प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र आयोजित १४ वे मराठी साहित्य संमेलन नागपूर येथे उत्साहात पार पडले. संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ कवी श्यामसुंदर गावकर उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थापिका देगलूरकर, प्रमुख अतिथी अंजली डोळे, उद्घाटक राज यावलीकर उपस्थित होते. साहित्य संमेलनप्रसंगी बोलताना संस्थापिका लीना देगलूरकर म्हणाल्या, 'समाजामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या प्रांतांमध्ये, वेगवेगळे कार्य अविरतपणे निष्कामपणे करत असतात. त्यांचे हे कार्य, समाजभान दिशादर्शक असते. अशा साहित्यिकांची, मान्यवरांची मांदियाळी आज संमेलननिमित्ताने पाहताना अभिमान वाटतो. इंटरनेट, मोबाइलचा अतिवापर टाळत, वाचन संस्कृतीला घराघरातून सर्वांनी प्राधान्य द्यायला हवे असे त्यांनी सांगितले. या साहित्य संमेलनामध्ये अहिल्यानगर येथील कवी लेखक बाळासाहेब देशमुख यांनी शिकवण ही रचना सादर केली. ग्रामीण भागातील आईवडील आपल्या मुलांना संगोपन करताना संस्कार, संस्कृतीचे बाळकडू कसे दिले जाते यावर त्यांनी भाष्य केले. या संमेलनामध्ये ज्येष्ठ कवयित्री अंजली डोळे, कवी दीपक करगुंटकर या मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेब देशमुख यांना सन्मानित करण्यात आले. बाळासाहेब देशमुख यांचे रंग माझा वेगळा, माणसे अशी.. अन् तशीही.., माणसे.. भिंगातून इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत.
भगवंताच्या सेवेमधूनच आपल्या जीवनातील दैन्यता जाते. मात्र सेवा करताना अहंकार नसावा. अहंकार आल्यास भगवंत आपली सेवा स्वीकारत नाही, हे लक्षात घ्यावे. नारद मुनींसारख्या शुद्ध भावाने भगवंताचे गुणगान करावे. भागवत कथा कलीयुगातील भाविकांना सत्ययुगात रहाण्याचा आनंद मिळवून देते, असा ठाम विश्वास राधाकृष्ण महाराज यांनी व्यक्त केला. येथील रामनिवास सतीशचंद्र इंदाणी आणि इंदाणी परिवारातर्फे नंदनवन लॉन्समध्ये आयोजित श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राधाकृष्ण महाराज म्हणाले, अलीकडे शानदार बंगले उभारले जात आहेत. मात्र त्या बंगल्यातील स्वयंपाक घरात भव्यताच अधिक असते. पवित्रता नसते. आपले स्वयंपाक घर भव्य नव्हे तर सदैव पवित्र असले पाहिजे. जेथे पवित्रता असते तेथे विचार करण्याची आवश्यकता नसते. स्नान केल्याशिवाय स्वयंपाक घरात पाऊल ठेवू नये. घरात आल्यावर मंदिरात आलो असे वाटले तरच घर उभारण्यातील सार्थकता अनुभवता येईल. अन्न उत्तम तर आनंद उत्तम. या आनंदातूनच प्रसन्नता मिळते. मात्र हे अन्न सात्विक पाहिजे. स्वयंपाक घर पवित्र झाले की, घरातील अर्ध्या समस्या कमी होतात. सात्त्विक अन्नच हा फरक दाखवून देते. दरम्यान, राधाकृष्ण महाराजांच्या अमृतवाणीमधून भागवत कथा श्रवण करण्यासाठी शहराच्या विविध भागातील भाविकांची अलोट गर्दी होत आहे. दरम्यान, शहरात आयोजित करण्यात आलेल्या या कथा सोहळ्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. राधाकृष्ण महाराज स्वतः श्रीमद्भागवत कथेचे निरुपण करत आहेत. त्यामुळे कथा ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अगदी लहानांपासून ते थेट वयोवृद्धांपर्यंत भाविक कथा ऐकण्यासाठी गर्दी करत आहेत. शहरातील नंदनवन लॉन्स येथे या कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ९ एप्रिलपर्यंत हा कथा सोहळा सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
वरखेडची श्री लक्ष्मी देवीची आज यात्रा:16 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार नजर'
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील वरखेड येथील श्री लक्ष्मी देवीची यात्रा मंगळवारी (७ एप्रिल) भरत आहे. यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्या स्वागतासाठी वरखेडनगरी सज्ज झाली आहे. यंदा सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला असून, मंदिर परिसरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष कडू पाटील गोरे यांनी दिली. यात्रेनिमित्त सोमवारी रोजी रात्री ८.३० वाजता 'होम' विधी झाला. मंगळवारी यात्रेचा मुख्य दिवस असेल. या दिवशी पालखी सोहळा, छबीना आणि प्रेक्षणीय शोभेच्या दारुकामाची (आतषबाजी) मोठी मेजवानी भाविकांना पाहायला मिळणार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता पैठण येथून कहार व भोई समाजाने आणलेल्या पालखीची पूजा ट्रस्टी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी परिसरातील विविध एसटी डेपोतून जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी यात्रेसाठी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, निवारा आणि दुकानांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्री लक्ष्मी देवी ट्रस्टचे अध्यक्ष कडूपाटील गोरे, उपाध्यक्ष लक्षाधिश दाणे, सचिव राजू शिरसाठ, खजिनदार रावसाहेब कुंढारे व सर्व विश्वस्त मंडळाने भाविकांना दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
नाशिक येथील 'रॉयल रायडर्स' आयोजित महाकुंभ व्हर्च्युअल सायकलिंग चॅलेंजमध्ये शेवगाव सायकल असोसिएशनच्या दोन संघांनी यश संपादन केले. यात शेवगावच्या 'डेक्कन वॉरियर' संघाने ३१ दिवसांत तब्बल १० हजार ८४६ किमीचा टप्पा पार करून देशपातळीवर द्वितीय क्रमांक पटकावला, तर 'शेवगाव रायडर' संघाने ५३ व्या क्रमांकावर झेप घेतली. या देशव्यापी चॅलेंजमध्ये एकूण ९७ संघांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक संघात चार रायडर्सना ३१ दिवसांत किमान २४२४ किमी अंतर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, शेवगावच्या सायकलपटूंनी हे उद्दिष्ट पार करत विक्रमी किमीची नोंद केली. डेक्कन वॉरियर (द्वितीय क्रमांक): सचिन वांढेकर, विठ्ठल आर्ले, राहुल सुर्वे आणि संजय शिवरामवर. या संघाने १०,८४६ किमी अंतर कापले.शेवगाव रायडर (५३ वा क्रमांक): नीलकंठ लबडे, वसंत सुरवसे, डॉ. दीपक वैद्य आणि डॉ. मनिषा लड्डा. या संघाने २,७८७ किमी अंतर पूर्ण केले. ५ एप्रिल रोजी नाशिकच्या डीकॅथलॉन येथे पार पडलेल्या सोहळ्यात यशस्वी खेळाडूंचा मेडल देऊन गौरव करण्यात आला. नाशिकच्या महापौर सौ. हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नाशिक सायक्लिस्ट फाऊंडेशनचे माजी अध्यक्ष प्रवीण खाबिया, रॉयल रायडर्सचे अध्यक्ष डॉ. आबा पाटील आदि उपस्थित होते. शेवगावच्या सायकलपटूंनी मिळविलेल्या या यशाबद्दल शेवगाव सायकल असोसिएशनचे पदाधिकारी विनोद ठाणगे, डॉ. मुकुंद दारकुंडे, डॉ. संदीप बोडखे, कैलास जाधव, डॉ. प्रदीप उगले, डॉ. जगदीश कुलकर्णी, निलेश केवळ, सुनील गवळी व प्रदीप बोडके यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
महावितरणच्या सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या वीज जोडण्या त्वरित द्याव्यात,सिंगल फेज योजनेची मंजूर कामे तातडीने पूर्ण करावीत, भारनियमनाचा कालावधी कमी करून पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी संतप्त शेतकऱ्यांनी आज, सोमवारी (६ एप्रिल) महावितरणच्या टाकळी ढोकेश्वर येथील वीज उपकेंद्रास टाळे ठोकून ठिय्या आंदोलन केले. अधिकाऱ्यांच्या निष्क्रियेच्या निषेधार्थ त्यांना बांगड्यांचा आहेर करण्यात आला. दरम्यान, विविध प्रलंबित प्रश्न येत्या दोन दिवसांपासून ते आठ दिवसांच्या कालावधीत मार्गी लावण्याचे आश्वासन महावितरणचे उप कार्यकारी अभियंता गांगुर्डे यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेले ठिय्या आंदोलन,पाच तासांनी,दुपारी साडेतीन वाजता संपले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आर.आर.राजदेव, म्हसोबा झाप ग्रामपंचायतीचे प्रशासक प्रकाश गाजरे,अमोल उगले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील आदिवासी बहुल गावांमध्ये विजेच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून असंतोष धुमसत होता.या असंतोषाचा आज उद्रेक झाला. खासदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून आरडीएसएस योजनेअंतर्गत मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांची उदासीनता आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना अद्यापही अधिकृत वीज जोडणी मिळाली नाही. हक्काच्या विजेसाठी शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही केवळ पोकळ आश्वासने मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आज सुटला असल्याचे आर. आर. राजदेव म्हणाले. महावितरणने शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. लावावीत.अश्वासनाप्रम ाणे कालबध्द पध्दतीने कामे पूर्ण करावीत.अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रकाश गाजरे यांनी दिला. अभिजीत झावरे,पांडुरंग आहेर, खंडू भाईक, कैलास सैद, प्रवीण सैद, अनिल आहेर, झांबर दरेकर, बाळासाहेब आहेर, संपत वाळुंज, विठ्ठल रोहकले, अशोक वाळुंज, शुभम काळे, दात्तराय वाळुंज, राजेंद्र दुधवडे, साहेबराव दुधवडे, संदीप गुंजाळ, काळूराम दुधवडे, लक्ष्मण कारंडे, गिरजु सूळ, लहू वाळुंज, ऋषिकेश वाळुंज, संजय पारधी, लहू भुतांबरे, विष्णू वाळुंज, बाबासाहेब वाळुंज, साहिल वाळुंज, भागचंद वाळुंज यांसह म्हसोबा झाप, वारणवाडी, कामटवाडी, वासुंदे, नांदूर पठार, सावरगाव, पळसपुर, काटाळवेढा, काकणेवाडी, खडकवाडी, पळशी या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पाथर्डीत चूल पेटवून सरकारचा निषेध:गॅस टंचाईवरून वंचित' आक्रमक
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झालेली गॅस टंचाई आणि सिलिंडरच्या कमतरतेविरोधात वंचित बहुजन आघाडीने सोमवारी (६ एप्रिल) पाथर्डी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. नरेंदर कब मिलेगा गॅस सिलेंडर अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी चूल पेटवून आणि रिकाम्या सिलिंडरचे प्रतिकात्मक प्रदर्शन करत सरकारचा निषेध नोंदवला. आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नायब तहसीलदार किशोर सानप यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात गॅस टंचाई दूर करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी युवक तालुकाध्यक्ष आकाश शिंदे, महिला अध्यक्षा रोहिणी ठोंबे, लहू शिंदे, मार्कस शिंदे, सुभाष शिंदे, आजिनाथ साळवे, विजय साळवे, अमोल जाधव, बाळासाहेब पंडागळे, दादू वाघमारे, तानाजी वाघमारे, कैलास वाघमारे, सचिन वाघमारे, गहिनीनाथ नाकाडे, दत्तात्रय सातपुते आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तालुकाध्यक्ष श्रीकांत बोर्डे म्हणाले,वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन हाती घेण्यात आले असून, त्याचा एक भाग म्हणून आज हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.शासनाने गॅस पुरवठ्यातील कमतरता दूर करून नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल.
अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान:तातडीच्या मदतीची केली मागणी
तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे वीटभट्टी व्यवसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आधीच तोट्यात चाललेल्या या व्यवसायाला आणखी मोठा फटका बसला आहे. यामुळे संतप्त वीट उत्पादकांनी शासनाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. विट भट्टी व्यवसायासाठी लागणाऱ्या माती, राख, कोळसा व भुसा यांच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने व्यावसायिक आधीच आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यातच अचानक झालेल्या पावसामुळे तयार विटा व कच्चा माल पूर्णपणे भिजून मोठे नुकसान झाले आहे. वीट उत्पादक संघाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देशातील हा एकमेव व्यवसाय असून त्यासाठी कोणतीही विमा योजना उपलब्ध नाही. याबाबत अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असला तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीप्रमाणे विट भट्टी व्यवसायिकांसाठीही स्वतंत्र धोरण आखून विमा योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, विमा कंपन्या हा विषय शासनाचा असल्याचे सांगत असून शासन व विमा कंपन्या एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला आहे. दरवर्षी शासनाकडे मातीची रॉयल्टी व इतर कर नियमित भरूनही, नुकसान झाल्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे. तरी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी तसेच विट व्यवसायासाठी विमा योजना लागू करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी वीट उत्पादक संघाचे अध्यक्ष कैलास वाकचौरे यांच्यासह राजू जोर्वेकर, मच्छिंद्र जोर्वेकर, संतोष जोर्वेकर, बाळासाहेब जोर्वेकर, अनिल जोर्वेकर, दिगंबर जोर्वेकर व विशाल सोनवणे यांनी केली आहे.
बागलाण तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फळबागा आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी नुकसानग्रस्त गावांना भेट देत पाहणी केली. आगामी तीन दिवसीय विशेष अधिवेशनात या नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर करून केंद्र सरकारकडे नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात सलग चार दिवस झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गिरणा, आरम व मोसम पट्ट्यातील फळबागा आणि शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले असून, जनावरांच्या चाऱ्याचाही तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. खासदार डॉ. बच्छाव यांनी रविवारी सटाणा, चौगाव, भाक्षी, मुळाणे, कौतिकपाडे, सारदे, मोराणे-सांडस, आसखेडा, सोमपूर, तांदुळवाडी, दरेगाव, नांदीन व ताहाराबाद आदी गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसानीची माहिती प्रत्यक्ष जाणून घेतली. विशेष अधिवेशनात बागलाण तालुक्यातील नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर करून केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते दिनेश बच्छाव, प्रकाश देवरे, यशवंत आहिरे, माजी सरपंच चेतन वनीस, श्रीकांत रौंदळ, आबा रौंदळ, योगेंद्र दात्रे, बाळासाहेब भदाणे, किशोर कदम व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येथील श्रीनाथ हायस्कूलमध्ये ‘रंग उधळूया वाचनाचे’ या संकल्पनेतून बालवाचक मेळावा व गौरव सोहळा उत्साहात झाला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरील साहित्याशी ओळख व्हावी, या उद्देशाने उपक्रम राबवला. इयत्ता सहावी ते नववीतील विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील विविध साहित्यकृती वाचल्या. त्यावर आधारित रसग्रहण केले. चर्चासत्र सादर केले. ययाती, पावनखिंड, एक भाकर तीन चुली, श्यामची आई, एक होता कार्व्हर, मृत्युंजय ही पुस्तके वाचली. छत्रपती शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रांचेही वाचन केले. उपक्रमाची संकल्पना श्रीकांत बांदल यांनी मांडली. मागील वर्षापासून उपक्रम सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पुस्तकांतील पात्रे, कथा, नीतिमूल्ये यांचे सादरीकरण केले. पायल शेळके, स्नेहा शेळके, आयशा पठाण, विहाण डोंगरे, सोहम राख, अंकिता गरड, कार्तिकी जाधव, गौरी तुपे, रेवती वडेकर, श्रावणी भावले, साक्षी इरतकर, श्रुती लबडे, हर्षदा जाधव, अक्षरा भोसले, आरती आहेर आदींचा सहभाग होता. प्राथमिक मुख्याध्यापक संतोष खराद उपस्थित होते. हायस्कूल विभाग प्रमुख सिकंदर थोरात उपस्थित होते. मिडल विभाग प्रमुख अनिल काकडे उपस्थित होते. सुनिल चितळे उपस्थित होते. सर्व बालवाचक विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन गौरवी लांडगे, अक्सा शेख, अंकिता गरड, कार्तिकी जाधव यांनी केले. प्रास्ताविक समृद्धी बडे हिने केले. मोबाइलपासून दूर राहा, वाचनाची सवय लावा ः अध्यक्षस्थानी प्राचार्य शिवाजीराव पठाडे होते. अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते, असे त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे प्रा. संतोष गव्हाणे यांनी वाचन संस्कृतीमुळे संस्कार, नीतिमूल्यांची जडणघडण होते, असे सांगितले. सशक्त नागरिक तयार होतात, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहावे. वाचनाची सवय लावावी, असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या दोन महिन्यांपासून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना हल्ला करून जखमी करणाऱ्या आग्यामोहळाच्या १० पोळ वन विभाग व भारतीय पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री व सोमवारी पहाटे हटवले. अजून ६ पोळ लवकरच स्थलांतरित करण्यात येतील, अशी माहिती अजिंठा वन परिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांनी दिली आहे. अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर गेल्या दोन महिन्यांपासून लेणी क्रमांक ४, ९, १०, १९ व २६ जवळ बसलेल्या आग्यामोहळाच्या पोळातील मधमाशा आक्रमक होऊन हल्ले करीत होत्या. लेणीत वारंवार अशा घटना घडत होत्या. गेल्या दोन महिन्यांत ४०५ पर्यटक जखमी झाले होते. यामुळे अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. येथील पर्यटनावरही याचा परिणाम दिसून येत होता. हे मधमाशांचे पोळ लेणी परिसरातून स्थलांतरित करावे, अशी मागणी पर्यटक करत होते. १८ फेब्रुवारी ४० १९ फेब्रुवारी ८ ११ मार्च ६० २१ मार्च ३० ३१ मार्च ११ १ एप्रिल ८२ २ एप्रिल ८२ ३ एप्रिल ९० ५ एप्रिल ५ अजिंठा लेणीतील एकूण १६ मध माशांच्या पोळांपैकी १० पोळ हटविण्यात आले आहे. पोळ हटविताना मध माशांनी कर्मच्याऱ्यांवर हल्ला केल्याने लेणी क्र. ४ व १९, २६ जवळील सहा पोळही राहिले असून, हे पोळही लवकरच स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे अजिंठा वन परिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांनी सांगितले आहे. पोळ काढल्याने पर्यटकांमधून समाधान्य व्यक्त करण्यात आले. शनिवारी अजिंठा येथील वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके, अजिंठा लेणीचे प्रमुख अधिकारी मनोज पवार, छत्रपती संभाजीनगर येथील कीटकशास्त्रज्ञ अजिंक्य पाटील, सचिन घमाट यांनी या पोळांची पाहणी करून स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी रात्री व सोमवारी पहाटे लेणी क्रमांक ९,१० जवळील १० मधमाशांचे पोळ काढले. तारीखनिहाय हल्ले व जखमी पर्यटक
‘वंचित’ने पैठण तहसीलपुढेच चूल पेटवून नोंदवला गॅस टंचाईचा निषेध
राज्यभर सुरू असलेल्या घरगुती गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. याविरोधात वंचित बहुजन आघाडीने पैठण तहसील कार्यालयावर आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी चुलीवर चहा तयार करून निषेध नोंदवला. गॅसच्या तुटवड्यामुळे स्वयंपाकघरातील शेगड्या थंड पडल्या आहेत. चहाच्या टपऱ्या, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते, छोटे व्यावसायिक यांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेकांना लाकूड, कोळशाच्या चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये हॉटेलमध्ये चहा, नाश्ता, इडली-डोसा, तळले जाणारे पदार्थांची विक्री बंद पडली आहे. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, केटरिंग व्यवसायावरही गॅस टंचाईचा मोठा परिणाम झाला आहे. अनेक कार्यक्रम पुढे ढकलले गेले आहेत. शिक्षणासाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांना मेसमध्ये गॅस उपलब्ध नसल्याने जेवणाची सोय बंद झाली आहे. अनेक विद्यार्थी गावाकडे परत गेले आहेत, असे तहसीलदार पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले.
