महिला आरक्षण विधेयकावरून घमासान
सत्ताधा-यांकडून समर्थन, विधेयकामागे राजकीय हेतू : विरोधक जागा वाढवायची गरज काय?, विरोधकांचा सवाल नवी दिल्ली : वृत्तसंस्था आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू झाले असून, संविधान १३१ वी दुरुस्ती विधेयक २०२६, केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक २०२६ आणि सीमांकन विधेयक २०२६ आज संसदेत मांडण्यात आले आणि महिला आरक्षण विधेयकासह सर्व विधेयकांवर चर्चा सुरू झाली. केंद्रीय गृहमंत्री […] The post महिला आरक्षण विधेयकावरून घमासान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी आयपीएल २०२६ मधील २४ वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात पार पडला. या सामन्यामध्ये मुंबईला घरच्या मैदानावर पंजाबने सात विकेटने पराभूत केले. पंजाबने मुंबईच्या १९६ धावांची यशस्वीपणे पाठलाग केला. त्यामुळे क्विंटन डिकॉक याची शतकी खेळी वाया गेली. पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबईची गाडी अजूनही विजयाच्या रूळावर येताना दिसत नाही तर दुसरीकडे […] The post पंजाबने उडविला मुंबईचा धुव्वा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
व्यावसायिक शिक्षणातून दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे
लातूर : प्रतिनिधी शालेय शिक्षणानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देवून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जेणेकरून दिव्यांग विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहतील, असे प्रतिपादन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी बुधवारी केले. जीवन विकास प्रतिष्ठान संचलित अॅड. विजयगोपाल अग्रवाल मुकबधिर विद्यालय, सौ. सुशिलादेवी देशमुख मुलींचे निवासी मुकबधिर विद्यालय व मतिमंद विद्यालय […] The post व्यावसायिक शिक्षणातून दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आरटीईची प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू
लातूर : प्रतिनिधी २०२६-२७ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेशाची सोडत (लॉटरी) सोमवार दि. ६ एप्रिल रोजी निघाली होती. त्यानुसार आरटीई २५ टक्के प्रवेश शाळा निहाय विद्यार्थी निवड यादी जाहीर झाली आसून लातूर जिल्हयातील २ हजार २६९ मोफत प्रवेशापैकी गेल्या सात दिवसात केवळ सातच प्रवेश झाले आहेत. पालकांच्या पाल्यांना इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी […] The post आरटीईची प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशाच्या राजधानीत सध्या संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असून यामध्ये महिला आरक्षण आणि मतदारसंघांची पुनर्रचना यांसारख्या विषयांवर चर्चा रंगली आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी एक अत्यंत धाडसी आणि महत्त्वाची मागणी केली आहे. माजी खासदार आणि माजी आमदारांना दिली जाणारी पेन्शन योजना कायमची बंद करावी, अशी मागणी करत त्यांनी राजकीय वर्तुळात चर्चेला तोंड फोडले आहे. राजू पाटील यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करताना स्वतःचाही उल्लेख आवर्जून केला आहे. ते म्हणाले, सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरू आहे. यापुढे देशभरात नव्याने होणारी जनगणना व त्या अनुषंगाने वाढणारे लोकसभा व विधानसभा क्षेत्र यांची संख्या, म्हणजेच मोठ्या प्रमाणात खासदार व आमदारांची संख्या वाढणार आहे. राजू पाटील पुढे म्हणतात, एकंदरीत आपल्या देशात माजी खासदार व माजी आमदार यांना दिल्या जाणाऱ्या पेंशन व इतर सुविधांचा भार पण भविष्यात वाढतच जाणार आहे. खरंतर माजी खासदार व माजी आमदार (यात मी पण आलो.) यांना पेंशन देण्याचे काहीच कारण नाही. प्रामाणिक करदात्या नागरिकांच्या पैशांची ही नासाडी थांबविण्यासाठी ही पेंशन योजना कायमची बंद करायला हवी.संसदेच्या विशेष अधिवेशनात याविषयावर पण चर्चा व्हायला हवी, अशी मागणीही राजू पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्रातील खासदारांची संख्या ७२ वर पोहोचणार? केंद्र सरकार २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघांची पुनर्रचना करण्याच्या तयारीत आहे. यामुळे लोकसभेतील एकूण सदस्य संख्या ५४३ वरून ८५० पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातून ४८ खासदार लोकसभेत जातात. पुनर्रचनेनंतर ही संख्या ७२ पर्यंत वाढू शकते. खासदारांची संख्या वाढल्यास भविष्यात माजी खासदारांच्या पेन्शनचा आकडाही प्रचंड मोठा असेल, याकडे राजू पाटील यांनी लक्ष वेधले आहे. संसदेत चर्चेची मागणी सध्या सुरू असलेल्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयकावर सखोल चर्चा होत आहे. याच अधिवेशनात लोकप्रतिनिधींच्या पेन्शनचा विषयही चर्चेला घ्यावा, अशी विनंती राजू पाटील यांनी केली आहे. सामान्य माणसाने आयुष्यभर काम केल्यावर त्याला पेन्शनसाठी झगडावे लागते, मग लोकप्रतिनिधींना ही सवलत का? असा उपरोधिक सवालही या मागणीतून अधोरेखित होत आहे. हे ही वाचा… आम्ही बाळासाहेबांचे संस्कार विकत घेतले नाहीत:किशोरी पेडणेकरांचे विधान; माफी मागेपर्यंत बीएमसीचे सभागृह चालणार नाही, महापौरांचा पवित्रा मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान आज अभूतपूर्व गोंधळ आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे सभागृहात अक्षरशः ठिणगी पडली. सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी या विधानावर तीव्र संताप व्यक्त करत पेडणेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले, मात्र दिवसभराच्या नाट्यमय घडामोडींनंतरही हा पेच सुटू शकला नाही. सविस्तर वाचा…
छत्रपती संभाजीनगर शहरात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीच्या अत्यावश्यक कामांसाठी महावितरणने शुक्रवारी (17 एप्रिल) काही भागांमध्ये वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील अनेक परिसरांमध्ये ठराविक वेळेत वीज खंडित राहील, अशी माहिती महावितरणने दिली आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत भीमटेकडी फीडर आणि दिल्लीगेट फीडरवरील अंबर हिल, एव्हरेस्ट कॉलेज, सईदा कॉलनी, हर्सुल गाव, कोलथनवाडी रोड, जहांगीर कॉलनी, चेतनानगर आणि फातेमा कॉलनी या भागांतील वीजपुरवठा बंद राहील. याशिवाय, सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पडेगाव उपकेंद्रावरील सर्व फीडर, निशांत पार्क फीडर आणि रेल्वे स्टेशन फीडरवरील उद्योग इंद्रकमल, स्काय सिटी, निशांत पार्क परिसर, मास्टर कुक हॉटेल, दिशानगरी, झेड गॅलेक्सी, शिवकला नेत्रालय, द्वारकादास नगर, शाहनूरवाडी आणि समाधान कॉलनी या परिसरातील वीजपुरवठा खंडित होईल. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत रेल्वे स्टेशन उपकेंद्रावरील सर्व फीडर्सवरील ग्राहकांची वीज बंद राहील. तसेच, सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत म्हाडा कॉलनी, चिकलठाणा गाव, सावित्रीनगर, विमानतळासमोरील भाग, प्रकाशनगर, रामनगर, नारेगाव, एन-11, एन-12, एन-1, पॉवरलूम, गौतम दा मिल, ग्रीव्हज, सिंधी कॉलनी, खोकडपुरा, बंजारा कॉलनी, उस्मानपुरा, एसबीएच कॉलनी आणि विकास नगर या परिसरातील वीज बंद राहील. महावितरणने ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कामाच्या नियोजनानुसार, वीजपुरवठा दिलेल्या वेळेपूर्वी किंवा वेळेनंतर पूर्ववत होऊ शकतो, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
एसबीआयमार्फत जिल्हा बँकेला मागणीच्या तुलनेत अपुरा चलन पुरवठा
लातूर : प्रतिनिधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत लातूर जिल्ह्यासाठी चलन पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियुक्त स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत अपु-या चलन पुरवठ्यामुळे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय व सर्व १२२ शाखेत तात्पुरती चलन रोख रक्कमेची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेकडून आरबीआय/ एसबीआय यांना पाठपुरावा, समन्वय सुरू असून मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी रक्कम एसबीआय […] The post एसबीआयमार्फत जिल्हा बँकेला मागणीच्या तुलनेत अपुरा चलन पुरवठा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुमारे १५,६६९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मुख्य सभेत मंजूर झाले आहे. या अंदाजपत्रकातील उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि महसूल वाढीसाठी विविध उपाययोजना करण्याच्या उद्देशाने स्थायी समिती सदस्य व प्रशासनातील अधिकाऱ्यांची एक संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली. या समितीत स्थायी समितीतील निवडक सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यासह विशाल धनावडे, संदीप बेलदरे, रुपाली धाडवे, मयुरी कोकाटे, प्रशांत जगताप आणि सुहास टिंगरे यांचा समावेश आहे. प्रशासनाकडून महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच संबंधित विभागांचे खातेप्रमुख यांचाही या समितीत समावेश असेल. महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी करसंकलन सुधारणा, थकबाकी वसुली, नवीन महसूल स्रोतांचा शोध आणि विविध आर्थिक उपाययोजनांचा आढावा घेणे ही या समितीची प्रमुख जबाबदारी असणार आहे. या समितीच्या माध्यमातून आर्थिक शिस्तीला बळकटी देत अंदाजपत्रकातील उद्दिष्टे गाठण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. प्रभाग समिती अध्यक्षपदांची निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होणार पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक येत्या २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. या निवडणुकीसाठी उदया (दि. १७) दुपारी ३ ते ५ या वेळेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. दरम्यान नगररोड वाघोली क्षेत्रीय कार्यालय आणि येरवडा वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालय या दोन प्रभाग समितीच्या पुर्नरचनेबाबत पालिका प्रशासनाचा अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे या दोन क्षेत्रीय कार्यालयाच्या निवडणुका स्थगित कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाने पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. महापालिका निवडणुकीनंतर १५ क्षेत्रीय कार्यालयांची पुनर्रचना प्रशासनाकडून केली आहे. क्षेत्रीय कार्यालयांच्या नव्या रचनेनुसार पक्षीय बलाबलानुसार १४ क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व निर्माण होणार आहे, तर काँग्रेसला एक प्रभाग समिती मिळणार आहे.
शारदा इंटरनॅशनल स्कूलचे दहावीच्या निकालात उत्तुंग यश
लातूर : प्रतिनिधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत शारदा इंटरनॅशनल स्कूल, लातूर या शाळेने पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. कठोर परिश्रम, सातत्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा सुंदर संगम म्हणजेच हा उज्ज्वल निकाल होय. या परीक्षेत रणवीर ज्ञानेश्वर साळुंखे याने ९९.२० […] The post शारदा इंटरनॅशनल स्कूलचे दहावीच्या निकालात उत्तुंग यश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती पोलिसांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण:47 प्रतिसाद किटचे वाटप, तात्काळ मदतीसाठी सज्ज
अमरावती जिल्ह्यात आपत्तीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गुरुवारी पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याचा उद्देश जीवित व वित्तहानी टाळणे हा आहे. या प्रशिक्षणात शहर आणि ग्रामीण दोन्ही पोलीस दलातील शिपाई सहभागी झाले होते. यावेळी त्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या ४७ 'आपत्ती प्रतिसाद किट'चे वाटप करण्यात आले. जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी होणारी हानी टाळण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी या शिबिराचे अध्यक्षस्थान भूषवले. पोलीस कर्मचाऱ्यांना आपत्ती काळात अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यात आपत्ती व्यवस्थापन किट हाताळणे, मोठे व मध्यम आकाराचे स्ट्रेचर, लाईफ जॅकेट, हॅडग्लोज, गमबूट, सेप्टी नेट, ३० मीटर रॅपलिंग रोप आणि किट स्टोरेज बॉक्सचा वापर करण्याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच वैद्यकीय प्रथमोपचार (सीपीआर), आपत्तीमध्ये जखमींना उचलण्याच्या पद्धती आणि प्राथमिक उपचार यावरही भर देण्यात आला. पूर, आग, वीज कोसळणे, भूकंप आणि उष्माघातासारख्या विविध आपत्तींचा सामना कसा करावा, तसेच अशा परिस्थितीत घ्यावयाची काळजी व कार्यवाही याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली. या नाविन्यपूर्ण प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होईल, असा विश्वास निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी व्यक्त केला. या प्रशिक्षणात क्रिएटिव्ह न्यू टेक लिमिटेडचे प्रा. डॉ. विलास बैले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ अनुराग पचौरी, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन भारसाकडे, विनय कढाणे आणि संतोष कविठकर यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले. सुरेंद्र रामेकर यांनी प्रास्ताविक केले, तर सचिन धरमकर, विशाल निमकर, आकाश निमकर, कौस्तुभ वैद्य आणि सुमीत बांबल यांनी प्रशिक्षणासाठी सहकार्य केले.
बालविवाह करतो मुलांच्या मूलभूत हक्कांवर गंभीर परिणाम
लातूर : प्रतिनिधी येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात दि. १६ एप्रिल रोजी सखी सावित्री समिती व विशाखा (अंतर्गत तक्रार) समितीमार्फत बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन व्हीएलसी हॉल मध्ये करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना बाल हक्क कार्यकर्ते व समाजसेवक सद्दाम शेख यांनी बालविवाह हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून तो मुलांच्या मूलभूत हक्कांवर गंभीर परिणाम करतो, […] The post बालविवाह करतो मुलांच्या मूलभूत हक्कांवर गंभीर परिणाम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती जिल्ह्यात मका आणि ज्वारीच्या सरकारी खरेदीसाठी १० केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. खुल्या बाजारात कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची मागणी होती. या केंद्रांवर खरेदीसाठी शेतकऱ्यांनी आगामी ३० एप्रिलपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही केंद्रे मोर्शी, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, वरुड, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या १० तालुक्यांमध्ये सुरू होतील. संबंधित तालुका खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयातच ही खरेदी प्रक्रिया राबवली जाईल. राज्य पणन महासंघाचे संचालक नितीन हिवसे, काँग्रेसचे खासदार बळवंतराव वानखडे आणि चांदूर रेल्वेचे माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी या केंद्रांच्या स्थापनेसाठी आग्रही भूमिका घेतली होती. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच खरेदी सुरू केली जाईल. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाने शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याची तयारी केली आहे. ठिकठिकाणचे खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि जिनींग-प्रेसींग युनिट्समार्फतही ही सूचना संबंधित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. दरम्यान, मका आणि ज्वारीच्या खरेदीपूर्वी शासनाने तूर आणि हरभरा खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. मात्र, बारदाण्याच्या (पोत्यांच्या) कमतरतेमुळे सध्या त्या ठिकाणची खरेदी थांबली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार वानखडे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयावर धडक देऊन बारदाना तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. बारदाना न मिळाल्यास शेतकरी आपली तूर आणि हरभरा कार्यालयात आणतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मुंदडा ट्रेडर्समधील आग ३ तासांनंतर नियंत्रणात
लातूर : प्रतिनिधी शहरातील जुन्या एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ई-१/२ व १/३ मधील मुंदडा ट्रेडर्स या अॅल्युमिनियम कोटिंग व अॅल्युमिनियम शीट निर्मिती करण-या उद्योगामध्ये दि. १६ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ३.१५ वाजण्याच्या सुमारास कोटिंग प्रक्रियेसाठी वापरण्यात येणा-या बॉयलरचा अचानक स्फोट होऊन भीषण आग लागली. लातूर शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला दुपारी ३.३२ वाजता कॉल आल्यानंतर अग्निशमन […] The post मुंदडा ट्रेडर्समधील आग ३ तासांनंतर नियंत्रणात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वन्यजीव अपघात रोखण्यासाठी अमरावतीत अनोखा उपक्रम:अपघातप्रवण रस्त्यांवर वन्यप्राण्यांची चित्रे रेखाटली
अमरावती महानगरातून इतर शहरांकडे जाणाऱ्या काही रस्त्यांवर वन्यप्राण्यांची वर्दळ असते, ज्यामुळे अनेकदा अपघात घडतात. हे अपघात टाळण्यासाठी वाईल्डलाईफ रेस्क्यू फाऊंडेशन आणि बिगकास्ट कन्झर्वेशन ट्रस्ट इंडिया या संस्थांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. अपघातप्रवण स्थळांवर रस्त्यांवर पट्टे आखून त्यावर वन्यप्राण्यांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. अमरावतीमधून चांदूर रेल्वे, नागपूर, मोर्शी आणि यवतमाळकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वळणांवर रात्री उशिरा रोही, हरिण, काळवीट, नीलगाय, चितळ आणि बिबट यांसारख्या प्राण्यांची ये-जा असते. या वळणांवर चढ-उतार असल्याने वाहनांची गती वेळेवर नियंत्रित होत नाही, परिणामी यापूर्वी अनेक प्राण्यांचे अपघात झाले आहेत. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी हा चित्रकला उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत अमरावतीतील रस्त्यांवर वन्यप्राणी-वाहन अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वाढती वाहतूक, रस्त्यांचे जाळे आणि वन्यजीवांच्या अधिवासांचे तुकडीकरण यामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे. या अपघातांमध्ये बिबट्या, चितळ, काळवीट आणि नीलगाय यांसारख्या अनुसूची-१ (शेड्युल वन) प्रजातींचा मृत्यू झाला आहे, जी जैवविविधतेसाठी चिंताजनक बाब आहे. हे अपघात प्रामुख्याने वन्यजीव कॉरिडॉरमध्ये घडले आहेत, जे वन्यप्राण्यांच्या स्थलांतरासाठी आणि हालचालींसाठी अत्यंत महत्त्वाचे पर्यावरणीय मार्ग आहेत. या भागांमधून वेगाने जाणारी वाहने प्राण्यांच्या नैसर्गिक वर्तनात अडथळा निर्माण करतात आणि अपघातांची शक्यता वाढवतात. या समस्येवर उपाय म्हणून, दोन्ही संस्थांनी व्यवहारशास्त्र आणि दृश्य ग्रहणशक्तीचा वापर करून रस्त्यावर आकर्षक वन्यजीव चित्रकला रेखाटली आहे. या उपक्रमाला स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामुळे रस्ते सुरक्षिततेसोबतच पर्यावरण संवर्धनाबद्दलही जागरूकता वाढत आहे. या मोहिमेत कुणाल दातेराव, बबलू बोबडे, अमीन गुडे, जिया बुगदादी, सुमेध गवई, अमित मोटीवाला, मेहुल रायचंद, नरेश पाठाडे, आकाश हरले आणि प्रसाद वानखेडे या तरुणांनी सहभाग घेतला आहे.
रावजी तांडा येथील नागरिकांचे उपोषण मागे
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील रावजी तांडा येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे अखेर येथील तांडावाशीयांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. हे उपोषण सुरू केल्यानंतर प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर तांडावासीयांनी उपोषण मागे घेतले. रस्त्यासाठी जळकोट तहसीलसमोर दि. १५ एप्रिलपासून उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुस-या दिवशी जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे यांनी उपोषणकर्त्यांची […] The post रावजी तांडा येथील नागरिकांचे उपोषण मागे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बालविवाह होणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन पुणे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने केले आहे. १९ एप्रिल २०२६ रोजी देशभरात अक्षय तृतीया साजरी होणार असून, या दिवशी अनेक ठिकाणी बालविवाह होण्याची शक्यता असते. जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी, पुणे यांनी संबंधित घटकांना या संदर्भात सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे जिल्ह्यात अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणताही बालविवाह होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीत विवाह हा एक महत्त्वाचा विधी असला तरी, शासनाने मुलांसाठी २१ वर्षे आणि मुलींसाठी १८ वर्षे अशी विवाहाची कायदेशीर वयोमर्यादा निश्चित केली आहे. यापेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींचा विवाह झाल्यास तो बालविवाह मानला जातो आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार तो बेकायदेशीर ठरतो. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करतात, तर शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी प्रकल्प) हे जबाबदार असतात. गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समितीची भूमिकाही महत्त्वाची आहे. बालविवाह आढळून आल्यास, मुला-मुलींचे नातेवाईक, आई-वडील, मंडपवाले, भटजी आणि वऱ्हाडी मंडळींवर अधिनियम २००६ च्या कलम ९, १०, ११ नुसार कारवाई करण्याची तरतूद आहे. असा कोणताही बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आल्यास, नागरिकांनी चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. हे आवाहन पुणे जिल्हा महिला विकास अधिकारी रोहिणी ढवळे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मंगेश जाधव यांनी केले आहे.
