SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

32    C
... ...View News by News Source

हे अधिवेशन फक्त बिल्डरांच्या फायद्याचे

नागपूर : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे आहेत. अशामध्ये नागपूर येथे ७ दिवसीय हिवाळी अधिवेशन घेण्यात आले. पण आता यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. नागपूर कराराप्रमाणे विदर्भाला न्याय मिळण्यासाठी हे हिवाळी अधिवेशन व्हायला हवे होते. पण, विदर्भाच्या पदरात काहीच पडले नाही. हे अधिवेशन […] The post हे अधिवेशन फक्त बिल्डरांच्या फायद्याचे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Dec 2025 2:38 pm

वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांना कायमस्वरूपी घरे देण्याबाबत शासन कटिबद्ध

नागपूर : वांद्रे शासकीय वसाहतीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कायमस्वरूपी घरे देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आधीच घेतला असून, या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. विधानसभा सदस्य वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे प्रश्न विचारला असता त्यावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी माहिती दिली. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, […] The post वांद्रे शासकीय वसाहतीतील रहिवाशांना कायमस्वरूपी घरे देण्याबाबत शासन कटिबद्ध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Dec 2025 2:37 pm

तुमच्या प्रचारासाठी राबले, आता हक्कासाठी लढले तर बदडले?:मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारला घेरले

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली होती. या प्रशिक्षणार्थींना रोजगार देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिले होते आता त्या तरुणांना रस्त्यावर सोडले आहे. काल आंदोलन केले तर त्यांना बदडून काढण्यात आले ही कसली व्यवस्था असा आक्रमक सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी उपस्थित केला. विधानसभेच्या लक्षवेधी प्रश्नात वडेट्टीवार म्हणाले, निवडणुकी आधी ही योजना आणली ,आता ती योजना बंद करून टाकली. या मुलांनी सरकारसाठी प्रचार केला, तुमच्यासाठी निवडणुकीत ते राबले त्याचे बक्षीस काय दिले तर काल आंदोलन केले म्हणून बेदम मारहाण केली,यातील मुलांना फ्रॅक्चर झाले आहेत, इतकी असंवेदनशील वृत्ती सरकारची आहे. या मुलांच्या भविष्याचे काय? तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले होते त्यांना आम्ही सेवेत कायम करू त्याच काय झालं असा आक्रमक पवित्रा वडेट्टीवार यांनी विधानसभेत घेतला. यावर उत्तर देताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या प्रशिक्षणार्थींना आम्ही नवीन योजनेत सामावून घेऊ आम्ही याबाबत नवीन धोरण करणार आहोत असे आश्वासन सभागृहात दिले. शेतकऱ्यांना मारहाण करून पैसे वसुली करणाऱ्यांवर कारवाई करा विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील भाकड जनावरांबाबत प्रश्न उपस्थित केले. गोवंश हत्याबंदी कायदा आहे. जेव्हा शेतकरी जनावरांची वाहतूक करतात तेव्हा त्यांना थांबवले जाते, धमकी दिली जाते ऐकले नाही तर मारहाण केली जाते. एका १७ वर्षाच्या शेतकऱ्याला इतकी मारहाण केली की त्याने आत्महत्या केली. भाकड जनावर विकून शेतकऱ्यांना काही पैसे तरी मिळतात. पण आता या बोगस टोळ्या शेतकऱ्यांच्या गाड्या थांबवून त्यांच्याकडून पैसे वसुली करतात याविरोधात सरकारने कारवाई केली पाहिजे,ही वसुली थांबवली पाहिजे. वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की भाकड जनावर प्रकरणी ज्या टोळ्या गैरफायदा घेतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याबाबत शेतकरी संघटनेकडून तक्रारी देखील आल्या आहेत. शेतकरी जनावरांची वाहतूक करताना अडवणूक झाली तर अशा लोकांवर कारवाई करण्यात येईल कुणाला पाठीशी घालण्यात येणार नाही, असे मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. महाज्योती राबवण्याऱ्या परीक्षेचे प्रशिक्षण ऑफलाईन करावे विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात वडेट्टीवार यांनी ओबीसी विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण ऑनलाइन देण्यात येणार असल्याने त्यांचे विद्यावेतन मिळालेले नाही. विद्यार्थ्यांनी काल आंदोलन देखील केले. यावर्षी महाज्योतीला जो निधी दिला आहे तो कमी आहे.. लोकसंख्येच्या हिशोबाने महाज्योतीला अधिकचा निधी द्यावा तसेच महाज्योतीचे गेल्यावर्षीचा निधी देखील प्रलंबित आहे. तो ही देण्यात यावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी ऑफलाईन प्रशिक्षणाची मागणी असेल तर ऑफलाईन ही देण्यात येईल हे स्पष्ट केले. निधी कमी दिला यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले ज्या विभागाला कमी निधी देण्यात आला आहे याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांच्या बरोबर बैठक झाली आहे, मार्च मधील पुरवणी मागण्या आणि अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात येईल असे आश्वासन दिले.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 2:35 pm

मराठी माणूस पंतप्रधान होणार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

पुणे : प्रतिनिधी दिल्लीच्या राजकारण मोठा भूकंप होणार असून आत्ताचे पंतप्रधान बाजुला होतील आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. ते म्हणाले होते की महिनाभरात हा बदल होईल. मात्र, पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी थेट तारीख सांगत १९ डिसेंबरला मराठी माणूस पंतप्रधान होईल, असे सांगितले. ते म्हणाले, नवीन पंतप्रधान […] The post मराठी माणूस पंतप्रधान होणार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Dec 2025 2:32 pm

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हार्डवेअर स्पर्धेचा उत्साह

पुणे : प्रतिनिधी येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल व एआयसीटीई यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२५ (एसआयएच-२०२५) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीत ओप्टीवीस (एआयसीटीई), वेलोट्रीज (रक्षा मंत्रालय) आणि ट्रेलब्रेजर्स (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय) या संघांनी विजेतेपद पटकावले. तर इनो-कोर (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय), क्लच एसआयएच […] The post ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हार्डवेअर स्पर्धेचा उत्साह appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Dec 2025 2:30 pm

घोडा लावला नाही, फेटे दिले नाहीत; सासरच्यांकडून विवाहितेला मारहाण:फ्लॅटसाठी दोन लाखांची मागणी, हिंगोलीत 6 जणांवर गुन्हा दाखल

लग्नात घोडा लावला नाही, तसेच वऱ्हाडींना फेटे दिले नाही, आता फ्लॅट घेण्यासाठी माहेरावरून दोन लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करणाऱ्या परभणी जिल्ह्यातील सासरच्या सहा जणांवर शनिवारी ता. 13 औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा तालुक्यातील कोंडशी येथील माधुरी यांचा विवाह परभणी जिल्ह्यातील आळंद येथील गजानन सांगडे याच्या सोबत झाला होता. विवाहानंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर सासरच्या मंडळींनी त्यांना त्रास देण्यास सुरवात केली. तुझ्या कुटुंबियांना लग्नामध्ये घोडा लावला नाही तसेच वऱ्हाडी ्मंडळींनी फेटे दिले नाही या कारणावरून त्यांचा छळ केला जाऊ लागला होता. त्यांनतर फ्लॅट घेण्यासाठी माहेरावरून दोन लाख रुपये घेऊन येण्याच्या कारणावरून त्यांना त्रास दिला जाऊ लागला होता. दऱम्यान, सासरी होणारा छळ असह्य झाल्याने माधुरी ह्या माहेरी कोंडशी येथे राहण्यासाठी आल्या. त्यानंतर सासरची मंडळीही त्यांच्या माहेरी आली त्यांनी माधुरी यांना मारहाण केली. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी माधुरी यांचे आई, वडिल मधे पडले असता त्यांच्या आई, वडिलांनाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांचाकडून होणारा छळ असह्य झाल्याने माधुरी यांनी औंढा नागनाथ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी गजानन सांगडे, किसन सांगडे यांच्यासह अन्य चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सिद्दीकी पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 2:06 pm

दिल्लीने एकनाथ शिंदेला भाजपमध्ये मर्ज व्हावे असे आदेश दिले:हिवाळी अधिवेशनातून जनतेला काहीही मिळाले नाही- शशिकांत शिंदे

एकनाथ शिंदे यांना दिल्लीने आदेश दिला आहे की भाजपमध्ये मर्ज व्हा अशी माहिती मला मिळाली आहे. त्यांची सुरवात म्हणून हे संघ कार्यालयात जाऊन कशा प्रकारचे एकत्रिकरण करायचे अशा प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी शिंदे सेनेचे लोक रेशीम बागेत गेले असतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, भाजपची आणि अजित पवारांची विचारधारा वेगळी असली तरी धोरणं राबवण्याचे काम हे भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे त्या विचारधारेसोबत किती फारकत घ्यायची हा अजित पवार यांचा प्रश्न आहे. अधिवेशनातून जनतेला काही मिळाले नाही शशिकांत शिंदे म्हणाले की, नागपूरमध्ये जेव्हा हिवाळी अधिवेशन असते त्यावेळी नागपूरला आणि विदर्भाला काही मिळेल अशी अपेक्षा असते. शेतकऱ्यांना काही तरी मिळेल अशी अपेक्षा असते पण या अधिवेशन काळात असे काहीच घडले नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन केले पण अद्यापही नागपूर आणि शेतकऱ्यांना काही मिळालेले नाही. एकही मंत्री उत्तर देत नाही, प्रश्न विचारल्यावर त्यावर काही ठोस निर्णय दिला जात नाही. अधिवेशनामध्ये केवळ कार्यक्रम उरकण्याचा प्रयत्न झाला. जाता-जाता घोषणा करतील पण पैसे कुठे?‌ शशिकांत शिंदे म्हणाले की, नागपुरात झालेल्या अधिवेशनामुळे विदर्भाला काही न्याय मिळाला असे मला वाटत नाही. आता जाता जाता काही तरी पॅकेज जाहीर करतील. पण त्या पॅकेजला पैसे पाहिजे ना? केवळ मोठ्या आकड्यांची घोषणा करुण काही फायदा नाही. त्यासाठी सरकारकडे पैसे तर पाहिजे ना. प्रत्यक्षात कृतीत काही येत नाही हे जनतेने पाहिले आहे. आता विदर्भाच्या जनतेने विचार केला पाहिजे. पोलिसांच्या लक्षात कसे आले नाही शशिकांत शिंदे म्हणाले की, राज्याच्या आजू बाजूच्या शकरामध्ये ड्रग्ज निर्मीतीचे कारखाने आहेत.कराडला सुद्धा काही दिवसांपूर्वी एक कारखाना उद्ध्वस्त झाला. पण दुर्गम भागात असलेला कारखाना जर पोलिसांना सापडतो तर यामागे किती मोठी प्लॅनिंग आहे विचार करण्याची गोष्ट आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाच्या बाजूला हा कारखाना असल्याची माहिती आहे. त्या ठिकाणी अनेकवेळा पोलिस जात असतात मग त्यांना हे कसे समजले नाही. त्यामागे पोलिसांची मदत आहे का? शिंदेंचे निकटवर्तीय यामध्ये असल्याचे बोलले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 12:20 pm

स्वत:च पक्ष संपत चालला असताना एनडीएबद्दनल भविष्यवाणी सुरू:शिरसाटांचा चव्हाणांना टोला, म्हणून विरोधी पक्षनेता नेमता आला नाही

काँग्रेसचे मोठे नेते एनडीएबद्दल भाकीत करत आहे, तिकडे त्यांचा पक्ष संपत चालला आहे. या मोठ्या नेत्यांना काय झाले हेच समजत नाही. असे काही बदल होणार अशी कोणतीही माहिती आमच्यापर्यंत आलेली नाही, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण हे मोठे नेते आहेत त्यांना चांगले माहिती आहे कायदा काय सांगतो. विरोधी पक्षनेत्यासाठी काय अडचण आहे हे अभ्यासू नेत्यांना माहिती आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेता नेमला जाऊ शकत नाही हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे, ही कायद्याची अडचण आहे. राज्यात ड्रग्जचे प्रमाण वाढत चालले आहे. बंदुकीने गोळ्या घालण्यापेक्षा मुलांना ही सवय लावत वेगळ्या मार्गावर नेले जात आहे. दहशतवादी पकडण्यापेक्षा या ड्रग्ज माफियांना पकडणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही रेशीमबागेत येतो संजय शिरसाट म्हणाले की, संघाचा बेस हा देशप्रेमाचा आहे. या देशामध्ये सौदंर्याचे वातावरण असावे ही संघाची भूमिका राहत आलेली आहे. म्हणून आम्ही जेव्हा नागपूरच्या अधिवेशनात येतो त्यावेळी रेशीमबागेत येत सर्वांची भेट घेत असतो. हिंदूत्व सोडल्याने हाल त्यांचे हाल संजय शिरसाट म्हणाले की, शिवसेनेचे दोन भाग झाले कारण ज्यांनी हिंदूत्वांचा विचार सोडला त्यांना त्या गोष्टीचा परिणाम भोगावे लागले. शिवसेना प्रमुखांनी ज्या कडवडपणे हिंदुत्व पुढे नेले ते हिंदूत्व जे विसरले त्यांचे हाल तुम्ही पाहात आहात. तर आम्ही ते विसरल्याने आमची प्रगती सुरू आहे. अजित पवार आले नाही हा त्यांचा प्रश्न संजय शिरसाट म्हणाले की, रा.स्व.संघाच्या बौद्धिकसाठी अजित पवार मागील वेळेस सुद्धा आले नव्हते यावेळीही आले नाही. कुणी आले कुणी आले नाही हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. संघ कोणाला बोलवत नसतो, हे काही बंधंनकारक नाही असे शिरसाट यांनी म्हटले आहे. शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! - एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या शंभर वर्षांपूर्वीच्या कार्याचे स्मरण केले. विशेषतः शिवसेना आणि संघाची विचारसरणी मिळतीजुळती असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सुरुवातीला संघाच्या शाखेतून प्रेरणा घेतली होती. आरएसएसच्या आपत्कालीन मदतकार्यात आणि राष्ट्रसेवेतील योगदानाचाही त्यांनी गौरव केला.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 11:55 am

संभाजीनगर शिवसेनेत शिरसाट-जंजाळ वादानंतर जैस्वाल-तनवाणी दोघांत मित्रांत‎ पुत्रप्रेमामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी‎:कसला त्याग? एका गुलमंडीवर निवडून येत नाही- जैस्वाल‎

छत्रपती संभाजीनगर‎ शहरात शिवसेनेच्या शिंदे गटात‎ पुत्र प्रेमातून निर्माण झालेली नाराजी ‎शनिवारी 13 डिसेंबर रोजी उघडपणे ‎फुटली. ‘दिव्य मराठी’त ही बातमी ‎छापल्यानंतर त्याचे पडसाद दिवसभर‎ उमटले. तनवाणी आणि प्रदीप जैस्वाल या ‎दोघांच्या नाराजीमुळे गुलमंडी प्रभागात ‎राजकीय ताप वाढला. काल घडलेल्या‎ घटनांचा अंक दुसरा शनिवारी पाहायला‎ मिळाला. दोघांनी आपण या तिकिटासाठी‎ दावेदार का हे स्पष्ट केले.‎ माझा त्याग, गुलमंडीची मागणी रास्त : तनवाणी‎ तनवाणी म्हणाले की, विधानसभा ‎निवडणुकीच्या वेळी हिंदू मतदार विभागू नये ‎आणि एमआयएमचा आमदार होऊ नये म्हणून “मी हिंदुत्वासाठी त्याग केला. सध्या ‎माझ्याकडे छत्रपती संभाजीनगर लोकसभा‎संपर्क प्रमुखाचे पद आहे, पण कोणत्याही‎ कार्यक्रमाचे निमंत्रण मला दिले जात नाही.‎ पेपरमध्ये बातमी आली की मला कळते.‎ जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ मला ज्युनिअर‎ आहेत, पण तरीही याबाबत मी त्यांच्याशी‎ बोलणार आहे. माझ्या मुलासाठी तिकीट‎ मागितले आहे; माझा भाऊ गुलमंडीवर ‎अपक्ष जिंकलेला आहे.” त्यामुळे आमचा‎दावा रास्त असल्याचे तनवाणी म्हणाले.‎ यावर प्रतिसाद देताना आमदार प्रदीप‎ जैस्वाल यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की,‎कसला त्याग? आम्ही विकासाची कामे‎ करून निवडून आलो. एका गुलमंडी ‎वॉर्डावरून निवडून येत नाही. प्रभाग मोठा‎ असतो. समिती तिकीट मुलगा म्हणून नाही‎तर कामामुळे दिले जाईल, असे प्रदीप ‎जैस्वाल यांनी सांगितले, तर ऋषिकेश ‎जैस्वाल यांनी देखील मी गुलमंडीहूनच ‎निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.‎ जंजाळ-तुपे यांच्या‎त शीतयुद्धदेखील सुरूच‎ शिवसेनेकडे दोन दिवसांत 836 अर्ज आले ‎आहेत. यामध्ये सर्व नगरसेवकांनी देखील ‎अर्ज भरले आहेत, तर काही उबाठा‎ आणि भाजप आणि काँग्रेसमधील ‎इच्छुकांनी देखील अर्ज केल्याची माहिती ‎जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी यावेळी ‎दिली आहे. दरम्यान, समन्वय ‎समितीमधील सदस्य त्र्यंबक तुपे यांनी‎ अर्ज घेण्यासाठी इतरांना पाठवले होते.‎ मात्र या ठिकाणी जिल्हाप्रमुख राजेंद्र ‎जंजाळ उपस्थित होते. त्यांनी गावाकडे‎ गेले असेल म्हणून फॉर्म देता येणार नाही.‎ उमेदवारांनी स्वत: अर्ज घेण्यासाठी ‎यावे, असे संबंधितांना बजावले. त्यानंतर‎ अवघ्या वीस मिनिटांत तुपे या ठिकाणी‎ अर्ज नेण्यासाठी आले. अर्ज लगेच घेऊन ‎ते निघून गेले.‎ इनसाइड स्टोरी‎ विधानसभा निवडणुकीच्या वेळी माजी ‎आमदार तनवाणी यांनी उबाठाचे ‎मिळालेले तिकीट परत करत शिंदेसेनेत‎ प्रवेश केला. त्यामुळे जैस्वालांनी किमान ‎मनपाचे तिकीट तरी आमच्यासाठी ‎सोडावे, अशी अपेक्षा आहे, तर जैस्वाल‎ यांची प्रकृती पाहता त्यांना आपला ‎राजकीय वारसदार तयार करणे गरजेचे‎ आहे. त्यासाठी हीच मनपा निवडणूक ‎मोठी संधी आहे. मुलाला निवडून‎ आणण्यासाठी एक खात्रीशीर प्रभाग‎ पाहिजे. तो गुलमंडीच आहे. त्यामुळे दोन्ही ‎नेत्यांचा यासाठी आग्रह आहे.‎ शिरसाट-जंजाळ यांच्यातील वादानंतर ‎जैस्वाल-तनवाणी या बड्या नेत्यांनी‎ छोट्या उमेदवारांच्या अडचणी सोडवणे‎ अपेक्षित आहे. मात्र या दोघांमध्ये वाद सुरु ‎झाले आहेत. या पुन्हा पक्षांतराच्या चर्चांनी ‎जोर धरला आहे.‎

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 11:32 am

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असतील तर आनंदच:... तर देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होतील- अब्दुल सत्तार, 19 तारखेला काय घडते पाहू

प्रकाश आंबेडकर हे जे बोलले आहेत ती काळाची गरज आहे. माझा नेता मुख्यमंत्री होणार असेल तर त्यांच्या तोंडात मी पेढा टाकायला हवा. त्यांचे आभार मानायला हवे. शेवटी ते ज्येष्ठ नेते आहेत. प्रकाश आंबेडकर यांना काही तरी समजत असेल म्हणून ते बोलत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असे म्हटले यावर बोलताना बोलताना शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी असे म्हटले आहे. अब्दुल सत्तार म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी माणूस पंतप्रधान होईल असे म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोणताही पुढारी जर पंतप्रधान झाला तरी आम्हाला त्याचा आनंद होईल. पृथ्वीराज चव्हाण बोलले म्हणजे त्यांना काही तरी माहिती असेल म्हणूनच ते बोलले असतील. सध्या जर बघितले तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि भाजपचे वरीष्ठ नेता म्हणून चांगले काम करत आहे. ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. दिल्ली चव्हाणांना चांगल्या पद्धतीने माहिती अब्दुल सत्तार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची खूर्ची रिकामी झाली तर त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड होऊ शकते. पण पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानात किती सत्यता आहे हे पाहावे लागेल. ज्या वेळेस घडायचे ते दिल्लीमधून घडते. दिल्लीत काय घडते हे माझ्यापेक्षा जास्त पृथ्वीराज चव्हाण यांना चांगल्या पद्धतीने माहिती असते. ते जे बोलले त्यात किती सत्य आहे हे आपण 19 तारखेला पाहून घेऊ. ..तर एकनाथ शिंदे नक्कीच मुख्यमंत्री होतील अब्दुल सत्तार म्हणाले की, शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते आहेत. सर्व पक्षीय नेते त्यांचे मार्गदर्शन घेत असतात. त्यांच्याइतका राजकारणाचा अभ्यास देशात आता काहीच लोकांना आहे. ते जर काही बोलत असतील तर एकनाथ शिंदे नक्कीच मुख्यमंत्री होतील. मुस्लीम मते ही कोणत्या एका पक्षाची नाहीत ती विकासाच्या मागे असतात. सामाजिक आणि धामिर्क भावना जपणाऱ्यांसोबत ही मते राहतात. माजी खासदार जलील यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यावर बोलू नये. भाजपसोबत युती होणार नाही अब्दुल सत्तार म्हणाले की, सिल्लोडमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आमची भाजपसोबत युती होणार नाही. भाजप आमच्याविरोधात सर्व पक्ष घेऊन लढत आहे. एकटा भाजप तिथे आमच्याविरोधात लढू शकत नाही. एमआयएम आणि भाजनप सिल्लोडमध्ये एकत्र आले आहेत. तिथे भाजपचा एकाधा नगरसेवक निवडून येईल बाकी सर्व नगरसेवक आमच्या शिवसेनेचे निवडून येतील. गेली 43 वर्षे सिल्लोड माझ्यासोबत आहे मी कोणत्याही पक्षात गेलो तरीही लोकं माझ्यासोबत असतात.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 11:23 am

हिवाळी अधिवेशन महापालिका निवडणुकांसाठीच होते:बिल्डरांचे भले आणि निवडणुकीची तरतूद, हेच सरकारचे धोरण - भास्कर जाधव

नागपूर कराराप्रमाणे विदर्भाला न्याय मिळण्यासाठी हे हिवाळी अधिवेशन व्हायला हवे होते. मात्र, विदर्भाच्या पदरात काहीच पडले नाही. हे अधिवेशन कोणालाही न्याय देण्यासाठी नसून केवळ पुरवणी मागण्या मंजूर करून सरकारी पैशांची उधळपट्टी करण्यासाठी आणि त्यातून आगामी निवडणुकांसाठी मते विकत घेण्यासाठीच होते, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. आज नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांनी केलेल्या आरोपांना आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. तत्पूर्वी भास्कर जाधव यांनी सरकारच्या कामकाजाचे वाभाडे काढले. महानगरांवर डोळा, विदर्भाकडे पाठ अधिवेशनाच्या सांगतेच्या वेळी बोलताना जाधव म्हणाले, विदर्भ वेगळा होऊ नये म्हणून झालेल्या करारानुसार वर्षातून एक अधिवेशन नागपूरला होते. या अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नांना प्राधान्य देणे अपेक्षित असते. मात्र, सभागृहात ज्या घोषणा झाल्या, त्या केवळ मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरसारख्या मोठ्या महानगरपालिकांत मते मिळवण्यासाठीच होत्या. बिल्डरांच्या फायद्याचे निर्णय घेण्यात आले, पण विदर्भातील सामान्य माणसाला काय मिळाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. घातक विधेयके चर्चेविना मंजूर सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना जाधव म्हणाले, कालच सभागृहात एमपीडीए कायद्याचे १०८ क्रमांकाचे विधेयक अचानक आणले गेले. त्यात अनेक घातक तरतुदी असतानाही कोणतीही चर्चा न करता ते मंजूर करण्यात आले. हे अधिवेशन केवळ आगामी निवडणुका जिंकण्यासाठी आणि लोकांना पैसे वाटण्यासाठीच घेतले गेले, हे माझे म्हणणे आता खरे ठरले आहे. विधानभवनाचे नाव 'लक्षवेधी भवन' ठेवा लक्षवेधींना वेळच्यावेळी उत्तरे मिळाली नाही, तर राज्याच्या मुख्य सचिवांवर हक्कभंग आणावा असे अध्यक्ष महोदय म्हणाले. २०२२ पासून आपल्या विधानभवनाचे नाव लक्षवेधी भवन ठेवा, असे मी म्हणालो होतो. इतके हे लक्षवेधीचे प्रकरण बरेच पुढे गेलेले आहे. या विषयात जे बोलायचे ते बोलून झालेले आहे. परंतु, त्यातून फारशी काही सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे त्यावर फार भाष्य करण्यात काही अर्थ नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 11:16 am

