दैवीशक्तीच्या नावाने लैंगिक शोषण
सातपुतेंची माहिती, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर नाशिक : प्रतिनिधी भोंदूबाबा अशोक खरात विरोधात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील ११ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करीत आहे. दैवीशक्ती असल्याचे भासवून आरोपी खरात महिलांचे लैंगिक शोषण करायचा. मंदिर परिसरात हातचलाखीचा वापर करून समाजात अंधश्रद्धा पसरवायचा. कुटुंबात मृत्यूची भीती दाखवून महिलांना धमकावत असल्याचे समोर आले. या प्रकरणात ३० […] The post दैवीशक्तीच्या नावाने लैंगिक शोषण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमेरिकेची इराणला थेट भीषण हल्ल्याची धमकी
इराण संस्कृती संपविणार, जगभरात धाकधूक वाढली वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा गंभीर इशारा देत आजची रात्र इराणसाठी काळरात्र असून इराणच्या संस्कृतीचे नामोनिशाण मिटवू, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर आता पश्चिम आशियाच नव्हे तर संपूर्ण जगाची धाकधूक वाढली आहे. इराणच्या बाबतीत असे काही घडावे, […] The post अमेरिकेची इराणला थेट भीषण हल्ल्याची धमकी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथील वादग्रस्त पुतळा प्रकरणात पोलिसांनी तपासाचा फास अधिक आवळला आहे. पुतळा पुरवणारा मुख्य सूत्रधार बाळराजे ऊर्फ बाळू आवारे याच्या जालन्यातील कारखान्यावर प्रशासनाने टाळे ठोकले असून, त्याच्या एका जवळच्या साथीदारालाही सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे अनधिकृत पुतळे तयार करणाऱ्या आणि बसवणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत. माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे धनगर समाजाच्या देवस्थान परिसरात बाळू आवारेने कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय रात्रीतून पुतळा बसवला होता. या घटनेमुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होऊन त्याचे रूपांतर दगडफेक आणि दंगलीत झाले होते. या प्रकरणात दोन्ही गटांतील अनेकांवर आणि मुख्य सूत्रधारावर आतापर्यंत आठ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कृषी केंद्राच्या नावाखाली पुतळा निर्मितीचा बनाव जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथे बाळू आवारेचा हा कारखाना सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे, शासकीय गायरान जमिनीवर 'कृषी अवजारे सेवा केंद्र' असल्याचे भासवून एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतपणे पुतळ्यांची निर्मिती केली जात होती. अंबडच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलिसांनी या कारखान्यावर धाड टाकून तो सील केला आहे. सहकाऱ्याला सीमेवरून अटक बाळू आवारेला तीन दिवसांपूर्वीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर आता त्याचा सहकारी संभाजी आघाव याला सोलापूर-धाराशिव सीमेवरून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. गंभीर गुन्ह्यांची नोंद बाळू आवारेवर केवळ माढाच नव्हे, तर करमाळा तालुक्यातील पुनावर येथेही अशाच प्रकारे विनापरवाना पुतळा बसवल्याचा आरोप आहे. त्याच्यावर जातीय तेढ निर्माण करणे, चिथावणीखोर भाषणे देणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे यांसारखे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. हे ही वाचा… मुंबईकरांचा प्रवास सुसाट!:दहिसर-काशिगाव मेट्रोचे मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण; मिरा-भाईंदरच्या 'त्या' वादग्रस्त उड्डाणपुलावरही दिले स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई मेट्रो मार्ग ९ च्या पहिल्या टप्प्याचे थाटात उद्घाटन करण्यात आले. दहिसर पूर्व ते काशिगाव दरम्यान धावणारी ही नवी मेट्रो मार्गिका बुधवारपासून सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार असून, यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या सोहळ्याला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या मिरा-भाईंदर येथील उड्डाणपुलाच्या वादग्रस्त रचनेवरही भाष्य करत प्रशासनाची बाजू मांडली. सविस्तर वाचा…
कावलगुडा (बु) येथे २५० जणांना अन्नातून विषबाधा
सर्वजण उमरी ग्रामीण रुग्णालयात, आरोग्य यंत्रणा सतर्क उमरी : कैलास सोनकांबळे उमरी तालुक्यातील कावलगुडा (बु) येथे मंदिरात आयोजित सामूहिक भोजन कार्यक्रमानंतर मोठ्या प्रमाणावर अन्न विषबाधेची घटना घडली. या घटनेत सुमारे २५० ग्रामस्थांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी गावातील मंदिरात आंबील व वरण,भाताचा कार्यक्रम आयोजित […] The post कावलगुडा (बु) येथे २५० जणांना अन्नातून विषबाधा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
“पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषद ही केंद्र आणि राज्यांमधील समन्वय अधिक मजबूत करत शेती क्षेत्रासाठी ठोस दिशा देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. या माध्यमातून घेतलेले निर्णय थेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रगतीस चालना देतील,” असे मत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. ते आज जयपूर येथे आयोजित पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषदेत बोलत होते. देशातील कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्षेत्रीय परिषदांच्या मालिकेची सुरुवात आज जयपूर येथे पश्चिम क्षेत्रीय कृषी परिषदेद्वारे झाली. या परिषदेत महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि गोवा राज्यांचे कृषी मंत्री आणि प्रतिनिधी सहभागी झाले होते. महाराष्ट्र सरकार व कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेले महाविस्तार अँप, अॅग्रिस्टॅक व एआय धोरण यांचे या परिषदेत अनेकांनी कौतुक केले. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या परिषदेत केंद्र-राज्य समन्वय बळकट करणे, विविध कृषी योजनांचा आढावा घेणे तसेच आगामी खरीप हंगाम 2026 साठी धोरण निश्चित करणे यावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेताना अॅग्रिस्टॅक अंतर्गत 1.32 कोटी शेतकऱ्यांची नोंदणी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि निर्यात क्षेत्रातील आघाडीचा उल्लेख केला. मात्र, 2025-26 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे राज्यातील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहितीही देण्यात आली. सुमारे 136 लाख शेतकरी आणि 105 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून राज्य सरकारने 20,196 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विशेष आभार त्यानी व्यक्त केले. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांचेही सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षीच्या सुरुवातीला देखील अवकाळी पावसाचा फटका बसत 29 जिल्ह्यांतील 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. सध्या प्रशासनाकडून पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच बाधित शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारकडेही अतिरिक्त मदतीची मागणी करण्यात आली आहे,असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. खरीप 2026 साठी राज्याने 158.92 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट निश्चित केले असून बियाणे व खतांचा पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. बीबीएफ तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आणि आधुनिक शेती पद्धतींचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,“केंद्र आणि राज्य सरकारांच्या समन्वयातून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून आणि प्रभावी अंमलबजावणीद्वारे खरीप हंगाम 2026 यशस्वी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांना सक्षम करण्याचे काम सातत्याने सुरू राहील.” तसेच त्यांनी पुढे असेही नमूद केले,“अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक संकटांच्या पार्श्वभूमीवरही महाराष्ट्रातील शेतकरी खंबीरपणे उभा आहे. शासन त्याच्या पाठीशी ठामपणे उभे असून, तातडीने मदत आणि दीर्घकालीन उपाययोजनांद्वारे शेती अधिक सक्षम करण्यावर आमचा भर आहे.” या परिषदेमुळे आगामी काळातील कृषी धोरणांना दिशा मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. याप्रसंगी माननीय केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री शिवराज सिंह जी चौहान साहेब, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलालजी शर्मा साहेब, केंद्रिय कृषी राज्यमंत्री श्री.भगीरथजी चौधरी साहेब, राजस्थानचे कृषी मंत्री श्री.डॉ.किरोड़ी लाल मीना जी, गुजरातचे कृषी मंत्री श्री.जितुभाई सवजीभाई वाघानी जी, मध्य प्रदेशचे कृषी मंत्री श्री.ऐदल सिंह कंसाना जी, गोव्याचे समाज कल्याण मंत्री श्री.सुभाष उत्तम पाल देसाई जी, कृषी विभागाचे केंद्रिय प्रधान सचिव श्री.अतिश चंद्रा यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते.
मेळघाटमधील सेमाडोहजवळील आदिवासींचे श्रद्धास्थान असलेले भूमका बाबा देवस्थान चैत्र महिन्यात नेहमीप्रमाणे खुले राहणार आहे. वन विभागाने यावर्षी पूजा-अर्चा थांबवण्याचा घेतलेला निर्णय खासदार बळवंत वानखडे यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला आहे. हे देवस्थान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येत असल्याने वन विभागाने येथे पूजा आणि महाप्रसाद करण्यास मनाई केली होती. या निर्णयामुळे आदिवासींमध्ये तीव्र नाराजी पसरली होती, कारण हे देवस्थान त्यांची श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचे केंद्र आहे. आदिवासी बांधवांनी खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे तक्रार करून चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर खासदार वानखडे यांनी तातडीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक व क्षेत्र संचालक आदर्श रेड्डी आणि उपवनसंरक्षक (प्रादेशिक) अर्जुना यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीला मेळघाटमधील आदिवासी प्रतिनिधी आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सर्वांशी झालेल्या चर्चेअंती, भूमका बाबा देवस्थानच्या यात्रेवरील बंदी स्थगित करण्याचा आणि चैत्र महिन्यात हे क्षेत्र खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या सकारात्मक चर्चेमुळे नियोजित आंदोलन मागे घेण्यात आले. भूमका बाबा देवस्थान हे अमरावती, बैतुल आणि खंडवा (मध्यप्रदेश) येथील आदिवासी व गैरआदिवासी बांधवांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. येथे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक मन्नत मागण्यासाठी येतात. या बैठकीला माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषदेचे माजी सभापती महेंद्रसिंग गैलवार, राजेश सेमलकर, विलास बोरेकर, पंकज मोरे, राहुल येवले, गोलू मुंडे आणि वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, भूमका बाबा देवस्थान आठवड्यातून केवळ एक दिवस दर्शनासाठी खुले केले जात होते. आता चैत्र महिन्यात ते पूर्णपणे खुले राहणार आहे.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत आदिवासीबहुल मेळघाटमध्ये अनेक विकास कामे केल्याचा दावा केला जातो. मात्र, युवक काँग्रेसने हे जलजीवन मिशन मेळघाटात पूर्णपणे फसल्याचा आरोप केला आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे सांगून त्याची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी केली जावी, अशी युवक काँग्रेसची मागणी आहे. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांच्या मते, 'हर घर-नल से जल' ही पंतप्रधानांच्या नावाने सुरू करण्यात आलेली योजना याठिकाणी सपशेल अयशस्वी ठरली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत खटकाली, मेनघाट आणि गरजधारी येथे पाणी वितरणासाठी एक ते दीड मीटर जलवाहिनी दाखवून त्यावर लाखो रुपये खर्च दर्शविण्यात आला. परंतु, प्रत्यक्षात ती पाइपलाइन जमिनीवरच आहे; खोदकाम करून ती जमिनीत दाबण्यात आली नाही. याउलट, प्रत्येक गावातील पाणी वितरण व्यवस्थेचे खोदकाम जास्त दाखवून मोठी बिले काढली गेली. त्याचप्रमाणे, मेळघाटमधील जलजीवन मिशनमध्ये जुन्याच जलकुंभांना रंगरंगोटी करून मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची रक्कम हडप केली गेल्याचा आरोपही युवक काँग्रेसने केला आहे. अनेक ठिकाणी जुन्या टाक्यांची दुरुस्ती न करता केवळ रंगरंगोटी करून निधी लाटण्यात आला. चिखलदरा तालुक्यातील चिलाटी येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गतची जुनी टाकी २०१२-१३ मध्ये बांधली गेली होती. ती टाकी पूर्णपणे हलते आणि तिला गळतीही लागली आहे. तरीही, २०२२-२३ मध्ये त्या टाकीची रंगरंगोटी करून लाखो रुपये खर्च करण्यात आले. पण, पाणीपुरवठा अजूनही बंदच आहे. सुमिता येथेही असाच प्रकार करण्यात आला असून, तेथील खर्चाची उचलही करण्यात आली आहे. सरवारखेडा येथे एका टाकीत एकही दिवस पाणी गेले नाही, तरीही दुसरी नवीन टाकी बांधली गेली. आता दोन्ही टाक्यांमध्ये एकही थेंब पाणी जमा झाले नाही. सद्यस्थितीत तेथील आदिवासी बांधवांना डोक्यावर घागर ठेवूनच पाणी आणावे लागते. रुईपठारला नवीन टाकी बांधली, त्यात डोमीवरून पाइपलाइन टाकून पाणी आणले, परंतु नवीन टाकीत एकही थेंब पाणी नाही. लोक आजही जुन्याच टाकीचे पाणी वापरतात आणि डोक्यावर पाणी आणावे लागते. कुहीला दोन टाक्या आहेत, तरी पाणीपुरवठा होत नाही. लोकांना विहिरीवरून डोक्यावर पाणी आणावे लागते. सिमोरी येथे टाकी बनविली, तेव्हापासून आजपर्यंत टाकीत पाणीच गेले नाही. चोबिता आणि चुर्णीचा पाणीपुरवठाही बंद आहे. पीपल्या येथील पाणीपुरवठा बंद असून, नळाला पाणी येत नाही. कारादा येथेही हीच स्थिती आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती गठित करणे आवश्यक असल्याचे युवक काँग्रेसने म्हटले आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विहिगाव येथील सात वर्षीय सोहम मोहन नेसनेसकर याने व्हिएतनाम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले आहे. मात्र, आता त्याला पुढील दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. सोहमने या स्पर्धेत जपान, मलेशिया आणि यजमान व्हिएतनामसारख्या देशांतील स्पर्धकांना मागे टाकून हे यश मिळवले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला ‘भारत भूषण’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ज्यात सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि सुवर्णपदकाचा समावेश होता. सध्या सोहम ओम इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिलीत शिकत आहे. त्याला भविष्यात उच्च शिक्षण आणि प्रशिक्षण घ्यायचे आहे. कुटुंबाचे उत्पन्न अत्यंत मर्यादित असल्याने त्याच्या पालकांनी समाजाला मदतीचे आवाहन केले आहे. सोहमने वयाच्या चौथ्या वर्षापासून योगाभ्यास सुरू केला. सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर त्याने फेब्रुवारी २०२५ मध्ये राष्ट्रीय योगा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. याच यशाच्या बळावर त्याची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. सोहमचे वडील फिजिओथेरपीचे शिक्षण घेतलेले असून, लकवाग्रस्त रुग्णांची मालिश करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत मर्यादित उत्पन्नातून ते घरखर्च सांभाळत सोहमच्या शिक्षणासाठीही बचत करत आहेत. व्हिएतनाम येथे स्पर्धेला जाण्यासाठी त्यांना सुमारे १ लाख ८० हजार रुपये खर्च आला होता. या खर्चापैकी कर्नाटक टीमने ५० हजार रुपये, तर काही सामाजिक संस्था, शाळा, ग्रामपंचायत आणि स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले होते. दर्यापूर येथील रोहिणी फाउंडेशनने ३० हजार रुपयांची मदत केली. उर्वरित रक्कम वडिलांनी जुळवली होती, परंतु वारंवार उद्भवणाऱ्या खर्चासाठी त्यांना अशी जुळवाजुळव करणे शक्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सोहमला आतापर्यंत ‘महाराष्ट्र गौरव’, ‘राष्ट्र गौरव’ आणि ‘क्रीडा शिरोमणी’सह एकूण १४ राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला होता.
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) नांदगाव खंडेश्वर येथे तीव्र निदर्शने केली. खरातवर कठोर कारवाई करण्यासोबतच त्याच्या संपर्कात असलेल्या ३९ आमदारांच्या राजीनाम्याची मागणीही यावेळी करण्यात आली. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बस स्टॉपसमोर हे आंदोलन केले. माकपच्या मते, अशोक खरात याने बुवाबाजीच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. राज्यातील ३९ आमदार खरातच्या तंत्र-मंत्र भोंदूगिरीत सामील झाले असल्याचा आरोपही पक्षाने केला आहे. या आमदारांची यादी राज्य सरकारने तातडीने जाहीर करावी आणि त्यांचे राजीनामे घ्यावेत, अशी मागणी माकपने केली आहे. तसेच, पीडित महिलांचे समाजमाध्यमांवर व्हायरल होणारे व्हिडिओ त्वरित हटवण्यात यावेत, अशी विनंतीही करण्यात आली. प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष सुरू करून ते तातडीने कार्यान्वित करावेत, अशी मागणीही आंदोलकांनी केली. आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात तहसीलदारांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले. निवडून आलेले लोकप्रतिनिधी संविधानिक पदावर असतात आणि संविधानाने त्यांच्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याची व तो जनतेत रुजवण्याची जबाबदारी दिली आहे. ही संविधानिक जबाबदारी पार न पाडता, उलट वर्तन करणे म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्याचे उल्लंघन आहे, असे माकपने म्हटले आहे. अशा लोकप्रतिनिधींमुळे तंत्र-मंत्र, जादू-टोणा यांसारख्या अंधश्रद्धांना राजमान्यता मिळते आणि सामान्य जनता भोंदू बाबांच्या फसवणुकीला बळी पडते. भोंदू बाबा जितके गुन्हेगार आहेत, तितकेच त्यांना समर्थन देणारे, त्यांच्याकडे शरण जाणारे आणि आपल्या अनुयायांना अशा बुवा-बाबांवर विश्वास ठेवण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दिशानिर्देश करणारे लोकप्रतिनिधीही गुन्हेगार आहेत. अशा गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या शोषणाला बळी पडलेल्या अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर फिरत आहेत, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे. हे व्हिडिओ समाज माध्यमांतून तातडीने हटवण्याची कारवाई राज्य सरकारने करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनात माकपचे तालुका सचिव शाम शिंदे, अशोक केसारखाने, विजय पाटील, योगेश महल्ले, दीपक अंबाडरे, राजेंद्र राऊत, प्रभाकर खडसे, दिलीप महल्ले, शत्रुघ्न नगर, लक्ष्मण झिमटे, रामदास मते, नारायण सोनोने, ज्ञानेश्वर शिंदे, मारुती बंड, विशाल शिंदे, किशोर शिंदे, लालचंद इंगोले यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त खोलापूर येथे विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढण्यात आली. नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान आरोग्य मंदिर आणि जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळेच्या वतीने ही रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीद्वारे स्वच्छता, आरोग्य आणि निरोगी जीवनशैलीबाबत प्रभावी संदेश देण्यात आला. शाळेच्या प्रांगणातून रॅलीची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी “स्वच्छ गाव – निरोगी गाव”, “आरोग्य हेच धन आहे” आणि “हात धुवा, रोग टाळा” अशा घोषणा देत संपूर्ण गावातून फेरी काढली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांच्या हातात आरोग्यविषयक संदेश देणारे फलक होते. गावकऱ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या रॅलीमध्ये आरोग्य विभागातील अधिकारी, आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तिका आणि आशा वर्कर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना स्वच्छता, आरोग्य तपासणी, लसीकरण आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व समजावून सांगितले. मुख्याध्यापक विनीत पारडे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी नियमित व्यायाम, स्वच्छता आणि संतुलित आहारावर भर देण्याचे आवाहन केले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात स्वच्छतेचे नियम पाळण्याबाबत मार्गदर्शन केले. या यशस्वी रॅलीमुळे गावात आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यामध्ये लखनसिंग जाधव, आशिष भुयार, कविता भेले, मंगेश ढाकर आणि मुख्याध्यापक विनीत पारडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
अमरावतीत 'स्वर ताल उत्सव' संगीत सोहळा पडला पार:विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजन
अमरावती येथील वैभव कॉलनी-दस्तूर नगर येथील कला वैभव संगीत अकॅडमीतर्फे 'स्वर ताल उत्सव-२०२६' या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. फरशी स्टॉप येथील नरहरी मंगल कार्यालयात हा उत्सव पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, तसेच रंगमंचावर सादरीकरणासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देशाने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गुरु आणि शिष्यांच्या अनेक जोड्यांसह बालकलाकार व ज्येष्ठ कलाकारांनी सहभाग घेतला. या संगीत महोत्सवात शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, व्हायोलिन, हार्मोनियम वादन आणि तबला वादन अशा विविध माध्यमांतून दर्जेदार कला सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी भक्तीरसावर आधारित सुमारे ३६ भक्ती रचना सादर केल्या. यावेळी महेश मूलचंदानी, डॉ. अमित वडुरकर आणि पुणे येथील मिलिंद दलाल हे अतिथी म्हणून उपस्थित होते. साथसंगत करणाऱ्या कलाकारांमध्ये हार्मोनियमवर डॉ. संदीप दलाल, कीबोर्डवर नागेश तायडे, तर तबल्यावर तारक दलाल, सर्वज्ञ दलाल, नंदन वसु, सुजल कोहळे, दीप हरणे, केशव राठी आणि राम बजाज यांचा समावेश होता. कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी यांच्या पूजन आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. श्रीमती ठाकरे, श्रीमती सावदेकर आणि वैष्णवी बावस्कर यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. डॉ. संदीप दलाल, निलिमा दलाल, रोहिणी वारेकर, अनिता दलाल आणि संगीत वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कला वैभव संगीत अकॅडमीने केवळ भारतातच नव्हे, तर रशिया, चीन आणि युरोपसह विविध देशांमध्ये शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार केला आहे. संगीततज्ज्ञ अरविंद दलाल, पंडित वामनराव धावंजेवार, उस्ताद लड्डू मियां खा साहेब, डॉ. देवेंद्र यादव आणि गुरुवर्य मुकुंद सराफ यांनी यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
पुणे येथे भाजपच्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यकर्ता संमेलनात राष्ट्रीय सह-संघटन मंत्री शिव प्रकाश यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. देशातील शेतकरी आंदोलन परदेशी शक्तींच्या मदतीने घडवले जात असून, स्थिर सरकार पाडण्याचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. या आंदोलनांना काँग्रेसकडून समर्थन मिळत असल्याचेही शिव प्रकाश म्हणाले. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या संमेलनात शिव प्रकाश यांनी 'राष्ट्र के विकास में भाजपा की भूमिका' या विषयावर मार्गदर्शन केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर शहराध्यक्ष धीरज घाटे व्यासपीठावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यापूर्वीच त्यांना मदत करत असतानाही आंदोलन घडवून आणले जात आहे, असे शिव प्रकाश म्हणाले. भाजप देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. देश सुरक्षित राहिला तरच विकास शक्य आहे, असे त्यांनी नमूद केले. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतलेल्या अणुचाचणीच्या निर्णयामुळेच आज भारत संरक्षण क्षेत्रात मजबूत झाला असून, अनेक देशांना शस्त्र निर्यात करत असल्याचे त्यांनी सांगितले. सिंदूर ऑपरेशननंतर भारताचा जागतिक स्तरावर दबदबा वाढला आहे, असेही ते म्हणाले. समान नागरी कायद्याबाबत बोलताना शिव प्रकाश यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयानेही या कायद्याला पाठिंबा दिला आहे. उत्तराखंडसह काही राज्यांत तो लागू झाला असून, लवकरच संपूर्ण देशात लागू करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. भाजपच्या प्रवासाचा आढावा घेताना शिव प्रकाश म्हणाले की, जनसंघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास संघर्षाचा आहे. १९८४ साली फक्त दोन खासदार असलेल्या पक्षाची टिंगल झाली होती, मात्र अटलबिहारी वाजपेयी यांनी 'एक दिवस कमल खिलेगा' असा दिलेला विश्वास आज सत्यात उतरला आहे. १९९८-९९ मध्ये बहुमताने सरकार स्थापन केल्यानंतर भाजपने स्थिर सरकार दिले आणि देशाला विकासाच्या मार्गावर नेले, असे त्यांनी सांगितले. आज काँग्रेसची स्थिती अत्यंत खराब झाली असून, देशविरोधी विचारसरणीला समर्थन देणारे लोक त्यांच्या नेतृत्वात आहेत, अशी टीकाही शिव प्रकाश यांनी केली.
