धनंजय मुंडे आणि अशोक खरात यांची वृत्ती एकसारखीच आहे. तपास केल्यास त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध उघड होऊ शकतात. धनंजय मुंडे अनेकदा 'नाशिकला जात आहे' असे सांगत असत, परंतु ते नेमके कुठे आणि कोणाला भेटायला जात होते, याची त्यांच्या फोन रेकॉर्ड्सवरून (CDR) चौकशी व्हायला हवी, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. करुणा मुंडे म्हणाल्या की, रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे इतके फोटो व्हायरल झाले आहेत. ते एकमेकांना खावू घालताना दिसून येत आहे. त्यांचे पाय धुतांना दिसून येत आहे. चाकणकरानी जर त्यांच्या पदासाठी इतकी निष्ठा दाखवली असती तर राज्यातील महिलांची जी बिकट परिस्थिती आहे ती सुधारली असती. ..म्हणून राज्याची ही अवस्था झाली धनंजय मुंडे आणि अशोक खरात हे एकाच वृत्तीचे लोकं आहेत. तपास केला तर मुंडे आणि खरातांचा संबंध आहे हे उघड होऊ शकते असे मला वाटते. रुपाली चाकणकर यांना पाठिशी घालण्याचा खूप लोकं प्रयत्न करत आहेत. यापूर्वी सुद्धा असे दिसून आले की लोकप्रतिनिधीवर काही आले की त्यांना पाठिशी घातले जाते, यामुळेच राज्याची ही अवस्था झाली आहे, असे म्हणत करुणा मुंडे यांनी निशाणा साधला आहे. खरातकडे 2 ते 3 हजार कोटींची संपत्ती असू शकते करुणा मुंडे म्हणाल्या की, खरात यांच्याकडे 200 -300 कोटींची नाही तर 2 ते 3 हजार कोटी रुपयांची संपत्ती असेल.आमदार आणि मंत्र्यांचे त्यांच्यासोबत फोटो आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा त्यांच्याशी संबंध असू शकतो. कारण धनंजय मुंडे आणि अशोक खरात हे एकाच वृत्तीचे लोकं आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांचे सीडीआर काढले पाहिजे. धनंजय मुंडे अनेक वेळा नाशिक चाललो असे सांगत होते. कुठे जात होते हे माहिती नाही ते तिथे जात होते का हे तपासले पाहिजे. खरातला राष्ट्रवादीचा पाठिंबा करुणा मुंडे म्हणाल्या की, माझा नवरा सुद्धा अशा साधू, संत, सन्यासी लोकांमध्ये असतो धनंजय मुंडे यांनी माझ्यासह मुलांवर काळी जादू केली होती. खरातला राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठबळ असल्याचे दिसून येत आहे. कोणता शर्मा आहे त्यांची सुद्धा कुंडली काढली पाहिजे.
रायपूर : छत्तीसगड विधानसभेत आज धर्म स्वातंर्त्य विधेयक, २०२६ मंजूर झाले आहे. बेकायदेशीरपणे धर्मांतर करण्याच्या प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यास ७ ते १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि किमान ५ लाख रुपये दंड आकारला जाईल. जर पीडित अल्पवयीन, महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय असेल, तर शिक्षा वाढवून १० ते २० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि किमान १० लाख […] The post धर्मांतरण केल्यास आता जन्मठेप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वनतारात कायद्याचे उल्लंघन नाही
नवी दिल्ली/गांधीनगर : सर्वोच्च न्यायालयाने वनताराविरुद्ध दाखल केलेली एका फाउंडेशनची याचिका फेटाळून लावली. वनताराने कोणत्याही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले नाही, असे न्यायालयाने म्हटले. वनताराविरुद्ध ही याचिका करणार्थम विरम नावाच्या एका फाउंडेशनने दाखल केली होती. या याचिकेत केंद्र सरकार, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण आणि इतरांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. यात वनतारावर प्राण्यांशी संबंधित […] The post वनतारात कायद्याचे उल्लंघन नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
परदेशी चलन देण्याच्या आमिषाने एकाची साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चार जणं विरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रसन्न मंडावले, शिवम भोजने, राजेश म्हस्के (तिघे रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर)अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे तक्रारदाराच्या ओळखीचे आहेत. आरोपीने त्यांनी अमेरिकन डाॅलर देण्याचे आमिष तक्रारदाराला दाखविले होते. त्यानंतर तक्रारदाराने आरोपींना सात लाख ४५ हजार रुपये आरोपींना दिले. पैसे दिल्यानंतर आरोपींनी त्यांना परदेशी चलन दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक एस शिरसाट पुढील तपास करत आहेत. किशोरवयीन मुलाकडून काम करून घेणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल किशोरवयीन मुलाकडून ज्युससेंटरवर काम करून घेणाऱ्या मालकावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 146 आणि बाल न्याय कायदा 79 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सत्तार मर्फत शेख (30, रा. समर्थनगर, खराडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ज्युस सेटंरच्या मालकाचे नाव आहे. याबाबत अशोक लहुराव केदार यांनी खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्तार शेख याने मुलगा हा किशोरवयी असल्याचे माहिती असताना देखील त्याच्याकडून झेनिया सी. टी. व्हिस्टा खराडी येथील आर झेड फ्रेश ज्युस सेंटवर कामाला ठेवून कमी वेतनात जास्त करून करण्यास लावले. त्या मुलाचे आर्थिक, मानसिक व शारीरीक शोषण केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून माणसाला मानवतेची जाणीव करून दिली. या आंदोलनाच्या माध्यमातून भारताला समतेकडे नेले. मुळात अस्पृश्यता व विषमता हा सर्वात मोठा अपराध आहे. त्यामुळे भावी पिढ्यांना समता व विषमता या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाड येथे बोलताना केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्याचे पाणी चाखून ऐतिहासिक सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहाला आज तब्बल 100 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाडला भेट देऊन चवदार तळे जलशुद्धीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले, आमदार प्रवीण दरेकर आदी नेते व अधिकारी उपस्थित होते. विखंडित समाज नेहमी पराभूत होतो मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले, चवदार तळ्याचा सत्याग्रह हा भारताच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण होता. 'बहिष्कृत भारत'मध्ये 3 एप्रिल 1927 रोजी बाबासाहेबांनी चवदार तळ्याच्या आंदोलनाची माहिती देताना सांगितले होते की, ज्या प्रकारे फ्रेन्च राज्यक्रांतीने जगाचा इतिहास बदलला, अगदी त्याचप्रकारे या आंदोलनाने भारताचे भविष्य बदलणार आहे. गुलामगिरीच्या साखळ्या सोडून एक मोठा न्याय प्राप्त होणार आहे. भारतीय समाजात अनेक वर्षे आपल्याला गुलामगिरीत काढावी लागली. या गुलामगिरीच्या मुळाशी काय आहे? आपण सातत्याने गुलाम का झालो? हे पाहिले तर त्यामागे आमच्या समाजातील अनिष्ठ प्रथा होत्या. आमच्या समाजात अस्पृश्यता होती. आमच्या समाजामध्ये जातीभेद होता. अशा पद्धतीचा विखंडित समाज नेहमी पराभूत होतो. त्यामुळे या पराभवातून शेकडो वर्षांची गुलामगिरी आपल्याला सहन करावी लागली. अशा कुप्रथा आल्या नसत्या तर कदाचित भारत केव्हाच गुलाम झाला नसता, असे ते म्हणाले. चवदार तळे परिसराचे होणार सुशोभीकरण मुख्यमंत्र्यांनी मुख्य सोहळ्यानंतर पत्रकारांशीही संवाद साधला. त्यात त्यांनी सरकार चवदारतळ्याच्या सुशोभीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहाच्या शताब्दीच्या निमित्ताने आम्ही येथे आलो आहोत. सरकारने बाबासाहेबांना वंदन करून चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या व इतर विविध गोष्टी उभारण्याच्या संदर्भात आराखडा तयार केला आहे. त्याचे भूमिपूजनही आम्ही येथे केले आहे. आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, भारताच्या इतिहासात चवदार तळ्याचा सत्याग्रह हा भारताला समतेकडे नेणारा होता. जेव्हा माणूस माणसाला माणूस म्हणून माणण्यास तयार नव्हता. तेव्हा बाबासाहेबांनी या सत्याग्रहाच्या माध्यमातून माणसाला मानवतेची जाणीव करून दिली. तेव्हा या देशात विषमता होती. या विषमतेने जी व्यवस्था निर्माण केली, त्या व्यवस्थेनेच आपल्याला गुलामगिरी स्वीकारावी लागली. त्यामुळे आपल्या देशात पुन्हा अशी विषमता येऊ नये यासाठी काम झाले आहे. अस्पृश्यता व विषमता हा सर्वात मोठा अपराध आहे. त्यामुळे येणाऱ्या पीढ्यांना समता व विषमतेने झालेले नुकसान या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत. म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. या प्रकरणी केवळ जलशुद्धीकरणाचा विकास नव्हे तर सर्वांगीण विकास करण्यावर आमचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दुचाकीस्वार व्यावसायिकाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू:पुणे-हडपसर-सासवड रस्त्यावर ऊरळी देवाची परिसरात अपघात
हडपसर-सासवड रस्त्यावर ऊरळी देवाची परिसरात ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वार व्यावसायिकाचा मृत्यू झाला. राकेश अंबादास जन्नू (वय ५०, रा. रविराज काॅलेरेडो, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. फुरसुंगी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जन्नू यांचा चुलतभाऊ राहुल (वय ४२) यांनी याबाबत फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश जन्नू हे हडपसर-सासवड रस्त्याने जात असताना भरधाव ट्रकने त्यांना ऊरळी देवाची परिसरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राकेश यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक पवार पुढील तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भरधाव वेगामुळे होणाऱ्या गंभीर अपघातांमध्ये पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांचा मृत्यू होत आहे. गेल्या आठवडाभरात अशा वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. कात्रज येथील प्राणीसंग्रहालयातून झाडे चोरीचा प्रयत्न पुणे शहरातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या आवारात शिरलेल्या चोरट्यांनी झाडे कापून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चोरट्यां विरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुरक्षारक्षक श्रीपती देवीदास कसबे (वय ३०, रा. शिवनेरीनगर, कोंंढवा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या आवारात मध्यरात्री चोरटे शिरले. चोरट्यांनी आवरातील चंदनाची चार झाडे कापून नेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर चोरटे पसार झाले. यापूर्वी प्राणी संग्रहालयाच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी प्राणीसंग्रहालयास भेट दिली असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. प्राणीसंग्रहालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेेरे बसविण्यात आले आहेत. चित्रीकरण तपासून चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील तपास करत आहेत.
‘एआय’मुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ४४२ अब्ज डॉलर्सचा फटका
नवी दिल्ली : जगभरातील आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या प्रमाणाने आता एका भीषण संकटाचे रूप धारण केले असून, गेल्या वर्षभरात म्हणजेच २०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला तब्बल ४४२ अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिक रकमेचा फटका बसला आहे. फ्रान्समधील ल्योन येथे मुख्यालय असलेल्या ‘इंटरपोल’ या जागतिक पोलिस सहकार्य संघटनेने आपल्या ‘२०२६ जागतिक आर्थिक फसवणुकीच्या धोक्याचे मूल्यांकन अहवालात ही माहिती प्रसिद्ध […] The post ‘एआय’मुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ४४२ अब्ज डॉलर्सचा फटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारताने ८८० नागरिकांना आणले मायदेशी
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाने भीषण रूप धारण केले असून, या युद्धाच्या आगीत अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक देशांनी आपले एअरस्पेस बंद केल्यामुळे भारतीयांना मायदेशी आणण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर होते. मात्र, भारताने अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांच्या मदतीने एक नवा सुरक्षित मार्ग […] The post भारताने ८८० नागरिकांना आणले मायदेशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तेहरान : मध्यपूर्वेतील युद्ध आता तेल उत्पादक देशांच्या मुळावर उठले आहे. कतारनंतर आता इराणने कुवेतच्या प्रमुख मीना अल-अहमदी रिफायनरीवर मध्यरात्री मोठा ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे रिफायनरीच्या काही युनिट्समध्ये भीषण आग लागली असून कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने खबरदारीचा उपाय म्हणून तेल उत्पादन तात्पुरते थांबवले आहे. सौदी अरेबियाच्या अधिका-यांनी व्यक्त केलेली भीती आता खरी ठरताना दिसत […] The post कच्चे तेल १८० डॉलर्सवर जाणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : आयपीएल २०२६ स्पर्धेतील यंदाच्या हंगामाला २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ ३० मार्चला चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या लढतीने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. त्याआधी संघाला मोठा धक्का बसला असून चेन्नई सुपरकिंग्सच्या ताफ्यातून ट्रेडच्या माध्यमातून राजस्थान रॉयल्स संघात आलेला इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन ग्रोइन इंज्युरीमुळे स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, […] The post सॅम करण आयपीएलला मुकणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धुरंधर २ ठरला बॉलिवूडचा सगळ्यात मोठा ओपनर
मुंबई : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ ने प्रदर्शित होताच अख्खे मार्केटच खाऊन टाकले आहे. पहिल्याच दिवशी धुरंधर २ ने बॉक्स ऑफिसवर धुव्वा उडवला आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच धुरंधर २ ने १०० कोटींच्या पेक्षाही जास्त कमाई केली आहे. केवळ देशातच नाही तर परदेशातही सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. धुरंधर २ च्या पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन […] The post धुरंधर २ ठरला बॉलिवूडचा सगळ्यात मोठा ओपनर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देवाभाऊंच्या नेतृत्वात तिपटीने वाढली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्राचा तिपटीने विकास देवाभाऊंच्या नेतृत्वात होत आहे. सर्वाधिक गुंतवणूक देवाभाऊमुळे महाराष्ट्रात येत आहे, राज ठाकरेंना मला सांगायचे आहे की अर्धवट माहितीची आधारे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर टीका करू नका, असे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. देवाभाऊ हे महाराष्ट्र आणि मुंबईला पुढे घेऊन जात आहे. या विकास यात्रेत राज ठाकरेंचे स्वागत आहे, सूचना करा टीका करू नका अन्यथा आकडेवारीसह उत्तर दिले जाईल. नवनाथ बन म्हणाले की, खरात नावाच्या भोंदू बाबाचे भक्त अनेक ठिकाणी होते. पण फोटो काढले म्हणून कोणी दोषी होते असे नाही. एकही मंत्री या कृत्याला साथ दिलेली दिसत नाही. या प्रकरणी सखोल तपास करण्याचे काम सुरू आहे. फोटो आहे म्हणून मंत्र्यांवर कारवाई करता येणार नाही, तपास करत चौकशीअंती जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येतील. नार्वेकर यांचे फोटो समोर आले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राऊत करणार आहेत का? असा सवाल बन यांनी केला आहे. नेत्यांसोबत काढलेल्या फोटोचा गैरफायदा हे भोंदू लोक करत असतात. कुणालाही सोडले जाणार नाही नवनाथ बन म्हणाले की, गुढीपाडव्यानंतर जनाब संजय राऊत यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला दिसतो आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्रकार परिषदेमध्ये कौतुक केले आहे. देवाभाऊंचे कामच असे आहे की गेली 3 टर्म जनता त्यांचे कौतुक करते. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जात नाही, मग तो खरात फाईल्स असो की पाटकर फाईल्सअसो. त्यामुळे राऊतांनी देवाभाऊंचे कौतुक केले आहे. खरात फाइल्समध्ये जे कोणी दोषी आढळेल त्या सर्वांवर कारवाई करण्यात येतील. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. कुणालाही सोडले जाणार नाही. अनेकांचे फोटो समोर नवनाथ बन म्हणाले की, त्या भोंदूसोबत जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर यांचे फोटो समोर आले आहेत. कदाचित संजय राऊत यांच्यासोबतचे असतील मला माहिती नाही. पण फोटो असला म्हणजे संबंध असतीलच असे काही नाही. रुपाली चाकणकर यांचे वेगवेगळे फोटो समोर आले आहेत. त्या प्रकरणी सखोल तपास करत कारवाई झाली पाहिजे. राजकीय लागेबांधे आहेत म्हणून कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही ते कुणीही असो. गृहविभागाने कारवाई केली नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्राची परंपरा धुळीस मिळवण्याची काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. आमच्या काळात भोंदू बाबा असो की कुणीही चुकीचे काम करणारी व्यक्ती त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार. कारवाई करण्यासाठी धाडस लागते ती गृहविभागाने दाखवली आहे. ठाकरेंनी अनेकांना पाठिशी घातले होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केलेत. रुपाली चाकणकर व भोंदूबाबा अशोक खरात याच्यात घरगुती संबंध होते. त्या तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिकाही कापली होती. या प्रकरणी त्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भोंदूबाबा अशोक खरातशी कथित संबंध असल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची व त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी त्यांच्या नार्कोटेस्टचीही मागणी केली. त्या एका पीडितेचा दाखला देत म्हणाल्या, रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिक कापली होती. हे कृत्य अशोक खरातपुढे झाले होते. खरातनेच कर्मकांडासाठी त्यांना अनामिक कापण्यास सांगितले होते. त्यातून त्यांच्या बोटाला जखम झाली. ती जखम तब्बल 4 महिने तशीच होती. याचा एक फोटो माझ्याकडे आहे. त्यात चाकणकरांनी अनामिकाला बँडेज लावल्याचे दिसून येत आहे. अशोक खरात - चाकणकरांत घरगुती संबंध सुषमा अंधारे पुढे बोलताना म्हणाल्या, रुपाली चाकणकर व अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर उपस्थित होत्या. एवढेच नव्हे तर चाकणकरांच्या घरात खरात यांची भाची राहते. प्रस्तुत प्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यामुळे त्यांची तत्काळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली पाहिजे. त्या फरार होण्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांनी यापूर्वीही आपल्या पदाचा दुरुपयोग करून या प्रकरणी अनेकांवर दबाव आणला आहे. त्या मध्यरात्री 2-2 वाजता फोन करून पीडितांना धमकी देत होत्या. त्यामुळे त्यांचा सीडीआर तपासला गेला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे व त्यांची नार्को टेस्ट केली गेली पाहिजे. सुषमा अंधारेंना धमकीचे फोन अंधारे यांनी सांगितले की, प्रस्तुत प्रकरणात अनेक महिलांचा लैंगिक छळ झाला. पण भीतीपोटी त्या त्या अद्याप तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. तपास यंत्रणांनी याची सखोल चौकशी करावी. त्यांच्याकडे तीन पीडित महिलांनी माहिती दिली असून, त्यांना पोलिस संरक्षण पुरवण्याची गरज आहे. मला स्वतःलाही धमकीचे अनेक फोन येत आहेत. पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी 8 वेगवेगळ्या नंबरवरून हे फोन आले. त्यात अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ करण्यात आली. मी याविषयी पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहे. खरात याच्या ट्रस्टवरील लोकांची माहितीही या प्रकरणी गोळा केली जात आहे. सुनेत्रा पवारांना कारवाईचे साकडे अंधारे यांनी आरोप केला की, गेल्या एक वर्षापासून अशोक खरात विरोधात तक्रारी येत आहेत. पण राज्य महिला आयोगाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. महिला आयोगाचे काम महिलांचे सबलीकरण आणि समुपदेशन करणे असताना, रुपाली चाकणकर यांनी नेहमी याच्या विरोधात काम केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर तातडीने आणि ठोस कारवाई करावी, अशी मागणीही अंधारे यांनी केली.
तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. यामध्ये आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांचे खरातांसोबतचे नवे फोटो पोस्ट केले आहेत. तर दुसरीकडे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे खरातचे फोटो समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. अंजली दमानिया यांनी अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांचे एकत्रित फोटो ट्विट केले आहेत. भोंदू बाबा'ला कोणाचे अभय होते, असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे. या फोटोंमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ह्या रुपाली चाकणकरांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी सुद्धा दमानिया यांनी केली आहे. नराधम भोंदू बाबाची मुजोरी...- वडेट्टीवार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पोस्ट करत म्हटलंय की, अशोक खरात या अत्याचारी भोंदू बाबाच्या कुटुंबीयांनी मुजोरीची परिसीमा गाठली आहे. त्यांच्या आलिशान बंगल्यातून बाहेरील पत्रकारांवर चपलांचा मारा करत पत्रकारांना कुत्र्याचा धाक दाखवायचा प्रकार खरात कुटुंबीयांनी केला आहे. खरंतर अशोक खरातचे कृत्य त्या बिचाऱ्या श्वानालाही लाजवणारे आहे. मात्र आपले भक्त सत्तेत आहेत, आपलं कोणी काही वाकड करू शकणार नाही हा माज या खरात कुटुंबियांच्या कृत्यातून दिसून येत आहे. राज्य सरकारने या प्रकरणावर अजिबात पांघरून घालू नये, अशोक खरातसह त्याच्या कुटुंबियांवर कारवाई करावी, या खरातच्या चरणी लीन असलेल्या सत्ताधाऱ्यांना पदावरून तातडीने बडतर्फ करावे. अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचा संशय- विखे या प्रकरणी बोलताना सुजय विखे म्हणाले की, मी अशोक खरातला कधीही भेटलेलो नाही किंवा त्याच्याशी संपर्क साधलेला नाही. मात्र त्यांची सिन्नरसह फक्त शिर्डी नव्हे तर अनेक ठिकाणी त्याच्या मालमत्ता असल्याची माहिती माझ्याकडे आहे. शिर्डी सोबतच राहाता, साकुरी आणि अन्य गावांमध्येही त्याने मालमत्ता खरेदी केल्याचे मला कळल्याचे सुजय विखेंनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. सीआयडी-एसआयटी तपास सुरू अशोक खरातच्या अटकेनंतर या प्रकरणाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून, संबंधित अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य पाहून शासनाने हा तपास सीआयडी (CID) आणि एसआयटी (SIT) कडे सोपवला आहे. या तपासातून खरातच्या अफाट संपत्तीचे आणि त्याच्या जाळ्यात अडकलेल्या इतर बड्या नावांचे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात संतापाची लाट दरम्यान, अशोक खरातविरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, 18 मार्च रोजी पहाटे त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त असून, अंकशास्त्रज्ञ म्हणून त्याने नाव कमावले होते. मात्र, या गंभीर आरोपांनंतर त्याची प्रतिमा पूर्णपणे डागाळली असून, या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
खरात प्रकरणात ऑफिसबॉयचा धक्कादायक कट उघड:नीरज जाधवचा ब्लॅकमेलिंग प्लॅन फसला, खरातचा काळा चेहरा समोर
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली असताना आता या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण मिळाले आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अटकेत असलेल्या खरातच्या कारवायांमागे त्याचाच विश्वासू ऑफिसबॉय नीरज जाधव हा महत्त्वाचा सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महिलांवरील अत्याचारांचे व्हिडिओ वापरून मोठ्या पैशांची मागणी करण्याचा कट उघड झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, खरातने महिलांचे लैंगिक शोषण करत त्याचे व्हिडिओ आणि फोटो कार्यालयातील सीसीटीव्ही प्रणालीत साठवून ठेवले होते. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘ओजस प्रॉपर्टीज’ या ठिकाणी हे सर्व प्रकार घडत होते. डिसेंबर 2025 मध्ये नीरज जाधव याने खरातच्या नकळत या 58 महिलांशी संबंधित व्हिडिओ आणि इतर पुरावे चोरून नेले. त्यानंतर पैशांच्या लालसेपोटी त्याने या सामग्रीचा वापर करून ब्लॅकमेलिंगची योजना आखली. सुरुवातीला नीरजने या व्हिडिओंच्या आधारे थेट खरातलाच पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र, खरातने त्याकडे दुर्लक्ष करत उलट त्याच्याविरोधात वावी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे समोर आले. त्यानंतर नीरजने आपली दिशा बदलत थेट पीडित महिलांनाच लक्ष्य केले. शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहित महिलेला मॉर्फ फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठवून धमकावण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याचदरम्यान, मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका पीडितेला नीरजने प्रत्यक्ष गाठून तिला संबंधित व्हिडिओ दाखवले. घाबरलेल्या महिलेने ही बाब खरातच्या कानावर घातली, मात्र स्वतःची बाजू वाचवण्यासाठी त्याने तिलाच पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान, खरातकडून पैसे मिळण्याची शक्यता कमी झाल्याने नीरजने सिडको येथील दुसऱ्या एका 28 वर्षीय विवाहित महिलेचा व्हिडिओ तिच्या नातेवाईकाला पाठवला. मात्र, याच घटनेमुळे प्रकरण उघडकीस आले आणि पीडितेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष तपास पथक स्थापन या गंभीर प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यासाठी राज्य शासनाने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून पथकाचे नेतृत्व तेजस्वी सातपुते करत आहेत. त्यांनी नाशिकमध्ये येऊन कागदपत्रांची तपासणी करत खरातची सखोल चौकशी केली आहे. दरम्यान, नीरज जाधवला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचे धागेदोरे राजकीय नेते, मंत्री आणि सेलिब्रिटींपर्यंत पोहोचत असल्याने तपास अधिकच संवेदनशील बनला आहे.
