ब्राह्मण समाजाने समाजकारणासोबतच सक्रिय राजकारणात उतरावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या ब्राह्मण नगरसेवकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. सकल ब्राह्मण समाज, पुणे शहर यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस राजेश पांडे, कर्हाडे ब्राह्मण संघाच्या अध्यक्षा मुक्ता चांदोरकर आणि समन्वयक भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वजीत देशपांडे यांनी केले. पुणे महानगरपालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवक पुनित जोशी, कुणाल टिळक, स्वरदा बापट, मंजुश्री खर्डेकर, मिताली सावळेकर, ज्योत्स्ना कुलकर्णी, निवेदिता एकबोटे आणि पिंपरी-चिंचवडमधील मंदार देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. धीरज घाटे आणि मानसी देशपांडे काही कारणास्तव अनुपस्थित होते. भांडारी पुढे म्हणाले की, समाजातून पुढे आलेल्या नेतृत्वाचा गौरव करणे म्हणजे समाजाच्या संघटनशक्तीचा गौरव आहे. राजकारणाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. सुसंस्कृत आणि सक्षम नेते तयार होण्यासाठी ब्राह्मण समाजाने सक्रियपणे राजकारणात यावे. आपल्या संघटनकौशल्यासोबतच बुद्धी, चिकाटी आणि प्रामाणिकपणाचा प्रत्यय समाजाने द्यावा. सामाजिक कार्यात सक्रियपणे काम करणारे तरुण कार्यकर्ते राजकारणात येत आहेत, ही आनंदाची बाब आहे. यावेळी भालचंद्र कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या मांडल्या. यामध्ये पुण्यात भव्य परशुराम भवन निर्माण करणे, पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देणे, दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करणे तसेच शनिवारवाडा आणि पर्वती देवस्थानचे नूतनीकरण करणे यांचा समावेश आहे. या मागण्यांसाठी राज्य सरकार आणि पुणे महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. सकल ब्राह्मण समाजाच्या व्यासपीठाखाली पुणे शहरातील ३० ब्राह्मण संस्था आणि संघटना एकत्रितपणे विविध कार्यक्रम राबवतात, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. सकल ब्राह्मण समाज समितीमध्ये आम्ही सारे ब्राह्मण, अ. भा. ब्राह्मण महासंघ, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्र, परशुराम हिंदू सेवा संघ, ब्राह्मण जागृती सेवा संघ, महाराष्ट्र चित्पावन संघ, चित्पावन अस्तित्व संस्था, देशस्थ ऋग्वेदी शिक्षणोत्तेजक संस्था, याज्ञवल्क्य आश्रम, कर्हाडे ब्राह्मण संघ, महाराष्ट्र ब्राह्मण सभा, कृष्ण यजुर्वेदी तैतरीय संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन मध्यवर्ती ब्राह्मण मंडळ, पुणे, विप्र फौंडेशन, सर्वशाखीय ब्राह्मण महासंघ, पौरोहित्य पुरोहित फौंडेशन, गौड सारस्वत ब्राह्मण संघ अशा सुमारे ३० ब्राह्मण संस्था, संघटना सदस्य आहेत.
राज्यातील 15 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस होता. या प्रक्रियेनंतर आता निवडणुकीच्या रिंगणातील अंतिम लढतींचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले असून, राजकीय आखाड्यात खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडणार आहे. अर्ज माघारीच्या मुदतीनंतर आता प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या उमेदवारांची यादी निश्चित झाली असून, सर्वच पक्षांनी आपापल्या बालेकिल्ल्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महायुतीने कोकणात जोरदार मुसंडी मारत विजयाचे खाते उघडले आहे. तळकोकणात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तब्बल 21 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातील महाड पंचायत समितीच्या सवाने धामणे गणातून महायुतीचे अनिल जाधव यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. अशाप्रकारे महायुतीचे एकूण 22 उमेदवार निवडणूक लढवण्यापूर्वीच विजयी झाले असून, या यशामुळे सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत भाजपचे 19 तर शिवसेना शिंदे गटाचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. जिल्हा परिषद मध्ये खारेपाटण जिल्हा परिषद उमेदवार प्राची इस्वालकर, बांदा जिल्हा परिषद उमेदवार प्रमोद कामत, पडेल जिल्हा परिषद उमेदवार सुयोगी घाडी, बापर्डे जिल्हा परिषद उमेदवार अवनी तेली, कोळपे जिल्हा परिषद उमेदवार प्रमोद रावराणे, किंजवडे जिल्हा परिषद उमेदवार सावी लोके या भाजपकडून बिनविरोध झाल्या आहेत. तर, जाणवली जिल्हा परिषद उमेदवार रुहिता तांबे या शिंदेंच्या शिवसेना उमेदवारही बिनविरोध निवडून आल्या आहेत. तसेच पंचायत समितीमध्ये भाजपचे बिडवाडी पंचायत समिती संजना राणे, वरवडे पंचायत समिती सोनू सावंत, कोकीसरे पंचायत समिती साधना नकाशे, पडेल पंचायत समिती अंकुश ठूकरूल, नाडण पंचायत समिती गणेश राणे, बापर्डे पंचायत समिती संजना लाड, नाटळ पंचायत समिती सायली कृपाळ, नांदगाव पंचायत समिती हर्षदा वाळके, शिरगाव पंचायत समिती शीतल तावडे, फणसगाव पंचायत समिती समृद्धी चव्हाण, जाणवली पंचायत समिती महेश्वरी चव्हाण, आडवली मालडी पंचायत समिती सीमा परुळेकर, आसोली पंचायत समिती संकेत धुरी हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. ठाकरे गटाच्या उमेदवारांची माघार आणि शिंदे गट बिनविरोध तर दोडामार्ग तालुक्यातील कोळझर पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार गणेशप्रसाद गवस यांची बिनविरोध निवड झाली आहे. या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रवीण परब यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गवस यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. गणेशप्रसाद गवस हे सध्या शिंदे गटाचे दोडामार्ग तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत असून, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मिळालेल्या या यशामुळे कोळझरमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला आहे. रायगडमध्ये शिंदे गटाची पहिली उमेदवारी बिनविरोध रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महाडमधून शिवसेना शिंदे गटासाठी विजयाचे शुभ संकेत मिळाले असून, सवाने धामणे पंचायत समिती गणातून अनिल जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्याने जाधव यांचा विजय सुकर झाला. या यशामुळे शिंदे गटाने रायगडमध्ये विजयाचे खाते उघडले असून, मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी शिवसैनिकांना पेढे भरवून या विजयाचा जल्लोष साजरा केला.
शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत वाद आता चांगलेच वाढत जात असल्याचे दिसत आहे. भाजपचे नेते व मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद वाढत जात आहे. भाजपच्या वरिष्ठांनी जर परवानगी दिली तर यांचे नामोनिशाण मिटवून टाकू, असे नाईक यांनी म्हटले आहे. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या गणेश नाईक यांना आवरा अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे. तसेच शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच, आम्हीही उत्तर द्यायला सज्ज आहोत, असेही म्हस्के यांनी म्हटले आहे. नरेश म्हस्के यांनी रवींद्र चव्हाण यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले, पत्रास कारण की, नवी मुंबईतील आपले ज्येष्ठ नेते गणेश नाईक साहेब यांनी आपले मित्र पक्ष असलेल्या राज्य आणि अनेक महानगरपालिका नगरपालिकांमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या, युती म्हणून लढून युती म्हणून जिंकून आलेल्या शिवसेनेला संपवण्याचा विडा उचलला आहे. एकेकाळी स्वतः शिवसैनिक असलेल्या गणेश नाईक साहेब यांनी आमचे प्रमुख नेते राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना अनेक वेळा डिवचून नवी मुंबईतून शिवसेनेला धोबीपछाड देण्याचे, टांगा पलटी करण्याचे आणि शिवसेनेला नवी मुंबईतून मुळातून संपवून टाकण्याचे स्पष्ट इरादे अनेक प्रसारमाध्यमातून जाहीर रित्या मांडले आहेत. आता तर त्यांनी जाहीरपणे, पक्षाने परवानगी दिली तर शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकू, असे बेताल वक्तव्य केले आहे. पुढे नरेश म्हस्के म्हणतात, मी तमाम शिवसैनिकांच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने आपल्याला विनंती करतो की त्यांच्या ह्या त्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच. आमची तयारी आहे. खरे म्हणजे, महाराष्ट्रात महा बिघाडीची सत्ता उलथवून टाकण्यात, भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय शिंदे साहेब या दोघांची मोठी भूमिका राहिली आहे. त्यानंतरच युतीचे सरकार महाराष्ट्रात येऊ शकले आणि आज कल्याण डोंबिवली ठाणे, मुंबई या ठिकाणी युती म्हणून लढत देऊन महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुकात आपण मोठे यश मिळवले आहे. या सर्व निर्णयांमध्ये आपली ही सक्रिय भूमिका राहिली आहे. सगळीकडे युती असताना युतीतल्या मोठ्या घटक पक्षाबद्दल असे विधान करणे म्हणजे आपल्या पक्ष नेतृत्वावरच अविश्वास दाखवण्यासारखे आहे. एखाद्या व्यक्तीवरचा राग समजू शकतो परंतु, त्यासाठी पक्ष, पक्षीय भूमिका, पक्षाचा अजेंडा या सगळ्या बाबी धुडकावून लावत गणेश नाईक साहेब आमचे नामोनिशाण मिटवण्याचे वक्तव्य करीत आहेत, असे नरेश म्हस्के म्हणाले. पुढे बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, आदरणीय मोदीजींच्या आणि आदरणीय अमितभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब दिवस रात्र काम करीत आहेत. काही बाबतीत विचार वेगळे असले तरी एक हिंदुत्ववादी, राष्ट्रीय विचारांचे स्थिर सरकार आपण त्यामुळेच देऊ शकलो आहोत. परंतु, त्यांना हे बघवत नसल्यानेच कदाचित ते अशी मागणी करत असावेत. धर्मवीर आनंद दिघे साहेब असताना गणेश नाईक साहेबांना शिवसेनेने कशी धोबीपछाड दिली होती ते त्यांनी एकदा आठवावे. किंबहुना आपण त्यांना त्याचे स्मरण करून द्यावे बाकी शिवसेना त्यांच्या प्रत्येक आव्हानाला उत्तर द्यायला सज्ज आहे आज नवी मुंबईत दहा जागाही शिवसेनेच्या निवडून येऊ शकत नाहीत अशा वल्गना करणाऱ्या गणेश नाईक साहेबांना आम्ही 42 जागा निवडून आणून दाखवले आहेत. कदाचित त्यामुळेच त्यांची अस्वस्थता वाढलेली असू शकते. दिवस रात्र लोकांच्यासाठी कार्यरत असणाऱ्या शिंदे साहेबांवर त्यामुळेच त्यांचा राग असू शकतो. तेव्हा त्यांच्या सर्व वक्तव्यांचा सखोल विचार करून त्यावर चिंतन करून आपण त्यांना शिवसेना संपवण्याची जबाबदारी देऊन टाकावीत ही नम्र विनंती. महा बिघाडीच्या सरकारने देवेंद्र फडणवीस साहेब गिरीश महाजन साहेब आणि अन्यही काही नेत्यांवर गंडांतर आणून त्यांच्यावर खोटे भ्रष्टाचाराचे आरोप लावण्याचा प्रयत्न केला. शिंदे साहेबांच्या उठावानंतर युतीचे सरकार आले आणि त्यामुळेच त्यांना चोख प्रत्युत्तर देता आले. दिल्लीत सत्ता स्थापन करतेवेळी जेव्हा शिवसेनेने घटक पक्षाची भूमिका सत्तेत स्वीकारली. त्यावेळी, आजही सरकारवर प्रश्नचिन्ह उभे राहिले तर शिवसेनेकडून त्याला धडाकेबाज उत्तर दिले जाते, सरकारच्या बाजूने विरोधी पक्षाने केलेल्या विरोधाचा फडशा पाडला जातो. दिल्लीत NDA घटक पक्ष म्हणून आणि महाराष्ट्रात युतीचे भागीदार म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी सत्तेत मोठ्या निर्णयात मोठ्या प्रकल्पांमध्ये खारीचा वाटा तरी उचलला आहे असे तुम्हाला वाटते का हो? आपल्या पक्षात पक्षश्रेष्ठीचा भंग करणारे नेते पक्षाची रचना आणि अध्यक्षांचे निर्णय याला न जुमानता मनमानी करत आहेत असे तुम्हाला वाटते का हो? असा सवाल नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. कधीकधी तर आम्हाला असे वाटते की शिंदे साहेबांपेक्षा गणेश नाईक साहेबांचा पक्ष नेतृत्वावरच अविश्वास आहे आणि त्यामुळेच ते असे बेताल वर्तन बेछुटपणे करू शकतात. त्यांच्या उचललेल्या प्रत्येक पावलाचा सखोल अभ्यास आणि चिंतन करून तुम्ही त्यांना पुढील जबाबदारी सोपवाल अशी अपेक्षा आहे. सदैव महायुतीचे हित जपणारा, पक्षादेश शिरसावंद्य मानून युती धर्मासाठी लढणारा एक सच्चा शिवसैनिक - नरेश म्हस्के, असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.
कर्तव्य पथवर प्रजासत्ताकदिनाची परेड उत्साहात
नवी दिल्ली/अमृतसर : आज देश ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. कर्तव्य पथावर संचलन झाले. ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेल्या इंटिग्रेटेड कमांडने प्रात्यक्षिक सादर केले. सुखोई-राफेलसह २९ विमाने सहभागी झाली. पॅराट्रूपर्स उतरले. सूर्यास्त्र, एमआय-१७ हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रध्वज फडकवला. यावेळी राष्ट्रगीत झाले. २१ तोफांची सलामी देण्यात आली. यानंतर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला […] The post कर्तव्य पथवर प्रजासत्ताकदिनाची परेड उत्साहात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिलेबीसाठी गावात लाठ्या-काठ्या घेऊन राडा
जहानाबाद : बिहारच्या जहानाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रजासत्ताक दिन सोहळ्यानंतर जिलेबीवरून मोठा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, थेट लाठ्या-काठ्या चालल्या आणि ४ गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. इतकेच नाही तर ज्या पंचायत भवनात हा कार्यक्रम सुरू होता, तिथल्या सरपंचाला पळून जाऊन आपला जीव वाचवावा लागला. काही लोकांनी जिलेबी चोरून नेण्याचा […] The post जिलेबीसाठी गावात लाठ्या-काठ्या घेऊन राडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी झालेल्या एका भीषण अपघातात सीआरपीएफ जवानासह चार जणांचा मृत्यू झाला. उधमपूर जिल्ह्यात एक बस आणि पिकअप ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सीआरपीएफच्या १३७ व्या बटालियनचे सेकंड-इन-कमांड करतार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ५२ व्या बटालियनच्या […] The post भीषण अपघातात जवानासह ४ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चंद्रपूर महापालिकेत अडीच वर्षांचा फॉर्म्युला:विजय वडेट्टीवार यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
चंद्रपूर महापालिकेतील महापौरपदाचा तिढा कायम असताना, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत अडीच वर्षांच्या महापौरपदाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महापौर भाजपचाच होईल, असा दावा केला आहे, तर वडेट्टीवार यांनी भेटीनंतर महापौर काँग्रेसचा होईल, असे म्हटले. सूत्रांनुसार, वडेट्टीवार यांनी पहिले अडीच वर्षे काँग्रेसचा महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष असावा, तर पुढील अडीच वर्षे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा महापौर असावा, अशी विनंती केली. तसेच, उबाठाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्याशी समन्वय साधून कारभार करण्याची ग्वाही दिली. चंद्रपूर महापालिकेत एकूण ६६ जागा आहेत. बहुमतासाठी ३४ नगरसेवकांची आवश्यकता आहे. सध्या भाजपचे २३ आणि शिंदे गटाचा १ असे २४ नगरसेवक आहेत, तर काँग्रेसचे २७ नगरसेवक आहेत. शिवसेना (उबाठा) ६, वंचित बहुजन आघाडी २ आणि २ अपक्ष असे एकूण १० नगरसेवक आहेत. भाजपला १० तर काँग्रेसला ७ नगरसेवकांची गरज आहे. यामुळे शिवसेना (उबाठा) गटाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. काँग्रेसला २७ जागा मिळाल्यानंतरही महापौरपदासाठी अंतर्गत कलह सुरू झाला होता. प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील वादामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना हस्तक्षेप करावा लागला. महापौर निवडण्याचे अधिकार धानोरकर यांना, तर स्थायी समिती सदस्य निवडण्याचे अधिकार वडेट्टीवार यांना देण्यात आले होते. गटनेता निवडण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्षांकडे आहे. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी भाजपचा दावा फेटाळून लावला. पहिली अडीच वर्षे आम्हाला मिळावीत, अशी आम्ही विनंती केली आहे. उद्धव ठाकरे स्थानिक जिल्हाप्रमुखांशी बोलून निर्णय देतील, असे वडेट्टीवार म्हणाले. ते पुढे म्हणाले की, महापौरपद कोणाला द्यायचे, याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतील. महाविकास आघाडीकडे महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती ही पदे राहिली पाहिजेत, यातून तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) यांच्या वतीने आयोजित १९ व्या ‘सिम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी’ (एसआयएटी २०२६) चे औपचारिक उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. देशातील वाहन उद्योगासाठी प्रमाणन, संशोधन व विकास क्षेत्रात एआरएआय अग्रगण्य भूमिका बजावते. हा आंतरराष्ट्रीय तांत्रिक परिसंवाद शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ पर्यंत मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (पीआयईसीसी) येथे आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन समारंभास टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड व टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा, फोर्स मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक व एआरएआय गव्हर्निंग कौन्सिलचे उपाध्यक्ष प्रसन फिरोदिया, एआरएआयचे संचालक व एसआयएटी २०२६ सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. रेजी मथाई, एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक व एसआयएटी २०२६ चे निमंत्रक डॉ. एन. एच. वाळके यांच्यासह अनेक मान्यवर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एआरएआयच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या १९ व्या एसआयएटीची मध्यवर्ती संकल्पना ‘इनोव्हेटिव्ह पाथवेज फॉर सेफ अँड सस्टेनेबल मोबिलिटी’ अशी आहे. सुरक्षित व शाश्वत गतिशीलतेसाठी नाविन्यपूर्ण उपायांवर जागतिक नेते, तंत्रज्ञ, संशोधक, धोरणकर्ते आणि नवोन्मेषक यांना एकत्र आणणे हा या परिसंवादाचा उद्देश आहे. यावेळी एआरएआयच्या वतीने ‘ग्लोबल ऑटोमोटिव्ह सेफ्टी रेग्युलेशन्स बुक’, ‘एसआयएटी २०२६ प्रोसिडिंग्ज’ आणि ‘टेक्निकल रेफरन्स बुलेटीन’ यांचे प्रकाशनही करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात एच. डी. कुमारस्वामी यांनी भारताच्या ऑटोमोटिव्ह परिसंस्थेमध्ये एआरएआयने दिलेल्या ६० वर्षांच्या योगदानाचे कौतुक केले. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, उत्पादन, निर्यात, संशोधन-विकास आणि सॉफ्टवेअर-आधारित गतिशीलता उपायांमध्ये वाहन उद्योगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. युरोपियन युनियनसोबत झालेल्या करारांमुळे भारतीय वाहन उद्योगाला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कॅपिटल गुड्स स्कीम, फेम योजना, पीएलआय योजना, पीएम ई-ड्राइव्ह योजना आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन यांद्वारे केंद्र सरकार शाश्वत व स्वच्छ गतिशीलतेला प्रोत्साहन देत असल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले. सार्वजनिक वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविणे व चार्जिंग पायाभूत सुविधा विस्तारण्यावर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शैलेश चंद्रा यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे ऑटोमोटिव्ह उद्योगात होत असलेल्या जागतिक बदलांवर प्रकाश टाकत, भारताच्या वाढत्या जागतिक स्थानाची माहिती दिली. शाश्वत विकास, ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञान आणि सहकार्याच्या माध्यमातून एसआयएटीने गेल्या अनेक दशकांपासून ज्ञानविनिमयाची प्रभावी भूमिका बजावल्याचे त्यांनी नमूद केले.
‘न्यू नॉर्मल’ला भारताचा ठाम नकार
नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. पाकिस्तानने नेहमीच विनाकारण कुरापती काढल्या असून, भारत आणि भारतीय जनतेला नुकसान पोहोचवणे हाच त्याचा एकमेव अजेंडा राहिला आहे अशी जोरदार टीका भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी केली. तसेच ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पर्वतानेनी हरीश यांनी पाकिस्तानचा […] The post ‘न्यू नॉर्मल’ला भारताचा ठाम नकार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईत आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा यशवंत संघर्ष सेनेचे अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे यांनी दिला आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. गट-तट विसरून सर्व समाजबांधव आझाद मैदानावर एकत्र येतील, असे कुऱ्हाडे म्हणाले. भाजपने २०१४ मध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचे वचन दिले होते. मात्र, त्यानंतर केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता येऊनही धनगर समाजाला फसवण्याचे काम झाल्याचा आरोप कुऱ्हाडे यांनी केला. कुऱ्हाडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीतील अनुक्रमांक ३६ संदर्भात निवेदन दिले. भारत सरकारच्या १९५० च्या संविधान (अनुसूचित जमाती) आदेशात किंवा त्यानंतरच्या कोणत्याही अधिकृत नोंदींमध्ये 'धनगड' नावाची कोणतीही जमात महाराष्ट्र किंवा भारतात अस्तित्वात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्यक्षात, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि शासकीय नोंदींमध्ये 'धनगर' हीच जमात सातत्याने आढळते. त्यामुळे, महाराष्ट्र शासनाने तात्काळ शासन आदेश काढून अनुसूचित जमातीच्या यादीतील अनुक्रमांक ३६ वरील 'धनगड' हा शब्द वगळून त्याऐवजी 'धनगर' असा स्पष्ट उल्लेख करावा, अशी त्यांची मागणी आहे. तसेच, 'धनगड' ही जमात अस्तित्वात नसून 'धनगर' हीच अनुसूचित जमातीच्या यादीतील अनुक्रमांक ३६ वर समाविष्ट असल्याचा मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात यावा. हा निर्णय राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे संविधानिक मान्यतेसाठी पाठवावा, अशीही मागणी करण्यात आली. सरकारने यापूर्वी समाजाची आंदोलने मोडून काढल्याने आता आक्रमक भूमिका घेणार असल्याचे कुऱ्हाडे यांनी सांगितले.
देशभरात ‘यूजीसी’ नवीन नियमांचा विरोध
नवी दिल्ली : देशभरात जनरल कॅटेगरीतील विद्यार्थी आणि सवर्ण जातीच्या लोकांचा विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) च्या नवीन नियमांना घेऊन विरोध तीव्र झाला आहे. नवी दिल्लीत यूजीसी मुख्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील लखनौ, रायबरेली, वाराणसी, मेरठ, प्रयागराज आणि सीतापूरमध्ये विद्यार्थी, तरुण आणि विविध संघटनांनी जागोजागी निदर्शनांमध्ये भाग घेतला. रायबरेलीमध्ये भाजप किसान नेते रमेश बहादूर […] The post देशभरात ‘यूजीसी’ नवीन नियमांचा विरोध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात राजस्थानच्या तरुणीची आत्महत्या:बालेवाडीत गळफास घेऊन जीवन संपवले, अकस्मात मृत्यूची नोंद
पुण्यात एका २० वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बालेवाडी परिसरात घडली आहे. दुर्गा घीसाराम चौधरी (वय २०) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी बालेवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुर्गा मूळची राजस्थानमधील पाली येथील रहिवासी होती. ती गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून पुण्यात तिच्या मामाकडे राहत होती. तिच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ती मामाच्या ओळखीने एका मेडिकलमध्ये काम करण्यासाठी पुण्यात आली होती. आज सकाळी ती राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच बालेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट पोलिसांना मिळालेली नाही. मात्र, मामा आणि मामी घरगुती कामावरून त्रास देत असल्याने दुर्गाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस या आरोपांची खातरजमा करत आहेत. मामाकडे याबाबत अधिक चौकशी केली जाणार आहे. चार वर्षांपूर्वी याच पद्धतीने बहिणीची आत्महत्या दुर्गा चौधरी ही तिच्या १९ वर्षीय भावासोबत बालेवाडी येथील मामाच्या टू बीएचके फ्लॅटमध्ये राहत होती. चार वर्षांपूर्वी तिची बहीण देखील मामाकडे राहण्यास आली होती. मात्र कोणत्यातरी कारणावरून तिने देखील याच पद्धतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता पुन्हा दुर्गा हिने आत्महत्या केल्याने तिच्या कुटुंबीयांनी मामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. बालेवाडी पोलीस याबाबत पुढील तपास करत आहे.
