मराठा समाजाच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी आणि समाजाच्या सुख-दुःखाकडे पूर्णवेळ लक्ष देण्यासाठी राज्यात स्वतंत्र 'मराठा आणि कुणबी' मंत्रालय स्थापन करावे, अशी आग्रही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. धाराशिव येथे भीम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मराठा आरक्षण उपसमितीच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष देणे हे उपसमितीचे काम आहे, मात्र ही समिती नेमके काय करते, हेच कळायला मार्ग नाही. सातारा गॅझेटचा अहवाल येऊन आठ महिने उलटले, तरी अद्याप त्यावर निर्णय का घेतला नाही? आणखी किती दिवस आम्ही वाट पाहायची? उपसमिती समाजाचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरली असून ती तात्काळ बरखास्त करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 'विदूषकां'साठी वेळ असलेल्या मंत्र्यांकडे समाजासाठी वेळ नाही महसूल मंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका करताना जरांगे पाटील यांची जीभ चांगलीच घसरली. ते म्हणाले, मराठवाड्यात मराठा समाजाची एक बैठक लावण्यासाठी विखे पाटलांकडे वेळ नाही. मात्र, उपद्रवी विदूषक लोकांसाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे. विखे पाटलांनी उपसमितीच्या अध्यक्षपदावरून स्वत:चे नाव घालवले आहे. विखे पाटलांनी समाजाचा विश्वास गमावल्याचा थेट आरोपही त्यांनी यावेळी केला. कष्ट करा, आळस सोडा; तरुणांना सल्ला आरक्षणासोबतच जरांगे पाटील यांनी समाजातील तरुणांच्या लग्नाळू प्रश्नांवर आणि शेतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न व्हायची असतील तर शेतीतून उत्पन्न निघण्याची गरज आहे. त्यासाठी पाणी गरजेचे आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मरत आहेत. पोरांनींही कष्ट करण्याची गरज आहे, उद्योगधंद्याकडे वळायला हवे. घरात खायला नाही तर कोण पोरगी देणार तुम्ही कष्ट करा, उद्योग धंद्याकडे वळा. आळशी पणा सोडला पाहिजे कष्ट करायला हवे शेतीतून खूप पैसा आहे. काम करायचे नसेल तर लग्नाचे काय सांगू असे म्हणत जरांगे पाटलांनी लग्नाळू तरुणांना सल्ला दिला.
जरांगेंना मारण्याचा कराड गँगचा प्लॅन?
बीड : जिल्हा कारागृहात पुन्हा एकदा कराड गँगची दहशत चर्चेमध्ये आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले यांनी एका कैद्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. जेलमध्ये घडलेला प्रकार कैद्याकडून दादासाहेब खिंडकर यांना सांगतानाची एक कथित ऑडिओ क्लीपदेखील व्हायरल झाली आहे. या संदर्भात जेल प्रशासनाकडून मारहाण झालेल्या कैद्याला विचारणा करण्यात आली, […] The post जरांगेंना मारण्याचा कराड गँगचा प्लॅन? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक वारसा दिनानिमित्त आयोजित 'हेरिटेज वॉक'मधून सातारा परिसरातील ऐतिहासिक खंडोबा मंदिरात एक अनोखा 'किरणोत्सव' उघडकीस आला आहे. दोन ते अडीच शतकांपूर्वीच्या भारतीय शिल्पकारांच्या खगोलशास्त्रीय कौशल्याचा हा एक अद्भुत पुरावा आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः हा विलोभनीय सोहळा कॅमेऱ्यात कैद केला. 'इंटॅक' आणि 'सहपीडिया' यांच्या वतीने आयोजित या हेरिटेज वॉकमध्ये पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर सहभागी झाले होते. मंदिराला भेट दिल्यानंतर पुजाऱ्यांनी येथील किरणोत्सवाचा उल्लेख केला. या माहितीची सत्यता पडताळण्यासाठी औंधकर आणि पवार यांनी अधिक चौकशी केली असता, हा किरणोत्सव बुधवारपासून सुरू होत असल्याचे समोर आले. ठरल्याप्रमाणे, आज सकाळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर मंदिरात उपस्थित होते. सूर्य वर येताच, त्याची किरणे गर्भगृहाच्या झरोक्यातून मंदिरात प्रवेशली. हा प्रकाशझोत खंडेरायाच्या देव्हाऱ्याच्या कळसाकडून हळूहळू खाली सरकत चरणांपर्यंत पोहोचला, ज्यामुळे संपूर्ण गर्भगृह सोनेरी प्रकाशाने उजळून निघाले. सुमारे दोन ते अडीच शतकांपूर्वी कोणत्याही आधुनिक उपकरणांशिवाय भारतीय शिल्पकारांनी खगोलशास्त्राचा अचूक अभ्यास करून हे मंदिर उभारले होते. सूर्याच्या उत्तरायण-दक्षिणायन स्थितीचा विचार करून झरोक्यांची केलेली रचना आजही तितकीच अचूक ठरत आहे. श्री. पवार आणि श्री. औंधकर यांच्या प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक वारसा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. हा 'किरणोत्सव' उद्या आणि परवा, म्हणजेच २३ व २४ एप्रिल रोजी सकाळी ८:३० ते ९ या वेळेत भाविकांना पाहता येणार आहे. नागरिकांनी या अद्भुत खगोलीय अविष्काराचे साक्षीदार होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई केली आहे. मध्यवर्ती भागात केलेल्या या धडक मोहिमेत ५१७० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, संबंधित विक्रेत्यांकडून ₹७५,००० दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई झोन क्र. २ अंतर्गत अंगुरी बाग आणि जुना मोंढा परिसरातील ३ ते ४ दुकानांची तपासणी करून करण्यात आली. यामध्ये शालिमार प्लास्टिक, संजय प्लास्टिक, एनबी प्लास्टिकसह इतर स्थानिक विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान, या विक्रेत्यांच्या शहरातील विविध दुकाने, गोदामे आणि ट्रान्सपोर्ट कंपन्यांवरही छापे टाकून प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जप्त केलेले प्लास्टिक हर्सूल कचरा प्रक्रिया केंद्रावर श्रेडिंग करून तात्काळ विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिकेकडून प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात सातत्याने जनजागृती केली जात असून, नागरी मित्र पथकाद्वारे नियमित कारवाई सुरू आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकची वाहतूक आणि विक्री होत असल्याने ही विशेष मोहीम राबवण्यात आली. मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त रमेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरी मित्र पथकाने ही कारवाई केली. या पथकात देविदास सुसर, बालाजी साबळे, सुवर्णसिंग परदेशी, जनार्दन सांगळे, संतोष बनकर, किशन निकम, ज्ञानेश्वर पाटील, रतन वाघ, नारायण फुके, जयेश मगरे यांचा समावेश होता. यावेळी स्वच्छता अधिकारी अनिल जाधव, स्वच्छता निरीक्षक सचिन मिसाळ, अभिजित गंगावणे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. महापौर समीर राजूरकर यांनी सांगितले की, शहरात प्लास्टिकचा सर्रास वापर खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून महानगरपालिकेला सहकार्य करावे आणि पर्यायी साधनांचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले. आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले की, यापुढेही शहरात प्रतिबंधित प्लास्टिकची विक्री किंवा वापर आढळल्यास कठोर कारवाई करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. दरम्यान, नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत प्लास्टिक बंदीवर सविस्तर चर्चा झाली होती. महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, सभागृह नेते गोविंद केंद्रे, विरोधी पक्षनेते समीर सय्यद यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांनी शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी एकमताने भूमिका घेत प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
मुंबई : प्रतिनिधी २००६ मधील बहुचर्चित आणि संवेदनशील असलेल्या मालेगाव साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पुराव्यांच्या अभावामुळे या चौघांविरुद्धचे दोषारोप न्यायालयाने रद्द केले असून, त्यांना या प्रकरणातून मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे संबंधित आरोपींवरील खटल्याची प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे. ८ सप्टेंबर २००६ रोजी मालेगावमध्ये शब-ए-बारातच्या […] The post मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील ४ आरोपींची निर्दोष मुक्तता! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील साडेचार लाख हेक्टरहून अधिक असलेल्या देवस्थान इनाम जमिनींच्या हस्तांतरणाबाबतचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील तीन दिवसांत कायद्याचा मसुदा सार्वजनिक केला जाणार आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. एक महिन्याचा वेळ हरकती व सूचना नोंदवण्यासाठी जनतेला दिला जाईल. त्यांच्या सूचनांचा विचार करून जुलैमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात या कायद्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. देवस्थान, कुळ आणि वहिवाटदारांचे हक्क निश्चित करण्यासाठी राज्य सरकार एक सर्वसमावेशक कायदा असेल, असे ते म्हणाले. राज्यात विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर देवस्थान इनाम जमिनी आहेत. या जमिनींवर काही ठिकाणी कुळांची नावे तर काही ठिकाणी वहिवाटदार पिढ्यानपिढ्या शेती करत आहेत. मात्र, देवस्थान जमिनी असल्याने त्यांच्या हस्तांतरणावर बंदी असल्याने अनेक विकासकामे रखडली असून शेतकऱ्यांनाही आपल्या जमिनीबाबत कोणतेही ठोस निर्णय घेता येत नव्हते. ही कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार हा नवीन कायदा तयार करण्यात येत आहे, असेही त्यांनी माध्यमाना सांगितले. 18 प्रस्तावांना CM फडणवीसांची मंजुरी दरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹2,56,137.01 कोटींच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची 14 वी बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू तसेच विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते. सविस्तर वाचा…
नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात हिला मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. राहता सत्र न्यायालयाने कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आज पार पडलेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंनी सुमारे सव्वा तास जोरदार युक्तिवाद झाला, मात्र सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला. कल्पना खरातवर पती अशोक खरात याच्या कथित बेकायदेशीर कृत्यांमध्ये सक्रिय साथ दिल्याचा आरोप आहे. तपासात असे समोर आले आहे की, अनेक बँक व्यवहार आणि जमिनीच्या खरेदी-विक्रीत तिचा थेट सहभाग होता. शिर्डीतील एका शेतकऱ्याची जमीन खरेदी प्रकरणात मोठी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप तिच्यावर आहे. या व्यवहारांतील पैसे कल्पनाच्या भावांच्या खात्यातून वळवण्यात आल्याचेही एसआयटी (SIT) तपासात उघड झाले आहे. न्यायालयात काय झाला युक्तिवाद? कल्पना खरात ३१ मार्चपासून फरार असून, तिने वकिलामार्फत न्यायालयात आपली बाजू मांडली होती. आज तिच्या अटपूर्व जामिनावर राहता न्यायालयात सुनावाणी पार पडली. या सुनावणीदरम्यान कल्पना खरातचे वकील प्रशांत गिरी यांनी तिचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. प्रशांत गिरी यांनी असा युक्तिवाद केला की, कल्पना ही केवळ गृहिणी असून अशोक खरातच्या कथित गैरकृत्यांशी तिचा कोणताही थेट संबंध नाही. तिची सर्व बँक खाती अशोक खरातच हाताळत होते आणि व्यवहारांच्या कोणत्याही बैठकीत ती उपस्थित नव्हती, असा दावा करण्यात आला. मात्र, सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी हे सर्व मुद्दे खोडून काढले. आरोपी महिला जाणीवपूर्वक तपास यंत्रणेला सहकार्य करत नसल्याचा आणि ती देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता असल्याचा मुद्दा पोलिसांनी लावून धरला. पुढील कारवाई काय? कल्पना खरात देशाबाहेर पळून जाऊ नये, यासाठी पोलिसांनी यापूर्वीच तिच्याविरोधात 'लूकआऊट नोटीस' जारी केली आहे. तिचा जामीन अर्ज फेटाळल्या गेल्यामुळे आता पोलिस तिला कोणत्याही क्षणी अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी या प्रकरणात तिचा मुलगा हर्षवर्धन आणि तिच्या दोन भावांचीही कसून चौकशी केली आहे. अशोक खरातसोबत १९९३ मध्ये विवाह पोलिस तपासातून कल्पना खरातच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक बाबी समोर आल्या आहेत. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पाडळी येथील सुनीता शिंदे ही १९९३ मध्ये अशोक खरातशी विवाहबद्ध झाल्यानंतर 'कल्पना खरात' झाली. तिचे प्राथमिक शिक्षण पाडळीत, तर माध्यमिक शिक्षण ठाणगावमधील डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात झाले. दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार असलेल्या कल्पनाची सुरुवातीला केवळ पत्नी म्हणून असलेली तिची ओळख नंतर अशोक खरातच्या फसवणुकीच्या आणि बेनामी मालमत्तेच्या व्यवहारांमधील मुख्य भागीदारीत बदलली गेल्याचे निष्पन्न झाले आहे.
पुणे शहर महिला काँग्रेसने बुधवारी महिला आरक्षण विधेयक त्वरित लागू करण्याची मागणी करत भारतीय जनता पक्षाविरोधात आंदोलन केले. पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भाजपने खोटा प्रचार थांबवून २०२३ मध्ये संसदेने मंजूर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बालगंधर्व रंगमंदिराजवळील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात हे आंदोलन झाले. आंदोलकांनी 'भाजप हटाओ, महिला आरक्षण बचाओ', 'आरक्षणावर घाला घालणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो', 'महिला आरक्षण लागू करा, नाहीतर खुर्च्या खाली करा', 'आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचे' अशा घोषणांचे फलक हातात घेतले होते. यावेळी बोलताना स्वाती शिंदे यांनी मोदी सरकारवर टीका केली. महिला आरक्षणाचे श्रेय घेण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न केविलवाणा असल्याचे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने यापूर्वीच घेतला असून, महापालिका, जिल्हा परिषदा आणि सहकारी संस्थांमध्ये त्याची अंमलबजावणीही झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करत फिरू नये, अशा शब्दांत स्वाती शिंदे यांनी भाजप नेत्यांना खडसावले. महिलांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष नेहमीच कटिबद्ध राहिला असल्याचेही त्यांनी नमूद केले. या आंदोलनात नगरसेसेविका अश्विनी लांडगे, अनिता मकवाना, प्राजक्ता जाधव, प्रियांका रणपिसे, अंजली सोलापुरे, नयना सोनार, रेखा जैन, ॲड. अंजली देसाई, कनहर आदरखान, ॲड. राजश्री दामले-चव्हाण, मनोरमा चौधरी, कल्पना शिंदे, ज्योती अडागळे, मनिषा धेंडे, ऋग्वेदी सपकाळ, सुमन हरिश्चंद्र सूर्यवंशी, पूजा सपकाळ, सुरेखा मारणे, पौर्णिमा नाईकमोडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
पुण्यात सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची १८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दहशतवादी कारवायांमध्ये बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगून आणि अटकेची भीती दाखवून ही फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी मोबाईलवर संपर्क साधला. दहशतवादी कारवाईत त्यांच्या बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगत, अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करण्याची धमकी दिली. या धमक्यांना बळी पडून ज्येष्ठ नागरिकांनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी १८ लाख रुपये जमा केले. पैसे जमा झाल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान, पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे शहरातील नऱ्हे आणि पाषाण परिसरात अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहेत. सिंहगड रस्ता भागातील नऱ्हे येथे एका ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ९० हजार रुपयांची सोन्याची साखळी चोरट्यांनी लांबवली. २० एप्रिल रोजी रात्री सव्वादहा वाजता दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवले. परिसरात चोरीच्या घटना वाढल्याचे सांगून, सोन्याची साखळी काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवण्यास सांगितले. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडून सोन्याची साखळी घेतली आणि ती कागदात गुंडाळण्याचा बहाणा केला. बोलण्यात गुंतवून त्यांनी ९० हजार रुपयांची सोन्याची साखळी चोरून नेली आणि कागदाची पुडी डिक्कीत ठेवण्यास सांगितले. याप्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक घाडगे तपास करत आहेत. पाषाण परिसरातही एका ज्येष्ठ महिलेकडील १ लाख ७० हजार रुपयांची सोन्याची साखळी पोलीस असल्याची बतावणी करून चोरट्यांनी लांबवली. २१ एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता पाषाणमधील रिलायन्स मॉलसमोर ही घटना घडली. दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेला अडवून पोलीस असल्याचे सांगितले. चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेला बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील १ लाख ७० हजार रुपयांची सोन्याची साखळी चोरून नेली. याप्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात दोन दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू:विश्रांतवाडी, लोणी काळभोर परिसरात घडल्या घटना
पुणे शहरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. विश्रांतवाडी आणि पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात या घटना घडल्या. विश्रांतवाडी येथे भरधाव दुचाकी घसरल्याने अजयकुमार डोमन मंडल (वय ३०, रा. येरवडा, मूळ बिहार) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी सुजीत सहानी (वय ३०, रा. विश्रांतवाडी) जखमी झाला. सहानी यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजयकुमार आणि सुजीत विश्रांतवाडी परिसरातून जात असताना, फुलेनगरजवळ अजयकुमारचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यावर घसरली गेली. दुचाकी घसरल्याने अजयकुमारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अजय याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक शेख या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरी घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर भागात घडली. मंगळवारी (२१ एप्रिल) दुपारी दोनच्या सुमारास डंपरच्या धडकेत गैारीशंकर शिवराज सपळे (वय ३५, रा. गुनवडी, बारामती, मूळ बेळम, ता. उमरगा, जि. धाराशिव) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गौरीशंकर यांचा भाऊ शिवशंकर (वय ३८, रा. बेळम) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरीशंकर पुणे-सोलापूर रस्त्यावरून जात असताना, कदमवाक वस्ती परिसरात एका टँकरने त्यांना जोरात धडक दिली. अपघातानंतर टँकरचालक घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या गौरीशंकर यांचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रुपाली जाधव पुढील तपास करत आहेत.
राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹2,56,137.01 कोटींच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची 14 वी बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी.अन्बळगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासू तसेच विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते. 18 प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांची मान्यता या बैठकीमध्ये थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित सोलर सेल, मॉड्युल, इग्नॉट, वेफर्स, ग्रीन स्टील, हरित अमोनिया, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, अवकाश व संरक्षण साहित्य, लिथियम आयन बैटरी, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती/साहित्य, स्टील व गॅस टू केमिकल निर्मितीचे विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्यासाठीच्या 18 प्रस्तावांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली. प्रमुख गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांत औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच तांत्रिक नवकल्पना, संशोधन-विकास आणि मजबूत पुरवठा साखळी निर्माण होण्यास मदत होईल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही याचा लाभ होणार आहे. याशिवाय, स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण व कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होणार आहे.
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात
कोलकाता : अमेरिकेने इराणच्या विरोधात सुरू केलेली नाकेबंदी आता केवळ आखाती देशांपुरती मर्यादित राहिलेली नाही. २१ एप्रिल २०२६ रोजी अमेरिकन सैन्याने बंगालच्या खाडीत, म्हणजेच श्रीलंका आणि इंडोनेशिया यांच्या दरम्यान असलेल्या आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात टिफनी नावाचे तेलवाहू जहाज जप्त केले. जप्त केलेले जहाज बोत्सवानाचा झेंडा लावून फिरत होते, मात्र ते इराणचे डार्क फ्लीट असून प्रतिबंध झुगारून तेलाची […] The post अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमेरिका-इराणच्या वादामुळे जपानला दणका
टोकियो : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आणि अमेरिकेची संरक्षणवादी व्यापारी धोरणे याचा फटका आता जपानच्या अर्थव्यवस्थेला बसू लागला आहे. मध्यपूर्वेतील अस्थिरतेमुळे जपानला तब्बल १७०० अब्ज येन म्हणजेच सुमारे १ लाख कोटी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. सलग पाचव्या वर्षी जपानला व्यापार तुटीचा सामना करावा लागत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. […] The post अमेरिका-इराणच्या वादामुळे जपानला दणका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारत-न्यूझीलंड करार म्हणजे ‘बटर चिकन त्सुनामी’!
ऑकलंड : न्यूझीलंडमधील एका वरिष्ठ मंत्र्याने भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नियोजित असलेल्या मुक्त व्यापार कराराबाबत केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय बनले आहे. न्यूझीलंडमधील या मंर्त्याने दोन्ही देशांमधील हा कराराला ‘बटर चिकन त्सुनामी’ असे म्हटल्याने संताप व्यक्त केला जात आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मुक्त व्यापार करारावर पुढच्या आठवड्यात दिल्लीत स्वाक्षरी केली जाणे अपेक्षित आहे. न्यूझीलंड […] The post भारत-न्यूझीलंड करार म्हणजे ‘बटर चिकन त्सुनामी’! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तेहरान : अमेरिका आणि इराणमधील युद्धात पाकिस्तानने मध्यस्ती केली. ८ एप्रिल रोजी झालेला युद्धविरामही पाकिस्तानशी चर्चा करून घेतला असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. तर, आजही पाकिस्तानशी चर्चा करून शस्त्रसंधी कायम ठेवली असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले. एकीकडे अमेरिकेकडून पाकिस्तानचे आभार मानले जात असताना इराणने मात्र पाकिस्तानवर दुहेरी खेळ खेळत असल्याचा आरोप केला आहे. विशेष […] The post पाककडून डबल गेम सुरू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रामध्ये '१०८' रुग्णवाहिका सेवेने आपत्कालीन वैद्यकीय सेवेत महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. या सेवेमुळे आतापर्यंत ५ लाख ४६ हजार १० अपघातग्रस्तांचे प्राण वाचले आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत घटनास्थळी पोहोचून रुग्णांना तातडीचे उपचार देणे आणि त्यांना सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करण्यात या सेवेने मोठे यश मिळवले आहे. ही सेवा 'भारत विकास ग्रुप' (बीव्हीजी) द्वारे महाराष्ट्रात संचालित केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने ही यंत्रणा २४ तास वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी कार्यरत आहे. बीव्हीजीने सुविधा व्यवस्थापन क्षेत्रात देशात आपले स्थान निर्माण केले असून, ही सेवा महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीरमध्येही यशस्वीपणे राबवली जात आहे. '१०८' रुग्णवाहिका सेवेचा सर्वाधिक फायदा दुर्गम आणि आदिवासीबहुल जिल्ह्यांना झाला आहे. नंदुरबार, गडचिरोली, धुळे, पालघर, नाशिक, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये एकूण १ लाख २१ हजार ६८५ अपघातग्रस्तांना या सेवेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत. दुर्गम भागात, जिथे पोहोचणे आव्हानात्मक असते, तिथे ही सेवा खऱ्या अर्थाने जीवनदायिनी ठरली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण लक्षात घेता, तेथे २१ आपत्कालीन पथके २४ तास तैनात करण्यात आली आहेत. या पथकांनी आतापर्यंत ५८९ अपघातग्रस्तांना तातडीची मदत देऊन त्यांचे प्राण वाचवले आहेत. बीव्हीजीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले की, आरोग्य विभागाने सोपवलेली जबाबदारी आम्ही निष्ठेने पार पाडत आहोत. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान कर्मचाऱ्यांनी भारतीय सैन्यदलासोबत समन्वय साधून केलेले कार्य उल्लेखनीय आहे. या शौर्याबद्दल लवकरच या 'वीर योद्ध्यांचा' विशेष गौरव करण्यात येणार आहे.
