वर्दीचं स्वप्न अपूर्णच!:पुणे पोलिस भरतीत 1600 मीटर धावताना बुलढाण्याच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका 23 वर्षीय तरुणाचा मैदानी चाचणी दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिवाजीनगर मैदानावर शनिवारी (दि. 28) सकाळी घडली. सोळाशे मीटर धावण्याची चाचणी देत असताना तिसऱ्या फेरीत त्याला अचानक 'फिट' आली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पुरुषोत्तम बारकुल (23, रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुणे शहर पोलिसांच्यावतीने गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. शनिवारी सकाळी पुरुषोत्तम याची मैदानी चाचणी सुरू होती. पोलिस भरतीतील अत्यंत कठीण टप्पा मानल्या जाणाऱ्या 1600 मीटर धावण्याच्या चाचणीत तो सहभागी झाला होता. दोन फेऱ्या पूर्ण केल्यानंतर, तिसऱ्या फेरीदरम्यान पुरुषोत्तमला अचानक 'फिट' (झटका) आली आणि तो धावता धावता मैदानावरच कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मैदानावरील इतर उमेदवार आणि पोलिस प्रशासनाची धावपळ उडाली. पुरुषोत्तम कोसळल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली. त्यावेळी त्याचे हृदयाचे ठोके अत्यंत मंदावले असल्याचे निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून ससून सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. अचानक तरुणाचा भरती दरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. पुरुषोत्तमच्या निधनामुळे बुलढाणा जिल्ह्यातील त्याच्या गावावर शोककळा पसरली असून, पोलिस दलातही या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर डीजीसीए अर्थात नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने व्हीआयपी व्यक्तीच्या हवाई प्रवासाच्या सुरक्षेविषयी नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या गाईडलाईन्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. डीजीसीएने व्हीएसआर कंपनीसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाी केली तर नव्या गाईडलाईन्सला अर्थ आहे, अन्यथा त्या केवळ एक दिखावा ठरतील, असे त्यांनी म्हटले आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथील एका विमान अपघातात निधन झाले. तेव्हापासून रोहित पवार या प्रकरणी व्हीएसआर विमान कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. या अपघातानंतर डीजीसीएने महत्त्वाच्या व्यक्तीच्या विमान प्रवासाच्या सुरक्षेविषयी नवी गाईडलाईन्स जाहीर केली आहे. त्यावर रोहित पवारांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, अजितदादांच्या दुर्दैवी अपघातानंतर VSR सारख्या कंपन्यांनी नियमांचे केलेले उल्लंघन यांसारख्या अनेक बाबी पुढे आल्या. या सर्व बाबींचा विचार करून DGCA ने महत्वाच्या व्यक्तीच्या प्रवासावेळेस सुरक्षेसाठीच्या नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. काहीतरी करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न 2014 च्या तुलनेत 2026 च्या नव्या गाईडलाइन्स थोड्या विस्तृत असल्या तरी आधीच्या गाईडलाइन्समध्ये थोडेफार फेरबदल करून काहीतरी करतोय, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. YSR रेड्डी यांच्या दुर्दैवी अपघातानंतर 2014 मध्ये अशाच प्रकारच्या गाईडलाईन्स काढल्या होत्या परंतु अधिकारी आणि विमान कंपन्यांचे हितसंबंध यामुळे गाईडलाईन्सची काटेकोरपणे अंमलबजावणी झालीच नाही. परिणामी अपघातही थांबले नाहीत आणि दुर्दैवांने अजितदादांसारख्या लोकनेत्याचा बळी गेला आणि त्यानंतर आता पुन्हा DGCA ला जाग आली. VSR कंपनी, the Accountable Manager, संबंधित सर्व अधिकारी यांनी गाईडलाईन्सचे पालन केलेले नाही. त्यामुळे जुन्या आणि नव्या या दोन्ही गाईडलाइन्समध्ये ज्याप्रमाणे Action Of Non-Compliance सांगितली आहे, त्याप्रमाणे संबंधित कंपनीचा NSOP रद्द करून संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तरच या गाईडलाईन्सला अर्थ आहे, अन्यथा या नव्या गाईडलाइनसुद्धा केवळ एक दिखावा ठरतील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ये प्यार और संघर्ष आखिर तक चलता रहेगा अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज बरोबर 2 महिने पूर्ण झाले. रोहित पवार यांनी या प्रकरणी अधिक त्वेषाने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आठवणींचे 2 महिने. ये प्यार और संघर्ष आखिर तक चलता रहेगा! मिस यू दादा सो मच, असे त्यांनी म्हटले आहे. दोन महिने लोटले, पण जखम अजूनही ताजीच - मिटकरी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणी आपल्या भावना प्रकट केल्या आहेत. ते म्हणाले, दोन महिने उलटले… पण जखम अजूनही ताजीच आहे. दादांच्या विमान अपघातानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला होता, आणि आजही तेच दुःख प्रत्येकाच्या मनात घर करून बसलेलआहे. वेळ पुढे सरकतोय, दिवस बदलत आहेत… पण दादांच्या आठवणी आणि त्यांच्या अचानक जाण्याचं दुःख अजूनही तसंच आहे. राज्यातील लाखो चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आजही जिवंत आहे - नेमकं काय घडलं? या घटनेमागचं गूढ अजूनही उकललेलं नाही, आणि हीच वेदना प्रत्येकाच्या मनाला सतावत आहे. दादा फक्त एक नेता नव्हते… ते लाखो लोकांच्या आशा-अपेक्षांचं केंद्र होते, एक विश्वास होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. आजही महाराष्ट्रातील प्रत्येक दादा समर्थक न्यायाची वाट पाहतोय… सत्य समोर येण्याची वाट पाहतोय. कारण दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक हृदयाला एकच अपेक्षा आहे - सत्य बाहेर यावं… आणि दादांना न्याय मिळावा! दोन महिने काळीज चिरणारे 28 जानेवारी ते 28 मार्च, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडर पुरवठा अद्याप सुरळित झालेला नसतानाच जिल्हा प्रशासनाने डिझेलवर निर्बंध आणले. डब्यातून डिझेल विक्रीवर बंदी घातल्याने उद्योगातील जनसेट बंद आहेत. त्याचा मोठा परिणाम उत्पादनावर झाला आणि सुमारे 5 हजार कामगार घरी बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उद्योगांत विद्युतपुरवठा खंडित झाल्यानंतर विजेला पर्याय म्हणून जनसेट चालवतात. त्याला मोठ्या प्रमाणात डिझेल लागते. तेच मिळत नसल्याने 8 उद्योगातील उत्पादन ठप्प होण्याच्या मार्गावर असल्याचे उद्योग जगतातून सांगण्यात आले. एमआयडीसीमधील मोठ्या यंत्रसामग्रीला अखंडित वीज लागते. महावितरणचा पुरवठा खंडित झाल्यास लाखो रुपयांचे नुकसान टाळण्यासाठी तत्काळ ‘पॉवर जनरेटर’ सुरू करावे लागते. त्यासाठी बॅरल किंवा कॅनमधून पंपावरून डिझेल आणले जाते. प्रशासनाने सुट्या इंधन विक्रीवर बंदी घातल्याने पंपचालक उद्योजकांना डिझेल देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. पुरवठा विभागाकडे एमआयडीसीतील अनेक उद्योजकांनी बॅरलमधून डिझेल देण्याची मागणी केली आहे. सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशनला पत्र दिले. कठीण काळात महावितरणने काळजी घ्यावी कठीण काळात उद्योगांना मदत करायची असेल तर महावितरणकडून विनाअडथळा विद्युत पुरवठा सुरू ठेवावा लागणार आहे. महावितरणचे सतत अडथळे असतात. खरंच सरकारला सगळ्यांना मदत करायची असेल तर त्यांनी महावितरणचा वीजपुरवठा विनाअडथळा सगळ्यांना सुरळित ठेवला पाहिजे. आता अडचणी खूप वाढल्या. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर फॅक्टरी सुरू ठेवण्यासाठी डिझेलवरील जनसेट सुरू करावे लागतात. शरदकृष्ण ठाकरे, अध्यक्ष, लक्ष्मी हायड्रोलिक्स या उद्योगांना फटका लिनित एक्सपोर्टस्, कॉनकंट्रीझ मेटल स्ट्रॅटेझिज प्रायव्हेट लिमिटेड, लक्ष्मी हायड्रोलिक प्रायव्हेट लिमिटेड, श्रीकृष्ण फार्मासिटीकल्स अर्निकेम इंडस्ट्रीज, वेस्टर्न अमोनिया इंडस्ट्रीज. औद्योगिक संकट वाढतच जाणार 8 मार्चपासून 10 हजार 800 व्यावसायिक गॅस सिलिंडरचे बुकिंगच बंद करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने आदेश काढून 50 टक्के व्यावसायिक सिलिंडर पुरवण्याची सूचना केली. परंतु त्याच्या मार्गदर्शक सूचना अद्यापही नाहीत. त्यामुळे उत्पादनांना गॅसच नाही. अशा अवस्थेत डिझेलवर निर्बंध लादण्यात आले. त्यामुळे औद्योगिक संकट वाढतच जाणार. त्यावर तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. योग्य व्यवस्थापनाच्या सूचना दिल्या आहेत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह अन्य कामांसाठी डिझेलची गरज भासते. उद्योगांसाठी ते गरजेचेच आहे. सध्या काळाबाजार रोखण्यासाठी कॅन किंवा बाटलीतून पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. पण, उद्योगांसमोर डिझेलअभावी अडचणी निर्माण होऊ नयेत. यासाठी त्यांची गरज लक्षात घेऊन योग्य व्यवस्थापन करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात येतील. उद्योजकांच्या समस्यांची तातडीने दखल घेतली जाईल. जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 140 कोटी जनतेची टीम इंडिया अतिशय सक्षम आहेत. राऊतांनी त्यांची भूमिका काय हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. कारण ते नेहमी पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेत असतात, उबाठाची टीम पाकिस्तान आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. इंधन पुरवठा सुरळीत होण्यासाठी पंतप्रधान काम करत आहेत. नवनाथ बन म्हणाले की, कालपर्यंत गॅस आणि इंधन पुरवठा नाही म्हणणारे संजय राऊत आज इराणमुळे देशात गॅस-इंधन पुरवठा सुरळीत आहे असे म्हणत आहे. काल जेव्हा अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार ही धमकी दिली तेव्हा त्यांचे डोकं ठिकाण्यावर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे सर्व गोष्टी सुरळीत सुरू आहे. भांडणे लावू नका नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी जाती-जातीमध्ये आणि धर्मा-धर्मात वाद लावण्याचे काम करू नये. राज्यातील धार्मिक स्थळांना गॅस पुरवठा करण्याकरता राज्य सरकार प्रयत्न करत आहे. कुठेही धार्मिक भेदभाव करणे महाराष्ट्र सरकारचे काम नाही. नार्वेकरांवर काय कारवाई करणार नवनाथ बन म्हणाले की, रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झालेला आहे. तर खरात प्रकरणी कसून चौकशी करण्याचे काम राज्य सरकारकडून सुरू आहे. कुणालाही सोडले जाणार नाही. मविआने शेतकऱ्यांचे पाणी भोंदूला दिले, तेव्हा मंत्रालयापर्यंत त्याचा वावर कोणी आणला होता. राऊतांच्या दबावामुळेच खरातला पाणी देण्यात आले ही माहिती आमच्याकडे आहे. 40 आमदार खरातकडे जात होते त्यामध्ये मिलींद नार्वेकर होते, त्यांचे फोटो आहेत. नार्वेकरांवर कुठली कारवाई करणार हे स्पष्ट करा. राऊत महाराष्ट्र द्रोही म्हणून काम करता नवनाथ बन म्हणाले की, देवाभाऊंच्या नेतृत्वात टीम महाराष्ट्र अत्यंत सक्षमपणे काम करत आहे. महायुतीच्या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा गाडा अत्यंत व्यवस्थित ठेवण्याचे काम फडणवीस करत आहेत. राऊत 11 कोटी जनता आमच्यासोबत आहे. जनतेने तुम्हाला विरोधी पक्षनेता निवडून यावा इतकेही बहुमत दिलेले नाही. महाराष्ट्र विरोधी भूमिका घेताना जनतेने तुम्हाला बघितले आहे. देवेंद्र फडणवीस यांची टीम महाराष्ट्र ठरले आहे. तुम्ही महाराष्ट्र द्रोही म्हणून काम करत आहात.
५ घरफोड्या करणारा बांगलादेशी आरोपी जेरबंद:पुणे पोलिसांनी विविध राज्यांतील गुन्हे उघडकीस आणले
पुणे पोलिसांनी विविध राज्यांमध्ये ५० हून अधिक घरफोड्या करणाऱ्या एका कुख्यात बांगलादेशी आरोपीला अटक केली आहे. कर्वेनगर परिसरात घडलेल्या एका घरफोडी प्रकरणाचा तपास करत असताना ही कारवाई करण्यात आली. या अटकेमुळे अनेक गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे. १४ मार्च २०२६ रोजी रात्री ते १५ मार्च २०२६ दरम्यान कर्वेनगरमधील नवसह्याद्री सोसायटीतील एका कार्यालयात घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्याने खिडकीचे गज तोडून प्रवेश करत सोनी कंपनीचा कॅमेरा, दोन लेन्स, मार्विक प्रो 2 ड्रोन, अॅपल कंपनीचा आयफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असा सुमारे ६.७१ लाख रुपयांचा ऐवज चोरला होता. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक संशयित व्यक्ती रॉयल एनफिल्ड हिमालयन बाईकवरून जाताना दिसला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्या बाईकचा माग काढला. आरोपी हैदराबाद, नागपूर, जबलपूर, मिर्झापूरमार्गे वाराणसीकडे गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. पुणे पोलिसांनी वाराणसी पोलीस आयुक्तालयाच्या मदतीने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीने स्वतःचे नाव मोहम्मद बशर नूर मोहम्मद (वय ३८, मूळ रा. ढाका, बांगलादेश) असे सांगितले. तो नेवानाथ विनोद कुमार या नावानेही वावरत असल्याचे समोर आले आहे. आरोपी बनावट ओळखपत्रे तयार करून विविध ठिकाणी गुन्हे करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. आरोपीकडून चोरीस गेलेला सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय, त्याच्याकडून बांगलादेशी पासपोर्ट तसेच विविध देशांची चलनेही मिळाली आहेत. आरोपीविरुद्ध वाराणसी येथे इमिग्रेशन अॅक्ट अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये त्याच्यावर ३६ गुन्हे नोंद आहेत, तर इतर राज्यांतील गुन्ह्यांचीही चौकशी सुरू आहे. ही यशस्वी कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अलंकार पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली.
खरात प्रकरणी आर्थिक गोष्टीचा तपास करण्यात यावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहोत. चाकणकर यांचा आयोगाचा आणि प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा एकाच वेळी होऊ शकला असता. आयोगाच्या राजीनामा हा मुख्यमंत्र्यांनी द्यायला सांगितला त्यामध्ये काही तटकरेंचा रोल नव्हता. आणि महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा काही राजीनामा नाही ही गच्छंती आहे,असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या की, चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांनी राजीनामा घेतला आहे, ते पक्षातील नाराजी ओळखत घेतला आहे. चाकणकर यांच्यावर आरोपपत्र दाखल होईल असे वाटते. एसआयटीवर विश्वास ठेवायला हवा. चाकणकर, केसरकरांची चौकशी व्हावी सुषमा अंधारे म्हणाल्या की, भोंदू खरात प्रकरणी पोलिस तपास करतील त्या तपासाकडे आमचे लक्ष राहील. रुपाली चाकणकर, दीपक केसरकर यांची या प्रकरणी का चौकशी व्हावी याबद्दल माहिती आम्ही एसआयटी प्रमुखांना दिली आहे. चाकणकर यांचा राजीनामा ही आमची मागणी नाहीच. त्यांना पदावर असताना अटक झाली तर पक्षाची प्रतिमा डागाळेल. त्यांच्या राजीनाम्यासाठी मी नाही तर त्यांच्या पक्षातीलच लोकं आग्रही होते. 16 वर्षांपासून महिलांचे शोषण सुषमा अंधारे म्हणाल्या की, भोंदू खरातकडून 16 वर्षांपासून महिलांचे शोषण सुरू आहे. यात किती केसेस असतील? हजारो केसेस या प्रकरणी असू शकतात. चाकणकर आणि खरात याचा 12 ते 13 वर्षांपासून संपर्क आहे. खरातला मोठे करणारी लोकं कोण आहेत, तर दीपक केसरकर यांचा मी उल्लेख केला ते शालेय शिक्षणमंत्री? ते एमआयडीसीच्या मैदानावर काय करत होते. आवारे नावाचा माणूस जो जगदंब पतसंस्थेचा प्रमुख आहे त्या पतसंस्थेमध्ये खरातचे आर्थिक व्यवहार असू शकतो त्या आवारेंची चौकशी झाली पाहिजे. खरातसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी झाली पाहिजे.
वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर कारंजा ते वनोजा टोल प्लाझा दरम्यान चॅनल क्रमांक 197 जवळ पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षा आणि आपत्कालीन मदत यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरहून मुंबईकडे मालवाहतूक करणारा एक ट्रक प्रवास करत असताना अचानक त्याचा डिझेल पाईप तुटला. त्यामुळे संबंधित ट्रक महामार्गाच्या मधोमधच नादुरुस्त अवस्थेत उभा राहिला. या परिस्थितीत ट्रक चालकाने तत्काळ समृद्धी महामार्गावरील मदत यंत्रणा तसेच वाहतूक पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार फोन करूनही कोणतीही मदत वेळेत उपलब्ध झाली नाही, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, नादुरुस्त ट्रक रस्त्याच्या मधोमध उभाच असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. याच दरम्यान पहाटे अंदाजे तीन वाजण्याच्या सुमारास मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने नादुरुस्त ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुसऱ्या ट्रकचा चालक जागीच ठार झाला. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक दीड ते दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे, अपघात घडूनही बराच वेळ कोणतीही मदत घटनास्थळी पोहोचली नाही. अखेर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मदत यंत्रणा आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत अपघातातील मृत व्यक्तीसाठी खूप उशीर झाला होता. या संपूर्ण घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन सेवांची तत्परता, गस्त व्यवस्था तसेच नादुरुस्त वाहनांसाठी तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या यंत्रणेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. महामार्गावर इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक असताना, अशा प्रकारे मदत मिळण्यात झालेला विलंब भविष्यात अधिक मोठ्या दुर्घटनांना कारणीभूत ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्री करू नये म्हणून भोंदू अशोक खरातने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना फोन केला होता, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला होता. या प्रकरणी त्यांनी कोकाटेंना त्यांच्याकडे असलेली माहिती पुढे आणण्याचेही आवाहन केले आहे. प्रस्तुत प्रकरणात सुनील तटकरेंसह रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करून त्यांचे व्यवहार तपासले पाहिजेत. कारण अशोक खरात एकटा नसून, त्याची एक मोठी टीम आहे, असेही शरद पवार गटाने म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता तथा संघटक सचिव विकास लवांडे या प्रकरणी म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. त्याची नवनवीन प्रकरणे बाहेर येत आहेत. हा लिंगपिसाट भोंदू बाबाने गेल्या काही वर्षांत अनेक महिलांचे शोषण केले. अनेक महिलांचे शारीरिक, मानसिक आर्थिक शोषण केले. या प्रकरणात अनेक मोठे राजकीय व्यक्ती व उद्योजक अडकलेत. ही सर्व काळी कृत्य करणे हे त्याचे एकट्याचे काम नाही. त्याच्याभोवती मोठे रॅकेट किंवा मोठी टीम असल्याशिवाय हे शक्य नाही. कारण, आजपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकला नाही. त्याची कुकर्मे बाहेर आली नाही. चाकणकरांनी उपकार केल्यासारखा राजीनामा दिला विकास लवांडे म्हणाले, अशोक खरातच्या टीममध्ये ज्यांनी आता राज्य महिला आयोगाचा व राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्या रुपाली चाकणकरांचा समावेश आहे. त्यांनी उपकार केल्यासारखे राजीनामे दिलेत. त्या त्याच्यात खरोखर आरोपी आहेत. सुनील तटकरे आरोपी आहेत. हे दोघेही नाशिकच्या विमानतळावर उतरून तेथून गाडीने अनेकवेळा खरातकडे गेले आहेत. अनेक लोकांना त्यांच्या माध्यमातून अशोक खरात भेटला आहे. अशोक खरातचे अनेक व्यवहार या दोघांना माहिती आहेत. त्यामुळे या प्रकरणी खरात, तटकरे व चाकणकरांचे गत काही वर्षांतील सर्व सीडीआर तपासण्याची गरज आहे. त्यांचे मेसेज तपासले पाहिजेत. यांचा संपर्क कुठे, कसा, काय होत होता? व्यवहार कोणकोणते होत होते? हे तपासले पाहिजे. कारण, त्या ट्रस्टच्या विश्वस्तांची अद्याप चौकशी झाली नाही. त्यांच्यावर अद्याप गुन्हे दाखल झाले नाही. या ट्रस्टवर रुपाली चाकणकर स्वतः विश्वास्त होत्या. या ट्रस्टचे जे कुणी अकाउंटचे काम पाहणाऱ्या सीएवरही गुन्हा दाखल करून चौकशी झाली पाहिजे. कारण, मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत, असे ते म्हणाले. माणिकराव कोकाटेंचा होता अडथळा विकास लवांडे पुढे म्हणाले, या सर्व प्रकरणात सिन्नरचे आमदार माणिकरावर कोकाटे खरातच्या मार्गात अडथळा ठरत होते. कोकाटे या खरातकडे गेल्याचे कुठेही फोटो नाहीत, कुठेही चर्चा नाही. याच खरातने राज्यात सरकार स्थापन होत असताना सुनील तटकरेंना फोन करून कोकाटेंना मंत्री करू नये म्हणून फोन केला होता. तटकरेंनी सांगावे की किती वेळा खरातने त्यांना विनवण्या केल्या किंवा फोन केले माणिकरावांना मंत्री करू नये म्हणून. रुपाली चाकणकरांनीही तसा आग्रह धरला होता. पण अजित पवारांनी कोकाटेंना मंत्री केले. आज कोकाटेंनी त्यांच्या मतदारसंघात सिन्नरला एवढे मोठे रॅकेट सुरू असताना आता बोलण्याची आवश्यकता आहे. मंत्री कोकाटेंना अनेक गोष्टी माहिती विकास लवांडे म्हणाले, कोकाटेंना या प्रकरणातील अनेक गोष्टी माहिती असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात जोपर्यंत सुनील तटकरे व रुपाली चाकणकरांवर सहआरोपी करून गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत या प्रकरणातील नव्या गोष्टी बाहेर येणार नाहीत. खरे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही खरातसोबत फोटो असल्याचे समोर आले आहे. परवाच एक ऋषिकेश वैद्य नामक आणखी एक भोंदूबाबा सापडला. त्याच्यासोबतही मुख्यमंत्र्यांचे व आरएसएसच्या सर्व लोकांचे फोटो आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकरणात फडणवीस हेच कुणाला आरोपी करायचे व कुणाला करायचे नाही हे ठरवणार आहेत. आता या प्रकरणात मोठमोठे मासे दडपायचे की पुढे आणायचे हे मुख्यमंत्री ठरवणार आहेत. तटकरे व चाकणकरांवर गुन्हे दाखल केल्यानंतर अनेक नवी प्रकरणे पुढे येऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना फ्री हँड द्यावे अशी आमची मागणी आहे, असे लवांडे यांनी म्हटले आहे.
