दोन उमेदवारांत वाद; एकाने चक्क ‘एबी फॉर्म’च खाऊन टाकला
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात धनकवडी-सहकारनगर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक ३६ (अ) मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या दोन इच्छुक उमेदवारांमध्ये उमेदवारीवरून झालेल्या वाद विकोपाला गेल्याने एका उमेदवाराने चक्क एबी फॉर्म खाऊन टाकला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग ३६ (अ) साठी शिवसेना शिंदे गटाकडून दोन उमेदवारांना […] The post दोन उमेदवारांत वाद; एकाने चक्क ‘एबी फॉर्म’च खाऊन टाकला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट
टोकीयो : जगाला नवीन वर्षाचे वेध लागले असतानाच जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा मोठा धक्का जाणवला आहे. जपानमधील नोडा सिटी परिसरात आज संध्याकाळी ६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, नोडा शहराच्या पूर्वेला ९१ किलोमीटर अंतरावर भूकंपाचा धक्का जाणावला. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. जपानसाठी डिसेंबर महिना […] The post नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ दिवसांनी सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी सुविधा मिळाव्यात तसेच एसटीची सकारात्मक प्रतिमा अधिक बळकट व्हावी, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत बसस्थानकातील बैठक व्यवस्था, फरशी, […] The post राज्यातील बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अचलपूर तालुक्यातील हनवतखेडा येथील तरुण शेतकरी आणि परतवाडा शहरातील श्री डिजिटल हबचे संचालक सुमित प्रकाश घोम यांचा बुधवारी सायंकाळी दुचाकी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात परतवाडा-अंजनगाव मार्गावर घडला, ज्यात आणखी दोन युवक जखमी झाले आहेत. ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास परतवाडा-अंजनगाव मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. एमएच २७ बीएल ६२४६ आणि एमएच २७ डी ३६८१ या क्रमांकाच्या दुचाकी या अपघातात सामील होत्या. अपघातानंतर तिघांनाही रुग्णालयात नेण्यात आले, मात्र सुमित घोम यांचा वाटेतच प्राणज्योत मालवली. या अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील एक युवक गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे. अन्य एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. हे दोघेही अंजनगाव तालुक्यातील असल्याचे समजते, मात्र त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. सुमित घोम हे महानुभाव पंथाचे अनुयायी होते आणि गावात तसेच परिवारात सर्वांना मदत करणारे, तसेच युवकांसाठी प्रेरणादायी व्यावसायिक म्हणून ओळखले जात होते. ते बहुतांश वेळा चारचाकी वाहनाचा वापर करत असले तरी, अपघाताच्या दिवशी ते दुचाकीने परतवाडा जात होते. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.
अमरावती पालिका निवडणूक: काँग्रेस दोन नगरपालिकांतून हद्दपार:भाजपने 102 जागा जिंकत वर्चस्व राखले
अमरावती जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठे यश मिळवले. भाजपने सहा नगराध्यक्षपदांसह सर्व १२ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरसेवक निवडून आणले, तर काँग्रेसला दोन नगरपालिकांमध्ये एकही जागा जिंकता आली नाही. यामध्ये धामणगाव रेल्वे आणि शेंदुरजनाघाट नगरपालिकेचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व १२ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने एकूण १०२ जागा जिंकल्या आहेत. या तुलनेत काँग्रेसला ७९ जागांवर विजय मिळवता आला, ज्यामुळे काँग्रेस भाजपपेक्षा २३ जागांनी मागे राहिली. धामणगाव रेल्वे येथे भाजपने सर्वच्या सर्व २० जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली. त्याखालोखाल २६ सदस्यीय वरुडमध्ये भाजपने १८ जागा पटकावल्या. तसेच, चांदूर रेल्वे आणि शेंदुरजनाघाट या २० सदस्यीय नगरपालिकांमध्ये भाजपने प्रत्येकी ११ जागा जिंकल्या. भाजपने ४१ सदस्यीय अचलपूरमध्ये ९, चिखलदऱ्यात ८, मोर्शी आणि अंजनगाव सुर्जीत प्रत्येकी ६, दर्यापूर व धारणीत प्रत्येकी ४, नांदगाव खंडेश्वरमध्ये ३ आणि चांदूर बाजार येथे २ जागा मिळवल्या. दुसरीकडे, काँग्रेसने सर्वाधिक १७ जागा दर्यापूरमध्ये जिंकल्या. त्याखालोखाल १५ जागा अचलपूरमध्ये, १२ चिखलदरा येथे, ९ अंजनगाव सुर्जीत आणि ८ धारणीत मिळवल्या. दर्यापूर, चिखलदरा आणि धारणीमध्ये काँग्रेसला मिळालेल्या जागा सभागृहातील एकूण संख्येच्या निम्म्याहून अधिक आहेत. अचलपूरमध्ये १० अपक्षांची साथ मिळाल्यास काँग्रेस तेथेही आपले प्राबल्य सिद्ध करू शकते. काँग्रेसला मोर्शीत ६, नांदगाव खंडेश्वरमध्ये ५, चांदूर रेल्वेत ४, वरुडमध्ये २ आणि चांदूरबाजारमध्ये एक जागा मिळाली. मात्र, धामणगाव रेल्वे आणि शेंदुरजनाघाट या दोन नगरपालिकांमध्ये काँग्रेसला आपले खाते उघडता आले नाही. मोर्शी नगरपालिकेत नगराध्यक्षपद शिंदे गटाच्या शिवसेनेने जिंकले असले तरी, नगरसेवकांच्या संख्येच्या बाबतीत येथे अत्यंत विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. येथे काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी ६ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन १२ जणांचा गट सहज तयार करू शकतात. याउलट, महायुतीतील प्रमुख पक्ष भाजपचे ६, शिंदे सेनेचे २, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि प्रहारचा एक असे मिळून ११ सदस्य होतात. मोर्शीतील सत्ता स्थापनेचा खेळ रोडे गटाच्या एका सदस्याच्या भूमिकेवर अवलंबून असेल.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्रितपणे लढणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेतून दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले होते. सुरुवातीला राजकीय वर्तुळात शरद पवार गट 18 जागांवर आणि अजित पवार गट उर्वरित 110 जागांवर आपले उमेदवार उभे करतील, असा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, प्रत्यक्ष उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर या चर्चांमधील तफावत समोर आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 32 प्रभागांतील 128 उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये शरद पवार यांच्या 'तुतारी' चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे. केवळ प्रभाग क्रमांक 26 मधील चार उमेदवारांच्या नावांसमोर 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे 18 जागांच्या दाव्याऐवजी शरद पवार गटाला प्रत्यक्षात केवळ 4 जागा मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जाहीर झालेल्या यादीच्या आकडेवारीनुसार, अजित पवार यांच्या 'घड्याळ' चिन्हावर एकूण 123 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये अजित पवार गटाचे केवळ तीन उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत, तर उर्वरित सर्व प्रभागांत त्यांच्याच उमेदवारांचे वर्चस्व दिसत आहे. एकत्रित निवडणूक लढवण्याचे जाहीर केले असले तरी, जागावाटपात अजित पवार गटानेच सिंहाचा वाटा घेतल्याने आणि शरद पवार गटाला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागल्याने राजकीय वर्तुळात या नवीन समीकरणाची मोठी चर्चा सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 32 (अ,ब,क,ड) सर्व उमेदवारांची नावे 1.विकास नामदेव साने2.साधना नेताजी काशिद3.संगिता (नानी) प्रभाकर ताम्हाणे4.यश दत्तात्रय साने5.रुपाली परशुराम आल्हाट6.अश्विनी संतोष जाधव7.विशाल विलास आहेर8.वसंत प्रभाकर बोराटे9.अनुराधा दिपक साळुंके10.प्रकाश बबन आल्हाट11.पूनम अमित तापकीर12.लक्ष्मण सोपान सस्ते13.प्रतिभा अभिमन्यू दोरकर14.मंगेश शिवाजी असवले15.श्रध्दा योगेश आंकुलवार16.चंद्रकांत साहेबराव वाळके17.भिमाबाई पोपटराव फुगे18.अमर परशुराम फुगे19.प्रियांका प्रविण बारसे20.राहुल बाळासाहेब गवळी21.वर्षा गणेश बडे22.सुर्यवंशी निलेश रामू23.प्रियंका मयुर लांडे24.संतोष काळूराम लांडे25.विराज विश्वनाथ लांडे26.अनुराधा सुशिल लांडे27अश्विनी निलेश फुगे28.अमोल मधुकर डोळस29.सोमा रविंद्र सावळे30.राजश्री अरविंद गार्गे31.अश्विनी संजय वाबळे32.तुषार भिवाजी सहाणे33.सिध्दार्थ अण्णा बनसोडे34.वैशाली ज्ञानदेव घोडेकर लोंढे35.सारिका विशाल मासुळकर36.राहुल हनुमंतराव भोसले37.निलीमा रुपेश पवार38.वर्षा दत्तात्रय भालेराव39.संदीप श्रीरंग चव्हाण40.सतिश मधुकर क्षीरसागर41.मारुती गणपत जाधव42.मयुरी निलेश साने43.सत्यभामा संजय नेवाळे44.नारायण सदाशिव बहिरवाडे45.शरद वसंत भालेकर46.चारुलता रितेश सोनावणे47.सीमा धनंजय भालेकर48.पंकज दतात्रय भालेकर49.तानाजी विठ्ठल खाडे50.प्रिया प्रसाद कोलते51.संतोष शामराव कवडे52.विशाल बाळासाहेब काळभोर53.वैशाली जालिंदर काळभोर54.अरुणा गणेश लंगोटे55.प्रमोद प्रभाकर कुटे56.धनंजय विठ्ठल काळभोर57.प्रोतमराणी प्रकाश शिदे58.सरिता अरुण साने59.निलेश ज्ञानदेव शिंदे60.श्रेया अक्षय तरस61.जयश्री मोरेश्वर भोंडवे62.आशा तानाजी भोंडवे63.मोरेश्वर महादू भोंडवे64.मनिषा राजेश आरसुळ65.भाऊसाहेब सोपानराव भोईर66.शोभा तानाजी वाल्हेकर67.शेखर बबन चिंचवडे68.पूजा प्रशांत अगज्ञा69.ज्योती सचिन निंबाळकर70.अनंत सुभाष को-हाळे71.अश्विनी गजानन चिंचवडे72.रिना लहू तोरणे73.दिपक हिरालाल मेवाणी74.सविता धनराज आसवाणी75.काळूराम मारुती पवार76.जितेंद्र बाबासाहेब ननावरे77.मनीषा शाम लांडे78.वर्षा सर्जेराव जगताप79.योगेशकुमार मंगलसेन बहल80.निकिता अर्जुन कदम81.संदीप बाळकृष्ण वाघेरे82.प्रियांका सुनिल कुदळे83.हिरानंद उर्फ डब्बू किमतराम आसवानी84.मोनिका नवनाथ नढे85.उषा दिलीप काळे86.मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर87.संतोष अंकुश कोकणे88.मालिका नितीन साकळे89.विशाल नंदू बारणे90.योगिता महेश बारणे91.प्रविण रामचंद्र बारणे92.संतोष नागु बारणे93.वर्षा सचिन भोसले94.माया संतोष बारणे95.मंगेश मच्छिंद्र बारणे96.विक्रम भास्कर वाघमारे97.रेखा राजेश दर्शिले98.चित्रा संदीप पवार99.मयुर पांडुरंग कलाटे100. सुमित रघुनाथ डोळस101.अश्विनी चंद्रकांत तापकिर102.अनिता कैलास थोपटे103.सागर खंडूशेठ कोकणे104.उमेश गणेश काटे105.शितल विठ्ठल उर्फ नाना काटे106.मिनाक्षी अनिल काटे107.विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे108.कुंदा गौतम डोळस109.सुनिता दिशांत कोळप110.राजू रामा लोखंडे111.तानाजी दत्तात्रय जवळकर112.राजु विश्वनाथ बनसोडे113.प्रतिक्षा राजेंद्र लांघी जवळकर114.स्वाती उर्फ माई चंद्रकांत काटे115.रोहित सुदाम काटे116.दिप्ती अंबरनाथ कांबळे117.राजेंद्र गणपत जगताप118.उमा शिवाजी पाडुळे119.अरुण श्रीपती पवार120.निशा वसंत कांबळे121.प्रसाद उत्तम शिंदे122.उज्वला सुनिल ढोरे123.अतुल अरविद शितोळे प्रभाग क्रमांक 26 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवारराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवारराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवारराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार
दिवंगत सुनीता पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थापन झालेल्या 'स्व. सुनीता पाटील मेमोरियल फाऊंडेशन'ने जिल्ह्यातील २४ शाळांना शैक्षणिक साहित्य भेट दिले. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी शिल्पा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी, शिक्षणाधिकारी सतीश मुगल, डायटचे अधिव्याख्याता डॉ. दीपक चांदूरे, गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ व संदीप बोडखे, माजी उपशिक्षणाधिकारी पंडित पंडागळे आणि प्रतिष्ठानचे संस्थापक किरण पाटील उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात सीईओ संजिता महापात्र यांनी फाऊंडेशनचे किरण पाटील आणि डॉ. तनुश्री पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. जिल्ह्यातील प्रत्येक शाळेपर्यंत प्रतिष्ठानचे कार्य पोहोचण्यासाठी इतरांनीही अशा सामाजिक कार्यात पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. इतर मान्यवरांनीही यावेळी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला किरण पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. केंद्रप्रमुख सुभाष सहारे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर डॉ. तनुश्री पाटील यांनी प्रास्ताविक केले. गजानन चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी जिल्ह्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुनीता पाटील यांनी ज्या शाळांमध्ये सेवा दिली, त्या शाळांना तसेच प्रत्येक तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इतर शाळांना हे साहित्य देण्यात आले. दिवंगत सुनीता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साउंड सिस्टीम, कपाट, टेबल, खुर्ची आणि इतर शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले. या उपक्रमाचा लाभ भातकुली तालुक्यातील निंभा, परलाम, मार्की, साहूर; चिखलदरा तालुक्यातील कन्हेरी, गडगाभांडुम, काजलडोह; चांदुर रेल्वे तालुक्यातील तरोडा, दहीगाव धावडे, आमला, धनोडी, जळका जगताप; नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टाकळी, रोहणा; दर्यापूर तालुक्यातील नालवाडा, साईनगर; धामणगाव रेल्वे तालुक्यातील सावळा, शेंदुर्जना खुर्द; अमरावतीमधील अंतोरा; अंजनगाव सुर्जीमधील कारला; धारणी तालुक्यातील चिखलढाणा; मोर्शीमधील चिखलसावंगी आणि वरूडमधील शहापूर या २४ शाळांना मिळाला.
अमरावती जिल्ह्यात शेतीपिकांची स्थिती दर्शवणारी अंतिम पैसेवारी बुधवारी, ३१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली. जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ४७ असून, ती ५० पेक्षा कमी असल्याने प्रशासनाने दुष्काळसदृश स्थितीवर शिक्कामोर्तब केले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलचे उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांनी शेतीपिकांचा अंतिम अहवाल सादर केला. या अहवालानुसार, जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील २००४ पैकी शेतीपिकांची लागवड झालेल्या १९७३ गावांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात १९७३ पैकी १९३९ गावांमध्ये शेतीपिकांची स्थिती असामान्य आढळली. गतकाळातील अतिवृष्टी, पूरस्थिती आणि सततच्या पावसामुळे या गावांमध्ये शेतीपिकांची उत्पादकता घटली आहे. केवळ ३४ गावांमध्ये शेतीपिकांची स्थिती समाधानकारक असल्याने तेथील पैसेवारी ५० पेक्षा अधिक आहे. या अहवालानुसार, धारणी तालुक्यातील १५२ पैकी केवळ ३४ गावांमध्ये शेतीपिकांची स्थिती बरी आहे. धारणी तालुका वगळता जिल्ह्यातील उर्वरित १३ तालुक्यांमधील सर्व लागवडयोग्य गावांमध्ये शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुकानिहाय पैसेवारी पाहता, तिवसा तालुक्याची पैसेवारी सर्वात कमी ४३ आहे. मेळघाटातील धारणी, चिखलदरा आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यांची पैसेवारी सर्वाधिक ४९ आहे. वरुड, दर्यापूर आणि धामणगाव रेल्वे तालुक्यात ४८, तर भातकुली, चांदूर रेल्वे, मोर्शी, चांदूर बाजार आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यांची पैसेवारी ४७ आहे. अमरावती आणि अचलपूर तालुक्याची पैसेवारी ४६ वर थांबली आहे. अंतिम पैसेवारी घोषित करण्यापूर्वी तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्याची नजरअंदाज पैसेवारी ५६ वर स्थिरावली होती. त्यावेळी चांदूर बाजार आणि वरुड तालुक्याची पैसेवारी सर्वाधिक ६१ होती, तर धारणी तालुक्याची पैसेवारी सर्वात कमी ५२ होती.
आता सर्वसामान्यांना मध्यरात्रीही न्याय मिळणार
नवी दिल्ली : भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात आज एक सुवर्णक्षण नोंदवला गेला असून न्याय मिळण्यास विलंब होणे म्हणजे न्याय नाकारणे हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी देशाचे सरन्यायाधीश (सीजेआय) सूर्यकांत यांनी एक अत्यंत क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेत सर्वसामान्याच्या मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी चोवीस तास न्याय म्हणजेच मध्यरात्रीही न्यायालयाचे दरवाजे उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्वसामान्य नागरिकांना न्यायासाठी […] The post आता सर्वसामान्यांना मध्यरात्रीही न्याय मिळणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
२९ महापालिकांमध्ये ३३ हजार ६०६ उमेदवारी अर्ज
मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीत २ हजार ८६९ जागांसाठी विक्रमी ३३ हजार ६०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पुणे महापालिकेत सर्वाधिक म्हणजे १६५ जागांसाठी ३ हजार १७९ तर प्रतिष्ठेच्या असलेल्या मुंबईत महापालिकेच्या २२७ जागांसाठी २ हजार ५१६ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत मंगळवार दि. […] The post २९ महापालिकांमध्ये ३३ हजार ६०६ उमेदवारी अर्ज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी उमेदवारी न मिळाल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये असंतोषाचा उद्रेक झाला असून सलग दुस-या दिवशी याचे पडसाद उमटले. संभाजीनगरमध्ये नाराज इच्छुकांनी मंत्री अतुल सावे व भागवत कराड यांना घेराव घालून अक्षरश: शिवीगाळ केली. तर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये भाजपच्या ४० पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहेत. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेलाही बंडाळीचा मोठा फटका बसला […] The post बंडोबा आक्रमक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘स्वच्छ इंदूर’मध्ये विषारी पाण्यातून ८ जणांचा मृत्यू! ११० जण रुग्णालयात; ११०० रहिवासी बाधित
इंदूर : वृत्तसंस्था देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या इंदूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दूषित पाण्यामुळे १००० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास होत आहे. इंदूर शहरामध्ये नर्मदा नदीमधून येणारे पाणी हे आजार आणि मृत्यूचे कारण ठरत असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून […] The post ‘स्वच्छ इंदूर’मध्ये विषारी पाण्यातून ८ जणांचा मृत्यू! ११० जण रुग्णालयात; ११०० रहिवासी बाधित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चीनमध्ये ‘यू-टर्न’ इंडिकेटरसह येणार वाहने!
बिजींग : वृत्तसंस्था रस्त्यावरून चालताना अनेकदा समोरचे वाहन अचानक यू-टर्न घेऊ लागते तेव्हा आपल्याला अनेकदा अपघातजन्य परिस्थितीचा सामना करावा लागतो. सामान्य वाहनांमध्ये फक्त उजवे आणि डावे वळण निर्देशक असल्याने, त्यांच्या मागे असलेल्या ड्रायव्हरला हे माहित नसते की पुढे असलेली कार फक्त वळत आहे किंवा पूर्ण यू-टर्न घेत आहे. या गोंधळामुळे अनेक वेळा अपघात होतात आणि […] The post चीनमध्ये ‘यू-टर्न’ इंडिकेटरसह येणार वाहने! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
खामेनी सरकारविरोधात इराणमध्ये तीव्र आंदोलन
तेहरान : वृत्तसंस्था इराणमध्ये खामेनी सरकारविरोधात तीव्र आंदोलन उसळले आहे. इराणच्या जनरेशन झेडचे तरुण सरकारविरोधात रस्त्यांवर उतरले आहेत. अनेक शहरांमध्ये हिंसक परिस्थिती असून लोक सरकारविरोधी घोषणाबाजी करत आहेत. यामुळे इराणमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिकन डॉलरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून इराणी चलन रियालची तीव्र घसरण झाली आहे. याच्या निषेधार्थ ही निदर्शने सुरु […] The post खामेनी सरकारविरोधात इराणमध्ये तीव्र आंदोलन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘ओमाहाचा जादूगार’ वॉरेन बफे सक्रिय व्यवस्थापनातून निवृत्त!
