SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

25    C
... ...View News by News Source

निवडणूक निकाल लांबणार?

एकावेळी एकाच वॉर्डची मतमोजणी करण्यात येणार असल्याने या वेळी महापालिका निवडणुकीचे निकाल रखडण्याची शक्यता आहे. वॉर्डनिहाय मतमोजणी होणार असल्यामुळे साधारणपणे दुपारी स्पष्ट होणारे निकालाचे चित्र मध्यरात्रीपर्यंत स्पष्ट होईल की नाही याची शाश्वती नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. या विषयी व्यवस्थापन मात्र अजून संभ्रमातच आहे. नेमकी मतमोजणी कोणत्या पद्धतीने करायची याच्या मार्गदर्शन सूचना तातडीने जारी कराव्यात, यासाठी […] The post निवडणूक निकाल लांबणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 1:40 am

रिलायन्सच्या वाढीचे श्रेय गुजरातला

मुकेश अंबानी, गुजरातमध्ये ७ लाख कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा मुंबई : प्रतिनिधी रिलायन्स समूहासाठी गुजरात हे शरीर, हृदय आणि आत्मा आहे, असे सांगत मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या वाढीचे श्रेय गुजरातला दिले. तसेच भारताला कोणत्याही बा संकटापासून धोका नाही. कारण आपल्याकडे नरेंद्र मोदी नावाची अजेय भिंत असल्याचे अंबानी म्हणाले. गुजरातमधील राजकोट येथे रविवारी झालेल्या पहिल्या व्हायब्रंट गुजरात […] The post रिलायन्सच्या वाढीचे श्रेय गुजरातला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 1:17 am

‘झुंबा फॉर डेमॉक्रसी’ उपक्रमाला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिका आणि इम्प्रेशन फिटनेस, कातपूर रोड यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत ‘झुंबा फॉर डेमोक्रसी’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात लातूर शहरातील विद्यार्थी, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मतदानाचा जागर केला.आरोग्यासोबतच लोकशाहीचा उत्सव […] The post ‘झुंबा फॉर डेमॉक्रसी’ उपक्रमाला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 1:17 am

लातूरच्या विकासासाठी लातूरकर समर्थ; लुडबूड नको

लातूर : प्रतिनिधी लातूर महानगरपालिकेची निवडणुक लागताच निलंगा, औसा, उदगीर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, बारामती, नागपूर, ठाणे, मुंबई येथून कोणीतरी येतं आणि लातूरच्या बाबतीत बोलून जातं. ते येथे येतात ते फक्त लातूरचे लचके तोडण्यासाठी. लातूरकरांशी त्यांना काहींही देणं-घेणं नाही. लातूर हे लातूरकरांचं आहे. लातूरचा विकास करण्यासाठी लातूरकर समर्थ आहेत. कोणी येथे येऊन सांगण्याची, लुडबुड करण्याची गरज […] The post लातूरच्या विकासासाठी लातूरकर समर्थ; लुडबूड नको appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 1:15 am

स्वार्थासाठी ठाकरे बंधूंची युती

मुंबईचा महापौर मराठीच होणार, फडणवीस-शिंदे यांची ग्वाही मुख्यमंत्र्यांचेही लाव रे तो व्हिडिओ मुंबई : प्रतिनिधी मुंबई व मुंबईतील मराठी माणूस सुरक्षित आहे. कोणाच्या बापाचा बाप आला तरी मुंबई वेगळी होऊ शकत नाही. मुंबई नाही तर ठाकरे बंधूंचे अस्तित्व, त्यांचे राजकारण धोक्यात आले आहे. त्यामुळे मुंबई खतरेमेंची आवई उठवली जात असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि […] The post स्वार्थासाठी ठाकरे बंधूंची युती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 1:13 am

मतदारांच्या अपेक्षा काँग्रेस पक्षच पूर्ण करू शकतो

लातूर : प्रतिनिधी सर्व समान्यांना सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, त्यांचा आर्थिक स्तर उंचावून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणने, हा काँग्रेस पक्षाचा विचार आहे. त्या विचाराचे पाईक म्हणून माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, जिल्हा बॅकेचे चेअरमन धिरज देशमुख हे लातूर शहर महानगरपालिकेचा सर्वागीन विकासासाठी सातत्याने विकासाच्या योजना खेचून आणत असून मतदारांच्या अपेक्षा केवळ काँग्रेस पक्षच […] The post मतदारांच्या अपेक्षा काँग्रेस पक्षच पूर्ण करू शकतो appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 1:12 am

उमेदवारी मागे घेण्यासाठी ५ ते १५ कोटींची ऑफर

राज ठाकरे यांचा भाजप महायुतीवर पुन्हा हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधी कल्याण डोंबिवलीत भाजपची माणसे पैसे वाटतात आणि त्यांना शिंदेंची माणसे पकडून मारतात, ही अशी अवस्था आपण पाहत आहोत. यांनी जर विकास केला असता तर त्यांना मताला पाच-पाच हजार का द्यावे लागत आहेत, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. तसेच कल्याण डोंबिवलीत भाजपने ठाकरेंच्या उमेदवारांना माघार […] The post उमेदवारी मागे घेण्यासाठी ५ ते १५ कोटींची ऑफर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 1:10 am

१४ वर्षांखालील मुलांवर प्रचारासाठी बंदी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वाटेल ते करत आहे. राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. पायाला भिंगरी लावून प्रचाराचा तोफा डागत आहे. कुठेही कमी पडायला नको म्हणून, नातेवाईक, मित्र, मित्रांचे मित्र, बाहेर गावाहून माणसे बोलावून प्रचार सुरू केला आहे. यातच लहान मुलांना देखील प्रचारात उतरवल्याचे […] The post १४ वर्षांखालील मुलांवर प्रचारासाठी बंदी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Jan 2026 1:08 am

अमरावती महापालिका: प्रचाराचे भोंगे आज थांबणार:15 जानेवारीला मतदान, 16 ला निकाल; भाजप, सेना, राकाँ, एमआयएमच्या सभांचा जोर

अमरावती महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार आज, मंगळवार, १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार आहे. यानंतर गुरुवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. मतमोजणी शुक्रवार, १६ जानेवारी रोजी होणार असून, त्यानंतर नवीन नगरसेवक कोण हे स्पष्ट होईल. अमरावती शहरातील २२ प्रभागांमधून एकूण ८७ नगरसेवक निवडून येणार आहेत. यासाठी ६६१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी भाजप उमेदवारांसाठी सभा घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी ‘रोड शो’ देखील केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला, तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी जनमताचा कौल मागितला. या सर्व नेत्यांनी विकासाचे व्हिजन मांडत अमरावतीला विकसित शहर बनवण्याचे आश्वासन दिले. याच काळात एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही जाहीर सभा घेऊन इतर पक्षांवर टीका केली. एमआयएम हा जनतेसाठी लढणारा एकमेव पक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या प्रचारात काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन पक्ष मात्र काहीसे मागे पडले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमरावतीचा दौरा केला, परंतु त्यांची कोणतीही जाहीर सभा झाली नाही. त्यांनी काही प्रभागांमध्ये जाऊन काँग्रेस उमेदवारांसाठी मते मागितली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचाही कोणताही मोठा नेता अद्याप अमरावतीत प्रचारासाठी आला नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या दिवसांत दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभा होण्याची शक्यता व्यक्त केली होती, परंतु तसे काहीही घडले नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, खासदार अरविंद सावंत आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सभा होण्याची चर्चा होती. शिवसेना जिल्हा प्रमुख पराग गुडधे आणि काँग्रेस महानगर अध्यक्ष बबलू शेखावत यांनीही आपापल्या नेत्यांच्या सभांची शक्यता वर्तवली होती, मात्र यापैकी कुणीही प्रचारासाठी आले नाही.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 11:30 pm

राजस्थानमधील खुनाचा फरार आरोपी मोर्शीत पकडला:श्रीनाथजी मंदिर परिसरातील गुन्ह्यात राजस्थान पोलिसांकडून अटक

मोर्शी येथे राजस्थानमधील खुनाच्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद इसहाक मोहम्मद शफी लोहार (वय ३८) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. राजस्थानच्या श्रीनाथजी मंदिर, नागद्वारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तो फरार झाला होता. आरोपी मोहम्मद इसहाक याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये राजस्थानमध्ये गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता आणि राजस्थान पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, हा आरोपी मोर्शी येथे लपून बसल्याची माहिती राजस्थान पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ मोर्शी पोलिसांशी संपर्क साधला. दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचून मोहम्मद इसहाकला मोर्शी शहरातून ताब्यात घेतले. मोर्शी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, स्वप्निल बायस्कर आणि अथर्व कोहळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:50 pm

शिक्षणाधिकाऱ्यांच्या बैठकांवर सीईओंची बंधने:आठवड्यात फक्त मंगळवार, शनिवार निश्चित; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळणार

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर नियंत्रण आणले आहे. यापुढे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह निम्नस्तरीय अधिकाऱ्यांना आठवड्यातून केवळ मंगळवार आणि शनिवार या दोनच दिवशी बैठका घेता येणार आहेत. हा निर्णय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी घेण्यात आला आहे. शालेय कामकाजाच्या दिवशी बैठका आयोजित केल्यास शिक्षकांना अध्यापन करता येत नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. सीईओ महापात्र यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. प्रत्येक विद्यार्थी ज्ञानाच्या दृष्टीने प्रगत आणि प्रगल्भ व्हावा, हा या उपक्रमांमागील मुख्य उद्देश आहे. मात्र, पुरेसे अध्यापनच होत नसेल, तर हा उद्देश साध्य होणार नाही, हे लक्षात घेऊन ही नवी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या नव्या आचारसंहितेनुसार, शिक्षकांना यापुढे कोणत्याही दिवशी वरिष्ठाधिकाऱ्यांकडून बैठकीसाठी बोलावले जाणार नाही. तसेच, मुख्याध्यापक किंवा कोणत्याही शिक्षकाला शाळा सोडून इतर कामासाठी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकाऱ्यांकडे जायचे असल्यास, त्यासाठी संबंधित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. यामुळे शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती वाढेल आणि अध्यापनाचे कार्य सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. सीईओ संजीता महापात्र यांनी सुरू केलेल्या 'गप्पा विथ सीईओ' या कार्यक्रमादरम्यान अनेक शाळांना भेटी दिल्या. त्यावेळी त्यांना अनेक ठिकाणी शिक्षक अनुपस्थित आढळले. शिक्षणाधिकारी कार्यालय, पंचायत समिती स्तरावरील गटशिक्षणाधिकारी यांच्या बैठका किंवा टपाल पोहोचवण्यासाठी गेल्याचे कारण शिक्षकांनी दिले. या बेशिस्तपणाला आळा घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:27 pm

खोलापुरात एसटी अधिकृत थांब्यावर थांबत नाही:300 मीटर अंतरावर थांबल्याने विद्यार्थी, प्रवाशांना पायपीट

अमरावती ते दर्यापूर राष्ट्रीय मार्गावरील खोलापूर बस थांब्यावर एसटी बसेस थांबत नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अधिकृत थांब्याऐवजी बसेस सुमारे ३०० मीटर अंतरावर थांबत असल्याने पासधारक विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना पायपीट करावी लागते. खोलापूर येथून परिसरातील नावेद, वाठोडा शुक्लेश्वर, हरताळा, खालकोणी, हातोटी, बोरखडी, काकरखेडा यांसारख्या अनेक गावांतील विद्यार्थी, कर्मचारी आणि रोजंदारीवर काम करणारे युवक अमरावती आणि दर्यापूर येथे ये-जा करतात. सकाळी ९ ते ११ या वेळेत या थांब्यावर मोठी गर्दी असते. एसटी महामंडळाच्या नोंदीनुसार, खोलापूर हा लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी एक महत्त्वाचा थांबा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दररोज सुमारे तीनशे विद्यार्थी अमरावतीला शिक्षणासाठी जातात. या विद्यार्थ्यांनी एसटीचे पास काढले असले तरी, त्यांना योग्य ठिकाणाहून बसमध्ये चढता येत नाही. यामुळे त्यांना नाहक धावपळ करावी लागते आणि मोठा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास थांबवण्यासाठी येथील नागरिकांनी अनेक वेळा एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत. मात्र, एसटी चालकांच्या थांबण्याच्या पद्धतीत कोणताही बदल झालेला नाही. विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ येत असल्याने, महामंडळाने या निवेदनाची दखल घेऊन बसेस अधिकृत थांब्यावरच थांबवाव्यात, अशी पालकांची मागणी आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:26 pm

शिक्षक मतदारसंघात 33 हजार मतदार:अंतिम यादी जाहीर, तरीही मतदार नोंदणी सुरूच

विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी सोमवार, १२ जानेवारी रोजी घोषित करण्यात आली आहे. या यादीनुसार मतदारसंघात एकूण ३३ हजार नऊ मतदार आहेत. मात्र, अद्यापही नवी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू असून, संबंधित मतदारांची नावे पुरवणी यादीत समाविष्ट केली जातील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार डॉ. सिंघल यांनी सोमवारी सायंकाळी माध्यमांशी संवाद साधला. १ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकानुसार ही मतदार यादी तयार करण्यात आली आहे. मागील वेळी झालेल्या बोगस मतदार नोंदणीची दखल घेऊन यावेळी सुरुवातीपासूनच बारकाईने लक्ष देण्यात आले. यासाठी विभागातील पाचही सहायक निवडणूक अधिकाऱ्यांना (जिल्हाधिकाऱ्यांना) विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. प्राप्त अर्जांची बारकाईने पडताळणी करूनच पात्र शिक्षकांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी दरवेळी नव्याने मतदार यादी तयार केली जाते. गेल्या वर्षी ३० सप्टेंबरपासून मतदार नोंदणी सुरू करण्यात आली होती. या नोंदणीसोबतच दावे आणि हरकतीही स्वीकारण्यात आल्या. ६ नोव्हेंबर हा हरकती स्वीकारण्याचा शेवटचा दिवस होता. या कालखंडात प्राप्त झालेले दावे व हरकती विचारात घेऊन प्रत्येक तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतरच संबंधित नावांना अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले, असे आयुक्त डॉ. सिंघल यांनी स्पष्ट केले. यावेळी अप्पर आयुक्त संजय जाधव, तहसीलदार अनिता झाडे, नायब तहसीलदार श्याम देशमुख, विभागीय माहिती कार्यालयाचे सहायक संचालक विजय राऊत आदी अधिकारी उपस्थित होते. अंतिम मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेत ३ ते १८ डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात आल्या. तत्पूर्वी, ३० हजार ८६५ नावांचा समावेश असलेली प्रारूप मतदार यादी घोषित करण्यात आली होती. या यादीवर सुमारे ३ हजार ९१७ हरकती व दावे प्राप्त झाले. या हरकतींच्या आधारे १ हजार ४९ मतदारांची नावे रद्द करण्यात आली. त्यामुळे डिसेंबरअखेर या यादीत २९ हजार ८१६ नावे उरली होती. मात्र, याच काळात ४ हजार ४६ शिक्षकांकडून नवीन अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची पडताळणी करून त्यातील पात्र नावे प्रारूप यादीत समाविष्ट करण्यात आली, ज्यामुळे अंतिम मतदार यादीतील एकूण नावे ३३ हजार नऊवर पोहोचली.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:09 pm

पुण्याचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच असेल:सुप्रिया सुळे यांचा विश्वास; भाजपवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याचा पुढचा महापौर राष्ट्रवादीचाच असेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकशाहीत काहीही निश्चित नसते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केली. सुळे यांनी 'ओरिजिनल भाजप' आणि 'भाजप २.०' मध्ये फरक असल्याचे म्हटले. दिवंगत गिरीश बापट आणि प्रकाश जावडेकर यांच्यासारखा सुसंस्कृतपणा आताच्या भाजपमध्ये उरला नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. भाजप केवळ 'विनेबिलिटी' आणि सत्तेसाठी मूल्यांशी तडजोड करत असून, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच पक्षात घेतले जात असल्याची टीका त्यांनी केली. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असताना, खासदार सुप्रिया सुळे यांनी लाल महाल येथून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. सुळे यांनी पुणेकरांना दिलेल्या मोफत बस आणि मेट्रो प्रवासाच्या आश्वासनावरही भाष्य केले. हे आश्वासन केवळ निवडणुकीपुरते नसून, तज्ज्ञांच्या अभ्यासातून मांडलेला 'शब्द' असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन 'अशक्य' असल्याचे म्हटल्यानंतर, सुळे यांनी भाजपच्या १५ लाख रुपयांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली. त्या म्हणाल्या, 'आमचा अनुभव आणि काम वेगळे आहे, आम्ही दिलेले शब्द पाळतो.' तसेच, त्यांनी भाजपच्या '४०० पार'च्या घोषणेचे काय झाले, असा सवाल करत टोला लगावला. शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या प्रश्नावरून सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. पुण्यात 'कोयता गँग'ची दहशत आणि गुन्हेगारीचा वाढलेला आलेख हा भारत सरकारचाच डेटा सांगत असल्याचे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी यावर आत्मचिंतन करावे आणि पुण्यातील सामाजिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. केवळ 'काम बोलतं' असे म्हणून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृती हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले. कौटुंबिक वादांपेक्षा राज्यापुढील आर्थिक आणि जागतिक आव्हाने अधिक महत्त्वाची असल्याचे सुळे यांनी नमूद केले. निर्यात धोरण, अमेरिका-चीन संबंधांमधील तणाव आणि वाढलेला टॅरिफ यांचा परिणाम पुणेकरांच्या दैनंदिन आयुष्यावर आणि औद्योगिक क्षेत्रावर होत आहे, असे त्यांनी सांगितले. शरद पवार यांच्या काळात विकसित झालेली हिंजवडी, तळेगाव आणि चाकण सारखी औद्योगिक क्षेत्रे वाचवणे हे आपले ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषद निवडणुकांच्या विलंबाबाबत त्यांनी सरकारला कोर्टाच्या निकालाचा संदर्भ देत लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आवाहन केले. राज ठाकरे यांच्या मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर बोलताना, त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा दाखला दिला. 'जो महाराष्ट्रात आणि मुंबईत राहतो, तो प्रत्येक जण मराठी आहे,' असे सुळे म्हणाल्या.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:04 pm

काँग्रेसला विचारात घेतल्याशिवाय पुण्यात सत्ता स्थापन नाही:विश्वजीत कदम यांचा ठाम विश्वास, महायुतीवर टीका

काँग्रेसला विचारात घेतल्याशिवाय पुणे महानगरपालिकेत सत्ता स्थापन करणे कोणालाही शक्य होणार नाही, असा ठाम विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केला. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि समविचारी पक्षांना चांगले यश मिळेल, असेही ते म्हणाले. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या आघाडीने सोमवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी कदम बोलत होते. या पत्रकार परिषदेला शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर, काँग्रेस नेते विरेंद्र किराड, अमीर शेख, यशराज पारखी, सुनील शिंदे आणि प्राची दुधाने यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विश्वजीत कदम यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. यंदाच्या मनपा निवडणुकीमुळे नागरिकांना आपला आवाज मांडण्याची संधी मिळत आहे, मात्र महायुतीमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून राजकीय नाटक पाहायला मिळत आहे. खालच्या पातळीवरील टीका करूनही सत्तेत एकत्र राहून जनतेची फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पुणे शहरातील अनेक मूलभूत प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, मनपा निवडणूक उशिरा झाल्याने प्रशासक राजवटीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा दावाही त्यांनी केला. कदम पुढे म्हणाले की, केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपने प्रचारात सुरुवातीला आघाडी घेतल्याचे दिसत होते, मात्र काँग्रेस आघाडीने प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार देत प्रभावी प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस पक्ष तळागाळात रुजलेला असून जनतेचा विश्वास काँग्रेसवर आहे, असे त्यांनी नमूद केले. महायुतीतील पक्षांकडून तिजोरी आपली असल्याचे दावे केले जात आहेत, मात्र तिजोरीतील पैसा जनतेचा असून जनताच खरी मालक आहे, असे कदम यांनी स्पष्ट केले. राज्याची आर्थिक स्थिती बिघडलेली असताना मोफत योजनांच्या घोषणा करणे चुकीचे आहे. शेतकरी कर्जबाजारी असताना कर्जमाफी दिली जात नाही, तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेचे दोन महिन्यांचे पैसे एकत्र देणे हा निव्वळ निवडणूकपूर्व राजकीय निर्णय असल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यात महिलांची सुरक्षितता ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी असून त्यांच्यावर अत्याचार होऊ नयेत, यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले. आपल्या राजकीय वाटचालीबाबत बोलताना कदम यांनी सांगितले की, पुण्यात लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसतानाही पक्षाच्या आदेशाने त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली होती. सध्या ते सांगलीत आमदार म्हणून कार्यरत असून भविष्यातही सांगलीतूनच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:03 pm

लव्ह जिहाद, धर्मांतर भारताला कमकुवत करण्याचे मोठे षड्यंत्र:जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, 'ईस्ट इंडिया कंपनी' प्रमाणे वर्चस्वाचा योजना

द्वारका शारदा पीठाधीश्वर श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज यांनी 'लव्ह जिहाद' आणि 'धर्मांतरा'ची वाढती प्रकरणे भारतीय संस्कृती, सनातन धर्म आणि हिंदुस्थानला कमकुवत करण्याचे एक नियोजित षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या संकटाची तुलना 'ईस्ट इंडिया कंपनी'च्या कपटाशी केली, ज्याप्रमाणे कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने येऊन देशाला गुलाम बनवले. शंकराचार्यांनी पुणे येथे वेदाचार्य घैसासगुरुजी वेदपाठशाळेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात भागवत कथेचे निरूपण केले. याप्रसंगी 'हिंदु जनजागृती समिती' आणि 'राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती'च्या अधिवक्त्यांनी त्यांची भेट घेतली. शंकराचार्यांनी स्पष्ट केले की, धर्मांतर आणि लव्ह जिहाद केवळ धार्मिक नसून राजकीय वर्चस्व मिळवण्याची दूरगामी योजना आहे. लोकशाहीत बहुमत हाच सत्तेचा आधार असल्याने, हिंदूंची संख्या कमी करून स्वतःची लोकसंख्या वाढवणे हा एक सुनियोजित कट आहे. भविष्यात मताधिकाराच्या जोरावर शासन व्यवस्था हातात घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. ख्रिश्चन मिशनरीसुद्धा 'सेवे'च्या नावाखाली प्रलोभने देऊन हिंदूंचे धर्मांतर करत असल्याचे त्यांनी नमूद केले. या षड्यंत्राला आळा घालण्यासाठी शंकराचार्यांनी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने अन्य राज्यांप्रमाणे 'लव्ह जिहाद'विरोधात कठोर कायदा करावा, अशी मागणी केली. तसेच, अल्पसंख्याकांना त्यांच्या मदरसा आणि चर्चमध्ये धर्मशिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य असल्याप्रमाणे, शिक्षण मंत्रालयाने शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये हिंदू मुलांना 'हिंदु धर्मशिक्षण' अनिवार्य करावे, असे विधान त्यांनी केले. शालेय जीवनापासूनच मुलांना धर्माचे आणि संस्कारांचे ज्ञान मिळाल्यास ते कोणत्याही प्रलोभनाला किंवा षड्यंत्राला बळी पडणार नाहीत, असे शंकराचार्यांनी सांगितले. त्यांनी सर्व राजकीय पक्ष, मुख्यमंत्री आणि राष्ट्रप्रेमी संस्थांना या विषयाचे गांभीर्य ओळखून एकत्र येण्याचे आवाहन केले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:03 pm

पाकपर्यंतचा रस्ता चीनच्याच हद्दीत

बीजिंग : चीनने चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (सीपीईसी) संदर्भात भारतीय माध्यमांच्या प्रश्नांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी सोमवारी सांगितले की, ज्या भागाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यांनी सांगितले की, आपल्याच प्रदेशात पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) विकसित करणे हा चीनचा अधिकार आहे आणि यावर कोणताही प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही. […] The post पाकपर्यंतचा रस्ता चीनच्याच हद्दीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 9:54 pm

गुगल-मायक्रोसॉफ्ट आणताहेत ‘पास-की’ सिस्टम!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गुगल आणि मायक्रोसॉफ्ट आता ‘पासवर्डलेस लॉगिन’कडे वेगाने पाऊल टाकत असून ‘पास-की’ ही नवी सुरक्षा यंत्रणा राबवत आहेत. मात्र, भारतासारख्या विशाल बाजारपेठेत ही यंत्रणा पूर्णपणे यशस्वी होण्यासमोर काही मोठी आव्हाने उभी राहण्याची शक्यता आहे. ‘पास-की’ हे एक असे तंत्रज्ञान आहे ज्यात तुम्हाला कोणताही शब्द किंवा नंबर लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुमच्या फोनमधील […] The post गुगल-मायक्रोसॉफ्ट आणताहेत ‘पास-की’ सिस्टम! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 8:38 pm

तेल ना सोने, ट्रम्पची नजर व्हेनेझुएलाच्या डिजीटल खजिन्यावर!

