मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडत आहे. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहेत. हा मेळावा पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या काळात राज्याच्या राजकारणातील काही बड्या नेत्यांनी मला वैयक्तिकरित्या लक्ष्य करून बदनाम करण्याचा विडा उचलला होता. मात्र, परळीच्या स्वाभिमानी जनतेने या सर्व षडयंत्रांना भीक न घालता विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे, असे विधान परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केले. ते परळी येथे आयोजित घरकुल वाटप सोहळ्यात बोलत होते. गुढी पाडव्यादिनी परळी नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना 2.0 च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या 677 घरकुल लाभार्थींना एक लाख रुपये प्रति घरकुल प्रमाणे पहिल्या हप्त्याचे वितरण धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्याचबरोबर 5% निधीतून दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभाचेही वितरण करण्यात आले. या कार्यक्रमावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी जोरदार फटकेबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. यावेळी धनंजय मुंडे यांनी कोणाचेही नाव न घेता राज्यातील बड्या नेत्यांवर निशाणा साधला, त्यामुळे धनंजय मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे होता? याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. नेमके काय म्हणाले धनंजय मुंडे? नगरपालिकेच्या निवडणुका होत्या, त्यावेळी महाराष्ट्रभर निवडणुकीचे वातावरण होते. मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो. सर्व दूर जे एकट्या धनंजय मुंडे यांना बदनाम करता येईल. जे त्याकरिता महाराष्ट्रातील मोठ मोठे नेते सर्व काही करत होते, शेवटी मला वाटले आपल्यामध्ये काहीतरी नक्कीच आहे, त्याशिवाय संपवायला निघाले, असे धनंजय मुंडे म्हणाले. त्यांना असे वाटत असावे हा बाबा आपल्याला पुरून उरला, तशा परिस्थितीत एवढे वातावरण सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, युट्यूबचे चॅनल या परिस्थितीत सुद्धा परळीच्या मायबाप जनतेनं महायुतीच्या मागे भक्कम पाठिंबा दिला आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला, असेही ते म्हणाले. घरकुल योजनेचा 'परळी पॅटर्न' सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराच्या स्वप्नावर बोलताना धनंजय मुंडे यांनी आकडेवारीसह माहिती दिली. शहरात आतापर्यंत ३ हजार घरकुलांचे वाटप यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. यावर्षी आम्ही आणखी १५०० नवीन घरकुलांचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. एकही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये, याची जबाबदारी स्थानिक नगरसेवकांनी घ्यावी, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. यावेळी कार्यक्रमात अनेक लाभार्थ्यांना घरकुलाचे धनादेश प्रदान करण्यात आले. भौतिकसोबतच 'बौद्धिक' विकासावर भर परळी केवळ रस्ते आणि इमारतींच्या बाबतीतच नव्हे, तर ज्ञानाच्या बाबतीतही प्रगत व्हावी, असा आपला मानस असल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. शहरात उभारण्यात आलेल्या भव्य वाचनालयाचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांना तेथील हजारो पुस्तकांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शहरात सध्या सुरू असलेले सोलर प्रकल्प आणि इतर महत्त्वाकांक्षी योजना परळीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
श्री अंबाबाई मंदिराच्या ऐतिहासिक दगडी भिंतींचे खुलले मूळ रूप
कोल्हापूर : प्रतिनिधी मंदिर व मूर्ती जतन-संवर्धनाच्या कामासाठी गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेले करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन बुधवारपासून पूर्ववत सुरू झाले. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता अंबाबाईच्या मूळ मूर्तीत प्राणप्रतिष्ठा, अभिषेक व आरती करून देवीच्या दर्शनाला सुरुवात झाल्यानंतर भाविकांनी ‘अंबा माता की जय’चा गजर केला. सॅन्ड ब्लास्टिंगसह संवर्धनाची कामे झाल्याने मंदिराच्या दगडांचेही मूळ सौंदर्य खुलले […] The post श्री अंबाबाई मंदिराच्या ऐतिहासिक दगडी भिंतींचे खुलले मूळ रूप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर गुढीपाडव्याचा उत्साह, सहकुटुंब उभारली गुढी!
मुंबई : प्रथेप्रमाणे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) पाडवा मेळावा गुरुवारी (१९ मार्च) मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘शिवतीर्थ’ येथे पारंपरिक पद्धतीने ठाकरे कुटुंबीयांनी गुढी उभारली. यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते. पाडवा मेळाव्यानिमित्त सकाळपासूनच शिवाजी पार्क परिसरात मनसैनिकांची गर्दी वाढत […] The post राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर गुढीपाडव्याचा उत्साह, सहकुटुंब उभारली गुढी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी एसटी महामंडळाचा ५१५० विजेवरील बस कंत्राटी पद्धतीने भाडे तत्त्वावर घेण्याचा प्रकल्प अपयशी ठरल्यानंतरही सरकारी अधिका-यांकडून वेळकाढूपणा होत आहे. तसेच मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांचे निर्देश गांभीर्याने घेतले जात नसतील तर लोकवाहिनीसाठी हे दुर्दैवी असून अधिका-यांना या प्रकरणी काहीच गांभीर्य दिसून येत नसल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली […] The post इलेक्ट्रिक बस बैठक फुसका बार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी अर्ज करण्यातून विद्यार्थ्यांची सुटका
मुंबई : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत दिल्या जात असलेल्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी नव्याने अर्ज करण्याची गरज भासू नये, यासाठी पहिल्या वर्षानंतर शिष्यवृत्तीचे ऑटो रिन्युअल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. विधान परिषदेत किशोर दराडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. वितरण प्रक्रियेतील तांत्रिक […] The post शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी अर्ज करण्यातून विद्यार्थ्यांची सुटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सचिनने दिल्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
मुंबई : प्रतिनिधी पारंपरिक वेशभूषा आणि मायबोलीमध्ये मास्टर ब्लास्टरने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. क्रिकेटच्या या देवाने आईचे सपत्निक केलेले चरणस्पर्श सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. सचिनने या व्हीडीओच्या माध्यमातून आपले संस्कार जपले आहेत ही खरोखरीच वाखाणण्याजोगी बाब आहे. तुम्हाला व कुटुबियांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नववर्ष, आनंद, सुख, समृध्दीचे जावो, हीच प्रार्थना. अशा […] The post सचिनने दिल्या चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘धुरंधर २’ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी
मुंबई : प्रतिनिधी काल चित्रपटाचे प्रिव्हयू शो झाले. त्याला सुद्धा तुफान प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी टेक्निकल समस्येमुळे शो रद्द करावे लागले. आजपासून अधिकृतपणे हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुसाट निघाला असून दुपारी १२ वाजेपर्यंत भारतात या चित्रपटाने ६० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा आकडा आहे. ‘पठाण’, ‘स्त्री २’ आणि […] The post ‘धुरंधर २’ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले असताना आता या प्रकरणाला तीव्र वळण मिळाले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच करुणा मुंडे यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. चाकणकर यांना तात्काळ पदावरून दूर केले नाही, तर मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा स्पष्ट इशारा मुंडे यांनी दिल्याने राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे. करुणा मुंडे यांनी चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तींशी संबंध ठेवणे आणि त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे हे महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला अजिबात शोभणारे नाही. चाकणकर यांच्या भूमिकेमुळे राज्यातील महिलांना न्याय मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा संवेदनशील पदावर असलेल्या व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, अन्यथा सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. दरम्यान, या प्रकरणात मुंडे यांनी केवळ चाकणकर यांच्यावरच नव्हे, तर इतर राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केले. भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेला उत्तर देताना मुंडे यांनी त्यांच्यावरही जोरदार टीका केली. सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी जबाबदारीने वक्तव्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिकमधील तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. मात्र, त्याच्या पाद्यपूजेचा फोटो समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आक्रमक भूमिका घेत चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच संजय राऊत यांनीही त्यांच्यावर टीका करत प्रश्न उपस्थित केले आहेत. दुसरीकडे, मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मात्र चाकणकर यांची बाजू घेतल्याचे दिसून येते, तर रुपाली पाटील ठोंबरे यांनीही राजीनाम्याची मागणी केली आहे. राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर या प्रकरणात आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही गंभीर आरोप केले आहेत. वर्षभरापूर्वीच या प्रकरणाची तक्रार महिला आयोगाकडे देण्यात आली होती, मात्र कारवाई आरोपीवर न होता बातमी प्रसिद्ध करणाऱ्यांवरच करण्यात आली, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सरकार आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार यांनी सातत्याने पत्रकार परिषद घेत या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. तसेच आमदार अमोल मिटकरी यांनी देखील अजित पवारांच्या अपघातावरून शंका उपस्थित केल्या होत्या. आता त्यांनी आणखी एक शंका उपस्थित करत खळबळ उडवली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ज्या भोंदू बाबाचे पाद्यपूजन केले व ज्याच्यावर महिलांवर अत्याचार केल्याचे अनेक गंभीर आरोप असून गुन्हे दाखल आहेत, अशा अशोक खरातचा संबंध अजित पवारांच्या अपघातात हात आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले की, नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात याचा संबंध अजित पवार यांच्या अपघातामागे आहे का? याचा तपास करावा, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरी म्हणाले, कॅप्टन खरात नावाच्या भोंदू बाबाचा भांडाफोड काल पासून सुरू आहे. त्याच्या अश्लील व्हिडीओ क्लिप्स पोलिसांनी छापेमारीत जप्त केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले आहे. एका तक्रारीवरून त्याच्यावर ही कारवाई झाली आहे. मात्र त्याचा भक्त संप्रदाय राजकीय आणि बॉलिवूडपर्यंत असल्याचे कळत आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये कॅप्टन खरात हा VSR विमान कंपनीच्या पायलटसोबत तसेच त्याच विमानासमोर उभा आहे. काही दिवसांपूर्वी सहयोगी सोसायटी आणि देवगिरि बंगल्यासमोर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. अशा थोतांडावर आमचा किंवा अजितदादांचा विश्वास नव्हता, मात्र हा झालेला प्रयोग अशोक थोरातच्या सांगण्यावरून झाला का? आणि याचा धागा VSR कंपनीपर्यंत जात असेल, तर अजितदादांच्या घातपातामागे कॅप्टन थोरातचा हात असल्याचा संशय बलावतो. म्हणून अजित दादांच्या विमान अपघात संदर्भात कॅप्टन थोरात याचा कसून तपास झाला पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.
नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दंतरोगशास्त्र विभागात कार्यरत एका सहयोगी प्राध्यापकावर एका निवासी महिला डॉक्टरने लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणामुळे संस्थेमध्ये खळबळ उडाली असून, एम्स प्रशासनाने तातडीने विशाखा समितीमार्फत चौकशी सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दंतरोग विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या कनिष्ठ महिला निवासी डॉक्टरला संबंधित सहयोगी प्राध्यापकाकडून वारंवार अश्लील शेरेबाजी आणि लज्जास्पद वर्तनाचा सामना करावा लागत होता. सुरुवातीला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्रास वाढत गेल्याने, अखेर संबंधित डॉक्टरने एम्स प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच एम्स प्रशासनाने तत्परता दाखवत विशाखा समिती स्थापन केली. या समितीकडून प्राथमिक चौकशी सुरू असून, संबंधित विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आल्याचे समजते. विशाखा समितीच्या प्रमुख डॉ. ज्योती जॉन यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले, परंतु अधिक भाष्य करण्यास नकार दिला. लैंगिक छळाव्यतिरिक्त प्राध्यापकाकडून होत असलेल्या इतर बाबींची चौकशी करण्यासाठी डॉ. प्रदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती नेमण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र, डॉ. देशमुख यांनी आपल्याला याची कल्पना नसल्याचे म्हटले. एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी सुरुवातीला असे काहीही झाले नसल्याचे सांगितले, नंतर ही संस्थेची अंतर्गत बाब असल्याचे सांगत बोलण्यास नकार दिला. दंतरोग विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. उदय किरण उप्पाडे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. एम्स प्रशासनाकडे त्यांच्याविरोधात नेमकी कोणती तक्रार आहे, यावर ते सध्या भाष्य करणार नाहीत. या प्रकरणाची आंतरिक समितीकडून चौकशी सुरू असून, त्यातून सत्य समोर येईल, असेही त्यांनी नमूद केले.
वाघोलीत 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू:57 आणि 86 किलो गटात उपांत्य फेरीत मल्लांचा थरार
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि रामकृष्ण अण्णा सातव पाटील कर्तव्य फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ६८ वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा वाघोली, पुणे येथील स्व. अजितदादा पवार क्रीडानगरीत सुरू झाली आहे. या स्पर्धेत गुरुवारी सकाळच्या सत्रात ५७ आणि ८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीच्या (सेमी फायनल) चुरशीच्या लढती झाल्या. हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत झालेल्या या चित्तथरारक लढतींमध्ये काही पदकाचे दावेदार मानले जाणारे मल्ल स्पर्धेतून बाहेर पडले, ज्यामुळे त्यांचे पदकाचे स्वप्न भंगले. माती विभागातील ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत पुणे शहरच्या ओंकार निगडेने कोल्हापूर शहरच्या सुदर्शन पाटीलचा ७-० गुणांनी पराभव केला. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या मृणाल पाटीलने सोलापूर जिल्ह्याच्या अजय निंबाळकरवर ५-१ अशी मात करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. माती विभागातील ८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत सोलापूर शहरच्या मशीद शेखने सोलापूर जिल्ह्याच्या जय जाधवचा १०-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला. दुसऱ्या लढतीत पुणे शहरच्या चंद्रहार नरळेने साताऱ्याच्या विशाल कोकरेचा ४-२ अशा चुरशीच्या लढतीत अनपेक्षितपणे पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. गादी विभागातील ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कोल्हापूर शहराचा राष्ट्रीय मल्ल अक्षय ढेरेने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत कल्याणच्या विनायक भोईरचा १३-२ अशा मोठ्या गुण फरकाने पराभव केला. दुसऱ्या लढतीत नाशिक जिल्ह्याच्या शुभम आचपाळेने साताऱ्याच्या साहिल गोफणेला १०-२ अशी मात देत अंतिम फेरी गाठली. दरम्यान, महाराष्ट्र केसरी किताबासाठी गुरुवारी सायंकाळच्या सत्रात पहिल्या फेरीत होणाऱ्या लढतींची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये माती आणि गादी विभागातील मल्ल आमनेसामने येणार आहेत. माती विभागात महादेव काळे (लातूर) विरुद्ध समाधान दगडे (पिंपरी चिंचवड), विशाल बनकर (सोलापूर शहर) विरुद्ध महेंद्र गायकवाड (सोलापूर जिल्हा), ज्ञानेश्वर जमदाडे (अमरावती) विरुद्ध बाळू बोडके (नाशिक) आणि सुदर्शन कोतकर (अहिल्यानगर) विरुद्ध सुबोध पाटील (पालघर) यांच्यात लढती होणार आहेत. गादी विभागात आदित्य मोहोळ (वाशिम) विरुद्ध पवन रुपनवर (ठाणे), हर्षवर्धन सोनव (धुळे) विरुद्ध अरुण चरवडे (जालना), गजानन भोयर (हिंगोली) विरुद्ध अंकुश गायकवाड (कल्याण), जय पाटील (सोलापूर) विरुद्ध कालीचरण सोनलकर (नंदुरबार), प्रतीक जगताप (पुणे जिल्हा ब) विरुद्ध ओम जाधव (छत्रपती संभाजी नगर), प्रदीप बेहरे (सोलापूर) विरुद्ध सतपाल शिंदे (सांगली), यशराज अमराळे (पिंपरी चिंचवड) विरुद्ध संस्कार लटके (रत्नागिरी) आणि ओम सिंग (चंद्रपूर) विरुद्ध अक्षय मंगवडे (सोलापूर) यांच्यात सामने होतील.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 'कलावंत गुढी' उभारण्यात आली. यावेळी, सांस्कृतिकदृष्ट्या हे वर्ष कलावंत, तंत्रज्ञ आणि रसिकांसाठी सुखसमृद्धीचे जावो, अशा शुभेच्छा प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण आणि आनंद इंगळे यांनी दिल्या. नवीन वर्षात उत्तमोत्तम नाट्य कलाकृतींची निर्मिती व्हावी आणि रसिकांना त्यांचा भरभरून आनंद घेता यावा, अशी अपेक्षा सोमण आणि इंगळे यांनी व्यक्त केली. ही गुढी दरवर्षीप्रमाणे यंदाही उभारण्यात आली होती. ‘वसंत स्मृती’ महोत्सवाव्दारे उलगडणार वसंत कानेटकरांचे साहित्यविश्व मराठी साहित्य विश्वात ज्येष्ठ नाटककार आणि लेखक पद्मश्री वसंत कानेटकर यांचे नाव आदराने घेतले जाते. दिनांक २० मार्च हा वसंतराव कानेटकर यांचा जन्मदिवस असून यंदाचे वर्ष हे वसंतराव कानेटकर यांचे रौप्य महोत्सवी स्मृती वर्ष आहे. यानिमित्त विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वसंत स्मृती’ हा वसंतराव कानेटकर यांच्या साहित्याला समर्पित महोत्सव रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात वसंतराव कानेटकर यांच्या साहित्यावर आधारित वैविध्यपूर्ण सत्र होणार असून हा महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे, अशी माहिती विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी आणि समन्वयक नितीन जळूकर यांनी दिली आहे. यावेळी 'गोष्ट इथे संपत नाही' या कार्यक्रमाचे सादरकर्ते सारंग मांडके, सारंग भोईरकर यांच्यासह नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, कार्यवाह सत्यजित धांडेकर, उपाध्यक्ष समीर हंपी, कोषाध्यक्ष दीपक गुप्ते, अनुराधा हटकर आणि गणेश भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात समीर हंपी यांनी उपक्रमाविषयी माहिती दिली, तर सत्यजित धांडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. उपस्थित कलाकारांचा सत्कार सत्यजित धांडेकर, दीपक गुप्ते, सुनील महाजन, अनुराधा हटकर आणि गणेश भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल योगेश सोमण आणि सुनील महाजन यांचा सत्कार आनंद इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.
लोणी काळभोर परिसरात एका मद्यपी तरुणाने रुग्णालयात तोडफोड करून डॉक्टरांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत एका रुग्णालाही दुखापत झाली आहे. संतोष रमेश गुंजाळ (वय ३५, रा. काकडे वस्ती, थेऊर, पुणे-सोलापूर रस्ता) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. एका डॉक्टरांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉक्टरांचे पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा येथे रुग्णालय आहे. आरोपी गुंजाळ डोक्याला दुखापत झाल्याने रुग्णालयात आला होता. डॉक्टरांनी त्याच्यावर मलमपट्टी केली. उपचाराचे पैसे मागितल्यावर गुंजाळने पैसे देण्यास नकार दिला. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर गुंजाळने डॉक्टरांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने रुग्णालयात गोंधळ घातला आणि काच फोडली. या काचेचा तुकडा एका रुग्णाच्या हाताला लागल्याने त्याला जखम झाली. तसेच, गुंजाळने डॉक्टरांवर दगडही फेकून मारला.या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एन. जाधव करत आहेत. वाहनाच्या धडकेत मांजराच्या पिलाचा मृत्यू वाहनाच्या धडकेत मांजराच्या पिलाचा मृत्यू झाल्याची घटना विश्रांतवाडी भागातील एका सोसायटीच्या आवारात घडली. या प्रकरणी वाहन चालका विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ४२ वर्षीय महिला विश्रांतवाडीतील टिंगरेनगर भागात असलेल्या तिरुपती सोसायटीत राहायला आहेत. सोसायटीच्या आवारात तक्रारदार महिलेने मांजराचे पिलू पाळले आहे. सोसायटीच्या आवारात वाहनाने पिलाला धडक दिली. मांजराच्या पिलाचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेनेे पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक एस माने तपास करत आहेत.
बाणेर पोलिसांनी हळदीच्या पाकिटात गांजा लपवून विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १६ किलो गांजा आणि परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे (दोघे रा. पिंपरी-चिंचवड) अशी आहेत. आरोपी बोरसे हे शहराच्या विविध भागांमध्ये गांजाची विक्री करत होते. कोणालाही संशय येऊ नये यासाठी ते गांजा हळदीच्या पाकिटांमध्ये लपवून ठेवत असत. तसेच, गांजा विक्रीचा व्यवसाय लपवण्यासाठी ते एका खासगी कंपनीतही काम करत होते. बाणेर पोलिसांना माहिती मिळाली होती की, हे दोघे जण दुचाकीवरून बाणेर परिसरात गांजा विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडील पिशवीत हळदीची पाकिटे सापडली. तपासणीत या पाकिटांमध्ये गांजा लपवल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी सुरुवातीला तीन किलो गांजा जप्त केला. आरोपी बोरसे यांच्या चौकशीदरम्यान, त्यांनी पिंपरी-चिंचवड येथील त्यांच्या घरात आणखी गांजा लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेऊन तेथून १३ किलो गांजा जप्त केला. अशा प्रकारे एकूण १६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी हा गांजा कोठून आणला आणि ते कोणाला विक्री करणार होते, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. यापूर्वी आठवड्याभरात लोणी काळभोर परिसरातूनही एका व्यक्तीकडून गांजा जप्त करण्यात आला होता.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पुणे शहराच्या मध्यभागात हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त संघाची यशोगाथा मांडणारा विशेष रथ, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्तचा रथ, तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मराठी शाळांविषयी माहिती देणारा समरसता रथ, छत्रपती शिवाजी महाराज रथ आणि श्री कालिकादेवी संस्थानचा रथ असे विविध चित्ररथ सहभागी झाले होते. या भव्य शोभायात्रेत पारंपरिक नगारा, ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँड, मर्दानी खेळ, मल्लखांब, वेत्रचर्म पथक आणि लहान मुलींचे साहसी व धाडसी खेळ सादर करणाऱ्या पथकांनी पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. शोभायात्रेच्या सुरुवातीला तांबडी जोगेश्वरी मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक पंत फडके आणि भाऊराव क्षीरसागर यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली. यावेळी कसबा भागाचे संघचालक प्रशांत यादव, मोतीबाग नगराचे संघचालक शरद चंद्रचूड, मोतीबाग नगराचे कार्यवाह प्रमोद वसगडेकर, अश्विन देवळणकर, प्रदीप कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शोभायात्रेत खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, नगरसेवक राघवेंद्र (बाप्पू) मानकर, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, स्वरदा बापट आणि निवेदिता एकबोटे यांसारख्या राजकीय नेत्यांनीही सहभाग घेतला. याव्यतिरिक्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, गजानन मित्र मंडळाचे सागर दहिभाते, जोगेश्वरी मंदिराचे बेंद्रे, जिलब्या मारुती मंडळाचे राजाभाऊ धावडे, सो. क्ष. कासार कालिका माता देवस्थान समितीचे भांडेकर, नवनीत मित्र मंडळाचे संतोष फडतरे आणि अखिल शनिवार पेठ नवरात्र उत्सव समितीचे निलेश खडके, अमर भालेराव यांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. हिंदू नववर्ष स्वागत समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर, सहसंयोजक चैतन्य कुसुरकर, यात्रा प्रमुख गौरव पावटेकर आणि अथर्व दातार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 'एकत्र होऊनिया सारे... गुढी उभारु हिंदुत्वाची' असा जयघोष करत पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने पुणेकर या शोभायात्रेत सहभागी झाले होते. परिसरातील गणेश मंडळांनीही यात सक्रिय सहभाग घेतला. लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरू झालेली ही शोभायात्रा तुळशीबाग राममंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिरापर्यंत काढण्यात आली.
