SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

27    C
... ...View News by News Source

मुलभूत सुविधांसाठी लातूर महानगरपालिकेवर धडक मोर्चा

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभारा विरोधात हडको कॉलनी, प्रभाग क्रमांक ११ मधील नागरीकांनी मुलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून सोमवारी लातूर महानगर पालिकेवर धडक मोर्चा काढून आंदोलन केले. नागरीकांच्या घोषणांनी मनपाचा परिसर दणाणून गेला होता. प्रभाग क्रमांक ११ हडको वसाहत एमआयडीसी येथील जनतेचा मूलभूत समस्या सोडवण्यासाठी लातूर महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करण्यात आले. या […] The post मुलभूत सुविधांसाठी लातूर महानगरपालिकेवर धडक मोर्चा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 11:56 pm

दोन लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा

लातूर : प्रतिनिधी खरीप हंगामात सुरूवातीला हवा-हवा असणारा पाऊस शेवटच्या टप्यात नकोसा झाला होता. खरीप हंगामात अनेक मंडळात झालेल्या अटीवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतक-यांच्या डोळया देखत सोयाबीनचे ढिगारे नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. खरीप हंगामातील कांही अंशी पिके हाती लागली असली तरी बहूतांश पिकांचे अतिवृष्टीच्या पाससाने अधिक नुकसानच केले. त्यामुळे रबी हंगामातील पिकांच्याकडून शेतक-यांच्या […] The post दोन लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 11:53 pm

इतिहास विभागाच्या वतीने किल्ले औसा येथे हेरिटेज वॉक

लातूर : प्रतिनिधी हेरिटेज वॉक म्हणजे आपल्या स्थानिक परिसरात असणा-या ऐतिहासिक वास्तूंना भेटी देणे व तेथील परिसराची निगा राखणे, त्या वास्तूंचे संवर्धन करणे. वास्तविक पाहता ही संकल्पना सर्वात प्रथम पाश्च्यात्य देशांमध्ये उदयास आली आहे. मात्र लातूर शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या इतिहास व एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांनी किल्ले औसा येथे ही आगळीवेगळी संकल्पना प्रत्यक्षात राबवली. महाराष्ट्र राज्य […] The post इतिहास विभागाच्या वतीने किल्ले औसा येथे हेरिटेज वॉक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 11:51 pm

देशातील ‘जेन-झी’ला अराजक नव्हे तर शांती हवी

नागपूर : बांगलादेश, नेपाळमधील ‘जेन-झी’चे आंदोलन हा तेथील संवैधानिक समस्येंतून निर्माण झालेला मुद्दा होता. भारतातील ही पिढी अराजकतावादी नसून महत्वाकांक्षी आहे. काही देशविरोधी तत्व देशातील ‘जेन-झी’ला भडकविण्याचे षडयंत्र करत आहेत. मात्र काश्मीर असो किंवा छत्तीसगड, देशातील ‘जेन झी’ला शांती हवी आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी केले. नागपुरात […] The post देशातील ‘जेन-झी’ला अराजक नव्हे तर शांती हवी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 11:51 pm

प्रियंका सुरवसे यांना नारीशक्ती पुरस्कार 

लातूर : प्रतिनिधी येथील मांजरा महिला अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या चेअरमन प्रियंका सुरवसे यांना सांगलीच्या ए. डी. फाऊंडेशनच्या वतीने पुणे येथे आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांच्या हस्ते महाराष्ट्र नारीशक्ती समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. महिला बचत गटांच्या माध्यमातून उद्योग, व्यवसाय उभारणीसाठी त्यांनी हजारो महिलांना सहकार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार […] The post प्रियंका सुरवसे यांना नारीशक्ती पुरस्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 11:50 pm

यज्ञाला श्रद्धांजली म्हणून  सराफापेढी एक दिवस बंद 

लातूर : प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मौजे डोंगराळे या गावात सुवर्णकार समाजातील केवळ तीन वर्षांची चिमुरडी यज्ञा जगदीश दुसाने हिच्यावर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली. त्यामुळे संपूर्ण सुवर्णकार समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या भयानक घटनेने समाजासह सर्वसामान्य नागरिकही हादरले आहेत. या निष्पाप बालिकेला न्याय मिळावा आणि दोषींना कठोरातली कठोर […] The post यज्ञाला श्रद्धांजली म्हणून सराफापेढी एक दिवस बंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 11:48 pm

रेणापूर येथे प्रभाग ४, ५, ६ मधील  काँग्रेसच्या उमेदवारांची रॅली

रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासह सर्व प्रभागातील उमेदवार हे चारित्र्य संपन्न व जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले उमेदवार दिले आहेत. निवडणूक प्रचारामध्ये काँग्रेस पक्षाने आघाडी घेतली असून जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास रेणापूरकर व्यक्त […] The post रेणापूर येथे प्रभाग ४, ५, ६ मधील काँग्रेसच्या उमेदवारांची रॅली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 11:46 pm

कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढला

जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यामध्ये यंदा तुफान पाऊस झाला या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतक-यांना सोयाबीन तसेच मूग व उडीद त्यांच्या उत्पन्नामध्ये ५० टक्के घट झाली आहे. यासोबतच कापूसही एका वेचणीमध्येच संपला. यामुळे शेतक-यांना अशा होती ती तूर या पिकावर परंतु तूरही आता शेतक-यांच्या हातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या हवामानातील […] The post कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 11:17 pm

देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून सुर्यकांत यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली : देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सोमवार दि. २४ नोव्हेंबर रोजी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सूर्यकांत यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याकडे पुढील १५ महिने सरन्यायाधीशपदाचा कार्यभार असणार आहे. मावळते सरन्यायाधीश भूषण गवई हे रविवारी (२३ नोव्हेंबर) सेवानिवृत्त झाले. त्यानंतर आता सूर्य कांत यांची सरन्यायाघीशपदी नियुक्ती […] The post देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून सुर्यकांत यांनी घेतली शपथ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 10:46 pm

पद्मश्री डॉ. प्रमोद काळे: अवकाश विज्ञान आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देते:एमआयटी डब्ल्यूपीयूत ३० व्या संत ज्ञानेश्वर-तुकाराम व्याख्यानमालेचे उद्घाटन

अवकाश विज्ञान आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देते, ज्यामुळे देशांमध्ये शांततापूर्ण संबंध निर्माण होण्यास मदत होते, असे मत स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, इस्रोचे माजी संचालक पद्मश्री डॉ. प्रमोद काळे यांनी व्यक्त केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे आयोजित ३० व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत कोथरुड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृहात याचे उद्घाटन झाले. यावेळी नवी दिल्ली येथील आध्यात्मिक शास्त्रज्ञ डॉ. सी.के. भारद्वाज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड अध्यक्षस्थानी होते. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस, माईर्सचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी आणि व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पात्रे यांचीही उपस्थिती होती. या प्रसंगी पद्मश्री डॉ. प्रमोद काळे यांना मान्यवरांच्या हस्ते 'समर्पित जीवन गौरव पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. डॉ. प्रमोद काळे यांनी पुढे सांगितले की, अवकाशातून पृथ्वीचे अवलोकन करताना जमीन आधारित, हवाई आणि उपग्रहांच्या माध्यमातून पाणी व वायुमंडलाची माहिती एकत्रित केली जाते. नैसर्गिक घटना, संकटे आणि मानवी गतिविधींवर लक्ष ठेवले जाते. अंतराळ संप्रेषणामध्ये संप्रेषण उपग्रह, ग्राउंड स्टेशन आणि डीप स्पेस नेटवर्कसारख्या तंत्रज्ञानाचा वापर होतो. अंतराळातील वेगवेगळ्या बिंदूंमधील किंवा पृथ्वी आणि अवकाशातील माहिती व डेटाचे प्रसारण केले जाते. अंतराळातील वातावरण पृथ्वीवरील वातावरणापेक्षा पूर्णपणे वेगळे असून, त्यात हवा नाही, व्हॅक्यूम आहे, तसेच प्रचंड तापमान आणि रेडिएशनसारखे अनेक धोके आहेत. हे वातावरण गुरुत्वाकर्षण, रेडिएशन आणि सूक्ष्म उल्कापिंडांपासून बनलेले आहे. डॉ. सी.के. भारद्वाज यांनी आपल्या भाषणात सध्या संपूर्ण जगात अध्यात्म आणि शांतीची गरज असल्याचे नमूद केले. अध्ययन क्षेत्रामध्ये अध्यात्म आणि विज्ञानाची संकल्पना रुजविणे आवश्यक आहे. मानवजातीच्या आणि स्वतःच्या उत्थानासाठी युनिव्हर्सलमधील ऊर्जेचा योग्य वापर करावा. कोणत्याही रचनात्मक निर्मितीसाठी व कार्यासाठी ऊर्जा अत्यंत आवश्यक असते. शरीर, मन आणि आत्मा या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत, असेही ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 10:34 pm

डॉ. विजय लाड: संतसाहित्य शिक्षणपद्धतीत समाविष्ट करणे आवश्यक:मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन

भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव २०४७ मध्ये साजरा होणार आहे. तोपर्यंत भारताची विश्ववंदित राष्ट्र अशी प्रतिमा उभारण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या सर्व शिक्षण पद्धतीत संतसाहित्याचा समावेश करणे गरजेचे आहे, असे मत शिवथर घळ येथील श्री सुंदर मठ सेवा समितीचे विश्वस्त डॉ. विजय लाड यांनी व्यक्त केले. निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनीमधील मनोहर सभागृहात मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या राज्यस्तरीय संत साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष नितीनभाई कारिआ, कार्यवाह डॉ. मनोज देवळेकर, उपाध्यक्षा शारदा चोरडिया, उपक्रम संयोजक सुधीर कुलकर्णी आणि सुभाष देशपांडे उपस्थित होते. डॉ. विजय लाड पुढे म्हणाले की, संतांनी मानवी जीवनातील सूक्ष्म व्यवहाराचा साक्षेपाने विचार केला आहे. 'ज्ञानेश्वरी' आणि 'दासबोध' या ग्रंथांमध्ये विज्ञानाचे अनेक दाखले आढळतात. संतांनी संपन्नता किती असावी याबाबतही मार्गदर्शन केले आहे. संतांची शिकवण तळागाळात पोहोचवणे आणि त्यांचे विचार समाजात रुजवणे आवश्यक आहे. तरुणांनी संत साहित्य वाचायला हवे. सुधीर कुलकर्णी यांनी सांगितले की, गेल्या २७ वर्षांपासून राज्यभरात संत साहित्य पुरस्कारांचे वितरण केले जात आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी प्रथमच लेखक आणि प्रकाशक या दोघांनाही पुरस्कार दिला जात आहे. संत साहित्याचा प्रसार आणि त्यावरील लेखन अधिक व्हावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाची सुरुवात बोलावा विठ्ठल... या भक्तिगीताने झाली, तर समारोप रत्नाकरा... या प्रार्थनेने करण्यात आला. याप्रसंगी समीक्षक राधा गोडबोले आणि डॉ. रजनी पत्की यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिलेखा शिंदे यांनी केले, तर सुभाष देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 10:33 pm

भाविकांची बस कोसळून महाराष्ट्रातील एकासह ५ जणांचा मृत्यू

टिहरी : उत्तराखंडमधील टिहरी येथे भाविकांनी भरलेली बस ७० मीटर खोल दरीत कोसळली, ज्यात ५ लोकांचा मृत्यू झाला आहे. टिहरीचे एसपी आयुष अग्रवाल यांनी याची पुष्टी केली. दुपारी सुमारे साडेबारा वाजता झालेल्या या अपघातात गुजरात, हरियाणा, बिहार, उत्तरप्रदेश, पंजाब, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश आहे. बस ऋषिकेशमधील दयानंद आश्रमातून २९ लोकांना कुंजापुरी मंदिरात घेऊन गेली होती, येथून […] The post भाविकांची बस कोसळून महाराष्ट्रातील एकासह ५ जणांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 10:30 pm

यूपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ सोमवारी सायंकाळी एका धमकीच्या पत्रामुळे हादरली. शहरातील लुलु मॉलच्या बाथरुममध्ये एक पत्र सापडले, ज्यात २४ तासांत अनेक शाळा, सरकारी इमारती, चारबाग, विधानसभा, विमानतळ, रेल्वे स्टेशन यांसारख्या प्रमुख स्थळांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. पत्र मिळताच सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. दिल्लीतील अलीकडील स्फोटानंतर सुरक्षा आधीच कडक करण्यात आली […] The post यूपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 10:17 pm

पैशाच्या जोरावर विकत घेण्याचा प्रयत्न करू नका:शहाजी बापू पाटलांचा भाजपला इशारा, गुंडशाही सुरू असल्याचाही केला उल्लेख

सध्या राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे. या दरम्यान महायुतीमध्ये तणाव असल्याचे चित्रदेखील पाहायला मिळत आहे. यातच आता शहाजी बापू पाटील यांनी सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. शहाजी बापू पाटील म्हणाले की, निवडणूक खरी स्वाभिमानाची आहे, पण आपल्याला गुलाम बनविले. त्यापेक्षाही जास्त मोठी गुलामगिरी आपल्यावर आल्याचे बापू सांगोल्यात बोलतांना म्हणालेत. भाजपने माझे कंबरडे मोडले- शहाजी बापू दीपक साळुंखे आणि जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना शहाजी बापू म्हणाले की- स्वाभिमानाची निवडणूक आहे. आपल्याला गुलाम बनविले, त्यापेक्षा जास्त मोठी गुलामगिरी आली आहे. गणपतराव देशमुख 75 वर्षे आणि मी 51 वर्षे इथे आहे, स्वाभिमानी जनता होती. आता हेलिकॉप्टर घेऊन येत धाड धाड गुंडशाही सुरू केली. निवडणुकीपूर्वी मला माहीत होते भाजपने कंबरडे मोडले. मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली. भाजपसोबत इतका प्रामाणिक वागून माझ्यासोबत का असे वागले? असा प्रश्नही शहाजी बापूंनी उपस्थित केला. कुत्री मांजरं मला घाबरवायला लागलेत पुढे बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, ही लढणारी औलाद आहे. पैशावर तालुका विकत घेण्याचा नाद करू नका. महाराष्ट्र मला घाबरतो, अन् आता ही कुत्री मांजरं मला घाबरवायला लागले आहेत. या तालुक्यात दोनच राजे आहेत. एक म्हणजे गणपतराव देशमुख आणि दुसरा तो म्हणजे शहाजी बापू. आता गणपतराव देशमुख यांच्या समाधीला पूजनाचा अधिकारी यांचा नाही. शहाजी बापूंचा भाजपला सवाल शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही शब्द मी मोडला नाही. लोकसभेला मी आजारी असतानाही भाजप उमेदवाराला पंधरा हजाराचं मताधिक्य दिलं. मी माझ्या आजारपणाचा कोणताही विचार न करता काम करत राहिलो, याचं फळ मला दिलयं का? असा प्रश्नही शहाजी बापू पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:32 pm

एका युगाचा अंत : बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड!

मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ आज काळाच्या पडद्याआड गेला. याचसोबत एका बॉलिवूडमधील एका युगाचा अंत झाला. यानिमित्ताने अनेक मान्यवरांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. अमिट छाप सोडणारे धर्मेंद्र : शरद पवार १९६० च्या दशकात भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करून चित्रपटात सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करणा-या कथानकांमधून उठावदार भूमिका साकारणारे आणि भारतीय प्रेक्षकांची मने जिंकून सिनेजगतात आपली स्वतंत्र […] The post एका युगाचा अंत : बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 9:15 pm

‘एआय’ विश्वात रस्सीखेच : ‘शत्रू’च्या मदतीनेच अमेरिकेची शत्रूवर कुरघोडी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था चीन आणि अमेरिका यांचे संबंध अलीकडच्या काळात बरेच बिघडले आहेत. किंबहुना दोन्ही देश एकमेकांकडे प्रतिस्पर्धी म्हणूनच पाहतात. चीनला तर अमेरिकेला मागे टाकून जगातील एकमेव महासत्ता बनायचे आहे. अंतराळाच्या संदर्भातही चीनने अमेरिकेशी पंगा घेतला आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (एआय) संदर्भातही दोन्ही देशांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे आणि दोन्ही देश एकमेकांवर कुरघोडी करू पाहत आहेत. […] The post ‘एआय’ विश्वात रस्सीखेच : ‘शत्रू’च्या मदतीनेच अमेरिकेची शत्रूवर कुरघोडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 9:13 pm

सायबर भामट्यांकडून ‘एसआयआर’चा स्कॅम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, सायबर गुन्हेगारांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी एक नवीन मार्ग शोधला आहे. यामुळे लोक घाबरून जात असून बळी पडत आहेत. ‘एसआयआर’ फॉर्म स्कॅम नावाच्या या फसवणुकीत, सायबर ठग स्वत:ला निवडणूक अधिकारी किंवा बीएलओ म्हणून सांगत आहेत व समोरील व्यक्तीला लुबाडत आहेत. तुमचे एसआयआर व्हेरिफिकेशन अपूर्ण […] The post सायबर भामट्यांकडून ‘एसआयआर’चा स्कॅम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 9:11 pm

पेशावर हादरले : पाकिस्तानी आर्मीवर दहशतवाद्यांचा वार

पेशावर : वृत्तसंस्था पाकिस्तानच्या पेशावरमध्ये फ्रंटियर कोरचे मुख्यालय आहे. पॅरा मिलिट्री फोर्सेजचे मुख्य कार्यालय आहे. आज सोमवारी सकाळी पाकिस्तान निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला. फ्रंटियर कोरच्या मुख्यालयात दोन स्फोटांचे आवाज ऐकू आले. पाकिस्तानी सुरक्षापथकांनी हल्ला झालेल्या परिसराला घेराव घालून ऑपरेशन सुरु केलं आहे. फ्रंटियर कोर मुख्यालय परिसरात दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी स्वत:ला स्फोटात उडवून दिले. […] The post पेशावर हादरले : पाकिस्तानी आर्मीवर दहशतवाद्यांचा वार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 9:09 pm

७ हजार ख्रिश्चनांची क्रूर हत्या; ३१५ विद्यार्थी, कर्मचारी अपहृत

मैदुगुरी : वृत्तसंस्था नायजेरियातील एका कॅथॉलिक शाळेतून ३०० हून अधिक मुलांसह कर्मचा-यांचे अपहरण करण्यात आले आहे. सुरुवातीला ही संख्या २२७ इतकी नोंदवण्यात आली होती. मात्र आता हे देशातील आजवरचे सर्वात मोठे सामूहिक अपहरण असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियातील कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी ख्रिश्चनांच्या हत्येबद्दल लष्करी कारवाईची धमकी दिल्यानंतर हा प्रकार घडला आहे. […] The post ७ हजार ख्रिश्चनांची क्रूर हत्या; ३१५ विद्यार्थी, कर्मचारी अपहृत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 9:08 pm

पुण्यात 3 लाखांहून अधिक मतदारांची दुबार नोंदणी:सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मनपा आयुक्तांकडे याद्या दुरुस्त करण्याची मागणी

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रभागनिहाय अंतिम मतदार यादीत मोठ्या चुका आढळल्या आहेत. या यादीत ३ लाखांपेक्षा जास्त मतदारांची दुबार नोंदणी झाल्याची कबुली खुद्द महानगरपालिका आयुक्तांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर, पुण्यातील विविध राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेऊन मतदार याद्या दुरुस्त झाल्याशिवाय निवडणूक न घेण्याची मागणी केली आहे. या यादीत अनेक ठिकाणी मतदारांची नोंदणी गैरसोयीच्या दूरच्या प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. विरोधी पक्षांकडून महानगरपालिका प्रशासन सत्ताधारी भाजपच्या प्रभावाखाली काम करत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. या सदोष ड्राफ्ट यादीवर हरकती नोंदवण्यासाठी केवळ ८ दिवसांचा अल्प कालावधी देण्यात आला आहे. यामुळे सदोष मतदार यादी पुढे रेटून निवडणुका घेण्याचा हा डाव असल्याचा आरोप सर्वसामान्य पुणेकरांकडून आणि राजकीय पक्षांकडून केला जात आहे. हीच भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी यांच्यासह इतरही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त शिष्टमंडळाच्या माध्यमातून मनपा अतिरिक्त आयुक्त मंगेश दिवटे यांची भेट घेतली. मतदार यादीत मोठा घोळ असल्याची बाब स्वतः आयुक्तांनी मान्य केल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. या शिष्टमंडळाने मागणी केली की, सदोष पद्धतीने निवडणुका घेऊ नयेत. आधी मतदार याद्या पूर्णपणे निर्दोष कराव्यात आणि त्यानंतरच निवडणुका घ्याव्यात. या सर्वपक्षीय शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार बाप्पुसाहेब पठारे, अरविंद शिंदे, साईनाथ बाबर, संजय मोरे, गजानन थरकुडे, वंचितचे अरविंद तायडे, बाळासाहेब शिवरकर, बाबु वागसकर, आश्विनीताई कदम, अंकुशआण्णा काकडे, जयदेवराव गायकवाड, रविंद्र माळवदकर, अभय छाजेड, मनोहर जांबूवंत, सचिन दोडके आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:07 pm

महिला कबड्डी संघ ठरला जगतज्जेता

ढाका : वूमन्स टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वर्ल्ड चॅम्पियन ठरली. भारताने अवघ्या काही दिवसांआधी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्यानंतर रविवारी २३ नोव्हेंबरला भारतीय महिला दृष्टीहीन संघाने इतिहास घडवला. दृष्टीहीन क्रिकेट संघाने नेपाळवर मात करत वर्ल्ड कप मिळवला. त्यानंतर आता क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर […] The post महिला कबड्डी संघ ठरला जगतज्जेता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 9:07 pm

ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल व ईपीडी ग्लोबल यांच्यात आंतरराष्ट्रीय करार:भारताचे ‘नेट-झिरो’चे लक्ष्य गाठण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

पुणेस्थित ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटल आणि नॉर्वेस्थित ईपीडी ग्लोबल यांच्यात शाश्वत विकास आणि भारताचे २०७० पर्यंतचे ‘नेट-झिरो’ उद्दिष्ट गाठण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार झाला आहे. या भागीदारीमुळे भारतीय उद्योगांना पर्यावरणीय उत्पादन घोषणा (EPD) सेवा अधिक सुलभ आणि किफायतशीर होणार असून, प्रमाणपत्र खर्चात सुमारे ७० टक्के घट अपेक्षित आहे. या करारावर ईपीडी ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हॅकॉन हाऊआन आणि ग्रीनएक्सचे व्यवस्थापकीय संचालक सागर अहिवळे व आरती भोसले-अहिवळे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. हा करार तीन वर्षांसाठी असून, ग्रीनएक्स आता भारतातील ईपीडी जनरेशन सेवांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे. ग्रीनएक्स भारतीय उत्पादकांनी तयार केलेल्या वस्तूंच्या जीवनचक्रातील पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण ईपीडी ग्लोबलच्या आंतरराष्ट्रीय मानदंडानुसार करेल. त्यानंतर अधिकृत ईपीडी दस्तऐवज उत्पादकाच्या संकेतस्थळावर तसेच उत्पादनावर उपलब्ध करून दिले जाईल. आरती भोसले-अहिवळे यांनी सांगितले की, या सहकार्यामुळे देशभरात पर्यावरणीय पारदर्शकता वाढेल आणि हरित उद्योगांना गती मिळेल. ग्रीनएक्सने गेल्या काही वर्षांत रसायन, अभियांत्रिकी, धातू आणि अन्नप्रक्रिया यांसारख्या क्षेत्रांतील ५० हून अधिक कंपन्यांसाठी ईपीडी प्रकल्प यशस्वी केले आहेत. या करारामुळे आंतरराष्ट्रीय दर्जा राखत खर्चात मोठी बचत होणार आहे. सागर अहिवळे यांनी नमूद केले की, जागतिक बाजारपेठेत ईपीडी असलेल्या उत्पादनांना प्राधान्य मिळते. यामुळे भारतीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) निर्यात वाढवणे व चांगला दर मिळवणे शक्य होईल. सध्या ईपीडी ऐच्छिक असली तरी युरोप, अमेरिका आदी देशांत ती लवकरच बंधनकारक होत आहे. भारतालाही २०७० च्या नेट-झिरो ध्येयासाठी असे उपाय आवश्यक आहेत. हा करार भारतातील शाश्वतता क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरेल. उद्योगांची जागतिक स्पर्धात्मकता वाढवणे, रोजगार निर्मिती आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा वेगवान अवलंब यासाठी ही भागीदारी महत्त्वपूर्ण आहे. पुणे, मुंबई, गुजरात व दुबई येथे कार्यालये असलेल्या ग्रीनएक्सचा देशातील १० हून अधिक औद्योगिक शहरांत विस्तार होणार असून, १०० हून अधिक पर्यावरण सल्लागारांची भर पडणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:05 pm

गाफील राहू नका…..नाहीतर मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक ठरेल

मुंबई : प्रतिनिधी मतदारयाद्यांच्या माध्यमातून राजकारण सुरू आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत आणि कोण मतदार खोटे आहेत, यावर तुमचे लक्ष असणे गरेजेचे आहे. गाफील राहू नका, रात्र वै-याची आहे. मराठी माणसांना एकच गोष्ट सांगतो, आपण गाफील राहिलो तर ही निवडणूक हातातून गेली समजा. तसे झाले तर येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही शेवटची […] The post गाफील राहू नका…..नाहीतर मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक ठरेल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 8:34 pm

मतदारयादीप्रमाणेच प्रभागरचनेतही प्रचंड झोल

मुंबई : प्रतिनिधी मतदार याद्यातील घोळाचा मुद्दा गाजत असतानाच याद्यांची प्रभागनिहाय फोड करतानाही त्यात सत्ताधा-यांना अनुकूल ठरेल असे असंख्य झोल करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाने आणि मनसेने केला आहे. मतदार याद्यामधील या घोळाची चौकशी करून या त्रुटी दूर करण्याची मागणी ठाकरे बंधूंनी निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आ. आदित्य ठाकरे […] The post मतदारयादीप्रमाणेच प्रभागरचनेतही प्रचंड झोल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 8:32 pm

अलविदा ‘वीरू’…!

बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल वयाच्या ८९ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड झाले. ३१ ऑक्टोबरपासून १० नोव्हेंबरपर्यंत ते ब्रीच कँडी रुग्णालयात आयुष्यासाठी झुंज देत होते. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. त्यांना वाचवण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात आले. धर्मेंद्र यांना ३१ ऑक्टोबर रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले […] The post अलविदा ‘वीरू’…! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 8:20 pm

भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जुहू येथील निवासस्थानी धर्मेंद्र यांची प्राणज्योत मालवली. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एक देखणा, दिलदार आणि बिनधास्त कलाकार हरपल्याची भावना सर्वांच्या मनात आहे. धर्मेंद्र यांचे निधन झाल्यावर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी […] The post भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 8:18 pm

भारतीय नौदलात ‘आयएनएस माहे’ची धमाकेदार एन्ट्री

कोचीन : स्वदेशी बनावटीची युद्धनौका आयएनएस माहे सोमवारी भारतीय नौदलात सामील झाली. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तयार केलेली ही युद्धनौका ‘माहे-क्लास’ सीरिजमधील पहिलीच नौका असून भारताच्या समुद्री सुरक्षेला आणखी मजबूत करणार आहे. शत्रुच्या पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांना नष्ट करण्याची क्षमता असलेली ही वेगवान नौका ‘आत्मनिर्भर भारत’चे एक महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. या युद्ध नौकेच्या कमीशनिंग सोहळयात मुख्य […] The post भारतीय नौदलात ‘आयएनएस माहे’ची धमाकेदार एन्ट्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 8:08 pm

कौटुंबिक वादातून वडिलांचा खून करणाऱ्या दोन मुलांना जन्मठेपेची शिक्षा:हिंगोली न्यायालयाचा निर्णय, पानकनेरगाव येथील घटना

सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे कौटुंबिक वादातून वडिलांचा खून करणाऱ्या दोन मुलांना आजीवन कारावास व प्रत्येकी साडेसात हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश पी. जी. देशमुख यांनी सोमवारी ता. २४ नोव्हेंबर रोजी दिला आहे. याबाबत जिल्हा सरकारी वकील ॲड. एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथे संजय आबाराव देशमुख यांचा त्यांचा मुलगा निखील देशमुख व गजानन देशमुख यांच्यासोबत कौटुंबिक कारणावरून वाद सुरु होता. यामध्ये त्यांच्यात कुरबुरी होत होत्या. त्यानंतर ता. ४ जून २०२२ रोजी संजय यांना त्यांची मुले निखील व गजानन यांनी वेळुची काठी, लाकडी राफ्टर याने मारहाण करून जीवे मारले. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी, शिवाजी देशमुख यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ता. ६ जून २०२२ रोजी सेनगाव पोलिसांनी निखील व गजानन यांच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला. तत्कालीन पोलिस निरीक्षक रणजीत भोईटे, जमादार टी. के. वंजारे, सुभाष चव्हाण, राजेश जाधव यांच्या पथकाने अधिक तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. जी. देशमुख यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी निखील व गजानन यांना आजीवन कारावास व प्रत्येकी साडेसात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. एन. एस. मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी वकील ॲड. सविता देशमुख यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक सरकारी वकील ॲड. एस. डी. कुटे यांनी सहकार्य केले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार पी. ए. मारकड यांनी काम पाहिले.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 8:06 pm

बिबट्यांच्या शिकारीची अधिकृत परवानगी द्या

पुणे : बिबट्यांचा वस्त्यांमधील, गावांमधील किंवा आताच्या व्याख्येप्रमाणे शहरांमधील प्रवेश काही आताचा नाही. पूर्वीही याप्रकारे बिबटे येतच असत, मात्र त्यावेळी संख्या मर्यादीत होती व त्यामुळे असे प्रवेशही मर्यादीतच होते. आता संख्या वाढली तर त्यांचे प्रवेश व हल्लेही वाढतच राहणार असे ठाम मत पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले. त्यांच्या शिकारीला अधिकृत परवानगी द्यावी […] The post बिबट्यांच्या शिकारीची अधिकृत परवानगी द्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 7:44 pm

मतदारयादीतील त्रुटी दूर करून निष्पक्ष निवडणूकप्रक्रिया राबवा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात झाली असून येत्या २ डिसेंबर रोजी नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर जानेवारी महिन्यात राज्यातील मुंबईसह सर्वच महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारयादी विभाजनातील गंभीर त्रुटी व गोंधळ दूर करून निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूकप्रक्रिया राबविण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, […] The post मतदारयादीतील त्रुटी दूर करून निष्पक्ष निवडणूकप्रक्रिया राबवा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 7:01 pm

मुंबईतील रेल्वे वातानुकूलित करणार

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ढासळली आहे. रेल्वेमध्ये प्रचंड गर्दीची समस्या असून हजारो प्रवासी दररोज रेल्वेच्या दरवाजात उभे राहून लोंबकळत प्रवास करतात. दुस-या बाजूला बसने प्रवास करणंही तितकंच अवघड आहे. वाहतूक कोंडीमुळे बसेस कासवगतीने धावत असतात. मात्र, आता मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कायापालट होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. भाजपाच्या […] The post मुंबईतील रेल्वे वातानुकूलित करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 6:56 pm

सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह

ठाणे : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून राज्यात खुनाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असे असतानाच आता राज्यात खळबळ उवडून देणारी एक मोठी घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण शीळ रोवर एका तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कल्याणच्या शीळ रोडवर एका सुटकेसमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला आहे. देसाई खाडी परिसरात हा मृतदेह आढळला आहे. ही […] The post सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 6:52 pm

डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू ‘अनैसर्गिक’

मुंबई : प्रतिनिधी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे- गर्जे यांच्या मृत्यूप्रकरणी नवनवीन अपडेट समोर येत आहेत. डॉ. गौरी यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला जात आहे. आता या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. डॉ. गौरी गर्जे यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. […] The post डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू ‘अनैसर्गिक’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 6:49 pm

धनंजय मुंडेंएवढा नीच माणूस पृथ्वीवर असूच शकत नाही

जालना : परळीमध्ये आयोजित एका प्रचारसभेमध्ये धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची आठवण काढली आहे. जगतमित्र हे कार्यालय सर्वांसाठी खुले असायचे, आताही हे कार्यालय सुरू आहे, पण एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव आहे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. काही असेल नसेल, जगतमित्र कार्यालयामधून आपण गोरगरिबांना मदत करायचो, कार्यालय सुरू आहे, गोरगरिबांना मदत सुरू आहे, […] The post धनंजय मुंडेंएवढा नीच माणूस पृथ्वीवर असूच शकत नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 6:47 pm

अल्पसंख्यांकांच्या समस्यांवर संसदेत चर्चा करा:पुण्यातील कार्यकर्त्यांची मागणी; जंतर मंतरवर आंदोलनाचा इशारा

पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्या मुबिना अहमद खान आणि सामाजिक कार्यकर्ते असलम इसाक बागवान, अहमद खान, सचिन आल्हाट यांनी अल्पसंख्याक समुदायांवरील वाढत्या अत्याचारांवर संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधीपक्षनेते राहुल गांधी आणि विविध खासदारांना निवेदन दिले आहे. या प्रकरणी तोडगा न निघाल्यास जंतर मंतर येथे उपोषण करण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे. त्यांनी या विषयाला राष्ट्रीय महत्त्वाचा आणि संवेदनशील स्वरूपाचा म्हटले आहे. निवेदनात देशाच्या विविध भागांत अल्पसंख्याक, विशेषत: मुस्लिम समाजावर होणाऱ्या हिंसाचारात वाढ झाल्याचा उल्लेख आहे. या घटनांमुळे समाजात भय आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांमुळे अनेक निर्दोष नागरिकांना जीव गमवावा लागल्याचे बागवान यांनी सांगितले. या घटनांमुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होत असून संविधानातील अनुच्छेद 14, 15, 21 आणि 25 ला धक्का पोहोचत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकरणांमध्ये पीडितांना न्याय मिळण्यास अडचणी येतात आणि काहीवेळा प्रशासनाची उदासीनताही जाणवते, असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. प्रशासनिक विषमतेबाबतही गंभीर मुद्दे उपस्थित केले गेले आहेत. अनेक घटनांमध्ये एफआयआर नोंदविण्यास विलंब, आरोपींवर प्रभावी कारवाई न होणे, मावेजा न मिळणे आणि तपास प्रक्रियेत पक्षपाताच्या तक्रारी वारंवार समोर आल्याचे बागवान यांनी निदर्शनास आणले. यामुळे न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत होत असल्याचे निवेदनात नमूद आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा शून्यकाल, विशेष उल्लेख किंवा ध्यानाकर्षण प्रस्तावाद्वारे उपस्थित करून सरकारकडून स्पष्ट उत्तरदायित्व मागितले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच मॉब लिंचिंगला आळा घालण्यासाठी कठोर केंद्रीय कायदा करण्याची, अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र निरीक्षण कक्ष स्थापन करण्याची, हिंसाग्रस्त जिल्ह्यांमध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याची आणि पीडित कुटुंबांसाठी राष्ट्रीय पुनर्वसन व मुआवजा धोरण तयार करण्याची मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 6:32 pm

खेड्यापाड्यात बदलाचे वारे:'बिमा ग्राम एपीआय'मुळे ग्रामीण भागातील विमा कव्‍हरेज वाढणार; इन्‍शुरन्‍स अवेअरनेस कमिटीने केले कौतुक

भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) नुकत्याच लाँच केलेल्या 'बिमा ग्राम एपीआय'चे (Bima Gram API) इन्‍शुरन्‍स अवेअरनेस कमिटीने (IAC-Life) जोरदार स्वागत केले आहे. ग्रामीण भागातील विमा उपलब्धतेची स्थिती बदलण्यासाठी आणि कव्‍हरेज वाढवण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे. नेमके काय आहे 'बिमा ग्राम एपीआय'? 'बिमा ग्राम एपीआय' हा एक आघाडीचा डिजिटल उपक्रम असून, तो नॅशनल इन्‍फॉर्मेटिक्‍स सेंटर (NIC) ने पंचायती राज मंत्रालय, पोस्ट विभाग आणि भारतीय विमा माहिती ब्युरो (IIB) यांच्या सहयोगाने विकसित केला आहे. हे एपीआय 'लोकल गव्‍हर्नमेंट डिरेक्टरी' (LGD) कोड्सना पोस्टल पिन कोड्सशी जोडते. यामुळे विमा कंपन्यांना ग्राहकाचा केवळ पोस्टल पिन कोड टाकून त्यांच्या ग्रामपंचायतीचे नाव मिळवणे आणि पॉलिसीचे ग्रामीण ठिकाण त्वरित डिजिटल पद्धतीने पडताळून पाहणे शक्य होणार आहे. ग्रामीण विम्याला का मिळेल गती? 'आयआरडीएआय'ने विमा कंपन्यांना 'रूरल अँड सोशल' (RUSO) आदेशांतर्गत ग्रामीण भागात जीवन आणि मालमत्तेचे विमा संरक्षण देणे बंधनकारक केले आहे. मात्र, ग्राहकांच्या कागदपत्रांवर अनेकदा ग्रामपंचायतीचे नाव नसल्याने विमा कंपन्यांना ग्रामीण डेटाची अचूक पडताळणी करणे कठीण जात असे आणि मॅन्युअल प्रक्रियेत वेळ जात असे. 'बिमा ग्राम एपीआय'मुळे आता सरकारी स्रोताकडून ग्रामीण डेटाची रिअल-टाइम पडताळणी मिळणार आहे. यामुळे कागदपत्रांचे काम कमी होऊन प्रक्रियेची गती आणि अचूकता वाढेल. जाळे आणखी विस्तारणार समितीची प्रतिक्रिया या उपक्रमाचे कौतुक करताना इन्‍शुरन्‍स अवेअरनेस कमिटीचे (IAC-Life) सदस्य म्हणाले, बिमा ग्राम एपीआयचे लाँच हे ग्रामीण विमा क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे पाऊल आहे. हे केवळ पडताळणीसाठीच नाही, तर भविष्यातील पॉलिसी नियोजन आणि संसाधन वाटपासाठी एक बेसलाइन डेटासेट तयार करण्यास मदत करेल. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला भारताच्या आर्थिक सुरक्षिततेच्या कक्षेत आणण्यासाठी हे महत्त्वपूर्ण ठरेल. सध्या पाच विमा कंपन्यांसोबत (ज्यामध्ये दोन जीवन विमा, दोन सामान्य विमा आणि एक आरोग्य विमा कंपनी समाविष्ट आहे) या प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून, लवकरच ती संपूर्ण उद्योगासाठी कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 6:19 pm

लातूर शहर महापालिका प्रभाग क्रमांक-४ – मनपा यंत्रणेनेच केले ग्रीन बेल्टचे कचरा बेल्ट

मोकळ्या जागेचा गैरवापर, नागरिक त्रस्त लातूर (प्रतिनिधी ) : शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये समस्याच समस्या आहेत़ या प्रभागात एकमेव असलेल्या ग्रीन बेल्टचा लातूर शहर महानगरपालिका घन कचरा व्यवस्थापनच्या यंत्रणेने कचरा बेल्ट करुन टाकला आहे़ त्यामुळे नागरिकांना मॉर्निग वॉकसाठी श्री विलासराव देशमुख पार्क(नाना-नानी पार्क) किंवा थेट रिंग रोडवर जावे लागते़ कचरा, गटारींची स्वच्छता, गटारीतून काढलेला […] The post लातूर शहर महापालिका प्रभाग क्रमांक-४ – मनपा यंत्रणेनेच केले ग्रीन बेल्टचे कचरा बेल्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 5:53 pm

10 बाय10 च्या खोलीत 50 मतदार कसे:ही फसवणूक नाही तर गुन्हा; निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे संतापले

मुंबईतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या प्रारूप मतदार यादीत मोठे गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, मतदार यादीसारख्या महत्त्वाच्या दस्तऐवजात जाणूनबुजून फेरफार करण्यात आल्याचे त्यांना अनेक ठिकाणी आढळले आहे. त्यांच्या मते, काही विशिष्ट वॉर्डांतील मतदारांचे नावे अचानक अन्य वॉर्डांमध्ये हलवण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी मतदारांची संख्या अनैसर्गिकरीत्या वाढवण्यात आली आहे. या सर्वातून सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी संगनमताने आणि योजनाबद्ध पद्धतीने गोंधळ घालण्यात आल्याचा त्यांनी दावा केला. आदित्य ठाकरे म्हणाले की, मतदार यादीतील चुकांना साधा प्रशासनिक घोळ म्हणावे की एक गंभीर कट, असा प्रश्न सतत उपस्थित होत आहे. परंतु जर त्यांच्याकडे विचारणा केली, तर हे सर्व एकप्रकारे लोकशाहीला मारक ठरणारे कृत्य असून, स्पष्टपणे देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या श्रेणीत बसणारे आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मतदार यादीत जाणूनबुजून बदल करणे म्हणजे निवडणूक प्रक्रियेचा गैरवापर असून लोकशाही व्यवस्थेचा पाया हादरवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या मते, या मुद्द्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे भविष्यातील निवडणुका न्याय्य राहतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणे. या प्रकरणी फक्त शिवसेना ठाकरे गटच नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, मनसे आणि इतर विरोधी पक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून, या अनियमिततेच्या पूर्ण चौकशीची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, अनेक वॉर्डांमध्ये अत्यंत विचित्र उदाहरणे आढळली आहेत. काही 10 बाय 10 फूटांच्या छोट्या खोलीत 40 ते 50 मतदार दाखवले गेल्याची उदाहरणे त्यांनी दिली, ज्यावरून मतदार याद्यांची विश्वसनीयता गंभीरपणे प्रश्नांकित होते. अशा प्रकारच्या यादीने प्रत्यक्ष वास्तवाशी संबंधच राहत नाही आणि वॉर्डनिहाय मतदारसंख्येचा ताळमेळ पूर्णपणे बिघडतो, असे त्यांनी नमूद केले. प्रारूप मतदार यादी मशीन-रिडेबल स्वरूपात उपलब्ध नाही याचबरोबर त्यांनी आणखी एक गंभीर मुद्दा मांडला. प्रारूप मतदार यादी मशीन-रिडेबल स्वरूपात उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल स्वरूपात माहिती उपलब्ध नसल्याने संबंधित माहितीचे विश्लेषण करणे किंवा नागरिकांनी स्वतःची पडताळणी करणे कठीण होते. त्यातून पारदर्शकतेचा अभाव जाणवत असून, हा मुद्दाम केलेला डाव असल्याचे त्यांनी सूचित केले. पारदर्शकतेचा अभाव म्हणजे नागरिकांना त्यांचे नाव यादीत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी अनावश्यक अडथळे निर्माण होणे. मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेत सर्वात मूलभूत गोष्ट असून, तिला जाणूनबुजून गुंतागुंतीचे स्वरूप देणे अत्यंत चिंताजनक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. प्रकरण गंभीरतेने हाताळण्याची विनंती आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने तातडीने हस्तक्षेप करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यांच्या मते, जर या अनियमितता वेळेत दुरुस्त झाल्या नाहीत, तर आगामी निवडणुकांवरील जनतेचा विश्वास कमी होईल आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात येईल. त्यांनी नागरिकांनाही आवाहन केले की आपल्या नावाची नोंद निश्चित आहे की नाही याची त्वरित खात्री करावी आणि विसंगती आढळल्यास तक्रार नोंदवावी. लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर मतदार यादीसारख्या छोट्या गोष्टीतीलही प्रामाणिकपणा अत्यावश्यक आहे, असे ठाम मत व्यक्त करत त्यांनी प्रकरण गंभीरतेने हाताळण्याची विनंती केली.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 5:45 pm

सुश्रुती आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात:आयुर्वेद अन् आधुनिक वैद्यकशास्त्रातून स्त्रीरोग-प्रसूती व शल्यचिकित्सेला नवीन तंत्रज्ञान जोडण्याचा प्रयत्न

पुणे येथे ‘सुश्रुती २०२५ – आंतरराष्ट्रीय शल्य-वैद्यक परिषद’ तीन दिवसांच्या वैज्ञानिक चैतन्याने यशस्वीरित्या संपन्न झाली. डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद व संशोधन केंद्र आणि एनआयएमए ओबीजीवाय सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र यांच्या एकात्मिक दृष्टिकोनातून स्त्रीरोग-प्रसूती व शल्यचिकित्सेला नवीन तंत्रज्ञान जोडण्याचा प्रयत्न या परिषदेने केला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद झाली. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव यांच्यासह देश-विदेशातील तज्ज्ञ उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी एकात्मिक आरोग्यसेवा ही काळाची गरज असल्याचे सांगितले. 'सुश्रुती' सारख्या परिषदांमुळे रुग्णकेंद्री व सर्वसमावेशक वैद्यकीय व्यवस्था अधिक बळकट होईल, असे त्या म्हणाल्या. प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव यांनी आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक यांच्या संयोगाला भविष्याची दिशा म्हटले, तर कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी ज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम या त्रिसूत्रीवर भर दिला. परिषदेतील प्री-कॉन्फरन्स कार्यशाळेसाठी ६०० हून अधिक नोंदणी झाली होती. १६० पैकी ९० संशोधनपत्रांचे सादरीकरण झाले, तर ११ उत्कृष्ट पोस्टर्स सादर करण्यात आले. नाविन्यपूर्ण शल्य प्रशिक्षण सत्रे, लाइव्ह डेमो आणि हँड्स-ऑन वर्कशॉप्सना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्त्रीरोग-प्रसूती क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल डॉ. सुधा महादेवकर यांना 'लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार' प्रदान करण्यात आला. तसेच 'बेस्ट आयुर्वेद इन्स्टिट्यूट इनिशिएटिव्ह' पुरस्काराने एस.एस.ए.एम हडपसर (प्रथम), एस.डी.एम हसन (द्वितीय) आणि शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, धाराशिव (तृतीय) यांना सन्मानित करण्यात आले. तीन दिवसांच्या या वैचारिक मंथनाने आयुर्वेदिक शल्यचिकित्सेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा ठोस मार्ग प्रशस्त केला आहे. भविष्यातील एकात्मिक आरोग्यसेवेला ही परिषद दिशादर्शक ठरेल, अशी भावना सहभागींनी व्यक्त केली.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 5:27 pm

तुम्ही दोन, मुलं किमान दोन हवे, हिंदू राष्ट्राची गरज:नरेंद्र महाराजांचे आवाहन; लोकसंख्या, संस्कृती आणि अध्यात्मावर मांडली ठाम भूमिका

नाणीज येथे आयोजित कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दक्षिण पीठाचे धर्मगुरू रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांनी हिंदू समाजासंदर्भात महत्त्वपूर्ण विधान केले. जगात अनेक ख्रिश्चन आणि मुस्लीम राष्ट्रे आहेत, तर हिंदूंसाठी एकही स्वतंत्र राष्ट्र नाही, असा मुद्दा त्यांनी मांडला. यासाठी भारतातील हिंदू समुदायाने संघटित होऊन आपली लोकसंख्या टिकवून ठेवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, हिंदू समाजाने खूप कमी प्रमाणात अपत्ये जन्माला घातल्याने लोकसंख्येचे संतुलन बदलत आहे आणि हे भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषतः आम्ही दोन आणि आमचं एक, या प्रकारच्या विचारधारेमुळे हिंदू समाजाची संख्या सतत घसरत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नरेंद्र महाराज म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत मतदारसंख्येला प्रचंड महत्त्व असते. कोणत्याही समाजाची लोकसंख्या कमी झाली, की त्यांचे राजकीय अस्तित्व आणि प्रतिनिधित्व स्वाभाविकपणे कमी होते. त्यामुळे फक्त धार्मिक किंवा सांस्कृतिक कारणांमुळे नव्हे, तर देशाच्या व्यवस्थेत प्रभाव टिकवण्यासाठीही हिंदू समाजाची संख्या स्थिर राहणे गरजेचे आहे. त्यांनी हिंदू समाजाला आवाहन करताना सांगितले की, तुम्ही दोन आणि किमान दोन मुले असणे आवश्यक आहे. नाहीतर पुढील काळात हिंदू समाज बहुसंख्य राहणार नाही. त्यांच्या मते, लोकसंख्येची घट ही केवळ सामाजिक समस्या नसून पुढील पिढ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. नरेंद्र महाराजांनी भारतीय संस्कृती आणि अध्यात्माच्या मूल्यांवर भर दिला. त्यांनी सांगितले की, आधुनिकतेच्या नावाखाली अनेक जण पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करत आहेत. हे अंधानुकरण समाजात वेगळीच दिशा निर्माण करत असून, भारतीय अध्यात्माची खोली आणि वैज्ञानिकता दुर्लक्षित होते आहे. विज्ञान प्रगत झाले असले तरी मन:शांती देण्याची शक्ती अध्यात्मात आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुरोगामी चळवळीच्या नावाखाली भारतीय परंपरांना कमी लेखण्याची प्रवृत्ती वाढते आहे, ज्यामुळे तरुण पिढी आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारतीय संस्कृतीत वैज्ञानिकता, सामाजिकता आणि व्यवहार्यता त्यांच्या मते, भारत ही एकमेव अशी भूमी आहे, जी जगाला अध्यात्माची खरी ओळख करून देऊ शकते. कारण भारतीय संस्कृती ही केवळ श्रद्धेवर आधारित नसून तिच्यात वैज्ञानिकता, सामाजिकता आणि व्यवहार्यता आहे. अध्यात्मात विज्ञान आहे आणि सामाजिक दृष्टिकोनही आहे. पण ते समजून घेण्याऐवजी अनेक जण त्याची टिंगलटवाळी करतात, असे त्यांनी सांगितले. त्यांनी तरुण पिढीने भारतीय संस्कृतीचे महत्व जाणून घेतले पाहिजे आणि अध्यात्माचा अभ्यास केला पाहिजे, असा संदेश दिला. भारत जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकतो, हे त्यांनी स्पष्ट केले. धर्म, संस्कृती आणि राष्ट्रासाठी काम करण्याची आवश्यकता नरेंद्र महाराजांनी हिंदू समाजाने एकत्र येऊन धर्म, संस्कृती आणि राष्ट्रासाठी काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली. धर्मगुरू समाजाला दिशा देण्याचे काम करतात आणि हिंदू समाजाने एकत्रितपणे योग्य निर्णय घेतला तर धर्मरक्षणासाठी आम्ही कायम त्यांच्यासोबत उभे राहू, असे त्यांनी सांगितले. वाढती लोकसंख्या असलेला समुदायच सक्षम राहतो, म्हणून लोकसंख्या प्रश्नाकडे केवळ राजकीय दृष्टिकोनातून नव्हे तर दीर्घकालीन सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. हिंदू धर्म टिकवायचा असेल, तर हिंदूंनी किमान दोन अपत्ये असणे आवश्यक आहे, असे त्यांनी पुन्हा सांगत आपले मत स्पष्ट केले. त्यांच्या मते, भारताची शक्ती त्याच्या संस्कृतीत आहे आणि त्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी हिंदूंचे संघटन आणि लोकसंख्या संतुलन महत्त्वाचे आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 5:20 pm

