नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या मुंबईतील पथकाने पुण्यात एका आंतरराज्यीय ड्रग्ज टोळीचा पर्दाफाश केला. त्यानुसार गुन्हा दाखल केला आणि चार जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे (3.184 किलो) 398 ट्रिप्स 5,900 औषधांच्या गोळ्या जप्त करण्यात आले होते. नायट्राझेपाम हे औषध निद्रानाशाच्या अल्पकालीन उपचारांसाठी वापरले जाते. याप्रकरणात सदर टोळी मधील आरोपी यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. आरोपींचे आंध्र प्रदेश, बिहार आणि इतर काही राज्यांसह इतर राज्यांमध्ये संबंध आहेत. ते बिहारमधून हे औषध मिळवण्यात गुंतले होते, जे केवळ औषधी उद्देशाने आहे आणि ते पुण्यात अंमली पदार्थ म्हणून विकण्यात गुंतले होते.याबाबत आंध्रप्रदेश मधील रहिवासी असलेल्या तुंगला दुर्गा राव व इतर चार आरोपी यांना अटक केली होती. एनसीबीच्या म्हणण्यानुसार, बिहारमधून हे ड्रग्ज आणण्यासाठी सागर भादलकर जबाबदार होता. पुण्यात मेडिकल स्टोअरचा मालक राजेश चांदगुडे त्याच्या खरेदीसाठी जबाबदार होता तर स्वराज याच्याकडे शहरात ते विकण्याचे काम देण्यात आले होते. पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीच्या पथकाने सापळा रचला आणि शहरातील एका कुरिअर फर्मच्या कार्यालयातून आरोपीला अटक केली. विशिष्ट माहितीच्या आधारे, पुण्यातील एका शुक्रवार पेठेतील प्रोफेशनल कुरिअर सेंटरमध्ये एक पार्सल पकडण्यात आले, जे सागरला पोहोचवायचे होते. 2 मे 2023 रोजी, पुण्यातील कुरिअर कार्यालयात पोहोचलेल्या एनसीबी-मुंबईच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि सागरची पार्सल घेण्यासाठी येण्याची वाट पाहत होते. लवकरच, सागर आणि त्याचा मित्र राजेश हे दोघे कुरिअर कार्यालयात पोहोचले. पार्सल घेतल्यानंतर त्यांना अडवण्यात आले. पार्सल तपासल्यानंतर त्यात नायट्राझेपॅमच्या एकूण 5970 गोळ्या असल्याचे आढळून आले, असे एनसीबी अधिकाऱ्यांना तपासात निष्पन्न झाले. तपासणी केली असता, सागरने कबूल केले की हे पार्सल पुण्यातील स्वराज साठी होते. सदर आरोपींनी सत्र न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यावर आरोपी तुंगला दुर्गा राव यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे दाद मागितली त्यावर आरोपींच्या वकिलांनी नीलेश वाघमोडे व महेश देशमुख युक्तिवाद करताना, आरोपी हा कोणत्याही झोपेच्या गोळ्या विकत नव्हता, आरोपीचे नाव हे इतर आरोपींनी घेतलेले आहे. आमच्या आरोपीने आलेले पार्सल आहे तसे पाठवले होते, आमच्याकडे कोणतीही रिकवरी नाही, आमचे स्वतःचे मेडिकल स्टोअर आहे तरीही आरोपी दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी जेलमध्ये आहे,आमच्यावर पूर्वीचे कोणतेही गुन्हे नाहीत. त्यावर सरकारी वकिलांनी जोरदार विरोध केला. त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन आर बोरकर यांनी आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी तुंगला दुर्गा राव यांना जामीनावर मुक्त केले.
कोल्हापुरातील २२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, ताराराणी आघाडी या चारही पक्षांतील २२ माजी नगरसेवकांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये काँग्रेसच्या शारंगधर देशमुख यांच्यासह तीन माजी महापौर, स्थायी समितीचे दोन माजी सभापती यांचा समावेश आहे. सत्ता आणणारे किंगमेकर शिंदेसेनेत आल्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा निश्चित फडकेल, […] The post कोल्हापुरातील २२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बारामती येथील माळेगाव येथे असलेल्या अनंतराव औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेचे अतिरिक्त कार्यभार असलेल्या प्राचार्यांनी पॅरामेडिकल संस्थेत घेण्यात येणाऱ्या परीक्षेकरिता पर्यवेक्षक नेमण्याच्या बदल्यात तसेच परीक्षा सुरळित पार पाडण्यासाठी 33 वर्षीय तक्रारदार यास 80 हजार रुपयांची मागणी केली. या प्रकरणी दोषी प्राचार्यांना तडजोडीअंती 40 हजार रुपयांचा हफ्ता घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ अटक केली आहे. अवधूत भिमाजी जाधवर (वय- 53,रा. माळेगाव, बारामती,पुणे) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. याबाबत 33 वर्षीय तक्रारदार यांनी बारामती पोलिस ठाण्यात आराेपीविराेधात फिर्याद दाखल केल्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 चे कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे खासगी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या इन्स्टिट्यूटकडून घेण्यात येणाऱ्या चालू वर्षाच्या परीक्षेकरिता 45 विद्यार्थी बसलेले आहे. सदर परीक्षेकरिता शासकीय औद्याेगिक शिक्षण संस्था, माळेगाव बारामती यांचेकडून त्यांच्या नेमणुकीतील परीक्षा पर्यवेक्षक नेमले जातात. अवधूत जाधवर हे अनंतराव पवार शासकीय औद्याेगिक प्रशिक्षण संस्था येथे उपप्राचार्य पदावर काम करतात. त्यांच्याकडेच प्राचार्य या पदाचा देखील अतिरिक्त कार्यभार आहे. तक्रारदार यांनी अनंतराव पवार शासकीय औद्याेगिक प्रशिक्षण संस्थेस पत्र देऊन त्यांच्या पॅरामेडिकल संस्थेच्या परीक्षेकरिता पर्यवेक्षक नेमण्याची मागणी केली हाेती. त्याप्रमाणे प्राचार्य पदाचा अतिरिक्त कार्यभार असलेले अवधूत जाधवर यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या संस्थेची चालू वर्षातील परीक्षेसाठी पर्यवेक्षक नेमण्यासाठी आणि ती परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी तक्रारदार यांच्या संस्थेच्या परीक्षेत बसणाऱ्या एका विद्यार्थ्यासाठी दाेन हजार रुपये असे 45 विद्यार्थ्यांचे 90 हजार रुपयांची मागणी केली हाेती. त्या रकमेपैकी दहा हजार रुपये तक्रारदार यांच्याकडून अगाेरदच घेण्यात आले. त्यानंतर प्राचार्य यांनी पर्यवेक्षक नेमण्याचे पत्र तक्रारदार यांना दिले. त्या पत्राप्रमाणे पर्यवेक्षक येऊन तक्रारदाराच्या संस्थेतील परीक्षा सुरु झाली. त्यानंतर परीक्षा सुरू असताना अवधूत जाधवर यांनी उर्वरित 80 हजार रुपयांची लाच रकमेसाठी तक्रारदार यांच्या पाठीमागे तगादा लावला. त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तकआर दाखल केली. एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक डाॅ.शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली याबाबत एसीबी पथकाने खातरजमा केली. त्यावेळी अवधूत जाधवर याने परीक्षा सुरळित पार पाडण्यासाठी व परीक्षेत अडचण निर्माण न करण्याकरिता तक्रारदार यांना 80 हजार रुपये मागणी करुन तडजाेडीअंती 40 हजार स्विकरताना त्यास अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिली आहे. |
बच्चू कडू यांच्या अपात्रतेला हायकोर्टाने दिली स्थगिती
नागपूर : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाकरिता अपात्र ठरवणा-या वादग्रस्त आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी मंगळवारी अंतरिम स्थगिती दिली. तसेच, या प्रकरणावर येत्या ८ जुलै रोजी अंतिम सुनावणी निश्चित केली. कडू यांनी २०१७ मध्ये नाशिक येथे सामाजिक […] The post बच्चू कडू यांच्या अपात्रतेला हायकोर्टाने दिली स्थगिती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी कोथरूडच्या बाई आपणास नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करा, अशा आशयाचे बॅनर शहरात विविध ठिकाणी झळकले आहेत. महत्त्वाचे म्हणजे बाजीराव पेशवे यांचे शनिवारवाड्यात वास्तव्य होते. त्याच शनिवारवाड्याजवळ बॅनर लागले आहेत. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दोन दिवसांपूर्वी पुणे […] The post बुधवार पेठेचे नाव बदलून दाखवा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्रात लेख लिहून आणीबाणीच्या मुद्यावरून काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या प्रकरणी त्यांच्यावर पलटवार करत त्यांना स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये असा टोला हाणला आहे. आज निवडणूक आयोग स्वतंत्र आहे? माध्यमं स्वतंत्र आहेत? देशातील स्वायत्त संस्थांची स्वायत्तता शाबूत आहे? नाही ना? मग भाजपच्या मंडळींना पन्नास वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर बोलण्याचा काय अधिकार? असा कटू सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी घोषित केली होती. त्यांच्या या निर्णयाला आज बरोबर 50 वर्षे पूर्ण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एका मराठी वृत्तपत्रात लेख लिहून काँग्रेसवर टीका केली. देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला आज ५० वर्षे झाली. त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचे तरी कसे? महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो. त्यामुळे संविधान आणि सांविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेस पक्षाने लिहिलेल्या या अध्यायाला ५० वर्षं झाली, एवढेच म्हणावे लागेल. जुने दिवस कधी विसरायचे नसतात, ते सतत आपल्याला लढण्याचे बळ देत असतात, असे फडणवीस आपल्या लेखात म्हणालेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट शिल्लक आहे का? राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी त्यांच्या या लेखावरून भाजपवर तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. आज 25 जून, पन्नास वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आजच्या दिवशी देशावर आणीबाणी लादली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट शिल्लक राहिली नव्हती. पण आज तरी काय वेगळी परिस्थिती आहे? आज निवडणूक आयोग स्वतंत्र आहे? माध्यमं स्वतंत्र आहेत? देशातील स्वायत्त संस्थांची स्वायत्तता शाबूत आहे? नाही ना? मग भाजपच्या मंडळींना पन्नास वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर बोलण्याचा काय अधिकार? आज काहींनी वर्तमानपत्रांमध्ये पन्नास वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर रकाणे भरून काढले आहेत. पण चिनॉय सेठ, जिनके खुदके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंकते, असे रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आणीबाणीवर काय म्हणाले फडणवीस? देवेंद्र फडणवीस आपल्या लेखात म्हणतात, आणीबाणीने अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केले. अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. घरातील कमावती व्यक्ती कारागृहात असताना अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. अनेकांची संपत्ती जप्त झाली, उद्योग-रोजगार कायमचे संपुष्टात आले. मानसिक आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर मोठे शोषण झाले. माझा वैयक्तिक अनुभव विचाराल, तर मी केवळ पाच वर्षांचा होतो. माझे वडील दि. गंगाधरराव फडणवीस यांनाही अटक झाली होती. त्यांना कारागृहात डबा द्यायला जाताना किंवा त्यांना वैद्याकीय तपासणीसाठी नेताना फक्त भेट होत असे. लहान वयात वडिलांपासून बराच काळ दूर राहावे लागले. त्यामुळे मनातून चीड होती. आणीबाणीनंतर विधिपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका या व्यवस्थांचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले होते. लोकशाहीचे महत्त्व काय, हे अधिक प्रकर्षाने लोकांना समजले. संविधानावरील श्रद्धा अधिक दृढ झाली. त्या नेत्यांनी संघर्ष केला नसता, तर कदाचित आपल्या देशातसुद्धा हुकूमशाही प्रस्थापित झाली असती. आज जी अवस्था पाकिस्तानची आहे, तीच भारताचीही झाली असती. आज जी लोकशाही जिवंत आहे, ती 50 वर्षांपूर्वी संघर्ष केलेल्या त्या नेत्यांमुळे. आज आणीबाणीपेक्षाही त्या नेत्यांचे स्मरण अधिक आवश्यक आहे. गांधी घराणे आणि काँग्रेसने केलेल्या शोषणाच्या कथा जितक्या प्रकर्षाने पुढे येतील, त्यातून लोकशाही अधिक भक्कम होत जाईल. आज आम्ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणीबाणीच्या या विदारक कथा चित्ररूपाने प्रदर्शनातून मांडत आहोत. प्रत्येकाने त्याला अवश्य भेट द्यावी. आणीबाणीत संघर्ष करणाऱ्या कुटुंबांनी, लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी जो लढा दिला, त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरवसुद्धा करणार आहोत. त्या कुटुंबांना मानधन देण्याचा निर्णयसुद्धा राज्य सरकारने घेतला आहे. हे आम्ही लोकशाही रक्षणाच्या मंदिरात वाहिलेले पवित्र पुष्प आहे. येणाऱ्या पिढ्यांनी मात्र हा इतिहास आवर्जून समजून घेतला पाहिजे, असे फडणवीस यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मशिदींमध्ये जाऊ नये. त्यांच्या तिथे जाण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे स्पष्ट मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी सोमय्या यांना खडेबोल सुनावताना व्यक्त केले. त्यांच्या या विधानावर सत्ताधारी भाजपतून तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. राज्यातील धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांच्या मुद्यावर बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात एक बैठक झाली. या बैठकीत बोलताना अजित पवारांनी किरीट सोमय्या यांना उपरोक्त शब्दांत समज दिली. किरीट सोमय्या यांनी भोंग्यांच्या मुद्यावर थेट मशिदीत जाऊन तपासणी करत असल्याचे समोर आले होते. त्यावर मुस्लिम संघटनांच्या तीव्र आक्षेप घेतला होता. किरीट सोमय्या यांनी पोलिसांवर दबाव टाकून कारवाई केली तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्याला सर्वस्वी सोमय्या जबाबदार असतील, असे या संघटना म्हणाल्या होत्या. कुणावरही चुकीची कारवाई होता कामा नये - पवार त्यावर अजित पवारांनी त्यांचे समर्थन करत सोमय्या यांना मशिदीत न जाण्याची कडक शब्दांत समज दिली. किरीट सोमय्या यांनी मशिदीत जाऊ नये. त्यांच्या मशिदीत जाण्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, असे ते म्हणाले. अजित पवारांनी आजच्या बैठकीत पोलिस आयुक्त व पोलिस महासंचालकांना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पण त्याचवेळी चुकीच्या पद्धतीने कारवाई होणार नाही याची काळजी घेण्याचीही सूचना केली. त्यांच्या निर्देशांनंतर मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी हायकोर्टाने भोंग्यांच्या आवाजाविषयी 46-56 डेसिबल आवाजाच्या मर्यादेचे पालन करणे अशक्य असल्याचे सांगितले. तसेच प्रस्तुत बैठकीत बसलेल्या लोकांचा आवाजही 46 डेसिबलहून अधिक असल्याचे प्रात्यक्षिकही त्यांनी उपमुख्यमंत्र्यांपुढे करून दाखवले. त्यावरही योग्य तो उहापोह करण्यात आला. भारती यांनी यावेळी मुंबईतील 1500 अनधिकृत भोंगे उतरवण्यात आल्याचीही माहिती दिली. काँग्रेस नेत्याने व्यक्ती केली नाराजी दुसरीकडे, काँग्रेस नेते नसीम खान यांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. पोलिसांना वाटते की, भोंग्यांची परवानगी घेण्यात आली नाही. पण सुप्रीम कोर्टाचे नियम हे डेसिबल मेंटेन करण्यासंबंधीचे आहेत. पोलिस शक्ती प्रदर्शन करत भोंगे काढत आहेत. आमची पोलिसांना मदत करण्याची तयारी आहे. हा प्रश्न कोर्टात प्रलंबित आहे. संपूर्ण देशात कुठे असे नियम आहेत. हे नियम गुजरातमध्येही नाहीत, असे ते म्हणालेत. सोमय्यांनी हेतुपूर्वक वाद घडवला - अबू आझमी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी यावेळी किरीट सोमय्यांवर हेतुपुरस्सर वाद निर्माण करण्याचा आरोप केला. किरीट सोमय्या यांनी हेतुपुर्वक हा वाद उपस्थित केला. इथे महायुतीचा संबंध येत नाही. या वादावर तोडगा काढण्याचे सांगण्यात येत आहे. आम्ही हा विषय अधिवेशनात काढणार नाही. कारण, त्याला वेगळे वळण दिले जाते. अजित पवारांनी मुस्लिमांवर टीका झाल्यास त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा शब्द दिला होता. ते आता काय करत आहेत. सोमय्या मशिदीबाहेर कॅमेरे नेऊन व्हिडिओ करत आहेत. मशिदींवरील 1500 भोंगे काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. पण हाच नियम मंदिरांबाबतही लागू आहे. ध्वनी प्रदुषण केवळ अजानमुळे होत नाही, असे ते म्हणाले.
देश स्वतंत्र होत असताना ज्यांनी स्वातंत्र्याला विरोध केला. इंग्रजांच्या विचारधारेच्या विरोधात सर्व देश उभा असताना ज्यांची विचारधारा इंग्रजांसोबत उभी होती. ज्यांनी 55 वर्षांपर्यंत तिरंगा फडकवला नाही. अशा लोकांनी लोकशाहीचे हत्या केली किंवा संविधानाची हत्या केली असे बोलणे, चुकीचा आहे. हे सर्व हास्यास्पद असल्याचे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून वडेट्टीवार यांनी भाजपच्या वतीने पाळण्यात येत असलेल्या 'संविधान हत्या दिवस' याला विरोध केला आहे. सध्या रोजच संविधानाची हत्या होत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. सध्या देशात अघोषित आणीबाणी असल्याचा दावा देखील त्यांनी केला. भाजप याला 'संविधान हत्या दिवस' म्हणत आहेत हे हास्यास्पद आहे. कारण ते दररोज संविधान बदलण्याबद्दल बोलतात. त्यांचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मनुस्मृती त्यांच्या टेबलावर ठेवून त्यांचा संविधानावर विश्वास नसल्याचे सांगतात. भाजमधील बरेच जण संविधान बदलण्याबद्दल आणि मनुस्मृती लागू करण्याबद्दल बोलत असतात. जे दररोज संविधानाची हत्या करत आहेत, त्यांना त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नसल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. आणीबाणी नंतर जनतेने इंदिरा गांधी यांना प्रचंड बहुमत दिले भाजप जेव्हा आणीबाणी विषय बोलतो, त्यावेळी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी नंतर स्वतः निवडणूक लढवली होती. त्यानंतर देखील जनतेने इंदिरा गांधी यांना प्रचंड बहुमत दिले होते. म्हणजेच आणीबाणी लागू करणे ही त्यावेळची गरज होती, असा दावा देखील विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. देशात रोज संविधानाची हत्या सध्या आपल्या देशात रोजची आणीबाणी झाली आहे. ही अघोषित आणीबाणी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आज संविधानावर कोण चालतंय? आज तर मन मर्जीने काम चालू आहे? आज पन्नास वर्षानंतर ते आज संविधान हत्या दिवस असल्याचे म्हणत आहे. जे रोज संविधानाची हत्या करतात, त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी असे बोलणे म्हणजे हास्यास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाने बदलावे, अशी मागणी केल्यानंतर, याला विरोध करत उबाठाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात ठिकठिकाणी उपरोधिक बॅनर लावले आहेत. या बॅनरमुळे शहरात खळबळ उडाली असून, सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. उबाठाचे उपविभाग प्रमुख गिरीश गायकवाड यांनी हे बॅनर लावले असून, त्यामध्ये कोथरुडच्या बाई, जर तुम्हाला नामांतराची एवढी खुमखुमी असेल, तर बुधवार पेठेचे नाव ‘मस्तानी पेठ’ करा, असा उपरोधिक सवाल विचारण्यात आला आहे. नेमके बॅनरवर काय लिहलंय? उबाठाचे उपविभाग प्रमुख गिरीश गायकवाड यांनी लावलेल्या बॅनरवर म्हटलंय की, कोथरुडच्या बाई आपणांस नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेढेचे नाव मस्तानी पेठ करावे. यासह मेधा कुलकर्णी यांचा मस्तानीच्या वेशभुषेतील फोटो लावण्यात आला आहे. मेधा कुलकर्णींची मागणी काय?खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, पुणे हे देशातील शैक्षणिक व आयटी क्षेत्रातील महत्त्वाचे शहर आहे. इतके महत्त्व असूनही, पुणे रेल्वे स्थानकाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. राजधानी एक्सप्रेस व अन्य महत्त्वाच्या गाड्यांचे पुण्याशी थेट जोडणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, स्थानकाचे नाव थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाने ठेवावे, कारण त्यांनी अनेक युद्धे लढली आणि कधीही पराभव पत्करला नाही. कुलकर्णींनी इतिहासाचा अभ्यास करावा या मागणीवर प्रतिक्रिया देताना श्रीमंत कोकाटे म्हणाले की, पुण्याची स्थापना राजमाता जिजाऊ यांनी केली आहे. त्यामुळे स्थानकाचे नामकरण करताना त्यांचा विचार व्हावा. पुण्याची मूळ रचना राजमाता जिजाऊंमुळेच शक्य झाली. मेधा कुलकर्णी यांनी पुणे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव घेण्याची केलेली मागणी अत्यंत चुकीची आणि निराधार आहे. दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते सचिन खरात यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले की, पुणे रेल्वे स्थानकाला महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव देण्यात यावे.
संसद व विधिमंडळाची अंदाज समिती ही प्रामुख्याने सरकारला काटकसरीचा सल्ला देते. पण याच समितीच्या अध्यक्ष व सदस्यांच्या 2 दिवसांच्या जेवणावर चांदीच्या थाळीचा वापर करून त्यावर लाखोंचा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या उधळपट्टीमुळे राज्य विधिमंडळाच्या कारभाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर बोट ठेवले जात आहे. संसद व व राज्य विधिमंडळ अंदाज समितीच्या अध्यक्ष व सदस्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मंगळवारी मुंबईत समारोप झाला. या परिषदेला अध्यक्ष व सदस्य असे एकूण 250 विशेष व 350 अधिकारी असे एकूण 600 जण उपस्थित झाले होते. या पाहुण्यांच्या स्वागतासाठी विधिमंडळाबाहेर 40 फूट उंचीच्या फलकांच्या भिंती उभ्या करण्यात आल्या होत्या. विशेष पाहुण्यांच्या निवासाची सोय हॉटेल जात पॅलेस, तर त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांची हॉटेल ट्रायडंटला करण्यात आली होती. विधिमंडळ प्रांगणात मलमली कापडाचे दोन वातानुकूलीत शामियाने उभारण्यात आले होते. त्यात मोठाली झुंबरे लावण्यात आली होती. सभागृहातून शामियानात येण्यासाठी लाल गालिचा होता. मुंबई सहलीचे उत्तम नियोजन सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे, काटकसरीवर चर्चा करण्यासाठी आलेल्या या पाहुण्यांच्या जेवणासाठी ताटे, चमचे, वाट्या व ग्लास हे चक्क चांदीचे होते. इथली वॉश बेसीनही अत्यंत कलाकुसरीची होती. हॉटेलमध्ये रात्री पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, हॉटेल ते विधिमंडळ येथे पाहुण्यांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र कार तथा परिषद संपल्यानंतर मुंबईची सहल असे उत्तम नियोजन करण्यात आले होते. चांदीच्या ताटाचे एका दिवसाचे भाडे 550 रुपये पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था निखील केटरर्सकडे होती. यासाठी चांदीची भांडी भाड्याने आणली होती. एका ताटाचे दिवसाचे भाडे 550 रुपये असल्याची माहिती केटरर्स कंपनीचे व्यवस्थापक निखील टिपणीस यांनी दिली. भोजनात कोथिंबीर वडी, मालवणी करी, सुरमई फ्राय, दहीवडे, बटाट्याची भाजी व पुरण पोळी असा माठी मेन्यू होता. एका थाळीचा दर 4 हजार रुपये होता. विधिमंडळातील अधिकाऱ्यांनीच याची पुष्टी केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे सरकारी निधीचा वापर आमदार आणि खासदारांच्या जेवणावर उधळपट्टी करण्यासाठी होत असल्याच्या आरोपांमुळे जनतेत नाराजी वाढत आहे. अनेकदा राजकीय बैठका, समारंभ किंवा दौर्यांदरम्यान मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, ज्यामध्ये आलिशान जेवण, हॉटेल्स आणि इतर सुखसोयींचा समावेश होतो. हा निधी जनकल्याणकारी योजनांसाठी वापरला जावा, अशी अपेक्षा असताना, त्याचा गैरवापर होत असल्यास लोकप्रतिनिधींच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. यामुळे सरकारी निधीच्या वापरात पारदर्शकता आणि जबाबदारीची मागणी जोर धरत आहे. हे ही वाचा... भाजपच्या नेत्याने महिला PSI चा केला विनयभंग:गर्दीचा फायदा घेत दोनदा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श; पुण्यातील संतापजनक घटना पुणे - पुण्यातील भाजपच्या एका नेत्याने महिला पोलिस उपनिरिक्षकाचा (PSI) विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी सदर नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित नेत्याने आपल्यावरील आरोप फेटाळलेत. पण त्याच्यावर यापूर्वी सुद्धा असाच एक गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वाचा सविस्तर
पिंपरी-चिंचवड शहरातील तळवडे परिसरात महिला आणि पुरुषाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोक्यात आणि शरीरावर दगड घालून दोघांचा खून करण्यात आला असून, या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना तळवडे येथील डाऊन टाऊन हॉटेलच्या मागील भागात, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जगन्नाथ पुंडलिक सरोदे (वय 56, मूळ गाव अकोला) आणि मंगला सुरज टेंभरे (वय 30, मूळ गाव अमरावती) या दोघांची मध्यरात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. दोघांच्याही शरीरावर अनेक घाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर, तोंडावर, हात, पाय आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. प्राथमिक तपासात, हे हत्याकांड अनैतिक संबंधातून घडल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेह पाठवले शवविच्छेदनासाठी घटनास्थळी देहू रोड पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे तळवडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसविविध दिशांनी तपास करत आहेत. जुन्नरच्या रिव्हर्स वॉटर फॉलजवळ आढळले 2 मृतदेह दरम्यान पुण्याच्या जुन्नरमध्ये 1200 फूट खोल दरीमध्ये दोन मृतदेह आढळून आले. यामध्ये एक मृतदेह हा तलाठ्याचा तर दुसरा हा 22 वर्षीय तरुणीचा होता. जुन्नरच्या कोकणकडा परिसरातून दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नेमके प्रकरण काय? जुन्नरच्या रिव्हर्स वॉटर फॉलजवळ एक पांढऱ्या रंगाची कार गेली काही दिवस उभी होती. रविवार 22 जून रोजी ही गोष्ट स्थानिकांना निदर्शनास आली तेव्हा त्यांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी दरीच्या कड्यावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला आढळून आल्या. यानंतर सोमवारी रेस्कू टीमने दरीत उतरुन शोध घेतला असता रुपाली आणि रामचंद्र यांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर जुन्नर पोलिस आणि रेस्क्यू टीमने कठिण परिस्थितीत मृतदेह दरीतून बाहेर काढले आहेत. यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रग्णालयात पाठवण्यात आले आहेत. रमेश आणि प्रियंका यांनी आत्महत्या केली, की त्यांचा खून करण्यात आला. याबाबतचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मृत्यूचे कारण समजणार आहे. पोलिसांकडून आजूबाजूला चौकशी केली जात आहे. मृत्यूचे कारण आणि दोघांमधील संबंध याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार आले असले तरी सत्ता स्थापनेपासूनच तिन्ही पक्षातील मतभेद वारंवार समोर आले आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये असलेली नाराजी समोर आलेली असतानाच आता निधी वाटपावरून देखील शिंदेंचे मंत्री नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये थेट नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे मंत्री उदय सामंत हे अजित पवारांच्या भेटीला तर त्यानंतर स्वतः अजित पवार हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गेले होते. या सर्व घटनांमुळे आता महा-युतीत सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यात महा-युतीची सत्ता स्थापन झाल्यापासून शपथविधी आणि त्यानंतर मंत्रालयाच्या वाटपासाठी देखील दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती. पालकमंत्री पदाचा तिढा तर अद्याप देखील सुटलेला नाही. त्यातच आता शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचे मंत्री राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे निधी देत नसल्यामुळे नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत आपली नाराज व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री उदय सामंत हे अजित पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गेले होते. तर त्यानंतर लगेचच अजित पवार हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गेले. या सर्व घटना घडामोडीमुळे महा-युतीत किंवा राज्य सरकार मध्ये नेमके चालले काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तोडगा काढण्याची जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्यावर निधी वाटपाबाबत शिवसेना मंत्र्यांची नाराजी पाहता अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यापर्यंत शिवसेनेची भूमिका पोहोचवणे आणि त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यावर टाकली आहे. त्यामुळे उदय सामंत यांनी अजित पवार यांची भेट घेऊन निधी वाटपाबाबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता उदय सामंत यांच्या शिष्टाचाराने महायुतीतील संबंध राखण्यास कशी मदत होते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अजित पवारांच्या निधी वाटपावर वॉच ठेवा - एकनाथ शिंदे यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना अजित पवार यांच्या निधी वाटपावर वॉच ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. अजित पवार कोणत्या मंत्रालयाला, कोणत्या विभागाला किती निधी देतात? यावर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्या निधी वाटपावर शिवसेना नेते आणि मंत्र्यांचे बारीक लक्ष असणार आहे. वॉच ठेवायचा त्यांनी जरूर ठेवावा, त्यांना तो अधिकार - अजित पवार दुसरीकडे या संदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता, ज्याला माझ्या निधी वाटपावर वॉच ठेवायचा त्यांनी जरूर ठेवावा. त्यांना तो अधिकार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. या माध्यमातून अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला टोलावून लावले आहे.