पुणे येथील सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (एसआययू) येथे रोटरी पीस सेंटरचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. हे केंद्र शांतता आणि विकास क्षेत्रातील नेतृत्वासाठी एक वर्षाचा पदव्युत्तर डिप्लोमा कार्यक्रम 'ब्लेंडेड लर्निंग' स्वरूपात राबवणार आहे. या कार्यक्रमासाठी अर्ज 1 फेब्रुवारी ते 15 मे 2026 दरम्यान खुले असतील. रोटरीच्या एसआययू येथील पीस सेंटरच्या सेंटर हेड डॉ. सुलक्षणा सेन यांनी या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, 'एसआययू येथील रोटरी पीस सेंटर व्यापक आशिया क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन स्थापन करण्यात आले आहे. येथे इंटर-डिसिप्लिनरी दृष्टिकोन आणि अनुभवाधारित शिक्षण यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.' हा कार्यक्रम शांतता आणि विकासाच्या विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या मिड-लेव्हल व्यावसायिकांना शिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा समतोल साधण्यास मदत करेल. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आशियातील सामाजिक परिवर्तनासाठी शाश्वत, परिणामकारक आणि कृतीयोग्य उपाययोजना विकसित करणे हा आहे. विशेषतः संघर्ष निवारण, शांतता प्रस्थापना, विकास धोरणे आणि नेतृत्व कौशल्ये या क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यावसायिकांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. सध्या रोटरी इंटरनॅशनल आपल्या आठ पीस सेंटर कार्यक्रमांद्वारे जगभरातील शांतता आणि विकास क्षेत्रातील उदयोन्मुख नेत्यांना दरवर्षी सुमारे 170 पूर्णतः वित्तपुरवठा केलेल्या फेलोशिप्स प्रदान करते. या फेलोशिप्समुळे निवड झालेल्या उमेदवारांना शिक्षण शुल्क, निवास, प्रवास आणि इतर आवश्यक खर्चासाठी आर्थिक सहाय्य मिळते. 2002 पासून आजपर्यंत रोटरी पीस सेंटर्सने 1,800 हून अधिक व्यक्तींना शांतता-निर्मिती क्षेत्रातील करिअरसाठी प्रशिक्षण दिले आहे. हे माजी विद्यार्थी आज शासकीय व अशासकीय संस्था, आंतरराष्ट्रीय संघटना तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नेतृत्वाच्या भूमिका बजावत असून, जागतिक शांतता आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. अधिक माहितीसाठी, rotary.org/peace-fellowships या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रिपब्लिकन पक्षाला पुण्यात उपमहापौर पद मिळावे:रामदास आठवले यांची मागणी; जानराव यांच्यावर कारवाई नाही
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पुणे महानगरपालिकेत रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद मिळावे, अशी ठाम भूमिका मांडली आहे. तसेच, पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जानराव यांच्याबाबत काही वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या बातम्या तथ्यहीन असल्याचे आठवले म्हणाले. मुंबई येथे रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनावणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, श्याम सदाफुले आणि माजी नगरसेवक जयदेव रंधवे आदी उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेत रिपब्लिकन पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. एक उमेदवार केवळ १३८ मतांनी पराभूत झाला, तर दोन उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. ही पक्षासाठी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी असल्याचे आठवले यांनी नमूद केले. मागील कार्यकाळाप्रमाणे यंदाही रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद मिळावे, यासाठी आपण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे दोन्ही नेत्यांनी मत व्यक्त केल्याचे आठवले यांनी सांगितले. दरम्यान, काही कार्यकर्त्यांनी बाळासाहेब जानराव यांच्याविरोधात खोटे आरोप करत वर्तमानपत्रांत बातम्या प्रसिद्ध केल्याबद्दल रामदास आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बाळासाहेब जानराव हे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाची शिस्त सर्वांनी पाळावी आणि कोणीही कार्यकर्त्यांची बदनामी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. रामदास आठवले यांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच निष्ठेने काम करून पुणे महानगरपालिकेत पक्षाचे नगरसेवक निवडून आणता आले, असे बाळासाहेब जानराव यांनी सांगितले. पक्षाला उपमहापौर पदासह इतरही जबाबदाऱ्या मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी शहराध्यक्ष संजय सोनावणे यांनी इशारा दिला की, शहरातील कोणत्याही ज्येष्ठ नेते किंवा कार्यकर्त्यांवर बिनबुडाचे आरोप करून वर्तमानपत्रे व समाजमाध्यमांवर बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
प्रजासत्ताक दिन म्हणजे संविधानाचा उत्सव. पण छत्रपती संभाजीनगरमधील बाळापूर गावाने लोकशाहीचा असा एक चेहरा पाहिला, जो काळजावर कायमचा कोरला जाईल. दरवर्षी ध्वजारोहणासाठी कोणीतरी 'मोठा' किंवा 'प्रतिष्ठित' माणूस शोधला जातो. पण यंदा सरपंच नीता सुनील गिऱ्हे यांनी काळजाला हात घालणारा एक असा निर्णय घेतला की, अख्ख्या गावाचे डोळे पाणावले आणि उपस्थितांची छाती अभिमानाने भरून आली. सरपंच नीता सुनील गिऱ्हे यांनी ध्वजारोहणाचा सर्वोच्च मान कुणा नेत्याला किंवा धनदांडग्याला नाही, तर गेल्या दोन दशकांपासून उन्हातान्हात गावचा कचरा आणि नाले उपसणाऱ्या शाहू महाराज आदमाने (ग्रामपंचायत कर्मचारी रामेश्वर आदमाने यांचे वडील) यांना दिला. ज्या हातांना समाजाने नेहमी 'स्वच्छते'च्या कामासाठी वापरले, त्याच हातांना आज गावाने कृतज्ञतेने 'सलामी' दिली! ती अस्वस्थ रात्र... आणि तो पांढरा शुभ्र वेश रविवारी रात्री जेव्हा शाहू आदमाने यांच्या कानावर हा निरोप गेला की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुमच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तेव्हा क्षणभर त्यांचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना. कदाचित कोणीतरी आपली थट्टा करतंय, असं त्यांना वाटलं. पण जेव्हा खात्री पटली, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहू लागलं. ज्या हातांना समाजाने नेहमी लांबून पाहिलं, ज्या हातांशी हस्तांदोलन करताना अनेकांनी संकोच केला, ते हात थेट देशाच्या अस्मितेचा प्रतीक असलेल्या तिरंग्याला स्पर्श करणार होते! 20 वर्षांच्या कष्टाचा मिळालेला पांढरा शुभ्र सन्मान एका बाजूला कृतज्ञतेचा भार आणि दुसऱ्या बाजूला आयुष्यातल्या सर्वात मोठ्या सोहळ्याची ओढ... आनंदाच्या भरात रात्री साडेनऊ वाजता त्यांनी दुकान गाठलं आणि आयुष्यभर मळक्या कपड्यात राबलेल्या त्या देहासाठी त्यांनी आयुष्यातला पहिला कोरा करकरीत, पांढरा शुभ्र पोशाख खरेदी केला. तो पोशाख केवळ कापड नव्हता, तर त्यांच्या 20 वर्षांच्या कष्टाचा मिळालेला पांढरा शुभ्र सन्मान होता. थरथरणारे हात आणि दाटलेला कंठ! सोमवारी सकाळी शाहू आदमाने सर्वात आधी ग्रामपंचायतीच्या अंगणात हजर झाले. जेव्हा त्यांच्या हातात तिरंग्याची दोरी देण्यात आली, तेव्हा त्यांचे हात स्पष्टपणे थरथरत होते. ती थरथर भीतीची नव्हती, तर ती 20 वर्षांच्या उपेक्षेचा अंत होऊन मिळालेल्या सन्मानाची होती. दोरी ओढताना त्यांचा कंठ दाटून आला. ज्या खडबडीत आणि रापलेल्या हातांनी आयुष्यभर गावची घाण उपसून गाव रोगमुक्त ठेवलं, तेच प्रामाणिक हात आज राष्ट्रध्वजाची दोरी ओढून माणुसकीचा झेंडा आकाशात उंच करत होते. आकाशातून फुलांचा वर्षाव झालाच, पण त्याहून मोठा वर्षाव गावकऱ्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रूंचा झाला. भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीचाही सन्मान गावातील ज्येष्ठ अधिक कष्टाळू नागरिक आसाराम सांगळे यांनाही जिल्हा परिषद शाळेसमोरील ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला. हा सन्मान मिळाल्याने तेही भारावून गेले होते. यावेळी त्यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष व गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी बाळापूरच्या सरपंच नीता गिऱ्हे, उपसरपंच अर्जुन जौक, ग्रामसेवक सचिन पाटील, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई पवार, सुनीताबाई अवताडे, वंदनाबाई वाघ, आकाश बांगर, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश अवताडे, गणेश वाघ, शरद पवार, जनार्दन वाघ, सुनील वाघ, आसाराम सांगळे, शाळेचे मुख्याध्यापक विवेक पिटेकर, शिक्षिका प्रतिभा सुरासे, अंगणवाडी शिक्षिका मीरा जौक, रुखमन जौक, अर्चना जौक, सोनाबाई गिऱ्हे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.
‘वंदे भारत’च्या सेवेक-यांचे हाल
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची सर्वांत प्रिमियम असलेली ट्रेन म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेस. वंदे भारत ट्रेन लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. प्रवाशांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. गेल्या सुमारे ६ वर्षांच्या कालावधी तब्बल ७ कोटींहून अधिक प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद लुटला आहे. भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणारी वंदे भारत ही केवळ एक ट्रेन नाही तर ती आत्मनिर्भर […] The post ‘वंदे भारत’च्या सेवेक-यांचे हाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारताचा ‘ईयू’सोबत मुक्त व्यापार करार
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांमध्ये भारताने युरोपियन युनियनसोबत आपली मैत्री आणखी मजबूत केली आहे. भारताने एव सोबत मुक्त व्यापार करार केला आहे. ज्याला मदर ऑफ ऑल डिल्स असे म्हटले जाते. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या करारावर शिक्कामोर्तब झाले. दुसरीकडे कॅनडाही भारतासोबत संबंध मजबूत करण्याचा विचार करत आहे. कॅनडाचे पंतप्रधान […] The post भारताचा ‘ईयू’सोबत मुक्त व्यापार करार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या भाषणात संविधानांचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने चांगलेच वातावरण तापले आहे. वाद चिघळल्यानंतर गिरीश महाजन यांनी आपण अनावधानाने नाव घ्यायचे विसरलो, असे स्पष्टीकरण दिले. आता यावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी गिरीश महाजन यांची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. अनावधानाने नाव घ्यायचे विसरलात, तर अनावधानाने मंत्रिपदही काढून टाकण्यात यावे, अशी टीका आंबेडकरांनी केली आहे. गिरीश महाजन यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, ज्या संविधानामुळे तुम्ही मंत्री झालात, ते संविधान कोणी लिहिले हेच जर तुम्हाला माहिती नसेल, त्यांचे नाव तुम्हाला घेता येत नसेल तर तुम्हाला पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, अशी टीका करत आंबेडकरांनी पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. आरएसएस नेहमीच दुतोंडी भूमिका घेते पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील निशाणा साधला आहे. ते म्हणाले, आरएसएस नेहमीच दुतोंडी भूमिका घेते. एकीकडे आम्ही बाबासाहेबांना मानतो असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांच्या विचारांच्या विरोधात कृती करायची. हिंदू कोड बिलाला सर्वात आधी विरोध कोणी केला असेल तर तो आरएसएसनेच केला होता. मनुस्मृतीने महिलांना हिंदू धर्मात कोणताही अधिकार दिला नव्हता, ना मालमत्तेचा, ना वैयक्तिक, ना स्वतःच्या शरीराचा. हे सर्व अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिले. त्यामुळेच आज एक महिला अधिकारी (माधवी जाधव) जाब विचारण्यासाठी पुढे आली, असे आंबेडकर म्हणाले. अनावधानाने मंत्रिपदही काढून टाकण्यात यावे गिरीश महाजन यांनी आपण अनावधानाने नाव घ्यायचे विसरल्याचे म्हटले होते, यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, जर हीह चूक अनावधानाने झाली असेल, तर तुमचे मंत्रिपदही अनावधानाने काढून टाकण्यात यावे. ही काही छोटी-मोठी चूक नाही. तसेच ज्यांनी हे भाषण लिहून दिले त्यांच्यावर आणि ज्यांनी वाचले त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे. महाजनांनी स्वतःच्या हाताने भाषण लिहिले असेल किंवा लिहून दिले असेल तरीही त्यांनी आंबेडकरांचे नाव वाचले नसेल, तर त्यांच्या कर्तव्यातील कसूर आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी आंबेडकरांनी केली आहे.
नवी दिल्ली : भारतीय सैन्याने उत्तर आणि पश्चिमेकडील सीमांच्या आसपास शत्रूच्या ड्रोनवर नजर ठेवून त्याला तातडीने पाडण्याची जबाबदारी सांभाळली आहे. सीमेच्या ३५ किलोमीटर परिसरात ३ किमीपर्यंत उंचीवर जर एखाद्या शत्रूचे ड्रोन घुसखोरी करत असेल तर त्याच्यावर सैन्याकडून कारवाई केली जाते. भारतीय सैन्याने हे पाऊल देशाच्या पश्चिम आणि उत्तरेकडील सीमांवर घुसखोरी आणि हेरगिरी करणा-या शत्रू ड्रोनच्या […] The post पाकचे ड्रोन दिसताच पाडणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट!
मुंबई : मुंबईतील मालवणी परिसरातून एक दुर्घटना समोर आली आहे. एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने चाळीला आग लागल्याचे समोर आले आहे. या स्फोटात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना मालवणी गेट क्रमांक ८ जवळ भारतमाता शाळेजवळील एसी मशिदीनजीकच्या चाळीत सकाळी घडली. या घटनेची माहिती सकाळी ९:२५ वाजता बीएमसी अग्निशमन दलाला देण्यात आली. […] The post मुंबईत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणेच्या घटनेची पुनरावृत्ती
पुणे : प्रतिनिधी पुण्यातील उरुळी कांचन तालुक्यातील सोरतापवाडी येथे दीप्ती चौधरी या विवाहितीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, तिची सासू सरपंच, तिचे सासरे मुख्याध्यापक असताना त्यांच्याकडून वारंवार तिला माहेरावरून लाखो रुपये आणण्यास सांगितले जात होते. गेल्या वर्षभरात हुंडा मागणीच्या त्रासाला किंवा सासरच्या जाचाला कंटाळून अनेक महिलांनी आत्महत्या केल्याच्या […] The post पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणेच्या घटनेची पुनरावृत्ती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नागपूर : प्रतिनिधी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क सरकारकडून भरपाई स्वरूपात दिले जाते. मात्र, गेल्या दशकभरात ही रक्कम वेळेवर न मिळाल्यामुळे राज्य सरकारवर आता सुमारे २,४०० कोटी रुपयांची थकबाकी जमा झाली आहे. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात आरटीई प्रतिपूर्तीसाठी केवळ १७३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र ४५ ते […] The post खासगी शाळांचे २,४०० कोटी थकले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
घातक निपाह व्हायरसचा देशात शिरकाव!
नवी दिल्ली : भारतावर आणखी एक नवे संकट ओढवले आहे. खतरनाक निपाह व्हायरसने भारतात एन्ट्री केली आहे. पश्चिम बंगालमध्ये निपाह विषाणूचे दोन रुग्ण आढळले आहेत. या दोन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने या घटनेची दखल घेत राष्ट्रीय संयुक्त उद्रेक प्रतिसाद पथक बंगालमध्ये पाठवले आहे. बंगालमध्ये रुग्ण आढळल्यानंतर आता इतर राज्यांमध्येही […] The post घातक निपाह व्हायरसचा देशात शिरकाव! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रात सर्वात जास्त गाजलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. हीच योजना महायुतीसाठी विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरल्याचे बोलले जाते. परंतु, लाडकी बहीण योजना गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली असतानाच आता जळगावतून खळबळजनक बातमी समोर आली आहे. 1 लाख लाडक्या बहीणींचे पैसे रखडल्याने महिलांनी थेट महिला व बाल विकास कल्याण केंद्रावर धाड टाकल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर कार्यालयात घुसून या महिलांनी अधिकाऱ्यांना जाब विचारल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. जळगाव जिल्ह्यात जवळपास 10 लाखांहून अधिक महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता संक्रांतीच्या आधी मिळेल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, जळगावमधील सुमारे 1 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात अद्याप एक रुपयाही जमा झालेला नसल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आम्ही सर्व कागदपत्रे दिली, केवायसी केली, तरीही आमचे पैसे का कापले? असा सवाल संतप्त महिलांनी उपस्थित केला आहे. केवायसी करूनही तांत्रिक कारणास्तव लाभ मिळत नसल्याने अखेर महिलांनी थेट महिला व बाल विकास कार्यालाय गाठले. केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे ही अडचण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पात्र महिलांना काही अडचणी असल्यास 181 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. मात्र, या हेल्पलाइनवर फोन लागतच नाही. सरकार फक्त घोषणा करत आहे, पण जमिनीवर आम्हाला मदत ऐवजी मनस्ताप मिळत असल्याचा आरोप या आंदोलक महिलांनी केला आहे. दरम्यान, शेकडो महिला अचानक कार्यालयात घुसल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच लवकरात लवकर तांत्रिक त्रुटी दूर करून रखडलेले पैसे खात्यात जमा न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी महिलांनी दिला आहे. आता 1 लाख महिलांचे रखडलेले पैसे कधी मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. ई-केवायसीची मुदत वाढणार अनेक पत्र महिलांना ई-केवायसीमध्ये अडचणी येत असल्याने त्यांचे हक्काचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यात आता केवायसी करण्याची अंतिम तारीख ही 31 जानेवारी देण्यात आले आहे. परंतु, महिलांना येत असलेल्या अडचणींचा विचार सरकारकडून करण्यात येत असल्याचे दिसत आहे. याबाबतीत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी माहिती दिली आहे. हिंगोलीत बोलत असताना नरहरी झिरवाळ यांनी राज्य सरकारकडून ई-केवायसीची मुदत वाढवण्यात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. ज्या महिलांचे केवायसीमुळे 1500 रुपयांचा हप्ता बंद झाला आहे, आता त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच ज्यांना ओटीपीची अडचण येत आहे, त्यासाठी आता फिजिकल व्हेरीफिकेशन देखील करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा लाडक्या बहीणींचे 2100 रुपये करणार:'एक बार मैंने कमिटमेन्ट करदी तो मैं खुदकी भी नही सुनता', DCM एकनाथ शिंदेंनी दिला शब्द राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली असून, उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर प्रत्यक्ष लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जन्मभूमीतून प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देण्याचा शब्द पाळणार असल्याचे म्हटले आहे. तसेच मी बोलतो ते करून दाखवतो असे म्हणत 'एक बार मैंने कमिटमेन्ट करदी तो मैं खुदकी भी नही सुनता', असा डायलॉगही शिंदेनी मारला. वाचा सविस्तर
डॉक्टरचे अपहरण करून खंडणी उकळणारी टोळी जेरबंद:चालकच सूत्रधार, छत्रपती संभाजीनगरचे चार आरोपी अटक
ऊरूळी कांचन परिसरात एका डॉक्टरचे अपहरण करून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखा आणि ऊरूळी कांचन पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली कार आणि खंडणीची रक्कम असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले चारही आरोपी छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत. याप्रकरणी ऊरूळी कांचन पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम १४०(२), १४०(३), १२६(२), १२७(२) सह इतर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी डॉ. विठ्ठल किसन चौधरी (वय ५८, व्यवसाय डॉक्टर, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) हे १० जानेवारी रोजी रात्री सोलापूर–पुणे महामार्गाने आपल्या कारने घरी जात होते. इनामदार वस्ती परिसरात पांढऱ्या रंगाच्या इरटीगा कारने त्यांच्या वाहनाला अडवण्यात आले. त्यानंतर चार आरोपी डॉक्टरांच्या कारमध्ये जबरदस्तीने बसले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून डॉक्टरांचे अपहरण केले आणि त्यांना मारहाण केली. आरोपींनी डॉक्टरांना शिंदवणे परिसरात नेऊन ४ लाख रुपयांची खंडणी घेतली आणि त्यांना चौफुला येथे सोडून दिले. त्यानंतर आणखी १५ लाख रुपयांची मागणी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे घाबरलेल्या डॉक्टरांनी १२ जानेवारी रोजी १५ लाख रुपये दिले. अशा प्रकारे एकूण १९ लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि ऊरूळी कांचन पोलीस ठाण्याची दोन पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान डॉक्टरांचा ड्रायव्हर राजेंद्र छगन राजगुरु याच्यावर संशय बळावला. चौकशीत त्यानेच साथीदारांच्या मदतीने अपहरण आणि खंडणीचा कट रचल्याची कबुली दिली. त्यानुसार संतोष बनकर (वय ३६, रा. अनंतपूर, पैठण, संभाजीनगर), दत्ता ऊर्फ गोटू आहेर (वय ३४, रा. अनंतपूर, पैठण, संभाजीनगर) आणि सुनील ऊर्फ सोनू मगर (वय ३०, रा. गारखेडा, संभाजीनगर) या तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून पांढऱ्या रंगाची इरटीगा कार (किंमत ८ लाख रुपये) आणि ७ लाख ८० हजार रुपयांची खंडणीची रक्कम असा एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सुनील मगर याच्यावर यापूर्वी मालमत्ता चोरीचे तीन गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आला आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा आणि ऊरूळी कांचन पोलीस ठाण्याच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.