रुपाली चाकणकर मामा मला वाचवा म्हणाले आणि लगेच तुम्ही पळाला का? खरात प्रकरणी मंत्री दत्ता भरणेदेखील लाभार्थी आहेत का? असा सवाल संगिता तिवारी यांनी केला आहे. तर दत्ता भरणे चाकणकरांना का क्लीन चीट देत आहेत? असा सवाल करत त्यांनी दत्ता भरणेंवर टीका केली आहे. संगिता तिवारी म्हणाल्या की, भरणे मामा म्हणताय की रुपाली चाकणकरांची चूक नाही. अहो भरणे मामा तुम्ही काय बोलता आहात? महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांची काही चूकी नाही, अहो मामा त्यांनी मामा मला वाचवा अशी हाक देताच तुम्ही पळत त्यांना वाचवण्यासाठी धावून आलात, तुम्ही त्यामध्ये लाभार्थी आहात का? कशाला बाजू का घेत आहात? टीव्हीवर सगळे काही दाखवत असताना तुम्ही बाजू का घेत आहात? पत्रकार खोटे नाहीत ना? असे म्हणत भरणे यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान या प्रकरणी बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, खरात प्रकरणाची संपूर्ण माहितीच दत्तात्रय भरणे यांच्याकडे नाही. त्यांनी काय सांगितले की मी कार्यक्रमाला जातो, तेव्हा कुणीही फोटो काढतो, नेत्यांसोबत फोटो काढता हे खरे आहे पण कुणीहरी आपल्या मंत्रीपदाच्या लेटर हेडवर पत्र देत नाही. भरणे मामांना संपूर्ण माहितीच नाही. म्हणून त्यांच्याकडून चूकून हे वक्तव्य झाले आहे असे मी म्हणेल. दत्ता भरणे काय म्हणाले? मंत्री दत्ता भरणे यांनी या प्रकरणी बोलताना म्हटले की, या प्रकरणी रुपाली चाकणकर यांचा काही दोष नाही. काही कार्यक्रमानिमित्त चाकणकरांची आणि महाराजांची भेट झाली असेल, शेवटी आपण कुणाला तरी गुरू मानतो, यात रुपाली चाकणकर यांचा काही दोष नाही. कोणासोबत फोटो काढला तर ती काय चूक आहे का? नाही ना. ‘चॉइस पोस्टिंग’साठी सरकारी अधिकारी खरातच्या दरबारात उपजिल्हाधिकारी कधी होणार? अपर जिल्हाधिकारी म्हणून प्रमोशन कधी मिळेल? किंवा पोलिस उपअधीक्षक पदावर पोस्टिंग कुठे मिळेल? एमपीएससी आणि यूपीएससी पास होऊन सनदी अधिकारी झालेले अनेक जण असे प्रश्न ज्योतिषाच्या दारात रांगा लावून विचारत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या या महिला अत्याचारी ज्योतिषी अशोक खरातला स्वतःला कधी अटक होणार, याचे मात्र साधे भविष्यही ओळखता आले नसल्याची चर्चा आता रंगली आहे. याचबरोबर या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील पैशांची खरातच्या माध्यमातूनच जमिनींमध्ये सुमारे 100 कोटींहून अधिक गुंतवणूक केल्याची बाब उघडकीस येण्याची शक्यता आहे. दुसऱ्याचे भविष्य सांगणाऱ्या आणि अधिकारी- राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषाचे स्वतःचे भविष्य आता कोठडीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अशोक एकनाथ खरात याच्या काळ्या कृत्यांचा पाढा वाचला जात आहे. या भोंदूच्या मायाजालात महसूल आणि पोलिस दलातील बडे अधिकारीही अडकल्याचे उघड होत आहे. थेट मंत्रालयातून हलली सूत्रे हायप्रोफाइल बाबा अशोक खरात ऊर्फ कॅप्टनने पोलिस कोठडीत चुप्पी साधली असून रात्रभर तो गुन्हे शाखेच्या कार्यालयात जप करत स्वतःच्याच भविष्यासाठी अंकगणिताची जुळवाजुळव करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खरातसोबत म्हाडा भूखंड घोटाळ्यातील संशयित हायप्रोफाइल मोनू मनवानी, सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याचाही कायद्याच्या बालेकिल्ल्यात ‘पाहुणचार’ करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करण्याकरता स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात आली असून, प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी खरातच्या अंकगणिताचा दोन तास क्लास घेतला.
नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणाची तुलना थेट जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी करत जगात एपस्टीन फाईल्स गाजतात, तसेच महाराष्ट्रात आता खरात फाईल्स गाजत आहेत, असा स्फोटक दावा केला. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे अटकेत असलेल्या अशोक खरात याला न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, राज्यातील काही बडे राजकीय नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटी त्याच्या संपर्कात होते, अशी चर्चा रंगली आहे. याशिवाय त्याने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याचेही आरोप होत आहेत, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. दरम्यान, या कारवाईबाबत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनही केले. त्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून अत्यंत गुप्तपणे या प्रकरणाची चौकशी सुरू होती. गृहखात्याच्या माध्यमातून आखलेल्या कारवाईमुळे या प्रकरणाची पाळेमुळे उखडली जात आहेत. अशा प्रकारच्या घटनांनी महाराष्ट्राची बदनामी होते. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री जर या प्रकरणात स्वच्छता मोहीम राबवत असतील, तर ते कौतुकास पात्र आहे, असेही राऊत म्हणाले. व्हिडिओ सार्वजनिक झाले तर सरकार कोसळू शकते राऊत यांनी पुढे आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, खरातच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप्स सापडल्या असून त्यामुळे सत्ताधारी गटातील काही नेते तणावात आहेत. या प्रकरणात राज्यातील काही मंत्रीही त्याचे भक्त होते. ते त्याच्याकडे जाऊन विचित्र आणि घृणास्पद विधी करत होते, असा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये 58 व्हिडिओ असल्याचा दावा करत, हे व्हिडिओ सार्वजनिक झाले तर महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकते, असा धक्कादायक इशाराही त्यांनी दिला. सरकारनेच चाकणकर यांना पदावरून हटवावे याचवेळी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही राऊत यांनी टीका केली. खरातसोबत त्यांचे फोटो समोर आल्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. त्या स्वायत्त संस्थेच्या प्रमुख असल्या तरी त्यांची नियुक्ती सरकारनेच केली आहे. त्यामुळे सरकारनेच त्यांना पदावरून हटवावे, अशी स्पष्ट भूमिका राऊत यांनी मांडली. या सर्व घडामोडींमुळे खरात प्रकरण आता केवळ गुन्हेगारी चौकशीपुरते मर्यादित न राहता मोठ्या राजकीय वादळात रूपांतरित होताना दिसत आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना अचानक छातीत त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे तातडीने दाखल करण्यात आले. गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून डॉक्टरांनी त्वरित तपासणी करून त्यांच्या हृदयाशी संबंधित समस्या असल्याचे स्पष्ट केले होते. रुग्णालयात दाखल होताच तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने उपचारांची प्रक्रिया सुरू केली आणि आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी अँजिओग्राफी केली असता त्यांच्या हृदयात एक ब्लॉकेज असल्याचे स्पष्ट झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉ. समिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण झाली असून डॉक्टरांनी ती पूर्णपणे यशस्वी झाल्याची माहिती दिली आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, शस्त्रक्रियेनंतर सावंत यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना सध्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील काही तासांत त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर वैद्यकीय अहवाल देण्यात येणार असल्याची माहितीही रुग्णालयाकडून देण्यात आली. दरम्यान, या घटनेमुळे गोवा आणि महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सावंत यांच्या प्रकृतीविषयी अनेक नेत्यांनी विचारपूस केली असून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. अचानक उद्भवलेल्या या आरोग्य समस्येमुळे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असाही योगायोग विशेष म्हणजे, 19 मार्च 2019 रोजी दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारली होती. त्यानंतर 2022 च्या निवडणुकीनंतरही त्यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. योगायोगाने, याच दिवशी त्यांच्या कार्यकाळाची सात वर्षे पूर्ण झाली असताना त्यांना हा आरोग्याचा धक्का बसला. मात्र, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याने सर्वांनी दिलासा व्यक्त केला आहे.
शहराला गेल्या 25 वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायफन पद्धतीने पाणी घेण्यास सुरुवात करण्यात आली. नाथसागरातील जॅकवेल 1 तास 20 मिनिटांत 7 फूट भरले. आता सुमारे 38 किलोमीटरची पाइपलाइन महिनाभरात धुऊन 200 एमएलडी वाढीव पाणी नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचणार आहे. हा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मे महिन्याच्या शेवटी शहरात नळाला एक ते दोन दिवसांआड पाणी मिळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यातील नाथसागरातील उद्भव विहिरीत (जॅकवेल) पाणी घेण्याचा गुढीपाडव्याचा मुहूर्त ठरला होता. त्यानुसार सायंकाळी 4.40 वाजता विहिरीत पाणी घेण्यास सुरुवात झाली. त्याआधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्या हस्ते जलपूजन झाले. या वेळी महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जीव्हीआर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गुगलोथू, खलील खान, मनपा आणि जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. असे योजनेचे टप्पे 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते योजनेचे भूमिपूजन2021 : जीव्हीपीआरसोबत निविदेनुसार करार2022 मध्ये जॅकवेलचे डिझाइन मंजूर2024 : नाथसागरात सौम्य ब्लास्टिंगसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी2024 मध्ये पीसीसी सुरू2026 मध्ये जॅकवेलचा पहिला टप्पा पूर्ण19 मार्च 2026 रोजी सायंकाळी जॅकवेलमध्ये पाणी आले ऐन पाडव्याच्या दिवशी जलवाहिनीला भगदाड छत्रपती संभाजीनगर | रेल्वे स्टेशन ते ज्युबिली पार्क ही मुख्य जलवाहिनी फुटल्याने ऐन पाडव्याच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमधील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. परिणामी आता पाण्याचा टप्पा एका दिवसाने पुढे ढकलला जाणार आहे. बुधवारी (18 मार्च) मध्यरात्री दोनच्या सुमारास रेल्वे स्टेशनकडून ज्युबिली पार्ककडे येणारी 700 मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी अचानक फुटली. जलवाहिनीतील पाण्याचा दाब मोठा होता. काही वेळातच रस्त्यावर पाण्याचे लोट वाहू लागले. माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने रेल्वे स्टेशन गेटसमोरील व्हॉल्व्हवरून पाणीपुरवठा तत्काळ बंद केला. या बिघाडामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वितरण व्यवस्था कोलमडली. या भागातील पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला. . बुढीलेन, जुना बाजार, आसेफिया कॉलनी, जयभीमनगर, घाटी परिसराला फटका बसला. महिनाभर चालणार पाइपलाइन स्वच्छतेचे काम न्यायालयाच्या आदेशानुसार 22 किंवा 23 मार्चला पंप सुरू करायचे आहेत. 100 एमएलडी पाणी उपसा करणारे 2 पंप तयार आहेत. पाइपलाइनच्या सपोर्टसाठी अनेक ठिकाणी बांधलेले चेअर्स निकृष्ट असल्याचे समोर आले होते. पंप सुरू करताना हे चेअर्स दुरुस्त झाले का, याची शहानिशा होणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतरच पंप सुरू होतील. त्यानंतर पुढील महिनाभर पाइपलाइन स्वच्छ करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी 12 ठिकाणी पाणी काढून टाकण्यासाठी व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहेत. सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये पाणी पाणीपुरवठा योजनेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये पाणी घेण्यात यश आले आहे. टेस्टिंग झाल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रातून शहरातील जलकुंभांमध्ये पाणी पोहोचवले जाणार आहे. तेथून घरांपर्यंत पाणीपुरवठा केला जाईल. - मनीषा पलांडे, मुख्य अभियंता, एमजेपी लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याने टप्पा पूर्ण पाणी योजनेचा एक टप्पा पूर्ण झाला ही शहरासाठी आनंदाची बाब आहे. मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट, लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्यामुळे हे काम करता आले. - जी. श्रीकांत, आयुक्त मनपा न्यायालयाच्या रेट्यामुळेच पाणीपुरवठा योजनेला गती 2,740 कोटी रुपयांची ही राज्यातील सर्वात मोठी पाणी योजना असल्याचा गवगवा झाला. निविदा हैदराबादच्या जीव्हीपीआर कंपनीला मिळाली. कोरोना काळात मजूर मिळाले नाहीत. काम रखडले. कंपनी काम सोडणार अशी अफवा पसरली. कंपनीने मे 2024 मध्ये जॅकवेलसाठी पीसीसी सुरू केले. अवघ्या 20 महिन्यांत जॅकवेलचा पहिला टप्पा पूर्ण केला. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाच्या रेट्यानंतरच कामाला गती मिळाली. कालबाह्य जलवाहिनीमुळे संकट 700 मिमी जलवाहिनीचे आयुष्य 30 वर्षांचे होते. मात्र, ती 50 वर्षांपेक्षा अधिक काळापासून वापरात आहे. यामुळे ही जलवाहिनी वारंवार निखळत असून, त्यामुळे जुन्या शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उशीर होत असल्याने नागरिकांना या उन्हाळ्यातही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री काळाराम मंदिरावर अयोध्या येथील राममंदिराप्रमाणे धर्मध्वजा फडकणार आहे. मंदिराच्या कळसापासून तब्बल 21 फूट उंच ध्वजदंडावर ही ध्वजा फडकवली जाणार आहे. हा संपूर्ण ध्वजदंड 360 डिग्रीमध्ये फिरेल अशा चेंबरमध्ये स्थापित करण्यात येणार आहे. हा धर्मध्वज मंदिराच्या आध्यात्मिक गौरव, परंपरा आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक ठरणार असल्याचा विश्वास विश्वस्तांनी व्यक्त केला. मंदिरात कुंभमेळ्याच्या दृष्टीने विविध कामे हाती घेणार असल्याचे वासंतिक नवरात्रौत्सव प्रारंभ सोहळ्यात सांगण्यात आले. यावेळी सह धर्मादाय उपायुक्त महावीर योगी, संस्थानच्या अध्यक्षा रेखा पांढरे यांच्यासह संस्थानचे विश्वस्त उपस्थित होते. धर्मध्वजावर दिसणार, सूर्य, ओम अन् कोविदार वृक्ष धर्म, परंपरा, संस्कृतीचे जतन कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्थानकडून परंपरेचे जतन करत विकासाला प्राधान्य देण्याचा संकल्प आहे. ही धर्मध्वजा धर्म, परंपरा, संस्कृतीचे जतन करतानाच श्रद्धास्थान ठरणार आहे. - अमित कोठवदे, विश्वस्त
जिल्ह्याच्या राजकारणाचे ‘मिनी मंत्रालय’ समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत भाजपने अनपेक्षित ‘राजकीय सर्जिकल स्ट्राइक’ करत सत्ताहस्तगत केली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या संस्थेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), प्रहार जनशक्ती पक्ष आणि अपक्ष सदस्यांची मोट बांधून बहुमताचा आकडा गाठला. भविष्यात शिवसेनेकडून अविश्वास ठराव आणत सत्तेला सुरुंग लागू नये यासाठी राष्ट्रवादी आणि अपक्षांना सभापती पदासह स्थायी समितीत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारपर्यंत शिवसेनेकडे बहुमताचा ‘मॅजिकनंबर’ असल्याचे चित्र होते. मात्र, पडद्यामागून सुरू असलेल्या हालचालींत भाजपने राष्ट्रवादी आणि प्रहारच्या सदस्यांना आपल्या गोटात खेचण्यात यश मिळवले. शिवसेनेच्या रणनीतीला छेद देत भाजपने अविनाश गलांडे आणि जितेंद्र जैस्वाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या सत्तांतरामागे केवळ संख्याबळ नसून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात वर्चस्व निर्माण करण्याची भाजपची दीर्घकालीन खेळी दिसून येते. शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपने पारंपरिक विरोधकांशीही जुळवून घेतल्याचे यातून स्पष्ट होते.जिल्ह्यात 1 खासदार 6 आमदार असूनही मनपा आणि जिल्हा परिषद ताब्यात घेण्यास शिवसेनेला अपयश आले आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री देखील शिवसेनेचाच आहे. सत्तापालट करण्यासाठी शिवसेनेची रणनीती सत्ता हातातून गेल्याने शिवसेना आता आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. कायदेशीर पेच निर्माण करणे किंवा सदस्यांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी‘ फोडाफोडी’चे राजकारण सुरू होऊ शकते. जिल्हा परिषदेवरील या वर्चस्वाचा थेट परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांवर होईल. भाजप आता या सत्तेचा वापर करून ग्रामीण भागात आपली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. मित्रपक्षांना निधी वाटपात देणार अधिक झुकते माप जिल्हा परिषदेतील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या‘स्थायी समिती’मध्ये मित्रपक्षांच्या जास्तीत जास्त सदस्यांना सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विकास कामांच्या निधी वाटपात मित्रपक्षांच्या मतदारसंघाला प्राधान्य देऊन बंडखोरीची शक्यता कमी करण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. त्यामुळे मित्रपक्षांच्या सदस्यांना निधीची कमतरता नसेल. आव्हान सत्ता टिकवण्याचे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणे जेवढे कठीण होते, तेवढेच ती टिकवणे आता भाजपसमोर मोठे आव्हान आहे.शिवसेनेकडून भविष्यात ‘अविश्वासठराव’ आणला जाऊ नये, यासाठी भाजपने मित्रपक्षांना सत्तेत मोठा वाटा देण्याचे सूत्र निश्चित केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष सदस्यांना महत्त्वाची सभापती पदे देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाणार आहे. त्यामुळे भाजपने आतापासूनच सावधगिरी बाळगली.
तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच या प्रकरणाने आता स्पष्टपणे राजकीय वळण घेतले आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप खरातवर आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही विरोधकांकडून टीकेची झोड उठत आहे. भाजपचे नेते तुषार भोसले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाकणकर यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, काही दिवसांपूर्वी तुम्ही महिलांना पोथी-पुराणात अडकवून ठेवले जाते असे सांगत होतात. मात्र, अशा भोंदूंच्या मागे लागण्यापेक्षा पवित्र ग्रंथांचे वाचन आणि त्यांचे आचरण करणे कितीतरी चांगले आहे, असे म्हणत त्यांनी थेट हल्ला चढवला. भोसले यांनी पुढे असेही नमूद केले की, समाजाला उपदेश देण्यापूर्वी स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्तीने अशा वादग्रस्त व्यक्तींशी संबंध ठेवणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, या प्रकरणाची तीव्रता अधिक वाढली आहे. दरम्यान, अशोक खरातसोबतचे संबंध उघड झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे. खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे वादग्रस्त व्यक्तींशी संबंध ठेवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशोक खरातविरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर असून, 18 मार्च रोजी पहाटे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त आहे. अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळख निर्माण केलेल्या या व्यक्तीवर गंभीर आरोप झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे पडसाद राजकीय पातळीवरही उमटताना दिसत आहेत. या संबंधीत खालील बातम्या देखील वाचा… अशोक खरात याच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर फरार:रुपाली पाटील-ठोंबरेंच्या आक्रमक पोस्टने खळबळ; आंदोलनाचा इशारा अजित पवारांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा? अशोक खरातवर संशयाची सुई:देवगिरी बंगल्याबाहेर सापडल्या संशयास्पद वस्तू; काळ्या जादूचा आरोप, तपासाची मागणी
तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक झाल्यानंतर या प्रकरणात नवनवीन दावे समोर येत आहेत. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, त्याच्या अटकेनंतर आता राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली असून या प्रकरणाला आणखी एक नवा आयाम मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर मागणी करत, खरातचा संबंध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताशी आहे का, याचा तपास व्हावा असे म्हटले आहे. त्याचवेळी शरद पवार गटाचे प्रवक्ते सुनील माने यांनी अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्याबाहेर तसेच बारामतीतील निवासस्थानाबाहेर जादूटोण्याशी संबंधित वस्तू सापडल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर या कृत्यामागे अशोक खरात किंवा त्याच्याशी संबंधित व्यक्तींचा हात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या दाव्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर आढळलेल्या वस्तूंचा आणि खरातचा काही संबंध आहे का? त्याने कोणत्याही प्रकारची काळी जादू केली होती का? अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या सर्व दाव्यांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसून, याबाबत सखोल तपासाची मागणी जोर धरत आहे. गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप दरम्यान, अशोक खरातविरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, 18 मार्च रोजी पहाटे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त आहे. अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या या व्यक्तीकडे अनेक राजकीय नेते, उद्योजक आणि सेलिब्रिटी मार्गदर्शनासाठी जात असल्याचेही सांगितले जाते. मात्र, त्याच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे आणि नव्याने समोर आलेल्या दाव्यांमुळे राज्यात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
ब्रह्मांड नायिका, जगतजननी आदिशक्ती जगदंबा ही जगातील जीवांच्या उद्धारासाठी या भूतलावर अवतीर्ण झाली. तिने सृष्टीचे सृजन केले आहे. या आदिमायेची कृपा प्राप्त करण्यासाठी मातेचे नित्य स्मरण करून सुख समृद्धी प्राप्त करण्याचा हितोपदेश शास्त्री जनक जोशी यांनी केला. शास्त्रीनगर परिसरातील जय अंबे माता संस्थान व वास्तुशास्त्रज्ञ डॉ. तृप्ती भाटिया यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीनगर परिसरातील जय अंबे माता संस्थान प्रांगणात ऋषीकुमार संदीपनी विद्यानिकेतन पोरबंदरचे शास्त्री जनक जोशी यांच्याद्वारे गुरुवारी श्रीमद् देवी भागवत कथा प्रारंभ झाली. २६ मार्चपर्यंत दररोज दुपारी दोन ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित या संगीतमय देवी भागवत कथेचा प्रारंभ शोभायात्रेने झाला. शास्त्रीनगर परिसरातील वीर हनुमान मंदिरापासून कथास्थळापर्यंत आयोजित कलश शोभायात्रेत कलशधारी महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या. सर्वप्रथम शास्त्री जनक जोशी यांनी यजमान तृप्ती भाटिया, मुकेश भाटिया यांच्यासोबत मंत्रोच्चारात विधियुक्त पूजन केले. यानंतर भाटिया कुटुंबाने देवी ग्रंथ डोक्यावर धारण केला. ढोल ताश्यांच्या गजरात ही शोभायात्रा शास्त्रीनगर परिसरातील अनेक रस्त्यांवरून मार्गक्रमण करत या शोभायात्रेचे समापन भक्तिभावात कथास्थळी करण्यात आले. शुक्रवारी (दि.२०) भगवती आराधना व नवरात्र पूजा विधानावर कथा आहे. शनिवारी, २१ मार्च रोजी कृष्ण अवतार कथा, रविवारी, २२ मार्च रोजी महिषासूर वध, सोमवारी, २३ मार्च रोजी व्यास आत्मकथा व नारदाचे स्त्रिरूप, मंगळवारी, २४ रोजी माँ दुर्गा अवतार व उत्सव वर्णन, बुधवारी, २५ मार्चला सरस्वती पूजन व तुलसी उत्पत्ती कथा होणार आहे. गुरुवारी, २६ मार्च रोजी रुद्राक्ष महात्म्य व अंबा देवीपुराण कथा होऊन महाआरतीने या कथा उत्सवाचे समापन होणार आहे. कथेत दररोज रात्री ८ वाजता भजन गायक उमेश शर्मा, भोलेराम की सेना, प्रदीप शर्मा, राम देशपांडे, राम पांडे यांच्यासह भजन सादर करून रासगारबा साकार केला जाईल. महिलांचा गरबा खेळून जल्लोष; भजने सादर परिसरातील अनेक कुटुंबांनी या शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत केले. महिलांनी सामूहिक गरबा खेळून जल्लोष साजरा केला तर प्रकाश गोडा कुटुंबांनी ताक वितरण केले. कथास्थळी भागवताचार्य गोपाल महाराज कारखेडकर यांनी उपस्थिती दर्शवत देवी ग्रंथाचे पूजन केले. यावेळी कथा उत्सवाचे यजमान भाटिया कुटुंबाने गोपाल महाराज कारखेडकर यांचे स्वागत केले. रात्री जलाराम सेवा भजन मंडळाचा भजन कार्यक्रम संपन्न झाला. यात महादेवराव वनारे यांनी साथसंगत केली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेच्या अधिनस्थ अखिल भारतीय प्रकल्प कापणी पश्चात अभियांत्रिकी तंत्रज्ञान, कृषी अवजारे, कृषी व कृषी उद्योगांमधील ऊर्जा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच तंत्रज्ञान व यंत्र प्रात्यक्षिक मेळावा घेण्यात आला. यात विदर्भातील विविध भागातील शेतकऱ्यांनी भाग घेतला. यात महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कापणीपश्चात अभियांत्रिकी तंत्रज्ञान केंद्रात निर्मित पीकेव्ही डाळ, ऑइल, बेसन मिल, व गहू सफाई यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच विद्यापीठात विकसित विविध तंत्रज्ञान व पिकांच्या वाणांबद्दल माहिती देण्यात आली. कापणी पश्चात अभियांत्रिकी तंत्रज्ञान विभागामार्फत करडईपासून तेल काढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीपूरक जोडधंदा उभारण्यास मदत होत आहे. तसेच या संयंत्रात शेंगदाणा, मोहरी व जवसाचे तेल काढता येते. सीताफळ व जांभूळ फळांवर प्रक्रिया करुन गावा-गावात उद्योग निर्मिती करण्यास मदत होत आहे. उद्घाटनप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख यांनी यांत्रिकीकर्णाचे महत्व सांगितले. डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता, कृषी अभियांत्रिकी यांनी यंत्र प्रात्यक्षिकता का महत्वाची आहे, असे सांगितले. शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कृषी पदवीधर उद्योजकांकडून उद्योग उभारणीचे मार्गदर्शन कृषी उद्योजक नंदकिशोर शेगोकार यांनी कृषी अभियांत्रिकी उद्योग कसा उभारायचा, याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकरी उद्योग समूहाची स्थापना करत ट्रॅक्टर सर्व्हिस सेंटरपासून सुरवात केली. शेतकरी मोटर्स टू व्हिलर शोरुमची सुरवात केली. २०१६ पासून ते १५ हजार क्षमतेचे आधुनिक ब्रॉयलर पोल्ट्री एसी फार्मची निर्मिती केली.
