक्काचा दर्जा मिळाल्यास त्याच्या उल्लंघनाला आळा बसेल, असे त्यांचे मत आहे. नोटा (NOTA) हा लोकशाहीतील महत्त्वाचा पर्याय असून, त्यातून जनतेची नाराजी व्यक्त होते; मात्र बिनविरोध निवडीमुळे हा अधिकार हिरावून घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्यास मान्यता दिली आहे. ॲड. सरोदे यांनी मागणी केली की, चौकशी पूर्ण होईपर्यंत ७० बिनविरोध उमेदवारांना विजयी घोषित करू नये. न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करून बिनविरोध निवड रद्द करावी आणि प्रत्यक्ष मतदान घेण्यात यावे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. लोकशाही प्रक्रिया जिवंत राहण्यासाठी मतदान अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
नववर्षात नासाचे अंतराळवीर दोन वेळा करणार स्पेस वॉक
वॉशिंग्टन : नववर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’चे माईक फिंक आणि जेना कार्डमन हे दोन अंतराळवीर ८ व १५ जानेवारी रोजी स्पेस वॉक करणार आहेत. अंतराळ स्थानकासाठी दोन नवे सोलर पॉवर(सौरऊर्जा) चॅनल तयार करण्याची जबाबदारी या दोघांवर सोपविण्यात आली असून या स्थानकाला अखंड ऊर्जापुरवठा उपलब्ध करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. यातील पहिला स्पेस […] The post नववर्षात नासाचे अंतराळवीर दोन वेळा करणार स्पेस वॉक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रस्ते भटक्या कुत्र्यापासून मुक्त करा
नवी दिल्ली : भटकी कुत्री केवळ चावतात असे नाही, तर ते गंभीर अपघातांनाही कारणीभूत ठरतात. रस्ते भटक्या कुत्र्यापासून मुक्त आणि मोकळे ठेवावे लागतील अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी आज (दि. ७ जानेवारी) सर्वोच्च न्यायालयाने केली. यावेळी न्यायालयाने पीडित, प्राणीप्रेमी आणि विरोधक अशा सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून घेणार असल्याचे स्पष्ट केले. आज याचिकाकर्ते, प्राणी कल्याण संस्था, आणि हस्तक्षेपकर्त्यांच्या […] The post रस्ते भटक्या कुत्र्यापासून मुक्त करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाकला त्यांचेच नागरिक मारण्याचा हक्क
इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराचे मीडिया विंगचे अधिकारी डीजी आयएसपीआर नेहमी त्यांच्या विदुषकी वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. कधी ते महिला रिपोर्टरला डोळा मारतात तर कधी असा दावा करतात की सर्वजण डोक्याला हात लावलात. पाकिस्तानचे इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशनचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी लोकांना तुम्हाला मजा आली नाही तर […] The post पाकला त्यांचेच नागरिक मारण्याचा हक्क appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आरोपींच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस
नवी दिल्ली : देशभरात चर्चेचा विषय ठरलेला पुणे पोर्श अपघात प्रकरणातील आरोपी, व्यावसायिक आशिष मित्तल आणि आदित्य सूद या दोघांच्या जामीन अर्जांवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवार दि. ७ जानेवारी रोजी नोटीस बजावली. मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन मुलाने चालवलेल्या पोर्श कारने दोघांना चिरडल्याच्या या घटनेत, पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप या दोघांवर आहे. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल […] The post आरोपींच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात
मॉस्को : जगावर महायुद्धाचे सावट गडद होताना दिसत आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर आता रशियाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. रशियाने आपली अत्याधुनिक क्षेपणास्त्रे असलेली युद्धनौका आणि अण्वस्त्रवाहू पाणबुड्या थेट व्हेनेझुएलाच्या समुद्रात तैनात केल्या आहेत. यामुळे अमेरिकेच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर रशिया आणि अमेरिका यांच्यात थेट लष्करी संघर्षाची ठिणगी पडण्याची भीती निर्माण झाली […] The post व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नौदलात तब्बल १९ युद्धनौका सामील करणार
चेन्नई : भारतीय नौदलाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या वार्षिक वाढीसाठी भारतीय नौदल सज्ज आहे. २०२६ पर्यंत, नौदल १९ युद्धनौका कमिशन करणार आहे, बी एका वर्षातील सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या वर्षी, २०२५ मध्ये, नौदलाने १४ जहाजे कमिशन केली. २०२६ हे नौदलाचे सर्वोच्च विस्तार वर्ष असेल. या काळात निलगिरी-क्लास मल्टी-रोल स्टेल्थ फ्रिगेट्सची संख्या देखील वाढेल. या वर्गाचे […] The post नौदलात तब्बल १९ युद्धनौका सामील करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मशिदीजवळ रात्रभर बुलडोझरची कारवाई
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरातील फैज-ए-इलाही मशिदीजवळ काल रात्री बुलडोझरने कारवाई करण्यात आली. मशिदीभोवती बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. घटनास्थळी ३० हून अधिक बुलडोझर पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली. बुलडोझर कारवाईदरम्यान स्थानिकांनी निषेध केला. निषेधकर्त्यांनी दगडफेक केली आणि पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याच्या बातम्या आल्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या […] The post मशिदीजवळ रात्रभर बुलडोझरची कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विमानात ‘पॉवर बँक’ने मोबाइल चार्ज करण्यास बंदी
मुंबई : काही महिन्यांपूर्वी विमान प्रवासादरम्यान पॉवर बँकद्वारे मोबाइल चार्जिंग करताना आग लागल्याची घटना घडल्या होत्या. याची दखल आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रवासादरम्यान पॉवर बँकद्वारे फोन चार्जिंगवर बंदी घातल्याचे आदेश जारी केले आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये डीजीसीएने एक अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार, विमानाच्या आत नेऊ शकणा-या हँडबॅगमध्ये पॉवर बँक नेण्यास अनुमती दिली […] The post विमानात ‘पॉवर बँक’ने मोबाइल चार्ज करण्यास बंदी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका असून आधी त्यांनी स्वतःच्या मुलाचा पराक्रम पाहावा आणि नंतर आमच्यावर टीका करावी, असा टोला भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी लगावला आहे. तसेच अजित पवार हे स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपसोबत आले आहेत, त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशी खरमरीत टीका लांडगे यांनी केली आहे. अजित पवारांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर लांडगे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर दिले आहे. आमदार महेश लांडगे म्हणाले, आधी स्वतःच्या लोकांचे पराक्रम पाहा आणि ते स्वतः आका आहेत, हे त्यांनी जाहीर करावे. ते मला पिंपरी चिंचवडचा आका म्हणत आहेत, मुळात अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आले पुढे बोलताना महेश लांडगे म्हणाले, सध्या अजित पवारांचा अहंकार बोलत आहे, ते नैराश्यात आहेत. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आलेल्या अजित पवारांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू नयेत. तसेच आमच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करायचे असतील तर मी, पालिका प्रशासन आणि अजितदादांनी सामोरासमोर बसावे, मग सर्व उत्तर मिळतील, असे आवाहन लांडगे यांनी केले आहे. जे स्वतःच्या काकाचे झाले नाहीत ते पिंपरी चिंचवडचे होतील का? आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला तसेच आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी चिंचवडचे होतील का? असा सवाल उपस्थित करत लांडगे यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच वांद्रे (बांद्रा) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर प्रचारादरम्यान अज्ञाताने जीवघेणा हल्ला केला आहे. हल्लेखोराने कुरेशी यांच्या पोटात थेट चाकू भोसकल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हाजी सालीन कुरेशी हे बांद्रा येथील ज्ञानेश्वर नगर परिसरात आपल्या समर्थकांसह घरोघरी जाऊन प्रचार करत होते. यावेळी मतदारांच्या भेटीगाठी घेत असतानाच गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपीने अत्यंत क्रूरपणे कुरेशी यांच्या पोटात धारदार चाकू खुपसला आणि तिथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुरेशी यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने जवळच्या महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक, पोलिस तपास सुरू सध्या हाजी सालीन कुरेशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला की यामागे काही वैयक्तिक कारण आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. 'मुंबईत महायुतीचाच विजय होईल' असा चंग बांधून प्रचारात उतरलेल्या शिंदे गटाच्या उमेदवारावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. कोण आहे हाजी सलीम कुरेशी? हाजी सलीम कुरेशी हे शिवसेना शिंदे गटाचे नेते असून, पूर्वी ते एमआयएम या पक्षात कार्यरत होते. मुंबई महापालिका निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनीही त्यांना उमेदवारी दिली असून, मुंबईतील प्रभाग क्रमांक ९२ मधून ते निवडणूक लढवत आहेत. राज्यातील इतरही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना महानगरपालिका निवडणुकीच्या या कालखंडात केवळ मुंबईच नाही, तर राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर माहोळ गावात असाच भीषण हल्ला झाला होता. राजकीय वादातून झालेल्या या हल्ल्यात पटेल यांच्या पोटावर आणि मानेवर खोलवर जखमा करण्यात आल्या होत्या. त्यांचा आज उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याशिवाय सांगलीमध्ये एका उमेदवाराच्या आईने दडपशाहीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटनाही समोर आली आहे, ज्यामुळे स्थानिक राजकारणातील कटुता चव्हाट्यावर आली आहे. सोलापुरात मनसे पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. बिनविरोध निवडीसाठी या उमेदवाराची हत्या करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला होता. या घटनांवरून नव्या जमान्याच्या राजकारणाला 'रक्ताचा डाग' लागल्याचे म्हणावे लागेल.
मराठी माणसाच्या भल्यासाठी मुंबईत ठाकरेच विजयी व्हावेत, आमची त्यांना सहानुभूती असल्याचे विधान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या हक्काचे किती प्रकल्प गुजरातला पाठवले याची माहिती घ्यावी, म्हणजे मुख्यमंत्र्यांचे मराठीवरील प्रेम दिसून येईल, असा टोलाही शेट्टी यांनी लगावला आहे. धाराशिव येथे शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात झालेल्या आंदोलनानंतर राजू शेट्टी माध्यमांशी बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांचे प्रचार सुरू झाले आहेत. तसेच राजू शेट्टी यांनी महाराष्ट्रातील इतर ठिकाणी कॉंग्रेसला पाठिंबा दिला असला तरी मुंबईत मात्र त्यांनी ठाकरेंना पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत आहे. आमचे वैचारिक मतभेद असले तरीही मुंबईत मराठी माणसाच्या भल्यासाठी ठाकरे बंधूच विजयी व्हावेत, असे राजू शेट्टी म्हणाले. मुंबईवर, मराठी माणसावर प्रेम आहे, त्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करत आहोत असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यावर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले, महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातला किती पाठवले त्याची माहिती घ्या म्हणजे त्यावरून मराठीवर मुख्यमंत्र्यांचे प्रेम दिसून येईल, असा टोला शेट्टी यांनी लगावला आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवला असून त्यांनी आज धाराशिव-सोलापूर सीमावर्ती भागात शेतकऱ्यांचे अधिवेशन घेतले. यात त्यांनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली आहे. शक्तिपीठ विरोधात हिंगोलीत शेतकऱ्यांचा मोर्चा दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोलीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हा महामार्ग हिंगोलीच्या वसमत यमी कळमनुरी तालुक्यातून जात असल्याने यासाठी शेतकऱ्यांची शेकडो एकर सुपीक जमीन हस्तांतरित केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल, असा दावा करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
सत्तेसाठी एमआयएमशी हातमिळवणी करणे अकोटमधील भाजप नेत्यांना चांगलेच महागात पडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती 'तत्वशून्य' असल्याचे सांगत कडक कारवाईचे संकेत दिल्यानंतर, अवघ्या काही तासांतच अकोटमधील भाजप-एमआयएम युती तुटली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप नेतृत्व आता स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावणार आहे. अकोटमध्ये एमआयएमला सोबत घेऊन 'अकोट विकास मंच' स्थापन करण्याच्या निर्णयात आघाडीवर असलेले भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे आता पक्षाच्या रडारवर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आमदार प्रकाश भारसाकळे, भाजपचे अकोट शहराध्यक्ष, निवडणूक प्रभारी, गटनेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून 'कारण दाखवा' नोटीस पाठवली जाणार आहे. राज्यातील आणि केंद्रातील भाजप नेतृत्वाने या स्थानिक प्रयोगाबद्दल अत्यंत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, दोषींवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. MIM आता विरोधी बाकावर भाजपच्या दबावानंतर आणि राज्यातील बदललेल्या समीकरणानंतर एमआयएमच्या ५ नगरसेवकांनी आपला पाठिंबा काढून घेतला आहे. एमआयएमचे नगरसेवक आपला पाठिंबा काढण्याचे पत्र देण्यासाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता एमआयएम अकोट नगरपालिकेत सत्ताधारी बाकावरून थेट विरोधी बाकावर बसणार आहे. कसे होते अकोटमधील सत्तेचे 'अजब' गणित? अकोट नगरपालिकेत ३५ पैकी ३३ जागांचे निकाल जाहीर झाले होते. यात भाजपला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या होत्या, मात्र बहुमतासाठी त्यांना ७ जागांची गरज होती. यासाठी भाजपने 'अकोट विकास मंच' स्थापन केला, ज्यात चक्क एमआयएम (५ जागा) आणि इतर पक्षांना (शिवसेना, राष्ट्रवादी, प्रहार) एकत्र घेण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांकडे या विचित्र युतीची नोंदणीही झाली होती, ज्यामुळे भाजपवर मोठी टीका झाली होती. अंबरनाथ मध्येही काँग्रेससोबत हातमिळवणी अकोटमधील घडामोडींप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेतही भाजपने वेगळेच राजकीय समीकरण तयार केले होते. येथे भाजपने थेट काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्तेचा मार्ग निवडला. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणाऱ्या भाजपकडून काँग्रेससोबत युती होत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते. दरम्यान, या युतीनंतर काँग्रेसकडून भाजपसोबत युती करणाऱ्या पक्षाच्या सर्व नगरसेवकांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर हे सर्व नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्थानिक नेत्यांवर देवेंद्र फडणवीस संतापले दरम्यान, अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत तर अंबरनाथमध्ये काँग्रेसशी युती झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज झाले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली. स्थानिक पातळीवर काँग्रेस किंवा एमआयएमसोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही. ही युती तत्वशून्य आहे आणि ती होऊच शकत नाही. अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे आणि ती तोडावीच लागेल. स्थानिक नेत्यांनी जरी हा निर्णय घेतला असला, तरी तो पूर्णपणे चुकीचा आहे. ज्याने कोणी ही युती घडवून आणली असेल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यासंदर्भात आम्ही आदेश दिले आहेत, असे फडणवीस म्हणालेत. भाजपकडून 'डॅमेज कंट्रोल' करण्याचा प्रयत्न अकोट आणि अंबरनाथमधील भाजपच्या भूमिकेमुळे 'काँग्रेसमुक्त भारत' आणि 'हिंदुत्व' या मुद्द्यांवरून विरोधकांनी भाजपला घेरले होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ हस्तक्षेप करत ही युती तोडण्याचे आदेश दिल्याने भाजपने आता 'डॅमेज कंट्रोल' करण्याचा प्रयत्न केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिनविरोध नगरसेवक निवडीबाबत पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. बिनविरोध निवडीप्रकरणी न्यायालयात जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. काही जणांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून, आयोग माहिती घेत आहे. त्यांच्या चौकशीतून वस्तुस्थिती समोर येईल, असे पवार म्हणाले. निवडणुका जवळ आल्या की आपल्यावर वेगवेगळे आरोप करून अडकवण्याचा प्रयत्न होतो, असेही पवार यांनी नमूद केले. ज्यांना आरोप करायचे आहेत, त्यांनी न्यायालयात जावे. कोणत्या आरोपावर उत्तर द्यायचे, हा आपला निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि प्रदीप देशमुख उपस्थित होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक अलार्म, पाच काम हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. यामध्ये नळाद्वारे दररोज पाणीपुरवठा, वाहतूक कोंडीमुक्त शहर, खड्डेमुक्त रस्ते, नियमित स्वच्छता, हायटेक आरोग्य सुविधा आणि प्रदूषणमुक्ती या मुद्द्यांचा समावेश आहे. निवडणुकीत घड्याळासोबत तुतारीचा आवाजही ऐकू येईल, असा टोला त्यांनी लगावला. दोन्ही शहरांतील गंभीर समस्या नागरिकांच्या लक्षात आणून देण्यासाठी पक्षाने एक विशेष गाणेही प्रसिद्ध केले आहे. पवार यांनी दोन्ही शहरांतील प्रशासन आणि मागील सत्ताधारी अपयशी ठरल्याचा आरोप केला. नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत, असे ते म्हणाले. वाहतूक कोंडी, कचऱ्याची समस्या, खराब रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई हे प्रश्न गंभीर झाले आहेत. पाणीटंचाईचा फायदा घेऊन टँकर माफिया नागरिकांची लूट करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुण्यात प्रतिमाणसी ३०० लिटर पाणी दिले जाते आणि वर्षाला २२ टीएमसी पाण्याचा वापर होतो असे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात चुकीचे पाणीवाटप होत असल्याचे पवार यांनी म्हटले. शहरात १२ हजार ३५० स्वच्छता कर्मचारी असतानाही अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसतात. प्रदूषण वाढले असून, २० हजारांहून अधिक नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पिंपरी-चिंचवडमध्ये २५ वर्षे काम करताना सर्व गोष्टी व्यवस्थित करून दाखवल्याचा दावा अजित पवार यांनी केला. पुण्यात पैसा असूनही योग्य नियोजनाचा अभाव, भ्रष्टाचार आणि ठराविक लोकांनाच टेंडर देण्याची पद्धत आहे, अशी टीका त्यांनी केली. केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारा निधी आणि महापालिकेचे बजेट योग्य पद्धतीने वापरले गेले पाहिजे, असेही ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मयूर सोनवणे यांच्या पक्ष कार्यालयाला आग लावण्याच्या प्रयत्नाबाबत माहिती घेतल्यानंतर प्रतिक्रिया देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सत्तेचा मलिदा खाताना एकत्र येतात
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षांवर जोरदार शब्दांत टीका केली आहे. सत्तेसाठी सत्ताधारी नेत्यांची भूमिका दुटप्पी असून, सत्तेचा लाभ घ्यायचा असेल तेव्हा हे नेते एकत्र येतात आणि सत्ता हातातून गेल्यावर पुन्हा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत ‘कपडे उतरवण्याचे’ राजकारण सुरू करतात, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत […] The post सत्तेचा मलिदा खाताना एकत्र येतात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साडेचार तासांची प्रचार रॅली काढली. सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत चाललेल्या या रॅलीला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्याचा दावा पक्षाने केला. पुणे हे केवळ एक शहर नसून, राज्याच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे मुख्य केंद्र आहे, असे मत पवार यांनी यावेळी व्यक्त केले. पुणे महानगरपालिकेत सक्षमपणे निर्णय घेणारी आणि जबाबदारी स्वीकारणारी माणसे असावीत, असेही ते म्हणाले. ही निवडणूक केवळ भाषणांची नसून, केलेल्या कामांची परीक्षा आहे, असे पवार यांनी नमूद केले. पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण हे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेले महत्त्वाचे मुद्दे आहेत. यावर ठोस काम करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य पुणेकरांचा आवाज महापालिकेत पोहोचवण्यासाठी, तसेच भविष्यातील पुणे अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सक्षम बनवण्यासाठी जनतेचा विश्वास आणि पाठिंबा आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले. आपण शब्दांपेक्षा कामावर अधिक विश्वास ठेवतो आणि पुण्याच्या विकासासाठी जे आवश्यक आहे, ते करण्याची जबाबदारी आपली असून ती आपण पार पाडणारच, अशी ग्वाही पवार यांनी दिली. अजित पवार यांच्या रॅलीने कुसाळकर पुतळा, जनवाडी, सोमेश्वरवाडी, गोखलेनगर मुख्य रस्ता, रामोशीवाडी, हनुमान नगर, पांडवनगर, जंगली महाराज रोड, अलका टॉकीज, केळकर रोड, आप्पा बळवंत चौक, बुधवार चौक, छत्रपती शिवाजी रस्ता, गाडीखाना, गंजपेठ, मोमीनपुरा, खडकमाळ आळी, स्वारगेट, शिवदर्शन, अरण्येश्वर चौक, जनता वसाहत, दांडेकर पुल, पानमळा, दत्तवाडी, म्हात्रे पुल, गुळवणी पथ, दशभूजा मंदिर चौक यासह शहरातील विविध प्रमुख भागांना स्पर्श केला.