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याविरोधात दाखल करण्यात आलेला तक्रार अर्ज पुढील चौकशीसाठी अहमदाबाद पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात हा अर्ज दाखल करण्यात आला होता, परंतु अधिकारक्षेत्रानुसार तो गुजरात येथील पोलिसांना हस्तांतरित करण्यात आला आहे. हा अर्ज बीड येथील वाजेद खान (बीडकर) यांनी दाखल केला होता. यामध्ये हार्दिक पांड्याने राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याचा आरोप आहे. भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर झालेल्या जल्लोषादरम्यान हार्दिक पांड्याने आपल्या प्रेयसीसोबत मैदानावर आनंद व्यक्त करताना राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शिवाजीनगर पोलिसांना हार्दिक पांड्या (रा. खार पश्चिम, मुंबई) यांच्याविरोधात तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. या अर्जाचे अवलोकन केल्यानंतर, संबंधित घटना अहमदाबाद (गुजरात) येथील नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर घडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार अहमदाबाद पोलिसांकडे येतो, असे शिवाजीनगर पोलिसांनी स्पष्ट केले. यामुळे, शिवाजीनगर पोलिसांनी हा तक्रार अर्ज पुढील कारवाईसाठी पोलिस आयुक्त, अहमदाबाद यांच्याकडे वर्ग केला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी तक्रारदार वाजेद खान यांना समजपत्र देऊन माहिती दिली आहे. काय घडलेला प्रकार टी २० विश्वचषक विजयाच्या जल्लोषा दरम्यान खेळाडूंकडून आनंदोत्सव साजरा केला जात होता. याच दरम्यान सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओ मध्ये हार्दिक पांड्या याने भारतीय राष्ट्रीय ध्वज हाताळताना अयोग्य वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता.राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याचा आरोप वकील वाजेद खान बिडकर यांनी करून पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती.
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात ऊर्जा संकटाची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, भारताकडे सध्या ६५ दिवस पुरेल इतका धोरणात्मक ऊर्जासाठा उपलब्ध आहे. संरक्षण तज्ज्ञ ब्रिगेडीअर (निवृत्त) हेमंत महाजन यांनी ऊर्जा सुरक्षेच्या लढ्यात प्रत्येक भारतीयाने सजग राहून योगदान देण्याचे आवाहन केले आहे. ब्रिगेडीअर महाजन एरंडवणे परिसरातील सेवा भवन येथे आयोजित ‘भारत आणि मध्यपूर्व संघर्ष’ या विशेष व्याख्यानात बोलत होते. यावेळी तेल आणि वायू क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ कल्याण कुलकर्णी, प्रबोधन मंचाचे अध्यक्ष विद्याधर कुलकर्णी आणि विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी उपस्थित होते. महाजन यांनी सांगितले की, जगाच्या तुलनेत भारत अधिक सुरक्षित स्थितीत आहे. देशाची तेल शुद्धीकरण क्षमता तिप्पट असून, भारत युरोपलाही शुद्ध तेलाची निर्यात करतो. गरज पडल्यास निर्यात थांबवून देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्याची क्षमता भारताकडे आहे. त्यांनी नागरिकांना ऊर्जा बचतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. सध्या देशाला बाह्य संकटापेक्षा अंतर्गत दुष्प्रचार आणि अपप्रचाराचा धोका अधिक असल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी 'देश प्रथम' ही भावना ठेवून अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. अमेरिकेच्या स्थितीवर बोलताना महाजन म्हणाले की, अमेरिका या युद्धातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत आहे, कारण त्यांची वायूसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर खर्ची पडली आहे. दुसरीकडे, इराणच्या सॅटलाईट गायडन्स आणि एअर डिफेन्स सिस्टीममध्ये चीनचा हस्तक्षेप वाढत आहे. इस्रायल अत्यंत केंद्रित असून, हिजबुल्ला आणि हुतींचे अस्तित्व संपवण्यासाठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय हिताच्या रक्षणासाठी विक्षिप्त राज्यकर्त्यांशी कसे वागायचे, हे शिकणे आवश्यक असून, त्यासाठी अभ्यासक्रमात वेगाने बदल करण्याची गरज असल्याचे महाजन यांनी नमूद केले. यावेळी तेल आणि वायू क्षेत्रातील जागतिक तज्ज्ञ कल्याण कुलकर्णी यांनी इराणच्या ऐतिहासिक वारशावर प्रकाश टाकला. इराणचा इतिहास लढाऊ वृत्तीचा असून, झोराष्ट्रीयन धर्म सनातन धर्मातून प्रभावित होता. इस्लामसोबतच्या लढाईतही त्यांनी सहजासहजी शरणागती पत्करली नाही, असे कुलकर्णी यांनी सांगितले. त्यांच्या मते, इराणची भाषा आणि संस्कृतीचा प्रभाव खलिफांवरही राहिला आहे. इराणने नेहमीच योद्ध्यांची भूमिका बजावली आहे. या व्याख्यानाचे आयोजन व्हीएसके पुणे फाउंडेशन आणि प्रज्ञा प्रवाह यांच्या वतीने करण्यात आले होते.
विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त
अहमदपूर : प्रतिनिधी या तालुक्यातील हडोळती येथील महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रातून परिसरातील अनेक गावांना वीजपुरवठा केला जातो. मुख्यमंत्री महोदयांनी बोलल्याप्रमाणे शेतक-यांना दिवसा थ्री फेज वीज देणे अपेक्षित असताना, हडोळती उपकेंद्रातून मात्र वीज पुरवठा सलग ८ तास न देता तो मनमानीपणे सकाळ-संध्याकाळ केला जात असल्याने शेतकरी व व्यापारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. […] The post विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘ताक’ या पारंपरिक पेयाबद्दल सूक्ष्म जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून जनजागृती
लातूर : प्रतिनिधी दयानंद शिक्षण संस्था संचलित, येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे दि. ६ एप्रिल रोजी मायक्रोबायॉलॉजिस्ट्स सोसायटी, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ताक’ या भारतीय पारंपरिक पेयाबद्दल सूक्ष्मजीवशास्त्रीय दृष्टिकोनातून जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते. या मोहिमेचा मुख्य उद्देश हा, ताक या भारतीय पारंपरिक पेयाबद्यल आध्यात्मिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक महत्त्व सांगणे आणि पटवून देणे […] The post ‘ताक’ या पारंपरिक पेयाबद्दल सूक्ष्म जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून जनजागृती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शाळांची प्रत्यक्ष पडताळणी पुढे ढकलावी
लातूर : प्रतिनिधी राज्यातील शाळांची प्रत्यक्ष पडताळणी ११ ते २२ एप्रिल २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीत पॅट परीक्षेसह ९वी व ११वीच्या परीक्षांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांची प्रत्यक्ष पडताळणी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी लातूर जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाच्यावतीने शिक्षण उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील शाळांची […] The post शाळांची प्रत्यक्ष पडताळणी पुढे ढकलावी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ध्वनी प्रदूषणाविरुद्ध वाहतूक शाखेची कारवाई
लातूर : प्रतिनिधी नागरिकांच्या आरोग्य, शांतता व सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीने वाढत चाललेल्या ध्वनी प्रदूषणाच्या समस्येला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांचे मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांचे नेतृत्वात वाहतूक नियंत्रण शाखेकडून मागील महिन्यात मोहीम राबविण्यात आली होती. मोहिमेमध्ये […] The post ध्वनी प्रदूषणाविरुद्ध वाहतूक शाखेची कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्य शासनाने आज (७ एप्रिल २०२६) प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ स्तरावर मोठे फेरबदल केले आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) ११ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून, यामध्ये जळगाव, नाशिक, पुणे आणि मंत्रालयातील विविध महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची नियुक्ती आता मुंबईतील महत्त्वपूर्ण अशा 'पोकरा' प्रकल्पाच्या संचालकपदी करण्यात आली आहे. तर श्वेता सिंघल यांनी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात बदली करण्यात आली आहे. जळगाव आणि नाशिकमध्ये नवीन नेतृत्व मीनल करनवाल (२०१९ बॅच): जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून त्यांची बदली आता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (POCRA), मुंबई या महत्त्वाच्या पदावर झाली आहे. करिश्मा नायर (२०२१ बॅच): नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून त्यांची नियुक्ती आता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव म्हणून करण्यात आली आहे. अमित रंजन (२०२२ बॅच): यवतमाळमधील पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी आणि सहायक जिल्हाधिकारी पदावरून त्यांची पदोन्नती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नाशिक म्हणून करण्यात आली आहे. मंत्रालयातील फेरबदल आणि इतर महत्त्वाच्या नियुक्त्या श्वेता सिंघल (२००९ बॅच): यांची नियुक्ती नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे विशेष निवासी आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. गीतांजली बाविस्कर (२०१५ बॅच): खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून त्यांची बदली सहसचिव, नियोजन विभाग, मंत्रालय येथे झाली आहे. डॉ. दिलीप जगदाळे (२०१५ बॅच): महावितरण (कल्याण) च्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदावरून त्यांची बदली सहसचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय येथे करण्यात आली आहे. पुणे आणि कल्याणमधील बदल राहुल रंजन महिवाल (२००५ बॅच): महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (पुणे) च्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून त्यांची नियुक्ती आता सदस्य सचिव, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे म्हणून करण्यात आली आहे. रुचेश जयवंशी (२००९ बॅच): यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे या पदावर झाली आहे. कान्हूराज बगाटे (२०११ बॅच): यांची नियुक्ती संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, कल्याण म्हणून करण्यात आली आहे.
४ वर्षांपासून फेरीवाला धोरणाचे भिजत घोंगडे
लातूर : प्रतिनिधी शहरातील फेरीवाले व पथविक्रेत्यांना लातूर शहर महापालिका प्रशासनाने अधिकृत पथविक्रेता परवाने जानेवारी २०२२ मध्ये दिले. मात्र गेल्या ४ वर्षांपासून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाकडून झालेली नाही. महापालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत खुप कमी आहे. फेरीवाला धोरण हे एक उत्पन्नाचे चांगले स्त्रोत असताना महापालिका प्रशासनाकडून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे महापालिकेच्या खुप मोठ्या […] The post ४ वर्षांपासून फेरीवाला धोरणाचे भिजत घोंगडे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालातर्फे गिरीश कुबेर यांच्याशी संवाद
लातूर : प्रतिनिधी स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने शनिवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या ‘कस्तूर-कांचन सभागृहात, विख्यात लेखक आणि ‘दैनिक लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचा संवाद आयोजित करण्यात आला आहे. जगाचं राजकारण हे इतिहास आणि वर्तमान रक्तरंजित करणा-या ‘तेला’ भोवती फिरत आहे, याचे सखोल विश्लेषण गिरीश कुबेर यांनी केले आहे. […] The post स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालातर्फे गिरीश कुबेर यांच्याशी संवाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जलसंपदा विभागातील कर्मचा-याची आत्महत्या
लातूर : प्रतिनिधी जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण लातूर कार्यालयात कार्यरत असलेल्या एका चतुर्थश्रेणी कर्मचा-याने रविवार या सुटीच्या दिवशी कार्यातलयात विष प्राशन करून आतमह्त्या केल्याची चर्चा आहे. जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण लातूर कार्यालयात डेपोटेशनवर कार्यरत असलेल्या राम पंडू सुर्यवंशी याने रविवारी सुट्टीच्या दिवशी कार्यातलयात विष प्राशन […] The post जलसंपदा विभागातील कर्मचा-याची आत्महत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बाजारात विविध साहित्य दाखल
लातूर : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी १३५ वी जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुशंगाने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे गतवर्षाप्रमाणे विविध साहित्याचे स्टॉल अभारण्यात आले आहे. या स्टॉलवरून अनुयायी मोठ्या संख्येने खरेदी करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह म्हणजे एक आनंदाचा पर्वच असतो. त्यानिमित्ताने शहरात […] The post डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त बाजारात विविध साहित्य दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
४० माओवाद्यांसह ‘पीएलजीए’च्या जहाल कमांडरने टेकले गुडघे
गडचिरोली : तेलंगणा व छत्तीसगड सीमावर्ती भागात गेल्या अनेक वर्षांपासून दहशतीचे साम्राज्य निर्माण करणा-या नक्षलवादी चळवळीचा पाया आता पूर्णपणे हादरला आहे. नक्षल्यांच्या पीएलजीए (पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी) चा जहाल कमांडर सोडी केशालू ऊर्फ मल्ला याने आपल्या ४० सहका-यांसह पोलिसांसमोर ७ एप्रिल रोजी शरणागती पत्करली. यामुळे माओवाद्यांचे बटालियन विखुरले असून सीमावर्ती भागात हिंसक चळवळीला ओहोटी लागल्याचे […] The post ४० माओवाद्यांसह ‘पीएलजीए’च्या जहाल कमांडरने टेकले गुडघे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एल निनोचा प्रभाव, यंदा पाऊस कमी पडणार!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एल निनोचा परिणाम यंदा मान्सूनवर होणार असल्याचा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. २०२६ मध्ये सरासरीपेक्षा कमी मान्सूनचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीत मान्सून पर्जन्यमान सरासरीच्या ९४ टक्के असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हंगामाच्या दुस-या सहामाहीत एल निनोची तीव्रता वाढण्याची शक्यता […] The post एल निनोचा प्रभाव, यंदा पाऊस कमी पडणार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आमदार महेश सावंत यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा:आमदारकी राहणार कायम, सदा सरवणकरांची याचिका फेटाळली
माहीम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार महेश सावंत यांच्या विरोधात सदा सरवणकर यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती आरिफ एस. डॉक्टर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. महेश सावंत यांच्या वतीने ॲड. अमित कारंडे यांनी प्रभावीपणे बाजू मांडली, जी न्यायालयाने ग्राह्य धरली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महेश सावंत यांना ५०,२१३ मते मिळाली होती, तर प्रतिस्पर्धी उमेदवार सदानंद सरवणकर यांना ४८,८९७ मते मिळाली होती. सरवणकर यांनी असा आरोप केला होता की, सावंत यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात (Form 26) चार गुन्ह्यांची माहिती लपवली आहे. त्यामुळे सावंत यांची निवड रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. ॲड. अमित कारंडे यांचा युक्तिवाद आणि तांत्रिक बाबी महेश सावंत यांच्या वतीने युक्तिवाद करताना ॲड. अमित कारंडे यांनी याचिकेमधील अनेक कायदेशीर आणि तांत्रिक त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. सुरक्षा ठेव भरण्यास विलंब: लोकप्रतिनिधी कायदा (R.P. Act) कलम ११७ नुसार, याचिका सादर करतानाच सुरक्षा ठेव (Security Deposit) भरणे अनिवार्य आहे. या प्रकरणात, याचिका ४ जानेवारी २०२५ रोजी सादर केली गेली, परंतु रक्कम ६ जानेवारी रोजी भरली गेली. ॲड. कारंडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत स्पष्ट केले की, हा दोष 'न भरून निघणारा' (Incurable defect) आहे. साधरण माहितीचे प्रकटीकरण महेश सावंत यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात आधीच २० प्रलंबित गुन्ह्यांची माहिती जाहीर केली होती. सावंत यांनी ज्या गुन्ह्यांचा उल्लेख केला होता, ते किरकोळ स्वरूपाचे (उदा. आवाजाचे प्रदूषण, राजकीय आंदोलन) होते आणि त्यांचा निकालावर कोणताही परिणाम झाला नाही, असे कारंडे यांनी मांडले. कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन ही याचिका स्वतः उमेदवाराने सादर करण्याऐवजी वकिलांमार्फत सादर करण्यात आली, जे कलम ८१ चे उल्लंघन आहे, असेही त्यांनी नमूद केले. न्यायालयाचा निकाल निकालाचा परिणाम या निर्णयामुळे महेश सावंत यांचे आमदारपद कायम राहिले असून, त्यांना कायदेशीर लढाईत मोठे यश मिळाले आहे. ही याचिका प्राथमिक स्तरावरच (At the threshold) फेटाळल्यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार नाही.
मुंबईतील माटुंगा येथील मध्य रेल्वेच्या डबा दुरुस्ती कारखान्यात (Coach Repair Workshop) मंगळवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. वर्कशॉपच्या आवारात उभ्या असलेल्या एका वातानुकूलित (AC) कोचने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि लोकल रेल्वेची वाहतूकही सुरळीत राहिली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या या वर्कशॉपमध्ये डब्यांच्या डागडुजीचे काम सुरू होते. यावेळी यार्डात उभ्या असलेल्या एका एसी कोचमधील विद्युत उपकरणांना अचानक आग लागली. आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, काही वेळातच आगीच्या ज्वाला आणि काळ्या धुराचे लोट आकाशात उंच उठू लागले. माटुंगा स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि स्थानिकांना हा धूर दिसल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाची तत्परता आगीची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या काही वेळातच घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. खबरदारीचा उपाय म्हणून वर्कशॉपमधील आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला होता आणि घटनास्थळी रुग्णवाहिका व वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आले होते. रेल्वे सेवेवर परिणाम नाही ही आग वर्कशॉपच्या अंतर्गत भागात लागल्याने मुख्य रेल्वे मार्गावरील लोकल किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मध्य रेल्वेची वाहतूक आपल्या निर्धारित वेळेनुसार सुरू होती, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. रेल्वेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह काही दिवसांपूर्वीच कुर्ला रेल्वे यार्डात कचरा वाहू लोकलला आग लागल्याची घटना ताजी असतानाच, आता माटुंगा वर्कशॉपमध्ये आग लागल्याने रेल्वेच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यार्डात किंवा वर्कशॉपमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रवाशांमधून टीका होत आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.' हे ही वाचा… समृद्धी महामार्गावर टँकरमधून गॅस गळती:जालना एक्झिटच्या पुढे वाहनांची 25 KM लांब रांग; हजारो वाहने अडकली, प्रवाशांचा संताप गतिमान प्रवासासाठी हाती घेण्यात आलेला समृद्धी महामार्ग आता प्रवाशांसाठी चांगलाच अडचणीचा ठरू लागला आहे. मंगळवारी तारीख 7 तब्बल 25 किलोमीटरचा जाम लागल्यामुळे हजारो वाहने अडकून पडली आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असताना महामार्ग पोलिसांकडून मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवले जात आहे. सविस्तर वाचा…
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा मानाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२६' यंदा नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर झाला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात हा सन्मान प्रदान केला जाणार असल्याची घोषणा पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी केली आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान, हृदयेश आर्ट्स आणि सकाळ मीडिया समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा सोहळा भारतीय सांस्कृतिक विश्वातील एक महत्त्वाचा उपक्रम मानला जातो. कला, साहित्य, पत्रकारिता आणि समाजकार्य अशा विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या दिग्गजांचा गौरव करण्याची परंपरा यंदाही कायम राखण्यात आली आहे. यंदाचे मानकरी कोण? विविध श्रेणींमध्ये देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची यादी खालीलप्रमाणे आहे: मुख्य आकर्षण: मी लता दीनानाथ... या सोहळ्यात पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संकल्पनेतून साकारलेला “मी लता दीनानाथ…” हा विशेष सांगितीक कार्यक्रम सादर होणार आहे. यामध्ये विभावरी जोशी, मधुरा दातार, सावनी रवींद्र यांसह अनेक कलाकार भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अजरामर गीतांना स्वरांजली अर्पण करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी तर उद्घोषण सुप्रिया चित्राव करणार आहेत. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण हा भव्य पुरस्कार सोहळा शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० या वेळेत पुण्याच्या स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंदिर येथे संपन्न होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील ११ आयएएस अधिका-यांच्या बदल्या
मुंबई : राज्य सरकारने आज तब्बल ११ आयएएस अधिका-यांच्या बदलीचे आदेश काढले. राज्य सरकारकडून अनेकवेळा बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. फडणवीस सरकारकडून प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच असून अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. एप्रिलच्या दुस-या आठवड्यात अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत, ज्यामध्ये अनेक बड्या समावेश आहे. सर्व अधिका-यांना लवकरात लवकर पदभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. […] The post राज्यातील ११ आयएएस अधिका-यांच्या बदल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहण्याचे आवाहन केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत 'फेकनरेटिव्ह'मुळे पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी नमूद केले. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच सक्रियपणे काम करणे आवश्यक असल्याचे चव्हाण म्हणाले. पुण्यात भाजप वर्धापन दिनानिमित्त आयोजित बालगंधर्व रंगमंदिर येथील कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात पक्षाचे सध्या दीड कोटी सदस्य आणि अडीच लाख सक्रिय सदस्य कार्यरत आहेत. सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक लाख सहा हजार बूथमध्ये ५१ टक्के संघटना वाढवण्याचे आपले लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी पुढील वर्षभराचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री शिव प्रकाश, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, महापौर मंजुषा नागपुरे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजप गटनेते गणेश बिडकर आणि स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले उपस्थित होते. रवींद्र चव्हाण यांनी पुणे शहराची देशात एक वेगळी ओळख असून ती प्रभावीपणे पुढे नेणे हे आपले काम असल्याचे सांगितले. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता शिस्तप्रिय असावा आणि पक्षाच्या स्थापनेच्या मूळ गाभ्याशी व विचारधारेला समर्पित असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय विचारधारा ही आपली मूळ विचारधारा आहे, असेही ते म्हणाले. भाजपची मागील ४६ वर्षे ही समर्पणाची असून, अनेक जणांनी अपार कष्ट करून सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याग केला आहे. देशाला परम वैभव प्राप्त झाले पाहिजे, त्या दिशेने नेण्याची जबाबदारी केवळ भाजपची आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. यावेळी धीरज घाटे यांनी पुण्यात भाजपचे काम झपाट्याने वाढत असून, विविध निवडणुकांमध्ये पक्षाला चांगले यश मिळाल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांचे संघटन आणि तळागाळात पोहोचलेले पक्षाचे विचार यामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळत आहे. कार्यकर्ता विचारधारेच्या आधारे काम करतो आणि सामान्य पुणेकरांना डोळ्यासमोर ठेवून काम करायचे आहे, असे घाटे म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई मेट्रो मार्ग ९ च्या पहिल्या टप्प्याचे थाटात उद्घाटन करण्यात आले. दहिसर पूर्व ते काशिगाव दरम्यान धावणारी ही नवी मेट्रो मार्गिका बुधवारपासून सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार असून, यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या सोहळ्याला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या मिरा-भाईंदर येथील उड्डाणपुलाच्या वादग्रस्त रचनेवरही भाष्य करत प्रशासनाची बाजू मांडली. मिरा-भाईंदरमध्ये मेट्रो मार्गाला लागून उभारण्यात आलेल्या एका उड्डाणपुलावरून मोठा वाद उफाळून आला होता. सुरुवातीला चार मार्गिकांचा (लेन) असलेला हा पूल फाटकाजवळ उतरताना अचानक दोन मार्गिकांचा होतो. या सदोष रचनेमुळे भविष्यात या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होईल, अशी भीती व्यक्त करत स्थानिक नागरिकांनी एमएमआरडीएच्या (MMRDA) कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला होता. अर्धवट कामावरून वाद नको - मुख्यमंत्री या बहुचर्चित उड्डाणपुलाच्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भाष्य केले. नागरिकांच्या रोषाची दखल घेत त्यांनी स्पष्ट केले की, हा पूल अत्यंत गजबजलेल्या आणि दाट लोकवस्तीच्या भागात उभारण्यात येत आहे. तेथे पूल बांधण्यासाठी पुरेशी जागाच उपलब्ध नाही, हे वास्तव सर्वांना माहीत आहे. पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाच त्याचे अर्धवट फोटो काढून विनाकारण वाद निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रश्नावर आपण एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सध्या नागरिकांनी केवळ पुलाचे अर्धवट डिझाईन पाहिले आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर तिथे खूप मोठे बदल होतील असा कोणताही दावा आपण करणार नाही, कारण जागेची मोठी अडचण आहे. परंतु, तेथील भौगोलिक परिस्थिती आणि उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त चांगला वापर करून या पुलाचे काम पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. दहिसर-काशिगाव मेट्रो बुधवारपासून प्रवाशांच्या सेवेत मुंबईकरांची दैनंदिन वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मेट्रोचे जाळे वेगाने विस्तारले जात आहे. याच शृंखलेत आता दहिसर पूर्व ते काशिगाव या नव्या मार्गाची भर पडली आहे. या नव्या मार्गाच्या उद्घाटनामुळे मुंबई महानगरात आता कार्यान्वित असलेल्या मेट्रो कॉरिडॉर्सची एकूण संख्या पाचवर पोहोचली आहे. यामध्ये घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा (मार्ग १), अंधेरी पश्चिम-दहिसर पूर्व (मार्ग २ अ), दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व (मार्ग ७) आणि कुलाबा ते बीकेसी-सीप्झ (मार्ग ३- अॅक्वा लाईन) या आधीपासूनच सुरू असलेल्या मार्गांसोबत आता 'मेट्रो ९' जोडली गेली आहे.
