भावाशी खासगीत संपर्क साधल्याने सीजेआय नाराज
नवी दिल्ली : मेडिकल प्रवेशासंदर्भातील एका केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आज कडक भूमिका घेतली. याचिकाकर्त्याच्या वडिलांकडून मुख्य न्यायाधीशांच्या कुटुंबियांशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाल्याने कोर्टाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी हा न्याय प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रकार आहे. हा प्रकार कोर्टाचा अवमान का समजला जाऊ नये याबाबत विचार करण्यात येईल असे देखील ते म्हणाले. […] The post भावाशी खासगीत संपर्क साधल्याने सीजेआय नाराज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पहिल्या पूरक यादीत १३ लाख नावे वगळली
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजनच्या पहिल्या सप्लिमेंटरी यादीतून १३ लाख नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. यासह, राज्यात एकूण वगळलेल्या मतदारांची संख्या सुमारे ७६ लाख झाली आहे. निवडणूक आयोगाच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, ‘अंडर अॅडज्युडिकेशन’मध्ये ठेवलेल्या सुमारे ६० लाख मतदारांपैकी ३२ लाख नावांची तपासणी झाली आहे. यापैकी सुमारे ४०% मतदार यादीतून वगळण्यात आले […] The post पहिल्या पूरक यादीत १३ लाख नावे वगळली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे येथे समस्त हिंदू आघाडीतर्फे ऐतिहासिक लाल महालात शिवतेजदिन सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यात 'कथा शिवरायांची' या नाट्यरूप कथाकथनाचे प्रभावी सादरीकरण झाले, ज्याला शिवभक्तांनी उत्स्फूर्त दाद दिली. कसबा पेठ येथील लाल महाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने दुमदुमून गेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात शाहिस्तेखानाला धडा शिकवला, तो ऐतिहासिक दिवस 'शिवतेजदिन' म्हणून साजरा होतो. याच औचित्याने हिंदू महिला सभेच्या वतीने 'कथा शिवरायांची' हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा प्रवास नाट्यरूप कथाकथनातून मांडण्यात आला. हिंदू महिला सभेच्या सहा सदस्यांनी पारंपरिक वेशभूषा करून हे सादरीकरण केले. त्यांनी वाद्यवृंदाच्या साथीने गवळण, भारूड, जोगवा, पाळणा, पोवाडा आणि निवेदनाद्वारे शिवरायांचे कार्य प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले. या कार्यक्रमाची संहिता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरली होती, जी वसुधाताई मेहेंदळे यांनी संकलित आणि दिग्दर्शित केली. प्राची सप्रे, सुनीता अभ्यंकर, प्राची गोडबोले, वंदना जोगळेकर, स्मिता नातू आणि सुधा राजगुरू यांनी हे कथानक प्रेक्षकांसमोर मांडले. सादरीकरणात शिवरायांच्या जन्मापासूनच्या घटनांचा समावेश होता. किल्ले शिवनेरीवर शहाजीराजे आणि जिजाऊ मासाहेबांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला. त्यांनी बारा मावळ एकत्र करून रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली आणि तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवरायांच्या वाढत्या कर्तृत्वाची बातमी विजापूर दरबारात पोहोचल्यावर अफझलखान स्वराज्यावर चालून आला. शिवरायांनी सईबाईंच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून अफझलखानाचा खात्मा केला. यानंतर सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला. बाजीप्रभूंच्या पराक्रमाने पावनखिंड गाजली. सुरतेची लूट, शहाजीराजांचा मृत्यू, मिर्झाराजे आणि दिलेरखानाची स्वारी, शिवरायांची आग्रा भेट आणि कैदेतून सुटका, बहलोलखानावरील स्वारी, प्रतापरावांचे बलिदान, पन्हाळ्याची अविश्वसनीय मोहीम आणि शिवराज्याभिषेकापर्यंतचा संपूर्ण कालपट या सादरीकरणात समाविष्ट होता. या कार्यक्रमाला पल्लवी पिळणकर यांनी हार्मोनिअमवर आणि धनंजय चिंचणीकर यांनी तबल्यावर साथसंगत केली.
अमेरिकेसह २० देशांत अचानक कोरोना परतला
वॉशिंग्टन/नवी दिल्ली : अमेरिकेसह जगभरात २० हून अधिक देशात पुन्हा कोरोनाच्या केस वाढत आहेत. अमेरिकेत कोविडच्या व्हेरिएंट सार्स-कोव्ह-२ बीए.३.२ ची प्रकरणे समोर आली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या वेरिएंटच्या केस सातत्याने वाढत आहेत. अमेरिकेच्या सीडीसींचे म्हणणे आहे की हा व्हेरिएंट पाय पसरत आहे. हळूहळू केस वाढत आहेत. अशात प्रश्न निर्माण होत आहे की अन्य देशात […] The post अमेरिकेसह २० देशांत अचानक कोरोना परतला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केम्ब्रिज विद्यापीठातील नेहरू प्रोफेसर ऑफ इंडियन बिझनेस अॅट जज बिझनेस स्कूलचे प्राध्यापक आणि लेखक जयदीप प्रभू यांनी 'जुगाड'ला भारतीय संशोधनाची एक महत्त्वपूर्ण विशेषता म्हटले आहे. मर्यादित संसाधने वापरून गुंतागुंतीच्या समस्यांचे निराकरण करणे, ही भारतीय संशोधनाची खासियत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रा. प्रभू हे फ्यूल बिझनेस स्कूलने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांच्या 'लीन स्पार्क' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. काटकसरीचे नवोन्मेष, तात्पुरते उपाय, लवचिकता आणि वेग यातून अपारंपरिक शोध म्हणजे 'जुगाड' असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाला फ्यूल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे तसेच प्रा. मयुरी देशपांडे उपस्थित होत्या. प्रा. जयदीप प्रभू यांनी 'लीन स्पार्क'ची चार प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली. यामध्ये लीन अंमलबजावणी, संरचित प्रयोग आणि निरंतर शिक्षण, उद्देशपूर्ण साधेपण (आवश्यक वैशिष्ट्ये व अनावश्यक गुंतागुंत दूर करणे) आणि अनुकूलनक्षम विस्तारक्षमता (विविध वातावरणांमध्ये विकसित होण्यासाठी डिझाइन करणे) यांचा समावेश आहे. मोठ्या संस्थांसाठी कार्य करताना भरपूर शिकणे, चपळ व्हायला शिकणे, वगळलेले गट समाविष्ट करणे, कर्मचाऱ्यांना प्रयोग करण्यासाठी वेळ आणि संधी देणे महत्त्वाचे आहे. चपळ उद्योजकांसह व्यस्त राहून आणि उदयोन्मुख बाजारपेठांशी संलग्न होऊन 'जुगाड' करायला शिकण्याची मानसिकता ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. लहान संस्थांनी मोठ्या संस्थांसोबत भागीदारी करायला शिकावे, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी डॉ. केतन देशपांडे यांनी सांगितले की, फ्यूल संस्था राष्ट्रनिर्माणासाठी कार्य करत आहे. युवकांना कौशल्यपूर्ण शिक्षण दिल्यास आत्मनिर्भर भारत बनण्यास वेळ लागणार नाही. आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येणाऱ्या भारतात आता संशोधनाला अधिक प्राधान्य देणे गरजेचे असून, सध्या देशाला कौशल्य-आधारित युवकांची गरज आहे. या प्रसंगी प्रा. जयदीप प्रभू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नेतृत्व गुण, कष्ट, संशोधन आणि कमी खर्चात सामाजिक समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
रेशनकार्डधारकांना मिळणार ३ लिटर केरोसीन;सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी आखाती देशांमध्ये सुरू असणा-या युद्धाचा जगावर परिणाम होत आहे. यामुळे इंधनाचा आणि एलपीजी गॅसचा काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सध्या एलपीजी गॅसच्या किमती वाढल्या आहेत, तसेच एलपीजी गॅस बुकिंगचा कालावधी वाढला आहे त्यामुळे नागरिकांना खूप वाट पाहावी लागते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठे […] The post रेशनकार्डधारकांना मिळणार ३ लिटर केरोसीन;सरकारचा मोठा निर्णय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा:सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार, गिरीश महाजनांचा इशारा
सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल तुटवड्यासंदर्भात जे अफवा पसरवीत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, असा इशारा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर गॅस एजन्सीच्या बाहेर लोकांनी रांगा लावल्याचे पाहायला मिळाले होते. आता पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र तुटवडा नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात येत आहे. गिरीश महाजन म्हणाले, इंधन पुरवठ्यासंदर्भात जगभरात अशीच परिस्थिती आहे, पण आपण संयम बाळगावा. करमर्शियल गॅस बाबतीत शॉर्टेज आहे, घरगुती बाबतीत नाही. भारतात रॉकेल आले असून त्याचा वापर करून आपली गरज भागवू शकतो. तसेच सोशल मीडियावर पेट्रोल-डिझेल तुटवड्यासंदर्भात जे अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार असल्याचा इशाराही महाजन यांनी दिला आहे. पेट्रोल टंचाईच्या संदर्भात बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मागील महिन्यापेक्षा दीड पट मागणी गेल्या चार महिन्यात वाढली आहे. कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे, पेट्रोल पंप चालकांकडे संपूर्ण पेट्रोल-डिझेलचा साठा आहे. मात्र, मागणी अधिक वाढल्याने तुटवडा जाणवत आहे. अतिरिक्त साठा करण्याची गरज नाही, सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. त्यामुळे रांगा लागत आहेत. सिलिंडरसाठी देखील रांगा लावण्याची गरज नाही. नागरिकांना घरपोच सिलिंडर मिळत आहेत, कुठेही गर्दी करू नका, त्यामुळे सेवा विस्कळीत होत आहे, कुठेही तुटवडा नाही, असे महाजन यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना गिरीश महाजन यांना अशोक खरात प्रकरणी देखील प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, अशोक खरात प्रकरण अतिशय गंभीर असून ही विकृती आहे. आपल्या समाजात काही लोक या गोष्टी मानणारे आहेत, ते विश्वास ठेवतात. मला दोन महिन्यांपूर्वी याबाबत कल्पना होती, पोलिसांना तशी सूचना दिली होती. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार गंभीर दखल घेतली जाईल. पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, अशोक खरात कायमस्वरूपी कसा जेलमध्ये राहील हे पाहिले जाईल. खरातची हजारो कोटींची प्रॉपर्टी आहे, त्याच्या प्रॉपर्टीज कशा जोडल्या जातील याबाबत देखील कारवाई होईल, अशी माहिती महाजन यांनी दिली आहे. संभाजीनगरमध्ये पेट्रोल पंपावर तोबा गर्दी:वाहनांच्या प्रचंड रांगा, टू व्हिलरला फक्त 200 चे पेट्रोल मिळणार, वाचा ग्राउंड रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लॉकडाऊन लागू होणार असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरताच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. 'उद्या पेट्रोल मिळणार नाही' या भीतीने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी रांगा लावल्यात. शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर दोन दिवसांपासून लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. या अचानक वाढलेल्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले, “इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, पण लोक अफवांवर विश्वास ठेवून एकाच वेळी गर्दी करत आहेत. त्यामुळे व्यवस्थापन करणे कठीण जात आहे.” वाचा सविस्तर
दीक्षा त्रिपाठी बनल्या ‘अमर’ कोर्स पूर्ण करणा-या देशातील पहिल्या महिला
पुणे : भारतीय सैन्याच्या लेफ्टनंट दीक्षा त्रिपाठी यांनी एक अभूतपूर्व यश संपादन केले आहे. त्यांनी ‘आर्मी मार्शल आर्ट्स रुटीन’ म्हणजेच ‘एएमएआर’ अमर कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला असून अशी कामगिरी करणा-या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. हा कोर्स पुणे येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल ट्रेनिंग(एआयपीटी) मध्ये असतो. भारतीय लष्करातील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक कोर्सेसमध्ये याची […] The post दीक्षा त्रिपाठी बनल्या ‘अमर’ कोर्स पूर्ण करणा-या देशातील पहिल्या महिला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अंधारे-म्हात्रेंमध्ये ट्विटर वॉर
मुंबई : प्रतिनिधी अशोक खरात प्रकरण आता केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित राहिलेले नाही. यात अनेक राजकीय नेत्यांची नावे आणि कनेक्शन्स समोर येत आहेत. अशोक खरात प्रकरणाने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणाचे पडसाद दोन्ही शिवसेनेवर पडत असल्याचे दिसत आहेत. शीतल म्हात्रे यांनी या प्रकरणात थेट ‘मातोश्री’ला खेचल्याने या वादाला आता नवीन वळण […] The post अंधारे-म्हात्रेंमध्ये ट्विटर वॉर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीसाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेत सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या सुधारित निर्णयानुसार, शेतरस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचे नुकसान करणाऱ्या शेतकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकरणांत संबंधित शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आणि आधार कार्ड पाच वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार असून, त्या कालावधीत त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही. महसूल व वन विभागाने यासंदर्भात शुद्धीपत्रक जारी केले असून, याआधी 14 डिसेंबर 2025, 7 जानेवारी 2026 आणि 18 फेब्रुवारी 2026 रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे पाणंद रस्त्यांवर अडथळा निर्माण करणाऱ्यांवर प्रशासन अधिक कठोरपणे कारवाई करणार आहे. नव्या नियमांनुसार, शेतरस्त्यांवरील अतिक्रमण सात दिवसांच्या आत काढण्याचे आदेश दिले जातील. आदेशानंतरही अतिक्रमण हटवले नाही, तर प्रशासन स्वतः कारवाई करून ते हटवणार आहे. याशिवाय इतर शेतकऱ्यांच्या ये-जा हक्काच्या रस्त्यावर शेती करणेही पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आणि आधार क्रमांक पाच वर्षांसाठी ब्लॉक केला जाईल, तसेच त्यांना सरकारी योजनांपासून वंचित ठेवण्यात येईल. योजनेच्या अंमलबजावणीत जमीन उपलब्धतेबाबतही स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी कोणतेही भूसंपादन केले जाणार नाही. शेतकरी स्वेच्छेने जमीन देऊ शकतात, मात्र त्यासाठी नोंदणीकृत दानपत्र किंवा हक्कसोड आवश्यक राहील. एकदा जमीन दिल्यानंतर ती परत मागता येणार नाही. या प्रक्रियेसाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क माफ करण्यात आले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कंत्राटदार निवड प्रक्रियेतही सुधारणा तसेच, कामकाज पारदर्शक राहण्यासाठी कंत्राटदार निवड प्रक्रियेतही सुधारणा करण्यात आल्या आहेत. पात्र कंत्राटदारांचे पॅनेल तयार करून त्यांना समान प्रमाणात काम वाटप केले जाईल. कंत्राटदारांकडे आवश्यक यंत्रसामग्री स्वतःच्या मालकीची असणे बंधनकारक करण्यात आले आहे. कामाच्या रकमेच्या 2 टक्के किंवा किमान 15 लाख रुपयांची सुरक्षा ठेव अनिवार्य असेल. याशिवाय विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीत पाच शेतकऱ्यांची निवड करण्याचे अधिकार संबंधित आमदारांना देण्यात आले असून, महसूल यंत्रणेला या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पुढचे चार दिवस ‘अवकाळी’चे संकट
मुंबई : प्रतिनिधी राज्यात मार्च महिन्याच्या अखेरीस उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला असतानाच आता हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झालेले असताना दुसरीकडे अवकाळी पावसाची चाहूल लागली आहे. पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा […] The post पुढचे चार दिवस ‘अवकाळी’चे संकट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावतीत रुग्णवाहिकेची कारला धडक; ८ वर्षीय मुलीचा मृत्यू
अमरावती : प्रतिनिधी अमरावतीत भरधाव रुग्णवाहिकेने धामणगाव तालुक्यातील देवगाव चौफुलीवर पोलिस उपनिरीक्षकांच्या कारला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडल्याची घटना घडली. या भीषण अपघातात एका आठ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची थरारक दृश्यं सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दशासर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक राहुल […] The post अमरावतीत रुग्णवाहिकेची कारला धडक; ८ वर्षीय मुलीचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
झिरवाळांसाठी माजी मंत्र्यांनी लावला सापळा
मुंबई : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा ट्रान्सवूमनसोबतचा आक्षेपार्ह व्हीडीओ समोर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यानी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, झिरवाळ यांना अडकवण्यासाठी माजी मंत्र्याने ट्रॅप लावल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस आमदार, विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, ‘झिरवाळांची जागा रिकामी करून घेण्यासाठी एक मोठे नाव समोर येत आहे. […] The post झिरवाळांसाठी माजी मंत्र्यांनी लावला सापळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पश्चिम आशियातील संकटात फ्रान्सने दिले भारताला आमंत्रण
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संकटात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गुरुवारी फ्रान्स दौ-यावर गेले आहेत. त्याठिकाणी जयशंकर हे जी ७ देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत होणा-या बैठकीत सहभागी होतील. मध्य पूर्वेत सुरू असलेले अमेरिका, इस्रायलविरुद्ध इराण युद्ध आणि त्यामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील जल वाहतुकीवर झालेला परिणाम या मुद्यांवर या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे. परराष्ट्र मंत्री […] The post पश्चिम आशियातील संकटात फ्रान्सने दिले भारताला आमंत्रण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रात अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आले असून, महिलांसोबतचे अनेक व्हिडिओ आता समोर येताना दिसत आहे. तसेच हा बाबा काळी जादू करायचा, असेही समोर आले असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी खळबळजनक दावा केला आहे. माझ्यावरही अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा खैरे यांनी केला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अशोक खरातच्या संदर्भात काही आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी त्यांच्याच मित्रपक्षातील काही सहकाऱ्यांनी खरातकडून तंत्र-मंत्र तसेच अघोरी पूजा केली असल्याचा दावा सपकाळ यांनी केला होता. यावरच चंद्रकांत खैरे म्हणाले की, माझ्यावर सुद्धा अघोरी पूजा झाली होती. पण मी इतका धार्मिक आहे, देवभक्त आहे की माझ्यावर अघोरी पूजा करणारा माणूसच मरून गेला. मी मेलो नाही, तोच माणूस मेला, असा गौप्यस्फोट खैरे यांनी केला आहे. पुढे बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, राजकीय लोक बाबा लोकांकडे जातात. त्यांनी जाऊ नये. साधुसंतांच्या, देवांच्या दारी जाऊन प्रार्थना करावी. बाकीच्या लोकांच्या दारी कधी जाऊ नये. माझा जादूटोणावर अजिबात विश्वास नाही. मी इतका मजबूत आहे की माझ्या पाठीशी देवाची शक्ती आहे. मी अध्यात्मवादी आहे, धार्मिक वृत्तीचा आहे. म्हणून माझ्यावर जादूचे कोणतेही प्रयोग होत नाहीत. माझ्यावर जादूचा प्रयोग करणारा माणूस स्वतःच मेला. कन्नड तालुक्यातील नाचणवेलचा हा माणूस असल्याचीही माहिती खैरे यांनी दिली. माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे, सावध राहा!:नादाला लागाल तर नामोनिशाण नष्ट करू, भोंदू खरातने 20 वर्षांपूर्वी अंनिसला दिली होती धमकी भोंदू ज्योतिषी अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे पाढे आता एकामागून एक उलगडू लागले आहेत. खरातने केवळ महिलांचे शोषणच केले नाही, तर त्याचा पर्दाफाश करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनाही शस्त्राचा धाक दाखवून धमकावले होते, असा खळबळजनक दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. सुमारे दोन दशकांपासून खरातचे हे अघोरी उद्योग सुरू असून, त्याने अंनिसच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे, माझ्या नादाला लागाल तर तुमचे नामोनिशाण नष्ट करू अशी धमकी दिल्याची माहिती आता समोर आली आहे. वाचा सविस्तर
घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडर चढ्या दराने विकणाऱ्या गॅस एजन्सींच्या विरोधात शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार, ता. 26 मार्च रोजी झालेल्या बैठकीत या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवार ता. 27 मार्च रोजी संभाजीनगरातील 23 गॅस एजन्सीना निवेदन देऊन चढ्या दराने सिलेंडर गॅस विकू नये,अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात येणार आहे. शहरातील विविध भागांत नागरिकांना गॅस सिलिंडर जादा दराने विकले जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढत आहे.चढ्या दराने विक्री करणाऱ्या संबंधित गॅस एजन्सींवर तातडीने कारवाई करावी तसेच प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात यावा असा निर्णय या बैठकीत घेतला आहे. याप्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, राज्य संघटक चेतन कांबळे,उपजिल्हाप्रमुख संतोष खेंडके, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, विधानसभाप्रमुख प्रमोद ठेंगडे, विधानसभा संघटक गोपाल कुलकर्णी, वीरभद्र गादगे, गिरीश चपळगांवकर, माजी महापौर रशीद मामू खान, नगरसेवक गणेश लोखंडे, सचिन खैरे,राहुल सोनवणे, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, युवासेना जिल्हायुवाधिकारी हनुमान शिंदे,उपशहरप्रमुख सुगंध कुमार गडवे, बापू कवडे, सचिन वाघ, सोमीनाथ नवपुते, संजय हरणे, पुरुषोत्तम पानपट, सुरेश पवार, सीताराम सुरे, मंगेश भाले, दिनेश राजे भोसले, सुरेश गायके, किरण सालपे, गणेश सुरे, मोहन म्हस्के, भागीनाथ रिठे, गोरख सोनवणे, नंदू लबडे, योगेश पवार, मधुकर वाघमारे,वैजिनाथ म्हस्के, सलीम खामगावकर, संदीप चव्हाण, रणजीत दाभाडे, राहुल वाणी, देविदास रत्नपारखी, नरेंद्र देवतवाल, सुधीर जाधव, शिवकुमार देशमुख, मयूर तुपे, शौकत पटेल, नानासाहेब रणयेवले,नगरसेविका सुनीता सोनवणे,महिला आघाडी सुनीता सोनवणे, मीरा देशपांडे, रेणुका जोशी, राजश्री पोफळे, बबीता रणयेवले, छाया देवराज, सीमा गवळी, विजया पवार, प्रतिभा राजपूत व दीपाली पाटील उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलेलं कौतुक सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या वक्तव्यावर काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुळे यांनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी केली आहे. सुळे यांच्या विधानामुळे महाविकास आघाडीत मतभेद उघड झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याचा दावा केला. चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी अघोरी पूजा केल्याचा आरोप त्यांनी केला, तर एकनाथ शिंदे गटानेही फडणवीसांना पदावरून खाली खेचण्यासाठी अशाच प्रकारच्या पूजांचा आधार घेतल्याचा दावा त्यांनी केला. या सगळ्या प्रकारातून संविधानाची पायमल्ली होत असून मनुस्मृतीचे दिवस परत आणण्याचा कट असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. सपकाळ यांनी पुढे म्हटलं की, खरात प्रकरणाबाबत सरकारला आधीपासून माहिती होती, तरीही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. सहा महिन्यांपासून माहिती असताना सरकार झोपले होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, या प्रकरणाचा वापर राजकीय हेतूंसाठी केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. विरोधकांना गप्प बसवण्यासाठी हा मुद्दा वापरला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, महाविकास आघाडीतील समन्वयावर बोलताना सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या बैठकीतील नाराजी हा त्यांचा अंतर्गत विषय असल्याचं स्पष्ट केलं. मात्र राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांबाबत आघाडीत सखोल चर्चा होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. मागील काळात समन्वयाचा अभाव जाणवला होता, पण पुढील काळात तो टाळण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, असंही त्यांनी सुचवलं. राजकारण अधिक तापण्याची शक्यता सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया देताना सपकाळ यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यांचं विधान दिशाभूल करणारं आहे. फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा वारसा पुढे नेत आहेत. चोर आणि संन्याशाला एकत्र दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर सुळे यांनी तात्काळ खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली असून, या वादामुळे राज्यातील राजकारण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एका 16 वर्षीय तरुणीने केवळ बोलणे बंद केल्याच्या रागातून तिच्याच ओळखितल्या एका तरुणाने तिच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना मुंबईच्या मुलुंड परिसरात घडली असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आशिष बनसोड असे आरपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आशिष बनसोड आणि पीडित मुलगी दोघेही बदलापूरचे रहिवासी असून एकमेकांच्या ओळखीचे आहेत. काही दिवसांपासून काही वैयक्तिक कारणांमुळे मुलीने आरोपी आशिषसोबत बोलणे बंद केले होते. याचाच राग मनात धरून आशिष मुलुंडमधील तिच्या कॉलेजजवळ गेला आणि मुलीला गाठले. यावेळी सोबत आणलेल्या कोयत्याने मुलीच्या गळ्यावर वार केला. मुलीच्या सोबत असलेल्या मित्रालाही मारहाण करत गंभीर जखमी केले. इतकेच नव्हे तर हा हल्ला केल्यानंतर दोघांनाही जीवे मारण्याची धमकी आरोपी आशिषने दिली. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आशिष बनसोड या आरोपीला शस्त्रासह अटक केली असून, त्याच्यावर यापूर्वीही बदलापूरमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या मुलुंड पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. ही घटना केवळ वैयक्तिक गुन्हा नसून समाजातील महिलांच्या वाढत्या असुरक्षिततेचे भीषण वास्तव मांडणारी आहे. मुंबईसारख्या शहरात भरदिवसा होणारे असे हल्ले चिंतेचा विषय ठरत असून, महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक कायदे, पोलिसांची वाढीव सतर्कता आणि सामाजिक जागरूकता निर्माण होणे आता अनिवार्य झाले आहे. या निमित्ताने प्रशासनाने ठोस पावले उचलून महिलांना सुरक्षित वातावरण देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
