तालुक्यातील सर्वात लहान गाव बांभोरी खुर्द या गावाची नोंद असली,तरी दूध उत्पादनासाठी हे गाव प्रसिद्ध आहे.या गावाची मतदार संख्या २८५ च्या एवढी असून हे गाव वनकोठा गृप ग्रामपंचायतला जोडलेले आहे. कासोदा पोलिस स्टेशनच्या हद्दीत ले हे गाव असून पोलिस स्टेशनला आजतागायत येथून एक ही एफआयआर दाखल झालेला नाही, हे या गावाचे भूषण आहे. गिरणे वरील जामदा डावा कालव्यातून मिळणाऱ्या पाण्याचे हे शेवटच्या टोकांपैकी एक आहे .त्यामुळे येथे बारमाही बागायत होत नसली तरी भाजीपाला व कापूस, मका ही पीके घेतली जातात.या गावात मारुतीचे एक भव्य मंदिर आहे, गावाजवळून एक नाला फक्त पावसाळ्यात वाहतो,त्या नाल्यातून रस्ता असून त्यावर पूल होणे बाकी आहे. या गावाचे खास वैशिष्ट्य असे की,तालूक्यांतील हे सर्वात लहान व आदिवासी संख्या जास्त असलेले गाव असले तरी एरंडोल तालुक्यातील पहिला व एकमेव फोटोग्राफर १९६० च्या दशकात या गावाने कै.भीमसिंग पाटील यांच्या रुपाने दिला आहे. त्याकाळी या गावात फोटोग्राफर असणे हे आश्चर्य मानले जात होते. येथे पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था असून वनकोठा गृप ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच यागावाचेच रहिवासी आहेत.हे गाव असून १६४० नंतर वसले आहे.
येथील स्वातंत्र्या सैनिक श्री शामराव गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालयात गुरुवारी पोलिस स्थापना दिनानिमित्त अडावद पोलिस स्टेशनतर्फे राबवल्या जाणाऱ्या सप्ताहांतर्गत ‘शस्त्रास्त्र मार्गदर्शन शिबिर’ आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शस्त्र चालवण्याचे प्रात्यक्षिक पोलिसांकडून देण्यात आले. विद्यार्थ्यांनाही शस्त्रास्त्रे हाताळण्याची संधी यावेळी दिली. यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अडावद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ उपस्थित होते. त्यांच्यासोबत सहाय्यक फौजदार श्री जितेंद्र सोनवणे, पोलिस हवालदार किरण शिरसाठ, सेवराव तोदे, चंदुलाल सोनवणे, पोलिस नाईक विनोद धनगर, दिलीप पाटील, वर्डी गावाचे पोलिस पाटील पद्माकर नाथ आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे मुख्याध्यापक मोहन चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी जय हिंद चा जयघोष करून पोलिसांचे उस्फुर्त स्वागत केले. विद्यार्थ्यांनी वरील शस्त्रास्त्र स्वतः हाताळून पाहिले व शस्त्रास्त्र चालवण्याचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी वरील शस्त्रास्त्र स्वतः हाताळून पाहिले व शस्त्रास्त्र चालवण्याचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या शंका व प्रश्न उपस्थित केले. पोलिसअधिकाऱ्यांनी त्यांची उत्तरेही दिली. मुख्याध्यापक मोहन चव्हाण यांनी मान्यवरांचे आभार मानले. याप्रसंगी जितेंद्र सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना कार्बाईन गन, एस एल आर रायफल, गॅस गन, पिस्टल, हॅन्ड ग्रेनेड, स्टंट ग्रेनेड, मिरची स्प्रे व दंगल नियंत्रण वेळी आवश्यक साहित्य यांचा उपयोग व रचना याविषयी माहिती दिली. आणि शस्त्र चालवण्याचे प्रात्यक्षिक दिले. आणि विद्यार्थ्यांनाही शस्त्रास्त्रे हाताळण्याची संधी दिली.
नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे इगतपुरी शहर थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे. भातशेतीचा दरवळ, अल्हाददायक हवामान, हिरवेगार डोंगर, धुक्याने वेढलेला परिसर अशा निसर्गरम्य वातावरणामुळे इगतपुरी कोणत्याही ऋतूत पर्यटकांना भुरळ घालत आहे. विशेषतः पावसाळा व हिवाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते त्यामुळे शहराचे नाव जगविख्यात आहे. पावसाळ्यात डोंगरदऱ्यांतून कोसळणारे असंख्य धबधबे, गडकोटांनी नटलेला परिसर कसारा घाटातील नागमोडी वळणे, घनदाट वनराई, खोल दऱ्या, धबधबे आणि धुक्याने वेढलेले वातावरण पर्यटकांना मोहात पाडते. नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या या भागात शिवकालीन काळापासून प्रसिद्ध असलेले घाटनदेवी मंदिर आहे. व धुक्याची चादर पांघरलेले डोंगर पाहण्यासाठी राज्यासह देश-विदेशातील पर्यटक येथे येतात. शहरात असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे विश्व विपश्यना केंद्र – धम्मगिरी हे शहराचे प्रमुख आकर्षण आहे. वाढता ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा, प्रदूषण व बदलती जीवनमूल्ये यामुळे मानसिक आरोग्य ढासळत असताना मनःशांतीसाठी जगभरातील साधक येथे ध्यानधारणेसाठी येतात. आचार्य सत्यनारायण गोयंका महाराजांनी १९७६ मध्ये इगतपुरीतील वरच्या पेठेच्या मागील टेकडीवर या केंद्राची स्थापना केली. म्यानमार गेट, सुबक बगीचा, आकर्षक पॅगोडा आणि सोनेरी कळस असलेले ध्यानगृह साधकांना मंत्रमुग्ध करते. आज जगातील सुमारे ५० देशांत १०० हून अधिक विपश्यना केंद्रे कार्यरत असून इगतपुरी हे या चळवळीचे जागतिक केंद्र मानले जाते. रेल्वे व ऐतिहासिक महत्त्व शहराच्या विकासात रेल्वेचा मोठा वाटा आहे. तालुक्यालगत असलेला अशोका धबधबा हा वन-डे मॉन्सून डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध झाला आहे. शाहरुख खान आणि करीना कपूर यांच्या ‘अशोका’ चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण येथे झाल्यानंतर या धबधब्याला विशेष ओळख मिळाली. विपश्यना केंद्राचे प्रवेशव्दार.
पुण्यात्मा प्रभाकर सेवा मंडळ, अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कर्णबधीर निवासी विद्यालय व रुकमाबाई अपंग युवक स्वयं सहायता केंद्र इगतपुरी यांच्या वतीने पुज्य रुकम्मा जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात कर्णबधिर, गतिमंद व अंध - अपंग विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी दर्शन घडवून उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे शारीरिक अडचणींवर मात करत या विद्यार्थ्यांनी हिंदी व मराठी गीते सादर करून त्या गाण्यांना स्वतः संगीतही दिले. संगीताची लय, सूर आणि भाव यांचा सुरेख संगम अनुभवताना उपस्थित प्रेक्षक थक्क झाले. कार्यक्रमादरम्यान, समाज प्रबोधन करणाऱ्या विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य विशेष लक्षवेधी ठरले. सामाजिक जाणीव, एकोप्याचा संदेश, स्वच्छता, शिक्षणाचे महत्त्व अशा विषयांवर आधारित सादरीकरणातून त्यांनी समाजाला सकारात्मक संदेश दिला. केवळ नृत्यच नव्हे तर अभिनयातूनही विद्यार्थ्यांनी आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त केल्या. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि भावपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तर अनेकांनी त्यांच्या कौशल्याचे कौतुक केले. याप्रसंगी नगराध्यक्ष शालिनी खातळे, नगरसेविका वंदना रोकडे, आशा थोरात, आशा भडांगे, चारुलता ठाकूर,संस्थेचे केदार भट , विवेक हट्टंगडी,राजेंद्र शिंदे, सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तू व खाद्यपदार्थांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध हस्तकला वस्तू आणि खाद्यपदार्थांचे प्रदर्शन. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेबरोबरच स्वावलंबनाचा संदेश देण्यात आला. उपस्थित नागरिकांनी या वस्तूंना भेट देत विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे भरभरून कौतुक केले.
निसर्गाच्या अवकृपेमुळे बागलाण तालुक्यातील करंजाडी खोरे व काटवन भागातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. मागील अतिवृष्टीच्या जखमा अजूनही भरून निघाल्या नाहीत. त्यातच पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. हातातोंडाशी आलेले कांद्याचे पीक भुईसपाट झाले असून हरभरा, व द्राक्ष बागांनाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. करंजाडी खोऱ्यातील बिजोटे, आखतवाडे, आनंदपूर, गोराणे, कोटबेल, नामपूर आदी गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. तर काटवन भागातील बिलपुरी, बोढरी, चिराई, महड आदी गावांमध्येही शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे कांदा, हरभरा, द्राक्ष बागा तसेच कांदा लागवडीसाठी तयार केलेली रोपवाटिका पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा पावसात भिजल्याने त्याची गुणवत्ता घसरली असून, बाजारात दर आणखी कोसळण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून अधूनमधून ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगामातील कांदा, हरभरा व गहू पेरणी रखडण्याची शक्यता आहे. अनेक शेतकऱ्यांनी मशागत करून शेत पेरणीसाठी सज्ज ठेवली होती. मात्र ओलावा वाढल्याने सर्व कामे पुढे ढकलावी लागली आहेत. परिणामी रब्बी पेरणी किमान महिनाभर उशिरा सुरू होईल, असा अंदाज शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत. आंबा पिकालाही अवकाळीचा फटका बसल्याने आंबा उत्पादक शेतकरीही चिंतेत आहेत. करंजाडी खोरे भागात दरवर्षी हंगामात अवकाळी पावसाचा फटका बसतो. त्यामुळे या परिसराला अवकाळी अवर्षणप्रवण क्षेत्र घोषित करून शासनाने शेतकऱ्यांना विशेष मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यापूर्वी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत तसेच केंद्रीय पथकाने या भागाची पाहणी केली होती. कोटबेल येथील घुबडधरा शिवारात कांदा काढणी सुरू असताना अचानक अवकाळी पाऊस झाला. काढलेला कांदा पूर्णपणे भिजला. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने दिलासा द्यावा. - प्रदीप खैरनार, शेतकरी, कोटबेल
खोरीपाड्यात शेतकऱ्यांना चारा बियाणे, औषधे वाटप
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी खोरीपाडा (ता. दिंडोरी) येथे भेट देत शेतकऱ्यांना चारा बियाणे, जंतनाशक औषधांचे वाटप केले. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा प्रारंभ केला. राज्यपाल नुकतेच नाशिक जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले. अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार उपस्थित होते. खोरीपाडा येथे पोलिस पाटील सम्राट राऊत यांच्या वस्तीवर शेतकऱ्यांना चारा बियाणे व जंतनाशक औषधांचे वाटप करण्यात आले. पशुसंवर्धन विभागातर्फे लाळखुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे प्रातिनिधिक उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. प्रत्यक्ष काही जनावरांना लस देऊन लसीकरण मोहिमेची औपचारिक सुरुवात करण्यात आली. पिंपरखेड (ता. दिंडोरी) येथे शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत उभारलेल्या स्टॉलला राज्यपालांनी भेट दिली. जिल्हा परिषद सेस अंतर्गत जनावरांच्या औषधोपचारासाठी खोरीपाडा व पिंपरखेड या गावांमध्ये खोडा बसविण्यात आला. यामुळे पशुधन उपचार अधिक सुरक्षित, शास्त्रीय व सुलभ होणार आहेत. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, पशुधन विकास अधिकारी डॉ. भगवान पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी शासनाने वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची थट्टा केल्याचे दिसून येत आहे. हमीभाव खरेदी केंद्राकडे तब्बल १,९६५ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असताना, संपूर्ण तालुक्यासाठी केवळ २,७०२ क्विंटल मका खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. पण तालुक्यातील शेतकऱ्यांकडे सध्याही जवळपास २२,००० क्विंटल मका आहे. त्यामुळे उर्वरित मक्याचे काय करायचे, असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे उशिरा सुरू झालेल्या (३० नोव्हेंबरपासून) नोंदणीमुळे शेतकऱ्यांना १,००० ते १,४०० रुपये दराने व्यापाऱ्यांकडे मका विकावा लागला. मर्यादित खरेदी उद्दिष्टामुळे हमीभाव केवळ कागदावरच राहून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच वाढल्याची भावना व्यक्त होत आहे. तालुक्यात शिऊर, लासूर आणि वैजापूर अशी तीन हमीभाव मका खरेदी केंद्रे मंजूर असतानाही प्रत्यक्षात सध्या फक्त वैजापूरचेच केंद्र सुरू आहे. त्या एकमेव केंद्रावरही दिवसाला केवळ १५ शेतकऱ्यांचीच मका खरेदी केली जात असल्याने प्रक्रिया अत्यंत संथ आहे. यामुळे सरकारी खरेदी हा केवळ दिखावा असून शेतकऱ्यांची उघड थट्टा होत असल्याचा संतप्त आरोप होत आहे. -विजय राठोड, जिल्हा पणन अधिकारी, छत्रपती संभाजीनगर Q यंदा दोन महिने उशिराने खरेदी केंद्र सुरु का झाले? - राज्य सरकारकडूनच उशिराने सूचना आल्या, त्यामुळे खरेदीला उशीर झाला. Q जिल्ह्याचे आणि वैजापूरचे उद्दिष्ट किती आहे? - जिल्ह्यासाठी १ लाख क्विंटल खरेदीची मागणी होती, परंतु केवळ १०,००० चे उद्दिष्ट मिळाले. वैजापूरसाठी आता २,७०२ क्विंटलचेच उद्दिष्ट आहे. Q कमी उद्दिष्टमुळे शेतकरी आक्रमक झाले का? - हो, त्यामुळे आम्ही पुन्हा १ लाख क्विंटल वाढीव खरेदीसाठी प्रस्ताव वरिष्ठांना पाठवला आहे. उद्घाटन आणि फोटोसेशन औपचारिकतापुरते चार दिवसांपूर्वी वैजापुरात मका खरेदी केंद्रांचे उद्घाटन झाले असले, तरी खरेदी उद्दिष्ट तुटपुंजे आहे. यामुळे नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना हमीभाव मिळेल, याची कोणतीही खात्री नाही. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मका शिल्लक असताना सरकारने केवळ मर्यादित खरेदीचेच धोरण स्वीकारल्याचा आरोप होत आहे. परिणामी, ही खरेदी प्रक्रिया शेतकऱ्यांच्या दृष्टीने केवळ फोटोसेशन आणि औपचारिकता असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष प्रकाश ठुबे पाटील यांनी दिली.
मिरचीचे हब म्हणून अन्वी गावाला ओळख:गावाला सांस्कृतिक वारसाही, अनेक भजनी मंडळे कार्यरत
तालुक्यातील अन्वी गावाला राज्यात झालेल्या हरित क्रांती व धवलक्रांतीचा वारसा असल्याने आजही या गावात या वारशासोबतच धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा जपला जात आहे. मिरचीचे हब म्हणूनही अन्वी गावाला ओळखले जात आहे. खरीप पेऱ्यानुसार, गावातील १२६० हेक्टरपैकी ४३० हेक्टरवर मिरचीची लागवड झाली होती. तालुक्यातील खेळणा नदीच्या काठावर वसलेले अन्वी या गावात १९७०-७१ या दरम्यान झालेल्या हरितक्रांतीची सुरुवात या गावातून झाली होती. तत्कालीन कृषिभूषण कुमारकाका अन्वीकर यांनी राज्यातील पहिला हायब्रीड बियाण्याची चाचणी हा प्रयोग घेतला होता. यानंतरच सर्वत्र हायब्रीड बियाणे लागवड सुरू झाली होती. धवल क्रांती ही येथूनच झाली. संकरित गाईसाठी राज्यातले सर्वप्रथम केंद्र अन्वी येथे उघडण्यात आले होते. तत्कालीन डॉ. सुरेश गंगावणे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. यामुळे संपूर्ण परिसरात शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात गोधन होते. परिणामी या गावातून त्या वेळी दररोज तीन टँकर दूध संकलित केले जात असे. अन्वी हे गाव खेळणा नदीच्या काठावर आहे. शेतकरी बागायतदार गावातील शेतकरी सुजलाम- सुफलाम आहेत. या गावासह आजूबाजूच्या गावातही मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरचीचे उत्पन्न घेतले जाते.
भगवंताच्या कीर्तनातच जीवनाची खरी सार्थकता आहे. कीर्तन हे आत्म्याशी साधलेला संवाद आहे. त्यातून माणूस स्वतःला ओळखतो. अहंकार, द्वेष, लोभ यांचे ओझे हलके होते. मन निर्मळतेकडे वाटचाल करते. भगवंताच्या नामस्मरणाने अंतःकरणात भक्तीचा दिवा प्रज्वलित होतो. संयम, सदाचार आणि सेवाभावाचे संस्कार घडतात. म्हणूनच संतांनी कीर्तनालाच जीवनाचा खरा मार्ग मानले आहे, असे प्रतिपादन श्रीरामजी महाराज निकम यांनी केले. धारला येथे अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय श्रीमद्भागवत कथेची सांगता गुरुवारी काल्याच्या कीर्तनाने झाली या वेळी श्रीरामजी महाराज बोलत होते. त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या गवळणींसोबत काल्याच्या प्रसंगाचे भावपूर्ण वर्णन केले. काला हा एकट्याने खायचा नसतो. सर्वांनी मिळून खाल्ला की त्याचा आनंद वाढतो. संपूर्ण कथेचा सार काल्यात सामावलेला असल्याने सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन करण्याची परंपरा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सकाळी श्रीमद्भागवत ग्रंथाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात संपूर्ण गावातून ही मिरवणूक निघाली. कुमारिका मुलींनी डोक्यावर तुळशी कलश घेत शोभा वाढवली. महिलांनी ठिकठिकाणी पाट टाकून महाराजांचे पाय धुऊन आशीर्वाद घेतले. कीर्तनासाठी तबला, पेटी व गायनसाथ संतोष महाराज पंडित, किशोर महाराज पळशीकर, कृष्णा महाराज कदम, काशीनाथ महाराज पळशीकर, शंकर महाराज निकम, परमेश्वर महाराज साबळे, शिवाजी महाराज नांदेडकर, पंढरीनाथ महाराज दळवी, जगन महाराज बनकर आदींनी केली. शेकडो भाविकांना महाप्रसाद मिरवणूक नगरप्रदक्षिणा करून हनुमान मंदिराजवळ समारोपास आली. त्यानंतर श्रीरामजी महाराजांच्या अमृतवाणीतून काल्याच्या कीर्तनाचा भावविभोर आस्वाद भाविकांनी घेतला. कीर्तनानंतर सर्व भाविकांनी मंदिर परिसरात महाप्रसादाचा लाभ घेतला. सात दिवस चाललेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या यशस्वितेसाठी हनुमान मंदिर समिती, ग्रामस्थ व महिला भगिनींनी पुढाकार घेतला होता.
