SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
...

लोकप्रतिनिधी तात्पुरते, अधिकारी कायमचे; जनतेची कामे वेळेत करा:पाटोद्यात महसूल समाधान शिबिर; सभापती सचिन गरड यांचे आवाहन‎

लोकप्रतिनिधी दर पाच वर्षांनी बदलतात, मात्र प्रशासकीय अधिकारी कायमस्वरूपी सेवेत असतात. त्यामुळे जनतेची कामे तत्काळ मार्गी लावण्याची मोठी जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. जर अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये वेळेवर पार पाडली असती, तर आज अशा शिबिरांची गरजच भासली नसती, अशा शब्दांत जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती सचिन गरड पाटील यांनी प्रशासनाचे कान टोचले. आदर्श ग्राम पाटोदा येथे महसूल विभाग व पंढरपूर मंडळाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसीलदार उमेश पाटील, माजी सरपंच भास्कर पेरे, उपसभापती बाळासाहेब गाढे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात सातबारा वाटप, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेकडो लाभार्थींना जागेवरच देण्यात आला. तहसीलदार उमेश पाटील यांनी अभियानामागील हेतू स्पष्ट केला, तर उपसरपंच कपिंद्र पेरे यांनी पाटोदा गावाने राबवलेल्या विकासकामांचा आढावा घेत गाव कसे ‘स्मार्ट' बनले, याची माहिती दिली. या शिबिराला पंढरपूर मंडळातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेविका आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती. अडचणी आल्यास लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सहकार्य करू, मात्र कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही सचिन गरड यांनी शेवटी दिला. पंढरपूर गावातील घरे नियमित करा माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी पंढरपूर गाव सध्या अनियमित असल्याने नागरिकांना येणाऱ्या अडचणी मांडल्या. महसूल विभागाने सर्व घरे नियमित करून गावठाण मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली. यावर उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड यांनी २०११ पूर्वीच्या वसाहतींमधील अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे शेकडो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 7:23 am

म्हैसघाटातील 2 किलोमीटरच्या रस्त्याला वन विभागाकडून मंजुरी:कन्नड-नागदची वाहतूक व्यवस्था सुधारण्यास होईल मदत‎

कन्नड-नागदला गौताळा अभयारण्य मार्गे जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक ३९ वरील म्हैसघाटातील रस्ता अनेक दिवसांपासून धोकादायक झाला होता. अखेर म्हैसघाटातील दोन किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती कामाला वन विभागाने मंजुरी दिली. आमदार संजना जाधव यांनी ही माहिती दिली. यामुळे मागील दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली समस्या आता मार्गी लागणार आहे. कन्नड-नागद मार्ग म्हैसघाटातून गौताळा अभयारण्य क्षेत्रात जातो. दुरुस्ती, डांबरीकरणासाठी वन विभागाची परवानगी गरजेची होती. या रस्त्याचे डांबरीकरण १९८० साली झाले होते. त्यानंतर रस्त्याच्या रुंदीमध्ये कोणताही बदल झाला नाही. १९८० पूर्वीच्या मंजुरीच्या आधारे वन विभागाने दुरुस्ती, डांबरीकरणाला हिरवा कंदील दिला. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. आमदार जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित विभागांशी समन्वय साधला. प्रश्न मार्गी लागला. सोलापूर-धुळे महामार्गावरील कन्नड-चाळीसगाव औट्रम घाट अवजड ^कन्नड-नागद मार्गावरील म्हैसघाट रस्त्याच्या कामासाठी आम्ही सातत्याने निधीची मागणी करत आहोत. मात्र, हा रस्ता वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने परवानगी मिळवणे अत्यंत कठीण ठरत आहे. म्हैसघाटातील खराब झालेल्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यासाठीही वन विभागाकडून परवानगी मिळत नाही. परवानगी मिळाल्यास आम्ही तत्काळ, अगदी दुसऱ्याच दिवशी रस्त्याचे काम हाती घेऊ. दरम्यान, म्हैसघाटातील दोन किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित होता. त्यास आता मंजुरी मिळाल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. - रवींद्र जारवाल, सहायक कार्यकारी अभियंता, सा. बां. उपविभाग, पूर्व कन्नड वाहनांसाठी बंद आहे. अनेक वाहनचालक पर्यायी, जवळचा मार्ग म्हणून कन्नड-नागद रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. वाहतुकीचा ताण वाढल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली. घाटात लहान-मोठे अपघात झाले. तातडीने दुरुस्ती व्हावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा कलाकार तोताराम पवार, सागर पाटील, गंगाधर पाटील, ग्रामस्थांनी सातत्याने आंदोलने केली होती. या निर्णयामुळे वाहतूक व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. वाहनचालक, प्रवासी, नागरिकांना दिलासा मिळणार आहे. रस्त्याच्या उर्वरित कामासाठी पाठपुरावा

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 7:21 am

आई-वडिलांची सेवा म्हणजेच खरे पंढरपूर:भवनच्या सप्ताहाची चंद्रकांत महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता‎

आई-वडिलांची सेवा म्हणजेच खरे पंढरपूर आहे, असा हितोपदेश चंद्रकांत महाराज यांनी दिला. सिल्लोड तालुक्यातील भवन येथे ११ ते १८ एप्रिलदरम्यान सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात शनिवारी (दि. १८) हभप चंद्रकांत महाराज खळेकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. भक्तीचा गाढ संदेश भाविकांपर्यंत पोहोचला. संत तुकाराम महाराज यांच्या ‘या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडूनी देव संतांच्या संग राहिला’ या अभंगावर चिंतन करताना महाराज म्हणाले, भक्ताच्या निर्मळ प्रेमामुळे देवही संतांच्या सहवासात रमतो. केवळ पंढरपूरची वारी केल्याने पाप दूर होत नाही, जीवनातील आचरण शुद्ध हवे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दिखाऊ भक्ती नको. कृतीतून दिसणारी सेवा महत्त्वाची. आई-वडिलांवर प्रेम करा. त्यांची घरीच सेवा करा. हेच खरे पंढरपूर. मायबापच आपले विठ्ठल-रुक्माई, असे त्यांनी सांगितले. कर्माचे फळ नक्की मिळते, त्यामुळे सद्वर्तन जोपासा. निष्ठा ठेवा, असा संदेश देत त्यांनी भाविकांना अंतर्मुख केले. कीर्तनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सप्ताह सोहळ्यामुळे आठवडाभरात गावाला यात्रेचे स्वरूप आले होते. दररोज नामवंत महाराजांची कीर्तने झाली. रामकथा झाली. ज्ञानेश्वरी पारायण झाले. शनिवारी सर्व ग्रामस्थांनी घरोघरी गुढी उभारल्या होत्या. दारी रांगोळी काढली. पालखीचे स्वागत केले.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 7:19 am

जागतिक वारसादिनी वेरूळ लेणीला 6 हजार पर्यटकांची भेट:अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री लेणी पाहून भारावले‎

शनिवारी जगप्रसिद्ध वेरूळ येथील लेणीत जागतिक वारसा दिनानिमित्त मोफत प्रवेश देण्यात आला होता. या संधीचा लाभ घेत एकाच दिवसात सहा हजार पर्यटकांनी या जागतिक वारशाचा आनंद घेतला. पर्यटक भेटीचा आतापर्यंतचा विक्रम असून अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी वेरूळ लेणीला भेट देऊन भारतीय स्थापत्यकलेचा हा अजोड नमुना न्याहाळला. मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी शनिवारी वेरूळ लेणीला भेट दिली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे दरवर्षी १८ एप्रिल रोजी जागतिक वारसा दिनानिमित्त ऐतिहासिक वास्तूंमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश दिला जातो. या सवलतीचा फायदा घेत सकाळपासूनच वेरूळ परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. वेरूळ लेणीचे मुख्य अधिकारी निलेश कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ५.५ ते ६ हजार पर्यटकांनी लेणीला भेट दिली. पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रशासनातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली होती.अशी माहिती वेरूळ लेणी प्रमुख निलेश कोळी यांनी दिली. जागतिक वारसा दिनाचे महत्त्व तरुण पिढीला समजावे, या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथील पी. यु. जैन विद्यालय आणि वेरूळ लेणी प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत ऐतिहासिक वारशाचे संवर्धन या विषयावर आपले विचार मांडले. निबंध स्पर्धेतून एकूण पाच उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये हर्ष कोपरेकर याने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली. विजेत्या विद्यार्थ्यांचे अधिकारी निलेश कोळी आणि शाळा प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले. आपल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे संदेश या उपक्रमातून देण्यात आला. एकीकडे मुख्यमंत्र्यांसारख्य ा अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची भेट आणि दुसरीकडे हजारो पर्यटकांचा उत्साह, यामुळे यंदाचा जागतिक वारसा दिन वेरूळ लेणीमध्ये मोठ्या दिमाखात साजरा झाला. भारतीय कारागिरांच्या कौशल्याबद्दल अभिमान अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी वेरूळ लेणीला भेट देऊन भारतीय स्थापत्यकलेचा हा अजोड नमुना न्याहाळला. त्यांनी १६ क्रमांकाच्या ‘कैलास’ लेण्यांची पाहणी केली. एकाच अखंड पाषाणात कोरलेल्या या भव्य मंदिराचे सौंदर्य पाहून त्यांनी भारतीय कारागिरांच्या कौशल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. तसेच भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा हा वारसा थक्क करणारा असल्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 7:18 am

मोहसीन शेखची श्रीलंकेतील क्रिकेट स्पर्धेसाठी झाली निवड:भारतीय दिव्यांग संघात निवड , 1 ते 6 मे दरम्यान स्पर्धा‎

कन्नड येथील मोहसीन शेखची कोलंबो येथे भारत व श्रीलंका या दोन संघादरम्यान १ मे ते ६ मे या कालावधीत होणाऱ्या तीन आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी तसेच एक कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय दिव्यांग संघात निवड करण्यात आली आहे. निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाच्या दिनांक २२ मार्च रोजीच्या पत्रानुसार शेख मोहसीनसह भारतीय संघ या महिन्याच्या अखेरीस कोलंबो साठी रवाना होणार असून टी२० व कसोटी मालिका दोन्ही संघादरम्यान खेळवली जाईल. शेख मोहसीन हा कन्नड शहरातील एक गुणी व होतकरू खेळाडू असून पान टपरीच्या आधारे आपला उदरनिर्वाह करत असतो. एका हाताने दिव्यांग असूनही त्याने कन्नड येथील यस क्लब येथे योगेश पाटील व प्रवीण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून यापूर्वी देखील बांगलादेश व श्रीलंका या संघाविरूद्ध भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. निवडी बद्दल कन्नडच्या आमदार संजना जाधव, नगरअध्यक्षा फरीनबी अब्दुल जावेद, माजी नगराध्यक्ष विलास वाडेकर यांनी अभिनंदन केले.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 7:18 am

घाटनांद्रा येथे मारुती महाराजांचा वार्षिक यात्रा उत्सव सोमवारी:जय्यत तयारी, यात्रेत सोंग, बारागाड्या, जागरण, गोंधळाची धमाल‎

घाटनांद्रा येथील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या मारुती महाराजांचा वार्षिक यात्रा उत्सव यावर्षी सोमवार (दि.२० ) रोजी आयोजित करण्यात आला असून या एकदिवसीय यात्रा उत्सवामध्ये बारा गाड्या, दशावतारी सोंगे, तरुणांचे मनोरंजन करण्यासाठी जागरण गोंधळ व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ग्रामस्थांकडून यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती यात्रा उत्सव कमिटीने दिली. यात्रा उत्सवाच्या दिवशी सकाळी मारुती महाराजांची महापुजा, अभिषेक, सायंकाळी ग्रामस्थांनी बोललेले नवस फेडणे व गळ टोचण्याचा कार्यक्रम होईल तसेच अर्धा किलोमीटर वरुन ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नवसाच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होईल. बच्चेकंपनींसाठी मनोरंजन म्हणून अस्वलाचे सोंग काढण्यात येईल. रात्री तरूणांचे मनोरंजन करण्यासाठी शिव मल्हार वाघ्या मंडळ यांच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ वाजेच्या दरम्यान मारुतीरायाची टाळ मृदंगाच्या गजरात पालखी काढण्यात येऊन‌ त्यानंतर विविध देवी देवतांची दशावतारी सोंगांना प्रारंभ केला जाईल. ही सोंगे पहाटेपर्यंत काढण्यात येणार आहे. मंगळवार रोजी पहाटे लक्ष्मी आई, सूर्यनारायण व मारुती महाराजांचे सोंग काढुन या यात्रेचा समारोप करण्यात येईल. यात्रा उत्सवामध्ये रहाटपाळणे, खेळणी कटलरी सामान, झुला, हॉटेल्स, मिठाई आदींची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटण्यात आली असून एकदिवसीय यात्रा उत्सवाचा पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेऊन यात्रा उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन हनुमान मंदिर समिती व ग्रामस्थांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 7:17 am

बोरगावमध्ये दोन तास रास्ता रोको‎:म्हसला फाटा-अंधारी दरम्यानच्या 10 किलोमीटरची दुरवस्था झाल्यामुळे ग्रामस्थ झाले आक्रमक

सिल्लोड तालुक्यातील म्हसला फाटा ते अंधारी या मुख्य १० किमी रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी १० वाजता सिल्लोड-कन्नड हायवेवर २ तास रास्ता रोको आंदोलन केले. अनेक वर्षांपासून रस्ता खराब आहे. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या आंदोलनामुळे एक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. म्हसला फाटा येथे सकाळी १० वाजल्यापासून शेकडो नागरिक रस्त्यावर ठिय्या मांडून बसले. आंदोलनात जि.प. सदस्य राधाकृष्ण काकडे, सुखदेव सपकाळ, राजेंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर तायडे, जगदीश कवाळ, मनोज बैनाडे, महेंद्र मोरे, जय जैस्वाल यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. लवकरच रस्ता होईल प्रधानमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयाचे अभियंता मंगेश डापके यांनी सांगितले. म्हसला फाटा ते अंधारी १० किमी रस्त्यासाठी नवीन प्रस्ताव तयार होत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून नवीन रस्ता होईल. पाठपुरावा सुरू आहे. यासाठी४ महिने कालावधी लागेल.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 7:14 am

भूतानचे गृहमंत्री लिओनपो अजिंठा लेणी पाहून भारावले

जागतिक वारसा दिनानिमित्त भूतानचे गृहमंत्री लिओनपो शेरिंग यांनी शनिवारी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट दिली. लेणी पाहून ते भारावून गेले. मी लवकरच पुन्हा अजिंठा लेणीला येईल, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या सोबत ५४६ पर्यटकांनीही भेट दिली. सर्वांना मोफत प्रवेश देण्यात आला होता. शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांचे अजिंठा लेणीत मोटारीने आगमन झाले. भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी लेणी क्रमांक १, २, ५, ९, १०, १२, १७, २६ पाहिल्या. गाईड राहुलदेव निकम यांच्याकडून अजिंठा लेणीची सविस्तर माहिती घेतली. लेणीतील चित्रशैली, निसर्गरम्य परिसर, आदरातिथ्य पाहून आपण भारावून गेलो, अशी भावना लिओनपो शेरिंग यांनी व्यक्त केली. सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये पुन्हा अजिंठा लेणीला भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले. गाईड राहुलदेव निकम यांच्यासह उपस्थितांना त्यांनी भूतानला भेट देण्याचे निमंत्रण दिले. लिओनपो शेरिंग यांच्या आगमनापासून प्रयाणापर्यंत फर्दापूर पोलिसांच्या पथकाने अजिंठा लेणी परिसर, फर्दापूर टी पॉइंट, व्ह्यू पॉइंट परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. जागतिक वारसा दिनानिमित्त भारतीय पुरातत्व विभागाने शनिवारी पर्यटकांसाठी मोफत प्रवेश दिला होता. या संधीचा फायदा पर्यटकांनी घेतला. दिवसभरात ५४६ पर्यटकांनी अजिंठा लेणीचे मोफत दर्शन घेतले.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 7:12 am

हयात प्रमाणपत्र काढायला गेलेल्या लाभार्थींची रिक्षा उलटली:9 जखमी, हयात प्रमाणपत्र काढायला गेलेल्या‎लाभार्थींची रिक्षा उलटली, 9 जखमी‎

पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी शनिवारी (दि. १८) सकाळी हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पैठण तहसील कार्यालयात गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांच्या अपेरिक्षाला अपघात झाल्याने ९ प्रवासी जखमी झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, तहसील कार्यालयातील एका दलालाने ऑनलाइन प्रक्रिया करण्यासाठी १०० रुपये घेतल्याचा आरोप आहे. संगायो विभागात प्रमाणपत्र जमा करण्यासाठी प्रत्येकी ५० रुपये घेतल्याचाही आरोप आहे. प्रक्रिया पूर्ण करून सर्वजण ढाकेफळकडे निघाले होते. बोरगाव-ढाकेफळ रस्त्यावर दुपारी सुमारे अडीच वाजता रिक्षात (एमएच २० एस ४८६) ९ जण प्रवास करत होते. टाकळी-बोरगाव शिवारात रिक्षाच्या टायर बेरिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाला. चालकाचे नियंत्रण सुटले. रिक्षा रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पलटी झाली. वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर परिसरातील शेतकरी, वाहनधारकांनी मदत केली. जखमींना बाहेर काढले. ढाकेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. रुग्णवाहिका चालक विजय गायकवाड यांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बिडकीन शासकीय रुग्णालयात दाखल केले. बिडकीन ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्वांवर प्रथमोपचार केले. प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली. काहींना मुकामार, किरकोळ जखमा झाल्या. जखमींमध्ये मारोती संपत शिरसाठ (८०), हौसाबाई विश्वनाथ शिंदे (७०), सरसाबाई काशिनाथ दळे (६७), केसरबाई अर्जुन मोरे (८०), द्रोपदाबाई देविदास कोल्हे (७५), सरसाबाई जनार्धन कोल्हे (७५), हौसाबाई मुरलीधर गोन्टे (७८), द्वारकामाई मारोती शिरसाट (७१), राजू यादव मोरे (३०) यांचा समावेश आहे. कर्मचारी, दलालांवर कारवाई करा घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख किरण काळे यांनी बिडकीन ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तत्काळ, योग्य उपचार करण्याची विनंती केली. पैठण तहसीलदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. प्रकरणाची सखोल चौकशी करावी, संगायो विभागातील संबंधित कर्मचारी, दलालांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 7:10 am

सत्ताधारी आमदारांचा घरचा आहेर; सरकारच्या समित्या कागदावर:आ. वाघ, फरांदे, हिरे यांनी काढले शासनाचे वाभाडे; ‘झिरो टॉलरन्स’ची घोषणा