शाळेजवळील डी. पी. काढण्याची रेणापूर शहर काँग्रेसची मागणी
रेणापूर : प्रतिनिधी येथील शाळेच्या व मेन रोडच्या लगत असलेला डी.पी तात्काळ हटवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रेणापूर शहर काँग्रेसच्या वतीने महावितरण कंपनीचे उपअभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. येथील श्रीराम विद्यालय समोरील मेन रोडलगत उघडा धोकादायक डी.पी असल्याने शाळेतील लहान मुले, मुली तसेच नागरिकांना डी.पीचा धोका होत असल्याचे निर्दशनास आले आहे. अनेकदा येथील डी.पीस शॉर्टसर्किट होत […] The post शाळेजवळील डी. पी. काढण्याची रेणापूर शहर काँग्रेसची मागणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ग्रामीण भागातून अमरावती जिल्हा परिषदेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणपोईचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या या पाणपोईचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी करण्यात आले. हा उपक्रम जिल्हा परिषद कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र राज्य लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके आणि कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पंकज गुल्हाने प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना मान्यवरांनी कर्मचारी एकतेचे महत्त्व अधोरेखित केले आणि अशा उपक्रमांमुळे संघटनेची ताकद व बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले. उन्हाळ्याच्या दिवसांत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध व्हावे, या सामाजिक भावनेतून 'पानेरी' नावाने ही व्यवस्था करण्यात आली आहे. हा उपक्रम केवळ पाण्याची सुविधा देणारा नसून, समाजाप्रती असलेली जबाबदारी जपणारा एक प्रेरणादायी उपक्रम असल्याचे आयोजकांनी नमूद केले. त्यांच्या मते, 'पानेरी' हा उपक्रम माणुसकीची परंपरा जपणारा आणि समाजसेवेचा एक आदर्श ठरत आहे. विशेष म्हणजे, २०१३ पासून सुरू असलेला हा 'पानेरी' उपक्रम दरवर्षी सातत्याने राबवला जात असून, तो आता एक प्रेरणादायी परंपरा बनला आहे. या माध्यमातून कर्मचारी वर्ग आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि शिवजयंतीलाही दरवर्षी कर्मचारी संघटनेतर्फे अमरावतीकरांना फराळाचे वितरण केले जाते. या उपक्रमाच्या यशासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक करण्यात आले. यावेळी निलेश तालन, ज्ञानेश्वर घाटे, श्रीकांत मेश्राम, विजय कोठाळे, मंगेश मानकर, नितीन माहोरे, संजय मुंद्रे, अर्पणा आत्राम, जीवन नारे, परमेश्वर राठोड, सतीश पवार, राहुल रायबोले, स्वप्निल कुरेकर, आदित्य तायडे, प्रमिलाताई उंबरकर, दिनेश खंडारे, विजय काळे, निशांत तायडे, अशोक धोटे, उत्तम डोंगरे, गजानन इंगळे, चांदुरे आदींसह अनेक कर्मचारी उपस्थित होते.
औसा तांड्यावरील पोल्ट्री फार्ममुळे आरोग्यास धोका
औसा : प्रतिनिधी औसा ते भादा रस्त्यावर असलेल्या औसा तांड्याजवळ विनापरवाना व कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र न घेता उभारण्यात आलेल्या पोल्ट्री फार्ममुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असल्याने ही अनधिकृत पोल्ट्री तातडीने बंद करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे केली आहे. औसा तांड्याजवळ पाण्याच्या टाकीजवळ एका सेवानिवृत्त शासकीय अधिका-याने दोन ते […] The post औसा तांड्यावरील पोल्ट्री फार्ममुळे आरोग्यास धोका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशहितासाठी संशोधन करा:कुलगुरू डॉ. बारहाते यांचे संशोधन मार्गदर्शक कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आवाहन
विद्यार्थ्यांनी देशहित डोळ्यासमोर ठेवून संशोधन करावे आणि त्याची गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आयोजित ‘संशोधन मार्गदर्शक अभिमुखता’ कार्यशाळेत ते अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते. विद्यापीठाचा गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या विभागीय अध्यक्ष डॉ. मीनल भोंडे यांच्या हस्ते झाले. सिम्बायोसिस सेंटर फॉर मेडिकल इमेजिंग, पुणे येथील डॉ. भूषण बोरोटीकर हे बीजभाषक म्हणून उपस्थित होते. डॉ. भूषण बोरोटीकर यांनी संशोधनातील गुणवत्ता, प्रामाणिकता, चौर्यकर्म (प्लॅजिअरिझम) नियंत्रण तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन निकष यावर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. मीनल भोंडे यांनी संशोधन संस्कृती अधिक सक्षम करण्यासाठी मार्गदर्शकांची आणि संशोधकांची जबाबदारी अधोरेखित केली. शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता व पारदर्शकता अधिक प्रभावी व्हावी आणि संशोधन व्यावसायभिमुख व समाजाभिमुख व्हावे, यासाठी सर्व मार्गदर्शकांनी जातीने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. उद्घाटनानंतरच्या दुपारच्या सत्राच्या अध्यक्षस्थानी मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख होत्या. संशोधक आणि मार्गदर्शक नियमावलींचा अभ्यास करून संशोधन आणि कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असल्याबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी आय.क्यू.ए.सी.चे संचालक डॉ. संदीप वाघुळे, विद्यापीठ विद्या परिषदेचे सदस्य डॉ. हेमंत चांडक, अ.भा. शैक्षिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. ओमप्रकाश मुंदे यांचीही उपस्थिती होती. पॅनेल चर्चेदरम्यान संशोधन गुणवत्ता, मार्गदर्शक-विद्यार्थी संबंध, प्रकाशन प्रक्रिया व संशोधनातील नैतिकता या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. समारोप सत्राला प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे आणि उपकुलसचिव डॉ. मीनल मालधुरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. डॉ. मंगेश अडगोकार यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. संदीप वाघुळे यांनी आय.क्यू.ए.सी.ची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वि. रा. मांडवकर यांनी केले, तर डॉ. ओमप्रकाश मुंदे यांनी आभार मानले. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या सर्व अध्यक्ष, महामंत्री, महिला प्रमुख, सहप्रमुख तसेच अभ्यास मंडळ अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेला विविध विद्याशाखांमधील संशोधन मार्गदर्शक प्राध्यापक आणि पीएच.डी. संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार, आमदार वाढतील तर पेन्शनचा भारही वाढेल
मुंबई : सध्या दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन सुरु आहे. यापुढे देशभरात नव्याने होणारी जनगणना व त्या अनुषंगाने वाढणारे लोकसभा व विधानसभा क्षेत्र यांची संख्या, म्हणजेच मोठया प्रमाणात खासदार व आमदारांची संख्या वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी मोठी मागणी केली आहे. पेंशन योजना कायमची बंद करायला हवी, अशी मागणी […] The post खासदार, आमदार वाढतील तर पेन्शनचा भारही वाढेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मागील काही वर्षापासून निवडणुकीत गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी अनेक राज्यातून विविध राजकीय पक्षांनी केलेल्या आहेत. मतदार याद्यातील घोळ, EVM मधील घोळ यावर अनेक तक्रारी करण्यात आल्या पण निवडणूक आयोग त्याचे समाधानकारक उत्तर देत नाही. निवडणूक आयोगाचा कारभार एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा आहे, असा आरोप काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, माजी मंत्री नसीम खान यांनी केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चांदवली मतदारसंघात EVM मध्ये घोटळा झाल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार नसीम खान यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्याच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ईव्हीएम मशीन तपासणीचे आदेश दिले आहेत. दिनांक १६ व १७ एप्रिलला यातील काही मशीनची तपासणी बोरीवली येथे सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर नसीम खान प्रसार माध्यमांशी बोलत होते. नसीम खान पुढे म्हणाले की, न्यायालयाने डेटा सहित तपासणी करण्याचा आदेश दिला होता, तो पाळण्यास निवडणूक आयोग टाळाटाळ करत आहे. निवडणूक आयोगाची SOP सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांना हरताळ फासणारी आहे. CU, BU, VVPAT फक्त जोडणी करून दाखवली. त्याला आमचा विरोध आहे. यासंबंधी निवडणूक आयोगाला पत्र देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे EVM पडताळणीची मागणी केली आहे, ती मान्य न झाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही नसीम खान यांनी दिला आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका या निष्पक्ष व पारदर्शक वातावरणात पार पाडल्या पाहिजेत व त्याची सर्व जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी सातत्याने निवडणूक आयोगाचा गैरकारभार, घोटाळे यांचा पर्दाफाश केलेला आहे पण आयोग मात्र विरोधांच्या तक्रारीकडे लक्ष देत नाही म्हणून आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. हा फक्त चांदिवली विधानसभा निवडणुकीपुरता मर्यादित नाही तर हा लोकशाही आणि निवडणुकांची निष्पक्षता व पारदर्शकता जपण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत राहू, असेही नसीम खान म्हणाले.
पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत ३२,६४६ नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे गर्भवती महिलांना मोठा दिलासा मिळाला असून, योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने ही नोंदणी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्या संकेतस्थळावर केली आहे. जिल्ह्यात एकूण ६,०९४ अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत, ज्यात ग्रामीण भागात ४,३९५ आणि नागरी भागात १,६९९ केंद्रे आहेत. नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांमध्ये पुणे महानगरपालिकेंतर्गत १०,०३४, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ३,७१०, आंबेगाव तालुक्यात ९५२, बारामतीमध्ये १,७५५, भोरमध्ये ५२३, दौंडमध्ये १,५१४, हवेलीमध्ये २,०५५, इंदापूरमध्ये १,४९४, जुन्नरमध्ये १,६६१, खेडमध्ये २,०६४, मावळमध्ये १,७१२, मुळशीमध्ये ७८८, पुरंदरमध्ये ८८४, शिरूरमध्ये १,९२६ आणि वेल्हे तालुक्यात १२४ लाभार्थ्यांचा समावेश आहे. शहरी भागातून १,४५० नवीन लाभार्थ्यांची नोंद झाली आहे. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा मुख्य उद्देश गरोदर महिलांना गरोदरपणात चांगला आहार व आरोग्य मिळावे, तसेच त्यांनी या काळात मजुरी करू नये, हा आहे. या योजनेमुळे मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देण्यासही मदत होते. सन २०१७ पासून ही योजना आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत होती. आता महाराष्ट्रात जून २०२५ पासून एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महिला व बाल कल्याण विभागामार्फत ही योजना कार्यान्वित केली जात आहे. आनंद खंडागळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) यांनी सांगितले की, नवीन लाभार्थ्यांच्या नोंदीचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. उर्वरित पात्र महिलांची नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा, हा उद्देश साध्य करण्यासाठी विभागाकडून नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रांजे येथे उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगाला शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. चितळे बंधूंनी जागतिक ब्रँड बनण्याचा आत्मविश्वास दाखवला असून, राज्यातील खाद्य उद्योगाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, शंकर मांडेकर यांच्यासह इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे आणि केदार चितळे आदी मान्यवर उपस्थित होते. व्हिजन पार्कच्या माध्यमातून खाद्य उद्योगात आधुनिक सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. चितळे बंधूंची दूरदृष्टी या प्रकल्पातून दिसून येते, असे ते म्हणाले. या पार्कमध्ये स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत मानवी हस्तक्षेप नसलेली उच्च दर्जाची यंत्रणा उभारण्यात आली आहे. परदेशी यंत्रांमध्ये आवश्यक बदल करून ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे. या प्रकल्पात नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर करण्यात आला आहे. खाद्यपदार्थांचा दर्जा आणि ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेली निरीक्षण गॅलरी हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे. या गॅलरीमुळे उद्योगात पारदर्शकता येते आणि गुणवत्तेची तपासणी करणेही शक्य होते. येथून उत्पादनाच्या विविध टप्प्यांवरील प्रक्रियांचे अवलोकन करता येते. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि वितरकांना परदेशाप्रमाणे औद्योगिक सहलीच्या माध्यमातून व्हिजन पार्कमधील अनुभव घेता येईल. महाराष्ट्रीयन उद्योगाने अशा जागतिक मानकांचे पालन करणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अन्न ही एक 'सॉफ्ट पॉवर' आहे. चायनीज, जपानी, फ्रेंच, कोरियन खाद्यपदार्थांचा आस्वाद जगभरातील लोक घेतात. भारताच्या प्रत्येक भागात वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती आढळते, जी दर १० किलोमीटरवर बदलते. यात अनेक प्रकारचे चविष्ट पदार्थ आहेत. या पारंपरिक पदार्थांना जागतिक ब्रँडच्या रूपात जगासमोर आणण्याचे आणि त्यासाठी आवश्यक मानकांचे पालन करण्याचे काम चितळे बंधूंनी केले आहे. त्यांनी स्नॅकिंगचे उत्तम ब्रँड्स तयार केले आहेत. परदेशी नागरिक आता भारतीय पदार्थांकडे आकर्षित होत आहेत. चितळे यांचे महाराष्ट्रीयन पदार्थही अशाच प्रकारे जगात पोहोचतील आणि लोकप्रिय होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 'एक्सपोर्ट ओरिएंटेड' फूड इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असेही त्यांनी सांगितले. चार पिढ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे चितळे हा एक जागतिक ब्रँड बनला असून, त्यांची ओळख ३५ देशांमध्ये पोहोचली आहे. पुणेकरांनी चितळे यांच्या उत्पादनांवर नेहमीच मनापासून प्रेम केले आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
राज्य प्रशासनामध्ये सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच आहे. कालच पाच अधिकाऱ्यांच्या बदली केल्यानंतर आज (१६ एप्रिल) पुन्हा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाच्या आयुक्तपदी जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली असून, एकूण ४ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांची नवीन पदस्थापना करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे महसूल, सिडको आणि जीएसटी विभागातील प्रशासकीय समीकरणे बदलली आहेत. सलग दुसऱ्या दिवशी बदल्या करण्यात आल्याने प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. १. जी. श्रीकांत (IAS: २००९) : विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर जी श्रीकांत हे सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त होते. 15 दिवसांपूर्वीच त्यांची नवी मुंबई येथे 'जल जीवन मिशन'चे अभियान संचालक म्हणून बदली झाली होती. मात्र, जी. श्रीकांत पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये बदली होऊन येणार असून, यावेळी त्यांच्याकडे मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. जी श्रीकांत हे गेल्या पाच वर्षापासून छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये आधी जीएसटी आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त, प्रशासक म्हणून कार्य केले आहे. त्यापूर्वी ते मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहिलेले आहेत. २. जितेंद्र पापळकर (IAS: २०१०) : सह आयुक्त, जीएसटी, मुंबई छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले जितेंद्र पापळकर यांची बदली आता सह आयुक्त, जीएसटी, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून संभाजीनगर विभागाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. ३. गंगाथरन डी. (IAS: २०१३) : अभियान संचालक, जल जीवन मिशन गंगाथरन डी. यांची नियुक्ती अभियान संचालक, जल जीवन मिशन, नवी मुंबई या पदावर करण्यात आली आहे. जी. श्रीकांत यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी आता गंगाथरन यांच्याकडे असेल. ४. जगदीश मिनियार (IAS: २०१५) : आयुक्त, महिला व बालविकास, पुणे छत्रपती संभाजीनगर येथील सिडकोचे (नवी शहरे) मुख्य प्रशासक म्हणून कार्यरत असलेले जगदीश मिनियार यांची आता पुणे येथे महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
आकांक्षित जिल्हा व तालुका विकास कार्यक्रमांतर्गत सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून कामांची गुणवत्ता वाढवावी व लक्षणीय सुधारणा साधावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गुरुवारी तारीख 16 दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, मुख्य वित्त व लेखा अधिकारी दिगंबर माडे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गुप्ता म्हणाले की, आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत विविध परिमाणांची नियमित तपासणी करून प्रगतीचा आढावा घेणे आवश्यक आहे. जिल्हा किंवा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्यास नीती आयोगाकडून तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होतो. हा निधी विविध विकास कामांसाठी उपयोगात आणता येणार असून, त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळणार आहे. उत्तम कामगिरीच्या आधारे डेल्टा रँकिंगमध्ये सुधारणा करण्यासाठी सर्व विभागांनी विशेष प्रयत्न करावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. गृहविकास (हाऊसिंग) क्षेत्रात सध्या 16.52 टक्के प्रगती असून, त्यात वाढ करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. पशुसंवर्धन, आरोग्य तपासणी, घरकुल या घटकांमध्येही सुधारणा करण्यावर भर देण्यात यावा. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती यांच्या हस्ते पुरस्कारही दिले जातात, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व विभागांनी स्पर्धात्मक भावनेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. आरोग्य व पोषण विभागाला मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी एन-क्वॉस (NQAS) सर्टिफिकेशन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न वाढवावेत, असे सांगितले. पूरक पोषण आहार 100 टक्के सुनिश्चित करणे, तसेच अतितिव्र कुपोषित आणि मध्यम तीव्र कुपोषित बालकांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातील त्रुटी दूर करून वितरण व्यवस्थेत सुधारणा करावी, असे निर्देश देण्यात आले. फेस रिकग्निशन, भारत नेट, प्रधानमंत्री आवास योजना व प्रधानमंत्री डिजिटल साक्षरता अभियान यामध्ये प्रगती साधण्यावर भर देण्यात आला. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची ओळखपत्रे, स्थलांतर, टीसी व यु-डायस प्रणालीतील नोंदी अद्ययावत ठेवाव्यात, तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थिती व बदलांची काटेकोर नोंद करावी, असेही सांगितले. पशुसंवर्धन विभागात औषध साठ्याचे ऑडिट करून वितरणाची अद्ययावत माहिती ठेवावी. मत्स्य व्यवसाय विभागाने मत्स्य बीज व विक्रीची माहिती सादर करावी. ग्रामविकास विभागाने रस्ते, सभागृह व सामाजिक सुविधांतील वाढीची आकडेवारी द्यावी. सिंचन व जलसंवर्धन विभागाने प्रत्यक्ष सिंचन क्षेत्रात किती वाढ झाली याचा अहवाल सादर करावा. केवळ सीएनबी बांधकाम न करता त्याचा प्रत्यक्ष लाभ झाला का, याची खात्री करावी. शाळा व वर्गखोल्यांच्या दुरुस्तीची माहितीही सादर करावी. क्रीडा विभागाने क्रीडांगणे व व्यायामशाळांच्या विकासाची माहिती द्यावी. ग्रामपंचायतीमार्फत कामे न करता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फतच कामे करून घ्यावीत, असेही स्पष्ट करण्यात आले. आरोग्य व स्वच्छतेवर लक्ष आरोग्य विभागात दैनंदिन व मासिक तपासण्या नियमित कराव्यात. औषधांची स्वतः तपासणी करणे, स्वच्छता व पाणीपुरवठा व्यवस्थेवर लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक कामापूर्वी व पूर्ण झाल्यानंतर छायाचित्रे घेणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान आज अभूतपूर्व गोंधळ आणि राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे सभागृहात अक्षरशः ठिणगी पडली. सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी या विधानावर तीव्र संताप व्यक्त करत पेडणेकर यांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले, मात्र दिवसभराच्या नाट्यमय घडामोडींनंतरही हा पेच सुटू शकला नाही. सभागृहात महापौरांच्या सन्मानावरून चर्चा सुरू असताना वादाला तोंड फुटले. नवनिर्वाचित सदस्यांनी महापौरांचा मान राखला पाहिजे, असा मुद्दा सभागृह नेते गणेश खणकर यांनी उपस्थित केला. याला प्रत्युत्तर देताना आमच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत, आम्ही ते विकत घेतलेले नाहीत, असे विधान किशोरी पेडणेकर यांनी केले. त्यांचा रोख हा शिवसेना शिंदे गटाकडे होता. किशोरी पेडणेकर यांच्या या विधानातून बाळासाहेबांचा अवमान झाल्याचा अर्थ सत्ताधाऱ्यांनी काढला आणि संपूर्ण सभागृह घोषणाबाजीने दणाणून गेले. किशोरी पेडणेकर माफी मागा, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद अशा घोषणा सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी दिल्या. १० मिनिटांची तहकुबी आणि निलंबनाची मागणी वातावरण तणावपूर्ण झाल्याने महापौर रितू तावडे यांनी कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. मात्र, पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही शांतता प्रस्थापित झाली नाही. उलट, सभागृह नेते गणेश खणकर यांनी आक्रमक पवित्रा घेत, किशोरी पेडणेकर यांनी थेट बाळासाहेबांच्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचा आरोप केला. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या सदस्याला सभागृहात राहण्याचा अधिकार नाही, त्यांना तात्काळ निलंबित करा, अशी मागणी खणकर यांनी लावून धरली. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा आवाजाची धार वाढली. निधी वाटपावरून विरोधकांचा संताप या गदारोळात काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी मूळ मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. अर्थसंकल्पात विरोधकांच्या प्रभागांना निधी वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधकांना बोलू दिले जात नाही आणि निधीही दिला जात नाही, असे म्हणत आझमी यांनी सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा निषेध केला. मात्र, त्यांच्या या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाल्याने विरोधकही आक्रमक झाले. पेडणेकरांचे स्पष्टीकरण आणि महापौरांचा इशारा वाढता विरोध पाहून किशोरी पेडणेकर यांनी आपले स्पष्टीकरण मांडले. त्या म्हणाल्या, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मी बाळासाहेबांचे विचार किंवा संस्कार विकत घेतले नाहीत, असे म्हटले होते. सत्ताधारी मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटवण्यासाठी हा गदारोळ करत आहेत. असे सांगून त्यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, महापौर रितू तावडे या स्पष्टीकरणाने समाधानी झाल्या नाहीत. बाळासाहेब ठाकरे हे केवळ एका पक्षाचे नसून ते सर्वांचे आहेत. त्यांच्या संदर्भात चुकीचे शब्द वापरणे खपवून घेतले जाणार नाही. जोपर्यंत पेडणेकर माफी मागत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालणार नाही, असा कडक इशारा महापौरांनी दिला आणि सभागृह पुन्हा एकदा तहकूब करण्यात आले.