भाजपला निवडणूक आयोगाचा मोठा झटका; प्रचार गीत नाकारले
मुंबई : महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात रंग भरू लागला आहे. विविध पक्षांनी मतदारांना साकडे घालण्यासाठी मोहीम आखली आहे. विकास कामे आणि आपले चिन्ह मतदारांपर्यंत कसे पोहोचेल याची काळजी प्रत्येक पक्ष घेत आहे. प्रचाराच्या या धामधुमीत राज्य निवडणूक आयोगाने भाजपला मोठा झटका दिला आहे. मुंबई महापालिका निवडणूक प्रचारासाठी भाजपने तयार केलेले प्रचार गीत आयोगाने नाकारले आहे. मुंबई […] The post भाजपला निवडणूक आयोगाचा मोठा झटका; प्रचार गीत नाकारले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भांडुप बस अपघात चालकाच्या चुकीमुळे
मुंबई : प्रतिनिधी भांडुप रेल्वे स्टेशनबाहेर गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण बस अपघाताबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अपघातामागे बसमध्ये तांत्रिक बिघाड होता, असा दावा चालकाकडून करण्यात आला होता. मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केलेल्या सखोल तपासणीत बसमध्ये कोणताही तांत्रिक दोष नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हा अपघात चालकाच्या चुकीमुळेच झाल्याचे आता समोर आले आहे. […] The post भांडुप बस अपघात चालकाच्या चुकीमुळे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कुलाबा वॉर्डातील उमेदवारी अर्जावरून निर्माण झालेल्या वादानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हा केवळ राजकीयदृष्ट्या प्रेरित 'फेक नॅरेटिव्ह' सेट करण्याचा प्रयत्न आहे, असे म्हणत त्यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. ज्या महिलेने दबाव टाकल्याचा आरोप केला आहे, तिला आपण कधी पाहिले नाही किंवा भेटलोही नाही. उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी रुपये मागण्याचे ह्या लोकांनी प्रयत्न केले होते, असा आरोपही राहुल नार्वेकर यांनी केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान पोलिसांवर दबाव टाकर उमेदवारांवर दमदाटी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी नार्वेकरांवर गंभीर आरोप केले होते, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. यासंदर्भात कुलाबा मतदारसंघातील काही इच्छुक उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता या सर्व प्रकरणावर राहुल नार्वेकर यांनी भाष्य केले आहे. नेमके काय म्हणाले राहुल नार्वेकर? उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २ जानेवारीला संपली असताना ७ जानेवारीला हे आरोप का केले जात आहेत, असा सवाल नार्वेकरांनी विचारला. उमेदवारी मागे घेण्याची तारीख उलटून ५ दिवस झाले आहेत. या पाच दिवसांत हे लोक झोपले होते का? की काही विशेष प्लॅनिंग सुरू होते? हे सर्व राजकारण डोळ्यासमोर ठेवून रचलेले नाटक आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. दीपक पवारांवर गंभीर आरोप नार्वेकर यांनी आरोप करणाऱ्या दीपक पवार यांच्यावरच उलटतपासणी केली. मी या व्यक्तीची माहिती घेतली आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरून नंतर पैसे उकळण्यासाठी उमेदवारांना धमकावणे, हाच यांचा धंदा आहे. लोकसभेतही त्यांच्यावर असेच आरोप होते. ५-५ कोटी रुपये मागण्याचे प्रकार या लोकांकडून झाले असून, त्याबाबत आम्ही लेखी तक्रार आणि खुलासा करणार आहोत, असा इशारा नार्वेकरांनी दिला. मला धमकावण्याची गरजच काय? राहुल नार्वेकरांनी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. विधानसभा निवडणुकीत मला ५० हजार मतांचे मताधिक्य आहे. वॉर्ड २२५, २२६ आणि २२७ मधूनही मला हजारो मतांची आघाडी मिळाली आहे. ज्याच्या पाठीशी एवढे जनबळ आहे, त्याला कोणाला धमकावण्याची गरज काय? विरोधकांकडे उमेदवार उभे करायला माणसे नाहीत, म्हणून ते असले घाणेरडे प्रकार करत आहेत, असे स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिले. कोर्टात जाणे हा प्रत्येकाचा अधिकार राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील तीन सदस्य हर्षिता शिवलकर (मेहुणी), मकरंद नार्वेकर (भाऊ) आणि गौरी नार्वेकर (बहीण) हे कुलाब्यातील तीन वेगवेगळ्या वॉर्डांतून निवडणूक लढवत आहेत. राहुल नार्वेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पोलीस यंत्रणेवर दबाव आणला आणि इतर उमेदवारांना निवडणूक कार्यालयातून बाहेर काढले, असा आरोप करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. कोर्टात जाणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण कोर्टाने या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. मी कायद्याचा अभ्यासक आहे आणि संविधानाचे रक्षण करण्याचे काम मी सभागृहात व बाहेरही करत आलो आहे, असे ते म्हणालेत. उद्धव ठाकरेंची निलंबनाची मागणी दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत राहुल नार्वेकर यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. तर खासदार संजय राऊत यांनी नार्वेकरांनी पोलीस यंत्रणेचा गैरवापर केल्याचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर तोफ डागली होती. एका बाजूला विरोधकांचे गंभीर आरोप आणि दुसरीकडे राहुल नार्वेकरांचा आक्रमक बचाव, यामुळे कुलाब्यातील निवडणुकीला आता कायदेशीर आणि राजकीय संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
बिर्याणी, समोसे व वडा-पावच्या मागणीत वाढ
मुंबई : प्रतिनिधी २०२६ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक प्रचाराचा थेट परिणाम मुंबईच्या खाद्यव्यवसायावरही दिसून येत आहे. प्रचाराच्या धामधुमीमुळे वडा-ााव, समोसे, पुलाव आणि बिर्याणीच्या विक्रीत तब्बल २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या […] The post बिर्याणी, समोसे व वडा-पावच्या मागणीत वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूरच नव्हे तर महाराष्ट्राच्या जडणघडणीत विलासराव देशमुख यांचे मोलाचे योगदान
लातूर : प्रतिनिधी रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्यावर केलेल्या वक्तव्याने लातूरमध्ये गदारोळ झाला. तीव्र प्रतिक्रियेनंतर चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमधील सभेत विलासराव देशमुखांचा गौरव करत, चव्हाण यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतल्याचे स्पष्ट केले. त्यांनी लातूरसाठी २२९ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह अनेक विकासकामांची घोषणा केली, ज्यामुळे […] The post लातूरच नव्हे तर महाराष्ट्राच्या जडणघडणीत विलासराव देशमुख यांचे मोलाचे योगदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच वरळीतील मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. मनसेकडून तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले संतोष धुरी अखेर भाजपच्या गोटात दाखल झाले. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशानंतर धुरी यांनी थेट मनसेच्या अंतर्गत कारभारावर आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपमध्ये प्रवेशानंतर संतोष धुरी यांनी स्पष्ट केलं की, राज ठाकरे यांच्यावर त्यांची कोणतीही नाराजी नाही. मात्र मनसेच्या आतमध्ये काही “कटकारस्थानी” सक्रिय असल्याचा आरोप त्यांनी केल. आमच्या साहेबांनी एकदा सांगितलं होतं की, विठ्ठलाच्या बाजूला बडवे असतात. राग विठ्ठलावर नसतो, बडव्यांवर असतो. मनसेतही असेच काही बडवे आहेत, अशा शब्दांत त्यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणावर बोट ठेवलं. बाळा नांदगावकर यांच्यावर थेट आरोप करत त्यांनी, हेच बडवे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना झाकण्याचं काम करत असल्याचं म्हटलं. धुरी यांनी सांगितलं की, पक्षात जास्त बोलणारे, पुढे येणारे चेहरे मुद्दाम बाजूला सारण्याचा प्रयत्न केला जातो. आमच्यामुळे पक्ष चर्चेत राहत होता. त्यामुळेच आम्हाला झाकण्याचा प्रयत्न झाला, असा दावा त्यांनी केला. बाळा नांदगावकर नेहमी युतीची गरज असल्याचं सांगायचे, पण त्या युतीत आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय याकडे त्यांनी कधीच लक्ष दिलं नाही, असा गंभीर आरोपही धुरी यांनी केला. जागावाटपात मनसेच्या निष्ठावंतांवर अन्याय झाल्यामुळेच नाराजी वाढत गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मनसेमध्ये केवळ आपणच नाही तर आणखी अनेक नेते नाराज असल्याचा दावा करत संतोष धुरी यांनी मोठं विधान केलं. संदीप देशपांडे नाराज आहेत, अशी चर्चा मुद्दाम पसरवली जाते. म्हणजे त्यांनाही पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न आहे, असं धुरी म्हणाले. निवडणूक होण्याआधी दोन-तीन मोठे आणि महत्त्वाचे चेहरे मनसेला सोडचिठ्ठी देतील, असा दावा त्यांनी केला. कोण कोण नाराज आहे यांची नावे आपण सध्या सांगणार नाही, पण पक्षातून कोण जाणार होते याची संपूर्ण माहिती आपल्याकडे असल्याचंही त्यांनी सूचकपणे सांगितलं. संतोष धुरी यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिल्यास ते मनसेचे जुने आणि आक्रमक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. राज ठाकरे यांच्या प्रत्येक आंदोलनात ते सक्रिय सहभाग घेत असत. मागील मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. तरीही वरळी परिसरात त्यांचा प्रभाव कायम होता. मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्याशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती आणि यावेळीही त्यांच्या उमेदवारीसाठी देशपांडे यांनी प्रयत्न केल्याची चर्चा होती. अखेर धुरी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीमुळे जागावाटपाची गणितं बदलली. संतोष धुरी हे वॉर्ड क्रमांक 194 मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र जागावाटपात ही जागा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला सुटल्याने धुरी यांची संधी हुकली. याच मुद्द्यावरून मनसेतील नाराजी वाढली आणि अखेर धुरी यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. 6 जानेवारी रोजी त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. वरळी आणि आसपासच्या भागात मनसेला हा मोठा धक्का संतोष धुरी यांच्या भाजप प्रवेशामुळे मुंबईतील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः वरळी आणि आसपासच्या भागात मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. धुरींच्या आरोपांमुळे मनसेच्या अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली असून, निवडणुकीआधी आणखी कोणते नेते पक्ष सोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे भाजपसाठी हा प्रवेश आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात असून, मनसेतील असंतोषाचा फायदा भाजप कसा उचलतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अंबरनाथ नगरपालिकेतील घडामोडींवर कठोर भूमिका घेत पक्षशिस्तीचा मोठा निर्णय घेतला आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उमेदवार लढवून निवडून आले असतानाही भाजपच्या सदस्यांसोबत गटबंधन केल्याचा ठपका ठेवत प्रदेश काँग्रेसने थेट कारवाईचा इशारा दिला आहे. या प्रकरणी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना कारणे दाखवा नोटीस देत काँग्रेस पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय कळवण्यात आला आहे. हा निर्णय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत पत्रानुसार, अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर लढलेले बारा नगरसेवक निवडून आले. मात्र, पक्षाच्या प्रदेश कार्यालयास कोणतीही माहिती न देता या नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन करण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांतून समोर आले. ही बाब अत्यंत गंभीर, चुकीची आणि पक्षशिस्तीचा भंग करणारी असल्याचे प्रदेश काँग्रेसने स्पष्ट शब्दांत नमूद केले आहे. काँग्रेसच्या पत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की, स्थानिक पातळीवर कोणतेही आघाडी किंवा गटबंधन करताना प्रदेश किंवा वरिष्ठ नेतृत्वाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, अंबरनाथ नगरपालिकेच्या बाबतीत ही प्रक्रिया पूर्णपणे डावलण्यात आली. परिणामी, पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी विसंगत अशी राजकीय भूमिका घेतल्याचा ठपका संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षासाठी ही बाब केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित नसून, पक्षाच्या धोरणात्मक आणि वैचारिक भूमिकेवर आघात करणारी असल्याचेही पत्रात अधोरेखित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने कठोर भूमिका घेत अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना तात्काळ काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. यासोबतच, त्यांची ब्लॉक काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या नेतृत्वावर कारवाई करून काँग्रेसने खालीपर्यंत कडक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. इतकेच नव्हे, तर या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर नगरसेवकांनाही पक्षाने गंभीर इशारा दिला आहे. भाजपसोबत गटबंधन करून पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांवरही काँग्रेस पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अंबरनाथमधील काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रदीप पाटील 12 नगरसेवकांसह भाजप प्रवेश करणार काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदीप पाटील हे आपल्या 12 नगरसेवकांसह लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश होत असल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अंबरनाथमधील काँग्रेसची ताकद यामुळे लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक पातळीवरील युतीची माहिती दिली होती या निर्णयामागील कारणे स्पष्ट करताना प्रदीप पाटील यांनी काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ब्लॉक अध्यक्ष पदासाठी माझ्याकडे थेट एक कोटी रुपयांची मागणी केली, असा खळबळजनक आरोप पाटील यांनी केला. तसेच, स्थानिक पातळीवरील युती आणि राजकीय परिस्थितीबाबत आपण आधीच प्रदेश नेतृत्वाला माहिती दिली होती, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसकडून आपल्यावर करण्यात आलेली कारवाई अन्यायकारक असल्याचा दावा करत पाटील म्हणाले की, महापालिका निवडणुकीच्या तयारीत काँग्रेसने एकदाही आमच्याशी चर्चा केली नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर निवडून आलो आहोत, असा ठाम दावा त्यांनी केला. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर कुलाबा वॉर्ड क्र. २२६ मधील उमेदवार तेजल पवार आणि त्यांचे पती दीपक पवार यांनी धमकी आणि दडपशाहीचा गंभीर आरोप केला आहे. नार्वेकर यांनी दीपक पवार यांनामी बोलावल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही यावं लागतं, तुला कुलाब्यात राहायचंय की नाही, ते तू ठरव, अशी थेट धमकी दिल्याचे पवार दाम्पत्याने पत्रकार परिषदेत सांगितले. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आधी लाखो, नंतर कोट्यवधी रुपयांची ऑफर दिली गेली, असा दावाही त्यांनी केला. बुधवारी 'शिवसेना भवन' येथे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार दाम्पत्याने हा थरारक घटनाक्रम मांडला. तेजल पवार यांनी ३० डिसेंबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर राहुल नार्वेकर यांनी दीपक पवार यांना आपल्या गाडीतून कार्यालयात नेले आणि उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. दीपक पवार यांनी घडलेला प्रसंग सांगताना म्हटले, राहुल नार्वेकर मला म्हणाले, 'मी कुठल्या पदावर आहे तुला माहिती नाही का? मी बोलावल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही येतात.' त्यांनी मला 'राजू' नावाच्या कार्यकर्त्याचे उदाहरण दिले. राजूने निवडणूक लढवण्याची घोषणा करताच त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. 'तुला कुलाब्यात राहायचंय की नाही, हे तूच ठरव,' अशी धमकी त्यांनी दिली. त्यांचे हे शब्द ऐकून मी प्रचंड घाबरलो होतो. लाखोंची ऑफर कोटींवर! राहुल नार्वेकर आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडून (PA) वारंवार फोन करून आणि घरी येऊन दबाव टाकण्यात आल्याचे तेजल पवार यांनी सांगितले. माझे पती घरी आले तेव्हा नार्वेकरांचा पीए त्यांच्यासोबत होता. त्याने आम्हाला अर्जाची माघार घेण्यासाठी पैशांची ऑफर दिली. सुरुवातीला ही रक्कम लाखोंमध्ये होती, मात्र नंतर ती वाढवून कोट्यवधी रुपये करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पुन्हा पीए घरी आला, पण आम्ही घाबरून दरवाजाच उघडला नाही, असे तेजल पवार म्हणाल्या. जीव मुठीत धरून पलायन स्वतःच्या पक्षानेही साथ सोडल्याने आणि नार्वेकरांकडून होणाऱ्या सततच्या दबावामुळे पवार कुटुंब भयभीत झाले होते. नार्वेकरांच्या धमकीनंतर आम्ही इतके घाबरलो होतो की, आम्ही दोघांनी फोन बंद केले आणि घरातून निघून गेलो. सर्वजण आमचा शोध घेत होते, पण अखेर आम्ही ठाकरे गटाच्या मदतीने आज येथे आपली बाजू मांडत आहोत, अशी हतबलता दीपक पवार यांनी व्यक्त केली. नार्वेकरांच्या स्पष्टीकरणावर लक्ष एका संवैधानिक पदावरील व्यक्तीवर अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने निवडणुकीच्या तोंडावर वातावरण चांगलेच तापले आहे. आता या आरोपांवर राहुल नार्वेकर काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने 'विकसित पुण्यासाठी संकल्पपत्र' हा आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहर देशातील महत्त्वाचे शहर असून, ते सर्वाधिक विकसित आणि स्वच्छ बनवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे सांगितले. या प्रकाशन सोहळ्याला राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे आणि माजी आमदार जगदीश मुळीक उपस्थित होते. मोहोळ यांनी नमूद केले की, पुणेकर नेहमीच विकासाला साथ देतात आणि भाजपने दिलेला शब्द पाळल्यामुळे पुणेकरांचा पक्षावर सातत्याने विश्वास राहिला आहे. मोहोळ पुढे म्हणाले की, पुणे निवृत्तीनंतर राहण्यासाठी योग्य शहर असल्याने अनेकजण येथे स्थायिक होत आहेत. स्मार्ट सिटी योजनेत पुणे शहरातील बाणेर आणि बालेवाडी भाग निवडला जाऊन तो विकसित करण्यात आला आहे. मनपामध्ये पाच वर्षे काम करण्याची संधी जनतेने भाजपला दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या ११ वर्षांपासून देशात कार्यरत आहेत, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कार्यरत आहे. भाजपने प्रत्येक निवडणुकीत पुणेकरांना सादर केलेला जाहीरनामा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. पुणेकर पुन्हा एकदा भाजपवर विश्वास ठेवतील आणि सत्ता देतील, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, पुण्यात ३२ किलोमीटर मेट्रो सुरू झाली असून, आगामी काळात ती १५० किलोमीटरपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. तसेच, एक हजार ई-बसेस मंजूर असून, शहरात लवकरच साडेचार हजार ई-बसेस सुरू करण्यात येतील, ज्यामुळे सुरक्षित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होईल आणि वाहतूक कोंडी कमी होईल. गेल्या तीन वर्षांत मर्यादित मेट्रो मार्गांवर साडेदहा कोटी पुणेकरांनी प्रवास केला आहे. पुणे विमानतळाचे विस्तारीकरण प्राधान्याने करण्यात येत आहे. ४४ किलोमीटर लांबीच्या नदीकाठ सुधार प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून शहरात अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली असून, शहराचा सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा जपण्याचे कामही करण्यात आले आहे. ज्या पुणेकरांनी आमच्यावर विश्वास टाकला, तो सार्थ ठरवण्याचे काम भाजपने केले आहे, असे मोहोळ यांनी शेवटी सांगितले.
