नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे रविवारी सकाळी १० वाजता शेतात न्याहारी करत असलेल्या गोरख लक्ष्मण जाधव (४३) या शेतमजुरावर बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. या वेळी झटापटीदरम्यान कठडा नसल्याने मजूर आणि बिबट्या दोघेही विहिरीत कोसळले. दोघांचाही चाळीस फूट खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. शेतातील महिलांनी आरडाओरड केल्याने इतर मजूर विहिरीभोवती जमले. त्यांनी विहिरीत पाहिले तेव्हा बिबट्या विद्युत पंपाच्या फाउंडेशनवर बसून होता. त्यामुळे बुडणाऱ्या मजुराला वाचवण्यासाठी विहिरीत उतरण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही. वन विभागाने दुपारी १ वाजेच्या सुमारास पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद केले. मात्र, बिबट्याला ठार मारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. अखेर दुपारी साडेतीन वाजता गोविंद तुपे यांनी विहिरीत उतरून जाधव यांचा मृतदेह बाहेर काढला.यादरम्यान पिंजरा वारंवार पाण्यात बुडाल्याने नाकातोंडात पाणी जाऊन बिबट्याचाही मृत्यू झाला. फर्स्ट पर्सन - पाण्यातही बिबट्याने जाधव यांची मान सोडली नव्हती मी धावत आलो तेव्हा विहिरीतील फाउंडेशनचा आधार घेत बिबट्याने जाधव यांची मान सोडलेली नव्हती. पंजेही मारणे सुरूच ठेवले हाेते. काही वेळाने पकड ढिली झाल्याने जाधव पाण्यात बुडाले. - गणपत चव्हाणके, शेतमालक इनसाइड स्टाेरी- दाेन बालकांवरही याच बिबट्याने केला होता हल्ला शिवडे परिसरात याच बिबट्याने सकाळी दोन बालकांवरही हल्ला केला होता. त्यामुळे “आधी बिबट्याला ठार मारा, मगच मृतदेह बाहेर काढा,’ अशी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. पेंचमधील वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात सोडला बुलडाणा | पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या ३ वर्षांच्या नर वाघास मध्यरात्री ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात आले. शिकारी कौशल्य आत्मसात केल्यामुळे वनाचा अधिवास लाभावा यासाठी हे पाऊल उचलले. वनाचा अधिवास लाभताच या पट्टेदार वाघाने रेड्याची शिकार केल्याचे समोर आले. या वाघाचे नामकरण पीकेटी/ सीपी १ ठेवण्यात आले असून हा मूळ यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील आहे. ६ महिन्यांचा असतानाच त्याची आई मृत पावली होती.
तब्बल ५ हजार कोटींच्या गुलाबी नोटा अद्याप गायब!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था २०२३ मध्ये रिझर्व्ह बँकेने रद्द केलेल्या २००० रुपयांच्या गुलाबी नोटा अद्यापही पूर्णत: बँकेकडे जमा झाल्या नाहीत. २०२५ च्या शेवटच्या दिवसाचा डेटा आरबीआयकडून जारी करण्यात आला. आरबीआयच्या अहवालात ५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या गुलाबी नोटा अजूनही परत येण्याच्या प्रतीक्षेत आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या नोटा नेमक्या कुठे गेल्या आणि […] The post तब्बल ५ हजार कोटींच्या गुलाबी नोटा अद्याप गायब! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस-वंचित आघाडी नवा इतिहास घडवेल
उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला विश्वास लातूर : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाने कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी तडजोड केली नाही. डॉ. आंबेडकर यांचा विचार आणि संविधानाला मानणा-या काँग्रेस पक्षाने लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केली. या निवडणुकीत काँग्रेस-वंचित आघाडी नवा इतिहास घडवेल, असा […] The post काँग्रेस-वंचित आघाडी नवा इतिहास घडवेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रेणापूर येथे पहिले तालुका स्तरीय जनगणना प्रशिक्षण
रेणापूर : प्रतिनिधी भारताची जनगणना २०२७ च्या अनुषंगाने पहिला टप्पा एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २७ या कालावधीत पूर्ण करावयाच्या असल्याने पहिल्या टप्प्याचे तलाठी व ग्रामसेवक यांचे प्रशिक्षण रेणापूर तालुका जनगणना अधिकारी तथा तहसीलदार प्रशांत थोरात व गटविकास अधिकारी सुमित जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील पंचायत समितीच्या सभागृहात पार पडले. यावेळी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी सर्व […] The post रेणापूर येथे पहिले तालुका स्तरीय जनगणना प्रशिक्षण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औसा येथे राज्यातील प्रथमच शिक्षकांसाठी मॅरेथॉन स्पर्धा
औसा : प्रतिनिधी औसा शिक्षक पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्ताने शिक्षकांचे वैयक्तिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी राज्यात प्रथम मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मॅरेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाच्या मान्यता असलेल्या इ. १ ते १२ पर्यंतच्या जिल्हा परिषद, खाजगी, माध्यमिक, आश्रम शाळा, अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळा, स्वयंअर्थ सहाय्य शाळा, सर्व माध्यमांतील ३१२ शिक्षकांनी या मॅरेथॉनम स्पर्धेत […] The post औसा येथे राज्यातील प्रथमच शिक्षकांसाठी मॅरेथॉन स्पर्धा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निलंग्यातील बसस्थानक दहा महिन्यांतच बंद
निलंगा : प्रतिनिधी मोठा गाजावाजा करत उदघाटन झालेले ७ कोटींचे पंचतारांकित बसस्थानक अवघ्या दहा महिन्यात का बंद पडले असा प्रश्न मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने यांनी शासन प्रशासनाला विचारत बसस्थानकाचा स्पॉट पंचनामा केला. बसस्थानाकाचे बसवाहतुक होणा-या प्लॅटफॉर्मवरील सिमेंट उखडले असून चक्क स्टील उघडे पडले आहे. प्रवास्यांना बस आली-गेली की धुळीचे लोट उठतात. बसस्थानकामधील फरशीही उखडली […] The post निलंग्यातील बसस्थानक दहा महिन्यांतच बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उद्योजक निलेश ठक्कर यांना एकसष्टीनिमित्त दिल्या शुभेच्छा
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवार दि. २ जानेवारी रोजी सायंकाळी लातूर शहरातील सुप्रसिद्ध उद्योजक निलेश ठक्कर यांच्या एकसष्टीनिमित्त एमआयडीसी परिसरातील आरोमा हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून उद्योजक निलेश ठक्कर यांना निरोगी, दिर्घायुष्याच्या […] The post उद्योजक निलेश ठक्कर यांना एकसष्टीनिमित्त दिल्या शुभेच्छा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महापालिकेची निवडणूक लातूरच्या भवितव्याची
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्रित सामोरे जायचे आहे. ही निवडणूक लातूरच्या भवितव्याची व लातूरच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हातात द्यायची या संदर्भातील ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव […] The post महापालिकेची निवडणूक लातूरच्या भवितव्याची appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा:52 लाखांच्या दागिन्यांची चोरट्यांकडून लुटमार
पुण्यातील हडपसरमधील शेवाळवाडी भागात शनिवारी सायंकाळी एका सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा टाकण्यात आला. चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून ५२ लाख रुपयांचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महावीर ज्वेलर्सचे मालक महेंद्रसिंह सोलंकी (वय ३७) यांनी मांजरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पाच अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील सोलंकी यांच्या सराफी पेढीत सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते एकटेच होते. त्यावेळी खरेदीच्या बहाण्याने चार चोरटे पेढीत शिरले, तर त्यांचा एक साथीदार बाहेर थांबला होता. चोरट्यांनी सोलंकी यांना कोयत्याचा धाक दाखवला आणि आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी पेढीतील दागिने एका पिशवीत भरले. दागिने लुटल्यानंतर चोरटे दुचाकीवरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच मांजरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी सुरू आहे. आरोपी नेमके कोणत्या मार्गाने पसार झाले, त्यांचे इतर साथीदार कोण होते याबाबत तपास करण्यात येत आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेचे पोलिस देखील या घटनेचा समांतर तपास करत आहेत. विशेष म्हणजे, आठवड्याभरापूर्वी खडकवासला-पानशेत रस्त्यावरील खानापूर येथील एका सराफी पेढीवरही भरदिवसा दरोडा टाकून चोरट्यांनी सव्वा कोटी रुपयांचे दागिने लुटले होते. त्या प्रकरणी ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन चोरट्यांसह एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून आज ठाकरे बंधूंनी आज आपला वचननामा जाहीर केला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदिवलीत बोलतांना ठाकरे बंधूंच्या मिलनावर जोरदार फटकेबाजी केली आहे. फडणवीस म्हणाले की, आज जाहीर झालेला वचननामा हा वचननामा नसून हा केवळ वाचूननामा होता. यात कुठलेही वचनही नाहीये आणि नामाही नाही. खऱ्या अर्थाने वचननामा देण्याचा अधिकार हा केवळ बाळासाहेबांना असल्याचेही ते म्हणालेत. ही युती करप्शन आणि कन्फ्यूजनची- फडणवीस तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आज जो वचननामा आला आहे, त्यात वचनही नाहीये आणि नामाही नाहीये. मला कोणीतरी म्हणालं कार्टूननिस्ट आणि कॅमेरामॅनची युती झाली, मी म्हणालो असं म्हणणं योग्य नाही. मग मला कोणीतरी असं म्हटलं की, कॉमेडियन आणि कॅमेरामॅनची युती झाली, मी त्यांना म्हटलं हे देखील योग्य नाही. कारण कोणाचा व्यवसाय काहीही असू शकतो, ही जी युती झाली आहे ती युती करप्शन आणि कन्फ्यूजची झाल्याची टीकादेखील फडणवीस यांनी केली आहे. खोटं बोलायचं तर वचननामा आईच्या चरणी कशाला ठेवायचा? आज जाहीर झालेला वचननामा नाही, तो वाचूननामा आहे. पण त्यांनी काय वाचलं हे त्यांनाही माहिती नाही. याचं कारण आपण बघाल, एका वाहिनीने 2017 सालच्या यांच्या आश्वासनासंदर्भातील एक फॅक्टचेक केला, आणि त्या फॅक्टचेकमध्ये असं दिसलं की यांनी त्यावेळी जे पाच वचनं दिले होते, त्यातील एकही वचन यांना पूर्ण करता आलं नाही. मला आश्चर्य वाटतं जर आपल्याला खोटंच बोलायचं आहे तर तो वचननामा आईच्या चरणी कशाला ठेवायचा? फडणवीसांची शेरोशायरी मला असं कळलं की हे जेव्हा वचननामा करायला बसले, तेव्हा ते आपापसात काही तरी बोलत होते. मग मी त्याची माहिती काढली तर ते त्या ठिकाणी काय बोलत असतील? ‘झुटोने -झुटोसे कहा सच बोलो, अरे भाई दो भाईओ का ऐलान हुआ सच बोलो. घर के अंदर झुटो की एक मंडी है, दरवाजे पर लिखा है सच बोलो’ अशी शेरोशायरी करत फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजीही केली. ..याचंही उत्तर आम्हीच द्यायचं का? दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर देखील निशाणा साधला. आता बघा ते दोन युवराज त्या ठिकाणी कुठला तरी शो करत होते. राहुल गांधींसारखी स्क्रिन लावली होती, राहुल गांधींसारख्या येरझऱ्या मारत होते, काही तरी बोलत होते, आणि मला कोणीतरी सांगितलं की त्यांनी असं म्हटलं, मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचे शौचालय देखील नाहीत. आता हे आम्हाला का विचारता, घरी जाऊन काकांना किंवा बाबांना विचारा. 25 वर्षांमध्ये मुंबईत शौचालय देखील का तयार झाले नाहीत? याचं उत्तर आम्ही द्यायचं, की बाबा आणि काकांनी द्यायचं?
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज रविवारी ठाकरे बंधूंनी शब्द ठाकरेंचा हा वचननामा प्रसिद्ध केला. यामध्ये मुंबईकरांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणा-या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आला. पाळणाघरे, पाळीव प्राणी, पाणी आणि सांडपाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासह अनेक गोष्टी आहे, हा वचननामा या महानगरपालिका निवडणुकीत गेमचेंजर ठरणार का, अशी चर्चा सुरू आहे. […] The post शब्द ठाकरेंचा वचननामा जारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : विनायक कुलकर्णी राज्यात हिंदी भाषा सक्ती केली जाणार नाही, याचा पुनरुच्चार करून यापुढील काळात मराठीचा सन्मान वाढविण्यासाठी व्यापक स्तरावर प्रयत्न करण्यात येणार आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गेल्या चार दिवसांपासून येथे सुरु असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. […] The post मराठीचा सन्मान वाढविणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सिंधुदुर्ग : राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या राजकीय संन्यासाचे संकेत दिले आहेत. आता घरी बसायचे ठरवले आहे, दोन्ही मुलांना सांगेन… नांदा सोख्यभरे, असे नारायण राणे म्हणाले. माझ्यानंतर विकासात्मक राजकारण निलेश आणि नितेश करतील, त्यांनी हाक दिल्यावर ओ द्या असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. […] The post आता ठरवलेय, घरी बसायचे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्याचा कारभारी बदलण्याची वेळ आली आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी व्यक्त केले. कार्यकर्त्यांना निवडणुकीवेळी खड्यासारखे बाजूला करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असेही ते म्हणाले. बानेर परिसरातील प्रभाग क्रमांक नऊमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाबुराव चांदेरे, अमोल बालवडकर, पार्वती निम्हण आणि गायत्री मेढे कोकाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित विजयी संकल्प सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले की, पुणे शहरात मागील पाच वर्षांत ७३ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे, मात्र त्या प्रमाणात पुण्याचा विकास झालेला नाही. हा निधी कुठे गेला, हे तपासण्याची वेळ आली आहे. मागील काही वर्षांपासून पुण्यात नेतृत्व करणाऱ्या भाजपच्या त्रिमूर्तीने अनागोंदी कारभार चालवला असल्याचा आरोप त्यांनी केला. पुणे शहर जगात चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित आणि वाहतुकीची कोंडी असलेले शहर बनले आहे, ही शरमेची बाब आहे. पुण्यात १२ हजार ३५० लोक रोज स्वच्छतेचे काम करण्यासाठी आहेत, तरीही शहर स्वच्छ का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इंदूर शहर देशात स्वच्छतेत पहिले येऊ शकते, तर पुणे का नाही, असेही त्यांनी विचारले. पुण्याचा कारभारी बदलल्यास शहराचा चेहरामोहरा बदलण्याची ग्वाही पवार यांनी दिली. प्रशासनावर आपली पकड असून, नियोजनबद्ध विकासकामे कशी करायची याचा प्रदीर्घ अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी बोलताना उमेदवार अमोल बालवडकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. मागील ११ वर्षे भाजपच्या माध्यमातून समाजसेवेसाठी दिली. काही राजकीय महत्त्वाकांक्षाही होत्या, मात्र भाजपच्या दोन नेत्यांनी माझा राजकीय घात केला. कोथरूड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढू नये यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्या आई-वडिलांसमोर समजूत काढली होती, असे बालवडकर म्हणाले. बालवडकर यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटील यांचा मान ठेवून मी थांबलो होतो. मात्र, आता पुढील चार वर्षांत माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या मंत्र्याच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. ही लढाई कार्यकर्ता विरुद्ध अहंकारी नेता अशी आहे. चंद्रकांत पाटील यांनी केवळ चॉकलेट वाटण्याची कामे केली, कोणतीही विकासकामे केली नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
टँकर-दुचाकीच्या भीषण अपघातात तीन ठार
टेंभुर्णी : प्रतिनिधी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर वेणेगाव (टें) शिवारात केमिकल टँकर व दुुचाकीच्या भीषण अपघातात एक पुरुष व दोन महिलांचा दुुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. ४ जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेणेगावच्या शिवारात पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणारा […] The post टँकर-दुचाकीच्या भीषण अपघातात तीन ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील हळद व्यापाऱ्याची १४.७४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या गुजरात राज्यातील तीन हळद व्यापाऱ्यांवर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात रविवारी ता. ४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील किशोर पारडे हे हळद खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. गुजरात राज्यातील तीन व्यापारी हळद खरेदीसाठी ता. १८ जुलै २०२५ रोजी शिरडशहापूर येथे आले होते. त्यांनी किशोर यांच्या दुकानावर जाऊन त्यांच्याकडून ३७,४२ लाख रुपये किंमतीची २७ टन पॉलीश हळद खरेदी केली होती. सदर हळदीच्या खरेदी पोटी तिघांनी २२.६८ लाख रुपये दिले होते. उर्वरीत १४.७४ लाख रुपये नंतर देतो असे सांगून त्यांनी वाहनात हळदीचे पोते भरून नेले. दरम्यान, काही दिवसानंतर किशोर यांनी त्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी ता. १५ नोव्हेंबर २०२५ रोजी आणखी १८ टन हळद पाठवून देण्याबाबत कळविले. मात्र पूर्वीचे पैसे दिल्यानंतरच १८ टन हळद पाठवून दिली जाईल असे किशोर यांनी स्पष्ट केले. पण, त्यानंतर त्यांनी किशोर यांच्याशी संपर्कच केला नाही. याप्रकरणात किशोर यांनी त्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधून पैसे पाठविण्याबाबत वारंवार विनंती केली असतांनाही त्यांनी पैसे पाठवलेच नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच किशोर यांनी आज औंढा नागनाथ पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. यावरून औंढा नागनाथ पोलिसांनी अंजूम सय्यद (रा. सुरत, गुजरात), मोहम्मद आसीफ अब्दूल वाहिद मलीक, अन्नवर अब्दूल वाहिद मलीक (दोघे. रा. अहमदाबाद , गुजरात) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक वाघमारे, जमादार रवीकांत हरकाळ पुढील तपास करत आहेत.
बांगलादेशचा भारतात न येण्याचा निर्णय
मुंबई : बीसीबीने बांगलादेशला टीमला भारतात वर्ल्ड कप स्पर्धेसाठी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-बांगलादेश यांच्यातील वाद उफाळल्यानंतर बीसीबीने हा निर्णय घेतला. बीसीबीने याबाबत आयसीसीला पत्र लिहिले आहे. बीसीबीने या पत्राद्वारे बांगलादेशच्या सामन्यांचे आयोजन हे श्रीलंकेत करण्यात यावे, अशी विनंती केली आहे. आता आयसीसी बीसीबीच्या या विनंतीवर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. […] The post बांगलादेशचा भारतात न येण्याचा निर्णय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
द्वारकाशारदापीठाधीश्वर श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य सदानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या भव्य शोभायात्रेने पुण्यात श्रीमद् भागवत कथा ज्ञानसत्राचा प्रारंभ झाला. फुलांच्या पायघड्या, शंखनाद, भगव्या पताका, तुतारी आणि मृदुंगाच्या गजरात ही शोभायात्रा काढण्यात आली. श्री घैसास गुरुजी वेदपाठशाळेच्या वर्धापनदिनानिमित्त वेदभवन श्रीकृष्ण नगरी येथे १२ जानेवारीपर्यंत या ज्ञानसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीमद् भागवत सेवा समितीचे अध्यक्ष आचार्य गोविंद देवगिरी महाराज, वेदभवनचे प्रधानाचार्य वेदमूर्ती मोरेश्वर घैसास आणि विश्वेश्वर घैसास उपस्थित होते. पौड रस्त्यावरील शृंगेरी शारदा मठापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. श्रीरामाचा जयघोष करत ही शोभायात्रा पुढे सरकली. शोभायात्रा मार्गावर फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या आणि सुवासिनींनी औक्षण केले. शृंगेरी मठात जगद्गुरुंचे स्वागत करण्यात आले. शंकराचार्यांच्या हस्ते शृंगेरी मठातील देवतांचे पूजन करून ते भागवत ग्रंथासह भव्य रथात आरूढ झाले. आचार्य गोविंद देवगिरी महाराजांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेस प्रारंभ झाला. सनई चौघडा वादन, बॅन्ड पथक, आळंदी येथील वारकरी संस्थेच्या विद्यार्थ्यांची दिंडी, वैदिक शास्त्री आणि कोथरूड भागातील सनातन धर्माचे अनुयायी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. ही शोभायात्रा पौड रस्त्यावरून वेदभवन श्रीकृष्णनगरी येथे समाप्त झाली. वेदभवन श्रीकृष्णनगरी येथे स्वामीजींचे स्वागत झाल्यानंतर त्यांनी आशीर्वचन दिले. यावेळी मार्गदर्शन करताना शंकराचार्य सदानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणाले की, वेदांचे रक्षण होणे आवश्यक आहे, कारण सनातन धर्म वेदांमुळेच सुरक्षित आहे. वेद हे सनातन धर्माचा प्राण आहेत आणि भागवत कथा हे वेदरूपी वृक्षाचे परिपक्व फळ आहे. भागवत कथा सर्वांची तृष्णा भागवू शकते आणि त्यातून आनंद प्राप्त होतो.
