SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

25    C
... ...View News by News Source

बंडोबांचे आव्हान !

महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवार (३० डिसेंबर) ही अंतिम तारीख असून सर्वच राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी लपवाछपवीचा मार्ग स्वीकारला आहे. कारण त्यांच्यासमोर बंडोबांचे आव्हान कायम आहे. विशेष म्हणजे ही बंडखोरी सर्वपक्षीय आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही तेच चित्र आहे. सोमवारी उमेदवारांची यादी जाहीर होऊ लागल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांत बंडखोरी उफाळून आली. त्यामुळे बंडखोरांची नाराजी […] The post बंडोबांचे आव्हान ! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:52 am

साठोत्तरी साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी अभिजात मराठी भाषेला समृद्ध इतिहासाचा वारसा लाभला आहे.इस.पू.२२२० चा नाणेघाट, दोन हजार वर्षांपूर्वीचा ‘गाथासप्तशती’,’बृहत्कथा’,’कुवलयमाला’ या ग्रंथामुळे भाषेचे प्राचीन सामर्थ्य स्पष्ट होतेच, परंतु अभिजात मराठी भाषेला खरी प्रतिष्ठा व सन्मान साठोत्तरी मराठी साहित्याच्या भाषेने प्राप्त करून दिला आहे, असे प्रतिपादन शिवाजी महाविद्यालय रेणापूर येथील डॉ. जयद्रथ जाधव यांनी केले. मराठी विभाग महाराष्ट्र […] The post साठोत्तरी साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:50 am

चाकूरचे साईंनंदनवनम बनले कृषी पर्यटन आणि हुरडा पार्टीचे केंद्र

चाकूर : प्रतिनिधी चाकूर येथील सुप्रसिध्द साईनंदनवनम मध्ये हूरडा पार्टीची जोरदार सुरूवात झाली असून हे स्थळ कृषी पर्यटकांसाठी अस्सल गावरान मेजवानी ठरत असल्याची माहिती साईनंदनवनचे संचालक विशाल उत्तमराव जाधव यांनी दिली आहे. शेतात ज्वारीची कणस डौलात डोलायला लागली की सर्वांना वेध लागतात ते हुरडा पार्टीचे, ज्वारीचा दाणा कोवळा हिरवा असला की सुरुवात होते ती हुरड्याची. […] The post चाकूरचे साईंनंदनवनम बनले कृषी पर्यटन आणि हुरडा पार्टीचे केंद्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:49 am

वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध धंद्यांवर कारवाई 

लातूर : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क नांदेड विभागाचे विभागीय उपायुक्त बी. एच. तडवी यांनी दिलेल्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्याचे अधीक्षक केशव राऊत, यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १जानेवारी ते दि. २८ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये लातूर जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती/विक्री/वाहतूक विरोधात लातूर, उदगीर, निलंगा, चाकूर विभाग व भ.प. यांनी संयुक्तरित्या एकूण १६४९ गुन्हे नोंद करण्यात आले. यात १८०५ […] The post वर्षभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध धंद्यांवर कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:47 am

वर्षभरात स्थानिक गुन्हे शाखेचा गुन्हेगारांवर प्रभावी वचक 

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीला आळा घालणे आणि क्लिष्ट तसेच गंभीर गुन्ह्यांचा वेगवान तपास करणे, हे कोणत्याही सक्ष्म पोलीस प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असते. या दृष्टीने लातूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा ही जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या थेट मार्गदर्शनाखाली कार्यरत असून, गुन्हेगारीविरोधात एक प्रभावी, विश्वासार्ह आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम यंत्रणा म्हणून ओळखली जाते. […] The post वर्षभरात स्थानिक गुन्हे शाखेचा गुन्हेगारांवर प्रभावी वचक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:46 am

१०० टक्के मतदानाचा विद्यार्थ्यांचा निर्धार

लातूर : प्रतिनिधी आगामी लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर ‘स्वीप’ मोहीम तीव्र करण्यात आली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून येथील दयानंद महाविद्यालयात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी विशेष मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘मतदार प्रतिज्ञा’ आणि ‘संकल्प पत्र’ वितरणाद्वारे युवकांना लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात […] The post १०० टक्के मतदानाचा विद्यार्थ्यांचा निर्धार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:44 am

अंतर्गत कलह; बंडखोरीने लातूर भाजपात नाराजी उफाळली

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपामध्ये गोंधळाची स्थिती पहावयास मिळत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाने असंख्य निष्ठावंतांना डावलून इतर पक्षांतून नूकतेच आलेल्या उप-यांना उमेदवारी बहाल केल्याने अंतर्गत कलह आणि बंडखोरीने भाजपा हतबल झालेली दिसत आहे. लातूर भाजपात प्रचंड नाराजी उफाळुन आल्याचे दिसून येत आहे. लातूर शहर महानगरपालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन […] The post अंतर्गत कलह; बंडखोरीने लातूर भाजपात नाराजी उफाळली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:42 am

७० जागांसाठी एकूण ७५९ नामनिर्देशनपत्र दाखल

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या तिस-या सार्वत्रिक निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सूरु आहे. दि. २३ ते दि. ३० डिसेंबरपर्यंत ७० जागांसाठी एकुण ७५९ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी ५३४ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. या नामनिर्देशनपत्रांची आज छाननी होणार आहे. प्रभाग क्रमांक १, २, ३ मधील अ-१६, ब-६, क-११, ड-११, एकुण ११९, प्रभाग […] The post ७० जागांसाठी एकूण ७५९ नामनिर्देशनपत्र दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:42 am

टीम इंडियाकडून श्रीलंकेचा ५-० ने सुपडा साफ

तिरुवनंतपुरम : वूमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात २०२५ या वर्षाचा अफलातून शेवट केला आहे. टीम इंडियाने तिरुवनंतपुरममधील पाचव्या आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेवर १५ धावांनी मात केली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर १७६ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र श्रीलंकेला २० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून १६० धावाच करता आल्या. यासह भारताने हा सामना जिंकला. भारताचा हा […] The post टीम इंडियाकडून श्रीलंकेचा ५-० ने सुपडा साफ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 31 Dec 2025 12:02 am

कल्याण-डोंबिवलीत भाजपने विजयाचे खाते उघडले:रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित, विरोधात एकही अर्ज नाही

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भाजपने विजयाचे खाते उघडत मोठी बाजी मारली आहे. प्रभाग क्रमांक 18 (अ) मधून भाजपच्या उमेदवार रेखा राजन चौधरी यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला असून, या विजयामुळे भाजप गोटात उत्साहाचे वातावरण आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षित जागेसाठी विहित मुदतीत केवळ रेखा चौधरी यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला असून, इतर कोणत्याही पक्षाने किंवा अपक्ष उमेदवाराने येथून अर्ज भरलेला नाही. परिणामी, या प्रभागात निवडणूक न होताच भाजपने आपला पहिला विजय नोंदवला असून, अधिकृत घोषणेनंतर रेखा चौधरी या महापालिकेच्या पहिल्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका ठरतील. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मतदानापूर्वीच भाजपने विजयाचा श्रीगणेशा केला असून, प्रभाग क्रमांक 18 (अ) मधून भाजपचे खाते उघडले आहे. या प्रभागातील 'नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला' या राखीव जागेसाठी विहित मुदतीत केवळ रेखा राजन चौधरी यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याची अधिकृत माहिती निवडणूक अधिकारी वरुण कुमार सहारे यांनी दिली आहे. इतर कोणत्याही पक्षाने किंवा अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल न केल्यामुळे रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड आता निश्चित झाली असून, निकालाआधीच मिळालेल्या या मोठ्या यशाचे श्रेय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांना आणि निवडणूक नियोजनाला दिले जात आहे. रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत. रेखा चौधरी यांचा विजय हा हिंदुत्वाचा पहिला विजय असल्याची अधिकृत प्रतिक्रिया भाजपने दिली आहे. भाजपच्या कल्याण विभागाच्या महिला मोर्चाच्या चौधरी या जिल्हाध्यक्ष आहेत.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 11:34 pm

संभाजीनगर भाजप कार्यालयात 'हायव्होल्टेज ड्रामा':तिकीट कापल्याने दिव्या मराठे उपोषणाला; म्हणाल्या- स्वीकृत नगरसेवक करा, तरच उपोषण सोडणार

तिकीट कापल्यामुळे नाराज असणाऱ्या प्रभाग क्र.20, गादीया विहारच्या भाजप कार्यकर्त्या दिव्या मराठे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. पक्षाच्या सर्वेक्षणात नाव असताना निष्क्रीय कार्यकर्त्याला तिकीट देण्याचा जाब त्यांनी विचारला. आता स्विकृत नगरसेवक पदावर नियुक्तीचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या भाजप प्रचार कार्यालयात हाय व्होल्टेज ड्रामा झाला. दिव्या मराठे यांनी याबाबत पक्षश्रेष्ठींना जाब विचारण्यासाठी प्रचार कार्यालय गाठले. यावेळीच त्यांनी तिकीट मिळेपर्यंत उपोषणाचा इशारा दिला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 3 वाजेची वेळ संपल्यावर भाजप कार्यालयात शुकशुकाट होता. मात्र, दिव्या मराठे एकट्याच येथे उपस्थित होत्या. कार्यालयातील स्टेजवर असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याखाली सतरंजी टाकून त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. दिवसभरात मंत्री अतुल सावे, खासदार डॉ.भागवत कराड, आमदार संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे किंवा अन्य कोणाकडूनही फोन आला नाही. कोणी विचारणा केली नाही. मुंबईहून प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कार्यालयातून विचारणा झाली. मात्र, स्विकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. रात्री 10 वाजेपर्यंत त्यांचे उपोषण सुरू होते. दिव्या मराठे 18 वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहे. अतुल सावे यांनी त्यांचे सर्वेक्षणात नाव आल्याचे सांगितले होते. मात्र, शितोळे नाव नसल्याचे सांगतात. पक्षातील नेत्यांमध्येच समन्वय नसल्याचा आरोप त्यांनी केला. 2010 मध्येही ऐनवेळी त्यांना एबी फॉर्म नाकारला होता. यावेळीही त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 11:05 pm

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यात दीप्ती शर्मा अव्वलस्थानी

तिरुवनंतपूरम : आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत नंबर वनचा ताज पटकवल्यानंतर आता दीप्ती शर्माने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्व विक्रम तिने आपल्या नावे केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तिने या विक्रमाला गवसणी घालत वर्षाचा शेवट एकदम अविस्मरणीय केला. टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम दीप्ती […] The post आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यात दीप्ती शर्मा अव्वलस्थानी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 10:58 pm

पुणे महापालिका निवडणूक:अजित दादांकडून आणखी एका गुन्हेगाराला तिकीट, हत्या प्रकरणात जामिनावर असलेल्या बापू नायरला उमेदवारी

महापालिकेच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिवसभर झालेल्या 'एबी' फॉर्मच्या वाटपात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना मिळालेल्या संधीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. कुख्यात गजा मारणेची पत्नी आणि आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी सोनाली व लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर, आता दीपक मारटकर हत्या प्रकरणातील जामीनावर असलेला आरोपी बापू ऊर्फ या कुमार प्रभाकर नायर यालाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक 39 मधून मैदानात उतरवले आहे. गुन्हेगारांना टायरमध्ये घालू, अशा आक्रमक वल्गना करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत मात्र आपली सर्व तत्त्वे धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसत आहे. पुण्याला गुन्हेगारीमुक्त करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजकीय फायद्यासाठी चक्क कुख्यात टोळ्यांशी संबंधित व्यक्तींना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे अजित पवारांच्या शब्दांत आणि प्रत्यक्ष कृतीत मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाले असून, निवडणुकीच्या रिंगणात 'तत्वे' बाजूला ठेवून केवळ 'निवडून येण्याची क्षमता' या निकषावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना झुकते माप देण्यात आल्याचे दिसत आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी दिली असून, या दोघी आता जेलमधूनच निवडणूक लढवणार आहेत. यासोबतच कुख्यात गजा मारणे याच्या पत्नीलाही उमेदवारी देऊन पवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या घराण्यांवर सढळ हाताने मेहेरनजर दाखवली आहे. एका बाजूला गुन्हेगारांविरुद्ध कठोर भाषेचा वापर करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांनाच उमेदवारी देऊन राजकीय प्रतिष्ठा मिळवून द्यायची, अशा दुटप्पी भूमिकेमुळे 'पालकमंत्री' म्हणून अजित पवारांच्या विश्वासार्हतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 10:42 pm

मीरा-भाईंदरमध्ये धक्कादायक घटना:अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू तर भाजपच्या महिला नेत्याला हृदयविकाराचा झटका

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच, मीरा-भाईंदरमध्ये दोन अत्यंत धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एबी फॉर्म मिळवण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची प्रचंड झुंबड उडालेली असतानाच, मिरा रोड येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. याच तणावपूर्ण वातावरणात भाईंदरमध्ये भाजपच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने यांनाही हृदयविकाराचा झटका आल्याने खळबळ उडाली आहे. निवडणूक अर्जाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या दुःखद घटनांमुळे मीरा-भाईंदरमधील राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आपली कन्या श्रद्धा बने हिला भाजपकडून उमेदवारी नाकारली गेल्याच्या धक्क्याने माजी महिला जिल्हाध्यक्ष वनिता बने यांची प्रकृती खालावली असून त्यांना तातडीने मिरा रोड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली, तरी रुग्णालयातून त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया अत्यंत भावूक होती. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी असलेली निष्ठा आणि पक्षकार्यासाठी अंगावर घेतलेले खटले यांचा विचार न करता, ऐनवेळी डावलले गेल्याची भावना त्यांनी अश्रू अनावर होत व्यक्त केली. पक्षासाठी आयुष्य वेचूनही आज आपल्याकडे दुर्लक्ष झाले, अशा शब्दांत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली. मीरा भाईंदरमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटाची युती तुटली मीरा-भाईंदरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती अखेर अधिकृतरीत्या तुटली असून, यावरून दोन्ही पक्षांतील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन मेहता यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नरेंद्र मेहता यांचा अहंकार आणि घमेंडीमुळेच ही युती तुटली आहे. भाजपला सुरुवातीपासूनच शिवसेनेला सोबत घ्यायचे नव्हते. शहरात स्वतःचेच वर्चस्व राखणे आणि शिवसेनेला सातत्याने कमी लेखणे हीच भाजपची रणनीती होती, असा गंभीर आरोप सरनाईक यांनी केला. युतीसंदर्भातील चर्चेचा तपशील सांगताना सरनाईक यांनी भाजपच्या वागणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला. चर्चेसाठी बोलावून आपल्याला तब्बल 50 मिनिटे ताटकळत ठेवले गेले आणि केवळ 13 जागांची अपमानास्पद ऑफर देण्यात आली, असा दावा त्यांनी केला. शिवाय, भाजपने सहकार्य केले तरच तुमच्या या 13 जागा निवडून येतील, असे अहंकारपूर्ण विधान करून शिवसेनेचा अपमान करण्यात आल्याचेही ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेने आता स्वतंत्रपणे लढण्याचा पवित्रा घेतला असून मीरा-भाईंदर महापालिकेच्या 95 पैकी 81 जागांवर शिवसेना आपले उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 10:05 pm

भाजपची नातेवाईकांना तिकीट न देण्याची घोषणा कागदावरच!:राहुल नार्वेकरांच्या कुटुंबात तिघांना उमेदवारी; भाजप उपाध्यक्षांकडून बंडखोरी

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आमदार-खासदारांच्या नातेवाईकांना तिकीट नाकारण्याची घोषणा भाजपने केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र पक्षाला मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याच कुटुंबात तब्बल तीन जणांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांचे बंधू मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर आणि चुलत बहीण गौरवी शिवलकर-नार्वेकर रिंगणात आहेत. याव्यतिरिक्त भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा भाऊ आणि मुंबई भाजप अध्यक्षांच्या मेहुण्यालाही तिकीट मिळाल्याने, स्वतःचेच नियम धाब्यावर बसवणाऱ्या भाजपविरोधात कार्यकर्त्यांमध्ये आता नाराजीचा सूर उमटत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी उफाळून आल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. वॉर्ड क्रमांक 225 मध्ये भाजपच्या हर्षिता नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या सुजाता सानप यांचे आव्हान असतानाच, आता भाजपचे मुंबई उपाध्यक्ष कमलाकर दळवी यांनीच बंडखोरी करत शड्डू ठोकल्याने नार्वेकर यांच्या मतांच्या विभाजनाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. केवळ वॉर्ड 225 मध्येच नव्हे, तर प्रभाग क्रमांक 7 मध्येही शिवसेनेचे भूपेंद्र काशिनाथ कवळी यांनी बंडखोरी केल्याने तेथील भाजप उमेदवारासमोर पेच निर्माण झाला असून, मुंबईतील अशा वाढत्या बंडखोरीमुळे राजकीय गणिते बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत. गोरेगाव आणि चेंबूरमध्येही बंडखोरीचा फटका गोरेगाव आणि चेंबूरमध्येही भाजपला मोठ्या बंडखोरीचा फटका बसला आहे. गोरेगावच्या प्रभाग क्रमांक 54 मध्ये उमेदवारी न मिळाल्याने संतापलेले भाजप महामंत्री संदीप जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 155 मध्ये अवघ्या दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या श्रीकांत शेटे यांना तिकीट देण्यात आल्याने 'आयात' उमेदवारांविरुद्ध निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. शेटे यांच्या उमेदवारीमुळे नाराज झालेल्या भाजपच्या तीन इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केल्याने जुन्या कार्यकर्त्यांमधील असंतोष आता चव्हाट्यावर आला असून, यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. भाजपमधील बंडखोरीचे सत्र सुरूच असून आता घाटकोपर आणि चेंबूरमध्येही निष्ठावंतांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. चेंबूरमध्ये उमेदवारी न मिळाल्याने माजी नगरसेविका जयश्री खरात, हर्षा साळवे आणि शशिकला कांबळे यांनी अपक्ष अर्ज भरून पक्षाला आव्हान दिले आहे. तसेच, घाटकोपर वॉर्ड क्रमांक 29 मध्ये शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या माजी नगरसेविका अश्विनी मते यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून भाजपचे माजी नगरसेवक सूर्यकांत गवळी यांच्या भावजय सुरेखा गवळी आणि पदाधिकारी प्रकाश पाटील यांच्या पत्नी मालती पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आयात उमेदवारांना झुकते माप दिल्यामुळे निष्ठावंतांनी पुकारलेल्या या बंडामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 9:08 pm

भारत फोर्जचा संरक्षण मंत्रालयासोबत कार्बाइन पुरवठ्याचा करार:1,661.9 कोटी रुपयांचा स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांचा सर्वात मोठा करार

पुण्यातील प्रसिद्ध भारत फोर्ज लिमिटेडने भारतीय संरक्षण क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठत संरक्षण मंत्रालयासोबत लहान शस्त्रांच्या श्रेणीतला आतापर्यंतचा सर्वात मोठा करार केला आहे. या कराराअंतर्गत भारत फोर्ज भारतीय सैन्याला 2,55,128 स्वदेशी बनावटीच्या CQB कार्बाइन (5.56 x 45 मिमी) पुरवणार आहे. या कराराची एकूण किंमत 1,661.9 कोटी रुपये असून, मंगळवारी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. करारानुसार पुढील पाच वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने या कार्बाइनचा पुरवठा करण्यात येणार आहे. ही 5.56 x 45 मिमी CQB कार्बाइन ही पूर्णतः स्वदेशी डिझाइन, विकसित आणि उत्पादित शस्त्र प्रणाली असून ती डी आर डी ओ अंतर्गत आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (एआरडीई) आणि भारत फोर्ज, पुणे यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. ही कार्बाइन आधुनिक युद्ध परिस्थितीसाठी उपयुक्त, हलकी, कॉम्पॅक्ट आणि अधिक अचूक असल्याचे सांगितले जाते. ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेच्या उद्दिष्टांशी सुसंगत राहून, भारत फोर्ज लिमिटेड आणि त्यांची पूर्ण मालकीची संरक्षण उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टम्स लिमिटेड भारतीय सशस्त्र दलांना ‘मेड इन इंडिया’ प्रगत संरक्षण उपकरणे आणि प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. हा करार भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेला मोठी चालना देणारा मानला जात आहे. भारत फोर्ज लिमिटेड वतीने करण्यात आलेल्या या कराराच्या माध्यमातून नवीन रोजगार निर्मिती देखील उपलब्ध होऊ शकणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 8:53 pm

जालन्यात नवा इतिहास!:अजित पवार गट-मनसे-वंचितची महायुती; पवार, ठाकरे आणि आंबेडकर पहिल्यांदाच एकत्र

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत जालन्यात एक अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक राजकीय समीकरण पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात वर्षानुवर्षे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेले पक्ष आणि घराणी जालन्यात एकत्र आली आहेत. जालना महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, राज ठाकरे यांची मनसे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी यांनी अभूतपूर्व युती जाहीर केली आहे. 'अंबेडकर, ठाकरे आणि पवार' हे तीन मोठे राजकीय वारसा असलेले पक्ष पहिल्यांदाच एकाच झेंड्याखाली आल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष जालन्याकडे लागले आहे. जालना महापालिका अस्तित्वात आल्यानंतर होत असलेली ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची बनवली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीतून बाहेर पडत सर्वांना धक्का दिला. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्यावर अजित पवार गटाने तातडीने मनसे आणि वंचित बहुजन आघाडीशी संधान साधले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी या नव्या आघाडीची अधिकृत घोषणा केली आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित या नव्या आघाडीत जागावाटपाचे समीकरणही स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 50 जागांवर आपले उमेदवार उतरवणार असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 6 जागा देण्यात आल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या समावेशामुळे या आघाडीची ताकद अधिक वाढल्याचे मानले जात आहे. पहिल्या महापौराच्या खुर्चीवर आपलाच झेंडा फडकवण्यासाठी या तीनही पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यातील 29 महापालिकांमध्ये स्थानिक नेत्यांना निर्णयाचे स्वातंत्र्य दिल्यामुळे अनेक ठिकाणी कुठे शत्रू तर कुठे मित्र असे चित्र दिसत आहे. जालन्यात मात्र भाजप आणि शिंदे सेना स्वतंत्र लढत असल्याने आणि अजित पवार गट नव्या मित्रांसोबत मैदानात उतरल्याने ही निवडणूक चौरंगी आणि चुरशीची ठरणार आहे. जालन्याच्या पहिल्या महापौरपदाचा मान कोणाला मिळणार आणि हे 'पवार-ठाकरे-आंबेडकर' समीकरण यशस्वी ठरणार का, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 8:46 pm

