SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

24    C
... ...View News by News Source

चांगला लोकांना पाठिंबा द्या

नाशिक : राज्यात २९ महानगर पालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. परवाच विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. या उमेदवारीची छाननी सुरु असतानाच अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता विविध आघाडी आणि युत्यांच्या गोंधळात प्रचाराला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे यांनी नाशिक येथे मोठे […] The post चांगला लोकांना पाठिंबा द्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Jan 2026 12:00 am

वेळ निघून गेल्यावर रडण्यापेक्षा आताच लढा!:मनोज जरांगे पाटलांचे नाशिकमधून समाजाला मोठे आवाहन, जरांगेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय समीकरणे वेगवान झाली आहेत. अशातच, विविध आघाड्या आणि युत्यांच्या पेचात प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होत असताना मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नाशिक येथे एक मोठे विधान केल्याने निवडणुकीच्या मैदानात नवी खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले, समाजासाठी राजकारण लोकांनी केले पाहिजे. आमचा चांगला सहकारी आहे. त्यांना चांगला पाठींबा द्या. समाजात चांगले काम करणारे टिकले पाहिजेत. समाजाने देखील त्यांना राजकारणात सहकार्य केले पाहिजे. माझ्या हातात मते नाही पण समाजाला मी आवाहन करू शकतो. आजचे व्यासपीठ राजकिय नव्हते. पण मी जे बोलायचे होते ते बोललो आहे. गायकर निवडणुकीला उभे आहेत हे माहिती नव्हते, माहिती असते तरी आधी आलो असतो. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे मी नेहमी उभा राहतो, असे जरांगे यांनी यावेळी सांगितले. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, समाजातील काम करणाऱ्या पोरांना सांभाळले पाहिजे, समाजाची लढाई लावून धरणाऱ्यांचा समाजाने सांभाळ केला पाहिजे. नंतर वेळ निघून गेल्यावर रडत बसण्यापेक्षा लढले पाहिजे. ज्यावेळी या राजकीय पटलावर समाजाचे पोरे उभे राहत असतील तर बळ दिले पाहिजे. मत माझ्या हातात नाही. पण समाजाला चांगला संदेश देतो आपल्या मुलांना बळ द्या मग क्षेत्र कोणते पण असेल. भाजपाच्या ट्रोलिंगनंतर माघार घेणाऱ्या भाजपा उमेदवार पूजा मोरे यांच्याविषयी विचारले असता मनोज जरांगे म्हणाले, मला आत्ताच समजले, माहिती नव्हते. त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर मग हे योग्य नाही. परतू त्यांच्या प्रकरणी माहिती अगोदर वक्तव्य करणे योग्य होणार नाही. तुमच्या माध्यमातून समजत आहे की त्यांच्यावर अन्याय झाला आहे. अशा प्रकारे जुने व्हिडिओ काढून ट्रोलिंग होत असेल हे चुकीचे आहे. पुढे मनोज जरांगे म्हणाले, सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यापद्धतीचे बोलावे लागते तरच न्याय मिळतो नाही तर न्याय मिळत नाही. आणि तुम्ही आता व्हिडिओ काढत असाल तर बाकीच्यांचे पण व्हिडिओ आहेत. यात माफी मागायचा संबंध नाही. माफी मागू पण नाही. हे राजकारण आहे याच्यात जो आपला बळी द्यायचा प्रयत्न करेल त्याचा बळी पण घेतला पाहिजे. आपण जातीने क्षत्रिय मराठा आहोत. जुने व्हिडिओ पसरवायचे आणि माघार घ्यायला लावायचे हे जर सत्य असेल तर त्याचे दुष्परिणाम त्यांना सुद्धा भोगावे लागतील. मी समाजाला पुन्हा सांगतो निवडणुकीत उभ्या असलेल्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पाठीमागे समाजाने उभं राहावे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 11:54 pm

‘एकदृष्टी’ महिला शेतकरी उत्पादक कंपनीची उभारणी

वलांडी : वार्ताहर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, त्यांना स्वावलंबी बनविता यावे यासाठी शासनामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत देवणी तालुक्यातील जवळगा येथे महिला शेतक-यांसाठी उत्पादनक्षम अशी एकदृष्टी महिला शेतकरी उत्पादक कंपनी’ उभारण्यात येत असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन मंगळवारी गटविकास अधिकारी सागर वरंडेकर यांच्या […] The post ‘एकदृष्टी’ महिला शेतकरी उत्पादक कंपनीची उभारणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 11:45 pm

चांदूर बाजार: १० हजार शेतकरी अतिवृष्टी निधीपासून वंचित.:लोक विकास संघटनेचे आमदारांच्या कार्यालयासमोर 'डफली बजाओ' आंदोलन

चांदूर बाजार तालुक्यातील १० हजार शेतकरी अतिवृष्टीच्या निधीपासून वंचित असल्याने संतप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर लोक विकास संघटनेच्या नेतृत्वाखाली आज, गुरुवारी आमदारांच्या कार्यालयासमोर 'डफली बजाओ' आंदोलन करण्यात आले. कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारी आणि भुईमूग उत्पादक शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने अतिवृष्टी जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेला अनेक महिने उलटूनही चांदूर बाजार तालुक्यातील दहा हजारांहून अधिक शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टीचा निधी मिळालेला नाही. लोक विकास संघटनेच्या मते, शासनाने सांगितलेल्या सर्व प्रक्रिया शेतकऱ्यांनी पूर्ण केल्या आहेत. केवायसी प्रक्रिया वारंवार पूर्ण करूनही, तसेच बँक खाते आणि कागदपत्रे अचूक असूनही, मंजूर निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांची कुचंबना सुरू आहे. या गंभीर प्रश्नावर लोक विकास संघटनेने तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, प्रशासनाकडून केवळ आश्वासनांपलीकडे काहीच मिळाले नाही. मंजूर अतिवृष्टीचा निधी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा स्पष्ट इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यापूर्वी सर्व उपाय संपल्यानंतर स्थानिक आमदार प्रवीण तायडे यांना खुले पत्र देऊन शेतकऱ्यांना मंजूर निधी मिळवून देण्याची विनंती करण्यात आली होती. या विनंतीनंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळेच आज लोक विकास संघटनेने आमदार प्रवीण तायडे यांच्या कार्यालयापुढे 'डफली बजाओ' आंदोलन करून त्यांना या जुन्याच मुद्द्याची आठवण करून दिली. या आंदोलनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल भालेराव यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 11:44 pm

आनंदवाडीकरांनी केला प्लास्टिक मुक्त गावचा संकल्प

निलंगा : प्रतिनिधी निटूरपासून जवळच आसलेल्या आनंदवाडी गौर तालुका निलंगा येथील ग्रामस्थांनी नवीन वर्षारंभानिमित्ता गाव प्लास्टीकमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. ‘नव्या युगाचा हा ध्यास हवा, प्लास्टिक बंदी संदेश नवा’ हा संकल्प करण्यात आला आहे. दि. १ जानेवारी २०२६ रोजी आनंदवाडी गौर तालुका निलंगा येथे मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत प्लास्टिक मुक्त गाव करण्याचा संकल्प करण्यात केला […] The post आनंदवाडीकरांनी केला प्लास्टिक मुक्त गावचा संकल्प appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 11:43 pm

साताऱ्यात साहित्याचा जागर:ध्वजारोहणाने 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखदार प्रारंभ!

ऐतिहासिक सातारा नगरीत 'स्वराज्यरक्षक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी' मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९ व्या संमेलनाचा आज मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत आणि राज्यगीताची धून सादर करत वातावरण चैतन्यमय केले. या सोहळ्याला संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर आणि नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संमेलनाच्या पहिल्याच दिवशी 'कवीकट्टा' आणि 'प्रकाशनकट्टा' यांचे उद्घाटन करण्यात आले. विशेष म्हणजे, यंदा कवीकट्ट्यासाठी महाराष्ट्रासह जपान आणि अबुधाबी येथूनही कविता आल्या आहेत. एकूण १७६२ कवितांपैकी ४५० कवितांची निवड करण्यात आली असून, पुढील २२ तास २२ सत्रांमध्ये हा कवीकट्टा अविरतपणे सुरू राहणार आहे. ज्येष्ठ उद्योजक भालचंद्र जोशी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले, तर गझलकट्ट्याचे उद्घाटन उद्योजक संदीप शहा यांच्या हस्ते पार पडले. ग्रंथप्रदर्शनाने फुंकले संमेलनाचे बिगुल संमेलनाचे मुख्य आकर्षण असलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते झाले. मुख्य सभामंडपाकडे जाणाऱ्या मार्गावर दुतर्फा असलेली प्रकाशन संस्थांची दालने यंदाच्या संमेलनाचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. याचवेळी प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते 'बालवाचक कट्टा' सुरू करण्यात आला, ज्याला शालेय विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. सांस्कृतिक वैविध्याची जोड संमेलन परिसरात ग.दि. माडगुळकर, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर यांसारख्या दिग्गज साहित्यिकांच्या कार्यकर्तृत्वाचे फलक लावण्यात आले असून ते उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच, सोलापूरचे ६८ वर्षीय फुलचंद नागटिळक यांनी संत गाडगेबाबांच्या वेशभूषेत उपस्थित राहून लोकपरंपरा आणि साहित्याचे नाते अधोरेखित केले. या सर्व उपक्रमांमुळे साताऱ्यातील साहित्यनगरी रसिक आणि वाचकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 11:42 pm

नवीन वर्षाचा पहिला दिवस २५० तुळस रोपे लावून साजरा

लातूर : प्रतिनिधी ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन सदस्यांनी दि. १ जानेवारी रोजी सकाळी आपल्या दैनदिन कार्याचा अखंड २४०७ वा दिवस पूर्ण केला. नवीन वर्षाच्या पहाटे एमआयडीसी परिसरातील राधाकृष्ण मंदिर परिसरात तुळस व स्वस्तिक फुलांची फुलझाडे लावून नव वर्ष साजरा केला. ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन सदस्यांनी रात्री उशिरा जागणे, पार्टी करणे अशा पद्धतीला फाटा देऊन पहाटे […] The post नवीन वर्षाचा पहिला दिवस २५० तुळस रोपे लावून साजरा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 11:39 pm

ईव्हीएम यंत्र चाचणी प्रक्रियेस मनपा आयुक्ताची भेट

लातूर : प्रतिनिधी मनपा निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी सुरु आहे. त्यासाठी सुरु असणा-या मतदान यंत्र प्रात्यक्षिकास मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी भेट दिली. निवडणुकीसाठी कर्मचा-यांना मतदान यंत्र हाताळनी व मार्गदर्शनासाठी ४२ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या उपस्थितीत यंत्राची चाचणी घेण्यात आली. महिला तंत्रनिकेतन येथे ही चाचणी घेण्यात आली. यावेळी आयुक्त श्रीमती मानसी यांनी सर्व […] The post ईव्हीएम यंत्र चाचणी प्रक्रियेस मनपा आयुक्ताची भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 11:38 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास मार्चपर्यंत मुदतवाढ

लातूर : प्रतिनिधी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात दर्जेदार पायाभूत सेवा सुविधा बरोबच भैतीक सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायती सतत प्रयत्न करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हयातील ७८७ ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राबवून ग्रामपंचायती बळकट करण्यासाठी पंचायत विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. सदर अभियानाचा कालावधी हा दि. ३१ डिसेंबर पर्यंतच होता. मात्र सध्या स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका […] The post मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास मार्चपर्यंत मुदतवाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 11:35 pm

एमपीएससीच्या कारभारावर विद्यार्थी आक्रमक

पुणे : राज्यात एकीकडे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी करणा-या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. पोलिस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याने आणि वयोमर्यादा वाढीसाठी पुण्यात स्पर्धा परीक्षा करणा-या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकत्र आल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला असून चोख […] The post एमपीएससीच्या कारभारावर विद्यार्थी आक्रमक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 11:35 pm

चिखलदरा: मरियमपूरमध्ये पर्यटन विकासाचे नवे उपक्रम:नगराध्यक्ष, नगरसेवकांकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची योजना, बुद्धांच्या मूर्तीचाही प्रस्ताव

विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा येथे पर्यटन विकासासाठी नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात आदिवासीबहुल मरियमपूर परिसराच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या विकास आराखड्यानुसार, मरियमपूरमध्ये महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. हा पुतळा केवळ एक स्मारक नसून चिखलदऱ्यासाठी एक प्रमुख पर्यटन आकर्षण ठरेल, अशी त्याची रचना केली जाईल. याशिवाय, तथागत भगवान गौतम बुद्धांची भव्य मूर्ती उभारण्याचा प्रस्तावही नगर परिषदेच्या विचाराधीन आहे. नगराध्यक्षांनी देवी पॉईंट येथील ऐतिहासिक मंदिराचे संवर्धन आणि विकासाची जबाबदारी पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला. यासाठी नगरसेवक रुपेश चौबे आणि शैलेंद्र पाल यांच्यासह इतर सदस्यांचे सहकार्य मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. चिखलदऱ्याचा विकास पर्यटनाच्या माध्यमातूनच साध्य होणार असल्याने प्रत्येक नगरसेवक यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्र आणि लगतच्या राज्यांमधून अनेक पर्यटक चिखलदऱ्याला भेट देत आहेत. भविष्यात परदेशी पर्यटकांनाही चिखलदऱ्याकडे आकर्षित करण्याची योजना आहे. या भागात पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक नैसर्गिक आणि भौगोलिक स्थळे असून, आवश्यक जागाही उपलब्ध आहे. यामुळे पर्यटन विकासाच्या अनेक योजना राबवता येतील, यासाठी विशेष नियोजन सुरू आहे. मरियमपूर हे सुमारे ५०० लोकसंख्या असलेले आदिवासीबहुल गाव आहे, ज्याची साक्षरता ५० टक्के आहे. हे जिल्ह्यापासून ८० किलोमीटर अंतरावर असून, एसटी बस किंवा खाजगी वाहनाने येथे पोहोचता येते. परदेशी पर्यटकांना चिखलदऱ्याकडे आकर्षित करण्याच्या नगरपालिकेच्या योजनेत मरियमपूर महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 10:40 pm

'वॉल ऑफ फेम'चे पहिले मानकरी ठरले डॉ. देशमुख, पवार, बारहाते:जिल्हा परिषदेच्या अभिनव उपक्रमाचे नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उद्घाटन

अमरावती जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सन्मानासाठी 'वॉल ऑफ फेम' या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, १ जानेवारी रोजी, या 'वॉल ऑफ फेम'चे उद्घाटन करण्यात आले. वरुडचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल देशमुख, सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ सहायक सतिश पवार आणि पंचायत विभागातील वरिष्ठ सहायक परिक्षीत बारहाते हे या सन्मानाचे पहिले तीन मानकरी ठरले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित एका छोटेखानी समारंभात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत डिजिटल वॉलचे कळ दाबून विमोचन करण्यात आले. या वॉलवरील छायाचित्रे महिनाभर प्रदर्शित राहतील आणि पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन तीन अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवड करून त्यांचे फोटो लावण्यात येतील. 'वॉल ऑफ फेम'च्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व स्थायी, अस्थायी आणि कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवण्यात येणार आहे. यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जॉबचार्टनुसार नेमून दिलेल्या कामात १०० टक्के उद्दिष्टपूर्ती केलेली असावी किंवा जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली असावी. डॉ. अमोल देशमुख यांना 'गोल्डन कार्ड जनरेशन'साठी, सतिश पवार यांना '१०० टक्के ज्येष्ठता याद्या प्रसिद्धी'साठी, तर परिक्षीत बारहाते यांना 'ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विमा लाभ' मिळवून देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, बाळासाहेब बायस, बाळासाहेब रायबोले यांच्यासह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश गायकवाड, जल व मृद संधारण अधिकारी सुनील जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय घाणेकर, शिक्षणाधिकारी सतिश मुगल, कृषी विकास अधिकारी मल्ला तोडकर आणि इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 10:25 pm

अंजनगाव सुर्जी नगराध्यक्ष गायगोलेंनी अनौपचारिकपणे स्वीकारली सूत्रे:अधिकृत पदभार पहिल्या बैठकीत, काँग्रेस-उबाठा नगरसेवक अनुपस्थित

अंजनगाव सुर्जी नगरपालिकेच्या स्व. भावे सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी गुरुवारी अनौपचारिकपणे पदाची सूत्रे स्वीकारली. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे कार्यकर्ते मुकुंद संगई होते. मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष गायगोले म्हणाले की, पक्षभेद बाजूला ठेवून अंजनगाव सुर्जीचा सर्वांगीण विकास हेच माझे ब्रीदवाक्य आहे. आगामी पाच वर्षांसाठीचा सुस्पष्ट विकास आराखडा (ब्लू प्रिंट) तयार असून, शहराला नंदनवन बनवण्याचा माझा संकल्प आहे. जनतेने दिलेल्या विश्वासाची परतफेड विकासाच्या माध्यमातून केली जाईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे यांनी केले, तर संचालन उत्तमराव मुरकुटे यांनी केले. आभार नवनिर्वाचित नगरसेविका प्रियंका मालठाणे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. यावेळी अकबर शाह, काँग्रेसचे आशिक अन्सारी, योगिता देशमुख, मनीष मेन, उज्वला कविटकर, मोहम्मद रेहान अब्दुल मुनाफ, मोहम्मद आशिक अन्सारी, प्रियंका आवंडकर, प्रवीण नेमाडे, उमा ओळंबे, उमेश भोंडे, मुजम्मील अली, नसीमा बी., आफरीन कौसर, मुख्याधिकारी विजय लोहकरे, भाजपाचे पदाधिकारी सुधीर रसे, गजानन कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी नवनिर्वाचित सर्वच नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, काँग्रेसचे काही नगरसेवक तसेच समाजवादी पार्टी आणि शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सर्व नगरसेवकांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. त्यांच्या अनुपस्थितीमुळे शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, निकाल लागल्यापासून २५ दिवसांच्या आत नगरपालिकेची पहिली सभा आयोजित करणे अनिवार्य आहे. या सभेची तारीख नगराध्यक्ष अविनाश गायगोले ठरवतील. या सभेची नोटीस किमान सात दिवसांपूर्वी सर्वांपर्यंत पोहोचणे बंधनकारक आहे. पहिल्या बैठकीत उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांची निवड केली जाईल. तोच दिवस सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळाचा पहिला दिवस असेल आणि त्याच दिवशी अधिकृतपणे पदभार स्वीकारल्याची नोंदही होईल.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 10:10 pm

माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा काँग्रेसकडून प्रचार प्रारंभ:वानवडी-साळुंखे विहार प्रभागात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जोरदार सुरुवात

काँग्रेस-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आघाडीचे वानवडी-साळुंखे विहार प्रभाग क्रमांक १८ मधील अधिकृत उमेदवार आणि माजी महापौर प्रशांत सुदामराव जगताप यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, १ जानेवारी रोजी, आपल्या महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा जोरदार प्रारंभ केला. प्रचाराचा शुभारंभ वानवडी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद घेऊन करण्यात आला. त्यानंतर त्यांनी घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. वानवडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास आणि महात्मा ज्योतिराव फुले सांस्कृतिक भवन येथील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत प्रभागातील उमेदवार रत्नप्रभा जगताप, साहिल केदारी, शमिका जांभुळकर उपस्थित होते. तसेच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, अभय छाजेड, नानासाहेब जगताप आणि शिवाजी (अण्णा) केदारी यांनीही प्रचारात सहभाग घेतला. यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, काँग्रेस-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही वानवडी-साळुंखे विहार प्रभागातील नागरिकांच्या सेवेसाठी वचनबद्ध आहोत. भारतीय संविधानाला स्मरून, शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचा अंगीकार करून आम्ही सर्वसमावेशक विकास आणि सर्वांगीण प्रगतीसाठी सज्ज आहोत. ते पुढे म्हणाले, ही निवडणूक केवळ एखाद्या पदासाठीची धडपड नसून, महात्मा फुलेंनी दिलेल्या समतेच्या विचारांची जपणूक करण्याचा हा लढा आहे. या लढ्यात आम्हाला यश मिळावे अशी प्रार्थना करतो. त्यांनी उपस्थितांना नवीन वर्ष आणि शौर्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. १ जानेवारी हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केल्याचा दिवस आहे. माता-भगिनींच्या जीवनात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या या दिवसाला फुले दांपत्य सन्मान दिन म्हणून साजरे केले जाते. या ऐतिहासिक दिनानिमित्त प्रशांत जगताप यांनी फुले दांपत्याच्या महान कार्याला विनम्र अभिवादन केले.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 9:40 pm

व्यवसायिक सिलिंडर १११ रुपयांनी महागले

नवी दिल्ली : केंद्र सरकारने वाणिज्य वापराच्या एलपीजीचे दर सिलिंडरमागे १११ रुपयांनी वाढवण्याची गुरुवारी घोषणा केली. तर विमानाचे इंधन म्हणून प्रचलित एव्हिएशन टर्बाइन फ्युएलमध्ये (एटीएफ) दर किलो लिटरमागे ७,३५३.७५ रुपयांनी म्हणजेच ७.३ टक्क्यांची गुरुवारी कपात करण्यात आली. तेल कंपन्यांनी वाणिज्य एलपीजीच्या किमतीत १११ रुपयांनी वाढ केल्याने १९ किलोग्रॅमच्या सिलिंडरची किंमत १,६९१.५० रुपये (दिल्ली) झाली आहे. […] The post व्यवसायिक सिलिंडर १११ रुपयांनी महागले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 9:32 pm

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा पहिला गुलाल!:रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडींच्या बाबतीत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने आपली पकड घट्ट केली असून, यामध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार विजयी ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर भाजपच्या खात्यात आता 12 व्या बिनविरोध उमेदवाराची भर पडली असून, पिंपरी-चिंचवडमधील भोसरी मतदारसंघाच्या प्रभाग 6 'ब' मधून रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या वाढत्या आकड्यामुळे निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महायुतीने राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपने विजयाचे खाते उघडले असून रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले आहेत. 2017 च्या निवडणुकीत जेव्हा भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मोडीत काढला होता, तेव्हाही रवी लांडगे यांनीच पक्षाचा पहिला विजय नोंदवला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांनी त्याच इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. प्रभाग 6 'ब' मधील या विजयाची आता केवळ अधिकृत घोषणा बाकी असून, या यशामुळे आमदार महेश लांडगे यांच्यासह भाजप समर्थकांनी पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोष साजरा केला आहे. या विजयाचा मार्ग प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्ज बाद होण्याने आणि माघारीने सुकर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार निलेश सूर्यवंशी यांचा ओबीसी दाखला अवैध ठरल्याने त्यांचा अर्ज बाद झाला, त्यानंतर रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवार श्रद्धा लांडगे आणि प्रसाद ताठे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. विशेष म्हणजे, अपक्ष उमेदवार प्रसाद ताठे यांनी आपल्यावर कोणताही दबाव नसून, केवळ प्रभागाच्या विकासासाठी आणि रवी भाऊंच्या विचारांना पाठिंबा देण्यासाठी आपण माघार घेत आहोत, असे स्पष्ट केल्याने रवी लांडगे यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले. आमदार महेश लांडगे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भोसरीसह शहरातील गावकी-भावकी एक राहिली पाहिजे. त्यासाठी शक्य त्या ठिकाणी राजकीय हेवे-दावे बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करा, असा संदेश दिला होता. त्यानंतर, रवी लांडगे यांचा प्रवेश आणि पुन्हा बिनविरोध निवड होत असताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 9:13 pm

'चूक झाली असल्यास नक्की सुधारेन':संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर विश्वास पाटील यांची मवाळ भूमिका