पुण्यात ‘मकोका’ कारवाईतील फरार गुन्हेगाराने लष्कर भागात आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (सुसाईड नोट) एका माजी नगरसेवकासह काही जणांची नावे आढळली आहेत. माजी नगरसेवकाने फरार आरोपीकडे ५० लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादिक हुसेन कपूर (वय ५६, रा. सय्यदनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक फारुक यासीन इनामदार, अफान फारुक इनामदार, जहूर महंमद सय्यद (तिघे रा. सय्यदनगर, हडपसर) आणि तन्वीर इब्राहिम मणीयार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपूर यांचा मुलगा साजीद (वय २७) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असल्याची माहिती लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक कपूर याचे लष्कर भागातील ईस्ट स्ट्रीट परिसरातील कुमार पॅलेस सोसायटीत कार्यालय आहे. कपूर जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. शनिवारी सायंकाळी त्याने कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सादिक कपूर याने आत्महत्या करण्यापूर्वी ३० ते ३५ पानी चिठ्ठी लिहिली होती, जी पोलिसांनी जप्त केली आहे. सादिक कपूर यांचा मुलगा साजीद याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 'माजी नगरसेवकाने वडिलांकडे ५० लाख रुपये मागितले होते. नगरसेवक, त्याचा मुलगा आणि साथीदारांच्या त्रासामुळे वडिलांनी आत्महत्या केली.' या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यदनगर परिसरात टिपू पठाण याची दहशत आहे आणि त्याच्याविरुद्ध वानवडी, हडपसर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. सादिक कपूर हा पठाणच्या टोळीचा सदस्य होता. त्याच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्यात आल्यानंतर तो फरार झाला होता.
व्यवसायिकाची 51 लाखांची फसवणूक:कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने लुबाडले, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात एका व्यावसायिकाची ५१ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. व्यवसायासाठी बँक कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी खडक पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये आदित्य मोहन रेळेकर (वय ३४, रा. धनकवडे पाटील टाऊनशिप, बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता), करण विजय इजंतकर (वय ३२, रा. मेट्रो ग्रीन सोसायटी, टिळेकरनगर, कात्रज-काेंढवा रस्ता) आणि श्रीनिवास पांडुरंग बकरे (वय ४७, रा. गुलाबनगर, धनकवडी, मूळ रा. देवाळी, ता. माणगाव, जि. रायगड) यांचा समावेश आहे. एका व्यावसायिकाने खडक पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक असून, त्यांचे शुक्रवार पेठेत दुकान आहे. गेल्या वर्षी त्यांची आरोपींशी ओळख झाली होती. त्यावेळी आरोपींनी त्यांना कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ५१ लाखांची आर्थिक फसवणूक, कर्ज मंजुरी आणि कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या नावाखाली आरोपींनी व्यावसायिकाकडून वेळोवेळी ५१ लाख रुपये घेतले. मात्र, त्यांना कर्ज मिळवून दिले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक एन. व्हटकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मंदिरातून चांदीचा मुकुट चोरी मंदिराचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ३० हजारांचा चांदीचा मुकुट चाेरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर गावठाण परिसरात मांढरदेवी काळूबाई मंदिर आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी मंदिरातून देवीचा चांदीचा मुकुट चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक अजित बढे करत आहेत.
पुण्यात 'एफडीए'ची मोठी कारवाई:31 कोटींचा 'निकोटीन'चा साठा जप्त, अवैध हुक्का माफियांचे धाबे दणाणले
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यातील प्रतिबंधित वस्तूंच्या विरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश दिल्यानंतर विभागाने राज्यभर जोरदार मोहीम सुरू केली असून, याच धडक कारवाईअंतर्गत पुणे जिल्ह्यातील मावळमधील टाकवे येथील 'मे. सोएक्स इंडिया प्रा. ली.' या कंपनीवर छापा टाकून तब्बल 31 कोटी 67 लाख 21 हजार 987 रुपयांचा विक्रमी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रतिबंधित वस्तूंच्या उत्पादनावर बडगा उगारत प्रशासनाने कंपनीच्या संचालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, मंत्र्यांच्या कडक भूमिकेमुळे आणि सातत्याने होणाऱ्या आढाव्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाची ही कारवाई अधिक तीव्र झाली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अस्मिता टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई 2 जानेवारी 2026 रोजी करण्यात आली. यापूर्वी 1 डिसेंबर 2025 रोजी या कंपनीच्या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मुंबईतील अन्न विश्लेषकांच्या अहवालानुसार, या नमुन्यांमध्ये 'निकोटिन' पॉझिटिव्ह आढळले. हे उत्पादन मानवी आरोग्यास घातक असून महाराष्ट्र सरकारने 16 जुलै 2025 रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणारे असल्याचे स्पष्ट झाले. एकूण किंमत 31 कोटी 67 लाख 21 987 रुपये (31.67 कोटी) रुपयांचे विविध फ्लेवर्सचे तयार हुक्का प्रॉडक्ट्स, कच्चे पदार्थ आणि फ्लेवर्सचा साठा जप्त करून कंपनीच्या दारांना सील ठोकले आहे. या प्रकरणी अनिल कुमार चौहान (असिस्टंट मॅनेजर), असिफ फाजलानी (संचालक), फैजल फाजलानी (संचालक), मे. सोएक्स इंडिया प्रा. ली. (कंपनी) या व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 3(5), 123, 223, 274, 275 आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 च्या विविध कलमांनुसार (कलम 30, 26, 27, 59) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईमुळे अवैध हुक्का माफियांचे धाबे दणाणले प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि हुक्का माफियांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर मोठी मोहीम उघडली असून, भिवंडीतील एका मोठ्या कारवाईचा धागा पकडून पुण्यापर्यंतची साखळी उद्ध्वस्त केली आहे. भिवंडीतील दापोडे येथील 'मे. हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपी' या गोदामावर 30 डिसेंबर 2025 रोजी छापा टाकून तब्बल 19 कोटी 45 लाख 76 हजार 320 रुपये किमतीचा 'अफजल' ब्रँडचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त करण्यात आला. या उत्पादनाच्या नमुन्यांमध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असणारे निकोटिन आढळल्याचे अन्न विश्लेषकांनी घोषित केले होते. या प्रकरणाचा सखोल तपास पोलिस निरीक्षक अभिजित सुभाष देशमुख करत असून, या कारवाईमुळे अवैध हुक्का माफियांचे धाबे दणाणले आहेत. महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरही मोठी कारवाई दुसरीकडे, जळगाव जामोद येथील महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरही वनविभागाने सतर्कता दाखवत मोठी कारवाई केली आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तपासणी नाक्यावर मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अवैधरित्या आणला जाणारा 75 लाख रुपये किमतीचा 'विमल' गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आला. राज्यात मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या सुगंधी तंबाखू आणि हुक्क्यावर बंदी असतानाही छुप्या मार्गाने होणारी ही तस्करी रोखण्यासाठी प्रशासन आता अधिक आक्रमक झाले आहे. भिवंडी, पुणे आणि जळगाव अशा विविध ठिकाणी झालेल्या या कारवायांमुळे गुटखा आणि हुक्का तस्करांचे मोठे जाळे उघडकीस आले आहे.
दारी सीमा भाग जमला, भिक वाढा हो मराठी, दडपशाही सहन करूनी, बोलतो मराठी, असे लिहिलेली पत्रके वाटत आणि बेळगाव निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा लिहिलेली महाराष्ट्र एकीकरण समितीची नाव असलेली टोप्या घातलेल्या सीमा भागातील मराठी जनतेने आज 99 व्या साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी मुख्य मंडपाच्या बाहेरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत असताना दारातच घोषणाबाजी केली आणि पत्रके वाटली. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या घोषणाबाजीमुळे एकच गोंधळ माजला आणि सर्व माध्यम प्रतिनिधी आणि पोलिस यंत्रणा तेथे जमा झाली. एकनाथ शिंदे हे साहित्य संमेलनाच्या मुख्य मंडपाच्या प्रवेशद्वारा जवळ येताच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर निनादून सोडला. आम्हाला महाराष्ट्रात कधी घेताय? आमच्यावर अन्याय होत असतानाही आम्ही तेथे मराठी बोलतोय, किती सहन करायचे? असे सांगत भीक वाढा हो मराठी असेही या आंदोलनकर्त्यांनी म्हटले. उपमुख्यमंत्र्यांचे भाषण झाले आणि ते लगेच निघून गेले. त्यांना महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात घाई होती. मात्र येथे मराठी माणूस अन्याय सहन करूनही सीमा भागातील मराठी भाषीक मराठी बोलत आहे. त्याच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांना वेळ नव्हता अशीही प्रतिक्रिया महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. साहित्य महामंडळाच्या कार्याध्यक्षांवर बुक्का फेकणाऱ्याला सहा तारखेपर्यंत पोलिस कस्टडी सातारा येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीचे प्रमुख व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर बुक्का टाकल्या प्रकरणी अटकेत असलेल्या संदीप जाधव यास आज सातारा येथील न्यायालयात उभे केले असता येत्या सहा जानेवारीपर्यंत पोलिस कस्टडी रिमांड देण्यात आला आहे. जेएमएफसी न्यायमूर्ती आव्हाड यांच्यापुढे आज दुपारी संदीप जाधव यास हजर केले असता सरकारी वकीलांनी आरोपीला आठ दिवसाची पोलिस कस्टडी मागितली. साहित्य संमेलनाच्या परिसरातील या घटनेच्या वेळी तेथील सीसीटीव्ही कॅमेरे दोन दिवसापासून बंदच असल्याचे तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले असता न्यायाधीश यांनी त्यांना फटकारले. संदीप जाधव यांच्या वतीने एडवोकेट पायल गाडे या काम करत आहेत त्यांनी पोलिस कस्टडीला विरोध केला आणि त्याच्याकडे कोणतेही हत्यार सापडलेले नाही किंवा अन्य काही केमिकल युक्त बुक काही नाही हा बनाव असल्याचे सांगितले.
बुलढाणा-खामगाव महामार्गालगत वसलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याच्या वनवैभवात आज मोठी भर पडली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या 'PKT7CP-1' नावाच्या तीन वर्षीय नर वाघाला आज, रविवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास अभयारण्यात मुक्त करण्यात आले. या नव्या पाहुण्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ज्ञानगंगा अभयारण्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. या वाघाचा प्रवास रंजक आहे. 2023 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रात हा वाघ अवघ्या चार महिन्यांचा असताना सापडला होता. त्यानंतर त्याचे संगोपन पेंच व्याघ्र प्रकल्पात करण्यात आले. शनिवारी रात्री पेंचमधून विशेष वाहनाद्वारे सलग 15 तासांचा प्रवास करून या वाघाला ज्ञानगंगा अभयारण्यात आणण्यात आले. पहिल्या 4 तासांतच केली शिकार वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाघाला तूर्त अभयारण्यातील बोरखेड-देव्हारी परिसरातील एका विस्तारित जाळीच्या बंदिस्त क्षेत्रात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नवीन वातावरणात आल्यानंतर अवघ्या चार तासांतच या वाघाने त्याच्यासाठी सोडलेल्या एका रेड्याची शिकार केली. यावरून हा वाघ येथील वातावरणाशी लवकरच जुळवून घेईल, असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे. 205 चौ.कि.मी. क्षेत्रात पसरलेले हे अभयारण्य साग आणि अंजन वृक्षांच्या हिरवाईने नटलेले आहे. येथे आधीच बिबट, अस्वल, तडस, नीलगाय आणि 150 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती वास्तव्यास आहेत.
भाजपच्या प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथील निवडणूक कचेरीचे उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. पक्षासाठी निस्वार्थपणे आयुष्य वेचलेल्या कार्यकर्त्यांच्या त्यागाला, निष्ठेला आणि सेवेला वंदन करत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले की, निवडणूक ही केवळ राजकीय लढाई नसून, संघटनेचा आत्मा असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान जपण्याची जबाबदारी उमेदवारांवर असते. पक्षाच्या यशामागे लाखो ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे अनेक वर्षांचे कष्ट, त्याग आणि परिश्रम आहेत. याच भावनेतून प्रभाग २५ मधील ज्येष्ठ नगरसेविका मीरा पावगी, ज्योत्स्ना सरदेशपांडे, रमेश परचुरे आणि किरण सरदेशपांडे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते निवडणूक कचेरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी शुभेच्छा दिल्या. भाजपचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, गायत्री खडके, उदय लेले तसेच अमित कंक, मनोज खत्री, निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, प्रणव गंजीवाले, मोहना गद्रे, रुपाली कदम, सुनील रसाळ आणि श्रेयस लेले यांची उपस्थिती होती. या निवडणुकीत उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांमधून महागड्या गाड्यांची चर्चा सुरू असताना, प्रभाग २५ मधील उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या नावावर असलेले एकमेव चारचाकी वाहन लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या नावावर केवळ एक रुग्णवाहिका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत सध्या चर्चा रंगली आहे.
जपान आणि दक्षिण कोरियामध्ये तात्काळ आणीबाणीचा इशारा
टोकियो/सोल : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच जगभरात चिंतेचे वातावरण आहे. एकीकडे अमेरिकेने व्हेनेझुएलावर आक्रमण करत त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना ताब्यात घेतलेले असताना दुसरीकडे उत्तर कोरियाने खळबळ उडवून दिली आहे. रविवारी पहाटे उत्तर कोरियाने आपल्या पूर्व किनारपट्टीवरून जपानच्या समुद्रात संशयास्पद बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. या अनपेक्षित चाचणीमुळे जपान आणि दक्षिण कोरियामध्ये तात्काळ आणीबाणीचा इशारा देण्यात आला असून दोन्ही देशांचे […] The post जपान आणि दक्षिण कोरियामध्ये तात्काळ आणीबाणीचा इशारा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रचाराचा शुभारंभ केला आहे. परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आंबेडकरांची आज सभा पार पडली. या सभेत बोलताना कॉंग्रेसवर सडकून टीका केली आहे. इतके दिवस तुम्ही शरद पवारांच्या नादी लागलात, म्हणजे दाऊद इब्राहीमच्या नादी लागलात. म्हणून तुमची अशी अवस्था झाली, असे म्हणत आंबेडकरांनी टीका केली आहे. सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, कॉंग्रेसकडे आता मतदार उरला नाही. केवळ मुस्लिम मतदार त्यांच्याकडे राहिला आहे. तुम्ही इतके दिवस शरद पवारांच्या नादी लागलात म्हणजे दाऊद इब्राहीमच्या नादी लागलात. म्हणून तुमची अशी अवस्था झाली आहे. बाबाजाणी यांनी खतीब यांचा उपयोग करून घेतला आणि आता ते कॉंग्रेसचीच वाट लावायला निघालेत, अशी टीका त्यांनी कॉंग्रेसचे बाबाजाणी दुर्राणी यांच्यावर केली आहे. शरद पवार म्हणजे दाऊद इब्राहीमच पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, इथल्या मुस्लिमांना आवाहन आहे, काँग्रेसकडे आता काही राहिले नाही, फक्त मुस्लिम मतदार उरला आहे. काँग्रेस शरद पवारांच्या नादी लागल्याने असे झाले आहे. शरद पवार म्हणजे दाऊद इब्राहीमच आहेत. आता काँग्रेसकडे मतदार नाही, तेव्हा उद्याच्या व्यवस्थेमध्ये संविधान टिकले पाहिजे असे वाटत असेल तर मुस्लिमांनी वंचितच्या उमेदवाराला मतदान केले पाहिजे. हुकुमशाहीला सुरुवात झाली परभणी येथील सभा पार पडल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांना बिनविरोध नगरसेवक निवडून येत असल्याच्या प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. यावर आंबेडकर म्हणाले, हुकुमशाहीला सुरुवात झाली आहे. आमदारांनी उमेदवारांना दमदाटी करून पळवले आहे. काही ठिकाणी विकत घेतले आहेत. अर्ज माघारी घेण्याची सिस्टिम आता बंद केली पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहोत. तरच लोकशाही टिकेल असे आम्ही मानतो. भाजपला येथील राजकीय पक्ष संपवायचे आहेत महायुतीतील पक्ष काही ठिकाणी वेगळे लढत आहेत, यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, भाजपला येथील राजकीय पक्ष संपवायचे आहेत. इलेक्शन निमित्ताने आपल्याला यांना संपवता येईल असे त्यांना वाटत आहे. म्हणून त्यांनी युती केली नाही. सत्ता आली नाही की पक्ष संपतात अशी परिस्थिती आहे. सगळीकडे अजित पवार युतीतून वेगळे लढत आहेत. मुस्लिमांचे विभाजन करण्याचे ते बघत असल्याचे मत आंबेडकरांनी दिले आहे.
मोबाईलला रेंज शोधताना १७ व्या मजल्यावरून खाली पडून एकाचा मृत्यू
नोएडा : उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक अजय गर्ग यांचा सेक्टर-१०४ मधील एका हायराईज सोसायटीच्या १७ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजय गर्ग हे सेक्टर-१०४ मधील ‘एटीएस वन हॅम्लेट’ सोसायटीत आपल्या पत्नीसोबत राहत होते. शनिवारी सकाळी […] The post मोबाईलला रेंज शोधताना १७ व्या मजल्यावरून खाली पडून एकाचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर परिणाम?
नवी दिल्ली : अमेरिकेने व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई करत तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलस मदुरो यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईने जागतिक भू-राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे, जागतिक खनिज तेल बाजारावर याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे भांडार असलेल्या या देशातील अनिश्चित राजकीय परिस्थितीमुळे भारतासह जगाचे टेन्शन वाढले आहे. भारत आणि व्हेनेझुएलामध्ये तेल व्यापाराव्यतिरिक्त औषधनिर्माण, […] The post व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्याचा भारतावर परिणाम? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशातील ५२ टक्के गर्भवतींना ‘अॅनिमिया’!