काराकस : वृत्तसंस्था व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर जागतिक राजकारणात खळबळ उडाली. मात्र, अमेरिकेची ही कारवाई केवळ तिथल्या अफाट तेल साठ्यासाठी आहे की त्यामागे एखादा गुप्त ‘डिजिटल खजिना’ आहे, या चर्चेने आता जोर धरला आहे. व्हेनेझुएलाकडे तब्बल ६० अब्ज डॉलर (सुमारे ५ लाख कोटी रुपये) किमतीचा ‘बिटकॉइन’ साठा असल्याचा खळबळजनक दावा काही आंतरराष्ट्रीय तपास […] The post तेल ना सोने, ट्रम्पची नजर व्हेनेझुएलाच्या डिजीटल खजिन्यावर! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 8:37 pm

सीरियातील ‘इसिस’वर अमेरिकेचे हवाई हल्ले

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेने सीरियामध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले असून, या कारवाईत इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. व्हेनेजुएलामधील कारवाईनंतर यंदाच्या वर्षातील अमेरिकन लष्कराची ही दुसरी मोठी लष्करी कारवाई आहे. डिसेंबर महिन्यात अमेरिकन सैनिकांवर झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात हे हल्ले करण्यात आले आहेत. अमेरिका आणि तिच्या सहयोगी सैन्यदलांनी सीरियामध्ये मोठ्या प्रमाणावर […] The post सीरियातील ‘इसिस’वर अमेरिकेचे हवाई हल्ले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 8:35 pm

जागतिक तेल बाजार धास्तावला; हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार?

तेहरान : वृत्तसंस्था हॉर्मुझ सामुद्रधुनीवर पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे या अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गावर धोका निर्माण झाला असून, यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीचा ‘भडका’ उडण्याची भीती निर्माण झाली आहे. जर हा मार्ग विस्कळीत झाला, तर केवळ तेलच नाही, तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते. इराणमध्ये सध्या […] The post जागतिक तेल बाजार धास्तावला; हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 8:34 pm

ट्रम्प टॅरिफला भारताचा हादरा; २७ युरोपीय देशांशी ट्रेड डील

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिकेच्या टॅरिफनंतर भारताने चीन आणि रशियात आपली निर्यात वाढवल्यामुळे भारताची चीन आणि रशियासोबत जवळीक वाढत आहे, हाच आता अमेरिकेसाठी डोकेदुखीचा विषय बनला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचा जळफळाट होण्याचे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे भारत आणि अमेरिकेत मोठी ट्रेड डिल होणार होती, मात्र सध्या तरी तीचा वेग मंदावल्याचे पहायला मिळत आहे, […] The post ट्रम्प टॅरिफला भारताचा हादरा; २७ युरोपीय देशांशी ट्रेड डील appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 8:33 pm

ठाकरेंची दुटप्पीपणाची भूमिका- साटम:म्हणाले- मुंबईकर तुमचा चांगलाच समाचार घेतील

आज मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचे शिवतीर्थावर आयोजन करण्यात आले आहे. थोड्याच वेळात फडणवीस आणि शिंदे कार्यकर्त्यांना संबोधित करतील. तसेच, काल राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवर शिंदे-फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 8:26 pm

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची सभा:ठाण्यातून धर्मवीर आनंद दिघेंची पाटीच गायब, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडत आहे. ठाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला समजला जातो. याच ठाण्यात आज ठाकरेंची तोफ धडाडली. या सभेपूर्वी उपस्थितांकडून महाराष्ट्रात एकच ब्रॅंड ठाकरे ब्रॅंड अशा घोषणा देण्यात आल्या. सुषमा अंधारे यांनी त्यांच्या आक्रमक शैलीत यावेळी भाष्य केले. त्या म्हणाल्या, गेली चार दिवस झाले माध्यमे आकडे दाखवत आहेत, कोणाकडे किती नगरसेवक आहेत त्याचे. आम्हाला नम्रपणे त्यांना सांगायचे आहे, जे आकडे तुम्ही दाखवत आहात, त्या सगळ्यांच्या एबी फॉर्मवर 2017 साली ठाकरेंची सही होती. ते सगळे आकडे जे निवडून आले, त्यांना ठाकरेंकडे बघून मते मिळाली होती. त्यामुळे आम्ही त्या आकड्यांची चिंता करत नाही. पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, ज्या लोकांनी धर्मवीर चित्रपट काढला, त्या धर्मवीर नावाची पाटीच आज ठाण्यात दिसत नाही. ते सांगतात, बाळासाहेबांचे विचार आम्ही जपले, तर माझे साधे दोन प्रश्न आहेत, गणेश नाईकांनी असे म्हटले होते की टांगा पलटा घोडे फरार करेल, पण हे वाक्य आपल्याबद्दल बोलले असते तर आपण आत्तापर्यंत त्यांच्या घरात घुसलो असतो. पण त्यांनी पलटून उत्तरही दिले नाही. हे काय बाळासाहेबांचे विचार सांगतात, अशी टीका अंधारे यांनी केली.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 8:02 pm

जे आरक्षणाच्या विरोधात गेले त्यांना मतदान करू नका:मनोज जरांगेंची स्पष्ट भूमिका; म्हणाले- मराठ्यांनी आता कट्टर आणि कडवट वागले पाहिजे

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यानुसार सर्वत्र राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. जे समाजाच्या विरोधात गेले होते, जे आरक्षणाच्या विरोधात गेले, नेमके तेच आता निवडणुकीत उभे आहेत. त्यांना मतदान करू नका, असे आवाहन जरांगे पाटलांनी केले आहे. मनोज जरांगे म्हणाले, मराठ्यांनी आता कट्टर आणि कडवट वागले पाहिजे. मुस्लिम दलितांची या सरकारने काडी लावून टाकली. या सरकारचा कार्यक्रम करा. इतकी खुन्नस ठेवायची की यांना मतदान करायचे नाही. आम्ही कसे लोकसभेला एवढा फेस काढला होता. निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप होत नाही, तर यांनी पैसे वाटलेच आहेत. खूप माल आहे यांच्याकडे. यांच्याकडे आधी काय होते? आता खूप पैशांचे बंडल आहेत वाटते. शर्टामधून दिसतील असे बंडल हे सोबत ठेवतात. नोटा वाटतात आणि घोळ करतात. या महापालिकेत कोणासोबत कोणाची युती हेच कळत नाही. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, यांचे राष्ट्रवादीसोबत जमते, भाजप शिवसेनेसोबत जमते, काँग्रेससोबतही युती आहे. हे सर्व भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेना सगळे एकत्र आले आहेत. म्हणजे याचे शत्रू कोण तर आम्हीच ना, गोरगरीब जनता? आपल्या पक्षाचा नेता निवडून आला पाहिजे मग युती कुणासोबतही करा असा या लोकांचा अजेंडा आहे. लोक येडे आहेत, यांना पर्याय नाहीत. लोकांना एखादा पर्याय मिळू द्या, मग बघा जनता यांना कसे उलटेपालटे करते असे यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषदा, नगरपालिका अशा स्थानिक लेव्हलच्या निवडणुकीत मी पडतच नाही, आपल्याला असा टप्पू मासा लागतो, त्याला जर माज असेल तर तो माज मी उतरवलाच म्हणून समजा असेही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:31 pm

देशी गाईंवरील पुस्तकांचे प्रकाशन:श्री देशमुख महाराज फाऊंडेशनतर्फे गंगाधर स्वामी समाधी सोहळ्यानिमित्त आयोजन

श्री देशमुख महाराज फाऊंडेशनने देशी गायींवरील विविध पुस्तके एकाच वेळी प्रकाशित करून जागतिक विक्रम नोंदवला आहे. लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये याची नोंद करण्यात आली. 'गौ-कथा सप्ताह' अंतर्गत 'भारतीय कामधेनू' हे पुस्तक सभागृहात उपस्थित सर्व गो-भक्तांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. हा उपक्रम श्री देशमुख महाराज फाऊंडेशनच्या वतीने प.पू. श्री गंगाधर स्वामी यांच्या १९ व्या समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आला होता. देशी गायींच्या प्रजातींबाबत जनजागृती करणे आणि भारतीय सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा जपण्याचा या सप्ताहाचा उद्देश होता. पुण्यात प्रथमच वर्धमान सभागृह, गंगाधाम चौक येथे हा गौ-कथा सप्ताह आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुदास देशमुख महाराज, अध्यक्षा सुवर्णा बालेघाटे, विश्वस्त नरहर शिदोरे, वेदमुर्ती मंदार खळदकर, भोला वांजळे, डॉ. प्रसाद खंडागळे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रसाद खंडागळे यांचा देशी गायींवरील संशोधनातील समर्पण आणि मानवकल्याणासाठीच्या योगदानाबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या वतीने गौरव करण्यात आला. गुरुदास देशमुख महाराज यांनी सांगितले की, जुन्या पिढीला गायीचे महत्त्व माहीत आहे, परंतु नव्या पिढीलाही ते कळावे यासाठी संस्थेने देशी गायींचे महत्त्व सांगणाऱ्या दोन पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. ही पुस्तके संस्थेतर्फे हजारो शाळांमध्ये वाटप केली जाणार आहेत. देशी गायींची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संस्था प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी नमूद केले. डॉ. प्रसाद खंडागळे म्हणाले, पंचगव्य हे शुद्धीकरण, आयुर्वेदीय उपचार, पूजाविधी तसेच काही पारंपरिक औषधांमध्ये वापरले जाते. आज देशी गायींवर, म्हणजेच पंचगव्यावर अनेक संशोधन होत आहेत. त्याद्वारे विविध आजार बरे करण्याचे तसेच विविध औषधांची निर्मिती केली जात आहे. ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:05 pm

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार:शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई भागातील ज्येष्ठांना मिळणार लाभ

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात प्रभाग क्र २५ मधील ज्येष्ठांसाठी आपल्या प्रभागातच सुसज्ज आरोग्यसेवा उभारून ज्येष्ठ नागरिकांना दूरवर जावे लागू नये म्हणून प्रयत्न करणार असल्याचे राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी सांगितले. प्रभाग मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात मानकर बोलत होते. यावेळी बाप्पू मानकर यांच्यासह, स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित हे उमेदवार उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते. 'प्रभाग मध्ये शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई या भागात मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांना नियमित आरोग्य सुविधांसाठी दूरवर जावे लागते. त्यामुळे या ज्येष्ठांना प्रभागातच सुसज्ज आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. माझ्या २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्य्मातून आजवर ज्येष्ठांच्या सेवेत राहण्याचा प्रयत्न केला, यापूढेही ज्येष्ठांसाठी हा तुमचा मुलगा कायम सज्ज असेल', असे राघवेंद्र मानकर यांनी मेळाव्यात बोलताना सांगितले. या मेळाव्यास माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, शहर पदाधिकारी प्रणव गंजीवाले, महिला आघाडीच्या मोहना गद्रे, रुपाली कदम, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चाचे श्रेयस लेले व सर्व भाजपा बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 6:53 pm

प्रभाग 9 मध्ये भाजपची भव्य दुचाकी रॅली आयोजन:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत प्रचार

पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात, सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक ९ (ड) मध्ये भाजपने दुचाकी रॅलीचे आयोजन केले आहे. भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांच्या प्रचारासाठी ही रॅली काढण्यात येणार असून, केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची या रॅलीला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने यात सहभागी होतील. ही दुचाकी रॅली मंगळवार, १३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सुस येथील भैरवनाथ मंदिरापासून सुरू होईल. दसरा चौक – पाण्याची टाकी, बालेवाडी येथे या रॅलीचा समारोप होईल. या रॅलीच्या माध्यमातून प्रभागातील विविध भागांतून जात भाजपचा प्रचार व्यापक स्वरूपात पोहोचवला जाईल. दरम्यान, लहू बालवडकर यांनी आतापर्यंत घरोघरी जाऊन प्रचार केला आहे आणि विविध सोसायट्यांना भेटी दिल्या आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे प्रभागात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या भेटींमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे. बालवडकर सातत्याने नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका मांडत आहेत. तरुणांचे रोजगार आणि क्रीडाविषयक प्रश्न, महिलांसाठी सुरक्षितता आणि सक्षमीकरण, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या नागरी अडचणी सोडवण्यावर त्यांचा भर आहे. या दुचाकी रॅलीचा मार्ग सुस भैरवनाथ मंदिर, शिवशक्ती चौक, सुतारवाडी भैरवनाथ मंदिर, तापकीर चौक, शिवनगर, साई चौक, बालाजी चौक, वाकेश्वर मंदिर, कोकाटे आळी, भैरवनाथ मंदिर, भाजी मंडई, बौद्ध विहार, निम्हण माळा, लमाण तांडा, संध्या नगर, सचिन दळवी कार्यालय, ग्रीन पार्क महाबळेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कटके शाळा, दत्त मंदिर, रघुनाना चौक, मुरकुटे गार्डन, वीरभद्र नगर, सर्विस रोड, सदानंद हॉटेल, महाळुंगे मनपा शाळा, चिव्हे आळी, हनुमान मंदिर, महाळुंगे स्टेडियम, राधा चौक, गणराज चौक, बालेवाडी फाटा, लक्ष्मी माता मंदिर, दसरा चौक – पाण्याची टाकी, बालेवाडी असा असेल. लहू बालवडकर यांनी स्थानिक नागरिकांना या दुचाकी रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या रॅलीमुळे प्रभाग ९ मधील निवडणूक प्रचाराला गती मिळण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 6:52 pm

भंडा-यात उल्का वर्षाव?

भंडारा : प्रतिनिधी जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या परसोडी परिसरात आकाशातून दोन रहस्यमयी दगडाचे तुकडे पडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, हे तुकडे ‘उल्का’ असावेत, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १० जानेवारी रोजी सायंकाळी ७:०० ते ७:१५ वाजेच्या दरम्यान घडली. […] The post भंडा-यात उल्का वर्षाव? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 5:49 pm

अकोल्यात भाजप-एमआयएम पुन्हा एकत्र!:AIMIM उमेदवाराचा अर्ज बाद होताच पाचही नगरसेवकांचे भाजपला समर्थन, राजकीय वर्तुळात खळबळ

अकोल्यातील अकोटमध्ये गेल्याच आठवड्यात भाजपने एमआयएम पक्षासोबत युती केली होती. यावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर युती तोडण्यात आली. तर तिकडे अंबरनाथमध्येही भाजपने कॉंग्रेससोबत युती केली होती. या दोन्ही ठिकाणी भाजपने संबंधित पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावत कारवाई केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा अकोटमध्ये भाजप-एमआयएम युतीचा दूसरा अंक सुरू झाल्याचे समोर आले आहे. अकोटच्या नगरपालिकेत आज स्वीकृत सदस्य निवडण्याच्या प्रक्रियेत भाजप-एमआयएम युती वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळाली. एमआयएमकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी एमआयएमकडून ताज राणा यांचे नाव समोर आले होते, तर भाजपकडून माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचा मुलगा जितेन बरेठिया यांनाही उमेदवारी दिली. यात ताज राणा यांनी वेळ निघून गेल्यावर उमेदवारी दाखल केल्याचे कारण देत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आला नसल्याचे सांगितले. तसेच एमआयएमच्या पाचही नगरसेवकांनी भाजपच्या जितेन बरेठिया यांना समर्थन दर्शवल्याने ही भाजप-एमआयएमची अप्रत्यक्ष युतीच असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, अकोल्याच्या अकोटमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या भाजप-एमआयएम युतीवर चांगलाच गदारोळ निर्माण झाला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही युती तोडण्याचे आदेश दिले. तसेच युतीसाठी जबाबदार धरत स्थानिक आमदार प्रकाश भारसाखळे यांना भाजपने कारने दाखवा नोटीस पाठवली. या घटनेनंतर एमआयएम भाजपच्या नेतृत्वाखालील अकोट विकास मंचातून बाहेर पडला होता. यानंतर एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी स्वतःचा गट स्थापन केला होता. मात्र, पहिल्या युतीने वाद झाल्यानंतर आज परत ही युती नव्याने वेगळ्या रूपात समोर आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी आता काही दिवस शिल्लक असताना राज्यात विविध ठिकाणी घडामोडींना वेग आला आहे. प्रचारसभा, तसेच उमेदवारांची पळवापळवी देखील सुरू असल्याचे काही ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचा निकाल नेमका काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 5:44 pm

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध:पुणे विभागात 3.11 लाख पदवीधर, तर 52 हजार शिक्षकांची नोंदणी

पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या अंतिम मतदार याद्या सोमवारी प्रसिद्ध करण्यात आल्या. विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते या याद्या प्रसिद्ध झाल्या. यानुसार, पुणे विभागात ३ लाख १० हजार ९६४ पदवीधर आणि ५१ हजार ९७९ शिक्षक मतदार आहेत. मतदार नोंदणी प्रक्रिया निरंतर सुरू राहणार असल्याने पात्र पदवीधर व शिक्षकांनी नोंदणी करण्याचे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी केले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला अपर आयुक्त तुषार ठोंबरे, पुणे जिल्ह्याच्या उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. २०२५ च्या मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत पदवीधर मतदार संघासाठी पुणे जिल्ह्यात ६१ हजार ११३, सोलापूरमध्ये ३८ हजार २२, साताऱ्यात ४२ हजार ६३, सांगलीत ७८ हजार ३६६ आणि कोल्हापूरमध्ये ९१ हजार ४०० मतदारांची नोंदणी झाली आहे. ही एकूण नोंदणी ३ लाख १० हजार ९६४ इतकी आहे. शिक्षक मतदार संघासाठी पुणे जिल्ह्यात १२ हजार १८७, सोलापूरमध्ये १३ हजार १५८, साताऱ्यात ९ हजार ९७, सांगलीत ७ हजार ३२२ आणि कोल्हापूरमध्ये १० हजार २१५ मतदारांची नोंदणी झाली आहे. ही एकूण नोंदणी ५१ हजार ९७९ इतकी आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या या मतदार याद्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या आहेत. तसेच, या याद्या विभागीय आयुक्तालयाच्या आणि संबंधित जिल्ह्यांच्या संकेतस्थळांवर अपलोड करण्यात येणार आहेत. २०२० मध्ये पदवीधर मतदार संघासाठी ४ लाख २० हजार ८६ आणि शिक्षक मतदारांची ७२ हजार १९० इतकी नोंदणी होती. मागील निवडणुकीच्या तुलनेत सध्या अंतिम यादीत कमी मतदार दिसत असले तरी, निवडणूक प्रक्रिया जाहीर होईपर्यंत नोंदणी सुरू राहणार असल्याने मतदारांच्या अंतिम संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी राजकीय पक्षांनी मतदार नोंदणीबाबत जनजागृती करावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले. मतदार संघांच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत नवीन नाव नोंदणीसाठी दावा किंवा आक्षेप दाखल करता येणार आहे. नवीन नाव नोंदणीसाठी पात्र पदवीधरांनी नमुना क्रमांक १८ आणि शिक्षकांनी नमुना क्रमांक १९ द्वारे अर्ज करावा. नावांबाबत आक्षेप असल्यास नमुना क्रमांक ७ आणि नोंदीमध्ये दुरुस्तीसाठी नमुना क्रमांक ८ दाखल करता येईल, असेही विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 5:17 pm

पुण्यात परफ्युममुळे 6 वर्षांच्या मुलीला दीर्घ खोकला:आठ महिने उपचारानंतर डॉक्टरांनी उलगडले अनपेक्षित कारण

पुण्यात एका ६ वर्षांच्या मुलीला आठ महिने सतत खोकल्याचा त्रास होत होता. अनेक तपासण्या आणि उपचारांनंतरही आराम मिळत नव्हता. अखेर अंकुरा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलगडा केला, ज्याचे कारण तिच्या आईने वापरलेला परफ्युम ठरले. आर्या पाटील (नाव बदलले आहे) या मुलीला सतत खोकला, रात्री झोपेत खोकल्याची उबळ आणि घशात खवखव जाणवत होती. छातीचा एक्स-रे आणि इतर तपासण्या सामान्य आल्या होत्या. अनेक डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार करूनही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती, ज्यामुळे तिचे पालक चिंतेत होते. एका फॉलोअप तपासणीदरम्यान आर्याची आई डॉक्टरांशी बोलत असताना, जवळ उभ्या असलेल्या परिचारिकेला अचानक तीव्र खोकला येऊ लागला. चौकशीअंती परिचारिकेने सांगितले की आर्याच्या आईने वापरलेला परफ्युम खूप तीव्र आहे आणि त्यामुळेच तिला खोकला येत आहे. या निरीक्षणामुळे डॉक्टरांना खऱ्या कारणाचा अंदाज आला. आई दररोज वापरत असलेल्या तीव्र परफ्युमच्या सुगंधामुळे आर्याच्या श्वसनमार्गाला त्रास होत होता. डॉक्टरांनी तात्काळ मुलीच्या आसपास परफ्युम वापरणे बंद करण्याचा सल्ला दिला. हा बदल केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत आर्याचा खोकला जवळजवळ पूर्णपणे बरा झाला. अंकुरा हॉस्पिटलचे बालरोग फुफ्फुसविकार व ॲलर्जी तज्ज्ञ डॉ. मौनीश बालाजी यांनी सांगितले की, तीव्र परफ्युम, एअर फ्रेशनर, अगरबत्ती आणि एरोसोल स्प्रे यामुळे काही मुलांना दीर्घकाळ खोकला येऊ शकतो. वैद्यकीय कारण आढळत नसल्यास पर्यावरणीय घटकांचाही विचार करणे आवश्यक आहे. एका साध्या बदलाने मुलीचे आरोग्य सुधारल्याने पालकांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 5:14 pm

पुण्यात भाजप सर्व 165 जागा स्वबळावर लढणार:पश्चिम महाराष्ट्रात सहा महापौर भाजपचे असतील, राजेश पांडे यांचा विश्वास

आगामी २९ महापालिका निवडणुकांमध्ये पुणे हे एकमेव शहर आहे, जिथे भारतीय जनता पक्ष (भाजप) कमळाच्या चिन्हावर सर्व १६५ जागा स्वबळावर लढवत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, सातारा, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर या महापालिकांमध्ये भाजपने जोरदार तयारी केली आहे. या भागात भाजपचे किमान सहा महापौर निवडून येतील, असा विश्वास भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी व्यक्त केला. पत्रकारांशी बोलताना पांडे यांनी सांगितले की, मतदान आणि निकाल या दोन्ही टप्प्यांमध्ये भाजपला स्पष्ट आघाडी मिळेल. अनेक ठिकाणी भाजपचाच महापौर निवडून येईल, असा दावा त्यांनी केला. पुणे शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक यांनी घेतलेली मुलाखत शहरातील १०४ ठिकाणी थेट प्रक्षेपित करण्यात आली. या उपक्रमात सुमारे ५५ हजार नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. पुणे हे सांस्कृतिक शहर असल्याने, शहरातील सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी एकात्मिक सांस्कृतिक धोरण राबवण्याची योजना भविष्यात तयार केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे पांडे यांनी नमूद केले. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी, १३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता गोखलेनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. भाजपने ‘घर चलो अभियान’अंतर्गत शहरातील २६०० बूथपर्यंत घरोघर जाऊन प्रचार केला आहे. विकासाचा अजेंडा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भाजपने भर दिला असून, आरोप-प्रत्यारोपांऐवजी विकास, भविष्यातील पुण्याची प्रगती आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केल्याचे पांडे यांनी स्पष्ट केले. याच दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेल्या बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि फ्लेक्सवर कारवाई व्हावी, अशी मागणीही राजेश पांडे यांनी केली. भाजपने आपल्या पक्षाचे अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. इतरांनीही नियमांचे पालन करावे यासाठी मनपा आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 5:12 pm