पैठण विवेकानंद शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर संचलित श्री नाथ हायस्कूल, पैठण येथे संस्थेचे आद्य संस्थापक कै. पंढरीनाथ पाटील शिसोदे ऊर्फ ‘भाऊ’ यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य तालुकास्तरीय वाद–विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व कौशल्याला व वैचारिक प्रगल्भतेला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेस तालुक्यातील विविध शाळांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव पठाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून तुषार शिसोदे पाटील (कोषाध्यक्ष, विवेकानंद शिक्षण संस्था), शिवराज भुमरे (सरपंच, पाचोड), प्रल्हाद औटे, देवीचंद मोरे, दत्तात्रय आमले उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन संतोष खराद मुख्याध्यापक, स्पर्धेचे परीक्षक भाऊसाहेब भापकर ,श्रीमती आंधळे व रमेश शेळके हे उपस्थित होते. प्रा. संतोष गव्हाणे , पवन खराद, प्रा. शिवाजी जगताप, प्राचार्य डॉ. समाधान दांडगे, सिकंदर थोरात, अनिल काकडे पर्यवेक्षक मिडल विभाग, एनसीसी विभाग प्रमुख रामनाथ कानडे, सुनील चितळे, प्रवीण गोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले व कै. पंढरीनाथ पा शिसोदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक सुनील चितळे यांनी केले. त्यानंतर प्रा. संतोष गव्हाणे यांनी कै. पंढरीनाथ पाटील शिसोदे ऊर्फ ‘भाऊ’ यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील अमूल्य कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी भाऊंच्या दूरदृष्टी, शिक्षणप्रेम व समाजोद्धारक कार्याचा प्रेरणादायी आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत औटे सर यांनी केले. स्पर्धेचा विषय “मोफत शासकीय योजनांमुळे समाज दुर्बल आणि देशाची अधोगती होत आहे का?” या विषयावर तीस सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विषयाची मांडणी, मुद्देसूद युक्तिवाद, तर्कशुद्ध विचार व आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणातून उपस्थित परीक्षक व श्रोत्यांची मने जिंकली. प्राचार्य शिवाजीराव पठाडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री नाथ हायस्कूल परिवारातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले, संतोष मडके यांनी स्पर्धेच्या शेवटी आभार प्रदर्शन व्यक्त केले. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन अभिनंदन करताना मंचावर उपस्थित मान्यवर आणि शिक्षक. छाया : विनोद लोहिया तालुकास्तरीय वादविवाद स्पर्धेतील विजेत्यांची यादी प्रथम – सिद्धांत कृष्णा राजगुरू,चांगदेव विद्यालय,चांगतपुरी द्वितीय – तुषार दत्तात्रय भांड,आर्य चाणक्य विद्यामंदिर, पैठण तृतीय – अंकिता शिवाजी गरड,श्रीनाथ हायस्कूल, पैठण उत्तेजनार्थ – पायल कुंडलिक शेळके,श्रीनाथ हायस्कूल, पैठण तर चांगदेव विद्यालय, चांगतपुरीच्या सिद्धांत कृष्णा राजगुरू व सुखदेव खाडे यांनी संयुक्तरीत्या क्रमांक पटकावला. विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांची घेतलेली भेट सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. परळ-लालबाग परिसरातील राजकीय समीकरणांवर या भेटीचा नेमका काय परिणाम होणार याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. महापालिका निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात असताना झालेली ही भेट केवळ सदिच्छा भेट होती की त्यामागे काही राजकीय संकेत आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सकपाळ म्हणाले, मातोश्रीवर टीका नाही, पण मनात वेदना आहेत. या भेटीनंतर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना ही केवळ सदिच्छा भेट होती. दगडू सकपाळ यांची तब्येत खराब होती त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी आलो होतो असे स्पष्ट केले. मात्र, शिंदे आणि सकपाळ यांची भेट सार्वजनिक होताच राजकीय चर्चांना वेग आला. विशेषतः परळ-लालबागसारख्या संवेदनशील आणि शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या भागात या भेटीमुळे मोठा राजकीय भूकंप होणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर दगडू सकपाळ यांनी आपली मनोवेदना मोकळेपणाने व्यक्त केली. म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते, या शब्दांत त्यांनी आपल्या नाराजीला वाट करून दिली. पक्षासाठी आयुष्यभर काम करूनही आज आपल्याला बाजूला सारण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विशेषतः आपल्या मुलीला नगरसेवकपदाची उमेदवारी न दिल्यामुळे ते अधिक भावनिक झाले. बोलताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते आणि त्यांचा आवाजही अनेकदा भरून येत होता. दरम्यान, सकपाळ यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाकडून अजूनतरी कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. ऐन निवडणुकीत उबाठाचे मानखुर्द येथील माजी नगरसेवक वाघमारे शिंदेसेनेत दाखल मुंबई | निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला मानखुर्दमध्ये मोठे खिंडार पडले आहे. प्रभाग क्रमांक १३९ चे माजी नगरसेवक राजेंद्र वाघमारे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुजाता वाघमारे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. “नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या या सोहळ्यात शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे आणि सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी वाघमारे दांपत्याचे स्वागत केले. राजेंद्र वाघमारे (२००२-०७) आणि सुजाता वाघमारे (२००७-१२) यांनी मानखुर्द परिसरात दीर्घकाळ नगरसेवक म्हणून काम केले असून त्यांच्या प्रवेशामुळे या भागात शिवसेनेची (शिंदे गट) ताकद वाढली आहे. नाराजीचा आणि शिंदेंचा संबंध नाही : सकपाळ मी नाराज आहे, पण या नाराजीचा आणि एकनाथ शिंदे यांचा काहीही संबंध नाही. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आपण कुणाच्याही भेटीला आलेल्या व्यक्तीला घराबाहेर काढू शकत नाही. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री माझ्या घरी आला त्यामुळे त्यांना बाहेर काढणं शक्य नव्हतं, असे त्यांनी सांगितले. मात्र, आपल्याला ज्यांनी घडवलं, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मोठं केलं, त्यांच्यापासून आपण आज दूर कसे झालो, हा प्रश्न त्यांना सतावत असल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत मांडले.
पुणेकरांचा अधिकारनामा असलेला “पुणे फर्स्ट’ हा आघाडीचा जाहीरनामा आज काँग्रेस–शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आघाडीच्या वतीने प्रकाशित करण्यात आला. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर ही आघाडी ताकदीने निवडणूक लढत असून सत्ताधारी तीन पक्षांमुळे पुणे शहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. गुरुवारी काँग्रेस भवन येथे ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री व पुण्याचे प्रभारी आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी डिजिटल जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सत्ताधारी पक्षांमुळे पुण्यात उद्योग, वाहतूक आणि प्रदूषणाच्या समस्या गंभीर झाल्या आहेत. त्यामुळे उद्योग पुणे सोडून जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मुंबई -पुण्यासारखी प्रगती करण्याची प्रचंड क्षमता आहे. येथील पायाभूत सुविधा आणि रस्त्यांचे जाळे पाहून विदेशी उद्योजक शहराच्या प्रेमात पडत आहेत. दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत या शहरासाठी मोठ्या गुंतवणुकीवर चर्चा सुरू असून आगामी काळात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी विदेशी गुंतवणूक होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (८ जानेवारी) येथे दिली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित भाजपच्या ‘टॉक शो’ मध्ये ते बोलत होते. त्यांनी शहराचा भविष्यातील विकासाचा ‘रोडमॅप’ सादर केला. टोयोटा-किर्लोस्कर, एथर व लुब्रिझोलसारखे उद्योग शहरात आले आहेत. रिलायन्ससह बड्या कंपन्यांच्या पुढाकाराने शहराला १२,००० नवे रोजगार मिळतील. दावोसमध्ये सध्या महत्त्वाचे विषय चर्चेत असून सर्वच गोष्टी उघड करत नाही, मात्र लवकरच मोठे करार होतील, असे सूतोवाच त्यांनी केले. ‘गुड न्यूज’ः ३७०० हॉर्सपॉवर पंपाची चाचणी यशस्वी शहराचा आखलेल्या २,७४० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेतील ३७०० हॉर्सपॉवर पंपाची चाचणी यशस्वी झाली. सातारा-देवळाईसह मनपातील प्रत्येक भागाला पाणी पोहोचवण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मी शहरात असताना ही चाचणी यशस्वी झाली हा केवळ योगायोग आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कुशलनगर, सिंधी कॉलनी, बालाजीनगर हा गजबजलेला परिसर आहे. याठिकाणी व्यापारी प्रतिष्ठानांनी पार्किंग व्यवस्था ठेवली नसल्याने वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतो. मयूरबन कॉलनी, चाणक्यपुरी या भागात अलीकडेच रस्त्यांची कामे झाली. मात्र, अनेक ठिकाणी नव्याने खोदकाम केल्याने नवीन अखंड रस्त्यांचे स्वप्नच राहिले आहे. मुख्य रस्ते झाले असले तरीही सर्व्हिस रोडची दुरवस्था आहे. कॉलनीतील रस्तेही दुर्लक्षित आहेत. यामुळे नागरिकांना खड्ड्यांतून वाट काढावी लागते. प्रभागात महिन्यात ३ ते ४ दिवस पाणी मिळते. याशिवाय कचरा संकलन करताना कर्मचारी झाडांच्या पानांचा कचरा, कटिंगचा कचरा नेण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी हा प्रश्न पडतो. गॅस पाइपलाइन टाकून झाली असली तरी गॅसची प्रतीक्षा या भागातील नागरिकांना आहे. सोयी सुविधांयुक्त शहराचे दिवास्वप्न असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी नोंदवली आहे. दर्गा चौकात रस्ता मोठा झाला तरी विजेचे खांब हलवले नसल्याने वाहतूक कोंडी वारंवार होते. संग्रामनगर उड्डाणपुलावर सातत्याने होणाऱ्या कोंडीमुळे नागरिकांना प्रदूषणाचा त्रासही मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. बॅरिकेडमुळे वाहतूक कोंडी आकाशवाणी ते दूध डेअरी भागात बॅरिकेड्स लावल्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याशिवाय मोंढा नाका ते तानाजी पुतळा चौक या भागात एकेरी रस्ता, दुकानांची अतिक्रमणे यामुळे वाहतुकीला अडचणी निर्माण होतात. जाणून घ्या आपला प्रभाग प्रभागाची व्याप्ती : सिंधी कॉलनीचा काही भाग, बालाजीनगर, टिळकनगर, उल्कानगरीचा काही भाग, जयविश्वभारती कॉलनी, शिवशंकर कॉलनी, बौद्धनगर, उत्तमनगर, देशपांडेपुरम, चेतनानगर, गादिया विहारचा काही भाग. क्र. २० : मयूरबन कॉलनी, जय विश्वभारती कॉलनी, उल्कानगरी २०१५ : नगरसेवक, पक्ष, मतदान वॉर्ड क्र. उमेदवार, पक्ष मतदान१०४ स्मिता घोगरे, शिवसेना १,४८३९९ अर्चना नीळकंठ, भाजप १,५१५७४ नितीन साळवी, शिवसेना २,४१७९८ दिलीप थोरात, भाजप १,३९२७५ त्र्यंबक तुपे-शिवसेना २,७६२ उद्यानाची दुरवस्थाप्रभागातील रहिवाशांना सायंकाळी वेळ घालवता येईल अशा ठिकाणांची गरज आहे. यासाठी परिसरात एकच उद्यान आहे. मात्र, त्याची दुरवस्था असल्याने नागरिकांना परिसरात बसण्यासाठी निवांत जागा नाही.
मुंबई, पुण्यात विकासाचा वेग वाढत असताना पायाभूत सुविधा आणि विकासात छत्रपती संभाजीनगर-मधील परिस्थिती विसंगत आहे. शहरातील नागरिकांना टँकरने पाणी घ्यावे लागते, यासाठी लाजिरवाणी बाब कुठे नाही. मराठवाड्याच्या राजधानीची अशी अवस्था चांगली नाही. २०१४-१९ या काळात तत्कालीन पालकमंत्र्यांनी पाणी योजनेचे दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही. आम्ही सत्तेत आलो तर पाण्याचा प्रश्न एक वर्षात सोडवणार आहे, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा वंजारी मंगल कार्यालयात मेळावा पार पडला. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली पाटील चाकणकर, आमदार सतीश चव्हाण, सूरज चव्हाण, नितीन पाटील, अभिजित देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तटकरे म्हणाले की, अनेक वर्षांपासून शिवसेना, भाजप हे दोन पक्ष एकमेकांसोबत राहून निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नाहीत. कोणाला मुला-मुलींना तिकीट द्यायचे आहे, तर कोणाला राजकीय समीकरणे तयार करायची आहेत. त्यामुळे आम्ही स्वतंत्ररीत्या निवडणूक लढवत आहोत. शहराचा चेहरा बदलू तटकरे म्हणाले की, २०१४-१९ काळात पालकमंत्र्यांनी पाणी योजनेची केलेली घोषणा पूर्ण केली नाही. त्यावर मी टीका-टिप्पणी करू इच्छित नाही. पुणे, पिपंरी-चिचवड शहरांचा चेहरा बदलला आहे. त्याचप्रमाणे संभाजीनगरात काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिलांचा पाणीप्रश्न सोडवा रुपाली पाटील चाकणकर म्हणाल्या की, महिलांसाठी पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पुरुष नोकरीला निघून जातात. मात्र महिलांसाठी पाणी महत्त्वाचे असते. त्यामुळे महिलांचा पाणी प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे. आम्ही त्यावर काम करणार आहोत.
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने या वेळी ‘मोठा भाऊ’ होण्याच्या निर्धाराने आपली संपूर्ण राजकीय शक्ती पणाला लावली आहे. मागील २५ वर्षांचा इतिहास पाहता भाजप नेहमीच शिवसेनेच्या तुलनेत कमी जागांवर निवडणूक लढवत असे. मात्र शिवसेना फुटीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत भाजपने आपली बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी ९२ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या वेळच्या व्यूहरचनेत सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘सोशल इंजिनिअरिंग’ आणि ‘ओबीसी कार्ड’. शहरात सुमारे ६ लाख ओबीसी मतदार असून ही मते मिळवण्यासाठी भाजपने अत्यंत सूक्ष्म नियोजन केले आहे. केवळ राखीव जागांवरच नव्हे, तर अनेक सर्वसाधारण जागांवरही ओबीसी उमेदवार देऊन पक्षाने सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा, ब्राह्मण आणि मागासवर्गीय मतांचे गणित बसवतानाच ओबीसी आणि मायक्रो ओबीसी समाजाला सत्तेत वाटा देण्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे. आमदार अतुल सावे, प्रशांत बंब आणि संजय केणेकर यांच्यासारख्या ओबीसी चेहऱ्यांसोबतच रावसाहेब दानवे आणि राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या अनुभवाचा भाजप पुरेपूर वापर करून घेत आहे. पक्षशिस्तीला प्राधान्य देऊन बंडखोरी रोखल्याने भाजप या वेळी शहरात आपला वरचष्मा निर्माण करण्याच्या स्थितीत दिसत आहे. राज्यभर गाजले नाराजी नाट्य पक्षातील उमेदवारी वाटपानंतर उफाळलेली बंडखोरी शमवण्यात नेत्यांना मोठे यश आले आहे. १,४०० इच्छुकांमधून ९६ नावे जाहीर झाल्यावर पक्षात नाराजी होती आणि १०८ कार्यकर्त्यांनी बंडखोरीचे निशाण फडकवले होते. मात्र, मंत्री सावे, डॉ. भागवत कराड आणि किशोर शितोळे यांच्या समितीने ६८ बंडखोरांची माघार घडवून आणली. या कार्यकर्त्यांना भविष्यात शासकीय समित्यांवरील नियुक्ती किंवा पक्षात सन्मानाचे पद देण्याचे कमिटमेंट करण्यात आले आहे.
एमआयएम धर्माच्या नावावर मते मागून फूट पाडणारा पक्ष:काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची टीका
एमआयएम केवळ जाती-धर्माचे राजकारण करून लोकांमध्ये द्वेष पसरवत आहे. काँग्रेस पक्ष एकमेकांना जोडण्याचा, तर एमआयएम तोडण्याचे काम करतो. धर्माच्या नावाखाली मते मागून लोकांची दिशाभूल ते करत आहेत. अकोटमध्ये ते भाजपसोबत गेले. एमआयएम हा धिंगाणा घालणारा आणि धर्माच्या नावाखाली जातीत फूट पाडणारा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. ते शेख सलीम यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनावेळी बोलत होते. या वेळी काँग्रेसचे प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष कल्याण काळे, शहराध्यक्ष युसूफ शेख, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्याची उपस्थिती होती. सपकाळ म्हणाले की, एमआयएमला तोडफोड हवी आहे. त्यांना धिंगाणा घालायचा आहे. मात्र आम्हाला प्रेमाने एकमेकांना जोडायचे आहे. अकोटमधील युतीने भाजप आणि एमआयएम एक असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपच्या ‘बी’ आणि ‘सी’ टीमदेखील जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम करतात. देशाला आता प्रेमाची गरज आहे. मात्र, भाजप केवळ हिंदू-मुस्लिम यांच्यात वाद निर्माण करत असल्याची टीका त्यांनी या वेळी केली. ख्रिसमसच्या वेळी यांनी गणपतीला आक्षेपार्ह वेशभूषा केली होती. ईदच्या वेळी पुन्हा टोपी घालतील. हे लोक देवाला सोडत नाहीत तर सामन्य माणसाला काय करणार, अशी टीका त्यांनी या वेळी केली.
एक कोटी दहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी पथकाने कोल्हापूर येथील पन्हाळ्यातील दोघा सख्ख्या भावांना ताब्यात घेतले.इस्माईल शमशुद्दीन काझी (४२), भाऊ दस्तगीर शमशुद्दीन काझी (५२) (दोघे सध्या राहणार पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. आरोपींनी विमल कुमार गोयंका यांच्या सोशल मिडियावरील मैत्रीनंतर ओळखीचा फायदा घेत शेअर बाजारात पैसे गुंतवल्या तिप्पट मोबदला देतो. असे सांगून वेळोवेळी ऑनलाईन १ कोटी दहा लाख घेतले होते. गोयंका पैसे काढण्यासाठी प्रयत्न करू लागले. तेव्हा पैसे निघाले नाहीत. म्हणून संबंधित व्यक्तीस फोन केला. तेव्हा गोयंका यांना रक्कम काढू नका टॅक्समध्ये अडकाल असे सांगितले. पण पुढेही असेच घडल्याने गोयंका यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. तक्रारी वरून वेस्ट सायबर पोलीस स्टेशन क्राईम बँच मुंबई यांनी ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यात माहिती तंत्रज्ञान कलमांतर्गत गुन्हा नोंद करून घेतला. तपासा दरम्यान गोयंका यांना आलेले व त्यांनी केलेल्या फोनचे नंबर तपासले. पण त्यातून काही निष्पन्न न झाल्याने गोयंका यांनी रक्कम पाठवलेल्या बँक खात्याची माहिती घेतली असताहा प्रकार उघडकिस आला. बनावट ॲप तयार करून रक्कम तिप्पट दाखवली संबंधित कंपनीचे बनावट ॲप तयार करून त्यावर त्यांची रक्कम तिप्पट झालेचे दाखवले. ते पाहून गोयंका यांना खात्यातील पैसे काढण्यास सांगून खात्री पटवून दिली. त्यानुसार गोयंका यांनी खात्यातून तीन लाख रुपये काढून खात्री खात्री करून घेतली.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची चौकशीची मागणी करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठवलेले पत्र सध्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे असणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर सादर केले. आपण आता मुख्यमंत्रिपदावर नाहीत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर किंवा आयोगाने या पत्राची मागणी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयाकडे करणे योग्य ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात पवार यांनी ठाकरे यांना दिलेले पत्र आयोगाला सादर करण्यासाठी नोटीसा बजावूनही ते सादर केले नाही. त्यामुळे अटक वॉरंट का जारी करू नये, अशी नोटीस आता आयोगाने ठाकरे यांना बजावली होती. तसेच ठाकरे यांनी याबाबत व्यक्तिशः: किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहावे, असे नोटिसीमध्ये नमूद आहे. त्यानंतर ठाकरे यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फेत प्रतिज्ञापत्र सादर केले.वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाकडे एक अर्ज दाखल केला होता. या अर्जानुसार, २४ जानेवारी २०२० ला पवार यांनी ठाकरे यांना एक दोन पानी पत्र पाठवले होते. या पत्रात भीमा-कोरेगाव दंगल हा तत्कालीन फडणवीस सरकारचा कट असल्याचा आरोप करत, या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती, असा दावा आंबेडकर यांनी केला आहे. प्रशासकीय गोपनीयता आणि तांत्रिक अडचण शासकीय नियमांनुसार, मुख्यमंत्री कार्यालयात येणारी पत्रे ‘इनवर्ड’ नोंदणीसह जतन होतात. ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात याच तांत्रिक बाबीचा आधार घेत चेंडू विद्यमान सरकारच्या कोर्टात टोलवला आहे.
