मुंबई : प्रतिनिधी एसटीने सुट्टीत प्रवास करणा-या सर्वसामान्य नागरिकांसाठी खिशाला चाट देणारी बातमी दिली आहे. एसटी महामंडळानं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता आणि त्यामुळं होणारी गर्दी लक्षात घेता भाडेवाढ केली आहे. माहितीनुसार, साध्या बसेसच्या दरामध्ये दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. १५ एप्रिल ते १५ जून या काळासाठी ही वाढ करण्यात आली आहे. फक्त साध्या बसेसला […] The post लालपरीच्या तिकीट दरात वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत असून पार्थ पवार हे 9 एप्रिल रोजी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधीमुळे पवार कुटुंबातील आणखी एक चेहरा राष्ट्रीय पातळीवर सक्रिय होणार आहे. दिल्लीतील संसद भवनात होणाऱ्या या कार्यक्रमाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पार्थ पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या शपथविधीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांचा राजकीय प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज्यातील विविध घडामोडींमध्ये सक्रिय राहिलेल्या पार्थ पवारांना आता संसदेत काम करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यांच्या कामगिरीकडे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशपातळीवरही लक्ष राहणार आहे. दरम्यान, या शपथविधीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नवीन उर्जा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीत होणारा हा सोहळा आगामी राजकीय रणनीतीसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे. तसेच दिल्लीतील राजकारणात पक्षाची उपस्थिती अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न म्हणूनही या घडामोडीकडे पाहिले जात आहे. 9 एप्रिलचा दिवस पवार कुटुंबासाठी विशेष एकूणच, पार्थ पवार यांच्या राज्यसभेतील प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. शपथविधीनंतर ते संसदेत कोणती भूमिका बजावतात आणि पक्षासाठी कसे योगदान देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे 9 एप्रिलचा हा दिवस पवार कुटुंबासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी विशेष ठरणार आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका धक्कादायक घटनेत, एका महिलेने दुसऱ्या लग्नात अडथळा ठरणाऱ्या आपल्या ११ महिन्यांच्या बालकाची हत्या केली. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी महिलेला अटक केली आहे. यश रवींद्र पवार (वय ११ महिने) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. पूजा रवींद्र पवार (वय २२, रा. भांबार्डे) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. पूजाचा विवाह रवींद्र पवार यांच्याशी झाला होता. ८ मार्च रोजी पूजा आपल्या मुलासह घरातून निघून गेली होती. पत्नी आणि मुलगा बेपत्ता झाल्याने रवींद्र पवार यांनी ८ मार्च रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. ५ एप्रिल रोजी पूजा जांबूत गाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तिने सांगितले की, मी झोपेत असताना यश ओट्यावरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच मी त्याचा मृतदेह पोत्यात भरून दगड टाकले आणि विहिरीत फेकून दिले. या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपास आणि शवविच्छेदन अहवालातील माहितीनुसार पोलिसांचा पूजावरील संशय बळावला. पोलिसांनी तिला पुन्हा ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, तिने गुन्ह्याची कबुली दिली. पूजाने पोलिसांना सांगितले की, मुलगा सतत रडत असे आणि मला दुसरे लग्न करायचे होते. मुलगा दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत असल्याने मी त्याला कपडे धुण्याच्या दगडावर आपटून ठार केले. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून, त्यात दगड टाकून विहिरीत फेकून दिला. या कबुलीनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पूजाला अटक केली. पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक निरीक्षक अशोक चव्हाण, उपनिरीक्षक नीळकंठ तिडके, पोलीस कर्मचारी विलास आंबेकर, नितीन भोस, किशोर शिवणकर आणि नीलम जाधव यांनी या प्रकरणाचा तपास केला.
मद्यधुंद चालकाची वाहनांना धडक:कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांचे अपहरण करण्याचा प्रयत्न
पुणे शहरातील वारजे भागात एका मद्यधुंद मोटार चालकाने चार ते पाच वाहनांना धडक दिली. त्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे वाहतूक विभागातील पोलिस शिपाई अमोल पिसाळ यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर हे न्यायालयीन कामकाजासाठी वारजे परिसरातून जात असताना, वारजे-एनडीए रस्त्यावर एका भरधाव प्रवासी मोटारीने पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याचे त्यांनी पाहिले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक क्षीरसागर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मोटार चालकाचा पाठलाग सुरू केला. वारजे चौकाजवळ चालकाने एका टेम्पोला धडक दिल्यानंतर क्षीरसागर यांनी प्रसंगावधान राखून मोटार अडवली. त्यांनी वारजे माळवाडी वाहतूक शाखेतील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना माहिती देऊन चालकाला ताब्यात घेऊन पोलिस चौकीत नेण्यास सांगितले. वाहतूक पोलिस मोटारीत बसल्यानंतर चालकाने मोटार पोलिस चौकीकडे न नेता दुसऱ्या मार्गाने भरधाव वेगाने नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच क्षीरसागर यांनी मोटार काही अंतरावर अडवली. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत चालकाने मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. जगदाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्लॉट विक्रीमध्ये फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल दोन हजार स्केअर फुटचा मोकळा प्लॉट दाखवून त्या बदल्यात 48 लाख रूपये घेऊन प्लॉट न देता फसवणूक केलयाप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिष गिरीधरीलाल चौधरी (48), दिनेशकुमार गिरीधरीलाल चौधरी (45), सुरेश गिरीधरीलाल चौधरी (42रा) आणि उर्मिला सुरेश चौधरी (35, रा. वाल्हेकर वाडी, चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरेशकुमारता राजी चौधरी (41, रा. स्वामी रेसिडेन्सी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात 48 लाखांच्या फसवणूक प्रकरणी तक्रार दिली आहे.
पीएमपी बस प्रवासात उलटीचा बहाणा करून एका महिला प्रवाशाच्या पिशवीतून सात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेकडून ६ लाख ९० हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. पुणे-सोलापूर रस्त्यावरील वैदुवाडी परिसरात ही घटना घडली होती. ननिता दिनेश कांबळे (वय ३७, सध्या रा. विश्रांतवाडी, मूळ रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार महिला ३० मार्च रोजी हडपसर गाडीतळ ते चिंचवड या मार्गावरील पीएमपी बसमधून प्रवास करत होती. त्या वेळी शेजारी थांबलेल्या कांबळेने प्रवासात उलटी आल्याचा बहाणा केला. तक्रारदार महिलेचे लक्ष विचलित करून, तिच्या नकळत पिशवीतून सात लाख रुपयांचे दागिने चोरून नेले होते. दागिने चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेनंतर वानवडी पोलिसांनी तपास सुरू केला. हडपसरमधील शिंदे वस्ती परिसरात एक महिला दागिने विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विष्णू सुतार आणि अमोल गायकवाड यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ननिता कांबळेला ताब्यात घेतले. तिच्याकडून ६ लाख ९० हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत ननिता कांबळेने पीएमपी बसमधील प्रवासी महिलेचे दागिने चोरल्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर आणि सहायक आयुक्त नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव, सहायक निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक अल्फाज शेख, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, विष्णू सुतार, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विठ्ठल चोमले, बालाजी वाघमारे, अर्शद सय्यद, अभिजित चव्हाण आणि आशिष कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की:ट्रिपलसीट दुचाकीस्वारासह तिघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर 'ट्रिपलसीट' दुचाकीस्वारांना अडवणाऱ्या वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेत पोलिसाच्या गणवेशाची पट्टी तुटली. या प्रकरणी दुचाकीस्वारासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक शाखेतील पोलिस शिपाई सोहल शेख यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. नितीन रामदास कराळे (वय २८, दुचाकीस्वार) आणि संदीप दिनकर सोनवणे (वय ३४, रा. शेल पिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर घडली. पोलिस शिपाई शेख यांनी एकाच दुचाकीवरून ट्रिपलसीट जात असलेल्या तिघांना पाहिले आणि त्यांना थांबवले. चौकशी सुरू असताना दुचाकीस्वार आणि त्याच्या साथीदारांनी शेख यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. 'आम्ही एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत,' असे सांगत त्यांनी कारवाईला विरोध केला आणि पोलिस शिपाई शेख यांना धक्काबुक्की केली. ओैंध रस्ता परिसरात भरदिवसा घरफोडी पुणे शहरातील ओैंध रस्ता परिसरात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातून साडेचार लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एकाने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारादार तरुण ओैंध रस्त्यावरील श्री चेतन सोसायटीत राहायला आहे. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ते कुटुंबीयासोबत कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून चोरट्याने कपाटातील साडेचार लाख रुपयांचे दागिने चोरुन नेले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते घरी परतले. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत. शहर परिसात गेल्या काही दिवसांपासून भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील १६ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत एकाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस हवालदार एस माने तपास करत आहेत. या धक्काबुक्कीत शेख यांच्या गणवेशावरील पट्टी तुटली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक मोकाशी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नागपूर लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेतील २२.७० लाख रुपयांच्या दागिन्यांच्या चोरीचा छडा लावला आहे. या प्रकरणी नांदेड येथील २३ वर्षीय व्हेटरनरी विद्यार्थी रोहित मारोती दुय्येवार याला अटक करण्यात आली आहे. ऑनलाइन बेटिंगमध्ये झालेल्या मोठ्या नुकसानीमुळे त्याने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे तपासात उघड झाले आहे. ही घटना २९ मार्च रोजी पहाटे नागपूर स्थानकावर घडली. रायपूर येथील हरिशचंद चंदवाणी हे कुटुंबासह बिकानेर एक्सप्रेसने प्रवास करत असताना त्यांच्या पत्नीने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स डोक्याखाली ठेवून झोपल्या होत्या. गाडी नागपूर स्थानकावर थांबलेली असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या झोपेचा फायदा घेत पर्स लंपास केली. काही वेळाने पर्स बाथरूममध्ये रिकामी आढळल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. २०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, ज्यात एक संशयित व्यक्ती चोरी करून स्टेशनबाहेर जाताना दिसली. रॅपिडो बुकिंगमधून मिळालेल्या मोबाईल नंबरच्या आधारे तांत्रिक तपास करून पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. आरोपी नांदेडहून नागपूरकडे ट्रॅव्हल्सने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून ९ ते १० ट्रॅव्हल्स तपासल्या. रहाटे कॉलनी परिसरात संशयित दिसताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून रोहित दुय्येवार याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही, परंतु सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्याकडून १७.४३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
भारताने केली अणुऊर्जा संयंत्राने ‘क्रिटिकॅलिटी’ साध्य
कलपक्कम : अणुऊर्जा क्षेत्रात भारताने पुन्हा एकदा आपला डंका वाजवून संपूर्ण जगालाच आश्चर्यचकित केले आहे. तामिळनाडूतील कलपक्कम येथील अणुऊर्जा संयंत्राने क्रिटिकॅलिटी (क्रांतिकता) साध्य करून नुकता भारताच्या ऊर्जा क्षेत्रात एक नवा इतिहास रचला आहे. महत्वाचे म्हणजे, भारताचा अणुऊर्जा कार्यक्रम याच गतीने पुढे जात राहिला तर, या क्षेत्रातही भारत आत्मनिर्भर होण्यास वेळ लागणार नाही. याचे महत्व म्हणजे, […] The post भारताने केली अणुऊर्जा संयंत्राने ‘क्रिटिकॅलिटी’ साध्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून नुकतीच बदली करण्यात आलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन केले. 'तुकाराम मुंढे यांची बदली रद्द झालीच पाहिजे' अशा घोषणांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला असून, मुंबईतील मंत्रालय परिसरातील आंदोलनानंतर आता नांदेडमध्येही या मागणीचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. राज्य सरकारने प्रशासकीय स्तरावर आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा धडाका लावला असून, मंगळवारी सायंकाळी 11 अधिकाऱ्यांचे फेरबदल करण्यात आले. यापूर्वीच गेल्या आठवड्यात तब्बल 25 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, ज्यात अनेकांना महत्त्वाच्या मोक्याच्या जागांवर तर काहींना महामंडळे व प्राधिकरणांवर नियुक्त करण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री सचिवालयातील अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महानगरपालिका आयुक्तपदी वर्णी लागली असून, या महत्त्वपूर्ण नियुक्तीमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे, आपल्या धडाडीच्या कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली आहे. मात्र, दिव्यांग विभागाचे सचिव म्हणून मुंढे यांनी घेतलेल्या लोकहितवादी निर्णयामुळे दिव्यांग बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी आदराची भावना असून, ही बदली रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी मुंबईतील मंत्रालय परिसरातील आंदोलनानंतर आता नांदेडमध्येही दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून, मुंढे यांची नियुक्ती पुन्हा दिव्यांग विभागातच कायम ठेवण्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, नानादेड जिल्हाधिकारी कार्यालयात आज विधिमंडळ अंदाज समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीवेळी दिव्यांग बांधव तुकाराम मुंढे यांच्या बदलीवरून आक्रमक झाले होते. दिव्यांग बांधव आक्रमक झाल्याचे पाहून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महाराष्ट्रातील अवयवदान व अवयव प्रत्यारोपण चळवळ गतिमान करण्यासाठी राज्यात 'हब अँड स्पोक मॉडेल' राबवून अमरावती, नाशिक, पुणे, ठाणे, मीरा -भायंदर व मुंबई (वाडिया) येथे अवयव प्रत्यारोपण अधिक व्यापक होईल अशी यंत्रणा उभी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. आरोग्यमंत्री म्हणाले की, राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी झाली पाहिजे आणि अधिकाधिक रुग्णांना वेळेत अवयवरुपी नवजीवन मिळाले पाहिजे. त्यासाठी शासकीय रुग्णालयांमधील अवयवदान प्रक्रिया अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. विशेषतः ब्रेन-डेड (मेंदू मृत) रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रभावी समुपदेशन करून अवयवदानासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणेची गरज आहे. अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाला मिळणारी नवी आशा आहे. हे पुण्याईचे आणि नवजीवन देण्याचे कार्य असल्याचा दृष्टिकोन समाजात रुजवला गेला पाहिजे, अवयवदान चळवळ अधिक लोकाभिमुख करण्याची गरज असून, दात्यांची संख्या मोठ्या वाढवण्यासाठी राज्यभर जनजागृती, समुपदेशन आणि संस्थात्मक यंत्रणा उभारणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील सर्व उपसंचालकानी अवयवदानाबाबत राज्यभर विशेष जनजागृती मोहीम राबवावी. संदर्भित रुग्णालयात अवयवदान समुपदेशन व मार्गदर्शनासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा. आवश्यकतेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती/प्रशिक्षण करून प्रत्यारोपण सेवेला गती द्यावी. अवयवदान विषयक वर्कशॉप, जनजागृती मेळावा आणि प्रशिक्षण सत्रे नियमित आयोजित करावीत. राज्यातील ब्रेन-डेड प्रकरणांचा दर दोन महिन्यांनी आढावा घ्यावा अशा सुचना दिल्या आहेत. या बैठकीत संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती, संदर्भ सेवा रुग्णालय नाशिक, औध सिव्हिल हॉस्पिटल पुणे , ठाणे सिव्हिल हॉस्पिटल, पं. भीमसेन जोशी हॉस्पिटल मीरा-भायंदर, या रुग्णालयानी अवयवदान आणि प्रत्यारोपण क्षेत्रातील कार्याचे सादरीकरण केले. बैठकीत वाडिया रुग्णालयाने लहान मुलांच्या लिव्हर ट्रान्सप्लांट क्षेत्रातील कामाचे सादरीकरण केले. तसेच टेलिमेडिसिनच्या माध्यमातून राज्यातील विविध रुग्णालयांना तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जात असल्याची माहिती दिली. राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी सहा प्रादेशिक हब तयार करून प्रत्यारोपण सेवा अधिक बळकट करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. बैठकीस राज्यातील सर्व उपसंचालक, वैद्यकीय अधिकारी व संबंधित तज्ज्ञ ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते.
शाश्वत नागरी विकास, औद्योगिक व पर्यटन वृद्धी, नवीकरणीय ऊर्जा क्षमता आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात व्हिएतनाममधील विन ग्रुप जॉईंट स्टॉक कंपनी महाराष्ट्रात सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यासंदर्भात विन ग्रुप कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सोबत सामंजस्य करार केला. विन ग्रुप कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राज्यात शाश्वत विकास, हरित ऊर्जा, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गतिशील वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन आणि विन ग्रुपचे (आशिया ऑपरेशन्स) मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सान्ह चाऊ यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. विन ग्रुपचे महाराष्ट्रात येणे सन्मानाची बाब यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या विकासाच्या पार्श्वभूमीवर विन ग्रुपचे महाराष्ट्रात येणे ही आनंददायी आणि सन्मानाची बाब आहे. कंपनी योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करत असून मुंबई व रायगड परिसर हा भविष्यात जागतिक स्तरावर स्पर्धा करणारा सर्वात गतिमान शहरी भाग ठरणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर सशक्त आणि गतिमान शहरी वातावरण निर्माण होईल. राज्य शासनाची संपूर्ण यंत्रणा गुंतवणूकदारांना पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन देत कोणतीही अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांसोबत तसेच थेट संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. मागील काही वर्षांच्या अनुभवावरून राज्य प्रशासन कोणतीही समस्या सोडवण्यास सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील निवडक ठिकाणी प्रकल्प या कराराअंतर्गत विन ग्रुपकडून पुढील दोन वर्षांत सुमारे 8.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक प्रस्तावित असून सुमारे 5 हजार एकर क्षेत्रावर विविध प्रकल्प उभारले जाणार आहेत. या माध्यमातून सुमारे 24 हजार 700 थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील इतर निवडक ठिकाणी हे प्रकल्प साकारले जाणार आहेत. या करारानुसार स्मार्ट निवासी टाऊनशिप, इलेक्ट्रिक मोबिलीटी सोल्यूशन्स, सामाजिक व सार्वजनिक पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, पर्यटन व मनोरंज या क्षेत्रात विन ग्रुप गुंतवणूक करणार आहे. या करारानुसार मोठ्या प्रमाणावर स्मार्ट निवासी टाउनशिप उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. सुमारे 2,700 एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाची, पर्यावरणपूरक आणि एकात्मिक टाउनशिप विकसित केली जाणार असून सुमारे दोन लाख लोकसंख्येचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव असून मोबिलिटी-एज-अ-सर्व्हिस प्लॅटफॉर्मही विकसित केला जाणार आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर भर सामाजिक आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये विनस्कूलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा, विनमेकच्या माध्यमातून मल्टीस्पेशालिटी रुग्णालये तसेच व्ही ग्रीन मार्फत राज्यभर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग नेटवर्क उभारण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 170 एकर क्षेत्राचा वापर होणार आहे. याशिवाय 500 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारून स्वच्छ ऊर्जा निर्मितीवर भर दिला जाणार असून त्यासाठी सुमारे 1,200 एकर जमीन आवश्यक राहणार आहे. पर्यटन क्षेत्रालाही चालना देण्यासाठी सुमारे 865 एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचा थीम पार्क, प्राणीसंग्रहालय आणि सफारी प्रकल्प उभारण्याची योजना आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातील पर्यटनवृद्धीसह मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. या कराराच्या वेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बळगन, मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे, तसेच विन ग्रुपचे (आशिया ऑपरेशन्स) मुख्य कार्यकारी अधिकारी फाम सान्ह चाऊ, व्हिएतनामचे महावाणिज्यदूत ले क्वांग बिएन, सल्लागार गोकुल कांत टी, अमन सिंग, वैभव ठाकूर आदी उपस्थित होते.
इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात
मुंबई : पश्चिम आशियातील युद्ध आणि जागतिक भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम आता भारतीय सर्वसामान्यांच्या खिशावर होताना दिसत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी त्यांच्या ताज्या मॉनेटरी पॉलिसी बैठकीत भारतीय अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. मिडल ईस्ट संकटामुळे आगामी काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता असून जीडीपी वाढीचा वेगही मंदावणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले […] The post इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्था संकटात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील सासवड ते कोंढवा दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला 'हिंदू जनआक्रोश मोर्चा' पोलिसांनी मधेच रोखल्याने तणाव निर्माण झाला आहे. या मोर्चाअंतर्गत आयोजित केलेली बाईक रॅली खडी मशीन चौकापर्यंत जाणार होती आणि तिथे गोपीचंद पडळकर यांची सभा होणार होती. मात्र पोलिसांनी ही रॅली नियोजित स्थळापूर्वीच अडवल्याने गेल्या दीड तासांपासून आमदार पडळकर आणि संग्राम जगताप पुढे जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. पुरंदर तालुक्यातील भिवरी गावातील बापदेव घाट परिसरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या 'हिंदू जनआक्रोश मोर्चा'ला रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी आज पहाटेपासूनच कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. शिवतीर्थ सासवड येथून निघालेली ही भव्य बाईक रॅली कोंढव्यातील खडीमशीन चौकापर्यंत जाणार होती. मात्र कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले आहेत. या रॅलीत मोठ्या संख्येने तरुण आणि नागरिक सहभागी झाले असून, मार्गावर तैनात असलेल्या मोठ्या पोलीस फौजफाट्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. कोंढव्यातील संशयितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून कोंढव्यातील संबंधित संशयितांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, तसेच भिवरी ग्रामस्थांवर दाखल केलेले कथित खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी आक्रमक मागणी करण्यात येत आहे. या मागण्यांसह पुरंदर तालुक्यातील जमीन खरेदी प्रकरणातील अन्यायावरही या आंदोलनाद्वारे भूमिका मांडली जाणार आहे. बापदेव घाट प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर खडी मशीन चौकात सभा घेण्यासाठी आक्रमक झाले असून पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. बापदेव घाटात घडलेल्या मारहाण प्रकरणानंतर ग्रामस्थांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेऊन कोंढव्यातील संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, ही या मोर्चाची प्रमुख मागणी आहे. याशिवाय, पुण्यातील 'लव्ह जिहाद'च्या घटनांविरोधात आवाज उठवण्यासाठी या सभेचे नियोजन करण्यात आले होते. कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात दुसरीकडे, खडी मशीन चौक परिसरात अन्य धर्मीय नागरिकही जमायला लागल्याने संभाव्य संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गोपीचंद पडळकर नियोजित स्थळी पोहोचल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो, ही भीती लक्षात घेऊन पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला आहे. कोणत्याही प्रकारचा जातीय तणाव किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण परिसरात सध्या कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांना भोंदूबाबांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. महिलांनी भोंदूबाबांकडे जाणे बंद करावे. हे लोक स्वतःला ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, पार्वती असे काहीही म्हणतात. आपण त्यांच्या बोलण्याला बळी पडू नये. व्हायरल व्हिडिओमध्ये कोणती बाई बेशुद्ध दिसते? आपला समाज कोणत्या दिशेला चाललाय? असा परखड सवाल त्यांनी या प्रकरणी केला आहे. राज्यात सध्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यासंबंधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यानंतर अनेक महिलांनी अशोक खरातने आपण बेशुद्धावस्थेत असताना आपले लैंगिक शोषण केल्याचा दावा केला आहे. पण शर्मिला ठाकरे यांनी हाच धागा पकडत कोणत्या व्हिडिओमध्ये महिला बेशुद्ध दिसतात? असा तिखट सवाल उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी महिलांना अशा भोंदूबाबांपासूर स्वतःला दूर ठेवण्याचेही आवाहन केले. काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे? शर्मिला ठाकरे म्हणाल्या, महिलांनी सर्वप्रथम भोंदूबाबांकडे जाणे बंद करावे. आमचे 13 आमदार आले होते, तेव्हा आमच्याकडे भोंदूबाबांसाठी अनेकजण आले होते. हे भोंदूबाबा स्वतःला ब्रह्मा, विष्णू, महेश, लक्ष्मी, पार्वती असे काहीही म्हणतात. पण आम्ही कुणाच्याही पाया पडत नाही. या लोकांनी आमच्यासोबत फोटो काढून लोकांना आम्ही त्यांचे भक्त आहोत असे सांगितले तर आम्ही तिथे येऊन त्यांच्या कानशिलात हाणणार. त्यामुळे आमच्याकडे कुणी येतच नाही. भोंदूबाबा फसवतात म्हणजे काय? तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघितले असतील. त्यात कोणती बाई बेशुद्ध दिसते हो तुम्हाला. काय आहे हे? काय चाललंय हे? आपला समाज कोणत्या दिशेला चालला आहे?, असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या. अशोक खरात कसा करायचा लैंगिक शोषण? या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या मते, अशोक खरात हा पीडित व त्यांच्या कुटुंबीयांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्यांना खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी या सगळ्या गोष्टींची भीती दाखवून पैसा उकळत होता. विशेषतः महिलांना त्यांच्या कुटुंबात मृत्यूची भीती दाखवून व बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने महिलांचे शोषण केले. त्याचप्रकारे ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारात हातचलाखी करून स्वत:कडे दैवीशक्ती असल्याचे सांगून तो समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचेही काम करत होता. पण आता पीडित महिला व त्यांचे कुटुंब मोठ्या धाडसाने समोर आलेत. त्यांच्याच मदतीने त्याच्याविरोधात विविध गुन्हे दाखल करण्यात आलेत.