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंदिरात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी पहाटेपासूनच गणरायाच्या दर्शनासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. मंदिराच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त प्रवेशद्वारात उभारण्यात आलेल्या भव्य गुढीचे पूजन करण्यात आले आहे. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या हस्ते गणरायाची आरती करून गुढीपूजन करण्यात आले. यावेळी श्री गणेश नामाचा जयघोष, फुलांची आकर्षक आरास, रांगोळीच्या पायघड्या आणि बँडचे मंगलध्वनी अशा मंगलमय वातावरणात हा सोहळा पार पडला आहे. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, मंगेश सूर्यवंशी, विलास रासकर, गजानन धावडे, बंडू गावडे, अथर्व केदारी यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणेशयाग, अभिषेकांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुढीपाडव्यापासून म्हणजेच १९ ते २३ मार्च या कालावधीत संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. या संगीत महोत्सवात दिग्गज कलाकारांसह युवा कलाकारांचे सादरीकरण अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. रसिकांसाठी वाहने पार्किंगची व्यवस्था अप्पा बळवंत चौकातील प्रभात थिएटर समोरील नू.म.वि. मराठी शाळा येथे करण्यात आली आहे. हा संगीत महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, पुणेकरांनी मोठ्या संख्येने यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळख असलेल्या कॅप्टन अशोक खरात याला गंभीर अत्याचाराच्या आरोपांवरून अटक झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास जिंकून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. या घटनेनंतर आता या प्रकरणाला राजकीय रंग चढला असून, विविध नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी संबंधित फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिकच तीव्र झाली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात असे प्रकार घडणे धक्कादायक आहे, असे त्यांनी म्हटले. अशोक खरातवर झालेले आरोप अत्यंत गंभीर असून, अशा घटनांची कडक चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला आयोगाच्या अध्यक्षा संबंधित ट्रस्टशी जोडल्या असल्याची माहिती समोर येत असल्याने त्यांनी नैतिकतेच्या आधारावर तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून त्यांना पदावरून दूर करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. संभाजीराजे यांनी या प्रकरणाच्या सखोल तपासाची गरज अधोरेखित केली. या मागे कोण आहे, कोण-कोण त्यांच्याशी संपर्कात होते, याचा तपास झाला पाहिजे, असे ते म्हणाले. अशा प्रकारांना आळा बसावा यासाठी कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली. महिला आयोगाच्या प्रमुखांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने हा मुद्दा अधिक संवेदनशील बनल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातसोबतचा पाद्यपूजनाचा फोटो समोर आल्यानंतर वाद अधिकच वाढला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही होत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अजून राजीनामा का दिला नाही? असा सवाल उपस्थित करत संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही या प्रकरणावर आवाज उठवावा, असे आवाहन केले. हा फक्त नाशिकपुरता मर्यादित मुद्दा नसून संपूर्ण महाराष्ट्राशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त दरम्यान, अशोक खरातविरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने 18 मार्चच्या पहाटे त्याला ताब्यात घेतले. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाल्यानंतर ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळख मिळवली होती. मात्र आता त्याच्यावरचे गंभीर आरोप आणि अटकेमुळे त्याची प्रतिमा पूर्णपणे कोसळली असून, प्रकरणाची चौकशी अधिक वेगाने सुरू आहे.
नाशिकचा स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी अशोक खरात याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. चाकणकर यांनी आपल्या पदाचा आणि प्रभावाचा गैरवापर करून पीडित महिलांच्या तक्रारी दडपल्या आहेत, असा आरोप करत त्यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी कुंभार यांनी केली आहे. विजय कुंभार यांनी लिहिलेल्या पत्रात काय? विजय कुंभार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात याला महिलांवर अत्याचार प्रकरणी अटक झाल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. त्याच्या विविध राजकीय नेते, मंत्री, आमदार व खासदारांशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याशी संबंधित काही गंभीर बाबी समोर येत असून त्या शासन व्यवस्थेवरील विश्वासाला धक्का देणाऱ्या आहेत. विशेष म्हणजे हे मंदिर त्यानेच स्थापन केले आहे आणि त्याचा जमिनी देवाण घेवाणीचा व्यवसाय आहे. मागील वर्षी या प्रकरणासंदर्भात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबधित वर्तमान पत्राला 4 एप्रिल 2025 रोजी पाठवलेल्या नोटीशीमध्ये खरात याने महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी देखील सदर बातमीची दखल घेतली आहे. महिला आयोग यांनी देखील तुम्हाला पत्रव्यवहार केला असता तुम्ही त्यांना सदर खोट्या बातमी बद्दल कोणतेही स्पष्टीकरण किंवा समर्थन देण्यास अयशस्वी झाला आहात. परिणामी, महिला आयोगाने पोलिस ठाण्याला तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत असा उल्लेख केला आहे आणि ही बाब रुपाली चाकणकर यांना सदर प्रकरणाबद्द फार आधीपासून माहिती होती हे आणि त्या महिलांच्या तक्रारींबाबत संवेदनशील नाहीत हे सिद्ध करते. यातूनच अशोक खरात हा रुपाली चाकणकर यांच्याशी असलेल्या आपल्या ओळखीचा गैरफायदा घेत होता हेही दिसून येते. यासंदर्भात जे व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये फिरत येत आहेत त्यातून हा खरात किती विकृत आहे हे दिसून येते. विशेष म्हणजे या माणसाने आपल्या विकृतीचं चित्रीकरण केलं आहे. म्हणजे या व्हिडिओंचा वापर त्याने ब्लॅकमेलिंगसाठी केला असण्याची दाट शक्यता आहे. याहून कहर म्हणजे सदर चित्रीकरण सुरू असताना पार्श्वभूमीवर आरती किंवा स्तोत्रासारखे काहीतरी ऐकू येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, अशोक खरात याने नाशिक जिल्ह्यातील मीरपूर येथे मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या असून त्या ठिकाणी मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. सदर बांधकामासाठी आवश्यक शासकीय परवानग्या घेतल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे कमाल शेत जमीनधारणा कायद्याचे उल्लंघन त्याने केले असल्याचे दिसून येत आहे. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी दीड किलोमीटरचा रस्ता करण्यात आला आहे, तो कोणी बांधला याचीही चौकशी करणे आवश्यक आहे. याशिवाय, खरात याच्या शिवानिका या खाजगी ट्रस्टला धरणातून मोठ्या प्रमाणात (Bulk Water Entitlement) पाणी उचलण्याची परवानगी मंत्रालयातून देण्यात आली आहे. तो मंत्रालयापर्यंत कसा पोहोचला, ही परवानगी कोणत्या निकषांवर व कोणाच्या आदेशाने देण्यात आली, यासंदर्भात कोणी पाठपुरावा केला आणि खाजगी ट्रस्टला अशी परवानगी कशी देण्यात आली ?याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. अंधश्रद्धेमुळे अनेक महिलांवर अन्याय होतात, हे वारंवार दिसून येते. परंतु जेव्हा महिलांच्या हक्कांसाठी लढणान्या संस्थांच्या नेतृत्वात असलेले व्यक्तीच अशा अंधश्रद्धेला बळी पडतात, तेव्हा परिस्थिती अधिक चिंताजनक बनते. वर्षानुवर्षे विश्वासार्हतेचा आभास निर्माण करून, ज्योतिष व धार्मिक आडाख्यांच्या माध्यमातून उच्चभ्रू समाजात प्रवेश मिळवत, बंद दारांआड महिलांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप खरातवर आहे. सत्तेशी असलेली जवळीक आणि प्रभावामुळे अशा व्यक्तींवर आंधळा विश्वास निर्माण होतो व यंत्रणा निष्क्रिय बनून अशा कृत्यांना अप्रत्यक्षपणे खतपाणी मिळते. अंधश्रद्धेचा फायदा घेत महिलांचे मानसिक, आर्थिक व लैंगिक शोषण करणाऱ्या प्रवृत्तींना रोखणे ही केवळ कायद्याची नव्हे तर समाजाचीही जबाबदारी आहे. मात्र, जेव्हा महिला आयोगासारख्या संवेदनशील संस्थेच्या नेतृत्वाकडूनच अशा अंधश्रद्धेला बळी पडल्याचे चित्र समोर येते, तेव्हा हा विरोधाभास अधिक गंभीर ठरतो. विशेष बाब म्हणजे धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांशी अयोग्य वर्तन व शोषण केल्याचे आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आयोगाकडे आलेल्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आणि कोणतीही ठोस किंवा प्रभावी कारवाई न केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तसेच, पोलिस व संबधिताना आयोगाकडून कडून पाठविण्यात आलेल्या नोटिसांची गोपनीय माहिती संबधित आरोपीला कशी कळली?. त्यामुळे यात अंतर्गत संगनमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुमारे एक - दीड वर्षापूर्वी खरात याच्याबाबत आलेल्या तक्रारीकडे रुपाली चाकणकर यांनी गांभीर्याने लक्ष दिले असते तर कदाचित आणखी काही महिलांवरचा अत्याचार टळला असता. याशिवाय, चाकणकर यांनी खरात याच्या चुकीच्या कृत्यांना सार्वजनिकरित्या पाठिंबा दिल्याचे व त्याचा गौरव केल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामुळे अशा गैरप्रकारांना प्रोत्साहन मिळाले आहे. सदर प्रकरणाच्या गांभीर्याचा विचार करता, अशोक खरात आणि त्याच्या संस्थेने सदर व्हिडिओंचा वापर कुठे कुठे केला याची तसेचं मिळालेल्या शासकीय लाभांची, विशेषतः मोठ्या प्रमाणातील पाणी वाटप व जमीन व्यवहारांची, सखोल चौकशी करून त्यामागील संपूर्ण यंत्रणा उघड करण्यात यावी. या सर्व प्रकरणात सौ. रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, त्या आपल्या पदाचा योग्य वापर करण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे त्यांची केवळ चौकशीच नव्हे, तर त्यांना तत्काळ पदावरून हटविण्यात यावे. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे होणारे मानसिक, आर्थिक व लैंगिक शोषण रोखण्यासाठी शासनाने राज्यभर विशेष मोहीम राबविणे अत्यंत आवश्यक आहे. सदर प्रकरणातील सर्व दोषींवर कोणतीही दया न दाखवता कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रवृत्तींना आळा बसेल.
मुंबई : प्रतिनिधी नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ याला बलात्कार आणि भोंदूगिरी प्रकरणी अटक झाल्यानंतर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. चाकणकर यांनी याच अशोक खरातचे पाद्यपूजन केल्याचे फोटो आणि व्हीडीओ समोर आल्याने विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची एकमुखी मागणी केली आहे. नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावरणारा कॅप्टन अशोक […] The post चाकणकरांनी राजीनामा द्यावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकमधील 'कॅप्टन' अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात असताना, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने कुणी दर्शनाला गेले किंवा कुणासोबत फोटो काढला, तर त्यात त्या व्यक्तीचा काय दोष? महाराज भोंदू आहेत की चांगले, हे आम्हाला कसं कळणार? असा सवाल उपस्थित करत दत्तात्रय भरणे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची पाठराखण केली. तसेच, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करत त्यांनी विरोधकांना सूचक इशाराही दिला आहे. एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला पोलिसांनी काल अटक केली. खरातच्या अटकेनंतर त्याची पाद्यपूजा करतानाचा रूपाली चाकणकर यांचा व्हिडिओ समोर आला. तसेच रूपाली चाकणकर या अशोक खरात याच्या संस्थेच्या संचालक मंडळावर देखील आहेत. यामुळे रूपाली चाकणकर अडचणीत आल्या आहेत. विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चाकणकरांची बाजू घेतली आहे. नेमके काय म्हणाले दत्तात्रय भरणे? अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे नाव आल्यानंतर याबाबत दत्तात्रय भरणे यांना विचारले असता ते म्हणाले, सार्वजनिक जीवनात काम करताना आम्ही अनेकदा स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर विविध ठिकाणी जात असतो. समजा, एखाद्या गावी गेल्यानंतर तिथल्या सरपंचाने विनंती केली की, 'इथे महाराज आहेत, दर्शनाला जाऊया', तर आम्ही श्रद्धेपोटी तिथे जातो. आता ते महाराज चांगले आहेत की तुमच्या भाषेत 'भोंदू', हे आम्हाला कसे कळणार? आम्ही स्वतःहून तिथे गेलेलो नसतो. त्यामुळे केवळ भेटीवरून किंवा फोटोंवरून रूपाली चाकणकर यांना दोषी धरणे पूर्णपणे चुकीचे आहे. बारामती पोटनिवणुकीसाठी विरोधकांना भावनिक साद अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा जागेसाठी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर दत्तात्रय भरणे यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन विरोधकांना केले. अजितदादांचे नाव आजही घेतले की लोकांच्या डोळ्यात पाणी येते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी निवडणूक लढवत आहेत, अशा वेळी सर्वांनी एकत्र येऊन वहिनींना पाठिंबा दिला पाहिजे. ही निवडणूक बिनविरोध करणे हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे भरणे भावनाविवश होऊन म्हणाले. उभे राहिलात तर अवस्था पाहा, विरोधकांना इशारा काँग्रेसने बारामतीत उमेदवार देण्याचे संकेत दिल्याबाबत विचारले असता, दत्तात्रय भरणे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. कोणी स्वतःच्या हवसेपोटी किंवा चुकीच्या निर्णयामुळे सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उभे राहिले, तर त्यांची काय अवस्था होईल, हे मला वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. बारामतीची जनता दादांच्या कामाची पावती नक्कीच देईल, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा सल्ला दिला.
मुख्यमंत्री फडणवीसांनी चाकणकरांचा राजीनामा घ्यावा
मुंबई : प्रतिनिधी धक्कादायक बाब म्हणजे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा या भोंदूबाबासोबतचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हीडीओमध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातचे पाय धुताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता याच मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी चाकणकरांवर कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी […] The post मुख्यमंत्री फडणवीसांनी चाकणकरांचा राजीनामा घ्यावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांचा राजीनामा घ्यावा
मुंबई : प्रतिनिधी धक्कादायक बाब म्हणजे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा या भोंदूबाबासोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये रूपाली चाकणकर या अशोक खरातचे पाय धुताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी चाकणकरांवर कारवाईची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी […] The post मुख्यमंत्र्यांनी चाकणकरांचा राजीनामा घ्यावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात आता मळणी यंत्रावर काम करतांना शेजमजूरांचे अपघात रोखणे शक्य होणार असून त्यासाठी इडोळी (ता.हिंगोली) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी टू स्टेज स्मार्ट थ्रेशर हे उपकरण तयार केले आहे. या उपकरणाला राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला आहे. राज्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व लिडरशिप फॉर इक्विटी यांच्या वतीने ता. १६ मार्च ते ता. १८ मार्च या कालावधीत राज्यस्तरीय हॅकेथॉन स्पर्धा घेण्यात आली. तत्पुर्वी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करून माहिती घेण्यात आली होती. त्यानुसार हिंगोली तालुक्यातील इडोळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवी वर्गातील विद्यार्थीनी तेजल जाधव, वेदीका जाधव, अनुराधा टेकाळे यांनी शिक्षकी दीपाला ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी करून उपकरणाची माहिती दिली. त्यानंतर त्यांना आयोजकांकडून विविध आठ ते दहा प्रकारचे सेन्सर व इतर पार्टचा पुरवठा करण्यात आला. या सेन्सरमध्ये कोडींग करून व पार्टच्या माध्यमातून विद्यार्थीनींनी स्मार्ट थ्रेशर हे उपकरण तयार केले. सध्या पिकांची मळणी करतांना माळणी यंत्रात पिकाची टाकतांना थोडीही चूक मजूरांच्या जिवावर बेतते. यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने उपघात होतात. सदर अपघात रोखण्यासाठी विद्यार्थीनींनी स्मार्ट थ्रेशर तयार केले. यामध्ये टू ्स्टेज लावण्यात आल्या आहेत. यामध्ये मळणी यंत्रामध्ये हात सुरक्षित अंतराच्या पुढे जात असल्यास लगेचच अलार्म वाजतो व धोक्याची सूचना मिळते तर मळणी यंत्रात सुरक्षित अंतराच्या पुढे गेल्यानंतर अलार्म वाजून मळणी आपोआप बंद पडले. या उपकरणामुळे शेतमजूरांचे अपघात टाळणे शक्य होणार असल्याचे दाखवून देण्यात आले. पुणे येेथे ता. १६ ते ता. १८ मार्च या कालावधी झालेल्या हॅकेथॉन स्पर्धेत या उपकरणाचे सादरीकरण करण्यात आले. इडोळी सारख्या ग्रामीण भागातील शाळेने शेतकऱ्याच्या महत्वाच्या समस्येवर तयार केलेल्या उपकरणाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्याबद्दल विद्यार्थीनी तेजल जाधव, वेदीका जाधव, अनुराधा टेकाळे, मार्गदर्शक शिक्षीका दीपाली ढोले यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाणे, शिक्षणाधिकारी आसावरी काळे, केंद्र प्रमुख बी. जी. मुटकुळे, मुख्याध्यापक अशोक देवकर, शिक्षक संजय भक्कड, बंडू पुरी, अनिता जाधव, मनिषा पवार, सतीष कापसे, राजेश्वर पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे हनुमान जाधव, भानुदास जाधव, रामेश्वर टेकाळे, विठ्ठल जाधव, शिवाजी टेकाळे, वैजनाथ जाधव यांनी अभिनंदन केले आहे.
बारामतीसह राज्यातील दोन जागांवरील विधानसभेच्या पोटनिवडणुकांबाबत महाविकास आघाडीत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचे विधान करत, शरद पवार गटाने निवडणूक लढवली नाही तर काँग्रेस त्या जागांवर उमेदवार देण्याचा विचार करेल, असे सांगितले आहे. बारामती पोटनिवडणुकीबाबत सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या न लढण्याच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या मुद्द्यावर महाविकास आघाडीत अधिकृत चर्चा अद्याप झालेली नसून, परस्पर चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बारामतीत निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. तुतारीवर उमेदवार दिला नाही, तर आम्ही उमेदवार देऊ, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. बारामतीत राष्ट्रवादीमुळे काँग्रेस वाढली नाही, अशी नाराजीही उघडपणे व्यक्त करण्यात आली. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक वेळा युती करून काँग्रेसला अडचणीत टाकल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या भूमिकेवर टीका करतानाच भाजपवरही निशाणा साधण्यात आला. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून 23 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार उमेदवार असतील, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली आहे. त्यामुळे बारामतीत लढत कशी रंगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आघाडीत काय निर्णय होतो याकडे राज्याचे लक्ष याचदरम्यान, सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका ठामपणे मांडत, आम्ही बारामतीची जागा लढवणार नाही. सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही, असे स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीचीही या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देण्याची भूमिका नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे बारामतीतील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली असून, पुढील काही दिवसांत महाविकास आघाडीत काय निर्णय होतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
स्वदेशी जागरण मंचाच्या (एसजेएम) 'स्वावलंबी भारत अभियाना'साठी 20 मार्च ते 10 एप्रिल 2026 या कालावधीत देशव्यापी निधी संकलन मोहीम राबवण्यात येणार आहे. 'स्वदेशी' संकल्पनेचा प्रसार, स्थानिक उद्योगांना (एमएसएमई) बळकटी देणे आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत लोकसहभागातून निधी उभारला जात आहे. निधी संकलन आणि आर्थिक बाबींच्या व्यवस्थापनासाठी 'स्वर्णीम भारत फाऊंडेशन'ची स्थापना करण्यात आली आहे. या फाऊंडेशनमार्फत सर्व आर्थिक व्यवहार केले जातील. देणगीदारांसाठी क्यूआर कोड उपलब्ध असून, 100 रुपयांपासून पुढे कोणतीही रक्कम दान करता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 'व्होकल फॉर लोकल'ला प्रोत्साहन देणे, स्थानिक कारागीर आणि लघु उद्योगांना बळकटी देणे हे या निधी संकलनामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे. याशिवाय, स्वदेशी जागरण मंचाचे विविध उपक्रम आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. संकलित निधी प्रामुख्याने स्वदेशी विचारधारेचा प्रसार, लघुउद्योगांना प्रशिक्षण आणि आत्मनिर्भर भारतासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी वापरला जाईल, असे मंचाच्या सूत्रांनी सांगितले. 'एमवायएसबीए' (MySBA) या डिजिटल व्यासपीठाद्वारे तरुण नागरिकांना नोकरी शोधण्याऐवजी नोकरी देणारे बनण्यास प्रवृत्त केले जात आहे. ही मोहीम भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि स्वदेशी संकल्पनेला बळकटी देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. स्वदेशी जागरण मंचाने गावागावांत जाऊन नवीन स्वदेशी स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रचार-प्रसार करण्याकरिता आणि युवकांना प्रोत्साहित करून प्रशिक्षण देण्यासाठी पूर्णवेळ पगारी कार्यकर्ते नेमण्याचा निर्णय घेतला आहे. हे कार्यकर्ते दोन ते तीन वर्षे काम करतील आणि त्यांना साधारणतः 10 ते 15 हजार रुपये वेतन मिळेल. या कार्यकर्त्यांना रीतसर प्रशिक्षणही दिले जाईल. एवढ्या मोठ्या कार्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
हायप्रोफाईल भोंदूबाबाच्या फार्म हाऊसवर शस्त्रांचा साठा
नाशिक : प्रतिनिधी नाशिकमधील हायप्रोफाईल भोंदू बाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाली आहे. त्याचे राज्यातील अनेक मंत्री आणि उच्च पदस्थांसोबत संबंध असल्यामुळे त्याच्या अटकेने राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप अशोक खरातवर आहे. बुधवारी त्याला […] The post हायप्रोफाईल भोंदूबाबाच्या फार्म हाऊसवर शस्त्रांचा साठा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केंद्र सरकारच्या विदेश नीतीवर टीका केली आहे. होर्मूज समुद्रधुनीतून भारतीय जहाजांना मार्गक्रमण करण्यास परवानगी देण्याचे श्रेय केंद्र सरकारला नसून भारतीय जनतेला असल्याचे त्यांनी म्हटले. तिवारी यांच्या मते, इराणने भारतीय जहाजांना मार्ग देताना भारत सरकारचा उल्लेख टाळून स्पष्टपणे 'भारतीय जनतेचे' आभार मानले. यावरून सरकारपेक्षा जनतेचे आंतरराष्ट्रीय संबंध अधिक प्रभावी ठरत असल्याचे सूचित होते, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. देशहिताचे निर्णय वेळेवर घेतले जात नसल्याचा आरोप तिवारी यांनी केला. इराण-इस्राईल तणावाच्या पार्श्वभूमीवर, इज्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मोदींना सन्मानित केल्यानंतर लगेचच इराणवर हल्ला झाल्याचा संदर्भ देत, भारताची भूमिका संशयास्पद असल्याचे तिवारी यांनी म्हटले. इराणचे सर्वोच्च नेते अली खोमेनी यांच्या निधनाबाबत भारत सरकारने उशिरा प्रतिक्रिया दिल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, विशाखापट्टणम येथे आलेल्या इराणी युद्धनौकेवर अमेरिकेने हल्ला करून ती बुडवली, तेव्हा भारताने मदत करण्यास पुढाकार घेतला नाही, तर श्रीलंकाने मर्यादित साधनांनिशी मदत केल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. या सर्व घटनांमुळे भारतीय जनता इराणच्या समर्थनार्थ पुढे आली आणि देशभरातून सहानुभूती व्यक्त झाली. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी एका लेखाद्वारे भारत सरकारची भूमिका ही जनतेची भूमिका नसल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पष्ट केल्याचेही तिवारी यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर इराणने भारतीय जहाजांना होर्मूजमधून मार्ग दिला आणि त्याचे श्रेय भारतीय जनतेला दिल्याचा दावा त्यांनी केला. या घडामोडींमुळे संभाव्य ऊर्जा संकट काही काळ टळले असून, याचे श्रेय जनतेला व विरोधी पक्षांना दिले पाहिजे, असे तिवारी यांनी म्हटले.
नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या अशोक खरात उर्फ 'कॅप्टन' याच्या अटकेने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक श्रद्धा आणि मंत्र-तंत्राच्या आडून महिलांचे शोषण करणाऱ्या खरातला बुधवारी पहाटे अटक करण्यात आली. या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. महिल्या आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या पुरावे नष्ट करतील, त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ठोंबरे पाटील यांनी केली आहे. अशोक खरात हा सिन्नरमधील मिरगाव येथील 'श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट'चा अध्यक्ष असून, मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाल्यानंतर त्याने 'कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट' म्हणून ओळख निर्माण केली होती. अनेक बड्या नेत्यांशी त्याचे असलेले संबंध आता तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने कॅनडा कॉर्नर येथील खरातच्या कार्यालयाची सखोल झडती घेतली. यावेळी पोलिसांच्या हाती एक पेन ड्राइव्ह लागला असून, प्राथमिक तपासणीत त्यामध्ये तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, पीडित महिलांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काय म्हणाल्या रूपाली ठोंबरे? या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले. त्या म्हणाल्या, हा विषय कोणत्याही एका पक्षाचा किंवा जातीचा नसून महिलांच्या सुरक्षेचा आहे. या प्रकरणाची वाचा आम्ही एक वर्षापूर्वीच फोडली होती, मात्र खरात ज्या ट्रस्टचा अध्यक्ष आहे, त्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर स्वतः विश्वस्त आहेत. त्यामुळेच आजवर पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चाकणकरांनी पायउतार व्हावे, अन्यथा राज्यभर आंदोलन रूपाली ठोंबरे यांनी रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली आहे. ५८ व्हिडिओ सापडणे याचा अर्थ ५८ महिलांवर अत्याचार झाला आहे का? याचा तपास होणे गरजेचे आहे. चाकणकर मॅडम पदावर राहिल्या तर त्या पुराव्यांशी छेडछाड करू शकतात. त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ठोंबरे यांनी दिला. तसेच, हा गंभीर विषय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कानावर घालून तपासात पारदर्शकता आणण्याची विनंती करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. काय आहे मूळ प्रकरण? नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. खरातने स्वतःकडे 'दैवी शक्ती' असल्याचे भासवून आणि पीडितेच्या मनात विश्वास निर्माण करून तिला गुंगीचे औषध दिले व तिच्यावर अत्याचार केला, असा आरोप आहे. त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरात याची पाद्यपूजा केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
मराठी नववर्षाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा संदेश देत ‘महाराष्ट्र-नेक्स्ट’ हे अभियान जाहीर केले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या विशेष व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार आपणच करायचा, असा ठाम संदेश दिला आहे. या उपक्रमातून नव्या पिढीला आणि राज्याच्या भविष्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा केल्याने या मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा इतिहास, परंपरा आणि अभिमान यांचे प्रभावी दर्शन घडवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा, गड-किल्ल्यांची भव्यता आणि शौर्यगाथा दाखवत राज्याच्या स्वाभिमानाची जाणीव करून देण्यात आली आहे. दिल्लीचेही तख्त झुकावे, अशा ओळींतून महाराष्ट्राच्या ताकदीचा संदेश देत भावनिक वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या व्हिडिओमुळे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. ‘महाराष्ट्र-नेक्स्ट’ अभियानामध्ये शेतकरी, कामगार, उद्योजक आणि नोकरदार वर्ग यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. राज्याच्या विकासात प्रत्येक घटकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः तरुणांनी पुढाकार घेत आधुनिक आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न या मोहिमेतून मांडण्यात आले आहे. नव्या पिढीचा, नव्या युगाचा पुढचा महाराष्ट्र घडवूया, हा मुख्य संदेश या व्हिडिओतून देण्यात आला आहे. राजकीय अजेंड्याचा भाग व्हिडिओच्या शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र-नेक्स्टचे लोगो झळकतात, ज्यातून पक्षाची पुढील दिशा स्पष्ट होते. या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपली रणनीती ठरवली असल्याचे संकेत मिळत आहेत. हा उपक्रम केवळ प्रचार मोहीम नसून भविष्यातील राजकीय अजेंड्याचा भाग असल्याचे मानले जात आहे. मेळाव्यात मोहिमेवरही सविस्तर भाष्य दरम्यान, आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. ठाकरे बंधूंच्या युतीनंतरचा हा पहिलाच मेळावा असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या या सभेत राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट करतील. या मेळाव्यात ‘महाराष्ट्र-नेक्स्ट’ मोहिमेवरही सविस्तर भाष्य होण्याची शक्यता असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या भाषणाकडे लागले आहे.
हिंगोली जिल्हयातील दिव्यांगांच्या प्रश्नावर शासकिय रुग्णालयासमोर मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या उपोषणस्थळी दिव्यांग बांधवांनी गुरुवारी ता. 19 गुढी उभारून गुढी पाडव्याचा सण साजरा केला आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत उपोषण सुरुच राहिल अन सण, उत्सव याच ठिकाणी साजरे करू अशी भुमीका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात दिव्यांगांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. रुग्णालयात येणाऱ्या् दिव्यांगांना पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, वैद्यकिय महाविद्यालयातील कंत्राटी भरतीमध्ये दिव्यांगांना पात्रतेनुसार नियुक्ती द्यावी, दिव्यांग प्रमाणपत्राचे शिबीर असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत ज्यामुळे दिव्यांगांची फसवणुक करणाऱ्या दलालांना आवर बसणार आहे. डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या तसेच गतीमंद असलेल्या दिव्यागांना प्रमाणपत्र घेण्यासाठी रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर जावे लागते. रुग्णालयाची लिफ्ट बंद असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रुग्णालयाच्या खालच्या मजल्यावरच स्वतंत्र कक्ष सुरु करून प्रमाणपत्र द्यावी अशी मागणी दिव्यांग आधार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेचे पदाधिकारी पुजा मनवर, रंगनाथ मुटकुळे, महादा वाबळे, भारत वाबळे, त्र्यंबक शिंदे, पुजा इंगोले, लखन चव्हाण, संगिता शिंदे, रंजना काळे, दत्तराव किरडे, देविदास खिल्लारे यांनी बुधवारपासून ता. 18 शासकीय रुग्णालया समोर उपोषण सुरु केले आहे. दिव्यांगांच्या या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी उपोषणस्थळीच गुढी उभारून गुढी पाडव्याचा सण साजरा केला. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत याच ठिकाणी सण, उत्सव साजरे करणार असल्याची भुमीकाही आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता रुग्णालय प्रशासनाच्या भुमीकेकडे दिव्यांग बांधवांचे लक्ष लागले आङे. उपोषण हटविण्यासाठी दवाब तंत्राचा वापर या उपोषणस्थळी काही जणांनी बुधवारी ता. 18 दगडफेक करून उपोषण हटविण्यासाठी दवाब टाकण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणीही दिव्यांग बांधवाच्या वतीने करण्यात आली आहे.
औंढा नागनाथ तालुक्यात 15 वित्त आयोगाचा निधी नसतांनाही गटविकास अधिकाऱ्यांनी कामांच्या प्रशासकिय मान्यता दिल्या असून याप्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली झटे यांनी केला आहे. या प्रकरणी चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले आहेत. त्यामुळे आता औंढा तालुक्यात नवीनच प्रकरण उघड होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य शासनाकडून 15 व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतस्तरावर निधी दिला जातो. या निधीच्या उपलब्धतेनुसार संबंधित विभागाने कामांना मंजूरी देणे अपेक्षीत आहे. त्यानंतर या कामांसाठी प्रशासकिय मान्यता देऊन निवीदा प्रक्रिया राबविले आवश्यक आहे. मात्र सन 20211-22 या आर्थिक वर्षापासून पंधराव्या वित्त आयोगाचा जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावरील निधीच शासनस्तरावरून देण्यात आलेला नाही. तुर्तास केवळ ग्रामपंचायतस्तरावरील निधीच दिला जात आहे. मात्र पंचायत समितीस्तरावरील निधी नसतांनाही गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे यांनी काही कामांच्या प्रशासकिय मान्यता दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने अजरसोंडा येथे स्मशानभुमीत सुशोभीकरण करणे 4.55 लाख रुपये, अजरसोंडा येथे सोलारपंप बसविणे 5 लाख रुपये, तपोवन येथे सोलार पंप बसविणे 5 लाख रुपये तर लाख येथे पेव्हर ब्लॉक बसविणे या कामासाठी 4.55 लाख रुपयांचा निधी मंजूर करून प्रशासकिय मान्यता दिल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली झटे यांनी केला आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनानुसार जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार आता या चौकशीमध्ये काय निष्पन्न होणार याकडे औंढा नागनाथ तालुक्याचे लक्ष लागले आहे. या संदर्भात गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
गुढीपाडवा म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात… आनंद, उत्साह आणि नवीन गोष्टींचा आरंभ करण्याचा दिवस. या दिवशी घरात गुढी उभारली जाते, सण साजरा केला जातो आणि अनेक जण नवीन गोष्टींची खरेदी करतात. त्यात सर्वाधिक उठून दिसते ती म्हणजे नवीन वाहनांची खरेदी. दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. काहीजण महिनाभर आधीच बुकिंग करून ठेवतात, तर काहीजण या शुभ दिवशीच शोरूममध्ये जाऊन वाहन घेण्याचा निर्णय घेतात. शुभ मुहूर्त आणि नवीन वर्षाची चांगली सुरुवात या भावनेतून ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. या दिवशी अनेक कुटुंबांसाठी वाहन खरेदी ही केवळ गरज नसून, एक भावनिक क्षण असतो. काहींसाठी हे पहिले वाहन असते, तर काहींसाठी वर्षानुवर्षे पाहिलेले स्वप्न पूर्ण होण्याचा दिवस असतो. वाहन घेताना नारळ फोडणे, फुलांची सजावट करणे आणि विधीपूर्वक पूजा करणे, या सगळ्या गोष्टी त्या क्षणाला अधिकच खास बनवतात. शोरूममध्येही या दिवशी खास ऑफर्स, सवलती आणि आकर्षक योजना दिल्या जातात. त्यामुळे ग्राहकांसाठी हा दिवस अधिकच खास ठरतो. या पार्श्वभूमीवर आम्ही छत्रपती संभाजीनगरमधील काही ग्राहकांशी संवाद साधला.. सुमारे 80 टक्के ईव्हीबाबत चौकशा.. यंदा इलेक्ट्रिक वाहनांबाबत ग्राहकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सुमारे 80 टक्के चौकशा या ईव्हीबाबत होत आहेत. आखाती देशांतील तणावामुळे पेट्रोल दरवाढीची शक्यता आणि वाढते प्रदूषण लक्षात घेता ग्राहक मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली. हे आमचं स्वप्न होतं.. “हे आमचं स्वप्न होतं. गाडी घेताना आमच्या तिन्ही पिढ्या-आजोबा, वडील आणि नातू-एकत्र होते, त्यामुळे हा क्षण आयुष्यभर लक्षात राहील,” असे त्यांनी सांगितले. ही माझी खूप दिवसांची इच्छा होती.. एका महिलेने नवी चारचाकी घेतल्यानंतर सांगितले, ही माझी खूप दिवसांची इच्छा होती. मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर ती आज पूर्ण झाली,” असे त्यांनी सांगितले. वाहन बाजार (75 कोटी): जीएसटी कपातीचा बूस्टर डोस यंदा ऑटोमोबाइल क्षेत्रातील वाढ ही केवळ मुहूर्तामुळे नाही, तर जीएसटी दरातील कपातीमुळेही झाली आहे. छोट्या गाड्या आणि दुचाकींवरील जीएसटी कमी झाल्याने मध्यमवर्गीयांसाठी वाहन खरेदी अधिक सुलभ झाली आहे. तसेच इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांकडे वळताना दिसत आहे. मोठ्या गाड्यांच्या वाढत्या ट्रेंडमुळे एसयूव्ही सेगमेंटमध्ये सुमारे 25 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. दुचाकी विक्रीत 20 %पर्यंत वाढ यंदा दुचाकी वाहनांवरील जीएसटीमध्ये झालेल्या कपातीमुळे सर्वसामान्यांचे दुचाकीचे स्वप्न साकारणे सोपे झाले आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुचाकींच्या विक्रीत 15 ते 20 टक्क्यांची लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. 2 हजार दुचाकींची विक्रीजीएसटी कमी झाल्यामुळे 5 वर्षांत पहिल्यांदाच दुचाकी विक्रीत 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. पाडव्याला 2 हजार दुचाकींची विक्री होईल, यात 12 ते 15 टक्के ईव्ही गाड्या आहेत. अशी माहिती ऑटोमोबाइल डीलर राहुल मिश्रीकोटकर यांनी दिली. संभाजीनगरकरांची 790 कोटींची खरेदीची गुढी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. वाहनांसह गृहखरेदी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्येही ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. शहरातील रिअल इस्टेट, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल आणि सराफा या चार प्रमुख क्षेत्रांतील आकडेवारीनुसार, एका दिवसात सुमारे 790 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. त्यात रिअल इस्टेट क्षेत्रातच 400 कोटींची विक्री नोंदवली गेली, जे शहराच्या वाढत्या आर्थिक क्षमतेचे प्रतीक मानले जात आहे. नव्या सुरुवातीचा उत्सवगुढीपाडवा हा केवळ सण नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यात नवे पर्व सुरू करणारा- आशा, आनंद आणि नव्या स्वप्नांनी भरलेला एक खास क्षण आहे.
राज्यात मराठी नववर्षाचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असून गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, नागपूरसह अनेक शहरांमध्ये भव्य शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात नागरिक पारंपरिक वेशात सहभागी होत असून ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या पताकांच्या सजावटीत संपूर्ण वातावरण भारावून गेले आहे. सणाच्या निमित्ताने लोकांनी नव्या संकल्पांसह वर्षाची सुरुवात केली आहे. शोभायात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती नागपूरमध्ये आयोजित शोभायात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. या ठिकाणी सामूहिक रामरक्षा पठण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी गुढीपाडवा हा आपल्या संस्कृतीचा महत्त्वाचा सण असल्याचे सांगत नव्या वर्षात सकारात्मक संकल्प घेऊन पुढे जाण्याचे आवाहन केले. तसेच देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पारंपरिक पोशाखात सहभागी झालेल्या नागरिकांमुळे नागपूरमध्ये भगवामय वातावरण निर्माण झाले होते. ठाण्यातील शोभायात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरम्यान, ठाण्यातील शोभायात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला. कोपीनेश्वर मंदिरातून पालखी सोहळ्याची सुरुवात झाली असून यात आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आणि खासदार नरेश मस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाण्यातील रस्त्यांवर मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर आणि लेझीमच्या नादात शोभायात्रा रंगतदार झाली. डोंबिवलीत स्वागत यात्रा डोंबिवलीत गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेत आधुनिकतेची झलक पाहायला मिळाली. महिला रायडर्स आणि सायकलस्वारांनी पारंपरिक वेशात सहभागी होत मोटरसायकलवर गुढी उभारत अनोख्या पद्धतीने सण साजरा केला. नव्या पिढीकडून परंपरेचे जतन करण्याचा हा अनोखा प्रयत्न असल्याचे चित्र दिसून आले. महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. तुळजाभवानी मंदिरात गुढी दरम्यान, तुळजाभवानी मंदिर येथेही गुढीपाडवा मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. पहाटे आरती करून मंदिराच्या शिखरावर विधीवत गुढी उभारण्यात आली. मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा आणि वाकोाजी बुवा यांच्या उपस्थितीत देवीची विशेष पूजा करण्यात आली. तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवसानिमित्त भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली, ज्यामुळे संपूर्ण राज्यात सणाचा उत्साह अधिकच वाढला.
रुपाली चाकणकर या मुर्ख आहेत त्या खोटे बोलत आहेत. त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहूच नये, त्यांच्यात थोडीच जरी नैतिकता असेल तर त्यांनी पद सोडले पाहिजे, नाशिक भोंदू बाबा प्रकरणी वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न येतो कुठे असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अनेक गोष्टी चर्चेत येत होत्या, एका महिलेने हे सगळे सहन न झाल्याने तक्रार दाखल केली. तुम्ही अनेकांवर दबाव आणून तक्रार दाखल न करु दिल्याची प्रकरणे समोर आली आहेत. संजय राऊत म्हणाले की, महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांच्यावर अनेक आरोप झाले आहेत. त्या वादग्रस्त आहे त्यांना कोण आणि का वाचवतंय हा प्रश्न मला पडला आहे. त्या नाशिकच्या भोंदू बाबाने अनेक महिलांवर अत्याचार केले त्या मराठी महिला आहेत अशी माहिती माझ्याकडे आहे. त्यांच्या पाद्यपुजन करायला सत्ताधारी लोकं जातात आणि गृहमंत्री डोळेबंद करत बसले आहे. ..तर त्या सर्वांवर गुन्हे दाखल करा संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकारण्याचे नाशिक जिल्ह्यातील आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत त्यांना काल बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. हे एक प्रकरण नाही अशी अनेक प्रकरणे समोर येत आहे, पोलिसांनी जो मुद्देमाल जप्त केला आहे त्यातून राज्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेकांचे पुरावे त्यात असल्याचे सांगितले जाते. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा शासनाने मंजूर केला आहे. असे असताना सुद्धा शासनातील मोठ्या पदावरील बसलेल्या व्यक्ती मग त्यात महिला आयोगाच्या अध्यक्ष असू देत किंवा मंत्री, आमदार हे सगळे अंधश्रद्धेने त्या बाबाचे पुजा करत आहे. कोणी जादूटोण्याला बसले आहे, त्यांच्यासोबत ज्यांची ज्यांची छायाचित्र आले आहेत, त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केले पाहिजे. मंत्र्यांना गृहमंत्रालयाने बडतर्फ करावे संजय राऊत म्हणाले की, महिला आयोगाच्या अध्यक्षांचे काम काय आहे की महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर आवाज उठवणे, अशा गुन्हेगारांवर कारवाई करणे, मंत्री, नेते जर अशा लोकांच्या पायाजवळ बसत असतील तर महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस पदावर का ठेवतात. ज्यांचे संबंध तिथे उघड होत आहे त्यांना पदावरुन दूर केले पाहिजे. त्या भोंदू बाबाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रतिमेला कलंक लावणारा हा प्रकार आहे. ढोंग आणि अंधश्रद्धेविरोधात लढणारे हे पहिले राज्य आहे. सत्तेत टिकण्यासाठी मंत्रीच असे करणार असतील तर गृहमंत्रालयाने यांना बडतर्फ करायला हवे.
मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राजकीय वातावरण तापवणारी घडामोड घडली आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सकाळीच सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ शेअर करत सूचक इशारा दिला. या व्हिडिओमध्ये काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पक्ष सोडणाऱ्यांवर कठोर शब्दांत टीका करताना दिसतात. जा, स्वतःचा जीव आणि करिअर वाचवा, मला काही फरक पडत नाही, असा संदेश त्या व्हिडिओतून देण्यात आला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत राऊत यांनी ‘कहाणी अच्छी है!’ असे कॅप्शन दिले असून, त्यामागील राजकीय अर्थ काय याबाबत चर्चा रंगल्या आहेत. नववर्षाच्या शुभेच्छांचा माहोल असताना असा व्हिडिओ शेअर केल्यामुळे राऊतांनी कोणाला उद्देशून हा संदेश दिला, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. पक्षांतराच्या हालचालींवर हा इशारा असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, राऊत यांनी यामागील उद्देश स्पष्ट न केल्यामुळे राजकीय वर्तुळात कुतूहल अधिक वाढले आहे. काहीजणांच्या मते, हा संदेश पक्ष सोडण्याच्या विचारात असलेल्या नेत्यांना रोखण्यासाठी आहे. दरम्यान, राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा जोर धरू लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दिल्ली दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या दौऱ्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बैठक झाल्यानंतर शिंदे यांनी आपल्या खासदारांचीही बैठक घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव गटातील चार खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हे घडल्यास दिल्लीतील शिंदे गटाची ताकद वाढणार असून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळेच या पार्श्वभूमीवर राऊतांचे ट्वीट हे संभाव्य फुटीबाबतचा इशारा मानले जात आहे. ‘ऑपरेशन टायगर’ या चर्चेमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकारणात मोठ्या उलथापालथीची चिन्हे एकूणच, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीची चिन्हे दिसू लागली आहेत. राऊतांनी शेअर केलेला व्हिडिओ हा केवळ योगायोग आहे की त्यामागे ठोस रणनीती आहे, याचे उत्तर लवकरच स्पष्ट होणार आहे. उद्धव गटातील खासदार खरोखरच फुटणार का, की हा केवळ राजकीय दबावाचा भाग आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कॅप्टन अशोक खरातला 23 तारखेपर्यंत पोलिस कोठडी:अंकशास्त्रज्ञाच्या नावाखाली अत्याचारांचा पर्दाफाश
नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावरणारा कॅप्टन अशोक खरात याला गंभीर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्र यांचा आधार घेत महिलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे कारवाई करत त्याला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला 23 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये एका 35 वर्षीय विवाहित महिलेची कॅनडा कॉर्नर परिसरात अशोक खरातशी ओळख झाली होती. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत त्याने मंत्रतंत्र आणि धार्मिक विधींमधून तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर वेळोवेळी तिला कार्यालयात बोलावून तिच्यावर दबाव टाकण्यात आला. आरोपानुसार, गुंगीकारक पदार्थ देऊन आणि धमक्या देत तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले. नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत हा प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा उलगडा पीडित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर झाला. तीन वर्षे सहन केल्यानंतर तिने सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाडसाने तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. तपासादरम्यान कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली असता एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला. त्यामध्ये 58 व्हिडिओ सापडल्याची माहिती समोर आली असून, या व्हिडिओंची सखोल चौकशी सुरू आहे. काही नामांकित व्यक्तींचा देखील यात समावेश असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशानेश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाल्यानंतर तो अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला होता. अनेक राजकीय नेते, उद्योजक आणि सेलिब्रिटी त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असल्याने त्याची प्रतिमा प्रभावी बनली होती. मात्र आता त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे त्याची प्रतिमा पूर्णपणे ढासळली आहे. या प्रकरणामुळे धार्मिक आस्थेच्या नावाखाली चालणाऱ्या फसवणुकीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटत आहेत. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावरून खरातशी संबंधित व्यक्तींवर टीका करत सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी महिला आयोगाशी संबंधित व्यक्तींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत अशा लोकांना पाठिंबा देणे योग्य आहे का, असा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आला असून पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पतीच्या मृत्यूची भीती घालत महिलेवर 2 वर्षे अत्याचार पतीचे भविष्य जाणून घेण्यासाठी आलेल्या महिलेला दैवी शक्तीचा खोटा दावा करत ‘तुझ्या पतीचा मृत्यू होईल’ अशी पतीच्या निधनाची भीती घालून २ वर्ष अत्याचार करणाऱ्या ‘कॅप्टन’ अशोक खरातला गुन्हे शाखा १ च्या पथकाने मंगळवारी (दि. १८) रात्री ११.३० वाजता कर्मयोगीनगरमधील बंगल्यातून अटक केली. सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बड्या नेत्यांसह सेलिब्रिटींचे भविष्य सांगणाऱ्या कॅप्टनच्या पेन ड्राईव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याच्या चर्चेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. पूर्ण बातमी वाचा….