वर्धा जिल्ह्यात तापमानाचा पारा तब्बल ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचलेला असतानाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सेवाग्राम आश्रमाला भेट देत साधेपणा, स्वावलंबन आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला. त्यांच्या या दौऱ्यामुळे वर्धा जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सेवाग्राम आश्रमात आगमन होताच राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर आश्रमात जतन करून ठेवलेल्या गांधीजींच्या ऐतिहासिक वस्तूंची त्यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी गांधी विचारांचा जवळून अनुभव घेतला. भेटीदरम्यान राष्ट्रपतींनी स्वतः सूत काताई करत गांधीजींच्या स्वावलंबनाच्या तत्त्वांना अभिवादन केले. त्यांच्या या कृतीने उपस्थितांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. साधेपणातून मोठा संदेश देणारी ही कृती विशेष ठरली. उष्णतेचा तीव्र कडाका असतानाही राष्ट्रपती मुर्मू यांनी आश्रम परिसरात बेलाच्या वृक्षाचे वृक्षारोपण केले. ४५ अंश तापमानात केलेल्या या वृक्षारोपणातून त्यांनी निसर्गसंवर्धनाचा ठोस संदेश दिला. नागरिकांनी वृक्षलागवडीकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहनही या कृतीतून अधोरेखित झाले. या प्रसंगी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, सेवाग्राम आश्रमाचे सचिव विजय तांबे यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रपतींच्या या भेटीमुळे सेवाग्राम आश्रम पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला असून, गांधी विचार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देशभर पोहोचवणारा हा दौरा ठरला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ६१ बालविवाह रोखले:जिल्हा महिला व बालविकास विभागाने वर्षभरात केली कारवाई
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास विभागाने गेल्या वर्षभरात ६१ बालविवाह रोखले आहेत. कायद्यानुसार, मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास तो विवाह बालविवाह ठरतो आणि तो करण्यास सक्त मनाई आहे. बालविवाह केवळ कायद्यानेच नव्हे, तर सामाजिक, शैक्षणिक, बालमानसशास्त्र आणि आरोग्याच्या दृष्टीनेही हानिकारक मानले जातात. हे विवाह मंगल कार्य नसून, मुलामुलींच्या भविष्यावर नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे असे विवाह रोखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. जागरूक नागरिकांचा सहभाग आणि यंत्रणेचा तात्काळ प्रतिसाद यामुळे हे बालविवाह रोखणे शक्य झाले. बालविवाह प्रतिबंध ही एक चळवळ होण्यासाठी सर्वसामान्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र दराडे यांनी केले आहे. जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत एकूण ६१ बालविवाह रोखण्यात आले. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये २५, पैठणमध्ये ८, गंगापूरमध्ये ८, वैजापूरमध्ये ३, कन्नडमध्ये २, खुलताबादमध्ये २, फुलंब्रीमध्ये ४, सोयगावमध्ये २ आणि सिल्लोडमध्ये ७ बालविवाह रोखले गेले. रोखलेल्या ६१ प्रकरणांपैकी ५ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले, तर २ पीडित बालिकांना बालगृहांमध्ये संरक्षण पुरवण्यात आले. इतर प्रकरणांमध्ये बालविवाह रोखून पालकांकडून लेखी हमीपत्र घेण्यात आले. नागरिकही बालविवाह निर्मूलनात योगदान देऊ शकतात. आपल्या परिचयात कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ नजीकचे पोलीस ठाणे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष किंवा चाइल्ड हेल्पलाईन १०९८ क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गोपनीय ठेवले जाते. समाजातील सजग नागरिकांनी चाइल्ड हेल्पलाईन १०९८ वर बालविवाहाची माहिती दिल्यास, ती तक्रार संबंधित जिल्ह्यातील चाइल्ड हेल्पलाईनला जोडली जाते. ही सेवा पूर्णपणे निःशुल्क आहे. या हेल्पलाईनवरून समन्वय साधून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, संबंधित क्षेत्राचे पोलीस अधिकारी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयातून एक पथक तयार केले जाते. हे पथक घटनास्थळी भेट देऊन पोलिसांच्या मदतीने बालविवाहास प्रतिबंध करते. आवश्यकता भासल्यास पीडित बालिकेस आश्रय दिला जातो आणि तिचे व तिच्या पालकांचे समुपदेशन केले जाते. बालिकेचे पुनर्वसन करण्याचीही उपाययोजना केली जाते.
इंधनाअभावी मोबाईल टॉवर बंद होणार?
नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे इंधन संकटाचे ढग संपूर्ण जगावर दाटले आहेत. डिझेलचा पुरवठा कमी झाला असून याचा मोठा फटका टेलिकॉम कंपन्यांना बसत आहे. केंद्र सरकारने परिस्थितीचा आढावा घेताना एक महत्त्वपूर्ण समस्या समोर आली आहे. टेलिकॉम क्षेत्राला अत्यावश्यक सेवा मानले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र टॉवरसाठी लागणारे डिझेल मिळवताना या कंपन्यांना प्राधान्य […] The post इंधनाअभावी मोबाईल टॉवर बंद होणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केंद्र सरकारने महिला आरक्षणासाठी आणलेल्या ऐतिहासिक 'नारी शक्ती वंदन' विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू असताना आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्या भाषणादरम्यान एका सत्ताधारी खासदाराने आमदार आदित्य ठाकरे यांचे नाव घेतल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला. यावर संतापलेल्या अरविंद सावंतांनी, मी तोंड उघडले तर तडीपार आणि गोध्रा हत्याकांडही समोर येईल, असा रोखठोक इशारा सत्ताधाऱ्यांना दिला. केंद्र सरकार नारी शक्ती वंदन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. हे विधेयक पारित करण्यासाठी संसदेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन देखील बोलावण्यात आले आहे. विशेष अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकामागील सरकारची भूमिका स्पष्ट केली. हे विधेयक महिलांच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आम्हाला याचे कोणतेही श्रेय घ्यायचे नाही, असे मोदींनी यावेळी नमूद केले. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या चर्चेत राजकीय आरोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. आदित्य ठाकरेंच्या नावावरून ठिणगी खासदार अरविंद सावंत हे विधेयकावर आपले मत मांडताना सरकारचा हेतू स्वच्छ नसल्याची टीका करत होते. याच वेळी सत्ताधारी बाकावरून एका खासदाराने मध्येच आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ आक्षेप घेतला. जे या सभागृहाचे सदस्य नाहीत, अशा व्यक्तीचे नाव अशा पद्धतीने घेणे चुकीचे आहे, असे म्हणत त्यांनी सुनावले. मी गोध्रा हत्याकांडाचे नाव घेऊ का? सत्ताधाऱ्यांच्या या हस्तक्षेपामुळे अरविंद सावंत प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी सत्ताधारी बाकांकडे रोख करत सुनावले. ते म्हणाले, तुम्ही जर मर्यादा ओलांडणार असाल, तर लक्षात ठेवा. मी अशा लोकांची नावे घेतली आहेत जे तुरुंगात गेले होते. आता मी 'तडीपार' कोण होते त्यांचे नाव घेऊ का? महिलांवरील अत्याचाराची पूर्ण यादीच माझ्याकडे आहे. मी जर बोलायला लागलो तर गोध्रा हत्याकांड आणि 'एपस्टीन फाईल्स'चे नावही समोर येईल, हे विसरू नका, असा इशारा अरविंद सावंत यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. नावे कामकाजातून वगळली सभागृहात दोन्ही बाजूंनी आरडाओरड वाढल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर तालिका अध्यक्षांनी मध्यस्थी करत परिस्थिती सावरली. आदित्य ठाकरे यांचे नाव संसदेच्या कामकाजातून काढून टाकले जाईल, असे आश्वासन अध्यक्षांनी दिल्यानंतर हा गदारोळ शांत झाला आणि अरविंद सावंत यांनी आपले भाषण पूर्ण केले.
‘चेक क्लिअरन्स’साठी विलंब झाल्यास बँक जबाबदार
नवी दिल्ली : बँकेने कोणत्याही योग्य कारणाशिवाय ग्राहकाचा चेक वेळेत क्लिअरन्ससाठी सादर केला नाही, तर ती सेवेतील त्रुटी मानली जाईल असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने १५ एप्रिल रोजी दिला. या प्रकरणी न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत कॅनरा बँकेला ठोठावलेला दंड कायम ठेवला आहे. संबंधित ग्राहकाने २९ मे २०१८ […] The post ‘चेक क्लिअरन्स’साठी विलंब झाल्यास बँक जबाबदार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘मुंदडा इंडस्ट्रीज’ला भीषण आग; ३ होरपळले
लातूर : जुनी एमआयडीसी परिसरातील ‘मुंदडा इंडस्ट्रीज’(काच कारखाना)ला गुरूवार दि. १६ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ३:१५ च्या दरम्यान भीषण आग लागली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट झाले आहे. तर या आगीत ३ कर्मचारी होरपळले असून त्यांना प्रथमोपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण […] The post ‘मुंदडा इंडस्ट्रीज’ला भीषण आग; ३ होरपळले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात उन्हाचा तडाखा वाढतच चालला असून, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणासह संपूर्ण महाराष्ट्र घामाघूम झाला आहे. विदर्भातील अकोला शहराने तर उष्णतेचे जागतिक विक्रम मोडीत काढले असून, ते जगातील सर्वाधिक उष्ण शहरांपैकी एक ठरले आहे. या पार्श्वभूमीवर, अकोला आणि नागपूर जिल्हा प्रशासनाने 'हाय अलर्ट' जारी केला असून उष्माघाताचा सामना करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. अकोल्याचा पारा ४४.२ अंशांवर गेल्याने जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी तातडीची आढावा बैठक घेतली. नागरिकांना उन्हापासून वाचवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील शासकीय व ग्रामीण रुग्णालयांत एकूण १३७ उष्माघात खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात नागरिकांना सतर्क करण्यासाठी 'दवंडी' देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात ओआरएस (ORS) आणि आवश्यक औषधांचा साठा पुरेसा ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागपुरात उष्माघातासाठी विशेष 'कोल्ड वॉर्ड' नागपुरातही तापमानाचा पारा ४४ अंशांच्या घरात असल्याने प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (GMC) अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी माहिती दिली की, उष्माघाताच्या रुग्णांच्या शरीराचे तापमान तातडीने कमी करण्यासाठी विशेष 'कोल्ड वॉर्ड' तयार करण्यात आला आहे. या वॉर्डमध्ये एसी, कुलर आणि कोल्ड बाथची (थंड पाण्याचे टब) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विदर्भातील इतर शहरांचे तापमान: मराठवाड्यात सलग पाचव्या दिवशी ४० पार मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत सलग पाच दिवसांपासून पारा ४१ अंशांच्या वर आहे. परभणीमध्ये आज ४१.०४ अंश तापमानाची नोंद झाली. उन्हाचा कडाका वाढल्याने दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. तर हिंगोलीतील ४१ अंश तापमानामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. रस्त्यावर लोक डोक्याला रुमाल आणि गमछा बांधूनच घराबाहेर पडताना दिसत आहेत. पुणेकरांना १७ एप्रिलला उष्णतेच्या लाटेचा इशारा पुण्यातही तापमानाचा आलेख चढता असून १७ एप्रिल रोजी शहरात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुण्यातील पारा ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र, १८ आणि १९ एप्रिल रोजी पावसाची शक्यता असल्याने पुणेकरांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळू शकतो. प्रशासनाकडून नागरिकांसाठी 'गाईडलाईन्स' वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांसाठी गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. या गाईडलाईन्सनुसार दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. तहान नसली तरीही भरपूर पाणी प्या आणि ओआरएस किंवा लिंबू पाण्याचा वापर करा. उन्हात बाहेर पडताना सुती कपडे, टोपी आणि गॉगलचा वापर करा. यासोबतच चक्कर येणे, डोकेदुखी किंवा मळमळ जाणवल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
देशभर चर्चेत राहिलेल्या नाशिक TCS कांडात आता आणखी एक बाजू समोर आलीय. या प्रकरणातला संशयित आरोपी शाहरुखची पत्नी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आली. तिने सर्व आरोप फेटाळले. धर्मांतरासारखा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला. सोबतच शाहरुख सहकाऱ्यांशी फक्त थट्टा-मस्करी करायचा. त्याला केलेली अटक, पुरावे या साऱ्यांवरच तिने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू असून, एचआर मॅनेजर निदा खान अद्यापही फरार असल्याचे समजते. नाशिकमधील TCS BPO कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण झाले. धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या गंभीर तक्रारी पोलिसांकडे आल्या. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या 7 अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्यात. 26 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान 9 महिलांनी एफआयआर (FIR) दाखल केले. त्यांनी कंपनीच्या मुस्लिम टीम लीडर्स आणि एचआर (HR) मॅनेजरवर लैंगिक छळवणुकीसह जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्यासारखे गंभीर आरोप केलेत. त्यामुळे थेट दिल्लीपर्यंत या प्रकरणाचे पडसाद उमटलेत. ‘धर्मांतराचे आरोप खोटे’ संशयित आरोपी शाहरुखच्या पत्नीने 'आजतक'शी बोलताना सर्व आरोप फेटाळलेत. शाहरुखच्या पत्नी म्हणाली की, सर्वात आधी एफआयआरमध्ये नक्की काय लिहिले आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. एफआयआरमध्ये जे म्हटले आहे, त्यात कुठेही धर्मांतर किंवा कोणतेही रॅकेट चालवल्याचा आरोप नाही. त्यात फक्त इतकेच म्हटले आहे की, ते थट्टा-मस्करी करायचे किंवा गप्पा मारायचे. हे प्रकरण धर्मांतर रॅकेट म्हणून ज्या प्रकारे मांडले जात आहे, ते चुकीचे आणि खोटे असल्याचे तिने सांगितले. शाहरुखने महिला कर्मचाऱ्यांच्या पेहरावावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या प्रश्नावर ती म्हणाली की, कॉर्पोरेट क्षेत्रात जर कोणी कोणाच्या कपड्यांवर काही बोलले, तर ते सहसा कौतुक (कॉम्प्लिमेंट) असते. याचा अर्थ असा नाही की कोणी कोणाला जज करत आहे किंवा त्रास देत आहे. या आरोपांना विनाकारण मोठे करून दाखवले जात असल्याचे तिने स्पष्ट केले. 'त्या' मुलींना कधी पाहिलेही नाही… काही तक्रारींमध्ये असा दावा करण्यात आला होता की, महिला कर्मचाऱ्यांना रिसॉर्टवर नेण्याचे प्रस्ताव दिले गेले. यावर शाहरुखची पत्नी म्हणाली की, हे सर्व पूर्णपणे खोटे आहे. ज्या मुलींची नावे समोर आली आहेत, त्यांना आम्ही कधी पाहिले देखील नाही. माझे पती स्वतः टीम लीडर आहेत आणि त्यांच्या हाताखाली 15-20 लोक काम करतात. जर कोणी चूक केली तर ते ओरडतात आणि चांगले काम केले तर कौतुकही करतात. पण या आरोपांना कोणताही आधार नाही. तिने पुढे असेही सांगितले की, दुसरा एक आरोपी दानिश आणि एका महिला कर्मचारी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते, ज्याचा आता या प्रकरणाशी संबंध जोडला जात आहे. आम्हाला माहिती आहे त्यानुसार, त्यांच्यात चार वर्षांपासून नाते होते आणि ही बाब कॅम्पसमध्ये सर्वांना ठाऊक होती. जर दोन सज्ञान व्यक्ती नात्यात असतील, तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे ती म्हणाली. ‘इतक्या वर्षात एकही तक्रार नाही’ शाहरुखच्या पत्नीने त्याच्या कामाच्या रेकॉर्डचाही उल्लेख केला. ती म्हणाली की, तो अनेक वर्षांपासून तिथे काम करत आहे. जर असा काही प्रकार असता तर आधीच तक्रारी आल्या असत्या. पण आजवर त्याच्याविरुद्ध एकही तक्रार आलेली नाही. नुकतीच त्याने कंपनीची एक मोठी परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि त्याला प्रमोशन देखील मिळाले होते. एफआयआरमध्ये काही ठिकाणी हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचाही आरोप आहे. यावर पत्नीने सांगितले की, आम्हाला याबद्दल काहीच माहित नव्हते. जेव्हा या गोष्टी समोर आल्या तेव्हा आम्हाला समजले. मी स्वतः पतीला विचारले, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की त्यांनी कधीही असे विधान केलेले नाही. टीसीएस सारख्या मोठ्या आणि व्यावसायिक कंपनीत काम करणारी व्यक्ती अशा गोष्टी कशी करू शकते, हे अनाकलनीय आहे. अटकेआधी नोटीसही नाही शाहरुखच्या अटकेबाबतही त्याच्या पत्नीने अनेक प्रश्न उपस्थित केले. तिने सांगितले की, 1 एप्रिलच्या रात्री पोलीस साध्या गणवेशात आमच्या घरी आले आणि स्टेटमेंटवर सही करण्यासाठी शाहरुखला सोबत यावे लागेल असे सांगितले. आम्ही पूर्ण सहकार्य करत होतो, त्यामुळे तो त्यांच्यासोबत गेला. पण नंतर समजले की त्याला अटक करण्यात आली आहे. आम्हाला आधी कोणतीही नोटीस दिली गेली नव्हती. कार्यालयातील इतर लोक तिथे उपस्थित असताना केवळ काही ठराविक लोकांनाच का अटक करण्यात आली, असा आरोपही तिने केला. महिला कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याच्या आरोपावर ती म्हणाली, हे आरोपही धादांत खोटे आहेत. जर असे काही घडले असते तर त्याचे पुरावे असायला हवे होते. इतका मोठा तपास सुरू आहे, पण अद्याप कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. ‘चार वर्षे गप्प का राहिल्या?’ तिने सवाल केला की, जर कोणासोबत इतके काही घडत होते, तर त्यांनी आधी तक्रार का केली नाही? कंपनीत मॅनेजर, वरिष्ठ अधिकारी असतात, त्यांना का सांगितले नाही? थेट इतके मोठे आरोप करणे आणि ते मीडियात अशा प्रकारे प्रसिद्ध करणे योग्य नसल्याचे तिचे म्हणणे आहे. तिचे कुटुंब तपासात पूर्ण सहकार्य करत असून न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे तिने शेवटी सांगितले.
सिग्नल यंत्रणेत बिघाड करून शिर्डी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटले
परभणी : मानवत तालुक्यातील मानवत रोड रेल्वे स्थानकाजवळ गुरुवार, दि.१६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास साईनगर शिर्डी एक्स्प्रेस रेल्वे सिग्नल यंत्रणेत बिघाड करून लुटण्यात आल्याची घटना घडली. चोरट्यांनी रेल्वे थांबताच जनरल डब्यासह आरक्षित डब्यातील दोन महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे समजते. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मानवतरोड रेल्वे स्थानकावर […] The post सिग्नल यंत्रणेत बिघाड करून शिर्डी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना लुटले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘डेटिंग’च्या जाळ्या अडकल्या ५०० महिला
नवी दिल्ली : चित्रपट असो वा नाटक… वेगवेगळ्या ओळखी सांगून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणा-या आणि त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करणा-या ठगांच्या गोष्टी तुम्ही आजवर पडद्यावर पाहिल्या असतील. अशीच फिल्मी स्टाईल फसवणुकीची घटना समोर आली आहे. एका ठगाने तब्बल ५०० हून अधिक महिलांची सुमारे २ कोटी रुपयांची फसवणूक केली असून दिल्ली सायबर पोलिसांनी त्याला अटक केली […] The post ‘डेटिंग’च्या जाळ्या अडकल्या ५०० महिला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मोहोळचा पारा ४१° वर; रखरखत्या उन्हामुळे तहसील कार्यालय आणि मुख्य रस्ते ओस!