'आम्ही जगलो राहिलो, तरी कोणाला काही घेणं देणं नाही. रस्ते आहेत , लाइट आहे, पण जगण्यासाठी पाणी लागतं. तेच नाही. तर मग शहरात राहून काही एक उपयोग नाही, अशी आर्त हाक छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रभाग क्रमांक चारमधल्या नागरिकांनी सरकार आणि प्रशासनाला मारली. तेव्हा एका असहाय्यतेची चुटपूट उपस्थितांनाही लागली. दिव्य मराठी ॲपच्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' या टॉक शोमध्ये प्नागरिकांनी संताप व्यक्त केला. आमच्या भागात कत्तलखाना आणि हाडे उकळण्याचा कारखानाय. त्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटते. मळमळ, उलटीसारखे त्रास होतात, जगणे नकोसे वाटते, अशी खंतही व्यक्त केली. पाणीपट्टी भरूनही पाणी नाही दिव्य मराठी ॲपच्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' या टॉक शोमध्ये पडेगाव येथील रहिवासी मच्छिंद्र माळी म्हणाले, 'आम्ही टॅक्स भरतो, पण आम्हाला पाण्याचा पुरवठा केला जात नाही. महापालिकावाले आम्हाला टँकरने पाणी देतात. मात्र, त्यासाठी त्यांची अट असते की, पाणी हवं असेल तर १८ ड्रम एकत्र एकाठिकाणी आणून ठेवा. तरच आम्ही तुम्हाला पाणी देऊ. अन्यथा पाणी मिळणार नाही. ते १८ ड्रम ठेवायला जागा तर असली पाहिजे ना. आमचा चौक आहे पण तिथे सुद्धा जाणारे येणारे लोक बोलतातच रस्ता अडवला म्हणून. एवढंच नाही तर ड्रम आम्ही आणून जरी ठेवले तरी त्यातून पाणी घेऊन कोण जाणार. आम्ही वयोवृद्ध माणसं आहोत. आमची लेकरं, सुना नोकरीसाठी बाहेर जातात. मग त्यांनी काय कामधाम सोडून इकडे हंड्यानं पाणी आणत बसावं का? काही बोलायला जावं, तर ते नियमावर बोट ठेवतात. आमची फक्त एवढीच मागणी आहे की, महापालिकेने हे नियम रद्द करून व्यवस्थित पाणीपुरवठा करावा.' ना पाणी आल ना ड्रेनेजलाइन झाली पडेगाव भागात राहणाऱ्या चंद्रकला लहाने म्हणतात 'गेली सहा महिने झाले पाण्याची आणि ड्रेनेजची लाइन टाकून, पण अजूनपर्यंत आम्हाला पाणी भेटले नाही. आमचे शौच खड्डे आहेत. तेही सतत भरत राहतात. अनेकदा तक्रार केली. त्यांनी एकच वाक्य पाठ करून ठेवल आहे की, लवकरात लवकर समस्या सोडवली जाईल. या लोकांचे लवकर कधी येणार काय माहिती.' रस्ते, लाइट सगळं आहे पण पाणीच नाही प्रभागातील कडुबाई कामटे म्हणतात की, 'आमच्याकडे सिमेंटचे रस्ते आहेत, लाइट आहे, कचरा गाडी एक दिवसाआड येते. मात्र जीवनावश्यक पाणीच नाही. जगण्यासाठी पाण्याची गरज असते. मात्र तेच आम्हाला दिले जात नाही. आमच्याकडे नळच नाहीत. जे होते तेही फोडून टाकले. आम्ही जगलो काय आणि राहिलो काय यांना काहीच फरक पडत नाही. नुसते आश्वासन देतात आम्ही हे करू ते करू काही एक करत नाहीत.' यापेक्षा गाव बर प्रभागातील रहिवासी वाल्मिक सोनावणे म्हणतात 'महापालिकेकडून आम्हाला टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो. त्यासाठी आम्हाला २०० लिटरच्या बॅरलसाठी ११०० रुपये भरावे लागतात. हे तीन महिन्याचं आहे. यात ४५ ट्रिप मिळतात. जर समजा आम्ही ४ ड्रम घ्यायचे म्हटले, तर आम्हाला ४४०० रुपये तीन महिन्याला लागतात. एवढी तर पाणीपट्टी सुद्धा नाही. पाण्याचा अभाव असल्यामुळे आमच्याकडे कोणतेही पाहुणे येत सुद्धा नाहीत. या असल्या शहरापेक्षा आमचा गाव बरा. अशी म्हणायची वेळ आलीय.' कत्तलखान्याच्या दुर्गंधीमुळे रहिवासी त्रस्त प्रभागात एक कत्तलखाना आणि हाडे उकळण्याचा कारखाना आहे. हाडे पाण्यात उकळली जातात त्यावरील मांस काढून त्या हाडांची भुकटी केली जाते आणि त्याचा वापर केला जातो. यामुळे सायंकाळी प्रभागात प्रचंड दुर्गंधी सुटते. त्यामुळे नागरिकांना मळमळ, उलटीसारखे त्रास होतात. असं येथील नागरिकांनी सांगितले. त्याचबरोबर प्रभागात कचरा डेपोच्या दुर्गंधीचा त्रास आहेच. घंटा गाडीचे वेळापत्रक ठरलेलेच नसल्यामुळे गाडी कोणत्याही वेळेला येते. त्यामुळे लोक कदरून रस्त्यावर, नाल्यात कचरा टाकतात. असं येथील नागिरकांनी सांगितले. रस्ता ओलांडणेही कठीण वाहनांच्या गर्दीमुळे या भागात रस्ता ओलांडणेही नागरिकांना कठीण होते. नागरिकांना फिरण्यासाठी उद्यान नाही. त्यामुळे जीव धोक्यात घालून मुख्य रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी जावे लागते. पडेगाव व मिटमिटा भागातून दौलताबादकडे जाणारा रस्ता अरूंद आहे. या रस्त्याचे रुंदीकरण झालेले नसल्याने वारंवार अपघात होतात. इथे आजवर अनेकांचा मृत्यू झालेला आहे. मिटमिटा, पडेगावातून खुलताबादकडे रस्ता जातो. या रस्त्यावर अपघात होतात. त्यामुळे दोन्ही गावांसाठी पर्यायी रस्त्याची गरज आहे. नंदनवन कॉलनीतही रस्त्यांची समस्या आहे. अशा विविध समस्यांनी प्रभाग क्रमांक चारमधील रहिवाशांना ग्रासले आहे. अशी आहे प्रभागाची व्याप्ती प्रभाग क्रमांक ४ मध्ये लक्ष्मी कॉलनी, पडेगाव, मिटमिटा, पोलीस कॉलनी, विकासपुरी, M.S.E.B. पॉवर हाउस, रामगोपाल नगर, कासलीवाल तारांगण, शिवपुरी, भीमनगर भाग, भावसिंगपुरा भाग, नंदनवन कॉलनी, शांतीपुरा, संगीता कॉलनी, अमित नगर, मिलिंद कॉलेज परिसर, देवगिरी व्हॅली, माळी सैनिक कॉलनी, रावरसपुरा, प्रभात नगर, नवयुग कॉलनी, भुजबळ नगर, चांद मारी, मनजीत कॉम्प्लेक्सचा समावेश होतो.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, आरोप–प्रत्यारोपांची फैरी झडू लागल्या आहेत. दिव्य मराठीच्या ‘लढाई मनपाची – मुद्दा नागरिकांचा’ या विशेष शोमधून प्रभागातील ज्वलंत प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. पाणीटंचाई, वाढती गुन्हेगारी, नशेखोरी, देशी दारूची अवैध दुकाने आणि कचरा डेपो यांसारख्या प्रश्नांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले असून, लोकप्रतिनिधी जनतेची कामे सोडून कार्यकर्त्यांचे पोषण करण्यात व्यस्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. मंदिर परिसरात देशी दारूची दुकाने सुरू असल्यामुळे महिलांना भीतीच्या वातावरणातून प्रवास करावा लागत असल्याचा आरोपही करण्यात आला. या आरोपांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, सत्ता, मतदारसंघ आणि यापूर्वी कोण सत्तेत होते हे जनतेला चांगलेच माहिती असल्याचे सांगितले आहे. नशेखोरी आणि अवैध व्यवसायांना कुणाचा आशीर्वाद आहे, पोलिस कारवाईनंतर कोण पाठिशी उभे राहते, हे सर्व मतदार ओळखून आहेत, असा पलटवार भाजपकडून करण्यात आला. एकीकडे गुन्हेगारी आणि नशेखोरीमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असताना, दुसरीकडे कचरा प्रकल्प आणि बेकायदेशीर व्यवसायांवरून राजकीय आरोपांची धग वाढताना दिसत आहे. या सगळ्या मुद्द्यांवर प्रभाग क्रमांक ४ ची निवडणूक रंगणार असून, खऱ्या अर्थाने नागरिकांचे प्रश्न कोण सोडवणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. काही लोकं निवडणुकीपुरते सक्रीय होतात ठाकरे गटाचे पदाधिकारी म्हणाले की, काही लोकांना निवडणुकीपुरतेच जनतेच्या समस्या दिसतात.निवडणूक आली की काही लोक ओरडतात पण त्यापूर्वी त्यांनी काही काम केले नाही, ना नंतर करणार आहेत.कचऱ्याच्या मुद्द्यावर हे लोक कधीच समोर आले नाही. नगरसेवकांनी काहीही काम केलेले नाही भाजपचे दशरथ बनकर म्हणाले की, आमच्या प्रभागात सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे कचरा डेपो, त्यामुळे आमच्या प्रभागातील नागरिकांच्या लहान मुलांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. हा कचरा डेपो आम्हाला तिथून काढायचा आहे. ते प्रभागापासून दूर गेले पाहिजे हा माझा प्रयत्न राहणार आहे. मागच्या नागरिकांनी कामे केली असती तर इतक्या समस्या समोर आल्या नसत्या. त्यांनी केवळ सिमेंटचे रस्ते केले बाकी काहीही कामे त्यांनी केली नाही. प्रभागात त्यांनी जनतेला हवे असलेले एकही काम केलेले नाही. जनतेच्या हिताचे एकही काम केले नाही. त्यांनी एकही उद्यान विकसित केले नाही. ना ओपन जीम सुरू केले. एकही ओपन स्पेस विकसित करण्यात आला नाही. आमच्या प्रभागातील महामार्गाचे काम करण्यात आलेले नाही, त्यावर अनेक जीव गेले त्यावर नगरसेवकांनी काहीही काम केलेले नाही. तर प्रभागातील नागरिकांना साधे नळ सुद्धा देण्याचे काम मागील नगरसेवकांना करता आले नाही. पाणी पट्टी भरुन सुद्धा आमच्याकडे नळाला पाणी येत नाही राज्यातील अ वर्ग मनपामध्ये इतकी पाणीपट्टी नसेल इतके पैसे आमच्या पडेगावच्या लोकांना खर्च करावे लागतात. त्यांना वार्षिक १० हजार रुपयांपेक्षा जास्त पाणी पट्टी भरावी लागते. इतके करुणनही वेळेवर टँकर येत नाही त्यासाठी अनेक वेळा फोन करावे लागतात. मागच्या सरकारकडून रस्ते सोडले तर एकही काम आमच्या प्रभागात झालेले नाही. आमच्या प्रभागात कचरा संकलनासाठी गाड्या येत नाही, नगरसेवक नसल्याने त्यांच्यावर कुणाचा वचक नाही. आमच्याकडे जी लोकं हाडे उकळतात त्यांची परवानगी आम्ही रद्द करू. त्यांचा व्यवसाय असेल तर त्यांनी तो बाहेर जाऊन करावा. आमच्या प्रभागात ते असू नये यासाठी सर्व पक्षाचे लोक एकत्र येतीलच. पाणी योजना किती कोटींची होती ती आज किती कोटींची झाली ती रखडली कुणामुळे होते हे सर्वांना माहिती आहे. पण आमच्या सरकारकडून पाणी दिले जाणार आहे. आमच्या प्रभागात वाचनालय, अभ्यासिका सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. १० ठिकाणी हे नियोजन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माजी सैनिक यांना पाणी पट्टी फ्री करण्याचा आम्ही प्रयत्न करू. प्रभागातील हाडांचा कारखाना अवैध ठाकरे गटाचे उमेदवार गणेश लोखंडे म्हणाले की, आमच्या परिसरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे पाण्याची आहे. पाण्याच्या विषयावर सत्ताधाऱ्यांना आणि नगरसेवकांना काम करणे जमले नाही. यात आमच्या पक्षाचे नगरसेवक सुद्धा होते. कचरा डेपो आला त्यावेळी आला तेव्हा मी स्वत: त्याला विरोध केला आहे. त्यावेळी त्याला विरोध न करणारी लोकं आज कचरा डेपोच्या नावाने बोबा मारत आहेत. त्यावेळेस आम्ही आंदोलने केले आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले तिथे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत नाही केवळ आणून टाकला जातो. माझ्या प्रभागासाठी जायकवाडीचे पाणी येईल तेव्हा येईल पण मी नगरसेवक झालो तर मिटमिट्याच्या तलावातून नागरिकांना पाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. येणाऱ्या काळात लोकांना पाणी वेळेवर देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कचरा डेपो आणि पाणी मिळत नसल्याने अनेकांनी आमच्या प्रभागातील घरे सोडून दिली आहेत. आमच्या प्रभागातील कत्तलखान्याचा विषय आहे तो मनपाकडून बीओटी तत्वावर दिला गेला होता आता तो एका कंपनीला देण्यात आला आहे. तर हाडांचा जो कारखाना आहे तो अवैध आहे, त्यासाठी आम्ही आंदोलन सुद्धा केलेले आहे. त्याला कुठलीही परवानगी नाही एक कुरेशी नामक व्यक्तीचा तो कारखाना आहे. मिटमिट्यात सुद्धा असा एक कारखाना आहे त्याला परवानगी नाही पण मनपाचे काही अधिकारी आणि प्रशासनातील काही लोकं हप्ते घेतात त्यांच्या जीवावर हा कारखाना सुरू आहे. मनपामध्ये नगरसेवक नसल्याने प्रशासनावर बॉडी राहिलेली नसल्याने प्रशासनावर कुणाचा वचक राहिलेला नाही, ते मनमानी करतात. सत्ताधारी लोकांनी खूश करण्याचे काम ही मंडळी करत आहेत. पाणी प्रश्नावर आम्ही सर्वात पहिले काम करणार आहोत. मनपाच्या शाळा या डिजिटल आणि इंग्रजी माध्यमांच्या करण्याचा प्रयत्न करणार आहे. नागरिकांना मनपाची शाळेचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आरोग्य केंद्रामध्ये मिनी घाटी देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. प्रभागात पक्षाच्या नावाने लोक अवैध धंदे करत आहेत. मच्छिंद्रनाथ मंदिरासमोर देशीदारू विकतो. त्या ठिकाणी महिलांना मोठा त्रास होतो त्या रोडने महिलांना जाता देखील येत नाही. यावर आम्ही कारवाई करण्याची मागणी करणार आहोत. ते झाले नाही तर आम्ही ते दुकान काढून फेकणार आहोत. सत्ताधारी कार्यकर्ते पोसण्यात व्यस्त आहेत. पाण्याचा प्रश्न सोडवणार ठाकरे गटाच्या उमेदवार सावित्री वाणी म्हणाल्या की, आमच्या मनपाच्या शाळेचा दर्जा सुधारला जावा यासाठी आम्ही यापूर्वी काम केलेले आहे. तर महिलांना स्वावलंबी करण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न केले आहेत. पाण्याचा प्रश्न आमच्या प्रभागात मोठा आहे त्याकडे लक्ष देण गरजेचे आहे.पहिले पाणी होते पण आता तशी परिस्थिती नाही. आमच्या प्रभागात महिला सुरक्षित नाहीत. नशेखोरी वाढली आहे. त्याकडे लक्ष दिले पाहिजे त्यासाठी प्रभागात दोन पोलिस चौकी करण्यात याव्या अशी आमची मागणी असणार आहे. नशेखोरीमुळे महिलांना सुरक्षित वाटत नाही ठाकरे गटाच्या उमेदवार शंकुतला कांबळे म्हणाल्या की, आमच्या प्रभागात रस्ता, पाणी या मुख्य समस्या आहेत. या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार आहोत. महिला सुरक्षेचा प्रश्न आमच्या प्रभागात आहे, नशेखोरीचे प्रमाण वाढल्याने महिलांना सुरक्षित वाटत नाही. आम्ही महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी पोलिस चौकी आणि या टवाळखोरांचा बंदोबस्त व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. या आहेत प्रभागाच्या समस्या छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्र ४ चा जर विचार केला तर बहुतांश भागात घंटागाडी वेळेचे नियम पाळत नाही. त्यामुळे नागरिकांपुढे कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न आहे. घंटागाडी केव्हाही येते आणि निघून जाते.मिटमिटा, पडेगावातून खुलताबादकडे रस्ता जातो. या रस्त्यावर अपघात होतात. त्यामुळे दोन्ही गावांसाठी पर्यायी रस्त्याची गरज आहे. नंदनवन कॉलनीतही रस्त्यांची समस्या आहे.पडेगाव, मिटमिटा भागातही टँकरद्वारे पाणी येते. उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न भीषण होतो. टँकर वेळेवर येत नाही. वारंवार कॉल केल्यानंतर टँकर येतो, पण २ ड्रमच भेटतात. प्रभागात एक कत्तलखाना आणि हाडे उकळण्याचा कारखाना आहे. त्यामुळे सायंकाळी प्रचंड दुर्गंधी सुटते. त्यामुळे नागरिकांना मळमळ, उलटीसारखे त्रास होतात. त्याचबरोबर कचरा डोपोच्या दुर्गंधीचा त्रास आहेच. प्रभागाची व्याप्ती पडेगाव, मिटमिटा, कासलीवाल तारांगण, भावसिंगपुराचा काही भाग, भीमनगरचा काही भाग, नंदनवन कॉलनी, मिलिंद कॉलेज परिसर, पोलिस कॉलनी, रावरसपुरा, लक्ष्मी कॉलनी, अमितनगर, शांतीपुरा, माजी सैनिक कॉलनी.
दक्षिण भारतातील गाजलेल्या ‘विक्रम’ आणि ‘शिवाजी द बॉस’ या थ्रिलर चित्रपट पाहून ५० लाखांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बेलतरोडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्यांमध्ये भंडारा भूमी अभिलेख कार्यालयातील महिला लिपिकेचाही समावेश आहे. बहिणीच्या लग्नासाठी आर्थिक अडचणीत असलेल्या मुख्य आरोपीने चित्रपट पाहून गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अतुल अनिल तागडे (३०, रा. देवरी, गोंदिया), राहुल मीताराम पटले (२१), हिंदुस्तान वासुदेव रामटेके (२७), निखिल राजू नांदेकर (२८) आणि प्रेक्षा बाबू कांबळे (३०) यांचा समावेश आहे. तक्रारदार प्रकाश ढगे हे भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षक आहे. १७ डिसेंबर २०२५ रोजी भंडाऱ्यातील काम आटोपून नागपूरकडे परत येत असताना वेळाहरी बायपास रोडवर आरोपींनी ढगे यांची कार अडवली. कारच्या मागील काच आणि समोरील दरवाज्याच्या काचा फोडून भीतीचे वातावरण निर्माण करत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर १९ डिसेंबर २०२५ रोजी ढगे यांना अज्ञात क्रमांकावरून धमकीचा फोन आला. ‘तुला मारण्यासाठी २० लाखांची सुपारी देण्यात आली आहे. जीव वाचवायचा असेल तर ५० लाख रुपये दे’, अशी थेट धमकी देत आरोपींनी जबलपूर रिंगरोडवरील महादेव ढाब्यावर पैसे आणण्यास सांगितले. ‘टार्गेट’ करून सिनेस्टाइल कट रचला मुख्य आरोपी अतुल तागडे हा देवरी येथे मोबाइल शॉपी चालवतो. तो बहिणीच्या लग्नासाठी मोठ्या आर्थिक अडचणीत होता. प्रेक्षा कांबळे ही त्याची मावस बहीण असून ती भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. तिनेच कार्यालयीन माहितीच्या आधारे ढगे यांच्याकडे मोठी अवैध संपत्ती असल्याची माहिती तागडेला दिल्याचा आरोप आहे. याच माहितीवरून ढगे यांना ‘टार्गेट’ करून सिनेस्टाइल खंडणीचा कट रचण्यात आला. सध्या सर्व आरोपी पोलिस कोठडीत आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सापळा रचला. बनावट नोटांनी भरलेली बॅग ढगे यांच्याकडे देऊन ठरलेल्या ठिकाणी पाठवण्यात आले. मात्र, अंधाराचा फायदा घेत आरोपी बॅग घेऊन पसार झाले. त्यानंतर आरोपींनी सतत सिमकार्ड आणि मोबाइल फोन बदलत वेगवेगळ्या ठिकाणी पैसे आणण्यास सांगण्यास सुरुवात केली. २९ डिसेंबर २०२५ रोजी पुन्हा धमकीचा फोन करून ढगे आणि त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक तपास करत मोबाइल कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवित खंडणीच्या कटात सहभागी असलेल्या आरोपींना नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत छापे टाकून अटक करण्यात आली. तरुणाईवर गुन्हेगारीच्या चित्रपटांचा झाला प्रभाव चित्रपटातील गुन्हेगारीचे जग पाहून तरुण कशा प्रकारे चुकीच्या मार्गाला लागतात याचे हे धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. “केवळ पडद्यावरील काल्पनिक दृश्ये पाहून प्रत्यक्षात तसा गुन्हा करण्याचा प्रयत्न या टोळीने केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा कट उधळला गेला,” असे पोलिस सूत्रांनी सांगितले.
नेस्लेच्या बेबी मिल्क पावडरमध्ये विषारी घटक?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जागतिक अन्न आणि पोषण उद्योगाताली आघाडीची कंपनी नेस्ले सध्या मोठ्या अन्न सुरक्षा संकटाला सामोरे जात आहे. बाळाच्या दूध पावडरमध्ये विषारी घटक आढळण्याच्या शक्यतेमुळे कंपनीने तब्बल २५ देशांतील बालक पोषण उत्पादनांच्या काही बॅचेस परत मागवल्या आहेत. या परत मागविलेल्या बॅचेस केवळ व्यावसायिक दृष्टीनेच नव्हे तर सार्वजनिक आरोग्य, ग्राहकांचा विश्वास आणि जागतिक अन्नसुरक्षा […] The post नेस्लेच्या बेबी मिल्क पावडरमध्ये विषारी घटक? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रशियाकडून तेल खरेदी केल्यास ५०० टक्के कर?