कोल्हापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना म्हणजे समरजीत घाटगे यांची भाजपमध्ये झालेली घरवापसी. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले घाटगे आता पुन्हा ‘कमळ’ हाती घेतल्याने राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत आहेत. मुंबईतील भाजप मुख्यालयात मंत्री चंद्रकांत पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी अधिकृत प्रवेश केला. या निर्णयापूर्वी आपण शरद पवारांना सांगूनच पाऊल उचलल्याचेही घाटगे यांनी स्पष्ट केले होते. घाटगेंच्या या पुनरागमनावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षााचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, घाटगे हे मुळात भाजपचेच होते आणि फक्त तिकीटासाठी राष्ट्रवादीत आले होते. आता त्यांची परतफेरी ही केवळ वैयक्तिक राजकीय सोय नसून मोठा राजकीय संकेत आहे. विशेषतः कोल्हापूरमधील नेते हसन मुश्रीफ यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचा इशाराही त्यांनी दिला. भाजप स्वबळाच्या तयारीत - शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की, घाटगेंना पुन्हा भाजपमध्ये घेणे म्हणजे मित्रपक्षांना स्पष्ट संदेश देणे आहे. भाजप येत्या काळात स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे आणि त्यासाठी अशा नेत्यांची गरज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात दिलेला स्वबळाचा संदेश आता प्रत्यक्षात उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे महायुतीतील इतर पक्षांनीही या घडामोडी गांभीर्याने घ्याव्यात, असे शिंदेंनी सूचित केले. संघटनात्मक बदलांचा आढावा याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक पातळीवरही हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्ष मजबूत करण्यासाठी राज्यभर बैठकांचे आयोजन केले जात आहे. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत विविध सेलच्या बैठका घेतल्या जात असून कार्यकर्त्यांची नव्याने नियुक्ती केली जात आहे. जिल्हा आणि राज्य पातळीवरील संघटनात्मक बदलांचा आढावाही घेतला जात आहे. आगामी काळात राज्यभर दौरे करून विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेण्याची तयारी सुरू असल्याचे शिंदेंनी सांगितले. घाटगे खिडकीला लटकून जात आहेत - सतेज पाटील दरम्यान, काँग्रेसकडूनही या घडामोडींवर प्रतिक्रिया उमटली आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी घाटगेंच्या भाजप प्रवेशावर टोला लगावला. भाजपच्या गाडीत जागा नाही, तरीही घाटगे खिडकीला लटकून जात आहेत, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. घाटगेंच्या पुनरागमनामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः 2029 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे मित्रपक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काँग्रेसने बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली नाही. भाजप या प्रकरणी मुद्दा अफवा पसवून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक करत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. बारामती विधानसभा मतदासंघात येत्या 23 तारखेला पोटनिवडणूक होत आहे. ही जागा अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार येथून सत्ताधारी महायुतीतर्फे निवडणूक लढवत आहेत. त्यांना विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही पाठिंबा दिला आहे. पण काँग्रेसने ही लढवण्याची घोषणा करत येथून आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. पण आज अचानक काँग्रेसने उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची चर्चा सुरू झाली असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी तातडीने उपरोक्त स्पष्टीकरण दिली आहे. काँग्रेसशी भाजपच्या कोणत्याही नेत्याने संपर्क साधला नाही बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने काँग्रेस पक्षाशी अद्याप संपर्क साधलेला नाही. या संदर्भात प्रसारित होत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि निराधार आहेत. अशा अफवा मुद्दाम पसरवून भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची फसवणूक करत आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी स्थिती स्पष्ट करताना सांगितले आहे. ‘झाडखाऊ’ म्हणत फडणवीसांवर निशाणा हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिक येथील वृक्षतोडीच्या मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी फडणवीसांचा उल्लेख 'झाडखाऊ' असा केला आहे. ‘झाडखाऊ’ची कुऱ्हाड आरे नंतर आता नाशिक वर, उद्या असेल संपूर्ण महाराष्ट्रावर, असे ते म्हणालेत. या प्रकरणी त्यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात कुऱ्हाड असून, त्यांच्यापुढे तोडलेल्या झाडांचे बुंधे दिसत आहेत. हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. विजय वडेट्टीवारांचाही महायुतीवर निशाणा दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही नाशिक येथील कुंभमेळ्यातील कथित भ्रष्टाचारावरून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांना मलिदा गँगची उपमा दिली आहे. हिंदू खतरे मे है..., एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे असे हिंसक नारे भाजपला का द्यावे लागतात हे आता सर्वांना समजलंच असेल. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेले बोके स्वतःच भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न झाले आहेत. जनतेला याची खबर होऊ नये म्हणून त्यांच्यात धार्मिक वाद पेटण्याचे कसब भाजपने वापरले. धर्माच्या नावावर सत्तेत आलेले स्वतः मात्र कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यातही कोट्यावधींचा भ्रष्टाचार करत आहेत. हा पैसा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आहे. आपल्या भ्रष्टाचाराने, अमानुष वृक्षतोडीने कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्याला बदनाम करणाऱ्या ट्रिपल इंजिन मलिदा गँगला या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल, असे वडेट्टीवार म्हणालेत.
नवी मुंबईतील वाशी येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी मोठी कारवाई करत विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे (वय 55) यांना 22 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला वाशी येथील मंडळाच्या कार्यालयातील विद्युत देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट 1 सप्टेंबर 2025 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी देण्यात आले होते. या कंत्राटांतर्गत नोव्हेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या चार महिन्यांचे सुमारे 3.16 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांनी 7 टक्के कमिशन म्हणून 22,176 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. ही लाचेची मागणी भांडार विभाग प्रमुख मनोहर पवार यांच्या मध्यस्थीने करण्यात आली होती. 25 मार्च रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीची 6 एप्रिल रोजी पडताळणी केल्यानंतर, 7 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे त्यांच्याच केबिनमध्ये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले गेले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लाचखोरीच्या या थेट कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, लाच प्रकरणात अडकलेल्या याच राजेंद्र आहिरे यांनी फेब्रुवारी महिन्यात निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्यासह 19 जणांविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. अलिबाग आणि खोपोली येथील शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांनी या तक्रारीत केला होता. यापूर्वीच्या तक्रारीत आहिरे यांनी 2018 पासून सुमारे 1.25 कोटी रुपयांच्या सरकारी वेतन अनुदानाचा अपहार झाल्याचा गंभीर दावा केला होता. मात्र आता ते स्वतःच लाचेच्या जाळ्यात अडकल्याने शिक्षण विभागात मोठी चर्चा सुरू आहे. भ्रष्टाचार उघड करणाऱ्या अधिकाऱ्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप होऊन अटक झाल्याने या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले असून पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. कोण आहेत राजेंद्र अहिरे? राजेंद्र अहिरे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात विविध महत्त्वपूर्ण पदांवर कार्यरत असून, त्यांनी आपल्या सेवेची सुरुवात मुंबई विभागात शिक्षण निरीक्षक म्हणून केली होती. त्यानंतरच्या काळात त्यांनी राज्य मंडळाच्या नाशिक विभागाचे विभागीय सचिव, मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय शिक्षण उपसंचालक अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या ते राज्य मंडळाच्या मुंबई विभागीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.
अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध होईल आणि सुनेत्रा पवार यांना सहानुभूतीचा लाभ मिळेल, असा महायुतीचा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत हा अंदाज पूर्णपणे फोल ठरला असून, या निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 55 उमेदवारांनी उडी घेतल्याने लढतीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही पोटनिवडणूक आता अत्यंत चुरशीच्या आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आकाश मोरे यांच्या रूपाने धनगर समाजाचा उमेदवार रिंगणात उतरवून जातीय कार्ड खेळल्याने राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासमोरील आव्हान वाढले असून, ही लढाई आता अपेक्षेइतकी सोपी राहिलेली नाही. या बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांना शब्दही दिला असल्याचे समजते. भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहील- मुख्यमंत्री राज्यसभा खासदार पार्थ पवार यांना सोबत घेऊन सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता, या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा महत्त्वाचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. सुनेत्रा पवार यांचा विजय सुकर करण्यासाठी भाजप आवश्यक ती सर्व मदत आणि सहकार्य करेल, अशी ग्वाहीदेखील फडणवीस यांनी या भेटीदरम्यान दिली. 23 एप्रिल रोजी मतदान दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीचे राजकीय वर्चस्व कायम राखण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देऊन राज्याचे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि आता त्यांनी या रिक्त जागेवरून विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी 6 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून, 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाईल. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या रिंगणात करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले यांच्यासह एकूण 55 उमेदवार उतरल्याने लढत अत्यंत रंगतदार होणार आहे. पार्थ पवारांची कॉंग्रेसवर टीका दुसरीकडे, काँग्रेसने या मतदारसंघात आपला स्वतंत्र उमेदवार उभा केल्याने पार्थ पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, ही काँग्रेसच्या डाऊनफॉल सुरुवात आहे, असे आक्रमक वक्तव्य केले आहे. पार्थ पवार यांच्या या विधानामुळे काँग्रेसचे नेते चांगलेच संतापले असून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आता शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. या टीका-प्रतिटीकांमुळे बारामतीमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून महायुती आणि काँग्रेस यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
स्मृती मानधना -पलाश मुच्छलचा पॅचअप ?
मुंबई : प्रतिनिधी सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्मृती मानधनाचे कुटुंबीय आणि पलाश मुच्छलचे कुटुंबीय एकत्र असल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्मृती आणि पलाश पुन्हा एकत्र आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल यांचे लग्न होणार होते. त्यांच्या लग्नासाठी […] The post स्मृती मानधना -पलाश मुच्छलचा पॅचअप ? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औंढा नागनाथ पंचायत समितीच्या गटसाधन केंद्राला लागलेल्या आगीमध्ये संकलीत मूल्यमापन चाचणीचे तब्बल १२ हजार पेपर जळून खाक झाले आहेत. बुधवारी ता. ८ हा प्रकार घडला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे पेपरची मागणी नोंदविण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांनी सांगितले. राज्यात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून इयत्ता तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांची संकलीत मूल्यमापन चाचणी घेतली जाणार आहे. भाषा, गणित व इंग्रजी विषयाची हि परिक्षा असून ता. ११, ता. १५ व ता. २२ एप्रील रोजी हि परिक्षा होणार आहे. त्यासाठी परिषदेकडून सर्व जिल्हयांना पेपरचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातही पेपरचा पुरवठा झाला असून जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर व तालुकास्तरावरून केंद्रस्तरावर पेपर पाठविले जात आहेत. मागील तीन दिवसांपासून हे काम सुरु आहे. दरम्यान, औंढा नागनाथ गटसाधन केंद्रातून तालुक्यातील १३ केंद्रापैकी सात केंद्रांना पेपर वाटप झाले असून सहा केंद्रावर पेपर वाटप करण्याचे काम सुुर होते. मात्र आज सकाळी गटसाधन केंद्रातून धुर निघत असल्याचे कर्मचाऱ्याला दिसून आले. त्यानंतर कर्मचारी पांडूरंग सुर्यवंशी यांनी सदर प्रकार गटशिक्षणाधिकारी मोहम्मद तौफीक यांना कळविला. गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे, गटशिक्षणाधिकारी तौफीक, विस्तार अधिकारी संजय मेथेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, जमादार वसीम पठाण, शेख इकबाल, रवीकांत हरकाळ यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे. दरम्यान, या आगीमध्ये तब्बल १२ हजार पेपर जळून खाक झाले असल्याचे गटशिक्षणाधिकारी तौफीक यांनी सांगितले. शार्ट सर्किटमुळे हि आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून त्यादृष्टीने पोलिसांनीही माहिती घेण्यास सुरवात केली आहे. परिषदेकडे पेपरची मागणी नोंदविली हिंगोलीच्या शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांनी या प्रकरणी परिषदेकडे पेपरची मागणी नोंदवल्याची माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या, सदर घटनेमध्ये १२ हजार पेपर जळाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मिळाली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये तसेच चाचणी सुरळीत पार पडावी यासाठी परिषदेकडे पेपरची मागणी नोंदवली आहे. पेपर प्राप्त झाल्यानंतर ठरवून दिलेल्या तारखेलाच परिक्षा होईल.
खासदार मेधा कुलकर्णी यांनी 'लव्ह जिहाद'च्या बळी ठरलेल्या महिलांसाठी 'ऑपरेशन दुर्गा अभियान' सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत समाजात जनजागृती करून पीडित महिलांना समुपदेशन, पुनर्वसन आणि आवश्यक मदत दिली जाईल. या अभियानासाठी लवकरच एक हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या माध्यमातून पीडितांना त्वरित संपर्क साधता येईल. यावेळी त्यांनी सायली सुर्वे या महिलेच्या 'घरवापसी'चे यश नमूद केले. सायलीचा पती आतिफ तासे याच्यावर 28 गुन्हे दाखल असून, त्याला तातडीने अटक करून सायलीला घटस्फोट मिळावा अशी मागणी कुलकर्णी यांनी केली. सायलीवर मानसिक दडपण असून, तिच्या चार मुलांना आणि आई-वडिलांनाही धोका असल्याचे त्यांनी सांगितले. सायली सुर्वेला 'घरवापसी'नंतरही पोलीस संरक्षण मिळाले नाही, यावर कुलकर्णी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. स्थानिक पोलिसांनी वेळीच संरक्षण दिले असते तर तिच्या सासरच्यांनी तिला बळजबरीने परत नेले नसते, असे त्या म्हणाल्या. सायलीच्या मानसिक स्थितीकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. सायलीने सासू गुलशन तासे हिच्या विरोधात दबावाखाली दिलेला जबाब पोलिसांनी ग्राह्य धरू नये, असेही कुलकर्णी यांनी म्हटले. गुलशन तासेवर अनेक गुन्हे दाखल असून, तिच्या चार सुना हिंदू आहेत आणि काहींनी सासूविरोधात तक्रारीही केल्या आहेत. हा 'लव्ह जिहाद'चा प्रकार असल्याचे कुलकर्णी यांनी अधोरेखित केले. पोलीस ठाण्यांमध्ये भरोसा सेलप्रमाणे स्वतंत्र 'लव्ह जिहाद' सेल स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. महाराष्ट्र सरकारने बळजबरीने धर्म बदलण्यासाठी कोणावरही दबाव टाकला जाणार नाही, असा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणविरोधात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधीची घोषणा केली. इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची धमकी देणा-या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणने सैन्य कारवाया दोन आठवड्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला. दोन्ही देशांनी घेतलेल्या निर्णयाने इराणमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वेळेनुसार आज बुधवारी सकाळी पाच वाजल्यानंतर […] The post अमेरिका-इराणमध्ये युद्धविराम! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका; निनावी पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
बीड : प्रतिनिधी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका निनावी पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवितास आणि प्रतिष्ठेस धोका असल्याचा खळबळजनक दावा एका पत्रातून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे या भोंदू बाबा अशोक खरातच्या हस्तक असून त्यांच्यापासून सुनेत्रा पवार यांना धोका असल्याचे यात नमूद करण्यात […] The post सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका; निनावी पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकचा दूसरा भोंदू रवींद्र एरंडेच्या प्रकरणात देखील रोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. आता एरंडेने त्याच्या टॅबमध्ये असलेल्या आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओबाबत पोलिसांसमोर धक्कादायक माहिती दिली आहे. माझ्या मैत्रिणींसोबतचे विवस्त्र खासगी फोटो व व्हिडिओ टॅबमध्ये असल्याचे सांगितले आहे. तसेच त्याने खंडणीच्या फिर्यादीतही त्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे फोटो आणि व्हिडिओ साठवून लैंगिक शोषण किंवा खंडणी उकळण्याचा प्रयत्न एरंडे करत होता का? असा तपास पोलिसांकडून केला जात आहे. भोंदू अशोक खरातच्या पावलावर पाऊल ठेवत महिलांना विविध आमिषे दाखवून फसवणूक करणाऱ्या रवींद्र एरंडेचे काळे कारनामे उघड झाले असून, त्याच्या कार्यालयातून पोलिसांनी सापाची कात, पक्ष्यांचे अवयव आणि कवड्यांसारखे साहित्य जप्त केले आहे. स्वतःवरील लैंगिक अत्याचाराचे आरोप लपवण्यासाठी एरंडेने आक्षेपार्ह व्हिडिओच्या नावाखाली खंडणी उकळली जात असल्याचा बनाव रचला होता. मात्र त्याच्याच ऑफिस बॉयने रचलेल्या सापळ्यामुळे त्याचे बिंग फुटले. सातपूर पोलिसांनी एरंडेला लैंगिक अत्याचार आणि ॲट्रोसिटीच्या गुन्ह्याखाली बेड्या ठोकल्या असून, सत्र न्यायालयाने त्याच्या पोलिस कोठडीत 10 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. आपल्या मालकाच्या अनैतिक कृत्यांचा भांडाफोड करत ऑफिस बॉयने 12 लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता आणि एरंडेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधितांना अटकही केली होती. मात्र ही तक्रार दाखल करतानाच एरंडेने स्वतःच्या कृत्यांची एकप्रकारे कबुली दिली. मैत्रिणीसोबतचे विवस्त्र खासगी फोटो व व्हिडीओ असलेला टॅब ऑफिसमध्ये ठेवला होता, असा उल्लेख त्याने फिर्यादीत केल्याने त्याचे गुपित उघड झाले आणि तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या डीव्हीडीमध्ये त्याचे तब्बल 100 आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ आढळून आले आहेत. संशयित रवींद्र एरंडे हा वन्यजीवांचे अवयव आणि जादूटोण्याची भीती दाखवून, तसेच नोकरी-व्यवसायाचे आमिष देऊन गरजूंना शोषत असल्याचा संशय 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ने व्यक्त केला आहे. याप्रकरणी 'अंनिस'ने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना निवेदन देऊन एरंडेची सखोल चौकशी करण्याची आणि त्याच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यासह वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यात कोट्यवधींचा कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेले बोके स्वतःच भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न झालेत. कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्यात भ्रष्टाचार करणाऱ्या ट्रिपल इंजिन मलिदा गँगला या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला 6 लाख 37 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. यासंबंधीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात विलास लाड हा नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या टेंडरबाबत धक्कादायक दावे करताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी महायुती सरकार व सत्ताधारी भाजपवर तोंडसूख घेतले आहे. हिंदू खतरे मे है..., एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे असे हिंसक नारे भाजपला का द्यावे लागतात हे आता सर्वांना समजलंच असेल, असे ते म्हणाले. सत्ताधारी बोके भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न विजय वडेट्टीवार या प्रकरणी म्हणाले, हिंदू खतरे मे है..., एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे असे हिंसक नारे भाजपला का द्यावे लागतात हे आता सर्वांना समजलंच असेल. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेले बोके स्वतःच भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न झाले आहेत. जनतेला याची खबर होऊ नये म्हणून त्यांच्यात धार्मिक वाद पेटण्याचे कसब भाजपने वापरले. धर्माच्या नावावर सत्तेत आलेले स्वतः मात्र कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यातही कोट्यावधींचा भ्रष्टाचार करत आहेत. हा पैसा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा आहे. आपल्या भ्रष्टाचाराने, अमानुष वृक्षतोडीने कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्याला बदनाम करणाऱ्या ट्रिपल इंजिन मलिदा गँगला या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल. आता पाहू काय आहे व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये विलास लाड म्हणत आहे की, आपल्याला खूप मोठे काम मिळाले आहे. नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचे तब्बल 15 हजार कोटी रुपयांच्या कामांचे बजेट आहे. त्यातील काही निधी केंद्राने दिलाय तर काही राज्याने. अकाउंटला निधी येऊन पडलाय. या कामांचे टेंडर मॅनेज करण्यात आले आहे. मंत्र्यांपासून ते क्लर्क पर्यंत प्रत्येकाचे कमिशन ठरले आहे. त्यामध्ये माझ्या वाट्याला 500 कोटींच्या कामाचा कोटा आला आहे. आपण स्वतः 700 तंबू उभारण्याचे तसेच ई टॉयलेट अन् साफसफाईचे टेंडर घेतले आहे. या कुंभमेळ्यामध्ये नाश्ता आणि जेवणाचे टेंडर 18 कोटी रुपयांचे आहे. ते देखील आपल्याला मिळाले आहे. कुंभमेळा फक्त 40 दिवसांचा आहे. त्यामुळे एवढा खर्च येत नाही. त्यामुळे त्यातून मोठे कमिशन मिळणार आहे. तुझ्या कुणी ओळखीचे लोक असतील तर त्यांनाही मॅनेज करुन टेंडर देऊयात. फक्त कुणाला सांगू नको म्हणावे, असे विलास लाड फोनद्वारे समोरच्या व्यक्तीला म्हणताना या क्लिपमध्ये ऐकू येत आहे. दिव्य मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.
नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणात आरोपी अशोक खरात याच्याविरोधातील कारवाई अधिक तीव्र होताना दिसत आहे. आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. यासोबतच आरोपीला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीच्या सुनावणीत न्यायालयाने अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. ती मुदत संपल्यानंतर आज त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव या वेळीही त्याला प्रत्यक्ष न्यायालयात न आणता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेच हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याची ओळख पटवण्यासाठी थेट त्याचे नाव विचारले. त्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी देण्याचा निर्णय घेतला गेला. आजच्या सुनावणीत अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि वकील उपस्थित होते. आरोपीचे वकील सचिन भाटे न्यायालयात हजर होते, तर सरकारी बाजू मांडण्यासाठी शैलेंद्र बागडे उपस्थित होते. या प्रकरणाचे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनीही न्यायालयात हजेरी लावली. सुनावणीदरम्यान पुढील गुन्ह्यांमध्ये आरोपीचा ताबा मिळावा यासाठी अर्ज करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर अशोक खरातला आता मध्यवर्ती कारागृहात दाखल केले जाणार आहे. त्यानंतर विशेष तपास पथक (SIT) त्याचा पुन्हा ताबा घेण्याची प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी आवश्यक कायदेशीर औपचारिकता आजच पूर्ण करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे तपास अधिक वेगाने पुढे जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गंभीर स्वरूप पाहता न्यायालयीन प्रक्रियेला वेग सुनावणीनंतर सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आरोपीविरोधात दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली असून तिसऱ्या गुन्ह्यात ताबा घेण्याचा अर्जही मंजूर झाला आहे. त्यामुळे उद्या पुन्हा अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणातील गंभीर स्वरूप पाहता न्यायालयीन प्रक्रियेला वेग आला असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नांदेडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख निलंबित
नांदेड : प्रतिनिधी आरोग्य विभागासाठी आलेला करोड रुपयांचा निधी नियोजना अभावी व्यापकत झाला होता याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांना तडका फडके निलंबित केले आहे.. त्यांच्या कारभाराविषयी अनेक तक्रारी ही शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या यामुळे देशमुख यांचे विभागीय चौकशीही लावण्यात आले आहे. या कारवाईमुळे आरोग्य विभागात खळबळ […] The post नांदेडच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख निलंबित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती पोटनिवडणुकीत भाजपने मध्यस्थी करून निवडणूक बिनविरोध करावी, अशी स्थिती काँग्रेस पक्षाची नाही, असे स्पष्ट मत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले. काँग्रेस पक्ष मोठा असून, प्रदेश पातळीवरील नेत्यांनी उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले. सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उभा केला आहे. हा निर्णय प्रदेश पातळीवर घेण्यात आला आहे. भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मध्यस्थी करत असल्याचे समजते. काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांच्या प्रचारात प्रदेश स्तरावरील सर्वजण सहभागी होतील, असेही पाटील यांनी नमूद केले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या धोरणानुसार जिल्हा काँग्रेस कमिट्या सक्षम करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या संघटन सृजन अभियान बाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक विनोद सुलतानपुरी (आमदार, हिमाचल प्रदेश), माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सतेज पाटील यांनी अभियानाबद्दल माहिती देताना सांगितले की, देशभरात हे अभियान राबविण्यात येत आहे. याद्वारे लोकांचा जनमानस जाणून घेतला जात आहे. 17 ते 19 एप्रिल दरम्यान पुणे जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आढावा घेतला जाईल. सर्वसमावेशक पदाधिकाऱ्यांना पक्षाची जबाबदारी देण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे. हे अभियान सात ते आठ राज्यांमध्ये यशस्वी झाले असून, आता ते महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. पक्षाचे निरीक्षक विविध पदाधिकाऱ्यांना एकटे भेटून चर्चा करणार आहेत. नावे शिफारस करण्याबाबत त्यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. ज्यांना आपली भूमिका मांडायची आहे, त्यांनी पक्ष निरीक्षकांसमोर येऊन ती मांडावी, असे आवाहनही पाटील यांनी केले. यावेळी बोलताना विनोद सुलतानपुरी म्हणाले की, पुण्यातील विधी महाविद्यालयात माझे शिक्षण झाले असून, 20 वर्षांनी पुण्यात पुन्हा आल्याचा आनंद आहे. पुणे शहर ऐतिहासिक असून देशाला या शहराचे वेगळे महत्त्व आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी या अभियान माध्यमातून काम करण्यात येणार आहे.
पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांतील बांधकाम परवानग्यांच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या संदर्भात महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी नगरसेवकांनी नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव असीम गुप्ता यांना पत्र पाठवले आहे. पीएमआरडीएला 60 दिवसांसाठी बांधकाम परवानग्या देण्याचा शासनाचा निर्णय रद्द करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. हे पत्र माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे आणि नागरी हक्क संस्थेचे अध्यक्ष सुधीर कुलकर्णी यांनी दिले आहे. 30 जून 2021 रोजी 23 गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला होता. त्यानंतर या गावांचा विकास आराखडा तयार करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला होता. मात्र, 14 जुलै 2021 रोजी शासनाने पीएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, ती अद्याप प्रलंबित आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान,11 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने पीएमआरडीएचा विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा रद्द केला. त्यानंतर पुणे महापालिका नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत झाली. या प्रक्रियेत पीएमआरडीएकडील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीने महापालिकेकडे वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र, बांधकाम परवानग्यांसारख्या संवेदनशील विषयावर मार्गदर्शन मागत पीएमआरडीएने प्रस्ताव स्वतःकडेच ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, कायद्यात स्पष्ट तरतूद नसतानाही दोन महिन्यांसाठी पीएमआरडीएला बांधकाम परवानग्या देण्याची मुभा देण्यात आली आहे. अधिकार नसताना दिलेल्या या परवानग्या वैध ठरणार का, असा सवाल पत्रात उपस्थित करण्यात आला आहे. याशिवाय, पुणे महापालिकेने पाणीपुरवठ्याची पूर्ण व्यवस्था झाल्याशिवाय बांधकाम परवानगी न देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या धोरणाला छेद देणारे निर्णय भविष्यात महापालिकेवर अतिरिक्त ताण आणू शकतात, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे 60 दिवसांची मुदत रद्द करून सर्व प्रस्ताव तातडीने महापालिकेकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे. पीएमआरडीए आणि महापालिकेतील शुल्क संरचनेतील तफावतही यावेळी स्पष्ट करण्यात आली आहे. पीएमआरडीए रेडीरेकनरच्या 2 टक्के दराने विकास शुल्क आकारते, तर महापालिका 4 टक्के दराने शुल्क आकारते. या फरकामुळे होणारे आर्थिक नुकसान कोण भरून काढणार, असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तसेच, पीएमआरडीएने कोणताही प्रस्ताव मंजूर करण्यापूर्वी महापालिकेच्या नगर अभियंत्यांशी समन्वय साधावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. शहरातील नियोजन प्रक्रियेत अधिक गोंधळ टाळण्यासाठी शासनाने यावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
पुणे महानगरपालिकेकडून शहरातील ओव्हरहेड केबल्सवर सुरू असलेल्या कारवाईमुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने विद्यार्थी, आयटी क्षेत्रातील कर्मचारी, व्यावसायिक आणि स्टार्टअप्सचे दैनंदिन कामकाज ठप्प होत आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाने आज पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देऊन ही कारवाई तात्काळ स्थगित करण्याची मागणी केली आहे. शहराच्या डिजिटल प्रगतीवर या कारवाईचा गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पुणे शहर शिक्षण, आयटी आणि उद्योग क्षेत्रात देशात आघाडीवर आहे. अशा स्थितीत नियोजनशून्य आणि एकतर्फी कारवाई शहराच्या प्रतिमेला धक्का पोहोचवू शकते, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. केंद्र सरकारच्या 'डिजिटल इंडिया' उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट ही एक अत्यावश्यक सेवा बनली असून, त्यात अडथळे निर्माण होणे चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे, तसेच प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. निवेदनात प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ओव्हरहेड केबल्स संदर्भात स्पष्ट आणि पारदर्शक नियमावली तात्काळ तयार करावी, नियमावली लागू होईपर्यंत सध्या सुरू असलेली कारवाई स्थगित करावी, लहान व मध्यम इंटरनेट सेवा पुरवठादारांसाठी सुलभ परवाना प्रक्रिया राबवावी आणि कारवाईमागील हितसंबंध सार्वजनिक करून सर्व कंपन्यांवर समान निकषांनुसार पारदर्शक कारवाई करावी, यांचा समावेश आहे. यावेळी प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, इंटरनेट ही आजच्या काळातील अत्यावश्यक सेवा आहे. कोणतीही प्राथमिक उपाययोजना किंवा स्पष्ट नियमावली नसताना अशा प्रकारची कारवाई करणे योग्य नाही. प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने समन्वय साधून ठोस आणि लोकहिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.'स्मार्ट सिटी'च्या दिशेने वाटचाल करताना नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विचार करूनच धोरणे आखली पाहिजेत, अन्यथा विकास प्रक्रियेलाच अडथळा निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या एका कार्यक्रमात दिवंगत अजित पवार यांचा फोटो नसल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या प्रकरणी टीकेची झोड उठवत त्यांच्यावर त्यांच्या कथित कृतघ्नपणाचा निषेध केला आहे. या कृतीद्वारे प्रफुल्ल पटेल यांचे पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसत आहेत, असे शरद पवार गटाने म्हटले आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत आहेत. त्यातच सुनील तटकरे यांच्या रायगड येथील एका कार्यक्रमातील बॅनरवर अजित पवारांचा फोटो नव्हता. त्यामुळे शरद पवार गटाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता असाच काहीसा प्रकार प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत घडला आहे. त्यांच्याही कार्यक्रमात अजित पवार यांचा फोटो नसल्याचे निदर्शनास आले आहे. पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे दिसताहेत शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी या प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, रायगड मध्ये तटकरेंना जशी अजितदादांची अडचण तशीच आता पटेलांच्या विदर्भात तिरोडा येथील NCP पक्षाच्या अधिकृत बैठकीतील बॅनरवर अजित पवार यांचा फोटो नाहीच. फक्त स्वतःचे फोटो लावणाऱ्या पटेल तटकरे या दोन्ही नेत्यांनी दाखवून दिले की आम्ही तुमचे नसून स्वतंत्र आहोत. पक्ष ताब्यात घेण्याचे मनसुबे कुठे ना कुठे सतत दिसत आहेत. प्रफुल्ल पटेल साहेब तुमच्या कृतघ्नपणाचा निषेध ! मात्र स्वतःला अजितदादा प्रेमी म्हणवणारे त्यांच्या पक्षातील आमदार व पक्ष पदाधिकारी गप्प बसत असतील तर ते गुलाम असावेत किंवा ढोंगी असावेत. राम कृष्ण हरी, असे लवांडे यांनी म्हटले आहे. अमोल मिटकरींचाही शरद पवार गटाच्या सूरात सूर दुसरीकडे, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी अप्रत्यक्षपणे सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. ते एका पोस्टद्वारे म्हणाले, आदरणीय अजितदादा तुम्ही कुण्या बॅनरवर नसला काय असला काय? प्रसिद्धीचा तुम्हाला हव्यास होताच कुठे? तुम्ही मात्र गरिबांच्या घराघरात कायम आहात.. कोकण ते विदर्भापर्यंत तुमचा चाहता वर्ग विखुरलाय ..कदाचित तो तुम्हाला भेटलाही नसेल आयुष्यात कधी…. किंवा त्याला तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नसेल. मात्र तो फाटका असला तरी देवासमान पुजतो तुम्हाला … कारण तो जाणत होता की तुम्ही महाराष्ट्राची गरज होता….तो फाटका, गरीब, पिचलेला, रडतोय आजही तुमच्यासाठी धाय मोकलून… कदाचित तुम्ही त्याला दिसणार नाही, आणि तो ही आता परत हसणार नाही… तुम्ही व तुमचे फोटो कायमचे कोरून गेलेत त्याच्या काळजात… तुम्ही बॅनर वर नसलात म्हणून काय झालं?? एकदिवस अबाल वृद्ध इथला डोंगर हलवतील ,आणी स्वाभिमानाने म्हणतील “आमच्याकडे बॅनर छापायला पैसे नसतील पण दादा तुमच्या बॅनर पेक्षा आमच्या काळजात कायम दिसतील.. तुमच बॅनर उद्या खतावर ,छतावर राहील ,पण आमच्या काळजातलं दादा आम्ही सरणावर जाईस्तो आमच्या फाटक्या हृदयात कायम राहील. घराघरात दादा मनामनात दादा, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. रोहित पवारांनी तटकरेंवर साधला होता निशाणा राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ नुकताच रायगडमध्ये झाला होता. या कार्यक्रमाला सुनील तटकरे उपस्थित होते. पण या कार्यक्रमाच्या बॅनवर अजित पवार व सुनेत्रा पवार यांचे फोटो नव्हते. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी सुनील तटकरेंवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, “मालकाला अलगद बाजूला सारून जेव्हा बटाईदारच जमिनीचा ७/१२ स्वतःच्या नावे करतो, याचं जिवंत उदाहरण…. जे आम्ही वारंवार बोलतोय…”
गेली 3 ते 4 दिवसांमध्ये नांदेडमध्ये ज्या खुनाच्या घटना घडल्या आहेत त्या अत्यंत वाईट आहेत. नांदेड शहरामध्ये अवैध हत्यारे आली आहेत. नांदेडमधील अनेक गुन्हेगार हे गुन्हे करतात आणि तेलंगणा किंवा कर्नाटकात पळून जातात, असे शिवसेना नेते हेमंत पाटील यांनी म्हटले आहे. नांदेडमध्ये गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही असे म्हणत पाटील यांनी गृहविभागाच्या कामावरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हेमंत पाटील म्हणाले की, नांदेड शहरात जर झडती घेतली गेली तर अवैध दीड ते 2 हजार पिस्तूलं सापडतील. त्यामुळे कोणाचाच वचक शहरावर राहिलेला नाही. बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो. त्यांना व्याजाने पैसे दिले जातात, त्यांचे लॅपटॉप आणि इतर वस्तु हिसकावल्या जातात. यामुळे नांदेडमध्ये पोलिस आयुक्तालय झाले पाहिजे. पोलिसांच्या सिंघम अशा प्रतिमा रंगावल्या जातात पण ते केवळ तोडपाणी करण्यात पुढे असतात, असा आरोप पाटील यांनी केला आहे. गुन्हेगारांना राजाश्रय देऊ नये हेमंत पाटील म्हणाले की, मुलींची छेडछाड, बलात्कार, चोरी असे गुन्हे दाखल असणाऱ्यांना कोणीही राजाश्रय देऊ नये. मध्यतंरी शहरातील व्यापाऱ्यांकडून शेकडो कोटी रुपयांच्या खंडण्या जमा उकळण्यात आल्या. त्यामुळे अनेक व्यापारी शहर सोडून गेले. सर्व पक्षीय लोकांनी गुन्हेगारांना राजाश्रय देऊ नये. सरकारी रुग्णालयात पोलिसांसमोर जर हत्या होत असेल तर असे पोलिस दल काय कामाचे. जे पोलिस तिथे उपस्थित होते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हेमंत पाटील यांनी केली आहे. कागदावर काम करणाऱ्यांवर कारवाई व्हावी हेमंत पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या 23 कोटी रुपये निधी परत जातो याला कोण जबाबदार आहे. मोठे अधिकारी छोट्या अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवतात. त्याचा तपास झाला पाहिजे. शहरात मोठ्या प्रमाणात निधी आला तर तो कामासाठी असतो केवळ कागदावर कामे होत असतील तर कारवाई झाली पाहिजे.
राज्यात गुन्हेगारी चांगलीच फोफावली आहे. त्यात खून, खंडणी तसेच मुली बेपत्ता होण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. मुलींच्या तसेच महिलांच्या अपहरणाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत देखील मांडला होता. आता असाच बेपत्ता होण्याचा प्रकार बीडमध्ये झाला आहे. मात्र, यात वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे. बीडच्या माजलगाव शहरातील एक तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या शोधत एक पोलिस कर्मचारी पुण्यात आला होता. तपास पूर्ण केल्यानंतर तो परत बीडला गेला आणि मध्यरात्री 2 वाजता त्याने आपले आयुष्य संपवले. आता पुण्यात नेमके असे काय घडले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले 35 वर्षीय पोलिस कर्मचारी बाळकृष्ण जायभाये यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव शहरातील एका बेपत्ता मुलीच्या तपासासाठी पुणे येथे गेलेले जायभाये हे संबंधित तपास आणि काम व्यवस्थित पूर्ण करून रात्री उशिरा घरी परतले होते. मात्र त्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांनी ही आत्महत्या का केली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुण्यावरून तपास पूर्ण करून परतल्यानंतर अवघ्या काही वेळातच, पहाटे दोनच्या सुमारास त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत असून, त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळताच परिसरात मोठी गर्दी जमली होती. या हृदयद्रावक घटनेमुळे पोलिस दलातील त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा मानसिक धक्का बसला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पुण्यात नेमके काय झाले? बेपत्ता झालेल्या मुलीच्या शोधात गेलेले पोलिस कर्मचारी बाळकृष्ण जायभाये यांच्यासोबत पुण्यात नेमके काय झाले? असा सवाल उपस्थित होत आहे. प्राथमिक माहितीनुसार कोणतीही सुसाईड नोट अद्याप मिळालेली नाही, त्यामुळे आत्महत्येचे गूढ वाढले आहे. आता पोलिसांनी बाळकृष्ण जायभाये यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे विचारपूस सुरू केली आहे. या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. 17 वर्षीय विवाहित अल्पवयीन मुलीचा मृतदेह दरम्यान, बीड जिल्ह्यातून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 17 वर्षीय विवाहित अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. या मुलीचा विवाह अवघ्या एक वर्षापूर्वी झाला होता आणि लग्नानंतरचे सुरुवातीचे सहा महिने ती सासरी वास्तव्यास होती, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली असून या प्रकरणातील गुंतागुंत पाहता पोलिस अधिक तपास करत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात टंचाई उपायोजनासाठी विंधन विहीर अधिग्रहण किंवा टँकर सुरू करणे आवश्यक असणाऱ्या गावांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करूनच योग्य ती कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना मंगळवारी (ता. 7) आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक तसेच जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, सहायक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, संबंधित उपअभियंते व कनिष्ठ अभियंते, तसेच टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड या त्रयस्थ तांत्रिक तपासणी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जल जीवन मिशनची कामे मंजूर असल्याने यंदाच्या टंचाईच्या काळात एकाही गावात टँकरची आवश्यकता भासू नये, यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जल जीवन मिशनची कामे अपूर्ण असली तरी विहिरीचे काम पूर्ण झाले आहे आणि पाणी उपलब्ध आहे, अशा ठिकाणी स्टँडी बसवून पाणीपुरवठा सुरू करावा. तसेच गावांतील सर्व पाणीस्रोतांची तपासणी करून कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. नळ पाणी पुरवठा योजनांसाठी महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा घेण्यासाठी आवश्यक असलेल्या जोडण्यांसाठी लागणाऱ्या कोटेशनची रक्कम संबंधित ग्रामपंचायतींनी भरणे आवश्यक आहे. यासाठी 15 व्या वित्त आयोग निधीतून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत वैयक्तिक घरगुती नळ जोडणीची जी कामे अद्याप सुरू झालेली नाहीत, ती तात्काळ सुरू करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. पाणी टंचाईच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 701 गावांसाठी विविध उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, त्यामध्ये नळ योजनांची दुरुस्ती 5, विंधन विहिरींची दुरुस्ती 16, नवीन विंधन विहिरी व कुपनलिका 131 गावांत 158, खाजगी विहीर अधिग्रहण 302 गावांत 336, तसेच 22 गावांत 28 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यावेळी पाणी पुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या विविध कामांच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत राहण्याचा अधिकार आहे का नाही हे सांगण्याचा अधिकार राऊतांना नाही. तुम्ही राज्यसभेवर कसे निवडून आलात. तुमच्याकडे केवळ 20 आमदार आहेत, तुमचे उमेदवार निवडून येतात का हे बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनता निवडून देते आहे,असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. तुम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना घरातून बाहेर निघण्याचा सल्ला द्या. राऊत हे भोंदू बाबा राऊत आहात. नवनाथ बन म्हणाले की, भारताची परिस्थिती उंदरासारखी झालेली नाही तर राऊतांची परिस्थिती सापासारखी झाली आहे. साप जसे आपलेच दुध पितो आणि फना वर काढून बसतो तसेच देशाचे मीठ खात देशाविरोधात फना काढण्याचे काम संजय राऊत करत आहेत. तुम्ही आपल्याच देशाविरोधी भूमिका घेत पाकिस्तानचे समर्थन करत आहात. तुम्ही पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करण्याचे काम करत आहात. पाकिस्तान अन् उबाठाची अवस्था सारखीच नवनाथ बन म्हणाले की, ज्या पाकिस्तानचे गुणगाण संजय राऊत गात आहे त्या देशामध्ये लोकांना पीठ मिळत नाही. पेट्रोल-डिझेल महाग आहे, गॅस मिळत नाही. साडेचारशे रुपयांनी पेट्रोल डिझेल मिळते. आपल्याकडे भाव वाढले नाही कारण मोदींचे नेतृत्व सक्षम आहे. संजय राऊत तुमच्या पाकिस्तानची अवस्था महाराष्ट्रात उबाठाची अवस्थेसारखी झाली आहे. दलाली करणे भारताचा धंदा नाही नवनाथ बन म्हणाले की, ज्यांच्या पक्षाची धाव आणि मजल उरणपर्यंत नाही असे संजय राऊत इराणच्या गप्पा मारत आहेत. इराण प्रकरणी काय करायला हवे होते यांचा सल्ला देतात त्यांनी उबाठामध्ये लक्ष दिले पाहिजे. देशाचा विचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. इराण-इस्रायल युद्धात काय झाले कुणी मध्यस्थी करायला हवी होती? कोणी दलाली केली हे जगाने पाहिले आहे. दलाली करणे भारताचा धंदा नाही. जे दलाली करतात आणि भारतात त्यांची प्रवक्तेगिरी करणाऱ्यांना दलाली लखलाभ असो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सक्षम आहे, म्हणून या युद्धाची झळ आपल्याला पोहोचली नाही. राऊतांचा दलालीचा धंदा नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत तुमच्या उबाठा पक्षाची काय अवस्था झाली आहे याकडे तुम्ही लक्ष द्या. मनपामध्ये उद्धव ठाकरेंची काय अवस्था झाली याकडे लक्ष द्या. उरणपर्यंत पक्ष नसलेल्या लोकांनी इराणच्या गप्पा मारणे बंद केले पाहिजे. इराण-इस्रायल युद्धात ज्या पद्धतीने पाकिस्तानकडून दलाली करण्याचे काम केले जात आहे आणि पाकिस्तानची दलाली भारतात करण्याचे काम संजय राऊत करत आहेत. राऊत यांचा दलाली करण्याचा धंदा झाला आहे. पक्षामध्ये त्यांना काही काम उरलेले नसल्याने ते काही वेळ शरद पवार यांची दलाली करतात काही वेळ राहुल गांधी यांची दलाली करतात. आज तर त्यांच्याकडून पाकिस्तानचा उदोउदो केला जात आहे. हे दलालीचे धंदे बंद करा, यामुळेच तुमच्यावर ही पाळी आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांची प्रकृती आज अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू करण्यात आलेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सुषमा अंधारे यांची प्रकृती आज सकाळी अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली आहे. सुषमा अंधारे यांना नेमके काय झाले? हे अद्याप समजले नाही. पण त्यांच्या समर्थकांकडून त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात आहे. विधिमंडळ हक्क समितीच्या बैठकीला राहणार गैरहजर उल्लेखनीय बाब म्हणजे सुषमा अंधारे उद्या गुरुवारी विधिमंडळ हक्क समितीच्या बैठकीला हजर राहणार होत्या. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आता या बैठकीला हजर राहता येणार नाही. यासंबंधीची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून थेट विधिमंडळ सचिवालयाला पत्राद्वारे कळवण्यात येणार आहे. सुषमा अंधारे ह्या शिवसेना ठाकरे गटाच्या एक प्रमुख महिला नेत्या आहेत. आपल्या धारदार वक्तृत्वशैलीमुळे व विरोधकांवर थेट तिखट हल्ला चढवण्याच्या आपल्या खास शैलीमुळे त्या ओळखल्या जातात. त्या ठाकरे गटाच्या मुलूख मैदानी तोफ म्हणूनही ओळखल्या जातात. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी सुषमा अंधारे यांनी सामाजिक आणि प्रबोधनपर कामांमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक समता आणि महिलांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला. विविध सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घेत त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृतीचेही काम केले. राष्ट्र सेवा दल आणि इतर प्रबोधनवादी विचारसरणीच्या संस्थांशीही त्यांचा संबंध आहे. तर्कवादी आणि प्रगतिशील विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक व्याख्याने दिली व मोहिमा राबवल्या. भोंदू खरातवरून अंजली दमानियांवर साधला होता निशाणा दुसरीकडे, सुषमा अंधारे यांनी परवाच भोंदू अशोक खरातच्या मुद्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या, अंजली दमानिया, तुम्ही आज रडून जे victim कार्ड खेळलं ते कमालीचं बालिश होतं. पण मूळ मुद्दा भरकटू नये म्हणून आज मी तुमच्यावर कमी फोकस केला आहे. कारण तुमच्याशी वितंड वादापेक्षाही खरात आणि सर्व गुन्हेगार गजाआड होणे जास्त गरजेचे आहे. पण माझ्या कुठल्याही आरोपाचा खंडन तुम्ही आजही करू शकलेला नाहीत. तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवणार होतात पण तुम्ही ते करून दाखवू शकला नाहीत. तुम्ही सगळीकडून अडचणीत आलेल्या आहात याची मला कल्पना आहे. कारण तुम्ही केलेली कृती breach of privacy आहे. पण तुम्ही रडल्याने आणि अमृता फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्याने माझं म्हणणं सिद्ध व्हायला अधिक मदत झाली. आभार. बाकी भाजप सोडून मुद्दे असतील तर तुम्ही जगात कुठेही असला तर प्रकट होतात यावर माझा विश्वास आहे जशा कोरेगाव पार्क प्रकरणात तुम्ही अमेरिकेतून अचानक लाईव आला होता अगदी तशा... ! तुम्ही कुणाठी काम करता हे तुम्ही आज स्वतःच्या कृतीतून सिद्ध केला आहे आणि तुम्हाला सीडीआर कसे मिळाले यावर तुम्ही जे दोन वेगवेगळे स्टेटमेंट तुम्ही खोटं बोलत आहात हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत. लवकर खासदार व्हा, असे त्या म्हणाल्या होत्या.
मुंबईत शिखर बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नवे कायदेशीर वळण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी या प्रकरणात दोषमुक्तीची मागणी करत विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र, या अर्जावर केवळ तांत्रिक मुद्द्यांवर नव्हे तर प्रकरणाच्या गुणवत्तेच्या आधारे निर्णय घ्यावा, अशी स्पष्ट मागणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयासमोर केली आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या मूळ गुन्ह्याचा तपास बंद करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा अहवाल सादर केला होता, जो विशेष न्यायालयाने स्वीकारला. याच मुद्द्यावर आधार घेत रोहित पवार आणि इतर 11 जणांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे. त्यांचा दावा आहे की, मूळ गुन्हाच बंद झाल्याने त्यावर आधारित ईडीचे प्रकरण टिकू शकत नाही. मात्र, ईडीने या युक्तिवादाला विरोध करत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. कनिष्ठ न्यायालयाने अहवाल स्वीकारला असला तरी, ईडीने यापूर्वी दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जाबाबतचा निर्णय उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आला असून तो अजून प्रलंबित आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेताना सर्व बाबींचा सखोल विचार करणे आवश्यक असल्याचे ईडीने नमूद केले आहे. फक्त प्रक्रियात्मक कारणांवर आरोपींना दिलासा देऊ नये, असेही ईडीने स्पष्ट केले. ईडीच्या आरोपांनुसार, कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. हा कारखाना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो लिमिटेडशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारखान्यावर सुमारे 80.56 कोटी रुपयांचे कर्ज थकीत होते. हे कर्ज वसूल करण्यासाठी शिखर बँकेने 13 जुलै 2009 रोजी सरफेसी कायद्याअंतर्गत कारवाई करत मालमत्ता ताब्यात घेतली होती. यानंतर 30 ऑगस्ट 2012 रोजी या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. मात्र, ईडीच्या मते हा लिलाव प्रक्रियेत अनियमितता करून करण्यात आला. एका कथित मूल्यांकन अहवालाच्या आधारे कारखान्याची किंमत कमी दाखवण्यात आली. बोली प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्वाधिक बोलीदाराला तांत्रिक कारणांवर अपात्र ठरवण्यात आले, तर दुसऱ्या बोलीदाराचा बारामती अॅग्रो लिमिटेडशी संबंध असल्याचा आरोप आहे. तसेच त्या बोलीदाराकडे साखर कारखाना चालवण्याचा अनुभव किंवा आर्थिक क्षमता नसल्याचेही ईडीने नमूद केले आहे. न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार या सर्व पार्श्वभूमीवर आता न्यायालयाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. रोहित पवार आणि इतर आरोपींना दिलासा मिळणार की ईडीच्या भूमिकेमुळे त्यांच्यावरचे आरोप कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
इराण-इस्रायल युद्धामध्ये दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले. यात ट्रम्प सारख्या झुंड राष्ट्रप्रमुखाला धडा शिकवण्यात आले. पण शेवटी युद्धात मध्यस्थी करण्याचे श्रेय पाकिस्तानला जात आहे. चीन तर मोठा देश आहे पण पाकिस्तानला श्रेय मिळाल्याने तो देश जगाच्या नकाशावर पु्न्हा एकदा आला आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. हे श्रेय नरेंद्र मोदी आणि भारताला मिळायला हवे होते. महाविश्वगुरूंना हे श्रेय का मिळाले नाही तर त्यांची कोणतीच भूमिका नाही. जगात युद्ध सुरू असताना महाविश्वगुरू हे राजकीय विरोधकांवर प्रचार सभांमधून शाब्दिक बॉम्ब टाकत आहेत. संजय राऊत म्हणाले की, इराण-इस्रायल युद्ध हे संपूर्ण जगाचा विध्वंस होईल असे सुरू होते, यात हजारो लोक मारले गेले. अखाती राष्ट्रातील अनेक ठिकाणी शेकडो लोकं मारले गेले. पण इराणसारखा देश इस्रायल-अमेरिकेसारख्या महाशक्तीला शरण गेला नाही. 35 दिवसांपेक्षा जास्त काळ त्यांच्यासोबत युद्ध केले. अमेरिकेबद्दल जगाच्या मनात जी भीती होती ती भीती इराणने मोडून काढली. देशासाठी कसं लढावं हे इराणनं जगाला दाखवून दिले, राज्यकर्त्यांनी देशासाठी कसे बलिदान द्यावे, जनतेने कसे बलिदान द्यावे हे इराणने जगाला दाखवले आहे. ट्रम्प यांची भारताला चपराक संजय राऊत म्हणाले की, शांती बैठक इस्लामाबादमध्ये होणार आहे. जे इस्लामाबाद तुम्ही ऑपरेशन सिंदूरमध्ये ताब्यात घेणार होतात तिथे तुम्ही भाजपचा झेंडा फडकवणार होतात. तिथे ट्रम्प, नेत्यन्याहू आणि इराणचे राज्यकर्ते एकत्र येत शांततेवर चर्चा करणार आहेत.भारतासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. तुम्ही कसले विश्वगुरू आहात? तुम्ही भंपक आणि डरपोक आहात. ही ट्रम्प यांनी भारताला मारलेली चपराक आहे. कारण ते चीन आणि पाकिस्तानला थॅक्यू म्हणत आहेत. मोदींना आता सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. जयशंकर यांनी राजीनामा दिला पाहिजे संजय राऊत म्हणाले की, मोदींमुळे भारताची अवस्था ही डरपोक उंदरासारखी झाली आहे.इतक्या मोठ्या घडामोडी आशिया खंडात घडत असताना मोदींनी काय केले तर टेलिफोन ऑपरेटरचे काम केले. केवळ लोकांशी फोनवर बोलण्याचे काम त्यांनी केले. पाकिस्तानला श्रेय दिले यावर तरी बोलले पाहिजे. जयशंकर यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुम्ही आपल्या शत्रूला कमी लेखत आहात. अजित पवार हे काँग्रेसचे प्रोडक्शन संजय राऊत म्हणाले की, जनभावना काय हे देवेंद्र फडणवीसांनी सांगावे. पंढरपूर, नांदेडमध्ये जनभावना नव्हती का? तेव्हा भाजपने ती जनभावना पायी तुडवली याचे उदाहरण देऊ शकतो. पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केल्यावर त्यांच्यावर टीका होणारच.अजित पवार हे काँग्रेसचे प्रोडक्शन आहे. शरद पवारांची संपूर्ण हयात काँग्रेसमध्ये गेली. काँग्रेस पक्षाचे देशासाठी मोठे योगदान. महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांना जगभरात प्रतिष्ठा आहे. काँग्रेसचा पराभव झाला तर लोकशाही मरत नाही. काँग्रेसला 25 मते पडतील तुम्हाला 25 लाख मते पडतील. पण विरोध झाला पाहिजे.