संभाजी ब्रिगेडचे आंदोलनाचा इशारा देणारे कार्यकर्ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. मी वीस वर्षांपूर्वी संभाजीराजांबद्दलची कादंबरी लिहिली आहे. त्यांच्या मागणी संदर्भात ते आणि मी एकत्र बसून चर्चा करणार आहोत. जर माझ्याकडून अनावधानाने संभाजीराजांबद्दल बदनामीकारक असे काही लिखाण झाले असेल तर ते मी नक्की सुधारेन, असे पानिपतकार व 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. संमेलनाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला ध्वजारोहण कार्यक्रम व विविध ठिकाणाहून आलेल्या ज्योतींचे स्वागत झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना विश्वास पाटील यांना संभाजी ब्रिगेडने त्यांच्या संभाजी कादंबरीमध्ये संभाजी राजांच्या विषयी बदनामीकारक लिखाण केले आहे. त्याबद्दल माफी मागावी व त्या पुस्तकावर विक्रीसाठी बंदी घालावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने आज सातारा येथील पवई नाका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात घोषणा देत आंदोलन केले आणि विश्वास पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात खुलासा करून माफी मागावी व दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली होती. त्या संदर्भात प्रश्न विचारला असताना विश्वास पाटील यांनी माझ्या त्या कादंबरीच्या काही हजारात प्रति विकल्या गेलेल्या आहेत. अनेकांनी ही कादंबरी वाचली आहे. आंदोलनकर्ते व माझ्यामध्ये चर्चा झाली आहे आणि मी त्यांना असे सांगितले आहे की आपण दोघे एकत्रित चर्चा करू आणि जर अनावधानाने माझ्या हातून काही त्यात बदनामीकारक असे लिखाण झाले असेल तर मी नक्की सुधारणा करेन व माफी देखील मागेन. दरम्यान अतिशय उत्साहात सातारकर व राज्याच्या बाहेरूनही अनेक साहित्यिक व साहित्यिक रसिक या संमेलनासाठी आलेले आहेत व त्यांचा उत्साह बघून पुढील चार दिवसात संमेलनाहून जाताना ते नक्कीच काहीतरी घेऊन जातील असा मला विश्वास आहे, असेही विश्वास पाटील यांनी सांगितले. दरम्यान, साताऱ्याच्या राजवाडा परिसरातील गांधी मैदानापासून थोरले प्रतापसिंह महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निघालेल्या ग्रंथ दिंडीचे पालखी खांद्यावर घेताना स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलना अध्यक्ष विश्वास पाटील, मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 8:57 pm

कुटुंबातल्या हट्टी मुलांचे लगेच ऐकले जाते:समंजस मुलांना माघार घ्यावी लागते; तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंच्या पुत्राची पोस्ट

आगामी 15 जानेवारीला होणाऱ्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 19 'ड' आनंदनगरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले खासदार नरेश म्हस्के यांचे सुपुत्र आशुतोष म्हस्के यांना उमेदवारी मिळवण्यात अपयश आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना निवडणूक रिंगणात उतरण्याची संधी नाकारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, उमेदवारी न मिळाल्यानंतर आशुतोष यांनी फेसबुकवर एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत आपल्या मनातील भावनांना वाट करून दिली आहे. तसेच कुटुंबातल्या हट्टी मुलांचे लगेच ऐकले जाते, समंजस मुलांना माघार घ्यावी लागते, असे सूचक विधानही त्याने केले आहे. आशुतोष म्हस्केने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला तिकीट मिळाले नाही त्यामुळे माझ्या प्रभागातल्या लोकांची फारच निराशा झाली. त्या सगळ्या माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी हा पत्रप्रपंच!! माझे वडील माननीय नरेश म्हस्के साहेब आणि मी, आम्हा दोघांचाही जन्म ह्याच प्रभागातला. आम्ही लहानाचे मोठे इथेच झालो. आनंद नगर, गांधी नगर कुष्ठरुग्ण वसाहत आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे आमचे घर....परिवारच!! माननीय म्हस्के साहेब महापौर झाल्यानंतर आणि मला समज आल्यापासून या प्रभागात मी जमेल ते आणि पडेल ते काम करत आलो आहे आणि प्रत्येक कुटुंबाशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. स्वाभाविकपणे म्हस्के साहेब खासदार झाल्यानंतर माझ्या प्रभागातल्या या परिवारातील सदस्यांची मी त्यांचा प्रतिनिधित्व करावे अशी इच्छा होती. आम्ही शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली लहानाचे मोठे झालो. त्यामुळेच मी निरपेक्ष आणि मनापासून काम कायमच करत आलोय. शिवसेनेचा आणि माझ्या वडिलांचा तो वारसा मला मिळाला आहे. प्रत्येक घरातली अडचण समजून आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि माझे वडील यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रभागात शक्य तितक्या लोकांना शक्य ती मदत केली. आणि मेंटल हॉस्पिटल परिसर, रघुनाथ नगर, हजुरी परिसर या भागा मध्येही संपर्क ठेवून काम केले. या साऱ्या पाठीमागे कोणतीही अपेक्षा नव्हती. परंतु आनंदनगर आणि गांधीनगर तसेच आजूबाजूच्या परिसरामधील मधल्या लोकांच्या आग्रहस्तव त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मी अंगावर घेतली आहे. निवडणुका आल्या तसा हा आग्रह अधिक वाढू लागला. परंतु पक्ष स्तरावरच्या अडचणी वेगळ्या असतात आदरणीय शिंदे साहेबांचाही काहीतरी नाईलाज झाला असेल. शेवटी कुटुंबातल्या हट्टी मुलांचे लगेच ऐकले जाते. समंजस मुलाला बरेचदा माघार घ्यावी लागते तसंच काहीसे झाले असेल. किंवा माझ्यात काहीतरी कमी असेल किंवा मी त्या योग्यतेचा नसेल. माझा कोणावरही राग नाही. मी कायम काम करत आलो आहे आणि करत राहीन. पक्ष देईल ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करेन. माझ्या प्रभागातल्या माझ्या सर्व नागरिकांना मी एवढेच सांगेन.. तुमची नाराजी आणि खंत मी समजू शकतो. पण मी सदैव तुमच्यासाठी उपलब्ध आहे. तुमचे आशीर्वाद आणि साथ सदैव सोबत असू द्या. नसेल मिळाली संधी तरी ताठ आहे कणा, पाठीवरती हात ठेवा, फक्त 'लढ' म्हणा, अशा शब्दांत आशुतोष नरेश म्हस्केने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 8:37 pm

सिगारेट, विडी, पान मसाला १ फेब्रुवारीपासून महागणार!

नवी दिल्ली : प्रतिनिधी केंद्र सरकारने सिगारेट ओढणा-या आणि पान मसाला वापरणा-यांना मोठा धक्का दिला आहे. सरकारने १ फेब्रुवारी २०२६ पासून तंबाखू उत्पादनांवर उत्पादन शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये, केंद्र सरकारने ‘केंद्रीय उत्पादन शुल्क (सुधारणा) विधेयक २०२५’ या नवीन कायद्याला मान्यता दिली. उत्पादनाच्या […] The post सिगारेट, विडी, पान मसाला १ फेब्रुवारीपासून महागणार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 8:23 pm

घरगुती उपकरणांवर रेटिंग बंधनकारक; केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था १ जानेवारीपासून रेफ्रिजरेटर (फ्रिज), टेलिव्हिजन (टीव्ही), एलपीजी गॅस शेगडी आणि कूलिंग टॉवर यांसारख्या घरगुती उपकरणांवर ऊर्जा कार्यक्षमतेचे ‘स्टार रेटिंग’ असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. वाढती वीज टंचाई आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. ऊर्जा मंत्रालयांतर्गत येणा-या ‘ऊर्जा दक्षता ब्युरो’ने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. […] The post घरगुती उपकरणांवर रेटिंग बंधनकारक; केंद्राचा निर्णय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 8:21 pm

‘जीएसटी’ दरकपातीनंतरही संकलनात ६% वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने डिसेंबर २०२५ मधील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. या कालावधीत जीएसटी महसूल वार्षिक आधारावर ६ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. गुरुवारी, १ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये एकूण जीएसटी संकलन १.७४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. याआधी डिसेंबर २०२४ मध्ये देशाचा […] The post ‘जीएसटी’ दरकपातीनंतरही संकलनात ६% वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 8:20 pm

४०१ वर्षांची टपालसेवा बंद; डेन्मार्क जगातील पहिला देश

कोपनहेगन : वृत्तसंस्था डेन्मार्कने ४०१ वर्षांच्या जुनी परंपरा बंद केली आहे. देशाची पोस्टनॉर्ड सेवा, देशांतर्गत पत्र वितरण पूर्णपणे बंद केले आहे. डेन्मार्क हा जगातील पहिला देश बनला आहे. त्या ठिकाणी भौतिक पत्रे आता आवश्यक नाहीत. यामुळे ते बंद केले आहे. गेल्या २५ वर्षांत डेन्मार्कमध्ये पाठवल्या जाणा-या पत्रांच्या संख्येत ९० टक्क्यांनी घट झाली आहे. २००० मध्ये, […] The post ४०१ वर्षांची टपालसेवा बंद; डेन्मार्क जगातील पहिला देश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 8:18 pm

७२ जागांवर रणधुमाळी!  राज्यसभेचे गणित बदलणार; ‘एनडीए’ची ताकद, विरोधकांच्या रणनीतीची कसोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था २०२६ मध्ये राज्यसभेच्या तब्बल ७२ जागा रिक्त होणार आहेत. या निवडणुकांचा थेट परिणाम केंद्रातील राजकारणावर, सत्ताधारी एनडीएची ताकद आणि विरोधकांची रणनीती यावर होणार आहे. सध्या राज्यांच्या विधानसभांची स्थिती पाहता, भाजप आणि एनडीएची राज्यसभेतील संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे, तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या अडचणी वाढू शकतात. राज्यसभेतील बहुमताचे गणित बदलणार असले, […] The post ७२ जागांवर रणधुमाळी! राज्यसभेचे गणित बदलणार; ‘एनडीए’ची ताकद, विरोधकांच्या रणनीतीची कसोटी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 8:15 pm

जळगाव महापालिकेत शिवसेना शिंदे गटाची 'बिनविरोध हॅट्रिक':प्रभाग 9 'ब' मधून प्रतिभा देशमुख विजयी; पालकमंत्री गुलाबराव पाटलांची राजकीय ताकद वाढली

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे वेगाने बदलत असतानाच, जळगाव महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गट आणि महायुतीने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. प्रभाग 9 'ब' मधून प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड झाल्याने जळगाव महापालिकेत शिंदे गटाने 'बिनविरोध हॅट्रिक' साधली असून एकाच दिवसात पक्षाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या विजयामुळे महापालिकेबाहेर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला असून, आतापर्यंत जळगावमध्ये महायुतीचे एकूण चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. जळगाव महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि महायुतीने आपले वर्चस्व राखत 'बिनविरोध विजयाची हॅट्रिक' साधली असून, प्रभाग 9 'ब' मधून एकमेव अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्यामुळे प्रतिभा गजानन देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज एकाच दिवशी शिंदे गटाचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची राजकीय ताकद अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या ऐतिहासिक यशानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेबाहेर फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष साजरा केला. जळगाव महानगरपालिका निवडणुकीत सध्या भाजपचा एक आणि शिवसेना शिंदे गटाचे तीन असे महायुतीचे एकूण चार उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, या यशानंतर प्रतिभा देशमुख यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली आहे. दरम्यान, अर्जांच्या अंतिम दिवशी म्हणजेच उद्या शिवसेना शिंदे गटाचे आणखी काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता असल्याचे संकेत जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिले असून, यामुळे निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे. भाजपसह शिवसेनेचीही विजयाची घोडदौड सुरू भाजपने कल्याण डोंबिवलीमध्ये विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे तब्बल 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपचे 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने मतदानापूर्वीच विजयाचा गुलाल उधलण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 122 सदस्य संख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 62 जगांपासून महायुती आता केवळ 53 जागा दूर आहे. त्यामुळे भाजप, शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 8:00 pm

सत्ताधाऱ्यांचा एकही अर्ज बाद नाही:विरोधकांचे मात्र अनेक अर्ज बाद, हे महायुती सरकारचे षडयंत्र; अविनाश जाधवांचा आरोप

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असतानाच, अनेक ठिकाणी विरोधकांचे अर्ज बाद झाल्याने महायुतीच्या उमेदवारांना बिनविरोध विजयाची संधी मिळाली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपचे 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, ठाण्यातही विरोधकांचे अर्ज बाद झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर, मनसे नेते अविनाश जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधारी पक्ष निवडणूक अधिकाऱ्यांशी संगनमत करून जाणीवपूर्वक विरोधकांचे अर्ज बाद करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अविनाश जाधव म्हणाले, निवडणूक अधिकाऱ्यांकडून अनेक ठिकाणी पक्षपातीपणा करण्यात येत आहे. त्यात बरेच अर्ज बाद झाले आहेत. पडताळणी होण्याच्या अर्ध्या तास आधी उमेदवारांचे अर्ज डिस्पले केले जातात. त्यानंतर त्यावर आक्षेप घेतला जातो. परंतु ठाण्यात सकाळी 11 ऐवजी 3.30 वाजता हे अर्ज बाहेर लावले. त्यात शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या अर्जात निरंक जागा होत्या. जिथे काहीच भरले नव्हते. नियमानुसार जर एखादी जागा रिक्त ठेवली असेल तर तो बाद होतो. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, असा आरोप जाधव यांनी केला आहे. सत्ताधारी एकही अर्ज बाद केले नाहीत पुढे बोलताना अविनाश जाधव म्हणाले, तसेच सत्ताधारी एकही अर्ज बाद केले नाहीत. विरोधकांचे आणि अपक्षांचे अनेक अर्ज बाद करण्यात आले. हे सगळे पाहता ही संपूर्ण निवडणूक यंत्रणा वाईटरित्या चालवली जात आहे. ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी हे निवडणूक अधिकारी असतात. या लोकांचे सत्ताधारी नेत्यांसोबत साटेलोटे असते. सत्ताधारी नेते आणि प्रशासकीय नेते मिळून ही निवडणूक प्रक्रिया मलिन करतात. त्यामुळे अनेक लोकांचे अर्ज बाद झाले. गेले 10 वर्ष हे लोक मेहनत घेत होते. त्यांचे करिअर या भ्रष्ट यंत्रणेकडून बर्बाद करण्यात आले. जर अशाच प्रकारे निवडणुका होत असतील तर आम्ही निवडणूक लढायच्या कशाला? असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला. निवडणूक अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतले लढायची ताकद नाही. अपक्षांना खरेदी करायचे आणि त्यातून कुणी उमेदवार उरले तर निवडणुकीत पैसा ओतायचा. सत्तेचा वापर, दबाव आणि पैसे वापरून तरुणांचे करिअर बर्बाद करायचे हे काम सत्ताधारी करतात. हेच जर करायचे असेल तर राजेशाही घोषित करा. लोकशाहीच्या बाता कशाला करायच्या. निवडणूक आयोग केवळ नावापुरते स्वायत्त संस्था आहे. परंतु त्यात काम करणारे अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतले आहेत, असा आरोपही अविनाश जाधव यांनी केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 7:03 pm

अशोक चव्हाणांनी ५० लाख घेऊन तिकीट दिले

नांदेड : राज्यातील महापालिका निवडणुकीतील तिकीट वाटपावरुन सर्वच राजकीय पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची फरफट झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऐनवेळी पक्षात आलेल्या उमेदवारांना कुठे उमेदवारी देण्यात आली आहे तर कुठे आर्थिक परिस्थिती पाहूनच तिकीट दिले गेल्याने निष्ठावंतांची नाराजी उघड होत आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत असून नांदेड आणि लातूरमधूनही भाजप समर्थक व निष्ठावंत कार्यकर्ते मनातील […] The post अशोक चव्हाणांनी ५० लाख घेऊन तिकीट दिले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 6:52 pm

महावितरणचे ‘मिशन नाइन्टी डेज':सुमारे 300 कोटींच्या वीजबिल थकबाकी वसुलीसाठी वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच सुरुवात

थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची ‘मिशन नाइन्टी डेज' ही मोहीम महावितरणने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून सुरू केली आहे. आर्थिक वर्ष संपेपर्यंत आगामी 90 दिवस चालणाऱ्या या मोहिमेत वीजबिल वसुलीबरोबरच वीजचोरांवरही धडक कारवाई केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात सध्या वीजबिल थकबाकीचे संकट गडद झाले आहे. घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील जवळपास साडेचार लाख ग्राहकांकडे सुमारे 300 कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक ग्राहकांनी काही दिवसांपासून एक रुपयाचाही भरणा केलेला नाही. यामुळे वीजबिल थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महावितरणने थकबाकीदारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाच हजार थकबकीदारांचा वीजपुरवठा डिसेंबर महिन्यात खंडित करण्यात आला. आता कारवाईची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. मुख्य अभियंत्यांसह वरिष्ठ अधिकारीही मोहिमेत या मोहिमेत अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांसह परिमंडलातील विविध कार्यालयांत कार्यरत अधिकारी व कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. गुरुवारी (1 जानेवारी) शहरातील शहागंज उपविभागात शहागंजसह क्रांती चौक व पॉवर उपविभाग, छावणी उपविभागात छावणी, वाळूज व गारखेडा उपविभाग आणि चिकलठाणा उपविभागात चिकलठाण्यासह सिडको उपविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवली. मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे यांनीही मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. चिकलठाणा व शहागंज उपविभागातील काही थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्यांच्या उपस्थितीत कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्तात कारवाई थकबाकी वसुली करताना काही संवेदनशील भागांत कर्मचाऱ्यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता, ही कारवाई पोलिस बंदोबस्तात केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता ही मोहीम अधिक गतिमान केली जाणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. तसेच महावितरण कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी परिमंडलातील सर्व अभियंत्यांना दिल्या आहेत. थकबाकीदार शेजाऱ्यांना वीज देणे पडेल महागात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर काहीजण शेजाऱ्यांकडून बेकायदेशीररीत्या वीजपुरवठा घेतात. असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल करून अनधिकृत वीज देणाऱ्या शेजाऱ्याचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. एखाद्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित ग्राहकाचे शहरात दुसरे कनेक्शन असल्यास त्यावर थकबाकी वळवली जाणार आहे. वीजबिलासाठी रांगेत उभे रहायची गरज नाही ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी रांगेत उभे रहावे लागू नये व वेळ वाचावा यासाठी महावितरणने ऑनलाइन सुविधा दिली आहे. यूपीआय, नेट बँकिंग, वॉलेट्स, मोबाईलमधील फोन पे, गुगल पे आदी ॲप्स आणि महावितरणच्या वेबसाइटद्वारे घरबसल्या वीजबिल भरता येते. वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट बिल भरता येते. वीजबिल मुदतीत व ऑनलाइन भरल्यास बिलावर सुमारे 1.25 टक्के सूट मिळते. 5 जानेवारीला वीजबिल दुरुस्ती मेळावे वीजबिलासंबंधित तक्रार असणाऱ्या ग्राहकांसाठी 5 जानेवारी रोजी सर्व उपविभाग कार्यालयांत वीजबिल दुरुस्ती मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. त्रूटी असलेल्या बिलांची दुरुस्ती केली जाईल. ग्राहकांनी मेळाव्याचा लाभ घेऊन वीजबिल दुरुस्ती व बिलांसंबंधीच्या इतर तक्रारींचे निराकरण करून घ्यावे. दुरुस्त केलेले वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महावितरणतर्फे सर्व वर्गवारीतील ग्राहकांनी तातडीने थकीत वीजबिल भरणे नियमाने गरजेचे आहे. अन्यथा महावितरणला वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. कुणी वीजबिल वसुलीत अडथळा आणल्यास त्याच्यावर पोलिस कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी थकित वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे.- पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, महावितरण, छत्रपती संभाजीनगर परिमंडल

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 6:36 pm

शिवसेनेला 16 जागा देण्यास आम्ही तयार:मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे वक्तव्य; महापौर भाजपचाच होणार असल्याचाही व्यक्त केला विश्वास

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप पुन्हा महापौरपद जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शहरात अनेक विकासकामे झाली असून, पुणेकर नेहमीच विचार आणि कामाला साथ देतात, त्यामुळे मनपा निवडणुकीत नागरिक युतीला पाठिंबा देतील, असे मोहोळ म्हणाले. तसेच शिवसेनेला 16 जागा देण्यास आम्ही तयार असल्याचेही मोहोळ यांनी यावेळी म्हटले आहे. शहरात मेट्रो विस्तार, सार्वजनिक वाहतुकीसाठी अधिक ई-बसेस, 24/7 पाणीपुरवठा, वैद्यकीय महाविद्यालय, पुणे ते लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गास मंजुरी, विमानतळाचे नवीन टर्मिनल आणि चांदणी चौक विस्तारीकरण यांसारख्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि पुण्यात दमदार विकासकामे सुरू असून, पुण्याला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. बाजीराव रस्त्यावरील भारत भवन येथे पुणे शहर भाजप माध्यम कक्षाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महाराष्ट्र प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार योगेश टिळेकर, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, संजय मयेकर आणि पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. मोहोळ यांनी सांगितले की, आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने हे पुणे भाजप मीडिया सेंटर सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून पुढील 15 दिवस पक्षाच्या वतीने अधिकृत प्रसारमाध्यमांना माहिती दिली जाईल. भाजप, शिवसेना आणि आरपीआय यांची निवडणुकीत युती असून, भाजप आणि शिवसेनेने ठराविक जागेपेक्षा अधिक उमेदवारांना 'एबी फॉर्म' दिले आहेत. युती टिकली पाहिजे अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा असून, त्यानुसार चर्चा आणि प्रयत्न सुरू आहेत. महिला उमेदवारांबाबत बोलताना मोहोळ म्हणाले की, भाजपने 92 महिलांना उमेदवारी दिली आहे. 50 टक्के आरक्षणानुसार 83 महिलांना उमेदवारी देणे अपेक्षित असताना, आम्ही अधिक महिला उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. शिवसेनेला 16 जागा देण्यास आम्ही तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मागील निवडणुकीत भाजपचे 105 नगरसेवक असतानाही आम्ही युती करणार असल्याचे सांगत होतो. शिवसेनेच्या कमी जागा असतानाही ते ठराविक संख्येपेक्षा अधिक जागा मागत होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे युती करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. उमेदवारी जागांबाबत मतभेद होते, परंतु आता हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात घेतला जात आहे. स्थानिक पातळीवर एकमत न झाल्याने हा प्रश्न वरिष्ठ पातळीवर गेला आहे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 6:36 pm

अभ्यासक आशुतोष बापट यांनी व्यक्त केली खंत:म्हणाले- आधुनिक विकासाच्या ओघात पुण्याच्या ऐतिहासिक खुणा नामशेष होण्याची भीती

पुण्याचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा असून तो अतिशय समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. पुणे परिसरात अश्मयुगीन काळातील हत्यारे सापडलेली असून, मुठा नदीच्या प्रवाहात उत्खननादरम्यान ही हत्यारे आढळून आली आहेत. पुण्याची काळरेषा प्राचीन व समृद्ध असली तरी, आधुनिक विकासकामांमुळे अनेक जुन्या खुणा आणि ऐतिहासिक ठसे हळूहळू नामशेष होत चालल्याची खंत अभ्यासक आशुतोष बापट यांनी व्यक्त केली. सुलभ शिक्षण मंडळ, पुणे आणि श्री गोपाळ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित बहुश्रुत व्याख्यानमालेत ते ‘पुण्यातील नावे आणि त्यांच्या गोष्टी’ या विषयावर बोलत होते. सदाशिव पेठेतील श्री गोपाळ हायस्कूल येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्ष डॉ. उमा बोडस उपस्थित होत्या. आशुतोष बापट यांनी सांगितले की, नागझरी आणि आंबील ओढा यांसारखे जलस्रोत प्राचीन काळात अस्तित्वात होते. आजच्या संपूर्ण बाजीराव रस्त्यावरून पूर्वी आंबील ओढा वाहत होता. शनिपाराजवळ या ओढ्याच्या प्रवाहामुळे अनेक लोक बुडून मृत्युमुखी पडल्याच्या नोंदी आढळतात. नानासाहेब पेशव्यांनी आंबील ओढ्याचा प्रवाह वळवला, अशी रंजक ऐतिहासिक माहिती त्यांनी दिली. गावाच्या संरक्षणासाठी गावाच्या सीमेवर मारुतीची स्थापना करण्याची प्रथा होती. जिथपर्यंत वस्ती होती, तिथे मारुती असायचा. जसजशी वस्ती वाढत गेली, तसतशी पुढे नवीन मारुतींची स्थापना होत गेली. त्यामुळे पुण्यातील मारुतींच्या स्थानावरून शहराचा विस्तार कसा झाला, याचा अभ्यास करता येतो. पुण्यातील मारुतींना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि रंजक नावे आहेत. प्रेतयात्रेदरम्यान जिथे थांबा घेतला जात असे, तेथे विसावा मारुती; प्रेत नेताना नातेवाईक जिथे रडत असत, तो रड्या मारुती; उंटांच्या काफिल्याचा विसावा जिथे होत असे, तो उंटाड्या मारुती; तर पेशव्यांनी पुणे सोडावे का, असा विचार करताना जो मारुती हलल्यासारखा भासला, तो डुल्या मारुती म्हणून ओळखला जातो. जकात चुकवणारे पळून जाऊ नयेत म्हणून घोड्यावर स्वार असलेले घोडेस्वार ज्या ठिकाणी असत, त्या ठिकाणाला स्वारगेट असे नाव पडले, अशी माहितीही त्यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 6:34 pm