वृद्ध आई-वडिलांना सांभाळणे मुलांचीच जबाबदारी

मुंबई : प्रतिनिधी आई-वडिलांची काळजी घेणे आणि त्यांचे पालनपोषण करणे हे ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण कायदा, २००७ अंतर्गत मुलांचे बिनशर्त कर्तव्य आहे. मुलाकडे पालकांच्या मालमत्तेचा ताबा आहे की नाही, तसेच मालमत्ता वारसा हक्काने मिळणार आहे का, यावर ते अवलंबून नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. वृद्ध आणि आजारी असणा-या पालकांचा त्याग किंवा […] The post वृद्ध आई-वडिलांना सांभाळणे मुलांचीच जबाबदारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 5:19 pm

स्मृतीने लग्नाशीसंबंधित सर्व पोस्ट केल्या डिलीट

सांगली : प्रतिनिधी स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाशी संबंधित सर्व फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले आहेत. स्मृतीने साखरपुड्याचे, संगीतमध्ये डान्स करातानाचे, मेहंदीचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले आहेत. त्यामुळे स्मृती आणि पलाश या दोघांचे चाहते देखील संभ्रमात पडले आहेत. आता या दोघांचे लग्न कधी होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार […] The post स्मृतीने लग्नाशीसंबंधित सर्व पोस्ट केल्या डिलीट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 4:36 pm

परळी नगरपरिषद निवडणुकीत धनंजय मुंडेंच्या भाषणात कराडचा अप्रत्यक्ष संदर्भ:आज इथे एक माणूस नाही म्हणत दिला राजकीय संदेश

परळी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा भव्य कार्यकर्ता मेळावा रविवारी उत्साहात पार पडला. या मेळाव्यास पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी संयुक्त उपस्थिती दर्शवून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य भरले. दोन्ही नेते एकत्र व्यासपीठावर आले असल्याने परळीतील राजकारणाला वेगळी दिशा मिळणार का? याची उत्सुकता निर्माण झाली. सभास्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत उमेदवारांना पाठिंबा दर्शवला. महायुतीने परळीत एकसंघतेचा संदेश देत ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचे स्पष्ट केले. मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. मागील काही महिन्यांपासून परळीवर झालेल्या टीका, आरोप आणि वादांचा उल्लेख करून त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीचे आवाहन केले. परळीला गेल्या वर्षभरात अनावश्यक बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. परळीकरांनी त्याला ठाम उत्तर द्यायचे आहे, असे ते म्हणाले. त्यांनी आपल्या राजकीय जीवनातील संघर्षाचे उदाहरण देत, प्रत्येक निवडणूक मनापासून लढवल्याचा उल्लेख केला. येथील मातीसाठी प्राणही द्यावे लागले तरी मी मागे हटणार नाही, असे विधान करत त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. त्याचवेळी दहा महिन्यांपासून जगमित्र कार्यालय सुरू आहे, पण आज तिथे एकही माणूस नाही, असे वक्तव्य करत त्यांनी नाव न घेता काही व्यक्तींवर अप्रत्यक्ष टोला लगावला. या विधानानंतर वाल्मिक कराड प्रकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली. धनंजय मुंडेंनी बोलताना महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाची जबाबदारी स्वतःवर आणि पंकजा मुंडे यांच्यावर असल्याचे सांगितले. त्यांनी परळीत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा देत, पुढील वर्षभरात आणखी मोठे प्रकल्प प्रत्यक्षात दिसतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी ऐतिहासिक विजय नोंदवून परळीला नवे स्थान मिळवून द्यायचे आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी विरोधकांवर टीका करत, व्हिजन नसलेल्या लोकांना परळीचा विकास समजणार नाही, असे म्हणत सभेतील वातावरण तापवले. त्यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष व्यक्त केला. पंकजा मुंडे यांनीही भाषणात श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराडचा उल्लेख केला दरम्यान, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही मेळाव्यात उत्साहात भाषण करत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना अ‍ॅडव्हान्समध्ये शुभेच्छा देत परळीने यावेळी इतिहास घडवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. आम्ही आमचे वैयक्तिक भावभावना आणि इगो बाजूला ठेवले आहेत. आता एकच ध्येय, परळीचा विकास, असे त्या म्हणाल्या. मुंडे कुटुंबाचे परळीवरील योगदान, बालपणातील आठवणी आणि साध्या परिस्थितीत वाढल्याचा उल्लेख करून त्यांनी भावनिक वातावरण निर्माण केले. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात श्रीकृष्ण उर्फ भावड्या कराड यांचा विशेष उल्लेख केला, याचीही चर्चा मेळाव्यानंतर रंगू लागली. महायुती विजयासाठी तयारीला लागली पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखाना सुरू झाल्याची माहिती देत, आगामी काळात रोजगारनिर्मिती वाढेल, असा विश्वासही व्यक्त केला. आपण एकत्र आलो तर परळीचा विकास निश्चित आहे. भांडणे, वाद संपवून विकासाच्या दिशेने पाऊल उचलण्याची ही वेळ आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. महायुतीतील दोन्ही प्रमुख नेते एकत्र व्यासपीठावर दिसल्याने येणाऱ्या निवडणुकीत त्याचा नक्कीच परिणाम होणार, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. मेळावा संपल्यानंतर परळीतील राजकारणाला वेग आला असून, महायुती विजयासाठी जोरदार तयारीला लागली आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 4:18 pm

२ डिसेंबर लग्नासाठी शुभमुहुर्त; मतदानाचा टक्का घसरणार?

मुंबई : प्रतिनिधी राज्यात नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदांसह जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मात्र, याच दिवशी विवाहासाठी देखील शुभमुहूर्त असल्याने अनेक कुटुंबे विवाहसोहळ्यांच्या तयारीत गुंतणार आहेत. परिणामी, मतदार मतदान केंद्राकडे वळणार की लग्नसमारंभांकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. लग्नाच्या शुभमुहुर्तामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव म्हणून मतदानाकडे […] The post २ डिसेंबर लग्नासाठी शुभमुहुर्त; मतदानाचा टक्का घसरणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 4:09 pm

गुंतागुंतीच्या जगातला सरळ माणूस हरपला:'वीरू' आजही घनिष्ठ मैत्रीचे प्रतीक; शरद पवार, राज ठाकरेंसह अनेकांची धर्मेंद्र यांना श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे आज प्रदिर्घ आजाराने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांनी मुंबईतील आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेत्यांनी धर्मेंद्र यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. धर्मेंद्र यांच्या रुपाने सिनेसृष्टीने एक अतिशय देखणा, सुदृढ, मोहक हास्य, मर्दानीपणा असणारा, पण त्यात कुठेही दांडगाई नसणारा हिरो गमावला, अशी भावना या नेत्यांनी व्यक्त केली आहे. शरद पवार अभिनेते धर्मेंद यांना श्रद्धांजली वाहताना म्हणाले, 1960 च्या दशकात भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण करून चित्रपटात सर्वसामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कथानकांमधून उठावदार भूमिका साकारणारे आणि भारतीय प्रेक्षकांची मनं जिंकून सिनेजगतात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देओल यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. आताच्या तरुणाईला कल्पना नसेल पण एक पिढी त्यांच्या लकबीची, त्यांच्या केशभूषेची, वेशभूषेची चाहती होती. 'शोले'मध्ये त्यांनी साकारलेला 'वीरू' आजही घनिष्ठ मैत्रीचं प्रतीक आणि तडफदार नायक म्हणून भारतीय रसिकमनांवर अधिराज्य गाजवतो आहे. अनेक वेळा 'शोले'मधील त्यांचा पाण्याच्या टाकीवरील खुमासदार प्रसंग आजही आमच्या राजकीय क्षेत्रात उत्साही कार्यकर्ते आंदोलन म्हणून अंगिकारतात. 'धरम वीर', 'चुपके चुपके', 'सत्यकाम', 'अनुपमा', 'मेरा गाँव मेरा देश' आणि 'ड्रीम गर्ल' ह्यासारख्या जवळपास 250 सुप्रसिद्ध कलाकृतीत धर्मेंद्र ह्यांनी साकारलेल्या भूमिका कायम स्मरणात राहतील. सिनेसृष्टीच्या 'धरम पाजीं'ना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व देओल कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो. गुंतागुंतीच्या जगातला सरळ माणूस हरवला - राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी धर्मेंद्र यांच्या रुपाने सध्याच्या गुंतागुंतीच्या जगातला एक सरळ माणूस हरवल्याची भावना व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्रजींचं निधन झालं. भारतीय सिनेमात 'सुपरस्टार' म्हणलं की त्याच्या झंझावाताचा एक काळ असतो आणि तो ओसरण्याचा पण एक काळ असतो. पण याला अपवाद म्हणजे धर्मेंद्रजी. एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले, पण सुपरस्टारचं बिरुद त्यांना चिकटलं नाही म्हणा किंवा त्यांनी चिकटू दिलं नाही. मला चिकटू दिलं नाही असंच जास्त वाटतं, कारण धर्मेन्द्रजींच्या बाबतीत त्यांचं प्रतिमेहून प्रत्यक्ष उत्कट असं होतं. 1960 च्या दशकात धर्मेंद्र नावाचा एक देखणा, शरीराने अतिशय सुदृढ, मोहक हास्य, मर्दानीपणा सहज जाणवत असला तरी त्यात कुठेही दांडगाई नाही, अशा एका व्यक्तिमत्वाचा एक तरुण पडद्यावर झळकला आणि पुढे कित्येक दशकं त्याने हिंदी चित्रपटसृष्टीवर गारुड केलं. करिअरच्या सुरुवातीलाच बिमल रॉय यांच्यासारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचं भाग्य कितींच्या वाट्याला येतं? पुढे ऋषिकेश मुखर्जी, चेतन आनंद, रमेश सिप्पी, राज खोसला, मनमोहन देसाई यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शकांना धर्मेंद्र आपला नायक असावा असं वाटणं यातच धर्मेन्द्रजींच्यातल्या अफाट क्षमतेचं दर्शन होतं. आणि सिनेमाच्या खूप गुंतागुंतीच्या जगातला हा एक सरळ माणूस होता आणि म्हणूनच सर्वसामान्यांनाही तो कायम आपला हिरो वाटत राहिला. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन, असे राज ठाकरे म्हणाले. भारतीय चित्रपट क्षेत्रातील सुवर्णयुग हरपले - वडेट्टीवार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी धर्मेंद्र यांच्या निधनामुळे भारतीय सिनेसृष्टीतील एक सुवर्णयुग हरपल्याची भावना व्यक्त केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपट क्षेत्रातील एक सुवर्णयुग हरपल्याची पोकळी निर्माण झाली आहे. अभिनयातील सहजता, भूमिकांमधील विविधता आणि प्रेक्षकांवर अमिट छाप टाकण्याची विलक्षण ताकद धर्मेंद्र यांनी आपल्या कारकिर्दीत दाखवून दिली. तीनशेहून अधिक चित्रपटांमधून त्यांनी सामान्य माणसांच्या भावना मोठ्या पडद्यावर जिवंत केल्या. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. त्यांच्या परिवाराला, चाहत्यांना आणि भारतीय चित्रपटसृष्टीला ही अपरिमित हानी सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना, असे ते म्हणाले. हिंदी चित्रपटसृष्टीचे एक पर्व काळाच्या पडद्याआड - सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही धर्मेंद्र यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. प्रख्यात चित्रपट अभिनेते तथा माजी खासदार धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमधून भूमिका साकारल्या. चित्रपट रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजविले. पंजाबमधील एका छोट्या गावातून मुंबईत येऊन त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीचे एक पर्व काळाच्या पडद्याआड गेले, असे त्या म्हणाल्या.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 3:26 pm

अनंत गर्जे- अभियंता ते मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कशी मिळवली ओळख:सुरेश धस यांनीही केले होते आरोप; नोकरी, पार्श्वभूमी आणि आता वाद

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणारे अनंत गर्जे सध्या त्यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे यांच्या मृत्यूप्रकरणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मूळ रहिवासी असलेले गर्जे हे शिक्षणाने मॅकेनिकल अभियंता असून, त्यांनी मुख्यमंत्री फेलोशिपअंतर्गत अंबाजोगाई येथे काम केले होते. या कामाच्या अनुभवातून त्यांना प्रशासनाची सखोल समज मिळाली आणि त्यानंतर त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. 2022 पासून ते त्यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांनी केईएम रुग्णालयातील डॉक्टर गौरी पालवे यांच्याशी विवाह केला होता. मात्र, गौरी यांच्या रहस्यमय मृत्यूमुळे अनंत गर्जेंचे नाव वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, कुटुंबीयांच्या आरोपांमुळे त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अनंत गर्जे कोण? हा प्रश्न आता सर्वत्र चर्चेत आहे. पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. वरळी येथील राहत्या घरात त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र, या घटनेनंतर गौरी यांच्या कुटुंबीयांनी ती आत्महत्या नसून नियोजित हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे सुरुवातीला साधी आत्महत्या मानलेले हे प्रकरण आता गुंतागुंतीचे वळण घेत असून, वरळी पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला आहे. 22 नोव्हेंबरच्या संध्याकाळी घडलेल्या या घटनेने मुंबईतील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. अनंत गर्जे हे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील रहिवासी असून, शिक्षणाने मॅकेनिकल इंजिनिअर आहेत. मुख्यमंत्री फेलोशिपद्वारे अंबाजोगाई तालुक्यात त्यांनी काम केले होते. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि 2022 मध्ये ते त्यांच्या स्वीय सहाय्यकपदी निवडले गेले. मंत्रीस्तरावर जवळून काम केल्याने त्यांचा परिचय आणि राजकीय वर्तुळातील वावरणे वाढत गेले. त्यामुळे ही घटना समोर आल्यानंतर अनेक स्तरांवर वेगवेगळे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याच कारणामुळे पोलिसांनी अनंत गर्जे यांच्या हालचाली आणि कौटुंबिक नातेसंबंधांचा तपास अधिक काटेकोरपणे सुरू केला आहे. अनंत गर्जे आणि डॉ. गौरी पालवे यांचा विवाह फेब्रुवारी 2025 मध्ये झाला होता. दोघांचेही मूळ गाव एकच असून, नोकरीमुळे ते मुंबईत स्थायिक झाले होते. गौरी गर्जे या केईएम रुग्णालयातील दंत विभागात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. नोकरीमध्ये उत्कृष्ट कामगिरी आणि स्वभावाने मनमिळावू असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे. परंतु, लग्नानंतर काही दिवसांतच कौटुंबिक मतभेद, तणाव आणि छळ वाढल्याचा आरोप गौरी यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी केवळ मानसिक त्रासच नव्हे तर शारीरिक हिंसाचार आणि पतीचे अनैतिक संबंध असल्याचेही गंभीर दावे पोलिसांसमोर केले आहेत. यामुळे प्रकरण अधिक संवेदनशील बनले असून, कौटुंबिक हिंसाचाराच्या बाजूनेही पोलिस तपास पुढे सरकला आहे. सुरेश धस यांनीही अनंत गर्जे, पंकजा मुंडेंवर केले होते आरोप गौरीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि नातेवाईकांच्या तक्रारीनुसार अनंत गर्जे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. रविवारी उशिरा रात्री त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत त्यांनी दिलेल्या जबाबांमध्ये अनेक विसंगती असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या आधीही मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजप नेते सुरेश धस यांनी अनंत गर्जे, पंकजा मुंडे आणि इतर काही जणांवर विरोधात काम करून आपला पराभव घडवून आणल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर अनंत गर्जे यांचे नाव पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. सध्या अनंत गर्जे पोलिस कोठडीत असून त्यांची पुढील चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी अंतिम संस्कार दरम्यान, सोमवारी गौरी गर्जे यांच्या पार्थिवावर अहिल्यानगर जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी अंतिम संस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी गर्जे आणि पालवे कुटुंबीयांमध्ये वाद झाल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गौरीच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार अनंत गर्जे यांच्या घरासमोरच व्हावेत, असा आग्रह धरल्याने दोन्ही बाजूंमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रकरणाची संवेदनशीलता पाहता गावात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. सध्या पोलिसांचा तपास सर्व कोनातून वेगाने सुरू असून, फॉरेन्सिक अहवालानंतर या मृत्यूमागची खरी कारणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. गौरीच्या मृत्यूने एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, राजकीय स्तरावरही या घटनाक्रमाचे पडसाद उमटत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 3:18 pm

गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात अनंत गर्जे अटकेत

मुंबई : प्रतिनिधी गौरी पालवे- गर्जे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांना अटक करण्यात आली आहे. गेल्या काही तासांपासून अनंत गर्जे हे फरार होते. अखेर वरळी पोलिसांसमोर रविवारी रात्री १ वाजता अनंत गर्जे यांनी आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक केली. अनंत गर्जे यांना आज सोमवारी न्यायालयात हजर […] The post गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात अनंत गर्जे अटकेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 2:29 pm

सुपरस्टार धर्मेंद्र यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक होती. मुंबईमधील राहत्या घरी धर्मेंद्र यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांनी अनेक दशके प्रेक्षकांचे मनोरंजन केले. बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने अख्खे बॉलिवूड […] The post सुपरस्टार धर्मेंद्र यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 2:26 pm

५८ वर्षीय पोलीस अधिकारी, मुलाने दुबई ट्रायथलॉनमध्ये यश मिळवले:टी-१०० वर्ल्ड टूर स्पर्धा ५ तास ५० मिनिटांत पूर्ण केली

कोल्हापूरचे अप्पर पोलीस अधीक्षक विष्णू ताम्हाणे (५८) यांनी आपला १९ वर्षीय मुलगा गौरांग याच्यासोबत दुबईतील आंतरराष्ट्रीय टी-१०० ट्रायथलॉन वर्ल्ड टूर स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्यांनी ही १०० किलोमीटरची कठीण स्पर्धा केवळ ५ तास ५० मिनिटांत पूर्ण करून एक अभूतपूर्व कामगिरी नोंदवली आहे. दुबई येथे १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान ही ट्रायथलॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, ज्यात जगभरातून दहा हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. १६ नोव्हेंबर रोजी झालेल्या टी-१०० ट्रायथलॉनमध्ये २ किलोमीटर स्विमिंग, ८० किलोमीटर सायकलिंग आणि १८ किलोमीटर रनिंगचा समावेश होता. ताम्हाणे पिता-पुत्रांनी केलेल्या या कामगिरीमुळे केवळ क्रीडा क्षेत्रातील त्यांचे कौशल्यच सिद्ध झाले नाही, तर केंद्र सरकारच्या 'फिट इंडिया' उपक्रमाला अनुसरून शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीबाबत एक सकारात्मक सामाजिक संदेशही दिला गेला. फिटनेस फर्स्ट इंडियाचे संचालक आणि प्रशिक्षक विजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत हे मत व्यक्त केले. विशेष म्हणजे, या स्पर्धेच्या दिवशीच विष्णू ताम्हाणे यांचा २८ वा लग्नाचा वाढदिवस होता. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून त्यांनी पत्नी सुनीता ताम्हाणे यांना एक अनोखी आणि अविस्मरणीय भेट दिली. या कठीण स्पर्धेसाठी ताम्हाणे यांनी मागील सहा महिन्यांपासून विजय गायकवाड आणि पॉवर पीकचे प्रशिक्षक चैतन्य वेल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षण घेतले होते. 'वेगवान भारतीय स्पर्धक' हा बहुमान याच ट्रायथलॉनमध्ये सुनील ढाकणे यांनी ४ तास ४३ मिनिटांत स्पर्धा पूर्ण करत 'वेगवान भारतीय स्पर्धक' हा बहुमान संपादन केला. दरम्यान, ताम्हाणे यांनी केवळ ट्रायथलॉनच नव्हे, तर चिरंजीव गौरांग आणि कन्या तेजस्वी यांच्यासह १५ हजार फूट उंचीवरून स्काय डायव्हिंग करून आणखी एक साहसी पराक्रम केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 2:15 pm

डॉ. आनंद करंदीकर यांना श्रद्धांजली सभा:नोकरी सोडून समाजकारण निवडणारे 'आनंद दादा'; डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाच दशकांच्या आठवणींना दिला उजाळा

पुणे येथे स्व. डॉ. आनंद करंदीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. एफ.सी. रोडवरील विद्यार्थी सहायक समिती हॉलमध्ये झालेल्या या सभेत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर विश्वास काळे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचा समारोप करताना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे पती डॉ. आनंद करंदीकर यांच्यासोबतच्या पाच दशकांच्या सहजीवनाच्या आठवणींना उजाळा दिला. १८ नोव्हेंबरला 'आनंद गेले' ही बातमी कळताच अनेक वर्षांचा प्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला. त्यांचे नेत्रदान-देहदान संकल्प कसे पूर्ण करावे, याच विचाराने मन भरून आले, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. गोऱ्हे यांनी १९७६ मधील साध्या विवाह सोहळ्यापासून ते १९८१ च्या युवक क्रांती दलातील संघर्ष, रोजगार हमी योजना, सावकारीमुक्ती आंदोलने आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील सहअटक अशा अनेक आठवणी सांगितल्या. आणीबाणीच्या काळात कार्यकर्त्यांसाठी त्यांचे घर कसे खुले होते, याचाही त्यांनी उल्लेख केला. विशेष म्हणजे, सहा महिन्यांची गर्भवती असताना अटकेत असताना आनंद यांनी लिहिलेल्या कवितेचा उल्लेख करताना सभागृह हेलावून गेले. कोणत्याही सामाजिक लढ्यात 'तू नक्की जा' असे प्रोत्साहन आनंद नेहमी देत असत, असे सांगत डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी ठामपणे सांगितले की, त्यांच्या विचारांची परंपरा सदैव जिवंत राहील. यावेळी कन्या मुक्ता करंदीकर, जावई सत्यजीत गोर्हे-परळीकर, भाची अमृता काळे आणि कनिष्ठ बंधू उदय करंदीकर यांनीही डॉ. आनंद करंदीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. बालपणी इंजेक्शनची भीती दूर करणारे आणि उच्चपगारी नोकरी सोडून समाजकारण निवडणारे 'आनंद दादा' कसे होते, हे त्यांनी सांगितले. विचारवेधचे अनिकेत माळी, जागृती संस्थेच्या अनिता पवार-मंगला पाटील, उमेश वाघ, भूषण भुजबळ, शोभा कोठारी, नरेंद्र हेगडे आणि त्रिवेणी यांसारख्या अनेकांनी डॉ. करंदीकर यांच्या मार्गदर्शनाचे आणि प्रेमळ स्वभावाचे स्मरण केले. जातीअंत, शेतकरी चळवळ, स्त्री संघटन, मानसिक आरोग्य आणि आंतरजातीय विवाह प्रेरणा अशा विविध क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाला त्यांनी उजाळा दिला. त्यांच्या व्याख्यानांवर आधारित पुस्तक प्रकाशनाचा प्रस्तावही यावेळी मांडण्यात आला. सभेच्या अखेरीस उपस्थितांनी एकमुखाने डॉ. आनंद करंदीकर यांच्या समता, संवेदना आणि परिवर्तनाच्या मूल्यांना वाहिलेल्या जीवनकार्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 2:13 pm

सासू - सून एकमेकींविरोधात मैदानात:सुनेला काँग्रेसची, तर सासूला शिवसेनेची उमेदवारी; कुणाचा प्रचार करायचा? मुलाची झाली फजिती

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत सासूला एका पक्षाचे व सूनेला दुसऱ्या पक्षाची उमेदवारी मिळून घरात तंटा उभा राहिल्याचा प्रकार नागपूर जिल्ह्यातील कन्हान पिपरी नगरपालिकेत घडला आहे. या वादात आता नवऱ्या मुलापुढे आपल्या पत्नीचा प्रचार करायचा की आईचा प्रचार करायचा? हा प्रश्न उभा टाकला आहे. महाराष्ट्रात सध्या 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींसाठी निडवणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या प्रकरणी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी उमेदवार पळवापळवीचे प्रकार घडलेत. तसेच राजकीय पक्षांनी एकाच घरात एकाहून अनेकांना उमेदवारी दिल्याचेही प्रकार समोर आलेत. त्यात आता कन्हान पिपरी नगरपालिकेतील एका कुटुंबाची भर पडली आहे. सुनेला काँग्रेस, सासूला शिवसेनेचे तिकीट राज्याचे अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या रामटेक विधानसभा मतदारसंघातील कन्हान नगरपालिकेत शिवसेनेने काँग्रेसने तिकीट नाकारल्याने नाराज झालेल्या सासूला तिच्या सूनेविरोधात उमेदवारी दिली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सासू गुंफा तिडके या गतवेळी काँग्रेसच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. यावेळी पुन्हा काँग्रेस आपल्याला संधी देईल असा त्यांना विश्वास होता. त्यासाठी त्यांनी तयारीही जोरात सुरू केली होती. पण काँग्रेसने ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारली. त्यांच्याजागी त्यांच्या सूनबाई दर्शना तिडके यांना उमेदवारी दिली. त्यामुळे घरात दररोज सासू-सुनेत वाद होऊ लागला. त्यानंतर राजकारण कोळून प्यायलेल्या सासूने कोणताही मागचा पुढचा विचार न करता थेट सत्ताधारी शिवसेनेचा दरवाजा ठोठावला. त्यावर माजी नगरसेविका आयत्या चालून आल्याने शिवसेनेनेही त्यांना लगेचच उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सासू गुंफा तिडके गळ्यात शिवसेनेचा भगवा घालून आपल्या सुनेविरोधात प्रचारात उतरल्या. सासू-सुनेच्या या भांडणात मात्र मुलाचे नाहक हाल सुरू झालेत. या निवडणुकीत आईचा प्रचार करायचा की बायकोचा? हा ब्रह्मप्रश्न त्याच्यापुढे उभा टाकला आहे. शेवटी कुणीही जिंकले तरी सत्ता घरीच राहणार आहे. काँग्रेसने आमच्या घरात भांडणे लावली सासू गुंफा तिडके याविषयी बोलताना म्हणाल्या, काँग्रेसने आमच्या घरात भांडणे लावली. मी नगरसेविका होते. त्यामुळे मला उमेदवारी नाकारण्याचे कोणतेही कारण नव्हते. त्यांनी मला डावलून सुनेला तिकीट दिले. आता आम्ही दोघींनी उमेदवारी दाखल केली. मी आता माझ्या सुनेला पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सूनबाई म्हणते - सासूला आम्हीच निवडून आणले गुंफा तिडके यांच्या या भूमिकेनंतर त्यांच्या सुनेनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वासही व्यक्त केला आहे. दर्शना तिडके याविषयी बोलताना म्हणाल्या, आई मागील निवडणुकीत निवडून आल्या होत्या. त्यांच्या विजयासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या विजयात आमचाही मोठा वाटा होता. मी सुरुवातीपासूनच समाजसेवेत सक्रिय आहे. त्यामुळे माझ्या कार्याची दखल घेऊन काँग्रेसने मला तिकीट दिले. पण सासूबाईंनी राजकारणाच्या लोभापोटी शिवसेनेत प्रवेश केला आणि घराचे दोन तुकडे केल्याचे सून दर्शना तिडके यांचे म्हणणे आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 2:12 pm

अजरामर गीतांनी रंगली ‘मनात रुजलेली गाणी’ मैफल:वंचित विकास संस्थेतर्फे आयोजन; पुणेकर रसिक सुरेल सफरीत हरवले

पुण्यात 'मनात रुजलेली गाणी' या संगीत मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. 'या जन्मावर या जगण्यावर, शतदा प्रेम करावे', 'बगळ्यांची माळ फुले' आणि 'मन तळ्यात मळ्यात' यांसारख्या अजरामर गीतांनी मैफल रंगली. 'रसिका तुझ्याचसाठी' या गीताने सुरुवात झालेल्या या मैफलीची सांगता 'जरा विसावू या वळणावर' या गाण्याने झाली. वंचित विकास संस्थेतर्फे स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सभासद, हितचिंतक आणि रसिक श्रोते यांना एकत्र आणून संस्थेच्या कार्याची ओळख करून देणे आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता. गानसम्राज्ञी लता मंगेशकर, वसंतराव देशपांडे, अरुण दाते, आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह पंडित हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके आणि वसंत प्रभू यांसारख्या दिग्गजांची गाणी सादर करण्यात आली. सुधांशु नाईक, आरती परांजपे आणि चैत्राली अभ्यंकर यांनी आपल्या भावपूर्ण गायनाने रसिकांना संगीताच्या जादुई प्रवासात नेले. प्रत्येक गाण्याला अनुरूप चित्रांकन आणि ओघवते निवेदन यामुळे सादरीकरणानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता. याप्रसंगी संस्थेच्या कार्यवाह संचालिका मीनाताई कुर्लेकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. समाजातील विविध स्तरांतील घटकांना स्वाभिमानी व सन्माननीय आयुष्य जगता यावे, या उद्देशाने विलास चाफेकर यांनी वंचित विकास संस्थेची स्थापना केली असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या कार्यातील महत्त्वाचे टप्पे आदिवासी, परित्यक्त्या, देहविक्रय करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची मुले यांच्यासाठी तसेच आरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रम संस्था राबवत आहे. लहान मुलांसाठी 'निर्मळ रानवारा' मासिक आणि मुलांसाठी 'निहार' या निवासी संकुलासारखे प्रकल्प संस्थेच्या कार्यातील महत्त्वाचे टप्पे असल्याचे संचालिका सुनीता जोगळेकर यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 2:10 pm

दत्त जयंती उत्सव सुरू; घोरात्कष्टात स्तोत्राचे सामूहिक पठण:पुणे आणि जगभरात शेकडो भक्तांचा सहभाग, जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमूला

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवार यांच्या वतीने १२८ व्या दत्तजयंती उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने बुधवार पेठेतील दत्तमंदिराजवळील उत्सव मंडपात प. पू. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी रचित 'घोरात्कष्टात' स्तोत्राचे सामुदायिक पठण शेकडो दत्तभक्तांनी एकत्रितपणे केले. 'गुरुदेव दत्त... श्रीपाद वल्लभ दिगंबरा...' आणि 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...' च्या जयघोषाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता. या कार्यक्रमाचे आयोजन दत्तजयंती उत्सवाच्या प्रारंभी करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख चिदानंद अवधूत प. पू. बाबा महाराज तराणेकर (इंदूर), जया तराणेकर, वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त प. पू. नारायणरत्न शरदशास्त्री जोशी महाराज, देविदास जोशी, हरी मुस्तीकर, संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, शिरीष पाटुकले, शिरीष मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. प. पू. बाबा महाराज तराणेकर यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार, कोषाध्यक्ष युवराज गाडवे, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, डॉ. पराग काळकर, सुनील रुकारी आणि राजेंद्र बलकवडे यांनी या उत्सवाचे नियोजन केले आहे. शरदशास्त्री जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज म्हणजे मानवतेची गाथा आहेत आणि त्यांच्या स्तोत्राच्या सामूहिक पाठाने त्यांचे स्मरण झाले. प. पू. बाबा महाराज तराणेकर यांनी नमूद केले की, देशभरात अनेक दत्त मंदिरे असली तरी, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर हे एकमेव असे मंदिर आहे, जिथे दत्त जयंतीची सुरुवात लोकमंगलवर्धक 'घोरात्कष्टात' च्या सहस्त्र आवर्तनाने होते. ही परंपरा अन्यत्र कुठेही नाही. 'घोरात्कष्टात' स्तोत्रपठण हे केवळ आपल्यासाठी नसून, आपल्या आजूबाजूच्या परिसराच्या शुद्धीकरणासाठीची एक दैवी चिकित्सा आहे. अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले की, ट्रस्टचा १२८ वा दत्त जयंती उत्सव या कार्यक्रमाद्वारे सुरू झाला आहे. तब्बल १५ वर्षांपूर्वी केवळ २० ते २५ साधकांसह सुरू झालेला हा स्तोत्र पठणाचा उपक्रम आज महाराष्ट्रासह भारतातील विविध शहरांतील शाखांमध्ये आणि ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, ब्रिटन यांसह विविध देशांमध्ये ऑनलाइन पद्धतीनेही झाला. दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व देवता उपासकांनी एकत्र येऊन सामूहिक उपासना करावी, या उद्देशाने हे स्तोत्र पठण आयोजित करण्यात आले होते.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 2:09 pm