खेड शहरात वर्षाच्या सुरुवातीला व्यावसायिकाच्या घरी झालेल्या मोठ्या घरफोडीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी छडा लावला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि खेड पोलिसांनी आंतरराज्यीय सराईत टोळीच्या म्होरक्याला जेरबंद केले असून, त्याच्याकडून तब्बल ५५ तोळे सोन्याचे दागिने, ८३० ग्रॅम चांदी आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ४७ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना २ ते ३ जानेवारी २०२६ दरम्यान घडली होती. फिर्यादी मोतीलाल कांतीलाल गदीया (वय ५९, रा. होलेवाडी, राजगुरूनगर) हे देवदर्शनासाठी अक्कलकोट येथे गेले असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केली होती. या घटनेत रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने आणि महागडी घड्याळे असा सुमारे ६८ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. खेड पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी भा.न्या.सं. २०२३ कलम ३३१ (१), ३३१ (४), ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात करण्यात आली. तपासादरम्यान, घरफोडीमध्ये पांढऱ्या रंगाच्या कारचा वापर झाल्याचे आणि ती नाशिकच्या दिशेने गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तब्बल १२० किलोमीटरपर्यंतचे फुटेज तपासून संशयित आरोपींची माहिती गोपनीय बातमीदारांमार्फत मिळवली. तपासात, उत्तर भारतातील एक सराईत आंतरराज्यीय टोळी चारचाकी वाहनाने महाराष्ट्रात येऊन बंद घरांची घरफोडी करत असल्याचे उघड झाले. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गावर सापळा रचून आरोपी रिझवान निजामुद्दीन शेख (वय ४२, रा. दिल्ली, मूळ रा. बिजनौर, उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने इतर दोन साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपी रिझवान शेखकडून ५५ तोळे सोन्याचे दागिने, ८३० ग्रॅम चांदी आणि गुन्ह्यात वापरलेली हुंदाई आय-१० कार असा एकूण ४७ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीवर यापूर्वीही पुणे, कोल्हापूर, गुजरात आणि दिल्ली येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि खेड पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी एकतर्फी प्रेमातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला आहे. सुपा पोलीस स्टेशन हद्दीतील काळखैरेवाडी येथे एका अनोळखी महिलेच्या मृतदेहाच्या तपासातून हे प्रकरण समोर आले. या प्रकरणी पाच खुनांचा आरोप असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखा आणि सुपा पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. १९ जानेवारी रोजी सकाळी खैरेपडळ परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. तिच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केल्यानंतर सुपा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान, घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात एका संशयित व्यक्तीची हालचाल दिसून आली. घटनास्थळी सापडलेल्या एका लहान डायरीच्या आधारे साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. फुटेजमधील संशयित व्यक्ती जैतू चिंधू बोरकर (वय ४३, रा. कोयंडे खुर्द, ता. खेड) असल्याची ओळख पटली. त्याला खेड परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी जैतू बोरकर याचे मृत रंजना अरुण वाघमारे (वय २५, रा. खांडपे, ता. कर्जत, जि. रायगड) हिच्यावर एकतर्फी प्रेम होते. रंजनाने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिल्याने, १७ जानेवारी रोजी जैतूने तिच्या साथीदार सुरज अंकुश वाघ (वय ३०, रा. वांगणी, ता. बदलापूर, जि. ठाणे) याचा कोयत्याने वार करून खून केला. त्यानंतर त्याने रंजनाला जबरदस्तीने सुपा परिसरात आणले. १८ जानेवारी रोजी रंजनाने पुन्हा नकार दिल्याने आणि पोलीस तक्रारीची भीती वाटल्याने आरोपीने दगडाने मारून तिचाही खून केला. आरोपी जैतू बोरकरला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात समोर आले आहे की, आरोपीवर यापूर्वीही खुनाचे गुन्हे दाखल आहेत आणि तो एक सराईत गुन्हेगार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे करत आहेत.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या मुद्यावर ठाकरेंशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवारांनी ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचे सांगितल्यामुळे चंद्रपुरात सत्ता स्थापन करण्याचा तिढा जवळपास सुटल्याचे मानले जात आहे. चंद्रपूर महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे येते सत्ता स्थापनेचा मोठा पेच निर्माण झाला आहे. भाजप व काँग्रेस या दोन्ही बड्या पक्षांनी इतर पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केलेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रयत्नांतर्गत मंगळवारी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ठाकरे गटाची मदत मागितली. त्यावर ठाकरेंनी महापौर पद व स्थायी समितीचे अध्यक्षपद प्रत्येकी अडीच वर्ष वाटून घेण्याच्या अटीवर काँग्रेसला पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले. काय म्हणाले विजय वडेट्टीवार? उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर विजय वडेट्टीवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, चंद्रपूर महापालिकेत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासंदर्भात मी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आमच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. आमच्या प्रस्तावाला ठाकरेंनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन व्हावी अशी त्यांची 100 टक्के इच्छा आहे. त्यांनी आमच्यापुढे एक प्रस्ताव ठेवला आहे. महापौर पद हे अडीच-अडीच वर्षांसाठी होत असेल तर तशी तयारी केली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय स्थायी समिती सुद्धा अडीच-अडीच वर्षांसाठी दोन्ही पक्षांना मिळायला हवी असे ते म्हणालेत. या प्रकरणी आमच्या प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करून आमचा निर्णय मी त्यांच्या कानावर घालेन. या प्रकरणी काही अडचण येईल असे मला वाटत नाही. कारण, राज्यात महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभा व विधानसभेची निवडणूक लढवली. त्यामुळे चंद्रपूरमध्येही एकत्र आलो तर आम्हाला अधिक मजबुतीने काम करता येईल. त्यातून चांगलेच घडेल असे मला वाटते. ठाकरेंच्या प्रस्तावाला आमची काहीही अडचण नाही. माझ्या मते, संख्याबळ अगदी काठावर असूनच चालत नाही. मजबूत संख्याबळ असेल तर महापालिकेत 5 वर्षे काम करता येते. चांगले निर्णय घेता येतात. खुर्चीवर बसणाऱ्यांनाही चांगल्या पद्धतीने काम करता येते, असे वडेट्टीवार म्हणाले. पहिली अडीच वर्षे काँग्रेसला संधी देण्याची विनंती ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी महापौर कुणाचा असावा? यासंबंधीही एक अट ठेवली आहे. महापौर ठरवताना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिडे यांच्याशी चर्चा करून समन्वयाने एक नाव निवडावे असे त्यांनी सूचवले. त्यांची ही भूमिकाही आम्हाला मान्य आहे. शेवटी महापौर पदावर बसणाऱ्या व्यक्तीने सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणे गरजेचे असते. आम्ही त्यांच्यापुढे पहिली अडीच वर्षे काँग्रेसला संधी देण्याची विनंती केली. त्यावर ते त्यांच्या जिल्हाप्रमुखांशी संवाद साधून आपला निर्णय कळवणार आहेत. आम्हीही या प्रकरणी आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. भाजप आमदारांनीही घेतली फडणवीसांची भेट दरम्यान, भाजप आमदार किशोर जोरगेवार व आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चंद्रपूर महापालिकेतील राजकीय समीकरणांवर चर्चा केली. ही भेट ही चंद्रपुरात सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णायक ठरली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर काही महिन्यांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते. याचा परिणाम म्हणून आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मराठवाड्यातील अनेक मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली. उपोषण सुरू असताना हैदराबादसह सातारा गॅझेट देखील लागू करण्याचे मान्य करण्यात आले होते. परंतु, अद्याप सातारा गॅझेट लागू झाले नसल्याने मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला होता. याच संदर्भात मंत्रालयात पार पडलेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात आजच्या बैठकीत सातारा गॅझेटियरवर प्रामुख्याने चर्चा झाली आहे. तसेच हैदराबाद गॅझेटियर अंमलबजावणी आणि मराठा आरक्षण विषयावर आढावा घेण्यात आला. त्यानुसार, राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅझेटियर लागू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सातारा गॅझेट लागू करण्यास अडचणी येत असल्याचे म्हटले जात आहे. आजच्या झालेल्या बैठकीनंतर, फक्त इंटरप्रिटेशनचा भाग असल्याने या संदर्भात देखील लवकरच निर्णय होणार असून समज-गैरसमज दूर करत मराठा आरक्षणासंदर्भात सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या असल्याचे समजते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राज्यात निवडणुकीचे वातावरण आहे. सुरुवातीला नगरपालिका, मग महापालिका आणि आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यात राज्याच्या अनेक भागांमध्ये आचारसंहिता लागू असल्याने राज्य सरकारला मोठे निर्णय घेता आले नसल्याचे समजते. आता जिल्हा परिषदेच्या तसेच पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर सातारा गॅझेटियर लागू केले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मराठा समाजाला आणखी मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी देखील या निमित्ताने पूर्ण होणार असल्याचे दिसते.
गिरीश महाजनांकडून दिलगिरी व्यक्त
मुंबई : प्रतिनिधी नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन हेच संकटात सापडले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात तिथे उपस्थित असलेल्या महिला वन अधिका-याने त्यांच्या भाषणावर आक्षेप घेतला आहे. या सर्व प्रकरणावर मंत्री गिरीश महाजनांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. वन कर्मचारी माधवी जाधव यांनी, संविधान निर्मात्यांचे नाव […] The post गिरीश महाजनांकडून दिलगिरी व्यक्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथून बेपत्ता झालेल्या १८ वर्षांच्या तरूणाने महाबळेश्वरच्या केटस् पॉइंटवरून ४०० फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. भगवतसिंह मदनसिंह सोळंकी (वय १८, रा. ढेबेवाडी, ता. पाटण), असं त्याचं नाव आहे. त्याने सीईटी परीक्षेचा फॉर्म भरला नव्हता. त्या नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा ढेबेवाडी पोलिसांना संशय आहे. भगवतसिंह सोळंकी हा १८ वर्षांचा तरुण महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. त्याने सीईटीचा फॉर्म भरला नव्हता. त्यामुळे काही दिवसांपासून तो नैराश्यात होता. फॉर्म न भरण्याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. मूळचे राजस्थानचे असलेले सोळंकी कुटुंब व्यवसायाच्या निमित्ताने गेल्या २० वर्षांपासून ढेबेवाडीमध्ये स्थायिक आहे. ढेबेवाडी बाजारपेठेत त्यांचा बेकरी आणि स्वीटस्चा व्यवसाय आहे. याच कुटुंबातील तो धाकटा मुलगा होता. २३ जानेवारीपासून होता बेपत्ता भगवतसिंह सोळंकी हा शुक्रवारी (२३ जानेवारी) कोणाला काहीही न सांगता घरातून निघून गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी ढेबेवाडी पोलिस ठाण्यात दिली होती. मिसिंगचा मेसेज सातारा जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना गेला होता. त्याच्या मोबाईलचे लोकेशन महाबळेश्वरच्या केटस् पॉइंट परिसरात दाखवत होते. त्यामुळे पाचगणी पोलिसांनी सह्याद्री ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सना पाचारण केले. ४०० फूट खोल दरीतून काढला मृतदेह महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनील भाटिया, सुनील केळगणे, जयवंत बिरामने, पृथ्वी बिरामने, सौरभ गोळे, सौरव सालेकर, अक्षय नाविलकर, विशू सपकाळ, आतेश धनावडे, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे अनिकेत वागदरे, आशिष बिरामने यांनी केटस् पॉइंटवरील ४०० फूट खोल दरीत उतरल्या. त्यावेळी त्यांना १८ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला. मृतदेह दरीतून वर आणल्यानंतर पाचगणी पोलिसांनी तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. रुग्णालयात मृत तरुणाचे कुटुंबीय, पाचगणी आणि ढेबेवाडी पोलिस घटनास्थळी उपस्थित होते. मुलाचा मृतदेह पाहून सोळंकी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. ढेबेवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. एस. डाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार धीरज मुळे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
मंत्र्यांनी नाक घासलेय, आता विषय फार ताणू नका
मुंबई : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन वादात सापडले आहेत. वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेत अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे […] The post मंत्र्यांनी नाक घासलेय, आता विषय फार ताणू नका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाजनांविरोधात ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणार : प्रकाश आंबेडकर
नाशिक : प्रतिनिधी देशाचा ७७वा प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी) देशभर साजरा करण्यात आला. मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथील पोलिस संचलन मैदान येथे ध्वजारोहण केले. मात्र त्यानंतर गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळला. त्यावरून आता वाद होताना दिसत आहे. या कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या वनविभागाच्या अधिकारी माधवी जाधव यांनी थेट व्यासपीठावर […] The post महाजनांविरोधात ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करणार : प्रकाश आंबेडकर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाची हजेरी
मुंबई : गेल्या काही महिन्यांत देशभरात वातारणात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. एकीकडे थंडीचा तडाखा सुरू असताना दुसरीकडे ऐन हिवाळ्यात पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामानामुळे सकाळच्या वेळेत धुके जाणवत आहे. असे असताना राज्यातील काही भागांत अवकाळी पावसानेही हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये हवामानाबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. पुढचे २४ तास महत्त्वाचे असल्याचे हवामान […] The post ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाची हजेरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉ. बाबासाहेबआंबेडकरांचे नाव घ्यायला लाज वाटते का? : वडेट्टीवारांचा सवाल
मुंबई : प्रतिनिधी ‘हे सरकार हुकूमशाही पद्धतीने चालले आहे की लोकशाहीने, याचे उत्तर जनताच मागेल. संविधानावर विश्वास नसणा-यांनी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायला लाज वाटत असणा-यांचे सत्तेत राहणे लोकशाहीसाठी घातक आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी […] The post डॉ. बाबासाहेबआंबेडकरांचे नाव घ्यायला लाज वाटते का? : वडेट्टीवारांचा सवाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य; अंजली भारती बरळल्या
भंडारा : प्रतिनिधी गायिका अंजली भारती यांच्या वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. हे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या संदर्भात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी ट्विट करत निषेध केला आहे आणि कारवाईची मागणी केली आहे. हे वक्तव्य […] The post अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य;अंजली भारती बरळल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी महायुती सरकारला महाराष्ट्रात पुन्हा सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता महिलांच्या असंतोषाला कारणीभूत ठरत आहे. भंडारा, बुलडाणा आणि वाशिमनंतर जळगाव, पुणे, नागपूर, लातूर आणि धाराशिव जिल्यातील लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये मिळत नसल्याने हजारो महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक […] The post योजनेचे पैसे लवकरात लवकर द्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक केल्याची घटना आज सकाळी घडली. नगर परिषदेच्या वतीने आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न लावल्याने आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले होते. नगराध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त करण्याची अपेक्षा असताना, त्यांनी ती केल्याने संतप्त झालेल्या आंबेडकरी अनुयायांनी नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक केली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नगर परिषद परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती नगर परिषदेत ध्वजवंदनाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महात्मा गांधी यांची प्रतिमा लावण्यात आली होती. मात्र, ज्या संविधानामुळे प्रजासत्ताक दिन साजरा होतो, त्या संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कार्यक्रमात कोठेही दिसली नाही. प्रशासनाच्या या कृतीला 'अवमान' मानत कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलन आणि शाईफेक या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी आणि निषेध नोंदवण्यासाठी आज सकाळी मोठ्या संख्येने विविध संघटना आणि विविध पक्षांनी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाने जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. नगराध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त करावी, अशी अपेक्षा आंबेडकरी अनुयायांनी व्यक्त केली. मात्र, नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिलगरिी व्यक्त न केल्याने आंदोलकांचा संताप अनावर झाला आणि काही कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या अंगावर शाई फेकत, जोरदार घोषणाबाजी केली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे उपस्थित अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. पोलिस घटनास्थळी दाखल शाईफेकीच्या घटनेनंतर परिसरात गोंधळ उडाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलकांनी प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष व धनुष्यबाण प्रकरणाच्या सुनावणीसाठी आता सर्वोच्च न्यायालयाने आता 18 फेब्रुवारी ही नवी तारीख दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतरच सुनावणी होईल हे स्पष्ट झाले आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने शिवसेनेची सुनावणी 21 व 22 जानेवारी रोजी सलग 2 दिवस घेण्याचे निश्चित केले होते. पण 21 तारखेला सुप्रीम कोर्टाने ऐनवेळी अरावली पर्वताचे प्रकरण हातावर घेतल्यामुळे या प्रकरणी सुनावणी होऊ शकली नाही. त्या दिवशी या प्रकरणाची सुनावणी 23 जानेवारी रोजी होईल असे सांगण्यात येत होते. पण त्या दिवशीही हे प्रकरण बोर्डावर आले नाही. अखेर आज सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण 18 फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी हाती घेतले जाईल हे स्पष्ट केले आहे. सु्प्रीम कोर्टाच्या संकेतस्थळावर ही तारीख नमूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणाची सुनावणी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदर घेण्याची मागणी केली होती. पण कोर्टाने त्याकडे दुर्लक्ष करत ही सुनावणी या निवडणुकांचा निकाल घोषित झाल्यानंतर जवळपास 10 दिवसांनी घेण्याचे निश्चित केले आहे. काय आहे वादाचे नेमके प्रकरण? शिवसेना पक्षात 2022 च्या मध्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उभी फूट पडली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगने शिंदे यांच्या नेतृत्वातीलच आमदारांच्या बंडखोर गटाला शिवसेना पक्ष हे नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एका याचिकेद्वारे या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनीही एका स्वतंत्र याचिकेद्वारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या एका निर्णयाला कोर्टात आव्हान दिले आहे. त्यावरही अद्याप ठोस सुनावणी झाली नाही. सुप्रीम कोर्ट या प्रकरणाशी संबंधित सर्वच मुद्यांवर एकत्रित सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण मागील 3 वर्षांपासून या प्रकरणी कोणतीही ठोस सुनावणी झाली नसल्यामुळे ठाकरे गटाने वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी सध्या केवळ 'तारीख पे तारीख' सुरू आहे. संजय राऊत यांनी केली होती टीका उल्लेखनीय बाब म्हणजे सरन्यायाधीश सूर्य कांत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 दिवसांपूर्वी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवारही उपस्थित होते. या दोघांनीही सरन्यायाधीशांचे स्वागत केले होते. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या कार्यक्रमावर निशाणा साधत शिवसेना प्रकरणाचा निकाल लागल्याची उपरोधिक टीका केली होती. धनुष्य बाण आणि घड्याळाचा निकाल लागला! न्यायदेवते त्यांना क्षमा कर! हे राम, असे ते म्हणाले होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या उत्तर प्रदेशातील काशी येथील ऐतिहासिक मणिकर्णिका घाटावर तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यावर बुलडोझर चालविण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ मंगळवार, 27 जानेवारी रोजी शहरात महाविकास आघाडीच्या वतीने मूक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारच्या काळात देशाचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा संकटात सापडल्याचा आरोप करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी 1771 मध्ये वाराणसी स्थित मणिकर्णिका घाटाचे निर्माण केले होते. त्यानंतर 1791 मध्ये या घाटाचे नुतनीकरण करून त्याला नवसंजीवनी दिली होती. हिंदू धर्मात येथे अंत्यसंस्कार केल्याने आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो व जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. त्यानंतर आता पुनर्विकासाच्या नावाखाली या घाटाचा काही भाग पाडण्यात आला आहे. यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडीने मंगळवारी या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथे सरकारच्या या कृतीचा निषेध केला. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा अपमान करणाऱ्या भाजप सरकारचा अधिकार असो, अशा घोषणा देत अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आले. कोकणवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात हे मुक धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार संघटना व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारचे कृत्य अत्यंत निषेधार्ह - दानवे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ एका राज्याच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या आदर्श प्रशासक होत्या. त्यांच्या कार्याशी संबंधित ऐतिहासिक घाट आणि पुतळ्यावर बुलडोझर चालविणे ही अत्यंत निषेधार्ह बाब असून, भाजप सरकारचा बेगडी हिंदुत्वाचा चेहरा समोर आल्याची भूमिका शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी यावेळी मांडली. संविधान आणि महापुरुषांचा सन्मान करण्याचे नाटक करणाऱ्या भाजप सरकारकडून प्रत्यक्षात मात्र वारंवार ऐतिहासिक वारशावर घाव घातला जात आहे. अशा कारवायांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष भारताचा संपूर्ण ऐतिहासिक वारसा संपुष्टात आणण्याचे काम करत असल्याची टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांनी करत निषेध व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सामाजिक कार्य आणि सुशासनाचे प्रतीक आहे. त्यांच्या स्मृतीस्थळांवर कारवाई करणे म्हणजे देशाच्या अस्मितेवरच घाव घातल्यासारखे असल्याचे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील म्हणाले. याप्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, राज्य संघटक चेतन कांबळे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, काँग्रेस शहर अध्यक्ष शेख युसूफ, वंचित बहुजन आघाडी नेते योगेश बन,रामेश्वर तायडे, प्रकाश मुगदिया, महेंद्र रमंडवाल, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, संतोष खेडके, किशोर कच्छवाह, अरविंद धिवर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, दिग्विजय शेरखाने, ज्ञानेश्वर डांगे, विष्णू जाधव, प्रमोद ठेंगडे, गिरीश चपळगावकर, अंजन साळवे,सचिन खैरे,गणेश लोखंडे,सुरेश गायके, संदेश कवडे, गौरव पुरंदरे,राजेंद्र दानवे सचिन वाघ, जयसिंग होलिये, रामेश्वर कोरडे, अजय चोपडे, बापू कवळे, शिवकुमार देशमुख, सुदर्शन छापोले, सिताराम सुरे, दीपक तांबे,सलीम खामगावकर, नितीन पवार, संजय हरणे, कल्याण चक्रनारायण, प्रितेश जैस्वाल, मनोज बोरा, डॉ. नाना पळवदे, विशाल खंडागळे, सुदाम पवार, हिरालाल वाणी, सोमीनाथ नवपुते, वसंत भाई शर्मा, मिलिंद बोरडे, गणेश खोतकर, कोमल हिवाळे, साधना पठारे, मुंजाभाऊ तूपसुंदरे, सुनील जोगदंड, संतोष दळे, पंकज बनसोडे, सचिन तांबे, कृष्णा नजन, किरण तांबे, संतोष रिठे, गणेश रोडगे, विनोद सोनवणे, संतोष तांबे, सागर तांबे,लखन तांबे, सागर तांबे, लक्ष्मण जोशी, दिनेश रिठे, विनोद लोखंडे,कुणाल राऊत, भागीनाथ रिठे, राजू रोठे, शेख कैसर बाबा, उमाकांत खोतकर, शिरीष चव्हाण,कुणाल पाठक, विनोद लोखंडे,अनिल काळे, राहुल पवार, संजय पेरकर सतीश लोखंडे,अभिषेक शिंदे पाटील, राहुल संत, रवी लोखंडे, सुनील साळवे, मुदस्सिर अन्सारी, महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष दीक्षा पवार, अरुणा भाटी, मीरा देशपांडे, राजश्री पोकळे, वैशाली कोरडे, दिपाली पाटील बोरसे, रूपाली मुंदडा,जयाबाई तांबे, अर्चना तांबे, सखुबाई नजन, शोभाबाई तांबे, ज्योती जगधने, इंदुबाई तांबे, कविता सोरमारे, योगिता सरोदे, माधुरी सोरमारे, लंका सोलाट, योगिता रीठे, संगीता रिठे, रंजना कोरडे, छाया सोरमारे, मंजू लोखंडे व अरुणा लांडगे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
एका माथेफिरू तरुणाने खासगी शिकवणीला जाणाऱ्या 2 अल्पवयीन विद्यार्थिनींना विहिरीत फेकून दिल्याची भयंकर घटना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात घडली आहे. सदर तरुणाने या मुलींना विहिरीत का फेकले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील साकरी गावात ही घटना घडली आहे. रोहन चौधरी असे आरोपी माथेफिरू तरुणाचे नाव आहे. पीडित मुली इयत्ता 9 वीच्या विद्यार्थिनी आहेत. त्या मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे गावातून खासगी शिकवणीसाठी जात होत्या. त्या गावाजवळील एका शेतालगत पोहोचल्या असता तिथे दबा धरून बसलेल्या आरोपीने या दोघींवर हल्ला केला. त्याने त्यांना पकडून एका विहिरीजवळ नेले. त्यानंतर त्यांना पकडून विहिरीत फेकून दिले. हा प्रकार घडत असताना मुलींनी जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला. त्यांचा आरडाओरडा ऐकूण दुसऱ्या एका शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यानी हातातील काम सोडून त्यांच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी गावातही ही गोष्ट कळवली. त्यानंतर गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्काळ मुलींना दोरखंड व शिडीच्या मदतीने विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. हे वृत्त लिहीपर्यंतही त्यांचा प्रयत्न सुरू होता. पोलिसांनी आरोपी तरुणाला घेतले ताब्यात दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आरोपी रोहन चौधरी याला ताब्यात घेतले आहे. ते त्याची कसून चौकशी करत आहेत. सदर तरुणाने मुलींना विहिरीत फेकण्याचे विकृत पाऊल का उचलले? हे अद्याप समजले नाही. पण हे प्रकरण जुन्या वादातून घडले का की एकतर्फी प्रेम किंवा इतर कारणांतून घडली? आदी सर्वच अंगाने या प्रकरणाचा तपास केला जात आहे. हे ही वाचा… पुण्यात आईने पोटच्या मुलाचा गळा चिरला:मुलीवरही चाकूने सपासप वार, मुलगा ठार, मुलगी गंभीर; कौटुंबीक वादातून घटना घडल्याचा संशय पुण्याच्या वाघोली परिसरात एका महिलेने आपल्या पोटच्या मुलाची चाकूने गळा कापून हत्या केल्याची भयंकर घटना उजेडात आली आहे. या घटनेत एक 11 वर्षीय मुलगा ठार झाला असून, त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे. कौटुंबीक वादातून महिलेने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वाचा सविस्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (२७ जानेवारी) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनहिताचे पाच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये रोजगार, उद्योग, आणि महसूल विभागाशी संबंधित निर्णयांचा समावेश असून, तरुण विद्यार्थ्यांपासून ते कंत्राटदारांपर्यंत अनेक घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. १. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आयटीआयमध्ये 'पीएम सेतू' योजना (रोजगार व कौशल्य विकास) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) आता 'पीएम सेतू' (Pradhan Mantri Skilling And Employability Transformation through Upgraded ITIs) योजना राबवली जाणार आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होणार आहेत. अंमलबजावणी: पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील संस्थांमध्ये ही योजना सुरू होईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभर विस्तार केला जाईल. २. कंत्राटदारांसाठी 'ट्रेड्स प्लॅटफॉर्म' (सार्वजनिक बांधकाम) सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजक आणि कंत्राटदारांची प्रलंबित देयके (Pending Dues) वेळेवर अदा करण्यासाठी 'ट्रेड्स प्लॅटफॉर्म' (TReDS Platform) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कंत्राटदारांची आर्थिक कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. ३. धुळ्याच्या सूतगिरणीचे पुनरुज्जीवन (वस्त्रोद्योग) धुळे येथील 'जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी'चे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम, नवी दिल्ली यांच्याकडे शिफारस करण्यात येणार असून, यामुळे स्थानिक शेतकरी आणि कामगारांना मोठा आधार मिळणार आहे. ४. शासकीय जमिनींच्या भाडेपट्ट्याला मुदतवाढ (महसूल) विविध कारणांसाठी देण्यात येणाऱ्या शासकीय जमिनींच्या भाडेपट्ट्याचा (Lease) कालावधी वाढवून देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ आणि १९७१ च्या नियमांनुसार जे पट्टे ३० वर्षांसाठी दिले जातात, त्यांच्या कालावधीत वाढ करण्यात येणार आहे. ५. शत्रू संपत्तीवर मुद्रांक शुल्क माफी (महसूल) केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यात असलेल्या 'शत्रू संपत्ती'च्या (Enemy Property) खरेदी-विक्री व्यवहारांसाठी आता मुद्रांक शुल्क (Stamp Duty) माफ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अशा संपत्तींच्या हस्तांतरणातील अडथळे दूर होणार आहेत.