नवी दिल्ली : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा विपरित परिणाम भारताला होणा-या इंधन पुरवठ्यावर झाला आहे. एकीकडे स्वयंपाकाच्या गॅससाठी वितरण एजन्सींसमोर रांगा लागल्या आहेत, तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेलसाठी पेट्रोल पंपांसमोरही रांगा लागल्या आहेत. या इंधन संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून सुमारे आठ वर्षांनंतर भारताने इराणकडून एलपीजी खरेदी केला आहे. भारताचे […] The post एलपीजी घेऊन ‘सी बर्ड’ येतेय! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात लॉकडाऊन लागू होणार असल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरताच पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. 'उद्या पेट्रोल मिळणार नाही' या भीतीने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी रांगा लावल्यात. शहरातील सर्वच पेट्रोल पंपांवर दोन दिवसांपासून लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. या अचानक वाढलेल्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले, “इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, पण लोक अफवांवर विश्वास ठेवून एकाच वेळी गर्दी करत आहेत. त्यामुळे व्यवस्थापन करणे कठीण जात आहे.” दुसरीकडे तेल कंपन्यांनी आता अॅडव्हान्स रक्कम घेणे सुरू केले आहे. त्यामुळेही पेट्रोल उशिरा येत असल्याचे समजते. या साऱ्या गोंधळामुळे नागरिकांमध्ये मात्र संतापाचे वातावरण दिसून आले. एका वाहनधारकाने प्रतिक्रिया देताना म्हटले, “सरकारने आधी स्पष्ट माहिती द्यायला हवी. अफवा पसरतात कारण अधिकृत माहिती वेळेवर मिळत नाही.” तर दुसऱ्या एका नागरिकाने सांगितले की, “आम्हाला खात्री नाही उद्या काय होईल, म्हणून आजच पेट्रोल भरून घेतोय.” एकंदर पॅनिक स्थिती निर्माण झालीय. या ग्राउंड रिपोर्टमधून जाणून घेऊयात नेमकी काय परिस्थिती आहे ते... तेल कंपन्यांनी व्यवहाराची पद्धत बदलली आहे. यापूर्वी पेट्रोल पंपचालक आधी तेल घ्यायचे. त्यानंतर पैशाचा भरणा होत असे. मात्र, आता अमेरिका-इराण युद्ध सुरू झाले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधन प्रश्न निर्माण झाला. हे पाहता तेल कंपन्यांनी अॅडव्हान्स रक्कम घेणे सुरू केले. मात्र, पेट्रोल पंपचालक अॅडव्हान्स रक्कम देत नाहीत. त्यामुळे त्यांना पेट्रोल मिळत नसल्याचे समोर आले आहे. बहुतांश पंपचालक उशिरा पेमेंट देत आहेत. त्यामुळे सर्वांनाच उशिरा इंधन मिळत आहे. याचा फटका वाहनधारकांना बसत असून, पेट्रोल पंपावर रांगा लागल्याचे चित्र आहे. एका तरुणाने सांगितले की, 'गेली चार तास आम्ही रांगेत उभे आहोत. पण आम्हाला अजूनही पेट्रोल मिळालेले नाही. या उडालेल्या अफवेमुळे ज्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल आहे ते लोकही इथे येऊन गर्दी करत आहेत. एका वृद्ध नागरिकाने सांगितले की, ‘गेली दोन तास झाले मी या रांगेत उभा आहे. इथे लोक गाड्यात पेट्रोल असूनसुद्धा पेट्रोल भरायला आले आहेत. मी बघतोय अनेकजण त्यांच्या गाडीतून पाइपने पेट्रोल काढून ते कॅनमध्ये भरत आहेत. त्यांच्यामुळे आमच्यासारख्या वयस्करांना दिवसभर उन्हातान्हाच थांबावं लागत आहे. स्पष्ट माहितीचा अभाव पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. एका कर्मचाऱ्याने सांगितले की, “इंधनाचा पुरवठा सुरू आहे, पण लोक घाबरून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे साठा पटकन संपतो आणि पंप बंद करावे लागतात.” नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि संताप स्पष्टपणे दिसून येत आहे. एका वाहनधारकाने प्रतिक्रिया देताना म्हटले, सरकारने वेळेवर स्पष्ट माहिती दिली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती.” तर दुसऱ्या नागरिकाने सांगितले, “उद्याची खात्री नाही, म्हणून आजच इंधन भरून घेतोय.” इंधन गोंधळाचा फटका पाणीपुरवठ्यालाही बसला आहे. बीड बायपास परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, डिझेल न मिळाल्याने अनेक टँकरच्या फेऱ्या विस्कळीत झाल्या. संभाजीनगर जिल्ह्यात दररोज 19,130 सिलिंडरचा पुरवठा होत आहे. मात्र, बुकिंगचा आकडा तब्बल 60 हजारांच्या वर गेला आहे. लोकांच्या पॅनिक बुकिंगमुळे यंत्रणेवर मोठा ताण येत असून गरजेनुसार गॅस उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. फोर व्हिलरला 2000 चे पेट्रोल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी एक आदेशही जारी केला आहे. त्यांनी माहिती दिली आहे की, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर इंधन टंचाईबाबत अफवा पसरविल्या जात असल्याने पेट्रोल पंपांवर नागरिकांची अनावश्यक गर्दी होत आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी तसेच सर्वांना समान प्रमाणात इंधन मिळावे यासाठी प्रशासनाने इंधन वितरणाचे योग्य नियोजन केले आहे. प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, सर्व वाहनांना इंधन मिळावे यासाठी दुचाकी वाहनांना 200 रुपयांपर्यंत आणि चारचाकी वाहनांना 2000 रुपयांपर्यंत इंधन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे कोणाचीही गैरसोय होणार नाही. इंधनाचा कोणताही तुटवडा नाहीसुरक्षेच्या दृष्टीने इंधन साठवणूक धोकादायक ठरू शकते, त्यामुळे कॅन किंवा बाटल्यांमध्ये इंधन न घेता थेट वाहनांमध्येच इंधन भरून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने इंधन पुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधनसाठ्याची माहिती फलकावर दर्शविण्यात येणार असून नागरिकांना खरी परिस्थिती समजून घेता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नादच करायचा नाहीकोल्हापूरमध्येही पेट्रोल टंचाई आहे. त्यामुळे पंपावर वाहनधारक रांगा करत आहेत. गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने इंधन विक्रीवर निर्बंध घातलेत. त्यात दुचाकी वाहनधारकांना दररोज 200 रुपये, तर चारचाकी वाहनधारकांना दररोज 2000 रुपयांचेच पेट्रोल देण्यात येत आहे. पूर्वी वाहनधारक गाड्याच्या टाक्या फुल्ल करून घेत होते. त्यामुळे पेट्रोल पंप ड्राय होत. मात्र, आता या निर्बंधामुळे पेट्रोल पंपावरील गर्दी आटोक्यात आली आहे. नायराचे पेट्रोल महागइराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नायरा एनर्जीचे पेट्रोल प्रति लिटर ₹ 5 ने आणि डिझेल ₹ 3 ने महाग झाले आहे. आता भोपाळमध्ये पेट्रोलचा दर ₹111.72 आणि डिझेलचा दर ₹94.88 वर पोहोचला आहे. नायरा एनर्जीने केलेली ही दरवाढ स्थानिक कर आणि व्हॅटनुसार वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी असू शकते. काही राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ₹5.30 पर्यंत वाढ झाली आहे. नायराचे देशभरात सुमारे 7,000 पेट्रोल पंप आहेत. सरकार म्हणाले अफवा पसरवू नकामंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी म्हणाल्या की, 'देशात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. अफवा पसरवू नका आणि भीतीपोटी जास्त तेल खरेदी करणे टाळा. त्याचप्रमाणे सिलिंडर बुकिंगची टाइमलाइन बदलल्याच्या बातम्याही चुकीच्या आहेत. शहरांमध्ये ही मुदत २५ दिवस तर ग्रामीण भागात ४५ दिवस निश्चित आहे.' पीएनजी जोडणी घ्यावीच लागणारपाइप्ड नॅचरल गॅसची (पीएनजी) जोडणी घेतलेली घरे तसेच पीएनजी कनेक्शन न घेतलेल्या घरांचा तीन महिन्यांनंतर एलपीजी सिलिंडर पुरवठा बंद केला जाणार आहे. इराण-इस्रायल युद्धामुळे एलपीजी पुरवठ्यावर वाढणाऱ्या ताणादरम्यान केंद्र सरकारने हा आदेश जारी केला. पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले की, पाइपलाइनद्वारे पीएनजीचा सतत पुरवठा होतो. त्यामुळे रिफिल बुक करण्याची गरज भासत नाही. तांत्रिक कारणांमुळे एखाद्या घरापर्यंत पीएनजी कनेक्शन देणे शक्य नसेल तर अधिकृत एजन्सी एनओसी (नाहरकत प्रमाणपत्र) देऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये एलपीजी पुरवठा बंद होणार नाही. एजन्सीला याची नोंद ठेवावी लागेल. घरापर्यंत पीएनजी लाइन पोहोचल्यानंतर एनओसी परत घेतली जाईल. हाउसिंग सोसायटी आणि संबंधित संस्थांना तीन कामकाजाच्या दिवसांत परवानगी द्यावी लागेल. गेल्या २५ दिवसांत २.५ लाख नवीन पीएनजी कनेक्शन देण्यात आले असून २.२० लाख लोकांनी एलपीजीवरून पीएनजीकडे स्थलांतर केले आहे. ऑनलाइन डिलिव्हरी महागकच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे पेट्रोल महाग झाले आहे. त्यामुळे डिलिव्हरी पार्टनर्सचा खर्च वाढतो आहे आणि कंपनीच्या लॉजिस्टिक्स ऑपरेशन्सवरही परिणाम होतो आहे. हे कारण लक्षात घेता झोमॅटोने ऑर्डरवरील प्लॅटफॉर्म फीमध्ये 19% वाढ केली आहे. युजर्सना प्रत्येक ऑर्डरवर ₹12.50 ऐवजी आता ₹14.90 म्हणजेच ₹2.40 जास्त प्लॅटफॉर्म फी द्यावी लागेल. GST जोडल्यानंतर ही रक्कम आणखी वाढेल. प्लॅटफॉर्म फी हे प्रत्येक फूड ऑर्डरवर लागू होणारे अतिरिक्त शुल्क आहे. हे GST, रेस्टॉरंट शुल्क आणि डिलिव्हरी फीपेक्षा वेगळे आहे. झोमॅटो प्लॅटफॉर्म दररोज 20 ते 25 लाख ऑर्डर डिलिव्हर करतो. तर झोमॅटोची मुख्य प्रतिस्पर्धी कंपनी स्विगी सध्या करांसह सुमारे ₹14.99 प्लॅटफॉर्म फी आकारत आहे. भीतीमुळेच इंधन-गॅसची मागणी; पुरवठा सुरळीत जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी म्हणाले, 'छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 48 पेट्रोल पंप आहेत. यातील बुधवारी आठहून अधिक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध नव्हते. तर रात्री अकरापर्यंत बहुतांश पेट्रोल पंपावरील इंधन साठा संपला होता. त्यामुळे एकाच दिवशी जवळपास दहा लाख लिटर पेट्रोल आणि डिझेलची विक्री झाली. शहरात पेट्रोल आणि डिझेलचा 19 लाख लिटरची क्षमत आहे. दररोज 12 लाख लिटर इंधन शहरात येत असून पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. नागरिकांनी पॅनिक बुकिंग करू नये आणि आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन भरून घेऊ नये. सोबतच 12 हजार सिलिंडरचा पुरवठा होत असताना मागणी मात्र 60 हजारांवर पोहोचली आहे. ही अतिरिक्त मागणी केवळ भीतीपोटी होत असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे.'- प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी इंधनाचा तुटवडा नाही राज ऑटो पेट्रोल पंपचे प्रमुख हेमंत खिंवसरा यांच्या म्हणाले, 'इंधनाचा तुटवडा नाही, तर अफवेमुळे लोक टाक्या फुल्ल करून घेत आहेत. तसेच पूर्वी तेल कंपन्या पंपचालकांना पाच दिवसांच्या क्रेडिटवर इंधन पुरवत असत. मात्र, आता केवळ आगाऊ पैसे भरल्यावरच टँकर मिळत असल्याने काही पंपांवर तांत्रिक अडचण निर्माण होत आहे.'- हेमंत खिवंसरा, राज ऑटो पेट्रोल पंप
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलेले असताना आता महिला नेत्यांमध्येही जोरदार शब्दयुद्ध रंगले आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी ‘ताज का राज’ असा सवाल करत ठाकरे गटावर निशाणा साधला होता. या आरोपांनंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर देत म्हात्रेंवरच सवालांचा भडिमार केला. दोन्ही नेत्यांमधील ही चकमक सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. शितल म्हात्रे यांनी केलेल्या ट्विटमध्ये अशोक खरातला पाण्याची जोडणी देण्यासाठी ‘ताज’ हॉटेलमध्ये बैठक झाली होती का, असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच या निर्णयामागे मातोश्रीतील व्यक्तींचा आग्रह होता का, असा थेट आरोप त्यांनी केला. ‘ताज का राज’ उघड झाला तर अनेक गोष्टी समोर येतील, असेही त्यांनी सूचित करत ठाकरे गटावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या आरोपांवर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत म्हात्रेंना प्रतिप्रश्न विचारला. तुमचा ओरिजिनल व्हिडिओ सापडला का हो? असा टोला लगावत त्यांनी विषय भरकटवू नका, असेही म्हटले. अंधारे यांनी म्हात्रेंच्या आधीच्या व्हिडिओ वादाचा संदर्भ देत त्यावरच लक्ष केंद्रीत केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, खरात प्रकरणातील गंभीर मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी, पण मुद्दाम वेगळ्या विषयांकडे लक्ष वळवले जात आहे. दरम्यान, शितल म्हात्रे यांनीही अंधारेंच्या टीकेला उत्तर देताना मूळ मुद्दा ‘ताज’मधील बैठकीचाच असल्याचे सांगितले. खरातला पाणीपुरवठा देण्यामागे कोण होते, कोणत्या नेत्याने मध्यस्थी केली आणि पाईपलाईनसाठी जीआर काढताना कोणाचा दबाव होता, याची चौकशी व्हायला हवी, असे त्यांनी ठामपणे म्हटले. तसेच या सर्व प्रकरणामागे काही विशिष्ट गणित किंवा न्यूमरॉलॉजीचा संबंध होता का, याचाही तपास व्हावा, असा दावा त्यांनी केला. आरोप-प्रत्यारोपांमुळे खरात प्रकरणाला राजकीय रंग याचवेळी, अंधारेंवर वैयक्तिक टीका करत म्हात्रे म्हणाल्या की, त्या त्या काळात शिवसेनेत नव्हत्या आणि इतर राजकीय कार्यक्रमात व्यस्त होत्या, त्यामुळे त्यांना सर्व घडामोडींची माहिती नसावी. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे खरात प्रकरणाचा राजकीय रंग अधिकच गडद होत असून, पुढील काळात या वादातून आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
फलक लावण्याच्या वादातून गोळीबाराचा प्रयत्न:पुण्यातील गंज पेठेतील घटना, आठ आरोपींना अटक
महात्मा फुले पेठेत (गंज पेठ) श्री हनुमान जन्मोत्सवाचा फलक लावण्याच्या वादातून टोळक्याने तरुणाला मारहाण करुन त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली. स्वप्नील सुनील पाटणकर (वय २२, रा. महात्मा फुले स्मारकाजवळ, महात्मा फुले पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. पाटणकर याने याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अनिश धडे, ओम लोंढे, सुलतान सय्यद, चैतन्य उर्फ सार्थक शिवपावय, मितेश विनोद माने, सार्थक गावडे, वरद महेंद्र कांबळे, महेंद्र उर्फ वास्को रामचंद्र कांबळे यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, बुधवारी (२५ मार्च) मध्यरात्री एकच्या सुमारास पाटणकर आणि त्याचा मित्र महात्मा फुले पेठ परिसरात श्री हनुमान जन्मोत्सवाचे फलक लावत होते. त्या वेळी आरोपींशी पाटणकर आणि त्याचा मित्राचा वाद झाला. आरोपी सुलतान सय्यद याने त्याच्याकडील पिस्तूल काढले. पाटणकरवर पिस्तूल रोखून त्याने चाप ओढला. मात्र, पिस्तुलातून गोळी सुटली नाही. पाटणकर याच्याबोबर असलेले मित्र आदित्य, अथर्व आणि आदेश यांना पट्ट्याने मारहाण केले. पाटणकर याच्या डोक्यात पिस्तुलाचा दस्ता मारल्याने तो जखमी झाले. आरोपींनी पाटणकर आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना दगड, तसेच बाटल्या फेकून मारल्या. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस कुरुनुर पुढील तपास करत आहेत.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी डिजिटल साक्षरता महत्त्वाची : मंत्री आदिती तटकरे
मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी बचतीतून लघुउद्योग सुरू केले आहेत. अशा अनेक महिलांना महिला विकास मंडळाच्या माध्यमातून दिले जाणारे प्रशिक्षण, अनुदान आणि भांडवल यामुळे महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी तसेच, उत्पादने बाजारपेठेत पोहोचविण्यासाठीही मोठा आधार मिळत आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करताना त्यांना डिजिटल आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला […] The post महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी डिजिटल साक्षरता महत्त्वाची : मंत्री आदिती तटकरे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अत्याधुनिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार दिशादर्शक
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार, सुलभ आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ दिशादर्शक ठरणार आहे. २७ व २८ मार्च २०२६ रोजी जिओ कन्व्हेशन सेंटर येथे या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित […] The post अत्याधुनिक आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठी ‘पल्स वैद्यकीय परिषद’ ठरणार दिशादर्शक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला
मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद असून महाराष्ट्रासाठी ही मोठी हानी आहे. मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी, […] The post मराठेशाहीचा खरा इतिहास जगासमोर आणणारा शाहू विचारांचा इतिहासकार हरपला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे शिवचरित्राचा आणि मराठा इतिहासाचा वस्तुनिष्ठ मागोवा घेणारा एक व्यासंगी संशोधक हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांनी आयुष्यभर महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास लोकांसमोर मांडण्याचे काम केले. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि […] The post इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तत्त्वनिष्ठ, व्यासंगी इतिहास संशोधक हरपला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : ज्यांच्या व्यासंग आणि संशोधनपूर्ण मांडणीमुळे नव्या पिढीसाठी शिव-शाहू चरित्रांचा अमूल्य असा ठेवा उपलब्ध झाला, अशा डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनामुळे आपण इतिहास संशोधन क्षेत्रातील तत्त्वनिष्ठ, व्यासंगी मार्गदर्शकाला मुकलो आहोत, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, […] The post तत्त्वनिष्ठ, व्यासंगी इतिहास संशोधक हरपला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने पेट्रोल-डिझेल खरेदीवर तात्पुरत्या मर्यादा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अफवांना आळा घालण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, दुचाकी वाहनांना केवळ २०० रुपयांचे पेट्रोल, तर तीन व चार चाकी वाहनांना जास्तीत जास्त २००० रुपयांचे पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करता येणार आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या मते, जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, काही अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त इंधन भरून घेत आहेत, ज्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक तेवढेच इंधन भरावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित होईल, असा विश्वासही प्रशासनाने व्यक्त केला आहे. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
जैन धर्मीयांचे २४ वे तिर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या २६२४ व्या जन्मकल्याणक निमित्त हिंगोली येथे भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २९ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रख्यात वक्ते डॉ. विवेकजी जैन (छिंदवाडा, म.प्र.) यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान. “मैं और मेरे महावीर”, “भगवान बनने जन्मे हम” आणि “जिस पंथ चले भगवान वही आचरणीय” या विषयांवर ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. यादरम्यान पुढील प्रमाने कार्यक्राचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २९ मार्च रोजी महाविर भवन येथे दुपारी १२ ते ४ आनंदनगरी (शुद्ध जैन रेसिपी) सायं. ७.०० वा. सांस्कृतिक कार्यक्रम, ८.१५ वा. “मैं और मेरे महावीर” या विषयावर डॉ. विवेकजी जैन (छिंदवाडा, म.प्र.) यांचे व्याख्यान तसेच दि. ३० मार्च २०२६ सोमवार रोजी सायं. ७.०० वा. सांस्कृतिक कार्यक्रम ८.१५ वा. “भगवान बनने जन्मे हम” या विषयावर व्याख्यान. दि. ३१ मार्च मंगळवार रोजी सकाळी ८.०० वा. शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर,आदिनाथ दिगंबर जैन मंदिर,रामगल्ली, पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर, कासारवाडा, ग्रामीण पोलिस स्टेशन, महावीर किर्ती स्तंभ, संयम किर्ती स्तंभ, गणपती चौक, गांधी चौक, खुराणा पेट्रोल पंप मार्गे महावीर भवन येथे शोभायात्रेचा समारोप होनार असुन त्यानंतर डॉ. विवेकजी जैन यांचे “जिस पंथ चले भगवान वही आचरणीय” व्याख्यान होनार असून त्यानंतर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन सकल दिगंबर जैन समाज हिंगोली यांनी केले आहे. हे ही वाचा… पेट्रोल पंपधारकांनी कॅन, बाटल्यामध्ये इंधन देऊ नये:जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आदेश, म्हणाले - पुरेसा साठा उपलब्ध, अफवामुळे गर्दी जिल्ह्यातील नागरिकांनी पेट्रोल किंवा इंधना बाबत कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच पेट्रोल पंपधारकांनी कॅन किंवा बाटल्यांमध्ये इंधन देऊ नये असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी दिले आहेत. सविस्तर वाचा…
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास वेग घेत असताना आता विशेष तपास पथक थेट त्या ठिकाणी पोहोचलं आहे, जिथे महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत. खरातच्या ओकस कार्यालयात आज SIT ने सखोल तपासणी सुरू केली. शटर उघडताच तपास पथकाने आत प्रवेश केला आणि संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी करण्यात आली. या ठिकाणीच अनेक महिलांचे शोषण झाल्याचा आरोप असल्याने या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, न्यायालयाने अशोक खरात याला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून त्याची चौकशी सुरू आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक आणि अत्याचार केल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर बनले आहे. गेल्या काही दिवसांत तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, आता या कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. SIT पथकाने कार्यालयात सापडलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. या ठिकाणी विविध फाईल्स, नोंदी आणि इतर साहित्य आढळून आले असून त्यातून मोठे धागेदोरे मिळू शकतात, असा अंदाज आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर हे कार्यालय अधिकृतपणे सील करण्यात आले आहे. या कारवाईमुळे खरातच्या कारभाराचा अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. शिवनिका संस्थेचे बँक खाते सील तपासाच्या पुढील टप्प्यात आर्थिक व्यवहारांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. खरातच्या ‘शिवनिका’ संस्थेचे बँक खाते सील करण्यात आले असून, त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती गोळा केली जात आहे. जमीन, घर, दुकाने अशा विविध मालमत्तांची चौकशी सुरू असून, त्यासाठी नोंदणी विभागाकडून राज्यभरात तपास सुरू आहे. धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता या प्रकरणात कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरातने एवढी मोठी संपत्ती कशी उभी केली आणि त्यामागे पैसा कुठून आला, याचा तपास सध्या सुरू आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत या तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता असून, आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील सर सी. व्ही. रमण सभागृहात डॉ. वसंत आर. गोवारीकर स्मृती व्याख्यान नुकतेच संपन्न झाले. अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटरचे माजी संचालक प्रमोद काळे यांनी या व्याख्यानात 'डॉ. वसंत आर. गोवारीकर: भारताला अवकाशात प्रवेश मिळवून देणारे दूरदर्शी तंत्रज्ञ' या विषयावर मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात प्रमोद काळे यांनी डॉ. गोवारीकर यांच्या भारतीय अवकाश कार्यक्रमातील महत्त्वपूर्ण योगदानाचा आढावा घेतला. घन इंधन तंत्रज्ञानाच्या विकासातील त्यांच्या अग्रणी कार्यामुळे भारताच्या प्रक्षेपण क्षमतेत वाढ झाली आणि देशाला स्वयंपूर्ण व विश्वासार्ह अवकाश प्रवेश मिळाला, असे त्यांनी नमूद केले. स्वावलंबनाच्या काळात देशी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले नेतृत्व अत्यंत मोलाचे होते, असे काळे यांनी अधोरेखित केले. काळे यांनी डॉ. गोवारीकर यांच्या वैज्ञानिक, प्रशासकीय आणि संस्थापक नेतृत्वाचा प्रवासही उलगडून सांगितला. प्रतिभावान संशोधक घडविणे, सक्षम वैज्ञानिक संस्था उभारणे आणि नवोन्मेषी संस्कृती जोपासणे यावर त्यांनी विशेष भर दिला होता. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून त्यांनी शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात दिलेले योगदानही काळे यांनी अधोरेखित केले. या व्याख्यानादरम्यान मांडलेल्या वैयक्तिक आठवणी आणि ऐतिहासिक संदर्भांमुळे उपस्थितांना डॉ. गोवारीकर यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्त्वाची सखोल ओळख मिळाली. भारताच्या अवकाश कार्यक्रमाच्या विकासाची कथा आणि त्यामागील दूरदृष्टी यांचे प्रभावी चित्रण या व्याख्यानातून स्पष्ट झाले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गोसावी यांनी व्याख्यानाच्या सखोलता, स्पष्टता आणि समकालीन महत्त्वाचे कौतुक केले. डॉ. गोवारीकर यांसारख्या दूरदर्शी शास्त्रज्ञांचे स्मरण आणि सन्मान करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन चिकाटी, उत्कृष्टता आणि राष्ट्रनिर्मितीची भावना जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप उत्स्फूर्त प्रश्नोत्तर सत्राने झाला, ज्यात उपस्थितांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपली बौद्धिक उत्सुकता व्यक्त केली.
चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या:पुण्याच्या बिबवेवाडीतील घटना, आरोपी पतीला अटक
पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरातील अप्पर इंदिरानगर येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. सारिका शुभम घोडके (वय 23, रा. अंबिकानगर, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. तर शुभम श्रीकांत घोडके (वय 29) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत सारिकाची आई गेणीबाई रुपसिंग चव्हाण (वय 50) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार तिचा छळ करत होता. या कारणावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. 24 मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास वाद विकोपाला गेला. संतापाच्या भरात शुभमने सारिकाला कठीण वस्तूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, डोक्यावर आणि शरीरावर झालेल्या गंभीर मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर आरोपी पती फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी पेट्रोल किंवा इंधना बाबत कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. तसेच पेट्रोल पंपधारकांनी कॅन किंवा बाटल्यांमध्ये इंधन देऊ नये असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी दिले आहेत. या संदर्भात पाटील यांनी सांगितले की हिंगोली जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तथापि, समाजमाध्यमांवर पसरविण्यात आलेल्या अफवांमुळे नागरिकांकडून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असून रांगा लागलेल्या आहेत. परिणामी मागणी व पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झालेला आहे. सदर परिस्थिती लक्षात घेता, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने व इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी संबंधितांना आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त रुपये 200/- पर्यंतच इंधन भरण्यात यावे. तीनचाकी व चारचाकी वाहनासाठी जास्तीत जास्त रुपये 2000/- पर्यंतच इंधन भरण्यात यावे. कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या, ड्रम इत्यादीमध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी व रांगा टाळून आवश्यकतेनुसारच इंधन घ्यावे.रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनाना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्यात यावा. प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोज आपल्या पंपावर उपलब्ध असलेला शिल्लक साठा, त्या दिवशी प्राप्त झालेला साठा व मागणी केलेला साठा याची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करावी. सर्व पेट्रोल पंप धारकांनी सदर आदेशांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 कायद्यांनुसार कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी दिला आहे. शहरी पेट्रोलपंपावर बंदोबस्त द्यावा शहरी भागातील पेट्रोल पंपावर गर्दीमुळे गोंधळाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरी पेट्रोल पंपावर दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त द्यावा असे पत्र जिल्हा पुरवठा विभागाने पोलिस अधीक्षक कार्यालयास दिले आहे
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता एक नवा आणि गंभीर मुद्दा समोर आला आहे. खरात याच्याशी संबंधित काही अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असल्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे. या व्हिडिओंच्या माध्यमातून महिलांची ओळख उघड होत असल्याने परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पहिल्यांदाच गुन्हा दाखल करत संबंधितांवर कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. या व्हिडिओंचे प्रसारण केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील राहुल शिंदे, योगेश आढाव तसेच बीड जिल्ह्यातील संदीप गरजे या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या तपासात या तिघांमधील व्हिडिओ शेअरिंगची साखळी उघडकीस आली आहे. राहुल शिंदेला हे व्हिडिओ त्याचा मित्र योगेश आढाव याने पाठवले, तर योगेशला ते संदीप गरजे याच्याकडून मिळाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९४ (२) आणि ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत कलम ६७ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कायद्यांनुसार अश्लील सामग्री प्रसारित करणे आणि व्यक्तीची ओळख उघड करणे हे गंभीर गुन्हे मानले जातात. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी स्वतंत्र पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. ग्रुपच्या ॲडमिनवरही गुन्हा दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारचे कोणतेही व्हिडिओ किंवा क्लिप्स आपल्या मोबाईलमध्ये असल्यास तात्काळ डिलीट करावेत. विशेषतः पीडित महिलांची ओळख उघड करणारे किंवा त्यांचा सन्मान धोक्यात आणणारे व्हिडिओ शेअर करणे कायद्याने गुन्हा आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या सामग्रीचा प्रसार केल्यास केवळ संबंधित व्यक्तींवरच नव्हे, तर त्या ग्रुपच्या अॅडमिनवरही गुन्हा दाखल होऊ शकतो. व्हिडिओंचा गैरवापर करू नये, अन्यथा कठोर कारवाई अशोक खरात प्रकरणात आधीच अनेक गंभीर आरोप समोर आले असताना आता या व्हिडिओ प्रकरणामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, पीडित महिलांचा सन्मान राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणीही अशा प्रकारच्या व्हिडिओंचा गैरवापर करू नये, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
उन्हाळ्याची अधिकृत सुरुवात होण्यापूर्वीच बीड बायपास परिसरात पाण्याचे संकट उभे राहिले आहे. बीड बायपास आणि नो-नेटवर्क झोनमधील सुमारे साडेतीन लाख नागरिक सध्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भूगर्भातील पाणीपातळी वेगाने खालावल्याने विहिरी आणि बोअरवेल कोरडे पडले आहेत. या परिसराला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी भाजप नगरसेविका सविता कुलकर्णी यांनी मनपा आयुक्ताकडे केली आहे. सविता कुलकर्णी म्हणाल्या की, सातारा-देवळाई हा परिसर 2016 मध्ये महानगरपालिकेत समाविष्ट झाला. येथील घरे कायदेशीर असून अनेक नागरिकांनी गुंठेवारी नियमितीकरणही केले आहे. असे असूनही, प्रशासनाकडून नियमित पाणीपुरवठा करण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सविता कुलकर्णी म्हणाल्या की, नवीन जलवाहिनीचे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. उन्हाळा लक्षात घेता नागरिकांचे हाल थांबवण्यासाठी महापालिकेने स्वखर्चाने टँकर आणि ड्रमद्वारे पाणी पुरवावे. टँकरच्या पाण्यासाठी नागरिकांकडून कोणताही अतिरिक्त कर किंवा शुल्क घेऊ नये. कामात विलंब करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून, त्यातून होणाऱ्या वसुलीतून पाणीपुरवठ्याचा खर्च भागवण्यात यावा. परिसरातील नागरिकांना या भीषण उन्हाळ्यात पाण्यासाठी त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे. 600 रुपयांना खासगी टँकर एकीकडे मनपाचे स्वस्त आणि शुद्ध पाणी मिळवण्यासाठी सोसायट्यांच्या रांगा लागल्या आहेत, तर दुसरीकडे याच टंचाईचा गैरफायदा घेत खासगी टँकरचालक एका फेरीसाठी 600 रुपयांपर्यंत उकळून सर्वसामान्यांची लूट करत आहेत. 6 टाक्यांची ट्रायल का नाही? नो-नेटवर्क झोनमध्ये नळाचे पाणी अद्याप पोहोचलेले नाही. मागणी असूनही टँकर मिळत नसल्याने आम्ही महापौरांची भेट घेऊन जाब विचारणार आहोत, असे देवळाई परिसराच्या नगरसेविका सविता कुलकर्णी यांनी म्हटले तर नगरसेविका अनिता घोडेले म्हणाल्या की, सातारा-देवळाईतील 12 पैकी 6 टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यांची ट्रायल का नाही? भारतीय संविधानाच्या कलम 21नुसार स्वच्छ पाणी मिळवणे हा मूलभूत अधिकार आहे. पाणीपुरवठा सुनिश्चित करणे ही स्थानिक स्वराज्य संस्थांची घटनात्मक जबाबदारी आहे (कलम 243 डब्ल्यू). मनपाच्या नियमांनुसार, 18 कुटुंबांच्या गटाला 5 हजार लिटरचे एक टँकर मिळते. महिन्याकाठी एकूण 15 टँकर दिले जातात आणि त्यासाठी 6,588 रुपये शुल्क आकारले जाते.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता या प्रकरणात नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळालं आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत खरातला देण्यात आलेली पाण्याची जोडणी ही ‘मातोश्रीच्या मॅडम’च्या आग्रहामुळेच झाली, असा गंभीर आरोप केला आहे. या विधानामुळे ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शीतल म्हात्रे यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘ताज का राज’ असा उल्लेख करत, या प्रकरणामागील सत्य बाहेर आल्यास अनेकांचे तोंडचे पाणी पळेल, असे सूचक वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, खरात प्रकरण आता केवळ गुन्हेगारी तपासापुरते मर्यादित न राहता थेट राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी आले आहे. यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या प्रकरणावरून आणखी राजकीय घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात नाशिकमधील दारणा धरणातून अशोक खरात यांच्या ‘शिवनिका’ संस्थेसाठी 39 लाख लिटर पाणी मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर)ही समोर आल्याने वाद अधिकच चिघळला आहे. या पाणीपुरवठ्यासाठी धरणापासून सुमारे 48 किलोमीटर लांबीची पाइपलाईन टाकण्यात आली होती. अधिकृत नोंदीनुसार हे पाणी पिण्यासाठी राखीव असल्याचे सांगितले गेले, मात्र प्रत्यक्षात त्याचा वापर खरातच्या 21 एकर आंबा बागेसाठी केल्याचा आरोप होत आहे. हा प्रस्ताव 25 जून 2020 रोजी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजूर झाला होता, तेव्हा जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते. याचबरोबर, अशोक खरात याच्याविरोधातील कारवाईही सुरू असून न्यायालयाने त्याला 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याच्या आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. सध्या विशेष तपास पथक (एसआयटी) या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. यामध्ये खरातविरोधात आतापर्यंत दहावा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे. फार्महाऊसमधून 21 काडतुसे जप्त तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब उघडकीस आली आहे. अशोक खरात याच्याकडे असलेल्या बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे स्पष्ट झाले आहे. हा परवाना 15 ऑक्टोबर 2012 रोजी मंजूर करण्यात आला होता आणि 1 जानेवारी 2024 रोजी त्याचे नूतनीकरणही करण्यात आले होते. तपासात खरातच्या फार्महाऊसमधून 21 काडतुसे जप्त करण्यात आली असून त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली असल्याचे समोर आले आहे. या काडतुसांचा वापर नेमका कशासाठी करण्यात आला, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत. दरम्यान, हा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ठाकरे गटाच्या बैठकीत राडा; प्रियंका चतुर्वेदी भडकल्या
मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेत (ठाकरे) राज्यसभेच्या जागेवरुन धुसफूस असल्याचे समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सात जागांसाठी बिनविरोध निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या वाट्याला येणारी जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सोडण्यात आली. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली, तर भाजपचे चार आणि शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) यांचा प्रत्येकी […] The post ठाकरे गटाच्या बैठकीत राडा; प्रियंका चतुर्वेदी भडकल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक डॉ. जयसिंगराव पवार कालवश
कोल्हापूर : प्रतिनिधी महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज निधन झाले. आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते ८५ वर्षाचे होते. आज सकाळी ९.१५ वाजता कोल्हापूरातील साने गुरुजी वसाहत येथील त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघेल अशी माहिती आहे. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, विचारवंत आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे खंदे पुरस्कर्ते डॉ. जयसिंगराव पवार यांची प्रकृती […] The post ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक डॉ. जयसिंगराव पवार कालवश appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात मार्च महिन्याच्या अखेरीस उष्णतेचा पारा चांगलाच वाढलेला असतानाच आता हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झालेले असताना दुसरीकडे अवकाळी पावसाची चाहूल लागली आहे. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्णतेसोबतच पावसाचा हा दुहेरी परिणाम अनेकांना जाणवू लागला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथेही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत गारपीटही झाली असल्याने शेतकऱ्यांसमोर नव्या संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत पावसाच्या सरी कोसळल्या असून काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह गारपीट झाल्याची नोंद आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे आधीच उष्णतेचा सामना करणाऱ्या जनतेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. एका बाजूला ऊन आणि दुसऱ्या बाजूला पाऊस दरम्यान, काही भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार असल्याने हवामानाची ही दुहेरी स्थिती नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. एका बाजूला कडक ऊन आणि दुसऱ्या बाजूला अचानक पाऊस व वादळी वारे यामुळे वातावरण अस्थिर झाले आहे. पुढील काही दिवस हवामानाचा हा अनिश्चित पॅटर्न कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना आणखी एक मोठा राजकीय धक्का बसण्याची चिन्हे दिसत आहेत. अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. महिलांवरील अत्याचारांचे आरोप, व्हिडिओ क्लिप्स आणि विविध गंभीर गुन्ह्यांच्या चर्चेमुळे हे प्रकरण अधिकच गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर चाकणकर यांचे नाव समोर आले होते, ज्यामुळे त्यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. या प्रकरणात चाकणकर यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या अशोक खरातच्या तथाकथित दरबारात उपस्थित असल्याचे दिसल्याने वाद निर्माण झाला. याशिवाय त्यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याचेही आरोप झाले. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना अशा प्रकारच्या वादात नाव येणे ही गंभीर बाब मानली गेली. अखेरीस वाढत्या दबावामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तो सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला. मात्र, राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी वैयक्तिक कारणे दिली असून खरात प्रकरणाचा उल्लेख टाळला. राजीनाम्यानंतरही त्यांच्यावरील दबाव कमी झालेला नाही. सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावर आहेत. मात्र, हे पदही त्यांच्या हातातून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पक्षातील अनेक वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये याबाबत एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. चाकणकर यांच्या नावामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना नेत्यांमध्ये आहे. बैठकीत अनेक आमदारांची मागणी दरम्यान, दर मंगळवारी होणाऱ्या पक्षाच्या बैठकीतही हा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला. देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत अनेक आमदारांनी चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेमुळे पक्षावर नकारात्मक परिणाम होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढत आहे. निर्णय सुनेत्रा पवार यांच्या हातात आता या सर्व घडामोडींनंतर चाकणकर यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय सुनेत्रा पवार यांच्या हातात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षातील वाढता विरोध आणि जनमताचा दबाव लक्षात घेता, पुढील काही दिवसांत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चाकणकर यांना आणखी एक धक्का बसतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज चैत्र शुद्ध नवमी... अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव! मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा आज संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. चैत्र नवरात्रीची सांगता आणि प्रभू रामांच्या आगमनाचा आनंद व्यक्त करण्यासाठी सकाळपासूनच राज्यातील राम मंदिरांमध्ये भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. 'जय श्रीराम' आणि 'सियावर रामचंद्र की जय'च्या घोषणांनी अवघा आसमंत दुमदुमून गेला असून, गावागावांत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. राम नवमीनिमित्त आज पुणे शहरात निघणाऱ्या भव्य मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांमुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत शहरातील बाजीराव रोड आणि लष्कर (कॅम्प) परिसरातील वाहतूक वळवण्यात येणार असून काही रस्ते पूर्णपणे बंद राहतील. असे असतील बदल बाजीराव रोड: पुरम चौकातून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असेल. वाहनधारकांनी टिळक रोड – अलका टॉकीज – खंडोजी बाबा चौक या पर्यायी मार्गाचा वापर करावा. लष्कर विभाग: वाय जंक्शन येथील वाहतूक बंद राहील. एम.जी. रोडवरील वाहने १५ ऑगस्ट चौकातून वळवण्यात येतील, तर महंमद रफी चौकातील वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे जाईल. कोहिनूर हॉटेल परिसरातील वाहतूक भोपळे चौकमार्गे वळवण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे. शेगावमध्ये ७५० हून अधिक दिंड्या दाखल शेगावमध्ये आज १३२ वा श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त श्रींच्या मंदिरावर मनमोहक रोषणाई करण्यात आली असून राज्यभरातून ७५० हून अधिक भजनी दिंड्या संतनगरीत दाखल झाल्या आहेत. दुपारी श्रींची पालखी, रथ आणि अश्वासह नगर परिक्रमेसाठी निघणार असून सायंकाळी ६ वाजता मंदिरात परतेल. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता दर्शनासाठी 'एकेरी मार्ग' (One-way) निश्चित करण्यात आला आहे. काळाराम मंदिरात प्रभू रामाला 'सोन्याच्या मिशा पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात रामजन्मोत्सवानिमित्त प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण यांना 'सोन्याच्या मिशा' लावून अनुपम शौर्य शृंगार करण्यात आला आहे. अरण्यकांडातील १४ हजार राक्षसांच्या वधाचे आणि प्रभूंच्या अजोड पराक्रमाचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा ते द्वादशीपर्यंत हे विशेष रूप सजवले जाते. पेशवेकालीन या मंदिरात प्रभूंच्या या विलोभनीय दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. बेलापूरचा रामनवमी उत्सव अन् 'बेलापूर श्री' कुस्तीचा थरार बेलापूर गावात २०० वर्षांची परंपरा असलेला रामनवमी उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा होत आहे. 'राम जन्मला'च्या गजराने मंदिर परिसर दुमदुमला असून, रात्री निघणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. हनुमान जन्मोत्सवापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्याची सांगता भव्य जत्रेने होईल, जिथे लाल मातीतील कुस्त्यांच्या जंगी फडात 'बेलापूर श्री' हा मानाचा किताब प्रदान केला जाईल.
