SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
... ...View News by News Source

एबी फॉर्मची झेरॉक्स जोडणाऱ्या भाजपच्या शिल्पा केळुसकर विजयी:एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का; 50 खोके एकदम ओक्केच्या दिल्या होत्या घोषणा

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या प्रभाग क्रमांक 173 चा अखेर निकाल समोर आला असून, या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. भाजपचा कथित डुप्लिकेट एबी फॉर्म वापरून निवडणूक लढवलेल्या शिल्पा केळुसकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार पूजा कांबळे यांचा पराभव केला आहे. शिल्पा केळुसकर यांनी 1,722 मतांनी विजय मिळवत या प्रभागावर आपलं नाव कोरलं असून, हा निकाल शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. प्रभाग क्रमांक 173 हा महायुतीतील जागावाटपामुळे आधीच संवेदनशील ठरला होता. महायुतीअंतर्गत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडण्यात आली होती. त्यामुळे भाजपकडून या प्रभागात अधिकृत उमेदवार देण्यात येणार नव्हता. शिंदेंच्या शिवसेनेने या जागेवर माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, या निर्णयानंतरही भाजपच्या शिल्पा केळुसकर यांनी अपक्ष पद्धतीने का होईना, पण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे ही लढत अधिकच लक्षवेधी ठरली. निवडणुकीपूर्वी घडलेला एबी फॉर्मचा वाद या लढतीला वेगळंच वळण देणारा ठरला. सुरुवातीला भाजपकडून शिल्पा केळुसकर यांना अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, नंतर ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला गेल्यानंतर भाजपने केळुसकरांकडून तो एबी फॉर्म परत मागवून घेतला. असे असतानाही शिल्पा केळुसकर यांनी त्या एबी फॉर्मची रंगीत झेरॉक्स प्रत काढून ती जोडत निवडणूक अर्ज दाखल केला. हा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा झाली होती. हा मुद्दा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आल्यानंतर पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून शिल्पा केळुसकर यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरू नये, अशी मागणी केली होती. एबी फॉर्मची झेरॉक्स जोडून अर्ज भरणे हे नियमबाह्य असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता. मात्र, या सर्व घडामोडींनंतरही निवडणूक आयोगाने शिल्पा केळुसकर यांचा अर्ज वैध ठरवला आणि त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी दिली. प्रचारादरम्यान केळुसकर आणि कांबळे यांच्यातील लढत अधिकच तीव्र झाली होती. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या. शिल्पा केळुसकर यांच्या समर्थकांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला उद्देशून ‘50 खोके एकदम ओक्के’ अशा घोषणा देत प्रचारात वातावरण तापवलं होतं. याला प्रत्युत्तर म्हणून शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केळुसकर यांना ‘एबी फॉर्म चोर’ अशी हाक मारत टीका केली होती. त्यामुळे हा प्रभाग निवडणूक काळात सतत चर्चेत राहिला. अखेर मतमोजणीअंती शिल्पा केळुसकर यांनी 1,722 मतांची निर्णायक आघाडी घेत पूजा कांबळे यांचा पराभव केला. महायुतीत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आली असतानाही भाजपच्या पार्श्वभूमीच्या उमेदवाराने विजय मिळवणं, हा शिंदेंच्या सेनेसाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. विशेषतः रामदास कांबळे हे शिंदेंचे माजी नगरसेवक असल्यानं या पराभवाकडे अधिक गंभीरपणे पाहिलं जात आहे. राजकीय आणि कायदेशीर पडसाद उमटण्याची शक्यता या निकालानंतर आता प्रभाग क्रमांक 173 मधील एबी फॉर्म प्रकरणाचे राजकीय आणि कायदेशीर पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर विरोधकांनी आधीच प्रश्न उपस्थित केले होते, तर शिल्पा केळुसकर यांच्या विजयामुळे हा वाद आणखी गडद होण्याची चिन्हं आहेत. मुंबई महापालिकेच्या राजकारणात हा निकाल केवळ एका प्रभागापुरता मर्यादित न राहता, महायुतीतील अंतर्गत तणाव आणि समन्वयाच्या अडचणीही समोर आणणारा ठरला आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 3:06 pm

हे विकास अन् महायुतीवरील विश्वासाचे मत:मुंबईसह राज्यात भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळेल, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमधील भाजपचा विजय हा विकास व महायुतीवरील विश्वासाचा असल्याचे मत व्यक्त केले आहे. हे विश्वासाचे मत आहे. विकासाचे मत आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व महायुतीवरील विश्वासाचे मत आहे. भाजप व शिवसेनेची महायुती दोन तृतीयांश बहुमताने व 51 टक्के व्होट शेअरने मुंबई महापालिकेच्या सत्तेत येईल, असे ते म्हणाले. मुंबई महापालिकेत भाजप - शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तब्बल 25 वर्षांनंतर मुंबईवरील ठाकरे गटाची सत्ता संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे कल असेच कायम राहून महायुतीचा विजय होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, हे विश्वासाचे मत आहे, विकासाचे मत आहे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व महायुतीवरील विश्वासाचे मत आहे. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकार हेच महाराष्ट्राचा विकास करू शकतात हा त्याचा कल आहे. हा कल असाच सुरू राहील. भाजप व शिवसेनेची महायुती दोन तृतीयांश बहुमताने व 51 टक्के व्होट शेअरने मुंबई महापालिकेच्या सत्तेत येईल. नागपूर महापालिकेतही जनतेने देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या विकासाच्या भूमिकेवर मत दिले. विकसित नागपूरला मत दिले आहे. संपूर्ण महाराष्ट्राने विकासाला मत दिले. हा प्राथमिक अंदाज आहे. सायंकाळी 5 नंतर संपूर्ण निकाल स्पष्ट होईल. तेव्हा अधिक बोलता येईल, असे ते म्हणाले. भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळेल महाराष्ट्रात एकूण नगरसेवकांपैकी 51 टक्के नगरसेवक हे भाजप व महायुतीचे असतील. व भाजपला दोन तृतीयांशहून अधिक बहुमत मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबईच्या विकासाचे व्हिजन तयार केले. एकनाथ शिंदे व त्यांनी विकसित मुंबई करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून मुंबईला पाठबळ दिले. त्यामुळे तेच मुंबईचा विकास करू शकतात अशी लोकांची भावना आहे, असे बावनकुळे म्हणाले. भाजपची गाडी 100 च्या स्पीडने निघाली ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीची रचना केली. माझ्यावरही या निवडणुकीचा प्रभार होता. आम्ही तिघांनीही समन्वय साधून काम केले. महाराष्ट्राचे सरकार व केंद्रातील मोदी सरकार यांच्या विकासाच्या योजना. तथा संघटनेची भूमिका. ही दोन चाके जोडीने चालली. परिणामी, आमची गाडी 100 च्या स्पीडने निघाली. आम्हाला लातूरमध्ये काहीसे नुकसान सोसावे लागले. तिथे आम्ही 22 जागांवर थांबलो. तिथे काँग्रेस 40 च्या वर गेली. आम्ही यावर चिंतन करू. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी ईव्हीएमला दोष देणाऱ्या ठाकरे बंधूंचाही समाचार घेतला. ज्या ठिकाणी राज व उद्धव ठाकरे यांचे उमेदवार निवडून आले तिथे ईव्हीएम चांगल्या होत्या. स्पेशल होती. आम्ही जिथून निवडून आलो तिथे बोगस होती. हे लोकांना पटत नाही. लोकांना विकास पटतो. महाराष्ट्रात पुढे केवळ विकासाचे राजकारण होईल, असे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 3:01 pm

महापालिका निवडणूक २०२६:महापालिका निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी अखेर निवडणूक आयोगाकडून जारी

महाराष्ट्रात १५ जानेवारी रोजी झालेल्या २९ महापालिकांच्या मतदानाची आकडेवारी अखेर आज निकालाच्या दिवशी १६ जानेवारी रोजी राज्या निवडणूक आयोगाने जाहीर केली. त्यानुसार इचलकरंजी महानगरपालिकेत सर्वात जास्त ६९.७६% मतदान झाल्याचे समोर आले आहे. सर्वात कमी मतदान मीरा-भाईंदर महानगरपालिका ४८.६४% टक्के झाले आहे. बृहन्मुंबई महापालिकेत ५२.९४ टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. ठाणे महापालिकेसाठी ५५.५९, कल्याण - डोंबिवली महापालिकेसाठी ५०.३२ टक्के, नवी मुंबई महापालिकेसाठी ५७.१५ टक्के, पुणे महापालिकेसाठी ५२.४२ टक्के, छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी ५९.८२ टक्के, नाशिक महापालिकेसाठी ५६.६७ टक्के आणि जळगाव महापालिकेसाठी ५३.६० टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. राज्यातील सर्व महापालिकेसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे…

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 2:56 pm

लातूरच्या पहिल्या महापौर स्मिता खानापुरे पराभूत

लातूर : लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आज माजी महापौरांच्या प्रतिष्ठेचा फैसला झाला आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून झालेल्या पाच महापौरांपैकी चार जण यावेळेस रिंगणात होते. मात्र, मतदारांनी अनुभवापेक्षा रणनीती आणि नवीन समीकरणांना पसंती दिल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या पहिल्या महापौर प्रा. स्मिता खानापुरे यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला असून भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांनी त्यांना धूळ चारली आहे. […] The post लातूरच्या पहिल्या महापौर स्मिता खानापुरे पराभूत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 2:21 pm

मंत्री संजय शिरसाट यांची दोन्ही मुले विजयी:सिद्धांत अन् हर्षदा शिरसाट संभाजीनगर महापालिकेवर; गुलमंडीतून ठाकरे गटाचे सचिन खैरे विजयी

मराठवाड्यातील सर्वात मोठी महापालिका असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल वेगाने हाती येत आहेत. त्यात सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या सिद्धांत व हर्षदा शिरसाट या दोन्ही मुलांचा विजय झाला आहे. संभाजीनगरात सध्या भाजप सर्वाधिक जागा जिंकून आघाडीवर असून, शिंदे गट दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी भाजपचे 97, शिदे गटाचे 92, ठाकरे गटाचे 97, काँग्रेसचे 77, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे 77 व एमआयएमचे 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट हा प्रभाग क्रमांक 29 अ मधून निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांची लडथ भाजपचे भगवान गायकवाड व ठाकरे गटाच्या किशोर साबळे यांच्याशी होता. सिद्धांत, हर्षदा शिरसाट यांचा विजय दुसरीकडे, हर्षदा शिरसाट या प्रभाग क्रमांक 18 अ मधून महापालिकेच्या रणांगणात होत्या. त्यांचा सामना भाजपच्या मयुरी बर्थने यांच्याशी होता. विशेष म्हणजे सिद्धांत शिरसाट हे यापूर्वी महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. पण हर्षदा यांची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे संजय शिरसाट यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक बनली होती. त्यात या दोघांनीही आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांना धोबीपछाड देत विजय मिळवला. यामुळे शिरसाट यांना मोठा दिलासा मिळाला. गुलमंडीत सचिन खैरे यांचा विजय दुसरीकडे, संभाजीनगरची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गुलमंडी प्रभागात (15 अ) ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांचा विजय झाला आहे. मागच्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. पण यावेळी त्यांचा विजय झाला. हा प्रभाग ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे येथील ठाकरे गटाचा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आज झालेल्या मतमोजणीत सुरुवातीला एमआयएमच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे ठाकरे गटाची काहीशी धाकधूक वाढली होती. पण अखेर सचिन खैरे यांनी विरोधकांना पराभवाची धूळ चारत बाजी मारली. रशीद मामूंचे काय होणार? उल्लेखनीय बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगर महापालिकेत गरम पाणी वॉर्डातून नगरसेवक व आरक्षणामुळे महापौरपदावर वर्णी लागलेले माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू यांची राज्यभर चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाने त्यांना प्रभाग क्रमांक 4 ब मधून उमेदवारी दिली आहे. त्यांची लढत MIM च्या खान अमीर अनवर यांच्याशी आहे. रशीद मामूंच्या उमेदवारीला चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला होता. प्रचारासाठी जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. पण आज सुरू असलेल्या मतमोजणीत रशीद मामू आघाडीवर आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 2:09 pm

लातूरमध्ये काँग्रेस-वंचितची मुसंडी, भाजपला प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य भोवले

लातूर : मराठवाड्यातील पाच महानगरपालिका निवडणुकीपैकी परभणी आणि लातूरमध्ये भाजपसाठी अजून साजेसे चित्र दिसत नाही. छत्रपती संभाजीनगरनंतर नवनिर्मित जालना महानगरपालिकेत भाजपच्या विजयाचे वारू उधळले गेले आहे. तर नांदेडमध्ये सुद्धा भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. लातूरमध्ये मोठा करिष्मा करण्याची आणि काँग्रेसचा सफाया करण्याच्या वल्गणा भाजपने केल्या होत्या. तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस औषधालाही नसेल आशा आशयाचे वक्तव्य […] The post लातूरमध्ये काँग्रेस-वंचितची मुसंडी, भाजपला प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य भोवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 1:58 pm

‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चे मराठी प्रेम

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकासाठी आज मतदान पार पडले आहे. मुंबईत अनेक सेलिब्रिटी मंडळीही आपला मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळाली. अशातच अभिनेता आमिर खानही त्याचे मत देऊन बाहेर आला. तेव्हा त्याच्यासोबत एक घटना घडली, जी सध्या तुफान व्हायरल होत आहे. आमिर खाननेही आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, मतदान केंद्राबाहेर माध्यमांशी संवाद साधताना आमिरने जे विधान […] The post ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चे मराठी प्रेम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 1:42 pm

माबूद बागवान यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड:चार स्विकृत सदस्यांचीही निवड, हिंगोली पालिकेची पाहिली सर्वसाधारण सभा संपन्न

हिंगोली नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे माबूद बागवान यांची शुक्रवारी ता. १६ बिनविरोध निवड झाली आहे. या शिवाय शिवसेनेच्या दोन, भाजपाच्या एक तर राष्ट्रवादीच्या एका स्विकृत सदस्याचीही निवड झाली आहे. या निवडीनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. हिंगोली येथील पालिकेच्या सभागृहात शिवसेनेच्या नगराध्यक्षा रेखा श्रीराम बांगर यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची पहिली सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे १६, राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे दोन, भाजपाचे पाच नगरसेवकांची उपस्थिती होती. या शिवाय पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांचीही यावेळी उपस्थिती होती. हिंगोली पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे माबूद बागवान यांचा उपनगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची निवड जाहिर करण्यात आली आहे. या शिवाय शिवसेनेचे स्विकृत सदस्य पदी गुड्डू बांगर, नितीन बांगर, राष्ट्रवादीचे शेख शकील, भाजपाचे कैलास शहाणे यांची निवड झाल्याचे जाहिर करण्यात आले आहे. दरम्यान, उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल तसेच स्विकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माबूद बागवान, गुड्डू बांगर, नितीन बांगर यांचा सत्कार केला. तर राष्ट्रवादीने शेख शकील तर भाजपाच्या पदाधिकारी व कार्यर्त्यांनी कैलास शहाणे यांचा सत्कार केला. दरम्यान, शिवसेनेचे आमदार संतोष बांगर, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, ॲड. अविनाश बांगर, गणेश बांगर, संदीप मुदीराज, संतोष गोरे, यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. चौकटीचा मजकूर माबूद बागवान यांच्या प्रभागात शिवसेनेला जास्त मताधिक्य पालिका निवडणुकीत माबूद बागवान यांच्या प्रभागातून शिवसेनेला नगराध्यक्षपदासाठी सर्वात जास्त २७०० मतांंची आघाडी मिळाली होती. त्यामुळे उपनगराध्यक्षपदी माबूद बागवान यांचीच निवड होईल अशी अपेक्षा होती. त्यानंतरही आमदार संतोष बांगर कोणाच्या पारड्यात वजन टाकणार यावर सर्वबाबी अवलंबून होत्या. त्यानंतर आमदार बांगर यांनी माबूद बागवान यांच्या निवडीला हिरवा कंदील दाखविला.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 1:38 pm

भाजपने मानले उत्तर भारतीयांचे आभार:प्रवीण दरेकर म्हणाले - BJP मुंबई तोडणार नाही जोडणार; मराठी-हिंदी भाषकांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांना निकालाने उत्तर दिले

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या निकालानंतर हिंदीभाषक आणि उत्तर भारतीयांचे आभार मानले. भाजप मुंबई तोडणार नाही, तर ती जोडणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर दहिसरमधील वॉर्ड क्रमांक तीनमधून विजयी झाले. या विजयानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिव्य मराठीशी बोलताना दिली. मराठी भाषक आणि उत्तर भारतीयांमध्ये तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न झाला. मात्र, मुंबईकर आणि मराठी माणसांनी त्यांना उत्तर दिले. इथे सारे गुण्यागोविंदाने नांदत आहेत, हे दाखवून दिले, असा टोलाही त्यांनी ठाकरे बंधूंना नाव न घेता हाणला. प्रचंड आनंद देणारा विजय भाजप नेते प्रवीण दरेकर दिव्य मराठीशी बोलताना म्हणाले की, आज आम्हाला खूप आनंद आहे आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेले परिश्रम आणि देवाभाऊ आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा असणारा विश्वास हा या ठिकाणी दिसला. त्यामुळे हा विजय आम्हाला प्रचंड आनंद देणारा असा आहे.' तेढ निर्मितीचा प्रयत्न फसला भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, 'हिंदीभाषी, उत्तर भारतीयांचा मनापासून आभारी आहे. खरे म्हणजे मराठी भाषक आणि उत्तर भारतीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता. परंतु मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी दाखवून दिलं उत्तर भारतीय सुद्धा आमच्यासोबत इथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. उत्तर भारतीयांनी दाखवलं या मातीनं आम्हाला मोठें केले आहे. या मातीचा सन्मान केला पाहिजे.म्हणून ते ही आमच्याबरोबर आहेत. उपकाराचे प्रचंड बरडन भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, 'भाजप मुंबई तोडणार नाही. आम्ही मुंबई जोडणार आहोत. मुंबई आता आम्ही जोडलेली आहे. याही पुढे जाऊन आमचे मुंबई मिशन आमचे सगळे नगरसेवक रांगेत जिंकून येत आहेत. आमचे हर्षद कारकर आहेत. उमेदवार संजय घाडी आणि त्यांच्या पत्नी संजना घाडी आहेत. हे ताकदीने त्या ठिकाणी उभे राहिले. महायुतीचा परिवार म्हणून आम्ही हा वेगळा आनंद सध्या उपभोगतो आहेत आणि मुंबईकरांचे उपकार कसे फेडायचे याचे बरडन आमच्या मनावर आहे.'

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 1:34 pm

सत्यजीत तांबेंचा युवा नेत्यांवर अप्रत्यक्ष प्रहार:पराभवाचं आत्मपरीक्षण न करता संशयाचं राजकारण? म्हणाले- निकाल स्वीकारण्याची परिपक्वता हवी

राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल एकामागोमाग जाहीर होत असताना राजकीय वातावरण अधिक तापताना दिसत आहे. काही विरोधी पक्षांतील युवा नेत्यांनी आपल्या पराभवाचे खापर थेट निवडणूक प्रक्रियेवर फोडण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या मतामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. तांबेंनी थेट कोणाचं नाव घेतलेलं नसले तरी, त्यांच्या वक्तव्याचा रोख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडे असल्याची चर्चा रंगू लागली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश मिळत असल्याचं चित्र समोर येत आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांना अनेक ठिकाणी धक्कादायक निकालांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत काही युवा नेत्यांकडून निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्न उपस्थित केले जात असल्याचं दिसून येत आहे. ईव्हीएम, मतदानाची टक्केवारी, मतमोजणीची प्रक्रिया यांसारख्या मुद्द्यांवर संशय व्यक्त करत पराभवाचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका होत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेलं वक्तव्य विशेष लक्ष वेधून घेत आहे. आपल्या ट्विटमध्ये आमदार सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, महापालिका निवडणुकीचा निकाल समोर येत असतानाच अनेक पक्षांमधील ‘युवा नेते’ आपल्या अपयशाचे खापर थेट निवडणूक प्रक्रियेवर फोडत आहेत. या एका वाक्यातूनच त्यांनी विरोधकांच्या भूमिकेवर कठोर टीका केली आहे. निवडणुकीत अपयश आल्यानंतर आत्मपरीक्षण करण्याऐवजी प्रक्रियेवरच बोट दाखवणं ही गंभीर बाब असल्याचं त्यांच्या म्हणण्यातून स्पष्ट होतं. तांबे पुढे म्हणतात की, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे केवळ निवडणूक यंत्रणाच नाही, तर आपल्या पक्षातीलच अनेक मेहनती कार्यकर्ते आणि उमेदवार यांचाही अपमान होतो. हे नेते आपल्या पक्षातीलच त्या उमेदवारांचा अपमान करत आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे मेहनत करून जनतेचा विश्वास संपादन केला आणि निवडणुकीत विजय मिळवला, असा ठाम आरोप त्यांनी केला आहे. या विधानातून पक्षांतर्गत अस्वस्थताही समोर येत असून, वरिष्ठ आणि तळागाळातील कार्यकर्त्यांच्या संघर्षाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. लोकशाहीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणं किती घातक आहे, याकडेही आमदार तांबे यांनी लक्ष वेधलं आहे. केवळ आपल्या मनासारखा निकाल लागत नाही म्हणून लोकशाहीच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला आहे. निवडणूक ही लोकशाहीची सर्वात महत्त्वाची प्रक्रिया असून, ती पारदर्शक आणि विश्वासार्ह आहे, यावर विश्वास ठेवणं प्रत्येक राजकीय नेत्याचं कर्तव्य असल्याचं त्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित होतं. निकाल स्वीकारण्याची राजकीय परिपक्वता तांबे यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडताना सांगितलं की, अशा आरोपांमुळे केवळ विजयी उमेदवारांचा नाही, तर मतदान करणाऱ्या सामान्य नागरिकांचाही अपमान होतो. जनतेने मतदानाचा हक्क बजावून दिलेला कौल नाकारला जाणं म्हणजे लोकशाही मूल्यांनाच तडा देण्यासारखं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. निकाल स्वीकारण्याची राजकीय परिपक्वता नसेल, तर लोकशाही व्यवस्था कमकुवत होण्याचा धोका निर्माण होतो, असा इशाराही त्यांनी अप्रत्यक्षपणे दिला आहे. नव्या पिढीच्या नेतृत्वाला आत्मपरीक्षणाचा सल्ला राजकीय मतभेद, टीका-प्रत्युत्तर ही लोकशाहीचीच अंगं असली, तरी निवडणूक प्रक्रियेवर अविश्वास दाखवणं योग्य नाही, असा स्पष्ट संदेश आमदार सत्यजीत तांबेंच्या या ट्विटमधून दिला जात असल्याचं मानलं जात आहे. थेट नाव न घेता ‘युवा नेते’ असा उल्लेख करत त्यांनी राज्यातील नव्या पिढीच्या नेतृत्वाला आत्मपरीक्षणाचा सल्ला दिल्याचं बोललं जात आहे. महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच आलेल्या या प्रतिक्रियेमुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात शब्दयुद्ध आणखी तीव्र होण्याची चिन्हं दिसत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 1:31 pm

मुंबईत सदा सरवणकरांच्या मुलाचा पराभव:प्रभादेवीमधील वॉर्ड क्रमांक 194 मध्ये मोठा उलटफेर; ठाकरेंच्या शिलेदाराने केला हिशेब चुकता

मुंबई महापालिकेतील प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. याठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे उमेदवार समाधान सरवणकर यांचा पराभव झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार निशिकांत शिंदे यांनी अतितटीच्या लढतीत त्यांचा पराभव झाला आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या महेश सावंत यांनी सदा सरवणकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर आता महापालिका निवडणुकीतही ठाकरे गटाने त्यांच्या मुलाचा पराभव केला आहे. यामुळे सदा सरवणकर यांना दुहेरी झटका सहन करावा लागला आहे. दादर - प्रभादेवीतील वॉर्ड 194 मध्ये ठाकरे व शिंदे गटात अत्यंत हायव्होल्टेज लढत होती. शिवसेनेतील फुटीनंतर हा वॉर्ड शिंदे गट व ठाकरे गटातील संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला होता. आजी आमदार महेश सावंत यांनी पुन्हा एकदा कधी काळचे आपले गुरू माजी आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात शड्डू ठोकला. ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांचा पराभव केला होता. त्यामुळे सरवणकरांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. महापालिका निवडणुकीत राज व उद्धव ठाकरे यांनी युती केली होती. या दोघांच्या युतीत हा वॉर्ड ठाकरे गटाच्या वाट्याला सुटला होता. निशिकांत शिंदेंनी दिली समाधान सरवणकरांना मात प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 वर मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी व ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांनी दावा केला होता. पण हा प्रभाग उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला गेल्यामुळे संतोष धुरी नाराज झाले होते. त्यांनी राज ठाकरे यांनी उद्धव यांच्यापुढे सपशेल लोटांगण घातल्याचा आरोप करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. याठिकाणी शिंदे गटाचे समाधान सरवणकर विरुद्ध निशिकांत शिंदे अशी अत्यंत चुरशीची लढत झाली होती. त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत निशिकांत शिंदे यांनी समाधान सरवणकर यांचा 592 मतांनी पराभव केला. सरवणकर व महेश सावंत यांच्यात राजकीय हाडवैर उल्लेखनीय बाब म्हणजे प्रभादेवी हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. सदा सरवणकर व महेश सावंत यांच्यात मागील काही वर्षांपासून संघर्ष वाढला आहे. 2017 मध्ये महेश सावंत यांना डावलून सदा सरवणकर यांनी मुलगा समाधान सरवणकर याच्यासाठी उमेदवारी घेतली. त्यानंतर सावंत यांनी बंडखोरी केली. मात्र, त्यांना अवघ्या 252 मतांनी पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर महेश सावंत यांनी शिवसेनेत घरवापसी केली. शिवसेना फुटल्यानंतर सदा सरवणकर हे शिंदे यांच्यासोबत गेले. त्यानंतर प्रभादेवीत दोन्ही गटात राडा झाला. एका प्रसंगात सरवणकर यांनी पिस्तुलीतून गोळी झाडल्याचाही आरोप झाला.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 1:28 pm