माजी खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलाय. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना संभाजीनगरमध्ये मारहाण झाली आहे. नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांची कार रोखली. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कारवर धडाधड बुक्या आणि पायांनी मारहाण केली. त्याशिवाय जलील यांनाही मारहाण केली. या प्रकारानंतर संभाजनगरमधील वातावारण चांगलेच तापले. छत्रपती संभाजीनगरमधील बायजीपु-यात जलील यांना मारहाण झाली. एमआयएमचे कार्यकर्ते […] The post माजी खासदार इम्तियाज जलील यांना मारहाण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तमन्नाने गोव्यातील ६ मिनिटांच्या डान्ससाठी घेतले ६ कोटी?
गोवा : दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत ‘आयटम साँग क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया अनेकदा तिच्या चित्रपटांपेक्षा डान्स परफॉर्मन्समुळेच जास्त चर्चेत असते. ‘जेलर’मधील कावाला, ‘स्त्री २’ मधील आज की रात आणि ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ मधील ‘गफूर’ सारख्या गाण्यांनी तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आता तिच्या गोव्यातील एका परफॉर्मन्सची चर्चा सुरू आहे. नुकताच तमन्नाने गोव्यातील […] The post तमन्नाने गोव्यातील ६ मिनिटांच्या डान्ससाठी घेतले ६ कोटी? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल लागताच महाराष्ट्राला एक वेगळेच चित्र पाहायला मिळेल. निवडणूक संपल्यानंतर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील, तर रोहित पवार राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील. पवार कुटुंब कधीच वेगळे नव्हते आणि नाहीत, हे माझे भविष्य लवकरच खरे ठरेल, असा खळबळजनक दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. ' अजित पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करताना लक्ष्मण हाके यांनी पुण्याच्या राजकारणाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, एकीकडे मुखी फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे तिकीट वाटताना बोडके, आंदेकर, नायर यांसारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना जवळ करायचे, हेच अजित पवारांचे राजकारण आहे. पुण्यात सत्ता आल्यावर अजित पवार पुन्हा पहाटे बाहेर पडतील, मोकळे भूखंड शोधतील आणि ते ५०० रुपयांत हडप करतील. पवार हे भ्रष्टाचाराचे महामेरू असून ते जनतेचे सेवक नसून अदानींसारखे केवळ एक 'उद्योजक' असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. शरद पवारांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे शरद पवार यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करताना हाके म्हणाले, शरद पवार वरवर भाजपसोबत जाणार नाही असे सांगत असले, तरी त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. ते राज्यातील भाजप नेत्यांना किंमत देत नाहीत, त्यांचे थेट 'कनेक्शन' पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी आहे. भाजपच्या 'गंगे'त भ्रष्टाचाराची 'गटारगंगा' भाजपवर टीका करताना लक्ष्मण हाके यांनी कार्यकर्त्यांच्या नाराजीचा मुद्दा मांडला. भाजप स्वतःला कितीही पवित्र गंगा मानत असली, तरी त्यांनी अजित पवारांसारखी 'भ्रष्ट गटारगंगा' पक्षात मिसळून घेतली आहे. ज्या पवारांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी लोकांनी भाजपला निवडून दिले, त्याच पवारांना भाजपने सत्तेत भागीदार केले. यामुळे भाजपचा सामान्य कार्यकर्ता अस्वस्थ आणि नाराज आहे, असे लक्ष्मण हाके म्हणालेत. राज्यात सोयीच्या युत्यांचा खेळखंडोबा सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना लक्ष्मण हाके यांनी सर्वच पक्षांच्या सोयीच्या राजकारणाचा समाचार घेतला. सध्या भाजपची शिंदे गटाशी आणि अजित पवारांशी युती आहे. अजित पवारांचे शरद पवारांशी आतून साटेलोटे आहे. शरद पवार काँग्रेस आणि ठाकरेंसोबत आहेत. ठाकरे आणि मनसेची जवळीक आहे, तर काँग्रेस वंचितसोबत बोलणी करतेय. थोडक्यात काय, तर सर्वच पक्ष एकमेकांसोबत निवडणूक लढवत आहेत. यात सामान्य कार्यकर्ता मात्र बाजूला फेकला गेला असून, आगामी निवडणुका केवळ पैसा आणि गुंडगिरीच्या जोरावर लढल्या जातील, अशी भीती लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली.
नागपूर : प्रतिनिधी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देशभरात कडाक्याची थंडी पडली आहे. विदर्भासह नागपुरात आजही थंडीची लाट पसरल्याचे चित्र आहे. तर गोंदिया जिल्ह्यात राज्यातील सर्वांत कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसाही थंडीचा सामना करावा लागत आहे. उत्तरेकडील शीत वा-यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. तर या थंडीचा परिणाम उत्तर व […] The post विदर्भात थंडीची लाट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अंबरनाथमध्ये भाजपची काँग्रेससोबत युती
ठाणे : प्रतिनिधी नव्या आघाडीची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली आहे. या आघाडीत भाजपचे १४, काँग्रेसचे १२, राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे ४ आणि १ अपक्ष असा एकूण ३१ नगरसेवकांचा समावेश आहे. नगराध्यक्षांसह ही संख्या ३२ वर जाते. अंबरनाथ नगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त करण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. महापालिका […] The post अंबरनाथमध्ये भाजपची काँग्रेससोबत युती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून एमआयएम पक्षाचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाला असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जलील यांच्या वाहनावर संतप्त कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली. काही वेळातच मोठा जमाव जमा झाला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. या कारवाईनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र वाहनाचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर इम्तियाज जलील हे थेट जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल झाले असून त्यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली आहे. या हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असून पोलिसांकडून घटनास्थळावरील परिस्थितीचा आणि संबंधित व्यक्तींचा तपास सुरू आहे. पक्षांतर्गत उमेदवारीवरून निर्माण झालेल्या नाराजीचे पडसाद रस्त्यावर उमटल्याने, आगामी काळात या प्रकरणाचे राजकीय परिणाम काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत...
आमची राजकीय लढाई काँग्रेस पक्षाशी असली, तरी दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे, अशा नेत्यांमध्ये विलासरावांचे नाव प्रमुख आहे, हे सांगताना मला कोणताही संकोच वाटत नाही, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमध्ये भावनिक साद घातली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासरावांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी लातुरात 'डॅमेज कंट्रोल' केल्याचे दिसून आले. महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या वक्तव्यामुळे लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, काँग्रेस कार्यकर्ते आणि विलासराव देशमुखांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. मुद्दा अधिक तापण्याची शक्यता पाहता रवींद्र चव्हाण यांची आपल्या विधानावरून दिलगिरी देखील व्यक्त केली. मात्र, रवींद्र चव्हाण यांच्या निषेधार्थ विविध संघटनांच्या वतीने बुधवारी लातूर बंदची हाक देण्यात आली होती. नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? लातूरमध्ये आयोजित एका सभेत बोलताना फडणवीस यांनी लातूरच्या राजकीय वारशाचा गौरव केला. लातूर अशी भूमी आहे की जिने महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात नेतृत्व दिले. चाकूर साहेबांचे एकूण राजकीय आयुष्य बघितले, तर नगराध्यक्षपासून ते लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत आणि महाराष्ट्रातील मंत्रीपदापासून देशाच्या गृहमंत्रीपदापर्यंत त्यांनी कारभार चालवला. राजकारणात अशाप्रकारचे लोक आपल्याला विरळ दिसतात. त्याचप्रमाणे शिवाजीराव पाटील निलंगेकर यांसह लातूरला वेगळी ओळख देणारे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे नाव पक्षाच्या पलिकडे आहे. महाराष्ट्राचा जडणघडणीत मोलाचा वाटा आहे म्हणून आपण ज्या नेत्यांचा आदर करतो, त्यातील प्रमुख नाव विलासराव देशमुख यांचे आहे, असे सांगताना मला कुठलाही संकोच नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. रवींद्र चव्हाणांचे वक्तव्य अनावधानाने रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या विधानावरही स्पष्टीकरण दिले. दोन दिवसांपूर्वी काही गोंधळ झाला. आमच्या अध्यक्ष बोलत असताना, त्यांना सांगायचे होते की, राजकीयदृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचा आहे. पण कदाचित त्यांचे शब्द चुकीच्या पद्धतीने गेले असतील, त्याबाबत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. मी जाहीरपणे सांगतो काँग्रेस पक्षाशी आमची लढाई असली, तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. ते या महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेतृत्व आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी लातुरात डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. लातूर ज्यांची जन्मभूमी नव्हती, पण त्यांची कर्मभूमी होती, असे आमचे नेते गोपीनाथराव मुंडे यांचेही स्मरण या निमित्ताने लातुरकरांसोबत केले पाहिजे. या भूमिमध्ये नेतृत्व तयार करण्याचा एक गुण आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत. लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी आणावे लागणार नाही लातूरच्या पाणीप्रश्नावर बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आणि भविष्यातील विकासाचा रोडमॅप मांडला. आज लातुरला रेल्वेने पाणी आणावे लागतंय. या संकटाचे संधीत रुपांतर करायचे आहे. पुढील काळात लातुरमध्ये परत कधीही रेल्वेने पाणी आणावे लागू नये यादृष्टीने काम करायचे आहे. जलयुक्त शिवारपासून पिण्याच्या पाण्याच्या योजनेपर्यंत अनेक योजनांना चालना दिली. लातुरच्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर दररोज शुद्ध पिण्याचे पाणी आलंच पाहिजे, त्यादृष्टीने आपण नियोजन केले. मध्यंतरी सरकार गेल्यानंतर आपण केलेले नियोजन बासनात गुंडाळण्यात आले. आता पुन्हा सरकार आल्यानंतर आपण त्याला चालना दिलीये. जवळपास २५९ कोटी रुपयांची योजना आपण लातुरकरिता मंजूर केली. २२ टक्के कामही त्याचे पूर्ण झालेले आहे. महापालिका निवडणुकीनंतर दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता देणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. नेमके काय म्हणाले रवींद्र चव्हाण? लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शहरात प्रचारासाठी आले होते. यावेळी घेतलेल्या सभेत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना लातूरच्या राजकारणाचा उल्लेख केला. भाषणाच्या ओघात त्यांनी, लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा जो उत्साह दिसतोय, तो पाहता विलासराव देशमुख यांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, यात शंका नाही, असे विधान केले. या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले असून, विशेषतः काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मतमोजणी प्रक्रियेवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबईसारख्या देशातील सर्वात मोठ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने जाहीर होणे अत्यंत महत्त्वाचे असताना, यंदा अवलंबण्यात येणाऱ्या मतमोजणीच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त सुरेश काकणी यांना यासंदर्भात सविस्तर पत्र लिहून तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मुंबई महापालिकेतील सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू करावी, अशी ठाम मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे. काँग्रेसने आपल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी यंदा 23 निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात साधारणतः 8 प्रभागांचा समावेश आहे. मुंबईतील प्रत्येक प्रभागात किमान 40 किंवा त्याहून अधिक मतदान केंद्रे असून, उपनगरांमध्ये ही संख्या आणखी जास्त आहे. अशा परिस्थितीत मतमोजणी ही वेळखाऊ प्रक्रिया ठरणे स्वाभाविक आहे. मात्र, योग्य नियोजन केल्यास सर्व निकाल काही तासांत जाहीर करता येऊ शकतात, असा काँग्रेसचा दावा आहे. पत्रात पुढे नमूद करण्यात आले आहे की, 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून, प्रत्येक प्रभागासाठी साधारणतः दोन टेबल उपलब्ध असतील. यामुळे एका प्रभागासाठी अंदाजे 20 ते 25 मतमोजणी फेऱ्या होतील. एका प्रभागाची मतमोजणी पूर्ण होण्यासाठी किमान अडीच ते तीन तासांचा कालावधी लागेल, असा अंदाज काँग्रेसने व्यक्त केला आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू होत असल्याने अवघ्या तीन ते चार तासांत बहुतांश निकाल जाहीर होत असत. त्यामुळे उमेदवार, पक्षकार्यकर्ते आणि मतदारांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होत नसे. मात्र, यंदा अवलंबण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीबाबत काँग्रेसने गंभीर आक्षेप नोंदवला आहे. पत्रानुसार, एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील प्रभागांची मतमोजणी एकामागोमाग एक अशा पद्धतीने केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच, एखाद्या निर्णय अधिकाऱ्याच्या अखत्यारीतील पहिल्या प्रभागाची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या प्रभागाची मतमोजणी सुरू केली जाईल. ही माहिती खरी असल्यास, त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. या पद्धतीमुळे एका निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात 8 प्रभाग असतील, तर प्रत्येक प्रभागासाठी सरासरी तीन तास धरले तरी आठव्या प्रभागाचा निकाल येण्यासाठी 24 तासांहून अधिक कालावधी लागू शकतो. परिणामी, संपूर्ण मुंबईचे निकाल जाहीर होण्यासाठी दुसरा दिवस उजाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी उमेदवार आणि मतदारांना ताटकळत ठेवावे लागेल, जे लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टीने योग्य नाही, असा ठाम सूर काँग्रेसने लावला आहे. सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू करण्यात यावी काँग्रेसच्या मते, मुंबईसारख्या महानगरात निवडणूक निकाल लांबणीवर पडल्यास विविध प्रकारच्या अफवा, गैरसमज आणि तणाव निर्माण होण्याचा धोका असतो. याशिवाय, मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकतेच्या दृष्टीनेही प्रश्नांकित ठरू शकते. म्हणूनच, पूर्वीप्रमाणे सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू करण्यात यावी, जेणेकरून सर्व प्रभागांचे निकाल साधारणतः एकाच वेळेत किंवा काही तासांच्या फरकाने जाहीर होतील, अशी ठाम मागणी काँग्रेसने केली आहे. निवडणूक निकालांबाबत मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता एकंदरीत, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील मतमोजणीची कार्यपद्धती हा आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून, राज्य निवडणूक आयोग या मागणीवर काय निर्णय घेतो, याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. जर काँग्रेसने व्यक्त केलेल्या शंकांना दुजोरा मिळाला, तर निवडणूक निकालांबाबत मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयोगाने वेळेत हस्तक्षेप करून स्पष्ट आणि एकसमान कार्यपद्धती जाहीर करावी, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील भीषण पाणी टंचाईच्या प्रश्नाने आता राजकीय तापमान कमालीचं वाढवलं असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शहरातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत, दानवेंनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत टीका केली. पाण्यासंदर्भात सातत्याने दिशाभूल करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार करण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. शहरातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याच्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या असून, प्रत्यक्षात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचं वास्तव