महापालिका निवडणुकीपासून उद्धवसेनेतील एका गटाने जिल्हा प्रमुख प्रा. अजय दासरी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. ‘बजाओ बासरी... हटाओ दासरी...’ अशी मोहीम सुरू केली होती. त्यात त्यांना अखेर यश मिळाले आहे. पक्षाने आता जिल्हाप्रमुख पदावरून दासरी यांना डच्चू दिला आहे. त्यांच्याकडील जबाबदारी प्रताप चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. उद्धवसेनेच्या संपर्क प्रमुख प्रा. सुषमा अंधारे यांनी बैठक घेऊन नवीन कार्यकारिणी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नव्या कार्यकारिणी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध झाली आहे. प्रा. दासरी यांच्याकडील शहर उत्तर व शहर मध्यच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आता माजी शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दक्षिण, अक्कलकोटच्या जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी शरणराज केंगनाळकर यांच्याकडे तर सोलापूर महानगर प्रमुखपदी महेश धाराशिवकर यांची निवड झाली. लोकसभा प्रमुखपदी संजय पौळ यांची वर्णी जिल्हाप्रमुख - धनंजय डिकोळे (माढा, करमाळा), संभाजी शिंदे (सांगोला, पंढरपूर - मंगळवेढा), प्रताप चव्हाण (सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य), शरणराज केंगनाळकर (अक्कलकोट, दक्षिण सोलापूर), प्रवीण काकडे (बार्शी, मोहोळ, माळशिरस). लोकसभा प्रमुख - संजय पौळ (सोलापूर लोकसभा), हुकुमचंद राठोड (माढा लोकसभा), सोलापूर महानगरप्रमुख - महेश धाराशिवकर, सोलापूर महिला संघटिका - मंगल थोरात. विचित्र लोकांसोबत काम करणारच नाही जिल्हा प्रमुख हे महत्त्वाचे आणि पक्षप्रमुखांच्या जवळील पद आहे, अशा पदावरील व्यक्तीवर खालच्या पातळीवर आरोप करण्यात आले. पक्षासाठी प्रामाणिक काम करत असतानाही त्रास दिला. तरीही आपण पक्षासाठी काम केले. ज्यांनी पक्षप्रमुखांवर आरोप केले त्यांनाच पदे मिळाली याचे आश्चर्य आहे. यापुढील काळात या विचित्र लोकांत काम करण्याची मानसिकता नाही. पुढे पक्ष जी जबाबदारी देईल. ती पार पाडणार आहे. आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवसैनिकांसोबत काम करणार आहे. प्रा. अजय दासरी, माजी जिल्हा प्रमुख.
वृक्षतोडीच्या मुद्यावरून पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले असतानाच महापालिकेच्या उद्यान विभागाचा गलथान कारभारही समोर आला आहे. महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम 1975 नुसार दर 5 वर्षांनी वृक्षगणना करणे बंधनकारक आहे. पालिकेने 2018 नंतर अद्याप नव्या वृक्षगणनेचा अहवालच जाहीर केलेला नाही. विशेष म्हणजे, 2024 मध्ये 8 कोटी रुपये खर्चून नवीन गणनेचे काम सुरू करण्यात आले होते. तरी, मात्र 8 वर्षांपासून शहराच्या हरितसंपदेची नेमकी स्थिती काय, हे उद्यान विभागाने समोरच आणलेले नाही. 2017-18 मध्ये झालेल्या वृक्षगणनेत शहरात 47,95,387 झाडे आढळली होती. यात 257 प्रजातींची नोंद झाली होती. मात्र, यात चिंतेची बाब म्हणजे 45 टक्के झाडे ही विदेशी गिरिपुष्प (ग्लीरिसिडीया) प्रजातीची होती. त्याशिवाय बाभूळ 18 टक्के आणि सुबाभूळ 13 टक्के असे प्रमाण होते. तेव्हाच्या अहवालात एकूण 1528 वारसा वृक्षांची नोंद करण्यात आली होती, ज्यात पिंपळ, वड आणि आंब्याचा समावेश होता. मात्र, गेल्या 7 वर्षांत या शिफारशींवर नक्की काय कार्यवाही झाली आणि किती नवीन झाडे लावली गेली, याबाबत पर्यावरणप्रेमींनी सवाल उपस्थित केला आहे. जिओ-टॅगिंग प्रणालीचा वापर करून वृक्षांच्या आरोग्याची नोंद ठेवण्याचे दावे केले जात असले तरी, प्रत्यक्षात अहवालच नसल्याने पालिकेच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिकारी : न्यायालयासमोर वृक्षतोड, पुर्नरोपणाचे वास्तव मांडू रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडांमुळे आतापर्यंत 35 हून अधिक नागरिकांचा बळी गेलेला आहे. आम्ही रस्त्यातील धोकादायक व रुंदीकरणाला अडथळा ठरणारी जुनी वृक्षे काढून त्यांचे दुसऱ्या जागेत पुर्नरोपण करत आहोत. हरित लवादाने स्थगिती दिल्याने आता न्यायालयासमोर परिस्थिती मांडणार आहोत. लेखी आदेश दुपारपर्यंत तरी मिळालेले नव्हते. दुसरे म्हणजे वृक्षगणनेचा आदेशही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. - विवेक भदाणे, उद्यान अधिक्षक मनपा, नाशिक याचिकाकर्ते : अधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करु राष्ट्रीय हरित लवादाने मंगळवारी दुपारी 11:45 वाजता स्पष्ट आदेश दिले होते. 28 एप्रिलपर्यंत या वृक्षतोडीला पूर्णपणे स्थगिती देण्यात आली होती. मुळात या वृक्षतोडीला उच्च न्यायालयाने यापूर्वीच स्थगिती दिलेली आहे. तरीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या नियमांची पायमल्ली केली. हे कृत्य निव्वळ बेजबाबदारपणाचे नसून, न्यायालयाचा अवमान करणारे आहे. पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या आणि न्यायालयाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्याला न्यायालयात खेचणार आहे. -ॲड. श्रीराम पिंगळे, याचिकाकर्ते पालिकेवर होऊ शकते दंडात्मक कारवाई हरित लवादाने दिलेल्या आदेशाला न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच महत्त्व असते. त्यातही अशा दाव्यांमध्ये जर वकील उपस्थित असतील तर त्यांनी तत्काळ आपल्या आशीलाला सदर आदेशाची माहिती देणे महत्त्वाचे असते. जर सरकारी विभागाकडून किंवा अधिकाऱ्याकडून आदेशाचे उल्लंघन झाले, तर संबंधित विभागप्रमुखावर कारवाई केली जाते. त्यांना न्यायालयात उत्तर द्यावे लागते आणि वैयक्तिकरित्या दोषी धरले जाऊ शकते. दंडात्कम कारवाई देखील होऊ शकते. दिव्य मराठी एक्स्पर्ट ॲड. रवींद्र निकम, विशेष सरकारी वकील हरित लवादाचा लेखी आदेशच वैध राष्ट्रीय हरित लवादाने आदेश दिल्यानंतर त्याबाबतचे लेखी आदेश महापालिकेला प्राप्त होणे गरजेचे आहे. लेखी आदेशच वैध मानला जातो. मात्र, जर त्या ठिकाणी पालिकेची बाजू मांडणारे वकील उपस्थित असतील तर लवादाने दिलेल्या स्थगितीबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती द्यायला पाहिजे होती. वृक्षलागवड वाऱ्यावर 2017-18 मध्ये झालेल्या वृक्षगणना अहवालात शहरात नैसर्गिक साखळी समृद्ध करण्यासाठी बहावा, वड, पळस, अर्जुन, कदंब आणि करंज यांसारख्या स्थानिक वृक्षांच्या लागवडीची शिफारस करण्यात आली होती. गुन्हा दाखल करण्याची धमकी झाडे तोडणे थांबवले असले तरी तणाव निवळलेला नाही. उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी आक्रमक पवित्रा घेत, दुपारी 4 वाजेपर्यंत स्थगितीची अधिकृत ऑर्डर न दाखवल्यास सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करू, अशी धमकीच वृक्षप्रेमींना दिल्याचा आरोप वृक्षप्रेमींनी केला आहे. वृक्षगणनेची आठ वर्षांपासून प्रतीक्षाच पर्यावरणप्रेमी श्रीराम पिंगळे यांनी हरित लवादात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी (दि. 6) सुनावणी होणार होती. मात्र, सोमवार सकाळपासूनच महापालिकेने जुन्या, डेरेदार वृक्षांचा बळी घेणे सुरू केले. ही सुनावणी मंगळवारवर (दि. 7) गेल्याने पालिकेला आणखीच वेळ मिळाला आणि सुनवाणीपर्यंत पालिकेने तब्बल 22 झाडांचा बळी घेतला. या कामादरम्यान सोमवारी झाडे तोडण्याला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमी आणि रस्त्याच्या मध्यावरच असलेल्या झाडांमुळे माणसांचा जीव जातो म्हणत झाडे तोडण्याचे समर्थन करणाऱ्यांची आंदोलनेही झाली. ती दोन्ही झुगारुन पालिकेने मंगळवारी सुनावणी झाल्यानंतरही वृक्षतोड सुरूच ठेवल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने मंगळवारी (दि. 7) दुपारी 12 वाजता 28 एप्रीलपर्यंत नाशिकमध्ये कोणतीही वृक्षतोड करु नये, असे आदेश दिले. मात्र, ही स्थगिती मिळेपर्यंत गंगापूररोडवरील 44 पैकी 22 वृक्षांचा बळी गेला होता. जेहान सर्कल ते गोवर्धन या पट्ट्यातील रस्ता रुंदीकरणासाठी महानगरपालिकेने वृक्षतोडीचा सपाटा लावला होता. ही बाब कळताच पर्यावरणप्रेमींनी तातडीने घटनास्थळी धाव घेत काम थांबवण्याची विनंती केली. मात्र, ‘ऑर्डरची प्रत दाखवा’ असे म्हणत यंत्रणेने काम सुरूच ठेवले. यामुळे अधिकारी आणि वृक्षप्रेमींमध्ये शाब्दिक चकमक उडाली. अखेर दुपारी 1 वाजता महापालिकेकडून काम थांबविण्यात आले.
कोल्हापूरच्या राजकारणात मोठी घडामोड घडत असून, समरजीत घाटगे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता त्यांनी ‘घरवापसी’ करत पुन्हा भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत पक्षाच्या मुख्यालयात त्यांचा अधिकृत प्रवेश होणार असून, या निर्णयामुळे कोल्हापूरच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. समरजीत घाटगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, ते आपल्या मूळ पक्षात परतत आहेत आणि यामुळे कोणालाही अडचण निर्माण होणार नाही. त्यांनी सांगितले की, मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी असलेला दीर्घकालीन वाद आता संपुष्टात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यानच दोन्ही नेत्यांमध्ये सलोखा निर्माण झाला होता. या बदलामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. घाटगे यांनी पुढे सांगितले की, भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय अचानक घेतलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून याबाबत चर्चा सुरू होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपच्या चिन्हावर निवडून येत पक्षाशी जवळीक वाढवली होती. प्रदेशाध्यक्ष आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच त्यांनी हा निर्णय अंतिम केला. पुन्हा पक्षात येताना समाधान आणि अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही भावना व्यक्त करताना त्यांना मोठ्या भावासारखे संबोधले. पक्ष सोडल्यानंतरही त्यांनी फडणवीसांचा आदर कायम ठेवला होता, असेही त्यांनी सांगितले. आता पुन्हा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळत असल्याने आनंद होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आगामी काळात महायुतीतील सर्व नेत्यांसोबत समन्वयाने काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयापूर्वीच घाटगे यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यांनी सांगितले की, हा निर्णय त्यांनी कोणालाही न सांगता घेतलेला नसून, सर्व संबंधित नेत्यांना माहिती देऊनच पुढे पाऊल टाकले आहे. त्यामुळे या निर्णयाला राजकीय पारदर्शकतेची जोड मिळाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, कोल्हापूरमधील स्थानिक राजकारणात घाटगे आणि मुश्रीफ यांची एकत्रित आघाडी यापूर्वीच प्रभावी ठरली होती. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत या आघाडीने सर्व 23 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती. नगराध्यक्षपदी सविता माने यांची निवड झाली होती. या विजयामुळे दोन्ही नेत्यांच्या एकत्रित ताकदीला मतदारांनी मोठा पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले होते. कोल्हापूरमध्ये महायुती अधिक बळकट होण्याची शक्यता मात्र, दुसरीकडे मुरगुड नगरपालिकेत या आघाडीला धक्का बसला होता. त्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने विजय मिळवत सत्ता हस्तगत केली. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. आता घाटगे यांच्या भाजपमध्ये पुनरागमनामुळे कोल्हापूरमध्ये महायुती अधिक बळकट होण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकांमध्ये त्याचा मोठा परिणाम दिसू शकतो.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय चित्र दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत आहे. पूर्वीप्रमाणे निकाल निश्चित असल्याची भावना असली तरी यावेळी परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होण्याबाबत चर्चा सुरू होताच उलट उमेदवारांची संख्या वाढल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. सध्या या मतदारसंघात 53 उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. या 53 उमेदवारांपैकी जवळपास निम्मे उमेदवार बारामतीबाहेरील असल्याचे विशेष लक्षवेधी ठरले आहे. स्थानिक आणि बाहेरील उमेदवारांमुळे निवडणुकीची समीकरणे अधिक क्लिष्ट बनली आहेत. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांच्या माघारीवर निवडणूक बिनविरोध होणार की नाही, हे अवलंबून असले तरी इतर उमेदवारांचा प्रश्न अजूनही कायम आहे. त्यामुळे बिनविरोधीची शक्यता अनिश्चिततेत अडकलेली दिसते. विशेष म्हणजे, बाहेरील उमेदवारांमध्ये काही चर्चित नावेही समोर आली आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी स्वराज्य शक्ती सेना या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच अभिजीत बिचुकले यांनीही अपक्ष म्हणून रिंगणात उतरत निवडणुकीत रंग भरला आहे. या उमेदवारांना माघार घ्यायला राजी करणे हेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. दरम्यान, दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत 55 जणांनी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर छाननी प्रक्रियेत दोन अर्ज बाद झाल्यामुळे अंतिम आकडा 53 वर आला. या 53 उमेदवारांमध्ये 23 उमेदवार हे बारामतीतील स्थानिक आहेत, तर उर्वरित 30 उमेदवार बाहेरील आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, पुणे शहर, दौंड, हवेली आणि इंदापूर या भागांमधून एकूण 27 उमेदवार आहेत. तर उर्वरित 26 उमेदवार पुणे जिल्ह्याबाहेरील आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ स्थानिकच नव्हे तर राज्यभरातील राजकीय लक्ष वेधून घेत आहे. याआधी 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात उमेदवार होते. त्या वेळी 46 जणांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी चार अर्ज बाद झाले आणि नऊ जणांनी माघार घेतली. त्यामुळे अंतिमतः 23 उमेदवार रिंगणात राहिले होते. मात्र यावेळी सुरुवातीपासूनच उमेदवारांची संख्या जास्त असल्याने बिनविरोध निवडणुकीची शक्यता कमी होत चालल्याचे चित्र आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 9 एप्रिलपर्यंत मुदत सध्या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 9 एप्रिलपर्यंत मुदत आहे. या मुदतीत किती उमेदवार माघार घेतात, यावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. जर निवडणूक बिनविरोध झाली नाही, तर 23 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघात एकूण 3 लाख 83 हजार 767 मतदार असून, त्यांच्या मतांवरच अंतिम निकाल ठरणार आहे. त्यामुळे बारामतीची ही पोटनिवडणूक राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण करत आहे.
अवकाळीचा कहर ओसरला, पण उन्हाचा तडाखा वाढणार:हवामान विभागाचा इशारा; शेतकऱ्यांना दिलासा की नवा संकट?
गेल्या काही आठवड्यांपासून राज्यभर अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे निर्माण झालेल्या संकटानंतर आता वातावरणात बदल होताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये झालेल्या पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला असून शेतकरी अजूनही सावरलेला नाही. मात्र, बुधवारी म्हणजे 8 एप्रिलपासून हवामानात काहीसा बदल जाणवू लागला आहे. पावसाचा जोर ओसरत असला तरी संपूर्ण दिलासा मिळालेला नाही. भारतीय हवामान विभाग ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात सध्या कोरडे आणि उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्यात आज पावसाचा कोणताही मोठा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, अंशतः ढगाळ वातावरण राहील आणि तापमानात हळूहळू वाढ होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अवकाळी पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 ते 35 अंशांच्या दरम्यान राहू शकते. पुढील काही दिवसांत तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईसह कोकण पट्ट्यात हवामानात स्पष्ट बदल जाणवत आहेत. आर्द्रतेसह उष्णता वाढल्याने वातावरण दमट आणि त्रासदायक होण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी सूर्याचा तडाखा तीव्र जाणवत असल्याने नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेतच आवश्यक कामे उरकावीत, तसेच पाण्याचे प्रमाण वाढवून आरोग्याची काळजी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. दरम्यान, देशाच्या इतर भागांमध्ये मात्र वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. राजधानी दिल्ली आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा प्रभाव कायम आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान खात्याने काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. उष्णतेचा धोका वाढत असल्याने सतर्क राहणे आवश्यक हवामान तज्ञांच्या मते, उत्तर भारतात सुरू असलेल्या या घडामोडी हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये हवामान साफ होण्यास सुरुवात झाली असून, पुढील दोन दिवसांत इतर भागातही सुधारणा होईल. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या ते मध्यम पावसासह हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर बिहार, ओडिशा आणि तेलंगणाच्या काही भागांमध्येही हलक्या सरी पडू शकतात. एकंदरित, राज्यात अवकाळी संकट ओसरत असले तरी उष्णतेचा धोका वाढत असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ३० टक्के शेतकरी अनुदानापासून वंचित असून, त्यांना तातडीने अर्थसाहाय्य देण्यात यावे, अशी मागणी आझाद फाउंडेशनने केली आहे. याबाबत कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना फेब्रुवारी २०१९ पासून सुरू केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये) दोन हजार रुपये प्रति हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यांत, प्रति वर्षी ६ हजार रुपये त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात लाभ जमा करण्यात येतो. केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनानेही ही योजना सुरू केली. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य देऊन शेती खर्चाला हातभार लावण्याचा या योजनेचा उद्देश आहे. ज्या शेतकरी लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश आहे. त्या सर्वांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हे अनुदान शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत बाळापूर तालुक्यातील ३० टक्के लाभार्थी वंचित असल्याचे आझाद फाउंडेशनने कृषी अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार राबवत असलेल्या मुख्यमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थींना अनेक तांत्रिक कारणांमुळे अनुदानाच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे, असे आझाद फाउंडेशनने निवेदनात नमूद केले आहे. तालुक्यातील जवळपास ३० टक्के लोकांना सीएम किसान निधी मिळाला नसल्यामुळे याची तात्काळ योग्य ती दखल घेऊन उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. असे आहेत लाभार्थी : काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ कालावधीतील २२ व्या हप्त्याच्या वितरणाला प्रारंभ झाला. जिल्ह्यातील १ लाख ८८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ३८ कोटी रुपये जमा होत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) ही देशातील सीमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी लाभ दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्वरीत या पैशांचा वापरही करता येतो. लाभ मिळण्यासाठी ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर जावून लाभार्थींना थेट अर्ज करावा लागतो. अशी आहे राज्याची योजना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये अनुदान देण्यात येते. केंद्र शासनाच्या या अनुदानामध्ये राज्य शासनातर्फे प्रति वर्षी आणखी सहा हजार रुपये अनुदान देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाते. या दोन्ही योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतक-यांना प्रति वर्षी बारा हजार रुपये अनुदान मिळत असते. राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकरी लाभार्थींना आतापर्यंत एकूण सहा हप्ते देण्यात आले आहेत.
कृउबात आठ हजार क्विंटल तुरीची आवक:मंगळवारी सर्वाधिक आवक; शनिवारी मिळाला सर्वाधिक 8270 रुपये दर
जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी तुरीचे पीक काढले असून महिनाभरापासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक होत आहे. मंगळवारी येथील बाजार समितीत २२०० क्विंटल तुरीची आवक झाली. यात शेतकऱ्यांना क्विंटल मागे कमीतकमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त ८०९५ दर मिळाला. तर सरासरी ८०६० रुपयांचा दर मिळाला आहे. गत सहा दिवसात अकोला बाजार समितीत आठ हजार क्विंटल तुरीची आवक झाली आहे. सोमवारी बाजार समितीत १३०९ क्विंटल तुरीची आवक झाली. शेतकऱ्यांच्या तुरीला क्विंटल मागे सरासरी ८२५५ रुपये दर मिळाला. कमीतकमी सात हजार रुपये तर जास्तीत-जास्त आठ हजार रुपयांचा दर मिळाला आहे. अकोला बाजार समितीत शनिवारी शेतकऱ्यांनी सुमारे १६७४ क्विंटल तूर विक्रीसाठी आणली. शेतकऱ्यांना क्विंटल मागे कमीतकमी सात हजार रुपये तर जास्तीत जास्त ८३५० रुपयांचा दर मिळाला. तर क्विंटल मागे सरासरी ८२७० रुपयांचा दर मिळाला आहे. तर ३ एप्रिल रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी १२४५ क्विंटल तूर विक्रीसाठी आणली. दरात चढ- उतार शुक्रवारी क्विंटल मागे शेतकऱ्यांना ६५०० ते ८४५५ रुपयांचा दर मिळाला तर सरासरी ८२०० रुपयांचा दर मिळाला आहे. तसेच बुधवारी (दि.१) जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १५८१ क्विंटल तूर विक्रीसाठी आणली. यावेळी तुरीला कमीतकमी सात हजार रुपये तर जास्तीत-जास्त ८२३५ रुपयांचा दर मिळाला. तर क्विंटल मागे सरासरी ८१५० रुपयांचा दर मिळाला आहे. तालुका क्षेत्र (हेक्टर) अकोट ५१५० तेल्हारा ६१०० बाळापूर ११४०३ पातूर ५६४० अकोला १०९०० बार्शीटाकळी ९३०० मूर्तिजापूर ११२६९ एकूण ५९,७६२ {गेल्या सहा दिवसात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत आठ हजार क्विंटल तुरीची आवक झाली. जिल्ह्यातील तुरीचे एकूण क्षेत्र अधिक पेरणीमुळे आवक सुरू ^बाजार समितीत मंगळवारी २२०० क्विंटल तूर आली. शेतकऱ्यांना क्विंटल मागे सरासरी ८०६० रुपयांचा दर मिळाला आहे. जिल्ह्यात यावर्षी एकूण क्षेत्राच्या सरासरी ९९ टक्के क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले असून अजूनही बाजार समितीत आवक सुरू आहे. - सुनील मालोकार, सचिव, बाजार समिती, अकोला.