'सुराज्य अभियाना'ने प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रस्ते विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली शहरांमधील वृक्षांची 'मूक हत्या' केली जात असल्याचे अभियानाच्या राज्यव्यापी पाहणीत समोर आले आहे. झाडांभोवती बेकायदेशीरपणे काँक्रीट ओतणाऱ्या कंत्राटदारांवर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर 'नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल' (एनजीटी) कायद्याच्या कलम २६ अन्वये फौजदारी कारवाई करण्याची मागणी अभियानाने केली आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत 'सुराज्य अभियाना'चे जिल्हा समन्वयक पराग गोखले यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबई महानगरपालिकेने 'वृक्ष संजीवनी' मोहीम सुरू केली असली, तरी झाडांभोवती काँक्रीट ओतण्याची वेळच का येते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रस्ते बांधताना एनजीटीच्या आदेशांचे उल्लंघन करून झाडांच्या बुंध्यापर्यंत काँक्रीट ओतले जात असल्याचे गोखले यांनी निदर्शनास आणले. अभियानाने महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या विविध शहरांमध्ये केलेल्या पाहणीत वृक्ष संवर्धनाची दयनीय स्थिती समोर आली. पुणे महानगरपालिकेने गेल्या दोन वर्षांत लावलेल्या १७ हजार ५३३ झाडांच्या सद्यस्थितीबाबत कोणताही अधिकृत डेटा उपलब्ध नसल्याची कबुली दिली आहे. १७ हजार झाडे 'बेपत्ता' असणे हा जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा अपहार असून, प्रशासनाने पर्यावरणाची क्रूर थट्टा चालवली असल्याचा आरोप पराग गोखले यांनी केला. अधिवक्ता दत्तात्रय देवळे यांनी एनजीटीच्या आदेशांचा संदर्भ दिला. त्यानुसार, झाडांभोवती किमान १ मीटर जागा कच्ची ठेवणे बंधनकारक आहे. तसेच, झाडांवर खिळे ठोकणे किंवा त्यांना इजा पोहोचवणे हा 'महाराष्ट्र वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम १९७५' नुसार गुन्हा असल्याचे त्यांनी सांगितले. अभियानाने दिल्लीच्या धर्तीवर 'स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर' (एसओपी) तयार करण्याची, वृक्षारोपणाचे 'थर्ड पार्टी ऑडिट' करण्याची आणि नवीन कंत्राटांमध्ये झाडांभोवती जागा सोडल्याशिवाय देयके मंजूर न करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने येत्या ७ कामकाजाच्या दिवसांत ठोस कृती न केल्यास, एनजीटीमध्ये 'अवमान याचिका' आणि फौजदारी तक्रार दाखल करण्याचा इशारा सुरेंद्र महाजन यांनी दिला. या पत्रकार परिषदेला 'सुराज्य अभियाना'चे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी बुधवारी काँग्रेससह 'इंडी' आघाडीवर गंभीर आरोप केले. 'नारी शक्ती वंदन अधिनियम' आणि परिसीमन विधेयकाला विरोध करून काँग्रेसने महिलांसह महाराष्ट्रातील मतदारांच्या प्रतिनिधित्वाच्या हक्काचा विश्वासघात केला आहे, असे सूर्या म्हणाले. महिलांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार प्रणिली शिंदे यांच्या चर्चेच्या आवाहनावर सूर्या म्हणाले की, त्यांनी वेळ आणि जागा निश्चित करावी, आपण सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार आहोत. भाजप पुन्हा मोठ्या ताकदीने महिला विधेयक संसदेत आणणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. लोकसभा आणि सर्व विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'तील दुरुस्ती आणि परिसीमन विधेयक संसदेत पारित होऊ शकले नव्हते. या पार्श्वभूमीवर पुणे शहर भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेससह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि इतर विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. या पत्रकार परिषदेला युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ, प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, प्राजक्ता जोशी, प्रणव गंजीवाले आणि पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. सूर्या यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या प्रयत्नांनंतरही काँग्रेस आणि 'इंडी' आघाडीच्या घटक पक्षांनी महिला आरक्षणाचा मार्ग रोखला. संसदीय इतिहासात १९९६ पासून आजपर्यंत एकूण पाच वेळा महिला आरक्षण विधेयक संसदेत आले. प्रत्येक वेळी काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी सुनियोजित कट रचून महिला आरक्षणाला विरोध केला. भाजपने मात्र विरोधात असतानाही महिला आरक्षणाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. आगामी काळात संसदेत पुन्हा 'नारी शक्ती वंदन अधिनियम' मांडले जाईल आणि त्यावेळी कोणताही पक्ष महिलाविरोधी भूमिका घेण्याची हिंमत करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेसचा इतिहास महिलाविरोधी असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, काँग्रेसने महिलांच्या प्रगतीत कायम अडथळे आणले आहेत. हिंदू महिलांना हक्क देणाऱ्या 'हिंदू कोड बिला'ला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी विरोध केला होता, ज्यामुळे राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शहाबानो खटल्यातही काँग्रेसने व्होटबँकेचे राजकारण करत गरीब मुस्लिम महिलांवर अन्याय केला. तसेच, तिहेरी तलाकच्या अमानवी आणि बेकायदा प्रथेचे समर्थन केले, अशी टीका सूर्या यांनी केली. परिसीमन विधेयकामुळे महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यात लोकसभेच्या ५० टक्के जागा 'प्रो-रेटा' तत्त्वावर वाढविण्यात येणार होत्या. मात्र, काँग्रेससह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी याला विरोध केल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान होणार आहे, असे सूर्या म्हणाले. याबाबत मतदारांनी विरोधकांना जाब विचारला पाहिजे. विरोधकांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या ५४३ जागांची पुनर्रचना केल्यास महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ एक अतिरिक्त जागा येईल, असेही त्यांनी नमूद केले.
धडा शिकवायची हीच योग्य वेळ : मनसे
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली उपनगरातील ज्या रिक्षा आहेत, त्यांच्यासाठी ‘मी मराठी बोलतो, मला मराठी समजते आणि माझ्या रिक्षात तुम्ही बसू शकता’, या नवीन उपक्रमाला सुरुवात करत आहोत. उपनगरातील रिक्षांवर स्टिकर लावण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील मराठी प्रेमी जनतेला आमचे आवाहन आहे की, ज्या रिक्षांवर असे स्टिकर दिसेल, त्यांनीच […] The post धडा शिकवायची हीच योग्य वेळ : मनसे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळला
खोपोली : प्रतिनिधी साता-यानंतर खोपोलीतही शिवसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला असून शिवसैनिकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी खोपोलीत योग्य फिल्डिंग लावत थोरवे यांच्या जवळचे लोक फोडले. शिवसेनेतील अंतर्गत नाराजीचा फायदा उचलत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. शिवसैनिकांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे आमदार थोरवेंसह एकनाथ शिंदेंना जबर धक्का बसला आहे. […] The post शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत वाद उफाळला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जावयाने चक्क सासरवाडीच दिली पेटवून
नंदुरबार : संसाराचा गाडा ओढण्यासाठी पती-पत्नी महत्त्वाचे मानले जातात. कधीतरी दोघांमध्ये खटके उडणे साहजिक आहे. मात्र त्यातही रुसलेल्या पतीची किंवा पत्नीची माफी मागून नाते पूर्वीसारखे सुरळीत करणे ही देखील दोघांची जबाबदारी मानली जाते. मात्र धडगाव तालुक्यात रुसून माहेरी गेलेल्या पत्नीला सासरकडची मंडळी परत पाठवत नसल्याच्या रागातून, एका जावयाने चक्क सासरवाडीच पेटवून दिली असल्याची धक्कादायक घटना […] The post जावयाने चक्क सासरवाडीच दिली पेटवून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तब्बल १५० वर्षांनंतर जगावर ‘एल निनो’चे संकट
न्यूयॉर्क/नवी दिल्ली : यंदा संपूर्ण जग एका मोठ्या भीषण संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. १८७७-७८ मध्ये अशीच घटना घडली होती, ज्या घटनेने संपूर्ण जगात हाहाकार उडाला होता, त्याची पुनरावृत्ती २०२७ मध्ये घडू शकते असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे संकेत मिळत आहेत. जगभरातील हवामान तज्ज्ञांकडून यंदाच्या […] The post तब्बल १५० वर्षांनंतर जगावर ‘एल निनो’चे संकट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर ‘जग्वार-मिराज’चे ‘टेकऑफ’ आणि ‘लँडिंग’
सुलतानपूर : यूपीच्या सुलतानपूरमध्ये पूर्वांचल एक्सप्रेस-वेवर आज दुपारी २ वाजता लढाऊ विमानांचा एअर शो सुरू झाला आहे. सर्वात आधी वायुसेनेच्या सी २९५ ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टने एक्सप्रेस-वेवर बनवलेल्या धावपट्टीवर (रनवेवर) लँडिंग केली. नंतर जग्वारने उड्डाण केले. सुखोई आणि मिराज फायटर जेट्सनी टेकऑफ आणि लँडिंग केली. शो पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली आहे. ६ तास चालणा-या एअर शोसाठी ५ […] The post पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर ‘जग्वार-मिराज’चे ‘टेकऑफ’ आणि ‘लँडिंग’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लेन्सकार्टमधील ‘तिलक-हिजाब’ प्रकरण चिघळले
भोपाळ : आयवेअर कंपनी लेन्सकार्टच्या ड्रेस कोडवरून वाद वाढला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांमध्ये निदर्शने होत आहेत. हिंदू संघटनांशी संबंधित लोक गेल्या ४ दिवसांपासून या राज्यांमधील अनेक शहरांमधील लेन्सकार्ट स्टोअरमध्ये जाऊन कर्मचा-यांना टिळा लावत आहेत आणि कलावा बांधत आहेत. यादरम्यान, बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी कंपनीच्या प्रवर्तकांना सांगितले, ‘तू आपली […] The post लेन्सकार्टमधील ‘तिलक-हिजाब’ प्रकरण चिघळले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बंगळूरू : २०२३ च्या बंगळूरू तुरुंग कट्टरतावाद प्रकरणात एका महत्त्वपूर्ण निकालात, एनआयए विशेष न्यायालयाने सूत्रधार टी. नसीरसह सात आरोपींना दोषी ठरवले आहे. सर्व दोषींना सात वर्षांच्या सक्त कारावासाची आणि ४८,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात टी. नसीर व्यतिरिक्त सय्यद सुहेल खान, मोहम्मद उमर, झाहिद तबरेज, सय्यद मुदस्सिर पाशा, मोहम्मद फैसल रब्बानी आणि […] The post ७ दहशतवाद्यांना शिक्षा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे. या मतदानापूर्वी महायुतीने बारामतीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत जाहीर सभा घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेला संबोधित करताना, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन बारामतीकरांना केले. तसेच, विरोधातील उमेदवारांवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, काहींनी केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी या निवडणुकीत आपले अर्ज दाखल केले आहेत. या सभेला महायुतीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांची उपस्थिती विशेष चर्चेचा विषय ठरली. कारण, या पोटनिवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असून, त्या निवडणुकीच्या मैदानात आहेत. याच मुद्द्यावरून खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत खोचक टोला लगावला. घरच्याच व्यक्तीने विरोधात उमेदवारी अर्ज भरल्याचा संदर्भ देत सोनवणे यांनी मुंडेंना डिवचले आहे. बजरंग सोनवणे म्हणाले, बाहेरचे हवशे, गवशे, नवशे तिथे गेले असून आमच्या बीडच्या ताई देखील तिथे जाऊन निवडणुकीत उभारल्या आहेत. माझ्या पतीराजाला विचारून मी फॉर्म भरला, असे करुणा शर्मा (मुंडे) यांनी म्हटले होते. हा प्रकार नेमका काय? ही भानगड काय? हेच कळत नसल्याचे सोनवणे यांनी म्हटले आहे. तसेच प्रत्येक पक्षाने सुनेत्रा पवार यांना बिनशर्त पाठिंबा दिला पण निवडणूक ही कोणाची खोडी हे सुद्धा कळायला पाहिजे, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेत डिवचले आहे. दरम्यान, अजित पवारांच्या अपघात प्रकरणी बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले, ब्लॅक बॉक्स कुठे आहे? तपास कोणत्या दिशेने ऑफिशियली आणि अनऑफिशियली देखील माहीत नाही. महाराष्ट्राची इच्छा आहे, या गोष्टीचा तपास लागला पाहिजे आणि सत्य महाराष्ट्रासमोर आले पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येक सभेत या घटनेचा तपास सुरू आहे, असे सांगितले जाते. त्याबाबत मुख्यमंत्र्यांचे कौतुक, ते एखादी गोष्ट करायची असे म्हणतात पण कधी करणार तो दिवस कधी येणार याबाबत माहीत नाही, असे म्हणत सोनवणे यांनी टोला लगावला आहे.
रितेश-जिनिलिया देशमुख एसटीचे ब्रँड अँबेसिडर; विलासरावांच्या आठवणींना दिला उजाळा.
मुंबई: महाराष्ट्रात रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या वादावर आता अभिनेते आणि राज्याचे नवनिर्वाचित एसटी ब्रँड अँबेसिडर रितेश विलासराव देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य असायलाच हवी,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या निर्णयाचे समर्थन […] The post रितेश-जिनिलिया देशमुख एसटीचे ब्रँड अँबेसिडर; विलासरावांच्या आठवणींना दिला उजाळा. appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिक TCS छळ प्रकरण: कंपनीची ‘ती’मोठी चूक उघड; POSH कायद्याच्या उल्लंघनामुळे कारवाईचा फास आवळणार!
नाशिक: एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा झालेला लैंगिक छळ आणि धर्मांतराच्या प्रयत्नाप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक कार्यालयात ५० पेक्षा जास्त महिला कार्यरत असतानाही स्वतंत्र ‘पॉश’ (POSH – Prevention of Sexual Harassment) समिती नसल्याने पीडितांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नसल्याचे पोलीस तपासात आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. तपासातील महत्त्वाचे निष्कर्ष […] The post नाशिक TCS छळ प्रकरण: कंपनीची ‘ती’ मोठी चूक उघड; POSH कायद्याच्या उल्लंघनामुळे कारवाईचा फास आवळणार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत हिंगोली जिल्ह्याने राज्यात तिसरे स्थान पटकावले आहे. जिल्ह्याने १४१ टक्के उद्दिष्टपूर्ती करत उल्लेखनीय यश मिळविल्या केल्याबद्दल राज्याचे उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कौतुक करत शाबासकीची थाप दिली आहे. राज्यातील युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि स्थानिक पातळीवर रोजगार वाढविणे या उद्देशाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम १ ऑगस्ट २०१९ पासून कार्यान्वित करण्यात आला आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मितीला चालना मिळाली आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात हिंगोली जिल्ह्याने १४१ टक्के उद्दिष्टपूर्ती करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्यास एकूण ६०० प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यापैकी १९५७ प्रस्ताव विविध शाखांकडे सादर करण्यात आले. यामधून ८५० प्रकरणांना मंजुरी मिळाली असून, एकूण ६७९.७५ लक्ष रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या सक्षम नेतृत्वाखाली उद्योगनिर्मिती वाढविण्यासाठी वर्षभर सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा करण्यात आला. उद्योगांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत जागा उपलब्ध करून देणे, बँकांकडून वित्तपुरवठा वेळेत उपलब्ध करून देणे, तसेच वीजपुरवठा व इतर अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने समन्वय साधला. या सर्व प्रयत्नांमुळेच जिल्ह्याने ६०० प्रकरणे पूर्ण करत १४१.६७ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे. या योजनेंतर्गत टेलरिंग व रेडीमेड गारमेंट्स, ब्युटी पार्लर तसेच कृषिपूरक उद्योगांना चालना देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्यास मदत झाली आहे.या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा प्रशासनासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यास १००० प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, अधिकाधिक युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नवी दिल्ली येथील प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ यांची सातारा येथे होणाऱ्या 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या उद्घाटक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या प्राध्यापक, भारतीय शिक्षणतज्ज्ञ, गणितज्ञ आणि आदिवासी हक्कासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आणि 15 वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन संयोजन समितीनं उद्घाटक म्हणून एकमतानं प्रो डॉ सोनाझरिया मिंझ यांच्या नावाची निवड केल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राष्ट्रीय समन्वय समितीचे मुख्य समन्वयक डॉ भारत पाटणकर व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे अध्यक्ष कॉ धनाजी गुरव यांनी दिली. सातारा येथे आगामी दिनांक 9 आणि 10 मे रोजी 15 वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने साताऱ्याच्या प्रतिसरकारला अभिवादन करण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नवी दिल्ली येथील प्रो. डॉ सोनाझरिया मिंझ उपस्थित राहणार आहेत. त्या मूळच्या झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील आहेत. मिंझ 2005 पासून जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, नवी दिल्ली येथे स्कूल ऑफ कॉम्प्युटर अँड सिस्टीम्स सायन्स या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. झारखंडमधील विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून काम प्रोफेसर सोनाझरिया मिंझ यांनी झारखंडमधील दुमका येथील 'सिदो-कान्हू मुर्मू विद्यापीठाच्या' कुलगुरू म्हणून यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. 'सिदो-कान्हू मुर्मू विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून प्रो डॉ सोनाझरिया मिंझ यांनी मे 2020 ते जून 2023 मध्ये कुलगुरु म्हणून काम केले. त्यानंतर पुन्हा जवाहलाल नेहरु विद्यापीठात रुजू होत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रो डॉ सोनाझरिया मिंझ यांची जून 2025 मध्ये यूनेस्को: आदिवासी हक्क याच्या अनुषंगाने असलेल्या समितीच्या सह अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. हा बहुमान मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत, असे डॉ भारत पाटणकर यांनी सांगितले. प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ यांनी चेन्नईत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जवाहलाल नेहरु विद्यापीठात संगणक विज्ञान विषयात एम.फिल आणि पीएच.डी. पूर्ण केली. मिंझ यांनी आयआयटी कानपूरमधून देखील पीएच.डी केली आहे. अशा या आदिवासी समाजातील उच्चशिक्षित व तरीही आदिवासी हक्कांसाठी झटणाऱ्या प्रोफेसर सोनाझरिया मिंझ यांची सातारा येथील 15 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून झालेली निवड ही नक्कीच विद्रोही चळवळीला बळ देणारी ठरेल, असे संयोजन समितीचे अध्यक्ष ह. भ. प. डॉ सुहास महाराज फडतरे व कार्याध्यक्ष विजय मांडके यांनी सांगितले.
माजी सरन्यायाधीश बी. आर. गवईंची बागेश्वर धामला सहकुटुंब भेट
भोपाळ : भारताचे माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी मध्यप्रदेशातील प्रसिद्ध आणि तितक्याच वादग्रस्त ‘बागेश्वर धाम’ला सहकुटुंब भेट दिली आहे. त्यांच्या या भेटीमुळे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीत आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गवई यांनी पत्नी तेजस्विनी आणि मुलगा ज्योतिरादित्य यांच्यासह बागेश्वर बालाजीचे दर्शन घेऊन धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा आशीर्वाद घेतला. गवई कुटुंबाने बागेश्वर धामवर […] The post माजी सरन्यायाधीश बी. आर. गवईंची बागेश्वर धामला सहकुटुंब भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डीएनएमध्ये पितृत्व सिद्ध न झाल्यास पोटगी नाही
नवी दिल्ली : एखादा मुलगा लग्नाच्या कालावधीत जन्माला आला असला तरी डीएनए चाचणीतून हे सिद्ध झाले की पती हा त्या मुलाचा जैविक पिता नाही, तर त्याला पोटगी देण्याचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती नोंगमीकापम कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने पत्नीने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान […] The post डीएनएमध्ये पितृत्व सिद्ध न झाल्यास पोटगी नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भायखळा येथील मारहाण प्रकरणाला आता एक नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला युसूफ पठाण यांच्या नातेवाईकांवर शेजाऱ्यांशी हाणामारी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, आज पठाण यांच्या सासरच्या मंडळींनी समोर येत या वादात त्यांचेही लोकांना कशी दुखापत झाली, याचे पुरावे सादर केले आहेत. आम्ही सुरुवातीला माफी मागितली होती, तरीही आमच्यावर हल्ला करण्यात आला, असा आरोप युसूफ पठाण यांच्या नातेवाईकांनी केला आहे. शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला. युसूफ पठाण यांच्या सासरच्या कुटुंबातील युसूफ खान हे कारने घरी परतत होते. रस्त्यावरील एका खड्ड्यात चाक गेल्यामुळे गलिच्छ पाणी बाजूला उभे असलेल्या शोएब खान याच्या अंगावर उडाले. पठाण यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफ खान यांनी तातडीने गाडी थांबवून शोएबची माफी मागितली होती. मात्र, शोएबने माफी स्वीकारण्याऐवजी शिवीगाळ सुरू केली. इतकेच नाही, तर त्याने बांबूच्या काठीने कारची काच फोडली आणि युसूफ खान यांच्यावर हल्ला चढवला. पोलिस स्टेशनला जाताना आम्हाला अडवले युसूफ पठाण यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, जेव्हा ते या पहिल्या हल्ल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाले होते, तेव्हा वाटेतच दुसऱ्या गटाने त्यांना पुन्हा अडवले. तिथे दोन्ही गटांत पुन्हा शाब्दिक चकमक झाली आणि त्याचे रूपांतर फ्री-स्टाईल हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही बाजूंकडून लाठ्या आणि बेसबॉल बॅटचा वापर झाला असून, यात केवळ तक्रारदारच नाही तर पठाण यांच्या बाजूचे लोकही रक्तबंबाळ झाले आहेत, असे त्यांनी सादर केलेल्या व्हिडिओ पुराव्यातून दिसत आहे. युसूफ पठाणच्या सासऱ्यांना अटक या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत युसूफ पठाण यांचे सासरे खालिद खान, त्यांचा मुलगा उमरशाद आणि एका नातेवाईकाला अटक केली आहे. मात्र, पोलिसांनी समोरील गटाने केलेल्या मारहाणीचा विचार करावा, कारण हा वाद केवळ एका बाजूने चिघळलेला नाही, असे युसूफ पठाण यांच्या सासरच्या मंडळींचे म्हणणे आहे. भायखळा पोलिसांनी सध्या दोन्ही गटांचे जबाब आणि पुरावे ताब्यात घेतले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या हिंसक वळणाला नेमके जबाबदार कोण, याचा शोध सुरू केला आहे.
नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. राजकीय सल्लागार संस्था आयपॅक (I-PAC) च्या कार्यालयावर सुरू असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कारवाईत हस्तक्षेप केल्याप्रकरणी न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “तपासात अशा प्रकारे अडथळा आणणे ही लोकशाहीसाठी अत्यंत घातक आणि चिंतेची बाब आहे,” असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. जानेवारी […] The post ‘तपासात हस्तक्षेप म्हणजे लोकशाहीला धोका’; आयपॅक (I-PAC) प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे ममता बॅनर्जींवर ताशेरे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सायबर गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनासाठी कठोर पावले उचलली आहेत. एका निवृत्त ज्येष्ठ नागरिकाची ११ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील ९ सदस्यांवर पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी 'मकोका' (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम - १९९९) अंतर्गत कारवाई केली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सायबर गुन्हेगारांविरुद्ध केलेली ही पहिलीच 'मकोका' कारवाई ठरली आहे. या प्रकरणाची सुरुवात २० फेब्रुवारी २०२६ रोजी झाली, जेव्हा एका निवृत्त ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांना बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल ११ कोटी १३ लाख रुपयांना गंडा घालण्यात आला होता. पोलिसांनी या तपासादरम्यान विविध बँक खाती गोठवून २ कोटी ६५ लाख ७६ हजार रुपयांची रक्कम न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादीला परत मिळवून दिली आहे. या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत पोलीस पथकाने कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि राजस्थानमधील उदयपूर येथून नऊ आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अभय बाबासाहेब पाटील (कोल्हापूर), शिवतेज राजेंद्र पोटे (वाघोली, पुणे), युवराज उर्फ संतोष सतीश मुदलीयार (लोहगाव, पुणे), रॉनी उर्फ पंकज मंगु गिरीगोस्वामी (उदयपूर), प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी (उदयपूर), उमेश लक्ष्मीलाल भट्ट (राजस्थान), महेश करबसपा उडचणे (मुंबई), राहुल बहादुरप्रसाद मौर्य (मुंबई) आणि शेख अब्दुल रहिस शेख अब्दुल रशीद (औरंगाबाद) यांचा समावेश आहे. तपासात असे समोर आले की, आरोपींनी एक संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली होती. ही टोळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य जनतेला गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करत होती. फसवणुकीची रक्कम 'यूएसडीटी' सारख्या आभासी चलनात रूपांतरित करून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात राहून वर्ग केली जात होती. या टोळीने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही अनेक गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. सायबर गुन्हेगार केवळ वैयक्तिक फसवणूक करत नसून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही धोका निर्माण करत असल्याचे लक्षात घेऊन अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी या टोळीवर मकोका लावण्याचे आदेश दिले. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उप-आयुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी आणि त्यांच्या पथकाने केली आहे.