मुंबई : ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-५’च्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील ५२.२% गर्भवती महिला अॅनिमिया (रक्तक्षय) ग्रस्त असल्याचे उघड झाले आहे. ही परिस्थिती केवळ मातांच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर होणा-या बाळाच्या भविष्यासाठीही चिंताजनक ठरत आहे. एनएफएचएस-४ (२०१५-१६) च्या तुलनेत एनएफएचएस-५ (२०१९-२१) मध्ये अॅनिमियाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे होणारा हा आजार माता मृत्यूदरासाठी एक मुख्य कारणीभूत […] The post देशातील ५२ टक्के गर्भवतींना ‘अॅनिमिया’! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई महापालिकेवर सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष आहे. यावरून भाजप शिवसेना ठाकरे गटावर सातत्याने टीका देखील करत आहे. मतांसाठी विचारधारा सोडली, मुंबईमध्ये ठाकरेंकडून खान नावाचा महापौर होईल, अशीही टीका करण्यात आली. मात्र, मालेगावमध्ये भाजपने चार मुस्लिम समाजाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. यावरून आता विरोधकांनी डिवचण्यास सुरू केले आहे. मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने चार मुस्लिम समाजाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून यावरून भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज मालेगावच्या दौऱ्यावर असताना त्यांनी यावर सफाईदारपणे उत्तर दिले आहे. मुस्लिम समाजाच्या उमेदवारावर प्रश्न विचारला असता रवींद्र चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सर्वच समाजात सकारात्मक मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील विकासामुळे सर्वजण सोबत येत आहेत. तसेच भाजप सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. त्यामुळे मालेगाव महापालिकेत देखील विविध जाती धर्मातून उमेदवारी मागण्यांसाठी अर्ज आले होते. त्यानुसार, ज्या त्या ठिकाणी प्रत्येक समाजाला संधी देता येईल, तशी संधी देण्याचे काम भाजपने केले असल्याचे स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले आहे. दरम्यान, मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन यांनी ढोल, ताशा तसेच संबळ व हलगी या पारंपरिक वाद्याच्या तालावर बैलगाडीवरून रोड शो करत मतदान करण्याचे जनतेला आवाहन केले. सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे- मंत्री गिरीश महाजन मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. पक्षांतर्गत असलेल्या मतभेदांवर बोट ठेवत, पूर्वी सर्वांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला होती, मात्र आता सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजपाने मालेगावात 22 जागांवर आपले उमेदवार उभे केले असून, या सर्व जागा निवडून आणून मालेगाव महापालिकेवर भाजपचाच महापौर बसवण्याचे उद्दिष्ट महाजन यांनी कार्यकर्त्यांसमोर ठेवले. मालेगावनंतर धुळ्यातही प्रचाराचा बिगुल मालेगावनंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी धुळे जिल्ह्याचा दौरा करत निवडणूक प्रचाराचा बिगुल फुंकला. धुळ्याची ग्रामदेवता श्री एकवीरा देवीची महाआरती केल्यानंतर, 101 नारळ वाढवून भाजपाच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्याला मंत्री गिरीश महाजन, मंत्री जयकुमार रावल आणि इतर वरिष्ठ भाजप पदाधिकारी व उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद दाखवून देण्यासाठी नेत्यांनी आता जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ने लुटली रसिकांची मने
सातारा : प्रतिनिधी हा हा, ही ही.. चा कल्लोळ, टाळ्यांचा कडकडाट, तुडुंब भरलेल्या स्टेडियमच्या कोप-या कोप-यातून हास्याची कारंजी उडत होती. मोबाईलचे टॉर्च लावून रसिकांनी पौर्णिमेच्या रात्री ता-यांची चमक दाखविली. निमित्त होते ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाचे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अरुण कदम, प्रभाकर मोरे, समीर चौघुले, […] The post ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ने लुटली रसिकांची मने appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्वत:ला सतत पडताळून पाहणे सजगपणाचे
सातारा : प्रतिनिधी कोणत्याही प्रकारचा तोचतोचपणा आणि एकरेषीय विचार मला आवडत नाहीत. विविध माध्यमांतून, आयामांतून स्वत:ला सतत पडताळून आणि तपासून पाहणे, हे माणूस आणि कलावंत म्हणूनही सजगपणाचे वाटते असे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक अमोल पालेकर यांनी सांगितले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अमोल पालेकर लिखित ‘ऐवज- एक स्मृतिगंध’ या पुस्तकावर चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात […] The post स्वत:ला सतत पडताळून पाहणे सजगपणाचे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संमेलन मराठी भाषेच्या अस्तित्वाचा संघर्ष करणारे ठरेल
सातारा : विनायक कुलकर्णी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे केवळ शब्दांचा उत्सव नसून, तो मराठी अस्मिता, भाषा आणि संस्कृतीच्या मंथनाचा सोहळा असतो. सातारा येथे आयोजित ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषा संवर्धनाच्या मुद्यावर चर्चा होत असल्यामुळे हे संमेलन मराठी भाषेच्या अस्तित्वाचा संघर्ष करणारे ठरेल असा विश्वास संमेलनांच्या माजी अध्यक्ष डॉ. […] The post संमेलन मराठी भाषेच्या अस्तित्वाचा संघर्ष करणारे ठरेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सातारा जिल्ह्यातील लोणंद परिसरात पोलिसात तक्रार देण्याच्या धमकीमुळे एका ३० वर्षीय तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केली. या प्रकरणी दोन महिलांसह सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा येवलेवाडी पोलिसांनी दाखल केला आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव रामदास भरत पवार (वय ३०) असे आहे. शीतल काळे, अरविंद काळे, सतीश सरोदे, नितीन सरोदे, श्रृती कन्हेरे, ऋषी कन्हेरे आणि मोहन सोनार (सर्व रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पवार यांची बहीण रुपाली संतोष पुजारी (वय ३३, रा. बाळासाहेबनगर, लोणंद, जि. सातारा) यांनी येवलेवाडी पोलित ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास पवार हे कोंढव्यातील येवलेवाडी भागात असलेल्या शीतल ग्लॅमअप युनिसेक्स सलूनमध्ये कारागीर म्हणून काम करत होते. सलूनची मालकीण शीतल काळे हिच्याशी त्यांचा वाद झाला होता. आरोपींनी पवार यांना पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी दिली होती आणि तक्रार न करण्यासाठी त्यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती. आरोपींकडून होणाऱ्या त्रासामुळे पवार यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बहिणीला आरोपी त्रास देत असल्याची माहिती दिली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एका वहीत आणि समाजमाध्यमात आरोपींच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवले होते. ३० डिसेंबर रोजी त्यांनी सातारा जिल्ह्यातील लोणंद रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेगाडीखाली उडी मारून आत्महत्या केली. पवार यांच्या बहिणीने याबाबत नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलित निरीक्षक एस. थोरात या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसायाविरुद्ध पोलिस विभागाने मोहिम उघडली असून या मोहिमेत वसमत येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला असून चौघांवर वसमत पोलिस ठाण्यात रविवारी ता. ४ गुन्हा दाखल झाला आहे. तसेच हिंगोली शहरातील एका ठिकाणावर छापा टाकून गुटखा जप्त करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध धडक कारवाई करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्यांचे पथक स्थापन करण्यात आले आहेत. या शिवाय पोलिस अधिक्षक निलभ रोहन यांनी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. या पथकाकडून अवैध व्यवसायाची माहिती घेऊन छापासत्र सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, वसमत येथे रेल्वेस्थानक भागात झन्नामन्ना नावाचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार भुजंग कोकरे, गजानन पोकळे आकाश टापरे, ज्ञानेश्वर गोरे, साईनाथ कंटे, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, संभाजी लकुळे, जमादार वाबळे, रामदिनवार यांच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये चौघेजण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व मोबाईल जप्त केला आहे. याप्रकरणी शेख युनूस शेख मोहम्मद, विठ्ठल साठे, अजय सिंग चावरिया, मन्नू सिंग यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हिंगोली शहरातील रामलिला मैदानाच्या परिसरात एका ठिकाणी अवैधरित्या गुटखा साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक दिलीप मोरे, जमादार नितीन गोरे, धनंजय क्षीरसागर, इंगोले, अशोक धामणे गणेश लेकुळे मुजीब पठाण यांच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी इस्माईल पठाण याच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे ही वाचा... हट्टा येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर दुचाकीवर आलेल्या तिघांचा चाकू हल्ला:गंभीर जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी परभणीला हलवले वसमत तालुक्यातील हट्टा येथील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यावर दुचाकी वर आलेल्या तिघांनी चाकू हल्ला केल्याची घटना शनिवारी तारीख 3 घडली आहे. जखमी विद्यार्थ्याला तातडीने उपचारसाठी परभणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सविस्तर वाचा...
पुणे महापालिका निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार फारुख इनामदार अडचणीत आले आहेत. प्रभाग ४१ मधील रहिवासी सादिक कपूर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फारुक इनामदार यांच्यासह चार जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. खंडणी आणि जागेच्या व्यवहारातील वादातून सादिक कपूर यांनी आपले जीवन संपवल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सादिक कपूर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सविस्तर सुसाईड नोट लिहिली होती, ज्यामध्ये फारुख इनामदार यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. विशेष म्हणजे, मृत सादिक यांच्या हातावरही फारुख इनामदार यांचे नाव लिहिलेले आढळले आहे. सादिक यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून लष्कर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपल्या उमेदवारावर गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. ५० लाखांची खंडणी आणि धमकी पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फारुख इनामदार यांनी सादिक कपूर यांच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. जागेच्या व्यवहारातून हा वाद सुरू होता आणि इनामदार यांनी सादिक यांना धमकावण्याचा प्रयत्न देखील केला होता, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी आता संबंधितांना चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. सुसाईड नोटमध्ये ३८ लोकांची नावे सादिक कपूर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट अत्यंत महत्त्वाची ठरली असून त्यात तब्बल ३८ लोकांच्या नावांचा समावेश आहे. पोलिस या सर्व ३८ लोकांच्या भूमिकेची चौकशी करणार असून, ज्यांचा रोल निष्पन्न होईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे उपायुक्त शिवणकर यांनी स्पष्ट केले आहे. सध्यातरी ४ मुख्य आरोपींविरोधात बीएनएस १०८, ३/५ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. मृत सादिक कपूर 'मोक्का'मधील आरोपी या प्रकरणाला दुसरी बाजू देखील आहे. मृत सादिक कपूर हे स्वतः 'मोक्का' अंतर्गत असलेल्या दोन गुन्ह्यांत आरोपी होते आणि पोलिस रेकॉर्डवर फरार होते. १८ तारखेला त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. कोण आहेत फारुख शेख? आत्महत्या केलेल्या सादिक कपूर यानी आत्महत्या करताना फारुख शेख यांचे नाव हातावर लिहिले आहे. फारुख शेख हे प्रभाग ३५ मधून अजित पवार गटाचे उमेदवार आहे. माजी नगरसेवक आणि उद्योगपती फारुख शेख हे बिल्डर कॉन्ट्रक्ट घेतात. फारुख शेख गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, शेतकरी देखील आहे. विविध देशातील आंब्यांवर प्रयोग करुन ते भारतात पिकवतात, असा दावा करतात. जपानचा आंबा पिकवतो म्हणून ते प्रसिद्धीच्या झोतात आले. कोंढवा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल आहे. सोबतच विविध लहान मोठे गुन्हे दाखल आहेत. मोक्का अंतर्गत कारवाईदेखील त्याच्यांवर झाली आहे.
जय भानुशाली-माही विज यांचा घटस्फोट
मुंबई : प्रतिनिधी जय भानुशाली आणि माही विज यांनी घटस्फोट घेतल्याचे जाहीर केले आहे. जॉईंट स्टेटमेंट जाहीर करत त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय जोडी जय भानुशाली आणि माही विज यांनी अधिकृतरीत्या घटस्फोट घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या विभक्त […] The post जय भानुशाली-माही विज यांचा घटस्फोट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा प्रकाशित
मुंबई : महापालिकेसह २९ महापालिकांची निवडणूक १५ जानेवारीला पार पडणार आहे. तर १६ जानेवारीला निकाल लागणार आहेत. दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या संयुक्त वचननाम्याचे मुंबईत प्रकाशन करण्यात आले. यानंतर राज ठाकरेंनी निवेदन दिले. ‘‘इथे आलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. मला २० […] The post ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा प्रकाशित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवोदय विद्यालयातील सहावीच्या विद्यार्थिनीने संपवले जीवन; घातपाताचा संशय
लातूर : प्रतिनिधी लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणा-या सहावीतील एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत विद्यार्थिनीचा मृतदेह मुलींच्या वसतिगृहातील खोलीत पलंगाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही विद्यार्थिनी अत्यंत हुशार आणि चुणचुणीत असल्याचे सांगितले जात असून, तिने टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनेमुळे कुटुंबीयांसह शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत […] The post नवोदय विद्यालयातील सहावीच्या विद्यार्थिनीने संपवले जीवन; घातपाताचा संशय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बिनविरोध उमेदवारांचे टेन्शन वाढले; आयोगाने निकाल रोखला?
मुंबई : चौकशी अहवाल येईपर्यंत बिनविरोध उमेदवारांना विजयी जाहीर करू नका, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता बिनविरोध उमेदवारांवर टांगती तलवार आहे.. राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक रंगली आहे. प्रचाराचा धुरळा उडाला आहे. अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात ६९ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामध्ये सत्ताधारी भाजपचे ४४, […] The post बिनविरोध उमेदवारांचे टेन्शन वाढले; आयोगाने निकाल रोखला? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगरमध्ये अपहरणाचा थरार!
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मित्रांमध्ये स्पोर्टस् बाईकच्या खरेदी-विक्रीवरून क्षुल्लक वाद झाला. या वादानंतर तिघांनी एका मुलाचे अपहरण केले. चालत्या दुचाकीवरून ओढून खाली पाडत कारमध्ये टाकून पसार झाले. भररस्त्यावर घडलेल्या घटनेनंतर सिडको पोलिसांनी सात तासांत तरुणाची सुटका केली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बजरंग चौक ते वाळूज- रांजणगावदरम्यान हा थरार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय […] The post छत्रपती संभाजीनगरमध्ये अपहरणाचा थरार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भंडा-यात भीषण अपघात;दोघांचे प्राण वाचवले
भंडारा : प्रतिनिधी शनिवारी (३ डिसेंबर) रात्री चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थान परिसरात एक थरारक घटना घडली. भाविकाची कार अनियंत्रित होऊन थेट तलावात कोसळली. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी आणि एका स्थानिक तरुणाने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन दोघांचे प्राण वाचवले. गोंदिया जिल्ह्यातील भजेपार येथील रहिवासी श्रीकृष्ण नथू रहांगडाले हे आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी […] The post भंडा-यात भीषण अपघात;दोघांचे प्राण वाचवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भिवंडी महापालिका निवडणूक प्रचारात हिंसाचार
मुंबई : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फुटला असून राजकीय पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरू झाला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, सर्वच राजकीय पक्ष भाजपविरोधात आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गट- मनसे, अजित पवार यांची राष्ट्रवादीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे, यंदाच्या निवडणूक प्रचारसभेत प्रतिस्पर्धी काँग्रेसदेखील चांगलीच […] The post भिवंडी महापालिका निवडणूक प्रचारात हिंसाचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असून सर्वच राजकीय पक्षांनी आता उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यात आता ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आज मुंबईसाठी वचननामा देखील प्रकाशित केला. तर दुसरीकडे बिनविरोध निवडणूक झालेल्या ठिकाणी महायुतीने दमदाटी तसेच आर्थिक आमिष दाखवत विरोधी उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावल्याचे आरोप केले जात आहेत. मनसे नेते अविनाश जाधव यांनी याबाबत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. अविनाश जाधव यांनी ठाणे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दम देण्यात आल्याचा आफरोप केला आहे. अविनाश जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी मनसेच्या उमेदवाराला एक पोलिस अधिकारी घेऊन जात असल्याचा व्हिडिओ दाखवला आहे. तसेच शिंदे यांच्या घरी गेल्यानंतर हा उमेदवार अर्ज मागे घेतो, असेही जाधव यांनी म्हटले आहे. विक्रांत घाग असे या उमेदवाराचे नाव असून आता या उमेदवाराचा मोबाइल देखील बंद असल्याची माहिती जाधव यांनी दिली. उमेदवाराचा फोन स्विच ऑफ अविनाश जाधव म्हणाले, उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याचा दिवसाचा तो व्हिडिओ आहे. आम्हाला हा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या माध्यमातून आलेले आहे, आम्ही तिथे थोडी कॅमेरे लावले होते. अद्याप तो उमेदवार आम्हाला भेटलाच नाहीये, तो फोन स्विच ऑफ करून गायब आहे. जर त्याला एक पोलिसवाला घेऊन जात असेल तर त्याला धमकवलाच असेल ना? त्याला आतमध्ये घेऊन जाणारा माणूस हा पोलिस ऑफिसर आहे. तो कुठल्या जदतगे स्टेशनला आहे कुठल्या क्राईम ब्रँचला आहे तो तुम्ही शोधा. ज्यांनी ज्यांनी शिवसेना मनसे पक्षाची गद्दारी केली आहे त्यांचा पाहुणचार होणार असल्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे. बिनविरोध निवडून यायचा नवीन फंडा सुरू- राजन विचारे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांनी देखील या प्रकरणावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये 68 बिनविरोध निवडून आलेले आहेत. यात भाजपच्या 44, शिंदे गटाच्या 22 नगरसेवकांचा समावेश आहे. बिनविरोध निवडून यायचा हा नवीन फंडा सुरू झालेला आहे. मशीनमध्ये गडबड, वोट चोरीनंतर आता इलेक्शनच्या अगोदरच त्या ठिकाणी पैसे देऊन, धमक्या देऊन, पोलिसांना वापरुन निवडणूक जिंकली जात आहे. पुढे बोलताना राजन विचारे म्हणाले, विरोधकांचे 336 फॉर्म बाद केले आहेत. एकूण 68 बिनविरोध आलेत, त्यातला एकही विरोधी पक्षाचा नाही, उद्धव ठाकरे गटाचा नाही, मनसे पक्षाचा नाही कशा पद्धतीने षडयंत्र केलेला आहे. नोटाचा पर्याय शिल्लक असतानाही बिनविरोध डिक्लेअर केले. इथे पैशाचा वापर केलाय आता उरलेल्या शीट जे आहेत त्यासाठी देखील पैशाचा वापर केला जाणार असल्याचा दावा विचारे यांनी केला आहे.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही अजिंक्ययोद्धा बाजीराव पेशवे यांच्यासारख्या महापुरुषांचा पराक्रम आपल्याला जाणूनबुजून सांगितला गेला नाही. उलट पराभूत झालेल्यांचा इतिहास शिकवला गेला. बाजीरावांचा पराक्रम मस्तानीशी नाते जोडल्यामुळे कमी लेखण्याचा प्रयत्न झाला. पण खरे पाहता, त्यांनी केलेला पराक्रम अतुलनीय होता. भविष्यात देशाने मोठी झेप घ्यायची असेल, तर इतिहास योग्य रीतीने समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत व्याख्याते जगन्नाथ लडकत यांनी रविवारी व्यक्त केले आहे. सुलभ शिक्षण मंडळ पुणे आणि श्री गोपाळ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने बहुश्रुत व्याख्यानमालेचे आयोजन सदाशिव पेठेतील श्री गोपाळ हायस्कूल येथे करण्यात आले होते. यावेळी जगन्नाथ लडकत यांचे अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई या विषयावर व्याख्यान झाले. संस्थेच्या कार्याध्यक्षा डॉ. उमा बोडस यावेळी उपस्थित होत्या. जगन्नाथ लडकत म्हणाले, इंग्रज इतिहासकारांचेही याबाबत आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी बाजीरावांच्या पराक्रमाचे योग्य मूल्यमापन केले आहे. जर मराठी माणसानेच हा इतिहास सविस्तर लिहून ठेवला असता, तर आज मोठा संघर्ष उभा राहिला असता. बाजीराव पेशवे यांचे कर्तृत्व महान होते मात्र त्याची जाणीव आजच्या काळातील ठेवली पाहिजे.इंग्रजांनी बाजीरावांचे वर्णन करताना त्यांना “घोडदळाचा ईश्वर, ईश्वरी देणगी लाभलेला सेनानी, देवयोद्धा” असे गौरवोद्गार काढले आहेत.