ओमाहा : वृत्तसंस्था वॉरेन बफे आज ३१ डिसेंबर २०२५ रोजी ‘बर्कशायर हॅथवे’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून अधिकृतपणे निवृत्ती स्विकारली. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ जागतिक भांडवलशाहीला नवी दिशा देणारा हा ९५ वर्षीय महामेरू आज सक्रिय व्यवस्थापनातून बाजूला झाल्याने एका सुवर्ण अध्यायाचा शेवट झाला आहे. उद्या, १ जानेवारी २०२६ पासून कंपनीचे विद्यमान व्हाइस-चेअरमन ग्रेग एबेल बर्कशायरचा […] The post ‘ओमाहाचा जादूगार’ वॉरेन बफे सक्रिय व्यवस्थापनातून निवृत्त! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एवढे नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीयच महापौर होईल
मुंबई : प्रतिनिधी आम्ही मीरा-भाईंदरमध्ये इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीयच महापौरही बनेल, या भाजप नेते कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याने राजकारण तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलाच राजकीय मुद्दा मिळाला आहे. आपले वक्तव्य अंगाशी आल्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी मी महापौर ठरवत नाही. जे नगरसेवक निवडून येतील […] The post एवढे नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीयच महापौर होईल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दोन लोको ट्रेन आदळल्या; १०० जण जखमी, ५ गंभीर
चमोली : वृत्तसंस्था पीपलकोटी येथील ‘टीएचडीसी’ जलविद्युत प्रकल्पाच्या परिसरात असलेल्या बोगद्यात मंगळवारी रात्री दोन लोको ट्रेन एकमेकांवर आदळल्या, ज्यात १०० हून अधिक मजूर जखमी झाले. त्यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघाताच्या वेळी ट्रॉलीमध्ये सुमारे ११० अभियंते, कर्मचारी आणि मजूर होते, जे आपली शिफ्ट पूर्ण करून परत येत होते. अपघातात जखमी झालेल्यांपैकी ७० जणांना जिल्हा […] The post दोन लोको ट्रेन आदळल्या; १०० जण जखमी, ५ गंभीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गोव्यात ४ तालुक्यांचा नवा ‘कुशावती’ जिल्हा जाहीर
– धारबांदोडा, सांगे, केपे आणि काणकोण तालुक्यांचा समावेश – चालुक्यकालीन कुशावती नदीवरून जिल्ह्याला नाव – लहान जिल्ह्यांच्या संकल्पनेतून सुशासनाचा उद्देश पणजी : प्रतिनिधी १६ लाख लोकसंख्येच्या गोव्यामध्ये आतापर्यंत उत्तर गोवा आणि दक्षिण असे दोन जिल्हे होते, आजपासून कुशावती या नावाने तिसरा जिल्हा स्थापन झालेला आहे. बुधवारी मंत्रालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी […] The post गोव्यात ४ तालुक्यांचा नवा ‘कुशावती’ जिल्हा जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अखेर आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला मुंबईत १२ जागा
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाला भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कोट्यातून १२ जागा सोडण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. मुंबईतील २२७ पैकी १२ जागा वाट्याला आल्याने आठवलेंच्या पक्षाने ज्या प्रभागात रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार नाही तेथे भाजप-शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतील जागावाटपात भाजप […] The post अखेर आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला मुंबईत १२ जागा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
४ जानेवारीला ठाकरे बंधूंचा संयुक्त जाहिरनामा
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक होत असली तरी ठाकरेंच्या शिवसेनाझ्रमनसे युतीने मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक व संभाजीनगर या सहा, सात महापालिकांमध्येच शक्ती लावण्याचा निर्णय घेतला असून त्या दृष्टीने प्रचाराच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. ठाकरेंच्या युतीचा संयुक्त जाहीरनामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार असून ५ जानेवारीला पहिली संयुक्त सभा होणार आहे. मुंबई […] The post ४ जानेवारीला ठाकरे बंधूंचा संयुक्त जाहिरनामा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मराठा आरक्षण; न्यायमूर्ती शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ
मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करून प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारने यापूर्वी शिंदे समितीला दिलेली मुदत आज दि. ३१ डिसेंबर २०२५ संपुष्टात आली. […] The post मराठा आरक्षण; न्यायमूर्ती शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर, पुणे, अकोला आणि धुळे यांसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये उमेदवारी वाटपावरून भाजपमधील अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून, बाहेरून आलेल्यांना संधी दिल्यामुळे जुन्या फळीतील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. या परिस्थितीवर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनीही जाहीर नाराजी व्यक्त करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. निष्ठावंतांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे पक्षाला महागात पडू शकते, अशा सुरात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि छाननी प्रक्रियेदरम्यान या संतापाचे पडसाद ठिकठिकाणी पाहायला मिळाले. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये हा विरोध अधिक हिंसक झाला, जिथे एका कार्यकर्त्याने चक्क आत्मदहनाचा प्रयत्न केला. तसेच, संतापलेल्या कार्यकर्त्यांनी राज्याचे मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या गाड्या अडवून त्यांना घेराव घातला. नेत्यांच्या गाड्यांना आणि फोटोंना काळे फासून कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केल्यामुळे भाजपमधील हा अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. भाजप खासदार आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनीही या वादात उडी घेतली आहे. कार्यकर्त्यांच्या या जाहीर नाराजीला पाठिंबा दर्शवत त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. मेधा कुलकर्णी यांनी एक पोस्ट केली आहे. त्या म्हणाल्या, कुछ कह गए, कुछ सह गए. कुछ कहते कहते रह गए. महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायावरून मेधा कुलकर्णी एक शेर पोस्ट करत पक्षालाच सुनावले आहे. त्यांनी पोस्ट करताना सुरूवातीलाच निष्ठावंत कार्यकर्ते असेही म्हटले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात धनकवडी-सहकारनगर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि विचित्र प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक 36 (अ) मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या दोन इच्छुक उमेदवारांमध्ये उमेदवारीवरून झालेल्या वादाचे पर्यवसान चक्क 'एबी फॉर्म' गिळून खाऊन टाकण्यात झाले. एका उमेदवाराने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा अधिकृत 'एबी फॉर्म' हिसकावून तो चक्क गिळून टाकल्याने निवडणूक केंद्रावर मोठी खळबळ उडाली. या नाट्यमय आणि संतापजनक घटनेमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग 36 (अ) साठी शिवसेना शिंदे गटाकडून दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. बुधवारी सकाळी मच्छिंद्र ढवळे आणि उद्धव कांबळे यांच्यात यावरून जोरदार बाचाबाची झाली. ही वादावादी सुरू असतानाच, संतापलेल्या उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांच्या हातातील पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म हिसकावून घेतला आणि तो फाडून थेट तोंडात टाकून गिळून टाकला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर कमालीचा तणाव निर्माण झाला होता. एकाच पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांमधील हा टोकाचा अंतर्गत कलह पाहून उपस्थित नागरिक आणि इतर पक्षांचे उमेदवारही अवाक झाले. अखेर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि निवडणूक प्रक्रियेत गोंधळ घातल्याप्रकरणी तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी उद्धव कांबळे यांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे धनकवडी-सहकारनगर परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीच्या ऐन धामधुमीत 'एबी फॉर्म' खाऊन टाकण्याच्या या विचित्र प्रकारामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या प्रतिमेला मोठा तडा गेला असून राजकीय वर्तुळात यावर टीकेची झोड उठत आहे. उमेदवारीवरून उफाळलेला हा अंतर्गत वाद आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला असून, या गोंधळामुळे मच्छिंद्र ढवळे यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. त्यांना निवडणूक आयोगाकडून किंवा पक्षाकडून नवीन फॉर्म उपलब्ध करून दिला जाणार की तांत्रिक कारणास्तव त्यांचा अर्ज अवैध ठरणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत स्पष्टता न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पुण्यात शिवसेनेच्या अंतर्गत वादाची ही पहिलीच घटना नसून, यापूर्वी प्रभाग क्रमांक 3 मधील इच्छुक उमेदवार पद्मा शेळके यांनीही अशाच स्वरूपाचा गंभीर आरोप केला होता. पक्षाने आपल्याला अधिकृतरीत्या एबी फॉर्म दिला होता, मात्र तो अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा दावा शेळके यांनी केला होता. पुण्यात एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या एबी फॉर्म नाट्य आणि पळवापळवीच्या घटनांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पक्षांतर्गत समन्वयावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
घरपट्टी थकीत असतानाही भाजप उमेदवाराचा अर्ज मंजूर
सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवार रंजिता चाकोते यांची घरपट्टी थकीत असतानाही त्यांचा अर्ज मंजूर केल्याच्या आरोप काँग्रेसच्या उमेदवार रमाबाई पांडागळे यांनी केला आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज छाननी बुधवारी ३१ डिसेंबर रोजी पूर्ण झाली. तपासणी दरम्यान प्रभाग क्रमांक तीन क मधून भाजपने रंजिता चाकोते यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या अर्जावर काँग्रेसच्या उमेदवार […] The post घरपट्टी थकीत असतानाही भाजप उमेदवाराचा अर्ज मंजूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मीरा-भाईंदरमध्ये आमची फसणूक झाली आहे. तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांची फसवणूक झाली असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची अनेक ठिकाणी युती झाली नसल्याने आता एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करणे सुरू झाले आहे. प्रताप सरनाईक पत्रकारांशी बोलताना म्हणाले, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका असतात. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई विरार इथे चांगले निर्णय झाले आहेत. पण काही ठिकाणी फसवणूक झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये आमची फसवणूक झाली. तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांची फसवणूक झाली आहे. शेवटी युतीमध्ये जात असताना सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपने घेतली पाहिजे, असा सल्लाही सरनाईक यांनी दिला आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या फसवणुकीच्या आरोपावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दरेकर म्हणाले, आमच्या सारख्या जबाबदार नेत्यांनी उणेदुणे काढणे योग्य नाही. जेवढे एकत्रित करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न केलेला आहे. जिथे अडचण होती तिथे अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या असतील. अशा प्रकारे एकमेकांवर फसवणुकीचे वक्तव्य करणे हे महायुतीच्या हितासाठी योग्य नाही. कारण त्यांच्या वक्तव्याला उद्या आमच्याकडून उत्तर आले तर कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये विसंवाद होईल, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीला एकनाथ शिंदे गैरहजर राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. शिंदे यांच्या गैरहजेरीमुळे ते महायुतीमधील जागावाटपावरून नाराज आहेत की त्यांच्या प्रकृतीचे काही कारण आहे, असे तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, मंत्री उदय सामंत यांनी यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, उपमुख्यमंत्री केवळ वैयक्तिक कारणास्तव या बैठकीला येऊ शकले नाहीत. असे असले तरी, जागावाटपाचा तिढा अद्याप न सुटल्याने शिंदे यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर रंगली आहे.
एका लाँचरमधून सलग २ प्रलय क्षेपणास्त्रे डागली
बालासोर : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)ने बुधवार दि. ३१ डिसेंबर रोजी ओडिशाच्या किना-याजवळ प्रलय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. यावेळी एकाच लाँचरमधून खूप कमी वेळेच्या अंतराने दोन प्रलय क्षेपणास्त्रे (सल्वो लॉन्च) डागण्यात आली. संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही चाचणी लष्कराच्या वापराशी संबंधित तपासणीचा (यूजर इवैल्यूएशन ट्रायल) भाग होती. दोन्ही क्षेपणास्त्रे ठरलेल्या मार्गावर योग्य प्रकारे उडाली […] The post एका लाँचरमधून सलग २ प्रलय क्षेपणास्त्रे डागली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निम्म्या माजी नगरसेवकांना धक्का
पुणे : प्रतिनिधी पुणेसह नागपूर आणि इतर काही महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गज नगरसेवकांना थेट घरी बसवत त्यांच्या जागी नव्या दमाच्या तरुणांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे फक्त आंदोलन आणि घोषणाबाजीपुरते मर्यादित असलेल्या भाजयुमोच्या तब्बल ११ तरुण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नागपुरात भाजपने नगरसेवक पदासाठीची संधी दिली. त्यामुळे भाजपमध्ये तरुणांना संधीचे एक नवीन पर्व सुरू झाला […] The post निम्म्या माजी नगरसेवकांना धक्का appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
1995 च्या बहुचर्चित सदनिका घोटाळा प्रकरणी झालेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर, माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज जामीन प्रक्रियेसाठी न्यायालयात हजेरी लावली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेले कोकाटे थेट रुग्णालयातूनच न्यायालयात पोहोचले. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना झालेली शिक्षा आणि भविष्यातील मंत्रिपदाबाबत विचारणा केली असता, त्यांनी अधिक भाष्य करणे टाळले. जे काही बोलायचे आहे, ते माझ्या वकिलांशी बोला, असे उत्तर देत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. नाशिकमधील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात याप्रकरणी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्यात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती दिल्याने कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर पोलिसांनी माणिकराव कोकाटे यांना ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, याच काळात प्रकृती बिघडल्याने कोकाटे रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी कायदेशीर दिलासा मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला आणि त्यांची अटकेच्या कारवाईतून तात्पुरती सुटका झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर जामीन प्रक्रियेची पूर्तता करण्यासाठी माणिकराव कोकाटे आज रुग्णालयातून थेट न्यायालयात हजर झाले. जामीन अर्जावर स्वाक्षरी केल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना या संपूर्ण कायदेशीर संघर्षाबद्दल आणि पुढील भूमिकेबद्दल विचारले असता, त्यांनी अधिक बोलणे टाळले. काय बोलायचे ते माझ्या वकिलांशी बोला, मला आता थोडा आराम करू द्या, मला काही नको आहे, अशी त्रोटक प्रतिक्रिया देत त्यांनी आपली बाजू मांडण्याचे टाळले.
महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षामध्ये मोठी खळबळ उडवून दिली आहे. भाजपला निवडणूक सोपी जावी, यासाठी अंबादास दानवे यांनी निवडून येण्याची क्षमता असलेल्या महिला उमेदवारांचे तिकीट कापले आहे, असा खळबळजनक दावा खैरे यांनी केला आहे. यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर संभाजीनगरमध्ये ठाकरे गटात दोन तट पडल्याचे चित्र दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकीत तिकिट न मिळाल्यामुळे भाजपसह शिवसेना शिंदे गटात कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. आता ठाकरे गटातही तिच स्थिती पाहायला मिळत आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे ठाकरे गटातील अनेक निष्ठावंत महिला कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. आज अनेक महिलांनी चंद्रकांत खैरे यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी काही महिलांना अश्रू अनावर झाले होते. आम्ही रात्रंदिवस पक्षासाठी काम केले, मग आमचे तिकीट का कापले? असा जाब त्यांनी खैरेंना विचारला. यावर हतबल झालेल्या खैरेंनी या सर्व गोंधळाचे खापर अंबादास दानवे यांच्यावर फोडले. चंद्रकांत खैरेंचा दानवेंना निर्वाणीचा इशारा अंबादास दानवे यांच्या कार्यपद्धतीवर चंद्रकांत खैरे यांनी जोरदार टीका केली. अंबादास दानवे हे सर्व काही ठरवून करत आहेत. मी या शहरात पक्ष उभा केला, स्वतःचा पैसा खर्च केला. पण आता मलाच अंधारात ठेवले जात आहे. रशीद मामूंसारख्या बाहेरच्या लोकांना उमेदवारी देऊन निष्ठावंतांवर अन्याय केला जात आहे. आता पाहाच मी काय करतो, असा निर्वाणीचा इशारा खैरे यांनी अंबादास दानवे यांना दिला. रशीद मामूंच्या उमेदवारीवरून मोठा राडा काँग्रेसमधून आलेले माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांच्या उमेदवारीवरून चंद्रकांत खैरे अधिकच आक्रमक झाले आहेत. मुंबईतील शिवसेना भवनात रशीद मामू यांचा प्रवेश होत असतानाच खैरेंनी त्यांना दारात अडवून, तुला उमेदवारी मिळू देणार नाही, असे सर्वांदेखत सुनावले होते. मात्र, खैरेंचा विरोध डावलून अंबादास दानवे यांनी रशीद मामूंना तिकीट मिळवून दिले. मी मामूच्या प्रचाराला अजिबात जाणार नाही. या 'टीकोजीराव' दानवेंनी सर्व काही स्वतःच्या मनाने केले आहे. आज 'सामना'त यादी पाहिली, मला साधे विचारलेही नाही. हा माझा अपमान आहे, अशा शब्दांत खैरेंनी आपली नाराजी व्यक्त केली. भाजप आणि शिंदे गटातही कार्यकर्त्यांचा संताप दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये सुरू असलेला उद्रेक आज सलग दुसऱ्या दिवशीही कायम होता. अनेक वर्षांपासून पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचा आरोप करत आज कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. आज दुपारी भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी 'तांडव' केले. यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी काळं फासून निषेध नोंदवला, तर डॉ. भागवत कराड यांची गाडी आंदोलकांनी रोखून धरली. दुसरीकडे, तिकिट वाटपावरून झालेली नाराजी केवळ भाजपच नाही, तर शिंदेंच्या शिवसेनेतही पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक २० मधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेले पक्षाचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते सुनील सोनवणे यांनी तिकीट नाकारल्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ज्यांनी आम्हाला कालपर्यंत गद्दार म्हटले, त्यांच्यासाठी आम्हाला बाजूला केले जात आहे, असा संताप व्यक्त करत सोनवणे यांनी संजय शिरसाट यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सुरू केले आहे.
नववर्षाच्या काही तासांपूर्वी राजस्थानात १५० किलो स्फोटके जप्त
टोंक : राजस्थानच्या टोंकमध्ये कारमधून १५० किलो स्फोटके (अमोनियम नायट्रेट) घेऊन जाणा-या २ लोकांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत समोर आले की हे अमोनियम नायट्रेट टोंकमध्येच पुरवले जाणार होते. हे प्रकरण बरौनी पोलिस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग-५२ वरील चिरौंज गावातील आहे. कारमधील लोकांनी युरिया खताच्या गोण्यांमध्ये हे स्फोटक लपवून ठेवले होते, जेणेकरून ते पकडले […] The post नववर्षाच्या काही तासांपूर्वी राजस्थानात १५० किलो स्फोटके जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत
ऑकलंड : जगभरात सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२६ या नववर्षाचे स्वागत करण्याची जय्यत तयारी सुरू आहे. जगात सर्वप्रथम न्यूझीलंड या देशाने नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत केले आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३०च्या सुमारास न्यूझीलंडमध्ये मध्यरात्रीचे १२ वाजले आणि संपूर्ण देश नववर्षाच्या आनंदाने न्हाऊन निघाला. न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरात नववर्षाचे अत्यंत जंगी स्वागत करण्यात आले. ऑकलंडमधील ऐतिहासिक स्काय […] The post न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची 30 डिसेंबर ही शेवटची मुदत संपली असून, आजपासून अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय यांची महायुती मैदानात उतरली आहे. जागावाटपाच्या सूत्रानुसार, भाजप सर्वाधिक 137 जागांवर निवडणूक लढवत असून त्यांनी आपल्या सर्व उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 90 जागांवर नशीब आजमावणार असून रामदास आठवले यांच्या आरपीआयला भाजपच्या कोट्यातून जागा देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, विरोधी पक्षांमध्येही मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी या निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. तर काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत युती करत आपला स्वतंत्र मार्ग निवडला आहे. विशेष म्हणजे, महायुतीत एकत्र असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिकेत मात्र 'स्वबळा'चा नारा दिला असून ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. या बहुकोणीय लढतीमुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात आता भाजपने मुंबई महापालिकेसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. खालील फोटोमध्ये तुम्ही उमेदवारांची नावे पाहू शकता:
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत सक्रिय असलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज सकाळी भांडुप येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या एका गाडीवर ‘बॉम्ब से उडा दुंगा’ असे स्टिकर लावलेले आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचे बॉम्ब शोधक आणि नाशक पथक संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले असून संपूर्ण परिसराची तपासणी सुरू करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या निवासस्थानासमोर उभ्या असलेल्या एका गाडीवर ‘बॉम्ब से उडा दुंगा’ असे स्टिकर लावलेले आढळून आले. ही बाब राऊतांच्या घरातील कर्मचारी आणि कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. गाडीवर लावलेले धमकीचे स्टिकर पाहताच त्यांनी तातडीने संजय राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना याची कल्पना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ मुंबई पोलिसांना पाचारण करण्यात आले. अवघ्या काही मिनिटांत पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी पोहोचले. निवडणुकीच्या धामधुमीत दहशतीचा प्रयत्न? गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत राजकीय पटलावर केंद्रस्थानी आहेत. विशेषतः ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती घडवून आणण्यात संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या ऐतिहासिक युतीनंतर राऊत विरोधकांच्या निशाण्यावर असतानाच ही धमकी आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा केवळ राऊतांना घाबरवण्याचा प्रयत्न आहे की यामागे काही मोठे षडयंत्र आहे? याची चर्चा आता भांडुप परिसरात रंगली आहे. पोलिसांकडून कसून तपासणी बॉम्ब शोधक पथकाने संजय राऊत यांच्या घराचा परिसर, बागेचा भाग आणि आसपासच्या गल्ल्यांची तपासणी केली आहे. ज्या कारवर हे स्टिकर चिटकवण्यात आले होते, ती कार कोणाची आहे? आणि हे स्टिकर नेमके कोणी लावले? याचा शोध घेण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. दरम्यान, संजय राऊत दररोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर प्रहार करत असतात. अशा वेळी त्यांना थेट बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने गृह विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या धमकीनंतर राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला १४.७९ लाख रुपयांचा मुद्देमाल बुधवारी ता. ३१ तक्रारदारांना परत करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक निलभ रोहन यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांतर्गत दाखल झालेले घरफोडी, चोरी, वाहन चोरीचे गुन्हे उघडकिला आणण्यासाठी पोलिस विभागाकडून स्थानिक पोलिसांसह विशेष पथके स्थापन करण्यात आली आहे. या शिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथकही कार्यरत ठेवण्यात आले आहेत. या पथकाकडून डिसेंबर महिन्यात घरफोडीचे चार गुन्हे उघडकिला आणण्यात आले आहे. या शिवाय चोरीला गेलेली तीन वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. या शिवाय इतर मुद्देमालाचा समावेश आहे. पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हयांमधून जप्त केलेला मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्याचा उपक्रम पोलिस अधिक्षक निलभ रोहन यांच्या पुढाकारातून राबविला जात आहे. आज पोलिस अधिक्षक निलभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, उपाधिक्षक कुंदनकुमार वाघमारे, राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, जमादार प्रेमदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्देमाल करण्यात आला आहे. यामध्ये हिंगोली शहर, सेनगाव, नर्सी नामदेव, सेनगाव पोलिस ठाण्यांतर्गत दाखल झालेल्या चार गुुन्हयातील १.५४ लाख रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत. या शिवाय चोरीला गेलेली ७ लाख रुपयांची तीन वाहने जप्त करून सदर वाहने आज तक्रारदारांना परत करण्यात आली आहेत. या शिवाय इतर ६.२० लाख रुपयांचा जप्त केलेला मुद्देमालही पोलिस ठाण्यांत आयोजित कार्यक्रमात तक्रारदारांना बोलावून परत करण्यात आला आहे. चोरीला गेेलेला मुद्देमाल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले आहे.