सत्ताधारी आमदार दीपक केसरकर म्हणतात की मला एकट्यालाच का टार्गेट करता आहात, खरातकडे 40 आमदार जात होते, हे 40 आमदार कोण हे पुढे आले पाहिजे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. खरातसाठी विमानांची सोय करणारे सरकारमधील कोण लोकं होते हे जाहीर केले पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. संजय राऊत म्हणाले की, खरात दिल्लीमध्ये जात कोणाला भेटत होत हे जर पोलिस तपासात निष्पन्न झाले असेल तर ते समोर आले पाहिजे. अशोक खरात यांचा वावर सर्वत्र होता. सरकारने त्याला राजमान्यता दिली होती. ज्यांनी त्यांना राजमान्यता दिली ती लोकं फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आजही आहेत, फडणवीसांनी त्यावर बोलावे. एखाद्या समाजाच्या मंदिरासाठी मंत्री जर वेगळी ववस्था करत असतील तर त्यावर आम्ही टीका करणार नाही. नरेंद्र मोदी यांनी जी चूक केली ती देवेंद्र फडणवीयांनी करू नये. त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनासोबत घेत यावर बैठक घ्यावी. विरोधी पक्षनेता नेमावा तरच टीम महाराष्ट्र तयार होईल. .. हे सर्व ढोंग संजय राऊत म्हणाले की, आपले पंतप्रधान कधी राष्ट्रीय विचार करतात का? मुळात त्यांच्या पक्षामधील टीम त्यांच्याकडे नाही. हम दो हमारे दो असे ते वागतात. जे सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिले नाही ते टीम इंडियाम्हणत आहे. हे सर्व ढोंग आहे. ते कधीच विरोधी पक्षाला विश्वासात घेत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच कोणत्या विषयावर चर्चा करत नाही. व्हिडिओची पडताळणी कशी करणार? संजय राऊत म्हणाले की, मंत्री झिरवाळ यांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओची पडताळणी कशी करणार. मुख्यमंत्री किरीट सोमय्यांच्या व्हिडिओची सत्यता तपासणार होते, असे ते बोलले होते. पण ती सत्यता पडताळली पाहिजे. विरोधी पक्षाबद्दल असे काही घडले असते तर सरकारने आधी फाशी मग चौकशी ही भूमिका घेतली असती. इथे फाशीचे नावच नाही, करू चौकशी सुरू आहे. ..तर विरोधकांना विश्वासात घेतले पाहिजे संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान, मुख्यमंत्री जर सांगत असतील लॉकडाऊन लागणार नाही तर ती चांगली गोष्ट आहे, तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीम इंडियामध्ये कोण आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले पाहिजे. का केवळ मोदी आणि अमित शहाच त्यामध्ये आहेत. जर महाराष्ट्रात टीम करायची असेल तर विरोधकांना विश्वासात घेतले पाहिजे. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेता नेमला पाहिजे. इराणमधील जनतेसाठी देशभरातील लोकांनी पैसे जमा करत त्यांना 500 कोटीची मदत केली आहे. सरकारने मदत केलेली नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपने काहीही केले तरीही तिथे ममता बॅनर्जीच जिंकणार असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे.
महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलिसांची हवा खाणाऱ्या भोंदू अशोक खरातवर शुक्रवारी रात्री उशिरा आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. यापैकी एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा, तर दुसरा आर्थिक फसवणुकीचा आहे. लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात खरातने पीडित महिलेवर आपल्या मोडस ऑपरेंडीनुसार म्हणजे आपण दैवी अवतार असल्याचे सांगत अत्याचार केला. ही महिला आपल्या नवऱ्यासोबत संसार सुखाचा व्हावा म्हणून खरातकडे आली होती. पण त्याने तिच्यावरच अत्याचार करून आपला कामवासना भागवली. यासंबंधीच्या माहितीनुसार, प्रस्तुत प्रकरणात पती व पत्नीचे 2013 साली लग्न झाले. पण त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते. त्यामुळे ते विभक्त राहत होते. एका व्यक्तीच्या सूचनेनुसार ते आपला संसारगाडा रुळावर आणण्यासाठी भोंदू अशोक खरातकडे गेले होते. 2022 साली हे दोघे पहिल्यांदा त्याच्याकडे गेले. त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा ते अशोक खरात याच्याकडे गेले. त्यावेळी खरातने पतीला केबिनबाहेर बसवले. त्यानंर पत्नीला तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यायला देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तसेच यावेळी त्याने तिला ठार मारण्याचीही धमकी दिली. पीडितेला काय म्हणाला होता अशोक खरात? तू ही गोष्ट कुणाला सांगितली तर मी महादेवाचा अवतार आहे. माझ्याकडे दैवी शक्ती आहे. मी तुझ्या मुलांना मारून टाकून तुझा संसार उद्ध्वस्त करेन असे खरात म्हणाला होता, असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. तत्पूर्वी, हे दोघे 2022 मध्ये पहिल्यांदा अशोक खरातकडे गेले होते, तेव्हा त्याने या दोघांना त्यांच्या लग्नाची तारीख विचारली होती. त्यांनी लग्नाची तारीख सांगितल्यानंतर तुमचे लग्न चुकीच्या तारखेला झाल्यामुळे तुमच्यात सातत्याने वाद झाल्याची बतावणी त्याने केली होती. त्यानंतर हे दोघे जवळपास 6-7 वेळा त्याच्याकडे गेले होते. ऑगस्ट 2024 मध्ये अशोक खरातच्या नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात गेले असता त्याने महिलेवर बलात्कार केला. महिलेने आपल्या तक्रारीत ऑगस्ट 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत या कालावधीत अशोक खरातने आपल्यावर 4 वेळा बळजबरीने गैरकृत्य केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अशोक खरातविरोधात आतापर्यंत सरकारवाडा पोलिस ठाण्यात एकूण 10 गुन्हे दाखल झालेत. त्यातील 2 आर्थिक फसवणुकीचे तर 8 महिला अत्याचाराचे आहेत. राजेंद्र जासूद व राजेंद्र भागवत यांनी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल केलेत. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. सायबर पोलिसांनी या प्रकरणी नव्याने 65 जणांवर गुन्हे दाखल केलेत. यामुळे या प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईचा आकडा 74 वर गेला आहे. यापूर्वी कोपरगावातील 3, तर नाशिक पोलिसांनी 6 जणांवर गुन्हा दाखल केला होता. आता व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अवघ्या 3 दिवसांत 74 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
इराण-इस्त्रायल युध्दाची झळ वाहतूक व्यवसायालाही बसली असून अस्थिर वातावरणामुळे भाडेही 20 टक्क्यांनी वाढले आहे. मालवाहतुकीला परराज्यात जातांना जागोजागी डिझेल मिळाले किंवा हॉटेल्स खुले राहतील की नाही याची शाश्वती नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. शहरांतर्गत मालवाहतुकीवर अद्याप परिणाम दिसत नसला तरी शहरातून जाणारा कृषी माल, उद्योगांची उत्पादने, शहरात येणारे धान्य, किराणा यांवर याचा परीणाम झाला आहे. नाशिकमध्येच दररोज किमान 1150 ट्रक, ट्रेलर माल घेऊन येतात आणि तितकेच बाहेरच्या राज्यात माल पोहोचवतात, त्यापैकी 30 टक्के वाहनांना ब्रेक लागला आहे. मालवाहतूक व्यवसायाला देशाच्या धमण्या मानल्या जातात. मात्र गेल्या पाच दिवसांपासून देशभरात इंधनासाठी लागलेल्या रांगांमूळे रस्त्यात डिझेल मिळेलच याची शाश्वती राहिलेली नाही. दुसरी बाब म्हणजे, व्यवसायिक सिलिंडरअभावी अनेक हॉटेल्स बंद पडले आहेत, त्यामुळे जेवण मिळेलच याचीही शाश्वती वाहनचालकांना राहिलेली नाही. अनेक वाहनचालक वाहन रस्त्याच्या कडेला लावून आपला स्वयंपाक बनवतात, त्याकरीता प्रवासात कुठेही घेवून जाता येणारे तीन लिटरचे सिलिंडर वापरले जाते. ते यापूर्वी कुठेही भरून मिळत होते किंवा बदलून मिळत होते. आता तेही मिळणे बंद झाले आहे. या सर्व अनिश्चिततेमुळे वाहनचालक एकतर मालवाहतुकीला जाण्यास तयार नाहीत किंवा जास्तीचे पैसे मागतात. यामुळे मालवाहतुकीचे भाडेही 20 टक्क्यांनी महागले असून किमान 30 टक्के वाहनांना ब्रेक लागला आहे. शहरातून बाहेर जाणारा माल नेण्यासाठी काही प्रमाणात ब्रेक लागला आहे तसेच बाहेरील राज्यातून शहरात येणार मालही मोठ्या प्रमाणात बंद झाला आहे. यामुळे अशीच स्थिती राहिली आणि त्यात आणखी भर पडल्यास व्यवसायाला दुहेरी फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे व्यापार व उद्योग जगतातून चिंता व्यक्त होत आहे. बाहेरून गहू, तांदूळ येण्यासाठी अडचण सध्या गव्हाचा हंगाम असून मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आपल्या शहरात गहु येत असतो तर झारखंड, छत्तीसगड येथून तांदूळ येतो. मात्र, ऐन हंगामात 60 टक्के वाहने येणे बंद झाले आहे. त्यातच 31 मार्चपर्यंत मध्य प्रदेशात बाजार समित्या बंद आहेत, याचा दुहेरी फटका धान्य व किराणा व्यवसायाला बसतो आहे. - राहुल डागा, धान्य, किराणा घाऊक व्यापारी ...तर पूर्ण व्यवस्थाच कोलमडेल सिलिंडरअभावी अनेक हॉटेल्स बंद आहेत, इंधनाची शाश्वती नाही, त्यामुळे वाहतूकदार असुरक्षित झाला आहे. दोन दिवसांपूर्वी घेतलेला भाड्याचा दर आज 20 टक्के वाढला आहे. किमान 30 टक्के मालवाहतूक ठप्प आहे. शहरांतर्गत परिणाम नसला तरी दहा दिवसात हे सगळे नियमित झाले नाही तर पुर्ण व्यवस्था कोलमडेल.-राजेंद्र फड, अध्यक्ष, नाशिक डिस्ट्रीक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन
युद्धामुळे पामतेल, सूर्यफुलात 10 रुपयांनी वाढ:दररोज लागणाऱ्या 100 टनांपैकी केवळ 70 टनच पुरवठा
आखाती देशांतील युद्धाचा परिणाम आता छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेवर दिसू लागला आहे. यातील एक म्हणजे खाद्यतेलाच्या आयात आणि पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांत सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाच्या दरात प्रति लिटर 10 रुपयांची वाढ झाली आहे. कच्च्या तेलाचे वाढलेले भाव आणि जहाजांचा वाढलेला वाहतूक खर्च यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. शहराला दररोज सुमारे 100 टन खाद्यतेलाची गरज भासते. मात्र, सध्या युद्धामुळे आयात मंदावल्याने केवळ 70 टनच पुरवठा होत आहे. टंचाई वाढणार रशिया-युक्रेनमधून सूर्यफूल येते, मलेशियातून पामतेल तर अर्जेंटिना-ब्राझीलमधून सोयाबीन तेल आयात होते. मात्र सध्या युद्धामुळे खर्च वाढला आहे. -राकेश पांडे, विक्रेते. करडीचे भाव कमी झाले करडीचे नवीन पीक बाजारात आले आहे. त्यामुळे करडी तेलाचे भाव 20 रुपयांनी कमी झाले आहेत.- जगन्नाथ बसैये, विक्रेते. पंधरा दिवसांत असे बदलले भाव (प्रतिलिटर) खाद्यतेल 15 दिवसांपूर्वी आताचे भावसूर्यफूल 160 रुपये 175 - 180 रुपयेसोयाबीन 140 रुपये 150 रुपयेपामतेल 110 रुपये 120 - 140 रुपयेसरकी रिफाइंड 140 रुपये 150 रुपयेशेंगदाणे 195 रुपये 200 रुपयेकरडी 320 रुपये 300 रुपये करडी तेलाच्या दरात 20 रुपयांची घसरण स्थानिक पातळीवर मात्र ग्राहकांना दिलासा देणारी बाब समोर आली आहे. करडीचे नवीन पीक बाजारपेठेत दाखल झाल्यामुळे करडी तेलाच्या दरात 20 रुपयांची घट झाली आहे. सध्या 300 रुपये लिटरने मिळणारे हे तेल आगामी काळात 250 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे तथा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरातशी कथित संबंध असल्याच्या मुद्यावरून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. कर्माची फळे चुकत नसतात. ती ह्याच जन्मात भोगावी लागतात. 'वैयक्तिक' कारणांपासून सुरू झालेला 'माज' 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला, असे त्यांनी म्हटले आहे. रुपाली चाकणकर यांनी भोंदू अशोक खरातशी असलेल्या कथित संबंधांवरून शुक्रवारी रात्री राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यामुळे त्यांच्यावरील टीकेची धार कमी होण्याची शक्यता होती. पण उलट विरोधकांनी त्यांच्यावरील टीकेची धार अधिकच तिखट केली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. 'वैयक्तिक' कारणांपासून सूरू झालेला 'माज' 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला, असे त्यांनी म्हटले आहे. दादांच्या कार्यकर्त्या बहिणी समाधानी झाल्या - रुपाली ठोंबरे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही या प्रकरणी चाकणकरांवर निशाणा साधला आहे. चाकणकरांनी राजीनामा दिला नाही घेतला गेला आहे. भोंदूबाबा खरात बलात्कार प्रकरणात त्या आरोपी असल्याने सगळी चौकशी होणार. SIT ला मर्यादा होत्या आता त्या संपल्या. धन्यवाद सुनेत्रा वहिनी. ज्या सर्व लोकांनी ह्या पदाचा दुरुपयोग केला ते सर्व आरोपी आहेत. आज अजितदादांच्या कार्यकर्त्या बहिणी समाधानी झाल्या आहेत, असे त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. अंजली दमानियांनीही साधला निशाणा दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणी रुपाली चाकणकर यांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या, एक ओळीचा राजीनामा. सुनेत्रा पवार मनात म्हणत असतील “मी तर वाटच पाहत होते”. हा राजीनामा समर्पित डॉ. संपदा मुंडेंना, ज्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा प्रयत्न ह्यांनी केला. त्या प्रत्येक महिलेला ज्यांच्या वेदनांना न्याय मिळाला नाही. त्यांनाही ज्यांची प्रकरणे दाबली गेली. कर्माचे फळ चुकत नाही. ह्याच जन्मात भोगावं लागतं. राजीनामा देताना काय म्हणाल्या रुपाली चाकणकर? उल्लेखनीय बाब म्हणजे रुपाली चाकणकरांनी शुक्रवारी रात्री आपल्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना उद्देशून लिहिलेल्या राजीनाम्यात त्यांनी केवळ 'मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. त्याचा आपण स्वीकार करावा', अशी दोन वाक्य लिहिली आहेत. या राजीनाम्यासोबतच्या पोस्टमध्ये त्यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या, खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
तब्बल साडेपाच वर्षांनंतर झालेली महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी (27 मार्च)अक्षरशः थेट लाइव्ह ड्रामा ठरली. सभागृहात बसण्याच्या वादापासून सुरू झालेला गोंधळ पाणी योजनेच्या ठरावावरून चिघळला, नामकरणावरून एमआयएमने वॉकआऊट केला आणि शेवटी 22 कोटींच्या मुद्द्यावरून सभा तहकूब करण्याची वेळ आली. प्रशासनाला कोंडीत पकडण्यापासून, महापौरांच्या निषेधापर्यंत सर्व प्रकार पहिल्याच सभेत ठरले. महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आयुक्त जी. श्रीकांत यांची उपस्थिती होती. नगरसेवकांवर दीड दिवसाच्या आत गुन्हे दाखल करणाऱ्या प्रशासनाला 22 कोटींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर एफआयआर का करता येत नाही, असा सवाल केला. याचे प्रश्नासनाकडे काहीच उत्तर नव्हते. महाराणा एजन्सीच्या संपत्तीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले. गोंधळ वाढत गेला, महापौरांना सभा तहकूब करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तरीही घोषणाबाजी सुरूच होती. कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या कंपनीला दिलेल्या 22 कोटी रुपयांच्या जास्तीच्या देयकाचा मुद्दा उपस्थित झाला. एमआयएमचे नगरसेवक फिरोज खान, विरोधी पक्षनेते समीर बिल्डर आणि अशोक हिवराळे यांनी प्रशासनाला थेट प्रश्न विचारायला सुरुवात केली. ‘आठ टेबलवरून फाइल गेली, तरी एवढा घोळ कसा?’ असा सवाल उपस्थित झाला. वातावरण पुन्हा चिघळले. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. भाजपच्या प्रमोद राठोड यांनी या प्रश्नावरच प्रश्चचिन्ह उपस्थित केल्यानंतर वाद जास्तीच पेटला. काही सदस्य जागेवरून उठले. सभागृहाच्या बाहेर जाऊन केले ठिय्या आंदोलन या गोंधळादरम्यान संत बसवेश्वरांच्या पुतळ्याचा ठराव थांबवू का, असे म्हणत नगरसेवक सचिन खैरे यांना एक प्रकारे धमकीवजा इशाराच दिला. तेव्हा उद्धव ठाकरे, महात्मा बसवेश्वरांपेक्षा मोठे आहे का, असा उलट सवालही महापौरांनी केला. नगरसेवकांनी सभागृहाबाहेरच ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली.ते पुन्हा सभागृहात आले. मात्र, प्रस्ताव मान्य न झाल्यामुळे पुन्हा परतले. समीर राजूरकर यांनी त्यास नकार दिला. त्यावरून गणेश लोखंडे, सचिन खैरे, सावित्री वाणी, सुनीता सोनवणे, वैशाली कोरडे, लोखंडे यांच्यासह माजी महापौर रशीद मामू यांच्यासह उद्धवसेनेचे सहाही नगरसेवक महापौरांच्या समोर जाऊन उभे राहिले. त्यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतरही ते थांबले नाहीत. अभिनंदनाचा ठराव घ्यावाच लागेल, तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. अखेर महापौरांनी 6 सदस्यांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. सुरक्षा रक्षकांनी अक्षरश: उचलून त्यांना सभागृहाच्या बाहेर नेल्याचे चित्र पाहायला मिळाले. 22 खोके एकदम ओक्के: एमआयएम ‘दिव्य मराठी’ने ‘गौडबंगाल’ ही वृत्त मालिका प्रकाशित केली. आठ टेबलवरून फाइल तपासली गेली, तरीही ठेकेदारांना २२ कोटी कसे जास्त गेले? नवीन ठेकेदारांना कंत्राट देण्यासाठी कसा खटाटोप आहे हे समोर आणले. हाच प्रश्न विरोधी पक्षाकडून विचारत प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. सभेचा शेवटचा टप्पा आणखी धक्कादायक ठरला. शहराचा पाणीप्रश्न सोडवल्याबद्दल भाजप, शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी मांडलेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार आदींच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. तर उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा मांडलेला ठराव नाकारला, यावरून उद्धवसेनेच्या सहा नगरसेवकांनी आपली मागणी लावून धरली. त्यापूर्वी भाजपचे राजू वैद्य यांच्यासह काही नगरसेवकांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. उद्धवसेनेचे गटनेते गणेश लोखंडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाणी योजना मंजूर केली. योजनेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले, याची आठवण करून देत, त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, मात्र महापौर सभा संपल्यानंतरीही एमआयएमच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर फलक दाखवत घोषणाबाजी केली.
आता लढाई शेतीमालाच्या सन्मानजनक भावासाठी:एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात बच्चू कडूंची घोषणा
aशेतकरी कर्जमाफीच्या लढ्याला सकारात्मक अर्थ देत माजीमंत्री बच्चू कडू यांच्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाची सुरुवात शुक्रवारी (दि. २७) रक्तदानाने करण्यात आली. या उपोषणाच्या निमित्ताने कर्जमाफीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी व सहकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याचवेळी बच्चू कडू यांनी घोषणा केली कि, आता लढाई शेतीमालाला हमीभाव तसेच सन्मानजनक भाव मिळावा, यासाठी उभारणार आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा शेतकरी नेते महादेव जानकर, ज्येष्ठ शेतकरी नेते विजय जावंधीया आणि वामनराव चटप यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. आंदोलनाच्या काळातील संघर्षमय आठवणींना उजाळा देत, शेतकरी प्रश्नांवर पुढील लढ्याची दिशा देखील स्पष्ट करण्यात आली. यावेळी कर्जमाफीच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी असणारे परभणी जिल्ह्यातील दिव्यांग बांधव सूर्यभान मारोती ढगे यांची रक्ततुला करण्यात आली. तसेच आंदोलनांमध्ये सातत्याने कार्यकर्त्यांची सेवा करणारे, थकलेल्या आंदोलकांची काळजी घेणारे संजय गोमकाळे यांची बिजतुला करून सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामुळे आंदोलनातील निस्वार्थी कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. बच्चू कडू यांनी भाषणात सांगितले की, शेतकऱ्यांचे जीवन आणि कष्ट अत्यंत महत्त्वाचे आहेत. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही लढाई आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे. ही कर्जमाफी संघर्षाचा परिणाम आहे. आम्ही गांधीगिरीने लढायचे ठरवले आहे, पण गरज पडल्यास भगतसिंगगिरीनेही पुढे जाऊ. या संघर्षामुळे दिव्यांग, घरकुल आणि शेतमजूर योजनांमध्येही सकारात्मक बदल झाल्याचे त्यांनी नमूद केले. या उपोषणाच्या माध्यमातून शेतकरी प्रश्नांवर लढा सुरूच राहणार असल्याचा ठाम संदेश देण्यात आला. तसेच आंदोलनामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली, मोठे केले, त्या कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठीच मी आज रक्तदान केलं, असे म्हणताना बच्चू कडू भावूक झाले. यावेळी शेतकऱ्यांच्या पाठींब्यामुळेच यश कर्जमाफीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो तेव्हा टीका झाली, पण शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळेच हा निर्णय शक्य झाला. हे यश शेतकऱ्यांच्या पाठींब्यामुळेच मिळाले. या आंदोलनात बच्चू कडू यांचा पुढाकार महत्त्वाचा होता, असे जेष्ठ शेतकरी नेते वामनराव चटप यांनी नमूद केले. थेट केंद्रीय कृषीमंत्र्यांना घेरण्याचा इशारा : बच्चू कडू यांनी ऑगस्ट महिन्यात ९ तारखेला मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. आगामी काळात शेतकरी प्रश्नांवर अधिक आक्रमक भूमिका घेत लढा तीव्र केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पुढील लढा थेट केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना घेरून लढला जाईल. कार्यकर्त्यांसमोर बोलताना त्यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट करत, या लढ्यात प्रतीकात्मक स्वरूपात प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तलवार सोबत घेऊन जाणार असल्याचेही सांगितले. हा लढा शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी निर्णायक ठरणार असल्याचा विश्वासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या एकजुटीसमोर सरकारला झुकावे लागले शेतकऱ्यांच्या एकजुटीच्या ताकदीमुळेच सरकारला नमावे लागले. आपण पूर्णपणे विजयी झालो नसून सुमारे ८० टक्के यश मिळाले आहे. अनेक लोकं जाती-धर्मासाठी एकत्र येतात, मात्र शेतकऱ्यांसाठी एकत्र येणे अधिक गरजेचे आहे. नागपूर आंदोलनावेळी अनेक आरोप-प्रत्यारोप झाले, पण एकही शेतकरी मागे हटला नाही, त्यामुळेच सरकारला निर्णय घ्यावा लागला, असे माजी मंत्री, शेतकरी नेते महादेव जानकर यांनी सांगितले.
येथील पोलिस ठाण्याच्या आवारात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा एका व्यक्तीने प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच त्या व्यक्तीला थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी पोलिसांनी अंगावर डिझेल घेणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या पत्नीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. हा प्रकार शुक्रवारी (दि. २७) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडला आहे. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने व त्यांच्या कुटुंबियांनी यापूर्वीच आत्मदहन करणार असल्याचा इशारा पोलिसांना दिला होता. दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील रामगाव येथे रामभाऊ भगवान झिपरकर यांच्यावर जागेच्या वादातून १२ मे २०२५ रोजी बोडखे कुटुंबातील सदस्यांनी एकत्रीतपणे येऊन हल्ला केला होता. या घटनेत रामभाऊ झिपरकर यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान रामभाऊ झिपरकर यांच्या स्नुषा सारीका संजय झिपरकर यांनी खल्लार पोलीस ठाण्यात त्यावेळी खुनाची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून खल्लार पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन दहा जणांना अटक केली होती. दरम्यान या गुन्ह्याच्या तपासात खल्लारच्या तत्कालीन ठाणेदारानी हलगर्जीपणा केला तसेच अन्य गंभीर गंभीर आरोप सारिका झीपरकर यांनी केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात सखोल चौकशी करुन दोषी आढळणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करावी, अशी मागणी सारीका झिपरकर यांनी पोलिस अधिक्षकांकडे केली. तसेच याच मागणीसाठी २७ मार्चला आत्मदहन करण्याचा इशारासुद्धा दिला होता. दरम्यान वरिष्ठांकडे तक्रार देवुन सुध्दा न्याय न मिळाल्याने शुक्रवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान तक्रारदार सारीका संजय झिपरकर व त्यांचे पती संजय रामभाऊ झिपरकर हे दर्यापूर पोलिस स्टेशन आवारात दाखल झाले. यावेळी संजय झीपरकर यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर दर्यापूर पोलिसांनी झिपरकर दाम्पत्याला ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती ठाणेदार वानखडे यांनी दिली.
