ईदसाठी कपडे आणायला जाणाऱ्या 2 मित्रांचा मृत्यू:अज्ञात वाहनाची धडक, जरूर फाटा येथील घटना
खंडाळा अज्ञात वाहनाने दोन दुचाकींना जोराची धडक दिल्याने दोन मित्रांचा मृत्यू झाला. एक जण किरकोळ जखमी झाला. ही घटना २८ फेब्रुवारी रोजी खंडाळ्याजवळील जरूर फाटा येथे घडली. आयान शहा व आरमान शेख अशी मृतांची नावे आहेत. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील अरमान शरीफ शेख (१९), आयान रमजान शहा (१९) हे दोघे एका दुचाकीवर व फैजल लाला खान (२०) हा एका दुचाकीवर असे तिघे २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास खंडाळा येथून वैजापूरला ईद सणानिमित्त कपडे खरेदी करण्यासाठी जात होते. जरूर फाटा येथे समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात आयान शहा व अरमान शेख हे गंभीर जखमी झाले. फैजल खान हा किरकोळ जखमी झाला. अपघातस्थळी जमा झालेल्या नागरिकांनी सर्व जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या वेळी डॉक्टरांनी आयान शहा याला तपासून मृत घोषित केले. अरमान शेख हा गंभीर जखमी असल्याने प्राथमिक उपचार करून त्याला छत्रपती संभाजीनगर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु अर्ध्या रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. त्यामुळे उत्तरीय तपासणीसाठी त्याला उपजिल्हा रुग्णालय, वैजापूर येथे दाखल करण्यात आले. अरमान शेख आयान शहा आयशरची धडक? प्रत्यदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकींना धडक देणारा वाहन आयशर ट्रक असून त्यामध्ये ऊसतोड मजूरांना नेले जात होते. अपघातानंतर ट्रकचालकाने वाहन न थांबवता सुसाट वेगाने जानेफळच्या दिशेने पलायन केल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
2 महिन्यांपूर्वी लग्न झालेला तरूण ठार तर आई गंभीर:हायवाची दुचाकीला धडक; धानोरा फाट्यालगत घटना
भरधाव छोटा हायवाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील मुलगा ठार झाला असून, आई गंभीर जखमी झाली. ही घटना शनिवारी ( २८ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. कन्नड तालुक्यातील आडगाव भोसले येथून धार्मिक कार्यासाठी भोकरदनला जात असलेले अमोल भोसले, आई गीताबाई भोसले दुचाकीने (एमएच २० ईबी ०९४३) सिल्लोडकडे येत होते. या वेळी छोटा हायवा (एमएच २० जीझेड ४९२८) च्या चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेत अमोल भोसले जागीच ठार झाले. गीताबाई भोसले गंभीर जखमी झाल्या. त्यांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमोलचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. गीताबाई यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अपघातामध्ये जागीच ठार झालेले अमोल भोसले यांचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. ते आडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य होते. गावातील विविध धार्मिक कार्यक्रमांत त्यांचा कायम पुढाकार राहायचा. त्यांच्यावर आडगाव येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत ग्रा.पं.चा होता सदस्य
पिकअप- टेम्पो ट्रॅव्हल्स अपघातामध्ये नऊ गंभीर:गल्लेबोरगावजवळ दुर्घटना, सूचना फलकांचा अभाव
गल्लेबोरगाव सोलापूर-धुळे महामार्गावरील गल्लेबोरगावजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या निष्काळजी कामामुळे आणखी एक भीषण अपघात शुक्रवारी (दि.२७) पहाटे घडला. दूध वाहतूक करणारा पिकअप आणि खासगी प्रवासी बस (टेम्पो ट्रॅव्हल) यांची समोरासमोर धडक होऊन सात प्रवासी गंभीर जखमी झाले. या घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गल्लेबोरगावजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू असून वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. मात्र या बदलाची कोणतीही स्पष्ट सूचना देणारे फलक लावण्यात आलेले नाहीत. रस्त्यावर तात्पुरता दुभाजक नाही, रिफ्लेक्टर नाहीत तसेच प्रकाशयोजनाही नाही. परिणामी रात्रीच्या वेळी वाहनचालक पूर्णपणे अंदाजावर वाहन चालवत असल्याचे चित्र आहे. याच निष्काळजीपणाचा फटका बसत चाळीसगाव येथून छत्रपती संभाजीनगरकडे दूध घेऊन जाणारा पिकअप (एमएच १९ बीएम ३०९५) आणि विरुद्ध दिशेने सातारा येथून उज्जैन येथे देवदर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणारी खासगी प्रवासी बस (एमएच १२ व्हीटी ५४९५) यांना बसला. दोेन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील सात प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींची नावे अशी : पिकअपचालक दया राठोड (२६, रा. चाळीसगाव), टेम्पो ट्रॅव्हलचालक विशाल कोळी (३३, रा. सातारा), राजश्री घाडगे (३६), कविता पवार (५३), सीमा कदम (५४), वैशाली विराज चव्हाण (४०), संजय सुरेश वीर (४०, सर्व रा. सातारा), नितीनकुमार (१८), सर्वन बैठा (१९, दोघे रा. बिहार). जखमींना स्थानिकांच्या मदतीने महामार्ग पोलिसांनी रुग्णालयात हलवले होते, अशी माहिती प्राप्त झाली. रोजचाच आहे धोका, प्रशासन मात्र बेफिकीर येथे रोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. अनेकदा तक्रार केली, पण कुणी ऐकत नाही, असा संतप्त सूर ग्रामस्थांनी व्यक्त केला. रात्री रस्ता कुठे वळतो आणि समोरून वाहन येतेय का हेच कळत नाही, असे एका वाहनचालकाने सांगितले. ग्रामस्थांनी याबाबत वारंवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना माहिती दिल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.
मक्याचे भाव कोसळले:केवळ 1300 रुपये दराने होतेय खरेदी
प्रतिनिधी | घाटनांद्रा घाटनांद्रासह परिसरात खरिपातील मक्याचे दर अचानक घसरल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. काही दिवसांपूर्वी १६०० ते १७०० रुपये प्रतिक्विंटल असलेला मका सध्या १३०० रुपयांवर आल्याने भाववाढीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या अपेक्षांवरच पाणी फेरले गेले आहे. सध्या शेतकऱ्यांच्या हातात खरिपातील मका हेच मुख्य उत्पन्नाचे साधन उरले आहे. मात्र त्याचेही दर गडगडल्याने कुटुंबाचा आर्थिक ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे. यंदा कपाशीच्या पिकालाही अपेक्षित साथ मिळाली नाही. केवळ एक-दोन वेचणीतच पऱ्हाट्या झाल्याने उत्पादन घटले. जर चार-पाच वेचण्या झाल्या असत्या, तर शेतकऱ्यांच्या हातात काहीसा पैसा राहिला असता, अशी खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत.या भागात मका व कापूस हीच प्रमुख पिके घेतली जातात. इतर पर्यायी पिकांची लागवड कमी असल्याने उत्पन्नाचे दुसरे साधन उपलब्ध नाही. त्यामुळे या दोन्ही पिकांवरच अवलंबून राहावे लागते. मात्र यंदा दोन्ही पिकांनी साथ न दिल्याने आर्थिक संकट अधिकच गडद झाले आहे. यावर्षी पावसाची साथ चांगली लाभल्याने रब्बी पिके जोमात आली असली तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अंतिम उत्पादन हातात येईपर्यंत शेतकऱ्यांची चिंता कायम असते. त्यातच बाजारभावातील चढ-उतारामुळे अनिश्चितता वाढली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी वाढलेले रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी व इतर खर्चाचा विचार करता १३०० ते १४०० रुपयांचा दर परवडणारा नसल्याचे स्पष्ट केले आहे. मक्यास किमान २००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव शासनाने जाहीर करावा,अशी मागणी बाजीराव मोरे, रामकृष्ण मोरे,कचरु मोरे, धनराज मोरे,राजु चव्हाण व इतर शेतकरी वर्गातून होत आहे.एकूणच, उत्पादन खर्च वाढत असताना बाजारभाव घसरल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. इथेनॉल निर्मितीच्या समीकरणाचा परिणाम दर घसरणीमागे इथेनॉल निर्मितीचे बदलते समीकरण कारणीभूत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. इथेनॉल उत्पादक कंपन्यांकडून तांदळाची खरेदी वाढली असून मक्याची मागणी घटली आहे. तसेच वाहतूक, हमाली आणि इतर खर्चात वाढ झाल्याने व्यापाऱ्यांनाही तोटा सहन करावा लागत असल्याचे व्यापारी विष्णु मोरे, मोहसीन देशमुख यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उंडणगाव येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर चाललेल्या शिबिरात एकूण १९५ रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. या शिबिराचे आयोजन उंडणगाव येथील बालाजी संस्थानच्या पुढाकारातून करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर येथील समता फाउंडेशन, चिकलठाणा तसेच लॉयन्स नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला. तपासणी दरम्यान १० रुग्णांमध्ये मोतीबिंदू आढळून आला असून त्यांची शस्त्रक्रिया लॉयन्स नेत्र रुग्णालयात विनामूल्य करण्यात येणार आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांची ने-आण, राहण्याची तसेच अन्य आवश्यक सोयी संस्थेच्या वतीने मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उंडणगाव येथे अशा प्रकारचे नेत्रतपासणी शिबिर नियमितपणे आयोजित केले जाते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सातत्याने नेत्रसेवेचा लाभ मिळत आहे. या शिबिरासाठी डॉ. श्यामली जाधव, डॉ. सुमित, समन्वयक जनार्दन तळपे, अविनाश सोनवणे, रितेश केवट व शांताराम धनवई यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच मुकुंद धनवई, नानाराव सनान्से, अहेलाजी सपकाळ आदींनी सहकार्य केले. आयोजकांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त केला आहे.
सहेरीसाठी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास आईसोबत झोपेतून उठलेली ४ वर्षांची आयेशा मुनावर शेख या चिमुकलीच्या डोळ्यांत झोप, चेहऱ्यावर निरागस हास्य होतं.ती घराबाहेर ओट्यावर बसलेली असताना ४ मोकाट कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. एवढेच नव्हे तर दहा फुटांपर्यंत तिला फरफटत नेले. तेव्हा तिचे कुटुंबीय घरातच होते. सहेरीसाठी उठलेल्या परिसरातील नागरिकांनी कुत्र्याच्या हल्ल्यातून मुलीला वाचवून घरी आणले तेव्हा तिच्या आईच्या किंकाळ्यांनी पहाटेची शांतता चिरली. या वेळी कुठलाही वेळ न घालवता आयेशाला घाटीत दाखल केले. ही हृदयद्रावक घटना नारेगावात शनिवारी (२८ फेब्रुवारी) पहाटे घडली. चिमुकल्या आयेशाच्या अंगावर १०० वर जखमा झाल्या असून तिच्यावर सध्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात चिमुकल्या आयेशाच्या अंगावरील कोणताच भाग शिल्लक राहिला नाही की, ज्या ठिकाणी कुत्र्यांनी जखमा केल्या नाहीत. त्याच अवस्थेत रक्ताने माखलेली आयेशा आईच्या कुशीत कोसळली. आईचा हंबरडा आणि चिमुकलीच्या वेदना पाहून परिसरातील लोकही सुन्न झाले. नातेवाइकांनी धाव घेत कसेबसे तिला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले, पण तोपर्यंत तिच्या अंगावर खोल जखमा झाल्या होत्या. दोषींवर कारवाई करणारच चिमुरडीच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात येताच तिला भरती करून घेतले. अधिष्ठातांच्या पूर्वपरवानगीशिवाय तिला डिस्चार्ज देऊ नये, असे आदेश बालरोग विभागास दिले.या प्रकरणात शस्त्रक्रिया विभागाने रुग्णाला भरती करून घेण्यास हलगर्जीपणा केल्याचे आढळल्यास संबंधित वरिष्ठ डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात येईल. -डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, घाटी. मुलीच्या अंगावर गंभीर जखमा; सध्या घाटीत उपचार सुरू मुलीला रुग्णालयात आणल्यानंतर तिला एआरएस आणि एआरव्ही लस दिली, जखमा स्वच्छ करून ड्रेसिंग केले. प्राथमिक उपचारानंतर तिला घरी पाठवले होते, मात्र पुन्हा त्रास जाणवू लागल्याने तिला आता रुग्णालयात भरती करून घेण्यात आले आहे.-डॉ. प्रभा खैरे, बालरोग विभागप्रमुख, घाटी. एमआयएमच्या हस्तक्षेपानंतर उपचार सुरू घटनेची माहिती मिळताच विरोधी पक्षनेते समीर बिल्डर, नगरसेवक काकासाहेब काकडे आणि मतीन पटेल यांनी जखमीच्या घरी जाऊन तिची विचारपूस केली आणि तिला तत्काळ घाटीत दाखल केले. त्यांच्या हस्तक्षेपानंतर आयेशावर उपचार सुरू करण्यात आले. आयेशाची आई ही पतीपासून काही दिवसांपासून विभक्त असून ती नारेगावात आजोबांकडे राहून कंपनीत कामगार म्हणून काम करते. दोन मोठी भावंडे आणि ही चिमुकली आयेशा राहत होते. नातेवाइकांची २ तासांची परवड रक्तबंबाळ अवस्थेत आयेशाला घाटीत नेण्यात आले. डॉक्टरांनी १ इंजेक्शन दिल्यानंतर ३ नंबर वॉर्डात जा, २४ नंबर वॉर्डात जा, अशी टोलवाटोलवी केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. जवळपास २ तास जखमी मुलीला घेऊन या वॉर्डातून त्या वॉर्डात फिरावे लागल्याचे त्यांनी सांगितले. सुटी झाली, घरी जा, असे सांगून परत पाठवण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. ती सुन्न झाली होती, तिच्या अंगावरील कपडे फाटले होते आम्ही सकाळी ३.३० वाजता सहेरीसाठी उठलो. माझी नात आयेशाही जागी झाली. तिच्याकडे १० रुपये होते. ती पैसे घेऊन बाहेर ओट्यावर बसली. आम्ही सहेरीची तयारी करत होतो तेव्हा काही कुत्रे आले. तिला १० फुटांपर्यंत फरफटत नेले. अक्षरश: तिचे लचके तोडले. सहेरीसाठी उठवणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार बघितला. त्यांनी आयेशाला घरी आणून सोडले. तोपर्यंत ती सुन्न झाली होती. तिच्या अंगावरील सर्व कपडे फाटले होते. घटना घडल्यानंतर तिला आम्ही घाटीत नेले. त्यांनी आम्हाला ३ नंबर वॉर्डमध्ये जाण्याचा सल्ला दिला. आम्ही तेथे गेलो.- नसीम बेगम, जखमी आयेशाची आजी. आयेशा, तुझ्या जखमेवर निर्लज्ज अधिकाऱ्यांचे दात रुतले आहेत... आ येशा, आम्हाला माफ कर. आमच्या व्यवस्थेच्या दाढेला रक्ताची चटक लागली आहे. आता यात कुणीही सुरक्षित नाही. चार महिन्यांपूर्वी याच व्यवस्थेने जाफर गेटच्या जुन्या मोंढा भागात तीन वर्षांच्या अरमान शेखचा बळी घेतला होता. ही व्यवस्था नवीन शिकारीच्या शोधात होती आणि तू तिच्या समोर आलीस. तुझी चूक तरी काय होती? इतकीच ना, की पवित्र रमजान महिन्यात तू तुझ्या कुटुंबासोबत पहाटे तीन वाजता ‘सहेरी’साठी उठली होतीस. कुटुंब आणि जगाच्या कल्याणासाठी अल्लाहकडे प्रार्थना करत होतीस. दोषी ते चार कुत्रे नाहीत, ज्यांनी तुझ्यावर हल्ला केला. तेसुद्धा शेवटी या व्यवस्थेचेच बळी आहेत. तुला ही नरकयातना देणारे आमचे मनपा अधिकारी आहेत, ज्यांची झोप तुझ्या निष्पाप किंकाळ्यांनीही उघडली नाही. तुझ्या शरीराच्या प्रत्येक जखमेतून वाहणाऱ्या रक्ताचा प्रत्येक थेंब या निर्लज्ज प्रशासनाच्या नाकर्तेपणाची साक्ष देत आहे. यानंतरही त्यांच्या गेंड्याच्या कातडीवर काहीही परिणाम होणार नाही. एका महिन्यापूर्वीच आम्ही आपले प्रतिनिधी निवडले आहेत. महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांना निवडून दिले आहे. पण, त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस. तेसुद्धा याच व्यवस्थेचा भाग आहेत. नेहमीप्रमाणे येतील, दुःख व्यक्त करतील. काहीसा संतापही दाखवतील. एकमेकांवर आरोपही करतील. पण, काहीही बदलणार नाही. आणि, त्याहूनही आम्ही संभाजीनगरकर. आम्ही तर डोळे, कान आणि तोंड बंद करून बसलो आहोत. फोटो पाहून आणि बातमी वाचून क्षणभर मनात राग व्यक्त करू आणि पुन्हा याच नेते-अधिकाऱ्यांचा जयजयकार करणाऱ्या गर्दीचा भाग बनू. आयेशा, आम्हाला माफ कर. आम्ही तुला सुरक्षित ठेवू शकत नाही.
पैठण तालुक्यातील श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणाच्या नावाखाली १६ कोटी ६२ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सचिन घायाळ शुगर प्रा. लि. चे सचिन विक्रमराव घायाळ आणि त्यांच्या इतर भागीदारांविरुद्ध एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा विशेष लेखापरीक्षकांच्या चौकशीत हा कोट्यवधींचा घोटाळा उघडकीस आला आहे. जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश पंडितराव काकडे यांनी याबाबत तक्रार दिली. सचिन घायाळ शुगर प्रा. लि. तर्फे सचिन घायाळ यांनी बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून ३० कोटी रुपयांचे व्यावसायिक कर्ज घेतले होते. हे कर्ज महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची एकरकमी परतफेड योजना (ओटीएस) राबवण्यासाठी, कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण करण्यासाठी घेण्यात आले होते. त्यासाठी मुधलवाडी येथील कारखान्याची जमीन, इमारत, गोदाम आणि यंत्रसामग्री गहाण ठेवण्यात आली होती. त्यासाठी सहकर्जदार व जामीनदार म्हणून बाळासाहेब आगळे, अभिरुची घायाळ, चेअरमन तुषार काशीनाथ शिसोदे, प्रभारी कार्यकारी संचालक रोहित लोंढे आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे. तपासात सहकार्य नाकारले चाचणी लेखापरीक्षणादरम्यान वारंवार लेखी पत्रे देऊनही कारखान्याने आवश्यक दप्तर आणि रेकॉर्ड उपलब्ध करून दिले नाही. अखेर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ८० अन्वये कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या चौकशीत, कर्जाचा विनियोग कारखान्यासाठी झालाच नसल्याचे आणि निधीचा अपहार झाल्याचे उघड झाले. त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला. लेखापरीक्षणात गैरव्यवहार उघड झाल्यानंतर गुन्हा - असा झाला पैशांचा फेरफार : बुलडाणा अर्बन बँकेने वितरित केलेल्या ३० कोटींपैकी १३.१७ कोटी रुपये राज्य सहकारी बँकेच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र, उर्वरित १६ कोटी ६२ हजार रुपये सचिन घायाळ शुगर प्रा. लि. च्या एचडीएफसी बँकेतील चालू खात्यात जमा झाले.- नियम धाब्यावर : कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी कोणतेही अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया किंवा तांत्रिक अहवाल तयार करण्यात आले नव्हते. सभासदांचा विश्वासघात कारखान्याची कोट्यवधींची मालमत्ता गहाण ठेवून घेतलेल्या कर्जाचा विनियोग कारखान्याच्या हितासाठी न करता तो वैयक्तिक फायद्यासाठी वापरण्यात आला. बनावट आणि दिशाभूल करणारे कागदपत्रे तयार करून साखर कारखाना आणि हजारो सभासदांचा विश्वासघात केल्याचा ठपका सचिन घायाळ आणि त्यांच्या भागीदारांवर ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी कागदपत्रांची पडताळणी सुरू केली. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. - निधी वळवला : ही रक्कम कारखान्याच्या कामासाठी न वापरता आयसीआयसीआय बँक, आरबीएल बँक, औरंगाबाद पेपर मिल्स यांसारख्या इतर खासगी संस्थांच्या खात्यांवर वळवण्यात आली. - परवानगीचा अभाव : शासन नियुक्त यंत्रसामग्री खरेदी समितीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हा व्यवहार करण्यात आला. आधुनिकीरण, विस्तारीकरणाचे स्वरूप निश्चित न करता कर्जाची उचल.
एका माथेफिरू विवाहित प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या डोक्यात गावठी कट्ट्याने गोळी झाडून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आयुष्य संपवले. तालुक्यातील अकुलखेडा येथे शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अनिता जगदीश पाटील आणि देवानंद सुभाष धनगर (२६, रा. भामपूर, ता. शिरपूर) अशी मृतांची नावे आहेत. अनिता आणि देवानंद यांच्यात चार-पाच वर्षांपासून प्रेम होते. विवाहानंतर दोघांची ओळख सोशल मीडियावर झाली होती. मात्र काही दिवसांपासून अनिता प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे देवानंदने मोटारसायकलने (एमएच १८ एएम ०८५०) अकुलखेडा गाठले होते. ही घटना अकुलखेडा गावातील प्लॉट भागात हॉटेल संकेतच्या मागे घडली. जगदीश, मला माफ करा.. मेसेज सेंड झाला नाही ‘जगदीश, मला माफ करा. माझे आणि अनिताचे प्रेम आहे, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. मला ती टाळत आहे. दुसऱ्यासोबत बोलते, मी तिला सोडणार नाही आणि मी पण जिवंत राहणार नाही,’ अशा पद्धतीने देवानंदने अनिताचे पती जगदीशला पाठवण्यासाठी व्हॉट्सॲप मेसेज टाइप करून ठेवला होता. परंतु अकुलखेडा येथे घरात गेल्यानंतर त्यांच्यात वाद झाले असतील आणि त्यातून त्याने गावठी कट्ट्याने तिला आणि स्वतःला संपवून घेतले. या घटनेनंतर देवानंदच्या मोबाइलमधून तो मेसेज जगदीशला सेंड करायचा बाकी राहून गेल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गॅस टँकर अपघात वाढत आहेत. त्यानंतर वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी होते. मदतीसाठी आपत्कालीन कर्मचारी, तज्ज्ञांना घटनास्थळी तातडीने पोहोचणे शक्य होत नाही. म्हणून तज्ज्ञांसह सर्व यंत्रणेला घटनास्थळी वेगाने पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्याचा शासनाचा विचार आहे. त्यादृष्टीने सध्या तांत्रिक पडताळणी सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी विधानसभेत दिली. ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीसाठी कोणतीही एसओपी नाही, अशी कबुलीही त्यांनी दिली. ४ फेब्रुवारी रोजी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रोपोलिन गॅसचा टँकर उलटून ३१ तास वाहतूक कोंडी झाली होती. पाच दिवसांपूर्वीही असाच प्रकार घडला होता. या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. २ वर्षांपूर्वी १२ तासांच्या प्रयत्नांनी वाचले होते संभाजीनगर १ फेब्रुवारी २०२४ रोजी तब्बल १८ हजार किलो एलपीजी गॅसची वाहतूक करणारा एचपी कंपनीचा टँकर गुरुवारी पहाटे ५.१५ वाजता छत्रपती संभाजीनगरातील सिडको उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून प्रचंड गॅसगळती सुरू झाली होती. अग्निशमन दल तसेच पोलिसांनी १२ तास प्रयत्न करून गॅस गळतीवर नियंत्रण मिळवले. सिडको चौकाच्या एक किमी परिघातील शेकडो घरे, इमारती रिकाम्या केल्या होत्या.
बांगलादेशींवर कारवाईसाठी प्रत्येक ठाण्यामध्ये पथक:गृहराज्यमंत्री कदम यांची विधान परिषदेत घोषणा
राज्यात, विशेषतः मुंबई आणि परिसरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध राज्य सरकारने आता युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. या घुसखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ‘पाच जणांचे विशेष पथक’ तैनात करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत दिली. गेल्या वर्षभरात भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही शहर, गावांमध्ये बांगलादेशी घुसखोर राहत असल्याचे आरोप केले. त्यानंतर किमान ६ गुन्हे दाखल झाले आहेत. विधान परिषदेत सदस्य प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे घुसखोरांचा प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना कदम यांनी घुसखोरी रोखण्यासाठी सरकारची भूमिका स्पष्ट केली. भाजपची अजेंड्यावर नजर २०२४ मधील २०२ कारवायांच्या तुलनेत २०२५ मध्ये हा आकडा २३७३ वर पोहोचला आहे. घुसखोरांना ठेवण्यासाठी २० कोटींचे पहिले ‘डिटेन्शन सेंटर’ उभारून पक्क्या बंदोबस्ताची तयारी मोठी आहे. केवळ स्थानिक पोलिसच नव्हे, तर एटीएसमार्फत बोगस कागदपत्रांच्या आंतरराज्य रॅकेटचा तपास सुरू केला आहे. बांगलादेशांच्या प्रश्नावरून सरकार आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
ज्या वयात हातामध्ये खेळातील बाहुल्या आणि दप्तराचे ओझे असायला हवे, त्याच वयात राज्यातील शेकडो अल्पवयीन मुलींच्या नशिबी अकाली मातृत्वाचे भीषण वास्तव आले आहे. विधानसभा अधिवेशनात उपस्थित करण्यात आलेल्या एका तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही धक्कादायक माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल ४५३ अल्पवयीन मुली माता झाल्याचा काळजाचा थरकाप उडवणारा आकडा समोर आला असून, ही आकडेवारी समाजाच्या नैतिक अधःपतनाचे जळजळीत दर्शन घडवणारी आहे. केवळ संभाजीनगरच नव्हे, तर अमरावती जिल्ह्यातही गेल्या नऊ महिन्यांत ६० अल्पवयीन मुलींना “कुमारी माता’ व्हावे लागल्याची नोंद प्रशासकीय दप्तरी झाली आहे. रुग्णालयांनी दरपत्रक प्रदर्शित करावे : बोर्डीकर आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचारांचे दरपत्रक व रुग्णांच्या हक्कांची नोंदणी दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे. ज्या रुग्णालयांकडून हे नियम पाळले जात नाहीत, अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असे आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले. शंकर जगताप यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. कायद्याचा धाक की यंत्रणेची हतबलता? विधानसभेत उपस्थित करण्यात आलेल्या या गंभीर मुद्द्यावर मंत्र्यांनी स्पष्ट केले की, अमरावतीच्या ६० प्रकरणांपैकी १२ प्रकरणांमध्ये बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, सुरुवातीला एकाही प्रकरणात पोक्सो किंवा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई न झाल्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. संभाजीनगरमध्ये २०२४ आणि २०२५ या काळात प्रशासनाने १७३ बालविवाह रोखण्यात यश मिळवले असून ९ प्रकरणांत एफआयआर दाखल झाला आहे. तरीही, ४५३ मुलींचे बालपण करपले जाणे हे यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट करणारे आहे. कायद्याचा बडगा उगारण्यापूर्वीच अनेक कळ्या खुडल्या जात आहेत. यंत्रणेचा नवा वेढा आणि आव्हाने या दुष्टचक्राला लगाम घालण्यासाठी सरकारने आता कंबर कसली असून ग्रामसेवक आणि नागरी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून जबाबदारी सोपवली आहे. त्यांना अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांची जोड देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ‘बालविवाह मुक्त भारत’ मोहिमेचा गवगवा होत असला तरी, जोपर्यंत शिक्षण, आरोग्य, गृह विभाग आणि बालकल्याण समित्यांचा ग्रामीण स्तरावर प्रभावी समन्वय होत नाही, तोपर्यंत हे अंधारलेले वास्तव बदलणे कठीण आहे. केवळ नियमांची अंमलबजावणी करून भागणार नाही, तर सामाजिक मानसिकतेवर खोलवर शस्त्रक्रिया करण्याची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली आहे. रेडिओलॉजी’ पीपीपी तत्त्वावरच : मिसाळ राज्यात २३ नोव्हेंबर २०२१ पासून पीपीपी तत्त्वावर एमआरआय, सीटी स्कॅन आणि पीईटी स्कॅनची सुविधा देण्याचे धोरण सुरू करण्यात आले. यासाठी १० वर्षांचा करार करण्यात आला. जर सेवा प्रदात्याचा दर अधिक असेल, तर तो फरक शासन उचलते. त्यामुळे रुग्णाला अतिरिक्त पैसे द्यावे लागत नाहीत. या योजनेमुळे रुग्णांवर कोणताही आर्थिक भार पडत नाही आणि ही योजना सुरू राहणार आहे, असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले.