पुण्यातील भूसंपादन कार्यालयात लाचखोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सुनावणी पूर्ण झालेल्या प्रकरणाच्या निकालाची प्रत देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एका सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुण्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी महिलेचे नाव सुनंदा अशोक वागसकर (वय ६१) असून, त्या उपजिल्हाधिकारी भूसंपादन कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. सेवानिवृत्तीनंतर त्या कंत्राटी पद्धतीने सेवेत कार्यरत असल्याचे समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या तपासानंतर त्यांच्या विरोधात पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार ४१ वर्षीय शेतकरी असून, त्यांच्या मामेबहिणीच्या वडिलोपार्जित जमिनीच्या नोंदींबाबतचे प्रकरण उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सिद्धार्थ भंडारे यांच्या न्यायालयात सुरू होते. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकालाची अधिकृत प्रत देण्यासाठी आरोपी वागसकर यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. नंतर ही रक्कम वाढवून एक लाख रुपये करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. तक्रारदाराने २८ ऑक्टोबर २०२५ रोजी एसीबी, पुणे येथे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर २९ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०२५ या कालावधीत सात वेळा पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान आरोपी महिलेने स्वतःसाठी तसेच उपजिल्हाधिकारी यांच्यासाठी एकत्रितपणे एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे व त्यांच्या पथकाने केली. या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पुणे ते अहिल्यानगर मार्गावरील पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या जयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. हा सोहळा शांतता व उत्साहात पार पडावा यासाठी सर्व आवश्यक सुविधांची पूर्वतयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही हा अभिवादन सोहळा महत्त्वाचा आहे. यावर्षी अधिक अनुयायी येण्याची शक्यता गृहीत धरून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन योग्य ती दक्षता घेत आहे. नियोजनावेळी विविध संघटना आणि नागरिकांच्या सूचनांचाही विचार करण्यात आला आहे. सर्वांनी शांतता, संयम आणि त्याच उंचीने सोहळा साजरा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. ९ हिरकणी कक्ष उपलब्ध जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य आणि स्वच्छतेसाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये २३ आरोग्य केंद्रे, ४३ रुग्णवाहिका, १८ खासगी रुग्णालयांमधील २८६ खाटा आरक्षित, १५५ प्रशिक्षित मनुष्यबळ, उपहारगृह व टँकर तपासणीसाठी ३३ पथके, ८० घंटागाड्या आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यासाठी १५० टँकर्सचा समावेश आहे. पाणी भरण्याच्या ठिकाणी २०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच, २ हजार ८०० शौचालये, २६५ सफाई कामगार, २६० पर्यवेक्षण अधिकारी व कर्मचारी आणि ९ हिरकणी कक्ष उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीवरही भर देण्यात आला आहे. पेरणे, कोरेगाव भीमा ते पिंपळे जगताप रस्ता, ढरंगेवस्ती, कोरेगाव भीमा ते वाडेवस्ती या ठिकाणी रस्ते दुरुस्ती करण्यात आली आहे. पिण्याच्या पाणी भरण्याच्या ठिकाणी मुरुम टाकण्यासह शोषखड्डेही तयार करण्यात आले आहेत. २० हजार चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्यावतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात १ महानिरीक्षक, ३पोलिस उपमहानिरीक्षक, २०पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, ८ राज्य राखीवपोलिस दलाच्या तुकड्या, ३ शीघ्र प्रतिसाद दल, १४ घातपात विरोधी पथके, १८ बीडीडीएस पथके, ६५० होमगार्ड आणि ४ हजार ७००पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सोहळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी २५१ ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, ज्यात फेस रिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. तसेच, १९ ठिकाणी वाहनतळाच्या माध्यमातून २० हजार चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयाकडूनही सुरक्षा व्यवस्थेत योगदान दिले जात आहे. यामध्ये ४ पोलिस उपायुक्त, ८ सहायकपोलिस उपायुक्त, ४५ पोलिस निरीक्षक, सहायकपोलिस निरीक्षक वपोलिस उपनिरीक्षक असे एकूण १७१ अधिकारी, १ हजार ३२५ अंमलदार, ६५० वॉर्डन व होमगार्ड, २ सर्व्हेलन्स व्हॅन, ३ आरसीपी आणि १ शीघ्र प्रतिसाद दलातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ७ बीडीडीएस पथके नेमण्यात आली जिल्हा पोलिस अधीक्षक ग्रामीण कार्यालयाच्यावतीने कायदा व सुवव्यस्थेच्यादृष्टीने शिरुर तालुक्यातील वढू बु. येथील छत्रपती शंभाजी महाराज व गोविंद गोपाळ महाराज यांच्या समाधीस्थळी अनुयायी दर्शनासाठी येतात. यादृष्टीने गर्दीवर नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता कोरेगाव भिमा, वढु. बु. व शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत बंदोबस्ताकरिता ३३ वरिष्ठ पोलिस अधिकारी, ३३२ इतर पोलिस अधिकारी, ३ हजार १० पोलिस अंमलदार, १ हजार ५०० होमगार्ड, ४ राज्य राखीवपोलिस दल तुकड्या, १० स्ट्रायकींग फोर्स, ४ आरसीपी पथक, २ शिघ्र प्रतिसाद दल आणि ७ बीडीडीएस पथके नेमण्यात आली आहेत. सुरक्षेच्या व निगराणीच्या दृष्टीने पोलिस विभागामार्फत सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे तसेच ध्वनीक्षेपण यंत्रणा आदी सुविधा करण्यात आली आहे. वाहनतळाचे ठिकाण, पिकअप व ड्रॉपचे ठिकाण, वॉच टॉवर्स,पोलिस मदत केंद्र, वज्र मोबाईल आदी व्यवस्था करण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके आदी यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर रोजी संपुष्टात आली. हा दिवस अत्यंत नात्यापूर्ण घडामोडींनी रंगल्याचे पाहायला मिळाले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेससोबत युती केली होती. परंतु, 62 जागा घेतलेल्या वंचितने 21 प्रभागात 21 उमेदवार दिले नसल्याचे शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांनी म्हटले होते. आता वंचितकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कॉंग्रेसने वंचित बहुजन आघाडीला मुंबईमध्ये 62 जागा दिल्या होत्या. अर्ज भरायला अवघे 24 तासच उरलेले असताना वंचितने सांगितले की, आमच्याकडे 21 ठिकाणी उमेदवारच नाहीत. त्या प्रभागात 21 प्रभागाची यादी मी ट्विट केली आहे. आता कॉंग्रेसला सुद्धा प्रश्न समोर राहिला की आता हे 21 उमेदवार आम्ही कुठून आणायचे. त्यामुळे कॉंग्रेसला सुद्धा या ठिकाणी उमेदवार उभे करता आले नाही. आता या 21 ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत, कारण त्यांची संख्या जास्त आहे. 137 ठिकाणी भाजप निवडणूक लढवत आहे, तर 90 ठिकाणी आम्ही निवडणूक लढवत आहोत, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी दिली. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास आम्हाला लक्षात आले सिद्धार्थ मोकळे म्हणाले, मुंबईत आम्ही 21 नाही, तर 16 ठिकाणी उमेदवार देऊ शकलो नाही. 5 उमेदवार आम्ही दिले, 16 जागा आम्ही कॉंग्रेसला परत केल्या आहेत. मध्यरात्री अडीचच्या सुमारास आम्हाला लक्षात आले की 21 ठिकाणी उमेदवार देऊ शकलो नाही. मात्र, सकाळपर्यंत 5 उमेदवार आल्यामुळे आम्ही 16 ठिकाणी उमेदवार देऊ शकलो, अशी माहिती मोकळे यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना दिली आहे. तसेच पुढे बोलताना मोकळे म्हणाले, कॉंग्रेसला आम्ही जागा दिल्या, आमच्यात व्यवस्थित सुसंवाद सुरू होता. त्यामुळे, फायदा कोणाला किंवा भाजपच्या उमेदवाराच्या ठिकाणी वंचितने जागा सोडली का हे तुम्ही तपासा, असेही मोकळे यांनी म्हटले आहे. शेवटपर्यंत चर्चा पूर्ण झाल्या नाहीत सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले की, आम्ही मुलाखती घेऊन वॉर्ड फायनल केले होते. 70 जागा आम्ही ठरवल्या होत्या. 20 आमच्या जागा अशा होत्या तिथे आम्ही सहकार्य करायलायच तयार नव्हतो. बाकी जागांवर आम्ही चर्चा करत होतो. शेवटपर्यंत चर्चा पूर्ण झाल्या नाहीत त्यामुळे लक्षात आले नाही. 16 ठिकाणी काही उमेदवार चुकीचे आले होते त्यांना तिकीट द्यायला आम्ही नकार दिला आणि आम्ही काँग्रेसला जागा परत केल्या. तसेच 20 जागांवर आमच्याकडे सक्षम उमेदवार होते. 50 जागा राहिलेल्या आहेत, तिथे देखील उमेदवार आमच्याकडे होते. मात्र, आम्ही ज्या जागा मागत होतो त्या सगळ्याच युती आघाडीमध्ये मिळतील असे नाही. वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणतात, यावर काय सांगाल? असा प्रश्न विचारला असता सिद्धार्थ मोकळे म्हणाले, काँग्रेसला आम्ही जिंकलेल्या जागा दिल्या. त्यासोबत दोन नंबरला असणाऱ्या जागा देखील आम्ही दिलेल्या आहेत. आम्ही भाजपला बाय दिलेली नाही. आम्हाला काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे उमेदवार देता आले नाहीत. काही ठिकाणी चुकीचे उमेदवार होते ते आम्हाला द्यायचे नव्हते. सर्व इच्छुकांना आम्ही संधी देऊ शकत नव्हतो. आमचे कर्मचारी 3 दिवस घरी गेले नव्हते त्यामुळे त्यांना जास्त त्रास देणे योग्य वाटले नाही. त्यामुळे, आम्हाला डेटा लवकर मिळाला नाही, असे उत्तर मोकळे यांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज देसातील पायाभूत सुविधांना गती देणाऱ्या 2 प्रमुख महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली. सुमारे 20 हजार 668 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांत महाराष्ट्रातील नाशिक - सोलापूर - अक्कलकोट या 374 किलोमीटरच्या कॉरिडोरसह ओडिशातील NH-326 या 206 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र अधिक गतीमान होण्यास मदत मिळणार आहे. नाशिक - सोलापूर - अक्कलकोट कॉरिडोर हा 19, 142 कोटींचा ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बीओटी तत्त्वावर (बांधा-वापरा-हस्तांतरित करा) या कॉरिडोरच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. हा कॉरिडोर नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव व सोलापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडत पुढे आंध्र प्रदेशातील कुर्नुलपर्यंत कनेक्टिव्हिटी मजबूत करेल. हा उपक्रम गतीशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत एकात्मिक वाहतूक पायाभूत सुविधा विकासाला चालना देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. 6 पदरी एक्सेस कंट्रोल्ड कॉरिडोर उल्लेखनीय बाब म्हणजे प्रस्तावित ग्रीनफिल्ड कॉरिडोरला दिल्ली - मुंबई एक्सप्रेस वे (वाढवन पोर्ट इंटरचेंज), आग्रा - मुंबई कॉरिडोर (एनच-60 - अडेगाव जंक्शन) व समृद्धी महामार्ग (पांगरी, नाशिकलगत) यांच्याशी जोडण्याचाही प्रस्ताव आहे. हा 6 पदरी एक्सेस कंट्रोल्ड कॉरिडोरमुळे देशाच्या पश्चिम किनाऱ्यापासून पूर्व किनाऱ्यापर्यंत थेट वाहतुक सुविधा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत तब्बल 17 तासांची बचत होणार असून, 201 किलोमीटरचे अंतरही कमी होणार आहे. प्रस्तावित प्रकल्पातून 251.06 लाख मॅन - डे थेट रोजगार, 313.83 लाख मॅन - डे अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. तसेच या महामार्गालगतच्या परिसरातील आर्थिक उलाढाल वाढून नाशिक, अहिल्यानगर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे. 2 टप्प्यांत बांधला जाणार महामार्ग यासंबंधीच्या माहितीनुसार, नाशिक ते अक्कलकोट महामार्ग नाशिक ते अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट अशा 2 टप्प्यांत बांधला जाणार आहे. नाशिक ते अहिल्यानगर टप्पा 152 किमीचा, तर अहिल्यानगर ते अक्कलकोट टप्पा 222 किमी असेल. 374 किमीचा हा महामार्ग कार्यान्वित झाल्यास नाशिक ते अक्कलकोट अंतर केवळ 4 तासांत पार करता येणार आहे. सध्या हे अंतर पार करण्यासाठी तब्बल 9 तास लागतात. सुरत ते चेन्नई द्रुतगती महामार्ग कार्यान्वित झाल्यास नाशिक ते सुरत अंतर 2 तासात पार करता येणार आहे. चेन्नई ते सुरत महामार्ग नवसारी येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे पुढे दिल्लीकडे जाणेही सोपे होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले, पहिला प्रकल्प नाशिक आणि सोलापूरला जोडणारा सहा लेनचा अॅक्सेस-कंट्रोल्ड एक्सप्रेसवे आहे. एकप्रकारे हा प्रकल्प विकसित भारताच्या स्वर्णित चतुर्भुजचे प्रतिनिधित्व करतो. दिल्ली-मुंबई कॉरिडॉरने मोठी प्रगती केली आहे. त्यानंतर आता हा मुंबई-चेन्नई कॉरिडॉर आहे. आज ज्या सेक्शनला मंजूरी मिळाली तो नाशिक ते अक्कलकोट असा आहे. यापुढे हा कॉरिडॉर कुरनूल, कडप्पा, चेन्नईपर्यंत वाढवला जाईल. तूर्त आज नाशिक-सोलापूर कॉरिडॉरला मंजूरी देण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीतील तिकिट वाटपावरून झालेली नाराजी केवळ भाजपच नाही, तर शिंदेंच्या शिवसेनेतही पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक २० मधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेले पक्षाचे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते सुनील सोनवणे यांनी तिकीट नाकारल्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ज्यांनी आम्हाला कालपर्यंत गद्दार म्हटले, त्यांच्यासाठी आम्हाला बाजूला केले जात आहे, असा संताप व्यक्त करत सोनवणे यांनी संजय शिरसाट यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन सुरू केले आहे. सुनील सोनवणे यांनी माध्यमांशी बोलतान संताप व्यक्त केला. आम्ही गेल्या २० वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत आहोत. शिंदे साहेबांच्या उठावामध्ये आम्ही पहिल्यापासून आहोत. उठावात असताना शिंदे आम्हाला न्याय देतील, असे वाटत होते. कालपर्यंत आम्हाला गद्दार म्हणणारे, आम्हाला तलवारी दाखवणारे आज आमच्या पक्षात येऊन मुख्य झाले. इथे आम्ही मुख्य पाहिजे होतो. ते पैशावाले असल्यामुळे मुख्य आहेत का? असा संतप्त सवाल सुनील सोनवणे यांनी केला. माझी उमेदवारी रद्द करून, भाजपमधून आयात केलेल्या माणसाला दिली. त्यांच्यात असे काय आहे? जे माझ्यात नाही, हे मला शिरसाटांनी सांगावे. 'फिक्सिंग'चा खळबळजनक आरोप सोनवणे यांनी केवळ नेत्यांवरच नव्हे, तर स्थानिक रणनीतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मी सगळ्या मोर्चात आहे. मी पाच वर्ष डीपीडीसीचा मेंबर होतो. पण मी साहेबांना ताण न देण्यासाठी डीपीडीसीचा कोणताही फंड घेतला नाही. एक तिकिट मागितले होते. पण तेही भाजपमधून आलेल्या आयात माणसाला दिले. म्हणजे त्र्यंबक तुपे यांनी फिक्सिंग केली. भाजपचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी शिंदे गटाकडून एकदम कमकुवत उमेदवार दिला. असेच कारस्थान त्र्यंबक तुपे याने भाजपसोबत मिळून केले, असे मला वाटते, असा आरोप सुनील सोनवणे यांनी केला. संभाजीनगरात भाजप इच्छुकांचा सलग दुसऱ्या दिवशी 'राडा' दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये सुरू असलेला उद्रेक आज सलग दुसऱ्या दिवशीही कायम होता. अनेक वर्षांपासून पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचा आरोप करत आज कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. आज दुपारी भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी 'तांडव' केले. यावेळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी काळं फासून निषेध नोंदवला, तर डॉ. भागवत कराड यांची गाडी आंदोलकांनी रोखून धरली. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, दोन्ही नेत्यांना पोलिसांच्या कडक बंदोबस्तात तिथून पळ काढावा लागला.
करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली
बीड : प्रतिनिधी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला. विधानसभा निवडणूक २०२४ मधील त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रामध्ये उल्लेख केलेल्या माहितीवर आक्षेप घेण्यात आला होता. लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परळी वैद्यनाथ यांच्या न्यायालयात करुणा शर्मा-मुंडे यांनी फौजदारी कारवाई करण्याबाबत फिर्याद प्रकरण दाखल केले होते. याबाबत आज परळी न्यायालयाने […] The post करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निष्ठावंतांना डावलल्याने भाजपमध्ये राडा
मुंबई : प्रतिनिधी भाजपने निष्ठावंतांना डावलून उप-या लोकांना तिकिट दिल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या संयमाचा उद्रेक झाल्याची भावना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी व्यक्त केली आहे. भाजपचे सध्याचे धोरण वापरा व फेकून द्या असे आहे. त्यामुळे संभाजीनगरात इच्छुक उमेदवार नाराज झाले असून भाजपमध्ये राडा तर होणारच अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली. महायुती तुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात भाजपमध्ये […] The post निष्ठावंतांना डावलल्याने भाजपमध्ये राडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मालेगावात इस्लाम पार्टीने खाते उघडले; निकालापूर्वीच जल्लोष
मालेगाव : प्रतिनिधी राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वारे जोरदार वाहत आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार १५ जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर होती. दरम्यान ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरुवात झाली असून, मालेगावातून मोठी बातमी […] The post मालेगावात इस्लाम पार्टीने खाते उघडले; निकालापूर्वीच जल्लोष appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॅशिंग अवतारात नयनतारा दमदार लूक समोर
मुंबई : प्रतिनिधी ‘टॉक्सिक’ चित्रपटातून नयनताराचा दमदार फर्स्ट लूक समोर आला असून हातात बंदूक घेऊन दिसणा-या तिच्या पॉवरफुल अवताराने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. हा लूक यशने शेअर केल्याने चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. ‘टॉक्सिक’ चित्रपटातील पोस्टरमधील साऊथ अभिनेत्री नयनताराच्या डॅशिंग लूकची चर्चा होतेय. बहुप्रतीक्षित चित्रपट ‘टॉक्सिक’मधील तिचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला असून या […] The post डॅशिंग अवतारात नयनतारा दमदार लूक समोर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : ‘वेळ ही सर्वांत मौल्यवान संपत्ती’ या म्हणीची प्रचिती मुंबईच्या एका उमेदवाराच्या बाबतीत आली आहे. महापालिका निवडणूक लढण्याची संधी हुकल्याचे पाहायला मिळत आहे. मंदाकिनी खामकर असे संधी हुकलेल्या महिला उमेदवाराचे नाव आहे. विशेष म्हणजे त्यांना भाजपने उमेदवारी देत एबी फॉर्मही दिला होता. मात्र उशीर झाल्याने त्यांचा पत्ता कट झाला आहे. यामुळे भाजपला मोठा फटका […] The post हातात एबी फॉर्म; घालवली संधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून भारतीय जनता पक्षामध्ये अभूतपूर्व अराजकता निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी सतरंज्या उचलणाऱ्या निष्ठावंतांना डावलून 'आयारामां'ना रेड कार्पेट अंथरल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आणि महायुतीतील गुन्हेगारीकरणावर सडकून टीका केली आहे. काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला, अशी टीका सपकाळ यांनी केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, नगरसेवकपदासाठी भाजपमध्ये जो गोंधळ सुरू आहे, तो आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम असेल. मूळ भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून हा पक्ष आता 'उपऱ्यांच्या' हाती गेला आहे. मूळ भाजपा व संघाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून उपऱ्यांच्या हाती भारतीय जनता पक्ष गेल्याने लवकरच या पक्षाचे नियंत्रण हे नागपूरच्या रेशिमबागेतून नाही तर अदानी अंबानी यांच्याकडून होईल. अजित पवारांचा पक्ष गुंडांचा, याआधी माफियांना प्रवेश अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधताना सपकाळ यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांचा पक्ष हा आता केवळ गुंडांचा आणि माफियांना आश्रय देणारा पक्ष उरला आहे. मराठवाड्यातील गुन्हेगारी साम्राज्यातील नेत्यांना आणि कोयता गँगशी संबंधित लोकांना त्यांनी पक्षात स्थान दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील भावाच्या शेतातील ड्रग्ज कंपनीचा वितरक हा अजित पवार यांच्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे दिसून आले, असे सपकाळ म्हणाले. 2026 काँग्रेससाठी संघटनात्मक वर्ष सरत्या वर्षाला निरोप देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी नवीन वर्षातील काँग्रेसची रणनीती स्पष्ट केली. 2026 हे वर्ष काँग्रेससाठी पूर्णपणे 'संघटनात्मक वर्ष' असेल. डिसेंबरपासूनच आम्ही याची तयारी सुरू केली आहे. सध्या पक्षात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होत असून कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. नवीन वर्षात आम्ही वैचारिक मूठ बांधून अधिक ताकदीने जनतेसमोर जाणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे ही वाचा... संभाजीनगर भाजपमधील गोंधळात संजय केणेकरांची मध्यस्थी:रडणाऱ्या कार्यकर्त्याला कुरवाळले; 'सी-फॉर्म' आणि सत्तेत पदे देण्याचे आश्वासन महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये सुरू असलेला उद्रेक आज सलग दुसऱ्या दिवशीही कायम होता. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. सावेंच्या गाडीला काळं फासणे आणि कराडांची गाडी रोखून धरल्याने निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी अखेर आमदार संजय केणेकर रिंगणात उतरले. त्यांनी नाराज कार्यकर्त्यांची आर्त हाक ऐकून घेत त्यांना न्याय देण्याचा शब्द दिला. सविस्तर वाचा...
मुंबई उच्च न्यायालयाने पुण्यातील लोकमान्य नगर (सदाशिव पेठ) येथील पुनर्विकास प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने पुनर्विकास प्रकल्पाला मंजुरी दिली असून, राजकीय दबावापुढे झुकल्याबद्दल महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) यांना कडाडून फटकारले आहे. म्हाडाची भूमिका मनमानी, तथ्यहीन आणि कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचे न्यायालयाने ठामपणे नमूद केले. सन ग्लोरी आणि नूतन सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला म्हाडाने दिलेली स्थगिती न्यायालयाने रद्द ठरवली. कोणत्याही प्रशासकीय निर्णयात राजकीय दबावाला स्थान देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. लोकमान्य नगर पुनर्विकासाचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता. लोकमान्य बचाव कृती समिती आणि ॲड. गणेश सातपुते यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी याविरोधात संघर्ष केला. काळ्या फिती लावून आंदोलन, घंटानाद, मोर्चे, घेराव आणि निदर्शने अशा विविध मार्गांनी नागरिकांनी आपला आवाज बुलंद केला. या लढ्यादरम्यान पंतप्रधानांना शेकडो पत्रे पाठवण्यात आली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व प्रवीण दरेकर यांची भेट घेऊन पाठपुरावा करण्यात आला. हिवाळी अधिवेशनात सचिन अहिर आणि आदित्य ठाकरे यांनी हा प्रश्न ठामपणे मांडला. आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष लोकमान्य नगरला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला होता. न्यायालयीन सुनावणीदरम्यान असे समोर आले की, संग्लोरी सीएचएसला एप्रिल २०२५ मध्ये एनओसी देण्यात आली होती. नूतन सीएचएसचा प्रस्ताव प्रलंबित असतानाच पुनर्विकासावर एकतर्फी स्थगिती लादण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी “पुढील आदेश येईपर्यंत स्थिती कायम ठेवावी” अशी हस्तलिखित टिप्पणी केली होती; मात्र म्हाडाने ती ‘ब्लँकेट स्टे’ म्हणून अंमलात आणल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी व न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने सांगितले की, म्हाडा अधिकाऱ्यांनी कोणताही कायदेशीर आधार नसताना निर्णय घेतले. यामुळे नागरिकांच्या संविधानिक हक्कांचे उल्लंघन झाले असून, भारतीय संविधानातील कलम १४ आणि ३००(अ) चे उल्लंघन झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने म्हाडाला नूतन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या एनओसीबाबत १५ दिवसांत निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. पुनर्विकास तातडीने सुरू करण्यासही मोकळीक दिली आहे. या निर्णयामुळे लोकमान्य नगरमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, अनेक महिन्यांपासून रखडलेला पुनर्विकास मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. ॲड. गणेश सातपुते यांनी या लढ्याला अखेर यश मिळाल्याचे सांगितले.
भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 2 मधून ठाकरे गटातून आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजप कार्यकर्ते जाहीर नाराजी व्यक्त करत आहेत. या प्रकरणी एका इच्छुक महिला उमेदवाराने थेट व्यासपीठावरून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांपुढे नाराजी व्यक्त केली आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील भाजप कार्यकर्त्यांचा पक्षाविरोधातील रोष राज्यभरात गाजत आहे. त्यातच आता मुंबईतही भाजपला कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईसह राज्यभरातील महापालिका निवडणुकीत निष्ठावंतांना डावलून प्रस्थापित, नेतेमंडळांचे नातलग व उपऱ्यांना प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर दहिसरमध्ये भाजपधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. भाजपने येथील वॉर्ड क्रमांक 2 मधून ठाकरे गटातून आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिली आहे. या प्रकरणी पक्षाच्या महायुती कार्यकर्ता मेळाव्यात एका इच्छुक महिला कार्यकर्तीने तीव्र संताप व्यक्त केला आहे. पक्षाचा निर्णय मान्य, पण आमचे काय? ही इच्छुक महिला थेट व्यासपीठावरून म्हणाली, पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. पण कार्यकर्त्यांचे काय? मी पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळे मी बोलणार. मी कुणालाही शिवीगाळ किंवा दादागिरी करत नाही. केवळ मनातील भावना व्यक्त करत आहे. त्यामुळे मला बोलू द्या. मी मागील 10 वर्षांपासून दहिसर विधानसभा मतदारसंघात भाजपची कार्यकर्ती म्हणून काम कर आहे. आमदार मनिषा चौधरी यांनी ज्या जबाबदाऱ्या दिल्या, त्या संधी मानून पार पाडल्या. माझ्यासह माझ्या अनेक महिला कार्यकर्त्यांनी पक्षासाठी रात्रंदिवस कष्ट घेतले. असे असूनही पक्षाने मला उमेदवारी नाकारली. मी कुठे चुकले? पक्षाच्या निर्णयाचा मी आदर करते. पक्षाने उमेदवारी दिलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना निवडून आणण्याची जबाबदारीही मला माहिती आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडली जाईल. पण मी कुठे चुकले याचे उत्तर आमदार मनिषा चौधरी व खासदार गोपाळ शेट्टी यांनी दिले पाहिजे. जीव तोडून काम केल्यामुळे मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असेही या कार्यकर्तीने यावेळी ठणकावून सांगितले. पक्षात कुणीही समाधानी नाही इच्छुक महिला उमदेवार पुढे म्हणाली, मी ज्यांना आयुष्यभर गुरू मानले, त्यांनीच मला डावलले. यामुळे मी प्रचंड नाराज आहे. कार्यकर्ता आयुष्यभर समर्पित भावनेने पक्षासाठी काम करत असतो. तो राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करतो. पक्षाचा अचानक आदेश आल्यास महिला हातातील काम टाकून ते काम करतात. पुरुष नोकऱ्या सोडून पक्षाच्या मागे पळत असतात. पण भाजपने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय केला. खोट्या मुलाखती व खोटे अर्ज भरून घेतले. अखेरीस तिकीट कापले. वर्षानुवर्षे एवढे काम करूनही आज पक्षात कुणी समाधानी नाही, असेही ही महिला इच्छुक यावेळी बोलताना म्हणाली.
पुण्यात सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा चौकात वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई केल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी पोलीस हवालदाराला मारहाण केली आणि त्यांच्या शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी लकी गौरव आनंद (वय २१), साहिल प्रकाश चिकणे आणि श्रावण रमेश हिरवे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार राजेंद्र सेंगर यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सेंगर हे सिंहगड रस्ता वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. आरोपी तिघे जण एकाच दुचाकीवरून प्रवास करत असताना, सेंगर यांनी त्यांना धायरी फाटा चौकात अडवले. ट्रिपल सीट प्रवास करत असल्याने सेंगर यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. यामुळे चिडलेल्या आरोपींनी सेंगर यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादादरम्यान, आरोपी हिरवे याने सेंगर यांना चापट मारली. आरोपींनी आरडाओरडा करत त्यांचा गणवेश फाडला. शासकीय कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपनिरीक्षक मालुसरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. घरफोडीच्या दोन घटना दरम्यान, पुणे शहरात घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. विश्रांतवाडी आणि हडपसरमधील सय्यदनगर भागात चोरट्यांनी सदनिकांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली आहे. विश्रांतवाडीतील विद्यानगर भागातील नवआकांक्षा सोसायटीत एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज, ज्यात सोन्याचे दागिने आणि रोकड होती, तो लांबवला. तक्रारदार कुटुंब बाहेरगावी गेले असताना ही घटना घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करत आहेत. हडपसरमधील सय्यदनगर परिसरातील गल्ली क्रमांक १२ मध्ये एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे गंठण आणि कपाटातील ५ हजार ५०० रुपयांची रोकड असा एकूण ६५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव पुढील तपास करत आहेत.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी राज्य सरकारने सेलिब्रेशनच्या वेळेत मोठी वाढ केली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि आर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिक आणि पार्टीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, ही सवलत देताना प्रशासनाने काही कडक अटीही लागू केल्या आहेत. राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, पहाटे 5 वाजेपर्यंतची ही सवलत केवळ बंदिस्त किंवा इनडोअर आस्थापनांसाठीच लागू असेल. खुल्या जागा, इमारतींचे टेरेस किंवा मोकळ्या मैदानावरील सेलिब्रेशनला ही वेळ मर्यादा लागू असणार नाही. तिथे प्रचलित नियमांनुसारच वेळेचे पालन करावे लागेल. इनडोअर कार्यक्रम करतानाही ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळणे अनिवार्य असेल. नाक्या-नाक्यावर पोलिसांचा 'वॉच' नवीन वर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये, यासाठी गृह विभागाने सुरक्षिततेची चोख व्यवस्था केली आहे. राज्यभरात विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई यांसारख्या शहरांत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मद्यपान करून गाड्या चालवणाऱ्यांविरोधात पोलिसांनी 'झिरो टॉलरन्स' धोरण स्वीकारले असून ठिकठिकाणी ब्रेथ ॲनालायझरसह तपासणी केली जाणार आहे. रेव्ह पार्ट्या आणि अमली पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांच्या गुन्हे शाखेची विशेष करडी नजर असणार आहे. आनंद साजरा करा, पण कायदा पाळा नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले आहे की, नागरिकांनी उत्साहात आणि आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत जरूर करावे, मात्र कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल असे कृत्य करू नये. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर किंवा हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. हे ही वाचा... नववर्ष स्वागतासाठी वाहतूक बदल, मद्यपींवर कारवाईचा इशारा:पुण्यातील लष्कर, डेक्कन भागात गर्दी टाळण्यासाठी पोलिसांची कडक पाऊले पुण्यात नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन लष्कर आणि डेक्कन जिमखाना परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर हे बदल लागू होतील. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिला आहे. सविस्तर वाचा...
परळी स्थित न्यायालयाने विधानसभा निवडणुकीत शपथपत्रामध्ये कथित चुकीची माहिती सादर केल्याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा दिला आहे. या प्रकरणी कोर्टाने करुणा शर्मा मुंडे यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. धनंजय मुंडे यांनी गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी लोकप्रतिनिधित्व कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परळी वैद्यनाथ यांच्याकडे याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत कोर्टाने धनंजय मुंडेंवरील सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे सांगत त्यांची याचिका फेटाळून लावली. कोर्टाने करुणा शर्मा यांनी नोंदवलेला जबाब व वकिलांचा युक्तिवाद तथा प्रकरणातील वस्तुस्थिती लक्षात घेता ही याचिका फेटाळून लावली. धनंजय मुंडे यांच्या वतीने ॲड. अशोक कवडे यांनी काम पाहिले तसेच ॲड.हरिभाऊ गुट्टे यांनी त्यांना मदत केली. उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने धनंजय मुंडे यांच्याविरोधात कथित कृषी घोटाळ्याप्रकरणी दाखल करण्यात आलेली याचिकाही यापूर्वीच फेटाळून लावली आहे. त्या प्रकरणातही कोर्टाला कोणतेही तथ्य आढळले नव्हते. त्यामुळे कोर्टाने याचिकाकर्त्यालाच दंड ठोठावला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. नेमके काय आहे प्रकरण धनंजय मुंडे यांनी 2024 शपथपत्रात आपल्या 5 अपत्यांचा उल्लेख केला होता. यात त्यांनी शिवानी मुंडे आणि सीशिव मुंडे या दोन अपत्यांचा प्रथमच उल्लेख केला होता. तत्पूर्वी, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी जे शपथपत्र दिले होते, त्यात या दोन अपत्यांचा उल्लेख नव्हता. यावर करुणा मुंडे यांनी आक्षेप घेतला होता. विशेषतः धनंजय मुंडे यांनी यावेळी या अपत्यांचा उल्लेख का केला? याचे कारणही शपथपत्रात नमूद केले होते. त्यांच्या मते, तेव्हा ते त्यांच्यावर अवलंबून नव्हते. शपथपत्रामध्ये शपथ पत्र देणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचाच उल्लेख केला जातो. म्हणून आता शिवानी मुंडे आणि सिशिव मुंडे यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. धनंजय मुंडे यांनी उल्लेख केलेल्या अपत्यांची नावे 1. शिवानी मुंडे 2. सीशिव मुंडे 3. वैष्णवी मुंडे4. जानवी मुंडे5. आदीश्री मुंडे
महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत भाजपमध्ये उडालेल्या गोंधळावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भूमिका स्पष्ट केली. जागा कमी आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे काही ठिकाणी नाराजी पसरली आहे, हे सत्य आहे. मात्र, 51 टक्के मतांची लढाई जिंकण्यासाठी आम्हाला काही ठिकाणी पक्षप्रवेशाचे प्रयोग करावे लागले, असे बावनकुळे यांनी सांगितले. नाशिक आणि संभाजीनगरमधील घटनांची पक्षाने गांभीर्याने दखल घेतल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जागा कमी आणि इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या जास्त त्यामुळे काही ठिकाणी वातावरण खराब झाले होते. नाशिकमध्ये 122 जागा आहेत, तर अर्ज 700 आलेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची थोडी नाराजी झाली आहे. संभाजीनगरला मी स्वत: होतो. त्याठिकाणी 561 अर्ज आलेत. आपण एकाला उमेदवारी देऊ शकतो, पण त्याठिकाणी 20 लोकांनी मागणी केली. त्यामुळे काही कार्यकर्त्यांची नाराजी आहे. पण कार्यकर्ते पक्षाची भूमिका समजून घेतील. पक्षादेश समजून घेतील आणि खराब झालेले वातावरण आम्ही शांत करू. निष्ठावंत विरुद्ध 'आयाराम': बावनकुळेंचे स्पष्टीकरण बाहेरून आलेल्यांना लगेच उमेदवारी दिली जाते, असा आरोप भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. यावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, काही ठिकाणी आम्ही कधीच जिंकू शकत नाही. काही ठिकाणी कधीच जिंकलो नाही. नाशिकमध्ये 18-20 वॉर्ड असे आहेत, जिथे भाजप कधीच जिंकली नाही. त्यामुळे 51 टक्क्यांची लढाई जिंकण्यासाठी आम्हाला पक्षप्रवेश करावे लागले. शेवटी जो जीता वो सिंकदर. जिथे भाजपचा ओरिजिनल कार्यकर्ता जिंकू शकतो, तिथे कुठेही पक्षप्रवेशाचे प्रयोग केले नाहीत किंवा तसा प्रयोग झाला नाही. जिथे कमी आहोत, तिथे ॲडिशन केलेत, त्यामुळे नवीन उमेदवाराला जागा देण्यात आल्या आहेत, असे बावनकुळे म्हणालेत. कार्यकर्त्यांना एकसंघ लढण्याच्या सूचना नाशिक आणि संभाजीनगर मधील घटना नोंद घेण्यासारख्या आहेत. पक्षाने या घटनांची नोंद घेतलेली आहे. चंद्रपूरमध्येही अशीच परिस्थिती झाली होती. पक्षाने तिथेही नोंद घेतलेली आहे. त्यामुळे जे काही झालंय, त्यातून बाहेर निघून आपल्याला एकसंघपणे लढून महानगरपालिकेत यश मिळवायचे आहे, अशा आमच्या कार्यकर्त्यांना सूचना आहेत. निवडणुकीची तिकिट वाटप करतात, जे काही कमी जास्त झाले, ते आपण दुरुस्त करू, असे आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. 51 टक्के नगरसेवक निवडून येतील मतदानाआधीच भाजपचे चार नगरसेवक निवडून आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वा आम्हाला यश मिळाले आहे. ही आता सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आम्हाला समर्थन मिळत आहे. डबल इंजिन सरकारच आमच्या शहराचा विकास करू शकते, असा विश्वास जनतेचा भाजप महायुतीवर आहे. जनता आता टोमण्यांवर विश्वास ठेवत नाही, तर विकासावर विश्वास ठेवते. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात दोन तृतीयांश बहुमताने आणि 51 टक्क्यांच्यावर नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्याने अनेक ठिकाणी नाराजीचा उद्रेक झाला असून, त्याचे रूपांतर थेट बंडखोरीत होत आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक महापालिकांमध्ये सर्वच पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांचे अश्रू आणि कार्यकर्त्यांचा संताप हे चित्र ठळकपणे दिसून आले आहे. मुंबईतील मालाड परिसरातील प्रभाग क्रमांक 43 मध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. हा प्रभाग ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जात असताना, याच ठिकाणी बंडखोरी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय, तसेच आमदार सुनील प्रभू यांच्या मतदारसंघातील युवासेना सहसचिव समृद्ध शिर्के यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जागावाटपात हा प्रभाग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला दिल्याने शिर्के नाराज होते आणि अखेर त्यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत यावेळी राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले असून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही ठाकरेंच्या युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रित लढत देत आहे. दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची महायुती आहे, तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युतीमुळे अनेक ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. मात्र, या सर्व आघाड्यांना बंडखोरीचा मोठा फटका बसताना दिसतोय. प्रभाग क्रमांक 43 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे हा प्रभाग ठाकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, जागावाटपात हा प्रभाग तुतारीला गेल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी होती. त्यातूनच समृद्ध शिर्के यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आपल्या कामावर आणि जनतेच्या पाठिंब्यावर विश्वास ठेवत आपण निवडून येऊ, असा दावा शिर्के यांनी केला आहे. त्यामुळे या प्रभागात ठाकरे गटाचा शिलेदार विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे. दरम्यान, महायुतीलाही धक्का बसला असून मुंबई महानगरपालिकेतील दोन वॉर्डमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाद झाले आहेत. वॉर्ड क्रमांक 211 आणि 212 मध्ये महायुतीचा एकही उमेदवार रिंगणात राहिलेला नाही. त्यामुळे मतदान होण्यापूर्वीच या दोन प्रभागांमधून महायुती निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. एकूणच, मुंबई महापालिका निवडणूक बंडखोरी, नाराजी आणि बदलत्या समीकरणांमुळे अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी युती आणि आघाडींमध्ये फाटाफूट झाली. मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेसेनेमध्ये युती झाली असून त्यांच्याविरोधात ठाकरे बंधू आणि स्वतंत्र लढणाऱ्या काँग्रेसचे आव्हान असेल. पुण्यात भाजप स्वबळावर लढत आहे. येथे अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली असून, मविआ सुद्धा रिंगणात आहे. नागपूरमध्ये भाजप-शिंदेसेनेची युती झाली आहे. येथे काँग्रेस स्वबळावर रिंगणात आहे. नाशिकमध्ये भाजप स्वबळावर असून त्यांचा सामना मविआशी होईल. संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेसना दोघेही स्वबळावर लढत आहेत, तर मविआ एकत्र रिंगणात आहे. त्यामुळे येथे तिरंगा सामना होईल. जाणून घेऊयात कुठल्या महापालिकेमध्ये कोण-कोणाविरुद्ध लढत आहे ते एका क्लिकवर...
काँग्रेस आणि भाजपाचे टेंशन वाढवणारे तिकीट वाटप एकदाचे झाले. दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्याची वेळ उलटून गेल्या नंतर यादी जाहीर केली. त्यामुळे बंडखोरी टाळण्यात यश आले. अशा हवेतही काही उमेदवारांनी लक्ष वेधून घेतले. त्यापैकी एक म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे माजी जनसंपर्क अधिकारी जयंत दीक्षित यांचा मुलगा निनाद दीक्षित याने संघ मुख्यालय परिसरातील वाॅर्डातून फाॅरवर्ड ब्लाॅकचा उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. तीन पिढ्यांचा स्वयंसेवक असलेल्या निनादने भाजपाकडे तिकीट न मागता फाॅरवर्ड ब्लाॅक पक्षाकडून उमेदवारी दाखल केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे. भाजपात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. अनेक दिग्गजांना घरी बसवण्यात आले आहे. यातच महापालिकेची तिकीट नाकारल्याने भाजपमध्ये मोठा असंतोष खदखदत आहेत. नव्या आणि जुन्यांचा वाद निर्माण झाला आहे. नाराज झालेल्यांनी आम्ही सतरंज्यांच्याच उचलायच्या का असा सवाल करून बंडाचा झेंडा फडकावला आहे. ही परिस्थिती उद्भवणार आहे याची आधीच कल्पना असल्याने घेऊन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे माजी जनसंपर्क अधिकारी जयंत दीक्षित यांच्या मुलाने भाजपकडे उमेदवारीसाठी अर्जच केला नाही. त्यांनी एकेकाळी डाव्यांचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या फॉरवर्ड ब्लॉकचा झेंडा खांद्यावर घेऊन महापालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. निनादने प्रभाग क्रमांक २५मधून त्याने आपली दावेदारी दाखल केली आहे. या प्रभागातील एका जागेसाठी मागीलवेळी दोन कट्टर स्वयंसेवकांमध्ये मोठा राडा झाला होता. गडकरी यांच्या वाड्यापर्यंत हे भांडण गेले होते. त्यामुळे दोन्ही स्वयंसेवकांना तिकीट नाकारण्यात आले होते. यावेळी पुन्हा भाजपने तीच चूक केली. श्रीकांत आगलावे आणि सुबोध आचार्य या दोघांनाही या प्रभागातून उमेदवारी जाहीर केली. दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आला आहे. या पैकी एकाला माघार घ्यावी लागणार असल्याने पुन्हा वाद पेटणार आहे. हे बघून भाजपकडे उमेदवारी मागण्याच्या भानगडीतच पडलो नाही असे निनादने सांगितले. अपक्ष लढल्यास चिन्ह भेटायला वेळ लागतो. त्यामुळे फॉरवर्ड ब्लॉकचे ‘सिंह' हे चिन्ह घेतले. एवढाच त्या पक्षासोबत संबंध आहे. असे निनाद दीक्षित यांनी सांगितले. भाजप आता नेत्यांचा पक्ष झाला आहे. कार्यकर्ते घडवण्याची प्रक्रिया बंद झाली आहे. नेता म्हणेल त्यालाच भाजपचे तिकीट दिल्या जाते. सध्या राज्यभर तिकिटी वाटपावरून असंतोष उफाळून आला आहे, कार्यकर्त्यांना डावलल्याचे चित्र आहे. त्यावरून हे स्पष्ट होते. हे बघूनच निनाद याने वेगळी वाट निवडली.