लासूर स्टेशन लासूरगाव (ता. वैजापूर) येथील मराठवाड्याचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या कुलस्वामिनी श्री देवी दाक्षायणी माता मंदिराच्या इतिहासात प्रथमच रविवारी सायंकाळी दर्शन रांगेतील पैठण तालुक्यातील एका भाविक दांपत्याला थेट मातेला वस्त्रालंकार परिधान करण्याच्या पूजेचा मान मिळाला. दीड ते दोन तास पाच ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात धार्मिक विधी झाले. गेल्या तीन वर्षांपासून वैजापूरचे तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष सुनील सावंत यांनी मंदिराचा पदभार स्वीकारला. त्यांच्या संकल्पनेतून जुनी पद्धत बंद झाली. थेट दर्शन रांगेत समोर असलेल्या सर्वसामान्य भाविकांच्या जोडप्यांनाच आरतीचा मान देण्याची पद्धत सुरू झाली. भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले. लासूरगाव येथील शिवना नदीकाठी वसलेल्या श्री देवी दाक्षायणी मातेची यात्रा मंगळवारपासून (दि. ७) सुरू होत आहे. यात्रा १५ दिवस चालणार आहे. देशभरातून १० लाखांपर्यंत भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज मंदिर प्रशासनाकडून व्यवस्थापक विष्णू हरिचंद्रे यांनी व्यक्त केला. रविवारी सायंकाळी मातेस १ किलो सोन्याचे दागिने, वेगवेगळी वस्त्रे, १५ किलो चांदीचा टोप घालण्यात आला. नऊवारी आकर्षक साडीचोळी परिधान करण्यात आली. देवीची ओटी भरली. लोकाक्ष गुरु संतोष जोशी, श्रीकांत जोशी यांच्या मंत्रघोषात वस्त्रालंकार पूजा झाली. या पूजेचा मान मंदिराच्या इतिहासात प्रथमच दर्शन रांगेतील नकुल नाचन, सुवर्णा नाचन पारुंडी (ता. पैठण) यांना देण्यात आला. त्यांनी व्यवस्थापक विष्णू हरिश्चंद्रे, पत्नी वैशाली विष्णू हरिश्चंद्रे यांच्या समवेत विधिवत पूजा करून दाक्षायणी माता प्रसन्न झाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी सहव्यवस्थापक संतोष शेलार, पोलिस अंमलदार किरण गोरे, आदिनाथ वाघुडे उपस्थित होते. मोठ्या संख्येने भाविकही होते. देवी दाक्षायणी मातेच्या अंगावर कोट्यवधी रुपयांचे दागिने आहेत. यात्रा काळात १५ दिवस मंदिराच्या चहूबाजूने वैजापूर पोलिसांचा शस्त्रधारी पहारा आहे. यंदाही मोठा पोलिस बंदोबस्त लावला आहे, अशी माहिती वैजापूरचे पीआय सत्यजित ताईतवाले यांनी दिली.
तालुक्यातील शेतीला जोडणाऱ्या पाणंद रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढले जातील. नवीन रस्त्यांची उभारणीला प्राधान्य दिले जाईल. कुठेही रस्ते अडवून काम थांबले असेल तर ते सुरू करावे. याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा आमदार विलास भुमरे यांनी दिला. पाणंद रस्ते मार्गी लावण्यासाठी स्थानिक सरपंच, ग्रामसेवकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत तालुकास्तरीय आढावा बैठक आमदार विलास भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला उपविभागीय अधिकारी निलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, पंचायत समिती सभापती वैशाली बोंबले, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. भुमरे म्हणाले, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाणंद रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना गाळ काढायचा असेल, त्यांना त्वरित परवानगी द्यावी. अपूर्ण राहिलेली कामे पुन्हा सुरू करावीत. कामे लवकर पूर्ण करावीत, असे आदेश त्यांनी दिले. तालुक्यातील एकही शेती रस्त्याविना राहता कामा नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांबाबत ग्रामपंचायतींनी तात्काळ सूचना द्याव्यात. ग्रामसेवकांनी अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले. तहसील कार्यालयात सध्या ७९ पाणंद रस्त्यांबाबत प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली. ही प्रकरणे लवकर मार्गी लावली जातील, असे त्यांनी सांगितले. भूमी अभिलेख अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष अनेक ठिकाणी भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पाणंद रस्ते रखडले आहे. यावेळी आमदार भुमरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक सुचना देत धारेवर धरले होते. पाणंद रस्त्याच्या संदर्भात दोन कर्मचाऱ्यांना याच कामावर लक्ष देण्यासाठी द्यावे, अशा सुचना केल्या. यावेळी अक्षय जायभाये, जितू परदेशी, बजरंग लिंबोरे, अक्षय डुकरे, किरण जाधव, नंदूअण्णा पठाडे, दादा गलांडे, सतीश अंधाळे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वरद हॉस्पिटल ते सिग्मा हॉस्पिटलदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. वारंवार सूचना देऊनही हे अतिक्रमण काढले जात नसल्याने अखेर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनाच प्रशासनाविरुद्ध रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करावे लागले. सोमवारी (६ एप्रिल) सकाळी भाजप नगरसेविका शोभा बुरांडे आणि अर्चना नीळकंठ या विक्रेत्यांना समज देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, विक्रेत्यांनी त्यांना उद्धटपणे उत्तरे देत धमकावले. या प्रकारामुळे संतप्त होऊन नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर बसून आंदोलन सुरू केले. घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार आणि महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने धाव घेतली. पथकाने तातडीने रस्त्यावरील विक्रेत्यांचे साहित्य व हातगाड्या जप्त करून रस्ता मोकळा केला. प्रशासकीय सुस्तीवर ताशेरे भाजी विक्रेत्यांना पीरबाजारात स्वतंत्र जागा दिलेली असतानाही ते फुटपाथवर बसून वाहतूक कोंडी करत आहेत. या आंदोलनावर बोलताना शैलेंद्र नीळकंठ आणि प्रदीप बुरांडे यांनी इशारा दिला की, जर पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली, तर पुढचे आंदोलन थेट दर्गा चौकात करण्यात येईल. विशेष म्हणजे, महापालिकेत सत्ता असूनही स्वतःच्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींना रस्त्यावर उतरावे लागल्याने प्रशासकीय कार्यक्षमतेवर शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
भोंदू खरात याने पोलिसांसमोर अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महिलांना धमकावल्याची आणि हातचलाखीने आकर्षित करून त्यांचे शोषण केल्याची, “दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिए’ अशी धक्कादायक कबुली खरातने पोलिस कोठडीत दिली. ज्या गोष्टींना लोक चमत्कार किंवा वशीकरण समजतात, ती केवळ आपली हातचलाखी असल्याचेही त्याने मान्य केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने पोलिस कोठडीत अनेक खुलासे केले. मात्र केलेल्या कृत्याचे समर्थन करताना कोणत्याही प्रकारचा पश्चात्ताप व्यक्त केला नाही. उलट, महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ‘ट्रिक्स’ला त्याने विज्ञानाचे नाव दिल्याने पोलिस यंत्रणेच्या भुवया उंचावल्या आहेत. पीडित महिलांना मानसिक दबावाखाली आणून त्यांच्यावर वर्चस्व निर्माण केले. ज्या गोष्टींना लोक चमत्कार अथवा वशीकरण समजतात, तेच हातचलाखीने केल्याचे त्याने मान्य केले. खरात आता कबुलीत वारंवार विज्ञान युगाचा संदर्भ देत आहे. जे काही केले, ते लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि विज्ञानातील काही क्लृप्त्या वापरून केल्याची कबुली त्याने दिली. विकृत मानसिकतेचे दर्शन खरातने दिलेल्या जबाबानंतर त्याने कोणत्या हातचलाखीचा वापर केला, त्याला अन्य कुणाची मदत होती का, याचा तपास सुरू आहे. खरातच्या “झुकानेवाला चाहिए” या एका वाक्याने त्याच्या विकृत मानसिकतेचे प्रदर्शन समोर आले आहे. भोंदू खरातच्या पत्नीचा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज शिर्डी | खरातची पत्नी कल्पना खरात हिने अटकेपासून वाचण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पोलिसांनी तिच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी केलेली असतानाच, तिने आपल्या वकिलामार्फत राहाता न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात अशोक खरात आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध फसवणूक तसेच बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यात कल्पना खरातचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांना असून, ती फरार होऊ नये यासाठी यापूर्वीच यंत्रणांना सतर्क करण्यात आले होते. वारसदार ‘तृप्ताबाला’ एसआयटीच्या रडारवर, १०० कोटींच्या मालमत्तेची दिवसभर चौकशी भोंदू खरातच्या काळ्या साम्राज्यातील अनेक गुपिते एसआयटीच्या तपासात एक-एक करून बाहेर येत आहेत. एसआयटीने आता आपला मोर्चा खरातच्या मुलीकडे वळवला असून, तिची सोमवारी चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बापाने तृप्ताबाला या मुलीच्या नावे जमिनींसह स्थावर-जंगम अशी एकूण १०० कोटींची मालमत्ता खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खरात १९ दिवसांपासून पोलिस कोठडीत आहे. त्याच्या चौकशीत नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. एसआयटीच्या हाती लागलेल्या जमिनी, फ्लॅट्स आणि विविध ठिकाणी गुंतवणूक केलेल्या कागदपत्रांनुसार, खरातने कमावलेली बेकायदेशीर मालमत्ता मुलगी तृप्तबाला हिच्या नावे केलेली असल्याचे तपासात समोर आले आहे. यामध्ये मोकळे भूखंड, आलिशान फ्लॅट्स आणि काही बेनामी व्यवहारांचा समावेश असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. खरातने भोंदूगिरीने केवळ भविष्यच सांगितले नाही, तर आपल्या कुटुंबालाही या आर्थिक साखळीत ओढल्याचे स्पष्ट झाले. आज होणाऱ्या चौकशीत एसआयटी काय पावले उचलणार याकडे लक्ष लागले आहे. खरातवर ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल; लवकरच त्याची व संबंधितांची होणार चौकशी दोन पतसंस्थांमधील अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार आणि हवालामार्फत बांधकाम व्यावसायिक व डॉक्टरांच्या माध्यमातूनमोठ्या रकमा वळवल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भोंदू अशोक खरातविरुद्ध सोमवारी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. लवकरच याप्रकरणी त्याची व त्याच्याशी संबंधितांची चौकशी केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. केंद्रीय संस्थेच्या मुंबई विभागीय कार्यालयाने प्रतिबंधात्मक मनी लाँड्रिंग कायद्याच्या (पीएमएलए) विविध कलमान्वये अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) दाखल केला आहे. खरातविरोधात महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या अनेक एफआयआरची दखल ईडीने घेतली आहे. एका विवाहित महिलेने तीन वर्षांपासून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर खरातला १८ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. राज्य पोलिसांनी त्याच्यावर आतापर्यंत एकूण १५ गुन्हे दाखल केले आहेत. लेकीच्या नावे मालमत्तेचा डोंगर खरातने लेकीच्या नावे गौळणे, पाथर्डी रोडवर मोक्याचे प्लॉट खरेदी केले आहेत. त्याने उभारलेल्या कंपन्यांमध्ये मुलीची भागीदारी आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. मुलीच्या बँक खात्यातील कोट्यवधींचे व्यवहार नेमके कुणाशी संबंधित आहेत, याचा तपास होणार आहे. खरातची पत्नी कल्पना अजूनही फरार आहे. तिच्या अटकपूर्व जामिनासाठी शिर्डीत अर्ज दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, खरातच्या मुलाची एसआयटीने चौकशी केली, मात्र तो ‘ डॅडला माहिती’ हेच सातत्याने सांगत आहे. चौकशीच्या ससेमिऱ्यापासून वाचण्याकरिता तो दोन दिवस नॉट रिचेबल होता. तर दुसरी मुलगी सृष्टीच्या नावेही खरातने प्लॉट खरेदी केले असून पथकाकडून खरातची लेक व जावई यांनाही चौकशीकरिता बोलावणार आहेत.
सोलापुरात पुतळे बसवणाऱ्या टोळीचा मास्टरमाइंड’ जालन्याचा:जिल्ह्यामध्ये आतापर्यंत घडल्या नऊ घटना
सोलापूर, धाराशिवसह राज्यातील काही जिल्ह्यात रातोरात महापुरुषांचे पुतळे उभारण्याचा नवा ‘ट्रेंड’ निर्माण झाला आहे. कुठलीही परवानगी न घेता हे पुतळे उभारले जात असले तरी हा अतिशय संवेदनशील विषय असल्यामुळे पोलिस व जिल्हा प्रशासनही हतबल झाले होते. मात्र हा फक्त भावनिक विषय नसून त्यामागे सामाजिक अशांतता निर्माण करणारे व व्यावसायिक षड्यंत्र असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात अशा ९ घटना घडल्या आहेत. त्यापैकी चार प्रकरणांत सहभाग असल्याचे उघड झालेल्या मास्टरमाइंडला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. बाळराजे रामराज आवारे (रा. महाकाळ, ता. अंबड जि. जालना) असे आरोपीचे नाव आहे. या कटामागे त्याची एक टोळीच कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. बाळराजे आवारे याचा प्लास्टिकचे पुतळे बनवण्याचा कारखाना आहे. आपला उद्योग वाढवण्यासाठी त्याने सोशल मीडियाचा आधार घेत समाजाच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला. आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करायची व नंतर संबंधित गावात पुतळा उभारण्यासाठी त्याची यंत्रणा कामाला लावायचा. मार्केटिंग व प्रसिद्धीसाठी त्याने स्वतंत्र पथके तयार केली होती. या माध्यमातून तो गावकऱ्यांमध्ये भावनिक आवाहन करण्यात तरबेज झाला होता. विशेष म्हणजे, अवघ्या २५ ते ३० हजार रुपयांत तयार होणारा फायबरचा पुतळा तो गावातील तरुणांना चिथावून एक ते सव्वा लाखांना विकायचा. आरोपीच्या षड्यंत्रामागे राजकीय पाठबळ जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्यासाठी एक टोळी हे काम करत असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही दिली. कायदा व सुव्यवस्था बिघडवून अशांतता निर्माण करण्यासाठी ही टोळी काम करते. पुतळा बसवणारे वेगळे, समाज माध्यमात शांतता पसरवणारे वेगळे यासाठी कट रचणारे असे काम ही टोळी करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आधी या टोळीने मराठवाड्यात अशी कामे केली नंतर सोलापूरला टार्गेट केले. या टोळीमागे राजकीय पाठबळ असल्याचाही संशय आहे.
अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम आता थेट विकासकामांवर होताना दिसतोआहे. आखाती देशातून रस्त्यांसाठी आयात होणारा डांबराचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे डांबराची किंमत 2 महिन्यांत ३० हजार रुपये प्रति टन वाढली आहे. एकीकडे कमी पुरवठा अन् दुसरीकडे दरवाढीच्या कात्रीत सापडलेल्या कंत्राटदारांनी खरेदीही थांबवली आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे २४ हजार किमी रस्ते डांबरीकरण मंदावले आहेत. पावसाळ्यात डांबरीकरण होत नसल्याने दोन महिन्यांत तोडगा न निघाल्यास कामे रखडणार आहेत. रस्त्यांसह अन्य कामांसाठी भारतात डांबराची वार्षिक मागणी सुमारे ९० लाख टन आहे. यापैकी सुमारे ४० ते ४५ टक्के माल हा इराणसह आखाती देशांकडून आयात केला जातो. इराण हा भारताचा सर्वात मोठा डांबर पुरवठादार आहे. परंतु सागरी मार्ग बंद झाल्याने त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. मागणी जास्त पुरवठा कमी असल्याने किमती वाढल्या आहेत. वाढीव दरात डांबर खरेदी परवडेना राज्य शासनाने गेल्या तीन वर्षापासून कंत्राटदारांची बिले अदा केलेली नाहीत. त्यात सर्वच साहित्य क्रेडीटवर खरेदी करणे आता अडचणीचे झाले आहे. जानेवारीत ५४ हजार मेट्रिक टन डांबराचे दर आता ८४ हजारांवर पोहोचले आहेत. टनामागे करासह तब्बल ३० हजारांची वाढ झाल्याने वाढीव दरात खरेदी करणे परवडत नाही. यामुळे राज्यातील २४ हजारापेक्षा जास्त लांबीचे सर्व विभागांकडील डांबरीकरणाचे काम मंदावले आहे. - मिलिंद भोसले, राज्य अध्यक्ष, राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना. कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे कामे थांबण्याची शक्यता जळगाव जिल्ह्यात सुमारे ४५० किमीची डांबरी रस्त्यांची कामे सुरू आहेत. डांबराचे दर वाढले तरी ठेकेदारांना वाढीव दराने खर्च मिळतो. परंतु पुरवठा न झाल्यास त्याचे परिणाम होऊ शकतात. ठेकेदारांच्या काम बंद आंदोलनामुळे कामे थांबण्याची शक्यता आहे. - प्रशांत सोनवणे, अधीक्षक अभियंता, पीडब्ल्यूडी.
महिलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भोंदू अशोक खरातला अनेक बड्या नेत्यांनी कॉल केले होते. त्यात प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार तसेच महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर, उद्धवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा समावेश होता, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. त्यांनी खरात-नेत्यांचे सीडीआरही (कॉल डिटेल्स रेकॉर्ड) सादर केले. हे सीडीआर मुख्यमंत्री कार्यालयातूनच दमानिया यांना देण्यात आले, असा आरोप खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे यांनी केला होता. त्यावर सोमवारी दमानिया म्हणाल्या की, एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हने हा सीडीआर मला दिला. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारचा सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार तपास यंत्रणेलाच आहे. त्यामुळे हा सीडीआर कोणी लीक केला याची चौकशी राज्य सरकार करेल. दमानिया म्हणाल्या की, सीडीआरमधील टेलिकॉम ऑपरेटरचे हॉलमार्क्स, टॉवर लोकेशन आयडी अचूक आहेत. १ एप्रिल रोजी एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हने मला संपर्क साधला. त्याच्या कंपनीची वेबसाइट आणि व्हॉट्सअॅप लिंकवरून पडताळणी केल्यानंतर दुपारी १२:४९ वाजता त्यांना एक मोठी एक्सेल शीट प्राप्त झाली. ती पोलिस महासंचालक, गृहमंत्री आणि एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते यांना पाठवून तपासाची मागणी केली. पतसंस्थेचा संशयास्पद व्यवहार दमानिया म्हणाल्या, अजित पवारांचे निधन होण्याआधी खरातच्या फोनवर १७ मेसेजेस आले. २८ जानेवारीला म्हणजे अपघाती निधनाच्या दिवशी १९ मेसेजेस आले. एकाच दिवशी इतके मेसेजेस येणे, मोठ्या आर्थिक अफरातफरीचे लक्षण आहे. कायदा मोडीत काढलाय, तुरुंगात जावे लागू शकते प्रायव्हेट डिटेक्टिव्हला किंवा कोणत्याही खासगी व्यक्तीला सीडीआर काढण्याचा किंवा देण्याचा कोणताही अधिकार नाही. हे गुन्हेगारी कृत्य आहे. अशा प्रकरणांमध्ये यापूर्वी अनेक प्रायव्हेट डिटेक्टिव्हना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणातही योग्य तपास झाला तर तुरुंगात जावे लागू शकते. मोबाइल कंपनीचा नोडल ऑफिसर माहिती पुरवण्याच्या प्रक्रियेत पूर्णपणे जबाबदार असतो. यात सरकारी कर्मचारी सहभागी असतील तर निलंबनापासून बडतर्फीपर्यंत कारवाई होऊ शकते. ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट’ आणि ‘आयटी अॅक्ट’ (उदा. कलम ६५) अंतर्गत गुन्हे दाखल होऊ शकतात.
नांदेड शहरात मागील ७० तासांत पाच जणांचे खून झाले. पूर्वीच्या दोन घटनांतील तपास सुरू होण्यापूर्वीच ६ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता श्रीनगर येथे शिवसेनेचा माजी युवा सेना शहरप्रमुख सोनू कल्याणकर याची प्रेमप्रकरणातून चाकूने वार करून हत्या करण्यात आली. कल्याणकर याच्या शरीरावर तब्बल १७ घाव होते. त्यांना उपचारासाठी आयटीआय परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी अवघ्या सहा तासांत अटक केली आहे. सोनू कल्याणकर यांचे गोलू मंगनाळे याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. मंगनाळे कुटुंबीयांनी सोनू कल्याणकरची समजूत काढून हे प्रेमप्रकरण संपवण्यासाठी प्रयत्न केले; परंतु मंगनाळे याच्या बहिणीची सोयरीक जुळल्यानंतरही सोनू कल्याणकरने ती सोयरीक मोडण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यामुळे गोलू मंगनाळे याने २०२१ मध्ये सोनू कल्याणकर याच्यावर घरी जाऊन गोळ्या झाडल्या होत्या. सुदैवाने त्या वेळी सोनू कल्याणकर बचावला होता. नंतरच्या काळात संजय बियाणी हत्या प्रकरणात गोलू मंगनाळेला अटक करण्यात आली. तो सध्या कारागृहात बंदिस्त आहे; परंतु सोनू कल्याणकरचा सूड घेण्यासाठी गोलू मंगनाळे प्लॅन करीत होता. तुरुंगातील त्याचा साथीदार रोहित लोट हा पॅरोलवर सुटल्यानंतर त्याच्यामार्फत सोनू कल्याणकरचा खून करण्याचा प्लॅन करण्यात आला. पोलिसांनी आरोपीच्या पायावर झाडली गोळी मुख्य आरोपी अंकुश गंदमवार हा झरी परिसरात लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडून ताब्यात घेतले. या प्रकरणातील आरोपी प्रसाद ऊर्फ ऋषी शिंदे, कृष्णा जोगदंड, रवी ऊर्फ रोहित लोट यांना अटक केली. मॉर्निंग वॉक करताना गाठले रोहित लोट, अंकुश गंदमवार, प्रसाद ऊर्फ ऋषी शिंदे आणि कृष्णा जोगदंड या चौघांनी कट रचून ६ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता सोनू कल्याणकर श्रीनगरला मॉर्निंग वॉक करत असताना सोनू कल्याणकरला गाठले. त्याच्यावर चाकूचे १७ वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत सोनूला नागरिकांनी रुग्णालयात हलवले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अविनाशकुमार, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. ४ एप्रिल रोजी झाले दोन गँगमध्ये टोळी युद्ध, तिघांचा मृत्यू टोळीयुद्धात अर्जितसिंह चव्हाण, महमद अरबाज आणि सय्यद आवेज या तिघांचा खून झाला होता. ५ एप्रिल रोजी रणजितसिंग तबेलेवाले याची निर्घृण हत्या करण्यात आली तर ६ एप्रिल रोजी सोनू कल्याणकरचा खून करण्यात आला.
विषबाधेत ३ चिमुकल्यांचा मृत्यू
बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे आईसह चार मुलांना विषबाधा झाली होती. यामध्ये तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला. एकाच कुटुंबातील आईसह चार मुलांना विषबाधा झाल्याने ३ लहानग्या बहीण-भावांचा मृत्यू झाला असून आई व एका चिमुकलीवर उपचार सुरु आहेत. मोहंमद अली मोहंमद वसीम जमदार (४), मशिरा मोहंमद वसीम […] The post विषबाधेत ३ चिमुकल्यांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रेणा कारखानास्थळी अभिषेक, आरती, वृक्षारोपण
रेणापूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आ. धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रेणा सहकारी साखर कारखानास्थळी सोमवारी (दि.६) श्री सिध्दीविनायक मंदीर येथे अभिषेक, आरती व साई मंदीरात आरती करण्यात आली. जिल्हा बँकेचे चेअरमन तथा कारखान्याचे संचालक धिरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रेणा कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर, व्हाईस चेअरमन अॅड. प्रवीण पाटील, […] The post रेणा कारखानास्थळी अभिषेक, आरती, वृक्षारोपण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराण ठाम, ना होर्मुझ खुले होणार, ना युद्धविराम होणार तेहरान : वृत्तसंस्था पश्चिम आशियातील संघर्ष थांबविण्यासाठी पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की देशांनी मध्यस्थी करीत अमेरिका आणि इराणला ४५ दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, हा प्रस्ताव धुडकावून लावत इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. ना होर्मुझ सामुद्रधुनी खुली होणार, ना युद्धबंदी होणार, […] The post युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कुंभमेळ््याचे हजारावर कामांचे टेंडर मॅनेज?
लाचखोर कक्ष अधिका-याची ऑडिओ क्लिप व्हायरल मुंबई : निधी मंजूर करण्यासाठी मंत्रालयात ६ लाख ३७ हजारांची लाच घेताना अटक करण्यात आलेला कक्ष अधिकारी विलास लाडची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये त्याने नाशिकमध्ये होणा-या कुंभमेळ््याच्या टेंडरबाबत धक्कादायक दावे करताना दिसत आहे. कुंभमेळ््यासाठीच्या १ हजार २१ प्रकारच्या कामांचे टेंडर मॅनेज करून लोकांना […] The post कुंभमेळ््याचे हजारावर कामांचे टेंडर मॅनेज? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निलंगा येथे गॅसटंचाईविरोधात चुली पेटवून आंदोलन
निलंगा : प्रतिनिधी घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईने हैराण झालेल्या नागरिकांच्या प्रश्नास वाचा फोडण्यासाठी निलंग्यात वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भर उन्हात रस्त्यावर चुली पेटवून भाकरी चहा बनवत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले.दरम्यान उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांच्या निवेदनासह भाकरी-चहा भेट दिल्या. राज्यात सुरू असलेल्या ‘नरेंदर कब मिलेगा सिलेंडर’ या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून […] The post निलंगा येथे गॅसटंचाईविरोधात चुली पेटवून आंदोलन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा
लातूर : प्रतिनिधी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या शिक्षण प्रक्रियेतील त्रिसूत्री आहेत. आजची पिढी सुशिक्षित करण्याकडे आपला भर असून संस्काराकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वर्तमान स्थितीत विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पूर्वीची पिढी आई-वडिलांसाठी प्राण द्यायला तयार होत होती, परंतु आजची पिढी त्यांच्यासुध्दा प्राणावर उठली आहे. विनयशीलता, श्रद्धाभाव आणि संवेदनशीलता या बाबींचा […] The post संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मेंदूविकार तपासणी शिबिरात ७६ जणांवर उपचार
लातूर : प्रतिनिधी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, दिव्यांग सक्षमीकरण विभाग आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे दिव्यांगजनांसाठी विशेष मेंदूविकार आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ७६ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार करून त्यांना पुढील ३ महिन्यांसाठी आवश्यक असणा-या औषधांचे मोफत वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या […] The post मेंदूविकार तपासणी शिबिरात ७६ जणांवर उपचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर : प्रतिनिधी युवकांचे प्रेरणास्थान, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रोकडेश्वर मंदिर येथे रोकडेश्वर महाराजांचा अभिषेक व आरती करण्यात आला. तसेच त्याांना सुख, समाधान, उत्तम आरोग्य व उदंड आयुष्यासाठी रोकडेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळ जिल्हा परिषद सदस्य महादेव मस्के, कृषी उच्चतम बाजार समिती सदस्य युवराज जाधव, माजी पंचायत समिती […] The post रोकडेश्वरला अभिषेक व आरती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारदान्याअभावी हरभ-याची खरेदी ठप्प
लातूर : प्रतिनिधी लातूरच्या आडत बाजारात हरभ-याला हमीभावापेक्षा ३०० ते ४०० दर कमी मिळत असल्याने शेतकरी हमीभाव खरेदी केंद्राकडे वळले. शेतक-यांनी २३ हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी केल्यानंतर ज्या शेतक-यांना हरभरा विक्रीसाठी एसएमएस पाठवले. ते शेतकरी शेतमाल विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्रावर जाऊ लागले. मात्र हमीभाव खरेदी केंद्रावरील बारदाना संपल्याने गेल्या आठ दिवसापासून हरभ-याची खरेदी ठप्प झाली […] The post बारदान्याअभावी हरभ-याची खरेदी ठप्प appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांनी टोक गाठले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, या महायुतीच्या प्रयत्नांना काँग्रेसने सुरुंग लावत आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याने खळबळ उडाली आहे. यावरून पार्थ पवार यांनी काँग्रेसवर निशाणा साधल्यानंतर, काँग्रेसने अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून पार्थ पवारांचा 'कृतघ्न' असा उल्लेख करत अत्यंत बोचरी टीका केली आहे. यामुळे बारामतीतील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिल्याने पार्थ पवार यांनी संताप व्यक्त केला होता. काँग्रेसला कळायला हवे की ते काय करत आहेत. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला माहिती नाही, पण लोक हे विसरणार नाहीत. या निर्णयामुळे भविष्यात त्यांना महाराष्ट्रात काय त्रास होईल, हे त्यांना दिसेल, असा इशारा पार्थ पवारांनी दिला होता. त्यांच्या या विधानानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेसने नेमके काय म्हटले? पार्थ पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसने त्यांच्या राजकीय परिपक्वतेवरच बोट ठेवले. धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? अशा शब्दांत काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले. सरेंडर झालेल्यांनी काँग्रेसबद्दल न बोललेले बरे स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील, असा खोचक सल्ला काँग्रेसने पार्थ पवार यांना दिला. आमच्या उमेदवाराच्या मागणीवर बोलायला हवे या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे. असेही काँग्रेसने म्हटले आहे. हे ही वाचा… बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचा काँग्रेसला अधिकार:शरद पवार यांचे विधान, पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेवरही भाष्य काँग्रेस हा एक मोठा आणि स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक निवडणुकीत कुणीतरी विरोधात लढणारच, हे गृहीत धरूनच रिंगणात उतरावे लागते. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याबाबत अधिक चर्चा करण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारीकीची शपथ घेतली. यानंतर दिल्लीत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी बारामती पोटनिवडणूक, अशोक खरात प्रकरण, पार्थ पवार यांसह विविध मुद्द्यावर भाष्य केले. सविस्तर वाचा…
अमरावती येथे झालेल्या किसान-मजूर परिषदेत भारत-अमेरिका कृषी करारावर तीव्र टीका करण्यात आली. या करारामुळे भारतीय शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याचे मत प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. महेंद्र मेटे यांनी मांडले. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का देणारे निर्णय सातत्याने घेतले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा शाखेतर्फे येथील सुदामकाका भवनात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भाई प्रा. अरविंद वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस अशोक सोनारकर, प्रा. विजय रोडगे, प्रा. साहेबराव विधळे आणि बांधकाम कामगार फेडरेशनचे राज्य सचिव संजय मंडवधरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रा. डॉ. महेंद्र मेटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, केंद्र सरकारने केलेला हा करार भारतीय शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक ठरेल आणि तो शेतकऱ्यांना गुलाम बनवण्यासारखा आहे. विकसित देशांतील मोठ्या प्रमाणावर अनुदानित शेतीसमोर भारतीय लहान शेतकरी तग धरू शकणार नाहीत, या वास्तवाकडे दुर्लक्ष करून हा करार पुढे रेटला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकजूट होऊन या धोरणांविरोधात उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. या परिषदेत अखिल भारतीय किसान सभा, भारतीय खेत मजदूर युनियन आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन कौन्सिल (आयटक) या संघटनांचा सक्रिय सहभाग होता. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या, अपुऱ्या मोबदल्याचा प्रश्न आणि पुनर्वसनातील त्रुटी यावरही सखोल चर्चा करण्यात आली. इतर वक्त्यांनी भारतीय शेतीवर वाढत असलेल्या परकीय दबावावर चिंता व्यक्त केली. भारत-अमेरिका करारामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती असून, हा लढा केवळ कराराविरोधात नसून भारतीय शेतीच्या अस्तित्वासाठी असल्याचे मत त्यांनी मांडले. शेती वाचवायची असेल, तर केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांविरोधात कठोर संघर्ष करावा लागेल, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. या परिषदेचे प्रास्ताविक किसान सभेचे पुढारी सतीश चौधरी यांनी केले, तर प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी एम. वाय. शहाणे, धनंजय मस्के, राजेश चर्जन, अर्चना भांडवलकर, लक्ष्मणराव धाकडे, जे. एम. कोठारी, निळकंठ ढोके, प्रा. प्रफुल कडू यांच्यासह जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अमरावती येथे १० एप्रिल रोजी ज्येष्ठ गझलकार भीमराव पांचाळे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 'पुस्तकतुला' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जमा झालेली पुस्तके स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या स्थापनेनिमित्त आयोजित या कार्यक्रमात भीमराव पांचाळे यांची विशेष गझल मैफलही रंगणार आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक भवनात होणार आहे. भीमराव पांचाळे हे अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील आष्टगावचे मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाचा भाग म्हणून असोसिएशनने हा उपक्रम हाती घेतल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष नितेश राऊत आणि सचिव सूरज दहाट यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. भीमराव पांचाळे हे सुरुवातीपासूनच पुस्तकप्रेमी आहेत. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त होणाऱ्या पुस्तकतुलेतून जमा होणारी ग्रंथसंपदा जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासकांना दिली जाईल. यामुळे भविष्यात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा असोसिएशनने व्यक्त केली आहे. यावेळी असोसिएशनचे मार्गदर्शक यशपाल वरठे, उपाध्यक्ष स्वप्नील उमप, सहसचिव अनिरुद्ध दवाळे, कोषाध्यक्ष अमोल देशमुख, कार्यकारिणी सदस्य संजय शेंडे, सुरेंद्र आकोडे, अमर घटारे, शुभम बायस्कर, अनिकेत दहातोंडे आदी उपस्थित होते. भीमराव पांचाळे हे मराठी गझल गायकीला वेगळा साज चढवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या मैफलीत 'जखमा कशा सुगंधी, अंदाज आरशाचा...', 'अंदाज आरशाचा वाटे खरा असावा...', 'तू नभातले तारे...', 'आयुष्य तेच आहे...', 'मी किनारे सरकताना...' अशा त्यांच्या अनेक लोकप्रिय गझला ऐकायला मिळतील. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक आणि गझलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी आज, सोमवारी सकाळी आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सर्व विभागांची पाहणी केली. तसेच, कॅन्टीनमध्ये पराठा आणि मठ्ठा घेऊन त्याचे बिल ऑनलाइन भरल्याने त्यांच्या कार्यशैलीची चर्चा सुरू आहे. सीईओ गांधी यांनी अतिरिक्त सीईओ विनय ठमके यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी 'वैदर्भी' या जिल्हा परिषदेच्या कॅन्टीनला भेट दिली. तिथे त्यांनी पराठा आणि मठ्ठा घेतला आणि ऑनलाइन पद्धतीने शंभर रुपयांचे बिल अदा केले. पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी सर्व विभागांची पाहणी करून कॅन्टीनमधील पदार्थांची चव घेणारे सत्यम गांधी हे पहिले सीईओ ठरले आहेत. २०२१ च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असलेले गांधी यापूर्वी सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त होते. त्यामुळे त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करण्याचा अनुभव आहे. पाहणीदरम्यान, त्यांनी प्रत्येक विभागात जाऊन विभागप्रमुखांचे दालन, त्यांची उपस्थिती, कर्मचाऱ्यांची ओळखपत्रे आणि सामान्यांना विभागप्रमुखांची ओळख व्हावी यासाठी नेमप्लेटची अनिवार्यता यावर भर दिला. बांधकाम उपविभागातील एक विभागप्रमुख अनुपस्थित आढळल्याने त्यांनी लगेच त्यांच्या दौऱ्याची नोंद रजिस्टरमध्ये आहे की नाही, याची चौकशी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी आणि स्वीय सहायक ज्ञानेश्वर घाटे उपस्थित होते. प्रत्येक विभागातील विभागप्रमुखांशी बोलताना सीईओंनी कर्मचाऱ्यांची संख्या आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांची माहिती घेतली. काही कर्मचाऱ्यांशी, विशेषतः आयटीशी संबंधित कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांनी शासनाच्या ई-गव्हर्नन्ससाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांची एकप्रकारे पडताळणी केली.