मुंबईच्या जुहू परिसरातील 35 हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार:प्रत्येक सोसायटीच्या गेटवर लावले बॅनर; समस्या मांडूनही न्याय मिळाला नसल्याचा दावा

महापालिका निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय पक्षांचे प्रचार सुरू झाले आहेत. मतदानासाठी जनजागृती देखील केली जात आहे. परंतु, मुंबईच्या जुहू भागातील सुमारे 35 हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले आहे. मुंबईच्या जुहू परिसरातील जवळपास 200 इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले आहे. मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याच्या आशयाचे बॅनर जुहू रुईया पार्क, कराची सोसायटी परिसरात लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. जुहू परिसरात असलेल्या मिलिटरी रडारमुळे नागरिकांना फटका बसत असल्याचे चित्र आहे. गेल्या 35 वर्षांपासून इथल्या 200 धोकादायक इमारती आणि दोन झोपडपट्टी विकासकापासून रखडल्या आहेत. या इमारतींचे पुनर्विकास होऊ शकत नसल्याने जवळपास 35 हजार लोक धोकादायक इमारतींमध्ये भीतीच्या सावटाखाली राहतात असा दावा करण्यात आला आहे. येथील नागरिकांनी त्यांच्या समस्या केंद्र सरकारच्या संरक्षण विभागासमोर मांडल्या. अनेकदा त्याचा पाठपुरावा करूनही यश आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. बॅनरवर काय म्हटले आहे? जुहू परिसरातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकताना सर्वत्र बॅनर लावले आहेत. यावर असे लिहिले आहे की, एसआरओ 150 कायदा कालबाह्य आहे आणि त्यामुळे घरे उद्ध्वस्त होत आहेत. 1939 च्या ब्रिटिश कायद्यांतर्गत आम्हाला आमच्या कायदेशीर घरांमधून हाकलण्यात आले आहे. सुमारे 200 इमारती आणि दोन मोठ्या झोपडपट्ट्या धोक्यात असून इथल्या 35 हजार नागरिकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे मतदानासाठी बाहेर पडण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा आणि पुन्हा विचार करा. यापुढे खोटी आश्वासने आता चालणार नाहीत. लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत नेत्यांनी त्यांच्या प्रश्नावर निवडणुकीनंतर तोडगा काढणार असे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर कोणताहीह नेता मदत करत नसल्याचे सांगत येथील नागरिकांनी महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. ठाकरे बंधूंची भेट घालून तोडगा काढण्याचे आश्वासन जुहूच्या रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरात मतदानावर बहिष्कार टाकल्याचे अनेक बॅनर दिसून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 68 मधील मनसेचे उमेदवार संदेश सरदेसाई यांनी येथील नागरिकांची भेट घेतली. तसेच निवडणुकीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घालून, या प्रश्नाचा पाठपुरावा करू आणि योग्य तोडगा काढू, असे आश्वासन देण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 5:03 pm

पैसे वाटपावरून सांगलीत जोरदार राडा

सांगली : प्रतिनिधी राज्यात २९ महापालिकांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. येत्या १५ जानेवारीला निवडणुकींचा धुरळा उडणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. तत्पूर्वी निवडणुकांचे प्रचार सुरु असून उद्या या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. असे असले तरी पक्षापक्षांमध्ये अद्यापही धुसफूस सुरूच आहे. अशातच आता सांगली महापालिका निवडणुकीत मिरज येथे पैसे वाटप […] The post पैसे वाटपावरून सांगलीत जोरदार राडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 4:47 pm

मिरजेत पोलिस बंदोबस्तात पैशांचे वाटप?:राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा अजित पवार गटावर आरोप; दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले

महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पोलिस बंदोबस्तात पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप मिरज येथील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे येथील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, अजित पवार गटाने शरद पवार गटाचा आरोप फेटाळला आहे. राज्यात मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकीचा फड रंगला आहे. मिरजेतही या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणुकीला अवघे 2 दिवस शिल्लक असल्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापले आहे. सोमवारी दुपारी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवाडी यांच्या निवासस्थानालगत पैसे वाटप होत असल्याचा संशयावरून शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत हारगे व आमदार नायकवडी यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार वादावादी झाली. दोन्ही गटांचे समर्थक या प्रकरणी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यासंबंधीच्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 20 मध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत हारगे व अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचे सुपुत्र अतहर नायकवडी यांच्यात लढत आहे. सोमवारी दुपारी आमदार नायकवडी यांच्या घराजवळ मोठी गर्दी जमली होती. ते पाहून अभिजीत हारगे तिथे आले. त्यांनी तिथे मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाच्या फिरत्या पथकासह पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर आमदार नायकवडी व श्वेतपद्म कांबळे यांचे कार्यकर्ते अभिजीत हारगे यांच्यावर अंगावर धावून गेले. प्रतिस्पर्धी गटाचे कार्यकर्ते आपल्या उमेदवाराच्या अंगावर धावून आल्याचे पाहून अभिजीत हारगे यांचेही कार्यकर्ते पुढे सरसावले. यावेळी दोन्ही गटाच्या समर्थकांत धक्काबुक्की झाली. त्यानतंर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिलडा यांनीही घटनास्थळी धाव घेतली. नायकवडी यांच्या घरी सुरू होते पैशांचे वाटप - हारगे अभिजीत हारगे यांनी यावेळी अजित पवार गटावर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला. ते म्हणाले, मतदाराना पैसे वाटप करण्यास आक्षेप घेतल्यामुळे आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते व अंगरक्षक माझ्या अंगावर धावून आले. तिथे पोलिस बंदोबस्तात पैशांचे वाटप सुरू होते. मी त्याची तक्रार निवडणूक आयोगाचे अधिकारी व प्रशासनाकडे केली. पण एकही अधिकारी घटनास्थळी आला नाही. नायकवडी यांनी फेटाळला आरोप दुसरीकडे, आमदार इद्रिस नायकवडी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळला आहे. ते म्हणाले, आमच्यावर झालेले आरोप चुकीचे आहेत. आमचा मतदारांशी थेट संपर्क आहे. त्यामुळे आमच्यावर कधीही पैसे वाटण्याची वेळ आली नाही. निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे. मतदारांना त्यांची नावे कोणत्या प्रभागात आहे समजत नाही. त्यासाठी ते आमच्याकडे येतात. आमचे कार्यकर्ते त्यांना त्यांची नावे कोणत्या प्रभागात आहेत हे शोधून देतात. पण विरोधी पक्षाच्या उमेदवाराने आमच्या घरापुढे येऊन उगीचच त्यांना दमदाटी केली.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 4:35 pm

अकोटमध्ये पुन्हा ‘भाजप-एमआयएम’ युती

अकोला : प्रतिनिधी अकोला येथील अकोटमध्ये झालेल्या ‘भाजप-एमआयएम’ युतीवरून देशभरात मोठा गदारोळ उडाला होता. या युतीसाठी जबाबदार धरत स्थानिक आमदार प्रकाश भारसाकळे यांना भाजपने कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. या सर्व घडामोडीनंतर एमआयएम भाजपच्या नेतृत्वाखालील ‘अकोट विकास मंचा’तून बाहेर पडला होता. त्यानंतर एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी स्वत:चा गट स्थापन केला होता. पहिल्या युतीने वाद झाल्यानंतर आज […] The post अकोटमध्ये पुन्हा ‘भाजप-एमआयएम’ युती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 4:15 pm

चित्रकलेत विद्या विकास विद्यालयाचा १००टक्के निकाल

लातूर : प्रतिनिधी विद्याविकास विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र शासनाच्या कला संचनालय मुंबई तर्फे घेण्यात येणा-या शासकीय रेखाकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा २०२५ मध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेऊन घवघवीत यश संपादन केले. एलिमेंट्री ग्रेड परीक्षेत ३५ तर इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत ४९, असे एकूण ८४ विद्यार्थ्यांनी भाग घेऊन यश संपादन केले. त्यात ‘अ’ ग्रेड […] The post चित्रकलेत विद्या विकास विद्यालयाचा १००टक्के निकाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 4:11 pm

पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापेमारी:१.७७ लाखांच्या मुद्देमालासह ५ जणांना अटक, दहेगाव जंगलात सुरू होता अड्डा

दिघोरी / मोठी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दहेगाव जंगल परिसरात सुरू असलेल्या एका अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ आरोपींना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून १ लाख ७७ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मल्लेश रामकृष्ण बोरकर (४८ वर्षे) आकाश नरेंद्र टेंबुर्णे (२५ वर्षे) दोघेही रा. लाखांदुर, गोविंदसिंग हरनाम सिंग रामगडे (५८ वर्षे), बलरामसिंग करतारसिंग बावरी (४२ वर्षे) दोघेही रा. झिरोबा, कमलेश आबालाल बनसोड (३८ वर्षे) रा. सावंगी, जि. गडचिरोली असे घटनेतील आरोपीतांची नावे आहेत. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, दिघोरी/मोठी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रमोद शिंदे यांना दहेगाव जंगल परिसरातील कॅनलजवळ काही लोक एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून रविवारी, ११ जानेवारी रोजी दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास पोलिसांनी या परिसरात सापळा रचला आणि अचानक छापा टाकला. ​छाप्यादरम्यान पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह एकूण १,७७,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पाचही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत दिगोरी मोठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई ठाणेदार प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार विलास मातेरे, गोपाल कोसरे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, परिसरातील नागरिक पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक करत आहेत. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 3:43 pm

लाखांदूर तालुक्यात वाळू तस्करांना दणका:जिल्हाधिकारी पथकाने ​साखरा घाटात कारवाई करत केला ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त

भंडारा जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध महसूल व पोलीस विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने लाखांदूर तालुक्यातील साखरा घाट परिसरात मध्यरात्री धाड टाकून अवैध रेती तस्करी करणारी १ जेसीबी, २ टिप्पर आणि १ ट्रॅक्टरसह सुमारे ७८ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असली, तरी स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास साखरा येथील शेतशिवारात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन व वाहतूक सुरू होती. लाखांदूरचे नायब तहसीलदार दत्ता धकाते यांच्या फिर्यादीवरून, दिघोरी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ३० लाखांचा टिप्पर, १२ लाखांचा मिनी टिप्पर, ६.५ लाखांचा ट्रॅक्टर आणि ३० लाखांची जेसीबी असा एकूण ७८.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:​टिप्पर (MH 36 F 7435): ३ ब्रास रेतीसह (३०.१८ लाख)​मिनी टिप्पर (MH 36 AA 3919): २ ब्रास रेतीसह (१२.१२ लाख)​ट्रॅक्टर व ट्रॉली (MH 36 AG 2830): १ ब्रास रेतीसह (६.५६ लाख)​जेसीबी: (३० लाख)दिघोरी पोलिसांनी या प्रकरणी चेतन शामराव देशमुख, सतीश शंकर आगासे, कमलेश शामराव बावनकुळे, शंकर वामन मटे आणि राकेश धनु साळवे (सर्व रा. दिघोरी) यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास दिघोरी पोलीस स्टेशनचे पोलीस हवादार विलास मातेरे करत आहेत. स्थानिक महसूल प्रशासन झोपले होते का? जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाला कारवाई करावी लागते, यातच स्थानिक तालुका महसूल प्रशासनाचे अपयश स्पष्टपणे दिसून येते. साखरा घाटातून रात्रंदिवस जेसीबीच्या साहाय्याने ओरबाडणारी रेती आणि धावणारे टिप्पर स्थानिक महसूल विभागाला का दिसले नाहीत? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. स्थानिक यंत्रणेचे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष की तस्करांना दिलेले अभय? यामुळेच शासनाचा करोडोंचा महसूल बुडत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. वरिष्ठ पथकाने धाड टाकल्यावरच स्थानिक यंत्रणेला जाग येते का, असा रोखठोक प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 3:38 pm

हायकोर्टाचा गुंड गजा मारणेला दिलासा:निवडणुकीसाठी 2 दिवस पुण्यात येण्याची दिली सशर्त परवानगी; पुणे पोलिस अलर्ट मोडवर

मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने 2 दिवस पुण्यात येण्याची परवानगी दिली आहे. यामुळे त्याला या निवडणुकीत आपल्या पत्नीचा प्रचार करता येणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिली आहे. त्याची पत्नी कोथरूड भागातून निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. पण गजा मारणेवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे पुणे पोलिसांनी त्याच्यावर जिल्हाबंदी घातली होती. यामुळे त्याला पत्नीचा प्रचार करता येत नव्हता. अखेर गजा मारणेने या बंदीविरोधात मुंबई हायकोर्टात दाद मागितली होती. हायकोर्टाने आज त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना त्याला 15 व 16 जानेवारी असे दोन दिवस पुण्यात जाण्याची परवानगी दिली. पुणे महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित होणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही दिवस गजा मारणेला आपल्या कुटुंबीयांसोबत घालवता येणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे गजा मारणे सध्या त्याच्या मुळशीतील घरात राहतो. त्याच्यावर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ याच्या एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. पण निवडणुकीच्या तोंडावरच त्याला जामीन मंजूर झाला होता. पण त्यानंतर त्याला पुणे जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली होती. कोर्टाने गजा मारणेला कोणत्या घातल्या अटी गजा मारणेने पुण्यातील काही वैयक्तिक व कायदेशीर कारणांसाठी शहरात येण्याची परवानगी मागितली होती. त्याच्या अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने पोलिसांच्या निगराणीखाली व कायदा सुव्यवस्थेला धक्का न लागण्याच्या अटीवर त्याला पुण्यात येण्यास हिरवा कंदील दाखवला. या कालावधीत गजा मारणेला कोणतीही सार्वजनिक सभा घेता येणार नाही. आपल्या समर्थकांशी संपर्क साधून शक्तिप्रदर्शन करता येणार नाही. त्याला वेळोवेळी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे लागणार आहे. राष्ट्रवादी, भाजपकडून गुंडांना तिकीट दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी बंडू आंदेकरसह, सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकरला तिकीट देण्यात आले आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडून गुंड शरद मोहोळच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. हे ही वाचा… कल्याण डोंबिवलीत भाजपकडून पैशाचे वाटप:पांढऱ्या पाकिटातून पाचशेच्या 6 नोटा, VIDEO व्हायरल; शिंदे गटासह विरोधकांची टीका मुंबईलगतच्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपकडून मतदारांना पैसे वाटण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल केला असून, त्यात पांढऱ्या पाकिटातून मतदारांना पाचशेच्या 6 नोटा म्हणजे एकूण 3 हजार रुपये दिले जात असल्याचे दिसून येत आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 3:35 pm

राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : प्रतिनिधी महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असून राज्याचं लक्ष तिकडे लागलं आहे. मात्र, निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निवडणुकांसाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी केली होती. अखेर, राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला असून जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन आठवड्यांची मुदतवाढ मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालायने […] The post राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 3:31 pm

तिकीट वाटपात काही लोकांवर अन्याय

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. यासाठी भाजपसह सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या बंडखोरांसंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. गडकरी यांनी जाहीर सभेतून तिकीट वाटपामध्ये काही लोकांवर अन्याय झाला हे मान्य केले. त्याची कारणेही त्यांनी यावेळी सांगितली. नऊ […] The post तिकीट वाटपात काही लोकांवर अन्याय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 3:26 pm

भाजप उमेदवाराला धक्काबुक्कीचा प्रयत्न:वाढदिवसाच्या कार्यक्रमात घडली घटना; 5 जणांवर गुन्हा, पोलिस तपास सुरू

पुण्यातील मंगळवार पेठेत भाजपचे प्रभाग २४ मधील उमेदवार गणेश बिडकर यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना एका वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान घडली. आदित्य दीपक कांबळे (वय २४, रा. सदानंदनगर, मंगळवार पेठ) यांनी या संदर्भात फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निनाद धेंडे, संजय भिमाले, प्रदीप कांबळे, भरत शिंदे आणि सागर कांबळे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील भीममगर परिसरात रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी नीलेश आल्हाट यांच्या वाढदिवसानिमित्त १० जानेवारी रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आरोपी आणि भाजप उमेदवार उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान, आरोपींनी भाजप उमेदवारांविषयी अपशब्द वापरले. त्यानंतर आरोपी सागर कांबळे यांनी उमेदवार गणेश बिडकर यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ केली आणि धक्काबुक्कीचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी सागर कांबळे यांना रोखले. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उत्तम नामावडे आणि उपनिरीक्षक प्रणिल चौगले यांनी घटनास्थळी भेट दिली. उपनिरीक्षक चौगले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. एम. जी. रस्त्यावर दुकाने फोडणारे चोरटे गजाआड पुणे लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील वस्त्रदालनांचा दरवाजा उचकटून महागडे कपडे, तसेच अन्य वस्तुंची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महात्मा गांधी रस्त्यावरील एका वस्त्रदालनाचा दरवाजा उचकटून तीन लाख रुपयांचे कपडे चोरून नेण्यात आल्याची घटना ५ जानेवारी रोजी घडली होती. या गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. आरोपींमध्ये तीन अल्पवयीनांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पाईप, दोन दुचाकी, चोरलेला एक लॅपटॉप, कपडे असा तीन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरट्यांनी एम. जी. रस्त्यावरील तीन दुकानांमध्ये चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पोलिस उपायुुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, उपनिरीक्षक राहुल घाडगे, महेश कदम, अतुल मेंगे, सोमनाथ बनसोडे, संदीप उकीरडे यांनी ही कामगिरी केली.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 2:53 pm

पुणे पोलिसांना मिळाल्या १०० 'डोमिनार ४००' दुचाकी:आपत्कालीन प्रतिसाद आणि गस्त क्षमतेत होणार वाढ

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिस दलात १०० अत्याधुनिक ‘डोमिनार ४००’ मोटरसायकलींचा ताफा दाखल झाला आहे. बजाज ऑटो लिमिटेडने निर्मित या मोटरसायकली सोमवारी अधिकृतपणे पोलिस दलात समाविष्ट करण्यात आल्या. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होऊन आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीला गती मिळेल. या शक्तिशाली मोटरसायकलींमुळे पोलिसांची गस्त क्षमता, हालचाल आणि आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी पोहोचण्याचा वेळ लक्षणीयरीत्या सुधारेल. ३७३.३ सीसी लिक्विड-कूल्ड इंजिन, ड्युअल चॅनल एबीएस आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांसारख्या प्रगत वैशिष्ट्यांमुळे या मोटरसायकली उच्च जोखमीच्या परिस्थितीतही सुरक्षित आणि प्रभावी ठरतील. ‘डोमिनार ४००’ च्या पोलिस मॉडेलमध्ये एलईडी आपत्कालीन दिवे, सायरन, सार्वजनिक घोषणा प्रणाली आणि जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम यांसारख्या विशेष सुविधा आहेत. तसेच, मोबाईल आणि वॉकी-टॉकी चार्जिंगसाठी विशेष पॉइंट्स देण्यात आले आहेत. प्रत्येक मोटरसायकलमध्ये प्रथमोपचार किट, आवश्यक कागदपत्रे आणि फॉरेन्सिक साहित्य वाहून नेण्यासाठी लॉक करता येणारे साइड पॅनियर्स व टॉप बॉक्स बसवण्यात आले आहेत. या मोटरसायकलींचा वापर प्रथम १९ ते २३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या बजाज पुणे ग्रॅण्ड टूर २०२६ च्या ४३७ किलोमीटरच्या मार्गावर गस्तीसाठी केला जाईल. त्यानंतर, दैनंदिन कायदा अंमलबजावणीसाठी तिन्ही पोलिस विभागांमध्ये त्यांचे वितरण करण्यात येणार आहे. शिवाजीनगर येथील पुणे पोलिस मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनय चौबे आणि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप गिल यांच्या हस्ते या मोटरसायकली स्वीकारण्यात आल्या. या उपक्रमामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस दल अधिक सक्षम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 2:52 pm

सहावा पुणे पर्यटन महोत्सव १६ ते १८ जानेवारीला:लोकल ते ग्लोबल सहलींचे अनेक पर्याय उपलब्ध

भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्थेच्या वतीने सहावा पुणे पर्यटन महोत्सव १६ ते १८ जानेवारी २०२६ या कालावधीत हॉटेल सेंट्रल पार्क, डेक्कन, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्व पुणेकरांसाठी विनामूल्य खुला राहणार आहे. संस्थेचे चेअरमन प्रवीण घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी संस्थेचे सचिव प्रथमेश कुलकर्णी, खजिनदार हेमंत जानी, संचालक संतोष माने, सजेश पिल्ले, आशिष हिंगमिरे, अमित कुलकर्णी आणि चंदन पठारे आदी उपस्थित होते. प्रवीण घोरपडे यांनी सांगितले की, महोत्सवाचे उद्घाटन १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता प्रसिद्ध गायिका डॉ. राधा मंगेशकर आणि पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक भरत लांघी यांच्या हस्ते होईल. या महोत्सवात ७० हून अधिक नामांकित पर्यटन कंपन्या त्यांच्या सहलींचे विविध पर्याय सादर करतील. याशिवाय, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, कॉर्पोरेट ट्रॅव्हल अँड टुरिझम मीट, तसेच काश्मीर पर्यटन, महाराष्ट्र पर्यटन आणि मानसरोवर यात्रा यावर चर्चासत्रे आयोजित केली जातील. डॉ. राधा मंगेशकर यांचे 'एकटीचा सफरनामा' हे अनुभवकथनही ऐकायला मिळेल. या महोत्सवासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी), पर्यटन संचालनालय, पर्यटन मंत्रालय, पुणे विमानतळ प्रशासन, पुणे रेल्वे स्टेशन, पासपोर्ट कार्यालय, मेट्रो प्रशासन, पीएमपीएल प्रशासन, ट्रॅव्हल एजन्सी असोसिएशन्स, हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन्स, रिसॉर्ट्स असोसिएशन, कृषी पर्यटन असोसिएशन, लोकल टूर गाईड्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट आदी विभागांतील पदाधिकारी व अधिकारी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध मान्यवर या महोत्सवात चर्चा करतील. या महोत्सवात देश-विदेशातील सहलींचे विविध पर्याय एकाच छताखाली उपलब्ध असतील. कोकणापासून कॅलिफोर्नियापर्यंतच्या असंख्य सहलींचे नियोजन येथे करता येईल. तसेच, महोत्सव कालावधीत बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना खास सवलती दिल्या जातील.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 2:50 pm

'आप'ने पुण्यासाठी जाहीर केले निर्धारपत्र:उत्तम शाळा, आरोग्य सुविधा आणि मोफत बस प्रवासाचे आश्वासन