इराणच्या IRGC कडून होर्मुजच्या सामुद्रधुनीत भारताकडे येणारे जहाज जप्त; गोळीबारानंतर तणाव वाढला
नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) बुधवारी होर्मुजच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या दोन व्यापारी जहाजांना लक्ष्य केले. यामध्ये भारताकडे येणाऱ्या एका मोठ्या मालवाहू जहाजाचा समावेश असून, इराणने हे जहाज आपल्या ताब्यात घेऊन इराणी किनारपट्टीकडे नेले आहे. लक्ष्य केलेली जहाजे: इराणने ‘Epaminondas’ आणि ‘MSC Francesca’ या दोन जहाजांना ताब्यात घेतले […] The post इराणच्या IRGC कडून होर्मुजच्या सामुद्रधुनीत भारताकडे येणारे जहाज जप्त; गोळीबारानंतर तणाव वाढला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील वाहतूक 23 आणि 24 एप्रिल 2026 रोजी प्रत्येकी तीन तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) कि.मी. क्र. 58/500 (डोंगरगाव/कुसगाव) येथील पुलाचे शटरिंग काढणे आणि रंगकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी वाहतूक थांबवण्यात येणार आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील. या कालावधीत, सर्व वाहने किवळे – देहूरोड – तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून कुसगाव टोल प्लाझा येथे वळवण्यात येतील. त्याचप्रमाणे, पुण्याकडे येणारी वाहतूक 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वरून देहू रोड – किवळे मार्गे पुण्याकडे वळवण्यात येईल. वाहनचालकांनी प्रवासाचे योग्य नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केले आहे. या कालावधीत वाहनचालकांना कोणतीही अडचण आल्यास, त्यांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाच्या 9822498224 किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जप्त वाहनांचा २८ एप्रिल रोजी जाहीर लिलाव राज्य उत्पादन शुल्क विभाग, तळेगाव दाभाडे (पुणे) व महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अंतर्गत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत एकूण ०२ ट्रक कंटेनर, २० चारचाकी वाहने व २५ दुचाकी वाहने यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी उत्तम आव्हाड निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे पुणे येथे संपर्क साधावा.
उन्हाचा तडाखा, कांद्याला भाव नाही; शेतकरी दुहेरी संकटात
नाशिक : प्रतिनिधी कृषीसंपन्न म्हणून ओळखला जाणारा जुन्नर तालुका सध्या उन्हाच्या भीषण संकटाचा सामना करत आहे. एकीकडे तापमानाने ४२ अंशांचा टप्पा ओलांडल्याने अंगाची लाहीलाही होत आहे, तर दुसरीकडे कांद्याचे कोसळलेले बाजारभाव आणि वाढती मजुरी यामुळे शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. विशेषत: तालुक्याच्या पूर्व भागातील कांदा उत्पादक शेतकरी निसर्ग आणि अर्थकारणाच्या कात्रीत सापडला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे शेतात […] The post उन्हाचा तडाखा, कांद्याला भाव नाही; शेतकरी दुहेरी संकटात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जेरुसलेम : इस्रायलच्या स्मृतिदिनी मोसाद प्रमुख डेव्हिड बार्निया यांनी एका विशेष मोहिमेचा उलगडा केला. ज्या एजंटचा उल्लेख केवळ मेम या हिब्रू अक्षराने केला जात आहे, तो इस्रायलच्या ऑपरेशन रोअरिंग लायनचा कणा होता. इराणच्या अण्वस्त्र आणि लष्करी मोहिमांना चाप लावणा-या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मेम यानेच विकसित केला होता. मे २०२३ मध्ये इटलीच्या मॅगीओर तलावात गुडूरिया नावाची […] The post मोसादचा गुप्तहेर ‘मेम’ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी सरन्यायाधीश भूषण गवई सहकुटुंब
नागपूर : प्रतिनिधी धीरेंद्र कृष्ण शास्त्री, ज्यांना ‘बागेश्वर बाबा’ म्हणून ओळखले जाते, हे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचे प्रमुख आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होते आणि सोशल मीडियावरही त्यांची मोठी लोकप्रियता आहे. तथापि, त्यांच्या चमत्कारांच्या दाव्यांवरून वादही निर्माण झाले असून अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावर चर्चा रंगताना दिसते. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी […] The post माजी सरन्यायाधीश भूषण गवई सहकुटुंब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कल्याण-टिटवाळा परिसरातील पद्मावती रॉयल सोसायटीमध्ये पोलिसांनी एखाद्या चित्रपटात शोभावा असा थरार रचत तब्बल ६ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. विशेष म्हणजे, घराची झडती सुरू असताना आरोपी महिलेने हे अंमली पदार्थ कचऱ्याच्या डब्यात लपवले होते. मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून ती सुटू शकली नाही. याप्रकरणी अश्विनी पॉल या महिला पेडलरला अटक करण्यात आली असून, मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. टिटवाळ्याच्या पद्मावती रॉयल सोसायटीमध्ये काहीतरी संशयास्पद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस पथक या परिसरात दबा धरून होते. कोणालाही संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे (KDMC) अधिकारी असल्याचे भासवले आणि सोसायटीत 'सर्व्हे' सुरू केला. शनिवारी दुपारी पोलिसांना खात्री पटताच त्यांनी संशयित अश्विनी पॉल हिच्या इमारतीत पोहोचले. कचऱ्याच्या डब्यात दडवले ६ कोटींचे ड्रग्ज घरात शिरल्यानंतर पोलिसांनी अश्विनीची कसून चौकशी केली. सुरुवातीला तिने टोलवाटोलवी केली, मात्र नंतर आपण बारमध्ये काम करत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने घराची झडती घेण्यास सुरुवात केली. संपूर्ण घर पालथे घातले तरी काहीच सापडत नव्हते. अखेर एका सतर्क पोलीस अधिकाऱ्याची नजर कोपऱ्यात असलेल्या कचऱ्याच्या डब्यावर गेली. तो डबा उघडताच पोलिसांना धक्का बसला; त्यात तब्बल ६ कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ दडवून ठेवण्यात आले होते. बार गर्ल ते गुन्हेगारी विश्व: असा झाला प्रवास मूळची पुण्याची असलेली अश्विनी पॉल ही दहावी नापास आहे. २०१२ मध्ये ती नोकरीच्या शोधात मुंबईत आली आणि बार गर्ल म्हणून काम करू लागली. तिने नवी मुंबई, कल्याण अशा विविध भागात वास्तव्य केले. अश्विनीचा लिव्ह-इन पार्टनर जेलमध्ये असताना त्याला भेटण्यासाठी ती कारागृहात जात असे. तिथेच तिची ओळख साकीनाका येथील ड्रग्ज तस्कर इरफान अन्सारी याच्याशी झाली. अन्सारीने तिला जास्त कमाईचे आमिष दाखवले आणि अश्विनी या काळ्या धंद्यात ओढली गेली. तिचा पार्टनर तिला माल पुरवायचा आणि ती त्याची विक्री करायची. पार्टींमध्ये ड्रग्ज सप्लायचा संशय अश्विनीने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि मीरा रोड परिसरातील हायप्रोफाईल पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचा पुरवठा केल्याचा पोलिसांना संशय आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत आणि पुरवठ्याची ही साखळी कुठपर्यंत पसरली आहे, याचा तपास आता अंमली पदार्थ विरोधी विभाग करत आहे.
‘एआय’ डेटा सेंटर्समुळे तापमानात ९.१ अंशांनी वाढ
लंडन : ‘एआय’मुळे चालणा-या डेटा सेंटर्समधून बाहेर पडणा-या प्रचंड उष्णतेमुळे आजूबाजूच्या परिसराचे तापमान वाढून उष्णता बेटे तयार होत आहेत, ज्याचा परिणाम सध्या ३४ कोटी लोकांवर होत आहे. जेएलएल या रिअल इस्टेट कंपनीच्या अंदाजानुसार, २०२५ ते २०३० दरम्यान डेटा सेंटर्सची क्षमता दुप्पट होणार असून, या वाढत्या मागणीपैकी ५०% मागणी केवळ एआय तंत्रज्ञानामुळेच निर्माण होणार आहे, ज्यामुळे […] The post ‘एआय’ डेटा सेंटर्समुळे तापमानात ९.१ अंशांनी वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे मेट्रो आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (PMPML) प्रवाशांसाठी 'पहिली आणि शेवटची मैल कनेक्टिव्हिटी' अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांच्या सोयीसाठी 'मेट्रो फिडर बस मार्ग क्र. ३१' अधिकृतपणे सुरू करण्यात आला आहे. ही नवीन बस सेवा पी.सी.एम.सी. मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा या दरम्यान धावणार असून, यामुळे काळेवाडी, रहाटणी आणि पिंपरी परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या नवीन बस मार्गामुळे काळेवाडी, रहाटणी, विजय नगर, तापकीर नगर, श्रीनगर, धनगरबाबा वस्ती आणि ज्योतिबा नगर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांना थेट मेट्रो स्थानकाशी जोडण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना आता मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षा किंवा खाजगी वाहनांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. या मार्गावर एम.एम. शाळा, जिजामाता रुग्णालय परिसर आणि विविध खाजगी शिकवणी वर्ग असल्याने विद्यार्थी आणि इतर प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत सुरक्षित आणि वेळ वाचवणारी ठरेल. प्रवाशांच्या खिशाला परवडेल अशा दरात ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रवासासाठी किमान भाडे फक्त १० रुपये आणि कमाल भाडे २० रुपये निश्चित करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार, पी.सी.एम.सी. मेट्रो स्थानकावरून पहिली बस सकाळी ६:३० वाजता, तर काळेवाडी फाटा येथून सकाळी ७:०० वाजता सुटेल. अंतिम बस रात्री ९:०० वाजता पी.सी.एम.सी. वरून आणि ९:३० वाजता काळेवाडी फाटा येथून सुटेल. गर्दीच्या वेळी दर १५ मिनिटांनी आणि कमी गर्दीच्या वेळी दर ३० मिनिटांनी बस उपलब्ध असेल. ही बस सेवा वर्तुळाकार पद्धतीने धावणार आहे. यामध्ये कुंदन हॉटेल, गोकुळ हॉटेल, शगुन चौक, जिजामाता रुग्णालय, लकी बेकरी, विजय नगर, अविनाश मंगल कार्यालय, एम.एम. शाळा, तापकीर नगर, रहाटणी फाटा, कराची चौक, लाल मंदिर आणि मोरवाडी चौक अशा प्रमुख थांब्यांचा समावेश आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, सध्या एकूण १० मेट्रो स्थानकांसाठी ८३ फिडर बसेस २३ वेगवेगळ्या मार्गांवर सेवा देत आहेत. या फिडर बस सेवेचा मुख्य उद्देश नागरिकांना त्यांच्या घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत स्वस्त आणि जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होईल. प्रवाशांना काही तक्रार किंवा माहिती हवी असल्यास मेट्रोच्या मदत क्रमांकावर (१८००२७०५५०१) किंवा पी.एम.पी.एम.एल. च्या हेल्पलाईनवर (०२०-२४५४५४५४) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घ्यावा, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून भाजपने मुंबईतील वरळीत काढलेल्या मोर्चामुळे संध्याकाळच्या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली, ज्याचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसला. याच गदारोळात एका संतापलेल्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्यात तिने चक्क मंत्री गिरीश महाजन आणि उपस्थित पोलिसांना सडेतोड शब्दांत सुनावले आहे. या घटनेनंतर संबंधित महिलेला काही स्तरांतून ट्रोल केले जात असले, तरी प्रत्यक्षात वाहतूक कोंडीत अडकलेल्या आपल्या लहान मुलाच्या काळजीपोटी त्या महिलेचा संताप अनावर झाला होता. आपल्या लेकरासाठी कोणत्याही दबावाला बळी न पडता ती महिला ज्या निडरपणे व्यवस्थेला भिडली, त्याचीच आता सर्वत्र चर्चा रंगत आहे. वरळी येथील जांबोरी मैदानातून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा एनएससीआय डोमपर्यंत नेण्यात आला. मात्र या मधल्या काळात रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच कामाचा दिवस असल्याने कामावर जाणारे लोक तसेच शाळेतून घरी येणाऱ्या मुलांच्या बसेस सुद्धा सुरू होते. त्यात वाहतूक कोंडी झाल्याने आपल्या मुलांची बस निघून तर नाही गेली हे पाहण्यासाठी पालक रस्त्यावर आले होते. त्यात या महिला देखील होत्या. मुलासाठी काळजीने व्याकूळ झालेल्या महिलेचा संयम सुटला वरळी परिसरातील या वाहतूक कोंडीत संबंधित महिला आपल्या मुलाला घेण्यासाठी आली असताना अडकून पडली होती. भाजपच्या मोर्चामुळे रस्ते पूर्णपणे जाम झाले होते आणि मागील एक तासापासून तिला मुलाची स्कूल बस शोधता येत नव्हती. आपला मुलगा नक्की कुठे आहे आणि बस पुढे तर निघून गेली नाही ना? या भीतीने आणि मुलाच्या सुरक्षिततेच्या काळजीने व्याकुळ झाल्यामुळेच त्या महिलेचा संयम सुटला. आपल्या लेकरासाठी असलेल्या याच तगमगीतून तिचा राग अनावर झाला आणि तिने थेट व्यवस्थेला जाब विचारला. महिलेकडून आधी मदतीसाठी दाद, पण प्रतिसाद मिळाला नाही आपल्या मुलाला शाळेतून नेण्यासाठी आलेल्या या महिलेचा संताप निव्वळ राजकीय नव्हता, तर तो एका काळजीत असलेल्या माऊलीचा आक्रोश होता. तासाभरापासून वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे तिला आपल्या मुलाची स्कूल बस दिसत नव्हती, ज्यामुळे ती प्रचंड व्याकुळ झाली होती. तिने सुरुवातीला पोलिसांकडे आणि मोर्चाच्या आयोजकांकडे जाऊन मदतीसाठी दाद मागितली, आपले गाऱ्हाणे मांडले. मात्र कोणाकडूनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून तिचा संयम सुटला. आपल्या लेकराच्या सुरक्षिततेसाठी व्याकुळ झालेली ही माता मग कोणालाही न जुमानता थेट व्यवस्थेला भिडली आणि तिचा हा रोख थेट समोर असलेल्या मंत्र्यांच्या दिशेने वळला. मंत्री गिरीश महाजनांना धरले धारेवर या महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना अत्यंत आक्रमकपणे जाब विचारला की, तुमचं हे नेमकं काय चाललंय? इथून निघून जा, तुमच्या मोर्चामुळे शेकडो लोक अडकून पडले आहेत. विरोध करायचा असेल तर तो मैदानात करा, रस्त्यावर वाहतूक कोंडी करून सर्वसामान्यांना वेठीस का धरता? असा सवाल तिने यावेळी उपस्थित केला. केवळ मंत्र्यांनाच नाही, तर तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनाही तिने धारेवर धरले. या महिलेचे हे रौद्रवतार सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया दरम्यान, महिलेच्या संतापवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, वाहतूक कोडींमुळे त्या महिला वैतागलेल्या होत्या. मोर्चामुळे थोड्या फार प्रमाणात वाहतूक कोंडी आणि सामान्यांना गैरसोय होत असते. मात्र, त्यावेळी एक भगिनी महिला तिथे अत्यंत वाट्टेल तशा भाषेत बोलत होत्या. त्या महिला पोलिस भगिनींसोबतही अत्यंत वाईट भाषेत बोलत होत्या. मी त्यांना समजावत होतो की आम्ही 10-15 मिनिटांत निघून जाऊ. त्या महिलेने बाटली फेकून मारली, ज्या भाषेचा वापर केला ते चुकीचे होते, असे महाजन म्हणाले. तसेच पुढच्यावेळी यासंदर्भात आम्ही काळजी घेऊ की कुणाला अशी गैरसोय होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. संतप्त महिलेचे व्हिडिओ पाहा
ज्येष्ठ महिलेची ४३ लाखांची फसवणूक:सायबर चोरट्यांनी कारवाईची भीती दाखवून केली फसवणूक
पुणे, प्रतिनिधी: सायबर चोरट्यांनी कारवाईची भीती दाखवून सहकारनगर भागातील एका ज्येष्ठ महिलेची ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ६८ वर्षीय ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला संतनगर परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. त्यांनी नाशिकमधील पंचवटी पोलिस ठाण्यातून बोलत असल्याची बतावणी केली.चोरट्यांनी महिलेला सांगितले की, त्यांच्या बँक खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारात झाला आहे आणि या प्रकरणात पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्यांनी अटकेची भीती दाखवून, अटक टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल आणि तातडीने पैसे भरावे लागतील असे सांगितले. चोरट्यांच्या धमक्यांमुळे घाबरलेल्या महिलेने कोणतीही शहानिशा न करता ८ ते १५ एप्रिल या कालावधीत वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. अशा प्रकारे त्यांनी एकूण ४३ लाख सात हजार रुपये गमावले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत. व्यावसायिकाची ३३ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक दरम्यान, ऑनलाइन टास्कचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाची ३३ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार वारजे माळवाडी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ४३ वर्षीय व्यावसायिकाने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी तक्रारदार व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवून घरातून ऑनलाइन पद्धतीने काम करण्याची संधी असल्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून ऑनलाइन काम केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगितले.चोरट्यांनी त्यांना एक काम दिले आणि ते पूर्ण केल्यानंतर खात्यात पैसे जमा झाल्याचे भासवले, ज्यामुळे तक्रारदाराचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. मात्र, त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही आणि मूळ रक्कमही परत मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी या प्रकरणाचा तपास करत आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २७ लाखांची फसवणूक शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी २७ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार ५५ वर्षीय व्यावसायिक हे रविवार पेठेत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविणारा संदेश पाठविला होता, तसेच त्यांना गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. व्यावसायिकाने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही, त्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करत आहेत.
पुण्यात भरधाव टँकरमुळे होणाऱ्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेशिस्त टँकरचालकांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी टँकरचालक आणि मालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोंढवा पोलीस ठाण्यात वाहतूक पोलिसांनी पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरचालक आणि मालकांसाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. टँकरमुळे होणाऱ्या अपघातांच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी टँकरचालकांना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला पाणी वाहतूक करणारे टँकरचालक, मालक, पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, तसेच कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, उंड्री, पिसोळी, काळेपडळ आणि वानवडी भागातील नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी टँकरमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि भरधाव टँकरमुळे घडलेल्या अपघातांच्या घटनांबद्दल तक्रारी केल्या. टँकरमालकांनी सांगितले की, कोंढवा, उंड्री, पिसोळीसारख्या भागांतील सोसायट्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, कारण येथे कमी दाबाने पाणी येते. वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक सोसायट्यांना महानगरपालिकेकडून पाणी विकत घेऊन पुरवावे लागते. त्यामुळे, या भागातील रस्त्यांवर टँकर वाहतुकीसाठी विशिष्ट वेळ निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली. नागरिक आणि टँकरचालक-मालकांच्या सूचना ऐकल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी टँकरचालकांना वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले. टँकरची नियमित सुरक्षा तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पाटील यांनी टँकर मालकांना इशारा दिला की, जर चालकांनी गैरप्रकार केल्यास त्यांना पाठीशी घालू नये, तर योग्य ती कारवाई करावी. मद्यपान करणाऱ्या चालकांना कामावर ठेवू नये. बेशिस्त टँकरचालकांमुळे अपघात घडल्यास चालकांसह मालकांविरुद्धही पोलिसांनी कारवाई केली आहे, त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत, असे अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी नमूद केले. त्यांनी वाहनचालकांना पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. नियमांचे पालन केल्यास गंभीर अपघातांच्या घटना कमी होतील, असेही ते म्हणाले.
बँकींग क्षेत्रातली एक महत्त्वाची बातमी. HDFC लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून विभा पाडळकर यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाने 21 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. विभा पाडळकर यांची ही पुनर्नियुक्ती 12 सप्टेंबर 2026 पासून लागू होणार असून पुढील पाच वर्षांसाठी असेल. मात्र, या निर्णयासाठी भागधारकांची मान्यता आणि भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (IRDAI) यांची मंजुरी आवश्यक राहणार आहे. विभा पाडळकर या 2008 पासून HDFC लाइफशी जोडल्या असून त्यांनी विविध नेतृत्व पदांवर काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने सातत्यपूर्ण कामगिरी केली असून धोरणात्मक नियोजन, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि शाश्वत वाढ यावर विशेष भर देण्यात आला आहे. 2017 मध्ये HDFC लाइफच्या यशस्वी शेअर बाजारातील नोंदणीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. तसेच भारतीय जीवन विमा क्षेत्रातील पहिल्या विलीनीकरण व अधिग्रहण प्रक्रियेत त्यांनी कंपनीचे नेतृत्व केले होते. पाडळकर या उद्योगातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय असून त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवले आहेत. त्यामध्ये ‘बिझनेसवुमन ऑफ द इयर’सह विविध प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे. दरम्यान, कंपनीने स्पष्ट केले आहे की, विभा पाडळकर यांच्यावर कोणत्याही नियामक संस्थेकडून संचालक पद भूषवण्यास कोणतीही बंदी नाही.
पुण्यात युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळच्या कैलास मंदिर आणि जैन व बौद्ध लेण्यांवर आधारित 'एलोरामा' या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ललित कला अकादमी पुरस्कार विजेते छायाचित्रकार नीलेश काळे यांनी काढलेल्या पॅनोरामा छायाचित्रांचा यात समावेश आहे. हे प्रदर्शन घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा कला दालनात मंगळवार, २८ एप्रिल ते रविवार, ३ मे दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पुणेकरांसाठी खुले राहील. या प्रदर्शनात वेरूळ लेण्यांवर आणि विशेषतः कैलास मंदिरावर विविध अंगांनी प्रकाश टाकणारी छायाचित्रे पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. 'फोटोग्रॅमी' किंवा 'फोटोग्रॅमेट्री' या तंत्राचा वापर करून काढलेल्या निवडक छायाचित्रांचा यात समावेश आहे. या तंत्रज्ञानाने बनवलेले अचूक थ्रीडी (त्रिमिती) मॉडेल हे प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. 'एलोरामा' छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार, २८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. जागतिक कीर्तीचे मूर्तीशास्त्रज्ञ आणि कैलास मंदिरावरील तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर, खासदार प्रो. मेधा कुलकर्णी आणि प्रसिद्ध कलाकार जयंत जोशी यांच्या हस्ते हे उद्घाटन होईल. यावेळी डॉ. गो. बं. देगलूरकर उपस्थितांशी संवाद साधतील. प्रदर्शनादरम्यान गुरुवार, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता इंडोलॉजिस्ट डॉ. राहुल देशपांडे हे देखील 'एक्स्प्लोरिंग एलोरा' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. छायाचित्रकार नीलेश काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रकुटांनी कोरलेल्या वेरूळमधील कैलास मंदिराचा कालखंड इ.स. ७५६ ते इ.स. ७७३ दरम्यानचा आहे. सुमारे २ किलोमीटर परिसरात ३४ गुंफा कोरलेल्या आहेत. त्यापैकी क्रमांक १६ चे कैलास मंदिर हे एकाच खडकातून कोरलेले जगातील सर्वात मोठे अखंड देऊळ (मोनोलिथीक मंदिर) म्हणून ओळखले जाते. थ्री डी व्हिस्टा आणि क्लाऊड कम्पेअर तंत्रज्ञानाच्या मदतीने ही लेणी कुठून पाहायला सुरुवात करावी, प्रत्येक टप्प्यावर काय बघावे, त्याची वैशिष्ट्ये आणि वेगळेपण काय आहे, तसेच त्याची अचूक लांबी, रुंदी, उंची किती आहे, या सर्वांची माहिती प्रदर्शनात मिळेल. या जागतिक वारशाची एक 'संचलित सफर' अर्थात 'व्हर्च्युअल टूर' उपस्थितांना अनुभवता येईल, असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला.
काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार!:अकोल्यात भोंदू बाबाने चिमुकल्याला चक्क दाताने उचलून हवेत गरागरा फिरवले
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावातून अंधश्रद्धेचा एक मन सुन्न करणारा प्रकार उघडकीस आला आहे. चेतन सुनील मुळे नावाच्या एका भोंदू बाबाने एका निष्पाप चिमुकल्यावर अघोरी आणि जीवघेणे उपचार केल्याचा गंभीर आरोप होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या भोंदूने त्या लहान बाळाला चक्क आपल्या दातांनी उचलले आणि हवेत गरागरा फिरवले. हा अघोरी प्रकार पाहताना कोणाच्याही अंगावर शहारे येतील, इतका तो भयानक होता. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. लहान मुलांच्या आजारांवर किंवा समस्यांवर उपाय शोधण्याच्या नावाखाली अशा प्रकारच्या जीवघेण्या अघोरी पद्धतींचा अवलंब होणे, हे समाजातील खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धेचे विदारक चित्रण आहे. या प्रकरणातील दोषी भोंदू बाबावर प्रशासनाने तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. उपस्थित लोक बघ्यांच्या भूमिकेत समोर आलेल्या संतापजनक व्हिडिओमध्ये हा भोंदू बाबा एका निष्पाप बाळाला थेट दातांनी उचलून हवेत गोल गोल फिरवताना आणि धोकादायक पद्धतीने उलट-पालट करताना दिसत आहे. हे अघोरी कृत्य सुरू असताना बाळ प्रचंड रडत असूनही, तिथे उपस्थित असलेले पालक आणि इतर नागरिक अंधश्रद्धेच्या बळी ठरल्याने त्यांनी हा जीवघेणा प्रकार फक्त पाहत राहिल्याचे वास्तव समोर आले आहे. चिमुकल्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रकारामुळे पालकांच्या मानसिकतेवर आणि समाजातील खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भोंदूबाबावर कठोर कारवाईची मागणी दरम्यान, हा प्रकार नेमका कशासाठी केला होता, याची अद्याप माहिती समोर आलेली नाही. तसेच हा भोंदू बाबा नेमका कोण आणि कुठला आहे याची देखील संपूर्ण माहिती उपलब्ध नसली तरी हा प्रकार मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावातील असल्याचे समोर आले आहे. तसेच या भोंदू बाबावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा नंगानाच महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि समाजसुधारकांचा वारसा लाभलेल्या राज्यात अंधश्रद्धेचा असा नंगानाच सुरू असणे हे अत्यंत चिंताजनक आहे. एका बाजूला आपण विज्ञान आणि प्रगतीच्या गोष्टी करत असताना, दुसरीकडे अशा अघोरी प्रकारांमुळे चिमुकल्यांचे प्राण धोक्यात येणे हे सामाजिक जागरूकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करते. या धक्कादायक घटनेमुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट असून, प्रशासनाने केवळ बघ्याची भूमिका न घेता संबंधितांवर तातडीने आणि अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या व्होट जिहादच्या माध्यमातून खासदार झाल्याचा दावा भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे या फतवे काढून खासदार झाल्यात. त्या व्होट जिहादच्या माध्यमातून निवडून आल्यात. त्यामुळे त्यांच्यासारख्या मानसिकतेचे लोक या देशात महिलांना अधिकार मिळू देणार नाहीत, असे त्या म्हणाल्यात. राज्यात सध्या महिला आरक्षणाशी संबंधित सीमांकन विधेयकाच्या मुद्यावरून रान पेटले आहे. सत्ताधारी भाजपने या प्रकरणी विरोधकांवर विशेषतः काँग्रेसवर महिला आरक्षणाला विरोध केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सत्ताधारी व विरोधकांत राजकीय कलगीतुरा रंगला असताना मंत्री नीतेश राणे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर उपरोक्त आरोप केला आहे. सुप्रिया सुळे यांची भूमिका लव्ह जिहादच्या समर्थनाची आहे. तुम्ही त्यांचे यासंबंधीचे व्हिडिओही असंख्यवेळा पाहिले. त्या केवळ फतवे काढून खासदार झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत त्या कोणकोणत्या मस्जिदींत गेल्या व तेथून फतवे काढून त्या खासदार झाल्या हे सर्वांनी पाहिले. त्या केवळ व्होट जिहादच्या निमित्ताने निवडून आल्या. त्यामुळे या मानसिकतेचे लोक हिंदू राष्ट्रात किंवा या राष्ट्रात महिलांना अधिकार मिळू देणार नाहीत हे स्पष्ट आहे, असे नीतेश राणे यांनी म्हटले आहे. मी गोल टोपी व दाढीवाल्यांमुळे आमदार झालो नाही उल्लेखनीय बाब म्हणेज नीतेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी आपण गोल टोपी किंवा दाढीवाल्यांमुळे आमदार झालो नसल्याचेही वादग्रस्त विधान केले होते. ते मुंब्रा येथील एका कार्यक्रमात म्हणाले होते, मी छाती ठोकून सांगतो की, मी कोणत्याही गोल टोपी व दाढीवाल्यांमुळे आमदार झालो नाही. मी हिंदू समाजाने मला निवडून दिल्यामुळे आमदार झालो. त्यामुळे कुणीही हिंदूंनाी धमकावू किंवा भीती घालू नका. तुम्ही आमचा तिसरा डोळा उघडला, तर शुक्रवारी तुमचा सिलिंडरही वर येणार नाही एवढी दक्षता बाळगा. चांगल्या पद्धतीने सावधगिरी बाळगा. कारण, या हिंदू राष्ट्रात हिंदू समाजाने आशीर्वाद देऊन आम्हाला इथे बसवले आहे. मी मंत्रालयात बसतो किंवा इथे आलो ते एक आमदार किंवा मंत्री म्हणून नव्हे तर एक हिंदू म्हणून तुमच्याशी संवाद साधण्यासाठी व तुम्हाला ताकद देण्यासाठी आलो आहे. त्यामुळे तुम्ही निवांत राहा. आम्हाला मतांची काळजी नाही. त्यांची 5 मते कमी झाली, तर हिंदू समाजाची 50 मते आम्हाला मिळतील. त्यामुळे त्याची चिंता करू नका. हिंदू समाजाची ताकद काय आहे हे आम्हाला चांगले माहिती आहे. मुंब्रा कुणाच्या वडिलांची जहागीर नाही. इथे आमची मुंब्रा देवी आहे. हिंदूंच्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यासाठी आम्हाला कुणाच्याही परवानगीची गरज नाही, असेही नीतेश राणे यावेळी बोलताना म्हणाले होते.
मुंबईतील सर्वसामान्यांचे आधारवड आणि गोरगरिबांसाठी अत्यंत परवडणारे महापालिकेचे प्रसिद्ध किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालय सध्या नामांतराच्या मागणीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला अधिकृत पत्र लिहिले असून, ते गेल्या काही काळापासून या रुग्णालयाचे नाव बदलण्यासाठी विशेष आग्रही असल्याचे दिसून येत आहे. या मागणीमुळे वैद्यकीय आणि राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मंगल प्रभात लोढा यांनी दुसऱ्यांदा नामांतर करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात त्यांनी केईएम रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना जाहीरपणे नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता त्यांनी मुंबई महापालिकेला पत्र लिहून या प्रक्रियेला गती देण्यास सांगितले आहे. केईएम हे नाव ब्रिटिश काळातील असल्याने ते बदलून भारतीय संस्कृतीशी संबंधित नाव देण्यात यावे, अशीह मागणी लोढा यांनी केली आहे. कोणते नवीन नाव देण्याची मागणी? मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केईएम रुग्णालयाचे नाव बदलून ते 'कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय' करावे, अशी अधिकृत शिफारस महापालिकेकडे केली आहे. विशेष म्हणजे, या प्रस्तावित नावामुळे रुग्णालयाची 'केईएम' (KEM) ही जुनी ओळख आणि संक्षिप्त नाव तांत्रिकदृष्ट्या कायम राहील, असा दावाही या पत्राद्वारे करण्यात आला आहे. केईएम रुग्णालय ही केवळ एक वास्तू नसून ती मुंबईची जागतिक स्तरावर असलेली महत्त्वाची ओळख आहे. यापूर्वी मंत्री लोढा यांनी ही मागणी केली असताना त्यांना राजकीय आणि आरोग्य अशा दोन्ही क्षेत्रांतून तीव्र टीकेला सामोरे जावे लागले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी अधिकृत पत्राद्वारे हा मुद्दा लावून धरल्याने मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. हे रुग्णालय महापालिकेच्या प्रशासकीय अखत्यारीत येत असल्याने, प्रशासन यावर नक्की काय निर्णय घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. किंग एडवर्ड यांच्या स्मरणार्थ रुग्णालय स्थापन 1926 मध्ये ब्रिटनचे राजे किंग एडवर्ड (सातवे) यांच्या स्मरणार्थ स्थापन झालेले हे रुग्णालय मुंबईच्या आरोग्य व्यवस्थेचा एक ऐतिहासिक वारसा आहे. या वारशात बदल करण्याच्या प्रस्तावाला वारसाप्रेमी आणि विविध राजकीय पक्षांकडून विरोधाची चिन्हे असतानाच, रुग्णालयाची सामाजिक उपयुक्तताही विशेष महत्त्वाची ठरते. अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत माफक दरात उत्कृष्ट उपचार मिळत असल्याने, मुंबई शहर आणि उपनगरातील गोरगरीब व मध्यमवर्गीय रुग्णांसाठी केईएम रुग्णालय आजही एक मोठा आधारस्तंभ ठरत आहे.
राज्य प्रशासनाला अधिक सक्षम, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानस्नेही बनवण्याच्या उद्देशाने 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत 'महा-साधना सप्ताह' आयोजित करण्यात आला होता. भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि 'कर्मयोगी भारत' यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणारा हा उपक्रम शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. याद्वारे प्रशासकीय कामात आधुनिकता आणि गतिमानता आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या साधना सप्ताहात महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकावला असून मिशन कर्मयोगीमध्ये नवा मानदंड ठरला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, महाराष्ट्राने केंद्र सरकारच्या 'मिशन कर्मयोगी' अंतर्गत आयोजित 'साधना सप्ताह 2026' मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत देशभरात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 'साधना सप्ताह 2026' मध्ये सहभागी टीम महाराष्ट्रातील प्रत्येक सदस्याच्या परिश्रमांचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पाठवलेले अभिनंदनपत्र हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. आपल्या राज्याने iGOT Karmayogi प्लॅटफॉर्मवर 46,94,597 अभ्यासक्रम पूर्ण केले असून 6,59,759 एआय-विशिष्ट प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत. हे आधुनिक सुशासन आणि क्षमता विकासाबाबतच्या आपल्या दृढ वचनबद्धतेचे द्योतक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मार्गदर्शनासाठी फडणवीसांनी आभार मानले आहेत. तर या मिशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व कर्मचार्यांचे अभिनंदनही त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रात म्हटले की, संपूर्ण भारतातील शासकीय सेवकांना एकत्र आणणाऱ्या साधना सप्ताह या आठवडाभर चालणाऱ्या अध्ययन सप्ताहाच्या निमित्ताने मी तुम्हा प्रत्येकाप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. कर्मयोगी साधना सप्ताहात उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो. साधना सप्ताह 2026 मध्ये सहभागींनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून या सप्ताहादरम्यान आपण सर्वांनी तसेच देशभरातील सुमारे 33.4 लाख कर्मचाऱ्यांनी 'आय-गॉट (iGOT) कर्मयोगी' मंचावर सुमारे 4 तासांचा अध्ययन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, यावरुनच सातत्यपूर्ण ज्ञानोपासना आणि उत्तम सार्वजनिक सेवा वितरण यामधील तुमची वचनबद्धता दिसून येते, असे मोदी यांनी म्हटले आहे.
भीषण आगीत ४ फर्निचर दुकाने जळून खाक; कोट्यावधींचा माल भस्मसात
भोकर : प्रतिनिधी शहराबाहेरील भागात मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत ४ फर्निचर दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. यात कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास १ दुकानातून अचानक आग लागली. अवघ्या काही वेळातच तिरूमला व साईकृपा फर्निचर या नावाने ओळखली जाणारी चारही दुकानांसह संपूर्ण शेड […] The post भीषण आगीत ४ फर्निचर दुकाने जळून खाक; कोट्यावधींचा माल भस्मसात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वारंवार वादग्रस्त विधाने करून चर्चेत येणाऱ्या जैन मुनी नीलेशचंद्र यांनी यावेळी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे. भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसता तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी राहिली नसती. तुमच्या हातातील काठी ही गांधींची नव्हे तर संघाची आहे. ही काठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना मारणारी आहे, असे ते म्हणालेत. ठाण्याच्या भिवंडी तालुक्यातील बापगाव येथे मंगळवारी एक हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात बोलताना जैन मुनी नीलेशचंद्र यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधताना मुस्लिम धर्मियांविरोधातही वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, फक्त टोपी घालणारा व टिळा लावणारा हिंदू नाही. तो कोठ्यावर बसल्यासारखा आहे. मनोज जरांगे पाटलांनी माझ्यावर मुनीचे मुनीर करून टाकण्याची टीका केली. पण तुम्ही जनता जाणता. तुमचे हिंदूत्व काहींच्या ... टाका. भाजप सोडून द्या, पण ते आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी करतात. अरे बाबा, आरएसएस नसती तर भारतात हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी नसती. तुमच्या हातात असणारी काठी गांधींची नाही तर आरएसएसची आहे. गांधींची काठी मुस्लिमांना साथ देणारी होती. पण ही काठी संघाची आहे. ती भारताचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना मारणारी आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची नाटके पाहता व घरी जाऊन झोपता. आता तुमच्या घरातच ओरिजनल छावा पैदा करा. तेव्हा मुस्लिमांची वाट लागेल. त्याशिवाय त्यांचे काहीही होणार नाही, असे नीलेशचंद्र म्हणाले. जैन समाज सनातन परंपरेतीलच नीलेशचंद्र यांनी यावेळी आपण आपल्यावर गुन्हा दाखल झाला तरी घाबरणार नसल्याचेही स्पष्ट केले. माझ्यावर केस दाखल झाली तरी मी घाबरणार नाही. आमचा समाज एसी हॉलमध्ये बसला आहे. पण मी फक्त सनातन धर्मासाठी येथे आलो आहे. जैन समाज हा वेगळा नाही, तर तो ही सनातन परंपरेतीलच आहे. आपण सर्व आहोत. आपल्याकडील तलवारीला धार लावून ठेवा. संकल्प करा. दुर्गाडी किल्ल्यावरील आई भवानीची शपथ घेऊन येतील अतिक्रमण काढण्याचा संकल्प करू. अतिक्रमण काढले नाही तर ... त्यांना तिथेच गाडू, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. जैन मुनीचे यापूर्वीही अनेक वादग्रस्त विधाने उल्लेखनीय बाब म्हणजे नीलेशचंद्र यांनी वादग्रस्त विधान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री नीतेश राणे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली होती. तसेच ते लवकरच मुख्यमंत्री होतील असे भाकितही वर्तवले होते. पण त्यानंतर नीतेश राणेंनी आपल्याला ही तुलना मान्य नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता जैन मुनींनी पुन्हा वादग्रस्त विधान केल्यामुळे त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता न्यायालयात आज भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची सुनावणी पार पडली. आरोपी अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणीत कल्पना खरात हिने आपल्या पतीच्या कथित गैरप्रकारांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. तिच्या वकिलांनी सादर केलेल्या मुद्द्यांमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. कल्पना खरात ही 31 मार्चपासून फरार आहे. तिच्यावर पती अशोक खरात यांच्या कथित गैरकृत्यांमध्ये साथ दिल्याचा आरोप करण्यात आला होता. बँक व्यवहार आणि जमिनीच्या व्यवहारांमध्ये तिचा सहभाग असल्याचेही तपासात समोर आले होते. मात्र, न्यायालयात तिच्या वतीने मांडण्यात आलेल्या युक्तिवादात तिचा कोणत्याही व्यवहाराशी थेट संबंध नसल्याचा दावा करण्यात आला. तिची सर्व बँक खाती अशोक खरात हेच हाताळत होते, असे तिच्या वकिलांनी सांगितले. आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात अनेक मुद्दे मांडले. फिर्यादीने दीड वर्षांनंतर गुन्हा दाखल केल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तसेच, जमीन व्यवहार झाल्यानंतरही फिर्यादीने बराच काळ न्यायालयीन दाद मागितली नाही, असेही त्यांनी नमूद केले. अशोक खरात यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतरच जुन्या व्यवहारांचा मुद्दा काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, संबंधित बैठकींमध्ये कल्पना खरात उपस्थित नव्हती आणि व्यवहारांमध्ये तिचा सहभाग नव्हता, असा दावा करण्यात आला. याउलट, सरकारी वकिलांनी या दाव्यांना जोरदार विरोध केला. कल्पना खरात हिच्या खात्यांमधून आर्थिक व्यवहार झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जमीन खरेदीच्या कागदपत्रांवर तिची सही आणि अंगठा असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. तसेच, व्यवहारांसाठी तयार करण्यात आलेल्या मुखत्यारपत्रात व्याजदर निश्चित करण्याचा निर्णयही तिच्याच संमतीने घेतल्याचे सांगितले गेले. त्यामुळे ती या व्यवहारांपासून पूर्णपणे अनभिज्ञ होती, हा दावा मान्य करता येणार नाही, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. तपास अधिकाऱ्यांनीही न्यायालयात महत्त्वाची माहिती सादर केली. कल्पना खरात हिच्या खात्यातून सुमारे सात कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. ती कोणत्याही नोकरीत नसताना किंवा ठोस व्यवसाय नसताना एवढे मोठे व्यवहार कसे झाले, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. तसेच, खरात कुटुंबाच्या मालमत्तेमध्ये तिचा 40 टक्के हिस्सा असल्याने या व्यवहारांची माहिती तिला असणे स्वाभाविक असल्याचेही सांगण्यात आले. अनेक सरकारी कागदपत्रांवर तिची उपस्थिती असल्याचेही तपासात आढळल्याचे नमूद करण्यात आले. अशोक खरात प्रकरण अधिक गुंतागुंतीचे या संपूर्ण सुनावणीतून अशोक खरात प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत असल्याचे दिसून येत आहे. एका बाजूला पत्नी स्वतःला निर्दोष असल्याचे सांगत आहे, तर दुसऱ्या बाजूला सरकारी यंत्रणा तिच्या सहभागाचे पुरावे मांडत आहे. न्यायालय आता या सर्व मुद्द्यांचा विचार करून निर्णय घेणार आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
अभिनेते रितेश देशमुख -जिनिलिया देशमुख एसटीचे ब्रॅण्ड ऍम्बेसिडर
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राची ‘लालपरी’ म्हणून ओळखल्या जाणा-या राज्य परिवहन महामंडळाला आता नव्या चेह-यांची साथ मिळणार आहे. अभिनेते रितेश विलासराव देशमुख आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री जिनिलिया रितेश देशमुख यांची एसटी महामंडळाच्या ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी आकर्षित करण्यासाठी आणि एसटीची प्रतिमा अधिक आधुनिक व आकर्षक करण्याच्या उद्देशाने हा […] The post अभिनेते रितेश देशमुख -जिनिलिया देशमुख एसटीचे ब्रॅण्ड ऍम्बेसिडर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वरळी येथे भाजपतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे सर्वसामान्य महिलेने संताप व्यक्त करत थेट मंत्री गिरीश महाजन यांना 'गेट आऊट' म्हटले. या महिलेचा हा रुद्रावतार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यावर गिरीश महाजन यांनी त्यांची भाषा योग्य नव्हती असे म्हटले आहे. आता यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत अजित पवारांचे उदाहरण देत महाजन यांना सल्ला दिला आहे. अमोल मिटकरी म्हणाले, एक सर्वसामान्य महिला मंत्र्यांवर चिडली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. 16 हजार ट्विट त्या व्हिडिओचे झाले आहेत. इथे अजित पवार आपल्याला लक्षात घ्यायला हवेत. पत्रकार त्यांना विचारायचे पहाटे कामाला सुरुवात का करतात, तर दादा सांगायचे यामुळे लोकांना ट्रॅफिक समस्या जाणवत नाही. आपल्यामुळे त्यांना त्रास होत नाही आणि कामे देखील लवकर होतात. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी लवकर पोहोचता येते. गिरीश महाजन यांनी तेवढा तरी अजित पवारांचा आदर्श घ्यावा, असा सल्ला मिटकरी यांनी दिला आहे. मुरलीधर मोहोळ यांना सवाल यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघात प्रकरणी मुरलीधर मोहोळ यांना काही प्रश्न विचारले आहे. ते म्हणाले, माझा मुरलीधर मोहोळ यांना प्रश्न आहे की, अजित पवार यांचे विमानात बसण्यापूर्वीचे सीसीटीव्ही अद्याप बाहेर का आले नाहीत? तुम्ही म्हणाला 15 दिवसांत ब्लॅक बॉक्स डेटा बाहेर आणू, मग 4 महीने झाले, का हा डेटा बाहेर आला नाही? त्यांनी टाइमबॉन्ड पाळला नाही, त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. तसेच अशोक खरातचे सीसीटीव्ही गतीने बाहेर येतात, परतवाडा प्रकरणातील सीसीटीव्ही बाहेर येतात, मग अजित पवार यांचे अपघाताचे का नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नाशिकसारखीच अजितदादांच्या प्रकरणात गती यावी पुढे बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, बारामती विमान दुर्घटनेचा ब्लॅकबॉक्स अद्याप बारामती पोलिस ठाण्यात आहे. बारामतीत मी मागील 3 दिवस फिरत आहे. बारामतीचे लोक आम्हाला सांगत आहेत की, अजित पवार विमान दुर्घटनाप्रकरणी तपासाबाबत आमची नाराजी आहे. नाशिक, परतवाडा प्रकरणांसारखी या प्रकरणाला गती आली तर नक्कीच आम्हाला बरे वाटेल. दादांचे दुर्दैव म्हणायचे का? महाराष्ट्रात एफआयआर होत नाही याची खंत असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. ते म्हणाले, बेंगलोरमध्ये एफआयआर दाखल झाला, तर सरकारने परत पाठवला, त्यांचे म्हणणे आहे की कागदांची पूर्तता झाली नाही. हे दादांचे दुर्दैव म्हणायचे का? अद्याप हे सांगत नाही साहिल मदान कुठे आहे? तो कपूर कुठे आहे? जीवंत आहेत की मेले, हे तरी आम्हाला सांगा, अशी मागणीही मिटकरी यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील साखर उद्योगाशी संबंधित एक मोठी घडामोड समोर आली असून राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) राज्यातील सात साखर कारखान्यांना कर्ज नाकारले आहे. राज्य सरकारकडून एकूण 14 कारखान्यांचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते, मात्र त्यापैकी केवळ सात प्रस्तावांना मंजुरी मिळाली. उर्वरित सात प्रस्ताव फेटाळल्यामुळे राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील तीन कारखान्यांना नकार मिळाल्याने स्थानिक नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम काही राजकीय नेत्यांच्या रणनीतीवर झाल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संग्राम थोपटे यांच्या कारखान्याला 467 कोटींचे कर्ज नाकारण्यात आले आहे. त्याचबरोबर दिवंगत अजित पवार यांच्या संबंधित कारखान्याच्या 361 कोटींच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे या निर्णयामागे केवळ आर्थिक कारणे आहेत की, राजकीय समीकरणांचा प्रभाव आहे, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. पक्षांतर करून राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही नेत्यांसाठी हा निर्णय धक्कादायक ठरला आहे. शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांनी राष्ट्रवादीतून अजित पवार गटाशी जवळीक साधली होती. त्यांच्या पत्नीनेही नुकत्याच निवडणुकीत यश मिळवले होते. मात्र, संबंधित कारखान्याला कर्ज नाकारल्यामुळे त्यांचे राजकीय गणित बिघडल्याची चर्चा सुरू झाली आहे. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचाही या यादीत समावेश आहे. दरम्यान, काही नेत्यांना पक्षांतराचा फायदा झाल्याचेही चित्र आहे. शरद लाड यांनी आपल्या कारखान्याला मदत मिळावी यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या या निर्णयामागे आर्थिक गणित असल्याचे बोलले जात होते. मात्र, काही ठिकाणी युती करूनही अपेक्षित निकाल मिळाला नाही. भाजपचे पृथ्वीराज जाचक आणि अजित पवार समर्थकांनी एकत्र येत कारखान्याचे नियंत्रण मिळवले होते, तरीही कर्ज मंजुरी मिळाली नाही. यामुळे राजकीय युती नेहमीच फायदेशीर ठरत नाही, हे स्पष्ट झाले आहे. कर्ज नाकारलेल्या कारखान्यांमध्ये जालना येथील रामेश्वर सहकारी साखर कारखाना, धाराशिवमधील विठ्ठलसाई कारखाना, पुण्यातील घोडगंगा आणि राजगड कारखाने, सोलापूरचा सिद्धेश्वर कारखाना, तसेच अहिल्यानगरमधील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील साखर कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये शेकडो कोटींची गुंतवणूक अपेक्षित होती. संबंधित नेत्यांमध्ये रावसाहेब दानवे, बसवराज पाटील, धर्मराज काडादी, राहुल जगताप यांसारख्या नावांचा समावेश आहे. राजकीय समीकरणे कशी बदलतात, हे पाहणे महत्त्वाचे याचदरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. ‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. आता राज्य सरकार या अहवालावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साखर कारखान्यांच्या कर्जप्रकरणामुळे निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती स्थापन केली जाणार आहे. याशिवाय राज्यातील कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसा भोगवटादार वर्ग - 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरणाच्या अधिमुल्याची पुनर्रचना करण्यात आली आहे. या निर्णयाचा राज्यातील हजारो नागरिकांना लाभ होणार आहे. खाली वाचा मंत्रिमंडळाचे निर्णय संक्षिप्त स्वरुपात (नगर विकास विभाग ) महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण (सिबीजी), 2026 जाहीरप्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती, बायोगॅस प्रकल्प पीपीपी, हायब्रीड अन्युईटी तत्वावर राबवणार. यावर्षासाठी पाचशे कोटींची तरतूद. घनकचऱ्याचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन, हरित गृह वायू उत्सर्जन कमी होणार. (उच्च व तंत्रशिक्षण विभाग) राज्यातील सात आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार मूळ वेतन मिळणार. या पदावरील शिक्षकांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पद भरतीमध्ये अतिरिक्त गुण मिळणार. (महसूल विभाग) सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आय. टी. पार्कला जमीन देण्याचा निर्णय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास 42.55 हेक्टर जमीन देण्यात येणार. सातारा जिल्हा आणि परिसरातील आयटी क्षेत्राला प्रोत्साहन, युवकांना रोजगार - व्यवसायाच्या संधी. (महसूल विभाग) राज्यातील कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार भोगवटादार वर्ग - 2 मधून भोगवटादार वर्ग - 1 मध्ये रुपांतरणाच्या अधिमुल्याची पुनर्रचना. याबाबतची अधिसूचना काढण्यास मान्यता. बावनकुळेंनी दिली एनएच्या निर्णयाची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे एनए परवानगीसंबंधीच्या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, एन ए परवानगीची अट आपण काढून टाकल्यानंतर विकासकाला परवानगी आणि त्यासाठीचे अधिमूल्य भरण्यासाठी इमारत परवानगी व्यवस्थापन प्रणाली (बीपीएमएस) सुरू केली आहे. सरकारने एनएचा कायदा रद्द केला. पण त्याची प्रणाली मात्र डेव्हलप करायची होती. आता कोणत्याही व्यक्तीला विकास परवानगी घ्यायची असेल, तर त्यांना अर्ज केल्यानंतर बीपीएमएसमध्ये एक विंडो असणार आहे. त्या खिडकीवर एनएला क्लिक केले की, त्या ठिकाणी प्रीमियम क्लिक केले की, तुमच्या मोबाईलवर लगेचच एक मेसेज येईल. मेसेजवरून पैसे भरले की, तुमच्या जमिनीचे स्टेटस दिसेल. या प्रकरणी कन्व्हर्जन प्रीमियम जे घ्यायचे आहे, ते आता ऑनलाईन महाआयटीने सॉफ्टवेअर तयार केले आहे. महाआयटीने यात खूप प्रगत प्रणाली तयार केली आहे. त्यामुळे एनएची अट रद्द केल्यानंतर प्रीमियम कसे भरावे हा प्रश्न होता. तो प्रश्न आता सुटला आहे. प्रत्येक बांधकाम विकासकाला महाआयटीच्या वेबसाईटवर जाऊन आपला प्रीमियम भरल्यानंतर आपली जमीन अकृषक करता येईल. त्यांना या प्रकरणी कोणत्याही प्रकारचे वेगळे कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही, असे बावनकुळे म्हणाले. हे ही वाचा… चैतन्य देगलूकर वारकरी संप्रदायातील घुसखोर:त्यांनी राम कृष्ण हरी हा मूलमंत्र पुसून जय श्रीराम हा राजकीय मंत्र रुजवला - शरद पवार गट वारकरी संप्रदाय व संत साहित्य सर्वकाही संपण्याची भीती दाखवून भाजपला मतदान करण्याचे आवाहन करणारे चैतन्य महाराज देगलूरकर हे वारकरी संप्रदायातील घुसखोर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. देगलूरकर यांनी राम कृष्ण हरी हा मूलमंत्र पुसून जय श्रीराम हा राजकीय मंत्र रुजवला, असेही ते म्हणालेत. वाचा सविस्तर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने आता थेट रणशिंग फुंकले आहे. यासाठी पक्षाने खास “संपर्क मंत्री अभियान” राबवले आहे. हे अभियान सत्तेच्या दिशेने झेप घेणारी आक्रमक ब्लूप्रिंट ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. या अभियानांतर्गत शिवसेनेने राज्यातील २२ जिल्ह्यांतील संघटना मजबूत करत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर ताबा मिळवण्याचा निर्धार केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक संपर्क मंत्र्यांच्या खांद्यावर दोन जिल्ह्यांची जबाबदारी टाकत “जिंकाच, अन्यथा पर्याय नाही” असा स्पष्ट संदेश दिला आहे. उपमुख्यमंत्री यांच्या नंदनवन या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी रात्री उशिरा प्रमुख मंत्र्यांची, पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे यांनी आपल्या नेत्यांना आगामी वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. मागील स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये शिवसेनेने राज्यात क्रमांक दोनचा पक्ष म्हणून भक्कम स्थान मिळवले होते. या यशामुळे पक्षाच्या कामगिरीबाबत अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, त्याचबरोबर जबाबदारीही अधिक वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका केवळ पुनरावृत्तीची संधी नसून, आपले वर्चस्व अधिक मजबूत करण्याची आणि पहिल्या क्रमांकावर झेप घेण्याची निर्णायक लढाई म्हणून पाहिली जात आहे. त्यामुळेच पक्षाने यावेळी अधिक आक्रमक, नियोजनबद्ध आणि लक्ष्यकेंद्री रणनीती अवलंबत प्रत्येक स्तरावर विजय सुनिश्चित करण्याचा निर्धार केला आहे. या अंतर्गत गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव व नंदुरबार, उदय सामंत यांच्याकडे नाशिक व अहमदनगर, योगेश कदम यांच्याकडे ठाणे व पालघर, प्रकाश आबिटकर यांच्याकडे नांदेड व हिंगोली, भरतशेट गोगावले यांच्याकडे बीड, आशिष जयस्वाल यांच्याकडे जालना, प्रताप सरनाईक यांच्याकडे अमरावती व अकोला, संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ व वाशिम, संजय शिरसाट यांच्याकडे भंडारा व गोंदिया, प्रतापराव जाधव यांच्याकडे नागपूर व वर्धा, शंभुराज देसाई यांच्याकडे गडचिरोली व चंद्रपूर तसेच दादा भुसे यांच्याकडे धुळे व बुलढाणा या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या २२ जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण जिंकत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदांवर भगवा फडकवणे हे अंतिम लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी संपर्क मंत्र्यांना दिलेले आदेशही तितकेच धारदार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात टार्गेट फिक्स करून निवडणुकीची काटेकोर तयारी करायची, विजयाची टक्केवारी वाढवायची आणि जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार शोधून त्यांना पूर्ण ताकद द्यायची ही पहिली अट आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आहेत, त्या ठिकाणी जिल्हा व तालुका स्तरावरील शासकीय समित्यांमध्ये शिवसेनेचे प्रतिनिधित्व आक्रमकपणे वाढवायचे, यासाठी स्थानिक खासदार, आमदार आणि संपर्क प्रमुख यांच्याशी थेट समन्वय साधायचा असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर ज्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) किंवा भाजपचे पालकमंत्री आहेत, तिथेही मागे हटायचे नाही शासकीय समित्यांमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांना स्थान मिळवून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच निधीची बाजूही तितकीच मजबूत ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्हा नियोजन (DPDC) मधून जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि शाखाप्रमुख यांना निधी उपलब्ध करून देत स्थानिक पातळीवर पकड मजबूत करण्याचे निर्देश आहेत. प्रशासनावर प्रभाव निर्माण करत लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना वेळोवेळी सहकार्य मिळेल याची खात्री करायची, तसेच शासकीय योजनांचा लाभ थेट तळागाळापर्यंत पोहोचवायचा ही जबाबदारीही स्पष्ट करण्यात आली आहे. विशेष कार्यकारी अधिकारी (S.E.O.) यांच्या नियुक्त्या करून संघटनात्मक यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर बी एल ए यादी अद्ययावत ठेवणे आणि तालुका तसेच विधानसभा स्तरावर बी एल ए प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकूणच, शिवसेनेचे हे “संपर्क मंत्री अभियान” म्हणजे साधा कार्यक्रम नाही, तर स्थानिक सत्तेवर थेट कब्जा मिळवण्याची आक्रमक मोहीम आहे. संघटन, प्रशासन आणि निवडणूक व्यवस्थापन या तिन्ही आघाड्यांवर एकाच वेळी जोरदार हल्ला चढवत शिवसेना आता मैदानात उतरली असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये हा धडाका किती प्रभावी ठरतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आनंदराव अडसुळ (शिवसेना नेते), प्रकाश पाटील (शिवसेना नेते), भाऊसाहेब चौधरी (शिवसेना सचिव), मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री आशिष जैस्वाल, आमदार डॉ. मनिषा कायंदे तसेच माजी आमदार रविंद्र फाटक उपस्थित होते. बैठकीला ऑनलाईन उपस्थिती म्हणून मंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री संजय राठोड, मंत्री भरतशेठ गोगावले, मंत्री योगेश कदम, मंत्री संजय शिरसाठ आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले होते.
नाशिक आयटी कंपनीतील कथित लैंगिक शोषणाच्या प्रकरणातील आरोपींच्या वकिलांनी कोर्टात एकत्र काम करताना झालेल्या वादातून आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अवघ्या राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणाला एक वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक स्थित टीसीएस कंपनीत कार्यरत असणाऱ्या तरुणींवर लैंगिक अत्याचार झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी 9 तरुणींनी आपल्या वरिष्ठांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून रिसॉर्टवर नेत अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी धर्मांतराचा अँगलही समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या जामिन अर्जावर आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यात आरोपीच्या वकिलांनी या प्रकरणाला उगीचच वेगळे वळण दिले जात असल्याचा युक्तिवाद केला. बचाव पक्षाने काय केला युक्तिवाद? बचाव पक्षाचे वकील म्हणाले की, फिर्यादी व आरोपी एकाच कंपनीत काम करतात. काम करताना त्यांच्यात वाद झाला. त्या वादातून फिर्यादीने आरोपींवर खोटा गुन्हा दाखल केला. त्यांच्या या युक्तिवादावर सरकारी वकील किरण बेंडभर यांनी जोरदार विरोध करत आरोपींना जामिन देण्यास विरोध दर्शवला. आरोपींविरोधात बलात्कार व अॅट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीच्या कृत्याचे समाजात गंभीर पडसाद उमटलेत. त्यामुळे त्यांना जामीन देऊन दिलासा देण्याची काहीच गरज नाही, असे ते म्हणाले. अखेर कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी दानिश शेख व इतरांचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान, बचाव पक्षाच्या नव्या युक्तिवादानंतर प्रस्तुत प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पीडित तरुणीने काय सांगितली होती आपबिती? पीडितांपैकी एका तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टीसीएसमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. जुलै 2022 मध्ये त्याने पीडितेवर पहिल्यांदा बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याचे अगोदरच लग्न झाले होते. पण त्याने ही वस्तुस्थिती लपवून पीडितेपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. काही काळानंतर पीडितेला टीसीएसच्या नाशिक येथील युनिटमध्ये नोकरी मिळाली. तेव्हा आरोपीही तिथे कार्यरत होता. ऑगस्ट 2024 मध्ये आरोपी पीडितेला एका रिसॉर्टवर घेऊन गेला. तिथे त्याने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीच्या पत्नीनेच पीडितेशी साधला संपर्क या घटनेनंतर फेब्रुवारी 2026 मध्ये पीडितेला आरोपी विवाहित असल्याची व त्याला 2 मुले असल्याची बाब समजली. ही माहिती मिळताच तिच्या पायाखालची वाळू सरकली. विशेष म्हणजे आरोपीच्या पत्नीने स्वतः पीडितेशी संपर्क साधून तिला ही माहिती दिली. त्यानंतर पीडितेने या प्रकरणी आरोपीला जाब विचारला. तेव्हा त्याने स्पष्ट् केले की, त्याचा तिच्याशी लग्न करण्याचा कोणताही हेतू नव्हता. कारण, तो अगोदरच विवाहित होता. पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपी हा आपल्या इतर 2 सहकाऱ्यांसोबत कंपनीच्या उपहारगृहात तिच्याशी वारंवार भेटत होता. हे तिघे मिळून अनेकदा देवदेवतांविषयी अवमानकारक शेरेबाजी करत होते. आरोपी तरुणाने आपल्यावर धर्मांतर करण्याचा दबाव टाकला. त्याच्यासह त्याच्या इतर सहकाऱ्यांनी माझे लैंगिक शोषण केले. मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.
लग्नासाठी मुली मिळेना, बुलडाण्यात ५ दिवसांत दोन तरुणांची आत्महत्या
बुलडाणा : प्रतिनिधी लग्नासाठी मुली मिळत नसल्यामुळे बुलडाण्यात २ तरुणांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे राहणा-या हरीश वानखेडे या तरुणाने लग्न जुळत नसल्याने आत्महत्या केली. तर दुसरी घटना बुलडाण्याच्या चिखली तालुक्यात मंगरूळ येथे घडली. याच कारणातून सत्यपाल भिसे या तरुणाने आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, लग्न जुळत नसल्याने बुलडाणा […] The post लग्नासाठी मुली मिळेना, बुलडाण्यात ५ दिवसांत दोन तरुणांची आत्महत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दांत टीका केली आहे. तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट झालेला दिसतोय. तुमचे पिताश्री पक्ष रोडून राष्ट्रवादीत गेले, तेव्हा कुणी कसला तुकडा टाकला होता का? असा खोचक सवाल वाघ यांनी केला होता. त्यानंतर रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक रंगल्याचे पाहायला मिळत आहे. आता रोहिणी खडसे यांनी थेट संत तुकारामांच्या संतवाणीतून वाघ यांच्यावर प्रहार केला आहे. रोहिणी खडसे यांनी ट्विट करत म्हटले की, ज्यांचा बुद्धीशी काडीचाही संबंध नाही अशा 'चित्रा'विचित्र लोकांनी बुद्धी विषयी न बोललेले बरे! माझ्या वडिलांवर बोलण्याआधी लक्षात ठेवा की ज्या पक्षात तुम्ही आमदार म्हणून मिरवत आहात. त्या पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यात माझ्या वडिलांचा वाटा आहे. आयत्या बिळावरील नागोबांनी जरा बुद्धीवर जोर देऊन बोलावे, असा खोचक टोला खडसे यांनी लगावला आहे. पुढे रोहिणी खडसे म्हणाल्या, अशा 'चित्र'विचित्र लोकांसाठी तुकोबाराय म्हटलेत,आयत्या बिळावरी नागोबा वसे ।परिश्रम न करी, मान मात्र हसे ।। दुसऱ्याच्या घामावर उभारे दरबार ।काळ आला म्हणे, झाला मी शहाणार ।। कर्माविण फुशारकी किती दिवस जाई ।सत्याच्या उजेडी खोटे रूप पाही ।। तुका म्हणे ज्याचे कष्ट त्याचे फळ ।उगीच्याच्या मिरवणुकीचे होते विटाळ ।। अशा पद्धतीने रोहिणी खडसे यांनी थेट संत तुकाराम यांच्या संतवाणीतून चित्रा वाघ यांच्यावर टीका केली आहे. तसेच पुढे खडसे म्हणाल्या, आम्ही जन्मतः संघर्ष करतो आहोत आणि आता संघर्षच निवडला आहे. त्यामुळे लढण्याच्या बाता आमच्या समोर नका मारू. कारवाई होईल या भीतीने आम्ही मैदान सोडले नाही. त्यामुळे महिलांचा प्रश्न असो व या देशातील नागरिकांना हक्काचा आम्ही आजही मैदानात आहोत, कालही होतो आणि उद्याही राहू, असे खडसे यांनी म्हटले आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा तुतारीच्या वाजंत्रीच्या बुद्धीचा खडखडाट:चित्रा वाघ यांची रोहिणी खडसेंवर टीका; रोहिणींनी 'चित्रा विचित्र' म्हणत साधला होता निशाणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांवर महिला आरक्षणाच्या मुद्यावर चर्चेचे आव्हान दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे आव्हान स्वीकारले होते. पण चित्रा वाघ यांनी फडणवीस हे त्यांच्या बरोबरीच्यांशी बोलतील असे म्हणत त्यांचे आव्हान टोलवून लावले होते. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी सुप्रिया सुळे यांनी आव्हान स्वीकारल्यामु्ळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याची टीका केली होती. तसेच चित्रा वाघ यांचा उल्लेख त्यांनी चित्रा-विचित्र असाही केला होता. यामुळे संतापलेल्या चित्रा वाघ यांनी आज एका पोस्टद्वारे त्यांच्यावर पलटवार केला. वाचा सविस्तर
शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीचे दर कोसळल्याने क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सेनगाव ते गोरेगाव मार्गावर बुधवारी ता. 22 दुपारी हळद पेटवून देत शासनाचा निषेध केला. आगामी काळात मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर हळद फेकून आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. राज्यात सर्वात जास्त हळद हिंगोली जिल्ह्यात पिकविली जाते. हिंगोलीच्या हळदीने देशभरात ओळख निर्माण केली असून बाहेर राज्यातही हिंगोलीच्या हळदीची मागणी होत आहे. सध्या नवीन हळदीची आवक होत आहे. मात्र हळदीची आवक वाढल्यानंतर हिंगोलीच्या संत नामदेव हळद बाजारात हळदीच्या दरात घसरण झाली. सुमारे एक ते दीड महिन्यापूर्वी 16 हजार रुपये क्विंटल प्रमाणे खरेदी केली जात असलेली हळद आता 12 हजार रुपये क्विंटल दराने खरेदी केली जात आहे. हळदीचे भाव कोसळल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आंदोलन केले होते. दरम्यान, क्रांतीकारी शेतकरी संघटनेने हळदीच्या दराच्या प्रश्नावरून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज गोरेगाव ते सेनगाव मार्गावर पदाधिकाऱ्यांनी हळद पेटवून देत शासनाचा निषेध केला. यावेळी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सतीष इडोळे, तालुकाध्यक्ष प्रविण मते, शांतीराम पाटील, मनोहर सावके पाटील, संतोष सावके, सखाराम भाकरे, ज्ञानेश्वर कारवखे, संजय इंगळे, गोपाल पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच बटावच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या पैशातून रक्कम कपात करणाऱ्या व्यापाऱ्यांचाही निषेध केला आहे. हळदीच्या प्रश्नावर आगामी काळात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हळद फेकून आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे. यावेळी हिंगोली बाजार समितीचे माजी सचिव नारायण पाटील, विशाल गुंडेवार, बुळे यांनी पदाधिकाऱ्यांचे निवेदन स्विकारले. यावेळी अनुचीत प्रकार घडू नये यासाठी गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके, उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, जमादार अनिल भारती यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी अमेरिकेतील इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (यूएसआयडीएफसी) या संस्थेकडून 90 कोटी रुपयांची गुंतवणूक न्यूट्रीफ्रेश फार्म्सला प्राप्त झाली आहे. दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत झालेल्या सामंजस्य कराराचा हा एक भाग आहे. दावोस येथे महाराष्ट्र शासन, रूरल एन्हान्सर्स आणि न्यूट्रीफ्रेश फार्म्स यांच्यात नियंत्रित वातावरणातील शेतीसाठी 2500 कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला होता. यापैकी 400 कोटी रुपयांची गुंतवणूक अमेरिकेतून अपेक्षित होती. प्राप्त झालेली 90 कोटींची रक्कम ही त्यातील पहिली गुंतवणूक आहे. या निधीतून पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर आणि नागपूर येथे प्रकल्प कार्यान्वित केले जातील, अशी माहिती रूरल एन्हान्सर्सचे संस्थापक व सीईओ अंबर आयदे यांनी दिली. जागतिक स्तरावर अनिश्चिततेचे वातावरण असतानाही महाराष्ट्रातील कृषी व अन्नसुरक्षा क्षेत्रावर जागतिक गुंतवणूकदारांनी विश्वास दाखवल्याचे हे प्रतीक आहे, असे आयदे म्हणाले. स्मार्ट शेतीसाठी झालेल्या सामंजस्य करारानंतर महाराष्ट्राला मिळालेली ही पहिली थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आहे. या निधीमुळे अत्याधुनिक कृषी पायाभूत सुविधा उभारणी, तंत्रज्ञान-आधारित शेती प्रणालींचा विस्तार आणि निर्यात-केंद्रित कृषी पुरवठा साखळी बळकट करण्यात मदत होईल. यामुळे महाराष्ट्र उच्च कार्यक्षमतेच्या आणि तंत्रज्ञानाधारित शेतीसाठी जागतिक केंद्र म्हणून उदयास येईल. न्यूट्रीफ्रेश फार्म्सचे सहसंस्थापक गणेश निकम यांनी सांगितले की, या भांडवली गुंतवणुकीमुळे नियंत्रित वातावरणीय शेती (सीईए) पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल. यामुळे अचूक तंत्रज्ञानाधारित शेती, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि पिकांच्या उत्पादनक्षमतेत वाढ साध्य होईल. तसेच, या उपक्रमाद्वारे निर्यातक्षम कृषी पुरवठा साखळी अधिक बळकट करण्याचे उद्दिष्ट असून, राज्याला उच्च कार्यक्षमतेच्या शेतीचे केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर दिला जाईल. या गुंतवणुकीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, डीएफसीची ही गुंतवणूक आमच्या दावोस येथील वचनबद्धतेचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करण्याच्या दिशेने पडलेले महत्त्वाचे पाऊल आहे. अशा भागीदारींच्या माध्यमातून आम्ही अचूक शेतीकडे होणारा बदल अधिक वेगाने घडवून आणत आहोत, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवत आहोत आणि जागतिक अन्न प्रणालीत महाराष्ट्राची भूमिका अधिक मजबूत करत आहोत. या प्रकल्पांतर्गत नियंत्रित पर्यावरणाधारित क्लस्टर शेतीवर भर दिला जाणार असून, निर्यात-केंद्रित कृषी पायाभूत सुविधांना चालना मिळेल. अमेरिकेतील 'डीएफसी'कडून न्यूट्रीफ्रेश फार्ममध्ये एकूण 500 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे, त्यापैकी 90 कोटींचा हा पहिला हप्ता आहे. हे प्रकल्प जुलै 2026 पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा घडामोडींचा टप्पा गाठत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. 2006 साली झालेल्या स्फोट प्रकरणातील चार आरोपींना न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, सत्र न्यायालयाने यांच्याविरोधात निश्चित केलेले आरोप रद्द केले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला खटला आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर आरोपींना दिलासा मिळाला असून, प्रकरणातील तपास आणि पुराव्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणात राजेंद्र चौधरी, धान सिंह, लोकेश शर्मा आणि मनोहर नरवारीया या चार आरोपींचा समावेश होता. सत्र न्यायालयाने यांच्यावर हत्या, गुन्हेगारी कट रचणे तसेच युएपीए कायद्यांतर्गत आरोप निश्चित केले होते. मात्र, या आदेशाला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर सुनावणीदरम्यान न्यायालयाने सादर केलेल्या पुराव्यांचा आणि तपास प्रक्रियेचा सखोल आढावा घेतला. अखेर पुरावे अपुरे असल्याचे नमूद करत सत्र न्यायालयाचा आदेशच रद्द करण्यात आला. सुनावणीदरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सादर करण्यात आला नाही, ही बाब न्यायालयाच्या निर्णयात महत्त्वाची ठरली. घटनेचा प्रत्यक्ष अनुभव सांगणारा साक्षीदार नसल्यामुळे आरोपांची पायाभूत रचना कमकुवत ठरल्याचा मुद्दा आरोपींच्या वकिलांनी मांडला होता. तसेच, यापूर्वीच इतर आरोपींची सुटका झाल्याचा संदर्भ देत हा खटला टिकू शकत नाही, असा युक्तिवादही करण्यात आला. न्यायालयाने या सर्व बाबींचा विचार करत आरोपींना दिलासा दिला. 2006 मध्ये मालेगाव येथे चार ठिकाणी झालेल्या स्फोटांमध्ये 31 जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. या भीषण घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. या प्रकरणात दीर्घकाळ तपास सुरू राहिला आणि अनेक आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, कालांतराने पुराव्यांच्या अभावामुळे आणि तपासातील त्रुटींमुळे खटल्याची दिशा बदलत गेली. याच पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्त्वाचा ठरतो. दरम्यान, 2008 साली झालेल्या मालेगाव स्फोट प्रकरणातही सर्व सात आरोपींची यापूर्वी निर्दोष सुटका झाली होती. त्या प्रकरणातही केवळ संशयाच्या आधारे आरोपींना दोषी ठरवता येत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्यांची मुक्तता केली होती. आता 2006 च्या प्रकरणातही तसाच निर्णय आल्याने दोन्ही स्फोट प्रकरणांतील आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या संपूर्ण तपास प्रक्रियेवर आणि यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर चर्चा सुरू झाली आहे. उशिरा का होईना पण न्याय मिळाला या निर्णयानंतर आरोपींनी न्यायालयाचे आभार मानले असून, आम्हाला उशिरा का होईना पण न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया दिली. 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागल्याने संबंधित कुटुंबीय आणि समाजातही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या स्फोटांमध्ये अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गावात अल्पवयीन मुलीचा विवाह होत असून तातडीने यावे असा संदेश मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने हातचे काम सोडून जामठी बुद्रूक (ता.हिंगोली) गाव गाठले. मात्र त्या ठिकाणी सर्वत्र शांतता दिसून आली अन कुठलाही विवाह नसल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या प्रकरणात डायल 112 वर चुकीची माहिती देणाऱ्या तरुणावर पोलिसांनी मंगळवारी ता. 21 रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात अक्षय्य तृतीय व इतर वेळी बालविवाह होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. केवळ अक्षय तृतीयेच्या दिवशीच नव्हे तर इतर वेळीही सतर्क रहावे व आवश्यक त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. दरम्यान, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 21रात्री पावने नऊ वाजण्याच्या सुमारास डायल 112 क्रमांकवर महादेव आठवले (रा. जामठी बुद्रूक) या तरुणाने संपर्क साधून गावात 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असून तुम्ही लवकर या, तुम्हा तातडीने कारवाई केली नाही तर मी आत्महत्या करेल अशी धमकीच दिली. गावात अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शामकुमार डोंगरे, जमादार राजकुमार जमधाडे, सुधीर तपासे यांच्यासह पोलिस पथकाने तातडीने जामठी बुद्रूक गावात जाऊन पाहणी केली. पोलिसांनी संपूर्ण गावात फेरफटका मारला. मात्र कुठेही विवाह होत असल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर पोलिसांनी गावातील पोलिस पाटील व इतरांशी संवाद साधून खात्री केली. त्यांनीही गावात विवाह नसल्याची माहिती दिली. डायल 112 वर मिळालेली माहिती खोटी असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या प्रकरणी जमादार तपासे यांच्या तक्रारीवरून महादेव आठवले याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जमादार जमधाडे पुढील तपास करीत आहेत.