भाजपने वेळ संपल्यानंतर ‘एबी फॉर्म’ दिले

सोलापूर : उमेदवारी अर्ज भरण्याच्या करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवार दि. ३० डिसेंबर रोजी भाजपच्या वतीने आपल्या उमेदवारांचे ‘एबी फॉर्म’ अगदी शेवटच्या क्षणी वेगवेगळ्या निवडणूक कार्यात आणण्यात आले. मात्र भाजपने वेळ संपल्यानंतर एबी फॉर्म सादर केले. लोकशाहीची हत्या केली असा आरोप करत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. वेळेत एबी फॉर्म पोहोचवण्यासाठी भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहराध्यक्ष रोहिणी […] The post भाजपने वेळ संपल्यानंतर ‘एबी फॉर्म’ दिले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 8:40 pm

थर्टीफर्स्टच्या पार्श्वभुमीवर हिंगोली जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त:शहरातील चौकांमधून वाहन तपासणी, 450 पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा उतरणार रस्त्यावर

हिंगोली शहरासह जिल्हाभरात थर्टीफर्स्टच्या पार्श्वभुमीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून शहरातील सर्वच चौकांमध्ये वाहनांचील तपासणी केली जाणार आहे. या शिवाय ५४ पोलिस अधिकारी, ४५० पोलिस कर्मचाऱ्यांचा तफा रस्त्यावर उतरणार आहे. त्यांच्या मदतीला गृह रक्षक दलाचे जवान देखील तैनात केले जाणार आहेत. अनुचीत प्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. हिंगोली जिल्हयात थर्टीफर्स्टचे जल्लोषात स्वागत करण्याची नागरीकांकडून तयारी केली जात आहे. यावर्षी थर्टीफर्स्टच्या निमित्ताने शाकाहरी भोजनासाठी मांसाहरी भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी हॉटेल्स, ढाब्यांवर विशेष पदार्थ तयार ठेवण्याची तयारीही चालवली असल्याचे चित्र आहे. तर तळीरामांचा उच्छाद वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. दरम्यान, शहरासह जिल्हाभरात हुल्लडबाजी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. कुठेही अनुचीत प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. पोलिस अधिक्षक निलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक कुंदनकुमार वाघमारे, राजकुमार केंद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले हे अधिकारी देखील बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. जिल्हयातील मोठ्या शहरांमध्ये येणाऱ्या रस्त्यांवर दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकी वाहनांची तपासणी केली जाणार आहे. या शिवाय २६ ब्रिथॲनालायझरद्वारे वाहन चालका्ंची तपासणी होणार असून ध्वनी मर्यादेचे पालन होण्यासाठी २७ नाॅईल लेव्हल मिटर ठेवण्यात येणार आहेत. या शिवाय धार्मिकस्थळ, महापुरुषांच्या पुतळा परिसरात बंदोबस्त राहणार आहे. जिल्हयात मद्य प्राशनकरून वाहन चालविणाऱ्यांवर तसेच कायदा व सु्व्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सूुत्रांनी सांगितले. नागरीकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 8:38 pm

भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था! दरडोई उत्पन्नात घसरण; बेरोजगारीचे आव्हान कायम

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी सरत्या वर्षाच्या अखेरीस आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला हाती आलेल्या वृत्तानुसार, भारत, जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली आहे. भारताने जपानला मागे टाकत हे स्थान पटकवल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, भारताचे एकूण सकल घरगुती उत्पादन (जीडीपी) ४.१८ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचले आहे. अर्थात याची अधिकृत माहिती २०२६ मध्ये जाहीर होणार आहे. […] The post भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था! दरडोई उत्पन्नात घसरण; बेरोजगारीचे आव्हान कायम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 8:31 pm

बंगालमधील घुसखोरी संपवणार; प्रत्येकाला शोधून काढणार : शाह

कोलकाता : वृत्तसंस्था पश्चिम बंगालच्या दौ-यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोलकात्यात पत्रकार परिषद घेऊन तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या १५ वर्षांत बंगाल भीती, भ्रष्टाचार आणि घुसखोरीचा बळी ठरल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. २०२६ मध्ये भाजपाचे सरकार आल्यास घुसखोरी संपवणार, घुसखोरांना शोधून बाहेर काढले जाईल, विकासाला गती दिली जाईल आणि बंगालचा सांस्कृतिक वारसा […] The post बंगालमधील घुसखोरी संपवणार; प्रत्येकाला शोधून काढणार : शाह appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 8:29 pm

इंडिगो-एअर इंडियात चुरस; ५० लाखांची ऑफर!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय विमान वाहतूक क्षेत्र सध्या एका अभूतपूर्व संकटातून जात आहे. एकीकडे प्रवाशांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे अनुभवी वैमानिकांच्या कमतरतेमुळे इंडिगो आणि एअर इंडिया या दोन दिग्गज कंपन्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, प्रतिस्पर्धी कंपनीच्या अनुभवी कॅप्टन्सना आपल्याकडे खेचण्यासाठी एअरलाईन्स चक्क ५० लाख रुपयांपर्यंतच्या ‘जॉइनिंग बोनस’ची ऑफर देत […] The post इंडिगो-एअर इंडियात चुरस; ५० लाखांची ऑफर! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 8:21 pm

पुतीन यांच्या निवासस्थानी युक्रेनचा ९१ ड्रोनने हल्ला

मॉस्को/कीव्ह : वृत्तसंस्था रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग दरम्यान असलेल्या निवासस्थानावर युक्रेनने ९१ ड्रोन हल्ले केल्याचा खळबळजनक दावा रशियाने केला. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी ही माहिती दिली असून, या हल्ल्यानंतर रशिया आता युक्रेनवर निश्चित ठिकाणावर हल्ले करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शांतता प्रक्रियेला मोठी खीळ बसणार आहे. लावरोव्ह यांच्या […] The post पुतीन यांच्या निवासस्थानी युक्रेनचा ९१ ड्रोनने हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 8:17 pm

पहिली कार्बन डायऑक्साईड साठवणूक विहीर निर्मिती पूर्ण

मुंबई : वृत्तसंस्था आयआयटी मुंबई आणि एनटीपीसी लि. यांनी संयुक्तपणे देशातील पहिली कार्बन डायऑक्साइड साठवणूक चाचणी विहीर यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. आयआयटी मुंबई पृथ्वी विज्ञान विभागाने एकत्र येत देशातील प्रमुख कोळसाक्षेत्रांमध्ये कार्बन साठवणुकीची शक्यता तपासली. या अभ्यासातून चार मोठ्या कोळसाक्षेत्रांचा सविस्तर आढावा घेत पहिल्यांदाच भूवैज्ञानिक साठवण नकाशा तयार करण्यात आला. त्यानंतर झारखंडमधील उत्तर करनपुरा कोळसाक्षेत्रातील […] The post पहिली कार्बन डायऑक्साईड साठवणूक विहीर निर्मिती पूर्ण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 8:16 pm

सोमालीलॅँड : इस्रायल विरूद्ध २१ मुस्लिम देशांची आघाडी

तेलअवीव : वृत्तसंस्था इस्रायलने २६ डिसेंबर रोजी सोमालीलँडला एक स्वतंत्र देश म्हणून अधिकृतपणे मान्यता दिली. असा निर्णय घेणार इस्रायल हा पहिला देश ठरला आहे. इस्रायलच्या या निर्णयानंतर मुस्लिम देशांचा संताप वाढत आहे. जगभरातील २१ देशांनी या निर्णयाविरोधात संयुक्त निवेदन जारी करून विरोध दर्शवला आहे. सोमालीलँड आफ्रिकेच्या हॉर्न प्रदेशात स्थित आहे. या देशाने १९९१ मध्ये सोमालियापासून […] The post सोमालीलॅँड : इस्रायल विरूद्ध २१ मुस्लिम देशांची आघाडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 8:14 pm

अजित पवारांची दुटप्पी भूमिका?:गुन्हेगारी मुक्तीच्या वल्गना आणि जेलमधील आरोपींना 'एबी' फॉर्म; मुंबईतही शिंदेंपेक्षा जास्त उमेदवार

गुन्हेगारांना टायरमध्ये घालू, अशा आक्रमक वल्गना करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत मात्र आपली सर्व तत्त्वे धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसत आहे. पुण्याला गुन्हेगारीमुक्त करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजकीय फायद्यासाठी चक्क कुख्यात टोळ्यांशी संबंधित व्यक्तींना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे अजित पवारांच्या शब्दांत आणि प्रत्यक्ष कृतीत मोठी तफावत असल्याचे स्पष्ट झाले असून, निवडणुकीच्या रिंगणात 'तत्वे' बाजूला ठेवून केवळ 'निवडून येण्याची क्षमता' या निकषावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना झुकते माप देण्यात आल्याचे दिसत आहे. पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी दिली असून, या दोघी आता जेलमधूनच निवडणूक लढवणार आहेत. यासोबतच कुख्यात गजा मारणे याच्या पत्नीलाही उमेदवारी देऊन पवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या घराण्यांवर सढळ हाताने मेहेरनजर दाखवली आहे. एका बाजूला गुन्हेगारांविरुद्ध कठोर भाषेचा वापर करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांनाच उमेदवारी देऊन राजकीय प्रतिष्ठा मिळवून द्यायची, अशा दुटप्पी भूमिकेमुळे 'पालकमंत्री' म्हणून अजित पवारांच्या विश्वासार्हतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरवत महायुतीमध्ये स्वतःचे वजन वाढवले आहे. राष्ट्रवादीने मुंबईत एकूण 96 उमेदवार उभे केले असून शिंदे सेनेचे 90 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. राष्ट्रवादीच्या या 96 उमेदवारांमध्ये 56 मराठी, 23 मुस्लिम, 11 उत्तर भारतीय, 3 ख्रिश्चन, आणि तेलगू, तमिळ व बोहरा मुस्लिम समाजाच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश करून 'सोशल इंजिनिअरिंग' साधण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, पक्षाने पुरुषांच्या तुलनेत महिलांना (50 महिला, 46 पुरुष) झुकते माप दिले असून, यात 12 अनुसूचित जाती आणि 17 ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना संधी देत सर्वसमावेशक चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे. ठाकरे गटाने सर्वाधिक 163 जागांवर आपले उमेदवार उतरवले मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर स्पष्ट झाला असून, यामध्ये ठाकरे गटाने सर्वाधिक 163 जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवत वर्चस्व राखले आहे. या नव्या युती समीकरणात मनसेला 53 जागा देण्यात आल्या आहेत, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 11 जागा मिळाल्या आहेत. अशाप्रकारे मुंबईतील एकूण जागांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सर्वाधिक असल्याने, या निवडणुकीत ते मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 7:53 pm

राज्यस्तरीय युवा महोत्सव सुरू; नेतृत्वगुणांना व्यासपीठ:आयुक्त शितल तेली उगले यांच्या हस्ते उद्घाटन, एआय वापराचे आवाहन

पिंपरी-चिंचवड येथे आयोजित राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या आयुक्त शितल तेली उगले यांच्या हस्ते झाले. युवक-युवतींना नेतृत्वगुण सिद्ध करण्यासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे, तसेच राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हा महोत्सव २९ डिसेंबर २०२५ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत निगडी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृहात सुरू आहे. यावेळी बोलताना आयुक्त उगले यांनी युवक-युवतींना एआय (AI) तंत्रज्ञानाचा सकारात्मक व सर्जनशील वापर करून आपल्या कला व करिअरमध्ये यश मिळवण्याचे आवाहन केले. एआयसारखे आधुनिक तंत्रज्ञान युवकांसाठी समान संधी घेऊन आले असून, त्याचा नावीन्यपूर्ण वापर करून कौशल्ये सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले. आजची पिढी ऊर्जावान असून, त्यांच्या क्षमतांचा उपयोग नवोपक्रम आणि कलागुणांच्या विकासासाठी व्हावा. महोत्सवातून केवळ फोटो आणि प्रमाणपत्र नव्हे, तर उज्ज्वल भविष्य घडविणारी सकारात्मक ऊर्जा सोबत घेऊन जा, असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सतिश राउत यांनी युवकांना प्रेरणा देणारी उदाहरणे देत यशस्वी होण्यासाठी चिकाटी व सातत्याचा कानमंत्र दिला. भावी लेखक व कवींनी दर्जेदार साहित्यनिर्मिती करून मराठी साहित्य समृद्ध करावे, असेही त्यांनी अधोरेखित केले. उद्घाटनप्रसंगी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहायक संचालक मिलिंद दिक्षित, चंद्रशेखर साखरे, अर्णव महर्षी, राष्ट्रीय बाल पुरस्कारार्थी गोपाल देवांग, अर्जुन पुरस्कारार्थी (बॉक्सिंग) हितेंद्र सोमाणी आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे क्रीडा व युवक कल्याण विभागाचे उपसंचालक युवराज नाईक यांनी महोत्सवाची पार्श्वभूमी विशद करत निवास, भोजन, किट आदी सुविधांची माहिती दिली. या राज्यस्तरीय युवा महोत्सवात पुणे, कोल्हापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, नाशिक व मुंबई या आठ विभागांतून १५ ते २९ वयोगटातील एकूण ३१२ युवक-युवती सहभागी झाले आहेत. लोकगीत, लोकनृत्य, कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व व काव्यलेखन अशा विविध कला प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन या महोत्सवात करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 7:25 pm

कसबा गणपती मूर्तीवरील 900 किलो शेंदूर कवच काढले:95 व्या शतकातील मूळ मूर्ती समोर, 31 डिसेंबरपासून दर्शन सुरू

पुणे येथील ऐतिहासिक ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरातील मूर्तीवरील शेंदूर कवच काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यानंतर १५ व्या शतकातील मूळ मूर्ती समोर आली असून, ३१ डिसेंबरपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. मंदिरातील मुख्य दैवत श्री जयति गजानन कसबा गणपती मूर्तीच्या शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रियेला सोमवार, १५ डिसेंबर रोजी सुरुवात झाली होती. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. मूर्तीवरील शेंदूर कवच गळून पडत असल्याने भविष्यात कोणताही अनपेक्षित प्रसंग उद्भवू नये, यासाठी हे कवच काढणे आवश्यक होते. देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंदिराच्या उपलब्ध इतिहासात अशी प्रक्रिया प्रथमच झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहीर ठकार, मंदार ठकार, तेजस ठकार आणि हर्षद ठकार उपस्थित होते. मूर्तीतज्ञ आणि पुरातत्व विभागाच्या माहितीनुसार, समोर आलेल्या मूळ मूर्तीचा कालावधी थेट १५ व्या शतकातला असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संबंधित विभागांकडून सविस्तर अहवाल मिळाल्यावर यावर शिक्कामोर्तब होईल. श्री जयति गजानन यांची मूळ मूर्ती साधारण २ फूट उंच असून चतुर्भुज आहे. तिच्या डाव्या हातांपैकी एक अभय मुद्रेत, तर उजव्या हातांपैकी एक आशीर्वाद मुद्रेत आहे. दुसऱ्या डाव्या हातात मोदक असून त्यावर सोंड ठेवलेली दिसते. उजव्या बाजूला खाली मूषक वाहन आहे. ही मूर्ती डाव्या सोंडेची असून अर्ध पद्मसनाच्या बैठकीत आहे. लंबकर्ण आणि लंबोदर ही मूर्तीची इतर वैशिष्ट्ये आहेत. सुमारे ९०० किलो वजनाचा शेंदूर लेप काढल्यावर ही मूळ मूर्ती समोर आली आहे. या प्रक्रियेमुळे मूर्तीचे तत्कालीन कोरीव काम केलेले दगडी सिंहासन आणि प्रेक्षणीय गाभाराही आता भाविकांना पाहता येणार आहे. शेंदूर कवच काढण्यासाठी पुरातत्व विभाग, विविध मूर्तीतज्ञ आणि धार्मिक क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने तज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली सुमारे दोन आठवड्यांत पार पडली. आता गणेशभक्तांना शिवपूर्वकाळातील या ऐतिहासिक मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 7:24 pm

पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला 9 जागा:भाजपसोबतच्या युतीत महानगरपालिका निवडणुकीसाठी वाटप

पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) यांची युती असून पक्षाला पुणे महानगरपालिका निवडणुकीत ९ जागा मिळाल्याची माहिती शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी दिली आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये राहुल भंडारे, प्रभाग २ अ - रेणुका चलवादी, प्रभाग २ ब - सुधीर वाघमारे, प्रभाग ६ संतोष आरडे, प्रभाग ७ निशा मानवदकर, प्रभाग ८ परशुराम वाडेकर, प्रभाग १३ निलेश आल्हाट, प्रभाग १४ हिमाली कांबळे आणि प्रभाग २२ मधून बापू कांबळे यांना उमेदवारी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांच्या नेतृत्वात निवडणुकीला उमेदवार सामोरे जाणार आहे. पुढे त्यांनी सांगितले आहे की, भाजपकडे आम्ही १५ जागांची मागणी केली होती, वाटाघाटी मध्ये भाजपाने आम्हाला ९ जागा दिल्या आहेत. यामध्ये ६ पुरूष आणि ३ महिलांचा समावेश असून सामजिक संतुलन राखण्यात आले आहे, आरपीआयच्या उमेदवारांमध्ये ५ बौद्ध, ३ मातंग आणि एक धनगर उमेदवार आहे. मागील निवडणुकीत देखील भाजप आणि आरपीआय यांची मनपा युती होती त्याचप्रमाणे आता सुद्धा आम्ही युती म्हणून महापालिका निवडणुका लढवणार असून पुणे महापालिकेवर भाजप - आरपीआयची सत्ता येईल असा विश्वास शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, परशुराम वाडेकर, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, मोहन जगताप, महिला अध्यक्ष हिमाली कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 7:23 pm

पुणे जागतिक सायकलिंग हब बनवण्याचे ध्येय:'बजाज पुणे ग्रँड टूर'साठी जिल्हाधिकाऱ्यांचे संस्थांना सक्रिय सहभागाचे आवाहन

‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पुणे जिल्ह्यातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि इतर संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पुणे शहर पर्यटन आणि क्रीडा क्षेत्रात जागतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी, विविध विद्यापीठे, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरु युवा केंद्र, क्रीडा संघाचे सदस्य तसेच संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते. जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले की, पुणे हे एकेकाळी 'सायकलीचे शहर' म्हणून ओळखले जात होते. सध्या पुण्यात ५० हजारपेक्षा अधिक नागरिक दररोज सायकल चालवतात आणि १० हजारहून अधिक सायकलपटू जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेतात. पुणे शहराचा सायकलीचा इतिहास, येथील भौगोलिक परिस्थिती आणि जैवविविधता लक्षात घेऊन 'टूर द फ्रान्स' स्पर्धेच्या धर्तीवर या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 'बजाज पुणे ग्रँड टूर २०२६' ही स्पर्धा १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेचा युसीआय सायकलिंग कॅलेंडरमध्ये अधिकृतपणे समावेश करण्यात आला असून, तिचे थेट प्रक्षेपण जगभरात केले जाईल. ही स्पर्धा चार टप्प्यांत असून, जिल्ह्यातील एकूण नऊ तालुक्यांतून ती जाणार आहे. एकूण ४३७ किलोमीटर लांबीच्या या स्पर्धेत ४० देशांतील १७६ सायकलपटू सहभागी होणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेबाबत सर्वत्र मोठी उत्सुकता आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना आपले विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून पाठवण्याचे आवाहन केले. तसेच, ग्रामीण भागातील सरपंचांनी गावातील गणेश मंडळाचे सदस्य, राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेचे महत्त्व सांगून त्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि गावपातळीवर पारंपरिक व सांस्कृतिक पद्धतीने सायकलपटूंचे स्वागत करावे, असेही ते म्हणाले. या बैठकीत उपस्थित प्रतिनिधी आणि सरपंचांनी काही सूचना केल्या. त्या सूचनांवर सकारात्मक विचार करून कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 7:23 pm

शिक्षक भरती प्रक्रियेचा भार आता राज्य परीक्षा परिषदेवर

पुणे : राज्यात सन २०१७ पासून शिक्षक भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे आणि शिक्षण आयुक्त कार्यालयामार्फत केली जात होती. मात्र आगामी काळात ही प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत केली जाईल, असा निर्णय शासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे तसे परिपत्रक देखील प्रसिद्ध केले आहे. शासन निर्णयानुसार यापुढील काळात पवित्र पोर्टलमार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज […] The post शिक्षक भरती प्रक्रियेचा भार आता राज्य परीक्षा परिषदेवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 7:06 pm

मराठी अभिनेत्रीला भाजपची उमेदवारी:'महालक्ष्मी'च्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेला चेहरा आता राजकीय मैदानात; कांदिवलीतून लढणार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून मराठी अभिनेत्रीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. कांदिवली पूर्व येथील प्रभाग क्रमांक २५ साठी भाजपने प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशा परुळेकर यांना 'एबी' फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने एकेकाळी मोठा पडदा गाजवणाऱ्या निशा आता जनसेवेच्या वसा घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. निशा परुळेकर यांच्या उमेदवारीमुळे कांदिवली पूर्व भागातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे योगेश भोईर किंवा माधुरी भोईर यांचे तगडे आव्हान असणार आहे. एका बाजूला शिवसेनेचा स्थानिक जनसंपर्क आणि दुसऱ्या बाजूला निशा परुळेकर यांचा चाहता वर्ग, असा हा चुरशीचा सामना पाहण्यासारखा ठरेल. अभिनय क्षेत्रात मोठी कारकीर्द निशा परुळेकर हे मराठी कलाविश्वातील एक आदराचे नाव आहे. तिने नाटक, मालिका आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांत आपली मोहोर उमटवली आहे. 'काळुबाई पावली नवसाला', 'अशी होती संत सखू', 'पोलीस लाईन', 'हरी ओम विठ्ठला', 'तीन बायका फजिती ऐका' अशा चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. चित्रपटांसोबत निशाने नाटकांतही काम केले आहे, ती भरत जाधवसोबत 'सही रे सही' या अजरामर नाटकात दिसली होती, तर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' आणि 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. विशेषतः त्यांनी साकारलेली 'महालक्ष्मी अंबाबाई'ची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. निशाने आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, आता कांदिवलीकर 'महालक्ष्मी'ला कौल देतात की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. निशा आधीपासूनच राजकारणात सक्रीय निशा परुळेकर केवळ ग्लॅमरसाठी राजकारणात आलेल्या नाहीत, तर त्या गेल्या काही काळापासून भाजपच्या संघटन कार्यात सक्रिय आहेत. सध्या त्या भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या सहसंयोजक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. पक्षातील त्यांच्या निष्ठेचा आणि कामाचा विचार करूनच भाजपने त्यांना मुंबई महापालिकेच्या आखाड्यात उतरवले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 6:56 pm

अश्लील मजकुरांवर तात्काळ कारवाई करा

नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाढत्या अश्लील कंटेन्ट आणि आक्षेपार्ह मजकुराबाबत केंद्र सरकारने आता अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) यांसारख्या मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांना केंद्र सरकारने स्पष्ट शब्दांत ताकीद दिली असून अश्लील मजकुरावर तातडीने कारवाई न केल्यास गंभीर कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा सरकारने दिला आहे. […] The post अश्लील मजकुरांवर तात्काळ कारवाई करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 6:47 pm

लढणार तर 'कमळ' चिन्हावरच:भाजप नेत्या अक्षता तेंडुलकरांची निवडणुकीतून माघार, शिवसेना शिंदे गटाकडून मिळाली होती ऑफर

भाजप नेत्या अक्षता तेंडुलकर यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. वॉर्ड क्रमांक 192 मधून निवडणूक लढवण्यासाठी त्या इच्छुक होत्या, मात्र हा वॉर्ड महायुतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने पेच निर्माण झाला होता. शिवसेनेने तेंडुलकर यांना त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची अधिकृत ऑफर दिली होती. परंतु, 'कमळ' या आपल्या मूळ चिन्हाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढवण्यास त्यांनी ठाम नकार दिला आणि पक्षाशी निष्ठा राखत निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करत निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. अक्षता तेंडुलकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, एकमेव ओपन कॅटेगरीत असलेल्या वॉर्ड क्रमांक १९२ मधून निवडणूक लढवण्यास मी इच्छुक होते, काल दुपारपर्यंत भाजपच्या नेत्यांनी हा वॉर्ड भाजपला लढवण्यास मिळावा यासाठी अतोनात प्रयत्न केले. मात्र महायुतीच्या निर्णयानुसार हा वॉर्ड शिवसेनेला मिळाला. एक स्ट्राँग उमेदवार म्हणून शिवसेनेकडून मला हा वॉर्ड लढवण्यासाठी दुपारी ऑफर आली. त्यानुसार काही वरिष्ठांशी चर्चा करून या प्रयोगाविषयी चाचपणी करण्यात आली. याला अनुसरून काल आम्हाला सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर बोलावण्यात आले होते, त्यानुसार आम्ही तिथे भेट दिली. शिवसेनेतून लढण्याच्या प्रक्रियेनुसार पक्षप्रवेश व AB फॉर्म वाटप, दोन्ही एकत्र होणार होते. तिथे गेल्यावर काही काळ आमची चर्चा झाली व निर्णय घेण्यासाठी मी काही वेळ मागून घेतला. मी व माझ्यासोबत असलेले अनेक कार्यकर्ते घेऊन तिथून रात्री उशिरा आम्ही पुन्हा दादर कार्यालयात परतलो. माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर सर्वानुमते असे ठरवले की वरिष्ठांची परवानगी असली तरी एका निवडणुकीसाठी मागील दहा वर्षांचे पक्षातील कार्य, हिंदुत्वासाठी सुरू असलेला लढा आणि भाजपा परिवार यांच्यापासून दूर व्हायचे नाही, लढायचे असेल तर कमळ चिन्हावर लढायचे. मात्र याबाबत मान्यता न मिळाल्याने मी सदर सीट न लढवण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती अक्षता तेंडुलकर यांनी दिली. माझ्यावर दृढ विश्वास दाखवणाऱ्या एकनाथजी शिंदे, आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते, तसेच मला साथ देणारे माझे सर्व सहकारी, माझ्यावर शुभेच्छा व आशीर्वादाचा वर्षाव करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे अक्षता तेंडुलकर यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 6:46 pm

पुण्यात 'युती-आघाडी' कागदावरच:धंगेकर विरुद्ध बिडकर हायव्होल्टेज सामना पुन्हा एकदा! 2017 ची होणार का पुनरावृत्ती?