पुण्यात कर्तृत्ववान महिलांचा गौरव:'जिजाऊची लेक' आणि 'सावित्रीची लेक' पुरस्कारांचे वितरण
ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी जिजामाता आणि सावित्रीबाई फुले यांना सर्व स्तरातील महिलांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान म्हटले आहे. राष्ट्रपतीपदापासून ते जागतिक महिला क्रिकेटमध्ये ठसा उमटवणाऱ्या महिलांसाठी त्यांचे कार्य मार्गदर्शक असल्याचे सबनीस म्हणाले. मनोहर कोलते मैत्र संघ, पुणेतर्फे राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'जिजाऊची लेक' आणि 'सावित्रीची लेक' पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर महावितरण मुंबईचे संचालक राजेंद्र पवार, मैत्र संघ, पुणेचे प्रमुख मनोहर कोलते, सहयोगी आकाराम आलदर, सहयोगी पराग शिळीमकर तसेच अमर राजपूत आणि शैलेंद्र भालेराव उपस्थित होते. 'जिजाऊची लेक' पुरस्काराने योद्धा पत्नी व माता तारामती इंदलकर (पुणे) यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कार्याची यावेळी प्रशंसा करण्यात आली. 'सावित्रीची लेक' पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आणि ओ.बी.सी. महिला साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष प्रा. विजया मारोतकर (नागपूर), प्रसिद्ध लेखिका ललिता सबनीस (पुणे), समाजसेवी वैद्यकीय सेविका डॉ. माया तिरमारे (लांजा) आणि विदिशा विचार मंचच्या संस्थापक संचालक ममता क्षेमकल्याणी (पुणे) यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात लोहगाव जवळील स्वमालकीची साडेतीन गुंठे जागा स्नेहछाया बालकाश्रम, दिघी यांना दान करणारे मनसुख नवले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव केला. विधवा महिलेला देखील मातृत्वाचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या सावित्रीबाईंचे विचार आणि कृती जगाच्या पलीकडच्या होत्या, असे ते म्हणाले. जिजामाता आणि सावित्रीबाई या दोन्ही स्त्रिया वैचारिकदृष्ट्या पुढारलेल्या होत्या, असेही त्यांनी नमूद केले.
उमराह आटोपून परतताना ४ जणांचा अन्त
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पवित्र उमराह यात्रा पूर्ण करून मोठ्या आनंदाने परतणा-या एका भारतीय कुटुंबावर सौदी अरेबियात काळाने भीषण झडप घातली आहे. मदिना प्रांतातील महामार्गावर झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात केरळच्या मलप्पूरम जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे केरळसह आखाती देशांतील भारतीय समुदायावर शोककळा पसरली आहे. ज्या घरातून तीर्थयात्रेसाठी आनंदाने […] The post उमराह आटोपून परतताना ४ जणांचा अन्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आरोपीची कॅम्पमध्ये आत्महत्या; पुण्यात खळबळ
पुणे : प्रतिनिधी कुख्यात ‘मोक्का’ गुन्ह्यातील फरार आरोपी सादिक हुसेन कपूर (वय ५६, रा. सय्यदनगर, हडपसर) याने कॅम्प परिसरातील आपल्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी सादिक कपूरने ३० ते ३३ पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार फारूख शेख यांच्यासह अन्य […] The post आरोपीची कॅम्पमध्ये आत्महत्या; पुण्यात खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बाळासाहेब सरवदे यांच्या पार्थिवावर काल शोकाकुल वातावरणात आणि कडेकोट पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोलापूरचा दौरा करत सरवदे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी आपल्या आधारवड गमावल्यामुळे सरवदे कुटुंबाने केलेला आक्रोश अत्यंत हृदयद्रावक होता. या भेटीनंतर अमित ठाकरे यांनी स्थानिक प्रशासनाकडून घटनेची माहिती घेत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, तुमचे राजकारण काहीही असो, तुमचे बिनविरोध निवडून येवो. पण राजकारणासाठी कोणाचा जीव जाता कामा नये. मी या संदर्भात मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती अमित ठाकरे यांनी दिली. यावेळी, 'माझे पप्पा मला आणून द्या, माझ्या पप्पाला मी भेटलेच नाही, असा टाहो बाळासाहेब यांच्या चिमुकल्यांनी फोडला. तसेच सरवदे कुटुंबीयांनी देखील अमित ठाकरे यांच्यासमोर आक्रोश व्यक्त केला. मृत बाळासाहेब सरवदे यांच्या पत्नी वंदना सरवदे यांनी यावेळी म्हटले की, येथील उमेदवार रेखा सरवदे यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यातूनच येथे वाद झाला. यापूर्वी आमचे कोणतेही भांडण नव्हते. किरण देशमुख यांच्या सांगण्यावरून हे सगळे घडले आहे. सर्व आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजपचा खरा चेहरा सर्वांच्यासमोर आला- प्रणिती शिंदे कॉंग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येच्या निषेधार्थ आम्ही मूक आंदोलन केले आहे. सरवदे कुटुंबियांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण आहोत. भाजपची सत्तेसाठी जी भूक आहे, जिंकण्यासाठी ते काहीही करू शकतात. भाजपचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. फक्त पैसा आणि सत्ताच नाही तर ते आता रक्तावर येऊन थांबले आहेत. तसेच लोकांच्या सेवेसाठी नाही तर लोकांचे जीव घेऊन त्यांना सत्तेत यायचे आहे. दोन कुटुंबामध्ये भांडण आणि एक निरागस माणसाचा जीव यांनी घेतला. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप कुठल्याही थराला जाऊ शकते हे आज सिद्ध झाले. संविधान वाचवण्यासाठी आमची लढाई राक्षसी भाजप विरोधात सुरूच राहील, असे शिंदे म्हणाल्या.
गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संकटात असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी समोर येत या सर्व अफवांचे खंडन केले असून संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असल्याचे स्पष्ट केले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या सहकारी पतसंस्थांपैकी एक म्हणून नावलौकिक असलेल्या बुलढाणा अर्बन बाबत मराठवाड्यात पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधीही अनेक सहकारी क्रेडिट सोसायटीत ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. त्यात आता बुलढाणा सोसायटीबाबत अफवा उडाल्याने बीड आणि वडवणी सारख्या भागांत नागरिक पहाटेपर्यंत बँकांबाहेर रांगा लावून आपल्या ठेवी काढण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, या अफवांना कोणताही कायदेशीर किंवा आर्थिक आधार नसून ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे नेमके काय म्हणाले राधेश्याम चांडक? राधेश्याम चांडक यांनी सांगितले की, बुलढाणा अर्बनची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत असून संस्थेचे सर्व व्यवहार नियमित आणि सुरळीतपणे सुरू आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठ्या सहकारी पतसंस्थांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा अर्बनकडे सध्या सुमारे 16 हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. याशिवाय संस्थेकडे जवळपास 4 हजार कोटी रुपयांची मालमत्ता असून सुमारे 5 हजार कोटी रुपयांचे सोने सुरक्षित स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे संस्थेच्या आर्थिक स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याचे कोणतेही कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अफवांचे मूळ: 'कर्नाटक' कनेक्शन? संस्थेच्या प्रतिमेला तडा देण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचे चांडक यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील एका साखर कारखान्याला कर्ज देणे थांबवल्यानंतर काही हितसंबंधी घटकांकडून मुद्दाम अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा चांडक यांनी केला. संस्थेची प्रतिमा मलीन करणे आणि ठेवीदारांमध्ये भीती निर्माण करणे हा या अफवांचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले केले. मात्र बुलढाणा अर्बनचे आर्थिक नियोजन, गुंतवणूक धोरण आणि भक्कम मालमत्ता पाहता अशा अफवांचा संस्थेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा विश्वास राधेशाम चांडक यांनी व्यक्त केला. सर्व व्यवहार सुरळीत; घाबरू नका बुलढाणा अर्बनच्या सर्व शाखांमधील व्यवहार नियमितपणे आणि पारदर्शकपणे सुरू आहेत. बँकेच्या अधिकाऱ्यांनीही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास ठेवून धावपळ करू नका असे सांगितले आहे. संस्थेची दीर्घकालीन विश्वासार्हता आणि गुंतवणूक धोरण पाहता, अशा प्रकारच्या चुकीच्या माहितीचा संस्थेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
निवडणुका बिनविरोध करण्यासाठी कशाप्रकारे धमक्या दिल्या जात आहेत, कशाप्रकारे संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तींकडून अधिकाराचा गैरवापर केला जात आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निलंबन करण्याची मागणी केली आहे. शिवसेना भवनात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी वचननामा जाहीर केला. यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात एकूणच झुंडशाही सुरु झाली आहे, लोकशाही आत्ता संपली आहे. मतचोरीनंतर आता उमेदवारांची पळावापळवी सुरु केली आहे, निवडणुका बिनविरोध होत आहेत. राहुल नार्वेकर धमक्या देत आहेत, हा विषय निवडणूक आयोगाने गांभीर्याने घेतला पाहिजे आणि अध्यक्ष म्हणून निलंबित केले पाहिजे, अशी मागणी ठाकरेंनी केली. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. राहुल नार्वेकरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अध्यक्ष कोणत्या पक्षाचे नसतात, ते आमदारासारखे वागू शकत नाही. दमदाटी करून बिनविरोध उमेदवार निवडून आणले जात आहेत, त्यांनी त्या ठिकाणच्या मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे, जिथे बिनविरोध निवडणूक झाल्या, तिथे पुन्हा निवडणूक घेतल्या पाहिजे. विधानसभा अध्यक्ष हा कोणत्याही पक्षाचा नसतो आणि तो कोणत्याही पक्षाच्या प्रचारासाठी किंवा समर्थनासाठी जाऊ शकत नाहीत. परंतु, त्यांनी संरक्षण काढून घेण्याचे आदेश जे काही दिले, हा त्यांना अधिकार बाहेर नसतो, विधानसभेत असू शकतो. पालिकेच्या ठेवी कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटायला नसतात- उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेच्या निधीतून आपण कोस्टल रोड तयार केला आहे आणि तोही टोल मुक्त. मुंबई महापालिका ही एकमेव महापालिका होती, असे म्हणावे लागेल, ज्यात आपण 92 हजार कोटीपर्यंत ठेवी ठेवल्या होत्या. यातूनच आपण विकासकामे केली आहेत. नितीन गडकारींचा मुंबई-गोवा महामार्ग अजूनही तयारच होत आहे. ठेवी या काही चाटायला नसतात, पण याच ठेवी कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटायला नसतात, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. साधारण 3 लाख कोटींचा घोटाळा महायुतीने केला आहे. ही माझ्याकडे माहिती आली असल्याचे ठाकरेंनी म्हटले. वाचा सविस्तर
पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडीविरोधात आक्षेप घेतला, मग आता महाराष्ट्रात का नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपला केला आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि दुसरे येऊन याहून वाईट होईल, त्यावेळी आपण काय करणार याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजपवर प्रहार केला. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती केली आहे. आज शिवसेना ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा संयुक्त वचननामा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर आधारित प्रसिद्ध करण्यात आला. 'मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा असे नाव या वचननाम्याला देण्यात आले आहे. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या बिनविरोध निवडीवरून पश्चिम बंगालचा दाखला देत, भाजपवर जोरदार हल्ला चढवला. नेमके काय म्हणाले राज ठाकरे? राज ठाकरे म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या, तेव्हा भारतीय जनता पक्ष सुप्रीम कोर्टात गेला होता. आता त्याच पक्षाचे आत्ताच्या महाराष्ट्रातील गोष्टींबाबत काय म्हणणं आहे? हे त्यांनी सांगावे, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला. पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडणुका तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रात तुम्ही करतात. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. आज तुम्ही सत्तेत आल्यावर काँग्रेसने असे केले म्हणून आम्ही तसे करत आहोत, असे तुम्ही म्हणत आहात. उद्या तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दाम दुपटीने जेव्हा पुढे सुरू होईल तेव्हा कोणाकडे तक्रार करू नका, असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्राचे 'यूपी-बिहार' करू नका महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय संस्कृतीबद्दल चिंता व्यक्त करताना राज ठाकरे म्हणाले की, उद्या सत्ता परिवर्तन होईल आणि दुसरे येऊन याहून वाईट होईल, त्यावेळी आपण काय करणार याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा. महाराष्ट्राचा, यूपी बिहार करत आहेत. महाराष्ट्राचे अशाप्रकारे वाटोळे करणे, महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांचे वाटोळे करणे, महाराष्ट्रात जे राजकारणात येऊ इच्छितात, त्यांची विचारसरणी बदलणे हे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे. या सर्व गोष्टींचा विचार राजकीय पक्षांनी करणे गरजेचे आहे. फडणवीसांचे शिंदेंबद्दलचे वक्तव्य म्हणजे विनोद देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार असल्याचे तसेच शिंदेंचा उल्लेख बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ असा केला होता. या वक्तव्याबाबत राज ठाकरे यांना विचारले असता राज ठाकरे यांनी सुरुवातीला फक्त स्मितहास्य करत उत्तर दिले. पत्रकारांनी जेव्हा राज ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली, तेव्हा राज ठाकरे म्हणाले, मी हसलो खरं तर, मी नंतर हसलो. मी शांतपणे हसलो... संजय राऊत जोरात हसले... हे त्याचे उत्तर... असं राज ठाकरे यांनी म्हटले. त्यांनी अप्रत्यक्षपणे फडणवीसांचं वक्तव्य विनोद होता. त्यावर आपण हसलो, असं सांगण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केला. राज ठाकरेंकडून जुन्या आठवणींना उजाळा शिवसेना भवनातील आठवणींना उजाळा देताना राज ठाकरे म्हणाले की, मी खूप वर्षांनंतर इथे आलोय. आज २० वर्षांनंतर इथे आल्यावर मला आपण जेलमधून सुटून आल्यासारखे वाटत आहे नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच पाहत आहे, कारण माझ्या मनात कोरल्या गेलेल्या आठवणी जुन्या वास्तूतील आहेत. १९७७ साली हे भवन झाले आणि त्याच वर्षी जनता पक्षाचे सरकार आल्यावर इथे दगडफेक झाली होती, तिथपासूनच्या सर्व आठवणी आजही ताज्या आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीतही माघार न घेता, अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान उभे करत, बंडखोराी करणाऱ्या नेत्यांना 'मातोश्री'ने घरचा रस्ता दाखवला आहे. वारंवार देण्यात आलेले आदेश आणि अल्टिमेटम धुडकावून लावणाऱ्या २६ प्रमुख पदाधिकाऱ्यांवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. हकालपट्टी केलेल्यांमध्ये अनिल परब यांच्या निकटवर्तीयावरचाही समावेश आहे. यासंदर्भात ठाकरे गटाने एक अधिकृत पत्रक जारी केले आहे. या कारवाईत प्रभाग क्र. ९५ मधील शेखर वायंगणकर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. वायंगणकर हे पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल परब यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. वांद्रे पूर्व आणि पश्चिम परिसरातील पक्ष संघटनेत त्यांचा मोठा वाटा होता. मात्र, अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या निर्णयामुळे त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. कारवाईची कारणे काय? पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या 'एबी फॉर्म' धारक उमेदवारांविरोधात अर्ज भरून तो मागे न घेतल्याने ही कारवाई झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या युतीमध्ये जागावाटप झाले आहे. मित्रपक्षांच्या वाट्याला आलेल्या जागांवरही बंडखोरी केल्याने युती टिकवण्यासाठी हे पाऊल उचलले गेले. एकाच पक्षाचे दोन उमेदवार रिंगणात असल्यास मतविभागणी होऊन त्याचा फायदा थेट भाजप किंवा शिंदे गटाला मिळू शकतो, हे नुकसान टाळण्यासाठी बंडखोरांना बाहेर काढले गेले. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही हा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. बड्या नेत्यांवर कारवाई करून इतर पदाधिकाऱ्यांनी अशी हिंमत करू नये, असा जरब बसवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. ठाकरे गटाने जारी केलेल्या पत्रकानुसार हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी आणि प्रभागांची नावे खालीलप्रमाणे दरम्यान, या मोठ्या कारवाईमुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची अधिकृत फळी अधिक ताकदीने मैदानात उतरणार की बंडखोर अपक्ष म्हणून मोठे आव्हान उभे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिंगोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निवासस्थानात प्रवेशासाठी कार्यकारी अभियंत्यासह इतर अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली असून त्यासाठी आता गृह प्रवेशाचा मुहुर्त काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र त्यानंतरही कंत्राटी कर्मचाऱ्याच्या इच्छेनुसारच हा गृहप्रवेश कधी करायचा हे ठरणार असल्याचे चित्र आहे. हिंगोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह इतर अभियंता व बहुतांश कर्मचारी बाहेरगावाहून ये जा करतात. अभियंता कार्यालयात कधी येणार कधी जाणार याची इत्यंभूत माहिती कंत्राटी कर्मचाऱ्याकडून कंत्राटदारांना दिली जाते. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी आल्याचा निरोप मिळताच जिल्हाभरातील कंत्राटदारांचा घोळकाच बांधकाम विभागात पहावयास मिळू लागला आहे. या कंत्राटादारांची ‘कामे’ मार्गी लावण्यातच अधिकाऱ्यांचा वेळ जात असल्याने त्यांना बांधकामावर प्रत्यक्ष भेट देण्यास वेेळही मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हयात सुरु असलेल्या कामांचा दर्जा सुमार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी मुख्यालयी रहावी यासाठी बांधकाम विभागाच्या कार्यालयाला लागूनच निवासस्थानाचे बांधकाम केले आहे. त्यावर कोट्यावधी रुपयांचा खर्च केल्यानंतरही अधिकारी राहण्यासाठी आलेच नाही या संदर्भातील वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या निवासस्थानात गृह प्रवेशासाठी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अभियंत्यांची धावपळ सुुरु झाली आहे. इमारतीमध्ये प्रवेशासाठी मुहुर्त काढण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्याने पुढाकार घेतला असून त्याच्या इच्छेनुसारच अधिकाऱ्यांचा गृहप्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा बांधकाम विभागात सुरु आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिक्षक अभियंता कार्यालयाकडून पाठबळ मिळू लागल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. इमारत बांधल्यानंतर त्यात अधिकारी का राहात नाहीत हे तापसण्याची तसदीही अधिक्षक अभियंता कार्यालयाकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकाराला अधिक्षक अभियंता कार्यालयाही तेवढेच जबाबदार अल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता निवासस्थानांमध्ये प्रवेशाचा मुहुर्त कधी सापडणार याची चर्चा सुरु झाली आहे. कोट्यावधीच्या इमारती बांधून धुळखात ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाऊ लागली आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर पोतरे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