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या‎ रंगभूमीवर महिलांची दमदार पावले‎:तीन दिग्दर्शिका, लेखिकेच्या सर्जनशीलतेचा ठसा‎

माऊली संकुल सभागृहात नुकत्याच पार‎पडलेल्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य ‎‎स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत यंदा रंगभूमीवरील ‎‎बदलते सकारात्मक चित्र प्रकर्षाने दिसून आले. ‎‎विशेष म्हणजे, यंदा एकूण 22 नाटके सादर‎झाली असून यात ग्रामीण नाट्यसंघांचा मोठा ‎‎प्रतिसाद लाभला.यंदा कलाकार म्हणूनच नव्हे ‎तर लेखक, दिग्दर्शक आणि बॅकस्टेज आर्टिस्ट ‎‎म्हणूनही महिलांचा सहभाग लक्षणीयरीत्या ‎‎वाढलेला दिसून आला.‎ कल्पना नवले (माझं घर), विद्या जोशी ‎(लास्ट स्टॉप) व ज्योती खिस्ती (फार्म‎हाऊस) या 3 महिला दिग्दर्शिकांनी यंदा‎ नाटकाचे दिग्दर्शन करत संपूर्ण जबाबदारी‎ यशस्वीपणे पेलली. तर ‘जन्मवारी’ या ‎नाटकाचे लेखन हर्षदा बोरकर यांनी केले.‎या पैकी कल्पना नवले दिग्दर्शित ‘माझं घर’ हे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎नाटक स्पर्धेत तिसरे आले. आशयघन कथा,‎ सामाजिक जाणिवा आणि सशक्त सादरीकरण‎ यामुळे या नाटकांनी रसिकांचे लक्ष वेधून‎ घेतले. याशिवाय प्रकाश योजना, रंगमंच ‎व्यवस्थापन, वेशभूषा, रंगभूषा अशा बॅकस्टेज‎ विभागांमध्येही महिला व युवतींची उपस्थिती‎ ठळकपणे जाणवली. ही स्पर्धा नव्या पिढीतील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कलाकारांना व्यासपीठ देणारी व समाजातील‎ सकारात्मक बदल अधोरेखित करणारी ठरली.‎अहिल्यानगरची रंगभूमी अधिक समावेशक,‎सशक्त आणि प्रेरणादायी होत असल्याचे यातून ‎स्पष्ट होत आहे. पारंपरिक शहर केंद्रित‎रंगभूमी पलीकडे जाऊन ग्रामीण कलाकारांनी‎ आपली ताकद दाखवून दिली.‎ अभिनय, नेपथ्य, वेशभुषा‎संगीत दिग्दर्शनात बाजी‎ यंदाची राज्य नाट्य स्पर्धा अधिक चुरशीची ‎होऊन निकालातही महिलांनी बाजी मारली.‎उत्कृष्ट अभिनय व नेपथ्याचे प्रत्येकी एक,‎अभिनयाची गुणवत्ता प्रमाणपत्रे 5 जणींनी,‎उत्कृष्ट वेशभूषेची 3 व संगीत दिग्दर्शनात‎ दोघींनी, असा एकूण 12 जणींनी आपल्या ‎कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.‎ समृद्ध करणारा अनुभव‎‎ स्पर्धेत 15 वर्षांपासून अभिनय करत असून‎ बालनाट्य स्पर्धेत पारितोषिक पटकावले.‎म्हणून 4 वर्षांपासून या स्पर्धेतही अभिनय व‎ दिग्दर्शनाची दुहेरी जबाबदारी उचलली.‎अभिनयासोबत महिलांना दिग्दर्शन व ‎लेखनाच्या संधी मिळणे, ही मोठी बाब आहे.‎रंगभूमीवर स्त्री दृष्टीकोन अधिक ठळकपणे ‎मांडला जावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील‎ आहोत.- विद्या जोशी, दिग्दर्शिका

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 10:50 am

लवकरच ठरणार पार्किंगचे दर, कोंडीतून काही अंशी दिलासा:4155 वाहनांसाठी 28 पार्किंगस्थळे; गंगापूररोड, कॉलेजरोडला 15 ठिकाणे

महापालिकेच्या वाहतुक सेलतर्फे शहरात 28 ठिकाणी 4155 वाहनांसाठी पे ॲन्ड पार्क तत्वावर पार्किंग सुरू केले जाणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अधिकृत पार्किंग सुरू झाल्यानंतर त्याच्यापासून बाहेर 500 मिटर अंतरात जर वाहने लावलेली दिसली तर त्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे. दुचाकीसाठी 700 तर चार चाकीसाठी 1150 रुपये मोजावे लागतील. यामुळे अधिकृत पार्किंगच्या बाहेर लावल्या जाणाऱ्या वाहनांमुळे येणारे अडथळे, होणारी कोंडी दूर होण्यास मदत होईल असा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. शहरातील वाहतूक कोंडी सुटण्याच्या दृष्टीने पार्किंगसाठी निविदा प्रक्रिया राबविली जात होती. मात्र 35 लाख हा जादादर 19 लाखावर आणूनही निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी सिंहस्थापूर्वी शहरात पार्किंगची कामे मार्गी लावायचे असल्याने वाहतूक सेलने ही रक्कम 12 लाखावर आणली. त्यानंतर आता हे काम गतीने सुरू करण्यात आले आहे. वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मल्टी पार्किंगचा विचार व्हावा महापालिकेने पुणे, मुंबईच्या धर्तीवर गर्दीच्या ठिकाणी मल्टी पार्किंगचा विचार केल्यास एकाच जागेवर मोठ्या संख्येने वाहने लावली जातील. पण नाशिकमध्ये तशी पार्किंग होणार नाहीये. तरीही जेथे पार्किंग होईल त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यासाठी मदत होते. परदेशात नियमानुसार पे ॲण्ड पार्कमध्येच वाहने लावली जातात. आपल्याकडे मात्र तशी शिस्त नाही. ती शिस्तही लावण्याची गरज आहे. या पार्किंगमध्ये वाहने सुरक्षित राहतात. ठिकठिकाणी मल्टीलेवल व मॅकेनिकल ट्रॅक पार्किंगची व्यवस्था केल्यानंतरच पार्किंगचा प्रश्न मार्गी लागेल. पार्किंग स्थळांपासून 500 मी अंतरावरील अनधिकृत पार्क वाहनांवर कारवाई स्मार्ट पार्किंगसाठी 3 निविदाधारकांकडून निविदा प्राप्त झाल्या आहेत. निविदा सेलकडून तांत्रिक तपासणी सुरू असून अटी शर्थींची पूर्तता करणाऱ्यास कार्यारंभ आदेश दिले जातील. - रवींद्र बागुल, कार्यकारी अभियंता, वाहतूक सेल, मनपा

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 10:44 am

स्टीव्हन्सन स्क्रीनमुळे वेधशाळेतील नोंद अन् रिअल फिल तापमानात तफावत:तापमान मोजणारी यंत्रणा जमिनीपासून सव्वा ते 2 मीटर उंच

तुम्ही कधी विचार केला आहे का, हवामान विभागाने (आयएमडी) नोंदवलेले कमाल, किमान तापमान आणि प्रत्यक्षातील थंडीत विंड चिल्ड इफेक्टमुळे फरक जाणवतो. हवामान विभागाचे तापमान मापक अचूक असूनही, सामान्य माणसाला येणारा रिअल फील मात्र वेगळा असतो. या फरकाचे उत्तर दडले आहे ते स्टीव्हन्सन स्क्रीन नावाच्या पांढऱ्या लाकडी पेटीत. वैज्ञानिकदृष्ट्या या माध्यमातून मोजण्यात येणारे तापमान अत्यंत अचूक असले तरी मानवी अनुभव, स्थानिक वातावरणातील बदल यामुळे प्रत्यक्ष नोंद आणि आपल्याला जाणवणारे तापमान याच्यात फरक दिसून येतो. हिवाळ्यात वाऱ्याच्या वेगामुळे शरीरातील उष्णता वेगाने कमी होते. त्यामुळेही प्रत्यक्ष तापमानापेक्षा जाणवणारे तापमान कमी असते. अर्थात तापमान जास्त नोंदवले तरी, थंडी त्यापेक्षा जास्त जाणवते, असे चिकलठाणा वेधशाळेतील हवामान शास्त्रज्ञ राजेश कुमार यांनी सांगितले. स्टीव्हन्सन का आवश्यक आहे? हवेतील तापमान उपकरणे जर थेट उन्हात ठेवली तर मोजलेले तापमान प्रत्यक्ष तापमानापेक्षा जास्त निघते. ही चूक टाळण्यासाठी स्टीव्हन्सन स्क्रीनचा वापर केला जातो, ज्यामुळे तापमान आणि आर्द्रतेची नोंद आंतरराष्ट्रीय मानकांनुसार करता येते. ...म्हणून थंडी वेगळी जाणवते स्टीव्हन्सन स्क्रीनमध्ये ठेवलेल्या तापमापीला तापमान मोजण्यासाठी मोकळ्या हवेची आवश्यकता असते, परंतु स्क्रीनची रचना अशी असते की ती वाऱ्याचा थेट प्रवाह तापमापीवर पडू देत नाही. त्यामुळे वातावरणातील वास्तविक तापमान अचूकपणे दाखवते, परंतु वाऱ्याचा परिणाम आणि आर्द्रता यांसारख्या समावेश स्क्रीनच्या नोंदीत नसतो. यामुळेच वाऱ्यामुळे जाणवणारी थंडी ही नेहमी अधिकृत तापमानापेक्षा वेगळी जाणवते. स्क्रीनची वैशिष्ट्ये दुहेरी छप्पर : वरचा भाग गरम होऊ नये म्हणूनजाळीदार भिंती : नैसर्गिक हवेचा प्रवाह राखण्यासाठीपांढरा रंग : सूर्यकिरणे परावर्तित करण्यासाठीजमिनीपासून उंची : सुमारे १.२५ ते २ मीटरभारतामध्ये दाराची दिशा : उत्तरेकडे काय असते स्टीव्हन्सन स्क्रीन? स्टीव्हन्सन स्क्रीन हे हवामान निरीक्षणासाठी वापरले जाणारे एक खास, पांढऱ्या रंगाचे, जाळीदार फळी असलेले लाकडी किंवा धातूचे छोटे घरट्यासारखे बनलेले आवरण आहे. यामध्ये तापमान आणि आर्द्रता मोजण्यासाठी आवश्यक उपकरणे ठेवली जातात. स्टीव्हन्सन स्क्रीनचे उद्दिष्ट थेट सूर्यप्रकाश, पाऊस, हिमवृष्टी आणि वाऱ्यापासून उपकरणांचे संरक्षण. तापमान व आर्द्रतेचे अचूक आणि प्रमाणित निरीक्षण सूर्याच्या किरणांमुळे तापमानात होणारी चूक टाळणे. जगभरात याच पद्धतीचा वापर जगभरात या एकाच पद्धतीने हवेतील तापमान मोजण्यात येते. स्टीव्हन्सन स्क्रीनमुळे तापमापीवर उन्हाची किरणे पडत नाहीत, त्यामुळे मोजण्यात येणारे तापमान अचूक ठरते. तापमापी ठेवण्यात आलेल्या उंचीवरनही तापमानात फरक पडू शकतो. -राजेशकुमार, हवामानशास्त्रज्ञ, प्रभारी अधिकारी, भारतीय हवामान विभाग, छत्रपती संभाजीनगर.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 10:37 am

वीर तानाजी' नाटकाने जागवला शिवकालीन इतिहास:विश्वास करंडक बालनाट्य स्पर्धेमध्ये रसिकांना बालनाट्यांची दिली अनोखी भेट‎

कौलखेड परिसरातील स्कूल ऑफ स्कॉलर स्कूलने वीर तानाजी-स्वराज्यस सिंह' हे संस्कृत भाषेतील ऐतिहासिक नाटक सादर करून शिवकालीन इतिहास जागवला. विश्वास करंडक बाल नाट्य स्पर्धेच्या रंगमंचावर संस्कृत भाषेत नाटक सादर होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. आधी लगीन कोंढाण्याचे, मग रायबाचे या इतिहासात गाजलेल्या जोश पूर्ण प्रतिज्ञेवर आधारित नाटकाने स्पर्धेचा दुसरा दिवस गाजवला. वीर तानाजी' या नाटकाच्या अनुवाद, लेखन व दिग्दर्शनाची जबाबदारी स्वप्ना लांडे यांनी पार पाडली. सहाय्यक शिक्षिका भारती काळे व उज्वला कावरे यांनी त्यांना सहकार्य केले. सदर नाटकात किंजल पालखेडे, सिद्धी ठाकूर, स्वराज गावंडे, स्पृहा फुलाने, अन्वित चव्हाण, मिहीर केतकर, देवस्वी काळे, रजत गिरी, अथर्व आव्हाळे, सनी भोकरे, तनवी पाटील, भिमरत्न पळसपगार, स्पर्श जोशी व स्वराली राऊत या बालकलावंतांनी ऐतिहासिक वेशभूषेत उत्तम भूमिका वठवल्या. गत वर्षी करंडक पटकवणाऱ्या प्रभात किड्स च्या आहुती' या नाटकाने करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या अत्याचारांशी सामना करीत देश प्रेम व स्वातंत्र्याची प्रेरणा या नाटकाच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर करण्यात आली. विविध बालनाट्यांमुळे अकोलेकर रसिकांना उत्तम नाटकांची मेजवानी मिळत आहे. ८ नाटकांचे सादरीकरणाचे नियोजन आहे. त्यात जेआरडी टाटा स्कूलचे बिंदू संदेश' प.पू. श्री हेडगेवार शाळा चे बोन्साय', एज्युविला पब्लिक स्कूल पातुरचे लाली', किड्स झोन इंग्लिश स्कूल बार्शीटाकळीचे कष्टाची जाणीव', सातपुडा इंग्लिश स्कूल वरवट बकालचे अण्णा', व स्कूल ऑफ एक्सलन्स स्वयंपूर्ण आर. जे. चवरे हायस्कूल कारंजा लाडचे खेळताड' व डॉ. नीना वंदे आदर्श विद्यालय वरूड, अमरावतीचे जैसा राजा तैसी प्रजा' या नाटकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी व एकापेक्षा एक सरस असलेल्या या नाटकांचे प्रयोग झाले. यात ज्ञानदीप इंग्लिश स्कूल आणि सदाफुली रंगीत झाली, स्कूल ऑफ स्कॉलर आनंदाचे झाड' श्री संताजी कॉन्व्हेंट कसांडी एक परिक्रमा', प्लॅटिनम जुबली स्कूल जाने कहा गये वो दिन' विवेकानंद इंग्लिश स्कूल असं कसं', जुबिली इंग्लिश स्कूल कुंभारीचे आरसा', मनुताई कन्या शाळा वृक्षवल्ली आम्हा सोयरे', गीतांजली विद्यालय मोबाईल मायाजाल' व भारत विद्यालय लेक वाचवा हो' या नाटकांचा समावेश होता. नाट्य महोत्सवाची जबाबदारी महोत्सवाचे प्रमुख प्रा. मधू जाधव, निमंत्रक प्रशांत गावंडे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, जेआरडी टाटा स्कूलच्या प्राचार्या प्रतिभा फोकमारे, स्नेहल गावंडे व त्यांचे सहकारी सांभाळत आहेत. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 10:26 am

देवस्थानांच्या प्रतिनिधींची भावना:मुद्रांक माफीचा मुद्दा; दान जमिनींना व्यावसायिक शुल्क लावणे चुकीचे, दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन‎

देवस्थानांना दान स्वरूपात मिळणाऱ्या किंवा समाजहितासाठी मंदिरांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या जमिनींच्या हस्तांतरणावर आकारले जाणारे मुद्रांक व नोंदणी शुल्क त्वरित माफ करावे, या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. याबाबत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील देवस्थानांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. मंदिरांचा उद्देश नफा नसतानाही त्यांना कंपनी किंवा सहकारी संस्थांप्रमाणे शुल्क लावणे, ही प्रशासकीय विसंगती त्वरित दूर करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. दान-जमिनींना व्यावसायिक' शुल्क लावणे सांस्कृतिक परंपरेला बाधक असल्याची भावना प्रतिनिधींनी व्यक्त केली. ​सध्या मंदिरांना मिळणारे जमिनीचे हस्तांतरण व्यवहार हे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० च्या कक्षेत येतात. मंदिराचे कार्य पूर्णतः धार्मिक व धर्मदाय स्वरूपाचे असतानाही, या व्यवहारांवर व्यावसायिक दराने शुल्क आकारले जाते. यामुळे अनेक लहान मंदिरांना दान किंवा खरेदी व्यवहार पूर्ण करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य झाले आहे, असे विश्वस्तांचे म्हणणे आहे. याबाबत महाराष्ट्र मंदिर महासंघाने महासंघाकडून भूमिका जाहीर करण्यात आली. मंदिर महासंघ २०२३ पासून राज्यातील १५,००० हून अधिक मंदिरांचे संघटन आणि सुव्यवस्थापन करत आहे. ही शुल्क रचना सांस्कृतिक परंपरेला व भक्त भावनेला बाधक असल्याचे महासंघाचे मत आहे. दरम्यान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन सादर केले. ​देवस्थानांच्या जमिनीवरील शुल्कमाफीचा प्रश्न हा केवळ आर्थिक नसून, तो दानसंस्कृतीशी आणि सामाजिक जबाबदारीशी निगडित आहे. शासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी देवस्थांकडून होत आहे. ​अकोल्यातील बहुसंख्य मंदिरांचा पाठिंबा निवेदना महासंघाचे पदाधिकारी तसेच अनेक देवस्थानांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रा. राजू इंगळे, अधिवक्ता राधा मिश्रा, अधिवक्ता श्रुती भट, अधिवक्ता अक्षय नवलकर, अमोल वानखडे, अजय खोत, सुनील पाटील व अश्विनी सरोदे यांनी या शुल्कामुळे मंदिरांना भेडसावणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला.या मागणीला अनेक संस्थानतर्फे पाठिंबा देण्यात आला. श्री चंडिकादेवी संस्थान, कुरणखेड, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर संस्थान, अकोला, ​श्री काळा मारुती मंदिर, रामनगर, अकोला, ​श्री ज्ञानेश्वर मंदिर संस्थान, जुने शहर, अकोला, संत गजानन महाराज मंदिर, गंगानगर, अकोला, ​श्री जागेश्वर अंबिका संस्थान, जुने शहरचा सामवेश आहे. महासंघाकडून या आहेत मागण्या महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील देवस्थानांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. यात पुढील काही प्रमुख मागण्या केल्या. यामध्ये ​संपूर्ण शुल्कमाफी: धार्मिक व धर्मदाय संस्थांचा उद्देश नफा नसल्याने, हस्तांतरण व्यवहारांवरील सर्व शुल्क-मुद्रांक, नोंदणी व इतर कर पूर्णपणे माफ करण्यात यावे. ​कायद्यात स्पष्ट दुरुस्ती: सध्या असलेल्या तुटपुंज्या आणि अटींसह असलेल्या शुल्कसवलती व्यवहार्य नाहीत. त्यामुळे कायद्यात आवश्यक दुरुस्ती करून स्पष्ट व निर्विवाद धोरण तयार करण्यात यावे. ​व्यवसायीकरण थांबवा: मंदिरांच्या जमिनींच्या खरेदी-विक्रीला व्यावसायिक व्यवहाराप्रमाणे शुल्क लावणे थांबवावे.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 10:26 am

डीपी बसवण्याकडे दुर्लक्ष:शेतकऱ्यांनी दिला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, सस्ती महावितरण उपकेंद्राची अनास्था; पांगरताटीच्या शेतकऱ्यांनी दिले निवेदन‎

तालुक्यातील सस्ती येथील महावितरण उपकेंद्राचा कारभार ढेपाळला आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी व समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. पावसाळ्यात वाहून गेलेल्या डीपी संदर्भात पांगरताटी येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिले. ९ जूनपासून सस्ती उपकेंद्रांतर्गत पांगरताटी येथील शेतकरी किशोर शिवराम जाधव, गौतम रामलाल दुग्गड, प्रकाश नामदेव चोंडकर यांच्या तीनही डीपी गौतम रामलाल दुग्गड यांच्या शेतात आहेत. त्या पावसाळ्यात आलेल्या पुरात वाहून गेली. तेंव्हापासून डीपी बंद आहेत. तत्काळ दुरूस्ती करून देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सस्ती येथील महावितरण कार्यालयाला वारंवार भेटी देत निवेदन दिले. परंतु शेतकरी बांधवांच्या मागणीकडे सस्ती येथील महावितरण उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता दुर्लक्ष करत आहेत. शेतकरी बांधवांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या नेतृत्वात सस्ती उपकेंद्रासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. आमच्या शेतात गहू, हरभरा पेरला आहे. तो पाण्याअभावी सुकून जात आहे. आम्ही सावकाराचे कर्ज फेडल्याशिवाय आम्ही शांततेत आयुष्य जगू शकत नाहीत. त्यामुळे आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. शासनाने आम्हाला गळफास घेण्याची परवानगी द्यावी, नसता शेतकरी गळफास का घेतात, हे नाटकाच्या माध्यमातून सस्ती उपकेंद्रासमोर आंदोलनाच्या माध्यमातून सादर करणार आहोत.- निलेश तुकाराम कापकर

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 10:25 am

थंडीमुळे सर्दी, खोकल्याच्या‎रुग्णांमध्ये 25 % झाली वाढ‎:तापमानाचा पारा 10 अंशांवर; मुले, ज्येष्ठांच्या तक्रारी वाढल्या‎

अकोला शहरासह जिल्ह्यात किमान तापमानाचा पारा दोन दिवसांत घसरल्याने हुडहुडी भरणाऱ्या थंडीत वाढ झाली आहे. शुक्रवारी शहराचा किमान पारा तब्बल १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. गेल्या चार दिवसांपासून गारठा वाढल्याने सर्दी, खोकला आणि त्वचारोगांसह विविध साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. वाढलेल्या थंडीचा आरोग्यावर परिणाम होताना दिसत असून, लहान मुले आणि वयोवृद्धांना थंडीचा त्रास होत आहे. शासकीय जिल्हा रूग्णालयासह खासगी दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये गेल्या आठवडाभरात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, आकाश स्वच्छ आणि वातावरण कोरडे असल्याने सूर्यास्तानंतर तापमान वेगाने कमी होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत किमान तापमानात ३ ते ४ अंशांची घट नोंदवली गेली आहे. हवेत ओलावा कमी व वाऱ्याचा वेग मंद असल्याने रात्रीचा गारवा अधिक वाढला आहे. केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही किमान तापमानाचा पारा घसरला आहे. किमान तापमानात घट: काही भागांत पहाटे धुक्याची चादर पसरल्याचे चित्र आहे. पुढील दोन ते तीन दिवस तापमानात आणखी घसरण होऊ शकते. कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १० ते ११ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सजग राहण्याची गरज आहे. आता वातावरणातील बदल स्पष्टपणे जाणवत असून, सकाळच्या धुरकट प्रकाशात, मंद वारा आणि रात्री थंड हवा वाढत आहे. थंडीमुळे गोरक्षण भागात स्वेटरच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. ^मुले आणि वृद्धांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, त्यामुळे वाढत्या थंडीत त्यांना आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यांना उबदार कपडे घाला, विशेषतः त्यांचे डोके, कान, हात न पाय झाकून घ्या. वृद्धांना कोमट पाणी, सौम्य सूर्यप्रकाश आणि औषधे वेळेवर द्या. मुलांना थंड पदार्थ देणे टाळा. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थ द्या. - डॉ. मुकुंद अष्टपुत्रे, एमडी, फिजिशियन, जीएमसी अकोला.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 10:24 am

मालवाहू ट्रक उलटल्याने दोघांचा मृत्यू, 11 जखमी:खरप बु. ते घुसर रोडवर घडली घटना‎

कापूस वेचून घरी परतणाऱ्या मजुरांचे वाहन उलटून झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर ११ मजूर गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना शनिवारी रात्री सुमारे ८.१५ वाजता अकोला तालुक्यातील खरप बु. ते घुसर रोडवर घुसरनजीक घडली. अपघाताची माहिती मिळताच अकोट फाईल पोलिस आणि वाहतूक शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतक व जखमींना तातडीने अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार, अकोला शिवारात कापूस वेचणीसाठी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील मूळ रहिवासी असलेले मजूर आले होते. या मजुरांचे सध्या वास्तव्य आपातापा परिसरात होते. दिवसभर कापूस वेचणीचे काम आटोपून शनिवारी रात्री सर्व मजूर (एमएच-२८- एबी ९१५०) या वाहनाने घरी परतत होते. रात्रीच्या सुमारास घुसरनजीक विद्युत कंपनीच्या पॉवर हाऊससमोर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. अपघात इतका भीषण होता की, वाहनातील काही मजूर रस्त्यावर फेकले गेले. मृतांमध्ये मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील कालापाड (ता. खकणार) येथील मुन्नीबाई जांभेकर (४९) आणि मनीष कासदेकर (३७) यांचा समावेश आहे. ११ गंभीर जखमींना तातडीने अकोला जिल्हा सर्वापचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. या वेळी सामाजिक कार्यकर्ता पराग गवई यांनी मदतकार्य केले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 10:23 am

20 प्रभागांची अंतिम मतदारसंख्या जाहीर:पुरुषांच्या तुलनेत महिला मतदार संख्येत वाढ‎