महिलांच्या सुरक्षिततेसाठी बंधनकारक असलेल्या ‘विशाखा’ व ‘पोश’ समित्या नाशिकमध्ये केवळ नावापुरत्याच असल्याचे वास्तव समोर आले असून, यावर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच तीव्र नाराजी व्यक्त केली. शासकीय कार्यालयांपासून खासगी कंपन्यांपर्यंत नियमांचे पालन होत नसल्याने महिलांना तक्रार करण्यासाठी विश्वासार्ह यंत्रणा उपलब्ध नसल्याचा आरोप बैठकीत केला. जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या बैठकीत आमदार चित्रा वाघ, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांनी शासन व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर थेट बोट ठेवले. महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर नाशिकचे नाव बदनाम होत असल्याची चिंताही व्यक्त केली. ..तर कठोर कारवाई टीसीएसमधील प्रकरणाचा संदर्भ देत आ. फरांदे यांनी नाशिकच्या प्रतिमेबाबत चिंता व्यक्त केली. महिलांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवले जाईल, असे सांगितले. अधिकाऱ्यांनाच विसर आ. वाघ यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयातच विशाखा समितीचे फलक दिसत नाहीत. घटनांची पुनरावृत्ती होत असताना प्रतिबंधात्मक यंत्रणा निष्क्रिय आहे. समित्यांच्या बैठकाच होत नसल्याने अडचण समित्यांकडे तक्रारी येत नाहीत, कारण बैठका होत नाहीत. महिलांना न्याय देण्यासाठी समित्यांनी सक्रिय भूमिका घ्यावी. - सीमा हिरे, आमदार ९० दिवसांत निकाल देण्याचे बंधनघटनेनंतर तीन महिन्यांपर्यंत तक्रार करता येते आणि ९० दिवसांत निकाल देणे बंधनकारक आहे. आयसीसी समित्यांना प्रत्यक्ष अधिकार दिल्याशिवाय खासगी क्षेत्रातील महिलांना दिलासा मिळणार नाही. - चित्रा वाघ, आमदार

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 6:56 am

‘हे रीलस्टार नव्हे, गुंड आहेत’; छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा गर्दीसमोर दम:‘हवा’ करणाऱ्या गुंडांवर पोलिस भारी; गोळीबार करणाऱ्या पीडी टोळीची धिंड

दोन दिवसांपूर्वी हनुमाननगरात गावठी कट्टा आणि बिअरची बॉटल नाचवत गोळीबार करणाऱ्या पवन दिवेकर व त्याच्या पीडी कंपनीवर अखेर पोलिसांनी कारवाई केली. गुंडांवर पोलिस कसे भारी पडतात, याचा प्रत्यय शनिवारी (१८ एप्रिल) रात्री आला. अवघ्या ४८ तासांपूर्वी ज्या चौकात त्यांनी हवा केली होती, तेथेच पुंडलिकनगर पोलिसांनी हातकड्या लावून आणि माना खाली घालायला लावून पवन अनिल दिवेकर, कुणाल किशार साळवे, महेश गौतम साळवे, रोहन अनिल दिवेकर, सतीश अण्णाराव हिवराळे, सिद्धांत शाहू चाबुकस्वार या गुंडांची धिंड काढली. गुंड जेलमधून सुटल्यावर शस्त्रांसह रील्स बनवून दहशत माजवत असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने दिले होते. यानंतर ॲक्शन मोडमध्ये आलेल्या पोलिसांनी घटनास्थळी तपास केला. “हे रीलस्टार नसून गुंड आहेत. यांच्यासोबत व्हिडिओ काढू नका. असे पोलिसांनी या वेळी सांगितले. पोलिसावरच उगारला होता चाकू दरम्यान, अटकेच्या वेळी पवन दिवेकरने पळून जाण्याच्या प्रयत्नात फौजदार अर्जुन राऊत यांना ढकलून दिले. तसेच, एका पोलिसावर चाकू उगारून शिवीगाळ केल्याप्रकरणी त्याच्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 6:52 am

डायल 112 : 6 मिनिटांत रिस्पॉन्सचा दावा:पण पोलिस येतात 12 मिनिटांत, गरजूंना मर्यादित साधनसामग्रीमुळे वेळेत मदत मिळत नाही

राज्यातील पोलिस दलासाठी आपत्कालीन मदतीचा आधार असलेल्या डायल ११२ मोहिमेला शहरात अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. शहर पोलिसांच्या दाव्यानुसार आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पोहोचण्याचा वेळ (रिस्पॉन्स टाइम) ६ मिनिटे आहे, मात्र प्रत्यक्षात नागरिकांच्या अनुभवात हा वेळ १२ मिनिटांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. वाढती वाहतूक कोंडी, मर्यादित साधनसामग्री आणि विनाकारण येणारे फेक कॉल्स यामुळे पोलिसांच्या गतीला ब्रेक लागत आहे. डीजीपी अन् आयुक्तांडून तपासणी पोलिस महासंचालक सदानंद दाते व आयुक्त प्रवीण पवार यांनी या तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. गेल्या दोन महिन्यांत हे वरिष्ठ अधिकारी अचानक कॉल लिस्ट उघडून तक्रारदारांना फोन करतात. पोलिसांकडून वेळेत मदत मिळाली की नाही, याची थेट विचारणा त्यांच्याकडून केली जात असल्याने कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली आहे. १८ पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक वाहन १८ पोलिस ठाण्यांमध्ये एक दुचाकी, १ चारचाकी उपलब्ध आहेत. या वाहनांची संख्या वाढविण्याची गरज आहे. प्रत्येकी केवळ १ दुचाकी आणि १ चारचाकी उपलब्ध आहे. एकाच वेळी दोन कॉल आल्यास दुसऱ्या गाडीची वाट पाहावी लागते. दारू पाण्यासारखी लागते, असे कॉल्स वाढले अनेक दारुडे कॉल करून दारू पाण्यासारखी लागते आहे, दारू विक्रेत्याला अटक करा अशा तक्रारी करतात. अशा कॉल्समुळे खरंच संकटात असलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना उशीर होतो. बायकोने भाजी चांगली केली नाही, चकणा चांगला नाही अशा कारणांसाठी येणाऱ्या कॉल्समुळे यंत्रणेचा वेळ वाया जात आहे. डायल ११२ : स्थिती माहिती समजून घ्यारोजचे सरासरी कॉल्स : १५० ते १७०सर्वाधिक कॉल्स : वाळूज, मुकुंदवाडी, सिडको, जिन्सीउपलब्ध बळ : प्रत्येकी ठाण्यास १ दुचाकी, १ चारचाकीपोलिसांचा दावा : ६ मिनिटे रिस्पॉन्स टाइमप्रत्यक्ष वेळ : १२ मिनिटांहून अधिक विलंब होणार नाही रिस्पॉन्स टाइम १० मिनिटांच्या आत आणण्यासाठी रोज काम करत आहोत. काही वेळा गाडी कॉलवर असेल तर दुसऱ्या ठिकाणचे वाहन रुजू केले जाते. मदतीसाठी विलंब होणार नाही. -जयश्री कुलकर्णी, सहायक निरीक्षक, डायल ११२ फेक कॉल्स, मर्यादित वाहनांना ट्रॅफिकचे ग्रहण शहराच्या मध्यवर्ती भागात आणि सिडको-वाळूज पट्ट्यात ट्रॅफिकमुळे पोलिसांच्या गाड्या अडकून पडतात.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 6:48 am

तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठीही दबाव:तरुणीची तुळशीची माळ तोडली, गजवा-ए-हिंदची धमकी

पंचवटी परिसरात आणखी एक लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अभियंता तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीचे लैंगिक शोषण केलेच पण तिची धार्मिक ओळख पुसून टाकण्याचाही प्रयत्न केला. पंचवटी पोलिसांनी संशयित तांजिर इनामदार याला अटक केली. शनिवारी (दि. १९) त्याला न्यायालयात हजर केले असता २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याबाबत पीडित तरुणीने तक्रार दिली. पंचवटीतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना २०२४ मध्ये संशयित तांजिर सोबत ओळख झाली. फिरण्याचा बहाणा करत मेरी, म्हसरुळ परिसरातील सार्वजनिक उद्याने, लॉजमध्ये नेत बळजबरीने मिठी मारत तिच्या गळ्याला लव्ह बाईटच्या नावाखाली गंभीर जखमा करत मोबाईलमध्ये फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली. निरीक्षक ज्योती आमणे तपास करत आहे. मद्य पाजून अत्याचार संशयिताने पीडितेला मद्य पाजून तिच्यावर अत्याचार केला. तिच्या गळ्यातील तुळशी माळ व हातातील पवित्र धागे तोडले. मला मुस्लिम रिवाजाप्रमाणे गजवा-ए-हिंद करायचे आहे, असे बोलून तिला धर्मांतर करण्याकरीता धमकावले. जानेवारी २०२६ मध्ये पीडितेला लॉजवर नेले.बळजबरीने संबध केले.त्या क्षणाचे फोटो,व्हिडीओ काढून ठेवले. कुटुंबियांनी दिले बळ पीडित तरुणी काही दिवसांपासून घरात एकाकी राहत होती. आई-वडीलांनी तिला विश्वासात घेत विचारणा केली. मुलीसोबत घडलेल्या प्रकाराने वडीलांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगीतले. कॉर्पोरेट जिहाद : राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी नाशिक येथे टीसीएस कंपनीत धर्मांतर, महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचाराच्या चौकशीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाची ३ सदस्यीय समिती शनिवारी नाशिकमध्ये दाखल झाली. समितीने एका पीडितेसह तिच्या कुटुंबीयांशी डिजिटल माध्यमांद्वारे संवाद साधला. ही समिती २० एप्रिलपर्यंत नाशिकमध्ये थांबून चौकशी करेल. दरम्यान, कोर्टाने आरोपी रझा रफिक मेमन, शफी भिकन शेखला २० पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 6:35 am

उद्यापासून 3 दिवस राज्यात वादळी पावसाचा ‘अलर्ट’:आज मराठवाड्यात पावसाची स्थिती, वर्धा ठरले देशातील उष्ण ठिकाण

राज्याच्या हवामानात पुन्हा मोठा बदल होत असून रविवारी दुपारनंतर दक्षिण मराठवाडा व उत्तर खान्देशात पावसाळी स्थिती निर्माण होईल, तर 20 ते 22 एप्रिलदरम्यान राज्याच्या बहुतांश भागांत वादळी पावसाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने हा इशारा ट्वीट केला आहे. त्यानुसार, मराठवाडा, विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहून 21 जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह गारपीट शक्य आहे. दरम्यान, शनिवारी राज्यात 14 जिल्ह्यातील तापमान 40 अंशाहून जास्त होते. वर्धा देशात उष्ण ठिकाण ठरले. मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर जास्त 20 आणि 21 एप्रिलला प्रामुख्याने पुणे विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग (विशेषतः बीड, लातूर, नांदेड) व विदर्भातील अमरावतीत वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी असेल. या भागात मेघगर्जनेसह अचानक पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. नगरच्या पारनेरमध्ये महिलेचा उष्माघाताने मृत्यू पारनेर | अहिल्यानगरातील पारनेर तालुक्यातील माळवाडी (ढवळपुरी) येथे जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेलेल्या हर्षदा रावसाहेब चौधरी (46) या महिलेचा शनिवारी दुपारी उष्माघाताने मृत्यू झाला. कडक उन्हात मका कापत असताना चक्कर येऊन त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना तातडीने जखणगाव येथील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. चौधरी कुटुंबाचा मोठा दूध व्यवसाय असल्याने हर्षदा नेहमीप्रमाणे दुपारी 1 वाजता जनावरांच्या चाऱ्यासाठी मका आणण्यासाठी शेतात गेल्या होत्या. वर्धा देशात सर्वात उष्णवर्धा 45.0नागपूर 44.2अमरावती 44.0चंद्रपूर 43.4अकोला 43.3गोंदिया 43.2सोलापूर 42.4परभणी 42.2जळगाव 41.4धाराशिव 41.4अहिल्यानगर 41.1बीड 41.1संभाजीनगर 40.6सांगली 40.0पुणे 39.6नाशिक 39.1

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 6:33 am

लातूर जिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन

५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारणार : पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले लातूर : प्रतिनिधी लातूरकरांचे गेल्या अनेक वर्षांचे स्वप्न मूर्त स्वरूपात येत असून काही तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असलेला जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे. आज १०० खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन झाले तरी या ठिकाणी ५०० खाटांचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्यात येईल. यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासह पुरेसा […] The post लातूर जिल्हा रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 1:37 am

भारतीय जहाजांवर गोळीबार!

होर्मुझमधील धक्कादायक प्रकार, भारताकडून निषेध तेहरान : वृत्तसंस्था मध्य-पूर्वेतील परिस्थिती सुधारत असल्याचे चित्र असतानाच शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन भारतीय व्यापारी जहाजांवर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. ब्रिटिश लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार इराणच्या लष्करी नौकांकडून एका तेल टँकरला लक्ष्य करण्यात आले. यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून शांत असलेला हा सागरी मार्ग पुन्हा एकदा धोकादायक बनला आहे. या गोळीबारानंतर भारताने […] The post भारतीय जहाजांवर गोळीबार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 1:34 am

भर उन्हाळ््यात ठेवली चिमुकल्यांची शिष्यवृत्ती परीक्षा

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब, असंवेदनशील आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्याच्या शिक्षण विभागाच्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून ऐन उन्हाळ््यात चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे. राज्यात उन्हाचा पारा ४४ अंशापर्यंत वाढलेला असताना २६ एप्रिलला चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात […] The post भर उन्हाळ््यात ठेवली चिमुकल्यांची शिष्यवृत्ती परीक्षा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 1:31 am

आरक्षणाच्या नावाखाली सत्ता टिकविण्याचा डाव

महिला अत्याचार होताना मोदी कुठे होते? नवी दिल्ली : वृत्तसंस्था भाजपला महिलांचे मसीहा बनायचे आहे. पण महिलांनी उन्नाव, हाथरस आणि मणिपूरमध्ये काय घडले ते पाहिले आहे. दिल्लीच्या रस्त्यावर बसलेल्या महिला खेळाडूंना कोणी विचारले, केवळ संसदेत उभे राहून मसीहा म्हणवून घेतल्याने फरक पडत नाही, तर तसे करून दाखवावे लागते, अशा शब्दात काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी पीएम […] The post आरक्षणाच्या नावाखाली सत्ता टिकविण्याचा डाव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 1:28 am

महिलांच्या हक्कांसाठी यापुढेही लढत राहणार

महिला विधेयक नामंजूर झाल्याने मोदींची नाराजी नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या पक्षांनी नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध करत महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली. ज्या-ज्या पक्षांनी महिलांच्या आरक्षणात अडथळे आणले, त्यांना भविष्यात परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. दरम्यान, विधेयकाच्या अपयशासाठी कॉंग्रेस, द्रमुक, तृणमूल कॉंग्रेस, समाजवादी पक्षाला जबाबदार धरले आणि हा […] The post महिलांच्या हक्कांसाठी यापुढेही लढत राहणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 1:26 am

अटीतटीची लढत, हैदराबाद विजयी

हैदराबाद : आयपीएल २०२६ च्या २७ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने अटीतटीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सचा १० धावांनी पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ईशान किशनच्या नेतृत्वाखाली हैदराबादने शानदार विजय मिळवला. या विजयामुळे हैदराबादने गुणतालिकेत मोठी झेप घेतली असून ६ सामन्यांत ६ गुणांसह टॉप-४ मध्ये एन्ट्री मारली. हैदराबादने अत्यंत स्फोटक सुरुवात केली. […] The post अटीतटीची लढत, हैदराबाद विजयी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 1:23 am

जिल्हा बँकेच्या १०२ कर्मचा-यांनी केले रक्तदान

लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी व गटसचिव संघटनेच्या वतीने जिल्हा बँकेच्या मुख्यालयात दि. १८ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात १०२ कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार वैजनाथराव शिंदे व लातूर […] The post जिल्हा बँकेच्या १०२ कर्मचा-यांनी केले रक्तदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 10:40 pm

मोफत अस्थिरोग शिबिरात ७७ रुग्णांची तपासणी व उपचार

लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील पोद्दार हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत अस्थिरोग तपासणी व उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ७७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. लातूरचे ज्येष्ठ अस्थिशल्य चिकित्सक डॉ. अशोक पोद्दार लातूर शहरात मोफत आरोग्य शिबीर सुरु करण्याकामी अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व […] The post मोफत अस्थिरोग शिबिरात ७७ रुग्णांची तपासणी व उपचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 10:39 pm

मल्लिका फॅशन लाइफस्टाइल प्रदर्शनाला प्रतिसाद 

लातूर : प्रतिनिधी सेन्ट्रल इंडियाची सुप्रसिद्ध मल्लिका फॅशन अ‍ॅण्ड लाइफस्टाइल एक्झीबिशन लातुर येथील दिवानजी मंगल कार्यालयामध्ये दि. १८ व १९ एप्रिलपर्यंत सुरु आहे. या प्रदर्शनाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन फॅशन डिझायनर वैशाली गिरी, रेसीन आर्टिस्ट तनिष्का मनिष बोरा, डॉ संध्या करड, सानिका ककनाटे, आकांशा नवदिंगे, प्रो. डॉ. क्रांती विठ्ठलराव मोर, गायत्री […] The post मल्लिका फॅशन लाइफस्टाइल प्रदर्शनाला प्रतिसाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 10:37 pm

शिक्षण संस्थाचालक संघाच्या शिबिरात १५१ जणांचे रक्तदान

लातूर : प्रतिनिधी माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाच्या वतीने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात १५१ जणांनी रक्तदान केले. यानिमित्त १५१ अंध व्यक्तींना कपडेही वाटप करण्यात आले. शहरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असलेल्या साने गुरुजी विद्यालयात झालेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महापौर जयश्रीताई सोनकांबळे यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून […] The post शिक्षण संस्थाचालक संघाच्या शिबिरात १५१ जणांचे रक्तदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 10:36 pm

८,९१६ जणांची मोफत नेत्र तपासणी; ७६९ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार 

लातूर : प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून दि. १८ एप्रिल रोजी सर्वात मोठा ‘आरोग्य जागर’ आयोजित करण्यात आला होता. जिल्हाभरात एकचवेळी १३ ठिकाणी झालेल्या शिबिरांत ८ हजार ९१६ पेक्षा अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी व […] The post ८,९१६ जणांची मोफत नेत्र तपासणी; ७६९ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 10:34 pm

विलास साखर कारखान्यातर्फे अन्नधान्य वाटप 

लातूर : प्रतिनिधी माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर (निवळी) यांच्या वतीने शहरातील संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृहात अन्नधान्य वाटप करून सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता झालेल्या या कार्यक्रमाला माजी आमदार तथा कारखान्याचे व्हाईस चेअरमन वैजनाथराव […] The post विलास साखर कारखान्यातर्फे अन्नधान्य वाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 10:33 pm

लातूर शहरात ‘दुर्मिळ झाडांची देवराई’ साकारणार

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यात ख-या अर्थाने वृक्ष चळवळ रुजवणारे संवेदनशील नेतृत्व, सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा देवराई येथे १०० दुर्मिळ झाडे लावण्याच्या प्रकल्पाचा शानदार शुभारंभ करण्यात आला. येथील औसा रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया समोरील परिसरात हा कार्यक्रम पार पडला. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी १९९३ मध्ये […] The post लातूर शहरात ‘दुर्मिळ झाडांची देवराई’ साकारणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 10:32 pm

घाटलाडकी परिसरात आगीच्या दोन घटना:संत्रा बागा जळाल्या, शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी

घाटलाडकी परिसरात आगीच्या घटनांमुळे संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण प्रणालीतील बिघाडामुळे स्पार्किंग होऊन ठिणग्या पडल्या आणि गवत पेटल्याने आग लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महसूल विभागाने या घटनांचा पंचनामा केला असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महावितरणकडे माहिती पाठवली आहे. गेल्या चार दिवसांतच दोन मोठ्या आगीच्या घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरवाडी येथील शेतकरी मंगेश तर्हेकर यांच्या शेतात विजेच्या स्पार्किंगमुळे आग लागली. यात त्यांच्या संत्रा बागेला मोठी झळ पोहोचली असून, अनेक फळधारक झाडांचे नुकसान झाले आहे.तसेच, मौजा सांभोरा येथील शेतकरी जानराव लोखंडे यांच्या शेतात लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमुळे मुजीबुर रहमान यांच्या शेतातील संत्रा, सागवान आणि सीताफळाची झाडे जळून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या सर्व घटनांचे पंचनामे झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी होत आहे. वीज वितरण कंपनीने जबाबदारी स्वीकारून नुकसानभरपाई द्यावी, तसेच वीज यंत्रणेची तातडीने देखभाल व दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 9:51 pm