ड्रग्सविरोधात ‘दखल’ची एसपी कार्यालयावर धडक:पुरवठा साखळी उघड करा; आरोपींवर कारवाईची मागणी
ड्रग्स पुरवठा साखळी शोधून मुख्य आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यासह अन्य मागण्यांसाठी दखल संस्थेने मंगळवारी पोलिस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली. पोलिस अधीक्षकांना निवेदनही सादर करण्यात आले. शाळा, कॉलेज परिसर व नागरी वस्त्यांमध्ये गस्त वाढवण्यासाठीही आग्रह धरण्यात आला. सध्या अकोल्यात अंमली व नशेच्या पदार्थांच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. अलीकडील काही दिवसांत वर्तमानपत्रे, प्रसारमाध्यमे तसेच सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या व्हिडिओंमधून असे निदर्शनास येत आहे की अल्पवयीन मुले रस्त्यावर व नागरी वस्त्यांमध्ये असामाजिक कृत्ये करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. याबाबत अनेक नागरिकांनी आमच्या संस्थेकडे तक्रारी व माहिती दिली आहे, असे ‘दखल’ने निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना प्रदीप गुरुखुद्दे, शरद वानखडे, योगेश अग्रवाल, ठाकुरदास चौधरी, राजेश डोंगरकर, जयप्रकाश पाटील, शशिकांत हांडे, काजल राजवैद्य, अनिता कवडे, राजेश शिंदे आदी होते. दखलने काही मागण्या केल्या आहेत. यात अमली व नशेच्या पदार्थांच्या विक्रीवर तात्काळ विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात यावी. ड्रग्स पुरवठा साखळी शोधून मुख्य आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. शाळा, कॉलेज परिसर व नागरी वस्त्यांमध्ये नियमित गस्त वाढवण्यात यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. विक्रेते करतात मुलांना लक्ष्य अमली पदार्थ विक्रेते लहान वयातील मुलांना लक्ष्य करून त्यांना व्यसनाच्या आहारी नेत आहेत. यामुळे केवळ त्या मुलांचे भविष्यच नव्हे तर संपूर्ण युवा पिढी धोक्यात येत आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. सामाजिक सुरक्षिततेसाठी मोठा धोका निर्माण करणारा आहे. अकोला शहर हे शिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे. ग्रामीण भागातून अनेक पालक आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी येथे पाठवितात. अशा परिस्थितीत शहरातील सुरक्षितता व निरोगी वातावरण राखणे ही प्रशासनाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे, असेही निवेदनात नमूद केले.
मेळघाटमध्ये जलजीवन फसले; आंदोलनानंतर यंत्रणेला साकडे:ठिकठिकाणी आंदोलनानंतर चौकशीची केली मागणी
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत आदिवासीबहुल मेळघाटमध्ये अनेक विकास कामे केल्याचा दावा केला जातो. मात्र यातील काही कामे कागदावरच असून इतर कामांचा दर्जा अगदीच निकृष्ट आहे. त्यामुळे युवक काँग्रेसने हे जलजीवन मिशन मेळघाटात फसल्याचा आरोप केला असून त्यासाठी यंत्रणेला साकडे घातले आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सांगून त्याची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी केली जावी, अशी युवक काँग्रेसची मागणी आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्यामते ‘हर घर-नल से जल’ या पंतप्रधानांच्या नावे सुरु करण्यात आलेली योजना याठिकाणी सपशेल अयशस्वी ठरली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत खटकाली, मेनघाट व गरजधारी येथे पाणी वितरणासाठी एक ते दीड मीटर जलवाहिनी दाखवून त्यावर लाखो रुपये खर्च दर्शविण्यात आला. परंतु वास्तविक पाहता ती पाइपलाइन जमीनीवरच आहे. खोदकाम करुन ती जमीनीच्या आत दाबलीच गेली नाही. याऊलट प्रत्येक गावातील पाणी वितरण व्यवस्थेचे खोदकाम जास्त दाखवून मोठाली बिले मात्र काढली गेली. त्याचप्रमाणे मेळघाटमधील जलजीवन मिशन मध्ये जुन्याच जलकुंभांना रंगरंगोटी करुन मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची रक्कम हडप केली गेली. चिखलदरा तालुक्यातील चिलाटी येथील ग्रामीण पुरवठा योजनेंतर्गतची जुनी टाकी २०१२-१३ मध्ये बांधली गेली. ती टाकी पूर्णपणे हालते. एवढेच नव्हे तर तिला गळतीही लागली आहे. त्या टाक़ीची रंगरंगोटी करुन २०२२-२३ मध्ये लाखो रुपये खर्च करण्यात आले. पण पाणी पुरवठा अजूनही बंदच आहे. सुमिता येथेही असाच प्रकार करण्यात आला असून तेथील खर्चाची उचलही करण्यात आली आहे. सध्यस्थितित तेथील आदिवासी बांधवांना डोक्यावर घागर ठेऊनच पाणी आणावे लागत आहे. रुईपठारला नवीन टाकी बांधली. त्यात डोमीवरून पाईपलाईन टाकून पाणी आणले. परंतु नवीन टाकीत एकही थेंब पाणी नाही. लोकं आजही जुन्याच टाकीचे पाणी वापरतात. डोक्यावर पाणी आणावे लागते. मग नवीन टाकी बांधून उपयोग काय, असा ग्रामस्थांचा प्रश्न आहे. कुहीला दोन टाकी आहेत, तरी पाणी पुरवठा होत नाही. लोकांना विहिरीवरून डोक्यावर पाणी आणावे लागते. सिमोरी येथे टाकी बनविली, तेव्हापासून आजपर्यंत टाकीत पाणीच गेले नाही. ३ किलोमिटर अंतर चुर्णीच्या रहिवाशांसाठी तीन किलोमीटर अंतरावरुन पाइपलाईन घेतली आहे. आहाड, मेनघाट, ग़रज़धारी आदी गावे जलजीवन मिशन मध्ये असून तेथील जुने जलकुंभ पडण्याच्या मार्गावर आहेत. भुलोरी, बारूगव्हान, चोबिता, हिलड़ा, बोरधा, कोहाना, हतरु, दहेंद्री येथेसुद्धा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे या सर्व कामांची चौकशी करणे गरजेचे झाले आहे. सीईओ सरपंचांशी विषयांवर बोलणार जलजीवन मिशनच्या कामात भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याच्या युवक काँग्रेसच्या तक्रारीनुसार सीईओंनी प्रत्येक गावच्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्याशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी मेळघाटच्या दोन्ही तालुक्यातील बीडीओंना पत्र देण्यात आले असून ही ऑनलाईन बैठक लवकरच घेतली जाणार असल्याचे सीईओंनी स्पष्ट केले.
पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास आणि संस्कृती शिकण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा, जेवड येथील विद्यार्थ्यांनी नुकतीच गुजरात राज्याची शैक्षणिक सहल केली. जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या ''स्टॅच्यू ऑफ युनिटी''ला भेट देत विद्यार्थ्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या उत्तुंग कार्याचा आढावा घेतला. तसेच साबरमती आश्रमात महात्मा गांधींच्या सत्य-अहिंसेचे धडे गिरवले.या शैक्षणिक सहलीमध्ये ८ वी ते १० वी मधील विद्यार्थी सहभागी झाले होते. शैक्षणिक आणि ऐतिहासिक वारसा जवळून पाहता यावा, या उद्देशाने या सहलीचे नियोजन करण्यात आले होते.केवळ पर्यटन म्हणून नव्हे, तर इतिहास, संस्कृती आणि देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी ही सहल मैलाचा दगड ठरली. याशिवाय अहमदाबाद शहरातील इतर शैक्षणिक व ऐतिहासिक स्थळांनाही भेटी देण्यात आल्या. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारची मोठी सहल आयोजित केल्यामुळे पालक आणि शैक्षणिक वर्तुळातून शाळेचे कौतुक होत आहे. महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने अभ्यासक सहलीचे आयोजन केल्याबद्दल आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी कौतुक केले. आयोजन गटनेता डॉ. राजेंद्र तायडे, उपसभापती सुमती ढोके, नगरसेविका शारदा खोंडे, नगरसेवक संजय गव्हाळे यांचे योगदानातून तसेच उपायुक्त नरेंद्र वानखडे, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांचे मार्गदर्शनात पार पडली. मुख्याध्यापक प्रशांत नालसे व शिक्षक शीला डांगे, सीमा शिरभाते, किरण नालिंदे, वैशाली बुटे, हर्षा दिवे, पुष्पा कोरडे, सोनाली चापके, किरण शेंडे, शिरीष फसाटे व पालक यांच्या सहकार्याने करण्यात आले. साबरमतीत गांधीजींच्या विचारांचा वारसा सहलीच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी अहमदाबाद येथील ऐतिहासिक साबरमती आश्रमाला भेट दिली. महात्मा गांधींचे साधे जीवन आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान पाहून विद्यार्थी भारावून गेले. चरख्यावर सूत कताईपासून ते मिठाच्या सत्याग्रहापर्यंतच्या घटनांची माहिती देणारी चित्रे आणि वास्तू विद्यार्थ्यांनी आस्थेने पाहिल्या.
विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रात मेरिटमध्ये येण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत, योग्य नियोजन आणि पालकांचा ठाम पाठिंबा अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सेंच्युरी गाठण्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे,” असे प्रा. संदीप मुर्तडकर यांनी सांगितले. पुढील वर्षीच्या निकालात आदर्श विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी विविध क्षेत्रांत मेरिटमध्ये येतील. यासाठी कार्यशाळांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उद्यापासूनच विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही प्रमुख वक्ते प्रा. मुर्तडकर यांनी दिली. शैक्षणिक गुणवत्ता, अभ्यासातील सातत्य, आत्मविश्वास व स्पर्धात्मक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ‘मेरिट मेकर प्रोजेक्ट’ अंतर्गत २०२६-२७ साठी आयोजित करण्यात आलेली ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांची विशेष पालक सभा ६ एप्रिल रोजी कृषी भवन येथे उत्साहात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व शाळा समिती सदस्य प्राचार्य केशवराव गावंडे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे, शाळा तपासणी अधिकारी व्ही. डब्ल्यू. गावंडे, मेरिट मेकरचे संचालक प्रा. संदीप मुर्तडकर, शाळेचे मुख्याध्यापक एम. आर. देशमुख, उपमुख्याध्यापक एस. बी. ठाकरे, शिक्षक प्रतिनिधी अनिल भारसाकळे, माध्यमिक प्रभारी पी. एम. काळे, जुनिअर कॉलेजचे प्रा. पि. डी. गावंडे, आदर्श स्वयंअर्थसहाय्यित शाळेचे मुख्याध्यापक धनंजय गावंडे, शिक्षकेत्तर प्रतिनिधी प्रदीप भारसाकळे, ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख, पालक शिक्षक समितीचे सदस्य मंगला पातूर्डे, सुरेश सपकाळ यांची मंचावर उपस्थिती होती. प्रमुख अतिथी सुनील गावंडे यांनी आपल्या भाषणात शेतकरी व त्यांच्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण वैयक्तिक पातळीवर तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सदैव तत्पर राहू, असे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून अभ्यासात मेहनत घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मनोज देशमुख यांनी केले. संचालन व उपस्थित मान्यवरांचा परिचय शिक्षक गजानन घटाळे यांनी करून दिला. आभार प्रदर्शन शिक्षक प्रतिनिधी अनिल भारसाकळे यांनी केले. लाईव्ह प्रक्षेपणाचे काम नरेश इसळ यांनी पाहिले. एनएमएमएस परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन अध्यक्षीय भाषणात प्राचार्य केशवराव गावंडे यांनी आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एनएमएमएस परीक्षेत मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी अभिनंदन केले. या यशामध्ये मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षिकावृंद यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील काळातही अशाच प्रकारे तज्ज्ञ मार्गदर्शकांना आमंत्रित करून अधिकाधिक कार्यशाळांचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
14 पुरस्कारांचा मानकरी, पण फीसाठी संघर्ष:शैक्षणिक खर्चासाठी विवंचनेत अडकला विहिगावचा सोहम नेसनेसरकर
तालुक्यातील विहिगाव येथील सोहम मोहन नेसनेसकर या अवघ्या सात वर्षांच्या चिमुकल्याने आपल्या जिद्द, चिकाटी, मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा फडकवला आहे. व्हिएतनाम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक प्राप्त केले. मात्र सोहम, त्याचे कुटुंबीय, आता शैक्षणिक खर्चाच्या विवंचनेत अडकले आहेत. सोहमने आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत जपान, मलेशिया, यजमान व्हिएतनामसारख्या बलाढ्य देशांतील स्पर्धकांना मागे टाकत सुवर्णपदकावर दावा ठोकला होता. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला ‘भारत भूषण’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, सुवर्णपदक असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सध्या सोहम हा येथील ओम इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिकत आहे. भविष्यात सोहमला दर्जेदार शिक्षण, प्रशिक्षण घ्यायचे आहे. त्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. कुटुंबाचे उत्पन्न अत्यंत मर्यादित आहे. त्यामुळे त्याच्या पालकांनी मदतीचे आवाहन केले आहे. योग्यवेळी सहकार्य मिळाल्यास हा चिमुकला भविष्यात देशाचे नाव आणखी उंचावेल, अशी आशा अनेकांकडून व्यक्त होत आहे. मात्र ती खरी ठरवण्यासाठी सर्वांनी मदत करावी, असे त्याच्या पालकांचे म्हणणे आहे. सोहम वयाच्या चौथ्या वर्षापासून योगाभ्यास करत आहे. सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्याने फेब्रुवारी २०२५ मध्ये राष्ट्रीय योगा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. याच यशाच्या बळावर त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. सोहमच्या या जागतिक यशाची दखल विविध स्तरांवर घेण्यात आली उर्वरित. पान ४ आतापर्यंत १४ राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्याचा सन्मान महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते करण्यात आला होता. ‘अँटी हिरमण फाउंडेशन’ आणि केंद्र सरकारच्या ‘नीती आयोगा’मार्फतही त्याच्या कामगिरीची दखल घेण्यात आली आहे. आतापर्यंत सोहमला ‘महाराष्ट्र गौरव’, ‘राष्ट्र गौरव’, ‘क्रीडा शिरोमणी’सह एकूण १४ राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
एक्सक्लुझिव्ह:विमानतळावर डीव्हीओआर यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण, अथाॅरिटीकडून परवान्याची प्रतीक्षा
रात्री विमान उतरवताना धावपट्टीचा अचूक अंदाज यावा, विमानापासूनचे अंतर, उंची, दिशा कळावी यासाठी मार्गदर्शक प्रणाली डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी रेंज (डीव्हीओआर) बेलोरा विमानतळावर बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे आता रात्री बेलोरा विमानतळावरून विमानोड्डाण तसेच विमान उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी डीजीसीए व भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून मिळणारी परवानगी व परवान्याची प्रतीक्षा आहे. डीव्हीओआर यंत्रणेमुळे रात्री वैमानिकाला विमानाचे लॅण्डींग, टेकऑफ करण्यासाठी संपूर्ण सहकार्य, मार्गदर्शन मिळत असते. जोवर ही यंत्रणा कोणत्याही विमानतळावर उभारली जात नाही. तोवर त्या विमानतळावरून रात्री विमानोड्डाण व विमान उतरवणे शक्य नसते. अमरावती हे विभागाचे मुख्यालय असल्यामुळे येथे दररोज कोणत्या ना कोणत्या नेत्याचे, मंत्र्यांचे आगमन होत असते. जिल्ह्यासह शहरातील उद्योजक, नेते, आमदारांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. त्यांनाही वेळ, पैसा, इंधन खर्च करून नागपूरला जावे लागते. अमरावतीला बहुतेक नेते हे खासगी कंपनीच्या विमानाने येतात. सायंकाळ झाली की, या विमानांना विमानतळावरच उभे राहावे लागत होते. कारण, विमानोड्डाण शक्य नव्हते. परिणामी अनेकदा नेत्यांना अमरावतीत मुक्काम करावा लागला आहे. दिशादर्शक लाईट्स बसवण्याचे काम यंत्रणेकडून झाले पूर्ण विमान उतरताना धावपट्टी उंचीवरून व लांबून दिसावी यासाठी बेलोरा विमानतळाच्या धावपट्टीवर दिशादर्शक लाईट्स बसवण्यात आले आहेत. लाल, हिरवे, पांढरे असे हे लाईट्स असून त्यांच्या प्रखरतेमुळे ते उंचीवरून तसेच लांबूनही सहज दिसतात. विमानातील रडार व डीव्हीओआर यंत्रणा विमानाला या धावपट्टीचे अंतर, दिशा, उंची याबाबत सतत माहिती देत असते. त्यामुळे हे लाईट्स बसवणे आवश्यक असते. ते धावपट्टीचा नेमका आकार, लांबी कळण्यासाठी सहायक ठरतात.
इथून पुढे ३ वर्षे कोणत्याही निवडणुका नाहीत, त्यामुळे उमेदवारीसाठी नाही, मला कोणतेही पद नको त्यामुळे पद मिळावे म्हणूनही नाही, तर पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील विकास कामे व्हावीत, कार्यकर्त्यांची स्थानिक लोकप्रतिनिधींकडून होणारी अडवणूक थांबावी यासाठी आपली सर्वांची संमती असेल तर सत्तेसोबत जावे लागेल, अशी साद श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी कार्यकर्त्यांना घातली. यावर कार्यकर्त्यांनी हात उंचावून एकमताने भालके घेतील त्या निर्णयास संमती असल्याचे सांगितले. यानुसार येत्या दि. १२ एप्रिल रोजी भगीरथ भालके यांचा आपल्या समर्थकांसह शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत यांनीही शिवसेना प्रवेशाचे सूतोवाच केल्याने या दोन्ही नेत्यांचा सेना प्रवेश निश्चित झाला आहे. भगीरथ भालके गटाने काँग्रेस पक्षाला हात दाखवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी भालके यांनी पंढरपूर येथे कार्यकर्त्याची बैठक बोलावली होती. यावेळी भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत, शिवसेना नेते साईनाथ अभंगराव यांच्यासह मोठ्या संख्येने विविध गावचे सरपंच, आजी, माजी पदाधिकारी, शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या २ वर्षात स्थानिक लोक प्रतिनिधींनी आपल्या ग्रामपंचायतींचा निधी अडवला आहे, त्या गावातील विकास कामे ठप्प केली आहेत, पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो. नगराध्यक्षपदासोबत ११ नगरसेवक दिले ^४ महिन्यापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पंढरपूरच्या नागरिकांनी आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवर विश्वास टाकून नगराध्यक्षपदासोबत ११ नगरसेवक निवडून दिले. मात्र विकास कामे करण्यासाठी, निधी उपलब्ध करून घेण्यासाठी सत्तेसोबत जाण्याची गरज निर्माण झालेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत येण्याचे आवाहन केले आहे, तसेच लागेल तर मदत करणे, सर्व ताकद पाठीशी उभा करू असा शब्द देतानाच त्यांच्याकडील नगरविकास खात्यामधून विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिलेले आहे. भगीरथ भालके, माजी अध्यक्ष
गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीवर मोठा परिणाम झाला. वेळेवर वापसा न मिळाल्याने ज्वारीची पेरणी उशिरा झाली आणि त्यामुळे एकूण लागवड क्षेत्रही घटले. परिणामी, ज्वारीपासून मिळणाऱ्या कडब्याचे उत्पादन कमी झाले असून याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. सध्या कडब्याच्या दरांनी उच्चांक गाठला असून प्रति शेकडा सुमारे ३००० ते ४५०० रुपयांपर्यंत भाव पोहोचले आहेत. परगाव व इतर जिल्ह्यांतूनही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने दर अधिकच वाढले आहेत. त्यामुळे पशुपालक आणि शेतकऱ्यांना कडबा खरेदी करणे कठीण होत आहे. या परिस्थितीत शेतकरी कडब्याला पर्याय म्हणून मका पिकाचा वापर करत आहेत. हिरवा चारा म्हणून मक्याची लागवड करून, आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने त्याची कुट्टी करून मुरघास (सिलेज) तयार केला जात आहे. सध्या मका २७०० ते २८०० रुपये प्रति टन या दराने उपलब्ध असून, त्यापासून तयार होणारा मुरघास हा स्वस्त आणि पोषक पर्याय ठरत आहे. पशुपालकांच्या मते, मका मुरघासामुळे जनावरांच्या दूध उत्पादनातही वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काळात कडब्याऐवजी हिरव्या चाऱ्यासाठी मक्याचा वापर वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हिरवा चारा बाजारात आहे, मात्र त्याची किंमत गगनास भिडलेली आहे. सध्या हिरव्या चाऱ्याचे दर खूप वाढलेले आहेत. हिरव्या चाऱ्याची पेंड ३० ते ३५ रुपये झाली आहे. दूध देणाऱ्या जनावरांसाठी दिवसाला आठ ते दहा पेंड्याचा बंदोबस्त करून ठेवावा लागतो. त्यामुळे दिवसाला जवळपास साडेतीनशे रुपये या जनावरांसाठी खर्च करावा लागत आहे. तसेच या जनावरांकडून मिळणारे दुध आणि होणारा खर्च याचा मेळ देखील बसत नाही आहे. यामुळे दुधाचा व्यवसाय करणारे पशू पालक अत्यंत अडचणीत आला आहे. ^ शेतकरी संपत कुंभार (पांडे) यांनी सांगितले की कडब्याचे दर परवडत नसल्यामुळे आम्ही मका मुरघासाचा पर्याय स्वीकारला असून तो अधिक फायदेशीर ठरत आहे. संपत कुंभार, शेतकरी, पांडे ज्वारीच्या पेरणीमध्ये ६७६३ हेक्टर पेरा कमी ^सन २०२५- २६ या वर्षी प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी कारणाने ज्वारीच्या पेरणीमध्ये सुमारे ६७६३ हेक्टर पेरा कमी झाला आहे. गुरांना चाऱ्यासाठी ज्वारीच्या पिकांपासून मिळणारा कडबा अत्यंत महागलेला आहे. त्यामुळे शेतकरी मक्याच्या मुरघासाकडे वळाला आहे. दत्तात्रय गायकवाड, उप.तालुका कृषी अधिकारी, करमाळा कडब्याचे दर परवडत नाही
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने सायकल रायडर्स असोसिएशनच्या वतीने ७५ किमी लांबीच्या सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये १२५ सायकल स्वारांनी भाग घेतला होता. जागतिक आरोग्य दिनाबरोबरच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातर्फे या रायडिंगचे अकलूज ते अकलूज असा सुमारे ७५ किलोमीटर माळशिरस तालुका सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते. अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथून सकाळी ६ वाजता नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून या सायकल राईडचा शुभारंभ करण्यात आला. माळशिरस येथे पंचायत समिती सभागृहात सभापती दत्ता मगर यांनी सायकल स्वारांचे स्वागत केले. त्यावेळी आ.रणजितसिंह मोहिते पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, सभापती दत्ता मगर, इशिता मोहिते पाटील, गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे आदी उपस्थित होते. सायंकाळी ५ वाजता ही रॅली पुन्हा येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे पोहोचल्यानंतर आंतरराष्ट्रीय सायकल रायडर्स सतीश जाधव (मुंबई) यांचे सायकलिंग काळाची गरज या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते व अकलूजचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहभागी सायकल रायडर्सना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या राईडचे आयोजन सायकल रायडर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत भिसे, उपाध्यक्ष डॉ सुभाष कोकणे, सचिव सुरेंद्र पिसे, सहसचिव सुधाकर सोनवणे, विश्वस्त हर्षल सरोदे यांनी केले होते. श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या सायकल वारीच्या माध्यमातून आज आरोग्य उत्तम रहावे, म्हणून ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात सायकलिंगकडे वळले. ही अभिमानाची बाब आहे. या ज्येष्ठांचा आदर्श घेऊन तरुणांनी सायकलिंगकडे वळावे, असे आवाहन आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले.