अमरावती जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला. कामात कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेणार नाही, तसेच भ्रष्ट प्रवृत्तीला थारा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली. कार्यालयात बसून काम करण्याऐवजी प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करण्याला आपले प्राधान्य असेल, असेही त्यांनी सांगितले. सांगली-मीरज-कुपवाड मनपा आयुक्त म्हणून काम केलेल्या आणि त्यापूर्वी डहाणू सारख्या आदिवासी भागात अनुभव घेतलेल्या सत्यम गांधी यांनी सांगितले की, विकसित भागात विकास कामे करणे सोपे असते, मात्र ग्रामीण भाग विकासापासून दूर असतो. जिल्हा परिषद ही प्रामुख्याने गाव-खेड्यांसाठी काम करणारी यंत्रणा आहे. त्यामुळे शासनाने सोपवलेली जबाबदारी आपण चोखपणे पार पाडू. गांधी म्हणाले की, मला कार्यालयात बसण्याऐवजी प्रत्यक्ष गाव-खेड्यात पोहोचून तेथे काय आवश्यक आहे, हे जाणून घेण्यात अधिक रस आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार आठवड्यातून किमान दोन दिवस जिल्ह्याचा दौरा करेन. डहाणू सारख्या आदिवासी प्रदेशात काम केल्याचा अनुभव असल्याने मेळघाटच्या अडचणींची मला जाणीव आहे. तेथील मुले-मुली शहरी विद्यार्थ्यांसारखीच तल्लख व्हावीत, यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहे. विशेषतः, त्या मुलांना इंग्रजी विषयात निपुण करायचे आहे. गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञान हे विषयही त्यांच्यासाठी महत्त्वाचे असल्याने त्यावरही विशेष लक्ष देणार आहे. मेळघाटच्या समस्या दूर करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तात्काळ अतिरिक्त सीईओ विनय ठमके यांच्याकडून सूत्रे घेतली. त्यानंतर विभागप्रमुखांची ओळख करून घेतली. सुमारे तासभर त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील प्रत्येक विभागाची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी जिल्हा परिषदेच्या कॅन्टीनमध्ये नाश्ता केला. आपले व्हिजन काय, या प्रश्नावर गांधी यांनी मेळघाटच्या समस्या दूर करणे हे आपले प्राधान्य असल्याचे सांगितले. मी स्वतः पूर्णवेळ काम करेन आणि इतरांची हयगय खपवून घेणार नाही. फिल्ड व्हिजिटमध्ये कोणते गाव निवडणार, यावर ते म्हणाले की, अद्याप ते ठरले नाही. मंगळवारपासून सर्व विभागांच्या बैठका घेऊन त्यानंतर फिल्ड व्हिजिटचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल. डहाणूतील अनुभवाच्या आधारे मेळघाटसाठी नवीन मॉडेल तयार केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
अमरावती येथे सिलींडरच्या तुटवड्याकडे लक्ष वेधण्यासाठी आज, सोमवारी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. आंदोलकांनी चक्क चूल पेटवून भाकरी शिजवल्या आणि सिलींडरचा पुरवठा नियोजित वेळेत करण्याची मागणी केली. या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजयकुमार चौरपगार आणि जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश बोरकर यांनी केले. देशभरात, विशेषतः अमरावतीमध्ये सिलींडरची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने 'नरेंदर कब मिलेगा सिलेंडर' हे राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला भारतीय बौद्ध महासभेनेही पाठिंबा दिला. दोन्ही संघटनांनी संयुक्तपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि आंदोलकांनी तिथेच चूल पेटवून भाकरी शिजवून आपला निषेध नोंदवला. या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभेचे संजय चोरपगार, आर. के. भटकर, मदन खंडारे, नयन मोंढे, बाबाराव गायकवाड, रमेश आठवले, शैलेश बागडे, सुरेश तायडे, अमोल जंजाळ, प्रशांत गजभिये, करण जाधव, अलंकार बागडे, आनंदराव इंगळे, विद्या तायडे, जया होमनेर, सोनू तायडे, सुधीर कांबळे, रीना गजभिये, अस्मिता बागडे, पुष्पा बोरकर, सुनिता रामटेके, मालती मेश्राम यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान 'नरेंदर..कब मिलेगा सिलेंडर', 'केंद्र सरकारचा निषेध असो', 'बाळासाहेब संघर्ष करो हम तुम्हारे साथ है', 'भारतीय बौद्ध महासभेचा विजय असो' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून सिलींडरचा पुरवठा त्वरित आणि नियमित करण्याची मागणी केली.
39 आमदारांच्या राजीनाम्यासाठी ‘सीटू’ची निदर्शने:भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून अमरावतीत आंदोलन
महिलांच्या इभ्रतीवर हात घालणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातवर कठोर कारवाईची मागणी करत, त्याच्या संपर्कातील ३९ आमदारांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी कलेक्ट्रेटवर आंदोलन करण्यात आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची कामगार संघटना ‘सीटू’ आणि जनवादी महिला फेडरेशनच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. सध्या राज्यात भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरातचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात अनेक राजकीय पुढारी गुंतले असून, राज्य महिला आयोग आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. खरातची अनेक प्रकरणे समोर येत असून, दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहेत. ‘सीटू’च्या मते, या प्रकरणात राज्यातील ३९ आमदार गुंतले आहेत. त्यामुळे सरकारने या सर्व आमदारांचे राजीनामे घेतले पाहिजेत, अशी मागणी आंदोलकांनी केली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी निदर्शकांनी तीव्र घोषणाबाजीही केली. या आंदोलनात ‘सीटू’चे सुभाष पांडे, रमेश सोनुले, राजेंद्र भांबोरे, संध्या खांडेकर, पंजाबराव शिंदे, तसेच जनवादी महिला संघटनेच्या वहिदा कलाम, पद्माताई गजभिये, चित्राताई बोरकर, चंदाताई वानखडे, नीलू मेश्राम, मालती मोहोड, मनीषा गोरे, सुनीता भोवते, रेखा वानखडे, रेहाना खान, शमा परविन, अरुणा मालविय, वंदना बुरांडे, किरण रंगारी, वैशाली नेवारे, निता मेश्राम, ममता काळे, संगीता वानखडे, मुकूंद काळे, प्रभाकर आकोटकर आदी सहभागी झाले होते.
राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राहुरीत अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. प्रबळ दावेदार मानले जाणारे प्राजक्त तनपुरे यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. प्राजक्त तनपुरे यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत, राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेण्यामागचे कारणही सांगितले. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून प्राजक्त तनपुरे शड्डू ठोकणार, अशी जोरदार चर्चा होती. तनपुरे यांनी या निवडणुकीसाठी मोठी तयारीही केली होती, ज्यामुळे राहुरीत चुरशीची लढत पाहायला मिळेल, अशी सर्वांची धारणा होती. फडणवीसांचा फोन आणि तनपुरेंची माघार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपायला काही अवधी उरला असतानाच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. या नेत्यांमध्ये बराच वेळ बंद दाराआड खलबते झाली. विशेष म्हणजे, या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फोनवरून तनपुरे यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर आणि भाजप नेत्यांच्या शिष्टाईनंतर तनपुरे यांनी आपला पवित्रा बदलला आणि निवडणुकीतून माघार घेण्याचे निश्चित केले. प्राजक्त तनपुरेंनी फेसबुकवरील पत्रात काय म्हटले? निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी फेसबुकवर एक सविस्तर पत्र पोस्ट करत, निवडणुकीतून माघार घेण्यामागचे कारण सांगितले. प्राजक्त तनपुरे पत्रात लिहिले की, “आपल्या राहुरी तालुक्याचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याचा ध्यास मनात ठेवून मी या विधानसभा पोटनिवडणुकीकडे पाहत होतो. याच जाणिवेतून राहुरीच्या विकासासाठी, इथल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, युवकांच्या स्वप्नांसाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी मी ही पोटनिवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. परंतु, आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी माझी भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही पोटनिवडणूक न लढवण्याची विनंती केली. या चर्चेदरम्यान मी त्यांच्यासमोर राहुरीच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले. राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या आणि मला समाधान आहे की त्या सर्व मुद्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या मान्य केल्या.” प्राजक्त तनपुरे म्हणाले, “जरी आपल्या राहुरीचा आमदार दुसऱ्या तालुक्यातील होणार असला, तरी राहुरीच्या विकासात कोणतीही तडजोड होणार नाही, असा ठाम विश्वास आणि आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांच्या या विनंतीचा मान राखत आणि स्व. शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली अर्पण करत मी ही राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नाही. पण हा निर्णय म्हणजे आपली लढाई थांबली असा अजिबात अर्थ नाही. आपण दोन पावले मागे घेतली आहेत. पण आता त्यानंतर चार पावले पुढे जाण्याची तयारी आहे. राहुरीच्या विकासाची, आपल्या हक्काची ही लढाई अशीच सुरू राहील अधिक ताकदीने, अधिक निर्धाराने.” प्राजक्त तनपुरे म्हणाले, “या संपूर्ण प्रवासात माझे कुटुंबीय, हितचिंतक आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते ज्या ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, त्या प्रत्येकाचा मी मनापासून ऋणी आहे. तुमचा विश्वास, तुमचं प्रेम, आणि तुमची साथ हीच माझी खरी ताकद आहे. यापुढील काळात देखील आपण असेच प्रेम द्याल व माझ्या पाठीशी उभे रहाल हा विश्वास आहे.”
तामिळनाडूत ९ पोलिसांना मृत्युदंड
चेन्नई : वृत्तसंस्था २०२० मध्ये गाजलेल्या सथानकुलम पोलिस कोठडीतील हत्या प्रकरणात न्यायालयाने निकाल दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणात तामिळनाडू पोलिस दलातील ९ जणांना दोषी धरले आहे. त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना अतिदुर्मीळ असल्याचे न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. पोलिसांनी केलेला गुन्हा अतिशय निर्घृण असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. […] The post तामिळनाडूत ९ पोलिसांना मृत्युदंड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पत्नीचा खून; नांदेड जिल्ह्यातील सहावा खून
मुखेड : प्रतिनिधी मुखेड तालुक्यातील मौजे कर्णा येथे एका विवाहितेचा पतीनेच साडीच्या पदराने गळा आवळुन खून केल्याची घटना दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात आरोपी पत्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीस पोलिसांनी अटक केले आहे. मुखेड तालुक्यातील मौजे कर्णा येथील आरोपी मारुती रामकिशन उर्फ बाबुराव […] The post पत्नीचा खून; नांदेड जिल्ह्यातील सहावा खून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच, आता या मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला खरा, मात्र त्यांच्या विरोधात आता करुणा मुंडे यांनी शड्डू ठोकला आहे. करुणा मुंडे यांनी आज अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरल्याने बारामतीचा राजकीय पारा अचानक वाढला आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी आजपर्यंत ६८ उमेदवारी अर्ज आले आहेत. महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण काँग्रेसने याठिकाणी आकाश विश्वनाथ मोरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनीही आज आपला अर्ज दाखल केला आहे. तसेच याआधी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते, मात्र त्यांनी आता निवडणुकीतून माघार घेतली आहे. या निवडणुकीचा निकाल २३ एप्रिल रोजी लागणार आहे. करुणा मुंडे काय म्हणाल्या? उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना करुणा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, गेल्या 10 दिवसांपासून मी बिनविरोध निवडणुकीच्या गप्पा ऐकत आहे. पण लोकशाहीत मतदारांना निवडीसाठी चॉईस (पर्याय) असायला हवा. कोणत्याही मोठ्या पक्षाने किंवा तगड्या उमेदवाराने अजून धाडस दाखवले नाही, म्हणून मी एक सक्षम पर्याय म्हणून जनतेसमोर आले आहे. निवडणूक झालीच पाहिजे, तरच प्रजातंत्र वाचेल विशेष म्हणजे, मी बारामती पाहिलेली नाही, त्यामुळे तिथे नक्की काय विकास झाला आहे याची मला कल्पना नाही. मात्र, अनेक बारामतीकर माझ्याकडे मदतीसाठी आले, त्यांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवत आहे. मी केवळ बारामतीचे मुद्दे घेऊन लढत नाहीये, तर संपूर्ण राज्यातील अन्यायाविरुद्ध हा माझा लढा आहे. बारामतीमधील सुशिक्षित बेरोजगार आणि शेतकऱ्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. जर मतदारांनी मला संधी दिली, तर त्या संधीचे सोनं करून मी गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र काम करेन, असे साद त्यांनी बारामतीकरांना घातली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावुक दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात चांगल्याच भावुक झाल्या. बारामतीची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे. अजितदादांचे हे विचार होते. त्यांच्यानंतर मी माझे दुःख तळघरात कोंडून तुमच्या सेवेसाठी पुढे आले आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या. बारामती ही अजित पवारांची श्वास होती. त्यामुळे त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला. त्यांचा येथील प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळा, इमारतींना स्पर्श झाला. त्यामुळे आज या सर्व गोष्टी त्यांच्या आठवणीने रडत आहेत. पण मी स्वतः माझे दुःख तळघरात कोंडले आणि अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले, असे त्या आपले आतापर्यंत दाबून ठेवलेले अश्रू मोकळे करताना म्हणाल्या.
केरळमधील शबरीमला मंदिर प्रवेश प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात ९ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ७ एप्रिलपासून (आजपासून) अंतिम सुनावणी होणार आहे. ही सुनावणी शबरीमला मंदिरापुरती मर्यादित नसून धार्मिक स्वातंत्र्य, महिलांचे अधिकार आणि समानता यासारख्या महत्त्वाच्या घटनात्मक प्रश्नांवरती त्यात उहापोह करणार आहे. या खंडपीठाचे नेतृत्व सरन्यायाधीश सूर्यकांत करणार असून न्या. बी. व्ही. नागरत्ना, न्या. एस. एम. सुंदरेश, न्या. अहसानुद्दीन अमानुल्ला, […] The post शबरीमला मंदिर सुनावणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी; ७० वर्षीय महिलेला मिळाले नवजीवन
लातूर : प्रतिनिधी येथील विलासराव देशमुख शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी मेंदूतील अत्यंत गुंतागुंतीच्या आणि जीवघेण्या ‘अॅन्युरिझम’ या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करून एका ७० वर्षीय महिला रुग्णाचे प्राण वाचविले आहेत. या यशस्वी उपचारामुळे शासकीय रुग्णालयातील अत्याधुनिक न्युरोसर्जरी सुविधा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. संबंधित रुग्ण महिला डोकेदुखी, उलट्या आणि अचानक शुद्ध हरपणे अशा गंभीर तक्रारींसह रुग्णालयात […] The post मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी; ७० वर्षीय महिलेला मिळाले नवजीवन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर जिल्ह्यातून साडेपाचशे यात्रेकरू हजला जाणार
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातून हज यात्रेसाठी पाचशेहून अधिक भाविक निघाले आहेत. त्यांच्यासाठी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात भाविकांनी आरोग्यावर लक्ष केंद्रित करावे. तसेच हज यात्रेत प्रार्थनेवर भर द्यावा, तेथील स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा, अशा सूचना हज कमिटी ऑफ महाराष्ट्रच्या प्रशासकीय अधिकारी के. एफ. नाईकवाडे यांनी रविवारी दिल्या. येथील एम. के. फंक्शन हॉलच्या सभागृहात सुफा […] The post लातूर जिल्ह्यातून साडेपाचशे यात्रेकरू हजला जाणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धिरज देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
लातूर : प्रतिनिधी लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ६ एप्रिल रोजी विविध ठिकाणी समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करुन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मांजरेश्वर हनुमान येथे अभिषेक करून माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या उदंड आयुष्यासाठी मनोकामना करण्यात आली. बोरी येथे नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर […] The post धिरज देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात साजरा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे महानगरपालिका (PMC) अनधिकृत ओव्हरहेड केबल्स टाकणाऱ्या कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली. शहराचे सौंदर्य बाधित होत असून, जीवितहानीचा धोका वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या विद्युत विभाग, अतिक्रमण विभाग आणि अग्निशमन विभागाने आज फरासखाना, बेलबाग आणि बुधवार पेठ परिसरात अनधिकृत केबल्सवर संयुक्त कारवाई केली. या कारवाईनंतर पत्रकारांशी बोलताना भिमाले यांनी पुढील कठोर कारवाईची घोषणा केली. नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ३,६०० किलोमीटर लांबीच्या केबल्स अनधिकृत असल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आले आहे. नियमांनुसार केवळ भूमिगत केबल टाकण्याची परवानगी असतानाही अनेक कंपन्यांनी खांबांवर अनधिकृतपणे केबल्स टाकून शहराचे विद्रुपीकरण केले आहे. शहरातील अनेक रस्ते, चौक आणि इमारतींवर केबल्सचे गुंतागुंतीचे जाळे निर्माण झाले आहे, ज्यामुळे अपघात घडले आहेत. काही कंपन्या गायरोपचा वापर करतात, ज्यात ॲल्युमिनियम तारांचा समावेश असल्याने विजेचा धक्का लागून मनुष्यहानी होण्याची भीती आहे. अशा अनधिकृत केबल्सवर धडक कारवाई केली जात आहे. कारवाई केल्यानंतरही काही कंपन्या पुन्हा नव्याने अनधिकृत केबल्स टाकतात. अशा कंपन्यांवर आता फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील, असे भिमाले यांनी स्पष्ट केले. केबल्स टाकण्यासाठी महापालिकेची पूर्वपरवानगी आणि शुल्क भरणे अनिवार्य आहे. विविध सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी महापालिकेकडून रीतसर परवानगी घेऊन केवळ भूमिगत केबल्सच टाकाव्यात. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर पुढील काळात कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सेवा पुरवणाऱ्या छोट्या ऑपरेटर किंवा 'वर्क फ्रॉम होम' करणाऱ्यांना या कारवाईमुळे अडचण निर्माण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात महापौर मंजुषा नागपुरे यांच्या दालनात आज छोट्या ऑपरेटरच्या शिष्टमंडळासोबत एक बैठक घेण्यात आली. महापौरांच्या निर्देशानुसार, छोट्या ऑपरेटर कंपन्यांसाठी एक नियमावली तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या नियमावलीचे पालन करून महापालिकेत रीतसर शुल्क जमा करणे बंधनकारक राहील. एक एप्रिलपासून शहराच्या विविध भागांमध्ये ही कारवाई सातत्याने सुरू आहे. आतापर्यंत सुमारे शंभर किलोमीटरच्या केबल्स हटविण्यात आल्या आहेत. आगामी महिनाभरात सुमारे तीन हजार किलोमीटरच्या केबल्स हटविण्याचे उद्दिष्ट असल्याचे भिमाले यांनी नमूद केले.
दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा परिसरात एका अज्ञात कारने सुरक्षा यंत्रणेला चकवा देत थेट आत प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली. बॅरियर तोडून विधानसभा परिसरात प्रवेश केल्यानंतर, संबंधित कारने तेथून पळ काढला. या अनपेक्षित घटनेमुळे तिथे तैनात असलेले सुरक्षा रक्षक काही काळ गोंधळून गेले. ही घटना विधानसभेच्या गेट क्रमांक २ जवळ घडली. घटनेची माहिती मिळताच दिल्ली […] The post दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पाकच्या शांतता प्रस्तावाला इराणने धुडकावले
तेहरान : इराण, इस्रायल आणि अमेरिकेतील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. मात्र, आता पाकिस्तानने तयार केलेला १५ सूत्रीय शांतता प्रस्ताव इराणने नाकारल्याचे समोर आले आहे. युद्धविरामाबाबत कोणतीही चर्चा इराणच्या राष्ट्रीय हितांच्या आधारेच होईल, अशी स्पष्ट भूमिका इराणने घेतली आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानने अमेरिका आणि इराण या दोन्ही […] The post पाकच्या शांतता प्रस्तावाला इराणने धुडकावले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चीनकडून सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी
बीजिंग : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जगावर महायुद्धाचे सावट असतानाच, ड्रॅगन म्हणजेच चीन एक वेगळीच खेळी खेळत आहे. चीन सध्या पिसाटल्यासारखी सोन्याची आणि चांदीची खरेदी करत आहे. या खरेदीमागे चीनचा एक मोठा सीक्रेट प्लॅन असून तो थेट अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देणारा ठरू शकतो. इराण-अमेरिका युद्धाचा जागतिक पुरवठा साखळीवर आणि डॉलरच्या स्थिरतेवर परिणाम होण्याची […] The post चीनकडून सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : देशभरात एलपीजीचा तुटवडा जाणवतो आहे, स्वयंपकासाठी लोकांना एलपीजी सिलिंडर मिळत नाहीये. आम्ही विरोधक म्हणून या प्रश्नी सातत्याने आवाज उठवत आहोत. तरीही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही पावले उचलायला तयार नाहीत. त्यांचा हा कारभार कोव्हिड काळातल्या नीतीशून्य कारभारासारखाच आहे असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान […] The post मोदींचा कारभार नीतीशून्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
४ मे नंतर सर्वांचा हिशेब होणार
कूचबिहार : मालदामध्ये न्यायालयीन अधिका-यांना घेराव घालण्याची घटना म्हणजे, पश्चिम बंगालमधील तृणमूलच्या ‘महा जंगलराज’चे लक्षण असल्याचे टीका पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केली. विधानसभा निवडणुका सत्ताधारी पक्षाने पसरवलेल्या ‘भय’ आणि भाजपच्या ‘भरोसा’ यांच्यातील लढत असल्याचेही मोदी यांनी म्हटले आहे. कूचबिहार येथे बंगालमधील पहिल्या प्रचारसभेला संबोधित करताना मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली. राज्याच्या भविष्यासाठी ही […] The post ४ मे नंतर सर्वांचा हिशेब होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
न्यायाधीशाने केली मृत न्यायाधीशाच्या घरात ‘हातसफाई’
चंडीगड : पंजाबमधील एका न्यायाधीशाने दुुस-या न्यायाधीशाच्या मृत्यूनंतर त्याच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली असून चोरी करणा-या न्यायाधीशांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला. कंवलजीत सिंह हे सांगूर येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. १ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीय […] The post न्यायाधीशाने केली मृत न्यायाधीशाच्या घरात ‘हातसफाई’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ओडिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट
रांची : एकीकडे केंद्र सरकारकडून देशातून नक्षलवाद संपल्याची घोषणा केली गेली असतानाच आज ओदिशा-झारखंड सीमेवर असलेल्या सारंडाच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी आयईडीद्वारे स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात एक जवान गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील नक्षली कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या भागात घडली आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाकडून परिसरामध्ये […] The post ओडिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मध्यपूर्वेतील युद्धात भारत निभावू शकतो मोठी भूमिका
तेहरान : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. इतके दिवस होऊनही युद्धविराम किंवा होर्मुझ सामुद्रधुनी उघडण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्किए हे देश मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अजून अंतिम करारावर सहमती झालेली नाही. अशातच, इराणने भारताच्या कूटनीतीचे कौतुक केले आणि भारत […] The post मध्यपूर्वेतील युद्धात भारत निभावू शकतो मोठी भूमिका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘ग्रीन आशा’ लवकरच मायदेशात येणार
नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या सावटात भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली असून जागतिक तेल व्यापाराचे केंद्र असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील कडक नाकाबंदीतून भारताचे ८ वे व्यापारी जहाज ग्रीन आशा सुखरूप बाहेर पडले आहे. सुमारे २०,००० टन एलपीजी घेऊन हे जहाज रविवारी दुपारी ३:३० वाजता इराणच्या जलक्षेत्रातून […] The post ‘ग्रीन आशा’ लवकरच मायदेशात येणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जालना शहरातील राजपूत वाडी परिसरात रविवारी (दि. ५) दुपारी एक अत्यंत दुर्मिळ आणि रहस्यमय प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका विद्युत खांबाजवळील जमिनीतून अचानक लाव्हासारखा धगधगता आणि चिकट पदार्थ बाहेर पडू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यासंबंधीच्या वृत्तानुसार, रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना विद्युत खांबाच्या पायाशी गरम, अर्धद्रवरूप आणि शिलारसासारखा (लाव्हा) दिसणारा पदार्थ बाहेर येऊ लागला. जमिनीतून असा पदार्थ बाहेर येत असल्याचे पाहून नागरिक भयभीत झाले. काही तरुणांनी या घटनेचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर प्रसारित केल्याने शहरात या 'लावा'ची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्काळ या ठिकाणापासून दूर जाणे पसंत केले. प्रशासनाची धाव आणि प्राथमिक अंदाज घटनेची गांभीर्य ओळखून नागरिकांनी तत्काळ महावितरण विभागाला याची माहिती दिली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित केला. निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, जमिनीखालील अतिरिक्त उष्णतेमुळे असा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. विद्युत गळती की रासायनिक प्रक्रिया? हा पदार्थ नेमका काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता मिळालेली नाही. मात्र, विद्युत खांबाजवळून हायव्होल्टेज वायर जात असल्याने जमिनीत विद्युत गळती (Earth fault) होऊन प्रचंड उष्णता निर्माण झाली असावी आणि त्या उष्णतेमुळे जमिनीतील दगड, माती किंवा प्लास्टिकच्या केबल वितळून हा लाव्हासारखा पदार्थ तयार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. नागरिकांना सतर्कतेचे आवाहन महावितरण आणि महसूल विभागाकडून या घटनेचा तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे. वस्तुस्थिती समोर येईपर्यंत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि संबंधित जागेपासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या घटनेमुळे भूगर्भातील हालचालींबाबतही काही तर्कवितर्क लढवले जात असले तरी, तज्ज्ञांच्या अहवालानंतरच खरा प्रकार समोर येईल. हे ही वाचा… ग्राहकाला ओटीपी येऊनही सर्व्हर डाऊनमुळे सिलिंडर मिळेना:पहाटे ४ वाजल्यापासून ग्राहकांनी सिलिंडर मिळविण्यासाठी एजन्सीसमोर लांबच लांब रांग घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, तीर्थपुरी, रांजनी तसेच राणी उचेगाव येथे गॅस एजन्सीचे वितरक आहेत. कुंभार पिंपळगाव तसेच तीर्थपुरी येथे पहाटे ४ वाजल्यापासून ग्राहकांनी सिलिंडर मिळविण्यासाठी एजन्सीसमोर लांबच लांब रांग लावल्याचे दिसून आले. दरम्यान ओटीपी येऊनही सर्व्हर डाऊन असल्याने, सिलिंडरचा तुटवडा असल्याने, भर उन्हात दिवसभर उभे राहूनही नागरिकांना सिलिंडर मिळाले नाहीत. त्यामुळे नाराजी पसरली आहे. सविस्तर वाचा…
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर महागाईचा निषेध करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चूल पेटवून चक्क भाकऱ्या थापल्या. या प्रतिकात्मक आंदोलनाच्या माध्यमातून सातारा जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले. सातारा येथे राज्यभरातील गॅस टंचाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर या घोषणांनी लक्ष वेधून घेण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा लगत चूल पेटवून कार्यकर्त्यांनी चक्क भाकऱ्या थापल्या. या आंदोलनाबाबत बोलताना रामदास कांबळे म्हणाले, गॅस तुटवड्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. छोटे व्यावसायिक हॉटेल्स तसेच विद्यार्थ्यांच्या जीवन व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. अकोला व अमरावती येथे गॅस साठी रांगेत उभे राहणाऱ्यांची मृत्यू झाले आहेत. गॅसची कृत्रिम टंचाई थांबवणे काळाबाजार रोखणे सिलेंडर वितरणाची अट शिथिल करणे कम्युनिटी किचन सुरू करणे इत्यादी मागण्या प्रशासनाकडे करण्यात आले आहेत. याबाबत शासनाने तातडीने भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेस हा एक मोठा आणि स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येक निवडणुकीत कुणीतरी विरोधात लढणारच, हे गृहीत धरूनच रिंगणात उतरावे लागते. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध न होण्याबाबत अधिक चर्चा करण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारीकीची शपथ घेतली. यानंतर दिल्लीत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी बारामती पोटनिवडणूक, अशोक खरात प्रकरण, पार्थ पवार यांवर आपले मत व्यक्त केले. नेमके काय म्हणाले शरद पवार? माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेबाबत बोलताना शरद पवार भावूक झाले. ते म्हणाले, अजितदादांच्या जाण्याने आमच्या संपूर्ण कुटुंबाला मोठे दुःख झाले आहे. ते लोकांसाठी अत्यंत सक्रिय होते आणि विकासकामांत त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्याबद्दल मनात आदर आहे, हे मान्यच करावे लागेल. सध्या पवार कुटुंबात 'कुटुंबप्रमुख' म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही बारामतीची ही पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आम्ही या निवडणुकीत कोणाचाही प्रचार करणार नाही. राष्ट्रवादीच्या बॅनरवर माझा फोटो वापरणे चुकीचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज बारामती विधानसभा पोटनिवणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी आयोजित केलेल्या सभेत पक्षाच्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह शरद पवार यांचाही फोटो होता. याबाबत शरद पवार यांना विचारले असता, त्यांच्या पक्षाच्या बॅनरवर एनडीएच्या नेत्यांचे फोटो असण्यात काही अडचण नाही. कारण ते एनडीएमध्ये आहेत. पण राष्ट्रवादीच्या बॅनरवर माझा फोटो वापरणे चुकीचे आहे. विलीनीकरणाच्या चर्चांवर पडदा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही शरद पवार यांनी पडदा टाकला. “विलीनीकरणाची चर्चा ही जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये सुरू होती. मात्र, सध्या आमच्या पक्षात विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. अजितदादांसोबत या संदर्भात पाच- सहा बैठका झाल्या. बैठक झाल्यावर दोघांपैकी एक येऊन मला ब्रिफिंग करायचे. भविष्यात ही प्रक्रिया पुढे होऊ शकते की नाही आज ते सांगता येत नाही. अजित पवारांचा दृष्टिकोण आणि आग्रह हा आमच्या लोकांना समाधान देणारा होता. ते गेल्यामुळे ते कंटिन्यू राहिलं नाही. त्यामुळे आता पक्षाचं काम करत राहावं अशीच भूमिका आहे.” असे ते म्हणाले. बारामती अन् राहुरी पोटनिवणुकीवर भाष्य बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर भाष्य करताना पवार म्हणाले की, महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून काँग्रेसला माघार घेण्याबाबत सांगण्याची आम्हाला गरज वाटत नाही. राजकारणात पराभव झाला तरी लोक लोकांची कामे करण्यासाठीच मैदानात उतरत असतात. राहुरीतून प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली की नाही, याची मला अद्याप माहिती नाही. पार्थ पवार आणि खरात प्रकरणावर टिप्पणी यावेळी पत्रकारांनी पार्थ पवार यांच्या राजकीय परिपक्वतेबाबत विचारले असता, त्यांच्याकडे परिपक्वता आहे की नाही, हे मला माहिती नाही, असे त्रोटक उत्तर पवारांनी दिले. तसेच, राज्यात गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणावर बोलताना, खरातला फोन करणाऱ्यांमध्ये अनेकांची नावे समोर येत आहेत, त्याची चौकशी होईलच, असे सूचक विधानही त्यांनी केले.
पाचव्या खुनातील आरोपीला गोळीबार करून पकडले
नांदेड : प्रतिनिधी गेल्या तीन दिवसांपासून नांदेड शहर हादरले आहे. तीन दिवसांत पाच जणांची हत्या झाल्यामुळे नांदेड शहराचे बिहार होत आहे का, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. नागरिकांचा संताप लक्षात घेता पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांना तात्काळ गुन्हेगारांना पकडा असे आदेश दिल्यानंतर सोमवारी दुपारी झरी परिसरात मुख्य […] The post पाचव्या खुनातील आरोपीला गोळीबार करून पकडले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वाईत गद्दारीचा निषेध:विराज शिंदेंच्या विरोधात राष्ट्रवादीचा विराट मोर्चा, पुतळ्याचे जोडे मारून दहन
राष्ट्रवादी काँग्रेसशी प्रतारणा करून भाजपशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवत, सोमवारी (आज ) वाई शहरात विराज शिंदे आणि जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि बावधन गटातील मतदारांनी भव्य निषेध मोर्चा काढला. मतदारांशी बेईमानी करणाऱ्यांचा धिक्कार असो अशा उपरोधिक आणि संतप्त घोषणांनी यावेळी संपूर्ण वाई शहर दणाणून गेले होते. नियोजित आराखड्याप्रमाणे सोमवारी सकाळी अकरा वाजता महागणपती घाटावरून या मोर्चाला प्रारंभ झाला. हा मोर्चा महात्मा फुले मंडईमार्गे धर्मपुरी पेठेतील विराज शिंदे यांच्या 'विराज गॅस एजन्सी'वरून ब्राम्हणशाही मार्गे मुख्य किसन वीर चौकात पोहोचला. विशेष म्हणजे, विराज शिंदे यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी थांबून अत्यंत आक्रमकपणे घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. मोर्चाचा समारोप किसन वीर चौकात झाला. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, माजी जि . प.सदस्य महादेव मस्कर आणि खरेदी विक्री संघाचे चेअरमन मदन आप्पा भोसले यांनी आपली निषेधपर मनोगते व्यक्त केली. ज्या मतदारांनी विश्वासाने निवडून दिले, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम विराज शिंदे पती-पत्नींनी केले आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी विराज शिंदे यांचा प्रातिनिधिक पुतळा तयार करून त्याला जोडे मारले आणि जाहीर दहन केले. या आंदोलनात वाई तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आणि बावधन गटातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने जि.प. सदस्या वृषाली चव्हाण, बापूसाहेब शिंदे, वर्षा जगताप, माजी सभापती दिलीप पिसाळ, सत्यजित वीर, शहर अध्यक्षा निशा डाळवाले, माजी जि. प. सदस्य शशिकांत पवार, बाजार समिती चेअरमन मोहन जाधव, बाजार समितीचे विनायक येवले, नगरसेवक सनी चव्हाण, संतोष ननावरे, निलेश शिंदे, विलास मांढरे यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. बावधन जिल्हा परिषद गटातील या राजकीय बंडाळीमुळे वाई तालुक्यातील राजकारण आता चांगलेच तापले असून, या गद्दारीचा हिशोब आगामी काळात मतदारच करतील, असा सूर या मोर्चातून उमटला आहे.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जाहीर केलेल्या कॉल रेकॉर्ड्सवरून (CDR) आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. एका खासगी व्यक्तीला गोपनीय कॉल रेकॉर्ड्स कसे मिळू शकतात? हा 'ब्रीच ऑफ प्रायव्हसी'चा (गोपनीयतेचा भंग) गंभीर प्रकार असून, दमानियांचीच चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अंधारे यांनी केली आहे. तसेच एसआयटीपेक्षा दमानियांचा तपास भारी आहे, त्यांनाच प्रमुख करा असा टोला लगावला. सुषमा अंधारे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अशोक खरात प्रकरणातील अनेक धक्कादायक पैलू मांडले आणि थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्र्यांवर निशाणा साधला. नेमके काय म्हणाल्या सुषमा अंधारे? अंजली दमानिया यांनी अशोक खरात, रुपाली चाकणकर आणि इतर नेत्यांमधील संभाषणाचे तपशील एआय (AI) अॅपच्या माध्यमातून मिळवल्याचा दावा केला होता. यावर आक्षेप घेत सुषमा अंधारे म्हणाल्या की, दमानियांच्या दाव्यानुसार, चाकणकर यांनी खरातला १७७ वेळा, तर त्यांच्या बहिणीने २३६ वेळा फोन केले. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ वेळा तर दीपक केसरकर यांनीही खरातशी संवाद साधला. हे सर्व गोपनीय तपशील दमानियांकडे आले कुठून? त्यांना हे रेकॉर्ड्स कुणी पुरवले? जर एखादी खासगी व्यक्ती इतक्या सहजपणे कुणाचेही सीडीआर काढू शकत असेल, तर हा सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. यावेळी त्यांनी उपरोधिक टोला लगावत, एसआयटी शिंदेंची चौकशी करणार का? ज्यांनी सीडीआर काढले त्यांच्यावर कारवाई करावीच, पण ज्यांचे सीडीआरमध्ये नाव निघाले त्यांच्यावर काय कारवाई करणार? या सीडीआर प्रकरणात एकनाथ शिंदे यांचे नाव आहे. त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. सातारा ड्रग्जच्या प्रकरणात आम्ही अनेक आरोप केले, पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. राज्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्याच्या महिला आयोगाच्या आधीच्या अध्यक्षा यांनी इतक्या वेळा अशोक खरातला कॉल का केला? याची माहिती समोर आली पाहिजे. या काळात पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर ही नावे मोठी आहेत, त्यामुळे त्यांची चौकशी का केली जात नाही? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. दमानियांना एसआयटी प्रमुख करा एकनाथ शिंदे यांच्यावर एसआयटी कारवाई करणार आहे का? एसआयटी चांगले काम करेल अशी अपेक्षा आहे, असेही सुषमा अंधारे यांनी केली. एखादी माहिती अंजली दमानिया आणि माझ्यापर्यंत पोहोचते, पण तीच माहिती एसआयटीपर्यंत का पोहोचत नाही असा प्रश्न पडतोय. एसआयटीपेक्षा दमानियांचा तपास भारी आहे, त्यामुळे त्यांनाच एसआयटीचे प्रमुख करा, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. नाशिकच्या पोलिस अधिकाऱ्याची संशयास्पद भूमिका अशोक खरात प्रकरणात नाशिकमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. आम्ही या अधिकाऱ्याबाबत एसआयटीला माहिती दिली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, खरातची चौकशी सुरू असतानाच त्याची पत्नी कल्पना, मुलगी सृष्टी आणि मुलगा अचानक गायब झाले आहेत. पोलिसांच्या नजरेखाली हे कुटुंब गायब होणे अनाकलनीय आहे, असेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोटोवरही फुल्या या प्रकरणाला आता गूढ वळणही मिळाले आहे. काही लोकांच्या नावावर 'फुल्या' (crosses) मारण्याचे प्रकार समोर येत असल्याचा उल्लेख सुषमा अंधारे यांनी केला. काही लोक दबक्या आवाजात बोलत आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील फुल्या मारल्या गेल्या आहेत. फुल्या मारण्याचे प्रकरण काय आहे, याची आम्हाला कल्पना नाही. अशोक खरातच्या हातून कोणी अघोरी विद्या करू पाहत आहे का? तो नक्की कोण आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दीपक केसरकर आणि आर्थिक व्यवहाराचा दुवा या संपूर्ण साखळीत दीपक केसरकर हे महत्त्वाचा दुवा असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. दीपक लोंढे नावाचा व्यक्ती केसरकर आणि खरात यांच्यातील आर्थिक व्यवहार सांभाळत होता, असा दावा करत त्यांनी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे सूचित केले.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी भोंदू अशोक खरात विरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. यामुळे खरातवर दाखल असणाऱ्या गुन्ह्यांची संख्या 13 वर पोहोचली आहे. या गुन्ह्यामुळे भोंदू खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे. भोंदू अशोक खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याच्याविरोधात आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेत. यापैकी 8 गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक व जादूटोणा केल्याशी संबंधित आहेत. तर इतर 4 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. त्यात आता ईडीने दाखल केलेल्या मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याची भर पडली आहे. ईडीने प्रस्तुत प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर हा गुन्हा (ECIR) दाखल केला आहे. त्यानुसार, पोलिसांनी जमा केलेली सर्व महत्त्वाचे दस्तऐवज ईडीने आपल्या ताब्यात घेतले आहेत. अशोक खरातचे आर्थिक साम्राज्य नेमके कसे उभे राहिले? याचा तपास आता ईडी करत आहे. ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केल्याचीही माहिती आहे. या प्रकरणी अशोक खरातच्या बेहिशोबी मालमत्तांसह त्याच्या बँक खात्यांची माहिती घेतली जात आहे. या तपासानंतर खरातच्या मालमत्तांवर टाच येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आर्थिक व्यवहार, मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार रडारवर अशोक खरात व त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यासह 5 जणांविरोधात शिर्डीत बेकायदा सावकारकी व जमीन व्यवहारात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारासह मालमत्ता खरेदी - विक्रीचे व्यवहारही तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत. या प्रकरणी विशेष तपास पथकाने शिर्डी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवकांना चौकशीसाठी समन्स बजावला आहे. साई संस्थानचा एक माजी विश्वस्तही यासंबंधी चौकशीच्या रडारवर आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, शिर्डीत भोंदू खरातचा मोठा भक्त परिवार होता. त्यामुळे त्याचे सर्वाधिक आर्थिक व्यवहार व मालमत्ता खरेदी - विक्रीचे व्यवहार तेथूनच चालायचे. तो आपल्या अनेक भक्तांच्या मालमत्ता खरेदी - विक्रीत भागीदार असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर लगेचच ईडीचा गुन्हा उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अशोक खरात प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडीने या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री यासंबंधी म्हणाले होते, अशोक खरात प्रकरणात एसआयटी सखोल चौकशी करत आहे. हा तपास रोजच्या रोज जाहीर करता येणार नाही. पण खरातची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. त्याच्या सर्व व्यवहारांची चौकशी होईल. ईडीनेही या प्रकरणाची माहिती घेतली आहे. त्यामुळे त्याची ईडी चौकशीही होईल.
शिवसेना (शिंदे गट) नेते संजय निरुपम यांनी नागपूर येथे उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे आता फक्त 'टीव्हीवर उरलेले नेते' आहेत. ते केवळ मुलाखती आणि पत्रकार परिषदांपुरते मर्यादित राहिले आहेत, असे ते म्हणालेत. संजय निरुपम यांनी 'ऑपरेशन टायगर' या नावाला पत्रकारांनी दिलेले नाव म्हटले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे गटातील अनेक खासदार आणि आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून शिंदे गटात येण्यास इच्छुक आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांशी तडजोड केल्याचा आरोपही त्यांनी केला. संजय निरुपम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवार स्वतःचा पक्ष चालवण्याऐवजी विलीनीकरणाची भाषा करतात, हे दुर्दैव असल्याचे निरुपम म्हणाले. निरुपम यांनी अशोक खरातसारख्या 'भोंदू बाबां'पासून सावध राहण्याचे आवाहन केले. असे बोगस बाबा अनेकदा राजकारण्यांशी संपर्क साधतात, असे ते म्हणाले. नेत्यांची छायाचित्रे असली म्हणजे ते चुकीच्या कामांचे समर्थन करतात असे होत नाही. आसाराम बापूंकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर पक्षांतील अनेक नेते गेले होते. त्याचप्रमाणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशोक खरात यांच्याकडे गेले असतील, याचा अर्थ ते त्यांच्या चुकीच्या कामांचे समर्थन करत नाहीत, असे निरुपम यांनी स्पष्ट केले.
क्रेडिट कार्डची माहिती अद्ययावत करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी खडकी परिसरातील एका तरुणीची २ लाख ९९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी तरुणीने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. चोरट्यांनी तरुणीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. बँकेतून बोलत असल्याची बतावणी करत, क्रेडिट कार्डची माहिती अद्ययावत न केल्यास कार्ड बंद होईल, अशी भीती दाखवली. यानंतर त्यांनी तरुणीच्या बँक खात्याची माहिती मिळवली आणि त्याचा गैरवापर करून खात्यातून पैसे काढून घेतले. ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक दरम्यान, ऑनलाइन टास्कच्या आमिषाने आणखी एका तरुणाची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सिंहगड रस्ता भागातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी २ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी अनोळखी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणाला सायबर चोरट्यांनी मोबाईलवर संदेश पाठवून घरातून ऑनलाइन काम करण्याची संधी असल्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला एक छोटे काम देऊन त्याचे पैसे खात्यात जमा केल्याचे सांगितले, मात्र प्रत्यक्षात पैसे जमा झाले नव्हते. चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी तरुणाला पैसे गुंतवण्यास सांगितले. यानंतर तरुणाने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात २ लाख ७१ हजार रुपये जमा केले. त्यानंतर गुंतवणूक केलेल्या पैशाच्या अनुषंगाने परतावा मिळावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली. मात्र ,आरोपींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत कोणताही परतावा देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
पुण्यात डॉक्टरांची ऑनलाइन अपॉइंटमेंट घेण्याच्या प्रयत्नात एका ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी ५ लाख ५४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. सायनसच्या उपचारासाठी माहिती शोधत असताना ही घटना घडली असून, डेक्कन पोलिसांनी अनोळखी सायबर चोरट्यांविरुद्ध फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी ज्येष्ठ महिला विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका सोसायटीत राहतात. त्यांना मागील अनेक दिवसांपासून सायनसचा त्रास असल्याने त्यांनी मोबाइलवर या विकारावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती शोधली. त्यावेळी त्यांना एक मोबाइल क्रमांक मिळाला. डॉक्टरांना तात्काळ भेटून तातडीने औषध उपचार करून घ्यावेत असे त्यांनी ठरवले. त्यानुसार डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, तो क्रमांक डॉक्टरांचा नसून सायबर चोरट्यांनी तो ऑनलाइन टाकला होता. चोरट्यांनी अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी सुरुवातीला महिलेला ५ रुपये ऑनलाइन पाठवण्यास सांगितले. महिलेने ते पैसे चोरट्यांच्या खात्यात जमा केले. यावेळी चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला, कारण तो क्रमांक तिच्या बँक खात्याशी जोडलेला होता. त्यानंतर, चोरट्यांनी परस्पर महिलेच्या बँक खात्यातून ५ लाख ५४ हजार रुपये स्वतःच्या खात्यात हस्तांतरित केले. चोरट्यांनी महिलेचे बँक खाते रिकामे करण्यास सुरुवात केल्याने याबाबत महिलेच्या कुटुंबियांना संशय आल्यावर त्यांनी चौकशी केली असता, चोरट्याने मोबाइल क्रमांक बंद केल्याचे लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरामागे नदीपात्रात असलेल्या कै. गंगाधर केळकर यांच्या समाधीजवळ पुन्हा गुरे बांधून परिसराचा गोठ्यासारखा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. १९२८ साली बांधलेली ही समाधी वास्तू उभारणीचा एक अप्रतिम नमुना आहे. केळकर कुटुंबीयांनी पुणेकरांना या समाधीचे मूळ रूप आणि भावना बदलू नये, असे आवाहन केले आहे. स्थानिक परिसरातील काही व्यक्ती समाधीच्या शेडमध्ये गुरे बांधून त्यांच्या चारा-पाण्याच्या सोयीसह वापर करत असल्याचे केळकर कुटुंबियांच्या निदर्शनास आले. हे पाहून गंगाधर केळकर यांचे नातू, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर आणि कुटुंबीयांनी समाधीला भेट देऊन पाहणी केली. गोठ्यासारखा वापर होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि महापालिकेने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. ही समाधी वास्तू केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर केळकर आणि त्यांचे बंधू भास्कर केळकर यांच्या कलाप्रेमाचा नमुना आहे. 'गंगाधर' या शब्दाचा अर्थ शंकर असल्याने, उभारणीच्या वेळीच समाधीवर कलात्मकरित्या पिंड (शिवलिंग) बसवलेले आहे. पानशेतच्या पुरातून वाचलेली ही समाधी आजही येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. समाधीच्या मूळ स्वरूपाची जुनी छायाचित्रेही केळकर कुटुंबीयांकडे आहेत. त्यांनी नागरिक आणि पुणे पालिकेला नदीपात्रातील इतरही सर्व महनीय पुणेकरांच्या समाधीचा वारसा जपण्याचे आवाहन केले. यापूर्वी फेब्रुवारी २०२३ मध्ये महाशिवरात्रीदरम्यान या समाधी स्थळाचे शिवमंदिरात रूपांतर करण्याचा प्रयत्न झाला होता आणि तिथे नंदीही बसवण्यात आला होता. डॉ. श्रीकांत केळकर यांनी आक्षेप घेतल्यावर तेथील अतिक्रमण संबंधितांनी स्वतःहून काढून टाकले होते, मात्र नंदी अजूनही आहे. जुलै २०२३ मध्येही समाधीजवळ गुरे बांधून परिसराचा गोठ्यासारखा वापर सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तेव्हाही केळकर कुटुंबीयांनी समाधी स्थळाचे रूपांतर करून मूळ रूप आणि भावना बदलू नये, असे आवाहन केले होते. या समाधीच्या संरक्षणासाठी केळकर कुटुंबीयांचा पालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे, परंतु त्यांना एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे फिरवले जात आहे. डॉ. श्रीकांत केळकर यांनी सर्व माध्यमातून जागृती घडवून आणल्यावर समाधीजवळील काही लोकांनी अनवधानाने उभारलेले फलक आणि लोखंडी काम स्वतःहून काढले होते. त्यानंतर केळकर कुटुंबीयांनी 'कै. गंगाधर केळकर समाधीस्थळ' असा फलक तेथे उभारला, ज्यामुळे या समाधीला तिची पूर्वीची ओळख परत मिळाली होती. पानशेतच्या पुरातून वाचलेली समाधी अजून येणाऱ्या जाणाऱ्या चे लक्ष वेधून घेते .समाधीच्या मूळ स्वरूपाची जुनी छायाचित्रेही उपलब्ध आहेत. मात्र ,तेथे पुनः पुनः गोठा करण्याचे प्रयत्न होतच आहेत.नदीपात्रातील इतरही सर्व महनीय पुणेकरांच्या समाधीचा वारसा जपण्याचे आवाहन त्यांनी नागरिक आणि पुणे पालिकेला केले आहे .
राज्याच्या जडणघडणीत अजित पवारांचा सिंहाचा वाटा
बारामती : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा असली तरी कोणताही कार्यकर्ता गाफील राहता कामा नये. निवडणूक लागलीच तर ती झुंजारपणे लढून सर्व रेकॉर्ड मोडीत काढत विक्रमी विजय […] The post राज्याच्या जडणघडणीत अजित पवारांचा सिंहाचा वाटा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अध्यात्मिक सल्ला दिला. 'खुर्चीवर बसलेला एक दिवस उठणारच आहे. त्याला उठावेच लागणार आहे. नाही उठला तर देव उठवून घेऊन जाईल. याला कोणी अपवाद नाही,' असे गडकरी म्हणाले. ते म्हणाले की, 'हे तात्पुरते काम आहे. खुर्ची मिळाल्यावर शांततेने राहा, अंगात येऊ देऊ नका. खुर्ची कधीही जाऊ शकते. पोलीसही तुम्हाला सोडून जातात, ते कधीही सोडून जाऊ शकतात.' गडकरींनी पदाची तात्पुरतीता आणि नम्रतेचे महत्त्व अधोरेखित केले. नेतृत्वाच्या बदलावर बोलताना गडकरी म्हणाले की, कार्यकर्ते आणि नेत्यांच्या पिढ्या बदलत राहतात आणि नेतृत्वही बदलले पाहिजे. 'याचा अर्थ नेत्याच्या पोटातून नेता जन्माला आला पाहिजे असे नाही, तर कार्यकर्त्यांमधून नेतृत्व विकसित झाले पाहिजे,' असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गडकरींनी त्यांच्या इराण भेटीचा एक किस्सा सांगितला. ते जहाजबांधणी मंत्री असताना इराणमध्ये चाबहार बंदर बांधण्याचे काम त्यांना मिळाले होते. त्यावेळी इराण-अमेरिकेचे युद्ध सुरू असताना ते सात-आठ वेळा इराणला गेले होते. एकदा संरक्षण विभागाच्या विशेष विमानाने जात असताना पाकिस्तानने त्यांचे विमान मध्येच थांबवून पुढे जाण्यास मनाई केली होती. त्यानंतर तेथून परत येऊन गुजरातमार्गे चाबहारला गेले होते, असे त्यांनी सांगितले. गडकरींनी सांगितले की, अफगाणिस्तान, इराण, पाकिस्तान, उझबेकिस्तान या देशांसह सिंधू नदीच्या पलीकडे विकसित झालेल्या संस्कृतीशी भारताचे नाते आहे. त्यांनी अयातुल्ला खोमेनी यांची त्यांच्या घरी भेट घेतल्याचे सांगितले. त्यावेळी खोमेनींनी त्यांना पर्शियन भाषेच्या उगमाबद्दल विचारले होते. खोमेनींनी स्वतः सांगितले होते की, संस्कृत ही त्यांची मूळ भाषा असून पर्शियन भाषेचा उगम संस्कृतमधून झाला आहे. इराणमधील तेहरान विद्यापीठात संस्कृत विभाग असल्याचेही त्यांनी नमूद केले. खोमेनींनी आपले मूळ लखनऊजवळील एका गावात असल्याचेही गडकरींना सांगितले होते. आपला वारसा, संस्कृती आणि इतिहास एकच असल्याचे सांगत गडकरींनी 'काश्मीर हो या गोहाटी, अपना देश, अपनी माटी' हा नारा दिला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांच्याशी संबंधित एक आठवण त्यांनी सांगितली. गडकरी राजकारणात नवीन असताना अंतुले यांनी त्यांना बोलावून 'तुम्हाला माहिती आहे काय मी कोण आहे?' असे विचारले होते. गडकरींना माहिती नसल्याचे सांगितल्यावर अंतुले यांनी 'मी कोकणस्थ ब्राह्मण आहे आणि माझे आडनाव करंदीकर आहे,' असे सांगितल्याचे गडकरींनी नमूद केले.
अथर्व नानोरे हत्या प्रकरणाचा उलगडा:३ आरोपी अटकेत, वडिलांच्या ओळखीच्यांनीच रचला होता हत्येचा कट
१४ वर्षीय अथर्व नानोरे हत्या प्रकरणाचा उलगडा झाला असून, पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. गिट्टीखदान पोलीस आणि गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत हे आरोपी पकडले गेले. अटक करण्यात आलेले आरोपी २० ते २२ वयोगटातील असून, त्यात अथर्वच्या वडिलांच्या ओळखीच्या एका व्यक्तीचाही समावेश आहे. ७२ तासांच्या कसून चौकशीनंतर पोलिसांनी या प्रकरणातील सर्व तपशील उघडकीस आणले. संशयित आरोपींची नावे जयराम गोपाल यादव (१९), केतन उर्फ कुणाल रमेश साहू (२२) आणि आयुष मोहन साहू (१९) अशी आहेत. अथर्व दिलीप नानोरे हा गिट्टीखदान परिसरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत सहभागी झाला होता. मिरवणूक संपल्यानंतर तो घरी परतला नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी सुरुवातीला स्वतः शोध घेतला. काही माहिती न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गिट्टीखदान पोलिसांच्या तपासात समोर आले की, अथर्वचे वडील भाजी विक्रेते आहेत. आरोपी त्यांच्याकडून नियमितपणे भाजीपाला खरेदी करत होते आणि त्यांचे कर्जदार होते. अथर्वचे वडील घाऊक भाजी विक्रेते असल्याने त्यांच्याकडे रोख रक्कम असते, हे आरोपींना माहीत होते. याच पैशांच्या लोभातून तिन्ही आरोपींनी घटनेच्या तीन दिवस आधी अथर्वच्या अपहरणाचा कट रचला. या कटानुसार, अथर्वचे अपहरण करून त्याला दूर नेण्याची जबाबदारी जयरामवर सोपवण्यात आली होती. घटनेच्या दिवशी, हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान अथर्व आईस्क्रीम घेण्यासाठी बाहेर पडला. त्याचवेळी, जयरामने त्याला बहाणा करून एका टाटा एस गाडीजवळ नेले. तिथे आयुष आणि कुणाल आधीच वाट पाहत होते. तिघांनी अथर्वला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि तो आवाज करण्यापूर्वीच त्याच्या तोंडात कापड कोंबले. आरोपींनी त्याला गोरेवाडाच्या दिशेने नेले. मात्र, गिट्टीखदान परिसरातील गोंधळ पाहून ते घाबरले. त्यांनी कापडाच्या तुकड्याने अथर्वचा गळा दाबून खून केला. त्यानंतर, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला सोडून दिली आणि आपापल्या घरी परतले. खून केल्यानंतर, आरोपींनी अथर्वचा मृतदेह कळमेश्वर रेल्वे क्रॉसिंग फ्लायओव्हरजवळ फेकून दिला. कोणताही पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी गाडी धुतली. गिट्टीखदान पोलीस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही संपूर्ण कारवाई केली. अथर्व नानोरे बेपत्ता झाल्यानंतर, पोलिसांनी परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमुळेच या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यास पोलिसांना यश आले.
पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १ कोटी ५५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४५ वर्षीय तक्रारदाराने फिर्याद दिली आहे. तक्रारदार वारजे माळवाडी भागातील एका सोसायटीत राहतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून त्यांना जाळ्यात ओढण्यात आले. चोरट्यांनी तक्रारदाराला समाजमाध्यमातील एका समूहात सहभागी करून घेतले. तक्रारदाराने पैसे गुंतवल्यानंतर, चोरट्यांनी त्यांना परतावा मिळाल्याचे भासविले, मात्र प्रत्यक्षात कोणताही परतावा दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते या प्रकरणाचा तपास करत आहेत. गॅस देयक अद्ययावत करण्याच्या बहाण्याने फसवणूक दरम्यान, गॅस देयक अद्ययावत करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात एका ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे वारजे माळवाडी भागातील एका सोसायटीत राहतात, जिथे पाईपद्वारे गॅस पुरवठा होतो. चोरट्यांनी गॅस देयक अद्ययावत करण्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याची माहिती मिळवली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी खात्यातून सहा लाख रुपये काढून दुसऱ्या खात्यात हस्तांतरित केले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
आरती अंकलीकर-टिकेकर यांना कलाश्री पुरस्कार:२८ व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा पिंपळेगुरव येथे समारोप
पिंपळेगुरव येथे झालेल्या २८ व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा नुकताच समारोप झाला. या महोत्सवात ख्यातनाम गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांना माजी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ 'कलाश्री पुरस्कार' प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना अंकलीकर-टिकेकर यांनी सांगितले की, एकाग्र मनाने तानपुऱ्याच्या षड्जामध्ये आपला सूर मिसळणे हा प्रत्येक कलाकाराचा पहिला पुरस्कार असतो. गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाने आयोजित केलेला हा तीन दिवसीय महोत्सव पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात पार पडला. 'कलाश्री पुरस्कारा'चे हे २८ वे वर्ष असून, यात रोख १ लाख ५१ हजार १०१ रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र यांचा समावेश आहे. याच कार्यक्रमात शकुंतला ढोरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा 'कलाश्री युवा पुरस्कार' युवा तबला वादक सोहम गोराणे यांना प्रदान करण्यात आला. पं. योगेश समसी यांचे शिष्य असलेल्या सोहम गोराणे यांना ११ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी चंद्ररंग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य लक्ष्मण जगताप, उद्योजक विजू शेठ जगताप, नगरसेवक प्रशांत शितोळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाना शिवले, कीर्तनकार चेतनानंद गावडे महाराज, तबलावादक पं. रामदास पळसुले, ओअॅसिस एन्टरप्रायझेसचे महेश जोशी, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक पं. सुधाकर चव्हाण, विश्वस्त सच्चिदानंद कुलकर्णी, नंदकिशोर ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते. अंकलीकर-टिकेकर पुढे म्हणाल्या की, जेव्हा तानपुरा सुरात मिळवता येतो आणि तो सुंदर छेडता येतो, तेव्हा तो जपमाळेसारखा बनतो. त्यानंतर मन एकाग्र करून तानपुऱ्याच्या झंकारात आपला स्वर असा मिसळायचा की तो वेगळा वाटू नये, इथेच संगीताच्या साधनेला सुरुवात होते. त्यांनी आपले सर्व पुरस्कार गुरु आणि आई-वडिलांना समर्पित करत, शास्त्रीय संगीताची साधना खडतर आणि कष्टाची असल्याचेही नमूद केले. यामध्ये सुरुवातीची अनेक वर्षे विद्यार्थी हा फक्त रियाजच करीत असतो. कोणत्याही प्रकारचे यश, प्रसिद्धी ही त्याला सुरुवातीच्या या काळात मिळत नाही. केवळ रियाज करत राहणे आणि गात राहणे हेच संगीत साधकाचे काम असते. त्यामुळे ज्यांना गायला आवडते, वाजवायला आवडते त्यांनीच या क्षेत्रात यावे असा सल्लाही आरती अंकलीकर टिकेकर यांनी दिला. माझ्या यशाचे श्रेय हे श्रोत्यांचे देखील आहे असेही त्यांनी नमूद केले.
बारामती : प्रतिनिधी अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यापूर्वी भावूक आवाहन केले. ‘फक्त पार्थ आणि जय नाही, तर संपूर्ण बारामती माझं कुटुंब आहे,’ या त्यांच्या विधानाने उपस्थितांना गहिवरून आले. अजितदादांचा वारसा पुढे नेण्याचे आश्वासन देत, त्यांनी बारामतीच्या विकासाची प्रतिज्ञा केली. त्यांच्या या हृदयस्पर्शी शब्दांनी महाराष्ट्राच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित […] The post संपूर्ण बारामती माझे कुटुंब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नांदेड शहर सोमवारी आणखी एका हत्येने हादरले. आज पहाटे 5.30 च्या सुमारास मॉर्निंग वॉगसाठी गेलेल्या सत्ताधारी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याची हल्लेखोरांनी भररस्त्यात तलवारीने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. गत 3 दिवसांतील शहरातील हत्येची ही पाचवी घटना आहे. त्यामुळे नांदेड पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमेतवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सोनू कल्याणकर (35) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो सत्ताधारी शिवसेनेच्या युवा सेनेचा शहराध्यक्ष होता. सोनू कल्याणकर सोमवारी पहाटे 5.30 च्या सुमारास नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा पाळीवर कुत्राही होता. यावेळी शहरातील श्रीनगर भागातील पंचशील कापड दुकानालगतच्या कुमार ड्रेसेस सोमर एका चारचाकीतून आलेल्या 6-7 हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉड, चाकू व तलवारींच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला चढवला. हल्लेखोरांनी कल्याणकर यांची मान, पाठ व शरीराच्या विविध भागांवर वार करत त्यांना रक्तबंबाळ केले. या हल्ल्याची तीव्रता एवढी होती की, सोनू कल्याणकर जागीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी ते गतप्राण झाल्याचे पाहताच आपल्या वाहनातून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत तपासासाठी विशेष पथके तयार केली. या प्रकरणी एका संशयिताला तत्काळ ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सोनू कल्याणकर यांच्यावर यापूर्वीही एकदा गोळीबार झाला होता. पण त्यात ते बचावले होते. पण यावेळी हल्लेखोरांनी त्यांचा थेट जीव घेतला. झरी गावालगत 1 संशयित ताब्यात दुसरीकडे, पोलिसांनी सोनू कल्याणकर यांच्या हत्येनंतर तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. त्यात एक संशयित शहरालगतच्या झरी गावालगत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी तत्काळ तिकडे धाव घेतली असता संशयित पळून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याच्या पायावर गोळी झाडली. त्यात तो जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर झरी परिसरातही काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेत आहेत. शहरात 3 दिवसांत पाचवी हत्या दुसरीकडे, नांदेड शहरातील 3 दिवसांतील आजची पाचवी घटना आहे. 2 दिवसांपूर्वी भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तिहेरी हत्याकांड घडले होते. त्यात वर्चस्वाच्या वादातून सदा गंग व साई लाला गँगच्या पंटर्समध्ये राडा झाला होता. त्यात अरिजितसिंह चव्हाण, मोहम्मद अरबाज व सय्यद आवेज यांचा खून झाला होता. त्यानंतर वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुरमुरा गल्लीत रज्जुसिंग तबेलेवाले यांची हत्या झाली होती. त्यानंतर आज पहाटे सोनू कल्याणकर यांची हत्या झाली. सातत्याने घडणाऱ्या या खुनांच्या घटनांमुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाडस वाढल्याचे चित्र आहे. मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे व अगदी रुग्णालय परिसरातही हल्ले होत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसल्याची भावना नागरिकांत निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय च्या कामात झालेल्या कथित गैरप्रकारांची वारंवार मागणी करूनही चौकशी होत नसल्याच्या निषेधार्थ, वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विपिन बबनराव साळे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग कार्यालयासमोर सोमवारी सकाळी 10 वाजेपासून अनोखे आंदोलन सुरू केले आहे. अंगावर काळा कोट परिधान करून आणि त्यावर 'दैनिक दिव्य मराठी'मधील संबंधित बातम्यांची कात्रणे चिकटवून साळे यांनी प्रशासकीय उदासीनतेचा निषेध केला आहे. नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय यातील लासूर स्टेशन (गंगापूर) ते बेलगांव (वैजापूर) या हद्दीत हा महामार्ग कायम खड्डेयुक्त असतो. वारंवार विनंती करूनही राष्ट्रीय महामार्ग विभाग या महामार्गाची जुजबी कामे करून जनतेची थट्टा करत असतो. कोट्यवधी रुपये खर्च करून काही दिवस रस्ते चांगले असतात आणि महिन्याच्या आत पुन्हा खड्डे पडतात. मागील तीन वर्षांपासून या महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहे. मात्र ते काम प्रत्यक्षात दिसत नाही. यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते विपीन साळे यांनी दिनांक 17/02/2026 रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र त्यादिवशी संबंधित विभागाचे उपअभियंता वैजापूर यांच्या विनंतीनुसार त्यांनी आंदोलन स्थगित केले होते. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग आजही या प्रकरणी झोपेत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या निधीचा पर्यायाने जनतेच्या पैशाचा मोठा अपव्यय झालेला आहे. या विषयावर परिसरातील जनतेच्या भावना तीव्र आहेत. कोणत्याही क्षणी त्याचा उद्रेक होऊ शकतो. म्हणून सामाजिक कार्यकर्ते विपीन साळे यांनी निवेदना द्वारे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी मागणी केली, या नागपूर मुंबई एन एच 752 आय या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात तीन वर्षांपासून झालेल्या खर्चाची, प्रत्यक्ष झालेल्या कामाची तातडीने चौकशी करून दोषी अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा दिनांक 06/04/2026 रोजी क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर येथून काळे वस्त्र परिधान करून पहिले निवेदन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी ठेवून ,तिथून पायी चालत जिल्हा न्यायालय, महावीर चौक, हॉटेल नंदनवन मार्गे आपल्या कार्यालयासमोर येऊन अभिनव आणि अनोखे आंदोलन करण्यात येईल. असे लेखी निवेदन सामाजिक कार्यकर्ते विपीन साळे यांनी कार्यकारि अभियंता यांना दिले होते. त्यानुसार आज सकाळी 10 वाजेपासून सामाजिक कार्यकर्ते विपीन बबनराव साळे हे सहकारी गोकुळ सुरासे यांच्या सोबत काळे कोट घालून व त्यावर दैनिक दिव्य मराठीच्या आतापर्यंतच्या प्रसिद्ध झालेल्या सर्व बातम्या त्यांनी कोट वर चिटकवून अभिनय आंदोलन करत आहे. हे आंदोलन साळे मागणी पूर्ण होईपर्यंत करणार असल्याचे समजते.
गोरेगावात दोन गटात तुफान राडा; ८ जणांना अटक
मुंबई : मुंबईच्या गोरेगाव पूर्व मधील संतोष नगर येथे दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी ८ जणांना दिंडोशी पोलिसांनी मध्यरात्री अटक केलीय. मुंबईतील गोरेगांव पूर्व दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतोष नगर मार्केट परिसरात मरियम माता शोभा यात्रा दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी […] The post गोरेगावात दोन गटात तुफान राडा; ८ जणांना अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केशर आंब्याचे उत्पादन घटले; अवकाळीचा फटका
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी विपरीत हवामानामुळे यंदा केशर आंबा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून सुमारे ७० टक्क्यांपर्यंत उत्पादन कमी होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि फळगळ यामुळे बागांना मोठा फटका बसला आहे. गेल्या वर्षी दिवाळीपर्यंत झालेल्या पावसाचा परिणाम यंदाच्या हंगामावरही झाला. फळबागतज्ज्ञांच्या मते, सुरुवातीला ४० टक्के उत्पादन अपेक्षित […] The post केशर आंब्याचे उत्पादन घटले; अवकाळीचा फटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गोरेगावच्या दिंडोशी परिसरात रविवारी रात्री दोन गटांत तुफान राडा झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना पोलिसांनी आज सकाळी चोख बंदोबस्त या घटनेतील आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवून आपला खाक्या दाखवला. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या घटनास्थळी जाऊन हनुमान चालीसा म्हणणार आहेत. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, गोरेगावच्या दिंडोशी येथील संतोष नगर मार्केट परिसरात रविवारी रात्री मरियम माता शोभा यात्रा निघाली होती. त्यावेळी तेथील दोन गटांत वाद झाला. त्यात बजरंग दलाचे 3 कार्यकर्ते जखमी झाले. तर अनेक जण जखमी झाले. जखमींना जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींची ओळख पटवून 8 जणांना अटक केली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी त्यांनी सौम्य बळाचाही वापर केला. या घटनेनंतर संतोष नगर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे या भागाला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे. पोलिस स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे, संतोष नगर परिसरातील अनधिकृत बांधकामाबाबत पोलिसांकडे यापूर्वीच अनेक तक्रारी आल्या होत्या. कालच्या राड्यानंतर पोलिसांनी या तक्रारींची शहानिशा केली. त्यात या घटनेतील आरोपींची घरे अनधिकृत असल्याची बाब स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी आज सकाळी महापालिकेच्या मदतीने त्यांच्या घरावर बुलडोझर चालवला. यामुळेही येथील तणावात अधिकची भर पडली. किरीट सोमय्या पठण करणार हनुमान चालीसा दुसरीकडे, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज सायंकाळी घटनास्थळी हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाण व अनधिकृत वस्त्यांमधील आरोपींची नावे पुढे आल्याने सोमय्या यासंबंधी आक्रमक झालेत. आता पोलिस सोमय्यांच्या भूमिकेवर काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून दिवंगत नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. येथील निवडणूक बिनविरोध करून अजित पवारांना श्रद्धांजली देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. असे असतानाही कॉंग्रेसने उमेदवार जाहीर केला. यावरून आता पार्थ पवारांनी थेट कॉंग्रेसला इशाराच दिला आहे. पार्थ पवार म्हणाले, माझे कोणाशी बोलणे झाले नाही. कॉंग्रेसला कळायला पाहिजे, काय करायचे ते. त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला माहीत नाही. सगळे मोठे लोक आहेत. सर्वांना माहीहती आहे काय चालले आहे. त्यांनी विचार केला असेल तर करू द्या. पण त्यांना नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात, हे त्यांना दिसेल, अशा शब्दात पार्थ पवारांनी नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे. कॉंग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल सुरू पुढे बोलताना पार्थ पवार म्हणाले, जे दादांसाठीचे प्रेम आहे लोकांच्या मनात, ते लोक विसरत नाहीत. अशावेळी एवढ्या मॅच्युअर पार्टीने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, अतिशय चुकीचे आहे. मला वाटते की आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते तसे सामोरे जावे लागते. आम्ही सामोरे जाऊ, आम्ही काही कोणाला फोन करणार नाही, जे काही नशिबात लिहिले आहे ते बघू. फक्त मला वाईट वाटत आहे की कॉंग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल सुरू आहे. सुनेत्रा पवारांनी केला होता हर्षवर्धन सपकाळांना फोन दरम्यान, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने रविवारी आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर केली असून, यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे शिष्टाईचे प्रयत्न अपयशी ठरल्याचे दिसत आहे. उमेदवारीची अधिकृत घोषणा दिल्लीतून होण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामतीत उमेदवार न देता महायुतीला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र, काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने सुनेत्रा पवार यांची ही मध्यस्थी निष्फळ ठरली आहे.
महाराष्ट्रात दोन मतदारसंघात पोटनिवडणुका होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघातून दिवंगत नेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर राहुरी मतदारसंघात भाजपचे अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बारामती प्रमाणेच राहुरीतही बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू होते. मात्र राहुरीत शिवसेना शिंदे गटाकडूनच बंडखोरी झाल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आता राजकीय ट्विस्ट आला असून, शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी मोरे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना विधानसभेत प्रभावीपणे मांडण्यासाठी खुद्द शेतकऱ्यांनीच आग्रह धरल्यामुळे आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे मोरे यांनी अर्ज भरल्यानंतर स्पष्ट केले. भाजपने आम्हाला विश्वासात घेतले नाही, आम्ही का विचार करावा?- रवी मोरे यावेळी महायुतीच्या युती धर्माबाबत विचारले असता मोरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. राहुरी नगरपरिषद आणि स्थानिक कारखान्याच्या निवडणुकीत भाजपने शिंदे गटाला कधीही विश्वासात घेतले नाही, मग आम्ही तरी त्यांचा विचार का करावा, असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे बारामतीमध्ये महायुतीत एकवाक्यता दिसत असली तरी, राहुरीत मात्र शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यानेच बंडखोरीचे निशाण फडकावल्याने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. प्राजक्त तनपुरे माघार घेण्याची शक्यता तर दुसरीकडे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे यांचे नाव आघाडीवर असताना आणि ठाकरे गटानेही या जागेवर दावा केला असताना, अचानक घडलेल्या नाट्यमय घडामोडींनी राजकीय चित्र बदलले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी तनपुरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधून दिल्याचे समजते. या मध्यस्थीनंतर प्राजक्त तनपुरे आता निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार गटाकडून दोघांना फॉर्म शरद पवार गटाने दोन 'एबी' फॉर्म पाठवले असून, त्यात प्राजक्त तनपुरे आणि गोविंदराव मोकाटे यांच्या नावाचा समावेश आहे. जर काही कारणास्तव प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, तर पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून गोविंदराव मोकाटे रिंगणात उतरतील, हे आता स्पष्ट झाले आहे. पक्षाकडून लवकरच अधिकृत उमेदवाराची घोषणा केली जाणार असून, या आक्रमक पवित्र्यामुळे राहुरीची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असून तिथे आता प्रत्यक्ष लढत होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.
युद्धाची झळ स्वंयपाक घरापर्यंत
मुंबई : प्रतिनिधी आखाती देशांमध्ये सध्या सुरु असलेल्या युद्धाचा फटका दिवसेंदिवस महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे. या युद्धजन्य परिस्थितीचे भीषण परिणाम महाराष्ट्रातील शेती आणि पूरक व्यवसायांवर होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्गातील अडथळे आणि वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे ज्वारी,लाल मिरची, टरबूज, कांदा आणि पोल्ट्री उत्पादनांची निर्यात पूर्णपणे कोलमडली आहे. याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. त्यामुळे […] The post युद्धाची झळ स्वंयपाक घरापर्यंत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या 59 वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी संसदीय कारकिर्दीचा टप्पा गाठल्यानंतर तिसऱ्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी व्हीलचेअरवर बसूनच ही शपथ ग्रहण केली. विशेष म्हणजे शरद पवारांच्या या निवडीमुळे आता पवार कुटुंबातील तीन पिढ्या एकाच वेळी संसदेत कार्यरत असल्याचे ऐतिहासिक चित्र पाहायला मिळणार आहे. याचसोबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील शपथ घेतली आहे. आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांचा व्हिडिओ ट्विट करत 'देशातील सर्वात तरुण लोकनेता' असे वर्णन केले आहे. महाराष्ट्रातून माया ईवाते (भाजप), रामराव वाडकुटे (भाजप), ज्योती वाघमारे (शिवसेना) यांनी देखील आज शपथ घेतली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आता अधिकृतपणे राज्यसभा सदस्य म्हणून संसदेत प्रवेश करणार असून, 10 एप्रिल रोजी त्यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पार्थ पवार यांची पहिल्यांदाच राज्यसभेवर वर्णी लागली असून, ते 9 एप्रिल रोजी आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतील. या दोन्ही नेत्यांच्या संसदेतील एन्ट्रीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन पिढ्यांचे प्रतिनिधित्व आता देशपातळीवर अधिक प्रबळ होताना दिसत आहे. शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र स्तरावरील चारही सभागृहांचे सदस्यपद भूषवण्याचा बहुमान मिळवला असून, त्यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाची सुरुवात 1967 मध्ये पहिल्या आमदारकीच्या विजयाने झाली. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या पवारांनी 1968 मध्ये पहिल्यांदा राज्याची धुरा सांभाळली, तर 1984 मध्ये बारामतीतून खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर 1985 मध्ये ते पुन्हा विधानसभेच्या रिंगणात परतले. राज्यासोबतच केंद्रातही महत्त्वाची मंत्रिपदे भूषवत त्यांनी भारतीय राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 1990 पर्यंत सलग सहा वेळा बारामतीचे आमदार राहिलेल्या शरद पवारांनी 1991 ते 2014 या काळात बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून नेतृत्व केले आणि 2014 पासून ते राज्यसभेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. गेल्या सहा दशकांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात, 1998-99 मध्ये लोकसभा बरखास्त झाल्याचा अल्प काळ वगळता, ते सातत्याने राज्याच्या किंवा देशाच्या कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सक्रिय सदस्य राहिले असून, आता पुन्हा एकदा राज्यसभेची शपथ घेतल्याने त्यांचा हा ऐतिहासिक संसदीय कार्यकाळ 2032 पर्यंत अखंडपणे सुरू राहणार आहे.