तिवसा येथे पक्ष्यांसाठी पाणी, दाणे उपक्रम:वन्यजीवप्रेमींकडून कडक उन्हात पक्ष्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न

एप्रिल महिन्यातील वाढत्या तापमानामुळे वन्यजीव आणि पक्ष्यांना मोठा फटका बसत आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तिवसा तालुक्यातील वन्यजीवप्रेमी शुभम विघे आणि सागर अटाळकर यांनी 'पक्ष्यांसाठी अन्न व पाणी' हा संवेदनशील उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, त्यांनी मित्रपरिवाराच्या सहकार्याने विविध गावांमध्ये झाडांच्या सावलीत, मोकळ्या जागांमध्ये आणि सुरक्षित ठिकाणी पाण्याची भांडी (परळ) ठेवण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच पक्ष्यांसाठी धान्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या तिवसा आणि अमरावती तालुक्यातील मोझरी, अनकवाडी, मालधुर, ब्राम्हणवाडा गोविंदपूर, शिवणगाव आणि काटपूर या गावांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमामुळे अनेक पक्ष्यांना उन्हाच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळत आहे. स्थानिक नागरिकांकडूनही या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. समाजसेविका सोनिया गुप्ता, तसेच साहिल चावके, पवन भिवगडे, भूषण निकोशे, दर्शन खुळे, आकाश भुयार आणि कुणाल खुळे यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आहे, ज्यामुळे हा उपक्रम अधिक व्यापक होत आहे. याबाबत बोलताना शुभम विघे आणि सागर अटाळकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर किंवा परिसरात लहान पाण्याची भांडी ठेवून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी, असे ते म्हणाले. आपल्या छोट्या प्रयत्नातून मोठा बदल घडू शकतो, त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. हा उपक्रम केवळ काही गावांपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण तालुकाभर राबवण्याचा संबंधितांचा मानस आहे. येत्या काही दिवसांत भटक्या जनावरांसाठीही पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक पाण्याचे भांडे ठेवल्यास अनेक पशु-पक्ष्यांचे प्राण वाचू शकतात, असा संदेश ही चमू सर्वदूर पोहोचवत आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 9:50 pm

गतवर्षीचा पीक विमा मिळाला नाही:खंडाळा खुर्दच्या शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खंडाळा खुर्द, जावरा मोळवण, रोहना आणि मुंडवाडा परिसरातील शेतकऱ्यांना मागील हंगामातील सोयाबीन, तूर आणि कापूस पिकाचा विमा अद्याप मिळालेला नाही. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर धडक दिली आणि आपली कैफियत तहसीलदारांपुढे मांडली. मागील वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने पंचनामे करून नुकसानाची नोंद घेतली आणि काही प्रमाणात मदतही दिली. मात्र, पीक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विशेषतः सोयाबीन पीक काढणीच्या टप्प्यावर असताना आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर, संबंधित गावांतील शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात एकत्र येत तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देताना खंडाळा खुर्दचे सरपंच उमेश दहातोंडे, रोहना येथील सरपंच अमरीश काकडे, तसेच नरेश ठाकरे, निलेश ठाकरे, मोहन ठाकरे, नयन ठाकरे, कैलास लांडे, अर्पित काकडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. केवळ नांदगाव खंडेश्वरच नव्हे, तर इतर तालुक्यांतूनही पीक विम्याची रक्कम न मिळाल्याच्या अशाच तक्रारी समोर येत आहेत. काही शेतकऱ्यांना तर मागील वर्षी झालेल्या नुकसानाची भरपाईही अद्याप मिळालेली नाही. ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान होऊनही, त्यांची शेतं ज्या महसूल मंडळात येतात, तेथे अतिवृष्टीची नोंद नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही, अशी स्थिती आहे. मागील वर्षीची ही परिस्थिती असताना, यावर्षीच्या खरीप हंगामात दुष्काळसदृश स्थितीची नोंद झाली, तर आता रबीची पिके काढणीला असताना अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 9:50 pm

मारडाजवळ दुचाकी अपघातात भाजप उपाध्यक्षाचा मृत्यू:प्रवीण बडकस यांचे निधन, कुऱ्हा येथून परतताना घडली घटना

भाजपचे तिवसा तालुका उपाध्यक्ष प्रवीण बडकस (वय ४३, रा. मारडा) यांचे शुक्रवारी रात्री रस्ता अपघातात निधन झाले. मारडाजवळ त्यांची दुचाकी विद्युत खांबावर आदळल्याने हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण बडकस हे कुऱ्हा येथील कामे आटोपून रात्री दुचाकीने आपल्या गावी मारडा येथे परतत होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास मारडाजवळ अचानक त्यांचे वाहन अनियंत्रित झाले आणि ते एका विद्युत खांबावर आदळले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्यांना अमरावती येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी दुपारी मारडा येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार राजेश वानखडे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, प्रदीप गौरखडे, धीरज केने, संदीप आमले, अजय गुल्हाने, रवींद्र हांडे, मनोज अडसड, विठ्ठल रुक्मिणी संस्थेचे अतुल ठाकरे, सरपंच, उपसरपंच आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि मोठा आप्त परिवार आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 9:48 pm

मोर्शीत ब्रह्मकुमारीज् तर्फे 'खुशियों का पासवर्ड' कार्यक्रम:डॉ. सचिन परब यांनी दिले तणावमुक्तीचे मार्गदर्शन

मोर्शी येथे प्रजापिता ब्रह्मकुमारीज् ईश्वरीय विश्वविद्यालयतर्फे 'खुशियों का पासवर्ड' या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. सचिन परब यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याच्या तणावपूर्ण जागतिक परिस्थितीत 'परिस्थिती कठीण आहे पण मी स्थिर आहे,' हे वाक्य मनाला सांगणे हाच 'खुशियों का पासवर्ड' आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारीज् च्या स्थानिक केंद्रात सुरू झालेल्या या सकारात्मक ऊर्जा प्रदान करणाऱ्या कार्यक्रमात डॉ. परब यांनी तणावमुक्त जीवनासाठी योगा आणि मेडिटेशनचे महत्त्व अधोरेखित केले. मोर्शीकर जनतेसाठी तणावमुक्त जीवन जगण्याची ही एक चांगली संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. हा कार्यक्रम १९ एप्रिलपर्यंत दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सुरू राहणार आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारीज् च्या मोर्शी केंद्राने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा स्थानिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. परब यांनी यावेळी केले. डॉ. परब यांनी आपल्या संबोधनात अनेक उदाहरणे दिली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला प्रतिकूल परिस्थितीतही धीराने कुटुंब सांभाळते, तसेच अरुणिमा सिन्हा या खेळाडूचे उदाहरण देत त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे महत्त्व सांगितले. सध्याच्या जागतिक युद्धजन्य स्थितीत राजयोगाचे मेडिटेशन खूप उपयुक्त असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राजयोगिनी ब्रह्मकुमारी सीतादीदी, नगराध्यक्षा प्रतीक्षाताई गुल्हाने, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप कुऱ्हाडे, रवींद्र गुल्हाने, डॉ. दीपक ढोले, बबलूभाऊ अंगनाणी, नितीन पन्नासे, धावडेताई, प्रदीप खोडस्कर आणि मोर्शी शहरातील माध्यमस्नेही उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 9:47 pm

काँग्रेसचे 'सृजन अभियान' चांदूरबाजार, तिवस्यात; नव्या पदाधिकाऱ्यांची निवड:आमदार भाई जगताप व आफताब अहमद निरीक्षक म्हणून उपस्थित

काँग्रेसने शहर आणि जिल्हा स्तरावर नवीन पदाधिकारी निवडण्यासाठी 'संघटन सृजन अभियान' सुरू केले आहे. या अभियानांतर्गत चांदूरबाजार आणि तिवसा येथे काँग्रेसच्या सभा पार पडल्या. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते आफताब अहमद आणि प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी आमदार भाई जगताप यांनी निरीक्षक म्हणून या सभांना उपस्थिती लावली. निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. शहर आणि जिल्ह्याच्या नेतृत्वासाठी कोण योग्य आहे, याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच, काँग्रेसला गावपातळीवर मजबूत करण्यासाठी जनतेत कोणते मुद्दे घेऊन जावे, यावर मार्गदर्शन करण्यात आले. अचलपूर विधानसभा मतदारसंघातील चांदूरबाजार येथे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय दुबे, संजय खाडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, महिला काँग्रेसच्या कांचनमाला गावंडे, वासंतीताई मंगरोळे, अता शाह, नामदेवराव तनपुरे, किशोर देशमुख, श्रीकांत झोडपे, राहुल गवई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावान काँग्रेस समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संघटनेला अधिक बळकट करण्यावर आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यपद्धती गतिमान करण्यावर भर देण्यात आला. बबलू देशमुख यांनी यावेळी सांगितले की, संघटन सृजन अभियानामुळे पक्षाची पाळेमुळे अधिक मजबूत होत आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला जोडून काँग्रेसला पुन्हा जनतेच्या केंद्रस्थानी आणण्याचा आमचा निर्धार आहे. तिवसा येथेही निरीक्षक आफताब अहमद, आमदार भाई जगताप, माजी मंत्री यशोमतीताई ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, प्रदेश सरचिटणीस संजय दुबे आणि माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत आढावा बैठक व कार्यकर्त्यांच्या मुलाखती पार पडल्या. तिवसा तालुका काँग्रेस आणि शहर काँग्रेसने या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत वैभव वानखडे यांच्या पुनर्निवडीचा ठराव मांडण्यात आला आणि कडक ऊन असतानाही ग्रामीण भागातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 9:46 pm

वर्धा देशात 'हॉटस्पॉट'!:45 अंश सेल्सिअस तापमानासह जिल्हा अक्षरशः होरपळला, सूर्याचा प्रकोपाने रस्ते ओस

उष्णतेच्या लाटेने वर्धा जिल्हा अक्षरशः होरपळून निघत असून शनिवारी तब्बल 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. देशात सर्वाधिक तापमान नोंदवल्यामुळे वर्धा हॉटस्पॉट ठरला असून ‘रवी’च्या प्रखर तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडलेले दिसत असून नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले आहे. उकाड्याचा फटका सर्वाधिक शालेय विद्यार्थ्यांना, कामगारांना आणि रस्त्यावर काम करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. अनेक ठिकाणी उष्माघाताची लक्षणे दिसून येत असून रुग्णालयांतही उष्णतेशी संबंधित तक्रारी वाढू लागल्या आहेत. पाण्याची कमतरता, सावलीचा अभाव आणि वीजपुरवठ्याच्या अडचणी यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याचा इशारा देत येलो अलर्ट जारी केला आहे. तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना दिसून न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शीतल केंद्रांची उभारणी, तसेच आरोग्य सेवांची तत्परता यांसारख्या उपाययोजनांची तातडीची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला असून दुपारच्या वेळी व्यापारावरही परिणाम झाला आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. ‘रवी’चा हा प्रकोप कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या १० शहरांची माहिती: ​१. बांदा (उत्तर प्रदेश): ४५.४C​२. निर्मल - दस्तराबाद (तेलंगणा): ४४.५C​३. अमरावती (महाराष्ट्र): ४४.४C​४. अकोला (महाराष्ट्र): ४४.१C​५. वर्धा (महाराष्ट्र): ४३.९C​६. कर्नूल (आंध्र प्रदेश): ४३.४C​७. नागपूर (महाराष्ट्र): ४३.४C​८. सोलापूर (महाराष्ट्र): ४३.३C​९. आदिलाबाद (तेलंगणा): ४३.३C​१०. मालेगाव (महाराष्ट्र): ४३.२C

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 9:45 pm

अक्षय्य तृतीयेला अमरावतीत 60 कुटुंबांचा गृहप्रवेश:शंभरावर चारचाकींची डिलिव्हरी; सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचीही मोठी खरेदी

वर्षभरातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अमरावतीकरांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. घर, फ्लॅट, प्लॉट, शेती, दागिने, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. सध्याची भाववाढ आणि इतर बाबींचा खरेदीवर कोणताही परिणाम झाला नसून, उलट गतवर्षीच्या तुलनेत विक्रीत वाढ झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. या शुभमुहूर्तावर शहरातील सुमारे ६० कुटुंबे नव्या घरात प्रवेश करणार आहेत. काही नागरिकांनी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून, तर काहींनी गरजेपोटी सोने-चांदी आणि डायमंड ज्वेलरीला पसंती दिली. घर, फ्लॅट, प्लॉट आणि शेतीच्या बाबतीतही अशीच स्थिती होती. आजची खरेदी म्हणजे भविष्यातील फायदा, असे अनेक खरेदीदारांचे मत होते. अमरावती महानगरात चारचाकी वाहनांपासून ते गृहपयोगी वस्तूंचे सर्व नामांकित ब्रँड्स उपलब्ध असल्याने ग्राहकांचा ओढा शोरूम्सकडे होता. क्रेडाई, अमरावतीचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि त्याला मुहूर्ताची जोड दिली जाते. गेल्या महिनाभरात सुमारे १२० नागरिकांनी घरांसाठी बुकिंग केले. यापैकी निम्म्या खरेदीदारांनी व्यवहार पूर्ण केले असून, ते अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करणार आहेत. तर साधारणतः तेवढ्याच नागरिकांनी उद्याच्या मुहूर्तावर व्यवहार पूर्ण करण्याचे ठरवले आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीबद्दल बोलताना दूरदर्शन (इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दालन) चे संचालक निलेश साबू म्हणाले की, गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि एसीला ग्राहकांनी पसंती दिली आहे. नव्या घरांसाठी नव्या वस्तू लागतात म्हणूनही नागरिकांनी खरेदी केली. बुकिंगमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ८ ते १० टक्के वाढ झाली आहे. पीएनजी, अमरावतीचे सेल्स हेड बापूसाहेब कारवाड यांनी सांगितले की, अक्षय्य तृतीया हा शुभमुहूर्त असल्याने सोन्याचे दागिने आणि डायमंड ज्वेलरीला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. सोने हे अलीकडच्या काळातील सुरक्षित गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरले आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 9:37 pm

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पाणी, शिक्षण, आरोग्यावर भर:मनपाला 5 वर्षांच्या विकास आराखड्याचे निर्देश

अमरावती शहराच्या विकासासाठी पाणी, शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर भर देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. अमरावतीकरांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. महापालिकेच्या आढावा बैठकीत त्यांनी पुढील पाच वर्षांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. शनिवारी दुपारी झालेल्या या बैठकीत अमरावती शहराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या आढावा सभेला अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके, बडनेराचे आमदार रवि राणा, विधान परिषद सदस्य संजय खोडके व धीरज लिंगाडे यांच्यासह माजी पालकमंत्री प्रवीण पोटे आणि पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी शहरातील बेघर नागरिकांना प्राधान्य देत घरांचे पट्टे (हक्कपत्रे) वाटप करण्याचे निर्देश दिले. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, अशा नागरिकांची यादी तयार करून त्यांना विविध गृहनिर्माण योजनांद्वारे घरे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी, असेही ते म्हणाले. पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी जलविस्तार योजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले, जेणेकरून शहरातील सर्व भागांमध्ये नियमित व शुद्ध पाणीपुरवठा होईल. रस्ते, नाले, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत गरजांवर प्राधान्याने काम करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले. ऊर्जाबचत आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शहरातील पथदिवे सौरऊर्जेवर चालविण्याची सूचना करण्यात आली. तसेच, मनपाच्या शाळा, दवाखाने आणि प्रशासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शहरातील अतिक्रमणे हटवून सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचबरोबर, लघु व्यावसायिकांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन तयार करून त्यांना नियोजित जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे, स्‍थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता डॉ. राजेंद्र तायडे, गटनेता नाना आमले, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, उपसभापती सुमती ढोके, शिक्षण समिती सभापती अॅड. प्रीती रेवणे, महिला बाल कल्‍याण समिती सभापती ममता आवारे, उपसभापती लता देशमुख, विधी समिती उपसभापती डॉ. मधुरा काहाळे, आयुक्‍त वर्षा लड्डा, अतिरिक्‍त आयुक्‍त शिल्‍पा नाईक, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, उपायुक्‍त योगेश पिठे, नगरसेवक आणि विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 9:35 pm

राज ठाकरे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेत:त्यांना या विषयातले काय कळते? महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून ॲड. गुणरत्न सदावर्तेंची टीका

लोकसभा महिला आरक्षण कायद्यातील दुरुस्ती आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी केंद्र सरकारने मांडलेले विधेयक बहुमताअभावी नामंजूर झाले असतानाच, सरकारने रात्रीतून अधिसूचना काढून 2023 चा कायदा लागू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या या घाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नेमके काय साध्य करायचे होते? असा सवाल करत केंद्र सरकारला धारेवर धरले. मात्र, राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली असून, राज ठाकरेंना या विषयातील नेमके काय कळते, अशी विचारणा करत त्यांची खिल्ली उडवली आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली असून राज ठाकरेंवरही त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, राज ठाकरे यांना अनुसूचित जाती, जमातींचे खासदार वाढू द्यायचे नाहीत. राज ठाकरे हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत. त्यांना काही समजत नाही, अशी टीका सदवार्ते यांनी केली आहे. पुढे बोलताना ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, राज ठाकरे यांना एससी, एसटी समाजाचे आमदार, खासदार नको आहेत. राज ठाकरे यांचा हाच वैचारिक डीएनए आहे. राज ठाकरे हे ओबीसींचे विरोधक आहेत. तसेच राज ठाकरे यांचे सर्व उद्योग हे महापालिका, टेंडरशी संबंधित आहेत. परंतु, राज ठाकरे हे संविधानाला चुकीचे दर्शवत आहेत. त्यांचे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा सदवार्ते यांनी दिला आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 9:32 pm

संघ मातीतला, म्हणून रुजला; मार्क्सवाद संपला:'मला उमगलेला संघ' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात भाऊ तोरसेकरांचे प्रतिपादन

ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी प्रतिपादन केले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा भारतीय मातीतील असल्याने तो जनमानसात रुजला आहे, तर मार्क्सवादी विचार आयात केलेला असल्याने आणि कालबाह्य झाल्याने तो संपला आहे. 'मला उमगलेला संघ' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.पुण्यातील टिळक रस्त्यावरील लेडी रमाबाई सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ संगीतकार राहुल रानडे, प्रसिद्ध अभिनेते ऋषिकेश जोशी, पुस्तकाचे संपादक सुधीर जोगळेकर आणि 'भारतीय विचार साधना' (भाविसा) संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे व्यासपीठावर उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार यांनी तोरसेकर यांच्याशी संवाद साधला. संघाने १०० वर्षे पूर्ण केली असताना कम्युनिस्ट चळवळ का लयाला गेली, याचा उलगडा करताना तोरसेकर म्हणाले की, कम्युनिस्टांना आता भारताची मातीही मान्य नाही. सुरुवातीच्या काळात काही नेत्यांनी प्रयत्न केले असले तरी, आता ही संपूर्ण चळवळ केवळ 'पुस्तकी' राहिली आहे. याउलट, संघ स्वयंसेवक समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहेत आणि संघ केवळ ज्ञानी लोकच नव्हे, तर समाजासाठी उपयुक्त ठरणारे लोकसंग्राहक स्वयंसेवक निर्माण करतो. अभिनेते ऋषिकेश जोशी यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, नाट्यकलेचा अभ्यास करताना २० वर्षे ते डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली होते. मात्र, जगभरातील संस्कृती नष्ट होत असताना भारताची संस्कृती का टिकली, याचा अभ्यास केल्यावर त्यांना संघ कार्यामागील बलस्थाने लक्षात आली. राष्ट्रभक्तीचा समान धागा त्यांना संघाकडे आकर्षित करणारा ठरला. ज्येष्ठ संगीतकार राहुल रानडे म्हणाले की, संघाच्या शिस्तप्रियतेमुळेच ही संघटना १०० वर्षे टिकली आहे. संघ प्रार्थनेचे लंडनच्या 'रॉयल ऑर्केस्ट्रा'मध्ये ५७ वादकांसह ध्वनिमुद्रण करणे, हा एक प्रकारे 'काव्यगत न्याय' असल्याचे त्यांनी नमूद केले.अ‍ॅड. क्षितीज गायकवाड यांनी सांगितले की, बौद्ध समाजात जन्म झाल्यामुळे सुरुवातीला त्यांच्या मनात संघाविषयी चुकीची मते होती. मात्र, गिरीश प्रभुणे यांच्या सानिध्यात आल्यावर त्यांना खरा संघ उमजला. 'भारतीय विचार साधना' संस्थेने आतापर्यंत ६०० पुस्तकांचे प्रकाशन केले असून, समाजातील मान्यवरांची संघाविषयीची मते संकलित करण्याच्या उद्देशातून 'मला उमगलेला संघ' या पुस्तकाची निर्मिती करण्यात आल्याचे संपादक सुधीर जोगळेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी तोरसेकर यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले की, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर वंचितांसाठी लढा दिला. ते कधीही 'डावे' नव्हते. ते आज हयात असते, तर नक्कीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठीशी उभे राहिले असते. दुर्दैवाने आजच्या चळवळीतील लोकांनी या महापुरुषांना नीट वाचलेले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 8:43 pm

थॅलेसेमियाचे आव्हान पेलण्यासाठी व्यापक जनजागृती आवश्यक:डॉ. अतुल कुलकर्णी यांचे महर्षी कर्वे जयंती व्याख्यानात प्रतिपादन

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांची १६८ वी जयंती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित 'महर्षी कर्वे व्याख्यानमाले'त जनकल्याण रक्तकेंद्र, पुणे चे कार्यकारी संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी 'थॅलेसेमिया' या रक्तविकारावर मार्गदर्शन केले. थॅलेसेमियाचे आव्हान पेलण्यासाठी व्यापक जनजागृतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. दिवसभरात संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्वे रस्त्यावरील महर्षी कर्वे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी व्हिजन इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी घोषपथकाद्वारे पुतळ्यास मानवंदना दिली. 'आव्हान रक्तविकारांचे' या विषयांतर्गत डॉ. अतुल कुलकर्णी यांचे विशेष व्याख्यान संस्थेच्या रमा-पुरुषोत्तम विद्या संकुलात पार पडले. या व्याख्यानात त्यांनी थॅलेसेमिया या घातक रक्तविकाराविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव, व्यवस्थापक मंडळ सदस्य मंदार पारखी, सीमा कांबळे, वित्त समिती अध्यक्ष सीए अभय कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, उपसचिव कांचन सातपुते हे मान्यवर उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थिनी, विविध शाखांचे शाखाप्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने प्रत्यक्ष तसेच युट्यूब लिंकद्वारे आभासी स्वरुपातही सहभागी झाले होते. याच कार्यक्रमात डॉ. न. म. जोशी लिखित 'भारतरत्न महर्षी कर्वे' या मराठी पुस्तकाचा श्रीमती विनया बापट यांनी केलेला इंग्रजी अनुवाद मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. संस्थेच्या वतीने विनया बापट आणि डॉ. न. म. जोशी यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर दोघांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. अतुल कुलकर्णी यांनी मानवी देहाला निसर्गाची उत्कृष्ट निर्मिती संबोधत, रक्त हा त्यातील अलौकिक घटक असल्याचे सांगितले. शरीरातील सर्व इंद्रियांपर्यंत ऑक्सिजन पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रक्तपेशी करतात. मात्र, त्यात विकार उत्पन्न झाल्यास शरीराच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. थॅलेसेमिया हा असाच एक अनुवांशिक रक्तविकार आहे. रक्तातील लाल रक्तपेशी योग्य पद्धतीने तयार न होणे हे या विकाराचे मुख्य लक्षण आहे. सर्व शारीरिक गुणधर्म गुणसूत्रातून संक्रमित होतात, त्याचप्रमाणे काही विकारही संक्रमित होतात. आई आणि वडील दोघेही थॅलेसेमियाचे वाहक असल्यास पुढच्या पिढीत हा विकार उद्भवू शकतो, असे त्यांनी सांगितले. आज महाराष्ट्रात १५०० पेक्षा अधिक मुलांना या विकारामुळे नियमित रक्त भरून घ्यावे लागते. एका थॅलेसेमियाग्रस्त मुलास दर वर्षी १० ते १५ रक्तपिशव्यांची आवश्यकता असते. या मुलांवर उपचार करण्यासोबतच थॅलेसेमिया उद्भवूच नये यासाठी व्यापक जनजागरणाची नितांत आवश्यकता असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी अधोरेखित केले.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 8:04 pm

5.98 लाखांच्या बक्षीसांसह राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस स्पर्धा:पुण्यात 24 एप्रिल ते 4 मे दरम्यान; विक्रमी खेळाडूंचा सहभाग

पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य व्हेटरन्स टेबल टेनिस समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 32व्या राष्ट्रीय मास्टर्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 24 एप्रिल ते 4 मे 2026 या कालावधीत म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण 5 लाख 98 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष राजीव बोडस आणि पीडीटीटीएच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधून खेळाडूंनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये वैयक्तिक गटात 1195, सांघिक गटात 197 आणि दुहेरी गटात 834 खेळाडूंचा समावेश असून, याला विक्रमी प्रतिसाद लाभला आहे. केवळ महाराष्ट्रातून 300 हून अधिक वैयक्तिक प्रवेशिका आल्या असून, 30 संघ आणि 166 दुहेरी जोड्या राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यावेळी प्रकाश तुळपुळे (टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाचे वरिष्ठ सचिव), महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी यतीन टिपणीस आणि स्पर्धा संयोजन सचिव आशिष बोडस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शारदा ग्रुप आणि डेक्कन डाईज व केमिकल इंडस्ट्रीज यांनी या स्पर्धेला प्रायोजकत्व दिले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राचे स्टार खेळाडू मनीषा बोडस, वीणा जोशी, रंजना पत्की, सुशमा मोघरे, शिल्पा जोशी, राधिका दोरले, मयुरी दीक्षित तसेच पुरुष गटात सुबोध देशपांडे, सूरज चंद्रशेखरन, केदार कसबेकर, मनीष रावत, प्रसाद नाईक यांसारख्या अनेक दिग्गज खेळाडूंचे कौशल्य पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा 40, 45, 50, 55, 60, 65, 70, 75 वर्षांवरील आणि 75 वर्षापुढील पुरुष व महिला अशा विविध वयोगटात सांघिक, एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी प्रकारात खेळवली जाईल. स्पर्धेसाठी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात 16 नवीन 'स्टॅग' टेबल टेनिस टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. दररोज सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत सामने होतील. स्पर्धेतील विजेत्यांना पदके, करंडक आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 8:02 pm

नमिता थापर: एआयमुळे आरोग्यसेवेत मानवी स्पर्श मजबूत होईल:'सिमहेल्थ 2026' परिषदेत एमक्युर फार्मास्युटिकल्सच्या कार्यकारी संचालिकांचे मत

एमक्युर फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका नमिता थापर यांनी म्हटले आहे की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आरोग्यसेवेत मानवी स्पर्श अधिक मजबूत करेल. 'सिमहेल्थ २०२६' या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात बोलताना, त्यांनी भारताच्या आरोग्यसेवेचा प्रवास 'सुविधांच्या अभावाकडून' 'उद्देश्यपूर्ण काळजीकडे' वळला पाहिजे, असे मत व्यक्त केले. थापर यांच्या मते, एआय आरोग्यसेवा व्यावसायिकांना पुनरावृत्तीच्या कामांमधून मुक्त करून रुग्णांशी अर्थपूर्ण संवाद साधण्यास मदत करू शकते. त्यांनी पर्यायी उपचारपद्धतींचा समावेश आणि महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यावर भर दिला, जे सर्वसमावेशक आणि भविष्याभिमुख आरोग्य व्यवस्थेसाठी आवश्यक आहे. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) अंतर्गत वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेने १७ व १८ एप्रिल २०२६ रोजी ‘सिमहेल्थ २०२६’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. 'स्मार्ट आरोग्यसेवेचा स्वीकार: भाकीत-आधारित, अचूक आणि वैयक्तिकृत आरोग्य प्रणाली' या संकल्पनेवर आधारित ही परिषद सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे कॅम्पसमध्ये पार पडली. आरोग्यसेवा, तंत्रज्ञान आणि सार्वजनिक धोरणावर आधारित ही 'सिमहेल्थ' परिषदेचे हे २७ वे वर्ष होते. देशातील अग्रगण्य शैक्षणिक परिषदांपैकी एक म्हणून हिने विशेष स्थान निर्माण केले आहे. यंदाच्या परिषदेत चिकित्सक, संशोधक, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, आयटी नवोन्मेषक आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसह १ हजार ४०० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. आरोग्यसेवेच्या भविष्यावर भाष्य करताना, नमिता थापर यांनी भारताच्या 'थ्री ए' (उपलब्धता, जागरूकता आणि परवडणारी किंमत) कडे लक्ष देण्याच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यायी उपचार पद्धती आणि महिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणाऱ्या भविष्यवेधी दृष्टिकोनाचे समर्थन केले. थापर यांनी स्पष्ट केले की, एआय निदान, क्लिनिकल चाचण्या आणि दुर्गम भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. यामुळे आरोग्यसेवा तज्ज्ञांना सहानुभूती आणि वैयक्तिकृत काळजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. त्यांनी आधुनिक वैद्यकशास्त्रासोबत आयुर्वेद, पोषण आणि निसर्गोपचार पद्धतींच्या एकात्मिकरणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि महिलांच्या आरोग्यासाठी अधिक जागरूकता, संशोधन आणि गुंतवणुकीचे आवाहन केले. परिषदेच्या समारोप समारंभास नमिता थापर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी डॉ. राजीव येरवडेकर (प्रोव्होस्ट, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखा), डॉ. विद्या येरवडेकर (प्रधान संचालिका, सिंबायोसिस व प्र-कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ) आणि डॉ. आर. रमण (कुलगुरू, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ) आदी मान्यवर उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 8:01 pm

डेटा सेंटर प्रकल्पांना मिळणार गती:करारानंतर कंपन्यांना तत्काळ जागा मिळणार, CM देवेंद्र फडणवीसांचे प्रशासनाला निर्देश

महाराष्ट्रात डेटा सेंटर क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले असून, मध्य आशियातील नामवंत कंपन्यांकडून येणारी गुंतवणूक लक्षात घेता त्यांना करारानंतर तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या एका विशेष बैठकीत डेटा सेंटर प्रकल्पांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले, ज्यामध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदवला होता. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, डेटा सेंटर क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सर्व प्रक्रिया ठराविक कालमर्यादेत पूर्ण करण्यात याव्यात. विशेषतः जमीन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. तसेच डेटा सेंटर प्रकल्पांसाठी अखंड वीजपुरवठा अत्यावश्यक असल्याने संबंधित कंपन्यांना प्राधान्याने वीज उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले. ऊर्जा विभागाने यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे फडणवीस यांनी सांगितले आहे. डेटा सेंटर प्रकल्पांना गती देण्यासाठी सिडकोमार्फत स्वतंत्र 'लॅण्ड बँक' विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले असून, वीज उपकेंद्रांसाठी जागा तत्काळ उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. या प्रकल्पांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सिडकोकडून सुरू असून, डेटा सेंटर्सना लागणारा पुरेसा आणि अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित केला जात असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 7:57 pm

लेक लाडकी योजनेचा 9 हजार मुलींना लाभ:पुणे जिल्ह्यात तीन वर्षांत 4.74 कोटी रुपये वितरित; सीईओ पाटील यांची माहिती

पुणे जिल्ह्यात 'लेक लाडकी' योजनेअंतर्गत ९ हजार ४८२ मुलींना लाभ मिळाला आहे. १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या या मुलींना मागील तीन वर्षांत ४ कोटी ७४ लाख १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ही माहिती दिली. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. योजनेच्या पहिल्या हप्त्यांतर्गत प्रत्येक लाभार्थीला ५ हजार रुपये दिले जातात. २०२३-२४ मध्ये १ हजार ४० मुलींना ७० लाख रुपये, २०२४-२५ मध्ये ५ हजार ७२० मुलींना २ कोटी ८६ लाख रुपये आणि २०२५-२६ मध्ये २ हजार ३६२ मुलींना १ कोटी १८ लाख १० हजार रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला आहे. 'लेक लाडकी' योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाला चालना देणे, मृत्यूदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे हा आहे. याशिवाय, कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठीही ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. या योजनेसाठी काही अटी व शर्ती आहेत. लाभार्थी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असावे, त्यांचे बँकेत खाते असावे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. ही योजना १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील एक किंवा दोन मुलींसाठी लागू आहे. जर कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल, तर मुलीला या योजनेचा लाभ मिळतो. योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, इयत्ता सातवीत ७ हजार रुपये, इयत्ता अकरावीत ८ हजार रुपये आणि मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये असे एकूण १ लाख १ हजार रुपयांचा लाभ दिला जातो. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि बालकल्याण सभापती अंकिता पाटील यांनी जिल्ह्यातील स्त्री-पुरुष प्रमाण संतुलित राखण्यासाठी उपाययोजना करण्यासोबतच महिला सक्षमीकरणासाठी प्रभावी योजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) आनंद खंडागळे यांनी ही माहिती दिली.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 7:32 pm

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन:पत्रकारितेतील लढवय्या आधारवड हरपल्याची भावना

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांच्या निधनाने पत्रकारितेतील एक लढवय्या, संघटक आणि अनेकांसाठी आधारवड ठरलेले नेतृत्व हरपल्याची भावना विविध क्षेत्रांतील ज्येष्ठांनी व्यक्त केली आहे. उपस्थित मान्यवरांनी कै. भोईटे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कै. प्रकाश भोईटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पत्रकार भवन येथे शनिवारी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. भोईटे हे पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष होते. या सभेला पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, कार्यवाह पांडुरंग सांडभोर, तसेच ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, कल्पना खरे, राजेंद्र पाटील, मंगेश कोळपकर, जयराम देसाई, मारुती जोशी, मोरेश्‍वर जोशी, नंदकुमार काकीर्डे, दिगंबर दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, प्रदीप पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, विद्याधर अनस्कर, भाजपचे ज्येष्ठ नेते योगेश गोगावले, माजी पोलिस सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे, मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, प्रविण गायकवाड, बाळासाहेब दाबेकर, संगीता तिवारी, जिल्हा परिषदेचे आशिष जराड, प्रताप भोईटे, संदीप जगताप यांच्यासह विविध वृत्तपत्रांतील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय, राजकीय आणि अन्य क्षेत्रांतील अनेक ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शैलेश काळे यांनी सांगितले की, पत्रकारांच्या हक्कांसाठी कायम लढणारा, निर्भीड आणि स्पष्टवक्ता हरपल्याने पत्रकारितेची मोठी हानी झाली आहे. राजीव साबडे यांनी श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, पत्रकार संघाच्या उभारणीपासून ते इमारत, सभागृह, रस्ता अशा पायाभूत सुविधांसाठी प्रकाश भोईटे यांचे मोठे योगदान होते. पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात त्यांनी दिलेला लढा, संघटित शक्तीवर ठेवलेला विश्वास आणि पत्रकार कुटुंबासाठी घेतलेली जबाबदारी हे त्यांचे कार्य मोठे आहे. त्यांनी पत्रकार संघटना बळकट करण्यासाठी आपले आयुष्य झोकून दिले होते. अंकुश काकडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, भोईटे यांनी ग्रामीण भागातील निर्भीड आणि स्पष्टवक्ते पत्रकार म्हणून काम केले. त्यांनी जिल्हा परिषदेच्या चांगल्या कारभाराबरोबरच भ्रष्ट कारभारदेखील पुढे आणला, असे त्यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 7:24 pm

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकट!:20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपीटीचा अंदाज, CMO कडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये मागील काही आठवड्यात अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान देखील झाले. त्यानंतर पुन्हा कडक उन्ह तसेच गर्मीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. उन्ह इतके वाढले की अकोल्यात उष्माघातामुळे एका रिक्षा चलकाचा मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली होती. मात्र, आता पुन्हा राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत माहिती दिली की, राज्यातील विविध भागांमध्ये पुढील काही दिवसांत हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत असून 20 ते 22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर आभाळ दाटून येत मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. या काळात विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट क्षेत्र, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात दुपारनंतर वादळी पावसाची स्थिती निर्माण होऊ शकते. त्यानंतर 20 आणि 21 एप्रिल रोजी या पावसाचा प्रभाव अधिक भागांमध्ये जाणवण्याची शक्यता असून पुणे विभागासह मराठवाड्यातील दक्षिण भाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि विदर्भातील अमरावती परिसरातही वादळी पावसाची शक्यता आहे. मात्र 22 एप्रिल रोजी या पावसाच्या क्षेत्रात आणि तीव्रतेत काहीशी घट होईल, असे संकेत आहेत. तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, शेतीची कामे हवामानानुसार नियोजित करावीत आणि वादळी वारे व गारपीटीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 7:13 pm

मुंबई-बंगळुरू मार्गावर मालवाहू टेम्पोला आग:परदेशी फर्निचर जळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

पुण्यातील मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे परिसरात एका मालवाहू टेम्पोला आग लागल्याची घटना शनिवारी घडली. या आगीत टेम्पोसह त्यातील परदेशी बनावटीचे महागडे फर्निचर जळून खाक झाले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शनिवारी बाह्यवळण मार्गावरून जात असताना, वारजे पुलाजवळील सेवा रस्त्यावर टेम्पोने अचानक पेट घेतला. टेम्पोमध्ये परदेशी बनावटीचे फर्निचर होते. आग लागल्याचे लक्षात येताच, चालकाने प्रसंगावधान राखत टेम्पो बाजूला घेतला आणि स्वतः बाहेर पडल्याने तो बचावला. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान रमेश भिलारे, धर्मराज माने, नीलेश तांगुदे, सिद्धेश भगत, प्रतीक पांगसे आणि दत्ताराय शेटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या जवानांनी चालकाची चौकशी केली असता, तो मुंबईहून परदेशी बनावटीचे फर्निचर घेऊन पुण्यात येत असल्याची माहिती त्याने दिली. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यात मध्यभागात वाहतूक बदल - छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीस बंद अक्षय तृतीयेनिमित्त रविवारी (१९ एप्रिल) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. ‘अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. रविवारी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात करण्यात आले आहे. भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त दुचाकी फेरी मध्यभागातून काढण्यात येणार आहे. भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन रविवारी सकाळपासून मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे. ‘गर्दी ओसरेपर्यंत मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि परिसरातील रस्त्यांवर वाहतूक बदल करण्यात येणा आहे. अत्यावश्यक सेवावगळता पीएमपी बस, तसेच अन्य वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे’, असे त्यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 6:46 pm