दानवेंनी अधोरेखित केलं. विशेषतः राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांचा उल्लेख करत दानवेंनी अत्यंत बोचरी टीका केली. एकेकाळी स्वतःला जलसाम्राट, म्हणवून घेणारे आणि शहरभर बॅनरबाजी करणारे मंत्री आता पाण्याच्या प्रश्नावर ‘मौनी बाबा’ झाले असल्याचा सणसणीत टोला त्यांनी लगावला. शहरात पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, जबाबदार मंत्र्यांचे मौन नागरिकांच्या संतापात भर घालणारे आहे, असे दानवेंनी म्हटले. पाणीपुरवठा योजनांच्या उद्घाटनावेळी मोठमोठी आश्वासने दिली गेली, मात्र प्रत्यक्षात त्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचलाच नाही, असा आरोपही त्यांनी केला. अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत महायुती सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पाणीपुरवठा योजनेतील अपयश झाकण्यासाठी आता प्रशासनातील अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. स्वतःच्या चुकीच्या नियोजनामुळे आणि अकार्यक्षमतेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे खापर अधिकाऱ्यांवर फोडण्याचा हा प्रकार म्हणजेच महायुतीने अप्रत्यक्षपणे आपला पराभव मान्य केल्याचा पुरावा आहे, असे दानवेंनी स्पष्ट शब्दांत नमूद केले. प्रशासनावर दबाव टाकून प्रश्न सुटणार नाहीत, तर ठोस निर्णय आणि राजकीय इच्छाशक्ती लागते, असा इशाराही त्यांनी दिला. या मुद्द्यावर बोलताना दानवेंनी मंत्री संजय शिरसाट यांनी पूर्वी केलेल्या एका महत्त्वाच्या वक्तव्याची आठवण करून दिली. जयसिंगपुरा येथील एका कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना शिरसाट यांनी डिसेंबर 2025 पर्यंत शहराला वाढीव पाणी मिळालं नाही, तर आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचारासाठी येणार नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. त्या वक्तव्याचा संदर्भ देत दानवेंनी सांगितले की, आता डिसेंबर महिना उलटून गेला आहे, तरीही शहराचा पाणी प्रश्न जसाच्या तसा आहे. त्यामुळे शिरसाट यांनी आपल्या शब्दाला जागून आता प्रचारासाठी शहरात पाऊलही टाकू नये, अशी थेट मागणी त्यांनी केली. दानवेंनी पुढे म्हटले की, पाण्याच्या प्रश्नावर नागरिकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा अनियमित झाला असून, टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अशा परिस्थितीत सत्ताधाऱ्यांनी केवळ आरोप-प्रत्यारोप न करता जबाबदारी स्वीकारून उपाययोजना करायला हव्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात सत्ताधारी नेते एकमेकांवर दोष ढकलण्यात आणि प्रशासनाला लक्ष्य करण्यात गुंतलेले दिसत आहेत, असा आरोप दानवेंनी केला. एकेकाळी ‘जलसाम्राट’ म्हणून मिरवणाऱ्या मंत्र्यांनी आता या गंभीर प्रश्नावर मौन पाळल्याने जनतेत प्रचंड असंतोष आहे, असेही दानवेंनी नमूद केले. पाणी हा मूलभूत हक्क असून, तो पुरवण्यात अपयशी ठरणे म्हणजे शासनाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहणे आहे, असे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांमध्ये मोठमोठी आश्वासने दिली जात असली, तरी पाण्यासारख्या मूलभूत समस्येवर सरकारने अजूनही ठोस तोडगा काढलेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पाणी प्रश्न मोठा राजकीय मुद्दा बनला एकंदरीत, छत्रपती संभाजीनगरमधील पाणी प्रश्नाने आता केवळ नागरी समस्या न राहता तो मोठा राजकीय मुद्दा बनला आहे. अंबादास दानवेंच्या आक्रमक भूमिकेमुळे महायुती सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता असून, मंत्री संजय शिरसाट आणि सत्ताधाऱ्यांना या आरोपांना कसे उत्तर द्यावे लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरातील नागरिकांना दिलासा देणारे निर्णय लवकरच जाहीर होतील की हा मुद्दा निवडणुकीपुरताच मर्यादित राहील, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायतुल्लाह पटेल चाकुहल्ल्यात ठार
अकोला : अकोट तालुक्यातील मोहाळा येथे जुन्या वादातून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मंगळवारी (६ जानेवारी) चाकूहल्ला करण्यात आला होता. मंगळवारी दुपारी सुमारे १.३० त्यांचावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अकोट येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी (७ जानेवारी) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला […] The post काँग्रेसचे उपाध्यक्ष हिदायतुल्लाह पटेल चाकुहल्ल्यात ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अंबरनाथ, अकोटमधील युतीवर मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी
मुंबई : प्रतिनिधी राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना दुसरीकडे एकमेकांचे कट्टर विरोधी आणि वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र येऊन सत्तेसाठी आघाडी केल्याचे समोर आले. भाजपने एकीकडे अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेससोबत युती केली. तर, दुसरीकडे अकोटमध्ये सत्तेसाठी भाजपने एमआयएमसोबत हातमिळवणी केली. या दोन्ही आघाड्यांमुळे भाजपला विरोधकांनी लक्ष्य केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान […] The post अंबरनाथ, अकोटमधील युतीवर मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सरकारी कर्मचा-यांकडून पैसे वसूल
मुंबई : प्रतिनिधी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहे. या निकषाअंतर्गत येणा-या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेत सरकारी कर्मचा-यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, अनेक सरकारी कर्मचा-यांनी योजनेचा लाभ घेतला आहे.या सरकारी कर्मचा-यांवर कारवाई केली जाणार आहे. योजनेचा निकषाबाहेर जाऊन लाभ घेणे हे सरकारी कर्मचा-यांना चांगलेच भोवले […] The post सरकारी कर्मचा-यांकडून पैसे वसूल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अकोटमध्ये भाजपची ओवेसींच्या एमआयएमसोबत युती
मुंबई : प्रतिनिधी भाजप सत्ता मिळवण्यासाठी काहीही करू शकते, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र या टीकेत तथ्य असल्याचा प्रत्यत अकोला जिल्ह्यात आहे. नुकताच नगपपंचायत आणि नगपालिका निवडणूक झाली. अकोट नगरपालिकेत भाजपला बहुमत मिळाले नाही. मात्र, सत्तेत येण्यासाठी त्यांनी चक्क असुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमसोबत युती केली आहे. भाजपच्या नेतृत्वात अकोट विकास मंच स्थापन करण्यात […] The post अकोटमध्ये भाजपची ओवेसींच्या एमआयएमसोबत युती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचा भरणा वाढल्याने राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आणि इतर काही पक्षांनी आंदेकर, मारणे, बापू नायर आणि टिपू पठाण यांसारख्या कुख्यात टोळ्यांशी संबंधित उमेदवारांना उघडपणे पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. मात्र, 'गुंडगिरी खपवून घेणार नाही,' असा इशारा देत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना 'सर्जिकल स्ट्राईक'चे आदेश दिले आहेत. पोलिसांनी अशा 20 उमेदवारांची आणि समर्थकांची 'लिस्ट' तयार केली असून, त्यांच्यावर 24 तास पाळत ठेवली जाणार आहे. पुण्यातील उमेदवारी वाटपात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची यादी धडकी भरवणारी आहे. पुणे पोलिसांनी तयार केलेल्या यादीत आंदेकर टोळीचे नाव आघाडीवर आहे. प्रभाग 23 मधून निवडणूक लढवणाऱ्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या सध्या 'आयुष्य कोमकर' हत्या प्रकरणात येरवडा कारागृहात आहेत. विशेष म्हणजे, टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने हातात बेड्या असतानाच उमेदवारी अर्ज दाखल केला. या सर्वांवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मारणे आणि कोमकर: कुख्यात गुंड गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे आणि गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकर यांनाही उमेदवारी मिळाल्याने पुण्याचे राजकारण गुन्हेगारांच्या हाती जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीने प्रभाग 39 मधून बापू नायर (हत्या आणि खंडणीचे गुन्हे) यालाही मैदानात उतरवले आहे. फडणवीसांच्या टेबलावर 20 जणांची यादी गुन्हेगारांच्या या राजकीय घुसखोरीची गंभीर दखल घेत पुणे शहर पोलिसांनी 20 जणांची एक गोपनीय यादी तयार करून ती थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली आहे. या उमेदवारांकडून मतदारांना धमकावणे, पैशांचा वापर करणे किंवा दहशत निर्माण करणे असे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी एक विशेष 'निरीक्षण समिती' स्थापन केली आहे. २० उमेदवार आणि त्यांचे समर्थक प्रचारादरम्यान काय करतात, यावर पोलिसांची 'घारीसारखी नजर' असणार आहे. पिंपरीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे 34 उमेदवार रिंगणात केवळ पुणेच नाही, तर पिंपरी-चिंचवडमध्येही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचा सुळसुळाट झाला आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांची आकडेवारी धक्कादायक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांमध्ये भाजपचे 17, राष्ट्रवादी काँग्रेसचे 13, शिवसेनेचे 4 जण आहेत. यात दोन महिला उमेदवारही आहेत.पोलिसांच्या दप्तरी राजकीय गुंड म्हणून नोंद असणारे भाजपचे 8, राष्ट्रवादीचे 7 आणि शिवसेनेच्या 2 जणांचा समावेश आहे. तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 8 पती राजांच्या पत्नी उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.
‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा
पुणे : प्रतिनिधी स्वयंशिस्तीमुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर मर्यादा येत नसून, प्रत्यक्षात आपले रक्षण होत असते. वाहतूक सुरक्षा ही एक सामूहिक जबाबदारी असून, खरे सामर्थ्य वेगात नसून नियंत्रणात असते. हे तरुणांनी समजून घेतले पाहिजे आणि सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे, असे प्रतिपादन पुणे परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी केले. ते एमआयटी […] The post ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महागाव शिवारातील गोदावरी नदीत मजुराचा बुडून मृत्यू
परभणी : प्रतिनिधी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील कळगाव परिसरातील महागाव शिवारातील गोदावरी नदीकाठी दुर्दैवी घटना घडली आहे. दुस-या शेतक-याच्या मदतीसाठी नदीत उतरलेल्या मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव नामदेव विठ्ठलराव कोमटवार (रा. कळगाव) असे असून ते मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कळगाव येथील एका शेतक-याची मोटार पंप गोदावरी नदीच्या पाण्यात बुडाल्याने ती […] The post महागाव शिवारातील गोदावरी नदीत मजुराचा बुडून मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अदखलपात्र गुन्ह्यात (एनसी) कारवाई न करण्यासाठी एका भाजीविक्रेत्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदाराविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. विकास लक्ष्मण ओंबासे (वय ३९) असे गुन्हा दाखल झालेल्या हवालदाराचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सासवड येथील एका भाजीविक्रेत्याने यासंदर्भात एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी हवालदार ओंबासे याने सुरुवातीला दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांना पोलीस हवालदरास लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाखलुपत विरोधी पथकाकडे पोलीस कर्मचारी विरोधात तक्रार दाखल केली . तक्रारदाराने तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रार आल्यावर सासवड पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला. भाजीपाला विक्रेता हवालदाराला पैसे देण्यासाठी गेला असता, हवालदाराने त्याला पोलीस ठाण्यातील एका खोलीत नेले. तेथे त्याने तक्रारदाराची तपासणी केली. लाच प्रकरणात कारवाई होणार असल्याचा संशय आल्याने ओंबासे याने लाच स्वीकारण्यास नकार दिला. लाच स्वीकारली नसली तरी, हवालदाराने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ओंबासे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि पथकाने ही कारवाई केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक आसावरी शेडगे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अकोट आणि अंबरनाथ नगरपरिषदांमध्ये सत्तेसाठी भाजपने अनुक्रमे एमआयएम आणि काँग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या 'विचित्र' समीकरणांवर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणतीही युती चालणार नाही. अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे. ही युती तोडावीच लागेल. ही युती करणाऱ्यांवर कारवाई होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, अकोट आणि अंबरनाथमध्ये भाजपने सत्तेसाठी केलेल्या स्थानिक आघाड्यांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अकोटमध्ये 'एमआयएम' आणि अंबरनाथमध्ये 'काँग्रेस'सोबत भाजपने संसार थाटल्याने विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले आहे. मात्र, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली असून संबंधितांवर कारवाईचा इशारा दिला आहे. नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत तर अंबरनाथमध्ये काँग्रेसशी युती झाल्याने देवेंद्र फडणवीसांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज झाले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एबीपी नेटवर्क'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, स्थानिक पातळीवर काँग्रेस किंवा एमआयएमसोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही. ही युती तत्वशून्य आहे आणि ती होऊच शकत नाही. अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे आणि ती तोडावीच लागेल. स्थानिक नेत्यांनी जरी हा निर्णय घेतला असला, तरी तो पूर्णपणे चुकीचा आहे. ज्याने कोणी ही युती घडवून आणली असेल, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. यासंदर्भात आम्ही आदेश दिले आहेत. अकोटमध्ये 'अजब' विकास मंच! अकोट नगरपरिषदेत सत्तेचा आकडा गाठण्यासाठी भाजपने 'अकोट विकास मंच' स्थापन केला आहे. या आघाडीचे स्वरूप पाहून राजकीय विश्लेषकही चक्रावून गेले आहेत. या मंचमध्ये भारतीय जनता पक्ष, एमआयएम (MIM), शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), प्रहार जनशक्ती (बच्चू कडू) पक्ष एकत्र आले आहेत. या सर्व पक्षांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांकडे या नव्या गटाची अधिकृत नोंदणीही केली आहे. अंबरनाथ नगरपरिषदेतही काँग्रेससोबत हातमिळवणी अकोटमधील घडामोडींप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपरिषदेतही भाजपने वेगळेच राजकीय समीकरण तयार केले आहे. येथे भाजपने थेट काँग्रेससोबत हातमिळवणी करत सत्तेचा मार्ग निवडला आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा नारा देणाऱ्या भाजपकडून काँग्रेससोबत युती होत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, या युतीत शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवण्यात आल्याने शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. भाजप आणि काँग्रेस एकत्र येऊन अंबरनाथ नगरपरिषदेत बहुमत स्थापन करणार असल्याचा दावा केला जात आहे. विरोधकांच्या हाती कोलीत भाजपच्या या स्थानिक प्रयोगांमुळे विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे. भाजप सत्तेसाठी काहीही करू शकते, हे यातून सिद्ध झाले आहे, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या कडक पवित्र्यामुळे आता अकोट आणि अंबरनाथमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
बाणेर मतदारसंघात उमेदवारी नाकारल्याबद्दल भाजपला पश्चाताप झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक ९ मधील उमेदवार अमोल बालवडकर यांनी केला आहे. ते म्हणाले की, मी आधीच घराघरात पोहोचलो होतो. भाजपने ४० हून अधिक नगरसेवकांची तिकिटे कापली, पण त्यांना नंतर कोणी भेटले नाही किंवा सांत्वनही केले नाही. काम करणाऱ्या नेत्यांना जनता निवडून देते, असे मत त्यांनी व्यक्त केले. अमोल बालवडकर यांना भाजपने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने पुणे शहरातील प्रभाग क्रमांक ९ हा सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ बनला आहे. यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, पुणे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष या प्रभागातील निवडणुकीकडे लागले आहे. बालवडकर यांनी सांगितले की, कोथरूड विधानसभा मतदारसंघात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना 'जीवनात मोठे करू' असे आश्वासन दिले होते. मात्र, मनपा निवडणुकीत त्यांनी आपला घात केल्याचा आरोप बालवडकर यांनी केला. पुणे मनपात महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद दिले नसले तरी चालले असते, पण कोणतेही कारण न देता उमेदवारी नाकारणे चुकीचे होते, असे ते म्हणाले. मोठ्या नेत्यांनी आपल्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर शक्तीचा दुरुपयोग केल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले. भाजपने उमेदवारी नाकारताच पाचव्या मिनिटाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला आणि त्यांनीच तिकीट दिले, असे बालवडकर यांनी सांगितले. राजकारणात टिकून राहण्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतात, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाक्य आठवून आपण तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले. अजित पवार यांनीही आपली उमेदवारी कापल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीत आपण इच्छुक उमेदवार असल्याने हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रकांत पाटील आणि आपल्यातील वाद मिटवला असतानाही पुन्हा असे का घडले, असा प्रश्नही अजित पवार यांनी विचारल्याचे बालवडकर यांनी सांगितले. गेल्या दहा वर्षांपासून आपले काम चांगले असल्याचे अजित पवार यांनी मान्य केल्याचेही त्यांनी नमूद केले.