खडक पोलिस ठाण्यात शॉर्ट सर्किटमुळे आग:अल्पावधीत आग आटोक्यात आणली; पाच मिनिटांत बंब घटनास्थळी दाखल

पुण्यातील खडक पोलीस ठाण्याच्या स्वागत कक्षात रविवारी रात्री शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र स्वागत कक्षातील खुर्च्या आणि आसनव्यवस्था जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अल्पावधीत आगीवर नियंत्रण मिळवले. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर असलेल्या खडक पोलीस ठाण्याच्या स्वागत कक्षातून रविवारी रात्री अचानक धूर येऊ लागला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. पोलिसांनी तात्काळ मुख्य अग्निशमन केंद्राला माहिती दिली. माहिती मिळताच, लोहियानगर येथील मुख्य अग्निशमन केंद्रातून पाच मिनिटांत बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. या आगीत स्वागत कक्षातील खुर्च्या, आसनव्यवस्था आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खडक पोलीस ठाणे हे शहराच्या मध्यवर्ती भागात, ब्रिटिशकालीन मामलेदार कचेरीच्या आवारात आहे. या पोलीस ठाण्याच्या इमारतीचा दहा वर्षांपूर्वी पुनर्विकास करण्यात आला होता. पथदिवे चोरी प्रकरणी महापालिकेकडून तक्रार पुणे शहरातील बिबवेवाडी भागात सुशोभिकरणासाठी ठेवलेले पथदिवे, तसेच खांब चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. संत एकनाथनगर भागात ही घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील अभियंता शिवानंद अंकोलीकर (वय ४५) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडीतील पुष्पमंगल कार्यालय ते संत एकनाथनगर परिसरात सुशोभिकरणासाठी पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे. पदपथावर सुशोभिकरणासाठी खांब आणि दिवे ठेवण्यात आले होते. चोरट्यांनी पथदिवे आणि खांब असा दोन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पथदिवे आणि खांब चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर महापालिकेकडून तक्रार देण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते यांनी घटनास्थळी भेट दिली.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 2:08 pm

खासदार मुरलीधर मोहोळांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी रक्त संकलन:पुण्यात एकाच दिवशी 10,338 रक्त पिशव्या संकलित

पुणे शहराचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान महाअभियानाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या अभियानांतर्गत एकाच दिवशी तब्बल 10,338 रक्त पिशव्यांचे विक्रमी संकलन करण्यात आले. हे रक्तदान शिबिर पुणे शहरातील 56 ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आले होते. या मोठ्या संख्येने झालेल्या रक्त संकलनामुळे रक्ताच्या सततच्या तुटवड्यावर मात करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खासदार मोहोळ यांनी या विक्रमी संकलनाबद्दल पुणेकरांचे आभार मानले. ते म्हणाले, रक्ताचा सततचा तुटवडा लक्षात घेता हे संकलन पुण्याच्या सामाजिक जागरूकतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे. समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला, हा विश्वास माझ्यासाठी सर्वांत मोठी शक्ती व प्रेरणा आहे.आपत्कालीन परिस्थितीत रक्त तात्काळ उपलब्ध व्हावे यासाठी स्वेच्छारक्तदात्यांची मोठी यादी तयार केली जात असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. यामध्ये विशेषतः दुर्मिळ रक्तगटांच्या दात्यांचा समावेश असेल. याचबरोबर, रक्त दाते आणि गरजू रुग्ण यांना जोडणारे एक स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या पोर्टलवर रक्त दाते आपली नोंदणी करू शकतील आणि गरज पडल्यास रुग्ण किंवा रुग्णालये थेट त्यांच्याशी संपर्क साधू शकतील. यामुळे रक्तपेढ्यांमध्ये किंवा सोशल मीडियावर धावपळ करण्याची गरज भासणार नाही.खासदार मुरलीधर मोहोळ हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरांचे आयोजन करत आहेत. यंदाचे 10,338 रक्त पिशव्यांचे संकलन हे आतापर्यंतचे त्यांचे सर्वोच्च योगदान ठरले आहे. रक्त पेढी यांना देखील रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात यामुळे मदत झाल्या आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 2:01 pm

पंख्याची उंची ते सॅम्पल्स, तज्ज्ञांनी तपासला घरातील प्रत्येक पुरावा:वरळीत फॉरेन्सिक टीमची सखोल तपासणी; अनंत गर्जेची अटक, फॉरेन्सिक टीम घरात

मुंबईतील वरळी परिसरात राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या गूढतेने पोलिस तपासाला वेग आला आहे. शनिवारी त्यांच्या घरात गळफास घेतल्याची माहिती पुढे आली असली तरी नातेवाईकांनी आत्महत्येवर संशय व्यक्त केल्यानंतर प्रकरणाने गंभीर वळण घेतले. गौरींच्या कुटुंबीयांनी हा मृत्यू सरळसरळ आत्महत्या नसून काहीतरी वेगळे प्रकरण असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे वरळी पोलिसांनी प्राथमिक तपास अधिक मजबूत करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेत, घटनास्थळाचे पुन्हा निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला. गौरी पालवे-गर्जे यांचे पती अनंत गर्जे यांना रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आणि सोमवारी सकाळी त्यांचा दीर्घ जबाब नोंदवण्यात आला. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ते 31 व्या मजल्यावरील रेफ्यूजी एरियातून 30 व्या मजल्याच्या खिडकीपर्यंत उतरले आणि तिथूनच त्यांना पत्नीचा मृतदेह दिसला. त्यांच्या या वक्तव्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पडताळणी करणं आवश्यक असल्याचं मानलं. घराच्या संरचनेपासून ते रेफ्यूजी एरियातील मार्गांपर्यंत सर्व गोष्टींची बारकाईने तपासणी करण्यात आली आहे. कारण, पतीच्या उपस्थितीबाबत आणि घटनास्थळावरील परिस्थितीबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले होते. तपासाचा भाग म्हणून सोमवारी सकाळी सायन रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि अनुभवी फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. राजेश ढेरे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक वरळीतील घरात दाखल झाले. या टीमने घरातील प्रत्येक भागाचा सखोल तपास केला. गौरी पालवे-गर्जे यांनी ज्या पंख्याला दोर बांधून आपले जीवन संपवले, त्या पंख्याची उंची, त्याची वजन क्षमता, तसेच खोलीतील इतर वस्तूंच्या स्थितीचा तपास करण्यात आला. पंख्याची मजबुती आणि त्याने किती भार सहन करू शकतो याची माहितीही तपासात महत्त्वाची ठरली. या सर्व निरीक्षणातून आत्महत्येची शक्यता किती योग्य आहे का? याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृत्यूचे प्राथमिक कारण लिगेचर कम्प्रेशन ऑफ नेक फॉरेन्सिक पथकाने घरातून आवश्यक सॅम्पल्स गोळा केले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. यात दोरखंड, कपडे, पंख्याचे भाग, खोलीतील इतर शंका असलेली सामग्री यांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्राथमिक तपासानुसार हा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे डॉ. ढेरे यांनी सांगितले. त्यांनी नमूद केले की मृत्यूचे प्राथमिक कारण लिगेचर कम्प्रेशन ऑफ नेक म्हणजे गळ्यावर दाब येऊन श्वसनमार्ग बंद होणे, असे दिसून येते. मात्र हा दाब आत्महत्येमुळे झाला की, कोणत्यातरी जबरदस्तीने, हे निष्कर्ष स्पष्ट होण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. तपास अधिकारी सावधगिरीने पुढे जात आहेत या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गौरींच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हांनी पोलिस तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आलेल्या शंका, पतीच्या विधानांतील विसंगती आणि घटनास्थळावरील परिस्थिती यामुळे तपास अधिकारी सावधगिरीने पुढे जात आहेत. फॉरेन्सिक अहवाल मिळेपर्यंत पोलिस कोणताही निष्कर्ष काढण्यास तयार नाहीत. मात्र तपास जलदगतीने सुरू असून मृत्यूचे खरे कारण पुढील काही दिवसांत स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या प्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले असून, न्याय मिळवण्यासाठी नातेवाईक सातत्याने प्रयत्न करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 2:00 pm

सिद्धेश्‍वरमधून रब्बीसाठी 4 पाणी पाळ्या देण्याचा निर्णय:पहिली पाणी पाळी आजपासून सुरु होणार, 60 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

हिंगोली जिल्हयातील सिद्धेश्‍वर धरणातून रब्बी हंगामासाठी चार पाणीपाळ्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून पहिली पाणी पाळी मंगळवारपासून ता. 25 सोडली जाणार आहे. यामुळे हिंगोलीसह परभणी, नांदेड जिल्हयातील 60 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तर हरभरा व गहू पिकांना पाणी मिळणार असल्याने शेतकऱ्यांतून समाधानाचा सुर उमटू लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्‍वर धरणावरून हिंगोली, वसमत, पूर्णा शहराला पाणी पुरवठा होतो. या शिवाय प्रादेशीक पाणी योजना देखील या धरणावरच अवलंबून आहेत. त्यानंतर या धरणावरून हिंगोलीसह परभणी व नांदेड जिल्हयातील सुमारे 60 हजार हेक्टर शेती सिंचनाखाली येते. त्यामुळे धरणातून किती पाणी पाळ्या सोडल्या जाणार, पावसाळ्यात धरण किती टक्के भरले यावरूनच शेतकरी रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पिकांची निवड करतात. दरम्यान, यावर्षी अतिवृष्टीमुळे धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा 250.85 दशलक्ष घनमीटर असून धरणाचा मृत पाणीसाठा क्षमता 169.89 दशलक्ष घनमीटर तर उपयुक्त पाणीसाठा क्षमता 80.96 दशलक्ष घनमीटर एवढा आहे. सध्याच्या स्थितीत धरणामध्ये 100 टक्के पाणी साठा झाला आहे. दरम्यान, धरणातील पाणीसाठा लक्षात घेऊन पूर्णा पाटबंधारे विभागाचे अभियंता रुख्मानंद गरुड यांनी रब्बी हंगामासाठी चार पाणी पाळी सोडण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार सदर प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला शासनाकडून मंजूरी देण्यात आली असून मंगळवारपासून ता. 25 धरणातून पहिली पाळी सोडली जाणार आहे. पहिली पाळी 24 दिवसांची असणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. रब्बी मध्ये चार पाणीपाळ्या सोडल्या जाणार असून पुढील काही दिवसांतच उन्हाळी पाळीपाळ्याचे नियोजन होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सिद्धेश्‍वर धरणातून पाणीपाळ्या सोडल्या जाणार असल्याने हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यातील 60 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी लाभ होणार असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. पाणीपाळ्याचे असे असेल नियोजन पहिली पाणी पाळी - 25 नोव्हेंबर ते ता. 18 डिसेंबर दुसरी पाणी पाळी - 19 डिसेंबर ते 11 जानेवारी 2026 तिसरी पाणी पाळी - 12 जानेवारी ते 4 फेब्रुवारी चौथी पाणी पाळी - 5 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 1:45 pm

नक्षलवाद्यांनी सामूहिक आत्मसमर्पणासाठी वेळ मागितला:सुरक्षा दलांनी 15फेब्रुवारीपर्यंत कारवाई करू नये

केंद्र सरकारने देशातून नक्षलवादाचे उच्चाटन करण्यासाठी 31 मार्च 2026 ही अंतिम मुदत दिली असताना, महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगढ (MMC) स्पेशल झोनल कमिटीने (भाकपा-माओवादी) तीनही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी सामूहिक आत्मसमर्पण आणि शस्त्रे खाली ठेवण्यासाठी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंतची मुदत मागितली आहे. केंद्र सरकारच्या कठोर कारवाई, भूपती आणि नर्मदाक्काचे आत्मसमर्पण तसेच हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांनी हा निर्णय घेतला आहे. नक्षलवाद्यांनी पत्रात नमूद केले आहे की, त्यांचा कोणताही छुपा हेतू नाही. एकमेकांशी संपर्क साधून सहमती मिळवण्यासाठी वेळ लागणार असल्याने त्यांनी 15 फेब्रुवारी 2026 ही मुदत मागितली आहे. ही तारीख केंद्र सरकारच्या 31 मार्च 2026 च्या अंतिम मुदतीच्या आतच येते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या पत्रात, सर्वजण मिळून आत्मसमर्पण करतील असे म्हटले आहे. महाराष्ट्रात आत्मसमर्पण करणारे भूपती आणि छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण करणारे सतीश यांच्या पावलावर पाऊल ठेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतिम मुदतीपर्यंत सुरक्षा दलांनी कोणतीही कारवाई करू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच, माओवाद्यांनी मुख्यमंत्र्यांना काही दिवसांसाठी न्यूज नेटवर्क बंद करण्याचीही विनंती केली आहे. नक्षलवाद्यांनी येणारा वार्षिक पीपल्स लिबरेशन गुरिल्ला ॲक्शन (PLGA) सप्ताह साजरा करणार नाहीत असे आश्वासन दिले आहे. या काळात सुरक्षा दलांनी त्यांच्यावर कारवाई करू नये अशी विनंतीही त्यांनी केली आहे. जर तिन्ही राज्यांच्या सरकारांनी एमएमसी झोनमधील नक्षलवाद्यांना ही मुदत दिली आणि हे सामूहिक आत्मसमर्पण यशस्वी झाले, तर देशातील नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठी गती मिळेल.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 1:37 pm

अभिनेते धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन:घरी रुग्णवाहिका पोहोचली, बॅरिकेड्स लावण्यात आले; विलेपार्ले स्मशानभूमीत सुरक्षा वाढवली

देशातील लाखो सिनेरसिकांच्या गळ्यातील ताईत असणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे अखेर निधन झाले आहे. न्यूज एजन्सी IANS ने हे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, 89 वर्षीय धर्मेंद्र यांनी सोमवारी दुपारी 1 च्या सुमारास आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेताल. त्यांच्या घरी रुग्णवाहिका पोहोचली आहे. सध्या त्यांच्या राहत्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच बॅरिकेडींगही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, विलेपार्ले स्मशानभूमीत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 1:29 pm

‘आशा’चा टिझर रिलीज; १९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : प्रतिनिधी ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचा चित्रपट ‘आशा’ चा टिझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ‘बाई अडलीये म्हणूनच ती नडलीये’ या प्रभावी टॅगलाईनसह हा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. येत्या १९ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आशा’ चित्रपटाच्या कथानकाच्या केंद्रस्थानी आशा सेविका आहे आणि ही भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरू साकारत आहे. या […] The post ‘आशा’चा टिझर रिलीज; १९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 1:23 pm

मुंबईत सरकार पाताल लोक तयार करतंय:मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांची वाहतूक कोंडी सोडवण्याचा निर्धार; भूयारी मार्ग, समांतर रस्त्यांचे जाळे विणणार