राज्यातील फूड डिलिव्हरी, कॅब सेवा आणि कुरिअर क्षेत्रात कार्यरत असलेल्या लाखो “गिग वर्कर्स’ साठी राज्य सरकारने कल्याणकारी पाऊल उचलले आहे. या कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि विमा संरक्षण देण्यासाठी लवकरच स्वतंत्र “कल्याणकारी मंडळ’ स्थापन करण्यात येणार आहे. अधिवेशनात विचारलेल्या एका तारांकित प्रश्नाला लेखी उत्तर देताना कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी ही माहिती दिली. केंद्राच्या “सामाजिक सुरक्षा संहिता २०२०’नुसार आता या असंघटित क्षेत्रातील कामगारांना कायदेशीर संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्विगी, झोमॅटो, ओला आणि उबर सारख्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना पार्टनर संबोधले जात असले तरी प्रत्यक्षात वाहन, इंधन, दुरुस्ती आणि विम्याचा सर्व आर्थिक भार कामगारांवरच टाकला जात असल्याची बाब सरकारने अंशतः मान्य केली आहे. विशेषतः ३१ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईतील सुमारे १० हजार डिलिव्हरी बॉइजनी मागण्यांसाठी संप पुकारला होता. या संपाची दखल घेत सरकारने मान्य केले की, केवळ अल्गोरिदमच्या आधारे किंवा एका तक्रारीवरून कामगारांचे आयडी ब्लॉक केले जात असल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. केंद्राच्या सामाजिक सुरक्षा संहितेची अंमलबजावणी राजस्थान आणि कर्नाटकने गिग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी कायदे लागू केले आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही कार्यवाही करण्यात येत आहे. मंत्र्यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने सामाजिक सुरक्षा संहिता २९ सप्टेंबर २०२० रोजी अधिसूचित केली असून २१ नोव्हेंबर २०२५ पासून या संहितेची अंमलबजावणी करण्याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या संहितेनुसार आता गिग वर्कर्स, प्लॅटफॉर्म वर्कर्स आणि असंघटित कामगारांना विविध सामाजिक व कल्याणकारी योजना लागू करण्यासाठी कल्याणकारी मंडळ गठीत करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा मिळवून दिला आहे. कापूस खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी लक्षात घेता, केंद्र सरकारने आता ही मुदत १५ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी विधानसभेत ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या प्रश्नी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, ज्याला आता यश आले आहे. कापूस खरेदीची मुदत संपत असल्याने शेतकरी चिंतेत होते. अनेक ठिकाणी कापूस शिल्लक असल्याने मुदतवाढीची आवश्यकता होती. पणन विभागाने यासंदर्भात प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुदतवाढीमुळे आता शेतकऱ्यांना आपला उरलेला कापूस हमीभावाने विकता येणार आहे. उद्यापासून ५८७५ रुपयांनी हरभरा खरेदी कापसासोबतच राज्य सरकारने हरभरा उत्पादकांसाठीही महत्त्वाची घोषणा केली आहे. १ मार्च २०२६ पासून राज्यात हरभरा खरेदीसाठी शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरू होत आहे. शासनाने हरभऱ्यासाठी ५८७५ रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव निश्चित केला आहे. या निर्णयामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या मार्केटिंगसाठी शेतकऱ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळणार असून बाजारपेठेतील संभाव्य चढ-उतारांपासून त्यांचे संरक्षण होणार आहे.
बंजारा समाजासाठी ६ सदस्यीय समिती गठित
अकोला : प्रतिनिधी बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीला अखेर अधिकृत स्वरूप मिळाले आहे. महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाने ६ सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या अनेक दशकांपासून बंजारा समाजाची एसटी प्रवर्गात समावेशाची मागणी प्रलंबित आहे. ‘हैदराबाद गॅझेटियर’मधील […] The post बंजारा समाजासाठी ६ सदस्यीय समिती गठित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाकिस्तान जिंकला, मात्र स्पर्धेतून बाहेर
श्रीलंकेची चिवट खेळी, न्यूझीलंड उपांत्य फेरीत कोलंबो : वृत्तसंस्था टी-२० विश्वषचकात शनिवारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात लढत झाली. या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेसमोर २१३ धावांचा डोंगर उभा केला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने शेवटपर्यंत झुंज दिली. त्यांनी २०७ धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानने अवघ्या ५ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तानचा विजय झाला असला तरी पाकिस्तान टी-२० […] The post पाकिस्तान जिंकला, मात्र स्पर्धेतून बाहेर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भक्तीच्या पंढरीत भाविकांची अलोट गर्दी
लातूर : प्रतिनिधी तालुक्यातील खंडापूरच्या शिवारात सध्या भक्तीचा मळा फुलला आहे. त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळ्याने संपूर्ण मराठवाडा भक्तिमय झाला आहे. हभप गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुर असलेल्या या सोहळ्यात भाविकांची अक्षरश: तोबा गर्दी होत असून खंडापूरात जणु पंढरपूर, देऊ आणि आळंदी अवतरल्याचा भास होत आहे. […] The post भक्तीच्या पंढरीत भाविकांची अलोट गर्दी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची घेतली भेट
लातूर : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ यांच्या सेवा गौरव सोहळ्यासाठी राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची संघटनेच्या वतीने सदिच्छा भेट घेऊन आग्रहाने निमंत्रित देण्यात आले. शिक्षक संघटनेचे मदन धुमाळ यांच्या पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० एप्रिल २०२६ रोजी रोजी सेवानिवृत्त होत आहेत. अनेक शिक्षकांचे आशास्थान, मार्गदर्शक असलेले माजी मंत्री दिलीपराव देशमुख […] The post शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची घेतली भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिला विकासासाठी बजेटमध्ये तरतूद करा; पण अंमलबजावणी होते का ते बघा
लातूर : प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारडून जाहीर होणा-या अर्थसंकल्पासंदर्भात अपेक्षा जाणून घेण्यासाठी शहरातील महिला क्षेत्रातील तज्ज्ञांशी एकमत डिजीटल या मंचाने संवाद साधला. अर्थसंकल्पात महिला विकास, महिला सक्षमीकरणाशी संलग्न कोणत्या महत्वपूर्ण तरतुदी असाव्यात याबाबत महिला सक्षमीकरण क्षेत्रपात कार्यरत असणारे आयएमए महिला विंगच्या अध्यक्षा डॉ. ज्योती सूळ, संविधान सेवा संघाच्या संस्थापक अॅड. शहजादबी शेख, महिला बचत गटाच्या चळवळीत […] The post महिला विकासासाठी बजेटमध्ये तरतूद करा; पण अंमलबजावणी होते का ते बघा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सिध्देश्वर यात्रा महोत्सवात आज कुस्त्यांची दंगल
लातूर : प्रतिनिधी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर रत्नेश्वर देवस्थानचा यात्रा महोत्सव सुरु आहे. या महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम पार पडत असून या अंतर्गत आज दि. १ मार्च रोजी कुस्त्यांची दंगल पार पडणार आहे. यात्रा महोत्सवातील या कुस्त्यांच्या दंगलीसाठी लातूर जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील व परराज्यातील अनेक पैलवान आपली उपस्थिती लावत सिध्देश्वर केसरीचा मान मिळविण्यासाठी नशिब आजमावत असतात. […] The post सिध्देश्वर यात्रा महोत्सवात आज कुस्त्यांची दंगल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
व्यवस्था बदलण्यासाठी संघटन बांधणी आवश्यक: इनामदार
लातूर : प्रतिनिधी सरकार कोणत्याही पक्षाचे असो, त्यांना सामान्य नागरिकांशी काहीही देणे घेणे नसते. सामान्य मनुष्य कोणत्या स्थितीत जगतोय हे कोणत्याही सरकारला काहींही पडलेले नाही. आपली लढाई व्यवस्थेविरोधात आहे, कोणत्याही सरकारच्या विरोधात नाही. व्यवस्था बदलण्यासाठी संघटन बांधणी अतिशय गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय लोकआंदोलन न्यासाच्या कार्याध्यक्षा कल्पनाताई इनामदार यांनी व्यक्त केले. अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय […] The post व्यवस्था बदलण्यासाठी संघटन बांधणी आवश्यक: इनामदार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कायदेविषयक मदत वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी न्याय संस्था प्रयत्नशील
लातूर : प्रतिनिधी सर्वसामान्य नागरिक, वंचित घटकांना त्यांच्या हक्क, अधिकारांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन करणे, त्यांना कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासोबतच आता शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी न्याय संस्था पुढाकार घेत आहे. याचाच एक भाग म्हणून महा विधी सेवा शिबीर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणणे, हा मूळ […] The post कायदेविषयक मदत वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी न्याय संस्था प्रयत्नशील appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनात साहित्याचे योगदान मोलाचे
अहमदपूर : प्रतिनिधी शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर जन्मदिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठी विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. माने यांनी बोलताना मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनात साहित्याचे योगदान […] The post मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनात साहित्याचे योगदान मोलाचे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शॉर्टसर्किटने १ हेक्टर ऊस जळून खाक
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील तिपराळ शिवारात सर्वे नंबर २२ मधून विद्युत तारा गेल्या असून यात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत विठ्ठलराव पाटील या शेतक-याचा सुमारे एक हेक्टर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत शेतक-याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वीज वाहिनीमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अचानक ठिणग्या पडून उसाच्या शेताला आग लागली. उसाचे पीक […] The post शॉर्टसर्किटने १ हेक्टर ऊस जळून खाक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशाची आर्थिक राजधानी आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मुंबईत एका परदेशी महिला पर्यटकाची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भारत भ्रमंतीवर आलेल्या आयनस फारिया या पोर्तुगीज कंटेंट क्रिएटर महिलेचा दोन तरुणांनी सेल्फीसाठी जबरदस्ती करत पाठलाग केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी स्वतःहून दखल घेत आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ फेब्रुवारी रोजीची आहे. आयनस फारिया ही दोन महिन्यांपासून भारत फिरण्यासाठी आली आहे. ती नुकतीच मुंबईतील प्रसिद्ध धोबीघाट परिसरात फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी दोन तरुणांनी तिला गाठले. प्लीज, एक सेल्फी... दोन सेकंदही लागणार नाहीत, असे म्हणत हे तरुण तिच्याकडे सेल्फीसाठी वारंवार हट्ट धरू लागले. आयनसने अनेकवेळा स्पष्ट नकार देऊनही हे तरुण तिचा पाठलाग करत राहिले आणि तिला अस्वस्थ केले. हा संपूर्ण प्रकार आयनसच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्यात ती या तरुणांना टाळण्याचा प्रयत्न करताना स्पष्ट दिसत आहे. भारतातला अनुभव सुंदर, पण… मुंबईत घडलेल्या प्रकारावर आयनस फारिया हिने नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली, मी गेल्या दोन महिन्यांपासून भारतात आहे आणि माझा आतापर्यंतचा अनुभव अतिशय सुंदर आहे. मात्र, माझ्यासोबत असा प्रकार पहिल्यांदाच घडला. मी नकार देऊनही ते तरुण सुमारे १५ मिनिटांहून अधिक वेळ आमचा पाठलाग करत होते. त्यामुळे परिस्थिती अधिकच त्रासदायक व तणावपूर्ण वाटू लागली. एका क्षणी तर मला स्वतःला थोडी जागा मिळावी म्हणून त्यांना दूर ठेवावे लागले. पोलिसांकडून गुन्हा दाखल व्हिडिओ व्हायरल होताच मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवत आयनसशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला. पोलिसांनी तिचा पत्ता आणि संपर्क तपशील मिळवून तिला सहकार्य करण्याचे आवाहन केले. आयनसने दिलेल्या माहितीच्या आधारे आग्रीपाडा पोलिसांनी व्हिडिओत दिसणाऱ्या दोन अज्ञात तरुणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार (पूर्वीचे कलम ७८(१) ३(५)) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून तपास सुरू व्हिडिओमध्ये संशयित आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत असून आग्रीपाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी संबंधित आरोपींचा शोध घेत असून सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओच्या आधारे तपास सुरू आहे. भरवस्तीत पोर्तुगीज महिलेसोबत घडलेल्या या घटनेमुळे महिला पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा. नितीन घायवट उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी डॉ. के. के. गाडबैल यांनी स्थान भूषविले. प्रा. डॉ. दीपावली राऊत, प्रा. प्रमोद ढोले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात प्रा. प्रमोद ढोले यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य आणि कार्यक्रमाच्या हेतूची माहिती दिली. प्रमुख वक्ते प्रा. नितीन घायवट यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मराठी भाषेचा खरा गौरव तेव्हाच होईल जेव्हा दैनंदिन व्यवहार आणि प्रशासकीय कामकाज मराठीतूनच होईल. मोल्सवर्थ शब्दकोशानंतर दाते-कर्वे शब्दकोशात वाढलेली शब्दसंख्या पुढे शासकीय कोशात कमी झाल्याचे उदाहरण देत त्यांनी भाषासमृद्धीबाबत चिंता व्यक्त केली. मराठी भाषिकांनी भाषाभान जपणे आणि भाषेचा सक्रिय वापर करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा धावता आढावा घेत त्यांनी सांगितले की, कुसुमाग्रजांनी कवी, नाटककार, समीक्षक, कादंबरीकार अशा विविध क्षेत्रांत मराठी साहित्य समृद्ध केले. त्यांच्या ‘विशाखा’ या काव्यसंग्रहाला मराठी कवितेचा मानबिंदू असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘भाषा वापरली तरच टिकेल’ मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. दीपावली राऊत यांनी सांगितले की, भाषा गौरव दिन साजरा करणे अभिमानाची गोष्ट असली तरी दैनंदिन संवादात मराठीचा किती वापर होतो, याचा आत्मपरीक्षण होणे आवश्यक आहे. एक दिवसाचा गौरव करण्यापेक्षा भाषा जपणे, बोलणे, शिकणे आणि संवाद साधणे अधिक महत्त्वाचे आहे. विविध शास्त्रांमध्ये मराठी शब्दांची रूजवात करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वाढवावी, असे त्यांनी आवाहन केले. प्रत्येकाने दर महिन्याला किमान दोन पुस्तके वाचण्याचा संकल्प करावा, अशी सूचना त्यांनी केली. ‘मराठी ही संस्कृतीची ओळख’ अध्यक्षीय भाषणात डॉ. के. के. गाडबैल म्हणाले की, मराठी ही केवळ भाषा नसून ती संस्कृतीची ओळख आहे. धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रांत मराठीचे योगदान अनन्यसाधारण आहे. कुसुमाग्रजांनी मराठीला ज्ञानभाषा बनविण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या स्मरणार्थ शासनाने २१ जानेवारी २०१३ रोजी त्यांच्या जयंतीचा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या मोहोड हिने केले, तर आभार प्रदर्शन मो. अयान पटेल यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भाषाप्रेम आणि वाचनसंस्कृती जोपासण्याचा संदेश देण्यात आला.
अमरावती मनपाच्या विशेष आमसभेत नवीन स्वच्छता कंत्राटावरून मोठा गदारोळ झाला. नगरसेवकांनी प्रशासनावर कंत्राट देण्यामध्ये घाई केल्याचा आणि त्यात मोठ्या प्रमाणात 'अर्थ'कारण झाल्याचा आरोप केला. हा कंत्राट रद्द करून संबंधित दोषी अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शहरात पसरलेल्या अस्वच्छतेवर उपाययोजना करण्यासाठी शनिवारी ही विशेष आमसभा आयोजित करण्यात आली होती. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी भाजप, राकाँ (अ.प.), वायएसपी तसेच विरोधी काँग्रेस, एमआयएम, शिवसेना या सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी आपल्या भावना मांडल्या. तब्बल ३९ सदस्यांनी चर्चेत भाग घेतला आणि सभेचे कामकाज नऊ तासांहून अधिक काळ चालले. स्वच्छता अधिकारी डॉ. अजय जाधव आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती झाली. गेल्या दीड महिन्यात काही योग्य पावले उचलल्याबद्दल आयुक्त सौम्या शर्मा-चांडक आणि शिल्पा नाईक यांचे कौतुकही करण्यात आले. मात्र, डॉ. अजय जाधव हे सातत्याने टीकेचे धनी ठरले. वायएसपीचे प्रशांत वानखडे यांनी जाधव यांना काहीसा दिलासा देत, स्वच्छतेची जबाबदारी संपूर्ण शहरावर एकट्या त्यांच्यावर न सोपवता कामाची विभागणी करण्याची सूचना केली. माजी महापौर विलास इंगोले, सभागृह नेते चेतन गावंडे, गटनेते डॉ. राजेंद्र तायडे, नाना आमले, प्रशांत वानखडे, स्थायी समितीच्या माजी सभापती राधा कुरील, धीरज हिवसे, स्नेहा लुल्ला, मनीष बजाज, सुरेखा लुंगारे, सुनीता भेले, नसीम खान करीम खान, प्रियंका पाटणे, योगेश विजयकर, मिलींद बांबल, आशिष अतकरे, संजय हिंगासपुरे, लवीना हर्षे, मंगेश मनोहरे, मरियम राराणी, इस्माईल लालूवाले, नुतन भुजाडे, विनोज तानवैस, पंचफुला चव्हाण, सुनीता लोणारे, सय्यद राशद अली, बंडू हिवसे, संजय गव्हाळे, स्वाती कुळकर्णी, महेश मुलचंदानी, रजनी डोंगरे, ॲड. प्रीती रेवणे आदींसह अनेक नगरसेवकांनी अत्यंत मुद्देसूद मांडणी केली. त्यांनी प्रशासनाला आपल्या मुद्द्यांबाबत किती आग्रही आहेत, हे दाखवून दिले. मंचावर उपमहापौर सचिन भेंडे, मनपा आयुक्त सौम्या शर्मा-चांडक आणि नगरसचिव संदीप वडुरकर उपस्थित होते.
नेरपिंगळाई येथे संत गुलाबपुरी महाराजांच्या १०२ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित भागवत सप्ताहाची शनिवारी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सांगता झाली. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ग्रंथ दिंडी आणि महाप्रसाद वितरण ठरले. २१ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या सप्ताहात दररोज पहाटे काकड आरतीने सुरुवात होत असे. मंदिराचा परिसर वेदघोष, हरिनामाचा गजर आणि टाळ-मृदुंगाच्या निनादाने दुमदुमून गेला होता. हरिभक्त परायण दादा महाराज कोळसकर यांच्या मधुर वाणीतून भागवत सप्ताहाचे निरूपण झाले, ज्यामुळे भाविकांना आध्यात्मिक चिंतनाची अनुभूती मिळाली. श्री समर्थ गुलाबपुरी महाराज संस्थानतर्फे आयोजित या सप्ताहात अभिषेक, पूजन, हरिपाठ, भजन, कीर्तन आणि अन्नदान यांसारखे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम पार पडले. या निमित्ताने गावात पारंपरिक यात्राही भरली होती, ज्यामुळे उत्सवाला धार्मिकतेसोबतच सामाजिक स्वरूपही प्राप्त झाले. सप्ताह आणि यात्रेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी नेरपिंगळाई येथे दर्शनासाठी आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती. पुरणपोळीचे जेवण हे या महाप्रसादाचे वैशिष्ट्य होते. शेकडो तरुण-तरुणी आणि महिलांनी सेवाभावाने पुरणपोळ्या तयार केल्या, ज्यामुळे उत्सवाला सामूहिकतेचा स्पर्श लाभला. भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला. शनिवारी सकाळी प्रसाद महाराज काष्टी (परभणी) यांनी काल्याचे कीर्तन सादर केले आणि त्यानंतर सप्ताहाची सांगता करण्यात आली. श्री समर्थ गुलाबपुरी महाराज संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. हा संपूर्ण सप्ताह श्रद्धा, सेवा, समर्पण आणि एकतेचा संदेश देणारा ठरला. या सप्ताहादरम्यान शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनही साजरा करण्यात आला. कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात ग्रंथ दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील महिला भजन मंडळींनी या ग्रंथ दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. भजनाच्या तालावर फेर धरत आणि टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष करत त्यांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित मराठी बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी अमरावती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सुरू आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सहा दर्जेदार बालनाट्यांचे सादरीकरण झाले, ज्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या सादरीकरणाचा प्रारंभ कोल्हापूर येथील अलंकार कला अकादमी फाउंडेशनच्या 'चेटकीणीच्या बंगल्यात' या नाटकाने झाला. त्यानंतर बहुजन एज्युकेशन सोसायटीचे डॉ. सतीश साळुंखे लिखित 'झाले मोकळे आभाळ', भैरवी कला अकादमी अचलपूरचे 'अबोलांचे बोल', छत्रपती सेवाभावी संस्था परभणीचे शेख आसिफ दिग्दर्शित 'बेला', सिटी हायस्कूल सांगली येथील सागर सगरे दिग्दर्शित 'जंगल स्कूल' आणि गोपाला फाउंडेशन परभणीचे बालाजी दामुके दिग्दर्शित 'मोतीचूर' ही बालनाट्ये सादर झाली. ही संपूर्ण स्पर्धा महाराष्ट्र शासनातर्फे रसिकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आली आहे. दरम्यान, अमरावतीकर कला रसिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि बाल कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण स्पर्धेदरम्यान उपस्थित राहावे, असे आवाहन नाट्यस्पर्धा समन्वयक विशाल फाटे, सहसमन्वयक हर्षद ससाणे, ॲड. श्रद्धा पाटेकर आणि अमरावती नाट्य परिषदेचे अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर डोरले यांनी केले आहे. या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेत उद्या, रविवार, १ मार्च रोजी जळगाव, नागपूर, ओझर आणि भुसावळ येथील सहा नाटके सादर होणार आहेत. यामध्ये 'प्रोजेक्ट त्राहीमाम', 'सर्कस', 'एक होता राजो', 'रामा रे' आणि 'हे तुम्हीही करू शकता' या नाटकांचा समावेश आहे. नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता स्पर्धेचा प्रारंभ होईल, तर दुपारी ३ वाजता शेवटच्या नाटकाचे सादरीकरण सुरू होईल.
पुणे सायबर पोलिसांनी 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात समोर आले आहे की, अज्ञात आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी भासवले. त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवली. त्यांच्या आधारकार्डचा गैरवापर करून त्यांच्या नावाने बनावट बँक खाते उघडल्याचे आणि त्यावर फसवणुकीच्या तक्रारी असल्याचे सांगण्यात आले. कुटुंबीयांना अटक करण्याची धमकी देऊन, या प्रकरणातून सुटका करण्यासाठी सर्व गुंतवणूक आरोपींनी दिलेल्या खात्यांवर वर्ग करण्यास भाग पाडले. या धमक्यांना घाबरून फिर्यादीने विविध बँक खात्यांवर मोठी रक्कम जमा केली. यामुळे त्यांची एकूण १०.७४ कोटी रुपयांची फसवणूक झाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास केला. यामध्ये संबंधित खात्यांमधून एटीएमद्वारे रक्कम काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. या कारवाईत हर्षद सुभाष धनतोले (वय २३) आणि समर्थ सुरेश देशमुख (वय २४) या दोघांना अटक करण्यात आली. हे दोघे सध्या कर्वेनगर, पुणे येथे राहत असले तरी, ते मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील आहेत. आरोपींकडून फसवणुकीतील ४० लाख रुपये गोठवण्यात आले असून, ४ लाख ७८ हजार ५०० रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. सायबर पोलिस स्टेशनकडून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख आणि पोलिस उपायुक्त (आर्थिक व सायबर) विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी कारवाईमुळे 'डिजिटल अरेस्ट'च्या वाढत्या प्रकारांविरोधात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
लोणी काळभोर येथील मुळा-मुठा नदीपात्रात अवैधरित्या टाकण्यात आलेल्या कचऱ्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात विषारी धुराचे मोठे लोट पसरले. श्वसनाचा त्रास झाल्याने एमआयटी शिक्षण संकुलातील काही विद्यार्थ्यांना मध्यरात्री रुग्णालयात दाखल करावे लागले. अग्निशमन दलाचे जवान आणि एमआयटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न शनिवारीही सुरू होते. एमआयटी शैक्षणिक संकुलात सध्या देश-विदेशातील सुमारे २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी जवळपास ५ हजार विद्यार्थी आणि एक हजार कर्मचारी संकुलाच्या परिसरात राहतात. शुक्रवारी दिवसभर प्रयत्न करूनही आग विझवता न आल्याने रात्री ती आणखी वाढली. यामुळे वसतिगृहातील विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ आणि घसा बसणे असे त्रास झाले. विषारी धुरामुळे अस्वस्थ वाटू लागल्याने काही विद्यार्थ्यांना शुक्रवारी मध्यरात्री तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषारी वायूच्या लोटांमुळे परिसरातील दृश्यमानता लक्षणीयरीत्या कमी झाली. याचा परिणाम शनिवारी पहाटे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतुकीवरही झाला. तसेच, या धुरामुळे परिसरातील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आणि एमआयटी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना शनिवारी सुट्टी द्यावी लागली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लोणी-काळभोर आणि कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, पोलिस पाटील आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत देशभरात स्वच्छता आणि नदी संवर्धनासाठी प्रयत्न सुरू असताना, लोणी काळभोर येथे मुळा-मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकून तो जाळण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती या पुणे शहराला लागून असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायती आहेत. येथे दररोज मोठ्या प्रमाणात ओला व सुका कचरा निर्माण होतो. या ग्रामपंचायतींमध्ये कचरा संकलनासाठी जागा किंवा कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तांत्रिक प्रकल्प सध्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे नाइलाजास्तव दररोज सुमारे ३० ते ३५ ट्रॉलींहून अधिक कचरा थेट मुळा-मुठा नदीपात्रात टाकला जातो. परिणामी, नदीपात्रात आता कचऱ्याचे मोठे ढीग तयार झाले असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. घाणीचे साम्राज्य पसरलेल्या या ठिकाणी कचऱ्याला सातत्याने आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे वायुप्रदूषणातही कमालीची वाढ झाली असून परिसरातील नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. नदीपात्रात कचरा टाकल्यामुळे केवळ वायुप्रदूषणच नव्हे, तर जलप्रदूषणही वाढत असून मुळा-मुठा नदीचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे जलचरांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.
रेमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, जलपुरुष पद्मश्री डॉ. राजेंद्र सिंह यांनी जागतिक पाणी संकटावर चिंता व्यक्त केली आहे. सध्या जगात अनेक ठिकाणी युद्धाचे वातावरण असून, त्यामुळे स्थलांतर आणि रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्याचा विचार करून पाणी संकटावर तातडीने मार्ग काढण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. ते पुणे येथे रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ तर्फे आयोजित दोन दिवसीय ग्रीन एक्स्पो २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानात शनिवारी या तिसऱ्या ग्रीन एक्स्पोला सुरुवात झाली. डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते झाडाला पाणी घालून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रोटरीचे प्रकल्प प्रमुख केशव ताम्हणकर, रोटरी डिस्ट्रिक ३१३१ चे प्रांतपाल संतोष मराठे, रोटरी पुणे विस्डमच्या अध्यक्षा स्वाती यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. सिंह यांनी यावेळी नदीला पृथ्वीवरील प्रमुख घटक संबोधत तिच्याशी छेडछाड न करण्याचे आवाहन केले. पाणी हे ब्रह्म असून त्याचे महत्त्व मोठे आहे, असे ते म्हणाले. सध्याच्या जागतिक परिस्थितीत युद्धांमुळे होणारे स्थलांतर आणि रोजगाराची धडपड सुरू असतानाच, पाणी संकट अधिक कठीण होत चालले आहे, यावर काम करणे मोठे आव्हान आहे. भारतात अनेक ठिकाणी भूजल पातळी खालावत असून, ही चिंतेची बाब आहे. पाण्याच्या प्रश्नावर काम करताना शास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा एकत्रित वापर होणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, नीर, नारी आणि नदी या तीन गोष्टींना महत्त्व देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. पर्यावरण क्षेत्रात शाश्वत विकासाचे काम करताना त्यात संवेदना असणे महत्त्वाचे आहे. यामुळे पर्यावरण विकासाचे काम अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते. पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करताना डोळे आणि हृदयाने त्याच्याशी जोडले जाण्याची गरज आहे, असे डॉ. सिंह म्हणाले. यामुळे ग्रीन सोसायटी, ग्रीन स्कूल यांसारखे प्रकल्प यशस्वी होऊ शकतील. कोणत्याही नव्या कामामध्ये पुणे हे देशात पहिल्या क्रमांकावर असते, असेही डॉ. राजेंद्र सिंह यांनी नमूद केले. पूर्वी रेल्वेने जाताना चंबळचे खोरे आले कि, रेल्वेमध्ये खिडक्या लावा, चंबळ आले आहे, असे ओरडून संगितले जायचे. सध्या इथे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. या भागातील ६३३२ डाकूंनी हातातील बंदूक टाकून देत या भागातील नद्या जिंवत करण्याचे काम केले आहे, त्यामुळे इथे पाणी आले असून हे लोक उत्तम प्रकारे शेती करत असल्याची आठवण डॉ. राजेंद्र सिंह यांनी सांगितली. पर्यावरण क्षेत्रात येत असणारे नवनवीन तंत्रज्ञान पोहचवण्याचे काम या प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे होत असल्याचे रोटरीचे संचालक संतोष मराठे यावेळी म्हणाले. रोटरी ग्रीन एक्स्पो हे शाश्वतता-केंद्रित, शाश्वतता या संकल्पनेवर आधारित व्यासपीठ असून यामध्ये एकाच छताखाली नागरिकांना त्यांच्या घरासाठी, कामाच्या ठिकाणी आणि समाजासाठी राबविण्यात येऊ शकणाऱ्या शाश्वतता विषयक उपायांची व उपक्रमांची माहिती मिळू शकणार आहे. याद्वारे पर्यावरणपूरक उपाय जाणून घेण्यासोबतच त्यांचा सक्षम अवलंब कशा पद्धतीने करायचा यासंदर्भात देखील मार्गदर्शन मिळू शकेल असेही मराठे यांनी नमूद केले.
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात 'एएआयबी'ने (Aircraft Accident Investigation Bureau) प्रसिद्ध केलेला प्राथमिक अहवालात कोणता निष्कर्ष काढला? CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे? असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. तसेच या अहवालात बारामतीचा उल्लेख 'जिल्हा' म्हणून करण्यात आल्याने, केंद्र सरकारच्या या संस्थेने किती गांभीर्याने तपास केला हे दाखवण्यासाठी पुरेसे आहे, असा बोचरी टीका रोहित पवारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे विचारला आहे. २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हवाई उड्डाण मंत्रालयाच्या AAIB यंत्रणेने शनिवारी २२ पानांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये लँडिंगसाठी घाई करण्यात आल्याचे आणि बारामती विमानतळावर सोयीसुविधांचा अभाव असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या अहवालावर रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अहवालातील चूक काय? रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये अहवालातील पान क्रमांक ४ वरील मुद्दा ५.१ कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. या मुद्द्यात Baramati Airfield is situated in the Baramati District of the state Maharashtra असे वाक्य लिहिण्यात आले आहे. वास्तविक पाहता बारामती हा पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. एका राष्ट्रीय स्तरावरील तपास संस्थेने आपल्या अधिकृत अहवालात जिल्ह्याचे नाव चुकीचे लिहिणे, हे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे म्हटले जात आहे. नेमके काय म्हणाले रोहित पवार? प्राथमिक अहवालात AAIB ने कोणता प्राथमिक निष्कर्ष काढला? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे. तसेच CID या अहवालाचा आधार घेऊन कसा तपास करणार आहे? अशी विचारणाही त्यांनी केली. या अहवालातील पान क्रमांक ४ वरील मुद्दा ५.१ मधील “Baramati Airfiled is situated in the Baramati District of the state Maharashtra” हे वाक्य AAIB ने हा अहवाल किती गांभीर्याने बनवला हे दाखवण्यासाठी पुरेसे आहे. परवा मुंबईत यावर विस्तृत बोलेल, असे रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. एएआयबीच्या अहवालात काय? एएआयबीच्या अहवालानुसार, मुंबईहून बारामतीकडे येणाऱ्या या व्हीआयपी (VIP) फ्लाईटने रनवे ११ वर लँडिंगचा प्रयत्न केला होता. मात्र, पहिल्या प्रयत्नात वैमानिकाला लँडिंग करता आले नाही, त्यामुळे त्यांनी ‘गो-अराउंड’ (Go-Around) केला. दुसऱ्या प्रयत्नात पायलटने “Field in sight” असा संदेश दिला. परंतु, एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) त्यावेळी ३ किलोमीटर इतकी दृश्यमानता (Visibility) नोंदवली होती, जी ‘व्हीएफआर’ (व्हिज्युअल फ्लाईट रूल्स) नियमांनुसार आवश्यक असलेल्या ५ किलोमीटरपेक्षा खूपच कमी होती. लँडिंग क्लिअरन्स मिळाल्यानंतर काही क्षणांतच विमान रनवेच्या डावीकडे ५० मीटर अंतरावर असलेल्या झाडांवर आदळले आणि त्यानंतर लागलेल्या भीषण आगीत विमान जळून खाक झाले. अहवालातील निष्कर्ष प्राथमिक अहवालातून बारामती विमानतळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर अनेक गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत: सुरक्षा त्रुटी: बारामती हे ‘अनकंट्रोल्ड एअरफिल्ड’ असून तिथे नियमित एटीसी सुविधा नाही. रनवेवर बारीक खडी (Loose Gravels) आढळली असून, रनवेला परिपूर्ण कुंपण (Boundary Wall) नाही. हवामानाचा अंदाज: बारामतीमध्ये अधिकृत ‘मेट’ (MET) सुविधा उपलब्ध नाही. उपग्रह चित्रांनुसार परिसरात हलके धुके (Shallow Fog) होते, तरीही लँडिंगचा प्रयत्न झाला. नेव्हिगेशन अभाव: विमानतळावरील रनवे मार्किंग स्पष्ट नसल्यामुळे वैमानिकांना लँडिंगमध्ये अडचणी आल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.
हिंगोली तालुक्यांमध्ये मतदार यादी दुरुस्ती तसेच एसआयआर अंतर्गत कामाच्या पूर्वतयारी मध्ये वारंवार सूचना देऊनही गैरहजर राहणाऱ्या तसेच निष्काळजीपणा करणाऱ्या आठ शिक्षकांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तहसील कार्यालयाच्या वतीने तालुक्यामध्ये तारीख 29 ऑक्टोबर 2025 ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये मतदार यादीची दुरुस्ती तसेच एस आय आर अंतर्गत पूर्वतयारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासाठी तालुक्यामध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र यासाठी आयोजित बैठकांसाठी तसेच कामासाठी शिक्षकांना तहसील कार्यालयात हजर राहण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र यापैकी आठ शिक्षक गैरहजर राहिले होते. या प्रकारामुळे तहसील कार्यालयाने आठ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती तसेच त्यांना तहसील कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत भ्रमणध्वनी वरून संपर्क साधण्यात आला होता मात्र त्यानंतरही शिक्षक उपस्थित झालेच नाही. याप्रकरणी नायब तहसीलदार मंगला मोरे यांनी आज हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी कनेरगाव नाका जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रघुनाथ भारती, नरसी प्राथमिक शाळेचे शिक्षक नागेश जाधव, विठ्ठल कामखेडे, भारत प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक शिवाजी राठोड, संभाजी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक प्रल्हाद कोटकर, धानापूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पांडुरंग हाळसे, खानापूरच्या विद्यासागर विद्यालयाचे शिक्षक सतीश तायडे, बळसोंड जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सतीश नवले या शिक्षकांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार पोटे, अशोक धामणे संजय मार्केट पुढील तपास करीत आहेत. हे ही वाचा… चोरट्यांनी लुटलेला मुद्देमाल वीस दिवसांत परत:सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरळले, जिल्हा पोलिस दलाची मानले आभार कापडसिंगी ते रिसोड मार्गावर धानोरा शिवारात चोरट्यांनी तीस लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याने सराफा व्यापाऱ्याचे दुकानाच बंद झाले. मात्र हिंगोली पोलिसांनी अवघ्या वीस दिवसात तपास करून सराफा व्यापाऱ्याचे दागिने शनिवारी तारीख 28 परत दिले. दागिने परत मिळताच सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी सेनगाव पोलिसांसह जिल्हा पोलिस दलाचे आभार व्यक्त केले. सविस्तर वाचा…
जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात आज एका सायंकाळच्या सुमारास विशाल वडाच्या झाडाने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. छत्रपती संभाजीनगर ते कन्नड या महामार्गावर, खुलताबाद आणि वेरूळ या दोन प्रमुख गावांना जोडणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावरील ही घटना आहे. आगीचे रूप पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शर्थीचे प्रयत्न करूनही आग आटोक्यात येत नसल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेरूळ लेणी परिसरात असलेल्या या जुन्या वडाच्या झाडाला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली. लेणीचे कर्मचारी आणि परिसरातील नागरिक साबीर भाई, वेरूळ गावचे पोलिस पाटील रमेश ढवरे यांच्यासह पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीच्या ज्वाळा महामार्गापर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. आग आटोक्यात येईना झाड जुने आणि कोरडे असल्याने आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. स्थानिक नागरिकांनी पाणी आणि उपलब्ध साधनांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीची तीव्रता अधिक असल्याने सर्व प्रयत्न अपुरे पडत आहेत. महामार्गावर धुराचे लोट पसरल्याने वाहनधारकांनाही अडचणींचा सामना करावा लागला. महामार्गावर वाहतूक कोंडी हा रस्ता छत्रपती संभाजीनगर ते कन्नड असा मुख्य दुवा असल्याने येथे नेहमीच मोठी वाहतूक असते. आगीमुळे आणि खबरदारी म्हणून पोलिस प्रशासनाने केलेल्या नाकेबंदीमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आग पूर्णपणे विझेपर्यंत परिसरातील नागरिक आणि पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना (कामकाज क्र. ४) अंतर्गत मा. प्रवीण दरेकर यांनी मुंबईतील व्यावसायिक अवैध बांगलादेशी घुसखोरीच्या वाढत्या प्रश्नाबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केले की, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने या विषयावर शून्यसहिष्णुतेची भूमिका घेत आक्रमक कारवाई सुरू केली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात इंटेलिजन्स आधारित संयुक्त मोहीम राबविण्यात येत असून प्रत्येक पोलीस ठाण्यात पाच कर्मचाऱ्यांची विशेष टीम नियुक्त करण्यात आली आहे. एटीएस आणि स्थानिक पोलीस यांच्या समन्वयातून नियमित तपासणी व छापेमारी सुरू आहे. मागील पाच वर्षांतील आकडेवारी सादर करताना त्यांनी सांगितले की, २०२१ मध्ये १०९, २०२२ मध्ये ७७, २०२३ मध्ये १२७, २०२४ मध्ये २०२ आणि २०२५ मध्ये तब्बल २३७६ अवैध बांगलादेशींना हद्दपार करण्यात आले आहे. एका वर्षात दोन हजारांहून अधिक जणांना हद्दपार करून महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र शासनाच्या नव्या परिपत्रकानुसार पुरावे निश्चित झाल्यास गुन्हा दाखल न करताही संबंधितांना थेट बीएसएफच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे कारवाईला अधिक वेग आला आहे. राज्यात प्रथमच डिटेन्शन सेंटर उभारण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कन्स्ट्रक्शन साईट्सवरील कामगारांची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई केली जात आहे. तसेच महानगरपालिका व पोलीस विभाग संयुक्त कारवाईद्वारे फेरीवाल्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. अवैध घुसखोरी रोखण्यासाठी नागरिकांनी संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. राज्याच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदमांनी ठामपणे सांगितले. उत्तर देत असताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की आवश्यक तिथे कोंबिंग ऑपरेशन आणि आवश्यक असल्यास स्पेशल टास्क फोर्सची निर्मिती करण्यात येईल. हे ही वाचा… छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान:महसूल सेवा आता घरापर्यंत, शिबिरांतून 15 प्रमुख सेवांचा लाभ मिळणार - चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील जनतेला महसूल विभागाच्या महत्त्वाच्या १५ सेवा एकाच छताखाली आणि थेट घरपोच मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारतर्फे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक महसुली मंडळ, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिली. सविस्तर वाचा…
पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात मानव–बिबट संघर्षाच्या घटना वारंवार घडत आहेत. यात आतापर्यंत २००१ ते २०२५ या कालावधीत ५६ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्यांना जेरबंद करून मानव–बिबट संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागातर्फे बिबट्यांना देशभरातील ‘झू’मध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यासाठी वन विभागाने विविध राज्यांतील प्राणिसंग्रहालयांना पत्र पाठवून, बिबटे हवे असल्यास आमच्याकडून घेऊन जा, असे कळवले आहे. त्यानुसार अनंत अंबानी यांच्या जामनगर (गुजरात)येथील ग्रीन्स झुलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरला ५०, अरुणाचल प्रदेशात ६, बिहारला ५, अशा प्रकारे एकूण सहा राज्यांत ६७ बिबटे पाठवले जाणार आहेत. यासंदर्भातील पत्रव्यवहार पूर्ण झाला असून, येत्या दोन ते तीन महिन्यांत हे बिबटे पाठवले जाणार असल्याची माहिती वन विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी दिली. महाराष्ट्राच्या बिबट्यांची डरकाळी आता सहा राज्यांत ऐकायला मिळणार आहे. जुन्नर विभागात सर्वाधिक बिबटे राज्यात सर्वाधिक बिबटे जुन्नर विभागात आहेत. त्यामुळे गेल्या २० ते २५ वर्षांपासून या भागात मानव–बिबट संघर्ष सुरू आहे. या भागात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे येथे १३०० हून अधिक बिबट्यांचे वास्तव्य आहे. ही संख्या वाढू नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. १०४ प्राणिसंग्रहालयांसोबत पत्रव्यवहार जुन्नर भागात बिबट्यांच्या हल्ल्यात गेल्या वर्षी ११ जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळे या भागात बिबट्यांविरोधात मोठा रोष आहे. या संघर्षावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे. यासाठी येथून पकडण्यात आलेले बिबटे इतरत्र सोडावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. त्यानुसार वन विभागाने देशभरातील १०४ प्राणिसंग्रहालयांना पत्र पाठवून, बिबटे हवे असल्यास आमच्याकडून घ्यावेत, असे कळवले आहे. नसबंदीचाही प्रयोग जुन्नर भागातील बिबट्यांचा जन्मदर रोखण्यासाठी वन विभागाने थेट नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात प्रस्ताव तयार करून मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. त्याला मान्यता मिळाली असून, भारतीय वन्यजीव संस्थेनेही यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे नागपूर येथे प्रायोगिक तत्त्वावर ५ बिबट्यांवर नसबंदीचा प्रयोग केला जाणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. दोन वर्षांनंतर पुन्हा ५० बिबटे गुजरातला बिबट्यांची वाढती संख्या कमी करण्यासाठी त्यांना इतरत्र पाठवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. त्यानुसार सहा राज्यांत बिबटे पाठवले जाणार आहेत. यापूर्वी २०२४ मध्ये १० बिबटे जामनगरला देण्यात आले होते. ते त्या वातावरणात चांगलेच रमल्याचे वन विभागाने सांगितले. आता पुन्हा ५० बिबटे पाठवले जाणार आहेत. या राज्यांना जाणार बिबटे प्राणिसंग्रहालयाचे नाव — संख्या १) ग्रीन्स झुलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, जामनगर (गुजरात) — ५०२) बायोलॉजिकल पार्क, इटानगर (अरुणाचल प्रदेश) — ०६३) मणिपूर झुलॉजिकल गार्डन, इरोईसेम्बा (मणिपूर) — ०३४) संजय गांधी बायोलॉजिकल पार्क, पटना (बिहार) — ०३५) राजगीर झू सफारी, नालंदा (बिहार) — ०२६) मिनी झू, भिवानी (हरियाणा) — ०१७) इंदिरा गांधी झुलॉजिकल पार्क, विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) — ०२ एकूण — ६७ १०४ पैकी ६ ‘झू’चीच मागणी आलीय १०४ पैकी ६ प्राणिसंग्रहालयांनी आमच्याकडे मागणी केली आहे. त्यांना ६७ बिबटे आम्ही पाठवणार आहोत. जामनगरला ५० बिबटे पाठवणार आहोत. मार्चपासून टप्प्या-टप्प्याने स्थलांतर होईल असे जुन्नर विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी सांगितले. केंद्राच्या अंतिम मंजूरीची प्रतीक्षा दीड महिन्यांत पत्रव्यवहार केला आहे. राज्य सरकारने आम्हाला अंतिम मंजूरी दिली आहे. फक्त आता सेंट्रल झु अथॉरिटी ऑफ इंडियाच्या परवानगीची प्रतीक्षा करत आहोत. संभाजीनगरच्या मिटमिट्याचे प्राणीसंग्रालयाचे काम पूर्ण झाले की, त्यांनाही काही बिबटे देऊ असे जुन्नर विभागाचे उप वनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी सांगितले.
अजित पवारांचे विमान आधी झाडावर आदळले नंतर खाली पडले:डीजीसीएचा 22 पानांचा प्राथमिक चौकशी अहवाल समोर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीचा डीजीसीएचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. अपघाताच्या दिवशी अजित पवार यांचे विमान कोसळताना आधी झाडावर आदळले, त्यानंतर ते खाली पडले, असे चौकशीतून समोर आले आहे. तसेच विमान कोसळले तेव्हा २ हजार मीटर दृष्यमानता होती. ब्लॅक बॉक्समधील फ्लाईट डाटा रेकॉर्डर हा उष्णतेमुळे खराब झाला. रॉ डेटा डाउनलोड करण्यात आला असल्याचे अहवाल सांगण्यात आले आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत....
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि परळी बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांनी सोशल मीडियावर एक खळबळजनक पोस्ट शेअर करत मनोज जरांगे पाटील यांना थेट धमकी दिली आहे. धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला, तर कार्यक्रम खल्लास... जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय, अशा आशयाची ही पोस्ट सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात सातत्याने शाब्दिक युद्ध सुरू आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर हा वाद सुरू झाला. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असून तो सध्या तुरुंगात आहे. या घटनेवरून जरांगे पाटील यांनी मुंडेंवर गंभीर आरोप करत सडकून टीका केली होती. आपल्याला मारण्याचा कटाचा जरांगेंकडून दावा काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला मारण्याचा कट रचला जात असल्याचा खळबळजनक दावा केला होता. या प्रकरणात अमोल खुणे नावाच्या तरुणाला संशयित म्हणून अटक करण्यात आली होती, जो सध्या जामिनावर बाहेर आहे. या कटामागेही राजकीय हात असल्याचा संशय जरांगे यांनी व्यक्त केला होता, ज्यामुळे परळी आणि आसपासच्या परिसरात तणाव वाढला होता. धमकीच्या पोस्टने ठिणगी पडली गोविंद फड यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह आमदार सुरेश धस यांचाही उल्लेख केल्याचे समजते. ‘धनंजय मुंडे यांच्या केसाला पण धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास.. जरांगे, सुरेश धस भंडारा लावून बोलतोय’ असा मजकूर या पोस्टमध्ये आहे. भंडारा लावून बोलतोय या शब्दांतून त्यांनी दिलेली ही चेतावणी थेट संघर्षाला आमंत्रण देणारी असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात अद्याप गोविंद फड किंवा धनंजय मुंडे यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र सोशल मीडियावर या पोस्टमुळे आता वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे ही वाचा… छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान:महसूल सेवा आता घरापर्यंत, शिबिरांतून 15 प्रमुख सेवांचा लाभ मिळणार - चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील जनतेला महसूल विभागाच्या महत्त्वाच्या १५ सेवा एकाच छताखाली आणि थेट घरपोच मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारतर्फे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक महसुली मंडळ, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिली. सविस्तर वाचा…
धान खरेदीचा तिढा:भंडारा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडकला शेतकऱ्यांचा जनसागर
भंडारा जिल्ह्यातील धान खरेदीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांचा संताप आता अनावर झाला आहे. धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवणे, रखडलेले चुकारे आणि बोनसच्या मागणीसाठी भारतीय किसान संघाच्या नेतृत्वात काल, २७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाने प्रशासनाचे धाबे दणाणले असून, शेतकऱ्यांनी सरकारला ८ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ शेतकरीच नव्हे, तर अडचणीत सापडलेले धान खरेदी केंद्र चालकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खासदार डॉ. प्रशांत पडोले यांनीही या मोर्चात प्रत्यक्ष सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही, असा सूर यावेळी उमटला. प्रमुख मागण्या आणि सद्यस्थिती सध्याच्या मर्यादित उद्दिष्टामुळे जिल्ह्यातील सुमारे ४० टक्के धान अद्यापही केंद्रांवर उघड्यावर पडून आहे. त्यामुळे उदिष्टे वाढविण्यात यावे. ज्या शेतकऱ्यांनी धान विकले आहे, त्यांच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. ते तात्काळ अदा करण्यात यावे., सरकारने त्वरित बोनस जाहीर करावा आणि शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून त्यांना दिलासा द्यावा. अशा मागण्यांचा समावेश होता. आंदोलकांनी स्पष्ट केले आहे की, जर आठवड्याभरात सकारात्मक निर्णय झाला नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. यामध्ये 'आमरण उपोषण' आणि रस्ता रोको सारख्या मार्गांचा अवलंब करून सरकारचे लक्ष वेधले जाईल. प्रशासनाने आता यावर काय भूमिका घेतली, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा किसान मोर्चाचे जिल्हा महामंत्री दिनेश कापगते यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाला ८ दिवसांचा वेळ दिला आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले जातील आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकले जाईल, असे ते म्हणालेत.