अगदी १० दिवस आधीपर्यंत अस्वच्छता, कचऱ्यावरून शहरात आगडोंब उसळला होता. विरोधकच काय पण, सत्तापक्षातील नगरसेवकही मनपा प्रशासन, शहर स्वच्छतेचे नवे कंत्राट मिळवणारी कोणार्क कंपनी व स्वच्छता विभागावर तुटून पडले होते. शहर स्वच्छता अधिकाऱ्यांविरोधात रोष अन् निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या गळ्यात हार घालण्याचा प्रयत्न झाला. विरोधक तर अस्वच्छतेवरून आंदोलन करायला लागले. शहराच्या विविध भागात आंदोलनं करण्यात आली. परंतु, १५ मार्च रोजी मनपा प्रशासनाने कामात त्रुटी आढळल्याने कोणार्कला ९.६५ लाखाचा दंड काय केला. शहरात जणू अस्वच्छताच नाही, २२ प्रभाग व सुमारे १० लाख लोकसंख्येचे शहर पूर्णपणे स्वच्छ झाले, अशा पद्धतीने विरोधक, सत्तापक्षातील नगरसेवक, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वच शांत बसले आहेत. अचानक असे काय घडले की, कोणीही १७ रोजी झालेल्या आमसभेत शहराच्या अस्वच्छतेवर ना गोंधळ घातला ना गदारोळ. त्यामुळे शहरवासीही चकित झाल्याशिवाय राहिले नाहीत. शहरात अजुनही फेरफटका मारला तर सर्वत्र अस्वच्छता, घाण पसरलेली दिसून येते. ज्या पद्धतीने स्वच्छतेचे काम व्हायला हवे, असे ते अजुनही सुरू झाले नाही. मनपा पदाधिकारी, सर्वच पक्षांचे नगरसेवक आता शहर स्वच्छतेचे कंत्राट देणाऱ्या कोणार्कला स्थिती सुधारण्यास तीन महिन्यांची वेळ द्यायला हवी, असे म्हणत आहेत. या सर्वाचे अचानक मतपरिवर्तन कसे झाले, हा देखील एखादवेळी संशोधनाचा विषय ठरू शकतो. नागरिकांनी आम्हाला निवडून दिले. त्यांना नागरी सुविधा देणे कर्तव्य असल्याची भाषा बोलणारे अचानक कसे थंडावले असा गहन प्रश्न आहे. नाल्यांची स्वच्छता होत नसून, घरातून कचरा संकलनही दररोज होत नाही. कचरा जाळल्याने प्रदूषणात वाढ होत असल्यामुळे मनपाने कचरा जाळण्यास बंदी घातली असताना. शहरात विविध ठिकाणी ठेवलेल्या कचरा कंटेनरमधील कचऱ्याची उचल न करता तो जाळला जात असल्याचा अजब प्रकार दिसून येत आहे. आधीच्या झोननिहाय कंत्राटदारांनी हे कंटेनर तसेच सोडले आहेत. त्यांनी ते उचलून कंपोस्ट डेपोमध्ये रिकामे करणे आवश्यक होते. परंतु, त्यांनी हात वर केले. आता नवीन स्वच्छता कंत्राटदार कोणार्ककडे हे मोठे कंटेनर उचलण्याची यंत्रणा नाही. त्यांच्याकडे लहान कंटेनर उचलण्याची व्यवस्था आहे. त्यामुळे नाईलाजाने मोठ्या कंटेनरमधील कचरा जाळला जात असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले. मनपा प्रशासनाने आदेश दिल्यानंतरही प्रभाग क्र. १ शेगांव-रहाटगांव आणि प्रभाग क्र. ५ महेंद्र कॉलनी-नवीन कॉटन मार्केटमध्य कोणार्क कंपनीने १३ व १४ मार्च असे दोन दिवस स्वच्छतेचे कामच सुरू केले नाही. त्यामुळे कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लि.ला ९.६५ लाखाचा दंड ठोठावण्यात आला. हा दंड जर कंपनीने रोख स्वरूपात भरला नाही तर तो त्यांच्या महिन्याच्या देयकातून कापला जाईल. मात्र, ते खरेच दंड भरतील काय, असे साहजिकच प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. कारण, कामात शिस्त महत्त्वाची आहे. यंत्रणेचा अभाव: घंटागाड्या कमी शहरात कचरा संकलनासाठी आवश्यक असलेल्या घंटागाड्यांची संख्या अपुरी आहे. ६ वरून संख्या १० केली असली, तरी १० लाख लोकसंख्येसाठी ती अत्यंत तोकडी आहे. दंडाचा ‘फार्स' : किंवा कारवाई कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर'ला कामात त्रुटी आढळल्याने ९.६५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड कंत्राटदाराच्या मासिक देयकातून यंदाच्या वर्षी कापला जाणार आहे. महापौरांचे ‘कवच': नागरिकांचा प्रश्न महापौर श्रीचंद तेजवानी यांनी कंत्राटदाराला कामात सुधारणा करण्यासाठी ३ महिन्यांचा अवधी दिला आहे. तोपर्यंत नागरिकांनी अस्वच्छता सहन करायची का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. श्रीचंद तेजवानी, महापौर राजकीय ‘यू-टर्न'; मुद्दाच मांडला नाही अवघ्या १० दिवसांपूर्वी अस्वच्छतेवरून आक्रमक झालेले सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक अचानक शांत का? १७ तारखेच्या आमसभेत एकाही लोकप्रतिनिधीने अस्वच्छतेचा मुद्दा लावून धरला नाही. Q. शहरात अस्वच्छता असतानाही सर्व गप्प का आहेत? A. हळूहळू परिस्थिती रुळावर येत आहे. सफाई कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवली आहे. त्यामुळे काही प्रमाणात स्वच्छता होताना दिसत आहे. Q. शहर स्वच्छ, सुंदर होण्यास आणखी किती दिवस लागणार? A. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चरने नुकतेच काम सुरू केले आहे. त्यांना तीन महिन्यांचा वेळ दिला. या कालावधीत त्यांना कामात पूर्णपणे सुधारणा करावीच लागेल. Q. शहरातील अनेक परिसरांमध्ये दररोज घंटागाडी पोहोचत नाही, असे का? A. आधी कोणार्ककडे घंटागाड्यांची संख्या ६ होती. आता ती १० पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यात आणखी काही घंटागाड्यांची भर पडणार असल्याने दररोज घंटागाडी कचरा सकलन करताना दिसेल. Q. शहरात मोठ्या प्रमाणात कचरा का साठला? A. मनपा प्रशासनाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात या समस्येकडे दुर्लक्ष झाले. आम्ही आता कारभार हाती घेतला. अस्वच्छतेची स्थिती सुधारण्यास काही वेळ लागेल. Q. कामात हयगय आढळल्यास दंड करणार काय? A. कामातील शिस्तीच्या बाबतीत मी काटेकोर आहे. स्वच्छता कंत्राटदाराला नुकताच ९ कोटीच्या वर दंड केला. भविष्यात कामचुकारपणा दिसला तर निश्चितच दंड करणार. कंटेनरमधील कचरा जाळला जातोय
भक्ती, शक्ती आणि सामाजिक एकतेचा त्रिवेणी संगम २६ मार्च रोजी साखरखेर्डा येथे पाहायला मिळाला. रामजन्म उत्सव समितीच्या वतीने आयोजित श्रीराम नवमी उत्सवात केवळ हिंदूच नव्हे, तर मुस्लिम समाजही तितक्याच सन्मानाने सहभागी झाला होता. डीजेचा दणदणाट टाळून पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि महिलांच्या फुगडीच्या तालावर निघालेली ही शोभायात्रा तालुक्यात चर्चेचा विषय ठरली. सकाळी काकड आरतीपासून सुरू झालेला हा सोहळा दुपारी १२ वाजता ‘श्रीराम जन्मोत्सवा'ने शिखरावर पोहोचला. गुलालाची उधळण आणि प्रसादाच्या वाटपानंतर सायंकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सरपंच ज्योती अमित जाधव यांनी श्रीराम मूर्तीची पाद्यपूजा केली. यावेळी जिपचे माजी उपाध्यक्ष राम जाधव, प्रल्हाद महाराज संस्थानाचे उपाध्यक्ष रावसाहेब देशपांडे, माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल, महेंद्र पाटील, रामदाससिंग राजपूत, दिलीप बेंडमाळी, संदीप खिल्लारे, संतोष जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते. माजी सरपंच दाऊद कुरेशी, माजी उपसरपंच सैय्यद रफीक, असलम अंजुम, ग्रामपंचायत सदस्य शेख युनूस दिवान, इब्राहिम शाह यांनी शोभायात्रेत सहभागी होत पुष्पवृष्टीकरत शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी माजी सरपंच तथा शिवसेना नेते महेंद्र पाटील यांच्या वतीने एक क्विंटल साखरेची सरबत राम भक्तांना वाटप करण्यात आली. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी पुजा केली. तसेच केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वतीने त्यांच्या वतीने योगेश जाधव यांनी या वेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. साखरखेर्डा येथील सामाजिक सलोखा या निमित्ताने अधोरेखित झाला. माजी सरपंच दाऊदसेठ कुरेशी, सैय्यद रफीक, असलम अंजुम, शेख युनूस दिवान आणि इब्राहिम शाह या मुस्लिम बांधवांनी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करून रामभक्तांचे स्वागत केले. हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत सण साजरा केला, जे आजच्या काळात एक आदर्श उदाहरण ठरले आहे. डीजेमुक्त आणि संस्कृतीयुक्त सोहळा साजरा यंदाची शोभायात्रा आधुनिक 'डीजे' संस्कृतीला फाटा देऊन काढण्यात आली. पारंपारिक ढोल-ताशांचा गजर आणि महिलांनी खेळलेली फुगडी हे आकर्षणाचे केंद्र होते. मार्गावर काढलेल्या सुबक रांगोळ्या आणि फटाक्यांची आतिशबाजी यामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला. विशेष म्हणजे महेंद्र पाटील यांच्याकडून १ क्विंटल साखरेच्या सरबताचे वाटप करण्यात आले.
भारताच्या इतिहासातील महान सम्राट अशोक यांच्या समता, बंधुता,लोकशाही, लोककल्याण, अहिंसेच्या विचारांचा व धोरणांचा प्रसार करून समाजात नवी दिशा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित राज्यस्तरीय अशोक पर्व महोत्सव हा परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय आठवले यांनी व्यक्त केला. ते महोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत बोलत होते. सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी घराघरात अशोक' ही अभिनव संकल्पना राबवण्यात येणार असल्याचे पॅक्टोचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे यांनी सांगितले. सम्राट अशोक प्रतिष्ठान व फुले आंबेडकर शिक्षक संघटनेतर्फे (पॅक्टो) अशोक जयंतीनिमित्त अभिवादन व नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी भगवान बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी फुले आंबेडकर शिक्षक संघटना पॅक्टोचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल गवई, प्रा. शैलेश इंगळे, विद्याधर मोहोड, प्रा. विवेक पांडे, प्रा. सज्जन जाधव, प्रा. धम्मानंद नवघरे, मनोहर इंगळे, सुमेध घनबहादूर, संदेश गवई, अॅड. मंगेश बोदडे, अॅड. प्रकाश आठवले, किशोर शिरसाट, बाळकृष्ण शिरसाट, रोहित जगताप, आकाश पवार आदी उपस्थित होते. सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी घराघरात अशोक' ही अभिनव संकल्पना राबवण्यात येणार असल्याचे मत याप्रसंगी पॅक्टोचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे यांनी व्यक्त केले. अशोक पर्वातून समाजात समता, बंधुता आणि शांततेच्या मूल्यांची प्रभावी रुजवात होईल, असा विश्वास अशोक प्रतिष्ठानचे सचिव प्रा. सुनील कांबळे यांनी व्यक्त केला. अकोल्यातून सुरू होणारी ही अशोक विचारांची मशाल राज्यभर सामाजिक परिवर्तनाची नवी चळवळ उभी करेल, असा आशावाद व्यक्त करत सर्व समाजघटकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गवई , विद्याधर मोहोड यांनी केले. विविध समित्यांचे गठन; नियोजनाला वेग : अशोक पर्व महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वागत समिती, व्यवस्थापन समिती, प्रसिद्धी समिती, सांस्कृतिक कार्यक्रम समिती तसेच युवक व महिला आघाडी अशा विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. प्रत्येक समितीवर अनुभवी व कार्यक्षम पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने कार्यक्रमाच्या नियोजनाला वेग आला आहे. हे राहणार उपस्थित महोत्सवात अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे, किसान ब्रिगेडचे नेते प्रकाश पोहरे, आमदार धीरज लिंगाडे, आमदार सिद्धार्थ खरात, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, उद्योजक सुगत वाघमारे, तहसीलदार राहुल तायडे, डॉ. संतोष हुशे, सिनेट सदस्य डॉ. संतोष बनसोड, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. जगदीश बक्तुरे, कर अधिकारी विनोद विरघट, किरण लहाने, प्रा. प्रवीण कावळे, भवनसुंदर वानखडे, भीमराव परघरमोल, कवी नितीन चंदनशिवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
काकाची हत्या करून नैसर्गिक मृत्यूचा बनाव करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गळा आवळून हत्या केल्यानंतर मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन अहवालातील धक्कादायक निष्कर्ष आणि पोलिसांच्या तपासातील तत्परता यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलिस स्टेशन हद्दीतील वाई (माना) गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. घरगुती वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पुतण्या आणि वहिनीला अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू वाटणाऱ्या या घटनेमागे थरारक सत्य दडलेले असल्याचे तपासात उघड झाले आहे. वाई (माना) येथील संजय रामकृष्ण भटकर (वय ५०) हे २६ मार्च रोजी सकाळी घरामागील गोठ्यात मृत अवस्थेत आढळून आल्याची फिर्याद त्यांचा पुतण्या स्वप्नील विनोद भटकर (वय २५) याने माना ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले. मात्र पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत तपास सुरू केला. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे, स्था. गु. शा. अकोलाचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शन मिळाले. ठाणेदार नावकार, पोलिस उपनिरीक्षक महाजन, पो. हे. कॉ. संदीप सरोदे, पो. कॉ. जावेद खान, मंगेश पवार, म. पो. कॉ. जयश्री मेंढे यांनी कारवाई पार पाडली. माना पोलिसांनी काही तासातच खुनाचा गुन्हा उघडकीस आणल्यामुळे कौतुक करण्यात येत आहे. घरगुती प्रकराणचा तत्पपरतेने तपास करून मुख्य आरोपिस तत्काळ सजा मिळाल्यामुळे वाई (माना) गावामधील ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले व पोलिसांकडून अशाच पद्धतीचे जलदगतीने तपास व्हावेत अशी अपेक्षा देखील या निमित्ताने व्यक्त केली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. वैद्यकीय अहवालात मृत्यूचे कारण ‘गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून मृत्यू’ असे नमूद करण्यात आले होते. यानंतर हे प्रकरण नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान या घटनेचे गांभीर्य सक्षात घेत माना पोलिस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकार यांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. यासाठी अनेक साक्षी पुरावे देखील तपसण्यात आली. गोपनीय माहिती मिळवली या माहितीच्या आधारावरच पोलिसांना समजले की, घरगुती वादातून ही हत्या करण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिसांच्या तल्लख तपासामुळे आरोपींना लवकरच अटक करण्यात यश आले. पोलिस प्रशासनाला यश देखील आले आहे.
‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. निराधार आभाळाचा तोच भार साहे..’ निराधारांना ईश्वर आधार देतो, हा विश्वास व्यक्त करणाऱ्या भावगीताची प्रचिती शेगाव रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे रुळावर गंभीर अवस्थेत पडलेल्या एका ५५ वर्षीय निराधार महिलेला अकोला ‘जीएमसी’त आली. शेगाव रेल्वे पोलिसांनी तिला गंभीर अवस्थेत अनोळखी म्हणून अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी गेले महिनाभर तिची आस्थेवाइकपणे देखभाल आणि सुश्रुषा केली. तिच्यावर अवघड शस्त्रक्रिया करून तिला जीवनदान दिले. शेगावात गेल्या महिन्यात राष्ट्रपती दौपदी मुर्मू येणार म्हणून रेल्वे स्थानकाच्या परिसरात उघड्यावर राहणारे भिकारी, निराधारांना तेथून हुसकावून लावण्यात आले. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात आसरा शोधण्याच्या प्रयत्नात फिरणाऱ्या बेघर शांताबाई जाधव यांना २२ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास रेल्वेचा धक्का बसला त्यात त्यांचे दोन्ही हात कापले गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. शेगाव येथील रेल्वे पोलिस पांडुरंग वसू यांनी तिला त्याच दिवशी रात्री अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचलित सर्वोपचार रुग्णालयात वॉर्ड क्रमांक २६ मध्ये भरती केले. अनोळखी महिला म्हणून तिच्यावर आठ दिवस सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी तिची सुश्रुषा केली. ती शुद्धीवर आल्यानंतर तिची आेळख पटली. जवळचे कुणी नातेवाईक नाही. कुणाचा आधार नाही, असे तिने डॉक्टरांना सांगताच डॉक्टरांनी अधिक आपुलकीने तिची विचारपूस करुन तिला धीर दिला. गेले महिनाभर तिच्यावर सर्जरी विभाग अंतर्गत वॉर्ड २६ मध्ये शस्त्रक्रिया झाल्या. ती आता डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. शामकुमार शिरसाम यांच्या नेतृत्वामध्ये या निराधार रुग्ण महिलेवर सर्जरी विभागाचे विभागप्रमुख डॉ. अरविंद आडे, पथक क्रमांक ३ चे पथ प्रमुख डॉ. रवी खंडारे, डॉ. प्रवीण दंदी, डॉ. बालाजी लांडगे हे रुग्णावर उपचार करत आहेत. वॉर्ड परिसेविका संगीता चिमणकर, परिचारिका कविता शिंदे, परिचारक योगेश राणे, अनिल खरात, सतीश उकर्डे, शुभम भिंगे तसेच कक्ष सेवक अभिषेक गवई आणि सफाई कामगार शाम निनोरे रुग्णाची देखभाल व काळजी घेत आहेत. दानशुरांकडून रुग्णासाठी डायपरची व्यवस्था महिला रुग्णाला बेडवरून उठता येत नाही, रेल्वे अपघातात दोन्ही हात कापले गेले आहेत. त्यामुळे डायपरची व्यवस्था शहरातील अथर्व मल्टिपर्पज फाउंडेशनचे दानशूर अनिल मुळे यांच्याकडून रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक लक्ष्मीकांत शिंगोटे यांनी प्रयत्न करून मिळवून दिली आहे. ही महिला आजारातून बरी झाल्यानंतर तिचे समुपदेशन आणि पुनर्वसनासाठीही आपले प्रयत्न आहेत.