'एका मताने काय फरक पडतो?' याचे उत्तम उदाहरण ठरलेल्या परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ मधील निकालाला आता कायदेशीर वळण लागले आहे. या प्रभागात अवघ्या एका मताने पराभूत झालेले भाजपचे उमेदवार प्रसाद नागरे यांनी निकालाला आव्हान देत थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. बोगस मतदान आणि पोस्टल बॅलेटमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप प्रसाद नागरे यांनी केला आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे धाव घेत प्रभाग क्रमांक १ ची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी केली आहे. परभणी महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार व्यंकट डहाळे आणि भाजपचे उमेदवार प्रसाद नागरे यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. मतमोजणीअंती डहाळे हे अवघ्या १ मताने विजयी झाले होते. निकालाच्या दिवशीही या एका मतावरून सुमारे ३ तास गोंधळ चालला होता. अखेर निवडणूक निरीक्षक मेघना कावली यांनी डहाळे यांना विजयी घोषित केले होते. मात्र, भाजप उमेदवाराला हा निकाल मान्य नसून त्यांनी आता प्रशासनाच्या कारभारावर बोट ठेवले आहे. याचिकेत करण्यात आलेले खळबळजनक दावे प्रसाद नागरे यांनी उच्च न्यायालयात आणि आयोगाकडे सादर केलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. ज्या पोस्टल मतांच्या जोरावर उबाठा गटाचे उमेदवार विजयी झाले, त्यातील ७ मतदारांची कोणतीही अधिकृत कागदपत्रे निवडणूक विभागाकडे उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. विजयी उमेदवाराच्या नातेवाईकांनी प्रभागात दोन वेळा मतदान केल्याचा आरोपही प्रसाद नागरे यांनी केला आहे. तसेच काही नातेवाईकांनी इतर शहरांतील नगर परिषदेत मतदान करून पुन्हा परभणी महापालिकेतही मतदान केल्याचे पुरावे याचिकेत दिल्याचा दावा नागरे यांनी केला आहे. एका सामान्य मतदाराला पोस्टल मतदानाचा अधिकार कसा दिला गेला? यावरही प्रसाद नागरे यांनी आक्षेप घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडे फेरनिवडणुकीची मागणी आमच्याकडे या गैरप्रकारांचे 'सर्टिफाईड' पुरावे असल्याचा दावा करत भाजप उमेदवारांनी प्रभाग क्रमांक १ ची निवडणूक रद्द करून ती नव्याने पारदर्शकपणे घ्यावी. तसेच या प्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे पराभूत उमेदवार प्रसाद नागरे यांनी केली आहे. हायकोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच परभणीतील या जुन्या वादाने पुन्हा डोके वर काढल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. एका मताने भवितव्य ठरवणाऱ्या या निकालावर आता हाय कोर्ट काय शिक्कामोर्तब करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर न्यायालयाने ही याचिका ग्राह्य धरली, तर परभणीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते.
बीड जिल्ह्यातील परळी नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात मोठी खळबळ उडाली आहे. या निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने नाराजीचा सूर आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. स्वतः खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रचारात उतरून प्रतिष्ठा पणाला लावली होती, तरीही पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमीवर पक्षाचे बीड जिल्हा सरचिटणीस देवराव लुगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत थेट पक्षातील कारभारावर आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे शरद पवार गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. देवराव लुगडे यांनी राजीनामा देताना पक्षात दलालांचा कारभार सुरू असल्याचा आरोप केला आहे. पक्ष संघटनाऐवजी निवडणुकीच्या काळात सुपारीबाज आणि संधीसाधू लोकांना महत्त्व दिले जात असल्यामुळे आपण कंटाळल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षात निष्ठावंत कार्यकर्त्यांऐवजी दलाल प्रवृत्तीच्या लोकांचा प्रभाव वाढला आहे. अशा वातावरणात काम करणे शक्य नाही, असे सांगत त्यांनी जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या मते, खासदारांच्या चुकीच्या नियोजनामुळे आणि निर्णयक्षमतेच्या अभावामुळे परळी नगरपरिषद निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. लुगडे यांनी या आधीही पक्षाच्या वरिष्ठांकडे आपली नाराजी व्यक्त केली होती, असा दावा त्यांनी केला आहे. विकासपुरुष म्हणून ओळख असलेल्या शरद पवार यांच्या विचारांवर निष्ठा असलेला मोठा वर्ग आजही पक्षासोबत असताना, स्थानिक पातळीवर चुकीची धोरणे राबवली जात असल्यामुळे पक्षाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात आपण खासदार बजरंग सोनवणे यांना व्हिडिओ कॉल करून तक्रार केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोपही लुगडे यांनी केला आहे. या दुर्लक्षामुळेच आपल्याला टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याचे ते म्हणाले. शरद पवार गटातील धुसफूस वाढली दरम्यान, परळी नगरपरिषद निवडणुकीतील पराभवाने शरद पवार गटातील धुसफूस अधिकच वाढली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत असून, पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. परळी हा मतदारसंघ पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात असताना, अशा ठिकाणी पराभव होणे ही गंभीर बाब असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यामुळेच देवराव लुगडे यांच्या राजीनाम्याने केवळ जिल्हा पातळीवर नव्हे, तर संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर उघड टीका देवराव लुगडे यांनी याआधीही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर उघड टीका केली होती. पक्ष संघटन, उमेदवार निवड आणि भांडवलदारांना दिल्या जाणाऱ्या प्राधान्याबाबत त्यांनी गंभीर सवाल उपस्थित केले होते. या भागात पक्ष वाढवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. चुकीच्या लोकांच्या हातात कारभार देऊ नका, असे सांगत त्यांनी सोनवणे यांना थेट इशारा दिला होता. येऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तरी प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले होते. निवडणुकीच्या वेळी दलाल आणि श्रीमंत लोकांना पुढे केलं जात लुगडे यांनी आपल्या वक्तव्यात कार्यकर्त्यांच्या भावना ठळकपणे मांडल्या होत्या. अडचणीच्या काळात आम्ही पक्ष वाढवायचा, लोकांमध्ये जायचं, आंदोलन करायची, अंगावर खोटे गुन्हे घ्यायचे, हेच आमचं काम. मात्र निवडणुकीच्या वेळी दलाल आणि श्रीमंत लोकांना पुढे केलं जात असेल, तर कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास होतो, असे ते म्हणाले होते. पक्षावर हा भांडवलदारांचा आणि श्रीमंतांचा पक्ष आहे, अशी छाप पडू नये, अशी त्यांची ठाम भूमिका होती. हा पक्ष पवार साहेबांच्या विचारांचा असून, चाटुगिरी आणि पुढे-पुढे करणाऱ्यांना प्राधान्य देऊ नये, असे खडेबोल त्यांनी सुनावले होते. संघटनात्मक बांधणीवरही प्रश्नचिन्ह आता देवराव लुगडे यांच्या राजीनाम्यानंतर आणि आरोपांनंतर खासदार बजरंग सोनवणे यांची प्रतिक्रिया काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परळी नगरपरिषद पराभवाने सुरू झालेला हा वाद केवळ एका राजीनाम्यापुरता मर्यादित न राहता, शरद पवार गटातील संघटनात्मक बांधणीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. येणाऱ्या काळात पक्ष नेतृत्व या अंतर्गत नाराजीवर कसा तोडगा काढते आणि कार्यकर्त्यांचा विश्वास कसा पुन्हा मिळवते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या पीछेहाटीवरून ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी पवार काका-पुतण्यांवर जोरदार प्रहार केला आहे. बीड जिल्ह्यातील परळी येथे माध्यमांशी बोलताना हाके यांनी केवळ पवारांनाच नव्हे, तर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनाही 'नतदृष्ट' म्हणत लक्ष्य केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील २७ महानगरपालिकांमध्ये शरद पवारांच्या पक्षाला साधा नारळही फोडता आला नाही आणि अजित पवारांनाही तुटपुंजे यश मिळाले. ओबीसींना डावलून जरांगे पाटलांना साथ देणाऱ्यांना ओबीसी बांधवांनी त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशा जळजळीत शब्दांत ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. भुजबळ-मुंडेंना दूर ठेवणे भोवले अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या कामगिरीवर बोलताना हाके म्हणाले की, छगन भुजबळ यांना प्रचारापासून दूर ठेवणे आणि धनंजय मुंडे यांना बाजूला करून बजरंग सोनवणे व क्षीरसागर यांना जवळ करणे अजितदादांना महागात पडले आहे. ओबीसी बांधवांनी हे सर्व जवळून पाहिले असून त्याचेच प्रतिबिंब निवडणुकीच्या निकालात उमटले आहे. माने या न माने, पण ओबीसींनी आता पवारांना नाकारले आहे, असा दावा त्यांनी केला. आरक्षण संपलंय, आता तरी जागं व्हा! पुणे महानगरपालिकेतील आकडेवारीचा दाखला देत हाके यांनी खळबळजनक दावा केला. पुण्यामध्ये ४१ ओबीसी जागांपैकी ३० ते ३२ जागांवर मराठा-कुणबी उमेदवारांनी निवडणुका लढवून विजय मिळवला आहे. याचाच अर्थ ओबीसींचे आरक्षण आता केवळ कागदावर उरले असून प्रत्यक्षात ते संपले आहे, असे ते म्हणाले. तिकीट देताना केवळ 'निवडून येण्याची क्षमता' पाहून गुंड आणि धनदांडग्यांना प्राधान्य दिले जाते, अशी टीकाही त्यांनी अजित पवारांवर केली. गिरीश महाजन नतदृष्ट आहेत प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याबद्दल लक्ष्मण हाके यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा कडक शब्दांत निषेध केला. ज्या महामानवाने देशाला संविधान दिले, त्या बाबासाहेबांचे नाव घेण्याची जर तुम्हाला लाज वाटत असेल, तर महाजन तुम्ही 'नतदृष्ट' आहात. तुम्ही पालकमंत्री म्हणून मिरवायच्या आणि मंत्रिमंडळात काम करायच्या लायकीचे नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. भाजपने संविधानाची पायमल्ली सुरू केली असून, पक्ष फोडणे लोकांना विकत घेणे हे असे करत आहेत. जे पोटामध्ये आहे ते तुमच्या ओठावर आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुम्ही ते दाखवून दिले, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
नाशिकपासून सुरू झालेल्या आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चने राज्यातील प्रलंबित प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणले आहेत. वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, अनुसूचित क्षेत्रांमध्ये पंचायतींना अधिक अधिकार देणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी, रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करणे आणि जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त पदे तातडीने भरणे या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. हजारो आदिवासी आणि शेतकरी मुंबईच्या दिशेने पायी निघाले असून, रस्त्यात मिळेल तिथे मुक्काम करत पुन्हा मार्गक्रमण करत आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न अखिल भारतीय किसान सभा करत आहे. लाल झेंडे हातात घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेल्या या लॉन्ग मार्चमुळे ग्रामीण भागातील प्रश्नांना पुन्हा एकदा व्यापक लक्ष मिळाले आहे. मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या मागण्या याआधीही सरकारकडे मांडण्यात आल्या, आश्वासनेही मिळाली, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने प्रशासनावरील विश्वास कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तहसील कार्यालयाबाहेर आधी आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्या आंदोलनातून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने थेट राज्य सरकारपर्यंत पोहोचण्याचा निर्णय शेतकरी आणि आदिवासी संघटनांनी घेतला. त्यानुसार रविवारी नाशिकहून मुंबईच्या दिशेने पायी कूच करण्यात आले. आंदोलनादरम्यान अन्नधान्य, पाणी, सरपण आणि इतर आवश्यक साहित्याची स्वतः व्यवस्था करण्यात आली आहे, असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांत मोर्चेकऱ्यांनी सुमारे 60 किलोमीटरचे अंतर पार केले असून, मंगळवारी सकाळी कसारा घाट उतरून ते ठाणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने शेतकरी आणि आदिवासी या मोर्चात सहभागी झाले असून, संपूर्ण मार्गावर शांततापूर्ण पण ठाम भूमिका घेत सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरकारने प्रतिनिधिमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले या सततच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आणि माध्यमांमध्ये मोर्चाला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अखेर राज्य सरकारने आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधिमंडळाला चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. मंगळवारी मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांसोबत चर्चा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रतिनिधिमंडळात माजी आमदार जे. पी. गावित, माकपाचे पोलित ब्युरो सदस्य व अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक धवले, किसान सभेचे राष्ट्रीय संयुक्त सचिव अजित नवले आणि आमदार विनोद निकोले यांचा समावेश आहे. ठोस निर्णय होणे अत्यावश्यक याआधी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासोबतही बैठक झाली होती. त्या बैठकीत स्थानिक पातळीवरील प्रश्न जिल्हा स्तरावर सोडवले जातील, तर राज्यस्तरीय मागण्या मुंबईत मांडण्यात येतील, अशी सहमती झाल्याचे गावित यांनी सांगितले. मात्र, अनेक वेळा आश्वासनांपुरतेच प्रश्न थांबल्याचा अनुभव असल्याने, यावेळी ठोस निर्णय होणे अत्यावश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मंत्रालयातील चर्चेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष दरम्यान, या लॉन्ग मार्चच्या माध्यमातून सरकारला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, जर मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर संघर्ष अधिक तीव्र केला जाईल. लाल झेंड्यांच्या साक्षीने सुरू असलेला हा पायी मोर्चा केवळ मागण्यांची यादी नसून, सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. आता मंत्रालयातील चर्चेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, या संवादातून काय निष्पन्न होते यावर या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.
३१ जानेवारी पर्यंत अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्रे जमा करा
मुंबई : प्रतिनिधी लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीमध्ये चुकीची माहिती भरल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हजारो लाडक्या बहिणींना १५०० रूपयांचा हफ्ता मिळालेला नाही. अशा अपात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना आता पुन्हा ‘ई-केवायसी’मध्ये दुरुस्ती करता येणार आहे. ई-केवायसीतील चुकीच्या माहितीमुळे ज्या लाभार्थी महिलांना पैसे मिळत नाहीत त्यांच्याकडून पुन्हा अर्ज मागवण्यात आले आहेत. आज (दि. २७) पासून ३१ जानेवारीपर्यंत अंगणवाडी […] The post ३१ जानेवारी पर्यंत अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्रे जमा करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लाडकीच्या खात्यात २१०० येणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात प्रति महिना १५०० रूपयांचे मानधन जमा केले जातो. या योजनेअंतर्गत लाडकीच्या खात्यावर २१०० रूपये देऊयात, असे अश्वासन सरकारकडून देण्यात आलेय. आता यावरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठे वक्तव्य केले. लाडक्या बहिणींचे २१०० रुपये करणार असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहे. मी जे बोलतो ते करुन दाखवतो असंही ते […] The post लाडकीच्या खात्यात २१०० येणार; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस-भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच!
चंद्रपूर : प्रतिनिधी चंद्रपूर महापालिकेतील सत्तेचा तिढा सुटता सुटत नसून काँग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यातच काँग्रेसला बाजूला करत भाजपने सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्याने २४ तासांत अशक्य ते शक्य होईल, अशी चिन्हे आहेत. भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर महापालिकेत भाजप सत्ता स्थापन करेल, असा दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची […] The post काँग्रेस-भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बदलत्या काळाची चाहूल ओळखत आणि पर्यावरणपूरक भविष्यासाठी ठोस पाऊल टाकत, राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी एसटीच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या किरकोळ इंधन विक्री केंद्रांवर ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) चार्जिंग स्थानकांना प्राधान्य देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले. मंत्रालयातील आपल्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच विविध इंधन कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, “भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, वाहतूक व्यवस्थेतही हरित क्रांती घडवून आणणे अत्यावश्यक आहे. भविष्यातील प्रवास हा इलेक्ट्रिक ऊर्जेवर आधारित असेल, आणि एसटी महामंडळ त्यासाठी आजपासूनच पायाभूत सुविधा उभारण्यास कटिबद्ध आहे.” सध्या एसटीच्या सुमारे ९० टक्के बसगाड्या पारंपरिक डिझेल इंधनावर धावत असल्या, तरी टप्प्याटप्प्याने त्यांचे इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करण्याचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय भविष्यातील नव्या बस खरेदीमध्येही ई-बसेसना प्राधान्य दिले जाणार आहे. याच दृष्टीने, एसटीच्या जागेवर सार्वजनिक–खाजगी भागीदारीतून (PPP) उभारल्या जाणाऱ्या इंधन पंपांवर डिझेल आणि सीएनजीसह ईव्ही चार्जिंग स्टेशनची उभारणी बंधनकारक करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पात एसटीला आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्याबरोबरच “ एकाच ठिकाणी पारंपरिक इंधन आणि इलेक्ट्रिक चार्जिंगची सुविधा उपलब्ध झाल्यास, भविष्यातील वाहनव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. ही केवळ सुविधा नाही, तर पर्यावरण संरक्षणासाठी उचललेले दूरदृष्टीचे पाऊल आहे,” असेही त्यांनी अधोरेखित केले. या निर्णयामुळे एसटी महामंडळ केवळ प्रवासी वाहतुकीतच नव्हे, तर हरित ऊर्जेच्या प्रसारातही अग्रणी भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी भाजप नेते तथा मंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. गणेश नाईक यांचे अस्तित्व फक्त नवी मुंबईपुरते मर्यादित आहे. ते तिथे स्वतः तीनवेळा हरले. त्यांची मुलेही दोनवेळा हरली. त्यानंतर आता स्वतःचे नामोनिशाण मिटू नये म्हणून ते भाजपच्या वळचणीला गेलेलत, असे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी त्यांनी गणेश नाईकांचा उल्लेख नवी मुंबईचे 'मिस्टर फाईव्ह पर्सेंट' म्हणूनही केला. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तिखट हल्ला चढवला होता. भाजपने परवानगी दिली तर मी यांचे नामोनिशाण मिटवून टाकेन. आज पुन्हा मी हे बोलत आहे, असे ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर शितल म्हात्रे यांनी त्यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. शितल म्हात्रे म्हणाल्या, गणेश नाईक यांचे अस्तित्व फक्त नवी मुंबईपुरते मर्यादित आहे. तिथे ते स्वतः तीनवेळा हरले. त्यांची मुलेही दोनवेळा हरली. त्यामुळे स्वतःचे नामोनिशाण मिटू नये म्हणून आता ते भाजपच्या वळचणीला गेलेत. गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर बोलू नये. आपल्या हाताखाली असलेला एक सर्वसाधारण कार्यकर्ता आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व त्यानंतर उपमुख्यमंत्री होऊन प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत झाला हे त्यांना बघवत नाही. त्यामुळे त्यांनी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. परंतु त्यांनी हे विसरू नये की, ही थुंकी त्यांच्याच तोंडावर पडणार आहे. गणेश नाईक नवी मुंबईतील मिस्टर फाईव्ह परसेंटशितल म्हात्रे पुढे म्हणाल्या, गणेश नाईक यांना नवी मुंबईत मिस्टर फाईव्ह परसेंट म्हणून ओळखले जाते. या भागात जे कोणते प्रोजेक्ट सुरू होतात, त्यातील 5 टक्के जोपर्यंत नाईकांना दिले जात नाहीत, तोपर्यंत तो प्रोजेक्ट सुरू होत नाही. असे मी नव्हे तर नवी मुंबईकर म्हणतात. याऊलट एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्रात लाडके भाऊ म्हणून बहिणींच्या गळ्यातील ताईत झालेत. ते जिथे जातात तिथे महिलांची त्यांना भेटण्यासाठी गर्दी होते. परंतु गणेश नाईक जिथे जातात तेथून महिला पळून जातात. महिला त्यांच्यापासून दूर जातात. याचे कारण म्हणजे त्यांच्यावर असणारे गंभीर गुन्हे. गणेश नाईकांवर असणाऱ्या गुन्ह्यांची विशेषतः महिलांसंदर्भात असणाऱ्या गुन्ह्यांची माहिती माध्यमांनीच द्यावी. त्यानंतरच ही व्यक्ती काय आहे हे समजेल. आज तुम्ही जे काही बोलत आहात, त्याला आम्हाला अनेक पद्धतीने उत्तर देता येते. पण तुम्ही आमच्या मित्र पक्षाचे नेते असल्यामुळे जास्त बोलत नाही. पण तुम्ही आम्हाला जास्त बोलायला लावू नका. अन्यथा शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. त्यामुळे तुम्ही यापुढे एकनाथ शिंदेंविरोधात गरळ ओकली तर ही महिला आघाडी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात असू द्या, असे शितल म्हात्रे यांनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील कै. नारायणराव उजळंबकर सार्वजनिक वाचनालयाात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आले. महापालिकेचे अधिकारी आदित्य कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. वाचनालयाचे कोषाध्यक्ष अजिंक्य उजळंबकर यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर रमाकंत जगत यांनी कै. नारायणराव उजळंबकर सार्वजनिक वाचनालयातर्फे आदित्य कदम साहेब यांचा शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला. आदित्य कदम यांनी समयोचित भाषण केले. अध्यक्षीय भाषणात रमाकांत जगत यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जोग यांनी केले. कार्यक्रमाला शिवाजी रामरूले, शाहूराज कांबळे, अनंत पवार, भरत चौधरी, डॉ. एस. एल. कुडे, आनंद काळे, गणेश महाजन, ज.म. भोयरेकर, डॉ. सपकाळ, सुखदेव घोडके, एस. आर. जाधव, मनोज शिंदे, संदीप शेलार, म्हस्के, संजय पंडित, प्रेम साळवे यांची उपस्थिती होती. उदय सुरंगलीकर यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.
पंढरपूरहून परतणा-या भाविकांवर काळाचा घाला; ३ महिलांसह १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
मुंबई : प्रतिनिधी राज्यात अपघाताचे सत्र सुरूच असल्याचे दिसत आहे. सोमवारी २६ जानेवारी रोजी सोलापुरातील पंढरपूरच्या मंगळवेढाजवळ भीषण अपघाताची घटना घडली. विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतताना काळाने भाविकांवर घाला घातला. या अपघातात मृत पावलेले भाविक मुंबईचे असल्याची माहिती समोर येत आहे. चौघांच्या मृत्यूने मृतांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देव दर्शन घेऊन परतणा-या भाविकांच्या […] The post पंढरपूरहून परतणा-या भाविकांवर काळाचा घाला; ३ महिलांसह १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बँकांचा संप:पाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पुकारले आंदोलन
बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा असावा, या मागणीसाठी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (AIBEA) मंगळवारी देशव्यापी संप पुकारला. सरकारकडून या मागणीची पूर्तता होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. छत्रपती संभाजी नगरमधील पंजाब नॅशनल बँकेसमोर सर्व बँक कर्मचारी संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले, ज्यात हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे (AIBEA) नेते देविदास तुळजापूरकर यांनी माहिती दिली की, गेल्या अनेक वर्षांपासून बँक कर्मचारी संघटनांकडून पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात करारावर सह्या झाल्यानंतर लवकरच अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन सरकारने दिले होते. तत्कालीन वित्त सचिवांनीही ही मागणी मान्य केली होती. मात्र, अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे देशभरातील बँकांनी संप पुकारला आहे. तुळजापूरकर यांनी पुढे सांगितले की, आजचा संप किती तीव्र करायचा, वाढवायचा की बेमुदत करायचा, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. तसेच, आगामी अर्थसंकल्पात बँकांच्या विरोधात काही धोरणे आल्यास, त्याविरोधातही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बँक कर्मचारी संघटनांनी दिला आहे. या आंदोलनात बँक कर्मचारी संघटनांचे अनेक नेते, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी देविदास तुळजापूरकर, राजेंद्र देवळे यांच्यासह विविध नेत्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत भाषणे दिली.