चिऊताईची संख्या वाढावी यासाठी कार्य करणारे बोटावर मोजण्याइतके पक्षी मित्र जिल्ह्यातील शहरांमध्ये आज मितीस पहावयास मिळत आहे. येथील गुरुदत्तनगर भागात राहणारे पक्षिमित्र म्हणून काम करणारे एक संजय गुरव आहेत. २००६ सालापासून आपला प्रत्येक दिवस चिमणी संवर्धनासाठी वेगवेगळ्या माध्यमातून खर्ची घालत आहे. दरवर्षी २० मार्च जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.या दिवशी जिल्हा सह देशभरात विविध उपक्रम चिऊताई साठी राबवण्यात येतात अनेक निमशासकीय व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पाणीपात्र व धान्यपात्र माती व लाकडी घरटीचे वितरण करण्यात येते. यामागील त्यांचा एकमेव उद्देश आहे की,चिऊताई बरोबरच पक्षी संवर्धन कार्यास नागरिकांना प्रेरित करणे. गेल्या १९ वर्षापासून पक्षिमित्र संजय गुरव हे चिऊताई घरकुल योजना चिमणीच्या अधिवासासाठी व चिऊताईला प्रजनासाठी आपले हक्काचे घर मिळावे हा आहे. त्यांनी आतापर्यंत घरकुल योजनेतून महाराष्ट्रातील लहान मोठ्या गावात चिमण्यांच्या लाखो घरट्यांचे वितरण केले आहे. आज दिवसेंदिवस सिमेंट काँक्रीटच्या घराची संख्या वाढतच आहे. त्यामुळे चिऊताईला आपले हक्काचे घर राहिलेले नाही पण आता जागोजागी लावण्यात आलेल्या या घरट्यामुळे चिऊताईची संख्या वाढीस मदत मिळत आहे. आज अनेक शहरांमध्ये व ग्रामीण भागामध्ये पहाटेच्या वेळेस चिऊताई चा आवाज कानी पडत आहे. ज्या पक्षी प्रेमींनी घराच्या परिसरात किंवा झाडावर पाणी पात्र लावले आहे त्या ठिकाणी चिमण्या आपली तहान भागविण्यासाठी त्यातील पाणी पीत आहेआणि अन्नपत्रातील अन्न खाऊन भूक भागवित असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. चिऊताई घरकुल योजना हा उपक्रम इतर राज्यात गौरय्या आवास या नावाने ओळखले जात आहे. याचे महत्त्व त्या राज्यातील नागरिकांना आता पटू लागले आहेत. त्यामुळे आज हा उपक्रम त्या राज्यांमध्ये राबवण्यात येत आहे यामुळे चिमण्यांच्या संख्येत वाढ होण्यास त्या - त्या राज्यात हातभार लागत आहे. शाळांमध्ये चिमणी घरटे उपक्रमाला प्रतिसाद संजय गुरव हे जिल्हा सह जिल्हा बाहेर बाहेरील विद्यालय, महाविद्यालयात जाऊन त्या ठिकाणी घरटे बांधून एक गाव चिमणी शाळा उपक्रम गेल्या एक दशकापासून राबित आहे. केवळ घरटे बांधून त्यांचे कार्य थांबविले नाही तर ज्या विद्यालय, महाविद्यालयात ते गेले होते त्या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाच्या माध्यमातून चिमणी का वाचावी ? आणि चिमणीचे महत्व पटवून दिले आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या भिंतीवर छताखाली घरटे लावावी जेणेकरून चिऊताईला हक्काचा अधिवास मिळेल व परिवार वाढवण्यास मदत होईल इतर पक्षांच्या संख्येचा विचार करतात चिमणी ही मोठ्या प्रमाणात कीटकांच्या संख्येत नियंत्रण ठेवण्यास मदत करते. रासायनिक फवारण्यात केल्याने कीटकांसोबतच मित्र कीटक मृत्युमुखी पडतात तेव्हा आज प्रत्येक शेतकऱ्याने पण पर्यावरण पूरक लाकडी किंवा मातीची भाजलेली भांडी स्वरूपातील घरटे आपल्या शेतात लावण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.
महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी आमदार वसंत खंडेलवाल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. विधानपरिषदेत त्यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा मांडल्यानंतर सर्व संबंधित विभागांनी या संदर्भात एक महिन्याच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापतींनी दिले. आमदार खंडेलवाल यांनी लक्षवेधी सूचना क्रमांक ७३२ अन्वये या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले. महाराष्ट्रात विशिष्ट भागातील लोकसंख्या वाढीचा दर आणि स्थलांतरणाच्या प्रमाणामुळे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, सुरक्षेच्या दृष्टीने समस्या निर्माण होत आहेत. राज्यात विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि दत्तक विधान आदी वैयक्तिक बाबींसाठी वेगवेगळ्या समुदायांचे वेगवेगळे कायदे आहेत. यामुळे प्रशासकीय, न्यायिक बाबींमध्ये गुंतागुंत निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद ४४ मध्ये राज्यात नागरिकांसाठी समान नागरी कायदा सुनिश्चित करण्याची मार्गदर्शक तत्व लागू करणे आवश्यक आहे. उत्तराखंडने समान नागरी कायदा लागू केला. समान नागरी कायदा लागू करण्याबाबत शासनाची भूमिका व उपाययोजना करण्याची मागणी आ. खंडेलवाल यांनी लक्षवेधीद्वारे मांडली. सर्व विभागांनी एका महिन्याच्या आत या संदर्भातील लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. या विषयावर एका महिन्यात लेखी उत्तर द्यावे अन्यथा आमदार खंडेलवाल यांनी या संदर्भात सभापती किंवा उपसभापतींकडे माहिती दिल्यानंतर बैठक घेणार, असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. राज्यातील बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालणारे व धर्मांतर प्रक्रियेला कायद्याच्या चौकटीत आणणारे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक मंगळवारी रात्री विधानपरिषदेत प्रदीर्घ चर्चेअंती बहुमताने मंजूर झाले. विधानसभेत सोमवारी (दि. १६) या विधेयकाला बहुमताने मान्यता दिली होती. विधिमंडळाने विधेयक मंजूर केल्याने बेकायदा धर्मांतराला आळा घालणाऱ्या कायद्याचा मार्ग मोकळा झाला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे तेरावे राज्य ठरेल. बेकायदेशीररित्या होणारे धर्मांतर रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी विधानसभेत हे विधेयक मांडले होते. तेथे मंजूर झाल्यानंतर सरकारने दुसऱ्याच दिवशी मंगळवारी विधेयक विधानपरिषदेत चर्चेसाठी आणले. गृहराज्यमंत्री भोयर यांनी विधेयक सादर करताना सरकारची भूमिका स्पष्ट केली.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला अकोलेकरांनी खरेदीचा मुहूर्त साधला. दरात घसघशीत घसरण झाल्याने सुवर्णपेढ्या झळाळून निघाल्या. फ्लॅट्स खरेदीला जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यात २-बीएचके फ्लॅट्सला अधिक मागणी होती, असे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. तसेच दुचाकी, कार व ट्रॅक्टर्स खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची अधिक पसंती दिसून आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. शहरात दिवसभर गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. सकाळी शोभायात्रा निघाल्या तर रात्रीपर्यंत खरेदीला उत्साह दिसून आला. ३५० दुचाकींची विक्री जिल्हाभरात सुमारे चार हजार दुचाकींची विक्री झाली. २५० फ्लॅट्स, ५० ट्रॅक्टर, ३० कारची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. इलेक्ट्रिक दुचाकींना मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचे टीव्हीएस डेल्टा दालनाचे संचालक अरुण अलीमचंदानी यांनी सांगितले. अनेक ग्राहकांनी गुढीपाडव्यासाठी बुकिंग करुन ठेवले होते. त्यांनी मुहूर्तावर चाव्या घेऊन दुचाकी घरी नेत पूजन केले. जिल्हाभरात सुमारे ३५० इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाल्याचे दुचाकी डिलर्सने सांगितले. किंमत वाढूनही दुचाकी विक्री कायम होती. सोन्याचे दर गुरुवारी ८ ते १० हजार रुपयांनी व चांदीचे दर १५ हजारांनी कमी झाल्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. राणी हार, अंगठी, बांगड्या, पाटल्या, नेकलेस आदींची नागरिकांनी खरेदी केली. तर काही ग्राहकांनी २ ते ५ ग्रॅम दरम्यान खरेदी केली, यात सोन्याचे क्वॉइन, छोट्या अंगठ्या, नथ आदींचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात नागरिकांचे नुकसान झाले. त्यामुळे ते भरुन काढण्यासाठी सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे, असे सुवर्ण व्यावसायिक नितीन खंडेलवाल यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागरिकांनी टू बीएचके फ्लॅट्सची अधिक खरेदी करत स्वतःच्या घराचे स्वप्न केले पूर्ण केल्याचे, बांधकाम व्यावसायिक पंकज कोठारी यांनी सांगितले. वन बीएचके फ्लॅट्सची सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी झाली असेही त्यांनी सांगितले. कच्च्या मालाचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले. परंतु आम्ही सध्या दरवाढ केली नसून जुन्याच दरात फ्लॅट्सची विक्री केल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. आमच्याकडे १० फ्लॅटचे बुकिंग झाले, असेही पंकज कोठारी यांनी सांगितले. २५० फ्लॅट्सची विक्री, घराचे स्वप्न पूर्ण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कार खरेदीला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी छोट्या कारची अधिक खरेदी केली. सोबतच इलेक्ट्रिक कार खरेदीकडे कल वाढला असून मोठ्या प्रमाणात खरेदी केली, असे गद्रे मोटर्सचे संचालक अमोल गद्रे यांनी सांगितले. एक्सईव्ही ९- एस या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. या कारची रेंज ही ५०० किलोमीटर आहे. तसेच किंमत २२ ते ३२ लाखांपर्यंत आहे. नवीन आलेली कार सेव्हन एक्सओ हिला चांगली मागणी आहे, असे अमोल गद्रे यांनी सांगितले.
वाढत्या तापमानाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये. यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा केवळ सकाळच्याच सत्रात भरवण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे पत्र मुख्याध्यापकांना पाठवले आहे. शुक्रवारी २० मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. परंतु त्याचवेळी काही खासगी शाळांना या आदेशाची अंमलबजावणी करणे शक्य होणार नाही. असेही वास्तव पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने काहीशी कठोर भूमिका घेतली आहे. संबंधित शाळांनी पर्यायी व्यवस्था करावी. असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्याहीपुढे जाऊन ज्या शाळांची अडचण आहे, त्या शाळांचे मुख्याध्यापक आणि जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढला जाण्याची शक्यतादेखील निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा सुमारे १५०० शाळांचे जिल्हा परिषदेचे जाळे आहे. या शाळांमधून सुमारे ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्व विद्यार्थ्यांची शाळा शुक्रवारपासून दुपारच्या सत्रात भरणार नाही. याशिवाय शिवाजी शिक्षण संस्था, सातपुडा शिक्षण संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ, एलवायजे लेडीज क्लब, हव्याप्र मंडळ, भगीनी मंडळ अशा काही खासगी व्यवस्थापनाच्याही प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. या सर्व शाळांचे व्यवस्थापन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अखत्यारित येते. त्या शाळासुद्धा उर्वरित. पान ४ शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यासाठी दोन जि.प. च्या शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात दोन वेगवेगळ्या वेळा सूचविण्यात आल्या आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जारी केलेल्या पत्रात शाळेची वेळ सकाळी ७ ते ११ अशी निर्धारीत केली आहे. त्याचवेळी प्राथमिक विभागाच्या पत्रातील वेळ ७.१५ ते १२.१५ अशी लिहिण्यात आली आहे. येत्या काळात या मुद्द्यावर वाद होऊ शकतो. त्यामुळे सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळांची वेळ सकाळी ७ ते ११अशीच असायला पाहीजे, असे संघटनांचे म्हणणे आहे. प्रा. डॉ. महेंद्र मेटे, अमरावती का बरं, त्यांना उन्हं नाही का लागणार? : शिक्षण विभाग इमारतींची अडचण आहे म्हणून ज्या शाळा दुपारी भरवल्या जातील, त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना उन्हं नाही का लागणार, असा प्रश्न पालकांनी पुढे केला आहे. मुळात निर्णय जर सर्वच माध्यमांच्या व सर्वच व्यवस्थापनांच्या शाळांसाठी झाला असेल तर तो लागू केलाच गेला पाहिजे. भविष्यात दुपारच्या शाळांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर उन्हाचा परिणाम झाला, तर त्याला जबाबदार कोण असेल, असाही त्या पालकांचा प्रश्न आहे. प्रशासनाच्या रोषालाही सामोरे जाण्याची गरज नाही सध्या बहुतेक शाळांचे कोर्सवर्क पूर्ण व्हायला आले आहे. त्यामुळे ज्या शाळांच्या इमारती मर्यादित आहेत, त्या शाळांनी पिरिएडस् चा एकूण वेळ ४५ मिनीटांऐवजी ३० मिनीटे करावा. शिवाय शाळा सुरु करण्याची वेळ आठऐवजी सकाळी सातची करावी. अशाप्रकारे सकाळी ७ ते ११ या चार तासांत दोन शिफ्ट कराव्या.
जुन्या अमरावती येथील हिरे मठ जीर्ण अवस्थेत आहे. हिरे मठ वीरशैव परंपरेतील जुना मठ आहे. त्याचे पुनर्निर्माण करण्यासाठी गुढे परिवार सहकार्य करण्यास तयार आहे. या बांधकामासाठी समाजातून कोणतीही वर्गणीही जमा करणार नसल्याचा पुनरुच्चार अनंत गुढे यांनी केला. तसेच महात्मा बसवेश्वर यांना भारत सरकारने राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिलेला आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात अक्षय तृतीयेच्या दिवशी म. बसवेश्वर जयंती साजरी करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामुळे अमरावती शहरात प्रथमच महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यात आल्याने महानगरपालिकेने याठिकाणी म. बसवेश्वर जयंती साजरी करावी, असे आवाहन माजी खा. अनंत गुढे यांनी मनपा आयुक्तांना केले. या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या अनावरण व लोकार्पणप्रसंगी वीरशैव धर्मगुरू श्री सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा व शिवशंकर शिवाचार्य महाराज नेरपिंगळाई यांची विशेष उपस्थिती होती. या पुतळ्याच्या उभारणीसाठी सहकार्य करणारे श्री हिंदू स्मशानभूमीचे अध्यक्ष आर. बी. अटल यांचे विशेष आभार मानून सत्कार करण्यात आला. समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते भारत आप्पा मेंडसे यांचीही याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला विशेष अतिथी व सत्कारमूर्ती म्हणून सातत्याने ७ वेळा नगरसेवक म्हणून निवडून येणारे विक्रमादित्य विलास इंगोले यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र वाचन करून सत्कार करण्यात आला. या मानपत्राचे लेखन व वाचन आझाद हिंद मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. किशोर फुले यांनी केले. या सोहळ्यात अंबापेठ प्रभागातील नगरसेवक मिलिंद बांबल, स्वाती कुळकर्णी, जवाहरगेट प्रभागातील नगरसेवक डॉ. संजय शिरभाते, सुनीता मनोज भेले, ललीता सुरेश रतावा, गडगडेश्वर प्रभागातील नगरसेवक आशिष अतकरे, अर्चना अशोक पांडे, प्रियंका भूषण पाटणे, योगेश रघुनाथआप्पा विजयकर, विलास नगर प्रभागातील नगरसेवक पंजाबराव तायवाडे यांची सत्कारमूर्ती म्हणून विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन विलास काळे यांनी केले. आभार प्रदर्शन शिवराज आप्पा पारटकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. महेंद्र गुढे यांनी केले. या कार्यक्रमात संजीवनी भोगावकर, माधुरी मेंडसे, कविता बरमकर, सुरेखा चोंढेकर, अनिता गिलोरकर, किरण काळे, भारती कुऱ्हेकर, सीमा ओडे, मुंजाळे, वृशाली गुढे, वंदना गुढे, विजयाताई गुढे, सविता गुढे उपस्थित होत्या. हा रस्ता महात्मा बसवेश्वर मार्ग म्हणून ओळखला जाईल : विलास इंगोले मी या समाजाचा घटक आहे. आमच्या ज्येष्ठांनी जनतेची सेवा केली तरच जनता तुमची सेवा करेल, ही शिकवण दिली. त्याचाच फायदा मला ७ वेळा निवडून येण्यासाठी झाला. नगरसेवक म्हणजे जनतेचे सेवक. मी माझे मत कधीच विकत घेत नाही. प्रामाणिकपणे प्रत्येकाचे पक्षविरहित काम करण्याला माझे प्राधान्य असते. यापुढे भूतेश्वर चौकापासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता महात्मा बसवेश्वर मार्ग म्हणून ओळखला गेला पाहिजे. याकरिता मी याठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या विधी समितीतून हा प्रस्ताव मंजूर करून घेईन, असे वचन विरोधी पक्षनेता विलास इंगोले यांनी आपल्या भाषणात दिले.
अस्सल भारतीय संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी चैतन्याची गुढी उभारणाऱ्या शहर काँग्रेस कमिटीने सिलिंडरच्या दरवाढीविरुद्ध सामाजिक जागृती करत एकाच कार्यक्रमात दोन्ही भावनांचा मेळ साधला. शहराचे हृदयस्थळ असलेल्या राजकमल चौकात हा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. गुढीपाडव्यानिमित्त उंचच उंच गुढी उभारण्याचा विक्रम करणारी नवयुवक विद्यार्थी संघटनादेखील या कार्यक्रमात सहभागी झाली होती. मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा हा सण दरवर्षी राजकमल चौकात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीच्या उत्सवात शहर काँग्रेस कमिटीने सहभागी होत त्याला सामाजिक जाणीवेचेही स्वरुप दिले. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख आणि ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला महाकाली मंदिरचे पीठाधीश्वर शक्ती महाराज, दत्तमार्गी महंत पद्माकर तायडे महाराज, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक बबलू शेखावत, मनपाचे विरोधी पक्षनेते माजी महापौर विलास इंगोले व मिलींद चिमोटे, नवयुवक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, माजी नगरसेवक बबन रडके, जगदीश गवळी, राजेंद्र परिहार, सुरेश रतावा, अभिनंदन पेंढारी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांसह काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, महिला कॉंग्रेस अध्यक्षा जयश्रीताई वानखडे, युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, नगरसेवक संजय शिरभाते, नगरसेविका अर्चना आत्राम, नगरसेविका सुनिता भेले, नगरसेवक विक्की उर्फ विशाल वानखडे, नगरसेविका ललिता रतावा, नगरसेवक धीरज हिवसे, नगरसेविका राजश्री झटाले, नगरसेवक अनिल अग्रवाल, सतीश गवई, संजय वाघ, अविनाश पांडे, अभिनंदन पेंढारी, दीपक हुंदिकार, किरण साउरकर, प्रभाकर वाळसे, राहुल येवले, अनिकेत ढेंगळे, संकेत कुलट, संकेत साहु, पुरुषोत्तम मुंधडा, गजानन राजगुरे, मैथिली पाटील, सागर इंगोले, रफिक भाई चीकुवाले, प्रकाश मामर्डे, प्रमोद इंगोले, माणिक लोखंडे, ममता जावरे, कल्पना इंगोले, अमृता इंगोले, राधा इंगोले, किरण चांदवडकर, नेत्रा दोडके, वंशिता चांदवडकर, सिद्धी मारोडकर, शीतल जाधव, रसिका बल्लाळ, समृद्धी टाले, ऋतिका गौड, आनंदी टाले, भाविका काळबांडे यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते. सिलींडर झाला आडवा, कसा करु गुढीपाडवा ? गुढी उभारल्यानंतर काँग्रेसच्या महिला आघाडीने लगेच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या करण्यात आलेल्या फलकांकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत केले. ‘सिलींडर झाला आडवा, कसा करु गुढीपाडवा’ असा लक्षवेधी संदेश त्या फलकांवर लिहिला होता. फलकाला सिलींडरचाच आकार आणि तसाच रंग देण्यात आल्याने तो अगदी सर्वांच्या नजरेत भरला. यावेळी रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या अनेकांनी क्षणभर थांबून काँग्रेसची भूमिका समजून घेतली. माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी स्वत: पुढाकार घेत आपल्या सहकारी महिलांसह सिलींडरच्या दरवाढीचा निषेधही नोंदवला.