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी २० प्रभागांत ८० नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी पाच लाख ५० हजार ६० मतदार मतदान करणार आहेत. यावेळी पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. मतदार यादीतील संख्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम मतदार संख्या जाहीर झाली आहे. या आकडेवारीनुसार, एकूण मतदारांची संख्या ५ लाख ५० हजार ६० इतकी आहे, जी प्रारूप ५ लाख ५० हजार १२८ मतदारांच्या तुलनेत ६८ ने कमी आहे. ​अंतिम मतदार संख्येच्या आकडेवारीनुसार, पुरुष आणि महिला मतदारांच्या संख्येत किरकोळ घट झाली आहे तर, इतर मतदारांची संख्या कायम आहे. अंतिम आकडेवारीत एकूण २ लाख ७४ हजार ८७७ पुरुष मतदार तर २ लाख ७५ हजार १४२ महिला मतदार आणि ४१ इतर मतदारांची नोंद आहे. प्रारुप मतदार संख्येच्या तुलनेत पुरुष आणि महिला मतदारांच्या संख्येत प्रत्येकी ३४ मतांची घट नोंदवण्यात आली आहे. तर एकूण मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा २६५ ने जास्त आहे. प्रभागनिहाय आकडेवारी पाहिल्यास प्रभाग क्र. १८ मध्ये सर्वाधिक ३२ हजार १५९ मतदार, त्याखालोखाल प्रभाग क्र. १४ मध्ये ३१ हजार ७८१ मतदार आहेत. याउलट, प्रभाग क्र. ६ मध्ये सर्वात कमी म्हणजे २१ हजार १८९ मतदार आहेत. ​प्रारुप मतदार संख्येच्या तुलनेत प्रभागनिहाय बदलांमध्ये प्रभाग क्र. १६ मध्ये मतदारांच्या संख्येत सर्वाधिक २२६ मतांची वाढ नोंदवण्यात आली तर प्रभाग क्रमांक १९, ३ आणि १ मध्ये देखील वाढ दिसून येत आहे. सुधारित कार्यक्रम {प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतीवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या अधीप्रमाणित करून प्रसिद्ध करणे : १५ डिसेंबर २०२५ {मतदान केंद्रांच्या स्थळांची यादी प्रसिद्ध करणे : २० डिसेंबर २०२५ {मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी: २७ डिसेंबर २०२५ पुरुष, महिला मतदारांची संख्या { पुरुष मतदार संख्या- २,७४,८७७ { महिला मतदार संख्या -२,७५,१४२ { इतर मतदारांची संख्या -४१ एकुण मतदार संख्या- ५५००६०

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 10:22 am

400 खाटा; उपचारासाठी फक्त 20 डाॅक्टर‎:खाटांची संख्या दुप्पट; 253 पैकी 171 मनुष्यबळ, रुग्णांची हेळसांड‎

जिल्हा स्त्री रुग्णालयात (डफरीन) रुग्णांसाठी खाटांची संख्या २०० वरून ४०० झाली आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी चारशे खाटांच्या नवीन इमारतीत रुग्णालयाचे स्थानांतरण झाले आहे. रुग्णांसाठी खाटांची संख्या वाढल्यामुळे निश्चितच रुग्ण संख्येतही वाढ झाली आहे. मात्र, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांची संख्या पूर्वी होती तेवढीच कायम आहे. वास्तविकता २०० खाटांच्या रुग्णालयासाठीच मनुष्यबळाची कमतरता होती. आता रुग्णांसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध झाली आहे, मात्र डॉक्टर किंवा मनुष्यबळ वाढलेले नाही. त्यामुळे आहे त्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने महिला रुग्ण दाखल होत असतात. जुन्या इमारतीमध्ये आवश्यक सुविधांचा अभाव लक्षात घेता रुग्णालय परिसरात ४०० बेडची नवी इमारत उभारण्यात आली आणि या नव्या इमारतीमध्ये मागील आठ महिन्यांपासून रुग्णालयाचे कामकाजही सुरू झाले आहे. नव्या सर्व सुविधायुक्त या इमारतीमध्ये आता रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. सध्या स्थितीत दररोज सुमारे ३०० रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असतात. त्यामुळे येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण देखील वाढला आहे. तसेच येथे दररोज सरासरी २५ ते ३० महिलांची प्रसूती होते. त्यामुळे रुग्णालयातील कामाचा ताण लक्षात घेता येथील रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी होत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे महिला व नवजात शिशूंवर उपचार असतात. परंतू असे असताना देखील येथील बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बधिरीकरणतज्ज्ञ, क्ष-किरणतज्ज्ञांची पदे रिक्त आहेत. वर्ग एक वर्गवारीतील डॉक्टरांबरोबरच येथे वर्ग दोन वर्गवारीतील डॉक्टरांचीही पदे रिक्त आहेत. मेळघाटसह, मध्य प्रदेशातून येतात उपचारासाठी रुग्ण जिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्ह्यातील इतर बारा तालुक्यांच्या तुलनेत मेळ घाटातून येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. या व्यतिरीक्त जिल्ह्याच्या सीमेला मध्य प्रदेश राज्य लागून आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रुग्ण सुध्दा जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. मंजुरात मिळाली;पदे भरणार ^मनुष्यबळाची पुर्वीच कमतरता होती. यातच आता अतिरिक्त दोनशे खाटांची वाढ झाली आहे. मनुष्य बळाची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार अतिरिक्त पदे मंजूर झाली आहे. आगामी बदली प्रक्रियेत काही वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी रुग्णालयासाठी मिळणार आहे. डॉ. विनोद पवार, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय. पदांची स्थिती अशी

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 10:11 am

संत गाडगे बाबांचा यात्रोत्सव; समाधी मंदिर लक्षवेधी:आठवडाभराच्या पुण्यतिथी महोत्सवात नामवंत कीर्तनकारांचे निरुपण; मान्यवर उपस्थित‎

अमरावती संत गाडगे बाबांचा ६९ वा यात्रा उत्सव आज रविवार, १४ डिसेंबरपासून येथील गाडगेबाबा समाधी मंदिर समोरच्या पटांगणात सुरु होत आहे. या महोत्सवानिमित्त विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. २१ डिसेंबर रोजी गाडगेबाबांचे महानिर्वाण झाले होते. त्यानिमित्त दरवर्षी आठवडाभराच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन केले जाते.यात्रोत्सवात विविध नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाची मेजवानी ऐकायला मिळणार आहे. या दरम्यान भजन, पूजन, ज्ञानदान, अन्नदान असे विविध कार्यक्रमही होतील. २० डिसेंबर, शनिवारी सकाळी दहा वाजता गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजनाने पुण्यतिथी महोत्सवाचा शुभारंभ होईल. महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त सौम्या चांडक शर्मा यांच्या हस्ते व संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब देशमुख आणि समाजसेवक डॉ. राजकुमार लंगडे व इतर मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दैनंदिन कार्यक्रमामध्ये परमपूज्य सितारामजी बाबा यांच्या कृपापात्र शिष्या सुश्री महेश्वरी देवी यांची श्रीमद् भागवत कथा आयोजित केली असून दररोज दुपारी १ ते ४.३० ही या कथेची वेळ आहे. तत्पूर्वी १४ ला दुपारी १२.३० ते १ या वेळात नामदेवरावजी रोडे यांचे स्मृतीप्रीत्यर्थ अंध अपंगांना अन्नदान केले जाईल. या ज्ञानदान सप्ताहात सहभागी व्हावे असे आवाहन विश्वस्त बापूसाहेब देशमुख व्यवस्थापक प्रकाश महात्मे व उत्सव समितीचे प्रसिद्धी प्रमुख गजानन देशमुख-दर्यापुरकर यांनी केले आहे. गुरुवारी सत्यपाल महाराजांची सत्यवाणी दररोजच्या कीर्तनासाठी देशातील नामवंत कीर्तनकारांना ही निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प नारायण महाराज पडोळे, राष्ट्रीय कीर्तनकार विवेक कुरुंदकर, राष्ट्रीय कीर्तनकार ह भ प प्रशांत महाराज ठाकरे,श्याम वानखडे यांचा समावेश असून समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांची सत्यवाणी १८ डिसेंबरला रात्री ८ वाजता सादर होणार आहे. पंकज महाराज पोहोकार यांचे राष्ट्रीय कीर्तन इतर दैनंदिन कार्यक्रमांमध्ये ह भ प लक्ष्मीबाई गहूकार यांचे गाडगे बाबांच्या जीवनावर आधारित प्रवचन, हरिपाठ, सामुदायिक प्रार्थना व त्यानंतर सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळात ज्ञानेश्वर जी सौदागरे व त्यांचा संच यांचे भक्ती संगीत सादर होईल. रात्री ९ ते १०.३० या वेळात सोनी मराठी फेम ह भ प पंकज महाराज पोहोकार यांचे राष्ट्रीय कीर्तन होणार आहे. सप्त खंजेरी वादनाचे शनिवारी आयोजन यात्रोत्सवादरम्यान २० डिसेंबरला रात्री ह भ प ऋषिकेश रेडे यांची खंजेरी एक्सप्रेस तर ह भ प भरतजी महाराज रेडे यांचा सप्त खंजिरी कार्यक्रम होईल. त्यानंतर संत गाडगे बाबांच्या महानिर्वाण बद्दल बापूसाहेब देशमुख माहिती सादर करणार आहेत. त्यानंतर सामुहिक श्रद्धांजली गीत कार्यक्रमाने स्मृतिदिन व पुण्यस्मरण कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 10:08 am

घरकुलांसाठी जिल्ह्यामधील पाच हजार अतिक्रमणे नियमानुकूल:ग्रामीण भागातील 1200 लाभार्थींना या योजनेचा लाभ‎

सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी शासन स्तरावरून जिल्ह्यातील ५ हजार घरकुलांसाठीच्या अतिक्रमित जागा नियमानुकूल करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागरी भागातील प्रामुख्याने २०११ पूर्वी अतिक्रमण असल्यास ते नियमानुकूल करण्यात आले आहे. त्यामुळे हा लाभशहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांनाही झाला आहे. सध्या पीएमएवायच्या अंमलबजावणीवर जोर दिला जात आहे. त्यासाठी शासन विविध प्रकारे प्रयत्न करीत आहे. ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत अमरावती महा पालिकेमध्ये एकूण २ हजार ८१२ अतिक्रमणे नियमानुकूल करून संबंधिताना हक्काचे घर देण्याबाबत कार्यवाही पूर्ण करण्यात आल. तसेच जिल्ह्यातील नगरपालिकांच्या शहरांमध्येही ९२० लाभार्थींना जमिनीची मालकी उपलब्ध करून घरकुल मंजूर केले आहे. त्याचवेळी ग्रामीण भागातील १२०० लाभार्थींना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्वांसाठी घरे हा अतिशय स्तुत्य उपक्रम केंद्र शासनाने हाती घेतला आहे. या उपक्रमातून समाजातील सर्व घटकांना घरे उपलब्ध करून देण्यात येत आहे. या अनुषंगाने राज्य शासनाने देखील हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून घरासाठी अनुदान मंजूर होण्यास पात्र असणारे, मात्र ज्यांच्याकडे स्वतःची जागा नाही, अशा व्यक्तींसाठी महापालिका, नगरपालिका आणि ग्रामीण क्षेत्रातील १ जानेवारी २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदरची योजना युद्ध पातळीवर पूर्ण करण्याबाबत निर्देशही दिले आहेत. याचा फायदा होणार आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेची (पीएमएवाय) अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. ज्यांच्याकडे स्वत:ची जागा आहे, त्यांच्यासाठी यामध्ये फारसे अडथळे येत नाहीत. परंतु जे शासकीय जागांवर राहतात, त्यांना अतिक्रमणधारक म्हणून त्रास होतो. अशा नागरिकांनी त्या-त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका व महापालिकेशी संपर्क साधावा. जिल्हा प्रशासनाकडून त्यांचे प्रस्ताव नियमानुकूल केले जात असल्याचेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यासाठी विभागाकडून आता जनजागृती मोहिम राबवली जात आहे. यातून नागरिकांना याची माहिती मिळेल. आता ३०५ प्रस्तावांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनीदेखील ही योजना प्राधान्याने राबवण्यावर भर दिला आहे. गेल्या आठवड्यात महापालिकेच्या समितीने सादर केलेल्या ३०५ पात्र लाभार्थींच्या यादीला जिल्हाधिकारी यांनी एका दिवसातच मंजुरी दिली आहे. ज्यामुळे महापालिकेतील समितीने पात्र केलेली सर्व प्रकरणे जिल्हास्तरावरील समितीने मान्यता देऊन त्यांना पट्टे वाटप करण्याचा मार्ग खुला केला आहे. आजमितीस जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकही प्रकरण प्रलंबित नाही.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 10:06 am

चिमुकल्यांचे नृत्य, नाट्य ठरले लक्षवेधी:बाल शिक्षण मंडळाच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन थाटात; मान्यवरांचा सहभाग‎

खापर्डे बगीचा स्थित आदर्श प्राथमिक शाळेच्या प्रांगणात बाल शिक्षण मंडळाच्या भागीरथीबाई कलंत्री बालक मंदिर, माई हर्षे प्राथमिक शाळा व बालक मंदिर ,आदर्श प्राथमिक शाळा, आदर्श पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा या सर्व शैक्षणिक शाखांचे स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी यश खोडके, प्रा. डॉ. अरविंद देशमुख, डॉ.श्रीगोपाल राठी, मनीषा आष्टीकर, अॅड. रचना पिंपळगावकर, वंदना कुळकर्णी, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्या. सोळंके, मुख्याध्यापिका आळशी, माई हर्षे, प्राथ. शाळेच्या मुख्या. विरूळकर, बाल शिक्षण मंडळाच्या निरीक्षिका मुक्ता सराफ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी औक्षण करून लेझीमच्या तालावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते हस्तकला प्रदर्शनाचे व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मान्यवरांनी कौतुक करत शाबासकी दिली. यावेळी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. यश खोडके यांच्या हस्ते त्यांनी शाळेला भेट दिलेल्या डिजिटल स्मार्ट इंटर अॅक्टिव्ह पॅनलचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अंकुर व भरारी या हस्त लिखितांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच दहावीत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केल्या गेला. कैवल्य खंडारे ह्या विद्यार्थ्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावर धनुर्विद्या या खेळात प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. एम.टी एस परीक्षेत प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा, तसेच इयत्ता चौथीत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा, पाचवीचा विद्यार्थी स्वरूप फसाटे याने जिल्ह्यातून चौथा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्याचाही सत्कार करण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 10:06 am

हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस:विधानसभेत गाजणार महत्वाचे मुद्दे, अंतिम आठवडा प्रस्तावावर सरकारतर्फे मुख्यमंत्री देतील उत्तर

नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज रविवारी शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांनी केलेल्या आरोपांना आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. त्यामुळे आज सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडण्याची शक्यता आहे. आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत प्रलंबित असलेल्या लक्षवेधी सूचनांवर संबंधित खात्याचे मंत्री उत्तरे देतील. 'या' ज्वलंत मुद्द्यांवरून सरकारची कोंडी होणार आजच्या कामकाजात विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी विविध मुद्दे तयार ठेवले आहेत

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 9:55 am

‘नवोदय’साठी 10 हजार परीक्षार्थी:ग्रामीण विद्यार्थ्यांचा मिळाला मोठा प्रतिसाद‎

पोखरापूर (ता. मोहोळ) येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गातील ८० जागांसाठी प्रवेशपूर्व परीक्षा शनिवारी सुरळीत व शांततेत पार पडली. जिल्ह्यातील ३३ परीक्षा केंद्रांवर एकूण १० हजार ८१७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असल्याचे दिसून आले. परीक्षा केंद्रांवर सकाळी १० वाजल्यापासूनच विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर प्रवेशपत्रासह परीक्षा लेखन साहित्य व ओळखपत्रासह आले होते. प्रवेशपत्र पाहून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. परीक्षा केंद्राच्या भोवताली पोलिस बंदोबस्तही होता. अर्ज रजिस्ट्रेशन क्रमांक हा लॉगीन आयडी व जन्मतारीख हा पासवर्ड होता. पंढरपूर तालुक्यात ७ परीक्षा केंद्र होते. उर्वरित तालुक्यांमध्ये एक- दोन परीक्षा केंद्रे होती. या परीक्षांसाठी ३३ परीक्षा केंद्र प्रमुखांची नियुक्ती होती. त्यांच्या सोबतीला ३३ केंद्र निरीक्षक आणि ४८९ पर्यवेक्षक होते. शिक्षणाधिकाऱ्यांच्या विशेष भरारी पथकाने परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्षेचा आढावा घेतला. तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्याही फिरत्या पथकाने केंद्रांना भेटी दिल्या. सर्वच परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा उत्साही वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. परीक्षा संपल्यानंतर मात्र, विद्यार्थी एकमेकांशी परीक्षेतील प्रश्नांविषयी चर्चा करीत होते. हमीदखाँ पठाण, मुख्याध्यापक जि. प. प्रा. शाळा चंदननगर( लांबोटी) शिस्तीत झाली परीक्षा, गैरप्रकार घडला नाही सर्वच परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पारदर्शी व शिस्तीत पार पडली. ९३ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक होता. - सचिन जगताप, शिक्षणाधिकारी. परीक्षेतील काठीण पातळी जास्त होती नवोदयच्या परीक्षेसाठी १०० मार्कांसाठी ८० प्रश्न असतात. एका प्रश्नाला १.२५ मार्क आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत बुध्दीमत्ता चाचणी व भाषेचे प्रश्न सोडले तर गणिताचे ४ प्रश्न कठीण होते. विद्यार्थ्यांचे वय आणि त्यांच्या बुध्दीनुसार प्रश्नांची काठीण्य पातळी जास्तच होती. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी गणिताचे प्रश्न अवघड असल्याचे सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 9:55 am

बार्शी लोकअदालतीत 1469 प्रकरणे निकाली:लोकअदालतीचे कामकाज पाहण्यासाठी सात पॅनलची नियुक्ती‎

येथील न्यायालयात शनिवारी (दि.१३) आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय महा लोकअदालतीत एकूण १ हजार ४६९ प्रकरणे तडजोडीने निकाली काढून ३ कोटी ७५ लाख २१ हजार ९१६ रूपयांचा महसूल जमा करण्यात आला. बार्शी तालुका विधी सेवा समिती व वकिल संघ बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा समिती बार्शीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश वर्ग १ विक्रमादित्य के. मांडे यांचे अध्यक्षतेखाली शनिवारी राष्ट्रीय महा लोक अदालतमध्ये २३१ प्रलंबित दिवाणी तसेच तडजोड पात्र फौजदारी खटले व दाखल पुर्व १२३८ असे एकुण १ हजार ४६९ प्रकरणे तडजोडीने मिटवून प्रलंबित प्रकरणात अनुक्रमे ३ कोटी २६ लाख ६६ हजार ८२४ व दाखल पुर्व प्रकरणांत ४८ लाख ५५ हजार ९२ रुपयांची वसुली झाली. या राष्ट्रीय महा लोकअदालतीत बार्शी न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी असे ३७३८ व दाखल पुर्व ४६२४ असे एकुण ८३६२ प्रकरणे लोकअदालत पॅनलमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या लोकअदालतीचे कामकाज पाहण्यासाठी एकुण सात पॅनल करण्यात आले होते. या पॅनलमध्ये जिल्हा न्यायाधीश विक्रमादित्य के. मांडे, जिल्हा न्यायाधीश वर्ग २ व्ही. एस. मलकलपटट्टे रेड्डी , दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पी. बी. लोखंडे, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर पी. व्ही. राऊत, २ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर जी. एस. पाटील, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर एच. यु. यु. पाटील, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर आर.पी. बागडे यांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे पॅनल क. ३ मधील दिवाणी न्यायालय व स्तर पी. बी. लोखंडे यांचे न्यायालयातील १० वर्षे जुनी दरखास्त तडजोडीने निकाली काढण्यात आले. न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र फौजदारी प्रकरणांत १२ इतकी प्रकरणे व कबुलीची ९२ प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. त्यात सुमारे ८० हजार ७०० रुपयांची दंड वसुली करण्यात आला. या लोकअदालतीमध्ये पक्षकारांनी मोठ्या प्रमाणांत सहभाग नोंदविला. राष्ट्रीय महालोकअदालत यशस्वितेसाठी बार्शी वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.रणजित गुंड, पॅनल विधीज्ञ, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, बँका यांचे प्रतिनिधी यांचे विशेष सहकार्य लाभले. मोटार अपघाताची दोन प्रकरणे मिटवले जिल्हा न्यायालयातील मोटार अपघात प्रकरणांत एकुण २ प्रकरणे तडजोडीने मिटुन त्यात सुमारे ३२ लाख ५० हजार इतक्या रकमेची नुकसान भरपाई मंजुर करण्यात आली. एन. आय. ऍक्ट १३८ च्या एकुण १७ प्रलंबित प्रकरणांत तडजोड होवुन त्यात सुमारे ३२ लाख २८ हजार ५१ रुपयांची वसुली, तर रक्कम वसुलीच्या ४२ प्रकरणांत तडजोड होवुन त्यात २ कोटी ५६ लाख ८४ हजार ६६९ रुपयांची वसुली झाली.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 9:54 am

गोपाळपुरात विष्णुपदावर गर्दी, भोजनासाठी भाविकांची झुंबड:अखेरच्या शनिवार आणि रविवारी 50 हजाराहून अधिक भाविकांची गर्दी‎

मार्गशीर्ष महिन्यातील अखेरच्या शनिवार आणि रविवारी गोपाळपूर येथील श्री विष्णुपद येथे दर्शनासाठी दररोज ५० हजाराहून अधिक भाविकांची गर्दी होत आहे, तसेच या ठिकाणी हजारो भाविकसह भोजनाचा आस्वाद घेत आहेत. दरम्यान, भाविकांची प्रचंड गर्दी होत असताना सुरक्षेसाठी पुरेसे पोलीस बळ दिसत नाही, तसेच धोकादायक हॉटेल्स आणि रस्त्याच्या कडेला बसलेल्या विक्रेत्यांमुळे भाविक हैराण झालेले आहेत. गोपाळपूर येथील विष्णुपद हे तीर्थस्थान वारकरी संप्रदायात श्रद्धेचे स्थान आहे, मार्गशीर्ष महिन्यात साक्षात विठ्ठल विष्णुपद येथे गाई चारण्यासाठी गोपाळांसोबत जातो, तिथेच महिनाभर वास्तव्यास असतो, त्याच ठिकाणी गोपाळांसोबत सह भोजन घेतो, अशी आख्यायिका सांगितली जाते, त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात विष्णुपद येथे भाविकांची मोठी गर्दी होते. पंढरीत विठ्ठल दर्शनासाठी आलेला प्रत्येक वारकरी विष्णुपद येथे जाऊन भीमा नदीच्या पात्रातील मंदिरात असलेल्या गाईच्या खुरांचे दर्शन घेतो. तसेच याच ठिकाणी असलेल्या वनात सहभोजन घेतो. यंदाचा मार्गशीर्ष महिना आता अंतिम टप्प्यात आलेला आहे, येत्या शुक्रवार पासून भाद्रपद महिना सुरु होत आहे, त्यामुळे अखेरच्या शनिवार आणि रविवार रविवार सुट्टीचे दिवस साधून पंढरपूर शहर आणि तालुक्यातील हजारो भाविकांची विष्णुपद येथे दर्शन आणि वन भोजनासाठी गर्दी होत आहे. त्यातून वाट काढत भाविकांना चालावे लागते. धोकादायक हॉटेल्स आणि खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल्स रस्त्यावर अतिक्रमण केले विष्णुपदाकडे जाणारा रास्ता अतिशय अरुंद आहे, आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रासादिक वस्तू, चुडे, बांगड्या आदी सौभाग्य अलंकार, फळे विक्रेत्यांनी पथाऱ्या पसरलेल्या असतात. त्यातून वाट काढत भाविकांना चालावे लागते. शिवाय मोटार सायकली, रिक्षा यातूनच चालत असतात. त्यामुळे भाविकांना चालणे अवघड होऊन जाते. याच बरोबर नदीच्या अगदी किनाऱ्यावर हॉटेल्सच्या गॅस शेगड्या पेटलेल्या आणि उकळत्या तेलाच्या कढई दिसून येतात. रसपान गृहे, खाद्य पदार्थ विक्रीचे स्टॉल्स रस्त्यावर अतिक्रमण करून ठेवलेले दिसतात. मात्र पोलीस या अतिक्रमणाला मनाई करीत नाहीत असे दिसते.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 9:53 am

3000 जणांनी घेतला आमटीचा आस्वाद‎:औदुंबर कुंभार यांच्याकडून गेल्या 21 वर्षांपासून गाव जेवणाची पंगत‎