वारकरी संप्रदाय व संत साहित्य सर्वकाही संपण्याची भीती दाखवून भाजपला मतदान करण्याचे आवाहन करणारे चैतन्य महाराज देगलूरकर हे वारकरी संप्रदायातील घुसखोर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केला आहे. देगलूरकर यांनी राम कृष्ण हरी हा मूलमंत्र पुसून जय श्रीराम हा राजकीय मंत्र रुजवला, असेही ते म्हणालेत. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका लेखाद्वारे वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांच्या लोकांची घुसखोरी झाल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून विकास लवांडे यांनी अशा लोकांची कथित पोलखोल करत आहेत. त्यांनी आज एक व्हिडिओ पोस्ट करत चैतन्य महाराज देगलूरकर हे वारकरी संप्रदायातील प्रतिगामी विचारांचे घुसखोर असल्याचा तिखट आरोप केला. वारकरी संप्रदाय व संत साहित्याला भाजपशिवाय कुणीही वाचवू शकणार नाही अशी काल्पनिक भीती दाखवून ते आपल्या रसाळ वाणीने जनतेचा बुद्धिभेद करत आहेत, असे ते म्हणालेत. देगलूरकर यांच्याकडून जनतेचा बुद्धिभेद विकास लवांडे आपल्या पोस्टमध्ये जोडलेल्या व्हिडिओचा दाखला देत म्हणाले, हा घ्या आणखी एक पुरावा. हे आहेत देगलूरकर फडाचे शब्दप्रभू चैतन्य देगलूरकर आणि त्यांचे 2024 मधील पंढरपुरातील कीर्तनकारांच्या मेळाव्यातील भाषण. वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य सर्व काही संपणार आहे म्हणून भाजप शिवाय कुणीच आपल्याला वाचवणार नाही. अशी काल्पनिक भीती दाखवून निवडणुकीत प्रचार कसा करावा, जनतेचा बुद्धिभेद कसा करावा याचे आपल्या रसाळ वाणीने प्रशिक्षण देत आहेत. त्यानंतर राज्यात अनेक कीर्तनकार आपल्या कीर्तनातून भाजपाचा उघड खरा नव्हे खोटा प्रचार करत होते. सामान्य जनतेचा बुद्धिभेद करत होते. भागवत वारकरी संप्रदायातील संतांच्या कोणत्या ग्रंथात आहेत ? राम कृष्ण हरी हा मूलमंत्र पुसून जय श्रीराम हा राजकीय नवा मंत्र रुजवणाऱ्या सन्माननीय देगलूरकर यांना वारकरी संप्रदायातील घुसखोर नाही म्हणायचे तर काय मग म्हणायचे ? त्यांच्या समर्थकांनी सांगावे. बाकी त्यांच्या देगलूरकर फडाचा पूर्व इतिहास, ते वर्णवर्चस्ववादी आहेत की नाही, त्यांची घराची परंपरा याच्याशी मला आत्ता काहीच बोलायचे नाही बोललो नाही. राम कृष्ण हरी, असे ते म्हणालेत. काय म्हणत आहेत देगलूरकर आपल्या व्हिडिओत? चैतन्य देगलूरकर आपल्या व्हिडिओत म्हणत आहेत की, मी साधा प्रश्न आपल्याला विचारतो, तुम्ही हाच प्रश्न कीर्तनातून समाजाला विचारा. मला सांगा, रामगिरी महाराजांचे काय चुकले? साधा प्रश्न आहे. काय चुकले त्यांचे? त्यांचे जे तथाकथित स्कॉलर्स म्हणून भाषणे देतात त्यांच्या भाषणातून हेच वक्तव्य येते. तेच वक्तव्य रामगिरी बाबांनी केले. आजही आपण तेच सांगू. झालंय ते झालंय. 9 वर्षांच्या मुलीशी लग्न झालंय. करता काय त्याला. हा इतिहास आहे. वस्तुस्थिती आहे. त्याला मी किंवा तुम्ही काही करू शकत नाही. इतिहास बदलणे हे कुणाच्याही हातात नाही. पण इतिहासातून शिकणे हे सगळ्यांच्या हातात आहे. आणि हे केलेच पाहिजे. आता व्यक्तिगत संबंधांना फारसा अर्थ राहिला नाही. व्यक्तिगत संबंधांना अर्थ नाही. सुदैवाने माझे खूप चांगले आहे. माझ्या मतदारसंघात जो उभा राहत आहे, तो माझ्या प्रेमाचाच आहे. त्यामुळे मला दुसऱ्या विकल्पाचा प्रश्नच नाही. पण अनेक ठिकाणी अशा अडचणी निर्माण झाल्या आहेत की, तिथे प्रेमातला मनुष्य असतो, पण तो दुसऱ्या पक्षाचा असतो. त्यामुळे मी म्हणालो की, या निवडणुकीत वैयक्तिक संबंधांना धर्मासाठी, आपले अस्तित्व राखण्यासाठी, आपली विचारधारा अबाधित ठेवण्यासाठी, आपला धर्म राखण्यासाठी, आपले वाड्मय राखण्यासाठी हे सर्व बाजूला ठेवा. आपल्या अंतःकरणात धर्मनिष्ठता वाढती राहिली पाहिजे. कुठेतरी आपल्या अंतःकरणात आपले जाज्वल्य विचार नेहमी जागृत राहिले पाहिजे, यासाठी आपण नेहमी जागृत राहिले पाहिजे. आम्हाला चातुर्मासातून दुर्दैवाने बाहेर पडता येणार नाही. पण ज्यावेळी आमचे प्रवचनांची सांगता होईल, त्यावेळी यासंबंधीचे सविस्तर चिंतन आम्ही आमच्या प्रवचनातून मांडू. आम्हालाही याची काळजी आहे. आज तुम्ही जर तुम्ही योग्य बटणे दाबलीत, तर पुढचा चातुर्मास करता येण्याची शक्यता आहे. अन्यथा नाही. हे ही राहणार नाही. आपण योग्य बटण दाबून हिंदू उमेदवार निवडून दिले, हिंदुत्वाचा परामर्श घेऊन चालले पाहिजे. अहो काय केली हिंदुत्त्वाची व्याख्या. त्याला जीवनशैलीशी जोडण्यात आले. पण हिंदूत्व ही जीवनशैली नाही. ते आमचे रक्त आहे, हिंदूत्व हा आमचा प्राण आहे. हिंदूत्व हा आमची अस्मिता आहे, धर्म आहे. हिंदू हा आमचा संप्रदाय आहे. म्हणून हिंदू हा आमचे अस्तित्व आहे, या विचाराने आपण त्याच्याकडे पाहिले पाहिजे व त्या दृष्टिनेच आपण प्रवृत्त झाले पाहिजे. आत्ता फक्त अयोध्या झाली आहे. आपण योग्य बटणे दाबली तर नजिकच्या काळात मथुरा व काशी या दोन्हीकडे या दर्शनाचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे हा विचार वाटतो तेवढा सामान्य नाही. हे हिमनगाचे एक टोक आहे. त्याच्या खाली फार मोठी षडंयंत्रे आहेत. फार मोठा दुर्विचार व दुर्बुद्धी आहे. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या आमच्या हातात एकच गोष्ट आहे, ती म्हणजे हिंदूत्वाचा अभिनिवेष बाळगणाऱ्या उमेदवारा निवडून देणे. हे झाले की, शेवटी आपणच आहोत, असे बरेचकाही चैतन्य देगलूरकर म्हणालेत.
पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याला आता वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही यातील मृतांच्या अनेकांना न्याय मिळाला नाही. त्यात भाजप सध्या महिला आरक्षण विधेयकासाठी आंदोलन करत असतानाच पहलगामच्या महिलांना न्याय कधी देणार असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले की, सध्या देशात अफवांचे पेव फोडून आणि खोट्या आंदोलनांचा बाजार मांडत फिरणाऱ्या भाजप सरकारला तब्बल 11 महिन्यांनंतर जाग आली. पुण्याच्या असावरी जगदाळे या एका भगिनीला नोकरीचे नियुक्तीपत्र देऊन 'कर्तव्य' पार पाडल्याचा आव आणला गेला. पण हा प्रश्न एका नोकरीपुरता मर्यादित आहे का? न्यायाची प्रतीक्षा की केवळ आश्वासनांची खैर? पहलगाममध्ये ज्या माता-भगिनींचे कुंकू पुसले गेले, ज्यांचे संसार उध्वस्त झाले, त्यांच्या डोळ्यांतील पाणी पुसायला सरकारला वर्ष का लागते? असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला. पुढे अंबादास दानवे म्हणाले, आंदोलनांचा इव्हेंट कशासाठी? रस्त्यावर उतरून आंदोलने करण्याची हौस असणाऱ्या राज्यकर्त्यांनी एकदा पहलगामच्या पीडितांच्या डोळ्यात डोळे घालून सांगावे, न्याय कधी मिळणार? तसेच आमचा रोकडा सवाल, भाजपने आपल्या आंदोलनाच्या गदारोळात हे स्पष्ट करावे की, हिंदूंना 'वेचून' मारणाऱ्या त्या मारेकऱ्यांचे मुडदे कधी पडणार? राजकारणासाठी रस्त्यावर उतरण्यापेक्षा, ज्यांनी कुंकू पुसण्याचे कुकर्म केले त्यांना यमसदनी कधी धाडणार? असा रोखठोक सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे. वर्षापूर्तीनंतर कडेकोट बंदोबस्त पहलगाम येथील हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात लष्कर आणि सुरक्षा दलांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अलीकडील संभाव्य धोके लक्षात घेता, या भागात श्वान पथक आणि बॉम्बशोधक पथके दाखल झाली असून प्रत्येक ठिकाणची सखोल तपासणी केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही कसर न सोडता, सुरक्षा यंत्रणांकडून स्थानिक नागरिक आणि पर्यटकांची ओळखपत्रे अतिशय काटेकोरपणे तपासली जात आहेत. सुरक्षा दलांनी विशेषतः महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर आपले लक्ष केंद्रित केले असून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी संपूर्ण परिसर 'सॅनिटाईज' करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी अतिरिक्त नाकेबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली जात असून संशयास्पद हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, खबरदारीचा उपाय म्हणून पहलगाममधील काही प्रमुख पर्यटन स्थळे पर्यकांसाठी सध्या तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत.
राहुल गांधी हे काही जुमलेबाज नाहीत. त्यांची भूमिका एकच असते ज्या भागात जातील तशी भूमिका ते बदलत नाहीत. ते काही खोटं बोलत नाही. दक्षिणेत गेल्यावर एक आणि उत्तरेत एक रंग असे काही राहुल गांधी वागत नाहीत, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. सरड्या प्रमाणे कोण रंग आणि ड्रेस बदलतात हे सर्वांना ठाऊक आहे, असे म्हणत अप्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना दहशतवाद्यांशी केली आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, त्यांच्या पक्षाच्या सुब्रमण्यम स्वामी यांनी सुद्धा हेच वक्तव्य यापूर्वी केले आहे, त्यावर भाजप उत्तर का देत नाही. आमचे अध्यक्ष मागासवर्गीय माणूस आहे ते सत्य बोलतात त्यावेळी त्यांच्याविरोधात तुम्ही तुटून पडतात. स्वामींवर कारवाई करण्याची हिंमत तुमच्यात का नाही. स्वामींवर कारवाई का नाही? विजय वडेट्टीवार म्हणाले की, सुब्रमण्यम स्वामी यांनी महिलांचा अपामन केला आहे. महिलांना संसदेत किंवा विधिमंडळात जायचे असेल तर पंतप्रधान यांच्याकडे जावे लागते इतके चुकीचे शब्द ते महिलांबद्दल बोलत आहे. त्यांच्यावर भाजप कारवाई करण्याची हिंमत का करत नाही. आणि आमचा मागासवर्गीय नेता सत्य बोलतो त्याच्यावर तुटून पडतात. हे भाजपचे लोकं संधीसाधू आहेत. तेव्हा काँग्रेसला श्रेय दिले होते का? विजय वडेट्टीवार म्हणाले की, 2023 मध्ये महिला आरक्षणाचे विधेयक आले, तेव्हा काँग्रेसने याला समर्थन दिले होते आणि एकमताने ते मंजूर झाले होते.तेव्हा देशाच्या पंतप्रधानांनी काँग्रेसला श्रेय दिले होते का? आता जे विधेयक आणले होते त्यात नारी शक्तीचा उल्लेख कुठे होता? महिला आरक्षणाची सिरियल किलर भाजपच असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ..पण आता हे प्रकरण निवळले अजित पवार यांच्या मृत्यू बाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रश्न उपस्थित केले,त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना वडेट्टीवार म्हणाले की, सुनेत्रा ताईंनी ही भूमिका घेण्यास उशीर केला आहे. हा अजित दादांचा घातपात आहे का, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात होता. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर हे वक्तव्य आधी आले असते तर आगडोंब उसळला असता पण आता हे प्रकरण निवळले आहे. विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारी बाबत काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेल असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ..म्हणून यांची तोंड बंद झाली विजय वडेट्टीवार म्हणाले की, काल त्या महिलेने महिलांचा आक्रोश काय असतो हे दाखवून दिले आहे. 10 ते 20 महिला गोळा करत नाराशक्तीच्या काय बोंबा मारताय. काल त्या महिलेने जो आवाज उठवला तो खरा महिलांचा आवाज होतो. त्या महिलेला समजले हे काही खरे लोकं नाही, केवळ मताच्या राजकारणासाठी हे सर्व सुरू आहे, म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवला. भाजपने ज्या महिला जमा केल्या होत्या त्याचा तर आवाजही निघत नव्हता. पण त्या महिलेचा खरा आवाज होता म्हणून या सर्वांना काही बोलता आले नाही. फालतूगिरीला जनता बळी पडणार नाही विजय वडेट्टीवार म्हणाले की, महिला आरक्षणाचा आणि मंजूर न झालेल्या विधेयकाचा काहीही संबंध नव्हता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही बोलायचे नाही पण केंद्र सरकारकडून तसे लिहून आल्याने त्यांना बोलावे लागत आहे, पण वस्तुस्थिती काय आहे. नारी शक्ती वंदन नाही आणि हे लोकं चंदन लावून फिरत आहे, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. भाजपकडून महिला आरक्षणाच्या नावाने राजकारण सुरू आहे हे जनतेला माहिती आहे.अशा फालतूगिरीला महाराष्ट्रातील जनता बळी पडणार नाही.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या पूरक आरोपपत्रानंतर आता या प्रकरणाला नवा कलाटणी मिळाली आहे. न्यायालयाने या प्रकरणात रोहित पवार यांना मोठा दिलासा दिल्याची माहिती समोर आली असून, त्यांनी स्वतः समाजमाध्यमांवर पोस्ट करत न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. ईडीने याआधी मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये 2002 अंतर्गत रोहित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या कारवाईत बारामती अॅग्रो या कंपनीशी संबंधित 50 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. या मालमत्तेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील जमीन, साखर कारखाना, यंत्रसामग्री आणि इमारतींचा समावेश होता. ईडीच्या मते, ही संपत्ती कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या कथित अनियमित लिलाव प्रक्रियेतून मिळवण्यात आली होती. या प्रकरणाची सुरुवात 2019 मध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यापासून झाली होती. त्यात सहकारी साखर कारखाने अत्यंत कमी किमतीत खासगी कंपन्यांना आणि संबंधित व्यक्तींना विकल्याचा आरोप होता. या व्यवहारांमध्ये नियमांचे उल्लंघन करून काहींना अनुचित फायदा करून देण्यात आल्याचेही ईडीने म्हटले होते. या तपासादरम्यान एकूण 121.47 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली होती. दरम्यान, या कारवाईवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच ही कारवाई राजकीय दबावाखाली झाल्याचा आरोप केला होता. मी काही लोकांचे ऐकले नाही म्हणूनच माझ्यावर ही कारवाई झाली, असे त्यांनी याआधी म्हटले होते. मात्र, ईडीचे अधिकारी केवळ आदेशांचे पालन करत असल्याचे सांगत त्यांनी न्यायालयावर विश्वास व्यक्त केला होता. आता न्यायालयाने या प्रकरणात दिलासा दिल्यानंतर रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर भावनिक आणि ठाम प्रतिक्रिया दिली आहे. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास होता आणि आहे. अखेर न्यायालयाने मला या आरोपांतून वगळत ईडीच्या कारवाईतून मुक्त केले. याबद्दल न्यायालयाचे मनापासून आभार, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सत्य परेशान हो सकता है, मगर पराभूत नहीं, हे पुन्हा सिद्ध झाल्याचेही त्यांनी नमूद केले. घायल हूँ, इसलिए घातक हूँ याचबरोबर त्यांनी पुढील राजकीय भूमिकेबाबतही सूचक इशारा दिला आहे. या प्रकरणामुळे मला नाहक त्रास सहन करावा लागला, पण आता पुढे काय करायचे हे वेळच ठरवेल. ‘घायल हूँ, इसलिए घातक हूँ’, असे म्हणत त्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. या प्रकरणातील या नव्या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, पुढील काळात या मुद्द्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सातारा जिल्ह्यातील धरणांची घटती पाणी साठवण क्षमता, कालव्यांची दुरवस्था आणि जिहे-कटापूर योजनेतील विस्कळीत नियोजनावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधारी आमदारांवर आणि सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. सत्ताधाऱ्यांना अभ्यासापेक्षा केवळ श्रेयाचे राजकारण करण्यात रस आहे, असा गंभीर आरोप त्यांनी बुधवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. शशिकांत शिंदे म्हणाले की, जिल्ह्यातील धरणांमध्ये वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात गाळ साठल्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता कमालीची घटली आहे. अशा परिस्थितीत नवीन धरणे बांधण्यापेक्षा अस्तित्वात असलेल्या धरणांतील गाळ काढल्यास नैसर्गिकरित्या पाणी पातळी वाढू शकते. मात्र, सरकार या तांत्रिक बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा दावा त्यांनी केला. शशिकांत शिंदे पाणी सोडायला विरोध करत आहेत हा सत्ताधाऱ्यांचा प्रचार अत्यंत बालिशपणाचा आहे. स्वतःचे तांत्रिक अपयश लपवण्यासाठी दुसऱ्या लोकप्रतिनिधीवर आरोप करणे ही पळवाट आहे. निधी वळवल्याने टंचाई जिल्ह्यातील पाणी बंधारे आणि कालव्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत आहे. यावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, दुरुस्तीसाठी वारंवार निधीची मागणी करूनही सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्राचा निधी मराठवाडा आणि विदर्भाकडे वळवल्यामुळे सातारा जिल्ह्याला या टंचाईचा सामना करावा लागत असावा. पुसेगाव पट्ट्यातील जनतेला फसवून दोन भागांत संघर्षाची ठिणगी टाकण्याचे 'पाप' सत्ताधाऱ्यांनी केले आहे. उपलब्ध पाणीसाठा आणि सोडण्यात येणारे पाणी याचे नियोजन प्रशासनाला जमलेले नाही. जनतेची फसवणूक सुरू शशिकांत शिंदे म्हणाले की, गेली 20 वर्षे पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा कमी करून तो दुसरीकडे वळवणे हा चुकीचा निर्णय आहे. पाणी द्यायला आमचा कधीच विरोध नव्हता आणि नाही. परंतु, केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलेली आश्वासने आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने चाललेला सावळा गोंधळ यामुळे जनतेची फसवणूक होत आहे.