जळगाव महापालिकेच्या 17 मजली इमारतीत लिफ्ट अपघात:दोन जणांचा थोडक्यात जीव बचावला
मनपा इमारतीतील लिफ्ट दहाव्या मजल्यावरून खाली येताना कोसळल्यानंतर नवव्या मजल्यावर अडकली आणि जोरदार आवाजाने सतरा मजली इमारत हादरली. लिफ्टमध्ये अडकलेल्या दोघांना 18 मिनिटांच्या प्रयत्नानंतर दरवाजा ताेडून बाहेर काढावे लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 6 वाजता घडली. मनपात 6 लिफ्ट असून त्यापैकी 3 बंद आहे आणि एक लिफ्टमन. तोही व्हीआयपी लिफ्टसाठी. यासोबतच वापरावर नियंत्रण नसल्यामुळेच ही परिस्थिती ओढवल्याची कारणे समोर आली आहे. महापालिकेच्या सतरा मजली इमारतीतील लिफ्टचा प्रवास अधिकाऱ्यांसाठी आरामदायी असला तरी सर्वसामान्यांच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. मेहरूण परिसरातील जावेद शेख हे मित्र जलील अहमद यांच्यासाेबत मनपा कर्मचारी असलेल्या पत्नीच्या दाखल्यासाठी मनपातील दहाव्या मजल्यावर आले हाेते. काम आटाेपून घरी जाण्यासाठी ते सर्वसामान्यांसाठी असलेल्या लिफ्टमध्ये शिरले; परंतु काही सेकंदातच त्यांना हादरा बसला. यावेळी झालेल्या आवाजाने नेमके काय झाले याचा अंदाज आला नाही; परंतु आवाज एवढा माेठा हाेता की खालच्या व वरच्या मजल्यांवरील कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. नवव्या मजल्यावर लिफ्ट अडकल्याचे समाेर आल्यानंतर सुरक्षा रक्षकांना पाचारण केले. मेंटेनन्स कर्मचारी याेगेश बागुल सहकाऱ्यांसह तातडीने दाखल झाले; परंतु 18 मिनिटे प्रयत्न करूनही लिफ्ट उघडत नसल्याने दरवाजा ताेडून दाेघांना बाहेर काढावे लागले. लिफ्ट अर्ध्यात अडकल्याने तसेच लोड नसल्याने माेठी हानी टळली.प्रत्येक लिफ्टवर एक कर्मचारी हवा : पाच वर्षांपूर्वी बसवलेल्या लिफ्टसाठी दाेन काेटींचा खर्च झाला आहे. पाच वर्षांतच लिफ्टच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. दरवर्षी देखभाल दुरुस्तीसाठी 24 लाख रुपयांचा खर्च केला जाताे. त्यानंतरही लिफ्ट अडकण्याचे प्रकार हाेऊन लाेकांच्या जीवाशी खेळले जात आहे. मनपा प्रशासनाने प्रत्येक लिफ्टवर एक कर्मचारी नियुक्त केल्यास ओव्हरलाेड तसेच हाताळणीची समस्या निर्माण हाेणार नाही; केवळ अधिकाऱ्यांसाठी राखीव लिफ्टवर लक्ष दिले जात आहे.लिफ्ट अडकण्यामागे ओव्हरलाेडचे कारणअनेकदा ओव्हरलाेड हाेऊनही तसाच वापर केला जाताे. असे प्रकार वारंवार हाेत असल्यामुळेच मंगळवारची घटना घडल्याचे मेंटेनन्स कर्मचारी याेगेश बागुल यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. आवाज आल्याने चाैघींनी टाळली लिफ्ट स्वागत कक्षाला लागून असलेली लिफ्ट वरच्या मजल्यावर जात हाेती. यावेळी आठव्या मजल्यावरून आराेग्य विभागातील चार महिला कर्मचारी लिफ्टमध्ये गेल्या; परंतु बाराव्या मजल्यावर लिफ्टसाठी जात असताना मोठा आवाज येत हाेता. काहीतरी बिघाड तसेच २०१२ मध्ये झालेल्या अपघाताची घटना स्मरणात असल्याने चाैघी महिला कर्मचाऱ्यांनी जिन्याने जाण्याचा निर्णय घेतला. लिफ्टमध्ये वजन कमी झाल्यानंतर नवव्या मजल्यावर अडकली. लिफ्ट अडकण्यामागे ओव्हरलाेडचे कारण मनपातील सहा पैकी तीन लिफ्ट सुरू आहेत. तीन पैकी केवळ एकाच लिफ्टवर कर्मचारी असताे. उर्वरित दाेन लिफ्टमध्ये नागरिकांना सेल्फ सर्व्हिसने ये-जा करावी लागते. त्यामुळे लिफ्टची क्षमता 450 किलाे वजनाची असतानाही त्यात दहा पेक्षा जास्त लाेक शिरतात. तसेच दरवाजा बंद हाेत असताना मध्येच उघडण्याचा प्रयत्न हाेताे. 9 वर्षांपूर्वीही झाला होता अपघात दरम्यान काही वर्षांपूर्वीदेखील मनपाची स्वागत लिफ्ट सहाव्या मजल्यावरून धाडकन थेट तळमजल्यावर कोसळली. यात दोन कर्मचारी गंभीर जखमी तर जणांना किरकोळ दुखापत झाली होती. या घटनेमुळे महापालिकेच्या परिसरात प्रचंड घबराट उडाली होती. तर दुसरीकडे काही महिन्यापूर्वी जळगावमध्ये लिफ्टचं टेस्टिंग सुरू असताना अचानक वायर रोप तुटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये एका व्यवसायिकाचा मृत्यू झाला. राजकुमार प्रकाश दर्डा यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला होता.
औंढा नागनाथ पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात सासऱ्याला भांडणाऱ्या व्यक्तींना जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पतीला मारहाण करून महिलेचा विनयभंग करणाऱ्या तिघांवर मंगळवारी ता. २४ रात्री उशीरा औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औढा नागनाथ पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील महिलेचा सासरे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जनावरांच्या गोठ्याकडे जात होते. यावेळी बालाजी वानखेडे, माधव वानखेडे, गणेश वानखेडे यांनी त्यांना अडवून गोठ्याकडे जाण्यासाठी येथून रस्ता नाही. तुम्ही येथून जायचे नाही असे म्हणत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यावेळी सदर महिला त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी माझ्या सासऱ्याला का भांडत आहात अशी विचारणा केली. मात्र त्यांनी कुठलेही उत्तर न देता महिलेसोबत झटापट करून तिचा विनयभंग केला तसेच सदर भांडण सोडवण्यासाठी महिलेचा पती मध्ये पडला असता त्यांनाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने कुटुंबीयांसह मंगळवारी रात्री औढा नागनाथ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी वरील तिघांवर मारहाण करून विनयभंग करणे तसेच जिवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार मुकाडे, रवीकांत हरकाळ, संदीप टाक यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी या पुण्याचे, कलेचे वैभव आहे. त्यांचा सन्मान म्हणजे आपल्या सर्वांचा सन्मान आहे. त्यांना देशातील महत्त्वपूर्ण पद्म पुरस्कार मिळावा यांची शिफारस राज्य सरकारच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारकडे करणार असल्याचेच मत केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री नागरी विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर च्या वर्ध्यापानदिना निमित्त ' बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. यावेळी मोहोळ बोलत होते. या प्रसंगी मा.आमदार उल्हासदादा पवार, अ.भा मराठी नाट्य परिषदचे अध्यक्ष प्रशांत दामले, डॉ. संजय चोरडिया, चंदुकाका ज्वेल्सचे सिद्धार्थ शहा, पुण्याचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, बारामती नाट्य परिषदेचे अध्यक्ष किरण गुजर, बालगंधर्व यांच्या नातसून अनुराधा राजहंस, प्रशासन अधिकारी राजेश कामठे,,बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदि मान्यवर उपस्थित होते. मुरलीधर मोहोळ म्हणाले, गेली 17 वर्ष बालगंधर्व रंग मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा केला जात आहे. या निमित्ताने पुण्याची सांस्कृतीक ओळख जपण्याचे काम केले जात आहे. ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना आपण सर्व 'ब्लॅक अँड व्हाइट'च्या काळा पासून पाहत आलो आहोत. त्यांचे चित्रपट त्यांची कारकीर्द ही वाखणण्याजोगी आहे. लीला गांधी या आपल्या पुण्याचे, कलेचे वैभव आहे. उल्हास पवार म्हणाले, पू. ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून बालगंधर्व रंगमंदिराची निर्मिती झाली. तत्कालीन राजकीय नेत्यांनी त्यांना कोणतीही आठकाठी आणली नाही, ही बाब कौतुकास्पद आहे. बालगंधर्वांच्या नावाने दिला जाणार पुरस्कार लीला गांधी यांना मिळतोय म्हणजे अतिशय यथार्थ निवड आहे. प्रशांत दामले म्हणाले, अलीकडे महाराष्ट्रात ज्यांना नाट्यगृहांबद्दल काहीही माहिती नाही अशी लोकं नाट्यगृह बांधत आहेत. नाट्यगृह बांधल्या नंतर सुधारणा करण्यापेक्षा आधीच सुसज्ज आणि नियोजनबद्ध नाट्यगृह बांधली गेली पाहिजेत. यासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदीर, गडकरी रंगयातन आणि वाशीच विष्णुदास भावे नाट्यगृह यांचे प्लॅन फॉलो करायला हवेत. एव्हडे केले तरी शासनाचे कोट्यावधी रुपये वाचतील. तसेच नाट्यगृहाशी संबंधीत लोकांना सोबत घेवून नाट्यगृहांचे नियोजन केल्यास ते अचूक ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच राज्यातील नाट्यगृहांसंदर्भात पुढील अडीच वर्षासाठी शासनाने एक आराखडा तयार करण्यात आला असून त्यामुळे तरी राज्यातील नाट्यगृह निट होतील असा आशावाद देखील दामले यांनी व्यक्त केला.
पुणे भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस प्रमोद कोंढरे यांनी महिला पोलिस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दल भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शनिवारवाडा भेटीदरम्यान ही घटना घडली, जिथे सदर महिला पोलिस अधिकारी सुरक्षा व्यवस्था काम पाहत होती. प्रमोद कोंढरे यांनी महिला अधिकाऱ्याशी शासकीय कर्तव्यावर असताना अनुचित वर्तन केल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे, ज्यामध्ये गैरवर्तन स्पष्टपणे दिसून आली आहे. या घटनेनंतर, पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यात आली आणि भाजप पदाधिकाऱ्या विरुद्ध अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हा दाखल डेक्कन पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आणि पुराव्याचा भाग म्हणून या फुटेजची तपासणी केली जात आहे.प्रमोद कोंढरे हे कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांचे खंदे समर्थक आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुण्यातील शनिवार वाडा ते सारसबाग येथील भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी सोमवारी आले होते.यावेळीच प्रमोद कोंढरे यांनी महिला पोलिस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केले असा आरोप करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतरच हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी धक्का लागेल असे वर्तन केले नाही- कोंढरे दरम्यान, आपल्याला पोलिस ठाण्यात बोलाविले होते आपण तिथे आपला संपूर्ण जबाब दिला असून आपण कोणत्याही प्रकारे महिला पोलिस यांना धक्का लागेल अथवा स्पर्श होईल असे वर्तन कोणत्याही अधिकाऱ्याबाबत केलेले नाही असा दावा कोंढरे यांनी केली आहे. यापूर्वीही कोंढरेवर विनयभंगाचा गुन्हा कोंढरे याच्यावरती यापूर्वी देखील पुण्यातील डेक्कन पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल असून त्याशिवाय खडक पोलिस ठाणे, विश्रामबाग पोलिस स्टेशन येथे एकूण चार गुन्हे यापूर्वी दाखल आहे.या घटनेबाबत विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या असून, आरोपी नेत्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.पुणे शहरामध्ये पोलिस जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य महिलांचे काय असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जातो.पोलिस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की, हे प्रकरण पूर्ण पारदर्शकतेने आणि कायद्यानुसार हाताळले जाईल. |
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
महिलेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार:एका तरुणासह चौघांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
कळमनुरी तालुक्या्तील एका गावात महिलेस लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या तरुणासह चौघांवर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 24 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील एका गावात मेकॅनिकलचे काम करणाऱ्या शेख आवेज याने त्या गावातील एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे अमिष दाखविले होते. सन 2022 पासून शेख आवेज याने तरुणीला लग्नाचे अमिष दाखवत तिला बाहेर जिल्हयात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर शेख आवेज हा आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात राहण्यासाठी आला होता. दरम्यान, त्यानंतर सदर महिलेने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली असता त्याने लग्नास नकार दिला. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्या महिलेने मंगळवारी ता. 24 रात्री आखाडा बाळापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यामध्ये शेख आवेज याने लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्तीने अत्याचार केल्याचे नमुद केले आहे. तर त्याच्या सोबत शेख परवेज, शेख समील व अन्य एकाने त्या महिलेस शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत नमुद केले. यावरून आखाडा बाळापूर पोलिसांनी शेख आवेज, शेख परवेज, शेख समील याच्यासह अन्य एकावर गुन्ह दाखल केला आहे. पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश घोटके, जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आखाडा बाळापूर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी दोन पथके रवाना केली आहेत. उपाधिक्षक केंद्रे, निरीक्षक गुठ्ठे पुढील तपास करीत आहेत.
भाजपच्या वतीने इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला 50 वर्ष झाल्याच्या निमित्ताने 'संविधान हत्या दिवस' पाळण्यात येत आहे. याला उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी विरोध दर्शवला आहे. इतकेच नाही तर त्यांनी इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीचे समर्थन देखील केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी लागू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. आपत्काळ किंवा आणीबाणी हा संविधान हत्या दिवस कसा होऊ शकतो? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. संघाचे संस्थापक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. त्यांना इंदिरा गांधी यांना अटक केली होती. मात्र, तुरुंगातून त्यांनी जो पत्र व्यवहार केला होता, तो एकदा पहा, असा सल्ला देखील राऊत यांनी भाजपला दिला आहे. त्यात देवरस यांनी देखील आणीबाणीला समर्थन दिले असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर पणे आणीबाणीचे समर्थन केले होते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील जाहीर पणे आणीबाणीचे समर्थन केले होते. त्यांनी खुले समर्थन दिले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. वास्तविक आणीबाणीत आमच्या मार्मिक साप्ताहिकावर धाडी पडून तेव्हा प्रेस बंद केली होती. तरी देखील आम्ही त्यांना समर्थन दिलं होते. आणीबाणी ही शिस्त लावणारी एक व्यवस्था होती. भारतीय घटनेतील तरतुदीनुसार देशांमध्ये अशांतता, अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, अशा वेळी अशांतता निर्माण करण्यासाठी देशातील आणि देशाबाहेरील काही शक्ती काम करतात. तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करून देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणीबाणी लावण्याचा संविधानिक तरतूद भारतीय संविधान मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठाने दिलेली आहे. याचा अभ्यास देखील या लोकांनी करायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत.
वैजापूर तालुक्यात रानडुकरे पेरणी झालेले पिके फस्त करत आहेत, या रानडुकरांचा तत्काळ बंदोबस्त करा, असे आदेश तहसीलदार सावंत यांनी वन विभागाला दिले आहे. लासूरगाव येथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत सोमवारी थेट शेतात उतरले. गट नंबर २०८ मधील वसंत हुमे, आशोक हुमे, योगेश कुलकर्णी, विठ्ठल निघोटे, बाळू हुमे, राहुल निघोटे, शिवाजी निघोटे यांच्यासह इतर शेतकऱ्यांशी संवाद साधला. उपसरपंच रितेश शेठ मुनोत यांच्या शेतात स्वतः ट्रॅक्टर चालवत मक्याची पेरणी केली. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या निर्देशानुसार ‘अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर’ या उपक्रमांतर्गत लासुरगाव, शहाजतपूर, हडसपिंपळगाव, पिंपळगाव शिवारात तहसीलदार सावंत यांनी भेटी दिल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. हडसपिंपळगाव येथील महेश मेंढे आणि किशोर साळुंखे यांचा रस्त्यावरील वाद मिटवून रस्ता मोकळा करण्यात आला. राहुल निघोटे आणि शिवाजी निघोटे यांच्या शेतावरही भेट दिली. वसंत हुमे यांनी रानडुकरांचा त्रास वाढल्याचे सांगितले. मक्याच्या बियाण्याचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले. यावर तहसीलदार सावंत यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधून रानडुकरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले. गावातील रानडुकरं पकडणाऱ्यांनाही सूचना दिल्या. या वेळी मंडळ अधिकारी रीता पुरी, तलाठी प्रवीण पाटील, ग्रामपंचायत अधिकारी नानासाहेब राहींज, पोलीस पाटील बाबासाहेब हरिचंद्रे, कारभारी निघोटे, कृषी विभागाच्या वनिता खडके, कल्पना गायसमुद्रे, आशोक नळे उपस्थित होते. शेतकऱ्यांनी तहसीलदार सावंत यांचे आभार मानले. चित्तेपिंपळगाव | काद्राबाद येथे अधिकाऱ्यांनी थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पैठण पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी शिवाजी साळुंके यांनी शेतकरी रवी रामधन नायमने यांच्या शेतात भेट दिली. बियाणे वेळेवर मिळतात का, औषधे मिळतात का, पीक कर्ज मिळाले का, खताची लिंकिंग केली जाते का, यासह विविध प्रश्नांची माहिती घेतली. अधिकाऱ्यांची शासकीय गाडी शेतात आल्याने अनेक शेतकरी जमा झाले. शेतकऱ्यांनी बियाण्यांचे दर जास्त असल्याची तक्रार केली. महावितरणच्या ढिसाळ नियोजनावर नाराजी व्यक्त केली. तारा शेतात लोंबकळत असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले. शिवाजी साळुंके यांनी महावितरणला तत्काळ कळवले. या वेळी सरपंच इसाक पठाण, उपसरपंच विजयसिंग नायमने, माजी सरपंच मुनीर पटेल, शालेय अध्यक्ष हशम पटेल, ग्रामविकास अधिकारी माधव बसापुरे, ग्राम महसूल अधिकारी शीतल हिवराळे, शेतकरी रामधन नायमने उपस्थित होते. प्रतिनिधी | फुलंब्री जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार फुलंब्री तालुक्यात सोमवार रोजी १४ गावांमध्ये १३ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट भेटी दिल्या. खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. शेतकऱ्यांना कृषी साहित्य खरेदी करताना अडचण आहे का, शेतात जाण्यासाठी पाणद रस्त्यांची अडचण आहे का, पीक कर्ज मिळण्यात अडचण येते का, बांधावरून वाद आहेत का, बँका पीक कर्ज देत आहेत का, अशा विविध मुद्द्यांवर अधिकाऱ्यांनी थेट संवाद साधला. शेतकऱ्यांच्या अडचणींचा अहवाल जिल्हास्तरावर पाठवण्यात येणार आहे. कृषी विभाग, महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, पंचायत समिती, सहकारी संस्था विभागाचे अधिकारी सहभागी झाले.