राज्यभरात १३ नगरसेवक बिनविरोध

मुंबई : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या नाट्यातून पुढे येत आता अर्जांची छाननी केली जात असून यात राजकीय पक्ष एकमेकांना धक्के देत आहेत. तर काही ठिकाणी बिनविरोध विजयाचे गुलाल उधळण देखील सुरू झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने मतदानापूर्वीच विजयाचा गुलाल उधलण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे […] The post राज्यभरात १३ नगरसेवक बिनविरोध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 6:33 pm

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या मुहूर्ताची घोषणा:अवघ्या 2 तास 7 मिनिटांत प्रवास पूर्ण होणार, रेल्वे मंत्र्यांनी दिली प्रकल्पाची डेड लाइन

प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन आणि आवश्यक उपाययोजनांचा अभाव यामुळे मुंबई महापालिकेच्या 'एच-पूर्व' विभागाने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम थांबवण्याची नोटीस बजावली असून, यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मोठा प्रशासकीय फटका बसला आहे. एकीकडे या कारवाईमुळे कामात अडथळा निर्माण झालेला असतानाच, दुसरीकडे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या लोकार्पणाचा मुहूर्त जाहीर करून या प्रकल्पाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे या दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ अवघ्या 2 तास 7 मिनिटांवर येणार असून, प्रवाशांसाठी दर 30 मिनिटांनी ही ट्रेन उपलब्ध असेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत बीकेसी ते शिळफाटा दरम्यान 21 किमी लांबीचा बोगदा तयार केला जात असून, त्यात ठाणे खाडीखालील 7 किमीच्या विशेष भागाचाही समावेश आहे. या बोगद्याचे 5 किमीचे काम 'न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड'द्वारे, तर उर्वरित 16 किमीचे काम 'टनेल बोरिंग मशीन' वापरून पूर्ण केले जात आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही बुलेट ट्रेन 15 ऑगस्ट रोजी सुरू होणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरत ते बिलिमोरा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरत ते बिलिमोरा दरम्यान 15 ऑगस्ट 2027 रोजी सुरू होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली असून, त्यानंतर वापी-सुरत, वापी-अहमदाबाद आणि ठाणे-अहमदाबाद अशा टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प पूर्ण होऊन शेवटी संपूर्ण मुंबई-अहमदाबाद मार्ग प्रवाशांसाठी खुला होईल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचणार नाही, तर मुंबई आणि अहमदाबादमधील व्यापार, गुंतवणूक आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळणार आहे. जपानच्या तंत्रज्ञाचा वापर जपानच्या प्रगत 'शिंकान्सेन' हाय-स्पीड ट्रेन तंत्रज्ञानावर आधारित या मार्गावर एकूण 12 स्थानके असतील, ज्यापैकी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील स्थानक हे संपूर्ण कॉरिडॉरवरील एकमेव भूमिगत स्टेशन ठरणार आहे. जमिनीखाली सुमारे 106 फूट (32.50 मीटर) खोलीवर बांधल्या जाणाऱ्या या तीन मजली स्थानकात प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअरचा समावेश असेल. या मार्गावरील प्रत्येक स्थानकावर सहा प्लॅटफॉर्मची सुविधा असून ही सर्व स्थानके मेट्रो आणि रस्ते वाहतूक व्यवस्थेशी उत्तमरित्या जोडली जाणार असल्याने प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुखसोयींसह प्रवासाचा एक आधुनिक अनुभव घेता येईल.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 6:24 pm

सावरकरांचा माफीनामा, ब्रिटिशांकडून मिळणारी पेन्शनचे खंडन करणारी कागदपत्रे न्यायालयात सादर

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांना सादर केलेला माफीनामा, ब्रिटिशांकडून सावरकरांना मिळणारी पेन्शन अशा स्वरूपाच्या आरोपांचे खंडन करणारे कागदोपत्री पुरावे फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी बुधवार दि. ३१ डिसेंबर रोजी न्यायालयात सादर केले. या पुराव्यांची न्यायालयीन नोंदही करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधाने केल्याप्रकरणी पुण्याच्या एमपी/एमएलए या विशेष न्यायालयात न्यायाधीश अमोल शिंदे […] The post सावरकरांचा माफीनामा, ब्रिटिशांकडून मिळणारी पेन्शनचे खंडन करणारी कागदपत्रे न्यायालयात सादर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 6:06 pm

हिंगोलीत कर सहाय्यकास 20 हजारांची लाच घेताना पकडले:व्यवसाय कर व त्यावरील दंड माफीसाठी घेतली रक्कम, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

सेनगाव येथील एका कृषी सेवा केंद्राला लावण्यात आलेला 43904 रुपयांचा व्यवसाय कर व दंड माफ करण्यासाठी 20 हजाराची लाच घेणाऱ्या हिंगोलीच्या वस्तू व सेवा कर विभागातील कर सहाय्यकास गुरुवारी ता. 1 दुपारी रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे सेनगाव येथे कृषी सेवा केंद्र अँड मशिनरी विक्रीचे दुकान आहे. सदर व्यवसायासाठी जीएसटी क्रमांक आवश्यक असल्याने, तो मिळवण्यासाठी त्यांनी ता. 8 सप्टेंबर रोजी ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना ता. 10 ऑक्टोबर रोजी व्यवसाय कर अधिकाऱ्यांनी राऊत यांनी नोटीस काढली. त्यामध्ये ता. 19 डिसेंबर 2017 ते ता. 31 मार्च 2025 या कालावधीतील व्यवसाय कर व त्यावरील दंड, व्याज असे 43904 रुपये भरण्याची नोटीस काढली होती. सदर नोटीस घेऊन कर सहाय्यक उमेश सरकटे हा ता. 29 डिसेंबर रोजी सेनगाव येथील दुकानावर गेला होता. मात्र त्यांची भेट झाली नाही. त्यानंतर सरकटे याने संबंधित तक्रारदारांना नोटीस रद्द करतो तसेच कर, व्याज, दंड भरायचा नसेल तर ॲडजस्टमेंट करावी लागेत असे मोबाईलवरून संपर्क करून सागितले. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधळा. त्यानंतर पडताळणी करण्यात आली. यामध्ये 30 हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. तडजोडी नंतर 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. त्यानुसार आज लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख युनूस, जमादार भगवान मंडलिक, राजाराम फुफाटे, गजानन पवार, शिवाजी वाघ, विजय शुक्ला, विनोद पुंडगे, रवीद्र वर्णे, शेख अकबर यांच्या पथकाने आज वस्तू व सेवा कर कार्यालयाच्या बाहेर सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे कर सहाय्यक उमेश सरकटे याने 20 हजाराची लाच घेताच त्यास रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 6:02 pm

अशोक चव्हाणांनी उमेदवारीसाठी 50 लाख घेतले:कट्टर समर्थक माजी नगरसेवकाचा आरोप, नांदेड भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

माजी मुख्यमंत्री तसेच भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर उमेदवारीसाठी 50 लाख रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा आरोप चव्हाण यांचे जुने सहकारी व कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नांदेड महापालिकेची निवडणूक ही प्रथमच अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात लढवली जात आहे. अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी जाहीर करण्यात आली असताना अनेक इच्छुकांचे तिकीट कापण्यात आले आहे. यात चव्हाण यांचे कट्टर समर्थक तथा माजी नगरसेवक भानुसिंह रावत यांचा देखील समावेश आहे. मुलाचे तिकीट कापल्याने भानुसिंह रावत यांनी नाराजी व्यक्त करत अशोक चव्हाण यांनी उमेदवारीसाठी प्रत्येकाकडून 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच प्रभाग क्रमांक 16 मधून आपल्या मुलासाठी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. परंतु, कुठलेही ठोस कारण न देता ऐनवेळी उमेदवारी नाकारात आमच्यावर अन्याय केल्याचाही आरोप रावत यांनी केला आहे. भानुसिंह रावत हे अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. 1980 पासून ते चव्हाण यांच्यासोबत राजकीय प्रवासात सक्रिय आहेत. अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, तेव्हा रावत यांच्यासह 35-40 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. गाडीपुरा प्रभागातून ते सलग चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. दरम्यान, सर्वांना तिकीट देण्याचे आश्वासन दिलेले असताना ऐनवेळी अनेकांची उमेदवारी कापल्याने रावत यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे. तसेच एकाच घरातील पती, पत्नी आणि पिता-पुत्राला उमेदवारी दिल्यावरून देखील रावत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशोक चव्हाण यांचे आणखी एक समर्थक असलेले माजी नगरसेवक दुष्यंत सोनाळे यांनी देखील भाजपच्या महानगराध्यक्ष यांच्यावर उमेदवारीसाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप केला होता. महिला आघाडीच्या प्रदेश सचिव महादेवी मटपटी यांनी देखील आरोप केला होता. त्यामुळे नांदेड भाजपमध्ये उमेदवारी प्रक्रियेवरून तीव्र नाराजी अंतर्गत गटबाजी उघडपणे समोर येत आहे. आता या सगळ्या आरोपांवर अशोक चव्हाण काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, उमेदवारी नाकारल्यानंतर भानुसिंह रावत यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. प्रभाग क्रमांक 17 मधून भानुसिंह रावत यांचा मुलगा अक्षयसिंह रावत निवडणूक लढवत आहे. दुसरीकडे भाजपकडून महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दीपकसिंह रावत त्यांच्या विरोधात उभे आहेत. त्यामुळे येथे काका-पुतणे अशी लढत पाहायला मिळत आहे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 5:56 pm

किडनी तस्करीत मोठा भांडाफोड!

चंद्रपूर : प्रतिनिधी किडनी विक्री प्रकरणात देशातील दोन प्रतिष्ठित डॉक्टरांची नावे समोर आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील आणखी काही ‘बडे मासे’ पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, कोलकाता येथील ज्या पॅथॉलॉजीमध्ये रक्तचाचण्या करण्यात आल्या होत्या, तेथे तपासासाठी नागभीड तालुक्यातील रोशन कुडे यांना घेऊन विशेष तपास पथक बुधवारी रवाना झाले आहे. दरम्यान, किडनी विक्रीत […] The post किडनी तस्करीत मोठा भांडाफोड! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 5:53 pm

मुंबई वाचवण्यासाठी हीच शेवटची संधी

मुंबई : प्रतिनिधी मुंबई वाचवण्यासाठी मराठी माणसाकडे ही शेवटची संधी आहे, असे सांगत त्यांनी निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचे आदेश दिले. निवडणुकीच्या काळात तुम्हाला पैशांचे आमिष दाखवले जाईल, विविध प्रलोभने दिली जातील; पण कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका, असा स्पष्ट इशारा त्यांनी आपल्या उमेदवारांना दिला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे […] The post मुंबई वाचवण्यासाठी हीच शेवटची संधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 5:50 pm

पक्षनिष्ठेपोटी माजी महापौरांनी सोडले पतीचे घर

नागपूर : प्रतिनिधी भाजपाने नागपूरचे महापौरपद दिले आणि नवराच पक्षाच्या विरोधात गेल्याचे पाहून पत्नीने स्वत:चे घर सोडून थेट माहेर गाठले. नागपूरच्या अर्चना डेहनकरांच्या घरात हा प्रकार घडला आहे. त्यामुळे या डेहनकर कुटुंबाची नागपूर शहरात जोरदार चर्चा रंगली आहे. भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणात नाराज उमेदवार आहेत. त्यामुळे साहजिकच भाजपाचे बंडखोर हे सर्वाधिक मैदानात उतरल्याचे दिसत […] The post पक्षनिष्ठेपोटी माजी महापौरांनी सोडले पतीचे घर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 5:48 pm

एकाच प्रभागात दोन एबी फॉर्म!

नाशिक – महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपामध्ये एबी फॉर्मवरून मोठा गोंधळ उडाला. अशात एकाच प्रभागात दोन इच्छुक उमेदवारांना भाजपाकडून एबी फॉर्म देण्यात आले होते. बुधवारी छाननीदरम्यान त्यातील एका इच्छुक उमेदवाराचा एबी फॉर्म पाच मिनिटे लवकर निवडणूक निर्णय अधिका-यांकडे पोहोचल्याने त्यांना भाजपाची अधिकृत उमेदवारी मिळाली. मला पाच मिनिटांचे महत्त्व समजल्याचे त्या उमेदवाराने म्हटले आहे. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत रंगत […] The post एकाच प्रभागात दोन एबी फॉर्म! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 5:42 pm

हॉटेलच्या रूमचे छत कोसळून मुंबईतील पर्यटक कुटुंब जखमी

दापोली : प्रतिनिधी दापोली तालुक्यातील जालगाव येथील ‘हॉटेल चिरा मिडॉस’मध्ये हॉटेलच्या रूमचे छत कोसळल्याने मुंबईतील एकाच कुटुंबातील सदस्य जखमी झाले आहेत. याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात हॉटेल मालक आणि बांधकाम कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड (पश्चिम) येथील रहिवासी विकास तिवारी (वय ४८ वर्षे) हे आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी दापोली येथे आले होते. […] The post हॉटेलच्या रूमचे छत कोसळून मुंबईतील पर्यटक कुटुंब जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 5:40 pm

भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर ; राजकारणाची हास्यजत्रा

मुंबई : प्रतिनिधी उमेदवारांना उमेदवारी अर्ज देण्याच्या निमित्ताने राजकारणाची हास्यजत्रा सुरू आहे, ती अत्यंत रंजक आहे. कुणी आत्मदहनाचा प्रयत्न करत आहे, कुणी उपोषणाला बसले, तर कुणी ‘एबी’ फॉर्मच खाऊन टाकत आहे. तर कुणी भाजपाच्या नेत्याच्या कानशिलात लगावत आहे. हे सर्व बघितल्यानंतर भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची सुरुवात आहे अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. कारण काँग्रेस […] The post भाजपा फुटीच्या उंबरठ्यावर ; राजकारणाची हास्यजत्रा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 5:37 pm

तिकिट नाकारल्याने डुप्लिकेट एबी फॉर्म भरला

मुंबई : प्रतिनिधी राज्यात २९ महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू आहे मात्र, महायुतीमध्ये एबी फॉर्मवरून चांगलाच गोंधळ उडाला. अनेक ठिकाणी नाराजांचा उद्रेक झाला. मात्र मुंबईत एका इच्छुक उमेदवाराने चक्क डुप्लिकेट एबी फॉर्म दाखल केला. अखेर त्याची चोरी पकडली गेली आणि हा गैरप्रकार उघडकीस आला. याबाबत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक आयोगाला पत्रही लिहिले आहे. मुंबईतील […] The post तिकिट नाकारल्याने डुप्लिकेट एबी फॉर्म भरला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 5:35 pm

स्वित्झर्लंडमध्ये पार्टीदरम्यान मोठा स्फोट; १० ठार, अनेक गंभीर

क्रॅन्स-मोंटाना : वृत्तसंस्था स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध शहर क्रॅन्स-मोंटाना याठिकाणी नव वर्षाच्या पूर्वसंध्येला एका बारमध्ये स्फोट आणि आगीमुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली. स्तहनिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववर्षाच्या पूर्वसंध्येला साजरा होत असताना क्रॅन्स-मोंटाना येथील ले कॉन्स्टेलेशन येथे एक किंवा अधिक […] The post स्वित्झर्लंडमध्ये पार्टीदरम्यान मोठा स्फोट; १० ठार, अनेक गंभीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 5:32 pm

भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचा संताप

नाशिक : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीत नाशिकमध्ये भाजपमधला असंतोष चव्हाट्यावर आला आहे. आयारामांनाच झुकते माप दिल्याने निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ठाकरे गटातून भाजपमध्ये गेलेल्या सुधाकर बडगुजर यांनी बाजी मारली आहे. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या समर्थकांना डावलून बडगुजर यांच्या घरात तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. स्वत: सुधाकर बडगुजर, मुलगा दीपक आणि पत्नी हर्षा बडगुजर […] The post भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांचा संताप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 5:29 pm

देवदर्शनाने नव वर्षाची सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी नवीन वर्षाची सुरुवात आनंद, आशा आणि सकारात्मकतेने व्हावी या भावनेतून देशभरातील लाखो भाविकांनी पहिल्याच दिवशी मंदिरांकडे धाव घेतली आहे. नव वर्षाच्या स्वागतासाठी देवदर्शन घेण्याची परंपरा अजूनही तितकीच जिवंत असल्याचे चित्र आज पाहायला मिळतेय. पहाटेपासूनच विविध धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी वाढू लागली असून मंदिर परिसर भक्तीमय वातावरणाने भरून गेला आहे. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात […] The post देवदर्शनाने नव वर्षाची सुरुवात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 5:27 pm

ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त:ठाणे गुन्हे शाखेने पकडला २ कोटी १४ लाखांचा ६३८ किलो गांजा; ओडिशा - तेलंगणा कनेक्शन उघड

ओडिशा आणि तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने उद्ध्वस्त केले आहे. खारेगाव टोलनाक्यावर सापळा रचून पोलिसांनी एका इन्होवा कारमधून तब्बल ६३८ किलो गांजा जप्त केला असून, या कारवाईत २ कोटी १४ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी तेलंगणा येथील एका तस्कराला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालमत्ता कक्षाचे पोलीस हवालदार जयकर जाधव यांना एका आलिशान कारमधून मोठ्या प्रमाणात गांजा ठाण्यात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खारेगाव टोलनाक्याजवळ सापळा रचला. संशयास्पद इन्होवा कार (क्र. AP-09-BF-9382) येताच पोलिसांनी तिला घेराव घालून झडती घेतली असता, कारमध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा साठवून ठेवल्याचे आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी चिन्ना टागुर लक्ष्मण नायक (वय ३६, रा. मेहबूबनगर, तेलंगणा) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २ कोटी ४ लाख १६ हजार रुपये किमतीचा ६३८ किलो गांजा आणि १० लाख रुपये किमतीची इन्होवा कार, असा एकूण २ कोटी १४ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला ३ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही तस्करी ओडिशातून कोणासाठी केली जात होती आणि याचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचले आहेत, याचा अधिक तपास मालमत्ता कक्ष करत आहे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 5:12 pm

नागपूर काँग्रेसमध्ये बंडखोरी, अनेक कार्यकर्त्यांनी 'हात' झटकला:काही अपक्ष, तर काहींनी राष्ट्रवादी-वंचितमध्ये प्रवेश केला

नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपासोबतच काँग्रेसलाही बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाचा 'हात' सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे किंवा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पश्चिम नागपूरचे आमदार तथा शहराध्यक्ष विकास ठाकरे यांचे प्रभाग समन्वयक आणि पीए सत्यम सोडवीर यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सोडवीर यांनी सांगितले की, त्यांनी अनेक वर्षे युवक काँग्रेसमध्ये काम केले आणि प्रभागात सक्रिय होते. विकास ठाकरे यांच्यासाठी त्यांनी प्रसिद्धीचे काम तसेच प्रभाग समन्वयक म्हणूनही जबाबदारी सांभाळली. पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याची खंत त्यांना आहे, विशेषतः त्यांच्या जागेवर प्रभागाबाहेरील व्यक्तीला उमेदवारी दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक कार्यकर्त्यांच्या विनंतीनंतर त्यांनी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला. काँग्रेसमध्ये पश्चिम आणि उत्तर नागपूरमध्ये सर्वाधिक बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे. पूर्व नागपूरमध्येही अशीच स्थिती आहे. इतर बंडखोरांमध्ये, एबी फॉर्म न मिळाल्याने पुरुषोत्तम हजारे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. माजी नगरसेवक नितीन साठवणे यांनी प्रभाग २१ मधून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून नामांकन भरले आहे. माजी नगरसेवक कमलेश चौधरी यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. प्रभाग २८ मधून उमेदवारी न मिळाल्याने परमेश्वर राऊत यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. तसेच, उत्तर नागपूरचे काँग्रेसचे संदीप सहारे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून प्रभाग क्रमांक ७ मधून अर्ज दाखल केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 5:08 pm

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये 'शक्तिस्थळ'चे उद्घाटन:दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ प्रेरणा केंद्र

दिवंगत भाजप नेते आणि माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड येथे उभारण्यात आलेल्या 'शक्तिस्थळ' या प्रेरणा केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी झाले. यानंतर झालेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी जगताप यांना 'मातीतून तयार झालेले नेतृत्व' असे संबोधले. फडणवीस म्हणाले की, लक्ष्मण जगताप हे कोणताही राजकीय वारसा नसताना स्वबळावर उभे राहिले. त्यांनी तरुण वयात राजकारणात प्रवेश करून नगरसेवक ते आमदार अशी यशस्वी वाटचाल केली. पिंपरी-चिंचवडला विकासाची दिशा देण्याचे आणि सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. औद्योगिकीकरणामुळे राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लोकांचा विश्वास त्यांनी मिळवला. 'मिनी महाराष्ट्र' म्हणून ओळखले जाणारे हे शहर आधुनिक स्वरूपात उभे राहण्यात जगताप यांचे मोठे योगदान आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. २०१७ मध्ये भाजपची महापालिकेत सत्ता आल्यानंतर शहराचा चेहरा बदलला. रस्ते, उड्डाणपूल, नदी सुधारणा, मेट्रो, २४ तास पाणीपुरवठा अशा विकासकामांना गती मिळाली, असे फडणवीस यांनी सांगितले. जगताप यांच्या स्वप्नातील शहर पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी २०२२ च्या विधानपरिषद निवडणुकीची आठवण करून दिली. महाविकास आघाडी सरकार असताना अटीतटीच्या या निवडणुकीत जगताप गंभीर आजारी असूनही पीपीई कीट घालून कार्डियाक रुग्णवाहिकेतून मुंबईला येऊन मतदान केले होते. हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या मतदानानेच राज्यातील सत्ता बदलाची मुहूर्तमेढ रोवली गेली. १५-२० दिवसांत सत्ता बदलली आणि जगताप यांचे 'तुम्हाला मुख्यमंत्री पाहण्याची' इच्छा पूर्ण झाली, अशी आठवण फडणवीस यांनी सांगितली. या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार शंकर जगताप, महेश लांडगे, बापू पठारे, उमा खापरे, अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप, विलास लांडे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी महापौर संजोग वाघेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 5:04 pm

भाजपसह शिवसेनेचीही विजयाची घोडदौड सुरू!:कल्याण-डोंबिवली महापालिकेत 9, तर राज्यभरात 13 नगरसेवक बिनविरोध

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या नाट्यातून पुढे येत आता अर्जांची छाननी केली जात असून यात राजकीय पक्ष एकमेकांना धक्के देत आहेत. तर काही ठिकाणी बिनविरोध विजयाचे गुलाल उधळण देखील सुरू झाली आहे. भाजपने कल्याण डोंबिवलीमध्ये विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता केडीएमसी महापालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या युतीचे तब्बल 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. भाजपचे 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने मतदानापूर्वीच विजयाचा गुलाल उधलण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे 122 सदस्य संख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 62 जगांपासून महायुती आता केवळ 53 जागा दूर आहे. त्यामुळे भाजप, शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रणनीती यशस्वी ठरत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आता शिवसेना शिंदे गटाचेही 4 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांची खेळी यशस्वी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपची विजयी घोडदौड कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान होण्यापूर्वीच भाजपची विजयी घोडदौड सुरू झाली आहे. रेखा चौधरी, आसावरी नवरे, रंजना पेंकर, मंदा पाटील यांच्यासह आता ज्योती पवन पाटील या 24 ब मधून बिनविरोध निवडून आल्या आहेत. ज्योती पवन पाटील यांच्यामुळे बिनविरोध निवडून येणाऱ्या भाजप उमेदवारांची संख्या आता 5 वर पोहोचली आहे. याचे श्रेय रवींद्र चव्हाण यांच्या रणनीतीला दिले जात आहे. शिवसेना शिंदे गटाचेही वर्चस्व कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पॅनल क्र. 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली रणजित जोशी तर प्रभाग क्र. 28 अ मधून हर्षल राजेश मोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदारे राजेश मोरे यांचे हर्षल मोरे हे चिरंजीव आहेत. येथील सर्व अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर या निवडणुका बिनविरोध झाल्या. तसेच याचे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले जात आहे. राज्यभरात महायुतीच्या 13 जागा बिनविरोध कल्याण डोंबिवलीसह राज्यभरातही महायुतीची घोडदौड सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने धुळे महानगरपालिकेत 2, पनवेल महानगरपालिकेत 1 जागा बिनविरोध करत, राज्यात 8 जागांवर बिनविरोध उमेदवार विजयी केले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने केडीएमसीत 4, जळगावमध्ये 1 जागा बिनविरोध करत राज्यभरात 5 जागा बिनविरोध केल्या आहेत. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अहिल्यानगरमध्ये एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. त्यामुळे राज्यात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीच्या एकूण 13 जागा बिनविरोध झाल्या असल्याचे दिसून येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 5:02 pm