करकंबची बाजार आमटी म्हटलं की, जो तो ती खाण्यासाठी धडपडत असतो. ही बाजार आमटी आता महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरील राज्यातही प्रसिद्ध झाली असून अनेक खवय्यांची मागणी होताना दिसत आहे. प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी करकंबच्या औदुंबर, अरुण व अशोक बंधूंच्या वतीने सर्व ग्रामस्थ व मित्र परिवारांना बाजार आमटीचे आमंत्रण देण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून जेवणासाठी लोक येऊ लागले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत जेवणाच्या पंगती चालू होत्या. गेल्या २१ वर्षांपासून कुंभार बंधू ८ डिसेंबरला बाजार आमटीचे जेवण देत असतात. पण यावर्षी ८ तारखेला सोमवार आल्याने व गावचा आठवडी बाजार असल्याने त्याचे नियोजन शुक्रवारी १२ तारखेला करण्यात आले. जवळपास ९०० लिटर बाजार आमटी तयार करण्यात आली होती. याचा आस्वाद जवळपास ३ हजार जणांनी घेतला. प्रत्येक वर्षी ८/१२ या तारखेला सर्व मित्र परिवार व आप्तेष्टांना बाजार आमटीचे जेवण देत आहे. गेली २०/२२ वर्षे झाली हा उपक्रम चालू आहे. समाजऋण म्हणून हे चालू आहे. गेल्या दोन वर्षांत आमच्या कुंभार बंधूंच्या बाजार आमटीच्या मिक्स मसाला पॅकेजला भरपूर मागणी वाढली आहे. याच बरोबर शिपी आमटी, गावरान भरलं वांग, गावरान झुणका (पिठलं) या प्रिमिक्सलाही मागणी आहे. बाजार आमटी बरोबर चपाती, भाकरी कांदा, लिंबू, शेंगदाणे, काकडी इत्यादी ही असते त्यामुळे खाताना कोणताही त्रास जाणवत नाही, असे औदुंबर कुंभार यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 9:53 am

उसाला 3 हजारांचा पहिला हप्ता द्या:अन्यथा सोमवारपासून गव्हाण बंद, स्वाभिमानी संघटनेचा कारखान्यांना इशारा

मंगळवेढा तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामात येणाऱ्या उसाचा पहिला हप्ता प्रति टन ३ हजार रुपये जाहीर करावा, अन्यथा सोमवारपासून तालुक्यातील सर्व कारखान्यांची ऊस गव्हाण बंद ठेवण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी दिला आहे. ते संत दामाजी कारखान्यावर बोलत होते. उसाच्या दरांसाठी सोलापूर जिल्ह्यात आंदोलन पेटले असून सर्वच शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पहिला हप्ता ३ हजार रुपयांनी जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी ठामपणे उभे राहिले. यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाने दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.चेअरमन शिवानंद पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी रविवारी संचालक मंडळाची बैठक असून, या बैठकीत शेतकरी हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी दामाजीसह तालुक्यातील सर्व साखर कारखान्यांनी रविवारपर्यंत ऊस दर जाहीर करावा, अन्यथा सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी एकत्र येऊन मंगळवेढा तालुक्यातील सर्व कारखान्यांची ऊस गव्हाण दर जाहीर होईपर्यंत बंद ठेवू, असा ठोस इशारा दिला. आंदोलनावेळी युवराज घुले, श्रीमंत केदार, अनिल बिराजदार, आबा खांडेकर, शंकर संगशेट्टी, पांडुरंग बाबर, रोहित भोसले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 9:51 am

सीना नदीच्या पूरग्रस्तांसाठी विशेष पॅकेज मंजूर करावे:आमदार अभिजीत पाटील यांनी अधिवेशनात केली मागणी‎

मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि भीषण पुरपरिस्थितीमुळे अभूतपूर्व संकट ओढवले होते. सीना नदीला जवळपास ९०० क्युसेस पाण्याची क्षमता असताना एका रात्रीत तब्बल २ लाख १२ हजार क्युसेस पाणी नदीपात्रात आले. यामुळे माढा तालुक्यातील १७ गावे पूर्णतः जलमय झाली. अनेकांच्या घरांवर २० ते २५ फूट पाणी आले आणि मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. गावाच्या गावात उध्वस्त झाले. या भागातील नुकसानग्रस्तांसाठी विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी आमदार अभिजीत पाटील यांनी अधिवेशनात केली. माढा तालुक्यावर १०० वर्षांत असा महापूर आला नाही. या संकटातून नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सीना नदीच्या पुराची पाहणी केली. अतिशय भयान परिस्थितीमध्ये माढा तालुक्यातील नागरिकांनी या संकटाचा सामना केला. शासनाने जाहीर केलेले पॅकेज अपूरे असून, माढा तालुक्यास सोलापूर जिल्ह्याला स्वतंत्र विशेष पॅकेज देणे अत्यावश्यक आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार पाटील यांनी माढा मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी आणि महापुरामध्ये विस्कटलेला संसार उभा राहण्यासाठी सरकारकडे विशेष पॅकेजची मागणी केली.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 9:47 am

पोतरा शिवारात बिबट्यांचा धुमाकूळ; वासराची शिकार:अहिल्यानगर, परभणी येथून पिंजरे मागवले, ट्रॅप कॅमेरे वाढविणार

कळमनुरी तालुक्यातील पोतरा शिवारात शिकार केलेल्या वासराचा बिबट्यांनी फडशा पाडल्याचे रविवारी ता. 14 सकाळी आढळून आले आहे. त्यामुळे आता या भागात पिंजऱ्यांची संख्या वाढविली जाणार असून अहिल्यानगर व परभणी येथून प्रत्येकी एक पिंजरा मागविण्यात आला आहे. या शिवाय ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्या 15 वरून 25 पर्यंत केली जाणार आहे. कळमनुरी तालुक्यातील पोतरा व तेलंगवाडी शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेलंगवाडी शिवारात काशीराम मोदे यांच्या शेतातील दोन शेळ्यांचा फडशा पाडल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी ता.13 बिबट्याने पोतरा शिवारातील गजानन पतंगे यांच्या शेतातील वासराची शिकार केली. या घटनेनंतर विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने, वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल शिवाजी काळे, वनरक्षक सुधाकर कऱ्हाळे, खंडागळे, योगीता सहारे यांच्या पथकाने पाहणी करून पिंजरा लावण्याची तयारी केली होती. त्यानुसार शनिवारी ता. 13 रात्री पोतरा शिवारात एक पिंजरा लाऊन त्यात शेळी बांधली होती. दरम्यान, आज सकाळी पाहणी केल्यानंतर पिंजऱ्यात बिबट्या आलाच नाही. तर पोतरा शिवारात पतंगे यांच्या शेतात वासराची शिकार केलेल्या ठिकाणी बिबट्या आला अन त्याने या शिकारीचा फडशा पाडल्याचे रविवारी ता. 14 सकाळी दिसून आले आहे. त्यामुळे आता वन विभाग अलर्ट मोडवर आले असून या परिसरात आणखी दोन पिंजरे लावण्याची तयारी चालवली आहे. त्यासाठी अहिल्यानगर व परभणी येथून प्रत्येकी एक पिंजरा मागविण्यात आला आहे. त्यानंतर आज या परिसरात तीन पिंजरे बसविले जाणार आहेत. या शिवाय ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्याही 15 वरून 25 केली जाणार असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. सायंकाळपर्यंत दोन्ही ठिकाणचे पिंजरे पोतरा येथे येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या परिसरात वन विभागाचे तब्बल 25 पेक्षा अधिक कर्मचारी गस्तीसाठी तैनात करण्यात आले आहे. बिबट्यांना जेरबंद करण्याचे प्रयत्न- मीनाक्षी पवार, वन परिक्षेत्र अधिकारी या भागात एक मादी बिबट्या व दोन बछडे असल्याची शक्यता आहे. या बिबट्यांना जेरबंद करण्याचे वन विभागाचे प्रयत्न असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करून आवश्‍यक त्या ठिकाणी पिंजरे लावले जात आहेत. शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्‍यक या भागात एक बिबट्या व दोन बछडे शेतकऱ्यांच्या नजरेस पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्‍यक आहे. शेतात एकट्याने जाऊ नये तसेच शेतात जाणे आवश्‍यक असल्यास गटाने जावे तसेच जातांना मोबाईलवर गाणे ऐकत किंवा एकमेकांशी बोलत जावे. त्यामुळे बिबट्या जवळ येणार नाही.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 8:54 am

ज्येष्ठ लेखक बब्रूवान रूद्रकंठावार उर्फ धनंजय चिंचोलीकर यांचे निधन:वयाच्या 61 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखक बब्रूवान रूद्रकंठावार उर्फ धनंजय चिंचोलीकर यांचे आज निधन झाले. त्यांनी वयाच्या 61 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील प्रतापनगर स्मशानभूमीत आज सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. ..हे वृत्त अपडेट होत आहे

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 8:28 am

भारत देश महासत्ता होण्यासाठी कौशल्ये आत्मसात करावीत':पीएमश्री विद्यालयात वार्षिक महोत्सव, विद्यार्थ्यांनी सादर केले कलाकौशल्य‎

भारत देश हा जगातील क्रमांक एकची महासत्ता होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच या कौशल्यांच्या सहाय्याने देशाच्या आर्थिक विकास योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन व्हीआरडीईचे संचालक जीआरएम राव यांनी केले. पीएमश्री केन्द्रीय विद्यालय येथे वार्षिक महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. व्हीआरडीईचे संचालक जीआरएम राव व महिला संघाच्या अध्यक्षा माधवी राव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या महोत्सवात विद्यार्थीनींनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. भारतातील सांस्कृतिक विविधता आणि एकात्मता वेगवेगळ्या नृत्य, गीतगायन व नाटक सादरीकरणातून दाखवण्यात आली. भारतीय संस्कृती आणि सांस्कृतिक एकात्मता यांचे दर्शन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घडवले. राव पुढे म्हणाले, भारत देश आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे आणि त्यासाठी केंद्रीय विद्यालय संगठन कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या नवोक्रपमांच्या मदतीने कार्य करत आहे. प्राचार्य लोंढे यांनी विद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे नमूद केले. या कार्यक्रमात केवीएस क्षेत्रिय कार्यालय, मुंबईकडून दहावी व बारावीच्या परीक्षेत १०० % निकाल दिल्याबद्दल शिक्षकांना पुरस्कार व प्रशस्तीपत्र माधवी राव यांच्या हस्ते देण्यात आले. शैक्षणिक यशाबद्दल व सह-शैक्षणिक उपक्रमातील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके व प्रमाणपत्रे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली. डीआरडीओ नेहमीच शालेय शिक्षणात प्रभावीपणे आपले योगदान देत आले आहे. विशेषतः या विद्यालयाच्या विकासासाठी भविष्यात सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. विद्यालयात अधिक एक तुकडी मंजूर करण्यात केवीएसने सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 8:13 am

ऊस तोडीचा हंगाम सुरू असल्याने सध्या शेतात लपलेले बिबटे बाहेर:5 वर्षांत बिबट्याच्या हल्ल्यात 27 ठार, जिल्ह्यातील 970 गावांत दहशतीचे सावट‎

आहील्यानगर जिल्ह्यात ग्रामीण तसेच शहरालगतच्या मानवी वस्तीत बिबट्यांचा मुक्त संचार झपाट्याने वाढत आहे. शेतकरी, मेंढपाळ आणि सर्वसामान्य नागरिक प्रचंड भयभीत झाले आहेत. विशेषतः ऊस तोडणीचा हंगाम सुरू असल्याने उसाच्या दाट शेतात लपलेले बिबटे अचानक बाहेर पडत आहेत. यामुळे शेळ्या-मेंढ्या, कुक्कुट, वासरे यांच्यासह माणसांवरही हल्ल्यांच्या घटना सातत्याने वाढत आहेत. बिबट्यांच्या भीतीमुळे अनेक भागांत मजूर शेतात काम करण्यास नकार देत आहेत. परिणामी उभी पिके, पाणी देणे, निगा राखणे अशी कामे अक्षरशः “राम भरोसे” सुरू आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे नदीकाठच्या जंगलातील बिबटे आता जिरायती व मानवी वस्तीकडे सर्रास वळले आहेत. गेल्या काही महिन्यांत बिबट्यांच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर पशुधन दगावले असून मेंढपाळ, गुराखे आणि शेतकरी पूर्णपणे धास्तावले आहेत. जिल्ह्यात सध्या अंदाजे १,१५० बिबट्यांचा मुक्त संचार आहे. ९७० गावे बिबट्याप्रवण ठरली आहेत. दरम्यान, बिबट्यांचा जंगलाबाहेरचा वावर रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांनी मांडलेला ‘शेळ्या जंगलात सोडाव्यात’ हा उपाय ग्रामीण भागात संताप आणि टीकेचा विषय ठरला आहे. शेळ्या जंगलात सोडून बिबट्यांचा प्रश्न सुटणार आहे का? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. वन्यप्राण्यांपेक्षा नागरीकांचे व शेतीचे संरक्षण महत्त्वाचे असल्याची भावना व्यक्त होत आहे. वनविभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू, तर १७८ जण जखमी झाले आहेत. केवळ गेल्या वर्षभरात ८ मानवी मृत्यू झाले असून ४,५१२ पशुधनावर बिबट्यांनी हल्ले केले आहेत. या वाढत्या घटनांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांबाबतचे विद्यमान कायदे बदलून माणसांच्या आणि शेतीच्या संरक्षणासाठी ठोस धोरण राबवावे अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासन व वनविभागाने तातडीने उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय बिबट्याप्रवण गाव संख्या तालुकानिहाय पाहता अकोले (१९१), संगमनेर (१७१), पारनेर (१३१), नेवासे (१२७), राहुरी (९६), कोपरगाव (७९), श्रीरामपूर (५६), शेवगाव (२४), अहिल्यानगर (२०) आणि श्रीगोंदे (१४) तालुके सर्वाधिक बिबट्याप्रवण ठरले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 8:11 am

रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात‎उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू‎:रस्ते नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य व्हावे यासाठी उपोषण- बनकर

शिरूर–श्रीगोंदे सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जा व अनियमितता होत असल्याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते अनिल नामदेव बनकर यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. हे उपोषण गुरुवारपासून ११ डिसेंबर सुरू आहे. प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलन अधिक तीव्र होत आहे. हे आंदोलन वैयक्तिक स्वार्थासाठी नसून, शिरूर–श्रीगोंदे रस्त्याचे काम दर्जेदार, टिकाऊ व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य व्हावे, या उद्देशाने करण्यात येत असल्याचे बनकर यांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या सिमेंट काँक्रेटच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. खडी उघडी पडली आहे. तसेच पुलाच्या कामात वापरण्यात आलेले. पाइप हे मंजूर इस्टिमेटप्रमाणे नसल्याचे निदर्शनास आले आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. या संदर्भात बनकर यांनी प्रशासनासमोर पुढील मागण्या ठेवल्या आहेत. झालेल्या पुलांच्या कामाचे बिल संबंधित ठेकेदारास देऊ नये. सदोष सिमेंट काँक्रेट रस्ता काढून पुन्हा नव्याने करावा. पुलांमध्ये इस्टिमेटनुसार पाइप वापरून काम करण्यात यावे. रस्त्यावर पाण्याच्या टँकरची संख्या वाढवून दररोज किमान तीन वेळा पाणी मारावे. कामात स्क्रॅपिंग मशीनचा वापर करावा. इस्टिमेटप्रमाणे लांबी व जाडी नसलेले काम काढून पुन्हा करावे व तोपर्यंत काम बंद ठेवावे. रस्त्याची रुंदी ७ मीटरवरून १० मीटर करण्यात यावी. सध्या काम करत असलेला ठेकेदार बदलण्यात यावा. या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 8:08 am

छावा अन् ऑपरेशन सिंदूरने गाजले स्नेहसंमेलन:केडगावातील ओंकारनगर मनपा शाळेत स्नेहसंमेलनाला पालक, नागरिकांचा प्रतिसाद‎

छावा, कोळीगीत, आदिवासी नृत्य, वंदे मातरम, ऑपरेशन सिंदूरच्या सादरीकरणाने शुक्रवारी सायंकाळी केडगावातील आयएसओ मानांकन प्राप्त ओंकारनगर मनपा प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन गाजले. शाळेच्या प्रांगणात झालेल्या या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी पोस्ट मास्तर संतोष यादव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका सुनिता कोतकर, सविता कराळे,माजी नगरसेवक अमोल येवले, सुनील कोतकर,उपायुक्त शाहनवाज तडवी,सोमनाथ बनकर,बलभीम कर्डिले, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मधुबाला चोरडिया, पोलिस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड, तुषार देशमुख,अशोक कुरापाटी, दादासाहेब शेळके, विक्रम लोखंडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी केले. यावेळी शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व इयत्ता दहावी परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी कोळीगीत, आदिवासी नृत्य, अशा गीतांवर नृत्यांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या समूहनृत्याला उपस्थित प्रमुख पाहुणे, पालक व नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला. त्याचबरोबर 'छावा, वंदे मातरम, ऑपरेशन सिंदूर, मतदान जनजागृती अशा विषयांवरील सादरीकरणही उपस्थितांना भावले. अनेक सादरीकरणांना उपस्थितांनी प्रतिसाद देत बक्षिसांचा वर्षाव केला. यावेळी मनपा शाळांचे मुख्याध्यापक अक्षय सातपुते, विजय घिगे, शशिकांत वाघुलकर, संदीप राजळे, अनिल बडे, युवराज मोरे, योगेश राजळे, विठ्ठल आठरे,प्रियंका पुंडे, प्रशांत पुंडे उपस्थित होते. स्वागत शिवराज वाघमारे यांनी, सुत्रसंचलन अरुण पवार यांनी, तर आभार वृषाली गावडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्विततेसाठी शिवराज वाघमारे, वृषाली गावडे, पल्लवी भुजबळ, दुर्गा घेवारे, प्राजक्ता शिंदे, कवित वाघमारे, प्रियंका लोळगे, दीपाली साळवे, पूनम बडे, शिलाबाई देसाई, सायली पवार यांनी परिश्रम घेतले. ओंकारनगर मनपा शाळेचा प्रवास प्रेरणादायी आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रशासकीय शिस्त, पारदर्शकता व विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमुळे ही शाळा जिल्ह्यात आदर्श ठरत आहे. लोकसहभागातून राबवण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम या शाळेच्या गुणवत्तेचे उत्तम उदाहरण आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या व डिजिटल शिक्षणाची गरज लक्षात घेता शाळेसाठी नवीन वर्गखोल्या उपलब्ध करून दिल्याबद्दल मनपा प्रशासनाचे आभार. स्मार्ट क्लासरूम, प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा सुविधा वाढवण्याची गरज पोस्ट मास्तर संतोष यादव यांनी व्यक्त केली. उपक्रमांमुळे शाळा जिल्ह्यात ठरतेय आदर्श

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 8:08 am

कार अपघातामध्ये आई-मुलाचा मृत्यू:पाथर्डी–शेवगाव राज्य मार्गावर डांगेवाडी शिवारातील घटना

पाथर्डी–शेवगाव राज्य मार्गावर डांगेवाडी शिवारात झालेल्या भीषण समोरासमोरच्या कार अपघातात आई व मुलाचा मृत्यू झाला. या अपघातात सुनिता नवनाथ आव्हाड (वय ३१) व त्यांचा मुलगा जयेश नवनाथ आव्हाड अशी मृतांची नावे आहेत. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. पाथर्डी–शेवगाव रोडवरील आव्हाड वस्ती येथे वास्तव्य असलेले हे कुटुंब पाथर्डी येथून घरी जात असताना शुक्रवारी सायंकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास फोर्ड इकोस्पोर्ट व स्विफ्ट कार यांच्यात डांगेवाडी शिवारात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारमध्ये प्रवासी अडकून पडले. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक उपनिरीक्षक नितीन दराडे, हेडकॉन्स्टेबल भगवान गरगडे, सुखदेव धोत्रे, सचिन गणगे, संदीप नागरगोजे, बाबासाहेब बडे, अमोल जवरे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा रस्सीने बांधून एका बाजूला झाडाला गाडी बांधण्यात आली, तर दुसऱ्या बाजूने ट्रॅक्टरला दोर लावून दरवाजा उघडण्यात आला. त्यानंतर सुनिता आव्हाड व इतर जखमींना बाहेर काढले. मात्र उपचारापूर्वीच सुनिता आव्हाड व त्यांचा मुलगा जयेश यांचा मृत्यू झाल्याचे अहिल्यानगर येथे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघातात जखमी तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 8:07 am

दोन कुटुंबाचा दुभंगलेला संसार पुन्हा जुळवला, 234 प्रकरणे निकाली:8 लाख 24 हजार 887 रुपयांची वसुली, अनेकांना दिलासा‎

कौटुंबिक कलहातून दोन कुटूंबाचा दुभंगलेला संसार समुपदेशनाने पुन्हा जुळविण्यात आला. शनिवार (१३ डिसेंबर) रोजी पाटोदा न्यायालयात पार पडलेल्या लोकन्यायालयात पार पडलेल्या समुपदेशनानंतर पती-पत्नीने वाद संपवून एकत्रीतपणे राहण्याचा निर्णय घेतला.या लोकन्यायालयात इतरही २३४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्याच प्रमाणे वेगवेगळ्या प्रकरणातून ८ लाख २४ हजार ८८७ रुपयांची वसूली केली. हे लोकन्यायालय पाटोदा न्यायालयाचे मुख्य दिवाणी न्यायाधीश एम. ए. शिंदे, वडवणी न्यायालयाचे न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. पती-पत्नीत मतदभेद, वाद विवाद होतच असतात परंतु यातूनच होणारा कौटूंबिक कलह दोघांचेही जीवन उध्दवस्त करतो. अशा दांपत्यांच्या जीवनातील कलहाला दुर करुन त्यांची संसार पुन्हा जुळवण्यासाठी लोकन्यायालयाच्या माध्यमातून समुपदेशन केले जाते. अशाच प्रकारे पाटोदा येथे पार पडलेल्या लोकन्यायालयात दोन कुटूंबाचा वाद मांडण्यात आला. पॅनल क्रमांक १ चे प्रमुख दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर एम.ए. शिंदे, सदस्य बी.जी. थोरवे, पॅनल क्रमांक २ चे प्रमुख म्हणुनी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व्ही. डी. गीते, विधीज्ञ बी.आर. लऊळ यांनी या प्रसंगी समुपदेशनाचे कर्तव्य पार पाडले. सदर लोकन्यायालयात चालू वर्षातील एकूण ८८५ दाखल प्रकरणांपैकी २३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये दोन कौटुंबिक वादांमध्ये समेट घडवून पती-पत्नींचे वैवाहिक जीवन पूर्ववत करण्यात आले. दाखल असलेल्या ८९८ प्रकरणांपैकी २११ प्रकरणे यशस्वीपणे निकाली निघाली . लोकन्यायालय माणुसकीचे व्यासपीठ लोकन्यायालयाच्या माध्यमातून प्रकरणे समुपदेशन व समन्वयाने निकाली काढली जातात. आरोप-प्रत्यारोप आणि निर्णयाच्या प्रतिक्षेत न्यायालयाच्या चकरा मारण्याऐवजी पक्षकारांनी लोकन्यायालयाच्या माध्यमातून समन्वयातून प्रकरणे निकाली काढल्यास वाद त्वरीत मिटत आहेत. यामुळे लोकन्यायालय हे केवळ प्रकरणे निकाली काढण्याचेच नव्हे तर समाजाता सलोखा, समेट आणि माणुसकी जपणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे अधोरेखीत झाले आहे. या लोकन्यायालयातून अनेकांना दिलासा मिळाला .