राज्य सरकार मुंबईत पाताल लोक तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. हा पाताल लोक तयार झाल्यानंतर मुंबईकरांची वाहतूक कोंडीपासून कायमची सुटका होईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी भाजपच्या युथ कनेक्ट कार्यक्रमांतर्गत वरळीतील एनएससीआय डोम येथे तरुणांशी संवाद साधला. त्यात त्यांनी विविध विषयांना हात घालत वरील माहिती दिली. ते म्हणाले, वाहतूक कोंडी ही मुंबईची सर्वात मोठी समस्या आहे. या समस्येपासून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी सरकार वेगवेगळे रस्ते व भुयारी मार्ग बांधत आहे. तसेच मेट्रोचे जाळे विणण्याचे काम सुरू आहे. मुंबई सर्व प्रकारच्या कोंडीतून मुक्त होईल सरकारने आणखी एक योजना आखली आहे. आम्ही मुंबईत पाताल लोक तयार करत आहोत. मुंबईत भूयारी मार्गांचे जाळे तयार केले जाईल. वाहतूक कोंडी होणाऱ्या रस्त्यांना समांतर रस्ते व भूयारी मार्ग तयार केले जातील. यामुळे मुंबई वाहतूक कोंडीमुक्त होईल. मुंबईतील रस्ते, मेट्रो व रेल्वेचे काम आम्ही दरवर्षी पुढे नेणार आहोत. उदाहरणार्थ, दरवर्षी 50 किमी मेट्रो सुरू होईल. 5 वर्षांत शहराचा कायापालट होईल. काही प्रकल्प त्यापुढे जातील. पण 2032 पर्यंत सर्व प्रकल्प मार्गी लागतील व मुंबई सर्व प्रकारच्या कोंडीतून मुक्त होईल. सद्यस्थितीत 60 टक्के मुंबई ही पश्चिम द्रुतगती महामार्गावरून धावते. त्यावरील भार कमी होत नाही तोपर्यंत मुंबईला कुणीच वाहतूक कोंडीतून बाहेर काढू शकत नाही. यावर उपाय म्हणून सरकार रस्त्याला समांतर रस्ते बांधत आहे. सध्या मुंबईचा सरासरी वेग हा ताशी 20 किमी एवढा आहे. सकाळी व सायंकाळी हाच वेग ताशी 15 किमीपर्यंत घसरतो. त्यामुळे आम्ही असे रस्ते बांधत आहोत, जिथे नागरिकांना ताशी 80 किमी वेगाने वाहने चालवता येतील. ताशी 80 किमीहून कमी वेग चालणार नाही. त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडी आपसूकच कमी होईल. कुठे - कुठे तयार होणार भूयारी मार्ग? मुख्यमंत्री म्हणाले, सरकार ठाणे ते बोरीवलीपर्यंत एक भूयारी मार्ग बांधत आहे. तसेच मुलुंड ते गोरेगाव असा आणखी एक भूयारी मार्ग बांधला जात आहे. यामुळे मुंबईची पूर्व - पश्चिम कनेक्टिव्हिटी आणखी सुलभ होईल. पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर असा बोरीवली ते गोरेगाव दरम्यान आम्ही आणखी एक रस्ता बांधत आहोत. तर अटल सेतूला जोडण्यासाठी वरळी ते शिवडी हा पूल बांधत आहोत. यामुळे उपनगरांमधील नागरिकांना कोस्टल रोडने थेट नवी मुंबई विमानतळ गाठता येईल. दुसऱ्या बाजूला ईस्टर्न फ्री वे जिथे संपतो, तेथून वाहतूक कोंडी सुरू होते. तेथून पुढे आम्ही भूयारी मार्ग बांधत आहोत. त्याचेही काम सुरू झाले आहे. पुढील 3 वर्षांत भूयारी मार्ग तयार झालेला असेल. हा मार्ग थेट चौपाटीपर्यंत जाईल. यामुळेही वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल. या प्रकल्पावरही काम सुरू झाले आहे. वांद्रे - वरळी सी लिंकने वांद्रे येथे पोहोचल्यानंतर तेथून वांद्रे - कुर्ला संकुलाकडे जाण्यासाठी आणखी एक भूयारी मार्ग विकसित केला जात आहे. यामुळे वांद्रे - कुर्ला संकुलातील वाहतूक कोंडी दूर होईल. तोच भूयारी मार्ग पुढे विमानतळापर्यंत नेला जाईल. यामुळे दक्षिण मुंबईहून विमानतळ गाठण्यासाठी तुम्हाला अधिकाधिक 20 मिनिटे लागतील, असे फडणवीस म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 1:09 pm

फळभाज्या महागल्या; नागरिकांच्या खिशाला झळ

पुणे : प्रतिनिधी पुणे शहरात थंडीचा जोर वाढत चालला असताना त्याचा परिणाम थेट भाजीबाजारावर दिसू लागला आहे. नोव्हेंबरमध्ये वाढलेल्या थंडीमुळे भाजीपाल्याची आवक घटली असून, बाजारात गेल्या आठवड्याभरात दरांनी चांगलीच उसळी घेतली आहे. यामुळे हिवाळ्यात आरोग्यदायी हिरव्या भाज्यांसाठी नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे. मेथी, पालक, कांदापात व इतर फळभाज्याही ३० ते ५० रुपयांच्या आसपास दराने विक्रीस […] The post फळभाज्या महागल्या; नागरिकांच्या खिशाला झळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 24 Nov 2025 1:02 pm

डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मुंबईचा आंतरराष्ट्रीय विकास करणार:जात-धर्मावर नव्हे, विकासावर मतदान होईल, राज ठाकरेंकडून मतदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न- बावनकुळे

मुंबईच्या निवडणुकीसाठी भावनिक करत मतदान करण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. मला वाटते कुठलीही निवडणूक शेवटची नसते, मुंबईकरांकडून विकसित मुंबईच्या आराखड्याला मते मिळणार आहेत, असे म्हणत भाजपचे नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मनपाच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाही. ज्यावेळी मुंबई मनपाची निवडणूक जाहीर होईल त्यावेळी महायुतीचे नेते एकत्र बैठक घेतील. मुंबई मनपाची निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. फडणवीसांवर टीका महाराष्ट्र सहन करणार नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका महाराष्ट्र सहन करणार नाही. ज्या ज्या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसकडून व्यक्तिगत टीका करण्यात आली त्यावेळी महाराष्ट्राने काँग्रेसला पराभूत करत फडणवीसांच्या मागे महाराष्ट्र उभा राहील. महायुतीला 51 टक्के मते मिळणार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. या अनुकूल वातावरणाच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेच्या अपेक्षा अशा आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिन सरकारच या महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करू शकते. नागरी विकास हा डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून होऊ शकतो. यामुळे नगर पालिकेच्या निवडणुकीत 51 टक्के मते महायुतीला आणि भाजपला मिळतील. मुंबई विकसित करण्याचा प्रयत्न चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुंबईच्या निवडणुकीसाठी भावनिक करत मतदान करण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. मला वाटते कुठलीही निवडणूक शेवटची नसते. प्रत्येक निवडणुकीचे वेगवेगळे महत्त्व असते. मुंबई निवडणुकीचे महत्त्व आहे की मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेव्हलवर डेव्हलपमेंट करणे, 2029, 2035 आणि 2047 मधील मुंबईचा आराखडा देवेंद्र फडणवीस यांनी तयार केला आहे. मुंबईकरांकडून विकसित मुंबईच्या आराखड्याला मते मिळणार आहेत. जात-धर्म हे राजकारण करत मते मिळणार नाही. विकास निधीबद्दल तिन्ही नेते एकत्र निर्णय घेतात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, निधी वाटपाचा निर्णय अजित पवार, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिळून करत असतात. विकास निधीचे वाटप करत असताना तिन्ही नेते बसतात. कुठेही विकास निधीवाटपाबद्दल असे होत नसते. तो प्रचारातील एखादा मुद्दा असेल.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 12:59 pm

मित्राची आत्महत्या जिव्हारी लागली:अंत्ययात्रेत सहभागी झाला, पण अंत्यविधीच्या वेळीच घेतला गळफास; दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्यात दोन तरुण मित्रांनी काही तासांच्या अंतराने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघड झाली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावात घडलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गोरख भोई आणि सुरेश भोई हे दोघे एकमेकांचे फार जवळचे मित्र. गोरखच्या अचानक मृत्यूनंतर त्याच्या दुःखाने हळहळून दुसऱ्या मित्रानेही जीवन संपवण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. दोन तरुणांचे अशा प्रकारे जाणे हे गावाला न पेलणारे वास्तव ठरले असून, या घटनेने मानसिक आरोग्याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शुक्रवारी रात्री गोरख भोई यांनी आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील आणि गांवातील लोक या धक्क्यातून सावरतही नसतानाच दुसऱ्या दिवशी त्यांचा अंत्यविधी सुरू होता. अंत्यविधीच्या वेळीच गोरखचा जिवलग मित्र सुरेश भोई खूपच व्यथित झाल्याचे जवळच्या मंडळींनी सांगितले. मित्राच्या अशा अकस्मात जाण्याची वेदना तो सहन करू शकला नाही. अंत्यविधी सोडून तो एकटा शेताच्या दिशेने निघून गेला व तिथे झाडाला दोर लावून जीवन संपवले. काही वेळानंतर त्याचाही मृतदेह आढळल्याने गावात दोन दुर्दैवी मृत्यूंची चर्चा पसरली. दोन्ही तरुणांच्या आत्महत्यांची नोंद मंद्रूप पोलिस ठाण्यात स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून या दोन्ही तरुणांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले? याचा शोध घेतला जात आहे. दोघांच्या कुटुंबीयांनीही त्यांच्या वागण्यात काही विशेष बदल दिसला नव्हता, असे सांगितले. त्यामुळे या प्रकरणाचा मूळ शोध लावणे पोलिसांसाठीही आव्हान बनले आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रसंगानंतर मानसिक आधार आणि समुपदेशनाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. महिलेनेही मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली दरम्यान, याच दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातही एक वेगळी पण तितकीच दुर्दैवी घटना घडली. कुरुंदवाडमधील एका महिलेने घरातील ताणतणाव, पैशांची मागणी आणि सततच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. कौसर गरगरे असे या महिलेचे नाव असून, तिच्या मृत्यूनंतर तिच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, पतीचा व्यवसाय आणि सासऱ्याच्या निवडणूक खर्चासाठी दहा लाख रुपये आणण्याचा दबाव तिच्यावर टाकला जात होता. या मागणीनंतर सुरू झालेला शारीरिक आणि मानसिक त्रास तिला सहन न झाल्याने तिने आपले जीवन संपवले, असा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी पती आणि जाऊला अटक केली असून सासू-सासरा फरार असल्याची माहिती मिळाली आहे. मैत्रीतील भावनिक वेदना दोन जीव घेऊन गेल्या या दोन्ही घटना ग्रामीण समाजातील ताणतणाव, कौटुंबिक मतभेद आणि मानसिक आरोग्याच्या दुर्लक्षाचे गंभीर चित्र समोर आणतात. सोलापूरमध्ये मैत्रीतील भावनिक वेदना दोन जीव घेऊन गेल्या, तर कोल्हापूरमध्ये कौटुंबिक दबावाने एका तरुणीचे आयुष्य हिरावून घेतले. दोन्ही घटनेनंतर संबंधित कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. अशा घटनांनी समाजात जागरूकता, समुपदेशन, कुटुंबातील संवाद आणि मानसिक आधाराची गरज किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 12:53 pm

पंकजाचं नाव आलं की अंजली दमानिया बाहेर येतात:विरोधात बोलण्यासाठी त्या व्हेंटिलेटरवरूनही उठतील; प्रकाश महाजनांची टीका

डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरणानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादाला प्रकाश महाजन यांच्या तीक्ष्ण प्रतिक्रियेने आणखी उधाण आले आहे. पंकजा मुंडे यांच्या नावाचा राजकारणात वापर करून अनावश्यक टीका केली जात असल्याचा आरोप त्यांनी अंजली दमानिया यांच्यावर केला. दमानिया या केवळ पंकजा मुंडे यांच्या विरोधासाठीच प्रकरणात उडी घेत आहेत, असा दावा करत महाजन म्हणाले की, पंकजाचं नाव आलं की दमानिया बिळातून बाहेर येतात. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणापासून बीडमधील इतर घटनांपर्यंत दमानिया दिसल्या नाहीत, पण पंकजांच्या संदर्भातील कोणत्याही मुद्द्यावर त्या अचानक आवाज उठवतात, असा आरोप त्यांनी केला. पंकजाच्या विरोधात बोलण्यासाठी त्या व्हेंटिलेटरवरूनही उठतील, अशा कठोर शब्दांत महाजन यांनी दमानिया यांच्यावर हल्ला चढवत राजकीय वातावरण अधिक तापवले आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे- पालवे यांच्या रहस्यमय मृत्यूप्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. वरळीतील घरात त्यांनी गळफास घेतल्याची घटना समोर आली असली तरी कुटुंबीयांनी हा प्रकार आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गौरीला गेल्या काही महिन्यांपासून अनंत गर्जे आणि त्याच्या कुटुंबीयांकडून मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. विशेषतः अनंत गर्जेचे इतर एका महिलेबरोबर संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर घरातील तणाव वाढल्याची माहितीही समोर आली आहे. या आरोपांनंतर पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली असून अनंत गर्जेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. चौकशीत अनेक महत्त्वाचे मुद्दे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पातळीवरही या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त होत असून न्याय मिळावा, यासाठी गौरीच्या कुटुंबीयांनी ठाम भूमिका घेतली आहे. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेल्या एका तरुणीचा असा अकाली मृत्यू झाल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकार आणि पोलिस प्रशासनावर टीका करताच राजकीय वातावरण अधिक तापले. दमानिया म्हणाल्या की, गौरीने आत्महत्या केली असे स्वतःला वाटत नाही. तसेच घटनेच्या रात्रीच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश द्यायला हवे होते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माझा पीए असेल तरी योग्य ती कारवाई करा, असे पंकजा मुंडेंनी सांगितले असते तर प्रशासन अधिक तत्परतेने हालले असते, असे दमानिया यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाला राजकीय वळण मिळाले. पंकजा मुंडे यांचे नाव ऐकले की दमानिया बिळातून बाहेर येतात अंजली दमानिया यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना पंकजा मुंडे यांच्या मामांनी प्रकाश महाजन यांनी जोरदार हल्लाबोल केला. पंकजा मुंडे यांचे नाव ऐकले की दमानिया बिळातून बाहेर येतात, अशा कठोर शब्दांत त्यांनी टीका केली. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात किंवा बीडमधील वर्गातील घटनेत त्या कुठे दिसल्या नाहीत, असा सवालही त्यांनी केला. आपल्याला पंकजा नावाचा कावीळ झाला आहे. पंकजाच्या विरोधात बोलण्यासाठी तुम्ही व्हेंटिलेटरवरूनसुद्धा उठाल, असे वादग्रस्त वक्तव्य करत त्यांनी दमानिया यांच्यावर थेट हल्ला चढवला. कौटुंबिक वादांचे पुरावे यावर पुढील तपास अवलंबून या सर्व घडामोडींमुळे गौरी गर्जे- पालवे प्रकरण राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अधिक संवेदनशील बनले आहे. पोलिस चौकशी सध्या सुरू असून फॉरेन्सिक अहवाल, कॉल रेकॉर्ड, आणि कौटुंबिक वादांचे पुरावे यावर पुढील तपास अवलंबून राहणार आहे. एका वैद्यकीय शिक्षित महिलेला झालेला छळ, कुटुंबीयांचा हत्या झाल्याचा आरोप, राजकीय व्यक्तींची प्रतिक्रिया आणि समाजातील संताप, या सर्वांचे मिश्रण पाहता हे प्रकरण आणखी गाजण्याची शक्यता वर्तवली जाते. शेवटी सत्य बाहेर येण्यासाठी आणि गौरीला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतंत्र, निष्पक्ष व वेगवान तपास करण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 12:32 pm

जयकुमार गोरे आम्ही तुमच्याकडे लक्ष घातले तर तुमची अडचण होईल:2029 निवडणुकीत भाजप एकटा लढेल, सर्व मित्रपक्ष विरोधात राहतील- रोहित पवार

जयकुमार गोरे तुमचा इतिहास बऱ्यापैकी उघडा आहे. हे लोकांनी बघितलेले आहे त्याबद्दल बरीच काही चर्चा झालेली आहे. अजून काही बोलून अजून उघडा करु नका आम्ही त्यात लक्ष घातले तर तुमची अडचण झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री गोरे यांना दिला आहे. तर गोरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपचे सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या नेत्याबद्दल बोलले की काय असे आपल्याला म्हणावे लागेल. रोहित पवार म्हणाले की, भाजप संविधान आणि लोकशाहीला पायाखाली तुडवत आहे असे म्हणावे लागेल. मित्रपक्षाचे आमदार फोडून त्यांना कमळाच्या चिन्हावर संधी देत भाजप 2029 मध्ये एकटा निवडणूक लढेल असेही पवार यांनी म्हटले आहे. भाजप मित्र पक्षांना संपवणार रोहित पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष संपूर्णपणे मोडला आणि तोडला जाईल. त्यांच्या नेत्यांना विकत घेतले जाईल, त्यांच्या आमदारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजपकडे घेतले जाईल. भाजपच्या चिन्हावर त्यांना संधी दिली जाणार आहे. त्यामुळे भाजप 2029 मध्ये एकटा निवडणूक लढेल आणि त्यांच्याविरोधात महाराष्ट्रातील पूर्ण जनता आणि आज त्यांच्यासोबत असलेले मित्रपक्ष देखील विरोधात राहतील. 2029 ला भाजप स्वबळावर लढेल रोहित पवार म्हणाले की, 2029 ची निवडणूक ही राज्यातील सर्व हे भाजपच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे असे आम्हाला वाटायला लागले आहे. गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात साम,दाम सर्व गोष्टीचा वापर करत स्वत:च्या पत्नीला बिनविरोध नगराध्यक्ष केले आहे. सर्वच ठिकाणी विरोधकांवर दबाव आणला जात आहे. महाजनांनी उमेदवारच उभे राहू दिले नाही, बारामती-मध्येच हे काही सुरू आहे असे नाही राज्यभरात हेच सुरू आहे. बिनविरोध निवडून आलेले सर्व उमेदवार भाजपचे आहेत. हे सर्व सामान्य उमेदवार नसून लोकप्रतिनिधींचे नातेवाइक आहेत. जामखेड काँग्रेसवर हल्लाबोल रोहित पवार म्हणाले की, जामखेडमध्ये भाजपची बी टीम म्हणून काँग्रेस काम करत आहे असे आपल्याला म्हणावे लागेल. कर्जतमध्ये उमेदवारांना जे एबी फॉर्म दिले गेले होते त्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी आर्थिक व्यवहार केला होता, राम शिंदे आणि भाजपला मदत व्हावी अशा पद्धतीने उमेदवार हे काँग्रेसने आमच्या तालुक्यात दिले आहे. यात काँग्रेस नेत्यांची काहीही चूक नाही पण यात स्थानिक नेतृत्वाची ज्यांनी एबी फॉर्म विकला त्यांची चूक आहे.देश आणि राज्य लेव्हल वरचे काँग्रेस वेगळे आहे. आम्ही सामान्य लोकांना उमेदवारी दिली आहे, ज्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा उमेदवारांना संधी दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 12:26 pm