उन्हापासून बचावासाठी गरजुंना वाटल्या टोप्या:स्नेहबंध सोशल फाउंडेशनचा शहरामध्ये उपक्रम
यंदा मार्च महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी आवश्यक असते. गोरगरीब, रस्त्यावर कचरा वेचणाऱ्यांचे उन्हापासून आपले संरक्षण करता यावे म्हणून यासाठी स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने शहराच्या विविध भागात गरीब नागरिकांना टोप्या वाटप केल्या. या उपक्रमातून स्नेहबंधने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. स्नेहबंध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या संकल्पनेतून गेल्या दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. शहरातील सावेडी, सिव्हिल हॉस्पिटल, दिल्लीगेट, माळीवाडा, स्वस्तिक चौक, मार्केट यार्ड, आनंदधाम, स्टेशन रोड परिसरात उन्हात फिरणाऱ्या गरीबांना टोप्या देण्यात आल्या. यावेळी माजी प्राचार्य एकनाथ जगताप, प्रतिक डहाळे, स्वयंम बास्कर, प्रथमेश राठोड आदी उपस्थित होते. डोक्यावर संरक्षणासाठी अनपेक्षितपणे टोपी मिळाल्याने नागरिकांनी हात जोडून स्नेहबंधचे आभार मानले. उन्हापासून बचाव होण्यासाठी टोपी वापरावी, शक्य असल्यास दुपारच्या वेळी कामासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
समाजातील अगतिकता आणि असुरक्षिततेचा फायदा घेऊन भोंदू बाबा स्वतःचे साम्राज्य उभे करतात. सध्या गाजत असलेल्या खरात' प्रकरणाने या विकृतीचा पर्दाफाश केला असला, तरी अशा घटना रोखण्यासाठी पत्रकारांनी केवळ वार्तांकन न करता समाज शिक्षक' म्हणून भूमिका बजावणे काळाची गरज आहे, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ.टी.आर.गोराणे यांनी केले. अहिल्यानगरमधील पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या पत्रकार कट्टा' या उपक्रमाच्या दुसऱ्या अंकात समाजातील अंधश्रद्धा अन् माध्यमांतील वार्तांकन' या विषयावर ते बोलत होते. सीएसआरडी' संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर सीएसआरडीचे वरिष्ठ प्रा. डॉ. सुरेश मुगुटमल उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. गोराणे म्हणाले की, खरातच्या करामतींमागे समाजाची विस्मरणाची वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत. अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धेच्या बाजारातील काळा बाजार आहे, अशा शब्दांत त्यांनी बुवाबाजीवर प्रहार केला. खरात प्रकरणात एसआयटीचा तपास योग्य दिशेने सुरू असला, तरी भविष्यात असे 'खरात' निर्माण होऊ नयेत यासाठी माध्यमांनी विवेकपूर्ण लेखनाची कास धरावी, असा संदेश त्यांनी दिला. सूर्यकांत नेटके यांनी आभार मानले. कार्यक्रमात डॉ. गोराणे यांनी स्पष्ट केले की, देवदासींसारख्या अनिष्ट प्रथा केवळ पत्रकारांच्या जागरूकतेमुळेच बंद झाल्या. खरातसारख्या प्रकरणांमध्ये जेव्हा लैंगिक किंवा आर्थिक शोषण होते, तेव्हा पत्रकारांनी पुराव्यांसह आणि कायद्याच्या चौकटीत राहून सडेतोड लिहायला हवे. शिक्षणातून केवळ पदव्या न मिळवता वैज्ञानिक दृष्टी विकसित होत आहे का, याचे निरीक्षण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ज्या भाषेला अनेकजण कठीण मानतात, त्याच संस्कृत भाषेची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून सलग १७ वर्षे दहावीचा निकाल शंभर टक्के लावणाऱ्या सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील (महात्मा फुले कृषी विद्यापीठ) शिक्षिका गौरी बळवंत कुलकर्णी या सेवानिवृत्त झाल्या. निवृत्तीच्या या क्षणी आपल्या गुरुजनांचे स्मरण करत त्यांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी धनादेश सुपूर्द करून 'शिक्षक' कधीच निवृत्त होत नाही, हे आपल्या दातृत्वातून सिद्ध केले. प्राचार्य अरुण तुपविहीरे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयात निरोप समारंभ झाला. या सोहळ्यात जिल्हा सहकारी बँकेच्या विद्यापीठ शाखेच्या व्यवस्थापक शोभा पाटोळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्जेराव पेरणे, प्राचार्य योगिता आठरे, पत्रकार अनिल देशपांडे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, प्रा. जितेंद्र मेटकर, बाबासाहेब शेलार, के.के. पवार, संतोष जाधव, मनीषा कदम आणि पर्यवेक्षक मनोज बावा यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलकर्णी यांच्या कार्याचा गौरव करताना मान्यवर म्हणाले, गौरी कुलकर्णी यांनी केवळ संस्कृत व्याकरण शिकवले नाही, तर त्या भाषेतील संस्कार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले. सातत्याने संस्कृत विषयाचा इयत्ता दहावीचा निकाल खूपच चांगला लागला.संस्कृत भाषेची चांगली सेवा घडली. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह, मानपत्र आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना कुलकर्णी भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, माझ्या शिक्षकांनी- रुपाली कापरे, विमल लेले आणि चंद्रशेखर गोस्वामी सरांनी मला या विषयाची गोडी लावली, तीच मी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. याच कृतज्ञतेतून त्यांनी शाळेच्या ग्रंथालयासाठी आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला. सूत्रसंचालन संगिता नलगे यांनी केले.
आजचे युग डिजिटल असले तरी अनेकवेळा तांत्रिक गुंतागुंत सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरते. अशाच एका तांत्रिक अडचणीमुळे हतबल झालेल्या वृद्ध महिलेसाठी केडगाव टपाल कार्यालयाचे पोस्टमन सुनील जाधव देवदूतासारखे धावून आले. केवळ कर्मचारी म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील नागरिक म्हणून त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका वृद्धेचे रखडलेले काम मार्गी लागले. नेहमीप्रमाणे कर्तव्यावर जात असताना पोस्टमन जाधव यांना टपाल कार्यालय परिसरात एक वृद्ध महिला उन्हात थकलेल्या अवस्थेत बसलेली दिसली. त्यांच्या चेहऱ्यावर हतबलता आणि चिंता जाणवत होती. जाधव यांनी जवळ जाऊन आस्थेने विचारपूस केली असता, संबंधित महिलेचे बँक खाते तांत्रिक कारणामुळे केवायसी बंद असल्याचे समजले. कागदपत्रांची पूर्तता कशी करावी, हे न समजल्याने त्या अनेक दिवसांपासून त्रस्त होत्या.जाधव यांनी आजींच्या आयपीपीबी (इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक) कार्डची तपासणी केली, आवश्यक कागदपत्रे जुळवून दिली आणि अवघ्या काही मिनिटांत त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. एवढेच नाही, तर डिजिटल व्यवहार सोप्या भाषेत कसे करावेत, याबाबतही त्यांना सांगितले. काम पूर्ण होताच त्या वृद्ध महिलेच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. हातातील कामाचा पेच सुटल्याने त्यांनी भरल्या डोळ्यांनी जाधव यांना दिलेले आशीर्वाद कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. तंत्रज्ञानाच्या काळात नियम महत्त्वाचे आहेतच, पण एखाद्याची असहाय्यता पाहून त्याला मदतीचा हात देणे हे आपले पहिले कर्तव्य आहे, असे पोस्टमन सुनील जाधव म्हणाले.
इंग्रजी माध्यमाच्या झगमगाटाकडे वळलेली पालकांची पावले आता पुन्हा मायबोली मराठी आणि जिल्हा परिषद शाळांकडे वळू लागली आहेत. श्रीरामपूर तालुक्यात शिक्षण विभागाने घेतलेल्या विशेष पुढाकारामुळे यंदा १ एप्रिल रोजीच इयत्ता पहिलीमध्ये ७८५ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला असून, विशेष म्हणजे त्याच दिवशी त्यांचे वर्गही सुरू झाले आहेत. तालुक्यातील शिक्षण विभागाने १ एप्रिलपूर्वीच नियोजनबद्ध सर्वेक्षण केले होते. गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी घरोघरी जाऊन पालकांचे प्रबोधन केले.तालुक्यात इयत्ता पहिलीमध्ये पात्र विद्यार्थ्यांचा शोध घेतला. या सर्वेक्षणातून तालुक्यात एकूण १ हजार ४३२ विद्यार्थी पहिलीमध्ये प्रवेशासाठी पात्र असल्याचे समोर आले. पालकांच्या भेटी घेऊन मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्याबाबत प्रबोधन करण्यात आले. ग्रामीण भागात ६८३, तर नगरपालिका क्षेत्रात १०२ अशा एकूण ७८५ विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी प्रवेश घेतला. निमगाव खैरी (११२), टाकळीभान (१०७) आणि पढेगाव (१०२) या केंद्रांनी प्रवेशात बाजी मारली आहे. शिक्षक आणि पालकांच्या समन्वयामुळे मराठी शाळांचे अस्तित्व पुन्हा उजळले आहे. १ एप्रिलपासून वर्ग सुरू करण्याचा हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरू शकतो, असे गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, यांनी सांगितले. पालकांची बदलती मानसिकता कोरोना काळानंतर मराठी शाळांकडे पालकांचा कल लक्षणीय वाढला आहे. केवळ पाचवी किंवा आठवीतच नव्हे, तर आता पहिलीपासूनच पालक मराठी माध्यमाला पसंती देत आहेत. विशेषतः मुलांच्या शिक्षणासाठी पालक पुन्हा जिल्हा परिषद शाळांवर विश्वास दाखवत असल्याचे चित्र आहे. स्वागत आणि नवा उत्साह १५ जूनची वाट न पाहता १ एप्रिललाच शाळा सुरू करण्याचा हा प्रयोग राज्यात कौतुकाचा विषय ठरत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. कुठे ढोल-ताशांच्या गजरात, तर कुठे शैक्षणिक साहित्य आणि खाऊ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. आपले असे जंगी स्वागत पाहून चिमुरडेही भारावून गेले होते.
शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सारसनगर, भवानीनगर, विनायकनगर आणि बुरुडगाव रोड परिसरात गेल्या महिन्याभरापासून चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. वारंवार तक्रारी करूनही चोरटे गजाआड होत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, चोरी रोखण्यात अपयशी ठरलेले कोतवालीचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांची तातडीने बदली करावी, या मागणीसाठी प्रेरणा प्रतिष्ठानचे वैभव ढाकणे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांना निवेदन दिले. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा प्रतिष्ठानने यापूर्वीही कोतवाली पोलिस स्टेशनला चोऱ्यांच्या वाढत्या घटनांबाबत निवेदने दिली आहेत. मात्र, पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. अद्याप एकही चोर पकडला न गेल्याने पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक चोरट्यांना पाठीशी घालत आहे की काय? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. प्रेरणा प्रतिष्ठानचे पदाधिकारी वैभव ढाकणे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या निष्क्रियतेमुळेच या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे त्यांची बदली करून त्या ठिकाणी एखाद्या सक्षम आणि कामाप्रती तत्पर असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. तसेच रात्रीच्या गस्तीत वाढ करून नागरिकांना सुरक्षिततेचा दिलासा द्यावा. पोलिस प्रशासनाने तातडीने चोऱ्यांच्या घटना थांबवण्यासाठी ठोस आणि शाश्वत उपाययोजना न केल्यास, प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने परिसरातील नागरिकांसह तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मंगेश खताळ, मळू गाडळकर, अमित औसरकर व सनी कांबळे उपस्थित होते.
पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी येथील श्री काळभैरवनाथ महाराजांच्या यात्रेचा समारोप पारंपरिक जंगी कुस्त्यांच्या आखाड्याने झाला. लाल मातीच्या आखाड्यात अनेक कुस्ती पट्टू मल्लांनी आपले कौशल्य, डावपेच आणि मर्दानी जोर दाखवत उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.दिवसेंदिवस लाल मातीतील कुस्ती कमी होत असताना,अशा यात्रांच्या माध्यमातून या प्राचीन खेळाला प्रोत्साहन मिळत असल्याचे चित्र दिसले. कुस्ती आखाड्यात शिंगोरीचा १६ वर्षीय हर्षद केशव चेमटे विशेष आकर्षण ठरला. त्याने आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठ्या असलेल्या राघूहिवरे येथील २० वर्षीय प्रताप कुऱ्हे याला अवघ्या काही मिनिटांत खांद्यावर उचलून घेत चितपट केले. हर्षदच्या या 'अचूक डावा'वर प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. शिरसाटवाडी ग्रामस्थांच्या प्रयत्नाने ही यात्रा केवळ धार्मिक उत्सव न राहता,सांस्कृतिक आणि खेळाडूंच्या प्रोत्साहनाचे केंद्र बनली आहे.अशा पारंपरिक आखाड्यांमुळे मातीतील कुस्तीचा वारसा जिवंत राहण्यास मदत होत आहे.यावर्षीच्या यात्रेत लाखो रुपयांच्या बक्षिसांसह विविध वयोगटातील कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या.लहान बालकांपासून ५८ वर्षीय वृद्धांपर्यंत पैलवानांनी आखाड्यात उतरून प्रेक्षकांना रोमांचित केले. शेवटची कुस्ती शिरसाटवाडी गावचा सुपुत्र ओम शिरसाट यांच्यात आणि कृष्णा पवार (ढोरजळगाव) मात्र बरोबरीत सोडण्यात आली.ग्रामस्थांनी या खेळाला यात्रेत महत्त्वाचे स्थान दिले असून, विजेत्या पैलवानांना देवस्थान ट्रस्टतर्फे रोख पारितोषिके देण्यात आली. कुस्तीचे पंच म्हणून शहादेव शिरसाट, संजय शिरसाट, प्रा.सचिन शिरसाट आणि प्रा. अजय शिरसाट यांनी काम पाहिले. यात्रा यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटी सदस्य सुभेदार गोरक्ष शिरसाट,मेजर भानुदास शिरसाट,मेजर किशोर शिरसाट,भीमराज शिरसाट,मेजर बाबू कुटे,संजय शिरसाट, रामनाथ खाडे तसेच देवस्थानचे अध्यक्ष गोरक्ष मामू शिरसाट,जिल्हा परिषद समाज कल्याणचे माजी सभापती अर्जुन शिरसाट,जनार्दन शिरसाट,अनंत कराड,भाऊसाहेब शिरसाट आदींनी विशेष प्रयत्न केले.
मनपाच्या माध्यमातून “जीवनदायी” योजनेअंतर्गत नागरिकांना विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आजच्या आधुनिक व धकाधकीच्या जीवनात नागरिक, महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा आरोग्य शिबिरांचा लाभ घेऊन नियमित तपासणी करून निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. मनपा आरोग्य विभागामार्फत शहरात ठिकठिकाणी तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. यातून आजारांचे वेळेवर निदान होऊन डॉक्टरांना योग्य उपचार करणे शक्य होते. त्यामुळे आरोग्य शिबिरे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. नागरिकांनी केमिकलयुक्त अन्न टाळून नैसर्गिक व संतुलित आहार घ्यावा, असे आवाहन महापौर ज्योती गाडे यांनी केले. मनपा आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त मोफत दंत-मुख आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रंगी महापौर गाडे बोलत होत्या. शहरातील नागरिक, आशा सेविका, विद्यार्थी व महापालिका कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती दीपाली बारस्कर, उपसभापती वर्षा सानप, उपायुक्त मेहेर लहारे, शहाजहान तडवी, आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, डॉ. आहाद शेख, डॉ. आलिया शेख यांच्यासह आशा सेविका, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर म्हणाले, जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित या शिबिरात आशा सेविका, विद्यार्थी व महापालिका कर्मचाऱ्यांची दंत-मुख तपासणी करण्यात आली. यामध्ये दात, हिरड्या, जिभेचे आजार, एक्स-रे, लॅब तपासणी तसेच हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. दैनंदिन जीवनात दातांचे आरोग्य चांगले राखणे अत्यंत आवश्यक असून, त्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, सध्याच्या काळात केवळ वातावरणातील प्रदूषणच नव्हे तर विचारांचे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नागरिकांनी मोबाईलचा मर्यादित वापर करणे गरजेचे आहे. महिला व बालकल्याण समिती सभापती बारस्कर म्हणाल्या, महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरांची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिक या शिबिरांचा लाभ घेऊन आपल्या आजारांचे वेळेवर निदान करून उपचार घेऊ शकतील, असे त्यांनी सांगितले. कामात कुचराई नको, रोज १०० रुग्णांची तपासणी व्हावी महापालिकेच्या माध्यमातून शहरात २५ ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, डॉक्टर, कर्मचारी व आशा सेविकांनी नागरिकांमध्ये आजारांविषयी असलेले गैरसमज दूर करून विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये दररोज १०० ते १५० रुग्णांची तपासणी होणे अपेक्षित आहे. जे डॉक्टर कामात कसूर करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त डांगे यांनी दिला. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकचळवळ उभी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
येथील श्रीमती के. बी. आबड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयातर्फे मंगळवारी (दि. ७) जागतिक होमिओपॅथी सप्ताह आणि जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत चांदवड शहरातून भव्य जनजागृती फेरी काढण्यात आली. नेमिनाथ संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, महाविद्यालयाचे समन्वयक नंदकिशोर ब्रम्हेचा, डॉ. सुनिलकुमार बागरेचा, सुमतीलाल सुराणा आदींच्या मार्गदर्शनाखाली ही फेरी काढण्यात आली. महाविद्यालय परिसरातून सुरू झालेली ही रॅली चिंचबन, संत गाडगे महाराज चौक, श्री नेमिनाथ जैन संस्था परिसर मार्गे पुन्हा महाविद्यालयात विसर्जित झाली. यामध्ये तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. प्राचार्य डॉ. अजय डहाड यांनी यावेळी सुरक्षित औषध, अचूक उपचार, होमिओपॅथीच खरी आरोग्याची साथ असल्याचा संदेश दिला. या रॅलीत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांना सरबत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्या डॉ. संगीता दोशी व डॉ. अमित जगझाप यांनी नियोजन केले.यावेळी विद्यार्थ्यांनी फलक आणि बॅनरद्वारे विविध आजारांविषयी जनजागृती केली. होमिओपॅथी उपचारांचे लाभ, कर्करोग, मधुमेह, व्यसनाधीनता यासह सकस आहार, व्यायाम व दिनचर्येचे महत्त्व सांगणारी नाटिका सादर करण्यात आली. मूळापासून आजार बरा, होमिओपॅथीचा मार्ग स्वीकारा, आरोग्यम् धनसंपदा, माझे आरोग्य, माझा हक्क, अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही डिजिटल पोस्टरद्वारे जनजागृती करण्यात आली.
कळवण शहरातील मेनरोडवरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम मंगळवारी (दि.७) पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आली; मात्र व्यावसायिकांनी नोटीस न देता कारवाई केल्याचा आक्षेप घेत घेराव घातल्याने मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली. मोजणी करून हद्द निश्चित केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्पष्ट केले आहे. मेनरोडवर वाहतूक कोंडी नित्याची झाली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी ११ नंतर शिवस्मारक परिसरापासून कारवाई सुरू झाली. पुढे जितेंद्र ज्वेलर्ससमोर कारवाई होताच व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत हरकत घेतली. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. काही बांधकामे शंभर वर्षांपासून अस्तित्वात असून ती पक्की आहेत. महसूल विभाग व पोलिस ठाण्याच्या भिंतीची हद्द समान असताना अतिक्रमण म्हणून कारवाई कशी, असा सवाल त्यांनी केला. तसेच रस्त्याची मोजणी टपऱ्यांच्या पुढील बाजूपासून केल्याचा आरोप करत आधी अचूक मोजणी करूनच कारवाई करावी, अशी मागणी केली. चर्चेनंतर मोहीम तात्पुरती थांबवण्यात आली. यावेळी प्रल्हाद शिवदे, जितेंद्र विसपुते, गणेश कोठावदे, राजू मेणे, अनिल पवार, फिरोज शहा आदी व्यापारी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्थानिक व्यापारी व मालमत्ताधारक यांच्या सांगण्यानुसार त्यांची हद्द रस्त्यापर्यंत आहे. त्यामुळे कार्यालयामार्फत भूमी अभिलेख कार्यालयाशी पत्रव्यहार करून मोजणी करण्यात येणार आहे. मोजणीनंतर अतिक्रमण मोहीम राबविली जाईल. - जे. एम. वाघ, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम आमच्या मालमत्ता जुन्या आहेत. आम्ही अतिक्रमण केलेले नाही. रस्त्याचे करताना संबंधित एजन्सीने रस्त्याचा मध्य काढलेला नाही. फक्त काम करताना कोणाचा विरोध होऊ नये म्हणून काम करून घेतले आहे. बांधकाम विभागाने मोजणी नकाशाप्रमाणे हद्द दाखवावी आम्ही अतिक्रमण काढून घेऊ. - प्रल्हाद शिवदे, स्थानिक मालमत्ताधारक. अतिक्रमण मोहीम राबवू
मंगरूळ फाट्यावर बूच पांगारा फुलला आहे. लाल-भगव्या मखमली फुलांनी झाड सजले आहे. पळस आणि पांगारा भावकीची झाडे आहेत. आधी पळस लाल भडक रंगात फुलतो. या फुलांना सुगंध नाही. निसर्गाने ही उणीव रंगात, मकरंदात भरून काढली आहे. हा बूच पांगारा सुमारे २८ प्रजातींच्या पक्ष्यांना मकरंद पुरवतो. शिंजीर, जांभळा शिंजीर, शृंगराज, राखी वटवट्या, रानभाई, रान चिमणी, तांबट, कवड्या सुतार, पळस मैना, कुंटुक, लालबुड्या बुलबुल, शिपाई बुलबुल, हळद्या, जंगली मैना, भांग पाडी मैना, किर पोपट यांचा यात समावेश आहे. किर पोपट, रान चिमणी या फुलांच्या पाकळ्या आवडीने खातात. गाय कावळा, कुंटुक, काळटोप कस्तूर, कवड्या सुतार हे पक्षी काटेरी फांद्या घरटी बांधण्यासाठी वापरतात. मंगरूळ फाट्यावर लालभडक रंगात फुललेला बूच पांगारा. झुडुपवर्गीय झाड देते शीतल सावली पूर्वी बारी समाजबांधव पांगाऱ्याची दुसरी प्रजाती असलेल्या पांगाऱ्याची पानं मळ्यात लावगड करत. पानवेल त्यावर चढवली जात असे. हे झुडुपवर्गीय झाड थंड, शीतल सावली देते. चैत्राच्या उन्हात हा वृक्ष पाखरं, फुलपाखरं, मधमाशा यांना मध, मकरंद पुरवतो. वसंताच्या, चैताच्या अखेरीला सकाळी सकाळी उगवता सूर्य काटेरी फांद्यांत अडकला आहे असे भासते.
सिल्लोड तालुक्यातील चिंचखेडा जि.प. शाळेत गेल्या सहा महिन्यांपासून एकच शिक्षक आहे. तेही कधी तरी येतात. कधी शाळेचे हुशार विद्यार्थी, तर कधी त्या शिक्षकांच्या कारचा चालक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने त्रस्त ग्रामस्थांनी सोमवारी दुपारी १ वाजता सिल्लोड पंचायत समिती कार्यालयात शाळा भरवली. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील चिंचखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. शिक्षक वारंवार गैरहजर राहत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अधिक धक्कादायक म्हणजे, शाळेत कार्यरत असलेल्या बदर या शिक्षकांच्या अनुपस्थितीत त्यांच्या वाहनाचा चालक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा पाढा काही विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्यासमोर वाचला. शिक्षणाचा दर्जा पूर्णपणे खालावला आहे. या गंभीर प्रकाराबाबत शालेय ^चिंचखेडा शाळेतील प्रकाराबाबत शालेय समितीची तक्रार आली आहे. मात्र दोन्ही शिक्षकांचा अपघात झाल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. चौकशी करून कार्यवाही करू. - गटशिक्षणाधिकारी रमेश ठाकूर, सिल्लोड ६ एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत एकही शिक्षक शाळेत उपस्थित नसल्याने विद्यार्थ्यांनाच शिक्षक बनून वर्ग चालवावा लागला. नियुक्त असलेले शिक्षक कधी येतात, तर कधी नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत वाणी यांनी सांगितले. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणपत वाणी यांनी गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गटशिक्षण अधिकारी रमेश ठाकूर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. विद्यार्थ्यांनीच शिक्षक बनून वर्ग चालवला चौकशी करून कार्यवाही करणार
सिल्लोड शेंदूर टोप मिरवणुकीने ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यांच्या यात्रा महोत्सवाला मंगळवारी उत्साहात सुरुवात झाली. दुपारी १२:३० वाजता मिरवणुकीचे आगमन श्री म्हसोबा महाराज मंदिरात झाले. त्यानंतर भक्तिमय वातावरणात भव्य अभिषेक पार पडला. चार-पाच वर्षांतील गर्दीचा रेकॉर्ड यंदा तुटला. पहिल्या दिवशी दिवसभरात दोन लाखांपेक्षा जास्त भाविकांनी महिषासुराचे दर्शन घेतले. मंगळवारी पहाटेपासून भाविकांची मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अनेक भाविकांनी आपले नवस फेडले. सकाळपासून भाविकांचे अभिषेक सुरू झाले. दुपारी नवसाच्या बारा गाड्या ओढून लहान मुलांचे नवस फेडताना भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मोकळ्या जागेवर तगतराव व बारा गाड्यांचा कार्यक्रम झाला. रात्री दहा वाजता दशावतारी संघांचा कार्यक्रम झाला, तर बुधवारी पहाटे चार वाजता श्री म्हसोबा महाराजांची स्वारी निघते. बुधवारी कुस्त्या होणार आहे. सिल्लोड येथील ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त झालेली भाविकांची मोठी गर्दी.