मोहोळ (प्रतिनिधी): एप्रिल महिन्याच्या मध्यावरच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, मोहोळ तालुक्यातील तापमानाने आज ४१C सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. प्रखर उष्णतेच्या झळांमुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, एरव्ही गजबजलेल्या तहसील कार्यालयासह शहराच्या मुख्य रस्त्यांवर दुपारी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मोहोळमध्ये आज कमाल तापमान ४१C तर किमान तापमान २७C नोंदवले गेले. त्यामुळे विविध शासकीय कामांवर […] The post मोहोळचा पारा ४१ वर; रखरखत्या उन्हामुळे तहसील कार्यालय आणि मुख्य रस्ते ओस! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला तणाव जागतिक स्तरावर काहीसा निवळला असला, तरी त्याचे पडसाद भारतातील स्वयंपाकाच्या गॅसवर (LPG) अद्यापही उमटत आहेत. राज्यात गॅसचा तुटवडा अद्यापही काही प्रमाणात कायम असून, नागरिकांना एका सिलिंडरसाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. प्रशासनाकडून 'पुरवठा सुरळीत' असल्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्ष जमिनीवरची स्थिती भयावह आहे. याच संतापातून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एका ग्राहकाने गॅस मिळत नसल्याने चक्क स्वतःचे डोकं फोडून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरालगतच्या वाळूज भागातील रांजणगाव शेपू येथील कमल गॅस एजन्सीबाहेर आज दुपारी १ च्या सुमारास हा थरार घडला. बालचंद नेमाने (वय ५०, रा. रांजणगाव) असे या जखमी व्यक्तीचे नाव आहे. नेमाने हे गेल्या अनेक दिवसांपासून गॅस सिलिंडरसाठी एजन्सीच्या पायऱ्या झिजवत होते. वारंवार चकरा मारूनही गॅस मिळत नसल्याने आज त्यांचा संयम सुटला. बायकोला काय तोंड दाखवू म्हणत फोडले डोके अनेक दिवस झाले गॅस मिळत नाहीये, आता रिकाम्या हाताने घरी गेल्यावर बायकोला काय तोंड दाखवू? असा उद्विग्न सवाल करत त्यांनी संतापाच्या भरात गॅस एजन्सीच्या बाहेरच स्वतःचे डोकं फोडून घेतले. या प्रकारामुळे एजन्सीबाहेर मोठा गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेऊन नेमाने यांना तात्काळ उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेने सर्वसामान्य नागरिकांमधील वाढता असंतोष अधोरेखित केला आहे. अकोल्यात रांगेतच व्यक्तीचा मृत्यू केवळ छत्रपती संभाजीनगरच नव्हे तर संपूर्ण राज्यात गॅसची हीच अवस्था आहे. काही दिवसांपूर्वी अकोल्यात गॅसच्या रांगेत उभे असताना एका वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेवरून राजकारणही तापले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी यावरून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. सिलिंडर बुक करा, २५ दिवसांनी येईल, असे बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची माफी मागावी, अशा शब्दांत त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. तर अकोल्यातील त्या व्यक्तीच्या मृत्युला सरकारच जबाबदार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. प्रशासकीय दावे आणि वस्तूस्थिती पुरवठा विभागाकडून गॅसची कमतरता नसल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र, हॉटेल व्यावसायिकांपासून ते सामान्य गृहिणींपर्यंत सर्वांचेच बजेट आणि दैनंदिन कामकाज या टंचाईमुळे कोलमडले आहे. अनेक ठिकाणी गॅस एजन्सीबाहेर किलोमीटर लांब रांगा पाहायला मिळत असून, ग्राहकांना रिकाम्या हाती परतावे लागत असल्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
पूर्णा शहराचा पारा ४२° वर; रणरणत्या उन्हामुळे रस्ते पडले ओस!
पूर्णा (प्रतिनिधी): एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून, पूर्णा शहरात गुरुवारी (१६ एप्रिल) तापमानाचा पारा ४२ सेल्सिअसवर पोहोचला. कडक उन्हामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत शहरातील वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य झाले असून, अघोषित संचारबंदी असल्यासारखा शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पूर्ण शहराचे कमाल तापमान ४२C तर किमान तापमान २६C नोंदवले गेले आहे. उन्हामुळे […] The post पूर्णा शहराचा पारा ४२ वर; रणरणत्या उन्हामुळे रस्ते पडले ओस! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पत्नीला पेट्रोल टाकून जीवंत जाळले
सोलापूर : प्रतिनिधी सोलापुरात पती-पत्नीच्या वादातून एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. फैजान शेखने पत्नी नर्गिसला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. गंभीर भाजलेल्या नर्गिसवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लग्नाच्या काही महिन्यातच घटस्फोटाच्या वादातून हा प्रकार घडला. आरोपी पती फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना घरगुती हिंसाचाराचे भयाण रूप दर्शवते. सोलापुरात एक अत्यंत […] The post पत्नीला पेट्रोल टाकून जीवंत जाळले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे 'शेतकरी न्याय सत्याग्रह' आंदोलन करण्यात आले. भारत-अमेरिका कराराविरोधात पुकारलेल्या या सत्याग्रहाला पुणे जिल्ह्यातील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा करार भारतीय शेतकऱ्यांच्या अस्तित्वावर घाला घालणारा असून, तो तात्काळ मागे न घेतल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला. आंदोलनाला शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. आगामी काळात हा लढा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार यांनी केंद्र सरकारच्या तथाकथित 'किसान ट्रेड डील'वर तीव्र टीका केली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसने नेहमीच पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारने घेतलेली धोरणे शेतकऱ्यांसाठी मारक ठरत आहेत. कर्जमाफी होत नाही, शेतीमालाला किमान आधारभूत किंमत (MSP) मिळत नाही, परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे पुणे ग्रामीण युवक काँग्रेसच्या माध्यमातून गावागावातून युवकांना एकत्र करून हा लढा अधिक बळकट करण्यात येईल. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील. 'शेतकरी वाचवा, युवक वाचवा, भारत वाचवा' हा नारा जनमानसात पोहोचवण्याची गरज आहे, असे पवार यांनी नमूद केले. सत्याग्रहात माजी आमदार रामहरी रुपनवर, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष लहू निवंगुने, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, वीरधवल गाडे, विश्वजीत जाधव, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार, पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले, सौरभ अमराळे, यशवंत मोहोळ, वैभव यादव, अशोक घोलप, सौरभ रुपनवर, वैभव बुरंगुले, संकेत गवारी, राहुल जाधव आणि संदीप सातकर आदी पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
परदेशातून देणगी स्वीकारण्यास शास्त्रींना परवानगी
नवी दिल्ली : बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री यांना परदेशातून देणग्या स्वीकारण्यासाठी आता अधिकृत मंजुरी मिळाली आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात असलेल्या बागेश्वर धामला भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने परकीय योगदान नियमन कायद्याअंतर्गत ही मंजुरी दिली आहे. यानंतर आता परदेशात राहणारे लोक धीरेंद्र शास्त्री यांच्या संस्थेला कायदेशीररित्या देणगी देऊ शकतील. परदेशातून देणग्या स्वीकारण्यासाठी संस्थेला विशेष परवानगीची […] The post परदेशातून देणगी स्वीकारण्यास शास्त्रींना परवानगी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोहिनूर कट्टातर्फे आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ पर्यावरण व पाणी तज्ज्ञ तसेच गोमुखचे अध्यक्ष प्रा. विजय परांजपे यांच्या हस्ते महोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण करून त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. परांजपे यांनी राम नदीच्या पुनरुज्जीवनासाठी तिच्या उगमस्थानापासून संगमापर्यंत सखोल अभ्यास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. नदीची वारी-परिक्रमा व्हावी आणि मानवनिर्मित चुकांमुळे झालेले प्रदूषण कमी करणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. प्रा. परांजपे यांनी 'राम नदी काल-आज-उद्या' या विषयावर आपले विचार मांडले. नदी परिसरातील नैसर्गिक अधिवासही जतन करणे हे मानवाचे कर्तव्य असून, राम नदी प्रदूषित होण्यास मानवच जबाबदार आहे, यावर त्यांनी भर दिला. राम नदीशी नाते निर्माण व्हावे, तिच्या जैवविविधतेचा अभ्यास व्हावा आणि तिची स्वच्छता राखण्यासाठी युवा पिढी प्रेरित व्हावी, या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून हा चित्रपट महोत्सव आयोजित केला जात आहे. यावेळी कोहिनूर ग्रुपचे संचालक विनीत गोयल, संयोजक वीरेंद्र चित्राव आणि अनिल गायकवाड मंचावर उपस्थित होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. विजय परांजपे पुढे म्हणाले की, नदीचे संरक्षण-संवर्धन याविषयी अभ्यास करताना नदीतील जिवंत झरे, खडक, धबधबे यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मानवनिर्मित प्रदूषणामुळे झालेला नदीचा ऱ्हास समजून घेऊन त्या चुका पुन्हा होऊ न देता सुधारणा करणे गरजेचे आहे. नदीच्या पाण्यात स्वशुद्धीकरणाची यंत्रणा अस्तित्वात असतेच; परंतु मानवाने छोट्या प्रक्रियांमधून नदीच्या पाण्याची शुद्धता सांभाळणे, त्याकरिता नदीला येऊन मिळणाऱ्या नाले-ओढ्यांचे शुद्धीकरण करणे आवश्यक आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना नदीची परिक्रमा करून तिची वैशिष्ट्ये नोंदवण्याचा, पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करून विश्लेषण करण्याचा सल्ला दिला. विनीत गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितले की, भारतीय परंपरेत नदीला मातेसमान मानले जाते आणि तिचे पूजन केले जाते. नदी प्रदूषित झाल्यास संपूर्ण सृष्टीचे चक्र बिघडते, त्यामुळे नद्या स्वच्छ राहणे अत्यंत गरजेचे आहे. हे कार्य कुणा एकाचे नसून, यासाठी योग्य त्या मार्गदर्शनाखाली समाजाने एकत्र काम करणे आवश्यक आहे. कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सव युवा पिढीसाठी प्रेरक असून, या उपक्रमास सातत्याने सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविकात सांगितले की, सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या १९.२ किमी लांबीच्या राम नदीचा प्रवाह पूर्वीप्रमाणे जास्तीत जास्त शुद्ध व्हावा आणि ती अविरल व निर्मल व्हावी, या उद्देशाने सातत्याने काम चालू आहे. अशी नदी शांतताप्रिय व आनंदी समाज घडवण्यासाठी मदत करेल आणि यातून भावी पिढ्यांसाठी समृद्ध निसर्ग निर्माण होईल. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वसमावेशक व शाश्वत प्रारूप तयार करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे हा महोत्सव आहे.
वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना-भाजप आमने-सामने
मुंबई : प्रतिनिधी काशीगाव मेट्रो परिसरातील सुमारे ३० टक्के जमिनीच्या वादावरून मीरा-भाईंदरच्या राजकारणात नवा संघर्ष पेटला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या भागातील मोठ्या जमिनी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीच्या असल्याचा दावा केल्यानंतर वादाला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र मेहता यांनी माध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक यांच्यावर जोरदार टीका केली. जर माझ्याकडे ३० टक्के […] The post वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना-भाजप आमने-सामने appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक अशी एकूण 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने यासाठी संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला असून त्याच दिवशी संध्याकाळी निकालही घोषित केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. याच दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महत्त्वाचे वक्तव्य करत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेत असतील तर काँग्रेस त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहे. मात्र, इतर कोणत्याही प्रस्तावावर चर्चा आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे आघाडीतील जागावाटपावरून मतभेद उघड होण्याची चिन्हे दिसत आहेत. सपकाळ यांनी पुढे बोलताना राजीव सातव यांच्या जागेचा मुद्दाही उपस्थित केला. ही जागा काँग्रेसची असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी राजकीय संस्कृतीबद्दल केलेल्या विधानाची आठवण करून देत, आता तीच संस्कृती दाखवत ही जागा काँग्रेसला देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीतील गणित पाहता सत्ताधारी महायुती मजबूत स्थितीत असल्याचे दिसते. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपकडे 131, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 40 आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे किमान 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ सुमारे 46 असल्याने त्यांचा केवळ एक उमेदवार निश्चित विजयी होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. त्यामुळे दुसऱ्या जागेसाठी महाविकास आघाडीला अतिरिक्त 10 मतांची गरज भासणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत ही मतांची जुळवाजुळव करणे कठीण मानले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संपूर्ण प्रक्रिया 13 मेपर्यंत पूर्ण निवडणुकीचा कार्यक्रमही स्पष्ट करण्यात आला आहे. 23 एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार असून 30 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. 2 मे रोजी अर्जांची छाननी होईल, तर 4 मेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 12 मे रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. संपूर्ण प्रक्रिया 13 मेपर्यंत पूर्ण केली जाणार असून या निवडणुकीतून राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील तेलपुरवठा खंडित झाला आहे. भारतामध्येही इंधनाची टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत, इराणमधून सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन आलेला एक टँकर गुजरात किना-यावर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या टँकरबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने भारतीय तेल कंपन्यांनी हे इराणी तेल स्वीकारण्यास नकार दिला आहे. ‘द […] The post इराणचे तेल स्वीकारण्यास नकार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लाहोर : ‘लश्कर ए तोयबा’चा संस्थापक सदस्य असलेला अमीर हमजावर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली आहे. लाहौरमध्ये अज्ञात व्यक्तीने अमीर हमजावर गोळीबार केला. एका न्यूज चॅनेलच्या कार्यालयाबाहेरच ही घटना घडली आहे. लाहौर पाकिस्तानातील पंजाब प्रांताची राजधानी आहे. अमीर हमजाला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. अमीर हमजा हा दहशतवादी हाफिज सईद यांचा जवळचा साथीदार असून […] The post अमीर हमजा ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मंगरुळ खूनप्रकरणाचा २४ तासांत उलगडा; पत्नी व प्रियकर पोलिसांच्या ताब्यात
तुळजापूर : तालुक्यातील मंगरुळ येथे घडलेल्या युवकाच्या खूनप्रकरणाचा तुळजापूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणात मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले असून, घटनेमागील धक्कादायक सत्य समोर आले आहे. कृष्णाथ आनंद साठे (वय ३६) यांचा मृतदेह तुळजापूर-अक्कलकोट मार्गावरील नटकल पुलाजवळ आढळून आला होता. डोक्यात दगडाने वार करून हत्या […] The post मंगरुळ खूनप्रकरणाचा २४ तासांत उलगडा; पत्नी व प्रियकर पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भोंदू खरातचा अंक खेळ; कार नंबरपासून साम्राज्यापर्यंत ९ चा प्रभाव
नाशिक : प्रतिनिधी भोंदूगिरी आणि अंकशास्त्राच्या नावाखाली लोकांना फसवणा-या अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. अंकशास्त्राचा मोठा गाजावाजा करणारा खरात स्वत:साठी ९ हा अंक अत्यंत शुभ मानत होता. त्यामुळेच त्याने आपल्या गाड्यांचे नंबरही खास करून असे निवडले होते. तपास यंत्रणांच्या चौकशीत असे समोर आले की, खरातने आरटीओमधून चॉईस नंबर घेऊन आपल्या गाड्यांचे क्रमांक निश्चित […] The post भोंदू खरातचा अंक खेळ; कार नंबरपासून साम्राज्यापर्यंत ९ चा प्रभाव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकनंतर संगमनेरमध्ये भोंदूबाबा; मंत्रोच्चाराने आजार बरे करण्याचा दावा
अहिल्यानगर : प्रतिनिधी नाशिकच्या अशोक खरातने मांडलेल्या भोंदूगिरीच्या खेळाचा तपास सुरू असतानाच, आता अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून अशाच एका लुटारू बाबाचा प्रताप उघडकीस आला आहे. मंत्रांच्या जोरावर शारीरिक व्याधी दूर करण्याचा दावा संगमनेरच्या कोल्हेवाडी येथील दत्तधाम आश्रमातून केला जात आहे. कोल्हेवाडीतील दत्तधाम आश्रमात सध्या या तथाकथित महाराजाचा दरबार भरत असून, मंत्रोच्चाराने कॅन्सरसारखे आजारही बरे होतात, […] The post नाशिकनंतर संगमनेरमध्ये भोंदूबाबा; मंत्रोच्चाराने आजार बरे करण्याचा दावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उपचाराच्या नावाखाली महिलांचे शोषण; मुंबईतला भोंदूबाबा अटकेत
मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या दिंडोशी परिसरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. उपचारांच्या नावाखाली महिलांना मध्यरात्री बोलावून त्यांचे शोषण करणा-या आणि भक्तांची लूट करणा-या मुंबईतील एका भोंदूबाबाला अटक करण्यात आली आहे. रिदम पांचाळ ऊर्फ मॉन्टी पांचाळ (३७) असे या भोंदूबाबाचे नाव असून दिंडोशी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. भाजपचे माजी नगरसेवक अॅड. सिद्धार्थ शर्मा यांच्या […] The post उपचाराच्या नावाखाली महिलांचे शोषण; मुंबईतला भोंदूबाबा अटकेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्राच्या राजकारणात आक्रमक आणि जनतेसाठी झटणारे नेते म्हणून ओळख असलेले बच्चू कडू यांनी यावेळी एक वेगळाच पराक्रम गाजवला आहे. 13 एप्रिल रोजी त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत यशस्वी मजल मारत एक नवा विक्रम नोंदवला. 5364 मीटर म्हणजेच 17,594 फूट उंचीवर पोहोचत त्यांनी आपल्या जिद्दीचा आणि चिकाटीचा ठसा उमटवला. विशेष म्हणजे, हा प्रवास त्यांनी कोणत्याही विशेष सुविधा न घेता पूर्ण केला. हा संपूर्ण ट्रेक अत्यंत खडतर मानला जातो. सलग आठ दिवस दररोज 12 ते 14 किलोमीटर पायी चालत, डोंगर-दऱ्यांमधून चढाई करत हा प्रवास पार करावा लागतो. जसजसे उंची वाढत जाते, तसतसे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर तर फक्त 45 टक्के ऑक्सिजन उपलब्ध असतो. त्यामुळे श्वास घेणेही कठीण होते. याशिवाय उणे 15 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचणारी थंडी ही आणखी एक मोठी परीक्षा होती. या कठीण परिस्थितीत बच्चू कडू यांनी आपल्या मुलासोबत हा ट्रेक पूर्ण केला. ‘द अल्पायनिस्ट’ या संस्थेच्या माध्यमातून आयोजित या मोहिमेत त्यांना एव्हरेस्टवीर भगवान चवले यांचे मार्गदर्शन लाभले. एकूण 14 सहकाऱ्यांसह त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. शेवटच्या दिवशी 17 किलोमीटरचा लांब टप्पा पार करत त्यांनी बेस कॅम्प गाठला. या संपूर्ण मोहिमेत त्यांनी शारीरिक आणि मानसिक ताकदीची कसोटी दिली. सामाजिक मूल्यांचा संदेश देण्याचा प्रयत्न या मोहिमेला बच्चू कडूंनी एक सामाजिक आणि प्रेरणादायी संदेशही जोडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांनी ही मोहीम भारताचे संविधान आणि भगवद्गीता यांना समर्पित केली. यामागे देशभक्ती आणि सामाजिक मूल्यांचा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून आले. त्यांच्या या कृतीमुळे अनेकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली आहे. दरम्यान, नेपाळमध्ये ट्रेकिंगसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा पाहून बच्चू कडूंनी महाराष्ट्रातही अशाच सुविधा निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. राज्यात साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले. जनआंदोलनातून पुढे आलेले लढवय्ये नेते बच्चू कडू यांची ओळख केवळ राजकारणी म्हणून नाही, तर जनआंदोलनातून पुढे आलेले लढवय्ये नेते म्हणून आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते म्हणून त्यांनी दिव्यांग, शेतकरी आणि वंचित घटकांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या संघर्षमय प्रवासात आता एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करण्याची कामगिरीही जोडली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रातील एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठणारे ते कदाचित पहिलेच नेते ठरले असून, त्यांच्या या यशाची राज्यभरात चर्चा रंगली आहे.
महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे देगलूर नाका परिसरात पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू
नांदेड : सुनिल पारडे नांदेड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. देगलूर नाका परिसरात महापालिकेच्या वतीने नाल्याचे काम सुरू आहे. त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून ४ लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुदैर्वी घटना आज १६ एप्रिल रोजी गुरूवारी दुपारी घडली. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहरात शोककळा पसरली आहे.तर […] The post महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे देगलूर नाका परिसरात पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाच्या निषेधार्थ शहरातील वातावरण तापलेले असतानाच आज हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत मोठी बाईक रॅली काढली. या रॅलीत शेकडो महिला, तरुणी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये तापमान 38 ते 39 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले असतानाही आंदोलकांनी उन्हाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. ही रॅली ज्या कंपनीत हा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप आहे, त्या ठिकाणाहून सुरू झाली. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचली. रॅलीदरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत संबंधित प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवला. धर्मांतराच्या कथित षडयंत्राविरोधात कठोर कारवाईची मागणी यावेळी सातत्याने करण्यात आली. या आंदोलनात महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. अनेक तरुणी आणि महिला दुचाकीवरून सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे या रॅलीला रणरागिणींची बाईक रॅली, असे स्वरूप प्राप्त झाले. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही या रॅलीत सहभाग घेत आंदोलकांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. आंदोलकांची प्रमुख मागणी म्हणजे पीडित महिलांना तात्काळ न्याय मिळावा आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी होती. या प्रकरणामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, नागरिकांमध्येही संतापाची भावना निर्माण झाल्याचे दिसून आले. विविध हिंदुत्ववादी संघटना या मुद्द्यावर एकत्र आल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. कारवाई करण्याचा दबाव रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलिस तैनात करण्यात आले होते. आंदोलकांची संख्या मोठी असतानाही रॅली शांततेत पार पडली, मात्र घोषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण राहिले. दरम्यान, या आंदोलनामुळे नाशिकमधील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणाला अधिकच वेग मिळाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे. प्रशासनावरही या प्रकरणात जलद आणि ठोस कारवाई करण्याचा दबाव वाढताना दिसत आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत सार्वजनिक आरोग्य विभागातील बदल्यांचे नवे धोरण जाहीर केले आहे. या संदर्भात शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून या धोरणामुळे बदल्यांमध्ये सुसूत्रता, पारदर्शकता आणि समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः गट-ब, गट-क आणि गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी हे सर्वसमावेशक धोरण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून बदल्यांबाबत होत असलेल्या तक्रारींना काही प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या नव्या धोरणानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील सर्व संस्था आणि कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एकसमान नियमावली तयार करण्यात आली आहे. बदली वर्ष ही संकल्पना स्पष्ट करताना 31 मेपर्यंत ज्या बदल्या केल्या जातील ते वर्ष ग्राह्य धरले जाणार आहे. तसेच एखाद्या कर्मचाऱ्याच्या बदलीसाठी विचार करताना त्याची सलग सेवा 31 मेपर्यंत पूर्ण झालेली असणे आवश्यक ठरणार आहे. यामुळे बदली प्रक्रियेत स्पष्टता येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. याशिवाय, कोणत्याही कार्यालयातील एकूण कर्मचाऱ्यांच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त बदल्या एका वर्षात एकाच वेळी करता येणार नाहीत, असा महत्त्वाचा नियम लागू करण्यात आला आहे. यामुळे अचानक मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बदल्यांवर मर्यादा येणार आहे. तसेच विनंती बदल्यांचे आदेश दरवर्षी सप्टेंबर आणि डिसेंबर या दोन टप्प्यांत काढले जाणार आहेत. बदल्यांच्या प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप रोखण्यासाठीही सरकारने कठोर भूमिका घेतली असून, दबाव टाकल्याचे आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. बदल्यांमध्ये प्राधान्यक्रम निश्चित करताना सरकारने मानवी दृष्टिकोनही ठेवला आहे. गंभीर आजारांनी ग्रस्त कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबीयांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. यात पक्षाघात, हृदय शस्त्रक्रिया, कॅन्सर, मूत्रपिंड प्रत्यारोपण किंवा डायलिसीस अशा गंभीर आजारांचा समावेश आहे. तसेच अपंग कर्मचारी, मतिमंद मुलांचे पालक, तसेच आजी-माजी सैनिकांच्या पत्नी किंवा विधवा यांनाही प्राधान्य दिले जाणार आहे. या निर्णयामुळे गरजू कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठीही या धोरणात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित किंवा अविवाहित महिला कर्मचाऱ्यांना बदल्यांमध्ये प्राधान्य मिळणार आहे. तसेच 53 वर्षांवरील कर्मचारी, पती-पत्नी एकत्रीकरण आणि दहावी-बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांचे पालक यांचाही विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे कौटुंबिक आणि वैयक्तिक अडचणी लक्षात घेऊन बदल्यांचे नियोजन होणार आहे. बदल्यांची प्रक्रिया शिस्तबद्ध होण्याची अपेक्षा दरम्यान, बदल्यांचे अंतिम अधिकारही स्पष्ट करण्यात आले आहेत. गट-ब कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी सचिव-2 हे प्राधिकरण असतील आणि त्यासाठी आरोग्य मंत्र्यांची मान्यता आवश्यक असेल. गट-ड कर्मचाऱ्यांच्या बदल्या आरोग्य सेवा आयुक्तालय, पुणे यांच्या अखत्यारित केल्या जाणार आहेत. हा शासन निर्णय उपसचिव चंद्रकांत विभूते यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला असून, या नव्या धोरणामुळे आरोग्य विभागातील बदल्यांची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध होण्याची अपेक्षा आहे.
राज्यातील माथाडी कामगारांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत राज्य सरकारने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या गोण्यांचे वजन आता कमाल 50 किलोपर्यंतच मर्यादित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कांदा, बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक ठिकाणी जड गोण्यांची चढउतार करताना कामगारांना मोठ्या प्रमाणावर शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर कामगारांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर सरकारने हिरवा कंदील दिला आहे. माथाडी कामगारांना दररोज जड गोण्या उचलण्याचे काम करावे लागते. अनेकदा 50 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या उचलताना त्यांच्या शरीरावर ताण येतो. यामुळे पाठदुखी, सांधेदुखी आणि इतर गंभीर व्याधी निर्माण होण्याची शक्यता वाढते. विशेषतः वय वाढल्यानंतर या त्रासाचे प्रमाण अधिक वाढते. त्यामुळे या कामगारांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी गोण्यांच्या वजनावर मर्यादा घालणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनीही सांगितले होते. या निर्णयामागे आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचाही मोठा वाटा आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी जड वजन उचलण्यावर मर्यादा असावी, असा निर्णय यापूर्वीच आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आला होता. केंद्र सरकारनेही यासंदर्भात राज्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्य शासनाने याआधीच परिपत्रकाद्वारे मार्गदर्शन केले होते, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी विविध कामगार संघटनांकडून सातत्याने मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला कामगार संघटना, व्यापारी संघटना, कामगार विभाग, तसेच किराणा बाजार आणि दुकाने मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व संबंधित घटकांशी चर्चा करूनच हा निर्णय अंतिम करण्यात आला. त्यामुळे हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने बाजार समित्यांना या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी गोण्यांचे वजन 50 किलोच्या मर्यादेत ठेवावे यासाठी जनजागृती करण्यास सांगितले आहे. तसेच बाजार समित्यांमध्ये 50 किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांची चढउतार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे कामगारांचे आरोग्य सुरक्षित राहील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा दरम्यान, या नव्या नियमामुळे बाजार समित्यांच्या दैनंदिन कामकाजावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. उलट, कामगारांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांपासून त्यांना दिलासा मिळेल. एकूणच, या निर्णयामुळे माथाडी कामगारांच्या खांद्यावरील जड ओझे हलके होणार असून, त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुंबई : प्रतिनिधी दलित पँथरचे प्रणेते आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित ‘ढसाळ’ या चरित्रपटाची अखेर अधिकृत घोषणा करण्यात आली असून, त्याचे भव्य पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधत मुंबईत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर नामदेव ढसाळ यांच्या […] The post ललित प्रभाकर साकारणार ‘ढसाळ’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात सूर्य आग ओकतोय, सकाळी सात वाजल्यापासूनच कडाक्याचे ऊन जाणवत असून राज्य उष्णतेच्या ‘रेड झोन’मध्ये आले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील काही जिल्ह्यांचा समावेश ‘अति उच्च उष्णता धोका’ श्रेणीत करण्यात आला आहे. उष्मघातामुळे राज्यात ३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अकोला, हिंगोली आणि वाशिम या ठिकाणी उष्णघातामुळे ३ जणांचा मृत्यू […] The post महाराष्ट्र ‘रेड झोन’मध्ये appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उद्धव ठाकरे, संजय राऊत हे कधी मनपाची सुद्धा निवडणूक लढले नाही त्यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या बोलताना मतदारसंघ असे फोडले जातील तसे फोडले जातील असे सांगू नये. राऊत यांना स्वत:चा मतदारसंघ नाही. त्यामुळे तुम्ही मतदारसंघाची चिंता करू नका, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उद्या विधेयक मंजूर झाल्यावर सांगा, ठाकरे, काँग्रेस देशाचे शत्रू आहेत का? हे सांगा असेही बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की,कुठल्याही खासदारांना संसदेत येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही ही माहिती संजय राऊत यांना नाही का? मनाला येईल ती वायफळ बडबड करण्याचा तुमचा धंदा गेली 4 ते 5 वर्षे सुरू आहे. उद्या तृणमृल काँग्रेस, काँग्रेस, उबाठाचे खासदार विधेयकाला पाठिंबा देणार आहेत आणि संजय राऊत तोंडावर पडणार आहेत. राऊतांच्या पक्षाकडून महिलांना शिवीगाळ नवनाथ बन म्हणाले की, नारी शक्ती विधेयक हे काही भाजप शक्ती विधेयक नाही.तर भारत शक्ती विधेयक आहे. महिलांना सन्मानाचे स्थान मिळण्यासाठी हे विधेयक आहे. महिलांची शक्ती वाढवणारे हे बिल आहे. लोकसभेत महिलांचे नेतृत्व पुढे यावे म्हणून हे विधेयक आहे. राऊतांकडून या विधेयकाला विरोध करण्यात येतोय कारण त्यांच्या पक्षाकडून महिलांना शिवीगाळ करण्यात येते, हे बिल आले तर आपल्या पक्षाचे काही खरे नाही हे राऊतांना समजले म्हणून ते विरोध करत आहे. या विधेयकाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान होऊ नये अशी राऊतांची इच्छा आहे. राऊतांना देशाचे तुकडे व्हावे असे वाटते नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत तुमच्या मनात कितीही इच्छा असेल की या देशात वनवा पेटावा तरी या देशात असे काही होणार नाही. कारण देश नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी उभा आहे. नारी शक्ती विधेयकाच्या माध्यमातून उत्तर VS दक्षिण असा सामना रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्हाला देशाचे तुकडे व्हावे असे वाटते आहे, पण असे काहीच होणार नाही. इतर देशात जेव्हा हिंसाचार झाला त्यावेळी तुम्ही स्वप्न पाहिले होते पण देश नरेंद्र मोदी यांच्या पाठिशी आहे. आम्ही तुमच्यासारखे घरात बसत नाही नवनाथ बन म्हणाले की, 5 राज्यातील निवडणूक ही काय केवळ विरोधी पक्षातील खासदारांनाच आहे का? भाजपचे खासदार या निवडणुकीत मेहनत घेत आहेत. भाजपचे खासदार हे तुमच्यासारखे घरात बसून राहत नाही. ते लोकांमध्ये जातात, ते जर संसदेमध्ये येऊ शकतात तर बाकीच्या खासदारांना येण्यास काय समस्या आहे. विनाकारण पराभव होणार हे माहिती असल्याने ते पराभवाची कारणे शोधत असतात.
सातारा जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात आघाडीवर नेण्याच्या दृष्टीने ‘कोयना बॅकवॉटर महोत्सव 2026’ हा एक मैलाचा दगड ठरणार असून, महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि नैसर्गिक पर्यटनाला नवे बळ मिळणार आहे, असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. राज्यातील पर्यटनाला नवे परिमाण देण्यासाठी आणि सातारा जिल्ह्यातील कोयना बॅकवॉटर परिसराचे अद्वितीय नैसर्गिक सौंदर्य जगभर पोहोचवण्यासाठी कोयना तापोळा मुनावळे बॅकवॉटर महोत्सव 2026 भव्य स्वरूपात येत्या डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनाबाबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृह येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, उपसचिव संतोष रोकडे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि सहसंचालक संतोष जाधव यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत महोत्सवाचे स्वरूप, नियोजन आणि विविध आकर्षणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महोत्सव महाबळेश्वर – तापोळा – मुनावळे या निसर्गरम्य परिसरात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याचा सरकारचा मानस आहे. पर्यटनाला मोठी चालना मिळणार मंत्री देसाई यांनी सांगितले की, कोयना बॅकवॉटर परिसराला जागतिक पर्यटन नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सूचनांनुसार महोत्सवाचे नियोजन अत्यंत भव्य आणि दर्जेदार पद्धतीने करण्यात येईल. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सातारा जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. सुधारित रस्ते आणि सुविधा यामुळे पर्यटकांचा प्रवास अधिक सुलभ व सुखकर होणार आहे. महोत्सवात पर्यटकांसाठी विविध आकर्षक उपक्रमांची रेलचेल असणार आहे. यामध्ये जलक्रीडा (वॉटर स्पोर्ट्स), हेलिकॉप्टर राईड, बग्गी राईड, ड्रोन शो, हाऊसबोट, फ्लोटिंग मार्केट, टेंट सिटी, खाद्य जत्रा, हेरिटेज वॉक विथ राईड , मॉर्निंग योगा, किल्ले व शस्त्र प्रदर्शन, तसेच बालमेळा यांसारख्या उपक्रमांचा समावेश असेल. संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघणार असून पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी शालेय सुट्ट्यांच्या कालावधीत महोत्सव आयोजित करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना पर्यटन, संस्कृती आणि साहसी उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळेल. तसेच तापोळा परिसरात महोत्सवासाठी योग्य स्थळ निश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिले आहेत. महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग करण्यासाठी व्यापक प्रसिद्धी मोहीम राबविण्यावरही भर देण्याच्या सूचना पर्यटन विभागाला दिल्या आहेत.
अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या एका भोंदूबाबाला मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. रिदम पांचाळ असे या भोंदूबाबाचे नाव असून, गेल्या अनेक दिवसांपासून मालाड परिसरात 'भूत उतरवण्याच्या' नावाखाली त्याचे अघोरी प्रकार सुरू होते. स्थानिकांनी दिलेल्या तक्रारीनंतर आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रिदम पांचाळ हा गेल्या दोन वर्षांपासून मालाडमध्ये दर गुरुवार आणि रविवारी अघोरी पूजेचे आयोजन करायचा. माझ्या अंगात देवी येते असा दावा करून तो रात्री 6 वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत विधी करायचा. सुरुवातीला हे प्रकार त्याच्या घरापुरते मर्यादित होते, मात्र 4 एप्रिल रोजी त्याने चक्क मनपाच्या उद्यानात शेकडो लोकांच्या उपस्थितीत उघडपणे जादूटोण्याचा प्रकार केल्याने संताप व्यक्त केला जात होता. नेमका प्रकार काय? मिळालेल्या माहितीनुसार, मालाड परिसरातील रहिवासी असलेला रिदम पांचाळ गेल्या दोन वर्षांपासून दर गुरुवार आणि रविवारी अघोरी पूजेचे आयोजन करत असे. माझ्या अंगात देवी संचारते असा दावा करून तो रात्री 6-7 वाजेपासून दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत विधी करायचा. सुरुवातीला हे प्रकार घरापुरते मर्यादित होते, मात्र 4 एप्रिल रोजी त्याने चक्क मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक उद्यानात शेकडो लोकांना जमवून उघडपणे जादूटोण्याचे प्रयोग केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या घटनेचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. अघोरी साहित्यामुळे दहशतीचे वातावरण हा भोंदूबाबा उपचारांच्या नावाखाली भक्तांकडून अत्यंत संशयास्पद आणि अघोरी साहित्याची मागणी करायचा. यामध्ये बकऱ्याचे काळीज (कलेजा), स्मशानातील राख, लिंबू, टाचण्या, दारूची बाटली आणि सिगारेट यासारख्या गोष्टींचा समावेश होता. हे साहित्य विधीनंतर चार रस्यांच्या मध्यभागी (चौकात) नेऊन ठेवण्यास तो सांगत असे. या कृत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रहिवाशांच्या जागरूकतेमुळे कारवाई वारंवार सांगूनही रिदमने आपले प्रकार थांबवले नाहीत. अखेर दोन आठवड्यांपूर्वी स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत त्याच्या अघोरी कृत्यांचे व्हिडिओ पोलिसांना दिले आणि सामूहिक स्वाक्षऱ्यांचे निवेदन सादर केले. महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी रहिवाशांनी लावून धरली होती. प्राथमिक चौकशीनंतर दिंडोशी पोलिसांनी आरोपी रिदम पांचाळ याला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकऱ्याच्या मृतदेहावरील उत्तरीय तपासणीचा तिढा गुरुवारी ता. 16 सकाळ पर्यंत कायम होता. जो पर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत उत्तरीय तपासणी करू देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्याचे कुटुंब व गावकऱ्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे आता हा तिढा कधी सुटणार याची प्रतिक्षा पोलिस दलाला लागली आहे. सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथील शेतकरी गोरख पातळे (26) या शेतकऱ्याने विहीरीचे अनुदान भरण्याच्या मागणीसाठी पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याने बुधवारी ता. 15 शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा मगच मृतदेह खाली काढा अशी भूमिका गोरख यांचे कुटुंबिय व गावकऱ्यांनी घेतली. मात्र रात्री आठ वाजता झालेल्या चर्चेनंतर सात तासांनी मृतदेह खाली उतरविण्यात आला. दरम्यान, मयत गोरख यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोरेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला. आज सकाळी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या हवाली केली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र गावकरी व मयत गोरख यांच्या कुटुबियांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे. दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करा मगच उत्तरीय तपासणी करा अशी भुमीका कायम असल्याने पोलिस यंत्रणा देखील हतबल झाली आहे. दरम्यान, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष गजानन कावरखे, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, प्रविण महाजन, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात जाऊन मयत गोरख यांच्या कुटुंबियांची तसेच गावकऱ्यांची भेट घेतली आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत उत्तरीय तपासणीचा तिढा सुरुच होता. त्यामुळे मागील 21 तासापासून मृतदेह उत्तरीय तपासणीच्या प्रतिक्षेत आहे. आता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
पुणे महापालिकेत ‘टक्केवारी’च्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापल्याचे चित्र समोर आले आहे. यावेळी हा वाद विरोधकांमध्ये नसून सत्ताधारी भाजपच्या गोटातच उफाळून आला आहे. बाणेर परिसरात उभारण्यात येणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींसाठीच्या निवासी शिक्षण केंद्राच्या कामावरून विद्यमान आणि माजी नगरसेविकांमध्ये महापालिकेच्या इमारतीतच जोरदार वाद झाला. या घटनेमुळे महापालिकेतील वातावरण तणावपूर्ण झाले असून, सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या संपूर्ण प्रकाराला आणखी रंग चढला तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पसरल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये नगरसेविकांमधील तीव्र वाद, आरोप-प्रत्यारोप आणि शिवीगाळ स्पष्टपणे दिसत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या प्रकरणाने केवळ प्रशासकीय नव्हे तर राजकीय पातळीवरही चर्चेला उधाण आले आहे. महापालिकेमार्फत बाणेर येथे सुरू असलेला हा प्रकल्प आदिवासी विद्यार्थिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या निवासी शिक्षण केंद्राचे सुमारे 85 ते 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित कामासाठी सुमारे 3 कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले असून त्याला स्थायी समितीची मंजुरीही मिळाली आहे. अंतिम टप्प्यात असताना या कामावरूनच वाद उफाळल्याने प्रकल्पाच्या भवितव्याबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणात माजी नगरसेविका राजश्री काळे आणि विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे आमनेसामने आल्याचे समोर आले आहे. बुधवारी राजश्री काळे या महापालिकेच्या भवन विभागात आल्या असता, तेथे रोहिणी चिमटे आणि संबंधित कंत्राटदार उपस्थित होते. यावेळी कामाच्या अंमलबजावणीवरून दोघींमध्ये तीव्र वाद झाला. सुरुवातीला शब्दांची देवाणघेवाण सुरू असताना हा वाद हळूहळू वाढत गेला आणि परिस्थिती चिघळली. राजश्री काळे यांनी गंभीर आरोप करत म्हटले की, हा प्रकल्प शेवटच्या टप्प्यात असूनही ‘टक्केवारी’च्या कारणावरून काम अडवले जात आहे. त्यांनी रोहिणी चिमटे यांच्यावर आरोप केला की, कंत्राटदाराला टक्केवारी मिळेपर्यंत काम सुरू करू नका, असा दबाव टाकण्यात आला. तसेच स्थायी समिती सदस्य असल्याचा धाक दाखवत काम रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे प्रकरण आणखीच चिघळले आहे. सत्ताधारी पक्षाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह दरम्यान, या वादामुळे महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका महत्त्वाच्या शैक्षणिक प्रकल्पावरूनच असा वाद उफाळल्याने प्रशासनाची प्रतिमा मलिन झाल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घाटीत एमआरआयसाठी एक महिन्याची प्रतीक्षा:रुग्णांची वाढती संख्या, सुट्ट्यांमध्येही सेवा सुरू राहणार
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे एमआरआय तपासणीसाठी रुग्णांना आता एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत येथे केवळ 1 हजार रुपयांत ही सुविधा उपलब्ध असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे यंत्रणेवर ताण येत असून, ही प्रतीक्षा कमी करण्यासाठी सुट्ट्यांच्या दिवशीही एमआरआय सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घाटी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी रुग्णालयात एमआरआयसाठी 5 ते 10 हजार रुपये खर्च येतो, तर घाटीत तो अवघ्या १ हजार रुपयांत उपलब्ध आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 50 टक्के सवलत मिळत असल्याने रुग्णांचा ओढा घाटीकडे वाढला आहे. सध्या घाटी रुग्णालयात रेडिओलॉजी विभाग, सुपरस्पेशालिटी विभाग आणि कॅन्सर हॉस्पिटलमध्ये एमआरआयची सुविधा उपलब्ध आहे. या तीन एमआरआय मशीन असूनही रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रतीक्षा यादी वाढत आहे. मराठवाड्यातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमुळे घाटीतील एमआरआय विभागात दररोज सुमारे 90 एमआरआय तपासण्या केल्या जातात. रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा रोटे यांनी सांगितले की, रेडिओलॉजीमध्ये 40, सुपरस्पेशालिटीमध्ये 25 ते 30 आणि कॅन्सर हॉस्पिटलमध्ये 25 अशा एकूण 90 तपासण्या होतात. एमआरआय ही तातडीची (इमर्जन्सी) सुविधा नसली तरी, ज्यांना त्वरित गरज आहे अशा रुग्णांना प्राधान्य दिले जाते. एमआरआय तपासणी मेंदूचे विकार (उदा. अर्धांगवायू, मेंदूतील गाठी, फिट्स), मणक्याचे आजार (उदा. कंबरदुखी, मणक्यातील गादी सरकणे) आणि सांधे व स्नायूंच्या समस्या (उदा. लिगामेंट इंज्युरी) तपासण्यासाठी आवश्यक असते. या समस्येवर उपाय म्हणून, घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले की, रुग्णालयातील तीन एमआरआय मशीनचे योग्य नियोजन करून सुट्ट्यांच्या दिवशीही एक मशीन सुरू ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत. रेडिओलॉजी, सुपरस्पेशालिटी आणि कॅन्सर या तिन्ही ठिकाणी तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. डॉ. सुक्रे यांनी पुढे सांगितले की, एक विशेष मोहीम (ड्राइव्ह) राबवून ही प्रतीक्षा यादी कमी करावी लागणार आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर तपासणी मिळण्यास मदत होईल.