पुण्यात ताडीवाला रस्त्यावर दोन गटांत हाणामारी:बंडगार्डन पोलिसांनी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला
पुणे स्टेशन परिसरातील ताडीवाला रस्त्यावर किरकोळ वादातून दोन गटांमध्ये मारामारीची घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात पाच महिलांचा समावेश असून, पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी नोंदवल्या आहेत. ही घटना २५ जानेवारी रोजी सायंकाळी प्रायव्हेट रोड येथे आयोजित केलेल्या महाप्रसादाच्या वेळी घडली. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. आरोपींनी जेवणासाठी ठेवलेल्या खुर्च्या आणि ताटे फेकून दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अजय आनंद भालशंकर (वय २९, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात पहिली फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सोनू काळे, दस्तूर नदाफ, गणेश काळे, रफीक नदाफ, इस्माइल नदाफ, साहिल नदाफ आणि भूषण भंडारी यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी घरातील महिलांना मारहाण केली आणि अजय यांचा भाऊ अमर याच्या दुचाकीची तोडफोड केल्याचे भालशंकर यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, अक्षय उर्फ सोनू हरिश्चंद्र काळे (वय ३३, रा. प्रायव्हेट रोड, ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशनजवळ) यांनीही परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, अक्षय भालशंकर, अजय भालशंकर, अमर भालशंकर, आम्रपाली अक्षय भालशंकर, पूनम अजय भालशंकर, अरुणा भालशंकर, दीपाली आणि रुपाली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाप्रसादाच्या वेळी किरकोळ वादातून आरोपींनी काळे आणि त्यांचा मित्र भूषण भंडारी यांना मारहाण केली, तसेच गीता घाटे यांनाही मारहाण झाल्याचे काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. बंडगार्डन पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींची नोंद घेतली असून, या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ करत आहेत.
औंढा तालुक्यातील सोनवाडी शिवारामध्ये अर्धा एकर क्षेत्रावर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा तसेच घरचे धार्मिक कार्यक्रम कसे करावे या चिंतेमुळे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील सोनवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर श्रीरंग मुकाडे (४५) यांना सोनवाडी शिवारामध्ये अर्धा एकर शेत आहे. घरी पत्नी एक मुलगा व एक मुलगी असे कुटुंब असून एका मुलीचा विवाह झालेला आहे. अर्ध्या एकर शेतीमध्ये आलेल्या उत्पन्नावर तसेच रोज मजुरी करून मिळालेल्या उत्पन्नावर ज्ञानेश्वर हे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान यावर्षी खरीप हंगामामध्ये अर्ध्या एकर क्षेत्रामधून कुठल्याही प्रकारचे उत्पन्न हाती आले नाही. अतिवृष्टीमुळे हाती आलेला सोयाबीनचा घास हिरावल्या गेला त्यामुळे लागवडीच्या खर्चही निघाला नाही. यामुळे ते मागील काही दिवसापासून अस्वस्थ झाले होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा तसेच घरातील धार्मिक कार्यक्रम कसे करावे याची चिंता त्यांना लागली होती. दरम्यान त्यांचा मृतदेह एका शेतात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळतात औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे निरीक्षक जी.एस. राहिरे, पोलिस उपनिरीक्षक शेख खुद्दुस शेख लाल यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी सत्वशीला मुकाडे यांनी दिलेल्या माहितीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दुस शेखलाल पुढील तपास करीत आहेत.
पुणे महानगरपालिकेतर्फे मुळा-मुठा नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत मार्च २०२६ अखेर संगमवाडी ते कल्याणीनगर दरम्यान सुमारे ५ किलोमीटर लांबीचे नदीकाठ सुधार काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यामुळे शहराच्या पर्यावरणीय आणि नागरी विकासाला नवी दिशा मिळेल, अशी माहिती मनपाने दिली आहे. पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीची एकूण लांबी सुमारे ४४ किलोमीटर आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यान ३.७ किलोमीटर लांबीच्या नदीकाठ सुधारणा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, बंडगार्डन ते मुंढवा दरम्यान ५.५ किलोमीटर आणि औंध ते बालेवाडी दरम्यान ८.१ किलोमीटर लांबीच्या कामांनाही सुरुवात झाली आहे. नदीकाठ सुधारणा प्रकल्पाच्या लगतच्या उपलब्ध जागेत नागरिकांसाठी विविध नागरी सुविधा आणि थीम पार्क विकसित केले जात आहेत. यामुळे चालणे, सायकलिंग, विरंगुळा आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे. सध्या संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानच्या प्रकल्पाचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. यामधील संगमवाडी येथील सुमारे १.५० किलोमीटर लांबीचा भाग पूर्णतः विकसित करण्यात आला आहे. नुकतीच महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी., पवणीत कौर, ओमप्रकाश दिवटे आणि शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी या कामाची पाहणी केली. यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले. पूर्ण झालेल्या १.५० किलोमीटर ट्रॅकचे लोकार्पण पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून १५ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात येणार आहे. हा ट्रॅक नागरिकांसाठी सकाळी ६ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत खुला राहणार आहे. लवकरच नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी आणि मंत्री यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचेही मनपाने नमूद केले आहे.
घुसखोर बांगलादेशींवर कारवाई करण्याच्या गृहविभागाच्या आदेशाचा काही पोलिस अधिकाऱ्यांनी चक्क 'धंदा' मांडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. खाकी वर्दीतील दरोडेखोरांचा नवी मुंबई आणि कल्याण परिसरात उच्छाद पाहायला मिळत असून, घुसखोर बांगलादेशींविरोधातील कारवाईचा फायदा घेत त्यांनाच लुटणाऱ्या एका सहायक पोलिस निरीक्षकासह (API) चार पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईच्या नावाखाली घरात घुसून रोख रक्कम आणि दागिने असा सुमारे २५ ते ३० लाखांचा ऐवज लुटल्याचा खळबळजनक प्रकार चेंबूरच्या आरसीएफ पोलिस तपासात उघडकीस आला आहे. नवी मुंबईतील एका बारमध्ये काम करणारी अस्मा पॉली (मूळची बांगलादेशी) ही २ जानेवारी २०२६ रोजी कोपरखैरणे येथील तिच्या घरी असताना, साध्या वेशात काही पोलिस एका एजंटसह तिच्या घरी आले. त्यांनी अस्माची चौकशी केली आणि तिला बळजबरीने पोलिसांच्या गाडीत बसवले. अस्मा गाडीत असताना पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली. मात्र, पोलिस ठाण्यात नेल्यानंतर अस्माला तिच्या बहिणीकडून समजले की, घरातील सर्व सामान गायब आहे. अस्माच्या दाव्यानुसार, पोलिसांनी तिच्या घरातून १५ तोळे सोने आणि २० ते २५ लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. एजंट आणि बार मालकाचा मध्यस्थीसाठी वापर लूट केल्यानंतर हे प्रकरण अंगाशी येईल, या भीतीने पोलिसांनी अस्मा काम करत असलेल्या बारच्या मालक रमेश अण्णाला मध्यस्थीसाठी बोलावले. पोलिसांनी चोरलेल्या रकमेपैकी केवळ ५ ते ६ लाख रुपये आणि काही दागिने बार मालकाकडे सुपूर्द करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच, पोलीस शिपाई खांडके याने अस्माला याबद्दल कुणालाही काही सांगायचे नाही, अशी धमकीही दिली. मात्र, आपल्या कष्टाची मोठी रक्कम आणि दागिने गेल्याने अस्माने हिंमत करून आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तपासात समोर आले धक्कादायक वास्तव तपासादरम्यान समोर आले की, याच पोलिस पथकाने २५ डिसेंबर २०२५ रोजी कल्याणमधील शर्मिण खातून या बांगलादेशी महिलेच्या घरात घुसून तिलाही कारवाईची भीती घातली आणि ५ लाख रुपये उकळले होते. पोलिसांसोबत एक अज्ञात एजंट असायचा, जो बांगलादेशींच्या घरांची माहिती काढून त्यांना घाबरवण्याचे काम करायचा. आरसीएफ पोलिसांनी याप्रकरणी ४ पोलिस कर्मचारी आणि १ अज्ञात व्यक्तीवर BNS कलम ३०५ (A), ३०८(२), ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस दलात खळबळ ज्या घुसखोरांमुळे देश धोक्यात असल्याचे सांगून गृह विभाग कारवाईचे आदेश देत आहे, त्याच घुसखोरांना लुटण्यासाठी पोलिस दलातील अधिकारी दरोडे टाकत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारवाईच्या नावाखाली लुटमार करणाऱ्या या पोलिसांवर आता कोणती कठोर विभागीय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या एका महिला उमेदवाराचे अपहरण झाल्याची घटना उजेडात आली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यातच ही घटना घडल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. काँग्रेसने या प्रकरणी सत्ताधारी भाजपला जबाबदार धरले आहे. लातूर जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रकरणी राजकीय चिखलफेकीला जोर चढला असतानाच काँग्रेसच्या लातूर जिल्ह्यातील एका महिला उमेदवाराचे अपहरण झाल्याची घटना समोर आली आहे. अंजना सुनील चौधरी असे अपहरण झालेल्या काँग्रेसच्या महिला उमेदवाराचे नाव आहे. त्या निलंगा तालुक्यातील व औसा व विधानसभा मतदारसंघातील तांबाळा जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. हा गट अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. त्यांचे 24 जानेवारी रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास उदगीर येथून अपहरण झाले. हळदी - कुंकवाला गेल्यानंतर झाले अपहरण यासंबंधीच्या माहितीनुसार, अंजना चौधरी या उदगीर येथील बिदर रोड परिसरातील आपल्या मैत्रिणीकडे हळदी - कुंकवाच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. हा कार्यक्रम संपल्यानंतर त्या थेट प्रचाराला जाणार होत्या. त्यानुसार त्यांना घेण्यासाठी काँग्रेसचे स्थानिक नेते रणजीत कोकणे तिथे पोहोचले होते. पण रणजीत कोकणे काही कारणास्तव बाहेर गेले असता, काही गुंडांनी अंजना यांना जबरदस्तीने आपल्या गाडीत घालून पळवून नेले. या घटनेनंतर काँग्रेसने भाजपविरोधात अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी या घटनेसाठी भाजपला जबाबदार धरले आहे. पोलिस अधीक्षकांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन अभय साळुंके या प्रकरणी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सत्ताधारी भाजप आमदाराच्या गुंडांनी हे अपहरण केले. निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला करण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र रचले. या प्रकरणी काँग्रेसने जिल्हा पोलिस अधीक्षकांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. अंजना चौधरी याचा शोध घेऊन त्यांची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी काँग्रेसने या निवेदनामार्फत केली आहे. बंडखोर उमेदवारांची मनधरणी सुरू दुसरीकडे, लातूर जिल्हा काँग्रेसने या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासह ठाकरे गट व राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेशी आघाडी केली आहे. वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. आमदार अमित देशमुख यासंबंधी बोलताना म्हणाले, जिल्ह्यात आता भाजपविरोधात मत तयार झाले आहे. महापालिका निवडणुकीत ते स्पष्टपणे दिसून आले. सध्या काँग्रेस आपल्या बंडखोर उमेदवारांचे मन वळवण्याचे प्रयत्न करत आहे.
पुण्याच्या वाघोली परिसरात एका महिलेने आपल्या पोटच्या मुलाची चाकूने गळा कापून हत्या केल्याची भयंकर घटना उजेडात आली आहे. या घटनेत एक 11 वर्षीय मुलगा ठार झाला असून, त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे. कौटुंबीक वादातून महिलेने हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, सोनी संतोष जायभाय असे आरोपी मातेचे नाव आहे. तर साईराज संतोष जायभाय (11) हे मृत मुलाचे नाव असून, धनश्री संतोष जायभाय (13) असे जखमी मुलीचे नाव आहे. तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जायभाय कुटुंब मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील आहे. ते सध्या नोकरी निमित्त वाघोलीतील बाईफ रोड परिसरात वास्तव्यास आहे. आरोपी महिलेचा पती मंगळवारी सकाळी कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यावेळी तिने संधी साधून आपल्या मुलांवर चाकूने हल्ला चढवला. मुलाचा चाकूने गळा चिरला महिलेने प्रथम आपला मुलगा साईराज याचा गळा चाकूने कापला. त्यानंतर तिने धनश्रीवरही चाकूने सपासप वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली. घरातील आरडाओरडा ऐकूण शेजाऱ्यांनी त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी हा प्रकार पाहून तत्काळ पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी आईला अटक केली. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घरातील फरशीवर रक्ताचा सडा पडला होता. कौटुंबीक वादातून ही घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. दोन्ही मुलांना ठार मारून आरोपी महिला स्वतःही आत्महत्या करण्याच्या विचारात होती, असेही सांगितले जात आहे. महिलेने हे कृत्य का केले? या घटनेमुळे वाघोली परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. या महिलेने हे कृत्य का केले? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण पोलिस तिची कसून चौकशी करत आहेत. कौटुंबिक वाद की मानसिक तणाव? यामागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. या घटनेनंतरचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत, त्यामध्ये घरात असलेल्या पांढऱ्या फरशीवरती सर्वत्र रक्ताचे लाल डाग पडल्याचं चित्र दिसून येत आहे. दरम्यान, वाघोलीत सतत घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाघोलीत अवघ्या दोन दिवसांत घडलेली ही दुसरी निर्दयी घटना आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
राज्यातील राजकारण पुन्हा एकदा 'फोडाफोडी'च्या चर्चेने ढवळून निघाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते अंबादास दानवे हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. दानवे यांची आमच्याकडे येण्याची 'प्रोसेस' सुरू झाली आहे, असे सामंत यांनी रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना सांगितले. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, संजय राऊत यांनी यावर जोरदार पलटवार केलाय. अंबादास दानवे हे सातत्याने महायुती सरकार आणि शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करत असतात. यावर बोलताना उदय सामंत म्हणाले, दानवे यांच्या टीकेला मीडियाने फारसे गांभीर्य देऊ नये. आपल्या नेत्यांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी ते अशी विधाने करत असतात. मात्र, पडद्यामागे त्यांच्या पक्षप्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच ते आमच्यासोबत दिसतील. सामंत यांनी पुढे टोला लगावला की, उबाठा'चे नेतृत्व सक्षम नसल्यामुळेच निवडून आलेले नगरसेवक पक्ष सोडून जात आहेत. दानवे देखील याच वाटेवर आहेत. सामंतच भाजपच्या वाटेवर; राऊतांचा पलटवार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंबादास दानवे यांना शिंदे सेनेत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले. यावर संजय राऊत यांनी हा दावा साफ फेटाळून लावला. अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी कधीही पक्ष बदलले नाहीत. ते आमचे सहकारी आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी उदय सामंत यांच्या वक्तव्याला कोणताही अर्थ नसल्याचे सांगितले. उलट, उदय सामंत हे स्वतः एका मोठ्या गटासह भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. दावोसमध्ये काय चर्चा झाली, हे तुम्हाला माहिती आहे का? असा पलटवारही राऊतांनी केला. यामुळे शिंदे गटातील अस्वस्थता आणि संभाव्य घडामोडींच्या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. राजकीय अस्वस्थतेचे संकेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवक आणि नेत्यांच्या पक्षंतराची ही चर्चा चांगलीच रंगणार असल्याचे दिसत आहे. एका बाजूला शिंदे गट 'उबाठा'चे मोहरे आपल्याकडे खेचत असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे ठाकरे गट आपल्या नेत्यांच्या निष्ठेची ढाल पुढे करत प्रतिआक्रमण करत आहे. अंबादास दानवे यांच्यावर उद्धव ठाकरे यांचा मोठा विश्वास आहे. मात्र विरोधक त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना सातत्याने हवा देत आहेत. सामंत आणि राऊत यांच्यातील या वाकयुद्धामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांमधील संघर्ष अधिकच टोकदार झाला असून, येणाऱ्या काळात अंबादास दानवे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
सत्ताधारी भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. या अंतर्गत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांच्या उमेदवारांना आपला वेळ व पैसा वाया न घालवता निवडणुकीतून माघार घेण्याचे वादग्रस्त आवाहन केले आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना उपरोक्त विधान केले आहे. नगरपालिका, नगरपरिषद व महापालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. विरोधकांनी या निवडणुकांचे विश्लेषण करून आत्मपरीक्षण करावे. त्यांना या निवडणुकांच्या निकालावरून जमिनीवरील वस्तुस्थिती लक्षात आली असेल. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांचा टिकाव लागणार नाही. त्यामुळे त्यांनी आपला वेळ व पैसा वाया घालवू नये. त्यांनी सरळ आपले अर्ज मागे घ्यावेत. त्यातच त्यांचा शहाणपणा आहे, असे ते म्हणालेत. विरोधकांचा विकासापुढे टिकाव लागणार नाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी राजकीय गट, यंत्रणेला टोला आदी राजकारणातील ग्रामीण भागातील गुळगुळीत शब्द काय असतात यावरही भाष्य केले. मला ग्रामीण भागातील राजकारणाची चांगलीच माहिती आहे. गट टिकवणे असो वा यंत्रणा कामाला लावणे किंवा बळ देणे असो, हे सर्वच शब्द मी जवळून अनुभवलेत. विरोधक आपली संपूर्ण यंत्रणा व आर्थिकि ताकद लावून थकतील. पण जनतेचा कौल त्यांना बदलता येणार नाही. शेवटी विकासाचाच विजय होईल. केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्य जनता कल्याणकारी योजनांवर खुश लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजनेसारख्या सर्वच योजनांवर सर्वसामान्य लोक खुश आहेत. जनतेचा हा आनंद व पाठिंबा आगामी निवडणुकीच्या निकालातून स्पष्टपणे दिसेल. या निवडणुकीत विरोधकांचा निभाव लागणे अवघड आहे. त्यामुळे त्यांनी पैसा व वेळ वाया घालू नये, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत. दरम्यान, विरोधकांनी चंद्रकांत पाटलांवर या विधानाद्वारे दबावाचे राजकारण करण्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या प्रकरणी मोठा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. हे ही वाचा... शिंदे गटाने भाजपचा संयुक्त गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळला:आज कोकण आयुक्तांकडे करणार स्वतंत्र गटनोंदणी; काय आहे रणनीती? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक आज आपला स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. शिंदे गटाने यासंबंधी भाजपसोबत संयुक्त गट नोंदणी करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. पुढील 5 वर्षे भाजपच्या दबावात राहण्यापेक्षा आपल्या वाट्याला येईल ते स्वीकारून स्वतःचे अस्तित्व जपायचे, ही या मागची शिंदे गटाची रणनीती असल्याचा दावा केला जात आहे. वाचा सविस्तर
शिंदे शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी करत थेट पुढाकार घेतला आहे. आज शिंदे सेनेचे नगरसेवक स्वतंत्र गट नोंदणीसाठी कोकण भवनात जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच मुद्द्यावरून सकाळीच खासदार संजय राऊत यांनी शिंदे सेनेवर आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुंबईचा महापौर भाजपचाच होईल आणि शिंदे सेना निमूटपणे त्याला पाठिंबा देईल, असा थेट दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. शिंदे सेनेच्या स्वतंत्र गट नोंदणीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी शिंदे शिवसेनेवर कडवट शब्दांत हल्ला चढवला. शिंदे गटाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच वंदनीय आहेत, बाळासाहेब ठाकरे नाहीत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. शिंदे शिवसेना ही भाजपचं अंगवस्त्र आहे. किती दिवस रुसून बसणार? फारतर एखादी साडी-चोळी पदरात पाडून घेतील, असा जहरी टोला राऊतांनी लगावला. कोश्यारी यांच्याबाबतच्या वक्तव्यांवरूनही संजय राऊत यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र हल्ला केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना विरोध करणे, महात्मा फुले यांच्या विचारांचा अपमान करणाऱ्यांना विरोध करणे हे जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संकुचित वाटत असेल, तर मी त्यांना कोपरापासून दंडवत घालतो, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला असताना फडणवीस यांनी त्यांची बाजू घेतली, ही दिल्लीचीच जबाबदारी होती, असा आरोपही त्यांनी केला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवरही त्यांनी सवाल उपस्थित केला. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंबादास दानवे यांना शिंदे सेनेत आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले. यावर संजय राऊत यांनी हा दावा साफ फेटाळून लावला. अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. त्यांनी कधीही पक्ष बदलले नाहीत. ते आमचे सहकारी आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी उदय सामंत यांच्या वक्तव्याला कोणताही अर्थ नसल्याचे सांगितले. उलट, उदय सामंत हे स्वतः एका मोठ्या गटासह भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. दावोसमध्ये काय चर्चा झाली, हे तुम्हाला माहिती आहे का? असा पलटवारही राऊतांनी केला. यामुळे शिंदे गटातील अस्वस्थता आणि संभाव्य घडामोडींच्या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. महापौरपदाच्या तिढ्याबरोबरच भाजपवर सन्मान आणि पुरस्कारांवरूनही राऊतांनी निशाणा साधला. महाराष्ट्रात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून शिंदे-भाजपचे सरकार बसवणाऱ्यांना मोदी सरकारकडून पद्मभूषण देण्यात येतो. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला, त्यांचा भाजप सन्मान करतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला. अमृता फडणवीस यांच्यावरील वक्तव्यावर भाष्य करताना त्यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह बोलणे चुकीचे असल्याचेही नमूद केले, मात्र गमछा घातला नाही म्हणून टीका करणे हा भाजपचा खेळ आहे, अशी टीका करत भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दिलगिरी व्यक्त केली असेल, तर पडदा पडला पाहिजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या मुद्द्यावर संजय राऊत यांनी समतोल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, संबंधित व्यक्ती कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल, तर त्या विषयावर पडदा पडला पाहिजे. 26 जानेवारी रोजी भारताला संविधान मिळाले आणि देश प्रजासत्ताक झाला, त्यामुळे त्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानेच व्हायला हवी, हे सत्य आहे. निषेध नोंदवणाऱ्या महिलेचाही सन्मान व्हायला हवा, असे सांगत राऊत यांनी तिच्या भूमिकेचे कौतुक केले. मात्र मंत्र्यांनी माफी मागितली असून नाक घासले आहे, त्यामुळे हा विषय आता फार ताणू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक आज आपला स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. शिंदे गटाने यासंबंधी भाजपसोबत संयुक्त गट नोंदणी करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. पुढील 5 वर्षे भाजपच्या दबावात राहण्यापेक्षा आपल्या वाट्याला येईल ते स्वीकारून स्वतःचे अस्तित्व जपायचे, ही या मागची शिंदे गटाची रणनीती असल्याचा दावा केला जात आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालाला 10 दिवस लोटलेत. पण अद्यापही सत्ताधारी भाजप व शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांची गटनोंदणी केली आहे. हे दोन्ही पक्ष कोकण आयुक्तांकडे संयुक्त गटनोंदणी करतील अशी माहिती होती. पण आता शिंदे गट स्वतःच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व जपण्यासाठी स्वतंत्र गटनोंदणी करणार आहे. त्यानुसार, मुंबई महापालिकेतील शिंदे गटाचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आज कोकण आयुक्तांकडे जाऊन आपला स्वतंत्र गट स्थापन करणार आहेत. शिंदे गटाने या प्रकरणी भाजपसोबत मिळून एकच गट स्थापन करण्याचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. भाजपसोबत सुरू होत्या वाटाघाटी यासंबंधीच्या माहितीनुसार, भाजप व शिंदे गटात सध्या बीएमसीच्या महापौरपद, उपमहापौरपद, विविध वैधानिक व विशेष समित्यांच्या अध्यक्षपदासह सदस्यसंख्येप्रकरणी चर्चा सुरू होती. विशेषतः या प्रकरणी पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असलेल्या स्थायी समितीमधील सदस्यसंख्येवरून गणिते मांडली जात होती. सध्याच्या रचनेनुसार स्थायी समितीत सत्ताधारी व विरोधकांची सदस्यसंख्या समसमान येत आहे. शिक्षण समितीचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य असल्याने सत्ताधारी गट केवळ एका सदस्याने आघाडीवर आहे. शिक्षण समिती अध्यक्ष वगळता सत्ताधारी व विरोधकांचे प्रत्येकी 13 सदस्य स्थायी समितीवर जातील अशी स्थिती आहे. शिंदे गटाने भाजपचा कोणता धोका ओळखला? सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप व शिंदे गटाची संयुक्त गट नोंदणी झाल्यास गुणोत्तर प्रमाणात बदल होऊन सत्ताधाऱ्यांचा 1 सदस्य वाढू शकतो. पण संयुक्त नोंदणी झाल्यानंतर महापालिकेत भाजप - शिंदे गटाचा एकच गटनेता असेल. सभागृहात तसेच सर्वच समित्यांत भाजप जी भूमिका घेईल, तिला शिंदे गटाला अनिवार्यपणे पाठिंबा द्यावा लागेल. याशिवाय महापालिकेत दोन्ही पक्षांना स्वतंत्र कार्यालय मिळण्याऐवजी एकच कार्यालय मिळण्याची शक्यता होती. एवढेच नाही तर समित्यांवर शिंदे गटाला किती प्रतिनिधित्व द्यायचे याचा अंतिम निर्णयही भाजपच्याच गटनेत्याकडे राहण्याचा धोका होता. सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार, स्वतंत्र गटनोंदणी झाल्यास स्थायी समितीवर भाजपचे 8 व शिंदे गटाचे 3 सदस्य जाण्याची शक्यता आहे. पण संयुक्त गट झाल्यास शिंदे गटाचे किती सदस्य स्थायी समितीवर पाठवायचे याचे सर्वाधिकार भाजपकडे गेले असते. यामुळे शिंदे गटाने स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे महापालिकेत सत्ताधारी पक्ष महायुती म्हणून काम करणार असले तरी सत्तेतील समतोल व समित्यांवरील वाटाघाटींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.खालील तक्त्यात पाहा मुंबई महापालिकेचे पक्षीय संख्याबळ
मालाड रेल्वे स्थानकावर एका प्राध्यापकाची हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना, किरकोळ वादातून ओंकार शिंदे या सुशिक्षित तरुणाने इतके टोकाचे पाऊल का उचलले? या प्रश्नाने पोलिसांनाही चक्रावून सोडले होते. अखेर या प्रकरणातील संशयाचे धुके सरकले असून हत्येमागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. विधानपरिषदेचे माजी आमदार कपिल पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे या घटनेमागच्या मूळ कारणावर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये गर्दीतून उतरताना झालेल्या वादात आलोक सिंह यांनी ओंकारला महिलांसमोर झापले होते. सर्वांसमोर, विशेषतः महिलांसमोर झालेल्या या अपमानामुळे ओंकारचा राग अनावर झाला. त्याच्याकडे कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती, पण त्या क्षणी दुखावलेल्या स्वाभिमानाने त्याचे विवेकबुद्धीवरचे नियंत्रण सुटले. कपिल पाटील फेसबूक पोस्टमध्ये नक्की काय म्हणाले? कपिल पाटील फेसबूक पोस्टमध्ये म्हणाले की, ट्रेनमध्ये धक्के कधी लागत नव्हते ? पण आता धक्काही सहन होत नाही. लोकांचे पेशन्स संपत चालले आहेत. किरकोळ कारणांवरून माणसं घायकुतीला येतात. 27 वर्षांच्या ओमकार शिंदेने धारदार शस्त्राने 32 वर्षांच्या प्रा. आलोक कुमार सिंह यांचा बळी घेतला. प्रतिष्ठित एन. एम. कॉलेजमध्ये तो गणित शिकवायचा. दोन वर्षांपूर्वी तो लेक्चरर म्हणून लागला होता. त्याचे प्राचार्य पराग आजगावकर सांगत होते, कोणत्याच भानगडीत न पडणारा, अत्यंत सालस पण तितकाच बुद्धिमान शिक्षक. ट्रेनमधून अनेकदा दारात लटकून सगळेच प्रवास करतात. मीही केलाय लटकत. लटकणार्यांना लोक हाताने आधार द्यायचे. पोलिसांनी अवघ्या 12 तासात मारणार्याला शोधून काढलं. पोलिसांचं कौतुकच. ओमकार शिंदे असं का वागला ? कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती त्याची, तरीही जीवघेण्याचा गुन्हा त्याच्याकडून का घडला ? पोलीस शोधताहेत. दोन - अडीच महिन्यांपूर्वीची घटना आहे, 'भाई थोडा आगे हो जाओ, धक्का लग रहा है।' एवढंच 19 वर्षांचा अर्णव खैरे बोलला. हिंदीत का बोलतो, म्हणून त्याला मराठी मुलांनीच ट्रेनमध्ये मारहाण केली. अपमान आणि भीतीच्या धक्क्याने कोवळ्या अर्णवने राहत्या घरी गळफास घेतला. मालाडच्या घटनेला रंग देण्याची गरज नाही. पण माणसं घायकुतीला येतात. पेशन्स हरवतात. राग अनावर होतो. धारदार शस्त्राने थेट पोटात वार होतो. एका तरुण शिक्षकाचा बळी जातो. लोकही मध्ये पडत नाहीत. मारणार्याचे हात धरत नाहीत. माणसं प्रचंड भयाखाली जगताहेत. संशयाने पाहताहेत. एका बाजूला लोकलचा ताण, प्रचंड धावपळ, सुधारणांची शक्यता नाही. चिकटून एकमेकांचा घाम एकमेकात रिचवून प्रवास करणार्यांची मनं मात्र आता एकमेकांपासून कोसो दूर गेली आहेत. कशामुळे हे घडतंय? अशांततेचे सोपे फंडे शोधतात आमचे नेते. त्यांच्या राजकारणासाठी. पण अप्रत्यक्षपणे ते लोकमनावर खोल परिणाम करत जातात. प्रचंड स्ट्रेस, घरा- दारातले आणि प्रवासातले ताण - तणाव, संशय आणि द्वेष एकाबाजूला. तर दुसऱ्या बाजूला जगण्याची साधनं, उत्पन्न अत्यंत मर्यादित. अशा विलक्षण कोंडीत सापडलेल्या माणसांचा स्फोट होतो. गेले काही महीने भाषा, प्रांत आणि धर्माच्या नावाने कंठाळी गदारोळ सुरू आहे. मी मराठी तो भैय्या, मी हिंदू तो मुसलमान. आपली सहनशिलता आणि सहिष्णुता पार हरवून गेली आहे. मनात साचलेल्या रागाला आपल्याच सारख्या दुसर्या कष्टकरी माणसाला शत्रू बनवलं आहे. मारणारा ओमकार दिवसभर कष्ट करून किती कमवत असेल ? 15 - 16 हजार. पण आलोक सिंहचा पगार तरी किती होता ? तोही ज्युनिअर कॉलेजला कंत्राटी शिक्षक. जेमतेम 20 हजार. ओमकार 12वी पास होता, कोकणी मुलगा. पण ओमकारला राग व्यवस्थेचा येत नाही, आलोकचा येतो. कुणीतरी त्याला तसं सांगितलेलं असतं आपल्या घरातलं कुणीतरी रोज लोकल ट्रेनने प्रवास करत असतं, त्याची काळजी आपणच व्हायला हवी. सहनशिलता आणि सहिष्णुता त्याला शिकवली नाही तर वार कुणावरही होऊ शकतो. व्यवस्थेवर मात्र कधीच होत नाही. आपला मुलगा कोणावर तरी राग काढतो. त्याच्या हातून काही अघटीत घडतं. मग आपला मुलगाही वाचत नाही. नेत्यांच्या मुलांवर साधी केसही होत नाही. आलोक सिंहच्या पार्थिव शरीराचं दर्शन घेत होतो. त्याच्या वडिलांचा आणि गर्भार पत्नीचा टाहो काळजाला चीर पाडत होता. त्याच्या गर्भार पत्नीचं काय होईल? महिलांसमोर अपमान झाला या रागातून ओमकार सणकला. पुरुषी मानसिकता आणि दुसऱ्याचा द्वेष या दोघांचं कॉकटेल विषारी बनतं. आत्मघातकी बनतं. त्यातून टोकाची प्रतिक्रिया उमटते. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना ओमकार सारख्या तरुणाकडून गुन्हा घडतो, हे अधिक गंभीर आहे. आलोक आपल्या शेजारच्याच घरातला आणि ओमकार आपल्या घरातलाच...
नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठे रणकंदन माजले आहे. या प्रकरणावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाजन यांच्यावर घणाघाती प्रहार केला आहे. ज्यांना बाबासाहेबांचे नाव घेण्याची लाज वाटते, त्यांना या देशात राहण्याचा आणि सत्तेच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे. नाशिकच्या या कार्यक्रमात गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना, तिथे उपस्थित असलेल्या महिला वन अधिकारी माधवी जाधव यांनी उभे राहून थेट आक्षेप घेतला. संविधान निर्मात्यांचे नाव तुम्ही कसे काय विसरलात? असा रोखठोक सवाल त्यांनी भर कार्यक्रमात विचारला. या अनपेक्षित प्रकारामुळे सोहळ्यात काही काळ गोंधळ उडाला. या प्रकरणावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. विजय वडेट्टीवार यांचा सडेतोड प्रहार या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री गिरीश महाजन आणि सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली. या मंडळींना बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायला लाज वाटते. हे तेच लोक आहेत ज्यांनी संविधान निर्मितीच्या काळात त्याला विरोध केला होता. यांचा संविधानावर विश्वास आहे का? ज्यांना संविधान निर्मात्याचे नाव घेण्याची लाज वाटते, त्यांना या देशात राहण्याचा आणि खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. हे सरकार हुकूमशाही पद्धतीने चालले आहे की लोकशाहीने, याचे उत्तर जनताच मागेल. संविधानावर विश्वास नसणाऱ्यांनी सत्तेत राहणे लोकशाहीसाठी घातक आहे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. नेमके प्रकरण काय? नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात गिरीश महाजन यांचे भाषण सुरू होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. हे लक्षात येताच वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी जाहीरपणे आक्षेप नोंदवला. “संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात? भाषणादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले नाही?” असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. यामुळे काही काळ कार्यक्रमात तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे या दोघींना ताब्यात घेतले व सरकारवाडा पोलीस ठाण्यात नेले. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले आणि त्यांनी गिरीश महाजन यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी याप्रकरणी मंत्री महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रारही दाखल केली आहे. राजकीय वातावरण तापले संविधानाच्या उत्सवातच संविधान निर्मात्याचे नाव विसरल्याने गिरीश महाजन आणि भाजप सरकारवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. दुसरीकडे, कर्तव्यावर असताना मंत्र्यांना जाब विचारणाऱ्या माधवी जाधव यांच्या धाडसाचे कौतुकही समाजमाध्यमांवर केले जात आहे. या प्रकरणाचे पडसाद आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांवर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने निर्माण झालेला वाद शांत होण्याऐवजी अधिकच पेटताना दिसत आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना मंत्री गिरीश महाजन यांनी, मी गावात पंगत देतो, त्यांच्यासोबत जेवायला बसतो, 40 वर्षांत अंगात निळा शर्ट घातला नाही असं कधी झालंय का? असे वक्तव्य केल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. दिलगिरी व्यक्त करूनही अशा विधानांमुळे समाजात संभ्रम आणि संताप वाढत असून, महाजनांच्या या वक्तव्यावरून राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात भाषण करताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने उपस्थितांमध्ये असंतोष निर्माण झाला. विशेष म्हणजे, कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या एका महिला वन अधिकाऱ्याने थेट जाहीरपणे आक्षेप घेत संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात? असा सवाल केल्याने वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले. या घटनेचे पडसाद आता नाशिकपुरते मर्यादित न राहता राज्यभर उमटू लागले असून, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याबाबत जाहीरपणे आक्षेप नोंदवला. त्यांच्या या कृतीमुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला आणि दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या कारवाईनंतर नागरिक आणि विविध संघटनांनी पोलिस ठाण्याबाहेर एकत्र येत मंत्री महाजन यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी या घटनेला गंभीर स्वरूप देत महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नव्हे तर संपूर्ण देशाच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. अशा महामानवाचा उल्लेख टाळला जाणे हे अपमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. या मागणीनंतर राजकीय वातावरण अधिक तापले असून, महाजन यांची अडचण वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, मला आज खूप वाईट वाटले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये मी नेहमीच पुढाकार घेतो. अनेक नेते हार घालून निघून जातात, पण मी आमच्या गावात आणि तालुक्यात जयंती कार्यक्रमात उपस्थित राहतो. त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या चाळीस वर्षांत त्यांनी कधीही बाबासाहेबांचा अपमान होईल असे वर्तन केलेले नाही. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभारण्यात आला असून, मातंग समाज, वाल्मिकी समाज यांच्यासाठी आपण सातत्याने काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले. गिरीश महाजन यांनी हेही स्पष्ट केले की, मी संघाच्या संस्कारात वाढलेला आहे. गावात पंगत देतो, सर्व समाजातील लोकांसोबत जेवायला बसतो. मी बाबासाहेबांचे विचार जपणारा आहे. भाषणात बाबासाहेबांचा उल्लेख अनवधानाने राहिला असेल, पण यावरून एवढा गदारोळ कशासाठी, हे मला समजत नाही. त्यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करत दिलगिरी व्यक्त केली. ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर त्यांनी प्रश्न उपस्थित करत, कशासाठी ॲट्रॉसिटी? असा सवालही केला. या प्रकरणानंतर वन विभागातील कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. शासकीय कार्यक्रमात एका महिला कर्मचाऱ्याने थेट मंत्र्यांना जाब विचारण्याचे धाडस केल्याने ही घटना विशेष चर्चेत आहे. माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली असून, या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत. दोन्ही महिला कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ विविध सामाजिक संघटना आणि नागरिक रस्त्यावर उतरल्याचेही पाहायला मिळाले. सामाजिक आणि राजकीय वादाचे रूप एकीकडे गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला असला, तरी त्यांच्या वक्तव्यावर आणि भूमिकेवर विरोधकांकडून टीकेची झोड उठत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात न होणे ही केवळ चूक नसून ती मानसिकतेचे प्रतीक असल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता, सामाजिक आणि राजकीय वादाचे रूप घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. येत्या काळात या प्रकरणात पोलिस आणि प्रशासन काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा पेच अद्याप कायम असून, यावर अंतिम तोडगा काढण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आज (२७ जानेवारी) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. तत्पूर्वी काँग्रेसगचा एक गट भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. चंद्रपूरच्या राजकारणात मुनगंटीवार यांचा शब्द अंतिम मानला जात असल्याने, त्यांच्या संमतीशिवाय महापौरपदाचा कोणताही निर्णय न घेण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चंद्रपुरात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि 'वंचित'सोबत भाजपचा संवाद सुरू होता. भाजपने ठाकरे गटाला उपमहापौरपद आणि दोन वर्षांसाठी स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, ठाकरे गटाने अचानक महापौरपदाची मागणी केल्याने चर्चा फिस्कटल्याची माहिती समोर आली आहे. सुधीर मुनगंटीवार हे ठाकरेंच्या शिवसेनेला महापौरपद देण्यास अनुकूल नसल्याचे समजते. आजच्या चर्चेत मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्याशी संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मुनगंटीवारांचा काँग्रेसबाबत खळबळजनक दावा मुंबईला रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी मोठा दावा केला आहे. काँग्रेसचा एक मोठा गट आमच्या संपर्कात असून, त्यांच्यातील अनेक नगरसेवकांची भाजपसोबत येण्याची इच्छा आहे. जर ही चर्चा यशस्वी झाली, तर निश्चितपणे चंद्रपूरचा महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे चंद्रपूरच्या सत्तेत काँग्रेसच्या मदतीने भाजप नवीन चमत्कार घडवणार का? अशी चर्चा रंगली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपचा महापौर हवा मुनगंटीवार यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करताना जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा मांडला. गेल्या १० वर्षांत आम्ही चंद्रपूरच्या प्रगतीसाठी प्रचंड प्रयत्न केले आहेत. सध्या जिल्ह्यात २३ ते २४ महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत. हे प्रकल्प सुरळीत पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेत भाजपचाच महापौर असणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच त्यांनी अचानक महापौरपदाची मागणी केल्याने पेच निर्माण झाल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. चंद्रपुरातील पक्षीय बलाबल दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपाचे २४ नगरसेवक आहेत, तर शिवसेना ठाकरे गटाचे ६ नगरसेवक आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडी दोन आणि अपक्ष दोन असे १० नगरसेवक होतात. भाजपाचे २४ आणि ठाकरे गट, वंचित, अपक्ष असे १० नगरसेवक मिळून ३४ चा बहुमताचा आकडा गाठला जाऊ शकतो.
हिंगोली जिल्ह्यातील साखरा येथील रहिवासी असलेले पिंपरी चिंचवड पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. त्यांच्या यशामुळे हिंगोली जिल्हयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला असून त्यांच्या यशाबद्दल गावकऱ्यांनी जल्लोष केला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पिंपरी चिंचवड येथील सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांचे प्राथमिक शिक्षण साखरा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले तर तर माध्यमिक शिक्षण हिंगोली शहरात पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागातून जिद्दीच्या जोरावर पोलीस दलात वरिष्ठ पदापर्यंत पोहोचलेल्या कुबडे यांनी १९९३ मध्ये पोलिस दलात प्रवेश केला. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांनी नक्षलग्रस्त भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी बजावली त्यांच्या कामाची दखल घेऊन सन २०१८ मध्ये त्यांना पहिल्यांदा गुणवत्तापूर्ण सेवेचे राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आले होते. त्यानंतर गुन्हे शाखा आणि विविध पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम करताना त्यांनी गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रभावी पावले उचलली आहेत. विशेषतः तडीपार, मोकोका व स्थानबध्दतेच्या कारवायांमध्ये त्यांची भुमीका महत्वाची ठरली आहे. पोलिस दलातील अतिशय कर्तव्यदक्ष व शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या कुबडे यांना दुसऱ्यांचा राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. त्यांच्या यशाबद्दल हिंगोलीसह साखरा येथील गावकऱ्यांनी जल्लोष करून त्यांचे अभिनंदन केले आहे. कुबडे यांना मिळाले १२०० पेक्षा अधिक पारितोषीक पोलिस दलात गंभीर गुन्हयांची उकल करणे, गुन्हेगारांना अटक करणे यासह इतर कामगिरी बद्दल त्यांना आतापर्यंत तब्बल १२०० पेक्षा अधिक पारितोषिक मिळाले आहेत. या शिवाय साडेचारशे पेक्षा अधिक प्रशांसापत्र मिळाले आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहिर झाले आहे. त्यांच्या यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी ता. २६ त्यांचा पिंपरी चिंचवड येथे सत्कार करण्यात आला.