नाशिकमध्ये प्रचारातून राडा:पैसे न मिळाल्याने महिलांत तुफान मारामारी, रोजंदारी बुडाल्याचा आरोप
प्रचारासाठी महिलांना रोजंदारी देऊन विविध भागांत रॅली तसेच दौऱ्यात सहभागी करुन घेतले जात आहे. सिडकोतील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या ६५ महिलांना दुसऱ्या उमेदवाराच्या प्रतिनिधीने जास्त हजेरी देण्याचे आश्वासन दिले. या महिलाही दोन पैसे अधिक मिळतील या अपेक्षेने आधीच्या उमेदवाराचा प्रचार सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्या. मात्र दिवसभर त्यांना एकाच जागी बसून ठेवण्यात आले. दुपारनंतर जाण्यास सांगितले. कोणतीही रोजंदारीही त्यांना न मिळाल्याने त्यांच्यात आणि प्रतिनिधी महिलेत आधी झटापट नंतर मारामारीच झाली. ज्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महिला दिवसभर ताटकळत बसून राहिल्या त्या उमेदवाराने चक्क सायंकाळी फोन बंद केला होता. यातील काही महिलांना अश्रू अनावर झाले. तर काहींनी तीव्र संताप व्यक्त केला. हाताशी आलेले काम सोडून दुसऱ्या उमेदवाराच्या मागे गेलेल्या महिलांना मात्र यातून चांगला धडा मिळाला. अशीही चर्चा दिवसभर रंगली होती. एका उमेदवाराचा प्रचाराला बोलविले. असता दुसराच उमेदवार घेवून गेला. मात्र तिथे हजेरी न मिळाल्याने त्या महिलांचे ३० हजारांचे नुकसान झाले. हा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहचला. मात्र, महिलांनी संबंधितांविरेधात तक्रार न दिल्याने पोलिसांसमोरही पेच निर्माण झाला होता. मतदारांनाच वाटण्यासाठी मागविण्यात आलेला मद्य साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने सापगाव शिवार त्र्यंबकेश्वर येथे जप्त केला. कारसह १७ लाख ६ हजारांचा हा मुद्देमाल असून हे मद्य दादरानगर हवेली निर्मित आहे. कारचालक हार्दीक प्रवीणभाई दप्तरी, भावेश अरुणभाई रणपुरा (दोघे रा. अहमदाबाद) असे तस्करांचे नाव आहे. अधीक्षक संतोष झगडे यांनी माहिती दिली.मनपा निवडणूकीत मतदारांना वाटप करण्याकरीता दादरा नगर हवेली निर्मित मद्याची मागणी होत आहे. इच्छुकांकडून मतदारांना वाटप करण्याकरीता मद्य मागवले जात आहे. मद्य तस्करांकडून खासगी कारमधून मद्य पुरवठा केला जात असल्याचे समजले. पथकाने सिमेवर गस्त वाढवली. सापगाव पोस्टवर विभागाचे ड पथक गस्त करत असतांना जीजे ०५ आरक्यू ७०१८ कार थांबवण्यात आली. कारची झडती घेतली असता सीट खाली ६६ बिअर बॉक्स मिळून आले. एन. एच. गोसावी, आर. एन. सोनार, एस. आर.इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. फार्म हाऊसमध्ये येणार होते मद्य त्र्यंबकेश्वरमधील एका फार्म हाऊसमध्ये हा साठा उतरवला जाणार होता. मात्र कुणाकडे याबाबत माहिती नसल्याचे दोघा तस्करांनी पथकाच्या चौकशीत सांगीतले. विभागाकडून कसून तपासणी सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आधीच तापलेलं असताना, राष्ट्रवादी काँग्रेस या अजित पवार यांच्या पक्षाला धक्का देणारी गंभीर घटना समोर आली आहे. शहरातील वार्ड क्रमांक 16 मधील कैलास नगर परिसरात असलेल्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात अज्ञात व्यक्तीने आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी 7 जानेवारी रोजी पहाटे सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, निवडणूक प्रचाराच्या काळात घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कैलास नगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर उभारलेल्या मंडपाला अज्ञात व्यक्तीने आग लावण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी परिसरात काही कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. त्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत आग वाढण्यापूर्वीच ती आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जर आग भडकली असती, तर कार्यालयातील साहित्य, प्रचार सामग्री तसेच आजूबाजूच्या वस्त्यांनाही धोका निर्माण झाला असता, अशी चर्चा स्थानिकांमध्ये होत आहे. या घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी, प्रचार कार्यालयाला लक्ष्य करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर सोनवणे यांचा प्रचार सध्या जोरात सुरू असून, त्यांच्या प्रचार यंत्रणेवर थेट हल्ला करण्याचा हा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक जशी जवळ येत आहे, तसतसे विरोधकांकडून दबाव वाढत असल्याचा आरोपही काही कार्यकर्त्यांनी केला आहे. घटनेनंतर तातडीने जिंसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, संपूर्ण परिसरातील तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज उपलब्ध झाले असून, त्याच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आग लावण्यामागचा नेमका उद्देश काय होता, ही घटना राजकीय वैरातून घडली की इतर कोणता हेतू होता, याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणामुळे निवडणूक काळातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रचार कार्यालये, मंडप, बॅनर आणि प्रचार साहित्य यावर यापूर्वीही विविध ठिकाणी हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, थेट आग लावण्याचा प्रयत्न झाल्याने ही घटना अधिक गंभीर मानली जात आहे. स्थानिक नागरिकांनीही अशा प्रकारांबाबत चिंता व्यक्त करत, निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. हा लोकशाहीवरच हल्ला दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. लोकशाही मार्गाने लढवायच्या निवडणुकीत हिंसक प्रकारांना कोणताही स्थान नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रचार कार्यालय जाळण्याचा किंवा कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न हा लोकशाहीवरच हल्ला असल्याचं मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहावं पोलिस तपास सुरू असताना, संपूर्ण शहरात या घटनेची चर्चा रंगली आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अशा घटना घडल्यास वातावरण अधिकच तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात प्रचारादरम्यान सर्वच पक्षांनी संयम राखावा आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहावं, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो आणि दोषी कोण ठरतात, याकडे आता संपूर्ण छत्रपती संभाजीनगरचे लक्ष लागले आहे.
नाशिक दौऱ्यावर असलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शंखनाद केला. यावेळी त्यांनी अंबरनाथ आणि अकोटमधील भाजपच्या 'अजब' युतीवर आपली भूमिका स्पष्ट करत भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. अकोटमध्ये एमआयएम आणि अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत भाजपने युती का केली? याचे उत्तर भाजपचे नेतेच अधिक विस्तृतपणे देऊ शकतील. तो त्यांचा प्रश्न आहे. आमचा काँग्रेसला विरोध होता, आहे आणि पुढेही तीव्र राहील, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. एका बाजूला भाजप देशभर काँग्रेसविरोधी आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी विरोधी विचारधारांच्या पक्षांशी थेट हातमिळवणी केली जात असल्याचे समोर आले. अंबरनामध्ये भाजपने शिवसेना शिंदे गटासोबत सत्ता स्थापन करणे अपेक्षित होते. पण भाजपने शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवून काँग्रेससोबत हातमिळवणी केली. तर अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये एमआयएमशी आघाडी केली आहे. या घडामोडींमुळे पार्टी विथ डिफरन्स, अशी स्वतःची ओळख सांगणाऱ्या भाजपने सत्तेसाठी आपल्या राजकीय तत्त्वांनाच मुरड घातली आहे का? असा सवाल पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नेमके काय म्हणाले श्रीकांत शिंदे? अंबरनाथमध्ये भाजपने शिवसेनेला (शिंदे गट) बाजूला ठेवून काँग्रेसशी युती केली, तर अकोटमध्ये 'एमआयएम'शी जुळवून घेतले. या प्रश्नावर श्रीकांत शिंदे यांनी भाजपला आरसा दाखवला. अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत आणि अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत युती केली असेल, तर हा प्रश्न भारतीय जनता पार्टीचा आहे. यासंदर्भात भाजपच्या नेत्यांना विचारणा केल्यास, ते चांगल्याप्रकारे विस्तृत स्वरुपात उत्तर देऊ शकतील. आम्ही नेहमीच काँग्रेसला विरोध करत आलेलो आहे. या सगळ्या वृत्तींच्या विरोधातच एकनाथ शिंदे यांनी उठाव केला होता. बाळासाहेबांनी देखील काँग्रेसविरोधात नेहमीच बंड पुकारले होते. आज असे होत असेल, तर त्याचे उत्तर आमच्यापेक्षा भाजप चांगल्या प्रकारे देऊ शकते. पण आमचा काँग्रेसला विरोध होता आणि पुढेही तीव्र विरोध राहील, असे श्रीकांत शिंदे म्हणालेत. ज्या विचारांविरुद्ध लढलो, त्यांच्याशी हातमिळवणी? श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या मूळ विचारांची आठवण करून देत भाजपला टोला लगावला. ते म्हणाले. केंद्रामध्ये महायुती आहे. राज्यातही महायुती आहे. नगरपालिका निवडणुकीतही महायुतीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आल्या आहेत. महानगरपालिकेतही बहुतांश ठिकाणी महायुतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत कोणाबरोबर सत्ता स्थापन करत आहेत? ज्या विचारांच्या विरोधात आपण लढलो, अशा लोकांबरोबर सत्ता स्थापन कुणी करत असेल, तर हा त्यांचा प्रश्न आहे. याबद्दल त्यांनाच विचारले पाहिजे. कारण मी कुणाबरोबर तशी युती किंवा आघाडी केली नाही. मनपा निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळेल नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात चांगला स्ट्राईक रेट शिवसेनेला राहिलेला आहे. नगरपालिका निवडणुकांत पूर्ण महाराष्ट्रात ६४ जागांवर शिवसेनेचा नगराध्यक्ष बसलेला आहे. शिवसेना ६४ ठिकाणी नगराध्यक्ष बसवले, अशी कुणीही अपेक्षा केली नव्हती. पण लोकांचे आशीर्वाद आणि एकनाथ शिंदेंवरील लोकांच्या प्रेमापोटी हे शक्य झाले. जिथे शिवसेनेची ताकद नव्हती, तिथेही शिवसेनेचा नगराध्यक्ष बसलेला आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्येही त्यापेक्षा मोठे यश मिळेल, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपला महत्त्वाकांक्षी जाहीरनामा प्रसिद्ध करत शहराच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडला आहे. महिलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत, पायाभूत सुविधांपासून पर्यावरण संरक्षणापर्यंत अनेक मुद्द्यांचा समावेश असलेल्या या जाहीरनाम्यामुळे महापालिका निवडणुकीतील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं दिसत आहेत. कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीरनामा अधिकृतपणे सादर करण्यात आला. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांनी आणि उमेदवारांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेत जाहीरनामा विधिवत पूजा करून अंबाबाई चरणी अर्पण केला. या वेळी उपस्थित नेत्यांनी जाहीरनाम्याला धार्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान देत कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घेण्याचा प्रयत्न केला. शाहू छत्रपती महाराज आणि आमदार सतेज पाटील यांनी अंबाबाईच्या चरणी जाहीरनामा अर्पण करत शहराच्या प्रगतीसाठी आशीर्वाद मागितले. काँग्रेसचे सर्व उमेदवार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. हा जाहीरनामा केवळ आश्वासनांचा दस्तऐवज नसून, कोल्हापूरच्या इतिहास, संस्कृती आणि नागरिकांच्या गरजांचा विचार करून तयार करण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. जाहीरनामा तयार करताना आमदार सतेज पाटील यांनी थेट रस्त्यावर उतरून शहरवासीयांशी संवाद साधला होता. ‘कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं’ या टॅगलाईनखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान विविध प्रभागांमध्ये नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांचा अभ्यास करण्यात आला. वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि स्वच्छता अशा विविध विषयांवर नागरिकांनी मोकळेपणाने मते मांडली. या चर्चांमधून मिळालेल्या मुद्द्यांचा थेट समावेश जाहीरनाम्यात करण्यात आल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर दिलासा देणाऱ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महिलांना आणि विद्यार्थ्यांना केएमटी बसमधून संपूर्ण मोफत प्रवास देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील दोन लाख 60 हजार महिलांसाठी ‘आरोग्य कवच’ योजना राबवली जाणार आहे. अचानक उद्भवणाऱ्या अति गंभीर आजारांवर तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी दहा हजार रुपयांची त्वरित मदत देण्याचं आश्वासनही जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. महिलांच्या सुरक्षितता आणि सोयीसाठी शहरात फिरती ‘पिंक’ स्वच्छतागृहे उभारली जाणार असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. शहराच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर काँग्रेसने विशेष भर दिला आहे. कोल्हापूर शहरातील सर्व रस्त्यांचे थर्ड पार्टीकडून दर्जात्मक ऑडिट करून उत्तम दर्जाचे रस्ते तयार केले जातील, असा दावा करण्यात आला आहे. वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून शहरांतर्गत उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय जाहीरनाम्यात नमूद आहे. अमृत योजनेची अंमलबजावणी वेगाने पूर्ण करून नागरिकांना 24 तास शुद्ध पाणीपुरवठा करण्याचं उद्दिष्ट काँग्रेसने मांडलं आहे. यासोबतच शहरातील 10 ठिकाणी सुमारे 7 हजार वाहनं पार्क होतील अशी पार्किंग व्यवस्था उभारण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. पर्यावरण आणि शाश्वत विकासाचाही जाहीरनाम्यात विशेष उल्लेख करण्यात आला आहे. पंचगंगा नदीमध्ये मिसळणारे सांडपाणी पूर्णपणे थांबवून नदी प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे. शहरातील मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून ‘ऑक्सिजन पार्क’ उभारले जातील. झोपडपट्टी हा शब्दच कोल्हापूरमधून पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जाईल, असं आश्वासन देत सर्वांसाठी सन्मानजनक निवासाची हमी देण्याचा संकल्प मांडण्यात आला आहे. फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र ‘हॉकर्स झोन’ तयार करून त्यांना सन्मानाने व्यवसाय करता येईल, असंही जाहीरनाम्यात नमूद आहे. कोल्हापूर विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज आर्थिक विकास, रोजगारनिर्मिती आणि सांस्कृतिक जतन यावरही काँग्रेसने भर दिला आहे. कोल्हापूर शहरात अधिकाधिक आयटी कंपन्या याव्यात यासाठी करांमध्ये विशेष सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. लोकप्रिय खेळांसाठी स्वतंत्र मैदाने उभारली जाणार असून, शहराच्या सुनियोजित विकासासाठी महापालिकेची हद्दवाढ करण्याचा विचार मांडण्यात आला आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन पूर्ण केला जाईल, असा शब्द देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती राजाराम महाराज’ असे करण्याचा ठाम निर्धार जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी ‘टक्केवारी संस्कृती’ मुळापासून नष्ट करण्याचं आश्वासन देत काँग्रेसने कोल्हापूरकरांसमोर विकासाचा आक्रमक आणि व्यापक अजेंडा मांडला आहे.