अजित पवारांवर नाराजी, शरद पवारांची साथ सोडली:काँग्रेसमध्ये दाखल झालेले प्रशांत जगताप विजयी; पक्षांतरानंतरही कौल

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या वानवडी-साळुंके विहार परिसरातील प्रभाग क्रमांक 18 ड चा निकाल अखेर समोर आला असून, या निकालाने शहरातील राजकीय समीकरणांना नवी दिशा दिली आहे. या प्रभागातून काँग्रेसचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी भाजपचे अभिजीत शिवरकर यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. निवडणूक प्रचाराच्या काळापासूनच ही लढत प्रतिष्ठेची आणि अत्यंत चुरशीची मानली जात होती. मतमोजणीदरम्यानही या लढतीत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या प्रशांत जगताप यांनी निर्णायक टप्प्यावर बाजी मारत विजय आपल्या नावावर केला आणि वानवडी-साळुंके विहार प्रभागात काँग्रेसचा झेंडा फडकवला. मतमोजणीच्या पहिल्या फेऱ्यांमध्ये भाजपचे अभिजीत शिवरकर आघाडीवर होते. त्यामुळे या प्रभागात भाजपच बाजी मारणार, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, पुढील फेऱ्यांमध्ये चित्र बदलू लागलं. प्रशांत जगताप यांनी हळूहळू शिवरकर यांची आघाडी कमी करत अखेर लीड मोडून काढली. एकदा आघाडी मिळवल्यानंतर त्यांनी ती शेवटपर्यंत कायम ठेवत विजय साकारला. अंतिम निकालात प्रशांत जगताप यांनी 1534 मतांनी विजय मिळवला. हा फरक कमी असला तरी लढतीची तीव्रता आणि मतदारांचा कौल लक्षात घेता हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. प्रशांत जगताप यांचा हा विजय केवळ एका प्रभागापुरता मर्यादित नसून, त्यामागे मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. जगताप हे अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले होते. पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या आणि स्थानिक पातळीवर त्यांचा मजबूत जनसंपर्क होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही त्यांनी शरद पवारांची साथ सोडली नव्हती. मात्र, जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जगताप यांनी या निर्णयाशी असहमती दर्शवत आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पक्षाला रामराम केला. हा निर्णय त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या धाडसी आणि जोखमीचा मानला जात होता. राष्ट्रवादी सोडल्यानंतर प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशामुळे त्यांच्यावरील अपेक्षा वाढल्या होत्या. त्यामुळे वानवडी-साळुंके विहार प्रभागातील ही निवडणूक जगताप यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी आक्रमक प्रचार करत स्थानिक मुद्द्यांवर भर दिला. पक्षांतरानंतरही मतदार आपल्यावर विश्वास ठेवतील का, हा प्रश्न त्यांच्या समोर होता. मात्र, निकालाने हे स्पष्ट केलं की, जगताप यांचा वैयक्तिक संपर्क आणि स्थानिक पातळीवरील काम मतदारांनी स्वीकारलं आहे. माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र या लढतीत प्रशांत जगताप यांच्यासमोर भाजपचे उमेदवार अभिजीत शिवरकर होते. अभिजीत शिवरकर हे माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे पुत्र आहेत. त्यामुळे या निवडणुकीला राजकीय वारसाहक्काचीही किनार होती. भाजपने या प्रभागात पूर्ण ताकद लावली होती. मात्र, अटीतटीच्या या लढतीत अखेर प्रशांत जगताप यांनी बाजी मारली. विजयाची घोषणा होताच त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. पुण्याच्या राजकारणात त्यांची भूमिका अधिक निर्णायक या निकालामुळे पुणे महापालिकेच्या राजकारणात काँग्रेससाठी महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. प्रशांत जगताप यांच्या विजयामुळे काँग्रेसने पुण्यात आपलं खातं उघडलं आहे. वानवडी-साळुंके विहार प्रभाग क्रमांक 18 ड चा हा निकाल पुण्यातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम करणारा ठरणार आहे. पक्षांतर, प्रतिष्ठेची लढत आणि स्थानिक मुद्द्यांचा प्रभाव या सगळ्यांचा संगम या निवडणुकीत पाहायला मिळाला. प्रशांत जगताप यांनी सुरुवातीची पिछाडी भरून काढत मिळवलेला विजय हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, आगामी काळात पुण्याच्या राजकारणात त्यांची भूमिका अधिक निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 1:17 pm

प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाठिंबा दिल्याने महिलेसह चौघांना मारहाण:बाणेरमध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, निवडणुकीच्या वादातून प्रकार

पुणे जिल्ह्यातील बाणेर परिसरात प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाठिंबा दिल्याच्या रागातून एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली आहे. टोळक्याने महिलेसह चौघांना बेदम मारहाण केल्याची ही घटना घडली असून, या प्रकरणी बाणेर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कल्याणी रामदास धनकुडे (वय ३८, रा. धनशीला बंगला, बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, प्रणित प्रमोद निम्हण, प्रणय प्रमोद निम्हण, प्रसन्न रामभाऊ निम्हण, संदीप नामदेव निम्हण आणि परवेज शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणी धनकुडे यांच्या नणंद सरला बाबुराव चांदेरे यांचे पती बाणेरमधून निवडणूक लढवत आहेत. धनकुडे कुटुंबीयांनी चांदेरे यांना पाठिंबा दिल्याने निम्हण कुटुंबीय संतप्त झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कल्याणी धनकुडे त्यांच्या बंगल्याच्या परिसरात थांबल्या होत्या. मतदान प्रक्रिया सुरू असताना आरोपी निम्हण हे धनकुडे यांच्या बंगल्यात शिरले. त्यांनी धनकुडे यांच्या मोटारीवरील चालक सचिन उत्तम फासगे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, ज्यात फासगे जखमी झाले. यानंतर आरोपींनी कल्याणी यांना शिवीगाळ करत काठीने मारहाण केली. कल्याणी यांना वाचवण्यासाठी आलेल्या नवनाथ देशमुख यांनाही आरोपींनी काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कल्याणी यांच्या नातेवाईक सायली निलेश शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. आरोपी प्रणित निम्हण याने 'निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला बघून घेतो,' अशी धमकी दिल्याचे कल्याणी धनकुडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. कल्याणी यांनी फिर्याद दिल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा गर्दी करून मारामारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक आयुक्त विठ्ठल दबडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सरग या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 12:50 pm

जालन्यात रावसाहेब दानवेंचे बंधू, भावजय विजयी:लातुरात काँग्रेसचा भाजपला धक्का; मंत्री संजय शिरसाट यांची कन्या आघाडीवर

राज्यातील महापालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीची विजयी घोडदौड सुरू आहे. जालना महापालिका निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू व भावजयीचा विजय झाला आहे. तर छत्रपती संभाजीनगर येथेही सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांनीही आघाडी घेतली आहे. लातूर महापालिकेत काँग्रेसने भाजपवर आघाडी घेतली आहे. जालना जिल्ह्याच्या महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत 16 प्रभागांतील 65 जागांसाठी तब्बल 454 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले. त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे विजयी झाले आहेत. भास्कर दानवे यांच्या पत्नी सुशीला दानवे यांचाही या निवडणुकीत विजय झाला आहे. या विजयामुळे दानवे कुटुंबाचे महापालिकेतील वर्चस्व अधोरेखित झाले आहे. युती तुटल्याने बदलली राजकीय समीकरणे निवडणुकीपूर्वी भाजप व शिंदे गटात जालन्यात युती करण्याची चर्चा सुरू होती. पण या बैठका निष्फळ ठरल्या. अखेर या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व मनसे यांची या निवडणुकीत युती झाली. त्यातच महाविकास आघाडीतील घटक पक्षही स्वतंत्रपणे मैदानात उतरल्याने प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत झाली. त्यात आता दानवे पती-पत्नीचा विजय झाला आहे. मराठवाड्यात कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी दुसरीकडे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातूर महापालिकेसाठी मतमोजणी कडेकोट बंदोबस्तात सुरू झाली आहे. संभाजीनगरात 4 मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. ताज्या आकडेवारीनुसार, 115 सदस्यीय संभाजीनगर महापालिकेत आतापर्यंत 33 जागांचे निकाल जाहीर झालेत. त्यात भाजपने सर्वाधिक 12 जागांवर विजय मिळवला आहे. अनेक ठिकाणी भाजपने विजयी आघाडी घेतली आहे. शिंदे गटाने आतापर्यंत 6 जागा जिंकल्या असून, ठाकरे गटाने 5 जागांवर यश मिळवले आहे. एमआयएमनेही 5 जागांवर आपले खाते उघडले आहे. काँग्रेसला अवघ्या 3 जागांवर आघाडी मानावी लागली आहे. लातूर महापालिकेत काँग्रेसने 16 जागांवर, भाजपने 12 जागांवर आघाडीवर आहे . नांदेडमध्ये भाजपने 24 जागांवर आघाडीवर असून शिवसेना 12 आणि काँग्रेसने 12 जागांवर आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. परभणीत शिवसेनेने आघाडी घेतली आहे. येथे शिवसेना 8, भाजप 2, तर काँग्रेसने एका जागेवर आघाडी घेतली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 12:40 pm

राहुल गांधींचाही बोटावरील शाई पुसण्यावर संताप:म्हणाले - EC कडून जनतेची होणारी दिशाभूल हेच लोकशाहीवरील विश्वास संपण्याचे कारण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत बोटावरील शाई पुसण्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. व्होट चोरी एक देशविरोधी कृत्य आहे. विशेषतः निवडणूक आयोगाकडून जनतेची होणारी दिशाभूल हेच लोकशाहीवरील विश्वास संपण्याचे प्रमुख कारण आहे, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान झाले. त्यात निवडणूक प्रक्रियेत बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईवरून मोठा गदारोळ माजला. मतदानानंतर काही वेळातच बोटावरील शाई पुसली जात असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर चक्क स्वतःचा फॅक्ट चेक व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर काही वेळातच काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मनसेने या मुद्यावरून रान पेटवले. राज ठाकरे यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवत बोटावरील शाई सॅनिटायझरने निघत असल्याचा आरोप केला. त्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. निवडणुकीत बोटावरील शाई पुसली जात नाही, तर लोकशाही पुसली जात असल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आज निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये एका वृत्तपत्राचे वृत्त पोस्ट करत त्यात बोटावरील शाई कशा प्रकारे पुसली जात आहे हे दिसून येत आहे. व्होट चोरी हे देशविरोधी कृत्य -राहुल गांधी राहुल गांधी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, निवडणूक आयोगाकडून जनतेची होणारी दिशाभूल हेच लोकशाहीवरील विश्वास संपुष्टात येण्याचे प्रमुख कारण आहे. व्होट चोरी हे राष्ट्रविरोधी कृत्य आहे. राहुल गांधींच्या या पोस्टवर अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी राहुल गांधी यांच्या विधानाचे समर्थन केले आहे. तर काहींनी त्यावर विरोध प्रकट केला आहे. विशेषतः अनेकांनी निवडणुकीत बोटाला लावली जाणारी शाई पुसली जाणे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून चिंताजनक असल्याचे मत व्यक्त केले आहे. आत्ता पाहू काय म्हणाले होते राज ठाकरे? राज ठाकरे गुरुवारी मतदानानंतर बोलताना म्हणाले होते, आतापर्यंत मतदानावेळी शाई वापरली जात होती. आज एक नवे पेन (मार्कर) आणले आहे. त्याविरोधात सर्वच बाजूंनी तक्रारी येत आहेत. तुम्ही मतदान करून सॅनेटायझरने शाई पुसली तर ती सहजपणे पुसली जात आहे. सुरुवातीला निवडणूक आयोगाने उमेदवारांना प्रचारासाठी एक दिवस वाढवून दिला. असा कोणताही नियम नाही. पण त्यांनी तो या निवडणुकीत आणला. पैसे वाटण्यासाठी हा नियम आणला. संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी काम करत आहे. आम्ही आमच्या परीने जे काही करायचे आहे ते करतोय. पण हे काही चांगल्या लोकशाहीची लक्षणे नाहीत. निवडणूक आयोगाने फेटाळले होते आरोप राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मनसे व ठाकरे गटाचे आरोप फेटाळून लावले होते. ते म्हणाले होते, राज्य निवडणूक आयोग मार्कर पेन 2011 पासून वापरत आहे. ही शाई बोटावर लावल्यानंतर त्याला सुकण्यासाठी 10 ते 12 सेकंद लागतात. मतदार एवढा वेळ संबंधित मतदान केंद्रावरच असतो. एकदा ही शाई वाळल्यानंतर ती कोणत्याही प्रकारे काढता येत नाही. ही शाई वेगळी नाही. भारतीय निवडणूक आयोग जी शाई वापरतो, तीच ही शाई आहे. एखादा मतदार मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान केंद्रावर आला, तर तेथील निवडणूक अधिकारी निश्चितच त्याच्यावर कारवाई करतात. शाई पुसली जात असल्याविषयी केवळ संभ्रम निर्माण केला जात आहे. ही शाई 2011 पासून वापरली जात असल्यामुळे याच निवडणुकीत अशा प्रकारचा संभ्रम पसरवणे चुकीचे आहे. याशिवाय लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीतही अशा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. पण शाई वाळल्यानंतर ती पुसली जात नाही, असे ते म्हणाले होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 12:12 pm

अकोल्यात ईव्हीएमची पेटी बदलली:EVM ची पेटी व पेटीतील मशीन वेगवेगळी, ठाकरे गटाचा आरोप; मतमोजणी थांबवण्याची मागणी

राज्यात आज अकोल्यासह 29 महापालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्यात एका प्रभागातील पेटी व त्यातील मतदान यंत्र बदलण्यात आल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराने केला आहे. या प्रकारामुळे मतमोजणी स्थळी काही काळ मोठा गोंधळ झाला. अकोला महापालिकेसाठी गुरुवारी निवडणूक झाली. त्यानंतर आज मतमोजणी सुरू झाली आहे. त्यात एका मतदान केंद्रावरील ईव्हीएमची पेटी व पेटीतील ईव्हीएम बदलण्यात आल्याचा संशय ठाकरे गटाने व्यक्त केला आहे. ठाकरे गटाचे उमेदवार शंकरराव भाऊराव लंगोटे यांनी हा आरोप केला आहे. ते म्हणाले, ईव्हीएम मशीनच्या वरच्या बॉक्सवर पंजाबराव काळे विद्यालय असा पत्ता आहे. तर आतील बॉक्सवर सरस्वती विद्यालयाचा पत्ता आहे. त्यामुळे यांनी सगळ्या मशीन्स बदलल्याचा संशय आहे. वरचे बॉक्स वेगळे आहेत. आत ईव्हीएम वेगळ्या आहेत. त्यामुळे मतमोजणी थांबवावी अशी माझी मागणी आहे. या लोकांनी (निवडणूक अधिकारी व सत्ताधारी) आमच्या प्रभागात मोठा घोळा केला. त्यात येथील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे येथील मतमोजणी थांबवावी. हे असे कसे राजकारण आहे? रात्री बेरात्री येऊन लोक इथे येऊन फिरत होते. ही पेटी आमच्यापुढे गेली होती. पण आता पेटी वेगळी व आतील मशीन वेगळी कशी झाली? असा सवालही लंगोटे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. एका उमेदवाराचे नाव 3-3 वेळा प्रभाग क्रमांक 14 च्या 34 नंबरच्या यादीत एका उमेदवाराचे नाव 3-3 वेळा टाकण्यात आले आहे. यात भाजपच्या उमेदवाराचा समावेश आहे. मी प्रत्यक्ष बूथवर बसलो होतो. मी ही यादीही पत्रकारांना देऊ शकतो, असेही ते यावेळी म्हणाले. दुसरीकडे, अकोला महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीत आज माजी महापौर विजय अग्रवाल यांनी पहिल्या फेरीत आघाडी घेतली आहे. तर प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसचे चारही उमेदवार दुसऱ्या फेरीअखेर आघाडीवर आहेत. या ठिकाणी सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस असा प्रमुख मुकाबला आहे. अकोल्यात यंदा 55.61 टक्के मतदान दरम्यान, अकोला महापालिका निवडणुकीमध्ये यावेळेस प्रथमच झोननिहाय 6 वेगवेगळ्या ठिकाणी मतमोजणी केली जात आहे. निवडणुकीत 55.61 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 2017 च्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का 0.30 टक्क्याने घसरला असून 9 वर्षांपूर्वी 55.91 मतदारांनी मतदान केले होते. अकोलेकरांचा कौल नेमका कुणाला? याचे चित्र दुपारनंतर स्पष्ट होईल. हे ही वाचा… संभाजीनगरात मतमोजणीस्थळी पोलिसांचा लाठीचार्ज:शिंदे गटाचे माजी महापौर विकास जैन जखमी, घेरून मारले; संजय शिरसाट यांचा संताप छत्रपती संभाजीनगर येथील मतमोजणी केंद्रावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यात सत्ताधारी शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन जखमी झालेत. त्यांच्या हाताला जबर मार लागला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 11:48 am

महापौर ठरवण्यासाठी आकडे दाबले? रोहित पवारांचा निवडणूक आयोगावर संशय:PADU मशीन, मतदानाच्या टक्केवारीवरून आरोप

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी काल शांततेत मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र, निकालापूर्वीच निवडणूक आयोग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर तीव्र टीका करत गंभीर आरोप केले आहेत. निकालाला काही तास उरले असताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमधून रोहित पवार यांनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, काही वेळातच मतमोजणी सुरू होणार असताना अद्याप मुंबईसह अनेक महानगरपालिकांमधील मतदानाची अंतिम आणि अधिकृत टक्केवारी जाहीर करण्यात आलेली नाही. हा प्रकार आजवर कधीही पाहायला मिळालेला नसल्याचे सांगत त्यांनी आयोगाच्या हेतूंवरच संशय व्यक्त केला आहे. महापौर कोणाचा बसवायचा, याचे गणित शेवटच्या क्षणी जुळवण्यासाठीच मतदानाची टक्केवारी जाहीर केली जात नाहीये ना? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. याचबरोबर निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आम्ही भाजपाची बी टीम आहोत, हे जाहीरच करावे, अशी उपरोधिक पण तीव्र टीकाही रोहित पवार यांनी केली आहे. काल मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान एकूणच शांततेत झाल्याचे चित्र असले, तरी मतदानाच्या टक्केवारीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे विरोधकांमध्ये अस्वस्थता आहे. दुपारी 3.30 वाजेपर्यंत राज्यभरात अंदाजे 46 ते 50 टक्के मतदान झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी वृत्तसंस्थेला दिली होती. मात्र त्यानंतरची अंतिम आकडेवारी वेळेवर जाहीर न झाल्याने संशयाची धार अधिक तीव्र झाली आहे. गुरुवारी पार पडलेल्या या महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकीकडे मतदान शांततेत झाले असले, तरी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगाच्या अनेक निर्णयांवर विरोधक आणि मतदारांकडून टीका होत आहे. या निवडणुकीत राज्यभरातील 2,869 नगरसेवकांच्या जागांसाठी 29 महानगरपालिकांमध्ये 15,931 उमेदवार रिंगणात होते. एवढ्या मोठ्या निवडणुकीत पारदर्शकता आणि विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाची असताना, आयोगाकडून होत असलेली दिरंगाई संशयाला खतपाणी घालणारी ठरत आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणी प्रक्रियेवरूनही स्वतंत्र वाद निर्माण झाला आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत मतदार यादी, मतदान केंद्रांची रचना, 23 मतमोजणी केंद्रांची व्यवस्था आणि मतमोजणी प्रक्रियेत PADU या नव्या यंत्राचा बॅकअप म्हणून वापर केला जाणार असल्याची माहिती दिली होती. या यंत्राच्या वापरावर शिवसेना (ठाकरे गट) आणि आम आदमी पक्षाने आक्षेप नोंदवला आहे. राजकीय पक्षांना या यंत्राबाबत पुरेशी माहिती न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. PADU यंत्रावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेले नाही, त्याची माहिती दिलेली नाही. उद्धव ठाकरे यांच्या नावाने आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. निवडणूक आयुक्त यावर उत्तर द्यायला तयार नाहीत, अशी टीका त्यांनी केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर, मतमोजणीच्या दिवशीच निवडणूक आयोगावर रोहित पवारांनी केलेले आरोप केवळ एका पोस्टपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित करणारे ठरत आहेत. निकालासोबतच आयोगाच्या भूमिकेकडेही आता राज्याचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 11:35 am

मशाल विझली, इंजिनचा धूरही संपला!:दोघांचे राजकारण फक्त मुंबई-ठाण्यापुरतेच मर्यादित, प्रताप सरनाईकांचा ठाकरे बंधूंवर प्रहार

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. निकालाचे कल स्पष्ट होत असतानाच राजकीय आरोप-प्रत्यारोपांना धार चढली आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. आता मशालीची ज्योत विझली असून मनसेच्या इंजिनचा धूरही संपला आहे, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे बंधूंना लक्ष्य केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधूंच्या निवडणूक रणनीतीवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, राज्यात निवडणुकीचा एवढा मोठा रणसंग्राम सुरू असताना ठाकरे बंधूंनी केवळ शेवटचे तीन दिवस प्रचाराचे सोपस्कार पूर्ण केले. त्यांचे राजकारण केवळ मुंबई आणि ठाण्यापुरतेच मर्यादित आहे. महाराष्ट्रात या दोन शहरांव्यतिरिक्त इतर २७ महापालिका आहेत, पण ठाकरे बंधूंनी उर्वरित महाराष्ट्रातील जनतेला पूर्णपणे वाऱ्यावर सोडले होते. प्रचाराच्या 'सोपस्कारां'वरून टोलेबाजी प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधूंनी प्रचारात दाखवलेल्या 'गांभीर्या'वरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते पुढे म्हणाले, केवळ शेवटचे तीन दिवस प्रचाराचा दिखावा करून आपण संपूर्ण महाराष्ट्र जिंकू शकतो, या भ्रमात ठाकरे बंधू होते. मात्र, आजच्या निकालातून त्यांचे हे स्वप्न भंग पावेल. ज्यांना उर्वरित महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही, त्यांना जनता स्वीकारणार नाही. मशालीची ज्योत आणि इंजिनचा धूर आता इतिहासजमा झाला आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय खळबळ राज्यातील २९ महापालिकांच्या निकालांकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले असताना प्रताप सरनाईक यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई आणि ठाणे या ठाकरे कुटुंबाच्या बालेकिल्ल्यांमध्ये शिंदे गट आणि महायुतीने मोठे आव्हान उभे केले आहे. त्यातच सरनाईक यांनी 'मशाल' आणि 'इंजिन' या दोन्ही चिन्हांवर एकाच वेळी निशाणा साधल्याने ठाकरे गट आणि मनसेकडून काय प्रत्युत्तर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… संभाजीनगरात मतमोजणीस्थळी पोलिसांचा लाठीचार्ज:शिंदे गटाचे माजी महापौर विकास जैन जखमी, घेरून मारले; संजय शिरसाट यांचा संताप छत्रपती संभाजीनगर येथील मतमोजणी केंद्रावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यात सत्ताधारी शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन जखमी झालेत. त्यांच्या हाताला जबर मार लागला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 11:18 am

संभाजीनगरात मतमोजणीस्थळी पोलिसांचा लाठीचार्ज:शिंदे गटाचे माजी महापौर विकास जैन जखमी, घेरून मारले; संजय शिरसाट यांचा संताप

छत्रपती संभाजीनगर येथील मतमोजणी केंद्रावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. त्यात सत्ताधारी शिवसेनेचे माजी महापौर विकास जैन जखमी झालेत. त्यांच्या हाताला जबर मार लागला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यात आज छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलामध्ये सत्ताधारी महायुती आघाडीवर असल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही 4 ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. या चारही ठिकाणी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व नागरिकांनी निकाल ऐकण्यासाठी गर्दी केली आहे. त्यातच उस्मानपुरा येथील शासकीय अभियांत्रिकी मतमोजणी केंद्रावर मतमोजणी सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी तुफान लाठीमार केला. त्यात शिंदे गटाचे नेते तथा शहराचे माजी महापौर विकास जैन जबर जखमी झाले. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात पोलिस कर्मचारी नागरिकांना घेरून काठ्यांनी मारहाण करताना दिसून येत आहे. एक व्यक्ती पोलिसांच्या मारापासून वाचण्यासाठी झाडाजवळ बसला असताना पोलिस त्याच्यावरही काठ्यांचा प्रहार करताना दिसून येत आहेत. केवळ आत जाण्याच्या विनंतीवरून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. काय म्हणाले मंत्री संजय शिरसाट? संजय शिरसाट म्हणाले, आज मतमोजणी आहे. मतदान नाही. या लोकांना कळत कसे नाही. त्यांना काही सेन्स नाही का? जखमी झालेले कार्यकर्ते आमचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडे ओळखपत्र आहे. त्यांना जनावरासारखे मारले. यांना कसली मस्ती आहे. एक अधिकारी इथे दिसत नाही. यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. या पद्धतीने मारहाण होत असेल तर हा पोलिसांचा मस्तवालपणा आहे. ही मस्ती कुठे तरी उतरली पाहिजे. हे माजी महापौर आहेत. त्यांचा हात मोडला. ते मतदान करायला जात होते का? हा मतमोजणीचा टाईम आहे ना. ते पुढे म्हणाले, मतमोजणीसाठी सगळीकडे बॅरिकेड्स लावण्यात आलेत. सामान्य माणसांना प्रवेश नाही. असे असताना जे प्रतिनिधी आहेत, ज्यांच्याकडे ओळखपत्र आहे, त्यांना आत जाण्यास तुम्ही मज्जाव का करता? ही कोणती मस्ती आहे तुमची? मतदान सुरू असते तर समजू शकतो आपण. पण हा बळाचा वापर हा मस्तवालपणा आहे. पत्रकारांनाही मारहाण झाली. हा सागर देशमुख नामक जो कोणता प्राणी आहे ना, त्याची मस्ती उतरली पाहिजे. त्याच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे. मी सीपींशी बोललो. सीपी तिकडून बोलतात की, माझे अधिकारी तिकडे आहेत. त्यांना स्पॉटवर यायला काय झाले? नेमकी परिस्थिती काय आहे हे ते इथे येऊन पाहू शकत नाहीत का? असा सवालही शिरसाट यांनी यावेळी उपस्थित केला.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 10:34 am