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 7:34 am

थोरात वस्ती परिसरातील विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचा मार्ग 24 वर्षांपासून बंदच:खंडाळा-पानगव्हाण प्रकल्प क्षेत्रात रस्ता गेल्याने गैरसाेय‎

वैजापूर तालुक्यातील खंडाळा-पानगव्हाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात रस्ता गेल्याने विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांच्या दळणवळणाचा कायमचा मार्ग बंद झाला असल्याने शेताची बांध ओलांडत जीव मुठीत धरुन नदी काठावरून ये-जा करण्याची वेळ येऊन ठेपली असल्याने लवकरात लवकर या रस्त्यावर पुल बांधण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जिल्हा परिषद सिंचन विभागाने गावाजवळ २००१ मध्ये पाझर तलाव बांधला. त्यामुळे बहुतांश शेती सिंचनाखाली आली व पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात दूर झाली. प्रकल्पाच्या पश्चिम दिशे कडील कायमचा असलेला १२ फुटी गाडीवाट धरणाच्या पाणलोट क्षेत्राखाली गेल्याने रस्त्याच्या उत्तरेकडील खंडाळा गावातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या दळण वळणाचा असलेला हा मार्ग कायमचा बंद झाला. थोरात वस्ती परिसरातील विद्यार्थ्यांना परिसरातच शिक्षण मिळावे यासाठी माझ्या मालकीची पाच गुंठे जागा शाळेला दान दिली. परंतु प्रकल्प झाल्यापासून प्रकल्पाचे बॅकवॉटर रस्त्यावर थांबून राहिल्याने या परिसरातील शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांचा कायमचा रस्ता बंद झाला. अनेक वेळा आम्ही पत्रव्यवहार केला होता. तहसीलदार व आमदार येऊनही प्रश्न सुटला नाही. ^खंडाळा केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळेवर जाण्यासाठी अनेक वर्षापासून रस्ता नसल्याने विद्यार्थ्यासह शिक्षकांना देखील शेतीच्या बांधावरून पायपीट करावी लागत आहे. पंचायत समिती या कार्यालयांना पत्रव्यवहार करुणदेखील रस्ता नाही. -बबनराव तगरे, केंद्रप्रमुख खंडाळा. खंडाळा येथून दीड किमीवर थोरात वस्तीवर जिल्हा परिषदेची शाळा असून येथील शाळेत १ ते ४ पर्यंत वर्ग आहेत. २१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच ५ वीपासून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना गावातील जिल्हा परिषद प्रशालेत यावे लागते. परंतु जाण्यासाठी मधेच बोर नदी असून विद्यार्थ्यांना या बोर नदीतून जाने शक्य नाही. बोर नदीवर प्रकल्प झाल्याने या नदीत कायम मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने विद्यार्थ्यांना व परिसरातील नागरिकांना पर्याय नसल्याने त्यांना बांध तुडवत व नदीकाठावरून ये-जा करावी लागत आहे. यामुळे मुलांचा जीव धोक्यात असून यावर उपाययोजना कराव्यात. प्रशासनाला पत्रव्यवहार

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 7:25 am

जागृत मारुती मंदिर शफेपूर येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा सप्ताह म्हणून ख्याती‎

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा म्हणून ख्याती असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची उद्यापासून सुरुवात होणार आहे. येथील शेफेपूर भागातील जागृत मारुती मंदिर येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी दि .१४ रविवार पासून अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ होत आहे. कथा प्रवक्ते गुरुवर्य भानुदास महाराज चातुर्मास अन्वेकर यांच्या काल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता दि .२१ रोजी होणार आहे. या सप्ताहात सकाळी चार ते सहा काकडा भजन, सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण व दुपारी ११ ते २ शिव महापुराण कथा होईल. ५ ते ७ हरीपाठ व रात्री ८: ३० ते ११ पर्यंत कीर्तन व हरीजागर होईल. व्यासपीठाचे वाचक पुढील प्रमाणे- ह. भ. प. एकनाथ सपकाळ, ह. भ. प. सूर्यकांत मोकासे, ह. भ. प. विष्णु मोकासे, ह. भ. प. काळुबा ओपळकर व ह. भ. प. विठोबा मोकासे हे ज्ञानेश्वरीचे वाचक आहेत. तसेच या अखंड हरिनाम सप्ताहात महाराष्ट्रातील नामांकित विचारवंत, कीर्तनकारांचे अमृततुल्य वाणीतून विचार श्रवण करण्यास मिळणार आहे. दिनांक १४ रविवार रोजी ह. भ. प. समाधान महाराज शर्मा, दिनांक १५ सोमवार रोजी ह.भ.प. अर्जुन महाराज मोटे (परभणी), दिनांक १६ मंगळवार रोजी ह.भ.प. विशाल महाराज खोले (मुक्ताईनगर), दिनांक १७ बुधवार रोजी ह. भ. प. संजय बाबा पाचपोर (विदर्भ), दिनांक १८ गुरुवार रोजी ह. भ. प. संग्राम बापू भंडारे (पुणे), दिनांक १९ शुक्रवार रोजी ह. भ. प. संतोष वनवे (बीड), दिनांक २० शनिवार रोजी ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली कदम (आळंदी), व दिनांक २१ रविवार रोजी ह. भ. प. गुरुमाऊली बाबा महाराज चातुर्मासे अनवे यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता होणार आहे. त्यान‌ंतर दुपारी दोन ते चार महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मृदंगाचार्य ह.भ.प. गिरजानाथ महाराज जाधव, ह. भ. प. महेश महाराज कावले व ह. भ. प. कृष्णा महाराज मोरे, ह. भ. प. शंकर महाराज साबळे व ह. भ. प. शंकर महाराज हे गायनाचार्य असणार आहे . दिनांक मंगळवार रोजी कुमारी हर्षदा ताई ठाकूर हिंदुजागरण मंच यांचे व्याख्यान दुपारी १२ ते २ या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी या अखंड हरिनाम सप्ताहाचा परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शफेपूर पंच कमिटी व ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. दरवर्षी या होणाऱ्या या भव्य अशा धार्मिक सोहळ्याप्रसंगी परिसरातील वातावरण अत्यंत धार्मिक झाल्याचे बघायला मिळते. तसेच ग्रामस्थ व भाविकांमध्ये यावेळी मोठा उत्साह दिसुन येतो. भाविकांची सोहळ्यास गर्दी असते. मोफत रोगनिदान शिबिराचे देखील आयोजन दरम्यान दिनांक १८ गुरुवार रोजी सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत सर्व मोफत रोग निदान शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. यात एम.आय. टी. हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर असणार आहेत . यात आरोग्य समस्यांची मोफत तपासणी तसेच निदान करण्यात येणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 7:23 am

कन्नड येथे अतिरिक्त व सत्र न्यायालयास मिळाली मान्यता:कन्नडसह खुलताबाद, सोयगाव तालुके न्यायालयाशी संलग्न‎

कन्नड न्यायालयाची व्याप्ती वाढवून आता अतिरिक्त सत्र व वरिष्ठ न्यायालयास मान्यता मिळाली आहे. कन्नड तालुक्यासह आता सोयगाव, खुलताबाद हे तालुके या न्यायालयाशी संलग्न झाल्याने न्यायासाठी छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही, अशी माहिती वकील संघाचे माजी तालुकाध्यक्ष ॲड. कृष्णा जाधव यांनी दिली. कन्नड शहरात नव्या अद्ययावत न्यायालय इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे. यासाठी ४७ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. यात पाच न्यायालये चालणार आहेत. त्यातच आता कन्नड, खुलताबाद व सोयगाव तालुक्यांना या न्यायालयात संलग्न करण्यात आले आहे. न्यायालय स्थापना समितीने कन्नड येथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर नवीन न्यायालय स्थापन करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. त्यानुसार सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ न्यायालय स्थापन करण्यात येत आहे. तालुका वकील संघाचे सदस्य ॲड. विजयसिंह मोहिते यांनी सांगितले की, वकील संघाने दहा वर्षांपासून नवीन न्यायालय इमारत, न्यायाधीशांचे निवासस्थान तसेच सत्र न्यायालय व जिल्हा न्यायालय वरिष्ठ स्तर यांनी यासाठी पाठपुरावा केला. यास खुलताबाद येथील वकील संघाने सहमती दर्शवली. त्यामुळे उच्च न्यायालय, सत्र न्यायालय छत्रपती संभाजीनगर व महाराष्ट्र शासनाने ही मागणी मान्य केली आहे. यासाठी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. ए. यू. वारे, उपाध्यक्ष ॲड. शेख आरेफ, सचिव ॲड. शुभम राऊत व सदस्यांनी केलेल्या पाठपुराव्याला हे मोठे यश प्राप्त झाले आहे. छत्रपती संभाजीनगरला जाण्याची गरज नाही या नवीन वास्तूत जिल्हा न्यायालय होत असल्याने आता पक्षकारांना कन्नड तालुक्यासह खुलताबाद, सोयगाव या तालुक्यातील पक्षकारांना न्यायासाठी सत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतरावरील जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही .यापूर्वी कन्नड न्यायालयात पाच लाखांपर्यंतच दाव्यांची मर्यादा होती ती आता अमर्याद होणार आहे . तसेच ३७६, ३०२ या कलमांतर्गत खटल्यासाठी उच्च न्यायालयात म्हणजे जिल्हा ठिकाणी जावे लागत होते तेसुद्धा खटले आता कन्नड जिल्हा न्यायालयात चालणार आहेत.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 7:23 am

सोलापुरातील 103 वर्षांचा वारसा... आज 12 तासांत इतिहासजमा:राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चारपदरी पुलाचे काम झाले की, सोलापूर-सांगली महामार्ग पूर्ण होणार

‘तुला ते आठवेल का सारे...?’ गिरणगावातील गिरण्यांच्या सहवासात तब्बल १०३ वर्षे असलेला रेल्वेपूल माझ्या स्वप्नात आला आणि त्याने मला हा प्रश्न विचारला. मी दचकलोच! दगड, विटा, चुना, वाळू, पोलाद अजून काय काय वापरून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तम तंत्रज्ञान कौशल्य वापरून ब्रिटिशांनी बनवलेला हा पूल म्हणतो...‘विसरशील मला दृष्टिआड होताना..?’ मी स्वप्नातच ओरडलो, ‘मी तुला कधीच विसरणार नाही. कसं विसरणं शक्य आहे? झुकझुक अगीनगाडी, पहिल्यांदा तुझ्याच पाठीवर उभारून रेल्वेच्या दगडी कोळशाचा धूर अनुभवला. पहिली वंदे भारत ट्रेन पुलाखालून येताना फोटो काढला. कसं विसरेन तुला? तुझ्या कुशीत वसलेल्या एनजी मिल, लक्ष्मी-विष्णू मिल, जाम मिल... लाखो कष्टकरी पावलांनी या पुलावरून पायपीट केली. किती तरी सायकलींच्या कॅरियरवर कामगारांनी बायका, पोरं बसवून पायडल मारत पूल ओलांडला. किती मोर्चे, आंदोलनांची गर्दी पुलावर उसळली! कुणी तंगीत तणतणत, कुणी धुंदीत नाचत, कुणी झिंगून, कुणी खंगून, कुणी गळ्यात गळे घालून हा पूल ओलांडला. गळ्यातील घुंगरांचा मंजुळनाद करत गाई-गुरांनी पूल ओलांडला,”माझा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला म्हणत’ ट्रॅक्टर ट्रॉल्या दणाणत गेल्या. सिमेंटच्या ट्रका, गोडाऊनच्या धान्याच्या ट्रका, एसट्या, लक्झरी, दुचाक्या, चारचाक्यांची गिनतीच नाही. सगळा भार सहन करत पूल कणखरपणे उभाच होता.’ अगदी पार इंग्लंडहून रिटायरमेंटचे लेटर आलं तरी काम ओढतोच आहे अशी स्थिती. अखेर रिटायरमेंटची तारीख निघाली १४ डिसेंबर. मग सुरू झाली पाठवणीची तयारी. पुलाचा कार्यभार देण्यासाठी तीन रस्त्यांची निवड झाली. त्यांनी अतिरिक्त कार्यभार स्वीकारण्यास नाराजी दर्शवली. मग कडक आदेश निघाले. शेवटच्या क्षणापर्यंत पूल मात्र ड्युटीवरच होता. अखेर सगळे झोपेत असतानाच पुलाने रिटायरमेंट स्विकारली. लाखो, करोडो पावलांचा भार सोसलेल्या पूलाचे पाय जाताना लटपटत होते. मला दचकून जाग आली! सत्यातला पूल आता आठवणीतला पूल झाला होता. नव्या पुलाच्या स्वप्नाचे सत्यात रूपांतर होण्यासाठी सगळ्यांनाच आता वर्षभर वाट पहावी लागणार आहे. रेल्वेचा ११ तासांचा ब्लॉक रविवारी सकाळी साडेआठ ते रात्री साडेसात या वेळेत रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. पुलाचे पाडकाम पूर्ण होईपर्यंत रेल्वेसेवा ठप्प राहील. परंतु वंदे भारत, हुतात्मा, कर्नाटक, सिध्देश्वर एक्सप्रेस या गाड्या सकाळी साडेआठपर्यंत स्थानकातून नियोजित वेळेप्रमाणेच बाहेर पडतील, अशी माहिती देण्यात आली. अशी असेल यंत्रसामग्री१५० कामगार मक्तेदाराकडून आलेले२०० कामगार रेल्वे विभागातील असणार२०० टन क्षमतेचे ३ क्रेनच्या साह्याने काम२२० किलो क्षमतेचे ४ ब्रेकरने तोडणार. पूल पाडण्याचे नियोजन : १२ तासांचा ब्लॉक सकाळी ८.३० ते १०.३० पर्यंत रेल्वे इलेक्ट्रीक लाईन खाली आणणार.१०.३० वाजल्यापासून पुलावरील चुना, वाळूचे बांधकाम ब्रेकरनेतोडणार.पुलाच्या खाली २० गर्डर आहेत, ते क्रेनच्या साह्याने पाच टप्प्यांत काढणार. इंद्रधनुपासून दमाणी इस्टेटला जाण्यासाठी बोगदा १०० मीटर लांब : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकपर्यंत १०० मीटरचा नवीन पूल असेल. ज्यामुळे भविष्यात होणाऱ्या उड्डाणपुलाला अडचण होणार नाही. पुलाची पुढची बाजू मरिआई चौकपर्यंत असणार.रुंदी १९ मीटर : नवी पुलाची रुंदी १९ मीटर असणार आहे. त्याच्या दोन्ही बाजूला साडेपाच मीटरचा सर्व्हीस रोड असेल. नरसिंग गिरजी मिलच्या दिशेन अधिक तर रेल्वे ग्राऊंडच्या दिशेने कमी जागा जाईल.रेल्वे स्थानकाच्या मागे बाहेर पडण्यासाठी नवीन प्रवेशद्वार आहे. तिथून इंद्रधनु गृहप्रकल्पाकडे जाणारा रस्ता आहे. तो नवीन पुलापर्यंत येईल. तिथून दमाणी इस्टेटकडे जाण्यासाठी लहान बोगदा केला जाणार आहे.उंची २ मीटरने वाढणार : नवीन पूल चारपदरी बांधला जाईल. जुन्या पुलापासून त्याची उंची दोन मीटर वाढणार आहे. पुलाची उंची वाढली तरी दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड असणार आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास नाही. वर्षभरात होणार १०० मीटर लांब अन् १९ मीटर रुंद नवीन पूल ब्रिटिश साम्राज्यात १९२२ मध्ये बांधलेल्या दमाणीनगर रेल्वेपुलाचे आयुष्य संपल्याने रविवारी पाडण्यात येणार आहे. त्याने गिरणगावचा ऐतिहासिक साक्षीदार इतिहासजमा होईल. पण, पुढील वर्षभरात नवीन पूलही अस्तित्वात येणार आहे. नवीन पूल १०० मीटर लांब आणि १९ मीटर रुंदीचा असेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याची निविदा दिल्लीच्या गोयला कंपनीला दिली. त्याला ३५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पूल पाडण्याची पूर्वतयारी शनिवारी सायंकाळी पूर्ण झाली. त्यासाठी महामार्ग प्राधिकरण, मध्य रेल्वे प्रशासनाचे अधिकारी लक्ष ठेवून होते. रविवारी सकाळी आठच्या आतील सर्व नियोजित रेल्वेगाड्या स्थानकातून ये-जा करतील. आठनंतर मात्र ११ तासांचा ब्लॉक असेल. पुलाच्या खालील रेल्वेरुळ झाकण्यात येणार आहेत. सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत पूल पाडण्याची प्रक्रिया असेल ब्रिटिशकालीन पूल एका विशिष्ट प्रकारातील रचनेचा आहे. लोखंडी गर्डरच्या वर शाबादी फरशीच्या कमानी अणि त्यावर चुना-वाळूचे बांधकाम असल्याने त्याला ‘मद्रास टेरेस’ रचना म्हणतात. पाडकामासाठी १५० कर्मचारी आणि रेल्वे प्रशासनाचे २०० कर्मचारी कार्यरत असतील. प्रत्येक कामगाराला त्याची जबाबदारी सोपवण्यात आली. पुलाचा आजोरा रेल्वेरुळावर पडू नये म्हणून खाली प्लायवूड टाकला जाणार आहे. एका बाजूने पूल पाडला जाईल आणि दुसऱ्या बाजूने रेल्वे रुळावरची स्वच्छता केली जाणार आहे. ठरलेल्या वेळेत पूल पाडून रुळ स्वच्छ करण्यात येईल. 1. जेसीबीच्या साह्याने वायरी काढल्या2. २०० टन क्षमतेचे क्रेन आणले गेले3. क्रेनने लोखंडी सुरक्षा कठडे काढले4. पुलाखालील १५० टन वजनाचे गर्डर आहेत. त्यावरील लोखंडी प्लेट काढण्यासाठी रेल्वे इंजिनची मदत घेण्यात आली होती.‎‎

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 7:20 am

माळीवाडा वेस पाडण्याचा‎तो'' निर्णय 48 तासांत रद्द:अहिल्यानगरात इतिहाप्रेमींच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर युटर्न‎

सुमारे ४०० वर्षांपासून शहराची‎ठळक ओळख व इतिहासाचा ‎‎साक्षीदार असलेली माळीवाडा वेस ‎‎पाडण्याबाबत महापालिकेने हरकती‎व सूचना मागवल्या होत्या. त्यावर ‎‎शहरातील नागरिक, इतिहासप्रेमी व ‎‎सर्वसामान्यांतून तीव्र प्रतिक्रिया ‎‎उमटल्या. हा विरोध लक्षात घेता‎मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी ‎‎शनिवारी सायंकाळी उशिरा ‎‎प्रसिद्धीपत्रक काढून ‘नागरिकांच्या ‎‎जनभावना व लोकहित लक्षात‎घेऊन ही कार्यवाही रद्द करत ‎‎असल्याचे’ जाहीर केले.‎ शुक्रवारी स्थानिक‎वर्तमानपत्रांमध्ये जाहीर प्रकटन देत ‎‎महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती ‎‎भागात असलेली माळीवाडा वेस''‎या नावाने ओळखली जाणारी‎सुमारे ४०० वर्षे जुनी, ऐतिहासिक‎वास्तू पाडण्याचा निर्णय घेतला.‎त्यावर नागरिकांच्या हरकती व‎सूचना १७ डिसेंबरपर्यंत मागवल्या‎होत्या. मात्र, महापालिकेच्या या‎भूमिकेबद्दल नागरिकांमध्ये,‎इतिहासप्रेमींमध्ये तीव्र नाराजीची‎भावना व्यक्त होण्यास सुरुवात‎झाली.‎ शनिवारी काही संघटनांनी‎निवेदने देत निषेधही नोंदवला.‎त्यामुळे अखेर शनिवारी सायंकाळी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे‎यांनी माळीवाडा वेस निष्कासीत‎करण्याबाबत आलेली निवेदने व‎मागवलेल्या हरकती, सूचना,‎याबाबतची कार्यवाही रद्द करत‎असल्याचे जाहीर केले आहे. याचे‎इतिहासप्रेमी व नागरिकांनी स्वागत‎केले असून इतिहास जपण्यासाठी व‎शहरातील पर्यटन वाढवण्यासाठी‎प्रयत्न करण्याचे आवाहन केले‎आहे.‎ आता इतिहासाला ‎पर्यटनाची जोड द्या‎ माळीवाडा वेस पाडण्याचा‎निर्णय रद्द केल्याबद्दल आयुक्तांचे‎अभिनंदन व आभार. शहराच्या‎ऐतिहासिक वारशाबाबत त्यांची‎संवेदनशील भूमिका स्वागतार्ह‎आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन व‎संवर्धन हे महापालिकेचे कर्तव्य‎असून त्यासाठी इतिहासप्रेमी‎निश्चितच सहकार्य करतील.‎पर्यटन विकासासाठी नियोजनबद्ध‎कृती आराखडा व भरीव तरतूद‎केल्यास अहिल्यानगरच्या‎विकासाला नवी दिशा मिळेल.‎ – भूषण देशमुख, इतिहासाचे‎अभ्यासक, हेरिटेज वॉक‎अहिल्यानगर.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 7:14 am

साधूग्रामला जागा द्या, मठ-मंदिरांना नोटीस:तपोवनातील महंतांचा पालिकेविरोधात आंदोलनाचा इशारा

तपोवनात साधूग्रामसाठी वृक्षतोडीवरुन पालिकेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच आता पालिकेने साधूग्रामसाठीच तपोवनातील मठ-मंदिराना आरक्षणाबाबत देण्यात आलेल्या नोटीसावरुन साधू-महंत आता आक्रमक झाले आहेत. स्थानिक महंतांनी दिगंबर अनी आखाड्याचे महामंत्री महंत बलरामदासजी महाराज यांना याबाबत माहिती दिली आहे. याबाबत वैष्णव पंथाचे तीनही आखाड्यांचे महंत आधी बैठक घेणार असून प्रशासनाशी चर्चा करणार आहेत. त्यात मंदिर हस्तांतरण, तपोवनातील वृक्षतोड, साधुग्राम व्यवस्थापन तसेच सिंहस्थपूर्व नियोजनातील त्रुटींवर तोडगा काढण्यात येणार आहे. प्रशासनाशी एकमत न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असे महंत रामस्नेहीदास महाराजांनी सांगितले. यांना दिल्या नोटीसा प्रशासनाशी चर्चा; प्रसंगी आंदोलन करु तीनही आखाड्यांचे प्रमुख महंत प्रशासनाशी चर्चा करणार आहोत. अखिल भारतीय श्री पंच निर्मोही अनी आखाड्याचे श्री महंत राजेंद्रदासजी, श्री महंत रामजीदासजी, श्री महंत नरेंद्रदासजी, श्री महंत महेशदासजी, तसेच श्री पंच निर्वाणी अनी आखाड्याचे श्री महंत मुरलीदासजी आदींनी एकत्रित भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. - श्रीमहंत बलारामदासजी महाराज साधूग्राम उभारण्यात प्रयत्नांचा देखावा साधूग्रामसाठी १८२५ वृक्षांवर तोडण्यासाठी खुणा केल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले. राष्ट्रीय हरित लवादाने १५ जानेवारीपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती दिली. संपूर्ण वातावरण पालिकेच्या आणि विशेषत: सरकारच्या विरोधात गेले आहे. प्रत्यक्षात कुंभमेळ्यात या मठ-मंदिरांमध्ये साधू-महंत राहतातच. त्यातच आम्ही केवळ वृक्षतोड नव्हे तर साधूग्रामसाठी परिसरातील मंदिर-महंतांकडेही जागा मागत आहोत हे दाखविण्यासाठी पालिका आणि सरकारची धडपड आहे अशी चर्चा पालिका वर्तुळातही सुरू होती.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 7:12 am

छत्रपती संभाजीनगरमध्ये आईकडून लग्न जुळलेल्या मुलीच्या प्रियकराचे फिल्मीस्टाइलने अपहरण:सिडको बसस्थानकातील घटना, रात्री उशिरा एका महिलेला अटक

सिडको बसस्थानकासमोरील एका नाष्ट्याच्या गाडीवर काम करणाऱ्या २३ वर्षांच्या तरुणाचे शनिवारी (१३ डिसेंबर) दुपारी ३.१५ वाजता फिल्मीस्टाइलने अपहरण करण्यात आले. एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या महिलेसह १० ते १२ अज्ञातांनी तरुणाला बेदम मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसवून नेले. प्रेमप्रकरणातून मुलीच्या आईने हे कृत्य केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी रात्री उशिरा महिलेला अटक केली आहे.अपहरण झालेल्या तरुणाचे नाव विशाल आबासाहेब येडके (२३, रा. मिसारवाडी) असे आहे. फिर्यादी सुरेश नरवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा भाचा विशाल येडके हा सिडको बसस्थानकासमोरील एका नाष्टा सेंटरवर काम करतो. त्याचे आरोपी महिलेच्या मुलीसोबत प्रेमप्रकरण आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी अचानक एक गाडी आली. त्यात त्याला टाकून घेऊन गेले. त्यानंतर ही घटना घडली. अपहरणानंतर बेदम मारहाणीचा थरार अपहरणकर्त्यांनी विशाल येडकेला गाडीत कोंबून नेल्यावर काय घडले याची माहिती पीडित विशालने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत दिली आहे. दुपारी सव्वातीनच्या सुमारास सिडको बसस्थानकातून पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये विशालला कोंबण्यात आले. कारमधून सातारा परिसरात घेऊन जात असताना आरोपींनी विशालला बेदम मारहाण केली. साताऱ्यामध्ये पोहोचल्यावर आरोपींनी आणखी १० ते १२ जणांना बोलावून घेतले आणि त्या सर्वांनी मिळून विशालला मारहाण केली. मारहाण केल्यानंतर आरोपींनी विशालला सेव्हन हिल्स उड्डाणपुलाखाली आणून सोडून दिले. तेथून विशालने मामाला फोन केला. त्यानंतर मामा नरवडे यांनी त्याला सोबत घेऊन थेट पोलिस ठाणे गाठले आणि अपहरणाची तक्रार दाखल केली. एक वर्षापूर्वीच्या घटनेतूनच सूड या अपहरणामागे एक वर्षापूर्वी घडलेला प्रकार कारणीभूत ठरला आहे. एक वर्षापूर्वी विशाल आणि तरुणी हे दोघेही घरातून पळून गेले होते. तेव्हा विशालच्या मामाने (सुरेश नरवडे) मध्यस्थी करत दोघांनाही पोलिस ठाण्यात हजर केले होते. पोलिसांनी दोघांनाही समजावून सांगितले आणि तरुणीला तिच्या आईच्या, म्हणजेच आरोपी महिलेच्या स्वाधीन केले होते. मात्र, या घटनेनंतरही आरोपींच्या मनात राग कायम होता. याच जुन्या रागातून मुलीच्या आईने सूड घेण्याच्या उद्देशाने शनिवारी आपल्या काही साथीदारांना सोबत घेऊन फिल्मीस्टाइलने विशालचे अपहरण केले.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 7:04 am

राज्यातील शिक्षकांना “बीएलओ’च्या कामातून मुक्त करण्याच्या हालचाली:शालेय शिक्षणमंत्र्यांचे विधान परिषदेत लेखी आश्वासन