अमेरिकेचा आणखी एक टॅरिफ बॉम्ब, भारतालाही धक्का? वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आणखी एक मोठा निर्णय घेत द्विपक्षीय निर्बंध विधेयकाचा मार्ग मोकळा केला आहे. या विधेयकात भारतासह रशियासोबत व्यापार सुरू ठेवणा-या देशांवर ५०० टक्के प्रचंड टॅरिफ लादण्याचा प्रस्ताव आहे. ट्रम्प यांनी अशा प्रकारचा कर लादण्याचा थेट इशारा दिला आहे. रशियाकडून थेट […] The post रशियाकडून तेल खरेदी केल्यास ५०० टक्के कर? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विलासराव देशमुखसाहेब प्रत्येकाच्या हृदयात
लातूर : प्रतिनिधी विरोधक दरवर्षी दोन कोटी नोक-या देतो म्हणाले, प्रत्येकाच्या खात्यात १५-१५ लाख रूपये टाकतो म्हणाले, पण लबाडाचे आवतन जेवल्याशिवाय खरे नसते. तर दुसरीकडे लोकनेते विलासराव देशमुखसाहेबांनी लातूरसाठी खूप योजना आणून चौफेर विकास केला. अन् कांही लोक त्यांचे नाव पुसणार म्हणात. तुम्ही काय नाव पुसणार, लोकनेते विलासराव देशमुखसाहेब प्रत्येकाच्या हृदयात कोरलेले आहेत, असे प्रतिपादन […] The post विलासराव देशमुखसाहेब प्रत्येकाच्या हृदयात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दडपशाही, हुकूमशाही आमची संस्कृती नाही
लातूर : प्रतिनिधी आम्ही लोकशाही मार्गाने चालणारी माणस असून आम्हाला दडपशाही हुकूमशाही टक्केवारी कधी जमलीच नाही ती आमची संस्कृती ही नाही लाकशाही मार्गाने तुमच्या हक्कासाठी लढण्यासाठी आमच्या हाती महापालिका निवडणूकीत काँगे्रस व वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच्या सर्व उमदवारांना विजयी करून मतदान स्वरुपी ताकत द्या, असे आवाहन लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवृत्ती बँकेचे […] The post दडपशाही, हुकूमशाही आमची संस्कृती नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपणा-यांपासून सावध राहा
लातूर : प्रतिनिधी शहरातील प्रभाग क्रमांक ५ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. काँगेसला आव्हान देण्यासाठी काही लोकांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सामिल झाले आहेत. त्यांच्यापासून सावध राहा, असे आवाहन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग क्रमांक ५ मधील उमेदवार […] The post काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपणा-यांपासून सावध राहा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेस-वंचित आघाडीला अपक्ष उमेदवार वैरागे यांचा पाठिंबा
लातूर : प्रतिनिधी माजी मंत्री आमदार अमित देशमुख व खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत लातुर शहरातील प्रभाग ११ मधील अपक्ष उमेदवार आनंद वैरागे, प्रभाग क्रमांक ६ मधील अपक्ष उमेदवार महोव घोडके यांनी आपल्या समर्थकांसह लातुर शहर महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला. यावेळी महादेव घोडके यांची […] The post काँग्रेस-वंचित आघाडीला अपक्ष उमेदवार वैरागे यांचा पाठिंबा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये झालेल्या लातूर शहर महागरपालिकेच्या निवडणुकीत जी आश्वासने दिली होती. त्याच आश्वासनाचा पाढा मुख्यमंत्र्यांनी २०२६ च्या महापालिका निवडणुकीत वाचला. त्यामुळे २०१७ ला भाजपाने लातूर महापालिका ताब्यात घेऊन लातूरला काय दिले?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्र्यांची सभा म्हणले खाया पिया कुछ नही…, अशीच झाल्याची जोरदार चर्चा लातूरमध्ये […] The post खाया पिया कुछ नही… appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपने बंडखोरांसह ३२ जणांचे केले ६ वर्षासाठी निलंबन
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांची बंडखोरी भाजपने चांगलीच गंभीरतेने घेतली आहे. बंडखोरांसोबतच पक्षविरोधी कारवाया करणा-या ३२ जणांना भाजपने ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली असून उमेदवारांविरोधात छुपा प्रचार करणा-या काही माजी नगरसेवकांमध्ये आता धास्ती निर्माण झाली आहे. २०१७ साली भाजपने अशाच पद्धतीने ६५ जणांना बाहेरचा रस्ता दाखविला होता. शहरातील […] The post भाजपने बंडखोरांसह ३२ जणांचे केले ६ वर्षासाठी निलंबन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आज भाजप पक्षाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तराप्रमाणे झाली आहे. या चित्रपटात मास्तराला तमाशाचा इतका नाद लागला की मास्तरच तुणतुणे हातात घेऊन पुढे उभा राहायला लागला, अशी खोचक टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. 'ये बंद करने आए थे तवायफोके कोठे, मगर सिक्को की खणक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे, अशा शेरोशायरीतून जयंत पाटलांनी भाजपला टोला लगावला आहे. सांगलीत प्रचार सभेत ते बोलत होते. जयंत पाटील म्हणाले, भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गवासी अटल बिहारी वाजपेयी यांनी वेगवेगळ्या आघाड्या एकत्र करुन सत्ता बनवण्याचे नाकारल्याचे उदाहरण आहे. मात्र आज भाजप काय करतेय? सगळे काँग्रेसमधील ओढून भाजपमध्ये नेले आहेत. आता आपले गडी देखील तिथे चाललेत. काँग्रेस सर्व धर्मभावाचा विचार घेऊन चालते म्हणून तुम्ही साथ दिली. काँग्रेस सोडून जातीयवादी झेंडा घेण्यापूर्वी त्या व्यक्तीने दहा वेळा विचार करायला पाहिजे. मात्र दुर्दैवाने ती परिस्थिती नाही. भाजपवाले ओवेसींच्या मांडीला मांडी लावून बसतात पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, भाजपवाले सांगतात की ते हिंदुत्ववादी आहेत आणि अकोल्यात एमआयएम सोबत युती करतात. ओवेसींच्या मांडीला मांडी लावून बसतात. यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत, हे लक्षात घ्या. सत्तेसाठी कुणाशीही आघाडी करायला यांना काही वाटत नाही. काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेला भाजप आता काँग्रेसयुक्त झाला आहे. ज्यांनी पक्ष बदलले त्यांना हिसका दाखवा व्यक्तीला मतदान करा. साध्या मनाची, सुशिक्षित उमेदवार आम्ही दिले आहेत. ज्यांनी पक्ष बदलले त्यांना हिसका दाखवा. विचाराच्या मागे सांगली राहते हे दाखवण्याची हीच वेळ आहे, असे म्हणत जयंत पाटलांनी मतदारांना आवाहन केले आहे. तसेच नवा पर्याय म्हणून सांगलीकर या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीला स्वीकारतील, असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला.
कोल्हापुरात प्राथमिक शिक्षकांना भोवली बोगसगिरी
कोल्हापूर : नुकताच रत्नागिरी जिल्ह्यातील ३ शिक्षकांचे निलंबन करण्यात आले असून यामुळे शिक्षक खात्यात खळबळ उडाली आहे. राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी बोगस दिव्यांगांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर हे निलंबन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शिक्षण खाते हादरले असतानाच कोल्हापुरात देखील तब्बल १३ प्राथमिक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई […] The post कोल्हापुरात प्राथमिक शिक्षकांना भोवली बोगसगिरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औसा : प्रतिनिधी लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झालेल्या टाका येथील विद्यार्थिनी अनुष्का किरणकुमार पाटोळे (वय १२) हिच्यावर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मूळ टाका या गावी अश्रूंनी भरलेल्या वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. लेकीच्या अंतिम दर्शनासाठी नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिचितांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट […] The post अनुष्का पाटोळेस न्याय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
५३ हजारांचे वीज बिल चक्क २ हजारांवर
निलंगा : प्रतिनिधी निलंगा महावितरणचा मीटर रीडिंग घेणारा कंत्राटी विभाग ग्रामस्थांना अव्वाच्या सव्वा बिल मिटर रीडिंग न घेताच देत असल्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाने निलंगा महावितरण कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यांनी शेतक-यास ५३ हजार रुपयांचे आलेले वीजबिल चक्क २ हजार रुपये करुन दिले. मीटरचे रिडींग घेणा-याची चूक असल्याचे दिसून आले आहे. डॉ. भिकाने […] The post ५३ हजारांचे वीज बिल चक्क २ हजारांवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
खरोळा येथील सेवा संस्थेचे संचालक मंडळ अपात्र
रेणापूर : प्रतिनिधी खरोळा (ता. रेणापूर) येथील सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाने संस्थेच्या कारभारात अनियमितता, नियमांचे उल्लंघन तसेच सहकार अधिनियमाचे उल्लंघन करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत तक्रारदार डॉ. महेंद्र पिंपळे हे एकमेव संचालक वगळता उर्वरित १२ विद्यमान संचालक मंडळास अपात्र करीत संस्थेच्या सचिवास ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचा आदेश रेणापूर सहायक सहकारी निबंधक […] The post खरोळा येथील सेवा संस्थेचे संचालक मंडळ अपात्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पिंपरी चिंचवडमधील महापालिकेच्या प्रचार सभेत आज दोन्ही राष्ट्रवादी एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे दोघे एकत्र पाहायला मिळाले. यावेळी प्रचार सभेत बोलताना रोहित पवारांनी अजित पवारांचा 'केजीएफ' चित्रपटातील 'रॉकी भाई' असा उल्लेख केला. पिंपरीतील दोन गरुडा म्हणजे दोन्ही भाजप आमदारांचा भ्रष्टाचार संपवण्यासाठी अजितदादा रॉकी भाई प्रमाणे काम करतील, असे रोहित पवार म्हणाले. प्रचार सभेत बोलताना रोहित पवारांनी अजित पवारांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, केजीएफ चित्रपटात जसे एक गरुडा आहे, तो सर्व मायनिंगवर ज्या प्रकारे आपले नियंत्रण ठेवतो तसे या शहरातील दोन गरुडा हे सगळीकडे आपले नियंत्रण ठेवता आहेत. ते प्रत्येक टेंडरमध्ये रिंग करतात आणि पैसे खातात. या दोन्ही गरुडांना असे वाटते हे सामान्य लोकांचे साम्राज्य नाही, त्यांचे साम्राज्य आहे. त्यावेळी रॉकी हा हीरो सर्वसामान्य जनतेला जसे गुंडागर्दीच्या दहशतीतून बाहेर काढतो, अगदी त्या प्रकारे अजित पवार हे देखील रॉकीप्रमाणे या शहराला आणि जनतेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढतील. आपले रॉकी भाई म्हणजे अजितदादा भाजपने शहरवासीयांना चुना लावलाय. कुत्र्यांची नसबंदी, टीव्ही खरेदीत सर्वात जास्त भ्रष्टाचार केला. केजीएफमधील गरुडा पाहिलाय का? पिंपरी चिंचवडमध्ये एक दाढीवाला गरुडा अन् दुसरा बिन दाढीवाला गरुडा आहे. या दोन्ही गरुडांनी पालिका लुटली. केजीएफमध्ये जशी रॉकीने गरुडाची मक्तेदारी संपवली, तशी शहरातील दोन गरुडांची मक्तेदारी संपवायची आहे. यासाठी आपले रॉकी म्हणजे अजितदादा आहेत, असे रोहित पवार म्हणाले. महेश लांडगे भ्रष्टाचारात बरबटलेला बोका भाजप आमदार महेश लांडगेंनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, महेश लांडगे हे या शहरातला भ्रष्टाचाराने बरबटलेला बोका आहे असे स्थानिक लोक म्हणतात. स्थानिक लोक जे बोलतात त्याला ते जास्त महत्त्वाचे आहे. महेश लांडगे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकात भ्रष्टाचार केला. पिंपरीतील कचऱ्यात आणि पिण्याच्या पाण्याच्या टँकरमध्ये देखील त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप पवारांनी केला. भाजपाला सत्तेपासून थांबवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावे अशी आमच्या पक्षाची दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती त्यामुळे आम्ही महापालिका निवडणुकीत एकत्र आलो आहोत, असेही रोहित पवारांनी स्पष्ट केले. हिंदू संस्कृतीमध्ये पवार एकत्र असणे याला खूप महत्त्व आहे. दोन्ही परिवार एकत्र रहावे ही माझी देखील इच्छा आहे. मात्र राजकारणात सर्व गोष्टी साध्य होत नाहीत, असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अनेक वर्षांच्या चर्चेनंतर घेण्यात आला असून, अजित पवारांनी केलेले भाष्य केवळ पुणे जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथे स्पष्ट केले. आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला, ही भूमिका अनेक वर्षांपासून पक्षात चर्चेत होती. दरवेळी त्यातून माघार घेतली जात होती, पण शेवटी आम्ही हा निर्णय घेतला. या निर्णयामुळे होणारी टीका आम्ही सहन केली आणि आजही करत आहोत. काळाच्या उदरात काय दडलेले आहे ते आपोआप नंतर बाहेर येईल, असे तटकरे म्हणाले. सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे आले होते. वंजारी मंगल कार्यालयात मेळावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यावे किंवा नाही, हे सांगण्याइतपत मी मोठा नेता नाही. मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. मात्र, आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यावर आम्ही कायम आहोत, असे तटकरे यांनी नमूद केले. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढवत आहोत. गेली अनेक वर्षे एकत्र काम केल्याने कार्यकर्ते आनंदी असणे स्वाभाविक आहे. मात्र, अजित पवार यांनी केलेले वक्तव्य हे फक्त पिंपरी चिंचवडपुरतेच होते. त्यांनी अन्यत्र कोठे असे विधान केल्याचे ऐकिवात नाही, त्यामुळे त्याचे अर्थ सार्वत्रिक नाहीत, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. विलिनीकरणाच्या अनुषंगाने आतापर्यंत माझ्याशी प्रदेशाध्यक्ष म्हणून चर्चा झाली नाही. अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने ते ही भूमिका मांडू शकतात. सध्या तरी हा विषय पुणे आणि पिंपरी चिंचवडपुरताच मर्यादित असल्याची स्पष्टोक्ती तटकरे यांनी दिली. शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जातील, हे संजय शिरसाट यांचे वक्तव्य ते कोणत्या अधिकारात करतात हे आपणास माहीत आहे. एरवी ते भूमिका मांडताना योग्य असतात, पण कधी कधी ते घसरतात. त्यांचे हे वक्तव्य याच पातळीवरचे आहे, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
मुंबई येथील कुर्ला आणि विद्याविहार रेल्वे स्थानाकादरम्यान कचरा उचलणाऱ्या लोकल ट्रेनला अचानक मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत लोकल ट्रेनचा एक संपूर्ण डब्बा जळाला असल्याचे समजते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला येथील सायडिंगमध्ये उभ्या असलेल्या कचरा लोकल ट्रेनच्या दुसऱ्या डब्याला आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवनांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेमुळे सुरक्षेच्या कारणास्तव साधारण पावणे नऊ वाजल्यापासून अप स्लो लोकल मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या विद्याविहार रेल्वे स्थानाकाकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी स्लो लोकल ट्रेन वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती आहे. रेल्वे प्रशासनाकडून या घटनेची माहिती देण्यात आली असून या आगीची घटना 8 वाजून 38 मिनिटांनी समोर आली होती. यानंतर अवघ्या काही मिनिटांत अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. 8 वाजून 55 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, ही आग नेमकी का लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुंबईची लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन समजली जाते. दररोज लाखो प्रवासी या लोकलमधून प्रवास करत असतात. तसेच लोकलच्या वेळापत्रकानुसार मुंबईकरांचा दिवस ठरलेला असतो. परंतु, अशा काही घटना घडल्या की प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, निवडणूक आयोगाची ईव्हीएमसह सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि नागरिकांना आपला हक्क बजावता यावा यासाठी राज्य सरकारने 15 जानेवारी रोजी मतदानाच्या दिवशी मुंबईसह सर्व 29 महापालिका क्षेत्रांत सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खासगी आस्थापनांमधील कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी लागू असेल. प्रशासनाकडून मतदारांना या सुट्टीचा लाभ घेत मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना आपला मतदानाचा हक्क सुलभतेने बजावता यावा, यासाठी राज्य शासनाने संबंधित निवडणूक क्षेत्रांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयाबाबतची अधिकृत अधिसूचना राज्य शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली असून, निवडणुकीच्या दिवशी सर्वत्र सुट्टीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. ही अधिसूचना सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील शासकीय व निमशासकीय कार्यालये, महामंडळे आणि मंडळांना कळवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जे मतदार संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील रहिवासी आहेत, परंतु कामानिमित्त मतदारसंघाबाहेर कार्यरत आहेत, त्यांनाही या सार्वजनिक सुट्टीचा लाभ घेता येणार आहे. प्रशासनाचा हा निर्णय मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्रशासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका व तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.दरम्यान, मतदारांनी मतदानासाठी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी गुरुवारी अमरावती येथे शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केले. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व, सांघिक भावना आणि चिकाटी वाढते, ज्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व घडते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव हा विद्यार्थ्यांसाठी एक चांगला मंच असल्याचेही त्या म्हणाल्या. श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात आजपासून तीन दिवसीय शालेय क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सतीश मुगल होते. जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब रायबोले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सीईओ संजीता महापात्र यांनी यावेळी मिशन स्कॉलरशिप आणि निपुण महाराष्ट्रमध्येही यशस्वी कामगिरी करण्याचे आवाहन केले. मुलांची गुणवत्ता महाराष्ट्रात वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमादरम्यान धारणी पंचायत समितीच्या जिल्हा परिषद शाळा उकुपाटी येथील विद्यार्थिनी दुर्गा छगन कास्देकर हिचा गौरव करण्यात आला. दुर्गाने लांबउडी या वैयक्तिक खेळ प्रकारात राज्यस्तरावर अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व केले होते. यावेळी तिचे मार्गदर्शक महादेव राठोडही उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने यांनी केले. संचालन अजय अडीकने आणि संध्या जामकर यांनी केले, तर आभार क्रीडा संयोजक प्रवीण खांडेकर यांनी मानले. यावेळी उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते, निखिल मानकर, इम्रान खान, चांदूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ, तिवसा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे, धामणगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे, चिखलदरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भटेसिंग गिरासे, अंजनगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे, चांदूर बाजारचे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नंदकिशोर खरात, भातकुली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रामेश्वर माळवे, धारणी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गुणवंत वरघट, गटशिक्षणाधिकारी विनोद गाडे, विनायक लकडे, राजेश सावरकर, शकील अहमद, श्रीनाथ वानखडे, हेमंतकुमार यावले आदी मान्यवर उपस्थित होते.
माजलगावमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
छत्रपती संभाजीनगर : अहिल्यानगरच्या फैजान ए-कन्झूल इमान या ट्रस्टचा नोंदणी क्रमांक वापरून गुलजार ए-रझा ट्रस्टच्या नावाने लातूरमध्ये पाच वेगवेगळी खाते उघडून धार्मिक कामाच्या नावाखाली चार कोटी ७३ लाख ६७ हजार ५०३ रुपयांचा निधी जमा करण्यात आला. संबंधित रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरण्यात आल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या दहशतवाद विरोधी पथकाने बीड जिल्ह्यातील माजलगाव शहराजवळील पात्रुड गावात गुरुवारी सायंकाळी […] The post माजलगावमध्ये दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शेंदुरजनाघाट शहराच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुवर्णा वरखेडे आणि नगरसेवकांनी गुरुवारी पदाची सूत्रे स्वीकारली. नगर परिषद सभागृहात यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्याच भेटीत त्यांनी विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा केली. पदभार स्वीकारण्यापूर्वी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुवर्णा वरखेडे आणि सर्व नगरसेवकांनी डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांन बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात त्यांनी नगर परिषदेत प्रवेश केला. मुख्याधिकारी आणि इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांचे औक्षण करून पुष्पवृष्टीने स्वागत केले. नगर परिषद सभागृहात पोहोचल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. माजी नगराध्यक्ष सुरेंद्र आंडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले, तर नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन भोयर प्रमुख उपस्थित होते. मुख्याधिकारी भोयर यांनी अध्यक्ष सुरेंद्र आंडे आणि नगराध्यक्षा सुवर्णा वरखेडे यांचा शाल व वृक्ष भेट देऊन सत्कार केला. सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत नगर परिषद कर्मचाऱ्यांनी केले. मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक पिंटूभाऊ सावरकर, संदीप खडसे आणि नीलिमा कुबडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर परिषदेचे प्रकल्प अधिकारी विलास आठवले यांनी केले, तर समुदाय संघटक उमेश मोरे यांनी आभार मानले. याप्रसंगी बांधकाम अभियंता दयानंद डेहनकर, संगणक अभियंता विनय मालधुरे, पाणीपुरवठा अभियंता सोनाली खडेकर, बांधकाम लिपिक दीपक दवंडे, तसेच कार्तिक होले, महेश पोटे आणि केशव वंजारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सावळापूर गाव विविध योजनांमुळे चर्चेत:मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अभिनव उपक्रम राबवले
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील सावळापूर गाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या विविध योजनांमुळे चर्चेत आले आहे. या अभियानांतर्गत गावात लोकाभिमुख, अभिनव आणि विकासात्मक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये आरोग्य, शिक्षण, पाणी आणि महिला सक्षमीकरण या प्रमुख घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये मोफत दळण केंद्र, पूर्ण कर भरणाऱ्या करदात्यांसाठी मोफत पाणी कॅन वितरण, ऑक्सिजन पार्कची निर्मिती, परसबाग उपक्रम, 'उमेद' अंतर्गत महिला उद्योग, अंगणवाडी केंद्रातील सुधारित व्यवस्था, 'अभ्यासाचा भोंगा' हा अभिनव उपक्रम, तसेच ग्रामपंचायतीच्या विविध योजना, आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी स्वतः उपस्थित राहून यापैकी अनेक कार्यक्रमांचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधला आणि विविध ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या कार्यक्रमादरम्यान, ग्रामपंचायत अधिकारी ऋषिकेश रहाटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते वृक्ष देऊन सीईओ महापात्र यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. विस्तार अधिकारी (पंचायत) महादेव कासदेकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी तालुक्याची माहिती देताना देवगाव, उपातखेडा, जवर्डी, हनवतखेडा, निमकुंड, मल्हारा, सावळी दातुरा यांसारख्या इतर ग्रामपंचायतीही उत्कृष्ट कामगिरी करत असल्याचे नमूद केले. या सर्व प्रयत्नांमुळे सावळापूर हे अचलपूर तालुका आणि अमरावती जिल्ह्यासाठी एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून उदयास आले आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. सावळापूर ग्रामपंचायतीचा राज्यात चर्चेचा विषय ठरलेला अभ्यासाचा भोंगा हा अभिनव उपक्रमही यावेळी पाहण्यात आला. या उपक्रमांतर्गत दररोज सायंकाळी ७ वाजता सायरन (भोंगा) वाजवून संपूर्ण गावात टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवले जातात, जेणेकरून विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी प्रत्यक्ष घराघरांत जाऊन विद्यार्थी अभ्यास करत आहेत की नाही, याची पाहणी केली आणि अभ्यासात मग्न असलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुकही केले. सावळापूर गावाची लोकसंख्या २३२९ असून, साक्षरता दर ८५ टक्के आहे. हे गाव जिल्ह्यापासून ८८ किलोमीटर अंतरावर असून, खाजगी वाहन किंवा एसटीने येथे पोहोचता येते. अचलपूर पंचायत समिती अंतर्गत एकूण ७२ ग्रामपंचायती असून, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विविध उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. यापैकी २० टक्के ग्रामपंचायती गुणांकन पद्धतीनुसार अग्रेसर ठरल्या आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. विकासासाठी लागणारा निधी आपण आणण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ दसरा मैदानात गुरुवारी दुपारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अनुपस्थित राहिल्याने पालकमंत्री बावनकुळे यांनी ही सभा घेतली. सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री डॉ. पंकज भोयर होते. यावेळी राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, निवडणूक प्रभारी आमदार संजय कुटे, आमदार प्रवीण तायडे, पुलगाव-देवळीचे आमदार राजेश बकाने, विधीज्ञ प्रशांत देशपांडे आणि महानगर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बावनकुळे यांनी अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपने तयार केलेला सन २०४७ चा आराखडा सादर केला. त्यांनी शहराच्या आतापर्यंतच्या विकासाचा आढावा घेत भविष्यातील योजनांचे स्वप्न मांडले. या आराखड्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), वैमानिक प्रशिक्षण केंद्र, टेक्सटाईल पार्क, सिंभोरा ते अमरावती नवी जलवाहिनी, अंबादेवी मंदिराचा विस्तार, अंबानाल्याचा विकास आणि भुयारी गटार योजनेची पूर्णाहुती या प्रमुख प्रकल्पांचा समावेश आहे. शालेय शिक्षणमंत्री डॉ. भोयर यांनीही यावेळी आपले विचार मांडले. सभेची सुरुवात एमआयडीसी इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांच्या भाषणाने झाली. बावनकुळे यांनी विकासाची तुलना चारचाकी वाहनाशी केली. या वाहनाचे पहिले चाक पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तिसरे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चौथे चाक आपण स्वतः (पालकमंत्री) असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या विकासरथाचा चालक (ड्रायव्हर) आगामी महापौर असल्याने तो भाजपचाच असला पाहिजे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. या सभेत राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे आणि भाजप नेत्या, माजी खासदार नवनीत राणा यांचीही भाषणे झाली. त्यांच्या भूमिकांमध्ये काही प्रमाणात तफावत दिसून आली. डॉ. बोंडे यांनी नवनीत राणा यांना सबुरीचा सल्ला देत, काही पदाधिकाऱ्यांनी भूतकाळात घेतलेली पक्षविरोधी भूमिका विसरून जावी आणि आता ते सोबत असल्याने भाजपचाच विजय होईल, अशी भूमिका घेण्याचे आवाहन केले. याउलट, नवनीत राणा यांनी डॉ. बोंडे यांचा सल्ला न मानता, ज्यांनी यापूर्वी भाजपशी बेईमानी केली, त्यांना आपला उघड विरोध राहील असे स्पष्ट केले. यामुळे काही विशिष्ट उमेदवारांविरुद्ध त्यांची आघाडी प्रचारात कायम राहील, असे संकेत मिळाले आहेत.