आळंद परिसरात मे महिन्यात अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर १८ जूनपासून पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला. मात्र, तो खोटा ठरला. पुन्हा २२ जूनपासून पावसाचा नवा अंदाज जाहीर झाला. त्यामुळे शेतकरी पुन्हा आशेवर होते. आकाशात ढग दाटून येत आहेत. तरी पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आळंद, नायगव्हाण, जातवा, उमरावती, पिंप्री, सताळा परिसरात ८० ते ९० टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेरलेल्या पिकांना अंकुर फुटले. मात्र, पाणी नसल्याने अंकुर वाळत आहेत. पशुपक्षी ते उकरून खात आहेत. यंदा मका पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. काही शेतकऱ्यांची कपाशी, तूर यासह इतर पिकांची पेरणी बाकी आहे. पाऊस न पडल्यास बी-बियाणे, खत, मजुरी यासाठी लागणारा खर्च कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकरी अभिषेक तायडे यांनी सांगितले, ‘मी पावसाच्या आशेवर १० एकर मका पेरली. आता दुबार पेरणीची वेळ आली, तर हजारो रुपये वाया जातील. मजुरांचा तुटवडा आहे. विहिरींना पाणी आहे, पण लाईट नसल्याने ते वापरता येत नाही.’ प्रतिनिधी | पाचोड जून महिना संपत आला तरी पाचोड परिसरात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. यंदा मान्सून लवकर येईल, असा अंदाज होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी मशागतीची कामे वेळेत पूर्ण केली. पाचोड परिसरात हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे 55 टक्के शेतकऱ्यांनी कपाशी, तूर, बाजरी, सोयाबीन, मुग यांची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. हवामान खात्याने यंदाही वेळेवर पावसाचा अंदाज दिला होता. मात्र, प्रत्यक्षात पावसाची चिन्हे दिसत नाहीत. जूनमध्ये मान्सूनपूर्व सरींचे आगमन होते. यंदा मात्र वातावरणात बदल नाही. उष्णतेची तीव्रता कायम आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि रात्री थोडी थंड हवा एवढेच निसर्गाचे चित्र आहे. मागील दोन वर्षांत पावसाने चांगली साथ दिली होती. वेळेवर पाऊस पडला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. तरीही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामावर भर दिला. पाण्याची पातळी वाढल्याने फायदा झाला. यंदा मात्र जूनमध्ये पावसाची चिन्हेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. गेल्या काही वर्षांत पावसाची अनियमितता, दुबार पेरणी यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. मागील दोन वर्षांत चांगला पाऊस झाल्याने आशा निर्माण झाली होती. मात्र, यंदा पावसाने पुन्हा दगा दिला. विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. उष्णतेमुळे फळबागा, चारा पिके तहानलेली आहेत. त्यामुळे शेतकरी चातकासारखा पावसाची वाट पाहतो आहे. या दिवसांतच पेरणी केली तर चांगले उत्पन्न मिळते. मात्र, फसव्या मान्सूनमुळे उत्पन्नाची आशा फोल ठरत आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे. पण पावसाच्या मोठ्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
एमबीएच्या विद्यार्थ्याचा दुचाकी अपघातात मृत्यू, हेल्मेट असूनही अडकवले दुचाकीवर
माजलगावहून छञपती संभाजीनगरकडे जाणाऱ्य ा दुचाकीला भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने या दुर्घटनेत एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या एकाविद्यार्थ्यांचे घटनास्थळीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड (ता.पैठण) बायपासवर मंगळवारी (ता.२४) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. त्याने हेल्मेट असूनही डोक्यात घालण्याऐवजी दुचाकीला अडकवले होते. या अपघाताची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. सुमित सुधाकर प्रधान(२२)असे मयत झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातमाजलगाव येथीलसुमित प्रधान हा काही कामानिमित्त माजलगाव येथून छत्रपती संभाजीनगरकडे दुचाकीवर येत होता. दरम्यान पाचोड बायपासवर येताच बीडच्या दिशेने आलेल्या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. सुमित प्रधान हा दुचाकीवर प्रवास करतांना त्याने घरातून सोबत हेल्मेट घेतले होते. परंतु त्याने हेल्मेट न घालता दुचाकीच्या हँडलला लावले होते. डोक्यात हेल्मेट घातलेले असते तर कदाचित त्याचे जीव वाचू शकला असता. मृत सुमित हेल्मेट असूनही घातले नाही
इगतपुरी तालुक्यात चार - पाच दिवसापासून धुवांधार पाऊस सुरू आहे. २४ तासात १३७ मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. जून महिन्यातील आतापर्यंतची र्वाधिक ८२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दारणा धरणातून दोन दिवसापासून ४७४२ क्युसेस विसर्ग होत आहे. पश्चिम भागात झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वच भात खाचरांना तलावाचे स्वरूप आले आहे. दरम्यान, गेल्या १० वर्षातील जून महिन्यातील सर्वाधिक जादा पाऊस मानला जात आहे. दारणा धरणात ५७ टक्के साठा दरम्यान, साठा सर्व धरणे ५० टक्के भरली आहेत. विशेष म्हणजे दोन - तीन दिवसांत भावली धरण १०० टक्के भरेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी भात रोपे टाकण्यासाठी शेतकऱ्यांना वाफसा मिळत नसल्याने कामांना ब्रेक लागला आहे. इगतपुरी, घोटी, मानवेढे, वैतरणा, धारगाव, टाकेद या भागात मोठा पाऊस झाला. या भागात दोन दिवसांपासून पावसाचे सातत्य कायम राहिले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. - दीपक जाधव, हवामान तज्ञ ६१२ २०२० २१६ २०२१ निरंक २०२२ ४६ २०२३ निरंक २०२४ ८२२ २०२५ नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम व मध्य भागात हलका पाऊस १ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र मालेगाव, नांदगाव, सटाणा या भागात पावासाची ओढ कायम असणार आहे. कमजोर मान्सूनमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
बागलाण सायकल फाउंडेशनने सटाणा ते पंढरपूर सायकल वारीचे आयोजन करत ४०५ किलोमीटर अंतर तीन दिवसांत पार करत पंढरपूर गाठले. गावागावांत ‘झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाओ बेटी पढाओ, सायकल चालवा इंधन वाचवा’ हा पर्यावरणाचा संदेश देत सायकलवारी पूर्ण केली. १९ जूनला फाउंडेशनच्या ४१ सदस्यांनी सटाणा येथून प्रस्थान केले होते. २१ जूनला पंढरपूरला पोहोचत माऊलींचे दर्शन घेतले. भरपावसात तीन दिवसांत ४०५ किमी अंतर पार करत वारी पूर्ण केल्याचे फाउंडेशनचे सदस्य निवृत्त मुख्याध्यापक रवींद्र भदाणे यांनी सांगितले. महाराष्ट्रातील संतांनी आपल्या अभंगातून पंढरपूरचा महिमा सांगितला आहे. आषाढी कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाचा भक्त पंढरपूर तीर्थक्षेत्री विठुरायाला भेटायला जातो. या वारीत सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होतात. असाच सामाजिक भाव जपत फाउंडेशनतर्फे सायकलवारीचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण व अध्यात्माची सांगड असलेली बागलाण सायकल फाउंडेशनची ही वारी सर्वांचे आकर्षण ठरली. सायकल वारीचा पहिला मुक्काम ११९ किमीवरील शिर्डी येथे झाला. दुसरा मुक्काम १६० किमी अंतर पार करत मिरजगाव येथे होता. तिसरा मुक्काम २१ जूनला १२६ किमी अंतर पार करत सायकलवारी पंढरपुरात दाखल झाली. रविवारी (दि. २२ जून) सकाळी नगर प्रदक्षिणा व सायकल रिंगण सोहळा पार पडला. यावर्षी सायकल नगर प्रदक्षिणा कार्यक्रमात केंद्रीय युवा व्यवहार व खेळ राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी भाग घेत सायकल वारीला संबोधित केले. या सायकल वारीत रवींद्र सोनवणे, भाऊराव काळे, नितीन जाधव, विनोद जगताप, मोहन सोनवणे यांच्यासह सायकलिस्ट सहभागी झाले होते. बागलाण सायकल फाउंडेशनच्या सदस्यांनी वारीत रस्त्याने जाताना गावागावांध्ये ‘झाडे लावा झाडे जगवा, सायकल चालवा इंधन वाचवा, सायकल चालवा पर्यावरण वाचवा, बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या घोषणा देत सायकलवारीत पर्यावरण संवर्धन आणि सायकलिंग करण्याचा संदेश देण्यात आला.
खासदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून त्यांचे ‘आपला मावळा’ या संघटनेतर्फे रामशेज किल्ला संवर्धन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत स्वच्छता, वृक्षारोपण, साफसफाई, फलक, बसण्यासाठी बाके, सोलर लाइट लावण्यात आले. या मोहिमेत खासदार लंके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह ‘आपला मावळा’ संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शनिवारी रात्री खासदार लंके आपल्या कार्यकर्त्यांसह रामशेज येथे दाखल झाले. रविवारी सकाळी लंके यांनी वृक्षरोपे, बोर्ड, वाळू, सिमेंट, ट्री गार्ड, सौर पथदीप कार्यकर्त्यांना वाटप केले. भर पावसात हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जयच्या जयघोषत सर्व मावळ्यांनी किल्ल्यावर जात ठिकठिकाणी वृक्षारोपण केले. रस्त्यावर पडलेले दगडगोटे बाजूला केले. किल्ल्यावर जात तेथे स्वच्छता मोहीम राबवली. स्वागत कमान बसण्यासाठी बाके ठेवण्यात आली. विविध सूचना फलक लावण्यात आले. सौरपथदीप बसवण्यात आले. खासदार लंके यांच्या संकल्पनेतून ‘आपला मावळा’ ग्रुप विविध गड-किल्ल्यांचे संवर्धन करत आहे. रामशेज या चौथ्या किल्ल्याची संवर्धन स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष श्याम हिरे, सुनीता चारोस्कर, मनोज खांदवे, डॉ. योगेश गोसावी, राम खुर्दळ, महिला जिल्हाध्यक्ष संगीता पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र ढगे, राहुल उगले, गणेश पवार, छबू मटाले उपस्थित होते. रामशेज स्वच्छता मोहिमेसाठी खासदार लंके कार्यकर्त्यांसह रामशेज येथे दाखल झाले. माध्यमिक विद्यालयात सर्व कार्यकर्त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. लंके यांनी शाळेतच झोपण्याचा निर्णय घेतला. खासदार भास्कर भगरे यांनीही शाळेतच मुक्काम केला. आशेवाडी ग्रामस्थांतर्फे मान्यवरांचे स्वागत केले. जयंत पाटील यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. मोहिमेत हजारो युवक युवती सहभागी झाले होते. शासनानेही संवर्धनासाठी प्रयत्न करावे, असे लंके यांनी सांगितले.
सोयगाव मालेगाव महापालिक क्षेत्रातील जिजामाता उद्यान परिसरातील भूमिगत गटारकामानंतर पक्का रस्ता झालाच नाही. उखडलेला रस्ता, वाहतूक कोंडी, रस्त्यावर सोडलेले सांडपाणी, उद्यानात परिसरातील नागरिकांसह मालेगाव मध्य मधील नागरिकांचा वाढता ओघ, रस्त्यावर होणारी वाहन पार्किंग, रस्त्याच्या बाजूला फूड स्टॉल, खेळणी स्टॉल, रविवारचा आठवडे बाजार यामुळे रस्त्याची मुंबईच्या धारावी झोपडपट्टीसारखी अवस्था झाली आहे. डिके चौक परिसरातील आताचे एचडीएफसी एटीएम, जिजामाता उद्यान ते साईबाबा मंदिर रस्ता सुमारे दोनशे मीटर लांबीचा आहे. गेल्या ३ वर्षांपूर्वी रस्त्याचे कामचलावू पद्धतीचे डांबरीकरण काम मालेगाव येथील डिके चौक परिसरात जिजामाता उद्यान समोर उखडलेला रस्ता, दुसऱ्या छायाचित्रात उद्यानाचे प्रवेशद्वार व भिंतीलगत वाहनांची झालेली पार्किंग, तिसऱ्या छायाचित्रात उखडलेला रस्ता आणि वाहनांच्या पार्किंग यामुळे रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी. दर रविवारी संध्याकाळी भरणारा आठवडे बाजार ही नवीन मोठी समस्या झाली आहे. यामुळे या भागातील चारही रस्ते पूर्णपणे बंदिस्त होत आहेत. त्यात रविवारी उद्द्यानात गर्दी व बाजारातील गर्दी एकच होत असल्याने सगळाच गोंधळ उडतो. विद्यानगर रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास आठवडे बाजाराला रस्त्यावर जागा मिळेल व वाहतूक कोंडी कमी होणार आहे. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात घरे बांधताना सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याने उद्यान ,क्रीडांगणे यासाठी जागाच नाही. मध्य मधील नागरिकांचा ओघ कॉलेज ग्राउंड व जिजामाता उद्यानात वाढला आहे. त्यामुळे याठिकाणी मर्यादेपेक्षा अधिक लोकांची संख्या वाढल्याने परिसरातील नागरिकांचीही कोंडी झाली आहे. झाले. या कामानंतर लगेच २ महिन्यांत रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. त्यात गेल्या ८-९ महिन्यांपूर्वी भूमिगत गटार कामासाठी रस्ता खोदण्यात आला. सदर काम उरकल्यावर सरळ दगड माती टाकून बुजण्यात आला. त्याचे अध्यापपर्यंत पक्के काम करण्यात आले नाही. परिणामी उरलेल्या अर्धवट पक्क्या रस्त्यावर मार्गक्रमण करण्यासाठी वाहनचालकांची कसरत होते. जिजामाता उद्यानात सोयगाव, नववसाहत परिसरातील नागरिकांसह मालेगाव मध्य मधील नागरिकांचाही लोंढा वाढला आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहन पार्किंग समस्या निर्माण झाली आहे. त्यात उद्यानाच्या आजूबाजूला खेळणी, फुगे विक्रेते, फास्ट फूड विक्रेते यांची मोठी रेलचेल व खवव्यांची गर्दी होत असते. यामुळे संध्याकाळी वाहतूक कोंडी व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. येथून मार्गक्रमण करतांना अक्षरशः नागरिकांसह वाहनचालकांच्या नाकीनऊ येत आहे. शिवाय रस्त्यालगत असलेल्या रहिवासी इमारतीतून सांडपाणी सरळ या रस्त्यावर सोडण्यात आल्याने चिखलाचे साम्राज्य वाढले आहे.
गेल्या ६ जूनला कोथळी येथून निघालेला संत मुक्ताईंचा आषाढी वारी पालखी सोहळा ६०० पैकी ४०० किमी अंतर चालून बीड जिल्ह्यात दाखल झालेला आहे. या सोहळ्याचे मार्गातील प्रत्येक गाव-शहरात उत्स्फूर्त स्वागत होत आहे. वारकरी टाळ मृदंगाच्या गजरात भजन-अभंगांचे गायन करत भक्तीचा जागर करत आहेत. हा सोहळा बीडमधून धाराशिव व नंतर सोलापूर जिल्ह्यात दाखल होईल. त्यामुळे शीणभाग विसरून वारकऱ्यांना प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागली आहे. आदिशक्ती संत मुक्ताई पालखी सोहळ्यात सजवलेला रथ व त्यात विराजमान चांदीच्या पादुका, मुक्ताईची प्रतिमा यांचे दर्शन घेण्यासाठी गावोगावी प्रचंड गर्दी होते. सध्या हा पालखी सोहळा बीड जिल्ह्यात आहे. मंगळवारी पाली येथे मुक्काम झाला. त्याआधी मार्गात येणाऱ्या गावांनी सोहळ्याला सामोरे जात संत मुक्ताईंचे स्वागत केले. ठिकठिकाणी भव्य रांगोळी काढून व पताका लावून पुष्पवृष्टी केली. या पालखी सोहळ्याने सोमवारचा मुक्काम बीड येथील बालाजी मंदिरात केला. तेथे नवरंग मित्र मंडळाने वारकऱ्यांना अन्नदान केले. मंगळवारी सकाळी प्रवास सुरू करून पालखीने दुपारचा विसावा अहिर वडगाव येथे घेतला. रात्रीचा मुक्काम पाली येथे झाला. तेथील ग्रामस्थांनी आदरातिथ्य केले. आज वानगाव फाटा येथे मुक्काम : बुधवारी (दि.२५) सकाळी पाली येथून मार्गस्थ होणारा सोहळा दुपारचा विसावा उदंड वडगाव येथे घेईल. रात्रीचा मुक्काम वानगाव फाटा येथे होईल. या सोहळ्याचा आतापर्यंत २० ठिकाणी मुक्काम झालेला आहे. अजून नऊ दिवसात २०० किमी अंतर चालून सोहळा पंढरपूर येथे पोहोचेल.
मान्सून आला खरा; पण नुसतेच ढगाळ वातावरण! मृग नक्षत्रात दरवर्षी पेरणी केल्या जाते. परंतु यावर्षी ८ तारखेला मृग नक्षत्राची सुरूवात झाली असूनही २१ तारखेला मृग संपला तरीही समाधानकारक पाऊस पडला नाही. तसेच पावसाच्या आगमनाची आर्द्रा नक्षत्रातही कोणतीही चाहूल नसल्याने आता शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. मृग नक्षत्रात अद्याप वाकोदसह परिसरात पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन शेतकरी व इतरही व्यक्ती पेरणीचे किंवा इतर कार्याचे नियोजन आखतो. जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. तो अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. मात्र, जिल्ह्यात पावसाची समाधानकारक जूनच्या पहिल्या आठवड्यात दररोज पावसाच्या सरी बरसत होत्या. त्यामुळे कृषी केंद्र धारकांनी बियाणे खरेदी करून विक्रीकरिता उपलब्ध करून दिली. परंतु कोरडवाहूचा शेतकरी फिरकत नसल्याने बियाण्यांची खरेदी मंदावली आहे. ८० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी, असे कृषी विभागाने सांगितले आहे. हजेरी रुसली. हवामान खात्याचे अंदाज चुकत असल्याने जनसामान्यात नाराजीची भावना दिसत आहे. पावसाचा अंदाज डोक्यात ठेवून संपूर्ण नियोजन आखले जाते. ८० ते १०० मिलिमीटर पावसाशिवाय पेरणी करू नका. वातावरणाचा अभ्यास घेऊनच पेरणीचे नियोजन करा. जमिनीत किमान वितभर ओल मुरल्यावरच पेरणीचे नियोजन करा, असे कृषी विभागाने सांगितले आहे. बियाणे विक्री मंदावली मृग नक्षत्र संपले, पाण्याचा पत्ताच नाही मृग नक्षत्रानंतर बऱ्यापैकी पावसाला आरंभ होतो. परंतु यंदा मृग नक्षत्र पूर्ण होऊनही कोरडेच आहे. काही शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेऊन कोरडवाहूची पेरणी केली. मात्र पावसाचा थांगपत्ता दिसत नसल्याने आकाशाकडे नजरा लागल्या आहेत.
दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी अनुस्पर्श फाउंडेशतर्फे वृक्षारोपण
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हजारो भाविक पंढरपूरच्या दिशेने पायी वारी करीत आहेत. भक्ती, उत्साह आणि श्रद्धेने भारलेल्या या वारीमध्ये यंदा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येत आहे. तालुक्यातील जाटदेवळे येथील अनुस्पर्श फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने विविध पायी दिंड्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येत असून, समाजात पर्यावरणपूरक संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाची संकल्पना फाउंडेशनचे सचिव डॉ. उद्धव घोशीर यांनी मांडली असून, ज्या ठिकाणी दिंडीचा मुक्काम आहे. त्या ठिकाणी स्थानिक नागरिक, सरपंच व वारकऱ्यांच्या उपस्थितीत एक झाड लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक झाडासाठी कुंपणाचीही व्यवस्था करून त्याचे संरक्षण सुनिश्चित करण्यात येत आहे. लावले जाणारे झाड केशर आंबा जातीचे असून, स्थानिक कुटुंबांना त्याच्या संगोपनाची जबाबदारी दिली जाते. या उपक्रमाची सुरुवात सुदर्शनगड, शिंदेवाडी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या दिंडीपासून झाली. प्रस्थानापूर्वी झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात अनेक मान्यवर, स्थानिक नागरिक व वारकरी सहभागी झाले होते. धार्मिक कार्यातून पर्यावरणाचा संदेश दिला गेला, तर तो लोकांच्या मनात लवकर रुजतो, असा विश्वास सुदर्शनमुनी महाराज उदासीन असे म्हणाले. यावेळी ऋषी महाराज तांगडे, सुदाम महाराज पवार, डॉ. उध्दव घोशीर, बाबासाहेब झरांडे, उध्दव आठरे उपस्थित होते. पुढील वर्षी दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येनुसार त्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट आहे.
पाथर्डी नाथ संप्रदायाची म्हणून तालुक्यातील ओळखली जाणारी मढी देवस्थानची दिंडी मंगळवारी (२४ जून) पंढरपूरकडे रवाना झाली. परिसरातील हजारो नाथभक्त दिंडी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित होते. सांप्रदायिक भजने व नाथांच्या जयघोषाने संपूर्ण वातावरण चैतन्यमय बनले होते. सकाळी नाथांच्या पादुका व प्रतिमा रथामध्ये विराजमान करीत प्रथेप्रमाणे ग्रामप्रदक्षिणा करण्यात आली. त्यानंतर प्रस्थान सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांच्या हस्ते पादुकांची महापूजा होऊन प्रमुख सोहळ्याला प्रारंभ झाला. देवस्थान समितीचे कोषाध्यक्ष राधाकिसन मरकड यांच्या वतीने सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. वारकरी संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदायाची विस्तारित शाखा असून, याची मुहूर्तमेढ तालुक्यातील वृद्धेश्वर येथे रोवली गेली. नेवासे येथे जाऊन ज्ञानेश्वरी ग्रंथाला मूर्त स्वरूप आले. नाथ व वारकरी संप्रदायाची शिकवणच जातीभेदापलीकडे असून, माणसाचे कल्याण, मोक्ष, ज्ञान, तपसाधना, सेवा कार्यातून मोक्ष प्राप्तीसाठीचा मार्ग सांगितला आहे. गुरूंना शरण जात कल्याणाची प्रार्थना करा, असे नाथ संप्रदायात शिकविले जाते. पांडुरंगालाच सर्वस्व मानून त्याला शरण जा, पांडुरंग हाच साक्षात विष्णू स्वरूपात असल्याने कल्याणाचा मार्ग त्या सेवेतून मिळतो असे वारकरी संप्रदाय सांगतो. त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथांची निघणारी दिंडी नाथ सांप्रदायाची पंढरपूरला जाणारी पहिली दिंडी असते. त्या दिंडीनंतरच इतर नाथांच्या दिंड्या निघतात. पंढरपूर येथे देवस्थान समितीची स्वतःच्या मालकीची जागा असून तेथे मठाचे पहिल्या टप्प्याचे बांधकाम झाले आहे. या ठिकाणी या दिंडीचा मुक्काम असतो. रस्त्यामध्ये सर्व धार्मिक विधी व आरत्या नाथ संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे चालत असल्याने असे विधी पाहण्यासाठीसुद्धा गावोगावी भाविकांची गर्दी असते. दिंडीबरोबर संत-महंत, कीर्तनकार प्रवचनकार असल्याने विसाव्याच्या ठिकाणी प्रवचन-कीर्तने होतात. भारुडाचेही कार्यक्रम होतात. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी गावोगावच्या भाविकांची गर्दी होऊन आरोग्यसेवा, दैनंदिन अत्यावश्यक सेवाही मोफत पुरविल्या जातात. दिंडीचा मंगळवारचा मुक्काम सावरगाव येथे असून, बुधवारी सकाळी चापडगाव मार्गे दिंडी पंढरपूरला निघेल. देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मरकड, विमल मरकड, भाऊसाहेब मरकड, डॉ. विलास मढीकर, शामराव मरकड, माजी सरपंच भगवान मरकड, देविदास मरकड, चंद्रभान पाखरे आदी उपस्थित होते. पंढरपुरातील मठाचे बांधकाम करणार पंढरपूर येथील मठाचे विस्तारित बांधकाम करण्याचा विश्वस्त मंडळाचा मानस असून, त्यासाठी अनेक भाविक पुढे आले आहेत. देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळात याबाबत अंतिम आराखडा तयार होऊन बांधकाम केले जाईल. वर्षभर नाथ संप्रदायाचे हजारो भाविक पंढरपूरला दर्शनासाठी जात असतात. त्यांची येथे सोय व्हावी, यासाठी विस्तारित बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाकडे आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जाऊन पंढरपूर येथील बांधकामाला शासनातर्फे भरून निधी मिळावा, यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती कोषाध्यक्ष राधाकिसन मरकड व नवनाथ मरकड यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर पक्षातीलच अनेक मोठे नेते नाराज असल्याचे समोर आले आहे. पक्षांतर्गत या नाराजी मुळे पक्षात असंतोषाचे वारे वाहताना दिसत आहेत. ज्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांवर अजित पवार यांची पकड मानले जाते, त्या पुण्यातीलच अनेक बडे नेते हे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये पक्षातील काही माजी आमदारांचा देखील समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे देवेंद्र भुयार, जुन्नरचे अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे हे पक्षात प्रचंड नाराज आहेत. पक्षातील कोणत्याच बैठकीला आपल्याला बोलावले जात नाही. तसेच पक्षात कोणतीही मोठी जबाबदारी अद्याप पक्षाने दिलेली नसल्याची खंत या नेत्यांनी व्यक्त केली आहे. पक्षात नवीन येणाऱ्या लोकांचा मानसन्मान केला जातोय. मात्र, पक्ष अडचणीत असताना पक्षाच्या सोबत असलेल्या माजी आमदारांना योग्य वागणूक दिली जात नाही, असा आरोप या नेत्यांनी केला आहे. पक्षाच्या बैठकीमध्ये देखील बोलवले जात नसल्याची खंत पक्ष आणि अडचणीच्या काळात आम्ही पक्षाच्या सोबत होतो. मात्र नवीन येणाऱ्या माजी आमदारांना सन्मानाची वागणूक दिली जात आहे. तर दुसरीकडे सोबत असणाऱ्या माजी आमदारांना पक्षाच्या बैठकीमध्ये देखील बोलवले जात नसल्याची खंत या माजी आमदार आणि नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता अजित पवार या सर्व नाराज नेत्यांची समजूत कशा पद्धतीने काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षासाठी काम केलेल्या लोकांकडे दुर्लक्ष का करता? आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी मधील नाराज आणि पराभूत झालेल्या नेत्यांची सध्या महायुतीतील तिन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याच्या माध्यमातून महायुती अधिक मजबूत करण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे. मात्र यामुळे सध्या पक्षात असलेले इतर नेते नाराज होत असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले अनेक माजी आमदार किंवा उमेदवार हे महायुतीमधील घटक पक्षात समावेश होत आहे. मात्र पक्षासाठी काम केलेल्या लोकांकडे दुर्लक्ष का करता? असा सवाल अजित पवार यांच्या एका गटाकडून विचारला जात आहे. अजित पवार यांच्याशी संबंधीत खालील बातमी देखील वाचा... माळेगाव कारखाना:अजित पवारांच्या पॅनलची विजयाकडे वाटचाल; 21 पैकी 14 जागांवर अजित पवारांचे उमेदवार पुढे बारामती परिसरातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नीळकंठेश्वर पॅनल बाजी मारण्याच्या तयारीत आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. स्वत: अजित पवारांनी ब गटातून विजय मिळवला आहे, तर 21 पैकी जवळपास 14 जागांवर त्यांच्या पॅनलचे उमेदवार पुढे आहेत. पूर्ण बातमी वाचा...
आजच्या बदलत्या जीवनशैलीत जीवनातील सुख, आनंद मिळवण्याची संसाधने बदलली आहेत. आजची तरुणाई सत्याचा शोध घेण्याआधीच सोशल मीडियाच्या मायाजालात अडकून भरकटते आहे. विद्यार्थी नेहमीच अनुकरणीय असतात. तेही शॉर्टकट यशाच्या नादात आपल्यातील आत्मविश्वास, शौर्य व स्वाभिमान विसरत चालले आहेत. मृगजळमयी भौतिक सुख व तकलादू आनंदाच्या भ्रामक समजूतीतून बाहेर पडण्याचे व समृद्ध जगण्याच्या पद्धतीच्या वास्तववादावर जीवन घडविण्याचे आव्हान या विद्यार्थ्यांसमोर असल्याचे मत ऑस्ट्रेलियन नागरिकत्व घेतलेले अनिवासी भारतीय बिपिन चासकर यांनी केले. थोर स्वातंत्र्यसेनानी गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी (बाबा) यांनी १९६६ साली आदिवासीबहुल अकोल्यात स्थापन केलेले श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा ५९वा वर्धापन दिन गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करून साजरा करण्यात आला. या सोहळ्यात ऑस्ट्रेलियन नागरिकत्व स्वीकारलेले अनिवासी भारतीय व अगस्ती विद्यालयाचे माजी विद्यार्थी बिपिन चासकर बोलत होते. अध्यक्षस्थानी अकोले तालुका पत्रकार संघाचे संस्थापक विजय पोखरकर होते. व्यासपीठावर अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, कार्यवाहक सतीश नाईकवाडी, अमोल वैद्य, मंगेश खांबेकर, सुरेश खांडगे, सुरेश कोकणे, अगस्ती विद्यालयाचे आजी-माजी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अगस्ती विद्यालयातील पाचवी, आठवी व दहावीतील अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावरील गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांना सन्मानित करण्यात आले. संस्थेचे कार्यवाह सतीश नाईकवाडी यांनी संस्था स्थापनेचा उद्देश स्पष्ट करून स्वातंत्र्यसेनानी गुरूवर्य बा. ह. नाईकवाडी (बाबा) यांच्यासोबत समकालीन विचारशील सहकारी यांसह दिवंगत सचिव विद्यार्थीप्रिय शिक्षिका दुर्गाबाई बाबुराव नाईकवाडी यांच्या कार्यकर्तृत्वाचा धावता आढावा घेतला. अगस्ती विद्यालयाच्या स्थापनेपासून शैक्षणिक यशाचा संघर्षमय इतिहास विषद केला. समाजधुरिणांच्या त्याग व कष्टांतून ही संस्था मार्गक्रमण करीत आहे. त्यांच्या पश्चात संस्थेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांसह सर्वच विद्यालयातील शिक्षक दर्जेदार अध्यापन देण्याबाबत आघाडीवर असल्याचे सांगितले. याप्रसंगी संस्था कार्यवाहक शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, निवृत्त प्राचार्य आर. टी. सोनवणे, दिलीप शेणकर, प्राचार्य शिवाजी धुमाळ, मंगेश खांबेकर, संजय शिंदे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक पर्यवेक्षक संजय शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक संजय पवार यांनी केले. प्रकाश सोनवणे यांनी आभार मानले.