मुंबईच्या वरळी येथे महायुतीच्या आक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या महिलेने थेट 'गेट आऊट' म्हणत गिरीश महाजन यांना सुनावले होते. आता या प्रकरणावरून विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. रोहित पवार ट्विट करत म्हणाले, नौटंकी करणाऱ्या भाजपाला एकट्या महिलेने भर रस्त्यात उघडं करुन खऱ्या अर्थाने ‘हजारोंसे भारी… एक नारी’ हे सिद्ध केलं..! ही 'नारी शक्ती' खऱ्या अर्थाने 'वंदनीय' आहे. आता त्या भगिनीला पोलिसांकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण तसं झालं तर सत्यासाठी भिडणाऱ्या अशा शेकडो 'नारी शक्ती' पुढं येऊन भाजपचा मुखवटा पुन्हा टराटराsss फाडतील..!, अशा शब्दात पवारांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. जोरदार रिॲक्शन मिळणारंच तसेच एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले होते की, अनेक लोकांना आरोग्याच्या अडचणी असतात आणि अशा परिस्थितीत केवळ केंद्रातून आदेश आले म्हणून आणि His Masters Voice ला खूष करण्याच्या प्रयत्नात एखादा पक्ष लोकांना तीन-तीन तास ट्रॅफिकमध्ये अडकवून ठेवत असेल तर त्याची जोरदार रिॲक्शन मिळणारंच. पुढे रोहित पवार म्हणाले, अशाच एका संतप्त महिलेचा मुंबईतील व्हिडिओ बघायला मिळाला. आंदोलनाचं कारण सत्य असेल तर लोकं समजून घेतात... पण खोट्यासाठी लोकांना वेठीस धरलं जात असेल तर लोक तोंडावर कशी फजिती करतात, हेच या व्हिडिओतून दिसतं. आता त्रस्त व्यक्ती रागावल्याने काही वेळा शब्द चुकीचे जाऊ शकतात पण म्हणून संबंधित लाडक्या बहिणीवर कारवाई न करता तिच्या भावना समजून घेऊन तिला त्रास देणाऱ्यांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे…! इथून चालते व्हा हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला- विजय वडेट्टीवार कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडिओ शेअर करत भाजपवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, भाजपच्या महिला आघाडीला वाटलं असेल की घोषणाबाजीने आसमंत दणाणून सोडला की महिलांचे प्रश्न सुटले! पण भाजपच्या कार्यकर्त्यांना काय माहित, की खरी नारी शक्ती काय असते! त्यांच्या फोकनाड घोषणांपेक्षा सामान्य महिलेचा इथून चालते व्हा हा एकच आवाज जास्त पॉवरफुल ठरला. इव्हेंटच्या कॅमेऱ्यात शक्ती प्रदर्शन शूट होत असताना अचानक सामान्य मुंबईकर महिलेने भाजपला आरसा दाखवला. वाचा सविस्तर
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लालपरी आता नव्या रुपात प्रवाशांसमोर येणार आहे. सार्वजनिक वाहतूक अधिक आकर्षक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुख यांची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. एसटीची प्रतिमा अधिक आधुनिक बनवणे आणि नव्या पिढीला या सेवेकडे आकर्षित करणे, हा या निर्णयामागील मुख्य हेतू असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत एसटीची पोहोच वाढवण्यासाठी या सेलिब्रिटी जोडीचा वापर केला जाणार आहे. या निर्णयामुळे एसटीच्या प्रचारात नवचैतन्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्यासाठी केवळ सुविधा वाढवणे पुरेसे नसते, तर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी प्रतिमा निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे असते. याच विचारातून रितेश आणि जिनेलिया यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत एसटी महामंडळ प्रवाशांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लवकरच या दोघांसोबत अधिकृत करार करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा करार पाच वर्षांसाठी असणार असून, या कालावधीत दोघेही विविध जाहिराती, मोहिमा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. एसटीच्या सेवांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी तसेच प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या दोघांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. याआधीही एसटी महामंडळाने मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांना ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून निवडले होते. मकरंद अनासपुरे आणि दिवंगत विक्रम गोखले यांनी ही जबाबदारी पार पाडली होती. त्यांच्या माध्यमातून एसटीला एक वेगळी ओळख मिळाली होती. आता त्याच परंपरेला पुढे नेत नव्या पिढीशी जोड निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियावर या निर्णयाची चर्चा सुरू असून, चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामुळे चर्चेत दरम्यान, रितेश आणि जिनेलिया यांच्या कारकिर्दीतही सध्या एक महत्त्वाचा टप्पा सुरू आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामुळे त्यांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. या चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत, तर जिनेलिया सईबाईंच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारीही रितेश यांनीच सांभाळली आहे. राहिल देशमुख याचा देखील चित्रपटसृष्टीत प्रवेश या चित्रपटामुळे देशमुख कुटुंबासाठी आणखी एक खास क्षण निर्माण झाला आहे. या सिनेमातून त्यांच्या धाकट्या मुलाचा, राहिल देशमुख याचा देखील चित्रपटसृष्टीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प त्यांच्या कुटुंबासाठी विशेष ठरत आहे. एकीकडे एसटीच्या ब्रॅण्डिंगची जबाबदारी आणि दुसरीकडे मोठा ऐतिहासिक चित्रपट, अशा दुहेरी भूमिकेत रितेश-जिनेलिया ही जोडी सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंत्री गिरीश महाजन यांना महिलेने केलेल्या कथित शिविगाळीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला सत्तेचा माज आला आहे. सत्तेचा उपयोग जनतेला त्रास देण्यासाठी होत असल्यामुळे एका महिलेने काल एका मंत्र्याला भररस्त्यात शिविगाळ केली. इतिहासात प्रथमच एखाद्या मंत्र्याला महिलेच्या एवढ्या शिव्या खाव्या लागल्या, असे ते म्हणालेत. लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजपने सोमवारी मुंबईत एका मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या कोंडीमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जाऊन आपला संताप व्यक्त केला. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या व्हिडिओवरून सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सीरियल लायर असल्याचा आरोप केला आहे. मोदी व फडणवीस सीरियल लायर नाना पटोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सीरियल लायर अर्थात अट्टल खोटारडे आहेत. अशा विधानावर आम्ही प्रतिक्रिया द्यावी असे वाटत नाही. खोटे बोलणाऱ्यालाच ते लागते. महिला विधेयकाविषयी ज्या पद्धतीने लोकांना भ्रमित करण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबर 2023 मध्ये महिला आरक्षण विधेयक पारित झाले आहे. राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी झाली आहे. त्याचे नोटिफिकेशन जारी झाले आहे. हे विधेयक 2024 मध्ये लागू करण्यास तुम्हाला कुणी रोखले होते. आज 181 महिला सभागृहात पहायला मिळाल्या असत्या. सरकारने प्रथम सांगितले की, आम्ही जातनिहाय जनगणना करू. आता ते सांगत आहेत की, आता प्रथम आम्ही घरांची गणना करू. तुमच्याकडे महापालिका, नगरपंचायत, पंचायती, ग्राम पंचायत आदींमध्ये सर्व रेकॉर्ड आहे. त्यामुळे खोटे कोण बोलत आहे? बहुजनांवर सातत्याने अन्याय करणारी मानसिकता आज सत्तेत आहे. ही सत्तेतील मानसिकता बहुजनांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या खोटारड्या लोकांना जनतेने आता ओळखले आहे. भाजपला लोक आज कंटाळले आहेत. प्रथमच एखाद्या मंत्र्याने एवढ्या शिव्या खाल्ल्या नाना पटोले म्हणाले, मुंबईतील महिलेचा संताप हा भाजपच्या सत्तेच्या माजाचा परिणाम आहे. आमची सत्ता आहे. या सत्तेचे ज्या पद्धतीने दुरुपयोग जनतेला त्रास देण्यासाठी केला जातो, याचे सर्वात मोठे उदाहरण काल फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या दृष्टिकोनातून दिसून आला. सामान्य लोकांनी त्याला कसे ट्रोल केले. एक महिलाच त्यांना शिव्या घालत होती. महाराष्ट्रातील इतिहासात प्रथमच एखाद्या मंत्र्याला महिलेच्या एवढ्या शिव्या खाव्या लागल्या. राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून मुली व महिला बेपत्ता नाना पटोले यांनी यावेळी यवतमाळच नव्हे तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून महिला व मुली बेपत्ता होत असल्याचा दावा केला. ते म्हणाले, महाराष्ट्रात केवळ यवतमाळच नव्हे तर अनेक जिल्ह्यांतून मुली बेपत्ता होत आहेत. नागपूर सारख्या शहरातूनही मुली बेपत्ता होत आहेत. त्याच्या तक्रारीही आहेत. तिथे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री राहतात. आज महाराष्ट्रातील हजारो महिला व मुली बेपत्ता आहेत. पण सरकार हे दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मुली असो किंवा महिला या महाराष्ट्रात त्यांचा सन्मान झाला पाहिजे. पण आज भाजप सरकारकडून महिलांचा सातत्याने अवमान होत आहे. ही वस्तुस्थिती आहे की, यवतमाळच नव्हे तर मुली व महिला बेपत्ता होत आहेत. पाक शांततादूत अन् आपले स्वयंभू विश्वगुरू प्रचारात व्यस्त नाना पटोले यांनी यावेळी पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. एवढ्या मोठमोठ्या घोषणा करणारा पंतप्रधान. मी सोडणार नाही वगैरे वगैरे... ऑपरेशन सिंदूरमध्ये 3 अतिरेकी मारले गेले. ते खरे आहे की खोटे आहे. आज जागतिक पातळीवर इराण, इस्त्रायल व अमेरिकेच्या युद्धात ज्या देशाने पाकला अतिरेकी राष्ट्र म्हणून घोषित केले होते, तोच पाकिस्तान आता शांततादूत म्हणून पुढे येत आहे. पण आपले स्वयंभू विश्वगुरू निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त आहेत. या पंतप्रधानांनी अवघ्या भारताचीच मान खाली घातली आहे असे चित्र आहे. हा सत्तेचा माज आहे. यांना ना लोकशाही मान्य आहे, ना संविधान मान्य आहे. आम्हीच सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोत ही भावना फडणवीस व भाजपच्या डोक्यात निर्माण झाली आहे. हा गर्व आहे. या गर्वाचे घर जनता निश्चितच खाली करेल, असे नाना पटोले म्हणाले.
गोरेगाव नेस्कोमधील वॉचमनला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने लाच घेऊन ड्रग्ज विकणाऱ्याला मध्ये सोडले असा बनाव करण्याचा प्रयत्न पोलिस करत आहे, हे अत्यंत चुकीचे आहे.एका वॉचमनला पकडून हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, नेस्कोचे मालकांना चौकशीला बोलवत नाही, हा काय प्रकार आहे, त्यांना क्लीन चीट द्यायचे ठरवले आहे का? श्रीमंत लोकांना सोडण्याचे तुम्ही ठरवले आहे का? याचे उत्तर सरकार आणि पोलिसांना द्यावे लागेल, असे मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ निवडणुकीच्या वेळी इतर राज्यात जाऊन प्रचार करतात. त्यांनी त्यापेक्षा आपल्या राज्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यांच्या राज्यात रोजगार कसा निर्माण होईल याकडे पाहिले पाहिजे. आपल्या राज्यातील लोकांना रोजगारासाठी बाहेर पडावे लागू नये यासाठी योगी आदित्यनाथ यांनी प्रयत्न केले पाहिजे. मनसेचा संपला पाठिंबा नाही संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना कोणत्याही संपला पाठिंबा देणार नाही. मराठी रिक्षाचालक या संपात सहभागी होणार नाही. अमराठी लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न तर करुण बघावा मग बघू. ज्यांना महाराष्ट्रात राहून मराठी बोलण्याची लाज वाटते ते वाद घालणार आणि आम्ही शांत रहायचे का? सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा नाहीतर आम्हाला करता येतो. महाराष्ट्राची भाषा मराठीच संदीप देशपांडे म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वच मराठी भाग आहेत, कुठेही हिंदी भाग नाही. किंवा कुठल्याही परिसराची भाषा गुजराती भाषा नाही. सदावर्ते यांना आक्रमक भूमिका घेऊन घरातच बसायचे आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या भूमिकेला महत्त्व देत नाही. सर्वांनी मराठी बोललेच पाहिजे, आता लोकं मराठी बोलत आहेत. स्थानिक भाषा आलीच पाहिजे संदीप देशपांडे म्हणाले की, रिक्षाचालक मराठी बोलत असेल तर आम्हाला काही हरकत नाही. महाराष्ट्रात राहता तर इथली भाषा तुम्हाला आलीच पाहिजे. जर्मनीमध्ये गेलात तर त्यांची भाषा शिकावी लागते नाहीतर जॉब मिळत नाही. इतर राज्यात त्यांची त्यांचीच भाषा बोलली जाते मग महाराष्ट्रात का नाही? असा सवालही देशपांडे यांनी केला आहे. आमची मराठी शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. रिक्षाचा परवाना देताना तुम्हाला स्थानिक भाषा येणं गरजेचे आहे, हा नियम काही केवळ महाराष्ट्रात नाही तर सुरतमध्ये तामिळनाडूमध्ये सुद्धा आहे. हा नियम जुनाच आहे.इतर राज्यातून आलेले प्रशासकीय अधिकारी मराठी शिकतात ना. अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे संदीप देशपांडे म्हणाले की, संजू जैस्वाल नावाच्या अधिकाऱ्यांने जी सामान्य व्यक्तीला दादागिरीची भाषा वापरली हे काय पहिल्यांदा घडलेले नाही.यापूर्वी सुद्धा त्यांच्याकडे काही जण तक्रार घेऊन गेलेल्या व्यक्तीला केबिनमध्ये मारहाण करण्यात आली होती. कोणते हिंदी चित्रपट पाहून हे अधिकारी बिघडलेत माहिती नाही, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राज्यात गॅस संदर्भात डोळे उघडे ठेवले पाहिजे. ग्रामीण भागातील गॅस टंचाईबद्दल सरकारले डोळेझाकपणा करू नये.
अमरावतीत माजी खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना केल्यानंतरही त्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांसाठी सक्रिय प्रचार केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. पक्षातील अंतर्गत मतभेद, राज्यसभेची संधी न मिळाल्याची खंत या मुद्द्यांवर त्यांनी थेट भाष्य केले नसले तरी त्यांच्या समाज माध्यमांवरील पोस्टमधून नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसून येत आहे. नवनीत राणा यांनी अलीकडेच शेअर केलेल्या एका ‘रील’मुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये थेट कोणाचे नाव न घेता सूचक शब्दांत आपले मनोगत मांडले आहे. तुम्ही संघर्ष करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत, हे वाक्य लोक वारंवार वापरतात, मात्र त्यातील वास्तव वेगळे असल्याचे त्यांनी सांगितले. या वाक्याचा उल्लेख करत त्यांनी सामाजिक आणि राजकीय जीवनातील दुटप्पीपणावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी हिंदी भाषेत एक विचार मांडला आहे, जो सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. लोग कहते हैं, आप संघर्ष करो, हम आपके साथ हैं, लेकिन अगर आप साथ हैं, तो यह संघर्ष क्यों? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या विधानातून त्यांनी समर्थन देण्याच्या नावाखाली प्रत्यक्ष मदत न करणाऱ्या प्रवृत्तीवर निशाणा साधल्याचे दिसून येते. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांनी वेगवेगळ्या अर्थांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यापूर्वीही नवनीत राणा यांनी समाज माध्यमांवरून आपली भूमिका व्यक्त केली होती. संघर्ष करणे माझ्यासाठी नवीन नाही, मी कोणत्याही टप्प्यावरून नव्याने सुरुवात करू शकते, असे त्यांनी एका पोस्टमध्ये नमूद केले होते. या विधानातून त्यांनी भविष्यातील राजकीय संघर्षासाठी तयार असल्याचा संदेश दिला होता. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, नवनीत राणा यांच्या काही वक्तव्यांमुळे यापूर्वीही वाद निर्माण झाले होते. त्यांच्या कडव्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. परतवाडा येथील प्रकरणावर केलेल्या भाष्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्यासह डॉ. अनिल बोंडे यांना फटकारले होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोस्टमधून काहीतरी वेगळा संदेश एकूणच, नवनीत राणा यांच्या समाज माध्यमांवरील पोस्टमधून व्यक्त होणारी नाराजी आणि सूचक संदेश यामुळे त्यांच्या पुढील निर्णयांबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्या थेट भाष्य टाळत असल्या, तरी त्यांच्या प्रत्येक पोस्टमधून काहीतरी वेगळा संदेश दिला जात असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे येत्या काळात त्या कोणती भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
चालकाचा ताबा सुटला अन् बस थेट दुकानात; मोठी दुर्घटना टळली:घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण
पुण्यातील गजबजलेल्या शनिवार पेठ परिसरात सायंकाळी एक धक्कादायक अपघात घडला. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ची एक बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन आप्पा बळवंत चौकातील एका दुकानात घुसल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक ते पुणे स्टेशन या मार्गावर धावणारी PMPML बस सायंकाळी साडेचारच्या सुमारास आप्पा बळवंत चौकातून जात होती. हा परिसर नेहमीप्रमाणेच वाहतुकीने आणि गर्दीने गजबजलेला होता. याच वेळी अचानक चालकाचा बसवरील ताबा सुटल्याचे सांगितले जात आहे. नियंत्रण सुटताच बस रस्त्याबाहेर गेली आणि थेट एका लग्नपत्रिकांच्या दुकानावर जाऊन आदळली. अपघाताच्या वेळी संबंधित दुकानात कोणतेही ग्राहक उपस्थित नव्हते, हीच या घटनेतील सर्वात दिलासादायक बाब ठरली. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बसने दुकानात घुसण्यापूर्वी बाहेर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. त्यानंतर बस दुकानाच्या पुढील भागावर आदळल्याने दुकानाचा फलक, फर्निचर आणि आत ठेवलेल्या वस्तूंचे मोठे नुकसान झाले. या अपघातात एकूण चार दुचाकींचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दुकानातील मालही मोठ्या प्रमाणावर तुटला असून, व्यापाऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. काही काळ वाहतुकीवरही याचा परिणाम झाला होता. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करत प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. तसेच PMPML चे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून, त्यांनी अपघाताच्या कारणांचा आढावा घेतला. चालकाचा ताबा का सुटला, यामागे मानवी चूक होती की बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू दरम्यान, या घटनेत कोणतीही गंभीर दुखापत झाली नसली तरी मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दुकानात ग्राहक नसणे ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरली आणि त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून, पुढील काही दिवसांत या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे मोठी हालचाल सुरू झाली आहे. 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीची घोषणा होताच सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या सर्वच पक्षांकडून उमेदवारीसाठी नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत राजकीय समीकरणे अधिकच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 6 जागा येण्याची शक्यता आहे. शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. एक उमेदवार विजयी होण्यासाठी साधारण 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. सध्याच्या संख्याबळाचा विचार करता महायुतीकडे बहुमत असल्याने त्यांचे किमान 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे संख्याबळ मर्यादित असल्याने त्यांना एकाच जागेवर समाधान मानावे लागू शकते. भाजपकडून अनेक नेते सक्रिय भाजपकडून उमेदवारीसाठी अनेक नेते सक्रिय झाले आहेत. माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी ही नावे सध्या चर्चेत आहेत. यापैकी काहींना संधी देताना पक्षाकडून जातीय आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अंतिम यादीत कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारीसाठी चांगलीच स्पर्धा शिंदे गटाच्या शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावे चर्चेत आहेत. तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीतून नीलम गोऱ्हे, रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दिपक सावंत आणि बच्चू कडू यांच्यासारख्या नेत्यांची चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, राजन विचारे, वैभव नाईक आणि सूरज चव्हाण यांची नावे पुढे येत आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे. आमदारांना दोन वेळा मतदान करावे लागणार दरम्यान, या निवडणुकीचा कार्यक्रमही निश्चित झाला आहे. 12 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. 9 जागांसाठी नियमित निवडणूक होणार असून एका जागेसाठी पोटनिवडणूकही घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे पोटनिवडणुकीत महायुतीचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. यासाठी आमदारांना दोन वेळा मतदान करावे लागणार असून ही प्रक्रिया देखील महत्त्वाची ठरणार आहे. मोठे राजकीय निर्णय समोर येण्याची शक्यता याचबरोबर, विधान परिषदेतील काही विद्यमान आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक अधिकच महत्त्वाची ठरली आहे. उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार की जुन्यांनाच पुन्हा संधी दिली जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. एकूणच, विधान परिषदेच्या निवडणुकीने राज्यातील राजकारण तापवले असून पुढील काही दिवसांत मोठे राजकीय निर्णय समोर येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आलीच पाहिजे. तामिळमध्ये राहणाऱ्या माणसाला तामिळ भाषा आलीच पाहिजे, आपण कामधंद्यासाठी जिथे जातो तिथली भाषा आलीच पाहिजे यात काहीच गैर नाही, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले पाहिजे की मराठी भाषा आलीच पाहिजे, असे उबाठा खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही बोलले का? असा सवालही राऊतांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, भाजपपणे काही कारण नसताना महिला आरक्षणाच्या नावाने मोर्चा काढला म्हणून जनता त्यांच्यावर नाराज झाली आणि महिलेचा संताप अनावर झाला. तुमचे सरकार असताना मोर्चा कसले काढत आहात? सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाविरोधी काढलेला जगातील पहिला मोर्चा आहे. ज्यांनी तो काढला त्यांचा सत्कार केला पाहिजे. विधान परिषद निवडणुकीसाठी मविआमध्ये चर्चा संजय राऊत म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीसाठी मविआतील 3 पक्षांमध्ये चर्चा होईल. आमचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. विधान परिषदेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका जाहीर केली आहे की, उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असतील तर त्यांना त्यांचा पाठिंबा आहे. आता शिवसेनेकडून विधान परिषदेवर कोणाला पाठवायचे हे पक्षप्रमुख ठरवतील. आम्ही सर्व या मताचे आहोत की शिवसेना पक्षप्रमुखांनी विधीमंडळात असायला हवे, त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले असून ते मविआचे प्रमुख नेते आहेत. ते तिथे असले तर मविआ एकसंघ आहे हे दिसून येईल. पण आता उद्धव ठाकरेंच्या मनात काय ते स्वत: जाहीर करतील. महिला आरक्षणाला भाजपचाच विरोध संजय राऊत म्हणाले की, महिला आरक्षण लागू करणे हे सत्ताधाऱ्याच्या हाती आहे. त्यासाठी त्यांनामोर्चा काढण्याची काय गरज आहे. 2023 मध्ये महिला आरक्षणाचा कायदा लोकसभेत मंजूर झाला आहे. 33 टक्के महिला आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे. ते लागू करायचे का नाही हे ट्रम्प की पुतीनयांना विचारायचे आहे का? असा खोचक सवाल राऊत यांनी केला आहे. आपल्याकडे देशाची सत्ता आहे आरक्षण लागू करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. भाजपचा महिला आरक्षणाला विरोध आहे, विरोधकांनी महिला आरक्षणाला कधीच विरोध केला नाही. पण त्यांना 850 जागा केल्याशिवाय आरक्षण द्यायचे नाही. खरातने आकडा दिला का? संजय राऊत म्हणाले की, लोकसभेच्या 850 जागा केल्याशिवाय महिला आरक्षण लागू करण्यात येणार नाही हा विषय कुठून आला, कोणत्या घटनेत आहे. 2023 मध्ये हा कायदा मंजूर झाला त्यावेळी 850 जागांचा विषयच नव्हता. 850 जागांचा आकडा हा काय खरात बाबांनी दिला आहे का? असा सवाल राऊतांनी केला आहे. त्यामुळे हे 850 चा आकड्याला चिटकून बसले आहे. 543 मध्ये 33 टक्के आरक्षण दिला तर समतोल राहील. जागा वाढल्याशिवाय ते महिला आरक्षण देणार नाही. मोर्चासाठी महिलांना पैसे दिले असतील संजय राऊत म्हणाले की, जनतेने सत्ताधारी भाजपला फाट्यावर मारले आहे. काल त्यांच्या मोर्चात महिलांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त होती. महिलांना कळले आहे की भाजप काय आहे. त्यामुळे महिला त्यांच्यासोबत नाही. महिलांना पैसे देणं बंद झाले की महिला कोणाकडून आहेत ते समजेल. कालच्या मोर्चासाठी महिलांना 1000 रुपये दिले असतील.