धाराशिव जिल्ह्यातील पळसप येथे रविवारी ता. 29 एकदिवसीय ग्रामीण मराठवाडा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून यावेळी चर्चासत्र, कविसंमेलनासह विविध सांस्कृतीक कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजन समितीचे जिल्हाध्यक्ष बंटी मईंग यांनी दिली आहे. शिक्षण महर्षी माजी आमदार वसंतराव काळे यांच्या पुण्यतिथिनिमित्त स्व. अजितदादा पवार साहित्य नगरी, पळसप येथे आयोजित संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आमदार विक्रम काळे तर अध्यक्ष म्हणून नांदेड येथील साहित्यिक डॉ. सुरेश सावंत उपस्थित राहतील. यावेळी सकाळी आठ वाजता ग्रंथदिडीचे उद्घाटन जयकुमार शिताळे यांच्या हस्ते होईल. सकाळी दहा वाजता मराठी साहित्य मंडळाचे डॉ. घ. ना. पांचाळ यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. सकाळी सव्वा दहा वाजता चित्रकार शिवाजीराव हांडे यांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन साहित्यीक राजेंद्र अत्रे यांच्या हस्ते होईल. सकाळी साडेदहा वाजता संमेलनाचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजीमंत्री संजयजी बनसोडे, साहित्यक प्रा.फ.म.शहाजिंदे, संमेनाध्यक्ष मा. डॉ. सुरेश सावंत व संमेलनाचे स्वागताध्यक्ष विक्रम काळे यांच्या उपस्थितीत होईल. दरम्यान, दुपारी दिड वाजता बदलते ग्रामीण जीवन या विषयावर परिसंवाद होणार असून यामध्ये प्रा.गंगाधरराव हिंगोले, प्राचार्य डॉ राजकुमार मस्के व प्राचार्य डॉ. कैलास इंगळे इत्यादी विचारवंत सहभागी होणार आहेत. दुपारी तीन ते चार यावेळेत सत्यशिला तौर, डॉ.सुरेश पाटील व स्वाती कान्हेगांवकर यांच्या उपस्थितीत कथाकथन होईल. दुपारी साडेचार वाजताल जिजा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कवी शिवाजी कऱ्हाळे, गोडाती काळे, सिंधुताई दहिफळे इत्यादींचा सहभाग असणार आहे. संध्याकाळी सहा वाजता आमदार सतीश चव्हाण, प्रविण स्वामी यांच्या हस्ते संमेलनाचा समारोप होणार आहे.यावेळी साहित्यिकाचा सत्कार होणार आहे. रात्री आठ वाजता वसंतोत्सव सांस्कृतिक कार्यक्रम होईल. या संमेलनात जिल्ह्यातील रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बंटी मईंग, आनंद जाधव, आत्माराम मईंग, मनोहर पोपळाईत, सुभाष जिरवणकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
सर्वपक्षीय बैठकीला जर पंतप्रधान नरेंद्र मोदी जर उपस्थित नसतील तर त्या बैठकीला काही अर्थ नाही, पंतप्रधान बैठकीला येणार नव्हते तर आम्ही सर्वांनी त्या बैठकीला जाणे टाळायला हवे होते, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर भाजपमुळे हिंदुत्वाचे अध:पतन झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री किंवा पोलिस खाते यांना आता शांतपणे काम करू द्या. रोजच या विषयावर चर्चा करत इतर महत्त्वाच्या विषयाकडे पाणी टाकण्याचे काम करू नये. खरात प्रकरणी तपास सुरू असताना त्यावर संशय व्यक्त करणे योग्य नाही. भाजपमुळे हिंदुत्वाचे अध:पतन संजय राऊत म्हणाले की, भाजप सत्तेत आल्यापासून राजकीय नेतृत्व, अध्यात्म आणि हिंदुत्वाचे अध:पतन झाले आहे. राज्यात जे सध्या सुरू आहे त्यावर कोणावर आणि कितीवेळा बोलणार, मुख्यमंत्री, ज्यांची नावे यामध्ये येत आहेत त्यांनी या विषयावर बोलणं गरजेचे आहे. आमच्या पक्षात काहीही मतभेद नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. मी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या पक्षाचा स्थापनेपासूनचा सदस्य आहे. माझ्या जन्मापासून मी या पक्षाचा सदस्य आहे. माझी नियुक्ती बाळासाहेबांनी केली संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना नेते म्हणून नियुक्त केले त्यामधील मी एक आहे. उद्धव ठाकरे आणि माझे काय नाते आहे हे सर्वांना माहिती आहे. उद्धव् ठाकरेंनी बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीला मी हजा नव्हतो. पण त्या बैठकीत कोणी नाराजी व्यक्त केली नाही. नाराजीच्या बातम्यावर जर आम्ही काम करायला लागलो तर पक्ष वाढलाच नसता. उद्धव् ठाकरेंनी बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीत कोणी नाराजी व्यक्त केली नाही. ठाकरे गटाच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा! शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राज्यसभेच्या जागेवरून खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पक्षप्रमुखांसमोरच तीव्र नाराजी व्यक्त केल्याने बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 'आय वॉन्ट टू प्रोटेस्ट' (I want to protest) म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याची चर्चा आहे.
जनाब संजय राऊत यांचा जन्म शिवसेना वाढवण्यासाठी झाला की शिवसेना संपवण्यासाठी झाला हे महाराष्ट्राने पाहिले आहे. उबाठा गटाकडून संपवण्याची सुपारी तुम्ही काँग्रेसकडून घेतली आहे, म्हणून रोज वायफळ बडबड करत उबाठाचे अस्तित्व संपवण्याचे काम संजय राऊत करत आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, राऊतांनी सांगू नये की माझा जन्म शिवसेनेत झाला, मी जन्मापासून शिवसेनेत आहे हे ऐकून लोकांना हसू येते.कारण तुम्ही शिवसेनेविरोधात लिहलेले लेख जनतेने वाचले आहेत. उबाठाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचे काम तुम्ही करत आहात. येणाऱ्या काळात तुम्ही संपूर्ण उबाठा गट संपवल्याशिवाय राहणार नाही. उबाठामध्ये दोन गट नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटामध्ये संजय राऊत विरुद्ध उद्धव ठाकरे हा सामना जोरात रंगतो आहे. कारण राज्यसभेच्या निवडणुकीत राऊतांनी ज्या पद्धतीने शरद पवारांचे नाव पुढे करत प्रियंका चतुर्वेदींचा पत्ता कट करण्याचे काम राऊतांनी केले. त्यामुळे त्यांच्या दिल्लीतील पुस्तक प्रकाशनाला उद्धव ठाकरे गेले नाही.उबाठा गटामध्ये दुफळी माजली आहे. एका बाजूला राऊतांचा गट तर दुसरीकडे ठाकरेंचा गट असल्याचे दिसून येत आहे. राऊत थोड्या दिवसात उबाठा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. कारण उद्धव ठाकरे त्यांना पुन्हा राज्यसभेची संधी देणार नाही हे त्यांना लक्षात आले आहे. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जातील. राऊत सोनिया गांधींच्या चरणी लीन नवनाथ बन म्हणाले की, भाजपमुळे हिंदुत्त्वाचे अध:पतन झाले आहे असा दावा संजय राऊत करत आहेत. ज्यांनी हिंदुत्वांशी फारकत घेत औरंगजेब फॅन क्लब चालवत आहेत त्यांनी भाजपवर टीका करू नये. तुमचे हिंदुत्व काय आहे हे जनतेने पाहिले आहे. तुमच्या हिंदुत्वामुळे तुम्ही काँग्रेसच्या मांडीला-मांडी लावून पुढे बसलात. औरंगजेब फन क्लब आणि अफजल खानाची वंशावळ पुढे जाण्याचे काम तुमच्या बेगडी हिंदुत्वाकडून सुरू आहे. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून सोनिया गांधींच्या चरणी लीन झालात. त्यामुळे जनतेने तुम्हाला नाकारले आहे. तुम्ही हिंदुत्वावर काही बोलू नका तुम्हाला काहीच अधिकार नाही.
नाशिकच्या 'भोंदूबाबा' अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणावर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अत्यंत प्रखर शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. अशोक खरातला मारून टाकून मोकळे व्हावे, या प्रकरणावर चर्चासुद्धा करू नये, अशा कडक शब्दांत भिडे गुरुजींनी प्रतिक्रिया दिली आहे. खरातच्या कृत्यांचे एकामागून एक प्रकरण समोर येत असतानाच भिडे गुरुजींच्या विधानाने आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. अशोक खरात याने अध्यात्माच्या नावाखाली अनेक पिडीत महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. केवळ शोषणच नव्हे, तर अनेकांना धमकावून त्यांच्या जमिनी आणि मालमत्ता हडप केल्याचे गंभीर आरोपही त्याच्यावर आहेत. भीती आणि अंधश्रद्धेचा वापर करून खरातने फसवणुकीचे मोठे साम्राज्य उभे केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट होत आहे. अनेक बडे नेते खरातच्या भेटीसाठी जात असत, तर काही नेत्यांच्या घरी त्याचे येणे-जाणे होते. या संदर्भातील काही फोटो आणि पुरावे समोर आल्यामुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. राजकीय वरदहस्तामुळेच खरात इतका मोकाट वागत होता का? असा सवाल आता विरोधकांकडून विचारला जात आहे. चर्चा नको, थेट संपवून टाका! या प्रकरणावर भाष्य करताना संभाजी भिडे गुरुजी यांनी अशा प्रवृत्तींना समाजात स्थान असता कामा नये, अशी भूमिका घेतली. अशा गुन्हेगारांवर वेळ घालवून चर्चा करण्यापेक्षा त्यांना कायमस्वरूपी संपवून टाकणे हाच एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान अशोक खरातच्या विरोधात आता समाजमन आक्रमक झाले असून, पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी एल्गार पुकारला आहे. दहावीत नापास, गावात 'कोंबडी चोर' अन् नेव्हीत हमाल अशोक खरात याने आपल्या 'अंकशास्त्रा'च्या जोरावर अनेकांना भुरळ घातली होती. मात्र, प्रत्यक्षात तो दहावीच्या परीक्षेत गणित विषयात नापास झाला होता. वावी येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकत असताना त्याचे वर्तन अत्यंत वादग्रस्त होते. घरून अंडी चोरून ती शाळेत विकणे, यासारख्या उद्योगांमुळे त्याला परिसरात 'कोंबडी चोर' किंवा 'मोटर चोर' म्हणून हिणवले जायचे. खरातने केवळ ज्योतिषशास्त्रातच नव्हे, तर आपल्या पेशाबाबतही खोटे दावे केले होते. मर्चंट नेव्हीमध्ये तो 'हमाल' किंवा खालच्या श्रेणीतील कामगार म्हणून रुजू झाला होता. पाच-सात वर्षांनंतर गावात परतल्यावर त्याने स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घेण्यास सुरुवात केली.
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीत अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. राज्यसभेच्या जागेवरून खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट पक्षप्रमुखांसमोरच तीव्र नाराजी व्यक्त केल्याने बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 'आय वॉन्ट टू प्रोटेस्ट' (I want to protest) म्हणत त्यांनी संजय राऊतांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण आलेले आहे. लोकसभेतील संख्याबळ वाढवण्यासाठी शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार फोडणार असल्याचा चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. बैठकीच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी खासदारांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला. भाजप आणि राष्ट्रवादीचे लोक मला सांगत आहेत की तुमचे खासदार फुटणार आहेत. मात्र, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ही लढाई मी तुमच्याच जीवावर लढत आहे, अशा शब्दांत ठाकरेंनी फुटीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. राज्यसभेच्या जागेवरून ठिणगी या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेत काय बोलणे झाले, याबाबतही माहिती दिली. काँग्रेसने राज्यसभेच्या जागेसाठी मागणी केली होती. मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चन्नीथला यांनी फोन करून ही जागा काँग्रेसला देण्याची विनंती केली होती. यावर ठाकरेंनी तुम्ही आधी शरद पवारांशी बोला, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय होणार? असे सांगत ही पेचाची परिस्थिती बैठकीत मांडली. याच वेळी प्रियंका चतुर्वेदी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. संजय राऊतांच्या विधानावरून उडाले खटके उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील समन्वयावर बोलत असतानाच प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांना मध्येच थांबवून आक्षेप घेतला. संजय राऊत हे शरद पवार यांच्या संदर्भात वारंवार विधाने का करत आहेत? असा रोकडा सवाल चतुर्वेदी यांनी केला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तात्काळ संजय राऊत यांची बाजू सावरून धरली. राऊत बोलले म्हणून काय झाले? पक्षप्रमुख मी आहे, शेवटी अंतिम निर्णय मीच घेणार आहे, अशा शब्दांत ठाकरेंनी चतुर्वेदी यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यातील शीतयुद्ध आता चव्हाट्यावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मराठवाड्यातील खासदारांचा घरचा आहेर बैठकीत केवळ चतुर्वेदी भडकल्या असे नाही, तर त्यांच्यावरही पक्षांतर्गत टीका झाली. प्रियंका चतुर्वेदींना ६ वर्षे राज्यसभेची संधी देऊन पक्षाचा नेमका काय फायदा झाला? असा बोचरा सवाल मराठवाड्यातील एका खासदाराने बैठक संपल्यावर उद्धव ठाकरेंना केला. दुसरीकडे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरही काही खासदारांनी नाराजी व्यक्त केली. आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत नाहीत, त्यांनी मैदानात उतरले पाहिजे, अशी तक्रार खासदारांनी केली. या टीकेनंतर आदित्य ठाकरे बैठकीत शांत राहिले, मात्र त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
व्यावसायिक शेती पद्धतीचा अवलंब देशांतर्गत शेती व्यवसायाला शाश्वतेकडे नेणारा ठरणार, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. भाजीपालाशास्त्र विभाग, उद्यानविद्या शाखा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे एकात्मिक उद्यान पिके विकास अभियानांतर्गत सुपारी व मसाला पिके संचालनालय कालिकत, केरळ यांच्या अर्थसहाय्यातून ‘मसाला व सुगंधी वनस्पती पिकांचे शाश्वत उत्पादन व प्रक्रियेसाठी अद्ययावत तंत्रज्ञान’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय शेतकरी चर्चासत्र उद्घाटनप्रसंगी डॉ. गडाख बोलत होते. विदर्भ व मराठवाड्याचा विचार करता अपारंपरिक पिकांचा प्रभावी वापर आवश्यक आहे, असे सांगून विद्यापीठाद्वारे मसाला व सुगंधी वनस्पती पिकांचे क्षेत्र वाढीसाठी राबवलेल्या उपक्रमांची प्रशंसा केली. आपल्याकडील जमिनीच्या २० टक्के क्षेत्रावर नगदी अथवा अपारंपरिक पिकांची लागवड करत उत्पादनावर आधारित भविष्यातील पीक पद्धतीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. मिरची व भाजीपाला संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. श्याम घावडे, विसार शिक्षण विभागप्रमुख डॉ. नितीन कोष्टी, भाजीपालाशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विजय काळे, डॉ. अभय वाघ, कृषी विज्ञान केंद्र अकोलाचे डॉ. गजानन तुपकर, कृषीविज्ञान केंद्र वाशीमचे डॉ. निवृत्ती पाटील, कृषी विभागाचे विजय शेगोकार, राज्यभरातून आलेले शेतकरी बंधू व भगिनींची सभागृहात उपस्थिती होती. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तथा दीप प्रज्वलनाने सुरुवात झालेल्या चर्चासत्रात मसाला व सुगंधी वनस्पती पिकांबाबत अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान, पीक संरक्षण, मसाला व सुगंधी वनस्पती पिकांचे मूल्यसंवर्धन तथा प्रक्रिया, विपणन व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. विद्यापीठ प्रक्षेत्र भेटीतून प्रत्यक्ष लागवड तंत्रज्ञान शेतकरी बांधवांना आत्मसात करता येणार आहे. प्रास्ताविक अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. अरविंद सोनकांबळे यांनी केले तर अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई यांनी स्वागतपर भाषण केले. सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले तर डॉ. विजय काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. चर्चासत्र आयोजनासाठी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात उद्यानविद्या विभागाचे अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. उपक्रमास राज्यभरातून बहुसंख्य शेतकऱ्यांची उपस्थित होते. मसाला पिकांचे प्रदर्शन सुद्धा भरवण्यात आले. प्रदर्शनात सहभागी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कृषी विद्यापीठ अथवा तत्सम संस्थांच्या प्रक्षेत्र भेटीने प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहता येते. विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी राज्यांतर्गत शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी कृषी विद्यापीठांच्या अथक प्रयत्नातून व काळसुसंगत शास्त्रीय मार्गदर्शनात राज्यातील मसाला पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. हळद, आले, धने, ओवा, मेथी, मिरची आदी मसाला पिके व सुगंधी वनस्पतींचे उत्पादन घेण्याकडे कल वाढत आहे. विद्यापीठाच्या उद्यानविद्या शाखेने वैदर्भीय शेतीला नवीन दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्याचा उल्लेख केला. शेतकऱ्यांना अपारंपरिक पिकांच्या अद्ययावत लागवड तंत्रज्ञानाबद्द्ल माहिती व प्रक्रिया तंत्रज्ञान उपलब्ध करण्यासाठी भाजीपालाशास्त्र विभाग, उद्यानविद्या शाखा, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे मसाला व सुगंधी वनस्पती पिकांचे शाश्वत उत्पादन व प्रक्रियेसाठी अद्ययावत तंत्रज्ञान विषयावर २४ व २५ मार्चला दोन दिवसीय राज्यस्तरीय शेतकरी चर्चासत्र कृषी महाविद्यालयाच्या समिती सभागृहात घेण्यात आले. उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. अरविंद सोनकांबळे, फळशास्त्रविभाग प्रमुख डॉ. शशांक भराड यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी, राज्य शासन पुरस्कृत महिला उद्योजक शेतकरी शोभा गायधणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
औषध खरेदीसाठी दरवर्षी शासनाकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करुन दिला जातो तरीही येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचालित सर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना उपचारासाठी आवश्यक ती आैषधी बाहेरून आणण्यासाठी चिठ्ठी लिहून दिली जात आहे. यातून ‘जीएमसी’च्या आवारातील खासगी मेडिकल चालकाचा खिसा भरला जात आहे, हे चित्र ‘दिव्य मराठी’ने बुधवारी रुग्णालय परिसरात दुपारी साडेबारा ते दीड वाजेच्या दरम्यान केलेल्या पाहणीत दिसून आले. आ. अमोल मिटकरी यांनी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील औषधांच्या तुटवड्याबाबत १३ मार्च २०२६ ला विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा कोणताही तुटवडा नाही, असा दावा त्यांनी केला होता. अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयाबाबत आलेल्या तक्रारींची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून अहवाल मागवला जाईल. तसेच ‘शासकीय रुग्णालयांत औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. रुग्णांना बाहेरून औषधे लिहून देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. मात्र, त्यांच्या आदेशाला डावलून येथील‘सर्वोपचार’ रुग्णालयात बाहेरील औषधांसाठी चिठ्ठी लिहून देणे सुरूच असून, यामुळे गोरगरीब रुग्णांच्या खिशाला नाहक झळ बसत आहे. उर्वरित पान ४ डॉक्टरांकडून रुग्णांना औषधांची चिठ्ठी देऊन बाहेरील मेडिकलमधून औषधी आणण्यास सांगितले जाते. रुग्णालयाच्या आवारातील एका खासगी मेडिकल दुकानांकडे रुग्णांना पाठवले जात असल्याच्या तक्रारीही आहेत. रुग्णालयाच्या आवारातील या मेडिकलवर औषध खरेदीचा रुग्णांना आग्रह केला जातो. रुग्ण दुसरीकडे गेला तर बऱ्याचदा ती आैषधी उपलब्ध होत नाही, अशी स्थिती आहे. संबंधित डॉक्टरांना आता ‘जीएमसी’ प्रशासन काय तंबी देते, याकडे लक्ष लागून आहे. ...तर इथे करा तक्रार रुग्णांना बाहेरून औषधी केसपेपरवर किंवा साध्या कागदाच्या चिठ्ठीवर लिहून दिल्यास रुग्णांनी तत्काळ संबंधित रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी. याशिवाय शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य विभाग किंवा शासनाच्या हेल्पलाइनवर संपर्क करावा. लेखी तक्रार केल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता अधिक असते.मात्र बहुतांश रुग्ण लेखी तक्रार करण्यास धजावत नाही, त्यामुळे डॉक्टरांचे फावते आहे. सर्व औषधांचा पुरेसा साठा ^अँटीबायोटिक्स, जीवनरक्षक औषधे, लस साठा पुरेसा आहे. रुग्णांना बाहेरून आैषधी लिहून देणे बंद केले आहे. आपल्याकडे उपलब्ध आैषधीची दैनंदिन यादी सर्व डॉक्टरांना दिली जाते. तरी काही डॉक्टर बाहेरची आैषधी लिहत असतील तर त्यांना ते बंद करण्याच्या सूचना तातडीने दिल्या जातील.- डॉ. संजय सोनुने, अधिष्ठाता, जीएमसी. विशिष्ट मेडिकलमधूनच औषधी खरेदीचा आग्रह का? रुग्णांच्या नातेवाइकांचा सवाल
रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर पाचशेच्या नोटांचा नियंत्रित पुरवठा होत असल्यामुळे शहरातील एसबीआयच्या एटीएममध्ये मंगळवारी सायंकाळपासून तुटवडा दिसून आला. बुधवारी सकाळी एसबीआयच्या मलकापूर, आदर्श कॉलनी आणि तुकाराम चौकातील एटीएममध्ये पाहणी केली. मलकापूर एसबीआयचे एटीएम बंद होते. आरबीआयकडून पाचशेच्या नोटांचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे कमतरता जाणवत आहे. एटीएममध्ये पाचशेच्या नोटांचे तीन तर शंभरच्या नोटांचा एक स्लॉट असतो. त्यामुळे एकाच स्लॉटमध्ये शंभरच्या नोटा टाकता येतात व लवकर संपून जातात, पाचशेच्या नोटाच नसल्यामुळे आम्ही एटीएम बंद ठेवल्याचे तेथील शाखाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाऊन रक्कम काढता येत आहे. आदर्श कॉलनीतील एसबीआय एटीएममधून दोन हजार रुपयांची रुपयांची रोकड काढली असता एक ५०० रुपयांची आणि १५ शंभर रुपयांच्या नोटा निघाल्या. तर तुकाराम चौकातील एसबीआयच्या एटीएममधून १०० रुपयांच्या नोटा निघत होत्या. दरम्यान, शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियात याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या बँकेला संलग्न ७ एटीएममध्ये कॅश सुरळीत असल्याचे सांगितले. शाखेला एटीएम अटॅच असल्यामुळे त्यांना अडचण आली नाही, असे सेंट्रल बँकेच्या प्रमुख शाखेचे व्यवस्थापक सचिन डोके यांनी सांगितले. दरम्यान, एसबीआयच्या शहरात भरपूर शाखा असून एटीएमची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, एटीएममधून १०० रुपयांच्या चलनात कमी रक्कम निघत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना बँकेच्या शाखेत जाऊन रक्कम काढावी लागत आहे. {ग्राहकांना एटीएममधून मर्यादित रक्कम काढता येत असल्याचे दिसून आले. अधिक रक्कम काढायची असल्यास संबंधित बँक शाखेत जाऊन ग्राहकांना रक्कम काढता येत होती. अनेक ग्राहकांनी एसबीआयच्या शाखेत जाऊन विड्रॉल स्लिप भरत रक्कम काढल्याचे सांगितले. {ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाऊन वेळ खर्ची घालावा लागत आहे. बँकांच्या शाखेत जाऊन पैसे काढण्याचा ग्राहकांना सराव राहिलेला नाही. एटीएममधून पैसे काढून व्यवहार करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. अधिक रकमेसाठी आता बँकेच्या शाखेचाच पर्याय आरबीआयकडून पाचशेच्या नोटांचा पुरवठा कमी ^रिझर्व्ह बँकेने पाचशेच्या नोटांचा पुरवठा कमी केला आहे. पाचशेच्या नोटांचा तुटवडा जाणवत असून पुरवठा करण्याबाबत आरबीआयला तीनदा मेल केला आहे. आरबीआयने एटीएममध्ये वापरण्याजोग्या जुन्या नोटा एटीएममध्ये टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचे काम चालू आहे. नोटांचा पुरवठा ५ एप्रिल नंतर सुरळीत होण्याची शक्यता आहे. - स्वप्निल लग्गड, सहाय्यक व्यवस्थापक, एसबीआय मुख्य शाखा, टॉवर चौक.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून, सहकार गटातील ज्येष्ठ सदस्य व बाजार समितीचे संचालक विजय उर्फ राजाभाऊ कळमकर यांची उपसभापतीपदी निवड झाली. या निवडीमुळे तालुक्यातील सहकार गटाने राजकारणात समतोल साधत विरोधकांना आश्चर्याचा धक्का दिला. पूर्वनियोजनानुसार अडीच-अडीच वर्षांचा कार्यकाळ विभागून उपसभापतीपदासाठी सहकार पॅनलकडून नाव सर्वानुमते आधीच निश्चित केले होते. त्यामुळे २४ रोजी बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात झा लेली निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पूर्ण झाली. प्राधिकृत अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १८ सदस्यांपैकी १७ सत्ताधारी व १ विरोधी सदस्य उपस्थित होते. उपसभापतीपदासाठी विजय कळमकर यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली . या प्रक्रियेत सहकार नेते अनंत साबळे, सभापती अॅड. जयंत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालकांशी चर्चा करून एकमताने निर्णय घेतला. निवडीनंतर नवनियुक्त उपसभापतींचा सत्कार करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ संचालक शंकर चोरे व इतर सदस्यांनी बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शेतकरी हिताच्या निर्णयांसाठी अधिक वेळ देण्याचे आवाहन केले. संपूर्ण संचालक मंडळाने यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नवनियुक्त उपसभापती विजय कळमकर यांनी दोन वेळा सेवा सहकारी संस्था गटातून संचालक म्हणून निवडून आल्यानंतर उपसभापतीपदाचा मान मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला सहकार क्षेत्रातील मान्यवर, संस्थांचे संचालक, प्रतिनिधी उपस्थित होते..