दोन वर्षांच्या चिमुकल्यासह पित्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्याकेल्याची धक्कादायक घटना नांदेडजिल्ह्यातील दहेली (ता. किनवट)परिसरात उघडकीस आली आहे.विक्रम सुरेश मारशेटवार (३०)आणि शिवाजी विक्रम मारशेटवार(२) असे मृत बापलेकांची नावेआहेत. ही घटना ५ जानेवारी रोजीसायंकाळी ६ ते ६ रोजी सकाळी ६वाजेदरम्यान घडली. घटनेमागीलकारण स्पष्ट झाले नाही. दहेली येथील रहिवासी विक्रममारशेटवार यांनी आपल्या मुलासहपरिसरातील राजेश दिसलवार यांच्याशेतातील विहिरीत उडी घेऊनजीवनयात्रा संपवली. सकाळीघटनेची माहिती समोर येताचपरिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी सिंदखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन दहेलीतांडा येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात मंळवारी दुपारी करण्यातआले. हे शवविच्छेदन उमरी बाजारयेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.पुरुषोत्तम आईटवार यांनी केले.शवविच्छेदनानंतर दोन्ही पार्थिवनातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.त्यानंतर शोकाकुल वातावरणातअंत्यसंस्कार झाले. मृत विक्रममारशेटवार यांच्या पश्चात आई,पत्नी, व दोन भाऊ असा परिवार आहे. दोन वर्षांच्या चिमुकल्यासह पित्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या अकस्मातमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तपासात या घटनेचे कारण स्पष्टहोईल, असे सहायक पोलिसनिरीक्षक रमेश जाधवर म्हणाले. इनसाइड स्टोरी: पत्नी गेली होती माहेरी विक्रम मारशेटवार हे गावातच शेतीकरत होते. काही दिवसांपासून विक्रम यांची पत्नी माहेरी राहत होती,अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.त्यांची पत्नी माहेरी का गेली होती हेस्पष्ट झालेले नाही.
चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
रेणापूर : प्रतिनिधी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोमवार दि. ५ रोजी लातूर येथे लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा रेणापूर शहर कॉग्रेसच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर निषेध करीत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात आले. लोकनेते विलासराव देशमुख हे सर्वसमावेशक विकास, सामाजिक सलोखा व जनतेशी नाळ […] The post चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चव्हाण यांच्या छायाचित्रास जोडे मारो आंदोलन
लातूर : प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवीद्र चव्हाण यांनी लातूर येथे भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना लोकनेते विलासराव देशमुख यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत. लातूर तालुका काँग्रेसच्या वतीने मुरुड अकोला येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. मुरूड अकोला येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत रवींद्र चव्हाण यांच्या फोटोला जोडे मारून आपल्या […] The post चव्हाण यांच्या छायाचित्रास जोडे मारो आंदोलन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच दुसरीकडे प्रचाराच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा थेट संघर्ष दिसून येत आहे. भाजप नेत्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी केलेल्या आरोपांची आठवण करून दिली जात असून, त्यामुळे सत्तेत असूनही मित्र पक्षांमधील तणाव उघडपणे समोर येत आहे. विशेषतः पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने ‘मिशन 125’ चा नारा दिला असताना अजित पवार यांची भूमिका भाजपसाठी मोठं आव्हान ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपकडून पुणे महापालिकेत 125 जागा जिंकण्याचं लक्ष्य जाहीर करण्यात आलं आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक वाढवत युतीची दिशा बदलल्यामुळे भाजपच्या या महत्त्वाकांक्षी लक्ष्याला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सत्तेत एकत्र असतानाही प्रचारात राष्ट्रवादी आणि भाजप आमनेसामने आल्याचं चित्र दिसत असून, याचा थेट परिणाम मतदारांवर होण्याची भीती भाजपच्या गोटात व्यक्त केली जात आहे. खासगी तसेच शासकीय सर्व्हेंमध्येही भाजपला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे संकेत मिळत असल्यामुळे पक्षातील अस्वस्थता वाढली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे 2500 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, उमेदवारी जाहीर करताना पक्षाने अनेक जुने, निष्ठावंत कार्यकर्ते डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली. याच निर्णयामुळे पक्षात नाराजीचा सूर उमटला. नाराज नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तिथून उमेदवारी मिळवली आणि निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. परिणामी भाजपसमोरच भाजपचे माजी नेते उभे ठाकल्याने ‘मिशन 125’ धोक्यात येण्याची शक्यता सर्व्हेंमध्ये व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ नेत्यांना चांगलेच फटकारल्याची चर्चा या घडामोडींची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. प्रचारासाठी पुण्यात आले असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना चांगलेच फटकारल्याची चर्चा आहे. सोमवारी रात्री कात्रज येथे झालेल्या जाहीर सभेत फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. सत्तेत असूनही राष्ट्रवादीकडून होत असलेल्या हालचालींमुळे भाजपला होणाऱ्या नुकसानीचा सूर या भाषणांतून स्पष्ट दिसून आला. बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा मात्र, खरी राजकीय खलबतं सभा संपल्यानंतर रंगली. मुख्यमंत्री फडणवीस विमानतळाकडे रवाना होत असताना त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील हे एकाच वाहनातून प्रवास करत होते. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री गाडीत बसल्यानंतर चंद्रकांत पाटील तेथे पोहोचले आणि त्यांच्या उपस्थितीनंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः मोहोळ यांना बोलावून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर तिघेही नेते विमानतळावर पोहोचले आणि बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे. तातडीने राजकीय व्यूहरचना बदलण्याचे आदेश या बंद दाराआड झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी पुणे महापालिकेतील 165 जागांचा सविस्तर आढावा घेतल्याचं सांगितलं जात आहे. ज्या प्रभागांमध्ये भाजपची स्थिती कमकुवत आहे किंवा जिथे खासगी व शासकीय सर्व्हेंमध्ये विरोधकांचा कौल दिसून येत आहे, त्या ठिकाणी तातडीने राजकीय व्यूहरचना बदलण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. स्थानिक पातळीवर समन्वय वाढवणे, नाराज नेत्यांना पुन्हा सक्रिय करणे आणि बंडखोरी रोखण्यासाठी कठोर निर्णय घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्याची चर्चा आहे. पुण्यातील काही बड्या नेत्यांची शाळा दरम्यान, भाजपने महापालिका निवडणुकीत किमान 120 नगरसेवक निवडून आणण्याचं उद्दिष्ट ठेवले असले, तरी निष्ठावंतांना डावलून ‘आयात’ उमेदवारांना संधी दिल्यामुळे काही प्रभागांतील जागा धोक्यात आल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील काही बड्या नेत्यांची ‘शाळा’ घेतल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. धोकादायक जागांकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देत, प्रचार आणि संघटन या दोन्ही आघाड्यांवर कसून काम करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुण्यात भाजपची रणनिती अधिक आक्रमक आणि बदललेली पाहायला मिळणार, अशीच चिन्हं सध्या दिसून येत आहेत.
महाराष्ट्रात अर्धी काँग्रेस भाजपात सहभागी करुन घेतली. उर्वरित ठिकाणी एमआयएम बरोबर युती केली. भाजपला कोणीही चालते. महाराष्ट्रभर भाजप-एमआयएमची छुपी युती आहे. जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजप तयार आहे. अशी टीका राऊत यांनी केली. तसेच एमआयएमशी युती करताना ते आता हिरवे झाले नाहीत का? असा बोचरा सवालही राऊत यांनी भाजपला केला आहे. मिराभाईंदर आणि अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली आहे. तर अंबरनाथ नगरपरिषदमध्ये काँग्रससोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. यावरून संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जिव्हारी लागणाऱ्या शब्दांत टीका केली आहे. तसेच अजित पवार सावरकरांना मानत नाहीत, तर मग त्यांना सरकारमध्ये कशाला ठेवता? त्यांना सरकारमधून दूर करा, असे आव्हानही संजय राऊत यांनी भाजपला दिले. आता भाजप 'हिरवी' झाली नाही का? - युतीवरून निशाणा अंबरनाथ आणि मिरा-भाईंदरमधील राजकीय घडामोडींचा दाखला देत राऊत यांनी भाजपच्या 'हिंदुत्वा'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मिरा-भाईंदरमध्ये भाजपने एमआयएमला (MIM) पाठिंबा दिला आहे, तर अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहेत. आता हे हिरवे झाले नाहीत का? अकोटपासून मिरा-भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत उघड-गुप्त युती सुरू आहे. हा निर्लज्जपणाचा कळस असून भाजप हे 'दुतोंडी गांडूळ' आहे, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली. मराठी माणसाचे 'डेथ वॉरंट' मराठी माणसाच्याच हाती? संजय राऊत यांनी भाजपच्या रणनीतीवर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, भाजपने निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था आणि प्रशासनात जे अधिकारी नेमले आहेत, ते मराठीच आहेत. विशेष म्हणजे, मराठी माणसाच्या हातूनच मराठी माणसाचे 'डेथ वॉरंट' काढले जात आहे, ही भाजपची मोठी कसब आहे. प्रशासनाचा खेळखंडोबा राज्यातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या राज्याचा कारभार वाऱ्यावर सोडून प्रचारासाठी राज्यभर फिरत आहेत. दुसरीकडे अजित पवार भाजपला शिव्या घालत आहेत आणि तरीही सत्तेत एकत्र आहेत, हा प्रकार संतापजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. ठाकरे बंधुंची संयुक्त मुलाखत महाराष्ट्राची शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पहिल्यावहिल्या संयुक्त मुलाखतीचा टीझर समोर आला. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ऐतिहासिक मुलाखत घडताना कशी दिसतीये ते आपण काल पाहिले. प्रथम संयुक्त मुलाखतीला सर्व पत्रकारांना बसवले होते. मुलाखत देणारे आणि मुलाखत घेणारे दोन धुरंदर एकत्र आले. महाराष्ट्राच्या दृष्टीने तिला आम्ही महाराष्ट्राची मुलाखत म्हटले आहे. महाराष्ट्राला जे प्रश्न पडलेत आणि महाराष्ट्रासंदर्भात ज्या समस्या आहेत, त्या सर्व विषयांवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपली मते व्यक्त केली. मुंबई आपल्या हातची गेली, तर आपल्या पुढील पिढ्या बरबाद होतील. आता नाही, तर कधीच नाही, असे ठाकरे बंधुंनी सांगितल्याचे संजय राऊत म्हणालेत.
सातारा येथे झालेल्या शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात चार दिवसात साताऱ्यासह अन्य राज्यातून १० लाख साहित्यप्रेमींनी उपस्थिती दाखविली. परिसंवाद, चर्चा आदी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावरून १५० साहित्यीकांना तर कवी कट्टा व मुख्य व्यासपीठावर ५५० कवींना व्यासपीठ मिळाले. मोठे आकर्षण असलेल्या पुरस्तक प्रदर्शनासाठी पहिल्यांदाच ४० कोटीचा विमा उतरविला गेला. आठ कोटी ७२ लाखांची पुस्तकविक्री झाल्याची माहिती महामंडळाने दिली. पुस्तक खरेदासाठी येणाऱ्या साहित्यरसिकांचा २५ कोटींचा तर फर्निचर आणि इतर साहित्याचा चार कोटी ३० लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला होता. संमेलनाच्या मुख्य मंडपात जाण्याचा मार्ग ग्रंथ दालनातूनच ठेवण्यात आल्यामुळे संमेलनास येणारा प्रत्येकजण ग्रंथ दालनातूनच जात-येत होता. त्यामुळे पुस्तक विक्रिला प्रतिसाद मिळाल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. आठ कोटी ७२ लाखांची पुस्तक विक्री झाल्याची माहिती महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी दिली. मुख्य मंडपासह परिसंवाद-परिचर्चेसाठी उभारलेला दुसरा मंडप तसेच बाल-कुमार वाचककट्टा, गझल-कवी कट्टा, पुस्तक प्रकाशन मंच येथे चारही दिवस उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. १५० साहित्यिक व्यासपीठावरून भूमिका मांडू शकले. विविध विषयांच्या ३ लाख पुस्तकांचा समावेश पुस्तक प्रदर्शनात समिक्षा, ऐतिहासिक, वैचारिक, धार्मिक, बालसाहित्य अशा सर्वच प्रकारच्या पुस्तकांची विक्री या पुस्तक प्रदर्शनात झाली. यावर्षी साधारण ३ लाख पुस्तकांची विक्री झाली असून किमान ५०० रुपयेपासून ते ५० रुपये किंमतीची पुस्तकांची सरासरी किंमत काढली तरी जवळपास ९ कोटींची पुस्तक विक्री झाली आहे, अशी माहिती महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांनी दिली. विद्यार्थी, साहित्य रसिकांचा मोठा प्रतिसाद- विनोद कुलकर्णी, (कार्याध्यक्ष, साहित्य महामंडळ) सातारा नगरीला जशी ऐतिहासिक परंपरा आहे, त्याप्रमाणे सातारा शहर आणि जिल्ह्यात साहित्यप्रेमी, वाचक मोठ्या संख्येने आहेत. शतकपूर्व संमेलन साहित्य प्रेमींच्या सहभागातून व्हावे यासाठी जे सुरुवातीपासून प्रयत्न सुरू होते ते विद्यार्थी, साहित्य रसिकांचा मिळालेला प्रतिसाद बघता यशस्वी ठरले आहेत. सातारा येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात पुस्तक खरेदीसाठी अशी गर्दी झाली होती.
आखाडा बाळापूर ते बोल्डा मार्गावर पेठवडगाव शिवारात अवैधरित्या मुरुम वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल व पोलिस विभागाच्या पथकाने पकडले असून या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. ७ तक्रार देण्यात आली आहे. सदर ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात उभे करण्यात आले आहे. हिंगोली जिल्हयात अवैधरित्या गौणखनीज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधिक्षक निलभ रोहन यांनी महसूल व पोलिस विभागाची पथके सक्रिय केली असून या पथकाकडून दररोज रात्रीच्या वेळी व पहाटे वाळू घाटांवर जाऊन तपासणी केली जात आहे. मंगळवारी ता. ६ सेनगाव पोलिसांनी पूर्णा नदीच्या पात्रातून एका पोकलॅनसह, २०० ब्रास रेती, १५० ब्रास मुरुम असा सुमारे ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील पेठवडगाव शिवारातून मुरुम उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यावरून उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी स्वतंत्र पथक स्थापन केले. यापथकातील मंडळ अधिकारी आनंद काकडे, ग्राम महसूल अधिकारी विशाल पतंगे, एकनाथ कदम, पोलिस कर्मचारी पिराजी बेले यांच्या पथकाने मंगळवारी ता. ६ मध्यरात्री वाहनांची तपासणी सुरु केली. यावेळी पेठवडगाव शिवारात एक ट्रॅक्टर थांबविले असता त्यात मुरुम आढळून आला. पथकाने ट्रॅक्टर चालक अक्षय चन्ने याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर या पथकाने ट्रॅक्टर व मुरुम असा सुमारे ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चालक अक्षय याच्या विरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे नावाचा दरारा आजही तितकाच प्रभावी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्यातील युतीनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पहिल्यावहिल्या संयुक्त मुलाखतीचा टीझर समोर आला असून, या एका व्हिडीओनं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि प्रसिद्ध सिनेनिर्माते, दिग्दर्शक व अभिनेता महेश मांजरेकर यांनी घेतलेली ही मुलाखत राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण या मुलाखतीत ठाकरे बंधूंनी सत्ताधाऱ्यांवर, विशेषतः भाजपवर केलेला थेट आणि आक्रमक हल्ला पाहता आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट करणारी ही चर्चा ठरण्याची शक्यता आहे. या मुलाखतीच्या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या मानसिकतेवर जोरदार प्रहार केला आहे. राज्यकर्त्याचे प्रेम हे राज्यावर असले पाहिजे, सत्तेवर असता कामा नये, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट संदेश दिला. या एका वाक्यातूनच सध्याच्या सत्तास्थापनेवर त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येते. सत्ता टिकवण्यासाठी राज्याच्या हिताकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप अप्रत्यक्षपणे त्यांनी केला आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांच्या वक्तव्यांना वेगळंच राजकीय वजन प्राप्त झालं असून, हा टीझर म्हणजे संपूर्ण मुलाखतीचा केवळ एक झलक असल्याचं स्पष्ट होतं. दुसरीकडे, राज ठाकरे यांनीही या मुलाखतीत तितक्याच आक्रमक शैलीत भाजपवर निशाणा साधला आहे. विशेषतः भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट घणाघात केला. फडणवीसांनी करप्शनवर काही बोलूच नये, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या नैतिक अधिकारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. फडणवीसांनी यापूर्वी ठाकरे युतीला करप्शन आणि कन्फ्यूजनची युती असं संबोधलं होतं. त्याच वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर ठाकरे बंधू काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. टीझर साधारण 1 मिनिट 40 सेकंदांचा असून, त्याची सुरुवातच अतिशय ठळक आणि लक्षवेधी मथळ्याने होते. संयुक्त मुलाखत, हे शब्द पडद्यावर झळकताच, ही चर्चा किती ऐतिहासिक आहे, याची जाणीव प्रेक्षकांना होते. संजय राऊत यांनी विचारलेला “महाराष्ट्राला हे चित्र पाहण्यासाठी 20 वर्षं वाट का पाहावी लागली?” हा प्रश्नच अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतो. कारण याच प्रश्नातून ठाकरे बंधूंच्या विभाजनापासून ते पुन्हा एकत्र येईपर्यंतचा संपूर्ण राजकीय प्रवास अधोरेखित होतो. या प्रश्नावर त्यांनी नेमकं काय उत्तर दिलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता राज्यभर निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांनी याच टीझरमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राच्या भवितव्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठीचा खटाटोप सुरू आहे, असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या राजकीय खेळीवर थेट बोट ठेवलं आहे. हा आरोप केवळ राजकीय टीका नसून, तो महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडलेला असल्यामुळे अधिक तीव्र ठरतो. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीबाबत असे प्रयोग सुरू असल्याचा दावा त्यांनी केल्यामुळे या मुद्द्यावर नव्याने राजकीय संघर्ष उभा राहण्याची चिन्हं दिसत आहेत. मनसे-शिवसेना ठाकरे गट युतीनंतर हा मुद्दा अधिक आक्रमकपणे मांडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनीही एक सामान्य मुंबईकर म्हणून शहराची वस्तुस्थिती ठाकरे बंधूंसमोर मांडली आहे. मुंबईकर म्हणून घराबाहेर पडताना लाज वाटते, असं म्हणत त्यांनी शहराच्या विद्यमान अवस्थेवर प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी, मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला, असं सांगितलं आहे. मात्र, हे नेमकं कसं घडलं, त्यासाठी कोण जबाबदार आहे आणि पुढील काळात काय बदल अपेक्षित आहेत, याचं सविस्तर विश्लेषण संपूर्ण मुलाखतीत पाहायला मिळणार आहे. या संवादामुळे मुंबईच्या प्रश्नांवर ठाकरे बंधूंची भूमिका अधिक ठळकपणे समोर येणार आहे. ठाकरे बंधू नेमकं काय बोलणार? याची उत्सुकता शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेली ही पहिलीच संयुक्त मुलाखत असल्यामुळे तिचं राजकीय महत्त्व अनन्यसाधारण आहे. भाजपकडून होणाऱ्या टीकेला ठाकरे बंधू कसं प्रत्युत्तर देतात, तसेच आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काय असेल, याचे संकेत या चर्चेतून मिळणार आहेत. या टीझरने आधीच राजकीय वातावरण तापवलं असून, संपूर्ण मुलाखत 8 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ठाकरे बंधू नेमकं काय बोलणार? याची उत्सुकता आता केवळ समर्थकांपुरती मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे.