तर पाकचे किती तुकडे होतील देवच जाणे
नवी दिल्ली : पश्चिम बंगालवर हल्ला करण्याचे वक्तव्य करणा-या पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आसिफ यांनी चिथावणीखोर वक्तव्य करु नये असा सल्ला देताना राजनाथ सिंह यांनी बंगालकडे नजर टाकली तर पाकिस्तानचे किती तुकडे होतील हे फक्त देवालाच माहीत असा स्पष्ट इशारा दिला आहे. संरक्षण मंत्री […] The post तर पाकचे किती तुकडे होतील देवच जाणे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
साताऱ्यात आजींना लुटणारा पुण्यातील 'इराणी' गजाआड:शिवाजीनगर पोलिसांनी पाटील इस्टेट परिसरातून केली अटक
साताऱ्यात एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक करून पसार झालेल्या चोरट्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट परिसरातील इराणी वस्तीतून ही कारवाई करण्यात आली आहे. इब्राहीम बाबू इराणी (रा. इराणी वस्ती, पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. साताऱ्यातील शाहूपुरी परिसरातील एका बँकेतून रोकड काढून बाहेर आलेल्या ज्येष्ठ महिलेला बतावणी करून इराणीने तिच्याकडील सात हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. या प्रकरणी साताऱ्यातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा आढळून आला होता, त्यानुसार सातारा पोलिस तपास करत होते. तपास पथकातील पोलिस कर्मचारी महेंद्र कडू यांना मिळालेल्या माहितीनुसार, फसवणूक करणारा चोरटा पुण्यातील शिवाजीनगर भागातील इराणी वस्तीत राहत होता. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी पाटील इस्टेट भागातील इराणी वस्तीतील त्याच्या राहत्या घरातून इराणीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साताऱ्यात ज्येष्ठ महिलेकडील रोकड चोरल्याचे कबूल केले. इराणी हा सराईत चोरटा असून, त्याने पुणे शहर, जिल्हा तसेच रायगड जिल्ह्यातही ज्येष्ठांची फसवणूक केल्याचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले आणि सहायक आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक प्रमोद पाटील, हवालदार संतोष मेमाणे, सचिन जाधव, महेंद्र कडू आणि रोहित झांबरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (GECA) शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. संगणक शास्त्र व अभियांत्रिकी (CSE) विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कुमारी प्राची गटलेवार हिची जगातील आघाडीची टेक कंपनी 'अॅमेझॉन' (Amazon) मध्ये वार्षिक ४५ लाख रुपयांच्या भव्य पॅकेजवर निवड झाली आहे. महाविद्यालयाची साथ आणि 'सेमिस्टर स्वॅप'चा निर्णय प्राचीच्या या यशात तिची मेहनत आणि महाविद्यालयाने घेतलेल्या लवचिक निर्णयाचा मोठा वाटा आहे. सातव्या सत्रात असतानाच 'अॅमेझॉन'ने तिला सहा महिन्यांच्या इंटर्नशिपची ऑफर दिली होती. मात्र, महाविद्यालयाच्या नियमानुसार इंटर्नशिपची तरतूद आठव्या सत्रात असते. अशा वेळी प्राचीची ही सुवर्णसंधी हुकू नये म्हणून संगणक शास्त्र विभाग आणि विद्याशाखा परिषदेच्या (Academic Council) प्राधिकरणाने विशेष सकारात्मक पाऊल उचलले. तिला सातव्या सत्रात इंटर्नशिपला जाण्याची परवानगी देत 'सेमिस्टर स्वॅप'चा (सत्र अदलाबदल) पर्याय उपलब्ध करून दिला. सर्वत्र कौतुकाचा वर्षाव प्राचीच्या या उत्तुंग यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. संजय डंभारे, संगणक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विकुल पवार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर (TPO) डॉ. प्रवीण शेटिये, अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. अनिल करवणकर, शैक्षणिक कुलसचिव डॉ. एस. ए. सोनावणे, तसेच डॉ. श्रीवास्तव, डॉ. वाघ आणि प्रा. ए. बी. चौधरी. श्री शास्त्री यांनी तिचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांना जागतिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमचे महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील असते. प्राचीने मिळवलेले यश हे इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. - प्रशासन, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर.
महाराष्ट्र राज्यात विकासकामांमध्ये गुंतलेल्या विकासक व कंत्राटदारांची मोठ्या प्रमाणावर थकबाकी प्रलंबित राहिल्यामुळे राज्यभर तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ७ एप्रिलपासून संपूर्ण राज्यात कामबंद आंदोलन करण्याचा इशारा कंत्राटदार संघटनांकडून देण्यात आला आहे. कंत्राटदार संघटनांच्या माहितीनुसार, विविध शासकीय विभागांकडे मिळून सुमारे ९६ हजार कोटी रुपयांची देयके थकलेली आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाम, जलजीवन मिशन, ग्रामविकास, नगरविकास तसेच जलसंपदा विभागांचा मोठा समावेश असून, या थकबाकीमुळे कंत्राटदारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या संदर्भात शासनाकडे वारंवार निवेदने देऊनही ठोस निर्णय न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनांनी स्पष्ट केले आहे. निधी वितरण प्रक्रियेत काही कार्यकारी अभियंत्यांकडून भेदभाव होत असल्याचाही आरोप करण्यात आला असून, निधी वाटप पारदर्शक पद्धतीने करावे, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, राज्य सरकारने तातडीने उच्चस्तरीय बैठक घेऊन यावर तोडगा काढावा, अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कंत्राटदार संघटनांनी दिला आहे.यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष सिकंदर डांगे, अक्षय बांदल, रविंद्र कर्चे, प्रितम शिंदे, योगेश जगताप, डॉ.फाळके, प्रदीप रनवरे यांच्यासह जिल्ह्यातील कंत्राटदार संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१ कोटी ४० लाख लोक बलिदानासाठी तयार
तेहरान : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेत इराणला काही तासांची मुदत दिली आहे. इराणने लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाहीतर अमेरिकन सैन्य अवघ्या एका रात्रीत इराणला नकाशावरून पुसून टाकेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. यावर इराणचे प्रत्युत्तर समोर आले आहे. इराणचे राष्ट्रअध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी मंगळवारी सांगितले की, देशाच्या […] The post १ कोटी ४० लाख लोक बलिदानासाठी तयार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गतिमान प्रवासासाठी हाती घेण्यात आलेला समृद्धी महामार्ग आता प्रवाशांसाठी चांगलाच अडचणीचा ठरू लागला आहे. मंगळवारी तारीख 7 तब्बल 25 किलोमीटरचा जाम लागल्यामुळे हजारो वाहने अडकून पडली आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असताना महामार्ग पोलिसांकडून मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवले जात आहे. नागपूर ते मुंबई असा समृद्धी महामार्ग मागील दीड ते दोन वर्षात खुला करण्यात आला आहे. या मार्गावरून वाहनांचा गतिमान प्रवास होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र या मार्गावरून वाहतूक गतिमान होणे ऐवजी वारंवार वाहतूक ठप्प होण्याची प्रकार होऊ लागले आहेत. या समृद्धी महामार्गावर अपघात नित्याचे झाले असून अनेकांना जीव गमवावे लागले आहे. दोन दिवसांपूर्वीच या महामार्गावर सात मजुरांचा बळी गेला. त्यानंतरही या महामार्गाच्या वाहतुकीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. जालना एक्झिटच्या पुढे टँकरमधून गॅस लिकेज मंगळवारी (ता. ७) या महामार्गावर जालना एक्झिट च्या पुढे काही अंतरावर टँकर मधून गॅस लिकेज होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दुपारपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. हजारो वाहने अडकून पडली आहेत. विशेष म्हणजे काही वाहने जालना एक्झिट जवळ असताना कार सारख्या छोट्या वाहनांना जालना एक्झिट वरून खाली उतरण्यासाठी रस्ता मोकळा करावा अशी मागणी प्रवाशांनी महामार्ग पोलिसांकडे केली. मात्र पोलिसांकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याने प्रवाशांमधून संतापाची भावना व्यक्त होऊ लागली आहे. गैरसोयीमुळे प्रवाशांनी व्यक्त केला संताप या संदर्भात काही प्रवाशांनी समृद्धी महामार्गाच्या नियंत्रण पथकाशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र महामार्ग सुरू असल्याचे सांगत अज्ञान प्रगट केले. मात्र प्रत्यक्षात 25 ते 30 किलोमीटर अंतरापर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महामार्गाच्या नियंत्रण विभागाच्या या अज्ञानावरही प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या महामार्गावरून पोलिसांसोबतच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची वाहने धावत असल्यामुळे आता महामार्ग खुला होईल अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली. मात्र उपप्रादेशिक परिवहन विभाग देखील या जाम पासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. प्रवाशांचा उद्रेक होण्याची शक्यता प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच गतिमान प्रवासासाठी सुरू केलेला समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी मात्र चांगलाच अडचणीचा ठरू लागला आहे. या महामार्गावरील कर्मचाऱ्यांच्या मूग गिळून गप्प बसण्याच्या भूमिकेमुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भात काही प्रवाशांनी पोलिसांची संपर्क साधला. पण त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. परिणामी, वाहतूक सुरू करण्यासंदर्भात कुठल्याही संदर्भातील हालचाली सुरू नसल्याने प्रवाशांचा उद्रेक होण्याची शक्यता दिसून येत आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेचे परखड शब्दांत समर्थन केले आहे. पार्थदादा पवार यांचे विधान काँग्रेसला फारच झोंबले आहे. यामुळेच काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू सुरू असल्याच्या त्यांच्या विधानानंतर एरवी डबक्यात लपून बसलेली बेडके बाहेर पडून एकदम डऱ्याव डऱ्यावर करत आहेत, असे ते म्हणालेत. पार्थ पवार यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसवर निशाणा साधताना राज्यात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर सडकून टीका करत ते एक कृतघ्न मुलगा असल्याचा आरोप केला होता. विशेषतः शरद पवार, सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी पार्थ पवारांचे कान टोचले होते. यामुळे पार्थ पवार यांच्या राजकीय परिपक्वतेविषयी संशय व्यक्त केला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या विधानाचे जोरदार समर्थन केले आहे. पार्थदादा!, तुम्ही अगदी खरं बोललेत अमोल मिटकरी यासंबंधी म्हणाले, पार्थदादा, u are absolutely right !.... आमच्या पक्षाचे नेते खासदार पार्थदादा पवार यांचं वक्तव्य काँग्रेसला फारच झोंबलेलं दिसतंय. काँग्रेसचा 'डाऊनफॉल' सुरू असल्याच्या पार्थदादांच्या वक्तव्यावर एरव्ही डबक्यात लपून बसलेली बेंडकं बाहेर पडत एकदम 'डऱ्याव-डऱ्याव' करत बोंबलायला लागलीत. कधीकाळी राज्यात सत्ताधारी असलेली काँग्रेस आज विधानसभेत १६ च्या आकड्यावर थांबलीय. १६ हा आकडा नेहमीच धोक्याचा असतो, असं जाणकारांना माहित आहे. त्यामुळेच पार्थ दादांनी असं वक्तव्य केलेलं असावं. मात्र, आपलं वर्तमान आणि अस्तित्व गमावलेल्या अन विसरलेल्या काँग्रेसला आता इतिहासाचाही अभ्यास करावा लागेल हे नक्कीच. पार्थदादा!, तुम्ही अगदी खरं बोललेत. काँग्रेसचा 'डाऊन फॉल'च सुरू आहे. जाहीर समर्थन, असे ते म्हणालेत. सूरज चव्हाणांनीही केले समर्थन तत्पूर्वी, राष्ट्रवादीचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनीही या प्रकरणी काँग्रेसवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, काँग्रेसने आमच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय केले ते अगोदर पाहावे. एखाद्या नेत्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्ती पोटनिवडणूक लढवत असेल तर ती निवडणूक बिनविरोध करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण काँग्रेसने ती परंपरा पाळली नाही. काँग्रेसने राजकीय परंपरेला छेद देण्याचे काम केले. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही महाराष्ट्राची जनभावना आहे. पण या जनभावनेपासून दूर गेलेली काँग्रेस ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. काँग्रेसच्या या भूमिकेचा दाखला देत पार्थ पवारांनी काँग्रेसचे डाऊनफॉल सुरू होईल असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. काँग्रेसने आमच्या नेत्यांवर पुन्हा अशी टीका केली तर त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. पार्थ काँग्रेसच्या बाबतीत चुकला - रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याची टीका करणाऱ्या पार्थ पवारांचे कान टोचलेत. पार्थ पवार काँग्रेसच्या बाबतीत चुकले. असा कोणताही पक्ष संपत नसतो. या प्रकरणी नेहमी जमिनीवर राहणे महत्त्वाचे, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर सुप्रिया सुळेंनीही टोचले पार्थ पवारांचे कान भारतीय राजकारणात आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत काँग्रेस पक्षाचे योगदान अत्यंत मोठे आहे. देशाच्या पंतप्रधानापासून ते ग्रामपंचायतीच्या सरपंचापर्यंत, तसेच महिला आरक्षणापासून ते देशाने जिंकलेल्या युद्धांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. हे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसची पाठराखण केली. तसेच, लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असला तरी मर्यादांचे भान हवे, असे म्हणत त्यांनी पार्थ पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. वाचा सविस्तर
राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्याकडे सरकत आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) व्याप्ती वाढवण्यात आली असून, एकूण २४ अनुभवी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचे पथक अहोरात्र काम करत असल्याची माहिती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी खरातच्या अघोरी कृत्यांचा पाढा वाचतानाच, पीडित महिलांच्या गोपनीयतेबाबत अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले. तसेच जसे तपासात पुरावे समोर येतील, तसे अशोक खरातला गुन्ह्यांसाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तेजस्वी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष तपास पथकामध्ये २ पोलीस उपअधीक्षक, ३ पोलीस निरीक्षक, ३ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक आणि ६ पोलीस अंमलदार अशा एकूण २४ जणांचा समावेश आहे. हे पथक तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे खरातच्या गुन्ह्यांचे जाळे उलगडत आहे. गुन्ह्यांचे स्वरूप आणि व्याप्ती अशोक खरात याच्यावर नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मिळून एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ११ गुन्ह्यांचा तपास थेट एसआयटीमार्फत केला जात आहे. यामध्ये ८ गुन्हे हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे असून उर्वरित ३ गुन्हे आर्थिक फसवणूक, जादूटोणा विरोधी कायदा आणि अवैध सावकारी अधिनियमांतर्गत नोंदवण्यात आले आहेत. इतर तीन गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत. अंधश्रद्धेचा आधार आणि दहशतीचा वापर तपासादरम्यान आतापर्यंत ३० पेक्षा अधिक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली आहे. खरात हा स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून भाविकांच्या आणि पीडितांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत असे. कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू होईल अशी भीती दाखवून, तसेच खडे, चिंचोके आणि रुद्राक्षाच्या माध्यमातून तो लोकांकडून पैसे उकळत होता. ईशान्येश्वर मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेत हातचालाखीने चमत्कार दाखवणे आणि महिलांना बदनामीची धमकी देऊन त्यांचे लैंगिक शोषण करणे, असा त्याचा भयानक 'मोडस ऑपरेंडी' असल्याचे निष्पन्न झाले आहे. पीडितांची ओळख जपण्याचे कळकळीचे आवाहन पत्रकार परिषदेत तेजस्वी सातपुते यांनी समाजाला एक महत्त्वाचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, महिला अत्याचाराच्यासंदर्भाने दाखल आठही गुन्ह्यांमध्ये पीडिता आणि त्यांचे कुटुंबीय अतिशय धाडसाने समोर आलेले आहेत. त्यांनी फिर्याद दाखल केल्यामुळे आपण कायदेशीर कारवाई करू शकत आहोत. या महिलांनी लोक काय म्हणतील? या भीतीने अन्याय सहन केलेला आहे. आता अतिशय धाडसाने कुटुंबाला विश्वासात घेऊन गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख उघड न करणे, सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओज न पसरवणे, आपल्या मोबाईल्स मध्ये असे व्हिडिओ न बाळगणे हे आपल्या सगळ्यांचे नैतिक कर्तव्य तर आहेच, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे देखील तसे कठोर निर्देश आहेत. त्यांची ओळख गोपनीय राहणे आणि त्यांच्या खासगी बाबींची सार्वजनिक चर्चा न होणे हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांचे धैर्य टिकून राहण्यासाठी अतिशय गरजेचे आहे, असे आवाहन तेजस्वी सातपुते यांनी केले. पीडितांची गोपनीयता आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पीडित महिलांनी अत्यंत धाडसाने पुढे येऊन तक्रारी दिल्या आहेत, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा राखणे हे समाजाचे कर्तव्य असल्याचे सातपुते यांनी अधोरेखित केले. भारतीय संविधानाचे अनुच्छेद २१ आणि बीएनएस कलम ७२ नुसार लैंगिक अत्याचार पीडितांची ओळख उघड करणे हा गंभीर गुन्हा आहे. पीडितांच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा करणे किंवा त्यांचे व्हिडिओ प्रसारित करणे हे केवळ अनैतिकच नाही तर बेकायदेशीर आहे. अशा कृत्यांमुळे पीडितांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, त्यामुळे प्रसारमाध्यमांनी आणि नागरिकांनी 'मीडिया ट्रायल' टाळावी, असे आवाहन त्यांनी केले. सायबर सेलने ४६५० लिंक केल्या डिलीट पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि माहिती रोखण्यासाठी एसआयटीच्या सायबर टीमने मोठी मोहीम राबवली आहे. आतापर्यंत सोशल मीडियावरील ४ हजार ६५० आक्षेपार्ह लिंक हटवण्यात आल्या असून, चिथावणीखोर पोस्ट टाकणारे ४५१ अकाउंट्स कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहेत. तसेच, पीडितांचे व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी सातपूर (नाशिक) आणि कोपरगाव (अहिल्यानगर) येथे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. बड्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे संकेत या प्रकरणात काही बडे पदाधिकारी किंवा अधिकारी सहभागी आहेत का? या प्रश्नावर बोलताना तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केले की, तपास हा पूर्णपणे पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबावर आधारित आहे. खरातच्या या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी किंवा त्याला मदत करण्यासाठी इतर कुणी कारणीभूत ठरले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. तपासादरम्यान ज्यांचे नाव पुराव्यानिशी समोर येईल, त्यांच्यावर निश्चितपणे कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या विधानामुळे येत्या काळात काही बड्या व्यक्तींची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मणिपूरमध्ये पुन्हा भडकली हिंसा
इंफाळ : ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसा भडकली आहे. मणिपूरमधील बिष्णूपूर जिल्ह्यात मंगळवारी एका रॉकेटसारख्या वस्तूने घरावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात घरात झोपेत असलेल्या चार वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या नवजात बहिणीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जिल्ह्यात हिंसाचार उसळला. दोन मुलांच्या मृत्यूनंतर अनेकठिकाणी तीव्र निदर्शने सुरू झाली. यानंतर सीआरपीएफने केलेल्या गोळीबारात दोन नागरिक […] The post मणिपूरमध्ये पुन्हा भडकली हिंसा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कार-दुचाकीच्या भीषण अपघातात बहिण, भाऊ जागीच ठार
परभणी : तालुक्यातील झरी पासून जवळच असलेल्या जिंतूर मार्गावरील कॅनलजवळ मंगळवार, दि.७ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन बहिण, भावांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू पावले बहीण, भाऊ हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वटकळ येथील रहिवासी असल्याचे समजते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, झरीकडून जिंतूरकडे जाणारी […] The post कार-दुचाकीच्या भीषण अपघातात बहिण, भाऊ जागीच ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभियानाविषयी मंत्रिमंडळाला माहिती दिली. अभियानाविषयी माहिती देण्यात येणाऱ्या व्हिडिओ आणि पुस्तिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. राज्य शासनाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. लोकसहभागातून ही मोहीम व्यापक आरोग्य चळवळ म्हणून उभी राहावी, हा शासनाचा मानस असून, गावपातळीपासून राज्यस्तरापर्यंत आरोग्य सेवांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देणे. स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, पोषण, तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर नियंत्रण यासारख्या मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनशैलीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. माता-बाल आरोग्य, मानसिक आरोग्य आणि बदलत्या जीवनशैलीशी निगडित आजारांनाही या मोहिमेत विशेष स्थान देण्यात आले आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, विभाग, जिल्हा आणि ग्रामपंचायत स्तरावर समित्यांची स्थापना करण्यात आली असून, ठरावीक निकषांनुसार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना “आरोग्यसंपन्न गाव” म्हणून गौरविण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच आरोग्य संस्थांना ६५.२५ कोटी रुपयांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” हे अभियान केवळ योजना नसून एक लोकचळवळ आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्याचा स्तर उंचावून निरोगी, सशक्त आणि समृद्ध समाज घडविण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचा विश्वास यावेळी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी व्यक्त केला.