शिवटेकडी हे अमरावतीकरांसाठी केवळ एक पर्यटन स्थळ नसून, ते ऐतिहासिक व सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक मानले जाते. येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा नागरिकांमध्ये प्रेरणा जागवतो. याच परिसरात साकारत असलेली ‘शिवसृष्टी’ ही संकल्पना शहराच्या सांस्कृतिक वारशाला अधोरेखित करणारी ठरणार असून, या प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाच्या नियोजन, अंमलबजावणी आणि गुणवत्तेवर विशेष भर देण्याची गरज सभेत अधोरेखित करण्यात आली. महानगरपालिकेच्या शिवटेकडी (मालटेकडी) व्यवस्थापन समितीची विस्तृत आणि महत्त्वपूर्ण सभा महापौर श्रीचंद तेजवाणी यांच्या अध्यक्षतेखाली वातावरणात पार पडली. शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेली शिवटेकडी ही निसर्ग संपन्न आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्यामुळे त्याच्या सर्वांगीण विकासासाठी या बैठकीत सखोल चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याशिवाय, येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि शिवप्रेमींसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, माहिती केंद्र, पार्किंग व्यवस्था, तसेच मार्गदर्शक फलक यांसारख्या मूलभूत सुविधांची उभारणी करण्याचे नियोजन करण्यात आले. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम आणि ऐतिहासिक माहिती देणाऱ्या डिजिटल माध्यमांचा वापर करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. कामांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूद, कामांचे दर करार आणि टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करण्याचे नियोजन यावरही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. विकासकामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाने काटेकोर धोरण आखण्याचा निर्णय घेतला. सभेत उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी शिवटेकडीचा विकास हा केवळ भौतिक सुविधांपुरता मर्यादित न ठेवता, तो सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या आदर्श प्रकल्प म्हणून विकसित करण्याचा निर्धार व्यक्त केला. येत्या काळात शिवटेकडी हे अमरावती शहराचे प्रमुख आकर्षण केंद्र ठरेल आणि शहराच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे स्थान मिळवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. शिवटेकडीच्या विकासामुळे नागरिकांना दर्जेदार विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होणार असून, पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प शहराच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बैठकीस आयुक्त सौम्या शर्मा , स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, पक्षनेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, शिवटेकडी व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तथा नगरसेवक दिनेश बुब, नगरसेवक प्रदीप हिवसे, नगरसेविका राधा कुरील, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, उद्यान अधीक्षक अजय विंचूरकर, राजु कुरील, निरीक्षक मुकेश खारकर, महेश जोशी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत शिवटेकडी परिसराच्या सौंदर्यीकरणात अधिक भर घालण्याबाबत विविध प्रस्ताव मांडण्यात आले. यामध्ये आकर्षक लँडस्केपिंग, हरित क्षेत्राचा विस्तार, पादचारी मार्गांची सुधारणा, विश्रांतीसाठी बाकांची व्यवस्था, प्रकाशयोजना अधिक सक्षम करणे, तसेच स्वच्छतेची नियमित देखभाल यांसारख्या बाबींवर चर्चा झाली. नागरिकांना सुरक्षित आणि सुखद अनुभव मिळावा यासाठी सुरक्षा व्यवस्थेतही सुधारणा करण्यावर भर देण्यात आला. शिवटेकडी परिसराच्या सुरक्षा व्यवस्थेवरही दिला जाणार भर
शहराच्या वडाळी, मंगलधाम कॉलनी, एसआरपीएफ कॅम्प, जुना बायपास या भागात बिबट्याने संचार केल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे तत्काळ उपाययोजना करा, अशी मागणी आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी आज, बुधवारी विधीमंडळात रेटून धरली. अमरावती शहरालगत वडाळी वनपरिक्षेत्र व पोहरा जंगल असून या भागात बिबट्याच्या अधिवास आहे. सीसीटीव्ही कॅमेरामध्येही तसे दृश्य कैद झाले आहे. दरम्यान अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबट्याची शहराकडे भटकंती सुरु असून त्यामुळे तेथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. या भागातील काही पाळीव जनावरेही बिबट्याने फस्त केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परिणामी मंगलधाम परिसरातील नागरिक सायंकाळी ६ नंतर घराबाहेर पडत नसून या भागात ऑटो-रिक्षादेखील मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यासाठी कोणती कार्यवाही व उपाययोजना करण्यात आल्या ? वनविभागाला तसे दिशा-निर्देश देण्यात आले का ? असा प्रश्नही आमदार सुलभाताई खोडके यांनी विधानसभेत उपस्थित केला. यावर उत्तर देताना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा प्रशासन व स्थानिक पोलीस यंत्रणेला सोबत घेऊन तत्परतेने प्रभावी उपाययोजना करण्यासंदर्भात वन विभागाला निर्देश देणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबट्याची शहराकडे भटकंती सुरु असून त्यामुळे तेथील रहिवाशी त्रस्त झाले आहेत. या भागातील काही पाळीव जनावरेही बिबट्याने फस्त केल्याच्या घटना आल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी व्हिएमव्ही भागात धुमाकूळ दोन वर्षांपूर्वी एका बिबट्याने चक्क व्हीएमव्ही परिसर व पुंडलिकबाबा नगर , पाठपुस्तक मंडळापर्यंत शिरकाव करून धुमाकूळ घातला होता. याबाबतसुद्धा आमदार सुलभाताई खोडके यांनी सभागृहाला अवगत करून वनमंत्री गणेश नाईक यांचे लक्ष वेधले होते. पुढे त्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते.
जर या देशाची लोकशाही सक्षम करायची असेल, तर ग्रामसभा सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत गावातील प्रत्येक नागरिकाला ग्रामसभेचे महत्त्व उमजत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ग्रामीण विकास साधला जाणार नाही, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. हर्षवर्धन देशमुख यांनी केले. ‘संत गाडगेबाबांची दशसूत्रे आणि ग्रामविकास’ या विषयावर आयोजित सरपंच कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरूजी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विद्या शर्मा, जेष्ठ साहित्यिक डॉ. सतीश तराळ, महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना संस्थापक अध्यक्ष गजानन बोंडे, महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना अध्यक्ष राजेंद्र कराळे व संत गाडगे बाबा अध्यासन प्रमुख डॉ. दिलीप काळे उपस्थित होते. हर्षवर्धन देशमुख पुढे म्हणाले, अधिकारांसोबत सरपंच व नागरिकांनी जबाबदारीची जाणीवसुद्धा ठेवली पाहीजे, त्यामुळे सरपंचांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे. ग्रामपंचायतीमध्ये होणारे सर्व व्यवहार आणि खर्च गावातील प्रत्येक नागरिकाला समजले पाहिजेत. प्राचार्य डॉ. सतिश तराळ म्हणाले, संत गाडगे बाबांनी समाजाला दिलेली दशसूत्री केवळ आध्यात्मिक उपदेश नसून तो ग्रामविकासाचा एक परिपूर्ण कृती आराखडा आहे. विज्ञानाची जोड देऊन या दशसूत्रीची अंमलबजावणी केल्यास गावे खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होतील. दशसूत्रीतील प्रत्येक सूत्राचा आधुनिक ग्रामविकासाशी संबंध आहे. शिक्षण नसेल तर प्रगती खुंटते. बाबांनी रंजल्या-गांजल्यांसाठी शाळा आणि वसतिगृहे उभारली, कारण त्यांना माहित होते की, विचारांचे परिवर्तन शिक्षणाशिवाय शक्य नाही. केवळ परिसर स्वच्छ ठेवणे म्हणजे स्वच्छता नव्हे, तर विचारांची स्वच्छता राखणे हे ग्रामविकासाचे पहिले पाऊल आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला खिळखिळी करणाऱ्या व्यसनाधिनतेवर प्रहार करताना, सरपंचांनी आपल्या गावातून व्यसनमुक्तीची चळवळ सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात आचार्य वेरूळकर म्हणाले, संत गाडगे बाबांनी दिलेली दशसूत्री हा केवळ उपदेश नसून तो गाव सुखी आणि समृद्ध करण्याचा एक कृती आराखडा आहे. जोपर्यंत गावातील शेवटच्या माणसापर्यंत या दशसूत्रीचा लाभ पोहोचत नाही, तोपर्यंत ग्रामविकास अपूर्ण आहे. गाडगे बाबांनी हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा मंत्र दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महारांनी ग्रामगीतेतून ग्रामविकासाठी संकल्पना मांडली. आजच्या सरपंचांनी आणि युवकांनी केवळ सरकारी अनुदानावर अवलंबून न राहता श्रमदानातून गावे स्वच्छ आणि सुंदर करावीत. संचालन डॉ. राजेश मिरगे यांनी केले. कार्यशाळेला विदर्भातील सरपंच तसेच विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात ग्रामपंचायतीमध्ये नियुक्त झालेल्या प्रशासकाची जबाबदारी व भूमिका यावर लिनाताई तुरकर यांनी, तर शासकीय योजना राबवितांना येणाऱ्या अडचणी यावर प्रा. राजेंद्र कराळे यांनी माहिती दिली. मेहता कमिटी ते घटनादुरुस्ती ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शक असला पाहीजे. फाळणी आणि निर्वासितांच्या प्रश्नांमुळे सुरुवातीच्या काळात ग्रामीण विकासाकडे पूर्णतः लक्ष देता आले नाही. १९५७ मध्ये बळवंतराय मेहता समितीच्या शिफारसींनंतर आणि पुढे १९९३ च्या ७३ व्या घटनादुरुस्तीनंतर देशात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था खऱ्या अर्थाने लागू झाली. गाडगे बाबांच्या दशसूत्रीनुसार ग्रामविकास करणे ही प्रत्येक पदाधिकाऱ्याची जबाबदारी आहे. आदी कायदेशीर बाबीसुद्धा दिवसभराच्या कार्यशाळेत मांडण्यात आल्या.
तालुक्यातील गुरुदेव नगर येथे संत परंपरेचा वारसा जपण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी संताजी जगनाडे महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी तेली समाज आग्रही झाला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीला पत्र देण्यात आले असून,या प्राधिकारिणीतर्फे वेगवेगळ्या कंपन्यांशी पत्रव्यवहार करुन हा निधी प्राप्त करुन द्यावा, अशी मागणी केली आहे. गुरुदेव नगरचे उपसरपंच मिलिंद काळमेघ यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात गावातील संत परंपरा, भक्तीभाव आणि सामाजिक एकात्मता जपण्यासाठी पुतळा उभारणे आवश्यक असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. शिवाय या उपक्रमातून भावी पिढीला संतांच्या विचारांची प्रेरणा मिळेल. सामाजिक मूल्यांची जपणूक होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. सदर पुतळा उभारणीसाठी अंदाजे ५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा खर्च सीएसआर निधीतून भागविण्याची विनंती करण्यात आली आहे. याशिवाय पुतळ्यासाठी योग्य सार्वजनिक जागा निश्चित करून आवश्यक प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आली. या वेळी नामदेव मुंगले, धनराज बारबुद्धे, जयंत निखाडे, सूरज देवतारे, योगेश भिल, विनोद मुंगले, मंगेश तांबूलकर, नितीन निखाडे यांच्यासह तेली समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पंधरा दिवस उलटूनही घरगुती गॅस सिलिंडर रिफील करुन मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी २५ मार्चला रिकाम्या सिलिंडरसह जिल्हाकचेरीवर धडक दिली. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी काही नागरिकांना सिलिंडर डिलीव्हर झाल्याचा संदेश प्राप्त झाला आहे. साठा मुबलक आहे म्हणता, मग सिलिंडर रिफील का होत नाही, असा सवाल या नागरिकांनी विचारला. रुक्मिणीनगर भागातील लक्ष्मी गॅस एजंसीशी संबंधित हे ग्राहक आहेत. तुटवड्यामुळे नागरिकांची होत असलेली गर्दी लक्षात घेता या गॅस एजंसीचे शटर गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. दुसरीकडे ज्या ग्राहकांनी १० मार्चला रिफिलींगसाठी नंबर लावला, त्यांना अद्यापही सिलिंडर मिळाले नाही. याऊलट काही जणांच्या मोबाइलमध्ये सिलिंडर डिलीव्हर झाल्याचा संदेश आला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या ग्राहकांनी आधी लक्ष्मी गॅस एजंसीचे कार्यालय गाठले. परंतु तेथे प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी जिल्हाकचेरी गाठली.याठिकाणी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश उर्वरित. पान ४
खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सोलापूर- अजमेर- सोलापूर (०९६२७- ०९६२८) विशेष सुपरफास्ट रेल्वेगाडीला जेऊर (ता. करमाळा) रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा देण्याची मागणी केली खासदार मोहिते पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, जेऊर रेल्वे स्थानक करमाळा, जामखेड, परंडा तसेच कर्जत- राशिन परिसरासाठी अत्यंत सोयीचे असून या भागातील नागरिकांच्या प्रवासासाठी ते महत्त्वाचे केंद्र आहे. या परिसरात मुस्लिम समाजाची लोकसंख्या मोठी असून अजमेर येथील प्रसिद्ध दरगाह शरीफ येथे दर्शनासाठी अनेक भाविक नियमितपणे प्रवास करतात. तसेच जेऊरपासून सुमारे ३० किमी अंतरावर आवाटी येथे अलहजवली चाँदपाशावली यांची प्रसिद्ध दरगाह असून देशभरातून हजारो भाविक येथे येत असतात. याशिवाय सूरत येथील मोठ्या होलसेल कापड बाजारामुळे व्यापारी वर्गांचीही मोठी ये- जा सुरू असते. राजस्थानमधील कामगार तसेच पर्यटनासाठी जयपूरसह विविध ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांची संख्या देखील लक्षणीय आहे. सोलापूर विभागातून अजमेरसाठी ही एकमेव थेट रेल्वेगाडी उपलब्ध असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीला जेऊर स्थानकावर आगमन-प्रस्थानाचा अधिकृत थांबा देण्यात यावा, अशी विनंती खासदारांनी केली आहे.
यंदा डॉ. आंबेडकर जयंती डिजेमुक्त साजरी करावी:पंढरपुरात जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक संपन्न
भारताचे संविधान निर्माता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी दि. १४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त रखुमाई सभागृह पोलिस संकुल, पंढरपूर येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंढरपूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात दरवर्षी उत्साहात साजरी केली जाते. जयंती निमित्त शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, सहा.पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे, पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे, टी.वाय.मुजावर, रेखा घनवट, सहा. पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे, नगर अभियंता केसकर, महावितरणचे अधिकारी तसेच शहरातील व तालुक्यातील जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्ते व पोलीस पाटील उपस्थित होते. या बैठकीत डॉ. आंबेडकर जयंती डिजेमुक्त, शांततामय आणि उत्साही वातावरणात साजरी करावी. जयंती अनुषंगाने लावण्यात येणारे पोस्टर, बॅनर, झेंडे हे परवानगी घेऊन व योग्य ती खबरदारी घेऊन लावावे. तसेच ते आक्षेपार्ह असु नयेत याची दक्षता घ्यावी, मिरवणूक काढण्यापूर्वी किमान तीन दिवस अगोदर परवाना घेणे बंधनकारक आहे.
कुर्डवाडी नगरपरिषदेने सण २०१६- १७ मध्ये शहरामध्ये माढा, पंढरपूर, बार्शी, पंढरपूर रोडसह शहरामध्ये २५०० एलएडी पथदिवे ५० व्याटपासून १०० व्याटपर्यत बसवले आहेत. तर ८० हायमास्ट दिवे १५० ते २०० व्याटचे शहरात बसवण्यात आले. सदर दिवे बसवण्याचे काम दिल्लीच्या केंद्रीय इ- सेल कंपनीने केले असून संबंधित पथदिवे आणि हायमास्ट दिव्यांची देखभाल करण्याचा ३ ते ४ वर्षाचा कालावधी होता. मात्र कंपनीने काम अनेक महिन्यापासून अपूर्ण ठेवल्याने शहरातील रस्ते आजतगायत अंधारातच आहेत. शहरातील रस्त्यामध्ये प्रामुख्याने बार्शी- माढा, पंढरपूर रोडवर बसवण्यात आलेले पथदिवे नुसतं शोपीस असल्यासारखे दिमाखात दिवसा उभे आहेत. तर रात्री रस्ते पूर्णपणे अंधारमय असतात. यामुळे नागरिक अंधारातून मार्ग काढत आहे. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन चौक, मिठाई गल्ली बाळासाहेब ठाकरे शॉपिंग सेंटर समोरच्या मार्गावर तर गेल्या २ वर्षापासून एलएडी विना केवळ खांबच उभे आहेत. उच्च दर्जाच्या पथदिवे आणि हाय मस्टची देखभाल दुरुस्तीचे काम इसेल कंपनीचे होते. परंतु काम सुरु केल्यापासून काम संपले. तरी शहरात काही ठिकाणी दिवे दिवसा उजेड देतात. तर काही भागात रात्री बंद असतात. वास्तविक पाहता कंपनीकडून काम अपूर्ण राहण्याचे कारण संशोधनाचा विषय असून मोठं आर्थिक रहस्य लपलं आहे. २५०० पथदिव्यांपैकी निम्म्याहून अधिक प्रमाणात अनेक भागांमध्ये पथ दिवे बंद असतात आणि हाय मस्टचे चार फोकस ऐवजी एकच सुरु असतो. रात्री रस्त्यावरून गल्लीबोळातून जाताना नागरिकांना भीती माढा बार्शी पंढरपूर रोडवरचे जवळपास निम्म्याहून अधिक पथदिवे गेल्या अनेक वर्षापासून बंद आहेत. या मार्गावरून शहरातील सर्व पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक रात्री दिवसा ये- जा करतात. पण सदरील पथ दिव्यांबाबत कोणच ब्र शब्द काढत नसल्यामुळे केंद्रीय विभागाचा अपुरा प्रकल्प गुमान नागरिक सहन करत आहेत. रेल्वेचे महत्वाचे जंक्शन आहे. शहरात रात्री प्रवाशांसाठी येतात पण रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करतात. नगरपरिषद विद्युत विभागाने सर्व पथदिवे हाय मस्ट सुरू असल्याचा दावा केला असून केवळ दहा टक्के दिव्यांचे काम राहिले असल्याचे सांगितले. भीती वाटत आहे. याकडे नगरपरिषद विद्युत विभाग लक्ष देणार आहे का, असा प्रश्न नियमित नगरपरिषदेचा कर भरणारे नागरिक विचारत आहेत. मात्र रात्रीच वास्तव विदारक आहे.लाखो रुपये खर्च करून शहर प्रकाशमय नाही. नुसताच मिणमिणता उजेड रारी असतो. बार्शी- माढा पंढरपूर रोडवरचा अंधार विद्युत विभागाच्या दुर्लक्ष पणामुळे आहे का, अन्य कारण आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. यामुळे चोरी आणि अपघात होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने बार्शी रोडबाबत नगरपरिषद प्रशासन आणि पदाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत. पंढरपूर रोड बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची गत रात्री वाईटच आहे. शहरातील सर्व पथदिवे चालू करण्याची मागणी ^कुर्डूवाडी शहरातील मोठ्या प्रमाणात बसवण्यात आलेले पथदिवे हायमस्ट रात्री अल्प उजेड देतात. काही ठिकाणी दिवे नाहीत. त्यामुळे नागरिकांना रात्री भीती वाटते. न.पा. प्रशासनाने तात्काळ पथदिवे हाय मस्ट सुरळीत करावे. आनंद टोणपे, नागरिक
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या व्हिडिओची माहिती झिरवाळ यांना आधीपासूनच होती आणि यासंदर्भात त्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चाही केली होती, अशी माहिती मिळत आहे. मात्र, ही चर्चा होऊन २४ तास उलटण्यापूर्वीच हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने झिरवाळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नरहरी झिरवाळ यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ सुमारे सात महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येते. मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील एका खोलीत झिरवाळ एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत बिछान्यावर बसलेले असून शेजारी मद्य आणि खाद्यपदार्थ दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये दिसणारा तृतीयपंथी पवन यादव असून, त्याच्यावर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. एका जबाबदार पदावर असलेल्या मंत्र्यांच्या शासकीय निवासात अशा प्रकारची व्यक्ती असणे आणि तिथे अश्लील कृत्य होणे, यावरून आता नैतिकतेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षातील गटबाजी? राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर पक्षात नेतृत्वावरून आणि मंत्रिपदावरून मोठा संघर्ष सुरू आहे. झिरवाळ यांनीच सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याची मागणी केली होती. तसेच, दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करण्याबाबत अजितदादा सकारात्मक होते, असा दावाही त्यांनी केला होता. मंत्रिमंडळातील त्यांच्या जागेवर डोळा असलेल्या पक्षातीलच काही हितशत्रूंनी त्यांना जाळ्यात ओढले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काँग्रेसकडून हकालपट्टीची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. अशा कलंकित मंत्र्याला पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. दोन महिन्यांपूर्वीच झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला ३५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले होते, तेव्हापासूनच ते विरोधकांच्या निशाण्यावर होते. या संपूर्ण प्रकरणावर नरहरी झिरवाळ यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या स्वीय सहायकाशी संपर्क साधला असता, साहेबांना या विषयावर सध्या काहीही बोलायचे नाही, असे सांगण्यात आले. झिरवाळांवर संकटांची मालिका, तिसरा बळी ठरणार? नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत गेल्या काही काळापासून सतत वाढ होत आहे. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या कार्यालयातील लिपिकाला ३५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते. आता तृतीयपंथीसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने झिरवाळ चर्चेत आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. याआधी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने मंत्रिपद सोडावे लागले होते. तर अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकरणकर यांना राज्य महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला आहे. आता व्हिडिओ प्रकरणामुळे झिरवाळ यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यास, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसरे मंत्री ठरतील.