प्रतिनिधी | अमरावती महानगर पालिका निवडणुकीच्या प्रचारात दिवसेंदिवस रंगत चढत आहे. आपआपल्या पक्षाचे उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी पक्षाचे मोठे नेते मेहनत घेत आहेत. दरम्यान बुधवारी (दि. ७) शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, भाजपाचे महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शहरात येणार आहेत. या नेत्यांचे दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील नेहरु मैदानात दुपारी १२ वाजता जाहीर सभा होणार आहे. त्या सभेसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तसेच सायंकाळी साडेचार वाजता हॉटेल ग्रॅन्ड महफिल येथे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावकुळे यांची साडेचार वाजता प्रबुध्द सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आशियाड चौक, विलासनगर, श्री संत कंवरनगर चौक, रविनगर आणि बडनेरा नवीवस्ती आठवडी बाजार मैदानात जाहीर सभा होणार आहे. बुधवारी सकाळी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शहरात येणार आहे. ते मनपा निवडणुकीसंदर्भात कॉँग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत, तसेच सकाळी अकरा वाजता प्रसार माध्यमांच्या प्रतिनिंधीसोबत संवाद साधणार आहेत. या नेत्यांचे दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये जाहीर सभा अन् बैठकाही घेतल्या जाणार आहेत.
मोबाइल व पैसे घेतल्याच्या संशयातून मित्रांनीच एका मित्राला डोंगरावर नेत गळा चिरून हत्या केली. त्याआधी त्यांनी त्याच्या पायाला सिगारेटचे चटके दिले, डोळ्यांना पट्टी बांधून मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (६ जानेवारी) सकाळी ६ वाजेच्या सुमारास जटवाडा परिसरातील ऊर्जा भूमी येथील डोंगरात घडला. प्रकरणी सय्यद सिराज अली सय्यद नसेर अली ऊर्फ मोठा सिराज यास अटक केली, तर छावणी ठाण्यात त्याच्यासह छोटा सिराज, जब्बार, कबीर व अन्य एक अशा एकूण ५ जणांवर गुन्हा दाखल केला. शकील आरेफ शेख (३०, रा. फुलेनगर) असे मृताचे नाव आहे. मृताचा भाऊ सलमान आरेफ शेख याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात आरोपी सिराजने शकील धमकी दिली होती. दिवसभर चालला पोलिस हद्दीचा वाद हत्या झालेले ठिकाण हे दौलताबाद व छावणी पोलिस या दोघांच्या परिसरात आहे. दौलताबाद पोलिसांच्या पथकाने प्राथमिक बाबींची पूर्तता करून मृतदेह घाटीत नेला. मात्र त्यानंतर गुन्हा दाखलसाठी पोलिसांतील हद्दीचा वाद सुरू झाला. दिवसभर रंगलेल्या या वादानंतर वरिष्ठांच्या आदेशाने छावणी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हद्दीचा वाद आणि तपासाचे निकष मृतदेहाचे डोके ज्या हद्दीत, त्या ठाण्याकडे तपास जातो. शरीराचा जास्त भाग, नाभी, रक्ताचे डाग आणि संघर्षाच्या खुणा ज्या हद्दीत जास्त, तेथेच गुन्हा नोंदवून तपासाचा अंतिम निर्णय घेतात. इनसाइड स्टोरी: आठवडाभर प्लॅन करून केली हत्या आठवडाभरापूर्वी आरोपी सिराजने आरेफच्या आईला फोन केल्यापासून त्यांच्यात वादाची ठिणगी पडलेली होती. तेव्हापासून उर्वरित आरोपींनी त्यास मारण्याची तयारी सुरू केली . ४ जानेवारी रोजी आरोपीने त्यास पार्टीसाठी जटवाडा परिसरात नेले. तेथे नशा केली. त्यानंतर वाद होत त्यांनी आरेफला चटके देत अखेर त्याची गळा चिरून हत्या केली.
ईव्हीएम प्रशिक्षणात मशीनबाबत दिल्या महत्त्वपूर्ण सूचना:निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यावर भर
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित व कार्यक्षमरित्या राबवण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी ६ जानेवारी रोजी क्षेत्रीय अधिकारी (झेडओ) यांच्यासाठी ईव्हीएम(इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) संदर्भात सविस्तर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रशिक्षण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडले. या प्रशिक्षण कार्यक्रमात ईव्हीएमची रचना, कार्यपद्धती, मतदान प्रक्रियेपूर्वीची तयारी, मतदानाच्या दिवशी करावयाची कारवाई तसेच मतदानानंतरची सुरक्षित साठवणूक व मतमोजणी प्रक्रियेबाबत सखोल माहिती देण्यात आली. यासोबतच ईव्हीएम संदर्भातील नियम, मार्गदर्शक सूचना, आपातकालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी तसेच तक्रार निवारण प्रक्रियेवरही प्रकाश टाकण्यात आला. निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीचा कणा असून ती कोणत्याही त्रुटीशिवाय पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अधिकारी व कर्मचारी यांना अद्ययावत प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक व निष्पक्ष ठेवावी. कोणत्याही परिस्थितीत नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. सदर प्रशिक्षणात अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त दादाराव डोलारकर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रद्धा बबन उदावंत, यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रसन्नजीत चव्हाण, निवडणूक निर्णय अधिकारी तथा वन जमाबंदी अधिकारी विवेकानंद काळकर, निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आदी उपस्थित होते. मतदानाच्या दिवशी वेळेचे नियोजन करावे मशीनची सुरक्षितता, सीलिंग व साठवणूक करताना राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. मतदानाच्या दिवशी वेळेचे काटेकोर नियोजन करावे व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडेल यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी.
14.43 लाखांच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त:सहा जणांविरुध्द गुन्हे, दोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई
राज्यात प्रतिबंधित असलेला मात्र शहरात सर्रास मिळणारा गुटखा गुन्हे शाखेने मंगळवारी (दि. ६) जप्त केला आहे. हा गुटख्याचा साठा इंदौरवरुन शहरासह इतरत्र विक्रीसाठी आला असल्याची माहीती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहीतीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी पोलिसांनी दोघांना अटक केली असून गुटखा मागवणाऱ्या तिघांसह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ईश्वर भगवानसिंग सुर्यवंशी (४०, रा. आहेरखेडी, इंदौर, मध्यप्रदेश), ट्रान्सपोर्टचा मालक अ. सलीम अ. कादर ३५, रा. ट्रान्सपोर्टनगर, अमरावती या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याचवेळी अवध किशोर पांडे (रा. इंदौर), दानिश (रा. माहुली), साजीद (रा. नेर जि. यवतमाळ) आणि साईराम (रा. यवतमाळ) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुटख्याचा साठा दानिश, साजीद व साईराम यांनी बोलवल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले आहे. गुन्हे शाखेचे प्रमुख संदीप चव्हाण, एपीआय मनिष वाकोडे व त्यांचे पथक गोपनिय माहीतीच्या आधारे ट्रान्सपोर्टनगर भागात पोहचले. त्यांनी एका संशयित मालवाहू वाहनाची पाहणी केली, त्यावेळी वाहनात चालक ईश्वर सूर्यवंशी होता. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता त्याने वाहनात गुटखा, सुंगधीत तंबाखू असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहीती दिली. ते अधिकारी घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी पोलिसांसह वाहनाची झडती घेतली, त्यावेळी वाहनातून सुमारे १४ लाख ४३ हजार ६२० रुपयांचा महागडा गुटखा व सुंगधित तंबाखु तसेच १५ लाख रुपयांचा मिनीट्रक असा एकूण २९लाख ४३ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी चालकासह सहा जणांविरुध्द नागपुरी गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘मनरेगा’चे नाव बदलल्याने संताप:मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तिवसा तहसीलदारांना दिले निवेदन
मनरेगाचे नाव बदलवून जी रामजी केल्याच्या निषेधार्थ तसेच अतिवृष्टीची नुकसान भरपाईचे पैसे राहलेल्या किसानांना त्वरीत मिळावे, घरासाठी जागा मिळावी गावठाणाचा विस्तार करावा. तिवसा तालुक्यातील सर्व अतिक्रमित घरांची नमुना ८ अ ला नोंद करा, सर्वांना स्वस्त धान्य, गरजुंना राशन कार्डचे वाटप करा, श्रावण बाळ, संजय गांधी निराधार लोकांचे मानधन ३ हजार रुपये करा, घरकुल योजनेचे अनुदान ५ लाख रुपये द्या अशा अनेक मागण्यांचे निवेदन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तर्फे तहसीलदार आशिष नागरे यांना देण्यात आले. या आश्वासनांची पुर्तता झाली नाही तर १९ जानेवारी रोजी तहसील कचेरीवर प्रचंड मोर्चा धडकणार असल्याचा इशारा माकपच्या प्रतिनिधी मंडळाने निवेदनातून दिला आहे. या प्रतिनिधी मंडळात माकप तालुका सचिव दिलीप शापामोहन, महादेव गारपवार, तिवसा शहर सचिव अजय गारपवार, मोहिनी शापामोहन, अशोक राऊत, पुंडलिक पापणकर, लता पापणकर, सुरेश भारती, रामगोपाल निमावत यांचा सहभाग होता.