पावसाळ्यात सतत पाऊस झाल्यामुळे पेरणीसाठी वापसा आला नाही ,ज्वारीच्या हंगामात पेरणी करता आली नाही, त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी हरभऱ्याची पेरणी केली. ज्वारीचे सरासरी क्षेत्र ३४ हजार १३५ हे असून तालुक्यात १९ हजार ८२९ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पेरणी करण्यात आली होती. मंगळवेढ्याच्या काळ्या शिवारातील ज्वारीचा कडबा कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, तासगाव, कवठेमहंकाळ, खोपोली, अहिल्यानगर या भागात विक्रीसाठी जात असल्यामुळे या भागात दर ही चांगला मिळत आहे. त्यामुळे यावर्षी ज्वारीच्या कडबा विक्रीतून शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. यंदा मात्र कडबा पेढींचा शेकडा दर २२०० ते २५०० पर्यंत पोहोचला आहे. ज्वारीचा उत्पादन खर्च व मिळालेले उत्पन्न यात तफावत असल्यामुळे शेतकरी ज्वारीचे पीक घेण्यास तयार नसताना, चालू वर्षी ज्वारीला व कडब्याला चांगला दर मिळाला आहे, कडब्याच्या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना ज्वारीचे पीक परवडले आहे. मंगळवेढा शिवारातील कडबा दिवसभर ट्रक, टेम्पो यामध्ये भरताना दिसत आहेत. मंगळवेढा शहराच्या जवळपास असणाऱ्या काळ्या शिवारातील ज्वारीचा कडबा हा केवळ पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या एक मुळीचा असणारा कडबा तीन प्रकारामध्ये मोडतो उंच, मध्यम आणि ढाणडाळ (वाकडा किंवा पडलेला ), सद्या पालेदार व उच्च प्रतीच्या कडब्यासाठी २५ हजार रुपये दर असून मध्यम प्रतीच्या कडब्याला २२ हजार रुपये दर मिळत आहे, तर सर्वसाधारण कडब्याला १९ ते २० हजार रुपयापर्यंत मिळत आहे. ज्वारीचा उत्पादन खर्च व ज्वारीला मिळणारा दर ,यामुळे शेतकरी ज्वारीचे पिक घेण्यासाठी तयार होत नाहीत. मात्र चालू वर्षी ज्वारी व कडब्याचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत होत आहे. कडबा साठवण्यासाठी शेतकऱ्याकडे मंगळवेढा शहरांमध्ये जागा उपलब्ध नाही व कडबा साठवण करण्यासाठी ढेपण रचावी लागते ते रचत वर्ष कडब्याचे दर २०२२ ९ ते १२ हजार २०२३ १५ ते २० हजार २०२४ १० ते १५ हजार २०२५ १८ ते २१ हजार २०२६ २० ते २५ हजार ^ज्वारी करणे सध्या परवडत नाही. निसर्गाची हेळसांड तसेच हमीभाव नसल्यामुळे ज्वारीला दर मिळत नाही. ज्वारीचा उत्पादन खर्च व मिळणारा दर यात तफावत असल्यामुळे शेतकरी ज्वारी करणे त्रासदायक होते. मात्र यावर्षी ज्वारी व कडबा विकून फायदा मिळत आहे. येथील कडबा शेकडा २ हजार, अडीच हजार रुपये दराने खरेदी करून कोल्हापूर, सातारा, पुणे या ठिकाणचे व्यापारी व पशुपालक घेऊन जात आहेत. मधुकर घुले, शेतकरी मंगळवेढा रचत असताना त्यातले तज्ञ व निष्णात लोकांकडून रचली जाते. ढेपण रचण्यासाठी मजुरी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. १ हजार कडबा गोळा करण्यासाठी १ हजार रुपये मजुरी द्यावी लागते. कडबा शिवारातून शहरात वाहतूक करून आणण्यासाठी एका ट्रकला ३ ते ३५०० हजार रुपये (भरणी) मजुरी घेतली जाते. गंज लावण्यासाठी एक गडी रोज १ हजार रुपये घेतो व पेंड्या उचलून वर टाकणारे १ हजार रुपये घेतात. एक गंज लावण्यासाठी साधारणतः ५ दिवस लागतात. त्यामध्ये ५ हजार कडबा रचला जातो. त्यामुळे आजच्या काळात गंज लावण्यासाठी परवडत नसल्यामुळे शेतकरी गंज लावत नाहीत. त्यामुळे सध्या इतर भागात विक्रीसाठी कडबा मोठ्या प्रमाणावर जात असल्यामुळे शिवारात कडबा अतिशय कमी प्रमाणात दिसून येत आहे. हमीभाव नसल्यामुळेज्वारीला दर मिळत नाही असे आहे कडब्याचे दर
विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या गर्दीने पंढरी नगरी फुलून गेली आहे. या वर्षीची चैत्री एकादशी यात्रा रविवार, २९ मार्च रोजी साजरी होत असून, यात्रेचा मुख्य कालावधी २३ मार्च ते २ एप्रिल असा आहे. शुक्रवारी भाविकांची संख्या एक लाखांच्या पार पोहोचली असून मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट आणि ६५ एकर क्षेत्रात फक्त सात दिंड्यांचे बुकिंग झाले आहे. तर यंदाच्या यात्रेवर इंधन टंचाईचे सावट दिसत आहे. वाढते तापमान लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सोयीसाठी विशेष खबरदारी घेतली आहे. दर्शनासाठी १० वॉटरप्रूफ पत्राशेड सज्ज करण्यात आले असून, तिथे थंड व शुद्ध पिण्याचे पाणी, लिंबू सरबत, पंखे आणि कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी विशेष स्टॉलही उभारले आहेत. शुक्रवारी दुपारी सारडा भवन पर्यंत दर्शन रांगेतील भाविक उभा होते. पोलीस बंदोबस्त तैनात यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि वाहतुकीचे नियोजन सुलभ व्हावे, यासाठी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ६५ एकर, प्रदक्षिणा मार्ग आणि चंद्रभागा वाळवंटात चोवीस तास गस्त घातली जात आहे. . दर्शनाची वेळ: भाविकांच्या सोयीसाठी दर्शनाची वेळ वाढवण्यात आली असून, आता सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शन घेता येईल. . व्हीआयपी दर्शनावर मर्यादा: यात्रेच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी टोकन दर्शन, विशेष पूजा आणि व्हीआयपी दर्शनावर कडक निर्बंध. . स्वच्छता आणि आरोग्य: ६५ एकर आणि वाळवंट परिसरात फॅब्रिकेटेड शौचालये उभारली असून, शहरात अतिक्रमण मोहीम राबवली आहे. यंदाच्या यात्रेवर इंधन टंचाईचे सावट दिसत आहे, स्वयंपाकासाठी आवश्यक गॅसची उपलब्धता होणार की नाही, सोबत येणाऱ्या वाहनांना पुरेसे पेट्रोल डिझेल मिळणार की नाही याबाबत साशंकता असल्यामुळे भाविकांची संख्या आणि दिंड्यांची ही संख्या यंदा कमी राहील असा अंदाज व्यक्त होत आहे. गेल्या चार दिवसांपासून ६५ एकर येथील मैदानात दिंड्यांच्या बुकिंगसाठी महसूल विभागाची यंत्रणा सज्ज आहे, परंतु शुक्रवार दि २७ मार्च रोजी दुपारी २ वाजेपर्यंत केवळ ७ दिंड्यानी भूखंडासाठी बुकिंग केले आहे. चैत्री यात्रेसाठी दरवर्षीच्या मागणी प्रमाणे पुरवठा विभागाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, नगरपालिका मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्या शिफारस पत्राद्वारे १२०० गॅस सिलिंडर ची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे. चैत्र शुद्ध नवमी निमित्त पंढरीत एक लाखावर भाविक आलेले आहेत, परंतु शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत एकही सिलेंडर उपलब्ध झालेले नाही, सिलेंडरचा पुरवठा होईल, असे पत्रही गॅस एजन्सी किंवा पुरवठा विभागाला मिळालेले नाही. त्यामुळे भाविक गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी वणवण करताना दिसत आहेत. १२०० सिलेंडरची मागणी, अद्याप एकही मिळाले नाही शिखर शिंगणापूरच्या कावडींचे आगमन चैत्री यात्रेचे आणखी एक आकर्षण म्हणजे शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या कावडी. मराठवाड्यातून आलेल्या या कावडींनी श्री विठ्ठल मंदिराच्या संत नामदेव महाराज महाद्वारावर दर्शन घेतले. ‘हर हर महादेव'च्या जयघोषात नामदेव पायरीवर जलाभिषेक करून या कावडी आता शिंगणापूरकडे मार्गस्थ होत आहेत. भाविकांची, दिंड्यांची संख्या यंदा कमी राहील असा अंदाज
आकाशाला गवसणी घालणाऱ्या कावडी आणि काठया,शिगेला पोहोचणारा पारंपरिक हलगी वाद्यांचा गजर. बेभान होऊन नाचणारी तरुणाई.. गुलाल भंडाऱ्याची मुक्त उधळण, फटाक्यांची नेत्र दीपक आतषबाजी अशा अतिशय उत्साही वातावरणात भवानी उत्पत्ती चैत्र शुद्ध अष्टमी व राम नवमी अशा दुग्ध शर्करा योगावर मध्यरात्री एक वाजता नातेपुतेचे ग्रामदैवत श्री गिरीजापती शंभू महादेवाचा विवाह सोहळा हजारो भाविकांच्या व मानकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावर्षी कुरवलीचा मान असणारी मराठवाड्यातील भातगंळीची काठी विवाहाच्या अगोदर एक तास उपस्थित राहिली. काठीच्या मानकऱ्यांनी शंभू महादेवास आहेर देऊन विधिवत लग्न पूजेस विधिवत लग्न सोहळ्यास होकार दिला. दिवसभर घराघरांतून पुरणपोळीचा नैवेद्य करून देवास केळवण करण्यात आले. सायंकाळी ६ वाजता सालकरी बडवे यांच्या घरांतून पालखी-छबिना मिरवणूक निघाली. त्यावेळी पालखी समोर देगलूर (जि. नांदेड ) येथील मानकऱ्यांनी वाद्य वाजवून सेवा अर्पण केली. रात्री ९ वाजता मंद्रे (साळी ) कुटुंबीयांनी सवाद्य मिरवणूक काढून धज बांधली, त्यानंतर मुख्यविधीस सुरुवात झाली. राज्यभरातून ३५ कावडी दाखल झाल्या होत्या. ग्रामजोशी बडवेंनी मंगलाष्टके गायली. नातेपुते येथील विवाह सोहळा झाल्यावर शिखर शिंगणापूरला विवाह विधी होतात. शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे मूळस्थान मानून नातेपुते येथील गिरजापतीची पूजा केली जाते. यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने दोन दिवस हजारो यात्रेकरूंना अन्नदान करण्यात आले. राज्यभरातून आल्या कावडी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः मराठवाडा विदर्भातील मानांच्या ३५ काठ्यांची मंदिर प्रदक्षिणा झाली. त्यानंतर रात्री १०.३० वा. नंतर नातेपुतेथील पाटील,सुतार काळे पाटील,पोटे, परिवार, बोराटे,लांडगे तसेच परिसरातील मानांच्या कावडी विवाह व गिरजापतीस धार घालण्यासाठी विठ्ठल मंदिर येथील मठातून पवित्र जल घेऊन मंदिरात यायला सुरुवात झाली. फटाक्याच्या आतषबाजीत जल्लोषात गुलाल भंडारा उधळत कावडी विवाह सोहळ्यात दाखल होत होत्या. नातेपुते येथील पाटील परिवारास नवरीचा मान, माळशिरस येथील वाघमोडे पाटील यांना नवरदेवांचा मान, देशमुख, देशपांडे परिवारास करवलीचा मान आहे. या यात्रेत प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना विविध मान आहेत.व ते श्रद्धेने भक्तीने सहभागी होऊन आपली सेवा रुजू करतात. त्यानंतर मुख्य गाभाऱ्यातील विधी झाल्यानंतर विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला. नवरीचा मान उपनगराध्यक्ष अतुल पाटील, नवरदेव माळशिरसचे अमित वाघमोडे-पाटील, कुरवलीचा मान देशमुख परिवारातील राजाभाऊ देशमुख यांनी व देशपांडे परिवाराने पार पाडला.
भगवान परमात्मा हा डोळ्याने दिसत नाही. साधुसंतांनी त्यांना मनाने प्राप्त केले आहे. जीवाला शिवामध्ये घेऊन जाण्याची ताकद संतामध्ये असल्याने संत जगात सर्वात श्रेष्ठ आहेत. नेवासे ही संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी असल्याने हे क्षेत्र ब्रम्हविद्येचे माहेर आहे. जीवनात अंध नाही तर डोळसपणे परमार्थ करा. निर्मळ मनाने भगवंताची भक्ती करा असे आवाहन साध्वी सुवर्णानंद महाराज चैतन्य यांनी केले. नेवासे तालुक्यातील रामनगर येथील महंत सुनीलगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम साधना आश्रमात रामनवमी निमित्ताने आयोजित श्रीराम जन्मोत्सव पंचदिनात्मक सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. जीवाला शिवामध्ये घेऊन जाण्याची ताकद संतामध्ये असल्याने संत जगात सर्वात श्रेष्ठ आहेत. रामराज्य जर टिकवायचे असेल तर आधी जातीभेद नष्ट करा असे आवाहन साध्वी सुवर्णानंद चैतन्य महाराज यांनी केले. या सोहळयासाठी योगदान देणाऱ्या दात्यांचा श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरी महाराज व साध्वी सुवर्णानंदगिरी महाराज चैतन्य, महंत मुक्तानंद महाराज यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत महंत सुनीलगिरी महाराज, महंत मुक्तानंदगिरी महाराज, साध्वी सुवर्णानंद महाराज चैतन्य यांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडून पंचदिनात्मक श्रीराम जन्मोत्सव सोहळयाची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांच्या गर्दीने श्रीराम साधना आश्रमाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. यावेळी माऊली आश्रमाचे प्रमुख हभप ज्ञानेश्वर महाराज हजारे, लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, साहेबराव महाराज चावरे, हभप भिसे महाराज, वैभव निकम, सीताराम निपुंगे, पोपटराव निपुंगे, संदीप ताकपेरे, प्रशांत पवार, आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामराज्य टिकवण्यासाठी जातीभेद नष्ट करा जीवाला शिवामध्ये घेऊन जाण्याची ताकद संतामध्ये असल्याने संत जगात सर्वात श्रेष्ठ आहेत. रामराज्य जर टिकवायचे असेल तर आधी जातीभेद नष्ट करा असे आवाहन यावेळी उपस्थित भाविकांनी साध्वी सुवर्णानंद महाराज चैतन्य यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने कार्यरत असलेले प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आता एका नवीन आणि आधुनिक स्वरूपात ज्ञानदानासाठी सज्ज झाले आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त या शाळेचा केवळ भौतिक विस्तारच नाही तर शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी संस्थेचे चेअरमन मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने अनेक निर्णय घेतले. शाळेच्या जुन्या इमारतीची दुरुस्ती करून तिला आधुनिक रूप देण्यात आले आहे. विशेष म्हणजे २७ एप्रिल १९९७ साली संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. त्यालाही ३० वर्ष पूर्ण होत आहेत. प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत संगणक कक्ष, आणि सुसज्ज प्रयोगशाळा यामुळे विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाचे शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. डिजिटल शिक्षणावर भर देण्यात आला असून, अटल टिंकल लॅब आणि इंटरअॅक्टीव्ह बोर्डसह इंग्रजी भाषेचे प्राथमिक ज्ञान विद्यार्थ्यांना विद्यालयातून मिळणार आहे. प्राथमिक स्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, यासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच, माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाकरीता प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेचा विशेष पुढाकार असेल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केवळ अभ्यासच नव्हे तर क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी चमक दाखवावी, यासाठी क्रीडांगणाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. जुन्या इमारतीची दुरुस्ती करून आकर्षक व अद्ययावत रूपांतरण केले आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त व हवेशीर वर्गखोल्या आहेत. अद्ययावत संगणक कक्षाची उभारणी केली आहे. विज्ञान शिक्षणासाठी सुसज्ज प्रयोगशाळा आहे. डिजिटल शिक्षणावर भर तसेच इंटरअॅक्टिव्ह बोर्डची सुविधा आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेसाठी अटल टिंकर लॅबची स्थापना केली आहे. प्राथमिक स्तरापासून इंग्रजी भाषेच्या शिक्षणावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. विज्ञानाची आवड वाढवण्यासाठी विशेष शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला श्री रामनवमी उत्सवाला यंदाही चांगला प्रतिसाद मिळाला. उत्सवाच्या तीन दिवसांत राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सुमारे तीन लाख भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. गतवर्षीच्या तुलनेत २५ हजार भाविक जास्त होते. मुंबईसह देशाच्या विविध भागांतून आलेल्या पालख्यांतील भाविकांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी नगरी दुमदुमून गेली. गुरूवारी उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे काकड आरतीने कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर श्री साईसच्चरित्राच्या अखंड पारायणाची सांगता करण्यात आली. पारायणानंतर श्रींचे फोटो, पोथी, वीणेची मिरवणूक काढण्यात आली. यानंतर कावड मिरवणूक, मंगलस्नान, पाद्यपूजा आणि ध्वजपूजनाचे विधी पार पडले. द्वारकामाईतील गव्हाच्या पोत्याचे पूजन करून नवीन पोते ठेवण्यात आले. सकाळी ह.भ.प. विक्रम नांदेडकर यांचे श्रीराम जन्मोत्सव कीर्तन झाले. सायंकाळी निशाण मिरवणूक आणि श्रींच्या रथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रसिद्ध संगीतकार आनंद-मिलिंद यांच्या साईभजन संध्येला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्य दिवशी समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. या दिवशी नांदेड येथील साईभक्त विठ्ठल झुडपे यांनी २३०० ग्रॅम वजनाची चांदीची वीट अर्पण केली, तर शिर्डीतील तुकाराम मुखेकर यांनी ५० क्विंटल गहू साईचरणी अर्पण केला. उत्सवाच्या सांगता दिनी ह.भ.प. विक्रम नांदेडकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. तात्या पाटील कोते यांच्या वंशज अभिराज मिलिंद कोते यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. गॅसची बचत करत सोलारचा मुबलक वापर प्रचंड उष्णता आणि इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने गॅसची बचत करण्यासाठी सोलार प्रणालीचा अधिकाधिक वापर केला. सोलार स्टीम तयार करून त्यात बटाटो, दाळ, भात शिजवण्यात आले. परिणामी गॅसची बचत झाली आणि तुटवडा जाणवला नाही. उत्सवातील तीन दिवसांत सुमारे १ लाख ६२ हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. गर्दी असूनही फक्त २ ते ३ तासांत सुकर दर्शन व्यवस्था होत होती. देशाच्या विविध भागांतून ९७ पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या होत्या.
महापालिकेच्या अंदाजपत्रकावर आयोजित करण्यात आलेल्या सभेत विविध अवांतर मुद्द्यांवर चार तास गदारोळ झाला. चर्चेसाठी बजेट पुस्तकाचे पानही उघडले नाही. अवांतर विषयांवर सभेत चर्चा घडली. नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी बजेटवर सवाल उपस्थित करताच नगरसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द काढणाऱ्या छिंदमला सभागृहात बोलण्याचा अधिकार नाही, असे म्हणत गदारोळ घातला. घोषणाबाजी करत छिंदम यांना सभागृहातून बाहेर काढले. दरम्यान, यामुळे काही वेळ सभागृहात तणाव निर्माण झाला होता. महापौर ज्योती गाडे यांच्या अध्यक्षतेखाली तहकूब सभा शुक्रवारी दुपारी सुरू झाली. सुरुवातीपासूनच अवांतर विषयावर चर्चा सुरू झाली. सावेडी गावठाणच्या सिटीसर्वेचा मुद्दा, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, गॅस पाईपलाईनसाठी खोदाई शुल्क, महापालिकेच्या मालकीच्या भूखंडाची परस्पर विक्री, घरपट्टी सर्वेक्षण आदी मुद्द्यांवर नगरसेवकांनी प्रशासनाला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात नगरसेवक छिंदम यांनी बजेटवर चर्चेची मागणी करत आयुक्तांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक होत छिंदम यांना बाहेर काढण्याची मागणी केली. त्यांच्या हातातील बजेटचे पुस्तक हिसकावून घेत त्यांना सभागृहातून बाहेर काढले. त्यांच्या समोरील माईकही हटवण्यात आला. पुढच्या सभेत छिंदम यांना सभागृहातून बाहेर काढण्यासाठी ठराव झाला पाहिजे, त्यासाठी उर्वरित पान ४ माळीवाडा वेस पाडण्याची मागणी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी माळीवाडा वेस पाडण्यात यावी, अशी मागणी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांकडे लेखी निवेदनाद्वारे केली. सर्वांची मागणी असल्याचे नगरसेवक निखिल वारे यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे गटनेते दत्तात्रय कावरे यांनी मात्र, मागणीला विरोध केला. मला बाहेर काढण्यासाठी कट रचला होता : छिंदम मला नागरिकांनी लोकशाही मार्गाने निवडून दिले आहे. सभागृहात बोलण्याचा अधिकार मला आहे. मात्र, मला बोलून द्यायचे नाही, असेच चित्र सुरुवातीपासून तयार केले होते. कट रचून गोंधळ घालून मला बाहेर काढण्यात आले. यामागे आमदार संग्राम जगताप यांचा हात असल्याचा आरोप छिंदम यांनी केला. पोलिसात तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हवामान बदल:उन्हाच्या चटक्यानंतर ढगाळ सावली; दोन तासांत 3.2 अंशांनी पारा घसरला
अहिल्यानगर शहरात शुक्रवारी तापमानाचा मोठा लपंडाव पाहायला मिळाला. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पारा ३८.२ अंश सेल्सियसवर होता. मात्र, त्यानंतर अचानक बदललेले ढगाळ वातावरण आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अवघ्या दोन तासांत तापमानात ३.२ अंश सेल्सियसची लक्षणीय घट होऊन सायंकाळी ५:३० ला पारा ३५ अंशांवर आला. दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरात सोसाट्याचा वारा सुटला आणि पावसाचे काही थेंब कोसळले. काही काळ वारा सुटल्याने दिल्ली गेट, नेप्ती नाका, कल्याण रोडसह शहरातील अनेक भागात वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकांसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी तीव्र उष्णतेच्या मे महिन्यात जिल्ह्यात १०५ मिलिमीटर अतिवृष्टीच्या पावसाची नोंद झाली असतानाच यंदा मात्र मार्च महिन्यात दुसऱ्यांदा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अवकाळी पाऊस झाला आहे. शहरात दुपारी चार वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. छाया : मंदार साबळे अवकाळीमुळे गहू, कांदा, हरभरा, मक्याला फटका जिल्ह्यात १९ ते २० मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे ११ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. यात सर्वाधिक गहू, कांदा, हरभरा, मका, भाजीपाला ही पीके भुईसपाट झाली होती. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करून त्याचा अहवाल विभागीय आयुक्तालया मार्फत राज्य सरकारला सादर करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
सामाजिक राज्यस्तरीय न्याय व विशेष साहाय्य विभागाचा २०२४-२५ या वर्षीचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते, मानसतज्ज्ञ असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप नवलसिंग सिसोदे यांना पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. १५ हजार रुपये रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्थांना सन्मानित करण्यासाठी गेल्या ५ वर्षांचे पुरस्कार विभागाचे अपर सचिव विवेक शिंदे यांनी जाहीर केला होता. मागील दोन दशकांपासून डॉ. संदीप सिसोदे व्यसनमुक्ती, मानसिक समुपदेशन क्षेत्रात कार्यरत आहेत.
इगतपुरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि लायन्स क्लब जुहू यांच्या सामाजिक बांधिलकीतून उभारण्यात आलेली शाळा इमारत हे उल्लेखनीय कार्य आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यास नवी दिशा मिळत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार शिवराम झोले यांनी केले. खडकेद येथे लायन्स क्लब जुहूच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनिअर कॉलेजच्या नवीन इमारतीचे उद्घाटन रामनवमीच्या मुहूर्तावर पार पडले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब जुहूचे मनोज बागुल होते. यावेळी अध्यक्ष अक्षय मेहता, केतन मेहता, मुकेश शहा, विरेन काटवाला, नरेश सरवेया यांनी मनोगत व्यक्त करत सामाजिक बांधिलकीतून शिक्षण क्षेत्रात योगदान देत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी माजी आमदार निर्मला गावीत, पांडुरंग गांगड, काशिनाथ मेंगाळ, आदिवासी विकास विभागाचे संचालक देवराम मुंडे, माजी जि.प. सदस्य गोरख बोडके आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. खडकेद येथे मार्गदर्शन करताना माजी आमदार शिवराम झोले व उपस्थित मान्यवर
येथील श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठानतर्फे सामाजिक पातळीवर गौरवास्पद काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा कृष्णाई मंगल कार्यालयात पार पडला. अध्यक्षस्थानी अलका अमृतकार होत्या. या कार्यक्रमास महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमधून पुरस्कारार्थी महिलांची उपस्थिती होती. सात निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना साडीचोळी आणि महिनाभर पुरेल एवढा किराणा श्रीहरी प्रतिष्ठानने दिला. आश्विनी मोरे यांनी साकारलेली महिलांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित रांगोळी दालनाचे उद्घाटन मनिषा गहिवरे व किरण येवले यांनी केले. प्रमुख पाहुणे व पुरस्कारार्थी सुवासिनींनी पुष्पवृष्टी करून गौरव केला. स्नेहलता शरद नेरकर यांनी हार्मोनियमच्या तालावर महिषासूर मर्दिनी स्त्रोत व आरती सादर केली. सात गीतांचे नृत्य सादरीकरणही लक्षवेधी ठरले. उत्कृष्ट काम करणाऱ्या अकरा सावित्रींच्या लेकींना व सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, क्रीडा, आरोग्य इत्यादी क्षेत्रातील आदर्श काम करणाऱ्या बारा जोडप्यांना लक्ष्मीनारायण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे सटाणा नगराध्यक्षा हर्षदा सोनवणे, उज्ज्वला पाचपुते, प्रतिभा वाणी व मीनाक्षी देशमुख उपस्थित राहून सावित्रींच्या लेकींना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन ज्योती महालपुरे व स्नेहल पाटील यांनी केले. वैशाली देव, अरुणा नेरकर, छाया पाटकर, सीमा सोनजे, सविता शिरोडे, नीलिमा नेर, रेखा सोनजे, कल्पना अहिरे, योगिता कोठावदे, मंगला येवले, नेहा भदाने, नलिनी इंगळे, गायत्री देसले, धनश्री वाणी, वंदनीय लीलावती, रामराव सावंत, ज्योत्स्ना मोराणकर, सोनाली दुसे, कल्पना येवला, सारिका देसले, शुभदा निकम, अद्वैत उपासनी, आरुषी खुटाडे, सारिका सोनजे, चैताली महालपुरे, आशा शिरोडे, आश्विनी नावरकर
नांदगावी मांस विक्री व कत्तलखाने बंद ठेवावेत:सकल जैन समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन
भगवान महावीर जन्म कल्याणक उत्सव आणि हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मांस विक्री व कत्तलखाने बंद ठेवावेत, अशी मागणी सकल जैन समाजाने प्रशासनाकडे केली आहे. यासाठी तहसीलदार, पोलिस निरीक्षक आणि नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. महावीर जन्म कल्याणक उत्सव, त्यानंतर श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती हे पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरे होणार आहेत. या सणांचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता शहरात शांतता व पावित्र्य राखण्यासाठी सर्व मांस विक्री दुकाने व कत्तलखाने बंद ठेवणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी ओसवाल श्वेतांबर जैन संघाचे अध्यक्ष दत्तराज छाजेड, खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतचे अध्यक्ष सुमेर कासलीवाल, मंत्री शरद लोहाडे, तसेच प्रतिनिधी सुदेश गंगवाल, ललित काला, पीयूष काला आदी उपस्थित होते. सणांच्या काळात अहिंसा, संयम आणि धार्मिक श्रद्धांचा आदर राखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. शहरातील विविध धार्मिक संघटनांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला असून, प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मनोज चव्हाणांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनाा दिलासा:इगतपुरीतील आदिवासीपाड्यांना टँकरद्वारे पाणी
इगतपुरी तालुक्यातील पायरवाडी, झुगरेवाडी आणि खडकवाडी शिवारातील आदिवासी पाड्यांवरील नगरिकांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळाला आहे. मनसेचे ‘पाणीदूत’ म्हणून ओळख असलेले डॉ. मनोज चव्हाण (रा. मुंबई) यांच्या पुढाकारातून या भागात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. या पाड्यांवरील भीषण परिस्थितीची माहिती मिळताच चव्हाण यांनी समाजसेवक सीताराम गावंडा यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्वरित पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले. यापूर्वी येथील आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर-दऱ्यांमधून जीव धोक्यात घालून पायपीट करावी लागत होती. अनेकांना गढूळ झऱ्यांतील पाणी पिऊन तहान भागवावी लागत असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. सध्या पायरवाडी, झुगरेवाडी आणि खडकवाडी या तिन्ही पाड्यांवर नियमितपणे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, पावसाळा सुरू होईपर्यंत ही व्यवस्था सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने आदिवासी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण असून, स्थानिकांनी मनोज चव्हाण, सीताराम गावंडा, शैलेश पुरोहित तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
सम्राट अशोकाचे लोकाभिमुख कार्य, सत्य, अहिंसा, दया आणि क्षमा या मूल्यांचा अवलंब आजही समाजाला प्रेरणा देतो. अशोकाच्या योगदानामुळे जगाला बुद्धांची ओळख मिळाली आणि भारतीय संविधानासह राष्ट्रध्वज, संसद, चलन, राजमुद्रा यासारख्या राष्ट्रीय प्रतिकांवर त्याचा प्रभाव आजही दिसतो, असे प्रतिपादन बौद्ध संस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक अतुल भोसेकर यांनी केले. सटाण्यातील सम्राट अशोक स्तंभावर आयोजित जयंतीनिमित्त व्याख्यानात ते बोलत होते. या महान राजाच्या आदर्शाच्या खुणा भारत देशातील कणाकणात आहेत. संसद, भारताचे चलन, राष्ट्रध्वज, संविधान, राजमुद्रा यांसारख्या राष्ट्राच्या महत्त्वाच्या प्रतिकांवर सम्राट अशोकाचे अस्तित्व आजही अभिमानाने झळकत आहे. भारतीय जनमाणसात शिलालेखांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लेखनकलेची सुरुवात अडीच हजार वर्षांपूर्वी सम्राट अशोकाच्या काळात झाली. भारतात दगडामध्ये साकारलेल्या बहुतांशी बौद्ध लेणी असून, लेखनकलेसोबत चित्रकला, काव्य, रस्ते विकास, आरोग्य सुविधा, तसेच जगातील इतर देशांशी असलेले सौहार्दाचे संबंध अशा सर्वस्पर्शी सम्राट अशोकाच्या इतिहासाचे कौटुंबिक स्तरावर अध्ययन करण्याचे आवाहन भोसेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेशाध्यक्ष के. के बच्छाव होते, तर नगराध्यक्षा हर्षदा पाटील, तहसीलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक योगेश पाटील, सटाणा आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे अदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास कसमादेतील बौद्ध बांधव व प्रियदर्शी सम्राट अशोक कृती समितीचे पदाधिकारी, सदस्य आदींसह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले. उपस्थितांनी सम्राट अशोक यांच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याबद्दल अभिमान व्यक्त केला.
सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा येथील ग्रामदैवत शहा कलंदर बाबा यांच्या यात्रेला मंगळवारी २४ मार्च रोजी उत्साहात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सोमवारी रात्री ९ वाजता दादा मिया शहा यांच्या घरापासून बाबांची संदल मिरवणूक निघाली. ढोल-ताशांचा गजर झाला. फटाक्यांची आतषबाजी झाली. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी २५ मार्च रोजी दुपारी बाबांना कबूल केलेला नवस बारागाड्या ओढून, गळ लावून पूर्ण करण्यात आला. काहींनी बोकडाच्या कंदुरीची मेजवानी देऊन नवस पूर्ण केला. बुधवारी रात्री ठीक ९ वाजता गावात दरवर्षीप्रमाणे पारंपरिक मासीचे सोंग काढण्यात आले. सोंग पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी झाली. रात्री ठीक १० वाजता शहा कलंदर बाबा यांचे तयार केलेले बुगारे पेटवून हवेत उडवण्यात आले. रसिकांसाठी लोकनाट्य-तमाशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. तिसऱ्या दिवशी गुरुवारी २६ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत बाबाच्या दर्ग्यासमोर हाजरीचा कार्यक्रम झाला. दुपारी ३ वाजता गावकऱ्यांच्या वतीने, शहा कलंदर बाबा संस्थानतर्फे यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन झाले. आखाड्यासाठी १ रुपयापासून ७०५१ रुपयांपर्यंत बक्षीस ठेवण्यात आले. आखाड्यात १ रुपयापासून अंदाजे ६० हजार रुपयांपर्यंत बक्षिसांचे वाटप मल्लांना झाले. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत अनेक कुस्त्या झाल्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, सोयगाव तालुक्यांतून मल्ल आले. जालना जिल्ह्यातूनही मल्ल आले. आखाडा पाहण्यासाठी अंदाजे चार ते साडेचार हजार कुस्तीप्रेमी उपस्थित होते. बनकिन्होळा, परिसरातील कुस्तीपटूंनी आखाडा गाजवला. आखाडा यशस्वी करण्यासाठी माजी पोलिस पाटील पांडुरंग माऊली फरकाडे, एकनाथ फरकाडे, प्रल्हाद फरकाडे, ज्ञानेश्वर दामले, संतोष फरकाडे, सचिन जाधव, भाऊसाहेब फरकाडे आदींनी परिश्रम घेतले. दोघांना समान बक्षीस; हलगी वाजवत गावातून मिरवणूक बनकिन्होळ्याचा पांडुरंग फरकाडे, कानडगावचा शिवा सोनवणे यांच्यात ७०५१ रुपयांची शेवटची कुस्ती झाली. यात कोणीही पडले नाही. दोघांना समान बक्षीस देण्यात आले. शेवटच्या कुस्तीचा मानकरी पांडुरंग फरकाडे यांची गावातून मिरवणूक काढली.
सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देखील अनेक पेट्रोल पंपांवर ‘नो पेट्रोलचे बोर्ड’ लागलेले होते. ज्या पंपांवर डिझेल- पेट्रोल मिळत होते, तेथे वाहनधारकांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. पेट्रोल-डिझेलविषयी कुणी अफवा पसरवली तर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाच्या वतीने तहसीलदार ज्योती पवार यांनी दिला आहे, तर शेतीमधील वाढत्या दरांमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता डिझेल उपलब्ध होत नसल्याने ऐन पीक काढणीच्या वेळी संकटांना सामोरे जावे लागत आहे. आखाती देशांतील युद्धाचा जिल्ह्यातील नागरिकांनाही फटका बसला आहे. गॅसपाठोपाठ पैठण तालुक्यात पेट्रोल-डिझेलसाठी देखील पंपांवर वाहनधारकांच्या लांबच- लांब रांगा गुरुवारी (दि. २६) लागल्याचे आढळून आले. तीच परिस्थिती आज, शुक्रवारी देखील पाहायला मिळाली. अफवेमुळे अनेकांनी जास्तीचे पेट्रोल- डिझेलची खरेदी केली. तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वच पंपांवर शुक्रवारी देखील ‘नो पेट्रोल, डिझेलचे’ फलक लागलेले होते. ग्रामीण भागातील पंपांवर पेट्रोल नसल्याने पैठण शहरात दुसऱ्या दिवशी देखील वाहनधाराकांची पंपांवर गर्दी दिसून आली. तालुक्यातील अनेक पंपांवर डिझेल नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे गहू व इतर पिकांची काढणी वेळेत करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. अवकाळी पावसाची शक्यता असताना डिझेल टंचाई निर्माण झाल्याने अडचण वाढली आहे. बदलत्या काळानुसार शेतीत मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण झाले आहे. बैलजोडीऐवजी ट्रॅक्टर, पंपसेट, फवारणी यंत्रे, गहू काढणीची यंत्रे यांचा वापर वाढला आहे. नांगरणी, पेरणी, कोळपणी, फवारणी, वाहतूक ही कामे डिझेलवर चालणाऱ्या यंत्रांवर अवलंबून आहेत. इंधन टंचाईमुळे शेतीची साखळी विस्कळीत होत आहे. पैठणमध्ये पंपांवर गुरूवारी दुचाकीधारकांच्या अशा रांगा लागल्या होत्या. पुरवठा सुरळीत करण्याची शेतकऱ्यांमधून मागणी “गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाल्याने शेती कामे अडली आहेत. खर्च वाढला आहे. उत्पन्न कमी झाले आहे. शेतीचा ताळमेळ लागत नाही,” अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते माऊली मुळे यांनी दिली. शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलवरील कर कमी करावा. ग्रामीण भागात इंधनाचा सुरळीत पुरवठा करावा. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, असे तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी सांगितले.
खंडाळ्यात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त रथयात्रा, अघोरी टीमकडून सादरीकरण
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे गुरुवारी (दि. २६) श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. जन्मोत्सव समितीच्या वतीने प्रभू श्रीराम व हनुमान यांच्या प्रतिमा रथावर ठेवून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेला परसोडा रोडवरील लक्ष्मीनगर येथून प्रारंभ झाला. मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांच्या हस्ते पूजन झाले. मिरवणुकीत श्रीरामभक्त, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. या वेळी संगमनेर येथील हिंदुराजा महाकाल अघोरी टीमने सांस्कृतिक, धार्मिक वेशभूषेत सादरीकरण केले. डमरू नाद, महाकाल दर्शनाचे सादरीकरण झाले. धार्मिक वेशभूषा, कलेच्या माध्यमातून पौराणिक अघोरी परंपरेचा देखावा मांडण्यात आला होता. शिवशंकर, हनुमान, प्रभू श्रीराम, अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज, मावळे यांच्या वेशभूषेतील कलाकारांनी उपस्थितांची दाद मिळवली. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या सैनिकांच्या वेशभूषेनेही लक्ष वेधले. वैजापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलिस उपनिरीक्षक नितीन नलावडे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. उत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीराम नवमी उत्सव समितीने पुढाकार घेतला होता.
अनोखा वाढदिवस:मांडणा मूकबधिर मुलांसोबत साजरा, वृक्षारोपण व साहित्य वाटपातून सामाजिक संदेश
मांडणा येथे मानवतेचा सुंदर संदेश देणारा एक मनमोहक आणि प्रेरणादायी उपक्रम पाहायला मिळाला. उंडणगाव बँक ऑफ बडोदाचे अधिकारी अमोल दाभाडे यांनी आपला मुलगा रामचा तिसरा वाढदिवस अत्यंत वेगळ्या आणि सामाजिक भान जपणाऱ्या पद्धतीने साजरा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रामनवमीच्या पावन दिवशी साजरा झालेला हा वाढदिवस केवळ आनंदाचा क्षण नव्हता, तर तो सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा ठरला. अमोल दाभाडे यांनी मांडणा येथील मूकबधिर शाळेतील मुलांसोबत आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी त्या विशेष मुलांना वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल तसेच खाऊचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. या कार्यक्रमाची खास आकर्षण ठरली ती वृक्षारोपणाची सुंदर संकल्पना. मूकबधिर मुलांच्या हस्ते आंब्याच्या झाडाचे रोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अमोल दाभाडे यांनी यापुढे अजून १० आंब्याची झाडे देण्याचे आश्वासन दिले. सोहळ्यामुळे समाजात सकारात्मक संदेश वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे आणि पार्टी नव्हे, तर इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची एक संधी आहे. अमोल दाभाडे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या या कार्याने अनेकांसाठी प्रेरणेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
पूर्वी ग्रामीण भागात हरभऱ्याची लागवड मुख्यतः घरगुती वापरासाठी केली जात होती. मात्र गेल्या दशकात परिस्थितीत मोठा बदल झाला असून हरभरा हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे नगदी पीक बनले आहे. कमी खर्च, कमी पाण्यात येणारे पीक, सुधारित बियाणे आणि बाजारात मिळणारा चांगला दर या कारणांमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हरभरा लागवडीकडे वळत असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. दहा वर्षांत जिल्ह्यात क्षेत्र ३५ हून ७५ हजारांवर पोहचले आहे. तर सलग दोन वर्षांपासून दर देखील क्विंटलमागे ७५०० रुपये स्थिर आहे. विशेषतः जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा हे प्रमुख पीक बनले आहे. खरीप हंगामानंतर जमिनीत उरलेली ओल आणि थोडेफार पाणी यावर हरभरा चांगल्या प्रकारे येतो. त्यामुळे कमी जोखमीचे पीक म्हणून शेतकरी याकडे पाहू लागले आहेत. कृषी विभागाने सुधारित जातींचा प्रसार, बीज प्रक्रिया, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आणि कीडनियंत्रण तंत्रज्ञान यावर भर दिल्यामुळे उत्पादनातही वाढ झाली आहे. तसेच कडधान्यांची देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे बाजारभावातही वाढ होत गेली. त्यामुळे पूर्वी फक्त घरगुती वापरापुरता घेतला जाणारा हरभरा आता व्यापारी पिकाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. वर्ष लागवड (हेक्टर) २०१५ ३५,००० २०१६ ३८,००० २०१७ ४१,००० २०१८ ४५,००० २०१९ ४८,००० २०२० ५२,००० २०२१ ५६,००० २०२२ ६०,००० २०२३ ६३,००० २०२४ ६७,००० २०२५ ७१,००० २०२६ ७५,९३२ प्रकाश देशमुख जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर कमी पाण्यात येणारे पीक उत्पादन खर्च कमी रब्बी हंगामात सहज लागवड कडधान्यांना शासनाचे प्रोत्साहन बाजारात चांगला दर कृषी तज्ज्ञांच्या मते, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात येणारी कडधान्य पिके भविष्यात अधिक महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात हरभरा लागवड क्षेत्र व उत्पादन आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांसह शिंदेसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनीही केली. मात्र, अजित पवार गटाने झिरवाळांना सध्या पूर्ण संरक्षण दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यानुसारच माहिती देत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, तीन-चार व्हिडिओच्या जोडतोडीतून हा व्हिडिओ तयार केल्याचे मला झिरवाळांनी सांगितले. म्हणून मी त्यांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे व्हिडिओच्या सत्यता पडताळणीनंतरच मी आणि सुनेत्रा पवार राजीनाम्याविषयी निर्णय घेऊ. विरोधकांना फायदा होऊ नये म्हणून नेत्यांकडून झिरवाळांची पाठराखण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी झिरवाळ यांची पाठराखण केली आहे. “प्रत्येक वेळी केवळ आरोप झाले म्हणून राजीनामा घेणे योग्य नाही,” असे मत पक्षातील धुरिणांनी व्यक्त केले आहे. आधी धनंजय मुंडे, नंतर कोकाटेंचे राजीनामे घेण्यात आले. त्यात झिरवाळांच्या राजीनाम्याची भर पडली तर त्याचा फायदा शरद पवार गट तसेच भाजप आणि शिंदेसेनेला होईल, असे या धुरिणांचे म्हणणे आहे. या शिवाय झिरवाळांनीही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना फोन करून आपली बाजू मांडली.
खासदार पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने मुंढवा येथील शासनाची सुमारे १८०० कोटी रुपयांची ४० एकर जमीन ३०० कोटी रुपयांत खरेदीचा प्रकार नोव्हेंबर २०२५ मध्ये उघडकीस आला. या प्रकरणी नियुक्त खारगे चौकशी समितीने पार्थ यांना क्लीन चिट दिली. समितीच्या अहवालातून काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पार्थ यांचे मामेभाऊ आणि या जमिनीचा व्यवहार पाहणारे संचालक दिग्विजय पाटील यांनी या जमिनीचा सातबारा बंद झाल्याचे माहितीच नव्हते, असा दावा केला. आणि महत्त्वाची बाब म्हणजे हा दावा समितीने मान्य केला. काही वर्षांपूर्वी ही जमीन सरकार दरबारी जमा झाल्यानंतर तिचा सातबारा बंद करण्यात आला होता. मात्र, याची माहिती पार्थ पवार यांच्या कंपनीच्या संचालकांना असू नये याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. पाटील यांनी जमीन व्यवहारातील गैरव्यवहाराची सगळी जबाबदारी या प्रकरणात अटक केलेल्या शीतल तेजवानीवरच ढकलली आहे. तेजवानीवर विश्वास ठेवून व्यवहार : दिग्विजय पाटील मुंढवा येथील जमीन व्यवहार शासकीय आयकर धोरणांर्तगत १०० टक्के मुद्रांक शुल्क सवलतीसाठी पात्र असल्याने केवळ ५०० रुपयात खरेदीखत करण्यात आले. त्याविषयी समितीने विचारणा केली असता मी केवळ तेजवानी व एलओआय कागदपत्रावर विश्वास ठेवून व्यवहार केला, असेही पाटील यांनी जबाबात म्हटले आहे.
राज्यातील १ जानेवारी २०११ पर्यंतची सरकारी जमिनीवरील सर्व निवासी बांधकामे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय महसूल विभागाने जारी केला आहे. या निर्णयाने राज्यातील १० लाखांहून अधिक कुटुंबांना लाभ होऊ शकतो. त्यांचे ५०० चौरस फुटांपर्यंतचे बांधकाम मोफत नियमित केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे गरिबांच्या घराचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. नदी, नाल्यांवरील कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना सूत्रांनी सांगितले, या आदेशात नदी, नाल्यांवरील बांधकामे पाडून जागा मोकळी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नदी, नाल्यांवर ज्यांची घरे आहेत. त्यातील पात्र कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काचे पर्यायी घर देण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. बहुतांश झोपडपट्टीधारक भाजपविरोधी मानला जातो. त्याला या निर्णयातून आपलेसे करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केल्याचे दिसते. आधी काय होते, आता काय बदलले १. पूर्वी : कारवाईची टांगती तलवार असायची. आता : १ जानेवारी २०११ पर्यंतची सर्व निवासी अतिक्रमणे वैध होतील. २. पूर्वी: बांधकाम नियमित करण्यासाठी मुंबईसारख्या शहरात किमान ५ ते १० लाख रुपये दंड भरावा लागत होता. आता: ५०० चौरस फुटांपर्यंतचे बांधकाम पूर्णपणे विनामूल्य नियमित केले जाईल. ५०० चौ.फुटापेक्षा पुढील बांधकाम नियमित करण्यासाठी १०% बाजारमूल्य आकारले जाईल. ३. पूर्वी : अंतिम निर्णय मंत्रालयात होत होता. निकालासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत होती.आता: जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांच्या समित्या निर्णय घेतील.
भोंदूबाबा अशोक खरातमुळे गोत्यात आलेल्या रूपाली चाकणकरांनी अखेर शुक्रवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर पाणी सोडावे लागले होते. चाकणकरांविरोधात पक्षात असंतोष वाढीस लागला होता. अखेर शुक्रवारी चाकणकरांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. त्यानंतर राजीनामा पक्षाध्यक्षांकडे सुपूर्द केला. खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे.त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, असा दावा चाकणकरांनी राजीनामा पत्रात केला आहे. ‘माइंड रीडिंग’च्या आडून अशोक खरात करायचा महिलांचे शोषण लैंगिक अत्याचार प्रकरणातील भोंदूबाबा अशोक खरात याने ‘माइंड रीडिंग’व्दारे अडचणीतील महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा व नंतर संबंधितांच्या भूतकाळातील गुप्त गोष्टी सांगून आणि भविष्याची भीती दाखवून तो त्यांना संमोहित करून नंतर त्यांच्यावर अत्याचार करायचा, अशी धक्कादायक माहिती पोलिस कोठडीत समोर आली आहे. “तुमच्या आयुष्यात काय चाललंय, हे मला सर्व समजते,” असे भासवून खरात महिलांचा विश्वास संपादन करायचा. एकदा का महिला त्याच्या मानसिक जाळ्यात अडकल्या की, ‘गुपित सल्ला’ आणि ‘विशिष्ट उपचारांच्या’ बहाण्याने त्यांना कार्यालयात बोलावले जायचे. तिथे पूजेच्या नावाखाली त्यांचे शोषण केले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सोशल मीडियावर शिकला माइंड रिडिंग खरातने सोशल मीडियावरील ‘माईंड रीडिंग’ चे व्हिडिओ पाहून हे तंत्र आत्मसात केले होते. या थेरपीचा वापर करून तो समोरच्या व्यक्तीच्या मनातील भीती ओळखायचा. स्त्रियांना त्यांच्या खासगी आयुष्यातील गुपिते सांगून तो त्यांना मानसिकदृष्ट्या पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवत असे.
10 कलेक्टरांची चूक 24 तासांत सरकारने सुधारली:पेट्रोलवरील रेशनिंगचा निर्णय केला रद्द
राज्यातील १० जिल्हाधिकाऱ्यांनी इंधनाचे रेशनिंग करण्याचा चुकीचा निर्णय घेतला. त्यामुळे पेट्रोल पंपांवर गुरुवारी प्रचंड रांगा लागल्या. राज्यातील ७ हजारांपैकी १६०० पंप ड्राय आऊट होऊन भितीचे वातावरण पसरू लागले. ही बाब लक्षात येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला. १० जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली चूक दुरुस्त करण्यात आली. इंधनाच्या रेशनिंगचा आदेश मागे घेण्यात आला. हवे तेवढे इंधन मिळू लागल्याने वाहनाच्या रांगा काही प्रमाणात घटल्या. लॉकडाऊनच्या अफवेमुळे लोकांनी इंधनाचा साठा करणे सुरू केले. त्यांना रोखण्यासाठी राज्यातील १० जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीला २०० आणि चारचाकीला २ हजार रुपयांचेच पेट्रोल-डिझेल द्या, असे आदेश पंपचालकांना दिले होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरात २३ गॅस एजन्सीवर टंचाई, अफवेने निर्माण ‘पॅनिक’ स्थिती रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी महसूलचा एक लिपिक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर्मचारी लोकांच्या समस्या काय आहे. मोबाईलवर ओटीपी येतो का. नियमानुसार सिलिंडर वितरण होते का? याची पाहणी करेल. जिल्ह्यात ११.७७ लाख गॅसधारक असून पुरवठ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा ‘सरकारी वॉच’ महत्त्वाचा ठरेल. भाजपच्या मंत्र्यांनी केलेल्या तक्रारीची सीएमकडून दखल सूत्रांनी सांगितले की, पंपचालकांनी डेपोंना आगाऊ रक्कम देण्यास नकार दिल्यानेही नियोजन कोलमडले. त्यातच रेशनिंग निर्णयाची भर पडली. यामुळे रांगा वाढल्या. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांकडे काही सचिवांनी ‘साठा मुबलक’ एवढाच धोशा लावला होता. दरम्यान, भाजपच्या काही मंत्र्यांनी रात्री उशिरा फडणवीसांना वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी सकाळीच रेशनिंग रद्दचे आदेश दिले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जमिनीवरील युद्धाच्या मनसुब्यांना प्रत्युत्तरासाठी इराणने मोठी तयारी केली. इराणने १० लाख सैनिकांची फौज उभी केली. येमेनच्या हुती बंडखोरांनी इराणला पाठिंबा दर्शवत पूर्व आफ्रिकेतील अमेरिकी लष्करी तळ आमच्या निशाण्यावर असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी आखाती देशांत १० हजार सैनिक पाठवण्याची घोषणा केल्यानंतर इराणने आपले सैन्यबळ वाढवले. इराणकडे सध्या सुमारे ६ लाख सक्रिय सैनिक आहेत. दरम्यान, इराणने शुक्रवारीही इस्रायलवर हल्ले केले. यात हरझलिया येथील एक लक्झरी हॉटेल उडवले. इराणने जॉर्डन, यूएई, कुवेत व बहरीनवरही क्षेपणास्त्र हल्ले केले. इस्रायलने इराणच्या खोनदाब व यज्द शहरांमधील अणुकेंद्रांवर हल्ला केला. इराणच्या कोम आणि इस्फाहान शहरावर इस्रायलने हवाई हल्ले केले. यात २६ जण ठार झाले. इराणने शुक्रवारी इस्रायलवर ‘थँक्यू पीपल ऑफ इंडिया’ असे लिहून क्षेपणास्त्रे डागली. इराणने क्षेपणास्त्रांवर स्पेन, पाकिस्तान आणि जर्मनीसाठीही संदेश लिहिले होते. असे करून आम्ही मित्र राष्ट्रांप्रति कृतज्ञता व्यक्त केल्याचे इराणने म्हटले. सेन्सेक्सची १६९० अंक आपटी;७ लाख कोटींचे नुकसान इस्रायल-इराण युद्धाचा तणाव निवळण्याऐवजी वाढतच असल्याने जागतिक बाजारात भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी, सेन्सेक्स १६९० अंकांनी (२.२५%) कोसळून ७३,५८३ वर बंद झाला, तर निफ्टी ४८७ अंकांच्या घसरणीसह २२,८१९ वर स्थिरावला. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात ७ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. एसबीआय सिक्युरिटीजचे सुदीप शाह यांच्या मते, निफ्टीचा २३,३५०–२३,४०० च्या ‘रेझिस्टन्स झोन’चा टप्पा ओलांडण्यात अपयश आल्यानंतर विक्रीची नवीन लाट सुरू झाली आहे. इराणने होर्मुझमध्ये ३ जहाजे रोखली... युद्ध काही आठवड्यांत संपेल : अमेरिकी मंत्री इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दावा केला की, शुक्रवारी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करणारी ३ जहाजे रोखली. ही जहाजे वेगवेगळ्या देशांची आहेत. शत्रू देशांच्या जहाजांसाठी होर्मुझचा मार्ग बंद राहील, असे इराणने म्हटले. इराणने भारत, चीन, रशिया, पाकिस्तान आणि इराकच्या जहाजांना मात्र परवानगी दिली आहे. दावा : इराण प्रकरणी मोदी-ट्रम्प यांची फोनवर चर्चा, इलॉन मस्कही सहभागी पश्चिम आशियातील मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवारी फोनवर चर्चा झाली होती. या संभाषणात उद्योगपती इलॉन मस्क देखील सहभागी झाले होते. असा दावा न्यूयॉर्क टाइम्सने शुक्रवारी केला आहे. जागतिक ऊर्जा संकट आणि मस्क यांचे व्यावसायिक हितसंबंध यामुळे त्यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे. या संभाषणांनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, होर्मुज खाडी खुली आणि सुरळीत राहणे संपूर्ण जगासाठी आवश्यक आहे. ट्रम्प यांनी इराणच्या विद्युत प्रकल्पांवर हल्ला न करण्याचा युद्धविराम ६ एप्रिलपर्यंत वाढवला आहे. इराणसोबतची चर्चा सकारात्मक दिशेने सुरू आहे. दरम्यान व्हाईट हाऊसने एक संदेश जारी केला असून त्यामध्ये लिहिले आहे की शनिवारी मोठ्या घोषणेसाठी तयार राहा, असे ट्रम्प म्हणाले. भयमापन निर्देशांक ८.७% नी वधारला बाजारातील भीती मोजणारा निर्देशांक ‘इंडिया विक्स’ ८.७% नी वाढून २६.८ वर पोहोचला आहे. जून २०२४ नंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. येणाऱ्या दिवसांतही बाजारामध्ये मोठी चढ-उतार आणि विक्रीचा दबाव कायम राहू शकतो. काश पटेलांचे अकाउंट हॅक... इराणी हॅकर्सनी एफबीआय प्रमुख काश पटेल यांचे वैयक्तिक ईमेल अकाउंट हॅक केले. ‘हंडाला’ या इराणी हॅकर ग्रुपने पटेलांचे फोटो व कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. कच्चे तेल ११० डॉलर्स पार इराणने होर्मुझ खाडी बंद करण्याची धमकी दिल्याने कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ११० डॉलरवर पोहोचला आहे. यामुळे महागाईची भीती रुपयाची ऐतिहासिक घसरण: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ९४.८५ या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला परदेशी गुंतवणूकदारांची पळता भुई चालू मार्च महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून १.२३ लाख कोटी रुपयांची प्रचंड विक्री केली आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती येथील एका दांपत्याच्या देवदर्शनाचा बनाव अखेर रक्ताने माखला आहे. कौटुंबिक वादातून संतप्त झालेल्या पतीने आपल्या ३५ वर्षीय पत्नीची अमानुष मारहाण करून आणि त्यानंतर अंगावर कार घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अफझलपूरजवळील बळुरगी (कर्नाटक) येथे भरदिवसा घडली. याप्रकरणी अफझलपूर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. नेमकी घटना काय? बारामती तालुक्यातील गुणामा गावचे अक्षय आणि त्याची पत्नी शैलजा (३५) हे तीन वर्षांपूर्वीच विवाहबद्ध झाले होते. गुरुवारी हे दांपत्य गाणगापूर येथील दत्त दर्शनासाठी कारने निघाले होते. अक्कलकोट ओलांडून कर्नाटकाच्या हद्दीतील बळुरगी गावाजवळ पोहोचले असता, दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून जोरदार भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपी पती अक्षयने शैलजा यांना कारबाहेर ओढून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेचा आक्रोश ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेत पतीला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पतीने शांत झाल्याचे नाटक केले, मात्र नागरिक निघून जाताच त्याने पुन्हा क्रौर्याची सीमा गाठली. विव्हळत असलेल्या शैलजा यांच्या अंगावरून अक्षयने थेट कार घातली, यात तिचा मृत्यू झाला. पोलिस कारवाई आणि तपास अफझलपूरचे सीपीआय लखन आणि पीएसआय सोमलिंग वडेयर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला अटक केली. त्याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०२ (हत्या) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलबुर्गी जिल्हा पोलिस अधीक्षक अडुरू श्रीनिवासलू आणि डीवायएसपी तम्मराय पाटील यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत. देवदर्शनाचा बनाव प्राथमिक तपासात ही हत्या अनैतिक संबंधांच्या संशयातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. देवदर्शनाचे निमित्त करून आरोपीने हा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अफझलपूर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून संबंधित कुटुंबाला घटनेची माहिती दिली.