अंजनगाव सूर्जी तालुक्यातील वनोजा बाग येथील लखमाजी महाराज मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उत्सवावर गुरुवार १९ रोजी अचानक आलेल्या वादळी पावसासह तुफान गारपिटीने पाणी फेरले. दुपारी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या या अवकाळी पावसामुळे हजारो भाविक व व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सुमारे ३०० वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, मुंबई, सुरत, इंदूर आदी भागांतून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल झाले होते. मात्र अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसासोबत गारपिटीमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. गारपिटीपासून बचाव करण्यासाठी भाविकांनी दुकाने, हॉल तसेच उपलब्ध आसऱ्यांचा आधार घेतला. काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. उत्सवासाठी आलेल्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे साहित्य पावसात भिजले. अनेक स्टॉल विस्कळीत झाले. दरम्यान, मंदिर परिसर उंचावर असल्याने आणि पावसामुळे चिखल झाल्याने दुचाकी व चारचाकी वाहने अडकली. जंगलात उभी केलेली वाहने काढताना भाविकांची मोठी गैरसोय झाली. गारपिटीमुळे यात्रेतील दुकानांचे झालेले नुकसान, स्टॉल व तंबू उखडले, साहित्य भिजले. भाविकांना पावसाचा फटका पावसाने रोडग्यांचा कार्यक्रम मध्येच रोखावा लागला नवस व रोडगे कार्यक्रम सुरू असताना पावसामुळे ते मध्येच थांबवावे लागले. त्यामुळे अनेक भाविकांचा नवस अपूर्ण राहिल्याची खंत व्यक्त होत आहे. लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांना विशेष त्रास सहन करावा लागला. या अचानक झालेल्या गारपीटीमुळे गुढीपाडव्याच्या उत्सवावर पाणी फिरले असले तरी सुदैवाने गंभीर दुर्घटना घडली नाही.
तालुक्यातील श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथे गुढीपाडवा-रामनवमी यात्रा महोत्सवाला १८ मार्चपासून सुरुवात झाली आहे. आज (दि. १९) गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भाविकांच्या उपस्थितीत ७२ फूट उंच झेंड्यांना नवीन खोळ चढवण्याचा पारंपरिक व थरारक सोहळा यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. सावंगा विठोबा येथे श्री अवधुत महाराज (श्री कृष्णाजी महाराज) यांचे मंदीर आहे. येथील ही यात्रा २७ मार्चपर्यंत चालणार आहे. देव व भक्त या समानतेचे प्रतीक ७२ फूट झेंड्यांना खोळ चढविण्याचा हा चित्तथरारक सोहळा गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी ४ वाजता सुरू झाला. संस्थानचे विश्वस्त चरणदास कांडलकर यांच्या हस्ते महाराजांच्या समाधीचे विधीवत पूजन करून दोन्ही झेंड्यांना नवीन खोळ (कापड) चढविण्यात आली आहे. झेंड्यांना पायाचा स्पर्श होऊ नये म्हणून दोरांच्या सहाय्याने झेंड्यांची जुनी खोळ काढून नवीन खोळ चढवली आहे. अखंड कापूर ज्योती, बासन (टाळ), ढोलकी (मृदंग)चा गजर, लाखोंच्या-हजारोंच्या संख्येने सांवगा विठोबा नगरीत आलेल्या अवधूत भजन मंडळाच्या मांडीचे सुमधुर गायनात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. १८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता मंदिर व ग्राम परिसराची स्वच्छता करण्यात आली व अमावस्या निमित्त सायंकाळी ५ वाजता मंदिरात चंदन-उटी व रमणा कार्यक्रम घेण्यात आला. गुढी पाडव्याच्या दिवशी यात्रेत बाहेरगावाहून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी संस्थानची अन्नदान समिती आणि सेवाभावी मंडळाच्यावतीने प्रसाद (अन्नदान) व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, तसेच हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शांतता, सुव्यवस्था व स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन श्री विठोबा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. कापूर जाळण्याची परंपरा सावंगा विठोबा येथे श्री अवधुत महाराज (श्री कृष्णाजी महाराज) यांच्या मंदीरात येणाऱ्या प्रत्येक भाविक कापूस जाळतो. या ठिकाणी कापूर जाळ्ण्याची परंपरा आहे. त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी अनेक व्किंटल कापूर भाविकांकडून जाळला जातो, त्याचप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात कापूर जाळण्यात आला आहे.
चैत्र गुढीपाडवा व मराठी नववर्ष प्रारंभाच्या निमित्ताने आज (गुरुवार) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गाभाऱ्यात विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून, त्यामुळे श्रींचा गाभारा अत्यंत मनमोहक व प्रसन्न दिसत आहे. फुलांची सजावट विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील (रा. रांजणगाव महागणपती) यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली असून, सजावटीचे काम डेकोरेटर्स श्री कुमार शिंदे व श्री फ्लॉवर्स, पुणे यांनी पार पाडले. या कामासाठी सुमारे १२ कामगारांनी परिश्रम घेतले. दरवर्षी महत्त्वाच्या सण- उत्सवांच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विशेष फुलांची आरास केली जाते. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी सजलेल्या मंदिरामुळे विठूरायाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत असून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भाविक श्री क्षेत्र पंढरपूरात दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच नामगजराने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला आहे. पिंक डेझी २५० बंडल, व्हाइट शेवंती ८०० काडी, गुलाब ५० बंडल, कामिनी ३०० बंडल, जनाडो पत्ता ३० बंडल, आर्किड १० बंडल, झेंडू ७० किलो, शेवंती २० किलो, आदी माळांचा वापर केल्याचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली. विठ्ठल- रुक्मिणी मातेस दुपारच्या पोषाखावेळी अलंकार परिधान करण्यात आले होते. श्री विठ्ठलास सोने पगडी, कौस्तुभ मणी, हि-याचा कंगन जोड, दंडपेट्या जोड मोठा, नाम निळाचा, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, लहान शिरपेच, नवरत्नाचा हार, तोडे जोड, तुळशीची माळ, मत्स्य जोड, पितांबर व ठुशी तसेच श्री रूक्मिणीमातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळ, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, लक्ष्मीहार, सरी व कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले. याशिवाय, विठ्ठलास रेशमी सोहळे - अंगी व श्री रूक्मिणीमातेस नऊवारी रेशमी साडीचा पोषाख करण्यात आला. त्यामुळे श्रींचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेचे हे मनमोहक रूप पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. वाढत्या तापमानाचा देवाला त्रास होऊ नये, उन्हापासून त्याचे संरक्षण व्हावे म्हणून उन्हाळा संपेपर्यंत दररोज दुपारी चंदन उटी पूजा घातली जाते आणि देवाच्या अंगाला चंदन लेप लावला जातो. आजपासून चंदन उटी पूजा सुरू करण्यात आली आहे.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त मोडनिंब (ता.माढा) सकल हिंदू समाजाच्या वतीने येथे दि. १८ फेब्रुवारी ते दि. १८ मार्च, फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्यापर्यंत धर्मवीर बलिदान मास साजरा करून छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण व आदरांजली वाहिली. बलिदान मासात रोज सायंकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे नित्य पूजन व स्मरण करण्यात आले आहे. युवकांनी सामूहिक मुंडण करून संभाजी महाराज यांना आदरांजली वाहिली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता इतिहास आहे. छत्रपती श्री संभाजी महाराज मृत्युच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर पूर्ण महिनाभर अति धीरोदत्तपणे देहत्याग करीत होते. त्यामुळेच छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान, त्यांनी सहन केलेल्या मरणयातना याची प्रत्येक हिंदू मनाला जाणीव होण्यासाठीच समस्त शिवशंभू पाईकांकडून हा बलिदान मास पाळण्यात येत आहे. प्रतिनिधी | सांगोला सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील स्मारक परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त दि. १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या एक महिन्याच्या कालावधीत सांगोला तालुक्यातील मावळ्यांनी कृतज्ञता प्रार्थना व प्रेरणा मंत्र पठण करून महाराजांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. या उपक्रमांतर्गत अनेक मावळ्यांनी वैयक्तिक त्याग करत अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. काहींनी आवडते पदार्थ खाणे टाळले, तर काहींनी गोड पदार्थांचा त्याग केला. अनेकांनी संपूर्ण महिनाभर चप्पल न घालण्याचा संकल्प करत आपल्या आचरणातून छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण ठेवले. तालुक्यातील शेकडो नव्हे तर हजारो मावळ्यांचा या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. दि. १८ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता या उपक्रमाचा समारोप मूक पदयात्रेने करण्यात आला. ही पदयात्रा संपूर्ण सांगोला शहरातून शांततेत काढण्यात आली. पदयात्रेत युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचे विशेषत्वाने जाणवले, ज्यामुळे या उपक्रमाला अधिकच उत्साह प्राप्त झाला.शंभू राजांच्या बलिदानाचा विसर पडू नये, त्यांच्या त्यागाची आणि निष्ठेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पदयात्रेनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व मावळ्यांनी एकत्र येऊन प्रार्थना केली व छत्रपती संभाजी महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या उपक्रमामुळे सांगोला तालुक्यात देशभक्ती व इतिहासाबद्दलची जागृती अधिक दृढ झाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर ग्रामपंचायत कार्यालयासमोरील प्रांगणात जवळपास दररोज ६० ते ७० युवक नित्यनियमाने उपस्थितीत असत. कार्यक्रमाची सुरुवातीस प्रेरणा मंत्र म्हटला जातो. संभाजी सूर्यहृदय श्लोकाचे वाचन करून, अर्थ सांगितला जातो. सूर्यहृदय श्लोकाचे वाचन
तोंडले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि कला महोत्सव अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता पहिली ते चौथी आणि अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांनी यात १०० टक्के सहभाग नोंदवत आपल्या सुप्त गुणांचे दर्शन घडवले. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच भिकाजी लोंढे, उपसरपंच ज्योतीराम चव्हाण आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गोंधळ, देशभक्तीपर गीते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील गीतांवर बहारदार नृत्य सादर केले. भारूड, गवळण आणि वासुदेव यांसारख्या लोककलांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी पल्लवी सुभाष कोळी हिची तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, बाहेरील कोरिओग्राफर न घेता स्वतः सर्व गाणी बसवल्याबद्दल शाळेच्या शिक्षिका प्रिया महामुनी, उर्मिला ढोले आणि अंगणवाडी सेविकांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट नियोजनाबद्दल मुख्याध्यापक विलास कस्तुरे यांचाही सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक नाईकनवरे, उपाध्यक्ष बाबूराव मोरे, केंद्रप्रमुख प्रदीप आवताडे, नवनाथ कोडक यांच्यासह तोंडले, बोंडले परिसरातील ग्रामस्थ आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यात १०० टक्के सहभाग नोंदवत आपल्या सुप्त गुणांचे दर्शन घडवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद भोसले व सोनाली कस्तुरे-पाटील यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक विलास कस्तुरे यांनी मानले. मान्यवरांची उपस्थिती
मंगळवेढा नगरपालिकेची ही लोकाभिमुख वेबसाइट म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नाही, तर नागरिक आणि प्रशासन यांच्यात विश्वासाचा नवा पूल उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण प्रयत्न आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जनसहभाग या तीन सूत्रावर उभा असलेला हा उपक्रम मंगळवेढ्याच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असे प्रतिपादन धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन प्रा.शोभाताई काळुंगे यांनी व्यक्त केले, त्या वेबसाइटचे लोकार्पणवेळी बोलत होत्या. धनश्री महिला पतसंस्था चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे, प्रा. तेजस्विनी कदम आणि डॉ. पुष्पांजली शिंदे उपस्थितीत होत्या. पुढे बोलताना म्हणाल्या की, संतांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढ्यात नगरपालिकेच्या लोकाभिमुख वेबसाइटचे लोकार्पण करून नागरिकांना प्रशासनाशी थेट जोडण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे शहराच्या विकास प्रक्रियेत नागरिकांचा थेट सहभाग वाढणार असून तक्रारींच्या निवारणात ही पारदर्शकता आणि गती येणार आहे. नगराध्यक्षा सुनंदा आवताडे म्हणाल्या ,मंगळवेढ्याच्या संतांनी दिलेल्या एकता, सेवा आणि लोककल्याणाच्या विचारांचा वारसा पुढे नेत लोकाभिमुख प्रशासन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. शहराचा विकास केवळ प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून होत नाही. त्यासाठी नागरिकांचा थेट, सजग आणि सकारात्मक सहभाग मंगळवेढा नगरपालिकेकडून लवकरच ‘स्मार्ट मोबाईल ॲप’ची सुरू करण्यात येणार असून, या ॲप च्या माध्यमातून शहरातील मंदिरे, दवाखाने, हॉटेल्स तसेच महत्त्वाची ठिकाणे एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. बाहेरून येणारे भाविक, पर्यटक आणि नागरिकांना शहरातील आवश्यक ठिकाणांचा सहज शोध घेता येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मंगळवेढ्याला अधिक स्मार्ट, सुसूत्र आणि नागरिकाभिमुख बनविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ^ही वेबसाइट केवळ तक्रार नोंदवण्याचे साधन नाही, तर मंगळवेढ्याच्या विकासात प्रत्येक नागरिकाला थेट सहभागी करून घेणारे सक्षम व्यासपीठ आहे. सजग नागरिकांच्या सूचना, सहकार्य आणि विश्वासाच्या जोरावर आपण मंगळवेढ्याला आदर्श, पारदर्शक आणि विकासाभिमूख शहर बनवू. सुनंदा आवताडे, नगराध्यक्षा सहभाग आवश्यक असतो, असे त्यांनी सांगितले. या वेबसाइटच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या प्रभागातील नागरी समस्या, विकासकामांबाबतच्या सूचना आणि विविध तक्रारी थेट नोंदवता येणार आहेत. पुढे म्हणाल्या की, उद्याने, वाहतूक कोंडी, तीर्थक्षेत्र सुशोभीकरण, पाणीपुरवठा, स्वच्छता, बंद पथदिवे यांसारख्या विषयांवरील सूचना आणि तक्रारी ऑनलाइन पाठवता येणार आहे. त्या तक्रारीवर कोणती कारवाई झाली, ती कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहितीही नागरिकांना पाहता येणार आहे. यामुळे शहर विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांचा विश्वास, सूचना आणि सहभाग यांना केंद्रस्थानी ठेवत मंगळवेढ्याला अधिक सक्षम, उत्तरदायी आणि आधुनिक बनवण्याचा मानस यामागे असल्याचे स्पष्ट झाले. ‘स्मार्ट मोबाईल ॲप’ची मोठी सुविधा विकासात प्रत्येक नागरिकांना सहभाग करून घेणारे सक्षम व्यासपीठ ठरले
वैरागसह ग्रामीण भागात गुरुवारी दुपारनंतर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गारपिटीसह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे द्राक्ष व आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काढणीस आलेल्या ज्वारी, गहू पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आठवडाभर कडाक्याच्या उन्हानंतर गुरुवारी दुपारनंतर वैराग, शेळगाव आर, काळेगाव, घाणेगाव, मानेगाव, पिंपरी साकत, जळगाव, रुई, रातंजन, मालेगाव, हत्तीज, मळेगाव, लाडोळे, सर्जापूर, रातंजन, मुंगशी आर, दहिटणे, मुंगशी वा परिसरात अवकाळी पावसाने झोडपून काढले. कारी, बोरमाळे परिसरात गारांचा पाऊस झाला. तर काही भागात गारांचा पाऊस पडल्याने शेतातील उभी पिकं वादळी वारे व गारपिटीने भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात जिवापाड जपलेल्या द्राक्ष बागांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वैराग परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात उभ्या असलेल्या ज्वारी, हरभरा, गहू व कांदा या पिकांवर विपरीत परिणाम झाला आहे. विशेषतः काढणीस आलेली पिके भिजल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने घेतलेल्या या पिकांचे नुकसान झाल्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी पिके जमिनीवर पडली असून कांद्याचेही नुकसान झाले आहे. द्राक्षे, केळी, आंबा, ज्वारी, गहू व कांदा पिकांचे नुकसान
आपल्या शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने विशेष आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात त्वचारोग तज्ज्ञ डॉ. प्रियंका दोडके यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन करत आरोग्याप्रति जागरूक केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रणिता भालके प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी महिलांच्या प्रजनन आरोग्यावर डॉ. प्रियांका दोडके यांनी महिलांना मार्गदर्शन केले. वाढत्या वयानुसार महिलांच्या शरीरात होणारे बदल, त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या आणि त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे किती आवश्यक आहे, हे त्यांनी साध्या आणि सोप्या भाषेत पटवून दिले. स्वच्छतेचे काम करताना महिलांचा थेट कचरा आणि प्रदूषकांशी संपर्क येतो. अशा वेळी जंतू संसर्गापासून स्वतःचा बचाव कसा करावा, मास्क आणि हातमोज्यांचा वापर, तसेच कामाच्या ठिकाणी पाळावयाची शिस्त यावर त्यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा उपक्रम घेतला असून महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासंदर्भात नगरपालिका दक्ष राहून यापुढच्या काळात ही उपयुक्त असे निर्णय घेईल, कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेतानाच स्वतःच्या, कुटुंबाच्याही आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला. शंकांचे निरसन केले केवळ कामाच्या ठिकाणीच नव्हे, तर वैयक्तिक आयुष्यातही स्वच्छतेच्या साध्या सवयी कशा प्रकारे मोठ्या आजारांना रोखू शकतात, याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन या शिबिरात देण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांच्या मनातील आरोग्यविषयक शंकांचे निरसन केले.
मानेगाव परिसरात अवकाळी वाऱ्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बागेला फटका बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे द्राक्षबाग वाकली असून काही प्रमाणात द्राक्षे झडल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर शेतकरी मुकुंद साळुंखे यांनी सांगितले की, बेदाण्यासाठी शेडमध्ये ठेवलेली द्राक्षेही वाऱ्यामुळे प्रभावित झाली असून नुकसान वाढण्याची भीती आहे. तसेच बागेसाठी उभारलेले लोखंडी फाउंडेशन वाऱ्यामुळे वाकल्याने स्थिती अधिक चिंताजनक झाली आहे. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे बाग वाकली. याचा उत्पादनावर परिणाम होईल अशी भीती आहे, असे संबंधित शेतकऱ्याने सांगितले. महापूरातून नुकतेच सावरत असताना पुन्हा आलेल्या या संकटामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. विशेष म्हणजे, गेल्या ४ ते ५ वर्षांपासून शेती क्षेत्रात लक्ष देणारा तरुण शेतकरी आता अशा नैसर्गिक आव्हानांना सामोरे जात आहे. जर पुढील काळात वाऱ्यासोबत पाऊस झाला, तर शेडमधील द्राक्षांचे अधिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित भागाची पाहणी करून अहवाल सादर मानेगाव परिसरात अवकाळी वाऱ्यामुळे द्राक्षबागांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. संबंधित भागाची पाहणी करून अहवाल सादर करण्यात येणार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शासनाच्या नियमांनुसार मदत देण्याची कार्यवाही करण्यात येईल. हनुमंत बोराटे, कृषी सहाय्यक
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुल मंजूर होऊन वर्षभर उलटूनही काम सुरू न करणाऱ्या नेवासे तालुक्यातील तब्बल ५ हजार लाभार्थ्यांना प्रशासनाने शेवटचा इशारा दिला आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत घरकुलाचे बांधकाम सुरू न करणाऱ्यांची घरकुले रद्द करण्यात येणार असून मिळालेल्या अनुदानाचीही वसुली केली जाणार, असा स्पष्ट इशारा पंचायत समिती प्रशासनाने दिला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. तालुक्यात एकूण ११ हजारांहून अधिक घरकुले मंजूर असून त्यापैकी सुमारे ५ हजार लाभार्थ्यांनी अद्याप बांधकामालाही सुरुवात केलेली नाही ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर आता कठोर कार्यवाहीची तयारी सुरू केलेली आहे. या पार्श्वभूमीवर १८ मार्चपासून रोजी तालुक्यात तपासणी मोहीम राबवण्यात येत अरहे. सोनई ग्रामपंचायतहद्दीमध्य े पंचायत समितीच्या चार विशेष पथकांनी सुमारे २०० लाभार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली, तर नेवासे बुद्रुक येथेही चार पथकांनी २१६ लाभार्थ्यांच्या घरी भेट देत घरकुलाच्या कामाची स्थिती तपासली. एकाच दिवशी नेवासे तालुक्यात चारशेहून अधिक घरकुल लाभार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनी भेटी देऊन त्यांना नोटिसा बजाल्या. ३१ मार्चपर्यंत काम सुरू न झाल्यास घरकुल रद्द करण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाच्या वतीने त्यांना देण्यात आल्या. दरम्यान, अनेक लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुलाचा पहिला हप्ता जमा होऊन वर्ष उलटले आहे. मात्र अद्याप पायाभरणीही केलेली नसल्यामुळे प्रशासनातील अधिकारी संतप्त झाले. अशा लाभार्थ्यांकडून शासनाचा निधी वसूल केला जाईल आणि त्यांचे घरकुल कायमस्वरूपी रद्द केले जाईल असा फातवा नेवासे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी दिला आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून गरजूंसाठी हक्काचे घर देण्याची स्तुत्य उपक्रम राबवला जात असताना अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे आटा घरकुल लाभार्त्यांना ही कारवाई टाळण्यासाठी प्रत्यक्षात तातडीने घरकुल बांधकाम सुरू करावे लागेल आणि तशा सूचना देखील नेवासे पंचायत समिती प्रशासनाने दिल्यामुळे आता शासनाचे पैसे घेवूनही घरकुल न बांधणाऱ्या लाभार्थ्यांना चांगलीच ही सणसणीत चपराक बसलेली असल्याचे आटा नेवासे पंचायत समिती पाहणी आहवलात स्पष्ट झाल्यामुळे घरकुल बांधणीच्या कामाला नेवासे तालुक्यात मोठा वेग येणार असल्याचे चित्र पंचायत समितीच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे.
वांबोरी चारीसाठीचे उपोषण 8 तासांनंतर स्थगित:वंचित भागाचा सर्वेकरण्याचा तोडगा
वांबोरी चारीच्या लाभक्षेत्रात असूनही सुमारे ९०० हेक्टर क्षेत्र हे हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे हा भाग टंचाईग्रस्त राहिला आहे. प्रत्यक्षात या भागाचे हक्काचे पाणी मुळा धरणात शिल्लक आहे. तेच हक्काचे पाणी मिळावे, या मागणीसाठी वांबोरी येथे गोरक्षनाथ मोरे यांच्यासह शेतकऱ्यांनी गुरुवारी उपोषण सुरू केले होते. वंचित भागाचा सर्वे करून, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून सकारात्मकता दर्शवण्यात आली. त्यामुळे सुमारे आठ तासानंतर दिवंगत आ. शिवाजी कर्डिले यांचे सुपूत्र अक्षय कर्डिले यांच्या हस्ते उपोषण सोडवण्यात आले. वांबोरीकरांच्या हक्काचे पाणी धरणात शिल्लक असताना, दक्षिण भागातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. या भागातील ओढ्यावरील बंधारे या चारीद्वारे भरल्यास अप्रत्यक्ष सिंचनाचा लाभ परीसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी, मोरे यांनी बुधवारी सकाळपासून उपोषण सुरू केले होते. उपोषण स्थळी या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक वर्षांपासून गोरक्षनाथ डोंगर पायथालगत असलेल्या शेती क्षेत्राला सिंचनासाठी पाण्याची प्रतीक्षा आहे. अक्षय कर्डिले यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन प्रश्न समजून घेतला. वंचित भागाचा तत्काळ सर्वे करून वांबोरी चारीमध्ये समावेश करण्यात पाटबंधारे विभागाने सकारात्मक दर्शविल्याने, कर्डिले यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन मोरे यांनी उपोषण स्थगित केले ना पाणी, ना नवीन विहिर,वांबोरीकरांवर दुहेरी अन्याय... राहुरी तालुक्यातील वांबोरी पाणलोट क्षेत्राचा अतिशोषिक झोनमध्ये समावेश आहे. त्यामुळे शासकीय योजनांतून गावात विहीर मंजुरी मिळवण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे गावाला अतिशोषिक झोन मधून बाहेर काढण्याची प्रक्रिया वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने करावी अशी मागणी होत आहे. एकीकडे वांबोरी चारीपासून वंचित असलेल्या भागावर हा दुहेरी अन्याय प्रशासकीय अनागोंदीमुळे होत आहे.