वसमत ते औंढा नागनाथ मार्गावर चोंढीफाटा शिवारात वाळूची अवैध वाहतूक करणारे टिप्पर पोलिस उपमहानिरीक्षकांच्या पथकाने मंगळवारी ता. २७ पहाटे पकडले असून टिप्पर व वाळू असा सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांवर कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्हयात वाळूचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महसूल विभागाचे तर पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी पोलिस विभागाचे पथक नियुक्त केले आहे. या पथकाकडून दररोज वाळू घाटाकडे जाणाऱ्या मार्गावर पाहणी केली जात आहे. त्यामुळे जिल्हयातील वाळू वाहतूकीला काहीसा लगाम बसला आहे. दरम्यान, जिल्हयातून वाळू वाहतूक रोखली जात असतांना आता जिल्हयात नांदेड भागातून वाळू आणली जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विशेष पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय रोखण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक दशरथ तलेदवार यांचे पथक स्थापन केले आहे. या पथकाकडून नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या भागात अवैध व्यवसायाची माहिती घेऊन त्यावर छापे टाकले जात आहेत. दरम्यान, नांदेड कडून एका टिप्परमध्ये वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यावरून जमादार खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी यांच्या पथकाने वाहनाचा माग काढण्यास सुरवात केली. सदर टिप्पर वसमत ते औंढा नागनाथ मार्गावर चोंढी शिवारात असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास छापा टाकून टिप्पर ताब्यात घेतले. टिप्पर चालकाकडे विचारणा केल्यानंतर त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी टिप्पर व वाळू असा २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक हनुमंत धतुरे यांच्या तक्रारीवरून टिप्पर चालक मंगेश खैरे (रा. गिरगाव, ता. वसमत), मालक विलास कल्याणकर (रा. महादेव पिंपळगाव, जि. नांदेड) यांच्या विरुध्द कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमादार भगवान वडकिले पुढील तपास करीत आहेत. दरम्यान या पथकाने औंढा नागनाथ शिवारातही एक टिपर पकडल्याचे सूत्रांनी सांगितले या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
मरिन ड्राईव्ह येथील ऐतिहासिक विल्सन जिमखान्याचा भूखंड राज्य सरकारने 'जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन' या संस्थेला ३० वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या संस्थेने ताबा मिळवताच जिमखान्याचे नाव बदलून 'जैन जिमखाना' असा फलक लावल्याने स्थानिक गिरगावकर आणि विल्सन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयाविरोधात आता मोठे जनआंदोलन उभे राहिले असून, येत्या २ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता आझाद मैदानावर महामोर्चा काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विल्सन महाविद्यालयाकडे अनेक वर्षांपासून असलेला या जिमखान्याचा करार २०२३ मध्ये संपुष्टात आला होता. सुमारे एक लाख चौरस फुटांचा हा मोक्याचा भूखंड मोकळा होताच, राज्य सरकारने तो एका जैन संस्थेच्या स्वाधीन केला. मात्र, ताबा मिळताच त्या ठिकाणी धार्मिक उपक्रम सुरू झाल्याने आणि नामकरण बदलल्याने स्थानिक मुलांच्या खेळाच्या हक्कावर गदा आल्याची भावना व्यक्त होत आहे. या निर्णयाच्या विरोधात 'आम्ही गिरगावकर' ही स्थानिक संस्था आणि विल्सन महाविद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. मैदान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू 'आम्ही गिरगावकर' या स्थानिक संघटनेने या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मुंबईत बोटावर मोजण्याइतपत मोकळ्या जागा उरल्या आहेत. विल्सन जिमखान्याचा वापर मुंबईकर खेळाडूंसाठी आणि विद्यार्थ्यांसाठीच व्हायला हवा. तिथे कबड्डी, खो-खो आणि मल्लखांब यांसारख्या मातीतल्या खेळांचे मोफत प्रशिक्षण देण्यासाठी ही जागा मराठी संस्थेला द्यावी, अशी मागणी गिरगाव टीमने केली आहे. सोशल मीडियावर 'वॉर' सुरू अरे कोण बोलतोय, देणार नाय..!! आता विल्सन जिमखाना परत घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परप्रांतीय संस्थांच्या माध्यमातून स्थानिक मैदाने हडप केली जात असल्याचा आरोप करत, सर्व पक्षांतील पदाधिकारी, खेळाडू आणि विल्सन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी २ फेब्रुवारीच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जर आज आपण गप्प बसलो, तर हे लोक उद्या विभागातील सुलभ शौचालयेही गिळायला मागे-पुढे पाहणार नाहीत, अशा तिखट शब्दांत 'आम्ही गिरगावकर' टीमने आपला संताप व्यक्त केला आहे. धार्मिक की क्रीडा उपक्रम? जिमखान्याचे नामकरण बदलल्यानंतर या ठिकाणी केवळ एका विशिष्ट समाजाचे धार्मिक कार्यक्रम सुरू झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या जागेचे अस्तित्व धोक्यात आल्याचे सांगत, विल्सन जिमखाना जिवंत राखण्यासाठी आता गिरगावकर आरपारच्या लढाईच्या तयारीत आहेत. विल्सन जिमखान्यावरून पेटलेला हा वाद आता केवळ जागेचा उरला नसून तो मुंबईच्या मोकळ्या जागांच्या संरक्षणाचा लढा बनला आहे. २ फेब्रुवारीच्या आंदोलनानंतर राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कयाधू नदीचे पाणी खरबी बंधाऱ्यातून इसापूर कडे वळविण्याचे काम सुरु असून त्यास स्थगिती का देत नाहीत या प्रश्नावर काम थांबविण्यापेक्षा पर्याय शोधू असे सांगत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी या कामाला स्थगिती देण्यास अप्रत्यक्ष नकार दिला आहे. जिल्ह्याच्या सिंचनाच्या प्रश्नावर बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी पत्रकारांशी बोलतांना दिले आहे. प्रजासत्ताक दिना निमित्ताने पालकमंत्री झिरवाळ हिंगोलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार राजेश नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी हिंगोलीच्या कयाधूचे पाणी खरबी येथील बंधाऱ्यातून १०० फुट खोल बंधाऱ्याचे काम करून इसापूर धरणात नेला जात आहे. त्याचा हिंगोलीकरांना फायदा होणार नाही उलट जिल्हयाचे वाळवंट होईल. त्यामुळे या कामाला स्थागिती का देत नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला. काम थांबविण्यापेक्षा त्याला पर्याय शोधू आमचे पाणी नेले जात असेल तर आम्हाला काय देणार असा प्रश्न सरकार समोर मांडूत. त्यासाठी जिल्हयातील लोकप्रतिनिधींची अधिवेशन काळात बैठक घेतली जाईल असे पालकमंत्री झिरवाळ यांनी सांगितले. मात्र त्यांनी कामाला स्थगिती देण्यास अप्रत्यक्ष नकारच दिला. या कामाला थेट विरोध करणे हे योग्य नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. येलदरीच्या डाव्या कालव्याच्या प्रश्नावर त्यांनी या बैठकीतच जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या शिवाय जिल्हयातील मागील अनेक दिवसांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हयात शाळा, अंगणवाडी बांधकाम, वैद्यकिय महाविद्यालय, स्मशानभुमीच्या जागेचा प्रश्न यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी देणार आहोत. मात्र त्यानंतरही शासनाकडून आणखी काही अतिरिक्त निधी मिळेल काय यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात लाडक्या बहिणीच्या ई केवायसीला मुदतवाढ मिळेल पण त्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे झिरवाळ यांनी यावेळी स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिकेतील सत्तावाटपावरून महायुतीतच मोठा तणाव निर्माण झाल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे. महापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटूनही मुंबईला महायुतीचा महापौर मिळू शकलेला नाही, ही बाबच सध्याच्या राजकीय अस्थिरतेकडे निर्देश करणारी ठरते. एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद, तसेच स्थायी समितीसह इतर समित्यांमध्ये योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याची ठाम मागणी केल्याने हा वाद अधिक तीव्र झाला आहे. दुसरीकडे, भाजप मात्र महापौरपदावर कोणतीही तडजोड करायला तयार नसल्याची भूमिका घेत असल्याचे संकेत मिळत आहेत. या सत्तासंघर्षामागे घडलेल्या काही घटनांनी वातावरण अधिकच तापवले. एकनाथ शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्स नंतर दिल्लीतील भाजप नेतृत्व नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतरच दिल्लीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईच्या महापौरपदावर कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये, असा स्पष्ट संदेश देण्यात आल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर भाजपने आपली भूमिका अधिक कडक केली, तर शिंदे गटानेही माघार न घेण्याचा निर्धार केल्याचे दिसू लागले. परिणामी, महापौरपदाचा निर्णय लांबत चालला असून महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड होत आहेत. दरम्यान, या सगळ्या घडामोडींमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी अचानक साताऱ्यातील त्यांच्या दरे गावाकडे रवाना झाल्याने चर्चांना नवे वळण मिळाले आहे. दुपारपर्यंत मुंबईत असलेले शिंदे नंतर साताऱ्याकडे निघून गेले. अधिकृत कारण जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचे सांगितले जात असले, तरी शिवसेना-भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, याच काळात मुंबई महापौरपदावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, शिंदेंच्या साताऱ्याच्या दौऱ्यामुळे त्या शक्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन गटनोंदणी भाजपकडून मुंबई महानगरपालिकेत शिंदे सेना आणि भाजपच्या नगरसेवकांची एकत्रित गटनोंदणी करावी, असा आग्रह धरला जात होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी भाजपचा हा प्रस्ताव फेटाळत आपल्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, तो महायुतीतील दरी अधिक खोल करत असल्याचे बोलले जात आहे. शिंदे सध्या दरे गावात असल्यामुळे मंगळवारी राहुल शेवाळे आणि शीतल म्हात्रे हे दोघे शिंदे सेनेच्या नगरसेवकांना घेऊन सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनात जाणार आहेत. दुपारी एक वाजता शिंदे गटाचे 29 नगरसेवक दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाजवळ जमणार असून, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन बसने कोकण भवनात गटनोंदणीसाठी रवाना होणार आहेत. 29 नगरसेवक हॉटेलमध्ये एकत्र, सर्वांनाच धक्का महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेसाठी परदेशात गेले होते. त्यांच्या अनुपस्थितीतच मुंबईतील महापौरपदावरून शिवसेना-भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगले. याच काळात एकनाथ शिंदे यांनी आपल्या 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवून सर्वांनाच धक्का दिला होता. या कृतीमागे भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले गेले. मात्र, दिल्लीतील भाजप नेतृत्वाने या दबावाला कोणतीही भीक न घालता महापौरपदावर तडजोड न करण्याची भूमिका घेतल्याचे समोर आले. त्यानंतर काही दिवसांतच शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमधून परत घरी गेले होते. अपेक्षित एकमत झालेले नाही, हे स्पष्ट दावोसवरून परतल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुंबईत आले आणि प्रजासत्ताक दिनासाठी ते मुंबईतच होते. एकनाथ शिंदे देखील त्या दिवशी दुपारपर्यंत मुंबईत उपस्थित होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये महापौरपद आणि सत्ता वाटपाबाबत निर्णायक चर्चा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. काही राजकीय वर्तुळात दोघांची बैठक निश्चित असल्याची चर्चाही रंगली होती. मात्र, फडणवीस परतल्यानंतरही कोणतीही ठोस हालचाल झाली नाही. त्यामुळे आता शिंदे गट स्वतंत्र गटनोंदणी करत असल्याने, महापौरपदासह इतर सत्तावाटपाच्या मुद्द्यांवर भाजप आणि शिंदे सेनेत अपेक्षित एकमत झालेले नाही, हे स्पष्ट होत आहे. राजकीय अस्थिरतेचा संदेश या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकारण अधिकच रंजक आणि नाट्यमय वळण घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौरपदाचा तिढा किती काळ टिकणार, महायुतीत तडजोड होणार की संघर्ष वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत सत्ता स्थापनेचा निर्णय रखडल्याने राजकीय अस्थिरतेचा संदेश जात असल्याचीही चर्चा आहे. येत्या काही दिवसांत शिंदे-भाजपमध्ये समेट होतो की संघर्ष आणखी तीव्र होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सुरू असतानाच मुंबई आणि भिवंडी येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या, पण तितक्याच धक्कादायक घटनांनी सर्वांनाच हादरवून टाकले आहे. मुंबईतील विक्रोळी टागोर नगर परिसरात निष्काळजीपणामुळे एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला, तर भिवंडीत घरगुती वाद मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांमुळे कायदा-सुव्यवस्था, निष्काळजीपणा आणि वाढत्या हिंसाचारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एकीकडे उत्सवाच्या तयारीतून झालेली दुर्घटना, तर दुसरीकडे कौटुंबिक वादातून झालेला खून, अशा दोन घटनांनी समाजमन सुन्न झाले आहे. मुंबईतील विक्रोळी टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमासाठी लावण्यात आलेला मोठा स्पीकर अचानक कोसळून एका तीन वर्षांच्या मुलीवर पडला. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून, त्यात स्पीकर पडताच चिमुकली खाली अडकताना दिसत आहे. या घटनेत ती गंभीर जखमी झाली होती. तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, चिंध्या गोळा करणाऱ्या एका व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे हा स्पीकर हलल्याचा आणि अपघात घडल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण पसरले असून, विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान लावण्यात येणाऱ्या स्पीकर्स, मंडप आणि इतर साहित्याची सुरक्षितता तपासली जाते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एका निष्पाप चिमुकलीचा बळी गेल्यानंतरही जबाबदारी नेमकी कोणाची, यावर चर्चा सुरू आहे. स्थानिक रहिवाशांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात आहे. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा निर्घृण खून दरम्यान, भिवंडी शहरातूनही तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीतील न्यू आझाद नगर, शांतीनगर परिसरात नवरा-बायकोच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला आहे. मामा हॉटेलजवळील न्यू आझादनगर झोपडपट्टीत ही घटना घडली. दिलशाद शहा असे मृत तरुणाचे नाव असून, तो आपल्या मावस बहिणी आणि तिच्या पतीमधील कौटुंबिक वाद शांत करण्यासाठी गेला होता. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून बहिणीच्या पतीचे भाऊ आसिफ अब्दुलहकीम शहा, अलिहसन अब्दुलहकीम शहा आणि मुजफ्फर अब्दुलहकीम शहा यांनी संगनमत करून दिलशाद शहा याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दिलशाद शहा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने भिवंडीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातूनच ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी आणि मृतक हे परस्पर नातेवाईक असल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही घटनांमुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास सुरू आहे.
नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे उमेदवार प्रचारात व्यस्त झाले आहेत. मात्र, निवडणुकीच्या या धावपळीत सांगली जिल्ह्यातील विटा शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात काळी जादू आणि भानामतीचा प्रकार समोर आल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत कठोर भूमिका घेतली आहे. विटा शहरात भाजपाचे माजी आमदार सदाशिव पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या घरासमोर काळी जादू केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका बंगाली भोंदू बाबाने आणि त्याच्या स्थानिक साथीदाराने घरासमोर भानामतीसाठी वापरले जाणारे साहित्य टाकल्याचे समोर आले. सुरुवातीला हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नव्हता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संपूर्ण घटना स्पष्ट झाली. फुटेजमध्ये संबंधित व्यक्ती साहित्य टाकून निघून जाताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा अंधश्रद्धेच्या प्रकारामुळे लोकांमध्ये भीती पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही बाब लक्षात येताच सदाशिव पाटील यांच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. त्यांनी बंगाली भोंदू बाबासह त्याला मदत करणाऱ्या स्थानिक व्यक्तीला शोधून काढले. संतप्त नागरिकांनी दोघांना बेदम चोप दिला आणि शहरातून त्यांची धिंड काढली. या घटनेमुळे काही काळ विटा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर नागरिकांनी दोघांनाही विटा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील अनर्थ टाळला. या प्रकरणानंतर पोलिसांकडून संबंधित दोघांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या काळात भाजपाच्या माजी आमदाराच्या घरासमोर झालेल्या या काळ्या जादूच्या प्रकारामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा प्रकार नेमका कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या उद्देशाने करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. विटा पोलिसांनी या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, सखोल तपास केला जात आहे. निवडणूक काळात समाजात गैरसमज, भीती आणि अस्थिरता निर्माण करणाऱ्या अशा घटनांकडे पोलिसांनी गंभीरपणे पाहण्यास सुरुवात केली आहे. भीती न बाळगण्याचे आवाहन दरम्यान, या प्रकरणावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही प्रतिक्रिया दिली आहे. समितीचे कार्यकर्ते संजय बनसोडे यांनी नागरिकांना आणि उमेदवारांना आवाहन करत सांगितले की, अंधश्रद्धेचा आधार घेऊन कोणीही निवडणूक जिंकू शकत नाही. लोकशाहीत विजय हा जनतेच्या विश्वासावर मिळतो, काळी जादू किंवा भानामतीवर नाही. अशा प्रकारांना भीक न देता नागरिकांनी जागरूक राहावे आणि भीती न बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले. या घटनेनंतर निवडणुकीच्या प्रचारात अंधश्रद्धा आणि गैरप्रकारांवर आळा घालण्याची मागणी जोर धरू लागली असून, प्रशासनाकडूनही अधिक दक्षता घेतली जात आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख न केल्याचा आरोप होताच नाशिकमध्ये मोठा गदारोळ निर्माण झाला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात एका महिला वनकर्मचाऱ्याने थेट घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवला. या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेचे पडसाद राजकीय आणि सामाजिक स्तरावरही उमटू लागले आहेत. बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख टाळल्याचा मुद्दा पुढे येताच आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या, तर विरोधी पक्षांनीही महाजनांवर जोरदार टीका सुरू केली. दुसरीकडे, गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला असला तरी आंदोलन आणि निषेधाची धार अद्याप कायम आहे. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय ध्वजवंदन सोहळा गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर त्यांनी केलेल्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख नसल्याचा आरोप करण्यात आला. याच मुद्द्यावर माधवी जाधव या महिला वनकर्मचाऱ्याने कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी केली. बाबासाहेबांचा नामोल्लेख कसा काय टाळला? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. वर्दीत असतानाच मंत्र्यांना जाहीर प्रश्न विचारल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की काही काळ कार्यक्रमस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. निलंबन झाले तरी चालेल, पण बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका माधवी जाधव यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे हा प्रकार केवळ एका भाषणापुरता मर्यादित न राहता मोठ्या वादात बदलला. आंबेडकरी संघटना आणि भीम सैनिक रस्त्यावर या घटनेची माहिती पसरताच नाशिकमधील आंबेडकरी संघटना आणि भीम सैनिक रस्त्यावर उतरले. गिरीश महाजन यांनी जाहीर माफी मागावी, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही या मुद्द्यावर महाजनांवर टीकास्त्र सोडले. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी, संविधानाला मानणाऱ्यांचे हे वर्तन नाही, असा आरोप करत सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चेतन गांगुर्डे यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देत, महाजनांची मानसिकता बाबासाहेबांच्या विचारांशी विसंगत असल्याचा आरोप केला. दरम्यान, माधवी जाधव यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही दिला, त्यामुळे प्रशासनावर दबाव वाढला. 40 वर्षांपासून आंबेडकर जयंतीनिमित्त उपक्रमांमध्ये सहभागी - महाजन वाद अधिक चिघळत असतानाच गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या घोषणाबाजीची मोठी चर्चा सुरू असताना, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर महाजन म्हणाले की, भाषणात चुकून बाबासाहेबांचा उल्लेख राहून गेला असेल तर त्याबद्दल ते दिलगिरी व्यक्त करतात. त्यानंतर रात्री त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते म्हणूनच आपण आहोत, असे म्हणत त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांप्रती आपली निष्ठा दर्शवली. भाजपचे संस्कार बाबासाहेबांचे विचार जपणारे असल्याचे सांगत, आपण स्वतः गेल्या 40 वर्षांपासून आंबेडकर जयंतीनिमित्त विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. या पोस्टसोबत त्यांनी आपल्या भाषणाची क्लिपही शेअर केली आहे. दिलगिरीनंतरही वाद पूर्णपणे शांत झालेला नाही मात्र, गिरीश महाजनांच्या दिलगिरीनंतरही वाद पूर्णपणे शांत झालेला नाही. शासकीय कर्मचारी, तीही महिला, अशा प्रकारे थेट मंत्र्यांना जाहीरपणे सवाल करताना सहसा दिसत नाही, मात्र बाबासाहेबांच्या नामोल्लेखाचा मुद्दा असल्याने माधवी जाधव यांनी घेतलेली भूमिका अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या धाडसाची चर्चा वनविभागासह इतर शासकीय कर्मचाऱ्यांमध्येही सुरू आहे. दुसरीकडे, आंदोलनाची भूमिका घेतलेल्या आंबेडकरी संघटनांनी हा विषय केवळ एका चुकापुरता मर्यादित न ठेवता, बाबासाहेबांच्या सन्मानाशी जोडलेला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिलगिरीनंतरही हा वाद राजकीय आणि सामाजिक पातळीवर आणखी किती काळ तापणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. या सन्मानाला विरोध करणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पलटवार करत टीकाकारांना कोत्या मनाचे लोक असे संबोधले आहे. कोश्यारी यांचे आयुष्य दीर्घकाळ सार्वजनिक सेवेला वाहिलेले असून त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला असून, पद्मभूषण पुरस्काराचा मुद्दा आता थेट लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्राच्या अस्मितेशी जोडला जात आहे. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पद्म पुरस्कारांची घोषणा करत माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण देण्याचा निर्णय घेतला. कोश्यारी यांनी 2019 ते 2023 या कालावधीत महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली होती. या निर्णयानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी कोश्यारी यांच्यावर महाविकास आघाडी सरकार पाडण्यात सक्रिय भूमिका बजावल्याचा आरोप केला. राऊत यांच्या मते, निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करून भाजपचे सरकार सत्तेत आणण्यासाठी कोश्यारी यांनी घटनात्मक पदाचा गैरवापर केला आणि त्यामुळे लोकशाही व संविधानाची हत्या झाली. संजय राऊत यांनी पुढे दावा केला की, कोश्यारी यांच्या कार्यकाळात त्यांच्या अनेक निर्णयांवर सर्वोच्च न्यायालयानेही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि काही निर्णय बेकायदेशीर ठरवले होते. अशा पार्श्वभूमीवर अशा व्यक्तीला पद्मभूषणसारखा सन्मान देणे हे देशासाठी चुकीचा संदेश देणारे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी माध्यमांशी बोलताना कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा मुद्दाही पुन्हा उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे कोश्यारी यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. त्या वक्तव्यानंतर राज्यभर आंदोलनं झाली होती आणि विविध संघटनांनी निषेध नोंदवला होता. याचबरोबर संजय राऊत यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी कोश्यारी यांनी केलेल्या विधानांवरही टीका केली. समाजसुधारकांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान होणे हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी महायुती सरकारने या निर्णयाला विरोध करायला हवा होता, अशी अपेक्षाही राऊत यांनी व्यक्त केली. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कोश्यारी यांना त्यांच्या कार्यासाठीच पुरस्कार या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र ठाम भूमिका घेतली. त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांचे अभिनंदन करत त्यांच्या दीर्घ आणि सन्माननीय सार्वजनिक जीवनाचा उल्लेख केला. देशसेवेसाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय असून ते पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, ज्यांचे विचार संकुचित आहेत, असेच लोक अशा सन्मानाला विरोध करतात. कोश्यारी यांना त्यांच्या कार्यासाठीच हा पुरस्कार मिळाला असून त्यामागे कोणतेही राजकारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पलटवारानंतर पद्मभूषण पुरस्काराचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनजवळील सोरतापवाडी येथे सासरच्या छळाला कंटाळून एका इंजिनिअर विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दीप्ती मगर चौधरी असे मृत विवाहितेचे नाव असून तिने काल रात्री गळफास घेऊन जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीसमोरच हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली असून या घटनेने समाजमन हेलावून गेले आहे. आत्महत्येप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी पती, दीर तसेच सासू-सासरे अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दीप्ती चौधरी यांचा विवाह 2019 मध्ये झाला होता. विवाहानंतर सुरुवातीपासूनच तिला सासरकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सासरच्या मंडळींकडून तिच्या चारित्र्यावर संशय घेणे, दिसण्यावरून टोमणे मारणे तसेच घरकाम येत नाही अशा कारणांवरून सतत अपमान केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या सततच्या तणावामुळे दीप्ती मानसिकदृष्ट्या खचली होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, संसार टिकावा आणि मुलीचे भवितव्य सुरक्षित राहावे म्हणून दीप्तीने अनेक वेळा सहनशीलतेची भूमिका घेतली होती. या प्रकरणात हुंड्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. लग्नाच्या वेळी मुलीच्या कुटुंबाकडून 50 तोळे सोने देण्यात आले होते. याशिवाय वाहन खरेदीसाठी 25 लाख रुपये देण्यात आल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर नंतरही सासरच्यांच्या मागणीनुसार एकदा 10 लाख रुपये रोख स्वरूपात देण्यात आले होते, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मात्र, एवढे करूनही छळ थांबला नाही. पैशांच्या आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली दीप्ती अधिकच अडकत गेली आणि अखेर या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर उरुळी कांचन पोलिसांनी तातडीने कारवाई करत पती रोहन चौधरी, सासू सुनीता चौधरी, सासरे कारभारी चौधरी आणि दीर रोहित चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सासू आणि पतीला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, मृत विवाहितेची सासू सुनीता चौधरी या ऑक्टोबर 2025 मध्ये सोरतापवाडीच्या सरपंच झाल्या होत्या, तर सासरे शिक्षक असल्याची माहिती आहे. सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींवर असे गंभीर आरोप झाल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले दरम्यान, या घटनेचा तपास लोणी काळभोर पोलिस करत असून आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींची तपासणी केली जात आहे. हुंडाबळी आणि कौटुंबिक छळाच्या घटनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिक्षित आणि नोकरी करणाऱ्या महिलांनाही अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते, ही बाब चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दीप्तीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेकांचे डोळे पाणावले असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.
रायगडमधील महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट यांच्यात झालेल्या राडा प्रकरणी जामीन मंजूर होताच मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. कारागृहातून बाहेर आल्यानंतर तातडीने कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात करत त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला असून, एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही, अशा शब्दांत आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला. आपल्या अंगात भरत गोगावले आणि सुषमा गोगावले यांचे रक्त असल्याचे सांगत त्यांनी ही लढाई थांबणार नसल्याचे संकेत दिले असून, या भूमिकेमुळे महाडमधील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. जामीन मिळाल्यानंतर विकास गोगावले यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात विरोधकांना थेट इशारा देत आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला आहे. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही, माझ्या अंगात भरत गोगावले आणि सुषमा गोगावले यांचेच रक्त आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला गेलेले आपल्याला कदापि सहन होत नाही, असे सांगतानाच, न्यायदेवतेचा सन्मान राखण्यासाठीच मी कायदेशीर प्रक्रियेला सामोरे गेलो आणि शरण गेलो, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले. त्यांच्या या रोखठोक विधानामुळे महाडमधील राजकीय वर्तुळात सध्या मोठी चर्चा सुरू आहे. राडा झाल्यानंतर विकास गोगावले फरार होते महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीनंतर, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले फरार झाले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने महायुती सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र ताशेरे ओढले होते. खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याच मंत्र्यांपुढे हतबल असल्याचे चित्र निर्माण झाल्याची टीका करत न्यायालयाने, गोगावले यांना २४ तासांत हजर करण्याचे आदेश सरकारला दिले होते. न्यायालयाच्या या कडक भूमिकेनंतर आणि प्रशासकीय दबावानंतर विकास गोगावले पोलिसांना शरण आले होते. जामीन मंजूर झाल्यानंतर कारागृहातून बाहेर येताच विकास गोगावले यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. एक केस झाली म्हणून विकास गोगावले गप्प बसणारा नाही, असे ठाम प्रतिपादन करत त्यांनी आपल्या विरोधकांना थेट इशारा दिला आहे. परस्परविरोधी गुन्हे दाखल झाल्यानंतर आणि कायदेशीर लढाई लढल्यानंतर मिळालेल्या जामिनानंतरही गोगावले यांनी आपली आक्रमक शैली कायम ठेवली आहे. कार्यकर्त्यांच्या हितासाठी आपण कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही, असे संकेत त्यांनी यातून दिले असून यामुळे महाडमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळल्याने राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या एका महिला वन अधिकाऱ्याने संविधान निर्मात्यांचे नाव कसे विसरलात? असा थेट सवाल करत महाजन यांना जाहीरपणे टोकल्याने सोहळ्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाजन यांच्यावर 'ॲट्रॉसिटी' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची आक्रमक मागणी केल्याने हे प्रकरण अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. त्यात आता गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एवढा गदारोळ कशासाठी? गिरीश महाजन म्हणाले, आज घडलेल्या प्रकारामुळे मला खूप वाईट वाटले आहे. मी गेल्या 40 वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहे, पण आजवर कधीहीह असा प्रसंग आला नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलो असलो तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मी कायम आदरच केला आहे. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा मोठा पुतळा आम्हीच उभा केलाय. भाषणात नाव घेण्याचे अनावधानाने राहिले असेल, पण त्यावरून एवढा गदारोळ कशासाठी? मी याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त केली असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणतायत, पण कशासाठी? प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या ॲट्रॉसिटीच्या मागणीवर बोलताना गिरीश महाजन म्हणाले, ॲट्रॉसिटी दाखल करा म्हणतायत, पण कशासाठी? समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. मी मातंग समाज असो वा वाल्मीक समाज, त्यांच्या सुख-दुःखात नेहमी सहभागी होतो. लग्नात जातो, दलित वस्तीत पंगती देतो आणि स्वतः त्यांच्यासोबत जेवायला बसतो. माझ्या 40 वर्षांच्या राजकीय प्रवासात मी निळा शर्ट घातला नाही किंवा समाजाचा सन्मान केला नाही, असे कधीच घडले नाही. तसेच अधिकारी माधवी जाधव यांच्याविषयी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मला माहित नाही त्या भगिनी कोण आहेत. भुसावळमध्येही विकासकामांसाठी मी कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जामनेरमध्ये सर्व नगरसेवक आणि पंचायत समिती सदस्य निवडून येतात, यात सर्व समाजाचा वाटा आहे. आम्ही शाम बडोदे यांना जळगावातून तिकीट दिले, हे आमचे सर्वसमावेशक राजकारण असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा गिरीश महाजनांना बाबासाहेबांचे नाव न घेणे भोवणार:आंबेडकरांची अॅट्रोसिटी दाखल करण्याची मागणी; महिला अधिकाऱ्याशी संवाद वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याप्रकरणी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. गिरीश महाजन यांचे कृत्य अॅॅट्रोसिटीचा गुन्हा आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही, तर मी स्वतः यासंबंधीचा कायदेशीर ड्राफ्ट तयार करून पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडेन, असे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली असून, उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर प्रत्यक्ष लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या जन्मभूमीतून प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये योग्य वेळी देण्याचा शब्द पाळणार असल्याचे म्हटले आहे. तसेच मी बोलतो ते करून दाखवतो असे म्हणत 'एक बार मैंने कमिटमेन्ट करदी तो मैं खुदकी भी नही सुनता', असा डायलॉगही शिंदेनी मारला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना देतो त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत. आता, 1500 रुपयांचे 2100 रुपये योग्यवेळी करणार हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आम्ही पाळणार आहोत. पुढे ते म्हणाले, अडीच वर्षात माझे काम तुम्ही पाहिले आहे. मी अडीच वर्षात अडीच तास शांत झोपलो नसेल. लाडक्या बहीणींनी ठरवले होते, लाडक्या भावाला निवडून आणायचे, असे म्हणत त्यांनी 2100 रुपये योग्य वेळी करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी एका वर्षाचा खर्च होता, भल्याभल्यांची हिम्मत झाली नाही. मात्र, जे खोडा घालायचे त्यांना 232 नंबरचा घोडा दाखवला. महारष्ट्राच्या इतिहासात 232 जागा महायुतीच्या कधी निवडून आल्या नव्हत्या. तसेच, माझ्या आईची काटकसर आणि माझ्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पहिले होते, म्हणून मी याचा विचार करुन महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली असल्याचे शिंदे यांनी यावेळी अधोरेखित केले. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, माझी कर्मभूमी मुंबई असली तर माझी जन्म भूमी सातारा आहे, सातारा जिल्ह्याची गौरवशाली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण कारभार करतोय. संपत्ती कमावली यापेक्षा माणसं किती कमवली हे मी पाहिले. आधीच्या मुख्यमंत्र्यांना स्पीड ब्रेकर आणि स्थगितीशिवाय काही माहित नव्हते. फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम कराव लागते, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंवर टीका मी मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्या स्थगित्या उठवल्या, कोकण ते पश्चिचम महाराष्ट्र जवळ आणण्याचे काम सुरु झाले. साडेतीन वर्षे झाले आम्ही उठाव केला, झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला शिवसेनाच या भूमीचा आणि लेकरांचा विचार आणि प्रगती करू शकते. गेला तो चोर आणि कचरा असे किती दिवस बोलणार? आमच्या सोबत ते का आले? याचा विचार करा, असा सल्लाही ठाकरेंना दिला. शिवसेनेचा अजेंडाच विकास आहे, शिवसेना ठाण्यापर्यंत मर्यादित आहे म्हणत होते. मात्र, शिवसेना चांदा ते बांदा पसरलीय, दगडू दादांचे अभिनंदन करतो त्यांनी एवढी वर्षे दिली. दगडू दादांनी शिवसेनेसाठी केलेल्या कामाचे चीज करायला पाहिजे होते. पण, त्यांनी केले नाही. दगडू दादांनी आणि मी सुद्धा स्वाभिमान दाखवला. या मातीत स्वाभिमान आणि राष्ट्रभक्ती आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी माजी आमदार दगडू सपकाळ यांचे कौतुक केले. 22 गावांचे पालकत्व मी स्वीकारतोय साताराच्या पर्यटनाविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पर्यटन सुरक्षा दल स्थापन करणारा सातारा पहिलला जिल्हा आहे. येथील 22 गावांचे पालकत्व मी स्वीकारत असल्याचे शिंदे यांनी म्हटले. तसेच यावेळी भाषण करताना त्यांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंत यानं फोन केला. यावेळी सामंत फोनवर म्हणाले, 10 हजार लोकांसाठी एक इंडस्ट्री आणायचे फायनल झाले आहे. आचार संहिता संपल्यावर याला गती मिळेल, असे सामंत यांनी यावेळी म्हटले. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, कुणबी प्रमाणपत्र देणारा एकनाथ शिंदे आहे. लवकरात लवकर महादेव कोळी जातीच्या जात पडताळणीचे दाखले देण्याचे काम सुरू होईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे येथील एका शेतात सुरू असलेल्या बनावट दारूच्या कारखान्यावर धडक कारवाई करत तो उध्वस्त केला आहे. संशयित आरोपी राजू टिळेकर याच्या मालकीच्या गट क्र. 122 (2) मधील पत्र्याच्या शेडमध्ये हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू होता, जिथून पोलिसांनी वाहनासह तब्बल दीड कोटी रुपयांची बनावट देशी दारू आणि रसायनांचा साठा जप्त केला आहे. या ठिकाणी रॉकेट संत्रा, प्रवरा, भिंगरी, कोंकण प्रिमियम आणि टँगो पंच यांसारख्या नामांकित ब्रँड्सच्या नावाने बनावट मद्य तयार करण्याचे साहित्यही मोठ्या प्रमाणावर आढळले असून, या कारवाईमुळे जिल्ह्यातील बनावट दारू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 24 जानेवारी रोजी मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी गस्तीवर असलेल्या वळसंग पोलिस ठाण्याचे एपीआय राहुल डोंगरे यांच्या सतर्कतेमुळे हा बनावट दारूचा कारखाना उघडकीस आला. मद्रे ते आहेरवाडी रस्त्याने पेट्रोलिंग करत असताना त्यांना राजू टिळेकर यांच्या बांधकामाधीन क्षेत्राजवळ एक 'आयशर' टेम्पो संशयास्पद स्थितीत उभी असलेली दिसली. पोलिसांना या टेम्पोच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांनी तात्काळ तिथे धाव घेत तपासणी केली आणि त्यातून या दीड कोटींच्या बनावट दारू साठ्याचा पर्दाफाश झाला. पोलिसांना पाहताच आरोपींनी काढला पळ पोलिसांना पाहताच टेम्पोजवळ असलेले 3 ते 4 संशयित इसम तिथून पळून गेले, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर त्या ठिकाणच्या पत्र्याच्या गोदामाची झडती घेतली असता, तिथे कोणत्याही परवान्याशिवाय मोठ्या प्रमाणावर बनावट देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. या कारवाईमुळे या निर्जन स्थळी दडून सुरू असलेल्या एका मोठ्या बेकायदेशीर उद्योगाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 1 कोटी 54 लाख 9 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त वळसंग पोलिसांनी या प्रकरणी मद्रे येथील राजु उर्फ राजकुमार चंद्रकांत टिळेकर आणि धुळ्यातील दिनू शेठ उर्फ भूषण पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळावरून एकूण 1 कोटी 54 लाख 9 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला आयशर टेम्पो, दारू बनवण्याची 4 स्वयंचलित मशिने, कच्च्या रसायनाचे 122 बॅरल (प्रत्येकी 250 लिटर), रिकाम्या बाटल्या, झाकणे आणि विविध कंपन्यांचे बनावट लेबल्स हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे, टॅगो पंच, रॉकेट आणि कोंकण प्रिमियम यांसारख्या नामांकित ब्रँड्सचे सुमारे 1400 तयार बॉक्सही जप्त करण्यात आले असून, सोलापूर ग्रामीण पोलिसांनी या अवैध कारखान्याचा पर्दाफाश केल्याने बनावट दारू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
संपूर्ण देशभर 77 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना, गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बिनागुंडा या अतिदुर्गम भागात आज एक ऐतिहासिक सुवर्णक्षण साजरा झाला. एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अधिकृतपणे तिरंगा फडकवण्यात आला. 26 जानेवारी 1950 पासून देशात संविधानाची अंमलबजावणी सुरू होऊन जनतेचे राज्य आले असले, तरी या दुर्गम भागातील आजच्या पहिल्या ध्वजारोहणामुळे हा परिसर आता खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील झाल्याचे दिसत असून, नक्षलवादाच्या छायेतून बाहेर पडणाऱ्या ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गडचिरोली पोलिस दलाने माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात दोन दिवसांपूर्वीच नवीन पोलिस ठाणे उभारून दशकानुदशके चाललेली नक्षलवाद्यांची दहशत मोडीत काढली आहे. घनदाट जंगले आणि डोंगराळ भागामुळे दुर्गम असलेल्या अबुजमाड परिसरातील बिनागुंडा येथे माओवाद्यांच्या अस्तित्वाचे आणि दहशतीचे प्रतीक असलेले त्यांचे स्मारक पोलिसांनी पूर्णपणे नष्ट केले. या धाडसी कारवाईमुळे ग्रामस्थांच्या मनातील मानसिक भीती दूर झाली असून, या भागात प्रथमच लोकशाहीचे प्रतीक असलेला तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या ऐतिहासिक दिवशी केवळ बिनागुंडाच नव्हे, तर सीमेवरील कवंडे, तूमरकोटी आणि फुलणार या अतिदुर्गम गावांतही सुरक्षा दलांच्या उपस्थितीत प्रथमच राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. या सोहळ्यात सुरक्षा जवानांसोबत स्थानिक शाळकरी मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. चिमुकल्यांनी दिलेली भाषणे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून, या भागात आता नक्षलवादाच्या छायेतून बाहेर पडून विकासाची आणि शिक्षणाची नवी पहाट उगवत असल्याचे आशादायी चित्र पाहायला मिळाले.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सर्वच प्रमुख पक्षांचे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत प्रचारासाठी सक्रिय होणार आहेत. फडणवीस यांच्या प्रचार दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून आगामी काळात या निवडणुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. महानगरपालिका निवडणुकीतील यशानंतर आता जिल्हा परिषदांवरही भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली असून, 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या सात दिवसांच्या काळात ते राज्याचा झंझावाती दौरा करणार आहेत. या मोहिमेत फडणवीस 12 जिल्ह्यांमध्ये एकूण 22 जाहीर सभा घेणार असून, दौऱ्याची सुरुवात 28 जानेवारीला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या कोकणातील जिल्ह्यांतून होणार आहे. पक्षाची ताकद ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतः फडणवीस मैदानात उतरल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळाले असून, आगामी निवडणुकीत सर्व जिल्हा परिषदा काबीज करण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा धुराळा शांत होत असतानाच आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सध्या राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित असून, अनेक ठिकाणी प्रशासकांचा कारभार सुरू आहे. मात्र, 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती आदेशाचा परिणाम या निवडणुकीवर झाला आहे. त्यामुळे आता सरसकट सर्वच नव्हे, तर केवळ 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठीच प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, या जागांसाठी 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार असून, 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पार पडेल. या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार असून, 13 जानेवारीपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिकांनंतर आता ग्रामीण भागातील ही मिनी विधानसभा काबीज करण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आपले आराखडे तयार करण्यास सुरुवात केल्याने या रणधुमाळीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
देशभरात 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना नाशिकच्या मालेगावात एका दुर्दैवी घटनेने या आनंदावर विरजण पडले आहे. येथील पोलिस परेड मैदानापासून अवघ्या 250 मीटर अंतरावर एका फुगे विक्रेत्याच्या नायट्रोजन गॅस सिलिंडरचा अचानक भीषण स्फोट झाला. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आणि प्रशासनाची एकच धावपळ झाली. या भीषण स्फोटात 5 जण गंभीर जखमी झाले असून, त्यामध्ये दोन लहान मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी नाशिकला हलवण्यात आले आहे, तर इतरांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, या अपघाताचा सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे. मालेगावात 77 व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलिस परेड मैदानावर सुरू असतानाच, मैदानाबाहेर असलेल्या एका फुगे विक्रेत्याच्या नायट्रोजन गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यावेळी मैदानावर अतिरिक्त जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती, तर बाहेर काही नागरिक आपल्या मुलांसाठी फुगे विकत घेण्यासाठी विक्रेत्याभोवती जमा झाले होते. या अचानक झालेल्या भीषण स्फोटात विनोद थोरात, मोहित जाधव, अतुल शेवाळे, प्रमिला यादव आणि उज्ज्वला महाजन हे पाच जण जखमी झाले असून, ध्वजारोहणाच्या उत्साही वातावरणात या दुर्दैवी घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की त्याचा आवाज दूरवर ऐकू गेला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकाएकी खळबळ उडाली. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा सुरू असतानाच हा मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. परिणामी, हा एखादा दहशतवादी हल्ला किंवा घातपात असावा अशा चर्चा आणि अफवांना उधाण आले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.
देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असतानाच राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर-मनमाड महामार्गावर आज रक्ताचे सडे पडले. महामार्गाच्या कामातील संथ गती, रस्त्यावर पसरलेली खडी आणि अवजड वाहतुकीमुळे एकाच दिवशी दोन अपघात झाले. यात लोणी येथे बी.एस्सी. ॲग्रीचे शिक्षण घेणाऱ्या संकेत सखाराम बाचकर (वय १८, रा. गौटुंबा आखाडा) या हुशार तरुणाचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन युवक गंभीर जखमी झाले आहेत. पहिला अपघात: गाडगे आश्रम शाळेसमोर काळाचा घाला गोटुंबा आखाडा येथील संकेत बाचकर आणि त्याचा मित्र श्रीकांत काशिनाथ हापसे (वय २१) हे दोघे राहुरी कॉलेज येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाहून परतत होते. नगर-मनमाड महामार्गावरील गाडगे आश्रम शाळेसमोर रस्त्याचे काम सुरू असल्याने खडी टाकलेली आहे. ही खडी वाचवण्याच्या प्रयत्नात जड वाहने धोकादायक पद्धतीने चालवली जात आहेत. सकाळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (क्रमांक TN 29 BZ 3381) संकेतच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत संकेत ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर श्रीकांत हापसे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. मयत संकेत हा शांत व प्रेमळ स्वभावाचा होता. त्याचे वडील स्कूल बसवर चालक म्हणून काम करतात. मुलाच्या निधनाने बाचकर कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. दुसरा अपघात: बस स्थानकासमोर थरार पहिली घटना ताजी असतानाच काही मिनिटांत राहुरी बस स्थानकासमोर दुसरा अपघात घडला. रस्त्यावरील खडीवरून दुचाकी घसरल्याने कानडगाव येथील प्रसाद शरद गागरे (वय १८) आणि सार्थक कैलास आहेर (वय १९) या दोन तरुणांना आयशर टेम्पोने उडवले. या अपघातात प्रसाद गागरे याचा हाताचा पंजा पूर्णपणे ठेचला गेला असून पायालाही गंभीर दुखापत झाली आहे, तर सार्थक आहेर हा किरकोळ जखमी झाला आहे. प्रशासकीय 'खुना'चा आरोप! या दोन्ही अपघातांना सर्वस्वी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रकल्प संचालक आणि संबंधित भारत कन्स्ट्रक्शन कंपनी जबाबदार असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. रस्ता दुरुस्त कृती समितीने वारंवार मागणी करूनही या महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली नाही. गेल्या तीन महिन्यांपासून कामाचा वेग संथ असून, सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता रस्त्यावर खडी टाकली जात असल्याने दुचाकीस्वार मृत्यूच्या दाढेत ढकलले जात आहेत. आंदोलनाचा पवित्रा प्रजासत्ताक दिनीच एका निष्पाप विद्यार्थ्याचा बळी गेल्याने आणि तिघे जखमी झाल्याने राहुरी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने आता तरी जागे व्हावे, अन्यथा येणाऱ्या काळात मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा राहुरीतील नागरिकांनी आणि कृती समितीने दिला आहे.
सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे सोमवारी दि.२६ स्वच्छतागृहाचे बांधकाम करताना मंदिरासारखी कळसाकृती रचना असणारे भुयार सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या विटा व दगडाचे बांध काम असलेले हे भुयार नेमके कशाचे आहे याचा उलगडा मात्र गावातील जुने जाणकार व जेष्ठान्नाही करता आलेला नाही. या ऐतिहासिक पुरातन वास्तू शोधामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले असून, याठिकाणी सकाळ पासून बघ्यांची गर्दी जमली आहे. साधारण ८०० स्केअर मिटर मोठे घुमटाकार छप्पर असलेले हे बांधकाम आहे. महसूल प्रशासनातर्फे मंडळ अधिकारी, पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या समक्ष पंचनामा करून तहसीलदार यांच्यामार्फत पुरातत्व विभागाला ही माहिती देण्यात आली आहे. येथिल जैन समाज मंदिर परिसरात वास्तव्यास असणारे अशोक भगवान वाघ यांनी नुकतेच नवीन घराचे बांधकाम सुरु केले आहे. त्याशेजारी रिकाम्या जागेत स्वच्छतागृहासाठी खोदकाम करताना पोकळ जागा सापडली. नेमका हा प्रकार काय? म्हणून संपूर्ण भाग खोदून मोकळा केला, त्यावेळी जुने बांधकाम केलेले घुमटाकार भुयार आढळून आहे. याची रचना गोलाकार असून, दोन्ही बाजूच्या भिंतीला दिवे लावण्यासाठीची जागा सोड लेली आहे. याठिकाणी साधू संत किंवा महान तपस्वी वास्तव्यास असेल अशी चर्चा गांवात रंगू लागली आहे. घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी विजय शेळके,ग्राम विकास अधिकारी आर.जी.गंगावने,प्रतीक जोशी,सुनील वाघ, नदीम शेख यांनीं ग्रामस्थ समक्ष पंचनामा करून घटनेचे स्वरूप स्पष्ट न झाल्याने व कोणत्याही धर्माच्या भावना दुखवील्या जाऊ नये या उद्देशाने पुढील काम बंद करण्यात आले आहे.
अकोला महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या 30 जानेवारीला होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची बनली असून सत्तासंघर्ष तीव्र झाल्याचे चित्र आहे. भाजपकडून शहर सुधार आघाडी स्थापन करत महापौर पदासाठी शारदा खेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासोबत डमी उमेदवार म्हणून कल्पना गोटफोडे यांचा अर्ज सादर करण्यात आला आहे. उपमहापौर पदासाठी भाजपकडून अनिल गोगे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सुरेखा मंगेश काळे यांनी महापौर पदासाठी, तर काँग्रेसकडून आझाद खान अलीयार खान यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये थेट लढत निर्माण झाली आहे. तसच उपमहापौरपदासाठी भाजपचे अमोल मोहोकार यांनीही अर्ज दाखल केला आहे. महापौर पदासाठी 3 उमेदवारांनी एकूण 5 अर्ज दाखल केले. तर उपमहापौर पदासाठी 4 उमेदवारांनी 5 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. अपक्ष उमेदवारामुळे राजकीय गणितच बदलली या निवडणुकीत भाजपचे माजी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यांनी उपमहापौर पदासाठीही अर्ज दाखल केल्याने चुरस अधिक वाढली आहे. विशेष म्हणजे, उपमहापौर पदासाठी दाखल केलेल्या त्यांच्या अर्जाचे सूचक व अनुमोदक हे ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक आहेत. यामुळे भाजपविरोधी आघाडीत रणनीती आखली जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सध्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीही 3 असे एकूण 6 उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे. अकोल्याच्या महापालिकेत 41 च्या बहुमतावर सर्वांचं लक्ष अकोला महानगरपालिकेत बहुमतासाठी आवश्यक असलेला 41 नगरसेवकांचा जादुई आकडा कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे संपूर्ण अकोल्याचे लक्ष लागले आहे. भाजपप्रणीत आघाडी आणि भाजपविरोधी पक्षांनी एकत्र बांधलेली एकजूट यांच्यात थेट सामना होत आहे. अपक्ष उमेदवाराची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता असून, तो उबाठासोबत गेला तर काँग्रेस आपला उमेदवार माघार घेणार का की अपक्ष उमेदवारच शेवटच्या क्षणी माघार घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. येत्या 30 जानेवारीला महापौर निवडीसाठी होणाऱ्या विशेष सभेत महापालिकेतील सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे.
कल्याण-डोंबिवलीतील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने झालेला मृत्यू पोलिस चौकशीच्या तणावातून झाल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, माजी नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे बेपत्ता असल्याची तक्रार ठाकरे गटानेच कोळशेवाडी पोलिस ठाण्यात दिली होती व तसे पोस्टर्सही शहरात लावले होते. मात्र मधुर म्हात्रे यांनी स्वतः समोर येत हे पोस्टर लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात पोलिसांनी रमेश तिखे यांना चौकशीसाठी फोन करून बोलावल्याने त्यांना धक्का बसला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात असून, यावरून स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर, पोलिस तपासाच्या नावाखाली वारंवार फोन करून कार्यकर्त्यांना घाबरवण्याचा व मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत होते, असा दावा केला जात आहे. या सततच्या पोलिस कारवाईच्या धास्तीमुळेच तिखे यांचा मृत्यू झाल्याचे सांगत, ठाकरे गटाने या प्रकरणाला उमेश म्हात्रे आणि पोलिस प्रशासनाला जबाबदार धरले असून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नेमके प्रकरण काय? कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे बेपत्ता असल्याची तक्रार खुद्द ठाकरे गटानेच कोळशेवाडी पोलिस ठाण्यात दिली होती. या तक्रारीनंतर हे दोन्ही नगरसेवक नक्की गेले कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी आणि या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन शहरात विविध ठिकाणी हे नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर्स लावले होते. या पोस्टरवर नगरसेवक कुठे आढळल्यास ठाकरे गटाच्या शाखेला संपर्क साधावा, असा मजकूरही प्रसिद्ध करण्यात आला होता. मात्र, या पोस्टरबाजीमुळे नगरसेवकांची नाहक बदनामी होत असल्याचा दावा त्यांचे नातेवाईक दिव्येश म्हात्रे यांनी केला. याप्रकरणी म्हात्रे यांनी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात ठाकरे गटाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला आणि पोस्टर लावण्यात सहभागी असलेल्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी त्यांना चौकशीला बोलावण्याचे सत्र सुरू केले. पोलिसांकडून वारंवार येणारे फोन आणि चौकशीचा दबाव यामुळे कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याच प्रकरणाचा पाठपुरावा सुरू असताना, कल्याण पूर्वेतील करपेवाडी परिसरात राहणारे आणि या पोस्टर मोहिमेत सक्रिय असलेले ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांचा आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. पोलिसांकडून चौकशीसाठी वारंवार येणारे फोन आणि त्यातून निर्माण झालेला मानसिक ताण व दबाव यामुळेच तिखे यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा जीव गेला, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकारण चांगलेच तापले असून पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा राजकीय वादगरस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. शरद पवार हे राष्ट्रद्रोही असल्याचे विधान त्यांनी केले आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. संभाजी भिडे यांची धारातीर्थ यात्रा सध्या रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील लोहगड, भीमगड, अशा गडकिल्ले मोहिमेसाठी सुरू असून, या यात्रेदरम्यान त्यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली आहे. शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोही, ते जातिवंत आहेत. ते देशातील बदमाश आणि ***खोर आहेत, अशा शब्दांत भिडे यांनी पवारांवर टीका केली आहे. तसेच राज्यातील लवासाची अशी कीड काढून टाकली पाहिजे, असेही भिडे यांनी म्हटले आहे. पवार साहेबांना राष्ट्रद्रोही म्हणणे अतिशय चुकीचे- अंबादास दानवे संभाजी भिडे यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, टीका टिप्पणी क्रेन अयोग्य आहे का योग्य आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शरद पवार साहेबांना राष्ट्रद्रोही म्हणणे अतिशय चुकीचे आहे. शरद पवार साहेब हे या देशासाठी, महाराष्ट्रासाठी झिजणारे नेतृत्व आहे. त्यामुळे अशा पद्धतीने देशद्रोहाचा आरोप लावणे एकदम चुकीचे आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे. मंत्री शंभुराज देसाईंची सावध भूमिका तर मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील प्रतिक्रिया देताना सावध भूमिका घेतल्याची पाहायला मिळाले आहे. ते म्हणाले, संभाजी भिडे गुरुजी यांनी नेमके काय वक्तव्य केले आणि कोणत्या संदर्भात केले, हे ऐकल्याशिवाय प्रतिक्रिया देणे योग्य नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांबाबत वक्तव्य असेल तर त्याचा संपूर्ण संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे, असे देसाई यांनी म्हटले आहे. भिडे मास्तरला वैचारिक दिवाळखोरीचा रोग- अमोल मिटकरी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी टिकात्मक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, जे लोक आयुष्यभर द्वेष पेरतात, त्यांना राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही. भिडे मास्तरला वैचारिक दिवाळखोरीचा रोग आहे. पूज्य गांधीजी आणि आदरणीय पवार साहेबांचे योगदान व मास्तरची वैचारिक पात्रता याची दूरदूर बरोबरी होऊ शकणार नाही, हे अंगणवाडीतील बाळाला सुद्धा माहीत आहे, असा खोचक टोला मिटकरी यांनी लगावला आहे.

25 C