पुण्यात 25 लाखांचे मॅफेड्रॉन जप्त:चंदननगर येथून एका तस्कराला अटक
पुणे शहरातील चंदननगर परिसरातून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने २५ लाख रुपये किमतीचे मॅफेड्रॉन जप्त केले आहे. या प्रकरणी एका तस्कराला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रतननाथ मोहननाथ योगी (वय ४२, रा. सोपाननगर, वडगावशेरी) असे आहे. त्याच्याकडून १२७.७९ ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त करण्यात आले, ज्याची बाजारातील किंमत २५ लाख रुपये आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार संदीप देवकाते यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, वडगावशेरी येथील सोपाननगरमधील सायरस पेडर यांच्या फार्म हाऊसमध्ये रतननाथ योगी अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे, पथकाने सापळा रचून योगीला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून मॅफेड्रॉन जप्त केले. ही कारवाई पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, तसेच पोलीस अंमलदार राजस बास्टेवाड, महेश बोराडे आणि शुभांगी म्हाळसेकर यांच्या पथकाने केली. सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक: बिहारच्या टोळीला बेड्या सोन्या-चांदीचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या बिहारमधील एका टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पर्वती पोलिसांनी ही कारवाई करत पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शिवकुमार विनोद साह (वय २१), प्रितमकुमार सुशील साह (वय २३), गोविंद सुशील साह (वय २९), मदन गंगा भगत (वय २३) आणि राजा रामबारानी यादव (वय ३२) यांचा समावेश आहे. हे सर्वजण बिहार आणि पुणे येथील रहिवासी आहेत. त्यांच्या ताब्यातून २० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड आणि पॉलिश करण्याचे साहित्य असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. २१ डिसेंबर रोजी दांडेकर पूल येथील जयमहाराष्ट्र मित्रमंडळाजवळ एका महिलेच्या सोन्याच्या बांगड्या पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी व्यक्तींनी हातचलाखीने त्या चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलीस अंमलदार अमित चिव्हे, नानासो खाडे, राकेश सुर्वे आणि प्रसाद यांना आरोपींची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार, पर्वती पोलिसांच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, उपनिरीक्षक किरण पवार, इसराईल शेख, तसेच अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, शाहरुख शेख, अमोल दबडे, सूर्या जाधव, सुनील घुगे, सद्दाम शेख आणि कीर्ती भोसले यांच्या पथकाने केली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय प्रचार सभा सुरू आहेत. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीका टिप्पणी सुरू केली असून दुसरीकडे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात 70 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांनी टीका केली होती. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात विरोधी पक्षातील नेत्यांनी याचिका दाखल केली होती. यावर आता नवी मुंबईतील प्रभाग 17 (अ) च्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता 15 तारखेला मतदान होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 17 (अ) मधून भाजप उमेदवार नीलेश भोजने यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. कारण निवडणूक आयोगाने त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला होता. त्या संदर्भात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याच प्रकरणी न्यायालयाने येथील निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिली असून येत्या शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. भाजप उमेदवार नीलेश भोजने यांच्या मालमत्तेवर अनधिकृत बांधकाम असल्याने महाराष्ट्र म्यूनिसिपल कार्पोरेशन कायद्याच्या कलम 10(1ड) अंतर्गत भोजने यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला होता. मात्र, येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने प्रथमदर्शनी बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने अधिकारांचा वापर केल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाचे भाजप उमेदवार निलेश भोजने यांना दिलासा दिला. त्यानुसार, पुढील आदेश येईपर्यंत निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. नवी मुंबईत 117 अर्ज अवैध दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्व प्रभागांतील उमेदवारांच्या नामनिर्देशन पात्रांची छाननी प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली असून 839 अर्ज वैध ठरले, तर 117 अर्ज अवैध ठरले आहेत. एकूण 956 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. नेरूळ विभागात सर्वाधिक 28 अर्ज अवैध ठरले असून घणसोली विभागात तब्बल 39 अर्ज बाद झाले आहेत.
एक ड्रायव्हर चालवणार ५ ट्रक; मालवाहतूक क्षेत्रात नवे ‘मॅजिक’
बीजिंग : वृत्तसंस्था वाहतूक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चीनने पुन्हा एकदा जगाला थक्क करणारी झेप घेतली आहे. चीनमधील प्रसिद्ध ट्रक उत्पादक कंपनी रअठने आपल्या चौथ्या पिढीतील ‘ऑटोनॉमस’ (विनाचालक) ट्रकचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. या तंत्रज्ञानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, रस्त्यावर धावणा-या पाच ट्रकचा ताफा आता केवळ एक चालक चालवणार आहे. २०२६ या […] The post एक ड्रायव्हर चालवणार ५ ट्रक; मालवाहतूक क्षेत्रात नवे ‘मॅजिक’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्वदेशी सुसाईड ड्रोन लवकरच सेना दलात
नवी दिल्ली : प्रतिनिधी भारतीय सेना स्वदेशी ‘सुसाइड ड्रोन’ म्हणजेच लोइटरिंग म्युनिशनची मोठी खेप खरेदी करण्याच्या तयारीत आहे. हे आत्मघाती ड्रोन स्फोटकांनी सज्ज असतील आणि शत्रूच्या हद्दीत घुसून त्यांच्या ठिकाणांचा पूर्णपणे नाश करतील. हे ड्रोन असे असतील की, जॅमिंग (रडार सिग्नल अडवणे) आणि स्पूफिंग (खोटे रडार सिग्नल पाठवणे) अशा परिस्थितीतही ते आपले लक्ष्य अचूकपणे साध्य […] The post स्वदेशी सुसाईड ड्रोन लवकरच सेना दलात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सूस गावात भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराने वेग घेतला असून, प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजप उमेदवारांना जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोहिणी चिमटे, गणेश कळमकर, मयुरी कोकाटे आणि लहू बालवडकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. नुकतीच काढण्यात आलेली पदयात्रा हे या प्रतिसादाचे द्योतक ठरली. ही पदयात्रा भगवती नगर येथून सुरू होऊन भैरवनाथ मंदिर येथे समाप्त झाली. पदयात्रेदरम्यान नागरिकांनी फुलांची उधळण करून आणि घोषणाबाजी करत भाजपचे स्वागत केले. हा प्रतिसाद सूस गावाच्या विकासासाठी भाजपला पसंती दर्शवणारा होता. सूस गावातील प्रत्येक घरातून भाजपला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि तरुणांचा विश्वास यामुळे भाजपचा प्रचार अधिक प्रभावी ठरत आहे. यामुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये भाजप आघाडीवर असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपने ही निवडणूक सत्तेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी असल्याची भूमिका मांडली आहे. मतदारांनी दिलेले प्रत्येक मत सूस गाव आणि प्रभाग क्रमांक ९ च्या प्रगतीचा पाया ठरेल, असे पक्षाने म्हटले आहे. विकासालाच प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. भाजपने पुढील पाच वर्षांसाठीचा विकास आराखडा जनतेसमोर सादर केला आहे. यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा, उद्याने, स्ट्रीटलाइट्स आणि वाहतूक व्यवस्थेचा विकास करण्याचे आश्वासन देण्यात आले. विकास केवळ कागदावर न राहता तो थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनात दिसेल, असे लहू बालवडकर यांनी सांगितले. यावेळी भाजप नेते लहू बालवडकर यांनी नागरिकांना संबोधित केले. त्यांनी मतदारांना सेवा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले आणि पुढील पाच वर्षे प्रभागाच्या विकासाची असतील असे सांगितले. शब्दांपेक्षा कामातूनच भाजप आपली विश्वासार्हता सिद्ध करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पदयात्रेनंतर प्रभागात भाजपला जनतेचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रचाराला सुरुवात केली आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नऱ्हे-वडगाव बु.-धायरी आणि येरवडा-गांधीनगर येथे जाहीर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून महापालिकेत भगवा फडकवण्याचे आवाहन केले. प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे-वडगाव बु.-धायरीमध्ये शिवसेना उमेदवार गिरमे निलेश दशरथ, गिरमे राधिका दशरथ, सुप्रिया ईश्वर भूमकर आणि तांबे विठ्ठल ज्ञानेश्वर यांच्या प्रचारासाठी कालभैरव मंदिर चौक, नऱ्हे रोड येथे सभा झाली. तसेच प्रभाग क्रमांक ६ येरवडा-गांधीनगरमध्ये उमेदवार किशोर चंद्रकांत वाघमारे, वाघचौरे कोमल अभिजीत, स्नेहल सुनील जाधव आणि आनंद रामनिवास गोयल यांच्या प्रचारार्थ गाडीतळ येरवडा येथेही सभा घेण्यात आली. यावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, युवासेना प्रदेश सचिव किरण साळी, उपनेते इरफानभाई सैय्यद, निलेश घारे आदी मान्यवर उपस्थित होते. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, समाविष्ट गावे पहिल्यांदाच महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमी सामान्य लोकांच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. कदम पुढे म्हणाले की, या गावांच्या विकासासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना महापालिकेत पाठवणे गरजेचे आहे. नगर विकास खात्यासह महत्त्वाची खाती शिवसेनेकडे असल्याने शहराच्या विकासाला गती मिळेल. सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करून पुणे महापालिकेत भगवा फडकवा, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात नऱ्हे गावातील पाण्याच्या पाईपलाइनसाठी निधी दिल्याचे नमूद केले, ज्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. आता फिल्टरची मागणी असून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. समाविष्ट गावांच्या करमाफीचा मुद्दा मांडला आहे, मात्र प्रशासकामुळे त्यावर दुर्लक्ष झाल्याचेही त्यांनी म्हटले. डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, दिवसेंदिवस पुण्याला पाण्याची समस्या भीषण होत चालली आहे. त्यामुळे शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र धरणे बांधणे गरजेचे आहे. ही मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. नवे पोलीस स्टेशन योगेश कदम यांच्यामुळे सुरू झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
माणसाची भीती ओळखून भटके कुत्रे हल्ला करतात! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या सुळसुळाटावर आणि त्यांच्यामुळे होणा-या त्रासावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संजय मेहता आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. कुत्रे माणसांमधील भीती ओळखू शकतात आणि त्याच भीतीमुळे ते हल्ला करतात किंवा चावा घेतात असे निरीक्षण आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नाथ यांनी नोंदवले. आज […] The post माणसाची भीती ओळखून भटके कुत्रे हल्ला करतात! सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चंद्रपुरात बावनकुळेंच्या सभेत गोंधळ
चंद्रपूर : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपमधील अंतर्गत असंतोष चंद्रपूरमध्ये उघडपणे समोर आला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचारसभांदरम्यान तिकीट नाकारलेल्या इच्छुकांनी दोन ठिकाणी थेट हस्तक्षेप केल्याने सभास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनांमुळे भाजपमधील नाराजी अजूनही धगधगत असल्याचे स्पष्ट झाले. सपना टॉकीज चौकातील सभेत भाजपकडून तिकीट नाकारलेले राकेश बोमनवार हे बावनकुळे यांचे भाषण सुरू असतानाच […] The post चंद्रपुरात बावनकुळेंच्या सभेत गोंधळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपचे 'मायक्रो मॅनेजमेंट'वर लक्ष:पुणे मध्यवर्ती भागातील प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी विशेष रणनीती
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) प्रभाग २५ मध्ये 'मायक्रो मॅनेजमेंट'वर भर दिला आहे. मतदार यादीचे वाचन, मतदारांना स्लिप पाठवणे आणि घरोघरी प्रचार अशा विविध स्तरांवर तयारी सुरू असून, यामुळे भाजपच्या निवडणूक कार्यालयात लगबग वाढली आहे. या प्रभागात भाजपचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित निवडणूक लढवत आहेत. स्वरदा बापट या दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून आहेत, तर कुणाल टिळक हे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव आहेत. राघवेंद्र मानकर हे भाजपचे शहर सरचिटणीस असल्याने, पुण्याच्या मध्यवर्ती भागातील या प्रभागाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. भाजपने तळागाळात मजबूत संघटनात्मक जाळे निर्माण केले असून, उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपचे कसबा विधानसभा अध्यक्ष अमित कंक यांनी सांगितले की, आमदार हेमंत रासने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. भाजप नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून गांभीर्याने निवडणूक लढते. ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मेहनत, अनेक वर्षांपासून उभी असलेली संघटनात्मक फळी, निवडणुकीचे मायक्रो मॅनेजमेंट आणि विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचवणारे कार्यकर्ते यांच्या जोरावर प्रभाग २५ मध्ये मोठा विजय मिळवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. या विजयासाठी प्रभाग २५ चे पदाधिकारी किरण जगदाळे, निलेश कदम, संतोष फडतरे, मनीष जाधव, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, प्रणव गंजीवाले, अनंत कुंटे, धनंजय डिंबळे, अजित सुकादने, योगिता गोगावले, रुपाली कदम, दिलीप पवार, सोहम भोसले, आदेश पारवे, अमित सोनवणे, अनिल पवार, बिपीन बोरावके, श्रेयस लेले यांच्यासह सर्व हजारी भाग प्रमुख आणि कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.
पुणे येथे 'कन्स्ट्रो २०२६' या चार दिवसीय आंतरराष्ट्रीय बांधकाम प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनी बांधकाम क्षेत्रात संशोधन आणि नाविन्यपूर्णतेला चालना देण्याचे आवाहन केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्यावर भर दिला. पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाऊंडेशन (पीसीईआरएफ), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. ११ जानेवारी २०२६ पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला नवी दिल्ली येथील कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष आर्कि. अभय पुरोहित, कन्स्ट्रो प्रदर्शनाचे चेअरमन इंजि. जयदीप राजे, 'पीसीईआरएफ'चे अध्यक्ष इंजि. नरेंद्र कोठारी, सचिव आर्कि. शिरीष केंभावी आणि जयंत इनामदार उपस्थित होते. केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. रणजित नाईकनवरे यांनी सांगितले की, स्थापत्य अभियंत्यांनी केवळ नोकरीवर लक्ष केंद्रित न करता ज्ञानार्जन सुरू ठेवावे. बांधकाम क्षेत्रात वेगाने बदल होत असून, त्यात नाविन्यता आणणे आवश्यक आहे. 'कन्स्ट्रो'सारख्या प्रदर्शनांमुळे क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि बदल समजून घेण्यास मदत होते. शिक्षण, तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास यांचा बांधकाम क्षेत्रात समावेश होणे महत्त्वाचे आहे. आर्कि. अभय पुरोहित यांनी नमूद केले की, बांधकाम आणि स्थापत्य क्षेत्र देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. या क्षेत्रात शाश्वतता, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक नैतिकता यांचा समतोल राखणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल डिझाइन टूल्स आणि प्रगत बांधकाम साहित्य वापरून प्रकल्पांची गुणवत्ता व कार्यक्षमता वाढवावी, असे त्यांनी सुचवले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बांधकाम क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण साहित्य आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना स्वीकारणे आवश्यक आहे. रस्ते, पूल, स्मार्ट शहरे आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधा देशाच्या आर्थिक प्रगतीचा आधार आहेत. खर्च कमी करून टिकाऊ, दीर्घकालीन आणि पर्यावरणपूरक बांधकामावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. नव्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास वेळ, खर्च आणि गुणवत्ता या तिन्ही बाबींमध्ये सुधारणा होईल, असेही ते म्हणाले.
अमेरिकेची मोठी ‘एक्झिट’ ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार
वॉशिंग्टन : वृत्तसंस्थ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून अमेरिकेला अधिकृतपणे बाहेर काढण्याची घोषणा केली आहे. द गार्डियननुसार, यात ३५ बिगर-संयुक्त राष्ट्र संघटना आणि ३१ संयुक्त राष्ट्र संस्थांचा समावेश आहे. व्हाईट हाऊस आणि स्टेट डिपार्टमेंटनुसार, या संघटना अमेरिकेच्या हिताच्या विरोधात आहेत. यात पैशांचा अपव्यय होतो. याशिवाय, त्या अनावश्यक किंवा चुकीच्या पद्धतीने चालवल्या जात […] The post अमेरिकेची मोठी ‘एक्झिट’ ६६ आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिलांच्या सुरक्षेत चेन्नई, बंगळुरू अव्वल; टॉप-५ मध्ये पुणे, मुंबई
पुणे : प्रतिनिधी महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत बंगळुरू आणि चेन्नई देशातील सर्वोत्तम शहरे ठरली आहेत. पुणे, मुंबई आणि हैदराबाद ही शहरे टॉप ५ मध्ये आहेत. वर्क प्लेस कल्चर कन्सल्टिंग फर्म अवतार ग्रुपच्या ‘टॉप सिटीज फॉर वुमेन इन इंडिया’ च्या चौथ्या आवृत्तीत ही माहिती समोर आली आहे. या अहवालात १२५ शहरांना महिलांचा सहभाग, सुरक्षितता आणि करिअर वाढीच्या […] The post महिलांच्या सुरक्षेत चेन्नई, बंगळुरू अव्वल; टॉप-५ मध्ये पुणे, मुंबई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘एआय’ने ओळखले मनुष्याला झोपेद्वारे होणारे १३० आजार!