अहिल्यानगरमध्ये मनसेचे दोन उमेदवार बेपत्ता:'बिनविरोध' निवडणुकीसाठी अपहरणाचा संशय, पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला असतानाच अहिल्यानगरमध्ये गुन्हेगारी आणि राजकारणाचे भीषण रूप समोर आले आहे. प्रभाग क्रमांक १७ मधून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग हे दोन उमेदवार अचानक गायब झाले आहेत. या दोन्ही उमेदवारांचे राजकीय दबावातून किंवा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अपहरण करण्यात आले असावे, असा खळबळजनक आरोप मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर सर्वच उमेदवार प्रचाराच्या नियोजनात व्यस्त होते. मात्र, प्रभाग १७ मधील राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग यांचा गेल्या २४ तासांपासून त्यांच्या कुटुंबाशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांचे मोबाईल फोनही बंद येत आहेत. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, तपास सुरू केला असून, बेपत्ता उमेदवारांच्या लोकेशनचा शोध घेतला जात आहे. निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारच गायब झाल्यामुळे अहिल्यानगरमधील राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय षडयंत्राचा संशय बेपत्ता झालेल्या उमेदवारांपैकी एक उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या तर दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत होता. केडगाव हा भाग राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो. यापूर्वीही येथे अनेक राजकीय संघर्षाच्या घटना घडल्या आहेत. केडगावमधील निवडणूक बिनविरोध व्हावी, या हेतूनेच आमच्या उमेदवारांचे अपहरण करण्यात आले आहे, असा आरोप सुमित वर्मा यांनी माध्यमांशी बोलताना केला. महापालिकेत ठाकरे बंधुंची युती महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, 30 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, तब्बल १८ वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले असून मुंबईत त्यांची युती झाली आहे. या युतीचा प्रभाव राज्याच्या इतर महापालिकांमध्येही जाणवत आहे. हे ही वाचा... मुंबई वाचवण्याची ही शेवटची संधी:आमिषाला बळी न पडता BMC निवडणुकीला सामोरे जा, राज ठाकरेंचा मनसे उमेदवारांना कानमंत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या उमेदवारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता मुंबई महापालिकेचा किल्ला अर्थात निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स येतील. पैशांचेही आमिष दाखवले जाईल. पण त्याला बळी पडू नका. आपल्याला मुंबई वाचवायची आहे. ती वाचवण्याची ही शेवटची संधी आहे. मलाही ऑफर्स आल्या होत्या, पण मी त्या पळवून लावल्या. तुम्हीही तसेच करा, असे ते म्हणालेत. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 5:01 pm

भाजप फुटीच्या उंबरठ्यावर:ज्यांनी भाजपचे घर बांधले, तेच आज बेघर; नाराज कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळावरून सुषमा अंधारेंची टीका

महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून राजकारणात सुरू असलेल्या गोंधळाचा समाचार घेताना सुषमा अंधारे यांनी महायुतीवर बोचरी टीका केली आहे. कुणी आत्मदहनाचा प्रयत्न करतंय, कुणी एबी फॉर्म खाऊन टाकतंय, तर कुणी नेत्यांच्याच कानशिलात लगावतंय. ही रंजक परिस्थिती पाहता भाजप आता फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे विधान अंधारे यांनी केले. सुषमा अंधारे यांनी भाजपच्या सद्यस्थितीची तुलना इतिहासातील काँग्रेसशी केली. जेव्हा एखादा पक्ष अतिशक्तीशाली होतो आणि महत्त्वाकांक्षा वाढतात, तेव्हा त्यातूनच नवे पक्ष जन्माला येतात. भाजपमध्ये नाशिकच्या देवयानी फरांदे असोत किंवा सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी; हे सर्व आलबेल नसल्याचे लक्षण आहे. ज्या निष्ठावंतांनी वर्षानुवर्षे मेहनत करून भाजपचे घर बांधले, त्यांनाच आज बाहेरून आलेल्या 'उपऱ्यां'साठी घराबाहेर काढले जात आहे, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा 'समन्वय' दुसरीकडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत अशी परिस्थिती नसल्याचा दावा अंधारे यांनी केला. आम्ही पुण्यात ८० ते ८५ जागांवर लढत आहोत. जिथे एकापेक्षा अधिक इच्छुक होते, त्यांना सन्मानाने 'मातोश्री'वर बोलावून त्यांची समजूत काढण्यात आली आणि मार्ग काढला गेला. आमच्याकडे बंडखोरीचे चित्र नाही, असे सुषमा अंधारेंनी नमूद केले. ढवळ्या शेजारी पवळ्या...; अजित पवारांवर निशाणा अजित पवार गटाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना दिलेल्या उमेदवारीवर अंधारे यांनी 'वाण नाही पण गुण लागला' या म्हणीचा आधार घेत टीका केली. त्या म्हणाल्या, अजित पवारांनी ज्या भाजपशी घरोबा केला आहे, तिथे आधीच भ्रष्ट, तडीपार आणि गुन्हेगार भरलेले आहेत. भाजप सोबत असेल तर गुन्हेगारांनाही निवडून आणता येते, ही खात्री पटल्यामुळेच अजित पवारांनी गुन्हेगारांना उमेदवारी देण्याचे धाडस केले आहे. लोकांच्या मतांचा आदर न करता राजकारणाचे जे गुन्हेगारीकरण सुरू आहे, ते अत्यंत निषेधार्ह आहे, असे म्हणत अंधारे यांनी मतदारांना या प्रवृत्तीचा विचार करण्याचे आवाहन केले. हे ही वाचा... राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का?:गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्यावरून दमानिया संतापल्या, NCP-BJP वर घणाघात महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देण्याऐवजी राजकीय पक्षांनी गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तींच्या पत्नींना आणि चक्क तुरुंगात असलेल्या आरोपींना उमेदवारी दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रवृत्तीचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र निषेध केला असून, राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का? गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संबंधित व्यक्ती जनतेच्या हिताची कामे करतील का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 4:33 pm

राहुल गांधींचे काम प्रभू रामचंद्रांसारखेच:नाना पटोलेंनी राहुल गांधींची तुलना केली रामाशी; 'अटोले - पटोले' म्हणत शिवसेनेचा पलटवार

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्याची तुलना प्रभू श्रीरामांच्या कार्याशी केल्याने राज्याच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण झाला आहे. प्रभू रामचंद्रांचे काम शोषित व पीडितांची सेवा करणे व त्यांना न्याय मिळवून देण्याचे होते. राहुल गांधी तेच काम करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानावर सत्ताधारी शिवसेनेने तीव्र आक्षेप घेत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींची तुलना रामाशी करणे अत्यंत हास्यास्पद आहे. कारण काँग्रेस हा पक्षच मुळात रामविरोधी आहे, असे सेना नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अयोध्येत जाऊन अद्याप श्रीरामाचे दर्शन घेतले नाही. पत्रकारांनी याविषयी नाना पटोले यांनी छेडले असता त्यांनी राहुल गांधी हे श्रीरामासारखेच काम करत असल्याचे स्पष्ट केले. प्रभू श्रीराम सर्वांच्याच मनात असतात. प्रत्येकाच्या विचारांत असतात. शोषित व पीडित लोकांची सेवा करणे, त्यांना न्याय मिळवून देणे हेच त्यांचे काम होते. राहुल गांधी तेच काम करत आहेत. राहुल गांधी प्रभू श्रीरामाच्याच आदर्शांनुसार वाटचाल करत आहेत. त्यामुळे प्रभू रामाला केवळ मंदिरापर्यंत मर्यादित ठेवता कामा नये. त्यांचे विचार व कर्म अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे पटोले म्हणाले. राहुल गांधी अयोध्येच्या दौऱ्यावर जातील तेव्हा ते जरूर रामलल्लांचे दर्शन घेतील. कारण, राहुल यांचे वडील राजीव गांधी यांनीच रामलल्ला मंदिराचे कुलूप उघडले होते हे सर्वश्रूत आहे. आज काहीजण केवळ दिखावा करण्यासाठी मंदिरात जातात. पण राहुल गांधी तसे नाहीत. राहुल गांधी प्रभू श्रीरामचंद्रांचेच काम करत आहेत. त्यामुळे त्यांना तसा दिखावा करण्याची गरज नाही, असेही पटोले यावेळी बोलताना म्हणाले. अटोले - पटोलेंचे विधान अत्यंत हास्यास्पद - संजय निरुपम दुसरीकडे, सत्ताधारी शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार संजय निरुपम यांनी या प्रकरणी नाना पटोले व राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, नाना पटोलेंचे विधान अत्यंत हास्यास्पद आहे. कारण, काँग्रेस हा पक्षच मुळात रामविरोधी आहे. अयोध्या हे श्रीरामाचे जन्मस्थान आहे. तेथील रामजन्मभूमी मंदिराला काँग्रेसने नेहमीच विरोध केला. तिथे मंदिर होऊ नये यासाठी सातत्याने प्रयत्न केला. ज्या काँग्रेसने रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले, त्याच काँग्रेसच्या अटोले - पटोलेंनी (नाना पटोले) आपल्या नेत्याची तुलना रामाशी केली. मी त्यांना एवढेच सांगेन की, कृपया प्रभू रामाच्या नावाचा अपमान करू नका. तुम्हाला तुमच्या नेत्याची तुलना करायची असेल, तर त्यांच्या वर्तणुकीनुसार रामाशी नव्हे तर रावणाशी करा, असे ते म्हणाले. मुंबईचा महापौर मराठी भाषिकच ठरवतील संजय निरुपम यांनी यावेळी मुंबईचा महापौर मराठी जनताच ठरवणार असल्याचाही दावा केला. ते म्हणाले, मुंबईचा नवा महापौर महायुतीचाच होईल. त्याचा निर्णय मुंबईचा मराठी भाषिक समाज घेईल. मराठी समाज ठरवेल तोच पुढचा महापौर बनवेल. मराठा भाषिक लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानतो. ते आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते महाराष्ट्रात फक्त जय महाराष्ट्र बोला जय श्रीराम म्हणू नका असे केव्हाही म्हणाले नसते. पण आज ज्या पक्षांचे अस्तित्व संपले आहे, ते स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी इथे जय श्रीराम नव्हे तर जय महाराष्ट्रच बोला अशा प्रकारची विधाने करत आहेत. महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वांनीच मराठी बोलले पाहिजे असा आमचा आग्रह आहे. पण प्रभू श्रीरामांशी विद्रोह करून नाही. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य दैवत मानत असाल तर तुम्ही कधीही रामद्रोही होऊ शकत नाही. जे रामद्रोही झाले ते मुद्दाम हिंदू समाजात फूट पाडू इच्छित आहेत. कारण ही जिहादींची डिझाइन आहे, जिहादींचा प्लॅन आहे. आज ज्या प्रकारे ठाकरे गट व मनसे निवडक मुस्लिम मतांसाठी जिहादींशी हातमिळवणी करत आहेत, ते पाहता ते प्रभू श्रीराम व हिंदू समाजाच्या विरोधात गेल्याचे स्पष्ट होते, असे निरुपम म्हणाले. वंदे मातरम भारतात नव्हे तर पाकिस्तानात म्हणायचे काय? संजय निरुपम यांनी यावेळी वंदे मातरम गीताशी संबंधित वादावरूनही महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते म्हणाले, वंदे मातरम हे हिंदुस्थानचे राष्ट्रगीत आहे. एक प्रकारचे नॅशनल अँथम (National Anthem) आहे. हे दीडशे वर्ष जुने गीत आहे. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्याची लढाई लढली जात होती, तेव्हा आपल्या लाखो पूर्वजांनी स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. अशा वंदे मातरमवर कुणाला आक्षेप असेल, तर त्यांनी वंदे मातरम हे भारतात नव्हे तर पाकिस्तानात म्हणावे काय? हे सांगावे, असे संजय निरुपम म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 4:20 pm

जळगाव मनपात शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला विजय:ठाकरेंच्या उमेदवाराची माघारी, आमदारपुत्र बिनविरोध; राज्यात युतीचे 7 नगरसेवक विजयी

जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेत राजकीय नाट्य पाहायला मिळाले. प्रभाग क्रमांक १८ (अ) मध्ये शिवसेना शिंदे गटाकडून रिंगणात असलेले आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव सोनवणे यांच्या विरोधातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मयूर सोनवणे यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या विजयाने जळगावात शिंदेंच्या शिवसेनेने आपले खाते उघडले असून, महायुतीचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. आतापर्यंत राज्यातील विविध महापालिकांमध्ये महायुतीचे नगरसेवक मतदानाआधीच विजय झाले आहेत. भाजपचे कल्याण-डोंबिवली ३, धुळे २, पनवेल १ असे एकूण ६ उमेदवार विजय झालेत. तर आता जळगावात शिवसेना शिंदे गटाचा १ उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. जळगाव मनपा निवडणूक प्रभाग क्रमांक १८ अ मधील उमेदवार तथा आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे. कारण, येथील गौरव सोनवणेंच्या विरोधातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार मयूर सोनवणे यांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे डॉ. गौरव सोनवणे हे बिनविरोध निवडून आले आहे. माजी महापौरांचा अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद जळगाव महानगरपालिका निवडणुकीतील १०३८ अर्जांच्या छाननीमध्ये १३५ अर्ज अवैध ठरले आहेत. भाजपच्या माजी महापौर जयश्री धांडे यांना मोठा फटका बसला आहे. त्यांच्या 'एबी' फॉर्मवर स्वाक्षरी नसल्याने त्यांचा अधिकृत भाजप उमेदवार म्हणून अर्ज बाद झाला. मात्र, त्यांनी अपक्ष अर्जही भरला असल्याने त्या आता भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून मैदानात असतील. राष्ट्रवादीत बंडाळी: महानगरप्रमुखाचा राजीनामा महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठा भूकंप झाला आहे. महानगरप्रमुख अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी घराणेशाहीसाठी पक्ष विकल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे. देवकर यांनी आपल्या परिवारातील सदस्यांना उमेदवारी देण्यासाठी निष्ठवान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले, असे पाटील यांनी अजित पवारांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. जळगाव महायुतीचा 'जागावाटप' फॉर्म्युला अनेक दिवसांच्या चर्चेनंतर जळगावात महायुतीचे जागावाटप अंतिम झाले. भारतीय जनता पक्ष ४६ जागा, शिवसेना शिंदे गट २३ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला ६ जागा आल्या आहेत. काही प्रभागांमध्ये भाजप आणि शिंदे गटात उमेदवारांची 'आयात-निर्यात' करण्यात आली असून, नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचे आव्हान आता नेत्यांपुढे आहे. हे ही वाचा... पुण्यात भाजप उमेदवाराचा अर्ज मागे:कार्यकर्त्यांचा रोष, सोशल मीडियावरील टीकेमुळे घेतला निर्णय, माघारीनंतर पूजा मोरे रडल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पूजा मोरे-जाधव यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा रोष आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या खालच्या पातळीवरील राजकारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. पुणे शहरात भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 3:55 pm

आमच्या शेंबड्या बबड्याला नेता करा:कार्यकर्त्यांनो तुम्ही फक्त पाणी भरा; NCP कार्यकर्त्याची अजित पवारांना लिहिलेल्या पत्रात खदखद

जळगाव महापालिकेची उमेदवारी डावलण्यात आलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून आपला रोष व्यक्त केला आहे. या पत्राद्वारे त्यांनी आमदार गुलाबराव देवकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर जागांचा सौदा केल्याचा आरोप केला आहे. आमच्या शेंबड्याला नेता करा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनो तुम्ही फक्त पाणी भरा, असे या पदाधिकाऱ्याने देवकर यांना उद्देशून म्हटले आहे. जळगावचे राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी अजित पवारांना हे पत्र लिहिले आहे. जळगाव शहर व जिल्ह्यात पक्षाचे नेतृत्व आपण ज्यांच्याकडे सोपवले आहे, त्यांनी महापालिका निवडणुकीतील जागावाटपातून पुन्हा एकदा स्वतःचा खरा चेहरा दाखवून दिला आहे. स्वार्थासाठी पक्षाची इभ्रत पणाला लावली आहे, मिळालेल्या जागांचा सौदा केला आणि त्यातून स्वतः मोकळे झाले, असा संताप अभिषेक पाटील यांनी आपल्या पत्राद्वारे व्यक्त केला आहे. खाली वाचा त्यांचे पत्र जशास तसे... अभिषेक पाटील आपल्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना म्हणतात, जळगाव शहर व जिल्ह्यात पक्षाचे नेतृत्व आपण ज्यांच्याकडे सोपवले आहे, त्यांनी अलीकडील महापालिका निवडणुकीतील जागावाटपातून पुन्हा एकदा स्वतःचा खरा चेहरा दाखवून दिला आहे. स्वार्थासाठी पक्षाची इभ्रत पणाला लावली आहे, मिळालेल्या जागांचा सौदा केला आणि त्यातून स्वतः मोकळे झाले. आमच्या शेंबड्या बाब्याला नेता करा आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांनो तुम्ही पाणी भरा, या न्यायाने माजी मंत्री व पक्षाच्या प्रमुख नेत्याने स्वतःच्या मुलासाठी एक जागा राखून ठेवली. ज्याला राजकारणात वा समाजकारणात काडीचीही रुची नाही. उरलेल्या जागांवर घड्याळाच्या चिन्हाखाली भाजपचे चेहरे निवडणूक लढवणार आहेत. ही वस्तुस्थिती आता लपून राहिलेली नाही. हे योग्य की अयोग्य, चांगले की वाईट याचा निकाल आपणच द्यावा. या साऱ्या प्रक्रियेत पक्षाला काय मिळाले? हा प्रश्न जितका साधा आहे तितकाच महत्वाचा आहे. आणि कार्यकर्त्यांना काय मिळेल, हे तर सांगायलाच नको. वर्षानुवर्षे झेंडे उचलणारे, वेळ-श्रम-पैसा खर्च करणारे, कायम घरच्यांची नाराजी सहन करून बोलणी खाणारे प्रामाणिक कार्यकर्ते त्यांच्या वाट्याला सन्मानाऐवजी अपमान, आणि न्यायाऐवजी समजूतदारपणाच्या नावाखाली शांत बसण्याचा सल्ला मिळत आहे. या अशा भंकस नेतृत्वाखाली जळगाव शहर व जिल्ह्यात पक्ष कसा सांभाळला जाईल आणि पुढे कसा नेला जाईल? या प्रश्नाचे उत्तर मला आपल्याकडून अपेक्षित आहे. खर सांगायचं झाल तर आपण दिलेल्या जबदारीनुसार मी जळगाव शहराचा महानगराध्यक्ष आहे. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचे एबी फॉर्म महानगराध्यक्ष या जबाबदारीने माझ्याकडे दिले पाहिजे होते व माझ्या सहीशिवाय ते ग्राह्य धरले जायला नको होते. हे पदाच्या अधिकाराचे उल्लंघन नाही का? आणि अपमान सुद्धा. पक्ष विचारांवर उभा असतो, कार्यकर्त्यांवर उभा असतो, डुप्लिकेट, स्वार्थी, लबाड लोकांवर नाही, सौद्यांवर नाही. महोदय, माझा हा निर्णय रागातून नाही; तो वेदनेतून आहे. तुमच्या नेतृत्वावर प्रेम होते, आहे आणि राहील. पण अन्यायावर डोळे झाकून उभे राहणे मला जमणार नाही. म्हणूनच, आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारा, प्रेम करणारा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाचा व प्राथमिक सभासदत्वाचा राजीनामा देत आहे. हा राजीनामा विरोधाचा नाही, तर आत्मसन्मानाचा आहे. कदाचित हा आवाज किरकोळ वाटेल; पण तो अनेक न बोललेल्या कार्यकर्त्यांच्या मनातील अस्वस्थतेचा प्रतिध्वनी आहे, एवढी नम्र नोंद घ्यावी.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 3:44 pm

भाजपने मेरिटच्या आधारावर उमेदवारी दिली:महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा; बंडखोरांची मनधरणी करण्याचे दिले संकेत

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भाजपने मेरिटच्या आधारावर महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिल्याचा दावा केला. छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांत इच्छुकांनी उमेदवारी संदर्भात भाजपवर गंभीर आरोप केले असताना बावनकुळेंनी हा दावा केला आहे. यावेळी त्यांनी बंडखोर उमेदवा लवकरच उमेदवारी मागे घेतील, असा विश्वासही व्यक्त केला. चंद्रशेखर बावनकुळे हिंगोली येथे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेमध्ये लाभार्थ्यांच्या धनादेश वाटप कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, आमदार तान्हाजी मुटकुळे उपस्थित होते. महानगर पालिका निवडणुकीत भाजपात बंडखोरी झाल्याच्या प्रश्‍नावर ते म्हणाले की, निवडणुकीत एकाच पदासाठी एकालाच उमेदवारी मिळते. उमेदवारी मिळण्याची प्रत्येकालाच अपेक्षा असते. पक्षात अनेक वर्ष काम करणारा कार्यकर्ता उमेदवारी न मिळाल्याने नाराज होतोेच. मात्र सर्वोत्तम काय आहे हे पाहून पक्षच निर्णय घेत असतो. यावेळी जिंकून येण्याच्या मेरीटवरच उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाच्या विचाराने प्रेरीत असलेला कार्यकर्ता बंडखोरी करत नाही. राज्यात बंडखोरी झालेल्या ठिकाणी नाराज उमेदवारांच्या भेटी घेणार असून लवकरच ते उमेदवारी अर्ज मागे घेतील असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी (अजित पवार गट) व भाजपाने काही ठिकाणी गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याचा आरोप होत असल्याच्या प्रश्‍नावर ते म्हणाले की, गुन्हा दाखल झाला म्हणजे तो गुन्हेगार होत नाही त्यासाठी आरोप सिध्द झाला पाहिजे त्यामुळे आम्ही गुन्हेगारांना उमेदवारी दिले हे म्हणणे चुकीचे आहे. मुंबईत मनसनेच्या पदाधिकाऱ्याला धमकी दिल्याची अफवा असून हा फुसका बाँम्ब आहे. निवडणुकीच्या वेळी असे फुसके बाँॅंम्ब सोडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांना पिककर्ज घेतांना कुठल्याही स्टॅम्पड्यूटी भरण्याची गरज नाही. पिककर्जासाठी लागणारी स्टॅॅम्पड्युटी माफ केली जाणार आहे. या शिवाय शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी योग्य रस्ता, १२ तास विज व पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी सरकारने मुख्यमंत्री पांदणरस्ता योजना, मुख्यमंत्री सौरवाहिनी योजना आणल्याचे त्यांनी सांगितले. सन २०२९ पर्यंत सर्व शेतकऱ्यांना एक रुपयाही न देता १२ तास विज पुरवठा मिळेल. तर यापुर्वी शेतकऱ्यांकडे असलेली विज देयकांची २७ हजार कोटी रुपयांची थकबाकी माफ केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विनाचौकशी निलंबीत केल्याच्या प्रश्‍नावर त्यांनी शासन व प्रशासनाच्या माध्यमातून योजना राबविल्या जातात. त्यामुळे महसूल संघटनेने विनंती केल्यानुसार कारवाई झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरु असून त्यात ते दोषी आढळून आले तर कारवाई होणार आहे. गाळमुक्त धरणाचा हिंगोली पॅटर्न राज्यभर राबविणार हिंगोली शहराने तलावातील लाखो ब्रास गाळ काढून शेतकऱ्यांना दिला आहे. त्यामुळे पाणीसाठाही होणार असून शेतीही सुपीक झाली आहे. गाळमुक्त धरणाचा हिंगोली पॅटर्न राज्यभर राबविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नालाखोलीकरण व रुंदीकरणाच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मृद व जलसंधारण विभागाच्या कामाची चौकशी करणार हिंगोलीत मृद व जलसंधारण विभागाकडून कामे केली जातात. मात्र पावसाळ्यात हि कामे वाहून जात असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर या कामांची चौकशी करणार असून त्याबाबतच सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 3:35 pm