राज्यातील शिक्षकांवर सोपवण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यासारख्या अशैक्षणिक कामांतून मुक्त करण्यासाठी आता खुद्द राज्याच्या मुख्य सचिवांच्या स्तरावरून संबंधित विभागांना निर्देश दिले जाणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. विधान परिषदेचे सदस्य विक्रम काळे, सतीश चव्हाण, सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. ऑक्टोबर २०२५ च्या सुमारास खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अधिग्रहित केले जात आहे. एकाच शिक्षकाकडे अनेक वर्गांची जबाबदारी असताना त्यांना मतदार नोंदणीसारख्या महसुली कामांना जुंपल्याने आरटीई कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा आमदारांनी लावून धरला होता. तसेच इतर मुद्देही लावून धरले होते. अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा शिक्षणमंत्र्यांनी मान्य केले की, काही ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयांकडून निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केल्या जात आहेत. मात्र, शिक्षकांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा ही सरकारची भूमिका आहे. ज्या मुख्याध्यापकांनी शिक्षकांना कार्यमुक्त केले नाही त्यांच्यावर होणारी प्रशासकीय कारवाई आणि शिक्षकांवरील कामाचा अतिरिक्त भार कमी करण्यात येईल. पीएचडी निकष ठरवण्यासाठी समिती स्थापन : अजित पवार नागपूर| टीआरटीआय, बार्टी, सारथी व महाज्योतीच्या किती विद्यार्थ्यानी, कोणत्या विषयावर पीएचडी केली पाहिजे याचे निकष ठरवून नियमावली करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात दिली. बार्टी, सारथी व महाज्योतीमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळत नाही या संबंधीचा तारांकित प्रश्न नितीन राऊत यांनी उपस्थित केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या वेळेस निवडणुकीचा काळ होता. त्या काळात विद्यार्थी नाराज नको म्हणून कोणतेही निकष न लावता सरसकट शिष्यवृत्ती देण्यात आली. मागे काय झाले ते राहु द्या. आता निकष ठरवून लक्ष्यांक ठरवले पाहिजे, असेही ते म्हणाले. निकषानंतर शिष्यवृत्ती प्रारंभी या तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पीएचडीचे विषय समाजोपयोगी असले पाहिजे, असा आमचा कटाक्ष आहे. अनेकदा समाजाशी काडीचाही संबंध नसलेल्या विषयांवर पीएचडी केली जाते. विद्यार्थ्यांनी कोणत्या विषयावर करावी याचे निकष ठरवून यापुढे शिष्यवृत्ती देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 6:57 am

मंदिराच्या विकासामुळे घृष्णेश्वराच्या पूर्ण प्रदक्षिणेची परंपरा खंडित होणार:राज्यातील एकमेव घृष्णेश्वर मंदिरात पूर्वाभिमुख शिवलिंग

बारावे ज्योतिर्लिंग असलेले वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर हे महाराष्ट्रातील एकमेव पूर्वाभिमुख शिवलिंग असलेले मंदिर आहे. या मंदिराचा विकास करण्यात येत आहे. त्यासाठी तयार केलेल्या आराखड्यात शेकडो वर्षांपासून चालत आलेली मंदिराच्या पूर्ण प्रदक्षिणेची धार्मिक पद्धत बदलून ‘अर्ध प्रदक्षिणा’ मार्गाचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे धार्मिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर महादेव मंदिर विकासकामाच्या आराखड्याचे काम होत आहे. गट नं.४ मध्ये २१० कोटी रुपयांची विकासकामे केली जाणार आहेत. याबाबत आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे यांनी सांगितले की, जलाधारी ओलांडू नये तसेच शिवपिंडीच्या दर्शनापूर्वी नंदीचे दर्शन घ्यावे असे काही लोकांचे मत होते. यानुसार नव्याने मार्ग तयार करण्यात येत आहे. ५३ कोटींतून कामे २१० कोटींपैकी मंदिर परिसरासाठी ५३ कोटींचा निधी मंजूर केला. यात ४ कोटींचे भक्तनिवास, २५ लाखांचे फर्निचर, अडीच कोटींचा भूमिगत रस्ता, १६ कोटींचा बायपास रोड, २ कोटींची इलेक्ट्रिक कामे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाण्याचे नियोजन, सोलार सिस्टिम, दगडी वाट, दर्शनबारी, वृक्षारोपण आदी कामे केली जाणार आहेत. दर्शनरांगेचा तोडगा काढू बारावे ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण प्रदक्षिणा घालावी लागते. जर विकास कामात अशा पद्धतीने अर्ध प्रदक्षिणेचा मार्ग होत असेल तर भाविकांच्या श्रद्धा, भावना लक्षात घेता यावर तोडगा काढण्यात येईल. -कुणाल दांडगे, अध्यक्ष, घृष्णेश्वर मंदिर मंदिराचा मूळ प्रदक्षिणा मार्ग प्रारंभ : दक्षिण भागातून मंदिरात येणारा भाविक प्रथम गाभाऱ्यातील शिवलिंगाचे दर्शन घेतो.दर्शनक्रम : शिवलिंगाचे दर्शन झाल्यानंतर भाविक गणपती आणि नंदीचे दर्शन घेतात.प्रदक्षिणा पूर्ण करणे : ही दर्शने घेऊन भाविक परत पूर्व दिशेतील दरवाजातून बाहेर पडत होते आणि गोलाकार (पूर्ण) प्रदक्षिणा पूर्ण करत होते.मुख्य अडचण : या मार्गात शिवलिंगाच्या जलाधारीतून बाहेर पडलेले पाणी ओलांडून जावे लागत होते.अनंत पांडव, वेदमूर्ती ज्योतिष्याचार्य ...तर १२ ज्योतिर्लिंगांचे पुण्य मिळणार नाही १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा केल्याशिवाय संपूर्ण पुण्य प्राप्त होत नाही. ज्योतिर्लिंग मंदिरातील शिवलिंगाची जलाधारी उत्तरेला असते. परंतु घृष्णेश्वर हे एकमेव पूर्वाभिमुख शिवलिंग आहे. येथे शिवसोबतच ब्रह्म, विष्णू आणि महेश निवास करतात. त्यामुळे पूर्ण प्रदक्षिणा याच ठिकाणी घालण्याचा अधिकार शास्त्राने दिला आहे. अर्ध प्रदक्षिणा झाल्यास १२ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचे पुण्य प्राप्त होणार नाही. त्यामुळे बदल करताना पुरातत्त्व विभागाने शास्त्राची मदत घ्यावी. नव्याने प्रस्तावित अर्ध प्रदक्षिणा मार्ग (विकास आराखड्यानुसार)उद्देश : जलाधारीतून (दूध, दही, पंचामृत) निघालेले जल भाविकांना ओलांडावे लागणार नाही यासाठी हा मार्ग तयार करण्यात येत आहे.प्रारंभ : भाविक पूर्व दिशेच्या दरवाजातून मंदिरात प्रवेश करतील.नवा दर्शनक्रम :पहिल्यांदा नंदीचे दर्शन त्यानंतर गणपतीचे दर्शन सर्वात शेवटी शिवलिंगाचे दर्शनप्रस्थान : दर्शन घेऊन भाविक दक्षिण दरवाजातून बाहेर पडतील.स्वरूप : या पद्धतीने केवळ अर्ध प्रदक्षिणा पूर्ण होईल.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 6:54 am

मनपा निवडणुकीचा बिगुल सोमवारनंतर:12 ते 15 जानेवारीदरम्यान मतदानाची शक्यता

नागपूर येथे ८ डिसेंबरपासून सुरू असलेल्या विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा रविवारी समारोप होणार आहे. आता सर्वांचे लक्ष्य लागून असलेल्या महापालिकांच्या निवडणुका येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहेत. मुख्यमंत्री सचिवालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर त्याच दिवशी संध्याकाळी किंवा बुधवारी राज्य निवडणूक आयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकतात. राज्यातील २९ पैकी २८ महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान १२ ते १५ जानेवारी दरम्यान घेण्याबाबत निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. अर्ज ऑफलाइन भरता येणार मुंबई | आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारांना त्यांचे नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) ऑफलाइन पद्धतीने भरण्याची परवानगी दिली जाईल, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले. उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या विनंतीवरून यापूर्वी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठीही ऑफलाइन अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली होती. मुंबईसाठी वेगळी तारीख? महायुतीला मुंबईवर पूर्ण लक्ष केंद्रित करता यावे यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक २५ डिसेंबरच्या आसपास जिल्हा परिषदांच्या तारखांसोबत घोषित होऊ शकते, अशीही चर्चा आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 6:50 am

‘दिव्य मराठी’ मुलाखत:कबुतरांसाठी जैन मुनी निवडणुकीत उतरण्याची भाषा करताहेत, हे योग्य आहे? : कुंथूसागर महाराज

राजस्थानातील गाव सोडून जैन धर्माच्या प्रसारासाठी देशाच्या भ्रमंतीवर निघालेले सर्वात ज्येष्ठ जैन मुनी कुंथूसागर महाराज शनिवारी सोलापुरातहोते. ‘दिव्य मराठी’ने त्यांची भेट घेऊन मुंबईतील कबुतरखान्यावर सुरू झालेले आंदोलन, पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागा विक्री प्रकरणावर प्रश्न केले. त्यावर महाराजांनी परखड मते मांडली. ‘सर्व जीवांना जगण्याचा अधिकार आहे. मारण्याचा अधिकार तर कोणालाच नाही. परंतु कोणी चुकीची भूमिका घेतली तर अहिंसापालकांना त्यावर भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. मुनीगण निवडणुकीत उतरण्याची भाषा करत असतील तर त्यात गैर ते काय? मुनी लढले नाहीत तर त्यांचे शिष्यगण निवडणुकीत उतरतील. मुनी त्यांच्या पाठीशी राहतील, आशीर्वाद देतील. त्यात काहीही चूक नाही’, अशी भूमिका महाराजांनी मांडली. भ्रमंतीतून काय संदेश देता? आम्ही धर्माचा संदेश घेऊनच फिरतो. दयाधर्माचे पालन करावे, व्यसनांपासून दूर राहा, असाच उपदेश समाजाला देत असतो. अनवधानाने कोणी वाममार्गाने लागला तर त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचे काम असते. मुख्यत: अहिंसा हाच संदेश. मुंबईत जैन मुनींचे कबुतरखान्यावरून आंदोलन सुरू झाले. काय वाटते? माणूस स्वार्थासाठीच योग्य आणि अयोग्य या गोष्टी ठरवतो. कबुतरांचा विषय त्यातूनच आलेला आहे. कोणताही पक्षी एक जीव आहे. त्यांची सुरक्षा करणे आमचे कर्तव्य आहे. कबुतरे काही आजचे नाहीत. दिल्ली, राजस्थानात कबुतरांची आश्रयस्थाने आहेत. तिथे लोकांना त्रास नाही, मग इथल्या लोकांनाच कसा होतो? निवडणुकीत उतरण्याची भाषा? अहिंसा पालनकर्त्यांची हीच भाषा असते. त्यात चुकीचे काहीही नाही. जैन मुनींनी निवडणूक लढवली तर त्यात गैर काय? पण ते लढवणार नाहीत तर त्यांचे शिष्यगण निवडणुकीत उतरतील. त्यांना मुनिवर्य आशीर्वाद देऊन पाठीशी राहतील. यात गैर असे काहीही नाही. पुण्यात जैन बोर्डिंग विक्रीचा प्रकार घडला, काय सांगाल? जैन समाजासाठी असलेले बोर्डिंग विकत असाल तर ते चुकीचे आहे. मंदिर, संस्था, शाळा, महाविद्यालयांच्या सुरक्षेसाठी विश्वस्त असतात. मालक नव्हे. अशा मालकहोऊ पाहणाऱ्यांना मुनींनी रागावले तर चुकले कुठे? विश्वस्तांनी विश्वस्तांचीच भूमिका घ्यावी. मालक होऊ नये. जुन्या जैन मंदिरांवर अतिक्रमणहोत आहे... नवीन जैन मंदिरे उभी राहत आहेत हे चांगले आहे. पण ते करताना जुन्या मंदिरांचेही जतन होणे आवश्यक आहे. जुने ते जुने आहे. त्यांच्या संवर्धनाचे काम समाजानेच केले पाहिजे. अतिक्रमण हटवण्यासाठी काम करावे लागेल. ऐतिहासिक स्थळांचे जतन करणे आवश्यकच आहे. ६० वर्षांपूर्वी आपण दीक्षा घेतलीत? हा निर्णय कसा झाला? वयाच्या २० व्या वर्षी मी घरातून बाहेर पडलो. मी या गोष्टीकडे आकर्षित झालो. त्यानंतर सहा महिन्यांनी दीक्षा घेतली. हे मला सुचलेले नाही. ते ईश्वराचे देणे आहे. दीक्षा म्हणजे काय? हे समजल्यानंतरच दीक्षा सोहळा झाला.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 6:47 am

साताऱ्यात 15 कोटींचे एमडी ड्रग्ज केले जप्त:मुंबई पोलिसांची जावळी तालुक्यात कारवाई

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात सावरी येथे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अत्यंत गोपनीय पद्धतीने मोठी कारवाई करत तब्बल १५ कोटी रुपये किमतीचा मेफेड्रोन अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. सावरी गावातील एका शेडमध्ये हे बेकायदेशीर ड्रग्जनिर्मिती युनिट सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर मुंबई क्राइम ब्रँचने छापा टाकला. या धडक कारवाईमुळे साताऱ्याची पोलिस यंत्रणा तत्काळ “अलर्ट मोड’वर आली. मुंबई पोलिसांच्या सूचनेनंतर उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्याच्या पोलिसांचे एक पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. याप्रकरणी पोलिसांनी तीन कारागीर आणि एक स्थानिक व्यक्ती अशा एकूण चार जणांना ताब्यात घेतले आहे. याआधी मुंबई आणि पुण्यातील कारवाईनंतर संशयित आरोपींनी सावळी गावात एमडी ड्रग्ज निर्मिती सुरू केल्याचे उघड झाले आहे. सूत्रधाराचा शोध घेण्याचे आव्हान बामनोली, दरे, सावरीसारख्या संवेदनशील व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोनचे उत्पादन घेतले जात होते, याची कोणालाही माहिती नसावी याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. या फॅक्टरीमागे कोणाचा राजकीय वरदहस्त होता का, याबाबत पोलिस अत्यंत सावध पावले टाकून तपास करत आहेत. मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या आरोपींचा ताबा कायदेशीर कार्यवाहीसाठी सातारा पोलिसांकडे दिला जाणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 6:42 am

संभाजीनगरसह बारा मनपांना सरकारकडून 74 कोटींचा निधी:नागरी सोयी-सुविधांचा विकास गतिमान करण्यावर भर

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राज्य सरकारने “विकासा’च्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. नगरविकास विभागाने शनिवारी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, राज्यातील छत्रपती संभाजीनगरसह १२ प्रमुख महानगरपालिका आणि नगरपालिकांना विविध विकासकामांसाठी एकूण ७४ कोटी ६४ लाखांचा निधी वितरित केला आहे. राजकीय वर्तुळात या निधीवाटपाकडे थेट निवडणुका स्पेशल बूस्टर म्हणून पाहिले जात आहे. राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत नागरी सोयी-सुविधांचा विकास गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. विविध महानगरपालिका क्षेत्रांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, गटार, ड्रेनेज व अन्य मूलभूत सुविधांच्या कामांना गती मिळणार आहे. “टार्गेट’ महापालिका आणि वितरित निधी १ कोकण विभाग : मुंबईसह ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी निजामपूर, मीराभाइंदर, वसई-विरार या महापालिकांना १७२ कोटी मंजूर करण्यात आले असून त्यापैकी ४३ कोटींचा सर्वाधिक निधी वितरित करण्यात येणार आहे.२ पुणे विभाग : पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर सोलापूरसाठी ९० कोटी मंजूर करण्यात आले असून २२ कोटी ५० लाखांचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.३ छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड-वाघाळा या महापालिकांसाठी १३.६५ कोटी निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी ३ कोटी ४१ लाख निधी वितरित दिला.४ नाशिक विभाग : नाशिक, धुळे महापालिकांसाठी १३० कोटी मंजूर करण्यात आले असून ३ कोटी २५ लाख वितरित करण्यास मंजुरी. राज्यातील मतदारांवर डोळा आचारसंहितेपूर्वी तातडीने रस्ते, पाणी आदी विकासकामांसाठी निधी देऊन मतदारांना आकर्षित करण्याची मोठी राजकीय खेळी मानली जात आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेले प्रकल्प आता तातडीने पूर्ण करून मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तसेच स्थानिक नेत्यांनाही यातून खुश करण्याचे काम असल्याचे सांगण्यात येत आहे. पकड मजबूत करण्यावर भर महत्त्वाच्या मनपांवर लक्ष केंद्रित करून विकास प्रकल्पांची गती वाढवण्याचा प्रयत्न आहे. नाशिकसह खान्देश, मराठवाडा व विदर्भातील शहरांतील विकासकामांना हातभार लावून सत्ताधाऱ्यांकडून राजकीय पकड मजबूत करण्याची रणनीती आहे.

दिव्यमराठी भास्कर 14 Dec 2025 6:40 am

लक्ष्यवेधींची वेळेत उत्तरे द्या अन्यथा हक्कभंग आणणार

विधानसभा अध्यक्षांचा मुख्य सचिवांना इशारा मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशन संपत आले तरी सदस्यांनी मांडलेल्या अनेक लक्ष्यवेधी सूचनांची उत्तरे अद्याप प्रलंबित आहेत. त्यावरून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनीही त्याला प्रतिसाद देत कारवाईचा इशारा दिला. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत जर लक्ष्यवेधींची प्रलंबित उत्तरे दिली नाहीत तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा […] The post लक्ष्यवेधींची वेळेत उत्तरे द्या अन्यथा हक्कभंग आणणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Dec 2025 1:44 am

वर्षानुवर्षे संचालकपदावर राहणा-यांना कोर्टाचा दणका

कोल्हापूर : प्रतिनिधी सहकारी संस्थांमध्ये वर्षानुवर्ष संचालक म्हणून ठाण मांडून बसणा-या लोकप्रतिनिधींना कोल्हापूर सर्किट बेंचने दणका दिला आहे. रिझर्व्ह बँकेने २०२१ मध्ये दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळून लावली. बँक्स असोसिएशनने ही याचिका दाखल केली होती. आता याबाबतची अंतिम सुनावणी १५ जानेवारी रोजी होणार आहे. २०२१ साली रिझर्व्ह बँकेने आदेश जारी करत […] The post वर्षानुवर्षे संचालकपदावर राहणा-यांना कोर्टाचा दणका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Dec 2025 1:42 am

जीएसटी कपातीमुळे राज्याला १५ हजार कोटींचा फटका

उपमुख्यमंत्र्यांची माहिती, विकासकामांच्या निधीत कपात? नागपूर : प्रतिनिधी राज्य सरकारला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच वस्तू आणि सेवा करात कपात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राज्याला १२ ते १५ हजार कोटींचा फटका बसणार आहे. परिणामी सरकारला विविध कामांसाठीच्या निधीत कपात करावी लागेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. मुंबईसह […] The post जीएसटी कपातीमुळे राज्याला १५ हजार कोटींचा फटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Dec 2025 1:39 am

बँकांच्या बीएसबीडी खात्यांसाठी मोफत सुविधा

मुंबई : प्रतिनिधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खात्यात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने झिरो बॅलेन्स असलेल्या बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट (बीएसबीडी) खात्यांसाठी मोफत सुविधा वाढविली आहे. यामुळे सामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. या बदलांमध्ये अमर्यादित मासिक ठेवी, कोणत्याही नूतनीकरण शुल्काशिवाय मोफत एटीएम किंवा डेबिट कार्ड वापर, […] The post बँकांच्या बीएसबीडी खात्यांसाठी मोफत सुविधा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Dec 2025 1:36 am

जमीन व्यवहारात अधिका-यांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न

अंजली दमानियांचा थेट अजित पवारांवर प्रहार मुंबई : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील ४० एकर जमीन विक्री प्रकरणात प्रमुख अधिकारपत्रधारक (कुलमुखत्यारधार) शितल तेजवानीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात संबंधित अधिका-यांनी कागदपत्र पडताळणी करणे […] The post जमीन व्यवहारात अधिका-यांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Dec 2025 1:35 am

कोलकात्यात फुटबॉलपटू मेस्सीच्या कार्यक्रमात राडा

मेस्सीने दाखविली झलक, चाहत्यांकडून स्टेडियमची तोडफोड कोलकाता : वृत्तसंस्था फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी आज भारत दौ-यावर आला. कोलकात्यात त्याचे भव्य स्वागत झाले. त्यानंतर सॉल्ट लेक स्टेडियममध्ये तो दाखल झाला. प्रारंभी सन्मान सोहळा पार पडला. त्यानंतर काही वेळातच मेस्सी स्टेडियममधून निघून गेला. मुळात मेस्सीला पाहण्यासाठी स्टेडियमवर मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. त्याला पाहण्यासाठी अनेकांनी […] The post कोलकात्यात फुटबॉलपटू मेस्सीच्या कार्यक्रमात राडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Dec 2025 1:33 am

लाडक्या बहिणींना आता चुका सुधारण्याची संधी

३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी दुरुस्तीची संधी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीची एकच संधी मिळणार असल्याचे जाहीर केले आहे. ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३१ डिसेंबर २०२५ ची मुदत देण्यात आली आहे. ज्या लाडक्या बहिणींनकडून ई-केवायसी करताना चुकीची […] The post लाडक्या बहिणींना आता चुका सुधारण्याची संधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 14 Dec 2025 1:32 am

आले उदगीर आगाराच्या मना तेथे कोणाचे चालेना

जळकोट : प्रतिनिधी आले उदगीर आगाराच्या मना तेथे कोणाचे चालेना अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. जळकोट मार्गावर धावणा-या अनेक तसेच मध्येच बंद केल्या जात आहेत. यामुळे प्रवाशांना बसस्थानकामध्ये थांबावे की दुस-या वाहनाने जावे हेच कळेनासे झाले आहे. उदगीर आगार प्रमुखांचा मनमानी कारभाराचा जळकोटकरांना त्रास सहन करावा लागत आहे. एक तर जळकोट अविकसित तालुका […] The post आले उदगीर आगाराच्या मना तेथे कोणाचे चालेना appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Dec 2025 11:52 pm

चाकूर बाजारपेठ बंद ठेवून पाळला दुखवटा

चाकुर : प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चाकुरचे भुमिपुञ शिवराज पाटील चाकुरकर यांना चाकूर शहरातील शैक्षणिक संस्था, सहकारी सोसासटी, विविध सामाजीक संघटना, विविध राजकिय पक्षाच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यांत आली. तसेच संपुर्ण चाकूर बाजारपेठ बंद ठेवुन या दुखद घटनेत चाकूर वासीय सहभागी होऊन दुखवटा पाळण्यात आला. चाकूर नगर पंचायतीत भावपूर्ण श्रद्धांजली चाकुरचे भुमिपुञ, देशाचे माजी […] The post चाकूर बाजारपेठ बंद ठेवून पाळला दुखवटा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Dec 2025 11:51 pm

दयानंद एज्युकेशन सोसायटीस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धनाचा पुरस्कार आनंदाची पर्वणी 

लातूर : प्रतिनिधी ऊर्जा कार्यक्षमता ब्यूरो, भारत सरकार ऊर्जा मंत्रालयद्वारा ऊर्जा कार्यक्षमतेत अनुकरणीय उत्कृष्ट कामगिरीसाठी दयानंद एज्युकेशन सोसायटीस राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार-२०२५ हा पुरस्कार दुस-यांदा मिळाला ही संस्थेसाठी अभिमानास्पद बाब आहे. रविवार दि. १४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन म्हणून साजरा होणा-या नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात भारताच्या ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमाने भारताच्या […] The post दयानंद एज्युकेशन सोसायटीस राष्ट्रीय ऊर्जा संवर्धनाचा पुरस्कार आनंदाची पर्वणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Dec 2025 11:49 pm

ग्रंथमित्र प्रा. धनंजय पवार यांचा सपत्नीक सत्कार

लातूर : प्रतिनिधी हासाळा येथील श्री. गुणवंतराव रामचंद्र पाटील सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. धनंजय पवार यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ.एस. आर. रंगनाथन् उत्कृष्ठ ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल दि. १० डिसेंबर मानवाधिकार दिनानिमित्त वर्धा येथील लोक महाविद्यालयाच्या वतीने मातोश्री डॉ .कमलताई गवई यांच्या हस्ते पत्नी सूचितासह सन्मानीत करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक दे. सी. हेमके गुरुजी यांच्या […] The post ग्रंथमित्र प्रा. धनंजय पवार यांचा सपत्नीक सत्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Dec 2025 11:46 pm

पॅकेज टूर अंतर्गत पर्यटनासाठी लालपरी सज्ज

लातूर : प्रतिनिधी पर्यटन व धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी प्रवाशांच्या मागणीनुसार ४४ प्रवाशी थेट उपलब्ध असल्यास रापमच्या लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा या पाचही आगारातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. राज्य मार्ग परीवहन महामंडळाच्या लातूर विभगाकडून पर्यटन बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवाशी समुहाला एकत्रीत प्रवास करून महाराष्ट्रातील विविध मंदीर, धार्मिक क्षेत्र, गड […] The post पॅकेज टूर अंतर्गत पर्यटनासाठी लालपरी सज्ज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Dec 2025 11:45 pm