सोलापूर शहराच्या 1400 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी मनपा आपला हिस्सा भरण्यासाठी ‘बाँड’ च्या स्वरुपात 200 कोटी रुपयांचा निधी उभा करणार आहे. या योजनेचा विषय मनपाच्या 20 एप्रिल रोजीच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला येणार आहे. तिथे अंतिम मंजुरी दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. व्याजदर, परताव्याची हमी दिली तर चांगल्या कंपन्या, नागरिकांचा सहभाग वाढेल, असे तज्ञांचे मत आहे. हे बाँडमध्ये दोन प्रकार असून एक पब्लिक बाँड आणि दुसरे प्रायव्हेट बाँड आहे. पब्लिक बाँड या प्रकारात सर्वसामान्य नागरिकांना सहभागी होता येते, तर प्रायव्हेट बाँड प्रकारात फक्त कंपन्यांना सहभागी होता येते. सोलापूर मनपाने मात्र हे दोन्ही पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. यासाठी ‘एस्क्रो’ बँक खाते उघडले जाणार आहे. जर मनपा वेळेत व्याज देऊ शकली नाही तर या खात्यातून व्याज वळते केले जाईल. पाणी योजनेसाठी जागतिक बँक 600 कोटी देणार आहे. बाँडच्या माध्यमातून जे गुंतवणुकदार गुंतवणूक करतील त्यांना जागतिक बँकेकडून काही सुविधा मिळतील, असे महापालिकेचे म्हणणे आहे. पहिले तीन वर्षे फक्त व्याज, नंतर 7 वर्षे मुद्दलही मिळेल नाशिक मनपा बाँडधारकांना 8.20 टक्के व्याजदर देत आहे. सोलापूरमध्ये व्याज दर निश्चित नाही. व्याज दर महिन्याला द्यायचे की सहा महिन्याला हेही ठरले नाही. मात्र 200 कोटींसाठी सुमारे 4 कोटी रुपये दरमहा व्याज द्यावे लागेल. सुरुवातीचे तीन वर्ष फक्त व्याज दिले जाणार. नंतर सात वर्षात व्याज व मुद्दल दोन्ही परतावा करावा लागेल. परताव्यासाठी दहा वर्षाचा कालावधी असेल. या सर्व मुद्द्यांची अंतिम रूपरेषा सर्वसाधारण सभेत व जागतिक बॅँकेशी चर्चा ठरवली जाईल. 10 वर्षात परतावा होईल का? याचा विचार करावा सोलापूर पालिकेनेही 8.20 टक्के व्याज दिले तर कंपन्यांचा प्रतिसाद मिळेल. मात्र, दहा वर्षात परतावा होईल का ? याचा विचार करणे गरजेचे आहे. बाँड घेतल्यानंतर जागतिक बँकेकडून काही सुविधा मिळण्याचा प्रश्न नाही. महापालिका गॅरंटी काय देणार? परतावा कसा करणार ? या गोष्टींचा करार झाला की चांगल्या कंपन्या येतीलच. प्रायव्हेट बाँडसह पब्लिक बाँड ही सुरु केले तर अधिक चांगला प्रतिसाद मिळेल. - धनराज नोगजा, सी.ए. नळांना मीटर, मक्तेदार वसूल करेल पाणीपट्टी जागतिक बँक 600 रुपयांचे कर्ज देत आहे. केंद्रीय योजनेतून 300 कोटी आणि बाँडच्या माध्यमातून 200 कोटी उभे केले जातील. ही योजना पूर्ण झाल्यानंतर रोज पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. मात्र नळांना मीटर लागेल. देखभाल व पाणीपट्टी वसूली मक्तेदारामार्फत केली जाईल. जागतिक बँकेतून प्रथम निधी मिळेल. योजनेचे पन्नास टक्के काम झाल्यानंतर महापालिका निधी उभा करणार आहे. त्यामुळे बाँडचा विषय कदाचित पुढच्या वर्षी सुरु होईल. जागतिक बँकेच्या निधीचा पहिला टप्पा मिळाल्यानंतर होईल बाँड काढण्याची प्रक्रिया 1400 कोटी रुपयांच्या पाण्याच्या योजनेसाठी 200 कोटींचा निधी उभा करण्यासाठी मनपा बाँडच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. सर्व प्रकिया एकदा पूर्ण झाली की बाँडबाबतच्या कारवाईला सुरुवात होईल. मनपा आयुक्तांकडून तसे आवाहन केले जाईल. कंपनी व नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे. -रत्नराज जवळगेकर, मुख्य लेखा अधिकारी, मनपा
नाशिक शहरातील उपनगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत किरकोळ धक्क्याच्या वादातून तरुणाने ‘थांब, तुझा गेमच करतो’ अशी धमकी देत दुसऱ्या तरुणावर गोळीबार केला. दहशत माजविण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ‘तुझा गेमच करतो’ अशी उघड धमकी देत दहशत माजवणाऱ्या संशयितांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हे दाखल रण्यात आले असून, पोलिस आता त्यांच्या शोधात आहेत. आगार टाकळी येथील रहिवासी सिद्धार्थ प्रकाश पगारे (26) हे 14 एप्रिलच्या रात्री मिरवणुकीत सहभागी झाले होते. रात्री 11:30 च्या सुमारास डीजेच्या तालावर नाचताना गर्दीत अक्षय लोखंडे याला त्यांचा किरकोळ धक्का लागला. या शुल्लक कारणावरून संतापलेल्या अक्षयने सिद्धार्थ यांना जातीवाचक शिवीगाळ करीत ‘बघून घेतो’ अशी धमकी दिली. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही. काही वेळातच अक्षय लोखंडे हा त्याच्या एका साथीदारासह दुचाकीवरून टाकळीगाव येथील आंबेडकर पुतळ्याजवळ आला. त्याने सिद्धार्थ यांना अडवून थेट खिशातून पिस्तूल काढले आणि त्यांच्या दिशेने रोखून “थांब, तुझा गेमच करतो” अशी गर्दीत ओरडून धमकी दिली. संशयिताने पिस्तुलाचा घोडा दाबला. सुदैवाने गोळी झाडली गेली नाही. त्याचवेळी सिद्धार्थ यांनी प्रसंगावधान राखून खाली वाकत स्वत:चा बचाव केला. यावेळी संशयिताच्या साथीदारानेही धारदार शस्त्राचा धाक दाखवत परिसरात दहशत निर्माण केली. काही महिन्यांपूर्वीच उपनगर परिसरात धारदार शस्त्रांनी जाधव बंधूंवर वार करत हत्या करण्यात आली होती. त्याची चर्चा अजूनही परिसरात आहे. त्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरलेली असते. मात्र, पोलिस गस्त कमी पडत असल्याने गुंडांचे फावते, अशी तक्रार नागरिक करत आहेत. संशयित फरार; परिसरात तणावाचे वातावरण या जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर सिद्धार्थ यांनी थेट उपनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणाऱ्या या गुंडांना तातडीने अटक करण्याची मागणी सामाजिक संघटनांकडून होत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल सुरू झाली असून, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीचा मार्ग मोकळा होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या या जागा भरण्यासाठी प्रक्रिया गतीमान झाली आहे. यासोबतच, विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार असल्याने त्या जागांसाठीही पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता परिषद निवडणुकीसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सुरू झाली आहे. 17 मतदारसंघांतील निवडणुकीचा अहवाल लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे. जरी राज्यातील 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका अद्याप बाकी असल्या तरी परिषद निवडणुकीत त्याचा अडथळा येणार नसल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या निवडणुका राज्यातील अनेक महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये होणार आहेत. त्यामध्ये सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजीनगर-जालना आणि नागपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असल्याने निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधान परिषदेतील 9 विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर नवीन सदस्य निवडण्यासाठी राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजपला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, राष्ट्रवादीकडे असलेल्या अतिरिक्त मतांमुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असल्याचेही सांगितले जात आहे. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता महायुतीची स्थिती मजबूत असल्याचे दिसते. भाजपकडे 131, शिवसेना (शिंदे गट) 57 आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) 40 आमदार असून, इतर सहयोगी पक्षांसह महायुतीचे एकूण संख्याबळ 234 वर पोहोचते. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 16, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 10 आणि शिवसेना (ठाकरे गट) 20 असे मिळून 49 आमदार आहेत. इतर पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण 286 आमदारांचे सभागृह आहे. शेवटच्या क्षणी समीकरणे बदलण्याचीही शक्यता विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. या गणितानुसार महायुतीचे किमान 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, असे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ एक जागा निश्चित मिळू शकते, तर दुसऱ्या जागेसाठी त्यांना अतिरिक्त 10 मतांची गरज भासणार आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत ही मते मिळवणे कठीण मानले जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीची बाजू वरचढ राहण्याची शक्यता व्यक्त होत असली, तरी राजकीय घडामोडींमुळे शेवटच्या क्षणी समीकरणे बदलण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
महिला आरक्षणाला विरोधी पक्षांचा विरोध नाही, पण हे बिल पहिलेच मंजूर झाले आहे. महिला आरक्षणाला विरोध नाही, पण मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या 'मनमानी'ला विरोध आहे आणि राहणार, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. सरकारने विरोधकांशी चर्चा करायला हवी होती, मसुदा समोर आल्यावर काय चर्चा करणार? आठ दिवसांनी जर बिलावर चर्चा झाली तर काय मोठा फरक पडणार आहे? एवढी कसली घाई झाली आहे? असा सवाल राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, आम्ही मतदान करत नारी शक्ती विधेयकाला विरोध करत हे बिल पाडणार आहोत. 364 मते असल्याशिवाय हे मंजूर होणार नाही. सरकारकडे 292 मते आहेत, ते जास्तीत जास्त 300 होऊ शकतो. पण आमच्याकडे मोठा आकडा आहे, हे बिल मंजूर होऊ देणार नाही. बिलाला विरोध म्हणून सभा त्याग करणार नाही. सरकारला मतद करणारे देशाचे दुश्मन असतील. 2023 मध्येच बिल मंजूर संजय राऊत म्हणाले की, नारी शक्ती हे बिल 2023 मध्ये मंजूर झालेले आहे. केंद्र सरकार देशातील नागरिकांना फसवत आहे. त्या विधेयकामध्ये जनगणनेसंदर्भात काही चर्चा होत्या. हे बिल ऐतिहासिक आहे असे केंद्र सरकार म्हणत आहे. सध्या जितके खासदार आहेत त्यामध्ये महिलांना आरक्षण द्या, नवे मतदारसंघ निर्माण करत तुम्हाला हे बिल लादायचे आहे, सर्वांचा त्याला विरोध आहे. त्यांना हे बिल मंजूर करण्यासाठी बहुमत मिळणार नाही. नारी शक्ती बिल नसून केवळ भाजपा शक्ती बिल आहे. हे बिल आम्ही संसदेत मंजूर होऊ देणार नाही. उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार संजय राऊत म्हणाले की, 5 राज्यात निवडणुका असताना हे बिल मंजुरीसाठी आणायची सरकारला काही गरज नव्हती. जर तुम्हाला ऐतिहासिक बिल मंजूर करायची आहे, लोकशाही मजबूत करायची आहे. महिलांचा लोकशाहीत सहभाग वाढवायचा आहे. पण अनेक खासदार सध्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यांना तुम्ही मतदानापासून रोखत बिल मंजूर करूण घेऊ असा सरकारचा प्रयत्न आहे. केरळमधील सर्व खासदार उपस्थित राहणार आहेत, पश्चिम बंगालमधील सर्व खासदारांना आणायचा प्रयत्न आहे. तर द्रमुकचे सर्व खासदारही अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा करणार आहे.
भोंदूगिरी आणि अंकशास्त्राच्या नावाखाली लोकांना फसवणाऱ्या अशोक खरातच्या कारनाम्यांमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. अंकशास्त्राचा मोठा गाजावाजा करणारा खरात स्वतःसाठी 9 हा अंक अत्यंत शुभ मानत होता. त्यामुळेच त्याने आपल्या गाड्यांचे नंबरही खास करून असे निवडले, ज्यांची बेरीज 9 येईल. तपासादरम्यान ही बाब समोर आल्यानंतर त्याच्या अंधश्रद्धेच्या खेळाचा आणखी एक पैलू उघड झाला आहे. तपास यंत्रणांच्या चौकशीत असे समोर आले की, खरातने आरटीओमधून चॉइस नंबर घेऊन आपल्या गाड्यांचे क्रमांक निश्चित केले होते. या सर्व नंबरांची बेरीज 9 येईल याची तो विशेष काळजी घेत असे. अंकशास्त्राच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन करून त्याने अनेकांना जाळ्यात ओढले. मोठमोठ्या नेत्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांना त्याने आपल्या प्रभावाखाली घेतल्याचे आरोप आहेत. दरम्यान, खरातविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे आरोप त्याच्यावर आहेत. एसआयटीच्या तपासानंतर आणि हेल्पलाईन सुरू झाल्यानंतर अनेक महिलांनी व व्यावसायिकांनी त्याच्याविरोधात तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामुळे त्याच्या गैरकृत्यांची व्याप्ती किती मोठी होती, याची कल्पना येत आहे. अंकशास्त्रानुसार 9 हा अंक बंधुत्व, समृद्धी, भाग्य आणि मानवतावादी कार्याशी जोडलेला मानला जातो. तसेच मंगळ ग्रहाशी संबंधित असल्याने हा अंक ऊर्जा आणि यशाचे प्रतीक असल्याचे मानले जाते. याच कारणामुळे खरातने 9 या अंकाला विशेष महत्त्व दिले होते. पैसा आणि यश मिळवण्यासाठी हा अंक उपयोगी ठरतो, असा त्याचा विश्वास होता. खरातच्या ताब्यातील इतर वाहनांवरही 9 अंकाचा प्रभाव दिसून आला आहे. उदाहरणार्थ, त्याच्या एका गाडीचा नंबर 6453 असून, त्याची बेरीज 18 होते आणि पुढे 1+8 केल्यास ती 9 येते. यावरून त्याने प्रत्येक गोष्टीत अंकशास्त्राचा वापर करून स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती. तपास यंत्रणांनी त्याच्या मालमत्तांची तपासणी केल्यानंतर त्याच्या ऐषारामी जीवनशैलीचे अनेक पुरावे समोर आले आहेत. अंकाच्या खेळामुळे आता अडचणीत दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) खरातच्या संपत्तीची चौकशी सुरू असून त्याने कमावलेला पैसा नेमका कुठून आला आणि कुठे वापरला गेला, याचा शोध घेतला जात आहे. बांधकाम व्यावसायिकांसह अनेक मोठ्या व्यक्ती त्याच्या जाळ्यात अडकल्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे 9 या अंकावर विश्वास ठेवून साम्राज्य उभं करणारा खरात, त्याच अंकाच्या खेळामुळे आता अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.