मुंबईतील शिवाजी पार्क येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार असून, यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहेत. हा मेळावा पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात असून, यातून पुढील राजकीय दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या मेळाव्यात राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. त्यांच्या भाषणातून पक्षाची आगामी भूमिका, निवडणुकांची रणनीती आणि संघटनात्मक बदल याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेष म्हणजे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीनंतर हा पहिलाच गुढीपाडवा मेळावा असल्यामुळे, या युतीबाबत ते नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेळाव्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, मैदानात मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभारण्यात आली आहे. दोन मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत, ज्यावर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. या स्क्रीनवर कोणते व्हिडिओ दाखवले जाणार याबाबतही उत्सुकता आहे. सायंकाळी सहा वाजता मेळाव्याला सुरुवात होणार असून, त्यानंतर राज ठाकरे यांचे भाषण होईल. सभेतून महत्त्वाचे संकेत मिळण्याची शक्यता याआधी झालेल्या पदाधिकारी बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आगामी काळात पक्ष कोणती भूमिका घेणार, तसेच युतीनंतरची राजकीय समीकरणे कशी असतील, याबाबत महत्त्वाचे संकेत या सभेतून मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आजच्या या मेळाव्याकडे लागले आहे.
विदर्भातील पश्चिम भागात आगामी चार दिवस ढगाळ वातावरण राहणार असून विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचा परिणाम पूर्व विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ व बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे. अकोल्याचे तापमान बुधवारी ३६.२ अंश नोंदवले गेले. अकोल्यात मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात सतत ४१ तर काही वेळा ४२ अंश तापमान नोंदवले गेले होते. त्यानंतर गत दोन दिवसांपासून पारा घसरला असून बुधवारी तापमानाचा पारा ३७.२ अंशांपर्यंत खाली आले आहे. तसेच अमरावतीचे कमाल तापमान ३५.४ अंश राहिले. बुलडाण्याचे ३६.२ अंश तर यवतमाळचे विदर्भात ३४.२ अंश नोंदवले गेले आहे. पश्चिम विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यातील तापमान खाली आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना आगामी काही दिवस दिलासा मिळणार आहे. बदलत्या तापमानाचा अनुभव येणार आहे. दुपारी उन्हानंतर ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यांचा अनुभव येणार आहे. त्यामुळे पुढील चार दिवस बदलते हवामान व उकाडा, या दोन्हींचा अनुभव नागरिकांना येण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांच्या तुलनेत पूर्व विदर्भात वातावरण अधिक उष्ण राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी दुपारी ऊन आणि कोरडे हवामान जाणवणार आहे. शुक्रवारी वातावरण काही प्रमाण ढगाळ राहणार आहे. आणि दुपारनंतर वारे वाहण्याची शक्यता आहे. शनिवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. रविवारी पुन्हा कडक ऊन पडण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर हळूहळू तापमान वाढण्यास सुरुवात होईल आणि काही दिवसात वातावरण पूर्वपदावर येईल, असा अंदाज हवामानतज्ञांनी वर्तवला आहे. शहर कमाल किमान अकोला ३७.२ २२.७ अमरावती ३५.४ २२.३ यवतमाळ ३४.२ ०० बुलडाणा ३६.२ २१. ५ मार्चचा पहिला पंधरवडा ठरला सर्वाधिक उष्ण मार्चच्या पहिल्या पंधरवडा अकोल्यात सर्वात उष्ण राहिला आहे. तापमानाचा पारा सतत ४० ते ४२ अंशांच्या दरम्यान राहिला, त्यामुळे अकोलेकरांना कडक उन्हाचा सामना करावा लागला. त्यामुळे थंड पेयांची दुकाने, रसवंत्या आणि रसाळ फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. शहराच्या विविध भागात टरबूज आणि खरबुजांचे स्टॉल लागले आहेत. लिंबू पाणी, ताक सेवनाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
मनपा निवडणुकीत भाजपला शहदेण्यासाठी ठाकरे गटाचे आ. नितीनदेशमुख यांनी जोरदार मोर्चेबांधणी करूनसहा नगरसेवक निवडून आणले, यापैकीआता चार नगरसेवकांनी पक्षालासोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला.याशिवाय शिवसेना जिल्हाप्रमुख मंगेशकाळे यांनी देखील धनुष्यबाण हातीघेतल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या ग्रामीणव शहरी कार्यकर्त्यांवर याचा परिणामहोणार असल्याने हा आ. देशमुख यांनामोठा धक्का मानला जात आहे. महापालिका निवडणुकीचे वातावरण शांत झाले असले तरी, आता पुन्हा राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. पक्षाचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे तसेच मनपातील पक्षाच्या सहा नगरसेवकांपैकी चौघांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत मंगळवारी रात्री उशिरा शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश केला. या राजकीय भूकंपामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तर महापालिकेत शिवसेनेच्या शिंदे गटाचेपक्षीय बलाबल एकवरून पाचवरपोहोचले. या राजकीय उलथापालथीनंतर महापालिकेतील भाजपप्रणीत शहरसुधारणा आघाडीची ताकद वाढली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेशकेलेल्यांमध्ये ठाकरे गटाचे नगरसेवकसागर भारुका, मनोज पाटील, सोनालीसरोदे आणि सुरेखा काळे तसेचजिल्हाप्रमुख मंगेश काळे यांचा समावेश आहे. या सर्वांनी मुंबईत उपमुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षातप्रवेश केला. हा प्रवेश सोहळा शिवसेनानेते चंद्रशेखर पांडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता. ८० नगरसेवक असलेल्या अकोला महानगरपालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे सहा नगरसेवक विजयी झाले. शिवाय एक स्वीकृत सदस्य देखील वाट्याला आल्याने भाजप, काँग्रेसनंतर महापालिकेत क्रमांक तीनचा हा ठरला. मात्र हे समीकरण अवघ्या पंधरा दिवसात होत्याचे नव्हते झाले. जिल्हाप्रमुख मंगेश काळेंसह पक्षाच्या चार नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर आता महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे संख्याबळ देखील घटले असून, आता पक्षाचे गटनेते विजय इंगळे, अभय खुमकर व स्वीकृत नगरसेवक शंकर लंगोटे हे तीन नगरसेवक ठाकरे गटाकडे उरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू होते. या पक्षप्रवेशाने अखेर त्याला पूर्णविराम मिळाला आहे. येईल, असा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला. सन २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीतील २ हजारांपेक्षा जास्त विहिरींची देयके तांत्रिक कारणांमुळे रखडली होती. याबाबत काही दिवसांपूर्वी आ. नितीन देशमुख यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्याशी चर्चा केली. या बैठकीनंतर प्रशासनाने प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. दरम्यान विहिरींचा मुद्दा निकाली न निघाल्याने १८ मार्च रोजी आ. देशमुख, महानगराध्यक्ष आशिष गावंडे यांच्यासह शेतकऱ्यांनी सीईओंच्या कक्षात धाव घेतली. याठिकाणी सीईओ अनिता मेश्राम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, पातूरचे बीडीओ सतीश नायसेयांच्यासह अन्य अधिकारी होते. शेतकऱ्यांनी घरातील दागिने गहाण ठेवून, सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन २ हजार पेक्षा अधिक विहिरीचे बांधकाम केले. विहिरीचे जिओ टॅगिंग केले नाही. मस्टरची नियमानुसार नोंद केली नाही. ३१ मार्च पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांचे पैसे रखडणार आहे असे म्हणत शिवसेना नेत्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. तीन वर्षांपासून विहिरी मंजूर, बांधकाम पूर्ण केले, अद्याप देयक दिले नाही. बीडीओंमुळे पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केला. संबंधित अधिकारी व अभियंत्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करीत आ. देशमुख यंत्रणांवर संतापले. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी मध्यरात्रीठाकरे गटाच्या चार नगरसेवक व जिल्हाप्रमुख यांचा पक्षप्रवेश झाला.‘त्यांचा’ निर्णय क्षणिकसुखाचा, दूरदृष्टीचा अभाव^जिल्हाप्रमुखांसह चार नगरसेवकांनीशिंदेसेनेत प्रवेशाचा घेतलेला निर्णय हाक्षणिक सुखापोटी घेतला. दूरदृष्टीबघितली नाही. त्यांच्या जाण्यानेपक्षावर परिणाम होणार नाही. त्यांनामतदारांनी भाजप-शिंदे सेनेच्याविरोधात दिलेला कौल होता .- नितीन देशमुख, उपनेते तथाआमदार, शिवसेना ठाकरे गट.प्रभागाच्या विकासासाठीचपक्ष प्रवेशाचा निर्णय^पैशांसाठी नव्हे प्रभागाच्या विकासाचाविचार करूनच शिवसेना ठाकरे गटातूनशिंदंेच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णयचारही नगरसेवकांनी घेतला आहे.प्रभागातील जनतेच्या कामांसाठी निधीमिळावा, त्यांना निवडणुकीच्यावेळीदिलेल्या विकासकामांची पूर्ती व्हावी,यासाठी हा निर्णय घेतला आहे.- मंगेश काळे, जिल्हाप्रमुख.शिवसेना पक्ष वाढीसाठीमोठा हातभार लागणार^एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती पाहूनठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख मंगेशकाळेंसह चार नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश घेतला. पक्ष वाढीसाठीत्यांचा हातभार लागणार आहे. सर्वांनासोबत घेऊन काम करण्यावर आमचाशिवसेना शिंदे गटाचा प्रयत्न राहील.- राजेश मिश्रा, महानगरप्रमुख,शिवसेना शिंदे गट.
शहरासाठी निधी कमी पडू देणार नाही:मुख्यमंत्र्यांची ग्वाही; महापाैर शारदा खेडकर यांनी घेतली भेट
मुंबई दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळाचे भाजपचे मुख्य प्रतोद आ. रणधीर सावरकर, महापौर शारदा रणजीत खेडकर तसेच रणजित खेडकर यांनी भेट घेतली. या भेटीत अकोला शहराच्या विकासासाठी विविध प्रकल्पांवर विचारविनिमय करण्यात आला. विशेषतः रस्ते व पायाभूत सुविधा विकास, पाणीपुरवठा व्यवस्थेचे सुदृढीकरण, स्वच्छता व्यवस्था सुधारणा तसेच नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्याकरिता निधी अपूरा पडू देणार नाही, तसेच प्रलंबित विकासकामांना गती देणे, नवीन प्रकल्पांना मंजुरी मिळवून देणे व शहराकरिता आवश्यक नावीन्यपूर्ण प्रकल्प उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री यांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीमुळे अकोला शहराच्या विकासाला अधिक वेग मिळणार असून, नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास महापौर शारदा खेडकर यांनी व्यक्त केला.
अमरावतीच्या माजी महापौर तथा भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या किरणताई महल्ले यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी निवड झाली आहे. देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यालयातर्फे मंगळवार, १७ मार्च रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली. दरम्यान गुरुवारी १९ मार्च रोजी त्या दिल्ली येथे पदभार स्वीकारणार आहेत. त्यासाठी त्या अमरावती येथून दिल्लीसाठी रवाना झाल्या आहेत. किरणताई महल्ले या १९९७ मध्ये अमरावतीच्या महापौर म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यापूर्वी त्यांच्या नेतृत्वात राधानगर येथील मद्यविक्रीचे दुकान हटवण्याचे ऐतिहासिक आंदोलन झाले होते. दरम्यानच्या काळात किरणताई महल्ले यांच्या खांद्यावर भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारीही सोपविण्यात आली होती. सध्या भाजपच्या ज्येष्ठ नेतेमंडळींच्या समूहात त्यांचे नाव अव्वल स्थानी आहे. दरम्यान या यशाबद्दल भाजपसह विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ही वाढदिवसाची भेट ठरली किरणताई महल्ले यांचा वाढदिवस १९ मार्च आहे. सन १९९७ साली याच तारखेला त्यांनी महापौरपदाची सूत्रे हाती घेतली होती. आता पुन्हा त्याच दिवशी त्यांना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सदर तारीख ही त्यांच्यासाठी भाग्यशाली तर आहेच, शिवाय ही त्यांच्यासाठी वाढदिवसाचीही भेट ठरली आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर घरात नवीन वस्तू नेणे शुभ मानले जाते. त्यामुळे एखादी वस्तु घरी नेता आली नाही तरी तिचे बुकींग तरी करावे या उद्देशाने गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशीच बुधवारी १८ रोजी सराफा, दुचाकी, चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्स, तयार पोशाख व खाद्यान्नांच्या बाजारात चांगलाच झगमगाट दिसून आला. ग्राहक उत्साहाने खरेदी करीत असल्यामुळे व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरही समाधान दिसून आले. सोने-चांदीचे भाव वाढत असले तरी गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय असून आगामी काही दिवसांत सोने, चांदी २ लाखापर्यंत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सराफा बाजारासह सोने, चांदीच्या शोरूममध्ये दागिण्यांची खरेदी व बुकिंगसाठी चांगलीच गर्दी उसळली होती. काही शोरूमने हिऱ्याच्या दागिण्यांच्या घडवणीवर १०० टक्के सुट दिल्यामुळे १ लाख १५ हजार रु. कॅरेट दराने मिळणाऱ्या हिऱ्यांच्या दागिण्यांचीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक मागणी राहिली. शुद्ध सोन्याच्या अंगठ्या, नाण्यांसाठी तर मोठ्या प्रमाणावर बुकिंग झाले. १८ ते १४ कॅरेटपर्यंतच्या सोन्याचे दागिणे जसे गोफ, अंगठी, मंगळसुत्र, नेकलेस, कानातले दागिणे बुक करण्यात आले. महिलांसह पुरुषांनीही सोने, चांदी खरेदीसाठी गर्दी केली होती. चारचाकी वाहनाचा विचार करता आरामदायक, घरापासून ते गंतव्य ठिकाणापर्यंत कोणत्याही त्रासाशिवाय सहकुटुंब पोहोचण्यासाठी उत्तम तसेच प्रवासाचा उत्तम पर्याय म्हणून चारचाकी वाहनांच्या खरेदीतही यंदा चांगलीच तेजी दिसून आली. यंदा सर्वच कंपन्यांच्या एकूण ५७० चारचाकी वाहनांचे बुकिंग व डिलिवरी होणार असल्याचा अंदाज शोरूमच्या संचालकांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे दुचाकी वाहनांच्या खरेदीतही यंदा समाधाकारक वाढ नोंदवण्यात आली आहे. यंदा किमान ६५० दुचाकी वाहनांची खरेदी तसेच विक्री उर्वरित. पान ४ वस्तू २०२५ २०२६ चारचाकी ४५० ५७० दुचाकी ५०० ६५० श्रीखंड, चक्का ५५०० ८००० एसी ३०० ६०० कुलर ६०० ७०० तुलना २०२५ व २०२६ मध्ये अशी झाली खरेदी ९ कॅरेटचे दागिणेही उपलब्ध शहरात यंदा प्रथमच ९ कॅरेटचे दागिणे उपलब्ध असून त्यावर परतावाही चांगला मिळणार आहे. या दागिण्यांची किंमत १८ ते २४ कॅरेटच्या दागिण्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. २० हजारापासून सर्वच प्रकारचे दागिणे उपलब्ध असल्याची माहिती पी.एन.गाडगिळ शोरूमद्वारे देण्यात आली. चारचाकी वाहनांची बुकिंग, खरेदी उत्तम ^गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चारचाकी वाहनांचे बुकिंग व खरेदी उत्तम आहे. सुमारे ३० टक्के वाढ दिसून येत आहे. शासकीय वाहनापेक्षा स्वत:चे वाहन प्रवासाकरिता उत्तम असल्यामुळे चारचाकी खरेदीकडे कल. - रणजीत बंड, संचालक, अस्पा बंड सन्स. एसीची मागणी यंदा अधिकपटीने वाढली ^इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंमध्ये एसीला सर्वाधिक मागणी आहे, कारण उन्हाळा लवकर सुरू झाला असून उकाडाही गेल्या वेळच्या तुलनेत जास्त आहे. गेल्या वर्षीपेक्षा ५० टक्क्याने एसीच्या मागणीसह खरेदीत वाढ झाली. - नीलेश चिठोरे, संचालक, मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या वनोजा बाग येथील श्री संत लखमाजी महाराज संस्थान येथे गुरुवारी १९ मार्चला गुढीपाडवा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवानिमित्त येथे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळेल. श्री. संत लखमाजी महाराज संस्थान हे या तालुक्यातील एक प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या महोत्सवाला जवळपास ३०० वर्षांची परंपरा असून या महोत्सवाला धार्मिक तसेच सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. ‘बाग’ या नावामागेही एक इतिहास दडलेला आहे. पूर्वी या परिसरात घनदाट जंगल होते, इतके की दिवसादेखील अंधार पडावा अशी परिस्थिती होती. मोठमोठ्या वृक्षांनी व्यापलेल्या या जागेला ‘बाग’ असे संबोधले जाई. आजही त्या परंपरेची साक्ष देणारे हे मंदिर सात शिवारांच्या सीमेवर वसलेले आहे. या सात शिवारांमध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यातील वनोजा, चिंचोली, गावंडगाव, सातेगाव तसेच दर्यापूर तालुक्यातील वडनेरगंगाई, येवदा आणि उमरी या गावांचा समावेश होतो. या सातही गावांमधून मंदिराकडे जाण्यासाठी रस्ते उपलब्ध आहेत, मात्र अपुऱ्या रस्त्यांमुळे भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. घटस्थापनेपासून नऊ दिवस हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यानंतर पौष महिन्यातील पाच रविवारही यात्रा महोत्सव साजरा केला जातो. मात्र सर्वात मोठा उत्सव म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी लाखो भाविक येथे दाखल होतात. व्यापारी वर्ग, महाप्रसाद, तसेच दोन ते तीन किलोमीटर परिसरात भाविक तंबू ठोकून किंवा झाडाखाली बसून प्रसादाचा कार्यक्रम करतात. संस्थानतर्फे पाणी टँकरसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. तरीही रस्त्यांच्या अभावामुळे भाविकांची गैरसोय होत असल्याची खंत व्यक्त केली जाते. यासाठी पूर्वी उपोषणही करण्यात आले होते. सुमारे ६० वर्षांपूर्वी या मार्गावर महामंडळाची बसही धावत होती, जी ‘जंगल एसटी’ म्हणून ओळखली जात होती. धार्मिक कार्याबरोबरच संस्थान विविध समाजोपयोगी उपक्रमही राबवते. गुढीपाडव्याच्या दिवशी हजारो लोक महाप्रसादात सहभागी होतात. निराधारांना निवारा व अन्नाची व्यवस्था केली जाते. कोरोनाकाळात गरजूंना अन्नधान्य वाटप, गरीब मुलांच्या विवाहासाठी मदत, तसेच आदिवासी भागातील शेतमजुरांना अन्न व वस्त्रदान करण्यात येते. याशिवाय मंदिराच्या कळसाची स्थापना व होमपूजन यांसारखे धार्मिक विधीही येथे पार पडतात. अशी माहिती संस्थानचे सचिव चंदन गायगोले यांनी दिली. भाविकांनी या यात्रेचा लाभ घ्यावा व काही अडचण असल्यास संस्थानशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. देशभरातून वर्षभर येतात दर्शनासाठी सर्व भक्तगण लखमाजी महाराजांचे हे जागृत देवस्थान असल्याने सर्व जाती-धर्माचे भाविक वर्षभर येथे येत असतात. सुरत, यवतमाळ, वाशीम, ठाणे, पुणे, बडोदा, जयपूर, नागपूर, मुंबई, नांदेड, अकोला, वापी, गुजरात, इंदूर, अमरावती तसेच मध्य प्रदेशातूनही मोठ्या प्रमाणात भक्त येथे दर्शनासाठी येतात. प्रत्येक महिन्याच्या रविवारी कुटुंबासह येऊन ‘रोडगे’ प्रसाद बनवण्याची परंपरा येथे आजही कायम आहे. मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
स्थानिक सारडा महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने वर्तमान राजकारणात भारतीय युवकांची भूमिका या महत्त्वपूर्ण विषयावर मंगळवार १७ मार्च रोजी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रातून विद्यार्थ्यांना बदलत्या राजकीय परिस्थितीत युवकांची भूमिका, जबाबदाऱ्या आणि सहभाग याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कविता मालोकार होत्या, तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. महेंद्र गिरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांनी केवळ मतदार म्हणून न राहता सक्रिय नागरिक म्हणून समाज आणि राजकारणात सहभागी होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच सध्याच्या राजकीय प्रक्रियेत युवकांचा वाढता प्रभाव आणि त्यांच्या विचारांची आवश्यकता स्पष्ट केली. या कार्यक्रमाला डॉ. प्रवीण अढाऊ, आनंद थोरात आणि प्रा.सोनोने यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविक प्रा. सुरेंद्र किन्हीकर यांनी केले व कार्यक्रमाच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन क्षितिजा जैन यांनी केले. चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भाग्यश्री सोपान पाठक, सपना गुजर, धनश्री गिरनाळे, ईश्वरी रोहनकर, अर्पिता सदाफळे, श्रद्धा रोकडे, संदेश सरदार, आदित्य तायडे, अमित धारपवार आणि श्रुती सुरजुसे यांनी विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले. एकूणच हे चर्चासत्र विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरले. युवकांनी राजकारणात सजग आणि जबाबदार
चांदूर रेल्वे येथील पात्रिकर कॉलनी येथे अस्मिता महिला मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमांमध्ये काव्यलेखन, वाचन, नृत्य, कथाकथन यांचा समावेश होता. महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षिका विजया म्हसतकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ येथील प्राचार्य व सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा ठाकरे उपस्थित होत्या. ग्रामीण रुग्णालय, चांदूर रेल्वे येथील आरोग्य सल्लागार पूर्ती लाखोडे-गायकवाड उपस्थित होत्या. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका रंजना रेचे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागत व सत्काराने झाली. यावेळी स्टेशन प्रबंधक दीपिका बाजपेयी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. काव्यलेखन, काव्यवाचन, नृत्य, कथाकथन, विचारमांडणी असे विविध उपक्रम झाले. कार्यक्रम रंगला. उपस्थित महिलांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता कडू व मीनाक्षी रॉय यांनी केले. आभार रिता कडूकार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंजना रेचे, शुभांगी चोरे, अरुणा डुबे, स्वाती ठोसर, पूजा गायकवाड, प्रा. अनिता धुर्वे, अपर्णा जगताप, डॉ. लीना जाजू, पुनम पनपालिया, निता कडू, मीनाक्षी रॉय, छाया बापट, वैशाली जोग, रोहिणी ओक, वीणा चौधरी, साधना निहाटकर, वंदना सवाने, कल्याणी चुटके, मोना म्हस्के, स्वप्ना पाठक, शुभांगी तितरे यांसह अस्मिता महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. एकूणच, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला. त्यांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ मिळाले.