‘शालेय सहल’तून लालपरी मालामाल; मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शालेय सहलींसाठी २५ हजार ५५८ बस फे-यांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करत तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. हे उत्पन्न मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाखांनी अधिक असून, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित सहलींसाठी एसटीशिवाय पर्याय नाही, हे […] The post ‘शालेय सहल’तून लालपरी मालामाल; मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिलांचे लैंगिक शोषण, अवैध सावकारकी आणि आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकलेल्या भोंदू बाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांचे धागेदोरे आता थेट सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणाच्या तपासात परिवहन विभागातील (RTO) दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नावे समोर आली असून, त्यांच्यासह कुटुंबीयांच्या नावे असलेल्या संशयास्पद बँक खात्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 'समता' पतसंस्थेतील या संशयास्पद व्यवहारांमुळे आता या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून तपास यंत्रणांनी आपला फास आवळण्यास सुरुवात केली आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमुळे अवघ्या राज्यात संतापाची लाट उसळली आहे. खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आतापर्यंत त्याच्यावर 13 गुन्हे दाखल झालेत. यातील 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे, 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे, तर एक गुन्हा ईडीने दाखल केलेला मनी लाँड्रिंगचा आहे. त्यातच आता परिवहन विभागाच्या (RTO) दोन बड्या अधिकाऱ्यांची नावे तपासात समोर आल्याची माहिती मिळत आहे. शंभरहून अधिक बँक खात्यांचे जाळे शिर्डी पोलिसांनी खरातच्या आर्थिक व्यवहारांची पाळेमुळे खणून काढताना ५६ व्यक्तींच्या नावावर असलेल्या १०० हून अधिक बँक खात्यांची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये आरटीओ विभागातील दोन बड्या अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावावर खाती उघडण्यात आल्याची धक्कादायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. हे व्यवहार केवळ सावकारकीपुरते मर्यादित आहेत की मोठ्या प्रमाणावर काळा पैसा पांढरा करण्यासाठी या खात्यांचा वापर करण्यात आला, या दिशेने विशेष तपास पथक (SIT) आता सखोल तपास करत आहे. कागदपत्रांचा गैरवापर की संगनमत? तपास यंत्रणांसमोर आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःच्या संमतीने ही खाती उघडली होती की त्यांच्या वैयक्तिक आणि गोपनीय कागदपत्रांचा गैरवापर करून खरातने ही 'बेनामी' खाती तयार केली? जर ही खाती बनावट असतील, तर या अधिकाऱ्यांची अत्यंत गोपनीय कागदपत्रे एका भोंदू बाबाच्या हाती कशी लागली? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या संशयास्पद व्यवहारामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांना कोणत्याही क्षणी चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची दाट शक्यता आहे. ईडीची एन्ट्री आणि वाढीव कोठडीची शक्यता प्रकरणाचे गांभीर्य आणि कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहाराचे स्वरूप लक्षात घेता, आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED) देखील या प्रकरणात उडी घेतली आहे. एसआयटीच्या हाती काही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे दस्तऐवज लागले असून गेल्या काही तासांपासून खरातची कसून चौकशी केली जात आहे. उद्या खरातला न्यायालयात हजर केले जाणार असून, तांत्रिक पुरावे सादर करून पोलीस त्याच्या वाढीव कोठडीची मागणी करणार आहेत. आणखी पीडित समोर येण्याची शक्यता दरम्यान, जमीन खरेदी-विक्रीच्या नावाखाली फसवणूक झालेले आणखी काही पीडित तक्रारदार आता पुढे येत असल्याने खरातवर नवनवे गुन्हे दाखल होण्याची चिन्हे आहेत. आरटीओ विभागातील या अधिकाऱ्यांच्या चौकशीतून परिवहन विभागातील आणखी काही 'बड्या माशांची' नावे बाहेर येतात का? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
तेहरान : सध्या जगाचे लक्ष इराणवर होणा-या हवाई हल्ल्यांवर असले तरी, समुद्राच्या खोल पाण्यात इराणने एक असे जाळे विणले आहे ज्याने अमेरिकन नौदलासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. इराणच्या घादिर क्लास या चिमुकल्या पण अत्यंत घातक पाणबुड्यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझला शत्रूंसाठी किल झोन बनवले आहे. घादिर ही इराणची स्वदेशी बनावटीची मिनी पाणबुडी आहे. केवळ २९ […] The post ‘घादिर’ बसल्यात घात लावून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचे मोठे कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
नागपूर : प्रतिनिधी नाशिक आणि वसईच्या घटना ताज्या असतानाच आता नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेपत्ता पतीला परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका भोंदूबाबाने महिलेवर बलात्कार केला आहे. पीडित महिलेचा पती गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता होता, त्याला तंत्र-मंत्राच्या जोरावर परत आणण्याचे खोटे आश्वासन या नराधमाने दिले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे पीडित महिलेच्या लक्षात […] The post नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचे मोठे कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दुष्कृत्य धार्मिक प्रथा म्हणून सादर केल्यास न्यायालय हस्तक्षेप करेल
नवी दिल्ली : केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देणारा आदेश कायम ठेवावा की नाही, यावर सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे घटनापीठ आज या प्रकरणाची सुनावणी करत आहे. हे प्रकरण शबरीमला प्रकरणाची पुनर्सुनावणी आहे की केवळ संदर्भित सात प्रश्नांची उत्तरे देण्यापुरतेच मर्यादित असेल यावर वकिलांमध्ये चर्चा सुरू आहे. न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या जर एखादे सामाजिक दुष्कृत्य धार्मिक प्रथेच्या […] The post दुष्कृत्य धार्मिक प्रथा म्हणून सादर केल्यास न्यायालय हस्तक्षेप करेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी घुसवली कार
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या सुरक्षेला धक्का देणा-या कार घुसखोरी प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. आरोपी सरबजीतने चौकशीत धक्कादायक दावा केलाअ सून पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठीच त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. हरवलेल्या भाच्याच्या शोधासाठी हा सगळा प्रकार केल्याचा त्याचा दावा आहे. सरबजीतच्या म्हणण्यानुसार, त्याचा भाचा १ एप्रिलपासून बेपत्ता आहे. या संदर्भात हरिनगर पोलीस […] The post पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी घुसवली कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आंध्र प्रदेश कायमस्वरुपी राजधानी आता अमरावती
अमरावती : आंध्र प्रदेशमधील अमरावती शहराला अखेर अधिकृत आणि कायमस्वरूपी राजधानीचा दर्जा मिळाला आहे. भारत सरकारने ६ एप्रिल रोजी याबाबत गॅझेट नोटिफिकेशन जारी केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला. कायदा मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन) अधिनियम, २०२६ हा कायदा २ जून २०२४ पासून लागू मानला जाईल. या सुधारित […] The post आंध्र प्रदेश कायमस्वरुपी राजधानी आता अमरावती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पार्थ पवार कृतघ्न, कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर झालेला खासदार
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली होती. त्यावर आता महाराष्ट्र काँग्रेसने एक पोस्ट लिहून पार्थ अजित पवारांना उत्तर दिल्े आहे. सुनेत्रा पवार या बारामतीची पोटनिवडणूक लढत आहेत. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपाचा प्रयत्न होता. मात्र काँग्रेसने बारामतीत उमेदवार दिला […] The post पार्थ पवार कृतघ्न, कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर झालेला खासदार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘भूत बंगला’मध्ये सुपरस्टार्सची एन्ट्री
मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि विनोदी चित्रपटांचे बादशाह दिग्दर्शक प्रियदर्शन तब्बल १४ वर्षांनंतर ‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राजपाल यादव, परेश रावल यांची जुनी जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना खदखदून हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि दिग्गज दिग्दर्शक […] The post ‘भूत बंगला’मध्ये सुपरस्टार्सची एन्ट्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रवाशांच्या जेवनात आढळले मेलेले किडे
मुंबई : भारतीय रेल्वेची शान समजल्या जाणा-या आणि हायस्पीड प्रवासासाठी ओळखल्या जाणा-या वंदे भारत एक्स्प्रेसच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर धावणा-या वंदे भारत एक्स्प्रेसमधील अन्नात कीडा सापडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत आयआरसीटीसीने संबंधित केटरिंग कंत्राटदाराला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला असून त्याचे […] The post प्रवाशांच्या जेवनात आढळले मेलेले किडे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईत दोन जैन मुनींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी ताराबाई यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर पुण्यात जैन आणि मराठा समाजातर्फे संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. समाजात कोणताही गैरसमज किंवा तणाव निर्माण होऊ नये, या उद्देशाने ही परिषद घेण्यात आली. या परिषदेत दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, संबंधित वक्तव्यांचा जैन समाजाशी कोणताही संबंध नाही. ही विधाने वैयक्तिक असून राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जैन समाजाने अशा वक्तव्यांचा तीव्र निषेध केला. युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात आदर आणि अभिमान आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तव्यांना कोणताही पाठिंबा नसून ती संबंधित व्यक्तींची वैयक्तिक मते आहेत. समाजात तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्नांना एकत्रितपणे विरोध केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. मराठा मोर्चाचे अनिकेत देशमाने यांनी जैन समाजाने घेतलेल्या स्पष्ट भूमिकेचे स्वागत केले. कोणत्याही गैरसमजाला वाव न देता शांतता आणि एकता टिकवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भावना तीव्र असल्या तरी संयम राखणे गरजेचे असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. जितो पुणेचे लक्ष्मीकांत खाबिया यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अतुलनीय असल्याचे सांगितले. त्यांचे मोजमाप करण्याचा अधिकार कोणालाही नाही. जैन समाज नेहमीच शांतता, सहिष्णुता आणि परस्पर आदर यांचा पुरस्कार करतो, त्यामुळे अशा वक्तव्यांना समाजात स्थान नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेत दोन्ही समाजांनी एकत्रितपणे महाराष्ट्रातील एकता, बंधुता आणि परस्पर सन्मानाची परंपरा जपण्याचा निर्धार व्यक्त केला. अफवा आणि चुकीच्या माहितीपासून दूर राहून संवाद आणि संयमाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा टिकवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या परिषदेला अक्षय जैन, अनिकेत देशमाने, लक्ष्मीकांत खाबिया, दिनेश सुतार, मिलिंद फडे, सुधीर मते, राजेंद्र सुराणा, नितीन जैन, अनिल भोसुरे, गोविंद पवार, समाधान नागवे, माऊली दुचाल, अर्चना शहा, श्रीपाल ललवाणी, दिलीप खोबरे, रमेश पाटील, डॉ. सुजाता बरगळे, अनिल भंडारी, अँडी जय कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.
नाशिकमधील खरात लैंगिक शोषण प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक-अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी नाशिक पोलिस आणि विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. खरातची पत्नी आणि मुलगा फरार झाल्याने त्यांना कोणाचे अभय आहे, असा सवाल देसाई यांनी केला. देसाई म्हणाल्या की, खरात प्रकरणात अनेक निष्पाप महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे. हे प्रकरण गंभीर असतानाही काही राजकीय महिला नेत्या यात 'राजकीय पोळी' भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी आरोप-प्रत्यारोपांच्या माध्यमातून मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. एसआयटीचा तपास गुप्तपणे सुरू असतानाही मुख्य आरोपी अशोक खरातची पत्नी आणि मुलगा फरार कसे झाले, असा प्रश्न देसाईंनी उपस्थित केला. खरातच्या पत्नीने तोंड उघडल्यास अनेक बड्या राजकारण्यांची नावे समोर येतील, या भीतीनेच त्यांना फरार करण्यात आल्याचा खळबळजनक संशय त्यांनी व्यक्त केला. खरातच्या पत्नीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणे हे पोलिसांच्या अपयशाचे लक्षण असल्याचेही देसाईंनी नमूद केले. नाशिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही देसाईंनी टीका केली. सुरुवातीला लोक पोलिसांवर विश्वास नसल्यामुळे पुरावे घेऊन जाण्यास कचरत होते. यापूर्वीही अनेक प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः फोन करून आदेश दिल्यानंतरच नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून खरातला अटक केली, असे देसाईंनी सांगितले. अशोक खरातने केलेल्या 'दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए' या विधानाचा देसाईंनी समाचार घेतला. खरातने केलेल्या पापांमुळे आता त्याला कायद्याने झुकवलेच आहे, असे त्या म्हणाल्या. त्याचा 'माज' उतरवण्याचे काम प्रशासनाने कायमस्वरूपी करावे, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास उच्चस्तरीय यंत्रणेमार्फत झाल्यास अनेक 'पांढरपेशी' राजकारण्यांचे चेहरे समोर येतील, असा विश्वासही तृप्ती देसाई यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पैसा आणि जमिनींच्या व्यवहारांवरून सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असतानाच, दहिसर ते काशीगाव मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यात एक अतिशय मिश्किल आणि चर्चेत राहणारा प्रसंग घडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी या नव्या मेट्रोने प्रवास केला. यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि कॅमेरे सोबत असतानाच नेत्यांमध्ये गप्पांचा फड रंगला होता. मिरा-भाईंदरच्या विकासावर चर्चा सुरू असतानाच या प्रवासादरम्यान झालेल्या एका अनपेक्षित संवादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गप्पांच्या ओघात प्रताप सरनाईक यांचे स्वतःभोवती असलेल्या कॅमेऱ्यांकडचे लक्ष विसरले आणि त्यांनी मजेत बोलताना भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मिरा-भाईंदरमधील जमिनींचा उल्लेख केला. सरनाईक यांचा हा ऑफ द रेकॉर्ड वाटणारा संवाद कॅमेऱ्यात कैद होऊ नये, याची तत्परता दाखवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तातडीने सावध केले. आपण चकाला चकाला करत बसू आणि हे सगळे रेकॉर्ड करतील, असे म्हणत फडणवीसांनी सरनाईक यांना अधिक बोलण्यापासून थांबवल्याचे पाहायला मिळाले. मीरा-भाईंदरमध्ये 30 टक्के जागा नरेंद्र मेहतांची दहिसर ते काशीगाव मेट्रोचे उद्घाटन करत असताना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे तसेच प्रताप सरनाईक यांच्यासह इतर मान्यवरांनी प्रवास केला. यावेळी नेत्यांमध्ये गप्पांचं फड रंगला होता. यावेळी सरनाईक फडणवीस यांच्याकडे बघून हसत म्हणाले, मीरा-भाईंदरमध्ये 30 टक्के जागा नरेंद्र मेहता यांची आहे. त्यापैकी 10 टक्के जागा ते मला द्यायला तयार आहेत. यावर उपस्थित सर्व नेत्यांमध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. प्रताप सरनाईक बोलत असताना मागून त्यांना नरेंद्र मेहता खांद्याला हात लावत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. मात्र मस्करीच्या नादात सरनाईक बोलतच राहिले. हे सगळे आपले रेकॉर्ड करतील- देवेंद्र फडणवीस प्रताप सरनाईक बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सावध करत म्हटले की, आपण चकाला चकाला करू आणि येथे हे सगळे आपले रेकॉर्ड करतील, असे म्हणत वातावरण आणखी रंगवले. त्यांच्या या वक्तव्याने आणखी हशा पिकला. असे असले तरी प्रताप सरनाईक यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, दहिसर–काशीगाव मेट्रो मार्गाच्या उद्घाटनादरम्यान काशीगाव स्थानकावरील रखडलेल्या जिन्याच्या कामाचा विषय विशेष चर्चेचा ठरला आहे. या कामात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीची जमीन अडथळा ठरत असून त्यांची कंपनी अधिक मोबदल्याची मागणी करत असल्याची माहिती समोर आली आहे. नेमका हाच धागा पकडून आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच नरेंद्र मेहता यांना मिश्किल टोमणा मारल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सरनाईक यांनी गप्पांच्या ओघात अशा पद्धतीने गुगली टाकून भर मेट्रो प्रवासात मेहता यांची कोंडी केल्याची चर्चा आता रंगू लागली असून, या एका टोमण्याने विकासकामातील अंतर्गत वादावरही प्रकाश टाकला आहे.
पुणे शहरातील विमाननगर परिसरातील एका हॉटेलमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण १ लाख ४७ हजार ५५० रुपयांचे हुक्का साहित्य, विदेशी दारू आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई कोंबिंग ऑपरेशन दरम्यान करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथक-२ हे परिमंडळ ७ हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अॅटलान्टिस रूफ टॉप लाऊंज हॉटेल, विमाननगर येथे अवैधरित्या हुक्का पार्लर चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकला. या वेळी हॉटेलमध्ये हुक्का सेवा सुरू असल्याचे आढळून आले, तसेच विनापरवाना विदेशी दारूचा साठा करून विक्री सुरू असल्याचे उघड झाले. या प्रकरणात स्वप्निल तांबे (३२), अमेय अजमीरे (२८), नवरंग कोल्हे (२८), अमितकुमार गोयल (२६), कमरूल लष्कर (२६), शिवम यादव (२३) आणि माहरुफ आलम (१८) या सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून हुक्का पॉट, दारूच्या बाटल्या, विविध साहित्य आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत कलमे लावण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या पार पाडली. अवैध धंद्यांविरोधात पुढील काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नागपूरमध्ये बॉम्बच्या अफवेने खळबळ:दोसर भवन चौकात जिलेटीनच्या कांड्या आढळल्याने चिंता
नागपूर शहरातील दोसर भवन चौकातील लांजेवार इमारतीत बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरल्याने खळबळ उडाली. माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि परिसर सील केला. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकालाही (BDDS) पाचारण करण्यात आले. तपासणीदरम्यान जिलेटीनच्या कांड्या आढळल्याची माहिती आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. मोमीनपुरासारखा संवेदनशील परिसर जवळ असल्याने पोलिसांनी तात्काळ सतर्कता बाळगली. सेंट्रल ॲव्हेन्यूकडून बजेरियाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. घटनास्थळाजवळ एक पेट्रोलपंप आणि सरस्वती हायस्कूल असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्यात आली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने केलेल्या तपासणीत १५ जिलेटीनच्या कांड्या, ५० डिटोनेटर आणि ८ कनेक्टर सापडले. मिळालेल्या माहितीनुसार, लांजेवार इमारतीत गेल्या महिनाभरापासून स्फोटकांनी भरलेली एक बॅग ठेवलेली होती. हे स्फोटक १ मार्च रोजी काटोल येथील एसबीएल कंपनीत झालेल्या स्फोटाशी संबंधित असू शकतात, असा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी ९ डिसेंबर २०२४ रोजी नागपूरच्या गणेशपेठ बस स्टँडजवळील द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी ई-मेलद्वारे पोलिसांना मिळाली होती. त्यावेळीही पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवून हॉटेलमधील लोकांना बाहेर काढले होते. मात्र, नंतर ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले होते.
