सेनगाव तालुक्यातील मकोडी येथे विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेलेेली तरुणी पाणी काढत असताना विहीरीत पडली. सदर प्रकार वेळीच लक्षात गावकऱ्यांनी तातडीने मदत करून तिला विहीरी बाहेर काढले अन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. गावकऱ्यांच्या सतर्कतेने तरुणीचा जीव वाचला. मंगळवारी ता. २४ सकाळी हा प्रकार घडला आहे. सेनगाव तालुक्यातील मकोडी येथे मागील दिड वर्षापासून जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्ण आहे.त्यामुळे सध्या गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना पिण्याच्ाय पाण्यासाठी बंडू पाटील खरात यांच्या शेतातून पाणी आणावे लागत आहे. त्यानुसार आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गावातील अश्विनी थिटे हि तरुणी पाणी भरण्यासाठी गेली होती. यावेळी विहीरीतून पोहऱ्याने पाणी काढत असतांना ती विहीरीत पडली. सदर प्रकार परिसरातील विटभट्टी वरील कामगारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडा ओरड केली. यावेळी गावकरीही घटनास्थळी धावले. यावेळी गावकऱ्यांनी विहीरीत दोरी व बाज टाकून तरुणीला विहीरीच्या बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख हे देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या तरुणीला वाहनाद्वारे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अश्विनी हिला वेळीच विहीरीतून बाहेर काढल्यामुळे तसेच उपचार मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तिच्या प्रकृतीतल सुधारणा होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मात्र या घटनेमुळे गावातील जल जीवन मिशन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सदर योजनेचे काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा तिव्र आंदोलन उभारण्याची तयारी गावकऱ्यांनी चालवली आहे.
माजलगाव वाळू तस्करीची सखोल चौकशी करण्यात येईल
मुंबई : प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे कथित पोलिसांच्या संगनमतातून सुरू असलेल्या वाळू तस्करी प्रकरणात संशयित तीन व्यक्तींचे मोबाईल जप्त करण्यात आले होते. या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा देखील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पुनर्प्राप्त करण्यात आला आहे. मात्र या सर्व डेटाच्या विश्लेषणानंतरही संबंधितांमधील थेट संगनमत किंवा परस्पर संबंध सिद्ध करणारे ठोस पुरावे मिळाले नाहीत. तरीही या […] The post माजलगाव वाळू तस्करीची सखोल चौकशी करण्यात येईल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज ‘राजमाता जिजाऊ’ या बस सेवेचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नव्या बस सेवेची आजपासून सुरुवात करण्यात आली. विधानभवन प्रांगणात पार पडलेल्या बस सेवा लोकार्पण सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पर्यावरण मंत्री […] The post ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिन्याला आता केवळ दोनदा गॅस बुकिंग
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांचा थेट परिणाम घरगुती गॅस वापरणा-या ग्राहकांवर होणार असून प्रत्येक ग्राहकाला या बदलांची माहिती असणे आवश्यक आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड(बीपीसीएल) ने जाहीर केलेल्या नव्या नियमानुसार, आता एका ग्राहकाला महिन्यात जास्तीत जास्त दोनच एलपीजी […] The post महिन्याला आता केवळ दोनदा गॅस बुकिंग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट!
मुंबई : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून सतत हवामानात बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आज पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. आजही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पावसाचा यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी उष्णता तर कधी पाऊस अशी […] The post राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जेव्हा तुम्ही भाजपमध्ये मंत्री असाल तेव्हा इथे या…;खरात-बच्चू कडूंचा व्हीडीओ व्हायरल
नाशिक : प्रतिनिधी प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांचा एक व्हीडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अशोक खरात कडू यांना जेव्हा तुम्ही भाजपमध्ये मंत्री असाल तेव्हा इथे या… असा सल्ला देताना दिसत आहे. व्हीडीओत खरात बच्चू कडू यांना नारळ आणि शाल देखील देत आहे. शिवाय बच्चू कडू खरातच्या पाया पडल्याचेही दिसत आहे. त्यामुळे आता कडू यांच्या […] The post जेव्हा तुम्ही भाजपमध्ये मंत्री असाल तेव्हा इथे या…;खरात-बच्चू कडूंचा व्हीडीओ व्हायरल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
…त्यांचेच हात लोकशाहीच्या खुनाने बरबटलेले
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा लोकशाहीचा खून झाला आणि पोलिसांनी झुंडशाही केली त्या सर्वांचा केंद्रबिंदू हा विधिमंडळाच्या इमारतीमध्येच आहे. त्यामुळे छाती आपटून हे काय करणार? मुळात जे लोक लोकशाहीचा खून झाला असे म्हणतात त्यांचेच हात लोकशाहीच्या खुनाने बरबटलेले आहेत. संजय राऊत म्हणाले की, काल विधिमंडळाच्या पाय-यावर एक-दोन गटाचे काही मंत्री आणि आमदार उभे राहत […] The post …त्यांचेच हात लोकशाहीच्या खुनाने बरबटलेले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रात माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी विविध अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर, नवी मुंबई येथील सिडकोच्या जागेवर श्री सत्य साई संजीवनी केंद्र उभे राहिले आहे. या केंद्राचे उद्घाटन फडणवीस यांनी केले. श्री सत्य साई संजीवनी केंद्रामार्फत देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत टू-डी-इको शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांद्वारे विविध जिल्हा रुग्णालयांमध्ये हृदयरोग तज्ञांकडून एकूण 2,507 टू-डी-इको तपासण्या करण्यात आल्या. तसेच जन्मजात हृदयरोग (सीएचडी) उपचारासाठी राज्यभरातील आरबीएसके पथकांमार्फत 3226 बालकांवर श्री सत्य साई संजीवनी केंद्र येथे उपचार करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार श्री सत्य साई संजीवनी केंद्रांनी पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि सातारा जिल्ह्यातील जावळी या आदिवासी बहुल तालुक्यांना दत्तक घेऊन तेथे विशेष आरोग्य उपक्रम राबविले. तसेच पुण्यातील शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात आल्या. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात आरोग्य सेवा पोहचविण्यात येत आहेत. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये बालकांमधील जन्मजात हृदयरोग तपासणीसाठी मेगा शिबिरे सुरू असून, दुर्गम भागातील बालकांनाही अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत. नवी मुंबई येथे बांधकाम कामगार तसेच वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी विशेष आरोग्य प्रकल्प राबविण्यात येत आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांसाठी नॉन-कम्युनिकेबल डिसीज (एनसीडी) आणि कर्करोग तपासणी प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे. याशिवाय, आजपर्यंत आशा, अंगणवाडी सेविका, सहाय्यक परिचारिका आणि वैद्यकीय अधिकारी अशा 3500 हून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांना क्षमता विकास प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे सर्व उपक्रम राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सर्वसमावेशक आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहेत.
तटकरे,चाकणकरांच्या बोटाला एकाच वेळी जखम होणे हा कमालीचा योगायोग
मुंबई : प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बोटाला एकाच वेळी दरवाजात अडकल्याने जखम होणे हा कमालीचा योगायोग असल्याची टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी […] The post तटकरे,चाकणकरांच्या बोटाला एकाच वेळी जखम होणे हा कमालीचा योगायोग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अवकाळीग्रस्त शेतक-यांना तात्काळ मदत पुरवा
मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. एकीकडे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. तर दुसरीकडे, मराठवाड्यातील अवकाळी पावसाने शेतक-यांचे कंबरडे मोडले असताना सरकार केवळ भोंदूबाबांच्या मागे लागले आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडत असताना वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीसह राज्यातील सुरक्षिततेच्या प्रश्नावर सरकारला […] The post अवकाळीग्रस्त शेतक-यांना तात्काळ मदत पुरवा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धर्म बदलल्यास ‘एससी’ दर्जा संपुष्टात येणार
नवी दिल्ली : देशाच्या आरक्षण धोरणावर आणि सामाजिक संरचनेवर मोठा परिणाम करणारा एक ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार दि. २४ मार्च रोजी दिला असून हिंदू , शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म स्वीकारणा-या व्यक्तीला अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. महत्त्वाचे म्हणजे, धर्मांतर केलेल्या व्यक्तीला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती(अत्याचार […] The post धर्म बदलल्यास ‘एससी’ दर्जा संपुष्टात येणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी संसदेत महिला आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली. मंगळवारी 'झीरो अवर'मध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित करत, मानवी तस्करी रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. सरकारने या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन महिला व मुलींची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे कुलकर्णी म्हणाल्या. मेधा कुलकर्णी यांनी गृह विभागाच्या आकडेवारीचा हवाला दिला. त्यानुसार, 2024 आणि 2025 या दोन वर्षांत राज्यात 93,940 महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. यात 23 हजारांहून अधिक अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. दररोज सरासरी 132 महिला बेपत्ता होत असल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे. मुंबई, रायगड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नवी मुंबईसह पुणे शहरातही अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे. एकट्या पुण्यात गेल्या 15 दिवसांत 13 ते 17 वयोगटातील 20 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. या प्रकरणांमध्ये मानवी तस्करीच्या संघटित जाळ्यांचा सहभाग असण्याची शक्यता गृह विभागाने वर्तवली आहे. जबरदस्तीने पळवून नेणे, खोट्या प्रेमसंबंधांच्या माध्यमातून फसवणूक करणे आणि सोशल मीडियाचा गैरवापर करणे यांसारख्या बाबीही या घटनांमागे असल्याचे निरीक्षण गृह विभागाने नोंदवले आहे. शोधकार्य आणि तपासाचा वेग अत्यंत कमी असल्याबद्दल कुलकर्णी यांनी चिंता व्यक्त केली. 2024 मधील 45 हजार प्रकरणांपैकी 15 हजार प्रकरणांमध्ये अद्याप कोणताही ठोस मागोवा लागलेला नाही. तर, 2025 मधील 48 हजार प्रकरणांपैकी 13 हजार महिला अद्याप सापडलेल्या नाहीत. याचा अर्थ, गेल्या दोन वर्षांत सुमारे 28 हजार महिला व मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही. बेपत्ता झालेल्या महिलांचे भवितव्य काय, त्यांची तस्करी झाली का, त्यांना परदेशात विकले गेले का, किंवा त्यांच्यावर अत्याचार झाला का, असे गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या समस्येवर उपाय म्हणून मेधा कुलकर्णी यांनी काही ठोस मागण्या केल्या. 'गोल्डन अवर्स'मध्ये त्वरित शोध घेण्यासाठी आधुनिक व जलद तपास यंत्रणा उभारणे, मोबाईल ट्रॅकिंग प्रणाली अधिक सक्षम करणे आणि सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवून त्यांचे सतत निरीक्षण करणे यांचा यात समावेश आहे. याशिवाय, जबरदस्ती धर्मांतर आणि विवाहाच्या प्रकरणांवर कठोर कारवाई करावी, अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण ठेवावे आणि प्रवास तसेच हॉटेलमध्ये ओळखपत्र अनिवार्य करावे, अशी मागणीही त्यांनी केली. राज्यातील टोल नाक्यांवर डिजिटल पेमेंट व ओळख प्रणाली अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात हा सरकार पुरस्कृत बाबा होता की काय? अशी परिस्थिती असल्याची मिश्किल टिप्पणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर, दीपक केसरकर आदी नेत्यांनी पदावर असताना अशोक खरातची विशेष काळजी घेतली. त्याचे गुण माहिती असूनही त्याचे उदात्तीकरण केले. त्यामुळे भोंदू खरात हा सरकार पुरस्कृत बाबाच वाटतो, असे ते म्हणालेत. भोंदू अशोक खरातला पोलिसांनी लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याच्यावर अनेक महिलांचे श्रद्धेच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. राज्यातील अनेक बडे नेते व प्रशासकीय अधिकारी त्याच्या संपर्कात होते. आता प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यासोबतचा खरातचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यातच अशोक खरातने एका महिला नेत्याला लोकसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायकपणे फिरवण्याची ग्वाही दिल्याचीही बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर विजय कुंभार यांनी या प्रकरणी उपरोक्त टिप्पणी केली आहे. काय म्हणाले विजय कुंभार? विजय कुंभार एका पोस्टमध्ये म्हणाले, भोंदूबाबा अशोक खरात हा सरकार पुरस्कृत बाबा होता की काय याची खात्री पटावी अशी परिस्थिती सध्या आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खरातने मंदिरासाठी रस्त्याची मागणी केली आणि ती पूर्ण देखील झाली.मंत्रिमंडळ उप समितीने पाणी दिले, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पदावर असताना आणि त्याचे गुण माहीत असूनही त्याचे उदात्तीकरण केलं, त्याची दुष्कृत्ये माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले,त्याच्याकडे जास्तीत जास्त लोक आकर्षित होतील याची काळजी घेतली.महसूल विभागाने जमीन विषयक कायद्याकडे दुर्लक्ष केले. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तर कहर केला, अशोक खरातला अस्ट्रॉनॉमीचं चांगलं ज्ञान असल्याने आपण त्याच्याकडे ज्योतिष बघण्यासाठी जात होतो असं त्यांचं म्हणणं आहे.ज्या शिक्षण मंत्र्याला अस्ट्रॉनॉमी आणि अस्ट्रॉलॉजी यांच्यातला फरक कळत नाही त्यांच्याकडून काय वेगळी अपेक्षा करणार?. ते पुढे म्हणाले, अशोक खरातशी अनेक अधिकाऱ्यांनी आर्थिक संबंध ठेवलेले आहेत. त्यातील एक अधिकारी अभिजीत भांडे पाटील याचे खरात बरोबरचे संबंध पुढे आले. या अभिजीत भांडे पाटलावर शेकडो कोटी रुपयांची काळीमाया जमा केल्याचा आरोप आहे आणि त्यासंदर्भात 2024 मध्ये विधानसभेत लक्षवेधी देखील मांडण्यात आली होती. परंतु पुढे काहीच झाले नाही, अर्थात ते होणारच नव्हतं. भोंदू खरात आणि त्याच्या चरणी लोळण घेणारे मंत्री आणि अधिकारी पाठीशी असल्यावर काय होणार? असे अनेक अधिकारी आणि मंत्री भोंदू बाबाच्या चरणी लोळण घेत होते. अनेक आयएएस अधिकारीही त्याच्या सेवेत होते, असे ते म्हणालेत. राज्यातील शासन - प्रशासन रसातळाला विजय कुंभार यांनी राज्यातील शासन - प्रशासन रसातळाला गेल्याचाही दावा केला आहे. या प्रकरणी त्यांनी 3 ताजी उदाहरणे दिली आहेत. त्यांच्या मते, मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी पोलिसांकडून गैरवर्तन झाले, मग सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल?, आमदार संजय गायकवाड यांनी 35 कोटी “कमिशन” वाटल्याची उघड कबुली दिली, त्यावरून भ्रष्टाचाराचे सार्वत्रिकरण झाल्याचे संकेत मिळतात, तसेच भोंदू बाबा अशोक खरात यांच्या चरणी लीन झालेले मंत्री, आमदार, पदाधिकारी, आयएएस, आयपीएस अधिकारी पाहता राज्यात अंधश्रद्धेला आश्रय असल्याचे सिद्ध होते. यावरून राज्यातील शासन व प्रशासन रसातळाला गेल्याचे स्पष्ट होते.
विधानपरिषद सभागृहात संविधानातील अधिकारांच्या वाटणीवर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या भूमिकेवर स्पष्ट शब्दांत आक्षेप नोंदवला. मंत्रिमंडळ, विधानसभा आणि विधानपरिषद या तिन्ही स्तंभांचे अधिकार संविधानाने निश्चित केलेले असून, सभागृहाच्या अध्यक्षांचा किंवा सभापतींचा सन्मान राखणे आणि त्यांचे निर्देश पाळणे हे सर्वांचे कर्तव्य असले, तरी 'एक्झिक्युटिव्ह' (कार्यकारी मंडळ) च्या प्रशासकीय निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार पीठासीन अधिकाऱ्यांना नाही, असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे. हा संपूर्ण वाद सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून झालेल्या चर्चेनंतर सुरू झाला, ज्यामध्ये उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे थेट निर्देश दिले होते. यावर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, एखाद्या अधिकाऱ्याचे निलंबन करणे हा पूर्णपणे प्रशासकीय अधिकार असून तो सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे अशा निर्णयांमध्ये सभापतींनी हस्तक्षेप करू नये, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे उपसभापतींचे कान टोचले आहेत. विधानपरिषदेत सभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? देवेंद्र फडणवीस म्हणाले, खाली विषय झाला की अधिकारी मंत्र्यांच्या ब्रिफींगला आलेला नाही, अशा स्थितीत एखादा दिलेला निर्देश हा सभागृहाचा निर्देश असतो. एखादा मंत्री बोलतो की निलंबित करेन तेव्हा त्याला तो अधिकार आहे. सभापती यांनी दिलेला निर्देश असतो. वस्तुस्थिती असेल तर एक्झिक्युटीव्हकडून कारवाई होते, पण वस्तुस्थिती वेगळी असेल तर बदलही करू शकतो. आश्वासन पाळता येत नसेल तर हे सभागृहाला सांगावे लागते, जे एक्झिक्युटीव्हचे अधिकार आहेत ते त्यांचे अधिकार आहेत. त्या स्थानावर असताना तालिका सभापती परिस्थिती बघून निर्देश देऊ शकतात, पण ते ब्राम्हवाक्य नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
दिवाळीच्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाली होती. ऑक्टोबर, नोव्हेंबरपासूनच खरातचे गैरव्यवहार चव्हाट्यावर आले, गृहविभाग पुरावेही गोळा करत होता, मग मुख्यमंत्री सहा महिने झोपा काढत होते का?, असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज उपस्थित केला. भोंदू अशोक खरात प्रकरणाने सुरू झालेली विकृत चर्चा महाराष्ट्रासाठी चांगली नाही. एसआयटीला अधिकची कुमक द्या, टास्क फोर्स लावा आणि दोषींना गडाआड करून या प्रकरणाचा शेवट करा, असे ते म्हणालेत. बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अशोक खरातचे प्रकरण अंधश्रद्धेतून निर्माण झाले. त्यातून आपण धडा घेतला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगला पाहिजे. अंधश्रद्धा कोण वाढवत आहे, धर्मा-धर्मात, जाती - जातीत वाद कोण निर्माण करत आहे. द्वेष कोण निर्माण करत आहे, हे सर्वांना माहित आहे. यातूनच खरात सारख्या विकृती जन्माला येतात याची दखल घेतली पाहिजे. 2024 पासून देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांच्याच काळात अशोक खरात सारख्या विकृतीने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. आताही जाणीवपूर्वक हे प्रकरण रेंगाळत ठेवण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत. मित्रपक्षांना जेरीस आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे निषेधार्ह आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला आहे, पण इतर सर्व संबंधितांचे काय? त्यांच्यावरही गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे. खरातशी संबंधित असलेल्यांना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.. दाभोलकरांचे काम पुढे नेण्याची गरज समाजभान गुंडाळून ठेवल्यानेच अशोक खरात सारखे विकृत निर्माण होतात. खरात प्रकरणात काही जण अंधश्रद्धेचे बळीही ठरले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मुलनासाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांचे काम पुढे घेऊन गेले पाहिजे व अंधश्रद्धा निर्मूलनाचा संकल्प केला पाहिजे, जेणेकरून खरात सारखी विकृती महाराष्ट्रात पुन्हा निर्माण होणार नाही, असेही सपकाळ म्हणाले. राज्यात मंत्रीच मार खातात..! सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतच जुंपली असून मंत्री शंभुराजे देसाई व मकरंद पाटील या दोन मंत्र्यांना पोलिसांनीच मारहाण केली, असे तेच सांगत आहेत. महाराष्ट्रात मंत्रीच मार खात आहेत, हे लोकशाही रसातळाला गेल्याचा मोठा पुरावा आहे तसेच साताऱ्यात जे झाले त्यातून वोट चोरीवर शिक्कामोर्तब झाले आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.. अशोक खरातप्रमाणे भ्रष्टाचाराचीही विकृती.. आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दल बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आमदार गायकवाड ज्या विकासाच्या वल्गना करत आहेत, त्यांनी कोणत्या गावात किती पैसे खर्च केले याची श्वेतपत्रिका काढावी. सर्व कंत्राटे तर त्यांच्या घरात व नातेवाईकांकडेच आहेत. रेतीची अवैध कामे कोण करत आहे, मटक्याची दुकानेही त्यांचीच आहेत. ३५ कोटी रुपयांच्या कमिशनवर पाणी सोडले. सायकलवर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांकडे फार्च्यूनर कार आली, असे ते सांगत आहेत, तर ते ज्यातून फिरतात ती कोट्यवधींची डिफेंडर कार कोठून आली हेही त्यांनी सांगावे. आमदार झाल्यापासून आतापर्यंत किती पटीने त्यांची संपत्ती कशी व किती वाढली हेही त्यांनी जाहीर करावे. निराधार लोकांना घरे बांधून देण्यासाठी २० एकर जमीन दान केली होती, त्याचे काय झाले हेही सांगावे. महाराष्ट्रात अशोक खरातची विकृती समोर आली तशीच भ्रष्टाचाराचीही विकृती समोर येत आहे हे चिंताजनक आहे असेही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला थांबवण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसह नातेवाईकांना वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन येत असल्याचा दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची आज बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत आरोपींच्या वकिलांना लॅपटॉपमधील अतिरिक्त पुरावे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून देण्यात आले. यावेळी आरोपीच्या वकिलांनी पंचनाम्याचे व्हिडिओ देण्याची मागणी केली. पण सदर व्हिडिओ ई-साक्ष या शासकीय अॅपवर अपलोड असल्यामुळे ते देण्यास विरोध दर्शवला. यावेळी आरोपी क्रमांक 3 ते 7 यांच्याकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी एक अर्ज कोर्टात सादर करण्यात आला. पण तो कोर्टाने फेटाळला. वाल्मीक कराडने नेमला नवा वकील आज या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडने आणखी एका वकिलाची नियुक्ती करण्यात आली. नीलेश घाणेकर असे या वकिलाचे नाव आहे. ते छत्रपती संभाजीनगरचे आहेत. या प्रकरणा आता ते वाल्मीक कराडची बाजू मांडतील. यावेळी न्यायालयाने प्रस्तुत प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या सद्यस्थितीविषयी सीआयडीकडे विचारणा केली. त्यावर सीआयडीने त्याचा शोध अद्याप सुरू असल्याचे सांगितले. तसेच त्याची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याचेही कोर्टाला सांगितले. मला व नातेवाईकांना वेगवेगळ्या नंबरवरून फोन दुसरीकडे, या सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलातना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपल्या कुटुंबीयांना हे प्रकरण मिटवण्यासाठी वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन येत असल्याचे सांगितले. मला व व माझ्या नातेवाईकांना वेगवेगळ्या नंबरवरून फोन येत आहेत. त्याद्वारे ही केस कशी थांबवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण आम्ही त्यात पडत नाही. आम्ही त्याची पोलिस अधीक्षकांकडे रितसर तक्रार दाखल केली आहे. मी या प्रकरणी त्याची भेटही घेणार आहे. ते या प्रकरणी ठोस कारवाई करतील असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले. केव्हा अन् कशी झाली संतोष देशमुख यांची हत्या? बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींनी जिल्ह्यातील एका (आवादा) कंपनीकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. त्याला संतोष देशमुख यांनी विरोध केला होता. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संतोष देशमुख यांची हत्या, आवादा कंपनीकडून उकळण्यात येणारी खंडणी व कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी 3 वेगवेगळे गुन्हे केज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेत. यासंबंधी सीआयडी अर्थात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने 27 फेब्रुवारी रोजी बीड जिल्हा न्यायालयात 1200 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी या प्र्करणी 7 जणांवर अटकेची कारवाई केली आहे. कृष्णा आंधळे हा अन्य एक आरोपी गत 14 महिन्यांपासून फरार आहे. या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर कायमची बंद करून त्याऐवजी दादर-गोरखपूर ट्रेन सुरू करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे मुंबई आणि कोकणवासियांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, या जनक्षोभाची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज, 24 मार्च 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक प्रतिक गोस्वामी यांची भेट घेऊन जाब विचारला. मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, संदीप देशपांडे, जितेंद्र पाटील आणि योगेश सावंत यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने प्रवाशांच्या भावना रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवल्या असून, जर येत्या काही दिवसांत ही ट्रेन पूर्ववत सुरू झाली नाही, तर रेल्वे प्रशासनाला मनसेच्या तीव्र आंदोलनाचा तडाखा सोसावा लागेल. तसेच येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनबाबतची आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही उत्तर प्रदेश आणि बिहारला जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेन रोखून धरु, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. असा थेट इशाराही यावेळी देण्यात आला आहे. 'मनसे स्टाईल' आंदोलनाचा इशारा दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन कोरोना काळानंतर दादरऐवजी केवळ दिवा स्थानकापर्यंतच मर्यादित ठेवल्याने कोकणवासीयांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाने वारंवार मागणी करूनही ही गाडी पुन्हा दादरपर्यंत सुरू करण्यास नकार दिल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी रेल्वेला निर्वाणीचा इशारा दिला आहे. प्रवाशांची ही कुचंबणा मनसे कदापि सहन करणार नाही आणि जर रेल्वेने यावर तातडीने तोडगा काढला नाही, तर प्रशासनाला 'मनसे स्टाईल' तीव्र आंदोलनाचा तडाखा बसेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोकणवासीयांसाठी आम्ही लढत राहू- नितीन सरदेसाई रेल्वे प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना नितीन सरदेसाई म्हणाले, कोकण रेल्वेसाठी आम्ही आमची जमीन दिली आणि आता हे असे करत आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की, पॅसेंजर ट्रेन दादरपर्यंत चालवल्यास लोकलच्या वेळापत्रकात गैरसोय होते. ही गाडी रद्द होऊ नये, असे आम्ही त्यांना सांगितले आहे. कोकणवासीयांसाठी आम्ही लढत राहू. जर मान्य नाही झाले तर मनसे स्टाइल उत्तर द्यावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना नितीन सरदेसाई म्हणाले, गेले 25 वर्षे मुंबई गोवा महामार्गाबाबत बोलले जात आहे. रस्त्याने प्रवास करायचा म्हटला की हाल होतात. कोकणवासीय सहनशील असले तरी किती अन्याय सहन करायचा? तुम्ही रो-रो सेवा सुरू करत आहात, मग रत्नागिरी-दिवा पॅसेंजर रेल्वेबद्दल का बोलत नाही? महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी काय करत आहेत, हे मुद्दे संसदेत का मांडत नाही, असा सवालही देसाई यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. ‘राजमाता जिजाऊ’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एसटी बससेवेचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवारही उपस्थित होत्या. मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी सांगितले की, ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेच्या समावेशामुळे एसटीच्या ताफ्यात परंपरा आणि प्रगती यांचा सुंदर संगम साधला गेला आहे. या बसमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे. या बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देण्यामागे हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान असलेल्या जिजाऊसाहेबांना अभिवादन करण्याची भावना आहे. स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागील संस्कारशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ होय. या मातृशक्तीचा गौरव या नावातून अधोरेखित करण्यात आला आहे. एसटी महामंडळाने यापूर्वी ‘शिवनेरी’, ‘शिवशाही’, ‘शिवाई’, ‘यशवंती’ आणि ‘हिरकणी’ अशा ऐतिहासिक नावांनी बससेवेला वेगळी ओळख दिली आहे. त्या गौरवशाली परंपरेत आता ‘राजमाता जिजाऊ’ या नावाची भर पडल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान अधिक समृद्ध झाला आहे, असेही मंत्री सरनाईक यांनी नमूद केले. काय आहेत नव्या बसेसची वैशिष्ट्ये ‘राजमाता जिजाऊ’ बसेसमध्ये 32 आसन रचना असून एकूण 56 आसन क्षमता आहे. ही क्षमता सध्याच्या बसेसपेक्षा 16 आसनांनी अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या बसमध्ये 4 सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम तसेच इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होणार आहे. प्रस्तुत बसेस प्रामुख्याने 2 शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर शटल सेवेसाठी चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. या योजनेअंतर्गत पहिल्या 50 बसेस नागपूर येथे दाखल होणार आहेत. तेथून या नव्या सेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान आणि आधुनिकतेचा आत्मविश्वास यांचा संगम आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित होईल, अशी अपेक्षा मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.
रेबिजमुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू
पालघर : नालासोपा-यात रेबिजचा संसर्ग झाल्याने नऊ वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. कशिश सहानी असे मृत मुलीचे नाव आहे. कशिश सहानी ही मुलगी नालासोपारा पश्चिमेच्या सुबोध सागर इमारतीत आपल्या आई-वडिलांच्या सोबत राहत असून, ती मदर मेरी या शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होती. सहा […] The post रेबिजमुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, अल्पवयीन मुलांवर होणारे मानसिक, शारीरिक व शैक्षणिक परिणाम आणि डिजिटल सुरक्षेचे वाढते आव्हान या पार्श्वभूमीवर आज विधानसभेत अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सखोल चर्चा पार पडली. या संदर्भात मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. आशिष शेलार यांनी म्हटले की, राजेश पवार जी आणि इतर सदस्यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेतून सोशल मीडिया वापरावर निर्बंध, एज व्हेरिफिकेशनची सक्ती, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई, स्क्रीन टाईम लिमिट पॉलिसी आणि विद्यार्थ्यांसाठी डिजिटल सेफ्टी शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा ठोसपणे उल्लेख करण्यात आला. आशिष शेलार म्हणाले, या विषयाची गुंतागुंत आणि व्यापकता लक्षात घेता, महाराष्ट्र राज्याने अत्यंत संतुलित आणि दूरदृष्टी ठेवून पावले उचलली आहेत. इतर राज्यांनी केलेल्या केवळ घोषणांपेक्षा पुढे जात, महाराष्ट्र हे या विषयावर ठोस पावले उचलणारे पहिले राज्य ठरत आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालातही 18 वर्षांखालील मुलांवर सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे त्यांच्या नावीन्यपूर्णता, उत्पादकता आणि देशाच्या आर्थिक विकासावर होणाऱ्या परिणामांचा उल्लेख केला. याच अनुषंगाने, दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य शासनाने या विषयाचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन केली असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे. ते म्हणाले, या टास्क फोर्समध्ये शिक्षणतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, कंपन्यांचे प्रतिनिधी, विद्यार्थी व पालक प्रतिनिधी यांचा समावेश असून, या समस्येचा सर्वंकष अभ्यास करून व्यवहार्य आणि परिणामकारक उपाय सुचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच सरसकट बंदी हा उपाय नसून, शिक्षण आणि तंत्रज्ञान यांचा समतोल राखणे अत्यावश्यक असल्याचे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. एका बाजूला डिजिटल प्लॅटफॉर्म्समुळे शिक्षण, संवाद आणि नवकल्पनांना चालना मिळत असताना, दुसऱ्या बाजूला त्याचा अतिरेकी वापर टाळणे, मुलांचे संरक्षण करणे आणि जबाबदार डिजिटल सवयी विकसित करणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळेच एज व्हेरिफिकेशन यंत्रणा, स्क्रीन टाईम नियंत्रण, सायबर सुरक्षा नियम, तसेच शाळा स्तरावर डिजिटल सेफ्टी शिक्षण आणि जनजागृती यांसारख्या उपाययोजनांवर गंभीरपणे विचार सुरू असल्याचे शेलार म्हणाले. तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमे 66 आणि 69 यांसारख्या कायदेशीर तरतुदींचा प्रभावी वापर कसा करता येईल, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियामक चौकटींचा अभ्यास करून राज्यासाठी योग्य धोरण कसे तयार करता येईल, यावरही भर दिला जात आहे, असे आशिष शेलार म्हणाले. पुढील तीन महिन्यांत टास्क फोर्सचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर, महाराष्ट्र राज्य सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून आवश्यक त्या कायदेशीर, तांत्रिक आणि शैक्षणिक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेईल. डिजिटल युगात प्रगती करत असताना आपल्या पुढील पिढीचे सुरक्षित, जबाबदार आणि सशक्त भविष्य घडविण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचे आशिष शेलार म्हणाले.
भोंदू बाबा अशोक खरातला सत्ताधाऱ्यांकडून पाठबळ:विजय कुंभार यांचा गंभीर आरोप, सखोल चौकशीची मागणी
माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. खरातला सत्ताधाऱ्यांकडून थेट किंवा अप्रत्यक्ष पाठबळ मिळत होते, असा दावा कुंभार यांनी केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या आरोपामुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुंभार यांच्या आरोपानुसार, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खरातने मंदिरासाठी रस्त्याची मागणी केली होती, जी पूर्ण करण्यात आली. तसेच, मंत्रिमंडळ उपसमितीमार्फत त्याला पाणीपुरवठा मंजूर करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पदावर असताना खरातचे कथित “उदात्तीकरण” केल्याचा आरोप कुंभार यांनी केला. खरातच्या कृत्यांची माहिती असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि अधिकाधिक लोक त्याच्याकडे आकर्षित होतील, असे वातावरण तयार करण्यात आले, असे कुंभार म्हणाले. माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही कुंभार यांनी टीका केली. अशोक खरातला अस्ट्रॉनॉमीचे ज्ञान असल्यामुळे आपण त्याच्याकडे ज्योतिष पाहण्यासाठी जात होतो, असे केसरकर यांनी म्हटल्याचा उल्लेख करत, ज्यांना अस्ट्रॉनॉमी आणि अस्ट्रॉलॉजी यातील फरक समजत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? असा सवाल कुंभार यांनी उपस्थित केला. कुंभार यांनी पुढे दावा केला की, खरातचे अनेक अधिकारी आणि प्रशासकीय व्यक्तींशी आर्थिक संबंध होते. यामध्ये अभिजित भांडे पाटील यांचे नाव समोर आले असून, त्यांच्यावर शेकडो कोटी रुपयांची कथित काळी कमाई केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात 2024 मध्ये विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती, मात्र त्यानंतर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. भोंदू बाबा आणि त्याच्या संपर्कात असलेले मंत्री व अधिकारी यांच्या पाठबळामुळेच हे प्रकार वाढले,असा आरोप करत कुंभार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या आरोपांमुळे राज्यातील प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
पुणे महानगरपालिकेचा 15 हजार 669 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केला. शहराचा सर्वांगीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांना उत्तम सुविधा पुरवण्यावर या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. पुणे शहर राहण्यासाठी सर्वोत्तम बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे भिमाले यांनी यावेळी सांगितले. या अर्थसंकल्पात वाहतूक आणि पर्यावरण क्षेत्रासाठी महत्त्वाच्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. पुणे शहरात 1 हजार ई-बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, प्रदूषण नियंत्रणासाठी देशातील पहिली अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव आहे. सध्या शहरातील प्रदूषण पातळी 350 पर्यंत पोहोचली असून ती 50 पर्यंत खाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आरोग्य क्षेत्रातही मोठ्या योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या 53 बाह्यरुग्ण विभाग आणि 20 प्रसूतिगृहांमार्फत मोफत सेवा दिली जात असून, नागरिकांना 80 कोटी रुपयांची औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिली जात आहेत. बाणेर येथे कॅन्सर रुग्णालय उभारण्यात आले असून, लवकरच त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. वारजे येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे कामही सुरू आहे. महिलांसाठी विशेष योजना जाहीर करताना, 31 मार्च 2026 पर्यंत मालमत्तेवर नाव असलेल्या महिलांना 50 टक्के करसवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात 100 मोफत स्वच्छतागृहे उभारण्याची योजना असून, महिलांना स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. शहरी गरिबांसाठीच्या योजनेला अजित पवार यांचे नाव देण्यात येणार असून, त्यासाठी 80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, शहरातील उद्याने, तलाव आणि प्राणीसंवर्धनावरही भर देण्यात आला आहे. राजीव गांधी झुलॉजिकल पार्कच्या विकासासाठी 60 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले असून, नवीन वन्यप्राणी आणण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
ईशान्येश्वर मंदिरातील त्या गुप्त आणि अंधाऱ्या खोलीत महिलांचे लैंगिक शोषण केले जायचे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. तर खरात हा 12 मार्चला ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याच्या तयारीत होता, असा दावाही त्यांनी केला आहे. नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या कृत्यांनी महाराष्ट्र हादरला आहे. आता याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी उडी घेतली असून देसाई मिरगाव दौऱ्यावर आहेत. तृप्ती देसाई म्हणाल्या की, मिरगावमधील जे ईशान्येश्वर मंदिर आहे त्या मंदिरात भुयारी अंधारी खोली आहे. तिथे खरात महिलांचे लैंगिक शोषण करायचा, असा आरोप देसाई यांनी केला आहे. तर खरात वर मकोकाअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आम्ही SIT प्रमुख सातपुतेंकडे करणार आहोत. 12 मार्च 2026 ला अशोक खरात ऑस्ट्रेलियाला पळूल जाणार होता. त्याने तिकीट काढलेले होते. ही माहिती घेऊन जे लोकं आमच्याकडे आले त्यांना आम्ही अहिल्यानगरच्या एसपीकडे पाठवले होते. चाकणकर-ठोंबरेंना पदावरून हटवा भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. रुपाली पाटील या पक्षात कोणत्याही मोठ्या पदावर नसताना सतत अनावश्यक विधाने करत असल्याची टीका देसाई यांनी केली. या प्रकरणी आता त्या थेट सुनेत्रा पवार यांची भेट घेत रुपाली चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्यात यावा आणि रुपाली पाटील ठोंबरे यांना प्रवक्ते पदावरून तत्काळ हटवण्यात यावे अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आधी लाखांची तूट, मग अचानक देणग्यांचा ‘महापूर’ खरातच्या मिरगाव येथील ‘श्री शिवनिका संस्थान’च्या पाच वर्षांतील ऑडिट रिपोर्ट ‘दिव्य मराठी’च्या हाती लागला असून त्यातून एका सामान्य देवस्थानचा ‘कॉर्पोरेट’ प्रगतीपर्यंतचा चकित करणारा प्रवास उघड झाला आहे. 2020 ते 2022 या काळात संस्थानचे उत्पन्न 4.90 लाखांवर होते. 1.60 ते 1.64 लाख रुपयांची तूट होती. मात्र 2024 मध्ये 76 लाख 91 हजार416 रुपये उत्पन्न झाले. सध्या संस्थानच्या नावे बँकेत 23 लाख 35 हजार 248 रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. शक्तिवर्धक ‘तुर्की’मधाचा दावा; 1 किलोची 9 लाखांना व्हायची विक्री खरातकडून तुर्की मधाच्या नावाखाली कथित फसवणूक उघडकीस आली आहे. त्याने कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असे मोठे दावे करत अनेक व्यावसायिकांना, राजकीय नेत्यांना महागड्या दराने मध विक्री केली. मोठ्या प्रमाणात आलेली ही रक्कम ट्रस्टच्या नावे घेत ब्लॅक मनी व्हाईट केल्याची माहिती चौकशीकरिता बोलवण्यात आलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना दिली. खरातच्या संपर्कात आलेल्या ‘खास’ व्यक्ती हे मध खरेदी करायच्या. विशेष म्हणजे लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांनाच खरात ही मध विक्री करत होता. ‘एल्विश हनी’चे ब्रँडिंग करताना ते तुर्कीच्या समुद्रात खोल गुहेतून मिळते, असे सांगायचा. मधात लैंगिक क्षमता वाढीच्या गोळ्या कुटून टाकत एक किलोची बाटली 9 लाखांना द्यायचा. 2022 मध्ये 96 लाख असलेली मालमत्ता 2025 पर्यंत 1 कोटी 81,65,931 रुपयांवर पोहोचली. प्रॉपर्टी केली हडप खरात याने भविष्य बघण्याकरिता एका महिलेसह तिच्या आई वडिलांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि सातबारा उतारे मागवले होते. बँकेतून ओटीपी आला होता. काही दिवसानंतर एका पतसंस्थेचे नाव सातबारा उताऱ्यावर लागल्याचे समजले. कब्जा आई वडिलांकडे असून पतसंस्थेवर खरात संस्थापक असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ओकस प्रॉपर्टी मध्ये झडती कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात एटीएस पथकाने तक्रारदार महिलांसह पंचनामा केला.दुसऱ्या पथकाने मिरगाव येथील फार्म हाऊसची झडती घेतली. काही आक्षेपार्ह कागदपत्र आणि वस्तू जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विजेच्या धक्क्याने कारागिराचा मृत्यू:बालेवाडीत बांधकाम ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यातील बालेवाडी येथे एका नियोजित गृहप्रकल्पाच्या परिसरात विजेच्या धक्क्याने सुतारकाम करणाऱ्या कारागिराचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेस जबाबदार असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी बांधकाम ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उज्ज्वल मजुमदार (वय ३२, रा. बालेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या कारागिराचे नाव आहे. त्यांची पत्नी सरस्वती मजुमदार (वय २८) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, बांधकाम करणाऱ्या ठेकेदार कंपनीतील कर्मचारी प्रवीण चंद्रकांत जवळकर आणि महेंद्र केशव चांडगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वल मजुमदार हे बालेवाडीतील गृहप्रकल्पात सुतारकाम करत होते. १८ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास ते गृहप्रकल्पाच्या आवारात काम करत असताना अचानक पाऊस आला. प्लायवूड कापणाऱ्या कटरची वायर गोळा करत असताना त्यांना विजेचा धक्का बसला आणि ते बेशुद्ध पडले. मजुमदार यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पत्नी सरस्वती यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पती उज्ज्वल मजुमदार यांना सुरक्षाविषयक साधने पुरवली नसल्याने ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी पोलिसांनी ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक केकाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. बिबवेवाडीत तरुणाला मारहाण पुणे शहरातील बिबवेवाडीत तरुणाला मारहाण करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी साहिल बेंद्रे, रुद्र कांबळे, स्वरीत घोलप, तुषार तळेकर, शिवराम ढावरे यांना अटक करण्यात आली. याबाबत हरिष विनोद कदम (वय २०, रा. दुर्गामाता मंदिराजवळ, इंदिरानगर, बिबवेवाडी) याने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम आणि त्याची आई बिबवेवाडी भागातून निघाले होते. त्या वेळी आरोपींनी त्याला अडवले. आरोपी रुद्र कांबळे याने माझ्या मानलेल्या बहिणीची छेड का काढली ? अशी विचारणा करुन कदम याला दांडक्याने मारहाण केली. कांबळे याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी त्याला दगड फेकून मारले. आरोपींनी केलेल्या मारहाणीत कदम जखमी झाला. पोलीस हवालदार एन गायकवाड तपास करत आहेत.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या सेसफंडातील १० कोटींच्या अंदाजपत्रकाला प्रशासक तथा मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी मान्यता दिली आहे. या अंदाजपत्रकात शिक्षण विभागासाठी ९५ लाख तर पाणी पुरवठा व स्वच्छतेसाठी १ कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. या शिवाय दिव्यांग कल्याणसाठी ५१ लाख रुपये ठेवण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे यांनी जिल्हा परिषदेच्या सेसफंडातील अर्थसंकल्प सादर केला. यावेळी प्रशासक तथा मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने, विजय बोराटे, केशव गड्डापोड, कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, शिक्षणाधिकारी आसावरी काळे, संदीप सोनटक्के, डॉ. सखाराम खुणे, अतुल वायसे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल राठोड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी माडे यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात सेसफंडातील १० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यामध्ये इमारत व दळणवळणासाठी २० कोटी रुपये, शिक्षण विभागासाठी ९५ ाख रुपये, आरोग्य विभागासाठी ९७ लाख रुपये, महिला बालकल्याणसाठी ३५ लाख रुपये, पाणी पुरवठा व स्वच्छतेसाठी १ कोटी रुपये, अनुुसुचीत जाती, जमाती व इतर मागास कल्याण विभागासाठी ७० लाख रुपये, दिव्यांग कल्याणसाठी ५१ लाख रुपये, कृषी विभागासाठी ४७ लाख, पशुसंवर्धन करिता ५५ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. यासोबतच पंचायत विभागासाठी ३५ लाखरुपये, जलसंधारण विभागासाठी १५ लाख रुपये, मार्ग व पुलसाठी ५० लाख रुपये, आदिवासी कल्याणसाठी १५ लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या या अंदाजपत्रकास प्रशासक तथा मुख्यकार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी मान्यता दिली आहे. विविध विभागांनी योजनांसाठी दिलेला निधी वेळेत खर्च करावा व त्यातून वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजना हाती घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.
परभणीत राष्ट्रीय नारीरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
परभणी : एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्रच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात कार्य करणा-या कर्तृत्ववान महिलांना राष्ट्रीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच परभणीचे नवनिर्वाचित महापौर सय्यद इकबाल यांचा जाहीर नागरी सत्कार सोहळा व फैजूल उलूम प्रायमरी शाळेला महाराष्ट्र शासनाचे अ प्लस मानांकन मिळाल्याबद्दल संस्थेचे सचिव डॉ. मोहम्मद समिउल्लाहन खान यांचा विशेष […] The post परभणीत राष्ट्रीय नारीरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. एकीकडे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. तर दुसरीकडे, मराठवाड्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना सरकार केवळ भोंदू बाबांच्या मागे लागले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत सरकारवर निशाणा साधताना केली. विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडत असताना वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीसह राज्यातील सुरक्षिततेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, ब्रह्मपुरी शहरात गेल्या काही दिवसांत 10 वी आणि 12 वी मध्ये शिकणाऱ्या 6 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक घडली आहे. यापैकी केवळ 2 मुलींचा तपास लागला असून 4 मुली अजूनही बेपत्ता आहेत. सरकार सीसीटीव्हीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, मग तालुका स्तरावर या व्यवस्था कुठे आहेत? मुलींचे अपहरण होत असताना आणि त्यांचे मोबाईल बंद असताना पोलिस यंत्रणा काय करत आहे? शाळा - महाविद्यालयांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करण्याची गरज आहे. या प्रकरणी सरकारने बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी तत्काळ विशेष पथकाची नियुक्ती करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या विजय वडेट्टीवार यांनी यावेळी राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचाही मुद्दा मांडला. ते म्हणाले, राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हजारो हेक्टरवरील रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नांदेड, हिंगोली, धाराशिव,छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील स्थिती अत्यंत गंभीर आहे. या नैसर्गिक आपत्तीत 41 जनावरे दगावली असून 2 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शेतकरी अडचणीत असताना सरकार केवळ कर्जमाफीच्या पोकळ गप्पा मारत आहे. अद्याप अनेक ठिकाणी पंचनामेही सुरू झालेले नाहीत. सरकारने तात्काळ निवेदन करून बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. राज्यात शेतकरी मरत आहे, मुली सुरक्षित नाहीत, पण सरकार मात्र भोंदू बाबांच्या मागे धावण्यात धन्यता मानत आहे. पालकांचा आक्रोश सरकारला ऐकू येत नाही का? असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. रिलायन्सला डीपीटी स्टेन देण्यास विरोध हाफकिन संस्थेतील मौल्यवान त्रिगुणी लसीसाठी वापरण्यात येणारी स्टेन रिलायन्स लाईफ सायन्सेस विकण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केला. ते म्हणाले, हाफकिनकडे असलेला DPT लस तयार करण्याचा स्टेन ही अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक जैव - संपत्ती आहे. याचे बाजारमूल्य शेकडो कोटी रुपये आहे. पण रिलायन्स लाईफ सायन्सेस या खाजगी कंपनीने प्रस्ताव दिल्यानंतर, कोणतीही विचारणा न करता हाफकिनने लगेच Expression of Interest मागवण्याची प्रक्रिया सुरू केली. आमचा यावर आक्षेप आहे. हाफकिन ही संस्था स्वतः लस उत्पादनात सक्षम असताना, 1500 कोटींचा हा मौल्यवान ठेवा खाजगी कंपनीच्या हातात का दिला जात आहे? असा सवाल विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी या प्रकरणी उपस्थित केला. हाफकिन ही संस्था आजपर्यंत स्वस्तात लस निर्माण करते. त्यामुळे गोष्टी खासगी कंपनीच्या हातात गेल्यास सामान्य नागरिकांना लस महाग दरात मिळण्याची शक्यता. यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कमकुवत होईल. राज्याच्या मौल्यवान जैव-संपत्तीवर खाजगी कंपनीचे नियंत्रण हा धोका आहे. त्यामुळे खाजगी कंपनीला स्टेन देण्याची प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी. हाफकिनला स्वतःचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन आणि प्राधान्य द्यावे, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मांडली.