पुण्यात भाजप उमेदवाराचा अर्ज मागे:कार्यकर्त्यांचा रोष, सोशल मीडियावरील टीकेमुळे घेतला निर्णय, माघारीनंतर पूजा मोरे रडल्या

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पूजा मोरे-जाधव यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा रोष आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या खालच्या पातळीवरील राजकारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. पुणे शहरात भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांसह इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. या टीकेमुळे व्यथित होऊन मोरे-जाधव यांनी उमेदवारी अर्ज मागे घेताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी पूजा मोरे-जाधव म्हणाल्या, माझ्या खूप वेदना आहेत. माझा प्रवास सर्वसामान्य घरातून झाला आहे. पती धनंजय जाधव यांच्याशी विवाह करून पुण्यासारख्या मोठ्या शहरात येईल असे कधी वाटले नव्हते. त्यांनी पोलिसांच्या लाठीकाठीखाली विविध आंदोलने करत पाच गुन्हे अंगावर घेतल्याचे आणि तारुण्यात अनेकदा न्यायालयात फेऱ्या मारल्याचे सांगितले. वकिलांना देण्यासाठी पैसे नव्हते, अशी आठवणही त्यांनी करून दिली. छोट्या चुकीचा मोठा बाऊ केला भाजपमधून कोणत्यातरी पदावर जाऊन तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, त्यांच्या आयुष्यातील एका छोट्या चुकीचा मोठा बाऊ करून त्यांच्या विरोधात षडयंत्र रचले गेल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या की, त्या लढणाऱ्या कार्यकर्ती असून भाजपने त्यांना पक्षात स्वीकारले आहे आणि त्यांनी पक्षाची विचारधारा समजून घेतली आहे. पुण्यात आल्यावर हिंदुत्ववादी चळवळ समजली मोरे-जाधव यांनी स्पष्ट केले की, त्यांचे मागील आयुष्य आणि लग्नानंतरचे आयुष्य वेगळे आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या त्यांनी ग्रामीण भागात कारखानदारांविरोधात लढा दिला. शहरात आल्यावर त्यांना हिंदुत्ववादी चळवळ समजली. काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी अनेकांना भेटले होते, जिथे हिंदू धर्माच्या लोकांना विचारून मारण्यात आले होते. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती, परंतु ती बाजूला सारून दुसराच व्हिडिओ पसरवला गेला. तसेच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळावा म्हणून शेतकरी संघटनेमार्फत भेटल्याचा फोटो फिरवून बदनामी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील काळात हिंदुत्वाचे काम करत राहील मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातूनही त्यांनी काम केले आहे, परंतु काही ट्रोलर्स त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, त्या हिंदुत्वाचे काम पुढील काळात करत राहतील आणि भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी काम करतील. त्याग करण्याची ही त्यांची वेळ असून त्यांनी तो केला आहे. कोण आहे पूजा मोरे-जाधव? पूजा जाधव या मूळच्या गेवराईच्या असल्याची माहिती आहे. त्यांनी गेवराई येथून 2024 साली संभाजीराजे छत्रपती यांनी काढलेल्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे विधानसभा निवडणूकही लढवली होती. जुलै 2025 रोजी पूजा जाधव यांनी पुण्यामध्ये 5 हजार किलो चिकन मोफत वाटले होते, तेव्हापासून त्यांची चर्चा सुरू झाली होती.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 3:15 pm

प्रमोद निम्हण यांच्या समर्थनार्थ कडकडीत बंद:अजित पवार गटाने उमेदवारी नाकारल्याने ग्रामस्थांचा तीव्र निषेध

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात प्रमोद निम्हण यांना उमेदवारी नाकारल्याच्या निषेधार्थ पाषाणमध्ये गुरुवारी, १ जानेवारी रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ९ मध्ये प्रमोद निम्हण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल स्थापन करण्याच्या हालचाली सुरू होत्या. पक्ष पातळीवर या संदर्भात सर्व नियोजन झाले होते आणि नागरिकांनीही निम्हण यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला होता. मात्र, ऐनवेळी बाबुराव चांदेरे यांना उमेदवारी देण्यात आली, तर प्रमोद निम्हण यांना डावलण्यात आले. या अचानक बदलामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला. बाबुराव चांदेरे यांच्या उमेदवारीबाबत प्रचंड नाराजी असूनही त्यांना तिकीट देण्याच्या निर्णयाचा ग्रामस्थांनी निषेध केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत संतप्त भावना पोहोचवण्यासाठी आणि प्रमोद निम्हण यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी नागरिकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीही उत्स्फूर्तपणे हा बंद पाळला. एनओसी प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दरम्यान, पुणे महानगरपालिका निवडणुकीतील 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' (एनओसी) प्रक्रियेच्या वैधतेबाबत आणि सर्व उमेदवारांसाठी समान निकष लावले जात आहेत का, याबद्दल लोकहिताच्या दृष्टीने प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. इन्क्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक असलम इसाक बागवान यांनी या विषयावर माहिती अधिकार अर्ज दाखल केला आहे. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी आक्षेप, जिल्हाधिकारी यांना घटनात्मक स्मरणपत्र आणि राज्य निवडणूक आयोगाकडे औपचारिक तक्रार सादर केली आहे. बागवान यांनी स्पष्ट केले की, त्यांची ही भूमिका कोणत्याही व्यक्ती, उमेदवार किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नाही. भारतीय संविधानातील अनुच्छेद १४ आणि २४३झेडए नुसार स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका होणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रशासनाने या विषयावर वस्तुनिष्ठ, स्पष्ट आणि वेळेत स्पष्टीकरण द्यावे, जेणेकरून नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास दृढ राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 3:02 pm

अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने वार:पूर्ववैमनस्यातून हल्ला; खुनाच्या प्रयत्नाखाली 4 जण ताब्यात

पुण्यातील कात्रज परिसरातील अंजनीनगर येथे पूर्ववैमनस्यातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका अल्पवयीनासह चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ऋषभ नावाचा १७ वर्षीय मुलगा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी ऋषभ आणि एका अल्पवयीन आरोपीमध्ये वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेच्या दिवशी ऋषभ अंजनीनगर भागातून जात असताना आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी त्याला गाठले. त्यांनी ऋषभवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामुळे ऋषभ रक्तस्त्राव होऊन जमिनीवर पडला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी ऋषभला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंबेगाव पोलीस ठाण्यात ऋषभने या प्रकरणी फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक फिरोज मुलाणी पुढील तपास करत आहेत. खुनाचा गुन्ह्यातील आरोपी जेरबंद हडपसरमधील काळेपडळ परिसरातून एका तरुणाचे अपहरण करून वैमनस्यातून त्याचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक घटना ३० डिसेंबर रोजी घडली. प्रसाद वीरभद्र देवज्ञे (वय २१, रा. चिखले वाडा, नंदुरवेस गल्ली, परळी, जि. बीड) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी किरण भैरू चव्हाण (वय ३२), रोहित भरत गायकवाड (वय १९, दोघे रा. हडपसर) यांना अटक करण्यात आली. आरोपींबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चव्हाण आणि गायकवाड यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 2:59 pm

कौटुंबिक वादातून पत्नीच्या चेहऱ्यावर फेकला उकळता चहा:पतीविरुद्ध कोथरूड पोलिसांकडून गुन्हा दाखल

पुण्यात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर उकळता चहा फेकल्याची घटना कोथरूड भागात घडली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २३ वर्षीय तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात पतीविरोधात फिर्याद दिली आहे. आरोपी २७ वर्षीय पती खासगी ठिकाणी नोकरी करतो. त्यांचे वर्षभरापूर्वी लग्न झाले होते आणि ते पौड रस्त्यावरील भागात राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू होते. बुधवारी (३१ डिसेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास तक्रारदार तरुणी झोपली असताना, पतीसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून पतीने तिच्या चेहऱ्यावर उकळता चहा फेकला. या घटनेत तरुणीच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. पोलीस हवालदार एम. जी. दळवी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका महिलेला बेदम मारहाण दुसऱ्या एका घटनेत, पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका महिलेला बेदम मारहाण करून तिच्या चेहऱ्यावर ॲसिडसदृश द्रवपदार्थ ओतण्यात आला. ही घटना एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात घडली असून, उत्तमनगर पोलिसांनी दोन महिलांविरुद्ध गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ३२ वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी महिलेला तिच्या पतीचे तक्रारदार महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यानंतर शिवणे भागात आरोपी महिला आणि तिच्यासोबत असलेल्या एका महिलेने तक्रारदार महिलेला अडवले. त्यांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि धक्का दिल्याने ती रस्त्यावर पडली. आरोपी महिलेने रस्त्यात पडलेला दगड उचलून तिच्या चेहऱ्यावर मारला. त्यानंतर आरोपी महिलेने बाटलीतून ॲसिडसदृश द्रवपदार्थ महिलेच्या चेहऱ्यावर ओतला, ज्यामुळे तिचा चेहरा लालसर झाला. पोलीस उपनिरीक्षक एस. लढी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 2:58 pm

कोल्हापूरमध्ये कार अपघात; ३ ठार

कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूरमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भयंकर अपघाताची घटना घडली. भरधाव कारने तिघांना चिरडले. या अपघातामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. पहाटे पाचच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील […] The post कोल्हापूरमध्ये कार अपघात; ३ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 2:12 pm

अहिल्यानगरात शिंदे गटाला जोरदार झटका:5 उमेदवारांचे अर्ज बाद; एबी फॉर्मवरील खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, झेरॉक्स प्रत जोडणे भोवले

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत सर्वाधिक 54 जागा लढवणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेला जबर झटका बसला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवार अर्जाच्या छाननीत 5 उमेदवारांचे अर्ज बाद ठरवलेत. या उमेदवारांना अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी, एबी फॉर्मवरील खाडाखोड, अर्जासोबत झेरॉक्स प्रत जोडणे आदी चुका भोवल्या आहेत. अहिल्यानगर महापालिकेसाठी येत्या 15 जानेवारीला निवडणूक होणार आहे. त्यासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. बुधवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत सत्ताधारी शिंदे गटाच्या 5 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. यापैकी एक अर्ज अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी असल्याने बाद झाला. तर इतर 4 अर्ज एबी फॉर्म न जोडणे, एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडणे व जोडलेल्या एबी फॉर्मवर खाडाखोड करणे आदी कारणांमुळे बाद ठरवण्यात आले. यामुळे महापालिकेच्या 54 जागा लढवणाऱ्या शिंदे गटाचा आकडा 49 वर घसरला आहे. अर्जावर कोणते घेण्यात आले आक्षेप? विशेष म्हणजे बहुतांश प्रभागांतील उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जांवर विविध आक्षेप नोंदवले. यात महापालिकेचा कर थकवणे, रस्त्यांवर अतिक्रमण करणे, अवैध बांधकाम करणे, अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी, अर्जाच्या प्रस्तावकाची खोटी स्वाक्षरी आदी तक्रारींचा समावेश होता. या तक्रारींवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तत्काळ सुनावणी घेत या तक्रारींची पडताळणी केली. त्यात ज्या तक्रारींमध्ये तथ्य आढळले ते अर्ज अवैध ठरवण्यात आले. पडताळणीअंती 788 पैकी 17 अर्ज अवैध ठरले. तर 771 अर्ज वैध ठरले. शिंदे गटातील कुणाचे अर्ज ठरले बाद? यासंबंधीच्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 8 मधील शिंदे गटाचे उमेदवार राहुल कातोरे यांच्या उमेदवारी अर्जावरील अनुमोदकाच्या स्वाक्षरीवर आक्षेप घेण्यात आला. या स्वाक्षरीची प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतर ती चुकीची असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला नव्हता. प्रभाग क्रमांक 6 मध्ये विशाल शितोळे यांनी एबी फॉर्म जोडलेला नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवला. पण त्यांनी दाखल केलेला अपक्ष अर्ज वैध ठरला. प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार अमित खामकर यांनी एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडल्याने त्यांचाही अर्ज बाद ठरला. त्यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला. प्रभाग क्रमांक 16 मध्ये हर्षवर्धन कोतकर यांच्या एबी फॉर्ममध्ये खाडाखोड असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. इथे त्यांचाही अपक्ष अर्ज वैध ठरला. प्रभाग क्रमांक 17 मध्ये गौरी नन्नावरे यांच्या एबी फॉर्ममध्ये खाडाखोड असल्यमुळे त्यांचाही अर्ज अवैध ठरला. पण अपक्ष अर्ज वैध ठरला. घाईच ठरली घातक शिंदेसेनेचे पाच अर्ज अवैध ठरविण्यात आले. अन्य पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदेसेनेकडे उमेदवारीसाठी काही जणांनी संपर्क केला. त्यामुळे उपलब्ध असलेल्या एबी फॉर्मवर खाडाखोड करून व्हाईटनर लावून उमेदवारांची नावे टाकण्यात आले, तर काहींना एबी फॉर्मची झेरॉक्स देण्यात आली. त्यामुळे छाननीत हे अर्ज अवैध ठरले. शिंदे गटावर अपक्षांना पाठिंबा देण्याची वेळ आपल्या 5 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद ठरल्यामुळे शिंदे गटावर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची वेळ आली आहे. शिंदे गटाचे शहरप्रमुख सचिन जाधव यांनी याविषयी सांगितले की, छाननीमध्ये आमचे जे उमेदवार बाद ठरले आहेत व ज्यांचे अपक्ष उमेदवार अर्ज वैध आहेत त्यांना, तसेच ज्यांनी आमच्याकडे उमेदवारीची मागणी केली होती, पण काही कारणांमुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा उमेदवारांना आता पक्षाच्यावतीने पुरस्कृत केले जाईल. एका उमेदवाराचा ठाकरे व शिंदे गटाकडून अर्ज प्रभाग क्रमांक 16 मधील सुनीता कोतकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे अशा दोन्ही गटांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत त्यांनी शिंदे गटाचा अर्ज कायम ठेवला. त्यामुळे ठाकरे गटाच्या यादीतील 1 उमेदवार कमी झाला आहे. आता महापालिका निवडणुकीच्या मैदानात ठाकरे गटाचे केवळ 23 उमेदवार मैदानात आहेत.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 2:12 pm

नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत पाऊस

मुंबई : प्रतिनिधी नव वर्षाचे देशभरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. रात्रभर पार्टी करण्यात आली. पण नवीन वर्षाची पहाट होताच मुंबईकरांना खास सरप्राईज मिळाले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचा गोंधळ उडाला. नवीन वर्षाचे स्वागत पावसाने झाल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. मध्यरात्रीपासूनच मुंबईत […] The post नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत पाऊस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 2:10 pm

राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का?:गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्यावरून दमानिया संतापल्या, NCP-BJP वर घणाघात

महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार देण्याऐवजी राजकीय पक्षांनी गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित व्यक्तींच्या पत्नींना आणि चक्क तुरुंगात असलेल्या आरोपींना उमेदवारी दिल्याने खळबळ उडाली आहे. या प्रवृत्तीचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र निषेध केला असून, राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का? गुंड प्रवृत्तीच्या लोकांशी संबंधित व्यक्ती जनतेच्या हिताची कामे करतील का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुण्यातील कुख्यात गुंडांच्या टोळीतील तीन सदस्यांनी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एबी फॉर्म भरून उमेदवारी दाखल केली आहे. केवळ राष्ट्रवादीच नाही, भाजपकडूनही अपहरण, खंडणी आणि गोळीबाराचे आरोप असलेल्या गुंडाच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. हे प्रकरण महापालिका निवडणुकीत चांगलेच तापण्याची शक्यता असून, अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. . नेमके काय म्हणाल्या अंजली दमानिया? अंजली दमानिया यांनी विशेषतः अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. पुण्याच्या राजकारणात दहशत असलेल्या आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना पक्षाने तिकीट दिले आहे, ज्या सध्या तुरुंगात आहेत. यावर नगरसेवकाचे काम कचरा व्यवस्थापन, गटारांची सफाई, पाणीपुरवठा आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा देणे हे असते. ज्या महिला स्वतः तुरुंगात आहेत, त्या जेलमधून या सोयी नागरिकांना कशा काय पुरवणार आहेत? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय. तुरुंगातून मूलभूत सुविधा कशा देणार? नगरसेवक हा जनतेचा प्रतिनिधी असतो. कचरा व्यवस्थापन, गटारांची साफसफाई, प्राथमिक शिक्षण, दवाखाने, खेळाची मैदाने अशा मूलभूत सुविधा नागरिकांना देणे हेच नगरसेवकाचे काम आहे. मात्र सध्याच्या निवडणुकीत अजित पवार गटाने आंदेकर कुटुंबातील, सध्या तुरुंगात असलेल्या दोन महिलांना तिकीट दिले आहे. तुरुंगातून त्या मूलभूत सुविधा, ह्या बायका कशा देणार आहेत? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला. अशा लोकांकडून कामे होतील का? ह्या दोघींव्यतिरिक्त अजित पवार गटाने गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आणि खुनाच्या आरोपाखाली असलेल्या बापू नायर यांच्या पत्नीला, गजा मारणे यांच्या पत्नीला तिकीट दिले आहे. तर दुसरीकडे, भाजपने अपहरण, खंडणी आणि गोळीबाराच्या आरोप असलेल्या देविदास चोर्घे यांच्या पत्नीला तिकीट दिले आहे. काय अपेक्षा ठेवणार जनता ह्यांच्याकडून ? अशा लोकांकडून कचरा उचलला जाईल का? गटारे साफ होतील का? नागरिकांची कामे होतील का? राजकीय पक्षांची डोकी ठिकाणावर आहेत का? असा संतप्त सवाल अंजली दमानिया यांनी केला. हे ही वाचा... NCP ने गुन्हेगारांना उमेदवारी दिलेली नाही:अजित पवारांनी सचिन खरातांवर फोडले खापर; पण अर्जासोबत AB फॉर्म 'राष्ट्रवादी'चेच 'राष्ट्रवादी काँग्रेसने कोणत्याही गुन्हेगारांना उमेदवारी दिलेली नाही. आमची सचिन खरात यांच्यासोबत युती राहिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या जागावर उमेदवार देण्याचा त्यांना अधिकार आहे,' असे म्हणत अजित पवारांनी या साऱ्या प्रकरणाचे खापर खरातांवर फोडत वादातून पळ काढण्याचा आज प्रयत्न केलाय. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 2:09 pm

गंगाखेड तालुक्यात दोन गटांत तुंबळ हाणामारी

गंगाखेड : तालुक्यातील इरळद येथील देवईमाय मठ येथे बुधवारी जत्रा होती. सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दोन लहान मुलाच्या भांडणाचा वाद विकोपाला गेला. त्यानंतर दोन्ही गटातील माणसांनी लाठ्या, काठ्या, दगडानी एकमेकास तुंबळ हाणामारीस सुरुवात केली. या मारहाणीत दोघेजण गंभीर जखमी झाले. सदरील भांडण पेटण्याच्या मार्गावर असताना पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. त्यानंतर दोन्ही गटातील एकुण ३३ […] The post गंगाखेड तालुक्यात दोन गटांत तुंबळ हाणामारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 1:52 pm

भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलिसावर हल्ला:हिंगोलीच्या कमलानगर भागातील घटना, उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल

हिंगोली शहरातील कमलानगर भागात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर दहा ते बारा जणांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी ता. १ पहाटे घडली आहे. जखमी पोलिस कर्मचाऱ्यास उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हिंगोली शहरासह जिल्हाभरात थर्टीफर्स्ट निमित्त कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या शिवाय शहरी भागात बिटमार्शल मार्फत गस्त घातली जात होती. हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी देखील गस्तीवर होते. दरम्यान, मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास कमलानगर भागात विनोद गोरे व भुषण खिल्लारे यांच्या दोन गटात वाद सुरु असून हाणामारी होत असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून जमादार संजय डोंगरदिवे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिस आल्याचे लक्षात आल्यानंतर काही जणांनी तेथून पळ काढला. मात्र त्या ठिकाणी दोघे जण गंभीर जखमी असल्याने जमादार डोंगरदिवे यांनी वाहन बोलावून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. दोन्ही गटातील वाद सोडवित असतांना १० ते १२ जणांच्या टोळक्याने डोंगरदिवे यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या हल्यामुळे त्यांना प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही. यावेळी झालेल्या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक निलभ रोहन, पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, शेख मुजीब, शंकर ठोंबरे, गणेश लेकुळे, संतोष करे, संजय मार्के, महम्मद शेख, अजमद शेख यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर टोळके पळून गेले. या मारहाणीत जखमी झालेल्या जमादार डोंगरदिवे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 1:46 pm

सत्तेच्या खेळात विकास थांबायला नको

कंधार : सय्यद हबीब कंधार नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी आपला कौल स्पष्टपणे नोंदवत नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसला पसंती दिली आहे. लोकशाही प्रक्रियेतून दिलेल्या या निर्णयानंतर शहराच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा असतानाच, निकालानंतर सुरू झालेल्या राजकीय हालचालींमुळे पुन्हा एकदा पालिकेतील स्थैर्य धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राजकीय डावपेचांना आवर घालून विकासकामांना गती द्यावी, अशी अपेक्षा कंधारकर नागरिकांकडून […] The post सत्तेच्या खेळात विकास थांबायला नको appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 1:34 pm

‘धुरंधर’च्या यशाचा जल्लोष; दीपिकाने रणवीरसाठी बनवला मराठमोळा मोदक

मुंबई : प्रतिनिधी ‘धुरंधर’ ला जगभरात खूप यश मिळाले. ‘धुरंधर’ च्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ‘धुरंधर’ हा रणवीर सिंहचा त्याच्या कारकिर्दीतील सुपरहिट चित्रपट ठरला.‘धुरंधर’ च्या यशाचे सेलिब्रेशन करताना दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह एकत्र दिसले. दोघे सध्या न्यूयॉर्कमध्ये नवीन वर्षांचे स्वागत करताना दिसत आहे. अशात आता त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात […] The post ‘धुरंधर’च्या यशाचा जल्लोष; दीपिकाने रणवीरसाठी बनवला मराठमोळा मोदक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 1 Jan 2026 1:24 pm

मुंबई वाचवण्याची ही शेवटची संधी:आमिषाला बळी न पडता BMC निवडणुकीला सामोरे जा, राज ठाकरेंचे मनसे उमेदवारांना मार्गदर्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील आपल्या उमेदवारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता मुंबई महापालिकेचा किल्ला अर्थात निवडणूक लढवण्याचा सल्ला दिला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स येतील. पैशांचेही आमिष दाखवले जाईल. पण त्याला बळी पडू नका. आपल्याला मुंबई वाचवायची आहे. ती वाचवण्याची ही शेवटची संधी आहे, असे ते म्हणालेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज मनसेच्या 53 उमेदवारांना बोलावण्यात आले होते. यावेळी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी त्यांना मुंबई महापालिकेचा किल्ला कोणत्याही आमिषाला बळी न पडता लढवण्याचा सल्ला दिला. राज ठाकरे म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स येतील. पैशांचेही आमिष दाखवले जाईल. पण तुम्ही त्याला बळी पडू नका. आपल्याला मुंबई वाचवायची आहे. मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि ती वाचवण्यासाठी ही शेवटची संधी आहे. बोगस मतदार आढळला तर फटकवा राज ठाकरे यांनी यावेळी आपल्या उमेदवारांना मतदानाच्या दिवशी बोगस मतदान टाळण्यासाठी सतर्क राहण्याचेही आवाहन केले. मतदानाच्या दिवशी सत्ताधारी पक्षांकडून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला जाईल. पण तो तुम्ही हाणून पाडा. मतदानाच्या दिवशी प्रत्येक बुथवर आपली 10 माणसे उभी करा. बोगस मतदान होणार नाही याची काळजी घ्या. सतर्क राहा. मतदान केंद्रावर एखादा बोगस मतदार आढळला तर त्याला जागीच फटकवून काढा. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करा, असे ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या या आदेशानंतर मुंबईतील वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. राज व उद्धव ठाकरेंच्या होणार संयुक्त सभा उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी युती केली आहे. त्यात मनसे 53 जागांवर निवडणूक लढवणार आहे. आता ठाकरे बंधूंकडून 4 तारखेला मुंबईचा वचननामा जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर उद्धव व राज ठाकरे यांच्या मुंबई व लगतच्या परिसरात संयुक्त सभा होणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याविषयी बोलताना सांगितले, ठाकरे बंधूंच्या युतीचा वचननामा 4 जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल. सध्या या वचननाम्यावर दोन्ही पक्षांकडून शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या मुंबईसह एमएमआर परिसरात संयुक्त सभा होतील. पूर्व व पश्चिम उपनगरांम्ध्येही या सभा होतील. त्यानंतर शिवतीर्थावर संयुक्त सभा होईल. मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण व डोंबिवली आणि नाशिक येथेही ठाकरे बंधूंच्या जोरदार सभा होतील. आदित्य ठाकरे व अमित ठाकरे या वचननाम्यावर काम करत आहेत, असे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 1:24 pm

महापालिका निवडणूक:छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार रिंगणात, जाणून घ्या एका क्लिकवर...!

छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकीत वातावरण प्रचंड तापले आहे. यंदा एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये युती झाली नाही. या दोन्ही पक्षांमध्ये ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, ते इच्छुक प्रचंड नाराज आहेत. भाजपमधल्या इच्छुकांनी भागवत कराडांची गाडी अडवली. अतुल सावेंचे कार्यालय गाठून रोष व्यक्त केला. रडारड, उपोषण, आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण दणाणून निघाले आहे. शिंदेंच्या शिवसेनेनेमध्येही इच्छुकांनी संजय शिरसांटांविरोधात रोष व्यक्त केला. असेच 'एमआयएम'मध्येही घडले. त्यांच्या इच्छुकांनी इम्तियाज जलील यांच्याविरोधात रोष व्यक्त केला. त्यामुळे कुठल्या प्रभागात कोण-कोण उमेदवार रिंगणात आहेत, याची उत्सुकता मतदारांना पडलीय. छत्रपती संभाजीनगरमधील प्रभागनिहाय उमेदवार घ्या जाणून...

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 1:13 pm

संजय राऊतांना पराभव दिसू लागल्याने बिनबुडाचे आरोप:उमेदवारांना धमकावल्याच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचा पलटवार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या गोंधळावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांवर उमेदवारांना धमकावल्याचा आरोप केल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. ज्यांना वेळेत उमेदवारी अर्ज भरता आले नाहीत, त्यांनी आपल्या नियोजनातील त्रुटी मान्य कराव्यात, बिनबुडाचे आरोप करू नयेत, असा टोला नार्वेकर यांनी लगावला. कुलाबा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजीवर राहुल नार्वेकर यांनी पडदा टाकला आहे. कुठल्याच वॉर्डात आता बंडखोरीचा विषय उरलेला नाही. जे कार्यकर्ते नाराज होते, त्यांच्याशी आम्ही सकारात्मक चर्चा केली आहे. ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले होते, त्यांनी ते मागे घेतले आहेत. त्यामुळे आता कुलाबा विधानसभेत भाजपात अंतर्गत कुठल्याही प्रकारची नाराजी किंवा बंडखोरी उरलेली नाही, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. उमेदवारांना धमकावल्याच्या आरोपावर उत्तर कुलाबा मतदारसंघात उमेदवारांना धमकावल्याच्या आरोपांवर बोलताना, हे आरोप नाहीत, हे सत्य असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. यावरही उत्तर देताना नार्वेकर म्हणाले, मला संजय राऊत आणि ठाकरे गटाकडून अशीच अपेक्षा होती. जेव्हा आपला पराजय आपल्याला स्पष्टपणे दिसतो, त्यावेळी अशाप्रकारचे बिनबुडाचे आरोप करून, स्वत:च्या पराजयाचे कारण शोधायचा प्रयत्न करत असतात. त्यातीलच हा एक प्रकार आहे. संजय राऊतांना त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे, असे बिनबुडाचे आरोप करत असतात, असे प्रत्युत्तर राहुल नार्वेकर यांनी दिले. भाजपच्या काही उमेदवारांना अर्ज भरता आला नाही राहुल नार्वेकर म्हणाले, विधानसभा अध्यक्षांनी उमेदवारांना धमक्या दिल्या, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिले नाहीत, असे वारंवार सांगण्यात येते. मात्र, त्या निवडणूक कार्यालयात पाच वाजेनंतर आतमध्ये असणाऱ्या सगळ्यांना घेतले गेले. जे वेळेत आले नाही, त्यांना बाहेर ठेवण्यात आले. त्यात भाजपच्या काही उमेदवारांना आपला अर्ज भरता आला नाही. वॉर्ड क्रमांक २१२ च्या भाजपच्या उमेदवारांना फॉर्म भरता आला नाही. त्यामुळे मी स्वत: पक्षाचे फॉर्म भरण्यापासून कुणाला थांबवणार आहे का? हा कायदा सर्वांसाठी समान आहे. ज्यांना रडीचा डाव खेळण्याची सवय आहे, ते अशाप्रकारची कारणे सादर करत असतात, असा पलटवार राहुल नार्वेकर यांनी संजय राऊतांच्या आरोपांवर केला. विरोधकांनी उमेदवारांबरोबर चुकीची भूमिका घेतली ज्यांच्याकडे शेवटपर्यंत उमेदवार नव्हते. ज्यांनी दुपारी एक आणि दोन वाजता उमेदवारांना एबी फॉर्म दिला, ते पाच वाजेच्या आत येऊन कसे अर्ज दाखल करणार? तुम्ही रात्री दोन वाजता लोकांना एबी फॉर्म देतात आणि सकाळी जाऊन अर्ज भरण्यास सांगतात, यात चूक तुमची आहे. तुम्ही तुमच्या कार्यकर्ते आणि उमेदवारांबरोबर चुकीची भूमिका घेतलेली आहे. तुम्ही वेळेत उमेदवारी दिली असती, तर त्यांना वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता आला असता, अशी टीकाही राहुल नार्वेकर यांनी केली. राऊतांनी जबाबदार नागरिकाची शिकवणूक घ्यावी राहुल नार्वेकर हे विसरले आहेत की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. अध्यक्षपदाला काही नियम आणि संकेत असतात. राजकीय कार्यक्रमांपासून त्यांनी अलिप्त राहायला हवं, असे संजय राऊत म्हणाले होते. यावर बोलताना नार्वेकर म्हणाले, मी ज्यावेळी विधानसभेत अध्यक्ष म्हणून माझी भूमिका बजावत असतो, तेव्हा मी संपूर्णपणे विधानसभा अध्यक्ष म्हणूनच माझे काम करत असतो. मी माझ्या मतदारसंघात काम करत असताना, त्यावेळी माझ्या मतदारसंघाचा आमदार म्हणून, जनतेला न्याय द्यायचे काम करत असतो. त्यामुळे संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये. त्यांनी आधी जबाबदार नागरिक कसा असावा, याची शिकवणूक घ्यावी आणि मग बोलावे, असा टोला संजय राऊतांना लगावला.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 1:00 pm

नवऱ्याने भाजपविरोधात दंड थोपटताच बायकोने घर सोडले:नागपुरात पक्षनिष्ठेला सर्वोच्च स्थान देत माजी महिला महापौरांनी सोडले पतीचे घर

महापालिका निवडणुकीत नवऱ्याने भाजपविरोधात दंड थोपटताच माजी महापौर राहिलेल्या एका महिलेने आपले नांदते घर सोडल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. पक्षनिष्ठेशी संबंधित या घटनेची पंचक्रोशीत खमंग चर्चा रंगली आहे. राज्यात मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यात अनेक पक्षांना विशेषतः भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलून दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या कथित उपऱ्यांना संधी दिली जात असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारीमुळे नागपुरात एका उमेदवाराचा अनेक वर्षांचा संसारच संकटात सापडल्याचा प्रकार उजेडात आला आहे. नेमका काय प्रकार घडला? त्याचे झाले असे की, भाजपने नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या मनोज साबळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहरनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. यामु्ळे माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्यापुढे पक्षनिष्ठा व पतीची भूमिका यापैकी कुणाच्या मागे उभे राहायचे? असे धर्मसंकट उभे राहिले होते. त्यात त्यांनी पक्षनिष्ठेला सर्वोच्च स्थान देत या निवडणुकीत भाजपने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्चना डेहनकर यांनी यासाठी आपल्या पतीचे घर सोडत माहेरी भावाच्या घरी निघून गेल्यात. त्या आता महापालिका निवडणुकीत आपल्या पतीचा नव्हे तर भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसून येतील. भाजपने अर्चना डेहनकर यांना 2009 ते 2012 पर्यंत नागपूरचे महापौरपद दिले होते. त्यामुळे पतीचे पक्षाच्या विरोधात जाणे आपल्याला मान्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. अर्चना डेहनकर यांनी नवऱ्यावर दबाव निर्माण करण्यासाठी तथा स्वतःची पक्षनिष्ठा जपण्यासाठी नवऱ्याचे नांदते घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांचा हा प्रयत्न कामी येतात किंवा नाही हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 2 जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे. कोण आहेत अर्चना डेहनकर? अर्चना डेहनकर या नागपुरातील भाजपच्या ज्येष्ठ महिला नेत्या आहेत. त्यांनी 2009 ते 2012 पर्यंत नागपूरचे महापौरपद सांभाळले आहे. त्यांनी भाजपच्या महाराष्ट्र महिला मोर्चाचे अध्यक्षपदी सांभाळले आहे. त्या 1997 व 2007 साली नागपूर महापालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. आता महापालिका निवडणुकीत त्यांचे पती व भाजप नेते विनायक डेहनकर यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. यामुळे पती-पत्नीमध्ये वाद होऊन अर्चना यांनी थेट घर सोडल्यामुळे नागपूरच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 12:46 pm

शिवसेना उमेदवाराने एबी फॉर्मच गिळला:पोलिस शोधत असताना आता उद्धव कांबळे स्वतःहून हजर; म्हणाले- मीच अधिकृत उमेदवार

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी पक्षांतर्गत रस्सीखेच, तिकीट कापण्याचे निर्णय, नव्या चेहऱ्यांना संधी आणि त्यातून उफाळून आलेले नाराजीनाट्य, हे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. मात्र पुण्यात घडलेली एक घटना या सगळ्यांपेक्षा वेगळी आणि धक्कादायक ठरली आहे. एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांमधील चढाओढ इतकी टोकाला गेली की थेट निवडणुकीचा अधिकृत एबी फॉर्म गिळण्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील पद्मावती भागातील प्रभाग क्रमांक 36 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उमेदवारीवरून हा वाद निर्माण झाला. या प्रभागात ड गटातून मच्छिंद्र ढवळे यांना पक्षाकडून अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यांनी मंगळवारी पक्षाचा एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र त्याच दिवशी त्याच प्रभागासाठी उद्धव कांबळे यांनाही पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आणि त्यांनीदेखील उमेदवारी अर्ज सादर केला. एकाच जागेसाठी एकाच पक्षाकडून दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असताना या वादाने गंभीर वळण घेतले. मच्छिंद्र ढवळे यांचा अर्ज आधी दाखल झाल्यामुळे तो वैध ठरण्याची शक्यता अधिक असल्याचे उद्धव कांबळे यांच्या लक्षात आले. याच पार्श्वभूमीवर बुधवारी छाननीदरम्यान उद्धव कांबळे कात्रज येथील क्षेत्रीय निवडणूक कार्यालयात पोहोचले. नियमानुसार, उमेदवाराला आपल्या प्रभागातील अर्ज पाहण्याचा अधिकार असल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांनी सर्व अर्जांचा गठ्ठा त्यांच्यासमोर ठेवला. याच संधीचा गैरफायदा घेत उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांच्या अर्जासोबत जोडलेला पक्षाचा एबी फॉर्म अचानक फाडला. एबी फॉर्म फाडल्यानंतर कांबळे थेट बाथरुमच्या दिशेने धावले. निवडणूक कर्मचारी त्यांच्या मागे पळाले, मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली. प्रत्यक्षदर्शींनुसार, उद्धव कांबळे यांनी तो फाडलेला एबी फॉर्म क्षणार्धात तोंडात कोंबला आणि गिळून टाकला. सरकारी दस्तऐवज नष्ट केल्याचा हा प्रकार घडताच निवडणूक कार्यालयात एकच गोंधळ उडाला. छाननी प्रक्रियेदरम्यान असा प्रकार घडल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेतली आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेनंतर निवडणूक यंत्रणेकडून कडक पावले उचलण्यात आली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच वेल्हा येथील नायब तहसीलदार मनीषा भुतकर यांनी सरकारी कामात अडथळा आणणे आणि सरकारी कागदपत्र नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांत लेखी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी उद्धव कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कायदा व सुव्यवस्था भंग केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर 70 पोलिस कर्मचारी कांबळे यांचा शोध घेत होते, अशी माहिती समोर आली. उद्धव कांबळे स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये हजर दरम्यान, या प्रकरणात नाट्यमय वळण आले. पोलिस शोध घेत असतानाच उद्धव कांबळे स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये हजर झाले. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांसोबत आपण स्वेच्छेने पोलिसांसमोर आलो असल्याचे त्यांनी सांगितले. आपणच प्रभाग क्रमांक 36 मधून पक्षाचे अधिकृत उमेदवार असून, पक्षाने आपल्यालाच एबी फॉर्म दिला आहे, असा दावाही त्यांनी केला. मात्र निवडणूक प्रक्रियेदरम्यान केलेल्या कृतीमुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारीच्या वादातून थेट सरकारी दस्तऐवज गिळण्यापर्यंत गेलेला हा प्रकार निवडणूक प्रक्रियेच्या गंभीरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. निवडणूक आयोग आणि प्रशासन यापुढे अशा घटनांना आळा घालण्यासाठी कोणती पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यातील या घटनेने निवडणूक रणधुमाळीला वेगळाच रंग दिला असून, पुढील काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 12:17 pm

ठाकरे गटाने नाशकात मनसेचा केला गेम?:युती असूनही 9 प्रभागांत दिले विरोधात उमेदवार; एबी फॉर्मचा गोंधळ अंगलट आल्याचा दावा

नाशिकमध्ये एबी फॉर्मच्या घोळामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 9 प्रभागांमध्ये आपला मित्रपक्ष असलेल्या मनसेविरोधात उमेदवार दिलेत. हा घोळ उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निस्तरला नाही तर येथे मनसे व ठाकरे गटात निवडणुकीपूर्वीच मतभेद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ठाकरे बंधूंनी मुंबई व नाशिकसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये युतीची घोषणा केली आहे. नाशिक येथील दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या युतीचे स्वागत केले होते. त्यानुसार, नाशिकमध्ये ठाकरे गट 80 व मनसे 34 असा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला होता. दोन्ही पक्षांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. पण अखेर एबी फॉर्मच्या वाटपात झालेल्या गोंधळामुळे या दोन्ही पक्षांचे उमेदवार 9 प्रभागांमध्ये एकमेकांपुढे उभे टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवार अर्जांच्या छाननीतून ही बाब समोर आली आहे. यावर मनसे उमेदवारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये कसे आहे ठाकरे बंधूंचे जागावाटप? मनसे व ठाकरे गटाने नाशिक महापालिकेची निवडणूक मिळून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचीही साथ लाभली आहे. ठाकरे गट येथे सर्वाधिक 80 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर मनसे 34 व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 13 जागा मिळाल्या आहेत. पण आता 9 प्रभागांमध्ये ठाकरे गट व मनसेचे उमेदवार एकमेकांपुढे उभे राहिल्यामुळे या पक्षांतील विसंवाद प्रकर्षाने समोर आला आहे. आता पुढे काय होणार? महापालिका निवडणुकीत उद्या म्हणजे 2 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या एबी फॉर्म मिळालेल्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेण्याची प्रतिक्षा आहे. त्यांनी अर्ज मागे घेतले तर मनसेची नाराजी दूर होईल. पण त्यांनी अर्ज मागे घेतले नाही तर या 9 जागांवर ठाकरे गट व मनसे यांच्यात लढत होईल. तसेच त्यांना इतर पक्षांच्या उमेदवारांनाही सामोरे जावे लागेल. यामुळे दोन्ही पक्षांची ताकद विभागली जाऊन त्याचा फायदा भाजप - शिवसेनेला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार आपला अर्ज मागे घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाण्यात ठाकरे बंधूंचे 2 अर्ज बाद दुसरीकडे, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतही मनसे व ठाकरे गटाच्या प्रत्येक अशा एकूण 2 उमेदवारांचे अर्ज बाद झालेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, उमेदवार अर्जाच्या छाननीत ठाण्यातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे. या उमेदवाराने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर काही गंभीर आरोप केलेत. माझा उमेदवारी अर्ज छाननीवेळी बाद ठरवण्यात आला. त्यासाठी मी सही केली नाही आणि बँकेचे स्टेटमेंट न दिल्याचे कारण देण्यात आले. माझ्यावर अन्याय झाला, असे या उमेदवाराने सांगितले आहे. प्रभाग क्रमांक 18 मध्ये मनसेच्या प्राची घाडगे यांचाही अर्ज बाद ठरला आहे. त्यांनीही निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अवघी काही मिनिटे शिल्लक असताना मला काही कागदपत्रे राहिल्याचे सांगण्यात आले. त्या कागदपत्रांची पूर्तता मुदतीत करूनही आम्हाला आत सोडण्यात आले नाही. त्यानंतर थेट अर्जच बाद करण्यात आला, असे त्या म्हणाल्या.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 12:13 pm

लाडक्या बहिणींना वर्षाअखेरीचा दिलासा, खात्यात आले 1500 रुपये:तीन महिन्यांची प्रतीक्षा, पण हाती पडला एकच हफ्ता; अपेक्षांवर पाणी

राज्यातील लोकप्रिय आणि बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी वर्षाच्या अखेरीस मोठी घडामोड समोर आली आहे. पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता जमा करण्यात आला असून, बुधवारी सायंकाळी अनेक महिलांच्या खात्यांत 1500 रुपयांची रक्कम जमा झाली. या योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हफ्ते प्रलंबित होते. त्यामुळे वर्षअखेर एकत्रित रक्कम मिळेल, अशी आशा लाभार्थ्यांमध्ये होती. मात्र प्रत्यक्षात नोव्हेंबर महिन्याचाच एक हफ्ता जमा झाल्याने अनेक महिलांचा अपेक्षाभंग झाला आहे. याआधी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे मिळून 3000 रुपये मिळतील, अशी चर्चा होती. त्यातच जानेवारी महिन्याचाही हफ्ता एकत्र दिला जाईल आणि 4500 रुपये खात्यात जमा होतील, असा अंदाज बांधला जात होता. मात्र प्रत्यक्षात केवळ 1500 रुपये जमा झाल्याने महिलांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वर्षाच्या शेवटी महागाईचा भार वाढलेला असताना आणि घरगुती खर्च डोईजड झालेला असताना, अपेक्षेपेक्षा कमी रक्कम मिळाल्याने काही लाडक्या बहिणी नाराज झाल्याचे चित्र आहे. विशेषतः डिसेंबर महिना पूर्ण संपत असताना फक्त नोव्हेंबरचे पैसे मिळाल्याने सरकारकडून उर्वरित हफ्त्यांबाबत स्पष्टता कधी येणार, असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे. तरीही, किमान नोव्हेंबरचा हफ्ता खात्यात आल्याने अनेक महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. योजनेसाठी ई-केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर होती. ज्या महिलांनी मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांचा योजनेचा लाभ बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, किंवा ई-केवायसी अपूर्ण असणे, या कारणांमुळे अनेक महिलांना ‘अपात्र’ ठरवले जाऊ शकते. त्यामुळे नवीन वर्ष 2026 पासून अशा महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा हफ्ता कायमचा बंद होण्याचा धोका आहे. याच पार्श्वभूमीवर, अनेक महिलांना खात्यात पैसे जमा झाल्याचा एसएमएस अद्याप न मिळाल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. मात्र तांत्रिक अडचणी, बँक सर्व्हर डाऊन असणे किंवा नेटवर्क समस्यांमुळे अनेकदा संदेश उशिरा येतो किंवा येतच नाही. त्यामुळे एसएमएस आला नाही म्हणून घाबरून जाण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. महिलांनी बँक पासबुक अपडेट करून, मोबाईल बँकिंग किंवा यूपीआय अ‍ॅपद्वारे, एटीएममधील मिनी स्टेटमेंट तपासून खात्यात रक्कम जमा झाली आहे का, हे पाहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान वारंवार बदलणाऱ्या तारखा, केवायसीची कडक अट आणि हफ्त्यांबाबत असलेला संभ्रम यामुळे लाभार्थी महिलांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. एकीकडे योजना महिलांसाठी आर्थिक आधार ठरत असली, तरी दुसरीकडे नियमांचे पालन न झाल्यास लाभ बंद होण्याची भीतीही महिलांना सतावत आहे. त्यामुळे शासनाकडून याबाबत स्पष्ट आणि सुसंगत माहिती दिली जावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यांच्या हफ्त्यांबाबत अनिश्चितता कायम एकूणच, वर्षाच्या सरतेशेवटी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता हा काही अंशी दिलासादायक असला, तरी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांच्या हफ्त्यांबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. ई-केवायसी न केलेल्या महिलांसाठी ही योजना बंद होणार का, यावर पुढील निर्णय काय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शासनाकडून पुढील हफ्त्यांबाबत आणि मुदतवाढीबाबत स्पष्ट घोषणा झाल्यासच लाखो लाडक्या बहिणींचा संभ्रम दूर होणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 12:00 pm

'बुरखेवाली' महापौर होण्याची मिरची का लागली नाही?:हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते, नीतेश राणेंनी ठाकरेंना डिवचले

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. महापौर कोण असेल, यावरून भाजप आणि ठाकरे बंधुंमध्ये जुंपली आहे. भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी उत्तर भारतीय महापौराबाबत केलेल्या विधानावरून ठाकरे गटाने रान उठवले असताना, आता भाजप आमदार नीतेश राणे यांनी या वादात उडी घेतली आहे. उत्तर भारतीय महापौरची जेवढी मिरची ठाकरे गटाला लागली, तेवढी 'बुरखेवाली महापौर' बनेल या शक्यतेची का लागली नाही? असा जळजळीत सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे. मिरा-भाईंदरमध्ये बोलताना कृपाशंकर सिंग यांनी जास्तीत जास्त उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणण्याचे आवाहन केले होते, जेणेकरून उत्तर भारतीय महापौर होऊ शकेल. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी भाजपवर 'मराठीविरोधी' असल्याची टीका केली होती. यावर नीतेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. नेमके काय म्हणाले नीतेश राणे? जितकी मिर्ची ठाकरे गटाला.. उत्तर भारतीय महापौर ची लागली..तितकी मिर्ची बुरखे वाली महापौर बनेल ची का लागली नाही? असा सवाल करत, यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते, असा आरोप नीतेश राणे यांनी केला. मुंबईच्या अस्मितेचा आणि हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरताना, मुंबईचा महापौर हा मराठी आणि हिंदूच होणार आणि तो आमचाच होणार, असा विश्वासही नीतेश राणे व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारात आता 'मराठी' विरुद्ध 'उत्तर भारतीय' आणि 'हिंदू' अस्मिता या मुद्द्यांवरून खडाजंगी पाहायला मिळत आहे. नीतेश राणे यांच्या या विधानानंतर आता ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा... मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर होईल:भाजप नेते कृपाशंकर सिंहांचे वक्तव्य; महाराष्ट्रापासून मुंबई तोडायचा घाट, मनसेचा आरोप मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर विराजमान होईल. या ठिकाणी उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू, असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना डिवचले आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजकारण मुंबई, मराठी माणूस आणि उत्तर भारतीयांना विरोध करूनच सुरुवात झाले. उत्तर भारतीयांना अनेकदा या पक्षांनी वेगवेगळी कारणे पुढे करत मारझोडही केली. आता ऐन निवडणुकीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध उत्तर भारतीय हा मुद्दा मुंबईत पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठी माणसा जागा हो, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कृपाशंकर सिंहाना उत्तर दिले आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 11:51 am

मुंबई महायुतीत अखेर 'आठवलें'ची एन्ट्री:भाजप-शिवसेना प्रत्येकी 6 जागा सोडणार, रिपाइंने 39 उमेदवार रिंगणात उतरवताच निर्णय