आम आदमी पार्टीने (आप) पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आपले निर्धारपत्र (मॅनिफेस्टो) जाहीर केले आहे. दिल्ली आणि पंजाबमधील 'आप'च्या मॉडेलनुसार उत्तम शाळा, आरोग्य सुविधा आणि महिलांसाठी मोफत बस प्रवासाचे आश्वासन या निर्धारपत्रात देण्यात आले आहे. पक्षाने पुणेकरांना 'गैरकारभाराकडून जबाबदार, भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाकडे जाण्यासाठी बदल घडवूया' असे आवाहन केले आहे. या निवडणुकीत 'आप'चे ८५ उमेदवार रिंगणात असून, त्यापैकी बहुतांश सुशिक्षित युवक आहेत. हे निर्धारपत्र सोमवारी पक्षाचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी पुणे पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. अनेक नागरी मुद्द्यांना हात घालणारे हे निर्धारपत्र आहे. निर्धारपत्रात पुणेकरांसाठी आर्थिक संपन्नता आणणारे, दरडोई उत्पन्न वाढवणारे आणि रोजगार उपलब्ध करणारे धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीवर महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे. वाहतूक कोंडीमुक्त शहर निर्माण करण्यासाठी 'मिसिंग लिंक रोड' आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे पुणेकरांचा ऑफिसला जाण्याचा आणि परत येण्याचा वेळ ३० मिनिटांपर्यंत कमी होईल, ज्यामुळे वेळेची, इंधनाची आणि शारीरिक-मानसिक दमछाक थांबेल, असे पक्षाने म्हटले आहे. शिक्षणाबाबत, सर्व सरकारी शाळांना उच्च दर्जाच्या सुविधांसह खाजगी शाळांच्या तोडीस तोड बनवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या शाळांमध्ये माफक दरात शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल. आरोग्य सुविधांसाठी, प्रत्येक ५०० मीटर अंतरावर मोफत प्राथमिक आरोग्य सुविधा देणारे 'मोहल्ला क्लिनिक' उभारले जातील. तसेच, 'महापालिका तुमच्या दारात' या योजनेअंतर्गत नागरिकांना आवश्यक कागदपत्रे पारदर्शक पद्धतीने घरपोच दिली जातील. प्रत्येक घराला पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासोबतच, समाविष्ट गावांमध्ये मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाईल. रस्ते आणि पाणी यावर वाढीव निधी खर्च केला जाईल. प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर पावले उचलली जातील आणि पुणे भयमुक्त शहर बनवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येतील, असे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले. याप्रसंगी शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी पुणेकरांच्या समस्यांची यादी वाचून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीवर टीका केली. नागरिकांच्या करातून जमा होणारा पैसा योग्य ठिकाणी आणि पारदर्शक पद्धतीने खर्च केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या पत्रकार परिषदेला 'आप'चे प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, महिला अध्यक्ष सुरेखा भोसले, महासचिव अक्षय शिंदे, सुभाष कारंडे आणि सुनील सवदी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 2:49 pm

शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने तरुणाची 46 लाखांची फसवणूक:वाघोली पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका तरुणाची ४६ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध वाघोली पोलिस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायदा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांजरी खुर्द येथील रहिवासी असलेल्या या तरुणाने वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सप्टेंबर महिन्यात सायबर चोरट्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्याला एका गुंतवणूक ॲपमध्ये सहभागी होण्यास सांगितले. सुरुवातीला तरुणाने काही रक्कम गुंतवली. चोरट्यांनी त्याला परताव्यापोटी काही रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा केली. यामुळे तरुणाचा विश्वास बसला. त्यानंतर त्याने टप्प्याटप्प्याने चोरट्यांच्या खात्यात एकूण ४६ लाख ३३ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्याला कोणताही परतावा दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज हांडे करत आहेत. दरम्यान, शहरात 'ऑनलाइन टास्क'च्या आमिषाने फसवणुकीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. सिंहगड रस्ता परिसरातील एका तरुणाची सायबर चोरट्यांनी चार लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी या तरुणाशी संपर्क साधून घरातून ऑनलाइन काम करण्याची संधी असल्याचे आमिष दाखवले होते. सुरुवातीला एका कामाचे पैसे त्याच्या खात्यात जमा करून विश्वास संपादन केला. त्यानंतर अधिक परताव्याचे आमिष दाखवून त्याला जाळ्यात ओढले. तरुणाने पैसे जमा केल्यानंतर त्याला कोणताही परतावा मिळाला नाही.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 2:48 pm

१४ जानेवारीपासून विशेष ‘मेनोपॉज क्लिनिक’:रजोनिवृत्ती काळातील महिलांची दर बुधवारी विशेष बाह्यरुग्ण विभागात तपासणी अन् मार्गदर्शन

राज्यातील महिलांच्या रजोनिवृत्ती काळात उद्भवणाऱ्या शारीरिक व मानसिक आरोग्य समस्यांवर वेळेवर व शास्त्रीय उपचार मिळावेत, या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत विशेष ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी ता. १४ या क्लिनीकची सुरुवात होणार असून यापुढे दर बुधवारी विशेष बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांच्या मासीक पाळीच्या समस्यांमध्ये आरोग्य विषयक मार्गदर्शन होणार आहे. महिलांच्या रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्समधील बदलांमुळे शारिरातील उष्णता वाढ, झोपेचे विकार, चिडचिड, नैराश्य, सांधेदुखी, वजन वाढणे, हृदयविकाराचा धोका अशा विविध समस्या आढळून येत आहेत. मात्र महिलांकडून या समस्यांकडे अनेक वेळा दुर्लक्ष केले जात असल्यामुळे त्यांना पुढील काळात गंभीर समस्यांना सामोरो जावे लागले. या काळात महिलांना योग्य मार्गदर्शन, समुपदेशन व औषधोपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने महिलांसाठी स्वतंत्र ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये तसेच निवडक ग्रामीण रुग्णालयांमध्ये हे क्लिनिक सुरू करण्य्च्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात दर बुधवारी विशेष बाह्य रुग्ण विभाग सुरु केला जाणार असून बुधवारपासून ता. १४ या क्लिनीकला सुरवात केली जाणार आहे. या क्लिनिकमध्ये महिलांची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार उपचार, समुपदेशन, आहार व जीवनशैलीविषयक मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच मानसिक आरोग्य समुपदेशन, कॅल्शियम व व्हिटॅमिन-डी संदर्भातील उपचार आणि आवश्यक तपासण्यांविषयी माहिती दिली जाणार आहे. दर बुधवारी होणाऱ्या या विशेष बाह्यरुग्ण तपासणीचा महिलांनी घ्यावा, रजोनिवृत्ती काळातील लक्षणांबाबत संकोच न ठेवता पुढे यावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. ‘मेनोपॉज क्लिनिक’मुळे महिलांचे दीर्घकालीन आरोग्य सुदृढ राहण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सुत्रांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 2:20 pm

कल्याण डोंबिवलीत भाजपकडून पैशाचे वाटप:पांढऱ्या पाकिटातून पाचशेच्या 6 नोटा, VIDEO व्हायरल; शिंदे गटासह विरोधकांची टीका

मुंबईलगतच्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपकडून मतदारांना पैसे वाटण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांनी यासंबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल केला असून, त्यात पांढऱ्या पाकिटातून मतदारांना पाचशेच्या 6 नोटा म्हणजे एकूण 3 हजार रुपये दिले जात असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सध्या मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांचा फड रंगला आहे. निवडणुकीला अवघे काही तास उरल्यामुळे प्रचार शिगेला पोहोचला असताना विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर मतदारांना पैसे वाटण्याचा आरोप केला आहे. मनसे नेते राजू पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 29 मधील उमेदवारांना पांढऱ्या पाकिटात पाचशेच्या नोटा मिळाल्याचे दिसून येत आहे. महिला स्वतःहून त्यांना मिळालेली पांढरी पाकिटे फोडून दाखवत आहेत. त्यात 500 च्या 6 नोटा दिसत आहेत. त्यांच्या हातात भाजपचे पाम्पलेटही दिसून येत आहे. डोंबिवलीत पैसा अन् गुंडगिरीचा वापर - मनसे मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी या प्रकरणी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, डोंबिवलीत प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपाचे गांधी प्रेम. सर्रास पैसे वाटप सुरू आहे. कालचा रेट 3000/- होता, हे प्रकरण उघडकीस आल्यावर रेट 5000/- प्रति मत केल्याचे ऐकायला येत आहे. डोंबिवलीत पैसा व गुंडगीरीचा वापर सुरूच आहे. सत्तेचा माज ओसाढून वाहत आहे. भ्रष्टाचाराच्या नोटांना पाय फुटले - रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही हा पैसा भ्रष्टाचार व कमिशनचा असल्याचा दावा करत भाजपवर निशाणा साधला आहे. corruption आणि commission च्या नोटांना पाय फुटायला सुरवात झाली. पण हे फक्त निवडणुकीपुरतंच दिसेल, नंतर पाच वर्षे कुणी ढुंकूनही बघणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आत्ता पाहू काय म्हणाले शिंदे गटाचे उमेदवार? शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील याविषयी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना म्हणाले की, गत महिन्यापासून मी भाजपची सर्व पोलखोल केली आहे. त्यामुळे भाजपला जिंकण्यासाठी असे नको ते धंदे करावे लागत आहेत. भाजप कार्यकर्ते दशरथ भवनमध्ये पैसे वाटत होते. त्यांनी पाकिटातून 3 हजार रुपये दिले. भाजपचे बिनविरोध निवडून आलेले विषू पेंडणेकर यांचे कार्यकर्ते मतदारांना पैशांची पाकिटे वाटत होते. ते प्रत्येकाच्या घरात पाकिटे नेऊन टाकतात. ते आम्हाला सरळ मार्गाने हरवू शकत नाहीत. त्यामुळे असे धंदे करत आहेत, असे ते म्हणाले. भाजपने काय दिले स्पष्टीकरण? डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाची युती आहे. पण प्रभाग क्रमांक 29 मध्ये हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. येथील शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील यांनीही भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. पण भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. शिंदे गटाचा आरोप खोट आहे. आमचे कार्यकर्ते त्या भागात पत्रके वाटण्यास गेले होते. त्यांच्या खिशात पैसे कोंबून त्यांना मारहाण करण्यात आली. आम्ही ही दादागिरी, दडपशाही खपवून घेणार नाही, असे ते म्हणालेत. प्रभाग क्रमांक 29 मध्ये कुणामध्ये सुरू आहे लढत? कल्याम डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 29 अ मधून भाजपच्या कविता म्हात्रे यांच्या विरोधात शिवसेनेच्या रुपाली म्हात्रे, ब मधून भाजपच्या आर्या नाटेकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या रंजना पाटील, क मधून भाजपचे मंदार टावरे यांच्या विरोधात शिवसेनेचे नितीन पाटील हे उमेदवार आहे. ड मधून भाजपच्या अलका म्हात्रे यांच्या विरोधात शिवसेनेचे रवी पाटील उभे टाकले आहेत. सध्या सर्वच उमेदवारांचा प्रचार टोकाला पोहोचला आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 2:12 pm

पंधराशे रुपयांत घर चालवून दाखवा:करुणा मुंडेंचं फडणवीसांना थेट आव्हान; म्हणाल्या- 70 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या चोरांच्या हातात तिजोरीची चावी

राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असून, अवघे तीन दिवस शिल्लक असताना प्रचार अधिकच आक्रमक झाला आहे. जळगावमध्ये स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत करुणा मुंडे यांनी सरकारवर जोरदार शब्दांत हल्ला चढवला. आपल्या भाषणातून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणुकीच्या तोंडावरच वातावरण तापवले. विशेषतः ‘लाडकी बहिण’ योजनेवर केलेली टीका चर्चेचा केंद्रबिंदू ठरली असून, त्यांच्या वक्तव्यामुळे जळगावसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. लाडकी बहिण योजनेचा उल्लेख करताना करुणा मुंडे यांनी या योजनेची वास्तवातील स्थिती मांडली. लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये दिले जातात, पण त्याच बहिणीसाठी शौचालयही नाही, ही परिस्थिती आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. पंधराशे रुपये मिळवण्यासाठी महिलांना रांगेत उभं राहावं लागतं आणि त्यामुळे रोजंदारीचा तोटा होऊन हातात प्रत्यक्षात हजार रुपयांपेक्षाही कमी रक्कम उरते, असे त्यांनी सांगितले. याच मुद्द्यावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत, मी देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पत्नीला हजार रुपये देते, त्यांनी त्या पैशांत घर चालवून दाखवावं, असे जाहीरपणे म्हटले. करुणा मुंडे यांनी यावेळी आर्थिक गैरव्यवहारांवरही गंभीर आरोप केले. चांगल्या लोकांच्या हातात तिजोरीची चावी द्या. चोरांच्या हातात तुम्ही आधीच चावी दिली आहे, असा टोला लगावत त्यांनी 70 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याचा उल्लेख केला. सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधत, ज्यांनी एवढा मोठा घोटाळा केला, त्यांच्या हातातच तिजोरीची चावी आहे, असा आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे सभास्थळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद दिला. पुढे बोलताना करुणा मुंडे यांनी आपली वैयक्तिक वाटचाल आणि संघर्ष मांडत सत्तेच्या दडपशाहीवर भाष्य केले. माझे सासरे मंत्री होते, माझे पती मंत्री होते आणि माझी ननंदही मंत्री आहे. तरीसुद्धा मला दारोदार भटकावं लागत आहे, असे त्या म्हणाल्या. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलल्यामुळे आपल्याला तीन वेळा जेलमध्ये टाकण्यात आले, असा आरोप करत त्यांनी सत्तेचा माज किती आहे, हे अधोरेखित केले. मात्र, या सगळ्याला न घाबरता आपण सत्ताधाऱ्यांच्या छातीवर उभं राहून राजकारण करायचं ठरवलं आणि म्हणूनच आज संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना करुणा मुंडे यांनी उमेदवारी वाटपावरही प्रश्न उपस्थित केले. सत्ताधाऱ्यांनी गुंडांना, ड्रग्स माफियांना तिकीट दिले, असा गंभीर आरोप त्यांनी केला. निवडणुकीत पैसा वाटून मतं विकत घेतली जात असल्याचा दावा करत त्यांनी, मतदानाचे पैसे घेणे म्हणजे आपल्या भूमातेचा सौदा करण्यासारखे आहे, असे परखड मत मांडले. अनेक ठिकाणी उमेदवारांना बिनविरोध जिंकवून लोकशाही संपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. बिनविरोध निवडून आणण्यासाठी पैसा खर्च शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना करुणा मुंडे यांनी सरकारवर आणखी एक हल्ला चढवला. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत, पीक विमा देण्यासाठी पैसे नाहीत, पण आमदार खरेदी करण्यासाठी पैसे आहेत, असा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांची प्राथमिकता काय आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नगरसेवकांना विकत घेऊन बिनविरोध निवडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 2:11 pm

ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस:अदाणींच्या 'विस्तारा'वर राज ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडिओ', भाजपकडून 'शिवतीर्था'वरील भेटीचे फोटो व्हायरल

महाराष्ट्र नवनिर्वाचित सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्कवरील सभेत आपल्या जुन्या 'लाव रे तो व्हिडिओ' या शैलीत पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली. २०१४ पूर्वी देशात मर्यादित अस्तित्व असलेल्या अदाणी समूहाला भाजपच्या सत्ताकाळात मुंबई आणि महाराष्ट्रात कशा प्रकारे जमिनी आणि प्रकल्प दिल्या गेले, याचा सविस्तर व्हिडिओ राज ठाकरे यांनी सादर केला. मात्र, या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपने राज ठाकरे यांना 'दुटप्पी' ठरवत त्यांच्याच निवासस्थानी झालेल्या गौतम अदाणींच्या भेटीचे फोटो व्हायरल केले आहेत. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मैदानावर एका नकाशाच्या माध्यमातून अदाणी समूहाच्या २०१४ नंतरच्या विस्ताराची 'क्रोनोलॉजी' मांडली. त्यांनी दावा केला की, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ आधीच अदाणींच्या ताब्यात गेले असून वाढवण येथील प्रस्तावित विमानतळही त्यांनाच देण्याचा घाट घातला जात आहे. अदाणी समूह पूर्वी सिमेंट क्षेत्रात नव्हता, मात्र गेल्या १० वर्षांत तो देशातील दुसरा मोठा उत्पादक बनला असून सरकारी कामात त्यांचेच सिमेंट वापरले जात आहे. धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईची मोक्याची जागा एकाच उद्योगपतीच्या घशात घातली जात असल्याचा आरोप राज यांनी केला. मी उद्योगपतींच्या विरोधात नाही, पण एकाच व्यक्तीला अशा पद्धतीने मोठे करणे मला मान्य नाही, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले होते. भाजपचा पलटवार: हा तर दुटप्पीपणाचा कळस राज ठाकरेंच्या या आरोपांना भाजपने तातडीने उत्तर दिले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्यावर 'ढोंगी' आणि 'दुटप्पी' असल्याची टीका केली. काही वर्षांपूर्वी गौतम अदाणी स्वतः राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी गेले होते. या भेटीचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. फोटोंमध्ये राज ठाकरेंचे कुटुंब गौतम अदाणींच्या कुटुंबासोबत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत राज ठाकरेंनी गौतम अदाणींचा हात आपल्या हातात घेतला असून, त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करताना दिसत आहेत. अमित साटम यांनी या फोटोंवरून ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस म्हणत राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. राजकीय चर्चेला उधाण मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना राज ठाकरे यांनी थेट भाजपच्या धोरणांवर प्रहार केला आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे आगामी काळात 'मनसे विरुद्ध भाजप' असा नवा संघर्ष पाहायला मिळू शकतो.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 1:52 pm

ठाकरे बंधूंच्या प्रचाराची दिशा अन् फोकस चुकतोय:चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा; दोन्ही पक्ष किंचित - किंचित होत असल्याचा उपरोधिक टोला

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिका निवडणुकीच्या रणांगणात ठाकरे बंधूंच्या प्रचाराची दिशा आणि फोकस चुकत असल्याचा दावा केला आहे. उद्धव व राज ठाकरे यांच्या प्रचाराची दिशा चुकत असल्याचे मी वारंवार सांगत आहे. मी फार लहान माणूस आहे. मी त्यांना सल्ला देणार नाही. पण त्यांची पार्टी किंचित - किंचीत होत चालली आहे, असे ते म्हणालेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी ठाकरे बंधूंसह विरोधकांवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, राज ठाकरे व उद्धव ठाकरे भावनिक पद्धतीने बोलून जनतेच्या मनात संभ्रम तयार करत आहेत. त्यांना विकासाचा अजेंडा बाजूला करायचा आहे. राज व उद्धव यांना मी वारंवार सांगतो की, ते चुकत आहेत. त्यांच्या प्रचाराची भूमिका चुकत आहे. प्रचाराचा फोकस चुकत आहे. या पद्धतीने त्यांनी अनेकदा मतदान मागितले. पण काहीच मिळाले नाही. आता विकासावर बोलले तरच मतदान मिळते. मी या यंत्रणेतील फार लहान व्यक्ती आहे. मी राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांना सल्ला देणार नाही. पण त्यांची पार्टी किंचित - किंचित होत चालली आहे. मुंबईत ठाकरेंची अधोगतीच होईल ठाकरेंचा पक्ष लहान होण्याचे कारण असे आहे की, त्यांच्या प्रचाराची दिशाच चुकत आहे. त्यांनी निवडलेले विषय चुकत आहेत. त्यांनी निवडलेली प्रक्रिया चुकत आहे. त्यामुळेच त्यांची अधोगती होत आहे. माझ्या मते, मुंबईच्या निवडणुकीतही त्यांच्या पक्षाची अधोगती दिसून येईल. कारण, ते निवडणूक भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर चालणार आहे. विकास म्हणजे फडणवीस व फडणवीस म्हणजे विकास हे लोकांना माहिती आहे. लोकं आता या विषयाला घेऊन मतदान करणार नाहीत. ठाकरे प्रत्येकवेळी मुंबई तोडण्याचे भूत उभे करतात. पण त्याचे काहीच होत नाही. आता म्हणतात मराठी अस्मिता. पण मतदार त्यांचे काहीही ऐकत नाहीत, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे व फडणवीसांची बरोबरी होऊ शकत नाही उद्धव ठाकरे यांनी विकासाच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरेंशी चर्चा करण्याचे खुले आव्हान दिले आहे. पत्रकारांनी याविषयी बावनकुळेंना छेडले असता ते म्हणाले, लोकांनी अडीचवर्षे आदित्य ठाकरेंना पाहिले व फडणवीसांनाही पाहिले. त्यांनी विकासावर न बोललेले बरे. विकास हा असा नसतो. विकास हा जन्मापासूनच जनतेच्या सेवेत आपले आयुष्य द्यावे लागते. सोन्याच्या चमचाने बदामाचा ज्यूस पिऊन आलेले लोक विकासावर बोलूच शकत नाहीत. त्यांना मुंबई व महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे हे कळत नाही. आदित्य ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांची बरोबरी कशी करणार? महाराष्ट्राच्या व मुंबईच्या जनतेला तरी हे मान्य आहे का? आदित्य ठाकरेंनाही हे मान्य आहे का? काहीतरी पोकळ गप्पा मारून विषय भरकटवायचा असा हा प्रकार आहे, असे बावनकुळे म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 1:34 pm

भाजीपाल्याची उच्चांकी आवक; दर कोसळले

पुणे : प्रतिनिधी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये संक्रांतीमुळे फळभाज्यांसह पालेभाज्यांची भरपूर आवक झाली. बाजारात गेल्या दोन दिवसांत गाजर, टोमॅटो, कांदा, बटाटा, रताळी, वाटाणा व हिरव्या मिरचीची उच्चांकी आवक झाली. येथील पालेभाज्यांच्या बाजारात मेथी व पालक भाजीची आवक वाढून भावात मोठी घसरण झाली. पालेभाज्यांमध्ये मेथी, शेपू, पालक यांचे दर […] The post भाजीपाल्याची उच्चांकी आवक; दर कोसळले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 1:31 pm

भाजप कार्यकर्त्यांचा NCP उमेदवाराच्या घरी राडा:पिंपरी चिंचवडमध्ये मध्यरात्री घडली घटना; डॉक्टर महिलेचाही केला विनयभंग, गुन्हा दाखल

भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या घरी जाऊन वाद घातल्याची घटना रविवारी मध्यरात्री पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात हा सर्व प्रकार दिसून येत आहे. पिंपरी - चिंचवड शहरात सध्या महापालिका निवडणुकीचा फड सुरू आहे. या ठिकाणी सत्ताधारी महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांविरोधात लढत आहेत. त्यातून त्यांच्यात वादाचे प्रकार घडत आहेत. त्यातच रविवारी मध्यरात्री 12.15 च्या सुमारास पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या घरात शिरून वाद घातला. त्यानंतर त्यांनी घरातील सदस्यांना शिवीगाळ, मारहाण तसेच एका 33 वर्षीय डॉक्टर महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी स्वप्नील वाघेरे, सूरज वाघेरे, सागर वाघेरे, सिद्धार्थ वाघेरे, वरूण जगताप, प्रशांत वाघेरे, सारंग वाघेरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. तिची जाऊ प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. आरोपींनी रविवारी मध्यरात्री त्यांच्या घरात शिरून त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तक्रारदार महिलेची जाऊ रविवारी रात्री 10 च्या सुमारास प्रचार आटोपून घरी परतली. त्यानंतर त्यांच्या भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचे समर्थक व कार्यकर्त्यांनी आमच्या घरी येऊन वाद घातला. डॉक्टर महिलेचा केला विनयभंग यासंबंधीच्या तक्रारीनुसार, आरोपी मध्यरात्री 12.15 च्या सुमारास पिंपरी गावात जमले. त्यापैकी स्वप्नील वाघेरे याने परवानगीशिवाय आमच्या घरात प्रवेश केला. तक्रारदार महिलेच्या चुलत सासऱ्यांना अश्लिल शिवीगाळ केली. आमच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचे धाडस केलेस. आता जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली. आरोपींनी तक्रारदार डॉक्टर महिलेला शिवीगाळ करत अश्लिल वर्तनही केले. तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या दिराला धक्काबुक्की करत आजीसासूंना ढकलून दिले. या घटनेत आरोपींनी घरालगत लावलेल्या दुचाकींचीही मोडतोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात दोन्ही पक्षांचे लोक एकमेकांच्या अंगावर धावून जाताना दिसून येत आहेत. या घटनेनंतर पिंपरी चिंचवड येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. हे ही वाचा... मी मुंबईला येतोय, माझे पाय छाटून दाखवा:भाजप नेते अन्नामलाईंचे ठाकरे बंधूंना आव्हान; मला धमकावणारे राज ठाकरे कोण? असा सवाल मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर मुंबई महाराष्ट्राची नसल्याचे विधान करून भाजपची अडचण करणाऱ्या के अन्नामलाई यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे. मुंबई महाराष्ट्रापुरते मर्यादित शहर नाही. ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केली नाही, असे ते म्हणालेत. मला धमकावणारे आदित्य ठाकरे व राज ठाकरे कोण? असा सवालही त्यांनी या प्रकरणी केला आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 1:11 pm