‘लाडकी’ चा निधी सरकारी कर्मचा-यांच्या खात्यात
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असलेल्या हजारो सरकारी कर्मचा-यांनी थेट शासकीय निधीचा फायदा घेतल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सरकारने संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर […] The post ‘लाडकी’ चा निधी सरकारी कर्मचा-यांच्या खात्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
घरकुलाच्या हप्त्याचा वाद:सेनगावात भाजप पदाधिकाऱ्याचा लाभार्थ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा
हिंगोली जिल्ह्यात घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांना घरकुलाच्या अनुदानाचे हप्ते मिळत नसल्याने संतप्त झालेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्याने सेनगाव पंचायत समितीमध्ये आत्मदहनाचा इशारा दिला आहे तर दुसरीकडे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी औंढा नागनाथ येथे गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत घरकुल योजना राबवली जात असून त्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हयातील पाचही तालुक्यांमधून सुमारे ३ हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांची निवड झाली असून काही जणांना घरकुलाच्या अनुदानाचा १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला तर काही जणांना अद्यापही अनुदानाचा हप्ता दिलाच नाही. दरम्यान, घरकुल मंजूर झाल्यामुळे लाभार्थ्यांनी त्यांची कच्ची घरे पाडून ठेवली आहेत. मात्र आता अनुदानाचा हप्ता मिळत नसल्याने लाभार्थ्यांना घराच्या बाजूने मेनकापडाच्या फाऱ्या बांधून रहावे लागत आहे. सध्या कडाक्याची थंडी सुरु असून यामुळे लाभार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. घरकुलाचे हप्ते शासनस्तरावरून ऑनलाईन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याने लाभार्थ्यांकडून बँकेत चकरा वाढू लागल्या आहेत. दरम्यान, सेनगाव तालुक्यातील पळशी गावातील लाभार्थ्यांना घरकुलाचे अनुदानाचे हप्ते मिळाले नसल्याने भाजपाचे अनुसुचीत जाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर खिल्लारे यांनी लाभार्थ्यांसह प्रभारी गटविकास अधिकारी माधव कोकाटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ता. ५ जानेवारी पर्यंत अनुदानाचे हप्ते न मिळाल्यास लाभार्थ्यांसह आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. या शिवाय काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते, नंदू पाटील, ॲड. पोले, बबन डुकरे, नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी औंढा नागनाथचे गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे यांची भेट घेऊन सुमारे १५०० लाभार्थ्यांचे अनुदानाचे हप्ते का पडले नाहीत याबाबत जाब विचारला. सदर हप्ते तातडीने बँक खात्यात जमा करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास कळविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
१५ जानेवारीला राज्यात शासकीय सुटी; शाळाही राहणार बंद
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी. १५ जानेवारी रोजी मुंबई, ठाण्यासह २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने ‘भरपगारी सुटी’ जाहीर केली आहे. खासगी कंपन्या, आयटी पार्क्स आणि मॉलमधील कर्मचा-यांनाही हा नियम लागू असेल. मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सुटी न देणा-या आस्थापनांवर कडक कारवाईचा इशारा उद्योग आणि कामगार […] The post १५ जानेवारीला राज्यात शासकीय सुटी; शाळाही राहणार बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महायुतीकडून उमेदवारीसह कोटींचे पॅकेज : राऊतांचा दावा
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी (३० डिसेंबर) शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपा आणि शिवसेना यांच्यात अनेक ठिकाणी युती झाली नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांनी दुस-या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे […] The post महायुतीकडून उमेदवारीसह कोटींचे पॅकेज : राऊतांचा दावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रायगड जिल्ह्यातील महाड नगरपरिषद निवडणुकीत झालेल्या राड्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या तुंबळ हाणामारीनंतर पोलिसांनी विकाससह 29 जणांवर गुन्हे दाखल केले असून तो पोलिस दप्तरी 'फरार' आहे. मात्र, मुलगा फरार नसून मी त्याच्या संपर्कात आहे, अशी जाहीर कबुली स्वतः मंत्री भरत गोगावले यांनी तुळजापूर येथे माध्यमांशी बोलताना दिली आहे. यामुळे मंत्र्यांच्या दबावाखाली पोलिस यंत्रणा काम करत आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी महाड नगरपरिषदेच्या मतदानावेळी शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली होती. या हाणामारीत विकास गोगावले यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करताच विकास गोगावले भूमिगत झाला. स्थानिक न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने तो सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. तुळजाभवानीच्या दरबारात गोगावलेंची कबुली धाराशिव दौऱ्यावर असताना भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला. माझा मुलगा फरार नाही, माझे त्याच्याशी नियमित बोलणे सुरू आहे. आम्ही अटकपूर्व जामिनासाठी आधी प्रयत्न केले होते, मात्र ते फेटाळले गेले. आता आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. जर सुप्रीम कोर्टानेही जामीन दिला नाही, तर आम्ही त्याला स्वतःहून पोलिसात हजर करू, असे भरत गोगावले म्हणाले. प्रशासनावर दबावाचा आरोप? पोलिस दप्तरी जो आरोपी 'फरार' म्हणून नोंदवला गेला आहे, तो जर मंत्र्यांच्या संपर्कात असेल, तर पोलिस त्याला अटक का करत नाहीत? असा संतप्त सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. मंत्र्याचा मुलगा कुठे लपला आहे हे 24 दिवस पोलिसांना माहित नाही, पण वडिलांना माहित आहे; हे पोलिसांचे अपयश आहे की सत्ताधाऱ्यांचा दबाव? असा प्रश्नही आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. नेमके प्रकरण काय? महाड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक 2 मध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान शिंदे गटाचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या मारहाणीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप विकास गोगावले आणि त्यांच्या समर्थकांवर करण्यात आला आहे. या घटनेनंतर महाड पोलिस ठाण्यात विकास गोगावले यांच्यासह एकूण 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी भूमिगत झाले आणि आजपर्यंत ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अमरावती जिल्ह्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. महसूल विभागाशी संबंधित या एकमेव निर्णयानुसार, अमरावती येथील श्री अंबादेवी संस्थानास चिखलदरा तालुक्यातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची, एमटीडीसीची 3 एकर 8 आर जमीन देण्यास मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे धार्मिक पर्यटन आणि देवस्थान विकासाला चालना मिळणार असल्याचे मानले जात आहे. चिखलदरा येथील ही जमीन मूळत: 1975 साली पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा उभारण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला देण्यात आली होती. मात्र, अनेक दशकांनंतरही सुमारे साडे सात एकर क्षेत्रातील ही जमीन वापरात न आल्याने ती पडून होती. शासनाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर या जमिनीचा उपयुक्त वापर व्हावा, यासाठी पर्यायी मार्ग शोधण्यात येत होता. त्याच पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाकडे चिखलदरा येथील देवी पॉईंट आणि विराट देवी देवस्थान यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. या दोन्ही देवस्थानांचा विकास, सुविधा विस्तार आणि भाविकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यासाठी संस्थानाने शासनाकडे जमिनीची मागणी केली होती. देवस्थान विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी जागेचा अभाव असल्याने ही मागणी करण्यात आली होती. संस्थानाच्या या मागणीला मंत्रिमंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. निर्णयानुसार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडील सुमारे 3 एकर 8 आर जमीन शासनाकडे जमा करून घेण्यात येणार असून, ती श्री अंबादेवी संस्थानास विनामूल्य देण्यात येईल. ही जमीन भोगवटादार वर्ग–2 या स्वरूपात संस्थानाला मिळणार आहे. विशेष म्हणजे, या जमिनीचा वापर केवळ धार्मिक प्रयोजनांसाठीच करता येणार असून, कोणत्याही व्यावसायिक किंवा अन्य कारणांसाठी वापर करण्यास मनाई राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयामुळे चिखलदरा परिसरातील धार्मिक स्थळांच्या विकासाला गती मिळेल, तसेच श्रद्धाळू आणि पर्यटकांसाठी सुविधा वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पर्यटनासाठी वापरात न आलेली जमीन आता धार्मिक विकासासाठी वापरात येणार असल्याने, स्थानिक पातळीवर रोजगार आणि पर्यटनालाही अप्रत्यक्ष लाभ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीरा - भाईंदर येथील एका उमेदवाराचा निवडणुकीच्या धावपळीत हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. यामुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, नागपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने आईला मुखाग्नि देणाऱ्या एका उमेदवाराला स्मशानभूमीतच पक्षाचा एबी फॉर्म दिल्याची घटना घडली आहे. या घटनेची राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रात सध्या मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांचा फड रंगला आहे. यासाठी मंगळवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यासाठी सर्वच उमेदवाराची चांगलीच दमछाक झाली. मीरा भाईंदर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जावेद पठाण (66) यांनी मंगळवारी सकाळी प्रभाग क्रमांक 22 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर दुपारी 3.30 च्या सुमारास शहरातील हैदरी चौक परिसरात त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तत्काळ उपचारासाठी लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अजित पवारांनी व्यक्त केले दुःख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जावेद पठाण यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जावेद पठाण यांचं आकस्मिक दुःखद निधन झालं. जनसेवेचं ध्येय मनी बाळगणाऱ्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील सदस्याचं असं निघून जाणं मनाला चटका लावून जाणारी बाब आहे. मात्र काळाच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. मी जावेद पठाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबियांना मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. शिंदे गटाने स्मशानभूमीतच दिला एबी फॉर्म दुसरीकडे, सत्ताधारी शिवसेनेने निवडणुकीच्या रणधुमाळीत मृत्यू झालेल्या आईला मुखाग्नि देणाऱ्या एका उमेदवाराला स्मशानभूमीतच पक्षाचा एबी फॉर्म दिल्याची घटना नागपुरात घडली आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, शिवसेनेने नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मधून योगेश गोन्नाडे यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी गोन्नाडे यांच्या आईचे आईचे निधन झाले. मंगळवारी नागपूर येथील एका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ दुपारी 3 वाजेपर्यंत होती. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक नेते थेट स्मशानभूमीत गेले आणि त्यांनी गोन्नाडे यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला. त्यानंतर योगेश गोन्नाडे यांनी तातडीने निवडणूक कार्यालय गाठून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी ते चांगलेच भावुक झाले. शिंदे गटाने योगेश यांची कन्या कृतिका गोन्नाडे यांनाही प्रभाग क्रमांक 8 मधून पक्षाची उमेदवारी दिली आहे. तेजस्वी घोसाळकरांना भाजपतून विरोध दुसरीकडे, भाजपने मुंबई महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 2 मधून ठाकरे गटातून आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांत मोठा असंतोष पसरला आहे. एका इच्छुक महिला उमेदवाराने यासंबंधी तेजस्वी घोसाळकर यांच्यासह भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपुढे व्यासपीठावरूनच जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. पण कार्यकर्ता काय असतो? मी पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळे मी बोलणार. मी कुणालाही शिवीगाळ किंवा दादागिरी करत नाही. केवळ मनातील भावना व्यक्त करत आहे. भाजपने आमच्याकडून फॉर्म भरून घेण्याची खोटी कारवाई केली, असे या उमेदवाराने म्हटले आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुडपाड परिसरात कॅनलच्या पाण्यात पट्टेदार वाघाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. कॅनलमध्ये पाण्यात तरंगत असलेला वाघाचा मृतदेह पाहून शेतकऱ्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत वाघाचा परिसर सील करून पंचनामा करण्यात आला. प्राथमिक पाहणीत वाघाच्या शरीरावर बाह्य जखमा स्पष्टपणे दिसून न आल्याने मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला की शिकार अथवा विजेचा धक्का, विषबाधा किंवा अन्य कारणामुळे मृत्यू झाला, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच वाघाच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, वन्यजीव जंगल सोडून पाण्यासाठी किंवा भक्ष्यासाठी मानवी वस्त्यांच्या जवळ येत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे वन्यजीव व्यवस्थापनाबाबत वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जंगलातील पाणी, खाद्यसाखळी आणि अधिवासाची योग्य व्यवस्था न झाल्यास अशा घटना वाढण्याची शक्यता असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, तसेच परिसरात गस्त वाढवण्यात येईल, असे आश्वासन वनविभागाकडून देण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचा रंग भगवा होता. पण उद्धव ठाकरे यांच्या काळात तो हिरवा झाला. त्यांच्या काळात मराठी मुंबई मुस्लिम मुंबई झाली आहे, अशी तिखट टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना केली आहे. भाजप मुस्लिम मुंबई करण्याचे कारस्थान केव्हाही यशस्वी होऊ देणार नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीने सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. या निमित्ताने सत्ताधारी व विरोधी बाकावरील राजकीय पक्षांत सातत्याने चिखलफेक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेद्वारे ठाकरे बंधू विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, मराठी मुंबई आता मुस्लिम मुंबई झाली आहे. किरीट सोमय्या किंवा अमित शहा यांचा नव्हे तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचा हा रिपोर्ट आहे. 2025 मध्ये हिंदू लोकसंख्या 54 टक्क्यांखाली व मुस्लिम लोकसंख्या 30 टक्क्यांवर जाईल. मुंबईत हिंदूंचा जन्मदर 1.3 टक्के, तर मुस्लिमांचा जन्मदर 2.6 टक्के म्हणजे दुप्पट आहे. ठाकरे बंधूंचे मुस्लिम मुंबई बनवण्याचे कारस्थान उद्धव ठाकरेंचा सहकारी एमआयएम पक्ष म्हणतो, मुंबईचा महापौर खान, पठाण किंवा बुरखाधारी व्हावा. हे आमचे लक्ष्य आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यावर एक शब्दही बोलत नाहीत. मुंबईत बांगलादेशींचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यावरही ते चकार शब्द बोलत नाहीत. मुंबईतून माफिया कंत्राटदारांकडून तुम्हाला पैसे मिळतात. त्यामुळे एमआयएम, उद्धव ठाकरे व राज ठाकरे मुस्लिम मुंबई बनवण्याचे कटकारस्थान रचत असतील. पण महायुती त्यांचे कट कारस्थान कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असे सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या पुढे म्हणाले, सध्या मोठ्या ठाकरेंसोबत छोटे ठाकरे एकत्र आलेत. ते मुंबई ही मराठी माणसांची असल्याचा दावा करतात. पण प्रत्यक्षात मुस्लिम मुंबई करण्याच्या कारस्थानात सहभाग घेतात. माझ्याकडे जनगणनेची आकडेवारी आहे. 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा मुंबईत मुस्लिम लोकसंख्या 8.8 टक्के होती. 2011 मध्ये हा आकडा 20.68 टक्क्यांवर पोहोचला. 2025 मध्ये हा आकडा 24.98 टक्क्यांवर पोहोचला. मुस्लिम जन्मदर झपाट्याने वाढत आहे. गत काही वर्षांत बांगलादेशींचे आक्रमण वाढले आहे. जगातील राजधानीच्या मोठ्या शहरांत असेच षडयंत्र सुरू आहे. लंडन व न्यूयॉर्कचा महापौर पाहा. बल्गेरियातही तेच सुरू आहे. बांगलादेशात हिंदूंना मारले जात आहे आणि इथे बांगलादेशींना घुसवले जात आहे. त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व मुंबई महापालिकेला अधिक जागरूक रहावे लागेल. 2026 माझी बांगलादेशी घुसखोरावर बारीक नजर असेल, असे ते म्हणाले. ठाकरेंनी मुस्लिमांपुढे शरणागती स्वीकारली सोमय्या म्हणाले, गतवर्षीच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी व्होट जिहाद केला. त्यांनी धारावीत 25 हजार मुस्लिमांचे नेतृत्व करत अनधिकृत मशिदींसाठी पुढाकार घेतला. बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या हिंदुत्त्वामुळे 1992 मध्ये मुंबई वाचली. पण उद्धव ठाकरे यांनी मुस्लिमांपुढे सपशेल शरणागती स्वीकारली. उत्तर भारतीय असो, गुजराती असो, राजस्थानी असो, हिंदू हा हिंदूच आहे. पण उद्धव ठाकरेंना मुंबईचा महापौर नाही तर महापालिकेतील माफिया कंत्राटदारांवर त्यांचे नेतृत्व हवे आहे. याऊलट भाजपचे लक्ष मुंबईच्या विकासावर आहे.
धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व विमानतळांच्या विकासकामांमध्ये तसेच धोरणनिर्मितीमध्ये सुसूत्रता राहावी,या उद्देशाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.केंद्र शासनाची ‘उडान’ योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण केंद्र शासनासाठी नोडल एजन्सी म्हणून काम पाहते,तर राज्यात ही योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची नोडल एजन्सी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा […] The post धाराशिव विमानतळासह चार विमानतळ हस्तांतरणास मंजुरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये उत्तर भारतीय महापौर विराजमान होईल. या ठिकाणी उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू, असा ठाम विश्वास व्यक्त करत भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी ऐन महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना डिवचले आहे. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजकारण मुंबई, मराठी माणूस आणि उत्तर भारतीयांना विरोध करूनच सुरुवात झाले. उत्तर भारतीयांना अनेकदा या पक्षांनी वेगवेगळी कारणे पुढे करत मारझोडही केली. आता ऐन निवडणुकीत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध उत्तर भारतीय हा मुद्दा मुंबईत पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठी माणसा जागा हो, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कृपाशंकर सिंहाना उत्तर दिले आहे. नेमके प्रकरण काय? कृपाशंकर सिंह यांनी विशेषतः मीरा-भाईंदर महानगरपालिकेबाबत मोठा दावा केला आहे. उत्तर भारतीय समाजातील व्यक्तीला महापौरपदावर बसवण्यासाठी आवश्यक तेवढे नगरसेवक निवडून आणले जातील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. उत्तर भारतीय मतदारांची संख्या आणि त्यांचा राजकीय सहभाग लक्षात घेता, हा समाज निर्णायक ठरू शकतो, असा संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळतो. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करून महापौरपदापर्यंत मजल मारण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्राबाबत अंदाज कृपाशंकर सिंह यांनी केवळ एका महानगरपालिकेपुरता मुद्दा न ठेवता, संपूर्ण महाराष्ट्राबाबत भाकीत केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होईल, असा ठाम दावा त्यांनी केला. या विधानामुळे महायुतीकडून निवडणुकांची तयारी जोरात सुरू असल्याचे संकेत मिळतात. विशेषतः मुंबई महानगरपालिका, मीरा-भाईंदरसारख्या शहरी भागांमध्ये सत्ता मिळवण्याचा निर्धार महायुतीने केल्याचे या वक्तव्यातून स्पष्ट होते. निवडणूक रणनीतीचा भाग महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांची एकत्रित ताकद आणि विविध समाजघटकांवर असलेली पकड लक्षात घेता, सिंह यांचे विधान केवळ राजकीय घोषणा नसून निवडणूक रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे. विशेषतः उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांना राजकीय प्रतिनिधित्वाची भावना देण्यासाठी हा मुद्दा पुढे आणल्याचे चित्र दिसून येत आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू दरम्यान, कृपाशंकर सिंह यांच्या या विधानामुळे मुंबई आणि राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधूंच्या प्रभावाखाली असलेल्या मुंबईत उत्तर भारतीय महापौराचा दावा केल्याने आगामी निवडणुकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना वेग येण्याची चिन्हे आहेत. महायुतीची ही भूमिका प्रत्यक्ष निवडणुकांत कितपत प्रभावी ठरते, आणि उत्तर भारतीय मतदारांचा कौल कोणत्या दिशेने जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वीच या वक्तव्याने राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाल्याचे स्पष्ट होत आहे. मनसेचे प्रत्युत्तर कृपाशंकर सिंह यांच्या या विधानावर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील प्रत्यत्तर दिले आहे. या संदर्भात मनसेने म्हटले की, मुंबईसह सर्वत्र आम्ही इतके उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणू की, महापौर उत्तर भारतीयच असेल... हे विधान आहे भारतीय जनता पक्षाच्या कृपाशंकर सिंग यांचं... चरितार्थासाठी आलेल्या, उत्तर भारतीयांना मराठी माणसाने आश्रय दिला आणि याच उत्तर भारतीयांनीच आज मराठी माणसाच्या डोक्यावर थयथय नाचायला सुरुवात केली आहे. मराठी माणसा आतातरी जागा हो..!
हातात भाजपचे तिकीट असूनही एका उमेदवाराला आपली उमेदवारी दाखल करता आली नसल्याची विचित्र गोष्ट मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 212 मध्ये घडली आहे. यामुळे भाजपला निवडणुकीपूर्वीच एका जागेचा फटका सहन करावा लागला आहे. वेळ खरोखरच फार मौल्यवान असतो. तो कुणासाठीही थांबत नाही. याची अनेकांना प्रचिती येते. हीच प्रचिती मंगळवारी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराला आली. मंगळवारी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यासाठी सर्वच उमेदवारांची ठराविक वेळेत अर्ज भरण्यासाठी पळापळ सुरू होती. पण वॉर्ड क्रमांक 212 मधील भाजपच्या उमेदवार मंदाकिनी खामकर यांना 15 मिनिट उशीर झाल्यामुळे हातात भाजप सारख्या बलाढ्या पक्षाचा फॉर्म असूनही तो भरता आला नाही. वेळेचे व्यवस्थापन करण्यात चूक अन् जन्माची अद्दल त्याचे झाले असे की, भाजपने मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 212 मध्ये मंदाकिनी खामकर यांना उमेदवारी दिली होती. पक्षाने वेळेत त्यांना एबी फॉर्मही दिला होता. पण निवडणूक अर्जासोबत जोडाव्या लागणाऱ्या नवीन बँक खात्याच्या कामासाठी त्या बँकेत गेल्या होत्या. दुर्दैवाने बँकेतील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. बँकेतील काम आटोपून मंदाकिनी खामकर जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचल्या, तेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच होती. पण मंदाकिनी खामकर 15 मिनिटे उशिरा प्रभाग कार्यालयात पोहोचल्या. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपली असून, खिडकी बंद झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. त्यामुळे हातात भाजपसारख्या बलाढ्य पक्षाचे तिकीट असूनही त्यांना वेळ पाळण्यात झालेल्या अक्षम्य चुकीमुळे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावे लागले. यामुळे मुंबई महापालिकेच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपला निवडणुकीपूर्वीच एका जागेचा फटका सहन करावा लागला. सध्या वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपचा एकही अधिकृत उमेदवार नाही. त्यामुळे पक्षापुढे कुणाला पाठिंबा द्यायचा? हा पेच उभा टाकला आहे. दरम्यान, वेळ फार मौल्यवान असते, ती कुणासाठीही थांबत नाही हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हे ही वाचा... ठाकरे गटाने मनसेचा आवळा देऊन कोहळा काढला:भाजपचा आरोप; काँग्रेसने वंचितचे जे केले तेच उद्धव यांनी राज ठाकरेंचे केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला आवळा देऊन कोहळा काढल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. ठाकरे गटाने सन्मानाच्या नावाने राज ठाकरेंना घरी बोलावले व तसेच त्यांच्या घरी फेऱ्याही मारल्या. पण प्रत्यक्षात 50 जागांवरच मनसेची बोळवण केली, असे भाजपने म्हटले आहे. वाचा सविस्तर
महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये सुरू असलेला उद्रेक आज सलग दुसऱ्या दिवशीही कायम होता. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. सावेंच्या गाडीला काळं फासणे आणि कराडांची गाडी रोखून धरल्याने निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी अखेर आमदार संजय केणेकर रिंगणात उतरले. त्यांनी नाराज कार्यकर्त्यांची आर्त हाक ऐकून घेत त्यांना न्याय देण्याचा शब्द दिला. भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाबाहेर आज दुपारी अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. नेते आणि कार्यकर्त्यांमधील संघर्ष विकोपाला गेलेला असतानाच संजय केणेकर तेथे दाखल झाले. केणेकरांना पाहताच वर्षानुवर्षे पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा बांध फुटला. भाऊ, आम्ही काय गुन्हा केला? आम्हाला का डावलले? अशी विचारणा करत कार्यकर्ते केणेकरांच्या गळ्यात पडून रडू लागले. प्रशांत भदाणे यांना 'सी-फॉर्म'चा शब्द या आंदोलनात सर्वात जास्त संतापलेला निष्ठावंत कार्यकर्ता प्रशांत भदाणे याला केणेकर यांनी जवळ घेतले. भदाणे यांना अश्रू अनावर झाले होते. मी कुठे कमी पडलो? अशी विचारणा भदाणे यांनी संजय केणेकरांना केली. यावर तू चिंता नको करू, मी तुझ्यासोबत आहे. मी तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही. मी तुझ्यासाठी 'सी-फॉर्म' (C-Form) प्राप्त करतो, तू आता शांत हो, असे आश्वासन संजय केणेकर यांनी प्रशांत भदाणे यांना दिले. एकाचवेळी सगळ्यांना न्याय देता येत नाही - केणेकर यानंतर संजय केणेकर यांनी माध्यमांश संवाद साधला. ते म्हणाले, पक्ष एकाचवेळी सगळ्यांना न्याय देऊ शकत नाही. वर्षानुवर्षे, एकनिष्ठपणे कार्यकर्ता काम करत असतो. त्यामुळे कार्यकर्त्याच्या संतापाचा अनावर होणे सहाजिकच आहे. भाजपचे संस्कार आहेत. ३८ वर्षांपासून मी पक्षात काम करतोय. संयम बाळगणे, समजूतदारपणा घेणे आपल्या संस्कृतीत आहे. नाराजांची 'सरकार'मध्ये सोय करणार? काही कार्यकर्ते १० वर्षांपासून समर्पितपणे काम करत आहेत, त्यामुळे त्यांचा संताप अनावर होणे सहाजिकच आहे. परंतु, त्यांची समजूत काढायला मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी चाललो आहे. ज्यांना ज्यांना पक्ष संधी देऊ शकला नाही, त्या कार्यकर्त्याची आणि त्याच्या कुटुंबाच्या मनस्थितीची जाणीव मला आहे. कारण मी पण अशाच वॉर्डाच्या कार्यकर्त्यापासून महामंत्री झालेलो आहे. आपले सरकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला त्याच्या त्याच्या पोझिशनमध्ये या सरकारमध्ये बसवण्याचे काम मी करणार आहे. निश्चितपणे कार्यकर्त्याची समजूत काढू, असेही केणेकर म्हणाले.
नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज!
मुंबई : प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. सध्या राज्यात महापालिकेच्या निवडणुकांचे वातावरणही आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. २०२५ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सध्या मुंबई, पुणे, नागपूर यांसह बहुतांश ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. […] The post नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सातारा जिल्ह्यातील कराड नगरपालिकेतील सत्तास्थापनेनंतर एक भावनिक आणि तितकाच राजकीय अर्थ लावला जाणारा प्रसंग मध्यरात्री पाहायला मिळाला. भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कराड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची घेतलेली गळाभेट राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे राजेंद्रसिंह यादव हे शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते असून त्यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. तरीही उदयनराजेंनी वैयक्तिक मैत्रीपोटी घेतलेली ही भेट आणि त्यावेळी त्यांच्या डोळ्यांतून ओघळलेले आनंदाश्रू अनेक राजकीय संकेत देणारे मानले जात आहेत. कराड नगरपालिकेत शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या युतीने सत्ता स्थापन केली असून राजेंद्रसिंह यादव यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. या विजयानंतर मध्यरात्री उदयनराजे भोसले थेट यादव यांच्या भेटीसाठी पोहोचले. गळाभेट घेताच उदयनराजेंना भावना आवरता आल्या नाहीत. पार्टी पाहिजे, पार्टी, असे मिश्कील शब्द उच्चारत मित्राला शुभेच्छा देताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू स्पष्टपणे दिसत होते. हा क्षण उपस्थितांसाठी अनपेक्षित आणि भावूक करणारा ठरला. राजेंद्रसिंह यादव आणि त्यांचे बंधू विजय यादव हे दोघेही उदयनराजे भोसले यांचे जुने मित्र असल्याची माहिती आहे. वैयक्तिक मैत्रीचे नाते जरी घट्ट असले, तरी याच नगरपालिकेच्या निवडणुकीत यादव बंधू आणि भाजप आमनेसामने होते. त्यामुळेच या निवडणूक प्रक्रियेत खासदार उदयनराजे भोसले मुद्दामहून लांब राहिले होते. पक्षीय भूमिका आणि वैयक्तिक संबंध यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे बोलले जात होते. मात्र निकालानंतर मित्र नगराध्यक्ष झाल्याचे कळताच उदयनराजेंनी कोणताही राजकीय विचार न करता थेट भेट घेतल्याचे चित्र समोर आले. भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने नगराध्यक्षपद पटकावल्यानंतर, भाजप खासदाराने त्याची गळाभेट घेणे हा केवळ भावनिक क्षण नसून त्याचे राजकीय अर्थही काढले जात आहेत. सातारा जिल्ह्यातील राजकारणात उदयनराजे भोसले यांचे वजन मोठे आहे. अशा परिस्थितीत ही भेट केवळ वैयक्तिक मैत्रीपुरती मर्यादित आहे की त्यामागे भविष्यातील काही राजकीय संकेत दडले आहेत, यावर चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावर या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या भेटीदरम्यान उदयनराजेंनी राजेंद्रसिंह यादव यांचे मनापासून अभिनंदन केल्याचे सांगितले जाते. मित्राच्या यशाचा आनंद व्यक्त करताना त्यांनी कोणताही पक्षीय रोख न ठेवता मोकळेपणाने संवाद साधल्याचे उपस्थितांनी सांगितले. मित्र जिंकला, एवढंच महत्त्वाचं आहे, अशी भावना त्यांच्या देहबोलीतून स्पष्ट होत होती. निवडणुकीच्या राजकारणात क्वचितच पाहायला मिळणारा हा भावनिक क्षण असल्याने तो अधिकच लक्षवेधी ठरला. दरम्यान, या गळाभेटीनंतर साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत असतानाही उदयनराजेंनी घेतलेली ही भूमिका अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरली आहे. आगामी स्थानिक राजकारणात या मैत्रीचे प्रतिबिंब कसे उमटते, आणि याचा कोणता राजकीय परिणाम होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी मित्र नगराध्यक्ष झाल्याचा आनंद, हीच या भेटीची अधिकृत ओळख असली, तरी राजकारणात अशा भेटी कधीच केवळ भावनिक राहत नाहीत, हेही तितकेच खरे आहे.
भाजपने निष्ठावंतांना डावलून उपऱ्या लोकांना तिकीट दिल्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या संयमाचा उद्रेक झाल्याची भावना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी व्यक्त केली आहे. भाजपचे सध्याचे धोरण वापरा व फेकून द्या असे आहे. त्यामुळे संभाजीनगरात इच्छुक उमेदवारांचा आक्रोश दिसून येत आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी आमच्या पक्षातही काही ठिकाणी उपरे लोक घेतल्याच्या तक्रारी येत असल्याची कबुली दिली. महायुती तुटल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून सुरू झालेला गृहकलह आता जवळपास नियंत्रणाबाहेर गेला आहे. मंगळवारी रात्री भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयापुढे संतप्त कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व गोंधळ घाला. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची गाडी रोखून धरली. तसेच राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाडीला काळे फासून आपला निषेध नोंदवला. यावेळी प्रशांत भदाने नामक इच्छुक उमेदवाराने आपल्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी सावे व कराड यांनी पोलिस संरक्षणात तेथून काढता पाय घेतला. भाजपमध्ये राडा तर होणारच या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या अंतर्गत कलहावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, भाजमध्ये राडा तर होणारच आहे. कारण, सर्वच पक्षांमध्ये, आमच्याही पक्षामध्ये काही ठिकाणी उपरे लोकं घेतल्याच्या तक्रारी येत आहेत. भाजपमध्ये हे प्रमाण सर्वात जास्त आहे. भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना उमेदवारी देण्यात आल्याची ओरड होत आहे. निष्ठावंतांना डावलण्यात आल्याची चर्चा जोरात आहे. त्यातून हा उद्रेक झाला आहे. खरे तर भाजपचे धोरण वापरा आणि फेकून द्या असे आहे. त्यामुळे संभाजीनगरात जो आक्रोश दिसत आहे, तो बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी दिल्यामुळे होत आहे. पूर्वी काँग्रेसची जी स्थिती होती ती स्थिती आता भाजपची झाली आहे. ते पुढे म्हणाले, संभाजीनगरमध्ये भाजप - शिवसेनेची युती होण्याचे शेवटपर्यंत संकेत होते. पण काल त्यांनी वेगवेगळे लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांना जागा देण्याचा स्कोप होता. परंतु त्यांनी तसे केले नाही. सध्या जे वातावरण तयार झाले ते त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मला त्यावर अधिक भाष्य करणे चुकीचे वाटते. पण एक गोष्ट नक्की आहे की, काँग्रेस वैचारिक दृष्टिकोनातून लढत आहे, तर भाजप हा सत्ता मिळवण्यासाठी निष्ठा बाजूला ठेवून निवडणूक लढवत आहे व त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी तिकीट वाटप केले हे स्पष्ट होते, असे वडेट्टीवार म्हणाले. काय म्हणाले भाजपचे इच्छुक उमेदवार? भाजपचे इच्छुक उमेदवार प्रशांत भदाने आपल्या पक्षावर संताप व्यक्त करताना म्हणाले की, मी सर्वेक्षणात आघाडीवर होतो. रात्रंदिवस पक्षासाठी झटलो, पण साहेबांनी त्यांच्या पीएला तिकीट देऊन माझा घात केला. मला अंधारात ठेवले गेले. आता मला काही झाले तर त्याला नेतृत्व जबाबदार असेल.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला आवळा देऊन कोहळा काढल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. ठाकरे गटाने सन्मानाच्या नावाने राज ठाकरेंना घरी बोलावले व तसेच त्यांच्या घरी फेऱ्याही मारल्या. पण प्रत्यक्षात 50 जागांवरच मनसेची बोळवण केली, असे भाजपने म्हटले आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू व मनसेची युती झाली आहे. यामुळे सत्ताधारी महायुतीचे मुंबईतील राजकीय समीकरण बिघडल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका केली आहे. काँग्रेसने वंचित सोबत जे केले तेच उद्धव यांनी राजसोबत केले भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये या प्रकरणी म्हणाले की, आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं तेच केलं, जे काँग्रेसने वंचितसोबत केलं आहे. पडेल जागा देत काँग्रेसने मुंबईत वंचितशी आघाडी केली, तर किरकोळ जागा देत उबाठाने मनसेला गुंडाळलं. सन्मानाच्या नावाखाली बोलावणं, वारंवार राज ठाकरेंच्या घरी फेऱ्या मारण… ठाकरे ब्रॅन्डच्या घोषणा करण हे सगळं उबाठा ने केलं, पण प्रत्यक्षात मर्यादित जेमतेम ५० जागांवर समाधान मानायला लावलं. यालाच आवळा देऊन कोहळा काढणे म्हणतात, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंचा 2019 नंतर भाजप विरोध हाच केंद्रबिंदू केशव उपाध्ये यांनी नुकतीच एका लेखातूनही उद्धव व राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले होते, उद्धव ठाकरेंनी सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यापासून आजवर एकदाही महाराष्ट्राचा व मुंबईचा विकास करण्यासंदर्भातील आपल्या दृष्टिकोनाचा एकदाही परिचय करून दिलेला नाही. 2019 नंतर त्यांनी आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू भाजपच्या विरोधात स्थिर करताना काँग्रेस, शरद पवार, कम्युनिस्ट, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, अरविंद केजरीवाल अशा राष्ट्रीय राजकारणातील म्होरक्यांबरोबर पाट लावला. उद्धव ठाकरेंना सक्रिय राजकारणात येऊन 25 वर्षे होऊन गेली आहेत. या काळात मुंबई महापालिका ताब्यात ठेवताना आणि अडीच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम पाहताना उद्धव ठाकरेंना मुंबई, महाराष्ट्र व मराठी माणसाच्या कल्याणाचे काहीच देणे-घेणे नाही, हे अनेकदा दिसले आहे, असे ते म्हणाले होते. ते पुढे म्हणाले होते, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाल्यानंतर उद्धव ठाकरेंना आपणच घरातून बाहेर काढलेल्या चुलत-मावस भावाची आठवण झाली. ज्या मनसेची संपलेला पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंनी हेटाळणी केली होती, त्याच राज ठाकरेंच्या दारात जाण्याची वेळ नियतीने त्यांच्यावर आणली. आता मनोमिलनानंतरही ठाकरे बंधू मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार, यासारख्या घासून घासून गुळगुळीत झालेल्या मुद्यावरच बोलू लागले आहेत. मुंबापुरीचा विस्तार होत असताना मुंबईकरांपुढे दररोजच्या जगण्यातील हजारो प्रश्न तयार झाले आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल, याविषयी गांभीर्याने बोलण्याऐवजी ठाकरे बंधू पुन्हा मुंबई, मराठी या भावनात्मक विषयामध्ये मराठी मतदाराला गुंतवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.
महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये बंडाळीचा वणवा पेटला आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचा आरोप करत आज कार्यकर्त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आज भाजप कार्यालयात आले असता, संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला. भाजपने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी अनेक जुन्या नगरसेवकांचे आणि दिग्गजांचे पत्ते कट केल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. आज सकाळी डॉ. भागवत कराड आज सकाळी प्रचाराबाबत चर्चा करण्यासाठी भाजप कार्यालयात पोहोचले. मात्र, तेथे आधीच जमलेल्या नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला वेढा घातला. कार्यकर्त्यांचा संताप इतका अनावर झाला होता की, काहींनी कराडांच्या गाडीवर हात मारत आपला संताप व्यक्त केला. निष्ठावंतांना डावलल्याचा गंभीर आरोप ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, आंदोलने केली आणि पक्षाला शहरात मोठे केले, त्यांनाच आज उमेदवारी नाकारण्यात आली आहे, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. अनेक प्रभागांमध्ये विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापून तिथे नवख्या किंवा बाहेरून आलेल्यांना संधी दिल्याने निष्ठावंतांनी आता आरपारची लढाई पुकारली आहे. कालही दिव्या मराठे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी असाच पवित्रा घेतला होता, आज दुसऱ्या दिवशी हा संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. यंदा भाजप-शिवसेनेला रोखण्यासाठी काँग्रेसने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी युती टिकवण्यासाठी मोठे मन दाखवत वंचितला 62 जागा देऊ केल्या होत्या. मात्र, अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर समोर आलेल्या माहितीने काँग्रेस नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. वंचितला दिलेल्या 62 जागांपैकी तब्बल 16 जागांवर पक्षाने उमेदवारच उभे केलेले नाहीत. त्यामुळे आता काँग्रेससमोर मोठी नामुष्की ओढावली आहे. मुंबईत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसकडून 62 जागा मागून घेतल्या. मात्र, मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितने 62 जागांच्या कोट्यापैकी केवळ 46 जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. उर्वरित 16 जागांवर पक्षाला उमेदवारच मिळाले नसल्याची चर्चा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्याकडे उमेदवार नाहीत याची पुसटशी कल्पनाही वंचितने काँग्रेसला दिली नाही. जर काँग्रेसला वेळीच माहिती मिळाली असती, तर त्यांनी त्या 16 जागांवर आपले प्रबळ उमेदवार उभे केले असते. मात्र, मुदत संपल्यानंतर ही बाब समोर आल्याने काँग्रेसला आता तिथे 'एबी' फॉर्म देता येणे अशक्य झाले. आता बंडखोरांना पाठिंबा देण्याची नामुष्की ज्या 16 जागांवर वंचितने उमेदवार दिलेले नाहीत, त्यातील अनेक प्रभागांत काँग्रेसची ताकद चांगली आहे. युतीमध्ये मिठाचा खडा पडू नये म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठे मन करत, या जागा वंचितला सोडल्या होत्या. आता या जागांवर काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसल्याने, पक्षाला तिथे बंडखोरी करून अपक्ष उभ्या राहिलेल्या स्वपक्षीय कार्यकर्त्यांनाच पाठिंबा देण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाईल. मुंबईत वंचितने दिलेल्या या अनपेक्षित धक्क्यामुळे काँग्रेसच्या गोटात तीव्र संताप व्यक्त होत असून, आगामी प्रचाराच्या काळात या युतीचे भवितव्य काय असेल? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 1999 नंतर काँग्रेसचा सर्वाधिक जागांवर लढणार जागावाटपातील हा गोंधळ सोडला तर, काँग्रेसने यंदा राज्यात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. 1999 नंतर पहिल्यांदाच काँग्रेस महापालिका निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वबळावर आणि आघाडी करून मैदानात उतरली आहे. काँग्रेस कोणत्या शहरात किती जागा लढवत आहे? काँग्रेसचा स्वबळाचा नारा कोणत्या शहरांत? नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या महापालिकांमध्ये काँग्रेस पूर्णपणे स्वबळावर निवडणूक लढवत आहे. तर लातूर महानगरपालिका निवडणुकीत 5 जागा वंचितला सोडण्यात आल्या असून बाकी सर्व जागा काँग्रेस लढत आहे. नांदेडमध्ये 20 जागा वंचितला बाकी सर्व ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने मुंबई वगळता राज्यभरातील महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीत मतदारांकडून एखाद्या उमेदवाराला मतदान करण्यास होणारा विरोध व त्यामुळे मतदान प्रक्रियेत होणारा गोंधळ व विलंब टाळण्यासाठी मतदान यंत्रावरील (ईव्हीएम) ईएनडी बटण बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एखाद्या मतदाराने पसंतीच्या उमेदवाराला किंवा वरीलपैकी कुणीही नाही अर्थात नोटाला मत देण्यास नकार दिल्यास मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्राधिकाऱ्याने उपस्थित मतदान प्रतिनिधींसोबत नोटाचे बटन दाबून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आदेश आयोगाने दिलेत. राज्यात मुंबई महापालिका वगळता अन्य निवडणुकांत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक घेतली जाते. त्यानुसार प्रत्येक मतदाराला प्रभागाप्रमाणे 4-5 मते देण्याचा अधिकार आहे. या तरतुदींचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विकसित केलेल्या ईव्हीएमच्या बॅलेट युनिटवर शेवटचे (16 वे) बटण ईएनडीचे ठेवले आहे. आयोगाने का घेतला बटन बंद करण्याचा निर्णय? राज्य निवडणूक आयोगाने डिसेंबर 2022 च्या आदेशान्वये मतदान यंत्रावरील ईएनडी बटण कसे वापरायचे याविषयीचे आदेश दिले होते. या निर्णयानुसार, मतदारांकडून त्यांच्या प्रभागात 5 उमेदवारांना मत देणे अभिप्रेत असतानाही ते केवळ 2 उमेदवारांना मत देतात. त्यानंतर नोटा बटन दाबून निवडणूक प्रक्रिया संपल्याचे निर्देशित करावे लागते. पण मतदार हे बटन दाबत नाहीत. यामुळे त्याची मतदान प्रक्रिया पूर्ण होत नाही. परिणामी मतदान केंद्राधिकाऱ्यांनाच नोटाचे किंवा ईएनडी बटनाचा वापर करून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. स्थानिक पातळीवर या बटनाविषयी येणाऱ्या विविध अडचणी तथा मतदानास होणारा विलंब पाहता क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत आयोगाने या निवडणुकीत ईएनडी बटन पांढऱ्या मास्किंग टॅबने बंद करण्याचे आदेश दिलेत. आयोगाने काय दिले आहेत आदेश? जे मतदार मतदान कक्षात आल्यानंतर आपले मतदान पूर्ण करणार नाहीत, तसेच नोटाचे बटही दाबण्यास नकार देतील, त्या ठिकाणी मतदान यंत्र पुढील मतदाराच्या मतदानासाठी सज्ज ठेवण्यासाठी आयोगाने पुढीलप्रमाणे प्रक्रिया सूचवली आहे. एखादा मतदार आपले मतदान पूर्ण न करता मतदान कक्षातून बाहेर पडला तर मतदान अधिकारी किंवा मतदान केंद्राध्यक्षांना कंट्रोल युनिटवरील लाल दिवा न विझल्यामुळे व बिप साऊंड न वाजल्यामुळे मतदाराने मतदान पूर्ण केले नाही ही गोष्ट लक्षात येईल. त्या स्थितीत मतदान केंद्र प्रमुखांनी संबंधित तदाराला त्याचे मतदान पूर्ण न झाल्याची कल्पना देऊन पसंतीच्या उमेदवाराला मत देऊन अथवा नोटा बटन दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती करावी. त्यानंतरही मतदाराने मत देण्यास अथवा नोटा या पर्यायासमोरील बटन दाबण्यास नकार दिला तर मतदान केंद्र प्रमुखांनी बॅलेट युनिटवरील उमेदवारांच्या नावापुढील दिवे एखादा एखादा पुठ्ठा किंवा पुस्तक ठेवून झाकावेत. त्यानंतर मतदान केंद्रात उपस्थित असलेल्या सर्व मतदान प्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांच्या साक्षीने ज्या मतपत्रिकेवरील मतदान अपूर्ण राहिले आहे, त्या मतपत्रिकेवरील नोटा या पर्यायासमोरील बटन दाबून मतदान प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच ही प्रक्रिया करताना मतदाराने केलेल्या मतदानाची माहिती कुणालाही मिळणार नाही याची पुरेशी खबरदारी घ्यावी, असे आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना प्रचंड वेग आला असून, काही ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी तर काही ठिकाणी मतदानाआधीच निकाल लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशाच घडामोडींमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मतदान होण्याआधीच आपलं विजयाचं खाते उघडलं आहे. महापालिकेच्या 122 जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत भाजपच्या दोन महिला उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक 18-अ मधून रेखा राजन चौधरी आणि प्रभाग क्रमांक 26-क मधून आसावरी केदार नवरे या नगरसेविकापदी बिनविरोध विजयी ठरल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी प्रचंड गडबड, गोंधळ आणि हायव्होल्टेज राजकीय नाट्य पाहायला मिळालं. मात्र, कल्याण-डोंबिवलीत काही प्रभागांमध्ये वेगळंच चित्र दिसून आलं. प्रभाग क्रमांक 18-अ मधून भाजपच्या रेखा चौधरी यांनी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या राखीव जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपेपर्यंत त्यांच्या विरोधात एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. परिणामी निवडणूक अधिकारी वरुणकुमार सहारे यांनी अधिकृत माहिती देत रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्याचं स्पष्ट केलं. विशेष म्हणजे रेखा चौधरी यांची ही दुसरी टर्म असून, याआधीही त्यांनी नगरसेविकेची जबाबदारी सांभाळलेली आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 26-क मधून खुल्या प्रवर्गात पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आसावरी केदार नवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याही विरोधात एकही अर्ज न आल्याने त्यांची देखील बिनविरोध निवड झाली आहे. राजकीय क्षेत्रात नवख्या असलेल्या आसावरी नवरे यांचा हा पहिलाच निवडणूक विजय असून, भाजपसाठी हा विजय उत्साहवर्धक मानला जात आहे. दोन वेगवेगळ्या प्रभागांतून विरोधक न उभे राहिल्याने भाजपने कोणतेही मतदान न होता थेट दोन जागांवर विजय मिळवला आहे. रेखा चौधरी यांचा विजय भाजपने केवळ राजकीय नव्हे, तर वैचारिक विजय म्हणून साजरा केला आहे. रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सक्रिय कार्यकर्त्या असून, त्या भाजप महिला मोर्चाच्या कल्याण विभागाच्या जिल्हाध्यक्ष देखील आहेत. त्यांच्या विजयावर प्रतिक्रिया देताना भाजपने याला हिंदुत्वाचा पहिला विजय असे संबोधले आहे. प्रभाग क्रमांक 18-अ मधून एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची नगरसेविकापदी बिनविरोध निवड होणार असल्याचं स्पष्ट झालं असून, कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपने अधिकृतपणे विजयाचं खाते उघडल्याचं मानलं जात आहे. या बिनविरोध विजयामागे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांची चर्चा सुरू आहे. संघटनात्मक ताकद, योग्य उमेदवारांची निवड आणि स्थानिक पातळीवर केलेल्या रणनीतीमुळे भाजपला हा फायदा झाल्याचं बोललं जात आहे. या दोन उमेदवारांच्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे रेखा चौधरी आणि आसावरी नवरे यांचे अभिनंदन केल्याची माहिती समोर आली आहे. मतदानाआधीच मिळालेल्या या यशामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, आगामी निकालांसाठी पक्ष अधिक आक्रमक रणनीती आखताना दिसत आहे. दरम्यान, राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर यांसारख्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी राजकीय नाट्य शिगेला पोहोचलेलं दिसून आलं. अनेक ठिकाणी बंडखोरी, उमेदवार बदल, एबी फॉर्मसाठी झुंबड अशी स्थिती होती. आता 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार असून, 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला एकाच दिवशी 29 महानगरपालिकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्याआधीच कल्याण-डोंबिवलीत भाजपने मिळवलेला हा बिनविरोध विजय राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा संकेत मानला जात आहे.