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातच जागावाटप झाल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) नेते रामदास आठवले नाराज झाले होते. मात्र, या नाराजीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिपाइंला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीतील दोन्ही मोठे भाऊ आपल्या कोट्यातून प्रत्येकी ६ जागा रिपाइंला देणार असून, आता मुंबईत रिपाइं १२ जागांवर महायुतीचा घटक म्हणून निवडणूक लढवेल. मुंबईत भाजप-शिवसेना युतीतील जागावाटपात स्थान न मिळाल्याने रामदास आठवले यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांनी रिपाइं पक्षाचे ३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यानंतर त्यांनी 'वर्षा' बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी रिपाइंला प्रत्येकी ६ जागा देण्याचे आश्वासन दिले. आम्ही महायुतीचा भाग आहोत आणि आता १२ जागांवर आमचे उमेदवार निवडणूक लढवतील, असे आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मुंबई महायुतीचे सुधारित जागावाटप रिपाइंच्या प्रवेशानंतर आता महायुतीतील जागांचे समीकरण बदलले आहे. रामदास आठवले यांच्या रिपाइंची युतीत एन्ट्री झाल्यानंतर भाजपा 131, शिवसेना 84 आणि रिपाइं 12 असे जागा वाटपाचे गणित असणार आहे. उर्वरित २७ जागांचे काय? रिपाइंने मुंबईतून एकूण ३९ उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. महायुतीकडून केवळ १२ जागा मिळाल्या असल्या तरी, उर्वरित २७ जागांवरून रिपाइं माघार घेण्याची शक्यता कमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या उर्वरित जागांवर रिपाइं आपले उमेदवार अपक्ष म्हणून किंवा स्वबळावर मैदानात उतरवू शकते. यामुळे काही ठिकाणी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर रिपाइंच्याच बंडखोरांचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. उद्या अंतिम चित्र स्पष्ट होणार दरम्यान, कोणत्या १२ जागा रिपाइंला सोडल्या जाणार आणि कोणत्या प्रभागातून त्यांचे उमेदवार रिंगणात असतील, याबाबतची अधिकृत यादी उद्यापर्यंत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. महायुतीमधील या नवीन समीकरणामुळे दलित मतांचे विभाजन रोखण्यात भाजप आणि शिवसेनेला किती यश मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. रिपाइं आठवले गटाची मुंबईतील उमेदवारांची यादी

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 11:28 am

उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंनाही ठाण्यात धक्का:अर्ज बाद झाल्याने मनसेचा आयोगावर आरोप; RO विरोधात FIRची मागणी

ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेदरम्यान राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. छाननी प्रक्रियेत दोन्ही पक्षांच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरवण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित उमेदवारांसह पक्षनेत्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले आहेत. या निर्णयामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.ठाण्यातील प्रभाग क्रमांक 17 मधून शिंदे गटाचे उमेदवार मनोज शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा अर्ज छाननीदरम्यान बाद ठरवण्यात आला. संबंधित उमेदवाराने आपल्या अर्जाच्या बादबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत निवडणूक आयोग आणि संबंधित अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे. अर्ज बाद करण्यामागे स्वाक्षरी नसणे आणि बँक स्टेटमेंट सादर न केल्याचे कारण देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, अर्ज अवैध ठरवण्यात आल्यानंतरही आपल्याला पुन्हा नवीन प्रतिज्ञापत्र सादर करण्याची संधी देण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला. या उमेदवाराच्या म्हणण्यानुसार, अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपण्यास अवघे दहा मिनिटे शिल्लक असताना त्यांना अचानक नवीन प्रतिज्ञापत्र आणण्यास सांगण्यात आले. सकाळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे (RO) गेलो असता कोणतीही सूचना देण्यात आली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण गरीब कुटुंबातून आलेला असून, आर्थिक व सामाजिक परिस्थितीमुळे आपल्यावर अन्याय झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आपल्यासमोर निवडणूक लढवणारे शिंदे गटाचे उमेदवार मनोज शिंदे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकला होता का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, ठाण्यातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार प्राची घाडगे यांचा उमेदवारी अर्जही छाननी प्रक्रियेत अवैध ठरवण्यात आला आहे. अर्ज भरण्याची वेळ संपायला काही मिनिटे शिल्लक असताना आवश्यक कागदपत्रे अपुरी असल्याचे सांगण्यात आले, असा आरोप प्राची घाडगे यांनी केला. त्यांनी कागदपत्रे वेळेत पूर्ण करून आणली असतानाही पोलिसांनी निवडणूक कार्यालयात प्रवेश नाकारल्याचे त्यांनी सांगितले. बराच वेळ गेल्यानंतर प्रवेश दिला गेला, मात्र तोपर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणतीही बाजू ऐकून न घेता अर्ज बाद केल्याचा दावा त्यांनी केला. या घटनेनंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून, पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर थेट आरोप केले आहेत. उमेदवाराने आपली चूक मान्य करून प्रतिज्ञापत्र नंतर सादर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक नियमांनुसार अर्ज दाखल झाल्यानंतर ठराविक वेळेत त्याचा डिस्प्ले करणे आवश्यक असते, मात्र संबंधित निवडणूक अधिकारी वैशाली मॅडम यांनी हा डिस्प्ले वेळेत न करता साडेतीन वाजता केल्याचा आरोप अविनाश जाधव यांनी केला. हे निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी नमूद केले. अविनाश जाधव यांनी आणखी गंभीर आरोप करत निवडणूक अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या सहभागावरही प्रश्न उपस्थित केला. दुपारी निवडणूक अधिकाऱ्यांची मुलगी फाईल घेऊन कार्यालयात आल्याचा दावा त्यांनी केला. ही फाईल नेमकी कशासाठी होती, असा सवाल केला असता डिप्रेशनच्या औषधांची फाईल असल्याचे उत्तर देण्यात आले, असे त्यांनी सांगितले. हीच माहिती जर खरी असेल तर ती व्हॉट्सअ‍ॅपवरही मागवता आली असती, असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी ठाण्यात निवडणूक अधिकाऱ्यांच्या पारदर्शकतेसाठी आंदोलन केल्यामुळे जाणून-बुजून आपल्या उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अविनाश जाधव यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. अनधिकृत बांधकामांमध्ये सहभागी असणारे भ्रष्ट अधिकारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाल्यास अशाच प्रकारच्या घटना घडतात, असा आरोप त्यांनी केला. अशा अधिकारी नगरसेवक आणि राजकीय नेत्यांच्या आदेशानुसार काम करत असल्याचा दावाही त्यांनी केला. या प्रकरणी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी करत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेने केली आहे. या घडामोडींमुळे ठाणे महापालिका निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 11:26 am

भाजपकडून नाराज बंडखोरांची मनधरणी:सर्वच बंडखोर आपली उमेदवारी मागे घेतील, चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबईसह राज्यभरातील महापालिका निवडणुकीत भाजपच्या ज्या नेत्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, ते सर्वजण लवकरच आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा ठाम विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. त्यात सर्वच पक्षांमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. विशेषतः सत्ताधारी भाजपमध्ये जागा कमी व इच्छुकांचा भरणा जास्त असल्यामुळे बंडखोरी वाढली आहे. त्यातच भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना संधी देण्यात आल्यामुळे मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, अकोला, नाशिक आदी ठिकाणी मोठी बंडखोरी वाढली आहे. भाजपचे इच्छुक उमेदवार या प्रकरणी स्थानिक नेत्यांना धारेवर धरत त्यांच्याकडे जाब विचारत आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपरोक्त विश्वास व्यक्त केला आहे. बंडखोरी करणाऱ्या उमेदवारांशी साधणार संवाद चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. पण भाजपच्या ज्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. ते सर्वजण आपले अर्ज मागे घेतील. भाजप आपल्या सर्व नाराज कार्यकर्त्यांशी संवाद साधेल. मला विश्वास आहे की, जे कार्यकर्ते पक्षावर काही काळापुरते नाराज झालेत ते पुन्हा पक्षाचे काम करतील. भाजप प्रदेशाध्यक्षांनी चंद्रपूरच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांची एक यादी जाहीर केली होती. ती यादी डावलत भाजप जिल्हाध्यक्षांनी काही लोकांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईही झाली आहे. पत्रकारांनी याविषयी चंद्रशेखर बावनकुळे यांना छेडले असता या कारवाईचे जोरदार समर्थन केले. चंद्रपूरची कारवाई योग्यच आहे. प्रदेशाध्यक्षांनी मंजूर केलेली उमेदवारांची यादी परस्पर बदलणे हे काही योग्य नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी तेथील अध्यक्षांना काढून टाकले आहे, असे ते म्हणाले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचे समर्थन चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट देण्याच्या मुद्यावरही यावेळी भाष्य केले. ते म्हणाले, एखादा गुन्हा दाखल होणे किंवा एखाद्यावर केस रजिस्टर झाल्याने काही होत नाही. कोर्टात काय सिद्ध होते हे महत्त्वाचे असते. साधारणतः एफआयआरमध्ये नाव असले तरी शेवटी गुन्हा कोर्टात सिद्ध होणे महत्त्वाचे असते. कोर्टात गुन्हा सिद्ध झाला असल्यास त्या व्यक्तीला उमेदवारी देता येत नाही. त्यामुळे आता एफआयआरमध्ये नाव असलेल्या लोकांना काही पक्षांनी उमेदवारी दिली आहे. या प्रकरणी कोर्टात निकाल लागेल तेव्हा आपल्याला त्यावर भाष्य करता येईल. शिवसेना - भाजपचा युतीवरच भर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे घटकपक्ष वेगवेगळे लढणार की महायुती म्हणून एकत्र सामोरे जाणार असा प्रश्नही यावेळी बावनकुळेंना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, आमचा संकेत महायुतीचाच आहे. पण स्थानिक पातळीवर शिवसेना - भाजपचे आपसात न जमल्यामुळे काही ठिकाणी युती झाली नाही. पण राज्य पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युतीचेच संकेत दिलेत. त्यामुळे आम्ही युतीमध्येच जाणार आहोत. पण वरच्या पातळीवर युती झाल्यानंतर कधीकधी दोन्ही पक्षांकडून खालच्या पातळीवर अडचणी तयार होतात. यामुळे काही ठिकाणी युती तुटली आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही पुन्हा एकत्र बसून यावर चर्चा करू, असे बावनकुळे म्हणाले. जिल्हा परिषदेची निवडणूक केव्हा होणार? चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा फड लवकरच रंगणार असल्याचेही सांगितले. निवडणूक आयोगाचा जो काही कार्यक्रम आला आहे त्यात 12 जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण 50 टक्क्यांच्या आत आहे. त्या निवडणुका केव्हाही घेता येतील. राहिला प्रश्न सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारीच्या दिलेल्या अंतिम मुदतीचा, त्या आधारावर आयोग आपला निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 11:08 am

मराठी माणसाच्या तोंडावर पान खाऊन पिचकारी मारण्याचं काम:कृपाशंकर सिंहांच्या विधानावर राऊत संतापले; राहुल नार्वेकरांवरही टीका

हिंदी भाषिक उत्तर भारतीयच यंदा मुंबईचा महापौर होईल, अशी वल्गना भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज तीव्र आणि जळजळीत प्रतिक्रिया देत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी-अमराठी वाद पुन्हा ऐरणीवर आला असून, पुढील पंधरा दिवसांत प्रचारात हा मुद्दा केंद्रस्थानी राहणार असल्याचे स्पष्ट संकेत राऊतांच्या प्रतिक्रियेतून मिळाले आहेत. संजय राऊत म्हणाले की, भाजपने जाणीवपूर्वक अमराठी महापौर बनवण्याचा अजेंडा आखला असून त्याची जबाबदारी कृपाशंकर सिंह यांच्यावर सोपवण्यात आली आहे. कृपाशंकर सिंह हा भाजपचा बोलका पोपट आहे. त्याचं विधान हे चुकून किंवा भावनेच्या भरात आलेलं नाही, तर पूर्णपणे ठरवून केलेलं आहे. भाजप सध्या चाचपणी करत असून, मराठी समाजाकडून येणाऱ्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहे, असा आरोप राऊतांनी केला. मुंबईत मराठी माणसाला डिवचण्याचा आणि त्याच्या अस्मितेवर घाला घालण्याचा हा प्रयत्न असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. या मुद्द्यावर बोलताना राऊतांनी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचाही उल्लेख केला. आज कृपाशंकर सिंह बोलतोय, उद्या योगी आदित्यनाथ, सम्राट चौधरी यांसारखे नेतेही मैदानात उतरतील. भाजपला केवळ परप्रांतीयांची मते मिळवायची आहेत. महाराष्ट्राच्या लढ्यात भाजपचा काहीही संबंध नव्हता, तरीही आज सत्तेत बसून ते इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. मराठी माणसाच्या तोंडावर पान खाऊन पिचकारी मारण्याचं काम कृपाशंकर सिंहकडून करून घेतलं जात आहे, असे तिखट शब्द वापरत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला. याच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरही गंभीर आरोप केले. कुलाबा मतदारसंघात उमेदवारांना धमकावल्याच्या आरोपांवर बोलताना राऊत म्हणाले, हे आरोप नाहीत, हे सत्य आहे. राहुल नार्वेकर हे विसरले आहेत की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. अध्यक्षपदाला काही नियम आणि संकेत असतात. राजकीय कार्यक्रमांपासून त्यांनी अलिप्त राहायला हवं. पण मी स्वतः पाहिलं आहे की, कमळाचं उपरणं घालून ते आपल्या घरातील उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी गेले आणि तिथे विरोधकांना धमकावलं. राज्यात नेमकं काय चाललंय, असा सवाल उपस्थित करत त्यांनी नार्वेकरांवर तीव्र टीका केली. मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचा संयुक्त जाहीरनामा दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचा संयुक्त जाहीरनामा लवकरच जाहीर होणार असल्याची माहितीही संजय राऊत यांनी दिली. उद्या संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध होईल. संयुक्त सभा सगळीकडे होतील. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे वचननाम्याच्या कामात सक्रिय आहेत, असे ते म्हणाले. मीरा-भाईंदर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईत संयुक्त सभा आयोजित केल्या जातील. नव्या दमाचे नेते या प्रचारात मेहनत घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे गट दहा कोटी रुपये देते भाजपवर टीका करताना राऊतांनी आर्थिक व्यवहारांवरही गंभीर आरोप केले. एबी फॉर्मसोबत भाजप पाच कोटी रुपये देत आहे, तर शिंदे गट दहा कोटी रुपये देत आहे, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. त्यांच्या मते, सत्ताधारी पक्षांकडून उमेदवारीसाठी खुलेआम पैशांचा खेळ सुरू आहे. आमच्या पक्षातील काही लोकांनी अपक्ष अर्ज भरले असतील, पण त्यांनी तमाशे केले नाहीत. काहींनी वेळेत अर्ज मागेही घेतले आहेत, असे सांगत त्यांनी आपली भूमिका मांडली. मराठी अस्मिता, भाषा आणि स्थानिक हक्कांचा मुद्दा केंद्रस्थानी संजय राऊत यांनी भाजपच्या रणनीतीवर आणखी टीका करत म्हटले की, भाजपने काही ठिकाणी मुस्लिम उमेदवारही दिले आहेत. राणे पुत्रांना सांगा, आता यावर काय भूमिका घेणार? असा चिमटाही त्यांनी काढला. त्यांच्या मते, भाजपचा संपूर्ण प्रयत्न हा समाजात फूट पाडण्याचा आणि निवडणुकीत त्याचा फायदा करून घेण्याचा आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी अस्मिता, भाषा आणि स्थानिक हक्कांचा मुद्दा केंद्रस्थानी राहील, आणि याच मुद्द्यावर भाजपविरोधात जोरदार लढा उभा केला जाईल, असा स्पष्ट इशाराच राऊतांनी दिला.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 10:58 am

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईवर पावसाची सरप्राइज बॅटींग:मुंबईत अनपेक्षित हवामान बदल, पहाटेपासून पावसाची रिपरिप

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना वरुणराजानं अनपेक्षित सरप्राइज दिलं. गुरुवारी पहाटेपासून मुंबईतील विविध भागांत अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. ऐन हिवाळ्यात पडलेल्या या पावसामुळे नववर्षाच्या पहिल्या सकाळीच मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेषतः ऑफिस, कामधंदे आणि प्रवासासाठी लवकर घराबाहेर पडलेल्या नागरिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. छत्र्या, रेनकोट नसतानाच भिजत कामावर जाण्याची वेळ अनेकांवर आली. या पावसामुळे केवळ नागरिकच नव्हे, तर हवामानशास्त्र विभागालाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण मुंबईत पावसाची शक्यता असल्याचा कोणताही अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला नव्हता. त्यामुळे अचानक सुरू झालेल्या सरींमुळे हा पाऊस नेमका कुठून आला? असा प्रश्न सर्वसामान्यांसह तज्ज्ञांनाही पडला आहे. हवामानाच्या अंदाजाला छेद देत पहाटेच पावसाने हजेरी लावल्यामुळे नवीन वर्षाची सुरुवातच वेगळ्या वातावरणात झाली आहे. पहाटेपासून दक्षिण मुंबईसह मध्य आणि पूर्व उपनगरांमध्ये पावसाने जोर धरला. वरळी, दादर, सायन, चेंबूरपासून थेट वाशीपर्यंत अनेक भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. काही ठिकाणी तर पावसाने धुव्वादार बॅटींग केल्याचं चित्र पाहायला मिळालं. भल्या पहाटे झालेल्या या पावसामुळे सकाळच्या वेळेत रस्त्यांवर गडबड उडाली. वाहतूक मंदावली, तर पावसामुळे काही ठिकाणी नागरिक थांबून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करताना दिसले. हिवाळ्याच्या दिवसांत असा पाऊस सहसा अनुभवायला मिळत नसल्याने मुंबईकर गोंधळून गेले. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हिवाळ्याचा जोर वाढलेला असताना मुंबईतील काही भागांत पावसाची रिपरिप सुरू राहिली आहे. अचानक आलेल्या या पावसाच्या सरींमुळे वातावरणात आर्द्रता वाढली असून थंडी आणि दमटपणा यांचा संमिश्र अनुभव नागरिक घेत आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. काही ठिकाणी तापमान थेट 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरलं आहे. अधिकृतपणे थंडीची लाट जाहीर करण्यात आलेली नसली, तरी तापमानातील घसरणीमुळे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी गारठा अधिक जाणवत आहे. मुंबई, कोकण आणि इतर किनारी भागांत रात्री व पहाटे थंड वारे वाहत असल्याने थंडीची चाहूल लागली असतानाच दुपारच्या सुमारास उन्हाचा चटका वाढतो आहे. त्यामुळे दिवस आणि रात्रीच्या तापमानात मोठी तफावत जाणवत आहे. अशा बदलत्या हवामानात कोकणातील काही भागांतही पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. हा अवकाळी पाऊस आंबा आणि काजूच्या शेतीसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. सध्या आंब्याला मोहोर फुटलेला असल्याने पावसामुळे फुलगळ होण्याची आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच हवामानातील या अनपेक्षित बदलाचा फटका शहराबरोबरच ग्रामीण व कृषी क्षेत्रालाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 10:31 am

संघ मुख्यालयाच्या प्रभागात भाजपला धक्का:स्वयंसेवकाचा थेट संघर्ष; राजकारणात तरुणांना संधी नसल्याने मैदानात- निनाद दीक्षित

नागपूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 22 हा केवळ एक सर्वसामान्य प्रभाग नसून भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. कारण याच प्रभागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह संघाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे हा प्रभाग नेहमीच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वाचा राहिला आहे. मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकीत याच प्रभागातून भाजपला अनपेक्षित आव्हान उभं राहिलं असून, अवघ्या पंचवीस वर्षांचा तरुण स्वयंसेवक थेट सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांविरोधात मैदानात उतरला आहे. निनाद दीक्षित असं या तरुणाचं नाव असून, तो संघाचा स्वयंसेवक राहिलेला आहे. प्रभागातील भाजप नगरसेवकांनी गेल्या काही वर्षांत निष्क्रियता दाखवली, मूलभूत विकास कामांकडे दुर्लक्ष केलं आणि केवळ दिखाऊ कामांवर भर दिला, असा थेट आरोप करत निनाद दीक्षितने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची उमेदवारी नागरिक समितीच्या माध्यमातून असून, तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. संघ मुख्यालय असलेल्या प्रभागात भाजपच्या विरोधात उभा राहणं ही बाब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. निनाद दीक्षितच्या मते, प्रभाग 22 मध्ये केवळ गट्टू बसवणे, टाईल्स लावणे आणि सिमेंटचे रस्ते बांधणे एवढाच विकास झाला आहे. मात्र लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न, सार्वजनिक सुविधा, सामाजिक पायाभूत कामे आणि दीर्घकालीन विकास योजना याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. संघाचे मुख्यालय असलेला हा प्रभागच जर दुर्लक्षित राहात असेल, तर इतर भागांची अवस्था काय असेल? असा सवाल तो उपस्थित करतो. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी नागपूरच्या जनतेला गृहीत धरल्याचा आरोपही तो करतो. एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना निनाद दीक्षित म्हणाला की, प्रभागाच्या राजकीय परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवण्याची गरज आहे. मात्र सध्या अस्तित्वात असलेले मोठे पक्ष हा बदल घडवू शकत नाहीत. तीन-चार टर्म नगरसेवक राहिलेले, साठ वर्षांचे नेते जर बाजूला सरकत नसतील, तर तरुणांना संधी कधी आणि कशी मिळणार? असा थेट सवाल त्याने उपस्थित केला. तरुणांनी केवळ प्रचारासाठी धावायचं, झेंडे उचलायचे आणि मतांसाठी वापरून घ्यायचं, पण निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घ्यायचं नाही, ही आजची राजकीय संस्कृती असल्याचं त्याचं म्हणणं आहे. निनाद दीक्षितने आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात महाविद्यालयीन निवडणुका अनेक वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे तरुणांना राजकारणाची पहिली शाळा असलेला विद्यार्थी राजकारणाचा अनुभवच मिळत नाही. तरुणांनी जायचं तरी कुठे? राजकारणात प्रवेश कसा करायचा? असा प्रश्न तो विचारतो. याच पार्श्वभूमीवर, नागरिक समितीच्या माध्यमातून निवडणूक लढवणं हा तरुणांसाठी एक पर्यायी मार्ग असल्याचं तो सांगतो. व्यवस्थेत बदल घडवायचा असेल, तर किमान एका प्रभागातून तरी लढा उभारता येतो, आणि तोच लढा आम्ही देत आहोत, असं त्याचं ठाम मत आहे. आपली उमेदवारी बंडखोरी आहे का, या प्रश्नावर निनाद दीक्षित स्पष्ट भूमिका मांडतो. मी भाजपचा प्राथमिक सदस्य नाही. मी कधीही भाजपकडून उमेदवारी मागितलेली नाही. त्यामुळे ही बंडखोरी ठरू शकत नाही, असं तो सांगतो. मात्र, भाजपच्या कार्यपद्धतीविरोधात आणि नगरसेवकांच्या निष्क्रियतेविरोधात हा उठाव निश्चितच आहे, हे तो ठामपणे मान्य करतो. संघाकडून अधिकृत पाठिंबा असल्याचा दावा तो करत नाही, मात्र अनेक स्वयंसेवक शांतपणे आपल्या पाठीशी उभे असल्याचं तो सूचक शब्दांत सांगतो. संघ मुख्यालय असलेल्या प्रभाग 22 मध्ये भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांसमोर निनाद दीक्षितने वेगळंच आव्हान उभं केलं आहे. हा केवळ एक निवडणूक लढा नसून पारंपरिक राजकारणाला प्रश्न विचारणारी चळवळ असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. तरुण नेतृत्व, नागरिक समितीचा प्रयोग आणि संघाच्या पार्श्वभूमीचा संदर्भ यामुळे ही निवडणूक नागपूरसह राज्याच्या राजकारणात लक्ष वेधून घेत आहे. प्रभाग 22 मधील मतदार या तरुण स्वयंसेवकाच्या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतात, हे निकालातून स्पष्ट होणार असलं, तरी भाजपसाठी हा प्रभाग यावेळी सहजसोप्या विजयाचा राहिलेला नाही, हे मात्र निश्चित.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 10:10 am