वेगवेगळी माध्यमे उदयास आली आहे. पण, मुद्रित माध्यमांचे महत्त्व अबाधित आहे. बरेचदा आम्हाला आमच्या गोपनीय यंत्रणेच्याही आधी पत्रकारांकडून माहिती मिळते. पत्रकारांचे हे जाळे फार महत्त्वाचे आहे. या शब्दात पोलिस आयुक्त राकेश ओला यांनी पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित केले. अमरावती श्रमिक पत्रकार संघातर्फे मंगळवारी (दि. ६) पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला मनपा आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, ज्येष्ठ पत्रकार अॅड. दिलीप एडतकर, विलास मराठे, प्रवीण आहुजा, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे, श्रमिक पत्रकारांच्या पुरस्कार निवड समितीचे समन्वयक डॉ. विलास नांदुरकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मोहन अटाळकर, संचालन शैलेश धुंदी यांनी केले. मांडणी संघाचे कोषाध्यक्ष गिरीश शेरेकर आणि आभार सचिव रवींद्र लाखोडे यांनी मानले. स्वागत संघाचे उपाध्यक्ष अमोल इंगोले, कुष्णा लोखंडे, संतोष ताकपिरे, महेश कथलकर, भैय्या आवारे, वैभव बाबरेकर यांनी केले. यावेळी मान्यवरांनी आपली मते मांडत पत्रकारीतेवर प्रकाश टाकला. या पत्रकारांचा झाला सन्मान जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार मनोहर परिमल यांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले. प्रभावी पत्रकारिता पत्रकार स्वप्नील उमप, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रवीण कपिले, शोध पत्रकारिता पुरस्कार प्रदीप भाकरे तर लक्षवेधी पत्रकारिता पुरस्कार योगिनी अर्डक यांना देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी ११ हजार रुपये रोख, शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह, असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. याचवेळी सुनील धर्माळे व त्यांच्या पत्नी विनिता धर्माळे नुकतेच ‘केबीसी’ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या दोघांचा विशेष सन्मान करण्यात आला. याशिवाय राज्य शासनातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या लोकनायक बापूजी अणे पुरस्कारासाठी दिव्य मराठीचे ब्युरो चीफ अनुप गाडगे, पत्रकार गजानन मोहोड यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारे वक्तव्य करत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या विरोधात ज्यांनी काम केलं, जे खुल्या मंचावर ‘यावेळी 400 पार’च्या घोषणा देत होते, ते चेहरे आठवणीत ठेवा, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. माझ्या पराभवामागे विरोधकांपेक्षा आपल्या गोटातीलच काही लोक कारणीभूत आहेत. आमच्यातच घात करणारे लोक होते, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपमधील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवलं. माझा पराभव म्हणजे केवळ नवनीत राणांचा पराभव नाही, तर तो संपूर्ण शहराचा पराभव आहे, असा दावा करत त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर बोलताना नवनीत राणा यांनी भावनिक पण तितक्याच आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया दिली. लोकसभेत नुकसान कुणाचं झालं, तर आमच्या मुलांचं झालं, असं म्हणत त्यांनी हा पराभव वैयक्तिक वेदनेशी जोडला. मात्र, ही वेदना गिळून गप्प बसणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ज्यांनी माझ्याशी बेईमानी केली, ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला, त्यांचा बदला घेतल्याशिवाय नवनीत राणा शांत बसणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी जाहीरपणे व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. याच भाषणात त्यांनी अमरावती शहराच्या सुरक्षेबाबत मोठी घोषणा केली. शहराच्या प्रत्येक गल्लीबोळात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. भाजपचा महापौर निवडून आला, तर शहरात सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे आणि आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवले जातील, असं आश्वासन त्यांनी दिलं. आपण खासदार असताना अवघ्या पाच वर्षांत अमरावतीसाठी मेडिकल कॉलेज आणि पायलट ट्रेनिंग सेंटर आणलं, याची आठवण करून देत त्यांनी आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला. सत्ता असो वा नसो, शहराच्या विकासासाठी मी लढत राहणार, असा संदेश त्यांनी दिला. भाषणादरम्यान एक प्रसंग विशेष चर्चेचा ठरला. मंचाच्या टोकावर उभ्या असताना भाजपच्या काही उमेदवारांनी ‘भाभी, खाली बघा, पडाल’ असं सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यावर ‘आता मी पडणार नाही’ असं प्रत्युत्तर देत त्यांनी आपल्या राजकीय संघर्षाचा संदर्भ दिला. आतापर्यंत खूप काही सहन केलं, पण आता परिस्थिती बदलली आहे. ज्यांनी माझ्याशी बेईमानी केली, त्यांच्याशी मी आता सौम्य वागणार नाही, असा इशाराच त्यांनी या विधानातून दिला. नवनीत राणा यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके आणि त्यांच्या पत्नीवरही जोरदार टीका केली. मी कोणाची चमचेगिरी करण्यासाठी उभी नाही, असं ठणकावून सांगत त्यांनी थेट खोडके दाम्पत्यावर निशाणा साधला. कोणी घड्याळ घेऊन उभं आहे आणि उलटे काटे फिरवायचा प्रयत्न करत आहे, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी ते तर त्यांचं नशीब होतं की मी विधानसभेत फिरले नाही, नाहीतर दोन हजारांनी निवडून आले असते ना, दहा हजारांनी पडले असते, इतकी ताकद या भगव्यामध्ये आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. आपल्या राजकीय ताकदीचा उल्लेख करताना नवनीत राणा म्हणाल्या की, 2019 मध्ये याच लोकांनी मला निवडून दिलं होतं. माझी ताकद लोकांमध्ये आहे. मी लोकांची सेवा करण्यासाठी उभी आहे, कोणाच्या दावणीला बांधून चमचेगिरी करण्यासाठी नाही. ‘आता पुढे कशी खासदार होते ते आम्ही बघतो’ असं म्हणणाऱ्यांना उद्देशून त्यांनी, ‘तुमच्यात दम असेल तर दाखवा’ असा खुला आव्हान दिलं. या वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकारणात पुन्हा एकदा तापमान वाढल्याचं चित्र आहे. ओवैसींवरही थेट निशाणा भाषणाच्या शेवटच्या टप्प्यात नवनीत राणा यांनी ओवैसींवरही थेट निशाणा साधला. काल अमरावतीत ओवैसी येऊन गेले, बाहेर पाकिस्तान आणि हैदराबादमध्येही पाकिस्तानच असल्याची टीका करत त्यांनी वादग्रस्त विधान केलं. तुम्ही किती मुलं जन्माला घालायची हे सांगण्याचा अधिकार कुणालाच नाही, आधी तुम्ही देशात किती घुसखोर घुसवले ते सांगा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेवटी, ज्यांनी माझ्याकडून पैसे घेऊन माझ्यासोबत बेईमानी केली, अशा लोकांना यावेळी धडा शिकवा, असं आवाहन करत त्यांनी आपल्या तीन भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याची विनंती केली. चौथा उमेदवार कोण असेल, हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवत राजकीय उत्सुकता आणखी वाढवली आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कोणत्याही क्षणी घोषित होतील. त्यामुळे इच्छुकांनी गावोगावी, घरोघरी संपर्क मोहिम हाती घेतली आहे. उमेदवारीवर दावा करतानाच आपण कोणत्या आघाडीकडून उमेदवार असू याची खात्री एकाही उमेदवारास नाही. पांडुरंग परिवार विरुद्ध विठ्ठल परिवार अशी पारंपरिक लढत होणार की विठ्ठल परिवारातील गट वेगवेगळे लढणार याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले . पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८ आणि पंचायत समितीच्या १६ जागांसाठी लवकरच निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. येत्या आठ दिवसात निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता लक्षात घेऊन इच्छुक उमेदवारांनी आपापल्या गटात आणि पंचायत समिती गणात घरोघरो संपर्क अभियान हाती घेतले आहे. पंचायत समितीचे सभापती पद हे अनु जातीसाठी राखीव असून खर्डी, सुस्ते आणि पळशी या अनु.जातीसाठी राखीव असलेल्या ३ पंचायत समिती गणावर राजकीय नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. तसेच सभापती होण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे साकडे घालायला सुरुवात केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या ८ गणांपैकी वाखरी सर्वसाधारण महिला तर करकंब हा गट सर्वसाधारण राहिला आहे. इतर सहा जि.प. गट राखीव झाल्याने इच्छुकांची संख्या मर्यादित आहे. बगीरथ भालके २०११ साली दिवंगत आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल परिवाराने जिल्हा परिषदेच्या ६ जागा जिंकल्या होत्या. तर २०१६ सालच्या निवडणुकीत पांडुरंग परिवाराने ७ जागा जिंकून आपले वर्चस्व पुन्हा अधोरेखित केले होते. तालुका पंचायत समितीवर मागील ३० वर्षांपासून पांडुरंग परिवाराचे वर्चस्व अबाधित आहे. नगरपालिका निवडणुकीत विठ्ठल परिवारातील आ. अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांचे गट स्वतंत्र लढले होते. त्याचा फटका दोन्ही गटांना बसला असून आ. पाटील यांच्या गटाला एकही जागा मिळाली नाही तर भालके गटाचे तीन ते चार उमेदवार मतविभागणीमुळे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरपालिका निवडणुकीत अनपेक्षित असा धक्का बसल्याने पांडुरंग परिवार जिल्हा परिषद निवडणुकीत काहीसा सावध झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ग गटाचे नेते काळे यांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे विठ्ठल परिवारातील ताकद विभागली जाणार आहे. प्रशांत परिचारक जिल्हा परिषदेच्या ८ गणांपैकी वाखरी सर्वसाधारण महिला तर करकंब हा गट सर्वसाधारण राहिला आहे. इतर सहा जि.प. गट राखीव झाल्याने इच्छुकांची संख्या मर्यादित आहे. पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवारातील आ. पाटील आणि भालके गटालाही सक्षम उमेदवाराचा शोध घ्यावा लागतो आहे. वाखरी जिल्हा परिषद गटावर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले असून या गटावर परिचारक, काळे, भालके आणि आ. पाटील गटानेही लक्ष केंद्रित केलेले आहे. या गटासाठी मातब्बर उमेदवारांनी मागील सहा महिन्यापासून तयारी सुरु केलेली आहे. करकंब जिल्हा परिषद गटात कोण उमेदवार असणार याचीही उत्सुकता तालुक्यात वाढलेली आहे. अभिजीत पाटील पांडुरंग परिवाराचे कायम निवडणुकीमध्ये वर्चस्व परिचारक- काळे गट एकत्र येण्याची शक्यता
सांगोल्यात कारखान्यावर दुसऱ्या दिवशीही उपोषण:सांगोला तालुक्यात शेतकऱ्यांच्याउसात साखर निघत नाही का
सांगोला तालुक्यातील वाकी(शिवणे) येथील धाराशिव साखर कारखाना युनिट क्रमांक चार या कारखान्याने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना ऊस बिलाचा पहिला हप्ता ३ हजार रुपये द्यावा, या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणास ग्रामपंचायतीसह शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी ऊस बिलाचा पहिला हप्ता ३ हजार रुपये दिला असताना सांगोला तालुक्यातील वाकी(शिवणे) येथील धाराशिव कारखाना युनिट क्रमांक चार हा कारखाना तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिला हप्ता २ हजार ८०० रुपये देत आहे. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांवरील हा अन्याय दूर होऊन सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनाही पहिला हप्ता ३ हजार रुपये मिळावा, या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने कारखाना आमरण उपोषण सुरू केले. विठ्ठल सहकारी कारखान्याची ऊस वाहतूक करणारी वाहने वाकी येथील धाराशिव युनिट क्रमांक चारला गाळप होतात. पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र ३ हजार १ रुपयांनी पहिली उचल दिली जाते. त्याचवेळी सांगोला तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांना मात्र २ हजार ८०० रुपये पहिली उचल दिली जाते आहे. हा कारखाना सांगोला तालुक्यातच असूनही सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. वाकी येथील कारखान्यात तयार होणारी कच्ची साखर, बग्यास, मोलासेस इत्यादी सर्व गोष्टी वाहतूक करून विठ्ठल कारखाना येथे घेऊन जातात. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. दरम्यान आज कारखान्याच्या वतीने सुरेश सावंत, काझी, पवार यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आता २ हजार ८०० रुपये जमा केले आहेत. दिवाळीत २०० रुपये प्रति टन जमा केले जाईल, असे सांगितले. मात्र गतवर्षी ठरल्याप्रमाणे राहिलेले १०० रुपये अद्यापही दिले नाहीत. सांगोला तालुक्यात शेतकऱ्यांच्या उसात साखर निघत नाही का
कष्ट आणि प्रामाणिकतेच्या जोरावर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किती बदल होऊ शकतो, हे अर्णव शैक्षणिक संकुलाकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. एखाद्या चित्रपटांची स्टोरी निर्माण होईल, असा हा इतिहास असून आम्हाला कलाकार म्हणून संधी मिळाल्यास आम्ही या शाश्वत सत्याचे रूपांतर सुंदर कथेमध्ये करू, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिनेअभिनेत्री उर्मिला कानेटकर यांनी (कै) बाबूरावजी डिसले स्मृती जीवनगौरव पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षक आ. दत्तात्रय सावंत हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे उपस्थित होते. अर्णव शैक्षणिक संकुल सासुरे फाटा वैराग (ता. बार्शी) येथे वार्षिक स्नेहसंमेलन आणि कै. बाबूरावजी डिसले स्मृती जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. सूरज क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सचिव प्रताप दराडे यांनी मंडळाच्या कार्याची माहिती दिली. यावेळी सिनेअभिनेता सुमित तनपुरे, सभापती अनिल डिसले, अरुण बारबोले (अध्यक्ष, यशोदा शि.प्र.मं. बार्शी), संस्था सचिव रवींद्र कापसे, मुख्याध्यापिका अर्चना डिसले, अर्णव कापसे, उद्योगपती सचिन डिसले आदी मान्यवर उपस्थित होते. माजी शिक्षक आमदार सावंत बोलताना म्हणाले की, सर्व क्षेत्रांना स्पर्श करणारी ही संस्था असून क्वांटिटी सोबत क्वॉलिटी देखील जपण्यात यशस्वी झाली आहे. सूर्यकांत क्षीरसागर (कृषी भूषण पुरस्कार), राणुबाई जगताप महिला भूषण पुरस्कार), प्रदीप कापसे (डिजीटल पत्रकारिता), विजय निलाखे (वर्तमान पत्रकारिता पुरस्कार), भीष्माचार्य चांदणे (साहित्य पुरस्कार), गणेश शालगर (युवा उद्योजक पुरस्कार), नझीर अब्दुल शेख (शैक्षणिक पुरस्कार), प्रा. किरण देशमुख (क्रिडा पुरस्कार), भगवंत साळवे (आदर्श शिक्षक पुरस्कार), तुकाराम मस्के (आध्यात्मिक पुरस्कार), शशिकांत लांडगे (कला पुरस्कार), प्रसाद मोहिते (सामाजिक पुरस्कार) यांना सिनेअभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
ब्रिटिश कालीन पोलिस आणि आत्ताचे पोलिस यामध्ये अमुलाग्र बदल असून तत्कालीन पोलिस हे ब्रिटिशांसाठी होते, आताचे पोलीस हे आपल्या रक्षणासाठी आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाइलचा वापर कमी करावा. मोबाईलमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर यांचा परिणाम होतो, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी केले. ते पोलिस स्थापना दिनानिमित्त (रेझिंग डे) निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना पोलिस स्टेशनच्या दैनंदिन कामकाजाची माहिती देण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचारपिठावर प्राचार्य पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक लातूरकर, पोलिस उपनिरीक्षक विजय पिसे, नागेश बनकर, गोपनीय विभागाचे दिगंबर गेजगे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना बोरीगिड्डे म्हणाले की, २ जानेवारी १९६१ रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज दिला. पोलिस दलात येण्यासाठी तुम्ही शारीरिक तंदुरुस्त पाहिजे, त्यासाठी व्यायामाची सवय लावा, निर्णय क्षमता असली पाहिजे. समाजात चांगल्या ऐवजी जे काही वाईट घडत असेल, तर त्याची माहिती तुम्ही पहिल्यांदा माहिती आई- वडिलांना द्या, त्यानंतर गुरुजी आणि शेवटी पोलिसांना द्या असे त्यांनी सांगितले. यावेळी इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थ्यांना दैनंदिन कामकाजाची माहिती व शस्त्रांची माहिती देण्यात आली. मोबाइलच्या चुकीच्या वापरामुळे मुली पळून जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून अल्पवयीन मुलींना आई- वडिलांच्या कष्टाची जाण असली पाहिजे. त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता कोणताही निर्णय घेत असताना सज्ञान झाल्यावर घ्या.मोबाईलचा वापर करून करिअर करणारे देखील विद्यार्थी आहेत, आणि याचा गैरवापर करून आयुष्याची राख रांगोळी करणारी देखील विद्यार्थी आहेत. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, याचा पाया आताच घातला पाहिजे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीभोवती सुरू असलेल्या वादाला आता न्यायालयीन वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या निवडणुकीला तातडीने स्थगिती देत निवडणूक अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार होणारी निवडणूक तूर्तास थांबली असून, संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एमसीएच्या सत्तासंघर्षात मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. या प्रकरणाला सुरुवात झाली ती भारताचा माजी क्रिकेटपटू आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सदस्य असलेल्या केदार जाधव यांच्या गंभीर आरोपांमुळे. केदार जाधव हे सध्या भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारीही आहेत. त्यांनी थेट आरोप करत सांगितले की, एमसीएची सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी रोहित पवार यांनी संघटनेत मनमानी पद्धतीने सदस्यसंख्या वाढवली. त्यांच्या म्हणण्यानुसार, एमसीएची सदस्यसंख्या अवघ्या काही काळात 154 वरून थेट 571 पर्यंत नेण्यात आली, आणि ही वाढ निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली, जेणेकरून मतदानात आपल्याला अनुकूल निकाल मिळावा. केदार जाधव यांनी केलेले आरोप अधिक गंभीर ठरतात कारण नव्याने सदस्य केलेल्यांमध्ये रोहित पवार यांच्या कुटुंबातील व्यक्तींचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. या यादीत रोहित पवार यांची पत्नी कुंती, सासरे सतीश मगर, तसेच खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सदानंद सुळे यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच नव्हे, तर रोहित पवार यांच्या कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले कर्मचारीदेखील एमसीएचे सदस्य करण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय अनेक राजकीय नेते आणि काही शैक्षणिक संस्थांनाही ऐन निवडणुकीपूर्वी सदस्यत्व देण्यात आल्याचेही केदार जाधव यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने या संपूर्ण प्रक्रियेची गंभीर दखल घेत निवडणुकीला स्थगिती दिली आहे. न्यायालयाने आदेश देताना स्पष्टपणे नमूद केले की, निवडणुकीदरम्यान घडलेले प्रकार आणि सदस्यसंख्येतील अचानक वाढ पाहता या प्रकरणात हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 फेब्रुवारी रोजी होणार असून, तोपर्यंत एमसीएची निवडणूक प्रक्रिया गोठवण्यात आली आहे. या संपूर्ण वादामागची पार्श्वभूमी पाहता, एमसीए निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केले होते. मात्र, 24 ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या अंतिम उमेदवार यादीवर संघटनेचे जुने सदस्य श्रीपाद हळबे आणि इतर काही सदस्यांनी आक्षेप घेतले होते. त्यांच्या मते, काही उमेदवारांना नियमबाह्य पद्धतीने संधी देण्यात आली असून, अंतिम यादी जाहीर करताना पारदर्शकता पाळली गेली नाही. श्रीपाद हळबे आणि इतरांनी या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांकडे हरकती दाखल केल्या होत्या. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतेही ठोस कारण न देता या हरकती फेटाळून लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 24 ऑक्टोबरलाच थेट अंतिम उमेदवार यादी जाहीर करण्यात आली, ज्यामुळे हरकतींचा विचारच करण्यात आला नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. याच कारणामुळे श्रीपाद हळबे आणि अन्य सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. 4 फेब्रुवारीच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत केवळ क्रिकेट प्रशासनच नव्हे, तर राजकारणही केंद्रस्थानी आले असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाच्या स्थगितीमुळे आता एमसीएची निवडणूक कधी आणि कशा पद्धतीने होणार, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. 4 फेब्रुवारीच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्या निर्णयावर एमसीएच्या सत्तासंघर्षाचे भवितव्य ठरणार आहे. क्रिकेटच्या प्रशासनात पारदर्शकता राखली जाणार की राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.
स उत्तर सोलापूर शेतीतील वाढते खर्च, मातीची घटती सुपीकता आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या पार्श्वभूमीवर सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली असताना, उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची ग्रामपंचायतीने महिला शेतकऱ्यांच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचा ठोस आदर्श उभा केला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कालावधीत ग्रामपंचायत गुळवंचीच्या वतीने गावातील नऊ महिला शेतकऱ्यांना ‘आदर्श सेंद्रिय शेती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. उमेदच्या तालुका अभियान व्यवस्थापक पूनम दुध्याळ यांनी मार्गदर्शन या कार्यक्रमास सरपंच सुनील बापू जाधव, उपसरपंच जयश्री तांबे, सदस्य विष्णू भोसले, ग्रामपंचायत अधिकारी मीनाक्षी सरवदे, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक पूनम दुध्याळ, कणके, सीआरपी रंजना कोरके, अश्विनी कोरके, विजया बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. गुळवंची ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे महिला सबलीकरण, शाश्वत शेती आणि पर्यावरण संवर्धन या तिन्ही बाबींना एकाच वेळी चालना मिळाली असून, इतर गावांसाठी हा उपक्रम दिशादर्शक ठरत आहे. या महिलांचा पुरस्काराने झाला सन्मान उमा गायकवाड, उल्पा बोराडे, वाला पवार, वैशाली चव्हाण, मंगल कोरके, अपर्णा भोसले, मीनाक्षी तांबे, विजया बोराडे आणि अश्विनी कोरके यांचा समावेश आहे.

25 C