स्टॅनफोर्ड : वृत्तसंस्था अमेरिकेतील स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीसह अनेक संस्थांमधील शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन ‘स्लीप एफएम’ नावाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल (अक) तयार केले आहे. ‘नेचर मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, हे मॉडेल माणसाच्या एका रात्रीच्या झोपेच्या आधारावर १३० आजारांच्या धोक्याची भविष्यवाणी करू शकते. ‘एआय’ मॉडेलच्या भविष्यवाणीची सी-इंडेक्सवरील अचूकता ०.७५ पेक्षा जास्त आली आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, ती ७५% […] The post ‘एआय’ने ओळखले मनुष्याला झोपेद्वारे होणारे १३० आजार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी 'पुणे फर्स्ट' या आघाडीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधारी तीन पक्षांवर पुणे शहराचे लचके तोडल्याचा आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढल्याचा आरोप केला. चव्हाण म्हणाले की, पुण्यातील उद्योग, वाहतूक समस्या आणि वाढत्या प्रदूषणामुळे अनेक उद्योग पुणे सोडून जात आहेत. नवीन उद्योगांची गुंतवणूक पुण्यात येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. राज्य सरकार अनेक गुंतवणुकीच्या घोषणा करत असले तरी प्रत्यक्षात कोणतीही गुंतवणूक दिसत नाही. उद्योगांना पुण्यात यायचे असले तरी नागरी सुविधा कोलमडल्यामुळे सेमीकंडक्टरसारखे उद्योग येथे येत नाहीत. काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारमुक्त सरकार देईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या आघाडीने गुरुवारी काँग्रेस भवन येथे संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि पुण्याचे प्रभारी आमदार सतेज पाटील उपस्थित होते. यावेळी काँग्रेस पक्षाचा डिजिटल जाहीरनामा देखील प्रकाशित करण्यात आला. माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चौधरी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी महापौर प्रशांत जगताप, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर आणि शहर युवक अध्यक्ष सौरभ अमराळे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. चव्हाण यांनी पुढे सांगितले की, पुण्यात वाहतूक समस्यांचे निवारण केले जाईल. मेट्रोचे भूमिपूजन आम्ही पाठपुरावा करून पुण्यात आणले आणि ते पूर्ण केले. मी मुख्यमंत्री असताना मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये मेट्रो आणण्याचा निर्णय घेतला, याचे कागदोपत्री पुरावे आहेत. त्यामुळे श्रेयवादाचा प्रश्नच नाही. घोषणा करण्यासाठी पैसे लागत नाहीत, पण चुकीच्या पद्धतीने योजना राबवून सत्ताधारी भ्रष्टाचार करत आहेत. शहरातील भाजपने स्मार्ट सिटी योजना गुंडाळली आहे. एकेकाळी शिक्षण आणि रोजगारात पुणे अग्रणी होते, पण सध्या तशी परिस्थिती दिसत नाही. सर्वत्र महायुती असली तरी निवडणुकीत तसे चित्र राहणार नाही. देशात दोन विचारधारा कायम असून जनतेने गांधींच्या विचारधारेस पाठबळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. बायोडायव्हर्सिटीबाबत आम्ही गांभीर्याने निर्णय घेतले होते, पण भाजपने त्याकडे दुर्लक्ष केल्याने टेकड्या नष्ट होत आहेत. आम्ही सत्तेत आल्यावर त्यावर पुन्हा काम करू. 'लाडकी बहीण' योजना चुकीच्या पद्धतीने राबवली गेल्याने अनेक गैरप्रकार घडले आहेत, असेही चव्हाण म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर येथे गेले असताना एका मुलाखतीत त्यांना त्यांच्या नगरसेवकाच्या काळातला किस्सा विचारण्यात आला, यावर फडणवीसांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. तसेच महापौर आणि नगरसेवकाचा जॉब एकदम टफ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्याने मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक होतो आणि ज्याने महापाप केले तो महापौर होतो, असेही फडणवीस यांनी गंमतीने विधान केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी 21 व्या वर्षी नगरसेवक झालो. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मिरवणुका वगैरे काढल्या आणि पहाटे 4 वाजता मी आमच्या घराच्या हॉलमध्ये झोपलो. आणि सकाळी 7 वाजताच घराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला आणि समोर एक गृहस्थ उभे होते. मी त्यांना विचारले इतक्या सकाळी सकाळी कसेकाय? त्यावर म्हणाले, माझे गटार चोक झाले आहे म्हणून तक्रार करण्यासाठी तुमच्याकडे आलो. त्या दिवशी आपण काय स्वीकारले आहे हे मला समजले. ज्याने मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक होतो पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी गमतीने म्हणतो की, ज्याने मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक होतो आणि ज्याने महापाप केले तो महापौर होतो. पण मला असे वाटते की तेव्हाच्या महानगरपालिकेत आणि आताच्या महानगरपालिकेत खूप फरक पडला आहे. तेव्हा नागपूर शहर विकासाची आस बघत होते. मी महापौर झालो तेव्हा नागपूरमध्ये पाण्याच्या आठ टाक्या होत्या, आज 108 पाण्याच्या टाक्या आहेत. हा नागपूरमधला बदल आहे. आज नागपूर एक आधुनिक शहर म्हणून बघायला मिळत आहे. आमच्या काळात दिवे लावण्याचे दिव्य होते आमचा तो काळ होता जेव्हा नगरसेवक फक्त गटर, रस्ता आणि दिवे याचा विचार करायचा. तेव्हा अक्षरशः स्पर्धा लागायची की जो स्टोअर किपर असायचा, ज्याच्याकडे ते सगळे दिवे ठेवलेले असायचे, त्याला पटवून तो दिवा लावण्याचे एक दिव्य होते. आता या सगळ्या गोष्टी कराव्या लागत नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ..तर देवेंद्र फडणवीस नगरसेवक झाले नसते तेव्हाच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या नसत्या तर देवेंद्र फडणवीस नगरसेवक झाले नसते, यावर बोलताना त्यांनी सांगितले की, हे खरे आहे. मला ज्यावेळी सांगितले की या वॉर्डमधून लढायचे आहे. त्यावेळी मी कोणाला सांगितले नाही की माझे वय झाले नव्हते, माझे वय पूर्ण व्हायचे बाकी होते. पण तेव्हा ती निवडणूक काही कारणांमुळे पुढे ढकलली गेली आणि माझे वय त्या निवडणुकीसाठी भरले, असा किस्सा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितला.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा पारंपरिक पॅटर्न बदलत असल्याचे दिसून येत आहे. उमेदवार अमोल बालवडकर यांनी दावा केला आहे की, निवडणूक आता जनतेने हातात घेतली असून, अनेक ठिकाणी मतदार स्वतःहून त्यांच्या भेटीसाठी पुढे येत आहेत. ही निवडणूक केवळ प्रचाराची नसून, विश्वासाचे जनआंदोलन असल्याचे बालवडकर यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून विविध परिसरांतील नागरिक, सोसायटी प्रतिनिधी, युवक-युवती, महिला मंडळे, व्यापारी संघटना आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने बालवडकर यांना भेटण्यासाठी येत आहेत. ते एखाद्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच नागरिक जमा झालेले असतात. अनेकजण फोन करून 'आम्हीच येतो, भेटायचं आहे' असे सांगतात. नागरिक 'आम्ही तुमच्यासाठी कोपर सभा घेतो, मेळावा घेतो, प्रचार करतो' अशी भावना व्यक्त करत आहेत. ही ऊर्जा शब्दांत सांगता येणार नाही, असे बालवडकर म्हणाले. सातत्याने ११ वर्षे जनतेची केलेली सेवा हेच यामागचे एकमेव कारण असून, काम करणाऱ्या माणसाला जनतेची साथ हेच लोकशाहीचे खरे रूप असल्याचे त्यांनी नमूद केले. बालवडकर यांनी कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की, ही साथ केवळ त्यांच्यावरील वैयक्तिक सन्मान नाही, तर प्रभागाच्या भविष्यासाठीचा जनादेश आहे. लोकांना काम हवे आहे आणि ते विकासाचे काम करणारे व्यक्ती आहेत. प्रत्येक भेटीत ते 'संवाद, पारदर्शकता आणि काम' हेच वचन देतात. अनेक वर्षापासून मतदारसंघांमध्ये विविध प्रश्नावर काम केले असल्याने नागरिकांना कोणत्या समस्या आणखी जाणवत आहे त्याची जाण मला चांगल्या प्रकारे आहे.केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष काम करण्यावर आपला भर असल्याचे अमोल बालवडकर यांनी स्पष्ट केले.
जनगणना २०२७ चा पहिला टप्पा १ एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान
नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की देशात होणा-या २०२७ च्या जनगणनेचा पहिला टप्पा १ एप्रिल ते ३० सप्टेंबर दरम्यान पार पडेल. याची सुरुवात घरांची यादी तयार करणे आणि घरांचा डेटा गोळा करण्यापासून होईल. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्यांच्या येथे ३० दिवसांत हे काम पूर्ण करतील. एमएचएने बुधवारी अधिसूचना जारी करून सांगितले की […] The post जनगणना २०२७ चा पहिला टप्पा १ एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी मुंबई, पुणे आणि ठाण्याप्रमाणे नाशिकसाठी देखील समान नियम लागू करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने नाशिक क्रीडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांच्याशी फोनवरून संवाद साधताना जुन्या इमारातींच्या संदर्भात बदल करण्यास अनुकूलता दर्शवली. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शहरातील उद्योजक आणि संघटनांशी संवाद साधला असता, नाशिकमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी मुंबई-पुणे आणि ठाण्याप्रमाणे समान नियम लागू करण्याची मागणी क्रेडाईतर्फे करण्यात आली. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत सामंत यांनी तत्काळ एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून क्रेडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांचे त्यांच्याशी बोलणे करून दिले. ज्यावर एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निवडणूक आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर नाशिकमध्येही पुनर्विकासाचे समान नियम लागू करण्याचे आश्वासन दिले. मुंबई, पुणे आणि ठाणे येथे नवीन विकास नियंत्रण नियमावलीनुसार 9 मीटर रस्त्यालगतच्या इमारतींना 2.5 पर्यंत एफएसआय मिळत असल्याने तेथील पुनर्विकास सुलभ झाला आहे. मात्र नाशिकमध्ये हा लाभ केवळ 1.4 पर्यंतच मर्यादित असून अतिरिक्त एफएसआय विकत घ्यावा लागत असल्याचे क्रेडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांनी निदर्शनास आणून दिले. नाशिकमधील या तांत्रिक तफावतीमुळेच 9 मीटर रस्त्यांवरील अनेक जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडला असल्याचे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या संवादात निदर्शनास आणून दिले. मुंबई-पुण्याप्रमाणेच नाशिकमध्येही समान नियम लागू नाशिकमधील पुनर्विकासातील तांत्रिक अडचणी मांडताना क्रेडाईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले की, मुंबई, पुणे आणि ठाण्यात इमारतीची उंची मोजताना पोडियम पार्किंग वगळले जाते, मात्र नाशिकमध्ये ती पार्किंगसह मोजली गेल्यामुळे विकासकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, निवडणुकीनंतर नाशिक शहरासाठीही मुंबई-पुण्याप्रमाणेच समान नियम लागू केले जातील आणि त्याबाबतचे आवश्यक निर्देश नगरविकास विभागाला दिले जातील, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी फोनवरून दिले. नाशिकमध्ये 8-10 हजार जुन्या इमारती नाशिक शहरात 9 मीटर रस्त्याला लागून सुमारे 8 ते 10 हजार जुन्या इमारती असून, हे नवीन नियम लागू झाल्यास त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. विकासकांच्या या प्रलंबित प्रश्नावर तातडीने ठोस पावले उचलल्याबद्दल आणि आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहोचवल्याबद्दल नाशिक क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर आणि उपाध्यक्ष उदय घुगे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
कळमनुरी तालुक्यातील तक्रारदार व त्याच्या भावाचे बीपीएल योजनेत नाव समाविष्ट करून स्वस्त धान्याचा लाभ देण्यासाठी 3 हजाराची लाच घेणाऱ्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ता. 8 दुपारी रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील एका लाभार्थ्याने त्याचे व त्याच्या भावाच्या कुटुंबियांचे बीपीएल योजनेत नाव समाविष्ट करून स्वस्त धान्याचा लाभ देण्याबाबत तहसील कार्यालयात ता. 18 सप्टेंबर 2022 रोजी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांना शिधापत्रिका मिळाली होती. मात्र या शिधापत्रिकेवर त्यांना धान्यच मिळाले नाही. त्यावरून तक्रारदाराने पुन्हा तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडे वारंवार विचारणा केली. मात्र त्यांना दाद मिळाली नाही. त्यानंतर पुरवठा विभागातील लिपीक चक्रधर कदम याने बीपीएल योजनेअंतर्गत अन्नधान्याचा लाभ मिळण्याच्या योजनेत नाव समाविष्ट करून अन्नधान्य मिळणे बाबत अंतिम आदेश काढून देण्यासाठी आठ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर चक्रधर याने दोन्ही प्रस्तावाचे एकूण तीन हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणी संबंधित तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून आज दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख युनूस, जमादार भगवान मंडलिक, रवींद्र वरणे, गजानन पवार, शिवाजी वाघ, अमोल जाधव, शेख अकबर यांच्या पथकाने कळमनुरी तहसीलच्या पुरवठा विभागाच्या परिसरात सापळा रचला होता. दुपारी लिपीक चक्रधर याने तक्रारदाराकडून 3 हजार रुपयांची लाच टेबलाच्या ड्राव्हरमध्ये टाकून घेतली त्यानंतर सदर रक्कम घेताच त्यास पकडण्यात आले. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पुढील आठवड्यात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज फेटाळल्या गेलेल्या इच्छुक उमेदवारांना आता उच्च न्यायालयाकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. विविध कारणांमुळे बाद ठरवण्यात आलेले अर्ज पुन्हा स्वीकारले जावेत, या मागणीसाठी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून, प्रकरणाचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने यावर शुक्रवारी तातडीने सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या विभाग क्रमांक 1 ते 227 च्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आणि आयुक्तांनी उमेदवारांचे अर्ज फेटाळल्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली हे अर्ज बाद करण्यात आल्याचा संशय याचिकाकर्त्यांनी व्यक्त केला असून, अर्ज भरण्यासाठी दिलेली सात दिवसांची मुदत अत्यंत अपुरी असल्याचा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सहमती दर्शवत हे प्रकरण शुक्रवारी सूचीबद्ध केले आहे. काय आहे याचिकाकर्त्यांचा दावा? प्रतिज्ञापत्रे किंवा प्रश्न-उत्तर पत्रके योग्य स्वरूपात नसल्याच्या अथवा कायदेशीररीत्या आवश्यक नसलेली पोलीस, पाणी, कर, मलनिस्सारण आणि मालमत्ता यासह पाच विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्रे (एनओसी) सादर करण्यात अयशस्वी झाल्याच्या कारणास्तव कारणास्तव अनेक इच्छुक उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. परंतु, पाणी, मालमत्ता कर आणि बांधकाम प्रस्ताव यासारखे विभाग महानगरपालिकेच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली असल्याने ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी मनमानी, अवाजवी आणि घटनेच्या समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच विरोधी पक्षांच्या उमेदवारांना ना हरकत प्रमाणपत्रे मिळण्यास विलंब करून राजकीय कटकारस्थान होण्याची शक्यताही याचिकाकर्त्यांनी वर्तवली आहे. अधिकाऱ्यांची कृती असंवैधानिक वांद्रे पूर्व येथील मोझम अली मीर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत निवडणूक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले असून, किरकोळ आणि तांत्रिक कारणांचा आधार घेऊन विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज मनमानीपणे फेटाळल्याचा दावा केला आहे. अधिकाऱ्यांची ही कृती असंवैधानिक आणि अरेरावीची असून, यामुळे अनेक इच्छुकांना निवडणूक लढवण्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागले आहे, असे मीर यांनी म्हटले आहे. महापालिका प्रशासनाचा हा पवित्रा राज्य निवडणूक आयोगाच्या घटनात्मक अधिकारांवर गदा आणणारा असल्याची टीकाही या याचिकेतून करण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाकडून अधिकारांचा गैरवापर राज्य निवडणूक आयोगाच्या 12 डिसेंबर 2025 च्या अधिसूचनेतील अटींमध्ये बदल करून महानगरपालिका प्रशासन आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. महापालिका ही केवळ अंमलबजावणी करणारी संस्था असतानाही, तिने आयोगाचे विशेष अधिकार डावलून उमेदवारीसाठी स्वतःच्या अटी लादल्या असून, आयोगाने आधी जाहीर केलेल्या कागदपत्रांच्या यादीचे उल्लंघन करून नवीन कागदपत्रांची मागणी केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
चंद्रपूर : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत याआधी देशाचे पंतप्रधान प्रचारासाठी आले नव्हते, किंवा गृहमंत्री देखील प्रचारात सहभागी झाले नाहीत. पंतप्रधान व गृहमंत्री यांची नजर मुंबईवर आहे. त्यांना महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्यासाठी मुंबईला लुटायचे आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचे आहे. त्यांची वाईट नजर मुंबईवर आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. काँग्रेसचे […] The post मुंबईवर भाजपची वाईट नजर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : देशात सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सायबर ठग आता फेक लिंक किंवा बनावट ऍप्सच्या माध्यमातून नव्हे, तर मोबाईलमधील एक सर्वसामान्य फीचर वापरून लोकांची फसवणूक करत आहेत. या नव्या प्रकाराला कॉल फॉरवर्डिंग स्कॅम असे म्हटले जाते. यामुळे बँक खात्यांपासून सोशल मीडिया अकाउंटपर्यंत सर्व काही धोक्यात येऊ शकते. या गंभीर धोक्याबाबत गृह मंत्रालयाअंतर्गत […] The post देशात ‘कॉल फॉरवर्डिंग स्कॅम’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील ८६ हजार एसटी कामगारांचा पगार रखडला
मुंबई : प्रतिनिधी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यातील एसटी महामंडळाच्या ८६ हजारांहून अधिक कर्मचा-यांचा पगार रखडला आहे. एसटी कर्मचा-यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला देऊ, असे आश्वासन परिवहनमंत्र्यांनी गेल्या वर्षी दिले होते. मात्र बुधवारी सायंकाळपर्यंत पगाराचा ‘जीआर’ही काढण्यात आला नाही. त्यामुळे ‘सात’चा मुहूर्त चुकण्याबरोबर जीआर जारी न केल्यामुळे पगार नेमका होणार कधी? असा प्रश्न एसटी कर्मचा-यांना […] The post राज्यातील ८६ हजार एसटी कामगारांचा पगार रखडला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची ‘फ्री स्टाईल’ हाणामारी
नाशिक : प्रतिनिधी राज्यात सध्या महापालिकेच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. पक्षाचा प्रचार करण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. अनेक राजकीय पक्ष पुरुषांसोबतच महिलांना रोजंदारी देऊन प्रचारात सहभागी करून घेतात. सामान्यत: या महिलांना तीनशे ते पाचशे रुपये एवढी मजुरी दिली जाते. अशाच एका प्रचारादरम्यान महिलांमध्ये पैसे न दिल्याच्या रागातून तुफान हाणामारी झाली असल्याचे पाहायला मिळाले आहे. सदर […] The post प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची ‘फ्री स्टाईल’ हाणामारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
यजुवेंद्र चहल-धनश्री वर्मा पुन्हा एकत्र
मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेटपटू यजुवेंद्र्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. यजुवेंद्र चहल आणि धनश्री यांनी कोर्टात माहिती दिली की, गेल्या १८ महिन्यांपासून ते विभक्त राहत आहेत. परंतु ‘द ५०’ या रिअॅलिटी शोमध्ये धनश्री आणि यजुवेंद्र्र चहल एकत्र सहभागी होतील, असे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. यजुवेंद्र चहल आणि […] The post यजुवेंद्र चहल-धनश्री वर्मा पुन्हा एकत्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दाक्षिणात्य थ्रिलर चित्रपटांमधून प्रेरणा घेऊन ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. बेलतरोडी पोलिसांनी ही कारवाई करत खंडणीचा कट उधळून लावला. मुख्य आरोपी बहिणीच्या लग्नासाठी आर्थिक अडचणीत असल्याने त्याने हा गुन्हा केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील तक्रारदार प्रकाश ढगे हे भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षक आहेत. १७ डिसेंबर २०२५ रोजी ते भंडाऱ्याहून नागपूरकडे परत येत असताना वेळाहरी बायपास रोडवर आरोपींनी त्यांची कार अडवली. कारच्या मागील आणि समोरील दरवाज्याच्या काचा फोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेनंतर १९ डिसेंबर २०२५ रोजी ढगे यांना अज्ञात क्रमांकावरून धमकीचा फोन आला. फोनवरील आरोपींनी ढगे यांना, तुम्हाला मारण्यासाठी २० लाखांची सुपारी देण्यात आली आहे. जीव वाचवायचा असेल तर ५० लाख रुपये द्या, अशी धमकी दिली. आरोपींनी जबलपूर रिंगरोडवरील महादेव ढाब्यावर पैसे आणण्यास सांगितले. ढगे यांनी तात्काळ बेलतरोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सापळा रचून बनावट नोटांनी भरलेली बॅग ढगे यांच्याकडे देऊन त्यांना ठरलेल्या ठिकाणी पाठवले. मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी बॅग घेऊन पसार झाले. या घटनेनंतर आरोपींनी सतत सिमकार्ड आणि मोबाईल फोन बदलत वेगवेगळ्या ठिकाणी पैसे आणण्यास सांगण्यास सुरुवात केली. २९ डिसेंबर २०२५ रोजी पुन्हा धमकीचा फोन करून ढगे आणि त्यांच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक तपास करत मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन ट्रॅकिंग आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांत छापे टाकून पोलिसांनी अखेर सर्व आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अतुल अनिल तागडे (वय ३०, रा. देवरी, गोंदिया), राहुल मीताराम पटले (वय २१), हिंदुस्तान वासुदेव रामटेके (वय २७), निखिल राजू नांदेकर (वय २८) आणि प्रेक्षा बाबू कांबळे (वय ३०) यांचा समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतुल तागडे हा देवरी येथे मोबाईल शॉपी चालवतो. तो बहिणीच्या लग्नासाठी मोठ्या आर्थिक अडचणीत होता. प्रेक्षा कांबळे ही त्याची मावस बहीण असून ती भंडारा येथील भूमी अभिलेख कार्यालयात लिपीक म्हणून कार्यरत आहे. 'विक्रम' आणि 'शिवाजी द बॉस' यांसारख्या दाक्षिणात्य थ्रिलर चित्रपटांमधून प्रेरणा घेऊन त्यांनी हा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पीएमपीएमएलचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी आज पुण्यात भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, सुधीर काळे यांचा भाजपमध्ये उशिराने प्रवेश झाला असला तरी, ते पक्षात यावे अशी आमची इच्छा होती. निवडणुकीला अवघा एक आठवडा शिल्लक असताना कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आम्हाला अभिमान आहे. काळे यांची सर्वसमावेशक काम करणारा नेता अशी प्रतिमा आहे. त्यांच्यासारखे कार्यकर्ते सोबत आल्याने पक्षाचा उत्साह वाढतो, असेही मोहोळ यांनी नमूद केले. मोहोळ यांनी पुढे सांगितले की, सुधीर काळे यांना अनेक वर्षांचा राजकीय अनुभव आहे आणि पक्षात त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल. एक चांगला आणि कार्यक्षम नेता भाजपमध्ये आल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये आल्याचा त्यांना कधीही पश्चाताप वाटणार नाही, याची जबाबदारी आमची आहे, असे आश्वासनही मोहोळ यांनी दिले. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि राजेश येनपुरे उपस्थित होते. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सुधीर काळे यांचे पक्षात स्वागत केले. काळे यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असून, जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपमध्ये त्यांचे आगमन महत्त्वाचे आहे. केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेत असून, पुण्यात पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकेल, अशी स्थिती आहे, असे घाटे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'विकसित भारत' आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'विकसित महाराष्ट्र' हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. पुणे महानगरपालिकेतून १२५ नगरसेवक निवडून येऊन प्रभागाचे नेतृत्व करतील, असा विश्वास घाटे यांनी व्यक्त केला. मागील मनपा निवडणुकीत सुधीर काळे आणि आपण विरोधात लढलो असलो तरी, आमचे मैत्रीपूर्ण संबंध कायम होते, असेही त्यांनी सांगितले. संघाचे स्वयंसेवक राहिलेले काळे अनेक वर्षे काँग्रेसमध्ये होते आणि आता ते भाजपमध्ये आले आहेत. त्यांचा सन्मान पक्षात कायम राहील आणि प्रभागाचा विकास एकत्रितपणे पुढे नेऊ, असा विश्वास घाटे यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक २७ मध्ये त्यांच्या विजयात काळे यांचा वाटा महत्त्वपूर्ण राहील, असेही ते म्हणाले. आपल्या पक्षप्रवेशावेळी बोलताना सुधीर काळे म्हणाले की, आजपासून मी भाजपचा एक घटक झालो आहे. अनेक कार्यकर्त्यांच्या साथीने मी आतापर्यंत काम करत आलो आहे. ज्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काँग्रेसमध्ये काम केले, त्याच पद्धतीने यापुढेही भाजपमध्ये काम करत राहीन. शहरातील भाजप उमेदवारांचा मी यापुढे प्रचार करणार आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या कामांनी प्रेरित होऊन आज मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असे काळे यांनी स्पष्ट केले.