पुणे पालिकेत नवी खेळी; शिंदेची शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाणार:पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढवण्याबाबत आज चर्चा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस झाल्यानंतरही भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीबाबत ठोस निर्णय झालेला दिसला नाही. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली असून, पुणे पालिकेसाठी वेगळे राजकीय पर्याय तपासले जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे. भाजपसोबत युतीबाबत अनिश्चितता कायम असतानाच, पुणे महापालिकेसाठी शिवसेना (शिंदे गट) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोबत जाण्याची शक्यता चर्चेत आली. शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. याच काळात काही शिवसेना नेत्यांकडून भाजपसोबतची युती फिस्कटल्याचे सूचक वक्तव्य केले जात होते. मात्र, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हस्तक्षेप करत युती तुटलेली नसल्याचे सांगून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला होता. अशातच आता शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात प्रत्यक्ष चर्चा सुरू होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. भीमा कोरेगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवण्याबाबत आज उदय सामंत यांच्याशी चर्चा होणार असल्याचे जाहीर केले. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभागनिहाय जागावाटपाचा तिढा सुटू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. अजित पवार म्हणाले की, ज्या ठिकाणी एबी फॉर्म देण्यात आले आहेत, त्या ठिकाणी काही प्रमाणात जागा मागे घेण्याचा विचार होऊ शकतो. यापूर्वीच्या निवडणुकांचा दाखला देत त्यांनी सांगितले की, सचिन खरात यांच्यासोबत आमची युती आहे आणि काही जागा त्यांना देण्यात आल्या आहेत. आम्ही ज्यांच्यासोबत युती करतो, त्या पक्षाला त्या जागांवर उमेदवार ठरवण्याचा अधिकार असतो. शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी आणि नाराजीचे वातावरण होते, हेही त्यांनी मान्य केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही प्रभागांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. उदय सामंत यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असून, रात्री बसून काही जागांबाबत मार्ग निघतो का, यावर सविस्तर विचार केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना भाजपपासून काही प्रमाणात दूर जाऊन राष्ट्रवादीसोबत जवळीक साधत असल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचाही मुद्दा चर्चेत आला आहे. महानगरपालिकेची आचारसंहिता सध्या सुरू असून, त्यानंतर लवकरच जिल्हा परिषदांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे. मात्र, आरक्षण 50 टक्क्यांपर्यंतच ठेवावे, असे सुप्रीम कोर्टाचे आदेश असल्याने 50 टक्क्यांच्या आत असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका आधी होऊ शकतात, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. महायुतीतील जागावाटपात अपेक्षित जागा न मिळाल्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेकडून राष्ट्रवादीसोबत आघाडीची चाचपणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचाच भाग म्हणून सोमवारी शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी अजित पवारांची भेट घेतली. मात्र, त्या बैठकीत कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. भाजपवर दबाव वाढवण्यासाठीच शिवसेनेकडून ही रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. आता उदय सामंत आणि अजित पवार यांच्यातील चर्चेनंतर पुणे–पिंपरीच्या राजकारणात नेमकं कोणतं समीकरण आकाराला येतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 9:59 am

अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर एफटीओ एप्रिलमध्ये सुरू होणार:द. आशियातील सर्वात मोठी वैमानिक प्रशिक्षण ऑर्गनायझेशन, एका वर्षात 180 वैमानिकांचे प्रशिक्षण‎

दक्षिण आशियातील सर्वात मोठी वैमानिक प्रशिक्षण ऑर्गनायझेशन (एफटीओ) एप्रिल २०२६ पासून अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर सुरू होणार असून, एअर इंडिया या एफटीओचे संचालन करीत आहे. येथे एकूण ३४ प्रशिक्षण देणारी विमाने उपलब्ध राहतील. त्यात तीन दुहेरी इंजिन तर ३१ विमाने एका इंजिनची राहतील. येथे वर्षाच्या पहिल्या सत्रात १८० वैमानिकांना प्रशिक्षण देण्याची सोय केली जात आहे. हे प्रशिक्षण २ वर्षांचे असून, दरवर्षी एवढ्याच वैमानिकांना येथे प्रशिक्षित केले जाणार आहे. २०२८ मध्ये वैमानिकांची पहिली तुकडी तयार होईल. त्यामुळे वैमानिकाचे प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठी निवास व्यवस्था, थेअरी तसेच प्रत्यक्ष विमानोड्डानाची सोय केली जात आहे. प्रशिक्षणार्थींना येथे तज्ज्ञ वैमानिकांच्या मार्गदर्शनात विमानोड्डानाचा अनुभव दिला जाणार आहे. दोन दुहेरी इंजिन असलेली प्रशिक्षण विमाने अमेरिकेहून (युएसए) नुकतीच बेलोरा विमानतळावर दाखल झाली. त्याचप्रमाणे १३ सिंगल इंजिन असलेली विमाने सध्या नागपुरातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत. सोयीनुसार ती अमरावतीत आणली जाणार आहेत. या विमानांमधून प्रत्यक्ष विमानोड्डानाचा अनुभव प्रशिक्षनार्थी वैमानिकांना दिला जाईल. यासाठी वेगाने एफटीओच्या इमारतीचे काम पूर्ण केले जात असल्याची माहिती एफटीओचे व्यवस्थापक रवीतेजा शर्मा यांनी दिली. बेलोरा विमानतळ हे शहरापासून १५.५ कि.मी.अंतरावर असून, येथे एफटीओ सुरू झाल्यानंतर विकासालाही हातभार लागणार आहे. दुहेरी व एकेरी इंजिन असलेली विमाने युएसएहून मागवण्याचे कारण या विमानांमध्ये वैमानिकाचे प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ वैमानिकांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच ते वजनानेही हलके असते. त्यामुळे त्याचे टेकऑफ व लॅण्डिंग करणे शिकाऊ वैमानिकांसाठी सुलभ असते. विमानांमधील या वैशिष्ट्यांमुळेच ती युएसएहून मागवण्यात आली आहेत. प्रथम प्रशिक्षणार्थींना सिंगल इंजिन असलेल्या विमानांमध्ये उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जाईल.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 9:49 am

काचेचा स्कायवॉक उन्हाळ्यात होईल पूर्ण:चिखलदऱ्यातील 407 मीटर लांबीच्या स्कायवॉकमध्ये 80 मीटर राहणार काच‎

अमरावती विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यात मागील ४ ते ५ वर्षांपासून देशातील पहिल्या काचेच्या स्कायवॉकचे काम सुरू झाले आहे. ४०७ मीटर लांबीचा असलेल्या या स्कायवॉकचे काम एप्रिल, मे २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता सिडकोच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. स्काय वॉकचे काम पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांसाठी तो खुला करण्यापूर्वी वनविभागाकडून एक परवानगी सिडकोला घेणे अत्यावश्यक आहे, ती मिळाल्यास येत्या उन्हाळ्यातच पर्यटकांना काचेच्या स्कायवॉकवरुन अभूतपूर्व निसर्गथरार अनुभवता येणार आहे. या स्कायवॉकची जमिनीपासून उंची शंभर ते दोनशे नव्हे तर तब्बल १,५०० फूट आहे. हा भारतातील सर्वात जास्त लांबीचा स्कायवॉक असून, त्याचे विशेष म्हणजे दरीच्या मध्यभागी किंवा ज्या ठिकाणाहून दरी व निसर्ग अधिक उत्तमपणे अनुभवता येईल, अशा ठिकाणी ८० मीटर पारदर्शक काच बसवण्यात येणार आहे. काच असलेला देशातील हा पहिला स्कायवॉक राहणार आहे. { उर्वरित पान ४ अमरावाती झपाट्याने काम सुरू ^आता आवश्यक सर्व परवानगी व विंड टनेल टेस्टचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. त्यामुळे झपाट्याने काम सुरू झाले असून, एप्रिल ते मे २०२६ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. काम पूर्ण झाल्यानंतर स्कायवॉक पर्यटकांसाठी खुला करण्यापूर्वी केंद्रीय वन विभागाकडून एक परवानगी मिळवणे आवश्यक आहे. ती परवानगी प्राप्त होताच हा स्कायवॉक पर्यटकांसाठी खुला होणार आहे. - अक्षय महल्ले, प्रभारी कार्यकारी अभियंता, सिडको, चिखलदरा. चाचण्या, परवानग्यामुळे रखडले होते काम स्कायवॉकचे प्रत्यक्षात काम ५ वर्षांपूर्वी सुरू होते, सिव्हील वर्क अर्ध्यापेक्षा अधिक झाले असतानाच वन विभागाच्या तसेच इतर विभागांकडून काही परवानग्या सिडकोला घ्याव्या लागल्यात. याच दरम्यान गुजरातमधील पूल दुर्घटना झाली. नंतर या पुलाच्या बांधकामादरम्यान विन्ड टनेल टेस्ट करण्याच्या सूचना आल्या. रुडकी व अन्य एका ठिकाणच्या ‘आयआयटी’ तज्ज्ञांना पाचारण करुन या ठिकाणी विंड टनेल टेस्ट करण्यात आली. विविध परवानग्या व विंड टनेल टेस्टचा रिपोर्ट चार महिन्यांपूर्वी प्राप्त झाला. पुन्हा झपाट्याने काम सुरू झाले.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 9:48 am

मनपा निवडणूक; 6 झोनमध्ये उमेदवारांचे अकरा अर्ज अवैध:जात वैधता प्रमाणपत्र न जोडणे, अनामत रक्कम न भरल्यामुळे अपात्र‎

महानगर पालिका निवडणूक ही दिवसेंदिवस उत्कंठावर्धक ठरत आहे. अगदी सुरुवातीपासूनच मतभेद, रोष, आक्षेप, वाद चव्हाट्यावर आले आहेत. उमेदवारी अर्ज छानणी करण्याच्या दिवशी (बुधवार ३१) सहा झोनमध्ये (निवडणूक केंद्र) एकूण ११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. एका उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याने झोन क्र. ७ च्या वैध, अवैध अर्जांबाबत रात्री उशिरापर्यंत निर्णय झाला नव्हता. झोन क्र. १ रामपुरी कॅम्पमध्ये ११८ उमेदवारांपैकी दोघांचे अर्ज अवैध ठरले. तसेच ११६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. दोन्ही उमेदवारांनी अनामत रक्कम भरली नव्हती. झोन क्र. २ नवीन तहसील कार्यालय केंद्रात १२९ पैकी १२८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला. जात वैधता प्रमाणपत्र तसेच ते सादर { उर्वरित पान ४ झोन क्र. ७ (निवडणूक कार्यालय क्र.७) मध्ये प्रभाग क्र. १९ साईनगर येथील भाजपाचे उमेदवार तुषार भारतीय यांनी युवा स्वाभिमानचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या विरोधात आक्षेप दाखल केला. महानगर पालिका अधिनियमानुसार महानगर पालिकेत कंत्राटदार असलेल्या व्यक्तीला उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाही. सचिन भेंडे यांनी मनपात दोन कंत्राट घेतले आहेत. ते १६ रोजी परवाना परत करणार, असे त्यांनी लिखित दिले असले तरी तोवर त्यांनी घेतलेल्या कंत्राटातील कामे पूर्ण होणार नाहीत. त्यांना एकाच वेळी दोन लाभाची पदे उपभोगता येणार नाहीत, असा लिखित आक्षेप भारतीय यांनी बडनेरा झोन क्र. ७ च्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. या प्रकरणी सुनावणी झाली. दोन्ही उमेदवारांची बाजू ऐकून घेण्यात आली. मात्र, अद्याप निर्णय आला नसल्याने येथे किती उमेदवारांचे अर्ज वैध व अवैध ठरले, हे रात्री १० पर्यंत कळाले नव्हते.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 9:47 am

कुख्यात गुंड आकाश थुंकेकर 1 वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध:‘एमपीडीए’अंतर्गंत पाेलिसांची 21 वी कारवाई‎

अकोला नववर्षाच्या पूर्वसंध्येला व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कुख्यात गुंड आकाश उर्फ करण विनोद थुंकेकर (वय २४, रा. लेबर कॉलनी, कृषी नगर, अकोला) यास एम.पी.डी.ए. अॅक्ट अन्वये एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले. थुंकेकर याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, इच्छापूर्वक दुखापत पोहचवणे, पातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवणे, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे, शांतता भंग घडवून आणण्याच्या उ‌द्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे करणे, असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. तो प्रतिबंधक कार्यवाही करूनसुद्धा जुमानत नसल्याने त्याच्याविरूद्ध गंभीर दखल घेऊन त्याच्या गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा, याकरिता पोलिस अधीक्षक यांनी त्यास स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी यांना सादर केला होता. जिल्हा दंडाधिकारी वर्षा मीना यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताद्वारे माहिती मिळवून कुख्यात गुंड हा थोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एक वर्षाकरिता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध ठेवण्याबाबतचा आदेश ३० डिसेंबर २०२५ रोजी पारीत केला आहे. जिल्हादंडाधिकारी अकोला यांच्या आदेशावरून आकाश उर्फ करण विनोद थुंकेकर याचा तत्काळ शोध घेऊन त्यास हा आदेश तामील करून त्याला ३० डिसेंबर २०२५ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले. ही कारवाई पूर्ण करण्याकरिता पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पोलिस उपनिरीक्षक माजीद पठाण, पोलिस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सैरिसे, पोलिस कॉन्स्टेबल उदय शुक्ला तसेच सिव्हील लाईनच्या. पोलिस निरीक्षक मालती कायटे, पोलिस उपनिरीक्षक दिनेश पवार, पोलिस अमंलदार सचिन पाटोळे, शक्ती कांबळे, प्रदीप पवार, श्रीकांत अजलसांडे, अक्षय तायडे यांनी परिश्रम घेतले. सराईत गुन्हेगारांवर ‘एमपीडी ए’ची कारवाई केली जाणार ^‘एमपीडीए’अंतर्गंत अकोला पोलिसांनी शहरात केलेली ही २१ वी कारवाई आहे. जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहून शांतता राहावी, यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. - अर्चित चांडक, पोलिस अधीक्षक.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 9:44 am

काँग्रेस प्रदेश महासचिवांचा राजीनामा:उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसमध्ये पक्षाअंर्तगत घमासान वाढले‎

महापालिका निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे प्रदेश महासचिव मो. जमीर शेख हनीफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी त्यांची आई अख्तर बी शेख हनीफ यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती. त्या माजी नगरसेविका होत्या. हा राजीनामा त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष हाजी वजाहत मिर्झा यांच्याकडे पत्राद्वारे सादर केला आहे. मंगळवारी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून पक्षाअंर्तगत घमासान झाले. उमेदवारी न मिळालेल्या समर्थकांनी आमदारांचा फोटो असलेल्या फलकाला काळे फासत संताप व्यक्त केला होता. उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसमध्येही प्रभाग क्रमांक १ मधून आरोप झाले होते. आता याच प्रभागातील आणखी एका माजी नगरसेविकेला उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी व त्यांच्या मुलाने थेट राजीनामाच दिला. राजीनामा पत्रात मोहम्मद जमीर शेख हनीफ यांनी नमूद केलेल्या नुसार ते सुमारे ३० वर्षांपासून काँग्रेस पक्षासाठी कार्यरत होते. २०१७ मध्ये कीत त्यांच्या मातोश्री अस्तबी शेख हनीफ यांना काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक १ नायगाव–अकोट फैल येथून उमेदवारी देण्यात आली होती. त्या निवडूनही आल्या होत्या. मात्र सध्या स्थानिक दबावामुळे यंदा उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे माझी आई कांॅग्रेसच्या सदस्यत्वाचा मी मी प्रदेश महासचिव (अल्पसंख्यांक सेल) पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद कले आहे. स्थानिक राजकारणामुळे अन्याय झाला

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 9:44 am

बाळे शाळा, सिद्रामप्पा हत्तुरे, ठोकळ प्रशाला:जैन गुरुकुलने जिंकली ट्रॉफी, चारे येथे कब- बुलबुल, स्काऊट- गाईड जिल्हा विद्यार्थ्यांचा चार दिवसीय मेळावा उत्साहात‎

बार्शी सोलापूर भारत स्काऊट आणि गाईड शहर जिल्हा संस्था व जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला कब-बुलबुल, स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांचा चार दिवसीय जिल्हा मेळाव्यात कब विभागातून बाळेची प्राथमिक शाळा, बुलबुल विभागातून सोलापूरची सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा, स्काऊट विभागातून सोलापूरची निर्मलाताई ठोकळ प्रशाला तर गाईड विभागातून सोलापूर बाळी वेस येथील दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. दि.२६ ते २९ डिसेंबर या कालावधीत चारे (ता. बार्शी) येथील कर्मवीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हा जिल्हा मेळावा झाला. यात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून १७०० विद्यार्थी व ८० टीम लीडर, कब-बुलबुल, स्काऊट व गाईड विद्यार्थी सहभागी झाले होते. समारोप कार्यक्रमाप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी व शाळांना पारितोषिके, प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए.बी. कदम होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके, प्राचार्य डॉ व्हि.पी. शिखरे, प्रशासन अधिकारी भारत बावकर, या मेळाव्यात शिस्त, नेतृत्वगुण, साहस, स्वयंसेवा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शारीरिक व बौद्धिक कौशल्यांवर आधारित उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पाहुण्यांनी भाषणात स्काऊट-गाईड चळवळीचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, समाजसेवा, स्वावलंबन, शिस्त व नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांना या मेळाव्यातून मिळालेले अनुभव आयुष्यात उपयोगी पडतील, असा विश्वास जिल्हा स्काऊट गाईडचे समन्वयक यादव यांनी व्यक्त केला. बावकर, केंद्रप्रमुख बनसोडे व जाधव, मुख्याध्यापक थोरबोले, पाटील, वाघमारे, रेवडकर, कसबे उपस्थित होते. त्याचबरोबर सरपंच सुनीता जगदाळे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदकुमार जगदाळे, भाऊसाहेब जगदाळे, प्रकाश मेजर जगदाळे आदी उपस्थित होते. जिल्हा समन्वयक मोरे, यादव, शिरसाट, पुजारी, मटके, उपळकर, दळवे, पठाण उपस्थित होते. मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्था, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वसतिगृह अधीक्षक, विद्यार्थी यांचे महत्वपूर्ण योगदान लाभले व सर्वांनी परिश्रम घेतले.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 9:40 am

मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेत मुलींना चादर वाटपाचे उपक्रम:अक्कलकोट येथे वारकरी संप्रदायातील स्त्री- संतांच्या परंपरेचा जागर‎

वारकरी संप्रदायातील मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई यांसारख्या स्त्री-संतांनी घडवलेल्या समतेच्या, भक्तीच्या आणि माणुसकीच्या परंपरेचा जागर करत आळंदी नगरातील महिलांसाठी पहिली वारकरी संस्था म्हणून ओळख असलेल्या मुक्ताई वारकरी शिक्षण संस्था येथे चिमुकल्या वारकरी मुलींसाठी चादर वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. हा उपक्रम वृंदावन फाऊंडेशन, पुणे आणि विबोधी महिला फाऊंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ, सामाजिक जाणिवा सजग असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तसेच संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या माजी विश्वस्त मा. ॲड. प्रितीजी परांजपे आणि समता वारीच्या उपाध्यक्ष विबोधी फाउंडेशनच्या अध्यक्षा ,स्त्रीवादी अभ्यासू सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वर्षांताइ हांडे यांच्या शुभहस्ते चिमुकल्या मुलींना चादरींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामायणाचार्य ह.भ.प. बाबूराव तांदळे महाराज होते. यावेळी ह.भ.प. गयाताई यादव, जयश्रीताई तोडकर, लिलाताई यादव, डॉ. प्रतीक कुदळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात बोलताना प्रा. वर्षांताइ हांडे म्हणाल्या, वारकरी परंपरेचे शिक्षण घेणाऱ्या भगिनींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. चिमुकल्या मुलींमध्ये भक्तीबरोबर आत्मसन्मान आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 9:39 am

हजरत संत ताजुद्दीन बाबांचा उद्यापासून उरूस:गुळसडी येथे बाबांची चादर आणि मानाच्या आखाची निघणार मिरवणूक‎

करमाळा तालुक्यातील गुळसडी येथील हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले ग्रामदैवत व जागृत देवस्थान हजरत संत ताजुद्दीन बाबा यांच्या उरूसास येत्या १ जानेवारी २०२६ पासून प्रारंभ होणार आहे, अशी माहिती ताजुद्दीन बाबा दर्गाह ट्रस्ट, गुळसडी यांनी दिली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवार दि. १ जानेवारी रोजी संदलची मिरवणूक गुळसडी गावातून काढण्यात येणार आहे. त्यानंतर शुक्रवार दि. २ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता मुख्य संदलची मिरवणूक निघणार असून या मिरवणुकीत बाबांची चादर व मानाचा घोडा सवाद्य मिरवणुकीने सहभागी होणार आहेत. या वेळी महाराष्ट्रातील वैजापूर येथील बॅँडवादक हबीब चाऊस आपल्या बँडसह कला सादर करणार आहेत. याच दिवशी दर्गाह परिसरात भाविकांसाठी लंगर खाना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच उरूसाच्या रात्री दर्गाह पटांगणावर कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सुप्रसिद्ध कव्वाल अब्दुल हबीब अजमेरी हे आपली कव्वाली सादर करणार आहेत. कव्वाली कार्यक्रमास रात्री ९ वाजता सुरुवात होणार आहे. नववर्षानिमित्त आयोजित या उरूसातील विविध धार्मिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पंचकमिटीने केले आहे. गुळसडी येथे आजही हिंदू- मुस्लिम ऐक्याचे सुंदर उदाहरण पाहायला मिळते. गावातील मुस्लिम बांधव ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात, तर हिंदू बांधव हजरत संत ताजुद्दीन बाबा यांच्या उरूसातील विविध धार्मिक कार्यक्रमांना श्रद्धेने उपस्थित राहतात. दर्गाह परिसरात भाविकांसाठी लंगर खाना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे गुळसडी गावात आजही सामाजिक सलोखा व एकतेचे आगळेवेगळे दर्शन घडत आहे. हिंदू- मुस्लिम एकात्मतेचे आगळेवेगळे दर्शन

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 9:39 am

नववर्षाची पहाट काळरात्र ठरली:रस्त्याच्या कडेला शेकोटी करून उभ्या असलेल्या तिघांवर काळाची झडप; उभ्या-उभ्या इनोव्हाने चिरडले

नववर्षाची सुरुवात राज्यात भीषण अपघातांच्या बातम्यांनी हादरवणारी ठरली आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरात आज 1 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास तावडे हॉटेल चौकात घडली. रस्त्याच्या कडेला शेकोटी करून उभ्या असलेल्या तिघांवर अचानक काळाने झडप घातली. भरधाव वेगात येणाऱ्या इनोव्हा कारचे चालकावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट त्या तिघांच्या अंगावर आदळली. धडक इतकी भीषण होती की तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ महामार्गावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसर सुरक्षित करून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघातात ठार झालेल्या तिघांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात येत आहे. अपघात नेमका कसा झाला, चालकाचा वेग किती होता आणि वाहनावर नियंत्रण का सुटले, याचा तपास शाहूपुरी पोलिस करत आहेत. या भीषण घटनेमुळे नववर्षाच्या आनंदावर पाणी फेरले गेले आहे. महामार्गावर पहाटेच्या वेळी वाहनांचा वेग अधिक असतो, त्यातच थंडीपासून बचावासाठी रस्त्याकडेला शेकोटी करून उभे राहणे जीवघेणे ठरत असल्याचे या अपघातातून पुन्हा स्पष्ट झाले आहे. स्थानिक नागरिकांनी या चौकात वारंवार अपघात होत असल्याचे सांगत, प्रशासनाने येथे वेगमर्यादा आणि सुरक्षेच्या उपाययोजना अधिक कडक कराव्यात, अशी मागणी केली आहे. नववर्षाच्या तोंडावर दुर्घटनांमुळे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर दुसरीकडे सांगली-सातारा-कोल्हापूर परिसरातूनही अपघाताची हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात देवदर्शन करून गावाकडे परतणाऱ्या कुटुंबाच्या कारला गुहागर-विजापूर मार्गावर खानापूरजवळ भीषण अपघात झाला. सोमवारी सायंकाळी तामखडी परिसरात दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. या अपघातात विश्वास शामराव चौगुले (वय 59, सध्या रा. कऱ्हाड, जि. सातारा; मूळ रा. कसबा बावडा, कोल्हापूर) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी सुरेखा चौगुले आणि दोन मुले या अपघातात किरकोळ जखमी झाली आहेत. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करणारे मित्र तानाजी जाधव (रा. वाठर, ता. कऱ्हाड) आणि लता विष्णू कुंभार (रा. वाठार) हेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने अन्य जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मूळचे कसबा बावडा येथील रहिवासी असलेले विश्वास चौगुले हे व्यवसायाच्या निमित्ताने सध्या कुटुंबासह कऱ्हाड येथे वास्तव्यास होते. पत्नी, दोन मुले आणि मित्रांसह ते सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतीच्या प्रवासात तामखडी गावाजवळ त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारशी जोरदार धडक झाली आणि हा अपघात घडला. नववर्षाच्या तोंडावर झालेल्या या दुर्घटनांमुळे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रस्ते अपघात रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 1 Jan 2026 9:38 am