कॉंग्रेसने महिला आरक्षण विधेयकात खोडा घालण्याचे कारण नव्हते:कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही, अशोक चव्हाणांचा पलटवार

महिला आरक्षण विधेयकावरून कॉंग्रेस पक्षाने माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आपण कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही. परंतु, कॉंग्रेसने महिला आरक्षण विधेयकामध्ये खोडा घालण्याचे कारण नव्हते, असे चव्हाण यांनी म्हटले. तसेच लोकसभेचे मतदारसंघ अवाढव्य झाले आहेत. ते आता सुटसुटीत केले पाहिजेत यात गैर काय? मतदारसंघात समानता आणली पाहिजे, असेही चव्हाण यांनी म्हटले. अशोक चव्हाण म्हणाले की, मला मान्य आहे की कॉंग्रेसच्या काळात महिलांना आरक्षण द्यायचा निर्णय झाला, ते कोणी नाकारत नाही. पण आता जे महाभाग माझ्यावर टीका करतात, त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की माझी टीका वैतक्तीक नाही. महिला आरक्षणाच्या विधेयकात काल विनाकारण विरोधकांनी खोडा घातला. त्याचे काहीही कारण नव्हते. निर्णयाचे श्रेय मोदी सरकारला नको म्हणून अडवणूक पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, अमित शहा यांनी प्रत्येक प्रश्नावर स्पष्टीकरण दिले आहे. विरोधकांनी सांगितलेल्या सुधारणा करायलाही ते तयार होते. सरकारची सगळी राजकीय तयारी केली, सर्व स्पष्ट केले. मतदारसंघ पुनर्रचनेततून दक्षिण भारतातील जागा कमी होत नाहीत हे स्पष्ट केले. मग त्याला दोन तृतीयांश बहुमताने पास करण्यासंदर्भात विरोधकांच्या मदतीची आवश्यकता होती. महिला आरक्षणाचा महत्त्वाचा भाग होता. पण निर्णयाचे श्रेय मोदी सरकारला नको म्हणून अडवणूक केली, असे चव्हाण यांनी म्हटले. कॉंग्रेसकडे केडर शिल्लक नाही अनेक राज्यांत कॉंग्रेसची 20-20 वर्षे झाली, तरी सरकार नाहीत. अनेक राज्यात कॉंग्रेसकडे खाली केडर शिल्लक नाही. महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे. केंद्रीय नेतृत्वाला यांच्याशी काही घेणदेणे नाही. कॉंग्रेसला काहीही भवितव्य नाही, त्यामुळे त्यांच्यातील अनेक नेते हे भाजपमध्ये यायाला तयार असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, मी भाजपमध्ये असलो तरीही कॉंग्रेसच्या विरोधात मुद्यांवर बोलतो. सरकारने घेतलेले निर्णय योग्यच आहेत, कॉंग्रेसकडे काही मुद्दाच राहिला नाही. मी कॉंग्रेस सोडल्यामुळे काही लोकांना चांगले वाटते, कारण मी गेल्याने त्यांना संधी मिळाली. काही लोक खासगीमध्ये सांगतात की भाजपमध्ये यायचे आहे. किती दिवस विरोधात राहायचे असे बोलतात. कॉंग्रेसची अशोक चव्हाण यांच्यावर टीका कॉंग्रेसने अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, ज्या कॉंग्रेस पक्षाशी आपले वडील स्व. शंकरराव चव्हाण साहेब आयुष्यभर एकनिष्ठ राहिलेत, त्याच कॉंग्रेस पक्षासोबत आपण गद्दारी करण्याअगोदर 2023 मध्येच नारी शक्ती वंदन अधिनियम 2023, म्हणजे लोकसभा व विधानसभेच्या जागांमध्ये महिलांसाठीचे 33 टक्के आरक्षण हे संसदेत एकमताने (कॉंग्रेसच्या पाठिंब्याने) मंजूर झालेले आहे. ते 16 एप्रिल 2026 पासून लागूही झाले आहे. पुढे कॉंग्रेसने म्हटले की, आपल्या माहितीसाठी, ज्यांच्यामुळे आपण पहिल्यांदा लोकसभेच्या सभागृहात निवडून गेलात त्या स्व. रंजीव गांधी यांनीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू केले व नंतर 50 टक्के आरक्षणही कॉंग्रेसच्याच काळात लागू करण्यात आले. खाल्लेल्या मिठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या, अशी खोचक टीका चव्हाण यांच्यावर कॉंग्रेसने केली होती.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 6:17 pm

पंतप्रधान मोदी आज रात्री देशाला करणार संबोधित

नवी दिल्ली : लोकसभेत काल नारीशक्ती वंदन अधिनियमासह १०३ वी घटना दुरुस्ती विधेयक दोन तृतीयांश बहुमताअभावी फेटाळले गेले, त्यामुळे भाजपप्रणित एनडीए सरकार बॅकफूटवर आले आहे. तर दुसरीकडं २०२३ मध्ये पारित केलेले महिला आरक्षण विधेयक सरकारने तात्काळ लागू करावें, त्याला आमचा शतप्रतिशत पाठींबा असल्याचं काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचे म्हणणेआहे. त्यामुळे आता आता भाजप कोंडीत सापडला असून देशातील […] The post पंतप्रधान मोदी आज रात्री देशाला करणार संबोधित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 6:15 pm

संभाजीनगरचा पाणीपुरवठा प्रश्न सोडवणार:मनपा आयुक्त अमोल येडगे यांची ग्वाही; येडगे अन् जी. श्रीकांत यांचा स्वागत, सत्कार समारंभ

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने नवनियुक्त मनपा आयुक्त अमोल येडगे आणि नवनियुक्त विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचा सत्कार व स्वागत समारंभ शनिवारी संत एकनाथ रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना महापौर समीर राजूरकर यांनी जी. श्रीकांत यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, पुरुषोत्तम भापकर यांनी २०१३ मध्ये शहराच्या डीपीवर काम सुरू केले होते, त्याचा कळस श्रीकांत यांनी रस्ते मोकळे करून चढवला. श्रीकांत हे प्रशासनातील 'युझर फ्रेंडली अँड्रॉइड फोन' सारखे होते, ज्यांनी नेहमी आपलेपणा जपला. अतिक्रमण कारवाईत त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून विश्वास दिला. कर्मचाऱ्यांचा विमा काढल्यामुळेच, अनधिकृत बॅनर काढताना अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला १.१० कोटींची मदत मिळू शकली. श्रीकांत यांनी नियम पाळताना नगरसेवक पतीवरही गुन्हे दाखल करण्यास मागेपुढे पाहिले नाही. महापौर राजूरकर यांनी आता अमोल येडगे यांनी हा विकासाचा पाया कळसापर्यंत न्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर नवनियुक्त आयुक्त अमोल येडगे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, प्रोबेशन काळापासून मला जी. श्रीकांत यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनी केलेल्या कामाची उंची अधिक वाढवण्याचे काम मी करेन. शहराच्या प्रगतीत आता १२५ माजी नगरसेवकांचा अनुभव सोबत असेल. पाणीपुरवठा विभागाच्या कामाला गती देऊन नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवण्यावर माझा भर असेल. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी अत्यंत भावूक होत आपल्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, लोक मला विचारायचे की किती दिवस मराठवाड्यात अडकून राहणार? पण या मातीचे माझ्यावर ऋण होते आणि ते फेडण्यासाठीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला ही जबाबदारी दिली. मनपा आयुक्त म्हणून आलो तेव्हा ईडी चौकशी सुरू होती, पण मी डगमगलो नाही. शहराला १० दिवसांनी पाणी मिळते याची मला लाज वाटत होती. आता विभागीय आयुक्त म्हणून प्रत्येक घराला पाणी देण्यासाठी मी बांधील आहे. पुढच्या तीन वर्षात शहराचा चेहरा बदलेल. अतिक्रमण काढताना कुणाची घरे तोडणे हा आनंद नव्हता, तर शहर मोकळे करणे हा उद्देश होता, असे श्रीकांत यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास आमदार संजय केनेकर, उप महापौर राजेंद्र जंजाळ, विरोधी पक्षनेते समीर बिल्डर, प्रभारी जिल्हाधिकारी संभाजीराव अडकूने, मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, कल्पिता पिंपळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संतोष वाहुळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 6:11 pm

हायकूचे तत्त्वचिंतन भारतीय संस्कृतीशी मिळतेजुळते:कवी विजय पाडळकर यांचे 'हायकू - जागर' कार्यक्रमात मत

हायकू काव्यप्रकार परकीय नसून त्याचे तत्त्वचिंतन भारतीय संस्कृतीशी मिळतेजुळते आहे, असे मत हायकू काव्यप्रकाराचे अभ्यासक आणि कवी विजय पाडळकर यांनी व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे जागतिक हायकू कविता दिनानिमित्त आयोजित 'हायकू - जागर' या कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. दिपाली दातार यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत पाडळकर म्हणाले की, हायकू हे केवळ 'वृत्त' नसून ती एक 'वृत्ती' आहे. हा काव्यप्रकार चिंतनशील असून आशावादी साहित्याचा उत्तम नमुना आहे. हायकूकार दुःखाचे अस्तित्व मान्य करतो, परंतु त्याला शरण जात नाही. यासाठी चिंतनशील वृत्ती आणि सातत्यपूर्ण लेखन आवश्यक आहे. यावेळी विजय पाडळकर यांच्या 'हायकूऋतू' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी हेमंत गोविंद जोगळेकर यांच्या हस्ते झाले. 'हायकूऋतूः मुखपृष्ठ-विचार' या विषयावर चित्रकार शिरीष घाटे आणि कलासमीक्षक शरद तरडे यांनी मांडणी केली. प्रख्यात हिंदी साहित्यिक मनमोहन चड्डा यांनी पाडळकर यांच्या निवडक हायकूंच्या हिंदी अनुवादाचे वाचन केले. अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालक रसिका राठिवडेकर यावेळी उपस्थित होत्या. पाडळकर यांनी हायकूचे स्वरूप स्पष्ट करताना सांगितले की, हा काव्यप्रकार त्यांच्यासाठी ध्यानस्थ अवस्थेपेक्षा वेगळा नाही. निसर्गाशी तादात्म्य पावत तो प्रसूत होतो. हा अल्पअक्षरी काव्यप्रकार असून, तीन ओळींची कविता असे त्याचे थोडक्यात वर्णन करता येईल. हायकूच्या अंतरंगात एक लय असते. तो नियमबद्ध ठिपक्यांची रांगोळी नसून विखुरलेल्या ठिपक्यांची रांगोळी आहे, ज्यात वाचकाने स्वतःच्या मनातील आशयाचा शोध घेत ते ठिपके जोडायचे असतात. भारतात हायकू हा काव्यप्रकार सर्वप्रथम रवींद्रनाथ टागोर यांनी आणला आणि बंगाली भाषेत तो प्रस्थापित केला. मराठीत हा काव्यप्रकार आणण्याचे श्रेय शिरिष पै आणि शांता शेळके यांना जाते. ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांच्या प्रेरणेतून पै यांनी हायकूमध्ये भरीव काम केले. तत्कालीन प्रस्थापित कवींनी हायकू काव्यप्रकार तितकासा न स्वीकारल्यामुळे भारतात हायकू काव्यचळवळ क्षीण झाली. प्रस्थापित कवींनी यावर कविता न लिहिल्याने समीक्षकांनीही या साहित्य प्रकाराची नोंद घेतली नाही किंवा त्याची समीक्षा केली नाही. समीक्षकांनी दुर्लक्षित केल्यामुळे हायकू काव्यप्रकाराचा अभ्यासक्रमात समावेश होऊ शकला नाही.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 6:09 pm

प्लास्टिक कचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा:महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि बिसलेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या 'बॉटल्स फॉर चेंज' उपक्रमांतर्गत पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या बाकड्यांचे आणि कचरा संकलन डब्यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी महापौर रवी लांडगे यांनी प्लास्टिक कचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले. पिंपरी-चिंचवड शहराला पर्यावरणपूरक बनवण्यासाठी आणि प्लास्टिक कचरा समस्या सोडवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. पीसीएमसी कार्यालय परिसरात महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते या सुंदर बाकड्यांचे आणि कचरा संकलन डब्यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महापालिकेचे उपमहापालिका आयुक्त व आरोग्य विभाग प्रमुख डॉ. प्रदीप थेंगल, बिसलेरी इंटरनॅशनलचे सस्टेनेबिलिटी आणि कॉर्पोरेट अफेअर्स विभागाचे संचालक के. गणेश, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि सीएसआर सेलमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापौर लांडगे यांनी सांगितले की, बिसलेरीसोबतची ही भागीदारी कंपन्या आणि प्रशासन एकत्रितपणे काम करून शहरात सकारात्मक बदल घडवू शकतात, याचे उत्तम उदाहरण आहे. या उपक्रमामुळे शहरातील प्लास्टिक कचरा लँडफिलमध्ये न जाता त्याचा विधायक पुनर्वापर होईल, ज्यामुळे 'सर्क्युलर इकॉनॉमी'ला बळ मिळेल. बिसलेरीचे संचालक के. गणेश यांनी कचरा जिथे निर्माण होतो, तिथेच त्याचे वर्गीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. शैक्षणिक संस्था आणि जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून बिसलेरीने कचरा व्यवस्थापनाचा एक यशस्वी मार्ग दाखवला आहे. २०२५-२६ या वर्षात बिसलेरीने देशभरात ३०,३०९ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा संकलित करून तो पुनर्वापरासाठी पाठवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी पिंपरी-चिंचवडमधील ८ शैक्षणिक संस्थांना महापौरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या संस्थांनी वर्षभर आपल्या परिसरात प्लास्टिक कचरा संकलनाचे प्रभावी काम केले होते. डॉ. प्रदीप थेंगल यांनी 'बॉटल्स फॉर चेंज' सारखे उपक्रम शहराला शाश्वत विकासाकडे नेण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे म्हटले. हा उपक्रम बिसलेरीच्या 'ग्रीनर प्रॉमिस' मोहिमेचा भाग असून, याद्वारे शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि जलसंधारणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 6:08 pm

नागरी समितीला 'राम नदी सेवक सन्मान' प्रदान:कोहिनूर राम नदी महोत्सवाचा समारोप, पुनरुज्जीवनाचा निर्धार

पुणे येथे कोहिनूर कट्टा आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाचा शनिवारी समारोप झाला. या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (दि. १८) भूगाव येथील नागरी समस्या निवारण समितीला उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते 'राम नदी सेवक सन्मान' प्रदान करण्यात आला. यावेळी राम नदीच्या पुनरुज्जीवनाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यावेळी उपस्थित होते. अनिल निवृत्ती करंजावणे, पंढरीनाथ शिवराम शेडगे आणि शिवाजी काशीनाथ रणवरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी हा पुरस्कार स्वीकारला. पत्रकार भवन येथे आयोजित या महोत्सवाला महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी राम नदीचे प्रदूषण त्वरित थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, प्रदूषण, राडारोडा, अतिक्रमण, सांडपाणी आणि प्लास्टिक कचरा अशा अनेक समस्यांनी राम नदी वेढलेली आहे. गोयल यांनी विश्वास व्यक्त केला की, सर्व स्तरातील नागरिक, युवा पिढी आणि सामाजिक संस्थांनी सहकार्य केल्यास ही परिस्थिती बदलता येईल. या महोत्सवातून राम नदीवर आधारित लघुपट आणि पर्यावरण तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. चित्रपट हा समाजजीवनाचा आरसा असून, या महोत्सवाद्वारे नदीचे वास्तव मांडले गेले. केवळ महोत्सव करून न थांबता, नदी स्वच्छ, सुंदर आणि अविरल ठेवण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असेही त्यांनी सांगितले. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी सांगितले की, मातेसमान नद्यांची अवहेलना होऊ नये, ही जागृती या महोत्सवाद्वारे झाली आहे. भविष्यात राम नदीसंदर्भात विविध सामाजिक संस्था आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून 'राम नदी संसद' आयोजित करण्याचा मानस आहे. तसेच, दर महिन्याला 'राम नदी परिक्रमा' आयोजित करून नदीची ओळख करून दिली जाईल आणि लहान-मोठ्या उपक्रमांतून नदीची शुद्धता टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अनिल करंजावणे म्हणाले की, राम नदी परिक्रमा करताना निर्मळ नदी अशुद्ध झाल्याचे पाहून खूप दुःख झाले. मानवनिर्मित प्रदूषणाला आळा घालण्यासाठी त्यांनी नदी स्वच्छता अभियान सुरू केले. 'देशाचे देणे लागतो' या भूमिकेतून ते अविरतपणे कार्यरत आहेत. हा पुरस्कार पुढील कार्यासाठी प्रोत्साहन देईल, असेही त्यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 6:06 pm

अहद युसुफ शेख बनला तरोड्यातील पहिला एमबीबीएस डॉक्टर

परभणी : तालुक्यातील तरोडा गावातील युवक अहद युसुफ शेख याने वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित एमबीबीएस पदवी यशस्वीपणे प्राप्त केली आहे. त्याचे हे यश गावासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. विशेष म्हणजे तरोडा गावातून एमबीबीएस शिक्षण पूर्ण करणारा तो पहिलाच विद्यार्थी ठरला असून त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिद्द, मेहनत […] The post अहद युसुफ शेख बनला तरोड्यातील पहिला एमबीबीएस डॉक्टर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 5:52 pm

व्हॉईस ऑफ मीडियाची परभणी जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध जाहीर

परभणी : पत्रकारांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम (व्हीओएम) या आंतरराष्ट्रीय संघटनेची परभणी जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदी कैलास चव्हाण यांची तर सह सरचिटणीसपदी सुधीर बोर्डे यांची निवड करण्यात आली आहे. अवघ्या ५ वर्षात जगातील तब्बल ७८ देशात विस्तारलेल्या या संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी राज्याचे […] The post व्हॉईस ऑफ मीडियाची परभणी जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 5:51 pm

हवाई सेवा हळूहळू पूर्ववत : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे : पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाशी संबंधित घटनेनंतर धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली होती. शुक्रवारी (१७ एप्रिल) रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास लँडिंग करताना एका लढाऊ विमानाचे लँडिंग गिअर निकामी झाल्यामुळे धावपट्टीवर अडथळा निर्माण झाला. सुदैवाने, विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही. या घटनेनंतर धावपट्टी मोकळी करून दुरुस्तीचे […] The post हवाई सेवा हळूहळू पूर्ववत : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 5:42 pm

‘राजा शिवाजी’ सिनेमातून अतुल गोगावले यांच्या लेकाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

मुंबई : प्रतिनिधी सध्या रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाची खूप उत्सुकता आहे. या सिनेमात संगीतकार अजय-अतुल या जोडीपैकी अतुल गोगावलेंचा लेक रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या गाण्यात अतुल गोगावलेंचा लेक आर्य गोगावलेची झलक बघायला मिळाली. ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं जे अँथम साँग रिलीज झालं त्यात आर्य बघायला मिळाला. अतुल गोगावले यांनी सोशल […] The post ‘राजा शिवाजी’ सिनेमातून अतुल गोगावले यांच्या लेकाचे अभिनय क्षेत्रात पदार्पण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 5:38 pm