पुण्यात सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची 12 कोटी 31 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हडपसर भागातील या घटनेप्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील भोसलेनगर येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाला जानेवारी महिन्यात त्यांच्या मोबाइलवर एक संदेश आला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखवले. या आमिषाला बळी पडून, ज्येष्ठ नागरिकांनी गेल्या तीन महिन्यांत वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने चोरट्यांच्या खात्यात १२ कोटी ३१ लाख रुपये जमा केले. चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासविले, परंतु प्रत्यक्षात कोणताही परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चोरट्यांनी ज्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करून घेतले, त्या खात्यांची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे. पोलिसांनी संबंधित बँकांशी पत्रव्यवहारही केला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुक दरम्यान, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाची ९० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणीही शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ४४ वर्षीय व्यावसायिक हडपसरमधील मगरपट्टा सिटीत राहतात. चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दरमहा आठ ते दहा टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले होते. त्यानंतर त्यांनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. मात्र, त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस निरीक्षक संगीता देवकाते या प्रकरणाचा तपास करत आहेत. सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवणारे संदेश आल्यास त्यांना प्रतिसाद देऊ नये, कारण अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याची टीका करणाऱ्या पार्थ पवारांचे कान टोचलेत. पार्थ पवार काँग्रेसच्या बाबतीत चुकले. असा कोणताही पक्ष संपत नसतो. या प्रकरणी नेहमी जमिनीवर राहणे महत्त्वाचे, असे ते म्हणालेत. पार्थ पवार यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसवर निशाणा साधताना राज्यात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर सडकून टीका केली होती. विशेषतः शरद पवार व सुप्रिया सुळेंनीही या प्रकरणी पार्थ पवारांचे कान टोचले होते. त्यानंतर आता आमदार रोहित पवार यांनीही पार्थ पवारांचे काँग्रेसचे विषयीचे विधान चुकल्याचा दावा केला आहे. तसेच बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसशी संवाद साधतील असा विश्वासही व्यक्त केला आहे. पार्थ पवारांचे काँग्रेसबाबतचे विधान चुकले रोहित पवार म्हणाले, फॉर्म भरण्याची एक तारीख असते आणि फॉर्म मागे घेण्याची दुसरी तारीख असते. बऱ्याच मतदारसंघात अनेकजण फॉर्म भरतात आणि मागे घेतात. त्यासाठी संवाद व चर्चा करायची असते. या प्रकरणी एक राजकीय परिपक्वता दाखवायची असते. पण काल पार्थ पवारांनी घाईगडबडीने स्टेटमेंट केले. तरीसुद्धा काकी स्वतः असतील किंवा त्यांचे इतर नेते असतील, ते काँग्रेसशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढतील. तुम्ही सत्तेत असला काय किंवा विरोधात असला काय, तुम्ही जमिनीवर राहणे महत्त्वाचे असते. काल पार्थ पवारांनी केलेले विधान योग्य नव्हते. त्यात कुठे ना कुठे तरी घाईगडबड जाणवली. कोणताही पक्ष असा संपत नसतो. सर्व पक्ष आपापल्या पातळीवर आपली ताकद लावत असतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल संपला वगैरे म्हणणे योग्य नव्हतच. तुम्ही आज पार्थ पवारांशी बोललात, तर तो सुद्धा काल आपण थोडेसे बोलून गेल्याचे व आपल्या विधानाचा विपर्यास झाल्याचे मान्य करेल. पण त्याचे विधान योग्य नव्हते. आता त्यांच्या पक्षाचे नेते काँग्रेसशी सुसंवाद साधतील अशी अपेक्षा आहे, असे ते म्हणाले. पार्थ पवारांना कृतघ्न म्हणणे योग्य नाही रोहित पवार यांनी यावेळी काँग्रेसने अजित पवार व पार्थ पवारांवर घेतलेल्या भूमिकेवरही भाष्य केले. ते म्हणाले, पार्थ पवार अजित पवारांच्या अपघाताच्या मुद्यावर शांत राहतील किंवा नाही हे कुणालाच माहिती नाही. कदाचित ते त्यांच्या पातळीवर प्रयत्न करतही असतील. यासंबंधी जय पवारही सातत्याने प्रयत्न करत होते. खऱ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे. या अपघाताच्या चौकशीचा प्रस्ताव सीबीआयकडे देण्याची कल्पना सुनेत्राकाकी तथा पार्थ व जयची असू शकते. त्यात आणखी कुणाचे योगदान आहे हे सांगता येणार नाही. पण दुर्दैव असे की, अजूनतरी तो विषय सीबीआयकडे गेला नाही. पार्थ पवार कदाचित काल चुकले असतील, पण एका मुलाची आपल्या वडिलांविषयी जी भावना असते, तीच त्यांची भावना आहे हे मी खात्रीने सांगतो. कारण, तो माझा भाऊ आहे. त्यामुळे त्यांचा उल्लेख कृतघ्न असा करणे योग्य नाही. पण अजित पवारांच्या मृत्यूविषयी महाराष्ट्रात एफआयआर दाखल होत नव्हता. तेव्हा काँग्रेस शासित कर्नाटकात हा एफआयआर दाखल करण्यात आला. त्याविषयी आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे रोहित पवार म्हणाले. भोंदू खरात व अजितदादांच्या अपघातावरही भाष्य रोहित पवार यांनी यावेळी भोंदू अशोक खरात व अजित पवारांच्या अपघाताच्या कथित परस्पर संबंधांवरही भाष्य केले. ते म्हणाले, भोंदू अशोक खरातच्या समता पतसंस्थेच्या बँक खात्यांत अजित पवारांच्या अपघाताच्या एक दिवस अगोदर, अपघाताच्या दिवशी व अपघाताच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले होते. त्यामुळे यात एखादे कटकारस्थान असू शकते. त्यामुळे आम्ही जेव्हा गुन्हेगारी कट कारस्थान म्हणतो तेव्हा त्याविषयी येणाऱ्या सर्वच शंकांचा त्या कटात समावेश होतो. त्यामुळे खरातच्या प्रकरणाकडे पाहत असताना अंधश्रद्धा व हे विषय आहेतच. ते आपल्याला पटतच नाहीत. पण अजित पवारांच्या बाबती बोलायचे झाले तर आदल्या दिवशी, त्या दिवशी व दुसऱ्या दिवशी व्यवहार झाल्याचे दिसून येत असतील, तर काही ना काही निश्चित झाले असेल. कारण, अजित पवारांच्या मुंबई व बारामती येथील घराबाहेर काळ्या जादूची पूजा झाली होती हे खरे आहे. त्यामुळे खरात प्रकरणात या आर्थिक व्यवहार, मनी लाँड्रिंग व पैशांचे काही रिलेशन आहे का? हे तपासून पाहावे लागेल, असे रोहित पवार म्हणाले.
मुंबईकरांसाठी, विशेषतः मिरा-भाईंदरमधील रहिवाशांसाठी एक आनंदाची बातमी असून वाहतूक कोंडीच्या समस्येतून आता त्यांची कायमची सुटका होणार आहे. दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील 'दहिसर ते काशीगाव' (टप्पा 1) आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो 2 ब मार्गिकेतील 'डायमंड गार्डन ते मंडाले' (टप्पा 1) या दोन महत्त्वाच्या मेट्रो सेवांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याचसोबत ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पाचे शुभारंभ करण्यात आले आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या मेट्रो मार्गिका प्रवाशांसाठी खुल्या करण्यात आल्याने उपनगरातील प्रवासाचा वेग वाढणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले आहे. 2018 साली आपण याचे भूमिपूजन केले होते त्यानंतर मुंबई आणि मीरा भाईंदर यांना जोडणारी मेट्रो ही तयार करण्याचे काम सुरू झाले. मागच्या काळात शिंदे साहेब आणि मी याचा ट्रायल सुद्धा पाहिला होता. आज प्रत्यक्ष दहिसर पूर्व ते काशिगाव या 4.4 किमी टप्प्याचे काम पूर्ण केले आहे. मेट्रो 7 ला ही कनेक्टिंग मेट्रो झाली आहे. आता जो दूसरा टप्पा आहे, यात साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान याचे देखील 96 टक्के पूर्ण झाले आहे. आमचा प्रयत्न असणार आहे की त्याचे देखील याच वर्षी उद्घाटन झाले पाहिजे. ऑपरेशनल मेट्रोमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जवळपास 6 हजार 607 कोटी रुपये या प्रकल्पाला लागणार आहे. जिथे 2 तास लागायचे तिथे आता आपण 30 मिनिटांत पोहोचणार आहोत. आता कॅशलेस तिकीट आपण केले आहे. कार्ड देखील तयार केले आहे. आता 80 टक्के व्यवहार हा कॅशलेस चालू आहे. त्यामुळे आपले जे कार्ड आहे ते यशस्वी झाले आहे. हा प्रकल्प हरित प्रकल्प म्हणून गणला जाणार आहे. तसेच देशात ऑपरेशनल मेट्रोमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. वॉटर मेट्रो देखील लवकरच सुरु होणार देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही मेट्रो आणि कोस्टल रोडमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कमी होईल. दिल्ली नंतर मुंबई मेट्रो दुसऱ्या क्रमांकावर होईल. पुढील 3-4 वर्षात दिल्लीपेक्षा अधिक मेट्रो नेटवर्क सुरु व्हावे. 100 किमी पार ऑपरेशनल मेट्रो मुंबईत तयार झाली आहे. पुढील दोन वर्षात आणखी भर यात पडेल. वर्सोवा-घाटकोपर, दहिसर अंधेरी, दहिसर ते काशीगाव अशा लाईन ऑपरेशनल आहेत, सीबीडी ते नवी मुंबई, मेट्रो-3 आहे. ई-बसेस असतील किंवा अर्लरनेंट फ्यूअल बसेस देखील पोहोचतील. वॉटर मेट्रो देखील लवकरच सुरु होईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईतली मेट्रो आता मुंबई एमएमआर पर्यंत पुढे जात आहे. आता दूसरा टप्पा सुद्धा याच वर्षी पूर्ण होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि एमएमआर जोडण्याचा जो संकल्प होता तो साध्या होत आहे. ही मेट्रो दहिसरपासून मेट्रो 2ए आणि लाइन 1 सोबत कनेक्ट आहे. भविष्यात मेट्रो 7 आणि 7 ए द्वारा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाला पण जोडतोय. त्यानंतर ही मेट्रो 3 ला जोडली जाणार आहे. त्यानंतर सुभाषचंद्र बोस पर्यंत जाणार आहे. त्याचे देखील काम सुरू आहे. मी मुख्यमंत्री असताना अडथळे दूर केले- एकनाथ शिंदे पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना याचे भूमिपूजन केले. त्यानंतर अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना अडथळे दूर केले आणि आज पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री असताना याला आपण हिरवा झेंडा दाखवला आहे. मेट्रो हे काम आपण अतिशय जलद गतीने करत आहोत. यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होईल. पेट्रोल वाचेल. हे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे. ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पाचे शुभारंभ दरम्यान, आजच ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पाचे शुभारंभ करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. या बोगद्यामुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकारक होणार आहे. या प्रकल्पाचचा 'नायक' आणि अर्जुन या मशीनद्वारे कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातला एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणून पाहता येणार आहे असा ठाणे बोरिवली दुहेरी मार्ग आपण सुरू करणार आहोत. याची लांबी 11.84 किमी आहे. यातला जो बोगदा आहे त्याची लांबी 10.25 किमी आहे. आणि या ज्या मशीन आहेत या बोरिवलीकडून 5.75 किमी आणि ठाण्याहून 6.9 किमी अशा पद्धतीने या टनेलचे बोरिंग होणार आहे. 6 पदरी मार्ग आपल्याला मिळणार आहे आणि प्रत्येक बोगद्यात 2 वाहतुकीच्या आणि 1 आपत्कालीन अशा 3 मार्गिका असणार आहेत. सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प एमएसआरडीसी कडे होता आता एमएमआरडीएला देण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे जो काही 90 मिनिटांचा वेळ लागतो तो वेळ केवळ 15 मिनिटांवर येणार आहे.
हा मोकळा श्वास काँग्रेसमुळेच घेतोय
बारामती : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार दिल्याने नाराजी व्यक्त करत काँग्रेसला याची मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा वजा धमकी दिली होती. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसचे स्वातंत्र्यापासूनचे योगदान सांगत आपल्या भाच्याला चांगल्याच कानपिचक्या दिल्या. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार काँग्रेसमध्ये […] The post हा मोकळा श्वास काँग्रेसमुळेच घेतोय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘चप्पल’ मुळे घडला रक्तरंजित थरार
नागपूर : प्रतिनिधी येथील एका साध्या चप्पल बदलण्याच्या वादाचे रूपांतर रक्तरंजित थरारात होऊन १८ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना रामटेक परिसरात घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या चार तरुणांनी विटा आणि काठ्यांनी हल्ला करून समीर राजू ध्रुव या तरुणाची हत्या केली. याप्रकरणी रामटेक पोलिसांनी चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण […] The post ‘चप्पल’ मुळे घडला रक्तरंजित थरार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात राज्यातील स्थितीचा आढावा घेत मंत्रिमंडळाने विकासाशी संबंधित 5 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात महाराष्ट्रात नवीन स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धीमत्ता विभाग स्थापन करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचाही समावेश आहे. या निर्णयांमुळे राज्याच्या डीजिटल गव्हर्नन्सला गती मिळण्याचा अंदाज आहे. सरकारने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) राबविण्यासही मंजुरी दिली आहे. खाली वाचा मंत्रिमंडळाचे निर्णय संक्षिप्त स्वरुपात माहिती तंत्रज्ञान विभागमहाराष्ट्रात नवीन स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता विभाग. विकसित भारत २०४७ मधील विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाच्या पुर्तीसाठी महत्वाचे पाऊल. माहिती तंत्रज्ञान संचालनायाचे रुपांतर इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता आयुक्तालयात होणार. मंत्रालयीन विभाग, आयुक्त कार्यालय व सर्व जिल्ह्यांसाठी कायमस्वरुपी पदांचा समावेश असलेले नवीन माहिती तंत्रज्ञान संवर्ग (IT Cadre) निर्माण होणार. राज्यातील माहिती तंत्रज्ञान, एआय, डीजिटल गव्हर्नन्सला गती लाभणार. नियोजन विभाग महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर (MRSAC) आता कंपनी. सोसायटी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणी रद्द करुन कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम ८ अंतर्गत कंपनी स्थापन होणार. या निर्णयामुळे रस्ते माहिती प्रणाली, नगररचना, जलयुक्त शिवार – पाणलोट विकास, डोंगरी विकास योजना, ई- पंचनामा, महा अग्री टेक, कांदळवन अभ्यास, भूजल व्यवस्थापन, खनिच व खाणींचा अभ्यासाला गतीमानता लाभणार. नियोजन विभाग भू-स्थानिक तंत्रज्ञान (Geospatial Technology)चा वापर करुन प्रशासनात गतिमानता आणण्याकरिता महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन सेंटर (महाजिओटेक) कंपनी स्थापन होणार. आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, भूस्थानिक नवोप्रक्रम व उद्योजकता विभागामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, संशोधकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम राबविता येणार. ऊर्जा विभागमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी – महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार. शासन हमी असलेल्या कर्जा (३२,६७९ कोटी) साठी भांडवली बाजरात सरकारी रोखे येणार. याशिवाय कृषी वितरण व्यवसायाचे विभाजन (Agri Demerger) करण्यात येणार. तसेच महावितरण कंपनी भांडवली बाजारात सूचीबद्ध होणार. आपत्ती व्यवस्थापन विभाग महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) राबविण्यास मंजुरी. आपत्ती व्यवस्थापनात खाजगी भांडवलाच्या मदतीने वित्तपुरवठा उभारणार. यात जागतिक बँकेकडून १६५ कोटींचा निधी मिळणार. आपत्तीचा फटका बसलेल्या नागरीकांना गृह कर्जात तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना कर्जासाठी सवलत तसेच विमा सुरक्षा उपलब्ध होणार. पुराच्या पाण्याचा निचऱ्यासाठी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी शहरांसह, कृष्णा खोऱ्यातील पूराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार कऱण्यात येणार.
अमरावती –अकोला महामार्गावर भीषण अपघात; ४ ठार
अमरावती : प्रतिनिधी अकोला महामार्गावर सोमवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण अपघात झाला. त्यात चहा घेऊन परत येणा-या ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, बेलोरा विमानतळाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा येथील ७ तरुण सोमवारी उशिरा रात्री चहा पिण्यासाठी बेलोरा विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये गेले […] The post अमरावती – अकोला महामार्गावर भीषण अपघात; ४ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वकील असीम सरोदे यांनी नाशिक कुंभमेळ्यासाठी करण्यात येणाऱ्या अमाप वृक्षतोडीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. पर्यावरणस्नेही व निसर्गासोबत जीवन जगणे ही मानवी व सनातन धर्माची संस्कृती आहे. त्यामुळे साधूग्राम बांधण्यासाठी वाढलेले वृक्ष तोडण्याची योजना कोणत्या संस्कृती बसते? असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी सरकारला देशावर प्रेम करून पाहण्याचा उपरोधिक सल्लाही दिला. नाशिक येथे येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. त्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. यात साधूग्राम तयार करण्यासाठी तपोवनातील वृक्षतोड केली जात आहे. या प्रकरणी सरकारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वकील असीम सरोदे यांनी सरकारला खुले पत्र लिहून नाहक वृक्षतोड टाळण्याचा सल्ला दिला आहे. खाली वाचा असीम सरोदेंचे पत्र जशास तसे... असीम सरोदे आपल्या पत्रात म्हणतात, कुंभमेळ्यासाठी वृक्षवल्ली कापण्यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थगिती. मागील वेळी सुद्धा स्थगिती दिली होती पण कायद्याची प्रक्रिया न करता झाडे कापू नयेत असे म्हटल्याचा गैरफायदा तुम्ही घेतला आणि कागदोपत्री बोगस, दिखाऊ प्रक्रिया करून मोठ्ठाली वृक्ष जमिनीवर लोळवलीत. यावेळी मात्र स्पष्ट स्थगिती आहे कि पुढील तारखेपर्यंत झाडांना तोडायचे नाही. साधुग्राम बांधण्यासाठी वाढलेले वृक्ष तोडण्याची योजना कोणत्या संस्कृतीत बसते? पर्यावरणस्नेही व निसर्गासोबत जीवन जगणे ही आहे मानवी संस्कृती आणि सनातन धर्मसुद्धा. तुम्हाला वाढलेल्या वृक्षांपेक्षा महत्वाचा कुंभमेळा वाटतो? मग घ्या ना कुंभमेळा पण त्यासाठी वृक्षराजी आणि पर्यावरणावर करवती का चालविता? तुम्हाला लागलेला भव्यतेचा 'नाद' मानवी जीवनावर पर्यावरणाचा प्रकोप घडवेल. साहेब, तुम्हीच कट्टर हिंदुत्ववादी असे तुमच्या मनात नेहमी असते आणि आता तर तुम्ही योगी आदित्यनाथ यांच्याशी त्यांच्यापेक्षा जास्त कट्टर हिंदुत्ववादी अशी स्वयंघोषित स्पर्धा सुरु केलीय, त्या राजकीय कारणांसाठी तुम्हाला नाशिकचा कुंभमेळा भव्य करायचा आहे बस्स. कृपया बंद करा हे विघातक राजकारण. माणसांनी राजकारणासाठी भांडणे, एकमेकांना संपविणे आम्ही खूप बघितले लोकल चाणक्य साहेब. तुमचे राजकारणाचे व पैशांचे हिशोब, निसर्ग- पर्यावरणापासून दूर ठेवा इतकीच नम्र विनंती. निसर्ग, पर्यावरण काहीच म्हणणार नाही, बोलणार नाही, विरोध करणार नाही पण जेव्हा निसर्ग निषेध करेल तेव्हा मानवी जमात होरपळून निघेल, कचऱ्यासारखी पाण्यात वाहून जाईल किंवा थंडीने रक्त गोठून मरेल आणि तेव्हा तुम्ही, अभिजन-महाजन, साधू-महंत, फादर-मौलवी कुणीही वाचवू शकणार नाही. त्यामुळे सत्ता असण्याची अकड कमीच करा. जनतेचा पैसा खर्च करण्याची प्राथमिकता व प्राधान्यक्रम तुम्ही चुकविताय साहेब. देशावर या भारतभू वर प्रेम करणे सोप्पे नाही. येथील निसर्ग व पर्यावरणाचे मारेकरी म्हणजे देशाचे गद्दारच. बघा ना देशावर प्रेम करून. प्रयत्न केला तर जमेल, असे असीम सरोदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. अशोक खरात विशेष सरकारी वकील होण्याचा प्रस्ताव उल्लेखनीय बाब म्हणजे असीम सरोदे यांनी नाशिकच्याच भोंदू अशोक खरात प्रकरणात विशेष सरकारी वकील होण्याचीही तयारी दर्शवली आहे. ते म्हणाले होते, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सरकारी वकील म्हणून जबाबदारी घेण्यासाठी कुणी मिळत नाहीये ही बातमी वाचली. आमचे मित्र अजय मिसार सरकारतर्फे महाराष्ट्रातील अनेक केसेसमध्ये व्यस्त असल्याने असेल कदाचित त्यांनी खरात केसमध्ये सरकारी वकील म्हणून जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. 'वैसे तो मै बहोत प्रभावित हु आपसे' फेम एकमेव विशेष म्हणून स्वतःला प्रस्थापित केलेले महोदय दिल्ली सभेत जाऊन बसले. पण तरीही मीच विशेष सरकारी वकील म्हणून केसेस चालविणार असा त्यांचा हट्ट असतो. त्यांना सरकारने विचारून बघावे. ते कायदा व फायदा दोन्ही बाजूंनी विचार करू शकतात. खरात सारख्या भोंदू बाबालाच नाही तर अश्या प्रवृत्ती नेस्तनाबूत करायच्या असतील तर खरात विरोधातील या केसमध्ये 'विशेष सरकारी वकील' म्हणून काम करण्याची माझी तयारी आहे. पण विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे राजकारण आहे. ' यात राजकारण आणू नका' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या मनात जे राजकारण असेल त्यालाच 'राज्याचे धोरण' म्हणण्याचा प्रघात आहे, असे ते म्हणालेत.
लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही. कारण त्यांचा पक्ष लोकशाहीवर नाही तर घराणेशाहीवर चालतो, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. राऊतांना कुठेच मान्यता नाही. महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व करण्याच्या दृष्टीने काम करत आहे, त्यासाठी ते रोज राहुल गांधींना सल्ले देतात. उबाठा खड्ड्यात घातल्यानंतर आता काँग्रेस खड्ड्यात घालण्याचे काम राऊतांकडून करण्यात येणार आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत तुम्ही लुटारू सैनिक आहात हे जनतेने पाहिले आहे. तुम्ही महाराष्ट्र, मुंबई, पत्राचाळीची लुट केली. तुम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करू नका. तुम्ही लुटारू सैनिक आहात. राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांना विनंती केली आणि ती मान्य केली. तर लक्ष्णण हाके यांनी विनंती दत्ता भरणे यांची विनंती मान्य केली. ही काय धमकी नाही. आम्ही लोकांना साथ देतो म्हणून लोकं आमची विनंती मानतात. राहुरीच्या विकासासाठी साथ नवनाथ बन म्हणाले की, राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी भाजपला साथ देण्याचे काम केले आहे.त्यांचे मी आभार व्यक्त करतो. काल रवींद्र चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली, यावेळी राहुरीच्या विकासासाठी त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. संजय राऊत यांनी लोकशाही कुठे आहे, आणि ट्रम्प शाही कुठे आहे हे सांगण्याच्या भानगडीत पडू नये. तुमच्या कार्यकाळात राज्याची वाट लावली तेव्हा तुम्हाला लोकशाहीची आठवण झाली नाही का? असा सवाल बन यांनी केला आहे. उमेदवार नेमका कुणाचा? नवनाथ बन म्हणाले की, बारामतीमध्ये जो उमेदवार काँग्रेसने दिला आहे, तो काँग्रेसचा आहे की मविआचा हे संजय राऊत यांना समजत नाहीये, ते संभ्रमात आहेत. उद्धव ठाकरेंना वाटते की सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यावा. पण दुसरीकडे संजय राऊत यांना वाटते की काँग्रेस उमेदवाराला उबाठाने पाठिंबा दिला पाहिजे. हाच संजय राऊतांचा प्रयत्न आहे. काँग्रेसला बारामतीमध्ये पाठिंबा दिला तर ते आपल्याला राज्यसभेची खासदारकी देतील हे लक्षात घेऊन ते काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मविआत त्यांना राहुरी, बारामतीमध्ये काय निर्णय घ्यायचा हे ठरतच नाही. उबाठामध्ये दोन गट नवनाथ बन म्हणाले की, उबाठामध्ये दोन गट पडले आहेत, त्यामुळे त्यांना बारामतीमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा हे समजत नाही. राऊतांचा गट काँग्रेस तर उद्धव ठाकरेंचा गट सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यावे म्हणतोय. त्यांच्यातील हा वाद आता समोर आला आहे. उबाठामध्ये बारामती पोटनिवडणुकीवरून प्रचंड गोंधळ आहे. देवाभाऊंच्या कार्यकाळात अनेक कामे सुरू नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेसच्या काळात मुंबईमध्ये केवळ एक मेट्रो होती. तर देवाभाऊंच्या कार्यकाळात 11 मेट्रोची कामे सुरू आहेत. यातील दोन मेट्रोचे आज उद्घाटन झाले. नागरिकांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम देवाभाऊंच्या माध्यमातून सुरू आहे.