प्रलंबित मागण्यासाठी कर्मचाऱ्यांचा एल्गार:राज्यातील 17 लाख कर्मचारी 21 एप्रिल पासून बेमुदत संपावर
राज्यातील सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असे सुमारे १७ लाख कर्मचारी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य व ज्वलंत मागण्यासाठी मार्च २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ७ राज्यस्तरीय आंदोलने करण्यात आली. शिवाय शासनाशी चर्चेसाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळाला नाही. राज्य सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. संपावर जाण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुधारित निवृत्तीवेतन योजना जाहीर करून दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. अद्यापही स्पष्टीकरणात्मक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न गंभीर झाले आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष वाढल्याने बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक तथा जिल्हा अमरावतीचे सरचिटणीस डी. एस. पवार यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपाची नोटीस १७ मार्च रोजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आली. याप्रसंगी वर्षा पागोटे, विजय सावरकर, ॲड. एस. डी. कपाळे, एस. डब्ल्यू. शिर्के, अलीखान, शैलेश लिंगोट, डी. व्ही. देशमुख, विजय साळुंके, रवी गोसावी, आर. एस. शिंगोकार आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रस्तावित मागण्यांमध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे, कंत्राटीकरण व खाजगीकरण रद्द करणे, ज्या कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण झाली आहेत अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे, रिक्त पदे तात्काळ भरणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरभरती सुलभ करणे, सेवानिवृत्तीचे वय ६० करणे, शिक्षकांना दहा-वीस-तीस आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे, लिपिकवर्गीय व शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी दूर करणे, कलम ३५३ अजामीनपात्र करणे, पी. एफ. आर. डी. ए. कायदा रद्द करणे, आरोग्य विभाग व शिक्षण विभागातील प्रलंबित मागण्यांबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्रांचे आयोजन करणे, या व इतर प्रलंबित मागण्यासाठी २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप करण्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला आहे, असे निमंत्रक डी. एस. पवार यांनी कळविले आहे.
वि.सा. संघाच्या निवडणुकीत प्राचार्य शोभा रोकडे विजयी
विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणी सदस्यपदासाठी अमरावतीतून चार साहित्यिक निवडणूक लढवत होते. त्यापैकी केवळ एका उमेदवाराला विजयश्री प्राप्त झाली. साहित्यिक प्राचार्य डॉ. शोभा रोकडे यांनी २ हजार ४६५ मते मिळवून हा विजय प्राप्त केला. गेल्या दोन दिवसांपासून सुरु झालेली मतमोजणी मंगळवारी उशीरा रात्री संपुष्टात आली. या निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर केला जातो. त्यामुळे मतमोजणीला भरपूर वेळ लागला. मतदानाच्या एकूण प्रक्रियेत ४ हजार ९३६ मतदारांनी भाग घेतला होता. संघांचे अध्यक्ष म्हणून वनराईचे गिरीश गांधी बहुमताने विजयी झाले असून त्यांच्याच पॅनलतर्फे प्राचार्य डॉ. शोभा रोकडे यांनी ही निवडणूक लढविली होती. या पॅनलचे २२ पैकी तब्बल २१ सदस विजयी झाले आहेत. २० वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर ही निवडणूक झाल्यामुळे संपूर्ण साहित्य जगताचे याकडे लक्ष लागले होते. या यशाबद्दल साहित्य व सामाजिक क्षेत्रातून प्राचार्य डॉ. शोभा रोकडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निवडणुकीत वर्ध्याचे साहित्यिक प्रा. प्रदीप दाते यांच्या पॅनलतर्फे प्रसिद्ध कथाकथनकार प्रा. सतिश तराळ आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मानवविज्ञान शाखेच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. मोना चिमोटे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. आणखी एक उमेदवार कवि विष्णू सोळंके हे प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या पॅनलकडून सदस्यपदासाठी भाग्य अजमावत होते. साहित्यिक चळवळ जिवंत ठेवण्यात वाटा डॉ. शोभा रोकडे या अनेक वर्षांपासून विदर्भ साहित्य संघाच्या अमरावती शाखेत सहभागी असून सद्या त्याया उपाध्यक्ष आहेत. परिवर्तन प्रबोधिनी, अमरावती या साहित्यिक संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत. आजपर्यंत त्यांनी अमरावतीमध्ये अनेक यशस्वी संमेलनांचे आयोजन केले असून विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपददेखील भूषवले आहे. अमरावती शहरात साहित्यिक चळवळ जिवंत ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा असून सबंध महाराष्ट्रात त्या सुप्रसिद्ध आहेत.
महानगरपालिकेचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाकरिता तयार केला जात असलेला प्रस्तावित अर्थसंकल्प आयुक्त सौम्या शर्मा यांनी बुधवारी १८ रोजी स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्यासह समिती सदस्यांपुढे सादर केला. शहराच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाला गती देण्याच्या उद्देशाने हा अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अर्थसंकल्पामध्ये शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, वाहतूक, पायाभूत सुविधा व प्रशासन या सर्व क्षेत्रांचा समतोल विकास साधण्यावर भर देण्यात आला आहे. महानगरपालिका शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष तरतूद करण्यात आली असून विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ‘माझी वसुंधरा’ अभियान व वायु स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहर अधिक स्वच्छ, हरित व प्रदूषणमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी कर संकलन सुधारणा, नवीन महसूल स्त्रोतांचा शोध व डिजिटल प्रणालींचा वापर वाढवण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नागरिकांना ऑनलाइन सेवा सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात यासाठी ई-गव्हर्नन्स प्रणाली अधिक सक्षम करण्यात येणार आहे.शहरात नियमित कचरा दिसणाऱ्या ठिकाणी सौंदर्यीकरण करण्यासाठी या अर्थसंकल्पात विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी नाले बांधकाम व दुरुस्ती, विद्युतीकरण, अतिक्रमण निर्मूलन, शिवटेकडी परिसर विकास, युवक कल्याण योजना व नगरोत्थान योजना राबवण्यात येणार आहेत. तसेच बडनेरा व रहाटगाव येथील अग्निशमन विभाग अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. शहराच्या पायाभूत विकासाला गती देण्यासाठी अमरावती महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला असून यामुळे महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. उपलब्ध आर्थिक स्रोत व नागरिकांच्या अपेक्षा यांचा योग्य ताळमेळ साधत स्वच्छ, सुंदर व प्रदूषणमुक्त अमरावती घडविण्याच्या उद्देशाने हा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्याचे आयुक्तांनी नमूद केले. या बैठकीस स्थायी समिती सदस्य नगरसेवक प्रशांत वानखडे, मिलींद बांबल, विनोद तनवाईस, प्रशांत महल्ले, दिपक साहू, सल्लाउद्दीन इक्राममुद्दीन, नाझीम खान करीम खान, नगरसेविका पद्मजा कौंडण्य, पंचफुला चव्हाण, मंजुषा जाधव, स्मीता सुर्यवंशी, ललिता रतावा, अस्मा फिरोज खान, प्रियंका पाटणे, मीनल सवाई, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्यलेखापरिक्षक श्यामसुंदर देव, मुख्यलेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महानगर पालिकेचे आर्थिक वर्ष २०२५-२६ साठीचे अंदाजपत्रक हे येत्या ३० मार्च रोजी सभागृहात मंजुरीसाठी मांडले जाणार आहे. यात शिक्षण, आरोग्य, इतर पायाभूत सुविधांसाठी समाधानकारक तरतूद करण्यात आली असली तरी स्वच्छतेसाठी नेमका किती खर्च केला जाणार याबाबत उत्सुकता कायम आहे. केंद्र शासन पुरस्कृत पीएम ई-बस योजनेअंतर्गत अमरावती शहरासाठी मंजूर ५० ई-बस लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून त्यासाठी २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महानगरपालिका दवाखान्यांचे आधुनिकीकरण, नवीन आरोग्य केंद्रांची उभारणी तसेच स्वच्छता व्यवस्थेचे सुदृढीकरण करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान, कचरा वर्गीकरण व पुनर्वापरावर भर देण्यात आला आहे. ई-सिटी बस, दवाखान्यांच्या आधुनिकीकरणासाठी तरतूद
प्रतिनिधी | टाकरखेडा संभू भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू येथील श्रीराम मंदिर संस्थानतर्फे राम नवमी निमित्त उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी उद्या, गुरुवार, १९ मार्चपासून २ एप्रिलपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. दरम्यानच्या काळात २६ मार्चला अत्यंत उत्साहात श्रीरामनवमी साजरी केली जाईल. रामनवमी उत्सवाची सुरुवात गुरुवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्रीराम अभिषेक, पूजन, काकडा आरती, तिर्थस्थापना व ध्वजारोहणाने होणार आहे. त्यानंतर दररोज श्रीरामचरितमानस पारायण, विविध भजन मंडळांचे सादरीकरण, आरती तसेच भारूड, कीर्तन यांसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उत्सवात टाकरखेडा संभू तसेच परिसरातील अनेक भजन मंडळांचा सहभाग असून महिला भजन मंडळे, बाल भजन मंडळे आणि वारकरी संप्रदायातील कीर्तनकार आपल्या सादरीकरणातून भक्तिमय वातावरण निर्माण करणार आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी सोयाबीन, तूर व कापूस लागवडीसंदर्भात मार्गदर्शन कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. २६ मार्च रोजी राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून दुपारी १२ वाजता श्रीराम जन्म सोहळा, कीर्तन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान आठवडाभरात सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करून ग्रामस्थांना आरोग्यसेवाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन दिले जाणार आहे. उत्सवाचा समारोप २ एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्त श्री हनुमान अभिषेक, पूजन व भजन कार्यक्रमाने होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. मंदिराच्या आत राम, लक्ष्मण, सिता मातेची अशी सुंदर मुर्ती सजावट आहे.
पांडे पांगरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात ८५५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. एकाच छताखाली शासकीय सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी, एकाच दिवशी या संकल्पनेनुसार हे शिबिर झाले. उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच मंडळ अधिकारी व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी शिबिराचे नियोजन केले. या शिबिरात पांगरे, भाळवणी, कविटगाव, सांगवी १ व २, भिवरवाडी, ढोकरी, वांगी १, २, ३, ४ तसेच बिटरगाव येथील नागरिकांनी उपस्थित राहून विविध विभागांकडे अर्ज सादर केले. ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा तसेच दाखल मिळावे याकरिता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ नागरिकांनी घेतला. पुरवठा विभागाकडे राबवण्यात आलेल्या शिबिरात रेशनकार्ड १८८ तसेच आरोग्य विभागाकडे ७८, प्रतिज्ञापत्र विभागाकडे ५२, आधार कार्ड विभागाकडे ४४, भूमी अभिलेख विभागाकडे ३४, संजय गांधी योजनेअंतर्गत ३२, दुय्यम निबंधक विभागाकडे २८, कृषी विभागाकडे २३ आणि आटीओ विभागाकडे २१ प्रकरणे नोंदवण्यात आली. ८५५ नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
मिनी मंत्रालय असे संबोधल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बार्शी तालुक्यातील दिपक वैदय या अत्यंत सामान्य कुटूंबातील युवा शेतकऱ्याला संधी मिळाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात स्थापनेपासून प्रथमच म्हणजे ६४ वर्षानंतर वैदय यांच्या रूपाने प्रथमच बार्शी तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. तमाम बार्शी तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतरही कालपर्यंत शेतात स्वत: काबाडकष्ट करणारा हा युवा शेतकरी आज थेट जि.प.अध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान झाला. दिपक अरूण वैदय हे उपळाई ठोंगे येथील अल्पभूधारक शेतकरी आहेत. आई,वडील, दोघा भावांचे एकत्रित कुटूंब असा परिवार आहे. दिपक यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे. दिपक यांनी उपळाई ठोंगे येथे गेल्या टर्ममध्ये ग्रा.पं. सदस्यपदाची निवडणूक लढवली होती. यात ते अल्प मताने पराभूत झाले होते. नुकतीच जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली. उपळाई ठोंगे हा गट इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजप नेते राऊत यांनी दिपक वैदय यांना उमेदवारी दिली. त्यांनी विदयमान सरपंच मधुकर वैदय यांचा मोठया फरकाने पराभव केला. बार्शी तालुक्यात राऊत यांच्या नेतृत्वात भाजपने जि.प. व पं.स.निवडणूकीत १८-० असा नेत्रदिपक विजय मिळवला. जि.प.अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने या प्रवर्गातून निवडून आलेले भाजपचे दिपक वैदय यांचे नाव जि.प.अध्यक्षपदाच्या चर्चेत आले. अनेकजण पदासाठी देव पाण्यात ठेवतात पण दिपक यांच्या मनीध्यानी नसताना मुख्यमंत्री, पालकमंत्री व भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्या पाठबळामुळे त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. प्रतिनिधी | दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावचे इंद्रजीत पवार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाले. मार्डीकरांना हा आनंद झालाच शिवाय याच गावचे भाचे असलेले दीपक वैद्य हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. यामुळे गावच्या राजकीय इतिहासात आज एका वेगळ्याच आनंदाचा दुहेरी योग जुळून आला. याचा ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. िजल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी उपळाई ठोंगे गावचे दीपक वैद्य यांची निवड झाली. ते मार्डीचे हनुमंत बनसोडे यांचे भाचे आहेत. तर उपाध्यक्ष झालेले पवार हे या गावचे सुपूत्र आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी दुहेरी आनंद साजरा केला. बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगेचे दीपक वैद्य यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बार्शी तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.यावेळी सोलापूर येथे भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्यासोबत बाजार समितीचे सभापती विजय गरड, प स उपसभापती संतोष निंबाळकर, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, अरुण बारबोले, विजय राऊत, आदी उपस्थित होते. सोलापूर येथील निवडीनंतर भाजप नेते राजेंद्र राऊत, नुतन जि प अध्यक्ष दीपक वैद्य हे बार्शी येथे आल्यानंतर वैद्य यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. १९९७ साली झालेल्या जि.प.निवडणूकीत विश्वास बारबोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसकडून मळेगांवच्या गंगूबाई माळी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांचेही जि.प.अध्यक्षपद जवळपास निश्चित झाले होते. पण ऐनवेळी ही संधी पंढरपूरला मिळाली अन् तेथून २९ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर आता ही संधी बार्शीला मिळाली. जि.प.मध्ये याअगोदर बार्शी तालुक्यातील टी.एन.पाटील, बाबुराव पाटील गाडेगांवकर, रघुनाथ कोले, मकरंद निंबाळकर, गंगूबाई माळी यांना जि.प.मध्ये समिती सभापती पद तर कौरव माने यांनी जि.प.चे उपाध्यक्षपद भूषविले आहे. सोपल गटाला जि.प.मध्ये नेहमीच सत्तेत वाटा मिळाला आहे. जि.प. राजकारणात राऊत गट फारसा सत्तेत नसल्याने समिती सभापतीपद देखील मिळाले नव्हते. संजय पाटील यांच्या रूपाने विरोधी पक्षनेतेपद मिळाले होते. त्यानंतर आता थेट जि.प.अध्यक्षपद मिळाले आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, व्हायचेच, हे स्वप्न पाहूनच शहाजी पवार व इंद्रजीत पवार हे बंधू निवडणुकीत कामाला लागले होते. आज उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी इंद्रजीत पवार, उपाध्यक्ष जिल्हा परिषद, सोलापूर असा फलक तसेच याजसाठी केला अट्टहास, असे स्टेटस् आपल्या मोबाईलवर ठेवले होते. पवार यांच्या निवडीमुळे मार्डी गावात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. रात्री गावातून नूतन उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. १९९७ ला हुलकावणी, २०२६ ला मिळाली संधी, राऊत यांचे वर्चस्व
मराठी नववर्षारंभ, गुढी पाडव्या निमित्त आहे श्री विठ्ठल मंदिरात सकाळी सात वाजता ध्वज पूजन करण्यात येणार आहे. तसेच विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली असून सायंकाळी विठ्ठल रुक्मिणीस पारंपरिक अलंकार परिधान करण्यात येणार आहेत, द आज ( दिनांक १९ मार्च ) रोजी मराठी नवीन वर्षाचा शुभारंभ होत असून यानिमित्त विठ्ठल मंदिरात पारंपरिक भगवा ध्वज पूजन करण्यात येणार आहे. सकाळी सात वाजता मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले आणि समिती सदस्याच्या उपस्थितीत ध्वज पूजन होईल. यानंतर दुपारी विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपरिक दागिने परिधान करण्यात येतील. नैवेद्यांमध्ये पुरण पोळीचा समावेश असणार आहे. प्रतिनिधी | अक्कलकोट गुढी पाडवा , स्वामी समर्थ प्रकट दिन, रमजान ईद, साप्ताहिक सुट्टीनिमित्ताने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे भाविकांची गर्दी होणार असून या काळात सुमारे दीड लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून प्रशासनाने मंदिर समितीच्या मदतीने तयारी केली आहे. १९ मार्च रोजी गुढी पाडवा, दि.२० मार्च रोजी श्री.स्वामी प्रकट दिन, रमजान ईद व साप्ताहिक सुटी सलग आल्याने १९ ते २२ मार्च अखेर भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता मंदीर समितीच्या वतीने मंदिर व परिसरात महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र दर्शन रांग, , प्रथमोपचार व्यवस्था करण्यात आली आहे. अन्नछत्र मंडळ आणि समर्थ वटवृक्ष मंदिर व श्री स्वामी समर्थ समाधी मठ. राजाराय मठ याठिकाणीही भाविकांसाठी सुविधा करण्यात आल्या आहेत. प्रतिवर्षीप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते ज्येष्ठ शुद्ध षष्ठी अथवा मृग नक्षत्र प्रारंभ होईपर्यंत श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेची पारंपरिक चंदनउटी पूजा आयोजित करण्यात येत आहे. ग्रीष्म ऋतूमध्ये वाढणाऱ्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर श्रींच्या मूर्तींना शीतलता लाभावी या परंपरेनुसार सदर पूजा केली जाते. सन २०२६ सालाकरिता चंदनउटी पूजेचा कालावधी दि.१९ मार्च ते दि.८ जून असा निश्चित करण्यात आला असून, सदर पूजा श्रींच्या पोषाखानंतर दुपारी ४.३० ते ५.१५ या वेळेत करण्यात येणार आहे, असेही समितीच्या वतीने सांगण्यात आले.
राहुरीसाठी आगामी काळात पायाभूत सुविधा व विविध योजना राबवू- माजी मंत्री तनपुरे
शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, सौरऊर्जा प्रकल्प तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक विकासाच्या विविध योजना आगामी काळात तसेच मोठे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. राहुरी शहरात जॉगिंग ट्रॅक असलेला रस्ता, जुना कनगर रोड यांसह अनेक विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यानंतर नगरपालिकेला महावितरणचे मोठे वीजबिल भरावे लागत असल्याने त्यावर उपाय म्हणून सुमारे अडीचशे किलोवॅट क्षमतेचा सोलर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर दरमहा सुमारे पाच ते सहा लाख रुपये वीजबिलाची बचत होणार आहे. नागरिकांवर कोणत्याही प्रकारे कर किंवा पाणीपट्टी वाढविण्यात येणार नाही, असा दिलासा त्यांनी दिला. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत १५५ नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच नगराध्यक्ष शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून दररोज सकाळी सात वाजता सायरन वाजवण्याची अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एकनाथ नगर येथे ‘नमो उद्यान’ साकारण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई तसेच नगरसेवक उपस्थित होते. यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी पोटनिवडणुकीबाबत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतरच पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांशी आमचे घरचे नाते आहे. त्यांचे मत जाणून घेतल्यानंतरच पुढील राजकीय प्रवास ठरवू, असे तनपुरे म्हणाले. कार्यकर्त्यांशी चर्चेनंतर ठरवू पुढील राजकीय प्रवास आगामी पोटनिवडणुकीबाबत बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतरच पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांशी आमचे घरचे नाते आहे. त्यांच्या भावना आणि मत जाणून घेतल्यानंतरच पुढील राजकीय प्रवास ठरवू, असे तनपुरे म्हणाले.