आयएएस संजीव हंस अडचणीत; बिल्डरकडून १ कोटींची लाच घेतल्याचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी वरिष्ठ आयएएस अधिकारी संजीव हंस यांनी परवानगी मिळवून देण्याच्या बदल्यात मुंबईतील नामंकित बिल्डर्सच्या प्रवर्तकांकडून लाच मागितल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आयएएस अधिकारी संजीव हंस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आता त्यांच्यावर काय कारवाई ? केली जाणार हे पाहणं महत्त्वाचें ठरेल. मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ आयएएस अधिकारी संजीव हंस हे भारत सरकारच्या […] The post आयएएस संजीव हंस अडचणीत; बिल्डरकडून १ कोटींची लाच घेतल्याचा आरोप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा एकदा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर हल्ला चढवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बोटांना दरवाज्यात अडकल्यामुळे जखमा झाल्या हा कमालीचा योगायोग आहे, असे त्या म्हणाल्या. सुषमा अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकरांवर भोंदू अशोक खरातच्या सल्लानुसार अनामिका कापल्याचा खळबळजनक आरोप केला होता. यासंबंधी त्यांनी त्यांचे काही फोटोही शेअर केले होते. त्यात चाकणकरांच्या अनामिकेला जखम झाल्याचे दिसून येत होते. चाकणकरांनी आज एका व्हिडिओद्वारे त्यांचे आरोप जोरकसपणे फेटाळून लावले. या व्हिडिओत धायरीच्या गणेश मंडळाचा एक पदाधिकारी रुपाली चाकणकरांच्या अनामिकेला आरतीला येताना दरवाज्यात अडकल्यामुळे जखम झाल्याचा दावा करताना दिसून येत आहे. तटकरे अन् चाकणकरांच्या जखमांचा योगायोग सुषमा अंधारे यांनी त्यांच्या या दाव्यावर हरकत घेतली. त्या यासंबंधी म्हणाल्या, रुपाली चाकणकरांना अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर तब्बल 4 दिवसांनंतर नेमके त्यांच्या अनामिकेला नेमके काय झाले होते याचे कारण सूचले आहे. त्यांचे व्हॉट्सएप स्टेटस, बातम्या यावरून जाणवते की, म्हणे त्यांच्या अनामिकेला दरवाजात अडकल्यामुळे जखम झाली. साधारणतः मला कळते त्यानुसार दरवाजात माणसाचा अडकू शकतो. तर्जनी अडकू शकते किंवा करंगळी अडकते. पण काय योगायोग चाकणकरांच्या अनामिकेला दरवाज्यामुळे जखम झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही वेळापूर्वीच एक पत्रकार परिषद घेतली. त्यांनीही सांगितले की, त्यांच्याही तर्जनीला सुद्धा दरवाज्यात अडकल्यामुळेच जखम झाली. एकूण काय तर हातातले गंडेदोरे काय, ईशान्येश्वराची पुजा काय, बोटाला होणारी पुजा काय आणि नेमकी ती जखम दरवाज्यात अडकून होते हा सगळाच किती योगायोग आहे. कमाल आहे, असे त्या म्हणाल्या. खरे खोटे ईशान्येश्वर अन् खरातलाच माहिती रुपाली चाकणकरांचा कार्यकर्ता सांगत आहे की ताईंच्या बोटाला दरवाज्यात अडकल्यामुळे जखम झाली. ताई आमच्याकडे त्यादिवशी आरतीला आल्या होत्या, पण काय गंमत आहे की चाकणकर स्वतः सांगतात दोन तारखेला त्या अजितदादांच्या दौऱ्यामध्ये होत्या. काय खरं काय खोटं ईशान्येश्वराला आणि खरातांनाच माहिती. पण हा किती मोठा योगायोग आहे की तटकरेंच्या बोटाला झालेली जखम सुद्धा दरवाजात अडकूनच झाली, असेही सुषमा अंधारे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्या. हे ही वाचा... चाकणकरांच्या अनामिकेला दुखापत कशी झाली?:धायरीच्या गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा VIDEO शेअर करत फेटाळले अंधारेंचे आरोप राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भोंदू अशोक खरातच्या नादाला लागून तंत्रमंत्र विद्येसाठी आपली अनामिक कापल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यांच्या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. आता रुपाली चाकणकर यांनी स्वतः धायरीच्या एका गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा व्हिडिओ शेअर करत आपल्या अनामिकेला दुखापत कशी झाली? हे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, गाडीतून उतरताना बोट दरवाज्यात अडकल्यामुळे आपल्या बोटाला दुखापत झाली होती, असे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
नागपुरात पोलिस कॉन्स्टेबलचा आत्महत्येचा प्रयत्न
नागपूर : प्रतिनिधी मुंबईत काही दिवसांपूर्वी एका तरुण पोलिस कॉन्स्टेबलने नैराश्येतून आणि तणावातून आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्ये देखील एका पोलीस कॉन्स्टेबलने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकाराने पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, जयंत झोडे (रा. उमरेड) असे पोलिस शिपायाचे नाव आहे. […] The post नागपुरात पोलिस कॉन्स्टेबलचा आत्महत्येचा प्रयत्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजप आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आज विधिमंडळातील कामचुकार अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. त्यांनी या अधिकाऱ्यांना भोंदू अशोक खरातची उपमा दिली. मंत्रालयात अशोक खरातचे जादूचे पाणी देणारे काही अधिकारी आहेत. त्यांचे जादूचे पाणी लोकशाहीवर भारी होऊ देऊ नका. अन्यथा आत्म्याविना शरीर, इंजिनविना गाडी आणि पेट्रोलविना स्कुटर अशी आमची अवस्था होईल, असे ते म्हणाले. आज विधानसभेत आश्वासन समितीचे अध्यक्ष रवी राणा यांनी आपल्या समितीचा पहिला अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी अधिकारी वर्गाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सुधीर मुनगंटीवार यांनी नेमका हाच धागा पकडत अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. ते म्हणाले, विधानसभा अध्यक्षांच्या नेतृत्वात संसदीय कामकाज धारदार व्हावे, प्रभावी व्हावे यासाठी आम्ही सर्वजण सूचना देतो. अध्यक्षही निर्देश देतात. शेवटी तुम्ही - आम्ही आज आहोत, उद्या असणार नाही. पण शेवटी हा देश, ही विधानसभा व लोकशाही राहिली पाहिजे. ते (रवी राणा) स्वतः आश्वासन समितीचे अध्यक्ष आहेत. ते आश्वासन समितीचे अहवाल मांडत असताना त्यांची हतबलता ऐकताना कसे तरीच वाटत होते. अधिकारी समितीकडे येत नाहीत. म्हणजे मंत्रालयातही जादूचे पाणी देणारे अशोक खरात नामक काही अधिकारी दिसत आहेत. अंधश्रद्धा तशी अंधबुद्धी सुद्धा धोक्याची आहे. हे मी स्वतः अनुभवले आहे. इथे मंत्री महोदय अतिशय उत्तम पद्धतीने आश्वासन देतात आणि अधिकारी त्या आश्वासनाच्या संदर्भात फाईलवर, मग ते चित्रपटात गाणे आहे ना तर्कसंगत, 'नशा शराब में होती तो नाचती बोतल'.... अरे बाबा बॉटल नाचत नाही, नशेने माणूस नाचतो एवढे समजण्याची अंधबुद्धी असेल तर काय म्हणावे. मी अनुभवले आहे की, गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र होणार हे स्वतः मंत्री महोदय म्हणाले. पण फाईल अधिकाऱ्यांकडे गेली की ते वेगळेच लिहितात. कामचुकार अधिकारी अशोक खरातचे आधुनिक रुपे सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, आम्हाला काही जनतेने चिंता करण्यासाठी पाठवले नाही. चिंता सर्व त्यांनाच आहे. हे कर्मचारी अशोक थोरातचे आधुनिक रुपे आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. मंत्री सभागृहात आश्वासन देतात. पण त्यानंतर हे अधिकारी समितीपुढे मंत्र्यांना पटवतात. म्हणजे अशोक खरात हाच मंत्र्यांना फसवतो असे नाही. हे अधिकारीही फसवतात. ते आश्वासन समितीकडे मी विधानसभेत दिलेले आश्वासन मागे घेतो असे पत्र देता. अध्यक्ष महाराज, हे आश्वासन फक्त शब्दांत नाही. त्याचे साक्षीदार सभागृहातील एवढे महान नेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दिलेले आश्वासन हे अधिकारी आम्ही पूर्ण करणार नाही असे सांगत असतील तर हे खूप वाईट आहे. आश्वासन समितीकडे अशा प्रकरणांतील पत्रांचा फार मोठा गठ्ठा पडला आहे. शेवटी राज्य कोण चालवते? या घटनांवर आज लक्ष दिले नाही, तर हे जादूचे पाणी असेच लोकशाहीवर भारी होईल. त्यामुळे अध्यक्षांनी सर्व गटनेत्यांची बैठक बोलवावी. शक्य झाले तर मलाही बोलवा. पण हे शस्त्र पुन्हा धारदार केले पाहिजे. चांगल्या अधिकाऱ्यांनी, नियमांच्या चौकटीत काम करणाऱ्यांनी निश्चितपणे घाबरू नये. पण या सभागृहाला कामचुकार अधिकारी घाबरत नसतील तर, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हा विषय गंभीरपणे घेतला नाही तर या सभागृहाच्या कामकाजात आत्म्याविना शरीर, इंजिनविना गाडी, पेट्रोलविना स्कुटर अशी आमची अवस्था होईल, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. अध्यक्षांची अधिकाऱ्यांना कडक समज अखेर अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कामचुकार अधिकाऱ्यांना कडक शब्दांत समज दिली. ते म्हणाले, आज रवी राणा व सुधीर मुनगंटीवार आज आश्वासन समितीच्या कामकाजासंदर्भात जी भावना व्यक्त केली आहे. ती खरोखरच खूप गंभीर आहे. आपल्या समित्या विधिमंडळाचा आत्मा समजल्या जातात. त्यामुळे समितीचे कामकाज होण्यासंदर्भात कोणतेही अधिकारी कोणत्याही प्रकारचा विलंब करत असतील किंवा समितीपुढे येण्यासाठी हयगय करत असतील तर याच्यापेक्षा गंभीर बाब दुसरी होऊ शकत नाही. एका अर्थाने असे करून आपण विधिमंडळाच्या सार्वभौमत्वाशी तडजोड करणे आहे. हे मुळीच सहन केले जाणार नाही. यापुढे कोणत्याही समितीत अधिकाऱ्यांची अनुपस्थितीत यासंदर्भात माझ्याकडे कळवण्यात आली तर त्या अधिकाऱ्याला त्वरित योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची जी निवडणूक झाली त्यामध्ये शिवसेना नेते मंत्री शंभुराज देसाई यांना ज्या प्रकारे वागणूक दिली ती अतिशय चुकीची होती. मतदारांना मतदान करू दिले नाही. ही सर्व प्रक्रिया हायजॅक करण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. हे काही त्यांनी मनाने केलेले नाही, त्यांना कुणीतरी सांगितलेले असेल. भाजपने असे राजकारण करणे योग्य नाही, कारण शिवसेना त्यांचा मित्रपक्ष आहे. पण यांच्याकडे शत्रू ऐवजी मित्रांनाच संपवण्याचे काम सुरू आहे असे दिसून येत आहे, असे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले की, आम्ही करु तो कायदा अशा पद्धतीचे राजकारण सध्या सुरू आहे.महाराष्ट्रातील सर्वच निवडणुका हायजॅक करण्याचा प्रयत्न आपल्याला वॉर्ड रचना, निवडणूक प्रक्रिया यातून दिसून आल्या आहेत. कुठला अधिकारी कुठली निवडणूक घेणार हे ठरवत लोकशाही संपवण्याचे काम भाजपने निवडणुकीच्या माध्यमातून केले आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काल आदेश दिला होता की जा चुकला त्याला घरी बसवले पाहिजे, त्यांची चौकशी झाली पाहिजे.चूक नसेल तर पुन्हा घेता येईल. पण अर्धा तासात तो निर्णय राम शिंदेंनी तो निर्णय बदलला. एकनाथ शिंदेंनी सांगूनही ही अधिकाऱ्यांनी ऐकले नाही, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये हतबलता येण्याचे काम झाले आहे. ही गोष्ट निंदनीय आहे. ..तर निवडणूक घेताच कशाला? रवींद्र धंगेकर म्हणाले की, या पद्धतीचे राजकारण करायचे असेल तर निवडणूक घेताच कशाला? काय करायचे ते तुम्हीच ठरवा.हुकुमशाहीकडे जाणाऱ्या राज्याला, देशाला कोण वाचवणार हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडला आहे. हा देश लोकशाही मानणारा आहे. देशामध्ये गल्लोगल्ली विरोधकांना ठेचण्याचे काम सुरू आहे, हे सर्व देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे. या सर्व प्रकरणाला तेच जबाबदार आहेत. त्यांनी पहिले कारवाई करायला हवी, मग चौकशी केली पाहिजे. हे सर्व झाले त्यासाठी मुख्यमंत्री जबाबदार आहेत. देशात हुकुमशाही सुरू रवींद्र धंगेकर म्हणाले की, जयकुमार गोरे ज्या पद्धतीने पोलिसांची बाजू मांडत होते त्यातून त्यांना पाठिंबा देत आपली कामे करुण घेणे. त्यांना चाकोरीत आणत लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार होता. साताऱ्यातील त्या पोलिस अधिकाऱ्यांना घरी बसवले पाहिजे. तरच हे कायद्याचे राज्य म्हणता येईल. नाहीतर हुकुमशाही सुरू झालेली आहे. गल्लोबोळात सुद्धा हेच सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मुद्दाम त्रास देणं योग्य नाही. मित्र केवळ कामापुरता नसावा तो कायम असावा. निवडणूक आयोगाच्या फालतू लोकांसमोर जर नेत्यांना अशी वागणूक दिली जात असेल तर तो जनतेसमोर जाणार कसा? असा सवाल धंगेकरांनी केला आहे. खरातला भर चौकात फाशी दिली पाहिजे रवींद्र धंगेकर म्हणाले की, भाजपचा इतिहास पाहिला तर मित्रांनाच पहिले संपवते हे दिसून येते. हे नेते शिंदेंचे काही ऐकत नसतील तर आम्ही कार्यकर्ते कोणाकडे जाणार? हे राजकारण आता थांबवले पाहिजे. अशोक खरात प्रकरणी कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याला कोणी मदत केली हे शोधले पाहिजे. यात कोणी उद्योगपती अडकले आहेत का? हे शोधले पाहिजे. तर अशोक खरातला भर चौकात फाशी दिली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.
मविआमध्ये 3 पक्षाचे 3 दिशेला तोंड आहेत. उबाठामध्ये एक उद्धव ठाकरेंचा गट आहे तर दुसरीकडे संजय राऊत यांचा एक गट आहे. ज्यांना पुस्तक प्रकाशनासाठी ठाकरेंना बोलवता येत नाही त्यांनी महायुतीवर बोलूच नये. उबाठा गटातील गटबाजीवर राऊतांनी लक्ष द्यावे, त्यांना त्यांची खासदारकी वाचवती येणार नाही, कारण त्यांच्या पक्षात उद्धव ठाकरे विरुद्ध संजय राऊत सामना सुरू झाला आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार 11 कोटी जनतेच्या पाठिंब्याचे सरकार आहे. त्यांना सरकार वाचवण्यासाठी कुणाला पाठिशी घालण्याची गरज नाही. उद्धव ठाकरेंचे सरकार वाचवण्यासाठी किती गुन्हेगारांनी पाठिशी घातले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. देवेंद्र फडणवीस जनतेच्या आशीर्वादाने स्पष्ट बहुमत असलेले सरकार चालवत आहे. हे देवाभाऊंचे सरकार सर्वांना न्याय देईल. खरातला सोडणार नाही नवनाथ बन म्हणाले की, नाशिकमधील खरात नावाच्या भोंदू बाबावर सरकारने कारवाई केली, पोलिसांनी त्यांची चौकशी करत त्याला बेड्या देखील ठोकल्या आहेत. तरीदेखील जनाब संजय राऊत यांच्या पोटात दुखत आहे. ते रोज नको नको ते प्रश्न विचारत आहेत. मला राऊतांना एवढेच सांगायचे आहे की भोंदू खरातला सोडले जाणार नाही, त्याच्यासोबत असतील त्या प्रत्येकावर कारवाई होणार आहे. पण फक्त सोबत फोटो आले म्हणून मंत्र्यांवर गुन्हे दाखल करा ही मागणी कोणत्या पोटदुखीतून करत आहेत. हा न्याय द्यायचा तर मिलींद नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा लागेल. पाणी देणाऱ्या उद्धव ठाकरेंवर सुद्धा गुन्हा इदाखल करायचा का? असा सवाल बन यांनी केला आहे. फडणवीस-शिंदे समर्थ नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत लोकशाहीच्या गप्पा मारण्याचा अधिकार तुम्हाला नाही. सातऱ्यात जे झाले ते बघण्यासाठी महायुती सक्षम आहे. साताऱ्यात भाजप नंबर एकचा पक्ष होता, त्यात काही लोकांनी इतरांशी हातमिळवणी करत सत्तास्थापनेचा प्रयत्न केला त्यातील हा प्रकार होता. हा सर्व हाताळायला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे समर्थ आहेत. वाघाचे कातडे कोणी पाघरले आहे हे जनतेला माहिती आहे. तुमच्या आत गुलाम दडलेला आहे. वाघाचे कातडे पाघरत काँग्रेसची गुलामी करायची ही उबाठाची सवय झाली आहे. तुम्ही गुलाम आहात हे जनतेने सिद्ध केले आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठकही बोलावली आहे. त्यामुळे चाकणकर यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वाढली आहे. रुपाली चाकणकर ह्या भोंदू अशोक खरात प्रकरणात अडचणीत सापडल्या आहेत. महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या खरातशी जवळचे संबंध असल्यामुळे चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्षपदही जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधिमंडळात अशोक खरात प्रकरणावर निवेदन करणार आहेत. तत्पूर्वी, सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीचे कारण व तपशील अद्याप बाहेर आला नाही. पण या बैठकीत अशोक खरात प्रकरणावर चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. सुनेत्रा पवारांची पटेल, तटकरेंशी चर्चा उल्लेखनीय बाब म्हणजे रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुनेत्रा पवारांनी देवगिरी बंगल्यावर प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांची बैठक घेतली होती. या बैठकीत रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाच्या होणाऱ्या बदनामीवर चर्चा झाली होती. या बैठकीनंतर पक्षश्रेष्ठींनी चाकणकरांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे सुनील तटकरे यांनी या बैठकीनंतर लगेचच या प्रकरणी कुणालाही पाठिशी घातले जाणार नसल्याचे सूचक विधान केले होते. तेव्हापासूनच चाकणकरांची महिला प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी केली जाईल अशी चर्चा रंगली होती. सुनेत्रा पवारांनी बोलावली आमदारांची बैठक दुसरीकडे, सुनेत्रा पवारांनी आज सायंकाळी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीतही या प्रकरणी धीरगंभीर चर्चा होण्याची शक्यता आहे. विशेषतः रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद कुणाकडे सोपवायचे? याविषयी सुनेत्रा पवार आपल्या सहकारी आमदारांचे मत जाणून घेतील. यावेळी त्या आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना करणार असल्याचीही माहिती आहे. चाकणकरांनी फेटाळले जादूटोण्याचे आरोप रुपाली चाकणकर यांनी आज एका पोस्टद्वारे त्यांच्यावर जादूटोण्यासाठी अनामिक कापल्याचे होणारे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणी त्यांनी धायरीच्या एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सदर अध्यक्ष चाकणकरांच्या अनामिकेला गाडीतून उतरताना दुखापत झाल्याचा दावा करताना दिसून येत आहे. चाकणकर याविषयी म्हणाल्या, गेली 20-22 वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करताना, जसजसा प्रगतीचा आलेख वाढत गेला तसतशी चिखलफेक करणारी विकृती वाढत गेली. प्रत्येक वेळी संयमाने शांतपणाने टिका सहन केली. वैयक्तिक टिका करणे हे माझ्या रक्ताताच नाही. पण आता सगळ्या मर्यादा ओलांडून माझ्यासह कुटुंबाला जो त्रास दिला जातोय ते भयावह आहे. ज्यांनी हा आयुष्याचा प्रवास जवळून पाहिला, ते सर्व संपर्क करून आम्ही सोबत आहोत हे आवर्जून सांगतात. त्या सर्वांचे आभार. खरात प्रकरणात मी पहिल्या दिवशीच भूमिका स्पष्ट केली आहे. तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व त्यानंतरही माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुराव्यासह स्पष्टीकरण दिले आहे. सत्य समोर येईलच. धायरीकर तुमचे मनापासून धन्यवाद, असे त्यांनी म्हटले आहे.
अशोक खरात प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. जनतेसमोर सत्य आले पाहिजे, तर भोंदू बाबावर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची भूमिका आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यावर आम्ही वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे. सुनील तटकरे म्हणाले की, आम्ही भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये काम करत आहोत. एका जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेवेळी जर मंत्र्यांना धक्काबुक्की होत असेल तर ती योग्य नाही. आम्हाला राज्य एनडीए म्हणून चालवायचे आहे. चर्चेतून हे सर्व संपू शकते. सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेविषयी काल सभागृहात चर्चा झाली. यावर मुख्यमंत्री आज सविस्तर बोलणार आहे. मकरंद पाटील, शंभुराज देसाई यांनी काय झाले हे सविस्तर सांगितले आहे. खरातवर कठोर कारवाई व्हावी सुनील तटकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी गाडीचा दरवाजा लागून माझ्या बोटाला दुखापत झाली होती, त्यांचा अर्थ लोकं कुठेही लावणार असतील तर काय बोलणार. अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी होणार असे सांगितले आहे, एसआयटी स्थापन केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून या प्रकरणी सखोल तपासणी करावी, आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची भूमिका आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यावर आम्ही वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत आहोत. खरातवर कठोर कारवाई करण्यात यावी. बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी सुनील तटकरे म्हणाले की, बारामती विधानसभेची पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवारी 6 एप्रिलला अर्ज दाखल करणार आहे. सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघांनीही यावे अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत. यापूर्वी अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार पक्षाने ही निवडणूक लढवली होती पण ते सुनेत्रा पवारांविरोधात निवडणूक लढवणार नाही हे त्यांनी जाहीर केले, त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची इच्छा आहे. कारण अजितदादांच्या निधनाने ही निवडणूक होत आहे.मविआमध्ये बारामतीची जागा शरद पवार यांच्या पक्षाकडे आहे. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी घोषणा केली की आम्ही उमेदवार देणार नाही, यावर काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे निर्णय झालेला नाही. तसा निर्णय होणार असेल तर आम्ही दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांच्या नुकसानाकडे लक्ष वेधणार सुनील तटकरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणात पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले होते त्या संदर्भात एक बैठक बोलवली होती त्यावेळी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी काही माहिती दिली होती. यंदाही काही पीक शेतकऱ्यांच्या हाती येईल अशी परिस्थिती नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा मुख्यमंत्री करणार होते असे सांगितले होते. या नुकसानाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचे काम करणार आहोत.