महिला आरक्षण कायदा २०२३ मध्ये संसदेत मंजूर

मुंबई : प्रतिनिधी महिला आरक्षण कायदा २०२३ मध्येच मंजूर झाला असताना, आता मतदारसंघांची फेररचना करण्याचा घाट कशासाठी? असा सवाल करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे लोकशाहीविरोधी विधेयक पराभूत झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाने दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभेत महिला आरक्षण बिलाच्या विरोधात […] The post महिला आरक्षण कायदा २०२३ मध्ये संसदेत मंजूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 5:36 pm

ऑफिसमध्ये फरशीवर गोण्या अन् भिंतीवर रक्ताचे डाग:माझ्या बायकोची बॉडी...; मृत पूनमच्या पतीने सांगितली इन्साइड स्टोरी

पुण्यातील मुंढवा परिसरात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून ॲड. संजय सावंत याने आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीच्या मदतीने महिला सेक्रेटरीचा क्रूरपणे खून केला. पूनम दिनेश मुन (वय 35) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी सावंत कुटुंबातील तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी आता मृत पूनम मुन यांचे पती दिनेश मुन यांनी या घटनेची इन्साइड स्टोरी सांगितली आहे. दिनेश मुन म्हणाले, रोजच्या प्रमाणेच माझी बायको 2 वाजता ऑफिसला गेली आणि सव्वा तीन वाजता ऑफिसला पोहोचते. मला तिच्या साहेबांचा फोन आला मॅडम ऑफिसला आल्या नाहीत, काही अपडेट आहे का? मी म्हटले की त्यांना फोन लावून बघा. त्यावर त्यांनी सांगितले की फोन लावला पण लागत नाहीये. फोन केला तेव्हा रिंग वाजत होती, पण उचलत नव्हती पुढे दिनेश मुन म्हणाले, त्यानंतर मी फोन लावला तेव्हा फोन लागला, रिंग वाजत होती पण फोन उचलत नव्हती. 2-3 वेळा प्रयत्न करून बघितला. त्यानंतर 4 वाजता तिने मला मेसेज केला. मी तुम्हाला नंतर फोन करते. मग मला वाटले की कुठेतरी इंटरव्ह्यूसाठी गेली असेल. कारण आमचे यावर सकाळी बोलणे झाले होते. ती म्हणत होती की मी दुसरीकडे कामाला जाऊ का? त्यानंतर मी विषय टाळला होता. त्यामुळे मला वाटले की ती इंटरव्ह्यू देण्यासाठी गेली आहे. म्हणून मग तिने फोन बंद केला असेल किंवा फोन उचलत नसेल. पूनमचा फोन नॉट रिचेबल आला त्यानंतर मी पूनमला पुन्हा फोन लावत होतो, पण आता फोन लागत नव्हता. नॉट रिचेबल येत होता. मला वाटले नेहमी प्रमाणे तिचा फोन वगैरे बंद झाला असेल किंवा बॅटरी डाऊन असेल, ती रोजच्या प्रमाणे घरी येईल. मात्र ती घरी आली नाही. त्यानंतर मला थोडा संशय आला. मी 8 वाजता कामावरून निघालो, 9 वाजता घरी आलो आणि घरून तिच्या ऑफिसजवळ गेलो. तिथेच बाजूला एक टेलर आहे, त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की तुमची बायको दिसली नाही. पण वकिलांची बायको आणि मुलगी दिसली. त्या दुपारी ऑफिसला आल्या होत्या. मी पुन्हा वकिलाला फोन लावला. ते म्हणाले, तुम्ही एक काम करा, मॅडम वाघेश्वर मंदिर जवळ बसतात कधीकधी, तिथे जाऊन चौकशी करा. वकिलाल फोन केला तेव्हा त्यांनी भरकटवण्याचा प्रयत्न केला दिनेश मुन सांगतात की, मी तिथेही गेली, ती तिथेही नव्हती. तिथून पुन्हा मी वकिलाला फोन लावला तेव्हा त्यांनी विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला. मग मी पोलिसांत तक्रार दाखल करतो म्हटले. त्यावर आता चौकीत जाऊन काय करणार वगैरे ते म्हणाले. लगेच जाऊ नका, जरा धीर धरा. मी त्यांचे ऐकले नाही. मी शास्त्रीनगरला गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्ही लक्ष्मी नगरला जावा. लक्ष्मी नगर पोलिस ठाण्यात जाऊन संपूर्ण माहिती दिली. त्यांनी सांगितले की तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता या. मी सकाळी 10 वाजता तिथे गेलो, तेव्हा त्यांनी मला वेळ लागेल तुम्ही पुढे जाऊन चौकशी करा असे सांगितले. सीसीटीव्हीत पूनम ऑफिसला जाताना दिसली पुढे माहिती देताना दिनेश मुन म्हणाले, आम्ही येता येता विमान नगर चौकात थांबलो. विचार केला की विमान नगरला जाऊन ऑफिसमध्ये बघू. तिथे कोणाला विचारू. आम्ही तिथे सीसीटीव्ही तपासले तेव्हा दिसले की पूनम ऑफिसकडे गेली होती. मी काल ऑफिसच्या तिथे गेलो तेव्हा ऑफिसला कुलूप होते. पण दुसऱ्या दिवशी कुलूप नव्हते. मी लगेच वकिलाल फोन केला आणि सांगितले की तुमच्या ऑफिसला कुलूप नाही. तुम्ही तर म्हणाले होते की तुम्ही मी आल्यावर चावी पाठवून देतो मग ते आत्ता उघडे कसे? मी त्यांना विचारले खोलून बघू का विचारले, ते मला म्हणाले हो बघा. मी ते ओपन करून आत गेलो तर आतमध्ये पूर्ण अंधार होता. फॅन चालू होता. जवळच मच्छर मारायची बॉटल होती त्याच्यावर रक्ताचे डाग होते. ऑफिसमध्ये गोण्या अंथरलेल्या होत्या आणि रक्ताचे डाग दिनेश मुन यांनी पुढे सांगितले की, मी थोडा अजून आतमध्ये गेली, तिथे मला गोण्या अंथरलेल्या दिसल्या. दगड होता. मला वाटले काहीतरी काम चालू असेल. त्यानंतर मला पुन्हा एकदा फरशीवर आणि भिंतीवर रक्त दिसले. त्यानंतर मग मला संशय आला की माझ्या बायकोसोबत काहीतरी घडले आहे. मी लगेच लक्ष्मीनगर पोलिसांना फोन केला. ते म्हणाले 112 नंबरला फोन करा. चंदननगरचे पोलिस आले, त्यांनी संपूर्ण तपास केला. त्या सगळ्या गोण्या काढल्या तिथे बायको होती माझी. त्यांनी ओळख पटवली तेव्हा मी सांगितले की ही माझी बायको, पूनम आहे. मी त्यानंतर वकिलाल फोन केला, तर त्याने असे दाखवले की आपल्याला यातले काहीच माहीत नाही. तो म्हणाला, मी मुंबईत आहे, मी पुण्याला येतोच आहे. त्यानंतर रात्री त्याच्या बायकोला आणि मुलीला अटक करण्यात आली, अशी माहिती दिनेश मुन यांनी दिली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पूनमला बॅटीने बेदम मारहाण करण्यात आली होती पूनम मुन या गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. संजय सावंत यांच्या मुंढवा येथील कार्यालयात साहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. सावंत यांचे पूनम यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीची पत्नी स्वाती सावंत हिला होता. याच कारणावरून गुरुवारी (16 एप्रिल) कार्यालयात वाद झाला. संतापलेल्या संजय सावंत, पत्नी स्वाती आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीने पूनम यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पूनम यांचे पाय दोरीने बांधून त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने सपासप वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यात पूनम यांचा जागीच मृत्यू झाला.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 5:35 pm

नाशिकमध्ये आणखी एक धर्मांतर प्रयत्नाचे प्रकरण:इंजिनिअर तरुणीवर लैंगिक अत्याचार; बळजबरीने दारू पाजली, गळ्यातली तुळशी माळ काढून दिला लव्ह बाइट

नाशिकमध्ये लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढतच असल्याचे दिसत आहे. अशोक खरातनंतर टीसीएस कंपनीमधला लव्ह जिहाद प्रकरण, या नंतर आता आणखी एक धर्मांतराचा प्रकार समोर आला असून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी तंजीर इनामदारला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीने पंचवटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी तंजीर इनामदारने तिला लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेले. तिथे आपल्याला बळजबरी दारू आणि सिगारेट पिण्यास भाग पाडले. पीडिता शुद्धित नसताना तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गळ्यातील तुळशीमाळ आणि हातातला धागाही तोडला या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तंजीर इनामदारने पीडित तरुणीने आपल्या गळ्यात घातलेली तुळशीमाळ आणि हातावर बांधलेला धागा बळजबरी तोडला होता. तसेच आरोपीने बळजबरीने एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे गजवा-ए-हिंदचे पालन करण्यास सांगून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित तरुणीच्या धार्मिक ओळखीवरच घाला घालण्याचे कारस्थान या आरोपीने केले होते. गळ्यावर लव्ह बाईट, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार आरोपीने जानेवारी महिन्यात पीडित तरुणीच्या गळ्याजवळ चावा घेत हे लव्ह बाईट असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने तिला वारंवार विविध ठिकाणी लॉजवर नेत तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. आणखी काही मुलींचेही लैंगिक शोषण केल्याचा संशय संशयित आरोपी तंजीर इनामदारने अशाच पद्धतीने शहरातील आणखी काही मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचेही लैंगिक शोषण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या तक्रारीवरून त्याच्यावर सध्या गुन्हा दाखल करण्यात अल असला तरी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. तंजीर इनामदारला कोर्टात हजर करण्यात आले असून पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली आहे. कोर्टात दोन्ही पक्षाकडील युक्तिवाद तंजीर इनामदारला कोर्टात हजर करण्यात आले असता यावेळी सरकारी पक्षाने केलेल्या युक्तिवादात म्हटले की, तंजीर इनामदार महागड्या लॉजमध्ये पीडित तरुणीला न्यायचा. दारू सिगारेट पिण्यास भाग पडायचा. धर्मांतर करण्यासाठी पीडित तरुणीला जबरदस्ती करण्यात आली. तसेच हे प्रकरण देखील टीसीएस सारखेच असल्याचा दावा सरकारी पक्षाने केला. तसेच महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला? त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याचा शोध घ्यायचा असून त्यासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. तर आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात म्हटले की, दोघेही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. जानेवारी महिन्यात अत्याचार झाला तर तेव्हापासून आतापर्यंत वेळ का घालवला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच फोटो दाखवून धमकीचा व दारू सिगारेटचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. विशेष म्हणजे दोघांचेही एकमेकांवर प्रेम असून घरच्यांनी विरोध केल्याने आता हा आरोप होत असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 4:46 pm

अजय-अतुल यांची पुढची पिढी सिनेसृष्टीत! ‘राजा शिवाजी’चित्रपटातून आर्य गोगावलेचे पदार्पण

मुंबई: आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताने संपूर्ण देशाला वेड लावणारी जोडी म्हणजे अजय-अतुल. आता याच जोडीचा वारसा पुढे नेण्यासाठी अतुल गोगावले यांचा मुलगा आर्य गोगावले सिनेसृष्टीत दाखल झाला आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटातील ‘छत्रपती’ या अँथम साँगमध्ये आर्यची झलक दिसली असून, त्याच्या या एन्ट्रीमुळे चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली […] The post अजय-अतुल यांची पुढची पिढी सिनेसृष्टीत! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातून आर्य गोगावलेचे पदार्पण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 4:45 pm

आरोपी निदा खानचा पती मोईन खान जाळ्यात

ठाणे : प्रतिनिधी नाशिकमधील आयटी क्षेत्रात काम करणा-या निदा खान या महिलेच्या प्रकरणाने नाट्यमय वळण घेतले असून, पोलिस तपासात नवनवे खुलासे समोर येत आहेत. नोकरी गमावल्यापासून सुरू झालेल्या घटनाक्रमाने आता गुन्हेगारी स्वरूप धारण केले असून, तिच्या पतीला एसआयटीने ताब्यात घेतल्याने या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे. नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसतध्ये कार्यरत असलेल्या महिला आरोपी निदा […] The post आरोपी निदा खानचा पती मोईन खान जाळ्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 4:29 pm

पर्यटकांची गाडी दरीत कोसळली; ५ शिक्षिकांसह ९ जण ठार

कोइम्बतूर : तामिळनाडूतील वालपराई-पोल्लाची घाटात शुक्रवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. पर्यटकांची गाडी खोल दरीत कोसळल्याने केरळमधील ९ पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मल्लापूरम जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील पाच शिक्षिकांचा समावेश आहे. केरळच्या मल्लापूरम जिल्ह्यातील पेरिंथलमन्ना येथून १३ जण वालपराई येथे पर्यटनासाठी गेले होते. शुक्रवारी संध्याकाळी ५:१५ च्या […] The post पर्यटकांची गाडी दरीत कोसळली; ५ शिक्षिकांसह ९ जण ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 4:26 pm

केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता वाढला

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (दि. १८) केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली. प्रस्तावित ८ व्या वेतन आयोगांतर्गत वेतन रचनेत मोठे बदल करण्याच्या कर्मचारी संघटनांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल कॉन्सिल-जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीने सरकारला सादर केलेल्या निवेदनात वेतन रचनेत मोठे बदल करण्याची मागणी केली आहे. यात […] The post केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता वाढला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 4:22 pm

‘भोंदू बाबा अशोक खरातला वाचवण्यासाठी निदाला गोवलं’; टीसीएस धर्मांतर प्रकरणात वडिलांचा खळबळजनक आरोप

नाशिक: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या नाशिकमधील बीपीओ केंद्रात गाजलेल्या कथित धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणात आता एक नवीन वळण आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेली निदा खान हिच्या वडिलांनी सर्व आरोप फेटाळून लावत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्यावरील बलात्काराचे प्रकरण दाबण्यासाठी आणि लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी […] The post ‘भोंदू बाबा अशोक खरातला वाचवण्यासाठी निदाला गोवलं’; टीसीएस धर्मांतर प्रकरणात वडिलांचा खळबळजनक आरोप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 4:19 pm

संघाच्या ‘झेड प्लस’ सुरक्षेचा खर्च वसूल करा

​नागपूर : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुरवण्यात येत असलेल्या ‘झेड प्लस-व्हीव्हीआयपी’ सुरक्षा कवचाचा खर्च सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून वसूल करण्यात यावा, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते ललन किशोर सिंह यांनी अ‍ॅड. अश्विन इंगोले यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व राज वाकोडे […] The post संघाच्या ‘झेड प्लस’ सुरक्षेचा खर्च वसूल करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 4:17 pm

संगमनेरमधील गडगे महाराजसह पाच जणांना अटक

अहिल्यानगर : दुर्धर आजार मंत्राने बरे करतो, दैवी चमत्काराने दारू-व्यसन सोडवतो, मूल नसणा-या महिलांना मंत्रोच्चाराने मूल देतो, घरातील समस्या मंत्रशक्तीद्वारे दूर करतो, असा दावा करत भक्तांची आर्थिक फसवणूक करायचा. असा हा भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे ऊर्फ दत्तधाम सरकारसह त्याच्या पाच सहका-यांविरोधात गुन्हा दाखल करत संगमनेर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईचे अंनिसने स्वागत केले आहे. […] The post संगमनेरमधील गडगे महाराजसह पाच जणांना अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 4:14 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, १८ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित ‘संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक’ मंजूर होऊ शकले नाही, या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे हे संबोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. शुक्रवारी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी (Delimitation) संबंधित विधेयक दोन-तृतीयांश बहुमताअभावी फेटाळण्यात आले होते […] The post पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 4:13 pm

अ‍ॅक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर ‘टीसीएस’सारख्या घटना घडल्या

नाशिक : नाशिकमधील टीसीएस कंपनीत मुस्लिम धर्मीय संशयितांकडून हिंदू महिला कर्मचा-यांचे लैंगिक शोषण, विनयभंग व जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. देशभरात या धक्कादायक प्रकरणाची चर्चा असताना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अमृता फडणवीस यांनीही बराच काळ काम केले आहे. त्याअनुषंगाने […] The post अ‍ॅक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर ‘टीसीएस’सारख्या घटना घडल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 4:12 pm

इराणचा ‘यू-टर्न’: ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर तणाव वाढला, ‘होर्मुझची सामुद्रधुनी’पुन्हा बंद

तेहरान: जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’वरून (Strait of Hormuz) आखाती देशांत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत. इराणने आधी हा सागरी मार्ग व्यापारासाठी खुला करण्याचे संकेत दिले होते, मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक विधानानंतर इराणने अचानक ‘यू-टर्न’ घेत हा मार्ग पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजारात […] The post इराणचा ‘यू-टर्न’: ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर तणाव वाढला, ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 4:08 pm

स्वयंरोजगार महिला मेळावा, संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन

परभणी : एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्रच्या वतीने संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती निमित्त स्वयंरोजगार मेळावा, संविधान गौरव सन्मानपत्र सोहळ्याचे शुक्रवार, दि.२४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३५ वाजता श्री शिवाजी विधी महाविद्यालय सभागृह वसमतरोड परभणी येथे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन वनामकृविचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी […] The post स्वयंरोजगार महिला मेळावा, संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 3:28 pm

अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंच्या अपघातावर संशय:कंटेनर चालक जमाल वारिसने जबाबात दिली महत्त्वाची माहिती

नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचा निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचा उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ हा अपघात घडला. शेळके यांच्या कारने समोर असलेल्या कंटेनरला मागून जबरदस्त धडक दिली आणि कार थेट कंटेनरखाली घुसली. या दुर्घटनेत जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना घडल्यानंतर अपघाताबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, या अपघातामागे घातपाताची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने घेत कंटेनर चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात त्याची सविस्तर चौकशी सुरू असून, या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीमुळे तपास अधिक बारकाईने केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी शेळके यांची कार भरधाव वेगात होती. वेग नियंत्रणात नसल्यामुळे कार थेट कंटेनरला धडकली आणि त्याखाली अडकली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणात कंटेनर चालक जमाल वारिस याने पोलिसांना दिलेल्या जबाबात महत्त्वाची माहिती दिली आहे. तो उत्तर प्रदेशातील अमेठीचा रहिवासी असून, हैदराबादहून अहमदाबादकडे जात होता. दुपारी सुमारे 12 वाजता कंटेनरच्या रेडिएटरचा पाइप लीक झाल्यामुळे वाहन गरम झाले. त्यामुळे त्याने वाहनाचा वेग कमी केला होता. मात्र, त्याने गाडी पूर्णपणे थांबवली नव्हती, असे त्याने स्पष्ट केले. जमाल वारिसने पुढे सांगितले की, तो रस्त्याच्या कडेला सावकाश गाडी चालवत असताना अचानक मागून जोरदार आवाज आला. त्या वेळी आरशात काही दिसले नाही. नंतर खाली उतरून पाहिले असता कार कंटेनरला धडकलेली दिसली. या घटनेने तोही हादरला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर अपघाताची दिशा स्पष्ट होत असली तरी काही शंका अद्याप कायम आहेत. समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. चालकाची आणखी कसून चौकशी केली जाणार असून, अपघातामागे निष्काळजीपणा की अन्य काही कारण, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जितेंद्र शेळके यांच्या निधनामुळे त्यांच्या परिचितांमध्ये शोककळा पसरली असून, या घटनेने समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 3:17 pm

अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे अखेर निलंबन:15 हजारांच्या खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रमोद गायकवाड यांच्यावर कारवाई

अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी 15 हजार रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता त्यांच्यावर थेट निलंबनाची कुऱ्हाड चालवण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर खाणमालकांकडून प्रत्येकी 15 हजार रुपयांची मागणी करत त्यांना धमकावल्याचा आरोप होता. खाण व क्रशर मालकांनी या प्रकरणी 2 आठवड्यांपूर्वी त्यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, गायकवाड यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेमुळे अकोल्याच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी या प्रकरणी प्रशासनावर टीका केली होती. त्यानंतर सरकारने प्रमोद गायकवाड यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. तसेच या घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले होते. त्यानंतर आता सरकारने थेट प्रमोद गायकवाड यांच्या निलंबनाचे आदेश काढलेत. निलंबन काळात गायकवाड यांचे मुख्यालय अकोला जिल्हाधिकारी कार्यालय असेल. त्यांना पूर्वसूचनेशिवाय अकोला मुख्यालय सोडता येणार नाही. नेमके प्रकरण आहे तरी काय? अकोला जिल्ह्यात गौण खनिजाच्या असंख्य खाणी आहेत. या खाणींमधून दगड, गिट्टी, मुरूम काढला जातो. त्यापोटी गौण खनिज विभागाला स्वामित्वधन शुल्क प्राप्त होते. महसूल विभागाकडून गौण खनिज विभागाला वसुलीचे लक्ष्य दिल्या जाते. मार्च महिन्यात स्वामित्व शुल्क वसुलीची लगबग सुरू असताना खाण मालक संघटनेने अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर प्रत्येकी 15 हजार रुपयांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला होता. खाणी बंद पाडण्याची धमकी दिल्याचाही आरोप प्रमोद गायकवाड यांनी वारंवार भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. संघटनेच्या सदस्यांना कार्यालयात बोलावून अपमानित केले. पैशांची मागणी केली. काही ठिकाणी स्वत: जाऊन वसुली देखील केली. सर्व खाणी बंद पाडण्याची धमकी सुद्धा दिली. अखेर त्यांच्या त्रासाला कंटाळून या प्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे ही वाचा… भोंदू खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश; धर्मांतर प्रकरणाचाही घेतला आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पोलिसांना भोंदू अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले. प्रस्तुत प्रकरणात कुणीही दोषी असला तरी त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हाच महत्त्वाचा घटक असला पाहिजे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नाशिक धर्मांतर प्रकरणाचाही विस्तृत आढावा घेतला. वाचा सविस्तर अखेर 18 वर्षीय तरुणी गेली तरी कुठे?:हात हवेत वर करत कुणीतरी खेचून नेल्यासारखी एकटीच चालत गेली; चक्रावून टाकणारी घटना धुळे शहरातील एक 18 वर्षीय तरुणी हवेत हात वर करत म्हणजे कुणीतरी हाताला धरू नेल्यासारखे अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ही तरुणी अत्यंत गुढपणे चालत जात असल्याची दिसून येत आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 2:58 pm

हापूस आंब्याची आवक वाढली; दरात घसरण

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील हापूस आंब्याचा मुख्य हंगाम सुरू होताच वाशीच्या घाऊक बाजारात आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. वाढलेल्या आवकेमुळे आंब्याच्या दरात काहीशी घसरण झाली असून, त्यामुळे आंबा खवय्यांना आता हापूसचा आस्वाद घेणे सुलभ होणार आहे. अक्षय्य तृतीयेमुळे बाजारात आंब्याची आवक वाढली आहे . यंदा मात्र बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसल्याने कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन […] The post हापूस आंब्याची आवक वाढली; दरात घसरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 2:57 pm

जितेंद्र शेळके यांचा घातपात?

मुंबई : अशोक खरात प्रकरणातील महत्त्वाची कडी असलेल्या शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही भीती व्यक्त केली होती की, अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. त्याच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. या घटनेमुळे ही शक्यता अधिक ठळक पद्धतीने अधोरेखित होत आहे. […] The post जितेंद्र शेळके यांचा घातपात? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 2:55 pm

लाल मिरचीला महागाईचा तडका

नवी मुंबई : प्रतिनिधी युद्धजन्य परिस्थितीमुळे भडकलेल्या महागाईला मिरचीने तडका दिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाळवलेल्या लाल मिरचीचे भाव किलोमागे शंभर ते तीनशे रुपयांनी वाढले आहेत. कर्नाटक बेडगी, काश्मिरी मिरची २०० ते ३०० रुपये किलोमागे महागली असून, आंध्र प्रदेशातील तेजा जातीच्या मिरचीचे दर १०० ते १२० रुपयांनी वाढले आहेत. मुंबईकरांची तेजा, बेडगी आणि काश्मिरी जातीच्या […] The post लाल मिरचीला महागाईचा तडका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 2:52 pm

सरकारकडून स्टेनोग्राफर पद मृत घोषित:राज्यातील हजारो तरुणांची निराशा, विद्यार्थी आक्रमक; नोकरीच्या संधी हिरावून घेऊ नका - सुळे

राज्य सरकारने स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करत त्यावरील भरती प्रक्रियेला फुलस्टॉप दिला आहे. राज्यातील बेरोजगारीचा आकडा झपाट्याने वाढत असताना सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. सरकारने तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. सरकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून लघुलेखक अर्थात स्टेनोग्राफर पदाची भरती करते. पण आता सरकारने हे पद मृत घोषित करून त्यावरील भरती प्रक्रिया थांबवली आहे. यामुळे हजारो तरुणांचे स्टेनोग्राफर होण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गात कमालीचा रोष पसरला आहे. एकीकडे सरकार पदभरती करत नाही आणि दुसरीकडे अशा पद्धतीने आहे ती पदे रद्द करण्याचा निर्णय घेते, असा आरोप विद्यार्थ्यांनी या प्रकरणी केला आहे. विद्यार्थ्यांचा सरकारच्या निर्णयावर संताप सरकारने स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करू नये. कारण विद्यार्थी मागील 5 वर्षांपासून या पदाच्या परीक्षेची तयारी करत आहेत. आता सरकारने अचानक हे पद रद्द केल्याने त्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. त्यामुळे सरकारने हे पद मृत घोषित न करता त्यावर भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सरकारच्या निर्णयामुळे स्टेनोग्राफरचे प्रशिक्षण घेतलेल्या लाखो उमेदवारांचे भविष्य अंधारात बुडण्याची भीती आहे. सरकारने आपला निर्णय मागे घेतला नाही, तर पुढच्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही विद्यार्थ्यांनी सरकारला दिला आहे. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी स्टेनोग्राफर पदाची तयारी करतात. आता शासनाने ही भरतीच बंद केली, तर त्यांनी जायचे कुठे? विद्यार्थी गत अनेक वर्षांपासून या परीक्षेची तयारी करत हरोते. आता लगेच दुसरी फिल्ड निवडताही येत नाही, अशी खंतही काही विद्यार्थ्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली. रोजगाराच्या संधी हिरावून घेऊ नका - सुप्रिया सुळे दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी सरकारचे कान टोचलेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदाची भरती थांबविण्यात आली असून हे पद मृत घोषित करण्यात आले आहे. यामुळे क्लासेस लावून 'स्टेनोग्राफी' चा कोर्स केलेल्या हजारो तरुणांची निराशा झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्टेनोग्राफर पदासाठी तयारी करतात. ही भरती शासनाने रद्द केल्याने आता नेमकं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया या पदासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांची कैफियत शासनाने एकदा ऐकून घ्यावी. हे पद मृत घोषित करण्याऐवजी त्यात काही कौशल्ये जोडून ते सुरू ठेवण्याचा पर्यायही तपासून पहावा. तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 2:19 pm

मुंढवा जमीन घोटाळ्यात ट्विस्ट!:पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे शीतल तेजवानीला जामीन; पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने तिची अटक आणि रिमांड प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याचे नमूद करत जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, बावधन पोलिसांच्या कामकाजातील हलगर्जीपणाचा फायदा तेजवानीला झाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. या निर्णयामुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 2:05 pm

सध्याच्या 543 जागांवरच महिला आरक्षण द्या:प्रियांका चतुर्वेदींकडून भूमिकेत बदल, महिला आरक्षण कायदा 2023 मध्ये संसदेत मंजूर- आदित्य ठाकरे

महिला आरक्षण कायदा 2023 मध्येच मंजूर झाला असताना, आता मतदारसंघांची फेररचना करण्याचा घाट कशासाठी? असा सवाल करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे लोकशाहीविरोधी विधेयक पराभूत झाल्याचा दावा करत, त्यांनी 2029 च्या निवडणुकीत सध्याच्याच रचनेत 33 टक्के महिला आरक्षण लागू करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांच्यासह प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभेत महिला आरक्षण बीलाच्या विरोधात भूमिका घेतली होती. या बीलाच्या विरोधात त्यांनी मतदान केले. मात्र, प्रियांका चतुर्वेदींनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतली. यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्याचा हवाला देत उबाठावर टीका केली यानंतर प्रियांका चतुर्वेदी यांनी नारी शक्ती विधेयक आणि लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवणारे मुद्दे एकत्र करण्याचा प्रयतन केला आहे. पावसाळी अधिवेशनात सरकारने 543 खासदारांमध्येच महिलांना 33 टक्के आरक्षणाचेबिल आणावे त्याला आम्ही सर्व पाठिंबा देऊ, असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न उबाठाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी केला आहे. ..तर विधेयकाला पाठिंबा देऊ प्रियांका चतुर्वेदी यांनी 24 तासांच्या आत भूमिका बदलत आदित्य ठाकरेंच्या सुरात सुर मिसळला आहे. चतुर्वेदी म्हणाल्या की, पावसाळी अधिवेशनात हे बिल सत्ताधाऱ्यांनी आणावे आणि आता जितके सदस्य त्यातूनच महिलांना 33 टक्के आरक्षण द्यावे. महिलांना आरक्षण देणं आणि मतदारसंघ फेररचना करणे दोन्ही गोष्टी एकत्र केल्यानेच काल बिल मंजूर झाले नाही. दोन्ही गोष्टी एकत्र करू नये. तुम्ही जर केवळ महिला आरक्षणाचे बिल आणणार असाल तर विरोधी पक्ष तुम्हाला साथ देईल. यामुळे 2029 मध्ये 180 महिला खासदार लोकसभेत दिसू शकतील. दुसरीकडे जर आपल्याकडे इच्छाशक्ती नसेल तर किमान पक्षात तरी 33 टक्के उमेदवारी महिलांना देताल का? असा सवाल चतुर्वेदी यांनी केला आहे. आरक्षण लागू होऊ शकते केवळ दोन गोष्टी एकत्र करू नये. आदित्य ठाकरेंचे ट्विट काय? आदित्य ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारने राजकीय हेतूने संविधानात दुरुस्ती करून लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवणारे, अनेक राज्यांचा आवाज दाबणारे आणि गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठी मतदारसंघांची फेररचना करण्याचा प्रयत्न करणारे मांडलेले विधेयक, काल संसदेत पराभूत झाले. संविधानातील हा हस्तक्षेप भारतातील लोकशाहीसाठी पर्यायाने संविधानाकरिताही मारक ठरला असता, पण हा प्रयत्न विरोधी पक्षाच्या खासदारांच्या एकजुटीमुळे फेटाळण्यात आला. कायदा 2023 मध्येच मंजूर आदित्य ठाकरे म्हणाले की, खरे म्हणजे, महिला आरक्षण कायदा 2023 मध्ये संसदेत मंजूर झाले असून, त्याची अधिसूचना 16/04/2026 रोजी जारी करण्यात आली होती.आजच्या विधेयकाला गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक असे नाव द्यायला हवे होते. खरे तर सध्याच्या जागांमध्येच 33% महिला आरक्षण लागू करण्याची, आवश्यकता आहे! सरकारची खरीच तशी भूमिका असेल तर 2029 च्या लोकसभा निवडणुकांसाठी 543 जागांमध्ये तसेच देशभरातील सर्व निवडणुकांमध्ये हे आरक्षण प्रभावीपणे लागू करणे आवश्यक आहे. प्रियांका चतुर्वेदींनी आरसा दाखवला- बन नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आरसा दाखवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ट्विट बघण्यापेक्षा चतुर्वेदींनी केलेले ट्विट राऊतांनी बघितले तर त्यांचे डोळे उघडतील. महिला आरक्षणाचे समर्थन करण्याचे काम त्यांनी केले मी त्यांचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी नारी शक्तीच्या हिताची भूमिका घेतली. तुम्हाला महिलांबद्दल अभिमान वाटत नाही म्हणून तुम्ही विरोधात भूमिका घेतली. नारी शक्तीचा अपमान करण्याचे काम तुम्ही केले आहे, महिला तुम्हाला माफ करणार नाही.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 2:01 pm

भोंदू खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिसांना निर्देश; धर्मांतर प्रकरणाचाही घेतला आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पोलिसांना भोंदू अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले. प्रस्तुत प्रकरणात कुणीही दोषी असला तरी त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हाच महत्त्वाचा घटक असला पाहिजे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नाशिक धर्मांतर प्रकरणाचाही विस्तृत आढावा घेतला. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गृहविभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी नाशिकच्या भोंदू अशोक खरात व आयटी धर्मांतर प्रकरणासह परतवाडा व गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचा विस्तृत आढावा घेतला. या बैठकीला पोलिस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री प्रस्तुत प्रकरणांत आरोपी कोण आहेत? हे न पाहता संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. तपासात अपराधसिद्धी हाच महत्त्वाचा घटक सूत्रांच्या मते, मुख्यमंत्र्यांनी अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांच्या सुरक्षेवर प्राधान्यक्रमाने भर दिला. ते म्हणाले, प्रस्तुत प्रकरणातील पीडित महिलांना संपूर्ण विश्वास द्या. या प्रकरणी कुणीही दोषी असो त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोर्टात ही केस मजबूत कशी होईल, हे निश्चित करण्यासाठी भक्कम पुरावे शोधा. तपासात अपराधसिद्धी हाच एकमेव महत्त्वाचा घटक असला पाहिजे. नाशिक धर्मांतराची घेतली गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराच्या घटनेचीही गंभीर दखल घेतली. राज्यात धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका. नाशिक पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणले. त्यांचे अभिनंदन. पण आता तेवढाच दमदार तपासही झाला पाहिजे. या प्रकरणातील सर्वच पॅटर्नचा तपास करा. कोणताही अँगल तपासून सूटू देऊ नका, असे ते म्हणाले. गोरेगाव ड्रग्ज व परतवाडा प्रकरणावरही भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी गोरेगाव ड्रग्ज प्रकरण व परतवाडा प्रकरणावरही भाष्य करत पोलिसांना संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी ड्रग्जविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करावी. तरुणाच्या भविष्याशी निगडीत ही बाब आहे. त्यामुळे अशी प्रकरणे गांभिर्याने घेतली पाहिजे. परतवाडा प्रकरणातील पीडितांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यांना विश्वास दिले पाहिजे. या प्रकरणी संबंधित समाजसेवकांची मदत घेतली पाहिजे, असे ते पोलिसांना योग्य ते निर्देश देताना म्हणाले. हे ही वाचा… अखेर 18 वर्षीय तरुणी गेली तरी कुठे?:हात हवेत वर करत कुणीतरी खेचून नेल्यासारखी एकटीच चालत गेली; चक्रावून टाकणारी घटना धुळे शहरातील एक 18 वर्षीय तरुणी हवेत हात वर करत म्हणजे कुणीतरी हाताला धरू नेल्यासारखे अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ही तरुणी अत्यंत गुढपणे चालत जात असल्याची दिसून येत आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 1:36 pm

संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंविरुद्ध जामीनपात्र वॉरंट:माझगाव न्यायालयाचा निर्णय; प्रत्यक्ष कोर्टात राहून जामीन घ्यावा लागणार

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीत मोठी घडामोड समोर आली आहे. माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने भाजप नेते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास राज्यमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर नितेश राणे यांना आता प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे. या प्रकरणाची सुरुवात एका राजकीय वक्तव्यापासून झाली होती. 7 मे रोजी नितेश राणे यांनी केलेल्या विधानात त्यांनी असा दावा केला होता की, संजय राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. त्यांनी 10 जूनपर्यंत हा प्रवेश होईल, असेही स्पष्टपणे सांगितले होते. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. मात्र, संजय राऊत यांनी हे वक्तव्य आपली सार्वजनिक बदनामी करणारे असल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली. याचिकेत राऊत यांनी म्हटले होते की, त्यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी जाणूनबुजून असे विधान करण्यात आले. त्यामुळे त्यांनी नितेश राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला. हे प्रकरण माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरू होते. दरम्यान, या खटल्याची सुनावणी दुसऱ्या न्यायालयात व्हावी, अशी मागणी करत नितेश राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. यानंतर न्यायालयाने दिलेल्या पुढील तारखांना नितेश राणे अनुपस्थित राहिल्याचे नोंदवण्यात आले. सलग दोन वेळा हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने कडक भूमिका घेत त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता या प्रकरणात नवा वळण आले असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण वादाची पार्श्वभूमी पाहता, संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यातील राजकीय संघर्ष नवा नाही. यापूर्वीही दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर अनेक वेळा जोरदार टीका केली आहे. मे 2023 मध्ये नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत त्यांचा उल्लेख अपमानास्पद शब्दांत केल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्या घटनेनंतरच या मानहानी प्रकरणाची बीजे रोवली गेली होती. दोन्ही नेते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष दरम्यान, सत्तांतरानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना या प्रकारच्या वक्तव्यांमुळे वातावरण अधिक तापले आहे. राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा, त्यावरून निर्माण झालेला वाद आणि आता न्यायालयीन कारवाई यामुळे या प्रकरणाला अधिकच गंभीर स्वरूप आले आहे. पुढील सुनावणीमध्ये काय घडते, तसेच दोन्ही नेते या प्रकरणावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 1:30 pm

हिंगोलीत भाजपने निष्ठावंतांना डावलले:उपऱ्यांना पदे मिळाल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ, पण पक्षशिस्तीमुळे सर्वांचे तोंडावर बोट

हिंगोली जिल्हा भाजपामध्ये निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना पदे देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमधून अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र पक्ष शिस्तीमुळे कोणीही बोलण्यास तयार नसल्याने कार्यकर्त्यांवर तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी वेळ आल्याचे चित्र आहे. हिंगोली जिल्हयात भाजपामध्ये मागील काही दिवसांपासून प्रवेश घेणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. इतर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून भाजपात प्रवेश घेतला जाऊ लागला आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात भाजपाची ताकद वाढत असल्याचे बोलले जात असले तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून मात्र चांगलीच अस्वस्थता दिसून येऊ लागली आहे. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून हिंगोली जिल्हयाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे इतर पक्षातून येणाऱ्यांची स्वागत केले जात आहे. काही दिवसांपुर्वीच कळमनुरीच्या एका नेत्याला भाजपात प्रवेश देण्यात आला. मात्र पक्ष प्रवेश होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत याची कानोकान खबरही स्थानिक पदाधिकाऱ्यांना झाली नाही. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच इतर पक्षातून प्रवेश केलेल्या एका नेत्याला देशाच्या वरिष्ठ सभागृहात पाठविले. राज्य पातळीवरील या घडामोडी घडल्या. त्यानंतर मागील दोन दिवसांत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये भाजपाच्या सहसंपर्क प्रमुख रेखा कुलकर्णी यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या ते पदाधिकारी इतर पक्षांतून भाजपात नुकतेच आले होते. त्यांचे पक्षात कोणतेही काम नसतांनाही त्यांना पदे बहाल करण्यात आली तसेच नगर पालिका निवडणुकीतही स्विकृत सदस्याच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे. दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांची शहर, जिल्हा कार्यकारीणीवर वर्णी लावली जात असतांना निष्ठावंतांना मात्र डावलले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजापच्या निष्ठावंतांमधून नाराजीचा सुर उमटू लागला आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 1:15 pm

होर्मुझची सामुद्रधुनी खुली होताच अमेरिकन मार्केटमध्ये मोठी तेजी; भारतासाठीही आनंदाची बातमी!