महाराष्ट्रासह इतर राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेंद्रा कमंगर येथे दरवर्षीप्रमाणे भरवण्यात येणाऱ्या मांगीरबाबा यात्रेला भक्तिभावाच्या वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला. रविवारी मध्यरात्री यात्रेची सुरुवात होताच परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (७ एप्रिल) हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. जवळपास अडीच ते तीन लाख भाविकांनी हजेरी लावली. कडक उन्हाची पर्वा न करता ‘मांगीरबाबा की जय’च्या जयघोषात भाविकांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. पहाटेपासूनच नवस फेडण्यासाठी आलेले महिला-पुरुष अनवाणी पायाने मंदिराकडे जाताना दिसून आले. ढोल-ताशांच्या गजरात, रेवड्यांची उधळण करत आणि पारंपरिक वेशभूषेत भक्तांनी दर्शन घेतले. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला. प्रशासनाचा चोख बंदोबस्त यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामपंचायत, देवस्थान समिती आणि पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांच्यासह करमाड पोलिस व वाहतूक शाखेच्या पथकाने कडेकोट व्यवस्था केली आहे. वाढत्या उन्हाचा फटका; तरीही भक्तांची होती उपस्थिती भाविकांनी दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नवस फेडले : यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नवस फेडण्याची परंपरा पार पडली. मंगळवारी ९५० बोकड आणि ४१८ कोंबड्यांचा बळी देऊन भाविकांनी आपला नवस फेडला. २०१९ या वर्षापासून बंद करण्यात आलेली गळटोचणी प्रथा यंदाही पूर्णपणे बंद राहिली असली तरी बोकड व कोंबड्यांच्या बळीची परंपरा मात्र कायम असल्याचे दिसून आले. १९९९ नंतर शेंद्रा एमआयडीसीमुळे परिसरात झपाट्याने शहरीकरण झाले आहे. यामुळे पूर्वी असलेली झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून सावलीअभावी भाविकांना उन्हात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नवस फेडण्यासाठी मोकळी जागा कमी पडत असल्याने भाविकांना दूरवर जावे लागत असल्याचे चित्र आहे. {या वर्षी वाढत्या तापमानाचा काही प्रमाणात परिणाम भाविकांच्या संख्येवर झाल्याचे चित्र दिसले. सोमवारी उन्हाच्या तीव्रतेमुळे तुलनेने कमी गर्दी होती. मात्र मंगळवारी भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली. महाराष्ट्रासह इतर राज्यांतून आलेल्या भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी रांगा लावल्या. {कपाळावर मळवट, हातात कट्यार आणि मुखी बाबांचा जयघोष करत अनेक भाविक जालना महामार्गापासून अर्धा किलोमीटर अंतर चालत मंदिरात पोहोचले. कडक उन्हापासून बचावासाठी काहींनी झाडांचा आसरा घेतला, तर सामाजिक संस्थांकडून शिरा, खिचडीचे वाटप करण्यात आले.
पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान ‘दिव्य मराठी’च्या सततच्या पाठपुराव्याने सुरू झाले आहे. तब्बल २९ कोटींहून अधिक निधीतून पहिल्या टप्प्यात उद्यान सुरू झाले आहे. दररोज पाचशेहून अधिक पर्यटक उद्यानाला भेट देत आहेत. बुधवार, दि. ८ एप्रिल रोजी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील जायकवाडी येथील संतपीठ येथे कालवा समितीच्या बैठकीसाठी येत आहेत. ते उद्यानाचीही पाहणी करणार आहेत. उद्यानाच्या इतर कामांसाठी तब्बल १०९ कोटींचे टेंडर होणार आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने त्या अनुषंगाने तयारी सुरू करण्यात आली आहे. जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी १९७५ मध्ये या उद्यानाचे भूमिपूजन झाले. १९८६ पासून ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. सुमारे ३१० हेक्टर क्षेत्रावर विकसित करण्यात आलेल्या या उद्यानात काश्मीरमधील निशांत-शालीमार बागांप्रमाणे फलोद्यान आहे. हरियाणातील पिंजोर गार्डनच्या धर्तीवरील रचना आहे. म्हैसूरच्या वृंदावन गार्डनसारखे रंगीत कारंजे आहेत. सूरतालावर आधारित म्युझिकल फाउंटन हेही प्रमुख आकर्षण आहे. पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान जागतिक दर्जाचे करुन येथे जगभरातील पर्यटक येतील, असे नियोजन करण्यात येत आहे. नव्याने अनेक कामे उद्यानात होणार आहेत. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. -विलास भुमरे, आमदार पैठण उद्यानाच्या पुनरुज्जीवनासाठी सुमारे १०९ कोटी रुपयांच्या विविध कामांना गती मिळण्याची शक्यता असल्याचे उद्यान विकास समितीचे प्रा. संतोष गव्हाणे, रमेश शेळके, पवन लोहिया, रमेश लिंबोरे, बाळू आहेर, बजरंग काळे यांनी सांगितले. दरम्यान, उद्यानातील पाच एकरमध्ये अॅडव्हेंचर पार्क उभारण्यात आले आहे. मात्र हे काम निकृष्ट झाले असून अद्याप हा पार्क पर्यटकांसाठी खुला करण्यात आला नाही. भव्य प्रवेशद्वार, विठुरायाची आकर्षक मूर्ती, सेंट्रल गार्डन- लेझर शो, संगीतमय कारंजे, किड्स प्ले एरिया आणि गेम झोन, ॲक्वा स्केपिंग रोझ गार्डन, टुरिस्ट हाऊस-सेंट्रल व्हिस्टा, वॉटर वे, सोबतच लॅण्डस्केप गार्डन, मिनी ट्रेन-जांभूळवनाचे सुशोभीकरण-उद्यानाजवळ च बोटिंग सुविधा-मनोरंजन झोन-नाथसागर आणि परिसराचा विकास-भव्य वाहन पार्किंग आदी विकासकामे होणार आहेत. दरम्यान, उद्यान सुरू झाल्याने येथे राज्यभरातून व छत्रपती संभाजीनगरातून पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
जायकवाडीच्या नाथसागरातून छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या समांतर जलवाहिनीची सध्या टेस्टिंग सुरू असून या टेस्टिंगदरम्यान मंगळवारी ( ७ एप्रिल) दुपारी ढोरकीन येथील गावातील मुख्य पुलाजवळ जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी नदीपात्रात वाहुन गेले. यामुळे नदीला पूर आला होता. या ठिकाणी नदी असून व्हॉल्व्हजवळ फुटल्याने पाइपलाइनमधील पाणी नदीत वाहिले. दरम्यान, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी तत्काळ पाणीपुरवठा बंद केला. उशिरापर्यंत पाणी वाहत होते. छत्रपती संभाजीनगरसाठी नव्या जलवाहिनीचे काम प्रगतीपथावर आहे. मंगळवारी या जलवाहिनीची चाचणी सुरू होती. यादरम्यान ती जलवाहिनी फुटली.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता थेट शेती क्षेत्राला बसू लागला असून प्लास्टिकसह शेतीसाठी लागणाऱ्या विविध साहित्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे सिल्लोड तालुक्यातील केळगाव-आमठाणा परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून मिरची लागवडीच्या सुरुवातीलाच खर्चाचा मोठा बोजा वाढला आहे. युद्धामुळे उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा घटल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी पीव्हीसी पाइप, मल्चिंग पेपर यांसारख्या साहित्यांच्या दरात तब्बल ७० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ठिबक सिंचन संचाच्या किमतीतही ५० ते ६० टक्क्यांची वाढ झाली असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ठिबक सिंचनासाठी प्रतिएकर सुमारे ५ ते ६ हजार रुपयांची अतिरिक्त वाढ झाली आहे. महिनाभरापूर्वी सुमारे १३०० रुपयांना मिळणारा मल्चिंग पेपर आता थेट १८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. खतांच्या दरातही सातत्याने वाढ होत असल्याने लागवडीचा एकूण खर्च प्रचंड वाढला आहे. दरवाढीचा परिणाम बाजारावरही दिसून येत असून अनेक शेतकऱ्यांनी साहित्य खरेदी पुढे ढकलली आहे. त्यामुळे कृषी साहित्य विक्रेत्यांनाही फटका बसत असून बाजारात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या परिसरात मिरची लागवडीला सुरुवात झाली असली तरी वाढलेल्या खर्चामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. उत्पादन खर्च वाढल्यामुळे भविष्यात मिरचीच्या बाजारभावावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांची मागणी दरवाढीच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्लास्टिक साहित्य व खतांच्या दरांवर नियंत्रण ठेवावे, तसेच ठिबक सिंचन व इतर साहित्यावर अनुदान वाढवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरवाढीमुळे खरेदी कमी झाली, लागवड कमी होणार सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे प्लॅस्टिक व इतर कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पीव्हीसी पाईप, मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन साहित्य महाग झाले असून शेतकऱ्यांवर खर्चाचा मोठा बोजा पडत आहे. दरवाढीमुळे खरेदी कमी झाली असून बाजारात मंदीचे वातावरण आहे. -कृष्णा सोमासे, विक्रेता, आमठाणा
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथे कृषी अवजारे केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या महापुरुषांच्याअवैध पुतळे निर्मिती कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणीमुख्य सूत्रधार बाळराजे आवारे याला अटक करण्यात आली असून,त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणातील कारखान्याचा व्यवस्थापक आणि कायदेशीर सल्लागारालाही ताब्यात घेतले आहे. प्रशासनाने कारखाना सील केला आहे. संभाजी आघाव (२६ रा. महाकाळा) व ॲड. पंडीत उर्फ प्रणित डिकळे(वय ३०,रा.तांदुळवाडी, परांडा) यांना ताब्यातघेतले. महाकाळा येथील बाळराजे रामरावआवारे पाटील (वय ३७) याने २०२३ मध्येचुर्मापुरी येथे कृषी अवजारे सेवा केंद्र सुरू केले होते. मात्र, डिसेंबर २०२५ पासूनया केंद्रात शेती अवजारांऐवजीमुंबईतून फायबर मागवून या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे तयार केले जात होते.तसेच काही पुतळे छत्रपती संभाजीनगरयेथील चिकलठाण्यातील एकाकारखान्यातूनही मागविले जात. आवारेयाचा हा कारखाना बंद करण्याचेआदेश उपविभागीय अधिकारी उमाकांतपारधी यांनी अंबडच्या तहसीलदारांनादिले आहेत. एका पुतळ्याला ७० किलोफायबर लागत होते. कमी किमतीततयार होणारा पुतळा जास्त रकमेतविकला जात होता. उत्तर प्रदेशातील कामगार या कारखान्याचे व्यवस्थापन पाहण्यासाठी आवारे याने संभाजी शिवाजी आघाव याची नियुक्ती केली होती, तर कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी ॲड. पंडित उर्फ प्रणित डिकळे हा वकील म्हणून कार्यरत होता. विशेष म्हणजे, पुतळे घडवण्यासाठी उत्तर प्रदेशातील १६ कामगारांची फौजया ठिकाणी तैनात होती. कारखान्यातून आतापर्यंत विविध जिल्ह्यात ५७०महापुरुषांचे पुतळे उभारल्याचे एका चित्रफितीत आवारे याने सांगितले आहे. फायबरपासून पुतळे तयार करण्याचाकारखाना थाटला होता. याने याव्यवसायाचे मोठे जाळे विणले होते.महापुरुषांचा पुतळा एकदा बसवलाकी तो सहजासहजी काढला जातनाही, या भावनेचा फायदा घेत त्यानेअनधिकृतपणे पुतळे बसवण्याचासपाटा लावला होता. प्रशासनानेयापूर्वीच या केंद्रावर बंदी घातली होती.बीएनएसएस कलम १६३ अन्वयेपुतळ्यांची निर्मिती, साठवणूक आणिवाहतुकीवर ६० दिवसांसाठी बंदीघालण्यात आली आहे. आदेशाचेउल्लंघन केल्यास कठोर फौजदारीकारवाई केली जाणार आहे.कारखानाहटवण्यासंदर्भात आदेश आले आहेत,परंतु उपविभागीय अधिकारी वतहसीलदार यांच्या आदेशानुसार हीकारवाई होणार आहे. सध्या याबाबतसांगता येणार नाही, अशी माहितीगोंदी पोलिसांनी दिली.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धीमहामार्गावर गुंडेवाडी शिवारात सोमवारी सायंकाळी ६.४५ वाजता गॅस टँकरमधून अमोनियम नायट्रेटची गळती झाली. रात्रभरगॅस गळती सुरूच राहिल्याने मंगळवारीसकाळी समृद्धी महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली. यामुळे या मार्गावरअवजड वाहनांच्या १० किमीपर्यंत रांगालागल्या. भर उन्हात वाहने ५ तास कोंडीत अडकून पडल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. २४ तास उलटूनही गॅसचीगळती मंगळवारी उशिरापर्यंत सुरूच होती. मुंबईकडून नागपूरकडे जाणाऱ्याटँकरमधून (जीजे १२ बीवाय ८४००)सोमवारी सायंकाळी ६.४५ च्या सुमारास एका रसायनाची गळती सुरू असल्याचे लक्षातआले. मंगळवारी सकाळी वाहतूक वळवली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. टँकर रस्त्याखाली, वाहतूक सुरळीत जड वाहने वगळता इतर सर्ववाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. जड वाहने खाली उतरू शकत नसल्यानेसमृद्धीवरच होती. आता टँकर रस्त्याच्या खाली उतरवण्यात आला असून सध्यावाहतूक सुरळीत सुरू आहे. -रुपाली दरेकर, पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक गळती न थांबल्याने वाहने वळवली टँकरमधील अमोनियम नायट्रेट उष्णतेमुळे गरमहोऊन द्रव पदार्थ बाहेर पडत होता. तेव्हा समृद्धीमहामार्ग येथील अग्निशामक दलाने थंड पाण्याचाफवारा मारून टँकरची उष्णता कमी करण्यासाठीप्रयत्न केले. कंपनीच्या मुंबई येथीलव्यवस्थापकांशी संपर्क केला. तेव्हा त्यांनी रात्रीचेवातावरण थंड झाल्यावर थंडावा निर्माण होईल,असे सांगितले. परंतु सोमवारी रात्रभर गळती नथांबल्याने मंगळवारी वाहतूक वळवली. वाहतुकीचा मार्ग असा होता नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहनेसिंदखेड राजा येथून खाली उतरवण्यातआली. जालना येथून पुन्हा समृद्धीमहामार्गावर घेण्यात आली. मुंबईकडूननागपूरकडे जाणारी वाहने जालना येथूनखाली घेऊन सिंदखेड राजामार्गे पुन्हासमृद्धी महामार्गावर सोडण्यात आली.काही काळ एका लेनवरूनच वाहतूकसुरू ठेवण्यात आली होती. मंगळवारीसकाळी १०.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंतवाहतूक प्रभावित झाली होती. सुरक्षा अधिकारी, बंब तैनात होते मंगळवारी सायंकाळीही टँकरमधून गॅस गळती होतहोती, परंतु टँकर रस्त्याच्या खाली उतरवण्यातआल्याने वाहतुकीला कोणताही धोका नव्हता.घटनास्थळावर अनुचित प्रकार घडू नये म्हणूनअग्निशामक दल व सुरक्षा अधिकारी तैनात होते. अमोनियम नायट्रेट ज्वलनशीलनाही, संपर्काने मळमळ, डोकेदुखी अमोनियम नायट्रेट हे एक रासायनिक संयुगआहे. ते पाण्यात अतिशय सहज विरघळते.उष्णतेच्या प्रभावाने विघटन होण्याचीशक्यता असते. हे स्वतः ज्वलनशील नसलेतरी इतर पदार्थांना जळण्यास मदत करते.याच्या संपर्कात आल्यास खसा खवखवणे,मळमळ, उलटी, डोकेदुखी असा त्रास होतो.तसेच रक्तदाबही कमी होऊ शकतो.
गेल्या ३-४ वर्षांपासून स्वतःच्या खिशातून पैसा लावून विकासकामे करणाऱ्या आणि हक्काच्या पैशांसाठी सरकारी उंबरठे झिजवणाऱ्या कंत्राटदारांचा संयम आता सुटला आहे. राज्यभरातील विविध शासकीय विभागांकडे कंत्राटदारांची तब्बल १ लाख ७ हजार कोटी रुपयांची देयके थकीत आहेत. वारंवार निवेदने देऊनही सरकार दखल घेत नसल्याने आता संतप्त कंत्राटदार संघटनांनी १५ एप्रिलपासून ‘चक्का जाम’चा थेट अल्टिमेटम दिला आहे. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) नाशिक शाखेने पत्रकार परिषद घेत सरकारला १३ एप्रिलची अल्टीमेटम दिला आहे. या मुदतीत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक तोडगा न काढल्यास, १५ एप्रिलपासून ज्या रस्त्यांची आणि पुलांची बिले मिळालेली नाहीत, ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केले जातील. तसेच, नवीन शासकीय इमारतींचा वापर रोखून प्रगतीपथावरील सर्व कामे तत्काळ थांबवली जातील, अशी घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी वारंवार ई-मेल करून आणि वेळ मागूनही ते भेटत नसल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे. गंभीर...शासकीय कामांसाठी कमिशनचे ‘दरपत्रक’ उघड ज्या आमदारांना एरवी ५-१० कोटींची कामे मिळतात, त्यांना विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून २००-३०० कोटींचा निधी वाटण्यात आला आहे. यातून केवळ ‘पार्टी फंड’ गोळा करण्याचे काम झाले असून, आमदारांनी काम देतानाच आपले १० टक्के कमिशन आधीच वसूल केल्याचा अत्यंत गंभीर आरोप कंत्राटदारांनी केला आहे. कोणतेही काम मिळवण्यासाठी व पूर्ण करण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या टक्केवारी कमिशनचे ‘दरपत्रक’च त्यांनी जाहीर केले: आमदारांसह अभियंत्यांवरही आरोपआमदार १० ते १५%वर्कऑर्डरसाठी १ ते २ %कार्यकारी अभियंता १ %अधीक्षक अभियंता १ %मुख्य अभियंता १ %एफ.डी. (वित्त विभाग) २ % कोणत्या विभागाकडे किती थकबाकी?जल जीवन मिशन व मजीप्रा ३५,००० कोटीसार्वजनिक बांधकाम २९,००० कोटीआदिवासी विकास (रस्ते-पूल) १०,००० कोटीजलसंपदा विभाग ९,००० कोटीग्रामविकास व जलसंधारण ६,५०० कोटीनगरविकास २,१०० कोटीपर्यटन, गृह, आरोग्य १,७५० कोटी मुख्यमंत्री चर्चेसाठी वेळ देत नाहीत मुख्यमंत्री महोदय चर्चेसाठी वेळ द्यायला तयार नाहीत. आता आरपारची लढाई लढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. - मनोज खांडेकर, बी.ए.आय. आंदोलनाला ‘या’ संघटनांचे बळ : आंदोलनात ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया’सह महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना व मजूर सहकारी संस्था सहभागी होत आहेत. उच्च न्यायालयात याचिकाही दाखल आहेत. पत्रकार परिषदेला मनोज खांडेकर, सचिव अविनाश आव्हाड, राजू पानसरे आदी होते.
भोंदूबाबा अशोक खरात याचे रोज नवनवीन कारनामे समोर येत असून, आता त्याने स्वाध्याय परिवाराच्या तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या जागेवरच अघोषित ताबा मिळवल्याचा धक्कादायक प्रकार ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत उघडकीस आला आहे. कर्मयोगी नगर येथील खरातच्या ‘तृप्तबाला’ बंगल्याला लागून असलेल्या या जागेचा वापर तो आणि त्याचे कुटुंबीय स्वतःच्या खासगी मालमत्तेसारखा करत असल्याचे उजेडात आले आहे. नाशिक शहरातील त्याच्या बंगल्याशेजारील तब्बल ४७७ वार भूखंडावरही त्याची वक्रदृष्टी पडल्याचे दिसत आहे. ही जागा मूळची एका प्रख्यात बांधकाम व्यावसायिकाची असून, त्यांनी परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य या नात्याने चार वर्षांपूर्वी ती तत्त्वज्ञान विद्यापीठाला दिली आहे. सातबारा उताऱ्यावरही तशी अधिकृत नोंद आहे. या जागेवर भावफेरी आणि आध्यात्मिक उपक्रमांसाठी चारही बाजूंनी कुंपण घालून दाट वृक्षारोपण करण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराचीही आता ‘एसआयटी’कडून देखील चौकशी केली जाणार असल्याचे समजते. परिवारातील सदस्य अनभिज्ञ; कठोर कारवाई व्हावी या प्रकाराबाबत स्वाध्याय परिवारातील ज्येष्ठ सदस्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. “ही जागा निश्चितपणे स्वाध्याय परिवाराचीच आहे. येथे नियमित स्वच्छता ठेवतो आणि मोठ्या कार्यक्रमांसाठीच ती वापरली जाते. खरात कोणाच्या परवानगीने या जागेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतोय, हे माहीत नाही. त्याचा हा बेकायदेशीर ताबा आणि वावर अयोग्य आहे. पोलिसांनी संबंधितांवर कडक कारवाई करावी,” अशी मागणी सदस्यांनी केली आहे.
बोगस शालार्थ आयडी तयार करून झालेल्या राज्यव्यापी शिक्षक भरती घोटाळ्याची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पासवर्ड आणि युजर आयडी इतरांच्या हाती लागल्याने हा मोठा गैरप्रकार उघडकीस आला होता. यापुढे अशा घोटाळ्यांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने आता ई-ऑफिस प्रणालीचा वापर सक्तीचा केला असून, प्रणालीत लॉगिन करण्यासाठी प्रत्येक वेळी ओटीपी अनिवार्य केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. विश्वासाचा गैरफायदा; बनावट सह्यांचा सुळसुळाट यापूर्वी कामाच्या व्यस्ततेमुळे वरिष्ठ अधिकारी विश्वासाने आपले पासवर्ड आणि युजर आयडी संबंधित लिपिकांकडे देत असत. मात्र, या विश्वासाचा गैरफायदा घेत हे पासवर्ड हस्ते-परहस्ते अनेकांपर्यंत पोहोचले. परिणामी, त्यातून शिक्षक नियुक्तीचे अनेक बोगस शालार्थ आयडी तयार झाले. धक्कादायक बाब म्हणजे, शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून नियुक्तीच्या प्रस्तावांना परस्पर मान्यता देण्यात आली. ४२४ नियुक्त्या ठरल्या अवैध; २० जणांना बेड्या : आतापर्यंत तपासणी पूर्ण झालेल्या ४३१ पैकी तब्बल ४२४ नियुक्त्या अवैध ठरल्या आहेत. कागदपत्रे अचूक असल्याने केवळ ७ शिक्षकांचे पगार सुरू करण्यात आले आहेत. इतर १०२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुनावणी पूर्ण होऊन निर्णय येणे बाकी आहे, तर उर्वरित कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. अशी होते संपूर्ण प्रक्रिया
मार्चच्या दुसऱ्या पंधरवड्यात व एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांमध्ये २ लाख ५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, अशी प्राथमिक माहिती कृषी विभागाने मंगळवारी दिली. दरम्यान, पंचनाम्यांना वेग देऊन या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत करावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. राज्यात सलग तिसऱ्या वर्षी रब्बी हंगामाला हवामान बदलाचा तडाखा नोव्हेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ दरम्यान, राज्यात २.५ लाख ते ३ लाख हेक्टरहून जास्त क्षेत्रावरील पिके अवकाळी व गारपिटीमुळे उद्ध्वस्त झाली. २०२४-२५: या वर्षात अवकाळी व गारपिटीमुळे ४८.८८ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले, ज्याचा फटका ६८.४० लाख शेतकऱ्यांना बसला. शासनाकडून यासाठी ६,९४८ कोटींची मदत मंजूर केली. २०२५-२६ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अवकाळीमुळे ८९ लाख ८३,५४१ शेतकऱ्यांना फटका बसला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८,४४५ हेक्टर पिकांचे नुकसान अवकाळीने कांदा, गहू, द्राक्षांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मार्चअखेर जिल्हानिहाय हेक्टरमध्ये नुकसानीचे क्षेत्र असे : नाशिक (२९,८१२), अहिल्यानगर (२३,६३३), जळगाव (२२,३६१), धुळे (१४,८३२), बुलढाणा (८,५०७) व छत्रपती संभाजीनगर (८,४४५ हेक्टर).