आपल्याला चांगला समाज निर्माण करायचा आहे. चांगली कुटुंब व्यवस्था निर्माण करायची आहे. यासाठी विचार व संयम व शहाणपणाशिवाय दुसरा मार्ग नाही असे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले. तालुक्यातील कोंढवड येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी ते बोलत होते. ज्या घरात परमार्थ व संसार या दोन्ही गोष्टी केल्या जातात, जेथे इश्वराची भक्ती आहे, व्यवहारातील नीती आहे व संस्कृती आहे. जेथे सुख आणावे लागत नाही तर ते आपोआप प्राप्त होते. ते घर म्हणजे गोकूळ आहे. मात्र आजच्या कलियुगात माणसे सुख विकत घेण्याचा प्रयत्न करतात. हीच एक हास्यस्पद गोष्ट आहे. आपल्याला चांगला समाज निर्माण करायचा आहे. चांगली कुटुंब व्यवस्था निर्माण करायची आहे. यासाठी विचार व संयम व शहाणपणाशिवाय दुसरा मार्ग नाही. संतवचनाशिवाय दुसरा आपल्याला आधार नाही आणि हेच आपल्याला नवीन पिढीला वारंवार सांगायचे असून त्याची फलप्राप्ती मिळून संस्कारक्षम पिढी घडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जशी वेळ येईल तशी तयारी ठेवा, सगळा काळ मानसन्मानाचा वाट्याला येत नाही. काहीही न करताही अवमानही वाट्याला येतो. आपले धैर्य चांगले असेल तर मार्ग सापडतो. दु:खात खचून न जाता मार्ग काढला तर सार्थकतेचा आनंद मिळतो. असे त्यांनी सांगून श्रीकृष्ण भगवंतांच्या गोकुळातील लीलांचे वर्णन केले. तसेच उभारलेल्या भव्य मंदिराबाबत कोंढवडकरांचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, सोनालीताई तनपुरे, राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश बानकर, माजी उपसभापती रविंद्र आढाव, सरपंच रविंद्र म्हसे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले.
मराठी नववर्षाचा पहिला दिवस अर्थात गुढीपाडव्याचा सण शहरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणानिमित्त नगरकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून, नवीन वस्तू आणि विशेषतः कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी दिसत आहे. कापड बाजार, सावेडी आणि उपनगरांमधील नामांकित वस्त्रदालनांत ग्राहकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. यंदाच्या गुढीपाडव्याला युवक आणि युवतींनी पारंपरिक पेहरावा सोबतच आधुनिकतेला प्राधान्य दिले आहे. युवतींमध्ये प्रामुख्याने पेस्टल रंगाच्या पैठणी कुर्ती आणि रेडीमेड नऊवारी साड्यांना मोठी मागणी आहे. तर दुसरीकडे, तरुणांमध्ये फ्लोरल प्रिंटेड कुर्ते आणि जोधपुरी जॅकेट्सचा नवा ट्रेंड दिसत आहे. पारंपरिक लुक असला तरी तो कॅरी करायला सोपा असावा, असा कल तरुण पिढीत दिसत आहे. महिला वर्गाचा ओढा आजही अस्सल काठपदराच्या साड्या, खण साड्या आणि इरकलीकडे अधिक आहे. पुरुषांनी गुढीपाडव्याच्या मिरवणुकीसाठी लखनवी चिकनकारी कुर्ते आणि कोल्हापुरी फेटा याला पसंती दिली आहे. लहान मुलांमध्ये काठापदराचे पोलके आणि धोती-कुर्त्याला पसंती मिळत आहे. तर चिमुरड्या मुलांना पारंपरिक रुपात सजवण्यावर भर दिला आहे. ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यातही नगरकरांनी मोठ्या संख्येने प्रत्यक्ष बाजारात जाऊन, कापडाचा दर्जा तपासून खरेदी करण्याला पसंती दिली. यामुळे व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. ईको-फ्रेंडली फॅब्रिक्सचा अबालवृद्धांत वाढला ट्रेंड यंदा कापड बाजारात लिनन आणि ऑरगॅनिक कॉटनच्या कुर्त्यांना प्रचंड मागणी आहे. वाढत्या उन्हाचा विचार करता, स्टाईलसोबतच सोयीला महत्त्व दिले जात आहे. विशेषतः पेस्टल शेड्स आणि हाताने विणलेल्या कलाकुसरीचे कपडे यंदाचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. दुहेरी लूकला पसंती यंदा मिरवणुकीसाठी झगमगीत आणि पारंपरिक पेहराव, तर घरगुती पूजेसाठी सुटसुटीत व सुती कपड्यांची स्वतंत्र खरेदी करण्यावर नगरकरांचा भर आहे. शोभायात्रेसाठी खास लूक आणि सणासाठी साधेपण अशा दुहेरी खरेदीच्या ट्रेंडमुळे बाजारपेठेत वस्त्रांचे प्रकार व गर्दी वाढली आहे.
कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील हाडकीच्या ओढ्यापासून आत जाणारा निर्मनुष्य कच्चा रस्ता..सहावीतील कोमल (नाव बदलले आहे) शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे सायकलवर घराकडे निघाली. शाळेपासून साधरण साडेचार किमीच्या अंतरावर घर असेल. त्यातील साडेतीन किमीचे अंतर कापले, घर अवघे एक किमीवर असताना लाल रंगाचा टी-शर्ट घातलेला विशीतील एक तरुण जवळ आला. जाधव यांचे घर कुठे आहे...' असे विचारले कोमलने माहिती नाही, असे उत्तर दिले तितक्यात त्याने छोट्या बाटलीतील ते ॲसिड तिच्या चेहऱ्यावर फेकले अन् क्षणात तेथून पसार झाला. घटनेच्या २४ तासानंतरही गावातील या रस्त्यावरची दहशत कायम होती. रस्त्यांवर शुकशुकाट अन् ग्रामस्थांच्या मनात संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळाली. वडिलांचे निधन झाल्यानंतर कोमल व तिचा भाऊ मामा, आजी-आजोबांकडे राहते. घटनेच्या दिवशी ती शाळेत गेली. शाळा सुटल्यानंतर जाताना नराधमाने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. त्यावेळी कोमललाही काही कळाले नाही. माझ्या अंगावर विष फेकले, असे ओरडत ती धावली ग्रामस्थ मदतीला धावले. त्यांनी आधी स्थानिक रुग्णालयात नेले. पण जखमा जास्त असल्याने तिला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचा उजवा चेहरा भाजला आहे. सविता रमेश निघुते, मदतीला धावलेल्या ग्रामस्थ. तिचा चेहरा धुताना माझे हातही भाजले मुलीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले त्यावेळी माझ्यावर विष फेकले...' असे वेदनने ती किंचाळत धावत होती. ती रडत का आहे हे पाहण्यासाठी मी जवळ गेले. तितक्यात घरात जेवत बसलेले माझे पती बाहेर आले व त्यांनी तिच्या चेहऱ्यावर पाणी मारण्यास सांगितले. मी पाणी मारण्याचा प्रयत्न करताच माझे हातही जळजळ करत होते. त्यावरून कळले की ते अॅसिड होते. गांभीर्य ओळखून मुलगा व शेजारी व्यक्तीने तिला स्थानिक रुग्णालयात पाठवले. विविध अँगलने तपास सुरू ^ आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके नेमण्यात आली आहेत. पीडित मुलीची प्रकृती सध्या स्थिर असून ती तपासात सहकार्य करत आहे. आरोपीला नेमके याच मुलीला टार्गेट करायचे होते की अन्य कुणाला, याचा तपास वेगवेगळ्या अँगलने सुरू आहे. लवकरच आरोपीला ताब्यात घेऊ.' - सोमनाथ वाघचौरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक. गावात सुरक्षा रक्षक दल हवे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात आणि नगराध्यक्षा मैथिली तांबे यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे. ग्रामीण भागातही सुरक्षा रक्षक दला'ची स्थापना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मुलीच्या आजीने माझ्या नातीला न्याय द्या', अशी मागणी केली.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त अहिल्यानगरच्या बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण आहे. यंदा बांधकाम क्षेत्रात तेजी असून ३०० हून अधिक कुटुंबे गृहप्रवेश करत आहेत. तसेच सराफी पेढ्या, वाहन बाजार आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. शहरातील बांधकाम क्षेत्रात गेल्या तीन महिन्यात शहरामध्ये सुमारे एक हजाराच्या आसपास रो हाऊस, फ्लॅटची विक्री होऊन त्याचे ताबे देण्यात आले आहेत. त्यातील सुमारे तीनशेहून अधिक कुटुंब गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आज नवीन घरात प्रवेश करणार आहेत. गेल्या दोन वर्षात शहरात रो हाऊससह फ्लॅटची मागणी वाढली असून, गेल्या दोन वर्षात फक्त फ्लॅटची मागणी दुपटीने वाढल्याचे चित्र आहे. पुण्याच्या तुलनेत अहिल्यानगरमध्ये मागणी कमी असली तरी, गेल्या दोन वर्षात ग्राहकांकडून फ्लॅटची मागणी दुपटीने वाढली आहे. त्यामुळे अनेक नवनवीन प्रकल्प उभे राहत आहेत. १२० नवीन कार, ६०० दुचाकींची विक्री शहरात चारचाकी वाहनांची ८ तर दुचाकी १२ शोरुम आहेत. ग्राहकांनी गुढीपाड्यासाठी एक महिना अगोदरच कारची बुकींग केली आहे. गुढी पाड्याव्याच्या मुहर्तावर १२० चारचाकी तर ६०० हून अधिक दुचाकींची विक्री होणार आहे. इंधनाचे वाढलेले दर व २४ तास उपलब्ध असलेली वीज यामुळे यंदा विजेच्या बॅटरीवर चालत असलेल्या दुचाकींना ग्राहकांकडून मोठे मागणी राहणार आहे. यात महिलांसाठी असलेल्या इलेक्ट्रीक दुचाकींची सर्वाधिक विक्री होणार आहे. ग्राहक वर्गाकडून वजनाने कमी व कमी चार्जिंगवर अधिक चालत असलेल्या दुचाकींचे ग्राहकांना आर्कषण आहे. ^ शहरात गेल्या वर्षभरात ग्राहकांच्या बदलत्या मानसिकतेमुळे कम्युनिटी लिव्हिंगचा ट्रेंड पहायला मिळत आहे. रो हाऊससाठी काही उपनगर भागात मागणी आहे. मात्र, पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या भागात फ्लॅटची मागणी दुपटीने वाढली आहे. त्यातही वन बीएचके ऐवजी टू बीएचकेसाठी मध्यमवर्गीयांकडून अधिक पसंती मिळत आहे. पुण्याच्या धर्तीवर झालेल्या दर्जेदार प्रकल्पांमुळे थ्री व फोर बीएचके फ्लॅटची मागणीही शहरात वाढत आहे. - गिरीश अगरवाल, अध्यक्ष, क्रेडाई. ड्रायफ्रूट श्रीखंडाला पसंती शहरात यंदा गुढीपाडव्यानिमित्त ड्रायफ्रूट आणि मँगो फ्लेवर श्रीखंडाला विशेष मागणी आहे. शुद्ध चक्का आणि नैसर्गिक स्वादाचे हे श्रीखंड सण अधिक गोड करत आहे. यंदा चवीनुसार २८० ते ५५० रुपये प्रति किलो दराने वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड दुकानांमध्ये उपलब्ध आहे. बुधवारी दिवसभर चितळे रोड, सावेडी उपनगरातील दुकानांमध्ये श्रीखंड खरेदीसाठी गर्दी होती.
लासलगावी सर्वे 93 मधील आठवडे बाजाराला विरोध:ग्रामपंचायतीकडे नागरिक-डॉक्टरांनी नाेंदविली हरकत
शहरातील सर्वे क्रमांक ९३ परिसरात भरविण्यात येणाऱ्या रविवारच्या आठवडे बाजाराविरोधात नागरिक आणि वैद्यकीय व्यावसायिकांनी आक्षेप घेतला असून, बाजार तातडीने अन्यत्र हलविण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीत बैठक घेण्यात आली. बैठकीत डॉक्टर, मेडिकल चालक आणि स्थानिक नागरिकांनी अधिकृत हरकत नोंदवली. बाजाराच्या दिवशी वाढणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि आपत्कालीन सेवांना होणारा विलंब याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. यासंदर्भात ग्रामपंचायतीला निवेदनही दिले. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील, असे निवेदनात नमूद आहे. ग्रामपंचायत अधिकारी बाविस्कर यांनी बाजार योग्य ठिकाणी हलविण्याबाबत विचार सुरू असल्याचे सांगितले. शहरातील बाजारतळावर भाजीपाला विक्रीसाठी उभारण्यात आलेले ओटे वापराऐवजी रिकामे पडत असून, विक्रेते थेट रस्त्यावरच भाजीपाला विक्री करत आहेत. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याची तक्रार आहे. काही ठिकाणी ओट्यांचा गैरवापर होत असून ते तळीरामांचे अड्डे बनल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. समस्यांवर ग्रामपंचायत व पोलिसांनी कारवाई करून तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
शहर आणि तालुक्यात मंगळवारी दुपारी हवामानात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील काही भागात वादळ, विजांच्या कडकडाटासह गारा पडल्याने काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. मंगळवारी सकाळपासूनच तालुक्यात उकाडा जाणवत होता. मात्र, दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. सिन्नर शहरासह मोह, वडझिरे, नायगाव, जायगाव, देशवंडी, चिंचोली आणि माळेगाव परिसरात दुपारी ३ ते ५ या वेळेत पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. जायगाव घाटाच्या पायथ्याशी तसेच मोह शिवारात साधारण ५ ते ७ मिनिटे गारांचा पाऊस झाला. या अवकाळी संकटामुळे शेतात काढणीला आलेला गहू आणि हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. विशेषतः नायगाव खोऱ्यातील कांदा आणि कांदा बियाणे (डोंगळे) प्लॉट्सला या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. शहरातील सरदवाडी उपनगरात झालेल्या पावसामुळे वाजे लॉन्स परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाहनचालकांना कसरत करत रस्ता काढावा लागला. प्रतिनिधी |लासलगाव निफाड तालुक्यातील खानगाव, कोटमगाव तसेच लासलगाव रोड परिसरात बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा तडाखा बसला. द्राक्षबागांसह गहू, कांदा, मका, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. खानगाव येथील शेतकरी गोरख भाऊसाहेब भिलोरे यांच्या चार एकर द्राक्षबागेला गारपिटीचा मोठा फटका बसला. त्यापैकी दोन एकर क्षेत्रातील द्राक्षांची काढणी सुरू असतानाच अचानक गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले. गारांचा वेग अत्यंत तीव्र असल्याने द्राक्षबागांची पाने झडून पडली आहे. अनेक ठिकाणी वेल जमिनीवर कोसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. द्राक्षबागांबरोबरच काढणीला आलेल्या गहू व कांदा पिकांनाही फटका बसला आहे. लासलगाव परिसरात अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली. कांदा पिकात पाणी साचल्याने नुकसानीची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. प्रतिनिधी | सटाणा बागलाण तालुक्यातील ताहाराबाद परिसरात बुधवारी (दि.१८) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अचानक जोरदार वादळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारा पडल्या. साधारणत तासभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. काढणीस आलेल्या कांदा व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्याच्या कांदा पिकाबरोबरच गहू, टोमॅटो, भाजीपाला पिकांचे नूकसान झाले. याशिवाय जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा देखील भिजल्याने पशुपालकांसमोर अडचणी वाढल्या आहेत. पावसामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. - दीपक जाधव, हवामान तज्ज्ञ, चांदवड कमी दाबाचे क्षेत्र आणि पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे हिमालयात सुरू असलेली बर्फवृष्टीतील काही ढग खालच्या भागाकडे सरकत आहेत. परिणामी महाराष्ट्रात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात या प्रणालीचा प्रभाव अधिक जाणवत असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होत आहे. पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात २२ ते २३ मार्च वातावरण निवळेल व त्यांनतर २४ पासून ३१ मार्चपर्यंत पश्चिमी विकषोभामुळे नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. काही भागात गारपीट होण्याचीही शक्यता आहे.
शांतता समिती सभा:एकात्मता जपत साजरे करा सण-उत्सव, मनमाडला बैठकीत नगराध्यक्ष पाटील यांचे आवाहन
मनमाड शहरातील नागरी सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन सर्व त्रुटी दूर केल्या जातील, अशी ग्वाही नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी दिली. आगामी सण-उत्सव शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आगामी श्री राम नवमी उत्सव, रमजान ईद, भगवान महावीर जयंती, श्री हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहर पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नगराध्यक्ष बोलत होते. पोलिस निरीक्षक विजय करे यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले व सण-उत्सव काळात घ्यावयाच्या खबरदारीबाबत माहिती दिली. सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, तसेच सोशल मीडियावरील अफवांपासून दूर राहावे, शहराला जातीय दंगलीची पार्श्वभूमी नसून ही एकात्मतेची परंपरा कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस मुख्याधिकारी शेषराव चौधरी, सादिक पठाण, नगरसेवक मजीत शेख, बब्बू कुरेशी, लियाकत शेख, महावितरणचे शहर अभियंता भूषण तळेले आदी उपस्थित होते. शहरातून जाणाऱ्या इंदूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न तूर्तास मार्गी लागल्याबद्दल बैठकीत समाधान व्यक्त करण्यात आले. नाशिक येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत अवजड वाहतूक सुरू राहील, तर दिवसभर अवजड वाहतूक बंद राहील, असा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचना प्रसिद्ध केली असून, त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
राहुड घाटात ब्रेक फेल झाल्याने ट्रक उलटला:एक तास वाहतूक ठप्प, सुदैवाने जीवितहानी टळली
मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाटात बुधवारी (दि. १८) सकाळी अकराच्या सुमारास सोयाबीनने भरलेल्या मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक मारुती मंदिराजवळील वळणावर उलटला. या अपघातात क्लिनर राघवेंद्र कुशवा जखमी झाले असून, सुदैवाने जीवितहानी टळली आहे. अपघातानंरतर एक तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, या घाटातील चार महिन्यातील हा आठवा अपघात असून, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोयाबीनच्या गोण्यांनी भरलेला ट्रक (एमपी ०९ एचएच ३०५९) पनवेल-तळोजा येथून इंदूर-उज्जैनच्या दिशेने जात होता. राहुड घाट उतरत असताना अचानक ट्रकचे ब्रेक निकामी झाले. वेगावर नियंत्रण सुटल्याने ट्रक घाटातील वळणावर संरक्षक कठडे तोडून पलटी झाला. क्लिनर राघवेंद्र दीपक कुशवा यांनी प्रसंगावधान राखत चालत्या ट्रकमधून उडी मारली. मात्र यात ते जखमी झाले.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी शिक्षण विभागाकडू विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने अजिंठा केंद्रातंर्गत असलेल्या पिंपळदरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शाळा पूर्वतयारी कार्यक्रमांतर्गत नवीन प्रवेश होण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली. यात विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. या उपक्रमाच्या माध्यमातून गावात प्रभात फेरी काढून शाळेतील पटसंख्या वाढविण्याबाबत जनजागृती करण्यात आली. प्रभात फेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी ‘प्रत्येक बालक शाळेत चला’, ॅगुढीपाडवा सण आनंदाचा, प्रवेश घ्या शिक्षणाचा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. गावातील पालकांना नवीन शैक्षणिक वर्षात आपल्या मुलांचा शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळेच्या वतीने सांगण्यात आले की, प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण शिक्षण देणे हेच शाळेचे ध्येय असून ‘गुढीपाडवा, शाळेचा पट वाढवा’ अभियानाद्वारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शाळेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दरम्यान, या उपक्रमाला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
तालुक्यातील ढोरेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नवगत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेला प्रवेशोत्सव यंदा अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण गावाने एकत्र येत या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने उत्सवाचे रूप दिले. चिमुकल्यांची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ‘शिक्षणाचा उत्सव गावभर’ या संकल्पनेला साजेसा हा कार्यक्रम ठरला. शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आकर्षण निर्माण करण्यामुळे गावात शिक्षणाबद्दलची जाणीव अधिक दृढ झाली असून, ‘प्रत्येक मुलगा-मुलगी शाळेत’ हा संदेश प्रभावीपणे पोहोचला. १००% पटसंख्या वाढ, शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद व उत्साह, गावात शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण झाली. प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांची आकर्षक रथातून मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांचा वर्षाव करत ग्रामस्थांनी चिमुकल्यांचे स्वागत केले. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ‘सेलिब्रिटी’ सारखी वागणूक मिळाली. शाळा परिसर रंगीबेरंगी सजावटीने नटला होता. शिक्षकांनी औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची आनंददायी सुरुवात करून दिली. पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रवेशोत्सवाच्या उत्साहात शाळेच्या परिसरात खास पाणीपुरीचा स्टॉलही उभारण्यात आला होता. या अनोख्या उपक्रमामुळे चिमुकल्यांच्या आनंदात अधिकच भर पडली. विद्यार्थ्यांनी रांगा लावत मनसोक्त पाणीपुरीचा आस्वाद घेतला, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या गोड आणि चविष्ट अनुभवामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आपुलकी निर्माण झाली असून, ‘शाळा म्हणजे आनंदाचे ठिकाण’ ही भावना त्यांच्या मनात दृढ झाली. फुलांच्या वर्षावात चिमुकल्यांचे वर्गात स्वागत करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खलील पटेल, उपाध्यक्ष अशोक कांबळे, केंद्रप्रमुख दत्तात्रय दाणेकर, केंद्रीय मुख्याध्यापिका अंजली पुऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश हिवाळे, मनोज घुले, शंकर राऊत, बसवराज उदे, दिलीप धर्माधिकारी, भाऊसाहेब गाढवे, मनोज मस्के, नीलिमा कुलकर्णी, मुग्धा निमसे, परमेश्वर मस्के, सचिन पाटसकर, शामीर शेख,अली बाकोदा, कल्याणी जगताप, संगीता जोशी आदींसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. रंगीत ठशांच्या रूपाने जपली पहिल्या दिवसाची आठवण प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी रंगतदार उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. रंगामध्ये दोन्ही हात बुडवून कार्डशीटवर आपल्या हाताचे ठसे उमटवत चिमुकल्यांनी अक्षरशः अमीट छाप सोडली. या सर्जनशील उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळाला, तसेच शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण रंगीत ठशांच्या रूपाने कायमची जपली गेली. या उपक्रमामुळे शाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून आनंद, सृजन आणि अभिव्यक्तीचे केंद्र आहे, अशी भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजली.