अकोले आज इंटरनेटवरील माहितीचा खजिना सर्वांनाच उपलब्ध आहे. शिक्षणातही मोठे बदल होत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरातून शिक्षण पद्धतीत ज्ञान आत्मसात करणे अधिक प्रभावी व सोपे होत आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर करताना तो चांगल्या गोष्टींसाठी करावा. आपले ज्ञान इतरांचे जीवन समृद्ध करण्यासाठी वापरावे. इतरांच्या जीवनात आपल्यामुळे सुख व आनंदाचे क्षण निर्माण होतात, ही भावनाच आध्यात्मिक व उत्कट समाधानाची असल्याचे राज्याचे नगरविकास खात्याचे सहसचिव विजय चौधरी यांनी सांगितले. अकोले तालुक्याचे आराध्य दैवत अगस्त्य ऋषी आश्रमात गुरुकुलचे धडे घेणारे ५४ विद्यार्थ्यांना रविवारी (२२ जून) आश्वी (ता. संगमनेर) येथील गोडगे परिवाराकडून स्व. शेषराव गोडगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून चौधरी बोलत होते. त्यांनी यावेळी नवोदय विद्यालयातील विद्यार्थी आराध्य भोर यास आपल्याजवळील परदेशी बनावटीचे घड्याळ भेट दिले. व्यासपीठावर अगस्ति देवस्थान ट्रस्टचे खजिनदार किसनशेठ लहामगे, राधाकृष्ण आरोटे, व्यवस्थापक रामनाथ मुर्तडक, वनवासी कल्याण आश्रमचे रामदास सोनवणे, आर्थिक सल्लागार सुनील कडलग, प्रा. मंगल गोडगे, वृषाली कडलग, मंदा सोनवणे उपस्थित होते. आदित्य गोडगे यांनी प्रास्तविकात कार्यक्रमाचा उद्देश विषद केला. वृषाली कडलग म्हणाल्या, शालेय साहित्याची गरजू विद्यार्थ्यांना दिलेली मदत शैक्षणिक प्रगतीसाठी आधारभूत ठरेल. चौधरी म्हणाले, की आम्हास त्या कालखंडात खूप बिकट परिस्थितीतून शिक्षण घ्यावे लागले. असे छान शालेय दप्तर नव्हते, तर गोणपाटाची पिशवी वापरावी लागे. पावसाळ्यात छत्रीऐवजी घोंगडी वापरावी लागे. पायात चपला नसायच्या. खूप संघर्षातून शिक्षण घ्यावे लागे. शिक्षणात संघर्ष आताही आहे, पण विद्यार्थीदशेपासूनच बहुतांश भौतिक सुविधाही उपलब्ध आहेत. जीवनाला आध्यात्मिक अधिष्ठानाची जोड असेल तर जीवन समृद्ध होते. अगस्त्य ऋषी आश्रमातील गुरुकुल विद्यार्थ्यांना गोडगे परिवाराकडून शालेय साहित्याचे वाटप केले.
भक्तीमय वातावरणात मंगळवारी सायंकाळी श्रीक्षेत्र भगवानगडाच्या दिंडीचे हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान झाले. श्रीक्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या दिंडीचे पंढरपूरमध्ये स्वागत करण्याचा मान भगवानगडाच्या दिंडीला आहे. १९२१ मध्ये छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या दिंडी सोहळ्याचे रूपांतर महादिंडी सोहळ्यामध्ये मठाधिपती डॉ. नामदेव शास्त्री यांनी केले. गडाचे संस्थापक वै. संत भगवानबाबा यांनी नारायण गडावर असताना मराठवाड्यातून पहिला पायी पालखी सोहळा प्रारंभ केला होता. हीच परंपरा भगवानगडाच्या स्थापनेपासून आजपर्यंत सुरू आहे. दिंडीचा आजचा मुक्काम गडाच्या पायथ्याला असलेल्या भारजवाडी येथे आहे. बावी, खोकर, मोह, करंजवण, दिघोळ, जयवंत नगर, कुंभेफळ, पिंपरी, कुर्डूवाडी, ढेकळेवाडी या मार्गे ११ व्या मुक्कामाला दिंडी सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचेल. प्रस्थानापासून पंढरपूरपर्यंत यामध्ये असंख्य दिंड्या सहभागी होऊन किमान ५० हजार भाविक शेवटपर्यंत यामध्ये येतात. प्रामुख्याने अंभोरे येथील भोसले महाराजांची दिंडी, गुंजमूर्ती संस्थान, शेषाबाई संस्थान, रामगड संस्था विठ्ठलगड संस्थान, रामेश्वर संस्थान, सुपे, सावरगाव येथील भगवान बाबा संस्थान, भोगलवाडी संस्था, राजा हरिश्चंद्र संस्थान, जवळा, ग्रामस्थ बोरकिनी येथील भगवान बाबा संस्थान, भाग्यश्री संस्थान, गणपत बाबा संस्थान, सावरगाव कुमंडलेश्वर संस्थान घोगस पारगाव, सिद्धेश्वर संस्थान शिरूर कासार, मायंबा संस्थान भालगाव, भगवान बाबा संस्थान संभाजीनगर, पैठण, आळंदी, खडकवाडी येथील कानिफनाथ संस्थान, केशवराज संस्था वरणी, खर्डा येथील कानिफनाथ संस्थान, हनुमान टाकळी संस्था, शहर टाकळी संस्था, कानिफनाथ संस्थान खोकर मोह, साल सिद्धेश्वर संस्थान बीड सांगवी, तागडगाव येथील भगवान बाबा संस्थान या प्रमुख देवस्थानांचा सहभाग असतो. राजयोगी ऐश्वर्या संत म्हणून भगवान बाबांकडे बघितले जात असल्याने या दिंडीचाही थाट तसाच असतो. गडाचे उत्तर अधिकारी कृष्णाशास्त्री महाराजांचे उपस्थितीत दिंडी सोहळा समाधी मंदिराला प्रदक्षिणा करीत अत्यंत उत्साहात निघाला. त्याची भव्यता बघूनच एकूण प्रथा व परंपरांचा अंदाज येतो. गावोगावी दिवाळीसारखा सण साजरा करीत भाविक या दिंडीचे स्वागत करतात. भजन, कीर्तन, भारुड अशा सांप्रदायिक पद्धतीच्या वातावरणामध्ये मुक्कामी होतात. पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी आवर्जून उपस्थित राहतात. पादूका दर्शनासाठी होते गर्दी पैठण येथील संत एकनाथ महाराजांची दिंडी मागील आठवड्यातच मार्गस्थ झाली. त्या दिंडीला पंढरपूरमध्ये स्वागतासाठी ही दिंडी पुढे जाते. मानपान देऊन मुख्य स्थानाचे पूजन करीत सन्मानाने दिंडीला पंढरीमध्ये प्रवेश करण्याची प्रार्थना केली जाते. दोन्ही दिंड्या मिळून पंढरीत प्रवेश करतात. हा सोहळा अत्यंत बघण्यासारखा असतो. पंढरपूरमध्ये या दिंडीतील पादुका व संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचे दर्शन करण्यासाठी भाविकांची गर्दी उसळते.
योग ही सनातन अन् वैभवशाली संस्कृती- आगरकर
योग ही भारताची सनातन संस्कृती आहे. ही वैभवशाली संस्कृती जपत समर्पित भावनेने जिजाऊ फाउंडेशन नागरिकांना योगासनाचे प्रशिक्षण देत सुदृढ समाजनिर्मितीचे काम करीत आहे. हे कार्य कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. आता गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकार योगदिन साजरा करीत या क्षेत्राला मोठे प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे नित्यनेमाने योग करणाऱ्या संस्थांना योगा हॉल देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. शहर भाजपाच्या व्यापारी आघाडीने योग दिनाचा उत्कृष्ट उपक्रम राबवला असल्याचे प्रतिपादन भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर अॅड. अभय आगरकर यांनी केले. अहिल्यानगर शहर भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडी व जिजाऊ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त शास्त्रोक्त योगासने, हास्ययोग, ध्यान व प्रार्थना करून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अॅड. अभय आगरकर बोलत होते. जिजाऊ फाउंडेशनच्या प्रमुख मनीषा गुगळे यांनी उपस्थित साधकांना व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना योगासनाचे प्रशिक्षण देत मार्गदर्शन केले. यावेळी माजी सरचिटणीस सचिन पारखी व प्रशांत मुथा, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे, संयोजक हर्षल बोरा, गोपाल वर्मा, नीरज राठोड, प्रशांत बुऱ्हाडे, सुरेश लालबागे, लक्ष्मीकांत तिवारी, रुपेश वर्मा, संजय कांगला आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविकात महेश गुगळे यांनी उपक्रमाची माहिती देत जिजाऊ फाउंडेशनचे आभार मानले. यावेळी उपस्थित पाहुण्यांचा झाडांची रोपे देऊन स्वागत करण्यात आला.
बार्शी जीवनातील तुटलेल्या भिंती पार करणाऱ्यांनाच इतिहास घडवण्याची संधी मिळते. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हीच खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन झारखंडचे पेयजल व स्वच्छता विभागाचे विशेष सचिव आणि जलजीवन मिशनचे मिशन संचालक रमेश घोलप यांनी केले. साथ मित्रांची ग्रुपतर्फे येथील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात आयोजित 'सन्मान कर्तृत्वाचा-सोहळा गुणवंतांचा' या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेंद्र राऊत हे होते. या वेळी पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे, रमेश पाटील, युवराज काटे, उमेश घोलप, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे उपस्थित होते.या वेळी घोलप यांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांना जनतेच्या अपेक्षा, मानवी मूल्ये आणि संवेदनशीलतेची जाणीव ठेवत निष्ठेने विविध स्पर्धा परीक्षेतील या गुणवंतांचा झाला सन्मान : आनंद मोरे, प्रदीप काळे, राजन शिंदे, आशुतोष जाधव, अनिकेत काळे, मीनाक्षी जमदाडे, कृष्णात नाळे, गौरव ताकभाते, अनिकेत सुपेकर, वर्षा वांगदरे, निलेश कुलकर्णी, विशाल मोरे, विद्या मिरगणे, सरिता चिकणे, सुरज सुरवसे, कल्याणी पाटील, सरिता पौळ, राहुल गरदडे, प्रवीण चिवटे, ऋषिकेश जगताप, सागर सुपेकर, गिरीश राऊत, संसमाधान करळे, संतोष पाचकवडे, समाधान करळे, राजेंद्र चव्हाण, किशोर चौधरी, सागर जगदाळे, करण पवार, उदय जमदाडे, ओंकार गायकवाड, गणेश चिपडे, निखील ढेरे, शुभम जमदाडे, सचिन काशीद. सामाजिक कार्यसेवा पुरस्कार : वृक्ष संवर्धन समिती, जय शिवराय प्रतिष्ठान, शिवराज्य सेना ग्रुप, 'आण्णा ग्रुप' (वैराग), स्वराज्य युवा ब्रिगेड (कोरफळे). वैद्यकीय सेवा पुरस्कार : डॉ. अमित पडवळ, डॉ. कुमार जगताप. तृतीयपंथीयांसाठी विशेष कार्य पुरस्कार - सचिन वायकुळे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय संस्था : शौर्य अकॅडमी, श्री अकॅडमी, शिवराज अकॅडमी, डिफेन्स अकॅडमी, श्री करिअर अकॅडमी यांसंस्थाचालकांचा सन्मान करण्यात आला. भूमिपुत्राच्या पदोन्नतीनिमित्त बार्शीकरांकडून विशेष गौरव झारखंडमध्ये विशेष सचिव (पेयजल व स्वच्छता विभाग) व जल जीवन मिशनचे मिशन डायरेक्टर या महत्त्वाच्या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल बार्शी तालुक्याचे सुपुत्र आयएएस रमेश घोलप यांचा यावेळी मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. दिव्य मराठी गुणवतांचा सन्मान सोहळ्याप्रसंगी माजी आमदार राजाभाऊ राऊत, जलजीवन मिशनचे संचालक रमेश घोलप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्य करण्याचे आवाहन केले. माझ्या वैयक्तिक जीवनात आलेले संघर्ष, शिक्षणासाठी केलेली झुंज आणि समाजातील वास्तवाचे निरीक्षण यामुळे मला लोकहिताच्या दृष्टीने अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, आयएएस रमेश घोलप हे सामान्य कुटुंबातून मोठ्या पदावर पोहोचले असून त्यांच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी ही आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. कोणतेही कार्य अशक्य नसते, फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्नांची पराकाष्टा केली पाहिजे.
समाजातील सर्व घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले:डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांचे प्रतिपादन
शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील समाजकार्यात खेडगी यांचे नाव नेहमी अग्रेसर होते. सीमावर्ती भागात सन १९६९ मध्ये खेडगींनी शैक्षणिक संस्था उभी केली. त्याद्वारे भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण देणारी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्याबरोबरच वटवृक्षाप्रमाणे प्रगती करून समाजातील सर्व घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. (कै.) शिवशरण खेडगी यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी केले. सोमवारी सी. बी. खेडगी सभागृहात आयोजित 'शिव-शरण अक्कलकोटभूषण' सन्मान सोहळ्यात डॉ. महास्वामी बोलत होते. व्यासपीठावर विविध महास्वामींसह माजी नगराध्यक्षा शोभा खेडगी, संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, सचिव सुभाष धरणे आदी उपस्थित होते. या वेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, तहसीलदार विनायक मगर, पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे, मल्लिकार्जुन पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. यांचा झाला सन्मान या सोहळ्यात संजीवकुमार म्हेत्रे (सीईओ-एमएसईबी), डॉ. किसन झिपरे (सेवानिवृत्त प्राचार्य), विद्या शाबादे - मेंथे (शिक्षण सेवा), ज्योती गाजरे (निर्भया पथक), डॉ. आर. व्ही. पाटील (आरोग्य सेवा), प्रकाश कोळी (समाजसेवा), श्रीशैल वंजारी (कृषी सेवा), निनाद शहा (उद्योग व्यवसाय), मेजर शांतलिंग पाटील (संरक्षण सेवा), शिवाजी लोखंडे (व्यवसाय), धनराज भुजबळ ( प्रशिक्षक- पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र), श्रीमती रुबीनाफिरदौस इफ्तेकारअहमद खैरदी (कृतज्ञता सन्मान), आणि डॉ. आबाराव सुरवसे ( वरिष्ठ महाविद्यालय), प्रा. श्रीकांत जिड्डीमनी (कनिष्ठ महाविद्यालय), सातप्पा प्रचंडे (प्रशासकीय कार्यालय), सिद्धाराम अरबाळे व अशोक इसापुरे (शिक्षकेतर विभाग), गुणवंत विद्यार्थी : पूजा डबरे, प्रियांका पाटील, अनिता काराजनगी, पूजा हाळनुरे, गायत्री रामपुरे व झुवेरिया शेख इत्यादी.
घरकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्याच्या कामात मोहोळ पंचायत समिती विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते व विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अप्पर उपायुक्त विजय मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सदरचा पुरस्कार तहसीलदार सचिन मुळीक व सहाय्यक गटविकास अधिकारी विजयकुमार देशमुख यांनी स्वीकारला. महाराष्ट्र शासनाने बेघर लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना अंतर्गत घरकुल उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलाहोता. शासनाकडून मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर केली तथापि घरकुल बांधकाम करण्यासाठी काही लाभार्थींना स्वतःची जागा उपलब्ध नसल्याने घरांचे बांधकाम पूर्ण होऊ शकत नव्हते. त्यामुळे आशा लाभार्थींना शासकीय जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला होता. या कामात मोहोळ पंचायत समितीने पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात लाभार्थींना जागा उपलब्ध करून दिल्याने मोहोळ पंचायत समितीचा पुणे विभागात प्रथम क्रमांक आल्याने याबाबतचा पुरस्कार दिला. या वेळी मोहोळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नागसेन कांबळे व वरिष्ठ सहाय्यक नागेश भालेराव हे उपस्थित होते.
पंढरपूर आषाढी यात्रेत येणाऱ्या वारकरी व भाविकांना आरोग्य सेवा वेळेत देता याव्यात, यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कामगार, सुरक्षारक्षक व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुड समारिटन मोबाइल अॅप व कार्डिओपल्मोनरी रिसक्सटिशन (सीपीआर) याबाबतचे प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करत प्रशिक्षण देण्यात आले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या संत तुकाराम भवन येथे (दि. २१) प्रशिक्षण देण्यात आले. एखाद्या रुग्णाला रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत प्राथमिक उपचार देता यावेत, यासाठी प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे वारी काळातील रुग्णांना वेळेवर औषधोपचार, वेळेवर वैद्यकीय मदत मिळून रुग्णाच्या जीवितास धोका कमी करण्यास मदत होणार आहे. आरोग्य विभागाने यावर्षी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत ’गुड समारिटन’ नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून वारकऱ्यांना आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी त्वरित संपर्क साधता येणार आहे. अॅपवर आलेल्या माहितीवरून रुग्णवाहिका चालकाला रुग्णाचे ठिकाण अचूक कळणार. यामुळे वारीतील रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळून रुग्णाच्या जीवितास धोका कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने व १०८ चे मुख्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांच्या मार्गदर्शनाखली वारकरी भाविकांना पालखी मार्ग, तळांवर तसेच पंढरपूर शहरात आरोग्य सुविधा देण्यात येणार असल्याचे जिल्हा व्यवस्थापक सोलापूर डॉ. अनिल काळे यांनी सांगितले. या वेळी प्रशिक्षण विभाग प्रमुख डॉ. मेघना झेंडे, शस्त्रक्रिया प्रमुख डॉ. किशोर देव, डॉ. प्रियंक जावळे, जिल्हा व्यवस्थापक पुणे, डॉ. अनिल काळे जिल्हा व्यवस्थापक सोलापूर, डॉ. कौस्तुभ घाटुळे, डॉ. प्रतिक पाटील, डॉ. सीमरण केशवाणी आदी उपस्थित होते.
केम ता. करमाळा येथील विजेच्या प्रश्नासाठी ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेत मंगळवारी दिवसभर गाव बंद ठेवत जेऊर येथील महावितरण कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. या वेळी शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ जेऊर येथील कार्यालयासमोर येऊन बसलेले होते. सायंकाळी उशिरा यावर लेखी पत्र देत प्रशासनाने लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर सदरचे आंदोलन थांबवण्यात आले. मागील नऊ वर्षांपासून पाठपुरावा करून जेऊरवरून केम सबस्टेशनसाठी जेऊर (२२० केव्ही) सबस्टेशनमधून स्वतंत्र ३३ केव्ही आठ किमी लाइन व केमसाठी मंजूर करून घेतले आहे. सदर लाइनचे टेंडर दोन वर्षांपूर्वी झालेले आहे. विजेची समस्या बिकट असताना सुद्धा अद्याप काम सुरू केले गेले नाही. सदर निधीचा इतरत्र वापर करण्याचा मोठा डाव असल्याचा केम गावकऱ्यांना संशय आहे. सर्वच गावकरी हे महावितरण कार्यालय जेऊर या ठिकाणी जाऊन बसले. यावेळी अधिकाऱ्यांनी सकाळपासून संबंधित आंदोलन करताना समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लेखी आश्वासनानंतर सायंकाळी तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. घटनास्थळी आमदार नारायण पाटील यांनीही हजेरी लावली. यावेळी त्यावर तोडगा सायंकाळपर्यंत निघाला नव्हता. त्यामुळे प्रहार व इतर सर्वपक्षीय नेत्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून कडक इशारेही दिले होते. अखेर सायंकाळी उशिरा महावितरण कडून संबंधित काम लवकरात लवकर सुरू करून केले जाईल, असे आश्वासन लेखी दिले.
मंदिर समितीची बैठक:मंदिर समितीच्या जमिनी अकराऐवजी 33 महिन्यांसाठी भाडे तत्त्वावर देण्याचा प्रस्ताव
आषाढी यात्रेच्या अनुषंगाने भाविकांना मंदिर समितीमार्फत देण्यात येणाऱ्या सोई सुविधांची पूर्व तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. दरम्यान, मंदिर समितीच्या जमिनी वहिवाटीस देण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने या जमिनी ११ महिन्यांऐवजी ३३ महिन्यांसाठी भाडे तत्त्वावर देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे संपन्न झाली. सदर बैठकीस मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे, डॉ. दिनेशकुमार कदम, शकुंतला नडगिरे, ॲड. माधवी निगडे, प्रकाश जवंजाळ महाराज व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. आषाढी वारींच्या अनुषंगाने पदस्पदर्श दर्शन रांगेत अत्याधुनिक पध्दतीची १२ पत्राशेड उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या दर्शनरांगेत स्कायवॉक, स्कायवॉक ते पत्राशेडपर्यंत वासे व बांबूचे बॅरिकेटिंग करून वॉटरप्रूफ मंडप उभारणे, पत्राशेडपासून गोपाळपूर येथील स्वेरी कॉलेजपर्यंत बॅरिकेडिंग, दर्शनरांगेत बसण्यासाठी बाकडे, रहदारीस अडथळा निर्माण होऊ नये म्हणून सहा ठिकाणी उड्डाणपुले, तीन ठिकाणी विश्रांती कक्ष, यंदा प्रथमच दर्शनरांगेत पाणी वाटपाच्या स्टॉलसोबत फिरते गाडे ठेवण्यात आले आहेत. तसेच मुखदर्शनरांगेत छत्रपती संभाजी चौक येथे सरकता उड्डाणपूल बसवण्यात येणार आहे. याशिवाय, स्वयंसेवी संस्था, उपजिल्हा रुग्णालय व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत वैद्यकीय सुविधा देण्यात येणार आहे, यात्रेच्या दृष्टीने आवश्यक ती सर्व पूर्व तयारी झाली असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. आषाढी यात्रा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यासाठी मंदिर समिती आणि नगरपालिका प्रशासनाने यात्रेसंबंधीची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने आघाडी घेतली तर आरोग्य विभाग तयारीत गुंतला आहे. वीज वितरण विभागानेही आपली कामे जवळपास आटोपली आहेत. आषाढी यात्रा कालावधीत मंदिर समितीने भाविकांच्या सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य दिले आहे, त्या अनुषंगाने करण्यात आलेली पूर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्याचा आढावा घेण्यात आला. तसेच मंदिर समितीच्या जमिनी संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत. या जमिनी वहिवाटीस देण्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने, त्या ११ महिन्यांऐवजी ३३ महिन्यांसाठी भाडे तत्त्वावर देण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. याशिवाय, सदर जमिनी वहिवाटीस प्रतिसाद मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवण्यात येणार आहेत, याबाबतचे निर्णय बैठकीत घेण्यात आले असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
जिल्हा, तालुक्याला मदतीचा हात देण्यास तत्पर:मंत्रालयातील करमाळाकरांचा मुंबईतील स्नेहभेटीवेळी शब्द
कंदर करमाळा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याला मदतीचा, सहकार्याचा हात देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, असा सूर करमाळा तालुक्यातील मंत्रालयात कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या स्नेहमेळाव्यात निघाला. हा स्नेहमेळावा आयोजित करणे व सर्वांना एकत्रित आणणे, हा कौतुकास्पद उपक्रम आहे, असे प्रतिपादन कक्ष अधिकारी अजय साखरे यांनी केले. करमाळा तालुक्यातील मंत्रालय-विधानभवन येथे कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांचा शुक्रवारी (दि. २०) सचिवालय जिमखाना मुंबईत स्नेहभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंत्रालयीन पातळीवरील अनुभवाचा आपल्या तालुक्याच्या सर्वांगीन विकासासाठी जास्तीत जास्त उपयोग व्हावा, अशी अपेक्षा कार्यक्रमाचे संयोजक दीपक चव्हाण यांनी व्यक्त केली.आपल्या माध्यमातून गाव तसेच तालुक्यातील सामाजिक काम करण्यासाठी आपण यातून पुढाकार घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कक्ष अधिकारी संदीप कदम यांनी केले. या वेळी सदानंद मोहिते, सुरेखा तळेकर, महेश जाधव, विजय जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. मंत्रालयातील अधिकारी उपसचिव शाहजान मुलाणी, मंगेश चिवटे, विनोद गाडे, प्रशांत दौंड, आकाश कांबळे, अक्षय हांडे, राम नलवडे, महेश मोरे, संतोष कांबळे, दत्तात्रय शिरस्कर, प्रवीण पोळ, कल्याणी साळुंखे, रोहित मेहेर, सुजित सावंत, अक्षय शिंदे, संदीप कदम, शैलेश कानडे, दाऊद शेख, मीनाक्षी जाधव, कल्याणी देवकर, निखिल शिंदे, किशोर साळवे, गोपाळ वाघमारे यांच्यासह सर्व मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.