‘ना खान, ना बाण. आता फक्त भगव्याची शान’, अशी नवी घोषणा गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केली. येथील युती फक्त शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमुळे तुटली असा दावा त्यांनी केला. सोबतच शहर खड्डेमुक्त करू. संभाजीनगरचा पाणीप्रश्न दोन महिन्यात सोडवू, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यात त्यांनी संभाजीनगरच्या विकासासाठी करण्यात आलेल्या योजना तसेच निधींच्या तरतुदीबद्दल माहिती दिली. तसेच शहराच्या विकासाचे नवे व्हीजनही मांडले. संभाजीनगरात खड्डेमुक्त रस्ते होणार देवेंद्र फडणवीस म्हणाले, डीएमआयसीमध्ये देखील आपल्याला अधिकची जागा लागणार आहे. दोन एमआयडीसीला जोडण्याचे काम हाती घेतले आहे. 2015 साली छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यांसाठी 100 कोटी दिले होते आणि तेव्हापासून रस्ते आपल्याला मोठे करता येतात ही भावना तयार झाली. आता मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. शहरातील सगळे डीपी रोड अतिक्रमणमुक्त करणार असल्याचा अजेंडा असणार आहे. तसेच खड्डेमुक्त संभाजीनगर आपल्याला पाहायला मिळेल. पुढील 2 महिन्यात पाण्याचा प्रश्न सुटेल पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहिल्यांदा तर आपल्या सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे की आज आपण पाण्याच्या योजनेच्या पंपाची चाचणी यशस्वी केली आहे. इथला जो पाण्याचा प्रश्न होता, मागच्यावेळी मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आपण एका झटक्यात 1600 कोटींची योजना आपण मंजूर केली होती. तसेच अनुदानावर ही योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरेंची सत्ता आल्यानंतर या योजनेचा खोळंबा झाला. आता ही योजना 2700 कोटींची झाली असून पुढील 2 महिन्यात पाण्याचा प्रश्न सुटेल. औद्योगीक विकासामुळे संपूर्ण शहराचा विकास होणार औद्योगिक विकासासोबत आपल्याला अर्बन इनफ्रास्ट्रक्चर देखील सुरू विकसित करावे लागणार आहे. 2014 साली मोदीजी जेव्हा सत्तेवर आले तेव्हा शहराचच्या विकासावर काम करण्यास सुरू केले. संभाजीनगर सारख्या शहराला पूर्वी निधी मिळत नव्हता, आता शहरांच्या विकासासाठी निधी पुरवठा केला जात आहे. तसेच जोपर्यंत शहराचा आर्थिक विकास होत नाही, तोपर्यंत अर्बन इनफ्रास्ट्रक्चर कोपअप होत नाही. या औद्योगीक विकासामुळे संपूर्ण शहराचा विकास होणार आहे, असे आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले. एआयबाबतचे जागतिक सतरावरील काम संभाजीनगरातून उद्योजकासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्योजक संभाजीनगरच्या प्रेमात पडतात. आता दावोसमधून संभाजीनगरसाठी आणखी निधी आणणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी आश्वासन दिले आहे. इतकेच नव्हे तर एआयबाबतचे जागतिक सतरावरील काम संभाजीनगरातून होत असल्याची देखील माहिती फडणवीस यांनी दिली आहे. समृद्धी महामार्गाची कल्पना कधी आली? समृद्धी महामार्गासारखा महामार्ग असावा अशी कल्पना कधी आली? असा प्रश्न विचारण्यात आला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, याची कल्पना मी 2001 साली महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडली होती. नागपूर ते मुंबई असा महामार्ग तयार करण्यात यावा, अशी माझी कल्पना होती. त्याकाळी मी कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेसवे म्हटले होते, तेव्हा आयटीचा कल होता. परंतु, तेव्हा ते झाले नाही. पण जेव्हा मी 2014 ला मुख्यमंत्री बनलो आणि या महामार्गाचे काम सुरू करण्याचे ठरवले. नागपूर ते मुंबई अशी मी सरळ रेष मारली आणि असा रोड आपल्याला हवा आहे, असे मी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांना सांगितले की या महामार्गासाठी एक इंच जागा देऊ नका, पण मी यावर मात करत हा रस्ता पूर्ण केला. औरंगजेबाची निशाणी जपण्याची गरज नाही छत्रपती संभाजीनगर शहराविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, इतिहास पुसायचा नाही, पण इतिहासातून ज्या ठिकाणी गुलामगिरीची जाणीव होते त्या ठिकाणी मात्र जो खरा इतिहास आहे तो मांडायचा आहे. औरंगजेब हा काही भारतीय नव्हता, अगदी भारतीय मुस्लिम समाजाचा सुद्धा तो हीरो नव्हता. त्याने आक्रमण करून हिंदूंची मंदिरे पाडली, त्यामुळे त्याची निशाणी जपण्याची गरजच नाही. हिंदवी स्वराज्याचे तेज छत्रपती संभाजी महाराजांचे असे जीवंत ठेवले की औरंगजेबाची कबर इथे तयार झाली पण हिंदवी स्वराज्य संपले नाही. ना बाण ना खान, राखो भागव्याची शान छत्रपती संभाजीनगरमधील महापालिकेची निवडणूक ही बाण की खान अशी व्हायची, यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ना बाण ना खान, राखो भागव्याची शान, अशी नवी घोषणाच फडणवीस यांनी यावेळी दिली. मी एक गोष्ट स्पष्ट सांगतो, आम्ही खूप प्रयत्न केला शिवसेनेसोबत युती करायचा. दुर्दैवाने इथली शिवसेना ही स्प्लिट होती. शिवसेनेत काही गट होते, त्यामुळे एकाने प्रस्ताव मान्य केला की दूसरा त्यावर आक्षेप घ्यायचा. असे चार पाच वेळा झाल्यानंतर मी म्हणायचो चला नवीन प्रस्ताव मांडू. संजय शिरसाट यांच्याशी देखील मी चर्चा केली. पण दुर्दैवाने निर्णय होऊ शकला नाही आणि त्यांनी युती तोंडली. याचे मला दुःख झाले. याचा अर्थ असा नाही की आम्ही शत्रू आहोत, आमची मैत्रीपूर्ण लढत असणार आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, यावेळी भगव्याचा विषय येईल तेव्हा आम्हाला विचार करावाच लागेल. जे भगव्याची पाठराखण करतील त्यांना आम्ही सोबतच ठेऊ.
सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पोलिस दलाने गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कडक पावले उचलली असून, यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला मोठा झटका बसला आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आझम काझी यांच्यासह त्यांच्या टोळीतील एकूण आठ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, उद्या ९ जानेवारी रोजी मिरजेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होणार असतानाच ही कारवाई झाल्याने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही धडक कारवाई केली आहे. टोळीप्रमुख शोएब ऊर्फ मोहमद युसूफ साहेबपीर चमनमलीक काझी, मतीन काझी, अक्रम काझी, रमेश कुंजीरे, अस्लम काझी, उमेदवार आझम काझी, अल्ताफ रोहीले आणि मोहसिन गोदड या आठ जणांना सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या मुद्द्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये एकमेकांवर जोरदार टीकास्त्र डागले जात होते, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. जिल्ह्याच्या इतर भागांतही पोलिसांचे हद्दपारीचे सत्र केवळ मिरजच नव्हे, तर कुपवाड, विटा आणि आटपाडी भागातही पोलिसांनी गुन्हेगारांना कडक दणका दिला आहे. कुपवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुरज ऊर्फ रमजान मौला शेख, शब्बीर शेख, सौरभ जावीर आणि अर्जुन गेजगे या चौघांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. विटा येथील राजाराम बोडरे आणि सुदाम बोडरे यांच्यावरही सहा महिन्यांची हद्दपारी लादली आहे. आटपाडी येथील जितेंद्र ऊर्फ जिच्या काळे आणि त्याच्या टोळीला सांगली, सोलापूर आणि सातारा अशा तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल सतर्क ही धाडसी कारवाई पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्यासह मिरज, कुपवाड, विटा आणि आटपाडी येथील पोलिस निरीक्षकांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आगामी महानगरपालिका निवडणूक निर्भय आणि शांत वातावरणात पार पडावी यासाठी पोलिस दल पूर्णपणे सतर्क असल्याचे या कारवाईतून दिसून येत आहे. हे ही वाचा… अजित पवारांना पुण्यात मोठा धक्का:सचिन खरातांची निवडणुकीतून तडकाफडकी माघार, आता गुन्हेगार उमेदवारांची जबाबदारी कोणावर? पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट दिल्यावरून सुरू असलेल्या वादात अजित पवारांनी ज्यांच्याकडे बोट दाखवले होते, त्या सचिन खरात यांनीच आता निवडणुकीतून तडकाफडकी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा…
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी टोक गाठले आहे. कुख्यात गुंड नीलेश घायवाळ प्रकरणातील गुन्हेगारांना परदेशात पळून जाण्यासाठी मदत केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर करण्यात आला होता. अजित पवारांनी देखील मोहोळ यांच्यावर या संदर्भात टीका करत आरोप केला होता. या आरोपांमुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता स्वतः मुरलीधर मोहोळ यांनी यावर आक्रमक पवित्रा घेतला आहे. माझ्यावर झालेले आरोप सिद्ध करून दाखवा, जर ते सिद्ध झाले तर मी आजच राजकारणातून संन्यास घेईन, असे थेट आव्हान मोहोळ यांनी दिले आहे. पुण्यातील गुन्हेगारी आणि टोळीयुद्ध हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. नीलेश घायवाळ या कुख्यात गुंडाशी संबंधित काही गुन्हेगारांवर पोलिसांची कारवाई सुरू असताना, त्यांना देशाबाहेर पळून जाण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी रसद पुरवली आणि राजकीय दबावाचा वापर करून मदत केली, असा खळबळजनक आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. गुन्हेगारांना कायदेशीर कचाट्यातून वाचवण्यासाठी मोहोळ यांनी आपले वजन वापरले आणि त्यांना विदेशात सुरक्षित स्थळी धाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असे या आरोपांचे स्वरूप आहे. निवडणुकीच्या काळात हा मुद्दा समोर आल्याने मोहोळ यांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. आरोप सिद्ध न झाल्यास त्यांनी संन्यास घ्यावा या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, निवडणूक जवळ आली की अशा प्रकारचे बिनबुडाचे आणि खालच्या पातळीवरचे आरोप करणे ही विरोधकांची पद्धत झाली आहे. मी कोणत्याही गुन्हेगाराला कधीही मदत केलेली नाही. ज्यांनी माझ्यावर हे आरोप केले आहेत, त्यांना मी जाहीर आव्हान देतो की त्यांनी पुरावे समोर आणावेत. जर हे आरोप खरे ठरले तर मी राजकारणातून कायमची एक्झिट घेईन. मात्र, जर आरोप खोटे ठरले तर ज्यांनी हे आरोप केले आहेत, त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची हिंमत दाखवावी, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. एकाच व्यासपीठावर चर्चेचे आव्हान मुद्दयाचे राजकारण करण्याऐवजी विरोधक वैयक्तिक चिखलफेक करत असल्याचे सांगत मोहोळ यांनी चर्चेचे निमंत्रण दिले आहे. या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी मी कोणत्याही व्यासपीठावर यायला तयार आहे. विरोधकांनी समोरासमोर येऊन बोलावे आणि पुराव्यानिशी चर्चा करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आव्हानामुळे आता विरोधक यावर काय भूमिका घेतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून पुण्याचे राजकारण आता अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
डॉ. प्रवीण बीडकर आणि डॉ. अनघा बीडकर यांचे संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातले कार्य उल्लेखनीय आहे. कोविडसारख्या भीतीदायक काळात त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या कामातून विशेष योगदान दिले, असे कोडकौतुक मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. डॉ. प्रवीण बीडकर आणि डॉ. अनघा बीडकर यांच्या रुग्णालयाचा उद्घाटन व स्थानांतर कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमधील न्यू उस्मानपुरातल्या श्री गोविंद भुवन येथे झाला. यावेळी ते बोलत होते. तीस वर्षांनंतर… नवीन वर्षाच्या सुरुवातीला तीस वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर डॉ. प्रवीण बीडकर व डॉ. अनघा बीडकर यांच्या संकल्प मल्टीस्पेशालिटी होमिओपॅथिक दवाखान्याचे स्थानांतर श्री गोविंद भुवन उस्मानपुरा येथे झाले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून मंत्री अतुल सावे व प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि फित कापून हा सोहळा पार पडला. सहज, सुलभ उपचार कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, जनसामान्यात होमिओपॅथीचा प्रसार, प्रचार आणि लोकप्रियता वाढली आहे. सहज आणि सुलभ उपचार पद्धतीमुळे हे शक्य झाल्याचे ते म्हणाले. आयुष मंत्रालयाकडून होमिओपॅथिक संशोधनकार्यासाठी व अभ्यासासाठी उपलब्ध असलेल्या विविध योजना व निधीची डॉ. भागवत कराड यांनी माहिती दिली. विविध आजारांवर संशोधन माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांनी यावेळी डॉ. प्रवीण बीडकर आणि डॉ. अनघा बीडकर यांनी होमिओपॅथिक क्षेत्रात केलेल्या विविध कामांची, संशोधन प्रबंधांची व कोविड काळातील सामाजिक कार्याची प्रशंसा केली. 'व्हीएचएफ'चे अध्यक्ष डॉ. माळी यांनी बीडकर यांचा आंत्र ग्रंथी, विविध क्लिष्ट आजार, कॅन्सर, मुतखडा, गर्भाशयातील आणि स्तनातील गाठी, बालदमा, मुळव्याध, त्वचा विकार उपचारात हातखंडा असल्याचे सांगितले. तसेच डॉ. प्रवीण बीडकर यांच्या संशोधनकार्याची, विविध आजारांवर सादर केलेल्या शोध निबंध, प्रबंधांची राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय व आंतरराष्ट्रीय शोध परिषदांमध्ये झालेल्या सहभागांची तपशीलवार माहिती दिली. बुलढाणा केस गळती नाशिक विज्ञान विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. अजित फुंदे यांनी आयुष मंत्रालयातील संशोधन, अभ्यास, रुग्णसेवेसाठी आयुष हॉस्पिटलच्या विविध योजना व निधी उपलब्धतेची माहिती दिली. डॉ. प्रवीण बीडकर व 'व्हीएचएफ' टीमच्या सर्व डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी म्हणून बुलढाणा येथील कठोरा गावातील केस गळती साथ रोगाच्या व त्वचा विकारात केलेले उपचार व संशोधनपर कार्याचे महत्त्व विषद केले. या कामाची राष्ट्रीय संशोधन समिती (आयसीएमआर) दखल घेतल्याचा उल्लेख त्यांनी केला. कार्यक्रमाला 'व्हीएचएफ'चे सचिव डॉ. गंगवाल, उपसचिव डॉ. गोपाळघरे, डॉ. व्यवहारे, डॉ. मुसमाडे, डॉ. पटेल, डॉ. थोरात, डॉ. वैशाली. डॉ. हिना, डॉ. लुनिया, डॉ. समीक्षा आदी होमिओपॅथिक तज्ज्ञ उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचलन प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाची रूपरेषा व आयोजनात संजय खनाळे यांनी मार्गदर्शन केले, तर आदित्य बीडकर यांनी आभार मानले.
डॉक्टरविना चीनमध्ये ६० सेकंदात तपासणी, औषधही हजर!