राजकारणापाठोपाठ आता साहित्य क्षेत्रातही 'गौतम अदाणी' यांच्या नावावरून वादाचे वादळ उठले आहे. बारामती येथील 'शरद पवार सेंटर फॉर एक्सलन्स इन एआय' (Sharad Pawar Center for Excellence in AI) या वास्तूच्या उद्घाटनासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदाणी यांना निमंत्रित केल्याच्या निषेधार्थ ८ नामांकित लेखकांनी 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप'चे मार्गदर्शक पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील लेखकांचे एक पत्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गेल्या ४ वर्षांपासून या फेलोशिपसाठी मार्गदर्शक म्हणून काम पाहणाऱ्या लेखकांनी सामूहिकरीत्या हा निर्णय घेतला आहे. यामध्ये लेखक नितीन रिंढे, राजीव नाईक, गणेश विसपुते, किरण येले, रणधीर शिंदे, चंद्रशेखर फणसळकर, प्रमोद मुनघाटे, शरद नावरे यांसारख्या मान्यवरांचा समावेश आहे. ही मंडळी गेल्या 4 वर्षापासून सदर फेलोशिपसाठी मार्गदर्शक म्हणून सहभागी होते. नेमका आक्षेप काय? साहित्यिकांनी आपल्या पत्रात पद सोडण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. धार्मिक आणि आर्थिक पक्षपात तसेच सध्याच्या राजकीय सत्तेला आणि त्यांच्या विचारसरणीला आमचा ठाम विरोध आहे. त्याच पक्षाशी गौतम अदाणींचे घनिष्ठ संबंध आहेत. अशा व्यक्तीला शरद पवार यांनी सेंटरच्या उद्घाटनाला बोलावणे ही बाब आम्हाला खटकली आहे. त्यामुळे आम्ही या फेलोशिपच्या मार्गदर्शक पदाचा त्याग करत आहोत, असे या लेखकांनी पत्रात नमूद केले आहे. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया आणि लेखकांचे स्पष्टीकरण या पत्राबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारले असता, असे कोणतेही पत्र अद्याप माझ्यापर्यंत पोहोचलेले नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, लेखक प्रमोद मुनघाटे म्हणाले की, आम्ही सर्व लेखकांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वजण वेगवेगळ्या शहरांत राहत असल्याने पत्रावर सर्वांच्या सह्या होऊ शकल्या नाहीत, मात्र आमचा निर्णय ठाम आहे. वाय. बी. चव्हाण सेंटरसारखी साहित्यात काम करणारी दुसरी संस्था नाही, तरीही तात्विक विरोधापोटी आम्ही हा निर्णय घेतला आहे. पत्रात नेमके काय म्हटले? गेली चार वर्षे आम्ही 'शरद पवार इन्स्पायर फेलोशिप (साहित्य)' चे काम करीत आहोत. या फेलोशिपसाठी फेलो लेखकांची निवड करणे, त्यांना मार्गदर्शन करणे अशा स्वरूपाचे हे कार्य आहे. मराठीमध्ये पुस्तक लेखनासाठी अशा तऱ्हेची फेलोशिप असावी असा आम्हा सगळ्यांचा विचार होता. यशवंतराव चव्हाण सेंटरने ही फेलोशिप सुरू केल्याचा आम्हाला आनंद झाला. शरदराव पवार आणि आपण स्वतः यांचे साहित्य-कलांप्रति असणारे प्रेम पाहता आम्ही आपल्या निमंत्रणावरून फेलोशिप यशस्वी व्हावी यासाठी पूर्ण शक्तीनिशी काम केले. फेलोशिपच्या या कार्यात यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सर्व सहकाऱ्यांचे आम्हाला उत्तम सहकार्य लाभले. फेलोशिपच्या आजवरच्या कामात आयोजकांनी आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले. कुठल्याही प्रकारच्या विचारसरणीचा दबाव आणला नाही. अगदी मोकळ्या व सौहार्द्रपूर्ण वातावरणामध्ये व सर्व प्रकारच्या प्रेमळ सहकार्याने सारे कामकाज झाले. म्हणूनच आज ह्या उपक्रमातून आम्ही बाहेर पड्डू इच्छितो हे कळवायला आम्हाला अतिशय वाईट वाटत आहे. शरदराव पवार राजकारणात आहेत आणि संस्थापालकही आहेत. अशा माणसांना निरनिराळ्या परिस्थितींना सामोरे जावे लागते आणि वेगवेगळे पेच सोडवावे लागतात. विविध संस्थांच्या कारभाराकरता निधी उभारावा लागतो आणि उद्योजकांच्या व इतरांच्या साहाय्याची वेळप्रसंगी मदतही घ्यावी लागते. हे सर्व ध्यानात बाळगूनही आम्ही फेलोशिपच्या ह्या उपक्रमातून बाहेर पडत आहोत. कारण 'शरद पवार सेंटर फॉर एक्सलन्स इन ए. आय. 'च्या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याच्या आमंत्रण पत्रिकेतली भाषा ('शुभहस्ते') आणि धार्मिक व आर्थिक पक्षपात इत्यादी अनेक कारणांसाठी ज्या राजकीय सत्तेला व त्यांच्या विचारसरणीला आमचा विरोध आहे, त्या पक्षाशी अनेक पातळ्यांवर घनिष्ट संबंध असलेल्या उद्योजकांचं जणू प्रतिनिधित्व करणाऱ्या इसमाला दिलेला सन्मान. हुकुमशाही, मक्तेदारी, क्रोनी-भांडवलशाही, धर्मपक्षपात इत्यादी प्रतिगामी व समाजविघातक मुल्यांचा शरदराव पवार विरोध करतात असे आम्हाला वाटत असल्याने ह्या सोहळ्याचा आम्हाला धक्का बसला. कदाचित त्यांची ही राजकीय गरज वा खेळीही असेल, परंतु फेलोशिपचा उपक्रम हा साहित्यनिर्मितीचा उपक्रम आहे. या उपक्रमात निवड केल्या जाणाऱ्या फेलो लेखकांच्या लेखनाशी म्हणजेच त्यामागे असलेल्या त्या लेखकांच्या जाणिवा, त्यांचे विचार यांच्या घडणीशी आमचा मार्गदर्शक म्हणून संबंध येतो. सदर फेलोशिप राबवणाऱ्या आयोजकांकडून कोणत्याही कारणाने प्रतिगामी व समाजविघातक मूल्य-समर्थक व्यवस्था/व्यक्ती यांच्याशी जवळिकीचे प्रदर्शन घडवले जात असेल, तर काय करावे? आम्ही फेलो लेखकांशी नैतिक मूल्ये, जीवनदृष्टी इत्यादींबाबत संवाद साधणे, त्यांच्या साहित्याकडून त्या अपेक्षा ठेवणे ढोंगीपणाचे ठरेल. याच कारणामुळे अतिशय जड अंतःकरणाने आम्ही शरद पवार इन्स्पायर फेलोशिप (साहित्य) या उपक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत.
मुंबई महापालिकेसाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यात आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युती केली आहे. आज शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेत ठाकरे बंधू मुंबईसाठी वचननामा प्रकाशित करणार आहेत. 'मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा' असे या वचननाम्याला नाव देण्यात आले आहे. ठाकरे बंधूंच्या आजच्या पत्रकार परिषदेपूर्वी शुक्रवारी आमदार आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईसाठी वचननामा सादर केला होता. हा वचननामा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिली होती. त्यानुसार आज शिवसेना भवनात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केला. विशेष म्हणजे राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात आले असल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांसाठी हा क्षण विशेष ठरला आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असताना भिवंडीत शनिवारी सायंकाळी मोठा राडा झाला. प्रभाग क्रमांक २० मधील नारपोली भंडारी चौक परिसरात भाजप आणि काँग्रेस उमेदवारांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने मोठी हाणामारी झाली. दोन्ही गटांकडून लाठ्या-काठ्या, प्लास्टिक खुर्च्या आणि दगडांचा मुक्त वापर करण्यात आला. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला असून परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील भंडारी चौक येथे भाजप उमेदवार यशवंत टावरे आणि काँग्रेस उमेदवार जितेंद्र पाल यांची कार्यालये एकमेकांपासून जवळच आहेत. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास काँग्रेसची रॅली भाजप कार्यालयाशेजारच्या गल्लीतून जात असताना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यातूनच शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि त्याचे रूपांतर काही वेळातच भीषण हाणामारीत झाले. भाजपचा आरोप: पोलिसांच्या देखत दगडफेक भाजप उमेदवार यशवंत टावरे यांनी असा आरोप केला आहे की, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाणूनबुजून भाजप कार्यालयासमोर येऊन चिथावणीखोर घोषणाबाजी केली. रॅलीत पोलीस उपस्थित असतानाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा दावा टावरे यांनी केला आहे. काँग्रेसचा आरोप : महिलांवर आणि कार्यालयावर हल्ला दुसरीकडे, काँग्रेस उमेदवार वैशाली म्हात्रे यांची मुलगी हर्षली म्हात्रे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. आम्ही शांततेत प्रचार करत असताना भाजप कार्यकर्त्यांनी आम्हाला अडवले आणि महिलांवर दगडफेक केली. २०१७ मध्ये माझ्या वडिलांची हत्या झाली होती, आता माझ्या आईवर हल्ला करण्यात आला आहे, असे सांगत त्यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेस कार्यालयावरही दगडफेक करून नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिसांचा सौम्य लाठीमार घटनेची माहिती मिळताच नारपोली आणि भोईवाडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या घटनेनंतर परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला असून रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूंनी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हे ही वाचा... महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम:29 शहरांत 2,869 जागांसाठी 15,931 उमेदवार रिंगणात; कोणत्या ठिकाणी किती उमेदवार? वाचा राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण २,८६९ नगरसेवक पदांसाठी आता १५,९३१ उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईत सर्वाधिक उमेदवार असून, नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजी आणि जालन्यात पहिल्यांदाच ऐतिहासिक मतदान होणार आहे. सविस्तर वाचा...
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, एकूण २,८६९ नगरसेवक पदांसाठी आता १५,९३१ उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईत सर्वाधिक उमेदवार असून, नव्याने महापालिका झालेल्या इचलकरंजी आणि जालन्यात पहिल्यांदाच ऐतिहासिक मतदान होणार आहे. राज्याची राजधानी मुंबईत २२७ जागांसाठी सर्वाधिक १,७०० उमेदवार रिंगणात आहेत. त्यापाठोपाठ पुणे शहरात १६५ जागांसाठी १,१६६ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे पुण्यात तब्बल ९६८ उमेदवारांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने तेथे मोठी खळबळ उडाली होती. उपराजधानी नागपुरात १५१ जागांसाठी ९९३ उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. माघारीचा 'पुणे' पॅटर्न; ८,८४० जणांची माघार पुण्यात निवडणूक प्रक्रियेत सुरुवातीला ३३,४२७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील २४,७७१ अर्ज वैध ठरले, तर ८,८४० उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. माघार घेण्यामध्ये पुणे (९६८) अग्रस्थानी असून, त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर (५५२) आणि मुंबई (४५३) यांचा क्रमांक लागतो. सर्वात कमी उमेदवार (२३०) इचलकरंजी महापालिकेत आहेत. बिनविरोध ७० जागा आणि कायदेशीर पेच राज्यात ७० जागांवर आधीच बिनविरोध निवडी झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या निवडींना न्यायालयात आव्हान देता येईल का? याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. माघारीसाठी दबाव आणला गेला हे पुराव्याने सिद्ध करणे कठीण असले, तरी निवडणूक आयोगाची भूमिका यावर निर्णायक ठरणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६: अधिकृत आकडेवारी
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धरणगाव येथे आयोजित प्रचार सभेत गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून तुफान फटकेबाजी केली. मला बोलता येत नाही, मला प्रॉब्लेम आहे. सत्तेत असल्याने मला सर्वांना 'आय लव्ह यू' म्हणावं लागतं असे गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी आमदार किशोर पाटील यांना थेट सल्ला दिला की, विरोधकांना काहीही बोलू नका. आपण निवडून आलो आहोत, म्हणजे आता आपण सर्वांचे आहोत. लोकशाहीत निवडणूक संपली की विरोध संपला पाहिजे. मंत्री म्हणून काम करताना येणाऱ्या मर्यादांवर भाष्य करताना गुलाबराव पाटील म्हणाले, मी सरकारमध्ये आहे, त्यामुळे मला शब्द जपून वापरावे लागतात. मला सर्वांसोबत ‘आय लव्ह यू’ करावं लागतं. पण किशोर पाटील यांना बोलण्याची सूट असल्याने ते सध्या जोमात दंड थोपटत आहेत. किशोर पाटील यांच्या पोलीस दलातील पार्श्वभूमीवर विनोद करत त्यांनी, “किशोर पाटील पूर्वी पोलिसात होते. कधीकाळी ते आमदाराच्या मागे पिस्तूल घेऊन उभे राहिले असते, पण नशिबाने तेही आमदार झाले. असेही नमूद केले. भाजपशी युती न करण्याचे संकेत पाचोरा आणि भडगाव नगरपरिषद निवडणुकीचा दाखला देत गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केले की, आगामी निवडणुकांमध्येही भाजपशी युती होण्याची शक्यता कमी आहे. पाचोरा आणि भडगावमध्ये शिवसेनेने भाजपला हरवून सत्ता मिळवली होती. किशोर पाटील यावेळीही भाजपशी युती करणार नाहीत हे मला माहीत आहे, असे संकेत त्यांनी दिले. भावी नगरसेवकांना कानपिचक्या निवडून आल्यानंतर नगरसेवकांचे वर्तन बदलत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. दोन मोबाईल, चार माणसं आणि थोडी हवा लागली की काही नगरसेवक मतदारांना विसरतात. हात जोडून सांगतो, काम होवो किंवा न होवो, पण आलेला माणूस परत जाताना तुमची भाषा गोड ठेवा, असा सल्ला त्यांनी उमेदवारांना केले. १९९६ चा 'तो' किस्सा आपल्या राजकीय प्रवासातील संघर्षाची आठवण सांगताना पाटील म्हणाले, १९९६ मध्ये धरणगावचा पहिला नगराध्यक्ष बसवण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. तेव्हा मी नगरसेवकांना घेऊन झुरखेड्याला पळून गेलो होतो. १६ दिवस त्यांना एका वाड्यात ठेवून अखेर शिवसेनेचा नगराध्यक्ष बसवला होता. हे ही वाचा... अंबादास दानवेंचा घाटी अधिष्ठाता डॉ. सुक्रेवर गंभीर आरोप:उमेदवारांना धमकी दिल्याचा दावा, निवडणूक आयोगाकडे निलंबनाची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डॉ. सुक्रे उमेदवारांना धमकावत असल्याचा दावा करत दानवे यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. सविस्तर वाचा...
कुख्यात 'मोक्का' गुन्ह्यातील फरार आरोपी सादिक हुसेन कपूर (वय ५६, रा. सय्यदनगर, हडपसर) याने कॅम्प परिसरातील आपल्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी सादिक कपूरने ३० ते ३३ पानांची सुसाईड नोट लिहिली आहे. या नोटमध्ये अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार फारूख शेख यांच्यासह अन्य काही व्यक्तींच्या नावांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. कपूरचे ईस्ट स्ट्रीट परिसरातील कुमार पॅलेस सोसायटीमध्ये २८ क्रमांकाचा गाळा होता, जिथे त्याचे कार्यालय होते. याच कार्यालयात त्याने पंख्याला गळफास लावून घेतला. घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सादिकला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून, तिची पडताळणी सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादिक कपूर हा हडपसर परिसरातील कुख्यात गुंड टिपू पठाण याच्यासोबतच्या 'मोक्का' गुन्ह्यात पाहिजे होता. टिपू पठाण सध्या कारागृहात असून, सादिक या गुन्ह्यात फरार होता. त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कोण आहेत फारुख शेख? आत्महत्या केलेल्या सादिक कपूर यानी आत्महत्या करताना फारुख शेख यांचे नाव हातावर लिहिले आहे. फारुख शेख हे प्रभाग ३५ मधून अजित पवार गटाचे उमेदवार आहे. माजी नगरसेवक आणि उद्योगपती फारुख शेख हे बिल्डर कॉन्ट्रक्ट घेतात. फारुख शेख गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, शेतकरी देखील आहे. विविध देशातील आंब्यांवर प्रयोग करुन ते भारतात पिकवतात, असा दावा करतात. जपानचा आंबा पिकवतो म्हणून ते प्रसिद्धीच्या झोतात आले. कोंढवा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल आहे. सोबतच विविध लहान मोठे गुन्हे दाखल आहेत. मोक्का अंतर्गत कारवाईदेखील त्याच्यांवर झाली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डॉ. सुक्रे उमेदवारांना धमकावत असल्याचा दावा करत दानवे यांनी निवडणूक आयोगाकडे त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून दानवे राजकीय आखाड्यात अधिकाऱ्यांकडून उमेदवारांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत होते. यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी त्यांना संबंधित व्यक्तींची नावे जाहीर करण्याचे आव्हान दिले होते. या आव्हानाला उत्तर देताना दानवे यांनी थेट डॉ. शिवाजी सुक्रे यांचे नाव घेतले. डॉक्टरांच्या वेशभूषेत राजकीय सौदेबाजी करत असल्याचा आणि उमेदवारांना फोन करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दानवे यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, डॉ. सुक्रे यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराला फोन करून 'कशाला पालकमंत्र्यांच्या नादी लागतोस, उमेदवारी मागे घेऊन टाक' असे म्हटले आहे. ही बाब निवडणूक आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन असल्याचे दानवे यांनी नमूद केले. पत्रात पुढे असेही म्हटले आहे की, डॉ. शिवाजी सुक्रे यांची अधिष्ठाता पदावरील नियुक्ती केवळ २२ जून २०२४ पर्यंतच वैध होती, तरीही ते अजूनही पदावर कायम आहेत. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (MAT) देखील त्यांच्या या 'बेकायदेशीर नियुक्ती'ची दखल घेतली होती. पालकमंत्री संजय शिरसाट यांची बाजू घेऊन डॉ. सुक्रे पदावर कायम राहिल्याची परतफेड करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल या प्रकरणी दानवे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. डॉ. शिवाजी सुक्रे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. कारवाई न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही दानवे यांनी दिला आहे.
वसमत तालुक्यातील हट्टा येथील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यावर दुचाकी वर आलेल्या तिघांनी चाकू हल्ला केल्याची घटना शनिवारी तारीख 3 घडली आहे. जखमी विद्यार्थ्याला तातडीने उपचारसाठी परभणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील वारंगा येथील वैभव शिरसाट हा हट्टा येथील महाविद्यालयात शिक्षण घेतो. शनिवारी ता ३ जानेवारी रोजी महाविद्यालयातील वर्ग आटोपून तो सायंकाळी साडेपाच वाजता खोलीवर निघाला होता. यावेळी दुचाकीवर तिघेजण आले . त्यांनी साई अपार्टमेंट समोरील रस्त्यावर वैभव याच्यावर चाकु हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्यामुळे वैभव घाबरून गेला. हल्लेखोरांनी वैभववर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर चाकू फेकून देत दुचाकी वर परभणीकडे पळ काढला. या घटनेची माहिती मिळतात हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी वैभव यास रुग्वाहीकेतून परभणीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी वैभवची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणात आरोपींच्या शोधासाठी हट्टा पोलिसांचे पथक रवाना करण्यात आली आहे. यामध्ये हल्ला करणारा एक जण वसमत तालुक्यातील एक जण नांदेड जिल्ह्यातील तर एकजण परभणी जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसार पोलिसांनी आता हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून प्रेम संबंधातून हा प्रकार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे
येथील ॲसेस टू जस्टीस' प्रकल्प व आय. एस. डब्ल्यू. एस. अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन व स्त्रीमुक्ती दिनानिमित्त कान्हेरी सरप येथे जनजागृती कार्यक्रम व शासकीय योजना शिबिर घेण्यात आले. गत तीन वर्षांपासून बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी घोषित केलेल्या १०० दिवसीय अभियानाचा भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. गीतांजली विद्यालय व ग्रामपंचायत कार्यालयातून रॅलीची सुरुवात झाली. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ व बेटी मेरी अभी पढेंगी, विवाह की सूली नहीं चढेंगी', अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी रॅली काढली. रॅलीत ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. अनिता गुरव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मध्यस्थ ॲड. मीनल खंडारे, सरपंच सुनील ठाकरे व ग्रामपंचायत अधिकारी शिवदास गवई यांची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वितेसाठी जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, पूजा पवार, पूजा मनवर, राजश्री कीर्तिवार, रवींद्र सावरकर, शैलेजा विखोरे, चाइल्ड लाइन समन्वयक हर्षाली गजभीये, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि गीतांजली शाळेच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले. नि:शुल्क दिले कार्ड वंचित घटकांसाठी आयोजित कॅम्पमध्ये पॅन कार्ड, ई-श्रम कार्ड, पीएम विश्वकर्मा कार्ड, बांधकाम कामगार योजना, आभा कार्ड, आयुष्मान कार्ड, रेशन कार्ड आदी कार्ड नि:शुल्क देण्यात आली.