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा गोंधळ कायम राहिल्याने यंदा पुण्यात अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यातील युती अधिकृतरीत्या जाहीर न झाल्याने दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने-सामने ठाकले आहेत. तर दुसरीकडे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही समझोता न झाल्याने पुण्यात 'घड्याळ' विरुद्ध 'तुतारी' असा थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे. पुण्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष प्रभाग क्रमांक 23 आणि 24 कडे लागले आहे. येथे शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आणि भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी प्रभाग क्रमांक 23 मधून, तर मुलगा प्रणव धंगेकर याने प्रभाग क्रमांक 24 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, 2017 मध्ये रवींद्र धंगेकर यांनी गणेश बिडकर यांचा पराभव केला होता. आता 2017 च्या त्या अटीतटीच्या लढतीची पुनरावृत्ती होणार असून, यावेळी गणेश बिडकर यांच्यासमोर रवींद्र धंगेकरांच्या पुत्राने, प्रणव धंगेकराने मोठे आव्हान उभे केले आहे. दोन्ही राष्ट्रवादीत बिघाडी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच दिसत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पुण्यात नक्की किती जागा लढवायच्या, हे शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहिले. ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी 70 हून अधिक उमेदवारांना 'एबी' फॉर्म वाटल्याचे जाहीर केल्याने, दोन्ही राष्ट्रवादीमध्ये अनेक प्रभागांत मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. युती आणि आघाडी केवळ नावापुरतीच? भाजप आणि शिंदे गटातील जागावाटपाची चर्चा अर्जाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत सुरूच राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. जागावाटप न झाल्याने अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. त्यामुळे कागदावर दिसणारी युती प्रत्यक्षात मैदानात कुठेही दिसून येत नाही. महायुती असो वा महाविकास आघाडी, दोन्ही बाजूंच्या जागावाटपाचा घोळ मिटला नसल्याने पुण्यात यंदा बहुरंगी आणि चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 6:25 pm

राज्यात १४ ठिकाणी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती तुटली

मुंबई : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने सर्वच पक्षांमध्ये जोरदार हालचाली पाहायला मिळाल्या. काही इच्छुकांना पक्षाकडून उमेदवारी मिळाल्याने आनंदाचे वातावरण होते, तर अनेक पदाधिका-यांना ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी पक्षाशी दीर्घकाळ निष्ठा राखणा-या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप […] The post राज्यात १४ ठिकाणी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती तुटली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 6:19 pm

मला सर्वात जास्त वाईट वाटतं ते तुमच्याबद्दल...:भाजपच्या उमेदवारी यादीवरून सुषमा अंधारेंचा केशव उपाध्येंना खोचक टोला

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने अनेक ठिकाणी बाहेरून आलेल्या 'आयारामां'ना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यावर निशाणा साधला आहे. मला आज सगळ्यात जास्त वाईट वाटतं ते तुमच्याबद्दल... अशा एका वाक्यात अंधारे यांनी उपाध्ये यांची पक्षात उपेक्षा होत असल्याचे सुचवले आहे. भाजपच्या माध्यम प्रमुखपदाची जबाबदारी नुकतीच मिळालेल्या नवनाथ बन यांना मुंबईतून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, दीर्घकाळापासून पक्षाची बाजू मांडणाऱ्या केशव उपाध्ये यांना मात्र संधी मिळालेली नाही. याच मुद्द्यावरून सुषमा अंधारे यांनी उपाध्ये यांना चिमटा काढला आहे. मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरातील तीन सदस्यांना, तसेच विधान परिषदेचे आमदार प्रविण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांना उमेदवारी मिळाल्याने निष्ठावंतांमध्ये सुरू असलेली धुसफूस अंधारे यांनी अधोरेखित केली आहे. भाजपचे 9 तरुण प्रवक्ते रिंगणात! दरम्यान, महापालिका निवडणुकीत भाजपकडून 9 प्रवक्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. मुंबईतून नवनाथ बन, गणेश खंडकप, राणी द्विवेदी, नील सोमय्या, योगेश वर्मा, मकरंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाण्यातून मृणाल पेंडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यातून कुणाल टिळक, नागपूरातून शिवानी दाणी यांना उमेदवारी मिळाली आहे, अशी माहिती केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्ट करत दिली आहे. आपल्या-आपल्या वॉर्डमध्ये ठोस, पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करून दाखवण्याची क्षमता या सर्वांमध्ये आहे. या 9 तरुण प्रवक्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! तरुणाईच्या बळावर, विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे, असे केशव उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 5:59 pm

नववर्षात ८ वा वेतन आयोग लागू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ८ व्या वेतन आयोगाला अधिकृत मंजुरी दिली असून या आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना (पेन्शनर्स) तात्काळ वाढीव पगार मिळणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. आयोगाच्या शिफारसी लागू होण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी […] The post नववर्षात ८ वा वेतन आयोग लागू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 5:44 pm

एआय तंत्रज्ञान विवेकाने आत्मसात करा - अच्युत गोडबोले:बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या अधिवेशनात मार्गदर्शन

ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोले यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) तंत्रज्ञान विवेकाधिष्ठित वापराने आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. जीवनाच्या अनेक क्षेत्रांत एआय लवकरच जागा व्यापणार असून ते नाकारणे शक्य होणार नाही, असे ते म्हणाले. ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या (एआयबीओएमईएफ) नवव्या अखिल भारतीय अधिवेशनात ते मार्गदर्शन करत होते. गोडबोले यांनी 'एआय'च्या युगाचा सुरुवातीपासून आढावा घेत, संगणकीय तंत्रज्ञानाचे विविध टप्पे स्पष्ट केले. 'कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कामगार वर्ग - संधी, आव्हाने आणि पुढील वाटचाल' या विषयावरील व्याख्यानात त्यांनी आपले विचार मांडले. हे अधिवेशन बीएमसीसी रस्त्यावरील दादासाहेब दरोडे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला 'एआयबीओएमईएफ'चे महासचिव देवीदास तुळजापूरकर, अध्यक्ष स्वयंप्रकाश तिवारी, सचिव धनंजय कुलकर्णी आणि संयोजक शैलेश टिळेकर आदी उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग आपण रोखू शकत नाही किंवा नाकारू शकत नाही, ही वस्तुस्थिती असेल, तर या युगाचा विवेकाने स्वीकार करणे हाच चांगला मार्ग ठरेल, असे गोडबोले यांनी नमूद केले. 'एआय' युगाचा सर्वाधिक प्रभाव सेवा आणि आरोग्य क्षेत्रावर पडेल. अनेक प्रचलित रोगांवर नियंत्रण मिळवणे यामुळे सुलभ होईल. आर्टिफिशियल न्यूरॉन नेटवर्कने मशीनला डेटा पुरवून पॅटर्न ओळखण्याची क्षमता अधिकाधिक प्रगत करत नेणे, या प्रक्रियेत हे तंत्रज्ञान सध्या आहे. सर्व उद्योग, व्यवसाय, सेवा आणि सर्जनशीलतेची क्षेत्रेही कृत्रिम बुद्धिमत्तेने व्यापली जातील, असे चित्र त्यांनी मांडले. 'एआय'मुळे अनेक चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी घडतील, ही वस्तुस्थिती असली तरी, हे तंत्रज्ञान अयोग्य आणि अनैतिक मार्गांनी वापरले गेल्यास त्याचे दुष्परिणामही संभवतात. त्यामुळे 'एआय'चा वापर नेहमीच विवेकाने आणि जबाबदारीने केला गेला पाहिजे, असे आवाहन अच्युत गोडबोले यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 5:29 pm

नववर्ष स्वागतासाठी वाहतूक बदल, मद्यपींवर कारवाईचा इशारा:पुण्यातील लष्कर, डेक्कन भागात गर्दी टाळण्यासाठी पोलिसांची कडक पाऊले

पुण्यात नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन लष्कर आणि डेक्कन जिमखाना परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेनंतर हे बदल लागू होतील. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिला आहे. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता, तसेच डेक्कन जिमखाना परिसरातील जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन रस्त्यावर (नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता) नववर्षानिमित्त तरुणाईची मोठी गर्दी होते. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. गर्दी वाढल्यास मध्यरात्री गर्दी ओसरेपर्यंत वाहतूक बदल कायम राहतील, असे उपायुक्त जाधव यांनी स्पष्ट केले. लष्कर भागातील वाहतूक बदल पुढीलप्रमाणे आहेत: वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौकात बंद करून ती कुरेशी मशीद आणि सुजाता मस्तानी चौकाकडे वळवण्यात येईल. इस्काॅन मंदिराकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता आणि अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद राहील. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करून ती ईस्ट स्ट्रीटवरून इंदिरा गांधी चौकाकडे वळवण्यात येईल. याशिवाय, इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील आणि ती लष्कर पोलिस ठाण्याकडे वळवण्यात येईल. सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूकही बंद करण्यात येणार आहे. फर्ग्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक बदल असे आहेत: कोथरूड आणि कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडुजीबाबा चौकात थांबवण्यात येईल. ही वाहतूक विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता आणि अलका चित्रपटगृहाकडे वळवण्यात येईल. जंगली महाराज रस्त्यावरील गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद करण्यात येईल. झाशीची राणी चौकातील वाहतूक गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्तामार्गे वळवण्यात येईल. महात्मा गांधी रस्ता आणि फर्ग्युसन रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहेत. लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावर १५ ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौकादरम्यान वाहनांना सायंकाळी ५ नंतर प्रवेश बंद राहील. तसेच, फर्ग्युसन रस्त्यावर गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद असेल. पहाटे ५ वाजेपर्यंत ही वाहतूक बंदी कायम राहणार आहे. मद्यपींवर कारवाईचा इशारा मद्यप्राशन करून भरधाव वाहने चालविणारे दुचाकीस्वार, मोटारचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांकडून कारवाई (ड्रंक अँड ड्राइव्ह) करण्यात येणार आहे. मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी ब्रेथ ॲनलायझर यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. तपासणीसाठी वापरण्यात येणारी प्लास्टिक नळी नष्ट करण्यात येणार आहे. त्याचा पुनर्वापर करण्यात येणार नाही. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. - हिंमत जाधव, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखाअवजड वाहनांना बंदी शहरात येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. गुरुवारी (१ जानेवारी) रात्री बारापर्यंत शहरात येणाऱ्या जड वाहनांना शहरात येण्यास मनाई करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 5:27 pm

नार्वेकर कुटुंबातील तिघांना उमेदवारी

मुंबई : प्रतिनिधी आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. उमेदवारी न मिळाल्याने मुंबईमध्ये विविध पक्षांमध्ये बंडखोरी होऊन पदाधिकारी राजीनामे देत आहेत. घराणेशाहीबाबत कार्यकर्त्यांमधून आणि पदाधिका-यांमधून नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कुलाबा भागात नार्वेकर कुटुंबातील तिघांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर विरोधकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपने […] The post नार्वेकर कुटुंबातील तिघांना उमेदवारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 5:26 pm

भाजपने फेकलेल्या जागांवर शिंदे गट

मुंबई : प्रतिनिधी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. भाजप आणि शिंदे गटामधील जागावाटप जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेच्या इतिहासाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, आतापर्यंत मुंबईमध्ये शिवसेनाच मोठ्या भावाच्या भूमिकेत होती […] The post भाजपने फेकलेल्या जागांवर शिंदे गट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 5:24 pm

महायुतीकडून आमच्यासोबत विश्वासघात

मुंबई : प्रतिनिधी सत्ताधारी भाजप व शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रिपाइं (आ.) एकही जागा सोडली नाही. यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले चांगलेच संतापले आहेत. महायुतीने आमच्यासोबत विश्वासघात केला. आम्ही हा अपमान कदापि सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी या प्रकरणी महायुतीतल्या घटकपक्षांना दिला आहे. मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले […] The post महायुतीकडून आमच्यासोबत विश्वासघात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 5:22 pm

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली; ७ ठार, १२ जण जखमी

डेहराडून : उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील सल्ट भिकियासैन परिसरात मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. भिकियासैन-विनायक रस्त्यावर द्वारहाटहून रामनगरकडे जाणा-या एका प्रवासी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे बस खोल दरीत कोसळली. या अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. तर १२ प्रवासी जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात सात […] The post उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली; ७ ठार, १२ जण जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 5:21 pm

भाजपच्या 'नो रिलेटिव्ह' धोरणाला राहुल नार्वेकर कुटुंब अपवाद:एकाच घरात तिघांना उमेदवारी; विधानसभा अध्यक्षांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पारदर्शकता आणि सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी भाजपने 'आमदार-खासदारांच्या नातेवाईकांना तिकीट नाही' असे कडक धोरण जाहीर केले होते. मात्र, दक्षिण मुंबईच्या राजकारणात हे धोरण शिथिल झाल्याचे दिसत आहे. भाजपचे कद्दावर नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरातील चक्क तीन सदस्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या निर्णयामुळे पक्षात आणि राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यावर खुद्द राहुल नार्वेकर यांनी या उमेदवारीवर स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या कुटुंबाला मिळालेल्या उमेदवारीवर टीका करणाऱ्यांना राहुल नार्वेकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ज्यांना उमेदवारी मिळाली आहे, ते कोणीही पॅराशूट उमेदवार नाहीत. त्यांनी गेल्या १०-१५ वर्षांपासून जमिनीवर राहून लोकांसाठी काम केले आहे. लोकांचा त्यांच्या कामावर विश्वास आहे आणि मतदारांनी त्यांना स्वीकारले आहे. केवळ नातेवाईक आहेत म्हणून नव्हे, तर त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. नार्वेकर कुटुंबातील 'हे' सदस्य रिंगणात राहुल नार्वेकर यांचे बंधून मकरंद नार्वेकर यांना भाजपने प्रभाग क्रमांक २२६ मधून पुन्हा संधी दिली आहे. मकरंद नार्वेकर यांच्या पत्नी हर्षिता यांना प्रभाग क्रमांक २२७ मधून रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर, राहुल नार्वेकर यांच्या चुलत भगिनी गौरवी यांना प्रभाग क्रमांक २२५ मधून भाजपने उमेदवारी दिली आहे. स्वतः राहुल नार्वेकर हे कुलाबा मतदारसंघाचे आमदार असून सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. अशा स्थित्तीत एकाच कुटुंबात चार पदे गेल्याने चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीतच तिन्ही उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला अर्ज दाखल केला. भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह? नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांच्या मुलांचे अर्ज पक्षाने मागे घ्यायला लावले, तर कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलालाही संधी नाकारण्यात आली. मात्र, मुंबईत नार्वेकर कुटुंबासाठी हा नियम शिथिल केल्याने पक्ष एकाला एक आणि दुसऱ्याला वेगळा न्याय का लावत आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. भाजपमध्ये तिकीट वाटपावरून उमेदवारांची नाराजी दरम्यान, मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती. सत्ताधारी महायुतीत विशेषतः भाजपमध्ये तिकीट वाटपाच्या मुद्यावरून संतापाच्या लाटा उसळत आहेत. उमेदवार यादीत आपले नाव नसल्याचे पाहताच या इच्छुकांनी भाजपच्या नेत्यांवर तोंडसूख घेतले. यावेळी त्यांची रडारडही सुरू होती. यात काही महिला इच्छुकांचाही समावेश होता. नाशिक भाजपमध्येही प्रचंड नाराजी समोर आली आहे. तिकीट नाकारल्याने अनेक इच्छुक नाराज झालेत. त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तर 'एबी' फॉर्मसाठी काही इच्छुकांनी शहराध्यक्षांचा पाठलाग केला. निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप होतोय. नाशिक-मुंबई महामार्गावर शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या गाडीचा इच्छुकांनी पाठलाग केला.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 4:59 pm

मुंबईत प्रकाश सुर्वेंना शिवसैनिकांनी दाखवले काळे झेंडे:प्रभाग क्रमांक 3 ची जागा भाजपला सोडल्याने कार्यकर्ते आक्रमक; प्रकाश दरेकरांच्या उमेदवारीला विरोध

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांना शिवसैनिकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रभाग क्रमांक 3 भाजपला सोडल्याने नाराज शिवसैनिकांनी प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. मुंबई महापालिकेचा प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रकाश सुर्वे यांनी प्रकाश पुजारी यांना निवडणुकीसाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, ऐनवेळी हा वॉर्ड भाजप नेते प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांना सोडण्यात आला, यामुळे नाराज शिवसैनिकांनी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या विरोधात निदर्शने केली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठीचा अर्ज भरण्यासाठी अवघा एक तास उरलेला असताना मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात असंतोष उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार वैष्णवी पुजारी यांना डावलून बाहेरचा उमेदवार भाजपकडून लादण्यात आल्याने याचा निषेध करण्यासाठी शिंदे गटाचे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवत आमदार प्रकाश सुर्वे आणि उमेदवार प्रकाश दरेकर यांचा जोरदार निषेध नोंदवला. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी इतर मतदारसंघात तडजोड करावी लागल्याने हा मतदारसंघ भाजपला गेल्याचा दावा प्रकाश पुजारी यांनी केला आहे. तसेच या ठिकाणी कार्यकर्त्यांना अंधारात ठेऊन वरिष्ठ नेत्यांनी बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी जाहीर केल्याचे वैष्णवी पुजारी यांनी म्हटले आहे. दहिसरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार निदर्शने केली आहेत. वॉर्ड क्रमांक 3 मधून प्रकाश पुजारी यांच्या मुलीला उमेदवारी मिळण्याचे संकेत आमदार सुर्वे यांनी दिले होते आणि त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही केल्या होत्या. मात्र, ऐनवेळी ही जागा शिवसेनेऐवजी भाजपकडे गेल्याने संतापलेल्या पुजारी आणि त्यांच्या समर्थकांनी सुर्वे यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वादाचे मुख्य कारण म्हणजे वॉर्ड क्रमांक 3 मधून भाजपने विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये झालेल्या जागावाटपानुसार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 90 जागा मिळाल्या आहेत, तर भाजप 137 जागांवर निवडणूक लढवणार आहे. या जागावाटपामुळे इच्छुक उमेदवार डावलले गेल्याने सध्या दहिसरमध्ये शिंदे गटातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 4:58 pm

सूर्यकुमार यादव माझ्या संपर्कात; अभिनेत्री खुशी मुखर्जी

मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याबाबत अभिनेत्री खुशी मुखर्जीने केलेल्या दाव्यामुळे सध्या खळबळ उडाली आहे. खुशी मुखर्जीने असा दावा केला आहे की, सूर्यकुमार यादव तिला पूर्वी मेसेज करत होता, मात्र आता दोघांमध्ये कोणताही संवाद नाही. तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. खुशी मुखर्जी ही तिच्या बोल्ड ड्रेसिंग स्टाईलमुळे अनेकदा […] The post सूर्यकुमार यादव माझ्या संपर्कात; अभिनेत्री खुशी मुखर्जी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 4:52 pm

एबी फॉर्मची पळवापळवी

नाशिक : प्रतिनिधी नाशिक महानगरपालिका निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये राडा झाल्याची बातमी समोर आली आहे. एबी फॉर्म वाटपावरून नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. एबी फॉर्म वाटपावरून भाजपमध्ये राडा झाला असून एबी फॉर्मची पळवापळवी सुरू आहे. भाजपचे तिन्ही आमदार एकाच गाडीत एबी फॉर्म घेऊन गेले. त्यामुळे भाजप आमदारांच्या गाडीचा नाशिक-मुंबई महामार्गावर जिल्हाध्यक्षांनी पाठलाग केला. याचा व्हीडीओ […] The post एबी फॉर्मची पळवापळवी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 4:50 pm

शिक्षकाचे घर फोडून रोख रकमेसह दागिने लंपास

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी नाताळच्या सुट्यांनिमित्त कुटुंबीयांसह पर्यटनासाठी गुजरात येथे गेलेल्या शिक्षकाचे घर फोडून चोराने रोख रकमेसह दागिने लंपास केले. ही घटना २४ ते २८ डिसेंबरदरम्यान राजमाता जिजाऊ पार्क, कांचनवाडी भागात घडली. याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. संजय सदाशिव बनकर (४४, रा. प्लॉट क्र २९, राजमाता जिजाई पार्क, नाथ व्हॅली रोड, कांचनवाडी) हे नाताळ सणानिमित्त […] The post शिक्षकाचे घर फोडून रोख रकमेसह दागिने लंपास appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 4:43 pm

संभाजीनगरमध्ये राजेंद्र जंजाळ यांचा यू-टर्न:काल माघारीची घोषणा, आज निवडणुकीच्या रिंगणात; शेवटच्या दिवशी भरला उमेदवारी अर्ज

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे, सोमवारीच जंजाळ यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करून माघार घेतली होती, मात्र २४ तासांच्या आतच त्यांनी आपला निर्णय बदलल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे. सोमवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजपच्या जागावाटपावरून मोठे नाट्य रंगले होते. भाजपच्या प्रस्तावात शिवसेनेच्या हक्काच्या जागांवर दावा करण्यात आल्याने राजेंद्र जंजाळ कमालीचे व्यथित झाले होते. निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून भाजपला जागा सोडल्या जात आहेत, असा गंभीर आरोप करत त्यांना अश्रू अनावर झाले होते. याच रागातून त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली होती. सोमवारी काय घडले होते? शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपासाठी आतापर्यंत नऊ बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही. भाजपच्या ताज्या प्रस्तावानुसार, जंजाळ समर्थकांचे वर्चस्व असलेले आणि शिवसेनेचे बालेकिल्ले मानले जाणारे 7 प्रभाग भाजपला देण्याचे प्रस्तावित करण्यात आले. हे तेच प्रभाग आहेत ज्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळवून दिले होते. हा अन्याय सहन न झाल्याने राजेंद्र जंजाळ कार्यालयातून रडत बाहेर पडले. त्यांचे अश्रू पाहून कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर धडक दिली. यावेळी बंगल्याबाहेर युती तोडा, स्वबळावर लढा अशा घोषणाबाजी करत, भाजपला जास्त जागा सोडण्यापेक्षा युती तोडून स्वतंत्र लढण्याची मागणी केली. युतीचे काय होणार? राजेंद्र जंजाळ यांनी अर्ज भरला असला तरी, भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे. राजेंद्र जंजाळ यांच्या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह असला तरी, भाजपच्या गोटात यावर काय प्रतिक्रिया उमटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते नाराज दरम्यान, आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संभाजीनगर भाजपमध्ये मोठा नाराजी नाट्य पाहायला मिळाले. भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी आज मोठा राडा केला. भाजपच्या उमेदवार यादीत आपले नाव नसल्याचे पाहताच या इच्छुकांनी भाजपच्या नेत्यांवर तोंडसूख घेतले. यावेळी त्यांची रडारडही सुरू होती. यात काही महिला इच्छुकांचाही समावेश होता.पक्षासाठी नोकरी सोडली. मात्र, उमेदवारी दिली नाही. आम्ही दुकानदारी केली नाही. पक्षासाठी प्रामाणिक काम केले. पण त्याचे फळ हे मिळाले, असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 4:35 pm

संभाजीनगरात भाजपचे चाललंय काय?:रिपाइं कार्यकर्त्यांचा गोंधळ, एका चक्क अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा केला प्रयत्न

सत्ताधारी महायुतीत विशेषतः भाजपमध्ये तिकीट वाटपाच्या मुद्यावरून संतापाच्या लाटा उसळत आहेत. भाजपच्या छत्रपती संभाजीनगर येथील इच्छुक उमेदवारांनी या प्रकरणी आकांडतांडव केल्यानंतर आता मित्र पक्ष असणाऱ्या रिपाइंनेही (आ.) भाजपवर कमालीचा रोष व्यक्त केला आहे. या प्रकरणी रिपाइंच्या एका कार्यकर्त्याने चक्क अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. सत्ताधारी महायुती या निवडणुकीला मिळून सामोरे जाईल अशी शक्यता होती. पण उमेदवारी भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा करत या निवडणुकीला स्वबळावर सामोरे जाण्याची घोषणा केली. यामुळे महायुतीतील रिपाइं (आ.) सारख्या घटकपक्षांची गोची झाली आहे. या पक्षांना महायुतीच्या जागावाटपात काही जागा मिळण्याची शक्यता होती. पण युती तुटल्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. या पार्श्वभूमीवर रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात जाऊन गदारोळ केला आहे. नेमकी काय घडली घटना? यासंबंधीच्या माहितीनुसार, रिपाइंचे नेते राकेश पंडित व संजय ठोकळ यांनी आज आपल्या समर्थकांसह भाजप कार्यालयात प्रवेश केला. तिथे त्यांनी मंत्री अतुल सावे व खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भाजपने आम्हाला मित्रपक्ष म्हणून फक्त वापरून घेतले आणि उमेदवारीच्या वेळी वाटाण्याच्या अक्षता दिल्या, असा आरोप या नेत्यांनी केला. त्यांचा संताप एवढा टोकाचा होता की, त्यांच्यासोबत आलेल्या एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापुढेच ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी भाजपवर आपली जाणिवपूर्वक हेटाळणी केल्याचा आरोप केला. भाजपमध्ये अगोदरच निष्ठावंतांची बंडाळी सुरू असताना आता मित्रपक्षानेही आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे भाजपच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे. या आंदोलनामुळे भाजप कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हे ही वाचा... संभाजीनगरात महायुतीचा पोपट मेला:भाजपचा हट्ट आणि अंहकार यामुळेच युती टिकू शकली नाही, संजय शिरसाट यांचा थेट आरोप संभाजीनगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, महायुती तुटल्याची अधिकृत घोषणा शिवसेना शिंदे गटाचे नेते तसेच मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. भाजपचा हट्ट आणि अंहकार यामुळेच ही युती टिकू शकली नाही, असा थेट आणि तीव्र आरोप शिरसाट यांनी केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये भाजपकडून सातत्याने दबावाचे राजकारण केले जात होते. जागावाटपात शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्न झाला, तसेच स्थानिक नेत्यांचा सन्मान न राखता एकतर्फी निर्णय लादले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 4:32 pm

भाजपा कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी पालिका निवडणुकीत सर्वांचे लक्ष महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपावर लागले आहे. कारण पुणे, नांदेड आणि अमरावतीनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही शिवसेना आणि भाजपा युती तुटली आहे. युती तुटल्यानंतर भाजपाने इच्छुक उमेदवारांना उमेदवारी देणे अपेक्षित होते, मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील भाजपा पक्ष कार्यालयाला घेराव घातला आहे. […] The post भाजपा कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा इशारा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 4:21 pm

अजित पवारांकडून गुंड आंदेकरांच्या घरात दोघींना उमेदवारी:गजा मारणेच्या पत्नीनंतर आंदेकर टोळीला पाठबळ? राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपत असताना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गजा मारणेंच्या पत्नीनंतर आता स्वतःचा नातू आयुष कोमकर याच्या हत्या प्रकरणात आणि कोट्यवधींच्या खंडणी प्रकरणात सध्या येरवडा कारागृहात असलेल्या सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांना प्रभाग क्रमांक २३ मधून अधिकृत उमेदवारी दिली आहे. आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या कुटुंबाला मिळालेल्या या राजकीय पाठबळामुळे पुण्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. बंडू आंदेकर कुटुंबाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे या उमेदवारीबाबत अजित पवार गटाने सुरुवातीपासूनच कमालीची गुप्तता पाळली होती. अधिकृत घोषणा न करता थेट अर्ज भरण्यावर भर देण्यात आला. जेणेकरून विरोधाची धार कमी करता येईल. मात्र, आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी आंदेकर यांच्या वकिलांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात धाव घेत 'एबी' फॉर्म सादर केले आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. आंदेकरांच्या वतीने त्यांच्या वकिलांनीच ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. कोर्टाची सशर्त परवानगी बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांनी निवडणूक लढवण्यासाठी विशेष न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. निवडणूक लढवणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्यांना अर्ज भरण्याची मुभा दिली. मात्र, न्यायालयाने काही कडक अटीही घातल्या आहेत. अजित पवारांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा कसा? अजित पवार यांच्या पक्षाकडून आज सकाळी कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे हिला उमेदवारी देऊन चर्चेला उधाण आणले होते. आता त्यानंतर लगेचच बंडू आंदेकर कुटुंबाला उमेदवारी दिल्याने, अजित पवारांच्या 'गुन्हेगारीमुक्त पुणे' या घोषणेची खिल्ली उडवली जात आहे. ५ कोटी ४० लाखांच्या खंडणी प्रकरणात आणि हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या व्यक्तींना सत्ताधारी पक्ष उमेदवारी कशी देऊ शकतो, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. गुंड बंडू आंदेकर आणि गुंड गज्या मारणे या दोघांचाही गुन्हेगारीचा तगडा इतिहास आहे. या दोघांची गुन्हेगारी प्रकरणे राज्यभर गाजली आहेत. असे असताना, सत्ताधारी पक्षाने अशा प्रकारे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला पाठबळ दिल्याने पुण्यातील राजकीय वर्तुळात आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आयुषच्या आईचा आत्मदहनाचा इशारा आंदेकर कुटुंबाला देण्यात येणाऱ्या उमेदवारीला आयुषच्या आईने तीव्र विरोध दर्शवला आहे. आंदेकर टोळीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत, त्यांना उमेदवारी देऊ नका. जर त्यांना उमेदवारी दिली तर मी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करेन, असा इशारा बंडू आंदेकर याची मुलगी आणि मृत आयुष कोमकरची आई हिने अजित पवारांना दिला होता. मात्र, या आर्त हाकेकडे दुर्लक्ष करत अजित पवारांच्या पक्षाने आंदेकर कुटुंबातील दोघींना निवडणुकीसाठी तिकिट दिले. जयश्री मारणे यांना प्रभाक क्रमांक 10 मधून उमेदवारी दुसरीकडे, गज्या मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तिकीट देण्यात आले आहे. त्या प्रभाग क्रमांक 10 मधून अधिकृत उमेदवार असतील. त्यांना पक्षाने एबी फॉर्मही दिला आहे. जयश्री मारणे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गजा मारणे सध्या कोथरूडमधील एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याप्रकरणी तुरुंगात बंदिस्त आहे. हा दुचाकीस्वार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करत होता. त्याला गजा मारणे याच्या टोळीने बेदम मारहाण केली होती. त्यानंतर गजा मारणे याच्यासह त्याच्या काही सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. आता चेंडू मतदारांच्या कोर्टात या वादग्रस्त उमेदवारीमुळे पुण्यात निवडणुकीच्या निकालापेक्षा या उमेदवारांच्या नैतिकतेवरच जास्त चर्चा रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता पुणेकर या 'गुन्हेगारी' पार्श्वभूमीच्या उमेदवारांना कौल देतात की नाकारतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 3:47 pm

मुंबईत ठाकरे गटाच्या इच्छुकांचा संताप:'आम्ही काय नुसते झेंडेच लावायचे का?' असा सवाल करत 'मातोश्री'बाहेर व्यक्त केला संताप

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी युती केली आहे. यामुळे अनेक प्रभागांतील राजकीय समीकरण बदलले आहे. ठाकरे गटातर्फे बंडखोरी टाळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात येत आहेत. पण त्यानंतरही आज नाराज इच्छुक उमेदवारांचे जत्थेच्या जत्थे आज मातोश्रीवर येऊन आदळत असल्याचे चित्र होते. यापैकी अनेकांनी यावेळी पक्षावर रोष व्यक्त करत आम्ही काय नुसते झेंडेच लावायचे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रभाग क्रमांक 202 मधून मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी दिली आहे. श्रद्धा जाधव यांनी आपला मुलगा पवन जाधव याला उमेदवारी देण्याचा आग्रह धरला. त्यासाठी त्यांनी सोमवारी मातोश्रीत ठाण मांडले. पण उद्धव ठाकरे यांनी पवनच्या जागी श्रद्धा जाधव यांना उमेदवारी देऊ केली. पण आता श्रद्धा जाधव यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांच्या भागातील शिवसैनिक प्रचंड संतापल्याचे चित्र आहे. स्वतःला, नवऱ्याला, मुलाला, सासऱ्याला तिकीट, मग आम्ही जायचे कुठे? या प्रकरणी एक शाखाप्रमुख आपला रोष व्यक्त करताना म्हणाला, मी सामान्य शिवसैनिक आहे. मागील 36 वर्षांपासून पक्षाचे काम करतो. पण आम्ही फक्त झेंडे लावण्याचेच काम करायचे का? श्रद्धा जाधव शाखेच्या विद्युत बीलही भरत नाहीत. मेन्टेन्सही देत नाहीत. शाखेत पाऊल टाकत नाहीत. त्यांनी अक्षरशः शाखा विकून खाल्ली. सगळे निगेटिव्ह रिपोर्ट दिले. त्यानंतरही त्यांना उमेदवारी देण्यात आली. स्वतःला तिकीट, नवऱ्याला तिकीट, मुलाला तिकीट, सासऱ्याला तिकीट, मग आम्ही जायचे कुठे? उद्धव ठाकरे साहेबांना कळत नाही का? याच वॉर्डातील अन्य एका महिला शिवसैनिकानेही यावेळी आपला रोष व्यक्त केला. त्या म्हणाल्या, या बाईला 7 वेळा उमेदवारी दिली गेली. आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. आमचे आयुष्य शिवसेनेसाठी गेले. आम्ही शिवेसनेसाठी डोकी फोडतो. आमचा जीव जाळतो. पण आमच्यासोबत गद्दारी झाली. आमचा शाखाप्रमुख इतके दिवस काम करतो, पण उद्धव ठाकरे नेहमी श्रद्धा जाधव यांचेच ऐकतात. मग आम्ही आहोत तरी कोण तुमच्या नजरेत? आम्ही कुणीच नाही का? आम्ही पाय जाळतो तेव्हा शिवसेनेचा उमेदवार जिंकून येतो. हे उद्धव ठाकरे साहेबांना कळत नाही का? तुमच्यासाठी श्रद्धा जाधव मोठ्या आहेत, मग आम्ही चिंधी आहोत का? यावेळी अन्य एका महिला शिवसैनिक म्हणाले, 2017 च्या निवडणुकीत श्रद्धा जाधव निवडून आल्या. त्यावेळी महिलांना साड्या वाटल्या. पण त्याचे 3 लाख रुपये अजून त्यांनी दिले नाही. दागिने गहाण ठेवून मी त्या साड्या विकत घेतल्या होत्या. पण त्या बाईने अजून मला पैसे दिले नाही. गरीब माणसाचे पैसे द्यायला काय होते? मी रस्त्यावर बसून वडापाव विकते. काम करणाऱ्या माणसाने काय करायचे? असा सवाल या महिलेने यावेळी उपस्थित केला.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 3:27 pm

सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार?:प्रकाश आंबेडकरांच्या विधानाने चर्चांना उधाण; अदानी यांच्या मध्यस्थीने शरद पवार एनडीएमध्ये म्हणत वडेट्टीवारांचाही दुजोरा

राज्यात सुरू असलेल्या महापालिका निवडणुकांच्या गदारोळात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी महायुती तुटत असतानाच पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती फिस्कटल्याने वातावरण अधिकच तापले आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाच्या अगदी तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री होतील, असे थेट भाकीत करत त्यांनी शरद पवारांकडून धक्कातंत्र वापरले जाईल, असे संकेत दिले. त्यामुळे महापालिका निवडणुकांपुरती मर्यादित असलेली चर्चा थेट राष्ट्रीय राजकारणापर्यंत पोहोचली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये यंदा अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत असून, राज्यातील 12 हून अधिक ठिकाणी महायुती कोलमडली आहे. भाजप आणि शिवसेना अनेक महानगरपालिकांमध्ये थेट एकमेकांविरोधात उभ्या ठाकणार आहेत. दुसरीकडे, पुण्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. जागावाटपावरून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे ही युती फिस्कटल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील पाटीलकीमुळे आमचे आणि काँग्रेसचे पटले नाही, असे स्पष्ट करत प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीला स्वबळावर निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे पुण्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत. युती तुटल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी केवळ स्थानिक राजकारणापुरतीच भूमिका मांडली नाही, तर थेट केंद्रातील सत्ताकारणावर भाष्य करत एक मोठा बॉम्ब टाकला. सुप्रिया सुळे लवकरच केंद्र सरकारमध्ये मंत्री होतील, असे भाकीत करत त्यांनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणले. मुंबईत आमची आणि काँग्रेसची युती असल्यामुळे जर कोणी नाराज असेल, तर त्याची आम्हाला पर्वा नाही. आमच्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे, व्यक्ती नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार कोणता मोठा राजकीय निर्णय घेणार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यात काय घडणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्यास राज्यातील सत्तासमीकरणांवर मोठा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. अदानी यांच्या मध्यस्थीने शरद पवार राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये - वडेट्टीवार या चर्चांना आणखी हवा देणारे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. त्यांनी थेट दावा करत सांगितले की, उद्योगपती गौतम अदानी अलीकडेच बारामतीला येऊन गेले होते. अदानी यांच्या मध्यस्थीने शरद पवार हे लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये, म्हणजेच एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना खासदारांची संख्या वाढवण्याची गरज आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांच्याकडे आमदारांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे दोघांचे हितसंबंध एकमेकांशी जुळत असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. पुण्यात दोन्ही गट एकत्र येणे ही या संभाव्य एकत्रीकरणाची पहिली पायरी असल्याचेही त्यांनी सूचित केले. मोठ्या राजकीय बदलांची नांदी या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुण्यात काँग्रेस आणि वंचित युती तुटली असली, तरी ही केवळ स्थानिक आणि तात्पुरती घडामोड आहे की आगामी मोठ्या राजकीय बदलांची नांदी आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकांच्या धुरळ्यात सुरू असलेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील का, शरद पवार एनडीएमध्ये जाणार का, की हे सर्व केवळ राजकीय दबाव तंत्र आहे, याची उत्तरे येत्या काळातच मिळणार आहेत. मात्र, सध्याच्या घडीला तरी महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा निर्णायक वळणावर उभे राहिले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 3:03 pm

महायुतीमध्ये उभी फूट

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी ३० डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत राज्याच्या राजकारणात एकत्र असलेली भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ही महायुती आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) यांची महाविकास आघाडी अनेक ठिकाणी फुटली आहे. काही ठिकाणी नवी समीकरणे तयार झाली आहेत. […] The post महायुतीमध्ये उभी फूट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 3:02 pm

पुण्यात भाजप-सेना युती तुटलेली नाही:संभाजीनगरचा पेचही सुटणार, उदय सामंतांनी युतीचे चित्र केले स्पष्ट; एबी फॉर्म वाटपाचे सांगितले कारण

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती तुटल्याच्या बातम्यांनी आज सकाळपासूनच राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी ७० ते ८० जागी अर्ज भरून स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. मात्र, दुपारी तातडीने पुण्यात पोहोचलेले राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात किंवा राज्यात कुठेही महायुती तुटलेली नाही, असे जाहीर करत या वादावर पडदा टाकला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भावनेच्या भरात केलेल्या विधानांमुळे गैरसमज पसरल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज सकाळी शिंदेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी आक्रमक पवित्रा घेत म्हटले होते की, जागावाटपात अपेक्षित तोडगा न निघाल्यामुळे आम्ही ७०-८० जागांवर अर्ज भरले असून उर्वरित ठिकाणीही अर्ज भरले जातील. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत फूट पडल्याचे मानले जात होते. मात्र, उदय सामंत यांनी पुण्यात येऊन माध्यमांशी संवाद साधला आणि ही केवळ तांत्रिक प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले. नेमके काय म्हणाले उदय सामंत? महाराष्ट्रात कोणत्याही महानगरपालिकेत महायुती तुटलेली नाही. काही ठिकाणी जागावाटपाचा निर्णय अंतिम होण्यास वेळ लागला आणि अर्ज भरण्याची मुदत संपत असल्याने दोन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांचे अर्ज भरले आहेत, असे उदय सामंत म्हणाले. पदाधिकाऱ्यांनी भावनेच्या भरात युती तुटल्याचे सांगितले असेल, पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तसा कोणताही निर्णय झालेला नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असला तरी, अर्ज छाननी आणि माघारीसाठी अद्याप दोन-तीन दिवसांचा अवधी आहे. या काळात आम्ही सुवर्णमध्य काढून जागावाटपाचा तिढा सोडवू, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले. मॅरेथॉन बैठकांचे सत्र सुरू उदय सामंत यांनी पुण्यात आल्यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्याशी सविस्तर चर्चा केली. जागावाटप करताना थोडीफार खेचाखेच होतेच. जिथे शिवसेना जिंकू शकते अशा जागांवर आम्ही प्रबळ दावेदारी केली आहे. आता आम्ही सर्व पदाधिकारी मिळून एक प्रस्ताव तयार करू आणि तो मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडू, असे सामंत यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरचा पेचही सुटणार केवळ पुणेच नव्हे तर छत्रपती संभाजीनगरमध्येही पुण्यासारखीच स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, तेथील पेचही येत्या दोन दिवसांत सोडवला जाईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. 29 महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच वेळी असल्याने नेत्यांना चर्चेसाठी वेळ कमी मिळाला, त्यामुळे हा गोंधळ झाल्याचे सामंत यांनी नमूद केले. दरम्यान, या नाट्यमय घडामोडींनंतर आता कार्यकर्त्यांमधील संभ्रम काहीसा दूर झाला असला तरी, प्रत्यक्ष माघारीच्या दिवशी महायुतीच्या वाट्याला पुण्यात नेमक्या किती आणि कोणत्या जागा येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 2:56 pm

कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी

पुणे : प्रतिनिधी सध्या राज्यात निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. पुणे महानगरपालिकेत मोठमोठ्या राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. दोन्ही राष्ट्रवादीची युती काल जाहीर झाली आहे. तर थोड्या वेळापूर्वीच शिवसेना-भाजप युती तुटल्याचे समोर आले आहे. अशातच कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे. गुंडाची पत्नी निवडणुकीच्या […] The post कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 2:55 pm

सोशल मीडियाच्या ओळखीतून तरुणीवर रेप:विमानतळ पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा; मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

समाजमाध्यमातून झालेल्या ओळखीतून युवतीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एका तरुणाला विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका १७ वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खान याची समाजमाध्यमातून युवतीशी ओळख झाली. त्याने युवतीला विवाहाचे आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारनंतर युवती गर्भवती राहिली. युवती नुकतीच प्रसृत झाली. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पल्लवी बालपांडे तपास करत आहेत. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका अल्पवयीनाविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीनाने १६ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारानंतर ती गर्भवती राहिली. ससून रुग्णालयात ती नुकतीच प्रसृत झाली. सहायक पोलीस निरीक्षक तोंडे तपास करत आहेत. मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय कल्याणीनगर भागात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी मसाज पार्लर व्यवस्थापकासह दोघांना अटक केली. मोतीबर समसुलहक रेहमान (वय ३१, रा. संजय पार्क, विमाननगर,मूळ रा. आसाम), अब्दुल मोनुउद्दीन आवाल (वय १९, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई बालाजी सोगे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणीनगर भागातील एका संकुलात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती येरवडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मसाज सेंटरमधून तरुणींना ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान करत आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 2:54 pm

अभंगातून समाज प्रबोधन ही महाराष्ट्राची परंपरा:डॉ. संजय उपाध्ये यांच्या 'विवेक संहिता' अभंगसंग्रहाचे प्रकाशन

एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी नुकतेच डॉ. संजय उपाध्ये यांच्या 'विवेक संहिता' या आधुनिक अभंगसंग्रहाचे प्रकाशन केले. यावेळी बोलताना डॉ. कराड म्हणाले की, अभंगांच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करणे ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. डॉ. उपाध्ये यांनी अभिनव पद्धतीने हा संग्रह रचून आजच्या काळात कसे जगावे हे सांगितले आहे. एमआयटी येथे झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते 'विवेक संहिता' या अभंगसंग्रहाचे अनावरण करण्यात आले. या संग्रहात १०१ अभंगरचना असून, त्याद्वारे समाजाला विवेक मार्गाने जगण्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत डॉ. कराड यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. सुचित्रा कराड-नागरे, कुलगुरू डॉ. रविकुमार चिटणीस, शास्त्रज्ञ अशोक जोशी, डॉ. दीपक रानडे, गिरीश दाते आणि डॉ. महेश थोरवे यांची उपस्थिती होती. डॉ. विश्वनाथ कराड यांनी डॉ. संजय उपाध्ये यांच्या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले की, डॉ. उपाध्ये त्यांच्यासोबत काम करताना, एखाद्या विषयावर कविता किंवा गीत हवे असल्यास ते लगेच रचना करून देतात. इंद्रायणीची आरती, चंद्रभागेची आरती किंवा वाखरीचे गीत ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत, यातून त्यांची प्रगल्भता दिसून येते. याव्यतिरिक्त, चिंचवड येथील काशीधाम मंगल कार्यालयात डॉ. संजय उपाध्ये यांच्या 'मी नि कविता' या कार्यक्रमादरम्यान सुहास पोफळे, राजाभाऊ गोलांडे, अवधूत कुलकर्णी, विवेक कुंभोजकर आणि नितीन जोशी यांनी सपत्नीक या आधुनिक अभंगसंग्रहाचे प्रकाशन केले. या प्रसंगी डॉ. संजय उपाध्ये यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत वाचकांना त्यांच्या जीवनातील संभ्रम, अडचणी आणि निराशा यांवर मात करण्याचे मार्ग या संग्रहातून सुचवले आहेत. वाचक यातून नक्कीच बोध घेतील आणि स्वतःचा व पर्यायाने समाजाचा जीवनमार्ग उजळून काढतील. डॉ. उपाध्ये यांनी पुढे सांगितले की, राष्ट्राला वाचवायचे असेल तर आपली भाषा समृद्ध करावी. कवितेच्या माध्यमातून जीवन दर्शन घडते आणि आनंदात जगण्यासाठी कवितेचा शोध घ्यावा. जीवनात सकारात्मक दृष्टिकोन, निसर्गाचा आनंद, वर्तमान क्षणात जगणे आणि आंतरिक आनंदाचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक क्षण उत्सवरूपाने साजरा करा, स्वतःला शोधा आणि एकरूप व्हा, हे आपल्याला जीवनातील सौंदर्य आणि अर्थ शोधायला मदत करते.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 2:52 pm

जयस्तंभ अभिवादन:१ जानेवारी २०२६ साठी कोरेगाव भीमा, वढु बुद्रुकमध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था

पुणे ग्रामीण पोलिसांनी १ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या जयस्तंभ, पेरणे फाटा अभिवादन कार्यक्रमासाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली आहे. या दिवशी वढु बुद्रुक (ता. शिरूर, जि. पुणे) येथील छत्रपती संभाजी महाराज आणि गोविंद गोपाळ महाराज यांच्या समाधी स्थळी राज्यभरातून लाखो अनुयायी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरेगाव भीमा, वढु बुद्रुक आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या बंदोबस्तासाठी ३३ वरिष्ठ पोलीस अधिकारी, ३३२ इतर पोलीस अधिकारी, ३०१० पोलीस अंमलदार, १५०० होमगार्ड, ४ एसआरपीएफ कंपन्या, १० स्ट्रायकिंग फोर्स, ४ आरसीपी पथके, २ क्यूआरटी पथके आणि ७ बीडीडीएस पथके तैनात करण्यात आली आहेत. सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे आणि पी.ए. सिस्टीमचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अनुयायांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची सोय करण्यात आली आहे. नगर रोडकडून येणाऱ्यांसाठी वक्फ बोर्ड पार्किंग, तर मुंबई-नाशिक रोडकडून येणाऱ्यांसाठी टोरंटो गॅस पार्किंग (जातेगाव खु., चाकण रोड) निश्चित करण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या वाहनांसाठी तोरणा पार्किंगची व्यवस्था असून, कोरेगाव भीमाहून वढु बुद्रुककडे जाणाऱ्या अनुयायांसाठी इनामदार पार्किंग आणि पीएमपीएमएल बससेवा उपलब्ध असेल. एकूण ४०० पीएमपीएमएल बसेसद्वारे पार्किंग ठिकाणांहून डिग्रजवाडी फाट्यापर्यंत अनुयायांची ने-आण केली जाईल. बसस्टॉपपासून जयस्तंभापर्यंत सुमारे १.५ किलोमीटर अंतर पायी चालावे लागणार आहे. पार्किंगच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालये, प्रकाश व्यवस्था आणि मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दी नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी वॉच टॉवर्स, दिशादर्शक फलक, डीएफएमडी, पोलीस मदत केंद्रे आणि वज्र मोबाइल पथके कार्यरत असतील. आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निशामक दल, रुग्णवाहिका आणि एनडीआरएफ पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी बंदोबस्ताची पाहणी करून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 2:50 pm

राज्यात थंडीचा मुक्काम वाढणार

मुंबई : प्रतिनिधी राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. गाव-शिवारात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. किमान तापमानात घट झाल्याने गुलाबी थंडीने नववर्षाचे स्वागत होणार आहे. वर्षाच्या सरत्या दिवशी राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार कायम राहणार आहे. तर नवीन वर्षात तापमानाचा पारा अधिक घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शिवाय पावसाप्रमाणे थंडीचा मुक्काम देखील लांबणीवर जाणार आहे. सोमवारी परभणीत […] The post राज्यात थंडीचा मुक्काम वाढणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 2:50 pm

उमेदवार शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला:मुंबईत एका पक्षाच्या उमेदवारासोबत घडला विचित्र प्रसंग; कार्यकर्तेही हैरान

राज्यात येत्या 15 जानेवारीला मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. आज उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी इच्छुक व पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची पळापळ सुरू झाली आहे. त्यातच मुंबईतील एका पक्षाच्या उमेदवारासोबत एक विचित्र प्रसंग घडला आहे. हा उमेदवार आपल्या समर्थकांसह वाजंत्री घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात पोहोचला. पण ऐनवेळी उमेदवारी अर्जच आपण आणला नसल्याची बाब त्याच्या लक्षात आली. यामुळे हसावे की रडावे असा प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला. यासंबंधीच्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज शेवटच्या दिवशी मुलुंड, भांडुप व विक्रोळी परिसरात चांगलाच रंग चढला. टी आणि एस वॉर्डाच्या निवडणूक कार्यालयांबाहेर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरण्यास सुरुवात केली. या गदारोळात एका पक्षाचा उमेदवार शक्तिप्रदर्शन करत निवडणूक कार्यालयात पोहोचला. पण तो फॉर्मच विसरल्याने कार्यकर्त्यांत काही काळ हास्याचा फवारा उडाला. नेमका काय घडला प्रसंग? त्याचे झाले असे की, एका पक्षाचा उमेदवार गोवंडी, मानखुर्द, भांडुप, सोनापूर येथील कार्यकर्त्यांना घेऊन शक्तिप्रदर्शन करत गाड्यांचा ताफा घेऊन टी वॉर्डच्या कालिदास येथील निवडणूक कार्यालयाबाहेर पोहोचला. यावेळी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवत त्याला मोजक्याच कार्यकर्त्यांसह आत जाण्याची परवानगी दिली. आत जाण्यापूर्वी त्याने आपल्या सहकाऱ्यांना अरे फॉर्म कुठाय? असा प्रश्न केला. त्यावर कार्यकर्ते एकमेकांकडे पाहत राहिले. त्यांचा गोंधळ उडाला. अखेर चौकशीअंती उमेदवारी अर्ज घेऊन येणारा कार्यकर्ता गर्दीत मागेच राहिल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. यामुळे उमेदवाराची चांगलीच गोची झाली. कार्यालयाबाहेर थांबलेले त्यांचे समर्थक दादा, आत का जात नाहीत? असा प्रश्न करत होते. पण तेवढ्यात कुणीतरी काही नाही, अर्ज विसरलेत, असे त्यांना सांगितले. हे ऐकताच अनेकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्यानंतर 10-15 मिनिटांनी अर्ज असलेला कार्यकर्ता धापा टाकत निवडणूक कार्यालयात पोहोचला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अखेर उमेदवार आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह अर्जाची फाईल घेऊन निवडणूक कार्यालयात दाखल झाला आणि आपला अर्ज भरला. नील समोय्या प्रभाग क्रमांक 107 मधून रिंगणात दुसरीकडे, भाजप नेते किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या यांनी मुंलुंडच्या प्रभाग क्रमांक 107 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. यापूर्वी ते प्रभाग क्रमांक 108 चे नगरसेवक होते. यावेळी भाजपने त्यांना 107 मधून संधी दिली. भाजप उमेदवार प्रभाकर शिंदे, अनिता वैती यांनीही यावेळी आपला उमेदवारी अर्ज भरला. हे ही वाचा... संभाजीनगर, नाशिक, पुणे, मालेगावात युती तुटली:भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार; शेवटपर्यंत चर्चा ताणल्याचा परिणाम मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. त्यातच सत्ताधारी महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या 3 घटकपक्षांची युती अनेक ठिकाणी तुटल्यामुळे हे पक्ष आता आपापल्या वाटांनी वेगळे जाणार हे स्पष्ट झाले आहे. युती तुटलेल्या शहरांत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व मालेगावसह इतर काही ठिकाणचा समावेश आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 2:25 pm

नाशकात AB फॉर्मवरून मोठा राडा:भाजप शहराध्यक्षांच्या गाडीचा पाठलाग; संतापलेल्या कार्यकर्त्यांनी फार्महाऊसचे गेट फोडले

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपायला अवघे काही तास शिल्लक असताना, भारतीय जनता पक्षामध्ये अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळत आहे. भाजप यंदा नाशिकमध्ये स्वबळावर सर्व १२२ जागा लढवत आहे, मात्र ऐनवेळी 'एबी' फॉर्म न मिळाल्यामुळे इच्छुक उमेदवार आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संयम सुटला आहे. आपला हक्काचा फॉर्म मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या गाडीचा नाशिक-मुंबई महामार्गावर फिल्मी स्टाईलने पाठलाग केला. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. फॉर्म भरण्यासाठी काही तासच शिल्लक असून, अद्याप इच्छुक उमेदवारांना पक्षाकडून एबी फॉर्म मिळाले नाहीत. नाशिकमध्ये भाजप स्वबळावर लढणार असून, सर्व १२२ जागांवर आपले उमेदवार उभे केलेले आहेत. मात्र, निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांमध्ये नाराजी बघायला मिळत आहे. निष्ठावंतांचे तिकिट कापल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. नाशिकमध्ये मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. नेमके काय घडले? मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची तिकिटे कापली गेल्याची चर्चा रात्रीपासून सुरू होती. ज्यांना अद्याप फॉर्म मिळालेले नाहीत, असे अनेक इच्छुक उमेदवार शहराध्यक्ष सुनील केदार यांची भेट घेण्यासाठी जमले होते. मात्र, कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जाण्याऐवजी केदार यांनी गाडीतून निघून जाणे पसंत केले. यानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. हा थरार नाशिक-मुंबई महामार्गावर बराच वेळ सुरू होता. फार्महाऊसचे गेट फोडून कार्यकर्ते आत शहराध्यक्ष आणि काही पदाधिकारी एका खाजगी फार्महाऊसवर थांबल्याची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी तिथे धडक दिली. फार्महाऊसचे मुख्य गेट बंद असल्याचे पाहून संतप्त कार्यकर्त्यांनी ते चक्क तोडून आत प्रवेश केला. गिरीश महाजन 'नॉट रिचेबल' नाशिकच्या राजकारणाचे चाणक्य मानले जाणारे संकटमोचक गिरीश महाजन हे देखील सध्या 'नॉट रिचेबल' असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता अधिकच वाढली आहे. नाशिकमधील हा महामार्गावरील थरार आणि गाडीचा पाठलाग यामुळे भाजपची अंतर्गत एकजूट धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात पक्षाला स्वतःच्याच कार्यकर्त्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे निवडणुकीच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संभाजीनगरमध्ये सावेंच्या कार्यालयासमोर इच्छुकांचा धिंगाणा दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून भारतीय जनता पक्षातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. गेल्या १८ वर्षांपासून पक्षासाठी रक्त आटवणाऱ्या आणि आंदोलनांमध्ये अंगावर १८ केसेस ओढवून घेणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ती दिव्या उल्हास मराठे यांना पक्षाने डावलल्यामुळे त्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. भाजपचे स्थानिक नेत्यांना जाब विचारण्याचा पवित्र्यात आलेल्या या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. नुकत्याच पक्षात आलेल्या आणि कोणताही अनुभव नसलेल्यांना तिकीट देण्यात प्राधान्य दिल्याने भाजपमध्ये पुन्हा एकदा 'निष्ठावान' विरुद्ध 'आयात' या वादाची ठिणगी पडली आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 1:40 pm

पवनचक्कीच्या वाहनाने २ जणांना चिरडले; संतप्त जमावाने वाहन पेटवले

धाराशिव : प्रतिनिधी धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या वाहनाने दोन जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना सोमवारी २९ डिसेंबर रोजी रात्री उशीरा घडल्याने एकच खळबळ उडाली. अपघातानंतर संतप्त जमावाने त्या वाहनाला पेटवून दिले. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणावपूण वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईस सुरुवात केली. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी येथे पवनचक्कीच्या वाहनाने दोन […] The post पवनचक्कीच्या वाहनाने २ जणांना चिरडले; संतप्त जमावाने वाहन पेटवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 1:20 pm

एकनाथ शिंदेंचा खासदार नरेश म्हस्केंना झटका:मुलाचे तिकीट कापले, ठाण्यातील आनंद आश्रमाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; काय होणार?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाला उमेदवारी नाकारत त्यांना जोरदार झटका दिला आहे. यामुळे ठाण्यातील आनंद आश्रमाबाहेर नरेश म्हस्के यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी जमली असून, ते आपला वेगळा निर्णय घेतील असा दावा केला जात आहे. शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांचा मुलगा आशुतोष म्हस्के यांनी ठाणे महापालिका निवडणुकीसाठी तयारी केली होती. ते प्रभाग क्रमांक 19 मधून निवडणूक लढवणार होते. यासाठी त्यांनी या प्रभागात कार्यकर्त्यांची एक मोठी फळी उभी केली होती. तसेच प्रचारही सुरू केला होता. विशेषतः स्वतः खासदार नरेश म्हस्के यांनीही आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी जोर लावला होता. पण पक्षाने ऐनवेळी आशुतोष म्हस्के यांना तिकीट नाकारून त्यांना झटका दिला. यासंबंधीच्या माहितीनुसार, आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. पण अद्याप आशुतोष म्हस्के यांना अद्याप पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नाही. यामुळे ठाण्यातील आनंद आश्रमाच्या समोर म्हस्के यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. शिंदे गटातील घराणेशाहीविरोधात मीनाक्षी शिंदे यांनी पेटवलेल्या ठिणगीमुळे नरेश म्हस्के यांच्या मुलाला तिकीट नाकारण्यात आल्याची चर्चा स्थानिक राजकारणात रंगली आहे. मुंब्र्यातील 4 माजी नगरसेवकांची शिंदे गटाला सोडचिठ्ठी दुसरीकडे, ठाण्याच्या मुंब्रा येथील 4 माजी नगरसेवकांनी आज शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राजन किने, अनिता किने, मोरेश्वर किने व अन्य एका माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीचा एबी फॉर्म स्वीकारला आहे. राजन किने यांचे मुंब्रा येथे शिवसेना वाढवण्यात मोठे योगदान होते. त्यामुळे त्यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे येथील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. हे ही वाचा... संभाजीनगर, नाशिक, पुणे, मालेगावात युती तुटली:भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार; शेवटपर्यंत चर्चा ताणल्याचा परिणाम मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. त्यातच सत्ताधारी महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या 3 घटकपक्षांची युती अनेक ठिकाणी तुटल्यामुळे हे पक्ष आता आपापल्या वाटांनी वेगळे जाणार हे स्पष्ट झाले आहे. युती तुटलेल्या शहरांत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व मालेगावसह इतर काही ठिकाणचा समावेश आहे. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 1:03 pm

शिंदेसेनेने घरातील मंडळींच्या राजकीय पुनर्वसनालाच प्राधान्य दिले:युती तुटताच भाजपचे गंभीर आरोप; घरच्या मंडळींसाठी युतीचा बळी

छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती तुटल्याची घोषणा होताच काही तासांतच राजकीय वातावरण कमालीचे तापले असून भाजपने शिंदेसेनेवर जोरदार पलटवार करत थेट आरोपांची तोफ डागली आहे. शहराच्या विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून शिंदेसेनेने घरातील मंडळींच्या राजकीय पुनर्वसनालाच प्राधान्य दिले, त्यामुळेच युती जाणीवपूर्वक तोडण्यात आली, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार भागवत कराड यांनी केला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या आरोप-प्रत्यारोपांमुळे आता युतीचा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून शहरात थेट आणि कट्टर राजकीय संघर्ष अटळ असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपचे नेते अतुल सावे यांनी युती तुटण्यामागील पडद्यामागची सविस्तर माहिती उघड करताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी 37 जागांचा फॉर्म्युला अंतिम झाला होता. या फॉर्म्युलावर दोन्ही पक्षांमध्ये शिक्कामोर्तबही झाले होते. मात्र, त्यानंतर स्थानिक पातळीवर शिंदेसेनेच्या नेत्यांकडून सातत्याने नव्या मागण्या पुढे येत राहिल्या. एकदा ठरलेल्या जागांवर पुन्हा दावा केला जाऊ लागला, विद्यमान भाजप नगरसेवक असलेल्या प्रभागांवरही शिंदेसेनेने हक्क सांगितला. वैयक्तिक हितसंबंध, नातेवाईकांचे समायोजन आणि विशिष्ट मंडळींच्या पुनर्वसनासाठी प्रस्तावांमध्ये वारंवार बदल सुचवले गेले, असा आरोप सावे यांनी केला. सावे पुढे म्हणाले की, भाजपने युती टिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लवचिकता दाखवली. अनेक ठिकाणी तडजोडीची भूमिका घेतली, विकासाच्या दृष्टीने एकत्र लढण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदेसेनेच्या नेत्यांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढतच गेल्या. आम्ही शहराच्या भविष्यासाठी निर्णय घ्यायचा प्रयत्न करत होतो, पण समोरच्यांना समाधान मिळत नव्हते. मागण्या पूर्ण करूनही त्यांची भूक भागत नव्हती, असा थेट आरोप करत सावे यांनी युती तुटण्याची संपूर्ण जबाबदारी शिंदेसेनेवर ढकलली. या पार्श्वभूमीवर महायुती तोडण्याचा निर्णय हा अचानक घेतलेला नसून, शिंदेसेनेनेच तो घडवून आणल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. दरम्यान, खासदार भागवत कराड यांनी शिंदेसेनेतील अंतर्गत विसंवादावर बोट ठेवत आणखी गंभीर चित्र समोर आणले. शिंदेसेनेत पालकमंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्ष हे चारही प्रमुख नेते कधीही एका भूमिकेवर एकत्र आले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. चार नेते आणि चार वेगवेगळ्या दिशा, अशी स्थिती कायम राहिली. एक नेता काही सांगायचा, तर दुसरा त्याच्या उलट भूमिका घ्यायचा. या अंतर्गत मतभेदांमुळेच युतीबाबत स्पष्ट निर्णय होऊ शकला नाही आणि अखेर त्याचा बळी महायुतीला द्यावा लागला, असे कराड यांनी स्पष्ट केले. शिंदेसेनेच्या अंतर्गत गोंधळाचा फटका संपूर्ण राजकीय समीकरणांना बसल्याचेही त्यांनी नमूद केले. विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाण्याचा निर्धार केला या घडामोडींमुळे आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत युतीचा अध्याय पूर्णपणे संपुष्टात आला आहे. पूर्वी ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची चर्चा होती, तिथे आता थेट, आक्रमक आणि कट्टर संघर्ष पाहायला मिळणार हे निश्चित झाले आहे. भाजपने विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर जाण्याचा निर्धार केला असून मतदार हुशार असून तो विकासाच्या कामगिरीवरच निर्णय घेईल, असा विश्वास भागवत कराड यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, शिंदेसेनेवर घरातील मंडळींच्या पुनर्वसनासाठी युती तोडल्याचा आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. येत्या काळात या आरोप-प्रत्यारोपांचा थेट परिणाम निवडणुकीच्या रणधुमाळीत दिसून येणार असून, छत्रपती संभाजीनगरचे राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 1:01 pm

18 वर्ष काम, अंगावर केसेस घेतल्या, तरी डावलले:संभाजीनगरमध्ये भाजप महिला पदाधिकारी आक्रमक; उपोषणाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून भारतीय जनता पक्षातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. गेल्या १८ वर्षांपासून पक्षासाठी रक्त आटवणाऱ्या आणि आंदोलनांमध्ये अंगावर १८ केसेस ओढवून घेणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ती दिव्या उल्हास मराठे यांना पक्षाने डावलल्यामुळे त्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. प्रबळ उमेदवार असतानाही एका नवख्या उमेदवाराला संधी दिल्याचा आरोप करत दिव्या मराठे यांनी आता थेट प्रचार कार्यालयात धडक देत स्थानिक नेतृत्तवावर हल्ला चढवला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दिव्या मराठे यांनी प्रभाग क्रमांक २० मधून 'खुल्या प्रवर्ग महिला' गटातून भाजपची उमेदवारी मागितली होती. मात्र, पक्षाने त्यांना डावलून एका अत्यंत कनिष्ठ कार्यकर्त्याच्या पत्नीला तिकीट दिले आहे. या निर्णयामुळे धक्का बसलेल्या दिव्या मराठे यांनी थेट मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांना जाब विचारला आहे. पक्षासाठी आम्ही लढलो, मग फळ दुसऱ्यालाच का? आपल्या भावना व्यक्त करताना दिव्या मराठे यांना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, मी गेल्या १८ वर्षांपासून भाजपचा झेंडा खांद्यावर घेऊन फिरतेय. पक्षाच्या कामासाठी माझ्यावर आज १८ केसेस आहेत. जेव्हा पक्षात कोणी नव्हते, तेव्हा आम्ही सोबत होतो. आज पक्ष मोठा झाला म्हणून बाहेरच्यांना आणि ज्यांनी कधी पक्षाचा प्रचारही केला नाही, अशांच्या पत्नीला तिकीट दिले जात आहे. एखाद्या आमदार किंवा खासदाराच्या पत्नीला तिकीट दिले असते, तर मी समजू शकले असते. पण ज्या बाईने कधी पक्षाचे कामच केले नाही, तिला कोणत्या आधारावर तिकीट दिले? नेत्यांच्या 'सर्व्हे'वर उपस्थित केले प्रश्न पक्षाकडून सांगण्यात आले की, सर्वेक्षणात तुमचे नाव आले नाही किंवा वरून (श्रेष्ठींकडून) नाव आले नाही. यावर दिव्या मराठे यांनी संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, वरून नाव आले नाही म्हणजे काय?वर बसलेल्या नेत्यांना या कार्यकर्त्याची पत्नी कोण आहे हे माहिती आहे का? सर्व्हेत माझेही नाव आले होते, मग केवळ कारणे सांगून मला का डावलले जात आहे? २०१५ मध्येही आपल्यासोबत असाच अन्याय झाला होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बंडाचे निशाण आणि उपोषणाचा पवित्रा दिव्या मराठे यांनी आता आरपारची लढाई लढण्याचे ठरवले आहे. मला न्याय मिळेपर्यंत मी येथून उठणार नाही. मी आता उपोषण आणि आंदोलन करणार आहे. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाला मोठे केले, त्यांनाच आता संपवण्याचे काम सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. 'निष्ठावान' विरुद्ध 'आयात' वादाची ठिणगी दिव्या मराठे यांच्या सारखेच अनेक निष्ठावान कार्यकर्ते तिकीट नाकरल्याने नाराज होऊन प्रचार कार्यालयात धडकत आहेत. भाजपचे स्थानिक नेत्यांना जाब विचारण्याचा पवित्र्यात आलेल्या या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. नुकत्याच पक्षात आलेल्या आणि कोणताही अनुभव नसलेल्यांना तिकीट देण्यात प्राधान्य दिल्याने भाजपमध्ये पुन्हा एकदा 'निष्ठावान' विरुद्ध 'आयात' या वादाची ठिणगी पडली आहे. अनेक जुने कार्यकर्ते नाराज असल्याने याचा परिणाम निकालावर होऊ शकतो अशी चर्चा आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 12:51 pm

हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा तीव्र धक्का; १५ गावांत एकच खळबळ

हिंगोली : प्रतिनिधी हिंगोली जिल्ह्याला पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे बसले आहेत. पहाटे (३० डिसेंबर) सर्वजण गाढ झोपेत असताना हिंगोलीच्या औंढा व कळमनुरी तालुक्यातील १५ पेक्षा अधिक गावात हादरे बसले. भूकंपाची तीव्रता ३.५ रेश्टर स्केल इतकी नोंदण्यात आली आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये नागरिक झोपेत असताना भूकंप झाल्याने १५ गावांत एकच धावपळ उडाली. नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. काही […] The post हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचा तीव्र धक्का; १५ गावांत एकच खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 30 Dec 2025 12:42 pm

गुंड गजा मारणेच्या पत्नीला राष्ट्रवादीची उमेदवारी:पुण्यातील गुंडगिरी संपवण्याची भाषा करणाऱ्या अजित पवार यांच्या भूमिकेवर सवाल

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने कुख्यात गुंड गजा मारणे याच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. गजा मारणे एका प्रकरणात सध्या तुरुंगात आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यातच आता राष्ट्रवादीने त्याच्या पत्नीला उमेदवारी दिल्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात त्याचे मोठे राजकारण होण्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांची लगबग वाढली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिली आहे. जयश्री मारणे यांना प्रभाक क्रमांक 10 मधून उमेदवारी यासंबंधीच्या माहितीनुसार, जयश्री मारणे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 10 मधून अधिकृत उमेदवार असतील. त्यांना पक्षाने एबी फॉर्मही दिला आहे. जयश्री मारणे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. गजा मारणे सध्या कोथरूडमधील एका दुचाकीस्वाराला मारहाण केल्याप्रकरणी तुरुंगात बंदिस्त आहे. हा दुचाकीस्वार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करत होता. त्याला गजा मारणे याच्या टोळीने बेदम मारहाण केली होती. त्यानंतर गजा मारणे याच्यासह त्याच्या काही सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. अजित पवारांचे गुंडगिरीला पाठबळ? अजित पवारांनी एका कार्यक्रमात पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पुण्यातील कोयता गँग बंद करण्याची सूचना केली होती. आम्ही तुमच्यासाठी पोलिसांची संख्या वाढवली. तुम्ही आता गुन्हेगारी आटोक्यात आणण्यावर भर द्या, असे ते म्हणाले होते. पण आता अजित पवारांचा पक्षच एका गुंडाच्या पत्नीला उमेदवारी देत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कुख्यात गुंड गजा मारणेवर खंडणी, दहशत, खून यासारखे अनेक गुन्हे आहेत. गजा मारणेच्या घरी मध्यंतरी काही नेत्यांनी भेटही दिली होती. आता पुन्हा त्याच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने गुंडांना राजकीय पाठबळ दिले जात आहे का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांना उमेदवारी दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने रुपाली पाटील यांना प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी दिली आहे. पक्षाने त्यांना एबी फॉर्मही दिला आहे. काही दिवसांपूर्वी रुपाली ठोंबरे पाटील यांनी राष्ट्रवादीच्याच आपल्या सहकारी तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर त्यांनी अजित पवारांची भेट घेत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. आता राष्ट्रवादीने महापालिका निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिल्यामु्ळे हा वाद संपल्यात जमा असल्याचे मानले जात आहे. दीपक मानकरांचे दोन्ही मुले मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक मानकर यांची दोन्ही मुले पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. एकाला भाजपने तर दुसऱ्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. दोन्ही पक्षाकडून मुलांना उमेदवारी मिळाल्याने आता दीपक मानकर नेमका राष्ट्रवादीचा प्रचार करणार की भाजपचा? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 12:38 pm

पुण्यातही महायुती तुटली:शिंदेच्या शिवसेनेचा 165 जागांवर 'स्वबळा'चा नारा, एबी फॉर्मही वाटणार; भाजपने दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढतील, असे चित्र सुरुवातीला दिसत होते. मात्र, जागावाटपाचा तिढा सुटण्याऐवजी तो अधिकच ताणला गेला. अखेर भाजपकडून मिळणारी वागणूक आणि जागांचा अत्यल्प आकडा यामुळे शिवसेनेने युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी आज या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. शिवसेना शिंदे गट आता पुण्यात 165 जागांवर लढणार असून, सर्व उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करणार आहे. पुणे महानगरपालिकेत एकत्र लढण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटप आणि उमदेवारांसंदर्भात बैठका पार पडल्या होत्या. शिवसेनेने किमान 25 सन्मानजनक जागांची मागणी केली होती. मात्र, भाजपने केवळ 15 जागा देण्याची तयारी दर्शवली आणि नंतर हा आकडा 16 पर्यंत नेला. ज्या जागांवर भाजप किंवा शिवसेना निवडून येऊ शकत नाही, अशाच 'कमकुवत' जागा आम्हाला दिल्या जात आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केला. 165 पैकी फक्त 15 जागा लढण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेतील स्थानिक नेते सकारात्मक नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. केवळ 15 जागांवर लढणे हे कार्यकर्त्यांच्या मानसिकतेवर अन्याय करणारे असल्याचे सांगत शिवसेनेने युतीला 'रामराम' ठोकला. सामंत येण्यापूर्वीच नेत्यांनी घेतली भूमिका भाजप आणि शिवसेनेतील जागावाटपाचा हा पेच सोडवण्यासाठी राज्याचे मंत्री उदय सामंत आज पुण्यात येणार होते. मात्र, ते पोहोचण्यापूर्वीच पुण्यातील शहराध्यक्ष आणि उपनेत्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करत आक्रमक पवित्रा घेतला. हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बैठकीतून शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि इतर पदाधिकारी थेट 'एबी फॉर्म' वाटपासाठी बाहेर पडले. आम्ही आता कोणाचीही वाट पाहणार नाही, 165 जागांवर आमचे उमेदवार उभे करू, असे शिंदे गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी सांगितले. आम्ही सर्व जागा लढणार - भानगिरे “आमच्या सर्व कार्यकर्त्यांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. आम्ही जेवढ्या सर्व जागा आहेत, तेवढ्या सर्व जागा लढणार आहोत. थोड्याच वेळात सर्व जागा लढवण्याचा निर्णय होईल. वेगळे लढवण्याचे ठरलेले आहे आणि आमच्या सर्व उमेदवारांना एबी फॉर्म मिळतील. ज्या ठिकाणी आमच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत, त्या सर्वांना एबी फॉर्म दिले जातील”, असे नाना भानगिरे यांनी म्हटलं आहे. भाजपने दुय्यम स्थान दिल्याची कार्यकर्त्यांची भावना निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपने पुण्यात 'मोठ्या भावा'ची भूमिका बजावताना शिवसेनेला दुय्यम स्थान दिल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. 15 जागांवर ठाम राहून भाजपने वाटाघाटीचे दरवाजे बंद केल्याचे दिसताच, शिवसेनेने स्वतंत्र अस्तित्वासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आता पुण्यात भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) असा 'फ्रेंडली फाईट' किंवा थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे. संभाजीनगर, नाशिक, मालेगावातही युती तुटली दरम्यान, मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. त्यातच सत्ताधारी महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या 3 घटकपक्षांची युती अनेक ठिकाणी तुटल्यामुळे हे पक्ष आता आपापल्या वाटांनी वेगळे जाणार हे स्पष्ट झाले आहे. युती तुटलेल्या शहरांत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व मालेगावसह इतर काही ठिकाणचा समावेश आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 12:11 pm

पुण्यात शिवसेनेत रात्रभर घडामोडी, एबी फॉर्मवरून गोंधळ:उदय सामंत तातडीने पुण्यात, युतीचा निर्णय ऐनवेळी बदलला, नीलम गोऱ्हे यांनी सर्वच सांगितले

पुण्यात शिवसेना शिंदे गटामध्ये गेल्या 24 तासांत मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची रात्रभर खलबतं सुरू होती. सुरुवातीला अनेक इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आणि काही तासांतच ते फॉर्म परत घेण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला. पुण्यात शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार की भाजपसोबत युती करणार, यावरून अखेरच्या क्षणी निर्णय बदलल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या सगळ्या घडामोडींमुळे शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काल दिवसभर पुण्यातील शिवसेनेच्या कार्यालयात मोठी वर्दळ होती. 60 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांना अधिकृत एबी फॉर्म वाटप करण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना पुण्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. मात्र, रात्री उशिरा मुंबईहून वरिष्ठ नेत्यांकडून युतीबाबत निरोप आल्याने परिस्थिती पूर्णपणे बदलली. भाजपसोबत युती करूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय झाल्याचे सांगत संबंधित एबी फॉर्म तात्काळ माघारी घेण्यात आले. या अचानक बदललेल्या भूमिकेमुळे अनेक इच्छुकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शिवसेनेने कालपर्यंत पुण्यात स्वतंत्रपणे लढण्याची मानसिक तयारी केली होती. त्यामुळेच मोठ्या संख्येने उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले होते. मात्र, वरिष्ठ पातळीवर सुरू असलेल्या चर्चांमुळे आणि भाजपसोबत युतीच्या शक्यतेमुळे हा निर्णय ऐनवेळी बदलण्यात आला. परिणामी, ज्यांनी तयारी सुरू केली होती, प्रचाराचे नियोजन आखले होते, अशा उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. काही इच्छुकांनी उमेदवारी अर्ज देखील भरले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अधिकृत एबी फॉर्म अद्याप सर्वांपर्यंत पोहोचलेले नाहीत. उदय सामंत तातडीने पुण्यात, महत्वाच्या बैठकीकडे लक्ष या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत तातडीने पुण्याला रवाना झाले असून, महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्यातील वरिष्ठ पदाधिकारी, स्थानिक नेते आणि प्रमुख इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुण्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असून, पुढील काही तासांत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजप युती म्हणूनच निवडणूक लढणार, असा दावा सूत्रांकडून केला जात आहे. मात्र, सेनेतील अंतर्गत नाराजी कशी हाताळली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट संवाद शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या पुण्यातील बैठकीच्या ठिकाणी पोहोचत आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सर्व उमेदवारांना योग्य वेळी एबी फॉर्म दिले जातील. उदय सामंत पुण्यात येत आहेत. आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो संदेश असेल, त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात थेट संवाद सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. चर्चा सुरू आहेत, निरोप येईल तसे निर्णय नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, सध्या युतीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. यासंदर्भात अजून कोणतीही ठोस प्रगती आमच्यापर्यंत आलेली नाही. काही उमेदवारांनी अर्ज भरले आहेत, मात्र सर्वांना अजून एबी फॉर्म देण्यात आलेले नाहीत, असे त्यांनी सांगितले. वरिष्ठ नेत्यांकडून जसा निरोप येईल, त्यानुसार वेळेत एबी फॉर्म पोहोचवले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. उदय सामंत, विजय शिवतारे, मी धंगेकर आणि इतर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. धंगेकरांच्या एनसीपी भेटीवर गोऱ्हेंची प्रतिक्रिया दरम्यान, काल मी धंगेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतल्याबाबत विचारले असता, नीलम गोऱ्हे यांनी त्याबाबत कोणतीही ठोस माहिती नसल्याचे सांगितले. ती कदाचित सदिच्छा भेट असावी. पक्षाअंतर्गत राजकीय भूमिकेचा तो प्रश्न आहे, असे त्या म्हणाल्या. काल एबी फॉर्म देऊन रात्री परत घेतल्याच्या घटनेबाबत विचारले असता, त्यावर सध्या मी काही भाष्य करू शकत नाही, असे म्हणत त्यांनी विषय टाळला. मात्र, पुण्यात सुरू असलेल्या या घडामोडींमुळे शिवसेनेच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 11:42 am

संभाजीनगर महापालिका निवडणूक:शिंदेंची शिवसेना 87 जागा लढवणार, शिरसाट म्हणाले- लहान भावाची भूमिका घेण्यास तयार होतो

छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना (शिंदे गट) आगामी निवडणुकीत 87 जागा लढवणार आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली असून, भाजपने युतीबाबत विश्वासघात केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शिवसेनेने यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. शिरसाट यांनी सांगितले की, शिवसेना युती करण्याच्या बाजूने होती. प्रत्येक वेळी आम्ही 'लहान भाऊ' ही भूमिका स्वीकारली होती. मात्र, भाजपने केवळ युतीची चर्चा करून आम्हाला अंधारात ठेवले आणि आमची फसवणूक केली. पालकमंत्री शिरसाट यांनी भाजपवर विश्वासघाताचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, भाजपने केवळ चर्चा करून आम्हाला युतीच्या बोलण्यात अडकवले. मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतरही, भाजपने आम्हाला वेगवेगळ्या प्रभागांमध्ये जागा बदलण्याच्या सूचना दिल्या, ज्यामुळे आम्हाला युती होणार असेच वाटत राहिले. शिरसाट यांच्या मते, शिवसेनेने काही ठिकाणी भाजपला आवश्यक असलेल्या जागा सोडल्या, ज्यामुळे त्यांचे स्वतःचे नुकसानही झाले. जनतेचा युतीवर विश्वास असल्यामुळे आणि शिवसेना-भाजपवर जनतेचे प्रेम असल्यामुळे, आम्ही लहान भावाची भूमिका घेण्यास तयार होतो. छत्रपती संभाजीनगर शहर संवेदनशील असल्यामुळे येथे युती होणे गरजेचे होते, असे शिरसाट म्हणाले. मात्र, भाजपने त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले. स्थानिक नेते युती करण्याच्या मनस्थितीत नव्हते, त्यामुळे ही युती तुटल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 11:38 am

भिवंडी कनेक्शन उघड!:संभाजीनगरात कॉलेज तरुणांना ड्रग्ज पुरवणारा शेख मिजान अटकेत; साथीदार फरार

शहरातील महाविद्यालयीन तरुण-तरुणींना अमली पदार्थांच्या विळख्यात ओढणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अमली पदार्थविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. शेख मिजान शेख नईम (२७, रा. सिल्क मिल कॉलनी) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एमडी ड्रग्ज आणि आयफोनसह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सिल्क मिल कॉलनी आणि रेल्वेस्टेशन परिसरात दोन तरुण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याच्या माहितीवरून २८ डिसेंबरच्या रात्री पथकाने फॉरेन्सिक टीमसह छापा टाकला. पाठलाग करताना शेख मिजान हा पडल्यामुळे पोलिसांच्या हाती लागला. त्याचा साथीदार कैफ कुरेशी अंधारात पसार झाला. भिवंडीतून होत होता ड्रग्जचा पुरवठा तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून हा माल मुंबईजवळील भिवंडी येथील मस्तान आरिफ याच्याकडून आणला जात होता. पोलिसांनी या दोघांचाही गुन्ह्यात समावेश केला आहे. मिजानची झडती घेतली असता त्याच्याकडे ०.८९ ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. इनसाइड स्टोरी: शहराच्या मुख्य सप्लायरमधील दुवाशेख मिजान हा पोलिस रेकॉर्डवरील खतरनाक गुन्हेगार आहे. त्याच्यावर अमली पदार्थ तस्करीचे २, आर्म ॲक्ट आणि प्राणघातक हल्ल्याचा १ असे एकूण चार गुन्हे दाखल आहेत. तो भिवंडीहून माल आणून छोट्या पुड्यांच्या स्वरूपात कॉलेजच्या विद्यार्थ्यांना विकायचा. शहरातील मुख्य सप्लायर साखळीतील तो महत्त्वाचा दुवा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 11:37 am

संभाजीनगर, नाशिक, पुणे, मालेगावात युती तुटली:भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार; शेवटपर्यंत चर्चा ताणल्याचा परिणाम

मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांची लगबग सुरू झाली आहे. त्यातच सत्ताधारी महायुतीमधील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या 3 घटकपक्षांची युती अनेक ठिकाणी तुटल्यामुळे हे पक्ष आता आपापल्या वाटांनी वेगळे जाणार हे स्पष्ट झाले आहे. युती तुटलेल्या शहरांत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व मालेगावसह इतर काही ठिकाणचा समावेश आहे. मालेगावात भाजपने युती तोडली 22 सदस्यीय मालेगाव महापालिकेत भाजपने शिवसेनेकडे 10 जागांची मागणी केली होती. पण स्थानिक पातळीवर भाजपला केवळ 8 जागांवरच समाधान मानावे लागले. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी पसरली होती. भाजपमध्ये नुकत्याच प्रवेश केलेल्या एका गटाने सुरुवातीपासूनच युतीला विरोध दर्शवला. या गटाने निवडणुकीत तटस्थ राहण्याचीही भूमिका घेतली. या घडामोडींमुळे मालेगावातील महायुती अधिकच कमकुवत झाली आणि अखेर त्याची निष्पत्ती युती तुटण्यात झाली. नाशिकमध्येही भाजपने मित्र पक्षांना वाऱ्यावर सोडले नाशिक महापालिका निवडणुकीतही सत्ताधारी महायुती अखेर दुभंगली आहे. भाजपकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली. यावेळी भाजपने वाऱ्यावर सोडल्याची भावना शिंदे गटाच्या नेत्याने व्यक्त केली. आम्ही असलो नसलो तरी भाजपला काही फरक पडणार नाही. त्यामुळे त्यांनी स्वबळाचा निर्णय घेतला असावा, असे अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटले आहे. या घडामोडींनी महापालिका निवडणुकीत वेगळेच रंग भरले असून राजकीय संघर्ष रंगतदार व तितकाच चुरशीचा झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुती संदर्भात चर्चा सुरू असताना मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना भाजपमध्ये आणून विरोधकांसह मित्रपक्षांनाही दणका दिला होता. संबंधितांना भाजपमध्ये घेण्यामागे महापालिका निवडणूक, निवडून येण्याची गणिते असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले होते. भाजपची स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची पुरेपूर तयारी झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चर्चेच्या फेऱ्या पूर्ण होऊन सोमवारी उभयतांनी युतीवर शिक्कामोर्तब केले. अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवळ, माजी खासदार समीर भुजबळ, शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे आणि उपनेते विजय करंजकर आदींच्या बैठकीनंतर या संदर्भात घोषणा करण्यात आली. संभाजीनगरातही तिन्ही पक्षांच्या वेगळ्या वाटा छत्रपती संभाजीनगरात महायुतीचा पोपट मेला आहे. शिंदे गटाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजप, शिवसेनेची युती तुटल्याची घोषणा केली. यासाठी त्यांनी भाजपच्या अहंकाराला जबाबदार धरले. ते म्हणाले, संभाजीनगरमध्ये युती व्हावी, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रयत्न केले. स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या. मात्र, सुरुवातीपासूनच स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे शंका निर्माण झाल्या होत्या. मी सातत्याने स्थानिक नेत्यांच्या संपर्कात होतो. त्यांच्याशी फोनवरून चर्चा केल्या. देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू मानले जाणारे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही बैठक झाली. शिरसाट पुढे म्हणाले, शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर जागावाटप ठरले होते. त्यामुळे त्यावेळी युती झाली, अशाच संभ्रमात आम्ही होतो. मात्र प्रत्यक्ष जागा देण्याची वेळ आली, तेव्हा शिवसेनेच्याच जागा सोडाव्यात, असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला. ही भूमिका आमच्या कार्यकर्त्यांना कदापि मान्य होणारी नव्हती. त्यामुळे आम्ही आमच्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. पुण्यात भाजपा - शिंदे गटाची युती फिस्कटली? पुए महापालिकेच्या निवडणुकीतही शिवसेना व भाजपची युती तुटल्यात जमा असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी बोलताना सत्ताधारी शिवसेनेचे नेते नाना भानगिरे यांनी सांगितले की, आमच्या कार्यकर्त्यांना आता एबी फॉर्म दिले जाणार आहेत. आता आम्ही 165 सर्व जागा लढवण्याचा निर्णय होणार आहे. आता आमची माघार नाही. त्यांच्या या विधानामुळे पुण्यातही सेना - भाजप युती फिस्कटली हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 11:31 am

थर्टी फर्स्टला दारू पिऊन झिंगणाऱ्यांची गाढवावरून काढणार धिंड:अहिल्यानगरमधील निघोज गावातील महिलांचा टोकाचा इशारा

थर्टी फर्स्टचे निमित्त करून दारू पिऊन निघोज गावात फिरण्याचा बेत असेल तर सावधान! कारण झिंगाट होऊन गावात फिरणाऱ्या तळीरामांची गाढवावरून धिंड काढण्याचा निर्णय गावातील महिलांनी घेतला आहे. गावात पूर्णपणे दारूबंदीसाठी गाढवावरून धिंड काढण्याचे पाऊल महिला उचलत आहेत. २०१६ मध्ये महिलांनी मतदान करून निघोजमधील परवानाधारक दारू दुकाने बंद केली होती. त्यानंतरही गावातील हॉटेल व ढाब्यावर सर्रास अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप करत दारूबंदीविरोधी महिला समितीच्या सदस्यांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रारी करूनही दारू विक्री केली जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आता तळीरामांना जरब बसवण्यासाठी वेगळा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर निघोजमधील दारूबंदी चर्चेचा विषय ठरला आहे. कोणतीही कारवाई होत नसल्याने महिलांनी आता तळीरामांना अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. निघोजमधील दारूबंदीबाबत जनजागृती करण्यासाठी व गावातील दारू विक्रेत्यांवर कारवाईसाठी मंगळवारी थर्टी फर्स्टचे निमित्त साधून महिला गावातून फेरी काढणार आहेत. जिल्हा पोलिस प्रशासनाला तसे निवेदन दिले आहे. पोलिसांकडून मदत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या जनजागृती फेरीत पोलिसांनीही सहभागी व्हावे, असे साकडे या महिलांनी घातले आहे. दारूबंदीसाठी महिलांचा ८ वर्षांपासूनचा संघर्ष निघोज गावाची लोकसंख्या १५ हजारांच्या पुढे आहे. दारूच्या व्यसनामुळे गावातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. त्यामुळे गावात दारूबंदी व्हावी म्हणून मागील ८ वर्षांपासून महिला संघर्ष करत आहेत. तसा ग्रामसभेत ठराव करून दारूबंदीचा निर्णयही झाला. पण प्रत्यक्षात छुप्या पद्धतीने गावातील काही हॉटेल व ढाब्यांवर अवैध दारू विक्री होतच आहे. पोलिसही यावर कारवाई करत नसल्याने त्यांनी थर्टी फर्स्टला मद्यपींची गाढवावरून धिंड काढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही जनजागृती करणार गावात कुणालाही अवैध दारू विक्री करता येणार नाही. अशा प्रकारे दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही पुढाकार घेतला असून गावातील दारूबंदी कायमस्वरूपी बंद करणार आहोत. याची सुरुवात गावात जनजागृती करून करणार आहे. - कांता लंके, अध्यक्ष, दारूबंदीविरोधी समिती, निघोज.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 11:24 am

भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली:मुख्यमंत्र्यांचे आदेशही स्थानिक नेत्यांनी डावलले; शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट यांचा आरोप

शिवसेना-भाजप युती भाजपच्या अहंकारामुळे तुटली असून, स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संदेशही डावलले, अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली. भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या असहकार आणि अहंकारी भूमिकेमुळे युती संपुष्टात आल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. शिरसाट यांच्या म्हणण्यानुसार, भाजपने युतीचे सूत्र बदलले. जाणूनबुजून शिवसेनेला कमी जागा देऊन युती तोडण्याचे नियोजन स्थानिक भाजप नेत्यांकडून करण्यात आले होते. त्यामुळे भाजप वारंवार वेगळ्या भूमिका घेत होता, असेही त्यांनी नमूद केले. युतीच्या सूत्रामध्ये एकमत होत नसल्यामुळे दोन्ही पक्षांनी इच्छुक उमेदवारांना 'एबी फॉर्म' देण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी इच्छुक उमेदवारांना 'एबी फॉर्म' वाटप सुरू झाले आहे. माजी महापौर नंदकुमार घोडेले हे इच्छुक उमेदवारांची यादी तयार करत असून, त्यांना तात्काळ फॉर्म देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीबाबत दहा बैठका होऊनही कोणताही तोडगा न निघाल्याने, शिवसेनेने भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला अमान्य केला आहे. त्यामुळे शिवसेनेने आपल्या सर्व उमेदवारांची यादी तयार करून त्यांना फॉर्म भरण्याबाबत सूचना दिल्या आहेत. दरम्यान, महापौर विकास जैन यांनी नाराजी व्यक्त करत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी राजेंद्र जंजाळ यांनीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. आता शिवसेनेच्या आणखी एका नेत्याने हा निर्णय घेतल्याने पक्षातील नाराजी समोर आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 11:23 am

भाजपने फेकलेल्या जागांवर शिंदेगट:अमित शहांच्या दारात उभे राहणाऱ्यांना शिवसेना म्हणू नका; संजय राऊतांचा जोरदार हल्ला

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. भाजप आणि शिंदे गटामधील जागावाटप जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. भाजप 137 आणि शिंदे गट 90 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा झाल्यानंतर राऊत यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली. शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भाजपने फेकलेल्या जागांवर लढत आहेत, हे केवळ हास्यास्पद नाही तर धक्कादायक आणि लाजिरवाणे आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. या वक्तव्यामुळे मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेच्या इतिहासाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, आतापर्यंत मुंबईमध्ये शिवसेनाच मोठ्या भावाच्या भूमिकेत होती आणि भाजपला जागा देत होती. पण आज परिस्थिती पूर्णपणे उलटली आहे. स्वतःला शिवसेना म्हणवणाऱ्यांना आता भाजपच्या दारात उभे राहून जागा मागाव्या लागत आहेत. अमित शहांची शिवसेना, असल्याचा आरोप करत राऊत म्हणाले की, ज्यांनी कधीही कुणासमोर मान तुकवली नाही, त्या शिवसेनेच्या नावाचा आज अपमान केला जात आहे. गेल्या 60 वर्षांच्या इतिहासात शिवसेना कधीच कुणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. संजय राऊत यांनी शिंदे गटावर अधिक तीव्र शब्दांत टीका करत सांगितले की, युती व्हावी म्हणून एकनाथ शिंदे गटाने थेट अमित शहांच्या दारात धाव घेतली. भाजपने दिलेल्या जागांवर समाधान मानणे ही स्वाभिमानाची नाही, तर लाचारीची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपने जागा दिल्या, त्या स्वीकारल्या आणि त्यावर निवडणूक लढवायची, हे शिवसेनेच्या परंपरेला धरून नाही, असे राऊत म्हणाले. त्यांनी हे दृश्य मराठी माणसासाठी लाजिरवाणे असल्याचे सांगत, हा मराठी अस्मितेचा पराभव असल्याची भावना व्यक्त केली. सन्मानाने, स्वबळावर लढण्याची भूमिका राऊत यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करत सांगितले की, आम्हीच खरी शिवसेना आहोत आणि आम्ही सन्मानाने आघाडी केली आहे. मुंबईत सुमारे 140 जागांवर आम्ही लढत आहोत, असे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या पक्षाकडूनही मोठ्या प्रमाणात जागा लढवल्या जात असून, राष्ट्रवादी काँग्रेसला देखील योग्य त्या जागा देण्यात आल्या आहेत. ही सगळी मांडणी परस्पर सन्मान आणि समन्वयातून झाल्याचे त्यांनी नमूद केले. याउलट शिंदे गट भाजपने दिलेल्या जागांवरच निवडणूक लढवत असल्याने जनता याचा निश्चितच विचार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हात पसरून मागणी, राऊतांचा टोला मुंबईत शिंदे गटाला 100 पेक्षा जास्त जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असल्याच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी उपरोधिक उत्तर दिले. मिळाव्यात म्हणजे स्वतःच्या ताकदीवर नाहीत, त्यांनी द्याव्यात, असा टोला त्यांनी लगावला. याचा अर्थ भाजपसमोर हात पसरून जागा मागण्यात आल्या, असा आरोप त्यांनी केला. त्यांनी 2017 चा संदर्भ देत सांगितले की, त्या वेळी भाजपने अडेलटट्टूपणाची भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेने स्वाभिमानाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्यालाच स्वाभिमान म्हणतात, असे राऊत यांनी ठामपणे सांगितले. ना दिल्लीत दारात बसलो, ना लाचारी पत्करली संजय राऊत यांनी भाजपसोबतच्या जुन्या संघर्षांचा उल्लेख करत सांगितले की, जेव्हा भाजपने शब्द पाळला नाही आणि पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शिवसेनेने स्वतःहून स्वाभिमानाने बाजूला होण्याचा निर्णय घेतला. आम्ही दिल्लीत जाऊन कुणाच्या दारात बसलो नाही, ना कोणासमोर मान झुकवली, असे त्यांनी ठणकावून सांगितले. जे काही असेल, त्या ताकदीने आम्ही लढलो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम ठेवला, असा दावा त्यांनी केला. मात्र, सध्याचे चित्र वेगळे असून, शिंदे गटाने शिवसेना हे नाव वापरणे थांबवावे, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबई, मराठी अस्मिता आणि भाजपवर गंभीर आरोप राऊत यांनी मुंबईच्या अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि तिच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमित शहा आणि त्यांच्याशी संबंधित बिल्डर लॉबी मुंबई गिळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही निवडणूक त्याच विरोधातील लढाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या उमेदवार यादीत अमराठी उमेदवार मोठ्या प्रमाणावर असल्याबाबत विचारले असता, भाजपचा मराठी माणसाशी, महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या अस्मितेशी काहीही संबंध नसल्याचा घणाघात त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्या यादीत परप्रांतीय उमेदवार असणे स्वाभाविक असल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 11:20 am

संभाजीनगरात महायुतीचा पोपट मेला:भाजपचा हट्ट आणि अंहकार यामुळेच युती टिकू शकली नाही, संजय शिरसाट यांचा थेट आरोप

संभाजीनगरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, महायुती तुटल्याची अधिकृत घोषणा शिवसेना शिंदे गटाचे नेते तसेच मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. भाजपचा हट्ट आणि अंहकार यामुळेच ही युती टिकू शकली नाही, असा थेट आणि तीव्र आरोप शिरसाट यांनी केला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये भाजपकडून सातत्याने दबावाचे राजकारण केले जात होते. जागावाटपात शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्न झाला, तसेच स्थानिक नेत्यांचा सन्मान न राखता एकतर्फी निर्णय लादले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. शिरसाट म्हणाले की, महायुती ही समानतेच्या तत्वावर उभी असते, मात्र संभाजीनगरमध्ये भाजपने भागीदार पक्षाला गृहित धरले. अनेक बैठका, चर्चा आणि समन्वयाचे प्रयत्न करूनही भाजपकडून कोणतीही लवचिकता दाखवण्यात आली नाही. अखेर स्वाभिमान आणि कार्यकर्त्यांचा आत्मसन्मान जपण्यासाठी युती तोडण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला, असे त्यांनी स्पष्ट केले. या घोषणेमुळे संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आगामी महापालिका निवडणुकीत आता थेट आणि तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे. महायुतीतील या महास्फोटामुळे भाजपसह सर्वच पक्षांच्या रणनीतींवर मोठा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. सत्ताधारी महायुतीमधील एक महत्त्वाचा घटक असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडण्याचा निर्णय घेतल्याची अधिकृत घोषणा मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपच्या भूमिकेमुळे आणि सातत्याने दाखवण्यात आलेल्या अहंकारी वृत्तीमुळेच हा निर्णय घ्यावा लागला, असा थेट आणि तीव्र आरोप त्यांनी केला. या घोषणेमुळे संभाजीनगरमधील शिंदेसेना-भाजप युतीला मोठा धक्का बसला असून, आगामी महापालिका निवडणुकीचे राजकीय गणित पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले की, संभाजीनगरमध्ये युती व्हावी, यासाठी राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वाकडूनही गंभीर प्रयत्न करण्यात आले होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून युतीसाठी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पातळीवर अनेक वेळा बैठका घेण्यात आल्या, चर्चा झाल्या आणि समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुरुवातीपासूनच भाजपच्या स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांची भूमिका वेगळी असल्याचे जाणवत होते. युतीबाबत बोलण्यात काही आणि प्रत्यक्ष कृतीत काही, अशी परिस्थिती निर्माण होत होती, ज्यामुळे शंका बळावत गेल्या, असे शिरसाट यांनी सांगितले. युती वाचवण्यासाठी आपण स्वतः सातत्याने प्रयत्न केल्याचेही संजय शिरसाट यांनी नमूद केले. स्थानिक नेत्यांशी फोनवरून चर्चा करण्यात आल्या. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाणारे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही सविस्तर बैठक झाली, असे त्यांनी स्पष्ट केले. या चर्चांमधून काही सकारात्मक संकेत मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, बैठका आणि चर्चांनंतरही भाजपच्या भूमिकेत फारसा बदल झाला नाही. वरवर युतीबाबत सकारात्मक बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात शिवसेनेला कमी लेखणारी भूमिका कायम राहिली, असा आरोप शिरसाट यांनी केला. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसमोर जागावाटप ठरल्याचा दावा पत्रकार परिषदेत बोलताना संजय शिरसाट यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, युतीबाबतचा अंतिम टप्पा आला असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जागावाटपावर सहमती झाली होती. त्या चर्चेनंतर युती निश्चित झाली, अशा समजुतीत शिवसेना होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही सकारात्मक संदेश गेला होता. मात्र, प्रत्यक्षात जागावाटपाची अंमलबजावणी करण्याची वेळ आली, तेव्हा चित्र वेगळेच समोर आले. भाजपकडून शिवसेनेच्या जागाच सोडाव्यात, असा प्रस्ताव पुढे करण्यात आला, असे शिरसाट यांनी सांगितले. शिवसेनेच्या जागांवर गदा, कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध भाजपने मांडलेला प्रस्ताव शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत अपमानास्पद असल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या ताकदीच्या जागा सोडण्याची मागणी करण्यात आली, जी कोणत्याही परिस्थितीत मान्य होऊ शकत नव्हती. आमच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान आणि पक्षाची भूमिका लक्षात घेता असा निर्णय घेणे शक्य नव्हते, असे त्यांनी ठामपणे सांगितले. एकीकडे युतीबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे शिवसेनेला कमकुवत करणारे प्रस्ताव मांडायचे, ही भाजपची दुहेरी भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपकडून सन्मानजनक प्रस्ताव नाही, अहंकारच कारण ठरला संजय शिरसाट यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेवटच्या क्षणापर्यंत भाजपकडून कोणताही नवा किंवा सन्मानजनक प्रस्ताव देण्यात आलेला नाही. उलट भाजपने आपली आग्रही भूमिका कायम ठेवली. आमची ताकद वाढली आहे, आम्ही काहीही करू शकतो, असा अहंकार भाजपच्या भूमिकेतून दिसून येत होता. हा अहंकारच आज युती तुटण्याचे मुख्य कारण ठरला, असे शिरसाट यांनी ठामपणे सांगितले. युती समानतेच्या तत्वावर चालते, मात्र येथे ते तत्व पायदळी तुडवले गेल्याचा आरोपही त्यांनी केला. युतीत फूट, संभाजीनगरच्या राजकारणात नवे समीकरण महायुती तुटल्याची ही घोषणा संभाजीनगरच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी ठरली आहे. शिंदेसेना-भाजप युतीतील हा स्फोट महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने सर्वच पक्षांच्या रणनीतींवर त्याचा परिणाम होणार आहे. आता निवडणुकीत थेट आणि तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संजय शिरसाट यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय चर्चांना वेग आला असून, येत्या काळात संभाजीनगरच्या निवडणूक रणांगणात आणखी मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 10:58 am

आज उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस:उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग; अजित पवारांच्या NCP ची गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांची लगबग वाढली आहे. अनेक ठिकाणी सत्ताधारी महायुतीसह व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीतील घटकपक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची दमछाक होण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांत महायुती व महाविकास आघाडीतील घटकपक्ष एकमेकांविरोधात लढत आहेत. त्यामुळे या ठिकाणी वेगळेच राजकीय समीकरण दिसून येत आहे. दरम्यान, मुंबईत आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार असून उर्वरित मनपांमध्ये अर्ज स्वीकारण्याची वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. या लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहूया महापालिका निवडणुकीशी संबंधित अपडेट्स, पण संक्षिप्त स्वरुपात... खालील तक्त्यात पाहा निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबल

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 10:40 am

पिंपरी-चिंचवड निवडणुकीत अजित पवार उमेदवार:बातमी समोर येताच अनेकांना आश्चर्याचा धक्का, नेमके कारण काय?

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अनोखी आणि अनेकांना चकित करणारी घटना समोर आली आहे. शहरातील राजकीय चर्चांना अचानक वेग आला आहे, कारण अजित पवार हे नाव असलेला उमेदवार थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं समोर आलं आहे. विशेष बाब म्हणजे, या उमेदवाराचं नाव राज्यातील उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याशी जुळतं. त्यामुळे पहिल्यांदा ही बातमी समोर येताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार निवडणूक लढवत असल्याची चर्चा झपाट्याने पसरली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. खरं पाहता, पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मधून अजित पोपट पवार या स्थानिक उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी ‘ड’ या जागेसाठी अर्ज भरला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे चर्चा आणखी रंगली आहे. अजित पवार हे नाव आणि घड्याळ चिन्ह या दोन गोष्टी एकत्र आल्यामुळे अनेक नागरिक, कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. सोशल मीडियावरही याबाबत विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या अजित पोपट पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अर्ज दाखल केला असला, तरी अद्याप त्यांना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म मिळालेला नाही. त्यामुळे सध्या ते अधिकृत उमेदवार आहेत की नाहीत, याबाबत स्पष्टता नाही. मात्र, जर एबी फॉर्म मिळाला, तर ते शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आघाडीचे अधिकृत उमेदवार ठरू शकतात. त्यामुळे येत्या काही तासांत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. एबी फॉर्म मिळाल्यास ही उमेदवारी अधिकृत ठरेल आणि या चर्चेला नवं वळण मिळेल. राज्यातील राजकारणात अजित पवार हे नाव अत्यंत प्रभावी आणि ओळखीचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील महत्त्वाचे नेते म्हणून अजित पवार सर्वपरिचित आहेत. अशा वेळी पिंपरी-चिंचवडमध्ये त्याच नावाचा उमेदवार निवडणूक लढवत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होणं साहजिक आहे. काही जणांनी सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारच महापालिकेची निवडणूक लढवत असल्याचा अंदाज बांधला. मात्र, प्रत्यक्षात हे नावाचं साधर्म्य असून उमेदवार वेगळा आहे. तरीसुद्धा, या अनोख्या योगायोगामुळे निवडणुकीची रंगत नक्कीच वाढली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, अजित पवार गट आणि शरद पवार गट यांनी ही निवडणूक एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेतल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः याबाबत जाहीर वक्तव्य करत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या सभेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घड्याळ आणि तुतारी ही दोन्ही चिन्ह एकत्र निवडणुकीत दिसतील. राष्ट्रवादीचं कुटुंब पुन्हा एकत्र येत असून, कार्यकर्ते आणि मतदारांच्या मनात हीच अपेक्षा होती. राज्याच्या आणि शहराच्या विकासासाठी एकत्र येणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं. कठोर आणि व्यावहारिक निर्णय घेणं हेच महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. या एकत्र येण्यामुळे पक्ष अधिक मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या एकत्रिकरणामुळे निवडणुकीत थेट लढतींचं चित्र बदलू शकतं. त्यातच अजित पवार नावाच्या उमेदवाराच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक अधिक चर्चेची ठरली आहे. पुढील काळात एबी फॉर्म, अधिकृत उमेदवारी आणि प्रचाराच्या घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवडची निवडणूक राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 10:00 am

अखेर ठरले; भाजप- राष्ट्रवादीची युती:शिवसेनेशी मैत्रीपूर्ण लढत, भाजप 66 तर राष्ट्रवादी काँग्रेस 14 जागांवर लढणार‎

महापालिका निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली आहे. त्यानुसार भाजप ६६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १४ जागा लढवण्याचे निश्चित झाले आहे. या युतीची घोषणा सोमवारी रात्री ११ वाजता भाजपचे आ. रणधीर सावरकर, खा. अनुप धोत्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक राज्यमंत्री इंद्रनील नाईक,आ. अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आली. तर शिवसेना शिंदे गटाशी रात्री उशिरापर्यंत बोलणी सुरुच असून, त्यात युतीची शक्यता कमीच आहे. काही प्रभागात भाजप आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत आहेत. मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता अवघे काही तासच शिल्लक असतानाही सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी सोमवारी रात्री उशिरा बैठक एका हॉटेलात पदाधिकाऱ्यांची बैठक सुरुच होती. त्यात रात्री ११ वाजता भाजप आणि राष्ट्रवादीचा तिढा सुटला मात्र शिंदे सेनेची जागांबाबत तडजोड होत नसल्याने काही प्रभागात भाजप आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांत मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. उभय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे. हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल, महानराध्यक्ष जयंत मसने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष विजय देशमुख, प्रदेश पदाधिकारी मदन भरगड आदी उपस्थित होते. शिंदे सेनेशी झालेल्या चर्चेवेळी शिंदे सेनेचे नेते गोपीकिशन बाजोरिया, पक्षाचे जिल्हाध्यक्ष आश्विन नवले, श्रीरंग पिंजरकर आदी उपस्थित होते. भाजपच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी नगरसेवक हरीश आलीमचंदानी यांनी भाजपमध्ये पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतला असून, पक्षाने त्यांचे निलंबन मागे घेतले. त्यामुळे पक्षात त्यांचे स्वागत खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवारी स्वागत केले. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष जयंत मसने, संतोष शिवरकर, वसंत बाछुका, गिरीश जोशी, अजय शर्मा, माधव मानकर, डॉ. अमित कावरे, संजय गोटफोडे, आदी उपस्थित होते. पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाचे पालन करेल, अशा शब्दात हरीश आलीमचंदानी यांनी आपल्या घरवापसीचे स्वागत केले. माजी नगरसेवक हरीश आलीमचंदानींची ‘घरवापसी’