शोकाकूल वातावरणात शिवराज पाटील यांना श्रध्दांजली 

लातूर : प्रतिनिधी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, पंजाबचे माजी राज्यपाल, भारतीय राजकारणातील सुसंस्कृत, निष्कलंक, अभ्यासू आणि संसदीय परंपरा जपणारे नेते शिवराज पाटील चाकुरकर यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी लातूर शहराजवळील वरवंटी येथील त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना शिवराज पाटील यांच्या आठवणींना […] The post शोकाकूल वातावरणात शिवराज पाटील यांना श्रध्दांजली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Dec 2025 11:44 pm

पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होईल:19 डिसेंबरला देशात राजकीय भूकंप, अमेरिकेचा हवाला देत पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

येत्या 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार आहे. अमेरिकेतील एका इस्त्रायली गुप्तहेराने केलेल्या स्टिंग ऑपरेशनची माहिती बाहेर येणार असून, त्यामुळे अनेक बडे नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. या वादळात कदाचित भारताचा पंतप्रधान बदलून त्या जागी एखादा 'मराठी माणूस' पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो, असा खळबळजनक दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. पिंपरी-चिंचवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात चव्हाण बोलत होते. यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो', अशा आशयाचे ट्वीट केले होते. हे ट्वीट तूफान व्हायरल झाले होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज त्यांच्या ट्वीटचा सविस्तर खुलासा केला. नेमके काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, \जगात बरेच काही चालले आहे. मध्यंतरी मी एक ट्वीट केले होते. ते ट्वीट खूप व्हायरल झाले होते. मी म्हटले होते की, कदाचित महिन्याभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल. मला अनेकांचे फोन आले. याचा अर्थ काय आहे. कोण म्हटले तुम्ही होणार आहात का? तर कुणाला याची पार्श्वभूमी माहिती नव्हती. आता मराठी माणूस होणार म्हणजे, आता बसलेल्या माणसाला बाजूला व्हावे लागेल, मी आधीच अधोरेखीत केले आहे, नाव न घेता. बहुतेक बदल घडण्याची शक्यता आहे. बदल घडला तरी काँग्रेसचा माणूस हा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे तेवढं बहुमत नाही. सत्तेत असलेल्या लोकांपैकीच कोणीतरी होईल आणि तो कदाचित 'मराठी माणूस' असू शकतो. 19 डिसेंबरला हे घडेल, असा माझा अंदाज आहे. 19 डिसेंबर आणि 'इस्त्रायली गुप्तहेरा'चे कनेक्शन या राजकीय भूकंपामागे आंतरराष्ट्रीय कारण असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, अमेरिकेत एक 'अ‍ॅमस्टिन' नावाचा माणूस होता, जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने मोठमोठ्या बंगल्यांमध्ये कॅमेरे लावून लोकांचे खाजगी क्षण टिपले आहेत. अमेरिकन संसदेने कायदा केला असून, त्यावर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सही आहे. त्यानुसार 19 डिसेंबरला या प्रकरणातील 75 हजार फोटो आणि 20 हजार ई-मेल्सचा डेटा जाहीर होणार आहे. हा डेटा सर्च करता येणार असून, यात कितीही मोठा माणूस असला तरी त्याला संरक्षण मिळणार नाही, असे अमेरिकन संसदेने स्पष्ट केले आहे. नावे समोर येणार? या माहितीत नेमकं कोणाकोणाचं नाव आहे आणि त्यांनी काय पराक्रम केले आहेत, हे 19 डिसेंबरला जगासमोर येईल. सोशल मीडियावर काही नावे चर्चिली जात आहेत. त्यामुळे मोठा बदल होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आशा आहे, काही तरी होईल, हे ठरवून आम्ही पुढे चाललो आहे, असे सूचक वक्तव्य चव्हाण यांनी केले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानामुळे 19 डिसेंबरला नक्की काय माहिती बाहेर येणार आणि त्याचे भारतीय राजकारणावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Dec 2025 10:58 pm

पैसे मिळतात म्हटल्यावर एकाच कुटुंबातील 5-5 जण पीएचडी करतात:अजित पवारांचे विधान, सुषमा अंधारेंनी लगावला टोला

राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांमार्फत दिल्या जाणाऱ्या पीएचडी फेलोशिपवर आता निर्बंध येण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात विधानसभेत सूचक वक्तव्य करत फेलोशिपला 'लिमिट' घालण्याचे संकेत दिले आहेत. सध्या 42 ते 45 हजार रुपये मिळतात म्हणून एकाच कुटुंबातील 5-5 जण पीएचडी करत आहेत, असे विधान अजित पवार यांनी केले. त्यांच्या या विधानावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सडेतोड पलटवार केला असून, पीएचडी करणे म्हणजे पांढरा कागद काळा करणे नव्हे, असा टोला लगावला आहे. राज्य सरकारच्या वतीने टीआरटीआय, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत यांसारख्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ काही ठिकाणी एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगानं माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू असून, सध्या या शिष्यवृत्तीसाठी या संस्थांचा निम्म्यापेक्षा अधिक निधी खर्च होत आहे. त्यामुळे इतर गरजू विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांसाठी निधी उपलब्धतेवर परिणाम होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. नेमके काय म्हणाले अजित पवार? या विषयावर बोलताना अजित पवार यांनी स्पष्ट केले की, सध्या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अवाढव्य खर्च होत आहे. मी मध्यंतरी माहिती घेतली असता, ठराविक विद्यार्थ्यांवरच कित्येक शे कोटी रुपये खर्च होत आहेत. संस्थेचा जवळपास 50 टक्के निधी केवळ पीएचडीच्या विद्यार्थ्यांवर जात असल्याने बाकीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. 42-45 हजार रुपये महिना मिळतो म्हटल्यावर एकाच घरात 5-5 लोक पीएचडीला प्रवेश घेत आहेत. विषय निवडतानाही प्रश्न पडतो की नक्की कोणत्या संशोधनासाठी लाभ द्यायचा. निवडणुकीमुळे निर्णय घेतले, आता समिती नेमणार अजित पवार पुढे म्हणाले, मागे जे झाले ते खरे आहे. त्यावेळी निवडणुका होत्या, विद्यार्थी उपोषणाला बसायचे, त्यामुळे कोणाला नाराज नको करायला म्हणून निर्णय घेतले गेले. मात्र, आता यावर कॅबिनेटमध्ये साधक-बाधक चर्चा झाली आहे. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली असून, बार्टी आणि सारथीमधून किती विद्यार्थ्यांना लाभ द्यायचा, यावर आता मर्यादा (Limit) घालण्यात येणार आहे. सुषमा अंधारेंचा हल्लाबोल अजित पवारांच्या या भूमिकेवर सुषमा अंधारे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. अजितदादांना पीएचडीचे महत्त्व आणि त्यासाठी लागणारे कष्ट माहिती आहेत का? पीएचडी करणे म्हणजे केवळ पांढरा कागद काळा करणे इतके सोपे नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत आणि अभ्यास लागतो, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. फडणवीसांकडून अजितदादांचे समर्थन दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी व्यक्त केलेली चिंता योग्य असल्याचे म्हटले आहे. या संस्थांमधील निधीचे वाटप समतोल असावे, या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले. मात्र, सरकारच्या या नव्या भूमिकेमुळे आणि अजित पवारांच्या विधानामुळे राज्यातील संशोधक विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता असून, आगामी काळात हा मुद्दा अधिक पेटण्याचे चिन्हे आहेत.

दिव्यमराठी भास्कर 13 Dec 2025 10:42 pm

अमरावतीत पहिल्यांदाच राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी:64 वर्षांच्या इतिहासात बहुमान; नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यंदा अमरावतीत होणार आहे. ६४ वर्षांच्या स्पर्धेच्या इतिहासात अमरावतीला हा बहुमान पहिल्यांदाच मिळाला आहे. या अंतिम फेरीत राज्याच्या विविध विभागांतून पुरस्कारप्राप्त पहिली दोन नाटके सादर केली जातील. यामुळे राज्यभरातील सुमारे ४० नाटकांचे कलावंत, दिग्दर्शक, लेखक आणि इतर नाट्यकर्मी अमरावतीत दाखल होतील. स्पर्धेच्या सर्व विभागीय फेऱ्या पूर्ण होऊन निकाल नुकतेच घोषित झाले आहेत. अंतिम फेरीच्या तारखा लवकरच निश्चित केल्या जातील. अमरावतीत ही अंतिम फेरी आयोजित करण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाचे सदस्य ॲड. प्रशांत देशपांडे आणि नाट्य परिषदेच्या अमरावती शाखेचे अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर डोरले यांनी सरकारकडे मागणी केली होती. या मागणीसाठी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासह नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हा प्रस्ताव मान्य करून आवश्यक त्या तयारीच्या सूचना दिल्या. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांना याबाबत लेखी कळवले आहे. या भेटीवेळी भाजपचे अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन धांडे आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या मागणीला जिल्ह्यातील आमदार प्रतापदादा अडसड, आमदार राजेश वानखडे, राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे आणि माजी खासदार नवनीत राणा यांनीही सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार यांना पत्र देऊन पाठिंबा दिला होता. यंदा राज्य नाट्य स्पर्धेची विभागीय फेरी पीडीएमसी परिसरातील श्री शिवाजी शिक्षण संस्थेने बांधलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात झाली होती. या अत्याधुनिक सभागृहामुळे नाट्य रसिकांना उत्कृष्ट अनुभव मिळाला, ज्यामुळे अंतिम फेरी अमरावतीत घेण्याच्या मागणीला बळ मिळाले.

दिव्यमराठी भास्कर 13 Dec 2025 9:56 pm

वखार महामंडळातील कामगारांना कामावरून काढले, वंचित आक्रमक:पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

राज्य वखार महामंडळातून अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कामगारांना अचानक कामावरून काढल्याने वंचित बहुजन युवा आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. कामगारांना पूर्ववत कामावर घेण्याच्या मागणीसाठी आघाडीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. कामगारांच्या तक्रारीनुसार, मालाची उचल आणि भरणा करण्यासाठी प्रति पोते ९ रुपये मोबदला देण्याचा नियम आहे. मात्र, महामंडळाकडून केवळ ७ रुपये प्रति पोते मोबदला दिला जात होता. कामगारांनी ९ रुपये मोबदल्याची मागणी करताच, त्यांना कोणतेही ठोस कारण न देता कामावरून कमी करण्यात आले. वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला आहे. सर्व कामगारांना प्रति पोते ९ रुपये मोबदला देऊन त्यांना तात्काळ पूर्ववत कामावर घ्यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे. निवेदन सादर करताना वंचित बहुजन युवा आघाडीचे तिवसा तालुका अध्यक्ष सचिन जोगे, ज्येष्ठ नेते गुणवंत ढोणे, तालुका महासचिव अनिल सोनोने, सचिन डमके, पवन डमके, अनिकेत लांडे, श्रीकृष्ण निंभोरकर, हेमंत उईके, निलेश काळसरपे, रोषण गावणार, गौरव नेवारे, रवी धुर्वे, अक्षय वानखडे, विकी मंडरी, राहुल कडुकर, रोषण अन्नपूर्णे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 13 Dec 2025 9:55 pm

जिल्हा परिषद आरोग्य सेविकांचा मुद्दा आरोग्य संचालकांसमोर:तातडीने कारवाईचे आश्वासन, आमदार रवी राणांच्या सूचनेनंतर भेट

अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका, एलएचव्ही आणि अन्य संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. अंबाडेकर यांना साकडे घालण्यात आले. यावेळी संचालकांनी तातडीने योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या भेटीपूर्वी आरोग्य सेविकांनी आमदार रवी राणा यांची भेट घेतली होती. त्यांच्या सूचनेनुसारच आरोग्य संचालकांशी संपर्क साधण्यात आला. नागपूर येथील विधानभवनातील संचालकांच्या कार्यालयात ही भेट झाली, त्यावेळी संचालकांचे स्वीय सहायक उमेश ढोणे देखील शिष्टमंडळासोबत उपस्थित होते. निवेदनातील मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर संचालकांच्या लक्षात आले की, आरोग्य सेविका व या संवर्गातील कर्मचारी खरोखरच अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांनी हे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे सांगितले. प्रमुख मागण्यांमध्ये एनपीएस रद्द करणे, एलएचव्ही पद पुनर्स्थापित करणे, विना प्रशिक्षण पदोन्नती, प्रवास भत्ता वाढ आणि कोविड काळातील सेवेला योग्य मान्यता देणे यांचा समावेश आहे. या सर्व मागण्या तत्काळ निकाली काढण्यात याव्यात, अशी संघटनेची मागणी आहे. या निवेदनावर राज्य आरोग्य संघटनेच्या महिला पदाधिकारी पुष्पाताई वानखडे, चंदाताई बेलसरे, दीपालीताई शिंदे, पद्मा जाधव, सुनंदा नाथे, मोनिका भोवते, सुरेखा उके, लक्ष्मी बनसोड, पूनम नांदुरकर, निकिता गणवीर, सुजाता बनसोड, वीणा चव्हाण आणि संगीता लोखंडे यांच्या सह्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 13 Dec 2025 9:50 pm

अमरावतीचा महिला बचतगट दिल्लीत, वऱ्हाडी पदार्थांची चव:'द फ्लेवर्स ऑफ महाराष्ट्र' फूड फेस्टीव्हलमध्ये आज शेवटचा दिवस

अमरावती जिल्ह्यातील महिला बचतगटांनी सुरू केलेला खास वऱ्हाडी जेवणाचा थाट दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात पोहोचला आहे. 'द फ्लेवर्स ऑफ महाराष्ट्र' नावाचा हा थाट दर्यापूर तालुक्यातील तेलखेडा येथील बचत गटाचा आहे. यासाठी तेथील ७ महिलांची चमू कार्यरत असून, त्यांच्याकडील खास वऱ्हाडी जेवणाला चांगली मागणी असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने म्हटले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या फूड फेस्टीव्हलचा आज (१४ डिसेंबर) शेवटचा दिवस आहे. या राष्ट्रीय खाद्य महोत्सवात तेलखेड्याचा महिला बचत गट अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यांच्या 'द फ्लेवर्स ऑफ महाराष्ट्र' मध्ये रोडगे, बिट्ट्या, मांडे थाळी, पुरणपोळी, कढीगोळे, सर्गुंडे, विदर्भ स्पेशल चिकन आणि खास वऱ्हाडी मटन यांसारख्या विशेष पदार्थांचा समावेश आहे. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त कार्यालयातर्फे या फूड फेस्टीव्हलसाठी 'द फ्लेवर्स ऑफ महाराष्ट्र' ला आमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या पारंपरिक पाकसंस्कृतीची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने या महिला बचत गटाला दिल्लीला पाठवण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित झालेल्या 'वैदर्भी ब्रँड' अंतर्गत, तेलखेडा येथील आनंदी स्वयं सहाय्यता समूहाची यासाठी निवड करण्यात आली. या महोत्सवात दिल्लीतील नागरिक, दिल्ली-एनसीआरमधील महाराष्ट्रीयन समुदाय, तसेच देश-विदेशातील राजनैतिक प्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि मीडिया प्रतिनिधी असे हजारो पाहुणे सहभागी झाले आहेत. पर्यटनवाढ आणि सांस्कृतिक राजनैतिक संवाद दृढ करण्याच्या राज्य शासनाच्या उद्दिष्टांना पूरक असा हा उपक्रम आहे. या सहभागामुळे जिल्ह्यातील एका बचतगटाच्या महिलांना राष्ट्रीय स्तरावरील व्यवसाय, मार्केटिंग, खाद्य प्रदर्शन आणि ब्रँड प्रमोशनची अनमोल संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे त्यांच्या उद्योजकतेला चालना मिळून आर्थिक सक्षमीकरणाचा मार्गही अधिक बळकट होणार आहे. या बचतगटाने पहिल्याच दिवशी उत्तम विक्री नोंदवली. व्हेज स्टॉलच्या माध्यमातून २६ हजार ५६० रुपये आणि मांसाहारी स्टॉलच्या माध्यमातून ७ हजार २३० रुपये अशी एकूण ३३ हजार ७८९ रुपयांच्या खाद्य पदार्थांची विक्री झाली. उर्वरित दोन दिवसांतही याहून अधिक विक्रीचा अंदाज आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Dec 2025 9:46 pm

उत्तम ज्ञानासाठी ग्रंथाशिवाय पर्याय नाही:विश्वास पाटील यांचे पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनावेळी प्रतिपादन

उत्तम ज्ञान मिळवण्यासाठी ग्रंथांना पर्याय नाही. ग्रंथ हे माणसाचे मित्र असून, ते शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सोबत असतात. पुस्तकांच्या वाचनातून आनंद मिळाल्यास जीवनात सुख प्राप्त होते. पुणे पुस्तक महोत्सवामुळे पुणे शहर आगामी काळात पुस्तकांची पंढरी बनेल, असे मत नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे शनिवारी जल्लोषात उद्घाटन झाले. यावेळी पाटील बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह आनंद कटिकर, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक डॉ. किरण ठाकूर, सोमनाथ पाटील, प्रसेनजित फडणवीस आणि बागेश्री मंठाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. पाटील यांनी सांगितले की, प्रत्येक भारतीय व्यक्तीचा सरासरी सहा तासांचा वेळ मोबाईलवर जातो, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत मुलांना मोबाईल न देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन आपल्या उपस्थितीत झाल्याचा आनंद व्यक्त करत, त्यांनी या निमित्ताने पुण्यात ग्रंथांची पेठ उभी राहत असल्याचे नमूद केले. नव्या तंत्रयुगात ग्रंथांवर आणि पुस्तकांवर प्रेम करण्याची पालखी संयोजकांनी खांद्यावर घेतली असून, यातून उत्तमोत्तम विचार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, मागील दोन पुणे पुस्तक महोत्सवांच्या शेवटच्या दिवशी होणारी गर्दी यंदा पहिल्याच दिवशी झाली. यावरून पुणेकर या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहतात, हे स्पष्ट होते. पुणे पुस्तक महोत्सवाने स्वतःची ओळख निर्माण केली असून, वाचन चळवळ वाढण्यास मदत होत आहे. पुणे शहर हे साहित्य, कला आणि संस्कृतीचे मानबिंदू आहे. महोत्सवात वाचकांची संख्या दरवर्षी वाढत असून, विक्रमी पुस्तक विक्री झाली आहे. हा महोत्सव भारतीय विचार आणि संस्कृतीचा कार्यक्रम ठरला आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये वाचण्याची आवड निर्माण होत आहे. भविष्यात हे महोत्सव ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील आणि तेथे ग्रंथालये व वाचनालये निर्माण करावी लागतील, असे मोहोळ यांनी सांगितले. पुणे पुस्तक महोत्सवामुळे पुण्याचे नाव जगभर जावे आणि त्यातून मराठीसह इतर प्रादेशिक भाषांचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत मोहोळ यांनी पुणेकरांचे कौतुक केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, सामाजिक आणि शैक्षणिक कामात मदत करताना खर्चाचा विचार करायचा नसतो. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १०० रुपयांचे कूपन देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयांना पुस्तके खरेदी करण्यासाठी १० हजार रुपयांचे कूपन देण्यात येत आहे. आपले पुणे शहर हे पुस्तकांची राजधानी पुणे व्हावे, अशी आपल्या सर्वाची मागणी आहे. पुढच्या २०२६ वर्षासाठी पुस्तकांची राजधानी घोषित झाली आहे. त्यामुळे २०२७ मध्ये पुण्याला पुस्तकांची जागतिक राजधानी बनविण्यासाठी पुणेकरांनी पुढील आठ दिवस मोठ्या संख्येने भेट देऊन, पुस्तकांची खरेदी करायची आहे. पुढचा पुणे पुस्तक महोत्सव हा जागतिक पातळीवरील पुस्तक महोत्सव करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एकत्रित प्रयत्न करायचे आहे. मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आपण मराठीत पुस्तके वाचायला हवी. मराठीत नाटके आणि सिनेमे पाहायला हवे. अशा पद्धतीने आपल्याला अभिजात मराठी भाषेला जगापुढे न्यायचे आहे. यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या पुस्तक महोत्सवाला पुणेकरांनी महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 13 Dec 2025 9:32 pm

पुण्यात महाविकास आघाडीची बैठक, एकत्र लढण्याचे संकेत:सोमवारी काँग्रेस भवनात प्रमुख नेत्यांची पहिली औपचारिक चर्चा

पुणे महानगरपालिका निवडणुका तोंडावर असतानाच शहरात महाविकास आघाडीच्या हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी पुणे महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या दिशेने पहिले ठोस पाऊल म्हणून, महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची पहिली औपचारिक बैठक येत्या सोमवारी (दि. १५) सकाळी १० वाजता काँग्रेस भवनात होणार आहे. महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुकांची घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. १५ डिसेंबरनंतर आचारसंहिता लागू होण्याची चिन्हे असून, त्यानुसार नव्या वर्षाच्या सुरुवातीला १४ किंवा १५ जानेवारी रोजी मतदान होऊ शकते. त्यामुळे सर्व पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली असून रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या बैठकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांचे पुणे शहरातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका निवडणूक एकत्रित लढवण्याबाबतची भूमिका, संभाव्य जागावाटप, समन्वय समितीची रचना तसेच संयुक्त रणनीतीवर या बैठकीत प्राथमिक चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे. पुणे शहरात भाजप आणि महायुतीसमोर प्रभावी पर्याय उभा करण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र येणे आवश्यक असल्याची भूमिका आघाडीतील घटक पक्षांकडून सातत्याने मांडली जात होती. आता त्याला प्रत्यक्ष कृतीचे स्वरूप येत असून, ही बैठक म्हणजे महाविकास आघाडीच्या निवडणूक रणनीतीची सुरुवात मानली जात आहे. पुणे शहरातील राजकीय समीकरणे लक्षात घेता, महाविकास आघाडी एकत्र आल्यास निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे केवळ पक्ष कार्यकर्त्यांचेच नव्हे, तर संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Dec 2025 9:29 pm

सिरम कंपनीच्या डेप्युटी मॅनेजरची 23.14 लाखांची सायबर फसवणूक:शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने अज्ञात आरोपींनी घातला गंडा

पुण्यात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एका डेप्युटी मॅनेजरला शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली २३ लाख १४ हजार १० रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. या प्रकरणी पुणे सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश दिनेश पवार (वय ३६, रा. हडपसर, मांजरी) हे गेल्या १४ वर्षांपासून सिरम इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर मार्केटशी संबंधित एक जाहिरात पाहिली. त्या जाहिरातीतील लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. या ग्रुपमध्ये सुमारे ८२ सदस्य होते. ग्रुपमधील रंजीव मान आणि ऐश्वर्या राजपूत यांनी स्वतःला अ‍ॅडमिन म्हणून ओळख करून दिली. त्यांनी शेअर ट्रेडिंग आणि आयपीओमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी स्वतःला ब्रोकर असल्याचे सांगून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर दिली. त्यांनी पीडिताला एका लिंकद्वारे नोंदणी करण्यास सांगितले, ज्यात नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि ईमेल यांसारखी वैयक्तिक माहिती भरण्यास सांगण्यात आले. नोंदणीनंतर एक मोबाईल ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. सुरुवातीला १० रुपये आणि नंतर ४ हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले. ॲपवर ट्रेडिंगद्वारे काही नफा दाखवण्यात आल्याने पीडिताचा विश्वास वाढला. २ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत पीडिताने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण २३ लाख १४ हजार १० रुपये पाठवले. ॲपमध्ये त्याच्या गुंतवणुकीवर जवळपास ८३ लाख रुपयांचा नफा दाखवण्यात आला होता. मात्र, ३१ डिसेंबर रोजी पीडिताने पैसे काढण्याची विनंती केली असता, त्याला नफ्यावर १२% कर भरणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. पीडिताने नफ्यातून कराची रक्कम वजा करण्याची मागणी केली, परंतु आरोपींनी कर भरल्याशिवाय पैसे परत मिळणार नाहीत अशी अट घातली. यानंतर आरोपींनी तक्रारदाराचे फोन घेणे टाळण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

दिव्यमराठी भास्कर 13 Dec 2025 9:25 pm

तोतया पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक:कात्रज-कोंढवा रस्त्यावर 90 हजार रुपयांची सोनसाखळी लंपास

पुणे येथे तोतया पोलिसांकडून एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली आहे. कात्रज-कोंढवा रस्त्यावर ही घटना घडली असून, चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीची सोनसाखळी लंपास केली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० डिसेंबर रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास ६३ वर्षीय तक्रारदार ज्येष्ठ नागरिक कात्रज-कोंढवा रस्त्यावरील माऊलीनगर परिसरातून जात असताना, तीन चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवले आणि या भागात ज्येष्ठ नागरिकांचे दागिने चोरीला जाण्याचे प्रकार वाढल्याचे सांगितले. चोरट्यांनी एका वहीत ज्येष्ठ नागरिकाचे नाव लिहून घेण्याचा बहाणा केला. बोलण्यात गुंतवून त्यांनी ज्येष्ठ नागरिकाला सोनसाखळी काढून रुमालात बांधून ठेवण्यास सांगितले. ज्येष्ठ नागरिकाचे लक्ष नसताना, चोरट्यांनी हातचलाखीने ९० हजार रुपयांची सोनसाखळी काढून घेतली आणि त्याऐवजी दुसरा रुमाल दिला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, ज्येष्ठ नागरिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी हे तपास अधिकारी आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात तोतया पोलिसांकडून फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलीस असल्याची बतावणी करून किंवा मोफत धान्य आणि साडी वाटपाचे आमिष दाखवून चोरटे ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करत आहेत. सिंहगड रस्ता, पर्वती आणि बाणेर परिसरातही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. नागरिकांनी अशा बतावणी करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच, असे संशयित व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Dec 2025 9:23 pm

'मोरपीस आणि पिंपळपान' ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन:यात सौंदर्य आणि वास्तवाचा सुरेख संगम, डॉ. न.म. जोशी यांचे प्रतिपादन

डॉ. रामचंद्र उर्फ बाळ परांजपे लिखित 'मोरपीस आणि पिंपळपान' या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच सदाशिव पेठेतील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या सभागृहात झाले. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. रामचंद्र आणि रमा परांजपे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाला १ लाख रुपयांची देणगी दिली. गेल्या ५० ते ७० वर्षांमध्ये जीवनप्रणालीचे चित्र बदलले आहे. खेडी ओस पडली आणि शहरे भरभरून गेली. जीवनशैलीतील हे बदल 'मोरपीस आणि पिंपळपान' या ललित लेखसंग्रहामध्ये उत्तमपणे टिपले आहेत. या पुस्तकात वाचकांना जीवनातील सौंदर्य आणि वास्तवाचा सुरेख संगम अनुभवता येईल, असे मत डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले. स्मिता टाईपसेटर्स, पुणे आणि डॉ. रामचंद्र उर्फ बाळ परांजपे यांच्या वतीने या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार व निवेदक सुधीर गाडगीळ, लेखक डॉ. रामचंद्र परांजपे आणि स्मिता टाईपसेटर्सचे हेमंत जोशी उपस्थित होते. यावेळी डॉ. रामचंद्र परांजपे यांचे वडील अ‍ॅड. वि. रा. उर्फ बापूसाहेब परांजपे यांच्या स्मरणार्थ डॉ. रामचंद्र आणि रमा परांजपे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाचे पांडुरंग बलकवडे यांच्याकडे १ लाख रुपयांची देणगी सुपूर्द केली. ज्येष्ठ पत्रकार सुधीर गाडगीळ यांनी पुस्तकाचे कौतुक केले. ते म्हणाले की, या ललित लेखसंग्रहातील शीर्षके अतिशय उत्तम आहेत. सोप्या मराठीमध्ये आयुष्याचे धावते वर्णन हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. वाचकांची उत्सुकता वाढवणारे हे पुस्तक असून रेखाचित्रांमुळे याला अधिकच उठावदारपणा आला आहे. लेखक डॉ. रामचंद्र परांजपे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, लेखाचे आशयानुरूप शीर्षक, सुंदर आणि अर्थपूर्ण रेखाचित्रे तसेच विविधांगी संस्कृतीचे दर्शन वाचकांना घडविण्याचा प्रयत्न पुस्तकात केला आहे. या ललित लेखसंग्रहामध्ये २७ लेखांचा अंतर्भाव आहे. आपले सणवार, परंपरा, जीवनशैली याबाबतचे अनेक संदर्भ लेखांमध्ये असून, वर्णनशैली प्रासादिक आणि सहजसंवादी असल्याने संदेश वाचकांपर्यंत सहज पोहोचेल.