स्त्री शिक्षणाला चालना देणाऱ्या पालकांना पुरस्कार:आदर्श पालक पुरस्कारने रामदयाल कोठार सन्मानीत
येथील स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. सावित्रीबाई फुले आदर्श पालक पुरस्कार २०२६ हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलींना उच्च शिक्षण देणारे नांदगाव पेठ येथील रामदयाल कोठार यांना प्रदान करण्यात आला. या वेळी स्व. दत्तात्रय पुसदकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वृषाली पुसतकर, महाविद्यालयाचे प्राचार्या अलका मेश्राम, अनुराग वारेकर, रामदयाल कोठार, रेखा कोठार प्राचार्य डॉ. विजय दरणे आदी उपस्थित होते. मुलगा -मुलगी असा कोणताही भेद न करता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी धडपड करणाऱ्या पालकांना दरवर्षी महाविद्यालयाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने आदर्श पालक पुरस्कार सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी देण्यात येतो. धनादेश, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वर्षीच्या पुरस्कार वितरण समारंभाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरस्कार वितरण समितीचे समन्वयक डॉ. गोविंद तिरमनवार यांनी पुरस्कार वितरणामागची भूमिका प्रास्ताविकातून विशद केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ.सुनीता बाळापुरे यांनी तर आभार डॉ. विकास अडलोक यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्रा. डॉ.पी. आर. जाधव, डॉ. राजेश ब्राह्मणे, डॉ. श्रीकांत माहुलकर, डॉ. सुभाष पवार, डॉ. पंकज मोरे, रेखा पुसतकर, दिलीप पारवे, विनायक पावडे, अनिल शेवतकर, राहुल पांडे, कोठार महाराज यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले, अशी माहिती स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयाच्या वतीने एका प्रसद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वत्र साजरी करण्यात आली. शहराह जिल्ह्यात ठिकठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. मुली आणि महिलांसाठी प्रेरणास्थान असलेल्या सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. मुलींच्या शिक्षणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालयात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले. वघाळ येथे फुले जयंतीनिमित्त बालिका दिन उत्साहातकेला साजरा वरूड | महात्मा ज्योतिबा फलेंच्या बरोबरीने प्रस्थापित व्यवस्थेला झुगारून स्त्री शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुलेंप्रमाणे विद्यार्थिनींनी आपल्या कृतीतून नवविचार समाजात रूजवले पाहिजे. सावित्रीबाईंच्या कार्याचा वसा पुढे चालवण्याचे आवाहन जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अफसर खान यांनी केले. जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळा वघाळ येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.या वेळी मुख्याध्यापक प्रकाश विंचूरकर, वरिष्ठ शिक्षक देवानंद बागडे उपस्थित होते. वर्षभर राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याला वघाळ शाळा प्राधान्य देत आहे. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई यांच्या विचार वाटेवरून चालल्यास अंगी सामर्थ्य येईल, असा आशावाद मुख्याध्यापक प्रकाश विंचूरकर यांनी व्यक्त केला. या वेळी बालिका दिनानिमित्त नेहा विंचूरकर, राधा जवळेकर, दुर्गा पोहणे या विद्यार्थिनीची वेशभूषा कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका रंजना परतेती यांनी केले तर आभार मेघा खोपे यांनी मानले. विभागीय आयुक्त कार्यालयात फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम अमरावती | स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्यप्रणेत्या, कवयित्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी नायब तहसीलदार संदीप टांक, मधुकर धुळे, अतुल बुटे, सचिन लोणारे उपस्थित होते. उपस्थितांनीही सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन अमरावती | जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपस्थितांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात अभिवादन कायर्यक्रम अमरावती | क्रांतीकारी समाजसेविका, भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील स्त्री अभ्यास केंद्रात उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्या वतीने अभिवादन केले.या कार्यक्रमाला डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. मोना चिमोटे, डॉ. वैशाली गुडधे, डॉ.एच.पी. नंदुरकर, डॉ. वैशाली धनविजय, डॉ. सुजाता काळे, डॉ. जागृती बारब्दे, उप कुलसचिव मिनल मालधुरे, उप कुलसचिव मंगेश वरखेडे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, डॉ. भगवान फाळके, सहायक ग्रंथपाल विशाल बापते. संचालन डॉ. भगवान फाळके यांनी केले.
पाणी रस्त्यावर आल्यामुळे इंदिरानगरात नागरिक त्रस्त:मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचा जनतेचा आरोप
येथील इंदिरानगर व मते लेआउट परिसरात नागरिक आजही मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असल्याचे वास्तव्य पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत कार्यालयाकडे परिसरातील नागरिकांनी लेखी तक्रारी देऊनसुद्धा ग्रामपंचायत प्रशासन संबधित तक्रार गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिसरातील रहिवासी ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन कार्यकारी व पंचायत समिती चांदुर बाजारचे गटविकास अधिकारी नीलेश वानखडे, ग्रामपंचायत कार्यालय ग्रामविकास अधिकारी सुरेश रेखाते यांना मुख्य रस्त्यावरील सांडपाणी विसर्ग नियोजन व रस्त्याच्या दुतर्फा नालीचे बांधकाम तत्काळ करण्याचे मागणी निवेदनाव्दारे केली आहे. तसेच या परिसरातील नागरिकांना मुलभुत सोईसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, याकरिता साकडे घातले आहे. इंदीरानगर, मते लेआऊट परिसरातून जाणारा हा मार्ग परतवाडा ते शिरजगाव या मुख्य मार्गाला गावातील महत्वाचा जोड रस्ता असून तो गावातील महत्त्वाचा अंतर्गत मार्ग आहे श्री संत गजानन महाराज विश्व मंदिराकडे दर्शनाला रोज भाविक गावातून याच रस्त्यावरून जातात तसेच बाहेर गावातील विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी श्रीमती गंगाबाई गणोस्कर विद्यालय तसेच संस्कार इंटरनॅशनल शाळेत पोहोचण्यासाठी हा मार्ग सोयीस्कर असल्याने विद्यार्थीसुध्दा याच रस्त्याने ये जा करतात. मात्र या मार्गावर सांडपाण्यातून मार्ग काढत विद्यार्थी व भाविक तसेच परिसरातील ग्रामस्थांना जावे लागते. ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ या भागातील ग्रामस्थांवर आली आहे. तरी परिसरातील नागरिकांच्या तक्रारीला जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेऊन अनेक वर्षांपासून रहिवासी असलेल्या या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा म्हणून नाली बांधकाम करून सांडपाणी विसर्ग नियोजन करण्यात यावे, ही मागणी जोर धरू लागली आहे. शिरजगाव कसबा येथील इंदीरानगरात सांडपाणी असे रस्त्यावर आले आहे. नालीचे बांधकाम करण्यात येईल ^मुख्य रस्त्यावर सांडपाणी थांबत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नालीचे बांधकाम करण्यात येईल. तात्पुरत्या स्वरुपात रस्त्याच्या कडेला नाली खोदून रस्त्यावरील सांडपाणी काढण्यात येईल. सुरेश रेखाते, ग्रामविकास अधिकारी, शिरसगाव कसबा ग्रामपंचायत.
टेब्रुसोंडा ते परसापूर, घोंगडा ते धामणगाव गढी रस्त्याच्या दुरुस्तीसह सुमारे २० गावांतील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मेळघाटमधील आदिवासी अमरावतीकडे पायी निघाले. सुमारे ९० कि.मी.अंतर पार करुन ते अमरावतीत पोहोचणार होते. दरम्यान शुक्रवारी अचलपूरच्या एसडीओंनी हस्तक्षेप करीत १९ जानेवारीनंतर संयुक्त बैठकीचे आश्वासन दिले. आंदोलनकर्त्यांनी मेळघाटमधून हे आंदोलन सुरु केले. पहिल्या दिवशीचा मुक्काम बोराळा येथे केला. दुसऱ्या दिवशी अचलपूरचे एसडीओ यांनी या आंदोलनात हस्तक्षेप करीत त्यांना कार्यालयात बोलावले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे १९ ते २३ तारखेदरम्यान या मुद्द्यांवर संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल, असे त्यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट केले. त्यामुळे आदिवासींनी पायदळ वारी थांबवली आहे. या आंदोलनात रामबाबू दहिकर, सागर बेलसरे, टेंब्रुसोंडा येथील सोमेश दुर्गे व ज्ञानेश्वर वायकर, चांदपूर येथील राजेश कास्देकर, ओंकार सावलकर वलालाजी दहिकर आदी सहभागी झाले होते.
शेंदूरजना बाजार, शिरजगाव मोझरी नंतर आता बिबट्याने निंभोरा मार्गे डेहणी शेतशिवारात धाव घेत झाडावर वास्तव्यास बसलेल्या माकडाची शिकार करून ठार केले आहे. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तिवसा तालुक्यात बिबट्याचा वावर सुरू असून, कुठे ना कुठे तो धाव घेत प्राण्यांची जीवितहानी करीत आहे. शिरजगाव मोझरी येथे बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातल्यानंतर त्याने निंभोरा-डेहणी शेतशिवारात धाव घेतली आहे. तेथील निलेश राहान यांच्या शेतातील आंब्याच्या झाडावर रात्रीच्या अंधारात बसलेल्या माकडाच्या कळपावर बिबट्याने झडप घालून त्यातील एका माकडाची शिकार करून त्यास ठार केले. शनिवारी सकाळी शेतकरी निलेश राहान हे शेतात गेले असता त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली असता कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
नगरपालिका निवडणुकीत झालेल्या आघाडीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी जाहीरपणे स्वीकारतो. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कार्यकर्ते सांगतील तोच शेकापचा निर्णय असेल, असा शब्द देत कार्यकर्त्यांच्या भावनांना फुंकर घालण्याचा प्रयत्न आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केला. नगरपालिका निवडणुकीवेळी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी पुरेशी चर्चा होऊ शकली नाही, वेळ कमी होता, शहरातील पदाधिका-यांशी चर्चा करुन निर्णय घेतल्याचे सांगतानाच रामाने १४ वर्ष वनवास भोगला, भावामध्ये प्रेम, त्यागाची भावना असते. भावाचे पावित्र्य नाते असते ते तुटत नाही पण पवित्र नाते जपणार नसाल तर माझाही नाईलाज आहे, अशा शब्दात विरोधकांशी गुळपीठ चालू असलेल्या भाऊबंदकीचे नाव न घेता सुनावले. शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवा संघटनांच्या वतीने सांगोला येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रामकृष्ण मंगल कार्यालय येथे हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. मेळाव्यात आमदार डॉ. देशमुख बोलत होते. मंचावर विठ्ठलराव शिंदे, डॉ .प्रभाकर माळी, चिटणीस दादासाहेब बाबर, विजय राऊत, अरुण पाटील, निकिताताई देशमुख, रुक्मिणी गलांडे, नगरसेवक इंजि रमेश जाधव, नगरसेविका श्रद्धा साबळे, दिव्यांनी दौंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवाजीराव व्हनमाने, विनायक कुलकर्णी, गजेंद्र कोळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत विजय राऊत यांनी प्रास्ताविक दादासाहेब बाबर यांनी तर आभार परमेश्वर कोळेकर यांनी मानले. सांगोला तालुक्यातून वाहणाऱ्या माण, कोरडा व अपूर्वा नद्यांवर बंधारे बांधून पाणी साठवणूक करण्याची मागणी करण्यात आली असून तालुक्यास ५ टीएमसी पाणी लवकरच मंजूर होईल, असा विश्वास मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांनी दिल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त अशा ५ हजार बॅटऱ्यांचे वाटप करण्यात आले. शेतकरी कामगार पक्ष हा कार्यकर्त्यांनी पिढ्यानपिढया जपलेला आहे, तो देशमुख कुटुंबाचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा आहे. टीका करायची असेल तर माझ्यावर करा; मात्र माझ्या कुटुंबीयांवर खालच्या पातळीवर टीका केली तर ती अजिबात सहन केली जाणार नाही. शांतता ही कमजोरी नसून गरज पडल्यास कारस्थान मोडून काढण्याची ताकद आपल्यात आहे, असा इशारा दिला. सांगोल्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेतील कामकाजावर बोलताना ते म्हणाले, आत्तापर्यंत तीन ते चार अधिवेशने झाली असून स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर आहे. त्यामुळे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सभागृहात सर्वप्रथम पोहोचणारा आणि शेवटी बाहेर पडणारा लोकप्रतिनिधी मीच असतो, असे त्यांनी अभिमानाने सांगितले. हिवाळी अधिवेशनात सांगोला शहर व तालुक्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्याचे सांगितले. अंबिका देवी ग्रामदैवत मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ठोस मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. संजय नगर, इंदिरानगर व लक्ष्मी नगर या भागांतील गोरगरीब नागरिकांना झोपडपट्टीचा दर्जा देऊन प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुलांचा लाभ द्यावा. तसेच चारा छावणी धारकांनी मुक्या जनावरांना जीवनदान दिले, त्यांचे थकीत सुमारे ३३ कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, यासाठी सभागृहात आवाज उठवल्याचे सांगितले. तालुक्यास ५ टीएमसी पाणी लवकरच मंजूर होईल ३३ कोटी रुपयांचे अनुदान प्रलंबित सरसकट शेतकरी कर्जमाफी व्हावी शासनाने सरसकट शेतकरी कर्जमाफी करावी. मार्च अखेर असल्याने खाजगी बँकांकडून शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास देऊ नये. शेतकरी वर्ग दूध व्यवसायाकडे वळला आहे. दूध काढतेवेळी सकाळ व सायंकाळी लोडशेडिंग घेऊ नये. मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांनी टेंभू-म्हैसाळ योजनेसाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगितले. अंबिका देवी ग्रामदैवत मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी निधी उपलब्ध
महिलांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध:पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांचे प्रतिपादन
येथील पोलिस ठाण्यात रायझिंग डे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोलिस दलातील शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवेच्या कार्याला उजाळा देण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक गावडे म्हणाले की, पोलीस दल नेहमीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देत राहील, असे प्रतिपादन केले. त्यानंतर पोलिस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथील बँड पथक यांचा वैराग शहरातील डेफोडिल्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे आवारात रेझिंग डे निमित्त वाद्य वाजवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमावेळी कॉलेजच्या सेक्रेटरी शुभांगी मोहिते व इतर शिक्षक वृंद पालक व लहान विद्यार्थी उपस्थित होते. तसेच वैराग बस स्टँड या ठिकाणी बँड पथकांचा वाद्य वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी वैराग शहरातील नागरिक उपस्थित होते. विद्यामंदिर कन्या प्रशालेच्या व डेफोडिल्सच्या विद्यार्थिनींना पोलिस निरीक्षक यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनी यांना पोलिस स्टेशन कामकाजाची माहिती त्यात पोलिस ठाणे अंमलदार कक्ष, मुद्देमाल कक्ष, क्राईम कक्ष, वाहतूक, गोपनीय कक्ष, पासपोर्ट चरित्र पडताळणीची माहिती दिली. विद्यार्थ्यांना योगदान
विकासाला योगदान द्यावे- समाधान आवताडे:पंचायत समिती अधिकाऱ्यांची आढावा बैठक
कामात व कर्तव्यात कोणत्याही प्रकारे कसर करून मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्यास मी कोणाचीही गय करणारा आमदार नाही. त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याने आपापल्या कर्तव्य सेवेशी प्रामाणिक राहून सातत्यपूर्ण कामातून जनतेच्या व तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला योगदान दिले पाहिजे असे मत आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे. आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवेढा पंचायत समिती प्रशासकीय अधिकारी वर्गाची आढावा बैठक जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे संपन्न झाली. त्याप्रसंगी ते प्रत्येक शासकीय विभागांच्या विविध बाबींचा आढावा घेत असताना बोलत होते. बैठकीत सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, रोजगार हमी योजनेसह विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, नागरिकांशी संबंधित योजना वेळेत व प्रभावीपणे राबवणे, प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करणे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याबाबत स्पष्ट सूचना आमदार आवताडे यांनी दिल्या. ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, हाच या बैठकीचा मुख्य उद्देश होता. समन्वय, पारदर्शकता आणि जबाबदारीच्या भावनेतून काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, गटविकास अधिकारी श्रीमती जस्मिन शेख नूतन नगरसेवक प्रा.येताळा भगत, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, काशिनाथ पाटील, सरोज काझी, सुधाकर मासाळ, शिवाजीराव पटाप, माजी पंचायत समिती सदस्य नितीन पाटी, महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे कार्याध्यक्ष ॲड.शिवानंद पाटील आदी व सर्व विभागांचे अधिकारी तसेच विविध गावांचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.
दोघांच्या हातात कात्री, कोणाचा पत्ता कापणार:अभिजित पाटील आणि भगीरथ भालके पुन्हा मंचावर
पंढरपूर नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीवेळी स्वतंत्र निवडणूक लढवल्यामुळे आ. अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांचे परस्परांचे नुकसान झालेले आहे, पालिका निवडणुकीनंतर मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनांच्या निमित्ताने आ. पाटील आणि भगीरथ भालके एकत्र आले होते, दोघांनी एकाच कात्रीने फित कापून कार्यलयाचे उदघाटन केले. मात्र एकच कात्री हातात घेऊन आगामी निवडणुकीत हे दोन्ही नेते विरोधकांचे पत्ते कट करतात कि विरोधात लढून एकमेकांच्या मतांचे पॉकेट्स कापतात याची चर्चा तालुक्यात रंगलेली आहे. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत आ. अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांच्यात आघाडी होऊन एकत्र निवडणूक लढवतील अशी शक्यता निर्माण झालेली होती. परंतु पडद्यामागून अनेक घडामोडी घडल्या आणि आ. अभिजित पाटील यांनी वेगळी आघाडी उभा करून ११ जागा लढवल्या. या ११ उमेदवारांना मिळालेल्या मतांमुळे भगीरथ भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे किमान ७ उमेदवार पराभूत झाले आहेत. भालके आणि पाटील एकत्र असते तर यांच्या आघाडीला बहुमत मिळाले असते असे मतांचे गणित समोर येते आहे. या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत हे दोन्ही नेते एकत्र येतात कि पुन्हा विरोधात लढतात याकडे लक्ष लागलेले असतानाच गुरुवारी संध्याकाळी दोन्ही नेते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. मनसेचे नेते आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या विजयाचे शिल्पकार दिलीप धोत्रे यांच्या वार्डातील संपर्क कार्यालयाचे उदघाटन या दोन्ही नेत्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, शिवसेना (शिंदे गट) संपर्क प्रमुख महेश साठे, नगराध्यक्षा प्रणिता भालके यावेळी उपस्थित होत्या. दुरावलेले दोन्ही नेते एकत्र आल्याने तालुक्यात चर्चा दिलीप धोत्रे यांनी आ. पाटील आणि भगीरथ भालके यांच्या हातात एकच कात्री दिली आणि कार्यालयाच्या उदघाटनाची फीत कापण्यास सांगितले. दुरावलेले दोन्ही नेते एकत्र येत असल्याचे पाहून यावेळी उपस्थित हजारो समर्थकांमध्ये हि उत्सुकता ताणलेली होती. दोघांच्याही हातात आता निवडणुकीची कात्री आलेली असून या कात्रीने ते विरोधकांचे पत्ते कट करतात कि एकमेकांच्या मतांचे पॉकेट्स कट करून पराभव ओढवून घेतात याची चर्चा तालुक्यात रंगलेली आहे.