तत्कालीन बार्शी लाइट रेल्वेच्या (बीआरएल) कर्मचाऱ्यांनी एक- एक रुपया गोळा करून तर कधी झोळी फिरवून जमा केलेली वर्गणी आणि श्रमदानातून कुर्डुवाडी शहरातील रेल्वे कॉलनीत उभारण्यात आलेले श्रीराम मंदिर यंदा १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे. अठरा पगड जाती धर्मातील रेल्वे कर्मचाऱ्यांची भक्ती अन् श्रद्धेचे प्रतीक असलेले आणि ब्रिटिशकालीन आठवणी सांगणारे हे मंदिर आजही दृढतेने दिमाखात उभे आहे. शताब्दी वर्षानिमित्त रामनवमीसह वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १८८६ मध्ये बार्शी लाइट रेल्वेची स्थापना झाली. त्यानंतर कुर्डुवाडी- बार्शी पहिली रेल्वे १८९३ मध्ये धावली. दरम्यान, कुर्डुवाडीत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी पाच व बारा कोठरी अशा प्रकारची घरे (आताची रेल्वे कॉलनी) उभारण्यात आली. रेल्वे कर्मचारी कामानंतर भजन व इतर अध्यात्मिक कार्यात वेळ देत असत. तेव्हाचे दत्त आणि गणेश मंडळांनी रेल्वे वसाहतीत एखादे मंदिर असावे, अशी मागणी लावून धरली. तत्कालीन ऑफिस सुपरीडंट दत्तात्रय आजरेकर यांनी बार्शी लाइटचे रेल्वे अधिकारी जे.डब्ल्यू. इव्हन (एजंट) यांच्याकडून प्रस्ताव देऊन मंदिरासाठी मंजुरी मिळवली आणि कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर १५० बाय १५० चौरस फूट जागेवर मंदिराची उभारणी झाली. १९२६ मध्ये हिंदू देवालय संस्था (रजिस्टर नंबर १४७) नावाने संस्थेची स्थापना झाली. १९३० मध्ये कै. महादेव कुंटे यांनी दिलेल्या राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. रेल्वे कर्मचारी व इतर मंडळीच्या आर्थिक सहकार्य आणि श्रमदानातून पुढे श्रीराम मंदिर गाभारा, मारुती मंदिर गाबारा आणि सभामंडप तयार झाले..मंदिरात दहा दिवस रामनवमी, दत्त जयंती, कृष्ण जन्माष्टमी, दास नवमी आदी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. शिवाय सामाजिक कार्यही मंदिराचे मोठे योगदान राहिले आहे.मंदिर हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषयरेल्वे कर्मचाऱ्याकडून मासिक वर्गणीतून इतर देणगीतून मंदिराचे कामकाज चालते. प्रभू श्रीराम मंदिराच्या शताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रम, मंदिराला ऊर्जितावस्था आणणार ^कुर्डुवाडी शहरात १०० वर्षांचे श्रीराम मंदिर हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या शंभर वर्षांत श्रीराम मंदिराच्या साक्षीने अनेक पिढी घडल्या.आता रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बदलीने मंदिराचे काम म्हणावे तसे होत नाही. सर्वांच्या मदतीने मंदिराला ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न आहे. श्रीराम मंदिराच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम करण्याचे नियोजन केले आहे. -अश्विनी जोशी- कुलकर्णी
स्वतःला अंकशास्त्राचा महान तज्ज्ञ आणि 'कॅप्टन' म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्या भूलथापांना मोठे राजकीय नेते आणि अधिकारी बळी पडले असले, तरी त्याचा खरा भूतकाळ आता समोर आला आहे. शालेय जीवनात गणितात अवघे २८ गुण मिळवून नापास झालेला हा 'अंकशास्त्रज्ञ' त्याच्या वावी गावात 'कोंबडी चोर' म्हणून ओळखला जात होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता १० गुन्ह्यांचा एकत्रित तपास विशेष तपास पथकाकडे (SIT) वर्ग करण्यात आला आहे. अशोक खरात याने आपल्या 'अंकशास्त्रा'च्या जोरावर अनेकांना भुरळ घातली होती. मात्र, प्रत्यक्षात तो दहावीच्या परीक्षेत गणित विषयात नापास झाला होता. वावी येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिकत असताना त्याचे वर्तन अत्यंत वादग्रस्त होते. घरून अंडी चोरून ती शाळेत विकणे, यासारख्या उद्योगांमुळे त्याला परिसरात 'कोंबडी चोर' किंवा 'मोटर चोर' म्हणून हिणवले जायचे. याच शाळेतील वर्तमान विद्यार्थ्यांनी खरातच्या कृत्यांमुळे आमच्या शाळेची नाहक बदनामी झाल्याची खंत व्यक्त केली आहे. हमाल ते कॅप्टन: फसवेगिरीचा मोठा प्रवास खरातने केवळ ज्योतिषशास्त्रातच नव्हे, तर आपल्या पेशाबाबतही खोटे दावे केले होते. मर्चंट नेव्हीमध्ये तो 'हमाल' किंवा खालच्या श्रेणीतील कामगार म्हणून रुजू झाला होता. पाच-सात वर्षांनंतर गावात परतल्यावर त्याने स्वतःला 'कॅप्टन' म्हणवून घेण्यास सुरुवात केली. त्याच्या या बनावट ओळखीला भुलून अनेक प्रभावशाली व्यक्ती त्याच्या जाळ्यात अडकल्या, याबद्दल तरुण पिढीने आणि विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त करत सुशिक्षित समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सर्व १० गुन्हे एसआयटीकडे वर्ग भोंदू अशोक खरात विरुद्ध दाखल झालेले सर्व गुन्हे आता 'एसआयटी'च्या माध्यमातून तपासले जाणार आहेत. यामध्ये नाशिकमधील ८, तर वावी आणि सिन्नरमधील प्रत्येकी एक अशा एकूण १० गुन्ह्यांचा समावेश आहे. काल रात्रीच एसआयटीच्या पथकाने नाशिक गुन्हे शाखेकडून लॅपटॉप, डीव्हीआर, सीसीटीव्ही फुटेज आणि महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. डिजिटल पुराव्यांवर पोलिसांचा भर खरातने आपल्या मोबाईलमधील अनेक संवाद आणि व्हॉट्सॲप डेटा नष्ट केल्याचा संशय पोलिसांना आहे. हा डेटा पुन्हा मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. खरातने नेमक्या कोणाकोणाशी संवाद साधला होता आणि यामागे आणखी मोठे मासे अडकले आहेत का, याचा शोध आता एसआयटी घेणार आहे. हे ही वाचा… भोंदू खरातवर 5 कोटी रुपयांना गंडा घालण्याचाही गुन्हा दाखल:पुण्याच्या व्यावसायिकाला दाखवले होते परिसाच्या शक्तीचे आमिष लॉजिस्टिक व्यवसायात प्रगती करण्यासाठी ‘अवतार पूजा’ आणि ‘परिसाची शक्ती’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून भोंदू अशोक खरातने पुण्याचे व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना २०१८ ते २५ कालावधीत तब्बल ५ कोटी रुपयांचा गंडा घातला. “पूजा केली नाही तर नागदेवता दंश करेल. त्यात तुमचा मृत्यू होईल,” अशी भीती दाखवून खरातने जासूद यांच्याकडून ९० लाखांची मर्सिडीज कार (एमएच १५ जीएल ८१८१) आणि अमेरिकेतील उपचारांचा खर्चही उकळला. सविस्तर वाचा…
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनोखा कारभार समोर आला आहे. धानोरा ते चिंचोली या दरम्यान चक्क तीन ते चार ठिकाणी एकाच जागी प्रत्येकी दोन, तीन फलक (मैलदगड) लावण्यात आले आहेत. या प्रकारामुळे महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे. महामार्गावर प्रत्येक एक किलोमीटरवर अंतराची माहिती देणारे मैलदगड लावले जातात. मात्र, धानोरा ते चिंचोली या टप्प्यात अनेक ठिकाणी एकाच जागी तीन वेगवेगळे दगड पाहायला मिळत आहेत. यामध्ये काही जुने तर काही नवीन दगड असून, ते एकमेकांपासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावरच उभे आहेत. एकाच ठिकाणी इतके फलक लावल्याने नेमके अचूक अंतर कोणते, असा प्रश्न प्रवाशांना पडतो. एकाच जागी तीन-तीन दगड लावण्याचा हा प्रकार म्हणजे सरकारी निधीचा अपव्यय असल्याचे बोलले जात आहे. तीन ते चार वेगवेगळ्या ठिकाणी असाच प्रकार आढळून आल्याने हे काम करणाऱ्या कंत्राटदाराने आणि संबंधित विभागाने नेमके काय नियोजन केले होते, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या महामार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी लावण्यात आलेले हे फलक आता गैरसोयीचे ठरत आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन अनावश्यक असलेले फलक तातडीने हटवावेत आणि योग्य ठिकाणी अचूक अंतराचे फलक लावावेत, अशी मागणी परिसरातून होत आहे. गतिरोधक बसवणे आवश्यक ^सार्वजनिक बांधकाम विभाग व न्हाईचे अधिकारी कधी कोणते काम करतात याबाबत काहीच माहिती पडत नाही. राष्ट्रीय महामार्ग घोषित असून सुविधा शून्य आहेत. ठीक ठिकाणी गतिरोधक बसवणे आवश्यक आहे. - माणिकचंद महाजन, माजी उपसभापती धानोरा वृक्ष प्रेमींमध्येही नाराजी : गेल्या अनेक वर्षांपासून बऱ्हाणपूर-अंकलेश्वर हा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित झाला आहे. याठिकाणी वाहनधारक अनेकदा संभ्रमात पडतो. यामुळे जुन्या काळात जे रस्ते बनले ते तरी दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण होते, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे. तसेच रस्त्याच्या पलीकडे असलेली जुने जीर्ण झाडे काढता अन्य हिरवीगार झाडे तोडल्याने वृक्षप्रेमी ही नाराज आहेत. जुने दगड पडून... ^राष्ट्रीय महामार्ग घोषित असल्याने आम्ही जे नवीन दगड लावले आहेत ते योग्य आहेत. जुने दगड हे सार्वजनिक बांधकामकडे असल्याने ते पडून आहेत. - चंदन गायकवाड, प्रकल्प संचालक, न्हाई
श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे सध्या प्रशासनाच्या कारभारावरून नवा वाद निर्माण झाला आहे. विश्वस्त मंडळ बरखास्त झाल्यानंतर प्रशासक मंडळाकडे कारभार असताना रस्त्यावर लावण्यात आलेल्या बॅरिकेट्समुळे स्थानिक व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पूर्वी शनिशिंगणापूरमध्ये प्रवेश करताच तथाकथित ‘लटकू’ वाहनधारकांकडून शनिभक्तांचा पाठलाग करून पूजा साहित्य खरेदीसाठी जबरदस्ती केली जात होती. या प्रकारामुळे भाविक त्रस्त झाले होते. तसेच भरधाव मोटारसायकलींमुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ आणि प्रशासनाने एकत्र येत कारवाई करत रस्त्यावर उभे राहून अडथळा निर्माण करणाऱ्या लटकूंना आळा घातला. या निर्णयाचे भाविक आणि स्थानिकांकडून स्वागतही झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती वेगळीच वळण घेताना दिसत आहे. शनिशिंगणापूरमधील खासगी पार्किंगकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या मधोमध पोलिस प्रशासनाने बॅरिकेट्स उभारले आहेत. यामुळे पूजा साहित्य दुकाने, नाश्ता केंद्रे, नारळपाणी, फळ विक्रेते तसेच लॉजिंग व्यवसायिकांकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. या अडथळ्यामुळे खासगी पार्किंग परिसरातील शेकडो व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “व्यवसाय ठप्प झाला आहे, कर्जाचे हप्ते कसे भरायचे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा?” असा प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक पोलिस प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही वरिष्ठांच्या आदेशानुसार बॅरिकेट्स लावले आहेत असे उत्तर मिळत असल्याचा आरोप व्यवसायिकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
रक्तदान हे मानवी जीवनातील सर्वश्रेष्ठ असे कर्तव्य असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा या रक्तदान शिबिरामधील सहभाग समाजाला दिशादर्शक ठरणारा आहे, असे प्रतिपादन न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांनी केले. न्यू आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमधील रसायसनशास्त्र विभाग आणि जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर व थॅलेसेमिया तपासणी शिबीर पार पडले. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील तसेच इतर विद्याशाखेतील पदवी, पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्राचार्य सागडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विज्ञान शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. अनिल आठरे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय कळमकर, प्रबंधक बबनराव साबळे, रसायनशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्रा. सुषमा दरे, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. वसंत झेंडे, थॅलेसेमिया आजाराबाबत समाजामध्ये जनजागृती मोहिम राबविणारे डॉ. गौरव पठाडे, डॉ. अॅड. अंजली केवळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रसायनशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख प्रा. सुषमा दरे यांनी महाविद्यालयात उच्च शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य रुजली जावीत या हेतूने अशा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन विभागामार्फत नेहमीच करण्यात येत असल्याचे सांगितले. या रक्तदान शिबिरास अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव अॅड. विश्वासरावजी आठरे, सहसचिव मुकेश मुळे, खजिनदार अॅड. दीपलक्ष्मी म्हसे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आभार शिबिराचे समन्वयक प्रा. अविनाश करंडे यांनी केले. महाविदयालयातील रसायनशास्त्र विभागातील तसेच इतर विदयाशाखेतील पदवी, पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांनी तसेच महाविदयालयातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी रक्तदान शिबीरामध्ये उत्स्फुत सहभाग नोंदविला.
अमेरिका-इराण युद्धाची गॅसपासून सुरु झालेली टंचाईची झळ आता पेट्रोल-डिझेलपर्यंत येऊन पोहचली आहे. १६ दिवसांपासून घरगुती गॅससाठी रांगेत असलेले ग्राहक बुधवारी शहरातील विविध पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल घेण्यासाठी रांगेत उभे होते. इंधन संपण्याच्या भीतीने ग्राहकांनी सकाळपासूनच पंपांसमोर रांगा लावल्या. दुपारनंतर मात्र शहरातील बहुतांशी पेट्रोल पंपांवर पेट्रोल संपल्याचे फलके लावण्यात आली होती. युद्धामुळे पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, या धास्तीने मंगळवारी रात्रीपासून ग्राहकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करण्यास सुरुवात केली होती. बुधवारी सकाळपासून पंपांवर एकच झुंबड उडाली. प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर -पुणे रस्त्यावरील पेट्रोल पंपांवर ग्राहकांनी गर्दी केली. त्यामुळे या रस्त्यावरील पंपावर दुपारनंतर पेट्रोल नसल्याचे फलके लावण्यात आली. त्याचबरोबर तपोवन रोड नवनागापूर, कल्याण रोड, सर्जेपुरा, उपनगरातील सावेडी, केडगाव, भिंगार, बोल्हेगाव परिसरातील पेट्रोल पंपांवर देखील ग्राहक पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी रांगेत होते. उद्या पेट्रोल मिळेल की नाही या शंकेनेच झाली गर्दी पेट्रोल-डिझेल संपणार असल्याची चर्चा सुरु झाल्यानंतर ग्राहक पंपांवर गर्दी करू लागले होते. उद्या पेट्रोल मिळेल की नाही? या शंकेने ग्राहकांनी क्षमतेपेक्षा अधिक पेट्रोल-डिझेल आपल्या वाहनांमध्ये भरून घेतले. त्याचा परिणाम २४ तासाला एका पेट्रोलपंपावर लागणारे इंधन ८ ते ९ तासांतच संपले. त्यामुळे शहरातील पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा जाणवत होता. निम्या पंपावर तुटवडा ^ जिल्ह्यात सुमारे ४०० पंपांपैकी निम्म्या पंपांवर इंधन तुटवडा निर्माण झाला. या तुटवड्यामागे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑईल) दरात झालेली वाढ हे प्रमुख कारण मानले जात आहे. वाढत्या खरेदीदारांमुळे विद्यमान दरात इंधन विक्री करणे तेल कंपन्यांना परवडत नसल्याची स्थिती आहे. त्याचवेळी सरकारकडून इंधन दरवाढीवर नियंत्रण असल्याने कंपन्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. या परिस्थितीचा परिणाम म्हणून इंधन वितरणात कंपन्यांकडून अनियमितता दिसून येत आहे. - डॉ. स्वाधिन गाडेकर, अध्यक्ष अहिल्यानगर, जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशन. अफवांवर विश्वास ठेऊ नये शहरासह जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे ग्राहकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. पेट्रोल-डिझेल पुरेसे असल्यामुळे ग्राहकांनी गर्दी करण्याची आवश्यकता नाही, असा दावा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी दिव्य मराठी'शी बोलताना केला आहे.
नामपूरमधील बसस्थानक ते शिवमनगर रस्त्याची दूरवस्था:पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांतर्फे आंदोलनाचा इशारा
शहरातील सर्वाधिक वर्दळीचा राज्यमार्ग असलेल्या येथील मध्यवर्ती बसस्थानक ते शिवमनगरपर्यंतच्या एक किलोमीटरच्या रस्त्यावर तुंबलेले पाणी, रस्त्यावरून उडून गेलेले डांबर, जागोजागी खोलखोल खड्डे, दुभाजकांची झालेली दूरवस्था आदी बाबींमुळे रस्ता जीवघेणा बनला आहे. गेल्या वर्षभरापासून सातत्याने तक्रारी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेल्या एक वर्षापासून नामपूर परिसरात चिराई ते नामपूर, नामपूर ते वडनेर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम जोमाने सुरू असून, ते अंतिम टप्प्यात आहे. नामपूर बसस्थानक ते लखमापूर या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम मात्र संथगतीने सुरू आहे. नामपूर बसस्थानकापासून हॉटेल ललकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवेशद्वार, पेट्रोलपंपाजवळ, तुळजाई ट्रेडर्स, वंदे मातरम् पॉईंट, जिल्हा परिषदेच्या शाळेचे प्रवेशद्वार, आदिवासी वस्तीपर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. रस्त्यालगत जिल्हा परिषदेच्या शाळेतील लहान मुले ये-जा करत असतात. रस्त्याची दुरुस्ती न केल्यास मालेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा नारायण सावंत, चारुदत्त खैरनार, सचिन अहिरराव, सुनील निकुंभ, योगेश जगताप आदींनी दिला आहे.
वाढत्या कर्करोगाच्या धोक्याला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, या मोहिमेंतर्गत सटाणा ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी ‘एचपीव्ही” लस विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप भगत यांनी केले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पहिल्या टप्प्यात १४ वर्षे पूर्ण झालेल्या, परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलींना ही लस दिली जात आहे. ही लस भविष्यात होणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका ९० ते १०० टक्क्यांपर्यंत कमी करण्यास प्रभावी ठरते. हे लसीकरण पूर्णतः ऐच्छिक असून, त्यासाठी पालकांची संमती अनिवार्य आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून, काही मुलींना लसीकरणानंतर हलका ताप किंवा टोचलेल्या जागी सूज येऊ शकते; मात्र ही लक्षणे २ ते ३ दिवसांत आपोआप कमी होतात. यासाठी ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांचे पथकही तैनात करण्यात आले आहे. गर्भाशयमुखाचा कर्करोग हा महिलांमधील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. वेळेत लसीकरण केल्यास हा धोका टाळता येतो. त्यामुळे नागरिकांनी आपल्या १४ वर्षांच्या मुलींचे लसीकरण करून त्यांना सुरक्षित भवितव्य द्यावे, असे आवाहन डॉ. संदीप भगत यांनी केले. या मोहिमेत “गार्डासिल-४” या लसीचा केवळ एक डोस (०.५ मिली) दिला जात आहे. ही लस डाव्या हाताच्या दंडातील स्नायूमध्ये दिली जाते. लसीकरणाची नोंदणी केंद्र सरकारच्या पोर्टलवर डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असून, लाभार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्रही दिले जाईल.
भारतीय समाजात चिकित्सा करणे, प्रश्न विचारणे हे पाप ठरवले आहे. संशोधकीय दृष्टिकोनाचा अभाव असल्याने सामाजिक फसवणुकीचे गुन्हे घडत असून त्यात वाढ होत आहे, असे मत डॉ. प्रतिभा अहिरे यांनी व्यक्त केले. शिवाजी महाविद्यालयात सोशल सायन्स क्लबच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘सामाजिक संशोधन पद्धती आणि आजचा समाज’ या विषयावर डॉ. अहिरे यांनी मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, मानवाने आज विविध क्षेत्रांत जी प्रगती साध्य केली आहे, त्यामागे मानवाची चिकित्सक, संशोधक वृत्ती आहे. प्रश्न विचारण्यातून शोधाला प्रारंभ होतो. त्यातून संशोधनाला चालना मिळते. भारतीय समाजात ही संशोधकीय वृत्ती विकसित करण्यासाठी धर्म, समाज यांचा अडथळा आहे. वर्तमान शिक्षण पद्धतीतही संशोधनाला फाटा देण्यात येत आहे. संशोधक वृत्तीचा समाज निर्माण झाल्यास सामाजिक आणि असामाजिक यातील फरक समजण्यास मदत होते. वैज्ञानिक दृष्टिकोनाअभावी नाशिक येथील कॅप्टन खरात महिला, राजकारण्यांचे सहज शोषण करू शकला. डोळे झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून सत्य स्वीकारणारा समाज निर्माण करण्यासाठी सामाजिक संशोधन पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे. संशोधनाच्या पायऱ्या, त्याचे हेतू, निष्कर्ष यासह विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रकल्प सिद्ध करावे, असे आवाहनही त्यांनी केले. अध्यक्षस्थानी डॉ. रणजित पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून जलतज्ज्ञ डॉ. संजय भालेराव, प्रा. के. एल. भानुसे, डॉ. अलका गडकरी, डॉ. सीमा काशीद, डॉ. सीताराम मोगल, डॉ. पी. बी. महाजन, प्रा. सुनील गोरडे, प्रा. सोमेश मोगरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमास अभिषेक जंजाळ, जयकुमार कदम, रोशन राठोड , साक्षी धनेधर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पूजा चव्हाण यांनी तर रवीना चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ..तर प्रगतीची गती वाढेल सोशल सायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. बी. जी. देशमुख यांनी केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांत संशोधन, चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी सोशल सायन्स क्लब कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक, प्रशासकीय अशा सर्वच क्षेत्रांत सामाजिक संशोधन पद्धती अप्लाय केली तर प्रगतीची गती वाढल्याशिवाय राहणार नाही. समाजाच्या उपयोगाचे संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे.