आंदोलन:गोरेगावात कृषीमंत्र्यांचा पुतळा जाळणाऱ्या क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या सहा पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे कृषीमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळणाऱ्या क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गोरेगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. १५ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडले आहे. वाशीम जिल्हयातील एका शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांसह विविध संघटनांमधून तिव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित कृषी अधिकाऱ्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी राज्यभर तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या शिवाय संघटनेचे संस्थापक रवीकांत तुपकर यांनीही या घटनेचा तिव्र निषेध केला असून या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून शासनाचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असून अधिकाऱ्यांनाच पाठबळ दिले जात असल्याचा आरोप केला आहे. वाशीम जिल्हयातील शेतकऱ्यास मारहाण झालेल्या घटनेच्या निषेधार्थ गोरेगाव येथे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून या घटनेचा निषेध केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. या प्रकरणानंतर जमादार भिकाजी मेनकुदळे यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषीमंत्र्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या् आरोपावरून संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, नामदेव पतंगे, प्रविण मते, सतीष इढोळे, बालाजी मोरे, सखाराम भाकरे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नोटीस देऊन सोडले आहे. जमादार मैंदकर पुढील तपास करीत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर कितीही गुन्हे झेलण्याची तयारी या संदर्भात संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर यापुर्वीही केलेल्या आंदोलनात गुन्हे दाखल झाले आहेत. यापुढेही आंदोलन सुरुच राहणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर कितीही गु्न्हे झेलण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 10:28 am

नाशिक महापालिका मतदानात गदारोळ; कायद्याचा बालेकिल्ला मोहीम अपयशी ठरली का?:13 घटना, पण एकही गुन्हा नाही, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान शहरातील वातावरण अनेक ठिकाणी अस्वस्थ करणारे ठरले. पैसे वाटपाचे आरोप, उमेदवाराच्या वाहनातून सापडल्याची चर्चा असलेली रोकड, कार्यकर्त्यांमधील झटापट आणि किरकोळ वाद अशा तेरा घटनांनी मतदानाच्या दिवशी नाशिकचे राजकारण तापले. मात्र, एवढ्या गदारोळानंतरही एकाही घटनेत गुन्हा दाखल न झाल्याने शहरभर चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून नाशिक पोलिसांकडून कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम जोरात राबवली जात असताना, निवडणुकीच्या दिवशी मात्र कारवाई का झाली नाही, असा सवाल नागरिक आणि राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. गुरुवारी (15 जानेवारी) नाशिक महानगरपालिकेच्या एकूण 1,563 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. काही भागांमध्ये मतदारांच्या रांगा उशिरापर्यंत कायम राहिल्या आणि रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. यंदा नाशिकमध्ये एकूण 56.76 टक्के मतदानाची नोंद झाली असून, 2017 च्या महापालिका निवडणुकीतील 61.60 टक्के मतदानाच्या तुलनेत जवळपास 5 टक्क्यांची घट झाली आहे. मतदानाचा टक्का घटलेला असला, तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय तापमान मात्र उच्च पातळीवर असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. मतदानाच्या दिवशी सिडको, नाशिकरोड आणि पंचवटी या भागांमध्ये विशेष तणावाचे प्रसंग पाहायला मिळाले. काही ठिकाणी मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप झाले, तर एका उमेदवाराच्या वाहनातून रोख रक्कम सापडल्याची चर्चा शहरात वेगाने पसरली. या घटनांमुळे संबंधित भागांमध्ये कार्यकर्ते आमनेसामने आले, घोषणाबाजी झाली आणि काही ठिकाणी किरकोळ झटापटही झाली. काही मतदान केंद्रांबाहेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, ज्यामुळे मतदारांमध्येही अस्वस्थता पसरली. मात्र, या सर्व प्रकारांनंतरही कोणत्याही राजकीय पक्षाकडून किंवा नागरिकांकडून अधिकृत तक्रार दाखल न झाल्याचे कारण पुढे करून पोलिसांनी एकाही घटनेत गुन्हा नोंदवला नाही. नाशिक पोलिसांनी निवडणूक काळात कडक बंदोबस्त तैनात केला होता. संवेदनशील आणि अति-संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलिस कर्मचारी, गस्त पथके आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून सातत्याने नजर ठेवण्यात येत होती. शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. तरीही प्रत्यक्ष घटनांनंतर कारवाई न झाल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. तक्रार नोंदवली नसली, तरी प्रत्यक्ष घडलेल्या घटनांकडे दुर्लक्ष करणे योग्य होते का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. या निवडणुकीत नाशिक महानगरपालिकेतील 31 प्रभागांमधील एकूण 122 जागांसाठी 735 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये 527 उमेदवार विविध राजकीय पक्षांचे असून 208 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. 2017 च्या तुलनेत यंदा राजकीय चुरस अधिक तीव्र असल्याचे चित्र आहे. प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही जोरदार प्रचार केल्यामुळे निवडणुकीतील स्पर्धा अत्यंत काट्याची झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मतदानादरम्यान घडलेल्या घटनांकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. दरम्यान, आज होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पुन्हा एकदा कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अति-संवेदनशील भाग पोलिसांच्या विशेष रडारवर ठेवण्यात आले असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून, पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे. निवडणूक निकालाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले जात आहे. नाशिकच्या राजकीय वातावरणात नवा वाद नाशिक महापालिकेत सत्तास्थापनेसाठी किमान 63 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला बहुमत मिळते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. मतदानादरम्यान घडलेल्या तणावपूर्ण घटनांप्रमाणेच निकालानंतरचे वातावरणही संवेदनशील ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे सत्तासंघर्ष तीव्र असताना, दुसरीकडे पोलिसांच्या कारवाईअभावी निर्माण झालेली चर्चा नाशिकच्या राजकीय वातावरणात नवा वाद निर्माण करत आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 10:23 am

महायुतीचा निवडणूकपूर्व धमाका:बिनविरोध नगरसेवकांची संपूर्ण राज्याची यादी एका क्लिकवर; कुठे-कुठे बिनविरोध निवडून आले?

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेचा निकाल काय लागणार, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, मतदान आणि मतमोजणीच्या गदारोळाआधीच काही महानगरपालिकांमध्ये निवडणुकीचा निकाल ठरला होता. कारण काही प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. या बिनविरोध निवडींमुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, राजकीय वर्तुळात यावरून जोरदार चर्चा आणि वादही रंगले होते. राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये एकूण अनेक उमेदवार मतदान न होता थेट विजयी घोषित करण्यात आले. यामध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा विशेष उल्लेख करावा लागेल. कारण राज्यात सर्वाधिक बिनविरोध उमेदवार याच महानगरपालिकेतून निवडून आले आहेत. एका बाजूला लोकशाहीत जनतेचा कौल महत्त्वाचा मानला जात असताना, दुसऱ्या बाजूला एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारांचा बिनविरोध विजय होणे, हे अनेक प्रश्न निर्माण करणारे ठरले आहे. त्यामुळे खरंच ही लोकशाहीची प्रक्रिया आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत विविध प्रभागांतून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची यादी मोठी आहे. प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी यांच्यासह प्रभाग 24 (ब) मधून ज्योती पाटील, प्रभाग 18 (अ) मधून रेखा चौधरी, प्रभाग 26 (अ) मधून मुकंद तथा विशू पेडणेकर, प्रभाग 27 (ड) मधून महेश पाटील, प्रभाग 19 (क) मधून साई शेलार, प्रभाग 23 (अ) मधून दिपेश म्हात्रे, प्रभाग 23 (ड) मधून जयेश म्हात्रे, प्रभाग 23 (क) मधून हर्षदा भोईर, प्रभाग 19 (ब) मधून डॉ. सुनिता पाटील, प्रभाग 19 (अ) मधून पूजा म्हात्रे, प्रभाग 30 (अ) मधून रविना माळी, पॅनेल 27 (अ) मधून मंदा पाटील, पॅनेल 28 (अ) मधून हर्षल मोरे, तसेच प्रभाग 26 (क) मधून आसावरी नवरे आणि प्रभाग 26 (ब) मधून रंजना पेणकर यांचा समावेश आहे. याशिवाय राजन मराठे आणि रेश्मा निचल हे उमेदवारही बिनविरोध विजयी झाले आहेत. ठाणे महानगरपालिकेतही काही प्रभागांत उमेदवार बिनविरोध निवडून आले. प्रभाग क्रमांक 14 (ड) मधून शितल ढमाले, प्रभाग 17 (ब) मधून राम रेपाळे, प्रभाग 18 (क) मधून जयश्री फाटक, प्रभाग 17 (अ) मधून एकता भोईर आणि प्रभाग 5 (अ) मधून सुलेखा चव्हाण यांची निवड बिनविरोध झाली. त्याचप्रमाणे भिवंडी महानगरपालिकेत प्रभाग 18 (अ) मधून अश्विनी सन्नी फुटाणकर, प्रभाग 18 (ब) मधून दीपा दीपक मढवी, प्रभाग 18 (क) मधून अबूसूद अशफाक अहमद शेख, प्रभाग 16 (अ) मधून परेश (राजू) चौघुले, प्रभाग 23 (ब) मधून भारती हनुमान चौधरी आणि वॉर्ड क्रमांक 17 (ब) मधून सुमीत पाटील हे उमेदवार थेट विजयी घोषित करण्यात आले. जळगाव महानगरपालिकेतही बिनविरोध निवडींची संख्या लक्षणीय आहे. प्रभाग क्रमांक 9 (अ) मधून मनोज चौधरी, 9 (ब) मधून प्रतिभा देशमुख, 12 (ब) मधून उज्वला बेंडाळे, प्रभाग 7 मधून विशाल भोळे, 16 (अ) मधून विरेंद्र खडके, 7 (अ) मधून दीपमाला काळे, 13 (क) मधून वैशाली पाटील, 7(ब) मधून अंकिता पाटील, 2 (अ) मधून सागर सोनवणे, 19 (अ) मधून रेखा पाटील, 19 (ब) मधून विक्रम सोनवणे आणि 18 (अ) मधून गौरव सोनवणे हे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय अहिल्यानगर महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 11 मधून कुमारसिंह वाकळे आणि प्रभाग क्रमांक 14 मधून प्रकाश भागानगरे यांचा समावेश आहे. धुळे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 17 (ब) मधून सुरेखा उगले, प्रभाग 1 (अ) मधून उज्ज्वला भोसले आणि प्रभाग 6 (ब) मधून ज्योत्स्ना पाटील या उमेदवारांची निवड बिनविरोध झाली. पुणे महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 35 (ड) मधून श्रीकांत जगताप आणि प्रभाग 35 मधून मंजुषा नागपुरे विजयी झाल्या. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रभाग 35 (ड) मधून श्रीकांत जगताप आणि प्रभाग 10 (ब) मधून सुप्रिया चांदगुडे यांचा बिनविरोध विजय झाला. राजकारणाची दिशा ठरवणारा निकाल पनवेल महानगरपालिकेतही अनेक प्रभागांत निवडणूक न होता निकाल लागला. प्रभाग 18 (ब) मधून नितीन पाटील, तसेच नितीन पाटील, रुचिता लोंढे, अजय बहिरा, दर्शना भोईर, प्रियंका कांडपिळे, ममता प्रितम म्हात्रे आणि स्नेहल ढमाले हे उमेदवार विविध प्रभागांतून बिनविरोध निवडून आले आहेत. या सर्व बिनविरोध निवडींमुळे आज जाहीर होणाऱ्या अंतिम निकालांवर त्याचा थेट परिणाम होणार आहे. एकीकडे मुंबईसारख्या महानगरपालिकेचा निकाल चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे अनेक ठिकाणी आधीच ठरलेले निकाल लोकशाही प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे आजचा निकाल केवळ विजयी आणि पराभूत उमेदवारांची नावे जाहीर करणारा नसून, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 9:59 am

मुंबई महानगरपालिका मतदान विश्लेषण:शेवटच्या दोन तासांत मतदानाचा स्फोट; 11.86% वाढीने राजकीय गणितं बदलणार?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानाची आकडेवारी पाहता, यंदा मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात मतदारांमध्ये लक्षणीय उत्साह दिसून आला आहे. दिवसभर संथ गतीने सुरू असलेली मतदान प्रक्रिया सायंकाळच्या सत्रात अचानक वेग घेताना दिसली. विशेषतः शेवटच्या दोन तासांत झालेली मतदानातील मोठी वाढ ही राजकीय पक्षांसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आकडेवारीमुळे मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, दुपारी 3.30 वाजेपर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 41.08 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर अवघ्या दोन तासांत म्हणजे सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी थेट 52.94 टक्क्यांपर्यंत पोहोचली. म्हणजेच शेवटच्या दोन तासांत 11.86 टक्के मतदान झाले. ही वाढ केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, तिचा थेट परिणाम निकालावर होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे. मतदानाच्या वेगाचा विचार केला असता, दुपारी 3.30 वाजेपर्यंत मतदानाचा सरासरी वेग प्रति तास 5.13 टक्के इतका होता. मात्र, सायंकाळी 3.30 ते 5.30 या दोन तासांत हा वेग वाढून प्रति तास 5.93 टक्क्यांवर पोहोचला. या कालावधीत झालेली 11.86 टक्क्यांची वाढ ही स्पष्टपणे मतदारांच्या शेवटच्या सत्रातील सक्रियतेकडे निर्देश करते. मुंबईसारख्या महानगरात कामकाजानंतर मतदार मतदानासाठी बाहेर पडतात, हे चित्र यंदाही पुन्हा अधोरेखित झाले आहे. लिंगानुसार मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, दुपारी 3.30 वाजेपर्यंत पुरुष मतदारांचा सहभाग महिलांपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. या वेळेपर्यंत पुरुष मतदारांचे मतदान 42.18 टक्के इतके होते, तर महिलांचे मतदान 39.83 टक्क्यांवर मर्यादित राहिले. ही तफावत जरी फार मोठी नसली, तरी मुंबईसारख्या शहरात महिला मतदारांचा सहभाग तुलनेने कमी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मात्र, शेवटच्या सत्रात ही दरी कितपत भरून निघाली, याकडेही राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. मुंबईमध्ये मतदानाच्या शेवटच्या सत्रात टक्केवारी वाढण्याची परंपरा नवी नाही. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीतही हा ट्रेंड कायम राहिल्याचे दिसून आले. शेवटच्या दोन तासांत झालेली 11.86 टक्क्यांची वाढ ही सामान्य वाढ मानली जात नसून, ती राजकीय समीकरणे बदलू शकणारी असल्याचे मानले जात आहे. काही प्रभागांमध्ये अत्यल्प फरकाने निकाल लागण्याची शक्यता असल्याने, हे शेवटच्या सत्रातील मतदान कोणाच्या पारड्यात झुकले, यावर अंतिम निकाल अवलंबून असणार आहे. या पार्श्वभूमीवर मागील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तुलना देखील महत्त्वाची ठरते. 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान झाले होते. मात्र, मतदान प्रक्रियेच्या शेवटच्या तासात म्हणजे सायंकाळी 5 ते 6आणि त्यानंतरही रांगेत उभ्या असलेल्या मतदारांमुळे मोठी वाढ झाली. अंतिम मतदानाची सरासरी थेट 66.05 टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. शेवटच्या टप्प्यातील मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता विधानसभा निवडणुकीतील शेवटच्या तासातील आकडेवारी पाहता, 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाले होते, तर अंतिम एकूण मतदान 66.05 टक्के नोंदवले गेले. म्हणजेच शेवटच्या तासात 7.83 टक्क्यांची वाढ झाली होती. हाच अनुभव लक्षात घेता, मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही शेवटच्या टप्प्यातील मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आज जाहीर होणाऱ्या निकालात शेवटच्या तासांत मतदान करणाऱ्या मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने गेला, हेच मुंबईच्या सत्तेचा फैसला करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 9:45 am

मुंबईत भाजप ‘मॅजिक फिगर’ गाठणार? मोहित कंबोज यांच्या पोस्टने खळबळ:दाव्यावर ठाकरे गट, मनसेचा पलटवार; आज फैसला

मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी काल, 15 जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली असून आज या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेचा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, अनेक एक्झिट पोल्समध्ये भाजप-शिवसेना महायुतीला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर होणार का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार का, याबाबत चर्चा सुरू असतानाच भाजप नेते मोहित कंबोज यांनी मोठा दावा केला आहे. कायमच आपल्या आक्रमक वक्तव्यांमुळे आणि सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत राहणाऱ्या कंबोज यांनी मुंबई पालिकेत भाजप ‘मॅजिक फिगर’ पार करेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सलग दोन पोस्ट करत भाजपच्या विजयाबाबत आपला अंदाज मांडला आहे. मोहित कंबोज यांनी आपल्या पहिल्या पोस्टमध्ये भाजप मुंबई महानगरपालिकेत 100 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला. यानंतर त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये थेट आकड्यांकडे इशारा करत 110 कमळाची फुले आणि ‘अधिक’ असे चिन्ह वापरून सूचक संदेश दिला. या पोस्टमुळे भाजप मुंबईत 110 हून अधिक जागा जिंकणार का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कंबोज यांच्या दाव्यामुळे भाजप समर्थकांमध्ये उत्साह संचारला असून, विरोधक मात्र या अंदाजांवर संशय व्यक्त करत आहेत. मोहित कंबोज यांच्या या दाव्याला शिवसेना ठाकरे गटाकडून तीव्र प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी कंबोज यांची पोस्ट शेअर करत त्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. क्रोनॉलॉजी समजून घ्या, असे म्हणत अखिल चित्रे यांनी एक संतप्त पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या पोस्टमध्ये भाजप निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतो, कंबोज निवडणुकीच्या काळात अमेरिकेत असतो, निवडणुकीआधी भारतात येतो, विजयाचे आकडे जाहीर करतो, त्यानंतर एक्झिट पोल्स येतात आणि तरीही सामान्य जनता चिंतेत असते, असा आरोप त्यांनी केला आहे. अखिल चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे जात, जर निवडणूक निकालात कंबोज यांनी दिलेले आकडे खरे ठरले आणि त्यामध्ये कंबोज : अमेरिका : ईव्हीएम : भाजप : अघोरी बहुमत यांचा परस्पर काहीही संबंध आढळला, तर महाराष्ट्राने तो केवळ योगायोग मानायचा का? असा सवाल उपस्थित केला आहे. या शब्दांतून त्यांनी अप्रत्यक्षपणे निवडणूक प्रक्रियेवर आणि ईव्हीएमवर संशय उपस्थित केल्याचे दिसून येते. या पोस्टमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निकालांवर मनसेकडूनही प्रतिक्रिया आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निवडणूक निकालांबाबत संयमित भूमिका मांडली आहे. आज मुंबई महानगरपालिकेचे निकाल आहेत. कोण जिंकेल आणि कोण हरेल, याचा निर्णय जनता करेलच, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी आपल्या सहकारी महाराष्ट्र सैनिकांचे कौतुक करत, ज्या हिमतीने माझ्या सहकारी महाराष्ट्र सैनिकांनी ही निवडणूक लढवली आणि मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन, असेही नमूद केले आहे. निकाल अत्यंत निर्णायक ठरणार एकीकडे भाजपकडून विजयाचे दावे, तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून तीव्र आरोप आणि मनसेकडून संयमाची भूमिका, अशा पार्श्वभूमीवर आज जाहीर होणारा मुंबई महानगरपालिकेचा निकाल अत्यंत निर्णायक ठरणार आहे. मुंबईच्या सत्तेची चावी कोणाच्या हाती जाणार, भाजपाचा पहिला महापौर होणार की शिवसेनेचे वर्चस्व कायम राहणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काही तासांतच या सर्व प्रश्नांची उत्तरं समोर येणार असून, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राची नजर निकालाकडे लागली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 9:29 am

पोकरा प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यास 24 तासात अनुदान:शेतकऱ्यांनी केले समाधान, तुषार सिंचन संचाची सांगितली आवश्यकता‎

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू झाले असून तालुक्यातील शेलोडी गावातील लाभार्थी शेतकऱ्याला कृषी विभागाच्या तत्परतेमुळे अर्ज केल्यापासून २४ तासात अनुदान मिळाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. प्रकल्पा अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी यांचे अनुदान वाटप सुरू झाले असून शेगाव व खामगाव तालुक्यातील समाविष्ट असलेल्या पाणलोट समूहात समूह सहायक विजय भागवतकर कार्यरत आहेत. खामगाव तालुक्यातील शेलोडी गावातील शेतकरी भगवानसिंग शामसिंग पवार यांनी तुषार सिंचन या घटकाचा अर्ज ८ जानेवारी रोजी ग्राम विकास समिती शेलोडीकडे केला होता. योगायोगाने त्याच दिवशी ग्राम विकास कृषी समितीची सभा असल्यामुळे सदर अर्जास मान्यता देण्यात आली व सहाय्यक कृषी अधिकारी आसरा कांबळे या सभेस उपस्थित असल्यामुळे त्यांनी सदर अर्जावर त्यांनी त्याच दिवशी कार्यवाही केली. असता सदर अर्जास त्याच दिवशी खामगाव तालुका कृषी अधिकारी सुनील पवार यांनी पूर्वसंमती दिली. लाभार्थी भगवानसिंग पवार यांनी यांचे शेतात कांदा पिकाची लागवड केलेली असून त्यांना तुषार सिंचन संचाची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे त्यांनी त्याच दिवशी संचाची खरेदी केली व पाइपवर दुकानदार यांनी आंबोशिंग करून दिल्यामुळे ९ जानेवारी रोजी उपकृषी अधिकारी दीपक पाटेखेडे यांनी स्थळ पाहणी करून सकाळी १० वाजता लेखाधिकारी यांच्या डेस्क वर सदर प्रकरण अनुदान वर्ग करण्यासाठी वर्ग केले. प्रभारी लेखाधिकारी विजय खोंदिल यांनी कार्यवाही करून ११ वाजता प्रकरण उपविभागीय कृषी अधिकारी खामगाव यांच्या डेस्क वर वर्ग केले. १२ वाजता उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी सदर प्रकरण अनुदान वर्ग करण्यासाठी प्रकल्प अंमलबजावणी कार्यालय, मुंबई येथे सादर केले. प्रकल्प अंमलबजावणी कार्यालय, मुंबई यांनी सदर अर्जाची तपासणी करून याच दिवशी ९ जानेवारी रोजी संध्याकाळी अनुदान वर्ग केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ चा जिल्हा स्तरावरून वेळोवेळी घेतल्या जात असलेला आढावा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, मनोजकुमार ढगे, तसेच तंत्र अधिकारी रेणुका पाटील यांचे सहकार्य मिळाले.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 9:17 am

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये आज निवडणुकीचा निकाल:सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी, दुपारनंतर निकाल; 3 एक्झिट पोलमध्ये भाजप युतीला बहुमत

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांमध्ये झालेल्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. 893 प्रभागांमध्ये एकूण 15,931 उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू होईल. दुपारनंतर निकाल येण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाची बृहन्मुंबई महानगरपालिका आहे. एक दिवसापूर्वी आलेल्या 3 एक्झिट पोलमध्ये भाजप युतीला BMC मध्ये बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईला 227 प्रभागांमध्ये विभागले आहे. बहुमतासाठी 114 जागांची आवश्यकता आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 130 ते 150 जागा मिळू शकतात. काँग्रेस आघाडीला 60 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांच्या खात्यात 5 ते 7 जागा येऊ शकतात.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 8:30 am

स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव- दिलीप इंगाेले:चंद्रभानजी विद्यालयात कार्यक्रम : शाळेच्या वर्षभरातील प्रगतीचा आढावा सादर‎