पैठण शहरामध्ये गॅसचा तुटवडा:नागरिकांच्या अर्धा किमी रांगा, वारंवार गरम करावे लागणारे पदार्थ बंद
शहरातील इंडेन गॅस केंद्रावर गॅस टाकी मिळण्यासाठी बुधवारी नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. मागील २० वर्षांत एवढी मोठी रांग पहिल्यांदाच दिसली. महिलांनीही घरकाम सोडून गॅससाठी रांग लावली होती. पैठणच्या उद्यान रोडवरील संत एकनाथ गॅस एजन्सीवर २२ हजार गॅसधारक आहेत. बुधवारपर्यंत एजन्सीकडे २,२६३ धारकांनी सिलिंडर बुक केले. एजन्सीवर एक किंवा दोन दिवसाआड भरलेल्या टाक्यांची गाडी येते. हॉटेल व्यावसायिक अजय परळकर म्हणाले, हॉटेलमध्ये जास्त गॅस लागणारे, वारंवार गरम करावे लागणारे पदार्थ बनवणे बंद केले. कोळशाची शेगडी मिळणे कठीण झाले. पूर्वी शेगडी १,८०० रुपयांत मिळत होती. आता ३,००० रुपये देऊनही मिळणे कठीण झाले. आम्ही लाकडाची भट्टी सुरू केली. गॅस तुटवड्यामुळे मसाला डोसा, उत्तप्पा, पोळी-भाजी, राइस प्लेट बनवणे बंद केले. त्यामुळे कामगारांची संख्या कमी केली. ही परिस्थिती काही दिवस राहिली तर अनेक हॉटेल बंद होतील. वारंवार गरम करावे लागणारे पदार्थ बंद
जिल्हा परिषदेच्या (मिनी मंत्रालय) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. भाजपच्या या विजयाचे मुख्य शिल्पकार ठरलेले राज्याचे बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी महानगरपालिकेपाठोपाठ आता जिल्हा परिषदेतही आपला राजकीय दबदबा सिद्ध केला आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांचे पुतणेप्रेम आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेनेला हातची सत्ता गमवावी लागली आहे. या निकालामुळे जिल्ह्यात भाजपची पकड आता अधिक मजबूत झाली आहे. भाजपच्या भविष्यातील वाटचालीसाठी जिल्हा परिषदेची सत्ता नांदी ठरणार आहे. भाजप आणि शिवसेनेची महापालिका निवडणुकीत युती तुटली आणि भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. प्रत्येक वेळी लहान भाऊ म्हणून भूमिका बजावणारा भाजप मोठा झालेला शिवसेनेला अद्याप रुचेनासा झाला आहे. शिवाय युती करण्यावरून शिवसेनेमधील अंतर्गत राजकारणही कारणीभूत ठरत आहे. महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर भाजपने अभूतपूर्व यश मिळवले होते. प्रत्येक वेळी छोटा भाऊ म्हणून भूमिका बजावणारा भाजप आता मोठा झाल्याचे शिवसेनेला पचनी पडत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत सुरुवातीला युतीची घोषणा झाली होती. मात्र सिल्लोडमध्ये आमदार सत्तारांनी युती तोडली आणि नंतर संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेने सर्व जागांवर आपले बी फॉर्म दिल्याने भाजपची अडचण झाली. शिवसेनेची ही खेळी मंत्री अतुल सावे यांच्या वेळीच लक्षात आली. शिवसेनेला रोखण्यासाठी सावे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांच्याशी संधान बांधले आणि राष्ट्रवादीचे ४ सदस्य आपल्या बाजूने वळवले. काँग्रेसच्या एकमेव सदस्याला पक्षात प्रवेश देऊन ताकद वाढवली. यामुळे भाजपचे २३ सदस्य, दोन पुरस्कृत, एक काँग्रेस आणि एक प्रहार असे एकूण २७ सदस्यांचे पाठबळ उभे राहिले. दुसरीकडे, उद्धवसेनेचे सर्व सदस्य मतदानाला गैरहजर राहिले. याचा थेट फायदा भाजपला झाला.
आमठाणा/चिंचोली लिबाजी आमठाण्यासह परिसरातील (ता. सिल्लोड) काही गावांसह चिंचोली लिंबाजी, शेलगाव, बरकतपूर, दहिगाव, वाकद, वाकी (ता. कन्नड) येथे अर्धा तास बुधवारी सायंकाळी वादळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह गारांचा जोरदार शिडकावही झाला. दरम्यान, वाऱ्याचा वेग प्रचंड राहिल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला. काढणीसाठी तयार असलेला गहू, हरभरा, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गारपीट, सुसाट वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी पडली. शेतात काढून ठेवलेला माल खराब झाला. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट कोसळले. वादळामुळे आमठाणा गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. कन्नड तालुक्यातील नागापूर परिसरातही बुधवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते. सायंकाळी पाच वाजेदरम्यान पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. या वेळी शेतामधील मक्याची पुंज, गहू झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. लासूर स्टेशन परिसरातही रात्री उशिरा पावसास सुरूवात झाली होती. सोयगाव | शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी ७.१० ते रात्री उशिरापर्यंत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, महावितरणचा विद्युत पुरवठा गूल झाल्याने धावपळ उडाली होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १७ मार्चपासून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. बुधवारी विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसात सुरुवातीला बोरांच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. या पावसाने शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या गव्हाचे, मकाचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे मकाचे पीक आडवे पडले.
गल्लेबोरगाव येथील लेकीच्या हातात गंगापूर पं.स.ची सूत्रे; ग्रामस्थांत आनंद
तालुक्यातील गल्लेबोरगाव या छोट्या गावातील संजय बाजीराव बडे यांची कन्या कविता रवींद्र चव्हाण यांची गंगापूर पंचायत समितीच्या सभापतिपदी निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण आहे. गावकऱ्यांत अभिमान आहे. कविता चव्हाण सामान्य कुटुंबातून पुढे आल्या. जिद्द, चिकाटी, लोकसंपर्काच्या बळावर त्यांनी हे यश मिळवले. २२ फेब्रुवारी २०१४ रोजी त्यांचा विवाह धामोरी खुर्द येथील रवींद्र चव्हाण यांच्याशी झाला. सभापतिपदामुळे माहेर गल्लेबोरगाव, सासर धामोरी खुर्द या दोन्ही गावांची मान उंचावली. या निवडीत आमदार प्रशांत बंब यांनी दाखवलेला विश्वास निर्णायक ठरला. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली. कविता चव्हाण यांनी जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा निर्धार व्यक्त केला. रवींद्र चव्हाण धामोरी खुर्दचे उपसरपंच आहेत. ते भाजपचे गंगापूर तालुक्याचे अध्यक्ष आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने धावणारे, मजबूत जनसंपर्क असलेले, आमदार बंब यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यशैलीमुळे गंगापूरसह खुलताबाद तालुक्यातही त्यांची लोकप्रियता वाढली. २ लेकी पं.स.मध्ये अभिनंदनाचा वर्षाव गल्लेबोरगावच्या दोन लेकी गंगापूर पंचायत समितीत पोहोचल्या. सभापती कविता चव्हाण यांच्यासह जामगाव गणातून अपक्ष निवडून आलेल्या मालती लक्ष्मण सांगळे यांचेही माहेर गल्लेबोरगाव आहे. गावासाठी हा दुहेरी अभिमानाचा क्षण ठरला. निवडीनंतर सर्व स्तरांतून कविता चव्हाण यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबरमधील अतिवृष्टीमुळे वैजापूर तालुक्यात शेकडो विहिरींची पडझड होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शासनाकडून नुकसानग्रस्त विहिरींसाठी प्रत्येकी ३० हजार रुपये इतकी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पंचायत समितीमार्फत एकूण २७४ प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले. मात्र या प्रस्तावांची छाननी करताना केवळ ८ प्रस्ताव मंजूर झाले, तर तब्बल २६६ प्रस्ताव पंचनामा अहवाल व आवश्यक कागदपत्रे न जोडल्यामुळे बाद करण्यात आले. परिणामी, सुमारे ८२ लाख रुपयांचे अनुदान फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसल्याने खळबळ उडाली आहे. तहसील स्तरावर वेळेत पंचनामे न केल्यामुळेच ही संपूर्ण प्रक्रिया कोलमडल्याचे स्पष्ट होत आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेकडो प्रस्ताव अपूर्ण राहून थेट बाद झाले. नैसर्गिक आपत्तीत दिलासा देण्याऐवजी प्रशासनाच्या ढिसाळ कामकाजामुळे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागले. त्यामुळे आता या प्रकारासाठी जबाबदार कोण, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे. तहसील विभागाची चूक पंचायत समिती (रोहयो) एपीओ रामेश्वर खरात म्हणाले, तालुक्यातील २७४ विहिरींचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. पैकी केवळ ८ प्रस्ताव मंजूर, तर २६६ प्रस्ताव नामंजूर झाले. यात ही चूक तहसील विभागाची असून त्यांनी केवळ यादी पाठवली. तहसील स्तरावरून पंचनामा अहवाल न जोडल्यामुळे प्रस्ताव अपूर्ण राहून बाद झाले. ८२ लाखांचा प्रश्न; जबाबदार कोण? सुमारे ८२ लाख रुपयांचे अनुदान कागदपत्रांच्या त्रुटींमुळे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकले नाही. वेळेत पंचनामे न केल्याने प्रस्ताव अपूर्ण राहिले आणि मदत अडकली. या मोठ्या आर्थिक नुकसानीसाठी जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. २४ नोव्हेंबरचे पत्र धूळ खात; तहसीलचे दुर्लक्ष दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी पंचायत समिती, वैजापूरकडून तहसील कार्यालयाला अतिवृष्टीग्रस्त विहिरींचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. संबंधित तलाठी व ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करावा, असे नमूद असूनही तहसील स्तरावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. आदेश कागदावरच राहिल्याने प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे.
3000 दुचाकी, 1300 कारची बुकिंग:गतवर्षीच्या तुलनेत 500 दुचाकी तर 100 कारची अधिक विक्री
हिंदू नववर्षाचा पहिला सण असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील वाहन बाजारपेठ पूर्णपणे सज्ज झाली आहे. यंदा दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या खरेदीचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून सुमारे ३ हजार दुचाकी, तर १३०० नवीन चारचाकींची बुकिंग झाली आहे. मागील वर्षी २५०० तर १२०० कारची विक्री झाली होती. आज, गुरुवारी नागरिक शुभमुहूर्तावर आपल्या लाडक्या वाहनाची डिलिव्हरी घेणार आहेत, अशी माहिती ‘संजय ऑटो’चे जनरल मॅनेजर संजय जोशी यांनी दिली. विशेष म्हणजे यंदा इलेक्ट्रिक दुचाकी आणि एसयूव्ही तसेच प्रीमियम हॅचबॅक या प्रकारातील वाहनांनी ग्राहकांना भुरळ घातली आहे. यंदा दुचाकी वाहनांवरील जीएसटीमध्ये झालेल्या कपातीमुळे सर्वसामान्यांचे दुचाकीचे स्वप्न साकारणे सोपे झाले आहे. तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. तालुक्यात चारचाकी व ट्रॅक्टरचे सुमारे ११, तर दुचाकीचे १५ शोरूम कार्यरत आहेत. मागील वर्षी ८९ चारचाकी व ४८५ दुचाकींची विक्री झाली होती. यंदा पाडव्याच्या निमित्ताने १२५ ते १५० चारचाकी, तर ५०० ते ५५० दुचाकी विक्रीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरेदीदारांकडून प्रतिसाद नसल्याचे दिसून येत आहे. सोने- चांदी बाजारात शांतता दिसून आली. वाहन खरेदीला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्रिया हीरो शोरूमचे व्यवस्थापक बाळासाहेब भालेराव यांनी दिली. गतवर्षी १८५ दुचाकींची विक्री झाली होती, यंदा २०० चा टप्पा पार होईल. पैठण तालुक्यातील २०० दुचाकी, २० चार चाकीच्या बुकिंग झाल्या असून सोने, चांदी, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीला चांगला प्रतिसाद मिळेल असे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया यांनी सांगितले. फुलंब्री शहरासह ग्रामीण भागात ट्रॅक्टर व दुचाकी खरेदीत कोट्यवधींची उलाढाल झाली. सोने-चांदी महाग असल्याने सराफा दुकानांत ग्राहकांची कमी गर्दी दिसून आली. सर्वात जास्त ४० दुचाकींची विक्री झाली आहे, तर २८ ट्रॅक्टर खरेदी झाले. गंगापूर | सराफा व्यावसायिक संतोष अंबिलवादे यांनी सांगितले की, यंदा दर जास्त असूनही ग्राहक गुंतवणूक म्हणून दागिन्यांची खरेदी करीत आहे. मात्र रिअल इस्टेट, रोहाउसेस, प्लॉट खरेदी, ट्रॅक्टरच्या बाजारात अपेक्षित बुकिंग दिसली नाही. गंगापूर : गुंतवणूक म्हणून सोने खरेदी फुलंब्री : दागिने खरेदीकडे पाठ वैजापूर : ५५० दुचाकी, १५० चारचाकींची विक्री सिल्लोड : दुचाकी वाहन बाजार सुसाट, २०० बुकिंग
प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांच्या हत्याकांडात आरोपी विशाल राठोडने पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी डिजिटल सापळा रचला होता. खुनानंतर लोंढेंचा मोबाइल जमिनीत पुरून तो पुन्हा पॉवर बँकने चार्ज करणे आणि स्वतःच्या फोनवरून त्यावर २० सेकंदांचा कॉल करणे, ही विशालची चूक ठरली. उस्मानपुरा पोलिसांनी याच पुराव्याच्या आधारे विशालला अटक केली. या प्रकरणाचे धागेदोरे आता एका रील्सस्टार महिलेपर्यंत आणि २५ लाखांच्या संशयास्पद व्यवहारापर्यंत पोहोचले. लोंढे बेपत्ता झाल्याची तक्रारीनंतर पोलिसांनी ७ फेब्रुवारीला विशालला चौकशीसाठी बोलावले होते. तेथून सुटल्यावर संशय टाळण्यासाठी विशाल थेट सिग्मा हॉस्पिटलजवळ जाऊन लोंढेंचा पुरलेला मोबाइल बाहेर काढला. चार्जिंग संपल्याने बंद पडलेला हा फोन त्याने पॉवर बँक लावून सुरू केला. त्यानंतर त्याने स्वतःच्या मोबाइलवरून लोंढे यांच्या मोबाइलवर कॉल केला आणि २० सेकंदांत तो बंद केला. तपासात विशाल आणि लोंढेंच्या मोबाइलचे लोकेशन एकाच वेळी, एकाच ठिकाणी दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि तपासाचे चक्रे फिरली. पुण्यातून स्टेटस अपडेट करणारा कोण? विशालचे इंग्रजी चांगले आहे. त्याने तपासाची दिशा भरकटवण्यासाठी लोंढे यांचा मोबाइल पुण्याला पाठवून दिला. तेथून लोंढे यांच्या मोबाइलवरून इंग्रजी भाषेत स्टेटस अपडेट केले, जेणेकरून लोंढे पुण्यात सुरक्षित असल्याचा भास निर्माण व्हावा. मात्र, हा मोबाइल दुसऱ्याच एका व्यक्तीने पुण्यात नेऊन ठेवल्याचे तपासात समोर आले. तेव्हा स्टेटस ठेवणारा कोण हा प्रश्न आहे. रील्सस्टार कनेक्शन; २५ लाखांच्या व्यवहाराचे गूढ या प्रकरणातील सर्वात मोठे वळण म्हणजे एका प्रसिद्ध मराठी रील्सस्टार महिलेची सुरू असलेली चौकशी. लोंढे यांनी या महिलेला २५ लाख रुपये दिले होते, हे आता तपासात स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, आरोपी विशाल राठोडने स्वतः एका गाण्याची निर्मिती केली असून त्या गाण्याच्या टीझरमध्ये तो निर्माता म्हणून झळकत आहे. या गाण्याच्या उद्घाटनाला राजकीय मंडळींची असलेली उपस्थिती आणि त्यात गुंतलेला लोंढेंचा पैसा यामुळे प्रकरणाचे धागेदोरे खोलवर असल्याचे दिसत आहे. १. लोंढे यांनी रील्सस्टार महिलेला दिलेले २५ लाख रुपये नेमके कशासाठी होते?२. जर लोंढे यांनी पैसे दिले, तर विशाल त्या गाण्याचा निर्माता कसा झाला?३. १५ हजार रुपये देऊन खड्डा खोदताना त्या जेसीबी ऑपरेटरला संशय का आला नाही?
आज नव्या योजनेचे पाणी जॅकवेलमध्ये येणार:अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीनंतर चाचणीला दिला ग्रीन सिग्नल
शहरासाठी राबवण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा गुरुवारी (१९ मार्च) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पूर्ण होणार आहे. भव्य जॅकवेलमध्ये सायफन तंत्रज्ञानाने पाणी घेण्यास सुरुवात होणार असून त्याच वेळी ९०० मिमीची नवीन जलवाहिनीही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाणार आहे. मनपा आयुक्त जी. श्रीकांत आणि एमजेपीच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी बुधवारी (१८ मार्च) कामाची अंतिम पाहणी करून पाणी जॅकवेलमध्ये घेण्यास ‘ग्रीन सिग्नल’ दिला. जॅकवेलमधील २०० पैकी १२० तांत्रिक दुरुस्त्या युद्धपातळीवर पूर्ण झाल्या आहेत. जॅकवेल परिसरातून ७५ ट्रक भरेल इतका राडारोडा हटवण्यात आला असून, १८ मार्चपर्यंत सर्व तांत्रिक कामे पूर्ण करण्याचे कडक निर्देश आयुक्तांनी पाळले आहेत. इनसाइड स्टोरी १९ मार्च (आज): जॅकवेलमध्ये पाणी सोडण्याचा सोहळा.२२-२३ मार्च : मुख्य जलवाहिनीची स्वच्छता (फ्लशिंग) आणि पंप सुरू होणार.२७ मार्च : उच्च न्यायालयात प्रगती अहवाल सादर होणार. ९०० मिमीचा मार्ग मोकळा; ७५ एमएलडी जादा पाणी अतिरिक्त अभियंत्यांनी १९ मार्चपासून ९०० मिमीची जलवाहिनी पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश दिले. ५६ एमएलडी योजनेच्या पुनरुज्जीवनांतर्गत ही वाहिनी टाकली होती, मात्र जायकवाडी ते ढोरकीनदरम्यानच्या ग्रामपंचायतींच्यौ नळ जोडण्यांमुळे ती रखडली होती. आता हे स्थलांतर पूर्ण झाल्याने जुनी ७०० मिमीची गळतीग्रस्त वाहिनी बंद केली जाईल. ११ आणि १२ मार्च रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या तांत्रिक बदलांवर शिक्कामोर्तब झाले होते. सायफन तंत्रज्ञानामुळे पाणी उचलणे सुलभ होईल, मात्र पुढील ७२ तास अत्यंत संवेदनशील असतील. ३८ किमीच्या प्रवासात कुठेही गळती होऊ नये यासाठी अभियंत्यांचे पथक तैनात आहे.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या “शेट्टी टॉवर’ निवासस्थानाबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून याप्रकरणी आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकर सध्या परदेशात असून त्याच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. या गुन्ह्यामागे बिश्नोई गँगचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए ) ताब्यात असलेल्या अनमोल बिश्नोईचा ताबा मुंबई पोलिसांना मिळावा, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. एनआयएची कोठडी संपल्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आमदार मिलिंद नार्वेकर यांनी रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानावरील गोळीबाराबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. तर आमदार सचिन अहिर यांनी चित्रपट क्षेत्रातील कलाकारांमध्ये पसरलेल्या भीतीबद्दल चिंता व्यक्त केली. याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, एका व्यक्तीने भिंतीलगत पिस्तूल चालवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी मिळालेल्या स्कूटीच्या आधारे पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपींना अटक केली. घटनेनंतर मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने तपास केला. चित्रपटसृष्टीत ‘दहशतीचे अर्थकारण’ गेल्या काही वर्षांत केवळ गुन्हेगारी विश्वातच नाही, तर ग्लॅमर आणि बिझनेस, राजकीय विश्वातही दहशत पसरवण्यासाठी बिश्नोई गँग चर्चेत आली आहे. ९० च्या दशकातील गँगवॉरची भीती बिश्नोई गँगमुळे पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये पसरत आहे. सलमान खान, सिद्धू मूसेवाला आणि बाबा सिद्दिकी यांच्यानंतर आता रोहित शेट्टीला लक्ष्य करणे, हे केवळ वैयक्तिक हल्ले नसून चित्रपटसृष्टीवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न आहे. जेलमधून आणि परदेशातून चालवल्या जाणाऱ्या या कारवायांतून ‘दहशतीचे अर्थकारण’ पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. मुंबईत गँगवार होऊ देणार नाही काँग्रेस आणि भाजपच्या काही आमदारांनाही धमकीचे फोन आले होते, मात्र पोलिसांनी ते प्रयत्न हाणून पाडले आहेत. धमकीचे कॉल आल्यावर सेलिब्रिटींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक आहे, म्हणूनच रोहित शेट्टी यांना पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. मुंबईची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असून शहराला पुन्हा एकदा गँगवॉरच्या खाईत लोटण्याचे कुणाचेही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास फडणवीस यांनी सभागृहात व्यक्त केला.
पतीचे भविष्य जाणून घेण्यासाठी आलेल्या महिलेला दैवी शक्तीचा खोटा दावा करत ‘तुझ्या पतीचा मृत्यू होईल’ अशी पतीच्या निधनाची भीती घालून २ वर्ष अत्याचार करणाऱ्या ‘कॅप्टन’ अशोक खरातला गुन्हे शाखा १ च्या पथकाने मंगळवारी (दि. १८) रात्री ११.३० वाजता कर्मयोगीनगरमधील बंगल्यातून अटक केली. सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बड्या नेत्यांसह सेलिब्रिटींचे भविष्य सांगणाऱ्या कॅप्टनच्या पेन ड्राईव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ मिळाल्याच्या चर्चेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनुसार, अशोककुमार एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ (तृप्ताबाला बंगला, रा. कर्मयोगीनगर) याने नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील ओक्स प्रॉपर्टीज्च्या ऑफिसमध्ये फिर्यादी महिलेला जाळ्यात ओढले. दैवी शक्ती असल्याचे भासवून मंत्र-तंत्र व धार्मिक विधीच्या बहाण्याने महिलेला गुंगीकारक पदार्थ देऊन संमोहित केले. ‘तुझे आयुष्य बरबाद करेन’, ‘तुझ्या पतीचा मृत्यू होईल’ अशी भीती घालून वारंवार इच्छेविरुद्ध अत्याचार केला. नेव्ही कॅप्टननंतर खरात थेट ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट अध्यक्ष साईप्रसाद पाटील | खरातने मर्चंट नेव्हीत २२ वर्षाच्या कारकीर्दीनंतर अंकशास्त्र, ‘कॉस्मॉलॉजी’चा (विश्वशास्त्र) अभ्यास केला. ‘शिवनिका ट्रस्ट’चे नेतृत्व करत २०१० पासून मिरगाव (ता. सिन्नर) येथील ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष झाला. २०२२ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मंदिरात गेले असता खरातने त्यांच्याशीही राजकीय भविष्यावर चर्चा केली. नेव्हीत असताना १५४ देशांचे दौरे केले. १३ भाषा शिकल्या.