रामनवमी उत्सवानिमित्त शहरापासून जवळच असलेल्या हिवरखेडा (गौताळा) शिवारातील श्री नित्यानंद धाम संस्थान येथील श्रीराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ८ ते १०:३० पर्यंत सुंदर कांड, सकाळी ११ ते १२:३० अभिषेक, पूजा, महाआरती व महाप्रसाद भंडारा होणार आहे. सायंकाळी रतलाम (मध्य प्रदेश) येथील राधेशाम पाटीदार व भजनी मंडळाकडून सुंदरकांड व भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंढरीनाथ काळे | फुलंब्री लोहगड नांद्रा येथे वनवासाच्या काळात सीतामाता या डोंगरावर राहिल्या असून त्यांनी येथेच लव-कुशांना जन्म दिल्यामुळे या डोंगराचे नाव लहूगड पडले असल्याची आख्यायिका सांगितली जात आहे. येथे राम, सीता, लक्ष्मण व लव-कुश हे वास्तव्यास असल्याच्या खुणा असल्याची माहिती दादा महाराज बारबैले यांनी दिली आहे. लोहगड नांद्रा गडावरील स्वयंभू रामेश्वर महादेव मंदिर आहे. हेच लव-कुश यांचे जन्मस्थळ असून नांद्रा गावाजवळ लोहगड नावाचा मोठा डोंगर आहे. प्रभू रामचंद्राने बांधलेले हे स्वयंभू महादेव मंदिर असल्याने या मंदिराला रामेश्वर नाव पडल्याची आख्यायिका सांगितली जाते. राम वनवासातून परतल्यावर सीतेचे रावणाने अपहरण केले. अनेक दिवस ती दुष्ट रावणाच्या लंकेत राहिली. नंतर शंका-कुशंकांमुळे रामाने सीतेला वनवास दिला. याच डोंगरावर महर्षींचा आश्रम होता. या आश्रमात सीतामातेने लव-कुश यांना जन्म दिल्याचे सांगितले जाते. प्रतिनिधी | पैठण/फुलंब्री रामनवमीनिमित्ताने आज, गुरुवारी (दि. २६) ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरांत भक्तिमय वातावरण तयार झाले आहे. पैठणला सायंकाळी ५ वाजता शोभायात्रा काढली जाणार आहे. फुलंब्री तालुक्यातील लोहगडनांद्रा येथे राम, सीता, लक्ष्मण व लव-अंकुश हे वास्तव्यास असल्याची आख्यायिका सांगितली जात असून येथे महिला लव-अंकुशचे पाळणे गाणार आहेत. पैठणला काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी पैठणमध्ये सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रामनवमी निमित्ताने सकाळपासूनच भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी होणार आहे. राम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शोभायात्रेदरम्यान विविध देखावे, ढोल-ताशा पथके, भजन मंडळे यांचे आकर्षण असणार आहे. शोभायात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. पोलिस प्रशासनाकडूनही बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. रामभक्तांमध्ये शोभायात्रेबद्दल विशेष उत्साह असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याचे नीलेश परदेशी यांनी सांगितले. शहरातील खंडोबा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत ही शोभायात्रा दोन तास चालली. सीतामाता येथे अंघोळ करायची म्हणून सीतामाता न्हाणी म्हणूनही येथील जागा ओळखली जाते. तसेच लव-कुश खेळणारी जागा इथे बघायला मिळते. तसेच लक्ष्मणाने बाण मारून तयार केलेले पाण्याचे कोरीव दगडी हौद आजही तसेच असून तेथे बाराही महिने पाणी असते. रामनवमीनिमित्त लोहगड नांद्रा येथील रामेश्वर मंदिरात सकाळी विधिवत पूजा करण्यात येणार असून येथे लव-कुश यांचे महिलांच्या वतीने पाळणे गायले जाणार आहेत. तसेच दुपारी बारा वाजता रामेश्वर महादेव मंदिरात महाभिषेक तसेच महाआरती करण्यात येणार आहे. सकाळी पूजा, दुपारी आरती
खंडाळ्यात इंधन तुटवड्याची अफवा:पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या रांगा
पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याच्या अफवांमुळे वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील पेट्रोल पंपांवर दुचाकी, कार, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. तर, इंधनाचा तुटवडा ही केवळ अफवा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. पेट्रोलचा पुरवठा सुरळीत असल्याचेही सांगितले. अफवांवर विश्वास ठेवू नये, अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन करण्यात आले. पंपांवर गर्दी वाढल्याने खंडाळ्यात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे दिसते. तरीही नागरिक जास्त प्रमाणात वाहनांमध्ये इंधन साठवून ठेवत आहेत. बुधवारी शेतकऱ्यांसह इतर वाहनधारकांनी डिझेल अधिक प्रमाणात खरेदी केल्याने आमच्या पंपावरील डिझेल दुपारनंतर संपले होते. डिझेल भरण्यासाठी टँकर पाठवले होते, अशी माहिती धन्वंतरी पेट्रोल पंपावरील कर्मचारी सचिन बागूल यांनी दिली. अफवेमुळे खरेदी वाढली : अजित पेट्रोल पंपाचे मालक जयेश पालेजा यांनी सांगितले, “पेट्रोल व डिझेल खरेदीसाठी नागरिकांची दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. सध्या कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. अफवेमुळे गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत आहे.”
पिंपळदरी परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचा उन्हाळी मिरची लागवडीकडे कल दिसत आहे. गेल्या वर्षी मिरचीला रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. भावही कमी मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. ही निराशा झटकून यंदा चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकरी पाण्याच्या उपलब्धतेनुसार मिरची लागवड करत आहेत. सिल्लोड तालुक्यातील आनाड, बाळापूर, पिंपळदरी, गोळेगाव, धोत्रा, पानवडोद, शिवणा, पानस, डिग्रस, सराटी, बोदवड, लिहाखेडी, खंडाळा, वसई, जळकी, अंभई, उंडणगाव भागांत मान्सूनपूर्व मिरची लागवडीसाठी शेतकरी सरसावले आहेत. परिसरात एप्रिलअखेर व मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर मान्सूनपूर्व मिरचीची लागवड होते. या पिकासाठी शेतकरी पाणी राखून ठेवतात. हवामान खात्याने यंदा अधिक पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावर्षी इतर पिकांना योग्य भाव मिळाला नाही. तरीही शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पादन कायम ठेवले आहे. गतवर्षीची भरपाई यावेळी होईल, असे शेतकऱ्यांना वाटते. मल्चिंग पेपर अंथरून मिरचीची लागवड केली जाते. त्यामुळे खर्च वाढतो. नांगरणी, रोटावेटरपासून मिरची निघेपर्यंत एका एकराला ९० हजार रुपये ते एक लाख रुपये खर्च लागतो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून मिरचीला मोठ्या प्रमाणात पाणी द्यावे लागते. ऊन जास्त असल्याने मिरचीवर थ्रिप्स आजार येण्याची शक्यता असते. त्यामुळे औषधांची फवारणी करावी लागते. सिल्लोड तालुक्यात शिवणा येथे मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. दरवर्षी येथून पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, दिल्ली, मुंबई, मध्यप्रदेश, पुणे, अमरावती, नागपूर, कानपूर, छत्तीसगड, जबलपूर, रायपूर, गजरात, अहमदाबाद, छत्रपती संभाजीनगर यासह इतर राज्यात विक्री साठी पाठवली जाते. ^पिंपळदरी येथील शेतकरी मिरची लागवड मल्चिंगवरती करतात. यावर्षी एप्रिल ते मे दरम्यान लागवड केलेल्या मिरची पिकाला जून ते जुलै दरम्यान सुरुवातीला चांगला भाव मिळेल या अशेवर दहा हजार रोपे मिरची लागवड करणार आहे. -विष्ण दौड, शेतकरी, पिंपळदरी चांगला भाव मिळण्याची आशा
बोरगाव बाजार येथे झाले विविध प्रमाणपत्रांचे वाटप
सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत विशेष शिबिर मंगळवारी आयोजित करण्यात आले होते. महसूल विभागाच्या महत्त्वाच्या १५ सेवा एकाच छताखाली, थेट घरपोच मिळाव्यात. यासाठी राज्य सरकारतर्फे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान सुरू करण्यात आले असल्याचे सिल्लोड तहसीलदार संजय देवराय यांनी सांगितले. प्रलंबित फेरफार, भोगवटदार वर्ग २ जमीन वर्ग १ मध्ये घेण्याकरिता, तसेच मृत शेतकऱ्याच्या जमिनी त्यांच्या वारसांच्या नावे नोंदी घेण्याकरिता शेतकऱ्यांनी आवश्यक दस्तऐवज मंडळ अधिकारी यांच्याकडे जमा करावेत, अशा सूचना तहसीलदारांनी या वेळी केल्या. सोनाप्पावाडी जि. प. शाळेतील जवाहर नवोदय प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. बोरगाव बाजार परिसरातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. रहिवासी, अधिवास, नॉन क्रीमी लेअर, जातीचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड अशी विविध प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. या वेळी नायब तहसीलदार तुकाराम बनकर, सरपंच सय्यद सत्तार, अर्जुन गाढे, केशवराव तायडे, अंबादास शिंदे, दत्ता चव्हाण, रब्बानी शेख, लक्ष्मण साखरे, श्याम अधिकार, काशीनाथ गोरे, श्रावण शिंदे, दिगंबर टाकसाळे हजर होते. गावच्या पहिल्या महिला पोलिसाचा सन्मान अपर्णा नंदू चव्हाण यांची धुळे पोलिस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाली असून त्यांचा जाहीर सत्कार या वेळी तहसीलदार संजय देवराय यांच्या हस्ते करण्यात आला. बोरगाव बाजार गावातून पहिल्या महिला पोलिस कॉन्स्टेबल होण्याचा मान अपर्णा चव्हाण यांनी मिळवला. गावातून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांचा सन्मान गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
प्रलंबित महसूल प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी प्रशासन अधिक गतिमान झाले आहे, असे प्रतिपादन तहसीलदार सुनील सावंत यांनी केले आहे. लासूरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांना १५०० महसुली सेवांचा लाभ मिळाला आहे. लासूर गाव महसूल मंडळातील शेतकरी तसेच लाभार्थी नागरिकांना मंगळवारी (२४ मार्च) श्रीदेवी दाक्षायणी मंदिरातील लॉन्सवर वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत ५४ फेरफार निकाली काढण्यात आले. ७/१२ दुरुस्तीसाठी स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची संख्या २८ होती. अभियानांतर्गत ४६२ डिजिटल सातबारा उपलब्ध करून देण्यात आले. ८-अ उताऱ्यांची संख्या ४०२ होती. अभियानातून ११२ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. अभियानांतर्गत एक खिडकी योजनेत ४७२ विविध महसूल प्रकरणे निकाली काढण्यात आली. दरम्यान, शिबिरस्थळी गावकऱ्यांना १५ पेक्षा जास्त महसुली सेवांचा एका रांगेत लावण्यात आलेल्या टेबलद्वारे लाभ मिळाला आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्या संगीताताई सुभाष तांबे, पंचायत समिती सदस्या अर्चनाताई अप्पासाहेब शेलार, राहुल शेळके, बाजार समितीचे संचालक रितेश मनोत, नायब तहसीलदार कुमावत, काकडे, सहायक गटविकास अधिकारी जायभाये, विस्तार अधिकारी राठोड आदींची उपस्थिती होती. नागरिकांच्या प्रलंबित महसूल प्रकरणांचा तत्काळ निपटारा करून प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्यावर या महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत भर देण्यात येत असल्याचे तहसीलदार सुनील सावंत यांनी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे शेतकरी, महिला, विद्यार्थी व गरजू लाभार्थींच्या अडचणी थेट शिबिरातच सोडवण्याचा हा लोकाभिमुख उपक्रम ठरत असल्याचेही सावंत यांनी सांगितले. रंजित देशमुख, पोलिस पाटील बाबासाहेब हरिचंद्रे, देवी दाक्षायणी मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे, ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक मंडळ अधिकारी रिता पुरी यांनी केले. आभारप्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी नानासाहेब राहिंज यांनी केले. शेतकरी, महिला, विद्यार्थी यांना मिळतोय दिलासा नागरिकांच्या प्रलंबित महसूल प्रकरणांचा तत्काळ निपटारा करून प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्यावर या महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत भर देण्यात येत असल्याचे तहसीलदार सुनील सावंत यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शेतकरी, महिला, विद्यार्थी व गरजू लाभार्थींच्या अडचणी सुटत असल्याचे सावंत यांनी सांगितले.
शहरातील चिकलठाणा, जाफर गेट आणि शहानूरमियाँ दर्गा (पीर बाजार) येथील ऐतिहासिक आठवडी बाजार कायमचे बंद करण्याची घोषणा केली आहे. महापालिका स्थापनेपूर्वीपासून सुरू असलेले हे बाजार बंद करण्यामागे वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि पसरणारी अस्वच्छता ही मुख्य कारणे असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. या बाजारांमध्ये दर आठवड्याला २५ ते ५० लाखांची उलाढाल होते. मात्र यामुळे रस्ते अडवले जात असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. रस्त्यावरील बाजार बंद करून हे विक्रेते आता मनपाच्या अधिकृत भाजी मंडईंमध्ये स्थलांतरित केले जातील. अस्तित्वात असलेल्या मंडईंची डागडुजी करून तिथे नवीन गाळे उभारले जातील. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा ३ हजार २२३ कोटी ९० लाख रुपयांचा ४६ वा मूळ अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्याकडे आयुक्त जी. श्रीकांत यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात ४७ लाख १५ हजार रुपयांची शिल्लक दर्शवण्यात आली असून प्रामुख्याने तंत्रज्ञान आणि नागरिकाभिमुख सुविधांवर भर देण्यात आला आहे. अर्थसंकल्पात सध्या मनपा भाडे आधारित कर पद्धतीने मालमत्ता कर आकारते. यामध्ये बदल करून रेडीरेकनरचा आधार घेऊन भांडवली मूल्य आधारित करप्रणालीचा अवलंब करण्याचा प्रस्ताव पुढील वर्षांसाठी ठेवण्यात आला आहे. ४३४.६८ कोटी रुपये शहरांतील नवीन विकासकामांसाठी केले जाणार खर्च करवसुलीमध्ये १८ ते ३० टक्क्यांपर्यत वाढ होणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले. यासोबतच मनपा प्रशासनात पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर आणि घरबसल्या सेवा देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. ६३६ कोटींच्या एकूण कामांपैकी ४३४.६८ कोटी रुपये शहरांतील नवीन विकासकामांसाठी प्रस्तावित आहेत. तृतीयपंथीयांच्या कौशल्य विकासासाठी पहिल्यांदाच २० लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. याप्रसंगी स्थायी समितीचे सर्व सदस्य, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. या अर्थसंकल्पाची तयारी मागील दीड महिन्यांपासून सुरू होती. २९ कर्मचारी काम करत होती. सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प २०४७ डोळ्यासमोर ठेवून विकासाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. शहर विकासाच्या दृष्टीने वाटचाल करण्याचा अर्थसंकल्प आहे. पहिल्या १० स्वच्छ शहरांत येण्यासाठी या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. यातून शहराचा सर्वांगीण विकास करता येईल. -समीर राजूरकर, महापौर. डीपी रस्त्यासाठी निधी देणार मनपाने डीपी रस्त्यावरील अतिक्रमण काढले. मात्र रस्त्यासाठी निधीची शासनाकडे मागणी करावी लागत आहे. त्यामुळे डीपी रस्त्याच्या विकासासाठी नवीन लेखाशीर्ष तयार करण्यात आले असून त्यासाठी २० कोटींची तरतूद आहे. २०० कोटींच्या ग्रीन बाँडचा प्रस्ताव जलनिस्सारणासाठी मनपाचा हिस्सा भरावा लागणार आहे. यामुळे कर्ज न काढता २०० कोटी रुपयांचे ग्रीन बाँड काढण्यात येणार आहे. हे ग्रीन बाँड जारी केल्यास भारत सरकारकडून २० कोटी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून मिळेल. १० ईव्ही चार्जिंग स्टेशन इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे १० ठिकाणी ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार आहेत. यामध्ये घरगुती व पार्किंग क्षेत्रासाठी स्लो चार्जिंग, व चार्जिंग स्टेशनवर फास्ट चार्जिंग स्टेशन उभारणी करण्यात येणार आहे. विभागीय आपत्कालीन केंद्र अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापन विभागासाठी १६ कोटी ७१ लाखांची तरतूद केली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन केंद्र उभारणी, मनपा इमारतीसाठी अग्निरोधक उपकरणे लावण्यात येणार आहेत. आरोग्य विभाग एन-११ च्या रुग्णालयात आयुष अंतर्गत पंचकर्म, आयुर्वेद, योगा निसर्गोपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मनपा रुग्णालयात हाडांची ठिसूळता तपासणीसाठी मशीन खरेदी करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण विभाग मनपाच्या शाळांमध्ये अतिरिक्त खोली बांधकाम व क्रीडा पायाभूत सुविधांसाठी ५ कोटींची तरतूद केली आहे. मनपा शाळेत विदेशी भाषा शिकवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना एआय व रोबोटिक्स शिक्षण देण्यात येणार आहे. पहिल्यांदाच रेडीरेकनरनुसार कर आकारणी भाडेमूल्य दरानुसार मालमत्ता कर आकाराला जात आहे. सध्या घरगुतीसाठी १९ रुपये प्रति स्क्वेअर मीटर तर व्यावसायिकसाठी ४७ रुपये प्रति स्क्वेअर मीटरप्रमाणे दर आकारला जात आहे. नवीन प्रस्तावानुसार प्रत्येक भागाच्या रेडीरेकनर दरानुसार मालमत्ता कर आकाराला जाणार आहे. यामध्ये प्रत्येक भागासाठी वेगवेगळे दर असणार आहेत. मॅपिंग आणि दरनिश्चितीची प्रक्रिया करण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत होतील बदल अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला आहे. यावर ३० मार्च रोजी स्थायी समिती सदस्यांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बजेटमध्ये सदस्यांसाठी २५ लाख रुपये निधी देण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, तर सदस्यांनी सुचवलेली काही कामे यात समाविष्ट करण्यात येतील. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येऊ शकतो. शहरात एक प्रभाग एक उद्यान उद्यानाच्या विकासासाठी शहरात एक प्रभाग एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉटनिकल गार्डन, सिद्धार्थ उद्यान याचा विकास करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष प्राधिकरणाला ५ कोटींचा निधी देणार आहे. स्वच्छ शहरांत येण्यासाठी तरतूद देशातील पहिल्या दहा स्वच्छ शहरांत येण्यासाठी मनपा प्रयत्नशील आहे. यासाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. शहराचा विकास करण्यासाठी टॅक्स वाढ आणि वसुली गरजेची आहे. त्यावर भर देण्यात येणार आहे. -जी. श्रीकांत, महापालिका आयुक्त . नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी मनपाने ८२२ कोटींचे कर्ज घेतले आहे. योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच शहरात पाणी येईल. यामुळे नळाला आता स्मार्ट वॉटर मीटर लावले जाणार आहेत. कर्जाची परतफेड वेळेवर करण्यासाठी व योजना ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालवण्यासाठी पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याबाबतही आयुक्त श्रीकांत यांनी अर्थसंकल्पात शिफारस केली आहे. शहर विकासाचा अर्थसंकल्प सादर शहराला आणि स्थायी समितीला अपेक्षित असलेला विकासाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यावर आम्ही स्थायी समितीमध्ये सर्वजण चर्चा करून काही बदल असल्यास ते करून सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवणार आहोत. -अनिल मकरिये, सभापती, स्थायी समिती. क्रीडा विभाग क्रीडा विभागाला मनपाने ६१.२० कोटी एवढी तरतूद केली आहे. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज महानगरपालिका क्रीडांगण येथे ५० कोटी खर्च करून आंतराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारण्यात येणार आहे. पाणीपुरवठ्यातून उत्पन्न नो नेटवर्क भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाने खासगी एजन्सीकडून टँकर लावलेले आहेत. या माध्यमातून ८ कोटी रुपये उत्पन्न कमावण्याचा महापालिकेचा मानस आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात लॉकडाऊन लागण्याच्या अफवेने नागरिक आणि वाहनधारकांमध्ये घबराट पसरली आहे. या भीतीपोटी सकाळपासूनच शहरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. एकाच वेळी सर्वांनी टाक्या फुल्ल करून घेण्याचा सपाटा लावल्याने शहरातील ४८ पैकी ८ हून अधिक पेट्लो पंप ड्राय झाले होते. तर रात्री ११ वाजेपर्यंत शहरातील बहुतांश पेट्रोल पंपावरील इंधन साठा पेट्रोल पंपांवरील साठा संपला होता. दरम्यान, एकाच दिवशी १० लाख लिटर पेट्रोल-डिझेलची विक्री झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली. शहरात पेट्रोल आणि डिझेलचा १९ लाख लिटरची क्षमत आहे. दररोज १२ लाख लिटर इंधन शहरात येत असून पुरवठ्यात कोणतीही अडचण नाही. नागरिकांनी पॅनिक बुकिंग करू नये आणि आवश्यकतेपेक्षा जास्त इंधन भरून घेऊ नये.” सोबतच १२ हजार सिलिंडरचा पुरवठा होत असताना मागणी मात्र ६० हजारांवर पोहोचली आहे. ही अतिरिक्त मागणी केवळ भीतीपोटी होत असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रवीण फुलारी यांनी दिली. गॅस बुकिंगचा डोंगर जिल्ह्यात दररोज १९,१३० सिलिंडरचा पुरवठा होत असूनही बुकिंगचा आकडा तब्बल ६० हजारांच्या वर गेला आहे. लोकांच्या या पॅनिक बुकिंगमुळे यंत्रणेवर मोठा ताण येत असून गरजेनुसार गॅस उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या इंधन गोंधळाचा फटका पाणीपुरवठ्यालाही बसला आहे. बीड बायपास परिसरात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, डिझेल न मिळाल्याने अनेक टँकरच्या फेऱ्या विस्कळीत झाल्या. अफवांचा फटका आणि रोख व्यवहारांचा नियम राज ऑटो पेट्रोल पंपचे प्रमुख हेमंत खिंवसरा यांच्या मते, इंधनाचा तुटवडा नाही, तर अफवेमुळे लोक टाक्या फुल्ल करून घेत आहेत. तसेच पूर्वी तेल कंपन्या पंपचालकांना ५ दिवसांच्या क्रेडिटवर इंधन पुरवत असत, मात्र आता केवळ आगाऊ पैसे भरल्यावरच टँकर मिळत असल्याने काही पंपांवर तांत्रिक अडचण निर्माण होत आहे.
सोन्याचे दर 3,811 रुपयांनी,चांदी 9,270 रुपये महागली:सलग दुसऱ्या दिवशीही सराफा बाजारामध्ये तेजी
जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि मध्य पूर्वेतील इराण-इस्रायल संघर्षाचा परिणाम सुवर्ण बाजारावर दिसून आला आहे. बुधवारी वायदे बाजारात सोन्याच्या दरात तब्बल ३८११ रुपयांची वाढ होऊन भाव प्रति १० ग्रॅम १,५०,३८० लाख रुपये झाला, तर चांदीमध्ये तब्बल ९२७० रुपयांची वाढ झाली. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीला पसंती दिली आहे. बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सोने व चांदीच्या दरात तेजी दिसून आली. मंगळवारी १,४६,५६९ रुपये असणारे सोने बुधवारी १,५०,३८० रुपये झाले तर चांदी २,४१,०२० रुपयांवरून थेट २,५०,२९० रुपये प्रति किलो झाली. बाजारात सध्या तेजी असली तरी संस्थात्मक गुंतवणूकदार नफ्यासाठी विक्री करत आहेत. त्यामुळे या धातूत घसरण सुरू होती. परंतु व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केल्यामुळे दरवाढीला अधिक गती मिळाली आहे. नजीकच्या काळात सोन्याचे भाव उच्चांकी स्थिर राहू शकतात. जागतिक घडामोडींनुसार चढ-उतार अपेक्षित आहेत.