ब्रिटिश सत्तेच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढताना भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य भारतीयांनी आंदोलनं केली, मोर्चे काढले आणि सत्याग्रह केले. अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, हौतात्म्य पत्करले. फासावर जातानाही या क्रांतिकारकांच्या ओठांवर 'वंदे मातरम्' हेच शब्द होते. या एका गीताने संपूर्ण देशाला गुलामगिरीविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. त्यामुळेच आजही राष्ट्रगीताप्रमाणेच 'वंदे मातरम्' या गीताचा प्रत्येक भारतीयाच्या हृदयात सर्वोच्च सन्मान आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी केले. 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित विशेष उपक्रमांतर्गत वंदे मातरम रथाचे पारनेर येथील न्यू आर्टस् कॉमर्स अॕण्ड सायन्स महाविद्यालयात सोमवारी आगमन झाले. विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी 'दे मातरम्'' आणि 'भारत माता की जय'च्या जयघोषात रथाचे उत्साहात स्वागत केले. त्यावेळी प्राचार्य डॉ. आहेर बोलत होते. वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी वक्त्यांनी 'वंदे मातरम्' या गीताचा जाज्वल्य इतिहास आणि त्याचे महत्त्व सांगितले. या गीताचा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रवास उलगडताना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश आहेर म्हणाले, १८७० च्या सुमारास बंकिमचंद्र चटर्जी यांनी 'वंदे मातरम्' या गीताची रचना केली आणि पुढे आपल्या 'आनंदमठ' या कादंबरीत त्याचा समावेश केला. त्या काळात ब्रिटिशांकडून बंगालमध्ये राष्ट्रभक्तीची भावना दडपली जात होती. अशा अंध:कारमय परिस्थितीत हे गीत आशेचा किरण बनले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने 'वंदे मातरम्'लाच स्वातंत्र्यलढ्यातील घोषवाक्य मानले होते. १८९६ मध्ये कोलकाता येथे आयोजित काँग्रेसच्या अधिवेशनात या गीताचे सार्वजनिकरित्या प्रथम सादरीकरण झाले. या गीताला गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी स्वरबद्ध केले होते. विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. रवींद्र देशमुख म्हणाले, 'वंदे मातरम्' हे केवळ काही शब्दांचे गीत नसून, तो भारतीय स्वातंत्र्याचा आणि अस्मितेचा आत्मा आहे. या गीतात भारत मातेचे अथांग सौंदर्य, निसर्गसंपन्नता आणि तिचे वात्सल्यपूर्ण मातृप्रेम याचे विलोभनीय वर्णन केले आहे. हे गीत ऐकताना आजही अंगावर काटा येतो. हे गीत येणाऱ्या प्रत्येक पिढीला देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीवरील अढळ प्रेमाची प्रेरणा देत राहील. आभार डॉ. हनुमंत गायकवाड यांनी मानले.
तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या माझे गाव बालविवाह मुक्त गाव या कार्यशाळेत ३१८ अंगणवाडी सेविकांनी एकत्र येत बालविवाहाच्या विरोधात ठाम भूमिका घेत समाजपरिवर्तनाचा निर्धार व्यक्त केला. यापुढे तालुक्यात एकही बालविवाह होऊ देणार नाही असा संकल्प करत त्यांनी गावपातळीवर कृती करण्याची तयारी दर्शवली. या कार्यशाळेमुळे बालविवाहाच्या घातक परिणामांची जाणीव अधिक तीव्र झाली असून, प्रतिबंधासाठी ठोस पावले उचलण्याची दिशा मिळाल्याचे सेविकांनी सांगितले. लहान मुलींच्या लग्नाच्या चर्चा सुरू होताच त्या संबंधित कुटुंबांशी संवाद साधून समुपदेशन केले जाईल. बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगतील आणि कोणत्याही परिस्थितीत अशा घटना घडू देणार नाहीत. आपले गाव बालविवाहमुक्त करून संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असा निर्धार अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केला. या कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम, स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा महिला व बाल विकास प्रकल्प विभाग, जिल्हा बाल संरक्षण विभाग, चाईल्ड हेल्पलाईन, स्नेहालय उडान प्रकल्प आणि महिला सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६, बालहक्क, सामाजिक कारणे व दुष्परिणाम, तसेच प्रभावी जनजागृती यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जोखमीतील कुटुंबांची ओळख पटवणे, प्रशासनाशी समन्वय ठेवणे आणि गरज पडल्यास त्वरित माहिती देणे यावर भर देण्यात आला. कार्यक्रमादरम्यान महिला सक्षमीकरण केंद्राच्या दीपाली भोले यांनी “बेटी बचाओ, बेटी पढाओ” अभियानाची माहिती दिली, तर बाल संरक्षण अधिकारी विकास बागुल यांनी शासकीय योजना व कायद्यांची माहिती दिली. चाईल्ड हेल्पलाईनचे राहुल वैराळ यांनी १०९८ या हेल्पलाईन क्रमांकाविषयी जनजागृती करत तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी बालविवाह विरोधी प्रतिज्ञा घेतली. प्रत्येक घटकाने या प्रथेविरुद्ध उभे राहणे गरजेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम म्हणाले, बालविवाह हा मुलींच्या आयुष्यावर गंभीर परिणाम करणारा असून त्यांच्या शिक्षण, आरोग्य व भविष्याला बाधा आणणारा आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाने या प्रथेविरुद्ध उभे राहणे अत्यावश्यक आहे. याशिवाय, प्रभावी संवाद कौशल्य, संवेदनशीलता आणि तात्काळ कृती याबाबतही सेविकांना मार्गदर्शन करण्यात आले.
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गेल्या २४ वर्षांपासून शहराची सांस्कृतिक ओळख बनलेल्या ‘रसिकोत्सव’ सोहळ्याने गुरुवारी रात्री सावेडीतील जॉगिंग पार्कच्या मैदानावर रंगत आणली. रिमझिम बरसणारा पाऊस आणि व्यासपीठावरून वाहणारी स्वरांची सरिता अशा दुहेरी संगमात नगरकर रसिक चिंब भिजले. गीत, नृत्य आणि हास्यकल्लोळाने सजलेल्या या सोहळ्याने रौप्यमहोत्सवी वर्षाकडे यशस्वी पाऊल टाकले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठ पूजनाने झाली. यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, माजी खासदार डॉ. सुजय विखे, महापौर ज्योती गाडे, नगरसेविका गौरी बोरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला पावसाने हजेरी लावली, मात्र रसिकांचा उत्साह कमी झाला नाही. भर पावसातही हजारो नगरकरांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. प्रसिद्ध पार्श्वगायिका आर्या आंबेकर हिच्या आवाजातील गाण्यांनी सोहळ्याला विशेष उंची प्राप्त करून दिली. तिला साथ देताना मधुरा कुंभार, ‘इंडियन आयडॉल’ फेम प्रसेनजीत कोसंबी, राहुल सक्सेना आणि श्वेता दांडेकर यांनी एकापेक्षा एक चित्रपटगीते व भावगीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. नृत्यांगना मीरा जोशी यांच्या नृत्याविष्काराला तरुणाईने शिट्ट्या आणि टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. तर, प्रसिद्ध हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे यांच्या खुसखुशीत विनोदांनी मैदानावर हास्यकल्लोळ उडवला. २५ ते ३० कलाकारांच्या या भव्य संचाने अहिल्यानगरच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घातली. या कार्यक्रमाचे नियोजन रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी पंकज आशिया, मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह फिरोदिया बंधू व जिल्ह्यातील दिग्गज व्यक्तींनी या सोहळ्याला उपस्थिती होती.
येथील सीनिअर कॉलेजच्या मैदानावर झालेल्या नामदार चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेत सीएसके नेवासा संघाने विजेतेपद पटकावले आहे. उदयन गडाख युवा मंच, जगदंब ग्रुप, गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्यावतीने उदयन गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये नेवासा तालुक्यातील १२ क्रिकेट संघ सहभागी झाले होते. दररोज होणारे सामने पाहण्यासाठी तालुक्यातील क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. सीएसके नेवासा व जनता गॅरेज नेवासा यांच्यामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात सीएसके नेवासा संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ षटकात ६७ धावा काढून जनता गॅरेज संघावर आठ धावांनी विजय मिळविला. प्रथम बक्षीस सीएसके नेवासा ६१ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकाचे जनता गॅरेज ४१ हजार १११ रुपये बक्षीस तसेच तृतीय क्रमांकाचे जगदंब सोनई ३१ हजार १११ रु बक्षीस व चतुर्थ क्रमांचे २१ हजार १११ बक्षीस शिवम फायटर संघाने पटकावले. यूट्यूब लाइव्हच्या माध्यमातून १५ हजार क्रिकेटप्रेमींनी अंतिम सामना पाहिला. या स्पर्धेतील बक्षीस प्राप्त संघांचा व उत्कृष्ट फलंदाज म्हणून अक्षय जऱ्हाड, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सौरभ गायकवाड, मॅन ऑफ द सिरीज म्हणून सागर रेवाळे व अखेरचा सामनावीर म्हणून पियुष घोलप यांचा सत्कार प्रवीण गडाख, राजेंद्र गुगळे, नंदकुमार पाटील, सतीश पिंपळे, अंबादास इरले, जालिंदर गवळी, अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. आयोजक कमिटीच्यावतीने उदय पालवे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी नागरिक उपस्थित होते.
जिल्ह्यातील मुलींचे बालपण सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी स्नेहालय संचलित ‘उडान’ प्रकल्प अग्रेसर ठरला आहे. बालविवाह मुक्त भारत अभियानात देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या या प्रकल्पाने केवळ जनजागृतीवर भर न देता, मुलींच्या प्रत्यक्ष संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. मागील ७ वर्षांत २ लाख ९५ हजार विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. गेल्या सात वर्षांत उडान प्रकल्पाने ६६७ बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी ५२ प्रकरणांमध्ये थेट गुन्हे दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई केली आहे. मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ६०० हून अधिक शाळांमध्ये विशेष मोहीम राबवली. त्यामुळे शाळाबाह्य मुलींच्या हातांत पुन्हा पुस्तके आली आहेत. १५० मुलींना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि स्वावलंबी बनवले आहे. जिल्ह्यात ५ हजार पेक्षा जास्त ‘बाल रक्षक’ आणि शाळाशाळांमध्ये ‘उडान बालसेना’ कार्यरत आहे. त्या मुलींच्या संरक्षणासाठी अहोरात्र पहारा देत आहेत. ३ लाख महिला आणि १० हजार तरुणांच्या सहभागामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा हा लढा आता एक व्यापक लोकचळवळ बनला आहे. मुलींच्या प्रतिष्ठेसाठी मागील ७ वर्षांत ३५८ पथनाट्ये, ३४० सोशल मीडिया पोस्टर्स आणि ७७५ किमीची सायकल यात्रा काढून समाजाची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्ह्यातील ८ लाख विद्यार्थ्यांनी बालविवाह विरोधी प्रतिज्ञा घेतली असून, ३७ लाख नागरिकांनी मुलींच्या संरक्षणाची शपथ घेतली आहे. जिल्ह्यात एकीकडे मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत असताना हा प्रकल्प मुलींसाठी बळ देणारा ठरला आहे. मुलींना शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही स्तरांवर स्वसंरक्षणाचे धडे दिले. यात प्रामुख्याने कराटे, लाठीकाठी आणि बचावात्मक तंत्रांचा सराव करून घेण्यात आला. जेणेकरून त्या संकटाच्या वेळी प्रतिकार करू शकतील. तसेच, छेडछाड किंवा अनुचित प्रकार घडल्यास घाबरून न जाता ‘गुड टच-बॅड टच’ ओळखणे आणि धाडसाने मदत मागण्याचे बळ त्यांना दिले आहे. मुलींना स्वतःचे रक्षण स्वतः करता यावे, यासाठी ७ वर्षांत २ लाख ९५ हजार विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. संकटात सापडलेल्या ४६३ मुलींना तज्ज्ञांकडून समुपदेशन करून त्यांना मानसिक आधार दिला. १ हजार ३२३ गावांमध्ये बाल संरक्षण समित्यांची स्थापना करून प्रत्येक मुलीसाठी सुरक्षित गाव ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. स्वसंरक्षण आणि मानसिक बळ
अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला प्रकरण:संशयिताचे स्केच जारी, 10 पथकांकडून तपास सुरू
तालुक्यातील एका गावातील १२ वर्षीय शाळकरी मुलीवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना १७ मार्च रोजी घडली. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील शाळेतून सायकलवरून घरी परतत असताना कोल्हार-घोटी राज्य मार्गावरील हाडकीच्या ओढ्याजवळ अज्ञात व्यक्तीने मुलीला अडवून तिच्या चेहऱ्यावर बाटलीतून अॅसिड फेकले. यात तिच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला मोठी जखम झाली. पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र (स्केच) तयार करून जारी केले. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी १० विशेष पथके तयार केली आहेत. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण, पीडितेकडून मिळालेली माहिती तसेच इतर सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. सायबर टीम आणि फॉरेन्सिक विभागही तपासात सक्रिय आहे. दोन दिवस उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. नागरिकांनी संशयिताबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालानुसार पीडितेला सुमारे ४ ते ५ टक्के भाजल्याच्या जखमा झाल्या. तिच्यावर पीएमटी लोणी रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. जनरल फिजिशियन, नेत्रतज्ज्ञ व प्लास्टिक सर्जन यांची टीम उपचार करत आहे. सध्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
उमराणेत प्रवेशोत्सव रॅली:गुढीपाडव्यानिमित्त जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम
उमराणे हिंदू संस्कृतीचा सण गुढीपाडवा आणि नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत करण्यासाठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने गावातून शोभायात्रा व ‘प्रवेशोत्सव’ रॅली काढण्यात आली. ‘प्रवेश वाढवा – मराठी शाळा वाचवा’ असा संदेश देत काढण्यात आलेल्या या रॅलीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले चिमुकले विद्यार्थी होते. डोक्यावर पांढरी टोपी अशा पारंपरिक पोषाखात शोभायात्रेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध संदेशांनी परिसर दणाणून सोडला. शाळेतील शिक्षिका व पालकांनीही या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शोभायात्रेदरम्यान जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्तेचा व उपलब्ध सुविधांचा प्रचार करण्यात आला. दर्जेदार भौतिक सुविधा, अनुभवी व उपक्रमशील शिक्षकवृंद, शालेय पोषण आहार तसेच विविध शैक्षणिक सवलती यांबाबतचे बॅनर्स झळकावत पालकांना आपल्या पाल्यांचा प्रवेश जिल्हा परिषद शाळेतच करण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. हिरे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच अशा उपक्रमामुळे शैक्षणिक वातावरणात चैतन्य निर्माण झाल्याने पालकांकडून या उपक्रमाचे कौतूक होत आहे. उमराणे येथे काढण्यात आलेल्या प्रवेशोत्सव रॅलीत सहभागी विद्यार्थी.
आलियाबाद या आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर मातांसाठी सुरक्षित व दर्जेदार आरोग्यसेवा देत एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या ११ महिन्यांच्या कालावधीत २०० यशस्वी प्रसुती करून उल्लेखनीय कामगिरी नोंदविण्यात आली आहे. आदिवासी भाग असल्याने एकेकाळी घरगुती प्रसुतीचे प्रमाण जास्त होते; मात्र प्रभावी जनजागृतीमुळे आता शंभर टक्के संस्थात्मक प्रसुतीकडे कल वाढला आहे. त्यामुळे माता व बालमृत्यू दर कमी होण्यास मदत होत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षलकुमार महाजन यांनी दिली. वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने उपलब्ध मनुष्यबळाच्या सहाय्याने प्रभावी नियोजन केले. उपकेंद्रातील परिचारिकांच्या ड्युटीचे योग्य नियोजन करून आरोग्य पथकाने गाव, वाड्या आणि पाड्यांमध्ये जाऊन गरोदर महिलांमध्ये जागरूकता निर्माण केली. आरोग्य सेवकांनी गृहभेटी देऊन महिलांना सरकारी दवाखान्यात प्रसुतीसाठी प्रोत्साहित केले. तसेच २४ तास प्रसुती सेवा अखंड सुरू ठेवण्यात आली. यामुळे महिलांचा विश्वास वाढला असून, संदर्भीत करण्यात आलेल्या मातांची सिझेरियन प्रसुतीही यशस्वीपणे पार पडत आहे. आलियाबाद आरोग्य केंद्रात गरोदर माता व महिलांना प्रसुती बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या केंद्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसूतीनंतर मातांना डिस्चार्जपूर्वीच नवजात बालकाचा जन्म दाखला आरोग्य केंद्रामार्फत देण्यात येतो. शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेमुळे प्रक्रिया जलद व पारदर्शक होत असून प्रसूती झालेल्या माता व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
1 कोटी 78 लाख 71 हजार रुपयांची वसुली:चांदवडला आयाेजित राष्ट्रीय लोकन्यायालयात 1183 प्रकरणे निकाली
चांदवड येथे झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात न्यायचौकशीपूर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी तब्बल ११८३ प्रकरणे निकाली काढण्यात येऊन एकूण १ कोटी ७८ लाख ७१ हजार ८९ रुपये वसूल केले. चांदवड तालुका विधी सेवा समिती आणि तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १४) दिवाणी व फौजदारी न्यायालयात हे लोकन्यायालय पार पडले. या लोकन्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरूपाची एकूण १४५४ प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४४ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ती निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमधून दंडरूपाने तसेच बँक वसुलीद्वारे १ कोटी २२ लाख ८४ हजार ६३२ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली. याशिवाय १८२३ प्री-लिटिगेशन प्रकरणे विचारार्थ ठेवण्यात आली होती. त्यापैकी ११३९ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ती निकाली निघाली. ग्रामपंचायतीची १११८ प्रकरणे तसेच बँका व वीजबिलांची २१ प्रकरणे तडजोडीद्वारे मार्गी लागली. या प्रकरणांतून एकूण ५५ लाख ८६ हजार ४५७ रुपये वसूल झाले. न्यायचौकशीपूर्व आणि न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे मिळून एकूण ११८३ प्रकरणांचा निपटारा करत १ कोटी ७८ लाख ७१ हजार ८९ रुपये इतकी एकत्रित वसुली केली . या लोकन्यायालयात तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस. एस. छल्लाणी यांनी पॅनलप्रमुख म्हणून काम पाहिले. पॅनल सदस्य म्हणून अॅड. पंकज काळे यांनी सहभाग घेतला. तसेच तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. भैय्यासाहेब पटेल, वकील संघाचे सदस्य, न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक मनोज मंडाले, पॅनलवरील न्यायालयीन कर्मचारी, चांदवड व वडनेरभैरव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. चांदवड येथील लोकन्यायालयात न्यायालयीन प्रलंबीत प्रकरणे निकाली काढताना दिवाणी न्यायधिश एस. एस. छल्लाणी. समवेत अॅड. पंकज काळे, विधीज्ञ, अधिकारी, कर्मचारी व पक्षकार. राष्ट्रीय लोकन्यायालय ही पर्यायी व जलद न्यायनिवाडा पद्धत आहे. यात प्रलंबित तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे परस्पर तडजोडीने निकाली काढली जातात. लोकन्यायालयाचा निर्णय दोन्ही बाजूंना मान्य असतो व त्यावर पुढील अपील करता येत नाही. त्यामुळे कमी खर्चात आणि जलद गतीने वाद मिटविण्याचे हे प्रभावी व्यासपीठ मानले जाते.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई परिसरात बुधवारी रात्री अचानक वातावरण बदलले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विजांच्या कडकडाटासह जोरदार वारा सुरू झाला. कापणी करून शेतात सोंगणी करून ठेवलेले मका, हरभरा धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली. शेतकऱ्यांची धावपळ उडाली. अनेकांनी रात्रीच शेत गाठले. पीक वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली होती. हवामान खात्याने वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला होता. बुधवारी उशिरा रात्री ढगांची गर्दी झाली. जोरदार वाऱ्याने हजेरी लावली. काही ठिकाणी विजांचा कडकडाट झाला. अनिश्चित हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. रब्बी हंगामातील मका, हरभरा काढणी मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली आहे. अनेकांनी पीक शेतातच सोंगणी करून ठेवले आहे. वादळी वाऱ्याने सोंगणी उडून जाण्याची भीती निर्माण झाली. पावसात भिजून नुकसान होण्याची भीती वाढली. त्यामुळे अनेक शेतकरी रात्रीच्या अंधारात शेताकडे धावताना दिसले. शेतकऱ्यांनी तातडीने उपाय केले. मकाच्या कणसांवर ताडपत्री टाकली. हरभऱ्याच्या गंजी झाकल्या. काही ठिकाणी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आले. वाऱ्याचा वेग जास्त होता. ताडपत्री नीट बांधण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. अवकाळी पावसाचे संकट दरवर्षी उभे राहते. काढणीच्या काळात हवामान बदलले तर मोठे आर्थिक नुकसान होते. पिंपळगाव रेणुकाई परिसरातील अनेक शेतकरी याच चिंतेत आहेत. काही ठिकाणी पीक अजूनही उघड्यावर आहे. तज्ज्ञांच्या मते हवामानातील अचानक बदल चिंतेचा आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. शक्य असेल तेथे पिकांची सुरक्षित साठवण करावी, असा सल्ला दिला जात आहे. ग्रामीण भागात पुरेशा सुविधा नाहीत. त्यामुळे अशा वेळी शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवावे, अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास तातडीने पंचनामे करावेत. मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पुढील काही दिवस हवामान कसे राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हार्वेस्टरवाल्यांची मनमानी सुरू हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाजानुसार परिसरात पावसाचे वातावरण तयार झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी गहू व हरभरा मळणीला गडबड सुरू केली. याचाच फायदा घेत हार्वेस्टर वाल्यांनी गव्हाचे एकरी दर पंधराशेवरून तीन हजार रुपये केले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. तरीही शेतकरी नाईलाजाने अवकाळीच्या धास्तीने गहू व हरभरा मळणी करू लागले. ताडपत्रीने पीक झाकण्यासाठी धडपड ^बुधवारी रात्री अचानक वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला, तेव्हा आमच्या तोंडचे पाणीच पळाले. दिवसभर कष्ट करून शेतात मका आणि हरभऱ्याची सोंगणी करून ठेवली होती. जर पाऊस आला असता तर संपूर्ण पीक भिजून मोठे नुकसान झाले असते. आम्ही लगेच कुटुंबासह शेतात धाव घेतली. ताडपत्री टाकून पीक झाकले. अशा अवकाळी हवामानामुळे शेतकऱ्यांची अडचण होते. - रमेश आहेर, शेतकरी, पिंपळगाव रेणुकाई
युवती, महिलांनी यशस्वी उद्योजक बनावे- उदावंत
स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी नोकरीच्या मागे न धावता महिला, युवतींनी यशस्वी उद्योजक बनावे, असे आवाहन गजानन उदावंत यांनी केले. जाफराबाद येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्रशालेत मंगळवारी महिला व बाल विकास कार्यालय, गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय माता व किशोरी मेळावा घेण्यात आला.अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा कविता वाकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी सतीश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा मुळीक, माजी नगराध्यक्ष डॉ. सुरेखा लहाने, बाल विकास प्रकल्प अधिकारी अनुपमा म्हस्के, प्रा. डॉ. सुनंदा रिंगे, छाया निकम, मुख्याध्यापक उमेश दुनगहु, मुकेश भारद्वाज आदींची उपस्थिती होती. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कल्पना चावला यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रा. डॉ. सुनंदा रिंगे यांनी ‘मुलगी घडवताना पालकाची भूमिका’ या विषयावर तर डॉ. सुरेखा लहाने यांनी ‘शिक्षित मुलगी, प्रगत समाज, शिक्षित कुटुंब, छाया निकम यांनी ‘सुरक्षा मंत्र, मुलीसाठी स्वसंरक्षण, कायदेशीर हक्क’ या विषयावर मार्गदर्शन केले. गजानन उदावंत यांनी ‘विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर बोलताना सांगितले की, आज नोकरीसाठी मोठी स्पर्धा आहे. विविध क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे नोकरीच्या मागे न धावता यशस्वी उद्योजक बनावे. यावेळी शालेय विद्यार्थिनींनी नाटिका, नृत्य, कराटे प्रात्यक्षिक सादर केले. प्रास्ताविक विस्तार अधिकारी जिनेंद्र काळे यांनी केले. सुत्रसंचालन सिमा रिंढे यांनी तर मुख्याध्यापक उमेश दुनगहू यांनी आभार मानले. यावेळी मुख्याध्यापक संदीप पंडित, पर्यवेक्षिका हिस्सल यांच्यासह शिक्षिका, शिक्षक, अंगणवाडी सेविका, माता पालक, महिला विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. शहरातील मिरवणुका, शुभेच्छांचा वर्षाव, सांस्कृतिक वातावरण यामुळे सर्वत्र उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यात २०० कुटुंबांनी नव्याने गृहप्रवेश केला. यासोबतच जिल्ह्यात एकूण ३३ कोटींची उलाढाल झाली. यात सर्वाधिक खरेदी सराफा बाजारात झाल्याचे दिसून आले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी दिसून आली. सराफा बाजार, वाहन बाजार, इलेक्ट्रॉनिक्स बाजारात दिवसभर ग्राहकांची लगबग सुरू होती. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील बाजारपेठांत एकूण २०- २५ कोटी रुपयांची उलाढाल झाली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पैठणमध्ये सोने-चांदीच्या दागिन्यांना विशेष मागणी होती. पारंपरिक नथ, मोरणी, हार, बांगड्या, नक्षीकाम असलेल्या दागिन्यांकडे महिलांचा कल दिसून आला. कमी वजनाच्या दागिन्यांची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली, अशी माहिती सोने-चांदीचे व्यापारी बलराम लोळगे यांनी दिली. मात्र आणखी भाव कमी होतील, या आशेने सराफ बाजारातील उलाढालीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचेही विक्रेते लोळगे यांनी सांगितले. पैठणला अनेक एटीएममध्ये दिवसभर होता खडखडाट गुढीपाडव्याच्या दिवशी पैठण शहरातील अनेक एटीएममध्ये रोकड उपलब्ध नसल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी, अनेकांनी डेबिट कार्ड आणि एटीएम कार्डद्वारे व्यवहार पूर्ण केले. गृहखरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील विविध भागांत घर आणि प्लॉट खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. नवीन घरांची खरेदी जवळपास ५० हून अधिक झाली आहे. पैठण येथील नागरिकांनी संभाजीनगर रोडवरील घरांना अधिक पसंती दिली. सराफा व रिअल इस्टेट क्षेत्रात कमी व्यवहार सराफ व रिअल इस्टेट क्षेत्रात गतवर्षापेक्षा कमी व्यवहार नोंदवले गेले. वाहन व इलेक्ट्रॉनिक्समध्येही मागणी कमी नोंदवली गेली. जिल्ह्यात ग्रामीण भागात यंदा साधारण २०- २५ कोटींची एकूण उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सराफ बाजारात (सोने-चांदी) खरेदीला कमी मागणी होती. अंदाजे ७-८ कोटींची उलाढाल झाली. रिअल इस्टेटमध्ये प्लॉट व घरांच्या बुकिंगमध्ये ६- ७ कोटींचा व्यवहार झाला. दुचाकी व काही चारचाकी खरेदीमुळे ४-५ कोटींची उलाढाल झाली. नवीन मोबाईल, टीव्ही, फ्रिज खरेदीतून अंदाजे ३-४ कोटींची उलाढाल झाली. अशी माहिती मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक पवन लोहिया यांनी दिली.