मंत्रालयात 6 लाख 37 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलेला कक्ष अधिकारी विलास लाड याची एक खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर आली असून, यामध्ये त्याने नाशिक कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेबाबत धक्कादायक दावे केले आहेत. या कथित क्लिपमध्ये कुंभमेळ्यासाठीची सुमारे 1021 प्रकारची कामे 'मॅनेज' करून ठराविक लोकांना दिली जाणार असून, त्यातून कोट्यवधींचे कमिशन मिळणार असल्याचे लाड बोलताना दिसत आहे. या दाव्यांमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. (दिव्य मराठी या व्हायरल ऑडिओ क्लिपची अधिकृत पुष्टी करत नाही). यावरून कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, कुंभमेळ्यासारख्या पवित्र उत्सवाला अक्षरशः भ्रष्टाचाराचे कुरण बनवणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा एक एक पराक्रम आता उघड होत आहे. लाचखोरीच्या आरोपाखाली अटकेत असलेला मंत्रालयातील कक्ष अधिकारी विलास लाड याची एक ऑडियो क्लिप सध्या व्हायरल होत आहे. यात तो अधिकारी कुंभमेळ्याचे अनेक टेंडर 'मॅनेज' झाल्याचा, कोट्यवधी रुपयांच्या कमिशनचा दावा करत आहे. या प्रकरणाची, या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. यात कोण कोण मंत्री, अधिकारी सामील आहेत हे समोर आले पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. विलास लाडकडून कोट्यवधींच्या कमिशनचे आमिष दरम्यान, एसीबीच्या अटकेत असलेला मंत्रालयातील कक्ष अधिकारी विलास लाड याची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या चर्चेत असून, यात त्याने नाशिक कुंभमेळ्यातील निविदा प्रक्रिया आणि त्यातून मिळणाऱ्या कमिशनबाबत धक्कादायक दावे केले आहेत. या संभाषणात तो समोरच्या व्यक्तीला कोट्यवधींच्या कमिशनचे आमिष दाखवताना आणि टेंडर 'मॅनेज' करण्याबाबत बोलताना ऐकायला मिळत आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिपमधील विलास लाडच्या विधानांमध्ये कितपत तथ्य आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता समोर आलेली नसली, तरी या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 500 कोटींचा मोठा कोटा असल्याचा दावा राज्य आणि केंद्र सरकारकडून कुंभमेळ्यासाठी 15 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यातील 500 कोटींचा मोठा कोटा आपल्याकडे असल्याचा दावा विलास लाडने या कथित ऑडिओ क्लिपमध्ये केला आहे. यामध्ये त्याने स्वतः 700 तंबूंचे काम, ई-टॉयलेट आणि साफसफाईची टेंडर्स मिळवल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, 18 कोटींचे नाश्ता आणि जेवणाचे कंत्राटही आपल्याकडेच असून, 40 दिवसांच्या या सोहळ्यात प्रत्यक्ष खर्च कमी आणि कमिशनचे प्रमाण मोठे असल्याचे प्रलोभन तो समोरच्या व्यक्तीला देताना दिसत आहे. अधिकाऱ्यांपासून ते थेट मंत्र्यांपर्यंत सर्वांची 'टक्केवारी' निश्चित या ऑडिओ क्लिपमध्ये विलास लाडने भ्रष्टाचाराच्या साखळीचा उल्लेख करत सर्वच टेंडर्स आधीच 'मॅनेज' झाल्याचे म्हटले आहे. कुंभमेळ्यातील कामांमध्ये कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते थेट मंत्र्यांपर्यंत सर्वांची 'टक्केवारी' निश्चित झाली असल्याचा दावाही त्याने केला आहे. ई-टॉयलेट आणि साफसफाईच्या हजारो कामांतून लाखो रुपये कमावण्याची संधी असल्याचे सांगत, त्याने समोरच्या व्यक्तीलाही आपल्या ओळखीच्या लोकांना ही टेंडर्स मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. या दाव्यांमुळे आता कुंभमेळ्याच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विलास लाडला 8 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी राज्य शासनाच्या अर्थ आणि नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड याला 6 लाख 37 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर सत्र न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी त्याने ही लाचेची मागणी केली होती, ज्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खारघर परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. लाडच्या अटकेनंतर त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात 2 लाखांची अतिरिक्त रोकडही जप्त करण्यात आली असून, या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
काँग्रेसने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीवरून खासदार पार्थ पवार यांच्यावर कृतघ्न मुलगा म्हणत जहरी टीका केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसवर जोरदार पलटवार करत काँग्रेसला दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा आपले नेते राहुल गांधींच्या कामगिरीकडे पाहण्याचा टोला हाणला आहे. काँग्रेसने आमच्या नेत्यावर टीका करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय केले ते अगोदर पाहावे, असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. पार्थ पवार यांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसवर निशाणा साधताना राज्यात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर सडकून टीका केली होती. विशेषतः शरद पवारांनीही त्यांच्या राजकीय परिपक्वतेवर निशाणा साधला होता. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनीही पार्थ पवारांना काँग्रेसचे मोठेपण लक्षात आणून देत आपण स्वतः व पार्थ यांचे वडील अजित पवारही काँग्रेसच्या मुशीत तयार झाल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी पार्थ पवारांवर होणारी टीका फेटाळताना राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने राजकीय परंपरेला छेद दिला सूरज चव्हाण म्हणाले, काँग्रेसने आमच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत काय केले ते अगोदर पाहावे. एखाद्या नेत्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील व्यक्ती पोटनिवडणूक लढवत असेल तर ती निवडणूक बिनविरोध करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण काँग्रेसने ती परंपरा पाळली नाही. काँग्रेसने राजकीय परंपरेला छेद देण्याचे काम केले. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी ही महाराष्ट्राची जनभावना आहे. पण या जनभावनेपासून दूर गेलेली काँग्रेस ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. काँग्रेसच्या या भूमिकेचा दाखला देत पार्थ पवारांनी काँग्रेसचे डाऊनफॉल सुरू होईल असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. काँग्रेसने आमच्या नेत्यांवर पुन्हा अशी टीका केली तर त्याला जशास तसे प्रत्युत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. आत्ता पाहू काँग्रेसने काय केली होती पार्थ पवारांवर टीका? महाराष्ट्र काँग्रेसने पार्थ पवारांवर टीका करताना त्यांचा उल्लेख कृतघ्न मुलगा असा केला होता. काँग्रेसने म्हटले होते, धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रगेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे, असे काँग्रेसने म्हटले आहे. शेवटी पाहू काय म्हणाले होते पार्थ पवार? तत्पूर्वी, पार्थ पवार काँग्रेसवर निशाणा साधताना म्हणाले होते, माझे कुणाशीही बोलणे झाले नाही. पण काँग्रेसला कळायला पाहिजे काय करायचे ते. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला माहिती नाही. सगळे मोठे लोक आहेत. सर्वांना माहिती आहे काय सुरू आहे. त्यांनी विचार केला असेल, तर करू द्या. पण त्यांना नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल. लोक विसरत नाहीत. जे दादांचे प्रेम आहे लोकांच्या मनात, अशा वेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचं आहे. मला वाटते की, आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ, आम्ही काही कुणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिलं आहे, ते बघू काय व्हायचंय ते. फक्त मला वाईट वाटतंय की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे, असे पार्थ पवार म्हणाले होते.
‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ म्हणत खरातने केले अनेक महिलांचं लैंगिक शोषण
नाशिक : प्रतिनिधी एसआयटीकडून सुरू असलेल्या चौकशीदरम्यान ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ म्हणत आपला सहा शब्दांचा खास मंत्रच विशेष तपास समितीला सांगित अशोक खरात याने त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चमत्कार दाखवून किंवा वशीकरण करून नव्हे तर हातचलाखी करून आपण महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे अशोक खरातने कबूल केले […] The post ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ म्हणत खरातने केले अनेक महिलांचं लैंगिक शोषण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने शहराच्या आरोग्याबाबत समोर आलेली आकडेवारी धक्कादायक असली तरी ती प्रत्येकासाठी वेळीच सावध करणारी आहे. बदललेली जीवनशैली आणि व्यायामाच्या अभावामुळे शहरामध्ये हृदयविकाराचा विळखा घट्ट होत आहे. शहरात महिन्याकाठी तब्बल २ हजार, तर वर्षाकाठी २५ हजारांहून अधिक अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे, पूर्वी उतारवयात दिसणारे हे आजार आता वयाच्या तिशीपासूनच तरुणांना ग्रासत आहेत. काय सांगते छत्रपती संभाजीनगरची आकडेवारी? स्थूलताशहरातील सुमारे 30 टक्के लोक वाढलेल्या पोटाच्या घेरामुळे म्हणजेच ‘ओबेसिटी’चे शिकार आहेत. उच्च रक्तदाब35 टक्क्यांहून अधिक लोक हायपरटेन्शनने ग्रस्त आहेत. तिशीतील तरुणांमध्ये याचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. प्री-डायबेटिकमधुमेह होऊ नये यासाठी काळजी घेतल्यास ते सावरू शकतात. मधुमेह15 टक्क्यांहून अधिक नागरिकांना मधुमेहाने ग्रासले आहे. कर्करोग रुग्णालयात 42 हजार रुग्ण शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ओपीडीमध्ये 2025 या एकाच वर्षात 42,937 रुग्णांनी उपचार घेतले. विशेष म्हणजे, मागील वर्षाच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत 13,068 ने मोठी वाढ झाली आहे. ऑन्कोसर्जन डॉ. राजेश सावजी यांच्या मते, महिलांमध्ये स्तनाचा व गर्भाशयाचा, तर पुरुषांमध्ये फुप्फुस व अन्ननलिकेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. आरोग्याची पंचसूत्री नियमित हालचाल: दररोज किमान 45 मिनिटे वेगाने चालण्याचा व्यायाम करा. आहारावर नियंत्रण: मैद्याचे पदार्थ, अति तेलकट आणि साखरेचा वापर कटाक्षाने टाळा. व्यसनमुक्ती: धूम्रपान, मद्यपान आणि गुटख्यापासून पूर्णपणे लांब राहा. वेळोवेळी तपासणी: तिशीनंतर नियमितपणे बीपी आणि शुगरची तपासणी करा. सकस भोजन: आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि कडधान्यांचा समावेश करा. घाबरू नका, जीवनशैली बदला फास्ट फूड सेवनामुळे शरीरात कार्बोदकांचे प्रमाण वाढून स्थूलता येते, ज्यातून मधुमेह, बीपी आणि किडनीचे आजार बळावतात. नियमित 45 मिनिटे चालणे आणि सकस आहार घेतल्यास या गंभीर आजारांना आपण दूर ठेवू शकतो. -डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, (घाटी) शहरात वर्षाला 25 हजार हृदयशस्त्रक्रिया चाळीशी ओलांडलेल्या 30 ते 35 टक्के लोकांना बीपीचा त्रास होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, उच्च रक्तदाब सुरू होण्याचे प्रमाण आता वयाच्या तिशीमध्येही दिसून येत आहे. व्यायामाकडे नागरिकांचे होत असलेले दुर्लक्ष याला प्रामुख्याने कारणीभूत आहे. परिणामी, हृदयविकाराचा धोका वाढला असून छत्रपती संभाजीनगरात महिन्याकाठी तब्बल दोन हजार, तर वर्षाकाठी २५ हजारांपेक्षा अधिक अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी होत आहेत.- डॉ. विलास मगरकर, हृदयरोगतज्ज्ञ महिलांमध्ये स्तनाचा, पुरुषांत फुप्फुसाचा कॅन्सर पूर्वी कॅन्सरचे प्रमाण तुलनेने कमी होते. मात्र, गेल्या दहा वर्षांत रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे पाहायला मिळते. शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात 2025 या एकाच वर्षात तब्बल 42 हजार 937 रुग्णांनी उपचार घेतले. विशेष म्हणजे, त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत तब्बल 13 हजार 68 ने वाढ झाली आहे. कॅन्सरचे प्रमाण साधारण दहा टक्क्यांनी वाढत आहे. महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर, तर पुरुषांमध्ये फुप्फुस, आतडे आणि अन्ननलिकेच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. यालाही बदलती जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव कारणीभूत असून, धूम्रपान, गुटखा आणि मद्यपान कटाक्षाने टाळावे.- डॉ. राजेश सावजी, ऑन्कोसर्जन आठवड्याला किमान 150 मिनिटे व्यायाम मधुमेहाचा परिणाम केवळ रक्तातील साखरेपुरता मर्यादित नसून हृदय, मूत्रपिंड, डोळे आणि मज्जासंस्था यांवर गंभीर परिणाम करतो. यामुळे हृदयरोग, किडनी फेल्युअर, अंधत्व आणि पाय कापण्याची वेळ येण्याचा धोका वाढतो. तसेच आरोग्यखर्चही मोठ्या प्रमाणात वाढतो. उपाय म्हणून संतुलित आहार, नियमित व्यायाम (आठवड्याला किमान 150 मिनिटे), वजन नियंत्रण आणि तणाव व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. नियमित ब्लडशुगर तपासणी, HbA1c मॉनिटरिंग आणि जोखमीच्या व्यक्तींचे लवकर स्क्रीनिंग करणे गरजेचे आहे. समाजपातळीवर जनजागृती, प्रतिबंधक आरोग्य कार्यक्रम आणि प्राथमिक स्तरावर डायबेटीस व्यवस्थापन मजबूत करणे हा दीर्घकालीन उपाय आहे. - अजय रोटे, मधुमेह तज्ज्ञ वैद्यकीय अभ्यासक
गुन्हेगारी, विकृती, निर्दयीपणा, क्रूरता, अमानुषपणा या सगळ्यांचाच मनुष्याने कळस गाठला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातील एका घटनेने अक्षरशः माणुसकीला काळिमा फासलाय. एका महिलेने दूसरा चांगला नवरा करण्यासाठी पोटच्या 11 महिन्यांच्या बाळाचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून एखादी आई इतकी निष्ठुर कशी काय असू शकते असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे. मृत बाळाचे वडील रवींद्र अशोक पवार यांनी रांजणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपी पूजा रवींद्र पवारला अटक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एका आईनेच आपल्या 11 महिन्यांच्या पोटच्या गोळ्याचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला पूजा पवार ही कोकण-मुरुड पर्यटनावरून आली होती. मुलगा यश सतत रडत आणि किरकिर करत असल्याच्या कारणावरून तिने घर सोडून जाण्याचा आणि दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लहान मुलगा सोबत असल्यास कोणीही आपल्याशी लग्न करणार नाही, हा विचार तिच्या मनात आला आणि त्यातूनच आपल्या भविष्यातील सुखासाठी अडथळा ठरणाऱ्या निष्पाप मुलाला कायमचे संपवण्याचा क्रूर कट तिने रचला. चिमुरड्याचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटून घेतला जीव माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेत, आरोपी माता पूजा हिने आपल्या अवघ्या 11 महिन्यांच्या यशची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची कबुली दिली आहे. तिने चिमुरड्याचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटून त्याचा जीव घेतला आणि त्यानंतर हा भयानक गुन्हा लपवण्यासाठी मुलाचा मृतदेह एका बॅगेत भरून शेतातील विहिरीत फेकून दिला. स्वतःच्या सुखासाठी पोटच्या गोळ्याचा असा निर्दयीपणे बळी घेतल्याची माहिती समोर आल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. जन्मदात्या आईकडूनच घडलेल्या या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत असून, निष्पाप बालकाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मृत मुलाचे वडील रवींद्र अशोक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव पोलिसांनी आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.
भारतीय राजकारणात आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या उभारणीत काँग्रेस पक्षाचे योगदान अत्यंत मोठे आहे. देशाच्या पंतप्रधानापासून ते ग्रामपंचायतीच्या सरपंचापर्यंत, तसेच महिला आरक्षणापासून ते देशाने जिंकलेल्या युद्धांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. हे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसची पाठराखण केली. तसेच, लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असला तरी मर्यादांचे भान हवे, असे म्हणत त्यांनी पार्थ पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, भारतातील संविधानाच्या चौकटीत राहून कोणताही पक्ष काम करत असेल, तर आपण लोकशाही मानणारी माणसे म्हणून त्याचा आदर केला पाहिजे. आम्ही सर्वांनी काँग्रेस पक्षाला अत्यंत जवळून पाहिले आहे. मी स्वतः अनेकदा काँग्रेसच्या साथीने निवडणूक लढवून निवडून आले आहे. मी आणि दादा (अजित पवार) दोघेही काँग्रेसच्याच तालमीत लहानाचे मोठे झालो आहोत. आज आपण जो मोकळा श्वास घेतोय आणि आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, ती काँग्रेसची देण आहे हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.पार्थ पवारांच्या संदर्भात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना सुळे म्हणाल्या की, कौटुंबिक सल्ले हे घराच्या चार भिंतींच्या आत दिले जातात, ते माध्यमांसमोर जाहीरपणे सांगायचे नसतात. मात्र, जेव्हा घरातील मोठी व्यक्ती काही बोलते, तेव्हा त्यावर प्रतिवाद न करणे किंवा उलट न बोलणे हे आमचे संस्कार आहेत. या विधानातून त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेचे पूर्णपणे समर्थन केले आहे. मविआचे मानले आभार शरद पवार यांची राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीसह महायुतीतील नेत्यांचेही आभार मानले. त्या म्हणाल्या, विरोधक हा आपला शत्रू नसून ती केवळ एक वैचारिक लढाई आहे, व्यक्तिगत नाही, हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा महाराष्ट्राने जपला आहे. मतभेद असले तरी मनभेद नसावेत, हीच आपली संस्कृती आहे. याच सामंजस्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध पार पडली. काँग्रेसने घेतलेली भूमिका लोकशाहीला धरूनच राज्यातील पोटनिवडणुकांच्या मुद्द्यावर बोलताना सुळे यांनी स्पष्ट केले की, अनेकदा पोटनिवडणुका बिनविरोध होतात, तर कधी त्या लढवल्या जातात. काँग्रेसने यासंदर्भात घेतलेली भूमिका लोकशाहीला धरूनच आहे, त्यात काहीही गैर वाटत नाही. काँग्रेसशी कोणी संपर्क केला की नाही, याबद्दल मला कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भोंदू अशोक खरात व त्याच्या आश्रमात झालेल्या अघोरी पूजेचा अजित पवारांच्या विमान अपघाताशी कथित संबंध असल्याचा दावा केला आहे. भोंदू अशोक खरातचा जानेवारी महिन्यातील सीडीआर काढल्यास अजित पवारांचा अपघात की घातपात? हे स्पष्ट होईल, असे ते म्हणालेत. दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्यानेच असा दावा केल्यामुळे याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले होते. तेव्हापासून त्यांच्या निधनाविषयी ना-ना प्रकारचे दावे केले जात आहे. त्यातच भोंदू अशोक खरातचे प्रकरण समोर आल्यानंतर त्याचाही या अपघाताशी संबंध जोडला जात आहे. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या एक दिवस अगोदर, अपघाताच्या दिवशी व अपघाताच्या दुसऱ्या दिवशी भोंदू खरातच्या बँक खात्यांवर प्रचंड व्यवहार झाल्याचा दावा केल्यामुळे या प्रकरणी व्यक्त केल्या जाणाऱ्या संशयाला अधिक बळ मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी उपरोक्त दावा केला आहे. नेमके काय म्हणाले आमदार अमोल मिटकरी? अजितदादा विमान अपघात प्रकरण संदर्भात नराधम अशोक खरात व त्याच्या आश्रमात झालेल्या अघोरी पूजेचा संबंध असल्याची सर्वांना शंका होतीच.जानेवारी महिन्यात सर्वात जास्त SMS चौकशी च्या फेऱ्यात आले.या महिन्यातील खरातचे CDR काढल्यास दादांचा अपघात की घातपात? हे स्पष्ट होईल, असे अमोल मिटकरी म्हणालेत. रोहित पवारांनीही केलेत असेच आरोप उल्लेखनीय बाब म्हणजे विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही यापूर्वी अनेकदा भोंदू खरात व अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. ते या प्रकरणी सोमवारी म्हणाले होते, अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ‘समता पतसंस्थे’त भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती, भोंदू खरातचा VSR कंपनीच्या विमांनामधून अनेकदा झालेला प्रवास आणि त्याचे अनुयायी हे सगळं बघता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का? यासंदर्भातील संशय अधिक गडद होत आहे. अजितदादांच्या घातपातासंदर्भात चौकशी करताना सीआयडीने खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांचा देखील तपास करायला हवा, असे ते म्हणाले. शेवटी पाहू काय म्हणाल्या अंजली दमानिया? अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी भोंदू अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित काही महत्त्वाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, समता नावाची एक पतसंस्था आहे. त्यात पैसे टाकले किंवा काढले की एसएमएस येतो. मी या संस्थेची पूर्ण माहिती काढली आहे. त्यात मला अनेक गोष्टी समजल्या. 27 जानेवारी रोजी म्हणजे अजित पवारांच्या निधनाच्या एक दिवस आधी, खरातच्या समता पतसंस्थेच्या खात्याचे 17 मेसेज आले होते. तद्नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवशी (28 जानेवारी) 19 मेसेज आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 29 जानेवारी 10, 30 जानेवारी 8, तर 31 जानेवारी रोजी 8 मेसेज आलेत. या व्यवहाराची मी एसआयटीकडे चौकशी करण्याची मागणी करणार आहेत, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
भाजप-महायुती सरकारने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचे नामकरण केले आहे. त्यात प्रामुख्याने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती, ही मागणी महायुतीने पूर्ण केली. त्यानंतर उस्मानाबादचे धाराशिव केले व अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यात आले. असे असतानाही शासकीय कामांमध्ये व कागदपत्रांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख 'औरंगाबाद' करण्यात येत असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी निदर्शनास आणले आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले की, नामांतराचे ढोल वाजवणाऱ्या भाजप-शिंदे-पवार सरकारच्या नाकाखाली, महसूल विभागाच्या कागदपत्रांवर अजूनही 'औरंगाबाद' नाचतेय. ही अधिकाऱ्यांची 'मोगली मानसिकता' आहे आणि सरकारचा दुटप्पीपणा असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. तसेच अंबादास दानवे पुढे म्हणाले, एकीकडे नावावरून निधी रोखण्याची धमकी द्यायची आणि दुसरीकडे सरकारी जीआरमध्ये औरंगाबादचीच शाई वापरायची; हा 'आंधळेपणा' नसून मुघल सरंजामशाहीचा प्रभाव आहे. तुमचे मंत्रालय आता शासन निर्णय कमी आणि शाही फर्मान अधिक काढते, असा टोला दानवे यांनी लगावला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत शासन निर्णयाचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये 'औरंगाबाद' असा उल्लेख केल्याचे दिसून येत आहे. अंबादास दानवे यांनी शेअर केलेला शासन निर्णय हा महसूल विभागाचा आहे. यात राज्यातील सहाही महसूल विभागातील महसूल यंत्रणेतील सर्व कार्यालयातील विविध संवर्गातील पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याचा प्रस्ताव त्यावर शासनाने निर्णय घेतला आहे. यात विभागीय आयुक्तालयात 6 महसूल विभागांची नावे दिली आहेत. त्यात कोकण, पुणे, नाशिक, 'औरंगाबाद', अमरावती आणि नागपूरचे नाव आहे. यात विशेष लक्ष वेधले ते छत्रपती संभाजीनगरच्या जुन्या नावाने. यावरूनच अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्रात मतदान संपल्यानंतर तब्बल 76 लाख वाढीव मतदान झाल्याचा दावा त्यांनी केला असून, आंध्र प्रदेशातील रात्री उशिरापर्यंत चाललेल्या मतदानाला 'फ्रॉड' निर्मला सीतारमण यांच्या पतीने बोगस ठरवल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच धर्तीवर आगामी काळात तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निकालांचे चित्र फेरफार करून भाजपच्या पथ्यावर पाडले जाऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि काँग्रेससारख्या विरोधी पक्षांनी निवडणूक रिटर्निंग ऑफिसरला कठोर तंबी देऊन निवडणूक यंत्रणेवर वचक निर्माण करावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. नेमके आंबेडकर काय म्हणाले? प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया संपल्यानंतर तब्बल 76 लाख वाढीव मतदान झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अत्यंत संशयास्पद असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती डॉ. परकला प्रभाकर यांनीदेखील आंध्र प्रदेश निवडणुकीबाबत असेच दावे केले आहेत. आंध्र प्रदेशात रात्री 9 ते पहाटे 2 वाजेपर्यंत मतदान झाले आणि तो निकाल 'फ्रॉड' असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ही परिस्थिती लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले. आगामी निवडणुकांबाबत भाकीत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जर हीच परिस्थिती कायम राहिली आणि निवडणूक यंत्रणेवर वचक बसवला नाही, तर तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये निकालांचे चित्र अनपेक्षितरीत्या बदलू शकते, असा इशारा आंबेडकरांनी दिला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 जागा आहे. यामध्ये AIADMK 150 जागा जिंकू शकते, तर भाजप 25 जागांवर विजय मिळवेल. सत्ताधारी स्टॅलिन, काँग्रेस आणि टीव्हीके पक्षाला मोठा फटका बसू शकतो. तर केरळमध्ये भाजप किमान 15 जागा जिंकण्याची शक्यता आहे. आसाममध्ये 126 जागा असलेल्या विधानसभेमध्ये भाजप 90 ते 92 जागा जिंकू शकते. तर ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये 294 पैकी भाजप 180 ते 200 जागा जिंकण्याची शक्यता आंबेडकर यांनी वर्तवली आहे. तर पाँडिचेरीमध्ये भाजप आणि मित्रपक्ष मिळून 20 जागा जिंकू शकतात, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. रिटर्निंग ऑफिसरला तंबी द्या प्रकाश आंबेडकर यांनी ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल), एम.के. स्टॅलिन व विजय (तामिळनाडू), आणि केरळ व आसाममधील काँग्रेस व डाव्या पक्षांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. जर हे निकाल बदलू द्यायचे नसतील, तर सर्व विरोधी पक्षांनी आतापासूनच दक्षता घ्यावी. प्रत्येक निवडणूक रिटर्निंग ऑफिसरला स्पष्ट तंबी द्यावी की, जर कायद्यानुसार काम झाले नाही, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आंबेडकर म्हणाले.