करकंब अधूनमधून पडणारा पाऊस व वाढलेले मजुरीचे व खतांचे दर यामुळे सध्या सर्वच आठवडी बाजारात भाजीपाला व फळ भाज्यांचे दर वाढलेले दिसून येत आहेत. सोमवारी करकंबमधील आठवडी बाजारात भरपूर प्रमाणात भाजीपाला व फळभाज्यांची आवक असूनही गेला एक महिना दर वाढलेलेच आहेत. करकंब येथील आठवडा बाजार भोसे, जळोली, नेमतवाडी, उंबरे, कान्हापुरी, तुळशी, बार्डी, सांगवी, नेमतवाडी तेही मोडनिंब इत्यादी आसपासच्या गावातील शेतकरी व व्यापारी बाजारात येत असतात. सध्या भाज्यांची पेंडी २० ते ३० रुपये तर फळभाज्या ८० ते १०० रुपये किलोपर्यंत आहेत. टॉमेटो व बटाटा मात्र ३० रुपये किलोंच्या भावाने मिळत आहेत. करकंब येथील आठवडी बाजारात खरेदी साठी ग्राहकांची गर्दी ^सध्या अधूनमधून पडणाऱ्या पावसाने उगवण व्यवस्थित होत नाही. मजुरीचे व खतांचे वाढलेले दर यामुळे सर्वच ठिकाणी मार्केट तेजीत आहे. येथून पुढे ही भाजीपाल्याचे व फळभाज्यांचे दर वाढतच राहणार. -सुरेश बाबर, व्यापारी मेथी व शेपू ३० पालक, कोथिंबीर २० भेंडी ६० ते ८० रु. वांगे १०० ते १२० रु. अन्य भाज्या १५ ते २० रु.
बारामती परिसरातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नीळकंठेश्वर पॅनल बाजी मारण्याच्या तयारीत आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. स्वत: अजित पवारांनी ब गटातून विजय मिळवला आहे, तर 21 पैकी जवळपास 14 जागांवर त्यांच्या पॅनलचे उमेदवार पुढे आहेत. या तिरंगी निवडणुकीत चंद्रकांत तावरेंचे सहकार बचाव पॅनल आणि अजित पवारांचे पॅनल यांच्यातच लढत दिसत आहे. शरद पवारांचे बळीराजा पॅनल असले तरी त्यांचा एकही उमेदवार पुढे दिसत नाही. बारामती लोकसभा मतदारसंघात महत्त्व असलेला हा कारखाना यापूर्वी शरद पवारांच्या ताब्यात होता. त्याची सूत्रे अजित पवारांकडे होती. आता शरद पवारांनी आपले वजन नातू युगेंद्रच्या पारड्यात टाकले होते. शेतकरी सभासदांशी स्वत: संवाद साधला होता. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. केंद्र आणि राज्य सरकारमधील सत्तेचा वापर करून माळेगावसाठी 550 कोटी रुपये आणतो, असे आश्वासन अजित पवारांनी दिले होते. ते शेतकरी मतदारांना भावल्याचे दिसत आहे. 21 पैकी 18 जागांचा कल पाहता 14 जागा अजित पवारांकडे मंगळवारी रात्री उशिरा 21 पैकी 18 जागांचा कल पाहता 14 जागा अजित पवारांकडे दिसत होत्या. तावरे गटाला 4 जागा मिळतील असे दिसते. अजित पवार यांच्या पॅनलची सत्ता स्थापन झाल्यास पुणे जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्रावरील शरद पवारांची पकड ढिली झाली असे म्हणावे लागेल, असा सूर राजकीय विश्लेषकांनी लावला आहे. माझी भूमिका ही प्रत्यक्ष सहभागाची - अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. ते विजयी देखील झाले आहेत. या संदर्भात बोलताना शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून हा कारखाना माझ्या विचारांवर सुरू होता. मात्र, सत्तेतील व्यक्तीने प्रत्यक्ष निवडणुकीत सहभागी न होण्याची माझी भूमिका असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. यासंबंधी अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ती शरद पवार यांची भूमिका आहे. माझी भूमिका ही प्रत्यक्ष सहभागाची असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
वसमत तालुक्यातील हयातनगर पाटीजवळ एका हॉटेल मध्ये बसलेल्या दोघांना खंजीरने भोसकल्याची घटना मंगळवारी ता. 24 रात्री उशीरा घडली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह हट्टा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. याप्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे. मुलीच्या कारणावरून हा वाद झाल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील थोरावा येथील विशाल मुंजाजी देवरे (22) हा त्याचा मित्र ओमकार नरवाडे याच्यासोबत मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हयातनगर पाटीजवळील एका हॉटेलमध्ये बसले होते. यावेळी थोरावा येथीलच गोपाळ देवरे, ऋषीकेश कदम, शिवाजी देवरे हे तिघे आले. यामध्ये दोघांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून तेथे बसलेल्या विशाल व ओमकार याच्यावर खंजीरने वार करण्यास सुरवात केली. दरम्यान, आचानक झालेल्या या हल्यामुळे दोघेही प्रतिकार करू शकले नाही. यामध्ये विशाल याच्या पोटावर व छातीवर खंजीरचा वर्मी वार बसला तर ओमकार याच्याही पोटावर वार बसले. त्यानंतर मारहाण करणारे तिघेही पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, जमादार कासले, सुर्यवंशी, सुरेशे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमी विशाल व ओमकार यांना उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र विशाल याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. तर गंभीर जखमी असलेल्या ओमकार याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेतील फरार आरोपींच्या शोधासाठी हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांनी तीन पथके रवाना केली असून त्या तिघांचाही कसून शोध घेतला जात आहे. सदर घटना मुलीच्या कारणावरून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून आरोपींच्या अटकेनंतरच सर्व प्रकार उघड होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पातूर-बाळापूर रोडवरील आयटीआय कॉलेजसमोर मंगळवारी भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले. ओव्हरटेक करताना ट्रकने मागून दिलेल्या धडकेनंतर ऑटोविरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळल्याने ही दुर्घटना घडली. २४ जून रोजी सकाळी ९ च्या सुमारास प्रवासी ऑटोरिक्षा क्रमांक एमएच ३० बीसी २०७१ हा अकोला येथून पातूर मार्गे अंबाशीकडे जात होता. देऊळगावजवळ ट्रक क्रमांक एमएच १८ बीजी ८४९४ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ऑटोला मागून धडक दिली. या धडकेमुळे ऑटोरिक्षा विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुसरा ट्रक क्रमांक एमपी ०९ एचएच ४४२६ वर आदळला. त्यामुळे ऑटोचा पूर्णपणे चुराडा झाला. भीषण अपघातात पीयूष रवींद्र चतरकर (१३), रा. सिंधी कॅम्प, अकोला आणि लीलाबाई ढोरे (५०), रा. लाखनवाडा हे दोघे जागीच ठार झाले. तसेच सुरेंद्र चतरकर (४५), रवींद्र चतरकर (५२), रूपचंद वाकोडे (५०) आणि प्रमिलाबाई वाकोडे (६५) हे गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पातूर-बाळापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून अनेक वेळा या रस्त्यावर ओव्हरटेक करण्याच्या नादात छोटे-मोठे अपघात घडले आहेत. प्रवासी ऑटो व खाजगी वाहने मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन बेधडकपणे धावत असतात. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाईच होत नसल्याने ते नियम पाळत नाहीत. त्यामुळे या मार्गावर अपघातांची संख्या वाढत चालली आहे. वाहतूक पोलिसांनी अवैध वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. अवैध प्रवासी वाहतूक
जुने शहरातील ३२१ वर्षे पुरातन असलेल्या विठ्ठल मंदिर संस्थानात आषाढी एकादशीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहासाठी मंदिरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. टाळ मृदंगांच्या गजरात प्रारंभ होणाऱ्या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सप्ताहात ३५ भजन मंडळांचा सहभाग राहणार असून, रोज संध्याकाळी कीर्तन होणार आहे. दीड दिवसीय गजानन महाराज सामुहिक विजयग्रंथ महापारायण सोहळा. विठू नामाचा सप्ताहभर अखंड गजर करत प्रहरकरी वीणा घेऊन दिवसरात्र अखंडपणे आपली सेवा बजावणार आहेत. विठ्ठल मंदिरात १९३३ पासून अखंड हरिनाम सप्ताहासह इतरही धार्मिक कार्यक्रम, उत्सवांचे आयोजन करण्यात येते. यंदा ४ ते १० जुलै या दरम्यान सप्ताह होणार आहे. सप्ताहात रोज सकाळी ६ वाजेपासून ३५ पेक्षा जास्त भजन मंडळे सेवा देणार आहेत. तसेच प्रहारातही भजन मंडळं सहभाग नोंदवणार असून, सप्ताहाच्या यशस्वितेसाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले असल्याचे व्यवस्थापक रमेश अलकरी यांनी कळवले आहे. एकादशीला अभिषेक : आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच रविवारी, ६ जुलै जून रोजी पहाटे ४ वाजता श्री विठ्ठल रुक्मिणीस अभिषेक करण्यात येणार आहे. हा अभिषेक मंडळाचे सर्व सर्वाधिकारी कृष्णा शर्मा यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. आषाढीनिमित्त विठ्ठल मंिदरात िवशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. पहाटे पांडुरंगास अभिषेक होणार आहे. ११ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता शहरातील प्रमुख मार्गावरुन भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. शोभा यात्रेत वििवध गावांमधील सांप्रदायिक भजनी सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी ११ वाजता दहिहंडा व गोपालकाला हेणार आहे. शोभा यात्रेत पंचक्रोशीमधील वारकरी मंडळांच्या दिंडींचा सहभाग राहणार आहे. दुपारी ३.२० वाजता नवदाम्पत्यांच्या हस्ते महापूजा होणार असून, शोभा यात्रेनंतर रात्री ८.३० वाजता महाप्रसादाचे िवतरण करण्यात येणार आहे. रोज होणार कीर्तन : शुक्रवार ४ ते गुरुवार १० जुलैपर्यंत रोज रात्री ८ ते १० पर्यंत कीर्तन होणार आहे. राष्ट्रीय कीतर्नकार डॉ. नंदिनी कडूस्कर (नागपूर) यांचे कीर्तन होणार असून, तबला वादक म्हणून चैतन्य खेडकर व हार्मोनियम वादक म्हणून हार्दिक दुबे सेवा अर्पण करणार आहेत. सप्ताहात रोज विविध महिला भजन मंडळे विठ्ठल चरणी सेवा अर्पण करणार आहेत. यात शिवचरण महिला भजन मंडळ, गोडबोले प्लॉट महिला भजन मंडळ, श्री गजानन महाराज महिला भजन मंडळ मंडळ, ज्ञानेश्वरी महिला भजन मंडळ, महाकाली महिला भजनी मंडळ, विठ्ठल परिवार महिला जप मंडळ , राधे राधे महिला भजन मंडळ, ठाकरे महिला भजन मंडळ, गायत्री महिला भजनी मंडळ, माणकेश्वर महिला भजन मंडळ, योगीराज महिला भजनी मंडळ, समृद्धी महिला भजनी मंडळ, समर्थ महिला भजन मंडळ, अभिरुची महिला भजनी मंडळ, चैतन्य भजनी मंडळ, माऊली महिला भजन मंडळ, ज्ञानई महिला भजनी मंडळ, नवोदय भजनी मंडळ, अरुणोदय महिला भजन मंडळ, प्रगती महिला भजनी मंडळ, श्री गजानन महाराज महिला भजनी मंडळ आदींचा सामवेश आहे.
महिलांच्या नेतृत्वाखाली गुरु दिक्षा सोहळा यशस्वी
महात्मा वीरशैव लिंगायत सभा, अकोला जिल्हा समिती आणि महात्मा बसवेश्वर विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने, श्री १०८ सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा यांच्या पावन सानिध्यात गुरु दिक्षा सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी सोमवार उजवणे, प्रदोष, शिवरात्री निमित्त विशेष पूजा, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा यांचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण आयोजन महिला समितीच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आले. महाप्रसादाचा प्रारंभ २ वाजता झाला आणि सायंकाळी ५ वाजता कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांच्या प्रवचनाचा लाभ घेतला. या सोहळ्याला नाशिक जिल्हा समितीच्या महिलाध्यक्षा श्रद्धा नीळकंठ, भारती बिडवाई, मनीषा बोंद्रे आणि बुलडाणा जिल्हा समितीच्या महिला अध्यक्षांची उपस्थिती होती. त्यांच्या प्रभावी भाषणांनी महिलांना आत्मविश्वास आणि मार्गदर्शन दिले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महिला जिल्हाध्यक्षा सुषमा यमतकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. संयोजनात शारदा थोटे, संगीता पाटील, सुनीता शिरोडकर, वंदना शेटे, विद्या लोखंडे, स्नेहा बोन्ते, अश्विनी बोन्ते, कल्पना डहाके, नयना गोंडाळ आदींचे योगदान होते. प्रा. विश्वनाथ हजारे, बाबासाहेब भांगे, वैजनाथ मिटकरी, काशीनाथ खुपसे यांनी सहकार्य लाभले. बाबासाहेब भांगे यांनी समन्वय साधला. अध्यक्ष सुभाष पाटील, सुनील शिरोडकर, महेश शेटे, सुनील डहाके, नितीन गवळी, गजानन गोंडाळ, बसवेश्वर डहेनकर, सुरेश लोखंडे आदींनी सहभाग घेतला.
आळंदा जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव; लेझीम पथकाकडून स्वागत
येथून जवळच असलेल्या आळंदा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शाळेचा शाळा प्रवेशोत्सव साजरा केला. इयत्ता पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे व पाहुण्यांचे स्वागत हनुमान व्यायाम शाळेच्या लेझीम पथकाने केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या रत्नमाला खडके उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविकांत पवार, गटशिक्षणाधिकारी संदीप मालवे, विस्तार अधिकारी रमेश चव्हाण, विस्तार अधिकारी दीपक इंगळे, सरपंच दत्ता पाटील, उपसरपंच विश्वनाथ जानोरकार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चैताली बेद्रे,उपाध्यक्ष शिल्पा मोहोड व ग्रामस्थ, पालक उपस्थित होते. इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे व पाहुण्यांचे स्वागत हनुमान व्यायाम शाळेच्या लेझीम पथकाने केले. यासाठी हनुमान व्यायाम शाळेचे पदाधिकारी सुनील खाडे, बंडू पाटील, रमेश नागे, संजय घटाळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके, शूज सॉक्स ,नोटबुक्स, पेन, पेन्सिल अशा वस्तूंचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थ धनराज लोंदे यांनी विद्यार्थ्यांसाठी नोटबुक, पेन्सिलचे वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज जयस्वाल यांनी केले.
गत १५ - १६ वर्षांपासून मनपा शिक्षक, सेवानिवृत्त शिक्षक यांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या. सदर समस्यांना घेऊन शिक्षक आमदार धीरज लिंगाडे व आ. साजिद खान पठाण यांनी मनपा आयुक्तांच्या दालनात शिक्षक संघटनांना घेऊन मंगळवारी सकाळी बैठक घेत या सर्व समस्या मांडल्या. यावेळी सर्व समस्या लवकरात लवकर सोडवणार असल्याचे आश्वासन मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिले. गेल्या अनेक वर्षांपासून मनपाच्या शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगापासून शिक्षक अद्यापही वंचित असून त्याची थकबाकी रक्कम देण्यात यावी, पदवीधर शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी लागू करणे बाबत,४० शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीची थकबाकी रक्कम मिळण्याबाबत, तसेच मुख्याध्यापक पदी नियुक्ती जारी करण्यात आली असली तरी मात्र आर्थिक लाभ देण्यात आला नाही तो देण्यात यावा, सोबतच सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकांची पदोन्नती देण्यात यावी, आरटीई कायद्यानुसार शिक्षकांचा कार्यालयीन कामकाजाचा पदभार काढण्यात यावा, मनपाची बिंदू नामावली मंजूर नसतानाही इतर जिल्ह्यातील शिक्षकांना मनपा शाळेत नियुक्ती देण्यात आली आहे, ही बाब गंभीर असून याची चौकशी करण्यात यावी तसेच जे बिंदू नामावली नुसार मनपा शाळेत समायोजित झाले आहेत त्यांनाच कायम करण्यात यावे इतर शिक्षकांना त्यांच्या मूळ आस्थापनेवर पाठविण्यात यावे, १० वर्षांपासून जे शिक्षक एकाच शाळेवर कार्यरत आहेत त्यांच्या बदल्या करण्यात याव्या, तसेच मनपाने सातव्या वेतन आयोगाच्या नुसार एरियर्स न देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो मागे घेत नियमाप्रमाणे सर्व शिक्षकांना देण्यात यावा, सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन मिळण्यास होणारी अडचण दूर करण्यात यावी, शिक्षकांचे जीपीएफ व सेवा पुस्तकांचे अपूर्ण असलेले कार्य पूर्ण करण्यात यावे, मनपा शिक्षक विभागातील प्रशासकीय रिक्त पदे भरण्यात यावी अशा अनेक मागण्या यावेळी शिक्षक संघटनांनी आयोजित बैठकीत मांडल्या. यावेळी मनपा आयुक्त सुनील लहाने यांनी सदर मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी यावेळी उपआयुक्त गीता ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. शाहीन सुलताना, संजय खराटे यांच्यासह अधिकारी कर्मचारी तसेच प्रदेश महासचिव प्रकाश तायडे, महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, पराग कांबळे, अब्दुल रहीम पेंटर, योगेश कळसकर, तपसू मानकीकर, प्रा. नरेंद्र लाखाडे, पंकज देशमुख, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे सै. जव्वाद हुसैन, सरदार खान, मजबूर अहमद, सईद खान, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे अनिल अघडते, रवींद्र वानखेडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे गोकुळ हरणे, श्रीकांत भूतकर, न.पा. शिक्षक संघाचे राजू भिरड, शेख रहेमान, अपंग अधिकारी कर्मचारी संघाचे मो. अब्दुल अजीज, शेर जमा खान, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे राम शेगोकार, रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. मनपा शाळांची भौतिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे, सोबतच अनेक ठिकाणी पाहणीत आढळून आले की, पावसात शाळेची छत गळते, वर्गामध्ये पाणी साचते, शाळेच्या आवारात सुद्धा मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी यासह अनेक भौतिक सुविधांचा अभाव आढळून आला आहे. मनपा शाळांची भौतिक अवस्था सुधारण्यात यावी, विद्यार्थ्यांना बसायला डेस्क बेंच उपलब्ध करून देण्यात यावे सोबतच शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात यावे असे निर्देश आ. पठाण यांनी बैठकीत दिले. भौतिक सुविधेसह शिक्षणाची गुणवत्ता वाढवावी; विद्यार्थ्यांना बसायला बेंच पुरवा
अकोल्यात एमएसएमई महोत्सवाचे आयोजन:नवउद्योजकांसाठी एकाच छताखाली सर्व सुविधा
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) अकोला शाखेच्या वतीने पहिल्यांदाच एमएसएमई (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योगाचा सन्मान, एमएसएमईचा अभिमान' या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय हा महोत्सव २६ व २७ जून रोजी आयसीएआय भवन, तोष्णीवाल लेआउट येथे पार पडणार आहे. या महोत्सवात १५ शासकीय, वित्तीय व उद्योग क्षेत्राशी संबंधित संस्थांचे मार्गदर्शन स्टॉल्स नागरिकांसाठी खुल्या असणार आहेत. आयसीएआयच्या आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष धीरज चांडक, उपाध्यक्ष रोमिल सोजतीया, सचिव श्याम माहेश्वरी, कोषाध्यक्ष विशालकुमार राजपाल व विकास अध्यक्ष प्रतीक मंत्री यांनी ही माहिती दिली. महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी, २६ जून रोजी सकाळी १० वाजता खा. अनुप धोत्रे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उद्योजक अजयप्रकाश रुहाटिया उपस्थितांना मार्गदर्शन करतील. एमएसएमई स्टार्टअप इकोसिस्टीम, टॅक्सेशन, फंडिंग, कायदेशीर सल्ला, कॅपिटल मार्केट, टेक्निकल अडॉप्शन, आणि सबसिडी योजनांवर सखोल सत्र होणार आहेत. २७ जून रोजी विविध विषयांवर तांत्रिक व समारोप सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात असो.च्या वतीने हेल्प डेस्क साकार करण्यात येणार असून यामध्ये उद्योजक बनू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी उद्यम नोंदणी करण्यात येणार आहे. डीआयसीच्या वतीने पीएसआय, सीएमईजीपी, पीएमईजीपी तथा मैत्री पोर्टल नोंदणीची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आयकर विभागाच्या वतीने ई पॅन, स्टार्टअप टॅक्स एक्सेप्शन, टीडीएसचे निराकरण, पॅन आधार लिंकिंगचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विविध माहिती देणार मनपाच्या वतीने परवाना शिबिर तर प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या वतीने संबंधित विविध मार्गदर्शन होणार आहे. नाबार्डच्या वतीने विविध प्रकारच्या वित्तीय कर्ज योजना व सबसिडी यांची माहिती देण्यात येणार असून जीएसटी विभागाच्या वतीने पीटीआरसी नोंदणी,जीएसटी नोंदणी व नागरिकांच्या शंकांचे समाधान करण्यात येणार आहे. एफएसएसएआय विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
रिपाइंला जागा न सोडल्यास उमेदवार देणार- अवचार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मित्र पक्षाने रिपाइं (आठवले) ला जागा सोडाव्यात, अन्यथा रिपाइं उमेदवार उभे करेल व स्वबळावर निवडणूक लढवेल, असे जिल्हाध्यक्ष सुनील अवचार म्हणाले. रिपाइंच्या बैठकीत तसा ठराव घेण्यात आल्याचे अवचार यांनी सांगितले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )अकोला जिल्हा बैठक जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. बैठकीत युवा नेते आशिष शिरसाट यांच्यासह शेकडो युवकांनी पक्षात प्रवेश केला. बैठकीत जिल्ह्यातील ज्या अतिक्रमण धारकांनी १४ एप्रिल १९९० सालापूर्वी शेतीसाठी शासकीय गायरान जमिनीवर अतिक्रमण केले. त्याचप्रमाणे गावठाण जमिनीवर रहिवाशी घरे बांधली त्यांच्या पाठीशी रिपाइं खंबीरपणे उभे राहील, असा ठराव या बैठकीत घेण्यात आला. यावेळी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत रिपाइंला मित्र पक्षाने राखीव जागा सोडाव्यात अन्यथा रिपाइं स्वबळावर उभे करू असा निर्धार या जिल्हा बैठकीत करण्यात आला. तसेच श्रावण बाळ योजनेचे मानधन दीड हजार रुपयावरून तीन हजार रुपये करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या बैठकीला जिल्हाभरातून युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण, अजय गवई, आशिष शिरसाट, गणेश थोरात, अनिल वाकोडे, संघदीप शेगांवकर, पंडित सदार, दयानंद तेलगोटे, दिनेश पेटकर, सूरज तायडे, शोभा राठोड, गीताबाई जाधव, एकता राठोड आदी बैठकीला उपस्थित होते.
मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांशी स्पर्धेच्या माध्यमातून बघत असताना लघु, मध्यम व मोठ्या उद्योजक तसेच व्यापाऱ्यांनी नवनव्या उत्पादन निर्मितीची कास धरावी. येणारा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा असून, या तांत्रिक प्रगतीचा उपयोग आपल्या उद्योगात करून आपले पारंपारिक व्यापार व उद्योग विकसित व सुसंस्कृत करण्याचे आवाहन जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. ते शतकोत्तर वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या वार्षिक आमसभा सभेत बोलत होत. सभा खंडेलवाल भवन पार पडली. अध्यक्षस्थानी चेंबरचे अध्यक्ष नीकेश गुप्ता होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजप व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, खा. अनुप धोत्रे, चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष सिद्धार्थ रुहाटीया, कनिष्ठ उपाध्यक्ष निखिल अग्रवाल, मानद सचिव नीरव वोरा, कोषाध्यक्ष किशोर बाछुका, सहसचिव किरीट मंत्री, चेंबरचे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल आदी उपस्थित होते. या वार्षिक आमसभेत सकाळी बिझनेस सत्र संपन्न झाले. यात गतवर्षीचा लेखाजोखा व अंदाजपत्रक मंजूर करण्यात येऊन अंकेक्षक प्रशांत लोहिया यांची नियुक्ती करण्यात आली. या नंतर द्वितीय सत्रास प्रारंभ झाला. या कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजकाना विविध श्रेणीत व्हीसीसीआय अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉसब्लिटी अवॉर्ड गुजरात अंबुजा एक्स्पोर्टचे ब्रिजमोहन चितलांगे, बेस्ट वुमन इंटरप्रेनर अवॉर्ड काईट्स रोबोटिक्सच्या काजल राजवैद्य, बेस्ट फॅमिली बिझनेस प्रॅक्टिस अवॉर्ड आरआर गृप ऑफ इंडस्ट्रीजचे कैलास अग्रवाल तर फास्ट जनरेशन इंटरप्रेनर अवॉर्ड हिमांशू खंडेलवाल व क्रफ्टिंग फ्युचर ब्रिक्सचे अवीन अग्रवाल यांना बहाल करण्यात आला. तसेच सर्वोत्कृष्ट कार्यकारिणी सदस्य म्हणून चंचल भाटी, उपसमिती सदस्य पुरस्कार ॲड. सुभाषसिंह ठाकुर यांना देण्यात आला. यावेळी चेंबरच्या अवॉर्ड कमिटीचे परीक्षक रमाकांत खंडेलवाल, विजय पनपालिया, प्रशांत लोहिया, इव्हेंट पार्टनर स्टार ॲग्रीवेअर हाउसिंगचे कैलाश काळपांडे, खंडेलवाल भवनचे प्रमोद खंडेलवाल, चेंबरचे कर्मचारी गिरीराज लखोटिया, मंगेश रघुवंशी, रेवत पळसपगार, चेंबर बुलेटिन समितीचे संतोष छाजेड, राहुल मित्तल, रोहित रुंगटा, मनोज अग्रवाल, अॅड. सुरेश अग्रवाल यांनाही सन्मानित करण्यात आले. औद्योगिक विकास आवश्यक व्यापार उद्योजकांनी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला अधिक चालना द्यावा, असे आवाहन खा. अनुप धोत्रे यांनी केले. जिल्ह्यात नव्या कॉर्पोरेट उद्योगांना आणण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन भाजप व्यापार विभागाचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. चेंबरचे अध्यक्ष गुप्ता यांनी व्यापार उद्योग विश्वातील बाबींचा उहापोह केला.यावेळी स्टार ॲग्रीवेअर हाउसिंगचे कैलास काळपांडे यांनी आपल्या संस्थेची माहिती दिली.