मनरेगात 156 ऐवजी 186 दिवस मजुरी दाखवत गैरव्यवहार:छत्रपती संभाजीनगरातील गेवराई गावातील प्रकार
महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेचा आदर्श घेऊनच केंद्र सरकारने देशपातळीवर महात्मा गांधी नॅशनल एम्प्लॉयमेंट गॅरंटी अर्थात मनरेगा योजना सुरू केली होती. आता महाराष्ट्रात मनरेगामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचेही वेगळेच ‘रोल मॉडेल’ तयार झाले आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गेवराईमध्ये (कुबेर) गैरहजर मजुराला हजर दाखवून पैसे लाटले. शिवाय मोजमाप पुस्तिकेत १५६ दिवसांऐवजी १८६ दिवस मजुरी दाखवत आर्थिक गैरव्यवहार केल्याचे ताशेरे ‘कॅग’ने ओढले आहे. २५ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध अहवालात डबल जॉबकार्ड्््स, बोगस हजेरीपटावरही संशय व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पिंपळखुटा गावातील पाणंद रस्त्यावरील फक्त गवत काढून रस्ता तयार झाल्याचे दाखवले अन् २३.६९ लाखांचा अपहार केला. सहा जिल्ह्यांतील ४८ ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार लेखापरीक्षणासाठी निवडलेल्या ६ जिल्ह्यांमधील ४८ ग्रामपंचायतीत अनियमितता आढळून आली आहे. त्यामध्ये अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नागपूर आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. अमरावती: ग्रामपंचायत इटकी शिवार (बु.), हिंगणी आणि मिर्झापूर: या ग्रामपंचायतींमध्ये हस्तलिखित हजेरीपटात ५०८ दिवस नोंदवलेले असताना, संगणकात ५७४ दिवस दाखवून १०२ मजुरांच्या नावे अतिरिक्त मजुरी काढल्याचेही नमूद करण्यात आले आहे.पालघर : ग्रामपंचायत वेती वरोटी ४१० मीटर खडीच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याचे कागदावर दाखवून ३.९७ लाखांचा अपहार, ग्रामपंचायत बोरांडा येथील रस्त्याच्या कडेला ‘खांदा बांधणी’ केल्याचे दाखवून ८.७८ लाख रुपयांची उचल केली. लेलेपाडा रस्त्यासाठी ७.८२ लाख रुपये खर्चले पण रस्ता पावसात वाहून गेला, ग्रामपंचायत चळणी ६.४० लाख मंजूर असलेल्या रस्त्यावर केवळ मुरूम टाकून १.४९ लाख रुपये काढले.धाराशिव : ग्रामपंचायत शेलका-धानोरा येथे ‘रेशीम शेती’साठी २.३५ लाख रुपये खर्च करण्यात आले. प्रत्यक्षात पडताळणीत तिथे कोणतेही रेशीम किडे आढळले नाहीत. बांधलेले शेड अत्यंत खराब अवस्थेत होते, असाही यामध्ये उल्लेख आहे. कॅगचे निरीक्षण१. दुबार जॉब कार्डस : एकाच कुटुंबप्रमुखाच्या नावाने अनेक ‘दुबार जॉब कार्डस ’ बनवली. यामुळे एका कुटुंबाला १०० दिवसांपेक्षा अधिक दिवस काम दिल्याचे उघड झाले आहे.२. बोगस हजेरीपट : हस्तलिखित हजेरीपट आणि संगणकीय हजेरीत तफावत दिसून आली. हस्तलिखितात कमी तर संगणकात जास्त दिवस काम करून जादा मजुरीचे लाखो रूपये काढल्याचे निष्पन्न.३. कागदोपत्री, निकृष्ट कामे: कागदावरच कामे झाल्याचे दाखवले. प्रत्यक्ष पाहणीत रस्ते पाण्याखाली गेलेले, बांधलेल्या विहिरी लगेच कोसळलेल्या आहेत. केवळ माती, मुरूम टाकून बिले काढले.
कॅनडा कॉर्नरच्या एका अरुंद बोळीत १० बाय १२ च्या छोट्याशा खोलीत बसून लोकांचे भविष्य बदलण्याचा दावा करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा प्रवास थक्क करणारा आहे. १९९८ मध्ये जमिनीचा व्यवहार करणारा एक सामान्य एजंट ते कोट्यवधींचे साम्राज्य उभा करणारा ‘कॅप्टन’ ज्योतिषी... असा त्याच्या भोंदूगिरीचा प्रवास आता चव्हाट्यावर आला आहे. जिथे सामान्य माणसाला दर्शनासाठी दीड-दीड वर्ष ताटकळावे लागायचे तिथे बड्या नेत्यांना मात्र अवघ्या आठ दिवसांत ‘तारीख’ मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरातने १९९८ मध्ये एका छोट्या गाळ्यातून रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला होता. जमिनीच्या व्यवहारातून लोकांच्या संपर्कात येत असतानाच त्याने हळूहळू भविष्य सांगण्यास सुरुवात केली. २००४ नंतर त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांची संख्या वाढू लागली आणि जमिनीच्या व्यवहाराची जागा पूर्णपणे भोंदूगिरीने घेतली. २०१४ नंतर त्याने स्वतःचे स्वतंत्र साम्राज्य विस्तारले. १० बाय १२ च्या या कार्यालयाच्या अर्ध्या जागेत झेड ब्लॅक काचा लावून ‘कॅप्टन’चा दरबार भरू लागला. सुज्ञ सल्ल्याने वाचला एका तरुणाचा संसार एका तरुणाने नवीन व्यवसाय सुरू केला, पण तीन वर्षांतच त्याला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागले. नैराश्यातून मार्ग काढण्यासाठी तो आपल्या पत्नीसह खरातकडे गेला तेव्हा खरातने त्याला दीड लाखाचे रत्न खरेदी करून पूजा करण्याचा महागडा सल्ला दिला. मात्र, या तरुणाच्या ओळखीच्या एका सुज्ञ व्यावसायिकाने त्याला मोलाचा सल्ला दिला की, ‘हाताच्या रेषांपेक्षा मनगटावर (कर्तृत्वावर) विश्वास ठेव, या भोंदूच्या नादी लागू नकोस.’ त्या तरुणाने भोंदू खरातकडे जाणे टाळले आणि मेहनत सुरू ठेवली. आज खरातचे खरे रूप समोर आल्यावर योग्य सल्ल्यामुळे त्याचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचला. बड्या हस्तींसाठी अंथरायचा रेड कार्पेट खरातच्या दरबारात भक्तीपेक्षा शक्ती आणि संपत्तीला झुकते माप दिले जात असे. नाशिकसह राज्यातील बडे राजकीय नेते, धनदांडगे व्यापारी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना येथे विशेष वागणूक मिळे. व्हीआयपी कल्चर : बड्या नेत्यांना अवघ्या ८ दिवसांत भेटीची वेळ मिळे. अनेक दिग्गज नेते सकाळी ८ वाजेपासूनच रांगेत उभे राहत. सामान्यांची परवड : आपल्या व्यथा घेऊन येणाऱ्या सामान्य नागरिकांना मात्र भेटीसाठी तब्बल दीड ते दोन वर्षांचे वेटिंग दिली जाई. दरबाराची वेळ : कोरोनाकाळानंतर हा दरबार केवळ शनिवारी सकाळी ११ ते ५ या वेळेत भरत असे. या वेळी कार्यालयाबाहेर महागड्या चारचाकी वाहनांच्या रांगा लागत. झेड ब्लॅक काचांच्या आडून ‘काळी’ कृत्ये खरातच्या कार्यालयाला असलेल्या झेड ब्लॅक काचांमुळे आत नेमके काय चालते याची पुसटशी कल्पनाही बाहेर बसलेल्यांना येत नसे. या गोपनीयतेचा गैरफायदा घेत खरात लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना भविष्याची भीती दाखवत असे. २०२१ नंतर या दरबाराचे स्वरूप अधिक भव्य झाले आणि येथून तो कारनामे करायचा.
चाकणकरांनी प्रदेशाध्यक्षपदही सोडले
भोंदूबाबा खरातला गुरू मानणे भोवले, निष्पक्ष चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. खरातला गुरू मानणा-या रुपाली चाकणकरांवर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी दबाव होता. आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. या संपूर्ण प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी आपली मागणी असल्याचे रुपाली […] The post चाकणकरांनी प्रदेशाध्यक्षपदही सोडले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक
नैसर्गिक, पेट्रोलियम गॅससंदर्भात केली चर्चा मुंबई : वृत्तसंस्था आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरू असलेला इंधन तुटवडा, गॅस पुरवठा आणि इतर महत्त्वाच्या बाबींसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत ऑनलाईन बैठक घेतली. युद्धजन्य परिस्थितीवर मोदींनी गेल्याच आठवड्यात संसदेत बोलताना चिंता व्यक्त केली होती. आज त्यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना नैसर्गिक आणि पेट्रोलियम […] The post पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांत थांब्याची उद्घोषणा!
मुंबई: प्रतिनिधी ‘मुंबई लोकलमध्ये रेल्वे स्थानकांविषयीची उद्घोषणा होते किंवा फलकावर येणारे स्थानक दर्शवले जाते. तशा प्रकारे सर्व लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये पुढील थांब्याविषयी उद्घोषणा व्हायला हवी. जेणेकरून प्रवाशांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेतली जाईल आणि धावत्या रेल्वेगाडीतून उतरण्याचे आणि जीव धोक्यात घालण्याचे प्रवाशांचे प्रकार कमी होतील, अशी महत्त्वाची सूचना मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या निमित्ताने रेल्वे प्रशासनाला केली. त्यामुळे […] The post लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांत थांब्याची उद्घोषणा! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बीडमध्ये माय-लेकाचा होरपळून मृत्यू, सोलापुरात २ मित्रांचा बळी सातारा जिल्ह्यात आजोबा, नातीचा मृत्यू बीड/सोलापूर/सातारा : प्रतिनिधी बीड, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात झालेल्या तीन वेगवेगळ््या अपघातांत ६ जण ठार झाले. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात कार अपघातानंतर कारने पेट घेतल्याने माय-लेकाचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात बोरामणी नाक्याजवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील २ मित्र दगावले तर पंढरीला दर्शनासाठी जाणा-या […] The post ३ भीषण अपघातांत ६ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लडाखमध्ये हिमस्खलन; ७ मृत्युमुखी, ५ जखमी
महामार्ग बंद, अनेक वाहने बर्फाखाली अडकली लेह : वृत्तसंस्था लडाखमधील जोजिला भागात भीषण हिमस्खलन झाल्याने श्रीनगर-लेह मार्गावर मोठी दुर्घटना घडली. या हिमस्खलनामुळे बर्फात अडकून ७ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण जखमी झाले आहेत. हिमस्खलनाचा फटका अनेक वाहनांना बसला. अनेक वाहने कमी-अधिक प्रमाणात बर्फात अडकली. तसेच महामार्गही बंद झाला. शुक्रवारी दुपारी झालेल्या हिमस्खलनानंतर किमान १५ […] The post लडाखमध्ये हिमस्खलन; ७ मृत्युमुखी, ५ जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात भोंदूबाबा अशोक खरातचे लैंगिक शोषणाचे प्रकरण गाजत असताना, त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित एक कथित आक्षेपार्ह व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे झिरवाळ यांच्यावर नैतिकतेचे प्रश्न उपस्थित होत असून विरोधकांकडून […] The post झिरवाळ संकटात! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लोकप्रतिनिधींना डावलल्याचा आरोप
रेणापूर : प्रतिनिधी येथील पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी दि. २७ मार्च रोजी विविध विकासकामांच्या संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र, या बैठकीस खासदार व तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य व काही पंचायत समिती सदस्यांना जाणीवपूर्वक डावण्यात आल्याने कॉग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्याच्या वतीने गटविकास अधिकारी सुमित जाधव यांना निवेदन देण्यात येऊन […] The post लोकप्रतिनिधींना डावलल्याचा आरोप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गव्हाण बॅरेजेसमध्ये तिरू मध्यम प्रकल्पातील पाणी सोडावे
जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यातील गव्हाण परिसरात तीव्र उन्हामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सध्या गव्हाणमधील बेरजेसमध्ये पाणीसाठा नाही. या कारणाने पाणीटंचाई निर्माण झाली असून, तिरू मध्यम प्रकल्पातील पाणी तिरु नदीपात्रात सोडावे, यामुळे गव्हाण येथील उच्च पातळी बंधा-यांमध्ये पाणी येईल व निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई कमी होईल. यामुळे गव्हाण येथील उच्च पातळी बंधा-यांमध्ये तात्काळ पाणी सोडावे […] The post गव्हाण बॅरेजेसमध्ये तिरू मध्यम प्रकल्पातील पाणी सोडावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिरकणी हाटमध्ये ७३ लाखांची उलाढाल
लातूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या महिला बचत गटांनी आपल्या हस्तकला, खाद्यपदार्थ, सेंद्रीय शेती उत्पादने व गृहोद्योग वस्तूचे तसेच हाताने बनवून देणा-या ताज्या व्हेज तसेच नॉन व्हेज पदार्थाचे १०६ स्टॉल आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले होते. २१ ते २६ मार्च या पाच दिवसात हिरकणी हाट मध्ये ७२.८६ लाखाची विक्रमी उलाढाल झाली असून लातूरकर ग्राहकांनी उदंड […] The post हिरकणी हाटमध्ये ७३ लाखांची उलाढाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
घडले दोन असे महारथी, दोघांची धुरंधर निती, एक शिवबा छत्रपती, दुसरे भीमराव घटनापती
लातूर : प्रतिनिधी दयानंद कला महाविद्यालयात ’कलातीर्थ २०२६’ वार्षिक स्रेहसंमेलन मोठ्या जल्लोषात साजरे करताना समारोप प्रसंगी लोककलावंत राजन सरवदे यांच्या घडले दोन असे महारथी, दोघांची धुरंधर नीती एक शिवबा छत्रपती, दुसरे भीमराव घटनापती अशा लोकसंगीताच्या गाण्यातून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागवली. दयानंद कला महाविद्यालयात दोन दिवसीय ‘कलातीर्थ २०२६’वार्षिक स्रेहसंमेलनाची सांगता लोककलावंत राजन सरवदे यांच्या लोकसंगीताने व सुप्रसिद्ध […] The post घडले दोन असे महारथी, दोघांची धुरंधर निती, एक शिवबा छत्रपती, दुसरे भीमराव घटनापती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्व. प्रा. डॉ. आदमाने यांच्या कुटुंबाला कर्मचा-यांकडून १९ हजारांची मदत
लातूर : प्रतिनिधी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या लातूर येथील उप-केंद्रात कार्यरत असलेले तासिका तत्त्वावरील प्रा. डॉ. दत्तात्रय आदमाने यांचे नुकतेच वयाच्या ३८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. डॉ. आदमाने हे येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून, त्यांच्या निधनामुळे एका सुविद्य आणि सुस्वभावी व्यक्तिमत्त्वाला समाज मुकला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, […] The post स्व. प्रा. डॉ. आदमाने यांच्या कुटुंबाला कर्मचा-यांकडून १९ हजारांची मदत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हैदराबादच्या धर्तीवर उभे करावे
लातूर : प्रतिनिधी लातूर शहरात उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य ७५ फूट उंचिचे स्मारक हैदराबाद येथील भव्य स्मारकाच्या धर्तीवरच उभे करावे, अशी एकमुखी मागणी समाज बांधवांकडून पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाज बांधवांच्या वतीने लातूर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना यांना निवेदन देण्यात आले. शहरातील डॉ. आंबेडकर […] The post डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हैदराबादच्या धर्तीवर उभे करावे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनंतर प्रशासकीय हालचाली
लातूर : प्रतिनिधी लातूर तालुक्यातील मौजे साई येथे फोफावलेली अवैध दारु विक्री आणि त्यामुळे ढासळलेली कायदा-सुव्यवस्था सुधारण्यासाठी तरुण कार्यकर्ते सुरज दत्तात्रय पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथे २५ मार्चपासून सुरू केलेले उपोषण, प्रशासनाच्या आश्वासनानंतर २६ मार्च रोजी रात्री ८ वाजता मागे घेण्यात आले आहे. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनंतर प्रशासकीय […] The post माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनंतर प्रशासकीय हालचाली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातसोबत व्हिडिओ तसेच अनेक फोटो समोर आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा द्यावा लागला होता. आता त्यांनी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला आहे. रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही, आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच. पुढे त्यांनी सांगितले की, हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा, ही माझी मागणी मी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. तसेच आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे ट्विट चाकणकर यांनी केले आहे. सोबतच त्यांच्या राजीनाम्याचा फोटोही शेअर केला आहे.
ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे किल्ले पन्हाळा येथे छत्रपती महाराणी ताराराणी बाईसाहेब यांचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक उभारण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार शिवंशंभु प्रतिष्ठान आणि सरहद संस्थेने केला आहे. डॉ. पवार यांचे नुकतेच कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनापूर्वी त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती. डॉ. पवार यांनी पुण्यात गुजर-निंबाळकरवाडी, कात्रज येथील रस्त्याला 'महाराणी ताराराणी पथ' असे नामकरण करण्याच्या समारंभात आणि त्यानंतरच्या भेटींमध्ये ही इच्छा बोलून दाखवली होती. महाराणी ताराराणींच्या ३५१ व्या जयंती वर्षात हे स्मारक व्हावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांनी यासाठी महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी त्यांना याबाबत आश्वासनही दिले होते. औरंगजेबाने मराठा स्वराज्य नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले, तेव्हा महाराणी ताराराणींनी किल्ले पन्हाळ्याला आपली राजधानी बनवून मोगलांशी लढा दिला. १७०० ते १७०१ या काळात औरंगजेबाने पन्हाळ्याला वेढा दिला होता. महाराणी ताराराणींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हा किल्ला नऊ वर्षे (१६९२-१७०१) झुंजवला. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे आणि धैर्यामुळे पन्हाळा किल्ला मराठा सत्तेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनला. किल्ले पन्हाळ्यावर आजही महाराणी ताराराणींचा वाडा, सुसज्ज तटबंदी आणि अनेक ऐतिहासिक स्थळे त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात. म्हणूनच पन्हाळा किल्ल्यावर छत्रपती महाराणी ताराराणी बाईसाहेब यांचे जागतिक दर्जाचे स्मारक व्हावे, असे डॉ. जयसिंगराव पवार यांचे स्वप्न होते. दुर्दैवाने, त्यांच्या हयातीत हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. आता त्यांच्या निधनानंतर, त्यांचे हे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार पुण्यातील शिवंशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम आणि सरहद परिवाराचे मयुर मसूरकर यांनी केला आहे. या स्मारकात छत्रपती महाराणी ताराराणींचा अश्वारूढ पुतळा आणि स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी छत्रपती शाहू महाराज आणि या विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. महेश कदम आणि मयुर मसूरकर यांनी शासनाला या स्मारक उभारणीस विलंब न लावता परवानगी देण्याचे आवाहन केले आहे.
नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याचे धक्कादायक कारनामे एकामागून एक उघडकीस येत असून, त्याने शंभरहून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आणि त्याचे चित्रीकरण केल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणातील 100 हून अधिक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध झाल्या असून, केवळ शोषणच नव्हे तर धमकावून मोक्याच्या जमिनी बळकावल्याचेही आरोप त्याच्यावर होत आहेत. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना हे व्हिडिओ नेमके बाहेर कसे आले, अशोक खरातला कशी अटक झाली, याबाबत सविस्तर माहिती दिली असून या गोरखधंद्यांचे धागेदोरे आता अधिक खोलात तपासले जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ऑफिस बॉयने कसे उघडकीस आणली व्हिडिओ? अशोक खरातचे काळे धंदे समोर येण्यामागे त्याच्याच ऑफिस बॉयने घेतलेला धाडसी पवित्रा कारणीभूत असल्याचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्पष्ट केले आहे. खरातने ऑफिस बॉयच्या सात महिन्यांच्या गरोदर पत्नीसोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर, संतापलेल्या ऑफिस बॉयने खरातच्या विरोधात जात त्याचे काही पुरावे रेकॉर्ड केले होते. आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्यास हे पुरावे समोर यावेत या उद्देशाने त्याने ते व्हिडिओ काही विश्वासू व्यक्तींकडे सुपूर्द केले होते. त्यानंतर ज्यांच्याकडे हे व्हिडिओ होते त्यांनीही सुरक्षिततेसाठी ते पुढे इतरांकडे सोपवल्याने साखळी पद्धतीने हे सर्व व्हिडिओ आता सार्वजनिक झाले असून खरातचा खरा चेहरा समाजासमोर आला, अशी माहिती कर्णिक यांनी दिली आहे. पुढे बोलताना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले, आम्ही 65 ट्वीटर अकाऊंट तसेच काही फेसबूक व इन्स्टा अकाऊंटवर गुन्हे दाखल केले आहेत. काही व्हिडिओ मॉर्फ देखील केले आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे काम सुरु असल्याचे कर्णिक म्हणाले. बऱ्याच ठिकाणाहून अशोक खरातकडे लोक येत होते. महाराष्ट्रासह बाहेरच्या राज्यातून देखील येत होते. अशोक खरातच्या सगळ्या व्हिडिओंची संख्या खूप मोठी असल्याची माहिती कर्णिक यांनी डली आहे. अशोक खरातला कशी अटक झाली? पोलिस आयुक्त कर्णिक यांनी पुढे सांगितले की, अशोक खरातला पकडण्याचे ऑपरेशन हे अत्यंत गोपनीय होते, कारण आरोपीचे शिष्य, भक्तगण हे सर्वच क्षेत्रात पसरलेले आहेत. त्यामुळे, जर हे ऑपरेशन लीक झाले असते तर आरोपी पळून जाण्याची किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला असता. आरोपीला कुठल्याही गोष्टी न समजू देता किंवा त्याला अलर्ट न होऊ देता त्याला अटक करणे महत्त्वाचे होते. पुढे बोलताना संदीप कर्णिक म्हणाले, त्यानंतर, महिला तक्रारदारास विश्वासात घेऊन तक्रार नोंद करुन घेणे गरजेचे असते. त्यामुळे, खरातच्या अटकेची प्रक्रिया किंवा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया ही पोलिस खात्यातल्या काहीच जणांना माहिती होती. तसेच, आधी महिलेची फिर्याद घेतली, त्यानंतर अशोक खरातच्या अटकेची कारवाई सुरू झाली. रात्री 11 वाजता आरोपी खरात घरी असल्याची खात्री केल्यानंतर अटक करण्याची कारवाई केली.
सज्जनगडावर पर्यटकांसमोरच थरार:हॉटेल कामगाराची 200 फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या, परिसरात खळबळ
सज्जनगड येथे एका हॉटेल कामगाराने सुमारे 200 फूट उंच कड्यावरून दरीत उडी घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, माची पेठ येथील संदेश शंकर पडियार (वय 34) हे सातारा शहरातील एका हॉटेलमध्ये कामगार म्हणून कार्यरत होते. आज सकाळी ते एकटेच सज्जनगडावर आले. गडावर पोहोचल्यानंतर त्यांनी गडाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या धाब्याचा मारुती मंदिराच्या दक्षिणेकडील कड्याकडे जाऊन कोणालाही न कळता दरीत उडी घेतली. ही घटना परिसरातील पर्यटकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ सातारा तालुका पोलीस स्टेशन येथे माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका बोलावली. स्थानिकांच्या मदतीने सुमारे 200 फूट खोल दरीत उतरून संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्यात आले. मात्र, उंचावरून पडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यावेळी पोलिस हवालदार कर्णे, एएसआय वायदंडे तसेच होमगार्ड पलटण नायक शिंदे, सावंत व चव्हाण यांनी मिळून संबंधित व्यक्तीचा मृतदेह दरीतून बाहेर काढत रस्त्यापर्यंत आणला. त्यानंतर बलून स्ट्रेचरच्या सहाय्याने मृतदेह वाहनापर्यंत हलवण्यात आला. दरम्यान, कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार संदेश पडियार हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.
धारावीतील झोपडपट्टीवासियांना प्रत्येकी 500 चौ.फू.चे घर देण्याबाबत राज्य सरकार करीत असलेली टाळाटाळ, धारावीतील सर्व झोपडपट्टीवासियांना धारावीतच घरे देण्याचे आश्वासन राज्य सरकार अजूनही देत नाही. धारावीतील झोपड्या एसआरए अदानी कंपनी मोठ्या प्रमाणात अपात्र करीत आहे, या प्रमुख मुद्द्यांकडे राज्य शासन, एसआरए व अदानी कंपनीचे लक्ष वेधण्यासाठी 'धारावी बचाव आंदोलन' या संघटनेतर्फे येत्या 5 एप्रिल नंतर व्यापक आंदोलन धारावीत सुरु करण्यात येणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी धारावी बचाव आंदोलनचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एक महत्वाची बैठक बुधवारी सायंकाळी धारावीत झाली. या बैठकीत अदानी कंपनी आणि राज्य सरकार विरोधात काढण्यात येणारे मोर्चे, करण्यात येणारी निदर्शने ,रास्ता रोको, जनसभा आयोजित करण्याबाबतचे वेळापत्रक निश्चितीबाबत चर्चा झाली. या बैठकीस 200 कार्यकर्ते उपस्थित होते. आता आगामी धडक, व्यापक आंदोलनाची रणनिती ठरविण्यासाठी आणखी एक बैठक 5 एप्रिल रोजी धारावीत होणार आहे. या बैठकीनंतर आंदोलनाचा धडाका सुरु होणार आहे. हुसकावून लावण्यासाठी अपात्र करण्याचा धडाका धारावी झोपडपट्टीवासियांना 500 चौ.फू.ची घरे देण्याची आमची मागणी ही पहिल्यापासूनच आहे. तसेच कोणालाही अपात्र न करता सर्व सव्वा लाख झोपडपट्टीवासियांचे धारावीतच पुनर्वसन करावे हीही मागणी सुरवाती पासूनची आहे. तसेच झोपडपट्टीवासियांच्या सर्व्हेक्षणाच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. यात 100 झोपड्यांमागे 15/20 झोपड्या पात्र बाकीच्या 8085 झोपड्या अपात्र... हे असे येथील झोपडपट्टीवासियांच्या संतापाचे कारण आहे. येथील झोपडपट्टीवासियांना हुसकावून लावण्यासाठी लोकांना मोठ्या प्रमाणात अपात्र केले जात आहे असा आरोप धारावी बचाव आंदोलनचे नेते माजी आमदार बाबुराव माने यांनी केला आहे. सरकार हे झोपडपट्टीवासियांच्या मदतीसाठी आहे की अदानीच्या मदतीसाठी आहे असा प्रश्न सध्या येथील लोकांना पडलेला आहे. लोकांच्या मनातील या असंतोषाला मोकळी वाट करुन देण्यासाठी धारावीत 5 एप्रिलनंतर धरणे, मोर्चे, निदर्शने करण्यात येणार आहेत, असेही बाबुराव माने यांनी सांगितले. दरम्यान हे आगामी आंदोलन यशस्वी करण्यासाठी धारावी बचाव आंदोलन चे कार्यकर्ते पदाधिकारी हे कामाला लागलेले आहेत. हे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नगरसेवक जोसेफ कोळी, टी.एम.जगदीश, दीपक काळे व नगरसेविका अर्चना शिंदे यांची भेट घेतली तेंव्हा या स्थानिक नगरसेवकांनीही या आगामी आंदोलनास पाठिंबा दिला असून तेही या आंदोलनात उतरणार असून तसे त्यांनी आश्वासन धारावी बचाव आंदोलनला दिलेले आहे. याच बरोबर या आंदोलनात खासदार अनिल देसाई, खासदार वर्षा गायकवाड, आमदार महेश सावंत, आमदार ज्योती गायकवाड हेही आपला सक्रिय सहभाग नोंदविणार असल्याचे धारावी बचाव आंदोलनने म्हटले आहे. धारावी बचाव आंदोलनचे हे आगामी व्यापक आंदोलन अधिक यशस्वी करण्याच्या सूचना आमदार महेश सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. त्यांनी हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे. खासदार, आमदार, नगरसेवक या आंदोलनात उतरणार असल्याने धारावी बचाव आंदोलनचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा उत्साह हा दुणावलेला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन धारावीतील झोपडपट्टीवासियांना धारावीतच प्रत्येकी 500 चौ.फू.चे घर द्या, लोकांना अपात्र करण्याचा खेळ थांबवा, धारावीत छोट्या उद्योगांसाठी स्वतंत्र उद्योग क्षेत्र तयार करा, कुंभार बांधव, कोळी बांधव, गणेश मूर्तिकार यासारख्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाया प्रमाणे जागा देण्यात याव्यात आदी मागण्या धारावी बचाव आंदोलन च्या आहेत. या मागण्यांची पूर्तता लेखी स्वरुपात जो पर्यत अदानी कंपनी - राज्य सरकार करीत नाही तो पर्यंत आमचे हे आंदोलन चालू राहील, असा इशारा बाबुराव माने यांनी दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर मनपाचा 22 कोटींचा वेतन घोटाळा!:एमआयएम आक्रमक, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी 3 कंत्राटदार कंपन्याना तब्बल 22 कोटी 42 लाख रुपयांचे जादा दिल्याचा (अतिप्रदान) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. विशेष म्हणजे, ठेकेदाराचे बिल मंजूर होण्यापूर्वी फाइल मनपाच्या विविध 8 विभागांतील टेबलांवर तपासली जाते. लेखा विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतरच धनादेश निघतो. तरीही अनेक महिने डोळे झाकून कंत्राटदाराची बिले मंजूर होत गेली. या प्रकरणातील तांत्रिक घोळ महागाई भत्ता (डीए) वाढीमध्ये आहे. डीए हा मूळ वेतनावर देणे अपेक्षित आहे. मात्र, तसे न होता पूर्ण वेतनावरच डीए देण्याचा हिशेव करण्यात आला. त्यानंतर ही रक्कम कंत्राटी एजन्सींना दिली. 2024-25 मध्ये वर्षभरात दोनदा डीए वाढवण्यात येतो. दोन्ही वेळा अशाच प्रकारे पगार वाढण्यात आली. मात्र, ही बाब कुणाचाही लक्षात आली नाही. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणात अतिप्रदान रक्कम कशी गेली, याबाबत कुठलीही चौकशीदेखील केली नाही. तीन कंपन्यापैकी महाराणा एजन्सीचे काम पीएफ आणि ईएसआयसीची रक्कम नियमित भरत नाही, असे कारण दाखवून थांबवण्यात आले. या कंपनीतील दोन हजार कर्मचारी हे गॅलेक्सी आणि अशोका एंटरप्रायेझेस या एजन्सीकडे वर्ग करण्यात आले. आता याच मुद्द्यावरून एमआयएमच्या नगरसेवकांनी 22 कोटी कुठे गेले? असा सवाल उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले आहे. यामुळे झालेल्या गोंधळामुळे महापौरांना जनरल बॉडी तहकूब करावी लागली. त्यानंतर महापालिकेचे विरोधी पक्षनेते समीर बिल्डर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एमआयएमचे समीर बिल्डर म्हणाले, गुन्हा दाखल करून 22 कोटी परत घेण्यात यावे. याचसोबत लेखा विभागाचे ज्या अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत त्या अधिकाऱ्यांमुळेच तुमचे आणि आमचे टॅक्सचे पैसे भ्रष्टाचारात गेले. पुढे ते म्हणाले, जोपर्यंत आता कारवाई होत नाही, लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांवर सक्तीची कारवाई होत नाही, तसेच महाराणा एजन्सीला ब्लॅक लिस्ट करण्यात यावे, या कारवाई होत नाहीत तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक जीबीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
पुण्यातील ऐतिहासिक एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या अस्तित्वावर सध्या संकट निर्माण झाले आहे. शासनाच्या प्रस्तावित निर्णयामुळे या उद्यानाची सुमारे एक एकर जागा न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे, ज्याला पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध होत आहे. दि ॲग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत गेल्या १३४ वर्षांपासून हे उद्यान जपले जात असून, संस्थेचे अध्यक्ष प्रताप पवार आणि सचिव सुरेश पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सचिव सुरेश पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गार्डनमधील सुमारे एक एकर जागा न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव शासनाकडून पुढे रेटला जात आहे. या निर्णयाला संस्थेने तीव्र विरोध दर्शवला असून, विविध स्तरांवर आंदोलने आणि निवेदने देऊन निषेध नोंदवला आहे. संस्थेच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून शासन दडपशाहीचा मार्ग अवलंबत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संस्थेच्या म्हणण्यानुसार, संबंधित जागेवर ‘जैवविविधता उद्यान’ उभारण्याची योजना आहे आणि त्यासाठी आधीच शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ही जागा बांधकामासाठी वापरल्यास येथील परिसंस्था धोक्यात येऊन जैवविविधतेचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. शहरातील महत्त्वाचा ‘ग्रीन झोन’ नष्ट झाल्यास पुण्याच्या पर्यावरणावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे, १८९२ पासून या उद्यानाच्या देखभालीसाठी शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही. तरीही संस्थेने लोकसहभागातून हे ठिकाण जपले आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली या ऐतिहासिक वारशावर गदा आणू नये, अशी मागणी संस्थेकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, पुणेकरांनी आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्र येऊन या लढ्यात सहभागी व्हावे आणि शहराच्या ‘फुफ्फुसां’चे संरक्षण करावे, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
शिक्षण व्यवस्था अधिक समावेशक, न्याय्य आणि प्रभावी करण्यासाठी नागरिक सोशल फाउंडेशनने राईट टू एज्युकेशन (RTE) ॲक्ट, २००९ मध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने अनुदान, अंतर निकष आणि अल्पसंख्याक संस्थांना सध्या दिलेली सूट रद्द करण्याच्या मागण्यांचा समावेश आहे. नागरिक सोशल फाउंडेशनचे सीए सर्वेश मेहेंदळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी संस्थेचे संचालक प्रीतम थोरवे आणि अमेय सप्रे उपस्थित होते. भारतीय संविधानातील कलम २१ए नुसार, ६ ते १४ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत व सक्तीचे शिक्षण देणे ही राज्याची जबाबदारी आहे. शिक्षण हा मूलभूत हक्क सर्वांना समानतेने मिळावा, अशी संस्थेची भूमिका असल्याचे सीए सर्वेश मेहेंदळे यांनी सांगितले. शिक्षण हा मूलभूत हक्क असल्याने, आरटीई कायदा कोणत्याही अपवादाशिवाय सर्व शैक्षणिक संस्थांवर, अल्पसंख्याक संस्थांसह, समानपणे लागू करावा, अशी प्रमुख मागणी फाउंडेशनने केली आहे. धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळांना सध्या दिलेली सूट (कलम १(५)) रद्द करून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत एकसमान आणि न्याय्य धोरण लागू करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. आरटीई अंतर्गत शाळांना दिले जाणारे अनुदान वेळेत न मिळाल्यास, थकीत रकमेवर व्याजासह पेमेंट करण्याची स्पष्ट कायदेशीर तरतूद करण्याची मागणीही करण्यात आली. सध्याचा १ किमी/३ किमी अंतर निकष शहरांच्या वाढत्या लोकसंख्येनुसार अपुरा ठरत आहे. त्यामुळे, A+, A, B, C, D ग्रेडिंग प्रणालीवर आधारित नवीन निकष तयार करून ग्रामीण व शहरी भागांसाठी स्वतंत्र नियम निश्चित करावेत, असे फाउंडेशनने सुचवले आहे. समाजातील सर्व घटकांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन नागरिक सोशल फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
बीएड सीईटी परीक्षा पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सर्व्हरमधील बिघाडामुळे ही परीक्षा दोन दिवसांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता ही परीक्षा २८ किंवा २९ रोजी होणार आहे. परीक्षेची सुधारित तारीख आणि नवीन प्रवेशपत्र डाउनलोड करण्याबाबतची माहिती लवकरच नोंदणीकृत ईमेल आणि मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे कळवली जाईल, असे कक्षाने स्पष्ट केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. नागपूर येथील वैनगंगा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, डोंगरगाव येथे ३०० विद्यार्थी दुपारी ३ ते ४.३० या वेळेतील पेपर देण्यासाठी पोहोचले होते. विद्यार्थ्यांना दुपारी २ वाजता परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्यास सांगितले होते, मात्र दुपारी ३.३० वाजेपर्यंतही पेपर सुरू झाला नव्हता. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी संगणक उपलब्ध नव्हते, तसेच नेटवर्कचीही समस्या होती. एमएच सीईटी परीक्षा घेण्याचे कंत्राट अॅसेस इन्फ्रा या कंपनीला देण्यात आले आहे. त्यांनी इड्यूस्पार्क या कंपनीला परीक्षा केंद्रांवर सॉफ्टवेअर चालवणे आणि परीक्षा घेण्याचे उपकंत्राट दिले आहे. महाविद्यालयाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, परीक्षा घेण्यासाठी लागणारा सर्व्हर इड्यूस्पार्क स्वतः आणते. महाविद्यालयाचे काम केवळ संगणक आणि बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणे हे असते. महाविद्यालयाने ३ ते ४ दिवस आधीच सर्व बैठक व्यवस्था आणि संगणक इड्यूस्पार्कच्या इंजिनिअर्सना दिले होते. त्यांनी परीक्षेपूर्वी सर्व संगणक व्यवस्थित सुरू असल्याची खात्री केली होती. मात्र, परीक्षेच्या अगदी अर्धा तास आधी इड्यूस्पार्कच्या इंजिनिअर्सना त्यांच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण असल्याचे लक्षात आले, असे महाविद्यालयाने सांगितले.
हवामानातील बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी 22 हजार रुपयांची मदत म्हणजे बागायतदारांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याची घणाघाती टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. नैसर्गिक संकटामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही तुटपुंजी मदत अपुरी असल्याचे सांगत जाधव यांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील आंबा बागायतदारांसाठी जाहीर केलेली हेक्टरी 22 हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असून, सरकारने या निर्णयाचा तातडीने फेरविचार करावा, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली आहे. कोकणाने तुम्हाला नेहमीच राजकीय पाठबळ दिले आहे, याची जाणीव ठेवा, असे सुनावत जाधव यांनी या मदतीचा तीव्र निषेध नोंदवला असून, सरकारविरोधात एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी आंबा बागायतदारांना केले आहे. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, वातावरणातील बदलामुळे आंबा आणि काजूला कमी प्रमाणात फळधारणा झाली आहे. क्षेत्रीय पातळीवर झालेल्या नुकसानीचा अहवाल मागवला असून सकृतदर्शनी फळबागांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. कोकणात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात 1 लाख 24 हजार हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली आहे. तर काजू पिकाखाली 1 लाख 75 हजार 140 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. मागील वेळी आपण आंबा आणि काजू उत्पादकांना 15 हजार हेक्टरी मदत दिली होती, यावेळी ती हेक्टरी 22 हजार रुपये केली आहे. अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील आंबा व काजू बागायतदारांसह धान उत्पादकांनाही बोनस देण्याची घोषणा केली असून, त्यासाठीची आवश्यक कार्यपद्धती सध्या निश्चित केली जात आहे. हवामानातील बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
सेना ८०० किमी रेंजची ब्रम्होस क्रूझ-क्षेपणास्त्र खरेदी करणार
नवी दिल्ली : भारतीय सेना ८०० किमीपेक्षा जास्त पल्ल्याची ब्रम्होस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या तयारीत आहे. सध्या सैन्याकडे ४५० किमी पर्यंत मारक क्षमता असलेले ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे. संरक्षण अधिका-यांनी सांगितले की, सेना या नवीन आवृत्तीची मोठी ऑर्डर देण्याची योजना आखत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळू शकते. मे २०२५ मध्ये […] The post सेना ८०० किमी रेंजची ब्रम्होस क्रूझ-क्षेपणास्त्र खरेदी करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराणच्या मदतीच्या नावावर बनावट मदत
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये इराणमधील युद्धग्रस्तांच्या मदतीच्या नावाखाली फसवणूक करणा-या बनावट चॅरिटी नेटवर्कचा खुलासा झाला आहे. इराणी दूतावासाने १४ मार्च रोजी युद्धबाधितांच्या मदतीसाठी निधीचे आवाहन केले होते. या नावाखाली घाटीमध्ये सुमारे १७.९१ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह सोने, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू गोळा करण्यात आल्या. मात्र, हा पैसा गरजूंपर्यंत पोहोचला नाही. या रकमेचा मोठा हिस्सा […] The post इराणच्या मदतीच्या नावावर बनावट मदत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जुन्नर-आंबेगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) गोविंद पंढरीनाथ शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी मंचर येथे रंगेहाथ पकडले. एका बांधकाम व्यावसायिकाकडून इमारत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्रांताधिकारी शिंदे यांनी एका इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडे तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती दोन लाख रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत ४८ वर्षीय तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदार हे एका भागीदारी फर्मचे भागीदार असून, त्यांच्या फर्मने पुणे-नाशिक महामार्गालगत नारायणगाव येथे एका प्लॉटवर इमारतीचे बांधकाम केले होते. इमारतीचे ९० टक्के काम पूर्ण झाल्यावर तक्रारदारांनी अंशतः पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. हा प्रस्ताव नगररचना विभागाकडे पाठवून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त केल्यानंतर प्रांताधिकारी शिंदे यांनी तो स्वतःकडे राखून ठेवला होता. तक्रारदार चौकशीसाठी गेले असता, शिंदे यांनी अंशतः पूर्णत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर एसीबीने मंचर येथे सापळा रचला आणि गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी ही माहिती दिली.