विद्युत रोहित्रातील कॉपर चोरुन विकले भंगारात:मुद्देमाल व कारसह पुण्यात टोळी झाली गजाआड
राजुर, ता. अकोले परिसरातील विद्युत रोहित्रामधील कॉपर चोरी करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड करुन केले आहे. या कारवाईत चोरीचा माल घेणारा व इतर तीन आरोपींसह १५ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरलेले कॉपर आरोपींनी पुणे जिल्ह्यातील भंगार विक्रेत्याला विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२५ दरम्यान कोहंडी येथील धरणाजवळील विजेच्या रोहित्रामधील ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा कॉपर चोरीला गेलेला होता. या घटनेवरुन फिर्यादीने राजुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील माहिती संकलन करून आरोपींचा शोध घेत होता. २ जानेवारी २०२६ रोजी नारायणगाव परिसरातून आरोपी सुखरुप सुखदेव नांगरे (२४) पोलिसांच्या ताब्यात आला. तपासात त्याने गुन्ह्यातील आपले साथीदारांसह सहभाग कबूल केला आणि चोरीचा माल पुणेतील भंगार दुकानदाराला विकल्याचे सांगितले. ताब्यात आलेल्या आरोपींसह सागर शिवराम जाधव, शैलेश बाळु पारधी, मोहंमद जुबेर यांना देखील पकडण्यात आले, तर भास्कर केवळ व सुनिल खंडागळे हे अद्याप फरार आहेत. या कारवाईत पोलिसांनी ६५ हजार रुपये किमतीचे कॉपर, १५ लाख रुपये किमतीची चोरी केलीली इनोव्हा कार जप्त केली आहे. या आरोपींविरुद्ध राजुर आणि शिरुर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंदवला आहे.
फुले दाम्पत्याने सुरू केली होती परिवर्तनाची लढाई:संमेलनाध्यक्ष अंजली कुलकर्णी यांचे प्रतिपादन
साहित्य संमेलनातून मूल्यांची पेरणी केली जाते. शिक्षिका संमेलनातील उपस्थित शिक्षिका या आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या वारसदार आहेत. फुले दांपत्याने अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले, अनिष्ट रुढींवर प्रहार केले. सावित्रीबाई फुले यांनी समाजजागृतीचे व स्त्रीशिक्षणाचे काम केले, तेच कार्य त्यांच्या कवितेच्या माध्यमातून, लेखनातून उमटलेले आहे. शिक्षणाने मनुष्याचे पशुत्व हटते ही धारणा सावित्रीबाई फुले यांची होती. एक पुरुष शिकला तर एक व्यक्ती शिकतो परंतु एक महिला शिकली तर एक कुटुंब, एक समाज शिकतो या भावनेतून महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना घडवले होते. तत्कालीन प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम व परिवर्तनाची लढाई फुले दाम्पत्याने लढली होती, असे प्रतिपादन अखिल भारतीय चौथ्या शिक्षिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अंजली कुलकर्णी यांनी केले. भारतातील स्त्रियांच्या जीवनात नवपरिवर्तन करणाऱ्या, स्री हक्काच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील दादा पाटील महाविद्यालयात येथील मराठी विभागाच्या वतीने अखिल भारतीय चौथ्या शिक्षिका साहित्य संमेलनाचे आयोजन शनिवारी महाविद्यालयाच्या शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले होते. सकाळी ८ ते ९ या कालावधीत कर्जत शहरातून ग्रंथदिंडी व शोभायात्रा काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत संमेलनाध्यक्ष, संमेलनाचे प्रमुख पाहुणे व निमंत्रित कवयित्री प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले. याप्रसंगी कन्या विद्यामंदिर, दादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या स्त्री समाजसुधारकांच्या वेशभूषा परिधान केलेल्या होत्या. उद्घाटन सत्राकरिता रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे इन्स्पेक्टर नवनाथ बोडखे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अंबादासजी पिसाळ, बप्पासाहेब धांडे, प्राचार्य डॉ. प्रवीण बडधे, प्राचार्य डॉ. संजय कांबळे, प्राचार्या डॉ. मंजुषा बोबडे, प्राचार्य डॉ.अनिल शितोळे,सुभाषचंद्र तनपुरे, बाळासाहेब साळुंके, प्रकाश धांडे, काकासाहेब वाळुंजकर, तात्यासाहेब ढेरे, निर्मला पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले. संमेलनाध्यक्षा कुलकर्णी म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांचा वारसा जोपासतच अनेक महिला समाजसुधारक व लेखिका घडल्या. ताराबाई शिंदे, मुक्ता साळवे ते आधुनिक काळातील लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई चौधरी, संजीवनी मराठे, पद्मा गोळे, अनुराधा पोतदार, शांता शेळके, अरुणा ढेरे ते कल्पना दुधाळ या लेखिकांच्या लेखनकार्याचा आढावा त्यांनी याप्रसंगी घेतला. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुरस्कारप्राप्त सरोजमाई पाटील यांच्या वतीने मीनाताई जगधने यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आम्ही रयत शिक्षण संस्थेचे राखणदार म्हणून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. सरोजमाई यांनी शिक्षिका म्हणून मुंबई येथील झोपडपट्टी सदृश्य परिसरामध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. महात्मा फुले शिक्षण संस्था व रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण कार्यात माईंनी आपली पूर्ण आहुती दिलेली आहे. अरुण कडू पाटील यांच्या हस्ते साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक कार्य करणाऱ्या चौदा शिक्षिकांचा व सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. जिवंत प्रश्नांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार लेखनाची व वाचनाची स्फूर्ती मिळावी याकरिता अशी संमेलने घेण्यामागील उद्देश असतो. शिक्षिका साहित्य संमेलनातून समकालीन जिवंत प्रश्नांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. लक्ष्मीबाई टिळक, बहिणाबाई चौधरी, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, तारा भवाळकर, कविता महाजन आदि लेखिकांनी स्त्रीकेंद्रित लेखन केलेच परंतु समाजातील वैगुन्यावरही बोट ठेवले, असे उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे अरुण कडू म्हणाले.
आयकॉन पब्लिक स्कूल येथे ‘कलर्स ऑफ करेज’ कार्यक्रमात समाजातील उणिवा दूर करण्यासाठी योगदान देणाऱ्या महान व्यक्तिमत्वांच्या जीवन गाथा उलगडल्या. शाळेतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभागी होऊन थोर व्यक्तिमत्वांच्या कार्याचे सादरीकरण केले. प्रत्येक व्यक्तिमत्वापासून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यातील वाटचालीचा संस्कारीत पाया भक्कम केला. दीड तास सलग दृकश्राव्य स्वरूपात हा कार्यक्रम सादर झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत समाजासाठी भरीव योगदान देणारे व्यक्तिमत्त्व खरे हिरो असतात. अशा व्यक्तीमत्वांच्या जीवन कार्याचा सखोल अभ्यास करून आणि त्यांच्यातील उत्कृष्ट गुण आत्मसात करत मुलांनी सादरीकरण केले. जवळपास दोन महिने विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी धैर्य या संकल्पनेवर सखोल चर्चा, विचारमंथन व आत्मचिंतन केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव अधिक बळकटी झाली. शहरातील स्नेहलय संस्थेला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम साकारण्यात आला असून या कार्यक्रमातून मिळणारे उत्पन्न संस्थेला देण्याचा प्रस्ताव आहे. गीत संगीत, आकर्षक प्रकाश योजना, दृकश्राव्य माध्यम आणि कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. या कार्यक्रमास आदर्शदगाव योजना समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, डॉ. गिरीश कुलकर्णी, शरद मुथा, अशोक मुथा, निर्मल मुथा, अमित मुथा, संचालक कर्नल आर. सी. राणा, आराधना राणा, प्राचार्या दीपिका नगरवाला आदी उपस्थित होते. विद्यालयाच्या या अनोख्या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले.
दीपनगर औष्णिक विद्युत प्रकल्पातील राखेची वाहतूक करणारे डंपर वरणगाव शहरातून धावतात. डंपरमधील राख रस्त्यावर पडल्याने सर्वत्र धूळ उडते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच शहरातून धावणाऱ्या डंपरमुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातून डंपर वाहतूक बंद करावी, अशी मागणी सिद्धेश्वरनगर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. या विषयी जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय, वरणगाव पोलिस ठाणे व नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवसेना शिंदे गटातर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शहरातील मुख्य रस्ता वर्दळीचा असून या मार्गावर भाजीपाला व फळ विक्री करणाऱ्यांची वर्दळ असते. तसेच सकाळी व दुपारी शाळा, महाविद्यालय सुटल्यावर रस्त्यावर विद्यार्थ्यांचीही वर्दळ वाढते. दुसरीकडे या रस्त्यावरून राखेचे डंपर भरधाव वेगाने जात असल्याने अपघाताची भीती आहे. तसेच डंपरमधून उडणारी व सांडणारी राख संपूर्ण रस्त्यावर पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो आहे. डंपरमुळे रस्त्यांची दुरवस्था होते आहे. आस्वाद हॉटेलजवळ तोल काटा असून या ठिकाणी डंपर रस्त्यावर उभे असतात. त्यामुळे या परिसरात अपघाताचा धोका वाढला आहे, अशी तक्रार निवेदनाद्वारे केली. क्षमतेपेक्षा जास्त राखेची वाहतूक डंपरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त राख असते. त्यामुळे डंपरवर तात्काळ कारवाई करून शहरात डंपरला प्रवेश बंद करावा, डंपर वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या विषयी निर्णय झाला नाही तर शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
एरंडोल येथील डीसीएसपी महाविद्यालयात उपक्रम:आरोग्याची काळजी घेण्यावर केले मार्गदर्शन
येथील डीडीएसपी महाविद्यालयात ऋतुमती अभियानांतर्गत मासिक पाळीवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच २५८ विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप केले. युवती सभा मंच व सोफी सॅनिटरी पॅड कंपनीतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमात युवती सभेच्या सचिव डॉ. रेखा साळुंखे, सोफी सॅनिटरी पॅड कंपनीच्या प्रतिनिधी सीमरन कौर, सोनिया कुमार यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत मासिक पाळी दरम्यान होणारे शारीरिक व मानसिक बदल, पीसीओडीसारख्या समस्यांची लक्षणे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. तसेच विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन केले. महाविद्यालयात उपलब्ध असलेले सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन व डिस्पोजल मशीनच्या वापराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मशीनचा योग्य व सुरक्षित वापर कसा करावा याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थिनींना दाखवण्यात आले. कार्यक्रमानंतर सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ.अरविंद बडगुजर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य गायकवाड, मुख्याध्यापक केदार, शेखर पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला डॉ. स्वाती शेलार, डॉ. मीना काळे, डॉ. शर्मिला गाडगे, डॉ. सविता पाटील यांचे सहकार्य लाभले.
श्री मतोबा महाराज यात्रेस नैताळेत प्रारंभ:पहिल्याच दिवशी 30 हजार भाविकांची उपस्थिती
नैताळे श्री मतोबा महाराज यात्रोत्सवास शनिवारी (दि.३) उत्सहात प्रारंभ झाला. देवस्थान ट्रस्टच्या वतीने महापुजा व रथ पूजा करण्यात आली. त्यानंतर रथ मिरवणूक काढण्यात आली. यात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवसी ३० हजार भाविकांनी श्री मतोबा महाराजांचे दर्शन घेतले, अशी माहिती देवस्थान व्यावस्थापनाने दिली आहे. हा उत्सव १५ दिवस सुरु राहणार आहे.पहिल्या दिवशी पहाटे ५ वाजता भागवताचार्य ज्ञानेश्वर शिंदे, सुनिल जैन, भारती जैन व दर्शन रांगेत उभ्या असलेले भाविक प्रविण पाटील, अनिता पाटील यांच्या हस्ते श्री मतोबा महाराजांच्या नवीन चांदीच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली.बोकडदरे येथील भारत माता आश्रमाचे महंत जनेश्वरानंदगिरी महाराज व मोहन खापरे यांच्या हस्ते रथ मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीस रथाला पहिली बैलजोडी जुंपण्याचा मान भाटवाडी येथील शेतकरी नंदकिशोर महात्मे यांना मिळाला. यात्रा कालावधीत दररोज सकाळी ६, दुपारी १२, सायंकाळी ७ वाजता संगितबध्द आरती होणार आहे.
कन्नडला महिलेचा बंदघरात आढळला मृतदेह:आघाताचा संशय, दुर्गंधी येत असल्याने प्रकार उघड
कन्नड शिवनगरमधील ६५ वर्षीय शकुंतला यादवराव देहाडे या महिलेचा मृतदेह शनिवारी दुपारी साडेबारा वाजता घरात आढळून आला. त्या एकट्याच राहत होत्या. घरातून दुर्गंधी येत असल्याचे संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यांनी शेजाऱ्यांना सांगितले. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटना उघडकीस आली. पोलिसांनी आघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. सहायक फौजदार नासेर पठाण यांनी सांगितले की, सामाजिक कार्यकर्ते योगेश कोल्हे आणि डॉ. सदाशिव पाटील यांनी त्यांना दुर्गंधीबाबत कळवले. त्यांनी घटनास्थळी भेट दिली. घर आतून बंद होते. सहायक पोलिस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक केशरसिंग जारवाल, सहायक फौजदार एन. एस. बेग यांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी कटरने दरवाजा तोडला. घरात लाकडी दिवानवर शकुंतला देहाडे मृत अवस्थेत आढळून आल्या. शरीर फुगलेले होते. कुजण्यास सुरुवात झाली होती. त्या अविवाहित होत्या. नगरपालिका स्वच्छता विभागाचे वाल्मीक शिरसाट, भय्या कैलास साळवे, राहुल कुचेकर, गोरख साळवे, विशाल साळवे, विजयसिंग चव्हाण यांनी रूम फ्रेशनर मारला. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काही दिवसांपासून संपर्कात नव्हत्या तहसील कार्यालयात जनतेची कामे करून उपजीविका करत होत्या. त्यांचा भाचा सुनील देहाडे आणि कमलबाई देहाडे यांनी सांगितले की, त्या सणासुदीला घरी येत. काही दिवसांपासून संपर्क नव्हता.
पाचोडहून खासगी काम आटोपून गावी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा बैलगाडीला समोरासमोर धडकून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास केकत जळगावजवळ कोळीबोडखा रस्त्यावर घडली. या अपघातात ज्ञानेश्वर करूबा वाघमारे (२१, रा. केकत जळगाव) याचा जागीच मृत्यू झाला. आदेश आबासाहेब बढे (२१, रा. केकत जळगाव) हा गंभीर जखमी झाला. दोघे मित्र खासगी कामासाठी पाचोड येथे आले होते. रात्री उशिरा दुचाकीने गावी परतत असताना कोळीबोडखा रस्त्यावर समोरून उसाची बैलगाडी येत होती. बैलगाडी रेणुकामाता-शरद सहकारी साखर कारखान्यातून ऊस खाली करून परत येत होती. अंधारामुळे बैलगाडी दिसली नाही. दुचाकी बैलगाडीला समोरासमोर धडकली. धडकेत ज्ञानेश्वरच्या छातीला आणि डोक्याला गंभीर मार लागला. आदेशच्या कमरेला, छातीला आणि डोक्याला दुखापत झाली. तो जागीच ठार झाला. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना खासगी वाहनाने पाचोड ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉ. नोमान शेख यांनी ज्ञानेश्वरला मृत घोषित केले. तपास पोउपनि. हरिविजय बोबडे करत आहेत. जखमीवर घाटी रुग्णालयात उपचार आदेशवर प्राथमिक उपचार करून त्याला छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात हलवले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात झाली.
वाकोद येथून शिर्डीकडे निघालेल्या साईबाबा पायी पालखी दिंडीचा बनकिन्होळा येथे शुक्रवारी सायंकाळी मुक्काम झाला. सलग १३ वर्षांपासून ही दिंडी शिर्डीकडे निघते. यावेळी ओमसाई प्रतिष्ठानच्या पदाधिकारी व ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी करत दिंडीचे स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. महिलांनी रांगोळ्या काढून, सडा-सारवण करून पालखीचे पूजन केले. फुलांनी सजवलेली पालखी आणि त्यामध्ये विराजमान असलेली साईबाबा यांची अर्धाकृती मूर्ती विद्युत रोषणाईने उजळून निघाली होती. मिरवणुकीमुळे संपूर्ण गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. ही मिरवणूक दोन तास चालली. रात्री ८.३० वाजता गजानन महाराज मंदिरात साईबाबा महाआरती पार पडली. त्यानंतर ओमसाई प्रतिष्ठानतर्फे भाविकांसाठी अन्नदान करण्यात आले. वरण, भात, शिरा, बट्ट्यांचा महाप्रसाद तयार करण्यात आला होता. जवळपास दोन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शनिवारी पहाटे सात वाजता साईबाबा महाआरती झाली. यावेळी वाकोद येथून आलेल्या भाविक भक्तांचा टोपी, उपरणं व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
विहिरींच्या गैरव्यवहार चौकशीसाठी लाटेंचे उपोषण 6 दिवसांपासून सुरू
सोनखेडा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ९ सिंचन विहिरींच्या कामात कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून, या प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संतोष अंबादास लाटे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण शनिवारी सहाव्या दिवशीही सुरू होते. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती खालावत चालल्याने प्रशासनावर दबाव वाढला आहे. लाटे यांच्या म्हणण्यानुसार, विहिरींच्या ठिकाणी प्रत्यक्षात कोणतेही काम झालेले नाही. मात्र, कागदोपत्री काम पूर्ण दाखवून मस्टर रोल तयार करण्यात आले. मजुरांच्या नावावर मजुरी अदा करून शासकीय निधी हडप करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी २० ऑगस्ट २०२५ रोजी तत्कालीन गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर ८ सप्टेंबर २०२५ रोजी चौकशीचे आदेश देण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष चौकशी अद्याप सुरू झालेली नाही. चौकशीला होत असलेल्या विलंबामुळे लाटे यांनी १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रशासनाकडे स्मरणपत्र दिले. त्यानंतर त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, समितीनेही अद्याप काम सुरू केलेले नाही, असा आरोप लाटे यांनी केला आहे. २९ डिसेंबरपासून लाटे यांनी आमरण उपोषण सुरू केले. सहाव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावत असल्याचे दिसून आले.
कन्नड तालुक्यात मका खरेदी केंद्र सुरू करावे:डॉ. अण्णासाहेब शिंदेंची तहसीलदारांकडे मागणी
कन्नड तालुक्यात मका खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे आणि अतिवृष्टीचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी उबाठा सेनेचे तालुका संघटक आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अण्णा शिंदे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत मका खरेदी केंद्रे अद्याप सुरू झालेली नाहीत. मका पिकाची नोंद १ डिसेंबरपासून सुरू असून एक महिना उलटूनही केंद्रे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी बियाणे, खते उधारीवर घेतले असून केंद्रे सुरू नसल्याने मका कमी भावात विकावा लागत आहे. ही अन्यायकारक बाब असून केंद्रे तत्काळ सुरू करावीत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान मंजूर केले आहे. मात्र तालुक्यातील २० ते २५ टक्के शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. नावात किंवा बँक खात्यातील त्रुटींमुळे अनुदान थांबले आहे. मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक यांच्यावर जबाबदारी सोपवून या त्रुटी दूर कराव्यात. येत्या १० दिवसांत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करावे. या मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून (दि. १२) कन्नड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला. या वेळी डॉ. अण्णासाहेब शिंदे, वामनराव सोनवणे, शहरप्रमुख विश्वनाथ त्रिभुवन, बळीराम जाधव, विश्वास राठोड यांच्यासह उबाठा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सावित्रीबाई फुलेंच्या कार्याला माउली गुरुकुलात अभिवादन
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त निल्लोड फाटा येथील श्री माउली वारकरी गुरुकुल आश्रम अनाथालय व संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयात कार्यक्रम झाला. स्त्री शिक्षणासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंच्या कार्याला या वेळी अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज पवार होते. शारदाताई पवार, माजी विद्यार्थी व प्रिंटिंग व्यावसायिक प्रमोद कोलते, मुख्याध्यापक कृष्णा जैवाळ, व्यवस्थापक गजानन डिगावकर, सचिव पुरुषोत्तम महाराज पवार, वारकरी व्यवस्थापक संदीप महाराज काकडे, अकील शेख उपस्थित होते. महिला शिक्षकांनी कार्तिक मालोदे या विद्यार्थ्याला सावित्रीमाईंच्या वेशात सादर केले. या उपक्रमाला उपस्थितांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लक्ष पाटील, अथर्व पवार, संग्राम भूतकर यांनी भाषणातून सावित्रीमाईंच्या कार्यावर प्रकाश टाकला. रामेश्वर महाराज पवार म्हणाले, सावित्रीमाईंनी शेण-गोट्यांचा मार सहन करत शिक्षणाची मशाल पेटवली. त्यामुळेच आज स्त्री प्रगतीच्या वाटेवर आहे.’ प्रमोद कोलते यांनीही भावना व्यक्त केल्या. सूत्रसंचालन सुजाता बिऱ्हाडे यांनी केले. आभार मयूरी काकडे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्या सभा म्हणजे केवळ फुसका बार आहेत, त्यातून कोणतेही आऊटपुट निघणार नाही. ३० वर्षे सत्ता उपभोगताना मराठी माणूस मुंबईबाहेर का फेकला गेला, याचे उत्तर त्यांनी आधी द्यावे, अशा शब्दांत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. तसेच अंबादास दानवे यांनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा रशीदमामूंचा प्रचार करून रशीद मामू जिंदाबादच्या घोषणा द्याव्यात, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. शनिवारी (३ जानेवारी) आयोजित पत्रकार परिषदेत शिरसाट यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. अंबादास दानवे यांनी शिरसाट यांच्यावर दबावाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. याला प्रत्युत्तर देताना शिरसाट म्हणाले, मी कुणालाही दबावासाठी फोन केलेला नाही. दानवेंनी लावलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत. ज्यांनी पक्षात तिकिटे विकली, त्यांना कार्यकर्ते त्यांची लायकी दाखवून देतील. आता तुमच्याकडे फक्त रशीदमामूंचा प्रचार करणे एवढेच शिल्लक राहिले आहे, असेही ते म्हणाले. टार्गेट करण्यासाठी फक्त शिरसाटच दिसतो विरोधकांना टीका करण्यासाठी केवळ संजय शिरसाटच दिसतो. त्यांना वाटते की माझ्यावर काही परिणाम होईल, पण मी अशा आरोपांना भीत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतींना लोक वैतागले असून, मुंबई तोडणार ही जुनीच रेकॉर्ड आता चालणार नाही, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली.
आमचा आग्रह होता की, भाजप आणि शिवसेना नैसर्गिक युती असून ती झाली पाहिजे. आधी तयारी केली असती तर आम्हीदेखील १६५ जागांवर उमेदवार उभे करू शकलो असतो. काही ठिकाणी आता उमेदवार नसले तरी आगामी निवडणुकीत १२० जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. शिवसेनेची खरी ताकद उमेदवारांनी दाखवून दिली पाहिजे. आमच्याकडे एक नगरसेवक असला तरी त्याचे १५० नगरसेवक कसे करावयाचे हे एकनाथ शिंदे यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. पक्षाची जबाबदारी आपली समजून आगामी काळात काम करावे. मनपा इतर सर्व पक्षाच्या ताब्यात होती, परंतु आता मनपा सेनेच्या ताब्यात आली पाहिजे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. सामंत म्हणाले, पुणे मनपा निवडणूक राजकारणाच्या इतिहासात प्रथमच शिवसेना १२० जागांवर लढत आहे. उमेदवार यांचा आत्मविश्वास पाहिल्यावर १६ जानेवारी रोजी निकालादिवशी महापौर बनवताना शिवसेनेला विचारात घ्यावे लागेल, असे दिसते. आज पुण्यात सर्वत्र शिवसेनेचे भगवे वातावरण दिसत आहे. शिवसेनेने सत्तेच्या माध्यमातून केलेला विकास जनतेपर्यंत आम्ही घेऊन जाणार आहे. शिवसेना पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या वेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मंत्री विजय शिवतारे उपस्थित होते. भाजप प्रत्येक गोष्ट पूर्णत्वास नेतो : चव्हाण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना स्मरून पुण्याच्या विकासाची शपथ आज भाजपचे उमेदवार घेत आहेत. निवडणुकीला सामोरे जाताना जाहीरनामा जनतेसमोर ठेवून भाजप निवडणूक लढवत आहोत. भाजपने आतापर्यंत १४ जाहीरनामे केलेले असून भाजप एकमेव असा पक्ष आहे जो जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्ट पूर्णत्वास नेतो, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. समताभूमी येथे सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांना वंदन करून पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी करण्यात आला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. आपण कोणत्याही टीकेला उत्तर देत बसू नये सामंत म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या विविध प्रश्नांत जातीने लक्ष घालून त्याची सोडवणूक केली. त्यामुळे पुणेकर शिवसेनेला पाठिंबा देतील. आपण कोणत्याही टीकेला उत्तर देत बसू नये. ते काम उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या करत आहेत. विकासाचे प्रश्न सोडून इतर टीकाटिप्पणी काही पक्षांची सुरू आहे. पुणे कोणत्या एका पक्षाची मक्तेदारी नाही. काही लोकांना दुसऱ्या पक्षांना कमी लेखण्याची सवय आहे, पण वस्तुस्थिती तशी नाही. शिवशक्ती, श्रमशक्ती विरोधात धनशक्ती अशी ही लढाई आहे. शिवसैनिक हा संघर्षातून अनेक गोष्टी शिकलेला आहे. संघर्ष सेनेच्या पाचवीला पुजलेला आहे. त्यातूनच मोठे काम उभे राहते. हा इतिहास आहे. केवळ विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक मोहोळ म्हणाले, केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून पुण्याचा विकास वेगाने होत असून निवडणुकीच्या निमित्ताने तो जनतेसमोर मांडायचा आहे. पुणेकर नेहमी भाजपच्या पाठीशी उभे राहिले आहेत. सत्तेत असताना जी विकासकामे केली ती जनतेपर्यंत पोहोचवणे आपले काम आहे. विविध विषय निवडणूक काळात मांडले जातील, पण आपण केवळ विकासाच्या मुद्द्यावर लक्ष्य केंद्रित करावे असेही ते म्हणाले.
मुंबई महापालिकेच्या कायद्याचा गंध नसलेल्या आणि अभ्यासाचा पत्ता नसलेल्या आदित्य ठाकरे व अमित ठाकरे यांचे वर्कशॉप म्हणजे निव्वळ फ्लॉप शो असल्याची जहरी टीका शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी केली आहे. “ज्या मुलांनी होमवर्कच केलेला नाही त्यांचा अर्धवट वर्कशॉप मुंबईकरांची दिशाभूल करणारा आहे,’ अशी टीका शेवाळ यांनी केली. “दोन युवराजांचे सादरीकरण म्हणजे एखाद्या कंपनीच्या संचालकांसाठी केलेले प्रेझेंटेशन वाटत होते. पालिकेच्या नियमावलीची साधी जाण नसलेल्या या जोडगोळीला वर्कशॉपला पाठवण्यापूर्वी पालकांनी थोडा अभ्यास करायला लावायला हवा होता. हे दोन्ही युवराज मुंबईकरांना फसवण्याचे पाप करत आहेत.” घोषणांची चिरफाड आणि पोलखोल शेवाळे यांनी आकडेवारीनिशी उबाठा आणि मनसेच्या दाव्यांमधील हवा काढून घेतली. मुख्य मुद्द्यांवर त्यांनी केलेली टिप्पणी खालीलप्रमाणे आहे. “म्युच्युअल फंड’प्रमाणे सावधान राहावे शेवाळे यांनी शेवटी मतदारांना इशारा दिला की, “ज्याप्रमाणे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना जोखीम असते तसेच उबाठा-मनसेला मतदान करणे म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेणे आहे. एकदा फसवणूक झाली की निवडणूक आयोगही तुम्हाला वाचवू शकणार नाही.” लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांनी आता घरकाम करणाऱ्या महिलांचा पुळका आणणे हा निव्वळ दुटप्पीपणा असल्याचा घणाघातही त्यांनी या वेळी केला. ७०० चौ. फूट करमाफीआदित्य-अमित यांची ही घोषणा पूर्णपणे दिशाभूल करणारी आहे. मुंबई महापालिकेला अशा प्रकारची करमाफी देण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. हा सर्वस्वी राज्य सरकारच्या नगरविकास खात्याचा अखत्यारीतला विषय आहे. १०० युनिट मोफत वीज वीज दरांबाबतची आश्वासने देणे म्हणजे तांत्रिक अज्ञानाचा कळस आहे. वीजदराचा कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार महापालिकेकडे नसून ते राज्य वीज नियामक आयोग (एमईआरसी) कडे राखीव आहेत. राजकीय ताकद : २० आमदार आणि ८ खासदारांच्या जिवावर राज्याचे कायदे बदलण्याची भाषा करणे ही मतदारांची शुद्ध फसवणूक आहे. कायदे बदलण्यासाठी लागणारे संख्याबळ आणि घटनात्मक प्रक्रिया यांची साधी जाणही या “युवराजांना’ नाही.
महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांना अवघी एकच जागा सोडल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप–शिवसेना महायुतीत घटक पक्ष असतानाही रिपब्लिकन पक्षाला थेट उमेदवारी देण्यात कंजूषपणा करण्यात आला आहे. मात्र, या रिपब्लिकन पक्षाने मुंबईत १३ वॉर्डांत स्वबळावर उमेदवार उभे करीत भाजप आणि राकाँपा अजित पवार गटाला मोठे आव्हान दिले आहे. महायुतीकडून शिवसेनेच्या कोट्यातील चेंबूर पांजरापोळ परिसरातील एकमेव जागा रिपाइंला सोडण्यात आली आहे. या ठिकाणी रिपाइंच्या कार्यकर्त्या प्रज्ञा सुनील सदाफुले या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. ही जागा सोडण्याचा दिलदारपणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवल्याचे स्पष्ट करीत भाजपला टोला लगावला आहे. रिपाइंने ३८ जागांवर उमेदवार फायनल केले होते, मात्र प्रत्यक्षात १३ जागा लढवत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतरही रिपाइंच्या पदरात एकच जागा पडली आहे. त्यामुळे त्यांची निराशा झाली आहे. या वॉर्डात भाजप, राकाँपाशी सामना भाजपचे उमेदवार असलेल्या वॉर्ड ५४, ५९,६५,१०४, १८६ या पाच वॉर्डांत आणि राकाँपा अजित पवार गटाचे उमेदवार असलेल्या वॉर्ड ३८,३९,५९, ११९, १८८ वॉर्डात रिपाइंचे उमेदवार स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे मुंबईत शिवसेना-भाजप युती झाली असली तरी राकाँपा अजित पवार गट आणि रिपाइं उमेदवारांचा मित्रपक्षांबरोबरच सामना रंगताना दिसणार आहे.
सुव्यवस्थित बाजारपेठा आणि मोहल्ल्यांचे हे शहर म्हणून ओळख असलेला शहराचा जुना भाग आता वाढत्या लोकसंख्येच्या आणि अपुऱ्या सोयी-सुविधांच्या ओझ्याखाली दबला आहे. गुलमंडी, सिटी चौक, सराफा आणि शहागंज हे भाग शहराचे मुख्य व्यापारी केंद्र आहेत. मात्र, येथील रस्ते अत्यंत अरुंद आहेत. प्रत्येक सणावाराला या भागातील रस्ते गजबजून जातात. प्रमुख व्यापारीपेठ असल्यामुळे रस्त्यांवर कायम हातगाडी, फेरीवाले, लहान-मोठे विक्रेते कायम असतात. यामुळे या भागात चारचाकी वाहने घेऊन जाणे म्हणजे मोठी कसरत. अरुंद गल्ल्यांमुळे या भागात राहणाऱ्या बहुतांश रहिवाशांची पार्किंग थेट रस्त्यावर. त्यामुळे रस्त्यांवर कायम वाहतुकीची कोंडी. जाफर गेट, जुना मोंढा या परिसरामध्ये दिवस-रात्र मोठ्या वाहनांचीही ये-जा असल्यामुळे येथील रस्ता व स्वच्छतेचा प्रश्न कायम आहे. कुंवारफल्ली, केळीबाजार आणि मछली खडक, सिटी चौक, जाफर गेट भागात अधिकृत पार्किंग नसल्याने ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात, त्याने वाहतूक कोंडी होते. सिटी चौक भागात खरेदीसाठी आलेल्यांना गाडी थेट औरंगपुरा येथील नाथ मंदिरासमोर लावावी लागते. जलवाहिन्या, ड्रेनेजलाइन जुनी : जुन्या शहरातील नारळीबाग, खोकडपुरा आणि नवाबपुरा यांसारख्या भागात ड्रेनेज, पाणीपुरवठ्याची यंत्रणा अत्यंत जुनी झाली आहे. त्यामुळे जलवाहिनी, ड्रेनेज फुटण्याचे प्रकार वारंवार घडतात. १२५ कोटींचा खर्च : गेल्या १० वर्षांत प्रभागात १२५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यातून काही भागात नवी ड्रेनेजलाइन, पथदिवे, रस्ते यांची कामे प्रामुख्याने करण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. क्र. १५ : राजाबाजार, गुलमंडी, औरंगपुरा, गांधीनगर २०१५ : पक्ष, नगरसेवक, मतदान वॉर्ड क्र. उमेदवार, पक्ष मतदान४७ यशश्री बाखरिया, अपक्ष २,५४८४८ राजू तनवाणी, अपक्ष २,१५६५३ बबिता चावरिया, भाजप २,००६५४ रामेश्वर भादवे, भाजप १,२१४प्रभागाची व्याप्ती : नारळीबाग, सिटी चौक, कुंभारवाडा, मछली खडक, दिवाण देवडी, केळी बाजार, अंगुरीबाग, राजाबाजार, जाधवमंडी, कुंवारफल्ली, मोतीकारंजा काही भाग, धावणी मोहल्ला काही भाग, गुलमंडी, गांधीनगर, खोकडपुऱ्याचा काही भाग 1. कचरा व्यवस्थापन : मंडईमधील भाजीच्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचा त्रासशहागंज भागात रस्त्याच्या शेजारी असलेले फळ विक्रेते, जवळच भाजीमंडईत रोज तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसल्याने दुर्गंधी पसरते. 2. रस्ते : भररस्त्यामध्येच रिक्षांच्या थांब्यांमुळे कायम वाहतुकीची कोंडीप्रभागात अनेक ठिकाणी लहान गल्ल्या आहेत. येथून चारचाकी वाहने नेणे मोठे आव्हान आहे. राजाबाजार, अंगुरीबाग, जाधवमंडीत रस्त्यावरच रिक्षांचे थांबे आहेत. त्यामुळे रस्ता आणखी लहान झाला आहे. 3. पाणीपुरवठा : ड्रेनेजलाइन फुटल्याने नळातून होतो दूषित पाण्याचा पुरवठाया प्रभागामध्ये ८ ते १० दिवसांनी पाणी येते. अनेक ठिकाणी ड्रेनेजलाइन फुटल्यामुळे ते दूषित पाणी जलवाहिनीत शिरते आणि तेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी येते.
95 % बंडखोरी शमवण्यात यश- भाजप:बंडखोरांशी संवादाची जबाबदारी नेत्यांकडे वाटून दिल्याने लाभ
महापालिका निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर येथे भाजपच्या वतीने तब्बल १,४०० कार्यकर्ते इच्छुक होते. भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडून महापालिकेच्या ९५ जागांवर अधिकृत उमेदवार घोषित केले आहेत. शेवटच्या दिवशी भाजपला मातब्बर उमेदवारांची बंडखोरी शमवण्यात यश आले. यात लता दलाल, दिव्या मराठे, वर्षा साळुंखे, मनीषा मुंडे, जगदीश सिद्ध, सतीश खेडकर आदींचा समावेश आहे. सुमारे ९५ टक्के बंडखोरांचे बंड शमवण्यात यश आल्याचा दावा पक्षाने केला आहे. भाजपने बंडखोरांना शमवण्यासाठी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यांची समिती नियुक्त केली होती. संबंधित सदस्यांना प्रत्येकी पाच प्रभाग वाटून दिले होते. प्रत्येक सदस्याने प्रभागातील बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधत त्यांना अधिकृत उमेदवारांविरुद्ध लढू नये, अशी गळ घातली. या प्रयत्नांमुळे अनेक दिग्गज उमेदवारांनी आपली बंडखोरी मागे घेतली. यासाठी भाजपचे मंत्री सावे यांनी व्यूहरचना आखली. प्रदेश स्तरावरून यासंबंधीचे निर्देश मिळताच सावे, डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर, किशोर शितोळे, बसवराज मंगरुळे, शिरीष बोराळकर या समितीने काम हाती घेतले. प्रत्येकाने ५ प्रभागांतील बंडखोरांवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी ६४ जणांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले. प्रदेशाच्या नेत्यामुळे माघार भाजपविरोधात शिवसेना अधिकृत ए, बी फॉर्म देण्यास तयार होती. आपण स्थानिक नेत्यांच्या सांगण्यावरून आपली बंडखोरी मागे घेतली नसून, प्रदेश स्तरावरील नेत्याच्या सांगण्यावरून व स्वेच्छेने बंडखोरी मागे घेतली. - मनीषा मुंडे, माजी शहर अध्यक्ष, महिला आघाडी, भाजप. सत्ताधारी म्हणून फायदा भाजपच्या अनेक बंडखोरांना केंद्र व राज्याच्या योजनांमध्ये सामावून घेतलेले आहे. अनेकांना भाजपने विविध कामांची कंत्राटे दिली. बंडखोरी केल्यास कामे जातील या भीतीपोटी अनेकांनी उमेदवारी मागे घेतल्याचे मानले जाते.

24 C