काशीगाव मेट्रो परिसरातील सुमारे ३० टक्के जमिनीच्या वादावरून मिरा-भाईंदरच्या राजकारणात नवा संघर्ष पेटला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या भागातील मोठ्या जमिनी आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीच्या असल्याचा दावा केल्यानंतर वादाला सुरुवात झाली. मात्र, या प्रकरणाने आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांचे रूप धारण केले असून दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र मेहता यांनी माध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक यांच्यावर जोरदार टीका केली. जर माझ्याकडे 30 टक्के जमीन असती, तर सरनाईक मला दूरून बोलावले असते. इतकेच नव्हे तर ते माझे ड्रायव्हर झाले असते, असे वादग्रस्त वक्तव्य मेहता यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून या वक्तव्यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. या वक्तव्याचा निषेध करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी नरेंद्र मेहता यांना उद्देशून एक पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी मेहता यांच्या वक्तव्याला अत्यंत आक्षेपार्ह आणि खालच्या पातळीचे संबोधले आहे. राजकारणात मतभेद असू शकतात, परंतु व्यक्तीगत पातळीवर टीका करताना मर्यादा पाळणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पूर्वेश सरनाईक यांनी पत्रात पुढे नमूद केले की, जनतेने दिलेल्या कौलानंतर लोकप्रतिनिधींनी विकासकामांवर लक्ष केंद्रित करणे अपेक्षित आहे. चार वेळा निवडून आलेल्या आमदाराबाबत आणि सध्याच्या मंत्र्यांबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे ही राजकीय संस्कृतीला शोभणारी नाही. राजकारण हे केवळ वक्तव्ये करण्यासाठी नसून ते संस्कार आणि जबाबदारीची गोष्ट आहे, असे सांगत त्यांनी सभ्यतेचे भान राखण्याचे आवाहन केले. या संपूर्ण वादामुळे मिरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांमध्येही या प्रकरणावरून संताप व्यक्त होत असून कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर यांनी प्रतिक्रिया देताना, आमचा नेता संयमी आहे, त्यामुळे आम्हीही संयम पाळतो, असा टोला लगावला. तसेच आवश्यक असल्यास उत्तर देण्याची ताकद आमच्यात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता दरम्यान, काशीगाव मेट्रो परिसरातील जमीन वादातून सुरू झालेला हा संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर पोहोचल्याने आगामी काळात राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याऐवजी आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे हा वाद नेमका कोणत्या दिशेने वळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक शहरातील एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या छळवणूक आणि धर्मांतराच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात निदा खान हीच मुख्य सूत्रधार असल्याचा धक्कादायक उलगडा पोलिस तपासात झाला आहे. मुंबई नाका आणि देवळाली पोलिस ठाण्यात या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत सात जणांना अटक झाली आहे. मात्र, मुख्य आरोपी निदा खान गेल्या 20 दिवसांपासून फरार असून तिचा शोध अद्याप लागलेला नाही. पोलिसांनी निदा खानच्या अटकेसाठी तीन स्वतंत्र पथके तयार केली असून ती विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत. तरीही तिचा ठावठिकाणा लागत नसल्याने तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. कंपनीत ऑपरेशन विभागात मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून काम पाहणारी निदा खानच या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी असल्याचे समोर आले आहे. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, कंपनीतील कामाच्या मीटिंगच्या माध्यमातून काही महिलांना लक्ष्य केले जात होते. विशेषतः हिंदू तरुणींना वेगळे करून त्यांच्यावर मानसिक दबाव आणला जात होता. त्यांना धर्मांतरासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न केले जात होते. विरोध करणाऱ्या महिलांना मानसिक तसेच लैंगिक छळाला सामोरे जावे लागत असल्याचेही समोर आले आहे. या सर्व कारवायांमध्ये निदा खान सक्रियपणे भूमिका बजावत असल्याचे पोलिसांना आढळले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कंपनीच्या एचआर अधिकारी अश्विनी चैनानी हिच्या चौकशीतूनही अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत. तिच्या जबाबातून निदा खानच या संपूर्ण प्रकारामागील प्रमुख व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा पुरुष आणि दोन महिला आरोपींचा समावेश असलेल्या या प्रकरणात एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून कारवाया राबवल्या जात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठे आणि संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. निदा खानविषयी मिळालेल्या माहितीनुसार, ती वयाच्या 26 व्या वर्षी पासून कंपनीत टीम लीडर म्हणून काम करत होती. 2021 पासून ती कंपनीत कार्यरत होती. नाशिकच्या द्वारका परिसरात तिचे माहेर असून तिचे पती एका खासगी कंपनीत नोकरी करत असल्याची माहिती आहे. नव्याने नोकरीला लागलेल्या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी तीच शिफारस करत असे आणि त्यातूनच त्यांना या जाळ्यात ओढले जात असल्याचा आरोप आहे. आर्थिक व्यवहारांमध्येही तिचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय संबंध उघड होण्याची शक्यता दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्यासाठी निदा खानची अटक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तिच्या अटकेनंतर या रॅकेटमागील खरे सूत्रधार आणि संभाव्य आंतरराष्ट्रीय संबंध उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणांनी तिचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क असण्याचाही संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांसाठी हे प्रकरण अधिक गंभीर बनले असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक शहरातील एका नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या गंभीर आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता थेट दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी कंपनीत सखोल तपास सुरू केला आहे. या कारवाईमुळे कंपनीच्या कामकाजावर परिणाम झाला असून, परिसरातही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेली निदा खान ही गेल्या जवळपास २० दिवसांपासून फरार आहे. पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून तीन स्वतंत्र पथके तयार करून विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. निदा खान कंपनीत ऑपरेशन विभागात मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून काम करत होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तीच या संपूर्ण प्रकारणात प्रमुख भूमिका बजावत होती. दरम्यान, कंपनीच्या दिल्ली मुख्यालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक थेट नाशिकमध्ये येऊन कंपनीची ‘झाडाझडती’ घेत आहे. तपासादरम्यान कामकाजात अडथळा येऊ नये आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी कंपनीने सुमारे 150 कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कंपनीच्या कार्यालयात सध्या पूर्णपणे शांतता असून कर्मचारी अनुपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कामगार उपायुक्त कार्यालयाचे अधिकारी जेव्हा तपासासाठी कंपनीत पोहोचले, तेव्हा त्यांना एकही कर्मचारी तेथे आढळला नाही. अधिकाऱ्यांनी शॉप अॅक्ट परवाना तसेच इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी केली असून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच अंतर्गत चौकशीदरम्यान अनेक कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात असून, त्यातून काही गंभीर बाबी समोर येत असल्याची माहिती मिळत आहे. पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, कामाच्या मीटिंगच्या नावाखाली काही महिलांना लक्ष्य केले जात होते. त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असल्याचे आरोप आहेत. विरोध करणाऱ्या महिलांना मानसिक आणि लैंगिक छळाला सामोरे जावे लागत असल्याचेही समोर आले आहे. हा सर्व प्रकार एका विशिष्ट व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून चालवला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, यात मोठ्या रॅकेटचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चौकशीतूनच निदा खानच्या भूमिकेचा उलगडा या प्रकरणी मुंबई नाका आणि देवळाली पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली असून, कंपनीची एचआर अधिकारी अश्विनी चैनानी हिचाही त्यात समावेश आहे. तिच्या चौकशीतूनच निदा खानच्या भूमिकेचा उलगडा झाला आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगानेही घेतली असून 18 एप्रिल रोजी आयोगाचे पथक नाशिकमध्ये येणार आहे. पीडित महिलांशी संवाद साधून संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेतला जाणार असल्याने या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कारंजा नगरीत नव्याने स्थापन झालेली ‘श्री संत रविदास फाउंडेशन’ ही संस्था केवळ एका संघटनेची निर्मिती नसून, सामाजिक कार्याच्या नव्या अध्यायाची नांदी आहे. या संस्थेची प्रेरणा संत रविदासांच्या विचारांतून आलेली आहे, ही तिची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणावी लागेल. संत रविदासांनी मांडलेली समतेची, बंधुत्वाची आणि श्रमप्रतिष्ठेची भूमिका ही भारतीय समाजव्यवस्थेला दिशादर्शक ठरलेली आहे. जात, पंथ, आर्थिक स्थिती यापलीकडे जाऊन माणूसपणाला केंद्रस्थानी ठेवणारा त्यांचा विचार आजही तेवढाच सुसंगत आहे. या विचारांना केवळ अभिवादन करण्यापेक्षा त्यांची अंमलबजावणी करण्याचा संस्थेचा निर्धार अधिक महत्त्वाचा ठरतो असे विचार आमदार सई डहाके यांनी येथे व्यक्त केले. कारंजा येथील श्री संत रविदास फाउंडेशनचे उद्घाटन व प्रथम कार्यारंभ म्हणून आयोजित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. मंगळवारी १४ एप्रिल रोजी येथील नूतन सांस्कृतिक भवन मध्ये श्री संत रविदास फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून गुरु रविदास विश्व महापिठाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंतराव धाडवे उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक पंजाबराव नायक, माजी पंचायत समिती सदस्य दिनेश वाडेकर, सेवानिवृत्त शिक्षक प्रल्हादराव पानझाडे, मानोरा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पांडुरंग गव्हाळे हे उपस्थित होते. दरम्यान उपस्थित अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर घुडे, उपाध्यक्ष खुशाल राजगुरे, सचिव महादेव अंबाळकर, कोशाध्यक्ष मधुकरराव सोनटक्के, सदस्य कैलास ठोसरे, गजानन राजगुरे, ज्ञानेश्वर अंबाळकर, बाबाराव वानखडे, रविंद्र इंगळे यांनी उपस्थित अतिथींचे अतिथींचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पुढे बोलताना आमदार डहाके म्हणाल्या की, समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या संस्था या लोकशाही व्यवस्थेच्या बळकटीसाठीही महत्त्वपूर्ण ठरतात. ‘श्री संत रविदास फाउंडेशन’ने सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेत जागरूकता, एकजूट आणि सकारात्मकता निर्माण केली, तर ती खऱ्या अर्थाने परिवर्तनाची वाहक ठरेल. आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात सामाजिक बांधिलकी ही अनेकदा दुय्यम ठरताना दिसते. व्यक्तिकेंद्री विचारसरणीच्या वाढत्या प्रभावामुळे सामूहिक हिताच्या संकल्पना मागे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशा वेळी चर्मकार समाजातील काही सजग कार्यकर्ते पुढाकार घेत समाजासाठी संघटीत पणे कार्य करण्याचा निर्णय घेतात, ही बाब निश्चितच आश्वासक आहे. ‘श्री संत रविदास फाउंडेशन’च्या स्थापनेतून हाच सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित होतो. पंजाबराव नायक, प्रल्हादराव पानझाडे यांनीही आपले विचार मांडले. ज्ञानेश्वर घुडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन फाउंडेशनचे सचिव महादेव अंबाळकर यांनी केले तर उपाध्यक्ष खुशाल राजगुरे यांनी आभार मानले. संस्थेतपुरते मर्यादित नको आजचा हा कार्यक्रम केवळ एका संस्थेच्या उद्घाटनाची औचित्य नाही तर समाज जीवनाला नवी दिशा देणाऱ्या विचार प्रवाहाचा आरंभ आहे असे ते म्हणाले. वसंतराव धाडवे यांनी कारंजा नगरीत सुरू झालेले हे नवे दालन केवळ एका संस्थेतपुरते मर्यादित न राहता व्यापक सामाजिक चळवळीचे रूप धारण करेल अशी अपेक्षा याप्रसंगी बोलताना व्यक्त केली.
शहरात बुधवारी ४४.२ अंश तापमान नोंदवल्या गेले. मंगळवारी तापमानाचा पारा ४४ अंशांवर होता. भारतीय हवामान विभागाने विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट आली आहे. अमरावतीचे तापमान ४४ अंश नोंदवले गेले आहे. तिसऱ्या क्रमांकावर वर्धा जिल्ह्याचे तापमान ४३.९ अंश नोंदवले गेले तर नागपूरचा पारा ४३.४ अंश राहिला आहे. अकोल्यात बुधवारी एका व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी उष्माघात उपाययोजनांबाबत आढावा घेत सर्व रूग्णालये, यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती फुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनूने आदी उपस्थित होते. प्रत्येक आरोग्य संस्थेत उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात १३७ खाटा राखीव ठेवल्या आहेत. ओआरएस व औषधसाठा पुरेसा ठेवा, उष्माघातापासून दक्षतेबाबत नागरिकांत जनजागृती करा, ग्रामीण भागात दवंडी द्या, शहरात होर्डिंग्ज, ध्वनीचित्रफीतीद्वारे जनजागृती करा, यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान कामगारांसाठी आस्थापनांनी पेयजल, कुलर आदी सुविधा कराव्या. उन्हात अधिक वेळ श्रमाची कामे टाळावी, कारखान्यांच्या बॉयलर रुममध्ये काम टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच पाच वर्षांखालील मुले, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. उष्माघात टाळण्यासाठी हे करा डोक्यावर टोपी, रुमाल बांधा किंवा छत्रीचा वापर करा, हलक्या रंगाचे सुती कपडे घाला, भरपूर पाणी प्या, ताक, लिंबूपाणी, नारळ पाण्याचे सेवन करा, दुपारी १२ ते ४ दरम्यान उन्हात काम करणे टाळा, उन्हात अनवाणी चालू नका, लहान मुलांना बंद गाडीत ठेवू नका. मद्य, चहा, कॉफी, कार्बोनेटेड पेये टाळा.
अमरावती शेतकरीविरोधी भूमिका बजावणाऱ्या केंद्र शासनाने इंडो-यूएस ट्रेड डील लागू केली आहे. ही डील भारतीय शेतकऱ्यांसाठी भविष्यात घातक ठरणार असून, ती रद्द करण्याच्या मागणीसाठी युवक काँग्रेसने गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान आज, बुधवारी युकाँच्या प्रतिनिधीमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सदर डील रद्द करण्याची मागणी केली. या मागणीसाठी देशभरात साखळी सत्याग्रह सुरु आहे, त्याचाच भाग म्हणून अमरावती जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने काँग्रेस भवनासमोर गेली सात दिवस निदर्शने केली गेली. त्यानंतर आज, बुधवारी पहिल्यांदा काँग्रेस भवन व नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन निवेदन देण्यात आले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या मते या कराराच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करीत आहे. ही ट्रेड डील अतिशय घातक आहे. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले, मेळघाट विधानसभा अध्यक्ष पीयूष मालवीय, चिखलदरा तालुका अध्यक्ष संदीप मुंढे, इतर पदाधिकारी राजेन्द्र कासदेकर, धनराज आठवले, पंकज अमोदे, अक्षय घुमावरे, चिंटू झाड़खंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेतकरी, शेतमजूर, कामगारांचाही विरोध अमेरिकेने भारतासोबत केलेला कृषी व व्यापारविषयक करार (ट्रेड डील) हा भारतीय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे, हे भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीनेही म्हटले आहे. या दोन्ही पक्षाच्या कामगार व मजूर संघटनांनी याविरोधात देशभर एल्गार पुकारला आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी दिल्लीत जसे प्रदीर्घ काळ चालणारे शेतकरी आंदोलन झाले होते, केंद्र सरकारने करार रद्द न केल्यास भविष्यात तसेच एखादे मोठे आंदोलन उभे होऊ शकते, असे कामगार क्षेत्राशी निघडीत पुढाऱ्यांचे भाकीत आहे.
कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान, लोकहिताचे करण्याचा संकल्प पदग्रहण करताना विधी समिती सभापती स्नेहा लुल्ला यांनी व्यक्त केला. शहरातील विकासकामांना कायदेशीर चौकटीत गती देण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. उपसभापती डॉ. मधुरा कहाळे यांनीही आपल्या मनोगतात समितीच्या कामकाजात समन्वय साधून नागरिकांच्या समस्यांवर तत्परतेने उपाययोजना करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने समिती अधिक सक्षम करण्याचा विश्वास व्यक्त केला. महानगरपालिकेच्या विधी समितीच्या नवनिर्वाचित सभापती स्नेहा लुल्ला व उपसभापती डॉ. मधुरा कहाळे यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात झाला. महानगरपालिकेतील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास महापौर श्रीचंद तेजवानी, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, परम पूज्य संत डॉ. संतोषदेव महाराज, शिवसेना उपनेता प्रीती बंड, युवा स्वाभिमान पार्टीचे कार्याध्यक्ष सुनील राणा, जिल्हा प्रमुख संतोष बद्रे, गटनेता नाना आमले, गटनेता डॉ. राजेंद्र तायडे, माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता, शिक्षण समिती सभापती अॅड. प्रीती रेवणे, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ. ममता आवारे, उपसभापती सौ. लता देशमुख, सन्मा. नगरसेवक आशिष अतकरे, प्रदीप हिवसे, संजय गव्हाळे, अजय जयस्वाल, विनोद तानवैस, सचिन वैद्य, मनीष बजाज, इस्माईल लालुवाले, योगेश विजयकर, मोहंमद रेहान मोहमद यासीन, संजय तीरथकर, नगरसेविका पद्मजा कौंडण्य, स्वाती कुलकर्णी, माधुरी ठाकरे, अर्चना पांडे, अर्चना पाटील, विद्या माटे, स्मिता सूर्यवंशी, मंजुषा जाधव, प्रियंका पाटणे, आशिष लुल्ला, मिलिंद कहाळे, शिवसेनेचे पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित विधी समिती सभापती स्नेहा लुल्ला व उपसभापती डॉ. मधुरा कहाळे यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित विधी समिती सभापती स्नेहा लुल्ला व उपसभापती डॉ. मधुरा कहाळे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. समारंभाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संबंधित अधिकाऱ्यांनी केले. या पदग्रहण समारंभामुळे महापालिकेच्या विधी समितीच्या कामकाजाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरात 'पीपीपी' मॉडेल अंतर्गत अनेक बस स्थानकांचा कायापालट करण्याचा धडाका लावला असला, तरी माढा तालुक्याचे प्रमुख केंद्र असलेले माढा बस स्थानक मात्र आजही ५० वर्षांपूर्वीच्या जुन्या काळात अडकले आहे. राजकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे या स्थानकाचे आधुनिकीकरण रखडले असून, प्रवाशांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. माढा हा कृषीप्रधान तालुका असून परिसरातील सुमारे ४० गावांतील नागरिक प्रवासासाठी याच स्थानकावर अवलंबून आहेत. दररोज येथे ४० ते ५० गाड्यांची वर्दळ असते. यामध्ये नाशिक, गुलबर्गा, गाणगापूर, पुणे, बोरिवली यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसह मध्यम पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. व्यापारी, शेतकरी आणि मोठ्या संख्येने असणारा विद्यार्थी वर्ग या स्थानकाचा वापर करतो, मात्र वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत सुविधा 'शून्य' आहेत. बस स्थानक परिसराचे काँक्रिटीकरण न झाल्याने पावसाळ्यात संपूर्ण आगार चिखलमय होते. प्रवाशांना चिखल तुडवतच बस गाठावी लागते. जून्या इमारतीमुळे छताला गळती लागली असून अपुरे फलाट, अपुरा प्रकाश, अस्वच्छ पाणी आणि दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सोलापूर आणि पंढरपूर बस स्थानकांचा विकास होत असताना माढ्याला मात्र नेहमीच सापत्न वागणूक दिली जात असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. ^माढा बस स्थानकाचे बीओटी तत्त्वावर बांधकाम करण्यासाठी एस टी महामंडळाकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. याकामी मुंबईच्या कंपनीकडे डिझाईन तयार करण्याचे काम दिले असून कंपनीने तयार केलेले डिझाईन राज्य सरकारकडे दाखल केले आहे. राज्य सरकारकडून मंजुरी प्राप्त होताच कामास सुरुवात होणार आहे. - आ. अभिजीत पाटील, आमदार ^सुमारे पन्नास वर्षांपूर्वीचे बस स्थानक असल्याने अनेक आधुनिक सुविधांची वानवा आहे. बस स्थानकाच्या आतील परिसरात डांबरीकरण नाही, शौचालयाची पुरेशी सुविधा नाही, सांडपाण्याचे योग्य नियोजन नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी लक्ष घालून माढा बस स्थानकाचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. - संतोष पंडित, अध्यक्ष, प्रवासी वेल्फेअर असोसिएशन . जुन्या इमारती: ५० वर्षांपूर्वीच्या बांधकामामुळे इमारत कमकुवत. . चिखलाचे साम्राज्य: काँक्रिटीकरण नसल्याने पावसाळ्यात प्रवाशांचे हाल. . अस्वच्छता: स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही. . अंधाराचे साम्राज्य: स्थानक परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध नाही. ^माढा बस स्थानक दर्शनी भागात येणे गरजेचे असून काही सुविधा उपलब्ध असल्या तरी आधुनिकीकरण नसल्याने अनेक सुविधांचा अभाव आहे. आधुनिकीकरण झाल्यास प्रवाशांना सुविधा मिळण्याबरोबरच बस स्थानकाच्या जागेत व्यापारी गाळे उभारल्यास महामंडळाचे उत्पन्नही वाढणार आहे. - रत्नाकर लाड, आगार व्यवस्थापक, कुर्डूवाडी स्थानिक राज्यकर्त्यांनी लक्ष देणे गरजेचे राज्य सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा प्रमुख समस्यांचा पाढा
आषाढीत वारकऱ्यांची सुरक्षा ‘टॉप प्रायोरिटी':जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी घेतला आढावा
आषाढी शुद्ध एकादशीचा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, या यात्रा कालावधीत पंढरीत येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पालखी मार्ग, पालखी तळ, विसावा आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षेसोबतच रस्ते दुरुस्ती, शौचालय सुविधा आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली. आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल- रुक्मिणी भक्त निवास येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने पाहणी करून पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती वारीपूर्वी पूर्ण करावी. भाविकांना कोठेही रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्रास होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. ^वारी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. सीसीटीव्ही यंत्रणा आणि आपत्कालीन व्यवस्थेवर आमचा विशेष भर असेल. भाविकांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाने घेतली आहे. कार्तिकेयन एस., जिल्हाधिकारी
अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४८ व्या पुण्यतिथी निमित्त बुधवारी अक्कलकोट नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. ‘श्री स्वामी समर्थ' आणि ‘गुरुदेव दत्त'च्या जयघोषाने आसमंत दुमदुमला असला, तरी यंदा वाढते ऊन, मुलांच्या परीक्षा आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे दरवर्षीच्या तुलनेत भाविकांच्या संख्येत घट पाहायला मिळाली. पहाटेपासूनच आलेल्या हजारो भक्तांनी वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्रद्धेने नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला. अक्कलकोटचा पारा ४२ अंश होता, समितीने कापडी मंडप उभारून विशेष सोय केल्याने भाविकांना दिलासा मिळाला. अक्कलकोट राजघराण्याच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब यांच्या हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींना परंपरेनुसार महानैवेद्य दाखवण्यात आला. पहाटे २ वाजता पारंपरिक पद्धतीने श्रींची मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते श्रीं ची काकड आरती झाली. नगर प्रदक्षिणा वटवृक्ष मंदिर ते समाधी मठ ते पुन्हा मुख्य वटवृक्ष मंदिराकडे पहाटे ३ ते ४ या वेळेत झाली. पारंपरिक लघु रुद्र सकाळी ६ वाजता पुरोहित मोहनराव गुरूजी यांच्या आधिपत्त्याखाली मंदार महाराज पुजारी व ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात भक्तिभावाने करण्यात आले. नाम वीणा सप्ताह समाप्ती सोहळा ज्योतिबा मंडपात देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्संग महिला भजनी मंडळाच्या भजनाने झाला. श्रींचा सजवलेला सवाद्य पालखी मिरवणूक सोहळा वटवृक्ष मंदिरातून सायंकाळी ५ वाजता थाटात निघाला. तहसीलदार विनायक मगर, पोलिस निरीक्षक दिपक भिताडे यांनी भक्तांच्या सुविधेसाठी यंत्रणा नियंत्रित केली होती. दुपारी १२ वाजता राजवाड्यातून अक्कलकोट राजघराण्याचा आणलेला महानैवेद्य श्रीमंत मालोजीराजे भोसले राजासाहेब यांच्या हस्ते व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रींना दाखवण्यात आला. सकाळी ११ वाजता देवस्थानची महानैवेद्य आरती विश्वस्तांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी प्रथमेश इंगळे, पुरोहित मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी आदी उपस्थित होते. ^उन्हामुळे व ठिकठिकाणच्या स्वामी मंदिरामुळे भाविकांची संख्या कमी होती. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने व्हावे, यासाठी वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने दक्षिण महाद्वारालगत बॅरेकेटींगची सोय केली होती. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी कापडी मंडप उभारून विशेष सोय केली होती. महेश इंगळे, चेअरमन, देवस्थान. तत्पूर्वी श्री स्वामी समर्थ गुरुलीलामृत चरित्र पोथी पारायण सोहळ्याची समाप्ती, भजन सोहळा समाप्ती, धर्म संकीर्तन सोहळ्याची समाप्ती करण्यात आली. भजन सेवा सोहळ्यात सोलापूर, पंढरपूर, वैराग, मंगळवेढा, लातूर, बार्शी, सांगोला, इत्यादी भागातून ४८ भजनी मंडळांनी आपली भजन सेवा अखंडपणे श्रींच्या चरणी समर्पित केली. धर्मसंकीर्तनात नामांकित वक्ते व कलावंतांनी आपली सेवा सादर केली.