अमरावती भातकुलीतील एका शेतकऱ्याने शेतीच्या मशागतीसाठी गावातील दोघांकडून टप्प्याटप्प्याने काही रक्कम व्याजाने घेतली होती. मात्र नापिकीमुळे शेतकऱ्याला ती व्याजाची रक्कम वेळेत फेडता आली नाही. त्यामुळे ते दोघे पैशांसाठी तगादा लावत होते. तसेच त्यांनी या शेतकऱ्याच्या सामायिक शेतापैकी एक एकर शेतावर कुंपण टाकून ताबा घेतला. या प्रकारामुळे ५२ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात भातकुली पोलिसांनी चौकशीअंती सोमवारी (दि. २३) उशिरा रात्री दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. गजानन त्र्यंबक डाहाट (५२, रा. भातकुली, अमरावती) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी अतुल मोहनसिंग रघुवंशी (५२, रा. भातकुली) आणि प्रकाश मोहनसिंग रघुवंशी (५५, रा. लक्ष्मीनगर, अमरावती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अतुल रघुवंशीला अटक केली आहे. भातकुली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन डाहाट यांनी अतुल व प्रकाश रघुवंशी यांच्याकडून शेतीच्या मशागतीसाठी वर्षभरापूर्वी टप्प्याटप्प्याने सुमारे दहा लाख रुपये व्याजाने घेतले होते. दरम्यान पीक निघाल्यानंतर ही रक्कम परत करू, असे गजानन डाहाट यांनी ठरवले होते. दरम्यान रक्कम देतेवेळीच रघुवंशीने डाहाट यांच्याकडून बाँड पेपरवर लिहून घेऊन सर्व्हे क्रमांक ३१६ ची कच्च्या स्वरुपात ईसारचिठ्ठी केली होती. दरम्यान डाहाट यांना त्यावर्षी समाधानकारक पीक झाले नाही. त्यामुळे रघुवंशीकडून घेतलेली व्याजाची रक्कम परत करता आली नाही. दुसरीकडे रक्कम परत करण्यासाठी उशीर होत असल्यामुळे व्याजाचा बोजा वाढतच होता. त्यामुळे गजानन डाहाट सातत्याने तणावात राहत होते. यातच रघुवंशी त्यांना वारंवार फोन करून पैशांची मागणी करत होते, धमकी देत होते. त्यामुळे डाहाट तणावात होते. यातच एके दिवशी रघुवंशी यांनी डाहाट यांच्या शेतात जाऊन एक एकर जागेवर तारेचे कुंपण टाकून ताबा मिळवला. दरम्यान १६ मार्च २०२५ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास प्रकाश रघुवंशीने गजानन डाहाट यांना कॉल करून पैशांची मागणी केली. मात्र डाहाट यांनी सध्या पैसे नसल्याचे सांगितले. त्यावेळी रघुवंशीने डाहाट यांना शिवीगाळ केली. कर्जाचा बोजा वाढत होता, शेतीवरही रघुवंशीने ताबा घेतला होता. त्यामुळे गजानन डाहाट खचले व त्यांनी १६ मार्चला सायंकाळी ६ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी १९ मार्चला गजानन डाहाट यांच्या पत्नीने भातकुली पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीअंती पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करून मागील तीन महिने सखोल चौकशी केली. चौकशीअंती पोलिसांनी रघुवंशी बंधूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी भातकुलीचे ठाणेदार रवींद्र राजुलवार यांनी केली. गजानन डाहाट यांना रघुवंशीने वर्षभरात टप्प्याटप्प्याने जवळपास १० लाख रुपये व्याजाने दिले होते. त्यावेळी कच्च्या इसार चिठ्ठीवर सर्व्हे क्रमांक ३१६ चा उल्लेख होता. मात्र रघुवंशीने डाहाट यांच्याकडील शेत सर्व्हे क्रमांक ३१९ या सामायिक शेतापैकी एक एकर शेतावर ताबा घेतला. केवळ ताबाच घेतला नाही तर तार कुंपणही केले. व्याजाची रक्कम वाढत होती, रघुवंशीने ताबा घेतलेली शेती ही भावांसोबतची सामायिक होती. त्यामुळे भावांचेही नुकसान होणार होते. यामुळे गजानन डाहाट अधिकच विवंचनेत वावरत असल्याचेही पोलिस चौकशीत समोर आले आहे. मागील काही वर्षांपासून सातत्याने शेतकरी नापिकी व इतर आव्हानांचा सामना करताना मेटाकुटीला येत आहेत. यातच वर्षभर मेहनत करून शेतमालाला भाव मिळत नाही. कर्जाचे डोंगर दिवसागणिक वाढतच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संख्या वाढतच आहे. १ जानेवारी ते २४ जून २०२५ पर्यंत जिल्ह्यात तब्बल १०४ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जीवन संपवले आहे. उल्लेख एका शेतीचा, ताबा मात्र दुसऱ्या सामायिक शेतीचा दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू ^या प्रकरणात चौकशीअंती गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. रघुवंशीने डाहाट यांना व्याजाने रक्कम दिली होती. तसेच शेतावर ताबा घेतल्याचेही समोर आले. दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास अजूनही सुरूच आहे. -रवींद्र राजुलवार, ठाणेदार, भातकुली.
नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असलेल्या गोंदिया जिल्ह्यात गेली १२ वर्षे निरंतर मोफत योग विद्येचा प्रचार करणाऱ्या, ग्रामीण जीवनात योगाची ज्योत पेटवणाऱ्या अमरावती येथील प्रसिद्ध योग निसर्गोपचार व आहार तज्ञ मेघा लक्ष्मण ठाकरे यांना नुकतेच ‘योगरत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, एजीएमए व आयुष विभाग यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विशेष समारंभात त्यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटक डॉ. बाळासाहेब पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन राजे पाटील उपस्थित होते. मेघा ठाकरे यांनी गोंदिया जिल्ह्यातील अनेक आदिवासी व मागास भागांमध्ये जाऊन ३६० पेक्षा अधिक मोफत योग शिबिरे घेतली. केवळ योगाभ्यासच नव्हे तर वृक्षारोपण, जनजागृती रॅली, शालेय योग शिबिरे व बालसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण केली आहे. गेल्या चार वर्षांपासून त्यांनी अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातही योग प्रसाराचे कार्य हाती घेतले असून, त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन ‘योगरत्न’ या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. समाजात आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि नैतिक मूल्यांची जागृती घडवणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वांचा सन्मान हा संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत असतो. योगसाधना आणि सामाजिक बांधिलकी यांची अभूतपूर्व सांगड घालणाऱ्या मेघा ठाकरे यांचे कार्य हे इतरांसाठीही मार्गदर्शक ठरत असून, त्यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्कारामुळे जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ^गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका हा अति नक्षलग्रस्त भाग होता. येथे काम करताना सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. धीराने त्या अडचणींवर मात केली. मानसिक त्रासही झाला. मात्र, गावागावांत योगविद्या पोहोचवण्याचा संकल्प असल्याने जिद्दीने त्या ठिकाणी काम केले. महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नंतर संपूर्ण जिल्ह्यात योगविद्या शिकवण्याचा मार्ग सुकर झाला. कठीण परिस्थितीत केलेल्या कामाचे फळ योगरत्न पुरस्काराच्या माध्यमातून मिळाल्याने आनंदीत आहे. हा पुरस्कार सर्व योग साधकांना समर्पित करते. -डॉ. मेघा ठाकरे, योग, निसर्गोपचार तज्ज्ञ, अमरावती. देवरी तालुक्यात अडचणींचा सामना
दिघीच्या शाळेत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक, गणवेश वाटप
पंचायत समितीअंतर्गत दिघी जहानपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. या वेळी सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, सॉक्स व बुटासह लेखन साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीराम डोंगरे होते. सरपंच बाबुराव नितनवरे, पालक जयमाला भोरखाडे, प्रियंका अटाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम इयत्ता पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांचे कुमकुम तिलक लावून औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पायाचे ठसे कोऱ्या कागदावर घेण्यात आले. त्यानंतर इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठपुस्तके, गणवेश, सॉक्स व बुटासह लेखन साहित्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. पहिल्या दिवशी शासन आदेशानुसार येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मसाले भातासोबत मिष्टान्न देण्यात आले. या वेळी सरपंच बाबुराव नितनवरे, आशा वर्कर संगीता हरणे, मुख्याध्यापक विनायक लकडे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका जया बुधाडे, आम्रपाली भोरखडे, आशा वर्कर योगिता दिघेकर, संगीता हरणे, प्रशिक्षणार्थी साक्षी सगणे यांच्यासह माता पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक विनायक लकडे यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षिका युगंधरा पांडे यांनी केले, तर आभार साक्षी सगणे यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उन्हाळ्याच्या सुटीनंतर सोमवारी शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, सॉक्स व बुटासह लेखन साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक नंदकिशोर पनपालिया मित्र मंडळ वरुडद्वारा संत श्री गजानन महाराज पारायण सेवा समितीला सेवाव्रती पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या या पारायण सेवा समितीला मानपत्र, ११ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. शहरातील श्री अष्टविनायक सभागृहात नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध आर्किटेक्ट माधव देशपांडे होते. पत्रकार बाळासाहेब कुळकर्णी, वनराई फाउंडेशनचे सचिव नीलेश खांडेकर, डॉ. विजय देशमुख, आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र राजोरिया, ठाणेदार अर्जुन ठोसरे, प्रा. अनिल जावळे यांच्यासह नंदकिशोर पनपालिया यांचे वडील हरिकिसन पनपालिया उपस्थित होते. सर्वप्रथम नंदकिशोर पनपालिया यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. नंदकिशोर पनपालिया यांनी त्यांच्या आयुष्यातून सेवाभाव कायम ठेवून त्यांनी आयुष्य व्यतीत केले. त्यांचा हा वसा पुढील पिढीला मिळावा व समाजसेवेचे हे व्रत अखंड सुरू रहावे, या उद्देशाने त्यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून नंदकिशोर पनपालिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ धार्मिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या वरुडच्या संत श्री गजानन महाराज पारायण सेवा समितीला प्रदान करण्यात आला. संत गजानन महाराज पारायण सेवा समिती गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांना पादत्राण व्यवस्था नि:शुल्क पुरवत आहे. संत गजानन महाराज यांच्या प्रगटदिनी गजानन मंदिर परिसरात, महाशिवरात्रीला केदारेश्वर देवस्थान परिसरात व इतर दिवशी आवश्यक त्या ठिकाणी अत्यंत नि:शुल्कपणे सेवा पुरवत आहे. यामध्ये शेकडो गजानन भक्त आपली सेवा देत असतात. त्याची दखल घेत २०२५ वर्षाचा पुरस्कार संत गजानन महाराज पारायण सेवा समितीला प्रदान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाला वरुड शहर व परिसरातील शेकडो नागरिक तसेच नंदकिशोर पनपालिया यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक चंद्रकांत चांगदे, तर आभार डॉ. विजय देशमुख यांनी मानले, असे कळवण्यात आले आहे. पुरस्कार प्राप्तीनंतर संत गजानन महाराज पारायण सेवा समितीने रोख रक्कम ११ हजार रुपये नंदकिशोर पनपालिया मित्र मंडळाला परत करून त्या बदल्यात पादत्राणे ठेवण्याकरिता बॅग उपलब्ध करून देण्याची सूचना केली. यातून पारायण सेवा समितीचा सेवाभाव दिसून येतो. मागील अनेक वर्षांपासून केवळ सेवा देण्याचे कार्य करण्याचे व्रत घेतलेल्या या समितीने पैशांचा मोह न ठेवता त्याऐवजी बॅग मागितल्या. यातून त्यांचा समाजाबद्दल असलेला सकारात्मक दृष्टिकोन दिसून येतो. पारायण सेवा समितीचा असाही सेवाभाव
विद्यार्थ्यांना रोपटे, पाठ्यपुस्तकांचे वितरण:मणीबाई गुजराती हायस्कूलमध्ये उपक्रम
आंबापेठ येथील मणीबाई गुजराती हायस्कूलमध्ये सोमवारी शाळेत पर्यावरणपूरक प्रवेशोत्सव उपक्रम राबवण्यात आला. मुख्याध्यापिका अंजली देव यांच्या मार्गदर्शनात सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व सांगून त्यांचे स्वागत केले. वर्ग पाचवीतील नवप्रवेशित विद्यार्थ्यांकरिता प्रवेशोत्सवाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्काराची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने सर्व नवागत विद्यार्थ्यांचे कुमकुम तिलकाने औक्षण करून, पुष्प वर्षाव करून पर्यावरणपूरक हातरूमाल व भारतीय प्रजातीचे रोपटे देऊन अंजली देव व शिक्षकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर बँड पथक व बिगुलच्या आवाजात विद्यार्थ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी आराध्या लांडगे या विद्यार्थिनीने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केलेले व्हायोलिन वादन लक्षवेधक ठरले. शाळेचे प्रवेशद्वार आंब्याच्या पानाचे तोरण, फुलांच्या माळा लावून सुशोभित केले होते. विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत व्हावा म्हणून शाळेच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला उभारलेला सेल्फी पॉइंट विद्यार्थी व पालकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. विद्यार्थ्यांचा शालेय परिसरात प्रवेश झाल्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन पाटणकर व जयंत मुंजे यांनी केले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. तसेच शालेय पोषण आहार व पूरक आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना पुलाव, पोहे व केळी असा अल्पोपाहार देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या प्रवेशोत्सवासाठी गुजराती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुरेश राजा यांनी कार्यकारिणीच्या वतीने शुभेच्छा देण्यात दिल्या. शिक्षण उपसंचालक नीलिमा टाके, जि. प.च्या शिक्षणाधिकारी, माध्यमिक प्रिया देशमुख, मनपा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण व स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण होऊन त्यांनी याबाबतची अंमलबजावणी करावी, यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो, असे शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली देव यांनी सांगितले. मणीबाई गुजराती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुरेशभाई राजा व कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबवला असल्याचे अंजली देव यांनी सांगितले.याप्रसंगी मुख्याध्यापिका अंजली देव, उपमुख्याध्यापक अनिल पंजाबी, पर्यवेक्षक प्रवीण सावजी, सरिता गायकवाड, प्रफुल्ल मेहता, माजी नगरसेविका रश्मी नावंदर, शैलेश धुंदी, सागर तायडे, प्रदीप इंगोले, शिक्षक वृंद, कर्मचारी व पालक उपस्थित होते.
सीताबाई संगई हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव थाटात
येथील सीताबाई संगई हायस्कूल येथे शैक्षणिक सत्राला प्रारंभ झाला. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तसेच मुख्य इमारतीवर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक फुग्यांची सजावट करण्यात आली. तसेच या वेळी सुंदर रांगोळी काढण्यात आली. मुख्य प्रवेशद्वारावर शाळेचे प्राचार्य राकेश डोणगावकर, उपमुख्याध्यापक राजेश वैद्य, पर्यवेक्षक डॉ. नीलेश डाहाळे, सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. शाळेच्या प्रथम दिवशीच दैनिक परिपाठ घेऊन राष्ट्रगीताने शाळेची सुरुवात झाली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तकांचे प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या वेळी अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य राकेश डोणगावकर, उपमुख्याध्यापक राजेश वैद्य, पर्यवेक्षक डॉ. नीलेश डाहाळे, शिक्षक विनोद शिंगणे, तर पालक प्रतिनिधी म्हणून प्रदीप धाबे, कमलेश पर्वतकर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळद्वारा आयोजित गणित प्रावीण्य परीक्षेत शाळेचे तीन विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांची गणित प्रज्ञा परीक्षेकरिता निवड झाली. त्यामुळे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये इयत्ता पाचवीचा विद्यार्थी सम्यक मनीष जोहरापूरकर, वर्ग आठवीचा देवांश मनीष येवले, मिहिर राजेंद्र टांक यांचा समावेश आहे. तसेच समरसता साहित्य परिषद मुंबईच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्यस्तरीय खुली निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. येथील सीताबाई संगई कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेची अकरावीची विद्यार्थिनी गौरी वाघमारेला अमरावती विभागातून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून, तिचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल भेलांडे यांनी केले.
अखेर वळण मार्गावर दर्शनी फलक लागल्याने अपघाताचा धोका टळला
अकोला बाजार ते घाटंजी मार्गावर असलेल्या शाळेजवळील वळणावर दर्शनी माहिती फलक नसल्याने अपघातास हे वळण कारणीभूत ठरत होते. या वळणावर दर्शनी माहिती फलकाच्या अभावी जोरात असलेल्या वाहन चालकाला वळण दिसत नव्हते आणि वळणावर वाहन धारकांना वळण घेण्यास अडचण जात होती. परिणामी या वळणार चारचाकी सारख्या वाहनाचे अपघात घडत होते. सोबतच दुचाकीचे छोटे मोठे अपघात घडून नागरिकांना, चालकांना दुखापती होत त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान होत होते. याबाबत दि. २७ मे रोजी दै. दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित करून घाटंजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. या विभागाचे अभियंता शर्मा यांनी वृत्ताची दखल घेत मार्गावरील वळण प्रकरणी इगल कंपनीचे व्यवस्थापक राकेश रेड्डी यांच्याशी संपर्क करून या भागाची पाहणी करत या वळणार दर्शनी फलक लावून व परिसरात असलेली लहान काटेरी झाडे कापण्याचे देण्याचे आदेश दिले. इगल कंपनीच्या व्यवस्थापकाने या वळणार दर्शनी फलक लावून दिले. त्यामुळे छोट्या मोठ्या वाहन धारकांचा होणारा अपघात टाळण्यास मदत झाली. या वळणार घडणाऱ्या अपघातास आणि वाहनाच्या होणाऱ्या नुकसानीस आता आळा बसेल.
येथील कला व विज्ञान महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे योग दिन साजरा केला. या योग दिनानिमित्त महाविद्यालयातर्फे नागरिकांना, विद्यार्थी,विद्यार्थिनींना आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शारीरिक संचालक डॉ. उमेश राठी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निशा जोशी नायगावकर यांच्या वतीने सकाळी ८ वाजता योग दिवसानिमित्ताने योग साधना प्रात्यक्षिकाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सुनील आखरे यांनी आरोग्य, आत्मिक समृद्धीसाठी एक पाऊल यावर मार्गदर्शन करताना म्हणाले शनिवारी २१ जूनला अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. देशाची ही देणगी मानवाच्या समग्र जीवनशैलीसाठी जागतिक उत्सव ठरली आहे. आज समाजात अनेक जण अनेक शारीरिक आजाराने त्रस्त झालेले आहेत. त्या आजारावर रामबाण औषध म्हणजे योग साधना ही अत्यंत महत्त्वाची आहे. माणसाच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे योग साधना आपल्या विस्मरणात गेलेली आहे. परंतु, नागरिकांनी योग साधना आत्मसात जर केली तर जीवनातील अनेक समस्यावर प्रत्येक व्यक्तीला जीवनाचा आनंद घेता येईल व आपला आरोग्यावर होणारा खर्च टाळता येईल असे ते म्हणाले. याप्रसंगी योग प्रशिक्षक प्रा. स्वप्निल दिलीप ईखार म्हणाले योगाभ्यास म्हणजे फक्त आसने नाही किंवा शारीरिक व्यायाम नाही तर तो आपल्या आरोग्याचा, मन:शांतीचा आणि आत्मिक समृद्धीचा मार्ग आहे. या दशकपूर्तीच्या ऐतिहासिक प्रसंगी प्रत्येक घरात, प्रत्येक मनात योगाभ्यास रुजवायचा संकल्प करूया. योग्य संगमात सहभागी व्हा. कुटुंबाला, शेजाऱ्याला, मित्रमंडळींना सोबत घेण्याचा संकल्प करा असे ते म्हणाले. रासेयो कार्यक्रमधिकारी प्रा .डॉ. निशा जोशी नायगावकर म्हणाल्या योग ही एक चळवळ नाही, ही भारताच्या आत्म्याची अभिव्यक्ती आहे. मानवी जीवनातील छोटे-मोठे आजार व दुःख नाहीसे करायचे असेल, जीवनाचा प्रत्येक व्यक्तीला आनंद घ्यायचा असेल तर रोज प्रत्येकाने योगसाधना करणे ही काळाची गरज आहे असे त्या म्हणाल्या.आभार व्यक्त डॉ.किशोर ताकसांडे यांनी केले. या योग दिवसाच्या निमित्ताने विजय डहाके, सदस्य, महाविद्यालय विकास समिती, डॉ. स्मिता जाधव, प्रा. हर्षा कांबे, प्रा. डॉ.किशोर ताकसांडे, प्रा. डॉ. अजय अभ्यंकर, शिक्षकेतर कर्मचारी दिलीप पाटील,गजानन बेहरे , रमाबाई आत्राम, प्रदीप पवार, विलास भोंगाडे, राजेश लोहे, उपस्थित होते.
पावसाळ्याच्या अनुषंगाने नालेसफाई तसेच इतर सर्व कामांना गती देऊन, नियोजनबद्ध पद्धतीने काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी दिले. यासाठी सातत्याने स्थळपाहणी करून पावसाच्या पाण्याचा त्वरित निचरा होईल आणि रस्ते जलमय होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मनपाच्या वतीने पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने उपायुक्त डॉ. वासनकर यांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालया जवळील कॅम्प परिसरातील, दस्तूर नगर रोड गानूवाडी मनोर मांगल्य, मंगल कार्यालयानजीक व पार्वतीनगर परिसरातील नाल्यांची तसेच पाणी साठणाऱ्या संभाव्य ठिकाणांची पाहणी केली. तसेच पावसाळ्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन, नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी जाणार नाही, याची काळजी घेण्यात यावी. त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. नाल्याचे खोलीकरण करणे व कल्वर्ट साफ करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणी दौऱ्यादरम्यान सदर परिसरातील नाल्यांची तसेच संभाव्य पाणी साचणाऱ्या भागांची पाहणी उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी केली. तसेच पूरस्थितीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मनपाच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा या वेळी घेण्यात आला. शहरात पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे दरवर्षीप्रमाणे सुरू आहेत. तथापि, गाळ उपशाच्या पलीकडे जाऊन पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थिती रोखणे, हा नाले स्वच्छता करण्याचा प्राधान्याने उद्देश असला पाहिजे. ही बाब लक्षात घेऊन प्रचलित कार्यपद्धतीत सुधारणा करावी. सर्व नाल्यांमधील गाळ उपसा करण्यासाठी नालेनिहाय आणि दिवसनिहाय नियोजन करावे. संबंधित अधिकाऱ्यांनी फक्त कार्यालयात आढावा न घेता, प्रत्यक्ष कार्यस्थळी दररोज उपस्थित राहून गाळ उपसा कामांवर योग्य देखरेख करावी, अशा स्पष्ट सूचना उपायुक्त डॉ. वासनकर यांनी दिल्या. तसेच नाल्यांमध्ये नागरिकांना घनकचरा फेकण्यापासून अटकाव करण्यासाठी आवश्यक त्या-त्या ठिकाणी नाल्याच्या दोन्ही बाजूला जाळी लावण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही उपायुक्तांनी दिले आहेत. या पाहणी दौऱ्यावेळी सहायक आयुक्त भूषण पुसतकर, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख योगेश कोल्हे, स्वास्थ अधीक्षक श्रीकांत डवरे, स्वास्थ निरीक्षक, मनपा कर्मचारी उपस्थित होते. नाल्यांमध्ये घरगुती घनकचरा मोठ्या प्रमाणावर टाकला जात असल्याच्या तक्रारी येतात. त्यामुळे या नाल्याची सातत्याने स्वच्छता करावी. नाल्याच्या एका बाजूला दुमजली घरे, दुकाने व आस्थापना आहेत. तेथून कचरा नाल्यात फेकला जातो. ही बाब लक्षात घेता वारंवार नाला स्वच्छ करावा. नाल्याच्या बाजूला घरांमधून कचरा फेकल्या जाण्याची समस्या आहे, अशा ठिकाणी जाळी बसवावी, अशी सूचना उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी केली. नागरिक कचरा टाकतात तेथे तातडीने जाळ्या बसवा
विविध व्यवसायात घरगुती गॅस सिलिंडरचा होतोय वापर:काळा बाजारला लगाम कोण लावणार; नागरिकांचा प्रश्न
शहरासह तालुक्यात अनेक महत्त्वपूर्ण असलेल्या बाजारपेठेतील हॉटेल्समध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जात असून, याकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने या काळ्या बाजाराला लगाम कोण लावणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. महागाईमुळे पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे अनेकांनी आपली वाहने एलपीजीवर चालवणे पसंद केले आहे. त्यासाठी घरात वापरण्यात येणाऱ्या गॅसचा वापर केला जात आहे. तर हॉटेल्समध्ये या गॅसचा वापर होत असल्याने पडद्याआडून सिलिंडरचा छुपा काळा बाजार सुरू आहे. तर लग्न समारंभ व इतर कामासाठी लागणाऱ्या जनरेटरसाठी काहींनी घरगुती सिलिंडरचा वापर केल्याचे चित्र आहे. पुरवठा विभागाच्या डोळ्यात धूळ टाकून या सिलिंडरचा काळा बाजार गेल्या अनेक वर्षांपासून बिनबोभाटपणे सुरू आहे. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरचा वापर इतर कामासाठी करता येणार नाही, असा पुरवठा विभागाचा नियम असतानाही वाहनचालक, हॉटेल व्यावसायिक, किरकोळ व्यावसायिक हे या नियमाला गुंडाळून ठेवत असल्याचे चित्र आता उघड झाले आहे. तहसील प्रशासनातील पुरवठा विभागाकडून अजूनही कारवाई झाली नसल्याने गॅस सिलिंडरचा अवैध वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. घरगुती गॅस सिलिंडर अशा ठिकाणी ठेवण्यात येते की, ज्या ठिकाणी ग्राहकांची नजर जाणार नाही. त्याला कापडाने झाकून ठेवले जाते. घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कामांसाठी वापर केल्यास शिक्षा व दंडाची तरतूद आहे. हे माहीत असतानाही व्यावसायिक धोका स्वीकारायला तयार असतात. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना सिलिंडर मिळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. पुरवठा विभागाने अवैध गॅसचा वापर करणाऱ्याची शोध मोहीम राबवणे गरजेचे झाले आहे. व्यावसायिकांना घरगुती सिलिंडर वापरता येत नाही ^व्यावसायिकांना घरगुती सिलिंडरचा वापर करता येत नाही. त्यांनी व्यावसायिक सिलिंडर वापरणे अनिवार्य आहे. व्यावसायिक घरगुती सिलिंडरचा वापर करताना आढळल्यास संबंधितावर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार. -प्रमोद काळे, प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी, दर्यापूर.