लहान वयात विद्यार्थ्यांच्या आंतरिक सुप्त गुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन हे एक व्यासपीठ असून त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांची प्रतिभा पुढे येत असते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव सर्वप्रथम शालेय स्नेहसंमेलनातूनच मिळत असतो. असे प्रतिपादन श्रीराम मंदिर ट्रस्ट, कुंड सर्जापूर चे अध्यक्ष तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी केले. कुंड सर्जापूर येथील चंद्रभानजी विद्यालयाचे दोन दिवसीय स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. त्यात उद्घाटकीय कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम मंदिर ट्रस्टचे सदस्य प्राचार्य गजानन इंगोले होते. यावेळी ट्रस्टचे सदस्य रमेशपंत बहाळे, वसंत मानकर, सुधिर कुकडे, संजय मानकर, चंद्रशेखर मानकर, अशोक मानकर, सत्कारमुर्ती व डॉ. पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑप बँकेचे संचालक अक्षय इंगोले, माजी मुख्याध्यापक आर.एस.गावंडे, रमेशपंत किटूकले व स्वागताध्यक्ष तथा चंद्रभानजी विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.टी.चव्हाण आदी उपस्थित होते. सर्वप्रथम दिप प्रज्वलन करून तसेच प्रभू श्री राम, शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख, दानदाते स्व.चंद्रभान मानकर व विद्यालयाचे संस्थापक स्व.रावसाहेब इंगोले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तथा दिप प्रज्वलन करून या स्नेहसंमेनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर रांगोळी स्पर्धा, हस्त व पुष्प प्रदर्शनी, गणित कक्ष याचे उद्घाटन सुध्दा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. पंजाबराव देशमुख बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अक्षय दिलीप इंगोले तसेच महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्र्ीमाई ुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले शाळेचे क्रीडा शिक्षक शरद गढीकर यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. सत्कारमुर्ती अक्षय इंगोले यांनी सत्काराला उत्तर देतांना ग्रामिण भाग असूनही शाळा ज्याप्रमाणे प्रगती करीत आहे त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून भविष्यातही शाळेने अशीच प्रगती कराव. असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी शरद गढीकर यांनी सुध्दा आपल्याला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे शाळेचा झालेला गौरव असून त्यासाठी सर्वांप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक एन.टी.चव्हाण यांनी शाळेच्या वर्षभरातील प्रगतीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे संचालन आर.एस.मानकर यांनी तर आभार स्नेहसंमेलन प्रभारी एस.पी.लाजूरकर यांनी मानले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीच्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अरुणा वाडेकर होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पालक व गावकरी मंडळीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी आयोजित विविध स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून कुंड सर्जापूरचे सरपंच निलेश मानकर, वनारसी गावाच्या सरपंचा ज्योत्स्ना संजयराव मोहोड, हातुर्णाचे सरपंच भरतरीनाथ गौरकर, हातुर्णा ग्रामपंचायतचे सदस्य भुषण वाणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक एन.टी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्नेहसंमेलन प्रभारी एस.पी. लाजूरकर, व्ही.के.राठोड, के.एस.लाजूकर, ए.पी.मांगे, आर.एस.मानकर, ए.व्ही. राजगुरे, शिक्षकेत्तर कर्मचारी सी.ए.शेंडे, आर.आर. मडावी यांच्यासह शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी, माजी विद्यार्थी, गावकरी मंडळी यांनी सहकार्य केले. दोन दिवसीय संमेलनात विद्यार्थ्यांचा जल्लोष दोन दिवसीय या स्नेहसंमेलनात विविध क्रीडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, हस्तकला, चित्रकला व गणित विषयक मॉडेल, प्रश्नमंजूषा, अंताक्षरी स्पर्धा घेण्यात आल्या. तर सांस्कृतिक कार्यक्रमात या सर्व स्पर्धेचे तसेच शाळेच्या सन-२०२५-२६ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ३ व राज्यस्तरावरील ६४ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 8:26 am

दोन दिवशीय राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा समारोप‎:शिक्षक साहित्य संमेलन म्हणजे साहित्यिक घडवणारे वैचारिक देवाण-घेवाणचा विचारमंच- प्राचार्य डॉ.विनय राऊत

बी.एड.चा अभ्यासक्रम हा केवळ पुस्तकी ज्ञान मिळवण्याचा काळ नसून तो खऱ्या अर्थाने आदर्श शिक्षक घडवण्याचा काळ असतो. शिक्षक साहित्य संमेलन विचारपीठ वैचारिक देवाण घेवाणीचा मोठा विचारमंच आहे. विद्यार्थांच्या सृजनशीलतेचा विकास येथे आलेल्या साहित्यिक शिक्षकांमधून होऊ शकतो. या संमेलनात सहभागी झालेले अनेक शिक्षक स्वतः लेखक, कवी, नाटककार आहेत. शिक्षक साहित्य संमेलन म्हणजे शिक्षकांमधून साहित्यिक घडविणारा विचारमंच आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.विनय राऊत यांनी केले. मातोश्री विमलाबाई देशमुख साहित्य नगरी श्री. शिवाजी शिक्षण महाविद्यालय येथे ९ व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या समारोपीय आणि सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. समारोपीय सत्राच्या पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय प्राचार्य डॉ. विनय राऊत, प्रा.डॉ.गणेश चव्हाण, प्रा.डॉ.पृथ्वीराजसिं ह राजपूत, संघर्ष सावरकर, जयदीप सोनखासकर, प्रा.अरुण बुंदेले, शरदचंद्र बिडकर, प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे, प्रा.किशोर क्षत्रीय आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य राऊत पुढे ते म्हणाले की, या शिक्षक साहित्य संमेलनातील चर्चासत्रे, एकपात्री प्रयोग, मुक्त संवाद, कथा कथन, ग्रंथ दिंडी, परिसंवाद आणि कवी संमेलने हे सर्वच कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेले आहेत. पूर्णपणे यशस्वी झाले, असे मला वाटते. असे विचार प्राचार्य डॉ. विनय राऊत यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान मान्यवरांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन राज्याध्यक्ष जयदीप सोनखासकर, राजेंद्र भटकर, गजेंद्र पाथरे यांनी स्वागत केले. या सत्कार समारंभात लोकनेते, साहित्यिक, संपादक, निसर्गवासी भाई प्रभाकर सावरकर स्मृती राज्यस्तरीय शिक्षक साहित्यरत्न पुरस्कार प्रा.प्रतीक पाथरे, शिवा काळे देण्यात आला. तसेच अनेक गुणवंत मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. प्रमुख अतिथी संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ.गणेश चव्हाण, प्रा.डॉ. पृथ्वीराज सिंह राजपूत, संघर्ष सावरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शिक्षक साहित्य संघाचे राज्याध्यक्ष जयदीप सोनखासकर यांनी ठराव वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. मदा नांदुरकर, तर आभार सुरेश मडावी यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 8:25 am

सलग आयोजनाचे 13 वे वर्ष:स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तरुणांनी वर्षभरात मिळवल्या नोकऱ्या

तिवसा तालुक्यातील कुऱ्हा गावाला ‘माझं गाव, माझा उत्सव - कुऱ्हा महोत्सव’ मुळे वेगळी ओळख मिळाली आहे. गेल्या तेरा वर्षांपासून नियमितपणे हे आयोजन केले जाते. त्यासाठी शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी पुढाकार घेतात. यावर्षी २३ ते २५ जानेवारी दरम्यान कुऱ्ह्यात तेराव्यांदा हे आयोजन होत आहे. या महोत्सवामध्ये साहित्य, संस्कृती आणि क्रीडाविषयक उपक्रमांशिवाय गावातील प्रतीभांचा सन्मान केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात अख्खे गाव सहभागी होते. त्यामुळे गावातील सामाजिक सौहार्द आणि राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यास मदत होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात बोलताना वाचनालयाचे ज्येष्ठ पदाधिकारी विवेक बिंड म्हणाले, हा उत्सव म्हणजे गावाची अस्मिता आहे. ती जपण्यासाठी आमची सतत धडपड सुरु असते. जमेची बाब अशी की गावकरी याला उत्स्फुर्त प्रतिसाद देतात. त्यामुळे आमचा उत्साहदेखील वाढतो. या उत्सवांतर्गतचा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम म्हणजे सामाजिक विषयावरील बौद्धीक आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून वर्षभरात नोकऱ्या मिळविलेल्या तरुण-तरुणींचा सत्कार हा आहे. त्यामुळे गावातील इतर तरुणांनाही प्रेरणा मिळते. पुढे त्यांचे अनुकरण करीत इतरही चांगला कित्ता गिरवतात, असे बिंड यांचे निरीक्षण आहे. याशिवाय बहुतेकांना लाभ घेता येईल, यासाठी तिर्था राजेश टेकाळे या चिमुकलीच्या स्मरणार्थ आरोग्य तपासणी शिबिरही भरवले जाते. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि नागरिकांदरम्यान रस्सीखेच स्पर्धादेखील घेतली जाते. कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये { हे गाव राजकीयदृष्ट्याही अत्यंत प्रगल्भ आहे. येथे डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही विचारांचा सन्मान करणारे लोकं राहतात. परंतु राजकीय मतभेद कधीही होऊ देत नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयापासून अंतर खेळ पैठणीचा हे असेल आकर्षण कुऱ्हा महोत्सवाच्या श्रृंखलेत यावर्षी एक नवे आकर्षण सहभागी करुन घेण्यात आले आहे. या आकर्षणाचे नाव ‘खेळ पैठणीचा’ असे आहे. कुऱ्हा येथील विवाहित मुली (ज्या महोत्सवादरम्यान सासरहून येथे येतात) व इतर महिला यामध्ये सहभागी होतील. या महोत्सवादरम्यान यावर्षी अधिक उत्पादन घेणारा शेतकरी आणि गावातील यशस्वी व्यवसायिक यांचाही सन्मान केला जाणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 8:24 am

काँग्रेसच्या पारड्यात उपनगराध्यक्षपद; इतिहासात पहिल्यांदाच महिलेची निवड:अचलपुरात मारली बाजी; खुर्शिदा बानो अताउल्ला शाह विजयी‎

अचलपूर नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्‍या महिला उपाध्यक्ष होण्याचा बहुमान काँग्रेसच्या खुर्शिदा बानो अताउल्ला शाह यांना प्राप्त झाला आहे. त्यांच्या रुपाने काँग्रेसच्या पारड्यात आणखी एक उप नगराध्यक्ष वाढला आहे. आज, गुरुवार, १५ जानेवारी रोजी पार पडलेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या गटनेता असलेल्या हेमा आसवान पराभूत झाल्या. नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी दुपारी प्रारंभ झालेल्या पहिल्या बैठकीत ही निवड घोषित झाली. उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड हा या बैठकीचा अजेंडा होता. सदर प्रक्रिया पीठासीन सभापती नगराध्यक्ष रुपाली अभय माथने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सहायक अधिकारी व मुख्याधिकारी धीरज गोहाड यांनी पाहिले. अचलपूर नगर पालिकेच्या उपाध्यक्षांसाठी काँग्रेसच्या खुर्शिदा बानो अताउल्ला शा, भाजपच्या हेमा दिलीप आसवानी, प्रहार शहर विकास आघाडी पुरस्कृत अपक्ष विजय थावानी व राज पाटील यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. दरम्यान ठरलेल्या वेळेत विजय थावानी व राज पाटील यांनी आपले नामनिर्देशन मागे घेतल्याने दोनच उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पुढे हात उंचावून मतदान घेण्यात आले. काँग्रेसच्या खुर्शिदा बानो यांच्या बाजूने दीक्षित यांनी हात उंचावून पहिल्यांदा समर्थन केले. त्यांच्यासोबतच अपक्षांनी त्यांना समर्थन दिल्याने एकुण २३ मते त्यांच्या पारड्यात पडली. त्याचवेळी भाजप उमेदवार हेमा आसवानी यांच्या बाजूने नगराध्यक्ष रूपाली अभय माथने यांच्यासह १८ सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. अशाप्रकारे पीठासीन सभापतींनी काँग्रेसच्या खुर्शिदा बानो यांना विजयी घोषित करण्यात आले. राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे एमआयएम, राष्ट्रवादी व अपक्षांचे गटनेता माजी नगराध्यक्ष ल. ज. दीक्षित यांनी शेवटपर्यंत आपल्या गटाला एकत्रीत बांधून ठेवले. विशेष म्हणजे काँग्रेस व दीक्षित यांच्या गटाला व्हीप काढण्याची गरज भासू दिली नाही. काँग्रेसच्या नगरसेवकाला उपाध्यक्षपदी विराजमान करण्यात त्यांनी अशाप्रकारे महत्वाचे योगदान दिले. तर दुसरीकडे भाजपच्या पाठीशी मनोज नंदवंशी यांच्या गटाने पूर्णपणे समर्थन दिले. भाजपने मात्र या निवडणुकीत व्हीप काढला होता. १८ सदस्यांचे हात उंचावून मतदान; विजयाचा मार्ग सुकर भाजपने व्हीप बजावला

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 8:20 am

अखेरच्या दोन तासातील 16 टक्के मतदान ठरवणार निकालाचा कल:मनपासाठी 64.35 टक्के मतदान; सन 2018 च्या तुलनेत 8.77 टक्के कमी‎

महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी शहरात शांततेत मतदान झाले. महापालिका प्रशासनाकडून अंदाजे आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार दिवसभरात ३ लाख ७ हजार ९ पैकी १ लाख ९७ हजार ५५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सुमारे ६४.३५ टक्के मतदानाची नोंद झाली. सन २०१८ मध्ये ७३.१२ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यंदा ८.७७ टक्के कमी मतदान झाले आहे. दरम्यान, दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४८.४९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर अखेरच्या दोन तासात झालेले १५.८६ टक्के मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत अवघे २० टक्केच मतदान झाले. सुरुवातीला निरुत्साह दिसून आला. बहुतांश प्रभागात दुपारनंतर नागरिक मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे साडेतीन वाजेपर्यंत मतदानाचा टक्का २८ टक्क्यांनी वाढला. बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अखेरच्या दोन तासातही मतदानासाठी मोठा उत्साह दिसून आला. मात्र, मागील निवडणुकीच्या तुलनेत निवडणुकीबाबत उत्साह कमी असल्याने मतदानाचा टक्का मोठ्या प्रमाणात घडल्याचे चित्र आहे. दरम्यान, राधाबाई काळे महाविद्यालय, आयकॉन पब्लिक स्कूल, पेमराज सारडा महाविद्यालय येथील मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सर्वात शेवटी पावणेसात वाजता राधाबाई काळे महाविद्यालयातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. मनपा निवडणुकीसाठी प्रभाग क्र. ५, ९, १०,१३ या चार प्रभागांत पुरुषांपेक्षा महिला मतदार आघाडीवर राहिल्या. प्रभाग क्रमांक ५ मध्ये ८ हजार १७९ महिला मतदारांनी तर ७८१८ पुरुषांनी मतदान केले. यात पुरुषांपेक्षा ३६१ महिला मतदार अधिक होत्या. प्रभाग क्र. ९ मध्ये ८५५१ महिलांनी, तर ८४९६ पुरुषांनी मतदान केले. येथे पुरुषांच्या तुलनेत ५५ महिला मतदार अधिक होत्या. तर प्रभाग क्र. १० व १३ मध्ये अनुक्रमे ४६ व ३७ महिला मतदार जास्त होते. प्रभाग १० मध्ये महिला मतदार १० हजार ९०३, पुरुष मतदार १० हजार ८५७, प्रभाग १३ मध्ये ७८८० महिला, तर ७८४३ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यंदाच्या निवडणुकीतील अर्थकारणावरून दिवसभर मतदार व नागरिकांमध्ये चर्चा रंगल्या होत्या. मध्य शहरासह केडगाव, मुकुंदनगर सावेडी उपनगरातील विविध भागात हॉटेल्स, उपहारगृहे, चौकांमध्ये उमेदवारांनी मतदारांना घडवलेले लक्ष्मीदर्शन व काही प्रभागात अर्थकारणाने गाठलेला उच्चांक सर्वसामान्यांच्या चर्चेचा केंद्रबिंदू होता. सर्वाधिक सुशिक्षित मतदार असलेल्या सावेडीतील प्रभागातही अखेरच्या टप्यात लक्ष्मीदर्शन घडवण्याची वेळ आल्याने हाही चर्चेचा विषय ठरला. महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी आयकॉन शाळेत मतदानासाठी मतदारांची लागलेली रांग. छाया : सिद्धार्थ दिक्षित. दिवसभर असे झाले मतदान { सकाळी ७.३० ते ९.३० : ७.८७ टक्के { सकाळी ९.३० ते ११.३० : २०.१६ टक्के { सकाळी ११.३० ते १.३० : ३३.९१ टक्के { दुपारी १.३० ते ३.३० : ४८.४९ टक्के { दुपारी ३.३० ते ५.३० : ६४.३५ टक्के मध्य शहर, केडगाव, मुकुंदनगर येथील प्रभाग वगळता इतर प्रभागांमध्ये परस्परविरोधी सक्षम उमेदवार नसल्याने मतदारांमध्येही निरुत्साह दिसून आला. विशेषतः दोन जागा बिनविरोध झालेल्या प्रभागात सर्वात कमी ५७ टक्के मतदान झाले. इतरही प्रभागांमध्ये विद्यमान नगरसेवक किंवा सक्षम असलेल्या उमेदवारांच्या तुलनेत विरोधी उमेदवार सक्षम नसल्याने मतदारांना मतदानासाठी सक्षम पर्याय नसल्याच्या चर्चा या प्रभागांमध्ये रंगल्या होत्या. त्यातूनच अनेक प्रभागात कमी मतदान झाल्याचे बोलले जात आहे. प्रभागनिहाय मतदान व अंदाजे टक्केवारी प्रभाग १ - १४५३४ (६५.८०%), प्रभाग २ - १२१८४ (५६.६४%), प्रभाग ३ - ८४७४ (५८.३३%), प्रभाग ४ - १३२८७ (६९ %), प्रभाग ५ - १०२९६ (६३.९९%), प्रभाग ६ - ९७७६ (५७%), प्रभाग ७ - १०२०४ (६४%), प्रभाग ८ - १३५१५ (७५%), प्रभाग ९ - ११२६६ (६६.०८%), प्रभाग १० - १५.२८ (६९.०६%), प्रभाग ११ - १२३१७ (५९.३०%), प्रभाग १२ - ११५६९ (६०%), प्रभाग १३ - ९७४८ (६२%), प्रभाग १४ - १०७२३ (६३%), प्रभाग १५ - ११३५४ (६८.१७%), प्रभाग १६ - १३१०० (६९.४१%), प्रभाग १७ - १०१८० (६६.५९%).

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 8:08 am

एकाच व्यक्तीकडून 31 मतदार कार्ड जप्त:तिघांवर गुन्हा दाखल, आनंद शाळेत बोगस‎मतदान, सेनेचा आरोप‎

सावेडीच्या गुलमोहोर रोडवरील आनंद शाळेजवळ मनपा निवडणुकीच्या मतदानासाठी आलेल्या दोघा जणांना शिवसेनेच्या उमेदवाराने पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच, जवळच असलेल्या पारिजात चौकातून एका व्यक्तीकडून ३१ मतदार कार्ड शिवसेनेच्या कार्यकर्त्याने काढून घेतले. यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी मतदार कार्ड जप्त करून दोघांना ताब्यात घेतले. शिवसेना उमेदवार चंद्रकांत उर्फ काका शेळके यांच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश कुंडलीक शेकडे (वय ३४, रा. म्हसोबाची वाडी, ता. आष्टी, जि. बीड) व सतीश नवनाथ शेकडे (रा. म्हसोबाची वाडी, ता. आष्टी, जि. बीड) यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद शाळेत मतदान उत्साहात सुरू असताना मतदानासाठी आलेल्या दोघांना शिवसेना उमेदवाराने हटकले. त्यांना पत्ता विचारला असता मतदाराला तो सांगता आला नाही. तसेच, जवळच चौकातून एका अनोळखी व्यक्तीकडून मतदार कार्ड हिसकावून घेण्यात आले. त्याला पकडण्याच्या आतच तो पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 8:07 am

गावाच्या विकासात सहकार्यासाठी श्रमसंस्कार शिबिरांची आज गरज

सध्याची तरुण पिढी सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेली आहे, त्यांच्या मन व मेंदूला बळकटी मिळायला हवी. गावाच्या विकासात सहकार्य करण्यासाठी श्रमसंस्कार शिबिरे असतात. वृक्ष कायम दात्याची भूमिका निभावत असतात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे या विंदा करंदीकर यांच्या कवितेचा दाखला देऊन तरुणाईने समाजासाठी उतराई होण्याचे याप्रसंगी आवाहन केले. युवा पिढीकडून समाजाची खूप मोठी अपेक्षा आहे. युवा पिढीने ठरवले तर गावाचाच नव्हे तर देशाचा सुद्धा चेहरामोहरा बदलू शकतो, असा विश्वास दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी व्यक्त केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व दादा पाटील महाविद्यालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर १५ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत कर्जत तालुक्यातील पठारवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य संजय नगरकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पठारवाडीचे ग्रामस्थ मोहन शिंदे तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पासाहेब धांडे, पठारवाडी गावचे सरपंच शरद यादव, नितीन तोरडमल, विजूकाका तोरडमल आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात मोहन शिंदे यांनी एनएसएस शिबिरार्थींना पठारवाडी गावाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. युवा पिढीचा आमच्या गावासाठी मोठा हातभार लागणार असल्याचा आनंद त्यांनी याप्रसंगी व्यक्त करून महाविद्यालय राबवित असलेल्या शिबिराबद्दल धन्यवाद व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास भोसले यांनी तर आभार डॉ. कैलास रोडगे यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 8:07 am

वधू-वर मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद समाजाचा आनंद द्विगुणित करणारा- आगळे

राज्यस्तरीय वधू-वर मेळाव्याला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा लोहार समाज बांधव व भगिनींसाठी आनंद द्विगुणित करणारा आहे, असे या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष प्रा हर्षल आगळे यांनी सांगितले. अखिल लोहार समाज विकास संघ, लोहार यूथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य व अहिल्याननगर जिल्ह्यातील लोहार समाज बांधवांच्या वतीने नुकताच शहरातील लक्ष्मी नारायणमंगल कार्यालयात राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल स्वागताध्यक्ष प्रा. आगळे यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, या मेळाव्याची विशेष उपलब्धी म्हणजे या मेळाव्यात राज्यभरातून सुमारे ३१० उपवर वधूंची नोंदणी झाली तर सुमारे ७५ उपवर-वधू यांनी आपला परिचय करून देत आपल्या भावी जोडीदाराबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या. या मेळाव्यात रेशीमगाठ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. आजच्या गतिमान व स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या करिअर,नोकरी व व्यवसायात व्यस्त आहे.त्यामुळे पूर्वी प्रमाणे समाजात सर्वस्तरावर सखोल परिचय होणे शक्य नाही. आजच्या काळात वधू-वर परिचय मेळावा घेणे ही आगामी काळाची गरज आहे. अशा मेळाव्यामुळे राज्यातील तसेच सर्व जिल्ह्यातील जास्तीत जास्त विवाह इच्छुक युवक-युवतींची माहिती एकत्रितपणे व एकाच मंचावर,एकाच ठिकाणी प्रत्यक्ष मिळत आहे. त्यामुळे समाज बांधवांचा वेळ,पैसा व श्रम वाचून कठीण कार्य होण्यास मदत होईल. या मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद ही समाजाकरिता गौरवाची व अभिमानास्पद बाब आहे. मेळाव्यासाठी परिश्रम घेणाऱ्या अखिल लोहार समाज विकास संघ, लोहार यूथ फाऊंडेशन महाराष्ट्र व जिल्ह्यातील लोहार समाज बांधवांचा मी आभारी आहे, असे स्वागताध्यक्ष प्रा. आगळे म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 8:06 am

विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने:विशाल जुन्नर फार्मसी''चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात, पुष्प सजावट स्पर्धेला प्रतिसाद‎

विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च आळे या महाविद्यालयांचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन बाळेश्वर शिक्षण व शेती विकास संस्थेचे संस्थापक डॉ. शिवाजीराव पोखरकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांच्या नृत्य, गायन, एकपात्री अभिनय, नाटक, फॅशन शो अशा रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. ११ ते १३ डिसेंबर २०२५ दरम्यान झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करताना प्रमुख पाहुणे म्हणून मनोज हाडवळे व कुलदीप मोरे उपस्थित होते. ३ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या पुष्प सजावट स्पर्धेने कार्यक्रमाला वेगळीच कलात्मक उंची दिली. यावेळी प्रसिद्ध हास्य कलाकार दिव्येश शिरवडकर यांच्या विनोदी सादरीकरणाने सभागृहात हास्याची लाट उसळली. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, उपाध्यक्ष दिनेश पाडेकर, सचिव विजय पारखे, खजिनदार शिवाजीराव बांगर, संचालक लक्ष्मण कोरडे, महेंद्र शिंदे, विक्रांत काळे, माजी अध्यक्ष अशोक सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दुष्यंत गायकवाड, प्राचार्य डॉ. सुरेश जाधव, प्राचार्या डॉ. रूपाली हांडे आदी उपस्थित होते. प्राचार्या डॉ. रूपाली हांडे यांनी महाविद्यालयाचा वार्षिक शैक्षणिक अहवाल सादर केला तर संचालक लक्ष्मण कोरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘विशाल फार्मोत्सव २०२५-२६’ ची जनरल चॅम्पियनशीप जी. बी. फार्मसी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पटकावत उपस्थितांकडून दाद मिळवली. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. तर उर्वरित सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाचा रंग अधिक गडद केला. महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाला नागरिकांचीही उपस्थिती होती. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, एकपात्री अभिनय, नाटक, फॅशन शो असे विविध कलाविष्काराचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सादरीकरणाला मिळाली दाद दरम्यान, महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाला नागरिकांचीही उपस्थिती होती. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, एकपात्री अभिनय, नाटक, फॅशन शो असे विविध कलाविष्काराचे सादरीकरण करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 8:05 am

विद्यार्थ्यांनी समाजाशी जोडले जावे:हीच रासेयो'ची खरी भावना: फराटे

श्रम आणि संस्कार हे दोन शब्द आपल्या जीवनाचा पाया आहेत. विद्यार्थ्यांनी समाजाशी जोडले जावे, हीच राष्ट्रीय सेवा योजनेची खरी भावना आहे, असे प्रतिपादन संस्थेच्या सचिव मृणाल फराटे पाटील यांनी केले. फराटे कॉलेज ऑफ फार्मसी, निर्वी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित सात दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप समारंभ निर्वी येथे उत्साहात पार पडला. याप्रसंगी संस्थेच्या सचिव फराटे पाटील बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन सुरेखा बंडू सोनवणे होत्या. कार्यक्रमास माजी सरपंच तात्यासाहेब सोनवणे, विद्यमान सरपंच भाग्यश्री बुऱ्हाडे, माजी सरपंच मनीषा पवार, उपसरपंच प्रियंका माळवदकर, माजी उपसरपंच निलेश सोनवणे, तसेच ग्रामपंचायत सदस्य, प्राचार्य डॉ. हेमंत कांबळे, प्राचार्य प्रवीण कुरुमकर, प्राचार्य डॉ. विवेक सातपुते, प्राचार्य संदीप कोकरे प्रा. अहिवाळे, कार्यक्रम अधिकारी जयराम पवार, ऋषिकेश पवार, विशाल चव्हाण, वृषाली शेलार, सुप्रिया वागस्कर, इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरादरम्यान ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, झाडांना रंगरंगोटी, प्रभातफेरी, पथनाट्य, मेडिकल कॅम्प तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्रामविकासाची जाणीव, सामाजिक भान, शिस्त व कष्टाचे महत्त्व रुजल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. समारोपावेळी स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत शिबिरातील अनुभव कथन केले व ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमळ आदरातिथ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. रमेश शितोळे यांनी, तर आभार प्रा. जयराम पवार यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 8:05 am