मी मुंबईला येतोय, माझे पाय छाटून दाखवा:भाजप नेते अन्नामलाईंचे ठाकरे बंधूंना आव्हान; मला धमकावणारे राज ठाकरे कोण? असा सवाल

मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर मुंबई महाराष्ट्राची नसल्याचे विधान करून भाजपची अडचण करणाऱ्या के अन्नामलाई यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे. मुंबई महाराष्ट्रापुरते मर्यादित शहर नाही. ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केली नाही, असे ते म्हणालेत. मला धमकावणारे आदित्य ठाकरे व राज ठाकरे कोण? असा सवालही त्यांनी या प्रकरणी केला आहे. मुंबई महापालिकेसह 29 महापालिकांसाठी येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे. ही निवडणूक अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे सर्वच पक्ष अंग झटकून प्रचाराला लागलेत. त्यातच तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के अन्नामलाई यांनी मुंबई महाराष्ट्राचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे विधान करून भाजपची अडचण केली आहे. या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी सोमवारी पुन्हा एकदा या मुद्याला हात घालत एकप्रकारे आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचाच दावा केला आहे. एवढेच नाही तर मी मुंबईला येतोय, माझे पाय तोडून दाखवा, असे आव्हानही त्यांनी ठाकरे बंधूंना दिले आहे. मला धमकावणारे राज ठाकरे कोण? के अन्नामलाई आज सकाळी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, मला धमकी देणारे आदित्य ठाकरे व राज ठाकरे कोण आहेत? मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. त्या लोकांनी (ठाकरे बंधू) फक्त मला शिवीगाळ करण्यासाठी सभा बोलावली होती. मलाही माहिती नव्हते की, मी त्यांच्यासाठी एवढा महत्त्वाचा बनलो आहे. कुणीतरी असे लिहिले आहे की, मी मुंबईत आल्यानंतर माझे पाय छाटले जातील. अशा लोकांना मी सांगतो की, मी मुंबईत येतो. माझे पाय छाटण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा. मी धमक्यांना घाबरणारा असतो, तर मी माझ्या गावात लपून बसलो असतो. जर मी म्हणत असेन की, कामराज हे भारताच्या सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत. तर याचा अर्थ असा होतो की, ते तामिळ राहिले नाहीत. त्यानुसारच जर मी म्हणालो की, मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे, तर त्याचा अर्थ असा होतो का की, महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केली नाही? हे सर्व अज्ञानी लोक आहेत, असे ते म्हणालेत. आत्ता पाहू मुंबईविषयी काय म्हणाले होते अन्नामलाई? भाजप नेते अन्नामलाई गत आठवड्यात मुंबईत भाजपच्या प्रचाराला आले होते. तिथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले होते, मुंबईतील लोकांना ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे. मुंबई हे देशातील एकमेव असे शहर आहे जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे. केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र आणि बीएमसीमध्ये भाजपचा महापौर असेल. कारण बॉम्बे महाराष्ट्रातील शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट 75 हजार कोटी आहे. ही लहान रक्कम नाही. चेन्नईचे बजेट 8 हजार कोटी आहे. बंगळुरूचे बजेट 19 हजार कोटी आहे. त्यामुळे तुम्हाला अशा माणसांची गरज आहे जे आर्थिक नियोजन करून प्रशासन चांगले सांभाळतील.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 12:41 pm

मातोश्रीचे दार मी नाही, त्यांनीच बंद केले:मी फोन करत होतो, ते बोलायला तयार नव्हते; फडणवीसांचा ठाकरेंबाबत मोठा खुलासा

मातोश्रीचे दरवाजे कोणासाठीही बंद नाहीत, असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावे की, ते दार मी नाही तर त्यांनीच बंद केले होते. मी वारंवार फोन करत होतो, पण त्यांनी फोन घेण्याचेही सौजन्य दाखवले नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. समृद्धी महामार्गाचे श्रेय एकनाथ शिंदेंनाही जाते:प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना कसले श्रेय? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी युती तुटली तेव्हाच्या अनेक खळबळजनक बाबींचा खुलासा केला. २०१९ च्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींवर बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही पाच वर्षे सोबत होतो, एकत्र निवडणूक लढलो. तरीही तुम्हाला जर फारकत घ्यायची होती, तर किमान 'देवेंद्रजी, माझे आता तुमच्यासोबत जमणार नाही' असे सांगण्याची माणुसकी तरी दाखवायला हवी होती. मी फोन करत होतो, पण ते फोनवर बोलायला तयार नव्हते. याचे साक्षीदार स्वतः एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर आहेत. बदनामी मी नाही, त्यांच्या लोकांनी केली मातोश्रीची बदनामी थांबवा, या उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, इतक्या वर्षात मी मातोश्रीची कोणती बदनामी केली. मी बोललेलं एक स्टेटमेंट दाखवा. मी विरोधी पक्षनेता असताना आदित्य ठाकरेंवर मला विचारलं गेलं. मी एकमेव विरोओधी पक्षनेता होतो, मी म्हटलं मला असं वाटत नाही. त्यामुळे मी कधीही बिलो द बेल्ट आरोप करत नाही. त्यांच्या लोकांनी माझ्या पत्नीची बदनामी केली फडणवीस पुढे म्हणाले, मी त्यांच्यावर आरोप करत नाही. त्यांच्या लोकांनी माझ्याविरोधात माझ्या पत्नीविरोधात खालच्या स्तरावर जाऊन बदनाम केले. आमच्याबद्दल अश्लील लिहिले. पुरावे आहेत. तरीही मी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. आता मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे उघडलेत उद्धव ठाकरे आता म्हणतात की दारे उघडी आहेत, पण आता मला कोणत्याही दरवाजाची लालसा उरलेली नाही. माझ्यासाठी आता मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे उघडले आहेत आणि तीच माझी ताकद आहे, असे म्हणत फडणवीसांनी आता 'मातोश्री'शी पुन्हा सख्य होण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. आम्हीच आमच्याविरोधात उमेदवार द्यायचा का? या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देत उमेदवारांच्या निवडीबद्दल सांगितले. तसंच त्यांनी याच मुद्यावरून विरोधकांनाही घेरले. “या निवडणुकीमध्ये फक्त आमचे उमेदवार निवडून हे म्हणणे चुकीचे आहे. अपक्ष आणि इस्लामिक पार्टीचाही उमेदवार निवडून आलाय. अपक्षांची काय ताकद असते? पण तोही आला ना? किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्यांच्या विरुद्ध काँग्रेसने, उबाठाने, शरद पवारांनी उमेदवार दिला नाही. अपक्ष उमेदवार त्यांच्यापुढे आहे. अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार नाही सापडले,” असे फडणवीस म्हणालेत. उद्धव ठकरेंची शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आली, आता त्यांच्याकडे नेतेच राहिले नाही. आम्ही आघाडी केल्यावर महापालिका वनसाईड झाली. दुसऱ्या पक्षांचं अस्तित्व संपलं. अनेक वॉर्डात यांना उमेदवारच मिळाले नाही. जर उमेदवार देणार नसतील तर आम्ही स्वत: आणून उभे करायचे का? असा सवाल फडणवीस यांनी केला.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 12:33 pm

फडणवीसांनी अजित पवारांची खिल्ली उडवताच सुप्रिया सुळेंचा पलटवार:आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण; मेट्रो मोफत की घोषणा?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या मोफत मेट्रोच्या घोषणेवर टीका केल्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वक्तव्याला खोचक शैलीत प्रत्युत्तर दिले. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचा अनुभव असेल, म्हणूनच अशा घोषणा कशा करायच्या हे त्यांना माहिती असेल, असा टोला लगावत सुळेंनी फडणवीसांच्या टीकेला पलटवार केला. शब्दांपेक्षा काम महत्त्वाचं असल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीचा दाखला दिल्याने, पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांमधील आरोप-प्रत्यारोप अधिकच तीव्र झाले आहेत. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, विशेषतः पुणे महानगरपालिका निवडणूक केंद्रस्थानी आली आहे. राज्यात सत्तेत सहभागी असलेले पक्षच या निवडणुकीत वेगवेगळ्या आघाड्यांमधून लढत असल्याने, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र झाली आहे. पुणे महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या संयुक्त जाहीरनाम्यामुळे ही राजकीय लढाई आणखी तापली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी मेट्रो सेवा मोफत करण्याची मोठी घोषणा केल्यानंतर, त्यावरून सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्येच शब्दयुद्ध सुरू झाले आहे. या घोषणेवर भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट टीका करत अजित पवारांच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, मोफत मेट्रोची घोषणा ऐकून त्यांनाही एक कल्पना सुचली होती. मी जाहीर करणार होतो की पुण्यातून उडणाऱ्या सर्व विमानांमध्ये महिलांना मोफत तिकीट दिलं पाहिजे. अनाउन्स करायला काय जातंय? अनाउन्स करायला आपल्या बापाचं काय जातंय, असे विधान करत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. केवळ घोषणा करणं सोपं असतं, मात्र त्या प्रत्यक्षात शक्य आहेत का, याचा विचार राजकीय नेत्यांनी करायला हवा, असा टोला त्यांनी लगावला. फडणवीस यांनी पुढे सांगितले की, राजकीय जीवनात अनेक वेळा निवडणूक जिंकण्याची शक्यता कमी वाटू लागली की काही नेते लोकांना भुलवण्यासाठी अवास्तव जाहीरनामे काढतात. काहीही सांगितलं तरी चालेल, अशी मानसिकता असते. पण किमान जनतेचा विश्वास बसेल, अशा गोष्टी तरी सांगायला हव्यात, ज्या प्रत्यक्षात करता येतील, असे म्हणत त्यांनी अजित पवारांच्या घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अजित पवार फक्त बोलतात, माझं काम बोलतं, असा थेट हल्ला चढवत, आतापर्यंत आपण संयम राखला होता, मात्र आता परिस्थिती बदलत असल्याचे संकेतही फडणवीस यांनी दिले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी, कदाचित हा त्यांचा अनुभव असेल. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार होते ना? त्यामुळे मोफत घोषणांचा अनुभव त्यांनाच जास्त असावा, असा उपरोधिक टोला लगावला. आमचा अनुभव कामाचा आहे, असे सांगत सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले शब्द नेहमीच पाळले आहेत. सरसकट कर्जमाफीसाठी 70 हजार कोटी रुपयांची योजना आम्ही राबवली होती, मात्र सत्ताधाऱ्यांनी दिलेले शब्द आजही पूर्ण केलेले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. दोन भाऊ काय करतात, यापेक्षा देशासमोरचे प्रश्न जास्त गंभीर सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावरही भाष्य केले. आजकाल भाषणं कमी आणि इंटरव्यू जास्त झाले आहेत. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक वृत्तवाहिनीवर तेच चेहरे दिसत आहेत. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, असे त्या म्हणाल्या. मात्र, राज्यातील राजकीय नेते कोण काय बोलत आहेत, यापेक्षा देशासमोर उभ्या असलेल्या मोठ्या आव्हानांवर चर्चा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात कोण बहीण-भाऊ काय करत आहेत किंवा दोन भाऊ काय करतात, यापेक्षा देशासमोरचे प्रश्न जास्त गंभीर आहेत, असा सूचक टोला त्यांनी लगावला. पुणे महानगरपालिकेसाठी संयुक्त जाहीरनामा दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी पुणे महानगरपालिकेसाठी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये पुणेकरांसाठी मेट्रो आणि बस सेवा मोफत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामागील गणित स्पष्ट करत सांगितले की, पुण्यातील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे दररोज साडे सात कोटी रुपये पेट्रोलवर खर्च होतात. वार्षिक हिशोब केला तर हा खर्च सुमारे दहा हजार आठशे कोटी रुपयांपर्यंत जातो. हेच पैसे सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्यास नागरिकांना दिलासा देता येईल, असा दावा त्यांनी केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 12:26 pm

कोंढव्यातील चाळीत दाम्पत्य मृतावस्थेत आढळले:मुलगा रात्रपाळीवरून आल्याने घटना समोर; महिला वर्षभरापासून होती आजारी

कोंढव्यातील एका चाळीत दाम्पत्य मृतावस्थेत सापडल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानंतर दाम्पत्याच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रकाश मुंडे (वय ५२) आणि ज्ञानेश्वरी मुंडे (वय ४८) अशी मृतावस्थेत सापडलेल्यांची नावे आहेत. मुंडे कुटुंबीय कोंढव्यातील श्रद्धानगर भागात असलेल्या एका चाळीत राहायला होते. मुंडे दाम्पत्याचा मुलगा गणेश(वय २३) हा एका खासगी कंपनीत नोकरी करतो. सकाळी तो रात्रपाळीवरुन घरी आला. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. गणेशने दरवाजा वाजविला. मात्र, प्रतिसाद देण्यात आला नाही. गणेशने शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा वडील प्रकाश आणि ज्ञानेश्वरी हे बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळून आले. मुंडे दाम्पत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. ‘ज्ञानेश्वरी यांना ब्रेन ट्यूमर होता. वर्षभरापासून त्या आजारी होत्या. प्रकाश हे चालक म्हणून काम करायचे. पोलिसानी घटनास्थळाची पाहणी केली. दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकेल. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे’, अशी माहिती येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांनी दिली. दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गजाआड दहशत माजविण्यासाठी देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. सराइताकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले. अभिषेक कैलास दांगट (वय १९, रा. वृंदावन विश्व सोसायटी, नऱ्हे रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दांगट याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक भारती विद्यापीठ परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी राजमाता उद्यानाजवळ एक जण पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी मितेश चोरमले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दांगट याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस सापडले. चौकशीत त्याने दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची कबुली दिली.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 12:11 pm

शिवसेनेचा पुणे भयमुक्त करण्याचा संकल्प:डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जनतेला दबावाला बळी न पडण्याचे आवाहन

पुणे महानगरपालिकेत भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा शिवसेनेने निर्धार केला असून, जनतेने कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वतंत्रपणे मतदान करावे, असे आवाहन शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. त्यांनी नागपूर चाळ येथे आयोजित प्रचारसभेत हे वक्तव्य केले. डॉ. गोऱ्हे फुलेनगर-नागपूर चाळ प्रभागातील शिवसेना उमेदवार डॉ. रिंकू मोरे, विजयकुमार ढाकणे, सविता नाईक आणि विपुल दळवी यांच्या प्रचारार्थ बोलत होत्या. यावेळी गायत्री भागवत, शैलेंद्र मोरे, डॅनियल मगर, भानुदास बावस्कर, राजकुमार ढाकणे, सुजित परदेशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. याच सभेत रेश्मा शेख, अलिशा शेख, प्रगती दोडके आणि अर्चना लोखंडे यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. महिलांच्या सक्षमीकरणावर भर देताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 'लाडकी बहीण' योजनेमुळे महिलांना मोठा आधार मिळाला आहे. महिलांचा सन्मान हा त्यांचा अधिकार आहे, ही भूमिका शिवसेनेने नेहमीच घेतली आहे. शिवसेना सत्तेत आल्यास दोन लाख महिलांना लखपती बनवण्यासाठी सहकारी तत्त्वावर उद्योगभवन उभारले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, नोंदणीकृत महिला बचत गटांना महानगरपालिकेतर्फे दरवर्षी ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुढील १० वर्षांत सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करून प्रत्येक झोपडीधारकाला ५५० चौरस फुटांचे मोफत घर देण्याचेही त्यांनी जाहीर केले. शिक्षण क्षेत्रातही सुधारणा करण्याचे आश्वासन देत डॉ. गोऱ्हे यांनी मनपा शाळांमध्ये कॉम्प्युटर आणि एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) शिक्षण सुरू करण्याची घोषणा केली. मुलींना मोफत शिक्षण, ई-लर्निंग शाळांची वाढ आणि पीएमपीएमएल बसमध्ये महिलांना अर्धे तिकीट भाडे यांसारख्या योजनाही त्यांनी मांडल्या. यावेळी त्यांनी मतदारांना मोठ्या संख्येने शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण आणि फळा चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेना उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 12:08 pm

समृद्धी महामार्गाचे श्रेय एकनाथ शिंदेंनाही जाते:प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना कसले श्रेय? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

समृद्धी महामार्गाची संकल्पना माझी होती, तर त्यासाठी तत्कालिन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी परिश्रम घेतले, त्यामुळे समृद्धी महामार्गाचे श्रेय एकनाथ शिंदे यांना देखील जाते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ज्या प्रकल्पाला उद्धव ठाकरेंचा सुरुवातीपासून विरोध होता, ज्याच्या विरोधात त्यांनी सभा घेतल्या, त्यांना त्याचे श्रेय कसे मिळेल? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी समृद्धी महामार्गाबद्दल बोलताना एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. तर श्रेयवादावरून उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पामागची क्रोनोलॉजी सांगितली. ते म्हणाले, मी शिंदेंना एमएसआरडीसी दिले, तेव्हा ते त्यांना नको होते. उद्धवजींना या खात्यात काहीच नाही, म्हणून एमएसआरडीसी शिंदेंना दिले. त्यामुळे शिंदे फार नाराज होते. त्यावेळी हे खाते आपण मोठे करून दाखवू, तुम्ही काळजी करू नका, असे शिंदेंना सांगितले. निधीची जुळवाजुळव आणि शिंदेंचे कष्ट फडणवीस पुढे म्हणाले, त्यानंतर मी समृद्धी पीडब्ल्यूडीला दिला. त्यावर काम सुरू होते. तो पीडब्ल्यूडीकडून काढून एमएसआरडीसीला दिला. त्याही वेळेत शिंदेंना सुरुवातीच्या हा प्रकल्प होईल, असे वाटत नव्हते. कारण एवढे पैसे येणार कुठून? असा प्रश्न त्यांना होता. मी पहिल्यांदा जमिनीचे अधिग्रहण हातात घेतले. जमीन अधिग्रहणासाठी कुणी अर्थसहाय्य करत नाही. मी मुख्यमंत्री असताना एमआयडीसी, एमएमआरडी यांच्याकडून उधार घेऊन पैसे उभे केले. त्यानंतर शिंदेंनी गावात जाऊन एका दिवसात सगळ्या रजिस्ट्र्या केल्या. त्यामुळे मी कधीच एकट्याचे श्रेय घेतले नाही. समृद्धी महामार्ग हा माझ्यामुळे आणि शिंदे साहेबांमुळे झाला. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विरोध करणाऱ्यांना श्रेय कसे? दरम्यान, समृद्धी महामार्ग झाला, तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरे गटात होते, त्यामुळे ते ठाकरेंचे श्रेय झाले का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला. त्यावर ते म्हणाले, त्यावेळी शिंदे हे ठाकरे गटात असतील, पण समृद्धीचे श्रेय त्यांचे नाही. कारण ठाकरेंनी त्यांना वाळीत टाकले होते. मरी गाय बम्मण को दान, या म्हणीप्रमाणे ठाकरेंनी शिंदेंना मरी गाय (काहीच नसलेले एमएसआरडीसी खाते) देऊन टाकली होती. त्याला जिवंत करण्याचे काम शिंदेंनी केले, असे फडणवीस म्हणालेत. ज्या प्रोजेक्टला उद्धव ठाकरेंचा विरोध होता. हा प्रोजेक्ट होऊ नये, यासाठी सभा घेतल्या, त्यांना त्याचे श्रेय कसे मिळेल? असा सवालही फडणवीस यांनी केला.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 12:08 pm

गिरीश महाजनांचे राज ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर:म्हणाले- मला लाकूडतोड्या म्हणाले तर बोलू द्या, ते मोठे; पावसाळी बेडकांसारखे आवाज येत असल्याचे म्हणत टीका

सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील तपोवन परिसरात सुरू असलेल्या तयारीवरून सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, साधू-संतांच्या निवासव्यवस्था आणि धार्मिक विधींसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून विविध कामे सुरू आहेत. मात्र, या प्रक्रियेत तपोवन परिसरातील काही झाडे छाटली जात असल्याचा आरोप होत असून, यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केल्यानंतर आता या वादाने अधिक आक्रमक वळण घेतले आहे. गिरीश महाजन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मोठी झाडे तोडण्याचा कुठलाही प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही मोठी झाडे तोडणार नाही, ही ग्वाही आम्ही अनेकदा दिली आहे, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. आतापर्यंत आंध्र प्रदेशातून सात ते आठ हजार झाडे आणून लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित झाडांची लागवडही सुरू असून, पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, या नव्याने लावलेल्या झाडांकडे एकही तथाकथित वृक्षप्रेमी फिरकलेला नसल्याचा टोला त्यांनी लगावला. या वादात राज ठाकरे यांनी आपल्याला ‘लाकूडतोड्या’ संबोधल्यावर महाजन यांनी त्यावरही उपहासात्मक प्रतिक्रिया दिली. मी स्वतः 20 हजार झाडे लावून त्यांचे संगोपन करतोय. तरीही केवळ टीआरपीसाठी माझ्यावर आरोप केले जात आहेत, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी झाडाला मिठी मारल्याचा उल्लेख करत, त्यांना आता उशिरा जाग आली असल्याचा टोला त्यांनी लगावला. राज ठाकरे हे सतत काहीही बोलत राहतात, मुख्यमंत्र्यांवरही टीका करतात, मात्र मला लाकूडतोड्या म्हणतात तर बोलू द्या, ते मोठे आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली. राज ठाकरे यांनी नुकत्याच नाशिकमध्ये झालेल्या सभेत बोलताना गिरीश महाजन यांच्यावर अत्यंत खोचक शैलीत हल्ला चढवला होता. संजय राऊत म्हणतात तसं, यांना तपोवनातील झाडं छाटायची आहेत. त्या महाजनपेक्षा तो लाकूडतोड्या बरा होता, जो सोन्या-चांदीच्या कुऱ्हाडीला भुलला नव्हता, असे म्हणत त्यांनी थेट टोला लगावला. यावरही न थांबता, हे लोक झाडं छाटण्याआधी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते आणि माणसं छाटतात. बाहेरून झाडं मागवून ती आता पक्षात लावली जात आहेत, असा आरोप करत राज ठाकरे यांनी भाजपच्या पक्षवाढीवरही अप्रत्यक्षपणे टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे तपोवनातील झाडतोड आणि कुंभमेळा तयारीचा मुद्दा राजकीय केंद्रस्थानी आला. राज ठाकरे यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी गोदाघाटावर आयोजित भाजपच्या सभेत आपली भूमिका ठामपणे मांडली. तपोवन परिसरात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधू-संतांच्या पारंपरिक निवासासाठी तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दहा ते बारा वर्षांत नैसर्गिकरीत्या उगवलेल्या छोट्या-मोठ्या झाडांवरून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पर्यावरणप्रेमी असल्याचा आव आणणारे काही लोक धार्मिक कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून, हे सर्व डाव्या विचारसरणीचे लोक असल्याचा थेट आरोपही महाजन यांनी केला. याच सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर होत असलेल्या टीकेलाही गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले. फडणवीस हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर बोलतात, असा आरोप केला जातो. मात्र, ते विकासाशिवाय काहीही बोलत नाहीत, असे ते म्हणाले. विरोधकांकडे आता बोलण्यासाठी मुद्दे उरलेले नसल्याने निवडणुका जवळ आल्या की, ते पावसाळ्यातील बेडकांसारखे आवाज करायला लागतात, असा घणाघाती टोला त्यांनी लगावला. यामुळे सभेत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कुंभमेळ्याच्या तयारीसोबतच नाशिकचे राजकारणही तापले महाजन यांनी पुढे जात ठाकरे ब्रँड आणि महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. मुंबई महापालिकेतील 25 वर्षांचा सत्ताकाळ, कोरोना काळातील कथित घोटाळे आणि सलग निवडणूक अपयशाचा दाखला देत त्यांनी मविआवर टीका केली. ठाकरे असोत, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस, महाविकास आघाडी एकही मोठी महापालिका जिंकू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला. लोकांचा विश्वास भाजप महायुतीवर असून, आगामी महापालिका निवडणुकांमध्येही तो स्पष्टपणे दिसून येईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी भाषणाचा समारोप केला. या संपूर्ण वादामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसोबतच नाशिकचे राजकारणही अधिकच तापल्याचे चित्र दिसून येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 11:40 am

हिंगोली जिल्हा बालविवाहमुक्तीसाठी प्रत्येक विवाहाची नोंद बंधनकारक:जिल्हा प्रशासनाचे आदेश, धर्मगुरू, कार्यालयांनी वधुवरांच्या वयाच्या प्रमाणपत्राची तपासणी करावी

हिंगोली जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रत्येक विवाहाची नोंदणी करावी तसेच धर्मगुरु, मंगल कार्यालय व्यवस्थापकांनी वधुवरांच्या वयाच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यंत्रणांना दिले आहेत. हिंगोली जिल्हयात बालविवाह हि समस्या निर्माण झाली आहे. जिल्हयात ८१ मातांचा विवाह अल्पवयीन काळात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारानंतर यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी गुप्ता यांनी यंत्रणांची बैठक घेतली. यामध्ये सामाजिक रूढी, अज्ञान, गरीबी, स्थलांतर, शिक्षणात खंड व परंपरागत समजुतींमुळे हिंगोली जिल्ह्यातील काही ग्रामीण, दुर्गम व शहरी भागांत अद्याप बालविवाहाच्या घटना निदर्शनास येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. बालविवाह जिल्ह्यासाठी चिंताजनक असल्याने हिंगोली जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी गावात होणाऱ्या प्रत्येक विवाहाची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात करणे अनिवार्य आहे. ग्रामीण भागात विवाह नोंदीची जबाबदारी पोलीस पाटील, ग्रामसेवक व सरपंच यांची तर शहरी भागात संबंधित प्रभागाचे नगरसेवक व मुख्याधिकारी यांची राहील असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व धार्मिकस्थळांचे व्यवस्थापक, विश्वस्त व सर्व धर्मांचे धर्मगुरू यांनी कोणताही विवाह विधी पार पाडण्यापूर्वी वधू-वरांचे वय तपासणे अनिवार्य असून वधु किंवा वर अल्पवयीन असल्यास कोणत्याही परिस्थितीत विवाह लावण्यात येऊ नये. बालविवाहाची माहिती मिळाल्यास तात्काळ स्थानिक बालविवाह प्रतिबंध अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय किंवा चाइल्ड हेल्पलाईन 1098 यांना कळवावे, असे आवाहन त्यांनी केले. विवाहासाठी मंडप, केटरिंग, मंगल कार्यालय, प्रिंटिंग प्रेस, बँड, लाईट-साऊंड, डीजे, फोटोग्राफी, डेकोरेशन आदी सेवा/साहित्य पुरविणाऱ्यांनी सेवा देण्यापूर्वी वधू-वरांचे वय तपासणे बंधनकारक आहे. बालविवाहास प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. जन्म प्रमाणपत्र तपासावे वयाच्या पुराव्यासाठी जन्म प्रमाणपत्रास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. जन्म प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास शाळेचे अभिलेख किंवा संबंधित परीक्षा मंडळाचे मॅट्रिक किंवा समतुल्य प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. आधार कार्ड वयाच्या पुराव्यासाठी ग्राह्य धरू नये. कोणतेही दस्तऐवज नसल्यास प्रकरण बालकल्याण समितीकडे वय पडताळणीसाठी पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिल्या.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 11:18 am

आमच्या विरोधात उभे राहिलात तर संपवून टाकू:भाजप कार्यकर्त्यांचा विरोधी उमेदवाराच्या घरात धिंगाणा, पिंपरी-चिंचवडमधील घटना

महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय संघर्षाने हिंसक वळण घेतले आहे. प्रभाग क्रमांक २१ मधील भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी चक्क विरोधी उमेदवाराच्या घरात घुसून धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका ३३ वर्षीय महिला डॉक्टरने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी भाजप उमेदवाराच्या समर्थकांविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी मध्यरात्री १२:१५ च्या सुमारास पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र स्कूलजवळ घडली. प्रभाग २१ मधील भाजप उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचे समर्थक आणि नातेवाईक असलेल्या कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवाराच्या निवासस्थानी जाऊन दहशत निर्माण केली. स्वप्नील वाघेरे, सूरज वाघेरे, सागर वाघेरे, सिद्धार्थ वाघेरे, वरुण जगताप, प्रशांत वाघेरे, सारंग वाघेरे आणि इतर काही जणांनी संगनमत करून हा हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. आमच्या विरोधात उभे राहिलात तर संपवून टाकू तक्रारदार महिला डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील वाघेरे याने परवानगीशिवाय घरात प्रवेश केला आणि घरातील सदस्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुम्ही आमच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचे धाडस कसे काय केले? तुम्हाला जीवे मारून टाकू, अशी धमकी आरोपींनी दिली. या गोंधळात आरोपींनी तक्रारदार महिलेशी अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच, मध्यस्थीसाठी आलेल्या दिराला धक्काबुक्की केली आणि वयोवृद्ध आजेसासूलाही ढकलून दिले. सीसीटीव्ही आणि व्हिडिओ पुरावे सादर आरोपींनी केवळ घरात घुसून धिंगाणाच घातला नाही, तर घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांचीही तोडफोड केली. या सर्व प्रकाराचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, फिर्यादीने हे व्हिडिओ पुराव्यादाखल पोलिसांकडे सोपवले आहेत. निवडणुकीच्या दहशतीपोटी हा प्रकार करण्यात आला असून आम्ही सुरक्षित नाही, अशी भीती पीडित कुटुंबाने व्यक्त केली आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता या घटनेनंतर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या या कथित कृत्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली आहे. हे ही वाचा… जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार?:राज्य निवडणूक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज, मुदतवाढ देण्याची मागणी राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या भवितव्याबाबत आज, १२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती अर्जाद्वारे केली आहे. या निर्णयावर राज्यातील ३२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे गणित अवलंबून आहे. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 11:17 am

फडणवीसांना हवं तेच गणेश नाईक बोलतायत:संजय राऊतांची टीका, लवकरच जाहीर सत्काराची घोषणा; म्हणाले- भ्रष्टाचाऱ्यांचा टांगा पलटी करायला हायकमांड नको

ठाण्यात होणाऱ्या ठाकरे गटाच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक हे शिंदे गटातील भ्रष्टाचाराबाबत जाहीरपणे बोलत असल्याने नवी मुंबई-ठाण्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी गणेश नाईकांचे कौतुक करत, नाईक आज जे बोलत आहेत, ते फडणवीसांना हवं तेच आहे, असा टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रीच या लोकांना तुरुंगात जावंच लागेल, असे बोलत असतील आणि त्यांना शांत केलं जात नसेल, तर सत्ताधाऱ्यांची अंतर्गत स्थिती काय आहे, याचं ते द्योतक असल्याचं राऊत म्हणाले. राऊतांनी पुढे जात गणेश नाईक यांचा जाहीर सत्कार करण्याची घोषणा करत राजकीय वर्तुळात नवा स्फोट घडवून आणला. भ्रष्टाचार कसा सुरू आहे, हे एक मंत्री बेधडकपणे सांगतोय, यासाठी जनतेने त्यांचा सत्कार करायला हवा, असे ते म्हणाले. गणेश नाईक यांनी हायकमांडने परवानगी दिली तर टांगा पलटी करेन, असे विधान केल्याचा उल्लेख करत राऊत म्हणाले की, भ्रष्टाचाऱ्यांचा टांगा पलटी करायला कुठल्याही हायकमांडची गरज नसते. तुमचा अंतरात्मा पुरेसा आहे. शिवसेना, शरद पवार यांच्यासोबत काम केलेल्या गणेश नाईकांकडे ही ताकद आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना एकत्र आणल्याचे श्रेय घेतल्यावर राऊतांनी त्यावरही जोरदार प्रतिवाद केला. फडणवीसांनी स्वतःविषयी गैरसमज करून घेऊ नये. ठाकरे बंधू एकत्र येणं ही महाराष्ट्राची गरज होती आणि मराठी माणसांनी ते केलं आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील एकोपा आधी सांभाळावा, असा सल्ला देत राऊत म्हणाले की, भिऊ नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे, हा संदेश ठाकरेंनी महाराष्ट्राला दिला, म्हणून सभेला एवढी गर्दी झाली. मतं विकत घ्यावी लागणार नाहीत, मात्र शिंदे गटाकडून पैशांचा वापर होत असल्याचे व्हिडीओ पुढे येतील, असा दावाही त्यांनी केला. अजित पवार थापा मारत असतील, तर त्यांना आवर घालावा याचबरोबर संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केले. पुण्यात मोफत बससेवेचं आवाहन केवळ पुण्यापुरतं का, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी का नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. अजित पवार थापा मारत असतील, तर त्यांना आवर घालावा, असे आवाहन राऊतांनी फडणवीसांना केले. तसेच अण्णामलाईंच्या वक्तव्यावरून भाजपवर टीका करत, भाजप बाहेरून लोक आणून चाचपणी करते, हे आमच्यावर फेकलेले मुंगळे आहेत, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. ठाण्यातील सभेपूर्वीच राऊतांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 11:12 am

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:राज्यभरामध्ये आरटीओंचे हात बांधले, आता मॅन्युअल फिटनेस चाचण्यांना ब्रेक; केंद्राचा निर्णय, वाहन फिटनेस चाचण्या एटीएसमध्येच

केंद्र सरकारने राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) दिलेल्या अधिकारांवर मोठी कात्री लावत १ जानेवारी २०२६ पासून मॅन्युअल वाहन फिटनेस चाचण्या व प्रमाणपत्र देण्याचा अधिकार रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता ज्या जिल्ह्यांच्या शेजारी ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन (एटीएस) कार्यरत आहेत, त्याच जिल्ह्यातील आरटीओंना आता वाहन फिटनेस चाचण्या घेता येणार नाहीत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे अवर सचिव मृत्युंजय कुमार यांनी यासंदर्भात महाराष्ट्र शासनाला अधिकृत पत्र पाठवले आहे. या निर्णयामुळे पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या फिटनेस चाचण्यांना पूर्णविराम मिळणार असून, आता अत्याधुनिक यंत्रणांवर आधारित एटीएस केंद्रांमध्येच वाहनांची चाचणी होणार आहे. यापूर्वी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशात सुधारणा करत ज्या जिल्ह्यांमध्ये स्वतः एटीएस उपलब्ध नाही, पण शेजारील जिल्ह्यात एटीएस आहे, अशा ठिकाणच्या आरटीओंचे अधिकारही रद्द करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा-आरटीओ मॅपिंगची सुधारित यादीही जोडण्यात आली आहे. परिणाम कोणावर? सर्व लहान मोठे वाहनधारक, आरटीओ कार्यालये, व्यावसायिक वाहनचालक, खासगी बस व ट्रक मालकया सर्वांना एटीएस केंद्रावरच वाहन फिटनेस चाचणीसाठी जावे लागेल. ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणे अनिवार्य आहे. हा होईल फायदा या निर्णयामुळे पारदर्शकता वाढेल, भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि वाहनांच्या सुरक्षिततेचा दर्जा उंचावेल, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, आरटीओ कर्मचाऱ्यांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये या निर्णयामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील या आरटीओ कार्यालयांचा समावेश महाराष्ट्रात नाशिक येथील एटीएस केंद्राशी संलग्न धुळे, भाडगाव, चाळीसगाव, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, श्रीरामपूर, ठाणे, कल्याण, वाशी, न्यू मुंबई, पालघर आदी जिल्ह्यांतील अनेक आरटीओंवर याचा थेट परिणाम होईल. कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला राज्यात नव्या एटीएस केंद्रांच्या उभारणीसाठी ठोस कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात आणखी आरटीओंचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय या आराखड्याच्या आधारे घेतला जाईल. महत्त्वाचे मुद्दे > १ जानेवारी २०२६ पासून अंमलबजावणी > आरटीओंचे मॅन्युअल फिटनेस अधिकार रद्द > फक्त एटीएस केंद्रांमध्येच फिटनेस चाचणी > नाशिक व छत्रपती संभाजीनगर एसटीएसशी संलग्न अनेक जिल्ह्यांवर परिणाम > राज्य सरकारला एटीएस विस्ताराचा आराखडा सादर करण्याचे आदेश

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:57 am

ठाकरेंना अदानी चालत नाहीत, पण मुलतानी आणि ममदानी चालतो:नितेश राणेंचा पहिला वार; मुंबई विक्रीच्या आरोपांवरून रणसंग्राम

मुंबईतील शिवाजी पार्कवर रविवारी पार पडलेल्या मनसेच्या जाहीर सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देशातील मोठ्या उद्योगसमूहांबाबत थेट आणि आक्रमक भूमिका घेतली. गेल्या दहा वर्षांमध्ये अदानी समूहाने देशभरात, विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रात कशाप्रकारे आपला प्रभाव वाढवला, यावर त्यांनी सादर केलेला व्हिडीओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. लाव रे तो व्हिडीओ, या त्यांच्या खास शैलीत राज ठाकरे यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून 2014 नंतर अदानी समूहाला मिळालेल्या प्रकल्पांचा, जमिनींचा आणि सत्ताकाळातील वाढत्या प्रभावाचा आढावा सभेत मांडला. या सादरीकरणानंतर सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात आपण उद्योगपतींच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, एकाच उद्योगसमूहाला सातत्याने मोठे केले जात असल्याचे चित्र दिसत असल्याने चिंता व्यक्त केली. देशात उद्योग वाढले पाहिजेत, रोजगार निर्माण झाला पाहिजे, याला आपला विरोध नसल्याचे सांगत त्यांनी सत्तेचा आणि उद्योगाचा अतिशय जवळचा संबंध असल्याचा आरोप केला. मुंबईसारखे आर्थिक राजधानीचे शहर हळूहळू एका विशिष्ट गटाच्या ताब्यात दिले जात असल्याचा दावा करत त्यांनी याचा थेट संबंध आगामी महापालिका निवडणुकांशी जोडला. त्यामुळे ही सभा केवळ राजकीय आरोपांची नव्हे, तर मुंबईच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित करणारी असल्याचे चित्र निर्माण झाले. राज ठाकरे यांच्या या सभेनंतर अवघ्या काही तासांत भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक ट्विट करत ठाकरे बंधूंना थेट लक्ष्य केले. ठाकरेंना अदानी चालत नाहीत, पण चंगेज मुलतानी आणि झोहरान ममदानी चालतो, असा टोला त्यांनी लगावला. मुंबईकरांनी सावध राहावे, असा सूचक इशाराही त्यांनी या ट्विटमधून दिला आहे. नितेश राणे यांच्या या ट्विटमुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून, हा मुद्दा केवळ अदानी समूहापुरता न राहता थेट ठाकरे बंधूंवरील आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. राज ठाकरे यांनी या व्हिडीओतून 2014 पूर्वी आणि 2014 नंतरचा कालखंड ठळकपणे वेगळा करत तुलना मांडली. भाजप सत्तेपूर्वी देशात फारसे नाव नसलेले अदानी समूह कसा देशातील सर्वात प्रभावशाली उद्योगसमूहांपैकी एक बनला, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वर्षानुवर्षे कशाप्रकारे अदानी समूहाला विविध प्रकल्प मिळत गेले, याचे नकाशे आणि आकडेवारी सभेत दाखवण्यात आली. विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रात मिळालेल्या मोठ्या प्रकल्पांवर राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामध्ये मुंबई विमानतळ, नवी मुंबई विमानतळ आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा उल्लेख करत मुंबईतील मौल्यवान जमिनी एका उद्योगसमूहाकडे जाण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. सभेत बोलताना राज ठाकरे यांनी अदानी समूहाच्या औद्योगिक विस्ताराचे उदाहरण देत सिमेंट उद्योगाचा उल्लेख केला. कधीही सिमेंट उद्योगात नसलेला अदानी समूह अवघ्या दहा वर्षांत देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक कसा झाला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सध्या देशातील अनेक सरकारी प्रकल्पांमध्ये अदानी समूहाच्या सिमेंटचा वापर होत असल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ अदानींच्या ताब्यात गेल्याचे सांगत, वाढवण येथे प्रस्तावित असलेले विमानतळही भविष्यात त्यांच्याच ताब्यात जाण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हा सर्व विस्तार नैसर्गिक उद्योगवाढ आहे की सत्तेच्या आश्रयामुळे घडलेली प्रक्रिया, असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मुंबईच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी एकूणच, शिवाजी पार्कवरील सभेत दाखवलेला अदानी समूहाचा व्हिडीओ, त्यातून मांडलेले आरोप आणि त्यानंतर भाजपकडून करण्यात आलेला थेट हल्ला यामुळे मुंबईच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी झाली आहे. मुंबईचे प्रकल्प, जमीन आणि विकास कोणाच्या हातात जाणार, हा प्रश्न निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र होत चालला आहे. येत्या काळात हा वाद अधिक चिघळणार की राजकीय पातळीवर शमणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:47 am

शिवसेनेत अंतर्गत वाद अन् ठाकरे यांनी घेतले 2 नगरसेवकांचे राजीनामे:पाणीपट्टीत वाढ करण्याच्या मुद्द्यावरून पेटलेला वाद थेट पोहोचला हाेता ‘मातोश्री’पर्यंत

मी महापालिका बोलतेय... आतापर्यंत मी आपल्याला सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील कुरघोडीचं राजकारण सांगितलं. शिवसेना, भारतीय जनता पक्षातील संघर्षही आपण पाहिला, पण मला आता आठवते ती गोष्ट आहे शिवसेनेतील अंतर्गत वादाची. शिवसेनेचे विकास जैन महापौर असताना घडलेलं हे प्रकरण. सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपट्ट्याच्या मुद्द्यावरून आणि इतर काही ठरावांवरून शिवसेनेमध्ये हा वाद पेटला. उत्पन्न वाढीसाठी पाणीपट्टी वाढवण्याचा ठराव आला होता. हा मुद्दा केवळ एक निमित्त ठरला. खरंतर तेव्हा पाणीपट्टी वाढलीच नाही, पण वाद या मुद्द्यावर असल्याचं वरवर दाखवण्यात आलं. सभागृह नेते अंबादास दानवे यांनी विकास जैन यांची कोंडी केली. त्यांना सुदाम सोनवणे यांचीही साथ होती. बरेच दिवस त्यांच्यातील संघर्ष मिटला नाही. ‘त्यांना म्हणजे दानवे आणि सोनवणे यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,’ असं जैन उघडपणे बोलले होते. त्यावर ‘हा पक्षातील अंतर्गत विषय आहे. आम्ही त्यातून तोडगा काढू,’ असं सोनवणे यांनी सांगितलं होतं. स्थानिक पातळीवर वाद मिटंना. अखेरीस प्रकरण थेट उद्धव ठाकरे यांच्याकडं गेलं. त्यांनी तिघांनाही मुंबईला बोलवून घेतलं. मुंबईत जाताना त्यांच्यासोबत शिवसेनेचे आणखी नगरसेवकही होते. कुणी काय बोलायचं हे सर्व ठरलेलं होतं. मात्र, ऐनवेळी ठाकरे यांच्या पवित्र्यामुळे अंतर्गत धुसफूस ‘मातोश्री’वर उघड झाली. दानवे आणि सोनवणे यांना स्थानिक नेत्यांनीही साथ दिली नाही. पक्षानं दोघांनाही राजीनामा द्यायला सांगितलं होतं. विशेष म्हणजे पक्षाने राजीनामा घेतलेले हे पहिले दोन नगरसेवक. त्यानंतरच्या काळातही शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद होतच राहिले. मात्र, सोनवणे आणि दानवे यांना झालेली शिक्षा लक्षात घेता बऱ्याच जणांनी स्थानिक पातळीवरच वाद मिटवण्यात धन्यता मानली. दानवे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा घेतल्यानंतर त्यांची शिवसेनेतून पीछेहाट सुरू होईल, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात त्यांनी जिल्हाप्रमुख पद मिळवलं आणि ते कायम आपल्याकडं ठेवत ही चर्चा फोल ठरवली. नंतर तर ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेही झाले. सध्याच्या निवडणुकीची सूत्रं दानवे यांच्याकडंच आहेत. महत्त्वाचे म्हणजे दानवे आणि सोनवणे यांचे राजीनामे कोणत्या कारणामुळे घेतले हे गुलदस्त्यातच आहे. मनपात सर्वात प्रभावी काम करणारे प्रदीप जैस्वाल आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील संघर्ष त्यांनी कधी उघड होऊ दिला नाही. अंतर्गत वादात न पडता नंदकुमार घोडेले यांनी मात्र दोन वेळा महापौरपद मिळवलं. शिवसेनेनं आमदारकीची उमेदवारी नाकारल्यानंतर प्रदीप जैस्वाल अपक्ष म्हणून लढले. पुढं यांनी शहर विकास आघाडी स्थापन करत मनपा निवडणूक लढवली. त्यांनी काही नगरसेवक निवडूनही आणले. या शहरात स्वतःच्या बळावर काही नगरसेवक निवडून आणणारे ते एकमेव स्थानिक नेते म्हणावे लागतील. एकूणच काय तर वेळप्रसंगी संघर्ष करावा, पण राजकारणात टिकून राहावं हा संदेश महापालिकेच्या राजकारणातच मिळतो. मग ते उदाहरण दानवेंचं असो किंवा जैस्वाल यांचं...

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:34 am

अपघाती मृत्यूच्या घटनेनंतर बेशिस्त वाहनांवर दर्यापूर पोलिसांची कारवाई:अकोट–दर्यापूर मार्गावर रस्ते सुरक्षेसाठी मोहीम; बेशिस्त वाहने उभे करू नका‎

प्रतिनिधी । दर्यापूर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी व ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दर्यापूर पोलिसांनी अकोट–दर्यापूर मार्गावर वाहतूक नियंत्रण व रस्ते सुरक्षा मोहीम राबवली आहे. शुक्रवारी याच मार्गावर अवैध व बेशिस्त ऑटोमुळे अनियंत्रित होऊन दुचाकी चालक प्राचार्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले असून भविष्यात असे दुर्दैवी अपघात घडू नयेत, यासाठी ही कारवाईची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने हटवून संपूर्ण मार्ग मोकळा करण्यात आला. मुख्य रस्त्यावर बेवारस, बेशिस्त व चुकीच्या पद्धतीने उभी असलेली वाहने पोलीसांकडून हटवण्यात आली.तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली. हेल्मेट न घालणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, रस्त्यावर वाहन उभे करून अडथळा निर्माण करणे, तसेच वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर दंड आकारण्यात आला. पुढील काळातही नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे यामुळे वाहनचालक व नागरिकांनी थोडे समाधान व्यक्त केले आहे. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन अनिवार्य वाहन चालकांनी व नागरिकांनी नियमाचे काटेकोर पालन करणे महत्त्वाचे आहे. अति घाई संकटात नेई याप्रमाणे रस्त्याचे नियम पाळणे नागरिक हिताचे मानले जाते. तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा सुजान नागरिक म्हणून सहकार्य करणे महत्वाचे असून यापुढेही पोलीस प्रशासनाची कारवाई व खाकीचा धाक असणे महत्त्वाचे आहे,अशी प्रतिक्रीया अॅड. अनुप गोमाशे यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:26 am

युवा पिढ्यांनी मातृ भाषा अवगत करण्याची गरज -प्रा.डॉ. चव्हाण:राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन; मान्यवरांचे माेलाचे मार्गदर्शन ‎, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी सहभागी‎

प्रतिनिधी | अमरावती शिक्षण, रोजगार आणि शहरी जीवनात इंग्रजी आणि हिंदीचे दिवसेंदिवस वर्चस्व वाढत चालल्यामुळे मराठीच्या वापरावर परिणाम होत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेमुळे मराठीचा भाषिक आणि सांस्कृतिक पाया कमकुवत होत आहे. पुढील पिढ्या मातृभाषेपासून दूर जात आहेत. वाढत्या आधुनिकीकरणामुळे माणसाच्या जीवनशैली व विचारांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. बोली भाषेचे मूळ स्वरूप बदलत आहे. ज्यामुळे मराठीची उपेक्षा होत आहे. त्याचा परिणाम मराठी भाषेच्या पारंपारिक स्वरूपावर होत आहे. शिक्षक साहित्य संमेलनातून मराठीचा जागर होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. असे विचार संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा डॉ. गणेश चव्हाण यांनी व्यक्त केले . शिवाजी शिक्षण महाविद्यालय, तथा शिक्षक साहित्य संघ,महाराष्ट्र राज्य व मासिक शिक्षकमत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या ९ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन मातोश्री विमलाबाई देशमुख साहित्य नगरी येथे घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाचे संमेलनाध्यक्ष साहित्यिक प्रा.डॉ.गणेश चव्हाण, हर्षवर्धन देशमुख, ॲड.जे.व्ही. पाटील (पुसदेकर), ॲड. गजानन पुंडकर, प्रा. वसंत पुरके, आमदार धीरज लिंगाडे, डॉ.श्रीकांत तिडके, हेमंत डोणगावकर, डॉ. पूनम चव्हाण, प्राचार्य डॉ.विनय राऊत, जयदीप सोनखासकर, शरदचंद्र बिडकर प्रा.अरुण बुंदेले, प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे, प्रा.डॉ.किशोर क्षत्रीय आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी मातोश्री विमलाबाई देशमुख व डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. संमेलनाचे उद्घाटन उद्घाटक हर्षवर्धन देशमुख यांनी दीप प्रज्वलित करून केले. स्वागत गीत व जिजाऊ वंदनेचे छाया पाथरे यांनी गायन केले. अभंगकार प्रा.अरुण बुंदेले यांनी भाऊसाहेब या स्वरचित वंदन गीताचे गायन केले. प्रास्ताविक जयदीप सोनखासकर यांनी केले. शिक्षक मतचे प्रकाशन; साहित्यिक उपस्थित शिक्षकमत या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. तसेच ह.बा.खंडारे, प्राचार्य डॉ. अतुल ठाकरे, ना.शी.उर्फ भारतभूषण चाफेकर, प्रा.सुशीला मळसने या लेखक व कवींच्या पुस्तकांचेही प्रकाशन झाले. या साहित्य संमेलनाला प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, शिक्षक साहित्य संघाचे सर्व पदाधिकारी नागपूर, लातूर, संभाजीनगर, वर्धा, नांदेड, बुलढाणा येथील पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील साहित्यिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यामुळे हा सोहळा लक्षवेधी ठरला.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:25 am

भेदभाव टाळून पत्रकारांनी संघटीत व्हावे-संजय देशमुख:लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा सन्मान सोहळा‎

प्रतिनिधी |अकोला बदलत्या काळात कोसळणाऱ्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी अवास्तव अहंभावाने निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या भेदभावांनी तिलांजली देऊन पत्रकारांनी संघटीत व्हावे, असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी केले. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून ४० पत्रकारांसह अन्य मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशमुख बोलत होते. समाजाला अपेक्षित असणारा पत्रकार कसा असावा' या विषयावर परिसंवाद व ४० पत्रकारांना राज्यस्तरीय पुरस्कारांनी व सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार प्रदीप खाडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, स्तंभलेखक प्रा. मोहन खडसे, महेंद्र कवीश्वर, अॅड. अनंतराव खेळकर, दिनेश शुक्ल, निशाली पंचगाम, माणिकराव कांबळे, संघटन प्रमुख जगदिश अग्रवाल, विदर्भ संघटक सागर मोदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जया भारती यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सचिव राजेंद्र देशमुख, अंबादास तल्हार, सिद्धेश्वर देशमुख, पुष्पराज गावंडे, प्रा. डॉ. किरण वाघमारे, राजेश खारोडे, पंजाबराव वर, सागर लोडम आदी उपस्थित होते. आभार दीपाली बाहेकर यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:21 am

श्री गजानन महाराजांचा जयघोष; पालखी सोहळा शेगावी मार्गस्थ:श्री गजानन महाराजांचा जयघोष करत वारकरी हरिनामात दंग

बोरगाव मंजू | बोरगाव मंजू येथील लक्ष्मीनगरातील संत गजानन महाराज मंदिरातून पालखी सोहळा रविवारी शेगावकडे मार्गस्थ झाला. टाळ मृदंगाच्या गजरात श्री गजानन महाराजांचा जयघोष करत वारकरी हरिनामात दंग झाले. पाच दिवस चालणाऱ्या सोहळ्यात विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. असा राहणार प्रवास पालखी सोहळ्याला रविवारी बोरगाव मंजू येथून प्रारंभ. अकोला येथे मुक्काम करून सकाळी निघून रात्री गायगाव येथे पालखी सोहळा मुक्कामी असेल. सकाळी गायगाव नागझरीकडे वारकरी मार्गस्थ होतील. रात्री श्री क्षेत्रे रात्री गोमाजी महाराज, नागझरी येथे मुक्काम राहणार आहे. मंगळवारी सकाळी संतनगरी शेगावकडे पालखी सोहळा निघणार आहे. (छाया : देवानंद मोहोड) असा झाला प्रारंभ सोहळ्यात ५०० भाविक सहभागी झाले आहेत. रविवारी सकाळी श्रींच्या चरणी महापूजेसह जलाभिषेक करून पालखी सोहळ्याचा श्रीगणेशा झाला. पालखी मार्गावर भाविकांनी स्वच्छतेसह रांगोळी काढून श्रींच्या चरणी मनोभावे सेवा अर्पण केली. या पालखी सोहळ्यात पांढरा शुभ्र वस्त्र व डोक्यावर टोपी, महिला सेवाधारी हातात टाळ मृदंगाच्या गजरात जयघोष करत मार्गस्थ झाले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:20 am

महापालिका निवडणूक‎प्रचाराचा ठरला ‘सुपर संडे''‎:रणधुमाळी काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, वंचितचे नेते उतरले मैदानात‎

प्रतिनिधी | अकोला मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रचाराचा ‘सुपर संडे' शहरातील मतदारांना अनुभवायला मिळाला. मतदान अवघ्या दोन दिवसावर आल्याने विविध प्रभागांमध्ये प्रचार रॅली, पदयात्रा, सभा व कोपरा बैठका यांच्या माध्यमातून सर्वच पक्षांचे उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. रविवारी सुटी असल्याने उमेदवारांच्या प्रचार रॅलीत नागरिकांचाही सहभाग दिसून आला. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, मौलाना हारुण नदवी, शिंदे सेनेचे मंत्री संजय राठोड, भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्या गल्ली बोळांमध्ये प्रचार रॅलींमुळे शहरातील विविध भागांतील प्रभागांत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार असल्याने उमेदवारांनी प्रचाराची ताकद पणाला लावली असून, महानगरपालिका निवडणूक अधिकच रंगतदार होत चालली आहे. रविवारी जास्तीत जास्त सभा घेण्यावर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी भर दिला आहे. त्यामुळे विविध शहरांत राजकीय पक्षांबरोबरच कार्यकर्त्यांची धावपळ दिसून आली. रिंगणातील उमेदवारांकडून विकासकामे, स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा यांवर भर देत मतदारांना साद घातली जात आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा १३ जानेवारी रोजी थंडावणार आहेत. त्यामुळे प्रचाराला अवघे दोनच दिवस शिल्लक असल्याने रविवारपासून शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली. शेवटच्या टप्प्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, शिवसेना (उबाठा), मनसे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी यांच्या प्रमुख नेत्यांच्या सभांतून आरोप-प्रत्यारोपांनी प्रचाराचा खऱ्या अर्थाने धुरळा उडण्यास सुरवात झाली आहे. या सभांमधून नेतेमंडळी आपले निवडणुकीचे मुद्दे मांडत असून, मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे निवडणुकांची रंगत आणखी वाढली आहे. रविवार सत्कारणी लावण्यासाठी उमेदवारांची लगीनघाई सुटीच्या निमित्ताने घरी असलेल्या जास्तीत जास्त मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांची भेट घेण्यासाठी उमेदवारांनी फिल्डिंग लावली होती. त्यामुळे रविवार सत्कारणी लावण्यासाठी उमेदवारांची लगीनघाई झाल्याचे पाहायला मिळाली. या प्रचार धडाक्यात रविवारी भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार रणधीर सावरकर यांच्या शहरात विविध प्रभागात पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली, पदयात्रा, कॉर्नर सभा झाल्या. १२ जानेवारीपासून दोन दिवस जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर शहरात प्रचारासाठी येणार आहेत. रविवारी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, शिंदे सेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या शहरात ठिकठिकाणी कॉर्नर सभा झाल्या. शहराच्या विविध प्रभागात विविध राजकीय पक्षांच्या निघालेल्या प्रचार रॅलींमुळे सर्वत्र निवडणुकमय वातावरणाची धामधूम पाहायला मिळाली.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:19 am

स्नेहमेळाव्यातून मिळाला जुन्या आठवणींना उजाळा:चांद्यातील जवाहर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा‎

प्रतिनिधी|चांदा चांदा येथील जवाहर माध्यमिक विद्यालयामध्ये नुकताच माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. विद्यालयाच्या स्थापनेपासून म्हणजेच १९५९ पासून ते २०२५ पर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. माजी विद्यार्थी व पुण्यातील एस.पी. महाविद्यालयाचे उपप्राचार्य सोपानराव शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्था कार्यकारिणी सदस्य नानासाहेब अंबाडे, डॉ. दीपक शिंदे, संभाजी दहातोंडे, विनोद गुंदेचा, अमृत गांधी, प्रा. किसन अंबाडे, आसाराम कर्डिले, मच्छिंद्र थिटे, आर.डी. गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास दहातोंडे आदी उपस्थित होते. यावेळी संभाजी दहातोंडे, संस्था कार्यकारिणी सदस्य नानासाहेब अंबाडे, डॉ. दीपक शिंदे, प्रा. अशोक चौधरी, प्रा. किसन अंबाडे, प्रा.रावसाहेब राशिनकर, किशोर रक्ताटे, संतोष कानडे, किशोर शिंदे, कार्तिक पासलकर, ज्योती जावळे, जनार्धन पटारे, विनोद गुंदेचा यांनी मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यालयाच्या प्रगतीसाठी व आवश्यक त्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शक्य तितकी मदत देणगी स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी माजी विद्यार्थी महासंघाची स्थापना करण्यात आली. विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. विनोद गुंदेचा यांची माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी तर विद्यालयाचे प्राचार्य अंशुमन वाकचौरे यांची सचिवपदी निवड करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:13 am

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करत त्यानुसार वाटचाल करावी:पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे प्रतिपादन, हंडीनिमगाव येथे श्रमसंस्कार शिबीर उत्साहात‎

प्रतिनिधी | नेवासे फाटा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना आपले ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने आपली वाटचाल केली पाहिजे. स्पर्धा परीक्षा देताना येणारे विविध आव्हाने समाजातील दैनंदिन जीवन जगाताना वेगवेगळ्या आव्हानांना कसे सामोरे जावे, विद्यार्थी जीवनात शिस्त किती महत्वाची आहे, हे आपले दैनिक वेळापत्रकच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बनवायला हवे, असे आवाहन नेवासे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले. नेवासे तालुक्यातील हंडीनिमगाव येथे पुणे विद्यापीठ व ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज, विठ्ठल पाषाण, बाबासाहेब रोडगे, बाळासाहेब पिसाळ, किरण जाधव, संकेत वाघमारे, कुणाल पिसाळ, प्रा. डॉ. एन. डी शेख, प्रा. डॉ. कार्तिकी नांगरे आदी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अभ्यास, शारिरीक कसरत आणि संस्कार या त्रिसूत्रीवर आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास निश्चितच तुम्ही समाजासाठी आदर्श नागरिक बनताल. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. नवनाथ आगळे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशनंदगिरी महाराज यांनी विद्यार्थ्यांना संस्कार, श्रमदान, आईवडिलांचा आदर व सामाजिक जबाबदारी राखावी असे आवाहन केले. विद्यार्थ्यांपैकी अजित चौरे, अनुष्का सदाफळ, वेदांत बोलके, भारती दारूंटे, विशाल हपसे, सलमान शेख यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी विठ्ठल पाषाण, बाबासाहेब रोडगे, बाळासाहेब पिसाळ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अनेकांनी भाषणात समसंस्कार शिबीराचे कौतुक केले. शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या शिबिरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विविध मान्यवरांच्या व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले होते.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:12 am

अपयशाच्या भीतीचा सामना करावा आणि यशस्वी व्हावे:व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांचा विद्यार्थ्यांना मंत्र‎

प्रतिनिधी | संगमनेर अपयशाची भीती तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही, त्याचा सामना करा आणि तुमच्या यशाचा मार्ग प्रशस्त करा. असफलता ही यशाच्या मार्गातील एक पाठशाळा आहे. प्रत्येक अपयशातून शिकून तुमच्या ध्येयाकडे सजगतेने पुढे जा. तुमचं आयुष्य अपयश हे तुमच्यामुळे तुमच्या विचारांमुळे अडतं इतरांमुळे नाही. तुम्ही जितकं कमी ठेवालं तेवढे जग तुम्हाला कमी देईल. त्यामुळे तुम्हाला अपयशातून शिकून तुमच्या ध्येयाकडे सजगतेने पुढे जा असे उद्गार व्याख्याते, व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी काढले. मंगळेश्वर विद्यालय मंगळापूर, संगमनेर आणि अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था, शाखा संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कथाकथन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अरविंद गाडेकर यांनी कथेतून अनेक थोर व्यक्तिमत्वांची बालपणातील शिक्षण, नापास होण्याची गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली. या कथेतून विद्यार्थ्यांनी बोध घ्यावा आणि विद्यार्थ्यांमधील नापास होण्याची भीती दूर व्हावी यासाठी प्रबोधन केले. यावेळी काही निवडक व्यंगचित्र सादर करून विद्यार्थ्यांना हसविले आणि मार्मिक चिमटेदेखील काढले.अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था, शाखा संगमनेर या संस्थेविषयी संस्थेचे सदस्य मनोज साकी यांनी माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील काढणे, पवार दौलत आणि शिक्षकवृंद, शालेय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:11 am

शेतकऱ्यांना मिळाले ऊस पीक व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान:पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापनाचे मार्गदर्शन‎

प्रतिनिधी| शनिशिंगणापूर सोनई येथील कृषी महाविद्यालयाच्यावतीने ग्रामीण जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नेवासे तालुक्यातील खेडलेकाजळी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर तंत्रज्ञान प्रचार-प्रसार करत कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कृषिदूत विद्यार्थ्यांनी ऊस पिकावरील संपूर्ण व्यवस्थापन या विषयावर शेतकरी चर्चासत्राचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत डॉ. अतुल दरंदले यांनी ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गावात राहून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष समस्या जाणून घेता येतात. पिकांवरील कीड व रोग, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याचे शास्त्रीय मार्ग विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. प्रा. नरेंद्र दहातोंडे यांनी कांदा व ऊस पिकांवर येणाऱ्या प्रमुख कीड व रोगांची ओळख, एकात्मिक कीड व्यवस्थापन, कीटकनाशकांचा सूज्ञ वापर, जैविक व रासायनिक उपाय, कीड नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर, जैविक खते व जैविक बुरशीनाशकांचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. क्षारयुक्त जमिनीच्या सुधारणा यावर प्रा. राहुल गडाख यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. सूत्रसंचालन कृषिदूत पृथ्वीराज चौधरी यांनी तर आभार माजी सरपंच बाळासाहेब कोरडे यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:10 am

पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी दिला पाणी बचतीचा संदेश:रॅलीद्वारेही केली जनजागृती, नागरिकांनी केला पाणी बचतीचा संकल्प, विद्यार्थ्यांचा उपक्रम‎

प्रतिनिधी | पाथर्डी श्री आनंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन व पाण्याच्या बचतीबाबत पाणी वाचवा, जीव वाचवा या विषयावर सादर केलेल्या पथनाट्याला नागरिकांनी भरभरून दाद देत दैनंदिन जीवनात पाणी बचतीचे उपाय अंमलात आणण्याचा संकल्प केला. श्री आनंद महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रम संस्कार शिबीर तालुक्यातील मोहटादेवी गडावर चालू आहे. शिबिराचे उद्घाटन मोहटा देवस्थानचे विश्वस्थ श्रीकांत लाहोटी यांचे हस्ते पार पडले. यावेळी संस्थेचे खजिनदार सुरेश कुचेरिया, प्राचार्य डॉ. शेषराव पवार, कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज भावसार, डॉ. जयश्री खेडकर आदीसह मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या कालावधीमध्ये शिबिरार्थींनी पाणी या विषयावर लक्ष केंद्रित करत पाणी बचतीसाठी पथनाट्याबरोबर रॅली काढत पाण्याचे महत्व पटवून दिले. मोहटादेवी गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांसमोर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. भाविकांनी सुद्धा या उपक्रमाचे कौतुक केले. पथनाट्याची संकल्पना डॉ. जयश्री खेडकर यांची होती. तसेच परिसर स्वच्छतेसह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्वच्छता हीच सेवा या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी केली. या सर्व उपक्रमामुळे राष्ट्रीय सेवा योजनेचे नॉट मी बट यू हे ब्रीद वाक्य केवळ शब्दात न राहता प्रत्यक्ष कृतीतून विद्यार्थांनी आत्मसात केले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:10 am

श्रीगोंदेतील क्रीडा संकुल खेळाडूंसाठी महत्वपूर्ण ठरेल:पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे

प्रतिनिधी|श्रीगोंदे “ग्रामीण भागातील युवकांमध्ये खूप गुणवत्ता आहे. त्यांना योग्य संधी, सुविधा व व्यासपीठ मिळाले तर ते राज्य व देश पातळीवर चमकदार कामगिरी करू शकतात. अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्राची परंपरा सर्व खेळाडूनी आपल्या नैपुण्यातून जोपासली आहे. श्रीगोंदे येथे उभारण्यात येणारे हे क्रीडा संकुल युवकांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देणारे ठरेल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला. श्रीगोंदे शहरातील क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन मंत्री विखे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम पाचपुते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, तहसीलदार सचिन डोंगरे, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव आदी उपस्थित होते. सुमारे साडे आठ कोटी रुपयांच्या माध्यमातून पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलाच्या धर्तीवर २ हेक्टर जागेवर क्रीडा विकासाची कामे या ठिकाणी करण्यात येणार आहेत. क्रीडा संकुलामध्ये मैदाने, धावपट्टी, इनडोअर हॉल, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, प्रेक्षक गॅलरी, प्रकाशव्यवस्था अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले. भूमिपूजन कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ. विखे यांनी श्रीगोंदे येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या शासकीय विश्रामगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी बांधकामाची गुणवत्ता, खोल्यांची रचना, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, पार्किंग, सभागृह आदी बाबींची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 9:58 am

आध्यात्मिक उपक्रमांतून समाजात सद्भाव व एकोपा:संगीतमय श्रीमद् भागवत कथा तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात

प्रतिनिधी|सोनई येथे श्री संत हभप महंत भगवानबाबा व श्री संत हभप महंत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त संगीतमय श्रीमद् भागवत कथा तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात पार पडला. आज झालेल्या हभप राम महाराज झिंजुर्के यांच्या काल्याच्या कीर्तनाला माजी पंचायत समिती सभापती सुनिता गडाख उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत अशा अध्यात्मिक कार्यक्रमांमुळे समाजात सद्भावना, एकोपा व संस्कार वृद्धिंगत होत असल्याचे मत व्यक्त केले. कथा व पारायण सोहळ्यामुळे मनुष्याला आत्मिक ऊर्जा मिळते तसेच जीवनाला योग्य दिशा मिळते, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. सोनई परिसर ही अध्यात्मिक भूमी असून येथे सातत्याने धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम होत असल्याचेही सांगण्यात आले. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी सोनई व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घेतला. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 9:57 am

मोबाइलच्या अतिवापराचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम:सायबर गुन्हेगारी, फसवणुकीचे प्रकार वाढले, पालकांनी जागरुक व्हावे

प्रतिनिधी |अहिल्यानगर सध्या मोबाइलचा अतिरेक वाढत असून त्याचा लहान मुलांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. याद्वारे सायबर गुन्हेगारी व आर्थिक फसवणूक वाढत आहे. पालकांनी स्वतः जागरूक राहून मुलांना मोबाइलपासून दूर ठेवावे तसेच सुरक्षित इंटरनेट वापराचे धडे द्यावेत असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण यांनी केले. लिटिल स्कॉलर्स प्री-प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित पालक आणि मान्यवरांची मने जिंकली. कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण, स्नेहालयचे सहसंचालक संजय चाबुकस्वार, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दौलत येवले, संस्थेचे अध्यक्ष बद्रीनाथ जाधव, एकनाथ शिंदे, शाळेच्या प्राचार्या संगीता जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व नृत्य सादर केले. त्यानंतर विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दौलत येवले यांनी सांगितले, मुलांचा बौद्धिक, शारीरिक आणि संस्कारक्षम विकास घडवून आणण्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पाल्य कोणत्या वातावरणात वावरतो, तो काय शिकतो, कोणत्या सवयी अंगिकारतो याकडे पालकांनी बारीक लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केल्यास मुलांचे उज्ज्वल भविष्य घडू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष बद्रीनाथ जाधव यांनी शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्या संगीता जाधव यांनी शाळेच्या वाटचालीचा आढावा घेत पालकांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभम जाधव, अथर्व औताडे, प्रणव जाधव, स्मिता थोरात, नम्रता गोळे, मंगेश आहेर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी ढेरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शरद जाधव यांनी मानले. मुलांचा भावनिक विकासही महत्वाचा स्नेहालयचे सहसंचालक संजय चाबूकस्वार यांनी सांगितले, मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाचा सखोल अभ्यास करून पालकांनी त्यानुसार त्यांच्या गरजांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे तर मुलांचा भावनिक विकासही तितकाच महत्त्वाचा असून त्यासाठी पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा, असे त्यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 9:56 am

नथुराम गोडसे माणसात नव्हता, त्याच्याच या औलादी...:असदुद्दीन ओवैसींचे वादग्रस्त विधान, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

महानगरपालिका निवडणुकींच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नथुराम गोडसेबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. नथुराम गोडसे माणसात नव्हता, त्यालाही कपडे पाहण्याचा नाद होता. त्याच्याच या औलादी आहेत., अशा शब्दांत ओवैसींनी विरोधकांवर प्रहार केला. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. परभणी आणि जालना महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारांसाठी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची काल सभा पार पडली. या सभांमध्ये बोलताना त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर निशाणा साधताना उपरोक्त वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, आमच्या बरबादीची दास्तान हे लोक लिहितात आणि सांगतात आम्ही सेक्युलर आहोत. मात्र नथुराम गोडसे हा टुई होता. इथे नाही बोलता येत, त्यालाही कपडे पाहण्याचा नाद होता. त्याच्याच या औलादी आहेत. त्यांचेच विचार हे लोक घेवून आलेत. ओवैसींच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून मोठी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या 'बी-टीम' आरोपाचा घेतला समाचार परभणी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी रविवारी दर्गाह रोडवरील मैदानावर असदुद्दीन ओवैसी यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून होणाऱ्या 'बी-टीम'च्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. मोदी तीनवेळा पंतप्रधान झाले, ते काय मुस्लिमांमुळे झाले का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते पुढे म्हणाले, तुम्हाला भाजपला हरवता येत नाही आणि नाव माझे घेता. बिहारमध्ये आम्ही केवळ ५ जागा मागितल्या होत्या, त्या तुम्ही दिल्या नाहीत. स्वतः ६० जागा लढवून फक्त ५ जागा जिंकलात; मग उरलेल्या जागांवर कोण जिंकले? याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. नेहरू ते मनमोहन सिंग... अन्यायाचा पाढा वाचायला तयार असदुद्दीन ओवैसी यांनी केवळ भाजप-काँग्रेसवरच नाही, तर राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि इतर पक्षांवरही तोफ डागली. नेहरूंपासून ते मनमोहन सिंग यांच्या काळापर्यंत मुस्लिमांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचायला मी तयार आहे. मला फक्त दोन मिनिटे द्या, तुम्हाला चुल्लूभर पाण्यात जीव द्यावा लागेल, अशा जहाल शब्दात त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. तरुणांची मोठी उपस्थिती या सभेला मुस्लिम बांधवांसह मोठ्या संख्येने तरुण-तरुणींची उपस्थिती होती. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर असदुद्दीन ओवैसींनी थेट गोडसेचा उल्लेख करत भावनिक आणि राजकीय मुद्द्यांना हात घातल्याने आगामी काळात प्रचाराची रणधुमाळी अधिकच तीव्र होण्याचे शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 9:45 am