मोदी आणि मी कामे मार्गी लावतोच
वॉशिंग्टन : अमेरिकेचे निवृत्त कर्नल डग्लस मॅकग्रेगर यांनी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हटले की, पंतप्रधान मोदी युद्धविरामात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अमेरिकेच्या माजी लष्कर अधिका-याने मोदींवर विश्वास व्यक्त करताच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पंतप्रधान मोदी आणि मी असे व्यक्ती आहोत, जी कामे मार्गी लावतातच असे उद्गार ट्रम्प यांनी काढले […] The post मोदी आणि मी कामे मार्गी लावतोच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बालेन शाह बनले नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान
काठमांडू : नेपाळच्या राजकारणात आज एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात झाली. प्रसिद्ध रॅपर तथा इंजिनीअर बालेन शाह यांनी शुक्रवारी नेपाळच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ते वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान झाले आहेत. विशेष म्हणजे, मदेश क्षेत्रातून या सर्वोच्च पदावर पोहोचणारे ते पहिलेच लोकप्रतिनिधी आहेत. राष्ट्रपती राम चंद्र पौडेल यांच्या उपस्थितीत शीतल निवास येथे […] The post बालेन शाह बनले नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राहुल यांच्यात कार्यकर्त्यांसारखी समज
तिरुवनंतपुरम : केरळच्या मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींच्या आकलनशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर, काँग्रेस पक्षाने यावर तीव्र आक्षेप नोंदवला. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी असे प्रतिपादन केले की, राहुल गांधींची आकलनशक्ती एखाद्या सामान्य पक्षकार्यकर्त्याइतकीच असणे ही खरे तर एक सकारात्मक बाब आहे. कारण पक्षकार्यकर्ता हा जमिनीवरील वास्तवाशी खोलवर जोडलेला असतो. आम्हाला याचा अभिमान वाटतो असे त्यांनी नमूद केले. […] The post राहुल यांच्यात कार्यकर्त्यांसारखी समज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अंधश्रद्धा वाढणे हे सरकारचे अपयश:काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचा शासनावर गंभीर आरोप
काँग्रेसचे वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी राज्यात वाढत्या अंधश्रद्धेवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. पुणे येथील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, अंधश्रद्धा वाढणे हे शासनकर्त्यांचे अपयश असल्याचे ते म्हणाले. शासन व्यवस्थेचा अंकुश कमी झाल्यामुळेच भोंदूगिरीचे प्रस्थ वाढले असल्याचा आरोपही त्यांनी केला. तिवारी म्हणाले की, मानवी वर्तनात तर्कशक्तीचा अभाव असल्यास भीती निर्माण होते. याचा गैरफायदा घेत निष्पाप लोकांवर, विशेषतः महिलांवर अंधश्रद्धेच्या नावाखाली अत्याचार केले जातात. अशा घटना रोखणे हे सरकारचे कर्तव्य असताना, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात काँग्रेस सरकारने जादूटोणा व अंधश्रद्धा विरोधी कायदा आणला होता. मात्र, सध्याचे सरकार या कायद्याचा प्रचार, प्रसार आणि जनजागृती करण्यात अपयशी ठरले आहे, असे तिवारी यांनी नमूद केले. सरकारी यंत्रणेवरील लोकांचा विश्वास कमी झाल्यामुळेच नागरिक आपल्या समस्यांच्या निराकरणासाठी भोंदू बाबांकडे वळत असल्याचेही ते म्हणाले. भोंदूगिरीच्या घटनांवर प्रशासन आणि पोलिस यंत्रणा वेळेत कारवाई करत नाहीत, अशी टीका तिवारी यांनी केली. काही प्रकरणांमध्ये तर माध्यमांवरच दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे अशा प्रवृत्तींना अप्रत्यक्षपणे राजकीय पाठबळ मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची आणि विवेकवादी विचारांची जपणूक करण्याची गरज तिवारी यांनी व्यक्त केली. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांनुसार वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि सुधारणा यांची जोपासना करणे आवश्यक आहे. अंधश्रद्धा नव्हे, तर वैज्ञानिक विचारांनीच समाजातील समस्या सोडवता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीरामनवमी मिरवणुकीतील वादातून तरुणावर शस्त्राने हल्ला:पुण्यात टोळक्याकडून हल्ला, तिघांना अटक
पुण्यात श्रीरामनवमी मिरवणुकीतील वादातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. हडपसर रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेत मुंढवा पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अक्षय आनंद गवळी (वय ३०, रा. कात्रज) असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अक्षय रिक्षाचालक आहे. त्याचा भाऊ अजिंक्य आनंद गवळी (वय २७, रा. शक्तीनगर, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांनी याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी काशीराम मोघे (वय ३०), अभिषेक मोघे (वय २७) आणि नंदू नवनाथ थोरात (वय २९, तिघे रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या इतर साथीदारांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजिंक्य गवळी यांचा मोठा भाऊ अक्षय हा श्रीरामनवमीच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी कात्रजहून आला होता. गुरुवारी (२६ मार्च) एका संघटनेने घोरपडी गाव परिसरातून मिरवणूक काढली होती. मिरवणुकीत कार्यकर्त्यांची छायाचित्रे किंवा नावाचा वापर न करण्याचे ठरले होते, मात्र काशीराम मोघे याचा फलक लावण्यात आला होता. यावरून कार्यकर्त्यांच्या दोन गटांत वाद झाला होता. अक्षयने मिरवणुकीत फलक लावण्यास विरोध केला होता. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी नंदू थोरात याने अक्षयला शिवीगाळ करत 'तुला माज आला का?' अशी विचारणा केली. अक्षयला मारहाणही करण्यात आली. त्यावेळी मिरवणुकीतील इतर कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मिरवणूक संपल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास अक्षय आणि त्याचा मित्र अमित परदेशी हे मांजरीतील झेड कॉर्नर येथे निघाले होते. मुंढव्यातील ताडीगुत्ता चौकात आरोपी काशीराम मोघे आणि नंदू थोरात यांनी अक्षयला पाहिले. त्यांनी पुन्हा अक्षयला शिवीगाळ केली. हडपसर रेल्वे स्थानक परिसरातील जाधव वस्तीत रात्री अकराच्या सुमारास आरोपींनी अक्षयला अडवले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्याच्यासोबत असलेल्या मित्रालाही मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या अक्षयला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पसार झालेल्या इतर आरोपींचा शोध सुरू केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथे महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे. कामाचा ताण कमी करण्यासाठी क्रीडा आणि कलागुणांची जोपासना करणे आवश्यक आहे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना केले. त्यांनी सर्वांना स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. विभागीय क्रीडा संकुलात या स्पर्धांचा प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, अपर आयुक्त रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, संगीता सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, संतोष गोरड, अरुण जऱ्हाड, नीलम बाफना यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दैनंदिन जीवनात खिलाडूवृत्तीचे महत्त्व अधोरेखित केले. अशा स्पर्धांमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि निरोगी स्पर्धा वाढते, असे ते म्हणाले. आयुष्यात क्रीडा आणि सांस्कृतिक गुणांची जोपासना आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त पापळकर यांनी कर्मचाऱ्यांना त्यांच्यातील गुणांचा विकास करण्यासाठी खेळण्याचे आवाहन केले. छत्रपती संभाजीनगर विभागाला राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवण्याच्या जिद्दीने खेळण्याचे प्रोत्साहन त्यांनी दिले. तणावमुक्त जीवनासाठी क्रीडांगणावर सराव करून घाम गाळणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केले. या स्पर्धांमधील विजेते खेळाडू आणि संघ विभागीय क्रीडा स्पर्धांसाठी निवडले जातील. परभणी येथे ३ ते ५ एप्रिल दरम्यान या विभागीय क्रीडा स्पर्धा होणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथील मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी येथे विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची भीती दूर करण्यासाठी आणि सोप्या पद्धतीने संवाद साधता यावा यासाठी इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू करण्यात आला आहे. मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली, फिनिक्स इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे संचालक ॲड. मोहन कोरडे यांनी हा विशेष कोर्स सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मनपा शिक्षण अधिकारी भारत तीनगोटे यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी प्रास्ताविक करून स्पीकिंग कोर्सचे महत्त्व स्पष्ट केले. शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका मनीषा नगरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ॲड. मोहन कोरडे यांनी स्वतः मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील उदाहरणे देऊन इंग्रजी भाषेची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इंग्रजीतील वर्तमान काळाच्या संकल्पनेवर हसत-खेळत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांकडून प्राथमिक चाचणी सोडवून घेण्यात आली. सहावी ते नववीचे विद्यार्थी आणि सर्व वर्गशिक्षक या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. हे प्रशिक्षण तीन दिवस चालणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली गुळवे यांनी केले. तेजस्विनी देसले, प्रकाश इंगळे, संगीता चौधरी, सूर्यमाला जाधवर, किरण पवार, रेखा माचेवार, हर्ष नरवडे, सचिन लवेरा आणि काकासाहेब जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने गेल्या सव्वा वर्षापासून केवळ आमदार म्हणून कार्यरत असलेल्या धनंजय मुंडे यांनी अखेर आपल्या मनातील खंत जाहीरपणे बोलून दाखवली आहे. भायाळा येथील नारळी सप्ताहात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी 'जन्मापासूनच माझ्या पाठीशी संघर्ष आहे' असे सांगत, मंत्रिपद नसल्याची खंत व्यक्त केली. गेल्या सव्वा वर्षात अनेक सार्वजनिक कार्यक्रम आणि भाषणे टाळणाऱ्या धनंजय मुंडेंनी, 'माझ्या गप्प राहण्यातच जर एवढी ताकद असेल, तर बोलल्यानंतर काय होईल?' असा सूचक इशाराही यावेळी दिला, ज्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. जन्माला आलो 4 महीने डोळेच उघडले नाहीत यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, धार्मिक व्यासपीठावरून मी बोलणार नव्हतो, पण महंतांनी आदेश दिल्यानंतर पाळावा लागतो म्हणून मी बोलतो. पुढे ते म्हणाले, अनेक जणांनी माझ्या गेल्या सव्वा-दीड वर्षांपासून आलेल्या संकटांच्या बाबतीत आज आठवण काढली. धोंडे साहेब आणि आपल्या सगळ्यांना मी सांगतोय, जसे जन्माला आलो तसे माझ्या पंथी संघर्ष आहे. जन्माला आलो 4 महीने डोळेच उघडले नाहीत. जन्मतःच लिव्हरचा त्रास, कसा वाचलो देव जाणे. अनेकदा संकट आले, पण तुमच्या आशीर्वादाने वेळ कधीच आली नाही. गप्पा राहण्यातच एवढी ताकद आहे, तर बोलल्यानंतर काय होईल? पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, बोलणाऱ्यांना बोलू द्या, कोणी कितीही बोलले तरी मी सव्वा वर्ष गप्प राहिलो, अजिबात बोललो नाही. कारण, आपल्या गप्पा राहण्यातच एवढी ताकद आहे, तर बोलल्यानंतर काय होईल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, मी रथावर बसावे म्हणून एवढा आग्रह सगळ्यांचा होता, गाडीच्या आडवा झाला कार्यकर्ता. पण याला कसे सांगावे. अरे रथावर घोड्याच्या बसावे लागते, मोराच्या नाही. उदाहरण कर्णाचे दिले पण माझे नाव अर्जुनाच्या एका नावातले धनंजय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरू देणार नाही- पंकजा मुंडे यावेळी कार्यक्रमाला मंत्री पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी भावनिक भाषण केले. त्या म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे हे नाव जगाला विसरू देणार नाही, ही शपथ मी चितेवर खाल्ली आहे. गोपीनाथ मुंडे या नावाच्या संस्कारावर किती विश्वास आहे. माझ्या कातड्याचे जोडे केले आणि तुमच्या पायात घातले तरी ही फेड होणार नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
आईच्या उपचारासाठी पाठवले जाणारे 80 हजार रुपये चुकून दुसऱ्या फोन पे वर गेल्यानंतर हिंगोलीच्या सायबर सेलने तातडीने कारवाई करत 80 हजार रुपये परत मिळवून दिली आहेतअकोला जिल्हयातील जांब येथील अशोक सूर्यभान लठाड हे हिंगोली येथे कामाच्या निमित्ताने आले होते. त्यांनी त्यांच्या आईच्या उपचारांसाठी वर्धा येथी आपल्या भावाच्या फोन पे नंबर वर 80 हजार रुपये पाठवले. परंतु फोन पे मोबाईल नंबरचा एक नंबर चुकल्यामुळे सदरचे 80 हजार हे ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर परिसरातील एका महिलेच्या अकाउंट वर गेले. सदरची चूक कळल्यानंतर अशोक लठाड यांनी सदर महिलेशी संपर्क साधला. पण सदर महिलेने मोबाईल नंबर स्विच ऑफ करून कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर अशोक लठाड यांनी सायबर सेल हिंगोली येथे येऊन घटनाक्रम सांगितला. त्यांची अडचण लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे जमादार प्रदीप झुंगरे, मारुती काकडे, दत्ता नागरे, प्रणिता मोरे यांनी तातडीने माहिती घेण्यास सुरुवात केली या पथकाने सदर मोबाईलचे डिटेल्स घेतले असता सदरची महिलाही ठाणे जिल्ह्यातील कल्याण उल्हासनगर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. सायबर सेल हिंगोलीने तत्काळ कल्याण तालुका पोलिस स्टेशन येथे संपर्क साधून सपोनि दत्तात्रय नलावडे कल्याण तालुका पोलीस स्टेशन यांच्यामार्फत उल्हासनगर येथील सदर महिलेचा पत्ता मिळवला. तसेच चुकून गेलेले 80 हजार रुपये तात्काळ परत करा, अन्यथा कायदेशीर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याबाबत बजावले. त्यानंतर सदर महिलेच्या नातेवाईकांनी तक्रारदार अशोक लठाड यांचे 80 हजार रुपये तात्काळ परत केले. त्यानंतर लठाड यांनी आईच्या उपचारासाठी पैसे भरले. आईच्या हॉस्पिटलच्या कामासाठी पाठवलेले पैसे अचानक दुसऱ्या अकाउंट वर गेले व ज्यांच्या अकाउंट वर गेले त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने अशोक लठाड यांच्यासमोर आईच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु सायबर सेलच्या मदतीने तक्रारदार यांचे पैसे तात्काळ परत मिळून दिल्याने तक्रारदार अशोक लठाड यांनी हिंगोली पोलिसांचे आभार मानले.
राज्याचे दिवंगत नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला जवळपास दोन महीने पूर्ण झाले आहेत. मात्र, अद्यापही या घटनेचा तपास सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे प्रकरणाच्या चौकशीसाठी अनेकांच्या भेटी घेत आहेत. तसेच कर्नाटकमध्ये जाऊन त्यांना एफआयआर निंदवावा लागला आहे. आता संसदेत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अपघाताच्या चौकशीचा मुद्दा उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे यांनी झीरो अवरमध्ये अजित पवारांच्या अपघाताचा विषय मांडला. याबाबत रोहित पवारांनी ट्विट करत माहिती दिली आहे. ते म्हणाले, अजितदादांना न्याय मिळावा यासाठी आज खासदार सुप्रियाताई यांनी झीरो अवरमध्ये अत्यंत तळमळीने आणि प्रभावी शैलीत संसदेत या विषयांची मांडणी करून अजितदादांना न्याय देण्याची मागणी सरकारकडे केली. सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती पवारांनी केली आहे. सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? संसदेत झीरो अवरमध्ये बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या भावाला जाऊन आज दोन महीने पूर्ण झाले. 28 जानेवारी रोजी माझ्या भावाचे विमान क्रॅश झाले होते. दोन महीने झाले या गोष्टीला. एखाद्या घरातला कर्ता पुरुष जातो न त्याचे दुःख त्या कुटुंबालाच माहीत असते. आम्ही पण हे भोगले आहे. मग विमानात जाऊदे, रेल्वेमध्ये जाऊदे, सुरक्षितता ही अतिशय महत्त्वाची झाली आहे. सुरक्षितता कशासाठी? तर माझ्या भावाचे प्लेन क्रॅश झाले. दोन महीने झाले, माझ्या कुटुंबाला कुठे नये मिळाला? माझा भाऊ डेप्युटी चीफ मिनिस्टर होता महाराष्ट्राचा. त्याला जर न्याय मिळत नसेल, तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला. एक एफआयआर करायला एवढी अडचण? पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्या मोठ्या भावाचा मुलगा रोहित पवारला एक एफआयआर दाखल करायला जंग-जंग करावी लागली. आमच्या राज्याने तर महाराष्ट्रात घेतलाच नाही. पण अनेक राज्यांमध्ये जाऊन त्याने विणवण्या केल्या, की एफआयआर दाखल करा आणि आमच्या काकांना न्याय मिळू द्या. एक एफआयआर करायला एवढी अडचण? या देशाच्या एवढ्या मोठ्या डेप्युटी चीफ मिनिस्टरचा जेव्हा एवढा मोठा अपघात होतो आणि त्याचा एफआयआर होत नाही, तर सर्वसामान्य लोकांनी जायचे कुठे? एवढा मोठा अपघात झाल्यावर चौकशी व्हायला नको? सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार जेवढा माझा भाऊ होता, तेवढाच महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनामधला एक लाडका नेता होता. एवढ्या मोठ्या नेत्याचा एवढा मोठा अपघात झाल्यावर चौकशी व्हायला नको? माझी हात जोडून भारत सरकारला विनंती आहे की पारदर्शक चौकशी व्हावी. सगळ्याच अपघातांची, मग तो अहमदाबादचा क्रॅश असू दे, हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये बिपिन राऊत गेले ते असूदे, मध्ये एक एयर अॅम्ब्युलेन्स क्रॅश झाला झारखंडमध्ये किंवा अजित पवारांचे विमान पडलेले, न्याय हा समानच असला पाहिजे. सरकारने उत्तरे दिली पाहिजेत आधी आम्हाला सांगितले ब्लॅक बॉक्स मिळणार, आता सांगितले खराब झाला. रोहित पवारांच्या प्रयत्नांवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केले. माझी त्यांनाही विनंती आहे की टाइम बाउंड मॅनरमध्ये ही चौकशी झाली पाहिजे. अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत. आणि अजित पवारांना जी केस झाली, त्या विमानातील पायलट असतील तसेच जे लोक त्या विमानात होते, प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा ही भारत सरकारकडे विनम्र मागणी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्रच्या सातारा जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा उत्साहात संपन्न झाला. सातारा पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचं आयोजन केलं जाणार आहे. या संमेलनाच्या तयारीच्या निमित्तानं साताऱ्यातील युवा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला सातारा जिल्ह्यातील विद्रोहीचे युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते. या कार्यकर्त्यांनी संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार केला. या मेळाव्यास महाराष्ट्रासह देश विदेशात चर्चेत असलेले दंगलकार नितीन चंदनशिवे, विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे मुख्य राष्ट्रीय समन्वयक डॉ. भारत पाटणकर, विद्रोही संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विजय मांडके, सरचिटणीस अॅड. राजेंद्र गलांडे, संघटक डॉ प्रशांत पन्हाळकर, उपाध्यक्ष मंगला साठे,डॉ.विजय माने, डॉ. आनंद साठे, प्रा. गौतम काटकर, प्रा.डॉ. भरत जाधव उपस्थित होते. प्रबोधन गीतांच्या सादरीकरणानं मेळावा सुरु अमित कांबळे, पूजा भिसे, आरुष कांबळे, आस्तिका आगाशे, ऋतुजा बैले यांनी प्रबोधनाच्या गाण्यांचं सादरीकरण केलं. दोन्ही सत्रात प्रबोधनाची गीतं सादर करण्यात आली. दंगलकार नितीन चंदनशिवे यांची काव्य मैफिल दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी निर्धार मेळाव्यात कवितांचं सादरीकरण केलं.या वेळी त्यांनी भारताचे नागरिक म्हणून आणि माणूस म्हणून सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. नितीन चंदनशिवे यांनी कवितेच्या माध्यमातून सध्या सुरु असलेल्या सामाजिक स्थितीवर परखड भाष्य केलं. साताऱ्याचं विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन महाराष्ट्राला नवा विचार देणारं ठरेल, असं ही त्यांनी म्हटलं. आरुष कांबळेंच्या पिगी बँकेचा निधी विद्रोही संमेलनाला विद्रोही साहित्य संमेलनाची आजवरची परंपरा लोकसहभागातून, कष्टकऱ्यांनी दिलेल्या पैशांच्या माध्यमातून एक मूठभर धान्य आणि एक रुपया या सूत्राद्वारे सुरु आहे. साताऱ्यात आयोजित केल्या जाणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या तयारीसाठी छोटे शाहीर आरुष कांबळे यांनी पिगी बँकेतील निधी देत केली. आरुषच्या या निर्णयाचं सर्वांकडून कौतुक करण्यात आलं. विद्रोही साहित्य संमेलनाच्या तयारीचा वेग वाढवू : डॉ. भारत पाटणकर विद्रोही साहित्य संस्कृती संमलेनाच्या तयारीच्या निमित्तानं झालेल्या चर्चेत हणमंत सावंत, शिवराम ठवरे, डॉ. प्रशांत पन्हाळकर, मयूर खराडे, पूजा भिसे, प्रियांका गडदे यांनी सहभाग घेतला. डॉ. भारत पाटणकर यांनी विद्रोहीच्या युवा कार्यकर्त्यांना संबोधित केलं. पंधरावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध मुद्यांवर त्यांनी मार्गदर्शन केलं. प्रतिसरकारच्या सातारा भूमीत होणारं संमेलन यशस्वी होण्यासाठी आता सुरु असलेल्या तयारीला आणखी वेगवान करुया, अशी भूमिका त्यांनी मांडली.
महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू कुटुंबांना हक्काचे घर देण्यासाठी फडणवीस सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून, याअंतर्गत 1 जानेवारी 2011 पर्यंत सरकारी जमिनीवर झालेली व सध्या अस्तित्वात असलेली अतिक्रमणे आता नियमानुकूल केली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. तसेच यासाठीची पात्रता आणि अंमलबजावणीची कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आली आहे. महसूल विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून, पात्र लाभार्थ्यांकडून 31 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत, ज्यामुळे हजारो कुटुंबांच्या डोक्यावर कायमस्वरूपी हक्काचे छप्पर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील हिंगणघाट फैल परिसरातील सुमारे 4,500 कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, येथील जुन्या सर्व्हे नंबर 369 मधील घरांना मालकी हक्क देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याची ग्वाही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली विधानसभेत दिली होती. ज्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला या कुटुंबांच्या घरांचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. विधानसभेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, 1 जानेवारी 2011 पूर्वी बांधण्यात आलेल्या घरांच्या नियमितीकरणासाठी राज्य शासन धोरणात्मक निर्णय घेत आहे. या अंतर्गत पुलगावमधील रहिवाशांना त्यांच्या घरांचे प्रॉपर्टी कार्ड, खासगी सनद आणि अधिकृत नोन अभिलेखित करून दिली जाईल. नगरपालिका, महानगरपालिका आणि ग्रामीण भागात यासाठी विशेष समित्या नेमून जुन्या चुकीच्या नोंदी रद्द केल्या जातील आणि सर्वसामान्यांना त्यांच्या घराचा अधिकृत मालकी हक्क मिळवून दिला जाईल, अशी माहिती बावनकुळे यांनी विधानसभेत बोलताना दिली होती.
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'गुडबुक'मध्ये राहिलेले धडाकेबाज आयएएस अधिकारी कुणाल कुमार यांनी आज अचानक प्रशासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. ते मार्च अखेरनंतर स्वेचा सेवानिवृत्त होतील. राज्य सरकारने तसे आदेशही काढलेत. कुणाल कुमार यांनी अचानक प्रशासकीय सेवा सोडण्याचा निर्णय का घेतला? याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. कुणाल कुमार हे 1999 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. ते सध्या राज्य सरकारच्या मुंबई स्थित शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 2014 ते 2018 या कालावधीत पुणे महापालिकेचे आयुक्त म्हणूनही काम केले आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात स्मार्ट सिटी मोहीम, 24 तास पाणी पुरवठा व डिजिटल उपक्रमांसह विविध अभिनव उपक्रम राबवले. त्यांनी पुण्यात सर्वाधिक काळ आयुक्त म्हणून काम पाहिले. यामुळे त्यांच्याकडे अजित पवारांच्या गुडबुकमधील अधिकारी म्हणून पाहिले गेले. विविध शहरांत जिल्हाधिकारी व आयुक्त म्हणून दिली सेवा कुणाल कुमार हे अत्यंत शिस्तप्रिय व कठोर निर्णय घेणारे आयएएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रात 1999 पासून कार्यरत असताना त्यांनी गडचिरोली, नागपूर, भंडारा, कोल्हापूर व जळगाव यासारख्या विविध शहरांत अनेक विभागांमध्ये सेवा बजावली. त्यांनी जळगाव, भंडारा व औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजीनगर) या शहरांमध्ये जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले. कुणाल कुमार यांच्याकडे भू-महसूल व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी नागपूर महापालिकेत तब्बल 2 वर्षे अतिरिक्त आयुक्त व कोल्हापूर महापालिकेत 3 वर्षे आयुक्त म्हणूनही काम केले. त्यामुळे त्यांना शहरी विकास व नगरपालिका प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे आज त्यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती घेण्याची घोषणा केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सरकारच्या आदेशानुसार, कुणाल कुमार भारतीय प्रशासन सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आहे. या मार्च अखेरनंतर ते आपल्या पदावरून पायऊतार होतील. राज्य सरकारने आजच तसे आदेश दिलेत.
‘वंदे भारत’प्रमाणे सर्व ट्रेनमध्ये सुरक्षा सूचना, माहिती द्या
मुंबई : वंदे भारत गाड्यांप्रमाणे सर्व लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये सार्वजनिक सुरक्षा सूचना (अनाऊन्समेंट) सुरू करण्याचा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेला दिला. गाडी कोणत्या रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे, याची माहिती देण्यात यावी, असेही न्यायालयाने म्हटले. प्रवाशांनी चालत्या गाडीत चढणे किंवा उतरणे टाळावे असे न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने निकालात म्हटले आहे. जवळपास १० वर्षांपूर्वी जळगाव रेल्वे […] The post ‘वंदे भारत’प्रमाणे सर्व ट्रेनमध्ये सुरक्षा सूचना, माहिती द्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आदिवासी कामगारांच्या वेतनासाठी निधी का नाही?
मुंबई : कुपोषणामुळे हाडाचे सांगाडे दिसणा-या, धड चालताही न येणा-यांना अन्न देण्यासाठी, रुग्णांना रक्त पुरविण्यासाठी आणि मनरेगावर अवलंबून असलेल्या आदिवासी कामगारांना एक दिवसाचे वेतन देण्यासाठी सरकारकडे निधी नाही. मात्र, घरी बसणा-यांना पैसे (लाडकी बहीण योजना) देण्यासाठी सरकारकडे निधी आहे. ही स्थिती गंभीर आहे, अशी उद्विग्नता मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केली. जे जगण्यासाठी लढत आहेत, […] The post आदिवासी कामगारांच्या वेतनासाठी निधी का नाही? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

32 C