बंदी असताना प्लास्टिक मांजांचा सर्रास वापर 2 सराटी पक्ष्यांचा मृत्यू:तर एक घुबड जखमी, बंदी असलेला मांजामुळे पक्षी धोक्यात, बंदी असलेल्या मांजाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष‎

मकर संक्रांतीला पतंगप्रेमींनी आनंदोत्सव साजरा करून, ‘काटा, काटी’ स्पर्धेचा थरार अनुभवला. पण काही पतंगप्रेमींनी बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर केल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत झाडांवर तसेच वीजवाहक तारांवर मांजा व पतंग लटकलेले आहेत. या मांजांत अडकून दोन सराटी जातीचे पक्ष्याचा मृत्यू झाला आहे. तसेच एक घुबड सतर्कतेमुळे बचावले. 'नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल'ने (एनजीटी) नायलॉन किंवा काचयुक्त (सिंथेटिक) मांजाच्या विक्री, उत्पादन आणि वापरावर बंदी घातली आहे. परंतू, या माजांच्या नियंत्रणासाठी पोलिस प्रशासन वगळता वनविभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठोस पावले उचलली नाहीत. दरवर्षी या मांजामुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर येतात. यंदाही शहरात मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या मांजाचा वापर करण्यात आला. काटाकाटीच्या स्पर्धेत कटलेल्या पतंगाबरोबर, आलेला मांजा वीजवाहक तारा, तसेच झाडांमध्ये अडकला आहे. आकाशात मुक्त भरारी घेणाऱ्या पाखरांना तसेच झाडावर बसलेल्या पाखरांनाही इजा पोहोचली आहे. नेचर लव्हर्स क्लब, अहिल्या नगर बर्डिंग पाल्स व अहिल्या नगर बर्ड रेस्कयू सेंटर, आरण्य फाउंडेशन व नगर ट्रेकर्सने मांजामुळे जखमी पक्ष्यांवर उपचार करणे व बचावासाठी प्रयत्न सुरू केले. मंदार साबळे, जिल्हा मानद वन्यजीव रक्षक. अन्नसाखळीला बाधा, मनपाने मोहीम घ्यावी अन्नसाखळी पक्ष्यांचे स्थान महत्त्वपूर्ण असून, ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत. पिकांना हानिकारक किटक, अळ्यांना पक्षी खाऊन, नियंत्रणात ठेवतात. दुर्दैवाने बंदी असूनही मांजाचा वापर वाढल्याने पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. मनपाने तातडीने शहरभरातील विजेच्या तारा व झाडावर अडकलेला मांजा काढण्याची मोहीम हाती घ्यावी, तशी मागणी मी आयुक्तांकडे करणार आहे. झाडावरच्या मांजात घुबडाचे पाय, पंख अडकले ^ धर्माधिकारी मळा येथे कढीपत्त्याच्या झाडांत अडकलेल्या मांजात एक घुबड अडकून जखमी झाले. या मांजाच्या गुंत्यात त्याचे पाय व पंख अडकले होते. काही वेळाने निसर्ग मित्र येथे आले. त्यांनी घुबडाची मांजातून सुटका केली. पण त्यात घुबड जखमी झाले. या मांजावर बंदी असायला हवी. विशाल फणसे, प्रत्यक्षदर्शी.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 8:04 am

उत्कृष्ट आरास; श्रीराम गणेश मंडळाला प्रथम क्रमांक:विसपुते वाचनालयाच्या आकर्षक, कल्पक व कलात्मक देखावे स्पर्धेचे पारितोषिक वितरण‎

शहरातील गणेशोत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध व कलात्मक व्हावा या उद्देशाने कै. बळवंत विष्णू विसपुते सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य गणेश आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमुळे शहरातील गणेश मंडळांमध्ये सर्जनशीलता, सांस्कृतिक जतन व पर्यावरणपूरक सजावटीला चालना मिळाली असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ग्रामीण उन्नती मंडळ, एरंडोलतर्फे चालवण्यात येणाऱ्या विसपुते सार्वजनिक वाचनालयाच्या पुढाकाराने आयोजित या स्पर्धेत शहरातील विविध गणेश मंडळांनी अत्यंत आकर्षक, कल्पक व कलात्मक देखावे सादर केले. उत्कृष्ट गणपती आरास सादर करणाऱ्या मंडळांमधून प्रथम क्रमांक श्रीराम गणेश मंडळ, द्वितीय क्रमांक सर्वोदय गणेश मंडळ तर तृतीय क्रमांक नम्रता गणेश मंडळ यांनी पटकावला. विजेत्या मंडळांना ढालीच्या स्वरूपात आकर्षक पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमुळे गणेशोत्सव केवळ उत्सव न राहता सामाजिक प्रबोधन, पर्यावरण संवर्धन व कलात्मक अभिव्यक्तीचे माध्यम ठरत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष सचिन विसपुते, सचिव अंजुषा विसपुते, नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, नगरसेवक मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी गणेश मंडळांच्या उपक्रमांचे कौतुक केले. अशा स्पर्धा सामाजिक सलोखा व सांस्कृतिक परंपरेच्या जतनासाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. या स्पर्धेचे परीक्षण अमोल वाणी, एस. एस. पाटील, आनंद ठाकूर यांनी केले. तर ग्रामीण उन्नती मंडळ व सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सर्व सहभागी गणेश मंडळे, परीक्षक व नागरिकांचे आभार मानण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:47 am

इगतपुरी नगरपरिषेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे (अ प गट) शिरोळे अविरोध:स्विकृत नगरसेवकपदाच्या 2 जागांसाठी 5 जणांचे अर्ज, त्रुटीमुळे सर्व अर्ज बाद‎

येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंगेश शिरोळे यांची गुरुवारी अविरोध निवड करण्यात आली. तर स्विकृत नगरसेवकपदाच्या २ जागांसाठी ५ जणांचे अर्ज आले होते मात्र अर्जात त्रुटी असल्यामुळे पाचही जणांचे अर्ज बाद झाले. दरम्यान, उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत मंगेश शिरोळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यावर सुचक म्हणून राजेंद्र जावरे यांनी तर अनुमोदक म्हणून आशा भडांगे यांनी सही केली होती. यावेळी नगरपरिषदेच्या सभागृहात नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा पार पडली. व्यासपिठावर नगराध्यक्षा शालिनी खातळे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते फिरोज पठाण उपस्थित होते. या प्रसंगी सभागृहात सर्व नगरसेवक व नगरसेविका यांच्यासह शिवसेनेचे युवानेते संजय खातळे, शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष वसीम सैय्यद आदी उपस्थित होते.उपनगराध्यक्ष यांच्या निवडीची घोषणा झाल्यानंतर मंगेश शिरोळे यांच्या समर्थकांनी सभागृहाच्या बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. उपनगराध्यपदी मंगेश शिरोळे यांची अविरोध निवड झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना पदाधिकारी

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:38 am

लासलगावी नायलॉन मांजात अडकून घुबड जखमी:पक्षी मित्र पंकज आब्बड यांनी केली पक्षाची सुटका; पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार‎

शहरातील सर्वे नंबर ९३ येथे तुटलेली पतंग पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या बालकाच्या हाताच्या करंगळीला नायलॉन मांजामुळे गंभीर दुखापत झाली आहे. जवळपास १२ टाके पडले. शिवाय आनंद वर्मा (८) याने तुटलेली पतंग पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला नायलॉन मांजा असल्यामुळे डाव्या हाताची करंगळीला गंभीर दुखापत झाली. शिवाय वर्मा याला तातडीने कातकडे हॉस्पिटल येथे नेण्यात आले. १२ टाके टाकून करंगळी जोडण्यात आली. तर बुधवारी लासलगाव आणि विंचूर येथे दोन घटनांमध्ये शेतकरी गंभीर जखमी झालेले आहेत. प्रतिनिधी | लासलगाव पतंगांसाठी नायलॉन मांजा वापरण्यास बंदी असताना देखील सर्रासपणे नायलॉन मांजा वापरल्याने येथे मांजामध्ये अडकून घुबड गंभीर जखमी झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते व पक्षीमित्र पंकज आब्बड यांनी या अडकलेल्या घुबडाची सुटका करून त्याच्यावर उपचार केले आहे. शहरात मकर संक्रांतीच्या दिवशी कोटमगाव येथील शेतकरी गळ्यामध्ये मांजा अडकल्याने गंभीर जखमी झाले होते. हे प्रकरण ताजे असताना गुरुवारी किल्ल्यामध्ये असलेल्या एका झाडावर नायलॉन मांजामध्ये घुबड अडकून मोठ्या प्रमाणात जखमी झाले होते. याच परिसरात वास्तव्यास असलेले पंकज आब्बड यांनी शेर मोहम्मद रंगरेज, राजेश आब्बड यांनी जवळपास एक तास अथक परिश्रम करत या घुबडाची सुटका केली. घुबडाच्या पंखांना मोठ्या प्रमाणात जखम झालेली आहे. गंभीर जखमी झालेल्या घुबडाला लासलगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन त्यावर उपचार करण्यात आले. एक दिवस उपचार करून उडण्या योग्य झाल्यास त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे, किंवा उडता न आल्यास वनविभागाच्या ताब्यात दिले जाणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:37 am

कर्दमऋषींचं कर्दमाश्रम असलेले करंजी (आंबेवणी):दत्तात्रेय प्रभूंचे आजोळ म्हणून परिचित; प्रतिगाणगापूर म्हणूनही क्षेत्राची ओळख‎

दिंडोरी तालुक्यातील करंजी (आंबेवणी) हे कर्दमऋषींच्या आश्रमामुळे आणि दत्तात्रेय प्रभूंचे आजोळ म्हणून ओळखले जाणारे आध्यात्मिक व निसर्गरम्य गाव आहे. श्री क्षेत्र करंजी हे कर्दमऋषी व दत्तात्रेय प्रभूंच्या माहात्म्यामुळे भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. ग्रामस्थांच्या माहितीनुसार, दंडकारण्यात ज्या भागात कर्दमऋषींनी तपश्चर्या केली त्या परिसरात करंजीची झाडे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे या परिसराला करंजी हे नाव पडले, तर आश्रम कर्दमाश्रम म्हणून ओळखला जाऊ लागला.दत्तात्रेय प्रभूंचे आजोळ म्हणून हा परिसर पुरातन काळापासून गाव करंजी (आंबे वणी) जगातील एकमेव पद्मासन स्थित स्वयंभू श्री दत्तात्रेय मूर्ती व श्री क्षेत्र करंजी येथील मंदिर करंजी (आंबेवणी) हे कर्दमऋषींचा आश्रम असलेले गाव आहे. दत्तात्रेय प्रभूंचे आजोळ म्हणून या क्षेत्राला विशेष महत्त्व आहे. येथे पद्मासनातील त्रिमुखी दत्तमूर्ती असून गंगास्थान व घाट भाविकांचे मुख्य आकर्षण आहे. दत्त जयंती आणि महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी येतात. परिचित आहे. दशनाम जुना आखाड्यातील साधू-महंत कुंभमेळ्याच्या काळात येथे वास्तव्यास येतात. कर्दमाश्रमात काशीची गंगा अवतरल्याची श्रद्धा असून पर्वणीच्या काळात हजारो भाविक गंगामाईत स्नानासाठी येथे येतात. त्यामुळे या क्षेत्राला प्रतिगाणगापूर असेही म्हटले जाते. करंजी येथे दत्तात्रेय प्रभूंची पद्मासनातील त्रिमुखी मूर्ती आहे. दत्तप्रभूंनी आपल्या आजोळी ज्ञानसाधना केल्यामुळे ही मूर्ती पद्मासनात असल्याचे सांगितले जाते. येथे स्वामी शिवदयाळ गिरी व रामचंद्र महाराज यांच्या समाधी आहेत. देवस्थानतर्फे विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा, भाविकांसाठी भक्तनिवास, गोशाळा चालविली जाते. दत्त जयंती व महाशिवरात्रीला भाविकांची गर्दी होते.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:33 am

वाळू उपशावरून पाचोड पोलिस अन् महसूल विभागात जुंपली‎:हिरडपुरी, तुळजापुरातील उपशावरून वाद, वाळूला पोलिसांची परवानगी

तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून महसूल व पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे. पाचोड पोलिसांनी हिरडपुरी, तुळजापूर येथे वाळू उपशाला तोंडी परवानगी दिल्याचे महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तर आम्ही कोण परवानगी देणारे, असा सवाल पाचोड पोलिसांनी केला आहे. यामुळे महसूल व पोलिस विभागात समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. हिरडपुरी, टाकळी, तुळजापूर या परिसरातून दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टर व हायवा वाहनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. मात्र, महसूल विभागाचे अनेक अधिकारी छत्रपती संभाजीनगरच्या निवडणूक कामकाजात व्यग्र आहेत. वाळूविरोधी पथक हे केवळ कागदावरच असल्याने महसूल बुडतो असे चित्र दाखवले जात होते. परंतु, हिरडपुरी व तुळजापूर येथे चक्क पाचोड पोलिसांनी तोंडी परवानगी दिल्याचा आरोप महसूलकडून होत आहे. हिरडपुरी, तुळजापूरसह परिसरातील गोदावरी नदीपात्रातून उपसा केलेली वाळू पाचोड पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून वाहतूक केली जाते. पण कारवाई होताना दिसत नाही. आम्ही परवानगी देणारे कोण? ः सपोनि पंडित आम्ही कारवाई करू : तहसीलदार पवार पाचोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अवैध वाळू उपशाबाबत पोलिसांनी तोंडी परवानगी दिली आहे का, याची चौकशी करण्यात येत आहे. आमच्या महसूलची टिम वाळूविरोधी कारवाई करणार आहे, अशी माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली. एकूणच महसूल व पोलिसांच्या टोळवाटोळवीत वाळू उपसा जोरात होत असल्याचे दिसून येत आहे. आम्ही तोंडी परवानगी देणारे कोण? आमच्यावर जसे आरोप केले जातात तसे आम्हीसुद्धा महसूलच्या अधिकाऱ्यांवर करू शकतोत. आमच्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. आमच्या हद्दीत जर वाळू उपसा होत असेल तर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पाचोडचे सपोनि सचिन पंडित यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:20 am

भावाने मारहाण केल्याने सिल्लोडमध्ये आत्महत्या:मृताच्या पत्नीची फिर्याद, चौघांवर गुन्हा दाखल‎

शेतीच्या व सामायिक विहिरीवरून पाणी भरण्याच्या कारणावरून शारीरिक मानसिक छळ करून वेळोवेळी मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून चौघांच्या विरोधात सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार राजू दुल्लत यांनी दिली. मृत संजय तानाजी दुधे यांची पत्नी रेखा दुधे यांनी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले की, त्या व त्यांचे पती शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. मागील सहा ते सात वर्षांपासून त्यांचे दीर राजू तानाजी दुधे व त्यांचे तीन मुले हे त्यांना व त्यांच्या पतीला नेहमी शेतीच्या व विहिरीवरून पाणी भरण्याच्या कारणावरून मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देत असत. अशाच धमकीसह बुधवारी (दि. १४) त्यांच्या पतीस त्यांचा दीर राजू तानाजी दुधे, त्याची पत्नी लता, मुले संदीप व राजू यांनी मारहाण केली. त्यानंतर घरी आल्यावर जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या त्रासाला कंटाळून संजय दुधे यांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली, अशा आशयाच्या तक्रारीवरून वरील चौघांच्या विरोधात संजय दुधे यांना आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे करीत आहेत. चारही आरोपी फरार या प्रकरणामधील संशयित चारही आरोपी फरार आहेत. या चौघांचाही पोलिस शोध घेत आहेत, रात्री उशिरापर्यंत कुणालाही अटक झाली नव्हती, अशी माहिती पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांनी दिली. मृतावर रात्री उशिरा सिल्लोडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:19 am

हार्वेस्टरमुळे आळंदला एकरभर तुरीचे खळे तासाभरात; मनुष्यबळावर तोडगा

फुलंब्री तालुक्यातील आळंद परिसरात यंदा खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर तुरीची लागवड झाली. सध्या तूर काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. यंदा शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी हार्वेस्टर यंत्राचा वापर करत आहेत. यामुळे वेळेची बचत होत आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिल्याने तुरीचे पीक जोमात आले. मात्र, काढणीच्या वेळी मजुरांची टंचाई जाणवत आहे. पूर्वी तूर कापल्यानंतर ती खळ्यावर आणून काठ्यांनी बडवून किंवा बैलांच्या साहाय्याने मळणी केली जात होती. या प्रक्रियेला वेळ आणि मेहनत अधिक लागत होती.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:18 am

गवळी शिवऱ्यात दिवसात दोनदा ‘महारुद्र’ची आरती:2 शतकांची परंपरा आजतागायत सुरू, महिला मंदिरासमोरून चप्पल घालून जात नाहीत‎

गंगापूर तालुक्यातील आराध्यदैवत असलेल्या श्रीक्षेत्र गवळी शिवरा गावातील स्वयंभू असलेल्या महारुद्र मारुती मंदिराची आख्यायिका पुरातन काळापासून चालत आलेली आहे. येथे अखंडित दररोज सकाळी सहाला आणि सायंकाळी सहाला अशा दोन वेळा सातत्याने गावकरी भाविकांच्या उपस्थितीत महाआरती व हनुमान चालिसा पठण होते. विशेष म्हणजे महारुद्र मारुतीच्या मूर्तीला आजतागायत महिलांचा स्पर्शही झालेला नाही तसेच तब्बल दोन शतकांपासून महिला येथील मंदिरासमोरून कधीच चप्पल घालून गेलेल्या नाहीत, हातात चप्पल घेऊन गावाच्या बाहेर निघाल्यावर पायात चप्पल घालतात, ही परंपरा आजही गावाने जपलेली आहे. २०१६ साली धर्मदाय आयुक्तांकडून झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यास महारुद्र मारुती संस्थानने योगदान दिले होते. श्रावणात मंदिरातर्फे विशेष करून रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आयोजित केले जातात. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर प्रशासनाने १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्याचबरोबर भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध आरओ प्लँट, राहण्यासाठी भक्तनिवास आहे. प्रसिद्ध : महारुद्र मारुती मंदिर जिल्हाधिकारी कार्यालयापासून अंतर 5000 वेगळेपण : गावात मोठे धरण आहे. टोमॅटो मार्केट, भाजीपाल्याचे गाव म्हणून ओळख. कनेक्टिव्हिटी : नागपूर - मुंबई हायवे, जवळच समृद्धी महामार्गही. पाच कोटींपर्यंत निधी : जिल्ह्यात जागृत देवस्थान म्हणून महारुद्र मारुतीच्या मंदिराची ओळख आहे. नुकतेच श्री महारुद्र मारुती मंदिराला तीर्थक्षेत्राचा ब दर्जा मिळाला. देवस्थानाच्या विकासासाठी आता टप्प्याटप्प्याने पाच कोटींपर्यंत निधी येईल.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:18 am

ज्ञान दिल्यामुळे वाढते, अंतःकरण शुद्ध ठेवा- महंत गणेशानंद महाराज:मकरसंक्रांत, एकादशीनिमित्त मेहेगाव येथील भगवानगडावर प्रवचन‎

मकर संक्रांत आणि एकादशी निमित्त कन्नड तालुक्यातील भगवान गड, मेहेगाव (वासडी) येथे प्रवचनाचा कार्यक्रम झाला. महंत गणेशानंद महाराज शास्त्री यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘संत तुकाराम महाराजांनी ज्ञानाचे महत्त्व पहिल्याच चरणात सांगितले आहे. ज्ञान कधीच संपत नाही. व्यवहारातील वस्तू दिल्यावर कमी होतात. पण ज्ञान दिल्यावर वाढते’’. तुमच्याकडे एक लाख रुपये असतील आणि ते एखाद्याला दिले, तर खिसा रिकामा होतो. पण ज्ञान दिल्यावर ते वाढत जाते. ज्ञान स्वीकारायचे असेल, तर अंतःकरण शुद्ध असणे गरजेचे आहे. प्रपंचात सुख हवे असेल, तर गडावर सेवा करावी. देणाऱ्याचे हात हजार असतात. त्यासाठी सेवाभाव ठेवणे आवश्यक आहे. सेवा केल्यानंतर त्याचा मेवा नक्की मिळतो. जेव्हा अंतःकरणात सेवाभाव निर्माण होतो, तेव्हा त्यातून आनंद मिळतो. येथे दिल्याने त्याची वाढ होते. अन्न शुद्धीसाठी अन्नदान करावे. प्रपंचात किती कमावले, याला अर्थ नाही. दान, धर्म आणि सेवा हेच कायम आपल्याबरोबर राहतात. भगवंताशिवाय मृत्युलोकातून कोणीही सुटू शकत नाही. गड सर्वांचा आहे. तो माझा एकट्याचा नाही. नाम फुकट आहे. त्यासाठी अंतःकरण शुद्ध असावे लागते, असा हितोपदेशही महाराजांनी दिला. एकादशीनिमित्त फराळ दान करण्यात आले. राहुल आनंद सोनवणे आणि भावलाल कोडीबा डिघोळे यांनी हे दान केले.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:17 am

वेरूळ घाटात ऊस वाहतूक धोकादायक; अपघातांचा धोका वाढला:सतत कोंडी, वाहतुकीमुळे पर्यटकांचा जीव धोक्यात, कारवाई करण्याची मागणी‎

वेरूळ ते खुलताबाद घाट रस्ता ऊस वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. मुख्य वेरूळ गावापासून खुलताबाद घाटापर्यंतचा वळण रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावरून दोन ट्रॉल्या जोडलेले ट्रॅक्टर जातात. चढ-उतार, तीव्र वळण आणि भरलेली ट्रॉली यामुळे ट्रॅक्टरचे पुढचे चाक हवेत उचलले जाते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. वेरूळ, खुलताबाद, कन्नड, गदाना, टापरगाव, आलापूर, अंतापूर, केसापूर, गल्लेबोरगाव, पळसवाडी या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा काढणी हंगाम सुरू आहे. त्यामुळे दररोज डबल ट्रॉली ट्रॅक्टर घाटातून जात आहेत. सोमवारी एका ट्रॅक्टरला दुसऱ्या ट्रॅक्टरने टोचन करून घाट चढवण्यात आला. या वेळी पर्यटक आणि वाहनचालकांचा जीव धोक्यात आला. वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरात विदेशी पर्यटकांची वर्दळ असते. याच मार्गावरून अवजड ट्रॅक्टर जात असल्याने अपघात होत आहेत. चांगोबा वळणावर ट्रॅक्टर पलटी होणे, ट्रॉली घाटात उतरणे हे प्रकार रोजचे झाले आहेत. एका युवकाचा पाय ट्रॉली तुटल्याने चिरडला गेला आहे. पोलिस प्रशासनाने रात्री ९ ते सकाळी ५ दरम्यान ट्रॅक्टर वाहतूक थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही ट्रॅक्टरचालक आणि कारखाने आदेश पाळत नाहीत. त्यामुळे पर्यटकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. नागरिकांनी सहकारमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:15 am

आजही राजमाता जिजाऊंच्या विचारांची गरज- वहाटुळे:आमठाणा येथील न्यू हायस्कूलमध्ये जयंती साजरी‎

हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी परिश्रम घेतले. आजच्या आधुनिक काळातही राजमाता जिजाऊ यांच्या विचारांची खरी गरज आहे, असे प्रतिपादन चित्तेपिंपळगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलचे पर्यवेक्षक कडुबा वहाटुळे यांनी केले आहे. सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील न्यू हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त पर्यवेक्षक कडुबा वहाटुळे होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक साईनाथ सोमवंशी, गायकवाड होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा परिधान केली होती. यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे कडुबा वहाटुळे म्हणाले की, न्यू हायस्कूलशी माझे भावनिक नाते आहे. या शाळेवरच पहिल्यांदा माझी नियुक्ती सर्वप्रथम झाली होती. येथून सुरू झालेला शैक्षणिक प्रवास चित्तेपिंपळगाव येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या पर्यवेक्षक पदापर्यंत पोहोचलो. मला या शाळेत आयुष्याची सुरुवात आणि सेवानिवृत्तीनंतर येण्याचा मिळालेला मान हा दुग्धशर्करा योग आहे. कुठेही जा पण आपली सुरुवात व शेवट कधीही विसरू नका, असे भावनिक आवाहनही वहाटुळे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले. या वेळी शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:15 am

छत्रपती संभाजीनगर मनपासाठी सकाळी 10 वाजता सुरू होणार मतमोजणी:दुपारी तीन वाजेपर्यंतच होणार चित्र स्पष्ट, मतमोजणीमुळे विट्स हॉटेल ते गाडे चौक अन् पीर बाजार रस्ता आज बंद

महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानानंतर आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत. शुक्रवारी (१६ जानेवारी) सकाळी ९ वाजता एकाच वेळी २९ प्रभागांच्या मतमोजणीच्या प्रक्रियेला प्रारंभहोणार आहे. प्रशासनाने यासाठी चोख बंदोबस्त तैनात केला असून दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत सर्व प्रभागांचे अधिकृत निकाल हाती येतील, असा अंदाज आहे. नियोजनाचे स्वरूप सुरुवातीला पोस्टल बॅलेटची (टपाली मतदान) मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू केली जाईल. प्रत्येक प्रभागासाठी ८ ते २१ टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून ९ निवडणूक निर्णय अधिकारी यावर देखरेख करतील. प्रभाग १८ मध्ये सर्वात कमी ६ फेऱ्या असल्याने तिथला निकाल सर्वात आधी लागण्याची शक्यता आहे, तर प्रभाग ६ आणि १४ मध्ये सर्वाधिक २६ फेऱ्या होतील. मतमोजणीची चार केंद्रे गरवारे स्टेडियमः प्रभाग १, ७, ८, ९, १०, ११, २३, २४, २५.शासकीय तंत्रनिकेतन : प्रभाग १५, १६, १७, २६, २८, २९.शासकीय अभियांत्रिकी : प्रभाग २१, २२, २७, १८, १९, २०,सेंट फ्रान्सिस हायस्कूलः प्रभाग ३, ४, ५, ६, १२, १३, १४. (उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पडणार असून, मतमोजणीसाठी स्वतंत्र अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती. उस्मानपुरा आणि जालना रोड परिसरात बदल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (१६ जानेवारी) पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील उस्मानपुरा आणि जालना रोड परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रांवर होणारी गर्दी आणि कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी १६ जानेवारीला सकाळी ७ वाजेपासून मतमोजणी संपेपर्यंत काही मार्ग बंद करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश जारी केले आहेत. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय (उस्मानपुरा), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (उस्मानपुरा) आणि सेंट फ्रान्सिस स्कूल (जालना रोड) या तीन ठिकाणी मतमोजणी होणार आहे. यामुळे या भागात उमेदवारांचे कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक नियमन करण्यात आले आहे. वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग विट्स हॉटेलकडून येणाऱ्यांसाठी : विट्स हॉटेल चौक - कोकणवाडी चौक - गोपाल टी - उत्सव चौक - भाजीवाली बाई पुतळा चौक - पीरबाजार चौक - गाडे चौक मार्गे वाहने ये-जा करतील. बंद : सेव्हनहिल उड्डाणपूल (पूर्व बाजू) ते आकाशवाणी चौक रस्त्याची दक्षिण बाजू (जालना रोडवर अहिल्यानगरकडे जाणारा रस्ता). पर्यायी मार्ग जालना रोड व रेल्वे स्टेशनकडून: विट्स हॉटेल चौक - रेल्वेस्टेशन चौक - महानुभव चौक - एम.आय.टी. उड्डाणपूल - गोदावरी पुलाखालून - दर्गा चौक - भाजीवाली बाई पुतळा चौक - पिरबाजार चौक - गाडे चौक तसेच उत्सव चौक मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:10 am

नवी मुंबईत 70 वर्षीय वनमंत्र्यांचे यादीत नाव सापडेना:4 केंद्रांच्या फेऱ्यानंतर केले मतदान, निवडणूक आयोगाच्या कारभाराचा मंत्री गणेश नाईकांना बसला फटका

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत एका मतदाराला चार मते देण्याची पद्धत (प्रभाग पुनर्रचना) अवलंबल्याने मतदान केंद्रांमध्ये मोठे बदल करण्यात आले होते. यामुळे गुरुवारी मतदानाच्या दिवशी मोठा गोंधळ उडाला. खुद्द राज्याचे ७० वर्षीय मंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांनाही आपले नाव मतदार यादीत शोधण्यासाठी धावपळ करावी लागली. जर मंत्र्याला अशा अडचणी येत असतील, तर सामान्य मतदारांची काय अवस्था असेल, असा सवाल त्यांनी केला. यावरुन सर्वच स्तरातून प्रशासनावर टीका झाली. कुटुंबाची ताटातूट; एकाच घरच्या सदस्यांना ३ केंद्रे हा केवळ योगायोग नसून नियोजित कट असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. नाईक कुटुंबातील सर्व सदस्य ’बालाजी’ इमारतीत एकत्र राहतात, मात्र प्रशासनाने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे चक्क ३ वेगवेगळ्या केंद्रांवर विखुरली होती. “सामान्य मतदारांना मतदानापासून परावृत्त करण्यासाठीच हा तांत्रिक खेळ खेळला जात आहे का?” असा संतप्त सवाल नाईक यांनी उपस्थित केला. प्रशासकीय तमाशा : ४ केंद्रे बदलली, पण नाव मिळेना गणेश नाईक सर्वात आधी प्रभाग ९४ मधील मनपा शाळेत गेले, तिथे नाव नसल्याने त्यांना राघो नाईक विद्यालयात धाडण्यात आले, तिथेही नाव नसल्याने नंतर प्रशासनाने त्यांना “सेंट मेरी स्कूल’चा रस्ता दाखवला. तिथे ज्या रूम नंबर ९’ मध्ये त्यांचे नाव असल्याचे सांगितले होते, ती रूमच त्या शाळेत अस्तित्वात नव्हती. मंत्र्याला अशा प्रकारे वाऱ्यावर सोडणे, हा प्रशासनाचा घोर बेजबाबदारपणा आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:01 am

जळगावात हजेरी लावून मतदारांना पैसे वाटप:रिक्षाचालकावर साेपवली हाेती जबाबदारी, आधी नोंदणी, नंतर बोटावरची शाई तपासून दिली रोकड, व्हिडिओ पुरावे उघडकीस

निवडणुकीच्या धामधुमीत जळगाव शहराच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सुप्रीम कॉलनी परिसरात मतदानाचे एक अतिशय धक्कादायक चित्र समोर आले. एका उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी चक्क एखाद्या शाळेतील वर्गाप्रमाणे मतदारांची हजेरी घेऊन, रजिस्टरमध्ये नोंद करून लक्ष्मीदर्शन घडवल्याचा प्रकार उघडकीस आला. याचे व्हिडिओ पुरावेही ‘दिव्य मराठी’कडे उपलब्ध झाले आहेत. सुप्रीम कॉलनीतील या प्रभागात पैसे वाटपात कोणतीही चूक होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी आगळीच शक्कल लढवली होती. या प्रक्रियेत सर्वप्रथम मतदारांना एका रिक्षात बसवले जात असे. त्यानंतर एक कार्यकर्ता मतदारांकडील मतदान चिठ्ठ्या गोळा करून त्यांची एका स्वतंत्र रजिस्टरमध्ये सविस्तर नोंद करत होता. नोंद पूर्ण झाल्याची खात्री करण्यासाठी तो कार्यकर्ता प्रत्येक मतदाराचे नाव मोठ्याने पुकारून त्यांची हजेरी घेत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे. हजेरी पूर्ण झाल्यानंतर दुसरा एक कार्यकर्ता खिशातून ५०० रुपयांच्या नोटांची गड्डी काढून मतदारांच्या संख्येनुसार पैसे रिक्षाचालकाच्या ताब्यात देत असे. मात्र, हे पैसे मतदारांना लगेच न देता, त्यासाठी एक अट घालण्यात आली होती. या सर्व मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केल्यानंतर त्यांच्या बोटावरची शाई नीट तपासूनच त्यांना पैसे दे असा दम कार्यकर्त्यांनी रिक्षाचालकाला दिला होता. कार्यकर्त्यांच्या आदेशानुसार रिक्षाचालकाने होकारार्थी मान हलवत पैसे खिशात टाकले आणि रिक्षा थेट मतदान केंद्रावर नेली. केंद्रावर मतदारांनी ठरल्याप्रमाणे बोटावरची शाई दाखवल्यावरच त्यांना रोख रक्कम वाटण्यात आली. मतदार याद्यांचा मोठा गोंधळ प्रभाग क्रमांक ३ आणि १६ मध्ये मतदार याद्यांचा गोंधळ समोर आला. प्रभाग रचनेतील तांत्रिक त्रुटी आणि भौगोलिक सीमांमुळे मतदारांची गोची झाली असून, यामुळे अनेक कुटुंबांमध्ये विभागणी झाल्याचे पाहायला मिळाले. प्रभाग ३ आणि १६ एका रस्त्याने विभागले गेल्याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एकाच कुटुंबातील काही सदस्यांची नावे प्रभाग १६च्या यादीत, तर काहींची नावे प्रभाग ३ च्या मतदार यादीत आढळली. प्रभाग क्रमांक १५ मध्ये अनपेक्षित घडामोडींमुळे तणाव सेंट लॉरेन्स शाळेच्या गल्लीत सकाळपासूनच उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या ताफ्यांची मोठी वर्दळ होती. मात्र, सायंकाळच्या सत्रात या परिसरात अनपेक्षित घडामोडींमुळे तणाव निर्माण झाला. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सेंट लॉरेन्स शाळेच्या केंद्रावर अचानक ३०० ते ४०० मतदारांची गर्दी उसळली. या गर्दीतूनच उमेदवारांच्या समर्थकांवर गंभीर आरोप करण्यात आले. रिक्षा उभी करून पैसे वाटप प्रभाग क्रमांक १६मध्ये आचारसंहितेचे धिंडवडे उडवणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका उमेदवाराने चक्क मतदारांच्या रांगा लावून भररस्त्यात पैसे वाटप केले. त्याचे व्हिडिओ पुरावेही उपलब्ध झाले आहेत. दुपारी ४ वा. एका उमेदवाराने घराशेजारी गल्लीत एक रिक्षा उभी केली होती. रिक्षाच्या आडोशाने मतदारांना पैसे वाटले जात होते. पैसे घेणाऱ्यांची गर्दी वाढल्यामुळे तिथे रांगा लागल्या. पत्रकार आल्याचे लक्षात येताच उमेदवाराची भंबेरी उडाली. त्याने पैसे वाटणाऱ्या तरुणाला बाजूला सारले आणि काही काळासाठी वाटप थांबवले. पोलिसांचे गस्तपथकही दाखल झाले. पोलिस गाडी पाहताच मतदारांची गर्दी पांगवण्यात आली. मात्र, तोपर्यंत पैसे वाटपाचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. अरुंद गल्ल्यांत मतदारांची गर्दी प्रभाग क्रमांक १४ मध्ये तांबापुरातील अरुंद गल्ल्याचा भाग आहे. सकाळी ९ वाजेपासूनच तेथे मतदार तसेच उमेदवारांच्या प्रतिनिधींची लगबग सुरू झाली. थोड्याच वेळात काही विशिष्ट कार्यकर्त्यांच्या घरांत मतदार याद्यांनुसार उपलब्ध मतदारांना पैसे देण्याचे काम सुरू झाले. या वेळी एका गल्लीत शेकडो मतदार एकाच वेळी आल्याने प्रचंड गोंधळ उडाला. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधी या ठिकाणी पोहोचताच उमेदवार प्रतिनिधी दुचाकीवरून निघून गेले.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 6:59 am

आता ग्रामीणमधील वर्चस्वाच्या राजकीय लढाईला सुरुवात:जिल्हा परिषदेसाठी आजपासून रणधुमाळी सुरू

राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात ७३ गटातून जिल्हा परिषद सदस्य तर पंचायत समितीमधून १४६ सदस्य निवडीसाठी २९ लाख ७६ हजार ४५४ मतदार पात्र आहेत. शहरातील राजकीय वर्चस्वाचा फैसला शुक्रवारी होत असताना आता मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदांच्या वर्चस्वाची लढाई सुरु होत आहे. ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या १२ जिल्हा जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला. त्यात मराठवाड्यातील लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली तर कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे जिल्हा परिषदेसाठी प्रशासनाने तयारी केली असून १३ तालुक्यातून ३ हजार ६०५ मतदान केंद्रे तयार करण्यात येणार आहेत, २३ हजार ३७३ कर्मचारी एकूण निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात आहेत. ७ हजार ९३१ ईव्हीएम मशीन तर ३ हजार ९६६ युनिट कंट्रोल मशीन मतदान प्रक्रियेसाठी लागणार आहेत. प. महाराष्ट्रातील जिल्हा परिषद पक्षीय बलाबल पुणे : भाजप ७, राष्ट्रवादी ४४, शिवसेना १३, काँग्रेस ७, अन्य ४सोलापूर : भाजप १४, काँग्रेस ७, राष्ट्रवादी २३, शिवसेना ५, अन्य १९कोल्हापूर : भाजप १४, काँग्रेस १४, राष्ट्रवादी ११, शिवसेना १०, अन्य १८सातारा : भाजप ७, काँग्रेस ७, राष्ट्रवादी ३९, शिवसेना २, अन्य ९सांगली : भाजप २३, काँग्रेस १०, राष्ट्रवादी १४, शिवसेना ३, अन्य १० दोन्ही राष्ट्रवादी एकत्र ? नगरपालिका निवडणुकीत जिल्ह्यात मोठे यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे भाजपविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन अजित पवारांनी महापालिका निवडणूक लढवली. आता जिल्हा परिषद हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढणार आहेत. ग्रामीण भागातील वर्चस्व टिकवण्यासाठी हा निर्णय घेतला जात असल्याची माहिती पक्षातील सूत्राने दिली.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 6:57 am

डोक्यात दगड घालून लहान भावाकडून मोठ्या भावाचा खून:वसमतमध्ये व्यवहार मोठ्याकडे असल्याने द्वेषातून हत्या

वसमत तालुक्यातील रांजोना शिवारातील शेतात तरुणाचा खून झाल्याची घटना १५ रोजी सकाळी उघड झाली. घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटना उघड झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत गुन्ह्याची उकल केली. कुटुंबात मोठ्या भावालाच सर्वजण सन्मान देतात, व्यवहार त्याच्याकडे असल्याने द्वेषातून लहान भावानेच मोठ्या भावाचा डोक्यात दगड घालून खून केल्याचे स्पष्ट झाले. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले. नवनाथ साळवे असे मृताचे, तर गजानन साळवे असे संशयिताचे नाव आहे. रांजोना शिवारातील शेतात तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती हट्टा पोलिसांना डायल ११२ वरून मिळाली होती. सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, उपनिरीक्षक संजय केंद्रे यांच्या पथकाने सकाळी ७ वाजता घटनास्थळ गाठले. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेह रांजोना येथील नवनाथ साळवे याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या डोक्यात दगडाने वार करून खून केल्याचे दिसून आले. या प्रकरणी हट्टा पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणत असतानाच आरोपींची माहिती घेतली. पोलिसांनी मृत नवनाथ याचा लहान भाऊ गजानन साळवे याची चौकशी केली. त्याने खुनाची कबुली दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आपल्या भावाचा खून केल्यावर पुन्हा घरी येऊन शांत झोपला मृत नवनाथ हा शेतात झोपण्यासाठी गेला होता, तर संशयित गजानन व त्याचे आई, वडील रांजोना येथे घरी झोपले होते. मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास गजानन याने घराला बाहेरून कुलूप लावून शेतातील आखाडा गाठला. त्या ठिकाणी झोपेत असलेल्या नवनाथवर त्याने दगडाने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर पुन्हा घरी येऊन तो झोपी गेला.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 6:52 am

देशात रोज 136 स्टार्टअप सुरू होतायत, टियर 2-3 शहरांतील निम्मे:2025 हे स्टार्टअपचे वर्ष ठरले, 50 हजार नवीन स्टार्टअपची भर

वर्ष २०२५ मध्ये देशात ५० हजारांहून अधिक नवीन स्टार्टअप सुरू झाले. म्हणजेच सरासरी दररोज १३६ नवीन स्टार्टअप उघडले गेले. आता देशात २.०९ लाख नोंदणीकृत स्टार्टअप झाले आहेत. गेल्या स्टार्टअप नोंदणी काळात (जानेवारी, २०२५) देशातील स्टार्टअपची संख्या १.५९ लाख होती. गेल्या एका दशकातील ही सर्वात वेगवान वार्षिक वाढ आहे. ५२.६ टक्के स्टार्टअप हे मेट्रो शहरे नव्हे तर टियर-२ आणि टियर-३ शहरांमधील आहेत. ५० टक्के स्टार्टअपमध्ये किमान एक महिला संचालक आहे. त्यात त्या किमान बेबी प्रॉडक्ट्सपासून ते अवजड उद्योग यंत्रसामग्री बनवणाऱ्या संस्थांशी जोडल्या गेल्या आहेत. गेल्या एका दशकात स्टार्टअप्सनी देशभरात सुमारे २१ लाख नोकऱ्या निर्माण केल्या. म्हणजेच एका स्टार्टअपने सरासरी १० लोकांना थेट रोजगार दिला. गेल्या वर्षी केवळ ७ स्टार्टअप युनिकॉर्न (एक अब्ज डॉलर किंवा त्याहून अधिक मूल्य असलेली कंपनी) बनले. डीपीआयआयटीचे संयुक्त सचिव संजीव यांच्या मते, देशात गेल्या १० वर्षांत ६,३८५ स्टार्टअप बंद झाले आहेत. इकोसिस्टिम : आयपीओ आणण्यास कमी वेळ ओरिओस व्हेंचर पार्टनर्सनुसार, २०२५ मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झालेल्या २० स्टार्टअप्सनी हे यश १३.३ वर्षांत मिळवले. २०२४ मध्ये यासाठी सरासरी १३.४ वर्षे लागली होती. मात्र, २०२३ मध्ये मामाअर्थ व यात्रा यांनी १२.५ वर्षांतच शेअर बाजारात स्थान मिळवले होते. २०२२ व २०२१ मध्ये हा टप्पा गाठण्यासाठी १६ वर्षे लागली होती. म्हणजेच भारतीय स्टार्टअप कमी वेळात आयपीओसाठी तयार होत आहेत. एक दशक पूर्ण झाल्यानिमित्त आज कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी स्टार्टअप इंडिया उपक्रमाला एक दशक पूर्ण झाल्याच्या कार्यक्रमात सहभागी होतील. स्टार्टअपची सुरुवात १६ जानेवारी २०१६ ला झाली होती. फंडिंग: भारताच्या पुढे फक्त अमेरिका-ब्रिटन ट्रॅक्सनच्या अहवालानुसार स्टार्टअप्सनी २०२५ मध्ये ९४,५०० कोटी उभे केले. अमेरिका आणि ब्रिटननंतर भारत तिसरी सर्वात मोठी फंडेड स्टार्टअप इकोसिस्टिम बनून राहिला आहे. लाइफ स्किल: जीडीपीत १५% योगदान शक्य भारत ‘स्टार्टअप इंडिया’ कडून ‘आंत्रप्रेन्योरियल भारत’ कडे वाटचाल करत आहे. ‘द इंडस आंत्ररप्रेन्योर्स’च्या अहवालानुसार उद्योजकता (आंत्रप्रेन्योरशिप) हे एक आवश्यक जीवन कौशल्य म्हणून शिकवले गेले पाहिजे. २०३५ पर्यंत ७५% माध्यमिक शाळांमध्ये आणि ८०% उच्च शिक्षण संस्थांमध्ये याचा समावेश करणे आवश्यक आहे. असे झाल्यास स्टार्टअप्स जीडीपीत १५% योगदान देईल. राज्य एकूण स्टार्टअप बंदमहाराष्ट्र 34,444 1200कर्नाटक 20,330 845दिल्ली 19,273 737उत्तर प्रदेश 19,207 598गुजरात 16,805 348तामिळनाडू 13,105 338तेलंगण 10,804 368हरियाणा 10,295 306केरळ 7,768 241राजस्थान 7,103 211मध्य प्रदेश 6,493 180

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 6:45 am

निवडणुकीत लढले परस्परांविरुद्ध, मनपाच्या सत्तेसाठी येणार एकत्र:बहुमताची शक्यता नाही; शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात

महापालिकेच्या ११५ जागांसाठी मतदान संपल्यानंतर कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांना पुन्हा एकत्र यावे लागेल, असे चित्र आहे. दोन्ही पक्षांना एकत्र येऊनही बहुमतापर्यंत जाता आले नाही, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतली जाईल. महापालिकेच्या ११५ जागांपैकी जवळपास ३५ ते ४० जागांवर मुस्लिम मतदारांचे प्राबल्य आहे. त्यामुळे उर्वरित ७५ ते ८० जागांसाठी महायुतीमध्ये स्पर्धा होती. युती केल्यास आपल्या वाट्याला पुरेशा जागा येणार नाहीत. त्यामुळे शहरात मोठा पक्ष ठरण्याच्या उद्दिष्टाला सुरूंग लागू शकतो. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांना न्याय देता येणार नाही. त्यामुळे भाजप व शिंदेसेनेने युती तोडण्याचा निर्णय घेतला. त्यातून उद्धवसेना स्पर्धेत आल्याचे मानले जाते. हिंदू मतदारांचे प्राबल्य असलेल्या बहुतांश जागा शहराच्या पूर्व आणि दक्षिण भागांत आहेत. सिडको-हडको या पूर्व छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात चुरस होती. मात्र, मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीयांचे प्राबल्य असलेल्या भागात उद्धवसेनेचाही जोर होता. त्यामुळे मतविभागणीचा फटका तिन्ही पक्षांना बसू शकतो. मतदारांनी पॅनल तोडून क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चाही सिडको-हडकोत जास्त होती. आपल्या भागातले, आपल्या ओळखीचे, नातेसंबंध आणि जात यांच्या आधारावर मतदान करण्यात आले. अजित पवार गटाकडे लक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात ७८ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. १० ते १२ जागांवर पक्षाचे उमेदवार शर्यतीत असल्याचे मानले जाते. त्यातून ४ ते ६ जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मदत महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजप व शिंदेसेनेला होईल, असे मानले जाते. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शिवसेना, भाजपच्या विरोधात असलेली उद्धवसेनेकडे जाणारी मते आपल्याकडे वळवल्याचे मानले जाते. शिवसेना, भाजपची कामगिरी वर्ष एकूण जागा भाजप शिवसेना१९८८ ६० ०० २७१९९५ ८२ ०७ ३४२००० ८३ १६ २०२००५ ९९ २१ २६२०१० ९९ १५ ३०२०१५ ११५ २२ २८ दक्षिण शहरात मतदानात चुरस दक्षिण संभाजीनगरमध्ये शिवसेना व भाजप यांच्यात स्पर्धा तीव्र होती. त्याच वेळी उद्धवसेनेची ‘कमिटेड व्होटर्स’ भिस्त होती. दुपारी चार-साडेचारनंतर मतदारांची संख्या वाढली. त्यामुळे काही भागांत मतदान केंद्रांवर साडेपाचनंतरही रांगा होत्या. बहुतांश प्रभागांत हिंदू मतदारांचे प्राबल्य असले तरी मुस्लिम व मागासवर्गीयांच्या वसाहतीही आहेत. एमआयएमचे उमेदवार नाहीत. काँग्रेसचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे मुस्लिम मते उद्धवसेनेच्या पारड्यात जाण्याची शक्यता जास्त आहे. दक्षिण संभाजीनगरमधील काही प्रभागांत उद्धवसेना शर्यतीत येईल, असे मानले जाते. कार्यकर्त्यांच्या दबावाखाली तुटली युती महापालिकेची निवडणूक दहा वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येकी दोन निवडणुका झाल्या. या निवडणुकांत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून कष्ट उपसले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर झालेल्या निवडणुका प्रतिष्ठेच्या होत्या. त्या वेळी शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामामुळे युतीला यश मिळाले. या निवडणुकांत कार्यकर्त्यांना महापालिकेच्या उमेदवारीसाठी शब्द दिले होते. त्यामुळे मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कार्यकर्ते इरेला पेटले. त्यामुळे दोन्ही पक्षांवर स्वबळावर निवडणुका लढण्याची वेळ आली.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 6:36 am

अस्थिर इराण!