भोंदू खरात प्रकरणात पोलिसांनी केलेल्या आवाहनाला साद देत आणखी ११ पीडितांनी खरातच्या विरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. त्यांचे कोणतेही व्हिडिओ व्हायरल झालेले नाहीत. खरातने ‘ऊर्जा आणि मन, शरीरशांती पूजां’च्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याचे या पीडितांनी सांगितले. खरातविरुद्ध महिलांच्या एकूण १९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. लैंगिक शोषणाच्या आठ गुन्ह्यांचा तपास सुरू असताना २०१८ पासून खरातच्या जाळ्यात अडकलेल्या या ११ पीडितांनी पोलिसांत धाव घेतली. व्हिडिओ नसले तरी अन्य तांत्रिक पुरावे आणि दबावाचा वापर करून खरातने शोषण केल्याची तक्रार पीडित महिलांनी दिली आहे. समाजातील प्रतिष्ठेपोटी आजपर्यंत या महिला शांत होत्या. आता तपास पथकाने केलेल्या आवाहनानंतर या महिला तक्रार देण्यास पुढे आल्या. २४ जणांकडून २० दिवस सलग प्रक्रिया १७ मार्च रोजी गुन्हा दाखल झाला असून २० दिवसांत तपास पुढे गेला आहे. उर्वरित ४० दिवसांत अन्य गुन्ह्यांचा तपास होईल. साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत. दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत गोपनीयता बाळगली जाईल. २४ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून ही प्रक्रिया सुरू आहे. ६० दिवसांत तपास पूर्ण करू : एसआयटीप्रमुख नाशिक | खरातविरोधात दाखल लैंगिक शोषणाच्या ८ गुन्ह्यांचा आणि फसवणुकीच्या १ गुन्ह्याचा तपास ६० दिवसांत पूर्ण करण्यात येऊन दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती एसआयटीप्रमुख तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत दिली. खरातविरोधात दाखल ९ गुन्ह्यांचा एसआयटी, २ गुन्ह्यांचा अहिल्यानगर पोलिस, १ गुन्ह्याचा शहर पोलिस तपास करत आहेत. खरात दोन गुन्ह्यांत १९ दिवसांपासून पोलिस कोठडीत आहे. समाजाची भीती झुगारून तक्रार देण्यासाठी पुढे आलेल्या पीडितांचे धैर्य ही आमची प्रेरणा असल्याचे त्या या वेळी म्हणाल्या. ईडीकडे १०० दस्तऐवज, होणार स्वतंत्र तपास खरातविरोधात ईडीने ईसीआयआर दाखल केला आहे. मालमत्तेसंदर्भात १०० हून अधिक दस्तऐवज ईडीकडे आहेत. त्याचा स्वतंत्र तपास होईल. तसेच सीडीआरबाबत गृह विभागाकडूनही वेगळा तपास सुरू आहे. व्यावसायिक रडारवर : शिर्डीतील काही हॉटेल व्यावसायिक व राजकीय पदाधिकारी ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यता. ७ खातेदारांचीही चौकशी : खरात नॉमिनी असलेल्या ५७ खातेदारांपैकी मंगळवारी ७ खातेदारांची शिर्डीत चौकशी करण्यात आली. पतीचा मृत्यू अटळ आहे, अशी भीती दाखवून ‘देवाची ऊर्जा’ देण्याच्या नावाखाली अत्याचार खरातच्या पापाचा डोंगर मोठा आहे. ज्या महिला खरातकडे गेल्या त्यांची सर्व माहिती खरात रजिस्टरवर लिहून घेत होता. सर्व माहिती काढून, महिलांना अचूक भविष्य सांगून ‘पतीचा मृत्यू अटळ आहे’ अशी भीती दाखवून त्यांना तोजाळ्यात अडकवत असे. त्यानंतर आठ-पंधरा दिवसांनी पूजा करण्याच्या नावाखाली कार्यालयात बोलावून घेऊन त्यांचे शोषण करायचा. खरात आपले बिंग फुटू नये म्हणून एकटाच पूजा मांडायचा. मंत्र म्हणायला लावून आणि डोळे बंद करायला सांगून भीती दाखवत असे. एकांतवासामध्ये पूजेच्या नावाखाली ‘देवाची ऊर्जा’ महिलांना देण्याचा बहाणा करून तो अत्याचार करायचा. खरातच्या सर्व संशयास्पद कृतींमागचे गुपित आता चव्हाट्यावर आले आहे.
बारामतीवर अधिराज्य गाजवणाऱ्या पवार कुटुंबीयांच्या श्रीमंतीचे अनेक किस्से सांगितले जातात. त्यातील काही आकडे समोर आले आहेत. त्यानुसार शरद पवारांपेक्षा त्यांच्या सूनबाई म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दुप्पट धनवान आहेत. अर्थात यात दिवंगत पती अजित पवारांच्या संपत्तीचाही समावेश आहे. शरद पवारांकडे ६१ कोटी तर सुनेत्रांकडे १२२ कोटींची संपत्ती आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून हा तपशील समोर आला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे वडील आणि वहिनींपेक्षा धनाढ्य आहेत. त्यांच्याकडे १६७ कोटींची संपत्ती आहे. सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबाची (दिवंगत पती अजित पवार व इतर) एकत्रित संपत्ती सुमारे १२१.७९ कोटी रुपये आहे. सुनेत्रांची खरी ताकद त्यांच्या जमिनींमध्ये आहे. त्यांच्याकडे स्वतःच्या नावे ६७.६७ कोटींची स्थावर मालमत्ता असून त्यात बारामतीतील मौल्यवान शेतजमीन आणि व्यावसायिक इमारतींचा मोठा वाटा आहे. कुटुंबाची एकूण स्थावर मालमत्ता ८७ कोटींहून अधिक आहे. राज्यसभा, बारामती पोटनिवडणुकीत दाखल प्रतिज्ञापत्रातून माहिती उघड वाहन : शरद पवारांकडे स्वतःची गाडी नाही. सुनेत्रांकडे टोयोटा कॅमरी (३७.६५ लाख), इनोव्हा (३८.३९ लाख), ५-६ ट्रॅक्टर्स, ट्रेलर्स आहेत. त्यांच्या जंगम मालमत्तेचे मूल्य २३.२५ कोटी रु. आहे. १६.५३ कोटींचे कर्जही आहे. शरद पवार: ८६ वर्षीय शरद पवारांनी जमिनीपेक्षा शेअर्स आणि मुदत ठेवींत जास्त गुंतवणूक केली. ४४.७१ कोटी रु.ची ‘जंगम’ मालमत्ता आहे. पत्नी प्रतिभा यांच्या नावे २७.७७ कोटी गुंतवणूक आहे. पवारांवर ४९ लाखांचे कर्ज आहे.
दैवीशक्तीच्या नावाने लैंगिक शोषण
सातपुतेंची माहिती, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर नाशिक : प्रतिनिधी भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील ११ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करीत आहे. दैवीशक्ती असल्याचे भासवून आरोपी खरात महिलांचे लैंगिक शोषण करायचा. मंदिर परिसरात हातचलाखीचा वापर करून समाजात अंधश्रद्धा पसरवायचा. कुटुंबात मृत्यूची भीती दाखवून महिलांना धमकावत असल्याचे समोर आले. या प्रकरणात ३० […] The post दैवीशक्तीच्या नावाने लैंगिक शोषण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमेरिकेची इराणला थेट भीषण हल्ल्याची धमकी
इराण संस्कृती संपविणार, जगभरात धाकधूक वाढली वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा गंभीर इशारा देत आजची रात्र इराणसाठी काळरात्र असून इराणच्या संस्कृतीचे नामोनिशाण मिटवू, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर आता पश्चिम आशियाच नव्हे तर संपूर्ण जगाची धाकधूक वाढली आहे. इराणच्या बाबतीत असे काही घडावे, […] The post अमेरिकेची इराणला थेट भीषण हल्ल्याची धमकी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथील वादग्रस्त पुतळा प्रकरणात पोलिसांनी तपासाचा फास अधिक आवळला आहे. पुतळा पुरवणारा मुख्य सूत्रधार बाळराजे ऊर्फ बाळू आवारे याच्या जालन्यातील कारखान्यावर प्रशासनाने टाळे ठोकले असून, त्याच्या एका जवळच्या साथीदारालाही सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे अनधिकृत पुतळे तयार करणाऱ्या आणि बसवणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत. माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे धनगर समाजाच्या देवस्थान परिसरात बाळू आवारेने कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय रात्रीतून पुतळा बसवला होता. या घटनेमुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होऊन त्याचे रूपांतर दगडफेक आणि दंगलीत झाले होते. या प्रकरणात दोन्ही गटांतील अनेकांवर आणि मुख्य सूत्रधारावर आतापर्यंत आठ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कृषी केंद्राच्या नावाखाली पुतळा निर्मितीचा बनाव जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथे बाळू आवारेचा हा कारखाना सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे, शासकीय गायरान जमिनीवर 'कृषी अवजारे सेवा केंद्र' असल्याचे भासवून एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतपणे पुतळ्यांची निर्मिती केली जात होती. अंबडच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलिसांनी या कारखान्यावर धाड टाकून तो सील केला आहे. सहकाऱ्याला सीमेवरून अटक बाळू आवारेला तीन दिवसांपूर्वीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर आता त्याचा सहकारी संभाजी आघाव याला सोलापूर-धाराशिव सीमेवरून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. गंभीर गुन्ह्यांची नोंद बाळू आवारेवर केवळ माढाच नव्हे, तर करमाळा तालुक्यातील पुनावर येथेही अशाच प्रकारे विनापरवाना पुतळा बसवल्याचा आरोप आहे. त्याच्यावर जातीय तेढ निर्माण करणे, चिथावणीखोर भाषणे देणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे यांसारखे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. हे ही वाचा… मुंबईकरांचा प्रवास सुसाट!:दहिसर-काशिगाव मेट्रोचे मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण; मिरा-भाईंदरच्या 'त्या' वादग्रस्त उड्डाणपुलावरही दिले स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई मेट्रो मार्ग ९ च्या पहिल्या टप्प्याचे थाटात उद्घाटन करण्यात आले. दहिसर पूर्व ते काशिगाव दरम्यान धावणारी ही नवी मेट्रो मार्गिका बुधवारपासून सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार असून, यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या सोहळ्याला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या मिरा-भाईंदर येथील उड्डाणपुलाच्या वादग्रस्त रचनेवरही भाष्य करत प्रशासनाची बाजू मांडली. सविस्तर वाचा…
कावलगुडा (बु) येथे २५० जणांना अन्नातून विषबाधा
सर्वजण उमरी ग्रामीण रुग्णालयात, आरोग्य यंत्रणा सतर्क उमरी : कैलास सोनकांबळे उमरी तालुक्यातील कावलगुडा (बु) येथे मंदिरात आयोजित सामूहिक भोजन कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणावर अन्न विषबाधेची घटना घडली. या घटनेत सुमारे २५० ग्रामस्थांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी गावातील मंदिरात आंबील व वरण,भाताचा कार्यक्रम आयोजित […] The post कावलगुडा (बु) येथे २५० जणांना अन्नातून विषबाधा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
“पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषद ही केंद्र आणि राज्यांमधील समन्वय अधिक मजबूत करत शेती क्षेत्रासाठी ठोस दिशा देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. या माध्यमातून घेतलेले निर्णय थेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीस चालना देतील,” असे मत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. ते आज जयपूर येथे आयोजित पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषदेत बोलत होते. देशातील कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्षेत्रीय परिषदांच्या मालिकेची सुरुवात आज जयपूर येथे पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषदेद्वारे झाली. या परिषदेत महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि गोवा राज्यांचे कृषी मंत्री आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. महाराष्ट्र सरकार व कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेले महाविस्तार अँप, अॅग्रिस्टॅक व एआय धोरण यांचे या परिषदेत अनेकांनी कौतुक केले. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परिषदेत केंद्र-राज्य समन्वय बळकट करणे, विविध कृषी योजनांचा आढावा घेणे तसेच आगामी खरीप हंगाम 2026 साठी धोरण निश्चित करणे यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेताना अॅग्रिस्टॅक अंतर्गत 1.32 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि निर्यात क्षेत्रातील आघाडीचा उल्लेख केला. मात्र, 2025-26 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहितीही देण्यात आली. सुमारे 136 लाख शेतकरी आणि 105 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून राज्य सरकारने 20,196 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार त्यानी व्यक्त केले. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचेही सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षीच्या सुरुवातीला देखील अवकाळी पावसाचा फटका बसत 29 जिल्ह्यांतील 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. सध्या प्रशासनाकडून पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच बाधित शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारकडेही अतिरिक्त मदतीची मागणी करण्यात आली आहे,असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. खरीप 2026 साठी राज्याने 158.92 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले असून बियाणे व खतांचा पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. बीबीएफ तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आणि आधुनिक शेती पद्धतींचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,“केंद्र आणि राज्य सरकारांच्या समन्वयातून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून आणि प्रभावी अंमलबजावणीद्वारे खरीप हंगाम 2026 यशस्वी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांना सक्षम करण्याचे काम सातत्याने सुरू राहील.” तसेच त्यांनी पुढे असेही नमूद केले,“अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवरही महाराष्ट्रातील शेतकरी खंबीरपणे उभा आहे. शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असून, तातडीने मदत आणि दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे शेती अधिक सक्षम करण्यावर आमचा भर आहे.” या परिषदेमुळे आगामी काळातील कृषी धोरणांना दिशा मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. याप्रसंगी माननीय केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री शिवराज सिंह जी चौहान साहेब, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलालजी शर्मा साहेब, केंद्रिय कृषी राज्यमंत्री श्री.भगीरथजी चौधरी साहेब, राजस्थानचे कृषी मंत्री श्री.डॉ.किरोड़ी लाल मीना जी, गुजरातचे कृषी मंत्री श्री.जितुभाई सवजीभाई वाघानी जी, मध्य प्रदेशचे कृषी मंत्री श्री.ऐदल सिंह कंसाना जी, गोव्याचे समाज कल्याण मंत्री श्री.सुभाष उत्तम पाल देसाई जी, कृषी विभागाचे केंद्रिय प्रधान सचिव श्री.अतिश चंद्रा यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते.
मेळघाटमधील सेमाडोहजवळील आदिवासींचे श्रद्धास्थान असलेले भूमका बाबा देवस्थान चैत्र महिन्यात नेहमीप्रमाणे खुले राहणार आहे. वन विभागाने यावर्षी पूजा-अर्चा थांबवण्याचा घेतलेला निर्णय खासदार बळवंत वानखडे यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे. हे देवस्थान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येत असल्याने वन विभागाने येथे पूजा आणि महाप्रसाद करण्यास मनाई केली होती. या निर्णयामुळे आदिवासींमध्ये तीव्र नाराजी पसरली होती, कारण हे देवस्थान त्यांची श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचे केंद्र आहे. आदिवासी बांधवांनी खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे तक्रार करून चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर खासदार वानखडे यांनी तातडीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक व क्षेत्र संचालक आदर्श रेड्डी आणि उपवनसंरक्षक (प्रादेशिक) अर्जुना यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीला मेळघाटमधील आदिवासी प्रतिनिधी आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्वांशी झालेल्या चर्चेअंती, भूमका बाबा देवस्थानच्या यात्रेवरील बंदी स्थगित करण्याचा आणि चैत्र महिन्यात हे क्षेत्र खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या सकारात्मक चर्चेमुळे नियोजित आंदोलन मागे घेण्यात आले. भूमका बाबा देवस्थान हे अमरावती, बैतुल आणि खंडवा (मध्यप्रदेश) येथील आदिवासी व गैरआदिवासी बांधवांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. येथे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक मन्नत मागण्यासाठी येतात. या बैठकीला माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सभापती महेंद्रसिंग गैलवार, राजेश सेमलकर, विलास बोरेकर, पंकज मोरे, राहुल येवले, गोलू मुंडे आणि वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, भूमका बाबा देवस्थान आठवड्यातून केवळ एक दिवस दर्शनासाठी खुले केले जात होते. आता चैत्र महिन्यात ते पूर्णपणे खुले राहणार आहे.
नवीन सीईओ सत्यम गांधी यांचा पहिला आदेश जारी:ओळखपत्र, हलचल रजिस्टरशिवाय दौरा अडचणीचा ठरणार
अमरावती जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ओळखपत्रे अनिवार्य करण्यात आली आहेत. तसेच, वरिष्ठांच्या सूचनेनुसार मुख्यालयाबाहेर दौऱ्यावर किंवा बैठकीसाठी जाण्यापूर्वी हलचल रजिस्टरमध्ये नोंद करणे बंधनकारक असेल. नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी हे आदेश जारी केले आहेत. सीईओ गांधी यांनी सोमवारी सकाळी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी हे परिपत्रक जारी केले. या परिपत्रकात ओळखपत्र आणि हलचल रजिस्टरच्या नियमांव्यतिरिक्त एकूण पाच प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी लगेच विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रत्येक विभागाची सखोल पाहणी केली, ज्यात त्यांना काही त्रुटी आढळल्या. २०१८ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असलेले सत्यम गांधी हे कामकाजाच्या बाबतीत कठोर मानले जातात. त्यांनी पहिल्याच दिवशी कामात हयगय खपवून घेतली जाणार नाही आणि भ्रष्ट प्रवृत्तीला थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला. त्यांच्या आदेशानुसार, यापुढे ओळखपत्राविना काम करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर तत्काळ प्रशासकीय कारवाई केली जाईल. तसेच, विनाकारण बैठका किंवा दौऱ्याचे कारण देऊन मुख्यालयात अनुपस्थित राहणाऱ्यांवरही अंकुश ठेवला जाईल.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत आदिवासीबहुल मेळघाटमध्ये अनेक विकास कामे केल्याचा दावा केला जातो. मात्र, युवक काँग्रेसने हे जलजीवन मिशन मेळघाटात पूर्णपणे फसल्याचा आरोप केला आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सांगून त्याची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी केली जावी, अशी युवक काँग्रेसची मागणी आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्या मते, 'हर घर-नल से जल' ही पंतप्रधानांच्या नावाने सुरू करण्यात आलेली योजना याठिकाणी सपशेल अयशस्वी ठरली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत खटकाली, मेनघाट आणि गरजधारी येथे पाणी वितरणासाठी एक ते दीड मीटर जलवाहिनी दाखवून त्यावर लाखो रुपये खर्च दर्शविण्यात आला. परंतु, प्रत्यक्षात ती पाइपलाइन जमिनीवरच आहे; खोदकाम करून ती जमिनीत दाबण्यात आली नाही. याउलट, प्रत्येक गावातील पाणी वितरण व्यवस्थेचे खोदकाम जास्त दाखवून मोठी बिले काढली गेली. त्याचप्रमाणे, मेळघाटमधील जलजीवन मिशनमध्ये जुन्याच जलकुंभांना रंगरंगोटी करून मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची रक्कम हडप केली गेल्याचा आरोपही युवक काँग्रेसने केला आहे. अनेक ठिकाणी जुन्या टाक्यांची दुरुस्ती न करता केवळ रंगरंगोटी करून निधी लाटण्यात आला. चिखलदरा तालुक्यातील चिलाटी येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गतची जुनी टाकी २०१२-१३ मध्ये बांधली गेली होती. ती टाकी पूर्णपणे हलते आणि तिला गळतीही लागली आहे. तरीही, २०२२-२३ मध्ये त्या टाकीची रंगरंगोटी करून लाखो रुपये खर्च करण्यात आले. पण, पाणीपुरवठा अजूनही बंदच आहे. सुमिता येथेही असाच प्रकार करण्यात आला असून, तेथील खर्चाची उचलही करण्यात आली आहे. सरवारखेडा येथे एका टाकीत एकही दिवस पाणी गेले नाही, तरीही दुसरी नवीन टाकी बांधली गेली. आता दोन्ही टाक्यांमध्ये एकही थेंब पाणी जमा झाले नाही. सद्यस्थितीत तेथील आदिवासी बांधवांना डोक्यावर घागर ठेवूनच पाणी आणावे लागते. रुईपठारला नवीन टाकी बांधली, त्यात डोमीवरून पाइपलाइन टाकून पाणी आणले, परंतु नवीन टाकीत एकही थेंब पाणी नाही. लोक आजही जुन्याच टाकीचे पाणी वापरतात आणि डोक्यावर पाणी आणावे लागते. कुहीला दोन टाक्या आहेत, तरी पाणीपुरवठा होत नाही. लोकांना विहिरीवरून डोक्यावर पाणी आणावे लागते. सिमोरी येथे टाकी बनविली, तेव्हापासून आजपर्यंत टाकीत पाणीच गेले नाही. चोबिता आणि चुर्णीचा पाणीपुरवठाही बंद आहे. पीपल्या येथील पाणीपुरवठा बंद असून, नळाला पाणी येत नाही. कारादा येथेही हीच स्थिती आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती गठित करणे आवश्यक असल्याचे युवक काँग्रेसने म्हटले आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहिगाव येथील सात वर्षीय सोहम मोहन नेसनेसकर याने व्हिएतनाम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. मात्र, आता त्याला पुढील दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. सोहमने या स्पर्धेत जपान, मलेशिया आणि यजमान व्हिएतनामसारख्या देशांतील स्पर्धकांना मागे टाकून हे यश मिळवले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला ‘भारत भूषण’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि सुवर्णपदकाचा समावेश होता. सध्या सोहम ओम इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिकत आहे. त्याला भविष्यात उच्च शिक्षण आणि प्रशिक्षण घ्यायचे आहे. कुटुंबाचे उत्पन्न अत्यंत मर्यादित असल्याने त्याच्या पालकांनी समाजाला मदतीचे आवाहन केले आहे. सोहमने वयाच्या चौथ्या वर्षापासून योगाभ्यास सुरू केला. सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्याने फेब्रुवारी २०२५ मध्ये राष्ट्रीय योगा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. याच यशाच्या बळावर त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. सोहमचे वडील फिजिओथेरपीचे शिक्षण घेतलेले असून, लकवाग्रस्त रुग्णांची मालिश करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत मर्यादित उत्पन्नातून ते घरखर्च सांभाळत सोहमच्या शिक्षणासाठीही बचत करत आहेत. व्हिएतनाम येथे स्पर्धेला जाण्यासाठी त्यांना सुमारे १ लाख ८० हजार रुपये खर्च आला होता. या खर्चापैकी कर्नाटक टीमने ५० हजार रुपये, तर काही सामाजिक संस्था, शाळा, ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले होते. दर्यापूर येथील रोहिणी फाउंडेशनने ३० हजार रुपयांची मदत केली. उर्वरित रक्कम वडिलांनी जुळवली होती, परंतु वारंवार उद्भवणाऱ्या खर्चासाठी त्यांना अशी जुळवाजुळव करणे शक्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सोहमला आतापर्यंत ‘महाराष्ट्र गौरव’, ‘राष्ट्र गौरव’ आणि ‘क्रीडा शिरोमणी’सह एकूण १४ राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला होता.
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) नांदगाव खंडेश्वर येथे तीव्र निदर्शने केली. खरातवर कठोर कारवाई करण्यासोबतच त्याच्या संपर्कात असलेल्या ३९ आमदारांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी करण्यात आली. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बस स्टॉपसमोर हे आंदोलन केले. माकपच्या मते, अशोक खरात याने बुवाबाजीच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. राज्यातील ३९ आमदार खरातच्या तंत्र-मंत्र भोंदूगिरीत सामील झाले असल्याचा आरोपही पक्षाने केला आहे. या आमदारांची यादी राज्य सरकारने तातडीने जाहीर करावी आणि त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी माकपने केली आहे. तसेच, पीडित महिलांचे समाजमाध्यमांवर व्हायरल होणारे व्हिडिओ त्वरित हटवण्यात यावेत, अशी विनंतीही करण्यात आली. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष सुरू करून ते तातडीने कार्यान्वित करावेत, अशी मागणीही आंदोलकांनी केली. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात तहसीलदारांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले. निवडून आलेले लोकप्रतिनिधी संविधानिक पदावर असतात आणि संविधानाने त्यांच्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याची व तो जनतेत रुजवण्याची जबाबदारी दिली आहे. ही संविधानिक जबाबदारी पार न पाडता, उलट वर्तन करणे म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्याचे उल्लंघन आहे, असे माकपने म्हटले आहे. अशा लोकप्रतिनिधींमुळे तंत्र-मंत्र, जादू-टोणा यांसारख्या अंधश्रद्धांना राजमान्यता मिळते आणि सामान्य जनता भोंदू बाबांच्या फसवणुकीला बळी पडते. भोंदू बाबा जितके गुन्हेगार आहेत, तितकेच त्यांना समर्थन देणारे, त्यांच्याकडे शरण जाणारे आणि आपल्या अनुयायांना अशा बुवा-बाबांवर विश्वास ठेवण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दिशानिर्देश करणारे लोकप्रतिनिधीही गुन्हेगार आहेत. अशा गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या शोषणाला बळी पडलेल्या अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर फिरत आहेत, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे. हे व्हिडिओ समाज माध्यमांतून तातडीने हटवण्याची कारवाई राज्य सरकारने करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात माकपचे तालुका सचिव शाम शिंदे, अशोक केसारखाने, विजय पाटील, योगेश महल्ले, दीपक अंबाडरे, राजेंद्र राऊत, प्रभाकर खडसे, दिलीप महल्ले, शत्रुघ्न नगर, लक्ष्मण झिमटे, रामदास मते, नारायण सोनोने, ज्ञानेश्वर शिंदे, मारुती बंड, विशाल शिंदे, किशोर शिंदे, लालचंद इंगोले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त खोलापूर येथे विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान आरोग्य मंदिर आणि जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळेच्या वतीने ही रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीद्वारे स्वच्छता, आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. शाळेच्या प्रांगणातून रॅलीची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी “स्वच्छ गाव – निरोगी गाव”, “आरोग्य हेच धन आहे” आणि “हात धुवा, रोग टाळा” अशा घोषणा देत संपूर्ण गावातून फेरी काढली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांच्या हातात आरोग्यविषयक संदेश देणारे फलक होते. गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या रॅलीमध्ये आरोग्य विभागातील अधिकारी, आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तिका आणि आशा वर्कर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना स्वच्छता, आरोग्य तपासणी, लसीकरण आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व समजावून सांगितले. मुख्याध्यापक विनीत पारडे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी नियमित व्यायाम, स्वच्छता आणि संतुलित आहारावर भर देण्याचे आवाहन केले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन केले. या यशस्वी रॅलीमुळे गावात आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यामध्ये लखनसिंग जाधव, आशिष भुयार, कविता भेले, मंगेश ढाकर आणि मुख्याध्यापक विनीत पारडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

28 C