येथील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील संशयित आरोपीला गुन्ह्यात मदत करण्यासाठी ३५ हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचारी अनिल अजिनाथ गोसावी याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जेरबंद केले. तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारातच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. लाच घेतल्यानंतर गोसावी याने एसीबीच्या पथकातील कर्मचाऱ्यालाच इकडे कुठे? असे विचारले अन् पथकाने त्याला अलगद ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पत्नीचा छळ केल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी असलेल्या तक्रदरास गुन्ह्यात मदत करण्यासाठी कर्मचारी गोसावी याने ५० हजारांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराने अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. यात गोसावी याने तडजोडीअंती ३५ हजारांची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. बुधवारी दुपारी तोफखाना पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा कारवाईदरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गोसावी याला ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाई व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गोसावीने सात वर्षांपूर्वीही घेतली ५ हजारांची लाच पोलिस कर्मचारी अनिल गोसावी (त्यावेळचे आडनाव गिरीगोसावी) कोतवाली पोलिस ठाण्यात कार्यरत असताना २७ डिसेंबर २०१९ रोजी त्याला ५ हजारांची लाच घेताना अहिल्यानगरच्याच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते. कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र लवकर कोर्टात दाखल करण्यासाठी त्या प्रकरणातील फिर्यादीकडून त्याने लाच स्वीकारली होती. या गुन्ह्यात गोसावी याच्या विरोधात २१ नोव्हेंबर २०२० रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या सणाला आमरसाचा नैवेद्य दाखवण्याची जुनी परंपरा आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या बाजारपेठेत फळांचा राजा मानल्या जाणाऱ्या आंब्याचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे. बाजारपेठ केसरी व पिवळ्या रंगाने उजळून निघाली आहे. कडाक्याच्या उन्हात रसाळ आंब्यांनी ग्राहकांना भुरळ घालण्यास सुरुवात केली आहे. मात्र अवकाळीच्या फटक्यामुळे यंदा आवक कमी असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत दर दीडपट महागले आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ, माळीवाडा, कोठला, उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौक, भिस्तबाग चौक, पारिजात चौक या परिसरात, तसेच महामार्गाच्या कडेला आंब्याचे स्टॉल्स सजले आहेत. यात प्रामुख्याने रत्नागिरी व देवगड हापूस आपली टिकवून आहे. त्यासोबतच केसर, पायरी, बदाम, लालबाग यांसारख्या विविध जातींचे आंबे दाखल झाले आहेत. चवीला गोड आणि रसाळ असलेल्या रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याला मध्यमवर्गीयांकडून मोठी मागणी दिसून येत आहे. नगरच्या बाजारपेठेत प्रामुख्याने कोकणातून (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) हापूसची उर्वरित पान ४ नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या फळांना पसंती यंदा बाजारपेठेत रासायनिक औषधे वापरून पिकवलेल्या आंब्यापेक्षा नैसर्गिकरीत्या अढी लावून पिकवलेल्या आंब्याला ग्राहक अधिक पसंती देत आहेत. आरोग्याबाबत जागरूक असलेले नगरकर जादा पैसे मोजून सेंद्रिय केसर आणि हापूस आंबा खरेदी करत आहेत. फळांचा नैसर्गिक सुगंध आणि टिकण्याची क्षमता हे यंदाचे मुख्य आकर्षण आहे. सध्या आवक दुपटीने वाढली ^ सणासुदीच्या काळात व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध केला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या आवक दुपटीने वाढली आहे. ‘ खिशाला थोडी कात्री बसत असली तरी नागरिक मुहूर्ताचा आंबा खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत. - कैलास आहुजा, विक्रेते.
१२ एप्रिल १९६१ रोजी सोव्हिएत-रशियन अंतराळवीर युरी गागरिन यांनी 'व्होस्टोक १' या अंतराळ यानातून पृथ्वीची पहिली प्रदक्षिणा पूर्ण केली होती. भारताच्या इस्त्रोच्या गगनयान या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेची दुसरी एकात्मिक हवाई चाचणी नुकतीच १० एप्रिल रोजी यशस्वी झाली. तसेच नासाच्या आर्टीमिस-२ या उपक्रमाचे प्रक्षेपण व समुद्रातून पृथ्वीवरील पुनरागमन, तसेच इस्रोच्या गगनयानच्या मॉड्युल चाचणीचे लाइव्ह प्रात्यक्षिक शेकडो विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अनुभवले. नासाच्या उपक्रमाचे बोर्डिंग पास व पासपोर्ट विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. या निमित्ताने सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला, माध्यमिक विभागाच्यावतीने संयुक्त राष्ट्र महासभेच्यावतीने निर्धारित आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिवस साजरा करण्यात आला. याकामी डॉ.अमोल बागुल यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाचे सचिव सुरेश क्षीरसागर, प्राचार्या वसुधा जोशी उपस्थित होते. शालेय समिती चेअरमन ॲड. किशोर देशपांडे यांचे विशेष मार्गदर्शन या उपक्रमाला लाभले. २ एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीतील नासाच्या आर्टीमिस-२ या ४ अंतराळवीरांच्या चांद्र मोहिमेच्या १० दिवसांचा प्रवास विद्यार्थ्यांना ऑनलाइन दाखवण्यात आला. विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. क्षीरसागर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मानवजातीच्या अंतराळ युगाच्या सुरुवातीचे स्मरण करणे, शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या योगदानाचा गौरव करणे आणि शांततापूर्ण हेतूंसाठी बाह्य अवकाशाचा वापर करण्याच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे. यासाठी हा उपक्रम विशेष महत्त्वाचा वाटतो. विज्ञान शिक्षिका द्वारका खिलारी यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी सूर्यमालेची विविध शेकडो स्वयंचलित शैक्षणिक साहित्य साधने तयार करून उपक्रमात सहभाग घेतला. प्रास्ताविक प्राचार्या जोशी यांनी केले तर आभार पर्यवेक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी मानले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बौद्ध संस्कार संघ परिवाराच्या वतीने आयोजित भीमपहाट संगीत मैफलीने छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील चेतना लॉन्स मंगल कार्यालय परिसर भीममय झाला. ‘नमो गौतमा’, ‘भीमा तुझं प्रणाम कोटी कोटी’, ‘अंगार विषमतेचा तुडवून भीम गेला’, ‘न घडणारे आमचे जीवन घडवून भीम गेला’, ‘राखिले कुळाचे नाव तू भीमराव’, ‘खरंच सांगतो भीमराव माझा झाला पहिला बॅरिस्टर’ अशा विविध भीमगीतांनी मंगळवारची पहाट उजळून निघाली. डॉ. आंबेडकरांच्या जीवनचरित्रावर आधारित गीतांचे सुरेख सादरीकरण कलाकारांनी केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत या मैफिलीचा आनंद लुटला. बौद्ध संस्कार संघाच्या वतीने मागील १७ वर्षांपासून भीमजयंतीच्या दिवशी भीमगीतांची पहाट मैफल आयोजित केली जाते. यंदा १८व्या वर्षी ‘ऑर्केस्ट्रा संगीत सितारे’ परिवाराचे सुप्रसिद्ध निवेदक व गायक विनय कसबेकर यांच्या नेतृत्वाखाली विविध भीमगीते सादर करण्यात आली. अहिल्यानगरचे गायक अतुल थोरात यांनी ‘जय भीमवाले आले’ ही गीते सादर करत महाकवी वामनदादा कर्डक यांच्या रचनांना उजाळा दिला. महाराष्ट्रातील गायक नरेश बडेकर यांनी ‘पहाट झाली प्रभा म्हणाली भीम जयंती आली’, ‘राजा-राणीच्या जोडीला’ ही गीते सादर केली. तसेच शाहीर वसंत डंबाळे यांनी ‘भीमा तुझ्या महुला जाऊन काल मी आलो’ हे गीत सादर केले. गायिका आशा वडागळे आणि पल्लवी बोरुडे यांनीही आपल्या सादरीकरणाने रंगत वाढवली. साऊंड इंजिनियर शुभम नेटके यांनी ध्वनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, स्मिता मनोरंजन रूपवते आणि डॉ. तारकेश्वर वानखेडे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान गुलाबराव खरात (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा), अभियंता पी. बी. गायसमुद्रे (जिल्हा जलसंधारण अधिकारी), भारती सागरे (उपजिल्हाधिकारी, बीड), आणि भाऊसाहेब सोनवणे (कृषी मंडळ अधिकारी बीड) , इंजिनियर किरण साळवे (सहाय्यक अभियंता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या भीमपहाट मैफलीला आबालवृद्धांची मोठी उपस्थिती होती. अनेकांनी टाळ्यांच्या ठेक्यावर साथ देत वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमासाठी कीबोर्ड वादक नरेंद्र (सोनू) साळवे, ढोलक वादक निलेश उजागरे आणि ऑक्टोपॅडवर अभिनय कसबेकर यांनी साथसंगत केली. प्रास्ताविक भाऊसाहेब देठे यांनी, सूत्रसंचालन प्रा. विजय साबळे आणि डॉ. प्राजक्ता सावेडकर यांनी केले.
आपल्या अज्ञानामुळे आपण संत आणि महापुरुषांना जातींमध्ये विभागले आहे. त्यांना या जातींच्या विळख्यातून मुक्त करा आणि त्यांचे प्रगत विचार स्वीकारा. तरच आपली आणि देशाची खरी प्रगती होईल, असे परखड प्रतिपादन अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयाचे डॉ. सिद्धोधन कांबळे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉ. नानासाहेब पवार सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. विलास खर्चे हे होते. व्यासपीठावर संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे, कृषी तंत्रज्ञानाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विजू अमोलिक, प्रक्रिया अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी उपस्थित होते. डॉ. सिद्धोधन कांबळे यांनी महापुरुषांच्या जीवनातील संघर्षाचे दाखले देत सांगितले की, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरांच्या वाट्याला जो अपमान आला, तसा तो भविष्यात कोणाच्याही वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी समाजपरिवर्तन घडवले. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून शिक्षणाची दारे उघडली, म्हणूनच आज सामान्य माणूस स्वाभिमानी आणि ज्ञानी झाला आहे. कुलगुरू डॉ. खर्चे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेची जी तत्वे दिली, ती अंगी बाळगणे हीच काळाची गरज आहे. कृषी संशोधनाचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत कसा पोहोचवता येईल, याचा विचार शास्त्रज्ञांनी आणि विद्यार्थ्यांनी करावा. महापुरुषांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन संशोधनातून देशाची प्रगती साधा.प्रास्ताविक विद्यार्थी डॉ. कैलास कांबळे यांनी, गत व पाहुण्यांची ओळख डॉ. विलास आवारी यांनी करुन दिली. सूत्रसंचालन विद्यार्थी प्रथमेश निंगनुरे आणि अनिकेत सरपने यांनी, तर आभार ऋषिकेश मोरे यांनी मानले.
श्रीरामपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात थोडेच पाणी शिल्लक राहिल्याने श्रीरामपूरवर पाणी कपातीचे संकट ओढवले होते. जलसंपदा विभागाकडून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू झाल्याने श्रीरामपूरकरांना दिलासा मिळाला आहे. भंडारदरा, निळवंडे धरणातून पाणी पुरवठा होतो. काही वर्षांपूर्वी शेती व पिण्याचे पाण्याचे एकत्रित आवर्तन सोडले जात होते. मात्र, राजकीय वजन वापरून आपल्या भागाला फायदा होण्यासाठी नेत्यांनी शेती व पिण्याच्या पाण्याचे आवर्तन स्वतंत्ररित्या सोडणे सुरू केले. त्यामुळे पाण्याचा अपव्यय वाढला. श्रीरामपूर नगरपालिका सुमारे १.२५ लाख लोकांना पाणीपुरवठा करते. ४५ दिवसांनी पाण्याचे आवर्तन येते हे गृहीत धरून नगरपालिकेने गोंधवणी येथे ३७५ दशलक्ष लिटर क्षमतेचा सिमेंटचा पक्का व मिल्लतनगर येथे मातीचा ४५० दशलक्ष लिटर क्षमतेचे साठवण तलाव आहे. पाणी मातीच्या तलावाचे खोलीकरण, विस्तारीकरण आणि अस्तरीकरण काम सुरू असल्याने सध्या एकाच तलावात ३७५ दशलक्ष लिटर पाणी साठवले जाते. नवीन तलावाचे काम पूर्ण झाल्यास १ हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता वाढणार आहे. दररोज सुमारे दोन कोटी लिटर पाणी शुद्ध करता येईल, असा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला आहे. नगरपालिका दररोज सुमारे दोन कोटी लिटर पाणी पुरवठा करीत आहे. सध्या एकच साठवण तलाव वापरात असल्याने पाणी साठवण क्षमता कमी आहे. सुमारे ४५ दिवसांनी आवर्तन येत असल्याने तोपर्यंत पाणी जपून वापरण्याची श्रीरामपूर नगरपालिकेला कसरत करावी लागत आहे. सध्या शहरात पाणी टंचाई जाणवत असून थोड्या वेळ का होईना पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान, आता पाणी आल्याने पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. दरम्यान जितेंद्र छाजेड, गटनेते वैशाली चव्हाण, स्नेहल खोरे, जयश्री पाटील, रवी पाटील, दीपक चव्हाण, आशीष धनवटे, केतन खोरे, संजय गांगड, सिद्धार्थ फंड, मनोज लबडे, विशाल अंभोरे, अमोल शेटे, कार्तिक मंडवे आदींनी विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे. पाण्याचे आवर्तन आल्यानंतर सुरुवातीला अतिशय अस्वच्छ पाणी येते. त्यामुळे ते लगेचच साठवण तलावात घेता येत नव्हते. त्यामुळे काही तास पाणी वाहू द्यावे लागते मग साठवण तलावात घेता येते. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास पाणी साठवण तलावात घेण्यात आले. जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढला जलशुद्धीकरण केंद्रात खाली गाळ साठल्याने नळाला गाळ मिश्रित पाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत पाणी पुरवठा अधिकारी निलेश बकाल यांचेशी संपर्क साधला असता सदरचा गाळ काढला असल्याचे सांगितले आहे.
देशभरात सध्या एसआयआर प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत संशयास्पद पद्धतीने सुरू असल्याचे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता असावी आणि मतदारांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे, या मागणीसाठी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी नेवासा तहसीलदार व निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. कोणत्याही मतदाराचे नाव यादीतून वगळण्यापूर्वी त्याचे आधारकार्ड, मतदान कार्ड आणि रहिवासी पुराव्यांची सखोल पडताळणी होणे अनिवार्य आहे. नाव वगळल्यास त्याचे स्पष्ट आणि लेखी कारण संबंधित व्यक्तीला द्यावे; ही माहिती केवळ व्हॉट्सॲपवर देऊन चालणार नाही. तसेच, वगळलेल्या नावांची यादी त्या त्या ग्रामपंचायतीला देऊन तो विषय ग्रामसभेत चर्चेसाठी ठेवण्यात यावा. वंचित आघाडीचे पोपटराव सरोदे यांनी इशारा दिला की, एसआयआर प्रक्रियेत कोणतीही चूक झाल्यास निवडणूक अधिकाऱ्यास जबाबदार धरून कठोर कायदेशीर भूमिका घेतली जाईल. काँग्रेसचे संभाजी माळवदे यांनी ही प्रक्रिया लोकशाहीचा पाया असल्याचे सांगत जनतेला सजग राहण्याचे आवाहन केले. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अंजुम पटेल, वंचितचे संदीप क्षीरसागर, गणपत मोरे, हरीश चक्रनारायण यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीरामपूर तालुक्याला पुन्हा वैभवाचे दिवस आणायचे असतील, तर या शहराला 'जिल्हा' घोषित करणे ही आता काळाची गरज आहे. ज्यावेळी धर्मसत्ता आणि राज्यसत्ता एकत्र येते, तेव्हाच खऱ्या अर्थाने अर्थसत्ता आणि विकासाची गंगा वाहते, असे प्रतिपादन उद्योजक बाबासाहेब काळे यांनी केले. श्रीरामपूर येथील थत्ते मैदानावर आयोजित विराट हिंदू संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या ऐतिहासिक संमेलनाला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास (अयोध्या) चे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज, सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ. जयंतीभाई भाडेसिया यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्योजक काळे यांनी श्रीरामपूरच्या औद्योगिक पिछाडीवर बोट ठेवले. ते म्हणाले, पूर्वी येथे कारखानदारीमुळे समृद्धी होती, मात्र आज चित्र बदलले आहे. डॉ. जयंतीभाई आपण केंद्र व राज्य सरकारचे 'राजदूत' म्हणून आमची ही जिल्ह्याची मागणी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यापर्यंत पोहोचवावी. महंत रामगिरी महाराजांच्या माध्यमातून आणि सरकारच्या सहकार्याने श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे, हा आमचा हट्ट आहे. अयोध्या राम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज म्हणाले, हिंदुत्वाच्या विशाल गंगेतला मी एक बिंदू आहे, हे भान प्रत्येक हिंदूने ठेवावे. अंतकरणात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि विचार जपले, तरच देशाची प्रगती होईल. छत्रपती शिवरायांच्या विचारांनीच आपल्या जीवनाची पावले प्रगतीच्या दिशेने पडली पाहिजेत. अशा उपक्रमांतूनच राष्ट्राला नवी प्रेरणा मिळते. डॉ. जयंतीभाई भाडेसिया म्हणाले, आज जग भारतीय संस्कृतीचा स्वीकार करत असताना आपण आपल्या संस्कारांपासून दूर जाणे चिंतेचे आहे. केवळ शासन सर्व समस्या सोडू शकत नाही; शक्तिशाली समाजच देशाला सामर्थ्यवान बनवू शकतो. त्यांनी निसर्गपूजा आणि सामाजिक समरसतेचे आवाहन केले. या संमेलनासाठी संपूर्ण जिल्ह्यातून वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. थत्ते मैदान भगवेमय झाले होते. प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने संपूर्ण श्रीरामपूर शहर दुमदुमून गेले होते.
आंबे तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या एका १५ वर्षीय शाळकरी मुलाचा विजेच्या भीषण धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास फत्तेपूर येथे घडली. सुफियान खाँ चांद खाँ असे या मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सुफियान आपल्या मित्रांसोबत येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पाठीमागील शेतात आंबे तोडण्यासाठी गेला होता. झाडाच्या फांद्यांमधून विजेच्या उच्च दाबाच्या तारा गेलेल्या होत्या, आंबे तोडत असताना त्याचा स्पर्श थेट वीज प्रवाहीत तारेला झाला. विजेचा जोरदार धक्का बसल्याने तो झाडावरून थेट खाली कोसळला. सुफियानला झाडावरून खाली पडताना पाहून सोबत असलेले त्याचे मित्र प्रचंड घाबरले. त्यांनी तातडीने गावाकडे धाव घेत कुटुंबीयांना आणि नागरिकांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या सुफियानला तातडीने जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, जामनेर येथे पोहोचण्यापूर्वीच सुफियानची प्राणज्योत मालवली होती. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ठाणे जिल्ह्यातील मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खर्डी गाव सध्या भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेल्या श्री सोनाई-सीताई देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाला उत्साहा त सुरुवात झाली असून, १८५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा सोहळा अक्षय्य तृतीयेपर्यंत रंगणार आहे. भक्ती, श्रद्धा आणि ग्रामीण संस्कृतीचा अनोखा संगम या निमित्ताने भाविकांना अनुभवायला मिळत आहे. अंदाजे १८५ वर्षांपूर्वी देवीचे मूळ स्थान शिरोळ येथील गोपाळपाड्यावर होते. स्थानिक रहिवासी भिका झनकर यांना देवीने स्वप्नात दृष्टांत दिल्यानंतर, ग्रामस्थांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देवीची खर्डीत स्थापना केली. आजही शिरोळ येथे मूळ शिळेवर वाघावर आरूढ असलेली देवीची प्रतिमा पाहायला मिळते. खर्डी येथील मंदिराच्या गाभाऱ्यात देवीचे दोन अद्वितीय मुखवटे असून, त्यातील एक बालसुलभ निरागसता तर दुसरा शांत आणि मातृत्वाचे भाव दर्शवतो. शेंदरी रंगातील भव्य मूर्ती आणि चांदीचा मुकूट हे भक्तांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. यात्रेचा सर्वोच्च बिंदू अक्षय्य तृतीयेच्या दिवशी (दि.१९) गाठला जातो. या दिवशी देवीचे पात्र धारण केलेल्या व्यक्तीच्या मस्तकावर श्री सोनाई-सीताई देवीचा मुखवटा ठेवून भव्य मिरवणूक काढली जाते. खर्डी रेल्वे स्थानकापासून अवघ्या २ किमी अंतरावर असलेल्या या मंदिरात ठाणे, नाशिक आणि मुंबई परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत मंदिरात करत असून, परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. पारंपरिक 'बोहाडा' उत्सव या यात्रोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, पाच दिवस चालणारा ‘बोहाडा' (लळित) उत्सव. यामध्ये पौराणिक परंपरांचे दर्शन घडते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी गावातील पाटलांच्या घरासमोर मांडव उभारून देशमुख मराठा, शिंदे, बेदरकर, फाकटकर, निगुजकर (सोनार) आणि मुळे (ब्राह्मण) यांसारख्या मानकरी घराण्यांचा सन्मान केला जातो. पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघणाऱ्या मिरवणुकीत गणपती, सरस्वती, काळभैरव आणि खंडेराव अशा विविध देवतांची सोंगे साकारली जातात. यात सादर होणारे नरसिंह अवतार आणि रामायणकालीन प्रसंग भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतात.

27 C