‘समान नागरी कायद्या’बाबत राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. या कायद्यासंदर्भात विधी व न्याय, सामान्य प्रशासन तसेच महिला व बालकल्याण विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत. येत्या महिनाभरात सर्व संबंधित विभागांची बैठक घेऊन सरकार अधिकृत भूमिका मांडेल, असे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केले. भाजप आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेत याविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. “भारतीय संविधानाच्या कलम ४४ नुसार लग्न, घटस्फोट, वारसा हक्क आणि दत्तक विधानासाठी सध्या धर्मांनुसार वेगवेगळे कायदे आहेत. गोवा, उत्तराखंडमध्ये कायदा
जिल्हा परिषदेत भाजपने २३ सदस्यांच्या बळावर सत्ता मिळवली. बुधवारी झालेल्या निवडणुकीत भाजपने अजित पवार गटाच्या ५ तर शरद पवार गटाच्या एका सदस्याला सोबत घेतले. शिवाय उद्धवसेनेचे दोन आणि प्रहारचा एक सदस्य फोडला. काँग्रेसच्या एका सदस्याने आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे २१ सदस्य असलेल्या शिंदेसेना, ९ सदस्य असलेल्या उद्धवसेनेने मतदानावर बहिष्कार टाकला. आणि भाजपचे अविनाश गलांडे अध्यक्ष आणि जितेंद्र जैस्वाल बिनविरोध उपाध्यक्ष झाले. भाजपच्या फोडाफोडीचा अंदाज आल्याने शिवसेनेने (शिंदेसेना) स्वतःच्या सदस्यांसह, उद्धवसेना, राष्ट्रवादी आणि प्रहारच्या सदस्यांना दौऱ्यावर नेले होते. मात्र भाजपने त्यात फोडाफोडी केली. उद्धवसेनेच्या दोन सदस्यांना गैरहजर ठेवण्याची रणनिती आखून स्वबळावर अध्यक्ष बसवला. परभणीतही भाजपने अजित पवार गटाला सोबत घेत शिंदेसेना, उद्धवसेना आणि काँग्रेसला धक्का दिला. अध्यक्षपदी भाजपच्या लता वाकळे यांची, तर उपाध्यक्षपदी अजित पवार गटाचे श्रीकांत भोसले विटेकर यांची बिनविरोध निवड झाली. शिंदेसेनेसह इतर पक्षांनी या निवडीवर बहिष्कार टाकला होता. संभाजीनगरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बुधवारी निवडणूक झाली. अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे पीठासीन अधिकारी होते. भाजपकडून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले. यावेळी ३२ सदस्य हजर असल्याने कोरम पूर्ण झाला. विरोधात कोणीही उमेदवार नसल्याने अडकुणेंनी अध्यक्षपदी गलांडे, उपाध्यक्षपदी जैस्वाल बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. पहिल्या अडीच वर्ष अध्यक्षपदावरून युतीची चर्चा फिसकटली. शिवसेनेने उद्धवसेना, राष्ट्रवादी व प्रहारच्या सदस्यांनाही सहलीवर नेले. तरीही भाजपने खेळी केली. राष्ट्रवादीच्या ५ सदस्यांना सोबत घेत अध्यक्ष, उपाध्यक्षपद मिळवले. शिवसेना, उद्धवसेनेचे सदस्य सभागृहात आलेच नाहीत. फडणवीसांच्या नेतृत्वात सत्ता काबीज केली : गलांडे गल्ली ते दिल्ली भाजपच्या सत्तेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत आहेत. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपने दोन्ही पदे काबीज केली, असे अध्यक्ष गलांडे म्हणाले. उद्धवसेना, राष्ट्रवादीला सोबत घेऊन गळा कापला : आ. सत्तार शिंदेसेनेचे माजी मंत्री, आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, पहिले अडीच वर्ष आम्हाला अध्यक्षपद देण्याचे भाजपसोबत चर्चेत ठरले होते. मात्र ऐन वेळी उद्धवसेना, अजित पवार गटाला सोबत घेत भाजपने आमचा केसाने गळा कापला. राज्याच्या राजकारणात याचे पडसाद उमटतील. सोलापूरलाही भाजप बिनविरोध, पहिल्यांदाच सत्तेवर ताबा सोलापूर : अध्यक्षपदी भाजपचे दीपक वैद्य तर, उपाध्यक्षपदी इंद्रजित पवार यांची बिनविरोध निवड झाली. ६८ जागांपैकी सर्वाधिक ३८ जागा जिंकत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. इतिहासात प्रथमच जि.प.त भाजपची सत्ता आली आहे. भाजपकडून २०१७ चा हिशोब चुकता २०१७ च्या निवडणुकीत अध्यक्षपदाची भाजपची संधी त्यावेळच्या एकत्रित शिवसेनेने हिरावली होती. ऐनवेळी काँग्रेसशी हातमिळवणी करत शिवसेनेने सर्वाधिक २३ जागा असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवले होते. यावेळी भाजपने उद्धवसेनेचे सदस्य फोडून २०१७ च्या निवडणुकीचा हिशोब चुकता केला. सूत्रांनी सांगितले की, मंगळवारी रात्री उशिरा फडणवीसांशी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली होती. कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत अध्यक्ष, उपाध्यक्षपदी भाजपचे तानाजी पाटील यांची निवड झाली.सांगली : अध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची निवड झाली. येथे मविआचे बहुमत आहे.पुणे : अध्यक्षपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वीरधवल ऊर्फ बाबा जगदाळे तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. पुण्यात अजित पवार गटाचे ५१, भाजपचे १०, उद्धवसेना ६, शिंदेसेना ५, शरद पवार गटाचा १ सदस्य आहे. त्यांनी वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केल्याने गणित फिरवले : मंत्री सावे भाजपचे मंत्री अतुल सावे म्हणाले की, शिंदेसेनेसोबत अडीच-अडीच वर्षे अध्यक्षपद, उपाध्यक्षपद वाटून घेण्याचा निर्णय झाला होता. पण त्यांनी अजित पवार गट, भाजप पुरस्कृत अपक्षांना ओढत वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही वेगळी गणिते जमवली. महायुतीतील अजित पवार गट आमच्यासोबत आहे. आता शिवसेना सोबत आली तर त्यांनादेखील सभापतिपद देण्याबाबत विचार करू.
११ वर्षांत सरकारने शहरांमधील राहणीमान सुधारण्यासाठी ८.३६ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. हा पैसा सांडपाणी व्यवस्था, पिण्याचे पाणी, पर्यावरण आणि पायाभूत सुविधांवर खर्च होणे अपेक्षित होते. मात्र हा सर्व खर्च कोणत्याही ठोस नियोजनाशिवाय करण्यात आला. याचा परिणाम म्हणजे इंदूरच्या भागीरथपुरा येथे दूषित पिण्याच्या पाण्यामुळे २२ लोकांचा मृत्यू,झाशीतील रुग्णालयातील आगीत १० मुलांचा मृत्यू झाला. जनाग्रहाच्या ‘शेपिंग अर्बन इंडिया बाय डिझाइन, नोबडी बाय डिफॉल्ट’ या अहवालानुसार,, २००१ ते २०२० या काळात मुंबईचे बांधकाम क्षेत्र केवळ २६.६९% ने वाढले आहे. असे असूनही, मुंबई जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांपैकी आहे. तुलनेत पुण्याचे बांधकाम क्षेत्र ११०% ने वाढले आहे. असे असूनही वाहतुकीच्या तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाली. घरांच्या किमतींवर नियंत्रण नसल्यामुळे बहुतेक लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढत आहे. वायू प्रदूषण, कमी होत असलेले हरित पट्टे जीविताला धोका निर्माण करत आहेत. खराब जलनिःसारणामुळे शहरांत दीर्घकाळ पाणी साचत आहे. स्थिती कठीण तरीही शहरे मुख्य स्रोत देशाच्या जीडीपीमध्ये शहरांचे योगदान ६०% आहे. केवळ पहिल्या १० शहरांचा वाटा २८% आहे तर या शहरांमध्ये देशाची केवळ ९% लोकसंख्या राहते. २०३० पर्यंत, ७०% नवे रोजगार शहरांत येतील. लहान शहरांत कृती योजना हवी अहवालानुसार शहरी सुधारणेसाठी खालील पावले उचलणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, पादचारी आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य दिले पाहिजे. लहान आणि मध्यम आकाराच्या शहरांमध्ये शहर कृती योजना लागू केल्या पाहिजेत. शहरांसाठी मॉडेल हवे. माहितीचा अभाव, सर्व शहरांसाठी एकच प्रारूप तयार केल्याने समस्या गंभीर अहवालानुसार सर्व शहरांसाठी सारखीच प्रारूपे विकसित केली. प्रशासनाकडे माहितीचा अभाव आहे. त्यामुळे शहरांचा विकास नियोजनानुसार होण्याऐवजी आपोआप होत आहे. नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा, गृहनिर्माण, शहरी व्यवहार खात्याचे अतिरिक्त सचिव डी. थारा व भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या उपस्थितीत बुधवारी हा अहवाल प्रसिद्ध झाला. बिनबोभाट, दरवर्षी अंदाजे १ कोटी नवीन लोक शहरांमध्ये स्थलांतरित जनाग्रहाच्या ‘शेपिंग अर्बन इंडिया: बाय डिझाइन, नोबडी बाय डिफॉल्ट’ या अहवालानुसार, गेल्या १८ वर्षांत शहरी भागांचा विस्तार २५ लाख हेक्टरने झाला आहे. हे क्षेत्रफळ १० हैदराबाद शहरांच्या आकाराएवढे आहे.. त्यामुळे शहरी जीवन कठीण होत चालले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, दरवर्षी अंदाजे १ कोटी नवीन लोक शहरांमध्ये स्थलांतरित होतात.
पर्यटनासाठी लेह- लदाख येथे गेलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांच्या फॉर्च्यूनर कारला राजस्थानात दिल्ली–मुंबई महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही भीषण घटना बुधवारी (दि. १८) सकाळी घडली. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच घडलेल्या या अपघातामुळे शहरावर शोककळा पसरली आहे. कुणाल चोरडिया (२५, रा. शांतीबन सोसायटी, चिंचवडगाव) मयुरेश पाडाळे (२३, रा. म्हाळुंगे पाडाळे) आणि सिद्धांत आल्हाट (२१, रा. थेरगाव) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तीन तरुणांची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव, वाकड आणि महाळुंगे परिसरातील तरुणांचा एक ग्रुप २७ तारखेला लेह - लदाख आणि जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेला होता. तीन आलिशान फॉर्च्यूनर कारमधून सर्वजण फिरायला गेले होते. पर्यटन करून सर्व तरुण पुन्हा घरी परतत होते. राजस्थानात दिल्ली–मुंबई महामार्गावर कोटा येथील केथून पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिल्ली-मुंबई महामार्गावर बुधवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. बर्फवृष्टीमुळे अडकले होते लेहमध्ये बर्फवृष्टीमुळे लेह-लदाखच्यामध्ये कारगिल येथे हे सर्व पर्यटक तरुण आठ दिवसांपूर्वी अडकले होते. बर्फवृष्टी झाल्याने रस्ते बंद होते. पिंपरी चिंचवडच्या स्थानिक नेत्यांनी बीएसएफच्या कमांडरशी संवाद साधून सर्व तरुणांना तेथून सुरक्षित बाहेर काढले होते. पर्यटनस्थळी फिरताना अपघात झालेल्या कारमध्ये अजून एक चौथा मित्रही होता. मंगळवारी (दि. १७) त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तो तातडीने विमानाने घरी निघून आला. आज सकाळी त्याच कारच्या अपघाताची माहिती त्या मित्राला समजली आणि त्याला मानसिक धक्का बसला. तो कोणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत नाही.
मुंबई-पुणे मार्गावर सहा वाहनांचा अपघात; 3 ठार:कंटेनरच्या धडकेनंतर वाहने एकमेकांवर धडकली
मुंबई–पुणे एक्स्प्रेस वेवर बुधवारी भीषण अपघात होऊन सहा वाहनांचा चक्काचूर झाला. या अपघातात इनोव्हा कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. बोरघाटातील खोपोली एक्झिटजवळ हा अपघात घडला. कंटेनर हा पुण्याहून मुंबईकडे जात होता. चालक अवधेश यादव (३७, उत्तर प्रदेश) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील वाहनांना जोरदार धडक दिली. सर्वप्रथम कंटेनरने टाटा पंच कारला धडक दिली. त्यानंतर पुढे असलेल्या टाटा टिगारो कारला धडक देत तो आयशर टेम्पोवर आदळला. यानंतर कंटेनरने इनोव्हा कारला पाठीमागून धडक देऊन तिच्यावर उलटला. पुढील बलकरलाही धडक बसल्याने ६ वाहनांचा साखळी अपघात झाला. या अपघातात इनोव्हा कारमधील श्रीकांत अनंत जाधव (६३, पुणे), अंबादास दामू पेटारे आणि प्रमोद संतोष पवार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहतूक झाली विस्कळीत कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदतकार्य करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी खालापूर येथे पाठवण्यात आले आहेत. या भीषण अपघातामुळे काही काळ एक्स्प्रेस वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
१ एप्रिलपासून आता इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागणार!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्पादनासाठी लागणा-या कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक्स तसेच वाहन क्षेत्रातील अनेक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. अलीकडील काळात […] The post १ एप्रिलपासून आता इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागणार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
युद्धजन्य स्थितीचे कारण देत दोन आठवड्यांत मोठी वाढ मुंबई : प्रतिनिधी गेले १९ दिवस अमेरिका- इस्रायल- इराण युद्ध सुरू आहे. एकीकडे घरगुती गॅस सिलिंडर पुरवठा साखळी विस्कळीत झालेली असताना भारताला इंधन तुटवड्याची झळ बसणार आहे. नागपुरात वाहनांसाठी वापरल्या जाणा-या एलपीजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. त्यामुळे ऑटो चालक आणि वाहनधारकांच्या खिशावर मोठा भार पडत आहे. […] The post वाहनांच्या एलपीजी दराचा भडका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शुद्धलेखनाच्या नावाखाली दीड लाख शेतक-यांचे सातबारा उतारे बदलले
महसूल विभागात घोटाळा, महसूलमंत्र्यांची कबुली मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागात खळबळ उडवून देणारा एक मोठा गैरप्रकार समोर आला आहे. जमिनीचा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज असलेल्या ७/१२ (सातबारा) उता-यात फेरफार करून तब्बल एक ते दीड लाख शेतक-यांची फसवणूक झाल्याची धक्कादायक कबुली खुद्द सरकारने दिली. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम १५५ चा चुकीचा अर्थ लावून महसूल […] The post शुद्धलेखनाच्या नावाखाली दीड लाख शेतक-यांचे सातबारा उतारे बदलले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पर्यावरण कर दुप्पट, नव्या गाड्या महागणार
सुधारणा विधेयक एकमताने मंजूर मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ आज विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले. राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने हे विधेयक महत्त्वाचे ठरणार आहे. या विधेयकाद्वारे वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जुन्या आणि प्रदूषणकारी वाहनांवरील पर्यावरण करात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची […] The post पर्यावरण कर दुप्पट, नव्या गाड्या महागणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जळकोट तालुक्यात वादळी वा-यामुळे आंब्याचे नुकसान
जळकोट : प्रतिनिधी जळकोट शहर तसेच तालुक्यात दि १७ मार्च रोजी रात्री वादळी वारा सुटला होता. यामुळे तालुक्यातील शेतक-यांच्या आंब्याच्या बागेस याचा मोठा फटका बसला आहे. आंबा उत्पादक शेतक-यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. जळकोट शहरातील सुनील अवलवार यांच्या गट नंबर १०८२ मधील एक हेक्टर जमिनीमध्ये असलेल्या १०० केशर आंब्याच्या झाडावरील या वादळामुळे […] The post जळकोट तालुक्यात वादळी वा-यामुळे आंब्याचे नुकसान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औसा येथे ईदगाह रस्त्यावर ठेकेदाराकडून अतिक्रमण
औसा : प्रतिनिधी औसा शहरातील ईदगाहकडे जाणारा मुख्य रस्ता सिव्हील हॉस्पिटलच्या बांधकाम ठेकेदाराने अतिक्रमण करून बंद केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या विरोधात एमआयएमच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, येत्या २१ मार्च रोजी रमजान ईद असल्यामुळे मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने ईदगाह येथे नमाज […] The post औसा येथे ईदगाह रस्त्यावर ठेकेदाराकडून अतिक्रमण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एमआयटी लातूर येथे ‘विश्वमैदान २०२६’ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे आयोजन
लातूर : प्रतिनिधी युवकांमध्ये क्रीडावृत्ती, नेतृत्वगुण आणि संघभावना विकसित करण्याच्या उद्देशाने माईर एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या पुढाकारातून दि. २२ मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘विश्वमैदान २०२६’ या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवामागे माईर एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांची प्रेरणादायी संकल्पना असून […] The post एमआयटी लातूर येथे ‘विश्वमैदान २०२६’ आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे आयोजन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक अभ्यास सहल
लातूर : प्रतिनिधी विद्यापीठ अनुदान आयोग आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ शैक्षणिक वर्षाची शैक्षणिक अभ्यास सहल नुकतीच उत्साहात संपन्न झाली. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत समाजातील विविध घटक, लोकांचे जीवनमान, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक रचना यांचा प्रत्यक्ष अनुभव यावा आणि आपले व्यक्तिमत्व समृद्ध व्हावे या उद्देशाने लातूर-कुडाळ-मालवण-कोल्हापूर याठिकाणी शैक्षणिक […] The post महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक अभ्यास सहल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रशासक काळात ६० टक्केच निधी खर्च
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषदेचा प्रशासक कालावधीतील पाचवा २०२६-२७ चा १७ कोटी रूपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प मुख्य लेखा व वित्त अधिकारी आर. बी. नागने यांनी १२ मार्च रोजी सादर केला. त्यास मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रशासक राहूल कुमार मिना यांनी मंजूरी दिली. मात्र असे असले तरी प्रशासक काळात मुक्तपणे सर्व यंत्रणा, सर्व विभाग प्रमुख ताब्यात असतानाही […] The post प्रशासक काळात ६० टक्केच निधी खर्च appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरात यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद किंवा त्यांच्यावरील आरोपांबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले होते. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका वृत्तपत्राचा जुना संदर्भ समोर आणत चाकणकर यांचा हा दावा खोडून काढला आहे. अंधारे यांनी सादर केलेल्या माहितीनुसार, खरात यांच्याशी संबंधित महिला शोषणाचे प्रकरण आणि त्यात रुपाली चाकणकर यांच्या एका पत्राचा स्पष्ट उल्लेख असल्याचे दिसून येत आहे. सुषमा अंधारे यांनी असा दावा केला आहे की, अशोक खरातच्या गैरकृत्यांबाबत बातमी प्रसिद्ध करणाऱ्या एका वृत्तपत्राकडून रुपाली चाकणकर यांनी वर्षभरापूर्वी लेखी माफीनामा लिहून घेतला होता. जर चाकणकर यांना खरातच्या प्रकरणाची माहितीच नव्हती, तर मग त्यांनी एका वर्षापूर्वी संबंधित वृत्तपत्राकडून माफीनामा का मागितला? असा थेट सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. सुषमा अंधारे यांनी ट्विट करत म्हटले की, रुपाली चाकणकर क्रमांक एकच्या खोटारड्या आहेत. कॅप्टन अशोक खरात काय लायकीचा माणूस आहे हे रूपाली चाकणकर यांना चांगलेच माहिती होते. खरात याची दुष्यकृत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न खबरदार पुढारी या एका स्थानिक वृत्तपत्राने केला तेव्हा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत त्याच्याकडून चाकणकर बाईंनी माफीनामा घेतला. ज्या चाकणकर बाई मला या प्रकरणाची माहिती नव्हती असे सांगत आहेत, त्या बाई या माफीनाम्याच्या संबंधाने काय बोलणार आहेत? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आपल्या पक्षाच्या प्रतिमेची फार काळजी असेल तर तटकरेंनी सांगावे, पीडित महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचेच चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, कधी वैष्णवी हगवणे कधी तनिषा दिसे तर कधी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत साततात्याने वादग्रस्त ठरलेल्या चाकणकर यांना महिला आयोगावर ठेवण्यात पक्षाची कोणती राजकीय अपरिहार्यता आहे? पुढे टीप म्हणून सुषमा अंधारे लिहितात, खबरदार पुढारीने दिलेले सदरील माफीनामा पत्र बघता रूपाली चाकणकरांना या खरात प्रकरणाची संपूर्ण माहिती एक वर्ष आधीपासूनच होती मात्र याच्या मुळाशी जाण्यापेक्षा पिढीचांवरच आणि पिढी त्यांना न्याय देणाऱ्यांवरच दबाव आणण्यात चाकणकरांनी धन्यता मानली हे विशेष आहे.
सांगोला येथील सांगोला विद्यामंदिर शाळेतून दोन दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या दहावीच्या भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका शोधण्यात पोलिसांना अखेर यश आले असून, याप्रकरणी त्याच केंद्रावर परीक्षा देणाऱ्या एका विधी संघर्ष ग्रस्त अल्पवयीन विद्यार्थ्याचा धक्कादायक सहभाग उघड झाला आहे. विशेष म्हणजे, हे कृत्य करणारा विद्यार्थी स्वतः दहावीत शिकत असून आज भूगोलाचा पेपर दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या शोधमोहिमेचा आज असा नाट्यमयरीत्या शेवट झाला असून, या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भूगोलाचा पुरेसा अभ्यास झाला नसल्यामुळे या विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिका चोरी केल्याची कबुली पोलिसांच्या चौकशीत दिली आहे. आपल्या पालकांसमोर दिलेल्या जबाबात त्याने सांगितले की, चोरी करण्यापूर्वी त्याने केंद्रावरील स्ट्रॉंग रूमची पद्धतशीर पाहणी केली होती आणि त्यानंतर पहाटे दोनच्या सुमारास इलेक्ट्रिक बाईकवर इलेक्ट्रिक कटर घेऊन तो शाळेत पोहोचला. कटरच्या साहाय्याने कुलूप तोडून त्याने भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांचे दोन गठ्ठे आणि तीन कोऱ्या उत्तरपत्रिका लंपास केल्या. घरी पोहोचल्यावर त्याने त्यातील एक गठ्ठा फोडून प्रश्नपत्रिकाही पाहिली होती, अशी धक्कादायक माहिती या तपासातून समोर आली आहे. सांगोला पोलिसांनी आज या विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन विद्यार्थ्याकडून चोरीला गेलेल्या 50 प्रश्नपत्रिका, 3 कोऱ्या उत्तरपत्रिका, इलेक्ट्रिक कटर आणि गुन्ह्यात वापरलेली इलेक्ट्रिक बाईक हस्तगत केली आहे. या चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आणि राज्यात मोठी खळबळ उडाली होती. काल याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आजचा पेपर होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र शिक्षण मंडळाने रात्री उशिरा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानुसार, आज राज्यातील सर्व केंद्रांवर दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर सुरळीतपणे पार पडला. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत असे समोर आले आहे की, प्रश्नपत्रिका चोरणाऱ्या या विद्यार्थ्याने त्याचा इतर कोणाशीही शेअर करून गैरवापर केला नव्हता, ही प्रशासनासाठी मोठी दिलासादायक बाब ठरली. केवळ स्वतःचा अभ्यास झाला नसल्याच्या कारणातून त्याने हे कृत्य केले होते. आता कायदेशीर प्रक्रियेनुसार या विधी संघर्षग्रस्त बालकास उद्या बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या प्रकरणाच्या यशस्वी तपासामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अनिश्चिततेवर अखेर पडदा पडला आहे.

27 C