इराणमध्ये महागाई, सामाजिक असमानता आणि राजकीय अस्थिरतेमुळे नागरिक रस्त्यावर उतरले असून, देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे. डिसेंबर महिन्यात अमेरिकेने इराणवर लादलेल्या आर्थिक निर्बंधामुळे आणि इस्रायलविरुद्धच्या संघर्षामुळे देशात महागाई ४२ टक्क्यांनी वाढली असून सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा गंभीर परिणाम झाला आहे. आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच सरकारकडून निष्पाप आंदोलकांवर कठोर कारवाई […] The post अस्थिर इराण! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 1:29 am

राष्ट्राच्या शाश्वत विकासात युवकांची भूमिका महत्त्वाची

चाकूर : प्रतिनिधी राष्ट्राच्या विकासात युवकाची भूमिका महत्त्वाची असून आजचा युवकच आदर्श राष्ट्राची निर्मिती करू शकतो. युवाशक्ती ही परिवर्तन करणारी शक्ती असून, राष्ट्राच्या शाश्वत विकासात युवकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन गटविकासाधिकारी संतोष वांगवडे यांनी केले. संजीवनी महाविद्यालय चापोली व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन चाकूर तालुक्यातील […] The post राष्ट्राच्या शाश्वत विकासात युवकांची भूमिका महत्त्वाची appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 1:27 am

अपघातानंतर कार पेटली; शिक्षकाचा होरपळून मृत्यू

अहमदपूर : प्रतिनिधी अंबाजोगाई-अहमदपूर महामार्गावर लांजी पाटी परिसरातील पुलाजवळ भरधाव कार पुलाच्या कठड्यास जोरदार धडकून काही क्षणांतच पेट घेतलेल्या कारमधील सहशिक्षकाचा जागीच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सुमारे ११.२५ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. किनगावकडून अहमदपूरकडे एम.एच. २२ एच १९१४ क्रमांकाच्या कारने कोपदेव हिप्परगा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले माधव श्रीवाड […] The post अपघातानंतर कार पेटली; शिक्षकाचा होरपळून मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 1:26 am

३५९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या तिस-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. १५ जानेवारी रोजी शहरातील ३७५ मतदान केंद्रांवर मतदान झाले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० ही मतदानाची वेळ होती. परंतु, बहूतांश मतदान केंद्रांवर सायंकाळी ५.३० वाजल्यानंतरही मतदारांच्या रांगा होत्या. त्यामुळे सायंकाळी ५.३० वाजता जे मतदार मतदान केंद्रांत रांगेत उभे होते त्या सर्वांना मतदान केंद्राच्या आत घेऊन […] The post ३५९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 1:24 am

मुलींचा महाराष्ट्र क्रिकेट संघ भुवनेश्वरकडे रवाना

लातूर : प्रतिनिधी अंध मुला-मुलींसाठी क्रिकेट खेळ विकासात सातत्याने कार्यरत असलेल्या क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड इन इंडिया या संस्थेमार्फत दि. १७ ते २२ जानेवारीदरम्यान भुवनेश्वर (ओरिसा) येथे अंध मुलींच्या सहाव्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी मुलींचा महाराष्ट्र क्रिकेट संघ भुवनेश्वरकडे रवाना झाला आहे. या स्पर्धेत देशातील १८ क्रिकेट संघ सहभागी […] The post मुलींचा महाराष्ट्र क्रिकेट संघ भुवनेश्वरकडे रवाना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 1:22 am

ज्ञान हे माणसाच्या व्यक्तिमत्व विकासाचे साधन 

लातूर : प्रतिनिधी जगामध्ये शालेय शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षण असे ज्ञानाचे प्रकार आहेत. शालेय ज्ञान हे भौतिक साधनांची परिपुर्तता करते तर आध्यात्मिक ज्ञान हे मनुष्याचे वैचारिक आणि व्यक्तिमत्व उंचावते. ज्ञान हे माणसच्या व्यक्तिमत्व विकासाचे साधन असल्याचे प्रतिपादन भिक्खु पय्यानंद थेरो यांनी केले आहे. पौष पौर्णिमेनिमित्त महाविहार, सातकर्णीनगर येथे आयोजित धम्मदेशना व सत्कार कार्यक्रमात ते बोलत […] The post ज्ञान हे माणसाच्या व्यक्तिमत्व विकासाचे साधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 1:21 am

लातूर जिल्ह्यात १४,५६५ दुबार मतदार

लातूर : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी २०२६ रोजी लातूर जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणा-या लातूर, औसा, रेणापूर, चाकूर, अहमदपूर, उदगीर, जळकोट, निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी या १० पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीची अधिसूचना १६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होणार असून ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होईल. तसेच […] The post लातूर जिल्ह्यात १४,५६५ दुबार मतदार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 1:20 am

सन्मानाची वागणूक मिळावी अन्यथा चर्चेचे पर्याय खुले:शिवसेनेच्या मेळाव्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे स्पष्ट संकेत

महायुती मधील घटक पक्षांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भाने शिवसेना शिंदे गटातील शिवसैनिकांचा सन्मान करावा. आत्मसन्मान मिळाला तर निश्चितच महायुती म्हणून विचार होईल वाटाघाटी यशस्वी झाल्या तर एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊ मानसन्मान राखला तर ठीक अन्यथा स्वबळावर लढू किंवा इतर चर्चेचे पर्याय आमच्यासाठी खुले आहेत असे स्पष्ट संकेत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिले . साताऱ्यात शिंदे गट शिवसेनेचा मेळावा नुकताच पार पाडला या मेळाव्यात मार्गदर्शन केल्यानंतर शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी व्यासपीठावरआमदार महेश शिंदे , संजिवराजे नाईक निंबाळकर , अनिकेत राजे नाईक निंबाळकर , कराडचे नगराध्यक्ष राजेंद्र यादव , जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले शिंदे गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुख रेशमाताई जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते देसाई पुढे म्हणाले महायुतीला घटक मानून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जागा वाटपाला आमचे प्राधान्य राहील. मात्र तिन्ही घटक पक्षांनी शिवसेनेला सन्मानाची वागणूक द्यावी जागा वाटपात प्राधान्याने आमचा विचार व्हायला हवा. वाटाघाटी यशस्वी झाल्या तरच महायुती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे देसाई यांनी सांगितले‌ मानसन्मान राखला तर ठीक अन्यथा स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . जागा वाटपासाठी आमचे चर्चेचे सर्व पर्याय खुले आहेत. जो आमच्याशी समविचाराने चर्चा करेल त्या बाबतीत नक्कीच राजकीय समीकरणांचा विचार केला जाईल असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले . पालिका निवडणुकीप्रमाणे महायुती झाली नाही तर यावेळी स्वतंत्र निवडणूक शिवसेना लढवणार आहे शिवसेना पूर्ण ताकतीने आपल्या पद्धतीने निवडणुकीत उतरेल कराडमध्ये पालिका निवडणूक ज्या पद्धतीने लढवली त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या जातील यावेळी कोणाचाही विचार करणार नाही फलटण पालिकेत आमचे काही अंदाज चुकले त्यामुळे आम्हाला अपयश आल्याचे त्यांनी मान्य केले राष्ट्रवादी अजित पवार पक्षाबरोबर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही तसेच भारतीय जनता पार्टी कडून सुद्धा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आपल्याला आला नसल्याची त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय पक्ष निरीक्षक नेमून त्यांच्याकडून अहवाल घेतले जाणार आहेत पक्षाने निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली आहे त्यासाठीच शिवसैनिकांची बैठक घेण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निहाय इच्छुकांची माहिती घेण्यात आली आहे असे देसाई म्हणाले

दिव्यमराठी भास्कर 15 Jan 2026 10:25 pm

एक्झिट पोल म्हणतात मुंबईवर भाजप-शिवसेनेची सत्ता, ठाकरे बंधूंना धक्का

मुंबई : प्रतिनिधी अनेक राज्यांपेक्षा अधिक बजेट असणा-या व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी भाजप व शिंदेंच्या शिवसेनेची महायुती व ठाकरे बंधूंच्या युतीत अत्यंत चुरशीची लढत झाली असून कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मतदानानंतर प्रसिद्ध झालेल्या सर्वच एक्झिट पोल मध्ये मुंबईवर भाजप-शिवसेनेची सत्ता येणार व ठाकरे बंधूंच्या […] The post एक्झिट पोल म्हणतात मुंबईवर भाजप-शिवसेनेची सत्ता, ठाकरे बंधूंना धक्का appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Jan 2026 9:51 pm

निकालाआधीच भाजपकडून पुण्यात विजयाचे फ्लेक्स!:सचिन दोडकेंचा थेट 'भावी आमदार' म्हणून उल्लेख, बॅनरबाजी ठरली चर्चेचा विषय

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, तब्बल 9 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या या निवडणुकीत मतदानाचा टक्का मात्र काहीसा घसरल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली असताना, पुण्यात मात्र निकाल जाहीर होण्यापूर्वीच विजयाचे फ्लेक्स लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 32 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांचे 'विजयी' झाल्याचे सांगणारे फलक त्यांच्या समर्थकांनी मतदान संपताच लावले आहेत. अधिकृत निकाल हाती येण्यापूर्वीच अशा प्रकारे विजयाचा गुलाल उधळल्याने आणि फ्लेक्सबाजी केल्याने शहरात हा चर्चेचा विषय ठरला असून, कार्यकर्त्यांमधील अतिउत्साह यामुळे स्पष्टपणे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 32 चे भाजप उमेदवार सचिन दोडके यांचे हे विजयी फलक झळकले असून, त्यावर त्यांना चक्क 'भावी आमदार' म्हणून संबोधण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालाआधी असे फलक लावू नका, असे सक्त आदेश दिले असतानाही कार्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोडके यांच्या समर्थकांनी निकालापूर्वीच केलेला हा विजयोत्सवाचा प्रयत्न पुण्यात सध्या चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Jan 2026 9:07 pm

निर्यातक्षम राज्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर!

नवी दिल्ली : प्रतिनिधी नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक-२०२४ मध्ये (ईपीआय) महाराष्ट्राने तामिळनाडूला मागे टाकत पहिले स्थान पटकावले. देशातील पाच राज्यांत गुजरात, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशचा अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक लागतो. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार, महाराष्ट्राने तामिळनाडूकडून पहिले स्थान संपादन केले आहे. आर्थिक वर्ष २०२२ ते २०२४ या कालावधीत केलेल्या कामगिरीवरून […] The post निर्यातक्षम राज्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Jan 2026 8:33 pm

एअर इंडियाच्या विमानाला रन-वेवर कंटेनरची धडक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी एक मोठा अपघात टळला. एअर इंडियाच्या फ्लाइट नंबर ए-३५० ला रनवेवर एका बॅगेज कंटेनरची जोरदार धडक बसली. या धडकेत विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. न्यू यॉर्कला जाणारे एअर इंडियाच्या ए-३५० विमानाने उड्डाण केले, परंतु इराणी हवाई क्षेत्र […] The post एअर इंडियाच्या विमानाला रन-वेवर कंटेनरची धडक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Jan 2026 8:32 pm

शेकडो कोटी पाण्यात; ५२ कोटी खर्चून अखेर बोगदा बंद करणार! भागीरथी नदीचा प्रवाह वळविण्याचा प्रयत्न अंगलट

उत्तरकाशी (उत्तराखंड) : विकास आणि पर्यावरण संवर्धन, यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात पर्यावरणाला प्राधान्य देणारा एक ऐतिहासिक निर्णय उत्तराखंडमध्ये घेण्यात आला आहे. भागीरथी (गंगा) नदीचा प्रवाह वळविण्यासाठी खोदलेल्या १४ किलोमीटर लांबीच्या बोगद्याला आता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे, २ हजार कोटी रुपयांचा लोहारीनाग पाला जलविद्युत प्रकल्प रद्द झाल्यानंतर, तयार करण्यात आलेला हा बोगदा […] The post शेकडो कोटी पाण्यात; ५२ कोटी खर्चून अखेर बोगदा बंद करणार! भागीरथी नदीचा प्रवाह वळविण्याचा प्रयत्न अंगलट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Jan 2026 8:30 pm

खोमेनी सहकुटूंब दुबईत राजकीय आश्रय घेणार? रु. १३५३ कोटी ट्रान्सफर केल्याने चर्चा; इस्रायली चॅनलचा दावा

तेलअवीव : वृत्तसंस्था इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह दुबईला पळून जाण्याचा विचार करत आहेत. हा दावा इस्रायली मीडिया चॅनलने केला आहे. चॅनलने म्हटले की, इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनामुळे खोमेनींच्या मुलाने १.५ अब्ज रुपये (१३५३ कोटी रुपये) दुबईला ट्रान्सफर केले आहेत. दरम्यान, इराण सरकारने या प्रकरणावर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. अयातुल्ला अली […] The post खोमेनी सहकुटूंब दुबईत राजकीय आश्रय घेणार? रु. १३५३ कोटी ट्रान्सफर केल्याने चर्चा; इस्रायली चॅनलचा दावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Jan 2026 8:29 pm

पुतिन यांचा संयम सुटला; जग महायुद्धाच्या दारात! ब्रिटन, जर्मनीला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी

मॉस्को : वृत्तसंस्था जर्मनी आणि इंग्लंड हे दोन मोठे देश रशियाच्या रडारवर आले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांचे अत्यंत निकटवर्ती असलेल्या सर्गेई करागानोव यांनी आता थेट जर्मनी आणि ब्रिटनला धमकी दिली आहे, जर युद्धामध्ये रशिया हरलं तर आम्ही ब्रिटन आणि जर्मनीमध्ये अण्वस्त्र हल्ला करू असं सर्गेई यांनी म्हटलं आहे. गेल्या चार वर्षांपासून रशिया आणि […] The post पुतिन यांचा संयम सुटला; जग महायुद्धाच्या दारात! ब्रिटन, जर्मनीला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Jan 2026 8:28 pm

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा किनगाव येथे शुभारंभ:ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे आवाहन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवून गावाचा कायापालट करण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी गुरुवारी ता 16 गाव भेटीमध्ये केले आहे. हिंगोली तालुक्यातील वडद, एकांबा, बोडखी, अंबाळा, अंबाडा तांडा, बोंडाळा, मोप, कनेरगाव, फाळेगाव या गावांना आज भेटी देण्यात आल्या.यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुमार मीना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, आसावरी काळे, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, नायब तहसीलदार कोकरे, गटविकास अधिकारी प्रदीप बोंढारे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला ता ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून गाव स्वच्छ व सुंदर करणे, गावात प्लास्टिक बंदी राबविणे, कर वसुली शंभर टक्के करणे, घरकुलांची कामे लवकरात लवकर पूर्ण करणे यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. गावाचा कायापालट करण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन अंतर्गत नव्याने लागू करण्यात आलेल्या कायद्याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, पूर्वीच्या नरेगा कायद्यात बदल करून ६५ टक्के जलसंवर्धन कामे, २५ टक्के गावातील मूलभूत सोयीसुविधा निर्माण, तसेच उर्वरित आजीविका कामे, पूरप्रतिबंधात्मक कामे यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी योग्य आराखडा तयार करून कामांची निवड करण्याच्या सूचना त्यांनी केल्या जिल्ह्यात प्रत्येक गावात लखपती दीदी म्हणून जास्तीत जास्त महिला सक्षम व्हाव्यात, यासाठी संबंधित विभागांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी यावेळी केले. या दौऱ्यादरम्यान हिंगोली तालुक्यातील वरील संबंधित ग्रामीण भागातील कृषि योजना, रस्ते, पाणी पुरवठा योजना, घरकुल आवास योजना, नरेगा कामे, पाणंद रस्ते, पंतप्रधान अदर्श ग्राम योजना, दलित वस्तीचे कामे, स्वच्छ भारत, आदिवासी आश्रम शाळा, समाजकल्याण वसतीगृहे, लघु पाटबंधारे तलाव, रेशनदुकान तपासणी, सामाजिक अर्थसहाय्य योजना, आभाकार्ड, 'उमेद'च्या योजना, पी.एम. सूर्यघर मोफत वीज योजनांबाबतची तपासणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संयुक्तपणे केली. यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

दिव्यमराठी भास्कर 15 Jan 2026 8:14 pm

शेतातील कामाच्या वादातून भावाने केली मोठ्या भावाची हत्या

हिंगोली : वसमत तालुक्यातील मौजे रांजोणा येथे माणुसकीला आणि रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शेतीतील कामाच्या किरकोळ वादातून एका २३ वर्षीय तरुणाने आपल्या २५ वर्षीय सख्ख्या मोठ्या भावाच्या डोक्यात कु-हाड घालून त्याची निर्घृण हत्या केली. नवनाथ नामदेव सावळे असे मयताचे नाव असून त्याचा धाकटा भाऊ गजानन सावळे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हिंगोली […] The post शेतातील कामाच्या वादातून भावाने केली मोठ्या भावाची हत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Jan 2026 7:51 pm

पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार:125 जागांचा टप्पा पार करू, मुरलीधर मोहोळ यांचा मोठा दावा

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. निवडणूक निकालानंतर भाजपला १२० ते १२५ जागा मिळतील, असेही त्यांनी म्हटले. मोहोळ म्हणाले की, पुणेकरांनी मागील निवडणुकीत कारभार बदलला होता. यंदा शिवसेनेसोबत युती होऊ शकली नाही. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली असून, सत्तास्थापनेसाठी कोणाचीही गरज लागणार नाही. निवडणूक मतदान प्रक्रिया संपल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार हेमंत रासने यांनी प्रभाग क्रमांक २५ मधील स्वरदा बापट यांच्या कार्यालयात उमेदवार आणि कार्यकर्त्यांसोबत 'भेळ भत्त्या'चा आनंद घेतला. यावेळी मोहोळ यांनी भाजपची वर्षानुवर्षे चालत आलेली 'भेळ भत्त्या'ची परंपरा स्पष्ट केली. कसबा मतदारसंघात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जुन्या लोकांनी घालून दिलेली ही परंपरा असून, संघटनेत काम करताना सर्वांनी एकत्र राहावे, हीच भावना यामागे असल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवारी मिळाली असो वा नसो, कार्यकर्ते एकदिलाने काम करतात, असेही ते म्हणाले. मोहोळ यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. अनेक ठिकाणी मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने काही जण आतापासूनच निकालानंतर तक्रारी करण्याची तयारी करत आहेत. विरोधक ईव्हीएम मशीनच्या नावाखाली निकालानंतरही आरोप करत बसतील, असे ते म्हणाले. पुण्यात भाजपने अनेक विकासकामे केली आहेत, असेही त्यांनी नमूद केले. राज्यात आणि केंद्रात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असले तरी, स्थानिक पातळीवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी अपेक्षा होती. मात्र, समोरून काही गोष्टी आल्यास प्रत्युत्तर दिले जाते, असे मोहोळ म्हणाले. गुंड निलेश घायवळ याला परदेशात पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप अजित पवार यांनी पुराव्यानिशी सिद्ध करावा, असे आव्हानही त्यांनी दिले. आता अजित पवार याबद्दल काही बोलत नाहीत, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 15 Jan 2026 7:48 pm

हिंगोलीत गुड्डू बांगर यांची स्वीकृत सदस्य पदी निवड निश्चित:शिवसेनेच्या आमदाराकडून 20 वर्षापासून एकनिष्ठ कार्यकर्त्याला निष्ठेचे फळ

हिंगोली नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य मध्ये शिवसेनेकडून दोन सदस्यांचे नावे अंतिम करण्यात आली असून यामध्ये मागील वीस वर्षापासून आमदार संतोष बांगर यांची सावली म्हणून सोबत राहणार आहे गुड्डू बांगर यांना शिवसेनेकडून निष्ठेचे फळ दिले आहे. हिंगोली पालिकेत त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड निश्चित झाली आहे. या निवडीवर शुक्रवारी तारीख 16 शिक्कामोर्तब होणार आहे हिंगोली नगरपालिकेमध्ये आमदार संतोष बांगर यांचे नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 34 पैकी 17 जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दहा जागा जिंकल्या आहेत. याशिवाय भाजप आणि पाच तर काँग्रेसने दोन जागांवर यश मिळवले आहे. तर नगराध्यक्ष पदावर शिवसेनेच्या रेखा श्रीराम बांगर विजय झाल्या. आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची एखादी सत्ता मिळवल्यानंतर आता उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य कोणाची निवड होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. दरम्यान स्वीकृत सदस्य पदासाठी शिवसेनेचे दोन, भाजपला एक तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे. त्यानुसार आज शिवसेनेचे त्यांच्या दोन सदस्यांची नावे अंतिम केली आहेत यामध्ये नितीन बांगर व गुड्डू बांगर यांचा समावेश आहे. तर भाजपा कडून कैलास शहाणे व राष्ट्रवादीकडून शकील यांचे नाव निश्चित झाले आहे. मागील वीस वर्षापासून आमदार संतोष बांगर यांच्यासोबत सावलीसारखे राहणारे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून गुड्डू बांगर यांची ओळख आहे. आमदार संतोष बांगर ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होते तेव्हापासून आजपर्यंत कुठल्याही पदाची अपेक्षा न करता त्यांनी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांनी पक्षाचे काम करणेच पसंत केले होते. यावेळी हिंगोली पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आल्या नंतर आमदार संतोष बांगर यांनी पालिकेवर स्विकृत सदस्य म्हणून गुड्डू बांगर यांची निवड केली आहे. शुक्रवारी तारीख 16 नगराध्यक्ष रेखा श्रीराम बांगर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यांच्या निवडीमुळे एका निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे

दिव्यमराठी भास्कर 15 Jan 2026 7:09 pm

ठाकरे बंधूंना जोरदार धक्का!:मुंबईत सत्तापालट होणार, भाजप-शिवसेना सत्तेत येणार; वाचा महापालिका निवडणुकीचा एक्झिट पोल

जनमतच्या एक्जिट पोलनुसार मुंबईत सत्तापालट होणार असल्याचे म्हटले आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 138 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच शिवसेन ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गटाला 62 जागा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच कॉंग्रेस-वंचितला 20 तर इतरला 7 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेवर सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष होते. याच महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा उपस्थित करत मराठी माणसाला भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला होता. तसेच ठाकरे बांधूंच्या सभांना लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. परंतु, एक्जिट पोल वेगळे आकडे दाखवत असल्याचे दिसून येत आहे. रुद्र रिसर्चनुसार, मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला 121 जागा मिळतील. तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीला 71 जागा मिळतील. कॉंग्रेस आणि वंचितच्या आघाडीला मुंबईत 25 जागा मिळतील, तर इतरांना 10 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व सामच्या एक्झिट पोलनुसार वसई विरारमध्ये भाजपला 27, शिवसेना शिंदे गटाला 5, कॉंग्रेसला 3, शिवसेना ठाकरे गटाला 7, वंचितला 72 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप 42 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. मनसे 6 जागांवर, काँग्रेस 2 जागांवर, शिवसेना ठाकरे गट 2 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर, वंचित बहुजन आघाडी 2 जागांवर आणि इतर 6 जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. उल्हासनगरमधला अंदाज काय? उल्हासनगरमध्ये भाजपाला 28, शिवसेना शिंदे गटाला 29 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा मिळू शकतात. तसेच इतरांच्या स्थानिक जागा आहेत त्यांना 12, काँग्रेसला 2, शिवसेना ठाकरे गटाला 1, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 15, तर मनसेला 2 जागा मिळण्याची शक्यता दर्शवण्यात आली आहे. पिंपरीत भाजपची सत्ता? पिंपरीचा देखील एक्जिट पोल समोर आला असून इथे देखील भाजपला जास्त मते मिळत असल्याचा अंदार 'प्राब'ने वर्तवला आहे. प्राबने दिलेल्या आकडेवारीनुसार पिंपरीमध्ये भाजपला 24, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 51, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 9 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर शरद पवार गटाला 2, शिवसेना ठाकरे गटाला शून्य, मनसेला एक तर वंचितला शून्य जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पुण्यात भाजपल 93 जागा मिळण्याचा अंदाज 'प्राब'नुसार पुण्यात भाजपला 93, शिवसेना शिंदे गटाला 6, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 43 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाला 7, शरद पवार गटाला 8, कॉंग्रेसला 8 आणि मनसेला शून्य जागा मिळणार असल्याचा अंदाज प्राबने वर्तवला आहे. हे वृत्त आम्ही सातत्याने अपडेट करत आहोत

दिव्यमराठी भास्कर 15 Jan 2026 6:42 pm

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसाठी ४० टक्के मतदान

पुणे : प्रतिनिधी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत कमी अधिक प्रमाणात मतदारांचा उत्साह दिसत होता पहिल्या चार तासात मतदानाची टक्केवारी कमी असल्याचे पाहायला मिळाले. दुपारनंतर मतदानाचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले. शुक्रवारी सकाळी मतमोजणीस सुरुवात होऊन संध्याकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याचा अंदाज आहे. दुपारी साडे तीन पर्यंत पुणे महानगर पालिकेसाठी ३६ टक्के आणि […] The post पिंपरी चिंचवड महानगर पालिकेसाठी ४० टक्के मतदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Jan 2026 6:40 pm

लाडकी बहीण योजनेमुळे वारे फिरणार?

पुणे : प्रतिनिधी राज्यात महापालिका निवडणुकीच्या एक दिवस आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. यात पुणे जिल्ह्यातील महिलांचाही समावेश होते. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याची चर्चा आहे. १४ जानेवारी रोजी, जिल्ह्यातील १.७१९ दशलक्ष महिलांच्या बँक खात्यात हप्ता जमा करण्यात आला. लाडकी बहीण योजनेचा हप्ता निवडणुकीच्या तोंडावर दिला जाणार असल्यामुळे आधीच राजकीय […] The post लाडकी बहीण योजनेमुळे वारे फिरणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Jan 2026 6:26 pm

आरोपी येरवडा जेलमध्ये, इकडे केंद्रावर मतदान!:पुण्यात मतदान केंद्रांवर बोगसगिरी, निवडणूक अधिकाऱ्यांकडून ठोस उत्तर नाही

राज्यातील विविध महानगरपालिकांच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत. मतदारांना पैशांचे वाटप, बोगस मतदान आणि बोटावरील शाई पुसून दुसऱ्यांदा मतदान करण्यासारख्या गैरप्रकारांनी निवडणूक प्रक्रियेला गालबोट लावले आहे. यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये येरवाडा तुरुंगात असलेल्या एका आरोपीच्या नावे चक्क कुणीतरी मतदान केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी प्रत्यक्ष तुरुंगात असतानाही त्याचे मतदान केंद्रावर मतदान झाल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मधील सरस्वती मंदिर या मतदान केंद्रांवर बोगस मतदान झाल्याचे समोर आले आहे. जो व्यक्ती येरवडा जेलमध्ये आहे, त्याच्या नावावर सुद्धा मतदान करण्यात आले आहे. याबाबत जे उमेदवार आहेत तसेच कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. मात्र, आयोगाकडून कुठलेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक 24 ड मध्ये भाजपचे पुण्यातील निवडणूक प्रमुख गणेश बीडकर हे उमेदवार आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या गणेश नवघरे, शिवसेनेच्या प्रवीण धंगेकर यांचे आव्हान आहे. त्यामुळे येथील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यात या प्रभागात झालेल्या बोगस मतदानामुळे खळबळ उडाली आहे. मतदान केंद्रावर पोहोचण्याआधीच महिलेच्या नावावर मतदान असाच काहीसा प्रकार प्रभाग क्रमांक 21 मधील कटारिया हायस्कूल येथील मतदान केंद्रावर पाहायला मिळाला आहे. मतदान केंद्रावर पोहोचण्याच्या आधीच एका महिलेच्या नावाने मतदान झाले असल्याचे उघडकीस आले आहे. शेख हसिना असे या महिलेचे नाव आहे. गेल्या 35 वर्षांपासून त्या महिला याच मतदान केंद्रावर मतदान करत आहेत. मात्र आज त्यांच्या नावाने आधीच कोणीतरी मतदान केल्याचे समोर आले आणि एकच खळबळ उडाली. या महिलेने सवाल उपस्थित केला असता त्यांच्याकडून पोस्टल मतदान करून घेतले आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Jan 2026 6:26 pm

१५,९०८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद

मुंबई/पुणे : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २,८६९ जागांसाठी आज मतदानाचा धुरळा उडाला असून एकूण १५,९०८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. उद्या(१६ जानेवारी) सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले. राज्यभरातील अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या देखील घटना घडल्या. त्यामुळे ज्या ठिकाणी मतदानाला उशिरा सुरुवात झाली, त्या […] The post १५,९०८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Jan 2026 6:20 pm

रवींद्र चव्हाणांकडून आचारसंहिता भंग?