संत्रा, पेरू, लिंबू पिकांचा विमा काढण्यासाठी १४ जून ही मुदत होती. मात्र, अनेक उत्पादकांची अखेरच्या दिवशी विमा काढण्यासाठी धावपळ झाली. यामध्ये काही जण बाकी राहिले होते. त्यामुळे शासनाने योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. आता ३० जूनपर्यंत या योजनेत सहभागी होता येणार आहे. हवामान आधारित फळपीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यामध्ये अधिसूचित पिकांसाठी फार कमी वेळ दिला होता. त्यामुळे कागदपत्रे जमवून योजनेत सहभागी होण्यासाठी उत्पादकांना कसरत करावी लागली. त्यातच काही शेतकरी बाकी राहिल्याने त्यांच्यामध्ये शासनाप्रती नाराजी होती. अखेर या योजनेची मुदत वाढवण्यात आली. या योजनेत तांत्रिक दोषामुळे पोर्टल १३ तारखेला सुरू झाले. अवघा ३० तासांचा अवधी शेतकऱ्यांना मिळाला होता. त्यामुळे शासनाने आता मुदतवाढ देऊन अवधी ३० जूनपर्यंत वाढवला आहे. दरम्यान या योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा फार्मर आयडी, आधारकार्ड, बँक खाते तपशील, सात-बारा, जिओ टॅगिंग केलेला फोटो असणे बंधनकारक आहे. या कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. हवामान आधारित फळपीक विमा योजनेत संत्रा, मोसंबी, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्षे आणि प्रायोगिक तत्त्वावर स्ट्रॉबेरी व पपई या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेत मृग बहारासाठी शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी पीक विमा योजनेचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या वर्षी शेतकऱ्यांना फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे. पीक मदत संत्रा १ लाख मोसंबी १ लाख पेरू ७० हजार चिकू ७० हजार डाळिंब १.६० लाख लिंबू ८० हजार सीताफळ ७० हजार द्राक्ष ३.८० लाख अधिकाधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येईल ^हवामानातील धोक्यांमुळे फळपिकांचे नुकसान होते. अशावेळी परतावा मिळण्यास ही योजना उपयुक्त आहे. शिवाय या योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता येईल. -राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती.
हिंगोलीमध्ये पोलिसांकडून 2 ठिकाणी छापेमारी:3 किलो गांजा जप्त, 3 जणांवर गुन्हा दाखल
हिंगोली शहरातील औंढा रोड व रिसाला बाजार भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 80 हजार रुपये किंमतीचा 3 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 24 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील औंढा रोड भागात दोघे जण गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, जमादार आझम प्यारेवाले, धनंजय क्षिरसागर, विकी कुंदनानी, आझम प्यारेवाले, साईनाथ कंठे, गजानन पोकळे, हरिभाऊ गुंजकर, किशोर सावंत, लिंबाजी वाहूळे, महिला पोलिस कर्मचारी अनिता राठोड यांची दोन पथके स्थापन केली. यापथकाने औंढा रोड भागात गांजा खरेदीच्या बहाण्याने एका कर्मचाऱ्यास पाठविले. त्या ठिकाणी दोघांनी गांजा दाखविताच तेथे दबा धरून बसलेल्या पथकाने दोघांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. यामध्ये शेख अलताफ व शेख अमजद यांच्याकडून 1.350 ग्राम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत सुमारे 34 हजार रुपये आहे. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी हा गांजा रिसालाबाजार येथील आनंद पाईकराव याच्याकडून घेतल्याचे सांगितले. त्यावरून या पथकाने रिसालाबाजार येथे जाऊन आनंद याच्या घराची झडती घेतली असता घरात 1.850 ग्राम वजनाचा सुमारे 46 हजार रुपये किंमतीचा गांजा सापडला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शेख अलताफ, शेख अमजद, आनंद पाईकराव यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. एन. बनसोडे, उपनिरीक्षक गंधकवाड, जमादार अशोक धामणे पुढील तपास करीत आङेत.
‘ऑरिक’मध्ये अनेक कंपन्यांनी जागा मागितल्या होत्या. त्यापैकी ६ कंपन्यांना भूखंड देण्यात आले आहेत. या कंपन्या १,२८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, त्यातून ३३०० लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. महिंद्रा अँसोलो कंपनी ३५० कोटी, जुन्ना सोलार ४०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. शेंद्रा-बिडकीन औद्योगिक क्षेत्रात आतापर्यंत ८८ हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. या कंपन्यांना नुकतेच देकारपत्र देण्यात आले आहेत. ८८ हजार कोटींची गुंतवणूक शेंद्रा-बिडकीनमध्ये आतापर्यंत ३१९ कंपन्यांना भूखंड दिलेआहेत. त्यामध्ये ८८ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. ८० कंपन्यांनी उत्पादन सुरू केले असून, १०५ कंपन्यांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे ४८ हजार प्रत्यक्ष, तर सुमारे एक लाख रोजगार अप्रत्यक्ष मिळणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. ऑरिकमध्ये या कंपन्यांना दिले भूखंड महिंद्रा अँसोलो १३ ३५० २००मेटलमन ०७ १९० ६००राखो इंडस्ट्री ०७ १०० ५००टोयोटा गोसाई १० १४० ५००जुन्ना सोलार ११ ४०० ११००एन एक्स लॉजिस्टिक १३ १०० ४००एकूण ६३ १२८० ३३००(जागा एकरांत, गुंतवणूक कोटी रुपयांत)
छत्रपती संभाजीनगर येथील २,७४० कोटी रुपयांच्या नवीन शहर पाणीपुरवठा याेजनेसाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेला स्वहिश्श्यापाेटी ८२२ कोटी २२ लाख रुपये लागणार आहेत. यासाठी हुडकोकडून कर्ज घेण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांसह गोवा राज्यात जाणाऱ्या, तीन शक्तिपीठे, दोन ज्योतिर्लिंगे आणि अनेक धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चाला मंगळवारी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. हा द्रुतगती मार्ग ८०२ किमी लांबीचा असेल. या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा १८ तासांचा प्रवास केवळ ८ तासांत पूर्ण होईल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शक्तिपीठ महामार्ग उभारणीच्या मान्यतेनंतर या महत्त्वाकांक्षी योजनेला विरोधही सुरू झाला आहे. प्रमुख शक्तिपीठे, संतभूमींसह तीर्थक्षेत्रे जोडली जाणार : या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे माहुर, तुळजापूर व कोल्हापूर तसेच अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जातील. तसेच मराठीचे आद्यकवी अंबेजोगाईस्थित मुकूंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच १२ ज्योर्तिलिंगापैकी २ औंढानागनाथ व परळी वैजनाथ, पंढरपूरसह कारंजा-लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्त गुरूंची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. २७४० कोटींची पाणी योजना ८२२ कोटी २२ लाख रु. कर्जावर ८.९०% व्याजदर नव्या पाणी योजनेच्या ८२२ कोटी रुपयांच्या कर्जाला राज्य शासनाची हमी मिळाल्याने आता महापालिकेला १० वर्षांत हे कर्ज फेडावे लागणार आहे.त्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा दरमहा हप्ता मनपाला भरावा लागणार आहे. वारंवार या ना त्या कारणाने लांबणीवर पडलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेतील हा महत्वाचा आणि अखेरचा अडथळाही अखेर दूर झाला आहे. योजनेच्या कामातील अंतिम टप्पा सुरू असताना निधीचा मार्ग मोकळा झाला आहे. हे विशेष. मालमत्ता, पाणीपट्टीसह इतर करांची वसुली वेळेवर होत नाही. पालिकेची आर्थिक स्थिती सध्या डगमगलेली असल्याने हा निधी शासनाने द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र शासनाने हुडको संस्थेकडून ८.९० टक्के व्याजदराने कर्ज मंजूर केले आहे. पालिकेने ८.०५ टक्के व्याजदराची मागणी केली होती, पण ती मान्य झाली नाही. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेंतर्गत २ हजार कोटींच्या कर्जास शासन हमी देण्यात आली असून हमी शुल्क माफ करण्यात आले आहे. या योजनेत छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा समावेश केला आहे. केंद्र सरकारकडून बिनव्याजी कर्ज मिळावे, अशी मागणी केली होती, मात्र ती नाकारण्यात आली. विरोध कुणाचा? महामार्गासाठी ज्या जमिनींचे अधिग्रहण होणार, त्या जमिनी सुपीक असल्याचा दावा करत शेतकरी विरोध करत आहेत. तसेच भूसंपादनाच्या बदल्यात शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई किंवा आर्थिक मदत दिली जाणार, हेही स्पष्ट नाही.
नाशिकच्या ओझरला एचएएल कारखाना यावा यासाठी भूमिपुत्र कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे योगदान मोठे आहे. आता तेथे विमानतळ सुरू झाले आहे. पण अद्यापही त्याचे नामकरण झाले नसून या विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नावे द्यावे, यासाठी मी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव मांडणार असल्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी दै. ‘दिव्य मराठी’च्या व्यासपीठावरुन केली. तसेच दिंडोरी येथे दादासाहेबांचे स्मारक उभारणीसाठीही निधी देणार असल्याचे सांगितले. ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयाेजित ‘दहा दिवस, दहा मंत्री’ या विशेष संवाद उपक्रमात त्यांनी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला, त्यावेळी ते बाेलत हाेते. विदेशी शिष्यवृत्तीसाठी समाजकल्याण विभागाद्वारे स्वतंत्र योजना न करता आता आदिवासी विकास विभाग, ओबीसी विभाग यांच्या समन्वयाने एकसमान धोरण आखले जाणार आहे. त्यासाठीची कमाल उत्पन्न मर्यादा आठ लाखांपेक्षा अधिक केली जाणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळातून बेरोजगारांना कमी भांडवलाची नव्हे तर किमान पाच लाखांपासून पुढे भांडवल देण्याची योजना आम्ही आणतोय. त्यासाठी याेग्य व निकषपूर्ती करणाऱ्या लाभार्थ्यांचीच निवड केली जाईल. व्यवसायवृद्धीसाठी टप्प्याटप्प्याने मदत देण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसाठी १२० वसतिगृह उभारणार राज्यातील गरीब विद्यार्थ्यांना शहरात शिक्षणासाठी निवासाची साेय व्हावी यासाठी राज्यात १२०० काेटी रुपये खर्चून १२० वसतिगृहे उभारली जातील. त्यात २५ हजार विद्यार्थ्यांना निवासाची साेय उपलब्ध हाेईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी दिली. ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात १४व्या वर्धापन दिनानिमित्त आयाेजित ‘दहा दिवस, दहा मंत्री’ या विशेष संवाद उपक्रमात त्यांनी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी साधलेला हा संवाद.... कुणाल गायकवाड, अध्यक्ष, नाशिक दलित शिक्षण प्रसारक मंडळप्रश्न : प्रवेश शुल्कापेक्षा शिष्यवृत्ती कमी, अनुदानित वसतिगृहांची संख्याही अपुरी, ‘स्वाधार’ची रक्कम वेळेत मिळू शकेल का?संजय शिरसाठ यांचे उत्तर : भाड्याने घेतलेल्या वसतिगृहांच्या इमारती ३०-३५ वर्षांपूर्वीच्या असल्याने त्यांची वाईट अवस्था आहे. त्यामुळे संख्या वाढविता येत नसून ज्या सुस्थितीत आहेत, तेथे सुविधा वाढवून देऊ. ‘स्वाधार’अंतर्गत अवघे ६००० रुपये दिले जातात त्यात भागत नाही. त्यामुळे वसतिगृह उभारणीवर लक्ष केंद्रित केले आहे. संजय काळे, सरचिटणीस, सुखदेव एज्यु. संस्थाप्रश्न : निवासी आश्रमशाळांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाकडून काेणती धाेरणे राबविली जाणार आहेत?उत्तर : राज्यात १६५ आश्रमशाळा आहेत. पण अस्तित्वात ५६ आहेत. त्यामुळे त्यांच्या तपासणीचे काम सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर धाेरण ठरेल. प्रश्न जटिल असले तरीही या शाळा चालविणाऱ्यांची फसवणूक समोर येत आहे. केवळ अनुदान घेण्यासाठी काही शाळा सुरू आहेत. काम मात्र शून्य आहे. त्यामुळे त्यावरही नियंत्रण आणावे लागेल. नितीन भुजबळ, अध्यक्ष, डाॅ. आंबेडकर ज्ञान विकास केंद्रप्रश्न : प्रवेश शुल्क परत देणे, शिष्यवृत्ती वेळेत देण्यासह काैशल्य विकासाच्या पायाभूत सुविधांना निधी मिळेल का?उत्तर : प्रस्ताव द्या. चांगले काम करणाऱ्यांना आम्ही भरघोस निधी दिला आहे. छत्रपती संभाजीनगरचे मिलिंद महाविद्यालय, डॉ. आंबेडकर महाविद्यालय परिसरासाठी ६७५ कोटी निधी दिला. संत तुकाराम महाराज वसतिगृहासाठी १७५ कोटी रुपये दिले. चांगल्या पायाभूत सुविधांसाठी पूर्ण सहकार्य केले जाईल. ज्ञानेश्वर काळे, सामाजिक कार्यकर्तेप्रश्न : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जमिनींचा दर बाजारभावानुसार देता येईल?उत्तर : अण्णा भाऊ साठे यांचे त्यांच्या गावात राहत्या घरातच स्मारक उभारायचे आहे. त्यासाठी शेजारची जमीन घेण्यासाठी प्रयत्न केले. ती मिळाली नाही. अखेर तेथीलच एका तळ्यानजीक शासनाच्या जमिनीमध्ये २५ कोटींचे हे स्मारक हाेईल. दोन-दोन एकरच्या जमिनी लोक शासनाला कशा देतील? त्यामुळे थोडी अडचण होत आहे. अनिल वैद्य, सेवानिवृत्त न्यायधीशप्रश्न : धर्मांतरितांना तसे प्रमाणपत्र द्यावे. विवाहित महिलांचा जातप्रमाणपत्र त्वरित देण्याची व्यवस्था कशी हाेईल?उत्तर : धर्मांतरित प्रमाणपत्र देण्याबाबत माहिती घेऊन योग्य निर्णय घेऊ. तसेच जातप्रमाणपत्रे आता वेळेत मिळतील. पूर्वी आमच्याकडे मनुष्यबळ कमी होते. आता २९ अधिकारी नियुक्त केले. जातीचा दाखला पित्याच्या कागदपत्रांच्या आधारे दिला जाताे. विभक्त व एकल मातेच्या मुलांचा जातीचा दाखला आईच्या दाखल्यावरसुद्धा दिला जावा, या मागणीवर विचार केला जाईल. राजू देसले, राज्य सचिव, आयटकप्रश्न : समाजकल्याण विभागात १७ वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत ५६ कर्मचारी सेवेत कायम कधी करणार?उत्तर : सर्वच विभागांमध्ये मनुष्यबळ ४० टक्के कमी आहे. ६० टक्क्यांवरच काम सुरू आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यायचे असेल तर धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल. तो केवळ सामाजिक न्याय नव्हे तर इतर विभागांतील कर्मचाऱ्यांसाठीही असावा, सर्वांसाठीच एकच न्याय असावा. त्यामुळे आश्वासन देता येणार नाही. बाळासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्तेप्रश्न : फुले महामंडळासाठी निधी व समाजकल्याणच्या पुरस्कारार्थींना सुविधा, कधी मिळणार?उत्तर : लवकरच निर्णय घेऊ. पुरस्कारार्थींना योग्य सोयी-सुविधा दिल्या जातील. तसेच बेरोजगारांसाठी कर्ज योजनेपेक्षा आैद्योगिक मदत योजना आणतोय. सात कोटींपर्यंत भांडवल देत असून ही रक्कम वाढविण्यासाठी आम्ही विचार करत आहोत. वेळेवर परतफेड करणाऱ्यांनाच त्याचा लाभ मिळेल. जयराम शिंगाडे, मुख्याध्यापक, विल्होळी आश्रमशाळाप्रश्न : विदेशी शिक्षण शिष्यवृत्ती संख्या १५० करणे व उत्पन्न मर्यादा वाढविणे शक्य आहे का?उत्तर : विदेशी शिष्यवृत्तीसाठी समाजकल्याण विभागाद्वारे स्वतंत्र योजना न करता आता आदिवासी विकास विभाग, ओबीसी विभाग यांच्या समन्वयाने एकसमान धोरण आखले जाणार आहे. त्यासाठीची कमाल उत्पन्न मर्यादा आठ लाखांपेक्षा अधिक केली जाणार आहे.चंद्रकांत गायकवाड, सामाजिक कार्यकर्तेप्रश्न : सामाजिक न्याय विभागाच्या जुन्या रहिवासी सोसायटींच्या पुनर्विकासासाठी कुठले धोरण ठरविणार का?उत्तर : याबाबत काही पुनर्विकासाचे प्रस्ताव असतील तर ते अधिकाऱ्यांमार्फत पाठवा. त्यावर अपेक्षित निर्णय घेता येईल. नक्कीच त्यावर आपण मार्ग काढू शकताे. नेमक्या अटी-शर्ती काेणत्या व सध्या काय अडचणी येत आहे, नव्याने काय करता येईल हेदेखील पाहता येईल. परंतु त्यासाठी आधी प्रस्ताव येणे आवश्यक आहे. जयवंत खडताळे, माजी परीक्षा नियंत्रक, मुक्त विद्यापीठप्रश्न : मानद विद्यापीठांमध्ये (डीम युनिव्हर्सिटी) शिष्यवृत्ती योजना व अभ्यासक्रमांसाठी आरक्षण लागू करता येईल का?उत्तर : चांगली सूचना आहे. याबाबत विचारकरून योग्य तो निर्णय घेऊ. जर या विद्यापीठांना शासनाकडून अर्थसहाय्य आणि इतर सहाय्य केले जाते तर मग तेथे गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नेमका कशा पद्धतीने आरक्षण व इतर शैक्षणिक सुविधांचा लाभ देता येईल याचाही विचार केला जाईल. रमेश जाधव, प्रदेशाध्यक्ष खाटीक समाजप्रश्न : खाटीक समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळाले पण ते केव्हा सुरू होणार, त्याद्वारे याेजना कधी राबविणार ?उत्तर : आम्ही महामंडळाची निर्मिती केली तसेच आगामी काळात लवकरच ते कार्यरत होईल. या महामंडळाद्वारे समाजातील गरीब होतकरू युवकांना योग्यरित्या न्याय कसा दिला जाईल यासाठी उपाययोजना त्यात असतील. विशेष म्हणजे इतर महामंडळाच्या धर्तीवरच या महामंडळाची नियमावलीही असेल. सर्व तुरतुदींची पूर्तता झाली की लाभार्थींना त्या याेजनांचे लाभ मिळू शकतील. दीपक डोके, सामाजिक कार्यकर्तेप्रश्न : राज्यात महापालिकांच्या अनेक शाळा बंद पडत असून त्याच्या सक्षमीकरणासाठी काय उपाययाेजना करणार?उत्तर : याबाबत शालेय शिक्षण अन् समाजकल्याण दोन्ही विभागांच्या समन्वयाने जे करणे शक्य असेल ते नक्की केले जाईल. महापालिकेच्या शाळांमध्ये खऱ्या अर्थाने गरीब आणि तळागाळातील विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे या शाळा होणे सुरू राहणे व योग्य सोयी-सुविधा तिथे विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे. वसतिगृहांच्या उपक्रमाचे दृष्य परिणाम सहा महिन्यांत समाेर सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे पुढील ५ वर्षांत शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व धोरणांची माहिती शिरसाठ यांनी यावेळी दिली. त्यात प्रामुख्याने सामाजिक न्याय विभागाकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी काम करत असल्याचे सांगितले. प्रथमत: ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शहरात उच्च शिक्षण घेता यावे यासाठी त्यांच्या निवासासाठी वसतिगृह बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी १२०० काेटी रुपयांचा निधीही मंजूर केला असून यात प्रत्येकी १० कोटींप्रमाणे १२० वसतिगृह उभी राहतील. ही सर्व थ्री स्टार सुविधांनी सुसज्ज असतील. २५००० नवीन विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा वाढविण्याचे लक्ष्य असेल. येत्या सहा महिन्यांत त्याचे दृष्य स्वरूपात परिणाम दिसतील. सर्वांना समान न्याय हा सामाजिक न्याय विभागाचा मुख्य उद्देश असून त्यानुसार राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहितीदेखील शिरसाठ यांनी यावेळी दिली. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकासाठी देणार निधी नाशिकच्या ओझरला एचएएल कारखाना यावा यासाठी भूमिपुत्र कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे योगदान मोठे आहे. आता तेथे विमानतळ सुरू झाले आहे. पण अद्यापही त्याचे नामकरण झाले नसून या विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्यावे यासाठी मी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव मांडणार असल्याची मोठी घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी दै. ‘दिव्य मराठी’च्या व्यासपीठावरून केली. कर्मवीरांचे नाव विमानतळाला देण्यासाठी नाशिककरांकडून मागणी होत असून, केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला असता राज्याच्या कॅबिनेटचा ठराव हवा, असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार नाशिककरांनी सामाजिक न्यायमंत्री शिरसाठ यांच्याकडे मागणी केली असता त्यांनीही तत्काळ होकार देत मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ठराव मांडला जाणार असल्याचे सांगितले. तसेच दिंडोरी येथे दादासाहेबांचे स्मारक उभारणीसाठीही निधी देणार असल्याचे सांगितले. बदल अधिकाऱ्यांपासून सुरू; कामासाठी सर्वांनाच माेकळीक बदलाची सुरुवात अधिकाऱ्यांपासून केली आहे. विभागासाठी चांगले काम काेणते व कसे करायचे यासाठी त्यांना पूर्णपणे मोकळीक दिली आहे. राज्यभरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रथमच यशदामध्ये कार्यशाळा घेतली. या उपक्रमात त्यांच्याकडून अनेक चांगल्या कल्पनाही सुचविण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी कशी करायची यावर सध्या काम सुरू आहे. दुसरीकडे सर्वसामान्यांसाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करत आहोत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा पुरस्कार प्रदान साेहळा नुकताच पार पडला. या पुरस्कारार्थींची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये केली. त्यांना मुंबईचे पर्यटनही घडविले. अशा स्वरूपाच्या उपक्रमांद्वारे खात्याकडे पाहण्याचा प्रशासकीय व सामान्य नागरिकांचा असे दाेन्हीही दृष्टिकोन बदलणार असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले. रोजगारनिर्मितीसाठी आर्थिक मदत वाढवणार महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळातून बेरोजगारांना कमी भांडवलाची नव्हे तर किमान पाच लाखांपासून पुढे ७ काेटींपर्यंत भांडवल देण्याची योजना आम्ही आणतोय. त्यासाठी याेग्य व निकषपूर्ती करणाऱ्या लाभार्थींचीच निवड केली जाईल. त्याअंतर्गत पाच जण एकत्र येऊन एखादा व्यवसाय सुरू करू शकतील व त्यांच्या वाहनावर, दुकानावर आमच्या विभागाचे अर्थसहाय्य प्रदानकर्ता म्हणून नावही असेल. त्यातूनच त्यांचा व्यवसायदेखील वाढेल हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यांना रोजचे भांडवलही दिले जाईल. कोटींच्या स्वरूपात भांडवली मदत टप्प्याटप्प्याने केली जाईल, म्हणजे नियमित व्यवसाय सुरू असेल तरच मदत मिळेल. उद्याेगवृद्धी प्रदर्शनांमध्येही २० ते २५ प्रकारचे स्टॉल्स असतील.
उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणातील एन्काऊंटरमध्ये मृत झालेल्या अमोल खोतकरची बहीण रोहिणी खोतकर (३५, रा. आर्च आंगण, पडेगाव) हिला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (२३ जून) रात्री उशिरा अटक केली. कोर्टात हजर केल्यावर रोहिणीच्या वकिलाने तिच्या वडिलांच्या वृद्धपकाळाचे कारण पुढे करत न्यायालयीन कोठडीची मागणी केली. तसेच दरोडा प्रकरणामुळे त्रास होत असल्याने विष घेण्याची मागणीही तिने न्यायाधीशांसमोर केली. दरम्यान, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तिला २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. महिलेला सूर्यास्तानंतर अटक करता येत नसल्याने रात्री उशिरा न्यायालयाची परवानगी घेऊन रोहिणीला अटक करण्यात आली आहे. घर झडतीत खोतकरच्या घराच्या तुळशी वृंदवनात सोन्याची चेन व ब्रेसलेट सापडले आहे. त्याचे वजन २२० ग्राम ४१० मिली आहे. त्याचठिकाणी गावठी कट्ट्याची ७ काडतुसेही सापडली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. लड्डा दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकरच्या एन्काऊंटरवेळी त्याच्यासोबत असलेली मैत्रीण हाफिजाने अमोलने सोने रोहिणीकडे दिले असल्याचे जबाबात सांगितले होते. तसेच अमोलचा मित्र सुरेश गंगणे, रोहिणीच्या मैत्रिणीनेही सोने तिच्याकडेच असल्याचे सांगितले. त्याच दरम्यान तिने नवीन सीम कार्ड खरेदी करून तीन जणांशी संपर्क केल्याचे समोर आल्याने तिला चौकशीसाठी बोलवले. तिचा फोन बंद आढळून आला. यात ती मित्रासह गोव्याला गेल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी तिला पुन्हा चौकशीसाठी बोलावले. तिच्या जबाबात विसंगती आढळत असल्याने तिला अटक केली. त्यानंतर झालेल्या घरझडतीमध्ये सोन्याचे दागिने मिळून आले आहे. गावठी कट्ट्याच्या सात काडतुसेपैकी १ राऊंड मिसफायर झालेले तर उर्वरित जीवंत आहेत. दरम्यान, राजेश साठे या आरोपीकडून गुन्हे शाखेने ४ तोळे सोने जप्त केले. काेर्टात रोहिणीने मांडली बाजू दरोड्यात आतापर्यंत जप्त मुद्देमाल ७९४.४१ ग्राम सोने३२ किलो चांदी८ लाख रोख३ चारचाकीएक दुचाकी
ड्रग्ज तयार करण्यासाठी रासायनिक पावडरची तस्करी:संभाजीनगरात सव्वा कोटीचे दीड किलाे एमडी ड्रग्ज जप्त
वाळूजच्या औद्योगिक नगरीमधून नशेखोरीसाठी वापरले जाणारे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. एनडीपीएस पथक व एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये १ किलो ४७३ ग्रॅम वजनाचे ड्रग्ज जप्त केले. त्याचे बाजारमूल्य १ कोटी २३ लाख ६५ हजार आहे. विशेष म्हणजे, एका कंपनीतून उत्पादनादरम्यान पडलेली पावडर वापरून ड्रग्ज तयार करण्यात येत होते. या प्रकरणात भंगाराच्या गोदामाचा मालक बबन खान (रा. साजापूर), आयशर चालक शफीकुर रहमान तफज्जुल हुसेन (४५), राज रामतिरथ अजुरे (३८, दोघे रा. उत्तर प्रदेश, ह.मु. साजापूर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती एनडीपीएस पथकाच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली. वाळूजमधील मायलन कंपनीतून बाहेर पडणाऱ्या दोन ट्रकमधून एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक पावडरची तस्करी केली जात होती. शनिवारी (२१ जून) पथकाने छापा टाकत ट्रक (एमएच ०४ बीयू ५१६० व एमएच ०४ ईवाय ९९७७) यातून निळ्या रंगाचे बॅरल व त्यात पावडरने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या. त्यांचे वजन १ किलो ५१२ ग्रॅम होते,असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी त्यानंतर न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. पोलिस आणि वैज्ञानिक प्रयोगशाळेचे सहायक रासायनिक विश्लेषक विनोदकुमार शहागडकर, प्रयोगशाळेचे परिचर प्रशांत कवडे यांनी आयशरमधील पथकाने बबन खानच्या साजापूूर येथील गोदामावर छापा मारला. तेथेही कंपनीमधील स्क्रॅपचा मोठा साठा होता. त्यात ९६१ ग्रॅम पावडर आढळली. या पावडरची प्राथमिक तपासणी केल्यावर एमडी ड्रग्ज असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यरात्री ५ किमीची टेहळणी करून पहाटे ट्रक जायचे कंपनीच्या आतून कच्चा माल बाहेर आणण्यासाठी मध्यरात्रीपासून तयारी सुरू असते. खानचा मुलगा आजूबाजूच्या तब्बल ५ किमी परिसराची संपूर्ण टेहाळणी करतो. त्याच्यासोबत काही कामगारदेखील असतात. त्याच वेळी काही मंडळी दुचाकीवरून टप्प्याटप्प्यावर थांबलेली असतात. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास ट्रक कंपनीतून बाहेर काढले जातात. या दोन्ही ट्रकचे रांजणगाव येथील दत्तनगर फाट्यावरील वजन काट्यावर वजन केले जाते. वजन झाल्यावर पुन्हा कंपनीसमोर येऊन दोन्ही ट्रक साजापूर शिवारातील भंगाराच्या गोदामाकडे रवाना होतात. गोदामात अगोदरच मुंबई येथून आलेली एक कार उभी असते. अवघ्या काही मिनिटांत ही कार काही ग्रॅम ड्रग्ज घेऊन मुंबईकडे रवाना होते. खान याच्याकडे केवळ भंगार उचलण्याची जबाबदारी आहे. मात्र, तो त्यातील रासायनिक पावडरदेखील उचलून घेतो. मुळात औषध निर्माण कंपनीने यासाठी अधिकृत एजन्सी नेमणे बंधनकारक असते. मात्र, हे नियम धाब्यावर बसवल्याने खान याने त्यातूनच ड्रग्जचे रॅकेट उभे केले होते. त्यातून त्याने कोट्यवधींची माया जमवली आहे. या भंगार गोदाम चालकांना पंढरपूर भागातील काही राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याचीही वाळूज परिसरात चर्चा आहे.
राज्यभरात गाजत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्यात विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी एका शिक्षणसंस्था चालकाला अटक केल्याने शिक्षणसंस्था चालकांचे धाबे दणाणले आहे. नागपुरातील मानेवाडा येथील जयहिंद प्राथमिक शाळा, गुलशन नगर संस्थेचे संस्थापक ओंकार भाऊराव आंजीकर यांना अटक केल्याचे विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख आणि पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले. राज्य विधिमंडळाचे पुढील पावसाळी अधिवेशन ३० जून २०२५ पासून सुरू होईल. त्यात हा घोटाळा गाजण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी विठ्ठल-रुख्मिणी प्राथमिक बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व संचालक दिलीप धोटे यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. धोटे यांच्यानंतर आणखी सुमारे ३० शिक्षणसंस्थाचालक एसआयटीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मालिकेत आंजीकर यांना अटक करण्यात आली आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार नीलेश वाघमारेसह माजी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे हे अटकेपासून अजूनही दूर आहे. “स्मार्ट’ आणि “हायटेक’ पोलिस त्यांच्यापर्यंत न पोहाेचण्याला अदृष्य हात तर कारणीभूत नाही ना, अशी चर्चा येथे शिक्षण आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यात सध्या गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याची प्रशासकीय चौकशी राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग संचालक महेश पालकर करीत आहे. त्यांचा अहवाल अंतिम टप्प्यात असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी दिली. संस्थाचालक आणि मुख्याध्यापकही दोषी आहेत. मात्र शिक्षण आयुक्तालयाचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे डीसीपी मदने यांनी सांगितले. कोणत्या मुख्याध्यापकाच्या काळात पहिला शालार्थ आयडी तयार झाला, कोणाच्या काळात त्या आधारे पहिला पगार निघाला याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाल्यानंतर कारवाई करू, असे मदने म्हणाले. ‘कानून के लंबे हाथ’ कुणामुळे अडले? : राजकीय वर्तुळात चर्चा शिक्षक भरती घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी, वेतन अधीक्षक निलेश वाघमारे दीड महिन्यांपासून फरार आहे. त्याची बँक खाती गोठवण्यात आली आहे. त्याचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तत्पूर्वीच त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली असता उच्च न्यायालयानेही दिलासा देण्यास नकार दिला आहे. शिक्षण विभागाने त्याला निलंबित केले आहे. तर सतीश मेंढे यांनाही जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. असे असताना “कानुन के लंबे हाथ’ नेमके कुठे अडले, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
एकीकडे इराण जुना मित्र. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी. दुसरीकडे इस्रायलकडून कायम भारताला खंबीर पाठिंबा, तांत्रिक साहाय्य. यामुळे भारताने इराण-इस्रायल युद्धात कोणतीही भूमिका घेतली नाही, असे म्हटले जाते. मात्र, यामुळे शरद पवार प्रचंड नाराज झाले आहेत. बघ्याची भूमिका घेतल्याने भारताला आता दूरगामी परिणाम भोगावे लागणार, असा अतिशय गंभीर इशारा त्यांनी दिला आहे. मुंबई येथे काही पत्रकारांना अनौपचारिक चर्चेसाठी बोलावून त्यांनी मनातल्या गोष्टी औपचारिकपणे व्यक्त केल्या. ते म्हणाले की, इराण-इस्रायल युद्धात भारताने बघ्याची भूमिका घेणे अचंबित करणारे आहे. अरब देशात मोठ्या प्रमाणावर भारतीय काम करतात. शिवाय तेलाचाही संबंध आहे. त्यामुळे या दोन देशांच्या युद्धामध्ये भूमिका न घेणे योग्य नाही, माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचे पॅनल आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागल्याने ते म्हणाले की, सरकारमध्ये मोठ्या पदावरील व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुक लढवू नये. मी माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांची निवडणूक लढलो नाही. तिसऱ्या भाषेचे ओझे नको, पण हिंदी शिकली पाहिजे सध्या पाचवीपासून मुले हिंदी शिकतात. त्यामुळे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषेची सक्ती योग्य नाही. मात्र हिंदी भाषा शिकणेही तितकेच महत्वाचे आहे. देशातील सुमारे ५५ टक्के नागरिक हिंदी भाषा बोलतात, त्यामुळे हिंदीचा विरोध करण्याची गरजही नाही, असे दोन्ही बाजूंची सारवासारव करणारे वक्तव्य शरद पवारांनी केले.
राज्यात प्रवासी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणा-या राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. आर्थिक संकटात सापडलेले हे महामंडळ गत ४५ वर्षांत फक्त ८ वेळाच नफ्यात होते. ‘गाव तेथे एसटी’, ‘रस्ता तेथे एसटी’ या घोषवाक्यांसह मिरवणारे हे महामंडळ सध्या १० हजार कोटींच्या वर संचित तोटा सहन करत आहे. महामंडळाची प्रकृती सुधारण्यासाठी, महामंडळाची आर्थिक सद्यस्थिती […] The post लालपरी कायम तोट्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हेडिंग्ले : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्ध ५ विकेट्सने पराभव झाला आहे. यामुळे, संघ ५ सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने मागे आहे. मालिकेतील दुसरा सामना २ जुलैपासून बर्मिंगहॅम येथे खेळला जाईल. मंगळवारी लीड्समधील हेडिंग्ले क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला ३५० धावा करायच्या होत्या, ज्या संघाने ५ विकेट गमावून साध्य केल्या. बेन डकेटने […] The post भारताने पहिली कसोटी गमावली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पोलिस पित्याने बालिकेचा खून करत केली आत्महत्या
नाशिक : शहरातील पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या उपनगर पोलिस ठाण्यात नेमणूकीला असलेले पोलिस अंमलदार स्वप्नील गायकवाड (३४, रा. मॉडेल कॉलनी, नाशिकरोड) यांनी स्वत:च्या ६ वर्षीय बालिकेचा गळा आवळून खुन केला. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. २४ जून रोजी संध्याकाळी घडली. नाशिक शहरातील पुणे महामार्गावर उपनगर पोलिस ठाणे आहे. या पोलिस ठाण्यात […] The post पोलिस पित्याने बालिकेचा खून करत केली आत्महत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
35 दिवसांच्या बाळावर दुर्मिळ रोबोटिक शस्त्रक्रिया करत रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांच्या टीमने या नवजात शिशूला जीवनदान दिले. ही शस्त्रक्रिया वैद्यकीय क्षेत्रात दुर्मिळ मानली जाते. मूत्रपिंडाच्या आजाराने त्रासलेल्या बाळावर रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा प्रकारची शस्त्रक्रिया करुन घेणारे ३५ दिवसांचे बाळ हे जगातील सर्वात लहान रुग्णांपैकी एक ठरले आहे. मंगळुरु येथील दाम्पत्याने आपल्या नवजात शिशूवरील उपचारासाठी पुण्यातील रुबी क्लिनिल रुग्णालय गाठले होते. डॉक्टरांनी बाळाची शारिरीक तपासणी केली असता त्याच्या दोन्ही किडनीमध्ये पेल्विक-युरेटेरिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन नावाचा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. या आजारात मूत्रपिंडामधून मूत्राशयाकडे लघवीचा प्रवाह अडकल्याने रुग्णाला प्रचंड वेदना होतात, सूज येते, किडनीला कायमस्वरुपी नुकसान होण्याचा धोका असतो. या आजारातून नवजात शिशूला बरे करण्यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. रुबी हॉल क्लिनिकचे रोबोटिक सर्जरी विभागाचे संचालक आणि मुख्य रोबोटिक युरो-ऑन्को सर्जन डॉ. हिमेश गांधी यांनी या शस्त्रक्रियेचे नेतृत्व केले. दा विंची रोबोटिक प्रणालीच्या साहाय्याने ही शस्त्रक्रिया पार पडली. अतिशय गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया सुरक्षितेतेने आणि अचूकरित्या करण्यासाठी दा विंची रोबोटिक प्रणालीचा वापर केला जातो. या पद्धतीचा अवलंब करत पेल्विक-युरेटेरिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन आजाराने त्रासलेल्या ३५ दिवसांच्या नवजात शिशूची या आजारातून डॉक्टरांनी सुटका केली. नवजात शिशूंवर शस्त्रक्रिया करणे हे आव्हान असते. बाळाचे लहान अवयव, नाजूक ऊती यांमुळे शस्त्रक्रियेदरम्यान बाळाच्या जीवाला धोका संभवतो. या शस्त्रक्रियांमध्ये चुकीला वाव नसतो असे डॉ. गांधी म्हणाले. रोबोटिक शस्त्रक्रियांमध्ये हा धोका टाळता येतो, असे सांगत त्यांनी रोबोटिक शस्रक्रियेबद्दल माहिती दिली. या शस्त्रक्रियेत आम्ही मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी वापरल्या जाणा-या सूक्ष्म उपकरणांचा वापर केला. ही रोबोटच्या हाताच्या मदतीने शस्त्रक्रिया केली गेली. बाळाच्या शरीरातील अनावश्यक भाग काढण्यासाठी रोबोटचे हात कामी आले. रोबोटच्या हाताचा वापर करुनच मूत्रपिंड पुन्हा मूत्राशयाला जोडले. आता बाळाला लघवीला त्रास होत नाही. बाळाच्या तब्येतीतही सुधारणा दिसून येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. रोबोटच्या मदतीने शस्त्रक्रिया केल्याचे अनेक फायदे आहेत. गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील शस्त्रक्रियांमध्ये रोबोटचा वापर केल्याने सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचा मुद्दाही डॉ. गांधी यांनी मांडला.यापद्धतीत रोबोटिक हातांमुळे शरीरात केवळ लहान छेद देता येतो. ही शस्त्रक्रिया अचूकपणे करता येते. अनावश्यक भागाजवळील ऊतींना फारसा त्रास न होता शस्त्रक्रिया पूर्ण केली जाते. शरीरावर कमी छेद दिले गेल्याने रुग्ण लवकर बरा होतो.दा विंची प्रणालीमुळे सर्जनला शस्त्रक्रिया होत असलेल्या संबंधित भागातील अंतर्गत हालचाली ३डी दृष्याच्या माध्यमातून पाहता येतात. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेले नियंत्रण साधण्यासाठी ही प्रणाली फायदेशीर ठरते.
नाशिकमधील खळबळजनक घटना:पोलिस शिपायाने 6 वर्षांच्या मुलीला गळफास लावला, स्वतःही केली आत्महत्या
नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून, पोलिस शिपायाने स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलीला गळफास लावून ठार मारल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना नाशिक रोड परिसरात घडली. पोलिस शिपायाचं नाव स्वप्नील गायकवाड असून, त्याच्या मुलीचं नाव भैरवी आहे. स्वप्नील गायकवाड नाशिक शहर पोलिस दलात कार्यरत होता. काही काळापूर्वी त्याचा पत्नीशी घटस्फोट झाला होता आणि त्यानंतर तो मानसिक तणावात होता. याच तणावातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी घटस्फोटीत पत्नीची सविस्तर माहिती घेण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे. तरुणाच्या पत्नीचे अश्लील कृत्य करतानाचे व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे हरियाणातील रोहतक येथे राहणाऱ्या एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या तरुणाच्या पत्नीचे संबंध संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासोबत विवाहबाह्य स्वरूपाचे होते. त्यांनी एकमेकांसोबत अश्लील कृत्य करतानाचे आणि डान्सचे व्हिडिओ तयार केले होते. हे व्हिडिओ संबंधित महिलेने तिच्या पतीला पाठवले. या प्रकारानंतर मानसिक तणावाखाली आलेल्या पतीने तीन दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तरुणाने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, ज्यात त्याने स्पष्ट आरोप केला की त्याची पत्नी दिव्या आणि तिचा प्रियकर, जो छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे, हे दोघे मिळून त्याला सातत्याने मानसिक छळ करत होते. दिव्या त्याच्यावर वडिलांना मारण्यासाठी आणि वडिलोपार्जित जमीन विकण्यासाठी दबाव टाकत होती. तसेच, पोलिस बॉयफ्रेंडला बढतीसाठी पैशांची गरज होती आणि त्यासाठी पत्नी दिव्या पतीला ब्लॅकमेल करत होती, असेही त्या व्हिडिओमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मृत तरुणाने आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये केली होती. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित संशयित पोलीस कर्मचारी दोन दिवसांपूर्वी पंधरा दिवसांची रजा टाकून बेपत्ता झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
येल्लोरीवाडी येथे महिलांची शेती शाळा
औसा : प्रतिनिधी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये येलोरी, येल्लोरेवाडी, गुळखेडा व रिंगणी या गावांचा समावेश झाला आहे. सदर प्रकल्पामध्ये प्रत्येक सहाय्यक कृषी अधिकारी यांना एका शेती शाळेचे नियोजन देण्यात आलेले आहे. औसा तालुक्यातील १४ शेती शाळेपैकी ७ शेतीशाळा या १०० टक्के महिला शेतक-यांच्या तर उर्वरित शेतीशाळा या सर्वसाधारण शेती शाळा आहेत. चार गावांचा समावेश […] The post येल्लोरीवाडी येथे महिलांची शेती शाळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
निर्मिती मूल्याच्या तब्बल ४५० टक्क्यांनी दारू महागली
मुंबई : भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर(आयएमएफएल) दारु निर्मितीच्या तब्बल ४५० टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. दरम्यान मंगळवार दि. २४ जून रोजी राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाने दारूचे नवे दर कसे असणार याचे परिपत्रक जारी केले असून नव्या दरांची अंमलबजावणी बुधवार दि. २५जूनपासून करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर(आयएमएफएल) स्पिरीट्स रुपये […] The post निर्मिती मूल्याच्या तब्बल ४५० टक्क्यांनी दारू महागली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘आरटीई’ प्रवेश; पाल्यांच्या पालकांना मोठा धक्का!
लातूर : एजाज शेख शिक्षणाचा हक्क कायदा (राईट टू एज्युकेशन-आरटीई) अंतर्गत मोफत शिक्षण घेणा-या हजारो विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी मोठा चिंतेचा विषय बनला आहे. ‘आरटीई’चे शुल्क शासन देत नसल्यामुळे आता शिक्षण संस्थाचालकांनी सदर शुल्क पालकांकडूनच वसुल करण्याचे फर्मान काढले आहे. तशा नोटीसाही पालकांना बजावल्याने ‘आरटीई’त प्रवेश घेतलेल्या पाल्यांच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. आता यातून […] The post ‘आरटीई’ प्रवेश; पाल्यांच्या पालकांना मोठा धक्का! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पालखी सोहळ्यात दागिने चोरणाऱ्या टोळीला अटक:23 तोळे सोने आणि 14 मोबाईलसह 24 लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे शाखा युनिट सहा आणि पाचच्या पथकाने केवळ महिलांच्या वर्णनावरून गुन्ह्यांचा छडा लावत वारी सोहळ्यात महिलांचे दागिणे चोरी करणार्या रेकॉर्डवरील टोळीचा पर्दाफाश केला आहे. तर मोबाईल चोरी करणार्या झारखंड येथील एका चोरट्याला अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी 23 तोळे सोन्याचे दागिणे,14 मोबाईल असा एकूण 23 लाख 91 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी, हडपसर, वानवडी आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.चांदणी शक्ती कांबळे ( वय 32), रिटा उर्फ गंगा नामदेव कांबळे ( वय 35), बबिता सूरज उपाध्ये ( वाय 7), पूजा धीरज कांबळे ( वय 35, सर्व रा. उदगीर, जि . लातूर ) आणि गणेश विलास जाधव ( वय 30, रा. सोलापूर ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील बहुतांश आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यात्रा, गर्दीची ठिकाणे येथे चोर्या करण्यात यांचा हातखंडा असल्याचे पोलिस सांगतात. त्याचबरोबर या पथकाने अरबाज नौशाद शेख ( वय 19, रा. महाराजपूर, झारखंड ) याला अटक केली असून, त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. या दोघांनी गर्दीचा फायदा घेत भाविकांचे मोबाईल चोरी केले होते. अशी माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी मंगळवारी (दि.24) पत्रकार परिषदेत दिली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्या प्रस्थानाच्यावेळी हडपसरमध्ये मोठी गर्दी उसळते. त्या गर्दीचा गैरफायदा घेऊन दरवर्षी चोरटे महिलांचे दागिने व मोबाईल पळवतात. ती बाब लक्षात घेऊन यंदा गुन्हे शाखेची पथके तेथे तैनात करण्यात आली होती.दरम्यान, पोलिस अंमलदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखिले यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती, लातूर येथून महिलांची एक टोळी पालखी सोहळ्यात दागिणे चोरी करण्यासाठी आली आहे. त्यांनी आत्ताच काही महिलांचे दागिणे चोरी केले आहेत. चोरीचा ऐवज आपल्या बॅगेच्या चोर कप्प्यात ठेवले आहेत. खबर्याने पोलिसांना महिलांचे वर्णन सांगितले होते. या महिला सोलापूरला जाण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पोलिसांनी गाडीतळ परिसरात खबर्याने सांगितलेल्या वर्णनाच्या महिला शोधून काढल्या. त्यांचा फोटो त्याला पाठवताच त्याने याच चोर्या करणार्या महिला असल्याचे सांगितले. महिला पोलिसांच्या मदतीने संशयीत महिलांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडीती घेतील असता, चोरी केलेला ऐवज मिळून आला. चोरी केलेले सोन्याचे काही दागिणे आरोपी महिलांनी कचरा कुंडीत टाकून दिले होते. ते दागिणे देखील पोलिसांनी शोधून काढले. चोरी गेलेल्या दागिण्याबाबत नागरिकांनी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
जिल्ह्यात १७३ मेगावॅट क्षमतेचे ३६ सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित
लातूर : प्रतिनिधी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण प्राधान्याने सौरऊर्जा प्रकल्पाची कामे पुर्णत्वाकडे नेत आहे. डिसेंबर २०२४ ते आजतागायत लातुर जिल्हयात १७३ मेगावॅट निर्मिती क्षमतेचे एकूण ३६ प्रकल्प कार्यान्वीत झाले आहेत. या प्रकल्पांद्वारे तब्बल पन्नास हजार शेतक-यांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे. तर […] The post जिल्ह्यात १७३ मेगावॅट क्षमतेचे ३६ सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
घरफोड्यांतील आरोपींना अटक; ४ गुन्हे उघड
लातूर : प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना १ लाख ४२ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह अटक अटक केली आहे. त्यांच्याकडून ४ गुन्हे उघडकीस आले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. काही दिवसांपूर्वी औसा तालुक्यात रात्रीच्या वेळी घरचा कडीकोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्या, चांदीच्या दागिन्यांच्या चोरी केल्याची घटना घडल्या होत्या. त्यावरून पोलीस ठाणे […] The post घरफोड्यांतील आरोपींना अटक; ४ गुन्हे उघड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नारायणा इ टेक्नो शाळेला अखेर शिक्षण विभागाने केले सील
लातूर : प्रतिनिधी शहरात गेल्या दोन वर्षांपासून विनापरवाना नारायणा इ टेक्नो शाळा चालू होती. ही शाळा दि. २४ जून रोजी अखेर शिक्षण विभागाने सील केली आहे. मनसे ने शिक्षण विभागाला ही बाब निदर्शनास आणून देवून मनसेच्या वतीने शिक्षण विभागाला वेळोवेळी निवेदन दिले होते. त्यानुसार शिक्षण विभागाने शाळा अनधिकृत आहे, असे पत्र काढून शाळा बंद करून […] The post नारायणा इ टेक्नो शाळेला अखेर शिक्षण विभागाने केले सील appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दोन लाख मजुरांना ‘मग्रारोहयो’चा आधार
लातूर : प्रतिनिधी बेमोसमी पाऊसाने लातूर जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे यंदा मोसमी पावसाळा लवकरच सुरु होईल, अशी आशा शेतक-यांना होती. पाऊस पडल्यामुळे मग्रारोहयोची कामे थांबतील आणि हाताला शेतीकामे मिळतील, अशी अपेक्षा मजूरांना होती. परंतू, पावसाने विश्रांती घेतल्याने अद्यापही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनची कामे सुरुच आहेत. त्यामूळे जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार […] The post दोन लाख मजुरांना ‘मग्रारोहयो’चा आधार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सर्वसामान्यांना अधिकचे शुल्क मोजावे लागणार
सर्वसामान्यांना अधिकचे शुल्क मोजावे लागणार
अहमदाबाद विमान अपघातात २७५ लोकांचा मृत्यू
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या बोइंग ड्रीमलाइनर विमानाला अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात २७५ लोकांचा बळी गेला आहे. यात विमानात असलेले २४१ प्रवासी आणि जमिनीवरील ३४ लोकांचा समावेश आहे अशी माहिती गुजरातच्या आरोग्य विभागाने आज प्रथमच अधिकृतपणे दिली. १२ जून रोजी लंडनला जाणारे हे विमान कोसळल्यापासून एकूण मृतांच्या संख्येबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. डीएनए चाचणीनंतरच […] The post अहमदाबाद विमान अपघातात २७५ लोकांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मासा फ्राय करायला आला, पण स्वत: फ्राय झाला
नवी दिल्ली : सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हीडीओ व्हायरल होतात. आताही एक व्हीडीओ आगीसारखा व्हायरल होत आहे. पण, यावेळी आग खरोखरची लागली आहे. एक माणूस नदीकाठी मासा शिजवत होता. त्याने तव्यावर तेल गरम केले, मोठ्या उत्साहाने भाज्या कापल्या, मसाले टाकले अन् मोठा मासा गरम तेलात टाकला. पुढे जे झाले, ते पाहून तुम्हाला धक्का तर […] The post मासा फ्राय करायला आला, पण स्वत: फ्राय झाला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डंपरच्या धडकेत ३ कामगार जागीच ठार
सोलापूर : जिल्ह्यात मंगळवारी सकाळी भीषण अपघात घडला असून धोत्री ते मुस्ती रस्त्याने एमएच १३ डीजे ५४६६ या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून निघालेल्या बांधकाम कामगारांना एका अनोळखी डंपरने उडविल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तिघे मुस्ती गावचे रहिवासी आहेत. देविदास दुपारगुडे(४०), नितीन वाघमारे(३५), हनुमंत पवार (४०) अशी मृतांची नावे आहेत. रोजच्या प्रमाणे ते सकाळी बांधकाम कामासाठी […] The post डंपरच्या धडकेत ३ कामगार जागीच ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .