प्लास्टिक कचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा:महापौर रवी लांडगे यांचे प्रतिपादन
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि बिसलेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या 'बॉटल्स फॉर चेंज' उपक्रमांतर्गत पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या बाकड्यांचे आणि कचरा संकलन डब्यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी महापौर रवी लांडगे यांनी प्लास्टिक कचरा व्यवस्थापनात नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केले. पिंपरी-चिंचवड शहराला पर्यावरणपूरक बनवण्यासाठी आणि प्लास्टिक कचरा समस्या सोडवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. पीसीएमसी कार्यालय परिसरात महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते या सुंदर बाकड्यांचे आणि कचरा संकलन डब्यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महापालिकेचे उपमहापालिका आयुक्त व आरोग्य विभाग प्रमुख डॉ. प्रदीप थेंगल, बिसलेरी इंटरनॅशनलचे सस्टेनेबिलिटी आणि कॉर्पोरेट अफेअर्स विभागाचे संचालक के. गणेश, तसेच घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि सीएसआर सेलमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महापौर लांडगे यांनी सांगितले की, बिसलेरीसोबतची ही भागीदारी कंपन्या आणि प्रशासन एकत्रितपणे काम करून शहरात सकारात्मक बदल घडवू शकतात, याचे उत्तम उदाहरण आहे. या उपक्रमामुळे शहरातील प्लास्टिक कचरा लँडफिलमध्ये न जाता त्याचा विधायक पुनर्वापर होईल, ज्यामुळे 'सर्क्युलर इकॉनॉमी'ला बळ मिळेल. बिसलेरीचे संचालक के. गणेश यांनी कचरा जिथे निर्माण होतो, तिथेच त्याचे वर्गीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. शैक्षणिक संस्था आणि जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून बिसलेरीने कचरा व्यवस्थापनाचा एक यशस्वी मार्ग दाखवला आहे. २०२५-२६ या वर्षात बिसलेरीने देशभरात ३०,३०९ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा संकलित करून तो पुनर्वापरासाठी पाठवला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी पिंपरी-चिंचवडमधील ८ शैक्षणिक संस्थांना महापौरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या संस्थांनी वर्षभर आपल्या परिसरात प्लास्टिक कचरा संकलनाचे प्रभावी काम केले होते. डॉ. प्रदीप थेंगल यांनी 'बॉटल्स फॉर चेंज' सारखे उपक्रम शहराला शाश्वत विकासाकडे नेण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे म्हटले. हा उपक्रम बिसलेरीच्या 'ग्रीनर प्रॉमिस' मोहिमेचा भाग असून, याद्वारे शाश्वत कचरा व्यवस्थापन आणि जलसंधारणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नागरी समितीला 'राम नदी सेवक सन्मान' प्रदान:कोहिनूर राम नदी महोत्सवाचा समारोप, पुनरुज्जीवनाचा निर्धार
पुणे येथे कोहिनूर कट्टा आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाचा शनिवारी समारोप झाला. या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी (दि. १८) भूगाव येथील नागरी समस्या निवारण समितीला उद्योजक कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते 'राम नदी सेवक सन्मान' प्रदान करण्यात आला. यावेळी राम नदीच्या पुनरुज्जीवनाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यावेळी उपस्थित होते. अनिल निवृत्ती करंजावणे, पंढरीनाथ शिवराम शेडगे आणि शिवाजी काशीनाथ रणवरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी हा पुरस्कार स्वीकारला. पत्रकार भवन येथे आयोजित या महोत्सवाला महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी राम नदीचे प्रदूषण त्वरित थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले, प्रदूषण, राडारोडा, अतिक्रमण, सांडपाणी आणि प्लास्टिक कचरा अशा अनेक समस्यांनी राम नदी वेढलेली आहे. गोयल यांनी विश्वास व्यक्त केला की, सर्व स्तरातील नागरिक, युवा पिढी आणि सामाजिक संस्थांनी सहकार्य केल्यास ही परिस्थिती बदलता येईल. या महोत्सवातून राम नदीवर आधारित लघुपट आणि पर्यावरण तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. चित्रपट हा समाजजीवनाचा आरसा असून, या महोत्सवाद्वारे नदीचे वास्तव मांडले गेले. केवळ महोत्सव करून न थांबता, नदी स्वच्छ, सुंदर आणि अविरल ठेवण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असेही त्यांनी सांगितले. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी सांगितले की, मातेसमान नद्यांची अवहेलना होऊ नये, ही जागृती या महोत्सवाद्वारे झाली आहे. भविष्यात राम नदीसंदर्भात विविध सामाजिक संस्था आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून 'राम नदी संसद' आयोजित करण्याचा मानस आहे. तसेच, दर महिन्याला 'राम नदी परिक्रमा' आयोजित करून नदीची ओळख करून दिली जाईल आणि लहान-मोठ्या उपक्रमांतून नदीची शुद्धता टिकवण्यासाठी प्रयत्न केले जातील. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अनिल करंजावणे म्हणाले की, राम नदी परिक्रमा करताना निर्मळ नदी अशुद्ध झाल्याचे पाहून खूप दुःख झाले. मानवनिर्मित प्रदूषणाला आळा घालण्यासाठी त्यांनी नदी स्वच्छता अभियान सुरू केले. 'देशाचे देणे लागतो' या भूमिकेतून ते अविरतपणे कार्यरत आहेत. हा पुरस्कार पुढील कार्यासाठी प्रोत्साहन देईल, असेही त्यांनी नमूद केले.
अहद युसुफ शेख बनला तरोड्यातील पहिला एमबीबीएस डॉक्टर
परभणी : तालुक्यातील तरोडा गावातील युवक अहद युसुफ शेख याने वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित एमबीबीएस पदवी यशस्वीपणे प्राप्त केली आहे. त्याचे हे यश गावासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. विशेष म्हणजे तरोडा गावातून एमबीबीएस शिक्षण पूर्ण करणारा तो पहिलाच विद्यार्थी ठरला असून त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिद्द, मेहनत […] The post अहद युसुफ शेख बनला तरोड्यातील पहिला एमबीबीएस डॉक्टर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
व्हॉईस ऑफ मीडियाची परभणी जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध जाहीर
परभणी : पत्रकारांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम (व्हीओएम) या आंतरराष्ट्रीय संघटनेची परभणी जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षपदी कैलास चव्हाण यांची तर सह सरचिटणीसपदी सुधीर बोर्डे यांची निवड करण्यात आली आहे. अवघ्या ५ वर्षात जगातील तब्बल ७८ देशात विस्तारलेल्या या संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी राज्याचे […] The post व्हॉईस ऑफ मीडियाची परभणी जिल्हा कार्यकारिणी बिनविरोध जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धुराचे लोट अन् आगीचे तांडव!:JNPA जवळ भीषण आग; उरणमधील गव्हान फाटा येथे कंटेनर यार्ड जळून खाक
मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (JNPA) जवळ, उरण येथील गव्हान फाटा येथे एका माल हाताळणी गोदामात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. प्राथमिक माहितीनुसार, कंटेनर यार्डमधील एका शेडमध्ये ही आग लागली, त्यानंतर आग पसरल्याने अनेक कंटेनर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दृश्यांमध्ये कंटेनर यार्डच्या वर धुराचा प्रचंड लोट दिसत असून, तो दूरवरूनही स्पष्ट दिसत आहे. पनवेलहून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आग विझवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहे. ही बातमी आम्ही अपडेट करत आहोत दरम्यान, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 येथे किरकोळ आग लागली होती. मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, मुंबई अग्निशमन दलाचे जवान, पोलिस आणि प्रभाग कर्मचाऱ्यांना आग लागलेल्या ठिकाणी त्वरित तैनात करण्यात आले होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
हवाई सेवा हळूहळू पूर्ववत : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
पुणे : पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाशी संबंधित घटनेनंतर धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली होती. शुक्रवारी (१७ एप्रिल) रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास लँडिंग करताना एका लढाऊ विमानाचे लँडिंग गिअर निकामी झाल्यामुळे धावपट्टीवर अडथळा निर्माण झाला. सुदैवाने, विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झालेली नाही. या घटनेनंतर धावपट्टी मोकळी करून दुरुस्तीचे […] The post हवाई सेवा हळूहळू पूर्ववत : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिला आरक्षण कायदा २०२३ मध्ये संसदेत मंजूर
मुंबई : प्रतिनिधी महिला आरक्षण कायदा २०२३ मध्येच मंजूर झाला असताना, आता मतदारसंघांची फेररचना करण्याचा घाट कशासाठी? असा सवाल करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे लोकशाहीविरोधी विधेयक पराभूत झाल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाने दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभेत महिला आरक्षण बिलाच्या विरोधात […] The post महिला आरक्षण कायदा २०२३ मध्ये संसदेत मंजूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील मुंढवा परिसरात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून ॲड. संजय सावंत याने आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीच्या मदतीने महिला सेक्रेटरीचा क्रूरपणे खून केला. पूनम दिनेश मुन (वय 35) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी सावंत कुटुंबातील तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी आता मृत पूनम मुन यांचे पती दिनेश मुन यांनी या घटनेची इन्साइड स्टोरी सांगितली आहे. दिनेश मुन म्हणाले, रोजच्या प्रमाणेच माझी बायको 2 वाजता ऑफिसला गेली आणि सव्वा तीन वाजता ऑफिसला पोहोचते. मला तिच्या साहेबांचा फोन आला मॅडम ऑफिसला आल्या नाहीत, काही अपडेट आहे का? मी म्हटले की त्यांना फोन लावून बघा. त्यावर त्यांनी सांगितले की फोन लावला पण लागत नाहीये. फोन केला तेव्हा रिंग वाजत होती, पण उचलत नव्हती पुढे दिनेश मुन म्हणाले, त्यानंतर मी फोन लावला तेव्हा फोन लागला, रिंग वाजत होती पण फोन उचलत नव्हती. 2-3 वेळा प्रयत्न करून बघितला. त्यानंतर 4 वाजता तिने मला मेसेज केला. मी तुम्हाला नंतर फोन करते. मग मला वाटले की कुठेतरी इंटरव्ह्यूसाठी गेली असेल. कारण आमचे यावर सकाळी बोलणे झाले होते. ती म्हणत होती की मी दुसरीकडे कामाला जाऊ का? त्यानंतर मी विषय टाळला होता. त्यामुळे मला वाटले की ती इंटरव्ह्यू देण्यासाठी गेली आहे. म्हणून मग तिने फोन बंद केला असेल किंवा फोन उचलत नसेल. पूनमचा फोन नॉट रिचेबल आला त्यानंतर मी पूनमला पुन्हा फोन लावत होतो, पण आता फोन लागत नव्हता. नॉट रिचेबल येत होता. मला वाटले नेहमी प्रमाणे तिचा फोन वगैरे बंद झाला असेल किंवा बॅटरी डाऊन असेल, ती रोजच्या प्रमाणे घरी येईल. मात्र ती घरी आली नाही. त्यानंतर मला थोडा संशय आला. मी 8 वाजता कामावरून निघालो, 9 वाजता घरी आलो आणि घरून तिच्या ऑफिसजवळ गेलो. तिथेच बाजूला एक टेलर आहे, त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की तुमची बायको दिसली नाही. पण वकिलांची बायको आणि मुलगी दिसली. त्या दुपारी ऑफिसला आल्या होत्या. मी पुन्हा वकिलाला फोन लावला. ते म्हणाले, तुम्ही एक काम करा, मॅडम वाघेश्वर मंदिर जवळ बसतात कधीकधी, तिथे जाऊन चौकशी करा. वकिलाल फोन केला तेव्हा त्यांनी भरकटवण्याचा प्रयत्न केला दिनेश मुन सांगतात की, मी तिथेही गेली, ती तिथेही नव्हती. तिथून पुन्हा मी वकिलाला फोन लावला तेव्हा त्यांनी विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला. मग मी पोलिसांत तक्रार दाखल करतो म्हटले. त्यावर आता चौकीत जाऊन काय करणार वगैरे ते म्हणाले. लगेच जाऊ नका, जरा धीर धरा. मी त्यांचे ऐकले नाही. मी शास्त्रीनगरला गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की तुम्ही लक्ष्मी नगरला जावा. लक्ष्मी नगर पोलिस ठाण्यात जाऊन संपूर्ण माहिती दिली. त्यांनी सांगितले की तुम्ही उद्या सकाळी 10 वाजता या. मी सकाळी 10 वाजता तिथे गेलो, तेव्हा त्यांनी मला वेळ लागेल तुम्ही पुढे जाऊन चौकशी करा असे सांगितले. सीसीटीव्हीत पूनम ऑफिसला जाताना दिसली पुढे माहिती देताना दिनेश मुन म्हणाले, आम्ही येता येता विमान नगर चौकात थांबलो. विचार केला की विमान नगरला जाऊन ऑफिसमध्ये बघू. तिथे कोणाला विचारू. आम्ही तिथे सीसीटीव्ही तपासले तेव्हा दिसले की पूनम ऑफिसकडे गेली होती. मी काल ऑफिसच्या तिथे गेलो तेव्हा ऑफिसला कुलूप होते. पण दुसऱ्या दिवशी कुलूप नव्हते. मी लगेच वकिलाल फोन केला आणि सांगितले की तुमच्या ऑफिसला कुलूप नाही. तुम्ही तर म्हणाले होते की तुम्ही मी आल्यावर चावी पाठवून देतो मग ते आत्ता उघडे कसे? मी त्यांना विचारले खोलून बघू का विचारले, ते मला म्हणाले हो बघा. मी ते ओपन करून आत गेलो तर आतमध्ये पूर्ण अंधार होता. फॅन चालू होता. जवळच मच्छर मारायची बॉटल होती त्याच्यावर रक्ताचे डाग होते. ऑफिसमध्ये गोण्या अंथरलेल्या होत्या आणि रक्ताचे डाग दिनेश मुन यांनी पुढे सांगितले की, मी थोडा अजून आतमध्ये गेली, तिथे मला गोण्या अंथरलेल्या दिसल्या. दगड होता. मला वाटले काहीतरी काम चालू असेल. त्यानंतर मला पुन्हा एकदा फरशीवर आणि भिंतीवर रक्त दिसले. त्यानंतर मग मला संशय आला की माझ्या बायकोसोबत काहीतरी घडले आहे. मी लगेच लक्ष्मीनगर पोलिसांना फोन केला. ते म्हणाले 112 नंबरला फोन करा. चंदननगरचे पोलिस आले, त्यांनी संपूर्ण तपास केला. त्या सगळ्या गोण्या काढल्या तिथे बायको होती माझी. त्यांनी ओळख पटवली तेव्हा मी सांगितले की ही माझी बायको, पूनम आहे. मी त्यानंतर वकिलाल फोन केला, तर त्याने असे दाखवले की आपल्याला यातले काहीच माहीत नाही. तो म्हणाला, मी मुंबईत आहे, मी पुण्याला येतोच आहे. त्यानंतर रात्री त्याच्या बायकोला आणि मुलीला अटक करण्यात आली, अशी माहिती दिनेश मुन यांनी दिली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पूनमला बॅटीने बेदम मारहाण करण्यात आली होती पूनम मुन या गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. संजय सावंत यांच्या मुंढवा येथील कार्यालयात साहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. सावंत यांचे पूनम यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीची पत्नी स्वाती सावंत हिला होता. याच कारणावरून गुरुवारी (16 एप्रिल) कार्यालयात वाद झाला. संतापलेल्या संजय सावंत, पत्नी स्वाती आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीने पूनम यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पूनम यांचे पाय दोरीने बांधून त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने सपासप वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यात पूनम यांचा जागीच मृत्यू झाला.
नाशिकमध्ये लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढतच असल्याचे दिसत आहे. अशोक खरातनंतर टीसीएस कंपनीमधला लव्ह जिहाद प्रकरण, या नंतर आता आणखी एक धर्मांतराचा प्रकार समोर आला असून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी तंजीर इनामदारला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीने पंचवटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी तंजीर इनामदारने तिला लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेले. तिथे आपल्याला बळजबरी दारू आणि सिगारेट पिण्यास भाग पाडले. पीडिता शुद्धित नसताना तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गळ्यातील तुळशीमाळ आणि हातातला धागाही तोडला या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तंजीर इनामदारने पीडित तरुणीने आपल्या गळ्यात घातलेली तुळशीमाळ आणि हातावर बांधलेला धागा बळजबरी तोडला होता. तसेच आरोपीने बळजबरीने एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे गजवा-ए-हिंदचे पालन करण्यास सांगून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित तरुणीच्या धार्मिक ओळखीवरच घाला घालण्याचे कारस्थान या आरोपीने केले होते. गळ्यावर लव्ह बाईट, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार आरोपीने जानेवारी महिन्यात पीडित तरुणीच्या गळ्याजवळ चावा घेत हे लव्ह बाईट असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने तिला वारंवार विविध ठिकाणी लॉजवर नेत तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. आणखी काही मुलींचेही लैंगिक शोषण केल्याचा संशय संशयित आरोपी तंजीर इनामदारने अशाच पद्धतीने शहरातील आणखी काही मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचेही लैंगिक शोषण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या तक्रारीवरून त्याच्यावर सध्या गुन्हा दाखल करण्यात अल असला तरी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. तंजीर इनामदारला कोर्टात हजर करण्यात आले असून पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली आहे. कोर्टात दोन्ही पक्षाकडील युक्तिवाद तंजीर इनामदारला कोर्टात हजर करण्यात आले असता यावेळी सरकारी पक्षाने केलेल्या युक्तिवादात म्हटले की, तंजीर इनामदार महागड्या लॉजमध्ये पीडित तरुणीला न्यायचा. दारू सिगारेट पिण्यास भाग पडायचा. धर्मांतर करण्यासाठी पीडित तरुणीला जबरदस्ती करण्यात आली. तसेच हे प्रकरण देखील टीसीएस सारखेच असल्याचा दावा सरकारी पक्षाने केला. तसेच महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला? त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याचा शोध घ्यायचा असून त्यासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. तर आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात म्हटले की, दोघेही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. जानेवारी महिन्यात अत्याचार झाला तर तेव्हापासून आतापर्यंत वेळ का घालवला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच फोटो दाखवून धमकीचा व दारू सिगारेटचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. विशेष म्हणजे दोघांचेही एकमेकांवर प्रेम असून घरच्यांनी विरोध केल्याने आता हा आरोप होत असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे.
अजय-अतुल यांची पुढची पिढी सिनेसृष्टीत! ‘राजा शिवाजी’चित्रपटातून आर्य गोगावलेचे पदार्पण
मुंबई: आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताने संपूर्ण देशाला वेड लावणारी जोडी म्हणजे अजय-अतुल. आता याच जोडीचा वारसा पुढे नेण्यासाठी अतुल गोगावले यांचा मुलगा आर्य गोगावले सिनेसृष्टीत दाखल झाला आहे. अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटातील ‘छत्रपती’ या अँथम साँगमध्ये आर्यची झलक दिसली असून, त्याच्या या एन्ट्रीमुळे चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली […] The post अजय-अतुल यांची पुढची पिढी सिनेसृष्टीत! ‘राजा शिवाजी’ चित्रपटातून आर्य गोगावलेचे पदार्पण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आरोपी निदा खानचा पती मोईन खान जाळ्यात
ठाणे : प्रतिनिधी नाशिकमधील आयटी क्षेत्रात काम करणा-या निदा खान या महिलेच्या प्रकरणाने नाट्यमय वळण घेतले असून, पोलिस तपासात नवनवे खुलासे समोर येत आहेत. नोकरी गमावल्यापासून सुरू झालेल्या घटनाक्रमाने आता गुन्हेगारी स्वरूप धारण केले असून, तिच्या पतीला एसआयटीने ताब्यात घेतल्याने या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले आहे. नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसतध्ये कार्यरत असलेल्या महिला आरोपी निदा […] The post आरोपी निदा खानचा पती मोईन खान जाळ्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पर्यटकांची गाडी दरीत कोसळली; ५ शिक्षिकांसह ९ जण ठार
कोइम्बतूर : तामिळनाडूतील वालपराई-पोल्लाची घाटात शुक्रवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. पर्यटकांची गाडी खोल दरीत कोसळल्याने केरळमधील ९ पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मल्लापूरम जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील पाच शिक्षिकांचा समावेश आहे. केरळच्या मल्लापूरम जिल्ह्यातील पेरिंथलमन्ना येथून १३ जण वालपराई येथे पर्यटनासाठी गेले होते. शुक्रवारी संध्याकाळी ५:१५ च्या […] The post पर्यटकांची गाडी दरीत कोसळली; ५ शिक्षिकांसह ९ जण ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मल्याळम कलाविश्वावर शोककळा: प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे कर्करोगामुळे निधन
कोची: मल्याळम टेलिव्हिजन विश्वातील एक लोकप्रिय चेहरा आणि प्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ वेणुगोपाल (Siddharth Venugopal) यांचे शनिवारी (१८ एप्रिल २०२६) कर्करोगाशी झुंज देताना निधन झाले. ते ४१ वर्षांचे होते. गेल्या दोन वर्षांपासून ते या गंभीर आजाराशी लढा देत होते, मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. कर्करोगाशी दोन वर्षांची झुंज सिद्धार्थ वेणुगोपाल यांना दोन वर्षांपूर्वी ‘न्यूरोएंडोक्राइन कार्सिनोमा’ (Neuroendocrine […] The post मल्याळम कलाविश्वावर शोककळा: प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ वेणुगोपाल यांचे कर्करोगामुळे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता वाढला
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (दि. १८) केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली. प्रस्तावित ८ व्या वेतन आयोगांतर्गत वेतन रचनेत मोठे बदल करण्याच्या कर्मचारी संघटनांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल कॉन्सिल-जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीने सरकारला सादर केलेल्या निवेदनात वेतन रचनेत मोठे बदल करण्याची मागणी केली आहे. यात […] The post केंद्रीय कर्मचा-यांचा महागाई भत्ता वाढला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संघाच्या ‘झेड प्लस’ सुरक्षेचा खर्च वसूल करा
नागपूर : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुरवण्यात येत असलेल्या ‘झेड प्लस-व्हीव्हीआयपी’ सुरक्षा कवचाचा खर्च सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडून वसूल करण्यात यावा, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते ललन किशोर सिंह यांनी अॅड. अश्विन इंगोले यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय अनिल किलोर व राज वाकोडे […] The post संघाच्या ‘झेड प्लस’ सुरक्षेचा खर्च वसूल करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संगमनेरमधील गडगे महाराजसह पाच जणांना अटक
अहिल्यानगर : दुर्धर आजार मंत्राने बरे करतो, दैवी चमत्काराने दारू-व्यसन सोडवतो, मूल नसणा-या महिलांना मंत्रोच्चाराने मूल देतो, घरातील समस्या मंत्रशक्तीद्वारे दूर करतो, असा दावा करत भक्तांची आर्थिक फसवणूक करायचा. असा हा भोंदूबाबा राजेंद्र बापू गडगे ऊर्फ दत्तधाम सरकारसह त्याच्या पाच सहका-यांविरोधात गुन्हा दाखल करत संगमनेर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईचे अंनिसने स्वागत केले आहे. […] The post संगमनेरमधील गडगे महाराजसह पाच जणांना अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, १८ एप्रिल २०२६ रोजी रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. लोकसभेत महिला आरक्षणाशी संबंधित ‘संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक’ मंजूर होऊ शकले नाही, या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे हे संबोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. शुक्रवारी लोकसभेत महिला आरक्षण आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी (Delimitation) संबंधित विधेयक दोन-तृतीयांश बहुमताअभावी फेटाळण्यात आले होते […] The post पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८:३० वाजता देशाला संबोधित करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अॅक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर ‘टीसीएस’सारख्या घटना घडल्या
नाशिक : नाशिकमधील टीसीएस कंपनीत मुस्लिम धर्मीय संशयितांकडून हिंदू महिला कर्मचा-यांचे लैंगिक शोषण, विनयभंग व जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे. देशभरात या धक्कादायक प्रकरणाची चर्चा असताना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अमृता फडणवीस यांनीही बराच काळ काम केले आहे. त्याअनुषंगाने […] The post अॅक्सिस बँकेत असताना माझ्यासमोर ‘टीसीएस’सारख्या घटना घडल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
इराणचा ‘यू-टर्न’: ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर तणाव वाढला, ‘होर्मुझची सामुद्रधुनी’पुन्हा बंद
तेहरान: जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’वरून (Strait of Hormuz) आखाती देशांत पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत. इराणने आधी हा सागरी मार्ग व्यापारासाठी खुला करण्याचे संकेत दिले होते, मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक विधानानंतर इराणने अचानक ‘यू-टर्न’ घेत हा मार्ग पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजारात […] The post इराणचा ‘यू-टर्न’: ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर तणाव वाढला, ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्वयंरोजगार महिला मेळावा, संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन
परभणी : एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्रच्या वतीने संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंती निमित्त स्वयंरोजगार मेळावा, संविधान गौरव सन्मानपत्र सोहळ्याचे शुक्रवार, दि.२४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३५ वाजता श्री शिवाजी विधी महाविद्यालय सभागृह वसमतरोड परभणी येथे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन वनामकृविचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी […] The post स्वयंरोजगार महिला मेळावा, संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गौण खनिज उत्खनन अन् वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपातून निलंबित केलेल्या तहसीलदार शारदा दळवी यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वात जास्त १५५ वाहने पकडण्यात आली. तसेच २.९१ कोटींचा दंडही आकारण्यात आला. त्यामुळे त्यांच्यावर झालेली कारवाई द्वेषभावनेतून झाल्याचा आरोप केला जात आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत अवैध गौणखनीज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. यामध्ये महसूल विभागाने तालुकास्तरावर तसेच पोलिस विभागानेही स्वतंत्र पथके स्थापन करून कारवाईची सपाटा सुरु केला आहे. त्यामुळे वाळू तस्करांना लगाम बसला आहे. दरम्यान, वसमत तालुक्यात तहसीलदार शारदा दळवी यांनी मागील अडीच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात सर्वात जास्त वाहनांवर कारवाई केली आहे. त्यांच्या कालावधीत वसमत तालुक्यातील तब्बल १५५ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्यावर २.९१ कोटी रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. याशिवाय गुन्हेही दाखल करण्यात आलेत. या प्रकरणी नांदेडहून येणाऱ्या वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त कारवाई वसमत तालुक्यात असतानाही तहसीलदार दळवी यांच्यावर गौण खनीज उत्खननाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून त्यांना निलंबीत केले आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त कारवाई असतानाही त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे ही कारवाई द्वेषभावनेतून झाल्याचा आरोप केला जाऊ लागला आहे. या प्रकारामुळे अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचा दावाही केला जात आहे. दरम्यान, या संदर्भात दीपक कदम,अलोक इंगोले, करण जाधव, अंकुश कोरडे यांच्यासह नागरीकांनी शासनाकडे पत्र पाठविले असून तहसीलदार दळवी यांच्यावर झालेली कारवाई चुकीच्या पध्दतीने झाली आहे. त्यांनी कठोर निर्णय घेतल्यामुळे काही जण दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावरील निलंबन रद्द करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचा निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचा उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ हा अपघात घडला. शेळके यांच्या कारने समोर असलेल्या कंटेनरला मागून जबरदस्त धडक दिली आणि कार थेट कंटेनरखाली घुसली. या दुर्घटनेत जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना घडल्यानंतर अपघाताबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, या अपघातामागे घातपाताची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी प्रकरण गंभीरतेने घेत कंटेनर चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात त्याची सविस्तर चौकशी सुरू असून, या दुर्घटनेमागील नेमके कारण काय, याचा शोध घेतला जात आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीमुळे तपास अधिक बारकाईने केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी शेळके यांची कार भरधाव वेगात होती. वेग नियंत्रणात नसल्यामुळे कार थेट कंटेनरला धडकली आणि त्याखाली अडकली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणात कंटेनर चालक जमाल वारिस याने पोलिसांना दिलेल्या जबाबात महत्त्वाची माहिती दिली आहे. तो उत्तर प्रदेशातील अमेठीचा रहिवासी असून, हैदराबादहून अहमदाबादकडे जात होता. दुपारी सुमारे 12 वाजता कंटेनरच्या रेडिएटरचा पाइप लीक झाल्यामुळे वाहन गरम झाले. त्यामुळे त्याने वाहनाचा वेग कमी केला होता. मात्र, त्याने गाडी पूर्णपणे थांबवली नव्हती, असे त्याने स्पष्ट केले. जमाल वारिसने पुढे सांगितले की, तो रस्त्याच्या कडेला सावकाश गाडी चालवत असताना अचानक मागून जोरदार आवाज आला. त्या वेळी आरशात काही दिसले नाही. नंतर खाली उतरून पाहिले असता कार कंटेनरला धडकलेली दिसली. या घटनेने तोही हादरला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर अपघाताची दिशा स्पष्ट होत असली तरी काही शंका अद्याप कायम आहेत. समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. चालकाची आणखी कसून चौकशी केली जाणार असून, अपघातामागे निष्काळजीपणा की अन्य काही कारण, हे तपासातून स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जितेंद्र शेळके यांच्या निधनामुळे त्यांच्या परिचितांमध्ये शोककळा पसरली असून, या घटनेने समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हापूस आंब्याची आवक वाढली; दरात घसरण
मुंबई : प्रतिनिधी कोकणातील हापूस आंब्याचा मुख्य हंगाम सुरू होताच वाशीच्या घाऊक बाजारात आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. वाढलेल्या आवकेमुळे आंब्याच्या दरात काहीशी घसरण झाली असून, त्यामुळे आंबा खवय्यांना आता हापूसचा आस्वाद घेणे सुलभ होणार आहे. अक्षय्य तृतीयेमुळे बाजारात आंब्याची आवक वाढली आहे . यंदा मात्र बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसल्याने कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन […] The post हापूस आंब्याची आवक वाढली; दरात घसरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : अशोक खरात प्रकरणातील महत्त्वाची कडी असलेल्या शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही भीती व्यक्त केली होती की, अशोक खरातचा एन्काउंटर होऊ शकतो. त्याच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. या घटनेमुळे ही शक्यता अधिक ठळक पद्धतीने अधोरेखित होत आहे. […] The post जितेंद्र शेळके यांचा घातपात? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी मुंबई : प्रतिनिधी युद्धजन्य परिस्थितीमुळे भडकलेल्या महागाईला मिरचीने तडका दिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाळवलेल्या लाल मिरचीचे भाव किलोमागे शंभर ते तीनशे रुपयांनी वाढले आहेत. कर्नाटक बेडगी, काश्मिरी मिरची २०० ते ३०० रुपये किलोमागे महागली असून, आंध्र प्रदेशातील तेजा जातीच्या मिरचीचे दर १०० ते १२० रुपयांनी वाढले आहेत. मुंबईकरांची तेजा, बेडगी आणि काश्मिरी जातीच्या […] The post लाल मिरचीला महागाईचा तडका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्य सरकारने स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करत त्यावरील भरती प्रक्रियेला फुलस्टॉप दिला आहे. राज्यातील बेरोजगारीचा आकडा झपाट्याने वाढत असताना सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. सरकारने तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. सरकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून लघुलेखक अर्थात स्टेनोग्राफर पदाची भरती करते. पण आता सरकारने हे पद मृत घोषित करून त्यावरील भरती प्रक्रिया थांबवली आहे. यामुळे हजारो तरुणांचे स्टेनोग्राफर होण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गात कमालीचा रोष पसरला आहे. एकीकडे सरकार पदभरती करत नाही आणि दुसरीकडे अशा पद्धतीने आहे ती पदे रद्द करण्याचा निर्णय घेते, असा आरोप विद्यार्थ्यांनी या प्रकरणी केला आहे. विद्यार्थ्यांचा सरकारच्या निर्णयावर संताप सरकारने स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करू नये. कारण विद्यार्थी मागील 5 वर्षांपासून या पदाच्या परीक्षेची तयारी करत आहेत. आता सरकारने अचानक हे पद रद्द केल्याने त्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. त्यामुळे सरकारने हे पद मृत घोषित न करता त्यावर भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सरकारच्या निर्णयामुळे स्टेनोग्राफरचे प्रशिक्षण घेतलेल्या लाखो उमेदवारांचे भविष्य अंधारात बुडण्याची भीती आहे. सरकारने आपला निर्णय मागे घेतला नाही, तर पुढच्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही विद्यार्थ्यांनी सरकारला दिला आहे. ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी स्टेनोग्राफर पदाची तयारी करतात. आता शासनाने ही भरतीच बंद केली, तर त्यांनी जायचे कुठे? विद्यार्थी गत अनेक वर्षांपासून या परीक्षेची तयारी करत हरोते. आता लगेच दुसरी फिल्ड निवडताही येत नाही, अशी खंतही काही विद्यार्थ्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली. रोजगाराच्या संधी हिरावून घेऊ नका - सुप्रिया सुळे दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी सरकारचे कान टोचलेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदाची भरती थांबविण्यात आली असून हे पद मृत घोषित करण्यात आले आहे. यामुळे क्लासेस लावून 'स्टेनोग्राफी' चा कोर्स केलेल्या हजारो तरुणांची निराशा झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्टेनोग्राफर पदासाठी तयारी करतात. ही भरती शासनाने रद्द केल्याने आता नेमकं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया या पदासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांची कैफियत शासनाने एकदा ऐकून घ्यावी. हे पद मृत घोषित करण्याऐवजी त्यात काही कौशल्ये जोडून ते सुरू ठेवण्याचा पर्यायही तपासून पहावा. तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने तिची अटक आणि रिमांड प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याचे नमूद करत जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, बावधन पोलिसांच्या कामकाजातील हलगर्जीपणाचा फायदा तेजवानीला झाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. या निर्णयामुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
महिला आरक्षण कायदा 2023 मध्येच मंजूर झाला असताना, आता मतदारसंघांची फेररचना करण्याचा घाट कशासाठी? असा सवाल करत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीमुळे लोकशाहीविरोधी विधेयक पराभूत झाल्याचा दावा करत, त्यांनी 2029 च्या निवडणुकीत सध्याच्याच रचनेत 33 टक्के महिला आरक्षण लागू करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांच्यासह प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभेत महिला आरक्षण बीलाच्या विरोधात भूमिका घेतली होती. या बीलाच्या विरोधात त्यांनी मतदान केले. मात्र, प्रियांका चतुर्वेदींनी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतली. यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्याचा हवाला देत उबाठावर टीका केली यानंतर प्रियांका चतुर्वेदी यांनी नारी शक्ती विधेयक आणि लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवणारे मुद्दे एकत्र करण्याचा प्रयतन केला आहे. पावसाळी अधिवेशनात सरकारने 543 खासदारांमध्येच महिलांना 33 टक्के आरक्षणाचेबिल आणावे त्याला आम्ही सर्व पाठिंबा देऊ, असे म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न उबाठाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी केला आहे. ..तर विधेयकाला पाठिंबा देऊ प्रियांका चतुर्वेदी यांनी 24 तासांच्या आत भूमिका बदलत आदित्य ठाकरेंच्या सुरात सुर मिसळला आहे. चतुर्वेदी म्हणाल्या की, पावसाळी अधिवेशनात हे बिल सत्ताधाऱ्यांनी आणावे आणि आता जितके सदस्य त्यातूनच महिलांना 33 टक्के आरक्षण द्यावे. महिलांना आरक्षण देणं आणि मतदारसंघ फेररचना करणे दोन्ही गोष्टी एकत्र केल्यानेच काल बिल मंजूर झाले नाही. दोन्ही गोष्टी एकत्र करू नये. तुम्ही जर केवळ महिला आरक्षणाचे बिल आणणार असाल तर विरोधी पक्ष तुम्हाला साथ देईल. यामुळे 2029 मध्ये 180 महिला खासदार लोकसभेत दिसू शकतील. दुसरीकडे जर आपल्याकडे इच्छाशक्ती नसेल तर किमान पक्षात तरी 33 टक्के उमेदवारी महिलांना देताल का? असा सवाल चतुर्वेदी यांनी केला आहे. आरक्षण लागू होऊ शकते केवळ दोन गोष्टी एकत्र करू नये. आदित्य ठाकरेंचे ट्विट काय? आदित्य ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारने राजकीय हेतूने संविधानात दुरुस्ती करून लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढवणारे, अनेक राज्यांचा आवाज दाबणारे आणि गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठी मतदारसंघांची फेररचना करण्याचा प्रयत्न करणारे मांडलेले विधेयक, काल संसदेत पराभूत झाले. संविधानातील हा हस्तक्षेप भारतातील लोकशाहीसाठी पर्यायाने संविधानाकरिताही मारक ठरला असता, पण हा प्रयत्न विरोधी पक्षाच्या खासदारांच्या एकजुटीमुळे फेटाळण्यात आला. कायदा 2023 मध्येच मंजूर आदित्य ठाकरे म्हणाले की, खरे म्हणजे, महिला आरक्षण कायदा 2023 मध्ये संसदेत मंजूर झाले असून, त्याची अधिसूचना 16/04/2026 रोजी जारी करण्यात आली होती.आजच्या विधेयकाला गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक असे नाव द्यायला हवे होते. खरे तर सध्याच्या जागांमध्येच 33% महिला आरक्षण लागू करण्याची, आवश्यकता आहे! सरकारची खरीच तशी भूमिका असेल तर 2029 च्या लोकसभा निवडणुकांसाठी 543 जागांमध्ये तसेच देशभरातील सर्व निवडणुकांमध्ये हे आरक्षण प्रभावीपणे लागू करणे आवश्यक आहे. प्रियांका चतुर्वेदींनी आरसा दाखवला- बन नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आरसा दाखवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ट्विट बघण्यापेक्षा चतुर्वेदींनी केलेले ट्विट राऊतांनी बघितले तर त्यांचे डोळे उघडतील. महिला आरक्षणाचे समर्थन करण्याचे काम त्यांनी केले मी त्यांचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी नारी शक्तीच्या हिताची भूमिका घेतली. तुम्हाला महिलांबद्दल अभिमान वाटत नाही म्हणून तुम्ही विरोधात भूमिका घेतली. नारी शक्तीचा अपमान करण्याचे काम तुम्ही केले आहे, महिला तुम्हाला माफ करणार नाही.
महाराष्ट्राच्या गौरवशाली मातीत सत्यशोधकी जलशांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ लोककलावंत शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांनी कलगीतुऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर असंख्य कार्यक्रम करून लोककलेला एक वेगळे स्थान मिळवून दिले. त्यांच्या निधनावर मंत्री छगन भुजबळ, काँग्रेस विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. शाहीर रामदास नाथाजी गुंड यांचे गाव अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील काताळवेढे आहे. त्यांचा पुणे जिल्ह्यातील गावागावात मोठा संपर्क होता. ते गावोगावी फिरून महागाई, दरवाढ, आरक्षण, बैलगाडा बंदी, बालविवाह, स्त्रीभ्रूण हत्या, जागतिक युद्ध, कोरोना महामारी, व्यसनमुक्ती आदी विविध सामाजिक मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी अनेक नवोदित कलाकार घडवले. त्यातून शाहिरी परंपरेला नवे बळ मिळाले. ते आपल्या कलगीतुरा फडासाठी ओळखले जायचे. चार वेद, सहा शास्त्र व अठरा पुराणांचा भेद मांडणारा दुर्मिळ प्रकार त्यांनी आपल्या कलेतून जिवंत ठेवला. पण आता शाहिरी क्षेत्रातील हा तरबेज 'गुंड' कायमचा शांत झाल्याने डफ पोरका झाला. डफावरच्या थापीने समाजमन जागृत करणारा कलावंत हरपला - भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांनी शाहीर गुंड यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या गौरवशाली मातीतील बुलंद आवाज आणि सत्यशोधकी जलशांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे ज्येष्ठ लोककलावंत प्रबोधनकार शाहीर रामनाथ नाथाजी गुंड यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने डफावरच्या थापीने समाजमनाला जागृत ठेवणाऱ्या एका महान कलावंताचा अंत झाला आहे. शाहिरी ही केवळ मनोरंजन नसून ते समाज परिवर्तनाचे शस्त्र आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांच्या रचनांमधून व्यक्त होणारा शेतकरी, कष्टकरी आणि बहुजन समाजाचा हुंकार कायमच प्रेरणादायी राहील. शाहीर रामनाथजींनी केवळ कलाच जोपासली नाही, तर नव्या पिढीला लोककलेचा वारसा देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने एक प्रबोधनाचा झंझावात शांत झाला असला तरी, त्यांनी दिलेला विचारांचा वारसा आपण सदैव पुढे नेऊया. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे ते म्हणालेत. गुंड यांचे निधन मन सुन्न करणारे - वडेट्टीवार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही गुंड यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, डफावरची थाप आणि पहाडी आवाजाच्या जोरावर समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा देणारे ज्येष्ठ लोककलावंत शाहीर रामनाथजी गुंड यांच्या निधनाचे वृत्त मन सुन्न करणारे आहे. लोककलेच्या माध्यमातून समाजजागृतीचा एक धगधगता वारसा आज शांत झाला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. शाहिरी ही केवळ कला नसून ते परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम आहे, हे रामनाथजींनी आपल्या पहाडी आवाजातून आणि धारदार शब्दांतून वारंवार सिद्ध केले. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांनी खेड्यापाड्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवले. कष्टकरी, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या हितासाठी त्यांनी आयुष्यभर दिलेला वैचारिक लढा सदैव स्मरणात राहील. रामनाथजींचे जाणे ही कला क्षेत्रातील एक न भरून निघणारी पोकळी आहे. त्यांच्या जाण्याने प्रबोधनाचा एक तेजस्वी झंझावात थांबला असला, तरी त्यांनी रचलेल्या पोवाड्यांतून आणि गीतांतून त्यांचा विचार महाराष्ट्राच्या मातीत कायम जिवंत राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असे वडेट्टीवार म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पोलिसांना भोंदू अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले. प्रस्तुत प्रकरणात कुणीही दोषी असला तरी त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हाच महत्त्वाचा घटक असला पाहिजे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नाशिक धर्मांतर प्रकरणाचाही विस्तृत आढावा घेतला. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गृहविभागाची तातडीची आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी नाशिकच्या भोंदू अशोक खरात व आयटी धर्मांतर प्रकरणासह परतवाडा व गोरेगाव ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचा विस्तृत आढावा घेतला. या बैठकीला पोलिस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, एसआयटी प्रमुख व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री प्रस्तुत प्रकरणांत आरोपी कोण आहेत? हे न पाहता संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. तपासात अपराधसिद्धी हाच महत्त्वाचा घटक सूत्रांच्या मते, मुख्यमंत्र्यांनी अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांच्या सुरक्षेवर प्राधान्यक्रमाने भर दिला. ते म्हणाले, प्रस्तुत प्रकरणातील पीडित महिलांना संपूर्ण विश्वास द्या. या प्रकरणी कुणीही दोषी असो त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोर्टात ही केस मजबूत कशी होईल, हे निश्चित करण्यासाठी भक्कम पुरावे शोधा. तपासात अपराधसिद्धी हाच एकमेव महत्त्वाचा घटक असला पाहिजे. नाशिक धर्मांतराची घेतली गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराच्या घटनेचीही गंभीर दखल घेतली. राज्यात धर्मांतरासारखे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका. नाशिक पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणले. त्यांचे अभिनंदन. पण आता तेवढाच दमदार तपासही झाला पाहिजे. या प्रकरणातील सर्वच पॅटर्नचा तपास करा. कोणताही अँगल तपासून सूटू देऊ नका, असे ते म्हणाले. गोरेगाव ड्रग्ज व परतवाडा प्रकरणावरही भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी गोरेगाव ड्रग्ज प्रकरण व परतवाडा प्रकरणावरही भाष्य करत पोलिसांना संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी ड्रग्जविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू करावी. तरुणाच्या भविष्याशी निगडीत ही बाब आहे. त्यामुळे अशी प्रकरणे गांभिर्याने घेतली पाहिजे. परतवाडा प्रकरणातील पीडितांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. त्यांना विश्वास दिले पाहिजे. या प्रकरणी संबंधित समाजसेवकांची मदत घेतली पाहिजे, असे ते पोलिसांना योग्य ते निर्देश देताना म्हणाले. हे ही वाचा… अखेर 18 वर्षीय तरुणी गेली तरी कुठे?:हात हवेत वर करत कुणीतरी खेचून नेल्यासारखी एकटीच चालत गेली; चक्रावून टाकणारी घटना धुळे शहरातील एक 18 वर्षीय तरुणी हवेत हात वर करत म्हणजे कुणीतरी हाताला धरू नेल्यासारखे अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ही तरुणी अत्यंत गुढपणे चालत जात असल्याची दिसून येत आहे. वाचा सविस्तर
हिंगोली जिल्हा भाजपामध्ये निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना पदे देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमधून अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र पक्ष शिस्तीमुळे कोणीही बोलण्यास तयार नसल्याने कार्यकर्त्यांवर तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी वेळ आल्याचे चित्र आहे. हिंगोली जिल्हयात भाजपामध्ये मागील काही दिवसांपासून प्रवेश घेणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. इतर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून भाजपात प्रवेश घेतला जाऊ लागला आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागात भाजपाची ताकद वाढत असल्याचे बोलले जात असले तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून मात्र चांगलीच अस्वस्थता दिसून येऊ लागली आहे. भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून हिंगोली जिल्हयाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे इतर पक्षातून येणाऱ्यांची स्वागत केले जात आहे. काही दिवसांपुर्वीच कळमनुरीच्या एका नेत्याला भाजपात प्रवेश देण्यात आला. मात्र पक्ष प्रवेश होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत याची कानोकान खबरही स्थानिक पदाधिकाऱ्यांना झाली नाही. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच इतर पक्षातून प्रवेश केलेल्या एका नेत्याला देशाच्या वरिष्ठ सभागृहात पाठविले. राज्य पातळीवरील या घडामोडी घडल्या. त्यानंतर मागील दोन दिवसांत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये भाजपाच्या सहसंपर्क प्रमुख रेखा कुलकर्णी यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले. ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या ते पदाधिकारी इतर पक्षांतून भाजपात नुकतेच आले होते. त्यांचे पक्षात कोणतेही काम नसतांनाही त्यांना पदे बहाल करण्यात आली तसेच नगर पालिका निवडणुकीतही स्विकृत सदस्याच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे. दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांची शहर, जिल्हा कार्यकारीणीवर वर्णी लावली जात असतांना निष्ठावंतांना मात्र डावलले जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजापच्या निष्ठावंतांमधून नाराजीचा सुर उमटू लागला आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी खुली होताच अमेरिकन मार्केटमध्ये मोठी तेजी; भारतासाठीही आनंदाची बातमी!
वॉशिंग्टन/नवी दिल्ली: जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा होर्मुझ सामुद्रधुनीचा (Strait of Hormuz) मार्ग पुन्हा एकदा खुला झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे. या बातमीचा सकारात्मक परिणाम शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजारात दिसून आला, जिथे गुंतवणूकदारांनी उत्साहात खरेदी केल्यामुळे बाजारात मोठी रॅली पाहायला मिळाली. अमेरिकन मार्केटमध्ये उत्साहाचे वातावरण इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावानंतर बंद करण्यात […] The post होर्मुझची सामुद्रधुनी खुली होताच अमेरिकन मार्केटमध्ये मोठी तेजी; भारतासाठीही आनंदाची बातमी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली तालुक्यातील हळदवाडी साठवण तलावाचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु झाले असून कामाला गती आली आहे. या तलावात 1.646 दशलक्ष घनमीटर पाणीसठा होणार असून त्यातून दोन गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या शिवाय 298 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. तलावाच्या कामाची शनिवारी ता. 18 आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पाहणी केली. हिंगोली तालुक्यातील हळदवाडी शिवारात जलसंपदा विभागाच्या वतीने सुमारे 39 कोटी रुपये खर्चुन तलावाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. य तलावासाठी नर्सी नामदेव व वैजापूर शिवारातील 39 हेक्टर जमीनीवर तलावाचे बांधकाम केले जात आहे. सदर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या तलावामध्ये 1.646 दशलक्ष घनमिटर पाणीसाठी होणार आहे. त्यातून नर्सी नामदेव व पुसेगाव या दोन गावांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या शिवाय 298 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून शेती सिंचनासाठी पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना एकरी उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. दरम्यान, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तलावाचे काम युध्दपातळीवर सुरु असून मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याचे जलसंपदा विभागाच्या सहाय्यक अभियंता प्राजक्त भुजाडले यांनी सांगितले. या तलावाच्या बांधकामाची आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पाहणी केली. यावेळी सहाय्यक अभियंता भुजाडले, ॲड. के. के. शिंदे, संतोष टेकाळे, विलास गोरे, माणिक लोडे, आसाराम घुगे, सरपंच शंकर सिंदे, प्रल्हाद शिंदे, रुस्तुम शिंदे, प्रद्युम्न गिरीकर, शिवाजी मेटकर यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार मुटकुळे यांनी तलावाच्या कामाबाबत आवश्यक सूचनाही दिल्या आहेत
धुळे शहरातील एक 18 वर्षीय तरुणी हवेत हात वर करत म्हणजे कुणीतरी हाताला धरू नेल्यासारखे अचानक बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ही तरुणी अत्यंत गुढपणे चालत जात असल्याची दिसून येत आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, संजीवनी राहुल वराडे असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती धुळ्यातील शासकीय दूध डेअरी परिसरातील सहजीवन नगर येथून शुक्रवारी दुपारी बेपत्ता झाली. गत काही दिवसांपासून धुळ्यात महिला व मुली बेपत्ता होण्याच्या अनेक घटना घडल्यात. या सर्व घटना आमिष दाखवून किंवा फुस लावून पळवून नेल्याच्या आहेत. पण संजीवनी वराडेची घटना काही औरच आहे. ती अक्षरशः एखाद्या अदृश्य शक्तीने हात धरून ओढत न्यावे, अशा पद्धतीने हवेत हात वर करून कुठेतरी जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पालकवर्गांत एकच दहशत पसरली आहे. घटनेचा व्हिडिओ झाला व्हायरल या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात संजीवनी घराबाहेर उभी असल्याचे दिसते. त्याचवेळी एक वृद्ध व्यक्ती तिच्यासमोरून जातो. हा व्यक्ती गेल्यानंतर दुसऱ्याच क्षणी संजीवनी शुद्ध हरपल्यासारखी चालू लागते. चालताना तिचा हात कुणीतरी खेचल्यासारखे वाटत आहे. कारण, संजीवनी पुढे जात असताना आपला हात कुणाच्या तरी हातात देऊन चालताना दिसून येत आहे. सीसीटीव्हीत तो व्यक्ती दिसत नाही. पण संजीवनीचा हात हवेत अधांतरी तरंगत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ती गुंगीत किवा झोपेत असल्याचे भासते. नेमके काय घडले? सर्वचजण चक्रावले दुसरीकडे, संजीवनी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. पण ती अद्याप सापडली नाही. दिवसाढवळ्या घडलेल्या या विचित्र घटनेमुळे सर्वचजण चक्रावेल आहेत. अखेरीस संजीवनी गेली कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. काही प्रत्यक्षदर्शी व व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मते, संजीवनीचे संमोहनाच्या मदतीने अपहरण केले जाण्याची शक्यता आहे. संजीवनी शुद्धीत नसून, तिला कुणीतरी अशा पद्धतीने नेल्याची चर्चा स्थानिकांत रंगली आहे. संजीवनी एखाद्या खोल विचारात असताना घराबाहेर पडली असावी व त्याच स्थितीत ती कुठेतरी गेली असावी, असा अंदाजही अनेकांनी वर्तवला आहे. हे ही वाचा… एक लाख अशोक खरात मिळून 1 अकबर होईल:शरद पोंक्षेंनी सम्राट अकबराशी केली खरातची तुलना; 'जोधा' काल्पनिक असल्याचा दावा अभिनेते शरद पोंक्षे यांनी भोंदू अशोक खरातची तुलना थेट मुगल सम्राट अकबराशी केली आहे. एक लाख अशोक खरात एकत्र केले, तर एक अकबर तयार होईल. मुगल ए आझम चित्रपटात अकबर किती सेक्युलर होता हे दाखवण्यासाठी इतिहासात अस्तित्वात नसलेले जोधा नामक पात्र घुसवण्यात आले, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची
मुंबई : प्रतिनिधी मराठी भाषेबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यम आणि मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली जाणार आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययनाची सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या नियमाचे उल्लंघन करणा-या शाळांवर कारवाई देखील केले जाणार आहे. नियम मोडणा-या शाळांवर १ […] The post राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रात उष्णतेचा इशारा; विदर्भात तापमान ४४ अंश पार
मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या तापमान खूप जास्त वाढताना दिसत आहे. घराबाहेर पडल्यावर घामाच्या धारा लागतात. दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भात झाली आहे. विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कडक उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा-कॉलेजला सुटी देण्यात आली आहे. विदर्भात तापामानाचा पारा वाढतच […] The post महाराष्ट्रात उष्णतेचा इशारा; विदर्भात तापमान ४४ अंश पार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्र काँग्रेसने महिला आरक्षणाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे खाल्लेल्या मीठाला जागायला शिकले पाहिजे. पाठीचा कणा थोडा तरी मजबूत राखला पाहिजे, असे काँग्रेसने म्हटले आहे. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी रात्री नारी शक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित घटनादुरुस्ती लोकसभेत नामंजूर फेटाळल्यावरून काँग्रेसवर सडकून टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारीशक्ती वंदन अधिनियमाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून 2029 च्या निवडणुकीपासून महिलांना लोकसभा व विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू व अनाठायी भूमिकेमुळे या प्रयत्नांत अडसर आणला गेला, असे ते म्हणाले होते. महाराष्ट्र काँग्रेसने या प्रकरणी अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार पलटवार केला. काँग्रेसचा चव्हाणांना पाठीचा कणा मजबूत ठेवण्याचा सल्ला काँग्रेसने अशोक चव्हाणांचे ट्विट रिट्विट करत म्हटले की, अशोकराव, ज्या कॉंग्रेस पक्षाशी आपले वडील स्व. शंकरराव चव्हाण साहेब आयुष्यभर एकनिष्ठ राहीलेत, त्याच कॉंग्रेस पक्षासोबत आपण गद्दारी करण्याअगोदर 2023 मध्येच, “नारी शक्ती वंदन अधिनियम - 2023”, म्हणजेच लोकसभा व विधानसभेच्या जागांमध्ये महिलांसाठीचे 33% आरक्षण हे संसदेत एकमताने (कॉंग्रेसच्या पाठींब्याने) मंजूर झालेले आहे. ते 16 एप्रिल 2026 पासून लागू ही झाले आहे. आपल्या माहितीसाठी, ज्यांच्यामुळे आपण पहिल्यांदा लोकसभेच्या सभागृहात निवडून गेलात त्या स्व. राजीव गांधी यांनीच स्थानीक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण लागू केलं व नंतर 50% आरक्षण ही कॉंग्रेसच्याच काळात लागू करण्यात आलं. खाल्लेल्या मीठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या, असे काँग्रेसने म्हटले आहे. खाली वाचा काय म्हणाले होते अशोक चव्हाण अशोक चव्हाण म्हणाले होते, नारीशक्ती वंदन अधिनियमाशी निगडीत घटना दुरुस्ती विधेयकाच्या माध्यमातून येत्या 2029 च्या निवडणुकीपासून लोकसभा व सर्व राज्यांच्या विधानसभेत 33 टक्के महिला आरक्षण लागू करण्याचा एक चांगला प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केला. मात्र, राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू व अनाठाय़ी भूमिकेमुळे या प्रयत्नात अडसर आणला गेला आहे. विरोधी पक्षांच्या सर्व शंका-कुशंकांना केंद्र सरकारने ठोस उत्तरे दिली. विरोधी पक्षांना हवे असेल तर सर्व राज्यांमध्ये सरसकट 50 टक्के लोकसभा मतदारसंघ वाढीबाबत सुधारणा आणण्याची तयारी गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत व्यक्त केली. परंतु, विरोधी पक्षांची एकंदर भूमिका लक्षात घेता त्यांना देशातील कोट्यवधी महिलांपेक्षा स्वतःचा राजकीय अहंकार महत्वाचा वाटला. त्यामुळेच सदर घटना दुरुस्ती विधेयकांना लोकसभेची मंजुरी मिळू शकली नाही. विरोधी पक्ष ज्याला आपला विजय समजत आहेत, तो दुर्दैवाने देशातील नारीशक्तीच्या हितांचा पराभव आहे. लोकसभा व विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण हा कोणताही राजकीय अजेंडा नाही. तर ते एक स्वप्न आहे, एक निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज नाही तर उद्या ते साकार झाल्याशिवाय राहणार नाही, असे चव्हाण म्हणाले होते.
पुण्यातील मुंढवा परिसरात एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या संशयावरून ॲड. संजय सावंत याने आपल्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीच्या मदतीने महिला सेक्रेटरीचा क्रूरपणे खून केला. पूनम दिनेश मुन (वय 35) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी सावंत कुटुंबातील तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. पूनम मुन या गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. संजय सावंत यांच्या मुंढवा येथील कार्यालयात साहाय्यक म्हणून कार्यरत होत्या. सावंत यांचे पूनम यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीची पत्नी स्वाती सावंत हिला होता. याच कारणावरून गुरुवारी (16 एप्रिल) कार्यालयात वाद झाला. संतापलेल्या संजय सावंत, पत्नी स्वाती आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीने पूनम यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पूनम यांचे पाय दोरीने बांधून त्यांच्यावर क्रिकेटच्या बॅटने सपासप वार करण्यात आले. या भीषण हल्ल्यात पूनम यांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह पोत्यात भरला हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी पूनम यांचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि तो कार्यालयातच लपवून ठेवला. दुसऱ्या दिवशी संधी पाहून या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन आरोपींचे होते. मात्र, तत्पूर्वीच हा प्रकार उघडकीस आला. पोत्यात सापडला मृतदेह पूनम रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचे पती दिनेश मुन यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. त्यांनी संजय सावंत याला फोन केला असता, त्याने पूनम नातेवाइकांकडे गेली असावी, असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. रात्री 11 वाजता कुटुंबीयांनी लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी शोध घेत असताना दिनेश मुन संशयावरून सावंत यांच्या कार्यालयात पोहोचले. तिथे त्यांना एक रक्ताने माखलेले पोते दिसले. ते उघडताच त्यांना पत्नीचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात घटनेची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी ॲड. संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेत धर्मातरांचा प्रकार झाला होता असे सांगितले नाही तर लैंगिक छळाचे प्रकरण झाले होते आणि या प्रकरणी रितसर चौकशी केल्याचे सांगितले. लैंगिक छळाबद्दलच बोलायचे झाले तर पाटकर फाईल्समध्ये तुम्ही एका महिलेबद्दल काय बोलला, त्यांच्यावर कसा अन्याय केला, हे पाटकर फाईल्समध्ये महाराष्ट्राने ऐकले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची टीसीएस प्रकरणी काय भूमिका आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये धर्मांतरणाचे प्रकरण सुरू आहे, त्यावर उद्धव ठाकरे मुक गिळून गप्प आहेत, त्यावर काहीच बोलत नाही. संजय राऊत उद्धव ठाकरेंना त्यावर बोलायला सांगा. प्रियांका चतुर्वेदींनी आरसा दाखवला नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आरसा दाखवला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले ट्विट बघण्यापेक्षा चतुर्वेदींनी केलेले ट्विट राऊतांनी बघितले तर त्यांचे डोळे उघडतील. महिला आरक्षणाचे समर्थन करण्याचे काम त्यांनी केले मी त्यांचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी नारी शक्तीच्या हिताची भूमिका घेतली. तुम्हाला महिलांबद्दल अभिमान वाटत नाही म्हणून तुम्ही विरोधात भूमिका घेतली. नारी शक्तीचा अपमान करण्याचे काम तुम्ही केले आहे, महिला तुम्हाला माफ करणार नाही. मोदी-शहा यांच्यात संघर्षाचा राऊतांचा दावा हास्यास्पद नवनाथ बन म्हणाले की, आम्ही भाजपमध्ये काम करतो. आमच्या पक्षात उबाठासारखे भांडणं नसतात. आम्ही देश प्रथम, मी पक्ष अशा भूमिकेतून काम करत असतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी- अमित शहा यांच्यात संघर्ष आहे असा हास्यास्पद आरोप राऊत करत आहे. तुमच्या पक्षात एकमेकांच्या विरोधात तुम्ही उभे राहतात. आमच्याकडे जनतेचे हित पाहिले जाते. उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष निर्माण करण्याचा डाव नवनाथ बन म्हणाले की, महिला आरक्षणाच्या निमित्ताने उत्तर VS दक्षिण संघर्ष इंडिया आघाडीला निर्माण करायचा आहे. विधेयकामुळे दक्षिणेतील राज्यावर अन्याय होणार नव्हता तर खासदारांची संख्या वाढणार होती. तुम्हाला देशाचे हित नको होते म्हणून तुम्ही या विधेयकाला विरोध केला आहे. दक्षिणेचे हित तुम्हाला नको असल्याचे काल दिसून आले. नारी शक्ती आणि दक्षिणेतील राज्य तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही महिलांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
भोंदू अशोक खरातच्या जमीन घोटाळ्यातील साक्षीदार, खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि शिर्डीतील नामांकित बांधकाम व्यावसायिक डॉ.जितेंद्र गणपतराव शेळके यांचा अपघात नाही, घातपातच झाला आहे, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. वाहन चालक काहीही जबाब देऊ द्या, हा घातपातच आहे. नेमके त्याला का मारले? आणखी कोणावर गुन्हे का दाखल करण्यात आले नाही,असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. नाना पटोले म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी जे कोणी अधिकारी, राजकीय नेते सहभागी आहेत त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले गेले नाहीत? काय लपवले जात आहे? भाजपचे बाहेर ठेवलेले प्रवक्ते यांच्याकडे सीडीआर जातो आणि सरकारला काही माहिती नाही. याचा अर्थ हा अशोक खरात राज्यातील भाजप आणि महायुती सरकारचा प्यादा आहे. त्यांच्या माध्यमातून धर्म भ्रष्ट केला जात आहे. अशोक खरातकडून सर्व माहिती घेऊन त्याला जेलमध्येच मारले जाईल असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. व्यापम घोटाळ्यातील अनेकांचे अपघात नाना पटोले म्हणाले की, डॉ.जितेंद्र शेळके यांचा काल अपघात झाला नाही तर घातपात झाला आहे. त्याच्याकडे सर्व माहिती होती. हे कोणी केले? त्यालाच टार्गेट का केले गेले. मध्यप्रदेशमध्ये भाजप सरकार असताना एक परीक्षा घोटाळा झाला होता त्यावेळी सर्वांना मारुण टाकले, सर्वांचे असे वेगवेगळे अपघात झाले. व्यापम घोटाळ्यात हे सर्व आपण पाहिले आहे. सर्व नष्ट करायचे आणि आमच्याकडे पुरावाच नाही असे मांडायचे आणि काही तरी गायब करायचे काम होऊ शकते. अशोक खरातला कसेही मारू शकतात. यांचा काही भरोसा नाही. फायद्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेचा डाव दुसरीकडे सोशल मिडीयावर पोस्ट करत नाना पटोले यांनी महिला आरक्षणाच्या मुद्यावर सरकारवर टीका केली आहे. नाना पटोले म्हणाले की,महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठी काँग्रेस आणि इंडिया आघाडीने कोणताही विरोध केलेला नाही. उलट, 2024 च्या निवडणुकीपूर्वीच महिला आरक्षण तत्काळ लागू करण्याचा आग्रह काँग्रेस आणि इंडिया आघाडीने सातत्याने केला होता.परंतु भाजपने महिला आरक्षणाच्या नावाखाली आपल्या राजकीय फायद्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेचा डाव आखला होता. ही मनुवादी रणनीती लोकसभेत यशस्वी झाली नाही. भाजपने ढोंगीपणा थांबवावा नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना मी 20/09/2023 रोजी महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यांनी केलेल्या अभिनंदनाच्या ट्विटची आठवण करून देतो आणि त्यांना सल्ला देतो की हा ढोंगीपणा थांबवावा. लाडक्या बहिणी आणि शेतकरीविरोधी मनुवादी अजेंडा राबवणाऱ्या सरकारने जनतेची दिशाभूल करणे बंद करावे. फडणवीस हे संघाचे कट्टर कार्यकर्ते आहेत. संघ आणि भाजपची मनुवादी व महिलांविरोधी विचारसरणी महिलांना किती न्याय आणि अधिकार देते, हे त्यांना अधिक चांगले माहिती आहे. तसेच, संस्कृतीच्या नावाखाली विरोधकांवर टीका करणाऱ्यांनी स्वतःच्या वागणुकीकडेही पाहणे गरजेचे आहे. बँड लावून डान्स करण्याची संस्कृती विरोधकांची नाही. इस्राईलला जाऊन World War Criminal समोर कोणी डान्स केला होता हे sixteen या नंबरच्या माध्यमातून सर्व जगासमोर उघड झाले आहे.
मुंबई महापालिकेत झालेल्या 122 अभियंत्यांच्या बदल्यांवर अखेर पूर्णविराम देण्यात आला आहे. बदल्यांमध्ये कथित गैरव्यवहार आणि ‘ट्रान्सफर मार्केट’चे आरोप पुढे आल्यानंतर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला. ऑक्टोबर 2025 मध्ये या बदल्या करण्यात आल्या होत्या, मात्र सुरुवातीपासूनच या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अनेक तक्रारी, आक्षेप आणि चौकशीच्या मागण्यांमुळे हे प्रकरण सतत चर्चेत राहिले होते. या संपूर्ण वादानंतर महापौर रितू तावडे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि चौकशीची मागणी केली. त्यानंतर हे प्रकरण अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे सोपवण्यात आले. तपास आणि प्रशासनिक पडताळणीनंतर अखेर सर्व 122 अभियंत्यांच्या बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महापालिकेच्या अंतर्गत कामकाजावर मोठा परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आणि भाजपचे मुंबई शहराध्यक्ष अमित साटम यांनी या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींनंतर तत्कालीन आयुक्त भूषण गगराणी यांनी तात्काळ हस्तक्षेप करत बदल्यांना स्थगिती दिली होती. त्यावेळीच या प्रकरणाची गंभीरता स्पष्ट झाली होती आणि पुढील कारवाईची दिशा ठरली होती. आता या बदल्या अधिकृतपणे रद्द केल्यामुळे महापालिकेतील बदली प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे हा निर्णय भ्रष्टाचाराविरोधातील कठोर कारवाई म्हणून पाहिला जात आहे, तर दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल्या रद्द होणे म्हणजे प्रशासनातील अनियमिततेची कबुली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पारदर्शकतेबाबत प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या निर्णयामुळे महापालिकेत चालणाऱ्या कथित ‘बदल्यांच्या बाजाराला’ मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. अनेक स्तरांवरून या प्रकरणाची चौकशी व्हावी, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे. यामुळे प्रशासनातील विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. बदली प्रक्रिया स्वतंत्र समितीमार्फत राबवण्याची मागणी दरम्यान, भविष्यात अशा प्रकारच्या वादांना आळा घालण्यासाठी बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि स्वतंत्र समितीमार्फत राबवण्याची मागणी जोर धरत आहे. नियमबद्ध आणि स्पष्ट निकषांवर आधारित बदली प्रणाली लागू करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिका प्रशासन कोणती नवी पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही महिलांना एक तृतीयांश आरक्षण देणारी 131 वी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याच्या मुद्यावरून विरोधकांवर संताप व्यक्त केला आहे. कालचा दिवस भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत लाजिरवाणा ठरला. महिला सक्षमीकरणाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनीच महिलांच्या हक्कावर घाला घातला. यावरून विरोधकांची महिला विरोधी मानसिकता पुन्हा एकदा उघड झाली, असे त्या म्हणाल्यात. महिला आरक्षण व लोकसभेच्या जागा वाढवण्याशी (परिसीमन) संबंधित अत्यंत महत्त्वाचे असणारे संविधान दुरुस्ती विधेयक शुक्रवारी लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. प्रदीर्घ चर्चेनंतर पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत सरकारला हे विधेयक पारित करण्यासाठी आवश्यक असणारे दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यात अपयश आले. परिणामी, बहुमताअभावी हे विधेयक फेटाळले गेले. त्यानंतर आता सत्ताधारी पक्षांनी विरोधी पक्षांवर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणी विरोधकांवर निशाणा साधला आहे. महिला आरक्षणाची लढाई इथे थांबणार नाही - सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार म्हणाल्या, कालचा दिवस आपल्या भारतीय लोकशाहीसाठी लाजिरवाणा ठरलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाहीय. महिलांना 1/3 आरक्षण देणारं 131 वं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकलं नाही तथापि जाणीवपूर्वक होऊ दिल नाही आणि विरोधकांची महिला-विरोधी मानसिकता पुन्हा उघडी पडली. महिला सशक्तीकरणाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनीच महिलांच्या हक्कावर घाला घातला. आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या एकत्र येण्याच्या आवाहनाला नकार हा अहंकार नव्हे तर देशातील महिलांवर केलेला अन्यायचं आहे. पण महिला आरक्षणाची लढाई इथे थांबणार नाही… नारीशक्ती उत्तर देईल, असे त्या म्हणाल्या. डीलिमिटेशन विधेयक अत्यंत घातक - रोहित पवार दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी लोकसभेने हे विधेयक फेटाळून लावण्याचे स्वागत केले आहे. या प्रकरणी त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, महिला आरक्षण विधेयकाच्या अडून केंद्र सरकारने चालवलेले घातक डिलिमिटेशन बिल हाणून पाडण्यात आले. या डिलिमिटेशन मुळे दक्षिणेतील राज्यांवर होणारा अन्याय ओळखण्याचे काम दक्षिणेतील जागृत पक्षांनी केलं. TDP पक्षाने मात्र केवळ आपल्या राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांसाठी आंध्र प्रदेशच्या जनतेशी धोका करण्याचं काम केलं. दक्षिणेवर अन्यायकारक असलेल्या डिलिमिटेशनच्या बाजूने मतदान करण्याचं काम TDP कडून झालं हे दुःखद आहे. TDP पक्षाने पुन्हा एकदा दाखवून दिले की त्यांच्यासाठी प्रादेशिक अस्मिता नव्हे तर सत्ता आणि आर्थिक हितसंबंध महत्वाचे आहेत. सोबतच अजित दादांच्या अपघातास कारणीभूत असलेल्या VSR कंपनीसोबत TDP चे आर्थिक हितसंबंध असल्याने केंद्राच्या दबावाखाली TDP पक्षाकडून डिलिमिटेशन बिलाला समर्थन दिलं गेलं असावं. असो, ज्या प्रादेशिक अस्मितेसाठी सत्ता मिळवली तीच अस्मिता दिल्लीच्या पायावर ठेवण्याचं पाप TDP पक्षाकडून झालं हे मात्र नक्की, असे रोहित पवार म्हणाले.
ज्या खासदारांनी काल महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान केले त्या खासदारांना कधीच निवडणूक जिंकता येणार नाही, त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. बहिणींना प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून हा विरोध करण्यात आला, काँग्रेसने कधीही महिलांना सन्मान दिला नाही, असे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर महिलांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या सर्वांना महाराष्ट्रातील आणि देशाची जनता उद्ध्वस् करेल. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अमरावती अत्याचार प्रकरणी मी आज पोलिस अधीक्षकांसोबत चर्चा करणार आहे. माझे त्या प्रकरणाकडे लक्ष आहे. या प्ररकणी सखोल तपास करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. पोलिसांना तपास करण्यासाठी काही गोष्टींची गरज लागणार आहे का? या चर्चा करणार आहे. चौकशी भरकटेल असे विधान कोणीही करू नये, या प्रकरणर 7 मोबाईल पकडले गेले आहेत. महिलांना प्रतिनिधित्व मिळू नये म्हणून विरोधात मतदान चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काल काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये नारी शक्ती विधेयकाला प्रचंड विरोध केला. त्या विधेयकाच्या विरोधात मतदान केले, काँग्रेसचे महिलाविरोधी धोरण आहे. काँग्रेसने कधीही महिलांना सन्मान दिला नाही हे दिसून आले. ज्या खासदारांनी विरोधात मतदान केले त्या खासदारांना त्यांच्या मतदारसंघासह देशभरातील महिला बहिणी त्यांची वाट लावतील. महिलांना 33 टक्के आरक्षण देत विकसित भारतामध्ये महिलांचे स्थान असावे यासाठी मोठा निर्णय घेतला. या निर्णयाला विरोध केला. यापूर्वी देखील त्यांनी तेच केले आहे. आमच्या 70 कोटी महिलांना प्रतिनिधित्व मिळू नये यासाठी मतदान केले आणि विधेयक मंजूर झाले नाही म्हणून आनंद उत्सव केला. हा महिलांचा अपमान आहे. यामुळे जनता त्यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. जनता विरोधकांना धडा शिकवेल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रात 72 खासदार झाले असते तर 33 टक्के महिला खासदार झाल्या असत्या. आणि जवळपास साडेतीनशे आमदार झाले असते तर 150 पर्यंत महिला आमदार झाल्या असत्या, त्यांना प्रतिनिधित्व मिळू शकणार नाही. यांना जनता आणि महिला धडा शिकवेल. जर लोकसभेच्या सीट वाढल्या असत्या तर आमच्या बहिणींच्या सीट वाढल्या असत्या. एससी, एसटीच्या जागा वाढल्या असत्या. देशातील अनेक मोठ्या मतदारसंघात जनतेला न्याय देण्यासाठी खासदार वाढले असते. कारण काही मतदारसंघात 40 लाख मतदार आहे, त्यांना मतदारांपर्यंत जाता येत नाही. छोटे मतदारसंघ झाले तर लोकांना भेटता आले असते. खासदारांशी सध्या संपर्क होऊ शकत नाही, हे दोन्हीही विषय महत्त्वाचे होते.
राज्यात सध्या हवामानाचा विलक्षण आणि चिंताजनक बदल पाहायला मिळत आहे. एका बाजूला तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून अनेक ठिकाणी तो 40 अंशांच्या पुढे गेला आहे, तर दुसऱ्या बाजूला काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या दुहेरी परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांसह विशेषतः शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत होत असतानाच अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती वाढली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा कहर अधिकच तीव्र झाला आहे. अकोला येथे 44.1 अंश तापमानाची नोंद झाली असून, वर्धा 44.4, नागपूर 44, गडचिरोली 44 आणि अमरावतीतही 44 अंशांच्या आसपास तापमान पोहोचलं आहे. यवतमाळमध्ये 42.8, चंद्रपूर 43.6, गोंदिया 42.9 आणि भंडारा 42 अंशांवर पोहोचले आहे. या तीव्र उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघाताचा धोका वाढला आहे. राज्यातील इतर भागांमध्येही तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. सांगलीमध्ये 41.5, जळगाव 42.3, परभणी 41.8, सातारा 40.8, पुणे 40.3 आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 41.6 अंश तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये 38.4, ठाणे 37 आणि माथेरानमध्ये 36 अंश तापमान आहे. या वाढत्या उष्णतेचा परिणाम जनजीवनावर स्पष्टपणे जाणवू लागला असून नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. दरम्यान, उष्णतेच्या या लाटेसोबतच राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यात सुमारे 1 तास पाऊस कोसळला. शहरातही अचानक पावसाची सर आली. काही दिवसांच्या तीव्र उकाड्यानंतर पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी शेती पिकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत आहे. वीज कोसळून तरुणाचा मृत्यू या अवकाळी पावसादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. मोहोळ तालुक्यातील आढेगाव येथे वीज कोसळून विजय राजाराम डोंगरे या तरुणाचा मृत्यू झाला. बांधकामासाठी आलेल्या वाळूच्या ट्रकजवळ असताना अचानक वातावरण बदलले आणि विजेचा कडकडाट सुरू झाला. त्याचवेळी वीज कोसळून तो गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. उष्णता आणि अवकाळी पावसाचा दुहेरी फटका दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातही उष्णतेचा तडाखा वाढला असून तापमान 41 अंशांवर पोहोचले आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम शिर्डीतील साईबाबा मंदिर परिसरावरही दिसून येत आहे. भाविकांची संख्या कमी झाली असून संस्थानने भाविकांसाठी मंडप, गालिचे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. एकूणच, राज्यात उष्णता आणि अवकाळी पावसाचा दुहेरी फटका बसत असल्याने शेतकरी आणि नागरिक दोघेही मोठ्या चिंतेत सापडले आहेत. सोलापूर आणि धाराशिवसाठी 24 तासांसाठी यलो अलर्ट मध्य महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुढील काही तासांत हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्वमोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर या भागांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. विशेषतः सायंकाळनंतर काही ठिकाणी जोरदार वारे वाहू शकतात. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या बदलत्या परिस्थितीमुळे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी पुढील 24 तासांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी दरम्यान, 18 ते 20 एप्रिल या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्येही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू शकतात. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटरपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता नाकारता येत नाही. महाराष्ट्राच्या सीमेलगतही वाऱ्यांची चक्राकार स्थिती हवामानातील या बदलामागे वातावरणातील विशिष्ट घडामोडी कारणीभूत ठरत आहेत. सध्या समुद्र सपाटीपासून सुमारे दीड किलोमीटर उंचीवर, मध्य प्रदेशच्या ईशान्य भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. हे वारे मराठवाडा आणि विदर्भातून पुढे सरकत असून, त्याचबरोबर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेलगतही वाऱ्यांची चक्राकार स्थिती स्थिरावलेली आहे. या सर्व घटकांमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. 19 एप्रिल रोजी सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर 20 एप्रिल रोजी अहिल्यानगर, पुणे, सातारा, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही यलो अलर्ट लागू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
मोदी है तो मुमकीन है ही आता दंतकथा झाली आहे. फार तर आता मोदी है तो नमकीन है असे म्हणू शकतात. कारण ते नमकीन भाषणे करतात आणि त्यांचे लोकं जीभ चाटत टाळ्या वाजवतात. अमित शहा यांनी काल विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपमानित करण्यासाठी आणले काय? आम्ही दोन-तृतीयांश मते जमा करू शकत नाही, भाजपकडे स्वत:चे बहुमत नसताना हे भोंदू बिल लोकसभेत आणले, त्यांचा मुळ उद्देश 543 जागा वाढवून 850 करायच्या आणि सत्तेचा अमर पट्टा बांधत सतत विजय मिळवण्यासाठी हे बिल होते, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, भविष्यात बेकायदेशीरपणे विजय मिळवता यावे यासाठी 850 जागा महिलांच्या नावाने वाढवायचा हा हेतू होता. सत्ताधाऱ्यांना देशात वाद पेटवायचा होता. 2023 मध्ये मंजूर केलेल्या बिलाला 543 मध्येच 33 टक्के आरक्षण देण्यास आम्ही पाठिंबा दिला होता. पण केवळ सत्तेतील खासदारांच्या सीट वाचवण्यासाठी हे बिल आणले होते ते आम्ही उधळून लावले. या विधेयकानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी VS अमित शहा संघर्ष पाहायला मिळाला. पहिले ही चर्चा दबक्या आवजात सुरू होती. पण आता लोकसभेच्या पटलावर दिसून आले. महिला आरक्षण विधेयक पडलेले नाही ते 2023 मध्ये मंजूर झालेले आहे. 16 महिन्यामध्ये 16 नंबर मोदींना घरी बसवेल असा दावाही राऊतांनी केला आहे. भाजप हा भोंदू पक्ष संजय राऊत म्हणाले की, आम्ही महिला आरक्षणाच्या विरोधात नाही, कुणीच केला नाही. कारण 2023 मध्ये हे महिला आरक्षणाचे बिल पास झाले आहे. भाजप हा पक्ष भोंदू आहे, त्यांनी देशात आणि राज्यात अनेक भोंदू तयार केले आहेत, ते भोंदू प्रकारचे विचार आणतात. भविष्यातील राजकारणात 16 आकडा धोक्याचा आहे. तेव्हा अमृता फडणवीस गप्प का बसल्या? संजय राऊत म्हणाले की, अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बॅकेत जर असे प्रकरण घडले असेल तर तेव्हा शांत का बसल्या? त्यांनी तक्रार दाखल का केली नाही. त्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या पत्नी आहेत, त्या शांत का बसल्या असा प्रश्न जनता विचारू शकते, असे राऊतांनी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना म्हटले आहे. हे जनतेचे यश संजय राऊत म्हणाले की, काल विधेयक मंजूर झाले नाही हे काही विरोधी पक्षाचे यश नाही हे जनतेचे यश आहे. हा देशातील महिलांचा विजय आहे. महिलेच्या नावाने जी फसवणूक सुरू होती आम्ही त्या विरोधात मतदान केले. आम्ही काही महिला आरक्षणाच्या विरोधात नाही, पण हे बिल 2023 मध्येच मंजूर झाले, आता जे खासदार आहेत. त्यापैकी 33 टक्के जागा राखीव कराव्या. देशातील महिला आमच्यासोबत आहे. महिलांना पैसे देऊन त्यांचे मत विकत घेतात. ते पैसे देणं बंद करा मग महिला कोणासोबत आहे ते तुम्हाला समजेल.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात भोंदूगिरीचा मोठा पर्दाफाश झाला असून, दत्तधाम सरकार नावाने दरबार भरवणाऱ्या राजेंद्र गडगे याला पोलिसांनी अटक केली आहे. मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली गंभीर आजार बरे करण्याचा दावा करत सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. संगमनेर पोलिसांनी ही कारवाई करत या प्रकरणातील मुख्य आरोपीला गजाआड केले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वडगावपान परिसरात राजेंद्र बापू गडगे हा स्वतःला दैवी शक्ती लाभलेला असल्याचे भासवत होता. त्याने दत्तधाम सरकार या नावाने यूट्यूब चॅनल सुरू करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोच निर्माण केली होती. कर्करोगासारख्या दुर्धर आजारांवर मंत्रशक्तीने उपचार करतो, निःसंतान महिलांना मूलप्राप्ती करून देतो आणि घरातील अडचणी दूर करतो, असे भ्रामक दावे करून तो लोकांना आकर्षित करत होता. या आमिषाला भुलून अनेक नागरिक त्याच्या दरबारात येत असल्याचे तपासात समोर आले आहे. तपासादरम्यान उघडकीस आलेल्या माहितीनुसार, गडगे हा आपल्या तथाकथित उपचारांसाठी मोठ्या रकमेची मागणी करत असे. 15 हजार, 21 हजार ते अगदी 51 हजार रुपयांपर्यंत पैसे घेतल्याचे समोर आले आहे. उपचाराच्या नावाखाली तो रुग्णांना साधे वनस्पतीजन्य पदार्थ देत असे, ज्यामुळे रुग्णांच्या आरोग्याशी गंभीर खेळ होत होता. गेल्या सुमारे दहा वर्षांपासून त्याने शेकडो लोकांची आर्थिक, मानसिक आणि शारीरिक फसवणूक केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीमुळे झाला. समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर संगमनेर तालुका पोलिसांनी कारवाई करत राजेंद्र गडगेसह त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, डॉ. मोहन पुरी, सुरज शिंदे आणि मधुकर शिंदे या पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा छापा टाकून राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे या दोघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात आरोपींवर विविध कठोर कायद्यांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जादूटोणा विरोधी कायदा, आयटी ॲक्ट, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांचा समावेश आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट व्हिडिओ तयार करून लोकांची दिशाभूल केल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे आणखी गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फसव्या दाव्यांना बळी न पडण्याचे आवाहन सध्या या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींच्या जाळ्याचा विस्तार किती मोठा आहे याचा शोध घेतला जात आहे. तसेच या प्रकरणात आणखी किती लोक फसले आहेत, याचाही तपास सुरू आहे. या कारवाईमुळे भोंदूगिरीविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, नागरिकांनी अशा फसव्या दाव्यांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीची घोषणा होताच सत्ताधारी शिवसेना शिंदे गटामध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 12 मे रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात उमेदवारीबाबत रणनीती आखली जात असून, पहिला उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील विश्वासू आणि अनुभवी चेहरा म्हणून त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे पहिल्या जागेवर शिंदे गटाकडून स्थैर्य राखण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. मात्र, दुसऱ्या जागेवरून चित्र अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. दुसऱ्या जागेसाठी पक्षात इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दीपक सावंत यांसारखी अनेक नावे चर्चेत आहेत. या सर्वांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस वाढली असून, शिंदे कोणावर विश्वास दाखवतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयोग केल्यानंतर, विधानपरिषदेतही अशाच प्रकारचा धक्कातंत्र वापरला जाईल का, याची चर्चा सुरू आहे. विधानपरिषद निवडणुकीत एका उमेदवाराला विजयासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. शिवसेना शिंदे गटाकडे विधानसभेत 57 आमदारांचे संख्याबळ असल्याने दोन जागा जिंकण्यात कोणतीही अडचण नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे उमेदवारी देताना पक्षांतर्गत समीकरणे, निष्ठा आणि भविष्यातील राजकीय रणनीती या गोष्टींना अधिक महत्त्व दिले जाणार आहे. याचदरम्यान, शिंदे गटात भाकरी फिरणार, असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. काही मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त होत असून, त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक आमदारांनी आपल्या भागातील कामे होत नसल्याची तक्रार केली असून, मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. धाराशिव आणि सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांच्या नाराजीचे स्वरही उघडपणे समोर आले होते. अंतर्गत बदलांची सुरुवात या पार्श्वभूमीवर, येत्या काही दिवसांत शिंदे कोणत्या मंत्र्यांना डच्चू देतात आणि कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानपरिषद निवडणूक केवळ सदस्य निवडण्यापुरती मर्यादित न राहता, शिंदे गटातील अंतर्गत बदलांची सुरुवात ठरू शकते. त्यामुळे या निवडणुकीत घेतले जाणारे निर्णय आगामी राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
देशाच्या राजकारणात गाजत असलेले महिला आरक्षण विधेयक अखेर लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत सरकारला मिळाले नाही. त्यामुळे हे महत्त्वाचे विधेयक कोलमडले असून त्यासोबतच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही पुढे जाऊ शकले नाही. या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र रंगले आहे. या घडामोडींमुळे संसदेतच नव्हे, तर राज्याच्या राजकारणातही वातावरण चांगलेच तापले आहे. विधेयक फेटाळल्यानंतर भाजप नेत्या नवनीत राणा या अतिशय भावूक झाल्या. प्रतिक्रिया देताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. विरोधकांनी हे विधेयक जाणीवपूर्वक रोखले, असा आरोप त्यांनी केला. हा दिवस काळा दिवस म्हणून लक्षात ठेवला जाईल. महिलांना न्याय देण्यासाठी पंतप्रधानांनी प्रामाणिक प्रयत्न केले, पण आम्ही त्यांना पूर्ण बहुमत देऊ शकलो नाही, यासाठी आम्ही त्यांची माफी मागतो, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. तसेच विरोधकांना महिलांकडून कधीच माफी मिळणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारचा डाव उधळून लावला - हर्षवर्धन सपकाळ दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र या निकालाचे वेगळेच विश्लेषण केले. त्यांच्या मते, हा लोकशाहीचा विजय आहे. इंडिया आघाडीने सरकारचा डाव उधळून लावला असल्याचे त्यांनी सांगितले. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला, पण तो फसला, अशी टीका त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील मतभेद अधिकच तीव्र झाले आहेत. प्रक्रियेचा राजकीय वापर होण्याची शक्यता - रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या विषयावर भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, इंडिया आघाडीचा महिला आरक्षणाला विरोध नव्हता, मात्र मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेला विरोध होता. जनगणना न करता हा निर्णय घेतला असता, तर अनेकांवर अन्याय झाला असता, असे त्यांनी नमूद केले. काही राज्यांमध्ये या प्रक्रियेचा राजकीय वापर होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. राजकीय षडयंत्र होते - संजय राऊत याच मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. त्यांच्या मते, महिला आरक्षण विधेयक हे एक राजकीय षडयंत्र होते आणि ते आता कोसळले आहे. सत्ताधाऱ्यांनी मतदारसंघांची फेररचना करून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला, असे त्यांनी म्हटले. या प्रकरणातून सरकारचे खरे स्वरूप समोर आले असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार अल्प बहुमतावर, कधीही कोसळू शकते संजय राऊत यांनी पुढे पंतप्रधानांवरही निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, सध्याचे सरकार अल्प बहुमतावर टिकले आहे आणि ते कधीही कोसळू शकते. फक्त काही खासदारांच्या आधारावर सत्ता टिकली आहे. परिस्थिती बदलली, तर सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. या सर्व घडामोडींमुळे महिला आरक्षणाचा मुद्दा आता केवळ विधेयकापुरता मर्यादित न राहता मोठ्या राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
शालार्थ घोटाळा:चव्हाणची ‘माया’ डोळे दिपवणारी, नाशिकचा निलंबित शिक्षण उपसंचालक संभाजीनगरचा रहिवासी
नाशिक विभागात उघडकीस आलेल्या शालार्थ घोटाळ्यातील आरोपी शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुलतानपूर (ता. खुलताबाद) येथील रहिवासी आहे. एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या चव्हाण याने अल्पावधीतच कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. चव्हाण आणि त्याच्या पत्नीने विविध व्यावसायिक फर्म तयार केल्या. यात दोन कंपन्या देखील आहेत. केवळ नोकरी करत असताना मिळालेल्या वेतनाच्या आधारे हे डोळे दिपवणारे साम्राज्य उभे करणे निव्वळ अशक्य आहे. बी. बी. चव्हाण याच्या नोकरीचा बहुतांश कार्यकाळ छत्रपती संभाजीनगर विभागातच गेला. शिक्षक, विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी, सहायक शिक्षण संचालक आणि उपसंचालक असा त्याचा नोकरीतील प्रवास आहे. तो नाशिक येथे उपसंचालक पदावर कार्यरत होता. शालार्थ घोटाळ्यातील सहभागामुळे सध्या तो निलंबित असून फरार आहे. कबीर कोर्ट हॉटेल, तिसगाव सिडको महानगरात रेशीमबंध मंगल कार्यालयाजवळच कबीर कोर्ट हॉटेल आहे. इथे फूड कोर्ट, भव्य असा बँक्वेट हॉल आहे. लग्न, स्वागत समारंभ, वाढदिवस अशा कार्यक्रमांसाठी येथील बँक्वेट हॉल भाड्याने दिला जातो. तारखेनुसार आणि सीझननुसार त्याचे भाडे आकारले जाते. काय आहे चव्हाणचे नाशिक प्रकरण? चव्हाणने शालार्थ आयडी घोटाळ्याच्या माध्यमातून शासनाला कोट्यवधींचा चुना लावल्याचा आरोप आहे. नाशिक विभागातील साडेआठशे शिक्षकांच्या मान्यता बोगस असल्याचे एसआयटीने उघड केल्यानंतर चव्हाणसह अन्य अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. तेव्हापासून चव्हाण पसार आहे. नाशिक पोलिस सध्या त्याचा शोध घेत आहेत. त्याच्या मालमत्तांचीही चौकशी केली जात आहे. मकोका कायद्यानुसार कारवाईचा प्रस्ताव शालार्थ आयडी प्रकरणात निवृत्त शिक्षण उपसंचालक, उपसंचालक, सहायक संचालक आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कट रचून केलेली संघटित गुन्हेगारी असल्यामुळे नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बी. बी. चव्हाणसह अन्य अधिकाऱ्यांवर मकोका कायद्यानुसार कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. रेशीमबंध मंगल कार्यालय, वाळूज सिडको महानगरजवळ अत्यंत प्रशस्त असे हे रेशीमबंध मंगल कार्यालय आहे. एका कार्यासाठी प्रतिदिन सुमारे ७५ हजार ते २ लाख रुपयांपर्यंतचे भाडे आकारले जाते. जवळपास १० हजार चौरस फूट जागेत हे मंगल कार्यालय आहे. भद्रा ब्रीडिंग फार्मसाठी घेतले २ कोटी अनुदान सुलतानपूर येथे अत्याधुनिक भद्रा ब्रीडिंग फार्म आहे. येथे गीर, जर्सी आणि होल्स्टिन फ्रिजिएन, गिरलँडो जातीच्या तब्बल ७०० गायी आहेत. या फार्मसाठी केंद्र सरकारच्या गोकुळ मिशनमधून २ कोटींचे अनुदान घेतले आहे. येथे परदेशी गोवंशाच्या सिमेनद्वारे ॲम्ब्रियो ट्रान्सफर केले जाते. या आयव्हीएफ तंत्राद्वारे तयार झालेल्या कालवडी एक ते सव्वा लाखांपर्यंत विक्री केल्या जातात. इथॉस मिल्क फूड प्रायव्हेट लिमिटेड इथॉस मिल्क फूड प्रा.लि. कंपनी बी. बी. चव्हाण याची पत्नी वैशाली चव्हाण व मुलगी फाल्गुनी चव्हाण यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. बीड बायपासलगत मुस्तफाबाद या पत्त्यावर ही कंपनी दाखवलेली आहे. गतवर्षीच या कंपनीची स्थापना करण्यात आलेली आहे. दूध आणि दुधापासून तयार केलेले उपपदार्थ या कंपनीद्वारे उत्पादित आणि विक्री केले जातात. बी. बी. चव्हाण मिलिटरी स्कूल अँड अकॅडमी खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव येथे ही अकॅडमी आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पॅरा मिलिटरी सर्व्हिसेसची पूर्वतयारी करवून घेणारी शैक्षणिक संस्था आहे. निवासी स्वरूपाची ही अकॅडमी असून इथे सातवी ते बारावीपर्यंतचे शिक्षणदेखील दिले जाते. एका विद्यार्थ्याकडून तब्बल २ लाख रुपयांपर्यंत फीस घेतली जाते. मालोजीराजे कृषी उत्पादक कंपनी २०१८ मध्ये ही कंपनी स्थापन केलेली आहे. यामध्ये भाऊसाहेब चव्हाण याची पत्नी वैशाली चव्हाण, मेहुणा उमेश निकम व अन्य नातलगांचा समावेश आहे. वैशाली चव्हाण या शिक्षिका असतानाही त्या या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संचालक म्हणून काम पाहतात, हे विशेष.
पुणे विमानतळाची धावपट्टी (रनवे) शुक्रवारी रात्री उशिरा एका IAF विमानाने केलेल्या हार्ड लँडिंगनंतर तात्पुरती बंद करण्यात आली होती. या घटनेमुळे विमानतळावरील विमान वाहतूक (फ्लाइट ऑपरेशन) 8 तास प्रभावित झाली. भारतीय वायुसेनेने स्वतः ही माहिती दिली. IAF नुसार, विमानाने लँडिंग करताना झालेल्या घटनेनंतर, सुरक्षा कारणांमुळे धावपट्टी (रनवे) तात्काळ बंद करावी लागली. विमानातील कर्मचारी (क्रू) सुरक्षित आहेत. कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. तथापि, विमानतळावरील विमान वाहतूक सकाळी 7.30 वाजल्यानंतर सामान्य होऊ शकली. विमानतळ संचालकांच्या मते, 5 एअरलाईन्सची 91 विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली होती. रद्द झालेल्या विमानांमध्ये इंडिगोची 65, एअर इंडियाची 6, स्पाइसजेटची 5, अकासा एअरची 5 आणि एअर इंडिया एक्सप्रेसची 10 विमाने समाविष्ट होती. विमानतळ संचालकांच्या मते, दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर सकाळी 7:30 वाजल्यापासून उड्डाणे सुरू झाली आहेत. दिवसभरात कामकाज (ऑपरेशन) सामान्य होईल. खरं तर, पुणे विमानतळ दुहेरी वापर मॉडेलवर काम करते, ज्यात नागरी व्यावसायिक उड्डाणांसोबतच एक सक्रिय वायुसेना स्टेशन ऑपरेशन देखील समाविष्ट आहे. वायुसेनेच्या विमानाचे लँडिंग गियर खराब न्यूज एजन्सी पीटीआयनुसार, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री सुमारे २२:२५ वाजता लढाऊ विमान लँडिंग करणार होते. यावेळी त्याचे 'अंडरकॅरेज' (लँडिंग गियर) खराब झाले होते, ज्यामुळे ते धावपट्टीवर आदळले. मात्र, हे कोणते फायटर जेट होते, याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. ना त्याचे व्हिज्युअल उपलब्ध आहेत. काय असते हार्ड लँडिंग सामान्यतः धावपट्टीवर लँडिंग करताना विमान हळू हळू आणि सहजपणे उतरते. पण जर ते धावपट्टीवर जोरात आदळले किंवा वेगाने खाली आले तर त्याला हार्ड लँडिंग म्हणतात. हार्ड लँडिंगची अनेक कारणे असू शकतात, यात खराब हवामान (वेगाने वाहणारे वारे, वादळ), पायलटच्या गणनेत चूक किंवा अचानक हवेचा दाब बदलणे यांचा समावेश आहे. हार्ड लँडिंगच्या वेळी कधीकधी फक्त धक्काच लागतो, पण तीव्रता जास्त असल्यामुळे विमानाला नुकसान होऊ शकते. त्यात बसलेल्या प्रवाशांना आणि क्रूला दुखापती होऊ शकतात.
दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:ज्या शाळेने दिले 7 पोलिस, 1 सैनिक, ती आज भरतेय फक्त एका विद्यार्थ्यासाठी
१९६७ सालची गोष्ट... लामकाना तांड्यावर एक जिल्हा परिषद शाळा सुरू झाली. जवळपास २५० घरांचा हा गजबजलेला तांडा. या शाळेत शिकलेली मुलं पुढे मोठी झाली. याच मातीत घडलेले ७ तरुण पोलिस झाले, एक जण आर्मीत गेला, तर दोघे रेल्वेत रुजू झाले. शाळेचा नावलौकिक वाढत होता. पण काळ बदलला, विकासाची गंगा शहरात आली, मात्र लामकाना तांड्यापर्यंत पोहोचलीच नाही. आज ५९ वर्षांनंतर या शाळेची अवस्था अशी आहे की, पूर्ण तांड्यातून फक्त आर्यन नावाचा एकुलता एक विद्यार्थी पहिल्या वर्गात बसतो आणि शिक्षक केवळ त्यालाच शिकवण्यासाठी रोज डोंगर-दऱ्या पार करून येतात. ही कथा फक्त एका शाळेची नाही, तर व्यवस्थेने वाऱ्यावर सोडलेल्या एका गावाची आहे. शहरापासून लामकाना तांडा केवळ ३२ ते ३५ किमीवर आहे. मुख्य रस्ता संपल्यावर दोन किलोमीटरची नुसती खडबडीत पायवाट सुरू झाली. पुढे गेल्यावर एक सुकलेलं तळं लागलं. सुदैवाने पाणी कमी असल्याने तळ्यातून वाट काढत शाळेपर्यंत पोहोचलो. आजूबाजूला घनदाट डोंगर आणि एका उंच टेकडीवर ही शाळा. वर्गात डोकावून पाहिलं तर एका रिकाम्या बाकावर चिमुकला आर्यन एकटाच बसला होता आणि शिक्षक त्याला धडे गिरवायला लावत होते. हे दृश्य मनाला चटका लावून जाणारं होतं. विचारपूस केल्यावर समजलं की रस्ता आणि पाण्याअभावी २५० घरांचा हा तांडा आता जेमतेम ५० घरांवर येऊन ठेपला आहे. या स्थलांतराचा शाळेच्या पटसंखेवर परिणाम झाला आहे. ‘मी पहिलीत शिकतो, वर्गात मित्रच नाहीत!’ “मी पहिल्या वर्गात शिकतोय. वर्गात शिकताना मला कुणाशी तरी बोलावंसं वाटतं, खेळायला जावंसं वाटतं, पण माझ्या वर्गात कुणीच मित्र नाही” - आर्यन राठोड, विद्यार्थी. आधी रस्ता तर द्या, मुलं शाळेत येतील “इथूनच शिकून मुलं पोलिस, आर्मीत लागली. आम्ही मजुरी करून मुलांना शिकवू, पण गावात रस्ता आणि सुविधा तर मिळाली पाहिजे. - रामसिंग राठोड, माजी विद्यार्थी. मुलांना आणण्याचा प्रयत्न करणार ग्रामस्थांशी संवाद साधून पटसंख्या वाढवण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. गरज पडल्यास स्वतःचे वाहन लावून विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्याचा निर्णय घेतला आहे. - ज्ञानेश्वर पठाडे, शिक्षक स्थलांतराचा फटका शिक्षणाला या बातमीचा सर्वात मोठा पैलू हा आहे की, ही शाळा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अनास्थेमुळे ओस पडलेली नाही तर ‘प्रशासकीय सुस्ती’मुळे पडली आहे. राज्यभरात कमी पटाच्या ८०० शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. लामकाना तांड्याची शाळाही त्याच उंबरठ्यावर आहे. डोंगराळ भाग, पिण्याचे पाणी नाही, वीज नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जाण्यासाठी साधा रस्ता नाही. त्यामुळे येथील ऊसतोड कामगार आणि मजुरांनी दुसऱ्या गावात स्थलांतर केले आहे. परिणामी, गेल्या वर्षी ६ असलेली विद्यार्थी संख्या या वर्षी थेट एकवर आली आहे. अधिकाऱ्यांच्या वाऱ्या प्रशासकीय यंत्रणेतील उणिवा इथे स्पष्ट दिसतात. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक अधिकारी येतात, पाहणी करतात आणि निघून जातात. कोणत्याही ठोस सुविधा दिल्या जात नाहीत. गावात साधा दवाखाना नाही. जर ही शाळा बंद पडली तर तांड्यावरील उरल्यासुरल्या लेकरांना शिक्षणासाठी तब्बल ४ किलोमीटर पायपीट करावी लागेल, जी लहान मुलांसाठी शक्य नाही.
महिला आरक्षण विधेयकावरून देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असताना, ठाकरेंच्या शिवसेनेतही अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. संसदेत महिला आरक्षणाशी संबंधित 131व्या घटनादुरुस्ती विधेयकाला आवश्यक असलेला दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने ते नामंजूर झाले. विधेयकाच्या बाजूने 298 तर विरोधात 230 मते पडली. त्यामुळे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मोठा धक्का बसला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या माजी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याचे समोर आले. मात्र, प्रियांका चतुर्वेदी यांनी पक्षाच्या भूमिकेला विरोध करत या विधेयकाचे उघड समर्थन केले. विधेयक मंजूर न होणे हा भारतीय लोकशाहीसाठी दु:खद दिवस असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. संसदेत किंवा विधानसभेत प्रवेश करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी ही मोठी निराशाजनक बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रियांका चतुर्वेदी यांनी आपली भूमिका अधिक ठाम करत, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर मी सातत्याने समर्थन करत राहणार असल्याचे सांगितले. मी स्वतःला इतरांच्या सोयीनुसार बदलणार नाही. कोणाला माझी भूमिका मान्य नसेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी मत व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून त्यांनी दूर जात स्वतःचा वेगळा मार्ग निवडल्याचे दिसून येत आहे. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रियांका चतुर्वेदी या ठाकरे गटात नाराज आहेत का, आणि त्या पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यांच्या या भूमिकेला पहिलं बंड म्हणून पाहिले जात असून, भविष्यात त्या नव्या राजकीय पर्यायाचा विचार करू शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, प्रियांका चतुर्वेदी यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ नुकताच संपला होता. पुन्हा एकदा राज्यसभेत जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र, महाविकास आघाडीने शरद पवार यांना एकमताने राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची संधी हुकली. यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा आधीपासूनच होती. चतुर्वेदी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात याच पार्श्वभूमीवर, प्रियांका चतुर्वेदी या भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांना राज्यसभेत पाठवण्यासाठी प्रयत्न केल्याचे बोलले जात असले, तरी अंतिम निर्णयात त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे आता पुढील राजकीय वाटचालीसाठी त्या कोणता मार्ग निवडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतीय सुवर्णयुगाचे शिल्पकार सम्राट अशोक यांच्या ऐतिहासिक कार्याला उजाळा देणाऱ्या राज्यस्तरीय अशोक पर्व महोत्सवा'त यंदा एक विशेष आणि प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात येत आहे. या महोत्सवात तब्बल ५०० भारतीय संविधानाच्या प्रतींचे वितरण करण्यात येणार असून, हा उपक्रम समाजात वाचन संस्कृती व संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अकोला येथे २९ एप्रिल रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘अशोक पर्व’ महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील भवनसुंदर वानखडे यांचा हा उपक्रम असून त्यांनी ५०० संविधान प्रतींचे दान देत समाजापुढे आदर्श ठेवला आहे. सामाजिक, धार्मिक उपक्रमांमध्ये सातत्याने सक्रिय असलेले भवनसुंदर वानखडे हे वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि महापुरुषांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने नेहमीच पुस्तक दानाचे कार्य करीत असतात. महोत्सवाच्या निमित्ताने भगवान बुद्ध, महापुरुषांची चरित्रे आणि भारतीय संविधान यांचे वितरण करण्यात येणार असून, हा कार्यक्रम अकोला येथे पार पडणार आहे. या उपक्रमामुळे युवकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे. दरम्यान, या उल्लेखनीय कार्याबद्दल अशोक पर्व आयोजन समितीकडून भवन सुंदर वानखडे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. संविधानाच्या ५०० प्रतींचे दान स्वीकारताना अशोक पर्व महोत्सव समितीने भवनसुंदर वानखडे यांचे आभार व्यक्त करून सन्मानही करण्यात आला. याप्रसंगी प्रा. विजय आठवले, डॉ. प्रा. बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे, अनिल गवई, प्रा. शैलेश इंगळे, विद्याधर मोहोड, सुमेध घनबहादूर, संदेश गवई, प्रा. विवेक पांडे, प्रा. सज्जन जाधव आदी उपस्थित होते. निबंध स्पर्धेसाठी दोन गट ठेवण्यात आले आहेत. पहिला गट १० ते १८ वर्षाचा असून यात सम्राट अशोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध यांच्या विचारांवर आधारित विषय आहेत. १८ वर्षांवरील खुला गटात संविधान, लोकशाही, सामाजिक परिवर्तन, मानवता व धम्मविजय यांवरील विषय आहेत. सम्राट अशोक यांचा संविधानिक मूल्यांवर प्रभाव' हा यंदाचा प्रमुख विषय असून अहिंसा, समता, न्याय, करुणा व लोककल्याणकारी राज्यकारभार या मूल्यांचा अभ्यास करण्याची संधी सहभागींस मिळणार आहे. निवडक निबंधांचे महोत्सवात सादरीकरण : उत्कृष्ट निबंधांना पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात येणार असून निवडक निबंधांचे महोत्सवात सादरीकरण होणार आहे. नोंदणी व माहितीसाठी फुले आंबेडकर शिक्षक संघटना पॅक्टो जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे यांचेशी संपर्क साधावा. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. विजय आठवले, प्रा. सुनील कांबळे, अनिल गवई, विद्याधर मोहोड, प्रा. शैलेश इंगळे, प्रा. सज्जन जाधव, प्रा. विवेक पांडे, संदेश गवई, सुमेध घनबहादूर आदींनी केले आहे. महोत्सव ठरेल परिवर्तनाची नांदी : भारताच्या इतिहासातील महान सम्राट अशोक यांच्या समता, बंधुता, लोकशाही, लोककल्याण, अहिंसेच्या विचारांचा व धोरणांचा प्रसार करून समाजात नवी दिशा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित राज्यस्तरीय अशोक पर्व महोत्सव हा परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्वास अशोक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय आठवले यांनी व्यक्त केल आहे. सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी घराघरात अशोक' ही अभिनव संकल्पना राबवण्यात येणार असल्याचे पॅक्टोचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे यांचे म्हणणे आहे. असा होणार महोत्सव : महोत्सवात व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजजागृती रॅली तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून सम्राट अशोक यांच्या स्वर्णीम इतिहासाचा उजाळा देत समाजात सकारात्मक व परिवर्तनवादी विचारांची रुजवात करण्यावर भर दिला जाणार आहे. सामाजिक व धार्मिक प्रबोधनासाठी भवन सुंदर वानखेडे यांनी पाचशे धम्मग्रंथांचे दान जाहीर केले असून हे ग्रंथ उपासक-उपासिका संघटनांना वितरित करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे अशोक विचारांचा प्रसार अधिक व्यापक होणार आहे. अशोक पर्व महोत्सव’ अंतर्गत होणार निबंध स्पर्धा राज्यस्तरीय ‘अशोक पर्व महोत्सव’ अंतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार व सामाजिक परिवर्तनाच्या मूल्यांना चालना देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्पर्धेत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्व वयोगटांतील नागरिकांना सहभागी होता येणार आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून प्रभाग क्रमांक १४ मलकापूर, शिवनी भागाला पाणीपुरवठा करणारा बुस्टर वीज पंप नादुरुस्त झाल्यामुळे या भागात पाणीपुरवठा न झाल्याने ऐन उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावा, या मागणीचे निवेदन प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक पराग गवई, नगरसेविका उज्वला पातोडे, नगरसेविका जयश्री बहादुरकर, नगरसेवक शेख समशू शेख कमर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रवीण पातोडे, सौरभ बहादुरकर यांनी मनपा आयुक्त यांना शुक्रवारी दिले. तसेच पाणीपुरवठा विभाग प्रमुख अमोल डोईफोडे यांच्यासोबत बैठक घेतली व तत्काळ पाणी समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘बूस्टर वीजपंप काही दिवसांपूर्वी दुरुस्त करण्यात आला होता. परंतु ग्रामपंचायत अस्तित्वात असतानापासूचा १४ वर्षे जुना बुस्टर पंप असल्याने वारंवार तो जळून नादुरुस्त होत आहे. परिणामी मलकापूर, शिवणी परिसरासह वाढीव वस्तीतील नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. दरवर्षी उन्हाळा आला की वाढत्या तापमानामुळे हा बुस्टर पंप नादुरुस्त होतो. या पंपाची कार्यक्षमता संपल्याने मलकापूर शिवनी करता नवीन बूस्टर पंप उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक पराग गवई यांनी केली आहे. मलकापूर, शिवनी भागात तसेच प्रभागातील अनेक भागांमध्ये पाण्याची जलवाहिनी नसून, तसेच अनेक भागांमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतची पाण्याची जुनी जलवाहिनी आहे. त्यामध्ये पाणी येत नाही. त्यामुळे त्या भागात पाण्याची कुठली व्यवस्था नाही. अकोला शहरातील उन्हाळा बघता नागरिकांना पाण्यासाठी कुठले त्रास होऊ नये. तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये करता टँकरची व्यवस्था करण्यात यावी तसेच प्रभागातील बंद पडलेले हॅन्ड पंप दुरुस्त करून देण्यात यावे. तसेच खडकी ते मलकापूर या भागात नवीन मोठी पाण्याची जलवाहिनी टाकण्यात यावी.’ अशी मागणी देखील परिसरातील नागरिकांकडूनवारंवार करण्यात येत आहे.
जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सतत बदलत्या हवामानात शेतकरी, शेतमजूर, कामगार, मजूर, आशा सेविका यांचे उन्हापासून संरक्षण व त्यांची शारीरिक क्षमता मजबूत करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे ‘इंटिग्रेटेड क्लायमेट रिस्क मॅनेजमेंट इन इंडिया' (इन क्रिस) हा प्रकल्प जिल्ह्यात राबवला जात आहे. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट जिल्ह्यातील सर्वात असुरक्षित घटक, म्हणजेच शेतकरी आणि कृषी कामगारांचे उर्वरित. पान ४ ^शहरासह जिल्ह्यातील तापमानात सतत वाढ होत आहे. शुक्रवारी १७ रोजी कमाल तापमान ४४.४ तर किमान तापमान २३.४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. २० एप्रिलपर्यंत सतत तापमान वाढणार असल्याने नागरिकांनी उन्हापासून स्वत:चे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यानंतर काही दिवस उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. - प्रा. अनिल बंड, हवामानतज्ज्ञ. सकाळी ११ नंतर सायंकाळी ५.३० पर्यंत काम करू नये ^जिल्ह्यात तापमान ४४ अंशावर पोहोचल्याने शेतकरी, शेतमजूर, कामगार, घरकामगार, मजूर, आशा सेविका, कटल्यावर साहित्याची वाहतूक करणाऱ्यांनी वाढत्या तापमानात स.११ वाजतानंतर तसेच सायंकाळी ५.३० वाजताच्या आधी काम करू नये. कारण, त्यांना उष्माघाताचा धोका होऊ शकतो. तसेच सतत घाम येत असल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊन डीहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते. कारण, सध्या वाढते तापमान अपायकारक ठरू शकते. त्यामुळे धोका कोणीही पत्करू नये. - डॉ. वसंत लुंगे, राष्ट्रीय सहसचिव, आयएमए.
जिल्ह्यातील बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नगदी, रोखीचे व्यवहार रखडले आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण, आदिवासी भागातील अर्थव्यवस्थेवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कारण, शहरात बहुतांश लोक हे युपीआय, फोन पे, गुगल पे, ऑनलाईन पैशाचे व्यवहार करतात. परंतु, ग्रामीण भागात अजुनही रोख रकमेशिवाय भागत नाही. शेतमजूर, कामगारांना रोख रक्कमच द्यावी लागते. ती थकली आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ५० लाखाची मागणी केल्यास फारतर २० ते २५ लाख रुपये रोख पाठवली जात असून त्यातच भागवावे लागत असल्याचे बँक व्यवस्थापकांचे म्हणणे आहे. ही परिस्थिती निवळण्यास किमान एक आठवडा लागेल, असे बँक व्यवस्थापकांनी सांगितले. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मजुरी देण्यासह शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यात अडथळे येत असून आर्थिक नियोजन कोलमडले आहे. तसेच व्यापाऱ्यांनाही रोख रकमेअभावी व्यवहार करणे कठीण जात आहे. जिल्ह्यात अमरावतीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे उर्वरित. पान ४ ^रोख रक्कम उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर चुकारा करणे कठीण होत आहे. त्यामुळे आमचे व्यवहार अडचणीत आले आहेत.बँकांनी बाजाराच्या दिवशी पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध करून द्यावी, मेळघाटातील बहुतांश गावामध्ये ऑनलाईन सुविधा नसल्यामुळे शेतकऱ्यांना नगदीच चुकारा लागतो. मात्र, बँकेत नगदी मिळत नसल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. - सतीश व्यास, संचालक, कृउबास अचलपूर सुटीचे दिवस, सण-उत्सव, पर्यटन तसेच लग्न सराई असल्याने सर्वांनाच रोख रकमेची आवश्यकता आहे. अशात एटीएममधील रोख लवकर संपत आहे. कारण, बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे मागितलेल्या रोख रकमेच्या तुलनेत त्यांच्याकडे निम्मी रोख रक्कम येत असल्याने त्यांनाही एटीएममध्ये सध्या विचारपूर्वक रोख रक्कम टाकावी लागत आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी अशी स्थिती असल्याने एटीएम रिकामे होत आहेत. नरेश हेडाऊ, शिखर बँक व्यवस्थापक एटीएममधील रोखही लवकर संपत आहे आमचे सध्याचे व्यवहार अडचणीत आलेत रोज २० लाखाची मागणी, पण रोखच नाही आम्ही दररोज २० लाखाची मागणी करतो. परंतु, जिल्ह्यात सर्वच बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा आहे. कारण बँकेत रोखच येत नाही. क्षेत्रिय कार्यालयालाकडून पुढच्या आठवड्यात रोख येईल असे सांगण्यात आले आहे. तोवर आम्हालाकाही करता येणार नाही. - मंगेश भुरे, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक, घाटलाडकी
तालुक्यात यावर्षी प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची लागवड करण्याचा ठाम निर्णय शेतकरी संघटनेने घेतला असून, या संदर्भात शुक्रवारी १७ रोजी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. शेतकरी संघटनेच्या मते, एचटीबीटी बियाणे तणनाशक सहनशील असल्यामुळे शेतीतील उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. सध्या मजुरांची टंचाई, वाढते फवारणी व खतांचे दर यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत एचटीबीटी बियाण्यांमुळे अतिरिक्त खर्चावर नियंत्रण मिळवता येईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा दावा संघटनेने केला आहे. सोबतच शासनाने या बियाण्यांवर बंदी घातल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकार परदेशातून एचटीबीटी संबंधित सोयाबीन, सोयाबीन तेल आणि पेंड आयात करत असताना देशातील शेतकऱ्यांना त्याच बियाण्यांची लागवड करण्यास बंदी घालणे हे दुटप्पी धोरण असल्याचा आरोपही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, शेतकरी संघटनेने जाहीरपणे एचटीबीटी बियाण्यांची लागवड करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, सरकारने शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव गावंडे, अंजनगाव तालुका अध्यक्ष संजय हाडोळे, स्वतंत्र भारत पक्षाचे तालुकाध्यक्ष गजानन दुधाट, जिल्हा समन्वयक मनोहर रेचे, सुनील साबळे, जिल्हा उपाध्यक्ष देविदास ढोक, अशोक गीते, मोहन ठाकरे, संजय हिंगे, बाबूराव साबळे, अरुण गोंडचोर, मधुकर मोरे, ज्ञानेश्वर वानखडे, प्रभाकर डोंबाळे, विनोद चिंचोळकर, विलास धुमाळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
शहरातील मोर्शी ते सिंभोरा रोडलगत असलेल्या बालाजी नगरातील खुल्या जागेवर नमो उद्यान साकारण्यात यावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. संतप्त नागरिकांच्या वतीने शेकडो सह्यांचे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनाची प्रतिलिपी आ. चंदू यावलकर यांना देण्यात आली. शहर विकासाच्या दृष्टीने नमो गार्डनचे एक मॉडेल तयार करण्यात आले आहे. हे मॉडेल भव्य-दिव्य परिसर असलेल्या बालाजी नगर येथील शिवपार्वती मंदिरासमोर, मोर्शी ते सिंभोरा रोडलगत असलेल्या जागेवर साकारण्यात यावे, असा मानस तेथील नागरिकांनी आ. यावलकर यांच्याकडे व्यक्त केला. आता निवडणुकीदरम्यान सत्ता स्थापन झाल्यानंतर नगरपरिषदेच्या वतीने हे नमो उद्यान बालाजी नगरऐवजी शहरातील मालवीय गार्डन येथे स्थानांतरित करण्याचा घाट घातला आहे. याला नागरिकांचा विरोध आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या मालवीय नगरातील उद्यानाची पूर्णपणे दुरुस्ती करण्यासाठी नगरपरिषदेने ठराव घेऊन १ कोटीच्या निधीचे इस्टिमेट तयार केले. बालाजी नगर येथे होणाऱ्या नमो उद्यानाचा निधी मालवीय गार्डन येथे तयार असलेल्या उद्यानावर खर्च केला जात असल्याची माहिती बालाजी नगर येथील नागरिकांना मिळाली. त्यांनी संबंधित नगरसेवकांकडे धाव घेऊन नमो उद्यानाची निर्मिती शिवपार्वती मंदिरासमोरील खुल्या जागेवरच व्हावी, अशी मागणी रेटून धरली. या प्रकल्पासाठी सुमारे ९९ लाख ९९ हजार ८९९ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मात्र मालवीय गार्डन येथील उद्यानात जॉगिंग ट्रॅक, गार्डन, बेंचेस, वृक्षारोपण, लाईट व सोलर लाईट यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. तरीदेखील याच कामांसाठी पुन्हा खर्च दाखविण्यात आल्याने संतप्त नागरिकांनी आर्थिक अनियमिततेचा संशय व्यक्त केला आहे. बालाजी नगर येथील शिवपार्वती मंदिरासमोर असलेल्या ओपन प्लेसमध्येच नमो उद्यानाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका प्रीती देशमुख यांनी केली आहे. नमो उद्यान हे नवीन जागेवरच विकसित करण्यात यावे, असा शासनाचा जीआर आहे. त्या अनुषंगाने बालाजी नगर येथील शिवपार्वती मंदिरासमोर असलेला खुला परिसर निश्चित करण्यात आला होता, अशी माहिती आ. चंदू यावलकर यांनी दिली.
शहराचा चेहरामोहरा बदलण्यासोबतच नागरी सुविधांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता विकासात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांनी शुक्रवार १७ रोजी सकाळी ६.३० वाजता शहरातील विविध भागांचा प्रत्यक्ष दौरा करून सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. शहर स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. अशा सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. दस्तूर नगर येथील झोन क्रमांक ३ मधील कचरा संकलन केंद्राची पाहणी करून संपूर्ण केंद्र स्वच्छ, सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. शहराचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी कचरा संकलन केंद्रे सुस्थितीत ठेवण्याला महानगरपालिकेचे प्राधान्य आहे. त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. पावसाळ्यापूर्वीची पूर्वतयारी म्हणून नाल्यांची नियमित साफसफाई करण्यावर महानगरपालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेस नगर परिसरातील नाल्यांच्या पाहणीदरम्यान नाल्यात हॉकर्स व काही नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. यावर कठोर भूमिका घेत नाल्यात कचरा टाकला जाणार नाही. नाल्याची नियमित साफसफाई केली जावी. असे निर्देश देण्यात आले. यावेळी नाल्यांमध्ये गाळ साचणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ऑक्सिजन पार्क परिसरात पाहणीवेळी रस्त्याच्या कडेला असलेले बांधकाम साहित्य हटवण्याबाबत नागरिकांना व व्यावसायिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले. विशेषत: ऑक्सिजन पार्कसारख्या सार्वजनिक ठिकाणी साहित्याची साठवणूक टाळावी. शहराच्या सौंदर्यीकरणात सर्वांनी हातभार लावावा. अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली. शहराचा विकास हा केवळ प्रशासकीय प्रयत्नांनी नव्हे. तो लोकसहभागातून अधिक प्रभावी होतो. असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. नागरिकांनी आपला घरगुती कचरा घंटागाडीतच द्यावा. सार्वजनिक स्वच्छता राखावी. महानगरपालिकेला सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी केले. अमरावतीला एक आदर्श शहर बनवण्यासाठी प्रशासन व नागरिक यांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी सकारात्मक पाऊल ऐतिहासिक छत्रीतलाव परिसराला भेट देऊन त्याचा विकास करून त्याला पर्यटनस्थळाचे स्वरूप देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वडाळी उद्यानाला भेट देऊन त्याचे पूर्वीचे वैभव परत मिळवण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. असे आयुक्त म्हणाल्या. या प्रकल्पांना गती देऊन शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी प्रशासन सकारात्मक पावले उचलत आहे. तसेच उद्यानांची नियमित स्वच्छता व देखभाल करण्याबाबतही संबंधित यंत्रणेला मार्गदर्शन करण्यात आले.
सांगोला तालुक्यातील शेतीला आधार देणाऱ्या माण आणि कोरडा नद्यांवरील १८ बंधारे सध्या पाण्याअभावी कोरडे पडल्याने शेतकऱ्यांसमोर भीषण संकट उभे राहिले आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने नदीपात्रात पाणी साचले नाही, परिणामी ३३०० हेक्टर क्षेत्रातील पिके आता वाळण्याच्या मार्गावर आहेत. शेतीसोबतच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला असून, प्रशासन कधी पावले उचलणार, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. तालुक्यातील माण नदीवर १७ आणि कोरडा नदीवर २ असे एकूण १९ बंधारे आहेत. यापैकी १८ बंधाऱ्यात पाणीसाठा शून्य झाला आहे. यामुळे खवासपूर, नाझरे, वाटंबरे, कडलास, मेथवडे यासह १७ गावांतील शेतकरी त्रस्त आहेत. नदी कोरडी पडल्याने विहिरी आणि बोअरवेलची पाणी पातळीही खालावली आहे. साधारण ३० टक्के बागायत आणि ७० टक्के उन्हाळी पिके कडक उन्हामुळे होरपळत आहेत. १९ पैकी १० ते १२ बंधाऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. त्यामुळे हे बंधारे पूर्ण क्षमतेने भरता येत नाहीत. नियमानुसार दोन वर्षांत दरवाजे बदलणे अपेक्षित असताना, कंत्राटदार केवळ दरवाजे काढण्या-बसविण्याचे काम करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. ^नदीवरील दोन बंधाऱ्या मधील अंतर ३.५ किमी आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह जास्त होत असतो. बंधाऱ्यावरील दरवाजे कंत्राटदार योग्य प्रकारे व पूर्ण दरवाजे काढून बसवत नाहीत. अर्धवट दरवाजे काढल्यामुळे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला गाळ साचल्याने पाणी निचरा व साठा होत नाही. त्याकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत आहे. वैजनाथ घोंगडे, माण नदी पुनर्वसन अभ्यासक ^दरवाजे बदलण्याकडे दुर्लक्ष करून कंत्राटदार केवळ थातूरमातूर कामे करत आहेत. वारंवार मागणी करूनही प्रशासन पाणी नियोजनाकडे दुर्लक्ष करत आहे. रघुनाथ पाटील (शेतकरी, नाझरे) . टेंभूच्या पाण्याची मागणी: उन्हाळी पिके वाचवण्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याची मागणी वारंवार होत आहे, मात्र अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. . तलावांची स्थिती: चिंचोली, जवळा आणि घेरडी तलावात काही प्रमाणात पाणी आहे, तर अचकदाणी भरण्याचे काम सुरू आहे. हंगिरगे तलाव मात्र पूर्णपणे रिकामा आहे. . पिण्याचे पाणी: तालुक्यातून अद्याप टँकरची मागणी झालेली नाही, शिरभावी योजनेतून पिण्याचा पाणीपुरवठा सध्या सुरू आहे.
श्री स्वामी समर्थ सद्गुरु बेलानाथ महाराजांच्या राजेराय मठ येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४८ वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पंधरा दिवस चाललेल्या या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल होती. विशेष म्हणजे, हे वर्ष मठातील पादुका स्थापनेचे १५० वे वर्ष असल्याने या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी, १५ एप्रिल रोजी पहाटे दोन वाजता काकड आरती व महापूजा करण्यात आली. सकाळी १० ते १२ या वेळेत स्थानिक व बाहेरगावच्या भक्तांच्या हस्ते श्रींच्या पादुकांवर सामुदायिक अभिषेक पार पडला. दुपारी महाआरती व महानैवेद्य दाखवून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले, ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या धर्मसंकीर्तन सोहळ्यात भजन, कीर्तन, प्रवचन तसेच भरतनाट्यम आणि कथक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. १६ एप्रिल रोजी बेला समर्थ महिला मंडळाच्या उपस्थितीत गोपाळकाल्याने या पंधरा दिवसांच्या उत्सवाची सांगता झाली. या महोत्सवासाठी मठाचे अध्यक्ष ॲड. शरद फुटाणे, उपाध्यक्ष विकास दोडके, पुण्यतिथीनिमित्त पनवेलचे अनुराग घरत, कोल्हापूरचे विराज धोंगडे आणि पुण्याचे विशाल धुमाळ यांनी मंदिरात व गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास केली होती. सोलापूरच्या वज्रेश्वरीताई गाजूल यांच्या मार्गदर्शनाखाली हरिनाम महिला मंडळाने महाप्रसाद वितरण व स्वच्छतेची सेवा बजावली. तसेच ज्योती झिप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ९५ महिलांनी गुरुलीलामृत पोथीचे पारायण केले. या महिला मंडळाने मठाला श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या ७५ प्रति आणि एक हार्मोनियम भेट स्वरूपात दिले. सायंकाळी ६ वाजता राजेराय मठातून भव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. या पालखीमध्ये नाशिककर महाराज दिंडी, हसापूरचे जय हनुमान भजनी मंडळ, चाकणचे मोरया ढोल पथक, अक्कलकोटचे दावल व दरबार बँड, हालहळीचे सनई-हलगी पथक आणि तुतारीच्या निनादाने वातावरण भारावून गेले होते. मुंबईचे नाट्यकर्मी मयूर मुरलीधर यांनी सादर केलेला श्रींचा जिवंत देखावा आकर्षणाचे केंद्र ठरला. पालखी मार्गावर महिलांनी पंचारतीने ओवाळून व प्रसाद वाटप करून दर्शन घेतले. दोडके, सचिव प्रा. किसन झिपरे, विश्वस्त ॲड. अनिल मंगरूळे, दत्तात्रय मोरे, विजयकुमार गाजूल, पद्माकर डीगे, सुरेश डिगे, शिवानंद फुलारी, महेश कलशेट्टी, वैशाख डिगे, ओंकार दोडके, ॲड. श्रद्धांक झिपरे यांच्यासह मठाचे सेवेकरी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. वाद्यांच्या गजरात निघाली भव्य पालखी
मिरवणुकीचा खर्च टाळत बुद्ध विहाराचे सुशोभीकरण:भाजप नेत्या रश्मी बागल यांच्याकडून अभिवादन
करमाळा तालुक्यातील मांगी गाव नेहमीच सामाजिक आणि आदर्श उपक्रमामुळे चर्चेत राहिले आहे. याच परंपरेला पुढे नेत दि. १४ एप्रिल रोजी भारताचे संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘नाचून नाही, तर वाचून’ या संदेशानुसार अत्यंत साधेपणाने आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. १३ एप्रिल रोजी मध्यरात्री महामानवांना अभिवादन करत फटाक्यांची आतषबाजी केली आणि भीमगीतांचा आनंद घेत जन्मोत्सव साजरा केला. पंचशील बुद्ध विहार परिसरात सडा-रांगोळी काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. यावर्षी मिरवणूक व इतर खर्चाला फाटा देत बुद्ध विहाराच्या सुशोभीकरणावर भर देण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक या आदर्श जयंती उपक्रमाबद्दल सुजित बागल यांनी आपल्या भाषणात कमिटीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. मांगी गावातील या उपक्रमाचे करमाळा तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे. यावेळी मांगी गावातील नागरिकांसह घूमट वस्ती व राजवाडा परिसरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वेळापूर (ता. माळशिरस) येथील श्री बृहन्मठ या वीरशैव लिंगायत धर्मातील मोठ्या मठांपैकी एक असलेल्या मठाचे मुक्तेश्वर शिवाचार्य यांचा अमृत महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रम आणि भव्य मिरवणुकीने साजरा करण्यात आला. या महोत्सवानिमित्त मठाचे शिवाचार्य सदाशिव यांनी ३ दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पहिल्या दिवशी ध्वजारोहणाने शुभारंभ झाला. गुरुगादीस रुद्राभिषेक, गणेशयाग व महारुद्रयाग स्वाहाकार, भजन-कीर्तन, संगीत आणि नवचंडी याग पार पडले. सायंकाळी मुक्तेश्वर शिवाचार्य यांची नाणे, श्रीफळ, पेढा, दूध, गहू, गूळ व तांदूळतुला झाली. मिरवणूक आणि सुवर्ण पट्टाभिषेक सायंकाळी ७ वाजता पालखी मैदान, काळा मारुती मंदिर, व्यापारी पेठ ते श्री बृहन्मठ या मार्गावरून पंचाचार्य जगद्गुरूंची भव्य अड्डापालखी व शिवाचार्य मिरवणूक सोहळा संपन्न झाला. कलशधारी महिला, भजन, ढोल-ताशा आणि पारंपारिक नृत्याने मिरवणुकीची शोभा वाढवली. विद्युत बग्गी व छत्री आकर्षणाचे केंद्र ठरली.
33 केव्ही लाईन हटवण्यासाठी महावितरणवर महिलांचा ठिय्या
मोहोळ शहरातील बागवान नगर आणि अहिल्यानगर परिसरात घरावरील ३३ केव्ही विद्युत वाहिनीचा शॉक लागून एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि महिलांनी मंगळवारी (१६ एप्रिल) महावितरणच्या कार्यालयावर धडक देत सकाळपासून ठिय्या आंदोलन मांडले. अखेर प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत ही धोकादायक लाईन अन्य मार्गाने वळवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले. दि. १५ एप्रिल रोजी बागवान नगरमधील लक्ष्मी विजय आदलिंगे (वय ३२) या यात्रेनिमित्त घराच्या स्लॅबवर स्वच्छता करत होत्या. यावेळी वरून गेलेल्या ३३ केव्हीच्या उच्च दाबाच्या वाहिनीने त्यांना ओढून घेतले. विजेचा तीव्र झटका बसल्याने त्या गंभीर जखमी होऊन खाली कोसळल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत महिला आणि ज्येष्ठ नेते पद्माकर देशमुख, नगरसेवक चैतन्य देशमुख, सरफराज सय्यद, नाना मांडवे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जोपर्यंत लाईन बदलली जात नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी ठाम भूमिका घेण्यात आली. अखेर उपकार्यकारी अभियंता जी. जी. पटवेगार आणि शहर अभियंता नागेश खडतरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून ३० एप्रिलपर्यंत लाईन शिफ्ट करण्याचे लेखी पत्र दिले. या आंदोलनात पद्माकर देशमुख, नाना मांडवे, सरफराज सय्यद, लखन ठोंबरे, बिलाल मोमीन, सचिन बनसोडे यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकवस्ती परिसरातील धोकादायक ३३ केव्ही लाईन ३० एप्रिलपर्यंत अन्य मार्गाने शिफ्ट केली जाईल, असे लेखी आश्वासन वीज वितरण कंपनीच्या वतीने देण्यात आले आहे. महावितरणचे आश्वासन
वाशिंबे उजनी लाभक्षेत्रात विद्युत पंपातील वायडींग तारा तसेच विद्युत पंप चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उंदरगाव व सोगाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी विद्युत पंपाच्या आतील वायडींग तारा तसेच संपूर्ण पंप चोरीच्या घटनासमोर आल्या आहेत. या घटनांमुळे ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उंदरगाव (ता. करमाळा) येथे रविवार (दि. १२) रोजी अमोल महादेव बोबडे (रा. वाशिंबे) यांच्या १२ एचपी क्षमतेच्या विद्युत पंपातील वायडींग चोरीला गेले. तसेच मगर या शेतकऱ्याच्या ७ एचपी पंपातील वायडींगही चोरट्यांनी लंपास केले. यापूर्वी सोगाव पश्चिम येथे शनिवार (दि. ११) रोजी रामहरी दत्तात्रय गोडगे यांचा १२ एचपी विद्युत पंप तसेच त्याच दिवशी गोरख पाखरे यांचा १० एचपी पंप चोरीला गेला होता. या सलग घटनांमुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उजनी लाभक्षेत्रातील वाशिंबे, खातगाव, केतूर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी गस्त वाढवून अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी स्थानिकांकडून होत आहे. ^विद्युत पंप चोरीच्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिस प्रशासना कडून तपास सुरू आहे. नागरिकांनी संशयित व्यक्तींबाबत माहिती देऊन सहकार्य करावे,माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल. तसेच या घटनांना आळा घालण्यासाठी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे संदीप बनकर, पोलिस उपनिरीक्षक, करमाळा ग्रामीण पोलीस आरोपींवर कठोर कारवाई करावी ^मागील अनेक दिवसांपासून उजनी जलाशय परिसरातील खातगाव, केतूर, पारेवाडी, वाशिंबे, सोगाव पश्चिम व पूर्व आणि उंदरगाव येथे विद्युत पंप तसेच त्यातील वायंरिंग, मोटार स्टार्टरं इत्यादी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या शेतीवर गंभीर परिणाम होत आहे. या संदर्भात अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रारी दाखल करूनही अद्यापपर्यंत कोणत्याही घटनेत ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले असून चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन आरोपींवर कठोर कारवाई करावी. अँड. मनोज घनवट, शेतकरी, सोगाव उजनी लाभक्षेत्रात विद्युत पंप व त्यातील वायंडिंग चोरीच्या घटनांनी मोठा उच्छाद मांडला आहे. वारंवार घडणाऱ्या या चोरीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून पोलीस यंत्रणा निष्क्रिय असल्याची टीका होत आहे. चोरीची पद्धत सारखीच असल्याने एकाच टोळीचे कारस्थान असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या घटनांमुळे चोरट्यांचा वाढलेला आत्मविश्वास स्पष्ट दिसून येत आहे.आत्मविश्वास दूणावलेले चोरटे पोलिसांना खुलेआम आव्हान देत आहे.अनेक दिवसांपासून विद्युत पंप व वायंडींग चोरीच्या घटना सुरू असूनही पोलिसांना चोरटे सापडत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बार्शी तालुक्यातील मुंगशी व परिसरातील दहिटणे, सासुरे, राळेरास, तडवळे, यावली, इर्लेवाडी आदी गावांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. या अस्मानी संकटामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून, हातातोंडाशी आलेल्या बेदाण्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. वर्षभर पोटच्या लेकराप्रमाणे जोपासलेल्या द्राक्ष बागेवर एका क्षणात पाणी फेरले गेल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. मुंगशी येथील शेतकरी अर्जुन श्रीपती क्षीरसागर यांनी दोन दिवसांपूर्वीच जालिंदर राऊत यांच्या शेडवर आपला द्राक्षाचा माल बेदाणा करण्यासाठी टाकला होता. मात्र, अचानक आलेल्या वादळाने शेडवरील शेडनेट आणि कागद फाडून टाकले. जोराच्या पावसामुळे शेडवर असलेला अंदाजे ७ ते ८ टन बेदाणा भिजल्याने त्याचा अक्षरशः चिखल झाला आहे. द्राक्ष बागेसाठी महागडी औषधे, खते आणि मजुरीवर केलेला अमाप खर्च आता वाया गेला आहे. काही शेतकऱ्यांचे पीक अजूनही झाडावरच आहे, तर काहींनी माल शेडवर वाळत घातला होता. या अस्मानी संकटामुळे उत्पादनाऐवजी कर्जाचा डोंगर उभा राहण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून भरीव मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अवकाळीच्या फटक्याने केवळ पिकांचेच नव्हे, तर शेडचेही मोठे नुकसान झाले आहे. आता प्रशासन कधी धावून येणार, याकडे बळीराजाचे डोळे लागले आहेत. ^वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटातून सावरण्यासाठी शासनाने त्वरित मदत करणे आवश्यक आहे. अजय क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक शेतकरी, मुंगशी ^अफाट झालेला खर्च आणि वाढती महागाई यामुळे शेतकरी आधीच संकटात आहे. त्यातच या वादळी पावसाने बेदाण्याचे मोठे नुकसान केले आहे. अर्जुन क्षीरसागर, नुकसानग्रस्त शेतकरी, मुंगशी त्वरित मदत करावे
अमळनेर तालुक्यातील मारवडयेथील प्राथमिक आरोग्य केंद्राचाभोंगळ कारभार समोर आला आहे.गुरुवारी रात्री उपचारासाठीआलेल्या एका बालिकेला आरोग्यकेंद्राला कुलूप असल्यानेउपचाराविना परतावे लागले. याप्रकारामुळे खेडी येथील ग्रामस्थांनीतीव्र संताप व्यक्त केला असून हेआरोग्य केंद्र नक्की कुणाच्याभरवशावर सुरू आहे, असा प्रश्नउपस्थित केला जात आहे. तालुक्यातील खेडी येथील प्रवीणजगन्नाथ पाटील यांची मुलगीगुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारासघरात चक्कर येऊन पडली.त्यामध्ये ती जखमी झाली. गावातवैद्यकीय सुविधा नसल्यामुळे तिचेवडील तिला तातडीने मारवडयेथील प्राथमिक आरोग्य केंद्रातघेऊन गेले. मात्र, कोट्यवधी रुपयेखर्च करून उभारलेल्या या सुसज्ज आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वारालाच कुलूप होते. रात्रपाळीत एकही वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी तेथे उपस्थित नव्हता. अखेर उपचार न मिळाल्याने वडिलांना आपल्या जखमी मुलीला घेऊन माघारी फिरावे लागले. मारवड हे पंचक्रोशीतील मुख्य आरोग्य केंद्र असून त्याअंतर्गत चार उपकेंद्रे येतात. मात्र, मुख्य केंद्रातच सेवा कोलमडली असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेबाबत खेडी येथील ग्रामस्थ तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. अशी माहिती ग्रामस्थांनी यावेळी दिली. दोन दिवसांत कर्मचारी रात्री उपस्थित राहणार सध्यास्थितीत दवाखान्यासहकर्मचारी निवासाचे बांधकाम सुरु आहे. विजेची सुविधा नसल्यानेकर्मचाऱ्यांना रात्रपाळीस अडचणीयेतात. त्यामुळे ते उपस्थित राहूशकले नाहीत. दोन ते तीन दिवसातकर्मचारी उपस्थित राहतील. असेवैद्यकीय अधिकारी डॉ. साहिलचौधरी यांनी सांगितले.
शहरासह जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून सूर्याचा प्रकोप वाढला आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक होरपळून निघाले आहेत. ९ एप्रिलला ३४ अंशांवर असलेला पारा अवघ्या नऊ दिवसांत ४२ अंशांपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी (१७ मार्च) शहराचे तापमान ४० अंशावर होते. दिवसभर कडक उन्हाबरोबर सायंकाळी काहीसे ढगाळ वातावरण तयार झाल्याने वातावरणात उकाडा वाढला होता. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शनिवारपासून, १८ एप्रिल उन्हाळी सुट्टी लागेपर्यंत शाळा सकाळी ७ ते ११ या वेळेतच भरतील. ९ एप्रिलपासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. १२ एप्रिलला पारा ४० अंशांवर गेला, तर १५ एप्रिलला तो ४२ अंशांपर्यंत पोहोचला होता. शुक्रवारी (१७ एप्रिल) तापमान ४० अंशांवर होते, मात्र उन्हाची तीव्रता कायम होती. सायंकाळी ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात अधिकच वाढ झाली आहे.रात्रीचा उकाडा अधिक प्रमाणात जाणवत होता. यापुर्वी मार्चमध्ये ३९ अंशावर तापमान गेले होते. त्यानंतर १९,२० मार्चला ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली होती. १ ते ३ एप्रिल या कालावधीत देखील ढगाळ वातावरण व अवकाळी पाऊस झाला होता. त्यानंतर ५ एप्रिलपासून तापमानात वाढ होऊ लागली होती. का बदलले वातावरण? कमी दाबाचा पट्टा: दक्षिण भारत ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. ४० अंशांवरील तापमानामुळे स्थानिक पातळीवर बाष्पीभवन वेगाने होत असून अरबी समुद्राकडून आर्द्रता येत आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाऱ्यांच्या मिलाफामुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे. { तीव्र उष्णतेनंतर आता जिल्ह्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाने १९ ते २१ एप्रिल दरम्यान जिल्ह्यासाठी 'येलो अलर्ट' जारी केला आहे. { वादळी वारे: ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता. { विजांचा कडकडाट: विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज. { कारण: दक्षिण भारत ते मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून अरबी समुद्राकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे वातावरणात अस्थिरता निर्माण झाली आहे.
घराघरात आलेल्या मोबाइलने बालकांचे बालपण हिरावून घेतले आहे. आजच्या काळातील उपलब्ध सुख साधनांचा कसा आणि किती प्रमाणात वापर करायचा हे कळले पाहिजे. बालमनावर सुसंस्कार करण्यासाठी मातापित्यांनी वेळ दिलाच पाहिजे. करिअरच्या मागे धावताना उत्तम जगण्याचा आनंद घेणे राहून गेले, असे व्हायला नको. ज्या घरात महिला आनंदी असतात त्याच घरात धनाचा वर्षाव होतो. घरातील सर्वांनी एक-दुसऱ्यांच्या सुखाचा विचार केला तर संपूर्ण परिवार सुखी होतो. इतरांचे दोष पहाण्यापेक्षा आपण आपलेच दोष शोधून ते घालवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन राधाकृष्ण महाराज यांनी केले. रामनिवास सतीशचंद्र इंदाणी आणि इंदाणी परिवारातर्फे नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्समध्ये आयोजित केलेल्या श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे सातवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. भाविकांना मार्गदर्शन करताना राधाकृष्ण महाराज म्हणाले, गोवर्धन पूजा उत्सव हा श्रीकृष्ण दर्शनाचा उत्सव आहे. सुदामाने श्रीकृष्णासाठी स्वतःकडे दारिद्र्य ओढवून घेतले. सकाळी उठल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाचे नाव घ्यावे. दररोज श्रीकृष्णांचे चरणामृत घ्यावे. गंगाजल घ्यावे. आपल्या कल्याणाचा मार्ग सोपा होतो. देवघरात मूर्ती, फोटोतील चित्र पाहू नका तर प्रत्यक्ष देवच बसले आहेत, असा भाव ठेवा. भगवंताच्या नामस्मरणाचे, त्यांच्या दर्शनाचे सुख अनुभवा. आपण मंदिराची पायरी चढलो तरी आपले अमंगल नष्ट होण्यास सुरुवात होते. संसारातील विषय सतावू लागले की, भगवान श्रीकृष्णांचे दर्शन करा. सांदिपनी आश्रमात ६४ कलांचे ज्ञान संपादन केलेल्या श्रीकृष्णांच्या सद्गुणांना समजून घेण्याचा प्रयत्न करत स्वतःलाच श्रीकृष्ण चरणी समर्पित करा. भागवत कथा श्रवण करण्यासाठी शहर आणि उपनगरासह जिल्ह्यामधून आणि जिल्ह्याबाहेरूनही भाविक आल्याने गर्दीचा उच्चांक होत राहिला. उपस्थित सर्वांसाठी उत्तम, सात्विक आणि दर्जेदार महाप्रसादाची व्यवस्था इंदाणी परिवारातर्फे करण्यात आली होती. हजारोंच्या संख्येतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भक्तिपूर्ण वातावरणात कथा सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील कुंभार गल्ली येथे संत गोरोबा काका समाधी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त आरोग्य शिबीर घेण्यात आले. स्थानिक नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच विविध कीर्तन, भजन व धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरण अधिकच भारावून गेले. यावेळी आमदार संग्राम जगताप, पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे उपस्थित होते. मान्यवरांनी संत परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत अशा कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते, असे मत व्यक्त केले. आ. जगताप म्हणाले, संत गोरोबा काका यांची शिकवण ही समाजाला एकत्र आणणारी आणि माणुसकीची जाणीव करून देणारी आहे. अशा धार्मिक सोहळ्यांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तरुण पिढीला संस्कारांची दिशा मिळते. पुढील काळातही अशा उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. कुंभार गल्ली समितीचे अध्यक्ष जयकुमार सुसरे, उपाध्यक्ष राहुल देवतरसे तसेच संत गोरोबा काका मंडळ व शिरोमणी प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.
‘दाक्षायणी’च्या यात्रेची उद्या सांगता:2 दिवस शिल्लक राहिल्याने लासूरगावकडे ओघ
लासूरगाव (ता. वैजापूर) येथील मराठवाड्याची कुलस्वामिनी श्री देवी दाक्षायणी मातेच्या यात्रेला आता दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. १९ एप्रिलला अक्षय तृतीया, रविवारी दाक्षायणी देवीच्या यात्रेची सांगता होणार आहे. शुक्रवार देवीचा शेवटचा वार असल्याने १७ एप्रिल रोजी मंदिरात आतापर्यंतच्या तुलनेत सर्वाधिक गर्दी झाली होती. दिवसा उन्हामुळे सायंकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत मंदिर भाविकांनी फुलून गेले होते. कात्रड (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथील देवीचे भक्त पोपटराव लांडगे यांनी समर्थ अर्थमूव्हर्स मित्र मंडळाकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. मंदिराच्या वतीने पोपटराव लांडगे यांचा सत्कार करण्यात आला. ५ एप्रिल रोजी श्री देवी दाक्षायणी मातेच्या वस्त्रालंकाराने यात्रेला सुरुवात झाली होती. आतापर्यंत तीन लाखांवर भाविकांनी दर्शन घेतले आहे. उष्णतेमुळे दिवसा कमी. रात्री गर्दी वाढत आहे. वैजापूरचे तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या संकल्पनेतून दर्शन रांगेतील भाविकांना पूजा व आरतीचा मान देण्याची परंपरा सुरू आहे. तेरा दिवसांत दररोज तीन वेळा होणाऱ्या आरतीचा मान ३९ सपत्नीक भाविकांना मिळाला. यात्रा उत्सवाच्या अनुषंगाने मंदिरातील संपूर्ण व्यवस्थापन. भाविकांच्या सुविधांचा आढावा दररोज दोन वेळा घेतला जातो, अशी माहिती मंदिराचे व्यवस्थापक विष्णू हरिचंद्रे यांनी दिली. शुक्रवारी गारज येथील रांगोळी चित्रकार भगवान सरोवर यांनी देवीच्या दर्शनी भागासमोर अप्रतिम रांगोळी रेखाटली. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ती आकर्षक ठरली.
उष्णतेचा कहर:सोयगावचा पारा 42 अंशांवर, खबरदारी म्हणून ग्रामीण रुग्णालयांत उष्माघात कक्ष सज्ज
तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा कडाका झपाट्याने वाढू लागला आहे. शुक्रवारी (१७ एप्रिल) तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. वाढत्या उन्हामुळे निर्माण होणारा आरोग्याचा धोका लक्षात घेता, आरोग्य विभागाने सोयगाव उपजिल्हा रुग्णालयासह तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तातडीने उष्माघात उपचार कक्ष कार्यान्वित केले आहेत. मार्च महिन्यात दोनदा झालेल्या अवकाळी पावसानंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाची तीव्रता वाढली आहे. उष्माघाताचा त्रास होणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी सोयगाव ग्रामीण रुग्णालयात दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. जरंडी, बनोटी व सावळदबारा या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. एकूण ८ बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. शहरातील आपला दवाखाना' येथेही लवकरच असा कक्ष सुरू केला जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीतेश चावडा यांनी दिली. उन्हाचा पारा वाढल्याने सोयगाव बसस्थानकासमोरील रस्त्यावर वाहनांची रहदारी कमी होत असल्याची स्थिती आहे. चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, स्नायूंना गोळे येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, उलट्या, थकवा, श्वासोच्छ्वास वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे. शरीराचे तापमान १०५ अंश फॅरेनहाइटपर्यंत पोहोचणे. ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे आहेत. रुग्णांसाठी एसी, कूलर आणि पंख्यांची स्वतंत्र व्यवस्था. ओआरएस, आयव्ही फ्लुइड्स, तातडीची औषधे आणि डिजिटल थर्मामीटर, रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी कोल्ड पॅक्स, थंड पाणी आणि बर्फाची उपलब्धता करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांकडून ग्राहकांसाठी पाण्याची सोय उन्हाचा तडाखा वाढल्याने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी स्वखर्चातून ग्रीन नेट'(हिरवे कापड) लावून कृत्रिम सावली केली आहे. तसेच ग्राहकांसाठी पिण्याच्या शुद्ध व थंडगार पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. उष्माघात रुग्ण आढळल्यास काळजी घ्या ^तापमान वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. उष्माघाताचा रुग्ण आढळल्यास त्याला त्वरित सावलीत बसवून शरीरावर थंड पाणी टाकावे. प्रकृती गंभीर वाटल्यास विलंब न करता रुग्णालयात दाखल करावे. याठिकाणी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. -डॉ. दिनाजी खंदारे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, सोयगाव
घाटनांद्रा राज्य महामार्ग क्रमांक ४०वरील घाटनांद्रा-सिल्लोड मार्गालगत वाहणाऱ्या चारणा नदीची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली असून सांडपाणी व कचऱ्याच्या विळख्यात सापडलेल्या नदीचे अक्षरशः गटारात रूपांतर झाले आहे. नदीपात्रात साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर तातडीने नदीची स्वच्छता करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. गावातील सांडपाणी थेट नदीमध्ये सोडले जात असल्याने तसेच काही नागरिकांकडून सर्रास कचरा टाकला जात असल्याने नदी प्रदूषणाच्या गर्तेत अडकली आहे. प्लास्टिक, प्राण्यांचे अवशेष, अंड्यांची टरफले यामुळे नदीचे स्वरूप कचराकुंडीप्रमाणे झाले आहे. परिणामी, कचऱ्यात साचलेल्या पाण्यातून कुबट वास येत असून परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या नदीवर उभारण्यात आलेल्या चारनेर लघु प्रकल्पामुळे चारनेर, आमठाणा, पेंडगाव, घाटनांद्रा वाडी या गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होत असला तरी सध्या वाढलेल्या प्रदूषणामुळे भविष्यात जलसाठा दूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यास हेच दूषित पाणी तलावात मिसळून परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात डासांचे प्रमाणही वाढले असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने तात्काळ याची दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी नदीपात्राची स्वच्छता करावी, अशी मागणी दामोदर मोरे, संतोष गुळवे, संजय गुळवे, योगेश ज्ञाने, सुनील मोटे, कृष्णा मोरे यांच्यासह परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. ग्रामस्थांनीही स्वच्छतेबाबत सहकार्य करावे ^चारणा नदीतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असून याकडे ग्रामपंचायतीचे लक्ष आहे. लवकरच नदीपात्राची स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. तसेच सांडपाणी व्यवस्थापनासाठी योग्य उपाययोजना करण्याचे नियोजन सुरू आहे. ग्रामस्थांनीही स्वच्छतेबाबत सहकार्य करावे. - प्रभाकर धुड, ग्रामविकास अधिकारी
नाट्यपरंपरा जपण्यासाठी कटिबद्ध- राजेंद्र पाथ्रीकर:76 वर्षांची नाट्य, कुस्तीची परंपरा पाथ्रीत कायम
फुलंब्री तालुक्यातील पाथ्री गावाच्या इतिहासात कुस्ती आणि नाट्यकला यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ही ७६ वर्षांची गौरवशाली परंपरा बदलत्या काळात आजही कायम आहे. यासाठी आवश्यक ते सर्व पाठबळ पुरवण्यात येईल. धावपळीच्या युगात माणसे जोडणाऱ्या या कला जिवंत राहणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राजेंद्र पाथ्रीकर यांनी केले. पाथ्री गावातील यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आयोजित नाट्यकलावंतांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या वर्षी यात्रा उत्सवात सावकार' हे नाटक यशस्वीरीत्या सादर करण्यात आले. या नाटकातील कलाकारांचा गौरव करण्यात आला. गावातील जुनी नाट्यपरंपरा जिवंत ठेवणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचाही शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कलेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दामूअण्णा पाथ्रीकर, भानुदास पाथ्रीकर, अंकुश मोहनराव बनसोड, कचरू तात्या, रशीद शेठ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विजय ढेपले यांनी केले. योगेश बनसोड यांनी सूत्रसंचालन केले.
प्रतिनिधी | लासूर स्टेशन सिरेसायगाव (ता. गंगापूर) येथील शेतकरी शिवसिंग बेडवाल यांच्या विहिरीत शुक्रवारी सकाळी बिबट्या आढळल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, पण रेस्क्यू पथकाने सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद केले. घटनेची माहिती शेतकरी रवी वाघ यांनी पंचायत समिती सदस्य शुभम बोऱ्हाडे यांना दिली. बोऱ्हाडे यांनी तातडीने वन विभाग प्रशासनाला कळवले. सहकारी सुनील जाधव, गणेश गव्हादे, कल्याण जाधव, पंकज आमराव यांच्यासह ते घटनास्थळी पोहोचले. वन विभागाचे परिमंडळ अधिकारी अनिल पाटील, वनरक्षक के. व्ही. ब्रह्मनावत, शेळके यांच्यासह कर्मचाऱ्यांचे रेस्क्यू पथक दाखल झाले. सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. बिबट्याला गौताळा अभयारण्यात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. घोसल्यात कुत्र्याची शिकार सोयगाव | घोसला शिवारातील ज्ञानेश्वर युवरे यांच्या शेताजवळ (गट क्र. ८०) बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांसह मजुरांची मोठी पळापळ झाली. या बिबट्याने रात्री एका कुत्र्याची शिकार केल्याचे गुरुवारी सकाळी उघड झाले. महावितरणने शेतातील सिंगल फ्यूज वीज बंद केल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
उंडणगाव लघु प्रकल्पामध्ये युवकाचा मृतदेह आढळला:पोहण्याचा मोह नडला, 22 तास शोधमोहीम
सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव लघु प्रकल्पात पोहण्यासाठी गेलेला १५ वर्षीय रितेश नंदकिशोर गिरी पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. माहितीनुसार, खुल्लोड येथील रितेश दुपारी मित्रांसोबत उंडणगाव प्रकल्पावर पोहण्यासाठी गेला होता. रितेशला पोहता येत नव्हते. तरीही तो पाण्यात उतरला. पोहण्याचा प्रयत्न करताना तो खोल पाण्यात गेल्याने बुडाला. संध्याकाळपर्यंत रितेश घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. तो तलावाकडे गेल्याचे समोर आले. घटनास्थळी त्याचे कपडे, चप्पल आढळली. गावकऱ्यांनी पाण्यात उतरून शोधकार्य सुरू केले. रात्रीपर्यंत काहीच मागमूस लागला नव्हता. शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. २२ तासांच्या शोधानंतर शुक्रवारी दुपारी रितेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. रितेशचे कुटुंब अत्यंत गरीब आहे. आई-वडील मामाच्या गावी स्थायिक झाले होते. मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाले. सायंकाळी सात वाजता खुल्लोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रितेशच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार असल्याची माहिती देण्यात आली.
लोकसभा-विधानसभेत 33% आरक्षण समर्थनार्थ करमाडमध्ये महिलांची रॅली
लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ करमाडला शुक्रवारी आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिलांची रॅली काढण्यात आली. महिलांच्या भजनी मंडळाचा गजर झाला, घोषणांनी करमाड गाव दणाणून गेले होते. नारीशक्ती वंदना अधिनियमाला पाठिंबा देण्यासाठी फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघाली. रॅलीत आणि नंतरच्या कार्यक्रमात जि. प. उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, शिक्षण व आरोग्य सभापती अनिता मोठे, जि. प. सदस्य पुष्पा काळे, साधना कुलकर्णी, जयश्री पवार, पंचायत समिती सदस्य गीता कोरडे, चारुशीला गावंडे, भाजप प्रदेश सचिव रेखा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. सकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून रॅलीला सुरुवात झाली. सुरुवातीला जय हनुमान महिला भजनी मंडळ होते. त्यामागे विविध वेशभूषांतील केंद्रीय प्राथमिक शाळा, न्यू हायस्कूलच्या विद्यार्थिनी होत्या. त्यानंतर महिलांच्या घोळक्यात आमदार अनुराधा चव्हाण स्वतः घोषणा देत सहभागी झाल्या. रॅली महात्मा जोतिबा फुले चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, महादेव मंदिर मार्गे श्रीराम मंदिर चौकात पोहोचली. तेथे रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. अंगणवाडी सेवेत उत्कृष्ट काम करून राज्यस्तरीय पुरस्कार मिळवलेल्या सुपरवायझर सुनीता परदेशी, अंगणवाडी सेविका अनिता तारो, जय हनुमान मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती काळे यांचा सन्मान करण्यात आला. आमदार अनुराधा चव्हाण, जितेंद्र जयस्वाल, रेखा कुलकर्णी, डॉ. जिजा कोरडे, पुष्पा काळे, दत्ता उकर्डे यांनी सभेला संबोधित केले. कार्यक्रमासाठी सय्यद कदीर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल उकर्डे, दादाराव कुलकर्णी, रवी कुलकर्णी, रामेश्वर सोळुंके यांनी पुढाकार घेतला.
शेतकऱ्यांनी समंजस भूमिका घ्यावी- तहसीलदार वगवाड:सिद्धनाथ वाडगावात महाराजस्व अभियान शिबिर
सिद्धनाथ वाडगाव (ता. गंगापूर) येथे शुक्रवारी महसूल मंडळ विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर झाले. याला शेतकरी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी शिल्लेगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सविता संतोष पाटील जाधव होत्या. आयोजक तहसीलदार नवनाथ वगवाड, प्रशिक्षणार्थी तहसीलदार श्री. वाघमारे, गंगापूर भूमीअभिलेखचे उपअधीक्षक श्री. इंपाळे उपस्थित होते. तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी शेतकऱ्यांना वहिवाट, बांध, शीवरस्ते यासारख्या वादाचे प्रसंग सोडवावेत. शेतकऱ्यांनी समंजस भूमिका घ्यावी, असे आवाहन केले. वजनापूरचे सरपंच शिवम जाधव यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या. पंचायत समिती सदस्या मोहिनी जगदीश साळुंके, वजनापूर-शेकटा गावचे युवा सरपंच शिवम अंकुश जाधव, मालुंजाचे सरपंच जगदीश साळुंके, तांदुळवाडीचे सरपंच अनिल राजगिरे, पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष जब्बार पटेल, शिल्लेगावचे महसूल अधिकारी सुनील सरगर, लासुरचे शंकर जाधव आदी उपस्थित होते. शिबिरात उपस्थित शेतकऱ्यांना वारस कारवाई, सातबारा, संजय गांधी, श्रावण बाळ मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.
सुमारे १८ लाख लोकसंख्येच्या शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी १८ पोलिस ठाणी, ३५०० पोलिस कार्यरत आहेत. असे असताना मात्र मागील काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर पोलिसांचे नव्हे तर गुंडांचे राज्य असल्याचे दिसून येत आहे. कारण मागील सात दिवसांत एका खुनासह १४ चाकूहल्ल्यांची पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली. त्याशिवाय मंगळसूत्र चोरीचे ६, विनयभंगाचे ५ गुन्हे दाखल झाले. २ ठिकाणी गोळीबाराच्या घटना तर सरकारी कामात अडथळा आणल्याचे २ गुन्हे नोंदवले आहेत. रस्त्यावर समोरून येणारा चाकूने मारेल, गळ्यातील सोने हिसकावून पळेल अथवा त्याचा विश्वास संपादन करून लुटेल याची भीती निर्माण झाली आहे. पोलिसांची पेट्रोलिंग पूर्ण अपयशी ठरली असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आल्याने प्रचंड दहशतीचे व पोलिसांवरील अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात भररस्त्यात रक्ताचे सडे पडत आहेत, गोळीबाराच्या फैरी झडत आहेत. तर आडोशाला उभ्या व्यक्तीला लुटण्याच्या उद्देशाने थेट चाकूचे वार झेलावेद लागत आहेत. पोलिसांच्या वतीने ऑल आऊट ऑपरेशन आणि कोम्बिंग ऑपरेशन अनेक दिवसांपासून बंद दप्तरात गेले आहे. त्यामुळे पोलिसांनी कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे. माध्यमावर ‘रील्स’मधून गुंडांची दहशत एकीकडे रस्त्यावर गुंडांचा नाच सुरू असताना, दुसरीकडे सराईत गुन्हेगार सोशल मीडियावरही धुमाकूळ घालत आहेत. हातात धारदार शस्त्रे घेऊन, तलवारी नाचवत आणि पोलिसांना खुलेआम आव्हान देणाऱ्या रील्स बनवून समाज माध्यमावर टाकल्या जात आहेत. हर्सूल जेल परिसरातील, कोर्टात सादर करतानाचे तसेच हातकडी घातलेले भाईगिरीचे हे व्हिडिओ आहेत. या डिजिटल गुंडांवर ठोस कारवाई होत नसल्याने पोलिसांचे सायबर मॉनिटरिंग केवळ देखावाच ठरत आहे. खबऱ्यांचे नेटवर्क; सराईतांवर लक्ष देण्यात अपयश कुठलाही सराईत गुन्हेगार तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याच्यावर नजर ठेवण्याची गरज असते. मात्र पोलिस यात अपयशी ठरत आहेत. तसेच पूर्वी असणारे खबऱ्यांचे नेटवर्क आता अस्तित्वात नसल्याचे दिसून येत आहे. सराईत गुंड बाहेर येताच त्यांचा जेलच्या बाहेरच सत्कार केला जातो. फटाके फोडले जातात, त्यांची रॅली काढली जाते, तरी त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. ‘चार्ली’ प्रयोगाची पुन्हा एकदा गरज शहरात अमितेश कुमार पोलिस आयुक्त असताना त्यांनी २०१५-२०१७ या काळात दलातील काही कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र चार्ली पथक स्थापन केले होते. त्यांच्यामार्फत २४ तास शहरात दुचाकीवरून गस्त घातली जायची. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण होऊन गुन्हेगारी घटली होती. त्यामुळे नागरिक पुन्हा एकदा अशा प्रयोगाची मागणी करत आहेत.
मित्रांमध्ये फुशारकी मिरवण्यासाठी अधिकाधिक मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचे, त्यानंतर त्यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन करायचे आणि त्याचे व्हिडिओ काढायचे, अशा प्रकाराचा उलगडा परतवाड्यात झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अयान अहमद तन्वीर अहमद याला अटक केली आहे. अयानचा एक “लव्ह गुरू’ होता. त्याने त्याला मुलींना जाळ्यात ओढण्याच्या काही क्लृप्त्या शिकवल्या. “मुलींना पटवण्यासाठी “हाय-हॅलो’ असे जनरल मेसेज करायचे नाहीत. त्यांना असा प्रश्न विचार, ज्याचे उत्तर द्यायला त्या भाग पडतील,” उदाहरणादाखल, “आप वहीं हो ना जो वहां मिले थे?” अशा प्रकारचे प्रश्न विचारून अयान मुलींना आपल्यासोबत चॅटिंग करण्यास भाग पाडत असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आल्याचे सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणात अयानने एकूण आठ मुलींसोबत गैरवर्तन केले असून त्यातील दोघींवर लैंगिक अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. लैंगिक अत्याचारासाठी त्याने अमरावती शहरातील एका मित्राच्या फ्लॅटचा वापर केला. गेल्या वर्षभरात तो सात ते आठ वेळा मुलींना त्या ठिकाणी घेऊन गेल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणात अयानला फ्लॅट उपलब्ध करून देणाऱ्या मानव सुगंधे यालादेखील पोलिसांनी गुरुवारी (16 एप्रिल) अटक केली आहे. मानव सुगंधे आणि अयान यांची थेट ओळख नव्हती. पीयूष नावाच्या एका तरुणाच्या माध्यमातून अयान हा मानवच्या संपर्कात आला होता. पीयूष आणि मानव पूर्वी संबंधित फ्लॅटवर रूम पार्टनर म्हणून राहत होते. मात्र काही काळानंतर पीयूषने तो फ्लॅट सोडला होता. पीयूषची अयानसोबत आधीपासून ओळख असल्याने, जेव्हा अयानने फ्लॅटबाबत विचारणा केली, तेव्हा पीयूषने त्याला मानवशी संपर्क साधण्यास सांगितले. यानंतर अयान मानवच्या संपर्कात आला. प्रत्येक वेळी 500 रुपये देऊन तो फ्लॅटमधील खोलीचा वापर या कृत्यांसाठी करत होता. भाजप नेत्या नवनीत राणा यांना दंगली घडवायच्यात : प्यारे खान नागपूर |अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी भाजप नेत्या नवनीत राणा यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. नवनीत राणा यांना दंगली घडवायच्या असून त्यांनी पसरवलेल्या अफवांमुळे त्यांच्यावर पोक्सोअंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत असल्याचे खान यांनी नागपूर येथील पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, नवनीत राणा यांनी या प्रकरणातील आरोपींचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली होती. त्याला प्यारे खान यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. परतवाड्यात 3 कॅफेमध्येही चाळे अयानने काही मुलींसोबत अमरावती शहरातील दोन कॅफे आणि परतवाडा येथील तीन कॅफेमध्येही अश्लील वर्तन केले होते. पोलिस आता या पाचही कॅफेंचा शोध घेत आहेत. त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी आपली चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 8 आरोपींना अटक केली आहे. पोलिस कोठडीत त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे. तपासाअंती आरोपींच्या संख्येत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन साखळ्या अटक केलेल्या आठ आरोपींपैकी अयान हा मुख्य सूत्रधार आहे. मानव सुगंधे हा फ्लॅट उपलब्ध करून देणारा आहे. उर्वरित सहा आरोपी आक्षेपार्ह व्हिडिओ एकाकडून दुसऱ्याला व्हायरल करणारे आहेत. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोन साखळ्या पोलिसांनी समोर आणल्या आहेत. पहिल्या साखळीत अयानकडून सर्वप्रथम त्याचा जिवलग मित्र उजेर खान याने व्हिडिओ मिळवले. ते पुढे मो. साद याला पाठवले. मो. सादने ते तरबेज खानला पाठवले. दुसरी साखळी अशी आहे. उजेर खानने ऐफाज खानला पाठवले. ऐफाजने मोहंमद इम्रानला पाठवले. त्याने शेख नावेदला पाठवले. ही साखळी अद्याप संपलेली नाही. अमरावतीतील व्हिडिओ कांड अयानला फ्लॅट उपलब्ध करून देणाऱ्या मानव सुगंधे यालादेखील पोलिसांनी गुरुवारी (16 एप्रिल) अटक केली आहे. मानव सुगंधे आणि अयान यांची थेट ओळख नव्हती. पीयूष नावाच्या एका तरुणाच्या माध्यमातून अयान हा मानवच्या संपर्कात आला होता. पीयूष आणि मानव पूर्वी संबंधित फ्लॅटवर रूम पार्टनर म्हणून राहत होते. मात्र काही काळानंतर पीयूषने तो फ्लॅट सोडला होता. पीयूषची अयानसोबत आधीपासून ओळख असल्याने, जेव्हा अयानने फ्लॅटबाबत विचारणा केली, तेव्हा पीयूषने त्याला मानवशी संपर्क साधण्यास सांगितले. यानंतर अयान मानवच्या संपर्कात आला. प्रत्येक वेळी 500 रुपये देऊन तो फ्लॅटमधील खोलीचा वापर या कृत्यांसाठी करत होता.
नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या ११ जणांना भरपाई देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारवर संताप व्यक्त केला. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांनी ४ मेपर्यंतची शेवटची मुदत दिली आहे. रक्कम न मिळाल्यास छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल. तसेच, विलंबासाठी प्रतिदिन प्रति लाभार्थी १,००० रुपये दंड त्यांच्या स्वतःच्या खिशातून वसूल केला जाईल, असा कडक इशारा न्यायालयाने दिला आहे. धोरणासाठी २ महिन्यांचा वेळ हवा राज्य सरकारने नवीन सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी २ महिन्यांचा वेळ मागितला आहे. त्यावर धोरणात केवळ सरकारी तिजोरीवर भार न टाकता संबंधित दुकानांची तपासणी करणाऱ्या निरीक्षकांवरही जबाबदारी निश्चित करावी, असे कोर्टाने म्हटले.
खरातच्या अटकेला एक महिना; 9 गुन्हे, 58 क्लीप, 130 खाती:नाशिक ते अहिल्यानगरपर्यंत 16 गुन्हे दाखल
स्वतःला देवाचा अवतार भासवून महिलांचे लैंगिक शोषण आणि व्यावसायिकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा पाय पूर्णपणे खोलात गेला आहे. १७ मार्च रोजी नाशिक गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्यानंतर तपासाचे चक्र वेगाने फिरले असून, आतापर्यंत त्याच्यावर एकूण १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये नाशिकमधील सरकारवाडा, मुंबई नाका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, राहता येथील गुन्ह्यांचा समावेश आहे. तपासातील धक्कादायक बाबी रिमोट कंट्रोल नाग : भक्तांना घाबरवण्यासाठी २० फुटांचा नाग रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने फिरवत असे.कस्तुरीचा वापर : फसवणुकीसाठी तो दुर्मिळ जडीबुटी आणि हरिणाची कस्तुरी वापरून चमत्कारचा बनाव.राजकीय कनेक्शन : खरातच्या आश्रमात अनेक बड्या नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची उठबस असल्याचे फोटो समोर.पत्नीचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू.एसआयटी-आता या प्रकरणाचा मुळापासून तपास करत असून खरातच्या मालमत्तेचा आकडा ५०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता.
भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्यावर सक्तवसुली संचालनालयाने आपला फास अधिक घट्ट केला आहे. कॅनडा कॉर्नर परिसरातील खरातच्या ‘ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर’ या कार्यालयावर शुक्रवारी ईडी आणि एसआयटीच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या मॅरेथॉन झाडाझडतीनंतर पथकाने कार्यालयातून महत्त्वपूर्ण दस्तऐवज आणि बंद पाकिटांमधील पुरावे बॅगा भरून जप्त केले आहेत. दुपारी १२ वाजेच्या सुमारास ईडीचे पथक अचानक कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात धडकले. यावेळी स्थानिक एसआयटीचे अधिकारीही सोबत होते. कार्यालयाचे दरवाजे आतून बंद करून प्रत्येक फाईल आणि संगणकीय डेटाची बारकाईने तपासणी करण्यात आली. खरातने फसवणुकीतून कमावलेली मालमत्ता आणि त्याचे आर्थिक धागेदोरे कोणापर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास या कारवाईत करण्यात आल्याचे समजते.कारवाई पूर्ण झाल्यानंतर पथकाने सर्व जप्त केलेले साहित्य सीलबंद करून सोबत नेले. तपास पूर्ण होताच ‘ओकस’च्या कार्यालयाला पुन्हा एकदा प्रशासनाकडून अधिकृत सील ठोकण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरातील बड्या संशयितांचे आणि खरातच्या निकटवर्तीयांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, खरात याने सामान्य नागरिकांची फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची माया जमवली आहे. या पैशांची गुंतवणूक रिअल इस्टेट आणि हवाला नेटवर्कद्वारे परराज्यात व परदेशात केल्याचा संशय आहे. निकटवर्तीयांची मालमत्ता जप्तीची प्रक्रिया शक्य भोंदू कॅप्टन अशोक खरातने सर्वसामान्यांची फसवणूक करून जमवलेली मालमत्ता आता ईडीच्या कचाट्यात समोर आली आहे. आजच्या कारवाईनंतर जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमुळे खरातच्या बेनामी संपत्तीचे अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. ओकस प्रॉपर्टीजच्या माध्यमातून नाशिकसह जिल्ह्यात कुठे कुठे जमिनी खरेदी केल्या, याचा शोध आता ईडी घेत आहे. आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे मिळाल्यास खरात आणि त्याच्या निकटवर्तीयांची बँक खाती तसेच मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले आहे.
नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिच्या अटकेसाठी एसआयटीची ३ पथके मागावर आहेत. शुक्रवारी दुपारी पोलिसांनी तिचा पती मोईन खान याला मुंब्र्यातून ताब्यात घेत ४ तास कसून चौकशी केली. निदा गरोदर असून ‘लोकेशन’ बदलून ती पोलिसांना सातत्याने गुंगारा देत आहे. दरम्यान, प्रकरणाच्या तपासात आता एटीएसचीही एंट्री झाली असून एटीएसने नातेवाईक पसार; फोन ‘स्विच ऑफ’ मोईन मुंब्र्यातील एका लॉजिस्टिक कंपनीत कार्यरत असून पोलिसांनी त्याला कामावरूनच ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिस निदा लपलेल्या नातेवाइकांच्या घरी पोहोचले. मात्र, पोलिस पोहोचण्यापूर्वीच ते नातेवाईक घर बंद करून पसार झाले. त्यांचे मोबाईलही ‘स्विच ऑफ’ असल्याने पोलिसांच्या हाती निराशा लागली. गरोदरपणाचे कारण सांगत सहानुभूतीचा प्रयत्न २६ वर्षीय निदा टीसीएसमध्ये २०२१ पासून एचआर मॅनेजर होती. या रॅकेटची ती ‘मास्टरमाईंड’ असल्याचा आरोप आहे. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी दाबल्याचा आरोप असून, ९ एप्रिल रोजी तिला कंपनीने बडतर्फ केले आहे. सध्या तिने गरोदरपणाचा आणि एफआयआरमध्ये ‘केवळ धार्मिक भावना दुखावल्याचा’ ठपका असल्याचा आधार घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. ॲक्सिस बँकेतही अशा केसे- अमृता फडणवीस मी ॲक्सिस बँकेत असताना अशा केसेस माझ्यासमोर झाल्या आहेत, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले आहे. नाशिकच्या टीसीएस बीपीओ कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
मुलींशी आक्षेपार्ह वर्तन आणि व्हिडिओ प्रकरणाच्या तपासासाठी १० अधिकाऱ्यांसह ४८ पोलिसांची ‘एसआयटी’ स्थापन केली असून त्यांची ५-६ पथके तयार केली आहेत. ही पथके शोषणाच्या जागांची झडती घेत आहेत. दुसरीकडे, मुख्य आरोपी अयान अहमद याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होणे परतवाडा पोलिस स्टेशनच्या तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरोपीसोबत केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी एपीआय समीर शेख, पोलिस अंमलदार शुभम वर्मा आणि मयूर गुरव या तिघांना शुक्रवारी (दि. १७) निलंबित केले आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या गंभीर प्रकरणाची दखल घेतली असून आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामीण पोलिसांकडून तपासाचा सविस्तर आढावा घेतला. सोशल मीडियावरील ४१ खाती सायबर सेलकडून बंद या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता सायबर सेलच्या मदतीने सोशल मीडियासंदर्भातही कारवाई करण्यात आली. पीडितांसंदर्भातील आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ असलेले ४१ संशयास्पद सोशल मीडियाची खाती बंद करण्यात आली आहेत.
राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय शिकवणे सक्तीचे केले असले तरी अनेक शाळा या नियमाची पायमल्ली करत आहेत. याची अत्यंत गंभीर दखल घेत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शुक्रवारी शासन निर्णय जारी केला. यापुढे मराठी भाषा अनिवार्यपणे न शिकवणाऱ्या शाळेला १ लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. तसेच, नियमाचे पालन न करणाऱ्या शाळांची मान्यता किंवा ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ रद्द केले जाईल. ‘इंग्रजी’ माध्यमाच्या आणि सीबीएसई शाळांना बसणार चाप! इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये अजूनही ‘मराठी’ भाषा विषय गांभीर्याने शिकवला जात नाही, अशा अनेक तक्रारी आहेत. या नवीन नियमावलीमुळे आणि थेट १ लाखाच्या दंडाच्या तरतुदीमुळे आता सीबीएसई, आयसीएसई आणि आंतरराष्ट्रीय मंडळांच्या शाळांना चाप बसेल. राज्यात एकूण खाजगी शाळांत मंडळाच्या १३,५३८, सीबीएसईच्या १,२६० आणि आयसीएसईसह इतर ३८९ शाळांचा समावेश आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी अखेर खुली
अमेरिकेने मानले इराणचे आभार, संघर्ष निवळणार? तेहरान : वृत्तसंस्था अमेरिका आणि इराणमध्ये २८ फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात झाली होती. हे युद्ध तब्बल ३९ दिवस चालले. अखेर ४० व्या दिवशी अमेरिका आणि इराणकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान, युद्धकाळात इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज जहाजांसाठी बंद केल्याने जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले होते. मात्र, आता इराणने होर्मुझची […] The post होर्मुझची सामुद्रधुनी अखेर खुली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर, मोदी सरकारला धक्का नवी दिल्ली : वृत्तसंस्था नारी शक्ती वंदन अधिनियम (१३१ वी घटनादुरुस्ती) आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर देशाच्या संसदेत काल जोरदार चर्चा झाली. त्यानंतर शुक्रवारीही सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी या विधेयकावर मते मांडली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी यावर मतदान पार पडले. यावेळी एकूण ५२८ सदस्यांनी मतदान केले. यापैकी २९८ […] The post मोदी सरकारची फजिती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा शिकवणे आता केवळ सक्तीचेच नाही, तर अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून, थेट शाळेची मान्यता रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. राज्याच्या भाषा धोरणानुसार मराठी भाषेचे अध्यापन सर्व शाळांना बंधनकारक आहे. मात्र, काही आंतरराष्ट्रीय आणि खासगी शाळांमध्ये मराठी विषय शिकविला जात नसल्याच्या अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत शासनाने आज एक नवीन आदेश जारी केला आहे. यानुसार, केवळ राज्य मंडळाच्याच (SSC) नव्हे, तर सीबीएससी (CBSE), आयसीएसई (ICSE), आयबी (IB) आणि आयजीसीएसई (IGCSE) यांसारख्या सर्व परकीय आणि इतर मंडळांच्या शाळांनाही मराठी विषयाचे अध्यापन करणे बंधनकारक असेल. पात्र शिक्षकांची नियुक्ती आणि विशेष तपासणी पथके नवीन आदेशानुसार, प्रत्येक शाळेत मराठी विषयासाठी स्वतंत्र आणि पात्र शिक्षकांची नियुक्ती करणे आवश्यक राहणार आहे. या नियमाची अंमलबजावणी केवळ कागदावर राहू नये, यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि निरीक्षकांचे विशेष पथक तयार करण्यात येणार असून, यामध्ये मराठी विषयातील तज्ज्ञ शिक्षकांचा समावेश असेल. हे पथक शाळांना आकस्मिक भेटी देऊन मराठी विषयाच्या तासांची आणि शिकविण्याच्या पद्धतीची तपासणी करेल. शाळा सुरू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल शिक्षण संचालकांकडे सादर करणे आता बंधनकारक आहे. १ लाख रुपयांचा दंड आणि मान्यता रद्द शाळांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास प्रशासन अत्यंत कठोर पावले उचलणार आहे. दोषी आढळलेल्या शाळा व्यवस्थापनाला प्रथम नोटीस देऊन १५ दिवसांत खुलासा मागविण्यात येईल. जर शाळेचे उत्तर समाधानकारक नसेल, तर महाराष्ट्र स्वंयअर्थसहाय्यित शाळा अधिनियमातील कलम १२(१) नुसार संबंधित शाळेला एक लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. दंडात्मक कारवाईनंतरही जर शाळेने मराठी विषय शिकविण्यास सुरुवात केली नाही, तर अंतिम कारवाई म्हणून त्या शाळेची मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा डॉ. पंकज भोयर यांनी दिला आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाला मिळणार बळ कोणतीही शिक्षण संस्था किंवा शाळा महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा अवमान करू शकत नाही. ही आमची राजभाषा असून तिचे संवर्धन करणे हे प्रत्येक शाळेचे कर्तव्य आहे, असेही डॉ. भोयर यांनी यावेळी स्पष्ट केले. शासनाच्या या धडाकेबाज निर्णयामुळे राज्यातील मराठी भाषेच्या सक्तीच्या अंमलबजावणीला मोठे बळ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून, पालकांमधूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे.
अनैतिक संबंधातून महिलेला बॅटने मारहाण करुन तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातीत चंदननगर भागात घडली. या प्रकरणी एका वकिलासह, त्याची पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आली आहे. पूनम दिनेश मुन (वय ३२, रा. गणेशनगर, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ‘या प्रकरणी वकील ॲड. संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती आणि मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पूनमचे पती दिनेश यांनी फिर्याद दिली आहे’, अशी माहिती चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश बडाख यांनी दिली. ॲड. सावंत यांचे पूनमशी प्रेमसंबंध होते, ॲड. सावंत यांचे चंदननगर भागातील जुन्या मुंढवा रस्त्यावर कार्यालय आहे. पूनम गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. सावंत यांच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून काम करत होती. गुरुवारी (१६ एप्रिल) सकाळी ती नेहमीप्रमाणे ॲड. सावंत यांच्या कार्यालयात गेले. त्यानंतर ॲड. सावंत, त्याची पत्नी स्वाती आणि मुलीने तिला बॅटने मारहाण केली. तिच्यावर शस्त्राने वार केले. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात ठेवण्यात आला. रात्री आठपर्यंत पूनम घरी न परतल्याने तिच्या पतीने ॲड. सावंत यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा पूनम मैत्रिणीकडे गेल्याचे सांगण्यात आले. पतीने तिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, मोबाइल बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पूनमचे पती शुक्रवारी सकाळी ॲड. सावंत यांच्या कार्यालयात गेले. तेव्हा कार्यालयाचा दरवाजा उघडा होता. पूनम रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्यानंतर पूनमच्या पतीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पूनमच्या पतीने माहिती दिल्यानंतर पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, गु्न्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, नूतन पवार, पोलिस निरीक्षक निलेश बडाख यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. चंदननगर पोलिसांनी ॲड. सावंत आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले, तसेच गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ॲड. सावंत यांची पत्नी स्वाती हिला ताब्यात घेतले. खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सहा तासात गुन्ह्याचा छडा लावला. पोलिस निरीक्षक बडाख, खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक राम राजमाने आणि पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

31 C