वॉशिंग्टन/नवी दिल्ली: जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा होर्मुझ सामुद्रधुनीचा (Strait of Hormuz) मार्ग पुन्हा एकदा खुला झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. या बातमीचा सकारात्मक परिणाम शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात दिसून आला, जिथे गुंतवणूकदारांनी उत्साहात खरेदी केल्यामुळे बाजारात मोठी रॅली पाहायला मिळाली. अमेरिकन मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावानंतर बंद करण्यात […] The post होर्मुझची सामुद्रधुनी खुली होताच अमेरिकन मार्केटमध्ये मोठी तेजी; भारतासाठीही आनंदाची बातमी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 12:53 pm

हळदवाडी साठवण तलावामुळे 298 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार:दोन गावांची तहान भागणार, मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न

हिंगोली तालुक्यातील हळदवाडी साठवण तलावाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु झाले असून कामाला गती आली आहे. या तलावात 1.646 दशलक्ष घनमीटर पाणीसठा होणार असून त्यातून दोन गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. या शिवाय 298 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. तलावाच्या कामाची शनिवारी ता. 18 आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पाहणी केली. हिंगोली तालुक्यातील हळदवाडी शिवारात जलसंपदा विभागाच्या वतीने सुमारे 39 कोटी रुपये खर्चुन तलावाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. य तलावासाठी नर्सी नामदेव व वैजापूर शिवारातील 39 हेक्टर जमीनीवर तलावाचे बांधकाम केले जात आहे. सदर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या तलावामध्ये 1.646 दशलक्ष घनमिटर पाणीसाठी होणार आहे. त्यातून नर्सी नामदेव व पुसेगाव या दोन गावांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या शिवाय 298 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून शेती सिंचनासाठी पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना एकरी उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तलावाचे काम युध्दपातळीवर सुरु असून मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याचे जलसंपदा विभागाच्या सहाय्यक अभियंता प्राजक्त भुजाडले यांनी सांगितले. या तलावाच्या बांधकामाची आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पाहणी केली. यावेळी सहाय्यक अभियंता भुजाडले, ॲड. के. के. शिंदे, संतोष टेकाळे, विलास गोरे, माणिक लोडे, आसाराम घुगे, सरपंच शंकर सिंदे, प्रल्हाद शिंदे, रुस्तुम शिंदे, प्रद्युम्न गिरीकर, शिवाजी मेटकर यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार मुटकुळे यांनी तलावाच्या कामाबाबत आवश्‍यक सूचनाही दिल्या आहेत

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 12:43 pm

अखेर 18 वर्षीय तरुणी गेली तरी कुठे?:हात हवेत वर करत कुणीतरी खेचून नेल्यासारखी एकटीच चालत गेली; चक्रावून टाकणारी घटना

धुळे शहरातील एक 18 वर्षीय तरुणी हवेत हात वर करत म्हणजे कुणीतरी हाताला धरू नेल्यासारखे अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ही तरुणी अत्यंत गुढपणे चालत जात असल्याची दिसून येत आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, संजीवनी राहुल वराडे असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती धुळ्यातील शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगर येथून शुक्रवारी दुपारी बेपत्ता झाली. गत काही दिवसांपासून धुळ्यात महिला व मुली बेपत्ता होण्याच्या अनेक घटना घडल्यात. या सर्व घटना आमिष दाखवून किंवा फुस लावून पळवून नेल्याच्या आहेत. पण संजीवनी वराडेची घटना काही औरच आहे. ती अक्षरशः एखाद्या अदृश्य शक्तीने हात धरून ओढत न्यावे, अशा पद्धतीने हवेत हात वर करून कुठेतरी जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पालकवर्गांत एकच दहशत पसरली आहे. घटनेचा व्हिडिओ झाला व्हायरल या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात संजीवनी घराबाहेर उभी असल्याचे दिसते. त्याचवेळी एक वृद्ध व्यक्ती तिच्यासमोरून जातो. हा व्यक्ती गेल्यानंतर दुसऱ्याच क्षणी संजीवनी शुद्ध हरपल्यासारखी चालू लागते. चालताना तिचा हात कुणीतरी खेचल्यासारखे वाटत आहे. कारण, संजीवनी पुढे जात असताना आपला हात कुणाच्या तरी हातात देऊन चालताना दिसून येत आहे. सीसीटीव्हीत तो व्यक्ती दिसत नाही. पण संजीवनीचा हात हवेत अधांतरी तरंगत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ती गुंगीत किवा झोपेत असल्याचे भासते. नेमके काय घडले? सर्वचजण चक्रावले दुसरीकडे, संजीवनी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. पण ती अद्याप सापडली नाही. दिवसाढवळ्या घडलेल्या या विचित्र घटनेमुळे सर्वचजण चक्रावेल आहेत. अखेरीस संजीवनी गेली कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. काही प्रत्यक्षदर्शी व व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मते, संजीवनीचे संमोहनाच्या मदतीने अपहरण केले जाण्याची शक्यता आहे. संजीवनी शुद्धीत नसून, तिला कुणीतरी अशा पद्धतीने नेल्याची चर्चा स्थानिकांत रंगली आहे. संजीवनी एखाद्या खोल विचारात असताना घराबाहेर पडली असावी व त्याच स्थितीत ती कुठेतरी गेली असावी, असा अंदाजही अनेकांनी वर्तवला आहे. हे ही वाचा… एक लाख अशोक खरात मिळून 1 अकबर होईल:शरद पोंक्षेंनी सम्राट अकबराशी केली खरातची तुलना; 'जोधा' काल्पनिक असल्याचा दावा अभिनेते शरद पोंक्षे यांनी भोंदू अशोक खरातची तुलना थेट मुगल सम्राट अकबराशी केली आहे. एक लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल. मुगल ए आझम चित्रपटात अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासात अस्तित्वात नसलेले जोधा नामक पात्र घुसवण्यात आले, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 12:41 pm

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची

मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यम आणि मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली जाणार आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययनाची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या नियमाचे उल्लंघन करणा-या शाळांवर कारवाई देखील केले जाणार आहे. नियम मोडणा-या शाळांवर १ […] The post राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 12:36 pm

महाराष्ट्रात उष्णतेचा इशारा; विदर्भात तापमान ४४ अंश पार

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या तापमान खूप जास्त वाढताना दिसत आहे. घराबाहेर पडल्यावर घामाच्या धारा लागतात. दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात झाली आहे. विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कडक उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा-कॉलेजला सुटी देण्यात आली आहे. विदर्भात तापामानाचा पारा वाढतच […] The post महाराष्ट्रात उष्णतेचा इशारा; विदर्भात तापमान ४४ अंश पार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Apr 2026 12:35 pm

अशोकराव खाल्लेल्या मीठाला जागायला शिका:पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या, महाराष्ट्र काँग्रेसचा अशोक चव्हाणांवर हल्ला

महाराष्ट्र काँग्रेसने महिला आरक्षणाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे खाल्लेल्या मीठाला जागायला शिकले पाहिजे. पाठीचा कणा थोडा तरी मजबूत राखला पाहिजे, असे काँग्रेसने म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री नारी शक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित घटनादुरुस्ती लोकसभेत नामंजूर फेटाळल्यावरून काँग्रेसवर सडकून टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारीशक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून 2029 च्या निवडणुकीपासून महिलांना लोकसभा व विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू व अनाठायी भूमिकेमुळे या प्रयत्नांत अडसर आणला गेला, असे ते म्हणाले होते. महाराष्ट्र काँग्रेसने या प्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार पलटवार केला. काँग्रेसचा चव्हाणांना पाठीचा कणा मजबूत ठेवण्याचा सल्ला काँग्रेसने अशोक चव्हाणांचे ट्विट रिट्विट करत म्हटले की, अशोकराव, ज्या कॉंग्रेस पक्षाशी आपले वडील स्व. शंकरराव चव्हाण साहेब आयुष्यभर एकनिष्ठ राहीलेत, त्याच कॉंग्रेस पक्षासोबत आपण गद्दारी करण्याअगोदर 2023 मध्येच, “नारी शक्ती वंदन अधिनियम - 2023”, म्हणजेच लोकसभा व विधानसभेच्या जागांमध्ये महिलांसाठीचे 33% आरक्षण हे संसदेत एकमताने (कॉंग्रेसच्या पाठींब्याने) मंजूर झालेले आहे. ते 16 एप्रिल 2026 पासून लागू ही झाले आहे. आपल्या माहितीसाठी, ज्यांच्यामुळे आपण पहिल्यांदा लोकसभेच्या सभागृहात निवडून गेलात त्या स्व. राजीव गांधी यांनीच स्थानीक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण लागू केलं व नंतर 50% आरक्षण ही कॉंग्रेसच्याच काळात लागू करण्यात आलं. खाल्लेल्या मीठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या, असे काँग्रेसने म्हटले आहे. खाली वाचा काय म्हणाले होते अशोक चव्हाण अशोक चव्हाण म्हणाले होते, नारीशक्ती वंदन अधिनियमाशी निगडीत घटना दुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून येत्या 2029 च्या निवडणुकीपासून लोकसभा व सर्व राज्यांच्या विधानसभेत 33 टक्के महिला आरक्षण लागू करण्याचा एक चांगला प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केला. मात्र, राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू व अनाठाय़ी भूमिकेमुळे या प्रयत्नात अडसर आणला गेला आहे. विरोधी पक्षांच्या सर्व शंका-कुशंकांना केंद्र सरकारने ठोस उत्तरे दिली. विरोधी पक्षांना हवे असेल तर सर्व राज्यांमध्ये सरसकट 50 टक्के लोकसभा मतदारसंघ वाढीबाबत सुधारणा आणण्याची तयारी गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत व्यक्त केली. परंतु, विरोधी पक्षांची एकंदर भूमिका लक्षात घेता त्यांना देशातील कोट्यवधी महिलांपेक्षा स्वतःचा राजकीय अहंकार महत्वाचा वाटला. त्यामुळेच सदर घटना दुरुस्ती विधेयकांना लोकसभेची मंजुरी मिळू शकली नाही. विरोधी पक्ष ज्याला आपला विजय समजत आहेत, तो दुर्दैवाने देशातील नारीशक्तीच्या हितांचा पराभव आहे. लोकसभा व विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण हा कोणताही राजकीय अजेंडा नाही. तर ते एक स्वप्न आहे, एक निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज नाही तर उद्या ते साकार झाल्याशिवाय राहणार नाही, असे चव्हाण म्हणाले होते.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 12:17 pm

पुण्यात वकीलाकडून महिला सेक्रेटरीची हत्या:मृतदेह पोत्यात भरून ऑफिसमध्येच लपवला, कटात पत्नी अन् अल्पवयीन मुलीचाही सहभाग

पुण्यातील मुंढवा परिसरात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून ॲड. संजय सावंत याने आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीच्या मदतीने महिला सेक्रेटरीचा क्रूरपणे खून केला. पूनम दिनेश मुन (वय 35) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी सावंत कुटुंबातील तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. पूनम मुन या गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. संजय सावंत यांच्या मुंढवा येथील कार्यालयात साहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. सावंत यांचे पूनम यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीची पत्नी स्वाती सावंत हिला होता. याच कारणावरून गुरुवारी (16 एप्रिल) कार्यालयात वाद झाला. संतापलेल्या संजय सावंत, पत्नी स्वाती आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीने पूनम यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पूनम यांचे पाय दोरीने बांधून त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने सपासप वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यात पूनम यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह पोत्यात भरला हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी पूनम यांचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि तो कार्यालयातच लपवून ठेवला. दुसऱ्या दिवशी संधी पाहून या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन आरोपींचे होते. मात्र, तत्पूर्वीच हा प्रकार उघडकीस आला. पोत्यात सापडला मृतदेह पूनम रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचे पती दिनेश मुन यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. त्यांनी संजय सावंत याला फोन केला असता, त्याने पूनम नातेवाइकांकडे गेली असावी, असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. रात्री 11 वाजता कुटुंबीयांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी शोध घेत असताना दिनेश मुन संशयावरून सावंत यांच्या कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांना एक रक्ताने माखलेले पोते दिसले. ते उघडताच त्यांना पत्नीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी ॲड. संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 12:11 pm

एक लाख अशोक खरात मिळून 1 अकबर होईल:शरद पोंक्षेंनी सम्राट अकबराशी केली खरातची तुलना; 'जोधा' काल्पनिक असल्याचा दावा

अभिनेते शरद पोंक्षे यांनी भोंदू अशोक खरातची तुलना थेट मुगल सम्राट अकबराशी केली आहे. एक लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल. मुगल ए आझम चित्रपटात अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासात अस्तित्वात नसलेले जोधा नामक पात्र घुसवण्यात आले, असे ते म्हणालेत. शरद पोंक्षे यांनी नांदेड येथे आयोजित परशुराम तजोत्सव व्याख्यानमालेत बोलताना उपरोक्त वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले. पूर्वी जात हा विषय नव्हता. संस्कृतीशी त्याचा कोणता संबंधही नव्हता. त्याची सुरुवात मुस्लिम आक्रमणापासून झाली. त्याला इंग्रजही तेवढेच जबाबदार आहेत. काँग्रेसने हिंदुत्वाची वज्रमूठ फोडून टाकली. आता सगळ्या जाती, आम्ही हिंदू नाही असे सांगत आहेत. त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे हे किडे सोडले आणि मुळापर्यंत जाऊन पोहोचले. हिंदुत्व कोणत्याही एका ग्रंथाशी बांधले गेले नाही. आमचा धर्मग्रंथ एक असून, 'हे विश्वची माझे घर' हे त्याचे ब्रीद वाक्य आहे. मोदींनी तुम्हाला जवळ का धरायचे? ते पुढे म्हणाले, धर्माच्या नावावर काही वेगळे मिळत नाही. मग मंदिरांवरच सरकारचा कंट्रोल का आहे? याविरोधात हिंदू कधी रस्त्यावर उतरत नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला जवळ का करायचे? स्वतःला सेक्युलर म्हणता, मग सरकारी पैसा हिंदू मंदिरांतून का जातो? 4 लाख हिदू मंदिरांतून पैसा सरकारी तिजोरीत जातो. मदरसे व चर्चमधून का जात नाही? या पैशांतून मुस्लिम, ख्रिश्नच लोकांचे सुद्धा कल्याण होते. 80 टक्के या गोष्टीसाठी रस्त्यावर का उतरत नाहीत? चर्च व मशिदीच्या पैशांवर सरकारचे का नियंत्रण नाही? असा सवालही शरद पोंक्षे यांनी यावेळी उपस्थित केला. सम्राट अकबराची भोंदू खरातशी तुलना शरद पोंक्षे यांनी यावेळी भोंदू अशोक खरातची तुलना मुगल सम्राट अकबराशीही केली. मुगल ए आझम चित्रपटातील अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठीच इतिहासात अस्तित्वात नसलेले जोधाचे पात्र त्यात घुसवण्यात आले. अकबर कसा चांगला असेल? तो बायकांचे आयुष्य बरबाद करणारा होता. 1 लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल, असे ते म्हणाले. टीपू सुलतानवरही साधला निशाणा काँग्रेसने ब्राह्मणांची हत्या करणाऱ्या टिपू सुलतानची सीरियल दूरदर्शनवर दाखवली. त्यातून टिपू सुलतान किती चांगला होता हे आमच्यावर बोडक्यावर लादण्यात आले. अटकपासून कटकपर्यंत ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, त्याचे साम्राज्य पूर्ण केले तो बाजीराव पेशवा आपल्याला माहिती नाही. त्याची सीरियलही टीव्हीवर येत नाही. त्याचा चुकीचा इतिहास आणला. 41 लढाई कसे लढला, हे सुद्धा दाखवले जात नाही. मस्तानी फक्त 17 महिने त्यांच्या आयुष्यात आली. तेवढ्यावरच त्यांनी तिला आपल्या पत्नीचा दर्जा दिला, असेही शरद पोंक्षे यावेळी बोलताना म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 12:01 pm

उद्धव ठाकरे धर्मांतर प्रकरणावर मूग गिळून गप्प का?:ॲक्सिस बँकेत धर्मांतर नाही तर लैंगिक छळाची चौकशी झाली- नवनाथ बन

अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेत धर्मातरांचा प्रकार झाला होता असे सांगितले नाही तर लैंगिक छळाचे प्रकरण झाले होते आणि या प्रकरणी रितसर चौकशी केल्याचे सांगितले. लैंगिक छळाबद्दलच बोलायचे झाले तर पाटकर फाईल्समध्ये तुम्ही एका महिलेबद्दल काय बोलला, त्यांच्यावर कसा अन्याय केला, हे पाटकर फाईल्समध्ये महाराष्ट्राने ऐकले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची टीसीएस प्रकरणी काय भूमिका आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये धर्मांतरणाचे प्रकरण सुरू आहे, त्यावर उद्धव ठाकरे मुक गिळून गप्प आहेत, त्यावर काहीच बोलत नाही. संजय राऊत उद्धव ठाकरेंना त्यावर बोलायला सांगा. प्रियांका चतुर्वेदींनी आरसा दाखवला नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आरसा दाखवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ट्विट बघण्यापेक्षा चतुर्वेदींनी केलेले ट्विट राऊतांनी बघितले तर त्यांचे डोळे उघडतील. महिला आरक्षणाचे समर्थन करण्याचे काम त्यांनी केले मी त्यांचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी नारी शक्तीच्या हिताची भूमिका घेतली. तुम्हाला महिलांबद्दल अभिमान वाटत नाही म्हणून तुम्ही विरोधात भूमिका घेतली. नारी शक्तीचा अपमान करण्याचे काम तुम्ही केले आहे, महिला तुम्हाला माफ करणार नाही. मोदी-शहा यांच्यात संघर्षाचा राऊतांचा दावा हास्यास्पद नवनाथ बन म्हणाले की, आम्ही भाजपमध्ये काम करतो. आमच्या पक्षात उबाठासारखे भांडणं नसतात. आम्ही देश प्रथम, मी पक्ष अशा भूमिकेतून काम करत असतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी- अमित शहा यांच्यात संघर्ष आहे असा हास्यास्पद आरोप राऊत करत आहे. तुमच्या पक्षात एकमेकांच्या विरोधात तुम्ही उभे राहतात. आमच्याकडे जनतेचे हित पाहिले जाते. उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष निर्माण करण्याचा डाव नवनाथ बन म्हणाले की, महिला आरक्षणाच्या निमित्ताने उत्तर VS दक्षिण संघर्ष इंडिया आघाडीला निर्माण करायचा आहे. विधेयकामुळे दक्षिणेतील राज्यावर अन्याय होणार नव्हता तर खासदारांची संख्या वाढणार होती. तुम्हाला देशाचे हित नको होते म्हणून तुम्ही या विधेयकाला विरोध केला आहे. दक्षिणेचे हित तुम्हाला नको असल्याचे काल दिसून आले. नारी शक्ती आणि दक्षिणेतील राज्य तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही महिलांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

दिव्यमराठी भास्कर 18 Apr 2026 12:01 pm