अडीच वर्षांपासून कुंभेफळ पोलिस चौकी बंद, शेंद्र्यामध्ये असुरक्षितता
करमाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुंभेफळ येथील पोलिस चौकी गेल्या अडीच वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे शेंद्रा एमआयडीसीसह परिसरात कायदा-सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. उद्योजक, नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना राष्ट्रीय महामार्गालगत कुंभेफळ येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. वाहतूक नियंत्रण, सुरक्षा, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी चौकीची स्थापना झाली होती. विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, तत्कालीन पोलिस अधीक्षक विनीत गोयल यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले होते. काही महिन्यांतच चौकी बंद पडली. स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. कुंभेफळ एमआयडीसी चौकात सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहतुकीचा मोठा गोंधळ होतो. कंपन्यांची शिफ्ट सुटल्यानंतर गर्दी वाढते. चौकी शेजारीच आहे. पोलिस कर्मचारी नसतात. वाहतूक नियंत्रण ढासळते. नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. आवश्यकतेनुसारच कर्मचारी कुंभेफळ पोलिस चौकी पुन्हा सुरू करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. करमाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत म्हणाले, “कुंभेफळ येथील पोलिस चौकी सुरू आहे. आवश्यकतेनुसारच तेथे कर्मचारी उपस्थित राहतात.”
266 विहिरींचा प्रस्ताव बादप्रकरणी चौकशी होणार:तहसील आणि पंचायत समितीची एकमेकांवर जबाबदारी ढकला-ढकल
अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त विहिरींसाठी शासनाने आदेश देऊनही वैजापूर तालुक्यात प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि समन्वयाच्या अभावामुळे संपूर्ण प्रक्रिया कोलमडल्याचे समोर आले आहे. २७४ प्रस्तावांपैकी केवळ ८ प्रस्ताव मंजूर झाले, तर तब्बल २६६ प्रस्ताव बाद करण्यात आले. तहसील, पंचायत समिती आणि कृषी विभाग यांच्यातील विसंगतीमुळे पंचनामा झाला की नाही, यावरच प्रशासनात वाद सुरू आहे. दरम्यान, ‘दिव्य मराठी’त प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतली असून, या प्रकरणी त्यांनी चौकशी करण्याचे संकेत दिले असून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची आज, शुक्रवारी बैठक बोलावली आहे. नुकसानीनंतर शासनाने प्रति विहीर ३० हजारांची मदत जाहीर केली होती. त्यानुसार तहसीलदार, बीडीओ आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांना डेडलाइन देणे, गावनिहाय पंचनामे करून अहवाल वेळेत सादर करणे बंधनकारक होते. ‘दिव्य मराठी’त प्रकाशीत झालेले वृत्त. आज आढावा घेणार २६६ प्रस्ताव बाद होणे ही चिंतेची बाब आहे. या संदर्भात चौकशी केली जाईल. आज जिल्हा परिषद व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली. अहवालच नव्हते; पंचायत समितीचा दावा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी तहसीलचा दावा फेटाळत सुरुवातीला प्रस्तावांसोबत पंचनामा अहवाल नव्हतेच, असा स्पष्ट आरोप केला आहे. नंतर तहसीलकडून सादर केलेले अहवालही नुकसानग्रस्त विहिरींशी ताळमेळ न बसणारे होते, असे त्यांनी सांगितले. म्हणजेच कागदपत्रांतील गोंधळ आणि विसंगतीमुळेच प्रस्ताव बाद झाल्याचे चित्र समोर येत आहे. २६६ शेतकऱ्यांना फटका २६६ शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. प्रति विहीर ३० हजारांच्या हिशेबाने जवळपास ८२ लाखांचा फटका बसला आहे. प्रशासनातील या बेजबाबदार कारभारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून दोषींवर कारवाई होणार का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसले यांची ४३२ वी जयंती व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या पुण्यतिथीनिमित्त वेरूळ येथील मालोजीराजे भोसले गढीवर अभिवादन कार्यक्रम पार पडला. जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज, नाथाश्रमाच्या आक्काताई महाराज, कैलास आश्रमाचे अभयानंद महाराज, नागेश्वरनंद महाराज आणि सिद्धेश्वर महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांनी सोहळ्याला उपस्थिती लावली. राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात भोसले घराण्याच्या संस्कारांचे महत्त्व सांगताना शिवविचारांचा जागर करण्याचे आवाहन केले. जगद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली. नाथाश्रमाच्या आक्काताई महाराज यांनी वेरूळ गढीच्या तेजोमय भूमीचे महत्त्व सांगितले आणि शिवविचारांची जागृती करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास प्रकाश पाटील मिसाळ, गणपत मस्के, मच्छिंद्र देवकर, अनिल नलावडे, सतीश लोखंडे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.
जवाहर नवोदय विद्यालय कन्नडसाठी प्रवेशपूर्व केंद्रस्तरीय चाचणी परीक्षेत आमठाणा येथील प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळेची खुशी सुरेश कुरकुटे, सार्थक हरिदास शिंदे या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. दोघेही सहावी नवोदयसाठी पात्र ठरले, असून, त्यांचा अशोक गरुड यांच्याकडून सत्कार करण्यात आला. या परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून १९,३११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. जिल्ह्यात एकूण ८० जागा होत्या. एका जागेसाठी जवळपास २५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या कठीण स्पर्धेत खुशी, सार्थक यांनी परिश्रम घेत यश मिळवले. या यशाबद्दल संस्था कार्यालय तळणी येथे संस्था प्रमुख अशोक गरुड यांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. सत्कार कार्यक्रमाला माजी जि. प. सदस्य दिलीप दाणेकर, प्रज्ञा जागृती प्रशालेच्या निवृत्त मुख्याध्यापिका नलिनी जोशी, शैलजा नागोरी, मुख्याध्यापक कुशल देशमुख, सुरेश कुरकुटे, मीरा कुरकुटे, हरिदास शिंदे, कविता शिंदे, शिक्षक गजानन पिसे, कैलास रिंढे, संदीप देशमुख, उपस्थित होते. दोन्ही विद्यार्थ्यांना सहावीपासून बारावीपर्यंत सी.बी.एस.ई. पॅटर्नचे मोफत शिक्षण मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अभ्यासात सातत्य असल्यास यश मिळतेच मेहनत, सातत्य गरजेचे असते. त्यातूनच यश मिळते. दोन वर्षे नवोदय निवडीचा ध्यास विद्यार्थ्यांनी मनात ठेवला होता. ती वाटचाल आज फळाला आली. ही निवड भविष्यातही प्रेरणा देईल. शाळेतील इतर विद्यार्थ्यांनीही नवोदय विद्यालयाच्या प्रवेश पुर्व परीक्षेसाठी तयारी करावी, असे आवाहनही गरुड यांनी यावेळी केले.
जंगलातील आटलेले पाणवठे व वाढलेल्या अवैध वृक्षतोडीमुळे विस्तीर्ण अजिंठा वनपरिक्षेत्राचा परिसर सध्या उजाड झाला आहे. कारवाईचा धाक नसल्याने लाकूड तस्करांची चांदी होत असून याकडे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानाडोळा केला आहे. यामुळे घनदाट जंगल दिवसेंदिवस विरळ होत आहे. दुसरीकडे पाणवठे आटल्यामुळे वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास काही वर्षांत अजिंठा वनपरिक्षेत्र नष्ट होण्याची भीती वन्यप्रेमींनी व्यक्त केली आहे. अजिंठा वन विभाग परिमंडळांत अजिंठा, फर्दापूर, ठाणा, रॉक्सा, मालखेडा, अमसरी, नाटवी, वाघेरा, वडाळी, जामठी, हिंगणा, पिंपळदरी, पळसखेडा, सावळदबारा, पिंपळा भाग जंगलाने वेढला असून जंगलात बिबटे, मोर, हरिण, नीलगाय, ससे, लाडंगे, कोल्हे, माकड, रानडुक्कर, तडस, खोकड, भोकर, सायाळ यासारखे प्राणी आढळून येतात. दिवसेंदिवस जंगलात वृक्षतोड होत असल्यामुळे या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जंगलात सर्रास वृक्षतोड होत असूनही याकडे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, अवैध वृक्षतोड होत असल्याबाबत अनेक नागरिकांनी वन्यप्रेमींनी तक्रारी केल्या. मात्र, याची कुणीही दखल घेतली नाही. तसेच ग्राहक संरक्षण समितीची मंगेश सनान्से यांनीही प्रधान मुख्य संरक्षक, मुख्य वनसंरक्षक, उपवन रक्षक तथा वनमंत्री यांना निवेदन देऊन वृक्षतोड निदर्शनास आणून दिली. मात्र, कारवाई करण्यात आली नाही. वनक्षेत्रामध्ये आठवडाभरापासून वृक्षतोडीचा सपाटा सुरूच इराण-अमेरिका युद्धामुळे राज्यात प्रचंड गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात सिलिंडर घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. यासाठी पर्याय म्हणून लाकडाचा वापर सुरु झाल्याने गेल्या आठवडाभरापासून ओली महाकाय झाडे तोडण्याचा सपाटा सुरु केला आहे. आधी लाकूड तस्कर लाकूडतोड करीत होते. आता नागरिकही सर्रास वृक्षतोड करीत असल्याचे दिसून येत आहे. वृक्षतोडीबाबत कारवाई करण्यात येणार अजिंठा वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षतोडीबाबत तक्रारी आल्या आहेत. याबाबत कारवाई करणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांनी सांगितले आहे.
बोरगाव अर्जला सप्ताह; धार्मिक कार्यक्रम सुरू
फुलंब्री तालुक्यातील तीर्थक्षेत्र बोरगाव अर्ज येथे गुरुवारी (१९ मार्च) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात झाली असून, यंदा प्रथमच भव्य कीर्तन महोत्सव होणार आहे. दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले आहे. बोरगाव अर्ज येथील अखंड हरिनाम सप्ताहाचे यंदाचे ११९ वर्ष असून, अखंड परंपरेनुसार गूढीपाडवाच्या शूभ मुहूर्तावर या सप्ताहाला सुरुवात होते. गुरुवार सकाळी आठ वाजता सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन मंगल वांद्याच्या गजरात गावातून मिरवणूक गणपती मंदिराकडे काढण्यात आली. पारंपरिक पद्धतीने जांभळीच्या डहाळ्यांचा मांडव टाकून अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला. सोहळ्याच्या निमित्ताने आठ दिवस बोरगाव नगरीसह परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून जाणार आहे. तसेच दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून, दररोज सकाळी ४ते ६ काकडा भजन, १० ते ४ हभप उदय महाराज गोंदिकर यांच्या अमृतवाणीतून शिवमहापुराण कथा सादर होणार आहे. दररोज सायंकाळी ५ते ७ हरिपाठ, रात्री ७ ते ९ नामांकित कीर्तनकार यांचे कीर्तन, रात्री नऊ वाजता येणाऱ्या भाविकांसाठी दररोज जेवणाची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. शुक्रवारी एकनाथ महाराज चतर शास्त्री, शनिवारी पुरुषोत्तम महाराज पाटील, रविवारी बाळू महाराज गिरगावकर, सोमवारी चिन्मय महाराज सातारकर, मंगळवारी पांडुरंग महाराज विविकार, बुधवारी संजय महाराज पाचपोर विदर्भरत्न गौसेवक, गुरुवारी प्रभाकर महाराज झोलकर, तर शुक्रवारी अमृत महाराज जोशी यांचे सकाळी ११ वाजता काल्याचे किर्तन होणार आहे. तसेच दोन वाजता महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. बोरगाव अर्ज येथे सप्ताह सुरू झाला असून, यावेळी उपस्थित ग्रामस्थ.
उपजिल्हाधिकारी कधी होणार? अपर जिल्हाधिकारी म्हणून प्रमोशन कधी मिळेल? किंवा पोलिस उपअधीक्षक पदावर पोस्टिंग कुठे मिळेल? एमपीएससी आणि यूपीएससी पास होऊन सनदी अधिकारी झालेले अनेक जण असे प्रश्न ज्योतिषाच्या दारात रांगा लावून विचारत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या या महिला अत्याचारी ज्योतिषी अशोक खरातला स्वतःला कधी अटक होणार, याचे मात्र साधे भविष्यही ओळखता आले नसल्याची चर्चा आता रंगली आहे. याचबरोबर या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील पैशांची खरातच्या माध्यमातूनच जमिनींमध्ये सुमारे १०० कोटींहून अधिक गुंतवणूक केल्याची बाब उघडकीस येण्याची शक्यता आहे. दुसऱ्याचे भविष्य सांगणाऱ्या आणि अधिकारी-राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषाचे स्वतःचे भविष्य आता कोठडीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अशोक एकनाथ खरात याच्या काळ्या कृत्यांचा पाढा वाचला जात आहे. या भोंदूच्या मायाजालात महसूल आणि पोलिस दलातील बडे अधिकारीही अडकल्याचे उघड होत आहे. थेट मंत्रालयातून हलली सूत्रे हायप्रोफाइल बाबा अशोक खरात ऊर्फ कॅप्टनने पोलिस कोठडीत चुप्पी साधली असून रात्रभर तो गुन्हे शाखेच्या कार्यालयात जप करत स्वतःच्याच भविष्यासाठी अंकगणिताची जुळवाजुळव करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खरातसोबत म्हाडा भूखंड घोटाळ्यातील संशयित हायप्रोफाइल मोनू मनवानी, सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याचाही कायद्याच्या बालेकिल्ल्यात ‘पाहुणचार’ करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करण्याकरता स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात आली असून, प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी खरातच्या अंकगणिताचा दोन तास क्लास घेतला. फिर्यादीच ठरला आरोपी; २९ डिसेंबर २०२५ - वावी पोलिस ठाणे: अशोककुमार एकनाथ खरात (६७, रा. मिरगाव, सिन्नर) याने फिर्याद दिली. दिनेश मनाजी परब (रा. भायखळा) याने व्हॉट्सॲप कॉलवर सांगितले की, राजेंद्र अशोक जासूद (रा. पुणे) याने तुमचे काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ पाठवले आहेत. तेव्हायरल करण्याची धमकी देत ५ कोटींची खंडणी मागणी करत ‘विषय सेटल करू’ अशी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. १२ मार्च २०२६ - शिर्डी पोलीस ठाणे २४ वर्षीय युवतीने तक्रार दिली. संशयित नीरज जाधव याने मोबाईलवर अश्लील फोटो पाठवला होता. ७ दिवसांनंतर एक अनोळखी व्यक्ती साईबाबा मंदिराजवळ भेटली. ‘नीरज जाधवकडे तुमचे अश्लील फोटो आहेत, ते आम्ही व्हायरल करणार आहोत’ अशी धमकी दिली. नीरज जाधव हा ओकस प्रॉपर्टीजमध्ये कामाला होता. त्याने एआयच्या मदतीने अश्लील फोटो तयार करून पाठवले होते. ३ वर्षांपूर्वी पीडिता नाशिक येथे ओकस प्रॉपर्टीजमध्ये व्हिजिटला जात होती. तिथे ऑफिस बॉय म्हणून नीरज जाधव काम करत होता. त्याने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. सोशल मीडियावर फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास करण्याकरता १३ मार्च रोजी एसआयटी स्थापन झाली आहे. दि. १७ मार्च २०२६ - सरकारवाडा पोलीस ठाणे नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२६ दरम्यान ओकस प्रॉपर्टीज, कॅनडा कॉर्नर येथे खरात याने भोंदूगिरी करत दैवी शक्तीच्या नावे महिलेचा विश्वास संपादन केला. गुंगीकारक औषध देत संमोहित केले. पतीच्या मरणाची भीती दाखवत बलात्कार केला. महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. हा तपास एसआयटीकडे दिला. शिपायाकडून खरातचा भांडाफोड खरातच्या ओकस प्रॉपर्टी येथे नीरज जाधव शिपाई असताना त्याला कॅप्टनचे सर्व कारनामे माहिती होते. पीडित महिलांचे फोटो, व्हिडिओच्या आधारे तो महिलांना ब्लॅकमेल करत होता. काही महिलांनी खरातला याबाबत सांगितले होते, मात्र खरात यानेच त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले होते.