मुंबई : राज्यात २९ महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडत आहे. विविध ठिकाणांहून आचारसंहिताभंगाच्या घटना समोर येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रवींद्र चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवलीत मतदानाचा हक्क बजावला. त्यावेळी रवींद्र चव्हाण यांच्या शर्टवर कमळाचं चिन्ह लावलेलं होतं, […] The post रवींद्र चव्हाणांकडून आचारसंहिता भंग? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Jan 2026 6:15 pm

धुळ्यात ईव्हीएम मशिन फोडली

धुळे : धुळे महापालिका निवडणुकीत राडा झाला आहे. मतदान केंद्रात घुसून, ईव्हीएम मशिन फोडण्यात आले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा प्रताप केल्याचा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केला. या प्रकारामुळे मतदान प्रक्रिया काही काळ ठप्प पडली होती. पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त वाढवला होता. त्यामुळे छावणीचे स्वरूप आले होते. मतदानाच्या आदल्या दिवसापासून धुळे शहरातील वातावरण तापले असून, भाजप […] The post धुळ्यात ईव्हीएम मशिन फोडली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Jan 2026 6:12 pm

निवडणूक अधिकारी वापरत आहेत भाजपचे अ‍ॅप

मुंबई : महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांसाठी मतदान होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मतदान प्रक्रियेदरम्यान मोठा गोंधळ पहायला मिळत आहे. अशातच अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मतदारांची नावे शोधण्यासाठी निवडणूक अधिकारी भाजपचे ऍप वापरत आहेत. मुंबईत हा प्रकार घडला आहे. निवडणूक अधिका-यांकडे भाजपचे अ‍ॅप पाहून मतदार देखील गोंधळले. कांदिवली येथील एका मतदान केंद्रावर नेमलेले निवडणूक अधिकारी मतदारांची […] The post निवडणूक अधिकारी वापरत आहेत भाजपचे अ‍ॅप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Jan 2026 6:04 pm

मतदान कार्डच्या गठ्ठ्यासह बोगस मतदार पकडला!

अहिल्यानगर : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत बोगस मतदारांना पकडण्यात आले आहे. केडगाव आणि सावेडी उपनगरात हा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, बोगस मतदारांना पकडून उमेदवारांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या बोगस मतदारांकडे मोठ्याप्रमाणात बोगस मतदान कार्डचा गठ्ठा सापडला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या बोगस मतदारांमागील सूत्रधार कोण याचा शोध घ्या? तसेच बोगस मतदान करायचे […] The post मतदान कार्डच्या गठ्ठ्यासह बोगस मतदार पकडला! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Jan 2026 6:03 pm

मतदान केलेच पाहिजे

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी सकाळी ७.३० पासून मतदानाला सुरुवात झाली. आज अनेक सेलिब्रिटीज मतदानासाठी बाहेर पडले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. सचिन तेंडुलकर सकाळीच मतदानासाठी उपस्थित होता. मतदानानंतर सचिन म्हणाला की, क्रिकेटमध्ये जसे धावांना महत्त्व आहे, तसेच लोकशाहीत प्रत्येक थेंबासारखे तुमच्या मताचे महत्त्व आहे, असे सांगत सचिन तेंडुलकरने […] The post मतदान केलेच पाहिजे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 15 Jan 2026 6:00 pm

निवडणूक आयोग म्हणजे दात काढलेला वाघ:रोहित पवारांची सचित्र टीका; शाई पुसली जातेय तशी लोकशाही पुसली जाण्याची भीती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य निवडणूक आयोग हा दात काढलेल्या वाघासारखा असल्याची टीका केली आहे. या प्रकरणी त्यांनी एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. त्यात भाजपने निवडणूक आयोगरुपी वाघाचे दात काढल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत सुरू असलेल्या अनागोंदीची गंभीर दखल घ्यावी. अन्यथा आज मतदानाची शाई पुसली जात आहे, तशी उद्या लोकशाहीही पुसली जाईल, असे ते म्हणालेत. राज्यात सध्या मुंबईसह 29 महापालिका निवडणुकांचा फड रंगला आहे. त्यात अनेक ठिकाणी मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जाण्याचे प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी बोगस मतदारही आढळून आलेत. आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच एका व्यंगचित्राद्वारे त्यांनी निवडणूक आयोग दात काढलेल्या वाघासारखा असल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, महापालिकेच्या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचं समोर येत आहे. आधी मतदान यंत्रणेत बिघाड, नंतर बोटाला लावली जाणारी शाई लगेच पुसली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मतदानाची टक्केवारी जाहीर करायला देखील विलंब केला जात आहे. अनेक केंद्रांमध्ये तर EVM क्रमवारीनुसार लावलेले नाहीत तर दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टारचं चिन्हही नाही… एकूणच काय तर मतदान प्रक्रियेमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचं काम खुद् निवडणूक आयोगाकडूनच होतंय. अनेक ठिकाणी मतदानाची टक्केवारी दर दोन तासांनी जाहीर केली जात नाही.. त्याऐवजी सायंकाळी एकत्रच ही टक्केवारी वाढवून बोगस मतदारांसाठी सोय करण्याचा तर हा प्रकार नाही ना? निवडणूक आयोगाने या सर्व बाबींची गंभीर दखल घेऊन ठराविक वेळेनंतर आकडेवारी जाहीर करावी अन्यथा आज मतदानाची शाई जशी पुसली जातेय तसं उद्या लोकशाही पुसली जाऊ नये, याची भीती वाटते, असे ते म्हणाले. नियम डावलून शाईऐवजी मार्करचा वापर रोहित पवार आपल्या अन्य एका पोस्टमध्ये म्हणाले, Conduct Of election Rules 1961 च्या नियम 49 K मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय की, मतदान करण्यासाठी आलेल्या प्रत्येक मतदाराला काढता किंवा पुसता न येणारी (indelible) शाई लावण्यात यावी. असं असताना राज्य निवडणूक आयोगाकडून मात्र शाईऐवजी मार्कर वापरण्यात येत असून त्याने केलेली खून लगेचच पुसली जात आहे. नियम हे कायद्याच्या पुस्तकात लिहून ठेवायला असतात प्रत्यक्षात आम्ही करु तो कायदा’ अशीच निवडणूक आयोगाची मग्रुरी सुरुय. लोकशाहीसाठी हे अत्यंत धोकादायक असून या शाईच्या माध्यमातून लोकशाही पुसण्याचं काम सुरू आहे. महाशक्तीच्या दबावातून मार्करचा वापर मतदानानंतर बोटाला लावलेली शाई अनेक दिवस तशीच रहात असल्याचं आतापर्यंतच्या अनेक निवडणुकींमध्ये बघितलंय… पण आज ही लावण्यात आलेली शाई लगेचच पुसली जात असून अशा प्रकारची शाई वापरणं म्हणजे दुबार आणि बोगस मतदानासाठी निवडणूक आयोगानेच लावलेला हा हातभार नाही का? की बोगस मतदानाच्या माध्यमातून जिंकण्यासाठी महाशक्तीच्या दबावातून अशी शाई वापरण्यात आली की या शाईमध्येही भ्रष्टाचार झाला? याचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा. तसंच अनेक ठिकाणी दुबार मतदार असूनही तिथं डबल स्टार दिसत नाही, याचा अर्थ काय? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला.

दिव्यमराठी भास्कर 15 Jan 2026 6:00 pm

नामदेव ढसाळांच्या पत्नींची प्रकृती खालावली:'लक्ष द्यायला कोणीच नाही', मुख्यमंत्र्यांकडे दुःख व्यक्त; आम्ही तुमच्यासोबत- फडणवीस

सुप्रसिद्ध कवी, लेखक, दलित चळवळीतील कार्यकर्ते स्व.पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नाव शाहीर अमर शेख यांच्या कन्या मल्लिका नामदेव ढसाळ या सध्या आजारी आहेत. पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही, नानाजी देशमुख प्रतिष्ठानतर्फे त्यांना मदत केली जात आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी व्हीडिओ कॉलवर संवाद साधला आहे. विशेष म्हणजे आज नामदेव ढसाळ यांची पुण्यतिथी देखील आहे. नामदेवच्याच मार्गाने जाणार असे वाटते.. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी तब्येतीची विचारपूस केली असता मल्लिका ढसाळ म्हणाल्या, प्रकृती काही बरी नाही. नामदेवच्याच मार्गाने जाणार असे वाटते. त्यावर फडणवीस म्हणाले, नाही नाही तुम्हाला काही होऊ देणार नाही. आम्ही सगळे आहोत, तुम्ही बिलकुल काळजी करू नका आणि आम्ही सगळे तुमची नीट काळजी घेऊ. तुम्ही कशाचीही चिंता करू नका. नामदेवरावांचे अजून खूप काम बाकी आहे, ते तुम्हाला पुढे न्यायचे आहे. आमच्याकडे लक्ष द्यायला कोणीच नाही यावर पुढे बोलताना मल्लिका ढसाळ म्हणाल्या, दुःख एवढेच आहे की ज्यांनी नामदेव सारखा झंजावात जन्माला घातला, त्याच्या नावावर इतके लोक दुकान थाटून बसले आहेत आणि त्याचे फायदे घेतात. पण नामदेव ढसाळांचे कुटुंब कसे राहते, ते जगत आहेत की मरतायत, याचे कोणालाही देणे पडले नाही, याची खंत वाटते. त्याने जे केले ते त्याचे कर्तव्य होते. आम्ही असे म्हणत नाही की त्याने जे केले त्याचे आम्हाला रिटर्न्स पाहिजेत, पण माणुसकी म्हणून तरी त्यांनी बघायला पाहिजे आम्हाला, असे दुःख मल्लिका ढसाळ यांनी व्यक्त केले. आम्ही तुमच्या सोबत आहोत- देवेंद्र फडणवीस यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही याचे अजिबात दुःख वाटून घेऊ नका. मी स्वतः लक्ष देणार आहे. आम्ही सगळे तुमच्या मागे आहोत. मी स्वतः पर्सनली लक्ष घालत आहे. तुम्ही बिलकुल काळजी करण्याचे कारण नाही. नामदेव ढसाळ असो किंवा तुम्ही असाल, तुमच्या कुटुंबाचे खूप मोठे योगदान आहे. त्यामुळे कोण काय करत आहे, हे विसरून जा आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत हे लक्षात ठेवा, असा धीर फडणवीस यांनी दिला.

दिव्यमराठी भास्कर 15 Jan 2026 5:54 pm

चंद्रकांत खैरेंचा अंबादास दानवेंवर थेट हल्लाबोल थेट अक्कल काढली:म्हणाले- चार दिवसांपासून निवडणूक प्रचारातून गायब; वाद चव्हाट्यावर

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादिवशी शिवसेना ठाकरे गटामधील अंतर्गत वाद उघडपणे समोर आला असून, पक्षातील जुनी धुसफूस आता थेट सार्वजनिक पातळीवर पोहोचली आहे. मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर जोरदार आणि तिखट शब्दांत टीका केली. माध्यमांशी संवाद साधताना खैरे यांनी दानवे यांची अक्कल काढली. या वक्तव्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. महापालिकेसाठी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी थेट पत्रकारांशी बोलत आपल्या मनातील असंतोष व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून पक्षात जे अंतर्गत तणावाचे वातावरण होते, ते आज मतदानाच्या दिवशी उफाळून आले. खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका करत, पक्षातील निर्णयप्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका वरिष्ठ नेत्याने अशा पद्धतीने जाहीरपणे आरोप केल्यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या वादामागील मुख्य कारण म्हणजे माजी महापौर रशीद मामू ठरले आहे. यावरून चंद्रकांत खैरे प्रचंड संतप्त असल्याचे दिसून आले. रशीद मामू यांना मी तिकीट दिलेले नाही. ते तिकीट अंबादास दानवे यांनी दिले आहे. तिकीट वाटपाच्या संपूर्ण प्रक्रियेत मला अंधारात ठेवण्यात आले आणि दानवे यांनी स्वतःची मनमानी चालवली, असा थेट आरोप खैरे यांनी केला. या विधानातून पक्षातील निर्णय एकाधिकाराने घेतले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे. आपल्या नाराजीचा सूर अधिक तीव्र करत खैरे म्हणाले की, मी एकनिष्ठ माणूस म्हणून इतकी वर्षे पक्षात टिकून आहे. दानवे यांनी आतमध्ये काय व्यवहार केले आहेत, हे मला सर्व माहिती आहे. जे खरे निष्ठावंत आणि निवडून येण्याची क्षमता असलेले होते, त्यांची तिकिटे कापण्यात आली. या आरोपांमुळे केवळ तिकीट वाटपावरच नाही, तर पक्षातील विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. निवडणुकीच्या ऐन तोंडावर अशा आरोपांमुळे ठाकरे गटासाठी ही बाब अधिकच अडचणीची ठरत आहे. या वादाला संक्रांतीचा ‘तिळगुळ’ हे निमित्त ठरले. मकरसंक्रांतीनिमित्त पालकमंत्री संजय शिरसाट यांना पत्रकारांनी विचारले की, तुम्ही आज तिळगुळ कुणाला देणार? यावर शिरसाट यांनी, मी शिवसेनेचे निष्ठावंत नेते चंद्रकांत खैरे यांना तिळगुळ देणार, पण अंबादास दानवे यांना नाही, असे उत्तर दिले. या विधानानंतर अंबादास दानवे यांनी प्रतिउत्तर देताना, चंद्रकांत खैरे यांनी विधानसभा निवडणुकीत शिरसाट यांचे काम केले असावे, म्हणून ते त्यांना तिळगुळ देत आहेत, असा टोला लगावला. याच वक्तव्याने खैरे यांचा संताप अनावर झाला. मी गद्दारी करणारा माणूस नाही दानवे यांनी केलेल्या ‘फितुरी’च्या आरोपावर चंद्रकांत खैरे आज चांगलेच भडकले. दानवेला कळत नाही का? मी गद्दारी करणारा माणूस नाही. मी आयुष्यभर पक्षाशी प्रामाणिक राहिलो आहे, असे म्हणत त्यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे ठाकरे गटातील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. निवडणुकीच्या दिवशीच अशा शब्दयुद्धामुळे कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसांपासून निवडणूक प्रचारातून गायब या सगळ्या घडामोडींनंतर खैरे यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. अंबादास दानवे हे गेल्या चार दिवसांपासून निवडणूक प्रचारातून गायब असल्याचे त्यांनी सांगितले असून, ही बाब त्यांनी थेट ‘मातोश्री’पर्यंत, म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवली असल्याचा दावा केला आहे. आता मतदान होऊ द्या. त्यानंतर मी अंबादास दानवे यांच्या विरोधात मोठी पत्रकार परिषद घेऊन सर्व सत्य जनतेसमोर आणणार आहे, असा इशाराही चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. त्यामुळे मतदानानंतर ठाकरे गटात आणखी मोठा राजकीय स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दिव्यमराठी भास्कर 15 Jan 2026 5:51 pm

नवी मुंबईत सरकारी यंत्रणेला दावणीला बांधण्याचा प्रयत्न:शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपवर आरोप; CP ताटातले मांजर झाल्याचा घणाघात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपवर मतदारांना धमकावल्याचा आरोप केला आहे. नवी मुंबईत सरकारी यंत्रणेला दावणीला बांधण्याचा प्रयत्न झाला आहे. पोलिस आयुक्तही कुणाच्या तरी ताटातले मांजर झाल्याचे चित्र आहेत. हा सर्व प्रकार चुकीचा आहे, अन्यथा आम्हाला सुद्धा कायदा हातात घ्यावा लागेल, असे ते म्हणालेत . खासदार नरेश म्हस्के म्हणाले, महापालिका निवडणुका सुरू आहेत. उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी मी प्रत्येक बुथला भेटी देत आहे. पण पोलिसांना हाताशी धरून बाहेरून माणसे आणून या ठिकाणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदारांना धमकावण्यात येत आहे. त्यांच्यावर खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिस आयुक्तांनी कुणाच्या तरी हातचे बाहुले बनू नये. महापालिका निवडणूक आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लढत असलो तरी शेवटी आम्हीही सत्तेत आहोत हे त्यांनी लक्षात घ्यावे. कारण, नवी मुंबईत सध्या दादागिरी करून मतदारांचे ओळखपत्र तपासणे, मतदारांना मारणे असे प्रकार सुरू आहेत. आमच्या 2 उमेदवारांना पोलिसांनी ताब्यात घेतले ते पुढे म्हणाले, पोलिसांनी आमच्या 2 उमेदवारांना ताब्यात घेतले. काही गुंड प्रवृत्तीचे लोक आमच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत होते. उमेदवारांना काम करू देत नव्हते. आम्ही पोलिसांना त्याची माहिती दिली. पण शेवटी अती झाल्यामुळे आमचे उमेदवार जाब विचारण्यासाठी गेले. पण पोलिसांनी त्यांनाच अटक केली. पोलिसांचा वापर करून उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यापासून मज्जाव करणे हा साफ चुकीचा प्रकार आहे. रस्त्याने चालणाऱ्या माणसाला मारणे, मतदानाला जाऊ नका म्हणून दादागिरी करणे, ही हुकूमशाही आहे का? सीपी कुणाच्या ताटातले मांजर आहेत का? नवी मुंबईचे पोलिस आयुक्त कुणाच्या ताटातले मांजर आहेत का? सध्या जे काही सुरू आहे ते साफ चुकीचे आहे. आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. कुणाच्या तरी दमदाटीमुळे पोलिसांचा नाईलाज झाला आहे. काही जण स्वतःला नवी मुंबईचे सम्राट समजतात. ते मंत्री निवडणूक आयोगावरही टीका करतात. हा प्रकार सरकारी यंत्रणेला दावणीला बांधण्याचा आहे, असे म्हस्के म्हणाले, उल्लेखनीय बाब म्हणजे नरेश म्हस्के यांनी या प्रकरणी पोलिसांवर टीका करताना या प्रकरणात गृह मंत्रालयाचा कोणताही हात नसल्याचेही प्रामुख्याने अधोरेखित केले. या प्रकारात गृह मंत्रालयाचा कोणताही हात नाही. कुणी तरी स्वतःला नवी मुंबईचे सम्राट समजतात. त्यांच्याकडून जोरजबरदस्तीने असे प्रकार सुरू आहेत, असे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 15 Jan 2026 5:42 pm

चंद्रपूरमध्ये मतदानाचा व्हिडिओ व्हायरल:मतदान केंद्रावर मोबाईल वापरास बंदी असूनही केले शूटिंग, प्रभाग क्रमांक 5 मधील प्रकार

राज्यात 29 महानगरपालिकांसाठी सकाळपासूनच मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. मात्र दिवसभरात अनेक मतदान केंद्रांवर बोगस मतदान, बोटांवरील शाई पुसणे, मतदान यंत्रात बिघाड, असे अनेक गैरप्रकार पाहायला मिळत आहे. अशातच आता चंद्रपूरमधून देखील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरच्या प्रभाग क्रमांक 5 विवेक नगर प्रभाग येथे एका मतदाराने आपण कोणाला मतदान केले याचा पूर्ण व्हिडिओ शूट केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चंद्रपूरच्या प्रभाग क्रमांक 5 म्हणजे विवेक नगर प्रभाग येथे एका मतदाराने मतदान करतानाच व्हिडिओ काढला. व्हिडिओ शूट केल्यानंतर या मतदाराने हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर केला. विशेष म्हणजे मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असते, मात्र तरी देखील या मतदाराने मोबाईल सोबत नेऊन व्हिडिओ देखील शूट केला आहे. तसेच हा व्हिडिओ नेमका कोणी काढला आणि याचा उद्देश्य काय? याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही. दोन उमेदवारांच्या पतींमध्ये झालेल्या हाणामारी महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान एकोरी प्रभागातील नेहरू शाळा मतदान केंद्रावर दोन उमेदवारांच्या पतींमध्ये झालेल्या हाणामारीमुळे मोठा तणाव निर्माण झाला. भाजपचे बंडखोर ललित कासट आणि शिवसेना शिंदे गटचे रशीद हुसेन यांच्यात झालेल्या या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी घटनास्थळी सौम्य लाठीमार केला, ज्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. या घटनेव्यतिरिक्त शहरांतील इतर काही प्रभागांमध्येही किरकोळ वादावादीच्या घटना समोर आल्या आहेत. राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या प्रभागात दोन्ही गट आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी संबंधित असल्याने ही लढत अधिक चुरशीची झाली आहे. ललित कासट हे आमदारांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक असून त्यांच्या पत्नी दीपा कासट या अपक्ष रिंगणात आहेत, तर आमदारांचे खंदे समर्थक रशीद हुसेन यांच्या पत्नी इस्मात हुसेन या शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवत आहेत. सकाळी 7.30 वाजता शांततेत सुरू झालेल्या मतदानाला या हिंसक घटनेमुळे गालबोट लागले असून, पोलिसांनी आता या भागात चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 15 Jan 2026 5:27 pm

महापालिकांचे मतदान सुरू असतानाच अजित पवारांनी फोडला जिल्हा परिषदेचा नारळ:महानगरपालिका निकालाआधीच जिल्हा परिषद रणनिती जाहीर

राज्यात आज 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील राजकीय रणनिती स्पष्ट करत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ पुणे जिल्ह्यात फोडला आहे. उद्या 16 जानेवारीला महापालिका निवडणुकांचा निकाल लागणार असतानाच, अजित पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्ता मेळावा घेऊन येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अजेंडा मांडला. या मेळाव्यात त्यांनी निवडणूक कार्यक्रम, आरक्षण, विकास आराखडे, उमेदवारी प्रक्रिया आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर सविस्तर भाष्य करत स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. अजित पवार यांनी सांगितले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 16 जानेवारीपासून नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, धाराशिव आणि परभणी या 12 जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे. उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी 50 टक्के आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे निर्देश असल्याने त्यानंतरच परवानगी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर माहिती देताना अजित पवार म्हणाले की, 16 ते 21 जानेवारीदरम्यान नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जातील, 22 जानेवारीला छाननी होईल, तर 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. प्रजासत्ताक दिन आणि सार्वजनिक सुट्ट्यांचा विचार करून ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. याच दिवशी बारा जिल्हा परिषद आणि संबंधित सर्व तालुका पंचायत समित्यांचे निकाल जाहीर होतील, असेही त्यांनी सांगितले. महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांबाबत बोलताना अजित पवार यांनी बारामती आणि माळेगावचा खास उल्लेख केला. बारामती नगरपरिषदेत 41 पैकी सुमारे 35 जागांवर राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले उमेदवार विजयी झाले, तर सहा वेगवेगळ्या विचारांचे उमेदवार निवडून आले. त्यातील तीन अपक्ष नगरसेवकांनी बारामतीतील सर्वांगीण विकास पाहून राष्ट्रवादीला पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या चार जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माळेगाव नगरपंचायतीत सुहास सातपुते निवडून आल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. नगरपालिका आणि नगरपंचायतीतील उपनगराध्यक्ष पदाबाबत बोलताना अजित पवार यांनी पाच वर्षांत पाच जणांना संधी देण्याचा निर्णय जाहीर केला. साखर कारखान्यांप्रमाणेच वेगवेगळ्या गटांना संधी देण्याचा हा पॅटर्न राबवला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वीकृत नगरसेवकांसाठी अचानक लागू झालेल्या नव्या नियमांवरही त्यांनी भाष्य केले. पाच वर्षांचा व्यावसायिक अनुभव, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए किंवा प्राध्यापक असणे यासारख्या अटी लादण्यात आल्याचे सांगत, चॅरिटी कमिशनरकडे नोंद असलेल्या संस्थांचे पदाधिकारीही पात्र ठरतात, असे त्यांनी नमूद केले. माळेगाव आणि बारामतीच्या विकास आराखड्यांवर बोलताना अजित पवार म्हणाले की, डेव्हलपमेंट प्लॅन करताना नागरिकांना हरकती आणि सूचना देण्याची अंतिम मुदत 17 जानेवारी आहे. माळेगाव कारखान्यामुळे परिसर झपाट्याने वाढत असून भविष्यात माळेगाव, बारामती आणि पिंपळी हे भाग एकसंध होतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. शासकीय जागांवर 33 आरक्षणे टाकण्यात आली असून उर्वरित आरक्षणे खासगी जागांवर ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. रिंग रोडमुळे काहींच्या जमिनी जाणार असल्या तरी उरलेल्या जमिनींच्या किंमती चारपट वाढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कॉन्ट्रॅक्टर व्हायचं असेल तर राजकारणात येऊ नका कार्यकर्त्यांना थेट इशारा देत अजित पवार म्हणाले की, भावकी, गटतट विसरून कामाला लागा. येत्या साडेतीन वर्षांत कोणतीही निवडणूक नसून विकासकामांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी इच्छुकांनी अर्ज करावेत, अंतिम निर्णय सर्वे आणि चर्चेनंतर घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राजकारण करायचं असेल तर कॉन्ट्रॅक्टर बनू नका आणि कॉन्ट्रॅक्टर व्हायचं असेल तर राजकारणात येऊ नका, असा थेट संदेश देत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना काम करून दाखवण्याचे आवाहन केले.

दिव्यमराठी भास्कर 15 Jan 2026 5:13 pm