निष्ठावंतांना वर्षानुवर्षे पक्षासाठी झटूनही उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागतो, मग दुसऱ्या पक्षातून गेलेल्यांना लगेच तिकीट कसं मिळतं? असा थेट सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले की, सध्या शिंदे गटात उमेदवारीसाठी प्रचंड गर्दी झाली असून त्यामागे केवळ विचारसरणी नव्हे, तर आर्थिक व्यवहार आहेत. उमेदवारीसोबत पाच कोटी रुपये दिले जात असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळेच तिकडे अचानक इच्छुकांची रांग लागली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. ही राजकारणाची नव्हे तर बाजाराची प्रक्रिया असल्याचे सांगत त्यांनी शिंदे गटाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, निष्ठा, त्याग आणि संघर्ष याला किंमत न उरता पैशाच्या जोरावर तिकीट मिळत असेल, तर ते लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे राऊत म्हणाले. मतदार हुशार असून अशा प्रवृत्तींना योग्य उत्तर देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज ठाकरे यांच्या पक्षाने जास्तीत जास्त जागा जिंकाव्यात, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे स्पष्ट वक्तव्य संजय राऊत यांनी केले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी ठाकरे गट आणि मनसेमधील समन्वयाबाबत महत्त्वाचे संकेत दिले. मुंबईसह राज्यातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेला भक्कम यश मिळावे, यासाठी दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर राहिलेल्या व्यक्तींनी पुन्हा निवडणूक लढवू नये, असा अलिखित संकेत पूर्वी काही प्रमाणात पाळला जात होता. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा संकेत कोणताही पक्ष गांभीर्याने पाळताना दिसत नसल्याचे राऊत यांनी नमूद केले. आज सर्वच पक्षात जुने संकेत मोडले जात आहेत. त्यामुळे निवडणुका आता केवळ परंपरेवर नाही, तर राजकीय गणितांवर लढवल्या जात आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. मनसेच्या कामगिरीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने किमान 80 टक्के जागा जिंकाव्यात, यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मतांचे विभाजन टाळून मराठी मतदारांची ताकद एकत्र आणणे, हा या प्रयत्नांचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे मुंबईसह अन्य महापालिकांमध्ये मराठी नेतृत्व अधिक मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या संभाव्य संयुक्त सभेबाबतही माहिती दिली. लवकरच ठाकरे बंधू संयुक्त सभा घेतील. त्याचबरोबर संयुक्त जाहीरनाम्याचंही प्रकाशन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. ही संयुक्त भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरेल, असा दावा करत राऊत यांनी येत्या निवडणुकांमध्ये नवे राजकीय समीकरण आकाराला येणार असल्याचे संकेत दिले.
सन २०२५ हे वर्ष वैजापूर तालुक्याच्याइतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेजाणारे ठरले आहे. तब्बल तीनदशकांपासून डोक्यावर असलेलेकर्जाचे ओझे अखेर उतरले आणिरामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचनयोजनेतील १४ गावांतील शेतकऱ्यांनाखऱ्या अर्थाने दिलासा मिळाला. २६मार्च २०२५ रोजी ६३ कोटी ६७ लाखरुपयांच्या कर्जमाफीवर अधिकृतशिक्कामोर्तब झाले आणिपिढ्यान्पिढ्या चालत आलेल्यासंघर्षाची सांगता झाली. या योजनेपोटी तालुक्यातील १४ गावांतील २ हजार ११७ शेतकऱ्यांच्या डोक्यावर तब्बल २१० कोटी रुपयांचे कर्ज होते. सुरुवातीला जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांच्या सातबारावर ३४ कोटीरुपये कर्ज घेऊन योजना सुरू झाली.मात्र जायकवाडी धरणासाठी पाणीसाठा आरक्षित करणे, ढिसाळ नियोजन आणि भ्रष्टाचारामुळे ही योजना बंद पडली आणि शेतकरी कर्जाच्या गर्तेत अडकले. राज्यशासनाने १८ जून २०२४ रोजी योजनेच्या थकीत मुद्दल रकमेची म्हणजेच ६४ कोटी २६ लाख ५९हजार रुपयांची कर्जमाफी जाहीरकेली. मात्र व्याजाचा डोंगर कायमहोता. अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेत १६ जुलै२०२४ रोजी १४५ कोटी २७ लाखरुपयांची कर्जमाफी मंजूर केली.नागपूर हिवाळी अधिवेशनात निधीची घोषणा झाल्यानंतर २०२५ मध्ये प्रत्यक्ष धनादेश सुपूर्द झाला आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्याचा मार्ग मोकळा झाला. ही कर्जमाफी केवळ आर्थिक निर्णय नसून वैजापूरच्या शेतकऱ्यांच्या संयम, संघर्ष आणि न्यायाच्या लढ्याला मिळालेली ऐतिहासिक पावती ठरली. लाभार्थी गावेमहालगाव, भगूर,पानवी, टेंभी, सिरसगाव, बल्लाळीसागज, एकोडीसागज, खिर्डी, माळीसागज, कनकसागज, टाकळीसागज, गोळवाडी, पालखेड, दहेगाव या गावांतीलशेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. नॉलेज: १९९१-९२ मधील योजना रामकृष्ण गोदावरी योजनेची स्थापना १९९१-९२ मध्ये झाली. एकूण २,११७ शेतकऱ्यांकडे सुमारे व्याजासह २१० कोटींचे कर्ज होते. यात शासनाकडूनमुद्दल माफी ६४.२६ कोटी रुपये होती. जिल्हा बँकेकडून कर्जमाफी १४५.२७ कोटींची झाली. १९९५ मध्येजायकवाडीचे पाणी आरक्षण पडले.या वेळी ढिसाळ नियोजन व भ्रष्टाचारामुळे योजना बंद झाली.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ रशीद मामू यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयामुळे ठाकरे गटातील दोन प्रभावी नेते, चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. या उमेदवारीने केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे, तर पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरही अस्वस्थता निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम निवडणुकीत शिवसेनेच्या कामगिरीवर होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपूर्वी अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने रशीद मामू यांचा मुंबईतील शिवसेना भवनात पक्षप्रवेश पार पडला होता. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशाकडे केवळ एक पक्षप्रवेश म्हणून पाहिले गेले नाही, तर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने एक रणनीतिक पाऊल म्हणूनही त्याकडे पाहण्यात आले. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मुंबईसह राज्यभर मुस्लीम मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर, छत्रपती संभाजीनगरमध्येही हे मतदारसंघीय गणित मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात होते. त्यामुळेच रशीद मामू यांचा प्रवेश आणि नंतर उमेदवारी हा अंबादास दानवे यांचा महत्त्वाकांक्षी राजकीय डाव असल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र, हा पक्षप्रवेश सहज पार पडलेला नव्हता. शिवसेना भवनाबाहेरच चंद्रकांत खैरे आणि रशीद मामू यांची थेट आमनेसामने भेट झाली आणि तिथेच तणावाचे चित्र स्पष्ट झाले. रशीद मामू यांनी खैरेंशी गळाभेट घेऊन वातावरण सौम्य करण्याचा प्रयत्न केला असतानाच, चंद्रकांत खैरे यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत झिडकारले. गळाभेट घेतली तरी उमेदवारी मिळणार नाही, असा ठाम इशारा देत खैरेंनी सर्वांसमोर आपला विरोध जाहीर केला होता. इतकेच नव्हे, तर रशीद मामू यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेचे सुमारे पन्नास हजार मतांचे नुकसान होईल, असा दावा करत खैरेंनी या निर्णयावर तीव्र टीका केली होती. त्या घटनेनंतरही अंबादास दानवे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. खैरेंच्या उघड विरोधानंतरही दानवे यांनी रशीद मामू यांना उमेदवारी मिळवून देत आपली राजकीय ताकद दाखवून दिली. यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाले आहेत. रशीद मामू यांना उमेदवारी दिल्यास मी पाहतो काय करायचं ते, असा सूचक इशारा चंद्रकांत खैरे यांनी यापूर्वीच दिला होता. त्यामुळे आता खैरे पुढील काळात नेमकी कोणती भूमिका घेतात, बंडखोरी करतात की, पक्षातच राहून विरोधाची धार कायम ठेवतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या संघर्षामुळे ठाकरे गटासाठी छत्रपती संभाजीनगरची निवडणूक अधिक आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. एका बाजूला मुस्लीम मतदारांचे समर्थन टिकवून ठेवण्याचा अंबादास दानवे यांचा प्रयत्न आहे, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक शिवसैनिक आणि जुने नेते नाराज होण्याची भीती चंद्रकांत खैरे व्यक्त करत आहेत. हा अंतर्गत वाद प्रचारात कितपत उफाळून येतो आणि मतदारांपर्यंत कोणता संदेश जातो, यावरच निवडणुकीतील यशापयश अवलंबून राहणार आहे. शिवसेनेची एकसंघ प्रतिमा या वादामुळे डागाळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच, रशीद मामू यांच्या उमेदवारीने छत्रपती संभाजीनगरमध्ये केवळ निवडणूक लढतच नाही, तर ठाकरे गटातील अंतर्गत शक्तीप्रदर्शनही सुरू झाले आहे. अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे हा संघर्ष उघडपणे समोर येत असताना, याचा थेट फटका मतपेटीत बसणार का? की ठाकरे गट शेवटच्या क्षणी एकत्र येऊन नुकसान टाळणार, हे येणारे दिवसच ठरवतील.
महापालिका निवडणुकीत उमेदवार अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली. सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून पक्षांतर्गत घमासान झाले. भाजपकडून उमेदवारी न मिळालेल्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह थेट निवडणूक प्रमुखांच्या घरीच धाव घेतली. तेथे त्यांच्या अश्रूंचा बांधच फुटला. एक महिला तर भोवळ येऊन पडली. त्यांनी थेट पैशांचा आरोप करत आपल्यावरील अन्यायाचा पाढाच वाचला. भाजपने २१ माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारली. मात्र उमेदवारी न दिलेल्या या २१ पैकी १० माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देत रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. तसेच काँग्रेसनेही दोन माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली नाही. परिणामी उमेदवारी न मिळालेल्या समर्थकांनी आमदारांचा फोटो असलेल्या फलकाला काळे फासत संताप व्यक्त केला. एकूणच निष्ठावानांना बाहेरचा रस्ता अन् आयारामांना ‘रेट कार्पेट’ असे काहीसे चित्र होते. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला. युती-आघाडीसाठी त्या-त्या घटक पक्षांमध्ये चर्चेच्या फैरी झडल्या. मात्र महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात युती झाली तर शिवसेनेच्या शिंदे गटाला स्वबळावर लढावे लागत आहे. तसेच महाविकास आघाडीतील महाविकास आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आघाडी झाली असून, शिवसेनेने (ठाकरे गट) एकला चलोरे'चा नारा दिला. परिणामी ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वाधिक घमासान सत्ताधारी भाजप व विरोधक असलेल्या काँग्रेस, शिवसेनेत झाले. स्वपक्षाने उमेदवारी नाकारलेल्यांनी अन्य पक्षातून उमेदवारी अर्ज भरला. आता राजकीय व अधिकृत उमेदवारांसमोर बंडोबांना शात करत त्यांचे अर्ज मागे घेण्यासाठी समजूत काढण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. आम्हाला हे फळ मिळत आहेत : महायुतीमध्ये राकाँच्या वाट्याला प्रभाग सुटल्याने उर्वरित पान ४ शिवसेना ठाकरे गट : ५५ उमेदवार असून, यात काँग्रेसचे २ , भाजपच्या दोघांनाही संधी दिली आहे. भाजपने ठाकरे गटातील एका माजी नगरसेविकेला तिकीट दिल्याने हिशेब चुकता केला. वंचित बहुजन आघाडी : पक्षाने ५७ ठिकाणी उमेदवार उभे केले असून, एका माजी नगरसेविकेला तिकिट नाकारले आहे. मुंबईत काँग्रेससोबत आघाडी असली तरी शहरात नाही. निवडणुकीपूर्वी भाजपमधील दुरावलेल्यांकडून तिसरी आघाडीची तयारी करण्यात आली. काहींनी थेट जनतेमध्ये जात बैठकही घेतली. यात माजी नगरसेवक हरिश आलीमचंदानी, डॉ.अशोक ओळंबे, आशिष पवित्रकार, गिरीश गोखले आदींचा समावेश होता. मात्र मंगळवारी यापैकी प्रतुल हातवळणे, गिरीश गोखले यांचे निलंबन परत घेऊन पुन्हा भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला; परंतु त्यापैकी केवळ हरिश आलीमचंदानी यांनाच उमेदवारी देण्यात आली. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षापासून दुरावलेल्या काहींना जवळ करीत मोट बांधूच द्यायची नाही, अशी खेळी भाजपकडून खेळण्यात आली. काँग्रेस : पक्षाने १३ पैकी ११ माजी नगरसेवकांना उमेदवारी दिली असून दोन जणांना उमेदवारी नाकारली आहे. पक्षाने एकूण ५५ उमेदवार उभे केले आहेत. शरद पवार गटासोबत आघाडी आहे. भाजपचे १९९४ ते २०१९पर्यंत आमदार असलेले दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्या जुने शहरातील अनेक इच्छुकांना उमेदवारी नाकारण्यात आली. आ. शर्मा यांनी जुने शहरातील विठ्ठल मंदिर परिसरातून आपली राजकीय कारकिर्द १९८५मध्ये सुरू केली. याच भागातून ते नगर परिषद निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. मात्र आता मनपामध्ये याच भागातील प्रभागातून उमेदवारी जाहीर झालेल्या चारपैकी दोन जण मूळचे काँग्रेसचे तर एक उमेदवार शिवसेनेच्या ठाकरे गटाची आहे. आयात उमेदवारांना संधीत देत निष्ठावानांना मात्र डावलण्यात आले. तसेच गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही दिवंगत आ. शर्मा यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न देता माजी महापौरांना संधी देण्यात आली. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ३० वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ काँग्रेसने खेचून आणला. आता मनपा निवडणुकीतही आ. शर्मा यांच्या समर्थकांनाही घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. राकाँ शरद पवार पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकूण ८० पैकी २४ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यात सर्व नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस : राकाँ अजित पवार गटाची भाजपसोबत युती आहे. राकाँने १४ ठिकाणी उमेदवार उभे केले असून, यात माजी महापौरांच्या कुटुंबातील महिलेला संधी दिली आहे. शिवसेना शिंदे गट : शिवसेनेने ७४ जणांना उमेदवारी दिली. उपजिल्हा प्रमुख, एक विद्यमान नगरसेवक व उपशहर प्रमुखाला उमेदवारी नाकारून अन्य पक्षातील इच्छुकांना संधी दिली. पक्षांतर्गत विरोधकांना शह देण्याची आखली रणनिती भाजप : उमेदवारीसह अन्य मुद्द्यांसाठी भाजपने सर्वेक्षण केल्याचा दावा केला. मनपामध्ये सत्ता असताना अनेक मुद्द्यांवर काही नगरसेवकांनी स्थानिक पक्ष नेतृत्वाच्या निर्णयाला विरोध केला. प्रभागात विकास कामे मंजूर करण्यावरून अर्थात ‘रसद’वरुनही वाद झाले. विधानसभा, राज्य पातळीवरील नेत्यांनी मनपाच्या राजकारणात फार ढवळाढवळ करू नये, असे त्यांचे म्हणणे होते. तसेच त्यापैकी काहींनी अकोला पश्चिमच्या विधानसभा निवडणुकीत ‘काम’ दाखवले. परिणामी भाजपचा पराभव झाला. त्यामुळे आता स्थानिक नेतृत्वाकडून अनेकांना उमेदवारी नाकारून पक्षांतर्गत काहींचा हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेस : मनपामध्ये १३ पैकी अल्पसंख्यांक बहुल भागातील २ नगरसेवकांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीतील उमेदवाराला पक्षांतर्गत विरोध झाला. तसेच काही जण एमआयएमच्याही संपर्कात होते. परिणामी काँग्रेसमध्येही कुरघोडीचे राजकारण रंगले. तिसऱ्या आघाडीतील हवाच काढली सत्ताविरोधी लाट थोपवण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप रस्ते, पथदिवे, काही भागात भूमिगत नाली बांधण्याचा दावा करत असले तरी सध्या अवाढव्य मालमत्ता कर व अवाजवी पाणी कर, हे दोन मुद्दे प्रचंड तापले आहेत. त्यामुळे सत्ताविरोधी लाट थोपवण्याच्या नावाखाली २१ माजी नगरसेवकांना संधी नाकारण्यात आली. तसेच अनेक ठिकाणी विरोधी पक्षांतील माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्यात आली. जेणे करुन विरोधक आणखी कमकुवत होईल आणि आयात केलेला उमेदवारच जनतेला फेस करेल. मात्र हे करताना त्या-त्या भागातील बंडखोरांना शांत करण्याचे आणि संधी न मिळूनही पक्षात कायम राहिलेल्यांना सक्रिय करण्याचे आव्हान पक्षासमोर उभे ठाकणार आहे. दिवंगत आमदार शर्मा यांच्या समर्थकांना डावलले
माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा अखेर शिवसेना शिंदे गटाला ‘जय महाराष्ट्र’
सुमारे सात महिन्यांपूर्वीच शिवसेनेत (शिंदे गट) आलेले माजी पालकमंत्री जगदिश गुप्ता यांनी मंगळवारी (दि. ३०) राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे पक्षाने पश्चिम विदर्भ संघटक प्रमुख अशी जबाबदारी दिली होती. त्यांनी पक्षाचा व आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला आहे. अशी माहीती जगदिश गुप्ता यांनीच पत्रकार परिषदेत दिली. जगदिश गुप्ता यांनी सांगितले कि, अलीकडे सर्व राजकीय पक्ष सारखेच झाले आहे. या पक्षांमध्ये नेत्यांच्या समोर मुजरा केल्याशिवाय कोणत्याही कार्यकर्त्याचे भले होत नाही, येथेही हीच परिस्थिती बघितल्याने निराश झालो. माझ्यासोबत अनेक ‘कमिटमेंट’ करण्यात आल्या, त्या काही वैयक्तिक नव्हत्या. ज्या लोकांनी मला अनेक वर्षांपासून साथ दिली, त्यांच्यासाठी मी या ‘कमिंटमेंट’ स्वीकारल्या होत्या. पण, बोलणी झाल्यानंतर लगेच गोष्टी बदलत होत्या. पक्षात प्रवेश घेतल्यापासून ते आतापर्यंत वारंवार हे होत असल्याने आपण शिवसेना पक्ष ( शिंदे गट) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता कोणत्याही राजकीय पक्षावर माझा विश्वास राहिलेला नाही. आता कोणत्याही पक्षात जायचे नाही, हा निर्णय मी घेतला आहे. त्या निर्णयावर मी ठाम आहे. आता अपक्ष म्हणून लढण्याची तयारी असलेल्या हिंमतबाज कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम मी करणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
3 जानेवारीला दिसणार सुपरमून:नववर्षात अवकाश नवलाई; खगोलप्रेमींसाठी वर्षभर घडामोडींची पर्वणी
जेव्हा पृथ्वी आणि चंद्रातील अंतर सर्वात कमी असते, तेव्हा सुपरमून होतो. यामुळे चंद्र मोठा आणि उजळ दिसतो. ३ जानेवारी रोजी पौर्णिमेच्या दिवशी सूपरमून दिसणार आहे. या दिवशी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर कमी राहिल. त्यामुळे चंद्र या दिवशी मोठा व प्रकाशमान दिसेल. सरासरी पृथ्वी-चंद्र हे अंतर ३ लाख ८५ हजार कि.मी. असते. जेव्हा पृथ्वी-चंद्र हे अंतर ३ लाख ७० हजार कि.मी.च्या आत असते त्याला सुपरमून असे म्हणतात. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने समुद्राच्या भरती-ओहोटीची तिव्रता वाढणे, वादळ यासारख्या घटना घडू शकतात. पृथ्वीवरुन आपण नेहमी चंद्राचा ५९ टक्के भाग पाहता येतो. चंद्रावरुन पृथ्वी ही ९८.४ टक्के दिसू शकते. चंद्रावरुन पृथ्वीवर प्रकाशकिरण येण्यास १.३ सेकंद लागतात. चंद्राचे वय हे ४.६५ अब्ज वर्ष आहे. चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षाला ३.८ सेंटीमिटर लांब जात आहे. त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी होईल व १०० वर्षांनी दिवस हा २ मिली सेकंदने मोठा होईल. चंद्रावर ३० हजार विवरे व १२ पर्वत आहे. पर्वत व विवरे दुर्बिणीमधून अगदी चांगल्या प्रकारे पाहता येतात. ३ जानेवारीला संध्याकाळी दिसणारा सूपरमून खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी अवश्य बघावा. नवीन वर्षातील ही पहिली संधी आहे. हा सूपरमून अगदी साध्या डोळ्यांनी पाहता येईल, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली आहे. सुपरमून काय आहे? सुपरमून ही एक खगोलीय घटना आहे. ज्यामध्ये चंद्र त्याच्या सामान्य आकारापेक्षा मोठा दिसतो. वर्षातून तीन ते चार वेळा सुपरमून दिसतात. सुपरमून दिसण्याचे कारण खूपच रंजक आहे. या काळात, चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना त्याच्या अगदी जवळ येतो. या अवस्थेला पेरिजी म्हणतात. दरम्यान, जेव्हा चंद्र पृथ्वीपासून दूर जातो तेव्हा त्याला अपोजी म्हणतात. ज्योतिषी रिचर्ड नोले यांनी पहिल्यांदा १९७९ मध्ये सुपरमून हा शब्द वापरला. चंद्र दर २७ दिवसांनी पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. दर २९.५ दिवसांनी एकदा पौर्णिमा देखील येते. प्रत्येक पौर्णिमा हा सुपरमून नसतो, परंतु प्रत्येक सुपरमून पौर्णिमेला येतो. चंद्र पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतो, म्हणून पृथ्वी आणि चंद्रातील अंतर दररोज बदलते. जुलैच्या सुपर मूनला बक मून असेही म्हणतात.
प्रवाहाविरुद्ध काम करण्यासाठी मोठ्या हिमतीची गरज असते आणि ती छाया देशमुख यांनी दाखवली आहे. त्यामुळे त्या खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत. सध्या समाजापुढे विधवा, विधुर, घटस्फोटित व प्रौढांचे विवाह हा एक गंभीर प्रश्न बनला आहे. पुनर्विवाह ही काळाची गरज असूनही यासाठी पुढाकार घेणारे हात कमी आहेत. अशा परिस्थितीत छाया देशमुख व त्यांच्या सावली ग्रुपचे कार्य अत्यंत वाखाणण्यासारखे आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या विषयात पुढाकार घ्यायला हवा, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले. सावली ग्रुपच्या वतीने मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात मराठा, कुणबी, पाटील देशमुख समाजातील विधवा, विधुर, घटस्फोटित व प्रौढांचा पुनर्विवाह परिचय मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत देशमुख, सावली ग्रुपच्या अध्यक्ष छाया देशमुख, चिंतामण देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी हेमंत काळमेघ यांनी मार्गदर्शन केले. जिथे चालीरीती, रूढी व परंपरा बदलण्याची भीती अनेकांना वाटते, अशा ठिकाणी हा कार्यक्रम होणे कौतुकास्पद आहे. तसेच मातोश्री विमलाबाई देशमुख यांच्या नावाने असलेल्या सभागृहात हा मेळावा होणे हे अत्यंत औचित्यपूर्ण आहे. असे मत व्यक्त केले. सलग चौथ्या वर्षी घेण्यात आलेल्या या पुनर्विवाह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सावली ग्रुपच्या छाया देशमुख यांच्यासह मनाली तायडे, वैशाली गुडधे, पूजा देशमुख, शीतल देशमुख, कल्पना देशमुख, पल्लवी देशमुख, वैशाली देशमुख, स्वाती देशमुख, सुचिता देशमुख यांचे सहकार्य लाभले. मेळाव्याचे प्रास्ताविक छाया देशमुख यांनी केले. मेळाव्याचे संचालन मंजुषा उताणे-देशमुख यांनी तर आभार कल्पना देशमुख यांनी मानले. या मेळाव्यास परभणी, नांदेड, अहमदनगर, नाशिक, मुंबई, बुलढाणा, यवतमाळ आदी जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने विधवा, विधुर, घटस्फोटित, प्रौढ व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. पुस्तकाचे विमोचन मेळाव्यादरम्यान सावली ग्रुपच्या अध्यक्ष छाया देशमुख लिखित दुसऱ्या लग्नाची गोष्ट या दुसऱ्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या पुस्तकात त्यांनी आतापर्यंतचे अनुभव कथन केले आहेत.