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात हालचाली वेगाने सुरू झाल्या असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी महायुतीची भूमिका होती. मात्र, काँग्रेसने उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्याने निवडणूक लढवावी लागत आहे. या घडामोडींमुळे बारामतीतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. या मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, अजितदादांच्या आकस्मिक निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली होती. त्यांनी विविध खात्यांची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळली. विशेषतः अर्थ खात्याचे काम त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने हाताळले. ‘लाडकी बहीण’ योजनेचा निर्णय घेताना देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे शिंदे यांनी नमूद केले. एक सक्षम प्रशासक आणि संघटक म्हणून अजित पवारांची ओळख होती, असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कामाचाही उल्लेख केला. अजित पवारांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी त्यांनी सक्षमपणे भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील कारभार पुढे नेण्यासाठी त्या आणि महायुतीतील नेते एकत्रितपणे काम करत आहेत, असे शिंदे म्हणाले. बारामतीतील विकासकामांची त्यांना चांगली जाण असून, स्थानिक जनतेचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. पुढे बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, अनेक सामाजिक संघटनांनी देखील सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा होती. परंतु, आता निवडणूक झाल्यास त्याचा निकाल जनतेच्या मतांमधून स्पष्ट दिसेल, असे ते म्हणाले. विरोधकांनी परंपरा लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा शेवटी शिंदे यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष इशारा देताना म्हटले की, जर बारामतीत निवडणूक झालीच, तर अजित पवारांनी केलेल्या कामाची पोचपावती मतदार देतील. आणि त्या मतांमधून सुनेत्रा पवार यांचा विजय मोठ्या फरकाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे बारामती पोटनिवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत थेट लढत रंगणार आहे. दरम्यान, आकाश मोरे यांनी अजित पवार यांच्या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यास आपण निवडणुकीतून माघार घेऊ, असे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या वडिलांनी, माजी आमदार विजयराव मोरे यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य करत राजकीय वातावरण तापवले आहे. विजयराव मोरे यांनी शरद पवार यांच्यावर थेट टीका केली. शरद पवार आता केवळ कुटुंबापुरता विचार करत आहेत. वयोमानानुसार त्यांच्या राजकारणात बदल झाला आहे, असा आरोप त्यांनी केला. मी शरद पवारांपेक्षा दोन महिन्यांनी मोठा आहे आणि त्यांच्या राजकारणाची मला पूर्ण जाण आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी असेही नमूद केले की, जर शरद पवार यांनी या निवडणुकीत उमेदवार दिला असता, तर त्यांनी त्यांचा प्रचार केला असता. पुढे बोलताना विजयराव मोरे यांनी काही वादग्रस्त मुद्दे उपस्थित केले. त्यांनी गौतम अदानी आणि शरद पवार यांच्या मैत्रीचा उल्लेख करत काही संस्थांना मदत झाल्याचे सांगितले. तसेच 2024 च्या निवडणुकांमध्ये त्यांनी शरद पवार गटासाठी प्रचार केला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सुप्रिया सुळे या भाजपच्या जवळ गेल्याचे चित्र दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. इतिहास सांगताना विजयराव मोरे म्हणाले की, त्यांच्या राजकारणाची सुरुवात समाजवादी पक्षातून झाली. 1967 मध्ये त्यांनी शरद पवारांच्या विरोधात प्रचार केला होता, तर 1972 मध्ये त्यांच्याविरोधात निवडणूकही लढवली. नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर 1990 साली विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्यात शरद पवारांचा मोठा वाटा होता, असे त्यांनी मान्य केले. तरीही 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर त्यांनी त्यात प्रवेश केला नाही. आजही त्यांचे शरद पवारांशी वैयक्तिक संबंध चांगले असल्याचे त्यांनी सांगितले. 23 एप्रिल रोजी मतदान, 4 मे रोजी निकाल दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघात ही पोटनिवडणूक अजित पवार यांच्या 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या निधनामुळे होत आहे. या निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आणि आकाश मोरे यांच्यातील लढत अधिकच लक्षवेधी ठरत आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज अजित पवारांच्या आठवणीने चांगल्याच भावूक झाल्या. बारामती ही अजित पवारांची श्वास होती. त्यामुळे त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीतच विसावला. त्यांचा येथील प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळा, इमारतींना स्पर्श झाला. त्यामुळे आज या सर्व गोष्टी त्यांच्या आठवणीने रडत आहेत. पण मी स्वतः माझे दुःख तळघरात कोंडले आणि अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले, असे त्या आपले आतापर्यंत दाबून ठेवलेले अश्रू मोकळे करताना म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांनी आज बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला. तत्पूर्वी, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आपल्या भावना व्यक्त केल्या. सुनेत्रा पवार म्हणाल्या, अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी आपण सर्वांनी आपल्या लाडक्या नेत्याला आदरणीय दादांना गमावले. आज त्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. मी आज अर्ज दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटले नव्हते की, बारामतीत ही पोटनिवडणूक होईल. दादा आपल्यात नाहीत असे मला अजूनही वाटत नाही. मला ते मान्यही नाही. पण नियतीने हा काळ माझ्यावर व तुमच्यावर आणला आहे. दादांचे जाणे ही केवळ माझी व माझ्या कुटुंबाची वैयक्तिक हाणी नाही, तर बारामती, महाराष्ट्र व देशाचीही हाणी झाली आहे. आज प्रत्येक पान-फुल दादांच्या आठवणीने रडतंय दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती. बारामतीचा प्रत्येक कार्यकर्ताच नव्हे तर प्रत्येक नागरीक दादांसाठी खरा पांडुरंग होता. बारामतीची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा हाच त्यंचा विश्वास व आधार होता. बारामती म्हणजे दादांचा श्वास होता. म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वास देखील बारामतीच्या मातीतच विसावला. बारामतीच्या प्रत्येक झाडात, फुलात, पानात, रस्त्यात, शाळेत, नदी, इमारतीत दादांचा स्पर्श आहे. त्या निर्जिव इमारती, ती न बोलणारी पाणे आणि फुले सुद्धा आज दादांच्या आठवणीने रडत आहेत, असे सुनेत्रा पवार रडत म्हणाल्या. मी माझे दुःख सुद्धा तळघरात कोंडले सुनेत्रा पवार म्हणाल्या, बारामतीकरांच्या विकासासाठी आदरणीय स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझे दुःख सुद्धा तळघरात कोंडले. अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले. मात्र मला हा धीर तुम्हा बारामतीकरांकडे पाहूनच आला आहे. तुमचे प्रेम, तुमचा पाठिंबा, तुमची साथ हीच माझी शक्ती आहे, हे मी नम्रपणे कबूल करते. गेल्या 35-36 वर्षांत तुम्ही सर्वांनी अजित पवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून दिले. दादांच्या तळमळीने प्रत्येक बारामतीकर आपणच उमेदवार आहोत या भावनेने दादांची निवडणूक नेहमीच हातात घेत होते. त्यामुळेच दादांनी प्रत्येक वेळी आपल्या स्वतःच्याच मताधिक्याचे विक्रम मोडित काढले. ही दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या, तुमच्या मताचा बोजा माझ्यावर आहे म्हणून मी 24 तास काम करतो असे ते म्हणायचे. त्यांच्या माघारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे ही केवळ निवडणूक नाही, तर दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रत्येक बारामतीकराला मिळालेली संधी आहे. शरद पवार साहेबांनी या बारामतीला विकासाचा दृष्टिकोन दिला. त्यावर दादांनी आपल्या कष्टाने रंग भरले, कोंदण भरले, या बारामतीला फुलवले, जगवले आणि जागतिक दर्जाकडे नेले. आपल्या बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होणार नाही याचे मी वचन देते. बारामती जगातील सर्वात विकसित व प्रगत तालुका बनवणे हे दादांचे स्वप्न नव्हते, तर त्यांची जिद्द होती. एक ध्यास होता. दादांना बारामती एक जागतिक दर्जाचे शहर बनवायचे होते. हे स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर असतानाच नियतीने त्यांना आपल्यातून नेले. ते केवळ एक व्यक्ती नव्हते, तर तो एक विचार होता. एक व्यवस्था होते. लोककल्याणकारी, लोककल्याणाची एक तळमळ होते. जोपर्यंत जिवातजीव आहे, तोपर्यंत बारामतीकरांची सेवा करतच राहील, हे शब्द त्यांनी खरे केले आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. त्यांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, हे त्रिवार सत्य सर्वांना ठावूक आहे. त्यांच्या विकासाच्या विचारांना पुढे नेण्याचा निर्धार मी केला आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. अजितदादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही सुनेत्रा पवार अजित पवारांची आठवण काढताना पुढे म्हणाल्या, अजितदादा शब्दाला जागणारे होते. त्यांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही. त्यांना साक्षी ठेवूनच मी तुम्हाला हे ही वचन देते की, माझ्यासाठी पार्थ व जय हेच माझे कुटुंब नाही. संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे. प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. या कुटुंबाच्या विकासासाठी मी आयुष्यभर झटत राहील. दादांच्या अचानक जाण्याने अनेक कार्यकर्त्यांचे मनोबल खचले. पण काळजी करू नका. एकाही कार्यकर्त्याला मी वाऱ्यावर सोडणार नाही. दादांचा जनता दरबार यापुढेही तसाच सुरू राहील. लोकांची कामे होणे ही दादांना श्रद्धांजली आहे. त्यांच्या जाण्याने बारामतीत अत्यंत अस्वस्थतेचे वातावरण होते. आजही तशाच भावना आहे. व्यापारी, शेतकरी, उद्योजक, तरुण, महिला आदी सर्वजण हवालदिल झाले होते. पण आज मी ठामपणे सांगते की, बारामतीचा विकास हा पूर्वीसारखाच वेगाने सुरू राहील, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.
भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; जहीर शेखवर गुन्हा दाखल
भिगवण : भिगवण अपहरण प्रकरणात पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आला आहे. आपण मुलासोबत स्वत:च्या मर्जीने गेल्याने तरुणीने सांगितले होते. मात्र, आता जहीर शेखने आपले अपहरण केल्याची तक्रार केली आहे. तिने आपल्यावर लैगिंक अत्याचार करुन कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. तिच्या तक्रारीनसुार जहीर शेखसह चौघांविरोधात अपहरण आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला […] The post भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; जहीर शेखवर गुन्हा दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘रवींद्र एरंडे’च्या अडचणीत वाढ; ८ पीडित महिलांची ओळख पटली
नाशिक : प्रतिनिधी एकीकडे नाशिकमधील वासनांध भोंदू अशोक खरात याच्या महिला लैगिंक शोषण प्रकरणाने देशात खळबळ उडालेली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असतानाच त्याची पुनरावृत्ती शहरातील सातपूर येथे उघडकीस आली आहे. तथाकथित पत्रकार असलेल्या रवींद्र एरंडेच्या टॅब व हार्डडिस्कमधून महिलांच्या लैंगिक अत्याचाराचे तब्बल १२१ व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. रवींद्र एरंडे याच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत 4 […] The post ‘रवींद्र एरंडे’च्या अडचणीत वाढ; ८ पीडित महिलांची ओळख पटली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी पुन्हा एकदा अजित पवारांच्या अपघाताशी भोंदू अशोक खरातचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवारांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाले होते. खरातचा व्हीएसआर कंपनीच्या विमानातून झालेला प्रवास व त्याचे अनुयायी पाहता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का? हा संशय अधिक गडद होतो, असे ते म्हणालेत. अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले होते. तत्पूर्वी, त्यांच्या घराबाहेर कथितपणे काळी जादू झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. आमदार रोहित पवार या प्रकरणी वारंवार संशय व्यक्त करत काही सत्ताधारी नेत्यांवर संशय व्यक्त करत आहेत. या प्रकरणी महाराष्ट्रात एफआयआर दाखल करण्यात अपयश आल्यानंतर त्यांनी थेट कर्नाटकात जाऊन एफआयआर दाखल केला. या पार्श्वभूमीवर त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका विधानाचा दाखला देत उपरोक्त आरोप केला आहे. रोहित पवार नेमके काय म्हणाले? रोहित पवार आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ‘समता पतसंस्थे’त भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती, भोंदू खरातचा VSR कंपनीच्या विमांनामधून अनेकदा झालेला प्रवास आणि त्याचे अनुयायी हे सगळं बघता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का? यासंदर्भातील संशय अधिक गडद होत आहे. अजितदादांच्या घातपातासंदर्भात चौकशी करताना सीआयडीने खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांचा देखील तपास करायला हवा, असे ते म्हणाले. आता पाहू काय म्हणाल्या अंजली दमानिया? अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी भोंदू अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित काही महत्त्वाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, समता नावाची एक पतसंस्था आहे. त्यात पैसे टाकले किंवा काढले की एसएमएस येतो. मी या संस्थेची पूर्ण माहिती काढली आहे. त्यात मला अनेक गोष्टी समजल्या. 27 जानेवारी रोजी म्हणजे अजित पवारांच्या निधनाच्या एक दिवस आधी, खरातच्या समता पतसंस्थेच्या खात्याचे 17 मेसेज आले होते. तद्नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवशी (28 जानेवारी) 19 मेसेज आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 29 जानेवारी 10, 30 जानेवारी 8, तर 31 जानेवारी रोजी 8 मेसेज आलेत. या व्यवहाराची मी एसआयटीकडे चौकशी करण्याची मागणी करणार आहेत, असे दमानिया यांनी म्हटले आहे. हे ही वाचा… बिनविरोध निवडणूक हे भाजपचे सोयीचे राजकारण:काँग्रेसने वसंतराव चव्हाण अन् भालकेंच्या मृत्यूनंतर झालेल्या निवडणुकीचा दिला दाखला काँग्रेसने बिनविरोध निवडणूक करणे हे भाजपच्या सोयीचे राजकारण असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने या प्रकरणी भाजपवर शरसंधान साधताना खासदार वसंतराव चव्हाणांच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? मंगळवेढ्याला भारत भालकेंच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. भाजप बिनविरोध निवडणूक करण्याच्या मुद्यावर केवळ आपल्या सोयीने राजकारण करतो, असे काँग्रेसने म्हटले आहे. वाचा सविस्तर
नांदेडात सलग तिस-या दिवशी पाचवा खून
नांदेड : प्रतिनिधी नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांत गुंडराज पाहायला मिळत आहे. सलग तिस-या दिवशी पाचवी हत्या करण्यात आली आहे. नांदेड शहरातील श्रीनगर भागात दिवसाढवळ्या तरुणाला रस्त्यात गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. धक्कादायक म्हणजे हा तरुण शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे उघडकीस आले आहे. या हत्येने नांदेडमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ही […] The post नांदेडात सलग तिस-या दिवशी पाचवा खून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नांदेडमध्ये ४८ तासांत पाचवी हत्या
नांदेड : प्रतिनिधी नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांत गुंडराज पाहायला मिळत आहे. गेल्या ४८ तासांत पाचवी हत्या करण्यात आली आहे. नांदेड शहरातील श्रीनगर भागात दिवसाढवळ्या तरुणाला रस्त्यात गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. धक्कादायक म्हणजे हा तरुण शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे उघडकीस आले आहे. या हत्येने नांदेडमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ही […] The post नांदेडमध्ये ४८ तासांत पाचवी हत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तसेच महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना काही अंशी यश देखील आले आहे. बारामतीनंतर आता राहुरी विधानसभेची पोटनिवडणूकही बिनविरोध करण्यासाठी भाजपने शेवटच्या क्षणी कंबर कसली आहे. भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर महायुतीतर्फे त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. मात्र, आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची अचानक भेट घेतल्याने, राहुरीची ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांशी प्राजक्त तनपुरेंची फोनवरून चर्चा राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी अचानक प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या तिन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बंद दाराआड चर्चेदरम्यान रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राजक्त तनपुरे यांचे फोनवरून बोलणे करून दिल्याचे समजते. या नाट्यमय घडामोडींमुळे तनपुरे आता निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ते नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्राजक्त तनपुरेंची प्रतिक्रिया या चर्चेच्या नंतर प्राजक्त तनपुरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांनी मला विनंती केली आहे. विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. याबाबत मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल. माझा उमेदवारी अर्ज भरुन तयार आहे. ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवायचे म्हणतोय, तो मुद्दाच सोडवण्याची तयारी त्यांनी दाखवली असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन मला निर्णय घ्यावा लागेल, असे तनपुरे यांनी म्हटले आहे. प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया पाहता ते या निवडणुकीतून माघार घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची विनंती केली- रवींद्र चव्हाण प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात एखाद्या लोकप्रतिनिधीचे निधन झाल्यानंतर त्याच्या घरातील कोणी निवडणुकीला सामोरे जात असेल, तर ती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. प्राजक्त तनपुरे, देवेंद्र फडणवीस, मी आम्ही सगळ्यांनी विधानसभेत एकत्र काम केले आहे. ते गेल्यावेळी राज्यात मंत्री म्हणून कार्यरत होते. राहुरी मतदारसंघातील विकासाचे विषय आणि समस्या एकत्रितपणे सोडवता येऊ शकतात. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांनी पोटनिवडणुकीतून माघार घ्यावी, अशी विनंती आम्ही त्यांना केली. ते आता त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेतील, अशी माहिती चव्हाण यांनी दिली आहे. ते जे म्हणतील त्या सगळ्या विकास कामाचा विचार केला जाईल पुढे बोलताना रवींद्र चव्हाण म्हणाले, राहुरी मतदारसंघात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणे, एमआयडीसी निर्माण होणे गरजेचे आहे. येथील धरणातील गाळ काढण्याची गरज आहे. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघातील समस्या कळकळीने मांडल्या. आम्ही यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे फोनवरुन बोलणे करुन दिले. आम्ही सर्वजण प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत आहोत. ते जे म्हणतील त्या सगळ्या विकास कामाचा विचार केला जाईल. प्राजक्त तनपुरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या या भागातील वलयाची आम्हाला कल्पना आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आम्ही उमेदवारी मागे घ्यायची की नाही, हा निर्णय त्यांच्यावर सोडला असल्याचे चव्हाण म्हणाले.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी काळात भाजप पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पुण्यात भाजपचे संघटन ५१ टक्क्यांच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष संघटनेच्या बळकटीवर भर देत, राज्यभरातही संघटना वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. पक्षाचा विस्तार करण्यासाठी युवकांना मोठ्या प्रमाणावर जोडण्याचा संकल्पही त्यांनी मांडला. बावनकुळे हे भाजपा पक्ष स्थापना दिनानिमित्त पुणे शहरातील भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मंत्री माधुरी मिसाळ, भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत बोलताना बावनकुळे यांनी महत्त्वाचे विधान केले. ते लवकरच बारामतीला जाणार असून, सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज स्वतः भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा भाजप जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामतीत ७५ टक्क्यांहून अधिक मतांनी विजय मिळवण्याचा दावाही त्यांनी केला. बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षाला बारामतीमध्ये निवडणूक न लढवण्याचे आवाहन केले. अजित पवार यांचा दीर्घ राजकीय प्रवास काँग्रेससोबत राहिला आहे, त्यामुळे त्यांच्या राजकीय योगदानाचा विचार करून काँग्रेसने सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. अशोक खरात प्रकरणावर बोलताना, हा विषय संवेदनशील असून विशेष तपास पथकाच्या (SIT) अहवालानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

26 C