दिव्यमराठी भास्कर 13 Dec 2025 9:17 pm

एमईडीसी एमएसएमई समिट पुण्यात 17 डिसेंबरला:नवउद्योजक, व्यावसायिकांनी सहभागी होण्याचे आवाहन; क्षमतावाढीवर लक्ष

महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (एमईडीसी) द्वारे 'एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट २०२५–२६' चे आयोजन १७ डिसेंबर २०२५ रोजी पुण्यात करण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, हेल्थकेअर आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) या विषयांवर ही विशेष शिखर परिषद होणार आहे. या परिषदेचा मुख्य उद्देश तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योग तज्ज्ञ, जीसीसी प्रतिनिधी, नवोन्मेषक, उद्योजक आणि धोरणकर्त्यांना एकत्र आणून भविष्योन्मुख क्षमतावाढ आणि सहकार्याच्या संधी शोधणे हा आहे. ही परिषद ताज विवांता, हिंजवडी, पुणे येथे सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत पार पडेल. समिटमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नोंदणी इच्छुकांना खुली आहे. स्टार्ट-अप्स, नवउद्योजक आणि व्यावसायिकांनी नोंदणी करून आपले स्थान निश्चित करावे, असे आवाहन आयोजकांनी शनिवारी केले आहे. नावनोंदणीसाठी ९३२२३५७५६७ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा medc@medcindia.com या ईमेलवर संपर्क साधता येईल. अधिक माहितीसाठी www.medcindia.com या संकेतस्थळाला भेट देता येईल. महाराष्ट्रातील वेगाने वाढणाऱ्या डिजिटल आणि आयटी क्षमता क्षेत्राला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या समिटमध्ये आयटी, एआय, हेल्थकेअर, संशोधन, स्टार्ट-अप्स आणि ग्लोबल डिलिव्हरी ऑपरेशन्समध्ये उदयास येणाऱ्या नवीन संधींवर प्रकाश टाकला जाईल. संबंधित क्षेत्रातील नवनवीन कल्पना आणि तंत्रज्ञान याची माहिती उपस्थिताना होणार आहे. महाराष्ट्राच्या नव्या जीसीसी पॉलिसी २०२५ च्या पार्श्वभूमीवर, ४०० हून अधिक नवीन केंद्रे, गुंतवणूक वाढ आणि कौशल्याधारित रोजगार निर्मितीचा विस्तार साधण्यासाठी पुणे हे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे आयोजकांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 13 Dec 2025 9:15 pm

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन : ओप्टीवीस, वेलोट्रीज, ट्रेलब्रेजर्स विजेते:एमआयटी एडीटी विद्यापीठात हार्डवेअर स्पर्धेची अंतिम फेरी संपन्न

पुणे येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठात केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि एआयसीटीई यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन–२०२५ (एसआयएच–२०२५) हार्डवेअर स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पडली. यात ओप्टीवीस (एआयसीटीई), वेलोट्रीज (रक्षा मंत्रालय) आणि ट्रेलब्रेजर्स (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय) या संघांनी विजेतेपद पटकावले. इनो-कोर, क्लच एसआयएच (दोन्ही विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय), नेफ्रॉन आणि आरोग्य शिल्ड (दोन्ही केरळ सरकारच्या आरोग्य विभागाचे) यांनी आपापल्या गटात संयुक्तरित्या प्रथम क्रमांक मिळवला. पाच दिवस चाललेल्या या राष्ट्रीय हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीसाठी एमआयटी एडीटी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव नोडल केंद्र होते. देशभरातील आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, केरळ, जम्मू–काश्मीर, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांमधून एकूण २५ संघांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी एआयसीटीई, रक्षा मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि केरळ सरकारच्या आरोग्य विभागासमोरील समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचवले. अंतिम फेरीत परीक्षकांनी प्रत्येक गटातील विजेत्या संघांच्या नवकल्पनांचे मूल्यमापन केले. विजेत्या संघांना भारत सरकारकडून करंडक, प्रमाणपत्रे आणि प्रत्येकी दीड लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेच्या समारोप आणि बक्षीस वितरण समारंभाला केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे सल्लागार डॉ. राघवप्रसाद दास, एआयसीटीईचे सहाय्यक संचालक डॉ. राकेश कुमार गंजू, आयआयटी मुंबईचे माजी प्राध्यापक डॉ. नरेंद्र शहा, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, एसआयएच सेंटर प्रमुख गणेश भिसे, नोडल केंद्र प्रमुख डॉ. निशांत टिकेकर आणि स्पर्धा संयोजक प्रा. सुरेश कापरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. राघवप्रसाद दास म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या नवकल्पनांतून भारत सरकारच्या विविध मंत्रालयांसमोरील समस्यांवर सुचवलेले उपाय पाहता, विकसित भारताच्या संकल्पनेपासून आपण आता फार दूर नाही, याची प्रचीती येते. देशातील युवा पिढी विकसित भारताच्या वाटचालीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल. अशा युवकांना त्यांच्या नवकल्पना जगासमोर मांडण्यासाठी एसआयएच–२०२५ सारखे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Dec 2025 9:14 pm

तपोवनातील वृक्ष तोड न थांबवल्यास हायकोर्टात जाणार:सह्याद्री वाचवा मोहिमेतंर्गत पर्यावरणप्रेमी सुशांत मोरे यांचा इशारा

नाशिक मधील गोदावरी नदीच्या किनारी वसलेल्या, निसर्गसंपन्न अशा तपोवनातील झाडे तूटू नये हा संघर्ष महत्वाचा आहे. अलीकडच्या काळात साताऱ्यातील तारळी धरणावर स्थानिकांच्या माथी सौरऊर्जेचा विनाशकारी प्रकल्प लादणे सुरू आहे. मुंबईतील आरेचे जंगल आपण गमावून बसलो आहे. पुण्यातील वेताळटेकडी वर सावट आहे, चंद्रपुरच्या जंगलांवर सावट आहे. तसेच सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील निसर्गसंपन्न, जैवविविधता संपन्न अशा अनेक ठिकाणांवर विकासाचे सावट घोंगावते आहे. नाशिकमधील पंचवटी-तपोवान येथील साधू ग्राम प्रकल्पासाठी १८२५ वृक्ष तोड थांबवणे आवश्यक आहे जर ती नाही थांबवली तर मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा सहयाद्री वाचवा मोहीमेचे पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केंद्रीय वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाव्दारे दिला आहे. निवेदनात, महाराष्ट्रात याआधी अनेक कुंभमेळे पार पडले. तेव्हा कुठल्याही प्रशासकीय संस्थेला हजारो झाडांची कत्तल करण्याची गरज भासली नाही. उलट, त्या नियोजनाची जागतिक पातळीवर प्रशंसा झाली. मग आता अचानक तपोवनच का? जेव्हा नाशिकमध्ये हजारो एकर रिकाम्या किंवा उपलब्ध जागा आहेत, तेव्हा तपोवनच्या हृदयातच साधूग्राम उभारण्याचा हट्ट का? याबाबत प्रशासनाकडून कोणताही तर्कसंगत आधार दिला जात नाही. झाडतोडीसाठी वेगवेगळे टेंडर, साधूग्रामसाठी वेगळे टेंडर, आणि एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावण्याचे स्वतंत्र टेंडर.. हा सर्व प्रकार सार्वजनिक निधीचा अपव्यय, कुंभमेळ्याच्या नावाखाली तिजोरी भरण्याचा संशय, आणि निसर्गाची हानी करण्याची वृत्ती दर्शवतो. सह्याद्री वाचवा मोहिमेअंतर्गत नाशिकमधील पंचवटी-तपोवन हे धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. येथील कुंभमेळ्यासाठी साधू ग्राम प्रकल्पासाठी सुमारे १८२५ प्रौढ झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे. तो तात्काळ रद्द करावा. इतक्या मोठ्या संख्येने झाडे कापल्याने हवेची गुणवत्ता, स्थानिक जैवविविधता, तापमान नियमन आणि एकूणच पर्यावरणीय संतुलनावर गंभीर परिणाम होईल. ही झाडे देखील महत्त्वपूर्ण अधिवास म्हणून काम करतात. प्रकल्पासाठी कोणतेही झाड तोडू नये. संतांसाठी व्यवस्था पर्यावरणपूरक पद्धतीने नियोजित करावी. साधूग्रामसाठी पर्यायी जागेचे नियोजन करावे. जुने असो की नवीन असू किंवा साधे झुडूप असो, कशालाही हात लागता कामा नये. या संपूर्ण प्रक्रियेची स्वायत्त चौकशी करून टेंडर प्रक्रियेतील संभाव्य गैरव्यवहार तपासावेत. निसर्ग, धार्मिक वारसा आणि पर्यावरणीय संतुलन जपणारे नियोजन पुन्हा तयार करावे. कुंभमेळा आयोजनात पारदर्शकतेसाठी आपण स्वत: लक्ष घालावे, अशा मागण्या श्री. मोरे यांनी केल्या आहेत. नाशिकच्या पर्यावरणीय वारशाचे आणि त्याच्या आध्यात्मिक पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपला वेळेवर हस्तक्षेप व आपली पर्यावरणीय हिताची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अन्यथा महाराष्ट्र राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मला सह्याद्री वाचवा मोहिमेअंतर्गत मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असा इशाराही श्री. मोरे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्राचे राज्यपाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वनमंत्री गणेश नाईक, मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई , प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य, प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर यांना पाठवल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 13 Dec 2025 8:35 pm

शिवराज पाटील चाकुरकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

लातूर : प्रतिनिधी सहा दशके आपल्या सुसंस्कृत राजकारणाचा ठसा उमटवणारे लातूर जिल्ह्याचे सुपूत्र लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकुरकर यांच्या पार्थिवावर दि. १३ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता लातूर शहरापासून जवळच असलेल्या वरवंटी येथील त्यांच्या शेतामध्ये शासकीय इतमामात तसेच मंत्रोच्चारात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशभरातून आलेल्या असंख्य मान्यवरांनी शिवराज पाटील चाकुरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण […] The post शिवराज पाटील चाकुरकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Dec 2025 7:48 pm

हिंगोलीत “प्लास्टिक कचरा गावमुक्त अभियान” विशेष मोहिम:563 ग्रामपंचायतींमध्ये यशस्वी अंमलबजावणी, विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून गावे चकाचक

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हिंगोली जिल्हा परिषदेमार्फत “प्लास्टिक कचरा गावमुक्त अभियान” ही विशेष मोहिम जिल्हाभर राबविण्यात आली. ही मोहीम दिनांक ६ ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रभावीपणे राबविण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांना या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व ५६३ ग्रामपंचायतीमध्ये प्लास्टिक कचरा संकलन, प्लास्टिक वापराविरोधात जनजागृती तसेच श्रमदान उपक्रम राबविण्यात आले. या मोहिमेअंतर्गत ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या रॅली, स्वच्छता फेऱ्या तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. गावातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक स्थळे आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आले. या उपक्रमात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पंचायत समिती स्तरावर सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, कृषी गट, युवक मंडळे तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहभागातून आरोग्य व स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली. ग्रामस्थांना गावातील प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तसेच वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांचा नियमित वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी या अभियानाचा समारोप करण्यात आला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे, केशव गड्डापोड यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये यशस्वीरीत्या राबविण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 13 Dec 2025 7:36 pm

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:त्यांनी अमित शहांना खिशात घातले, प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी

राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना खिशात घातले आहे. येत्या एक ते दोन महिन्यांत एकनाथ शिंदे पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होतील, असा दावा आंबेडकर यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये होणाऱ्या मेगा भरतीमुळे शिंदे गटाची कोंडी झाली होती. या नाराजीतून शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कारही टाकला होता. यानंतर शिंदेंनी तडकाफडकी दिल्ली गाठून अमित शाह यांची भेट घेतली. सुरुवातीला महापालिका निवडणुका वेगळे लढणार असल्याचे भाजप सांगत होती. मात्र, आता युती करून लढू असे आता म्हणत आहेत. आता या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मोठे भाकित केले. नेमके काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? प्रकाश आंबेडकर म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा स्वतःची 'पॉवर' काय आहे, हे भाजपला दाखवून दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपला आता माघार घ्यावी लागणार आहे. शिंदेंची ही किमया असून त्यांनी अमित शाह यांच्यासारख्या नेत्यालाही खिशात घातले आहे. त्यामुळे आता भाजपला शिंदे गटासोबत युती करूनच निवडणुका लढाव्या लागतील. विधानसभेचा वचपा काढला? नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री न करता उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. शिंदेंना मुख्यमंत्री केले नाही, त्याचा हा बदला असावा. शिंदेंनी जी खेळी खेळली आहे, त्यावरून ते येत्या महिना-दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होतील, असेच चित्र दिसत आहे, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. शरद पवारांशी भेटीचा 'मेसेज' काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट झाली होती. या भेटीचा संदर्भ देत आंबेडकर म्हणाले, शरद पवार हे राजकारणातील चाणक्य आहेत. शिंदे आणि पवार यांच्या भेटीतून शिंदेंनी भाजपला योग्य तो संदेश दिला आहे. अमित शाह यांना झुकवण्यामागे या भेटीचाही संदर्भ असू शकतो. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांच्या या विधानामुळे महायुतीमध्ये नक्की काय शिजतंय आणि भविष्यात मुख्यमंत्रीपदात बदल होणार का? या चर्चांना उधाण आले आहे. हे ही वाचा.. अधिकारीच सत्ताधाऱ्यांना बुथमागे 150 मते देतात:प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; मतचोरीच्या मुद्यापेक्षा हा मुद्दा महत्त्वाचा असल्याचा दावा निवडणुकीत प्रत्येक बुथवरील अधिकारीच सत्ताधारी पक्षाला 100 ते 150 मते टाकत असल्याचा गंभीर आरोप करून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. सद्यस्थितीत मतांची चोरी होत नसू, सत्ताधारी पक्षाला अधिकची मते देण्याची परिस्थिती अधिकारी वर्गच निर्माण करत आहे, असे ते म्हणालेत. सविस्तर वाचा..

दिव्यमराठी भास्कर 13 Dec 2025 7:12 pm

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वात मोठे 'ब्लॅकमेलर':15 रुपयांसाठी काटामारी बाहेर काढण्याची धमकी देतात, राजू शेट्टींचा घणाघात

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 15 रुपये द्या, नाहीतर तुमच्या कारखान्यातील 'काटामारी' (वजनातील घोळ) बाहेर काढू, असे म्हणणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सर्वात मोठे ब्लॅकमेलर आहेत, असा सणसणीत आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे ऊस दरासाठी सुरू असलेले आमरण उपोषण सोडवल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ऊसाला पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समाधान फाटे आणि त्यांचे सहकारी गेल्या सहा दिवसांपासून वाखरी येथे आमरण उपोषणाला बसले होते. आंदोलनाच्या दबावामुळे जिल्ह्यातील 15 हून अधिक साखर कारखान्यांनी पहिली उचल म्हणून 3 हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे. या विजयानंतर राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी आंदोलकांना लिंबू पाणी देऊन त्यांचे उपोषण मागे घेतले. यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात केला. नेमके काय म्हणाले राजू शेट्टी? यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी राज्य सरकार आणि साखर कारखानदारांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, एकिकडे हे सरकार एफआरपीचे (FRP) तुकडे पाडण्यासाठी न्यायालयात कारखानदारांची बाजू घेऊन लढत आहे. मात्र, दुसरीकडे स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 51 कारखान्यांना 3 हजार रुपयांपेक्षा जास्त दर देणे भाग पडले आहे. शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा जास्त रक्कम मिळवून देणे, हा स्वाभिमानीचा मोठा विजय असून कारखानदार आणि सरकारचा हा नैतिक पराभव आहे. आंदोलनाचा इशारा कायम सोलापूर जिल्ह्यात ज्या कारखान्यांनी अद्याप 3 हजार रुपये दर जाहीर केलेला नाही, त्यांना शेट्टी यांनी कडक इशारा दिला आहे. ज्यांनी दर दिला नाही, त्या कारखान्यांच्या गव्हाणीत उड्या मारून कारखाने बंद पाडण्याचे आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार राजू शेट्टी यांनी केला. काटामारी बाहेर काढू म्हणणारे फडणवीस ब्लॅकमेलर गेले सहा दिवस शेतकरी अन्नान्न दशेने उपोषण करत असताना सरकारला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. मुख्यमंत्र्यांना फक्त कारखानदारांकडून 15 रुपये वसूल करण्यात रस आहे. चोरी (काटामारी) पकडल्यावर कारवाई करण्याऐवजी तोडपाणी करणे हे ब्लॅकमेलिंग नाही तर काय आहे? असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला. हे ही वाचा... बाजार समित्यांवर पणन मंत्र्यांची नियुक्ती:राजू शेट्टी म्हणाले - सहकारातील लोकशाहीचा गळा घोटला, शेतकरीविरोधी पाऊल राज्य सरकारने ८० हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त उलाढाल असलेल्या बाजार समित्यांच्या अध्यक्षपदी राज्याचे पणन मंत्री आणि उपाध्यक्षपदी पणन राज्यमंत्री यांची नियुक्ती करण्याचा कायदा विधानमंडळात मंजूर केला आहे. या निर्णयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी तीव्र टीका केली आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 13 Dec 2025 6:47 pm

चांदीला झळाळी, दोन लाखांचा टप्पा पार

जळगाव : मागील काही दिवसांपासून दरवाढीचा वेग पकडलेल्या चांदीने शुक्रवारी (दि. १२) दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीच्या विक्रमी दरवाढीमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. चांदी दरवाढीचा वेग नव्या वर्षातही कायम राहणार आहे. दुसरीकडे सोन्याने देखील नवा उच्चांक गाठला आहे. लवकरच सोने दीड लाखाचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीपासून चांदीने दरवाढीचा वेग पकडला. […] The post चांदीला झळाळी, दोन लाखांचा टप्पा पार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Dec 2025 6:11 pm

गोरेगावात कुत्र्याची दहशत; २० जणांना चावा

मुंबई : राज्यात एकीकडे बिबट्यांची दहशत निर्माण झालेली असताना, मुंबई उपनगरांतील गोरेगावात मात्र पिसाळलेल्या एका कुत्र्याने सुमारे २० ते २५ नागरिकांना चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे. रस्त्याने ये-जा करणारा नागरिक दिसल्यास त्यांच्या अंगावर झेप घेऊन चावा घेत आहे. यामुळे गोरेगाव परिसरातील नागरिक मोठ्या दहशतीखाली असून सदर कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. गोरेगाव पश्चिमेकडील […] The post गोरेगावात कुत्र्याची दहशत; २० जणांना चावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Dec 2025 6:10 pm

शेतकरी प्रश्नांवरून यशोमती ठाकूर आक्रमक

नागपूर : प्रतिनिधी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतक-यांच्या गंभीर प्रश्नांवरून काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘लाडकी बहीण’ या संबोधनातून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना उद्देशून भावनिक पण अत्यंत बोच-या शब्दांत पत्र लिहिले असून, […] The post शेतकरी प्रश्नांवरून यशोमती ठाकूर आक्रमक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Dec 2025 6:10 pm

पुणे-संभाजीनगर प्रवास अवघ्या २ तासांत

नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू असून, आजचा अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. अशातच भाजप नेते केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे ते संभाजीनगर या दोन शहरांना जोडणारा नवीन महामार्ग बांधला जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. यामुळे या दोन शहरांमध्ये प्रवासाचे अंतर कमी होणार असून, अवघ्या दोन तासांत पुणे […] The post पुणे-संभाजीनगर प्रवास अवघ्या २ तासांत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Dec 2025 6:08 pm

राज्यात अडीच लाखाहून अधिक महिला, मुली गायब

नागपूर : प्रतिनिधी महाराष्ट्रातील २.५६ लाख महिला आणि मुली गायब आहेत. यामागे एक मोठे रॅकेट आहे. ते शोधण्यासाठी सरकारने स्वतंत्र यंत्रणेचा वापर करावा. सरकार एक-दोन महिलांना शोधून ८० टक्के सापडल्याचे सांगते, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. . विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यातून लहान मुलं-मुली आणि महिला गायब होत आहेत गृह खाते काय […] The post राज्यात अडीच लाखाहून अधिक महिला, मुली गायब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Dec 2025 6:05 pm

मेस्सीच्या भेटीला गालबोट

कोलकाता : वृत्तसंस्था फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी भारतीय दौ-यावर आला आहे आणि कोलकात्यात त्याचे भव्य स्वागत झाले. मेस्सी आज सॉल्ट लेक स्टेडियममध्ये दाखल झाला. सुरुवातीला सन्मान सोहळा पार पडला, मात्र हा सोहळा अपेक्षेपेक्षा फारच कमी वेळेचा झाला. अवघ्या काही मिनिटांतच मेस्सी स्टेडियममधून निघून गेल्याने उपस्थित चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. मेस्सीला प्रत्यक्ष पाहण्यासाठी हजारो […] The post मेस्सीच्या भेटीला गालबोट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Dec 2025 6:02 pm

अंगणवाडी सेविकांचे भत्ते रखडले

पुणे : प्रतिनिधी राज्यातील १ कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये देणा-या सरकारने त्याच बहिणींसाठी काम करणा-या राज्यातील काही लाख अंगणवाडी कर्मचा-यांचे लाखो रुपयांचे भत्ते मात्र थकवले आहेत. लाडकी बहीण योजनेचे अर्ज जमा करण्यासाठीचे मानधनही अनेक जिल्ह्यांमध्ये प्रलंबित ठेवण्यात आले असल्याने अंगणवाडी सेविकांनी लवकरात लवकर रखडलेला निधी मिळावा यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. राज्यातील […] The post अंगणवाडी सेविकांचे भत्ते रखडले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Dec 2025 5:59 pm