पुणे, प्रतिनिधी- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील तीन कर्मचाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. उपशिक्षक पदावर पदोन्नतीसाठी 3 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या प्रकरणात एक सहाय्यक प्रशासन अधिकारी आणि दोन कनिष्ठ सहायकांचा समावेश आहे. तक्रारदार (वय 36) हे जिल्हा परिषद पुणे येथे शिक्षण सेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची उपशिक्षक पदावर पदोन्नती होण्यासाठी प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी आणि जात वैधता प्रमाणपत्र नसतानाही अधिसंख्य पदावर वर्ग करून सेवा व निवृत्ती लाभ मिळवून देण्यासाठी आरोपी अधिकाऱ्यांनी 3 लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार 6 जानेवारी 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीनंतर 11 फेब्रुवारी 2026 रोजी पडताळणी करण्यात आली. यामध्ये आरोपींनी 3 लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी यापूर्वीच 25 हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य केले होते आणि उर्वरित 2 लाख 75 हजार रुपयांची मागणी कायम ठेवली होती. या माहितीच्या आधारे नुकताच सापळा रचण्यात आला. बी.टी. कवडे रोड, हडपसर येथील 93 एव्हेन्यू मॉलसमोर सायंकाळी 4.59 वाजता तक्रारदाराकडून 2 लाख 75 हजार रुपये स्वीकारताना अनिल रंधवे आणि अतिश शिंदे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर सहाय्यक प्रशासन अधिकारी राजेश खंदारे यांनाही ताब्यात घेण्यात आले. या तिन्ही आरोपींविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रविण निंबाळकर यांच्या पथकाने, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकृत शुल्काव्यतिरिक्त लाच मागितल्यास तत्काळ ॲन्टी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
अमरावती - अकोला महामार्गावर सोमवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण अपघात झाला. त्यात चहा घेऊन परत येणाऱ्या 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, बेलोरा विमानतळाजवळ घडली. मृत्यूमुखी पडलेले सर्व तरुण बडनेराच्या जुनी वस्ती परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा येथील 7 तरुण सोमवारी उशिरा रात्री चहा पिण्यासाठी बेलोरा विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चहा घेऊन ते परत येत असताना त्यांच्या कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर वेगात धडकली. या अपघाताची तीव्रता इतकी भयानक होती की, कारमधील 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. 4 जण जागीच ठार, 3 गंभीर या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे मोहम्मद अनस मोहम्मद सईद (20), मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (22), मोहम्मद अवेझ मोहम्मद सईद (26) व अब्दुल अनवेस अब्दुल सलीम (22) अशी आहेत. हे सर्वजण बडनेरा जुनी वस्ती परिसरातील रहिवासी होते. एकाच भागातील चार तरुणांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत उर्वरित तीन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने अमरावती येथील बडनेरा रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. अपघातात ट्रकचा सहभाग असल्याची माहिती या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले व पुढील कारवाई सुरू केली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी केली जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार, कार अनियंत्रित होऊन झाडावर धडकल्यामुळे हा अपघात झाला असावा, असे पोलिसांचे मत आहे. पण या अपघातात एका ट्रकचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस त्या अंगानेही या अपघाताची चौकशी करत आहेत. त्यांनी फरार ट्रक चालकाचा शोध सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे बडनेरा व आसपासच्या परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुण वयातच 4 तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बडनेरा पोलिसांनी मंगळवारी पहाटे या या अपघाताची नोंद करत पुढील तपास सुरू आहे. फरार ट्रकचालकाचा शोध घेणे व अपघातामागील नेमकी कारणे शोधणे हे सध्या पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे.
निवडणूक लढवू नका असे काही समजून सांगितले जात नाही, धमकी दिली जाते. साखर कारखाना, बँकेचे व्यवहार, सहकारी संस्था याबाबत कोणी समजून सांगत नाही. यात कोणते क्रांतीकारी काम आहे समजून सांगण्याचे? प्राजक्त तनपुरेंना समजून सांगायला रवींद्र चव्हाण आणि विखे पाटील गेले ते किती मोठे क्रांतीकारक आहेत? ते काय सेनानी आहेत का? तनपुरे काय महान सामाजिक कार्यकर्ते आहेत का? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, रवींद्र चव्हाण यांच्यावर निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप आहे. तर विखे पाटील यांचे जमीनीचे काही तरी प्रकरण आताच समोर आले आहे. हे काय समजून सांगणार. ही लोकं फाइल्स घेऊन जातात, माघार घ्या नाहीतर हे आमच्याकडे आहे अशा धमक्या देण्यासाठी ते जातात. कारखान्याला नोटीस देऊ, जे घाबरतात ते मागे जातात. सहज काही मिळत नसते धमक्यांना घाबरून राजकारण होत नसते. जे घाबरतात त्यांनी भाजपचे गुलाम आहोत असे मान्य करावे. आम्हाला हे मान्य नाही आम्ही भाजपला घाबरत नाही, देशात लोकशाही सुरू आहे. तेव्हा तुम्ही पिंपरीची निवडणूक लढवली होती संजय राऊत म्हणाले की, बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार दिला यावर शरद पवारांनी व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे. शरद पवारांनी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्यांच्यासोबत काम केले आहे. पक्ष जराी सोडला तरी त्यांची विचारधारा काँग्रेसची आहे. त्यांनी त्यांचे राजकारण काँग्रेसच सोबतच केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस कौटुंबिक कारणामुळे ती जागा लढत नसल्याने काँग्रेसला ती जागा लढण्याचा अधिकार आहे.याचा अर्थ दुसरे कोणी लढू नये ही भूमिका ठेवता येत नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवू नको म्हणून दबाव का आणायचा.पार्थ पवारांच्या वडीलांनी पिंपरी चिंचवड निवडणूक लढवलीच होती लक्ष्मण पवारांच्या निधनानंतर. काँग्रेसच्या मदतीने ते ती निवडणूक लढले होते, याची आठवण राऊतांनी करूण दिली. मुख्यमंत्र्यांना जाग आली आहे का? संजय राऊत म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाची संघर्षगाथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि त्यातून सातत्याने प्रेरणा मिळत रहावी यासाठी उद्धव ठाकरेंच्या प्रेरणेतून संयुक्त राष्ट्र दालनाची निर्मिती झाली. त्या दालनाचे उद्घाटन बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. भाजपच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये त्या दालन तुटले, त्यांचे नुकसान झाले. मुख्यमंत्र्यांना त्याकडे लक्ष द्यावे असे वाटले नाही हे 106 हुतात्माचे दुर्दैव आहे. मराठी माणसासाठी शिवसेनेने बरेच काही केले, पण तुमच्या काळात इतिहास सडवण्याचे काम सुरू आहे. मनपाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर गेल्या त्यांनी त्याची परिस्थिती दाखवली. यानंतर तरी मनपाना आणि मुख्यमंत्र्यांना जाग आली आहे का? असा सवाल राऊतांनी केला आहे. जय महाराष्ट्र म्हणायचा अधिकार नाही संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ एकडे तिकडे फिरत असते. अनेक प्रकल्पावर घोषणा करत असते, त्यांनी संयुक्त राष्ट्र दालनाची अवस्था स्वत: जाऊन बघावी आणि ती सुधारावी असे जर मुख्यमंत्र्यांना वाटत नसेल तर त्यांचे महाराष्ट्र प्रेम बेगडी आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही राऊतांनी म्हटले आहे. मनपाला काय भीक लागली आहे का? शिवसेनेच्या कार्यकाळात मनपाच्या 90 हजार कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या, त्या मोडून मोडून तुम्ही खात आहात. हजार कोटी रुपयांची कंत्राटे रद्द केली. पण हे सर्व सुरू असताना सर्वांना संयुक्त महाराष्ट्र भवनाचा विसर पडला आहे. का जय महाराष्ट्र म्हणता तुम्हाला तो अधिकार नाही.
भोंदूबाबा ऋषीकेश वैद्यला न्यायालयीन कोठडी:प्रसादातील गुंगीकारक औषधाची माहिती देण्यास आरोपीचा नकार
भोंदूबाबा ऋषीकेश वैद्यला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दैवी अवतार असल्याची बतावणी करणाऱ्या वैद्यवर एका महिलेला प्रसादातून गुंगीकारक औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. प्रसादात नेमके कोणते औषध मिसळले आणि ते कोठून खरेदी केले, याबाबत आरोपी माहिती देत नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. न्यायालयाने गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवला आहे. ऋषीकेश श्रीकांत वैद्य (वय 39, रा. वसई, पालघर) याच्याविरोधात बलात्कार आणि धमकावणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, एका 35 वर्षीय महिलेने वसईतील माणिकपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मांजरी पोलिस या गुन्ह्याचा तपास करत आहेत. आरोपी वैद्यच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला वानवडी येथील लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीची लैंगिक सक्षमतेची चाचणी करण्यात आली आहे. तसेच, आरोपी पीडितेला मांजरी आणि वसई येथील ज्या लॉजमध्ये घेऊन गेला होता, तेथेही तपास करण्यात आला आहे. गुन्ह्यासाठी वापरलेली चारचाकी जप्त करणे, पीडितेची आक्षेपार्ह छायाचित्रे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये आहेत का, याचा तपास करणे आणि आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याबाबत चौकशी करणे बाकी आहे. यासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. बचाव पक्षातर्फे ॲड. साजिद शाह, ॲड. दिगंबर देसाई आणि ॲड. पवन कुलकर्णी यांनी पोलिस कोठडी वाढवण्यास विरोध केला. सरकारी पक्षाने जुनीच कारणे दिली असून, आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद त्यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने वैद्यच्या पोलिस कोठडीत चौकशीचा अधिकार अबाधित ठेवून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपी वैद्य धर्मगुरू असल्याने त्यांच्या डोक्यावरील शिखा (शेंडी) हा धार्मिक प्रक्रियेचा भाग आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाला वैद्य यांची शेंडी न कापण्याचे आदेश द्यावेत, असा अर्ज वैद्यच्या वकिलांनी केला. यावर न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कारागृह प्रशासनाशी संपर्क साधून आरोपीची शेंडी न कापण्याचे आदेश दिले, अशी माहिती ॲड. साजिद शाह यांनी दिली.
राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जैन समुदायाला अल्पसंख्याक दर्जा सोडून हिंदू म्हणून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. लोढांच्या या वक्तव्यावर जैन समुदायातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी या विधानाचा कडक शब्दांत निषेध केला आहे. लोढांनी जैन समाजातील कोणालाही विश्वासात न घेता हे वक्तव्य केले. त्यांचे हे विधान अज्ञानमूलक आहे किंवा ठरवून आखलेल्या भूमिकेचा भाग असल्याची टीका गांधी यांनी केली आहे. ललित गांधी म्हणाले, जैन धर्म हा भारतातील एक स्वतंत्र, प्राचीन आणि वैज्ञानिक तत्त्वज्ञान आहे. त्याचे स्वत:चे तीर्थंकर, स्वत:ची तत्त्वमीमांसा आणि मोक्षपरंपरा आहे. आम्ही हिंदू संस्कृतीचे पालनकर्ते आहोत. परंतु, जैन धर्म हा हिंदू धर्माची शाखा किंवा उपशाखा नाही. धर्म आणि संस्कृती या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जैन धर्मियांना मिळालेला अल्पसंख्याक दर्जा ही कोणतीही भीक नसून आमचा घटनात्मक अधिकार आहे. पुढे बोलताना ललित गांधी म्हणाले, अल्पसंख्याक दर्जा हा एकप्रकारे आमच्या वेगळ्या ओळखीचा सन्मान आहे. हा दर्जा सोडणे म्हणजे स्वत:च्या अस्तित्त्वालाच नाकारणे. अशा कोणत्याही विचारसरणीला आम्ही सर्व स्तरांवर विरोध करू. हा घटनात्मक अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न पूर्ण ताकदीने हाणून पाडला जाईल. हा दर्जा जैन समाजाच्या ऐक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. जैन समाज आता शांत बसणार नाही, हे लोढा यांनी समजून घ्यावे, असा इशारा गांधी यांनी दिला आहे. काय म्हणाले होते मंगलप्रभात लोढा? मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले होते की, जैन धर्म हा मूळ हिंदू संस्कृतीचाच अविभाज्य भाग आहे. मुघल, इंग्रज आणि त्यानंतर काँग्रेसने आपल्या 'फूट डालो आणि राज करो' या कुटील नीतीने हिंदू समाजाचे तुकडे केले. आता ही गुलामगिरीची मानसिकता आणि अल्पसंख्याक दर्जा झुगारून मूळ प्रवाहात येण्याची वेळ आली आहे. एकेकाळी दक्षिण भारतात 22 ते 23 टक्क्यांच्या आसपास असणारा जैन समाज आज केवळ 3 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. ही केवळ आकडेवारी नसून एका मोठ्या राजकीय षड्यंत्राचा हा परिणाम असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. मुस्लिम समाजात अनेक जाती असूनही काँग्रेसने त्यांना संघटित ठेवले. मात्र, हिंदू समाजाला जाती-धर्माच्या कप्प्यात बंदिस्त करुन कमकुवत केले. पुढे बोलताना लोढा म्हणाले की, हा केवळ वैयक्तिक विचार नसून यावर समाजातील ज्येष्ठ मुनी आणि विचारवंतांशी चर्चा सुरु आहे. जर समाजात व्यापक सहमती निर्माण झाली, तर जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया राबवता येईल. राम जन्मभूमी आंदोलनाप्रमाणेच आता पुन्हा एकदा 'आम्ही हिंदू' ही भावना प्रबळ करण्याची गरज असल्याचे मत लोढा यांनी व्यक्त केले होते.
कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळच सांगेल. त्यामुळे मला यावर प्रतिक्रिया द्यायची नाही, असे कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते पार्थ पवार यांनी कॉंग्रेसवर टीका केली होती. यावर पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ते राजकारणात अजून लहान आहेत, त्यामुळे मला त्यांच्यावर काही बोलायचे नाही, असेही पटोले यांनी म्हटले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना नाना पटोले म्हणाले, संजय राऊत यांना त्यांच्याच पक्षात कोणी मान्यता देत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना मान्यता द्यावी असे वाटत असेल तर त्यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्र गुजरातचे लोक चालवतात पुढे बोलताना नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की, धर्मामध्ये आणि भाषेत भाजपने जे वाद निर्माण करून ठेवले आहेत. या मुंबईत देशाच्या आर्थिक राजधानीत गुजराती मराठी वाद निर्माण होणे यामागे भाजप आहे. राज्याला खऱ्या अर्थाने आपले राज्यातले मुख्यमंत्री नाही चालवत. गुजरातचे लोक चालवतात. कॉंग्रेसच्या काळात असा कुठलाही वाद कधीही झाले नाही. भाजपने पेरलेले हे विष आहे. ते आज भाषा या वादावर आणि मुंबईत ते पेटत आहे. अशोक खरात एक टार्गेट, यात मोठी राजकीय खेळी अशोक खरात प्रकरणी ईडीचा गुन्हा दाखल झाला आहे. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, कालच मी सांगितले की ईडीची कारवाई सुरू झाली. कारण यात आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी तसेच राजकीय लोक यांचे पैसे विदेशात पाठवण्याचे काम खरातच्या माध्यमातून होत होते हे समोर आले आहे. त्यामुळे ईडीची कारवाई ही स्वाभाविक आहे. अशोक खरात हा एक टार्गेट आहे. यात राजकीय खेळी आहे, असेही पटोले म्हणाले. पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, अशोक खरातची पत्नी सापडत नाही, महाराष्ट्राची पोलिस इतकी कमकुवत आहे का? गृहमंत्रालय याला कारणीभूत आहे का? अशोक खरात हे प्रकरण साधे नाही. यात अनेक गोष्टी पुढच्या काळात समोर येणार आहेत. कंत्राटदारांचे 89 हजार कोटींचे देणे बाकी कंत्राटदारांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि बजेट अधिवेशनात आम्ही हा मुद्दा मांडला होता. सरकारने यावर उत्तर देताना सांगितले होते की आता त्यांचे काही थकीत राहिलेले नाही. म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत सरकार खोटे बोलताना आपण बघितले आहे. जवळपास 89 हजार कोटींचे देणे या कंत्राटदारांचे बाकी आहे. यासाठी आता कंत्राटदारांनाच आंदोलन करावे लागत आहे आणि एका कंत्राटदाराने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नुसत्या घोषणा करून मोदीने पैसे देणे बंद केले, अशी टीकाही पटोले यांनी केली आहे.
गॅस सिलिंडर तुटवठ्यावरुन वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रात घेत सोमवारी चूल मांडो' आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्वच तालुक्याच्या ठिकाणी एकाच वेळी एल्गार पुकारत सरकारवर टीकास्त्र डागले. रस्त्यावर तयार केलेली भाकरी, मिरचीचा ठेचा असलेले ताट हातात घेऊनच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हे ताट अधिकाऱ्यांना दिले. सिलिंडर नसल्याने चुलीवर तयार असलेला भाकर-ठेचा गोड मानून घ्या, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. िसलिंडरचा तुटवडा नसल्याचा प्रशासनाकडून दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्ष स्थिती वेगळी असून, याच मुद्द्यावर वंचितने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात जिल्हा प्रमुख प्रमोद देंडवे, ज्ञानेश्वर सुलताने, मिलिंद इंगळे, महिला आघाडी अध्यक्ष आम्रपाली खंडारे, राजेंद्र पातोडे, गजानन गवई, नगरसेवक पराग गवई, शेख मकर, शोभा शेळके, चंद्रशेखर चिंचोळकर, संगीता अढाऊ, राजकुमार दामोदर, प्रा. मंतोष मोहोड, नितीन सपकाळ, बुद्धभूषण इंगोले आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचितने मंडप थाटले. यात रिकामे सिलिंडर ठेवण्यात आले. सर्वात पुढे दोन मातीच्या चुली तयार करण्यात आल्या. चुलीची पूजा करून चूल मांडो' आंदोलन सुरू झाले. ज्वारीची भाकर, ठेचा तेथेच तयार करण्यात आला. ‘नरेंदर कब मिलेगा गॅस सिलिंडर’, ‘देवेंदर कब मिलेगा गॅस सिलेंडर’, अशा घोषणा देत आंदोलकांनी हातात फलकही धरले. काही वेळ रस्त्यावरच तयार केलेली भाकरी-ठेचा खात आंदोलकांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटला मंडप; सरकारविरोधात दिल्या घोषणा सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनिती लोकसभा, विधानसभेसह अन्य निवडणुकांमध्ये वंचितने निवडणूक चिन्ह गॅस सिलिंडर होते. हाच धागा धरत चूल मांडो आंदोलनात ‘जर निवडणुकीत गॅस सिलिंडर निवडला असता तर आज किचनमध्ये गॅस सिलिंडर असता’, असे फलक वंचितच्या कार्यकर्त्यांनी हातात धरले होते. लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील पाचपैकी एकाही मतदारसंघात विजय झाला नाही. आता गॅसच्या मुद्द्यावरुन वंचितने सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी गॅस एजन्सीबाहेर एका वृद्धाच्या झालेल्या मृत्युवरुनही वंचितने आक्रमक भूमिका घेतली होती. आता अन्य विरोधी पक्ष सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या गॅसच्या प्रश्नावर मूळ गिळून बसले असतानाच वंचितने मात्र रस्त्यावरील लढाई सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरुन राजकीय पक्षांमध्ये जोरदार राजकीय कुरघोडी होणार आहे.
सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक सेवा कार्यात सक्रिय असणाऱ्या युवकांच्या गोरक्षण रोडचा राजा- विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळाच्या वतीने द्वितीय श्रीश्याम संकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात राष्ट्रीय भजनकार सहभागी होणार असून शहरात भक्तीभाव निर्माण होणार आहे. रामदेवबाबा- श्यामबाबा मंदिरात मंडळाच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत श्रीश्याम संकीर्तन महोत्सवाबाबतची माहिती देण्यात आली. शुक्रवार, १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता मूर्तिजापूर रोडवरील सिटी स्पोर्ट क्लबच्या प्रांगणात हा द्वितीय श्री श्याम संकीर्तन महोत्सव होणार आहे. मंडळाच्या वतीने गतवर्षी अशाच प्रकारचा प्रथम श्याम संकीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये राष्ट्रीय भजनकार राज पारीक उपस्थित होऊन त्यांनी संगीतमय भजने सादर केली होती. यंदाही भजनांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीश्याम संकीर्तन महोत्सवाच्या समाप्तीनंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. श्री श्याम संकीर्तन महोत्सवाचा भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. या पत्रकार परिषदेत मंडळाचे मार्गदर्शक सुधीर रांदड, संजय शर्मा, मुरलीधर उपाध्याय, अॅड. सौरभ शर्मा, राजू शर्मा बालाजी, प्रथमेश शर्मा, मधूर बिसेन, सिमरनजीतसिंह बछेर, श्रीकांत इंदोरीया, मुकेश शर्मा, अनमोल बछेर, सुनील कोरडीया आदी उपस्थित होते. श्यामबाबांचा दरबार: श्रीश्याम संकीर्तन भजन महोत्सवाचे आकर्षक व भक्तिमय श्री श्यामबाबांचा दरबार निर्माण करण्यात येणार असून यामध्ये फुलांची व सुवासिक अत्तरांची वर्षा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या प्रारंभ प्रसंगी भव्य आतिषबाजी करून मान्यवरांचे स्वागत करण्यात येणार आहे. श्रीश्याम संकीर्तन भजन महोत्सवात स्थानिक भजनकार गोपाल शर्मा हारे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी निर्माण केलेल्या गोरक्षण का राजा-या गीताच्या चित्रफितीचा अनावरण सोहळा होणार आहे. श्रीश्याम संकीर्तन या राष्ट्रीय संकीर्तन महोत्सवात राष्ट्भरातील खाटू नरेश श्याम भक्तात प्रसिद्ध असणारे तीन बाण के धार' या भजनाने राजस्थान येथील प्रसिद्ध भजनकार छोटूसिंग रावणा हे प्रथमच शहरात येत असून श्याम भजनांची वर्षा भक्तांवर करणार आहेत. त्यांच्या समवेत राजस्थान येथील श्यामबाबाचे पावन खाटू धाम येथील सेवक परिवार आलूसिंह व मोहनदास यांचे वंशज सेवाधारी भजनकार महाराज शामसिंह चौहान यांची उपस्थिती व इंदूर येथील बासरी वादक देव कनेरी यांची साथसंगत लाभणार आहे.
न्यू राधाकिसन प्लॉट व जुना आळशी प्लॉट येथील नागरिकांच्या वतीने हिंदू संमेलन आयोजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थान व संवर्धनासाठी हिंदू संमेलनाची जागोजागी आवश्यकता असून अशा संमेलनाच्या माध्यमातून आपण आपल्या आदर्शमय परंपरा व धर्माचे योग्य प्रकारे रक्षण करू शकू, असा सूर संमेलनात उमटला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मेहरबानू विज्ञान महाविद्यालयात आयोजित या संमेलनाचा प्रारंभ राणी सती धाम येथून शोभायात्रेने करण्यात आला. या शोभायात्रेत जुना आळशी प्लॉट व न्यू राधाकिसन प्लॉट परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. बँड बाजाच्या गजरात ही शोभायात्रा न्यू राधाकिशन प्लॉट, जुना आळशी प्लॉट परिसरातून मेहरबानू विज्ञान महाविद्यालयात या शोभायात्रेचे संमेलनात रूपांतर झाले. शोभायात्रेचे ठिकठिकाणी अनेक नागरिक व स्वयंसेवी संस्था, मंडळांनी उस्फूर्त स्वागत केले. न्यू राधाकिसन प्लॉटमध्ये या शोभायात्रेवर समाजसेवी कुंजीलाल जाजू, अनुसया जाजू व त्यांच्या कुटुंबाने पुष्प वर्षाव करत शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत केले. संमेलनाचा प्रारंभ भारत माता प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आला. यात प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू सेवा संघाचे महाराष्ट्र प्रभारी हनुमान गढी अयोध्या येथील सुनील महाराज, हिंदू जागरण मंचाच्या वक्त्या अॅड. ममता तिवारी, पंडित सुदर्शन शर्मा तर प्रमुख वक्ते म्हणून रुपेश शाह आदी उपस्थित होते. सर्वप्रथम न्यू राधाकिसन प्लॉट व जुना आळशी प्लॉट येथील नागरिकांच्या वतीने पाहुण्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. बालिका खुशी जोबनपुत्रा हिच्या गणेश वंदनाने व बालिका अनुष्का शर्मा हिच्या द्रोपदी वस्त्रहरण गीत नाट्याने या संमेलनास प्रारंभ करण्यात आला. सूत्रसंचालन शालिनी पिंपळे, दीपिका ठाकूर यांनी तर आभार धर्मेश वैद्य यांनी मानले.वंदे मातरम ने या संमेलनाची सांगता झाली. हनुमान चालिसाचे पठण संमेलनात मातृशक्तींनी हनुमान चालिसा पठण करून ऊर्जा निर्माण केली. यावेळी शताब्दी पार करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा कार्याची माहिती देण्यात आली. सुनील महाराज, पंडित सुदर्शन शर्मा, प्रमुख वक्ते रुपेश शाह आदींनी आपले विचार व्यक्त करीत हिंदू संमेलनाची उपयुक्तता प्रतिपादित करीत नागरिकांनी स्वयंपूर्ण धर्म रक्षणासाठी जागृत होऊन धर्माची पताका समाजात गतिमान करण्याचे आवाहन केले. पं सुदर्शन शर्मा यांनी हिंदू संमेलनाची आवश्यकता का आहे याची विमांसा करीत आजच्या परिस्थितीत हिंदूंचे एकत्रीकरण ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
जुने शहरातील सोनटक्के प्लॉट परिसरात अतिक्रमणाच्या वादावरून एकाच समुदायातील दोन गटांत सोमवारी रात्री तुफान हाणामारी झाली. या घटनेला हिंसक वळण लागले. दोन्ही गटांमध्ये जोरदार वादावादी झाली. शिवीगाळही झाली. त्यानंतर परिस्थिती चिघळली. दोन्ही गट आमने-सामने आले. या दरम्यान दोन्ही बाजूंनी तलवार, लोखंडी पाईप, कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा वापर झाला. या हल्ल्यात दोन्ही गटांतील सहा जण जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचालित सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अतिक्रमणाच्या वादातून सशस्त्र हाणामारी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सोनटक्के प्लॉट येथील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून दोन गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद काही वेळातच उग्र झाला. दोन्ही गटांतील व्यक्तींनी एकमेकांना शिवीगाळ केली. हाणामारी सुरू झाली. यावेळी काही जणांनी तलवार, लोखंडी पाइप तसेच कोयत्याचा वापर करून हल्ला केल्याचे गंभीर जखमी रुग्णाचा मुलगा शेख इब्राहिम शेख जमील कुरेशी याने सांगितले. सहा ते सात लोकांनी आपल्या वडिलांवर तलवारीने हल्ला केला. यावेळी घरातील महिलाही जखमी झाल्याचे त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले. जखमींना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात मोठा जमाव जमला होता. नियंत्रणासाठी मोठी पोलिस कुमक बोलावण्यात आली होती. जखमींची नावे समजू शकली नाहीत. घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिस तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री बारापर्यंत सुरू होती. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांचा धाक संपला ? दरम्यान, गेल्या आठवड्यापासून शहरात खून, हाणामाऱ्याच्या घटना वाढल्याने पोलिसांवरील ताणही वाढला आहे. शहरात किरकोळ कारणांवरून सशस्त्र हाणामाऱ्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये कायद्याचा धाक संपला का, अशा चर्चा रंगत आहेत. कारण अल्पवयीन मुलांच्या टोळ्या शहरात मुजोरी करत आहेत. एकुणच गेल्या महिनाभरात जिल्ह्याचा क्राइम रेटही वाढता आहे. पोलिस अधीक्षकांनी ही गंुडागर्दी मोडून काढण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अशी सुज्ञ अकोलेकरांची अपेक्षा आहे.
यंदा उन्हाळ्यात अवकाळी पाऊस, गारपीटमुळे पिकांची प्रचंड हानी झाली असून तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सोमवारी केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. गतवर्षी खरीपनंतर रब्बीमध्येही अवकाळी पाऊस झाला. मात्र पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने यंदाचा उन्हाळा कमी जाणवेल, असा सामान्यांचा अंदाज होता. मार्च महिन्यात पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवण्यात आला. अशाच काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे सत्रच सुरू झाले. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक कर्जाचा डोंगर आणखी वाढणार आहे. दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेने ६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी वर्षा मिना यांना निवेदन सादर केले. जिल्ह्यात ३० मार्च, ९ एप्रिल, ३ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारांमुळे जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू, कांदा बियाणे, तीळ, उन्हाळी मूग, टरबूज, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. तरी तातडीने पंचनामे करून हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी. तसेच सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असून ती सरसकट घोषित करण्यात यावी; अन्यथा संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी, मंगेश गावडे, रामहरी आगळे, रमेश चिचे, शेख मुख्तार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. गतवर्षी शेतमालाचे उत्पादन प्रचंड प्रमाणात घटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे पुढील आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. त्यामुळे सरसकट कर्जमाफीची मागणी होत आहे. जिल्ह्यात जून महिन्यात अतिवृष्टीमुळे ४ हजार २१५ हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली. १६३ गावांमधील ७ हजार ५७७ शेतकऱ्यांचे ६ कोटी ५ लाख ५६ हजारांचे नुकसान झाले होते. हा निधी मंजूर झाला. जुलै महिन्यातील अतिवृष्टीचा फटका ७ हजार ३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना बसला होता. ११ हजार ५९७ शेतकऱ्यांचे ६ कोटी २१ लाखांचे नुकसान झाले होते. या दोन्ही महिन्यांची मदत मंजूर झाली. ऑगस्ट महिन्यात १ लाख ६ हजार ६४९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली होती. अतिवृष्टीचा फटका १ लाख २० हजार ६९७ शेतकऱ्यांना बसला. मदतीसाठी ९२ कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली. ही मागणीही मंजूर झाली. जिल्ह्यात यंदा सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसान भरपाईसाठी वाढीव क्षेत्राकरिता सर्वात शेवटी २३ कोटी ३७ लाख मंजूर झाले होते. याचा लाभ २१ हजार २९३ शेतकऱ्यांना मिळत आहे. ही वाढीव मदत २६ हजार ८८९ हेक्टर क्षेत्रासाठी आहे. यापूर्वी १ लाख ७२ हजार ८७५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी १६२ कोटी ९५ लाख मंजूर झाले. राज्य शासनाने पीक नुकसान, पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेले ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेज जारी केले होते. यात जमीन महसुलात सुट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शाळा, महाविद्यालय परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामात शिथिलता, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदींचा समावेश होता. आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात केली आहे. अवकाळी पावसामुळे १२२ हेक्टरवर नुकसान जिल्ह्यात २० मार्च रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने १२२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला होता. २.३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली होती. मंगळवार, ३१ मार्च रोजी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी ६५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. अर्थात ही आकडेवारी नजर अंदाजाच्या प्राथमिक पाहणीनंतर पुढे आली होती. तिसऱ्यांदा ३ एप्रिल रोजी पुन्हा अवकाळी पाऊस पडल्याने २६८ हेक्टर क्षेत्रातील पिकं उद्ध्वस्त झाली.
गॅस पुरवठ्यावरून केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणत आहे की, परिस्थिती सर्वसामान्य आहे. मग सांगा अद्यापही नागरिक गॅस सिलेंडरसाठी रांगेत का उभे आहेत, असा सवाल वंचितने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे सादर केलेल्या निवेदनात केला आहे. आपण आपल्या एसी ऑफिसमधून बाहेर पडावे आणि बाहेरील परिस्थिती बघावी. अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरचा काळा बाजार होत आहे. सिलिंडर ५ ते ७ हजार रूपयांचा मिळत आहे. त्यामुळे कोणतेही संकट नाही, असा सरकारकडून होणारा दावा खोटा आहे, अशा शब्दात वंचितने सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. गत कही दिवसांपासून अमेरिका व इस्त्रायलने इराणवर हल्ला केला असून, आखाती देशांमध्ये युद्ध छेडले आहे. याचा परिणाम गॅस पुरवठ्यावर आहे. गॅस सिलिंडर मिळण्यासाठी नागरिक गॅस एजन्सी बाहेर रांग लावत आहेत. ऑनलाईन बुकींग होत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. अनेक कुटुंब गॅस मिळत नसल्याने शहर सोडत आहे कामधंदे सोडून तासंतास गॅस मिळण्याकरिता गॅस एजन्सी समोर उभे राहावे लागत आहेत. दरम्यान ६ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीने चूल मांडो आंदोलन करीत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या करण्यात आल्या मागण्या वंचितने निवेदनातून पुढील मागण्या केल्या. गॅस सिलिंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी. गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखावा. संबंधितांंवर कठोर कारवाई करा. २५ दिवसानंतर गॅस मिळेल, ही अट शिथिल करण्यात यावी. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करावेत. सरकारकडून प्रत्येक २ किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था करून गरजू लोकांना अन्न देण्यात यावे. अनेक ठिकाणी केवायसी होत नसल्याने सिलिंडर देण्यात नाही. त्यामुळे अशा ग्राहकांना तातडीने गॅस देण्यात यावा. जिल्ह्यामध्ये उज्वला गॅस योजनेअंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहेत, याची माहिती देण्यात यावी.
बीड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या एकूण 88 ग्रामपंचायतींच्या जागांसाठी आजपासून पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे. सदस्य किंवा सरपंचांचे निधन, राजीनामा आणि अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या 16 सरपंच आणि 72 सदस्य पदांसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये विशेषतः केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, प्रशासकीय स्तरावर या प्रक्रियेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार, इच्छूक उमेदवारांना 13 एप्रिलपर्यंत आपले नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया 28 एप्रिल रोजी पार पडणार असून, 29 एप्रिल रोजी मतमोजणी होऊन अंतिम निकाल घोषित केला जाईल. पुढील काही दिवस जिल्ह्यातील या 88 गावांमध्ये राजकीय हालचालींना वेग येणार असून गावपातळीवरील सत्तासंघर्ष पाहायला मिळणार आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी चर्चा ग्रामपंचायतच्या निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. याबाबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना म्हटले की, स्वर्गीय संतोष देशमुख यांनी जे काम केले आहे, तोच मानस गावकऱ्यांचा असणार आहे. गावकऱ्यांच्या विचारावर आम्ही थांबलेलो आहोत. येणाऱ्या दोन-तीन दिवसात काही गोष्टी स्पष्ट होतील. आजी-माजी सदस्य पॅनल प्रमुख गावकऱ्यांची बैठक झाली. यात निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी चर्चा झाली. माझ्या वहिनीला सरपंचपदाचा अनुभव पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, 18 महिन्यांचा उरलेला कालावधी स्वर्गीय संतोष देशमुख यांना श्रद्धांजली म्हणून बिनविरोध करण्याचा मानस आहे. गावाच्या विकासासाठी टीम वर्कची गरज असते. स्वर्गीय देशमुखांनी पंधरा वर्ष गावासाठी घातले आहे. या निवडणुकीसाठी शक्यतो मी उमेदवार नाही. माझ्या वहिनीला सरपंचपदाचा आणि बाजार समितीच्या सदस्यपदाचा अनुभव आहे. त्यांना विचारात घेऊन गावकऱ्यांनी बैठक घेतलेली आहे.येत्या एक-दोन दिवसात निवडणूक बिनविरोध कशी होईल? हा गावकऱ्यांचा प्रयत्न असेल. मला संतोष देशमुख यांची केस महत्त्वाची मला कुठल्याही प्रकारची भीती नाही. पण, मला संतोष देशमुख यांची केस महत्त्वाची आहे. मला केसला वेळ द्यायचा आहे. मला कुठला दबाव नाही. मला कुठली अपेक्षा नाही आणि भीतीही नाही, असेही धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या दोन-तीन दिवसात आम्ही सर्वजण बसून तोडगा काढणार आहोत. देशमुख कुटुंबावर आलेले संकट कुणी संधी म्हणून बघू नये. उरलेल्या कालावधीत संतोष अण्णांचे स्वप्न पूर्ण करावे, असे आमचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
गॅस सिलिंडर मिळण्यासाठी नागरिकांना असुविधा होणार नाही, दृष्टीने पुरवठा विभाग व गॅस एजन्सीने नियोजन करावे असे स्पष्ट, आमदार रणधीर सावरकर यांनी बैठकीत दिले. गॅस सिलींडरबाबत सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार व अधिकाऱ्यांची बैठक झाली. ग्राहकांच्या अडचणी तसेच गॅस एजन्सी यांच्या अडचणी, कायदा सुव्यवस्था तसेच वेगवेगळ्या विषयावर प्रशासन म्हणून उपाययोजना आदींबाबत बैठक पार पडली. गरजू गॅसधारक आपल्या हक्कांपासून वंचित राहिला पाहिजे नाही या दृष्टीने अन्नपुरवठा विभाग तसेच गॅस डीलर्स यांनी नियोजन करावे असे निर्देश आमदार सावरकर यांनी दिले. बैठकीत ग्राहकांच्या अडचणी संदर्भात सविस्तर चर्चा झाली. बैठकीला प्रामुख्याने जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र ऐन्नावार आदीसह कंपनीचे प्रतिनिधी होते. बैठकीत लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी मुद्दे मांडले. यात ओटीपी टक्केवारी आणि मेसेज न येणे, पुरवठा संभाजी नगर प्लांटवरून नियमित न होणे, प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी मुबलक पुरवणे, पुरवठा हा प्रतीक्षा यादीवर निर्भर असावा, इंडेन गॅस मनपा हद्दवाढ क्षेत्रात ग्रामीण वितरक आल्यामुळे बुकिंग अवधी २५ दिवसांची असावी., मॅन्युअल बुकिंग आणि थोडी शिथिलता देण्यात यावी, आदींचा समावेश होता. हद्दवाढ भागात अशीही समस्या शहरामध्ये बुकिंग २५-३० दिवसानंतर व ग्रामीणमध्ये ४५ दिवसानंतर होते. मात्र हद्दवाढ भागामध्ये ४५ दिवसानंतरच मिळत आहे. त्यामुळे हद्दवाढ भागातील ग्राहकांना २५-३० दिवसांनंतर मिळावे, अशी मागणी करण्यात आली. ग्राहकांचे बुकिंग आहे; पण ओटीपी न आल्यामुळे त्यांना सिलेंडर मिळत नाही. ते ऑफलाईन परवानगी द्यावे. एजन्सी धारकांच्या गाड्या प्लांटच्या बाहेर चार दिवसांपासून उभ्या आहेत. त्या लोड होत असून, ही समस्या दोन-तीन दिवसात सोडण्याचे आदेश बैठकीत देण्यात आला.
जिल्हा परिषदेचे नवनियुक्त सीईओ सत्यम गांधी यांनी आज, सोमवारी सकाळी आपली नवी जबाबदारी स्वीकारली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ विनय ठमके यांच्याकडून त्यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली. सूत्रे स्वीकारताच त्यांनी जि.प. मुख्यालयातील सर्व विभागांची प्रत्यक्ष पाहणी केली. या क्रमात सीईओंनी ‘वैदर्भी’ या जिल्हा परिषदेच्या कॅन्टीनलाही भेट दिली. केवळ भेटच दिली नाही. तेथे पराठा आणि मठ्ठा घेतला. वरून ऑनलाईन पद्धतीने शंभर रुपयांचे बिलही दिले. सूत्रे स्वीकारताच पहिल्याच दिवशी सर्व विभागांची पाहणी करून कॅन्टीनवरील पदार्थांची चव घेणारे सत्यम गांधी हे पहिले सीईओ ठरले आहेत. त्यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीची अन् तत्परतेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सत्यम गांधी हे सन २०२१ च्या तुकडीचे आयएएस आहेत. येथे येण्यापूर्वी ते सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करण्याचा पूर्वानुभव त्यांच्याकडे आहे. त्याची प्रचिती आजच्या पाहणीदरम्यान सर्वांनाच आली. प्रत्येक विभागात पोहोचून तेथील विभागप्रमुखाचे दालन, त्यांची तेथील उपस्थिती-अनुपस्थिती, ते कोण आहेत, हे सामान्यांना कळावे, यासाठी त्यांच्या नेमप्लेटची अनिवार्यता, कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे, आदी मुद्द्यांवर त्यांनी या पाहणीदरम्यान भर दिला. बांधकाम उपविभागातील एक विभागप्रमुख अनुपस्थित होते. त्यांच्या दौऱ्याची नोंद आहे की नाही, हेही त्यांनी जाणून घेतले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, स्वीय सहायक ज्ञानेश्वर घाटे, त्यांच्यासोबत होते. अटीबाबत दक्ष, कर्मचाऱ्यांची परीक्षा प्रत्येक विभागात पोहोचल्यानंतर सीईओंनी तेथील विभागप्रमुखांशी बोलणी केली. त्या विभागात किती कर्मचारी आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत आदी जुजबी माहिती जाणून घेतली. काही कर्मचाऱ्यांशी विशेषत: आयटीशी निगडित कर्मचाऱ्यांची त्यांनी एकप्रकारे परीक्षासुद्धा घेतली. शासनाच्या इ-गर्व्हनन्समध्ये आवश्यक असलेली कौशल्ये त्या कर्मचाऱ्याकडे आहेत की नाही, हे त्यांना जाणून घ्यायचे होते.

27 C