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भोंदू अशोक खरातच्या नादाला लागून तंत्रमंत्र विद्येसाठी आपली अनामिक कापल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यांच्या आरोपामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. आता रुपाली चाकणकर यांनी स्वतः धायरीच्या एका गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा व्हिडिओ शेअर करत आपल्या अनामिकेला दुखापत कशी झाली? हे स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, गाडीतून उतरताना बोट दरवाज्यात अडकल्यामुळे आपल्या बोटाला दुखापत झाली होती, असे त्यांनी म्हटले आहे. भोंदू अशोक खरात व त्यांच्याशी संबंधित असलेल्या पुढाऱ्यांमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. भोंदू खरात सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यातच सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर तंत्रमंत्र विद्येचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी आज एका पोस्टद्वारे सुषमा अंधारे यांचे आरोप जोरकसपणे फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी धायरीतील एका गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. काय महत्त्वाचे आहे या व्हिडिओत? या व्हिडिओत सदर मंडळाचा अध्यक्ष सांगत आहे की, रुपाली चाकणकर दरवर्षी आमच्या गणेश मंडळाच्या आरतीला येतात. गतवर्षीही त्या आरतीला आल्या होत्या. त्यावेळी गाडीतून उतरताना त्यांचे बोट दरवाज्यात अडकले होते. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतरही त्यांनी टिश्यू पेपरने जखम कोरडी करून त्यांनी गणपत्ती बाप्पांची आरती पूर्ण केली. हा संपूर्ण प्रकार आमच्या गणेश मंडळाच्या सीसीटीव्हीमध्येही दिसून येईल. चाकणकर यांच्यावर होणारे आरोप वैयक्तिक स्वरुपाचे असून, फोटोविषयी 'ध' चा 'मा' करण्यात आला आहे. चाकणकरांचा सुषमा अंधारेंवर हल्ला रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी सुषमा अंधारेंवर त्यांचे नाव न घेता जोरकसपणे टीका केली आहे. गेली 20-22 वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करताना, जसजसा प्रगतीचा आलेख वाढत गेला तसतशी चिखलफेक करणारी विकृती वाढत गेली. प्रत्येक वेळी संयमाने शांतपणाने टिका सहन केली. वैयक्तिक टिका करणे हे माझ्या रक्ताताच नाही. पण आता सगळ्या मर्यादा ओलांडून माझ्यासह कुटुंबाला जो त्रास दिला जातोय ते भयावह आहे. ज्यांनी हा आयुष्याचा प्रवास जवळून पाहिला, ते सर्व संपर्क करून आम्ही सोबत आहोत हे आवर्जून सांगतात. त्या सर्वांचे आभार. खरात प्रकरणात मी पहिल्या दिवशीच भूमिका स्पष्ट केली आहे. तपास निष्पक्षपणे व्हावा यासाठी आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व त्यानंतरही माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुराव्यासह स्पष्टीकरण दिले आहे. सत्य समोर येईलच. धायरीकर तुमचे मनापासून धन्यवाद, असे त्यांनी म्हटले आहे. आत्ता पाहू काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे? सुषमा अंधारे गत आठवड्यात चाकणकरांवर हल्ला चढवत म्हणाल्या होत्या, रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिक कापली होती. हे कृत्य अशोक खरातपुढे झाले होते. खरातनेच कर्मकांडासाठी त्यांना अनामिक कापण्यास सांगितले होते. त्यातून त्यांच्या बोटाला जखम झाली. ती जखम तब्बल 4 महिने तशीच होती. याचा एक फोटो माझ्याकडे आहे. त्यात चाकणकरांनी अनामिकाला बँडेज लावल्याचे दिसून येत आहे. रुपाली चाकणकर व अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर उपस्थित होत्या. एवढेच नव्हे तर चाकणकरांच्या घरात खरात यांची भाची राहते. प्रस्तुत प्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यामुळे चाकणकर फरार होण्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांनी यापूर्वीही आपल्या पदाचा दुरुपयोग करून या प्रकरणी अनेकांवर दबाव आणला आहे. त्या मध्यरात्री 2-2 वाजता फोन करून पीडितांना धमकी देत होत्या. त्यामुळे त्यांचा सीडीआर तपासला गेला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे व त्यांची नार्को टेस्ट केली गेली पाहिजे, असे त्या म्हणाल्या होत्या.
शंभुराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा आणि पोलिसांचा काहीही संबंध नाही.पोलिसांच्या मागे जी अदृश्य शक्ती होती त्यांची ही ताकद आहे. त्या शक्तीने पोलिसांना हे करायला लावले, पोलिस स्वत:हून असे काही करणार नाही मला विश्वास आहे असे शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी मुख्यमंत्र्यांना या विषयी पत्र लिहणार आहे. कालही मी भाजपच्या अनेक वरीष्ठ लोकांशी चर्चा केली आहे. ही लोकशाहीची हत्या आहे, ही गोष्ट अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. या पक्षामध्ये याबद्दल काय चर्चा झाली हे मला माहिती नाही. पण हा काही मोठा-छोटा भाऊ असा विषय नाही. हा लोकशाहीचा विषय आहे. लोकशाहीत अशी गुंडगिरी होणार असेल तर त्याविरोधात ताकदीने लढण्याची गरज आहे. आज साताऱ्यात झाले उद्या 10 ठिकाणी होईल. साताऱ्यातील घटनेचा जाहीर निषेध सुप्रिया सुळे म्हणाल्या की, साताऱ्यात जी घटना झाली त्याचा मी जाहीर निषेध करते. मला धक्का बसला हा यशवंतराव चव्हाण यांचा महाराष्ट्र आहे.चव्हाणांनी मंगल कलश आणला तो काय हा दिवस पाहण्यासाठी का? असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला आहे. माझा विश्वासच बसू शकत नाही की कॅबिनेट मंत्र्यांना मतदान करण्यासाठी धक्काबुक्की होऊ शकते. संविधानानेच देश चालणार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शंभुराज देसाई यांच्या हाताला दुखापत झाली आहे. मी काल मकरंद आबा यांना फोन करत हे काय सुरू आहे, कसे सहन करायचे असे म्हटले आहे. काल विधिमंडळाच्या पायऱ्यावर अजित पवार गटातील मकरंद आबा आणि शिवसेनेचे सर्व आमदार उभे होते.ते सर्व लढायचा प्रयत्न करत होते. हे सर्व दुर्दैवी आणि सशक्त लोकशाहीसाठी दुर्दैवी आहे.या विरोधात लढाई झालीच पाहिजे. हा देश कुणाच्या मर्जीने चालणार नाही. केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच देश चालणार. मग मार का खाता? सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मकरंद पाटील, शंभुराज देसाई यांना धक्काबुक्की झाली असेल त्यांना न्याय मिळत नसेल तर ही निवडणूक रद्द झाली पाहिजे. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. सरकारमध्ये तुम्ही आहात तेच सरकार तुम्हाला धक्काबुक्की करत आहे, पांडुरंगा हे काय दिवस बघावे लागत आहेत. ते ही मित्र पक्षाच्या नेत्यांना. तुम्ही सत्तेत एकत्र आहात आणि धाकटा भाऊ म्हणणाऱ्याला धक्काबुक्की होत असेल तर राज्याचे राजकारण कुठल्या दिशेने सुरू आहे. तुम्ही शिवराय, शाहु-फुले-आंबेडकर यांचे नाव घेत राजकारण करता मग मार का खाता? असा सवाल सुळेंनी केला आहे.
महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा लोकशाहीचा खून झाला आणि पोलिसांनी झुंडशाही केली त्या सर्वांचा केंद्रबिंदू हा विधिमंडळाच्या इमारतीमध्येच आहे. त्यामुळे छाती आपटून हे काय करणार? मुळात जी लोकं लोकशाहीचा खून झाला असे म्हणतात त्यांचेच हात लोकशाहीच्या खुनाने रंगले आहेत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, काल विधिमंडळाच्या पायऱ्यावर एक-दोन गटाचे काही मंत्री आणि आमदार उभे राहत लोकशाहीचा खून झाला ओरडत होते. त्याच्यामधील काही मंत्री जेव्हा शिवसेना सोडून गेले तेव्हा हे वाघाचे कातडे पाघरलेले वाघ गर्जना करत होते की स्वाभिमान, हिंदूत्वासाठी आम्ही कसा पक्ष सोडला आणि काल विधीमंडळाच्या पायऱ्यावर यांची मांजरं झाली होती. सरकारमधील मंत्र्यांची ही अवस्था? संजय राऊत म्हणाले की, सरकारमधील मंत्र्यांची ही अवस्था का झाली आहे. त्यांना भाजपच्या मंत्र्यांनी साताऱ्याच्या रस्त्यावर बेदम चोपले आहे. कुठे गेला तुमच्यातील शिवसैनिक? कुठे गेला तो बाळासाहेबांनी घडवलेला मर्द मावळा? मार खालला तुम्ही तुमच्याच सहकारी मंत्र्यांकडून आणि आता विधिमंडळाच्या पायऱ्यावर म्याव म्याव करताय. शेवटी जे कर्म तुम्ही केले त्याचे हे फळ आहे, असे राऊतांनी म्हटले आहे. फडणवीसांच्या मदतीशिवाय होऊच शकत नाही संजय राऊत म्हणाले की, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातील झुंडशाही होऊच शकत नाही. ज्या पद्धतीने पोलिसांनी तिकडच्या पालकमंत्र्यांना चोप दिला तोच म्हणतो मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला, पाय मोडला, सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाची भूमी आहे. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, किसनवीर ही मोठी नावे आहेत. जिथे साहित्य, कविता निर्माण झाल्या त्या साताऱ्याची काय तऱ्हा झाली आहे, अशीच तऱ्हा महाराष्ट्राची झाली आहे. तुषार दोषींची शिंदेंना दोनदा मदत संजय राऊत म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्यावर लाठीचार्ज झाला तेव्हा जालन्यात हेच तुषार दोषी पोलिस अधीक्षक होते. साताऱ्यात शिंदेंच्या भावाच्या जागेत ड्रग्जसाठा सापडला तेव्हा त्यांना वाचवण्यात हेच तुषार दोषी होते. आता कालच्या झुंडशाहीत हेच दोषी होते. ज्यांनी दोन वेळा तु्हाला मदत केली त्यांनाच निलंबित करण्यासाठी काल तुम्ही आग्रह धरला. सभापतींना निलंबनाचा अधिकार आहे का? तुम्ही पदावर बसून मनाने निर्णय देऊ शकत नाही.
केंद्र सरकारने हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट आणि दुग्धशाळांसाठी व्यावसायिक सिलिंडरचा कोटा 20 टक्क्यांनी वाढवून 50 टक्क्यांपर्यंत नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी नाही. प्रत्यक्षात बुकिंग कधीपासून सुरू करायचे? त्याची मर्यादा किती दिवसांची असावी? याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्याकडून आलेल्या नाहीत. त्यामुळे कंपन्यांकडून व्यावसायिक सिलिंडरचा कोटा एजन्सीसाठी अद्याप रिलीज करण्यात आलेला नाही. शासनाच्या मार्गदर्शक सूचना नसल्याने व्यावसायिक वर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. सोमवारी, व्यावसायिक सिलिंडर वितरणासंबंधी पुरवठा विभागाची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यात सोलापुरातून जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे आणि शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे सहभागी झाले होते. भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्यांकडे सिलिंडरचा साठा असूनही वितरण प्रक्रिया ठप्प असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी शहरातील सर्वच एजन्सींच्या बाहेर आणि त्यांच्या गोदामांत ग्राहकांच्या रांगा होत्या. तिथे सूचना फलक लावण्यात आले होते. काही ठिकाणी ग्राहक आणि एजन्सीधारक यांच्यात वादही पाहायला मिळाले. एजन्सींच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घरगुती गॅस ग्राहकांना दिलासा देण्यासाठी 23 मार्चपासून बुकिंगनंतर 96 तासांच्या आत सिलिंडर घरपोच करण्याचे लेखी आदेश सर्व गॅस एजन्सींना दिले आहेत. त्याचा अंमल सोमवारपासून सुरू झाला. परंतु ग्राहकांनी सिलिंडर मिळवण्यासाठी सकाळपासूनच गॅस एजन्सींच्या बाहेर रांगा लावल्या. त्यांना पुढील 4 दिवसांत पुरवठा सुरळित होईल, असे सांगण्यात आले. उद्योगांना सिलिंडर देण्यात संभ्रम रेस्टॉरंट, ढाबे, हॉटेल्स, अन्नप्रक्रिया, दुग्धव्यवसाय, सामुदायिक स्वयंपाकघरे, स्थलांतरित मजुरांसाठी 5 किलो एफटीएल यांसारख्या क्षेत्रांना शासन निर्णयाने दिलासा मिळाला असला तरी, लघु आणि मोठ्या उद्योगांना व्यावसायिक सिलिंडर पुरवण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. यामुळे अनेक उद्योजकांचे काम गॅसअभावी रखडले आहे. शासनाच्या सूचनेनंतरच वितरण व्यावसायिक सिलिंडर वितरणाबाबत केंद्र सरकारने कोटा वाढवला आहे. परंतु राज्य सरकारकडून त्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना अद्यापही मिळालेल्या नाहीत. त्या मिळाल्या की प्रत्यक्षात व्यावसायिक गॅसची बुकिंग सुरू करण्यात येईल. त्यानंतर वितरण होईल. ओंकार पडोळे, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी, सोलापूर
विधिमंडळ कामकाजात आज विधानपरिषदेचे सदस्य उद्धव ठाकरे यांच्यासह 9 सदस्यांचा निरोप समारंभ पार पडणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्याविषयी निरोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून काय बोलले जाते याकडे लक्ष असणार आहे. विधिमंडळ कामकाजाचे अपडेट पाहण्यासाठी लाईव्ह ब्लॉग पाहा
सायंकाळच्या वेळी हॉटेलमध्ये येऊन टोळक्यासह तब्बल 14 हजारांची दारू प्यायली. मात्र बिल देण्याची वेळ आल्यावर येथे अमराठी कामगार चालत नाही असे म्हणत मॅनेजरच्या कानशिलात लगावली, तर एकाने तलवार काढून दहशत पसरवली. शनिवारी (21 मार्च) रात्री 10 वाजेच्या सुमारास हॉटेल काबरूमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी विकास रहाटवाडे, सारंग तरमगे व दोन अनोळखी व्यक्तींवर सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश कांतीलाल गोलेच्छा (29, रा. राजाबाजार) यांनी फिर्याद दिली. ते दोन महिन्यांपासून लिंक रोडवरील काबरू हाऊस हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत. 21 मार्चला दुपारी 1 वाजता ते कामावर गेले. त्याच रात्री 10 वाजता आरोपी विकास रहाटवाडे, सारंग तरमगे आणि अनोळखी दोन, असे चौघे हॉटेलमध्ये आले. त्यांनी दारूची मागणी केली. आकाश यांनी त्यांना दारू दिली. एकाने दारू घेतल्यानंतर तिघांनी लगेच येथे अमराठी कामगार चालणार नाहीत, असे म्हणून दादागिरी सुरू केली. एकाने तेवढ्यात तलवार काढली आणि सर्वत्र फिरवली. यामुळे इतर ग्राहकांमध्येही दहशत पसरली. या आरोपींनी आकाशला धमकावून माफी मागायला लावले. यानंतर येथे कामाला यायचे नाही, असे धमकावत जिवे मारण्याची धमकी दिली. तेवढ्यात एकाने हॉटेल मालक रमण कपूर यांना बोलावले. ते आल्यावर आरोपींपैकी एक जण त्यांना बोलला आणि ते दारूचे 14 हजार 333 रुपये बिल न देता कारने (एमएच 20, ईएक्स 1431) निघून गेले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे करीत आहेत. हायप्रोफाइल व्यक्तींकडून वसुलीसाठी नित्याचाच स्टंट सध्या शहरात पैठण रोड झपाट्याने वाढणारा परिसर आहे. त्या ठिकाणी अनेक गुंडांचा वावर वाढला आहे. गेल्या दोन महिन्यांत लिंक रोडवर अनेकांना लुटण्याचे प्रकार समोर आले आहे. या नवीन भागात आपलीच ‘हवा’ असावी यासाठी अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. या हॉटेलमध्ये हायप्रोफाइल लोक पार्टीसाठी जातात, त्याच ठिकाणी दहशत माजवून वसुली सुरू करण्यासाठी थेट सीसीटीव्हीच्या समोर त्याने तलवार नाचवत राडा केला. हॉटेलमध्ये तब्बल 13 मिनिटे सुरू होता थरार हॉटेलमध्ये मॅनेजरने बिलाची मागणी केली. त्यामुळे थेट त्याच्या कानशिलात लगावून त्याने तलवार नाचवण्यास सुरुवात केली. हा थरार जवळपास 13 मिनिटे सुरू होता. त्यामुळे हॉटेलमधील इतर ग्राहकही भयभीत झाले होते.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणासोबतच आता त्याच्या आर्थिक फसवणुकीचे नवनवीन आणि धक्कादायक पैलू समोर येत आहेत. चिंचुके आणि बनावट खडे विक्रीच्या प्रकरणांनंतर, आता त्याने 'तुर्की मध' विकण्याच्या नावाखाली अनेक भाविकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याची खळबळजनक माहिती पोलिस तपासातून उघड झाली असून, या आर्थिक घोटाळ्याचे धागेदोरे आता अधिक खोलवर पसरल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा 'तुर्की मध' कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा खोटा दावा करून श्रीमंत उद्योजक व राजकीय नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढत असे. लैंगिक समस्यांवरील प्रभावी उपाय म्हणून या मधाची एका किलोची बाटली तो तब्बल 9 लाख रुपयांच्या अव्वाच्या सव्वा दराने विकत असल्याची खळबळजनक बाब आता पोलिस तपासातून उघड झाली आहे. अशोक खरात या मधाला 'एल्विश हनी' असे नाव देऊन तो तुर्कीतील समुद्राच्या खोल गुहांमधून मिळवलेला अत्यंत दुर्मिळ प्रकार असल्याचा बनाव रचत होता. या कथित दुर्मिळतेचा आधार घेत तो भाविकांचा विश्वास संपादन करून मधाची लाखो रुपयांना विक्री करत असला, तरी प्रत्यक्षात हा सर्व प्रकार निव्वळ फसवणूक आणि बनावटगिरी असल्याची दाट शक्यता आता पोलिस तपासातून समोर येत आहे. या गैरप्रकारांतून मिळालेली कोट्यवधींची अफाट रक्कम अशोक खरात आपल्या ट्रस्टच्या खात्यात वळवत असल्याचे उघड झाले असून, या व्यवहारांच्या आधारे काळा पैसा पांढरा करण्याचा गंभीर प्रकार झाल्याचा संशय आता तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. चिंचोके, बनावट खडे, तांत्रिक विधी आणि महागड्या मधाच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या अंधश्रद्धेचा तसेच वैयक्तिक अडचणींचा गैरफायदा घेत खरातने हे अवाढव्य आर्थिक जाळे विणल्याचे आता स्पष्ट होत आहे. अध्यात्माच्या नावाखाली वासनेचा बाजार!:भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश? खळबळजनक माहिती समोर अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपत असून, त्याला दुपारी 2 वाजता नाशिक सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, आजच्या सुनावणीत पोलिस न्यायालयात कोणती बाजू मांडतात आणि त्याच्या कोठडीत वाढ होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या भोंदूबाबाच्या काळ्या कारनाम्यांचे पितळ नेमके कसे उघडे पडले, याचे सविस्तर तपशीलही आता समोर आले आहेत. वाचा सविस्तर
येथील राजस्थानी गौड ब्राह्मण महिला मंडळांद्वारे गणगौरच्या पावन पर्वानिमित्त गणगौर पूजन करत शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा नुकतेच शहरातील विविध भागातून काढण्यात आली. या शोभा यात्रेची सुरुवात राजस्थानी ब्राह्मण भवन बारादरी येथून करण्यात आली. ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांनी मार्गक्रमण करीत नटराज गार्डन पर्यत काढण्यात आली. या ठिकाणी शोभा यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी राजस्थानी गौड ब्राह्मण महिला मंडळांद्वारे विविध कार्यक्रम घेण्यात आले. याकरिता मंडळाच्या शारदा शर्मा, नीता गौड, गौरजा शर्मा, सुजाता शर्मा, यांचे मार्गदर्शन लाभले. या उत्सवाच्या यशस्वितेसाठी मंडळाच्या अध्यक्षा मंजू बोहरा, स्नेहा शर्मा, शांती शर्मा, सुनीता शर्मा, अंकिता बोहरा, सरला शर्मा, माया शर्मा, नंदा शर्मा, मनीषा लोसल्या, नेहा जोशी सह सर्व महिला मंडळाने अथक परिश्रम घेतले.
माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने माहेश्वरी भवनात रंगारंग उत्सव आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात काशी विश्वनाथ गटाने सादरीकरण केले. कार्यक्रमात फुलांची होळी, खेळ आणि हॉउजीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात काशी विश्वनाथ गटाने चार युगांची होळी' सादर केले. यात शिव म्हणून राधिका हेडा, पार्वती म्हणून मीनल बियानी, राम म्हणून रोशनी कलंत्री, सीता म्हणून वैष्णवी काबरा, कृष्ण म्हणून रानी चांडक, राधा म्हणून राधिका खटोड, कलियुग होळी पूजा चांडक व साक्षी बियानी, नारद म्हणून किरण राठी, ब्रजवासी कंचन नवंदर यांनी भूमिका साकारली. चार युगांच्या होळीचे मंचन प्रशिक्षक हीरल गणत्रा यांनी केले. प्रस्तावना सचिव शोभा बियाणी यांनी केली. सूत्रसंचालन ज्योती बियाणी यांनी केले.अध्यक्ष वंदना हेडा, सचिव शोभा बियानी, उपाध्यक्ष मंजू गट्टानी, कोषाध्यक्ष अनिता गांधी, सल्लागार हेमा खटोड, शिल्पा चांडक, उपाध्यक्ष आरती जाजू, उपाध्यक्ष मंजू गट्टानी, सहसचिव राधा टावरी, सहसचिव सुनीता हेडा आणि कोषाध्यक्ष अनिता गांधी यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात माजी अध्यक्ष सुशीला गांधी, कमला जाजू, शशिकला खटोड, शकुंतला चांडक, रेखा मोहता, उमा भाला, कल्पना भुतडा, शोभा जाजू, वरिष्ठ महिला संघटनेच्या अध्यक्ष प्रमिला लाहोटी आदी उपस्थित होत्या. यांनी मारली बाजी कार्यक्रमात फुलांची होळी, खेळ आणि हॉउजीचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रथम मोनिका तोष्णीवाल, द्वितीय मीना मोहता, गुलालमध्ये सविता गांधी, पिचकारीत प्रीती लड्डा, मीना मोहता, होलिकामध्ये नीता भाला, गुब्बाऱ्यात कल्पना बियानी, होळी क्वीन भारती सारडा, गुजिया पुष्पा मंत्री, तर फुल हॉउजित सुमित्रा खटोड व सुषमा काकानी यांना सन्मानित करण्यात आले. या शिवाय काशी विश्वनाथ गटाकडून किरण बियानी, ज्योती बियानी, किरण राठी, मालती चांडक, कंचन नवंदर, दीपाली सोमानी, आशा सोमानी, नम्रता भाला, माया भट्टड आणि सुनंदा काबरा यांनीही भूमिका साकारली.
आपल्या मनातील ताणतणाव आणि अहंकाराची लंका' जाळण्यासाठी हनुमंतासारखी जागरूकता आणि गजानन महाराजांसारखी साक्षीवृत्ती' अंगी बाळगणे काळाची गरज आहे. जेव्हा आपण स्वतःला मी' म्हणून मोठे करतो, तेव्हा संकटाचे तोंडही मोठे होते; पण जेव्हा आपण ‘मी' पणाचा त्याग करून लघुरूप (नम्र) होतो, तेव्हा कोणत्याही संकटाच्या मुखातून सुरक्षित बाहेर पडू शकतो, असे प्रतिपादन रामकथाकार डॉ. भूषण फडके यांनी केले. नीलेश देव मित्र मंडळातर्फे आयोजित संगीतमय श्रीरामकथा' महोत्सवाच्या चौथ्या पुष्पात मार्गदर्शन करताना डॉ. फडके बोलत होते. त्यांनी सुंदरकांड' आणि युद्धकांडा'तील व्यवस्थापन सूत्रांवर निरूपण केले. कथेत हनुमानाचे समुद्र उल्लंघन, सीता शोध, रावण-हनुमान संवाद, लंकादहन, बिभीषण शरणागती, सेतुबंधन आणि अंगद शिष्टाई या प्रसंगांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. डॉ. फडके यांनी हनुमंताच्या कार्याला शेगावचे संत गजानन महाराज यांच्या आध्यात्मिक शिकवणुकीची जोड दिली. भक्ती, शक्ती आणि चातुर्य यांचा त्रिवेणी संगम म्हणजे वीर हनुमान, तर शक्ती आणि अहंकार यांचे प्रतीक म्हणजे रावण. हनुमंताने समुद्र ओलांडताना स्पर्श करून मैनाक पर्वताचा आदर केला; पण ते तिथे विश्रांतीसाठी थांबले नाहीत. गजानन महाराज नेहमी म्हणायचे, उपाधीत अडकू नका; संसारात मान-सन्मान मिळतील, पण त्यात न अडकता आपले ध्येय' (रामकार्य) विसरू नये’. हाच महाराजांचा आणि हनुमंताचा संदेश आहे. हनुमंतासमोर जेव्हा सुरसेसारखी संकटे आली, तेव्हा त्यांनी बुद्धीचा वापर केला. डॉ. फडके म्हणाले की, महाराजांचा गण गण गणात बोते' हा मंत्र शिकवतो की, प्रत्येक जीवात तोच परब्रह्म आहे. समोरचा आदरातिथ्य करत असेल तर नम्र व्हा; अहंकारी असेल तर सूक्ष्म व्हा आणि ध्येयाच्या आड येत असेल (सिंहिका राक्षसीप्रमाणे), तर तिथे धर्माचा प्रहार करायला मागे हटू नका, असेही ते म्हणाले. सोहळ्यात विविध भक्तीगीतांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. देवाशिष फडके याने सेतुबंध रे सागरी', हे राम हे राम तर निखील देशमुख यांनी पेटवी लंका हनुमंत, विश्वाचा विश्राम रे, सुग्रीव हे साहस असले, वैशाली फडके यांनी, गजाननच्या चरणी जुळवू या आपुले नाते, श्रीराम गजर तर सुमंत तरालकर यांनी अविरत ओठी हि गीते सदर केली. गण गणात बोते या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. हार्दिक दुबे आणि विग्नेश बोकसे यांनी साथ सांगत केली. प्रभु रामचंद्र हे नेतृत्वगुणांचे उत्तम उदाहरण सेतुबंधनाच्या प्रसंगावर बोलताना डॉ. फडके म्हणाले की, पाच दिवसांत सेतू उभा राहणे असामान्य आहे. प्रभू रामचंद्रांनी सामान्य वानरांकडून असामान्य कार्ये करून घेतली. हे नेतृत्वगुणांचे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले. गजानन महाराज आपल्याला शिकवतात, तुम्ही फक्त निमित्त व्हा, कार्य करणारा तो वर बसलेला राम आहे'. जसा नलाचा हात आणि रामाचे नाव लागून सेतू बांधला गेला. तसेच महाराजांचा आशीर्वाद आणि आपले कष्ट एकत्र आले की संसाराचा अथांग सागर ओलांडणे कठिण राहत नाही, असेही नमूद केले. लंका म्हणजे मनातील नकारात्मकता लंका म्हणजे मनातील नकारात्मकता-भिती, राग आणि अहंकार आहे, असे डॉ. फडके यांनी लंकादहनाचा प्रसंग विशद करताना सांगितले. हनुमंत हे इनर पॉवर अॅक्टिव्हेशनचे प्रतीक आहेत. हनुमंताने रावणाच्या दरबारात दाखवलेले बुद्धीचातुर्य हे विलक्षण होते. रावणाने जेव्हा शेपटी पेटवली, तेव्हा हनुमानाने त्याच अग्नीने सोन्याची लंका भस्मसात केली. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक लंका आहे, पण आपल्या आतही एक हनुमान आहे जो जागरूकतेने त्या लंकेला जाळू शकतो, असेही डॉ. फडके यांनी नमूद केले.
भोंदूबाबा अशोक खरात याच्यामुळे अडचणीत आल्याने राजीनामा देऊन मुक्त झालेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महिला काँग्रेसने केली आहे. अमरावती शहर काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष जयश्री वानखडे यांच्या नेतृत्वात आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी त्यांच्या छायाचित्राला चपलेने बडवण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात याने तंत्र-मंत्र विद्या व दैवी शक्तीचा हवाला देत काही महिलांवर अत्याचार केला आहे. या घटनेचे जिवंत पुरावे पुढे आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यानच्या काळात चाकणकर यांनी अशोक खरात याची पाद्यपूजा केल्याचेही पुढे आले. एवढेच नव्हे तर त्यांचा खरात यांच्या संस्थेतही सहभाग असल्याचे सिद्ध झाले. यामुळे त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र हे प्रकरण केवळ एवढ्यावर संपत नाही, असे म्हणत काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन फसवणुकीच्या अनेक प्रकरणाच्या अनुषंगाने त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याच मागणीसाठी सोमवारी महिला काँग्रेसने जिल्हा कचेरीसमोर निदर्शने करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात महिला काँग्रेसच्या इतर पदाधिकारी नगरसेविका डॉ. अर्चना आत्राम, राजश्री जठाळे व मालती गवई यांच्याशिवाय आरती पिंपळे, वंदना निर्गुडे, सीमा तिवारी, शेख शाहीन, किरण चांदवकर, आरती क्षीरसागर आदी सहभागी झाल्या होत्या.
श्री राम नवमीनिमित्त रामायण कथा:अंबागेटच्या दत्त मंदिरात रामकथेची अमृतधारा; उपस्थित भाविक मंत्रमुग्ध
प्रभू श्री रामांच्या अभिषेकाची तयारी अयोध्या नगरीत सुरू असताना माता कैकेयीच्या वचनाने अनर्थ ओढवला. पण, मातेच्या अप्रिय वचनांनी दुःखी न होता तिची इच्छा आणि पित्याचे वचन पूर्ण करण्यासाठी श्रीराम आनंदाने वनवासाला निघाले. कौसल्या मातेला त्यांनी समजावले. रागावलेल्या बंधूची, विशेषत: लक्ष्मणाची, त्यांनी समजूत घातली. केवळ तुच्छ राज्यासाठी यश आणि कीर्तीला कलंक लावणे श्री रामांना मान्य नसल्याचेच यातून अधोरेखित होते. श्री वाल्मिकी विरचित रामायणातील श्रीराम चरित्र नित्य शिरोधार्ह, पूजनीय असल्याचे रामकथेतील प्रत्येक भागाचा उलगडा करताना प्रा. डॉ. अलका बेडेकर यांनी सांगितले. जनकल्याण सेवा संस्थेद्वारे संचालित अंबागेटच्या आतील दत्त मंदिराजवळ डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे होमिओ व सुजोक उपचार केंद्र रुग्णसेवा सदनात आहे. याच वास्तूत श्री राम नवरात्रात (चैत्र नवरात्र) डॉ. बेडेकर यांच्या वाल्मिकी रामायणाचा श्रीगणेशा झाला आहे. त्या सुरेख रामकथा भाविकांना सांगत आहेत. अयोध्या कांड विशद करताना डॉ. बेडेकर म्हणाल्या, सर्वगुणसंपन्न श्री राम प्रजेसह सर्वांचेच लाडके आहेत. त्यांच्या अभिषेकासाठी अयोध्या नगरी सजली आहे. प्रजा आनंदित आहे. अशा आनंदी वातावरणात विष मिसळावे तसा प्रकार घडला. महाराणी कैकेयीला तिची दासी मंथरा म्हणते, श्री रामांचा अभिषेक होतो आहे. नगरी सजली आहे. तेव्हा कैकेयी आनंदित होते. मंथरेला बक्षीस देत ती म्हणते की, ही अमृतवार्ता आहे. मात्र, मंथरा पुढेही कैकेयीचे मन कलुषित करते. भरत आणि राम यांच्याविषयी कैकेयी भेद करीत नाही. रामाला राज्य मिळाले तरी ते भरताला मिळाल्यासारखेच आहे, असे ती म्हणते. त्यावर मंथरा विलक्षण युक्तिवाद करते. ती म्हणते, पुढच्या पिढीतही राज्य रामाच्या मुलांना मिळेल. लक्ष्मण सतत सोबत असल्याने त्याला काहीतरी मिळेल. पण, भरत सतत मामाकडे असल्याने त्याला काय देणार? माते, तू भरताला अयोध्येला बोलावून घे. त्यानंतर प्रसन्नचित्त श्री रामांनी पित्याला प्रदक्षिणा घालून माता कौसल्येच्या महालाकडे निघतात, असे सुरेख वर्णन रामकथेतील अयोध्या कांड सांगताना डॉ. बेडेकर यांनी केले. श्री राम कौसल्या मातेच्या महालात पोहोचल्यानंतर त्यांना म्हणतात मी दंडकारण्यात जाणार. सुखोपभोग नाकारून मी कंदमुळे खाणार. पण, श्रीरामा तू वनात जाणार तर मी तरी येथे कशी राहू ? तू राजा होऊ नकोस. परंतु, पुत्र धर्माचे पालन तर कर. त्यावर श्रीराम म्हणतात मी वनातून आलो की तुझी सेवा करीन. एवढे बोलून श्री राम माता सुमित्रेच्या महालात जातात. वनवासाविषयी ऐकताच लक्ष्मण रागाने म्हणतो, दादा तुम्ही कोणताही अपराध केला नाही.तर मग तुम्हाला राज्याबाहेर कसे काढणार ? तुम्ही लगेच अभिषेक करून घ्या. मी सर्व विरोधकांचा पराभव करेन. लक्ष्मणा, तुझे प्रेम मी जाणतो. पण, धर्म मोठा आहे. तू मातापित्याची सेवा कर. धर्महिन राज्यासाठी आपल्या यशाला मागे कसे ढकलणार ? अधर्मपूर्वक मिळालेले या तुच्छ पृथ्वीचे राज्यही मला नको आहे, असे श्री राम ठामपणे सांगतात, असेही वर्णन रामकथेत करण्यात आले.
अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपत असून, त्याला दुपारी 2 वाजता नाशिक सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, आजच्या सुनावणीत पोलिस न्यायालयात कोणती बाजू मांडतात आणि त्याच्या कोठडीत वाढ होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या भोंदूबाबाच्या काळ्या कारनाम्यांचे पितळ नेमके कसे उघडे पडले, याचे सविस्तर तपशीलही आता समोर आले आहेत. अशोक खरातला आपल्या कृत्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याची कुणकूण लागताच त्याने हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू केले होते. पीडित महिलांनी न्यायासाठी सुरुवातीला एका आमदाराची भेट घेऊन त्यांना सर्व आपबिती सांगितली होती, मात्र तिथे त्यांच्या पदरी निराशाच पडली. संबंधित आमदाराने पीडितांना मदत करण्याऐवजी उलट खरातलाच या तक्रारीची पूर्वसूचना दिली, ज्याचा फायदा घेत खरातने हे प्रकरण दाबण्यासाठी उलट पीडितेच्या पतीवरच गुन्हा दाखल करून त्यांना कायदेशीर कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या अन्यायापुढे हार न मानता पीडितांनी दुसऱ्या एका आमदाराची भेट घेतली, ज्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली. मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा प्रकार जाताच प्रशासकीय यंत्रणा वेगाने हलली आणि या संपूर्ण अत्याचारकांडाला वाचा फुटली. लोकप्रतिनिधींची खंबीर साथ आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळेच या भोंदूबाबाचे काळे कारनामे चव्हाट्यावर आले असून पीडितांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण:SITकडून पीडितांना समोर येण्याचे आवाहन, संपर्क क्रमांक केला जारी; ओळख गोपनीय ठेवण्याचे आश्वासन नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबा अशोककुमार एकनाथ खरात उर्फ 'कॅप्टन खरात' याच्या काळ्या कारनाम्यांविरुद्ध नाशिक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अशोक खरातवर आतापर्यंत ६ फौजदारी गुन्हे दाखल झाले असून, या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, एसआयटीने आता पीडितांसह जनतेला समोर येण्याचे आणि तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. तसेच माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासनही पोलिसांकडून देण्यात आले आहे. वाचा सविस्तर
राठी नगर स्थित सरस्वती कॉलनी येथील श्री श्री रुक्मिणी आध्यात्मिक संस्कार केंद्र (इस्कॉन) अमरावती तर्फे विश्वविख्यात कीर्तन सम्राट, त्रिदंड संन्यासी परम पूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनात आणि प्रेरणेने २७ मार्च रोजी श्री रामनवमी महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा श्री रामनवमी २६ मार्चला नसून २७ मार्च रोजी आहे, कारण त्या दिवशीच नवमी तिथी येत आहे. याच दिवशी श्री अयोध्या धाम येथेही श्री रामनवमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे, ही विशेष बाब आहे. गौडीय वैष्णव परंपरेमध्ये श्री चैतन्य महाप्रभु यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, भगवान हे एकच अद्वितीय परम तत्त्व असून ते विविध अवतारांद्वारे भक्तांशी लीला करतात. श्रीराम हे त्या परमेश्वराचे “मर्यादा पुरुषोत्तम” स्वरूप असून त्यांनी धर्म, सत्य आणि आदर्श जीवन कसे जगावे याचे प्रत्यक्ष उदाहरण दिले. महाप्रभू सांगतात की, श्रीराम हे ‘धर्माचे साक्षात प्रतीक’ आहेत. त्यांनी आपल्या जीवनातून सत्य, कर्तव्य आणि आदर्श राज्यकारभाराचे दर्शन घडवले. रामनामाचा जप केल्याने मन शुद्ध होते आणि व्यक्तीमध्ये सद्गुणांचा विकास होतो. सीतामाता या भगवती लक्ष्मींचे स्वरूप आहेत. महाप्रभूंच्या मते, त्या शक्ती म्हणजेच भगवंतांच्या आनंदशक्तीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या जीवनातून निःस्वार्थ प्रेम, सहनशीलता आणि परम भक्ती शिकायला मिळते. बंधू लक्ष्मणाने श्रीरामांची अखंड सेवा केली. महाप्रभूंच्या शिकवणीत “दास्य भाव” म्हणजेच सेवाभाव अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. लक्ष्मण हे त्या दास्यभावाचे सर्वोत्तम उदाहरण आहेत. हनुमानजींना महाप्रभूंनी “परम भक्त” म्हणून गौरवले आहे. त्यांची भक्ती ही पूर्णपणे निःस्वार्थ आणि समर्पित आहे. त्यांनी कधीही स्वतःसाठी काही मागितले नाही, फक्त प्रभूची सेवाच केली. महोत्सवाची सुरुवात २७ रोजी पहाटे ४.३० वाजता श्री श्री रुक्मिणी द्वारकाधीश यांच्या मंगल आरतीने होईल. त्यानंतर “हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे” या महामंत्राचा सामूहिक जप होईल. सकाळी १० ते १०.३० या वेळेत भक्तवृंदाद्वारे हरिनाम संकीर्तन होईल. त्यानंतर १०.३० ते ११.३० या वेळेत श्रीराम कथा होईल. पुढे ११.३० ते १२.३० दरम्यान श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान यांचा महाअभिषेक होईल. दुपारी १२.३० ते १या वेळेत ५६ भोग दर्शन व महाआरती होईल. त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. या संपूर्ण महामहोत्सवाचा लाभ सर्व अमरावतीकरांनी घ्यावा, असे आवाहन इस्कॉन अमरावतीचे अध्यक्ष श्रीमान अद्वैत आचार्य प्रभुजी यांनी केले आहे.
चार दिवसांपुर्वी जिल्ह्यातील बहूतांश भागात ढगाळ हवामान होते, मध्यम व हलका पाऊससुध्दा पडला. काही भागात गारपिट झाली होती. त्यामुळे २० मार्चला जिल्ह्याचे कमाल तापमान ३३ अंशापर्यंत खाली उतरले होते. त्यानंतर तीन दिवस तापमान कमीच होते. मात्र सोमवारी (दि. २३) पुन्हा एकदा तापमानाने उसळी घेतल्याचे दिसत आहे. सोमवारी शहरात कमाल तापमान ३८.४ अंश नोंद झाले आहे. अवघ्या तीन दिवसात तापमानात पाच अंशाची वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उन्हाचे चटके जाणवायला लागले. यावर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच शहर व जिल्ह्यात उन्हाचे रौद्ररुप पहायला मिळाले. त्यामुळे अलीकडच्या काळात कधी नव्हे ते पहिल्यांदाच १२ मार्चला अमरावतीत तापमान ४२.२ अंशावर गेले होते. सलग दोन दिवस देशात अमरावतीचे तापमान सर्वोच्च ठरले होते. त्यामुळे मार्च महिन्यातच यंदा तापमानाची एप्रिल महिन्याप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र १९ व २० मार्चला जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले. काही भागात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्या कारणाने दोन ते तीन दिवस का होईला अमरावतीकरांना उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला होता. कारण २० मार्चला शहरातील तापमान ३३ अंशापर्यंत खाली आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून ढग निघून गेल्यामुळे वातावरण निरभ्र झाले. मात्र २१ व २२ मार्चला फारसे तापमान नव्हते. मात्र आता पुन्हा एकदा पारा झपाट्याने वाढताना दिसतो आहे. २२ ते २३ मार्च या चोविस तासातच पारा जवळपास १.६ अंशाने वाढला आहे. डॉ. प्रवीण कुमार, हवामान शास्त्रज्ञ, आरएमसी, नागपूर. २७ मार्चला पुन्हा ढगाळ वातावरण? सद्या वातावरण ढगाळ नाही. त्यामुळे पुन्हा तापमानात वाढ व्हायला सुरूवात झाली आहे. आणखी तीन ते चार दिवस तापमान वाढणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा २७ किंवा २८ मार्चला विदर्भ व परिसरात ढगाळ वातावरण तयार होण्याची परिस्थिती आहे. मात्र पावसाची शक्यता दिसत नाही. ढगाळ वातावरण तयार झाल्यास पुन्हा तापमान काहीसे कमी होईल.
संत्रा विक्रीसाठी जाणाऱ्या 2 व्यावसायिकांचा मृत्यू:मध्य प्रदेशातील छिंदवाड्याला जाताना घडली घटना
संत्रा विक्रीसाठी हिवरखेडवरुन निघालेल्या दोन तरुणांवर काळाने घाला घातला. मध्य प्रदेशातील घाटपिंपरीजवळ या तरुणांच्या मालवाहू वाहनाला विरुद्ध दिशेने आलेल्या मिनी ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत हिवरखेड येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना २२ मार्चला मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण हिवरखेड गावात स्मशान शांतता पसरली आहे. हिवरखेड येथील भूषण मधुकर तडस (३२) आणि प्रज्वल ज्ञानेश्वर चावके (२२) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांचे नावे आहेत. भूषण व प्रज्वल हे दोघे तरुण संत्रा विक्रीचा व्यवसाय करायचे. २२ मार्चला रात्री दहा वाजताच्या सुमारास ते प्रज्वलच्या मालकीच्या बोलेरो पिकअपमध्ये संत्र्याचे क्रेट भरून विक्रीसाठी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे निघाले होते. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांच्या केबिनचा अक्षरश: चुराडा झाला. यामध्ये भूषण आणि प्रज्वल या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढले. सोमवारी (दि. २३) सकाळी नातेवाईकांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोन्ही तरुणांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी छिंदवाडा येथील रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदन आटोपल्यानंतर सोमवारी दुपारी दोन्ही तरुणांचे मृतदेह हिवरखेड गावात आणण्यात आले. एकाच मोहल्ल्यातील दोन तरुण मुलांचे मृतदेह गावात पोहोचताच ग्रामस्थांचा कंठ दाटून आला. भुषण व प्रज्वल हे दोघेही गाव व परिसरातील शेतकऱ्यांकडून संत्रा खरेदी करायचे. तो संत्रा नेऊन मध्य प्रदेशातील छिंदवाडा किंवा अन्य शहरात विकायचे. दरम्यान रविवारी रात्रीसुध्दा ते संत्रा घेऊन जात होते. मात्र छिंदवाड्यात संत्रा विक्रीसाठी पोहचण्यापुर्वी अपघात झाला व या दोन्ही तरुण व्यावसायिकांवर काळाने झेप घेतली. काळाने घातली झडप
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी दिल्या जाणाऱ्या विविध पुजांच्या नोंदणी प्रक्रियेत आता अधिक पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा आणला आहे. १ एप्रिल ते ३१ जुलै २०२६ या कालावधीतील श्रींच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन आणि महानैवेद्य सहभाग योजनेची ऑनलाईन नोंदणी बुधवार, २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजेपासून सुरू होत आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. मंदिर समितीने विविध पुजांसाठी खालीलप्रमाणे देणगी मूल्य निश्चित केले आहे: श्री विठ्ठल नित्यपूजा: २५,००० रुपये, श्री रुक्मिणीमाता नित्यपूजा ११,००० रुपये, पाद्यपूजा: ५,००० रुपये, तुळशी अर्चन पूजा: २,१०० रुपये, महानैवेद्य सहभाग योजना ७,००० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://www.vitthalr ukminimandir.org) ही नोंदणी करता येईल. यामध्ये एप्रिल ते जुलै २०२६ दरम्यानचे सण, उत्सव आणि अतिगर्दीचे दिवस वगळून इतर दिवसांच्या पुजा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, एप्रिल २०२६ मधील ''तुळशी अर्चन'' पूजेची नोंदणीही याच वेळी खुली होणार आहे. ऑनलाईन नोंदणी करताना भाविकांना काही तांत्रिक अडचण आल्यास, मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक ते मार्गदर्शन घेता येईल. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या ०२१८६-२९९२९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या ऑनलाईन सुविधेला महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम आणि आंध्र प्रदेशातील भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आता पुढील चार महिन्यांच्या नियोजनासाठी भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नवीन संशोधन आणि कल्पनांमधूनच राष्ट्राचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन, जीएलए विद्यापीठ, मथुराचे प्र-कुलगुरू डॉ. दुर्गसिंह चव्हाण यांनी केले. स्वामी चिंचोली येथे दत्त कला शिक्षण संस्था संचलित दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या वतीने ‘ट्रेंड्स इन मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग स्ट्रीम्स (टाइम्स-२०२६) विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक १३ व १४ मार्च रोजी पार पडली. दोन दिवस चाललेल्या या परिषदेत देश-विदेशातील ७५० संशोधक, प्राध्यापक, उद्योगतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच फिलिपाइन्समधील दक्षिण फिलिपाइन्स विज्ञान व तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्या सहकार्याने हायब्रीड पद्धतीने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भारतासह फिलिपाईन्स, इंडोनेशिया आणि तैवान येथील संशोधकांनी परिषदेत सहभाग नोंदवला. परिषजेच्या उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. दुर्गसिंह चव्हाण म्हणाले, ‘ बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात संशोधन, नावीन्य आणि नवीन कल्पनांच्या आधारेच राष्ट्राचा विकास होणे शक्य आहे. विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञानावर न थांबता प्रायोगिक ज्ञानालाही महत्त्व दिले पाहिजे , असे आवाहन त्यांनी केले. विश्वगुरू इन्फोटेक प्रा. लि. चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र गंगार्डे यांनी ग्रामीण भागातून जागतिक स्तरावर प्रगती साधण्याचा प्रेरणादायी अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. “जिथे समस्या, तिथे अभियंता” असा संदेश देत त्यांनी तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. परदेशातील तज्ज्ञ वक्त्यांनी विविध आधुनिक विषयांवर मार्गदर्शन केले. पवनचक्की देखभालीसाठी रोबोट, स्मार्ट मोटर प्रणाली, जैवसंकेत विश्लेषण, मानवी दोन दिवसांत ५७० शोधनिबंध सादर दोन दिवसीय परिषदेत ५७० संशोधन निबंध सादरीकरण, तांत्रिक सत्रे, प्रश्नोत्तर सत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उत्कृष्ट संशोधन सादरकर्त्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली. परिषदेच्या आयोजनासाठी प्रा. एस. एस. काठाळे, डॉ. एस. एस. बेरे आणि डॉ. एन. पी. देशमुख यांनी संयोजक म्हणून काम पाहिले. सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने परिषद यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
ब्रिटिशांच्या अन्यायकारक राजवटी विरुद्ध संघर्ष करून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी प्राणाची आहुती दिली. त्यांच्या हौतात्म्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा मिळाली, म्हणून त्यांचे कार्य इतिहासात वंदनीय आहे, असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले. महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील इतिहास अभ्यास मंडळाच्या वतीने हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते. ते म्हणाले की, भगतसिंग बुद्धिमान, विचारशील क्रांतिकारक होते. त्यांनी दिल्लीच्या सेंट्रल असेंम्ब्लीमध्ये बॉम्ब टाकून इन्कलाब जिंदाबाद’चा नारा दिला. सुखदेव आणि राजगुरू हेही त्यांच्या सोबत होते. ब्रिटिश सरकारने या तिघांना २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी दिली. तो दिवस आज आपण शहीद दिवस म्हणून पाळतो. प्रास्ताविक प्राध्यापिका मधुबाला लोणारी यांनी केले. आभार प्रा. सौरभ भस्मे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा राजशेखर पवार डॉ. शितल झिंगाडे- भस्मे, मनीषा शिंदे, सोनाली कटकधोंड, भीम सोनकांबळे, शिल्पा धूमशेट्टी, ओंकार घिवारे उपस्थित होते. हुतात्म्यांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा भगतसिंग,राजगुरू व सुखदेव यांनी देशप्रेम, धैर्य आणि निस्वार्थ सेवा यांचा आदर्श घालून दिला, त्यांची शौर्यगाथा सदैव आपल्या हृदयात जिवंत ठेवण्यासाठी युवकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेतला पाहिजे असे मत मलकप्पा भरमशेट्टी यांनी व्यक्त केले.
पंढरपूर शहरातील सर्वात महत्वाच्या मार्गावरील उड्डाण पुलाचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. सरगम चौक आणि भोसले चौक या दोन ठिकाणी स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध केल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून या पुलाचे काम ठप्प आहे. तर दुसरीकडे शहर भाजप आणि पालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी या पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे यासाठी आग्रही मागणी केली आहे. काम तत्काळ पूर्ण करावे अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. पालखी मार्गावर सध्या मार्केट यार्ड ते सरगम टॉकीज आणि इंदिरा गांधी चौक ते भिंगे चौक दरम्यान उड्डाण पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, नवीपेठ परिसरातील काही नागरिकांनी नगरपरिषदेच्या जागेवरील स्वतःचे अतिक्रमण वाचवण्यासाठी स्थानिक लोकांना हाताशी धरून या कामाला विरोध सुरू केला आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून काम बंद ठेवले आहे. दरम्यान, चैत्री यात्रेच्या तोंडावर वाहतूक कोंडी वाढली असून या पुलाचे काम तात्काळ पूर्ण करावे, या मागणीसाठी भाजपचे उपनगराध्यक्ष, गटनेते आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांना निवेदन देण्यात आले.उड्डाणपुलामुळे कोणत्याही व्यापाऱ्याचे नुकसान होणार नाही किंवा जागा बाधित होणार नाही. तरीही काही राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते केवळ विरोधासाठी विरोध करत आहेत . विकासात अडथळा आणणाऱ्या प्रवृत्तींवर कायदेशीर कारवाई न झाल्यास भाविक आणि नागरिकांसह धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, गटनेते भागवत बडवे, सुजितकुमार सर्वगोड, भाजप शहराध्यक्ष रोहित पानकर, पाणीपुरवठा सभापती अमोल डोके, नगरसेवक ॲड. सुनील वाळूजकर सिकंदर ढवळे आदी उपस्थित होते. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांचा व्यापाऱ्यांना पाठिंबा दिल्याने राजकीय रंग कर्नल भोसले चौक येथील व्यापाऱ्यांनी काम बंद पडल्यानंतर केलेल्या आंदोलनास तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. जेष्ठ नगरसेवक नागेश भोसले, माजी नगरसेवक किरण घाडगे आदींनी आंदोलनात सहभागी होऊन व्यापाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या उड्डाण पुलाच्या उभारणीस राजकीय रंग आलेला दिसून येत आहे.
बार्शी गुढी पाडव्या निमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षी ही येथील मल्लिकार्जुन मंदिरातील मनाच्या नंदीध्वज काठीची पारंपरिक वाद्यांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. मागील सुमारे दीडशे वर्षांपासून कसले परिवाराच्या वतीने ही परंपरा जोपासण्यात येत आहे. कथले परिवाराचेवतीने पाडव्या निमित्त काढण्यात येणारी नंदीध्वज काठी मिरवणूक ही शहराच्या सांस्कृतिक वारसा जपणारी ठरली आहे. याला पौराणिक अधिष्ठान असून चैत्र शुद्ध अष्टमी ते चैत्र वद्य प्रथम या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या शिवपार्वती सोहळ्याचा शुभारंभ या नंदीध्वज काठीच्या स्थापनेने करण्यात येतो. तर सोहळ्याची मुहूर्तमेढ गुढीपाडव्याच्या दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीतून रोवली जाते. या मिरवणुकीचा शुभारंभ माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मल्लिकार्जुन मंदिर प्रमुख बाबासाहेब कथले, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले,प्रशांत कथले, आसिफ तांबोळी, पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे, दीपक रोंगे, विलास रेणके, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लोढा, महेश बाफना उपस्थित होते.मिरवणुकीपूर्वी मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वज काठीचे विधिवत पूजन कथले परिवाराच्या हस्ते पार पडले. त्यानंतर मिरवणूक कापड बाजार पेठ, सावरकर चौक, भगवंत मंदिर परिसर आणि कसबा पेठ या प्रमुख मार्गांवरून उत्साहात मार्गक्रमण करत पुन्हा मंदिरात आली. कार्यक्रम यशस्वितेसाठी आप्पा कथले, दादासाहेब कथले, प्रशांत कथले, महेंद्र कथले, मनोज कथले यांच्यासह कथले कुटुंबातील सदस्य परिश्रम घेत आहेत. धार्मिक व सांस्कृतिक जीवनात योगदान कथले कुटुंबाच्या वतीने ही परंपरा सुमारे १५० वर्षांपासून अत्यंत श्रद्धा व भक्तिभावाने जपली जात असून शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते. बाबासाहेब कथले, देवस्थान प्रमुख
यंदाच्या मान्सूनमध्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे हिंगणी व जवळगाव परिसरातील पाणी प्रकल्पांना भरपूर पाणीसाठा लाभला आहे. मार्च महिन्यापर्यंत हिंगणी प्रकल्पांमध्ये सध्या ५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा तर जवळगाव प्रकल्पात ५६ टक्के जलसाठा उपलब्ध आहे, दोन्हीही प्रकल्पामध्ये पाणीसाठा समाधानकारक स्थितीत आहे. उन्हामुळे पाण्याचा वापर अन् बाष्पीभवन वाढले तरी प्रकल्पातील पाणी जुलैपर्यंत पुरणार आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यापासून शेती पिकांना पाणी देण्यासाठी प्रकल्पातून पाण्याचा उपसा वाढतो. ज्या वर्षी कमी पाऊसकाळ असायचा, त्या वर्षी डिसेंबरपासून प्रकल्पातही पाण्याची पातळी खालावू लागते. मार्च महिन्यात टंचाईच्या झळा तीव्र होऊ लागताच प्रशासनाला अधिग्रहण व टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागायचा. कमी पाण्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसायचा. परिणामी, उत्पादनात घट येण्याची शक्यता अधिक असायची. मात्र, यंदा चांगला पाऊस झाल्याने पाणी मुबलक आहे. हिंगणी प्रकल्पाची साठवण क्षमता १६०० दशलक्ष इतकी आहे. मार्च अखेरीस प्रकल्पात १८ .९३ दलघमी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ५९ टक्के एवढी आहे. तर जवळगाव प्रकल्पामध्ये साठवण क्षमता १२३३ असून सध्या १६६३ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ५६ % एवढी आहे. या हिंगणी प्रकल्पाच्या पाणी साठ्यामध्ये उन्हाळा हंगामात गेल्या जलशयावरून ९५० हेक्टर इतके क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. उन्हाळा हंगामाचे कालव्याचे आवर्तनयातून १९० हेक्टर इतके क्षेत्र ओळीताखाली येऊ शकते. या प्रकल्पावर वैराग, उपळे, गौडगावासह आठ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. पुरेस पाणी असल्याने यंदा टंचाई नाही. ^मान्सूनमध्ये चांगले पाऊस झाले होते. उन्हामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. बाष्पीभवनही तीन महिन्यात २० टक्के होईल. उपलब्ध पाणी जुलै महिन्यापर्यंत पुरेल असे नियोजन केले आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा. ज्यामुळे टंचाई जाणवणार नाही. अभिषेक देसाई, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग बार्शी
जीवनातील सर्व यशाचा पाया सकारात्मक विचारांमध्ये आहे. त्यामुळे नकारात्मकतेपासून दूर राहून सकारात्मकतेकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन लेखक व प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांनी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस मुख्यालयात आनंदी जीवन आयुष्याचा आनंद उत्सव या व्यक्तिमत्व विकास विषयावरील विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात दत्तात्रय वारकड यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस निरीक्षक उमेश परदेशी, राखीव पोलीस उपनिरीक्षक विजय भोसले तसेच विविध पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सध्याच्या धावपळीच्या व स्पर्धात्मक युगामध्ये मानव आपले अस्तित्व टिकवण्यासाठी सतत धडपड करत आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती, डिजिटल युग, एआय आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव यामुळे जीवन अत्यंत वेगवान झाले आहे. मात्र या वेगवान जीवनशैलीत मनःशांती, समाधान आणि आनंद लोप पावत चालल्याचे वास्तव आहे. अशा परिस्थितीत मानसिक सुख, शांती आणि आनंदी जीवन कसे जगावे, याविषयी वारकड यांनी मार्गदर्शन केले. समाजात कायदा व सुव्यवस्था राखताना पोलीस अधिकारी व कर्मचारी तन, मन आणि धन अर्पण करून कार्यरत असतात. या जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना ताणतणाव, मानसिक दडपण आणि कुटुंबासाठी वेळ न मिळण्यासारख्या अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी संयम, सकारात्मकता आणि शांत मन ठेवणे किती आवश्यक आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला. रात्री झोपण्यापूर्वी व सकाळी उठल्यानंतर १५ ते २० मिनिटे सकारात्मक वाचन केल्यास जीवनाकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक बनते. आपण आज जे काही आहोत ते आपल्या विचारांमुळेच आहोत असे स्पष्ट करत त्यांनी विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. विचार जीवनावर आणि कल्पना जगावर राज्य करतात असे सांगत त्यांनी विमान, दूरध्वनी, मोटार वाहन यांसारख्या शोधांचे मूळ विचारांमध्येच दडलेले असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी राखीव पोलीस उपनिरीक्षक विजय भोसले यांनी दत्तात्रय वारकड यांचा सन्मान करून उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगड येथे उभारण्यात येत असलेल्या ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या मंदिराच्या बांधकामाला भाविकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरातून देणग्यांचा ओघ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नांदूर निंबादैत्य येथील दहिफळे कुटुंबीयांनी तब्बल २२ लाख २२ हजार २२२ रुपयांची रोख स्वरूपात देणगी देऊन मंदिराच्या कामाला हातभार लावला आहे. भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी मंदीर बांधकामासाठी भाविकांना केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत शहादेव पंढरीनाथ दहिफळे यांनी ११ लाख ११ हजार १११ रुपये, तर त्यांचे चुलत बंधू नारायण दहिफळे यांनीही तितकीच रक्कम देणगी स्वरूपात अर्पण केली. या दोन्ही देणग्यांचा मिळून एकूण २२ लाख २२ हजार २२२ रुपयांचा निधी मंदिर उभारणीसाठी प्रदान करण्यात आला. नुकतेच महंत नामदेव महाराज शास्त्री नांदूर निंबादैत्य येथे भेटीवर आले असता दहिफळे कुटुंबीयांनी ही देणगी त्यांच्या हस्ते रोख स्वरूपात सुपूर्द केली. यावेळी गावातील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवानगड हे राज्यातील एक महत्त्वाचे धार्मिक व आध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते. येथे उभारण्यात येणारे ज्ञानेश्वर माऊली महाराजांचे मंदिर भविष्यात भाविकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. मंदिराचे काम सध्या प्रगतीपथावर असून भाविकांच्या सहकार्यामुळे या कामाला वेग मिळत आहे. दहिफळे कुटुंबीयांनी केलेल्या या देणगीमुळे धार्मिक कार्याला मोठी चालना मिळाली असून त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अशा प्रकारच्या देणग्यांमुळे मंदिर उभारणीचे स्वप्न लवकरच साकार होण्यास मदत होणार असल्याचे मत महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले. यावेळी भाविक उपस्थित होते.
युवकांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना लुबाडणाऱ्या एका महिलेसह दोन तरुणींच्या टोळीला कोपरगाव तालुका पोलिसांनी जेरबंद केले. आरोपी महिला युवकांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून दोन-तीन लाख रुपये घ्यायच्या. तसेच सोने-चांदीचे दागिने घ्यायचे. एका दोन दिवस राहायचे. त्यानंतर संधी मिळताच पळून जायचे. अशा प्रकरणाशी संबंधित एका प्रकरणी तालुक्यातील रवंदा येथील तक्रार कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. प्रकरणाचा तपास करत असताना कोपरगाव तालुका पोलिसांनी युवकांना लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका महिलेसह दोन तरुणींना जेरबंद केले, तीन आरोपी फरार झाले. तालुक्यातील रवंदा येथील युवकाचे लग्न झाले आणि दोनच दिवसात नवीन नवरी पसार झाली. फसवणूक झाल्याचे लक्षात येतात नवऱ्या मुलाने कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली होती. २१ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान रवंदे गावातील फिर्यादींची कशीष सुकदेव भालेराव, न्रमता सुकदेव भालेराव, भूमी किरण निकम (सर्व रा. जत्रा चौक, आडगाव नाका, ता. जि.नाशिक), अशोक तान्हाजी काळे, वनिता अशोक काळे (दोन्ही रा आंगणगाव ता. येवला), गोकुळ चिंदा पानकर (रा. मदरतेरेसा चौका जवळ, नाशिक) यांनी करुन लग्नाचे अमिष दाखवून २ लाख २९ हजार रुपये रोख रक्कम, सोने व चांदीचे दागिने घेऊन फसवणूक केली होती. फिर्यादीवरुन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे १८ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत असताना, आरोपी क्रमांक १ ते ३ यांचा आडगाव नाका,जि.नाशिक येथे तपास केला असता, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपींना न्यायालयात हजर करुन त्यांची पोलिस कोठडी रिमांड घेण्यात आली होती. या आरोपींना पोलीस कोठडी दरम्यान गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता, आरोपींनी संगनमताने खोटे लग्न लावून फसवणूक केल्याची माहिती दिली. आरोपींनी गुन्ह्यातील फसवणूक करुन अपहार केलेले रोख रुपये, सोने व चांदीचे दागिने काढून दिले. ही कारवाई कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे निरीक्षक संदिप कोळी, पोना. आर. ओ. कारखेले, मपोकॉ. ज्योती रहाणे, हेड कॉन्स्टेबल अनिता वलवे, कॉन्स्टेबल जयदीप गवारे, कॉन्स्टेबल अंबादास वाघ, अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, श्रीरामपुर (मोबाईल सेल) येथील हेड कॉन्स्टेबल संतोष दरेकर, सचिन धनाड, राम वेताळ यांनी केली. लग्नाचे खोटे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळ्या सक्रीय लग्नासाठी मुलगी शोधत असलेल्या तरुणांना हेरुन त्यांना लग्नाचे खोटे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळ्या सक्रीय आहेत. कोपरगाव पोलिसांनी पकडलेली ही टोळी सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. लग्नाळू तरुणांचे लग्न लावून लग्नानंतर सोने, चांदीचे ऐवज घेवून पोबारा करणारी टोळी काही महिन्यांपूर्वी श्रीगोंदे पोलिसांनी जेरबंद केली होती. कोपरगावातही यापूर्वी असे गुन्हे दाखल आहेत.
तालुक्यातील गवळीवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थी मेळावा, शालेय पूर्वतयारी मेळावा आणि ‘आनंदी बाजार’ या उपक्रमांचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या निमित्त शाळेचा परिसर माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींनी आणि विद्यार्थ्यांच्या उत्साहाने भारावून गेला होता. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता प्रतिमापूजन व स्वागत गीताने झाली. माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. ‘आठवणींचा कट्टा’ या विशेष सत्रात अनेकांनी भावनिक होत मनोगत व्यक्त करत शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेला ‘बाल आनंद बाजार’ उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. विद्यार्थ्यांनी उभारलेल्या विविध स्टॉल्समुळे परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी डॉ. महेश भालेराव यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी १ हजार रुपयांची देणगी देत सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या या योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये अनिलराव मडके, राजेंद्र खंडागळे, वाय. डी. कोल्हे, प्रकाश खंडागळे, महेश भालेराव, आप्पा गिरम आणि प्रदीप गवळी यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन मुक्ता कृष्णा बारगजे, मदन जाधव आणि सहकारी शिक्षकांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी ठरला. मराठी शाळा, उद्याचा उज्ज्वल काळ आणि संस्कृतीची जपणूक, आपली मराठी शाळा या घोषवाक्यांचा प्रत्यय या कार्यक्रमातून आला. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समित व ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
पारनेर शहरातून जाणाऱ्या गणपती फाटा ते हिंद चौक (पानोली फाटा) दरम्यान झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसे रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावावे या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शहरातील खालच्या वेशीजवळ तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले.रस्त्याची झालेली चाळण,त्यामुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी,छोटे-मोठे अपघात तसेच उखडलेल्या रस्त्यामुळे शहरात गेल्या वर्षभरापासून असलेले धुळीचे साम्राज्य यामुळे त्रस्त झालेले पारनेरचे नागरिक आंदोलनादरम्यान आक्रमक झाले होते. १ एप्रिल पासून रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यापूर्वी होणारे सर्वेक्षण सुरू करण्यात येईल, असे आश्वासन संबंधित कामाच्या ठेकेदार कंपनीतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुबोध वसईकर यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.आंदोलनादरम्यान वाहतूक ठप्प झाली होती.आंदोलन संपल्यानंतरही सुमारे एक तास विस्कळित झाली होती. आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जून भालेकर, बाजार समितीचे संचालक रा.या.औटी,राष्ट्रवाद ीच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.बाळासाहेब कावरे,पाणी पुरवठा समितीचे सभापती योगेश मते,माजी नगराध्यक्ष विजय औटी, नितीन आडसुळ, बाळासाहेब मते, नगरसेवक अशोक चेडे, भूषण शेलार,दत्ता आंबुले,शिरीष शेटीया,चंदन भळगट,उद्योजक राजू औटी,पांडुरंग खोडदे,शंकर नगरे, विठ्ठल औटी,विजय डोळ,चंद्रकांत कावरे,सखाराम औटी,पत्रकार विनोद गोळे,भगवान गायकवाड, ॲड गणेश कावरे आदी सहभागी झाले होते. गेल्या वर्षभरापासून हिंद चौक ते क्रीडा संकुल आणि गणपती फाटा या प्रमुख मार्गांची अवस्था खराब झाली आहे. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने वाहनचालक व पादचारी त्रस्त झाले आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही दखल न घेतल्याने नागरिकांनी अखेर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आंदोलकांनी रस्ता अडवत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनात मोठ्या संख्येने महिला व युवकही सहभागी झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुबोध वसईकर व राजपथ इन्फ्रा कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र चव्हाण यांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेतली. आंदोलकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत,लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय रस्ता मोकळा करणार नाही,अशी भूमिका घेतली. शहरातील खड्डे तातडीने डांबर टाकून बुजवण्यात येतील, नवीन रस्त्यांसाठी आवश्यक सर्वेक्षण १ तारखेपासून सुरू होईल, पुढील १५ दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करून कामाला गती दिली जाईल असे आश्वासन उपविभागीय अभियंता वसईकर यांनी ठेकेदार कंपनीच्या वतीने दिले. प्रत्यक्ष काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन १ एप्रिल पासून प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही,तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.दरम्यान आंदोलन शहरातील रस्त्यांबाबत असताना राजपथ कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक चव्हाण मात्र इतर गावांचा मुद्दा उपस्थित करत असल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. आंदोलन शहरासाठी आहे, त्यावरच बोला,असे खडसावत नागरिकांनी प्रकल्प व्यवस्थापकांना धारेवर धरले.
विज्ञान, श्रध्दा, अंधश्रद्धा, कर्मकांड, धार्मिक आणि अध्यात्मिक हे वेगवेगळे विषय आहेत. मी आणि अध्यात्म यामधील इगो हा मोठा अडथळा आहे. आपले देव आणि गुरू यांच्याबद्दल भीती नव्हे तर आदर, आपलेपणा, प्रेम वाटले पाहिजे. देवांशी आणि गुरूंशी आपल्याला मनमोकळेपणाने बोलता आले पाहिजे. मार्गदर्शन घेता आले पाहिजे, असे मत सतीश फडके यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंदॠषिजी महाराजांच्या ३४ व्या पुण्यस्मृतीदिनानिमित ्त आनंदधाममध्ये आयोजित भगवान महावीर व्याख्यानमालेचे व्दितीय पुष्प गुंफताना तुमचे आमचे अध्यात्म या विषयावर ते बोलत होते. स्वागत सपना कटारिया यांनी केले. प्रा.प्रसाद बेडेकर यांनी वक्त्याचा परिचय करून दिला. इमरतबाई मुनोत आणि राहुल मुनोत (नेवासावाला) यांच्या हस्ते वक्त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सिमा मुनोत, सुरेश कटारिया आदी उपस्थित होते. फडके म्हणाले, विज्ञान, श्रध्दा, अंधश्रद्धा, कर्मकांड, धार्मिकता या पलिकडे अध्यात्मिक व्यक्ती असते. धार्मिकतेच्या आणि श्रध्देच्या नावाखाली कर्मकांड करणारे अध्यात्मिक नव्हेत. काही गुरू- सद् गुरू आपल्या शिष्यांना कर्मकांडातच रमवतात. सत्संग शुध्द ज्ञानापर्यंत नेणारा पाहिजे. आपल्या पूर्वापार चालत आलेल्या रूढी, परंपरा आणि कर्मकांड यामध्ये गैरसमजच खूप आहेत. आजच्या खोट्यांच्या बाजारात सर्वसामान्यांना नेमके खरे काय? तेच कळत नाही. मला सगळे कळते ही महाचूक असते. जे चुकते ते मान्य करणे ही अध्यात्माची पहिली पायरी. आपण कोण? याचे उत्तर शांतपणे पाहिले पाहिजे. ईश्वर प्राप्ती हा मुख्य उद्देश समोर ठेवून प्रपंच नेटका केला की, मग परमार्थ साधावा. संन्यास घेऊन लवकर ईश्वर प्राप्ती करता येईलच, असे नाही! प्रापंचिक माणूस लवकर अध्यात्मिक होऊन ईश्वर प्राप्ती पर्यंत पोहोचतो. संसारात जो राहू शकला तो अध्यात्मिक होण्याची फुल गॅरंटी असते. ईश्वर प्राप्तीसाठी संन्यास घेण्याची गरज नाही. आपल्या तक्रारी घेऊन सद् गुरूंकडे जावू नका. आपल्या संसाराची ओझी सद् गुरूंवर टाकू नका. सद् गुरूंचा उपयोग प्रापंचिक समस्यांची सोडवणूक करून घेण्यासाठी न करता अध्यात्मिक उन्नतीसाठी करा, असे आवाहन फडके यांनी केले. आभार संतोष गांधी यांनी मानले.
शहराजवळील मुंबई–आग्रा महामार्गावरील सीएनजी पंपावर सध्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पंपापासून महामार्गापर्यंत वाहनांची रांग पोहोचत असल्याने वाहतुकीवर परिणाम होत असून वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यातच विल्होळी येथील सीएनजी पंपावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने इगतपुरीवरील ताण आणखी वाढला आहे. परिणामी नाशिक, सिन्नर, त्र्यंबक, कसारा आदी भागांतून मोठ्या संख्येने वाहनचालक आणि रिक्षाचालक इगतपुरीत सीएनजी भरण्यासाठी येत आहेत. इगतपुरीतील सीएनजी तुटवड्यामुळे विशेषतः रिक्षाचालक आणि छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. रोजंदारीवर चालणाऱ्या वाहनचालकांना तासन्तास रांगेत थांबावे लागत असल्याने त्यांच्या फेऱ्या कमी होत आहेत. काही जण महागडे इंधन वापरत आहेत, तर काहींनी तात्पुरते वाहन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात भरीव योगदान देण्याचे भाग्य बोटावर मोजता येणाऱ्या कुटुंबांनाच लाभते. असे भाग्य असणारे डॉ. जे. डी. पवार यांच्या कुटुंबाने बांधलेल्या नागरी शैलीतील गुरुदेव दत्त मंदिर परिसरातील भाविक भक्तांना प्रेरणा देत राहील, असा उपदेश गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केला. तालुक्यातील मानूर येथे गुरुदत्त शिक्षण संस्थेच्या आवारात डॉ. जे. डी. पवार यांनी स्वखर्चाने बांधलेल्या गुरुदेव दत्त मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमप्रसंगी अण्णासाहेब मोरे यांनी उपस्थित राहून भाविकांना उपदेश केला. व्यासपीठावर मीनाक्षी पवार, शैलेश पवार, चैताली पवार, प्राचार्य बी. एन. शिंदे उपस्थित होते. पुढे बोलताना गुरुमाऊली मोरे म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीत आध्यात्मिक क्षेत्राला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र, या अध्यात्माला ज्ञानाची जोड देण्यासाठी शैक्षणिक संस्थेच्या आवारात अर्धा एकर जागेत, गुरुदेव दत्ताचे प्राचीन शैलीतील भव्य दिव्य आकर्षक मंदिर उभारून विद्यार्थ्यांसाठी आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासोबतच आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचे काम सुरू केले आहे. मंदिरातील परिसर अतिशय शांत आणि अध्यात्मासाठी, ध्यान धारणा करण्यासाठी खूप छान झाला असून, इथे आल्याने मनशांती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. जे. डी. पवार यांनी त्यांना गुरुदेव दत्ताची मूर्ती देवून सन्मानित केले. प्राचार्य बी. एन. शिंदे यांनी प्रास्तविक केले. शैलेश पवार यांनी आभार मानले. यावेळी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरसूल पोलिस ठाण्याच्या पुढाकारातून आयोजित रोजगार मेळाव्यात ४२९ युवक-युवतींनी सहभाग नोंदवला असून त्यापैकी १९५ जणांना जागेवरच नोकरीची ऑफर देण्यात आली. ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही मोठी संधी ठरली आहे. नाशिक ग्रामीण पोलिस हरसूल आणि शासनमान्य प्लेसमेंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस ठाण्याच्या आवारात हा मेळावा पार पडला. आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई आणि जळगाव येथील सुमारे ३३ नामांकित कंपन्यांनी सहभाग घेत एकूण १५०० रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या. मेळाव्यात उपस्थित ४२९ उमेदवारांपैकी ३१० जणांची प्राथमिक निवड करण्यात आली. त्यापैकी १९५ उमेदवारांना ऑन-द-स्पॉट ऑफर लेटर देण्यात आले. निवड झालेल्या उमेदवारांना २५ हजार रुपयांपर्यंत वेतनाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या उपक्रमासाठी सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी, गृह रक्षक दलाचे जवान, पोलिस पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. हरसूल परिसरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावा पार पडल्याने समाधान व्यक्त होत आहे.
परधाडीमध्ये कुरडया बनविण्याची लगबग सुरू:कडकउन असल्याने महिला बनवतायेत विविध टिकाऊ खाद्यपदार्थ
उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामीण भागात पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. नांदगाव तालुक्यातील परधाडी गावात सध्या महिलांकडून कुरडया बनविण्याचे काम मोठ्या उत्साहात सुरू आहे. उन्हाळ्यातील कडक उन्हाचा फायदा घेऊन वर्षभर टिकणाऱ्या कुरडया तयार करण्याची परंपरा आजही जपली जात आहे. गावातील गल्लीबोळांत महिला सकाळी लवकर एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने कुरडया बनवताना दिसत आहेत. या प्रक्रियेमुळे महिलांमध्ये एकोपा वाढतो तसेच कामही जलद गतीने पूर्ण होते. कुरडया तयार करण्यासाठी साधारणपणे एका पायलीचे (सुमारे ७ किलो) गहू घेतले जातात. या प्रमाणातून तब्बल १५० कुरडया तयार होतात, अशी माहिती स्थानिक महिलांनी दिली. कुरडया तयार करण्याची प्रक्रिया मेहनतीची आहे. प्रथम गहू तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवले जातात. चौथ्या दिवशी त्याचे पीठ तयार करून लाकडाच्या चुलीवर शिजवले जाते. त्यानंतर तयार मिश्रणापासून कुरडया बनवून त्या उन्हात वाळविल्या जातात. कडक उन्हामुळे त्या लवकर वाळून टिकाऊ बनतात. विशेष म्हणजे, शेतातील गव्हाची कापणी झाल्यानंतर घरच्या गव्हापासूनच कुरडया तयार केल्या जातात. त्यामुळे त्या अधिक चविष्ट आणि पौष्टिक मानल्या जातात. वर्षभर या कुरडया तळून स्वयंपाकघरात वापरल्या जातात. उन्हाळा म्हणजे केवळ उष्णतेचा त्रास नव्हे, तर पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्याचा काळ असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित होते. ग्रामीण भागातील या उपक्रमामुळे परंपरा जिवंत राहते. कुरडयांची परंपरा आजही अखंडित कायम आहे. प्रत्येक कुरडई बनवण्यासाठी लागणारे कष्ट आणि काळजी उल्लेखनीय असून, घरच्या स्वयंपाकघरात भाजी बनवताना किंवा तळताना त्या केवळ चविष्टच नाहीत तर पोषकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. - संगिता गायकवाड, गृहिणी
तालुक्यातील खंबाळा सबस्टेशनवर असलेल्या ८ गावांतील थ्री-फेज वीजपुरवठ्यात १५ दिवसांपासून व्यत्यत येत आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही वीज नसल्याने पिके वाचवता येत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेत खंबाळा सबस्टेशनला कुलूप ठोकत दोन तास आंदोलन केले. आंदोलनाची तीव्रता पाहून प्रशासन हलले आणि नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी सकाळी महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात खंबाळा सबस्टेशनवर संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल दोन तास कुलूप ठोकत आंदोलन केले. या वेळी सबस्टेशनमधील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प करण्यात आला होता. नामका कालव्याला आवर्तन सुटल्याने पाणी उपलब्ध असतानाही वीज नसल्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी संतापले होते. पिंपळगाव, डवाळा, किरतपूर, बेलगाव, सुराळा व घायगाव या गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येत महावितरणविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. पैठण तालुक्यात ८ दिवस दिवसा तर ८ दिवस रात्री या पद्धतीने सलग ८ तास वीजपुरवठा शेतीला देण्यात येतो, असा दावा महावितरणने केला आहे. पण, आठ तासांत चार तासदेखील शेतीला सलग वीजपुरवठा होत नसल्याचे कातपूरचे शेतकरी दीपक मोरे यांनी सांगितले. बोर दहेगाव | शिवराई ३३ केव्ही फिडरवरील बोर दहेगाव, राहेगव्हाण, करंजगाव, पालखेड, गोळवाडी, बेंदवाडी, शिवराई परिसरात गेल्या १५ दिवसांपासून दिवस-रात्र वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. कमी दाबाने वीज येत आहे. लपंडावही सुरू असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले असल्याची माहिती देण्यात आली. सतत लाइट ट्रिप होणे, रात्रभर वीज खंडित राहणे आणि तासन्तास पुरवठा गायब होणे यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यामध्ये भर म्हणजे लाइनमनकडून फोनही उचलले जात नसल्याने तक्रारींचे निराकरण होत नाही, अशी माहिती पंचायत समिती सदस्य राहुल लांडे यांनी दिली. ^ वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पुढील आठ दिवसांत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून तांत्रिक अडचणी पूर्णपणे दूर केल्या जातील. शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन काम प्राधान्याने हाती घेतले आहे. -दीपक पांडव, उपकार्यकारी अभियंता, वैजापूर आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत केला जाईल पैठण तालुक्यातही आठ तास पुरवठा नावालाच शिवराई ३३ केव्हीवरील ८ गावांत विजेचा लपंडाव
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे ज्ञानेश्वर वसंत पवार यांच्या घराची पाठीमागील भिंत फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी (२३ मार्च) पहाटे उघडकीस आली. खंडाळा येथील गट नंबर ५१६ मध्ये पवार कुटुंब राहते. ज्ञानेश्वर पवार कुटुंबासह रोजच्याप्रमाणे समोरच्या खोलीत झोपले होते. पहाटे ज्ञानेश्वर पवार लाइट लावण्यासाठी मागच्या खोलीत गेले. तेव्हा घरातील वस्तू, साहित्य अस्ताव्यस्त दिसले. चोरी झाल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वर पवार यांच्या लहान मुलाचा विवाह झाला होता. कपाटातील नवविवाहितेचे बहुतांश सोन्याचे दागिने, चांदीचा ऐवज चोरट्यांनी नेला. रोख रकमेसह जवळपास दीड लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे पवार कुटुंबाने सांगितले. चोरीनंतर लग्नात आलेले नवीन साहित्य, इतर वस्तू घराच्या बाजूच्या शेतात फेकून दिल्याचे आढळले. घरमालकाचा मुलगा रवी पवार म्हणाला, पहाटे वडील मागच्या खोलीतील लाइट लावायला उठले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त दिसले. त्यांनी मला आवाज दिला. मी मागच्या खोलीत गेलो. पाठीमागची भिंत फोडलेली दिसली. भावाचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. वहिनीचे दोन चेन, आठ जोडवे, दोन सोन्याच्या नथी, पाच ग्रॅमची अंगठी, मिक्सर, इलेक्ट्रिक शेगडी अशा अनेक वस्तू चोरीला गेल्या.
पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या; आ. भुमरेंची मंत्री भरणेंकडे मागणी
तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीसह गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार विलास भुमरे यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन केली आहे. अवकाळी पावसामुळे उभ्या पिकांना मोठा फटका बसला. गहू, हरभरा, कांदा, फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गारपिटीमुळे अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे आडवी पडली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आमदार भुमरे यांनी कृषिमंत्री भरणे यांची भेट घेऊन पैठण तालुक्यातील बाधित भागांची तातडीने पाहणी करण्याची मागणी केली. कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना शेतात जाऊन पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, असेही त्यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी. शासनाने विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली. पैठण तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले, असे भुमरे यांनी सांगितले.
सिल्लोड-सोयगाव मतदारसंघामध्ये विषय पुनरीक्षण प्रक्रियेमध्ये होत असलेला विलंब, अनियमितता व राजकीय हस्तक्षेप याबाबत सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार सिल्लोड यांना भाजपतर्फे निवेदन देण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे की, सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील याद्यांच्या प्राथमिक पडताळणीमध्ये गंभीर स्वरूपाच्या अनियमितता निदर्शनास आल्या आहेत. उपलब्ध माहितीनुसार जालना, बुलढाणा, जळगाव, नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदारांची नावे त्यांच्या मूळ मतदारसंघात असतानाही ही नावे सिल्लोड मतदारसंघामध्ये सामाविष्ट करण्यात आली आहेत. एकाच व्यक्तीची नावे एकापेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये नोंद झालेली असून ही बाब जनतेचे प्रतिनिधित्व अधिनियम, १९५०मधील तरतुदीनुसार प्रतिकूल आहे. तसेच सिल्लोड शहरामध्ये अंदाजे ३ हजार ५०० व संपूर्ण तालुक्यात सुमारे १२ हजार इतके मृत मतदार असताना अशा मतदारांची नावे याद्यांमध्ये कायम असल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय विवाह झालेल्या महिलांची नावे माहेर व सासर अशा दोन्ही ठिकाणी नोंदवलेली असल्याचे मोठ्या प्रमाणात आढळून येते. तसेच परदेशी नागरिक, बांगलादेशी, रोहिंग्या यांची नावे समाविष्ट असल्याची बाब अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार ही बाब लोकशाही व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांना बाधा आणणारी आहे. आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेमध्ये संबंधित बीएलओमार्फत जाणीवपूर्वक हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येते. तसेच स्थानिक आमदार अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या प्रभावाखाली हस्तक्षेप होत असल्याबाबतचा गंभीर आरोप या निवेदनात नमूद करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक तसेच नगर परिषद येथील अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष पडताळणीमध्ये हस्तक्षेप करीत आहेत. काही प्रकरणांमध्ये बीएलओची मोबाइल व इतर उपकरणे इतरांमार्फत वापरली जात असल्याचेही समजते. परिणामी सिल्लोड शहरामध्ये केवळ सुमारे १५ टक्के तर ग्रामीण भागात ५० टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. या कामात जाणीवपूर्वक विलंब व निष्क्रियता दिसून येत आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे दुबार व बोगस मतदारांची नावे वगळण्यात येऊ नयेत, असा प्रयत्न होत असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर भाजप सिल्लोड मंडळ अध्यक्ष मनोज मोरेल्लू, किसान मोर्चाचे मकरंद कोर्डे, नगरसेवक कमलेश कटारिया यांच्यासह गणेश भूमकर, स्वप्निल शिनगारे, शामराव आळणे, मोतीराम मिसाळ, अमोल कुलकर्णी, वसीम बागवान आदी हजर होते. भाजपने दिलेले निवेदन बोगस : आमदार सत्तार या तक्रारीसंदर्भात स्थानिक आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मतदार यादी विशेष पुनरीक्षण हे संपूर्ण भारतात सुरू आहे. यात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. भाजपने दिलेले निवेदन हे बोगस असून ज्या मतदारांची नावे मतदार यादीत दुबार असतील त्यांची नावे आपोआप कमी होणार आहेत.
भोंदू कॅप्टन अशोक खरातविरोधात तक्रारदार महिलांची संख्या वाढत असून रविवारी रात्री २ महिलांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टी कार्यालयात या दोन्ही महिलांना गृह शांती, आणि भविष्याबाबत माहिती देण्याकरता बोलावून घेत गुंगीचे औषध पिण्यास देत संमोहित करून कार्यालयातच बलात्कार केल्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे. अटक झाल्यानंतर खरातला सुनावण्यात आलेल्या पोलिस कोठडीची मुदत आज (दि. २४) संपणार असून त्याला आज नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. खरात लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडिता तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. रविवारी खरातविरोधात दोन गुन्हे दाखल झाले. ३० ते ३५ वयोगटातील या तक्रारदार दोन महिला उच्चशिक्षित आहेत. एक वैद्यकीय, तर दुसरी शासकीय अधिकाऱ्याची पत्नी आहे. विधानसभेत गाजला मुद्दा; मुख्यमंत्री आज देणार निवेदन मुंबई | खरातने केलेल्या शोषणावरून विधानसभा सोमवारी प्रचंड गाजली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून मी आज (दि.२४) विधानसभेत त्यावर सविस्तर निवेदन करणार असल्याचे ते म्हणाले. खरात देशाबाहेर पळू नये यासाठी पोलिसांनी १० मार्च रोजीच ‘लूक आऊट सर्क्युलर’ जारी केल्याचे त्यांनी सांगितले. केवळ पैसा साठवला नाही तर गुंतवणूक मालमत्तेत २०२२ मध्ये ९६ लाख असलेली मालमत्ता २०२५ पर्यंत १ कोटी ८१,६५,९३१ रुपयांवर पोहोचली. या हेल्पलाइनवर करा खरातविरोधात तक्रारी ९५०३२७०२२४, ७७७५८१६३८९ खरातविरोधात तक्रार करायची असल्यास उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे, निरीक्षक राहुल मोरे यांच्या एसआयटी पथकाशी उपरोक्त क्रमांकांवर संपर्क साधावा, नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. ‘शिवनिका संस्थान’ची कोट्यवधींची झेप, आधी लाखांची तूट, मग अचानक देणग्यांचा ‘महापूर’ सचिन जैन | खरातच्या मिरगाव येथील ‘श्री शिवनिका संस्थान’च्या पाच वर्षांतील ऑडिट रिपोर्ट ‘दिव्य मराठी’च्या हाती लागला असून त्यातून एका सामान्य देवस्थानचा ‘कॉर्पोरेट’ प्रगतीपर्यंतचा चकित करणारा प्रवास उघड झाला आहे. २०२० ते २०२२ या काळात संस्थानचे उत्पन्न ४.९० लाखांवर होते. १.६० ते १.६४ लाख रुपयांची तूट होती. मात्र २०२४ मध्ये ७६ लाख ९१ हजार ४१६ रुपये उत्पन्न झाले.
सातारा जिल्हा परिषदेत शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या निवडणूकपूर्व आघाडीला बहुमत मिळाले. तरीही त्यांना बाजूला करत भाजपने पोलिस बळाचा वापर करून २० मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर कब्जा केला, असा आरोप झाला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून वाढलेली भाजप-शिंदेसेनेत सुरू असलेली धुसफूस सोमवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उफाळून आली. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचीही भर पडल्याने महायुतीत महाभारत घडले. सत्ताधारीच एकमेकांवर तुटून पडले होते. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यंत्री शिंदे एकाच आसनावर आजूबाजूला बसून परस्परांवर शरसंधान करत असल्याचे दिसले. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी साताऱ्यात मंत्री सुरक्षित नाहीत. लोकशाहीचा खून झाला आहे, असा थेट आरोप केला. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री मकरंद पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला. त्यानंतर विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे (शिंदसेनेच्या नेत्या) यांनी साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशींसह काही पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. त्याला भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांनी तीव्र आक्षेप घेतल्यावर सभापती राम शिंदे (भाजप नेते) यांनी उपसभापतींचे आदेश राखून ठेवल्याचे संकेत दिले. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. अपहरणाची तक्रार भाजपने शिवसेनेचे (शिंदेसेना) २, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ३ सदस्य फोडले. एका अपक्षाचा पाठिंबा मिळवला. ऐन मतदानापासून काही तास आधी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदस्य दिनकर शिंदे यांचे अपहरण केल्याच्या तक्रारीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचेच अनिल देसाई, संदीप मांडवे यांना ताब्यात घेतले होते. भाजपचा शिंदेसेनेला स्पष्ट संदेश या वादाच्या माध्यमातून भाजपने शिंदेसेनेला स्पष्ट संकेत दिले की, उपमुख्यमंत्री शिंदेंचा मूळ जिल्हा सातारा असो किंवा संपूर्ण महाराष्ट्र, सत्ता नेमकी कशी चालेल याचा निर्णय केवळ भाजपच घेईल. भाजपला डावलून सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न झाला, तर तो यशस्वी होऊ दिला जाणार नाही. शिवेंद्रराजे पडद्यामागचे खरे सूत्रधार साताऱ्यात भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंनी सर्व कारवाई केल्याचे दिसते. प्रत्यक्षात साताऱ्याची खडान्खडा माहिती असलेले मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी पडद्यामागून सूत्रे हलवली. त्यांनी पूर्ण रणनीती तयार केली होती. त्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी बळ पुरवल्याने सातारा जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आली.
शिर्डी येथे साईबाबा संस्थानकडून २५ ते २७ मार्चदरम्यान ११५वा रामनवमी साजरा होणार आहे. या उत्सवासाठी संस्थानने तब्बल १ लाख ६६ हजार ५५० भक्तमंडळ सभासदांना निमंत्रण पत्रिका पाठवल्या आहेत. सुमारे २ लाख देणगीदार साईभक्तांना एसएमएस व ई-मेलद्वारे आमंत्रित केले आहे. या उत्सवासाठी ९५ पालख्यांची नोंदणी झाली आहे. यंदा सुमारे ३ लाख भाविक येण्याचा अंदाज आहे, गेल्या वर्षी अडीच लाख भाविक रामनवमी उत्सवासाठी आले होते. रामनवमी उत्सव काळात शिर्डीत मोठी गर्दी अपेक्षित असल्याने मंदिर परिसरात सुमारे ७५ हजार चौ.फूट मंडप उभारले. भाविकांच्या निवासासाठी साईभक्तनिवास (५०० खोल्या) आणि साईधर्मशाळेत ३७ हजार ५०० चौ.फूट अतिरिक्त कापडी मंडप उभारले आहेत. यात पाणी, वीज, स्वच्छता व सुरक्षा यांची व्यवस्था केली आहे. या वर्षी ९५ पालख्यांची नोंदणी झाली आहे. मुंबई ते शिर्डी मार्गावर कळमवाडी, घोटी, सिन्नर, पांगरी आदी ठिकाणी एकूण १ लाख १२ हजार चौ.फूट मंडप उभारून पदयात्रेकरूंना निवाऱ्याची सोय केली आहे. तसेच १० पाण्याचे टँकर मोफत उपलब्ध केले आहेत. उत्सवादरम्यान कीर्तन, भजन, पालखी व रथ मिरवणुका तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. साईभक्तांनी उत्सवात सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे. विमानतळ, रेल्वे प्रवासालाही भाविकांनी पसंती दिली असल्याने दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद आदी ठिकाणांहून येणाऱ्या व जाणाऱ्या विमानांचे बुकिंग पूर्ण झाले आहे. भक्तांच्या कपाळी अष्टगंध लावण्यासाठी माजी विश्वस्त सचिन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ सज्ज आहेत. २.५० लाखांवर भाविकांना मोफत प्रसादाची व्यवस्था... रामनवमीनिमित्त भाविकांसाठी उदी व बुंदी पाकीटे प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे . गतवेळी दोन लाख भाविकांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. यंदा २.५० लाखांवर भाविकांना मोफत भोजन प्रसादाची व्यवस्था. प्रसादालय सज्ज, पुरेसा गॅससाठा, पर्यायी इंधनाचाही होतोय वापर साई प्रसादालय पूर्ण क्षमतेने सुसज्ज केले आहे. पुरेसा गॅस साठा, पर्यायी इंधन व्यवस्था आणि मनुष्यबळ उपलब्ध ठेवले आहे.उत्सव काळात भाविकांना चहा, नाश्ता आणि जेवणाची गैरसोय होऊ नये यासाठी श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. सुरक्षेसाठी पोलिस, बॉम्बशोधक पथक व द्रुत कृती दलसुरक्षेच्या दृष्टीने पोलिस, संस्थान सुरक्षा, बॉम्ब शोधक पथक व द्रुत कृती दल तैनात राहील. साई संस्थान व पोलिस प्रशासनाकडून १००० पेक्षा अधिक सुरक्षा कर्मचारी तीन शिफ्टमध्ये तैनात करण्यात आले आहे.
चंद्रपूरच्या किडनी रॅकेटचा मुख्य आरोपी असलेल्या डॉक्टरला छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुणाने ५ लाखांत किडनी विकल्याची माहिती ‘दिव्य मराठी’ला मिळाली. ‘किडनी डोनर’ ग्रुपच्या जाळ्यात ‘तो’ अडकला होता. ‘दिव्य मराठी’ने स्टिंग करत सोशल मीडियावर ४८ पेक्षा अधिक ‘किडनी डोनर ग्रुप’ असल्याची धक्कादायक माहिती पुढे आणली आहे. ग्रुपला संपर्क साधताच हैदराबादेतील तिघांनी ५ लाखांत किडनी विकत घेण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे अवैध किडनी रॅकेटचे धागेदोरे हैदराबादेतही असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, या संदर्भात विभागीय अवयव दान कक्षाचे माजी प्रमुख डॉ. सुधीर कुलकर्णी म्हणाले, ‘किडनी फक्त दान करता येते, विकता येत नाही. अशा रॅकेटपासून लोकांनी सावध राहावे. यावर पोलिस कारवाई करू शकतात. आम्हाला त्यांच्यावर कारवाईचे अधिकार नाहीत.’ बिहार, तामिळनाडू, हैदराबाद बंगालमध्ये रॅकेट : गरीब, गरजूंचा शोध घेत त्यांची बेकायदेशीरपणे किडनी काढली जाते. तामिळनाडूसह हैदराबाद, प. बंगाल, कोलकाता, बिहार, दिल्लीतील दलाल सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ४८ पेक्षा अधिक डोनर ग्रुप किडनी डोनर ग्रुप } किडनी डोनर्स ग्रुप } इंडियन किडनी ट्रान्सप्लांट ग्रुप } किडनी डोनर्स } किडनी डोनर्स ग्रुप हैदराबाद } किडनी डोनर्स ग्रुप इंडिया } इंडिया किडनी अँड लिव्हर डोनर या नावाने सोशल मीडियावर ४८ पेक्षा अधिक ग्रुप असल्याचे ‘दिव्य मराठी’ने शोधून काढले. २०२४ मध्ये एका युवकाची किडनी काढून ५ लाख दिले संभाजीनगरचा नरेश (नाव बदलले) कर्जबाजारी होता. त्याने ग्रुपवर मेसेज केला. एजंटने त्याच्याशी संपर्क साधला. तामिळनाडूच्या त्रिची शहरात त्याला बोलावले. ८ लाख सांगून सप्टेंबर २०२४ मध्ये त्याची किडनी काढली. नंतर त्याच्या खात्यात ५ लाख जमा केले. उर्वरित रक्कम अद्यापही दिली नाही. खोटी पद्धत 1 ग्रुपवर मेसेज करणाऱ्या डोनरला आधी फेक आयडीवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.2 व्हर्च्युअल कॉलने रक्तगट, वय विचारतात. ५ लाखांचा दर ठरतो. सर्जरीचे खर्च ते करतात.3 भेटीत सर्जरीची तारीख ठरते. तेथील स्टे, येणे-जाणे, औषधोपचाराचा खर्चाची हमी घेतात. खरी पद्धत 1 नोंदणीनंतर युरिन, रक्तगट, मेडिकल हिस्ट्री तपासणी तसेच समुपदेशन केले जाते.2 कुटुंबीयांच्या संमतीनंतर विभागीय समितीद्वारे पैशांचा व्यवहार झाला नसल्याची खात्री होते.3 वय,ओळख, निवासाचा पुरावा घेऊन डोनरची शस्त्रक्रिया होते. ७ दिवसांत सुटी होते. 1. सर्जरीचा खर्च करूदलाल : रक्तगट कोणता ?प्रतिनिधी : A+ आहे.दलाल : मी हैदराबादच्या रुग्णालयातील कर्मचारी आहे.प्रतिनिधी : पैसे किती मिळतील?दलाल : आत्ताच नाही हैदराबादला आल्यावर सांगू, खर्च हॉस्पिटलतर्फे केला जाईल. प्रतिनिधी : पैसे कधी मिळतात?दलाल : ओटीत जाण्यापूर्वी. 2.आधार कार्ड पाठवादलाल : तुम्ही स्वत: डोनर आहात की दलाल आहात?प्रतिनिधी : नाही, डोनर आहे.दलाल : तुमचे शहर कोणते आहे. रक्तगट कोणता आहे?प्रतिनिधी : पुणे, रक्तगट A+दलाल : ५ लाख रुपये देऊ.आधार आणि फोटो पाठवा.प्रतिनिधी : थोडे आणखी वाढवा.दलाल : एवढेच पैसे मिळणार. 3.आरोग्याची गॅरंटीदलाल : तुमचे वय, रक्तगट आणि तुम्ही कुठे राहता?प्रतिनिधी : पुण्यात राहतो. रक्तगट A+ असून वय ३७ आहे.दलाल : प्रवास अन् राहण्याचा खर्च आम्ही करू. ५ लाख देऊ.प्रतिनिधी: जीवास धोका असेल?दलाल : नाही, आमचे हॉस्पिटल चांगले आहे. भविष्यातही अडचण येणार नाही याची गॅरंटी असते.
आयुर्वेदिक कॉलेजातील 19 विद्यार्थिनींचे निलंबन:रॅगिंगमुक्त कॅम्पससाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये
राज्यातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला कलंक ठरणाऱ्या रॅगिंगच्या घटनांना चाप लावण्यासाठी राज्य सरकारने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. नागपूर येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाविद्यालयीन अँटी रॅगिंग समितीच्या चौकशी अहवालाच्या आधारे १९ दोषी विद्यार्थिनींना तीन महिन्यांसाठी वसतिगृहातून निष्कासित करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. नाशिक विद्यापीठ देशात तिसऱ्या क्रमांकावर; मंत्र्यांची कबुली आमदार सुधीर मुनगंटीवार, मोहन मते आणि डॉ. नितीन राऊत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ यांनी धक्कादायक आकडेवारी सादर केली. सोसायटी अगेन्स्ट व्हायोलन्स इन एज्युकेशन आणि यूजीसीच्या अँटी रॅगिंग हेल्पलाइनच्या माहितीनुसार, २०२२ ते २०२४ या काळात रॅगिंगच्या तक्रारींच्या बाबतीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक) देशात तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहे. सन २०२५ मध्ये नॅशनल अँटी रॅगिंग पोर्टलवर या विद्यापीठाच्या संदर्भात २७ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ३ तक्रारी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या होत्या. रॅगिंग रोखण्यासाठी नॅशनल मेडिकल कमिशनने ११ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केलेल्या नवीन नियमावलीची राज्यात तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने १२ ऑगस्ट २०२५ रोजी परिपत्रक काढून सर्व महाविद्यालयांना “इन्स्टिट्युशनल मेकॅनिझम’ अधिक सक्षम करण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ विद्यार्थिनींकडून कनिष्ठांचा छळ डिसेंबर २०२५ मध्ये नागपूरच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात रॅगिंगची घटना घडली होती. वरिष्ठ विद्यार्थिनींकडून छळ होत असल्याची तक्रार कनिष्ठ विद्यार्थिनींनी केली होती. या प्रकरणाची विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावर तातडीने दखल घेण्यात आली. चौकशीअंती रॅगिंग सिद्ध झाल्याने १९ विद्यार्थिनींवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.
वडिलांनी मोबाइल चेक केल्याने मुलीची आत्महत्या:पुण्यातील घटना, 16 वर्षीय मुलीने विष घेतले
वडिलांनी मोबाइल चेक केल्याच्या कारणावरून एका १६ वर्षीय मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना जाधववाडी, चिखली येथे घडली. प्रतीक्षा अनिल गायकवाड (१६, रा. जाधववाडी, चिखली) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्च रोजी प्रतीक्षाचा मोबाइल तिच्या वडिलांनी तपासला. मात्र, त्यामध्ये आक्षेपार्ह असे काहीच आढळून आले नाही. वडिलांनी आपला मोबाइल तपासल्यामुळे आलेल्या नैराश्यातून प्रतीक्षाने त्याच दिवशी रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरात विष प्राशन केले. ही बाब तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच तिला त्वरित जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान रविवारी (२२ मार्च) रात्री तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिखली पोलिस सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे सांगण्यात आले. नैराश्यातून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी येथील अंकुर कॉलनी परिसरात एका तरुणाने नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (२३ मार्च) सकाळी उघडकीस आली. सचिन नागनाथ रसाळ (२०, रा. अंकुर कॉलनी, रहाटणी) असे मृत तरुणाचे नाव आहे. काळेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सचिन याच्या मैत्रिणीने काही दिवसांपासून त्याच्याशी बोलणे बंद केल्याने तो नैराश्यात गेला होता. त्यातूनच त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना उघड झाली आहे. काळेवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.
दुधामध्ये पाण्याची आणि घातक पदार्थांची भेसळ करून लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध आता “मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिले. अंधेरीतील दूध भेसळ प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर मंत्र्यांनी संबंधित घोषणा सभागृहात केली. आमदार मनीषा कायंदे यांनी अंधेरीतील भेसळयुक्त कारवाईच्या अनुषंगाने राज्याच्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध व सुरक्षित दूध पुरवठा होणे आवश्यक असताना मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्री झिरवाळ यांनी मुंबईतील कारवाईविषयी उत्तर देताना सांगितले की, वर्सोवा पोलिस ठाण्याच्या पथकासह ७ ठिकाणी छापा टाकला असता दूध भेसळीचा प्रकार उघड झाला. त्या वेळी निदर्शनास आले की, अमुल आणि गोकुळ ब्रँडमध्ये भेसळ झाल्याचे समोर आले. यात दूध भेसळीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले. तसेच या प्रकरणात १४ जणांना अटक करून ४ जणांना तडीपार करण्यात आले आहे. आमदार भाई जगताप आणि अनिल परब यांनी या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. हा केवळ भेसळीचा प्रकार नसून लोकांच्या जिवाशी खेळ आहे. हे संघटितपणे सुरू असेल तर सरकार दोषींना मकोका का लावत नाही ? तुम्ही अधिकाऱ्यांना वाचवत आहात का? असा संतप्त सवाल सदस्यांनी विचारला. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर मंत्री झिरवाळ यांनी मकोकांतर्गत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनातील रिक्त पदांच्या मुद्द्यावरही मंत्र्यांनी माहिती दिली. प्रशासनात सध्या मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. एकूण २५४४ पदांची गरज असताना १२७३ पदे रिक्त आहेत. या पदभरतीची फाइल वित्त विभागाकडे पाठवण्यात आली आहे. त्रुटी दूर करून लवकरच नवीन आकृतिबंधानुसार ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अलीकडेच १९७ जणांची भरती झाली असून त्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले असल्याचे त्यांनी या वेळी बोलताना सांगितले आहे. भेसळखोरांवर वचक बसेल ‘मकोका’ मुळे दूध भेसळ ही केवळ भेसळ न राहता ‘संघटित गुन्हेगारी’मानली जाईल. यामुळे आरोपींना सहजासहजी जामीन मिळणार नाही आणि दोषसिद्धी झाल्यास जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. गुन्हेगारांच्या मालमत्ता जप्त होऊन रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणे पोलिसांना सोपे होईल, ज्यामुळे अशा जीवघेण्या धंद्यांवर वचक बसून सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राहील. आरोपींना आता सहजासहजी जामीन मिळणार नाही, ज्यामुळे तपासात अडथळे येणार नाहीत. दोषसिद्धी झाल्यास गुन्हेगारांना थेट जन्मठेपेपर्यंतच्या कठोर कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे भेसळघोखारांची आता खैर राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. दूध उत्पादनात ६३.८ टक्क्यांची वाढ आर्थिक पाहणी अहवालानुसार, महाराष्ट्रातील दूध उत्पादन सन २०१५-१६ मधील सुमारे १०१.५२ लाख मेट्रिक टनांवरून वाढत, सन २०२४-२५ मध्ये तब्बल १६६.२६ लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या दशकात ६३.८ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. त्याचबरोबर दरडोई दूध उपलब्धतेतही सुधारणा झाली असून प्रतिदिन २३९ ग्रॅमवरून ३८५ ग्रॅमपर्यंत वाढ झाली असून ४९.८ टक्के वाढ दर्शवते. पश्चिम महाराष्ट्र, नाशिक आणि पुणे विभाग आघाडीवर असून कोकण व विदर्भातील काही भागातही उत्पादनात वाढ होत आहे. मार्च २०२५ अखेर सहकारी संस्थांमार्फत दररोज सुमारे ५८.२५ लाख लिटर दूध संकलित होत असून खासगी डेअऱ्यांमधूनही मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे.
शिवकालीन ठेवा जपतायत छत्रपतींच्या वकिलांचे वंशज
अॅड. डॉ. विजयसिंह जाधव सोलापूर : पुण्यातील पोलिस दलात सेवेत कार्यरत असलेले काजी सोहेल शमशुद्दीन शेख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्ठप्रधान मंडळातील दरबारात सचिव आणि वकील काजी हैदर यांचे वंशज आहेत. काजी सोहेल शमशुद्दीन शेख यांच्याकडे आजही शिवकालीन वैभव जपलेले आहे. त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्ठप्रधान मंडळातील दरबारात काजी हैदर यांनी सचिव व […] The post शिवकालीन ठेवा जपतायत छत्रपतींच्या वकिलांचे वंशज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
५ दिवसांसाठी स्थगिती, ९ एप्रिलला युद्ध थांबणार : ट्रम्प वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वतील संघर्षाबाबत २ दिवस सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत इराणचे वीज प्रकल्प आणि ऊर्जा पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले ५ दिवस स्थगित केल्याचे जाहीर केले आणि अमेरिकन संरक्षण विभागाला लष्करी हल्ले थांबवण्याचे निर्देश दिल्याचे ते म्हणाले. दरम्यान, अमेरिकेने इराणसोबतचे […] The post इराणवरील हल्ले स्थगित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपुरात संघाच्या मुख्यालयावर मोर्चा
वंचित, काँग्रेस नेते एकवटले, मोदींविरोधात घोषणाबाजी नागपूर : वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने संयुक्तपणे आज नागपुरात विशाल मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात असंख्य लोक सहभागी झाले होते. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी मोदी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी […] The post नागपुरात संघाच्या मुख्यालयावर मोर्चा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तीन महिन्याचे वेतन देयक तयार करून अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेतल्याचा मोबदला म्हणून एक हजार रुपयाची लाच घेताना पूर्ण पाटबंधारे विभाग वसमत येथील वरिष्ठ लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी 23 सायंकाळी रंगेहात पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्ण पाटबंधारे विभागाच्या सिंचन व्यवस्थापन विभागातील एका कर्मचाऱ्याचे जुलै ऑगस्ट व सप्टेंबर 2025 या कालावधीत असलेले वेतन देयक थकीत होते. सदर वेतन देयक देण्यासाठी त्यांनी पूर्णा पाटबंधारे विभागाकडे मागणी केली होती. त्यानुसार पाटबंधारे विभागातील वरिष्ठ लिपिक सलीम अब्दुल अहमद शेख याने त्यांची वेतन देयक तयार करून त्यावर उपकार्यकारी अभियंत्यांची स्वाक्षरी घेतली होती. तसेच सदर देयक कोषागार कार्यालयात सादर करण्यात आले होते. या कामाचा मोबदला म्हणून वरिष्ठ लिपिक सलीम शेख याने एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावरून संबंधित कर्मचाऱ्याने हिंगोली येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची आज दुपारी पंचा समक्ष पडताळणी करण्यात आली होती. यामध्ये सलीम शेख यांने एक हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते त्यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक विकास घनवट पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सुलभा राऊत, जमादार भगवान मंडलिक, रवींद्र वरणे, सय्यद युनूस, शेख अकबर, राजाराम फुफाटे, गजानन पवार यांच्या पथकाने वसमत येथील पूर्ण पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सायंकाळी सापळा रचला होता ठरल्याप्रमाणे सायंकाळी वरिष्ठ लिपिक सलीम शेख याने एक हजार रुपये लाच घेताच पोलिसांनी त्यास रंगेहात पकडले. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मोफत प्रवेशासाठी दुप्पट अर्जांची नोंदणी
लातूर : प्रतिनिधी आरटीईतंर्गत पालकांच्या पाल्यांना पहिलीच्या वर्गासाठी २५ टक्के मोफत प्रवेश मिळावा म्हणून जिल्हयातील स्वंय अर्थसहित, विना अनुदानित अशा २०७ शाळांनी नोंदणी केली होती. या नोंदणी झालेल्या शाळेत २ हजार ३४३ मोफत प्रवेश दिले जाणार असून आज पर्यंत ५ हजार ७५८ पालकांनी पाल्यांचे प्रवेश करण्यासाठी ऑलाईन अर्जांची नोंदणी केली आहे. २५ टक्के मोफत प्रवेशाच्या […] The post मोफत प्रवेशासाठी दुप्पट अर्जांची नोंदणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नजीकच्या पार्डी देवी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मारोती संस्थान सभागृहात श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदोरी, ता. चांदूर रेल्वे येथील कथावाचक ह.भ.प. घनश्याम महाराज तायवाडे यांच्या मधुर वाणीतून येथे प्रवचन सुरु झाले आहे. हा ज्ञानयज्ञ आगामी २५ मार्चपर्यंत चालणार आहे. या सप्ताहात दररोज सकाळी प्रवचन आणि संध्याकाळी कीर्तन-भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या ज्ञानयज्ञासाठी पार्डी परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्घाटनप्रसंगी भागवताचार्य यांच्या हस्ते मंगलाचार व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी गावातील महिला व पुरुषांच्या मंडळांच्या उपस्थितीत सत्संग, नामस्मरण व कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. ज्ञानयज्ञाच्या दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असून, प्रसिद्ध हरिभक्त व प्रवचनकार मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. उद्या, २४ मार्च रोजी ग्रंथ दिंडी व काल्याचे कीर्तन होणार आहे. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ह.भ.प. घनश्याम महाराज तायवाडे यांच्या समाधान ग्रंथ प्रवचनासह समारोप केला जाईल. त्यानंतर दुपारी १ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी स्थानिक ग्रामस्थ, समिती पदाधिकारी, युवक मंडळ आणि सेवाभावी कार्यकर्ते मोठ्या संख्येने परिश्रम घेत आहेत. पार्डी परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण असून, श्री विठ्ठल रुक्मिणी मारोती संस्थान पार्डी (देवी) व समस्त गावकऱ्यांनी भाविकांना या ज्ञानयज्ञाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
महसूल खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे रविवारी वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा कौटुंबिक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात निवृत्त उपायुक्त सुरेशकुमार इंगोले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आता तुम्ही स्वतःसाठी जगा, तब्येतीची काळजी घ्या आणि स्वतःला कोणत्यातरी कामात गुंतवा. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इंगोले बोलत होते. यावेळी प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. अजय खांदेवाले, कोषागार कार्यालयातील निवृत्ती वेतन विभागाचे सहायक संचालक अमोल इखे, निवृत्त तहसीलदार किशोर गावंडे व गजभिये, तसेच संस्थेचे सचिव मधुकरराव गाडगे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. इंगोले यांनी सर्व सत्कारमूर्तींना उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या आणि संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होण्याचे आश्वासन दिले. नेत्रतज्ज्ञ डॉ. खांदेवाले यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी यावर सखोल मार्गदर्शन केले. नेत्रविकारांशी संबंधित अडचणी सोडवण्याचे आश्वासन देताना, त्यांची आई महसूल खात्यातून निवृत्त झाल्यामुळे हा विभाग त्यांच्यासाठी जिव्हाळ्याचा असल्याचे त्यांनी सांगितले. कोषागार विभागाचे सहायक संचालक अमोल इखे यांनी उपस्थितांना संबोधित करताना आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, त्यांची नेमणूक सेवानिवृत्तांच्या सेवेसाठीच झाली आहे. सध्या बहुतेक सेवा ऑनलाइन झाल्यामुळे कार्यालयात येण्याची गरज भासू नये, असा त्यांचा प्रयत्न आहे. कोणतीही अडचण आल्यास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत ती सहज सोडवली जाते, असेही त्यांनी नमूद केले. इखे यांनी सायबर फसवणुकीपासून वाचण्याचे उपाय सांगितले आणि तालुका पातळीवर शिबिरे घेण्याची तयारी दर्शवली. निवृत्त नायब तहसीलदार किशोर कनाटे यांच्या कन्या प्रा. मेघा कनाटे यांनी सत्कारमूर्तींबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सुमारे ४० ज्येष्ठांचा त्यांच्या कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला. त्यांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि ज्येष्ठ साहित्यिक अलका सप्रे लिखित वृद्धत्व जपताना हे पुस्तक भेट देण्यात आले. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाकडून 'ग्रामगीताचार्य' ही पदवी प्राप्त झालेले विजयराव बोके यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे पदाधिकारी रवींद्र डाखोरे, ढोणे, गोळवलकर, सुभाष वर्मा, वितोंडे, कोडापे, रामभाऊ राठोड आदींनी अतिथींचे स्वागत केले. संस्थेचे सचिव वीरेंद्रसिंह दीक्षित यांनी प्रास्ताविक व संचालन केले. त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचे विश्लेषण करत भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. अनिल पाटील यांनी आभार मानले.
अमरावती येथे महिला काँग्रेसने रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कुप्रसिद्ध भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या चाकणकर यांनी नुकताच महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, हे प्रकरण केवळ राजीनाम्यावर संपणार नाही, असे म्हणत काँग्रेसने त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. या मागणीसाठी अमरावती शहर काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष जयश्री वानखडे यांच्या नेतृत्वात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी रुपाली चाकणकर यांच्या छायाचित्राला चपलेने मारले. जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदनही सादर करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात या भोंदूबाबाला तंत्र-मंत्र विद्या आणि दैवी शक्तीचा हवाला देत महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचे आणि त्यांच्या संस्थेतही त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. या खुलास्यानंतर चाकणकर यांच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. असे असले तरी, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून फसवणुकीच्या अनेक प्रकरणांच्या अनुषंगाने त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या आंदोलनात महिला काँग्रेसच्या पदाधिकारी नगरसेविका डॉ. अर्चना आत्राम, राजश्री जठाळे, मालती गवई यांच्यासह आरती पिंपळे, वंदना निर्गुडे, सीमा तिवारी, शेख शाहीन, किरण चांदवकर आणि आरती क्षीरसागर आदी महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
चालू आर्थिक वर्ष संपायला काहीच दिवस शिल्लक असल्याने अमरावती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांवर निर्बंध लावले आहेत. हे निर्बंध २६ मार्च ते ३१ मार्च या कालावधीसाठी लागू राहतील. आर्थिक वर्ष संपुष्टात येत असल्याने या काळात शासन स्तरावरून अनेक आर्थिक व्यवहार होतात. विविध खात्यांतील योजनांचा निधीही याच काळात प्राप्त होतो. तसेच, रखडलेल्या कामांवर झालेल्या खर्चाची मागणी व पुरवठादेखील मार्च एंडिंगच्या काळातच केला जातो. अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे यापैकी कोणतीही बाब अडकू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण, आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण, समाज कल्याण आणि इतर विभागांच्या अनेक लोकोपयोगी योजना आहेत, ज्यांच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक मदत दिली जाते. या योजनांचा काही निधी याच काळात जिल्हा परिषदेला प्राप्त होणार आहे. वास्तविक, २६ मार्च ते ३१ मार्च या काळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुट्ट्या घेऊ नयेत, असे शासनाचेच निर्देश आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्हा परिषदेच्या सीईओंना तसे निर्देश दिले आहेत. यामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोणतीही रजा अनुज्ञेय राहणार नाही, असा स्पष्ट उल्लेख आहे. या निर्बंधांमुळे, एखादवेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुटीवर जावे लागल्यास कसे करायचे, असा सवाल काही कर्मचारी संघटनांनी उपस्थित केला आहे.
अमरावती जिल्हा परिषदेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज, मंगळवारी सादर होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अर्थसंकल्प सुमारे ३५ कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत सध्या लोकनियुक्त पदाधिकारी नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांना प्रशासकाचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे त्या स्वतः हा अर्थसंकल्प सादर करतील. यासाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात दुपारी १२ वाजता एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा अमरावतीच्या वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार, त्यांच्या कार्यालयातील इतर अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे विविध विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत. बांधकाम, समाज कल्याण, दिव्यांग कल्याण, महिला व बालविकास, कृषी व पशुसंवर्धन, सामान्य प्रशासन, पंचायत आणि शिक्षण विभाग यांसारख्या महत्त्वाच्या विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या लोकोपयोगी योजनांची माहिती या अर्थसंकल्पातून स्पष्ट होईल. गतवर्षी जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक सुमारे ३० कोटी रुपयांचे होते. यावर्षी काही नवीन योजनांचा समावेश केल्यामुळे २०२६-२७ चे अंदाजपत्रक सुमारे ३५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या अर्थसंकल्पाची तयारी गेल्या १५ दिवसांपासून सुरू आहे. प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार यांनी सर्व विभागांना पत्र पाठवून त्यांच्या मागण्या मागवल्या होत्या. १२ मार्च रोजी सीईओ महापात्र यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रत्येक विभागाची मागणी निश्चित केली होती. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून या मागण्या आणि त्यासाठी प्रशासनाने केलेली तरतूद स्पष्ट होणार आहे.
आज महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलसाठी अमरावतीत मंगळवारी मतदान होणार आहे. अमरावती वकील संघाचे २२०० हून अधिक सदस्य या प्रक्रियेत सहभागी होण्यास पात्र आहेत. यावर्षीच्या निवडणुकीत अमरावतीतून एकही स्थानिक उमेदवार नसल्याने, अकोला, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातील उमेदवारांचे लक्ष येथील मतदारांच्या कौलाकडे लागले आहे. मतदान प्रक्रिया जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिल्या माळ्यावरील कक्ष क्रमांक १२६ मध्ये मंगळवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडेल. २५ सदस्यीय महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलची निवडणूक दर पाच वर्षांनी होते, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणामुळे ही निवडणूक तब्बल आठ वर्षांनी आयोजित केली जात आहे. या दरम्यानच्या काळात जुन्याच पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. अमरावती वकील संघाच्या मतदार यादीला तीन टप्प्यांमध्ये विभागले आहे: सन १९९० पूर्वीचे वकील, सन १९९० नंतरचे वकील आणि नवीन वकील (फ्रेशर्स). या तिन्ही टप्प्यांतील मतदारांना निवडणुकीची माहिती देण्यात आली असून, ते सर्वजण मतदानात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. निवडणुकीची संपूर्ण तयारी महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलतर्फे केली जाते. मतपत्रिका आणि इतर आवश्यक साहित्यही त्यांच्याकडूनच पाठवले जाते. जिल्हा व सत्र न्यायालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग त्यांना आवश्यक ते सहकार्य पुरवत आहेत. यावर्षीच्या निवडणुकीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्यांदाच महिलांसाठी पाच जागा अनिवार्य करण्यात आल्या आहेत. यापैकी तीन सदस्यांची निवड मतदानाद्वारे होईल, तर उर्वरित दोन सदस्यांचे नामांकन केले जाईल. याशिवाय, महिलांना सामान्य मतदारसंघातूनही निवडणूक लढवण्याची संधी आहे. अमरावतीने महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलला आतापर्यंत तीन अध्यक्ष दिले आहेत. यामध्ये ज्येष्ठ वकील रमेश पाध्ये (जे पुढे न्यायमूर्ती झाले), डी. आर. उर्फ आप्पासाहेब कुळकर्णी आणि अलीकडच्या काळातील ज्येष्ठ विधीज्ञ प्रदीप महल्ले यांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यातील बेरार एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी ॲड. मोतीसिंह मोहता यांनीही अध्यक्षपद भूषवले आहे. पूर्वी सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर इतर सदस्यांच्या सहमतीने अध्यक्षपदी विराजमान होण्याची प्रक्रिया होती.
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याने महिलांवर केलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावती विधानसभा युवक काँग्रेसने जाहीर निषेध नोंदवला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सोमवारी, २३ मार्च रोजी सायंकाळी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे केंद्रीय पदाधिकारी भय्या पवार, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अनिकेत ढेंगळे आणि अमरावती विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख यांनी केले. आंदोलनात युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. युवक काँग्रेसने शासनाकडे पीडित महिलांना तात्काळ न्याय मिळावा आणि अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कठोर कारवाई न झाल्यास युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून याहून तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनादरम्यान, महिलांवरील अत्याचार बंद करा, दोषींना अटक करा, न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील अशा घोषणा देण्यात आल्या. युवक काँग्रेसच्या मते, राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, अशा घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या आंदोलनात आशिष यादव, प्रियाल मोहोड, कौस्तुभ देशमुख, श्रेयस धर्माळे, वेदांत केने, मोहित भेंडे, धनंजय बोबडे, चैतन्य गायकवाड, आकाश दुराटकर, आकाश गेडाम, शुभम बांबल, मनन अत्री, शंतनु हिवसे, शंतनु देशमुख, कृणाल गावंडे आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

34 C