विद्यार्थ्यांनी मानसिक, शारीरिक स्वास्थ्याकडे आवर्जून लक्ष द्यावे:विद्यापीठात फिटनेस वीकचे उद्घाटन
आजच्या स्पर्धेच्या व धकाधकीच्या युगात मानसिक व शारीरिक स्वास्थ्य टिकवणे सर्वांचे प्रथम कर्तव्य झाले आहे. स्पर्धेला सामोरे जातांना विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेवर परिणाम होऊ नये, तो निरोगी आणि सुदृढ रहावा. म्हणून विद्यापीठाच्या वतीने फिटनेस कॅम्पचे केलेले आयोजन आजची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सांभाळावे आणि फिटनेस कॅम्पमध्ये आपली शारीरिक तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनात्मक प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. विद्यापीठातील पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने सहा दिवसीय शारीरिक कार्यक्षमता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटनप्रसंगी कुलगुरू बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी प्रकाश मेश्राम, फिट इंडियाचे उज्ज्वल जाधव, पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. तनुजा राऊत. उपस्थित होते. यावेळी फित कापून फिटनेस वीकचे उद्घाटन झाल्याची घोषणा कुलगुरू यांनी केली. मार्गदर्शन करताना कुलगुरू पुढे म्हणाले, आजच्या युगात करिअर घडवण्याच्या आणि पैसे कमवण्याच्या मागे धावताना आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शुगर व बी.पी.च्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वाढीमुळे भारत भारत कॅपिटल होते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. तरुणांमध्ये सुध्दा हे आजार पसरत असून ते चिंताजनक आहे. सर्वांनी आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी अशाप्रकारच्या फिटनेस कॅम्पमध्ये आपली शारीरिक क्षमता तपासून घ्यावी. असे आवाहन करुन त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी प्रत्यक्ष चाचणी केंद्राची पाहणी केली. तसेच स्वत: शारीरिक चाचणी करुन घेतली. ३ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या शारीरिक क्षमता चाचणीमध्ये बी.एम.आय., स्टॅबिलिटी, ग्रीप स्ट्रेंग्थ, रियाक्शन टाईम, फॅट पर्सेंटेज, व्ही.ओ.२ मॅक्स, एक्झॅल कॅपेसिटी, ब्लड प्रेशर, हिमोग्लोबीन, फ्लेक्झिबिलीटी, फिंगर डेक्स्टेरिटी, फोर्टी यार्ड शटल रन, हँड-आय-को-ऑर्डीनेशन, फुट-आय-को-ऑर्डीनेशन, होल बॉडी को-ऑर्डीनेशन, मेमरी स्कोप अशा चाचणी करण्यात येणार आहेत. विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षकांकरिता ही चाचणी नि:शुल्क असून सर्वांनी आपली शारीरिक क्षमता चाचणी करुन घ्यावी. अशी विनंती पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. तनुजा राऊत यांनी प्रास्ताविकेतून केली व आयोजनामागील भूमिका मांडली. सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संचालन निखिलकुमार डोंंगरे, अमिता डुंगडुंग व मुशरफ अली, तर आभार रोजा गुरुंग हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. हेमंतराज कावरे, डॉ. अनुल बिजवे, डॉ. विजय निमकर, डॉ. निलेश इंगोले, डॉ. सौरभ त्रिपाठी, कु. सविता बावनथडे यांच्या मार्गदर्शनाखाली शारीरिक शिक्षण विभागातील प्रथम व व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. आरोग्य दूत म्हणून काम करा यावेळी मनपा शिक्षणाधिकारी प्रकाश मेश्राम म्हणाले, प्रत्येकाने फक्त स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देवून चालणार नाही, तर आरोग्य दूत म्हणून निरोगी आरोग्याचा संदेश समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. तरच या फिटनेस कॅम्पचे उद्दिष्ट खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. असे प्रतिपादन त्यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख महान कृषी क्रांतिकारक:शिक्षक साहित्य संघातर्फे जयंती साजरी
जोपर्यंत शेतकरी आणि बहुजन समाज शिक्षित होत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. केवळ पुस्तकी ज्ञान न देता शेतीवर आधारित तांत्रिक शिक्षण मिळावे. यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी पुढाकार घेतला. मध्य प्रांताचे शिक्षणमंत्री असताना प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी महत्त्वाचे कायदे केले. ज्यांच्या हातात नांगर आहे, त्यांच्या मुलांच्या हातात पुस्तक हवे, हे भाऊसाहेबांचे ब्रीदवाक्य होते. भाऊसाहेब महान कृषी क्रांतिकारक होते. असे विचार जयदीप सोनखासकर यांनी व्यक्त केले. शिक्षक साहित्य संघाच्या राज्य शाखा व अमरावती शाखेतर्फे शिक्षणमहर्षी - कृषिमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंती शिक्षक साहित्य संघाच्या श्याम नगर येथील कार्यालयात साजरी करण्यात आली. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून विचार व्यक्त करीत होते. यावेळी जयदीप सोनखासकर, प्रमुख वक्ते प्रा.अरुण बुंदेले, प्रमुख अतिथी अरविंद चौधरी, सुरेश मडावी, प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे, प्रा.सुशीला मळसणे, गजेंद्र पाथरे, छाया पाथरे, प्रा.विशाल देशमुख, आशीष इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी वक्ते प्रा.अरुण बुंदेले यांनी, डॉ.पंजाबराव देशमुख कृषिमंत्री असताना त्यांनी जे कृषकांसाठी कायदे केले ते कृषकांच्या विकासासाठी वरदान ठरले. श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून जशी शैक्षणिक क्रांती केली. तशीच त्यांनी कृषी क्रांती सुद्धा केली. असे विचार व्यक्त केले. यावेळी प्रा.अरुण बुंदेले यांनी भाऊ ज्ञानदीप या स्वरचित अभंगाचे गायन केले. आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.अतुल ठाकरे यांचा शिक्षक साहित्य संघ व कै. मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठान तर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालक प्रा.सुशीला मळसणे तर आभार गजेंद्र पाथरे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक साहित्य संघाचे, कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. शैक्षणिक क्रांती आणि तसेच कृषी क्रांती याबद्दल अनेकांनी विचार व्यक्त केले.
भावी पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी आणि जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या तालुका स्तरीय पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांसाठी तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था कार्यशाळा घेण्यात आली. शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ‘तंबाखू मुक्त पिढी : शाळांसाठी आव्हान’ या विषयाच्या अनुषंगाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. यामध्ये उपशिक्षणाधिकारी, महानगरपालिका शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण, शाळा केंद्र प्रमुख आणि विषय साधन व्यक्ती उपस्थित होते. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराच्या दुष्परिणामांबाबत समाजात आणि विशेषतः लहान मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी शासन स्तरावर निरंतर प्रयत्न सुरू आहेत. ज्यामध्ये शाळा आणि शैक्षणिक संस्था केंद्र व राज्य शासनाच्या निकषांनुसार तंबाखूमुक्त करण्यासाठी रॅली, पोस्टर, घोषवाक्ये, कविता आणि पथनाट्ये यांसारखे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्री करणे हा दंडात्मक गुन्हा असून १८ वर्षांखालील मुलांना तंबाखू विकणे किंवा तसे करण्यास भाग पाडणे, हा कठोर शिक्षेस पात्र गुन्हा आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील शाळांकरिता विशेष पोस्टर्स, बॅनर्स आणि बोर्ड्सचे वाटप करण्यात येत आहे. हे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षक डॉ. मंगेश गुजर यांनी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या निकषांची माहिती दिली, तर मंगेश गायकवाड यांनी तंबाखू नियंत्रण कायदा २००३ बाबत मार्गदर्शन केले. या मोहिमेत मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, संभाजी नगर यांनी संयुक्त सहभाग नोंदवला असून, कार्यशाळेतील प्रशिक्षित अधिकारी आता शाळा स्तरावर मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन व पर्यवेक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहेत.
सेनगाव येथे घुरुन पाहण्याच्या क्षुल्लक कारणावरून एकास चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून या प्रकरणी ९ जणांवर बुधवारी ता. ३१ सकाळी सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला असून त्यापैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव शहरातील धुमाळगल्ली भागातील दिलीप हरण हे कडाक्याची थंडी असल्यामुळे मंगळवारी ता. ३० रात्री शेकोटी करून शेकत बसले होते. यावेळी त्यांचा करण हरण याच्यासोबत वाद झाला. माझ्याकडे घुरून का बघतो या कारणावरून करण याने शिवीगाळ करण्यास सुरवात केली. शाब्दिक चकमकीनंतर वादाला तोंड फुटले. यावेळी भांडण होत असतांना करण याच्या सोबत इतर आठ जण आले. त्यांनीही दिलीप यांना मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक होत असलेल्या मारहाणीमुळे दिलीप प्रतिकार करू शकला नाही. यामध्ये दिलीप यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. त्यांच्या पोटात, पाठीत, हातावर चाकूचे वार झाल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, सेनगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार सुभाष चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दिलीप यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दिलीप हरण यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी करण हरण, प्रकाश हरण, गणेश हरण, केशव हरण, अर्जुन हरण, शंकर हरण यांच्यासह अन्य तिघांवर बुधवारी ता. ३१ गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने आरोपींची शोध मोहिम सुरु केली असून केशव व शंकर या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर अन्य आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार झाले असून तरुणाई सज्ज झाली आहे. परंतु थर्टी फर्स्टच्या दिवशी ड्रंक अँड ड्राईव्ह करणे मद्यपींना महागात पडणार आहे. दर्यापूर शहर पोलिस नववर्षाच्या निमित्ताने ठिक-ठिकाणी बॅरिकेड्स लावून नाकाबंदी मोहीम राबवणार असून मद्यपी चालकांना तपासण्यासाठी ब्रेथ अनालायझरचा वापर करणार आहे. त्यामुळे मद्यपिंनो सावधान,अशी म्हणण्याची वेळ आली आहे. दरवर्षी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण तयार असते. काहीजण तर नववर्षाची सुरुवात चांगली व्हावी, यासाठी नियोजन करत असतात. तर दुसरीकडे थर्टी फर्स्टच्या दिवशी उत्साही तरुण मद्यपानासह पार्टी करण्याचा बेत आखतात. नववर्षाच्या धुंदीत दारू पिऊन वाहन चालवताना लहान-मोठे अपघात घडू नये तसेच रस्त्यावर कोणताही वाद होऊ नये, यासाठी शहर पोलिसही सज्ज झाले आहे. दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याने ड्रंक अँड ड्राईव्ह करणे चांगलेच महागात पडणार आहे. विशेष म्हणजे नशेत वाहन चालवताना पोलिसांच्यावतीने अपघात रोखण्यासाठी व मद्यपी चालकांना तपासण्यासाठी ब्रेथ ॲनालायझरचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे सुसाट वेगाने वाहन चालविणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. शहरातील एस.टी.आगार चौक, गांधी चौक, अकोला-अंजनगाव-अकोट टी.पाईंट, अमरावती-आसेगाव रोड यासोबतच बुटी चौक, बाभळीसह चौका-चौकात मद्यपी चालकांना चाप लावण्यासाठी शहर पोलिस तैनात राहणार आहे. बेकायदेशीर कृत्य करणारे तसेच सर्वच वाहनधारकावर पोलिसांची करडी नजर राहणार असून थर्टी फर्स्टचा आनंद आपल्याच आवाक्यात घ्यावा, दुसऱ्यांना त्रास होणार नाही व शांतता अबाधित राहील, याची काळजी तरुणाईने घेणे गरजेचे झाले आहे. सुनील वानखडे, ठाणेदार, दर्यापूर. तर सहा महिण्यांची शिक्षा २०२५ या वर्षाला निरोप व नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मध्यरात्री अनेकजण विशेषतः हौशी तरुणाई मद्यपानासोबतब सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न घालणे, ट्रिपल सीट, लायसन्सशिवाय ड्रायव्हिंग, रॉग साइड इत्यादी नियमांचे उल्लंघन करतात. असे केल्यास पोलीस प्रशासनाकडून चालकांविरोधात मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे. या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये दंड किंवा सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांच्या नेतृत्वात स्थानिक नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्र व कचरा डेपोची पाहणी केली. तेथे आढळलेल्या अव्यवस्था दूर करण्याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचनाही देण्यात आल्या. त्यांच्या या भेटीमुळे पदभार स्वीकारण्याआधीच पदाधिकारी ॲक्शन मोडवर आल्याचे स्पष्ट झाले. या भेटीवेळी मुख्याधिकारी मात्र सुटीवर होते. मंगळवारी सकाळी १० वाजताच नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर व नगरसेवक नगरपंचायत कार्यालयात पोहोचले. त्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आढावा घेतला. दरम्यान विनापरवानगी गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश दिले. त्यांच्या या अचानक भेटीमुळे नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे. स्वत: मुख्याधिकारी सुट्टीवर असल्याने न.पं. कार्यालयातील अनेक कर्मचारी विनापरवानगी गैरहजर आढळून आले. अशा सर्व कर्मचाऱ्यांना लगेच कारणे दाखवा नोटीस देऊन योग्य कारवाईचे निर्देश दिले. लाखो रुपये खर्च करूनही कचऱ्याच्या नियोजनासाठी अद्याप जागा तयार करण्यात आली नाही, याबाबत नगराध्यक्षांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने डम्पींग ग्राउंड निर्माण केले. मात्र सदर डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे अस्तव्यस्त झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यावेळी आधुनिक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट करण्याचे निर्देशही नगराध्यक्षांमार्फत देण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी यावेळी नांदगाव शहराला पाणीपुरवठा करणोऱ्या जलशुद्धीकरण केंद्राचीही पाहणी केली. जल शुद्धीकरण केंद्रात योग्य त्या सुधारणा करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले. या भेटीदरम्यान पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य इत्यादी विभागाचा आढावा घेण्यात आला. बस स्थानक परिसरातील शौचालयाची दुर्गंधी पाहून नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी नगरसेवक प्रकाश मारोटकर, प्रीती इखार, कांता लोमटे, वासुदेव लोखंडे, राष्ट्रवादीचे मो.साजिद इत्यादी उपस्थित होते. जलशुद्धीकरणची मशीन नादुरुस्त नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली असता पाणी स्वच्छ करणाऱ्या बहुतांश मशीन नादुरुस्त होत्या. मशीन नादुरुस्त असल्यामुळे पाणी पाहिजे तेवढ्या प्रमाणात शुद्ध होत नाही, असाही मुद्दा पुढे आला. याबाबत नगराध्यक्षांनी पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली. परंतु मुख्याधिकारीच उपस्थित नसल्याने ते निरुत्तर झाले. दरम्यान मशीनची दुरुस्ती तत्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले.
एमआयडीसी परिसरात 25 लाखांचे 11,820 किलो प्लास्टिक जप्त:मनपाच्या पथकाची आजवरची सर्वात मोठी कारवाई
शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या मनपा प्रशासनाच्या ठोस व कठोर निर्देशांनुसार एमआयडीसी परिसरात बंदी असलेल्या सिंगल युज प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान एका गोदामातून ३९४ पोते प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला असून त्याचे एकूण वजन ११ हजार ८२० किलो आहे. जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिकची अंदाजे किंमत २५ लाख रु.आहे. बंदी असलेल्या प्लास्टिक विरोधातील ही मनपा पथकाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. सदर ठिकाणी पंचनामा करून प्लास्टिक बंदी नियमांनुसार संबंधितावर रु. ५ हजाराचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई सोमवारी २९ रोजी उशिरा रात्री १२.३० वाजेपर्यंत सुरू होती. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरात प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठवणूक व वापर करणाऱ्यांना या कारवाईमुळे मोठा इशारा मिळाला असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईच्या वेळी प्लास्टिक कारवाई नोडल अधिकारी विनोद टांक, स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक श्वेता बोके, स्वास्थ निरीक्षक सचिन सैनी, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्हे, बिटप्युन नरेंद्र दुगलज तसेच अतिक्रमण विभागाची संपूर्ण टीम उपस्थित होती. शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. याआधी २८ रोजी १२७० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करून नियमभंग करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. शहरात कुठेही कितीही मोठा प्लास्टिकचा साठा पहिल्यांदा जप्त करण्यात आला तर त्या साठेबाजाविरोधात फार मोठी कारवाई होत नाही. त्याला केवळ ५ हजाराचा दंड आकारला जातो. अर्थात एक किंवा दोन किलो बंदी असलेले प्लास्टिक आढळले तरी ५ हजार व ११ हजार किलो प्लास्टिक आढळले तरी ५ हजार रुपयेच दंड करून त्या गोदामाला सील ठोकले जाते. यामुळेच बंदी असलेले प्लास्टिक विकणाऱ्यांना कोणताही वचक बसत नाही. एक गोदाम सील झाले तरी ते दुसऱ्या ठिकाणावरून त्यांचा व्यावसाय करीत आहेत. दुसऱ्यांदा तोच साठेबाज बंदी असलेले प्लास्टिक विकताना आढळला तर १० हजाराचा दंड होतो. तिसऱ्यांदा त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामुळे शहरातून सिगल युज प्लास्टिकचे समूळ उच्चाटन होत नसल्याचा ठपका सुज्ञ नागरिकांनी ठेवला आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील तीव्र मतभेदांमुळे चांगलाच गाजला. 165 नगरसेवकांची संख्या असलेल्या पुणे महापालिकेत सत्ता स्वबळावर मिळवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या भाजपने शिंदेसेनेला केवळ 15 जागा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, या 15 जागांच्या बदल्यात शिंदेसेनेने भाजपसमोर ज्या उमेदवारांची यादी ठेवली, ती पाहून जागावाटपाची चर्चा करणारे भाजपचे नेते अक्षरशः अवाक झाले. या एका यादीने पुण्यातील शिवसेना-भाजप युतीचे गणित पूर्णपणे बिघडवले आणि अखेर दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र स्पष्ट झाले. पुण्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून सलग बैठका सुरू होत्या. सोमवारी रात्री साडेबारा वाजता शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचा संदेश प्रसारमाध्यमांना पाठवण्यात आला होता. त्या परिषदेत युती तुटल्याची औपचारिक घोषणा होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, पाऊण वाजता अचानक ही पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम वाढला. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच पुण्यात भाजप आणि शिवसेनेच्या दोन्ही गटातील उमेदवारांनी स्वतंत्रपणे अर्ज भरण्यास सुरुवात केली आणि युती जवळपास संपुष्टात आल्याचे संकेत मिळाले. भाजपच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, शिंदेसेनेने त्यांच्याकडे 15 उमेदवारांची अधिकृत यादी सुपूर्द केली होती. मात्र, या 15 जागा सोडणे भाजपसाठी अशक्य असल्याचे स्पष्ट झाले. भाजपला केवळ 15 जागा देण्याची तयारी होती, पण त्या बदल्यात शिवसेनेने मागितलेल्या जागा आणि उमेदवार भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रभागांमधील होते. त्यामुळे हा प्रस्ताव भाजपच्या जिव्हारी लागला. परिणामी, पुण्यात युतीत निवडणूक लढवण्याचा विचार भाजपने पूर्णपणे सोडून दिला आणि आपल्या सर्व इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याचे आदेश दिले. दुसरीकडे, भाजपशी युती शक्य नसल्याचे लक्षात येताच एकनाथ शिंदे यांनी तातडीने मुंबईहून पुण्यासाठी 165 एबी फॉर्म पाठवून दिले. या घडामोडीनंतर नाना भानगिरे आणि रवींद्र धंगेकर यांनी शिवसेना-भाजप युती तुटल्याची स्पष्ट भूमिका माध्यमांसमोर मांडली. मात्र, काही वेळातच विजय शिवतारे यांनी यू-टर्न घेत अजूनही भाजपशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. तरीही अंतर्गत चर्चांमधून समोर आलेली माहिती पाहता, शिंदेसेनेच्या पुण्यातील शिलेदारांनी ज्या पद्धतीने भाजपला 15 जागांवरून अडचणीत आणले, त्यामुळे युती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे मानले जात आहे. या वादामुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपने शिवसेनेला केवळ 15 जागा देण्याची तयारी दर्शवली असली, तरी शिंदेसेनेने त्या 15 जागांसाठी जी नावे पुढे केली, ती भाजपला मान्य होणे शक्यच नव्हते. या यादीत प्रभाग क्रमांक 41 ब मधून प्रमोद नाना भानगिरे, 41 क मधून स्वाती अनंत टकले, 24 ड मधून प्रणव रवींद्र धंगेकर, 23 क मधून प्रतिभा रवींद्र धंगेकर, 26 ड मधून उल्हास उर्फ वसंतराव बागुल, 37 क मधून गिरीराज तानाजी सावंत, 37 ड मधून रूपाली रमेश कोंडे, 38 क मधून वनिता जालिंदर जांभळे, 38 इ मधून स्वराज नमेश बाबर, 39 क मधून मनिषा गणेश मोहिते, 6 ड मधून आनंद रामनिवास गोयल, 3 क मधून गायत्री हर्षवर्धन पवार, 16 ड मधून उल्हास दत्तात्रय तुपे, 40 ड मधून दशरथ पंढरीनाथ काळभोर किंवा गंगाधर विठ्ठल बधे आणि 11 क मधून वैशाली राजेंद्र मराठे यांच्या नावांचा समावेश होता. विशेष म्हणजे या यादीतील एक मागणी भाजपसाठी अत्यंत डिवचणारी ठरली. प्रभाग क्रमांक 24 ड मधून शिंदे गटाने रवींद्र धंगेकर यांच्या पुत्र प्रणव धंगेकर यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली होती. याच प्रभागातून भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर रिंगणात असल्याने ही मागणी मान्य करणे भाजपसाठी अशक्य होते. परिणामी, भाजपने या 15 जागा सोडण्यास ठाम नकार दिला आणि त्याचाच थेट परिणाम शिवसेना-भाजप युती तुटण्यात झाला. आता पुणे महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने स्वतंत्रपणे लढवली जाणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

23 C