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 9:51 am

उबाठा-प्रहार पक्षाची युती; मशाल चिन्हावर लढणार:भाजपला घेरण्याची आखली रणनीती‎

मनपा निवडणुकीत उमेदवार अर्ज भरण्यासाठी एकच दिवस राहिला असतानाच सोमवारी शिवसेनेच्या (ठाकरे गट) व बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाची युती झाली. मात्र ही युती तूर्तास जुने शहरातील प्रभाग क्रमांक ८ साठीच आहे. अन्य जागांची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, २ जोनवारी रोजी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. प्रहारने शहरातील अनेक मुद्द्यांवर आंदोलन करत लक्ष वेधून घेतले होते. तेथूनच प्रहार महापालिका निवडणुकीत उतरणार असल्याची चुणूक दिसून आली होती. मनपा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला. मात्र मविआधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आता आपला जुना मित्र पक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाला जवळ केले आहे. आघाडीबाबत दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. प्रहार मशालवर लढणार ^शिवसेना व प्रहार जनशक्ती पक्ष सोबत लढणार असला तरी उमेदवारांचे चिन्ह मशाल राहील. सध्या एक प्रभागात प्रहारला सोबत घेतले आहे. अन्य जागांचा बोलून निर्णय घेऊ.- आशीष गावंडे, महानगराध्यक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ठाकरे गट भाजपला जुने शहरात घेरण्याची रणनिती आखत असल्याचे दिसून येत आहे. आधी मुस्लिम बहुल भागात थेट उमेदवार न टाकता शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आता प्रहारला सोबत घेत थेट मशालवरच लढवण्याचे निश्चित झाले. तसेही जुने शहरात २०१७च्या निवडणुकीत शिवसेनेचे सात उमेदवार विजयी झाले होते. आता त्यापैकी एकच नगरसेवक शिवसेनेत असला तरी प्रहारला सोबत घेत पक्ष सोडून गेलेल्यांसह भाजपला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भाजपला घेरण्याची आखली रणनीती शिवसेनेसोबत युती ^शिवसेना ठाकरे गटासोबत आमची युती झाली आहे. प्रभाग ८मध्ये आम्ही लढणार असून, चिन्ह मात्र मशाल असेल. अन्य जागांवर वेगळे चिन्ह राहील.- मनोज पाटील, महानगराध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 9:50 am

कोल्हापूर जिल्हा बँकेला RBIचा झटका:नियमभंग करणाऱ्या बँका, फायनान्स कंपनीवर लाखोंचा दंड; कर्ज व्यवहारातील नियमभंग उघड

देशातील बँका आणि वित्तीय संस्थांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. बँकिंग प्रणाली सुरक्षित, पारदर्शक आणि नियमांनुसार चालावी यासाठी आरबीआय वेळोवेळी तपासण्या करत असते. या तपासण्यांमध्ये जर कोणत्याही प्रकारचं नियमांचं उल्लंघन आढळून आलं, तर संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थांवर कारवाई केली जाते. अशाच कारवाईचा भाग म्हणून आरबीआयनं 29 डिसेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकांमधून तीन बँका आणि एका फायनान्स कंपनीवर आर्थिक दंड ठोठावल्याची माहिती दिली आहे. या यादीत महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचाही समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 22 डिसेंबर 2025 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, कोल्हापूर यांच्यावर 2 लाख 10 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. तपासणीत या बँकेकडून बँकिंग नियमन कायदा 1949 मधील कलम 20 आणि कलम 56 चे उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं आहे. या उल्लंघनांमुळे आरबीआयनं आपल्या अधिकारांचा वापर करत बँकेवर आर्थिक दंड आकारण्याचा निर्णय घेतला. सहकारी बँकांसाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे असून त्यांचे काटेकोर पालन होणे अपेक्षित असते. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी नाबार्डकडून करण्यात आली होती. ही तपासणी 31 मार्च 2024 रोजीच्या आर्थिक स्थितीच्या आधारे करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान बँकेच्या काही कर्ज व्यवहारांमध्ये नियमबाह्य बाबी आढळून आल्या. यानंतर आरबीआयकडून बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल दंड का आकारू नये, याबाबत बँकेकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलं होतं. बँकेनं सादर केलेलं उत्तर, दिलेली अतिरिक्त माहिती आणि तोंडी म्हणणं यांचा सखोल विचार केल्यानंतरच आरबीआयनं अंतिम निर्णय घेत दंड ठोठावला. आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्हा बँकेनं एका कंपनीला कर्ज मंजूर केलं होतं, ज्यामध्ये बँकेचा संचालकच जामीनदार होता. बँकिंग नियमन कायद्यानुसार अशा प्रकारच्या व्यवहारांवर स्पष्ट निर्बंध आहेत. संचालकांशी संबंधित कर्ज व्यवहारांमध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक असताना त्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचं तपासणीत स्पष्ट झालं. याच कारणामुळे बँकेवर 2.10 लाख रुपयांचा दंड लावण्यात आल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेसह तेलंगणा राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, वारंगळ यांनाही आरबीआयनं दंड ठोठावला आहे. या बँकेवर एक लाख रुपयांचा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे. वारंगळ जिल्हा बँकेनंही बँकिंग नियमन कायदा 1949 मधील कलम 20 आणि 56 चं उल्लंघन केल्याचं तपासणीत आढळून आलं. विशेषतः कर्ज प्रकरणांशी संबंधित नियमांचं पालन न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं आरबीआयनं सांगितलं आहे. याशिवाय, तामिळनाडूतील द सलेम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवरही आरबीआयनं कारवाई केली आहे. या बँकेला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तपासणीत असं आढळून आलं की, बँकेनं अशा कर्जदाराला अकृषिक कर्ज दिलं होतं, ज्याचं कर्ज खातं याआधी सामोपचारानं बंद करण्यात आलं होतं. नियमानुसार ठरवून दिलेला कुलिंग कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा कर्ज मंजूर करण्यात आलं होतं, जे नियमबाह्य ठरतं. यामुळेच आरबीआयनं बँकेवर दंडाची कारवाई केली. बँकांबरोबरच एका खासगी फायनान्स कंपनीवरही आरबीआयनं मोठा दंड लावला आहे. 23 डिसेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार वॅल्यूकॉर्प सिक्यूरिटीज अँड फायनान्स लिमिटेडवर 2 लाख 40 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कंपनीनं क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना ग्राहकांचा आवश्यक डेटा सादर केला नव्हता. तसेच निश्चित मर्यादेपेक्षा जास्त रकमेची कर्ज हस्तांतरणं करण्यात आली होती. यासोबतच ‘केवायसी’ संदर्भातील नियमांचं पालन न केल्याचंही आढळून आलं. या सर्व उल्लंघनांमुळे आरबीआयनं कंपनीवर आर्थिक दंडाची कारवाई केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 9:50 am

आम्ही 25 जागांवर लढू; भाजप वगळून आघाडी:काँग्रेस 55, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 25 जागांवर लढणार; अकोल पश्चिममधील जागांवरून तिढा

महापालिका निवडणुकीत उमेदवार अर्ज भरण्यासाठी एक दिवस राहिला असतानाच महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जागा वाटपावर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. काँग्रेस ५५ तर राकाँ २५ जागांवर लढणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वतंत्र लढणार असून, काँग्रेसमधील बंडखोर मशाल हातात घेत ठाकटे गटातून लढण्याच्या तयारीत आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चेला वेग आला. अनेक २० प्रभागांमधील ८० जागांवर काँग्रेस, राकाँ (शरद पवार पक्ष) व शिवसेनेच्या ठाकरे गटात अनेक बैठकांमध्ये चर्चा झाली. मात्र अकोला पश्चिममधील अनेक जागांवरून तीनही बाजूने एकमत झाले नाही. उमेदवारी अर्जाची मुदत ३० डिसेंबर रोजी संपणार असल्यानंतरही आघाडीत एकमत झाले नाही. अखेर रविवारी काँग्रेस-राकाँने एकत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला आणि सोमवारी कोण किती जागांवर लढेल, हेही निश्चित केले. बंडोबांना अशीही संधी : शिवसेनेच्या ठाकरे गटाने प्रभाग क्रमांक ८,९,१०, १७, १८मध्ये उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. अशातच प्रभाग क्रमांक ८ व ९ मधून कांॅग्रेसमध्ये संधी मिळालेले, जागा न सुटलेले शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे वळत आहेत. त्यामुळे शिवसेना स्वबळावर लढणार असल्याने बंडोबांनाही संधी उपलब्ध झाली आहे. ^आघाडीसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. काँग्रेस ५५ जागांवर लढणार असून, उर्वरित जागांवर राकाँचे उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. - डॉ. प्रशांत वानखडे, महानगराध्यक्ष, काँग्रेस. ^महापालिकेतील ८० पैकि २५ जागांवर राकाँ शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार लढणार आहे. आम्ही यापूर्वीच भाजप वगळता अन्य कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्याचे धोरण आखले आहे. - रफिक सिद्दिकी, महानगराध्यक्ष, राकाँ शरदचंद्र पवार पक्ष मतांचे विभाजन होऊ न देण्याचे आव्हान काँग्रेस व शिवसेनेचे पारंपरिक मतदार भिन्न असून, दोन्ही बाजूने आपापल्या हक्काच्या मतपेटीवर नजर ठेवून जागांवर रस्सीखेच झाली. अखेर मविआमध्ये बिघाडी झाली असली तरी काँग्रेस-राकाँमत आघाडी झाल्याने अल्पसंख्यांक मतांचे फारसे विभाजन होणार नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. मात्र अल्पसंख्यांक बहुल व अन्य हिंदू बहुल भागातील आपली पारंपरिक मते एकमेकांकडे ट्रान्सफर करण्याचे आव्हान काँग्रेस-राकाँ व शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे राहणार आहे. त्या-त्या भागात संबंधित मतदारांची मोट बांधल्यास भाजपला रोखणे शक्य होणार असून; अन्यथा कमळ फुलण्याचा मार्ग प्रशस्त होईल, असेही राजकीय जाणकारांचे मत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष ५५ जागांवर लढणार

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 9:49 am

आसेगाव देवी येथे शंकर पटामध्ये भैरव-फायर सादरीकरणामध्ये प्रथम:विविध गटातून आलेल्या गोंधळीकरांचे सादरीकरण उपस्थितांची मने जिंकली‎

तालुक्यातील आसेगाव देवी येथे जगदंबा मित्र परिवार व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ ते २५ डिसेंबर दरम्यान आयोजित तीन दिवसीय भव्य जंगी शंकरपट उत्साही व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या शंकर पटात विविध गटांतून गोंधळीकरांनी सादर केलेल्या थरारक व पारंपरिक कलेने उपस्थितांची मने जिंकली. शंकरपटाच्या उद्घाटनप्रसंगी माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके अध्यक्षस्थानी होते. आमदार बाळासाहेब मांगुळकर, सरपंच सचिन चव्हाण, पोलिस पाटील आशिष राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झाले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोहन भोयर, बंडूभाऊ कापसे, यादवराव घुरडे, अतुल देशमुख यांच्यासह ग्रामस्थ अविनाश गावंडे, गजानन कोळनकर, विजय गेलोत आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत अ' गटात गोंधळीचे मधुरा मोहोड व निलेश काळमेघ यांनी भैरव-फायर सादरीकरणातून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक राज दमाये (कुऱ्हा) यांच्या महाकाल-आनंद सादरीकरणाला, तर तृतीय क्रमांक नासिर पठाण यांच्या देवा-दुर्गा सादरीकरणाला मिळाला. क' गटात शेख अदनान यांनी भैरव-रायफल सादरीकरणातून प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक अभिषेक बाता यांना, तर तृतीय क्रमांक मनीष मोहोड यांच्या सर्जा-छावा सादरीकरणाला मिळाला. उत्कृष्ट धुरकरी म्हणून निवड झालेल्या कलाकाराला छाया गजानन कोळनकर यांच्या हस्ते विशेष पारितोषिक प्रदान करण्यात आले. या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समितीतील योगेश डहाके, रोशन जुनघरे, हरी भोईर, निलेश राऊत आदींनी विशेष परिश्रम घेतले. बक्षीस वितरण समारंभाने शंकर पटाचा समारोप झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल ग्रामस्थांनी आयोजनकांनी विशेष कौतुक केले.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 9:48 am

अमरावती जि.प. निवडणूक लांबणीवर; आरक्षण मर्यादा अधिक:जानेवारीच्या शेवटी हाेणार घाेषणा; पहिल्या टप्प्यात मिळणार डच्चू

आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक झाल्यामुळे अमरावती जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर पडणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. सूत्रानुसार मनपा निवडणुकांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्याबरोबर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा पहिला टप्पा घोषित केला जाणार आहे. परंतु ज्या संस्थांमधील आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेत आहे, त्याच ठिकाणची निवडणूक घेतली जाणार असल्याने अमरावतीला डच्चू मिळणार आहे. अमरावती जिल्हा परिषदेचे आरक्षण हे ६४ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे अशा संस्था वगळता राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा येत्या एक-दोन दिवसांत केली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगास दिले आहेत. मात्र त्या सर्व संस्थांमधील आरक्षण हे ५० टक्क्यांच्या मर्यादेतच असावे, अशी अटही घातली आहे. राज्यातील ३२ पैकी केवळ १२ जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्केच्या आत आरक्षण असून २० जिल्हा परिषदांमध्ये त्याहून अधिक आरक्षण देण्यात आले आहे. अशाच प्रकारे ३३६ पंचायत समित्यांपैकी १२५ पंचायत समित्यांमध्ये ५० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार ५० टक्क्यांच्या आत आरक्षण असलेल्या १२ जिल्हा जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक घेण्यात येणार आहे. सूत्रांच्या मते २९ महापालिकेसोबतच या निवडणूका घेण्याची चाचपणी आयोगाने केली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे या निवडणुका स्वतंत्र घेण्याचा निर्णय घेण्यात आला. आता महापालिकांची निवडणूक प्रक्रिया १७ जानेवारीपर्यंत संपणार असल्याने जिल्हा परिषदांसाठी निवडणूक कर्मचाऱ्यांची होणारी उपलब्धता लक्षात घेऊन जानेवारीच्या चौथ्या आठवड्यात या निवडणुका घेण्याची तयारी आयोगाने केली आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडलेल्या निवडणुकांबाबतच्या याचिकांवर २१ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. ‘ते’ सूत्रही वापरता आले असते आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ही काही नगरपालिका आणि महापालिकांमध्येही पाळली गेली नाही. मात्र तरीही राज्य निवडणूक आयोगाने तेथील निवडणुकांचे दोन टप्पे न करता त्या एकाच टप्प्यात घेणे सुरु केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी ही तेच सूत्र वापरुन संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल हा न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन ठेवता येऊ शकतो. मात्र मुळात याच चुकीमुळे गत काळात काही जणांनी न्यायालयाचे द्वार ठोठावून या निवडणुका एवढा काळ थांबविण्यात यश मिळविले. त्यामुळे आयोग कदाचित पुन्हा तीच चूक होणार नाही, याची काळजी घेत असावे.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 9:45 am

तक्षशिला महाविद्यालयात एआय राष्ट्रीय परिषदेला मोठा प्रतिसाद:कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानवासाठी प्रगती करावा- डॉ. के व्यंकटेश सतीश‎

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मैलाचा दगड ठरणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे तक्षशिला महाविद्यालय, अमरावती येथे पार पडली. या परिषदेच्या माध्यमातून भारताच्या भविष्यातील परिवर्तनात बहुविद्याशाखीय दृष्टिकोनातून एआय, एनईपी, नवोन्मेष आणि उष्मायनाची भूमिका एक्सप्लोर करणे समाज विकासाचा राष्ट्रीय संवाद घडणारा होता. यामध्ये राज्यासह देश विदेशातील सुमारे ५०० पेक्षा अधिक संशोधकांनी आपले प्रोजेक्ट पेपर सादर केले. यामध्ये जपान पासून तर आयआयटीचा समावेश होता. श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तक्षशिला महाविद्यालय आणि श्री संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय मंडळ दाभा संचालित श्री धाबेकर कला महाविद्यालयात खडकी,अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ही एक दिवसीय परिषद घेण्यात आली. परिषदेचे उद्घाटन सकाळी ११ वाजता तक्षशिला महाविद्यालय येथील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी उद्घाटनाला अमरावती विद्यापीठ कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते, श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल संस्थेच्या किर्ती अर्जुन, प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून आंध्र प्रदेश येथील आयआयआय टी''चे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. के. वेंकट सतीश, सचिव डॉ. कमलाकर पायस, प्रशासकीय अधिकारी प्रा. सचिन पंडित, अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे, तक्षशिला महाविद्यालय प्राचार्य डॉ माधुरी फुले, धाबेकर कला महाविद्यालय प्राचार्य डॉ. संजय देशमुख, विधी महाविद्यालय प्राचार्य डॉ वर्षा देशमुख, उपप्राचार्य प्रा. प्रितेश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्ते तथा आंध्र प्रदेश येथील आयआयआय टी''चे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. के. वेंकट सतीश यांनी यावेळी परिषदेला संबोधित केले. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. माधुरी फुले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. वर्षा गावंडे तर मान्यवरांचे आभार प्रा. आनंद देशमुख यांनी मानले. यावेळी अध्यक्ष म्हणून तक्षशिला इंजिनियरिंग कॉलेज दारापूर येथील प्राचार्य डॉ. डी. टी. इंगोले, मार्गदर्शक डॉ हरीश मालपाणी उपस्थिती होते. त्यानंतर परिषदेला विविध जिल्ह्यातून, राज्यातून आलेल्या संशोधकांनी आपल्या संशोधन पेपरचे सादरीकरण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती विद्यापीठाच्या डॉ. वैशाली गुडधे यांची उपस्थिती होती. यावेळी दिवसभर चाललेल्या परिषदेला विविध सत्रात संशोधकांची मांदियाळी पाहायला मिळाली. तसेच सायंकाळी सहा वाजता समारोपीय कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ नितिन कोळी, दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थेचे सचिव डॉ कमलाकर पायस, मार्गदर्शक भारतीय महाविद्यालय प्राचार्य डॉ. आराधना वैद्य, तक्षशिला महाविद्यालय प्राचार्य डॉ माधुरी फुले, दाबेकर कला महाविद्यालय प्राचार्य डॉ. संजय देशमुख, उप प्राचार्य प्रितेश पाटील, डॉ. नवल पाटील, प्रा. राहुल घुगे, डॉ. प्रवीण वानखडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात तज्ज्ञांचे मार्गदर्शन उद्घाटन कार्यक्रमानंतर द्वितीय सत्राला सुरुवात झाली. यामध्ये द आयडिया ऑफ क्रियेटिव्हिटी इन द एज ऑफ एआय यावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गीविश इंग्रजी विभाग प्रा. डॉ. रविंद्र बोरसे, प्रमुख वक्ते लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय येथील प्रा. ज्ञानेश्वर गटकर उपस्थित होते. त्यांनी एआय तंत्रज्ञानवर मार्गदर्शन केले. तसेच इम्पॉवेरिंग क्लासरूम : मॉडर्न ऍप्लिकेशन ऑफ एआय इन एज्युकेशन याविषयावर मार्गदर्शन झाले.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 9:44 am

अमावस्येमुळे संक्रांतीचे हळदी कुंकू 4 दिवस:18 रोजी अमावस्या; त्यामुळे 14 ते 17 पर्यंतच करावे लागणार हळदीकुंकू‎

यंदा मकरसंक्रांतीत केवळ चार दिवसच सुवासिनी महिलांना हळदी कुंकू आयोजित करता येणार असल्याने या कालावधीत सुवासिनींची चांगलीच धावपळ होणार आहे. कारण, पौष अमावस्या १८ रोजी आहे. या दिवशी पौष महिना संपणार असून साधारणत: पौष महिन्यातच संक्रांतीचे हळदीकुंकू व संक्रांतीचे वाण वाटप केले जाते. परंतु, यंदा १४ जानेवारीला मकर संक्रांत असून १७ जानेवारीपर्यंतच पौष महिना असल्याने केवळ चार दिवसच सुवासिनी महिलांना हळदीकुंकू तसेच वाण वाटपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करता येणार आहे. या काळात सायंकाळपासून ते रात्रीपर्यंत हळदीकुंकवाचे कार्यक्रम सुरू राहतात. आता केवळ चार दिवसच हळदी कुंकू असल्यामुळे एकाच दिवशी बऱ्याच ठिकाणी सुवासिनींनी वाण, हळदी कुंकू घेण्यासाठी जावे लागणार आहे. वाण देण्यासाठी मर्यादित दिवस संक्रांतीचा सणाला विवाहित महिला एकमेकींना हळद-कुंकू लावून वाण देतात व आनंद साजरा करतात, ज्यामुळे स्नेह आणि समृद्धी वाढते.हा सण सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशानिमित्त साजरा केला जातो. सौभाग्यवती स्त्रिया एकमेकींना हळद-कुंकू लावून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी महिला एकमेकींना हळद, कुंकू, फुले, वाण (धान्य किंवा वस्तू) देतात आणि एकमेकांना ''तिळगूळ घ्या गोड गोड बोला'' असे म्हणून शुभेच्छा देतात. वाणाच्या वस्तुंची करावी लागणार जुळवाजुळवा यंदा संक्रांतीचा सण हा फारच कमी दिवसांचा असल्याने सुवासिनी महिला आतापासूनच वाणाचे साहित्य खरेदी करण्यासोबतच नेमके कोणते वाण वाटायचे याबाबत एकमेकींसोबत विचार विनिमय करीत आहेत. एकाच महिलांच्या गटात एकसारखे वाण नको. वाण हे उपयोगात येणारे असावे, ते पर्यावरण पूरक असावे, गृहिणींच्या दररोज कामी यावे, किमान पुजेत तरी त्याचा उपयोग व्हावा, अशा प्रकारच्या वाणांची खरेदी करण्याचा मनोदय एकमेकींकडे महिला व्यक्त करीत आहेत. त्यामुळे यंदा चार दिवसांत महिलांची वाण लुटण्यासाठी चांगलीच दमछाक होणार हे निश्चित.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 9:41 am

सात केंद्रांवर तुफान गर्दी; 273 जणांचे अर्ज दाखल:आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस‎

उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी सोमवार २९ रोजी सातही केंद्रांवर उमेदवारांची कार्यकर्त्यांसह गर्दी होती. यात काही माजी दिग्गजांसह नवोदीत उमेदवारांचाही समावेश होता. मंगळवार ३० रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अनेकांनी आज उमेदवारी अर्जांचीही उचल केली. केंद्रांपासून किमान १०० मी. अंतरावर सुरक्षा कठडे लावण्यात आले होते. पोलीसांचा कडेकोट बंदोबस्तही होता. आज मनपाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या शहरातील सातही केंद्रांवर एकूण २१८ इच्छुकांनी ३११ उमेदवारी अर्ज उचलले. तसेच २७३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सातही केंद्रांवर कार्यकर्त्यांसह गर्दी केली होती. झोन क्र. १ रामपुरी कॅम्प, झोन क्र. २ राजापेठ, मनपा शिक्षणाधिकारी कार्यालय, अंबापेठ, जुने तहसील कार्यालय, झोन क्र. ३ दस्तूरनगर, झोन क्र. ४ बडनेरा व मोर्शी रोडवरील नवे तहसील कार्यालय या ठिकाणी अर्ज दाखल करण्यात आले. अर्ज दाखल करणारे दिग्गज अर्ज दाखल माजी महापौर विलास इंगोले, माजी उपमहापौर शेख जफर, राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाचे शहर अध्यक्ष प्रशांत डवरे, प्रवीण हरमकर व त्यांच्या पत्नी विशाखा हरमकर, सुरेखा लुंगारे, हिवसे, स्वाती निस्ताने यांच्यासह अनेकांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 30 Dec 2025 9:40 am