युद्धाने तेल पेटले; शेअर बाजार होरपळला:रुपयात आज मोठ्या घसरणीची शक्यता, गुरुवारी बाजार बंद होता
अमेरिका-इराण युद्धात तेल-गॅस तळांवरील हल्ले तीव्र झाल्यामुळे गुरुवारी बीएसई सेन्सेक्समध्ये २,४९६.८९ अंकांची (३.२६%) मोठी घसरण झाली. जून २०२४ नंतरची ही एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. सेन्सेक्स ७४,२०७.२४ वर बंद झाला, जो ७ एप्रिल २०२५ नंतरचा नीचांकी स्तर आहे. व्यवहारादरम्यान तो २,७५३.१८ अंकांनी (३.५८%) घसरून ७३,९५०.९५ च्या पातळीवर पोहोचला होता. तर, ५० शेअर्सचा एनएसई निफ्टी ७७५.६५ अंकांनी (३.२६%) घसरून २३,००२ वर बंद झाला. जिओजित इन्व्हेस्टमेंटचे मुख्य गुंतवणूक धोरणकार डॉ. व्ही.के. विजयकुमार सांगतात - शेअर बाजारातील या घसरणीमागे २ मोठी कारणे आहेत. पहिले - गुरुवारी सकाळी ब्रेंट क्रूड सुमारे $११० वर होते, व्यवहारादरम्यान ते $११७ वर पोहोचले. जर ब्रेंटच्या किमती दीर्घकाळ $१२० च्या वर राहिल्या, तर त्याचा परिणाम आर्थिक वर्ष २०२७ मध्ये देशाच्या जीडीपी वाढीवर व कॉर्पोरेट उत्पन्नावर होईल. हीच भीती बाजारात आहे. दुसरे -एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे बाजारात नैराश्य अधिकच वाढले. नियामक किंवा प्रशासकीय समस्या नसली, तरी त्याचा बाजाराच्या मानसिकतेवर परिणाम झाला. एचडीएफसी बँकेचा शेअर ५% पर्यंत घसरला. इंडियन बास्केटमध्ये ब्रेंट क्रूडची किंमत १४६ डॉलर प्रति बॅरल झाली आहे. भारत इराक, सौदी, रशिया, यूएईकडून तेल घेतो. या सर्व वेगवेगळ्या तेलांच्या किमतींच्या सरासरीला ‘इंडियन बास्केट’ म्हटले जाते. १. निर्बंध हटतील: इराणला अमेरिकेकडून सवलत शक्यअमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी म्हटले की ट्रम्प सरकार इराणच्या तेल विक्रीवरील निर्बंध हटवू शकते. दुसरीकडे, पेंटागॉनने संसदेकडे युद्धासाठी १६ लाख कोटी रुपयांची मागणी केली. संरक्षणमंत्र्यांनी म्हटले - बायडेन यांनी युक्रेनला अब्जावधी डॉलरची शस्त्रे दिली होती. गरजेमुळे आज जास्त पैसा हवा आहे. २. मुत्सद्देगिरी: शांततेसाठी मोदींची मॅक्रॉन यांच्याशी चर्चादुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक, कतारचे अमीर शेख तमीम हमद अल थानी व मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तणाव कमी करण्यावर भर दिला. ३. भीती संपली: आता रोज ५५ लाख गॅस सिलिंडर बुकिंगपेट्रोलियम मंत्रालयानुसार घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची पॅनिक बुकिंग थांबली आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी रोज ५५ लाख सिलिंडर बुक होत होते. युद्ध काळात म्हणजेच १३ मार्चला हा आकडा ८७.७ लाखांपर्यंत गेला होता. सध्या १८ मार्चला तो घटून ५६-५७ लाखांवर आला आहे. रशिया-युक्रेन युद्ध(23 फेब्रुवारी - 15 मार्च 2022)निर्देशांक/क्षेत्र घसरण सेन्सेक्स -2.5% निफ्टी -2.3% सर्वाधिक प्रभावित 5 सेक्टरऑटो -10.6% बँकएक्स -6.9% वित्तीय सेवा -6.6% कन्झ्युमर डिस्क्रीशनरी -4.4% कॅपिटल गुड्स -3.3%अमेरिका-इराण युद्ध(28 फेब्रु. ते 19 मार्च 2026)निर्देशांक/क्षेत्र घसरण सेन्सेक्स -8.7% निफ्टी -8.6% सर्वाधिक प्रभावित 5 सेक्टरवित्तीय सेवा -37.5% ऑटो -12.7% तेल आणि गॅस -12.5% बँकएक्स -11.8% मिड-स्मॉल प्रा. बँक -11.1% १३ वर्षांपर्यंत गॅस देऊ शकते साऊथ पार्ससाऊथ पार्स आखात इराण-कतार यांच्यातील सामायिक गॅस क्षेत्र आहे. येथे १८०० ट्रिलियन घनफूट गॅस आहे, जो जगाची १३ वर्षांची गरज पूर्ण करू शकतो. इराणची ८०% वीज नैसर्गिक गॅसपासून बनते. ...तर ५०% पर्यंत महाग होईल गॅसरास लफानमध्ये जगातील २०%, कतारची ९०% एलएनजी बनते. भारत गरजेची ४०% एलएनजी येथूनच घेतो. चीन, जपानही याचवर अवलंबून आहेत. हे दीर्घकाळ बंद राहिल्यास गॅस ५०% पर्यंत महाग होईल. इराण: कतारमधील सर्वात मोठ्या एलएनजी प्रकल्पावर, अमेरिकन F-35 विमानावरही हल्ला तेहरान |जगातील सर्वात मोठे गॅस फील्ड साऊथ पार्सवर इस्रायली हल्ल्यानंतर इराणने काल रात्री ९ देशांमधील तेल आणि गॅस आस्थापनांवर क्षेपणास्त्रे डागली. सर्वात मोठा हल्ला कतारस्थित रास लफान एलएनजी प्लँटवर झाला. यामुळे कतारची गॅस निर्यात क्षमता १७% ने घटली आणि २०% जागतिक एलएनजी पुरवठाही ठप्प झाला. हे पूर्ववत होण्यासाठी ५ वर्षे लागतील. याव्यतिरिक्त, एका इराणी ड्रोनने अमेरिकेचे पाचव्या पिढीतील प्रगत विमान एफ-३५ चेही नुकसान केले. त्याचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. इराणने गेल्या २० दिवसांत अमेरिकेची सुमारे १६ विमाने-हेलिकॉप्टर पाडली आहेत. सौदी अरेबिया: समरेफ रिफायनरीवर ड्रोन हल्ला. २०% उत्पादन ठप्प. देशात ७ क्षेपणास्त्रे, १५ ड्रोनने हल्ले झाले.कुवेत: मीना अल व अब्दुल्ला रिफायनरीजवर हल्ले. प्रकल्प बंद. यूएईच्या शाह-हब्सान प्लँटवर हल्ले. उत्पादन शून्य.इस्रायल: हैफामध्ये देशाच्या सर्वात मोठ्या रिफायनरीवर हल्ला. सुरुवातीचे २० दिवस... इराण युद्धात सेन्सेक्स ९% घसरला, युक्रेन युद्धात २.५% घसरला होता; आता वित्तीय सेवेला मोठा फटका. बीएसईवर एकूण ३,१९२ शेअर्स घसरले, १,०५१ शेअर्स वाढले, १६१ शेअर्स स्थिर राहिले. बीएसई मिडकॅप इंडेक्स ३.३४%, स्मॉलकॅप २.७७% घसरला. सर्व क्षेत्रीय निर्देशांकात (सेक्टोरल इंडेक्स) घसरण दिसून आली. ऑटो इंडेक्स ४.०७%, रिअल्टी ३.७९%, वित्तीय सेवा ३.६६%, बँकिंग ३.५३% पर्यंत कोसळले.
हिंदू नववर्षाचा उत्साह आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे सोन्याच्या भावात ६,९०१ रुपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल १८,५४० रुपयांची घसरले. चांदी मागील ७८ दिवसांच्या ( ३ जानेवारी २०२६) नीचांकी पातळीवर आली. बुधवारी १,६०,१६५ रुपयांवर असलेले २४ कॅरेट सोने आज ६९०१ रुपयांनी स्वस्त होऊन १,५३,२६४ प्रति १० ग्रॅमवर आले आहे. तर चांदी २,४४,११० रुपयांवर म्हणजेच अडीच लाखांच्या खाली आली. गेल्या १९ दिवसात सोन्यात २२,६६० रुपयांनी तर चांदीत ५९,७४० रुपयांची घसरण झाली. मार्च महिन्यात आतापर्यंत चांदीच्या किमतीत एकूण १६ टक्क्यांची घट झाली असून, सण असूनही गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. १ मार्च रोजी सोन्याचे दर १,७५,९२४ रुपये प्रति तोळे होते त्यातच २२,६६० रुपयांची घसरण झाली. तर १ मार्च रोजी चांदी ३,०३,८५० रुपये प्रति किलो होते. त्यात तब्बल ५९,७४० रुपयांची घसरण झाली. दरम्यान, सोने ६० दिवसांपूर्वीच्या (२० जानेवारी २०२६) नीच्चांकी भावावर आले. दरातील घसरणीची ५ प्रमुख कारणे..... लग्नसराईमुळे पुढे दरवाढीची शक्यता कायम .... जागतिक घडामोडींमुळे महागाईची भीती निर्माण झाली असून गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत. परिणामी, सोन्याचे दर घसरले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिरता असली तरी ही परिस्थिती फार काळ टिकून राहणार नाही. त्यामुळे आगामी काळात लग्नसराई लक्षात घेता पुन्हा दरवाढीची शक्यता आहे. आदित्य नवलखा, आंतरराष्ट्रीय बाजाराचे तज्ज्ञ
छत्रपती संभाजीनगर तसेच जालना, बीड, नाशिकसह राज्यातील एकूण ९ जिल्ह्यांमध्ये गुरुवारी वादळी पाऊस आणि गारपीट झाली. बुधवारी रात्रीनंतर सलग दुसऱ्या दिवशी पावसामुळे गहू, मका, हरभरा, कांदा बिजवाई तसेच द्राक्षांचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वाऱ्याचा फटका महाराष्ट्राला बसत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. शहरात सायंकाळनंतर सिडको, हडको, चिकलठाणा, शिवाजीनगर, गारखेडा परिसर, मध्यवर्ती शहराच्या बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस पडला. यादरम्यान सिडको, राजाबाजार, शहागंजसह अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. त्याचबरोबर जुना मोंढा भागातील फीडरही बंद पडले होते. जिल्ह्यातील खुलताबाद, गंगापूर व कन्नड तालुक्यात ९०० हेक्टरवरील गहू आणि मक्याचे पीक आडवे झाले. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात कुंभार पिंपळगाव, बोडखा, खडकावाडी, देवी देहगाव, शिंदखेड या गावांसह परिसरात गारपीट झाली. तसेच बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्याला, सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुपारनंतर गारपिटीसह पावसाने धुमाकूळ घातला. कारी, बोरमाळे परिसरात गारांचा पाऊस झाला. कुर्डूवाडी, मोहोळ, माढा, माळशिरस तालुक्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पुणे, सांगलीसह ६ जिल्ह्यांत इशारा संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली आणि सातारा या घाटमाथ्याला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (२० मार्च) हवामान बिघडलेले राहील. या भागात मेघगर्जनेसह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता कायम आहे. माणिकराव खुळे, निवृत्त शास्त्रज्ञ, पुणे हवामान विभाग अहिल्यानगर, पाथर्डी, राहुरीत मुसळधार बुधवारी अहिल्यानगर तालुका तसेच जिल्ह्यातील पाथर्डी, राहुरी, अहिल्यानगर तालुक्यांत गारपिटीचा पाऊस झाला. त्यामुळे गहू, कांदा या पिकांचे नुकसान झाले. घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे गारांसह पाऊस झाला. जगदंबा माता मंदिराच्याकमानीचा कोपरा खचला बुलढाणा, गोंदियात शेतीचे मोठे नुकसान झाले. उकळी-परतापूर जगदंबा माता संस्थानच्या कमानीवर वीज कोसळली. त्यामुळे कमानीच्या कोपऱ्याचा एक भाग खचला उत्तर व पश्चिम महाराष्ट्राला सलग दुसऱ्या दिवशी गारपिटीने झोडपले नाशिक | नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही दुपारी ३० ते ४० किमी वेगाच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने द्राक्ष व कांद्याचे मोठे नुकसान झाले. निफाड, सिन्नर, देवळा, नांदगाव, मालेगाव आणि दिंडोरी तालुक्यात गारपीट झाली. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातही भाजीपाला आणि कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेला माल वाचवण्यासाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली.
अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे बारामती तर भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीत २३ एप्रिलला विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. त्यात सुनेत्रा पवारांविरुद्ध मविआ उमेदवार देणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. मात्र, काँग्रेसने बारामतीत सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मविआतील मतभेद समोर आले आहेत. काँग्रेसचे नेते, आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, सुप्रिया सुळेंनी घेतलेल्या भूमिकेशी काँग्रेस सहमत नाही. बारामती, राहुरीत शरद पवार गटाने निवडणूक लढवली नाही तर काँग्रेस त्या जागांवर उमेदवार देण्याचा विचार करेल. मविआत चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, असे निदर्शनास आणून दिले असता वडेट्टीवार म्हणाले की, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही लढणार आहोत. हे राजकीय डावपेच! विश्लेषकांनुसार, सुप्रिया सुळे व वडेट्टीवारांच्या वेगवेगळ्या भूमिका हा राजकीय डावपेचांचा भाग असू शकतो. सुनेत्रांनी शरद पवारांशी चर्चा न करता उपमुुख्यमंत्रिपद स्वीकारले. विलीनीकरणावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी पवार कुटुंबात नाराजी आहे. मात्र, बारामतीत सुनेत्रांविषयीची सहानुभूती लक्षात घेता त्यांना शरद पवार गट उघड विरोध करू शकत नाही म्हणून काँग्रेसला पुढे केले आहे.
“महाराष्ट्र कोलमडून पडलाय, तरुण इन्स्टाग्राममध्ये अडकलाय आणि सरकार फक्त आकडेवारीचा खेळ मांडतंय,’ असे सांगून आज इराण अडचणीत असताना आपण मौन बाळगले आहे. इराणची साथ सोडणे भविष्यात भारताला महागात पडेल, “ अशा कडक शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर तोफ डागली. मुंबईतील शिवतीर्थावर आयोजित मनसेच्या भव्य गुढीपाडवा मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी त्यांनी ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ ही नवीन वेबसाइट महाराष्ट्राला अर्पण करत, जनतेचा आवाज बनण्याचे आश्वासन दिले. तरुणांच्या मानसिकतेवर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, “तुम्हाला आयपीएल, सिनेमे आणि इन्स्टाग्राममध्ये गुंतवून ठेवले जात आहे, जेणेकरून तुम्ही सरकारला प्रश्न विचारणार नाही. तुम्ही असेच इन्स्टाग्राममध्ये अडकून राहिलात, तर हे सरकार तुमच्या डोक्यावर बसून राज्य करेल. आता बदलाची वेळ आली आहे. ‘ जनतेच्या संपर्कात राहण्याचा डिजिटल प्रयत्न पक्षाच्या पडझडीनंतर, राज ठाकरेंची ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ ही नवी खेळी म्हणजे जनतेशी तुटलेला संपर्क पुन्हा जोडण्याचा ‘डिजिटल फेररचना’ प्रयोग आहे. वारंवार बदलणाऱ्या राजकीय भूमिकांमुळे निर्माण झालेली ‘विश्वसनीयतेची दरी’ भरून काढण्यासाठी प्रयत्न आहे. मोदी-फडणवीसांवर केलेली टीका हा स्वबळावरील अस्तित्वाचा एक रणनीतिक भाग आहे.
संघात संघटनात्मक बदल; 46 प्रांतांऐवजी 86 विभाग:‘जेन झी’ला संघाकडे खेचण्यासाठी पावले- सरसंघचालक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेचे शंभरावे वर्ष साजरे करत आहे. या निमित्ताने संघाच्या संघटनात्मक रचनेत काही बदल केले जात आहेत. सध्या संघाचे देशात ४६ प्रांतनिहाय काम चालते. नव्या बदलात ४६ प्रांतांऐवजी ८६ विभाग केले जातील. त्या विभागनिहाय संघाचे काम चालणार आहे. नवी विभाग रचना तसेच इतर उपक्रमांतून ‘जेन-झी’ला (तरुण पिढी) संघाकडे खेचण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका प्रकट मुलाखतीत सांगितले की, देशाची प्रगती करत आपली परंपरा आणखी समोर न्यायची असा विचार ‘जेन झी’मध्ये दिसून येतो. त्यांना प्रामाणिकता, सेवेचे आकर्षण आहे. त्यामुळेच त्यांची संघविचारांशी नाळ जुळत असून, ते संघकार्यासाठी अनुकूल आहेत. ‘जेन झी’साठी संघ काय करणार, सध्या काय करत आहे १ प्रत्यक्ष शाखेत येणे शक्य नसेल. मात्र संघकार्याशी जोडण्याची इच्छा असणाऱ्यांना उपयुक्त व्यवस्था केली जाईल. त्यादृष्टीने शहरातील टोलेजंग इमारती, सोसायटीत तरुणांशी संपर्क साधण्यावर भर.२ संघाचा प्रसिद्धी विभाग ‘इन्फ्लुएन्सर्स’, ‘यूट्यूबर्स’सोबत बैठक आयोजित करो. त्यांना विविध विषयांची सविस्तर माहिती दिली जाते. संबंधित साहित्यही संघाकडून उपलब्ध करून दिले जाते. अ) राष्ट्रीय सेवा संघाच्या रचनेत बदल का? शंभर वर्षांच्या कार्यकाळात संघाचे काम मोठे झाले आहे. त्यामुळे रचना विकेंद्रित होणे आवश्यक झाले. संघाकडून समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत व स्वयंसेवकांची कामेदेखील वाढली आहेत. अनेकदा कामादरम्यान शासन-प्रशासनाशी संबंध येतो. त्यासाठी वेगळी व्यवस्था हवी या विचारातून प्रांताऐवजी आता विभागाची रचना तयार करण्यात आली आहे.ब) बदलाने कार्यपद्धतीत बदल होईल का?नाही. लोकांशी मैत्री करायची व आपल्या उदाहरणातून परिवर्तन घडवायचे हीच संघाची कार्यपद्धती कायम राहील. यातून भाजपसाठी व्होट बँक तयार होऊ शकते.क) सोशल मीडियाविषयी काय करणार?पंचपरिवर्तनासारख्या उपक्रमातून समाजापर्यंत जाण्यावर भर देण्यात येत आहे. आपला मुद्दा योग्य पद्धतीने, शिस्तशीर असावा, यासाठी प्रशिक्षण व्हायला हवे.ड) महाराष्ट्रात सध्या संघाचे किती, कोणते प्रांत आहेत?विदर्भ (नागपूर अमरावती विभाग), देवगिरी (मराठवाडा), कोकण (मुंबई, ठाणे, कोकण), पश्चिम महाराष्ट्र (पुणे, कोल्हापूर) असे चार प्रांत आहेत.
इ. स. १८७० चे शिवाजी महाराजांचे चित्र प्रकाशात
सोलापूर : विजयसिंह जाधव जर्मनी येथील एका संग्रहालयांमध्ये जपून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन इ. स. १८७० च्या दशकात जर्मनीमध्ये प्रकाशित झालेल्या चित्राचा शोध लागला आहे. जर्मनी संग्रहालयांमध्ये सुरक्षित असलेली ही चित्रे समोर आणली असून, ही चित्रे छत्रपती शिवरायांच्या समकालीन असल्याने त्यांचे ऐतिहासिक मूल्य मोठे आहे. यामुळे इतिहासाच्या वैभवात भर पडली आहे,’ असे इतिहास अभ्यासक […] The post इ. स. १८७० चे शिवाजी महाराजांचे चित्र प्रकाशात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठवाड्यासह राज्यात गारपिटीसह पाऊस, पिकांची हानी छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी गुरुवारी सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह, नववर्षाचे स्वागत आणि मांगल्याचे वातावरण असतानाच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील धाराशिव, जालना, नांदेड, बीड आणि विदर्भात वाशिम, अकोला, बुलडाणा, पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह गारपिटीने शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. सोसाट्याचा वारा आणि […] The post अवकाळीचा धडाका सुरूच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराणच्या प्रकल्पांवर हल्ला, इराणने कतार, कुवेतमधील प्रकल्प उडविले तेहरान : वृत्तसंस्था अमेरिका-इस्रायलने दक्षिण इराणमधील असलुयेह शहरातील साउथ पार्स गॅस क्षेत्र आणि तेल व वायू सुविधांवर हवाई हल्ल्यानंतर चौथाळलेल्या इराणने बुधवार, दि. १८ मार्च २०२६ रोजी रात्री सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, कुवेतमधील आईल रिफायनरी, गॅस सुविधांवर हल्ले चढविले. त्यामुळे गॅस आणि तेल जळून खाक […] The post भारतासह जगावर ऊर्जासंकट! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यात सुरू असलेल्या ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती आणि गादी या दोन्ही विभागांत रोमांचक सामने झाले. सोलापूर आणि पुणे येथील मल्लांनी दमदार कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. रामकृष्ण अण्णा सातव पाटील कर्तव्य फाउंडेशनने वाघोली येथील स्व. अजितदादा पवार क्रीडानगरीत या स्पर्धेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र केसरी किताबाचे प्रमुख दावेदार असलेले महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षे, बाळू बोडके, पृथ्वीराज मोहोळ, हर्षवर्धन सदगीर, पृथ्वीराज पाटील आणि सिकंदर शेख यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. माती विभागात सोलापूरच्या अनुभवी महेंद्र गायकवाडने विशाल बनकरला ६-१ गुणांनी नमवून विजयी सलामी दिली. तर नाशिकच्या बाळू बोडकेने कोल्हापूरच्या माऊली जमदाडेवर १०-५ गुणांनी सनसनाटी विजय मिळवला. याच विभागात हिंगोलीच्या सिकंदर शेखने पुणे जिल्ह्याच्या अनिकेत मांगडेचा ८-१ गुणांनी पराभव केला. अनिकेतने पहिला गुण मिळवला असला तरी, सिकंदरने सलग गुण मिळवत एकतर्फी विजय नोंदवला. गादी विभागात पुणे जिल्ह्याच्या पृथ्वीराज मोहोळने १० गुण मिळवत विजयी आगेकूच केली. दुसऱ्या लढतीत शिवराज राक्षेने प्रतीक जगतापला हरवले. प्रतीकने सुरुवातीला २ गुण मिळवले असले तरी, शिवराजने धारांग डाव टाकत १० गुणांची कमाई करत विजय मिळवला. सोलापूरच्या पृथ्वीराज पाटीलने पालघरच्या वैभव मानेचा ८-० असा एकतर्फी पराभव केला. तर गादी विभागातील आणखी एका महत्त्वाच्या लढतीत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने बीडच्या प्रतीक देशमुखला १०-० गुणांनी पराभूत करत पुढील फेरीत स्थान निश्चित केले.
तिवसा येथील गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने 'गुढीपाडवा व रामनवमी महोत्सव' भक्तिमय वातावरणात सुरू झाला आहे. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाने आयोजित केलेला हा सोहळा १९ मार्च रोजी गुढीपाडव्यापासून २६ मार्चपर्यंत चालणार आहे. यामध्ये अध्यात्म, संस्कार आणि सामूहिकतेचा संगम अनुभवायला मिळणार आहे. महोत्सवाची सुरुवात १९ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी तीर्थ स्थापना, अभिषेक, महापूजा आणि सामुदायिक ध्यान यांसारख्या धार्मिक विधींनी झाली. पहाटे सादर होणारी भजनांजली भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा देत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळ, शेंदोळा खुर्द यांच्या वतीने करण्यात आले आहे. संपूर्ण आठवडाभर आश्रम परिसरात रामकृष्णहरी नामाचा अखंड गजर, सामूहिक प्रार्थना, ध्यान-चिंतन आणि विविध भक्तीपर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. गावोगावातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असून गुरुकुंज आश्रम परिसरात भक्तीचा दरवळ पसरला आहे. या सोहळ्याला डॉ. नंदकिशोर काळे, डॉ. डी.एस. निघोट, उद्धवराव वानखडे, डॉ. पी.पी. पाडेकर, डॉ. खारोडे, डॉ. रघुनाथ वाडेकर, संजयभाऊ देशमुख, आशिषदादा कावडे, कैलासजी गिरी, पंकज देशमुख आणि सद्गुणदादा ठोसर यांसारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने भक्ती, सेवा आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असून, सर्व स्तरातील नागरिकांनी यात सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. महोत्सवाचा मुख्य दिवस असलेल्या रामनवमीला विशेष सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी रामकृष्णहरी अभिषेक, भव्य महापूजा, सामुदायिक ध्यान व चिंतन, गोपाळकाला, हरिपाठ व कीर्तन होणार आहे. यानंतर हजारो भाविकांसाठी महाप्रसाद व सामुदायिक प्रार्थना आयोजित करण्यात आली आहे. गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रमातील महासमाधी स्थळी मानवतेचा संदेश देणारी गुढी उभारण्यात आली. यामुळे यंदाचा गुढीपाडवा सण सामाजिक जाणिवा आणि सेवाभाव यांचा अनोखा संगम ठरला. पहाटेपासूनच आश्रम परिसरात भक्तांची वर्दळ सुरू होती. वेदमंत्र, भजन आणि प्रार्थनांच्या सुरांनी वातावरण प्रसन्न झाले होते. सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली, त्यानंतर मानवसेवा छात्रालयातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रांगेत महासमाधी स्थळी पारंपरिक पद्धतीने गुढी उभारली.
महसूल खात्यातील नियमांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याची कबुली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली. आतापर्यंतच्या इतिहासात महसूल खात्यात झालेला हा सर्वांत मोठा घोटाळा आहे. या प्रकरणात जमिनीवरील सातबारा (७/१२) उता-यात शुद्धलेखनातील चुका दुरुस्त करण्याच्या नावाखाली बेकायदेशीर फेरफार करून काही महसूल अधिका-यांनी मालकी हक्कांमध्ये बदल केला, अशी माहिती मंत्री बावनकुळे यांनी दिली. ते म्हणाले, या […] The post महसूल खात्यात महाघोटाळा ! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अंबुलगा-घरणी येथील शेत रस्त्याचा सुटला वाद
चाकूर : प्रतिनिधी तालुक्यातील अंबुलगा-घरणी या गावात गेल्या अनेक वर्षापासून दोन शेतक-यांचा शेत रस्त्यासाठी वाद होता मात्र चाकूर येथील पोलीसांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन सामोपचाराने वाद मिटवून संबधित शेतक-यास अखेर शेत रस्ता मिळाला आहे. शेतक-यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या पुढाकाराने अनेक दिवसांपासूनचा हा वाद मिटला आहे. यावेळी बिट […] The post अंबुलगा-घरणी येथील शेत रस्त्याचा सुटला वाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रवींद्र मेटकर यांना युकेचे निमंत्रण:ऑक्सफर्ड विद्यापीठात जागतिक संशोधन परिषदेत सहभागी होणार
अंजनगाव बारी नजीकच्या म्हसला येथील यशस्वी पोल्ट्री व्यावसायिक रवींद्र मेटकर यांना युनायटेड किंग्डममधील प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठात आयोजित जागतिक संशोधन परिषदेसाठी निमंत्रण मिळाले आहे. ग्लोबल इकॉनॉमिक फोरमद्वारे आयोजित ही विशेष परिषद १ ते ५ मे २०२६ या कालावधीत होणार आहे. संस्थेने मेटकर यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, युनायटेड किंग्डममधील प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित या जागतिक संशोधन परिषदेत सहभागी होण्यासाठी त्यांना औपचारिकपणे आमंत्रित करताना संस्थेला आनंद होत आहे. रवींद्र मेटकर यांचा प्रतिकूलतेपासून समृद्धीकडे जाण्याचा प्रवास उल्लेखनीय आहे. शाश्वत शेती आणि कुक्कुटपालन ही त्यांची बलस्थाने असून, त्यांनी पोल्ट्री व्यवसायात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांची प्रगती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. मेटकर यांच्या पोल्ट्री व्यवसायाची वार्षिक उलाढाल १५ कोटी रुपये असून, ते १ लाख ८० हजार थर पक्ष्यांचे व्यवस्थापन करतात. त्यांचे हे कार्य भारताच्या कृषी क्षेत्रातील अपवादात्मक दूरदृष्टी, लवचिकता आणि नेतृत्व दर्शवते, असे अनेकांचे मत आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या भेटीअंती केलेल्या नोंदीनुसार, मेटकर यांचे एकात्मिक शेती, खर्चाचे ऑप्टिमायझेशन आणि हवामान-लवचिक शेतीमधील कार्य शाश्वत विकास आणि अन्न सुरक्षेच्या व्यापक उद्दिष्टांशी पूर्णपणे सुसंगत आहे. देशभरातील लाखो शेतकऱ्यांना प्रभावित करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हे खरोखरच एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय योगदान आहे, असेही या नोंदींमध्ये नमूद आहे.