राज्यातील जनतेला महसूल विभागाच्या महत्त्वाच्या १५ सेवा एकाच छताखाली आणि थेट घरपोच मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारतर्फे 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक महसुली मंडळ, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना दिली. हे अभियान जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली राबवले जाणार असून, स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्याचे नियोजन केले जाईल. प्रत्येक तालुक्यात एकूण सहा शिबिरे होणार असून, मार्चमध्ये ७ आणि १४ मार्च, एप्रिलमध्ये १० आणि १७ एप्रिल, तर मे महिन्यात ८ आणि १५ मे, असे एका तालुक्यात सहा ठिकाणी हे शिबीर होणार आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तुकडेबंदीचा अडथळा दूर तुकडेबंदी कायद्यामुळे राज्यातील सुमारे ६० लाख कुटुंबांच्या जमिनींचे रजिस्ट्रेशन रखडले होते. मात्र, सरकारने हा कायदा शिथिल केल्यामुळे आता या अभियानांतर्गत सर्व प्रलंबित रजिस्ट्रेशन पूर्ण केली जाणार आहेत. तसेच, 'मृत सातबारा जिवंत करणे' म्हणजेच वारस नोंदी करण्याच्या प्रक्रियेलाही या शिबिरांमध्ये वेग दिला जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. तलाठ्याकडे जाण्याची कटकट संपली शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता अधिकृत सातबारा मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज उरणार नाही. 'महाभूमी' ॲपवर केवळ १५ रुपये भरून डिजिटल अधिकृत सातबारा नागरिकांना घरबसल्या उपलब्ध करून दिला जाण्याची सेवा चालू करत आहोत. या तंत्रज्ञानामुळे महसूल प्रशासनात मोठी पारदर्शकता येईल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. घरांचे पट्टे देण्यात येणार १ जानेवारी २०११ पूर्वी ज्यांची घरे सरकारी जागेवर आणि रहिवासी भागात आहेत, त्या सर्व घरांचे पट्टे वाटप करणार आहोत. सरकारी पट्ट नसल्यामुळे अतिक्रमित घरमालकाला घर बांधता येत नाही. या राज्यात १५ लाख परिवारांची घरे सरकारी जागेवर आहेत. त्यांनाही पट्टे वाटप करण्याचा निर्णय आपण करत आहोत. या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कायद्याने त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी हे अभियान आहे, असे बावनकुळे म्हणाले. NA ची अट रद्द, पाणंद रस्ते मोकळे होणार व्यावसायिक आणि रहिवासी कारणांसाठी आता 'एनए' (बिगर शेती) सनद मिळवण्यासाठी कागदपत्रांची अट शिथिल करण्यात आली असून, त्याबद्दलची सविस्तर माहिती या शिबिरांमध्ये दिली जाईल. तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेमध्ये शेतकऱ्यांचे जे पाणंद रस्ते आहेत, त्याला क्रमांक देणे, सर्व रस्त्यांचे मोजमाप करणे, सर्व रस्ते खुले करणे हे अभियान आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
भारतात दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. काँग्रेसची विचारधारा संविधानाची आहे. तर भाजपची विचारधारा स्पृश्य व अस्पृश्यता मानणाऱ्या मनुवादाची आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज भाजपवर निशाणा साधताना केली. कोकणातील चिपळूण येथे काँग्रेसचे विभागीय प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. या शिबिराच्या दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर उपरोक्त शब्दांत निशाणा साधला. ते म्हणाले, भारतात दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. एक विचारधारा काँग्रेसची आहे, तर दुसरी भाजपची. काँग्रेस व भाजपच्या स्वप्नातील भारत वेगळा आहे. काँग्रेसचा प्रयत्न संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचा आहे. तर भाजपचा विचार हा देश फक्त मूठभर लोकांचा असावा व स्पृश्य - अस्पृश्यता मानणाऱ्या मनुवादाचा आहे. भाजपला सर्व यंत्रणांवर ताबा हवा आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला सत्ता व संपत्ती हवी आहे. त्यांना सर्व यंत्रणांवर ताबा हवा आहे. हिंसा, द्वेष व भय पसरवणे, असत्य कथन करणे व देश हा मूठभर लोकांच्या हाती असावा अशी त्यांची संकल्पना आहे. आज त्याच पद्धतीचे वातावरण देशात आहे. निवडणूक आयोग, ईडी, सीबीआय, न्यायपालिका, सरकारी यंत्रणा आदी सर्व संस्थांवर भाजपने कब्जा केला आहे. त्यांनी देशभर थैमान घातले आहे. भाजप मनुस्मृती व 'बंच ऑफ थॉट'ला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसची भूमिका याहून अगदी उलट आहे. देशातील संपत्तीवर सर्वांचा समान अधिकार ते पुढे म्हणाले, हा देश सर्वांचा आहे. देशातील संपत्तीवर सर्व जनतेचा समान अधिकार आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण हा काँग्रेसचा विचार आहे. देश संविधानानुसार चालला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. या संविधानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचे, शिव, शाहू, फुले, आंबेडकर, संत, वारकरी संप्रदाय, बसवेश्वर महाराज यांचे विचार आहेत. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 6 बिगर काँग्रेसी नेत्यांना स्थान दिले होते. यामागे सर्व विचारधारांना सहभागी करवून घेण्याचा विचार होता. नेहरूंची गरीब महिलेने धरली होती कॉलर एका गरीब महिलेने नेहरूंची कॉलर पकडून 'स्वातंत्र्याने मला काय दिले?' असा प्रश्न केला. त्यावर नेहरूंनी त्या महिलेला अटक केली नाही. उलट तिच्या प्रश्नाला शांतपणे उत्तर दिले. आजच्या भारतात कुणीही असे धाडस करू शकत नाही एवढी भयानक परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आंदोलन केले तर त्यांना अटक करण्यात आली. ते देशद्रोही असल्याचा अपप्रचार केला गेला. आतापर्यंत काँग्रेसला संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण काँग्रेस संपणार नाही. कारण काँग्रेसाल मोठा वारसा लाभलेला आहे. ज्यांनी काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहिले, तेच आज काँग्रेसयुक्त झालेत. राहुल गांधी यांनी सर्वांना न घाबरण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाला, दहशतीला न घाबरता विचारांची लढाई लढणाऱ्यांचाच या युद्धात विजय होईल, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सातारा कलेक्टर ऑफिससमोर कुरिअर कर्मचाऱ्याला मारहाण करून २३ तोळे दागिने लुटून पलायन केलेल्या दरोडेखोरांना अवघ्या १२ तासात जेरबंद करण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले आहे. काल (शुक्रवारी) रात्री साडे बाराच्या सुमारास ही लूटमार झाली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे दरोडेखोरांचा पाठलाग करत महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. कुरिअर कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचाच या गुन्ह्याच्या कटात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक सुधीर मोरे यांनी दरोड्याच्या घटनेची सविस्तर माहिती देताना सांगितले की, साताऱ्यातील लक्ष्मी कुरिअर कंपनीचा कर्मचारी २३ तोळ्याचे दागिने घेऊन कोल्हापूरहून येणाऱ्या ट्रॅव्हल्समधून पुण्याला जाणार होता. त्यासाठी तो सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आला असताना स्विफ्ट कारमधून आलेल्या पाच जणांनी त्याला जबर मारहाण करत त्याच्याकडील दागिने लुटून कारमधून पलायन केले. कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याने घटनेची माहिती सातारा शहर पोलिसांना दिली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तातडीने घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरूवात केली. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. संशयित आरोपी अहिल्यानगर मार्गे धुळ्याकडे चालले असल्याचे लक्षात आल्याने सातारा पोलिसांनी शिरपूर पोलिसांना अलर्ट केले. महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवरील शिरपूर येथे सापळा रचून सातारा आणि शिरपूर पोलिसांनी पाचही दरोडेखोरांना ताब्यात घेतले आहे. दरोडेखोरांनी लुटलेले २३ तोळे सोने तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार ताब्यात घेतली. सध्या संशयितांना घेऊन सातारा शहर डीबी पथक साताऱ्याला येत आहे. अभिषेक शिकलगार, अंकुश जाट, अनुज दिवाकर, पंकज राठोड व अजय राठोड, अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे असून ते मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचे आहेत.
ओझरमध्ये विधी सेवा महाशिबिर उत्साहात:न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर म्हणाले- वकील व्यवसाय समाजकार्याचे साधन
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पुणे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती आरिफ सा. डॉक्टर यांनी वकिली व्यवसाय हे केवळ एक व्यवसाय नसून समाजकार्याचे साधन असल्याचे प्रतिपादन केले. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. ओझर (ता. जुन्नर) येथे आयोजित विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती, जुन्नर आणि तालुका बार असोसिएशनमार्फत श्री विघ्नहर सांस्कृतिक भवन, ओझर येथे याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र के. महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष ॲड. सुजीत शेलार आणि तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. हेमंत हडावळे यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी व पक्षकार उपस्थित होते. न्यायमूर्ती आरिफ सा. डॉक्टर यांनी पुणे जिल्ह्याने शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून देण्यात नेहमीच पुढाकार घेतल्याबद्दल अभिनंदन केले. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांमुळे लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात. त्यामुळे नागरिकांना या योजनांची माहिती व लाभ देण्यासाठी आयोजित हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जास्तीत जास्त नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही न्यायमूर्ती डॉक्टर यांनी केले. यावेळी बोलताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन म्हणाले की, खेड-राजगुरूनगर, घोडेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यातील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना त्यांच्यासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, तसेच कायदेविषयक हक्कांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाच्या उन्नतीसाठी असे मेळावे महत्त्वपूर्ण ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.
अजित पवार यांच्या विमानअपघाताबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे काळाच्या मिळतील, असे वक्तव्य आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना केले. अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला एक महिना पूर्ण झाल्यानिमित्त तटकरे यांनी शनिवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत समाधी स्थळाचे दर्शन घेतले. बारामतीमध्ये बोलताना तटकरे म्हणाले की, 'अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांनी त्यांची भूमिका मांडण्यापूर्वी महाराष्ट्राने अनुभवले आहे की कोण किती टीका करत होते. दादांचे भाषण होते की 'मी एकटा आहे, पण बारामतीकर माझ्यासोबत आहेत.' तटकरे म्हणाले की, 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासून भूमिका आहे की, तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी करावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत. पक्षाच्या वतीने आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.' तटकरे म्हणाले की, 'विमान अपघात घटनेतील सत्य समोर यावे, अशी आमची अपेक्षा आहे. काही जणांनी वेगळे मत व्यक्त केले असले तरी, यंत्रणांनी तपास करताना उपस्थित झालेल्या इतर बाबींचाही विचार करावा. जागतिक पातळीवरील तपास यंत्रणांची मदत घ्यावे', अशी मागणीही त्यांनी केली. तटकरे म्हणाले की, 'अजित पवार यांच्या निधनामुळे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे मोठे नुकसान झाले आहे. दादांनी आयुष्यभर सर्वांना ऊर्जा देण्याचे काम केले आणि विकासाचा दृष्टिकोन जपला. आज दादाप्रेमी त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी एकत्र आले होते.' तटकरे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची माहिती देताना सांगितले की, ते 'मागील ३५ वर्षांपासून राजकारणात कार्यरत आहेत. १९९१ साली त्यांचा अजित पवार यांच्याशी परिचय झाला आणि १९९९ पासून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम सुरू केले.' '२०१४ ते २०१८ या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते आणि लोकसभेची निवडणूकही त्यांनी अजित पवारांच्या आग्रहाखातर लढवून जिंकली होती. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्याकडील जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यासाठी पक्षाच्या वतीने आपण काम केले,' असेही तटकरे यांनी नमूद केले.
एलोरा स्कूलमध्ये विज्ञान दिन साजरा:300 बालवैज्ञानिकांनी बनविले एकापेक्षा एक सरस वैज्ञानिक उपकरणे
बीड बायपास रोडवरील एलोरा इंग्रजी हायस्कूलमध्ये विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्षन भरविण्यात आले. त्यामध्ये 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी 150 एकापेक्षा एक सरस विज्ञान प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांत चंद्रयान - 3, वाहन घषर्णावर आधारित पथदिवे, हवा पाणी व्दारे विदयुतनिर्मिती तसेच व्होलकॅनो, वॉटरबोट, हायड्रोलिक ब्रीज, एअर कुलर, रोबोटिक हॅन्ड, व्हॅक्युम क्लिनर, रोप वे, डी.एन.ए मॉडेल, जनरेटर, ड्रोन, सोलार कार, एअर गन, प्रोजेक्टर, डिझास्टर मॅनेजमेंट, हेल्दी अॅण्ड अनहेल्दी फूट, एटीएम मषीन, मायक्रोस्कोप, जलचक्र, फुलांचे मॉडेल, रॉकेट, पेंडूलम, मेरी गो राऊड, एअरपोर्ट, डी.जे सेटप, स्ट्रीट लाईट, होलोग्राम, रिव्हर क्लिनिंग मशीन, स्टेथोस्कोप, सोलार फॅन, लेझर सिक्युरिटी अलार्म किडनी, हार्ट मॉडेल, रूरल फ्रिज आदी एकापेक्षा एक दर्जेदार प्रयोगाचे सादरीकरण केले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन देवळाई प्रभागाचे नगरसेवक आप्पासाहेब हिवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव प्रल्हाद शिंदे , प्राचार्या संगिता शिंदे , बालवैज्ञानिक मृणमयी पाटील, अंजिक्य शिंदे , नितीन आडे, आपासाहेब शिंदे मामा यांची उपस्थिती होती. याप्रसंगी यशस्वी बालवैज्ञानिकांसह नवनिर्वाचित नगरसेवक हिवाळे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुहास भानप यांनी विज्ञानदिनाचे व प्रदर्षनात मांडलेल्या विविध प्रयोगा बद्दल माहिती दिली. यावेळी प्रदर्षन पाहण्यासाठी पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अश्वनी काळे, तर आभार अर्चना मांडे यांनी मांडले. प्रदर्शनातील उत्कृष्ट प्रयोग निवडण्यासाठी परिक्षक म्हणून निलाक्षी राव, स्वाती देशमुख, वैषाली शिरवट, प्रज्ञा कुलकर्णी यांनी काम पाहिले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी पूजा शेळके, मनिषा फुलारे, संजय काथार, तेजस्विनी सोमवंशी , सचिन काळे, दत्तात्रय गवारे, हिरा पवार, मीना तळेकर, अनुसया लहाने, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कापडसिंगी ते रिसोड मार्गावर धानोरा शिवारात चोरट्यांनी तीस लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटल्याने सराफा व्यापाऱ्याचे दुकानाच बंद झाले. मात्र हिंगोली पोलिसांनी अवघ्या वीस दिवसात तपास करून सराफा व्यापाऱ्याचे दागिने शनिवारी तारीख 28 परत दिले. दागिने परत मिळताच सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी सेनगाव पोलिसांसह जिल्हा पोलिस दलाचे आभार व्यक्त केले. लोणार येथील सराफा व्यापारी सुरेश खंदारकर यांनी बँकांकडून कर्ज काढून पाच वर्षांपूर्वी सोने-चांदीचे दागिने विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी सारख्या ग्रामीण भागात एक हजार रुपये किराया असलेल्या खोलीमध्ये त्यांनी छोटेखानी व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र तारीख 31 जानेवारी रोजी कापडसिंगी येथून गावी परत जात असताना धनोरा शिवारात चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांना खाली पाडले. त्यानंतर त्यांच्याजवळी तीस लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने पळवले. याप्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. चोरट्यांनी दागिने लूटल्यामुळे खंदारकर यांचे दुकानाच बंद पडले होते. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण झाला होता. दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलिस अधीक्षक कमलेश मिना, पोलिस उपाधीक्षक राजकुमार केंद्रे मा.श्री. राजकुमार केंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस अधीक्षकांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सेनगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक दिलीप मोरे, रविकिरण खंदारे यांचे पथक नियुक्त केले होते. सेनगाव पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करून अवघ्या ४८ तासात सहा दरोडेखारांना ताब्यात घेवुन चोरी गेलेला संपुर्ण मुददेमाल जप्त केला होता. सदर दरोडेखोराकडुन जप्त केलेला मुद्देमाल कायदेशीर प्रक्रीया लवकरात लवकर पुर्ण करून सराफा व्यापारी खंदारकर यांना शनिवारी ता 28 परत दिला आहे. या घटनेमध्ये चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल परत मिळाल्यामुळे सराफा व्यापारी खंदारकर यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. बंद पडलेले सराफात दुकान आता नव्याने सुरू करण्यासाठी पोलिस दलाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तर खंदारकर यांनीही पोलिस दलाचे आभार मानले.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या पूना कॉलेज ऑफ फार्मसीने आयोजित केलेल्या ३९ व्या राज्यस्तरीय फार्मसी क्रिकेट करंडक स्पर्धेत पूना कॉलेज ऑफ फार्मसी (पुरुष गट) आणि इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी (महिला गट) यांनी विजेतेपद पटकावले. ही सात दिवसीय स्पर्धा भारती विद्यापीठाच्या एरंडवणे संकुलात आयोजित करण्यात आली होती. फार्मसी विद्यार्थ्यांमध्ये संवाद आणि क्रीडासौहार्द वाढवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेत विविध महाविद्यालये आणि औषधनिर्माणशास्त्र कंपन्यांचे एकूण ११ पुरुष संघ आणि ७ महिला संघ सहभागी झाले होते. महिला गटातील अंतिम सामना शिवनगर विद्या प्रसारक मंडळ (एस.व्ही.पी.एम.) कॉलेज ऑफ फार्मसी, बारामती आणि इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यात खेळला गेला. इंदिरा कॉलेजने सलग पाचव्यांदा हा फार्मसी कप जिंकण्याचा मान मिळवला, तर आयोजक पूना कॉलेजने १५ वर्षांनंतर विजेतेपद पटकावले. बक्षीस वितरण समारंभात सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे येथील प्राचार्य डॉ. राजेश पाटील यांच्या हस्ते मानाचा फार्मसी करंडक व मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पूना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. आत्माराम पवार, उपप्राचार्य डॉ. वर्षा पोखरकर आणि उपप्राचार्य डॉ. एल. सथियनारायणन उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन ब्राऊनडोव्ह हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड, मुंबईचे उपाध्यक्ष चंदन राजमाने यांच्या उपस्थितीत झाले. इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसीने प्रथम फलंदाजी करताना ८ ओव्हर मध्ये १०३ धावा केल्या. त्याला उत्तर देताना एस. वी.पी.एम कॉलेजने ४८ धावा केल्या. इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी ने विजेतेपदाला गवसणी घातली.पुरुष गटात अंतिम सामना जीवनधारा फार्मा कंपनी आणि पूना कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना पूना कॉलेज ऑफ फार्मसीने २० ओव्हर मध्ये १५२ धावा केल्या.त्याला प्रतिउत्तर देताना जीवनधारा फार्मा कंपनी ने १४२ धावा केल्या. या स्पर्धेचे संयोजन अक्षय खांडके, डॉ. सतीश मंडलिक, फार्मसी करंडक संयोजन प्रमुख प्रियांका कंधारे, डॉ. ज्ञानदेवी मथुरे आणि क्रीडा प्रमुख डॉ. नीलेश देशमुख यांनी केले.
पुण्यात गावठी दारू अड्ड्यावर छापा:महिला अटकेत, ६ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
पुणे नगर रस्त्यावरील भावडी गावात गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत एका महिलेला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी ६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव अनिशा योगेश गुडदावत (वय २०, रा. भावडी, ता. हवेली, नगर रस्ता) असे आहे. नगर रस्त्यावरील भावडी गावातील मोकळ्या जागेत एक महिला गावठी दारू तयार करून विकत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सातला मिळाली होती. पोलीस कर्मचारी नितीन धाडगे आणि प्रतिक्षा पानसरे यांना ही माहिती मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गावठी दारू तयार करण्याच्या भट्टीवर छापा टाकला. या छाप्यात १८ लिटर तुरटी मिश्रित पाणी, गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे रसायन आणि इतर साहित्य असा एकूण ६ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अनिशा गुडदावत हिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सारंग दळे, गिरीष नाणेकर, निलेश साळवे, सुहास तांबेकर, प्रशांत कापुरे, निर्णय लांडे, नेहा तापकीर, सोनाली नरवडे, ऋषीकेश ताकवणे आणि बाळासाहेब तनपुरे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंड गजाआड कोथरूड गोळीबार प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका)कारवाई करण्यात आलेल्या नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाला अटक करण्यात आली. अमोल दत्तात्रय लाखे (वय २७, रा. ईटखेडा. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोथरूड गोळीबार प्रकरणात फरार असलेला गुंड नीलेश घायवळ हा सध्या परदेशात असून, अद्याप त्याला ताब्यात घेण्यात आले नाही. घायवळ हा सध्या ब्रिटनमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसंनी ब्रिटीश उच्चायुक्तांशी संपर्क पत्रव्ववहार करण्यात आले आहे. खंडणी प्रकरणात घायवळ टोळीविरुद्ध वारजे पोलिसांनी ‘मकोका’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात अमोल लाखे याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर तो पसार झाला लाखे हा बार्शी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांना मिळाली. त्यानंतर त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले.
२८ लाखांचे मेफेड्रोन जप्त:दोन तस्कर अटकेत, वर्षभरापासून शहरात करत होते अमली पदार्थांची तस्करी
पुणे पोलिसांनी वाघोली परिसरातून दोन अमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २८ लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन आणि ५५ लाखांचा इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे आरोपी गेल्या वर्षभरापासून शहरात मेफेड्रोनची तस्करी करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. किशन नंदकिशोर लधड (वय ३५, रा. धानोरी) आणि हनुमान रूपाराम चौधरी (वय ३३, रा. वडगाव मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील केसनंद भागात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या किशन लधडला वाघोली पोलिसांनी प्रथम अटक केली. किशन लधडच्या चौकशीतून वडगाव मावळमधील तस्कर हनुमान चौधरी याने त्याला मेफेड्रोन पुरविल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून चौधरीला वडगाव मावळ परिसरातून ताब्यात घेतले. चौधरीच्या मोटारीत २८ लाख रुपये किमतीचे १३४ ग्रॅम मेफेड्रोन सापडले, जे जप्त करण्यात आले. हनुमान चौधरी मूळचा राजस्थानचा असून, तो राजस्थानातून मेफेड्रोन आणून पुण्यात विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. आरोपीने आतापर्यंत कोणाकोणाला अमली पदार्थांची विक्री केली आहे, किती अमली पदार्थ त्यांनी पुण्यात आणले होते, मिळालेल्या पैशातून त्यानी विनियोग कसा केला आहे याबाबतची माहिती पोलीस मिळवत आहेत.अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, सहायक निरीक्षक विजय चंदन, उपनिरीक्षक अमोल काळे, प्रदीप मोरे, शेखर शिंदे, विशाल गायकवाड आणि मारुती वाघमारे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
हिंगोली शहरासह जिल्हाभरात होळी व धूलिवंदनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात होळी व धूलिवंदनाचा सण उत्साहात व शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिस दलाकडून विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. ग्रामीण भागातून बेकायदेशीर रित्या गावठी दारू गाळप व विक्री होणार नाही याकडे लक्ष दिले जाणार आहे. याशिवाय देशी व विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. वाहनांच्या तपासणीसाठी जिल्ह्यातील १३ पोलिस ठाणे अंतर्गत विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेची चार पथकेही कार्यरत असणार आहेत. या पथकाच्या माध्यमातून चार चाकी, दुचाकी वाहनांसह ऑटोची तपासणी केली जाणार असून दारूची वाहतूक करणारी वाहने जप्त करून चालकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्यासाठी रविवार ता एक पासून वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली जाणार आहे. हिंगोली शहरात वाहतूक शाखेच्या वतीने वाहन तपासणी केली जाईल. शहरासह जिल्ह्यात मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या संदर्भातील स्पष्ट आदेश जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. संवेदनशील भागामध्ये पोलिस विभागाची गस्त राहणार आहे. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत विशेष दक्षता घेण्यात आली आहे. तर मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी वाहन चालकांची ब्रिथ ऍनालायझर द्वारे तपासणी केली जाणार आहे. याशिवाय ग्रामीण भागांमधून होणाऱ्या पार्ट्यांवरही लक्ष ठेवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनीही होळी व धुलीवंदनाचा सण उत्साहात व शांततेत साजरा करावा तसेच धुलीवंदनाच्या दिवशी नैसर्गिक रंगाचा वापर करावा असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी केले.
राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील चेंबूर परिसरात एक भयंकर घटना घडली आहे. चेंबूरच्या सुभाष नगर भागातील एका निर्माणाधीन इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून 6 कामगार कोसळलेत. या घटनेत एका कामगाराचा मृ्त्यू झाला असून, 5 जण जबर जखमी झालेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सुभाष नगर येथील एका आलिशान इमारतीचे वेगात बांधकाम सुरू आहे. शनिवारी दुपारी 12.05 च्या सुमारास या ठिकाणी कामगार नेहमीप्रमाणे काम करत होते. ते इमारतीच्या 6 व्या मजल्यावर बांधकाम करत होते. यावेळी 6 कामगार अचानक तोल जावून 80 ते 90 फूट उंचीवरून खाली कोसळले. या घटनेत 6 कामगार जबर जखमी झाले. त्यातील एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बांधकामस्थळी असणारे इतर कामगार व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सर्वच कामगारांना त्यांनी तातडने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी 5 पैकी काही कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरील पंचनामा केला आहे. सुरक्षा नियमांकडे साफ दुर्लक्ष या प्रकरणी सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे सदर कामगार एवढ्या उंचीवर काम करत असतानाही त्यांनी सेफ्टी किट वापरले नव्हते. नियमानुसार, उंच इमारतीवर काम करत असताना हेल्मेट, सेफ्टी बेल्ट व नेट असणे अनिवार्य आहे. पण या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे साफ उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले. या कामगारांनी सेफ्टी बेल्ट लावले अकसते तर कदाचित ही दुर्घटना घडली नसती अशी चर्चा घटनास्थळी सुरू आहे. काय आहेत जखमी कामगारांची नावे? राजावाडी रुग्णालयात रामाल्लू नामक 55 वर्षीय कामगाराला डॉक्टरांनी मृत घोषित केले. उर्वरित 5 कामगारांवर सध्या उपचार सुरू आहेत. 22 वर्षीय कामगार गुनाधर राय हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. याशिवाय उसराई (30), रमेश राय (25), विजय (35) व संदीप (27) अशी इतर जखमींची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, कामगारांच्या सुरक्षिततेवरती पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. आज सकाळीच आणखी एक दुर्घटना दुसरीकडे, मुंबईतील वरळी - शिवडी उन्नत मार्गाच्या कामात लोखंडी रॉड कोसळून अशीच एक घटना घडली आहे. विकसाकामांवेळी झालेली या महिन्यातील ही मुंबईमधील दुसरी दुर्घटना आहे. हा लोखंडी रॉड एका व्यक्तीवर कोसळला आहे. यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. केईएम रुग्णालय परिसरात ही दुर्घटना घडली आहे. सध्या जखमी व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी संदीपान भुमरे आणि त्यांच्या समर्थकांवर अत्यंत गंभीर आरोप करत थेट आव्हान दिले आहे. ज्याला अब्रू असते, तो अब्रू नुकसानीचा दावा करतो; मी अशा दाव्यांना फुकटची भीकही घालत नाही, अशा शब्दांत त्यांनी भुमरेंनी दिलेल्या नोटीसीवर प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे म्हणाले की, समृद्धी महामार्गाचे 1150 कोटी रुपये ढापण्याचा प्रयत्न झाला आहे. एक साधा ड्रायव्हर एवढी हिंमत करूच शकत नाही. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, 1985 मध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा 1971 चा हिबानामा कसा असू शकतो? तसेच, एखादे हिंदू कुटुंब मुस्लिमाला हिबानामा (भेटपत्र) कसे करून देऊ शकते, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. सोमवारी मी कलेक्टरांकडे जाणार आहे, तो हिबानामाच मी देतो तुम्हाला मग त्यांनी सांगावे हा मी नाहीच म्हणून. त्यामध्ये त्यांचे आधार कार्ड सुद्धा असतील. माझ्याकडे प्रकरणाचे 'खमंग मटेरियल' भुमरेंनी पाठवलेल्या नोटीसवर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, मी ती नोटीस वाचली देखील नाही, थेट वकिलांकडे पाठवली आहे. उलट त्यांनी मोठा दावा दाखल करावा, म्हणजे कोर्टात पैसे भरताना ते पैसे कुठून आले हे तरी उघड होईल. माझ्याकडे या प्रकरणाचे 'खमंग मटेरियल' असून मी कोर्टात त्याची वाट पाहत आहे. त्या ड्रायव्हरच्या भावावर 376 चा गुन्हा या प्रकरणात पोलिसांनी भुमरेंच्या ड्रायव्हरला पाठीशी घातल्याचा आरोप दानवेंनी केला. तसेच, वकील संदीप गव्हाणे हे लुटमारीचे धंदे करतात आणि बापू भुमरे त्यांच्याकडेच बसलेले असतात, असा दावाही त्यांनी केला. भुमरेंचा जो चालक सध्या चर्चेत आहे त्याच्या भावावर कुठेतरी 376 चा गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुन्ह्यात मेरे पास 100-200 कोटी है अब मेरा कोई कुछ नही कर सकता असे असल्याचे माझ्या कानावर आले आहे. FIR मी काढतो आहे. नोटीसीला मी उत्तर देणार अंबादास दानवे म्हणाले की, मी जो आरोप केला तो केवळ भुमरेंचा ड्रायव्हर आहे इतका माझा आरोप आहे. माझ्या आरोपाचे केवळ त्यांनी उत्तर द्यावे. त्यांचा ड्रायव्हर आहे हे त्यांनी कबुल केले आहे. त्यांचा जन्म 1985 शीचा आहे मग हिबानामा 1971 होतो कसा हा माझा प्रश्न होता. दुसरा प्रश्न हिंदू कुटुंब मुस्लीमाला हिबानामा कसे करुण देते? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. गट नंबरचा जा विषय आहे मी त्यांच्यात म्हटलंय की आधीचा गट नंबर 174 आणि आताचा सर्वे नंबर 89 असे माझ्या पत्रात स्पष्ट आहे. ते दुसरेच काही तरी बोलत आहेत. तिथे तो गट नंबर नाही हे मला माहिती आहे. तुमचा तालुका तिकडे आहे पण माझे या परिसरात रोज जाणे येणं आहे. मला सर्व माहिती आहे. दिशाभूल करणे अतिशय चुकीचे आहे. नोटीसीला मी उत्तर देणार पण हे काही कोर्टात जाणार नाही. भुमरेंनी आधीही काही केले नाही. त्यांच्या मुलाला मारले नाही पडले? किती वाजता पडले? कसे पडले? कुठे ॲडमिट केले? MLC झाली का? पूर्ण माहिती घेतली का? पोलिस तिथे गेले होते का? हे सर्व माहिती घेतली पाहिजे. त्यांना काय झाले मला सर्व माहिती आहे. अजितदादांच्या अपघाताबद्दल चौकशी व्हावी अंबादास दानवे म्हणाले की, अजित पवारांच्या अपघाताबद्दल चौकशी व्हावी ही सर्व महाराष्ट्राची मागणी आहे.ती लवकरात लवकर व्हावी आणि सत्य समोर यावे ही आमची इच्छा आहे. तर खारगे समितीचा अहवाल येत असेल आणि त्यामध्ये पार्थ पवार जर नसेल तर त्या अहवालाला काहीही अर्थ नाही. असे अहवाल शेवटच्या टप्प्यात होत असतात. राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीची चर्चा सुरू असून होळीनंतर चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.
आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत
बारामती : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज एक महिना पूर्ण झाला. २८ जानेवारीला बारामतीमध्ये अजित पवार यांचे विमान कोसळले. अजित पवार हे आपल्यामध्ये नाहीत असा विश्वास अजूनही अनेकांना बसत नाही. फक्त पवार कुटुंबीय नाही तर संपर्ू्ण महाराष्ट्र त्यांची आठवण काढत आहे. अजित पवार यांच्या निधनाला १ महिना पूर्ण झाला असून त्यांचे […] The post आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बँकेतील नोटा घेऊन जाणारे विमान कोसळले; १५ ठार
बोलिव्हिया – बोलिव्हियाच्या राजधानीजवळ शुक्रवारी पैसे घेऊन जाणारे एक मालवाहू विमान कोसळले. त्यामुळे महामार्गावरील सुमारे १२ वाहनांचे नुकसान झाले. विमान कोसळल्यानंतर नोटा जमिनीवर विखुरल्या गेल्या होत्या. या अपघातात १५जणांचा मृत्यू झाला. यात अनेकजण जखमी झाले आहेत. पंधरा जणांचा मृत्यू – ‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार, शुक्रवारी संध्याकाळी बोलिव्हियाची राजधानी ला पाझजवळील एल अल्टो शहरात खराब हवामानामुळे एक विमान […] The post बँकेतील नोटा घेऊन जाणारे विमान कोसळले; १५ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चालू महिन्याच्या सुरुवातीला मुंबई - पुणे एक्सप्रेसवर प्रोपेलिन वायूचा टँकर उलटल्याने संपूर्ण महामार्ग ठप्प झाला होता. यामुळे तब्बल 32 तास ट्रॅफिक जाम होऊन वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले होते. आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. त्यात मुख्यमंत्र्यांनी अशा स्थितीला सामोरे जाण्यासाठी संबंधित इंधन कंपन्या व सरकारकडे कोणतीही एसओपी नसल्याची कबुली दिली. तसेच या प्रकरणी लवकरच ठोस पाऊले उचलण्याची ग्वाहीही दिली. भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी ज्वलनशील पदार्थांच्या वाहतुकीसाठी काही विशिष्ट नियम आहेत का? असा प्रश्न लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत मांडला. मुंबई- पुणे महामार्गावर ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारा एक टँकर उलटल्यामुळे वाहनचालकांसह प्रशासनाची मोठी पंचाईत झाली, असे ते म्हणाले. त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, 3 फेब्रवारी रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या एका लेनवर प्रोपेलिन गॅसची वाहतूक करणाऱ्या एका टँकरचा अपघात झाला होता. सदर अपघातात टँकरमधील ज्वलनशील वायूची गळती सुरू झाली होती. सदर घटनेमुळे वाहतूक काही तास बंद ठेवून मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणावळा व खोपोली मार्गावर वळवण्यात आली होती. अमित साटम यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने या टँकरची तपासणी करण्यात आली होती. त्याचा योग्य तो परवानाही घेतला होता. त्याची वारंवार तपासणी होत होती. परंतु, मुंबई - पुणे एक्सप्रेसवर एकेठिकाणी वाहन चालकाचा तोल जाऊन टँकर उलटला. पण या प्रकरणी आपल्या अधिकारी व वाहतूक पोलिसांचे कौतुक केले पाहिजे. टँकर पेटला असता तर मोठी हानी झाली असती सरनाईक पुढे म्हणाले, सदर टँकर उलटला पण वायू गळती झाली नाही. ती वायू गळती झाली असती तर फार मोठ्या प्रमाणात मनुष्यहाणी झाली असती. कारण, हा प्रोपेलिन हा वायू फार मोठ्या प्रमाणात ज्वलनशील आहे. त्याची योग्य प्रकारे त्याच ठिकाणी तजवीज करून व्यवस्था करण्यात आली. हा वायू पेटला असता टँकरच्या सभोवतालच्या 500 मिटरच्या परिघात फार मोठी हानी झाली असती. त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे की, त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. पण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन स्थिती मोठ्या हुशारीने हाताळली. आदित्य ठाकरेंनी केली महत्त्वपूर्ण सूचना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही या चर्चेत हस्तक्षेप केला. त्यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. अशा घटना टाळण्यासाठी सरकार हॅझमॅट व्हेईकल यूनिट रस्त्यांवर का? व बोगद्यात आग लागली तर त्या प्रकरणांतही आपण अशी एखादी सोय करणार का? असे ते म्हणाले. त्यावर मंत्री सरनाईक म्हणाले, सरकारने एमएसआरडीसीला असे युनिट्स स्थापन करण्याचे आदेश दिलेत. एमआरडीसीने टोल नाक्यांवर घेण्यात आलेला टोल परत करण्याचाही निर्णय घेतला आहे. भविष्यात ज्वलनशील पदार्थांचा टँकर उलटला तर तो एअरलिफ्ट करता येईल का? यावरही विचार केला जात आहे. कंपन्या व सरकारकडे एसओपीच नाही - मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. ते म्हणाले, ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या आपल्या ज्या केंद्रीय कंपन्या आहेत, त्यांच्याकडे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जी उपकरणे हवी होती ती नव्हती. त्यामुळे आपल्याला या घटनेतून एक धडा मिळाला. या प्रकरणी आपल्याकडे एक एसओपीच नाही. ती एवढी वर्षे वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडेही नाही आणि सरकारकडेही नाही. त्यामुळे आपण संबंधित कंपन्यांना ही एसओपी तयार करण्याचे आदेश दिलेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी यावर समाधान व्यक्त केले.
यंदा 3 मार्च रोजी चंद्रग्रहण आहे. त्यामुळे धूलिवंदन साजरा करता येणार की नाही, रंग खेळणे जमणार की नाही, याबद्दल नाना शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, चंद्रग्रहण असूनही याच दिवशी धूलिवंदनाचा दिवस साजरा करता येईल. रंग खेळता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. धूलिवंदनादिवशी मंगळवारी चंद्रग्रहणाचे वेध सकाळी सूर्योदयापासून सुरू होत आहेत. या वेदकाळामध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये आपले नित्य नैमित्तिक पूजा, अर्चा अभिषेक, श्राद्ध इत्यादी सर्वे धार्मिक कृत्ये आपण करून शकतो, अशी माहितीही दाते यांनी दिली. पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले की, 'यावर्षी 2 मार्च रोजी सोमवारी होलिकादहन आहे. ते संध्याकाळी सूर्यास्तानंतर प्रदोषकाळात आपल्याला नेहमीप्रमाणे करायचे आहे. दुसऱ्यादिवशी पौर्णिमा प्रदोषकाळात नाही. तसेच या दिवशी चतुर्दशी आहे. त्यामुळे सूर्यास्तानंतर आपण नेहमीप्रमाणे भद्रा असतानासुद्धा होलिकादहन करायचे आहे. मंगळवार 3 मार्च रोजी धूलिवंदनाचा दिवस आहे. या दिवशी चंद्रग्रहण आहे. हे चंद्रग्रहण ग्रसतोदित असल्याने सूर्यास्तानंतर संध्याकाळी 6 वाजून 48 मिनिटापर्यंत या काळामध्येत ते आपल्याला दिसणार आहे. त्याचा स्पर्ष दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी आहे. स्पर्श आणि मध्य दिवसा असल्यामुळे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही.' पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले की, 'चंद्रग्रहण फक्त संध्याकाळी सूर्यास्तानंतर अल्पकाळ आपल्याला दिसणार आहे. या अल्पकाळात काही ठिकाणी तीन ते चार मिनिट, तर काही ठिकाणी दहा, पंधरा, वीस मिनिटे दिसणार आहे. या काळात जेवढे शक्य असेल तेवढे स्नान, जप इत्यादी गोष्टी आपण कराव्यात. जर या वेळात काहीच शक्य झाले नाही, तर 6 वाजून 49 मिनिटांनंतर ग्रहणाचे मोक्षस्नान करावे. ग्रहणाचा वेध सकाळी सूर्याोदयापासून सुरू होत असल्याने आपण या वेदकाळामध्ये संपूर्ण दिवसभरामध्ये आपले नित्य नैमित्तिक पूजा, अर्चा अभिषेक, श्राद्ध इत्यादी सर्वे धार्मिक कृत्ये आपण करून शकतो.' पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले की, 'चंद्रग्रहणाच्या काळात फक्त या ठिकाणी भोजनाचा निषेध आपल्याला सांगितलेला आहे. तरीही जे अशक्त आहेत, आजारी आहेत, वृद्ध आहेत, बाल आहेत, गर्भवती स्त्रिया या सर्वांनी अकरा वाजेपर्यंत अन्न घेण्यास हरकत नाही. त्यानंतर मात्र संध्याकाळी मोक्ष झाल्यावर आपण भोजन करायचे आहे. अर्थात या सर्व गोष्टी करता येत असल्यामुळे जो धूलिवंदनाचा दिवस आहे त्या दिवशी होळी, रंग खेळणे इत्यादी सर्व गोष्टी आपण करू शकतो. त्याला कोणताही निषेध नाही. धूलिवंदनाच्या दिवशी जरी चंद्रग्रहण असले तरी आपण होळीचा, रंगखेळण्याचा सण साजरा करू शकतो.'
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवांच्या मृत्यूला 1 महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी अजित पवारांच्या कार्याचा सखोल आढावा घेत ते आपल्या कायम स्मरणात राहतील अशी भावना व्यक्त केली आहे. आज त्यांच्या उणीवेची वेदना मनाला सतत जाणवते, पण त्यांचे विचार, त्यांची कार्यतत्परता व राष्ट्रवादी परिवाला त्यांनी दिलेले बळ मला व आपल्या सर्वांना पुढे जाण्याची नवी प्रेरणा देत राहील, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. या घटनेला आज 1 महिना पूर्ण झाला. पण त्यांच्या मृत्यूविषयी व्यक्त करण्यात येणाऱ्या शंका-कुशंका थांबल्या नाहीत. सत्ताधारी व विरोधी बाकावरील अनेक आमदारांनी अजित पवारांचा मृत्यू हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या पत्नी तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज एक व्हिडिओ पोस्ट करत ते आपल्या सर्वांच्या कायम स्मरणात राहतील अशी भावना व्यक्त केली आहे. काय म्हणाल्या सुनेत्रा पवार? सुनेत्रा पवार आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांची आठवण काढताना म्हणतात, जिवाभावाचा माणूस… माणुसकीची खोल जाण, काम करण्याची अखंड प्रामाणिक तळमळ आणि समाजासाठी झटण्याची अविरत वृत्ती, हेच अजितदादांचे खरे व्यक्तिमत्त्व होते. जनहितासाठी सत्ता वापरण्याची त्यांची ठाम भूमिका, दूरदृष्टीतून उभा केलेला विकासाचा मार्ग आणि कामातून कमावलेला जनतेचा अपार विश्वास, हेच त्यांच्या जीवनकार्याचे खरे विश्व होते. स्वभावाने दिलदार आणि आपुलकीने माणसं जोडणारे, तर निर्णयाच्या वेळी तितकेच रोखठोक आणि विकासाभिमुख नेतृत्व, अशी त्यांची वेगळी ओळख होती. प्रत्येक समाजघटकाला आधार देत त्यांनी सातत्याने “विकासाचे राजकारण” जपले. आज त्यांच्या उणीवेची वेदना मनाला सतत जाणवते; पण त्यांचे विचार, त्यांची कार्यतत्परता आणि राष्ट्रवादी परिवाराला त्यांनी दिलेले बळ मला आणि आपणा सर्वांना पुढे जाण्याची नवी प्रेरणा देत राहील. अजितदादा सदैव आपल्या स्मरणात.. आपल्या विचारांत, आपल्या कृतीत, आपल्या प्रत्येक कामात त्यांचे प्रतिबिंब कायम दिसत राहील, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. व्हिडिओ ट्विटरवरून काढला का? सुनेत्रा पवार यांनी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तो काही वेळातच व्हायरल झाला. पण काही वेळाने हा व्हिडिओ ट्विटरवर दिसेनासा झाला. त्यामुळे हा व्हिडिओ सुनेत्रांनी डिलीट केला का? अशी चर्चा रंगली आहे. शिखर बँक घोटाळ्यात सुनेत्रा पवारांच्या अडचणी दूर दुसरीकडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससी बँक) या राज्याच्या शिखर सहकारी बँकेत कर्जांचे वितरण करताना सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपांच्या प्रकरणात दिवंगत अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना क्लीन चिट देणारा ‘सी-समरी’ अहवाल विशेष एसीबी न्यायालयाने शुक्रवारी स्वीकारला. यामुळे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या गुन्ह्याचे प्रकरण कमकुवत होणार असल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याही अडचणी दूर होण्याची चिन्हे आहेत. ईडीचा हस्तक्षेप अर्जही फेटाळला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी विशेष एसीबी न्यायालयाचा हा महत्त्वाचा निर्णय आला आहे. ‘गुन्हेगारी प्रकरण दिसत नाही’, असे निरीक्षण नोंदवत न्यायाधीश महेश जाधव यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा (ईओडब्ल्यू) ‘सी-समरी’ अहवाल स्वीकारला. तसेच या अहवालाच्या विरोधातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, माजी आमदार माणिकराव जाधव, दिवंगत माजी मंत्री शालिनीताई पाटील यांच्यासह अनेकांनी केलेल्या जवळपास 30 ‘प्रोटेस्ट’ याचिका न्यायालयाने फेटाळल्या, शिवाय ईडीचा हस्तक्षेप अर्जही फेटाळला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. अजितदादांच्या अपघाताबाबत जनसामान्यांच्या मनात असलेल्या सर्व शंकांचे निरसन झाले पाहिजे. गरज पडल्यास या तपासासाठी जागतिक स्तरावरील निष्णात संस्थांची मदत घ्यावी, पण सत्य लवकरात लवकर समोर आले पाहिजे, अशी मागणी तटकरे यांनी केली आहे. सुनील तटकरे म्हणाले की, विमान अपघाताचा तपास करताना कोणत्याही प्रकारची त्रुटी राहता कामा नये. आजवर या प्रकरणावर जे प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, त्या सर्व बाबींचा सखोल तपास व्हावा. भारत सरकारच्या स्वायत्त संस्था आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयामार्फत चौकशी सुरू आहेच, शिवाय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सीआयडी (CID) चौकशीचे आदेश दिले आहेत. सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली सीबीआय चौकशीची मागणी तपासाच्या प्रक्रियेवर बोलताना त्यांनी सांगितले की, आम्ही केवळ मागणी करून थांबलो नाही, तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) कडे सोपवण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनीही तत्परता दाखवत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे ही मागणी वर्ग केली असून, त्यानुसार आता सीबीआय तपास सुरू झाला आहे. 1991 पासूनचे ऋणानुबंध अन् राजकीय प्रवास अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा देताना तटकरे भावूक झाले. त्यांनी सांगितले की, अजितदादा आणि माझा परिचय 1991 पासूनचा आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी आमच्यात झालेली दोन तासांची चर्चा आजही स्मरणात आहे. त्यांनी मला राजकारणात अनेक संधी दिल्या. माझी लोकसभा लढण्याची इच्छा नसतानाही केवळ त्यांच्या शब्दखातर मी निवडणूक लढलो. मात्र, यश मिळाल्यानंतर दादांचा असा अपघाती मृत्यू होणे हे धक्कादायक आहे. टीकाकारांना चपराक अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना संधी देण्यावरून होणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. अजितदादांचा एकनिष्ठ सहकारी म्हणून सुनेत्रा वहिनींना संधी मिळावी, ही आमची ठाम भूमिका होती. ज्यांना टीका करायची आहे त्यांनी ती खुशाल करावी, पण आम्ही आमचे प्रामाणिक कर्तव्य पार पाडले आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले. तटकरेंची पोस्ट काय? अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला. या निमित्ताने सुनील तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. अशातच आमदार अनिल पाटील यांनी आमदार रोहित पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर निशाणा साधला आहे. अपघाताबद्दल गोपनीयता न बाळगता वेगवेगळे व्हिडिओ आणि सादरीकरण (प्रेझेंटेशन) दाखवून एक प्रकारे दोषींना मदतच केली जात आहे, असा खळबळजनक आरोप अनिल पाटील यांनी केला आहे. अनिल पाटील म्हणाले की, जे कोणी या प्रकरणात दोषी असतील, त्यांना अशा सादरीकरणातून मदत होऊ शकते. त्यापेक्षा रोहित पवारांकडे जी काही माहिती असेल, ती त्यांनी थेट तपास यंत्रणांना द्यावी, जेणेकरून सत्य समोर येईल आणि संबंधितांवर कारवाई करता येईल. आम्ही भाजपसोबत आहोत, दबावाखाली नाही आमदार लवांडे यांच्या टीकेचा समाचार घेताना पाटील म्हणाले की, आम्हाला भाजपला खूश करण्याची कोणतीही गरज नाही. आम्ही एनडीएमध्ये भाजपसोबत आहोत ही वस्तुस्थिती आहे, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणाच्या दबावाखाली आहोत. अजित पवार हे कधीच कोणाच्या दबावाखाली आले नाहीत आणि ते कोणाला घाबरले नाहीत, आमच्या 4 नेत्यांवर टीका करणाऱ्यांनी सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी त्यांनी काय दबावाखाली काम केले का? नाही आम्ही सर्व जण अजितदादांच्या परिवारासोबत निष्ठेने आहोत. डीजीसीएकडून अनियमिततेचा तपास सुरू तपासाबाबत माहिती देताना अनिल पाटील यांनी सांगितले की, बारामती पोलिस ठाण्यात या अपघाताची 'एडी' (Accidental Death) दाखल करण्यात आली आहे. विमानातील तांत्रिक दोष शोधण्यासाठी 'एआयआयबी' (AAIB) माहिती घेत आहे, तर डीजीसीएकडून अनियमिततेचा तपास सुरू आहे. तर कुठे घातपात झाला का हे शोधण्याचे काम सुद्धा सुरू आहे. आपण जो पर्यंत कन्क्लूजनपर्यंत पोहचत नाही तो पर्यंत गोपनियता ठेवली गेली पाहिजे ती या प्रकरणी ठेवली गेली आहे. यामध्ये अजून कोणी दोषी आहे का? हे अहवालातून आल्यानंतर पुढच्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडता येतील. ..तर आम्हीच रस्त्यावर उतरू सुनेत्रा पवार यांनी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली असून, सीआयडीचा तपास वेगाने सुरू आहे. जोपर्यंत तपास अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत गोपनीयता पाळणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले. जर अपघाताच्या अंतिम अहवालात काही त्रुटी आढळल्या, तर इतरांच्या आधी आम्हीच रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजही अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. त्यात आज दिवसभरात विविध तारांकित प्रश्न, लक्षवेधी तथा अशासकीय विधेयके व अशासकीय ठरावांवरही उहापोह होणार आहे. या लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहूया अधिवेशनाशी संबंधित घडामोडी…
राज्य सरकारने बंजारा समाचा एसटी अर्थात अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मुद्यावर अभ्यास करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वात एक 6 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयामुळे कथिपणे नाराज झालेल्या बंजारा समाजाला एक मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदडे, बुलढाणा, जळगाव आदी जिल्ह्यांत बंजारा समाजाने मोठे मोर्चे काढले होते. हैदराबाद गॅझेटच्या आधारावर या समाजाचा एसटीमध्ये समावेश व्हावा अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली होती. तसेच या प्रकरणी कोर्टात जाण्याचाही इशारा दिला होता. त्यावर सरकारने या प्रकरणी योग्य तो निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वात एक 6 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. काय नमूद आहे शासन निर्णयात? सरकारच्या परिपत्रकानुसार, इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी बंजारा समाजाच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती व सदर बैठकीचे इतिवृत्त दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजीच्या संदर्भाधीन पत्रान्वये इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेले आहे. सदर बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, बंजारा प्रवर्गातील उप वर्गासह सदर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याबाबतची मागणी तपासण्याच्या दृष्टीने अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी मा. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बंजारा प्रवर्गातील उप वर्गासह सदर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करम्याबाबतची मागणी तपासण्याच्या दृष्टीने अभ्यास करून अहवाल सादर करम्यासाठी मा. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे 6 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत आहे. कोण कोण आहे समितीत?
हिंगोलीत लग्नाचे अमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार:एका तरुणावर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
वसमत तालुक्यातील एका गावात विवाहितेस लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केल्याच्या आरोपीवरून कोंढूर (ता. कळमनुरी) येथील एका तरुणावर वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 27 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तरुणाच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील कोंढूर येथील शिवाजी पतंगे (30) या तरुणाची वसमत तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेसोबत ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. यावेळी पतंगे याने त्या विवाहितेस लग्नाचे अमिष दाखवून ता. 25 फेब्रुवारी 2025 रोजी तिच्यावर शेतात अत्याचार केला. त्यानंतर त्या विवाहितेस पुणे येथे फिरण्यासाठीही नेले. दरम्यान, आठवडाभरापुर्वी त्या महिलेस कोंढूर येथे त्याच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्या विवाहितेने लग्न कधी करणार अशी विचारणा केली असता त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. तसेच तिला शिवीगाळ केली. दोघांमध्ये लग्नाच्या कारणावरून वाद सुरु झाला. या वादातून पतंगे याने त्या विवाहितेस मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या विवाहितेने थेट कळमनुरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून कळमनुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, सदर घटना वसमत तालुक्यात घडल्यामुळे कळमनुरी पोलिसांनी सदर गुन्हा वसमत ग्रामीण पोलिसांकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार विजयकुमार उपरे, आंबादास विभुते, नामदेव बेंगाळ पुढील तपास करीत आहेत.
अजित पवार यांचा अपघात धुक्याने झाला की धोक्याने हे आमचेही म्हणणे आहे. अजित पवार यांच्या अपघाताचे गांभीर्य राज ठाकरेंनी ओळखले त्यांनी काही ताशेरे ओढले असतील तर ते फार महत्त्वाचे आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. आमदार सरोज अहिरे यांचे वक्तव्य काही राजकीय नव्हते ते सहज बोलल्या. अमोल मिटकरी म्हणाले की, रोहित पवारांचे काका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अपघातात गेले आहेत त्यामुळे रोहित पवार जे करत आहे त्याला स्टंट म्हणता येणार नाही. ते न्यायासाठी अनेकांच्या भेटी घेत आहेत, ते VSR आणि डीजीसीएवर FIR का होत नाही म्हणून धडपड करत आहे, त्याला स्टंटबाजी म्हणू शकत नाही. ठोस काही हाती आले नाही अमोल मिटकरी म्हणाले की, अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण होत आहे. पण आजही विश्वास बसत नाही की अजितदादा आपल्यातून निघून गेले असतील. महाराष्ट्रातील जनतेच्या संवेदना पूर्वी होत्या त्या प्रमाणेच आहेत. जनतेच्या मनातील शंकांचं काहूर काही मिटता मिटत नाही. विमान अपघातानंतर ठोस असे काही तपास सुरू झाला नाही. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी FIR नोंदवून न घेणे हे दुर्दैवी फलित आहे. वैमानिकाचा संशयास्पद रेकॉर्ड होता त्यांचा खुलासा झालेला नाही. सीबीआयकडे धाव का? अमोल मिटकरी म्हणाले की, विमानातील बेकायदेशीर बदल, सीबीआरमधील फेरफार, ब्लॅक बॉक्सचे झालेले नुकसान आता तो सुरक्षित आहेत असे म्हणता आहेत. VSR कंपनीचे राजकीय कनेक्शन, हवामानाचे चुकीचे अंदाज होता की वैमानिकावर काही दबाव होता. बारामतीच्या विमानतळावर अनेक वेळा अजित पवारांचे विमान उतरले होते. तिथल्या भौगोलिक परिस्थितीची त्यांना आणि त्यांच्या वैमानिकांना संपूर्ण माहिती होती. शेवटच्या क्षणी प्रवासाचे साधन बदलणे असो की ऑपरेटर कंपनीची संशयास्पद भुमिका? यामध्ये काही घातपात झाला आहे का? की काही सुसाईड बॉम्बर होता का? पोलिस तपासाऐवजी सीबीआयकडे धाव घेण्याची कारणे काय? असे अनेक सवाल मिटकरी यांनी उपस्थित करत म्हणून जनता घातपाताचा संशय व्यक्त करत आहे. FIR न घेतल्याने शंका अमोल मिटकरी म्हणाले की, मरीन ड्राईव्ह आणि बारामती पोलिसांनी FIR न घेतल्यामुळे शंका आणखी बळावते आहे. अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या हाती काय आले तर शंका. साहिल मदन, यश, सुमित कपूर हे तिघे कुठे आहेत असा सवाल मिटकरी यांनी केला आहे. सुमित कपूर जर अमेरिकेत असेल तर त्याला तिथे जाऊन शोधावे लागण्याची तयारी ठेवावी लागेल. पक्षाची भूमिका आहे की अजितदादांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. जय पवारांनीही मागणी केली, सुनेत्रा पवार यांनीही ही मागणी केली आहे. मी त्या चर्चेत नव्हतो अमोल मिटकरी म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये मी सहभागी नव्हतो. त्याबद्दल निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार अजित पवार यांचा होता. त्यांनी जो निर्णय घेतला असता त्यांला आम्ही पाठिंबा दिला असता. पण त्या घडामोडीमध्ये आम्ही नव्हतो, त्यामुळे कुठल्या बड्या नेत्याने चिठ्ठी दिली याबद्दल मला माहिती नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला आज 1 महिना पूर्ण झाला. पण पवार कुटुंबीयांसह अख्खा महाराष्ट्र अजूनही त्यातून बाहेर पडला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज एका पोस्टद्वारे अजित पवारांच्या आठवणी जागवल्या. तर आमदार रोहित पवार यांनी एक स्क्रिनशॉट शेअर करत महिन्याभरापूर्वी घडलेली घटना झोपेत पडलेले एक वाईट स्वप्न होते अशी भावना व्यक्त केली आहे. अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनीही आपल्या वडिलांचे काही फोटो पोस्ट करत त्यांची आठवण काढली आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार हा अपघात नसून, घातपात असल्याचा आरोप करत आहेत. आज अजित पवारांच्या मृत्यूला 1 महिना पूर्ण झाला असताना त्यांचे सुपुत्र जय पवार यांनी आज त्यांचे काही फोटो शेअर करत आपल्या वडिलांची आठवण काढली आहे. या फोटोत लहानगे जय पवार अजित पवारांच्या खांद्यावर बसल्याचे दिसून येत आहे. 'मीस यू डॅड' असे कॅप्शन जय यांनी या फोटोला दिले आहे. अजितदादा सोबत नाही हे पचवणे अवघड खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या भावाची आठवण काढत दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल अशी भावना व्यक्त केली आहे. त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या, आपले अजितदादा सोबत नाहीत, हे पचविणे अजूनही कठिण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील. Miss you Dada. त्या काळ्या दिवशी कॉल केला, पण... रोहित पवार यांनी एका पोस्टद्वारे अजित पवारांना 28 जानेवारी रोजी सकाळी 8.56 वा. केलेल्या एका फोनचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात, जे घडलंय ते झोपेत पडलेलं एक वाईट स्वप्न होतं, असं अजूनही वाटतं आणि म्हणूनच त्या काळ्या दिवशी अजितदादांच्या या नंबरवर कॉल केला. पण कॉलही उचलला गेला नाही आणि नेहमीचा तो भारदस्त आवाजही ऐकू आला नाही. खूप वेदनादायी..! विमान अपघाताचा आज प्राथमिक अहवाल येणार दुसरीकडे, अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता आहे. त्यात हा अपघात नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाला यावर प्रकाश पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे या अहवालाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी या अहवालातील निष्कर्ष पाहून सोमवारी एका पत्रकार परिषदेद्वारे अजित पवारांच्या अपघाताविषयी काही नवे पुरावे व माहिती जाहीर करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी या प्रकरणी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आवाहन केले. हे ही वाचा… अजित पवारांच्या अपघाताला 1 महिना पूर्ण:युगेंद्र पवारांचे काकांना पत्र; म्हणाले, आजी अन् बाबांचे अश्रू थांबेनात, तुम्ही पोरके करून गेलात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला आज बरोबर 1 महिना पूर्ण झाला. पण आजही पवार कुटुंबीयच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र त्यांच्या आठवणीने व्याकुळ होत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी तथा अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आज आपले काका अजित पवारांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात त्यांनी आजी आणि आपल्या बाबांच्या डोळ्यातून आजही तुमच्या आठवणीने अश्रू ओघळतात अशी भावना व्यक्त केली आहे. तसेच तुम्ही अवघ्या महाराष्ट्राला पोरके करून गेल्याची भावनाही व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला आज बरोबर 1 महिना पूर्ण झाला. पण आजही पवार कुटुंबीयच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र त्यांच्या आठवणीने व्याकुळ होत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी तथा अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आज आपले काका अजित पवारांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात त्यांनी आजी आणि आपल्या बाबांच्या डोळ्यातून आजही तुमच्या आठवणीने अश्रू ओघळतात अशी भावना व्यक्त केली आहे. तसेच तुम्ही अवघ्या महाराष्ट्राला पोरके करून गेल्याची भावनाही व्यक्त केली आहे. खाली वाचा युगेंद्र पवारांचे पत्र तशास तसे प्रिय काका, आज तुम्हाला जाऊन एक महिना झाला… माझ्यासाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी, हा एक महिना आयुष्यातला सर्वात जड आणि सर्वात वेदनादायी ठरला. आजही तुमच्या नसण्याची जाणीव मनाला होत नाही. तुम्ही तुमच्या रुबाबदार आवाजात येऊन म्हणाल, “मी कामाचा माणूस आहे, आणि हे काम असंच झालं पाहिजे!” असा भास होतो. सतत वाटत राहते आता तुमची गाठ पडेल… आणि तुम्ही म्हणाल, काय चिरंजीव, कसं काय सुरू आहे? थांब थोडं, लोकांना भेटतो पहिले. मग आपण बोलू…” पण वास्तव समोर येतं आणि मन हेलावून जाते. आता मी तुमचे मार्गदर्शन कसे घेऊ...? आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत. त्या आजही तुमच्या विश्वात रमण्याचा प्रयत्न करतात. काका, तुम्ही आजीची काळजी करू नका, आम्ही सर्वजण त्यांची काळजी घेत आहोत. बाबा इतके भावूक झाले आहेत की, त्यांचा बांध केव्हाही फुटतो. त्यादिवशी गाडीतून प्रवास करताना अचानक त्यांचे डोळे पाणावले. ते उद्विग्नपणे म्हणाले, “दादा असा कसा जाऊ शकतो? अजून बरंच काही बोलायचं होतं…” आदरणीय साहेबही तुमच्याशिवाय अस्वस्थ झाले आहेत. काका, अपघाताबद्दलच्या अनेक शंका मनाला छळत आहेत. अपघात कसा काय होऊ शकतो? नेमकं काय घडलं? कोणामुळे घडलं? सत्य काय आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात तुमचा आवाज पुन्हा घुमणार नाही, तुमचा तो प्रभावी आवाका दिसणार नाही. यावर अजूनही विश्वास बसत नाही. तुम्ही गेलात… काका तुम्ही महाराष्ट्राला पोरकं करून गेलात... काका, तुम्ही शरीराने आमच्यात नसला तरी तुमची शिकवण, तुमचा ध्यास, तुमचा जनतेवरचा विश्वास आणि जनतेचा तुमच्यावरचा विश्वास आणि प्रेम कायम आहे. मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही सुरू केलेलं काम, जनतेला दिलेला विश्वास आणि विकासाचा घेतलेला वसा कधीही थांबू देणार नाही. तुमचा मार्गच आमचा मार्ग असेल. तुमचं स्वप्नच आमचं ध्येय असेल. तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही… Miss you Kaka, तुमचाच युगेंद्र, असे युगेंद्र पवार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूवर कुणीही पतंगबाजी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. अशा घटना घडतात तेव्हा आपण कोणतीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करण्याचा प्रयत्न करू नये. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो. या प्रकरणी आपण मृत व्यक्तीच्या पद व प्रतिष्ठेचा तथा त्याच्या कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचाही विचार करायला हवा, असे ते म्हणालेत. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदार हा अपघात नसून, घातपात असल्याचा आरोप करत आहेत. विशेषतः शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या दुर्घटनेविषयी काही महत्त्वपूर्ण खुलासे व पुरावे सादर करून या प्रकरणात घातपाताचा संशय असल्याचा ठाम दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना उपरोक्त आवाहन केले आहे. पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार नको मुख्यमंत्री म्हणाले, आमदार रोहित पवार यांनी माझी भेट घेऊन काही मुद्दे मांडले. त्यांनी दिलेल्या पत्राला मी माझे पत्र जोडून डीजीसीएकडे या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहे. पण अशा घटना घडतात तेव्हा आपण कोणतीही पतंगबाजी करू नये. कारण, हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असतो. दुर्दैवाने जी व्यक्ती मृत आहे, त्या व्यक्तीच्या पद व प्रतिषेठाचा आपण विचार केला पाहिजे. विशेषतः त्याच्या कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचाही या प्रकरणी विचार झाला पाहिजे. त्यामुळे या प्रकरणी कोणतीही पतंगबाजी किंवा हवेत गोळीबार करू नये असे मला वाटते. या प्रश्नावर याहून अधिक मी बोलू इच्छित नाही. सुनेत्रांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय आमचा नव्हे राष्ट्रवादीचा होता मुख्यमंत्र्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण तथा सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीसाठी करण्यात आलेल्या कथित घाईच्या मुद्यावरही भाष्य केले. तसेच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय हा आमचा नव्हे तर राष्ट्रवादीचा होता असेही स्पष्ट केले. ते म्हणाले, सुनेत्रा पवार यांच्याविषयी घेण्यात आलेल्या निर्णयात आमच्या पक्षाचा कोणताही सहभाग नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी त्याची माहिती आम्हाला दिली. ते कागदपत्रांसह माझ्याकडे आले. त्यांनी एक तारीख दिली. त्यावर माझा कोणताही आक्षेप नव्हता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केली आणि आम्ही ती मान्य केली. तो निर्णय त्यांच्या पक्षाचा होता. आमचा नव्हता. विलिनीकरणाच्या सीक्रेटची मला माहिती नाही विलिनीकरणाच्या मुद्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या एका बैठकीचा व्हिडिओ समोर आला. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्टीकरण दिले. अजित पवार व शरद पवार यांच्यात विलिनीकरणाची काही चर्चा सुरू होती, तर त्याचा आमच्याशी कोणताही संबंध नव्हता. पण असा एखादा निर्णय झाला असता तर अजित पवारांना मित्रपक्ष म्हणून आमचा सल्ला घ्यावा लागला असता. परंतु अजितदादांनी याविषयी आमच्यासोबत कोणतीही चर्चा केली नव्हती. याी प्रकरणी काही सीक्रेट असेल तर त्याची मला माहिती नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
VSR कंपनीकडे स्वत:चे विमान कमी आहेत ते राजकीय नेत्यांची विमाने आपल्याकडे ठेवतात. फडणवीस यांनी काल प्रवास केलेले विमान त्यांचे स्वत:चे असेल, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातावर पार्थ पवारांनी बोलले पाहिजे. सुनेत्रा पवारांनी यावर बोलले पाहिजे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूची FIR घेत नाही म्हणजे काय? असा सवाल राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी VSR कंपनी ही आरोपी नंबर 1 आहे. तर डीजीसीए हे सहआरोपी आहे. या दोघांची गुन्हेगारी संदर्भात जी हातमिळवणी आहे त्यातून अजित पवार यांचा मृत्यू ओढवलेला आहे. म्हणून त्यांची चौकशी केली जात नाही. VSR कंपनीमध्ये अज्ञात भागीदार कोण आहेत? तर आंध्रातील काही राजकारणी, महाराष्ट्रातील काही राजकारणी आणि अत्यंत महत्त्वाचे काही उद्योगपती हे बेनामी कंपन्याचे भागीदार आहेत. डीजीसीए ही देशातील सर्वात भ्रष्ट संस्था आहे. अहमदाबादमध्ये 300 पेक्षा जास्त बळी त्यांच्याच हलगर्जीपणामुळे गेले आहेत. अजित पवारांचा बळी त्यातूनच गेला आहे. काही दिवसांपूर्वी एअर अँब्युलन्स कोसळली होती, ते सुद्धा डीजीसीएचे पाप आहे. म्हणून अजित पवारांना माघारी जायचे होते संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांच्यासह 40 जण भाजपसोबत गेले कारण क्लोजर रिपोर्ट झाला नाही. जरंडेश्वर कारखान्याचा विषय अजित पवार असताना बंद झाला नाही, ती फाईल दिल्लीला गेली. अमित शहा यांनी ते नव्याने चौकशी करा असे आदेश दिले, त्यातून अजित पवार अस्वस्थ होते म्हणून त्यांना माघारी जायचे होते. कारण ज्या कारणासाठी मी भाजपसोबत आलो ती फाईलच बंद होत नसेल तर कशासाठी थांबावचे असे त्यांना वाटत होते. शिखर बँकेसंदर्भात क्लोजर रिपोर्टची कारवाई सुरू होती पण काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतल्याने थांबली होती. आता अण्णा हजारे यांना न जुमानता हा क्लोजर रिपोर्ट आला आहे. सुनेत्रा पवार का बोलत नाही? संजय राऊत म्हणाले की, सुनेत्रा पवार यांनी 40 आमदारांसह मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला पाहिजे आणि अजित पवार यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी FIR दाखल करुण घेतली पाहिजे. रोहित पवार यांचे काय चुकले आहे, त्यांनी VSR आणि डीजीसीएवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही मागणी केली आहे त्यात काहीच गैर नाही. हीच मागणी ज्यांनी पती आणि पिता गमावला आहे त्यांनी केली पाहिजे ते का करत नाही, हा प्रश्न आहे. मोदी, शहांनी केजरीवालांची माफी मागावी संजय राऊत म्हणाले की, अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीतील 7 लोकसभेच्या जागा जिंकायच्या होत्या म्हणून त्यांनी अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकले. दिल्लीची विधानसभा भाजपविरोधात होती ती काढून घेण्यासाठी केजरीवाल यांना कारागृहात टाकायचे होते हे काल सिद्ध झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी त्यांची माफी मागितली पाहिजे. आणि सीबीआय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली पाहिजे. अरविंद केजरीवाल यांच्यासह 23 जणांना सीबीआयने लीकर घोटाळा म्हणत अटक केली. केजरीवाल मुख्यमंत्री असताना त्यांना अटक केली. केजरीवाल सांगत होते की यामध्ये काही घोटाळा नाही पण तरीही त्यांना अटक करण्यात आली. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी केजरीवाल यांना जेलमध्ये टाकण्यात आले तर विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी हा विषय लावून धरण्यात आला. पण काल न्यायालयाने सांगितले की केस खोटी आहे. याबद्दल काहीच माहिती नाही, पुरावा नाही, म्हणून त्यांची निर्दोष मुक्तता केली. सरकारने सीबीआयच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. छगन भुजबळ यांच्यावर आरोप झाले ते 22 महिने जेलमध्ये राहिले नंतर निर्दोष सुटले त्यामुळे ईडी आणि सोमय्या यांच्यावर गुन्हे दाखल झाला पाहिजे.
शहरात वाढत्या मंगळसूत्र चोऱ्या, दागिने हिसकावण्याचे प्रकार आणि छेडछाडीच्या घटनांना आता विज्ञानाच्या मदतीने चाप बसणार आहे. शहरातील जागृती हायस्कूलमधील इयत्ता नववीत शिकणाऱ्या श्रीराज गोटे आणि रिझवान शेख या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून ‘वुमन सेफ्टी डिव्हाइस’ तयार केले आहे. एखादा चोर दागिना चोरण्याचा प्रयत्न करेल किंवा कुणी छेड काढण्याचा प्रयत्न करेल, तर त्या व्यक्तीला थेट विजेचा झटका बसून अनर्थ टळणार आहे. दररोज वर्तमानपत्रात येणाऱ्या महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या आणि परिसरात होणाऱ्या मंगळसूत्र चोऱ्यांची आईने मैत्रिणींशी केलेली चर्चा ऐकून श्रीराज आणि रिझवान अस्वस्थ झाले होते. यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याच्या जिद्दीतून त्यांनी शिक्षकांशी चर्चा केली. त्यांना विद्या कुबेर आणि रिता दुबे या शिक्षिकांनी मार्गदर्शन केले. ...अन् आईवरच केला पहिला प्रयोग या प्रयोगाची खात्री पटवण्यासाठी श्रीराजने चक्क आपल्या आईला हे डिव्हाइस वापरून पाहण्यास दिले. प्रयोग यशस्वी झाल्याची खात्री पटल्यावरच तो शिक्षकांना दाखवला. अवघ्या २०० ते ३०० रुपयांत हा प्रयोग यशस्वी झाला असून, आता हे विद्यार्थी पेटंट घेण्याच्या तयारीत आहेत. डिव्हाइससाठी टाकाऊ वस्तूंचा केला वापर हे डिव्हाइस तयार करण्यासाठी टाकाऊ प्लास्टिक बॉक्स, व्होल्टेज जनरेटर, ३ व्होल्टची बॅटरी आणि स्विच बटण यांचा वापर केला आहे. हे उपकरण महिला आपल्या सँडल, चप्पल, शूज किंवा पर्समध्ये सहज फिट करू शकतात. याला एका छोट्या वायरने जोडून शरीराच्या कोणत्याही भागास जोडता येते. कुणी अनपेक्षित स्पर्श केला किंवा दागिना हिसकावण्याचा प्रयत्न केला, तर त्याला तत्काळ विजेचा आऊटपुट करंट लागेल. यामुळे महिलेला इजा होणार नाही, मात्र समोरची व्यक्ती झटक्यामुळे सावध होईल. विद्यार्थ्यांनी बनवला दृष्टिबाधितांसाठी ‘स्मार्ट लेन्स' अन् अपघातांपासून ज्येष्ठांना वाचवणारी ‘स्मार्ट स्टिक' जागृती हायस्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या मयूर गुंजाळ आणि आशिष गिरे या दोन बालवैज्ञानिकांनी आपल्या कल्पकतेतून समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि दृष्टिबाधितांच्या सुरक्षेसाठी एक नावीन्य पूर्णप्रयोग केला आहे. रस्त्यावरून चालताना येणारे अडथळे आणि वेगवान वाहनांमुळे होणारेअपघात टाळण्यासाठी या विद्यार्थ्यांनी ‘स्मार्ट लेन्स'' आणि ‘स्मार्ट स्टिक'' ही दोन वैशिष्ट्यपूर्ण उपकरणे विकसित केली आहेत. त्यांच्या या नावीन्यपूर्ण प्रयोगाची दखल घेत ‘अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन' ने त्यांना मानाच्या पुरस्काराने गौरवले आहे. कर्णबधिर असणाऱ्यांसाठीही सुविधा ज्यांना ऐकू येत नाही अशांसाठीही ही स्मार्ट स्टिक आहे.यात अशी सुविधा केली जात आहे की, अडथळाआल्यावर स्टिक व्हायब्रेट होईल, ज्यामुळे समोर काहीआहे याचा माहिती मिळेल. या साहित्याचा वापर, ८ दिवसांची मेहनत तीन आयआर सेन्सर, एक स्विच, एक बॅटरी, चार्जिंगमॉड्यूल, घरातील टाकून दिलेला गॉगल यात वापरलाआहे. हा प्रयोग करण्यासाठी आठ दिवस लागले. आधीगॉगल जड झाला, पण बझर वाजले नाही. नंतर वजनहीनियंत्रित आणि हलके केले. अडथळा आल्यावरसेन्सरला सिग्नल मिळून बझर वाजेल.
स्त्री बीज तस्करी, नाशिकच्या ‘मालती आयव्हीएफ’ला नोटीस:बदलापूरमधील प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत
ठाण्यातील बदलापूरमधील स्त्री बीज तस्करी रॅकेट प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत पोहोचले आहेत. नाशिक महापालिकेने मुंबई नाका परिसरातील मालती आयव्हीएफ सेंटरची तपासणी करून काही कागदपत्रे ताब्यात घेऊन बदलापूर येथे आढळलेल्या कागदपत्रांबाबत खुलासा करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे. बदलापूर पूर्व येथील जोवेली भागातील एका रहिवासी इमारतीतून हे रॅकेट चालवले जात होते. आर्थिकदृष्ट्या गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या शरीरातून बेकायदेशीरपणे स्त्री बीजे काढली जात होती. एका पीडित महिलेने मोबदला न मिळाल्याने तक्रार केली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झाला होता. गरीब आणि गरजू महिलांना हेरून त्यांना एका सायकलसाठी 25,000 ते 30,000 रुपये देण्याचे आमिष दाखवले जात होते. यात 300 हून अधिक महिलांचे शोषण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सखोल तपासणीनंतर कारवाई नाशिक येथील मालती आयव्हीएफ सेंटरचे प्रमाणपत्र बदलापूर येथे सापडले होते. त्यामुळे नाशिक विभागाच्या आरोग्य उपसंचालकांनी तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार आम्ही मुंबई नाका परिसरातील सेंटरची तपासणी करून काही कागदपत्रे ताब्यात घेतली. तपासणीअंती काही निष्कर्ष निघाल्यास सबंधितांवर कारवाई करता येईल.-डॉ. जितेंद्र धनेश्वर, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा नाशिक लाखोंच्या किमतीत बीज विक्री कायद्यानुसार एक महिला आयुष्यात फक्त एकदाच स्त्री बीज दान करू शकते, मात्र या रॅकेटमध्ये बनावट आधार कार्ड आणि प्रतिज्ञापत्रे तयार करून एकाच महिलेकडून अनेकदा (काही प्रकरणांत 30 पेक्षा जास्त वेळा) बीजे काढल्याची बाब समोर आली आहे. ही बीजे मुंबई, ठाणे आणि इतर शहरांतील नामांकित आयव्हीएफ केंद्रांना लाखोंच्या किमतीत विकली जात होती.
जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांचा दोन दिवसीय प्रवचन व दर्शन सोहळा सध्या शहरातील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सुरू आहे. हा सोहळा शुक्रवारी सुरू झाला असून तो शनिवारपर्यंत (दि. 28) चालणार आहे. सकाळी 9 वाजेपासून सोहळ्यास सुरुवात होईल. त्यानिमित्त ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी विविध धार्मिक प्रश्नांवर संवाद साधला. हिंदूंनी कायद्याने मान्य असलेली दोन अपत्यं तरी जन्माला घातली पाहिजे. तसेच मुस्लिमांनीही हे बंधन पाळलं पाहिजे. विविध मुद्द्यांवर त्यांनी व्यक्त केलेली मते त्यांच्याच शब्दात ... प्रश्न : आज देशात बहुसंख्य हिंदू आहेत, मग धर्म संकटात कसा? आज हिंदू बहुसंख्य आहेत, पण काही वर्षांनंतर ते अल्पसंख्याक असतील असे चित्र आज आहे. देशात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वच राहतात. मग कायद्यानुसार सगळ्यांनी देशाच्या संरक्षणासाठी, स्वायत्तत्तेसाठी समान सहकार्य केले पाहिजे. हिंदूंनी दोन मुलं जन्माला घालून थांबायचे आणि मुस्लिमांनी धर्मात सांगितलंय म्हणत जास्त मुलं जन्माला घालायची, हे योग्य नाही. हिंदूंनी कायद्याने मान्य असलेली दोन अपत्यं जन्माला घातली पाहिजे.तसेच मुस्लिमांनीही हे बंधन पाळलं पाहिजे. आमच्याही धर्मात सांगितलंय, अष्टपुत्र सोभाग्यवती भव:, मग आम्ही त्याचा अट्टाहास धरला का? प्रश्न : आज तुम्ही घरवापसी करून घेत आहात. आतापर्यंत किती लोकांची घरवापसी केली ? - 20 वर्षांपासून आम्ही हे काम करत असून आतापर्यंत 1 लाख 54 हजार 591 परिवारांची घरवापसी केली आहे.आजही नाशिक जिल्ह्यातील आदिवासी परिसरातील 300 लोकांची घरवापसी होत आहे. या भागातील लोकांच्या गरिबीचा, अज्ञानाचा फायदा घेतला जातो. मूलबाळ नसणं, आजार,यांसारख्या अडचणी हेरून हे धर्मांतर केले जाते. आदिवासींच्या मिळणाऱ्या सर्व सुविधा उकळायच्या आणि हे करायचे, हे सुप्त राजकारण आहे. ते हाणून पाडणे गरजेचे आहे. प्रश्न : धर्मांतर थांबवायचे असेल तर काय प्राथमिक उपाय केला पाहिजे? इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सरकारने निधी दिला पाहिजे. कारण, आज प्रत्येकाला वाटते की मुलगा इंग्रजी शाळेत शिकला पाहिजे. कॉन्व्हेंटस्कूलमध्ये धार्मिक शिक्षणही दिलं जातं. हिंदू धर्माबद्दल काही सांगायचं तर, टिकली लावायची नाही, रिबन घालायची नाही, बांगडी हातात नको असे शिकवले जाते. तिकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. जर आपली हिंदू संस्कृती टिकवायची असेल तर या शाळांना सरकार देते तसाच निधी इंग्रजी शाळांनाही द्यावा. यातून इंग्रजी माध्यमाच्या शाळा निर्माण होतील. त्यात विज्ञानासोबतच वेदांचे शिक्षणही दिले जाऊ शकेल. यातून आज ऱ्हास होत चाललेली संस्कृती टिकेल. प्रश्न : वक्फ बोर्डाबद्दल या सरकारने उचललेल्या पावलाबाबत आपले मत काय? फाळणीमध्ये जे मुस्लिम पाकिस्तानात गेले, त्यांची मालमत्ता दान देण्याच्या उद्देशाने वक्फ बोर्डची स्थापना झाली होती. पण त्यानंतरची सरकारांनी कायद्यात बदल केले आणि विशिष्ट ठेकेदारांच्या हाती हे बोर्ड दिले.ते अगदी हिंदूंच्याही जमिनी हडप करायला लागले. छत्रपती संभाजीनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वारच वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे. अशा कितीतरी जमिनी हडपल्या. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर आता याला चाप बसत आहे. प्रश्न : लव्ह जिहादसंदर्भात कायद्यासाठी हालचाली सुरू असल्याचे समजतेय, यावर तुमचे मत काय? लव्ह जिहादसाठी सरकार कायदा करत आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो.लव्ह जिहादच्या नावाखाली मुलींना पळवायचं, शोषण करायचं, मौजमजा करायची आणि परदेशात नेऊन विक्री करायची असे हे सगळे रॅकेट सुरू आहे. त्याचा बीमोड होणे गरजेचे आहे.
मराठी राजभाषा गौरव दिना निमित्ताने डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया राज्य कमिटीच्या वतीने निवेदन देण्याचे ठरवले होते. त्याचाच एक भाग म्हणून डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने तहसीलदारांमार्फत शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना निवेदन पाठवले. महाराष्ट्र ही संतांची, समाज सुधारकांची व ज्ञान परंपरेची भूमी आहे. या भूमीत मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे, अस्मितेचा आणि सामाजिक प्रबोधनाचा आधारस्तंभ आहे. मात्र, अत्यंत खेदाने नमूद करावे लागते. की राज्यातील मराठी शाळांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अलीकडेच विधानसभेत राज्यातील विविध भागातील २५५ मराठी सरकारी शाळा बंद करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सात शाळांचा समावेश आहे. मागील पाच वर्षात पटसंख्येच्या कारणास्तव, विलीनीकरणाच्या नावाखाली तसेच नवीन संच मान्यता नियमावलीच्या अंमलबजावणीमुळे जवळपास १ हजार शाळा बंद झाल्याचा अहवाल आहे. ही केवळ आकडेवारी नसून शिक्षणाच्या हक्कावर झालेला झाला आहे.राज्यभर बंद करण्यात आलेल्या सर्व मराठी सरकारी शाळा पुन्हा सुरू करा, पटसंख्या व विलीनीकरणाच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने थांबवा, पहिली ते बारावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्याद्वारे सुनिश्चित करा, सरकारी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण आधुनिक व दर्जेदार शिक्षणाची हमी द्या, सरकारी शाळांमधील शिक्षकांची सर्व रिक्त पदे तात्काळ भरा, ग्रामीण, आदिवासी व वंचित भागासाठी विशेष शैक्षणिक पायाभूत सुविधा व अनुदान उपलब्ध करून द्यावे. मराठी राजभाषा गौरव दिनी राज्यभर पहिल्या टप्प्यात निवेदन देण्यात येत आहे. परंतु, परिस्थितीत सकारात्मक बदल न झाल्यास राज्यभर तीव्र व व्यापक लोक आंदोलन उभारण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला निवेदन देतेवेळी जिल्हा सचिव साथी किशोर शिंदे शैलेश कटाने, राजगुरू शिंदे, आशिष रावेकर, राम शिंदे, मिलिंद चवरे, प्रवीण गावनर, शहेनशहा, आदित्य शिंदे उपस्थित होते.
जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईचा प्रश्न उफाळून येतो. यंदाही जिल्ह्यातील ५४५ गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे टंचाई निवारणार्थ जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने १९ कोटी ७ लाख ५५ हजार रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. टंचाई निवारणार्थ ७२२ उपाय योजना प्रस्तावित असून चिखलदरातील १५ गावांना सर्वाधिक झळ असल्याने तेथे टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या ५३७ नळयोजना, १,७७२ हातपंप, ३९९ विद्युत पंप, १,१७० सार्वजनिक व २,०५६ खासगी विहिरींचे अधिग्रहन आदी उपाय योजना सुरू आहेत. तर आगामी टंचाई बघता १४ तालुक्यांमध्ये १४३ खासगी विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. याशिवाय प्रशासनाने जलस्त्रोत अधिग्रहण, नळयोजना दुरुस्ती आणि गरजेनुसार टँकरपुरवठा अशा उपाय योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार १४३ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार असून २८६ ठिकाणी नळयोजनांची दुरुस्ती प्रस्तावित आहे. सर्वाधिक बाधित तालुक्यांमध्ये चिखलदरा तालुक्यात ८३ व धारणी तालुक्यात ७५ गावांचा समावेश आहे. याकरिता आता ७२२ योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारणार्थ १९ कोटी ७ लाख ५५ हजारांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. त्यामुळे टंचाई निवारणार्थ आता ह्या उपाय योजना राबविण्याकरिता प्रशासन सज्ज झाले आहे. चिखलदर तालुक्यातील १५ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा चिखलदरा तालुक्यात दरवर्षीच पाणी टंचाईची झळ अधिक प्रमाणात दिसून येते. यंदा देखील तालुक्यात १५ गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागार आहे. तसेच नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शहरातील पोलिस यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे, लोकवस्ती वाढत आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, म्हणून शहर पोलीस आयुक्तालयात तीन नवीन पोलिस ठाणे निर्माण करण्याची गरज आहे. याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, तसेच शहरात सुरक्षेच्या दृष्टीने जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी करुन या दोन्ही प्रस्तावाला मंजूरी द्यावी, अशी मागणी यावेळी सभागृहात बोलताना आमदार संजय खोडके यांनी केली आहे. अर्थसंकल्पिय अधिवेशनामध्ये सन २०२५-२६ च्या पुरवणी मागणीवर चर्चा करतांना आमदार संजय खोडके यांनी शहर विकासाच्या दृष्टीने नगरविकास, आरोग्य व वैद्यकीय शिक्षण तसेच गृह विभागाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केली. महानगर पालिकेची नविन प्रशासकीय इमारत व अंबादेवी विकास आराखडा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून त्यास शासनाच्यावतीने मंजुरी प्रदान करण्याची मागणी अधिवेशनातुन करण्यात आली आहे. शहरातील बऱ्याच पोलीस स्टेशनच्या इमारती या जुन्या झाल्या असल्याने नवीन इमारत बांधण्यात यावी, पोलीस वसाहती शिकस्त झाल्याने नवीन वसाहती बांधण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याने तो प्रस्ताव मंजूर करून निधी देण्यात यावा, याबाबतसुद्धा आमदार खोडके यांनी अधिवेशनातुन मागणी केली. महानगरपालिका क्षेत्रातील भुयारी गटार योजना गेल्या २८ वर्षांपासून निधी अभावी अर्धवट आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता व पुढील तीस वर्षाचे भुयारी गटार योजनेचे नियोजन करायचे असल्याने शहरात भुयारी गटार योजनेचा सुधारित प्रारूप कृती आराखडा हा २ हजार कोटींवर गेला आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने हि योजना अत्यंत महत्वाकांक्षी असल्याने शासनाने याबाबत बैठक घेऊन योजनेच्या २ हजार कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्याची मागणी आमदार संजय खोडके यांनी केली. महानगर पालिकेला नगरोत्थान योजनेतून अनुदान वितरित होत असतांना ७० टक्के भार हा शासन व ३० टक्के हिस्सा महापालिकेला द्यावा लागतो. अमरावती मनपाची आर्थिक स्थिती पाहता मनपा ३० टक्के हिस्सा देऊ शकत नाही. त्यामुळे शहरात पायाभूत सुविधांची कामे करतांना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नगरोत्थान योजनेतील महापालिकेचा हिस्सा हा ३० टक्के ऐवजी १० टक्के इतका करण्यात यावा, म्हणजे महापालिकेला केवळ १० टक्के भार उचलणे शक्य होणार असल्याने शासनाकडून नगरोत्थान योजनेअंतर्गत महापालिकेला अनुदान मिळेल व विकास कामे करणे सोयीचे होणार असल्याचे आमदार संजय खोडके यांनी सांगितले. जिल्ह्यातील रुग्णांना वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळणे हेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी निवडण्यात आलेली जागा ही शहरापासून १३ ते १४ किलोमीटर लांब असल्याने तेथे रुग्णांना जाणे दुरापास्त होणार आहे. जिल्ह्यातील मेळघाटसह इतरही तालुक्यातील रुग्णांना सोयीचे होईल, या दृष्टीने शहरालगत नागपूर हायवेवरील जागेचा प्रस्ताव मान्य करण्यात यावा किंवा दुसरा पर्याय म्हणून जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल परिसरात जर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साकारल्यास यासाठी अपेक्षित असलेला खर्च ५०० कोटीऐवजी केवळ २०० कोटीमध्येच वैद्यकीय महाविद्यालय सुरु करता येणार असल्याचे आमदार खोडके यांचे म्हणणे आहे.
शहरातील साहित्यिक, सांस्कृतिक परंपरेचा गौरव जपण्याच्या दृष्टीने महापालिकेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला. शुक्रवारी २० फेब्रुवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील नामवंत मराठी साहित्यिकांच्या निवासस्थानी ‘नील फलक’ लावून त्यांचा सन्मान करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. प्रस्ताव क्रमांक २५ अंतर्गत हा विषय सभेत मांडण्यात आला. नगरसेविका अॅड. प्रीती हर्षल रेवणे यांनी प्रस्ताव मांडला, तर नंदा धनंजय सावदे यांनी त्यास अनुमोदन दिले. चर्चेनंतर सभागृहाने हा ठराव सर्वानुमते मंजूर केला. या निर्णयानुसार शहरातील दिवंगत, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या साहित्यिकांच्या निवासस्थानी निल फलक लावण्यात येणार आहेत. उर्वरित. पान ४ शहरातील साहित्याचा वारसा अधोरेखित होणार या उपक्रमामुळे शहरातील साहित्यिक वारसा अधोरेखित होईल व मराठी भाषा संवर्धनासाठी कायम स्मृतीचिन्ह निर्माण होईल. मराठी भाषा दिनाया निमित्त साहित्यिकांच्या घरांवर नील फलक लावण्याच्या उपक्रमास चर्चा करून संमती दिली . नील फलकांवर साहित्यिकाचे नाव, कार्यकाल साहित्य क्षेत्रातील योगदानाचा संक्षिप्त उल्लेख करणार आहे. यामुळे त्या साहित्यिकांविषयी माहिती मिळेल.
सुमारे दहा महिन्यांपूर्वी अमरावतीवरुन मुंबईसाठी प्रवासी विमानसेवा सुरू झाली आहे. मंध्यतरी काही दिवस हवामानातील बदलांमुळे या फेऱ्या बंद होत्या. त्यानंतर नियमित आठवड्यातून चार दिवस फेऱ्या सुरू झाल्या आहेत. दरम्यान अमरावतीवरुन मुंबईसाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून पाच दिवस विमान सेवा राहणार आहे. तसे बदल ‘अलाएन्स एअर’च्या ऑनलाईन तिकीट आरक्षण खिडकीवर दिसत आहेत. त्यामुळे आता अमरावतीकरांना मुंबई प्रवास आणखी सोईचा होणार आहे. अलायन्स एअरने मागील वर्षी २६ ऑक्टोबरपासून हिवाळी वेळापत्रकानुसार महत्वपूर्ण बदल केले होते. पुर्वी अमरावतीवरुन मुंबईसाठी दुपारी नंतर सायंकाळी विमान उड्डाण करत होते. मात्र २६ ऑक्टोंबरपासून अमरावतीवरुन दुपारऐवजी मुंबईसाठी सकाळी उड्डाण सुरू झाले आहे. आता मुंबईवरुन अमरावतीत येणारे विमान सकाळी ७ वाजून ०५ मिनीटांनी उड्डाण घेते तर अवघ्या १ तास ४५ मिनीटात म्हणजे सकाळीच ८ वाजून ५० मिनीटांनी अमरावती (बेलोरा) विमानतळावर उतरते. त्यानंतर अमरावतीवरुन मुंबईसाठी सकाळी ९ वाजून १५ मिनीटांनी उड्डाण घेते आणि अकरा वाजता मुंबईत उतरते.सद्या विमान फेऱ्या सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशा चार दिवस उपलब्ध आहेत. चार महिन्यांपुर्वीपर्यंत मुंबईला जाणारे विमान अमरावती विमानतळावरुन सायंकाळी ५.३५ वाजता उड्डाण घेत होते. ते विमान मुंबईत सायंकाळी ७.२० वाजता उतरत होते. या वेळेमुळे प्रवाशांना दिवसभराची कामे करण्यासाठी वेळ मिळत नव्हता. ही वेळ सोयीची उर्वरित. पान ४ ३० मार्चपासून मंगळवारीसुद्धा होणार उड्डाण ३० मार्चपासून दर मंगळवारी विमान उड्डाण सुरू होणार आहे. सद्या रविवार, सोमवार, बुधवार, शुक्रवार असे चार दिवस विमानसेवा आहे. ३० मार्चपासून मात्र ही सेवा रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार हे चार दिवस सलग, शुक्रवारीसुद्धा पाचव्या दिवशी राहणार आहे. पाचही दिवस विमान अमरावतीवरुन सकाळी ९.१५ वाजता मुंबईसाठी उड्डाण घेईल आणि सकाळी ११ वाजता मुंबई विमानतळावर पोहोचणार आहे.
उद्योजक पुढे आले नसल्याने अमरावती-नागपूर ब्रॉडगेज मेट्रोचा प्रस्ताव मागील ५ वर्षांपासून धुळखात पडला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोनदा ब्रॉडगेज मेट्रो सुरू होणार, अशी घोषणा केली. केंद्रीय रेल्वे मंत्र्यांपर्यंत प्रस्तावही गेला. परंतु, नंतर हा प्रस्ताव बारगळला. त्यानंतर नागपुरातील मेट्रो सुरू झाली. मात्र, अमरावती-नागपूर मेट्रो मात्र, कागदी रुळांवरच रखडली. त्यामुळे अमरावतीकरांमध्ये नाराजी आहे. ही मेट्रो सुरू झाली असती तर अमरावती ते नागपूर हे अंतर १ तास १० मिनिटांत पूर्ण झाले असते. सध्या कोणत्याही सुपरफास्ट रेल्वेने नागपुरात पोहोचण्यासाठी ३ तास १५ ते ३ तास ३० मिनिटे लागतात. पश्चिम विदर्भाला सापत्न वागणूक देण्याची परंपरा अजुनही कायम आहे. अमरावतीचा विकास हा केवळ कागदावरच असून, घोषणांचे ‘हवाई फायर'च येथील नागरिकांना खुष करण्यासाठी पुरेसे असल्याचा राज्य शासनाचा गैरसमज झाला असावा. त्यामुळे अमरावतीच्या विकासाचा अनुषेश अजुनही भरून निघाला नाही. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी अमरावती-नागपूर ब्रॉडगेज मेट्रोची पत्राद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत माजी खा. आनंदराव अडसूळ यांच्या प्रचार सभेत तसेच व्हेलकम पॉइंटवरील उड्डाणपुलाच्या भूमीपूजन समारंभात गडकरी यांनी मेट्रो सुरू करणार अशी, घोषणा केली होती. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठवला. त्यांनीही सकारात्मक उत्तर दिले. त्यानंतर, पुर्णपणे व्यावसायिक तत्त्वावर हा उपक्रम चालवला जाणार असल्यामुळे उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. पण, कोणीही पुढे आले नाही. तेव्हापासून हा उपक्रम बारगळला आहे. ^अमरावती-नागपूर मेट्रो सुरू झाल्यास अमरावतीच्या आर्थिक विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. त्यामुळे शासनासह महाराष्ट्र कार्पोरेशनने हा प्रकल्प सुरू करण्यासाठी गंभीरपणे पावले टाकायला हवीत. एकीकडे कोट्यवधी रुपये नागपूर शहरातील मेट्रोसाठी खर्च केले . मग, अमरावती-नागपूर मेट्रोसाठी हात आखडता का घेतला जात आहे. डॉ. सुनील देशमुख, माजी मंत्री, अमरावती. तर स्थानिक युवकांना मिळाला असता रोजगार या मेट्रोमध्ये इकॉनॉमी व बिझनेस अशा दोन श्रेणी राहणार आहेत. एकूण आठ कोच राहतील. त्यापैकी सहा कोच हे प्रवाशांच्या तर दोन कोच हे सामान वाहतुकीच्या कामी आणले जाणार आहेत. यातून औषधी, उत्पादने, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ पाठवले जातील. याचा लहान व्यापाऱ्यांना फायदा होणार असून, स्थानिकांनाही रोजगार मिळणार आहे. मेट्रोमध्ये विविध पदांवर नियुक्ती केली जाणार असल्याने अनेकांना रोजगार मिळाला असता. परंतु, अद्याप मेट्रोच सुरू झाली नसल्याने रोजगाराचा प्रश्नच नाही. शासनाने हा प्रकल्प हाती घ्यावा मार्च २०१९ मध्ये राज्य शासनाने दिली होती प्रकल्पाला मंजुरी ब्रॉडगेज मेट्रोच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मार्च २०१९ मध्ये मान्यता दिली. त्यानंतर रेल्वे मंत्रालयानेही काही दिवसांनंतर डीपीआर मंजूर केला. कारण, त्यांच्या रेल्वे मार्गासह सिग्नल व स्टेशनचा मेट्रोचे संचालन करण्यासाठी वापर केला जाणार आहे. एवढेच नव्हे तर प्लॅटफॉर्मची उंचीही कमी करावी लागणार आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाची मंजुरी आवश्यक होती. ही मंजुरी मिळाली. परंतु, उद्योजकच पुढे आले नसल्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होऊ शकला नाही.
बाजारातून भाजीपाला, फळे, अन्नधान्य खरेदी करताना सर्वसामान्य ग्राहकांच्या मनात शुद्धता, रसायनमुक्तता व नैसर्गिक परिपक्वता विषयी येणाऱ्या प्रश्नांचे समाधान कृषि वैज्ञानिकांनी शोधले आहे. शुद्ध, सकस, विषमुक्त अन्नधान्य, फळे, भाजीपाला, दूध निर्मितीचे सोपे व गाव पातळीवरच अवलंबिता येणारे तंत्रज्ञान सर्वदूर उपलब्ध झाले आहे. याच्या वापरातून सशक्त व तंदुरुस्त समाजनिर्मिती साध्य होणार आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील सेंद्रिय व नैसर्गिक शेती विकास संस्थेचे संचालक अजयसिंग राजपूत यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत अकोला कृषी महाविद्यालयाच्या पुढाकारातून शुक्रवार (दि.२७) व शनिवारी (दि.२८) आयोजित ‘कृषी उत्पादन व मूल्य साखळीत शाश्वतता वाढवण्यात तंत्रज्ञानाची भूमिका’ विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजपूत बोलत होते. याच प्रश्नावर येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची इतर लक्षात घेत हरितक्रांतीच्या माध्यमातून पिकांची उत्पादनक्षमता वाढवण्यासह जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी न होता पोत कायम राहण्यासाठी सेंद्रिय निविष्ठाचा वापर अत्यावश्यक असल्याचे सांगितले. आत्मनिर्भर देश निर्मितीसाठी कृषी विद्यापीठांद्वारे निर्मित शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात एकात्मिक प्रयत्नांची गरज प्रतिपादित केली. शाश्वत शेती तंत्रज्ञान विकासात कृषी विद्यापीठ मध्यवर्ती भूमिका बजावत आहे. याप्रसंगी विद्यापीठाचे कृषी अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे, संशोधन संचालक डॉ. श्यामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. अरविंद सोनकांबळे, आयोजन समितीचे सचिव, कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. संतोष दिवेकर, संयोजक डॉ. विवेक खांबलकर आदींची मुख उपस्थिती होती. सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे, डॉ. राजेंद्र काटकर, डॉ. शैलेश हरणे, डॉ. शेषराव चव्हाण आदींसह संपूर्ण देशभरातून आलेले शास्त्रज्ञ, विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक डॉ. संतोष दिवेकर यांनी केले तर सह्य अधिष्ठाता डॉ. संजय भोयर यांनी स्वागतपर भाषण केले. सूत्रसंचालन प्रतीक्षा शिंदे हिने केले तर आभार डॉ. मोहम्मद साजिद यांनी मानले. या परिषदेत देशाच्या विविध भागातून शास्त्रज्ञ, संशोधक, पीएच.डी., स्नातकोतर व स्नातक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून विद्यार्थ्यांना संशोधन पेपर व पोस्टर सादरीकरणाची राष्ट्रीय स्तरावरील संधी उपलब्ध झाली आहे. उत्कृष्ट सादरीकरणांना प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आहे. विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षमतेला व्यासपीठ मिळणार आहे. हवामान बदलाशी सुसंगत परिषदेत शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञान, मूल्यसाखळी वृद्धी, डिजिटल कृषी, हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अचूक शेती, हरित ऊर्जा, कृषी मूल्यवर्धन व ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरण या महत्त्वपूर्ण विषयांवर दोन दिवस मार्गदर्शक चर्चा घडवून आणणार आहे. कृषि महाविद्यालय अकोलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजय भोयर यांच्या नेतृत्वाखाली या परिषदेचे आयोजन होत असून, कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. संतोष दिवेकर हे आयोजन सचिव तर डॉ. विवेक खांबलकर हे संयोजक म्हणून कार्यरत आहेत. विविध शाखांचे प्रमुख, प्राध्यापक व तज्ज्ञांचा समावेश असलेली स्थानिक आयोजन समिती या परिषदेस यशस्वी करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुरस्कृत ‘अनुसूचित जाती उपयोजना’ प्रकल्पांतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन विभागामार्फत बार्शिटाकळी तालुक्यातील राहित येथील जेतवन बुद्ध विहार प्रांगणात बुधवारी (दि.२५) भव्य शेतकरी मेळावा व कापूस पीक परिसंवाद घेण्यात आला. अनुसूचित जातींतील शेतकऱ्यांची सामाजिक-आर्थिक स्थिती, उपजीविका सुरक्षा वाढवण्यासाठी अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील राहित गावाची निवड झाली आहे. कापूस संशोधन विभागामार्फत प्राप्त निधीतून शेतीविषयक गरजा पूर्ण करण्यासह त्यांच्यापर्यंत विद्यापीठ निर्मित तंत्रज्ञान पोहोचवण्याचा उद्देश आहे. या गटातील शेतकऱ्यांना शेतीपयोगी निविष्ठा पुरवत शाश्वत कापूस पीक उत्पादनासाठी एकात्मिक पीक व्यवस्थापन पद्धतीच्या प्रसारासाठी शेतकरी मेळाव्यात तांत्रिक सत्रात मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यात उपविभागीय कृषी अधिकारी विवेक बिऱ्हाडे, आत्माचे उपसंचालक प्रेमसिंग मारग यांनी कृषी विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांपर्यंत तांत्रिक माहिती पोहोचवण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन केले. पाणी फाउंडेशनचे समन्वयक संघपाल वाहुरवाघ यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून मिळालेल्या विद्यापीठ तंत्रज्ञान व निविष्ठांचा शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी फायदा होणार असल्याचे सांगितले. विद्यापीठ शास्त्रज्ञाद्वारे वेळोवेळी मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रसंगी राहित येथील उपसरपंच डॉ. नितीन वाहुरवाघ, तेजराव वाहुरवाघ, अरुण वाहुरवाघ, संतोष भड, मनोज देशमुख, मेजर गौरव मांगुळकर, प्रकाश वाहुरवाघ, माणिक वाहुरवाघ, चेलका येथील प्रगतशील शेतकरी रामेश्वर उंडाळ, ग्रामस्थ व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यशस्वितेसाठी कापूस संशोधन विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संतोष गहुकर यांच्या मार्गदर्शनात नितेश वानखडे, प्रशांत सरकटे, अमेय अनोकर, ओम गावंडे, विठ्ठल मांजरे, संदीप इंगोले, समीक्षा गावंडे, ज्ञानेश्वर यादगिरे, कुलदीप जाधव, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तांत्रिक सत्रात माती परीक्षणाचे महत्व, मातीचा नमूना घेण्याच्या पद्धतीविषयी मृदा शास्त्रत्र डॉ. ओमप्रकाश राखुंडे यांनी मार्गदर्शन केले.
अकोला महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहातील ‘टिपू सुलतान’ नामफलक तत्काळ काढण्याची मागणी करत शिवसेना शिंदे गटाने शुक्रवारी आक्रमक भूमिका घेतली. निवेदन देऊनही कारवाई न झाल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात जमून ‘फलक उतारो’ आंदोलन केले. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात होता. याप्रकरणी महापालिका- पोलिसांची संयुक्त बैठक झाली. पुढील आठ दिवसात या विषयांवर निर्णय दिला जाईल, असे अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांनी सांगितले. महापालिकेतील स्थायी समिती सभागृहाला असलेला टिपू सुलतान यांच्या नावाचा फलक हटवण्याची विनंतीवजा सूचना शिवसेना शिंदे गटाच्या वतीने दहा दिवसांपूर्वी मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. परंतू त्यावर कोणतीही कार्यवाही अथवा लिखित समाधानकारक उत्तर आयुक्त यांनी दिले नव्हते. त्यामुळे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे महानगरप्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. उपजिल्हाप्रमुख गजानन बोराळे, संघटक तरूण बगेरे, युवा सेना जिल्हाप्रमुख, अतुल एडणे, जिल्हाप्रमुख युवा सेना विक्की बावरी, शहर प्रमुख युवासेना योगेश ढोरे, माजी नगरसेवक गजानन चव्हाण,नितिन मिश्रा, मुन्ना मिश्रा,अंकुश शिंत्रे,राजेश जोशी, अजय दुबे, गोटू अग्रवाल यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. विद्यमान सत्ताधारी भाजपप्रणीत शहर सुधार आघाडी हा मनपातील टिपू सुलतानच्या नावाचा फलक काढण्याचा ठराव मंजूर करते का?,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांनी सत्ता स्थापनेसाठी शहर सुधार आघाडी स्थापन केली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) दोन आणि महानगर विकास समितीचा एक असे तीन मुस्लिम नगरसेवक आहेत. तसेच सत्ता स्थापनेवेळी तटस्थ राहणारे ‘एमआयआय’चे तीन असे एकुण सात नगरसेवक मुस्लिम आहेत. त्यामुळे विरोधी गटातील ‘एमआयएम’चे नगरसेवक कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे. राष्ट्रहिताच्या व्यक्तीचे नाव द्या मात्र ‘टिपू’ नको पर्यायी नाव म्हणून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारख्या राष्ट्रहिताच्या व्यक्तीचे नाव दिले तरी चालेल परंतु टिपु नको, या घटनेवरून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला.
विद्यार्थ्यांचा मराठमोळा कलाविष्कार:विविध वाचनालये, विद्यालयात वाचन, काव्य गीतांची मैफल
मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने करकंब येथील न्यू इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी मराठी गीतावर विविध कला व नृत्य सादर करून हा दिन मोठ्या आनंदाने साजरा केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी व पत्रकार लक्ष्मण जाधव, समाजसेवक व माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंदे तर व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संजीवकुमार म्हेत्रे, मुख्याध्यापक श्रीकांत लऊळकर, स्कूल कमिटीचे अध्यक्ष प्रशांत वेळापूरकर उपस्थित होते. सुरुवातीला कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर माय मराठी, ही शाळा माझी व इतर गीतांवर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर केले. यावेळी कवी लक्ष्मण जाधव यांनी मराठी भाषा दिन ही कविता सादर केली. समाजसेवक सचिन शिंदे यांनी मराठी ही आपली मातृभाषा असून तिच्यावर मनापासून प्रेम करा. इतर भाषा ह्या कामापुरता शिकायला हरकत नाही. पण मराठी भाषा ही समृद्ध असून तिची गोडी ही अविट आहे. यावेळी अविनाश देवकते यांनी मार्गदर्शन केले. प्रतिनिधी | बार्शी येथील अध्यापिका विद्यालयात वि. वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यानंतर विद्यार्थिनींनी विविध कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यामध्ये कविता सादरीकरण, मराठी गीत सादरीकरण, चारोळी वाचन, भाषण, चित्रपट समीक्षा, पुस्तक समीक्षा, निबंध स्पर्धा, भित्तिपत्रक इत्यादीचा समावेश होता.सुजाता आचलेरे यांनी हे राष्ट्र देवतांचे हे गीत सादर केले. श्रद्धा चव्हाण यांनी शिवगर्जना सादर केली. मनीषा उंबरे, महेक बागलकोटे, सिद्धी जाधवर व सीमा सोनवणे यांनी राज्य गीत सादर केले. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजन व कुसुमाग्रज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य जीवन लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सोमनाथ देंडे तर अध्यक्ष म्हणून प्रा. बजरंग वाघमोडे उपस्थित होते. आम्रपाली माने व अनुजा बुऱ्हाडे यांनी लाभले आम्हास भाग्य हे गीत सादर केले. सय्यद तंजीला यांनी शिखर तो उंच हे गीत सादर केले. गौरी घोलप व प्रतीक्षा भोगे यांनी ही मायभूमी ही जन्मभूमी हे गीत सादर केले. मोनिका धुमाळ व राधिका बदले यांनी हीच आमुची प्रार्थना ही प्रार्थना सादर केले.
प्रतिनिधी | पंढरपूर प्राचीन आणि पवित्र पंढरपूरचा वारसा नष्ट करू पाहणाऱ्या प्रस्तावित ‘कॉरिडॉर' प्रकल्पाच्या विरोधात आता पंढरपूरकर एकवटले आहेत. या प्रकल्पाचा निषेध करण्यासाठी सोमवार, दि. २ मार्च रोजी पंढरपूर शहरात कडकडीत ‘बंद' पाळला जाणार असून, प्रकल्प बाधितांचा एक भव्य मोर्चा तहसीलदार कचेरीवर धडकणार आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती गेल्या दोन-तीन वर्षांपासून या कॉरिडॉर प्रकल्पाला संवैधानिक पद्धतीने विरोध करत आहे. समितीचे अध्यक्ष आणि हिंदू महासभा नेते अभयसिंह कुलकर्णी इचगांवकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले असून त्यांनी शासनाच्या या धोरणावर कठोर शब्दांत टीका केली आहे. या बंदमध्ये सर्व बाधित नागरिक, वारकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. प्रतिनिधी | पंढरपूर पंढरपूर नगर पालिकेचे सन २०२५-२६ चा सुधारित आणि सन २०२६-२७ या वर्षाचे वार्षिक अंदाजपत्रक शुक्रवारी सादर करण्यात आले. या अंदाजपत्रकात शहराच्या पायाभूत सुविधांपासून ते धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विकासकामांसाठी भरघोस आर्थिक तरतूद करण्यात आली. जमा आणि खर्चाचा ताळमेळ घालून वर्षाअखेरीस सुमारे ३ लाख ५६ हजार ४९१ रुपये शिल्लक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. दरम्यान प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या विठ्ठल मंदिर परिसरातील भांडवली निधीतून १० कोटी रुपये खर्चातून वाणिज्य संकुल साकारण्यासाठीच्या आराखडा प्रस्तावाच्या विषयांवर सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवकांनी विरोध दर्शवला. नगरसेवकांनी सभागृह दणाणून सोडले. सभेच्या अध्यक्षा प्रणिता भालके यांनी विषयाला स्थगिती जाहीर केली. यावेळी उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांच्यासह भाजप आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते. यानंतर अंदाज पत्रकातील प्रत्येक तरतुदींवर सुमारे दोन तास चर्चा करण्यात आली. सदस्यांनी अभ्यासपूर्ण सूचना केल्या. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सादर केलेल्या अंदाज पत्रकात आरंभीच्या शिल्लकसह २०२६-२७ या वर्षाचे एकूण वार्षिक उत्पन्न २७३ कोटी ४७लाख ८४ हजार ७४४ रुपये अपेक्षित आहे. त्या तुलनेत वार्षिक खर्च २७३ कोटी ४४ लाख २८ हजार २४६ रुपये इतका प्रस्तावित आहे. या अंदाजपत्रकात शासकीय कर्जाची परतफेड आणि व्याजाच्या हप्त्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. श्री विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर राबवण्याच्या हालचाली प्रशासनाच्या पातळीवर सुरु आहेत. याच दरम्यान, विठ्ठल मंदिराच्या परिसरात शासन निधीतून १० कोटी रुपयांची तरतूद वाणिज्य संकुलासाठी या अंदाजपत्रकात प्रस्तावित केली होती. परंतु प्रशासनाने कॉरिडॉर संदर्भात नगरपालिकेस विश्वासात घेतलेले नाही. नागरिकांचा विरोध असल्याने विठ्ठल मंदिर परिसर वाणिज्य संकुलास १० कोटींची तरतूद नको, अशी भूमिका नगरसेवक ओंकार जोशी, भागवत बडवे, राहुल शिंदे - नाईक यांनी घेतली. त्यावर मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सभागृह या संदर्भात निर्णय घेऊ शकते, असे सांगितले. नगरसेवकांचा विरोध लक्षात घेऊन नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी या प्रस्तावास स्थगिती देण्यात येत असल्याचे सभागृहात सांगितले. ^शासन केवळ स्वतःचे नाव करण्यासाठी या विध्वंसकारी कॉरिडॉरचा घाट घालत आहे. पंढरपूर युगानुयुगे आहे, त्यावर आपले नाव कोरण्यासाठी येथील प्राचीन वारसा नष्ट करू नका, अशी मागणी आहे. अभयसिंह कुलकर्णी इचगांवकर, अध्यक्ष, तीर्थक्षेत्र बचाव समिती. . घरकुल योजना: रमाई आवास, प्रधानमंत्री आवास (१ व २) अंतर्गत गरजूंच्या घरांसाठी तरतूद. . स्वच्छता व आरोग्य: स्वच्छ भारत, घनकचरा व्यवस्थापन, अग्निशमन सुरक्षा अभियानावर भर. . नागरी सुधारणा: रस्ते विकास, पाणीपुरवठा, मलनिस्सारण योजना (गटार बांधणी), . नामसंकीर्तन सभागृह आणि नाट्यगृहांचे बांधकाम. उद्यानांचा विकास, पुतळ्यांची सुधारणा आणि शहराचे सुशोभीकरण. स्मशानभूमी सुधारणा आणि आवश्यक नवीन वाहनांची खरेदी. नगरविकास खात्याच्या तज्ञ अभियंत्यांच्या मते, नवीन विकास योजनेतील सध्याचे रस्ते पुरेसे रुंद आहेत. या रस्त्यांवरील केवळ अतिक्रमणे काढल्यास आणि वाहन वाहतुकीचे योग्य नियोजन केल्यास कोणतीही धास्ती उरणार नाही, असा दावा बचाव समितीने केला आहे. भाविकांची गैरसोय: कॉरिडॉरमुळे भाविकांची सोय होण्याऐवजी मोठी गैरसोय होणार आहे. स्थानिक सेवा सक्षम: कॉरिडॉर पेक्षा चांगली सेवा स्थानिक पंढरपूरकर भाविकांना देत आहेत. प्राचीन वास्तूंना धोका: भाविकांची प्राचीन वारसाप्राप्त घरे, मठ आणि मंदिरे पाडली जाणार. पर्यायी जागा उपलब्ध: शासनाने हवे तर मोकळ्या शासकीय जागेत कॉरिडॉर करावा. महसुली उत्पन्नाचे स्रोत प्रमुख आक्षेप, शासकीय जागेत कॉरिडॉर करावा नाव कोरण्यासाठी विध्वंसकारी कॉरिडॉरचा घाट घातला प्रशासनाने विश्वासात न घेताच प्रस्ताव सादर केल्याने गदारोळ प्रमुख विकास योजना आणि सुविधा
वाढदिवसासाठी कपडे आणण्यासाठी सुळेवाडीतून दोघा मित्रांना सोबत घेऊन दुचाकीवर पिलीवकडे जात असताना समोरुन येणा-या दुचाकीला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास पिलीव नजीक घडली. शुक्रवारी वाढदिवसा दिवशीच स्वप्निल सुळे (वय १८, रा.सुळेवाडी, ता.माळशिरस) यास अखेरचा निरोप देण्याची वेळ कुटुंबावर आली. अपघातात दुस-या दुचाकीवरील मयत राजवर्धन बापू शिरतोडे (वय १८, रा.खडकी, ता.माण, जि. सातारा) याचा समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुळेवाडी (ता.माळशिरस) येथील इयत्ता १२ वीत शिकत असलेला स्वप्नील सुळे याचा वाढदिवस असल्याने तो गुरुवारी रात्री ८.३० च्या सुमारास वर्ग मित्र असलेल्या साईराज सुळे व गणेश माने (तिघांचे वय १८, तिघे रा.सुळेवाडी) यांना घेऊन मोटार सायकलवरुन (एमएच ४५ एजी ६७९०) पिलीव येथे नवीन कपडे आणण्यासाठी निघाला होता. पिलीव जवळील बागवान टेकाजवळ चार चाकी वाहनाला ओव्हरटेक करत असताना खडकी (ता.माण) गावाकडे दुचाकीवरुन (एमएच ११ सीई ५८२८) निघालेल्या राजवर्धन शिरतोडे यांच्या मोटार सायकलशी जोरात धडक झाली. या अपघातात स्वप्निल सुळे व राजवर्धन शिरतोडे हे ठार झाले. माळशिरस पोलिस पुढील तपास करत आहेत. ^याठिकाणी सोलापूर सातारा हा महामार्ग असून मोठा उतार आहे. पश्चिमेकडून भरधाव येणाऱ्या वाहनांना याठिकाणी वाहन नियंत्रीत करणे कठीण होते. त्यामुळे याठिकाणी गतीरोधक बसवावेत, अशी मागणी अनेकवेळा अधिकारी पुढारी यांच्याकडे केली. मात्र कुणी गांभीर्याने घेत नाही. याठिकाणी वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी गतिरोधक तातडीने होणे गरजेचे आहे. विक्रम सुळ, सुळेवाडी स्वप्निल सुळे, साईराज सुळे व गणेश माने हे तिघेजण सुळेवाडी गावातील मित्र असून म्हसवड येथे बारावीत शिकतात. सध्या बारावीची परीक्षा अंतिम टप्प्यात आहे. एमएच सीईटीची परीक्षा देऊन पुढे शिक्षण घेण्यासाठी तयारी करीत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. मित्राचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी अंत्यसंस्कार करण्याची वाईट वेळ स्वप्निलच्या कुटुंबावर व मित्र परिवारावर आली. मयत राजवर्धन शिरतोडे याच्या हात आणि पायाला ४ ठिकाणी फ्रॅक्चर होऊन जिभेला गंभीर इजा झाली होती. स्वप्नील सुळेला जोरदार मार बसल्याने तो बेशुद्ध होता. राजवर्धन यास अकलूज येथे दवाखान्यात नेत असतानाच वेळापूरजवळ त्याचा मृत्यू झाला. जखमी दोन्ही मित्रांवर अकलूज येथे उपचार सुरु मयत राजवर्धन शिरतोडे याच्या हात आणि पायाला ४ ठिकाणी फ्रॅक्चर होऊन जिभेला गंभीर इजा झाली होती. स्वप्नील सुळेला जोरदार मार बसल्याने तो बेशुद्ध होता. राजवर्धन यास अकलूज येथे दवाखान्यात नेत असतानाच वेळापूरजवळ त्याचा मृत्यू झाला. स्वप्नील सुळे यास अकलूज डॉ. इनामदार यांच्या आश्विनी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु असताना रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. मयत स्वप्निलचे मित्र साईराज सुळे व गणेश माने या दोघांवर डॉ. इनामदार यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याठिकाणी गेली ३ महिन्यापूर्वी एक दूध उत्पादक दूध घालून परत जात असताना, त्यास समोरच्या चारचाकी वाहनाने उडवल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता, तर गेल्या महिन्यात वाहन वळवताना झालेल्या अपघातात एक गंभीर जखमी झाला होता. त्यास फार मोठा खर्च आला होता. अशी माहिती मिळाली आहे. तिघे मित्र म्हसवड येथे १२ वी मध्ये शिकत होते
कुसळंब गोळीबार प्रकरणातील तिघांना हत्यारासह अटक:चार दिवसांची कोठडी
कुसळंब (ता.बार्शी) येथे गुरुवारी (दि.२६) किरकोळ कारणावरून तरुणाला लोखंडी सळईने मारहाण करत पिस्तुलने गोळीबार केल्या प्रकरणातील पळून गेलेल्या तिघांना बार्शी तालुका पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर पाच तासातच पाठलाग करत शिताफीने अटक करून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली. शुक्रवारी (दि.२७) येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती रेवती बागडे यांनी आरोपींना २ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली. योगेश मोरे (वय २९, मूळ रा. कुसळंब, ता. बार्शी, सध्या रा. हडपसर, पुणे), राहूल गायकवाड (वय २६, मूळ रा. कुंभारगाव, ता. करमाळा, सध्या रा. मांजरी रोड, पुणे), रोशन पिसाळ (वय ३२, रा. बागरतीनगर, हडपसर, पुणे) अशी पोलिस कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे ५ तासांत पाठलाग करुन आरोपींना जेरबंद केले. पोलिस उपअधीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी वळसने यांनी ही कारवाई केली. गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस, कोयता, रॉड, दांडके, कार जप्त कुसळंब येथे बाळासाहेब उकिरडे या तरुणावर आरोपींनी किरकोळ वादातून हल्ला केला. पिस्तुलाने गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपींवर विविध कलमान्वये बार्शी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल केला. गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळवत पोलिसांच्या दोन पथकाने आरोपींचा शोध घेऊन हत्यारांसह अटक केले. आरोपींकडून गावठी पिस्तुल, जिवंत काडतूस, कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडके व गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.
आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत निती आयोगाच्या मुग्धा नरकर यांनी शुक्रवारी जेऊर येथील अंगणवाडी, जि.प. शाळेची पाहणी केली. अंगणवाडी केंद्राच्या स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, आहार, बालकांचे पोषण व्यवस्थापन, आरोग्य मोजमाप (ग्रोथ मॉनिटरिंग), पूर्व प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता याचा आढावा घेतला. क्षेत्रीय कर्मचारी हेच योजनांचे प्रत्यक्ष वाहक असल्याने त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्हा परिषद शाळेतील इको क्लब, शाळेच्या आवारातील परसबाग आणि डिजिटल क्लासरुमची पाहणी केली. अभियानाच्या उद्दिष्टांची माहिती नरकर यांनी यंत्रणेला दिली. आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत निती आयोगाच्या मुग्धा नरकर यांच्यावर संपूर्णतः अभियान २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अक्कलकोट तालुक्याच्या सल्लागार म्हणून विविध विकासात्मक उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मुग्धा नरकर यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. यावेळी गट विकास अधिकारी शंकर कवितवे, महिला व बालविकासचे विशाल भोसले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जेऊरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात एएनसी नोंदणी तपासणी, प्रसूतिगृहाची व्यवस्था पाहणी, तसेच उच्च जोखीम गर्भवती महिलांची ओळख व त्यांच्यासाठी उपलब्ध सेवांची पाहणी केली. आरोग्य, पोषण, शिक्षण, शेती, मूलभूत सुविधा या प्रमुख क्षेत्रांतील विकास निर्देशांकांमध्ये लक्षित सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. निर्देशांकांचे सॅच्युरेशन, रिअल-टाईम डेटा मॉनिटरिंग आणि पुराव्यावर आधारित नियोजनाद्वारे ठोस व वेळबद्ध परिणाम साध्य करण्यावर भर देण्यात आला. गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना विभागांमधील समन्वय, जबाबदारी निश्चिती आणि नियमित आढावा, यंत्रणा मजबूत करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. अधिकृत पोर्टलवर अहवाल सादर करणे, क्षेत्रीय पडताळणी करणे, योजनांचा लाभार्थींपर्यंत लाभ पोहोचवणे यावर विशेष भर देण्यात आला. सर्व विभागांनी एकत्रित व पारदर्शक पद्धतीने कार्य करण्याचा, समुदाय सहभाग वाढविण्याचा आणि स्थानिक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाययोजना राबवण्याचा सामूहिक संकल्प केला. जनावरांच्या लसीकरणाचा आढावा घेतला. जिल्हा परिषद शाळेतील इको क्लब, शाळेच्या आवारातील परसबाग आणि डिजिटल क्लासरुमची पाहणी केली. पंचायत समितीच्या तालुकास्तरावरील अधिका-यांची बैठक घेण्यात आली. विभागीय समन्वयक, नियमित देखरेख, मैदानी फॉलोअप तसेच नियोजित कृती आराखडा, प्रभावी अमलासाठी समुदाय सहभागाला समावेश करणे गरजेचे आहे. डेटा आधारित नियोजन व सातत्यपूर्ण मूल्यांकन प्रणाली अधिक सक्षम करण्यावर त्यांनी विशेष भर देण्याबाबत सांगितले. उच्च जोखीम गर्भवती महिलांशी साधला संवाद डिजिटल क्लासरुम आणि परसबागेची पाहणी
केजरीवाल व सिसोदियांनी देशहिताचे काम करावे:ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा सल्ला
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे आपलेच कार्यकर्ते आहेत.त्यांनी समाज आणि देशाच्या हिताचे काम करीत रहावे, असे सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी सक्त वसुली संचनालयाने (इडी) दाखल केलेल्या गुन्ह्यातून न्यायालयाने केजरीवाल व सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता केल्यावर हजारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी केजरीवाल व सिसोदिया यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाल्यावर हजारे यांनी एकेकाळच्या आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांविरोधात तिखट प्रतिक्रिया दिली होती.केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर करीत चुकीचे निर्णय घेतले. त्यांच्या कृत्याचे फळ त्यांना मिळाले.केजरीवाल यांच्या विरोधात नाराजी व्यक्त करताना हजारे म्हणाले होते की,जो माझ्याबरोबर काम करीत असताना दारूविरोधात आवाज उठवायचा तोच आता दारू धोरणाचा पुरस्कार करीत आहे, ही बाब क्लेशकारक असल्याचे हजारे यांनी म्हटले होते. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासंबंधी त्यावेळी मी जे बोललो त्यावेळी न्यायlलयाचा निर्णय आला नव्हता. न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे. केजरीवाल आणि सिसोदिया दोघेही आपलेच कार्यकर्ते आहेत. त्यांनी समाज आणि देशाच्या हिताचे काम करीत रहावे,असे हजारे म्हणाले. पवार अपघात प्रकरणी लोकभावना विचारात घ्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या विमान अपघातासंबंधी लोकांची मागणी असेल तर सरकारने चौकशी केली पाहिजे. लोकांच्या भावना सरकारने विचारात घेतल्या पाहिजेत. मात्र, जी गोष्ट डोळ्याने पाहिली नाही, ऐकलीही नाही, त्यावर माझे वैयक्तिक काहीच मत नाही. त्यावर मी काही बोलू शकत नाही, असे हजारे यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर स्पष्ट केले.
राहुरीसह चार तालुक्यांना वरदान ठरलेल्या चारीचा पाइप फुटल्यामुळे रब्बीसाठीचे आवर्तन मिळण्यास विलंब झाला. चारीची युद्धपातळीवर दुरुस्ती हाती घेतली होती, परंतू पाईपातील पाणी उपसा करण्यासाठी आठवडाभराचा कालावधी गेला. त्यामुळे प्रत्यक्ष चारी लिकेज दुरुस्त करून १६ दिवसांनी पाणी सोडण्यात आले. सद्यस्थितीत कालव्यातूनही सिंचनासाठी आवर्तन सुरू आहे. तथापि, ६८० दलघफूचे चारीचे आवर्तन पूर्ण करण्यासाठी मुळा विभागाकडून नियोजन आखण्यात येत आहे. चार तालुक्यातील ४३ गावांतील सुमारे १०२ पाझर तलाव भरून सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्राला वरदान ठरलेली, वांबोरी चारी ४ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली होती. त्यातून १८ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले होते. परंतू, सोमवारी (९ फेब्रुवारी) दुपारी एकच्या सुमारास राहुरी तालुक्यातील धामोरी खूर्द येथे अचानक मोठा आवाज होऊन, १८०० एमएम व्यासाची जलवाहिनी फुटली. एकाचवेळी तीन पंपांचा फ्लो असल्याने ३० फुट उंचीवर पाण्याचा फवारा उडाला. या घटनेत परिसरातील सुमारे दहा ते बारा एकर क्षेत्राचे नुकसान झाले. जलवाहिनीचा पाइप मोठा असून, त्यात एक माणूस जाऊ शकतो. त्याच ठिकाणी पाईपवर वेल्डिंग केलेली प्लेट पाण्याच्या दाबाने निघून जलस्फोटासारखी स्थिती तयार झाली होती. पहिले दोन दिवस खड्ड्यातील पाणी उपसा केला. त्यानंतर पुढील तीन ते चार दिवस पाईपमधील पाणीउपसा केल्यानंतर प्रत्यक्ष दुरुस्ती करता आली. अचानक झालेल्या लिकेजमुळे शेवटच्या टप्प्यात असलेल्या गव्हाला एक पाणी कमी मिळाले. दरम्यान, धरणातून सिंचनासाठी कालव्यांचे आवर्तन सुरू असून पुढील दीड महिन्यात साडेचार ते पाच टीएमसी पाणी कालव्याद्वारे दिल्यास, चारीच्या आवर्तनासाठी १०० दिवसांपेक्षा कमी कालावधी मिळण्याची शक्यता आहे. इतर मॅनव्होलचा शोध घ्यावा लागेल वांबोरी चारीच्या , १८०० एमएम जलवाहिनीवर मॅनव्होलची वेल्डिंग निघून जलवाहिनी लिकेज झाली. १७ ते १८ वर्षांपासून या वाहिनीतून पाणी सोडले जाते. मध्यमप्रकल्प विभागाने ही वाहिनी मुळा विभागाच्या ताब्यात दिली होती. परंतू, मॅनव्होल वेल्डिंग निघून गळती लागली. त्यामुळे असे मॅनव्होल किती आहेत? याची माहिती मुळा विभागाला नाही. त्यामुळे मॅनव्होल असतील तर तेथे जलस्फोटाची धास्ती आहे.
अहमदनगर महाविद्यालय माजी विद्यार्थी संस्था आणि अहमदनगर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. सन १९५९ सालापासून ते २०१६ पर्यंतच्या विविध बॅचमधील सुमारे ८० माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी उपस्थित होते. अनेक दशकांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत महाविद्यालयीन जीवनातील अनुभव कथन केले. या मेळाव्यास जेष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जवाहर मुथ्था, माजी प्राचार्य डॉ. विश्वास काळे, महाराष्ट्र राज्य माहिती व जनसंपर्क विभागाचे निवृत्त संचालक देवेंद्र भुजबळ, डॉ. ज्ञानेश कुलकर्णी, बाळासाहेब ढगे, शंकरराव राऊत, डॉ. अरविंद गुगळे, विजय तांबोळी आदींसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले माजी विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थी संस्थेचे उपाध्यक्ष प्रशांत दहिभाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. नोएल पारगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील सभागृहात पार पडलेल्या या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणातील आणि एकूणच व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीतील महाविद्यालयाच्या भूमिकेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अनेकांनी माजी प्राचार्य डॉ. जे. बार्नबस, डॉ. मनोरमा बार्नबस आणि डॉ. सरला बार्नबस यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल ऋण व्यक्त केले. डॉ. नोएल पारगे यांनी महाविद्यालयाच्या दीर्घ शैक्षणिक परंपरेचा गौरव करताना माजी विद्यार्थ्यांच्या यशाचा विशेष उल्लेख केला. एका संस्थेची खरी ओळख तिच्या इमारतींमध्ये नसून विद्यार्थ्यांच्या कार्यात आणि मूल्यांमध्ये असते. आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत असलेले आपले माजी विद्यार्थी हेच महाविद्यालयाच्या परंपरेचे जिवंत प्रतीक आहेत. त्यांच्या अनुभवांतून आणि संघर्षातून सध्याच्या पिढीला प्रेरणा मिळेल. संस्थेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच, माजी विद्यार्थ्यांशी सातत्यपूर्ण संवाद ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी माजी विद्यार्थी संस्थेचे सचिव डॉ. अभिजीत कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले व पुढील स्नेहमेळाव्यास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना करण्यात आले. मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा घडल्या भेटीगाठी एकेकाळी महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेतलेले मित्र, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणाच्या निमित्ताने तर कुणी रोजगार व्यवसायाच्या निमित्ताने दुरावले. त्यानंतर पुन्हा भेटण्याचा योग काही जुळून आला नाही. परंतु, नगर महाविद्यालयात आयोजित मेळाव्याच्या निमित्ताने जुने मित्र बऱ्याच वर्षांनी एकत्र आले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यामुळे त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
उन्हाळ्याची चाहूल लागताच थंड पाण्यासाठी नागरिकांची पावले ‘गरिबांचा फ्रिज’ समजल्या जाणाऱ्या माठ विक्रीच्या दुकानांकडे वळू लागली आहेत. शहरात येणाऱ्या प्रमुख महामार्गांच्या कडेला आणि अंतर्गत रस्त्यांवर लाल-काळ्या माठांची रेलचेल वाढली आहे. मात्र, गारवा देणाऱ्या या माठांच्या अवतीभोवती पसरलेली दुर्गंधी आणि अस्वच्छता नागरिकांच्या आरोग्यासाठी तापदायक ठरण्याचे कारण बनत आहे. तारकपूर रस्ता, मनमाड रस्ता, छत्रपती संभाजीनगर रस्ता, पुणे महामार्गालगत, तसेच शहरातील अनेक भागात माठ विक्रीचे स्टॉल्स लागले आहेत. प्रत्येकाला महागडा फ्रिज परवडत नाही, शिवाय नव्या माठात पाणी लवकर थंड होत असल्याने सर्वसामान्य नागरिक माठ खरेदीला पसंती देतात. परंतु, हे माठ ज्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवले आहेत, तिथे स्वच्छतेची काळजी घेतल्याचे दिसत नाही. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसत असून साथीच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. बहुतेक माठ विक्रेते आर्थिकदृष्ट्या दुर्बल असून, त्यांनी मनपाची कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नाही. त्यांना स्वच्छतेबाबत पुरेशी माहिती नसल्याने विक्रीच्या जागेवरच अस्वच्छता पसरलेली असते. मनपाने या विक्रेत्यांना केवळ जागा उपलब्ध करून न देता, तिथे किमान स्वच्छता राखण्याबाबत आणि दर्जेदार माठ विकण्याबाबत सूचना देणे गरजेचे झाले आहे. अन्यथा, गार पाण्यासाठी घेतलेला माठ आजारपणाचे कारण ठरू शकतो. माझी वसुंधरा अभियानाच्या चित्रांद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला, तिथेच कचरा दिसत आहे. याच ठिकाणी माठ विक्रीस ठेवले आहेत. छाया : समीर मन्यार. स्वच्छता संदेश भिंतीवरच शहरात ठिकठिकाणी भिंती रंगवून स्वच्छतेचा संदेश दिला आहे. प्रत्यक्षात त्याच चित्रांच्या खाली कचरा साचला आहे. स्वच्छतेचा पुरस्कार मिळवणाऱ्या अहिल्यानगर मनपाचे हे रूप पाहून नागरिक मात्र संताप व्यक्त करत आहेत. केवळ पुरस्कारासाठी स्वच्छता की नागरिकांच्या आरोग्यासाठी, असा प्रश्न आता विचारला जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ ^तारकपूर रोडवर माठ विक्रेत्यांजवळ दोन-तीन दिवसांपासून मृत कुत्रे पडून असून त्याची प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना फोन करूनही त्यांनी तो उचलला नाही. जिल्हा रुग्णालय आणि पोलीस स्टेशन शेजारीच असूनही मनपा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे का? - प्रीती शर्मा, सामाजिक कार्यकर्त्या
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शेती करावी- डॉ. खरबडे
विद्यार्थ्यांनी प्रथम आपले ध्येय निश्चित करून, प्रात्यक्षिकद्वारे विषयाचे सखोल ज्ञान घ्यावे आणि स्वतःच्या पायावर उभे रहावे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शाश्वत शेती करावी. ग्रंथालयाचा मुलांनी जास्तीत जास्त वापर करून जनरल नॉलेजची भर स्वतःमध्ये घालावी, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा संचालक शिक्षण डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले. सोनई कृषि महाविद्यालयाचा कृषिमृदगंध २०२६ वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ डॉ. खरबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुळा संस्थेचे सचिव उत्तमराव लोंढे होते. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्य डॉ. हरी मोरे यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केले. व्यासपीठावर उपविभागीय कृषि अधिकारी दत्तात्रय डमाळे, कोकण विभागाच्या राज्यकर सहाय्यक आयुक्त पुजा गोर्डे, सहसचिव डॉ. विनायक देशमुख, उपप्राचार्य प्रा. सुनिल बोरुडे, पत्रकार सुनिल दरंदले, प्रा. अनुप दरंदले, विद्यार्थी परिषदेची चेअरमन कु. प्रांजली हांगे, कृषि उपसंचालक लहू गाढवे आदी उपस्थित होते. डॉ. खरबडे म्हणाले, सोनई कृषि महाविद्यालयातील शैक्षणिक, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांच्या बांधावर जावून केलेले मार्गदर्शन, महाविद्यालयातील असलेल्या परिपूर्ण प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेसाठीची करून घेत असलेली तयारी चांगली आहे. पूजा गोर्डे यांनी सातत्य, संयम आणि स्वतःवर विश्वास हे यशाचे तीन मंत्र सांगितले. दत्तात्रय डमाळे यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. कृषि महाविद्यालय, सोनई म्हणजे सर्वांगीण विकासाची विकासगंगा असल्याचे डॉ. विनायक देशमुख यांनी सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयातील शैक्षणिक, क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना, महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले नोकरीतील नैपुण्य, कृषि पदवीत्तर आणि व्यवस्थापनामध्ये पदवीत्तर प्रवेश घेतलेले विद्यार्थी, विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी डॉ. संदीप तांबे यांनी, तर आभार उपप्राचार्य प्रा. सुनील बोरुडे यांनी मानले.
कोतुळेश्वर विद्यालयास माजी खासदार ठाकूर परिवाराची 25 लाखांची देणगी
तालुक्यातील कोतूळ येथील रयत शिक्षण संस्था संचलित कोतुळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास शाळा खोली बांधकामासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी २५ लाख रुपयांची देणगी दिली. याबद्दल कोतुळेश्वर विद्यालयाकडून खासदार रामशेठ ठाकूर व शकुंतला रामशेठ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आले. तसेच त्यांना विद्यालयाकडून सन्मानपत्रही प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय हरित सेना उपक्रमांतर्गत कोतुळेश्वर विद्यालयाने बेल वृक्ष व तुळशीचे रोपे त्यांना भेट दिले. यावेळी रामशेठ ठाकूर यांनी विद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून प्रगतीची माहिती घेतली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बी.के. देशमुख, पर्यवेक्षक जे. बी. गोडे, उपक्रमशील कलाशिक्षक एस. बी. उकिरडे, एस. पी. गोर्डे, एस. बी. लांडे, एस. व्ही. लांघी आदी उपस्थित होते. कोतुळेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांसह, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व स्थानिक स्कूल पदाधिकाऱ्यांसह शाळा व्यवस्थापन व सल्लगार समिती, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकाऱ्यांनी देणगीदार रामशेठ ठाकूर यांचे आभार व्यक्त केले.

24 C