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सांगता सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबत मोठं विधान करत राजकीय वातावरण तापवलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीत सुनेत्रा पवार सक्षमपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या सभेत बोलताना फडणवीस यांनी सुनेत्रा पवार केवळ उपमुख्यमंत्रीपदासाठी योग्य नाहीत, तर राज्याला सक्षम नेतृत्व देण्याची ताकद त्यांच्यात असल्याचा विश्वास व्यक्त केला. फडणवीस यांनी आपल्या अनुभवाचा उल्लेख करत सांगितले की, ते गेली 35 वर्षे राजकारणात सक्रिय आहेत आणि त्यामुळे एखाद्या नेत्याची क्षमता ओळखण्याचा त्यांना पुरेसा अनुभव आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या कामकाजाचा जवळून अभ्यास केला असून, त्या दीर्घकालीन राजकारणात यशस्वी होऊ शकतात, असा त्यांचा ठाम निष्कर्ष आहे. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला एक सक्षम आणि पुढे जाणारे नेतृत्व मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी स्वीकारली असून त्या कर्तव्यभावनेतून काम करत असल्याचे फडणवीस म्हणाले. खासदार झाल्यानंतर त्यांनी राजकीय जबाबदाऱ्या अधिक प्रभावीपणे सांभाळल्या आहेत. याशिवाय सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अजित पवारांसोबत काम केल्यामुळे त्यांना प्रशासन आणि राजकारणाची चांगली जाण आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बारामतीसह राज्याच्या विकासासाठी त्या सक्षमपणे काम करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभेत अजित पवार यांच्या विमान अपघाताचाही उल्लेख करत फडणवीस यांनी भावनिक सूर लावला. या अपघाताबाबत अनेकांच्या मनात शंका असून, त्यामागील सत्य समोर येईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा शब्द त्यांनी बारामतीकरांना दिला. या घटनेची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर यावे, अशी जनतेचीही अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले. या सांगता सभेला त्यांनी स्मृती यज्ञ, असे संबोधले. अजित पवार यांच्या आठवणी जपण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी ही सभा महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. बारामतीतील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. जर या यज्ञात आपली आहुती दिली नाही, तर ती मोठी चूक ठरेल, अशा शब्दांत त्यांनी मतदारांना मतदानासाठी प्रेरित केले. किती मोठे मताधिक्य मिळते याकडे सर्वांचे लक्ष एकूणच, बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत फडणवीस यांनी जोरदार प्रचार केला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे या निवडणुकीला अधिकच रंग चढला असून, सुनेत्रा पवार यांना किती मोठे मताधिक्य मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीतील राजकीय समीकरणे आणखी वेगाने बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी | अकोट कोणत्याही समाजाने त्यांचा इतिहास विसरू नये, कारण समाजाचा दैदिप्यमान इतिहास विसरला की, त्याचा भूगोल बिघडतो आणि त्यानंतर त्या समाजाची झपाट्याने अधोगती होते, ब्राह्मण समाज सुद्धा याला अपवाद नाही, असे प्रतिपादन पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार अंकित काणे यांनी येथे केले. स्थानिक सर्वभाषिक परशुराम जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित भगवान परशुराम जयंती सोहळ्यात अंकित काणे बोलत होते. आशा जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. अमरावती जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या सदस्य अमृता पुराडूपाध्ये, डॉ. सूरज व्यवहारे, नगरसेवक निलेश नवघरे, सुधाबेन राजगुरू, स्वप्नलक्ष्मी पांडे, राधेश्याम व्यास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परशुराम जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वभाषिक समितीच्या वतीने भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. स्थानिक श्री नरसिंग मंदिरातून शोभायात्रेला सुरुवात झाली. गावातील प्रमुख मार्गावरून फिरुन शोभायात्रा परत श्री नरसिंग मंदिरात आली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात अंकित काणे बोल होते. काणे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून ब्राह्मण समाज हा पुरोगामी आहे. थोरल्या माधवराव पेशव्यांपासून लोकमान्य टिळक, आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, मंगल पांडे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे आदी अनेक नावे सांगता येतील. या व अशा महापुरुषांचा वैचारिक वारसा पुढे चालवायचा आहे. ब्राह्मण समाजाने सर्व क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदवावा. राजकारण, समाजकारण, उद्योग, व्यवसाय, तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रात सहभाग घेऊन समाजासह राष्ट्राची उन्नती साधावी, असे कळकळीचे आवाहन पत्रकार अंकित काणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी क्षितीज पारसकर, चैतन्य भागवत, आनंद कारणकार, सर्वेश आसरकर, निलेश तिवारी, गौरव आसरकर, कैवल्य जोत, पार्थ देवळे, भार्गव जोशी, देवा दुबे, अमोल जती, शशांक भावे, मोहित काशीकर, प्रसाद ठक्कर, दर्शन ठक्कर, प्रसाद पाटील, पियुष शर्मा, चेतन शर्मा, केदार पांडे, चिन्मय आष्टीकर, आदित्य जोशी, अंकित जोशी, अथर्व मानेकर, विक्रांत पाटील, रोहित महाजन, भार्गव पोफळी, आदित्य पांडे आदींनी परिश्रम घेतले. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रमाच्या अध्यक्षा आशा जोशी यांनी कौटुंबिक मूल्ये जोपासण्यावर भर दिला. मुलींना प्रोत्साहन द्या परंतु त्यांना वाईट प्रवृत्तीपासून वाचवण्यासाठी सक्षम करा, असे आवाहन आशा जोशी यांनी केले. या प्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ज्योत्स्ना अनसिंगकर यांनी केले तर चेतन देवळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. कार्यक्रमाला सर्वभाषिक ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सुधारित निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजाणी, रिक्त पदे, निवृत्तीचे वय वाढवणे यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेले. संपाची हाक सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने दिली आहे. संपात महसूल, पुरवठा, सहाय्यक दुय्यम निबंध, विभागाचे १९८ कर्मचारी सहभागी झाले. हा संप दीर्घकाळ सुरु राहिल्यास व अन्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाल्यास थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामांवर होण्याची शक्यता आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर शासनाने परिपत्रक काढले असून ‘काम नाही वेतन नाही’ हे केंद्र शासनाचेच धोरण राज्य शासनही अनुसरत असल्याचे पत्रकात नमूद केले आहे. जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला असून, यापूर्वीही आंदोलने करण्यात आली. एक वेळची बाब म्हणून प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळावी, अशी मागणी समन्वय समितीने केली आहे. या संदर्भात अलीकडील शासनाचे धोरण जरी उदारमतवादी असले तरी हा प्रश्न पूर्णपणे धसास लागणे आवश्यक आहे. देशातील २६ राज्यात सेवा निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात आले आहे. मग पुरोगामी महाराष्ट्रात आपण मागे का आहोत, असा सवाल केला आहे. संपात संघटनेचे राजेंद्र नेरकर, वैजनाथ कोरकने, उमेश ढवळे, इंगळे आदी सहभागी झाले. कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडप टाकत मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. विभाग कार्यरत संपात सहभागी महसूल ५८३ १६२ पुरवठा २५ १२ दुय्यम निबंधक ३४ २४ संपात सहभागी होणे हे गैरवर्तन; शासनाचा इशारा संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने तातडीने परिपत्रक जारी करून सर्व विभागांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम १९७९ मधील विविध नियमान्वये संप करण्यात प्रतिबंधक करण्यात आला आहे. संप करण्यास मनाई असून, संपात सहभागी होणे हे गैरवर्तन मानले जाईल. अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. संपाच्या काळात कामावर अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर “काम नाही, वेतन नाही” हे धोरण लागू केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहावे. संपाच्या कालावधीत कोणत्याही कर्मचाऱ्याला नवीन रजा मंजूर करू नये तसेच आधी मंजूर रजा रद्द करून कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर बोलावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विभागप्रमुखांनी संप काळात मुख्यालय सोडू नये, तसेच परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संपात हे नाहीत सहभागी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना संपात सहभागी झाली नाही. १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, ही मागणी नसल्याने संपात सहभागी होणार नाही, असे संघटनेकडून कळवण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन संपत सहभागी नाही. युनियन व प्रशासनात चर्चा झाली. बेमुदत संपात प्रत्यक्ष सामील न होण्याचा निर्णय घेण्यात आला, असे संघटनेकडून सुनील जानोरकर यांनी कळवले आहे. तिजोरीत खडखडाट; निधी कमी सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह अन्य योजनांमुळे शासनाच्या तिजोरीवर ताण आला आहे. जिल्ह्यातील ३९ हजार लाडक्या बहिणींची केवायसी चुकल्याने अर्थसाहाय्याला ब्रेक लावण्यात आला. आमदार विकास निधीही गत आर्थिक वर्ष संपण्याच्या तोंडावर प्राप्त झाला होता.तसेच सध्या शेतकरी कर्जमाफीसाठीही पैसा लागणार आहे. परिणामी सुमारे ४ लाख ५० हजार खर्चच झाला नाही. एकूणच निधीचा तुटवडा असतानाच आता सरकारी कर्मचाऱ्यांकडून निवृत्ती वेतन, पद भरतीसह अन्य निधी लागणाऱ्या मागण्या करण्यात येत आहेत.
संपामुळे नोंदणी विवाहासाठी आलेल्या उपवर-वधूला मनस्ताप सहन करावा लागला. काही वेळ त्यांना ताटकळत बसावे लागले. दोघांसह अन्य नातेवाईक व परीचित जिल्हाधिकाऱ्यांपर्यं त पोहोचले. त्यानंतर सूत्र वेगाने फिरली आणि नंतर दोघांचा शुभ विवाहही पार पडला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधील गोविंद लांडे (बार्शी) यांचा विवाह अकोल्यातील बंडूसा घाटोळे यांची कन्या हर्षदा यांच्याशी ठरला. या विवाहासाठी अकोल्यातील सह जिल्हा निबंधक कार्यालयात दीड महिना आधीच नोंदणी करण्यात आली होती. नोंदणी विवाहसाठी २१ एप्रिल तारीख देण्यात आली. मात्र कर्मचारी संपावर असल्याने या लग्नाची नोंदणी होऊ शकत नव्हती. बार्शीतून आलेले वऱ्हाड दिवसभर ताटकळत होते. मानसिक ताण निर्माण झाला होता. उपवर-वधू पक्षातील मंडळीसह विवाह जुळवण्यासाठी पुढाकार घेणारे भावसार समाजाचे विदर्भ अध्यक्ष कॉ. अनिल मावळे यांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत विवाह नोंदणीचा आदेश पोहोचवण्यात आला. या विभागातील ३४ पैकी २४ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांवर विभागातील कारभाराची जबाबदारी होती. अखेर संप, प्रशासनातील अडथळे आणि ताणतणाव यावर मात करत हा विवाह पार पडला. संप काळातही एक सकारात्मक संदेश यानिमित्ताने समाजात गेला. ...अखेर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतला पुढाकार
भाजपने माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना पुन्हा सक्रिय राजकारणात आणत त्यांना महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पश्चिम विभाग प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही काळापासून त्या राजकारणात कमी सक्रिय दिसत होत्या, मात्र आता पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्या निर्णयानंतर प्रीतम मुंडे यांची राजकीय हालचाल कमी झाल्याचे चित्र होते. स्थानिक निवडणुकांमध्येही त्यांचा सहभाग मर्यादित दिसत होता. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत प्रश्न उपस्थित होत होते. मात्र, आता भाजपने त्यांना संघटनात्मक जबाबदारी देत पुन्हा संधी दिली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी भाजपने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी प्रभारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून पक्षाची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि सरकारच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत नेणे हा उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर प्रीतम मुंडे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्या आगामी काळात अधिक सक्रिय भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजपमध्ये जिल्हा प्रभारी नियुक्त्यांमध्ये मोठे फेरबदलही करण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यात दोन दिवसांतच प्रभारी बदलल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरुवातीला बंटी भांगडिया यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, अल्पावधीतच त्यांच्याकडून जबाबदारी काढून घेण्यात आली आणि त्यांना गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. भंडाऱ्याची जबाबदारी नंतर वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांच्याकडे सोपवण्यात आली. या बदलामागे स्थानिक राजकीय समीकरणांचा विचार करण्यात आल्याची चर्चा आहे. भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या भूमिकेबाबतही विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असला, तरी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने हे बदल केल्याचे सांगितले जात आहे. संघटनात्मक पातळीवर मोठे बदल एकूणच, भाजपकडून राज्यभरात संघटनात्मक पातळीवर मोठे बदल करण्यात येत असून, प्रीतम मुंडे यांच्यासारख्या नेत्यांना नव्याने संधी दिली जात आहे. त्यांच्या पुनरागमनामुळे मराठवाड्यात पक्षाला बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निर्णय महत्त्वाचे मानले जात असून, पुढील काळात या बदलांचा राजकीय परिणाम काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जुनी पेन्शन योजना आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी, २१ एप्रिलपासून सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांनी संप पुकारला आहे. या संपात महसूल विभागाचे शंभर टक्के तर आरोग्य विभागाचे ७० टक्के कर्मचारी सहभागी झाले आहेत. परिणामी तहसील कार्यालयातून रोज दिले जाणारे दाखले आज मिळाले नाहीत. दुसरीकडे आरोग्य विभागातील परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतल्यामुळे तेथील सुविधाही प्रभावित झाल्या. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात पर्यायी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. सरकारी-निमसरकारी-शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने या आंदोलनाची हाक दिली आहे. समितीचे निमंत्रक डी. एस. पवार यांच्या दाव्यानुसार मंगळवारी सकाळपासूनच विविध कार्यालयासमोर निदर्शने केली. संप असला तरी कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयासमोर एकत्र येत न्याय, हक्काच्या घोषणा दिल्या. काही कार्यालयांमध्ये विभागप्रमुखांना निवेदनेही देण्यात आली. त्यांच्यामते जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व तहसील व एसडीओ कार्यालये, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, वन विभाग, आरटीओ, हिवताप, नगरपालिका, विमा, बँकांसह जिल्ह्यातील सुमारे ३० हजार कामगार, कर्मचारी सहभागी उर्वरित. पान ४ संपामुळे जिल्हा कचेरीसह विविध कार्यालयांतील दालने अशी विना कर्मचारी दिसली. निदर्शने व धरणे आंदोलनासाठी जिल्हा कचेरीसमोर जमलेले प्रमुख पदाधिकारी. कंत्राटी आणि जीएमसीच्या भरवशावर रुग्णसेवा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालीटीमधील सुमारे ७० टक्के कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉक्टर्स, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आदी यंत्रणांमधील वैद्यकांची मदत घेऊन आरोग्य विभागाचा डोलारा चालवला जात आहे. कंत्राटी कर्मचारी आणि नव्याने भरती झालेले कर्मचारीही त्यांच्या मदतीला आहेत.
वर्षात 320 वीज चोऱ्या; 5.85 कोटींची चोरी उघड:जिल्ह्यात महावितरणच्या भरारी पथकाची कारवाई
जिल्ह्यातील वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकाने वर्षात कारवाई करत ३२० वीज चोरी प्रकरणांचा भंडाफोड केला . उपकार्यकारी अभियंता श्रीकांत तळेगावकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता शंकर राऊत, सहकाऱ्यांनी ही मोहीम यशस्वी राबवली. जिल्ह्यात महावितरणच्या भरारी पथकाने विविध ठिकाणी धाडी मारत केलेल्या कारवाईत ३३ लाख २५, ६०३ युनिट वीज चोरी झाल्याचे उघड झाले असून, त्यांची किंमत सुमारे ५ कोटी ८४ लाख ६७ हजार आहे. भरारी पथकाच्या सतर्कतेमुळे हे प्रकार वेळेत उघडकीस आले. या मोहिमेत ३२ प्रकरणांत गुन्हे दाखल केले असून, विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत कारवाई केली. कलम १२६, इतर तरतुदींनुसार ९१ प्रकरणांवरही कारवाई केली आहे. भरारी पथकाने जिल्ह्यात संशयास्पद ठिकाणी छापे टाकले असता २२९ ठिकाणी वीज चोरी होत असल्याचे आढळले. तपासात वीज चोरीचे अनेक प्रकार उघड झाले. त्यात मीटरमधील वायर कापणे, मीटर बंद करणे, फ्लॅश प्रणाली निष्क्रिय करणे, मीटरला छिद्र पाडून त्यात रोधक निर्माण करणे, मीटर बायपास करून वीज वापरणे अशा पद्धतींचा समावेश आहे. वीज चोरीमुळे कंपनीला फटका बसतो, वितरण हानीत वाढ होते. वीज चोरीमुळे यंत्रणेवर अनधिकृत भार वाढून अखंडित वीज पुरवठ्याला अडथळा होतो. त्यामुळे महावितरणची वीज चोरी विरोधात मोहिम आक्रमकपणे राबवणार आहे, असे अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांनी स्पष्ट केले. ५ कोटी ४ लाख रुपयांची वसुली महावितरणने ३२० पैकी २९८ प्रकरणांमध्ये तडजोडीची संधी देत ५ कोटी ४ लाखांची वसुली केली आहे. मात्र,अद्याप २२ प्रकरणांत ८१ लाख ६३ हजारांची वसुली बाकी असून ती वसूल करण्यासाठी पुढील कारवाई सुरू आहे.
‘सायन्सस्कोर’वर आता स्वच्छता, स्नानगृह:महापौरांसह नगरसेवकांचा पुढाकार, नागरिकांनी केली होती मागणी
अमरावती बाहेरगावाहून शहरात येणारे, शहरवासीयांच्या सोयीसाठी सायन्सकोर मैदानावर अत्याधुनिक स्वच्छता व स्नानगृह उभारणार आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्यासोबत महापौर श्रीचंद तेजवानी यांची सोमवारी २० एप्रिलला यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या चर्चेदरम्यान सीईओंनी संबंधित कर्मचाऱ्यांना या प्रकरणी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. ही जागा जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येत असल्याने, तेथे शौचालय बांधकामासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेसाठी महापौरांनी जिल्हा परिषद प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. महापौरांनी कार्यतत्परतेचा प्रत्यय देत मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सायन्सस्कोर मैदानावर भेट दिली असता, नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत त्यांनी तेथे स्वच्छतागृहे आणि स्नानगृहे उभारण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले आहेत. दररोज सकाळी उर्वरित. पान ४ आता सर्वांना मिळणार चांगल्या सुविधा सायन्सकोर मैदान हे शहरात मोक्याच्या ठिकाणी असून, त्यावर मेळावे, सभा, संमेलनं, प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. कशीतरी वेळ साजरी करण्यास फिरते प्रसाधनगृह ठेवले जाते. परंतु, ते असे काही घाणेरडे केले जाते की, महिलांना त्याचा वापर करता येत नाही. मैदानावर फिरण्यासाठी सकाळी व सायंकाळी महिला, युवती, ज्येष्ठ नागरिक येतात. त्यांच्यासह बाहेर गावाहून येणाऱ्या महिलांनाही सुविधा मिळावी, या उद्देशाने जर येथे कायम स्वच्छता व स्नानगृह झाले तर त्यांना कुचंबणा सहन करावी लागणार नाही. स्वच्छ, सुंदर अमरावतीसाठी महापौरांचे हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे.
येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ‘ डीसीपीई’चे माजी प्राचार्य, बृहन महाराष्ट्र योग परिषदेचे सर कार्यवाह डॉ.अरुण खोडसकर याचा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्य मास्टर्स योगासन स्पर्धेमध्ये महाराष्ट्र योगासना स्पोर्ट असोसिएशन, बृहन महाराष्ट्र योग परिषदचे अध्यक्ष संगमनेरचे डॉ.संजय मालपाणी यांच्या हस्ते फेटा बांधून व योगासन मूर्ती प्रदान करून सत्कार केला . श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने योगासनाचा प्रचार केला.स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तर मंडळाच्या योग प्रचार व प्रसार कार्याला वेग आला. गेली ५० वर्षे मंडळातील योगासनाच्या प्रचार व प्रसाराचे कार्य एचव्हीपीएमचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. अरुण खोडस्कर करीत आहेत. केवळ देशातच नव्हे तर विदेशातही त्यांनी योगासनाचा प्रचार केला असून अनेक विदेशी नागरिकांना योगासनाचे प्रशिक्षण दिले. एचव्हीपीएमच्या पुढाकाराने जम्मू्-काश्मीरात आयोजित आंतरराष्ट्रीय योग संमेलनाचे त्यांच्या मार्गदर्शनात आयोजन केले होते. राष्ट्रीय, राज्ययोगासन स्पर्धा, जिल्हा योगासन स्पर्धा, योगासनावर आधारित आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय चर्चासत्रांत त्यांची मोलाची भूमिका राहिली आहे. त्यांनी योगाच्या प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतल्यामुळे त्यांचा सन्मान होत असतो.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक आज रात्री वर्षा निवासस्थानी पार पडणार असून, या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर काही निवडक नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि हालचाल वाढली आहे. या निवडणुकीत एकूण 10 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 6 जागा येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सहा जागांसाठी कोणाला उमेदवारी मिळणार, यावर पक्षांतर्गत जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, यावेळी पक्षातील जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याचा विचार होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याशिवाय जातीय आणि प्रादेशिक समतोल साधण्यावरही भर दिला जाणार आहे. पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. उर्वरित पाच जागांसाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावे पुढे येत असून, अंतिम निर्णय मात्र केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीनंतरच होणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी मुंबईत गाठीभेटी वाढवल्या असून, सह्याद्री अतिथीगृहासह विविध ठिकाणी राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. या सर्वांनी आपापल्या पातळीवर लॉबिंग सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अंतिम यादी जाहीर होईपर्यंत पक्षातील वातावरण तापलेले राहणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक 12 मे रोजी होणार आहे. मतदान सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होणार असून, त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, आमदारांना दोन वेळा मतदान करावे लागणार असून, दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळे मतदानाचे गणित असणार आहे. अंतर्गत संतुलन साधण्याची मोठी कसोटी सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार, महायुतीला 10 पैकी 9 जागांवर विजय मिळवणे सहज शक्य असल्याचे मानले जात आहे, तर महाविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक केवळ औपचारिक नसून, अंतर्गत संतुलन साधण्याची मोठी कसोटी ठरणार आहे. आता अंतिम यादीत कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

29 C