बीजिंग : वृत्तसंस्था चीनने तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगाला पुन्हा एकदा थक्क केले. सोशल मीडियावर सध्या चीनमधील एका अशा रुग्णालयाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जिथे एकही डॉक्टर प्रत्यक्ष हजर नसताना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. हे एआय संचालित क्लिनिक (एआय क्लिनिक) पाहून नेटिझन्स म्हणत आहेत की, ‘चीन सध्या ३०२६ सालात जगत आहे. व्हायरल व्हिडीओमधील हे रुग्णालय म्हणजे […] The post डॉक्टरविना चीनमध्ये ६० सेकंदात तपासणी, औषधही हजर! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली शहरातील गाडीपूरा भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी ता. ८ एका घरावर छापा टाकून १.५५ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. मागील तीन दिवसांतील हि दुसरी कारवाई आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात एका व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात पोलिस अधिक्षक निलभ रोहन रुजु झाल्यानंतर त्यांनी जिल्हाभरातील अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या शिवाय गुटखा, जुगार अड्यावर छापे टाकून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असून त्यासाठी स्थानिक पोलिसांसोबतच स्थानिक गु्ुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक माधव जिव्हारे, दिलीप मोरे यांचे पथक सतर्क केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात अवैध व्यवसायाचे उच्चाटन करण्यासाठी पोलिस विभागाने छापासत्र सुरु केले आहे. जुगार अड्डा, मटका अड््डयाची माहिती घेऊन छापे टाकले जात आहेत. या शिवाय गुटखा विक्रीवर कारवाई केली जात आहे. हिंगोली शहरातील गाडीपूरा भागात एका घरामध्ये गुटखा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक घेवारे, उपनिरीक्षक जिव्हारे, जमादार सतीष जाधव, किशोर सावंत, आझम प्यारेवाले, विशाल खंडागळे, नरेंद्र साळवे, ज्ञानेश्वर गोरे, महादू शिंदे, दिलीप बांगर, शंकर हराळ, आकाश टापरे, महिला पोलिस कर्मचारी सुरेखा अत्राम यांच्या पथकाने आज स्वप्नील उबाळे याच्या घरावर छापा टाकला. यामध्ये घरात विमल पानमसाला, राजनिवास सुगंधित पानमसाला, सुगंधित व्ही एक तंबाखू, प्रिमीयम राजनिवास पानमसाला, गोवा गुटखा, रजनीगंधा पानमसाला सापडला. पोलिसांनी १.५५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून स्वप्नील याच्या विरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हे ही वाचा… औंढ्यात बीडिओंच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून मिरवणूक:ठाकरे गटाचे आंदोलन, योजनांचे अनुदान वाटप करण्याची मागणी औंढा नागनाथ तालुक्यात विविध योजनेमध्ये लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान द्यावे या मागणीसाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ता. ८ दुपारी गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवा वरून मिरवणुक काढली. त्यानंतर पंचायत समिती कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे. सविस्तर वाचा…
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन
पुणे : प्रतिनिधी देशातील पर्यावरण चळवळीला दिशा देणारे, निसर्ग आणि माणसातील नातं जपण्याचा सातत्याने आग्रह धरणारे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. अल्पशा आजाराने पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्पिटल येथे मंगळवारी (७ जानेवारी) रात्री ११ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने पर्यावरण संवर्धन, जैवविविधता आणि शाश्वत विकासासाठी आयुष्यभर […] The post ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
औंढा नागनाथ तालुक्यात विविध योजनेमध्ये लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान द्यावे या मागणीसाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ता. ८ दुपारी गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवा वरून मिरवणुक काढली. त्यानंतर पंचायत समिती कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे. औंढा नागनाथ पंचायत समिती अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजनेमधे लाभार्थ्यांना घरकुलाच्या अनुदानाचा हप्ता देण्यात आलेला नाही. काही लाभार्थ्यांना पहिला हप्ता काही जणांना दुसरा देण्यात आला. या अनुदानामुळे लाभार्थ्यांनी त्यांची कच्ची घरे पाडून पक्की घरे बांधण्यास सुरवात केली. मात्र मागील काही दिवसापासून अनुदानाचा हप्ताच देण्यात आला नाही. त्यामुळे लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. या शिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत विहीरीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मागील सहा ते आठ महिन्यापासून त्यांचेही अनुदान वाटप झाले नाही. हिच परिस्थिती जनावरांच्या गोठ्याच्या बांधकामाबाबत आहे. कामांचे हजेरीपत्रक बंद झाल्यामुळे मजूरांची मजूरी थकली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, लाभार्थ्यांचे अनुदान तातडीने वाटप करण्याच्या मागणीसाठी लाभार्थ्यांनी वेळोवेळी कार्यालयाकडे चकरा मारल्या मात्र अनुदान वाटप झाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी ता. ८ दुपारी गटविकास अधिकाऱ्यांचा प्रतिकात्मक पुतळा तयार करून त्याची गाढवावरून मिरवणुक काढण्यात आली. औंढा नागनाथ बसस्थानकावरून काढण्यात आलेली मिरवणुक पंचायत समिती कार्यालयावर आल्यानंतर त्या ठिकाणी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी ठाकरे गटाचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर झटे, माऊली मगर, दत्ता अंभोरे, संजय भामिरगे, डॉ. चंद्रमणी पाईकराव, विष्णू कटके, पांडूरंग मेटकर, सुरेश दळवी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पंधरा दिवसानंतर कुटुंबासह आंदोलन करणार औंढा तालुक्यातील लाभार्थ्यांना अनुदानाचे हप्ते वाटप करण्यास पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पंधरा दिवसांत अनुदान न मिळाल्यास लाभार्थी कुटुंबासह पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना, मनसे नेते अमित ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबातील वैयक्तिक आठवणी, राजकीय भूमिका आणि स्वतःच्या प्रवासाबाबत मोकळेपणाने भाष्य करत एक भावनिक चित्र उभं केलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी आजोबा बाळासाहेब ठाकरे, मातोश्री, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी संबंधित आठवणी सांगत, राजकारणापलीकडचं ठाकरे कुटुंबाचं वास्तव समोर आणलं. या संवादातून ठाकरे कुटुंबातील नातेसंबंध, मतभेद आणि काळानुसार बदललेली परिस्थिती स्पष्टपणे जाणवली. अमित ठाकरे म्हणाले की, माझे आजोबा नेमके काय होते, हे मला खूप उशीरा समजू लागलं. लहानपणी मातोश्रीवर जात असताना बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मोकळेपणाने बोलायचे. त्या काळात मातोश्रीवर कोणतंही राजकीय वातावरण नव्हतं, अशी आठवण त्यांनी सांगितली. आजोबा आणि नातवामधील नातं हे अत्यंत साधं आणि आपुलकीचं होतं. लहान वयात राजकारणाची जाणीव नसतानाही, त्या घरातील माणुसकी आणि स्नेह त्यांच्या मनावर खोलवर ठसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बालपणीच्या आठवणी सांगताना अमित ठाकरे अधिकच भावूक झाले. मीना ताई मातोश्रीवर असायच्या, त्या गेल्या तेव्हा मी केवळ तीन-चार वर्षांचा होतो, असं सांगत त्यांनी त्या काळाचा उल्लेख केला. लहानपणी डोळे बारीक असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे त्यांना प्रेमाने ‘ब्रुस ली’ म्हणायचे. मातोश्रीवर गेलो की आजा विचारायचे,आलास का रे ब्रुस ली?, अशी गंमतीशीर आठवण त्यांनी सांगितली. या आठवणींमधून बाळासाहेब ठाकरे यांचा घरातील आजोबा म्हणून असलेला हळवा स्वभाव अधोरेखित झाला. त्या काळात आदित्य ठाकरे यांच्याशी असलेली जवळीकही अमित ठाकरे यांनी सांगितली. मी आदित्यकडे खूपदा जायचो. पहिलीत असताना आदित्यकडेच मी बॅटमॅनचा चित्रपट पाहिला, असं ते म्हणाले. मात्र, राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर हे सगळं अचानक थांबलं, असं त्यांनी नमूद केलं. राजकीय फाटाफुटीचा परिणाम कुटुंबातील वैयक्तिक संबंधांवर कसा झाला, हे त्यांच्या या विधानातून स्पष्टपणे समोर आलं. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत बोलताना अमित ठाकरे यांनी युतीला उशीर झाला, हा दावा ठामपणे फेटाळून लावला. ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मतभेद होते, हे सत्य आहे. मात्र, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांना एकत्र यावंसं वाटलं. प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ आणि एक नशीब असतं. योग्य वेळ आली की गोष्टी घडतात, असं सांगत त्यांनी शिवसेना आणि मनसेच्या जवळिकीचं समर्थन केलं. त्यांच्या मते, या युतीला उशीर झाला असं म्हणणं चुकीचं आहे. मनसेच्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना अमित ठाकरे यांनी वडील राज ठाकरे यांच्याविषयी कृतज्ञतेने उल्लेख केला. माझ्या वडिलांनी प्रचंड कष्ट करून मनसे पक्ष उभा केला. एकेकाळी मनसेचे 13 आमदार निवडून आले, अनेक नगरसेवक होते आणि नाशिक महानगरपालिकेत सत्ता आली, असं त्यांनी सांगितलं. त्या काळात मनसेने प्रशासन आणि विकासाच्या दृष्टीने चांगलं काम केल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, 2014 नंतर पक्षाचा उतरता काळ सुरू झाला, हेही त्यांनी प्रामाणिकपणे मान्य केलं. याच उतरत्या काळात आपण राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं अमित ठाकरे यांनी सांगितलं. पक्षाच्या चढत्या काळात येण्यात काही अर्थ नव्हता. उतरत्या काळात वडिलांना एकटे पडू द्यायचं नव्हतं, असं ते म्हणाले. राजकारणात विशेष रस नसतानाही, वडिलांना मदत करण्यासाठी आपण पुढे आलो, अशी भूमिका त्यांनी मांडली. दोन वर्षे मेहनत घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पक्षात जबाबदारी दिल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीवर होणाऱ्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिलं. गेल्या दहा वर्षांत आम्ही सत्तेत नाही. आमचा पैसा हा आमच्या व्यवसायातून आलेला आहे, असं स्पष्ट करत त्यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिलं.
प्रचार साहित्य महागले; झेंडे, बिल्ले, टोप्यांना मोठी मागणी
मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाचा दिवस जवळ येत असल्याने उमेदवारांच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर अनेक उमेदवार भर देत आहेत. प्रचारावेळी आपाल्या पक्ष व पक्षचिन्हाची ठळक ओळख मतदारांना व्हावी यासाठी प्रचार साहित्याची खरेदी जोरात सुरू आहे. सध्या बाजारात टोपी, बिल्ले, […] The post प्रचार साहित्य महागले; झेंडे, बिल्ले, टोप्यांना मोठी मागणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भाजपने नाकारलेल्या उमेदवारांना पालकमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली आहे, असा आरोप भाजपचे पुणे शहर निवडणूक प्रमुख गणेश बीडकर यांनी केला आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची सखोल छाननी केली होती. पक्षाच्या अपेक्षेनुसार काम न करणारे, चुका करणारे आणि कामगिरीत अपयशी ठरलेल्या काही जणांची उमेदवारी भाजपने नाकारली होती, असे बीडकर म्हणाले. बीडकर यांनी सांगितले की, भाजपमधील एकही माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेला नाही. पक्षात कोणतीही नाराजी नसून कार्यकर्ते पूर्ण ताकदीने निवडणुकीसाठी काम करत आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या एका आमदाराचा मुलगा आणि सून भाजपकडून निवडणूक लढवत असल्याचा मुद्दाही मांडला. पुणे शहरातील भाजपचे संघटन मजबूत असून, ११० माजी नगरसेवकांच्या सोबतीने यंदा १२० नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे शहराच्या विकासावर बोलताना बीडकर यांनी भाजपच्या कामांचा उल्लेख केला. भाजपने विविध विकासकामांच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. मेट्रोचे विस्तारीकरण, नदीपात्र सुशोभीकरण, २४x७ पाणीपुरवठा योजना, अत्याधुनिक विमानतळ टर्मिनल, चांदणी चौक पुनर्विकास, रिंग रोड, उड्डाणपूल आणि रस्ते रुंदीकरण यांसारख्या प्रकल्पांमुळे पुणे झपाट्याने बदलत आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुणे शहराकडे विशेष लक्ष असून, राज्याच्या 'ग्रोथ इंजिन' म्हणून पुण्याकडे पाहिले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजप-शिवसेना युतीबाबत बोलताना बीडकर यांनी स्पष्ट केले की, युतीसाठी प्रयत्न झाले होते. मात्र, काही स्वार्थी लोकांनी अडथळे निर्माण केले. भाजपच्या नगरसेवक असलेल्या जागांवरही मागणी करण्यात आली, तसेच एकाच घरातून दोन तिकिटांची मागणी झाल्यामुळे युती होऊ शकली नाही, असे त्यांनी सांगितले. बीडकर यांनी निवडणुकीतील मुख्य लढत राष्ट्रवादी काँग्रेसशीच असल्याचे म्हटले. त्यांनी अजित पवारांवर टीका करताना सांगितले की, कोयता गँग आणि गुन्हेगारीवर बोलण्याचा नैतिक अधिकार राष्ट्रवादीकडे राहिलेला नाही, कारण त्यांच्या उमेदवार यादीतच गुन्हेगारी प्रवृत्ती दिसून येते. अजित पवार पालकमंत्री असताना मेट्रो भूमिगत की उड्डाणपूल यावर सहा वर्षे चर्चा चालू होती, तसेच बीआरटी बसच्या दरवाजांवरून तीन वर्षे वाया गेली, असेही त्यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे पुण्याचा खरा विकास केवळ भाजपच्या काळातच होऊ शकतो, असा दावा बीडकर यांनी केला.
संजय राऊत-एकनाथ शिंदे यांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना असा टोकाचा संघर्ष सुरू असतानाच, राजकारणाच्या या रणधुमाळीत एक अत्यंत अनपेक्षित घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे एकमेकांसमोर आले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची यावेळी भेट घेतली. या दोन्ही कट्टर राजकीय शत्रूंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. […] The post संजय राऊत-एकनाथ शिंदे यांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सेनेशियो (Senecio) या इस्रायली संस्थेने बीव्हीजी इंडिया लिमिटेडसोबत (BVG India Limited) भारतात डासजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक महत्त्वाचा करार केला आहे. या सहकार्यामुळे रोबोटिक्स-आधारित आणि निसर्गाधारित सार्वजनिक आरोग्य उपायांना चालना मिळेल, ज्याचा उद्देश डासांवर दीर्घकाळ आणि सुरक्षित नियंत्रण मिळवणे आहे. या करारानुसार, भारतात प्रगत 'स्टेराइल इन्सेक्ट टेक्निक' (SIT) ही डास नियंत्रण उपाययोजना सुरू केली जाईल. सेनेशियो संस्थेने यापूर्वी सीओपी29 साठीच्या अधिकृत इस्रायली तंत्रज्ञान शिष्टमंडळात सहभाग घेतला होता, ज्यामुळे रोबोटिक्सच्या माध्यमातून विस्तारक्षम आणि निसर्गाधारित सार्वजनिक आरोग्य उपायसुविधा विकसित करण्यातील त्यांची भूमिका अधोरेखित झाली होती. या सहयोगाचा मुख्य भर भारतात स्थानिक उत्पादन क्षमता उभारणे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी प्रभावी मार्ग विकसित करण्यावर आहे. यासाठी केंद्र व राज्यस्तरीय प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य यंत्रणा तसेच तांत्रिक व औद्योगिक भागधारकांच्या समन्वयाने काम केले जाईल. स्थानिक गरजा, हवामान, पर्यावरण आणि सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन उपाय विकसित करण्यावर विशेष भर दिला जाईल. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश डासजन्य आजारांवर दीर्घकालीन, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक नियंत्रण मिळवणे आहे. पारंपरिक रासायनिक कीटकनाशकांमुळे इतर प्रजाती आणि परिसंस्थांना होणारी हानी टाळून, निसर्गाधारित व तंत्रज्ञान-सक्षम उपायांद्वारे डास प्रादुर्भाव रोखण्याच्या व्यवस्थापनाला पाठबळ देणे हा या प्रकल्पाचा गाभा आहे. रोबोटिक्स आणि स्मार्ट सिस्टीम्सच्या सहाय्याने निरीक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रण अधिक अचूक, कमी खर्चिक आणि प्रभावी बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. तज्ज्ञांच्या मते, हवामान बदल, शहरीकरण आणि वाढती लोकसंख्या यामुळे डासजन्य आजारांचा धोका वाढत असताना, अशा प्रकारचे शाश्वत आणि विस्तारक्षम उपाय सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहेत. भारतात स्थानिक उत्पादन आणि तंत्रज्ञान हस्तांतरणामुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, तसेच दीर्घकालीन आरोग्य व्यवस्थापन अधिक सक्षम होईल. या सहयोगामुळे भारतात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात नाविन्यपूर्ण, पर्यावरणस्नेही आणि भविष्यासाठी उपयुक्त उपायांची नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञ आणि डेक्कन कॉलेज विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर यांना गुरुकुल प्रतिष्ठानचा पहिला 'प्रा. डॉ. अशोक कामत सन्मान' जाहीर झाला आहे. हा सन्मान १७ जानेवारी रोजी डॉ. कामत स्मृतीदिन सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. सागर देशपांडे आणि विश्वस्त शिवप्रसाद कामत यांनी ही माहिती दिली. रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या गुरुकुल प्रतिष्ठानमार्फत या वर्षापासून डॉ. कामत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रात सक्रिय योगदान देणाऱ्या प्रतिभावंतांना सन्मानित करण्यात येणार आहे. पहिला सन्मान डॉ. देगलूरकर यांना दिला जाणार असून, यामध्ये ५१ हजार रुपये रोख, मानपत्र आणि ग्रंथभेट यांचा समावेश आहे, असे डॉ. देशपांडे यांनी सांगितले. हा कार्यक्रम १७ जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता भांडारकर संस्थेच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी 'संत विचार आणि संत साहित्य- वर्तमानकाळाची गरज' या विषयावर व्याख्यान देतील. युनेस्कोमधील पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा अष्टेकर आणि कार्यकारी संचालक डॉ. सदानंद महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संत साहित्याचे ज्येष्ठ भाष्यकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे संस्थापक-विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक कामत यांचे गेल्या वर्षी २६ जानेवारी रोजी निधन झाले होते. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये पीएच.डी. प्राप्त केलेल्या डॉ. कामत यांच्या मार्गदर्शनाखाली ३५ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संशोधन पूर्ण केले होते. त्यांनी संत नामदेव महाराजांचे विचार, कार्य यांसह अन्य भारतीय संतांच्या साहित्यावर विशेष संशोधन आणि लेखन केले. त्यांचे शंभराहून अधिक ग्रंथ प्रकाशित झाले असून, २३ वर्षांपूर्वी त्यांनी स्थापन केलेल्या गुरुकुल प्रतिष्ठानमार्फत अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवले होते. संत साहित्य लेखन आणि प्रसारासाठी त्यांना ६० हून अधिक पुरस्कारही मिळाले होते.
जळगावात गाडीला भीषण अपघात; ३ ठार
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या कन्नड घाटात भीषण अपघात झाला आहे. उज्जैन येथे देवदर्शनासाठी जाणा-या तिघांवर काळाने घाला घातला आहे. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिस या घटनेचा तपास करत असून जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उज्जैन येथे दर्शनासाठी […] The post जळगावात गाडीला भीषण अपघात; ३ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अजित पवारांविरोधातील पुरावे गेले कुठे?
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एकत्र आलेले उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली. या मुलाखतीआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या युतीला करप्शन आणि कन्फ्युजनची युती म्हटले, यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे यांनी सिंचन घोटाळ्यांवरून देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांची […] The post अजित पवारांविरोधातील पुरावे गेले कुठे? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे शहरात दररोज सुमारे ३४७ दशलक्ष लिटर (MLD) सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नद्यांमध्ये सोडले जात आहे. पुणे महानगरपालिका (PMC) गेल्या अनेक वर्षांपासून केवळ ३० ते ४० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करत असून, उर्वरित मोठ्या प्रमाणातील सांडपाणी नदीप्रवाहात मिसळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) पुणे मनपाला १४ फेब्रुवारी २०१९ रोजी स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशानुसार, मनपाने सात दिवसांच्या आत एक स्वतंत्र खाते उघडून त्यात दररोज ३४ लाख ७० हजार रुपये जमा करणे बंधनकारक होते. ही रक्कम प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सांडपाणी शुद्धीकरणासाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, माहिती अधिकारातून केलेल्या तपासणीत असे उघड झाले आहे की, पुणे मनपाने आजतागायत ना स्वतंत्र खाते उघडले, ना एक रुपयाही जमा केला. मनपाने या आदेशाचे पूर्णपणे उल्लंघन केले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जर मनपाने दररोज ही रक्कम जमा केली असती, तर आतापर्यंत एकूण रक्कम एक हजार कोटी रुपयांच्या पुढे गेली असती. या निधीमुळे पुण्यातील नद्या, भूजल आणि विहिरींच्या पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी मोठी मदत झाली असती. यावेळी विजय कुंभार आणि विवेक वेलणकर उपस्थित होते. वर्षानुवर्षे विनाप्रक्रिया सांडपाणी नदीत सोडल्यामुळे नदीतील मासे नष्टप्राय झाले आहेत. तसेच, उजनी धरणातील पाणी आणि नदीकाठच्या परिसरातील भूजल मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहे. यामुळे उजनी आणि सोलापूर भागात रोगराई पसरत असून, नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. इंदूरसारख्या स्वच्छ शहरात पाणी प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंच्या घटना पुण्यासाठीही एक इशारा असल्याचे यादवाडकर यांनी नमूद केले. या प्रकरणात केवळ पुणे महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित अधिकारीच नव्हे, तर आदेश असूनही कारवाई न करणारे राज्य सरकारही तितकेच जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. १०० टक्के सांडपाणी प्रक्रियेला प्राधान्य न देता केवळ सुशोभीकरणावर हजारो कोटी रुपये खर्च करणे बेजबाबदार आणि बेकायदेशीर असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या प्रकरणी जबाबदार असलेल्या सर्वांवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
खुर्चीसाठी विचारधारेशी तडजोड नाही: उपमुख्यमंत्री शिंदे
मुंबई : प्रतिनिधी अंबरनाथमध्ये झालेल्या भाजप-काँग्रेस आघाडीबद्दल आम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो होतो. तिथे पाहा काय होतंय ते. जे होतंय, ते विचारसरणीशी सुसंगत नाही, याची जाण करून दिली होती. हा एकनाथ शिंदे खुर्चीसाठी लढत नाही. अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथ येथे झालेल्या काँग्रेस-भाजप युतीवर केली. आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सर्व […] The post खुर्चीसाठी विचारधारेशी तडजोड नाही: उपमुख्यमंत्री शिंदे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अमरावतीत महायुतीमध्ये 'बिघाडी' झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही प्रभागांत नवनीत राणा भाजपच्या प्रचारासाठी मैदानात आहेत, तर काही ठिकाणी भाजप उमेदवाराच्या विरोधातच राणा दाम्पत्याने धुराळा उडवला आहे. याच पार्श्वभूमीवर आयोजित भाजपच्या प्रचार सभेत खासदार अनिल बोंडे आणि नवनीत राणा यांच्यात जाहीर व्यासपीठावरच जुंपली. 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेचा संदर्भ देत सुरू झालेली ही चर्चा थेट एकमेकांच्या निष्ठेपर्यंत जाऊन पोहोचली. अमरावती महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना राजकारणातील वेगवेगळे रंग देखील अनुभवायला मिळत आहेत. नवनीत राणा या एकीकडे भाजप उमेदवारांचा प्रचार करत आहेत, तर दुसरीकडे आपल्या पतीच्या पक्षाच्या उमेदवारांसाठी देखील सभा घेत आहेत. यावरून भाजप खासदार अनिल बोंडे यांनी भाजपच्या सभेत नवनीत राणा यांना टोला लगावला. यानंतर नवनीत राणा यांनी देखील अनिल बोंडे यांच्यावर पलटवार केला. नेमके काय म्हणाले अनिल बोंडे? सभेत बोलताना खासदार अनिल बोंडे यांनी सुरुवातीला काँग्रेस आणि 'एमआयएम'वर निशाणा साधला. महापौर हिंदूच झाला पाहिजे, असे ठणकावून सांगताना त्यांनी आपला मोर्चा नवनीत राणांकडे वळवला. बोंडे म्हणाले, कोण काय बोलतंय याकडे लक्ष देऊ नका, केवळ कमळासाठी मते मागा. एकदा भगवा खांद्यावर घेतला की जुनं विसरून जा. माझा सखा भाऊ जरी 'युवा स्वाभिमान' (YSP), राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडून उभा असता, तरी मी माझ्या भगव्याशी (भाजपशी) प्रामाणिक राहिलो असतो, असा थेट चिमटा त्यांनी नवनीत राणा यांना काढला. नवनीत राणांचा पलटवार: बेईमानांना भीती वाटणारच! खासदार बोंडे यांनी काढलेल्या चिमट्यानंतर नवनीत राणा यांनीही आक्रमक पवित्रा घेत भरसभेतच उट्टे काढले. बोंडेंना प्रत्युत्तर देताना त्या म्हणाल्या, बोंडे भाऊ, मीही मोर्शी फिरून आली आहे आणि तिथे माझी सभाही झाली आहे. मला कोणालाही सांगण्याची गरज नाही. जो भगव्याशी आणि भाजपशी बेईमानी करेल, त्यांच्या पाठीशी नवनीत राणा कधीच उभी राहणार नाही. लोकसभेतील आपल्या पराभवाचा उल्लेख करत त्यांनी अनिल बोंडेंवर निशाणा साधला. लोकसभेच्या वेळी याच लोकांनी म्हटले होते की, 'अमरावतीची एक जागा हरलो तर काय फरक पडतो?' त्यावेळी ज्यांनी कमळाविरोधात काम केले, त्यांना आता भीती वाटणारच. बेईमानांना आम्ही सोडणार नाही, असा जबरी टोला नवनीत राणा यांनी लगावला. चंद्रशेखर बावनकुळेंसमोरच वादाचा धुरळा विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत घडला. पक्षातील दोन बड्या नेत्यांमधील हा वाद पाहून सभेला उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि मतदारही अवाक झाले. अमरावतीत भाजपमधील एक गट नवनीत राणा यांच्या विरोधात सक्रिय असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

22 C