नशिराबाद येथे आजपासून पीर यासीन मिया कादरी यांचा उरूस:१२६ वा उरूस सोहळा साजरा होणार

प्रतिनिधी | नशिराबाद पीर यासीन मिया कादरी यांच्या उरुसाला १२ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. यंदा हा १२६ वा उरूस सोहळा साजरा होणार आहे. या उरुसानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल नशिराबाद येथे पाहायला मिळणार आहे. उरूस सोहळ्याची सुरुवात १२ रोजी संदल मिरवणुकीने होणार असून, १३ रोजी मेहंदी व चादर अर्पण करण्यात येणार आहे. याच दिवशी उकाब एज्युकेशन सोसायटीतर्फे ऑल इंडिया मुशायरा (कविसंमेलन) होणार आहे. १५ रोजी पारंपरिक कुस्ती स्पर्धा होईल. याच दिवशी रात्री कव्वालीचा शानदार मुकाबला रंगणार आहे. मैफलीत मुंबई येथील प्रसिद्ध कव्वाल अंजुम बानू, कव्वाल जावेद अख्तर (मुंबई) आपल्या दमदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकणार आहे. उरूस शेख अजित शेख युसूफ, आबीद शेख मजिद, सैय्यद बरकत अली युसूफ अली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. पीर यासीन मिया कादरी यांचा दर्गा.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 9:35 am

दिव्य मराठी मुलाखत:पोलिस आयुक्तांवर मी समाधानी नाही; पोलिसांना विश्वासात घेतल्याशिवाय दोन नंबरचा धंदा करता येत नाही -पालकमंत्री संजय शिरसाट

मी पोलिस आयुक्तांच्या कामावर समाधानी नाही. शहरात ड्रग्जचे धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. २२ वर्षांची पिढी बरबाद होत आहे. पडेगाव मुकुंदवाडी, नारेगाव, ब्रिजवाडीत ड्रग्जचा व्यापार वाढला आहे. कोणताही दोन नंबरचा धंदा पोलिसांना विश्वास घेतल्याशिवाय करता येत नाही, असा माझा ठाम दावा आहे. पोलिसांनी सर्वांना असेच सोडले तर हे लोण घराघरात येईल. पोलिसांचेदेखील कुटुंब आहे असे सांगत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शहरातल्या कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवले. शहरातील ‘बेसिक’ सुविधांचा विकास झाला पाहिजे. त्यावर शिवसेनेचे लक्ष आहे, असे त्यांनी सांगितले. पक्षांतील गटबाजीचे राजकारण, शहरातील शांतता, भारतीय जनता पक्षाबरोबर युतीची फिसकटलेली चर्चा या सर्व विषयांवर शिरसाट यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मनमोकळी उत्तरे दिली.... प्रश्न : मुख्यमंत्री म्हणतात, भाजपची शिवसेनेमुळे युती तुटली. त्यांच्यात दोन गट आहेत...? शिरसाट : निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. आमच्या युतीच्या १० बैठका झाल्या. मुलगी पाहिल्यानंतर हो की नाही २-३ बैठकांत सांगता येते. मात्र, आमच्यात शेवटपर्यंत निर्णय झाला नाही. सुरुवातीला ५० टक्क्यांचा फॉर्म्युला, मग ‘छोटा भाऊ की मोठा भाऊ’ असे करत ५० टक्क्यांवरून आम्ही ३९ वरून ३६ वर आलो. मात्र, त्यामध्येही पुन्हा चुका केल्या. रात्री दहा वाजले तरी कळवले नाही. शेवटी त्यांचाच निरोप आला, आमचे काही ठरले नाही. मी स्पष्टपणे सांगितले की, मला नऊ वाजेपर्यंत फोन नाही आल्यास मी घोषणा करणार. मुख्यमंत्र्यांना या लोकांनी मिसगाइड केले. ही त्यांची रणनीती होती का याची माहिती नाही. प्रश्न : शिवसेनेत दोन गट आहेत. त्यामुळे युती तुटली का? शिरसाट : भाजपमध्ये दोन गट नाही काय? भागवत कराड, अतुल सावे गळ्यात गळे घालून फिरतात का? संजय केणेकर सोबत असतात का? प्रश्न : पोलिसांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? शिरसाट : मी पोलिस आयुक्तांवर समाधानी नाही. मी आयुक्तांना काही नावे दिली. कुठे धंदे चालतात मी त्यांना सांगितले आहे. ड्रग्जचे धंदे करणाऱ्यांना धरा आणि त्यांची धिंड काढा. पोलिसांचा धाक लोकांना कळू द्या. देवगिरी कारखान्यापासून पुढे गेल्यावर ड्रग्ज विक्रेते दिसतील. नारेगाव, ब्रिजवाडी येथे २० ते २२ वर्षांची मुले बरबाद होत आहेत. ड्रगमाफिया पोलिसांसोबत ‘कनेक्ट’ असतो. कोणताही दोन नंबरचा धंदा पोलिसांना विश्वासात घेतल्याशिवाय करता येत नाही. खून करणारे इतके निर्ढावले आहेत की त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही लवलेश नसतो. पोलिस मारताना ते आरोपी किती मारले ते मोजत असतात. पोलिसांनाच भीती वाटते. प्रश्न : पत्रकार परिषद घेऊन तुम्ही पोलिसांविषयी सांगूनही हे जाणीवपूर्वक होत आहे का? शिरसाट : जाणीवपूर्वक नाही. काही सवयी मोडायला वेळ लागतो. आम्ही राज्यकर्त्यांनी अनेक सवयी लावलेल्या आहेत. एखाद्या पत्त्याचा अड्डा असला तर दुर्लक्ष कर. मग आणखी दोन अड्डे नवीन तयार होतात. मग एकाचे तीन होतात. दारूचेदेखील तसेच आहे. मग त्यानंतर हे उदरनिर्वाहाचे साधन बनतात. प्रश्न : पालकमंत्री तुम्हीच. अधिकारीही तुमचेच सगळे. तुम्हाला माहिती आहे. मग ही परिस्थिती सुधारणार कधी? शिरसाट : मी पोलिसांना दोष देत नाही. मला वाटते मी आयुक्तालयात जाऊन काही सांगतो तेव्हा माझे ऐकले नाही तर मी माझ्या पद्धतीने करेन. शासनाचे ऐकले पाहिजे. जबाबदारी झटकता येणार नाही. प्रश्न : भाजपचे लोक जर्मनीतल्या शहरासोबत तुलना करतात आणि तुम्ही हिंदू-मुस्लिम करतात... शिरसाट : मला ते कोणते जर्मनीतील शहर बनवायचे नाही. मी लहानपणी नांदेडला लंडन करणार असे ऐकले होते. त्याची मी आजही वाट पाहतो, मुंबईला सिंगापूर होण्याची वाट मी पाहत आहे. बेसिक गोष्टी करून घेतल्या पाहिजेत. इथून लोक परदेशात जातात. आपला देश १०० वर्षे मागे आहे, असे सांगतात. दुबई कोणाच्या जिवावर उभी आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग आहे. बेसिक गोष्टी चांगल्या झाल्या तर विकास होईल. या शहरामध्ये ‘ग्रोथ’ होण्यासारखी जागा आहे. त्याचा वापर करायची गरज आहे. उद्योगासोबत अडीच ते तीन लाख लोकसंख्या वाढणार आहे. त्यांच्यासाठी बेसिक सुविधा आहेत का, त्यावर ‘फोकस’ केले पाहिजे. त्या असतील तर विकास होत जाईल. प्रश्न : कोणताही नेता आला की तुमचा बंगला, व्हिट्स हॉटेल, एमआयडीसीतील प्लॉटवरून तुमच्यावर टीका करतो... शिरसाट : माझे मोठेपण सिद्ध करण्याचा तो एक मार्ग आहे. जे आहेत ती वस्तुस्थिती आहे. माझ्या बंगल्यावर आता तर कपडा टाकता येणार नाही. व्हिट्सबाबत गुन्हे दाखल करा. ‘रिट पिटिशन’ दाखल करा ना. मी सडेतोड, स्पष्टपणे उत्तरे देतो म्हणून हे लोक टार्गेट करतात. प्रश्न : शहराच्या विकासाबाबत अनेक समस्या आहेत... शिरसाट : काही वेळा मी स्पष्ट बोललो की काही राज्यकर्त्यांनी सोयीनुसार निर्णय घेतला. उड्डाणपूल पाहिले तर याला सी-सॉ म्हणतात. यामध्ये कोणाचे इंटरेस्ट होते हे तपासून बघा. कोणत्याही शहरात देशात क्रांती चौकासारखा पूल पाहायला मिळणार नाही. तो पूल जिल्हा न्यायालयासमोर न्यायला हवा होता. आज काय होते तर रोज ती धूळ महाराज सहन करत आहेत. प्रश्न : पाण्याच्या बाबतही तसेच झाले आहे का? उत्तर : पाण्याच्या प्रश्नाबाबत एजन्सीला जाऊन विचारले. ‘मातोश्री’वर कोण गेलो होते? चार्टर्ड िवमान घेऊन कोण आले होते? ती एजन्सी कोणाची होती? तर राज्यसभा सदस्याची होती. याची विचारणा केली की सगळे माहिती होते. प्रश्न : महापौरपदी कोण, हर्षदा शिरसाट की आणखी कोणी? शिरसाट : महापौर शिवसेनेचा होणार आहे. महापौर कोण होणार हे सांगण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे, मला नाही. प्रश्न : सततच्या प्रक्षोभक भाषणामुळे अशांत वातावरणामुळे आपण २० वर्षे मागे चाललो आहोत का?शिरसाट : ‘ग्रीन बेल्ट’मध्ये भाषणाची सुरुवात विकासावर करण्यापेक्षा ‘मुस्लिम महिलांचे नकाब काढले तर हात छाटून टाकू,’ इथून सुरू होते. मग ‘शेर आया रे शेर आया, शेर भागा रे शेर भागा...’ शहरात मारामारी त्यांच्यात झाली. त्यात माझे, सावे यांचे नाव घेतले. तुम्ही दलाली केली नसती तर लोक चिडले नसते हे त्यांनी विसरू नये. प्रश्न : इम्तियाज यांनी आरोप केला की दंगलीत त्यांनी राम मंदिर वाचवले, तुम्ही घरी होतात... शिरसाट : कदीर मौलाना यांची मुले मारायला आली होती. त्यामुळे राम मंदिरात आश्रय घेतला. शरणागती घेतली. तिथे ते वाचले, अन्यथा कदीर मौलानाच्या मुलांनी मारून टाकले असते. आजही राम मंदिरातल्या ट्रस्टीसोबत जाऊन चर्चा करा. हा काय राम मंदिर वाचवणार? हा स्वत:ला वाचू शकत नाही. असे धर्मात्मा नको आम्हाला. रॅपिड फायर १. सत्तेसाठी उबाठा, एमआयआयचा पर्याय खुला आहे का ?उत्तर : बिलकुल नाही२. वारसदार कोण, हर्षदा, सिद्धांत की कार्यकर्ते?उत्तर : विचार कार्यकर्त्यांनी चालवला पाहिजे३. महापालिकेचा प्रचारात हिंदुत्व की विकास ?उत्तर : हिंदुत्व आणि विकास४. गटबाजी कोण करते, जंजाळ, भुमरे की शिरसाट?उत्तर : हे पक्षाच्या जिवंतपणाचे लक्षण५. उद्धवसेनेतील स्थानिक कोणता नेता आवडतो, खैरे की दानवे?उत्तर : संजय राऊत

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 9:08 am

लाडकी बहीण योजना अपडेट:मतदानाच्या आदल्या दिवशी 3 हजार रुपये देणार का? काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून सरकारला विचारणा

राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत असतानाच 'लाडकी बहीण' योजनेच्या हप्त्यावरून मोठे राजकीय वादंग निर्माण झाले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १४ जानेवारी रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये जमा केले जाणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या दाव्याची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना आज (सोमवारी) सकाळी ११:०० वाजेपर्यंत वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे कडक आदेश दिले आहेत. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी शनिवारी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवून खळबळजनक दावा केला होता. राज्य सरकार आचारसंहितेचा भंग करून मतदानाच्या बरोबर आदल्या दिवशी महिलांना प्रलोभन देण्यासाठी दोन महिन्यांचे पैसे एकत्र देणार आहे, असा आरोप त्यांनी पत्रात केला. हा प्रकार लोकशाहीला मारक असून आयोगाने तातडीने हस्तक्षेप करून सरकारला रोखावे, अशी मागणी काँग्रेसने केली होती. आयोगाचा सरकारला 'अल्टिमेटम' काँग्रेसच्या या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने रविवारी रात्री उशिरा मुख्य सचिव राजेश कुमार यांना पत्र पाठवले. सरकार खरोखरच १४ जानेवारीला दोन महिन्यांचे एकत्रित पैसे लाभार्थींच्या खात्यात जमा करणार आहे का? याबाबतची नेमकी वस्तुस्थिती काय आहे? अशी विचारणा आयोगाने केली आहे. यावर आज सकाळी ११ वाजेपर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. योजनेला विरोध नाही, टायमिंगला आक्षेप काँग्रेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या भूमिकेवर अधिक स्पष्टीकरण दिले आहे. लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा अजिबात विरोध नाही. मात्र, १५ तारखेला मतदान असताना १४ तारखेलाच हे पैसे देणे, हा थेट आचारसंहितेचा भंग आहे. हे एक प्रकारचे प्रलोभन आहे. आमचा विरोध केवळ या वेळेला (टायमिंगला) आहे, योजनेला नाही, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण पुन्हा केंद्रस्थानी निवडणूक आयोगाच्या या पत्रामुळे राज्य सरकार आता काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर आयोगाला हे उत्तर समाधानकारक वाटले नाही, तर मतदानापूर्वी पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेवर स्थगिती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे ऐन मतदानाच्या तोंडावर 'लाडकी बहीण' योजनेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 9:06 am

हिंगोली शहरालगत 3 लाखांच्या गुटख्यांच्या पोत्यासह 7.90 लाखांचा मुद्देमाल जप्त:स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, एका व्यक्ती विरुध्द गुन्हा

हिंगोली शहरालगत औंढा रोडवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका वाहनातून ३ लाख रुपये किंमतीच्या गुटख्यासह ७.९० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर सोमवारी ता. १२ पहाटे हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात एकास ताब्यात घेण्यात आले असून अन्य एकाचा शोध सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरासह जिल्हाभरात अवैध व्यवसायाचे उच्चाटण करण्यासाठी पोलिस विभागाने मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये गुटखा, जुगार अड्डे, मटका अड्डे यांची माहिती घेऊन छापे टाकले जात आहेत. दरम्यान, औंढा नागनाथ मार्गावरून एका कार मध्ये गुटख्याचे पोते आणले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, जमादार शेख जावेद, महादू शिंदे, किशोर सावंत, सतिष जाधव यांच्या पथकाने रविवारी ता. ११ रात्री आकरा वाजल्या पासून औंढा नागनाथ मार्गावर वाहनांची तपासणी सुरु केली होती. दरम्यान,रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास एक कार आल्यानंतर पोलिसांनी कार चालकाला थांबवून चौकशी सुरु केली. मात्र पोलिसांना पाहताच कार चालकाला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे संशयावरून पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये खाकी रंगाच्या सहा पोत्यामध्ये केसरयुक्त विमल पान मसाला तसेच दुसऱ्या सहा पोत्यांमध्ये व्हि एक तंबाखूचे पुडे असा २.९० लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटख्याची पोती व कार असा ७.९० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी जमादार महादू शिंदे यांच्या तक्रारीवरून मोहम्मद नदीम (रा. देगलुर नाका नांदेड), शेख सिकंदर शेख मुजीब (रा. महादेववाडी हिंगोली) यांच्या विरुध्द सोमवारी ता. १२ गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मोहम्मद नदीम यास ताब्यात घेतले असून शेख सिकंदर याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक राहुल महिपाळे, जमादार अशोक धामणे, संजय मार्के, शेख मुजीब, संतोष करे, गणेश लेकुळे, शंकर ठोंबरे यांच्या पथकाने शोध मोहिम सुरु केली आहे. नांदेड मार्गे आणला जात होता गुटखा पोलिसांनी कार चालक मोहम्मद नदीम याची प्राथमिक चौकशी केली असता त्याने शेख सिकंदर याच्या संगण्या्वरून नांदेड येथून गुटखा आणल्याची माहिती दिली आहे. नांदेड, औंढा मार्गे हा गुटखा हिंगोलीत आणला जात होता. त्यामुळे पोलिसांचे पथक लवकरच नांदेडला रवाना होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 8:38 am

शिवराईत आनंदनगरी:१६ हजारांची उलाढाल

प्रतिनिधी | हतनूर कन्नड तालुक्यातील शिवराई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी ‘आनंदनगरी’ उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि व्यावसायिक कौशल्यांची रुजवणूक करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे आणि खेळांचे स्टॉल्स लावले. पाववडा, सँडविच, गुलाबजाम, समोसे, कांदेपोहे, पाणीपुरी, चटपटीत शेंगदाणे, घरगुती पौष्टिक पदार्थ अशा चविष्ट पदार्थांनी स्टॉल्स गजबजले होते. विद्यार्थ्यांनी वस्तूंची विक्री करताना नफा-तोटा, हिशेब आणि ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य आत्मसात केले. ‘चला या, ताजे साबुदाणा वडे घेऊन जा’, ‘केवळ पाच रुपयांत आरोग्यदायी नाष्टा’ अशा घोषणांनी परिसरात उत्साह निर्माण झाला. पालकांनी स्टॉल्सना भेट देऊन मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. ‘मुलांना शाळेतच व्यवहारज्ञान मिळत आहे हे पाहून समाधान वाटले,’ अशी प्रतिक्रिया एका पालकाने दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी १६ हजारांहून अधिक रुपयांची उलाढाल केली. सर्वाधिक नफा कमावणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रजासत्ताकदिनी शाळेतर्फे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ‘आम्ही सारे खवय्ये’ या सेल्फी पॉइंटवर पालकांनी फोटो काढत आनंद व्यक्त केला. विविध खेळांचे स्टॉल्सही पालकांचे मनोरंजन करून गेले. उपक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि गावातील मान्यवरांच्या हस्ते झाले. सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक देशपांडे, सहशिक्षक सोनवणे, नवघडे, नलावडे, डोंगरे, घोडमारे यांनी मार्गदर्शन केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:36 am

वाहेगाव येथील सेंट मेरी'च्या माजी विद्यार्थ्यांचा २० वर्षांनंतर स्नेहमेळावा:दहावी २००५ व बारावी २००७ च्या विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा‎

प्रतिनिधी | गंगापूर विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेतील शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मोठा वाटा असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. समाजाच्या विविध क्षेत्रांत नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे पार पाडणारे विद्यार्थी पाहणे हे शिक्षकांसाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. तालुक्यातील वाहेगाव येथील येथील सेंट मेरी प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी २००५ व बारावी २००७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. दोन दशकांनंतर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अनेकांच्या मते ‘ना भूतो ना भविष्यति’ असा ठरला. स्नेहमेळाव्याचे उद्घाटन माजी संचालक रे. फादर विल्फ्रेड सल्ढाणा यांच्या हस्ते झाले. या वेळी संचालक फादर मायकल अँथनी व प्राचार्य एस. बी. बनसोडे प्रमुख म्हणून उपस्थित होते. या विद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवा, उद्योग, सामाजिक, पत्रकारिता, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याचे गौरवोद्गार शिक्षकांनी काढले. या स्नेहमेळाव्यास शिक्षकवृंद म्हणून एस. यू. निकम, ए. एम. थोरात, व्ही. ई. विराळे, एस. के. जाधव, ए. के. भडके, एस. एम. मानकर, आर. जी. चौधरी, जेम्स पंडित, दीपक गणराज, व्ही. व्ही. साबणे, डी. जी. सुरशे, ए. के. दुशिंग, सुभाष कुटे, आर. के. गायकवाड, बजरंग गायकवाड, रवींद्र वालतुरे, सोनवणे, येडू गुडाळे, संजय पारखे, अविनाश त्रिभुवन, एस. एच. मते, वेरॉनिका पारखे, अनिता पोळ, वाघमारे व गोरे उपस्थित होते. आयोजनासाठी सोमनाथ मनाळ, शिवाजी बर्डे, प्रमोद सूर्यवंशी, नितेश साबणे, अमोल पवार, पंकज जाधव, रामेश्वर हिवाळे, अमोल काकडे, प्रफुल्ल गणराज, संतोष डावान, अमोल जगताप, गणेश जगताप, सतीश आदमाने, लक्ष्मण जाधव, देविदास तगरे, वर्षा पवार, सुरेखा हिवाळे, सीमा वालतुरे व विनोद भडके व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेतील शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मोठा वाटा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. समाजाच्या विविध क्षेत्रांत नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे पार पाडणारे विद्यार्थी पाहणे हे शिक्षकांसाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:35 am

बाभुळगाव येथील आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद:रासेयोअंतर्गत शिबिरास गावकऱ्यांचा सहभाग‎

प्रतिनिधी | लासुर स्टेशन गंगापूर तालुक्यातील बाभुळगाव नांगरे येथे राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस विभाग विशेष शिबिराअंतर्गत शनिवारी आरोग्य तपासणी शिबिरास गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी, वृध्द नागरिक, महिलांसह तीनशेहून अधिक नागरिकांची या मोफत शिबिराद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि छत्रपती शाहू महाविद्यालय लासूर स्टेशन येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर अंतर्गत गेल्या आठवड्यापासून बाभुळगाव नांगरे येथे एनएसएस विशेष शिबिर सुरू आहे. या शिबिरामध्ये सर्व नागरिकांचे आरोग्य तपासणी करून मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, सर्दी, ताप, डोकेदुखी, गुडघेदुखी, मनकेदुखी, त्वचाविकार इत्यादी आजारांची तपासणी करून औषधी देऊन योग्य तो पुढील उपचारासाठी सल्ला देण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल धाबे, डॉ. विशाल उईके, डॉ. प्राची पाटील, डॉ. नदीम, डॉ. दत्ता पाटील, डॉ. ऋतुजा पाटील, डॉ. संतोष जाधव यांच्यासह ॲडव्हान्स मेडिसिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील सर्व डॉक्टरांचे पथक सहकारी सहभागी झाले होते. प्राचार्य बाळासाहेब पवार व सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:34 am

टाकळी जिवरग येथील विद्यार्थ्यांना आनंदनगरीत मिळाले व्यवहार ज्ञान:श्री शिवछत्रपती विद्यालयात आनंदनगरी मेळावा, पालकांचा प्रतिसाद

प्रतिनिधी | टाकळी जिवरग सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय जिवनासोबतच व्यावहारिक ज्ञानदेखील मिळावे म्हणून नारायण जिवरग यांच्या नेतृत्वाखाली आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी ३६ स्टॉल उभारले होते. दिवसभरात विविध पदार्थाच्या विक्रीतून १७ हजार ५०० रुपयांची कमाई केली. निमखेडा गावाचे सरपंच नामदेव खेत्रे व संस्तेचे आध्यक्ष नारायण जिवरग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान मिळणेदेखील गरजेचे असते. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातून दोन पैसे मिळवताना कशा प्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून श्री शिव छत्रपती विद्यालयात आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील तब्बल १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला. मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरूनच साहित्य बनवून आणून शालेय आवारात स्टॉल लावले. विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होते. या मेळाव्याला एक प्रकारे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. या वेळी सरपंच ज्ञानेश्वर वाहटुळे उपसरपंच कौतिक जिवरग, माजी सरपंच परमेश्वर जिवरग, गावकरी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, या आनंदनगरीमुळे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळाले. बाजारपेठेचा अनुभव मिळाला.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:34 am