लातूर जिल्हा परिषदेमध्ये बदल्यांसाठी हालचाली वाढल्या
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग-क व वर्ग-ड कर्मचा-यांच्या नियमित बदल्यांसाठी कार्यरत पदावरील कर्मचा-यांची सेवा जेष्ठता यादी तयार करण्यासाठी हलचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या वर्ग-क व वर्ग-ड मधील कर्मचा-यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या होणार आहेत. अनेक कर्मचारी आपल्याला सोयीचे ठिकाण मिळते का याची चाचपणी करताना दिसून येत आहेत. तसेच जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या […] The post लातूर जिल्हा परिषदेमध्ये बदल्यांसाठी हालचाली वाढल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
साई मंदिरात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते आरती
लातूर : प्रतिनिधी येथील विशालनगर भागातील श्री साई मंदिरात गुढीपाडवा निमित्ताने गुरुवारी सायंकाळी माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी साईबाबाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. यावेळी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे, रेणा […] The post साई मंदिरात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते आरती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सरकारी किंवा खाजगी नोकरीवर अवलंबून न राहता स्वत:चे उद्योग सुरू करावेत
लातूर : प्रतिनिधी शासनाने पशुसंवर्धन विभागासाठी ४५०० कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे. यामध्ये शेळीपालन आणि दुग्ध व्यवसायासाठी नवीन योजना १ एप्रिलपासून लागू होणार असून, त्यासाठी खुल्या प्रवर्गाला ५० टक्के आणि मागासवर्गीय प्रवर्गाला ७५ टक्के अनुदान मिळणार आहे. भारताला २०२७ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असून २०४७ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट […] The post सरकारी किंवा खाजगी नोकरीवर अवलंबून न राहता स्वत:चे उद्योग सुरू करावेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावती येथे दलितमित्र दिवंगत केशवराव भगवंतराव ठोंबरे गुरुजी यांच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (नॉफ) आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ब्रेल वाचन स्पर्धा, सुगम गायन स्पर्धा आणि दिव्यांग सेवा पुरस्कार सोहळा पार पडला. मुंबईचे सागर पाटील आणि इंजिनियर उमेश जेरी यांना यावेळी 'दिव्यांग सेवा पुरस्कार' प्रदान करण्यात आला. संस्थेच्या प्रांगणात पार पडलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन पहिल्या दिवशी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब रायबोले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अपंग कल्याण संस्थेचे उपाध्यक्ष विजयनारायण श्रीवास्तव होते. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष रामरावजी पोकळे, मानद सचिव किशोरभाऊ वैद्य, लक्ष्मीकांत वरणगांवकर आणि डॉ. विलास लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ब्रेल वाचन स्पर्धा आणि सुगम गायन स्पर्धा कनिष्ठ व वरिष्ठ अशा दोन गटांमध्ये घेण्यात आल्या. दृष्टीबाधित विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आणि कौशल्यपूर्ण सादरीकरण करत आपली प्रतिभा दाखवली. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेबरोबरच कलागुणांनाही योग्य वाव मिळाला. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला, त्यानंतर निवासी अंध विद्यालय, चिखलदरा येथील विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. बाळासाहेब रायबोले यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग सेवेमध्ये कार्यरत असलेल्या संस्थांचे महत्त्व अधोरेखित केले आणि समाजातील प्रत्येक घटकाने या कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. याच सोहळ्यात मुंबईचे सागर पाटील आणि इंजिनियर उमेश जेरी यांना 'दिव्यांग सेवा पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सागर पाटील म्हणाले, “हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी असून दिव्यांग सेवेसाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या प्रयत्नांना सलाम आहे. पुढील काळातही समाजसेवेची ही वाटचाल अधिक दृढ करण्याचा माझा प्रयत्न राहील.” इंजिनियर उमेश जेरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “हा सन्मान माझ्यासाठी केवळ गौरव नसून सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी तंत्रज्ञान व नवकल्पनांचा अधिक प्रभावी वापर करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव सुधाकर पोकळे यांनी केले, सूत्रसंचालन अनिल ढवळे यांनी केले, तर आभार राष्ट्रीय अपंग कर्मशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक डॉ. शिशिरकुमार महापात्रा यांनी मानले.
दर्यापूर बसस्थानकाला नवीन इमारत आणि बसेस मिळाल्या असल्या तरी, अनेक बसेस अजूनही नामफलकाविना धावत आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बुधवारी अशाच एका घटनेत एका चालकाने तक्रारदार प्रवाशासोबत उद्धट वर्तन केले, तर तक्रार नोंदवण्यासाठी तक्रार पुस्तिकाच उपलब्ध नसल्याचे समोर आले. गेल्या अनेक महिन्यांपासून दर्यापूर बस आगारात असे प्रकार सुरू आहेत. बसेसना योग्य नामफलक नसल्याने प्रवाशांना बस कोणत्या मार्गावर जाणार आहे, हे कळत नाही. यामुळे अनेकदा प्रवासी बसची वाट पाहत राहतात आणि बस निघून जाते, ज्यामुळे त्यांना प्रवासात अडचणी येतात. बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास साईनगर येथील विशाल पांडुरंग खंडारे हे त्यांच्या पत्नीला अंजनगाव सुर्जी येथे सोडण्यासाठी बसस्थानकात आले होते. नामफलक नसलेली एम.एच.४० वाय ५३७२ क्रमांकाची बस डेपोत आल्यावर, विशाल खंडारे यांनी चालकाला बस कोणत्या मार्गावर जाणार, असे विचारले. यावर चालकाने उद्धटपणे उत्तर देत त्यांच्याशी शाब्दिक वाद घातला. या अपमानास्पद प्रकारानंतर विशाल खंडारे यांनी चौकशी कक्षात तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क साधला. मात्र, तेथे उपस्थित कर्मचाऱ्याने तक्रार पुस्तिका उपलब्ध नसल्याचे सांगितले. अखेरीस, एका साध्या कागदावर तक्रार नोंदवण्यास सांगण्यात आले. तक्रार पुस्तिका उपलब्ध नसणे हा एक गंभीर प्रकार असून, यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशाल खंडारे यांनी आगार व्यवस्थापक आशिष बाहुलकर यांच्याकडे या घटनेबाबत लेखी तक्रार दिली आहे. त्यांनी संबंधित बस चालकावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा केवळ सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी याबाबत मुख्याध्यापकांना पत्र पाठवले असून, शुक्रवार, २० मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. मात्र, काही खाजगी शाळांना या आदेशाची अंमलबजावणी करणे शक्य होणार नाही, असे वास्तव समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, संबंधित शाळांनी पर्यायी व्यवस्था करावी, असे स्पष्ट केले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी सांगितले की, ज्या शाळांना अडचणी येत आहेत, त्यांच्या मुख्याध्यापकांची आणि जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढला जाईल. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सुमारे १५०० जिल्हा परिषद शाळा आहेत, ज्यात सुमारे ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्व शाळा शुक्रवारपासून दुपारच्या सत्रात भरणार नाहीत. शिवाजी शिक्षण संस्था, सातपुडा शिक्षण संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ, एलवायजे लेडीज क्लब, हव्याप्र मंडळ, भगिनी मंडळ यांसारख्या खाजगी व्यवस्थापनाखालील प्राथमिक व माध्यमिक शाळाही प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येतात. या शाळांनाही सकाळच्या सत्रातच भरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी काही शाळा आतापर्यंत सकाळ आणि दुपार अशा दोन्ही सत्रांमध्ये चालत होत्या, परंतु शुक्रवारपासून त्यांचे सर्व वर्ग केवळ सकाळच्या सत्रातच घेतले जातील. दरम्यान, सीबीएसईशी संलग्न असलेल्या काही मोजक्या खाजगी शाळांमध्ये इमारतींची कमतरता असल्याने त्यांना हा आदेश पाळणे शक्य होणार नाही, अशी वस्तुस्थिती आहे. एकाच सत्रात सर्व विद्यार्थ्यांना शिकवणे अवघड होईल, असे या शाळांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा शाळांनी अभ्यासक्रमाचे तास (पिरिएडस्) कमी करून किंवा शाळेच्या आसपासच्या इमारतींचा वापर करून मार्ग काढण्याची मागणी पुढे आली आहे. यावर दिव्य मराठीचे तज्ज्ञ प्रा. डॉ. महेंद्र मेटे यांनी अमरावती येथे पर्याय सुचवला आहे. त्यांच्या मते, बहुतेक शाळांचा अभ्यासक्रम पूर्णत्वाकडे असल्याने, मर्यादित इमारती असलेल्या शाळांनी प्रत्येक तासाचा (पिरिएडचा) कालावधी ४५ मिनिटांवरून ३० मिनिटांपर्यंत कमी करावा. तसेच, शाळा सुरू होण्याची वेळ सकाळी आठऐवजी सात करावी. सकाळी ७ ते ११ या चार तासांत दोन शिफ्टमध्ये वर्ग घेतल्यास उन्हापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण होईल आणि प्रशासनाच्या आदेशाचेही पालन होईल.
सिलिंडर दरवाढीविरोधात काँग्रेसचे गुढीपाडव्याला आंदोलन:राजकमल चौकात गुढीपूजन करत नोंदवला निषेध
शहर काँग्रेस कमिटीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजकमल चौकात सिलिंडर दरवाढीविरोधात आंदोलन केले. एकाच कार्यक्रमात गुढीपाडव्याचा उत्साह आणि सामाजिक जाणीव यांचा मेळ साधण्यात आला. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख आणि ॲड. यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा दरवर्षी राजकमल चौकात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीच्या कार्यक्रमात शहर काँग्रेस कमिटीने सहभाग घेतला. यावेळी नवचैतन्याची गुढी उभारण्यात आली. दोन्ही माजी पालकमंत्र्यांसह महाकाली मंदिरचे पीठाधीश्वर शक्ती महाराज आणि दत्तमार्गी महंत पद्माकर तायडे महाराज यांनी गुढीचे विधीवत पूजन करून आरती केली. सांस्कृतिक परंपरेनंतर सामाजिक जागृतीचा विषय हाती घेण्यात आला. अमरावती शहर काँग्रेसच्या अनेक महिला कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने केलेल्या सिलिंडरच्या दरवाढीचा निषेध नोंदवला. उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पारंपरिक वस्त्रे व फेटे बांधून दोन्ही कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक बबलू शेखावत, मनपाचे विरोधी पक्षनेते माजी महापौर विलास इंगोले, मिलींद चिमोटे आणि नवयुवक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्यासह माजी नगरसेवक बबन रडके, जगदीश गवळी, राजेंद्र परिहार, सुरेश रतावा, अभिनंदन पेंढारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्रीताई वानखडे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, नगरसेवक संजय शिरभाते, अर्चना आत्राम, सुनिता भेले, विक्की उर्फ विशाल वानखडे, ललिता रतावा, धीरज हिवसे, राजश्री झटाले, अनिल अग्रवाल यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
मोर्शी पोलिसांनी लहान आर्वी येथील गजानन महाराजांच्या मंदिरातून चांदीची छत्री आणि कळस चोरणाऱ्या एका अट्टल बदमाशाला अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही चोरीची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली होती. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार, गोपाल मोहन युवनाते (वय ४२, रा. पांढरघाटी, ता. वरूड) हा रात्रीच्या वेळी शहरात संशयीतरित्या फिरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली आणि त्याच्याजवळील पिशवीची तपासणी केली असता, त्यात घडी घातलेली चांदीची छत्री व चांदीचा कळस आढळून आला. आरोपीने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून अंदाजे ७५० ग्रॅम वजनाची चांदीची छत्री व कळस पंचासमक्ष जप्त केला. त्याच्याविरुद्ध कलम १२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपासणीत असे निष्पन्न झाले की, ही चांदीची छत्री व कळस आष्टी (जि. वर्धा) येथील गजानन महाराज मंदिरातून चोरीला गेले होते. आष्टी पोलीस ठाण्यात या चोरीचा गुन्हा नोंद आहे. त्यामुळे पुढील कार्यवाहीसाठी आरोपीला आष्टी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यात पोलीस उपनिरीक्षक आकाश शिवणकर, पोलीस अंमलदार स्वप्निल बायस्कर, छत्रपती करपते आणि अथर्व कोहळे यांचा समावेश होता.
आष्टगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या:कर्जबाजारीपणाला कंटाळून 65 वर्षीय अशोक ठाकरे यांनी जीवन संपवले
मोर्शी तालुक्यातील आष्टगाव येथे ६५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. अशोक गोपाळराव ठाकरे असे या वृद्ध शेतकऱ्याचे नाव असून, गुढीपाडव्याच्या दिवशी गुरुवारी, १९ मार्च रोजी ही घटना उघडकीस आली. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक ठाकरे यांनी स्वतःच्या घरी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. बुधवारी मध्यरात्री घरी कोणी नसताना त्यांनी हे पाऊल उचलले, आणि गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. ठाकरे यांच्याकडे आष्टगाव शिवारात चार एकर शेती होती. त्यांनी खाजगी सावकार, सोसायटी आणि बँकेकडून कर्ज घेऊन कापूस आणि तुरीची पेरणी केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे कापसाला बोंडे फुटली नाहीत आणि तुरीलाही शेंगा लागल्या नाहीत. यामुळे नगदी पीक हातातून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. या घटनेची माहिती मोर्शी पोलीस स्टेशनला देण्यात आली. ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर ठाकरे यांचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोर्शी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
विश्वमांगल्य सभेच्या वतीने २८ आणि २९ मार्च रोजी शेगाव येथे मातृसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अमरावती जिल्ह्यातून ७५० महिला सहभागी होणार आहेत. या तयारीच्या अनुषंगाने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी, गुढीपाडव्याच्या दिवशी माध्यमांशी संवाद साधला. विश्वमांगल्य सभेच्या स्थापनेला यंदा १५ वर्षे पूर्ण होत असल्याने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथील विसावा भक्त निवास संकुलात (बाळापूर मार्ग) हे अधिवेशन होणार आहे. पश्चिम विदर्भातील हजारो महिला कार्यकर्त्या यात सहभागी होतील. या अधिवेशनात भारतीय जीवनमूल्ये अर्थात भजन, भ्रमण, भवन, भोजन, भूषा आणि भाषा या सात 'भ'वर चर्चा केली जाईल. याशिवाय संस्कार, सामर्थ्य, सदाचार आणि सेवा या मूल्यांवर आधारित हे अधिवेशन असल्याने देशभरातील विद्वान यावर मार्गदर्शन करतील. विश्वमांगल्य सभेचे कार्य राष्ट्रव्यापी असून, सभेच्या केंद्रस्थानी माता आहे. आईने दाखविलेल्या मार्गावर चालूनच भविष्य चांगले होऊ शकते, असे सभेचे मत आहे. देश प्रगतीपथावर असताना आणि खंबीर नेतृत्वामुळे संकटांवर मात होत असताना, माता खंबीर व आदर्शवत असल्यास त्याचा लाभ मुलांना होईल आणि नवा भारत निर्माण होईल, असा विश्वास सभेने व्यक्त केला. प्रत्येक आईला जोडण्याचा विश्वमांगल्य सभेचा संकल्प आहे. मातांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, मूल्यांची बांधणी करणे आणि नवी पिढी संस्कारी व्हावी यासाठी मातांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने हे मातृसंस्कार अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या मातृसंस्कार अधिवेशनात अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठाचे मठाधिपती प.पू. जितेंद्रनाथ महाराज मातांना मार्गदर्शन करतील. तसेच प्रसिद्ध उद्योजक आणि शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे उपस्थित मातांना संबोधित करणार आहेत. मुख्य अतिथी कोमल झंवर यांच्या हस्ते सप्त मातृंचा सन्मान करण्यात येईल. विविध सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी होतील आणि राष्ट्रनिर्माणात महिलांच्या योगदानावर चर्चा केली जाईल. या पत्रकार परिषदेला बालसभेच्या विदर्भ पदाधिकारी प्राचार्य अंजली देव, डॉ. वसुधा बोंडे, विश्वमांगल्य सभेच्या पदाधिकारी प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख, पूजा चव्हाण, रश्मी जाजोदिया, रश्मी इटकीकर आणि लता कोल्हे आदी उपस्थित होत्या.
“भगतसिंह हे केवळ देशासाठी हुतात्मा झालेल्या क्रांतिकारकाचे नाव नाही, तर तो एक विचार आणि वृत्ती आहे. स्वातंत्र्यासाठी, श्रमजीवींसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि शोषितांसाठी लढणारा विचार म्हणजे भगतसिंह आहेत. त्यामुळे शरीररूपाने ते नसले तरी विचाररूपाने आजही प्रेरणादायी आहेत,” असे प्रतिपादन क्रांतिकारक भगतसिंह यांचे पुतणे आणि विचारवंत किरणजितसिंह यांनी पुण्यात केले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांना स्वातंत्र्य व न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सरहद पुणे आणि कृष्णा पब्लिकेशन यांच्या वतीने शहीद भगतसिंह यांच्या पुतणीने लिहिलेल्या 'युगदृष्टा भगतसिंह आणि त्यांचे मृत्युंजयी पूर्वज' या अधिकृत जीवनचरित्राचे प्रकाशन होणार आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे राजू शेट्टी यांना 'युगदृष्टा भगतसिंह राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान सोहळ्याचे शुक्रवारी (२० ऑक्टोबर) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने किरणजितसिंह पुण्यात आले होते. पुण्यातील माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भगतसिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी सरहद संस्थेचे संजय नहार, कृष्णा पब्लिकेशनचे संचालक चेतन कोळी आणि जीवनचरित्राच्या अनुवादक इंद्रायणी चव्हाण उपस्थित होत्या. किरणजितसिंह यांनी सांगितले की, भगतसिंह यांच्या घराण्यात तीन पिढ्यांपासून देश आणि कष्टकऱ्यांसाठी संघर्षाची परंपरा आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक ही त्यांची एक बाजू होती. मात्र, केवळ पिस्तूल किंवा बॉम्बने स्वातंत्र्य मिळत नाही, तर स्वातंत्र्याच्या तलवारीला विचारांच्या सहाणेवर धार येते, ही त्यांची वृत्ती होती. हे पुस्तक कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या महत्त्वपूर्ण आणि अधिकृत माहितीवर आधारित असल्याने त्याचे महत्त्व वेगळे आहे. भगतसिंह यांच्यासह बलिदान केलेल्या राजगुरू, सुखदेव आणि सर्वच क्रांतिकारकांच्या त्यागातून आजच्या युवा पिढीने प्रेरणा घ्यावी. स्वतःपलीकडे जाऊन समाज आणि देशाचा विचार करावा, त्या विचारांतून सकारात्मक कृती घडाव्यात, हा यामागील उद्देश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आजची युवा पिढी दिशाहीन, भरकटलेली आणि स्वकेंद्रित झाल्याचे दिसते. तेवीस वर्षांच्या भगतसिंहांनी दिलेले बलिदान आणि आजची युवापिढी यावर बोलताना किरणजितसिंह म्हणाले की, न्याय्य व योग्य गोष्टींसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा अलीकडची पिढी हरवून बसली आहे. अशा परिस्थितीत सरदार भगतसिंह यांच्या चरित्राच्या माध्यमातून नव्या पिढीसाठी उत्तम आदर्श उभा राहील आणि भगतसिंहांच्या मनातला देश प्रत्यक्षात यावा, त्यांचा संदेश नेमकेपणाने युवा मनांपर्यंत पोहोचावा, हा हेतू आहे. सत्तेतले लोक बदलतात, पण व्यवस्था तशीच आहे. त्यामुळे भगतसिंहांचे स्वराज्य अजूनही यायला वेळ लागेल. संघर्ष अजूनही संपलेला नाही, असे मत त्यांनी शेवटी व्यक्त केले.
न्यू यॉर्क : सध्या मिडल इस्टमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि इस्त्रायल हे दोन्ही देश मिळून इराणवर प्राणघातक हल्ला करताना दिसत आहेत. इराण देखील त्याला प्रत्युत्तर देत आहे. दरम्यान, एक अहवाल समोर आला आहे. या अहवालात भारत-पाकिस्तानमध्ये अणु युद्ध होण्याची शक्यता वर्तवली आहे. आता हा अहवाल नेमका काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला […] The post भारत-पाकमध्ये अणु युद्ध? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशातील पहिल्या ‘एलपीजी गॅस एटीएम’ची सुरूवात
नवी दिल्ली : मध्य-पूर्वेतील युद्धाचा थेट परिणाम इंधन आणि गॅस संकटाच्या रुपाने होत आहे. देशात पेट्रोल-डिझेल नाही तर गॅस टंचाई दिसून येत आहे. गेल्या पाच दिवसांपासून देशातील अनेक नागरिक लांबच लांब रांगेत रोज उभे राहत आहेत. त्यांना एलपीजी सिलिंडर मिळण्याची अजूनही शाश्वती वाटत नाही. तर सरकारने तुटवडा नसल्याचा दावा केला आहे. पुरवठा विस्कळीत झाल्याने गॅस […] The post देशातील पहिल्या ‘एलपीजी गॅस एटीएम’ची सुरूवात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सापाचे विष ‘एनडीपीएस’च्या कक्षेत येत नाही
नवी दिल्ली : सर्पदंश किंवा सापाच्या विषाचा वापर करणे हे अमली पदार्थ व मानसोपचार पदार्थ कायद्याच्या व्याख्येत बसत नाही, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने दि. १९ मार्च रोजी प्रसिद्ध यूट्यूबर एल्व्हिश यादव (उर्फ सिद्धार्थ) याच्याविरुद्ध सुरू असलेली फौजदारी कारवाई रद्द करण्याचा आदेश दिला. आम्ही अद्याप आरोपांमधील तथ्यांची सखोल तपासणी केलेली नाही. यामुळे संबंधित ‘सक्षम प्राधिकरणाने’ […] The post सापाचे विष ‘एनडीपीएस’च्या कक्षेत येत नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : इराण हे युद्ध हारणार नाही, असा दावा करत इराण नेहमीच भारताच्या पाठीशी राहिला आहे त्यामुळे आपणही इराणच्याच सोबत राहिले पाहिजे असे मत भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ चे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. पश्चिम आशियात सध्या सुरू असलेल्या संघर्षावर भाष्य करताना ए. एस. दुलत यांनी एक महत्त्वाचे विधान […] The post ‘इराण युद्ध हारणार नाही’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

30 C