शहरवासीयांसाठी एलपीजीच्या तुलनेत पंधरा टक्के स्वस्त मिळणारा वायूस्वरूपातील पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस (पीएनजी) चार वर्षांनंतरही बहुतांश स्वयंपाकघरात पोहोचला नाही. पंच्याहत्तर हजार जोडण्यांची तयारी केली असताना प्रत्यक्षात केवळ दीड हजार घरांपर्यंत गॅसचा पुरवठा सुरू झाला आहे. वाळूज महानगर, बीड बायपाससह काही भागांत २० हजार जोडण्या कार्यान्वित झाल्या तरी नागरिकांमध्ये अनास्था दिसून येते. केवळ अकराशे रुपये भरून शेगडी चालू करता येते. एलपीजी एजन्सीसमोर तासन््तास रांगा लावण्यापेक्षा पीएनजीकडे वळताना नागरिक मागे हटत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहराच्या वितरणाची जबाबदारी असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडने (बीपीसीएल) आतापर्यंत ७५ हजार नागरिकांना कनेक्शन दिले आहे. शहरात किमान एक लाख कुटुंबांपर्यंत पीएनजी पोहोचवण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. जानेवारी २०२२ रोजी या योजनेचे भूमिपूजन झाले होते. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून शहरात भूमिगत पाइपलाइनद्वारे गॅस आणण्याच्या साडेतीन हजार कोटी रुपयांच्या मेगा प्रोजेक्टचा शुभारंभ केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते पार पडला. पहिल्या टप्प्यात २५ हजार कुटुंबांना जोडण्या देण्याचे ठरले होते. तरी आगामी २०२३ च्या दिवाळीपूर्वी एक लाख कनेक्शन देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पीएनजी गॅसची वैशिष्ट्ये जितके वापराल तितकेच बिल येते – मीटरवर आकारणी. दोन महिन्यांतून एकदा बिल भरावे लागते. गॅस वायुरूपात असल्याने गळती झाल्यास तत्काळ हवेत विरघळतो. धोका राहत नाही. एलपीजीच्या तुलनेत १५ टक्के स्वस्त. सिलिंडर ऑर्डरचा त्रास नाही. विजेसारखा २४ तास उपलब्ध. केवळ १,१०० रुपयांमध्ये जोडणी सुरू पाइपलाइनची रचना अशी ईस्ट - वेस्ट कोस्ट जोडणारी मुख्य पाइपलाइन अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरसाठी श्रीगोंदा येथे टॅपिंग पॉइंट दिला आहे. पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून पीएनजी आणला जातो. सिटी गॅस डिस्ट्रिब्युशनद्वारे शहरात वितरण होते. दोन्ही जिल्ह्यांसाठी बीपीसीएल ही नोडल कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. घरात प्रत्यक्ष जीआय पाइपद्वारे गॅसपुरवठा केला जातो. व्यास ९० मिमी, ६० मिमी आणि ३२ मिमी असलेल्या पाइपलाइनमधून घरगुती पुरवठा होतो. ५०० रुपयांत नोंदणी, दोन महिन्यांनंतर बिल प्रत्येकी पाचशे रुपये नोंदणी शुल्क व सुरक्षा अनामत रक्कम भरावी लागते. याशिवाय इतर शुल्कात सवलत देण्यात आली आहे. दोन महिन्यांनंतर वापरलेल्या गॅसप्रमाणे बिल येते. घरांना जोडण्या दिल्या तेव्हा नागरिकांनी लेखी संमती दिली होती. आतापर्यंत किमान २० हजार घरांना गॅसपुरवठ्याची तरतूद झाली आहे. मात्र, केवळ दीड हजार ग्राहकांनी प्रत्यक्ष वापर सुरू केला आहे, असे बीपीसीएल अभियांत्रिकी विभागाचे सहायक प्रबंधक सचिन सोळुंके यांनी सांगितले. एलपीजीचे सिलिंडर जमा करण्याची भीती कारणीभूत पीएनजी कनेक्शन घेतल्यानंतर एलपीजी सिलिंडरही स्वतंत्र शेगडीवर वापरता येतात. मात्र एकदा पीएनजी घेतल्यास एलपीजी सिलिंडर जमा करावा लागेल, अशी खात्रीलायक भीती नागरिकांमध्ये आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमांनुसार पीएनजी असलेल्या घरांना अनुदानित एलपीजी मिळणार नाही. गॅस खंडित झाल्यास पर्याय म्हणून सिलिंडर मिळणार नाही, अशी शंका आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परिषदेने वर्षातून दोन वेळा परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. दुसरी परीक्षा २१ जून रोजी होणार आहे. यासाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया २७ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत असणार आहे.गेल्या वर्षीपासून शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. पदोन्नतीदेखील होणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. सेवानिवृत्तीस आलेले शिक्षक वगळता सर्वांना पात्रता परीक्षा द्यावी लागेल, असेही जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये आदेशानंतरची पहिली पात्रता परीक्षा झाली. शिक्षकांना दोन वर्षांत परीक्षा पात्र व्हावे लागणार आहे. त्यामुळे वर्षातून दोन वेळा परीक्षेचे नियोजन करण्यात येईल, असे परिषदेने जाहीर केले होते. असे असेल वेळापत्रकऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्क भरणे - २७ मार्च ते १६ एप्रिल प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढणे - ९ ते २१ जूनशिक्षक पात्रता परीक्षा २१ जून - पेपर एक - १०.३० ते १पेपर दोन २.३० ते ४.३०. उमेदवारांच्या संख्येत वाढ शिक्षक पात्रता परीक्षा वर्षातून दोन वेळा केल्याने आणि शिक्षकांना अनिवार्य केल्याने परीक्षेच्या संख्येत वाढ झाली. राज्यातून दीड ते दोन लाख उमेदवार परीक्षा देत होते. ही संख्या नोव्हेंबरमध्ये अडीच ते तीन लाख झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये १८ हजार जण होते. ही संख्या मागील परीक्षेत २२ हजारपर्यंत गेली.
राज्यातील सुमारे दीड ते दोन लाख गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी अधिकाराचा गैरवापर करून हडप करणाऱ्या महसूल विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर अखेर राज्य सरकारने बडगा उगारला आहे. या घोटाळ्यात सामील असलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना १५ दिवसांच्या ‘सक्तीच्या रजे’ ची शिक्षा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधान परिषदेत जाहीर केली. नाशिक विभागीय आयुक्तांचा सविस्तर अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही महसूल मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. आमदार अनिल परब यांनी १८ मार्च २०२६ रोजी लक्षवेधी सूचनेद्वारे हा गंभीर प्रकार सभागृहाच्या निदर्शनास आणला होता. महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमताने शेतकऱ्यांच्या मालकी हक्कात परस्पर बदल केल्याचा आरोप त्यांनी केला होता. अहवालानंतर बडतर्फीची टांगती तलवार येणार या प्रकरणांचे अ, ब आणि क अशा तीन गटांत वर्गीकरण केले आहे. ‘अ’ गटातील १३ प्रकरणे अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, यात सामील असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत आहे. नाशिक विभागीय आयुक्तांच्या अहवालानुसार त्यांच्यावर पुढील फौजदारी किंवा प्रशासकीय कारवाई निश्चित होईल.
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटावर कब्जा घेण्याच्या मोहीमेत शरद पवारांचे नातू रोहित पवार पुन्हा सक्रिय झाले आहेत. सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्राचा संदर्भ देत त्यांनी नवा आरोप केला आहे. पत्रात म्हटले होते की, २८ जानेवारी २०२६ नंतरचा कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये. रोहित यांचे म्हणणे आहे की, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरेंनी पक्षावर कब्जा घेऊ नये म्हणून सुनेत्रा काकींनी ते पत्र दिले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना तटकरे म्हणाले की, रोहित यांनी कट कारस्थाने थांबवावीत. अन्यथा आम्हाला तोंड उघडावे लागेल. रोहित म्हणाले की, पक्ष ताब्यात आला की, दिल्लीतील भाजप नेत्यांशी स्वतःच्या सोयीनुसार चर्चा करणे आणि ईडीसारख्या कारवायांपासून स्वतःचा बचाव करणे, असा त्यांचा ‘गेम’ होता. म्हणून काकींनी पक्षाची सूत्रे स्वतःच्या हातात घेऊन या नेत्यांना बाजूला सारले आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. तटकरेंत माझे नाव घेऊन बोलण्याची हिंमत नाही, म्हणूनच ते हवेत गोळ्या मारत आहेत. त्यावर तटकरेंनी सांगितले की, तटकरे म्हणाले की, अजित पवारांच्या निधनानंतर पक्ष हायजॅक करण्याचे आणि विलीनीकरणाचे जे मनसुबे आखले गेले, ते आम्ही यशस्वी होऊ दिले नाहीत. दादांच्या अपघातापासून ते पोस्टमार्टमपर्यंत नक्की काय काय घडलं, याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे आता तरी ही कटकारस्थानं थांबवा, अन्यथा मला अनेक बाबी जाहीरपणे स्पष्ट कराव्या लागतील. रोहित यांनी प्रचंड खर्च करून काढलेला त्यांचा महाराष्ट्र दौरा पूर्णपणे ‘फ्लॉप शो’ ठरला आहे. हा वाद सुरू राहणार आहे गेल्या पावणेदोन महिन्यात रोहित पवार सातत्याने पटेल, तटकरेंवर आरोप करत आहेत. त्यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या मदतीने एफआयआरही दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा होईपर्यंत वाद सुरूच राहिल. आणि येत्या काही महिन्यात अशी चर्चा होण्याची शक्यता कमी आहे, असा जाणकारांचा अंदाज आहे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन:इतिहास संशोधनातील ऋषीचुल्य व्यक्तिमत्व हरपले
शिवकालीन आणि मराठा इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर फुफ्फुसाच्या संसर्गामुळे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि मुली असा परिवार आहे. सांगली जिल्ह्यातील 'तडसर' हे डॉ. पवार यांचे मूळ गाव. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जयसिंगरावांच्या शिक्षणाची दिशा राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथे बदलली. प्रारंभी अर्थशास्त्र विषयात रस नसतानाही त्यांनी नंतर इतिहासाची वाट धरली आणि शिवाजी विद्यापीठातून एम.ए. परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या वसतिगृहांमुळेच आपण शिकू शकलो, ही कृतज्ञतेची भावना त्यांच्या मनात कायम होती. 'पंचगंगा तिरी' या त्यांच्या आत्मचरित्रातून त्यांचा हा जीवनप्रवास उलगडला आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई आणि महाराणी येसूबाई यांच्या जीवनावरील अनेक अज्ञात साधने त्यांनी प्रकाशात आणली. करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी यांचे चरित्र लेखून त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची जगाला ओळख करून दिली. तसेच, दादोजी कोंडदेव यांच्या संदर्भातील त्यांची ऐतिहासिक मांडणी ही संशोधक म्हणून त्यांची विशेष ओळख ठरली. पवारांना हे मिळाले पुरस्कार आयुष्यभर शाहू विचारांनी झपाटलेल्या डॉ. पवार यांना त्यांच्या कार्यासाठी 21 हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्तेही त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता.
अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान देशात इंधनटंचाई होणार असल्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची गर्दी होत असून मोठ्या रांगा लागत आहेत. छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, कोल्हापूर, जालना, नाशिक, पुण्यासह विविध शहरात हेच चित्र दिसत आहे, ज्यामुळे मागणी व पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेत कोल्हापुरात दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त २०० रुपयांपर्यंत आणि तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त २००० रुपयांपर्यंतच इंधन भरता येईल, असे निर्देश कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.हा निर्णय ३१ मार्चपर्यंत असणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात ‘वाहनधारकांना इंधन भरण्यासंबंधित संयमाचे आवाहनही करण्यात आले आहे. अफवांना बळी पडून वाहनांत जास्तीचे इंधन भरू नका : प्रशासन छत्रपती संभाजीनगरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशात तसेच आपल्या शहरातही इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलची कमतरता नाही. पेट्रोल पंपांना पुरवठा करणाऱ्या टर्मिनल्सवरही पुरेसा साठा उपलब्ध आहे. तरीही काहीजण केवळ अफवांना बळी पडून साठा करण्याच्या प्रयत्नात आहेत. वाहनांमध्ये जास्तीचे इंधन भरू नये, असे आवाहन केले. गरजेपेक्षा जास्त इंधन भरणा, पंपांवर लोड इंधनटंचाईच्या धास्तीने वाहनधारक गरजेपेक्षा जास्त इंधन भरत आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपांवरही याचा अधिकचा भार पडत आहे. अनेक ठिकाणी खासगी किंवा लहान पेट्रोल पंपांचा इंधनसाठा तर अशा गर्दीमुळे वेळेआधीच संपत आहे. त्यामुळेही पंपचालक आणि वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
महाराष्ट्र विधानसभेने बुधवारी भारतीय न्याय संहिता विधेयक २०२६ एकमताने मंजूर केले. या विधेयकाद्वारे शक्ती विधेयकात अशा तरतुदींचा समावेश केला जाईल. त्यामुळे ॲसिड हल्ल्यातील पीडितांची ओळख संरक्षित केली जाईल आणि डिजिटल लैंगिक छेडछाडीसाठी तुरुंगवासाची तरतूद सुनिश्चित केली जाईल. शक्ती विधेयक २०२० मध्ये राज्य विधानमंडळाने मंजूर करून राष्ट्रपतींच्या संमतीसाठी केंद्राकडे पाठवले होते. तेव्हा भारतीय दंड संहिता (आयपीसी), फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी), लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यातील तरतुदी एकत्र करून केंद्र असा एक कायदा करत असल्याची माहिती राज्याला दिली होती. राष्ट्रपतींनी ते विधेयक परत पाठवले होते. राज्यासंदर्भात भारतीय न्याय संहितेत सुधारणांची आवश्यकता आहे का, समिती स्थापन केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या विधेयकात तीन वर्ष शिक्षेसह दंड प्रस्तावित गुन्ह्याची व्याप्ती : पूर्वी केवळ शारीरिक छळ किंवा प्रत्यक्ष विनयभंगावर लक्ष केंद्रित होते, मात्र आता टेलिफोन, ईमेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मानसिक आणि डिजिटल छळालाही ‘लैंगिक छळ’ विनयभंग श्रेणीत आणून त्याचे गांभीर्य वाढले आहे. विधेयक २०२६ मध्ये तीन वर्षे शिक्षेसह दंड प्रस्तावित आहेत.
मुंढवा जमीन घोटाळा:खासदार पार्थ पवारांना क्लीन चिट!, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी चौकशी अहवाल
पुण्याजवळील मुंढवा येथील १८८० कोटींची सरकारी जमीन ३०० कोटी रुपयांत खरेदी प्रकरणात खासदार पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. या जमिनीच्या मालकी हक्कामध्ये खरेदीदारांच्या नावाची नोंद नाही. ताबाही हस्तांतरण झाला नाही. या जमिनीचा मालकी हक्क शासनाचा आहे, असे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल सरकारला प्राप्त झाला असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सभागृहात विधिमंडळाच्या पटलावर ठेवला. महसूल विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अहवालातील मुख्य निष्कर्ष१. पार्थ यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा एकही पुरावा आढळलेला नाही. २. तक्रारदारांचे दावे केवळ ऐकीव माहितीवर आधारित असून, त्याबाबत कोणतेही ठोस तांत्रिक किंवा कायदेशीर दस्तऐवज सादर करता आले नाहीत. चौकशी समितीसमोर १४ प्रत्यक्ष सुनावण्या झाल्या. लेखी म्हणणे पक्षकार व साक्षीदार २७ होते. तपासलेले तांत्रिक दस्तऐवज १५० पेक्षा जास्त आहेत. अहवाल ४३९२ पानांचा आहे.
अजित पवारांच्या अपघातप्रकरणी कर्नाटक सरकारने दाखल केलेला झीरो एफआयआर पूर्णपणे बेकायदेशीर असून ही केवळ महाराष्ट्राची मानहानी करण्यासाठी केलेली खेळी आहे,” अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. या प्रकरणाचा तपास नियमानुसार महाराष्ट्रातच होईल. अजित पवारांचा कुणी घातपात केला असेल तर त्याला खणून काढू, असेही ते म्हणाले. रोहित पवारांनी केलेल्या अनेक आरोपांवर तपासातून काय निष्पन्न झाले, याची माहिती त्यांनी दिली. विधानसभेत फडणवीस म्हणाले की, अपघातानंतर एडीआर दाखल होतो आणि चौकशीनंतर त्याचे रूपांतर एफआयआरमध्ये होते. ही कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे. मात्र, कर्नाटकने हस्तक्षेप करून झीरो एफआयआर दाखल केला. जो मुळात त्यांच्या अधिकारक्षेत्रात येतच नाही. जेव्हा पीडित व्यक्ती संबंधित पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोहोचण्याच्या परिस्थितीत नसते, तेव्हाच झीरो एफआयआर दाखल होतो. या प्रकरणात तशी कोणतीही स्थिती नव्हती. रोहित यांच्या आरोपांना अप्रत्यक्षपणे खोडले रोहित पवारांचा एक आरोप असा होता की, वैमानिक बदलामागे काहीतरी कट होता. मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकातील एफआयआरच्या निमित्ताने तो खोडला. ते म्हणाले की, २७ जानेवारी रोजी कॅप्टन राहुल ओबेरॉय, दिलीप सिंह यांची नियुक्ती होती. मात्र, ओबेरॉय यांचे पोट खराब असल्याने रात्री ११:५४ वाजता सुमीत कपूर, शांभवी पाठक यांची नियुक्ती झाली. व्हिसेरा आणि रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल, अमली पदार्थ किंवा कोणत्याही विषाचा अंश आढळलेला नाही. विमानाच्या राखेत स्फोटकांचे अंशही मिळालेले नाहीत. विमानाची शेवटची तपासणी २३ मार्च २०२५ रोजी झाली होती. सीबीआय चौकशीसाठी अमित शाह यांना भेटणार अजित पवार अपघात प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे. विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन अमित शाह यांची भेट घेणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
लॉजिस्टिक व्यवसायात प्रगती करण्यासाठी ‘अवतार पूजा’ आणि ‘परिसाची शक्ती’ मिळवून देण्याचे आमिष दाखवून भोंदू अशोक खरातने पुण्याचे व्यावसायिक राजेंद्र जासूद यांना २०१८ ते २५ कालावधीत तब्बल ५ कोटी रुपयांचा गंडा घातला. “पूजा केली नाही तर नागदेवता दंश करेल. त्यात तुमचा मृत्यू होईल,” अशी भीती दाखवून खरातने जासूद यांच्याकडून ९० लाखांची मर्सिडीज कार (एमएच १५ जीएल ८१८१) आणि अमेरिकेतील उपचारांचा खर्चही उकळला. याप्रकरणी बुधवारी (२५ मार्च) सरकारवाडा पोलिस ठाण्यात खरातविरुद्ध एकुणात नववा गुन्हा दाखल झाला. परिसाची शक्ती मिळवण्यासाठी त्याने जासूद यांना म्यानमार ते ग्रीनलँड अशा २१ देशांत फिरायला भाग पाडले. “मला स्वर्गातून बोलावणे आले आहे” असे सांगून जमिनीवर झोपून मरणाचे नाटक केले. जासूद यांना उपचारापोटी सुमारे ३० लाख रुपये खर्च करायला लावले. दरम्यान, खरातशी लागेबांधे असलेले उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांची मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातून महसूलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीची अशोक खरातच्या मुलीसोबत भागीदारी नाशिकच्या पाथर्डी शिवारातील अंदाजे १ एकर जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर भांडे पाटील यांच्या पत्नी प्रीती भांडे पाटील आणि अशोक खरातची मुलगी तृप्तबाला खरात यांची नावे ‘संयुक्त मालकीदार’ म्हणून आढळली आहेत. केवळ जमीनच नव्हे, तर काही स्टार्टअप्स आणि रिअल इस्टेट फर्म्समध्येही दोन्ही कुटुंबांचे व्यावसायिक हितसंबंध असल्याचे तपासात समोर आले आहे. अशोक खरातशी संबंधित एसआरए प्रकल्पांमधील वादग्रस्त फायली आणि निर्णयांमध्ये भांडे पाटील यांची भूमिका संशयास्पद आढळल्याने प्रशासनाने हा पवित्रा घेतला आहे. ‘ब्रह्मसदन’वर एसआयटीची धडक; मध्यरात्रीपर्यंत मिरगावात तपासणी खरातच्या पापकर्मांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) कंबर कसली आहे. मंगळवारी रात्री उशिरा पथकाने मिरगाव (ता. सिन्नर) येथील ईशान्येश्वर मंदिर परिसरातील त्याच्या ब्रह्मसदन या आलिशान बंगल्याची झडती घेतली. यापूर्वी पोलिसांनी याच बंगल्याची झडती घेतली असता, तेथे एक रिव्हॉल्व्हर, २१ जिवंत आणि ५ वापरलेली काडतुसे जप्त करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर एसआयटीने बंगल्याची रचना, तेथील गुपिते आणि संशयास्पद हालचालींची माहिती गोळा करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत तपासणी केली. तपासणीत पथकाच्या हाती नेमकी काय माहिती लागली, याबाबत अद्याप गुप्तता पाळण्यात आली आहे. खरातवर सरकारी कृपेचा वर्षाव; मंदिरासाठी १.०५ कोटींचा निधी सिन्नर| खरातच्या मिरगाव (ता. सिन्नर) येथील साम्राज्यावर शासनाची मेहेरनजर होती. त्याच्या श्री सिद्धक्षेत्र ईशान्येश्वर देवस्थानच्या विकासासाठी पर्यटन विभागाने तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. पहिल्या टप्प्यात २५ लाख रुपयांचा निधी वितरितही झाला होता. तत्कालीन पर्यटनमंत्र्यांच्या कार्यकाळात ३१ मार्च २०१८ रोजी या विकास आराखड्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता. या निधीतून सभामंडप: ३६.२० लाख रुपये ,भक्तनिवास: १२.५३ लाख रुपये, ‘माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी महादेवाचा अवतार आहे’ असे भासवून भोंदू अशोक खरात याने एका अल्पवयीन मुलीवरही अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी आणि “तन-मन शांती’साठी विशिष्ट पूजा करण्याच्या बहाण्याने त्याने हे कृत्य केले. याप्रकरणी अहिल्यानगर येथील पीडितेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात मंगळवारीच (२५ मार्च) तक्रार दाखल केली असून पोलिस तपासात ही भयंकर बाब पुढे आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी धर्मांतरितांसंबंधीचा महत्त्वाचा निर्णय दिला. हिंदू, शीख आणि बौद्ध धर्माशी संबंधित व्यक्तींनाच अनुसूचित जातीचा दर्जा मिळू शकतो असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. जर कोणी ख्रिश्चन किंवा अन्य कोणत्या धर्मात धर्मांतर केले तर त्या व्यक्तीचा अनुसूचित जातीचा दर्जा रद्द होईल असा निर्णय न्या. पी. के. मिश्रा आणि न्या. एम. व्ही. अंजारिया यांच्या […] The post …तर ‘एससी’दर्जा रद्द! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तंत्रज्ञान माहिती देईल; पण अनुभवाचे बोल फक्त शिक्षकच देऊ शकतात
लातूर : प्रतिनिधी तंत्रज्ञान आणि मानवी अनुभव यातील फरक अधोरेखित केला आहे. एक मिनिटाच्या रिल्समध्ये शिक्षण आणि माहिती देणा-या अनेक लिंक येतात. चॅट जीपीटी विचारलेली माहिती नक्कीच देते, पण अनुभवाचे बोल, जगाशी लढण्यासाठी लागणारी ताकद फक्त शिक्षकच देऊ शकतात. जबाबदारीचा भार कमी करण्याचे काम शिक्षकांमुळे शक्य होऊ शकते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांनी […] The post तंत्रज्ञान माहिती देईल; पण अनुभवाचे बोल फक्त शिक्षकच देऊ शकतात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रामेश्वर येथे प्रभू श्रीराम जन्मसोहळा
लातूर : प्रतिनिधी भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान, त्याग आणि समर्पणाचे मूर्तीमंत प्रतीक, समस्त भारतीयांचे श्रध्दास्थान असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मसोहळ्याच्या निमित्ताने सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले भारतीय संस्कृती दर्शन ‘श्रीराम’ रथ यात्रा उत्सव आणि ह.भ.प. हरिहर महाराज दिवेगावकर यांचा कीर्तन सोहळा लातूर तालुक्यातील रामेश्वर (रूई) येथे २६ मार्च गुरुवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास […] The post रामेश्वर येथे प्रभू श्रीराम जन्मसोहळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नरेंद्र गिरवलकर यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान
लातूर : प्रतिनिधी तुळजापूर-लिंगायत महासंघाच्या धाराशिव शाखेच्या वतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा. सुदर्शनराव बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. २२ मार्च रोजी तुळजापूर येथे पार पडलेल्या लिंगायत समाज अधिवेशनामध्ये भातांगळी ता.जि. लातुरचे सुपुत्र लालबहादूर शास्त्री माध्यमिक वचन माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य नरेंद्र सोमनाथ आप्पा गिरवलकर यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा […] The post नरेंद्र गिरवलकर यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

33 C