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांची आर्त विनवणी; गौरीवर गर्जेच्या घराशेजारीच अंत्यसंस्कार

मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जेच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे - गर्जे यांच्यावर आज अहिल्यानगर येथील मोहोज देवढे या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या वडिलांनी पोलिसांपुढे 'तुमच्या मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका,' असे म्हणत एकच टाहो फोडला. यावेळी त्यांचा आक्रोश पाहून पोलिसासंह सर्व उपस्थितांचे डोळे पानावले. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे - गर्जे यांनी शनिवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली होती. अनंत गर्जे यांचे कथित विवाहबाह्य संबंध तथा कौटुंबीक त्रासाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी अनंत गर्जेने रविवारी मध्यरात्री पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर आज सकाळीच गौरीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील मोहोज देवढे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अनंत गर्जेच्या घराशेजारीच झाले गौरीवर अंत्यसंस्कार तत्पूर्वी, पीडित कुटुंबीय व तिच्या नातेवाईकांनी गौरीची आत्महत्या नव्हे तर तिला ठार मारल्याचा आरोप करत गौरीवर अनंत गर्जेच्या घरापुढेच अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली. यावरून गर्जे व पालवले यांचया नातेवाईकांत मोठी बाचाबाची झाली. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. त्यानंतर अनंत गर्जे याच्या घराशेजारीच डॉक्टर गौरीच्या पार्थिवाला अग्निडाग देण्यात आला. या घटनाक्रमामुळे मोहोज देवढे गावात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका गौरी गर्जे - पालवेवर अंत्यसंस्कार सुरू असताना तिचे वडील धायमोकलून रडत होते. ते यावेळी उपस्थितांना आर्त विनवणी करत म्हणाले, तुम्हाला मुली असतील तर आम्हाला न्याय द्या. तुम्ही तुमच्या मुली गरिबाला द्या. श्रीमंतांच्या नादी लागू नका. श्रीमंतीच्या भपक्यावर जाऊ नका, असे ते रडत रडत सागंत होते. त्यांची ही विनवणी पाहून उपस्थितींचे हृदय हेलावून जात होते. यावेळी अनेकांचे डोळे पानावले. गौरीवर आत्महत्या करण्याची वेळ का आली? गत सप्टेंबर महिन्यात अनंत गर्जे व गौरी गर्जे यांनी आपले राहते घर बदलले. त्यावेळी गौरीच्या हाती काही दस्तऐवज लागले. या दस्तऐवजात एका महिलेचा पती म्हणून अनंत गर्जेच्या नावाचा उल्लेख होता. ही बाब गौरीने आपल्या वडिलांच्या कानावर घातली. तसेच तुझे आई-वडील मला जाब विचारायला आले, तर मी चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन आणि चिठ्ठीमध्ये तुझ्या नावाचा उल्लेख करेन, अशी धमकी अनंतने गौरीला दिली होती. या नव्या माहितीमुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. हे ही वाचा... गौरी गर्जे प्रकरणात पंकजा मुंडेंचे स्टेटमेंट धक्कादायक:तुमचा पुत्र समान PA फरार का झाला? तुम्ही पोलिसांना का कळवले नाही? - दमानिया मुंबई - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी डॉक्टर गौरी पालवे - गर्जे आत्महत्या प्रकरणात मंत्री पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी या प्रकरणी पंकजांवर विविध प्रश्नांची सरबत्ती करत एकप्रकारे त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे अधोरेखित केले आहे. अनंत गर्जे हा तुम्हाला मुलासारखा होता ना? मग सेलटमेंट करा म्हणून पोलिस ठाण्यात कोण गेले होते? याची चौकशी करण्याची मागणी तु्म्ही करणार का? तुमचा पुत्र समान PA फरार का झाला? तुम्ही पोलिसांना का कळवले नाही? असे विविध प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केलेत. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 12:19 pm

महायुतीतील एकजूट केवळ कागदोपत्रीच:तळागाळातील कार्यकर्त्यांची नाराजी कमी न झाल्याने, संघटना स्तरावर तणाव

सातारा जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत यंदा अपेक्षेपेक्षा अधिक गोंधळाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी युती करत सामोपचाराचे चित्र उभे केले असले तरी, या दोन्ही गटांतील अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी मोठ्या प्रमाणात उसळली आहे. अनेक वर्ष निष्ठेने पक्षासाठी काम केले, निवडणुकांपासून सामाजिक उपक्रमांपर्यंत योगदान दिले, तरीही उमेदवारी दिली नाही, असा आरोप करत काही कार्यकर्त्यांनी थेट बंडखोरीचा मार्ग स्वीकारला आहे. दोन्ही राजेंच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधातच अपक्ष म्हणून उभे राहून त्यांनी निवडणुकीत खळबळ माजवली आहे. त्यामुळे साताऱ्यातील महायुतीतील एकजूट केवळ कागदोपत्रीच राहिली असल्याचे दिसून येत आहे. शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंचे मनोमिलन हे भाजपसाठी मोठे यश मानले जात होते. परंतु तळागाळातील कार्यकर्त्यांची नाराजी कमी न झाल्याने, संघटना स्तरावर मोठे तणाव निर्माण झाले आहेत. भाजपने अलीकडेच नवीन लोकांना पक्षात घेत मोठ्या मनाने तिकिटे दिली. या निर्णयाने जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी आणखी भडकली आहे. काही ठिकाणी कार्यकर्ते थेट पत्रकारांसमोर येत, वर्षानुवर्षे आम्ही दोन्ही राजेंच्या मागे धावलो, पण वेळ आली तेव्हा आम्हाला विसरले, असा आरोप करताना दिसत आहेत. अपक्ष उमेदवारांनी उभारलेली ही बंडखोरी 3 डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीत किती परिणाम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात नऊ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीमध्ये निवडणुकीचे घमासान सुरू आहे. सातारा, कराड, मलकापूर, वाई, फलटण, महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड, रहिमतपूर आणि मेढा नगरपंचायतीमध्ये प्रचार अत्युच्च बिंदूकडे पोहोचला आहे. प्रत्येक ठिकाणी स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात अनेक ठिकाणी थेट लढाई होत आहे. युती असली तरी तिकिटवाटपातील नाराजी आणि गटबाजी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे भाजपने राबवलेली व्यापक निवडणूक रणनीती तळागाळात अपेक्षित परिणाम करेल का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्व ठिकाणी एकाच महायुतीचे वेगवेगळे गट वाई, फलटण, रहिमतपूर आणि काही प्रमुख नगरपालिकांमध्ये तर युतीतील घटक पक्ष एकमेकांविरोधातच उभे राहिल्याचे चित्र दिसत आहे. वाई नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजप यांच्यात जोरदार सामना रंगला आहे. या ठिकाणी माजी आमदार मदन भोसले यांच्या गटाला जयकुमार गोरे यांच्या रसदीमुळे अधिक बळ मिळाले आहे. फलटणमध्ये अजित पवार आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी थेट रामराजे गटाला आव्हान दिले आहे. रहिमतपूरमध्ये अजित पवार, मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांनी सुनील माने यांना मोठा पाठिंबा दिला असून त्यांनी काँग्रेस व शिवसेना (शिंदे गट) यांना सोबत घेऊन भाजपच्या मनोज घोरपडेंना कठीण टक्कर दिली आहे. या सर्व ठिकाणी एकाच महायुतीचे वेगवेगळे गट एकमेकांविरोधात उभे राहिल्याने निवडणूक अधिकच रोचक बनली आहे. बंडखोर उमेदवारांचा प्रभाव निकालावर थेट परिणाम करू शकतो साताऱ्यातील ही संपूर्ण परिस्थिती पाहता, दोन्ही राजेंना, उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना, संघटनात्मक नाराजी आणि अपक्ष बंडखोर यांचा दुहेरी फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, या बंडखोर उमेदवारांचा प्रभाव काही ठिकाणच्या निकालावर थेट परिणाम करू शकतो. मोठे नेते एकत्र आले असले तरी तळागाळातील मतभेद न सुटल्यास युतीची ताकद कागदावर राहण्याचा धोका आहे. 3 डिसेंबरला मतमोजणीदरम्यान या बंडखोरांनी कोणाच्या मताधिक्यावर परिणाम केला, कोणत्या नगरपालिकेत सत्ता उलटली किंवा कोणत्या ठिकाणी युतीचा फायदा झाला, हे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. सातारा जिल्ह्यातील ही निवडणूक आता केवळ पक्ष विरुद्ध पक्ष एवढ्या पातळीवर न राहता, स्थानिक गटबाजी, नाराजी आणि नेतृत्वाची ताकद कोण टिकवते यावर अवलंबून राहिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 12:15 pm

मुंबईत हिंदू-मुस्लिम आणि मराठी-अमराठी वाद पेटवला जातोय:मतचोरीविरोधात लढाई कायम, आदित्य ठाकरेंचा भाजपवर आरोप

मुंबईतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिक तापायला लागले असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपवर थेट हल्ला चढवला. मुंबईत पराभव होण्याची भीती असल्याने भारतीय जनता पक्ष जाणूनबुजून समाजात मतभेद निर्माण करत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. मतचोरी, सेटिंग, निवडणूक आयोगात स्वतःची माणसे बसवणे आणि पैशांची उधळपट्टी करूनही मुंबईत विजय मिळणार नाही म्हणूनच भाजप फुटीचे राजकारण करत आहे, असे ते म्हणाले. हिंदू-मुस्लिम आणि मराठी-अमराठी वाद तापवून निवडणूक परिणामांवर परिणाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपचा राजकीय कार्यक्रम उघड करताना म्हटले की, पारदर्शक, स्वच्छ आणि निःपक्षपाती निवडणुका झाल्या तर मुंबईत भाजप टिकणे शक्य नाही. जिथे धर्मावर तणाव निर्माण होत नाही, तिथे जातीचा मुद्दा पुढे आणतात. आणि तेही अपयशी ठरले तर मराठी-अमराठी असा वाद पेटवण्याचा खेळ सुरू होतो, असा आरोप त्यांनी केला. मुंबईत विविध भाषिक आणि सांस्कृतिक समूह एकत्र राहतात; त्यांच्यात भेद निर्माण करण्याचा प्रकार अतिशय धोकादायक असून लोकांनी या पद्धतीविरुद्ध उभे राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी प्रारूप मतदार यादीत झालेल्या अनियमिततांवरही तिखट प्रतिक्रिया दिली. शहरातील अनेक घरांत अवास्तव संख्येने मतदार दाखवले गेले असल्याचे ते म्हणाले. एकेका घरात दहापेक्षा अधिक नावे, दुकानांमध्ये मतदार आणि अगदी सार्वजनिक शौचालयांच्या पत्त्यावरही मतदार नोंदवणे हा निव्वळ प्रकार नसून मोठा घोटाळाच आहे, असे ठाकरे यांनी म्हटले. मतदार याद्यांतील ही विसंगती निवडणुकीवर थेट परिणाम करू शकते, म्हणून तात्काळ चौकशी करून दुरुस्त्या केल्या पाहिजेत, असे त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली. त्यांनी नागरिकांनाही आपापली नावे व्यवस्थित आहेत का? याची खात्री करण्याचे आवाहन केले. राजकीय सोयीसाठी भूमिका बदलल्या जात असल्याची टीका या चर्चेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी पालघर साधू हत्याकांडातील आरोपी काशीनाथ चौधरीच्या भाजप प्रवेशाचा मुद्दाही उपस्थित केला. पालघर प्रकरणाचा वापर करून भाजपने महाविकास आघाडीवर सातत्याने आरोप केले. पण त्याच प्रकरणातील आरोपीला पक्षात घेणे आणि नंतर त्याच्या प्रवेशाला स्थगिती देणे म्हणजे भाजपची दुटप्पी भूमिका नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कायद्याचा सन्मान राखण्याऐवजी राजकीय सोयीसाठी भूमिका बदलल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली. हा प्रकार जनतेत चुकीचा संदेश देणारा असल्याचे ते म्हणाले. बिहारमधील मतचोरीही लवकरच समोर येईल भाजपकडून देशभरात मतचोरी होत असल्याच्या आरोपांनाही आदित्य ठाकरे यांनी दुजोरा दिला. हरयाणा आणि वरळी मतदारसंघातील अनियमितता आधीच उघड करण्यात आली असून, बिहारमधील मतचोरीही लवकरच समोर येईल, असा दावा त्यांनी केला. लोकशाही टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. दुबार, तिबार आणि बोगस मतदार शोधण्याचे काम आम्ही सतत करत आहोत. मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आमची लढाई पुढेही सुरू राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीत मतदारांनी जागरूक राहून योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहन करत त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 12:01 pm

बारामतीत 8 उमेदवार बिनविरोध!:आमचे उमेदवार 20-25 लाखांत फोडले, अजित पवार गटावर युगेंद्र पवारांचा गंभीर आरोप

बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच अजित पवार गटाच्या नगरसेवक पदाच्या 8 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी अजित पवार गटाकडून दबाव आणला जात आहे. तर आमच्या ज्या 4 उमेदवारांनी माघार घेतली त्यांना 20 ते 25 लाख रुपये प्रत्येकी देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. युगेंद्र पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी दबाव आणला जात आहे. 8 पैकी 4 जागांवर आमच्या पक्षाचे उमेदवार होते त्यांना 20 लाख रुपये देऊन फोडले अशी चर्चा आहे. आमचे उमेदवार हे सामान्य घरातील आहेत. त्यांनी 10 वर्षे जरी काम केले तरी त्यांना 20 लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही. आणि एवढं सहज येत 20 लाख 25 लाख जो काय आकडा देऊन तिथे 4 लोकांना फाडले असा आरोप त्यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या यांच्या विधानसभा मतदारसंघातील बारामती नगर परिषदेतील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. लोकसभा–विधानसभेप्रमाणेच दहशत युगेंद्र पवार म्हणाले की, बारामतीमध्ये जे लोकसभेला झाले, विधानसभेला झाले तेच आता नगरपालिका निवडणुकीतही होत आहे, आमच्याविरोधात मोठी शक्ती निवडणूक लढवत आहे. आमच्या ज्या चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यापैकी दोन उमेदवार नवीनच आपल्याकडे आलेले होते, ते कुठल्याही पक्षामध्ये नव्हते. जर आम्हाला संधी दिली तर आम्ही चांगले काम करून दाखवू असे ते म्हणाले होते. आम्हीही त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण ते फुटले. बरेच लोक हे मुद्दाम करण्यासाठी येतात. लोकसभेला आणि विधानसभेला ही दहशत आपल्याला पाहायला मिळाली होती. आता नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील तेच पाहायला मिळत आहे. सामान्य उमेदवारांवर दबाव युगेंद्र पवार म्हणाले की, आमचे उमेदवार हे सर्व छोटे व्यावसायिक आहेत. उच्च शिक्षित तरुण उमेदवार आपण दिलेले आहेत. त्यांच्यावरही दबाव आणला जात आहे. आमच्या समोर खूप मोठी शक्ती आहे. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, संस्था आहेत. हे सगळे तिथे काम करत असतात, त्यांच्यावर दबाव आणला जात असेल तर मग दोन-तीन लोक जाणार हे साहजिक आहे. जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल, चांगला मजबूत विरोधी पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर या वेळेला तुम्ही सामान्य घरातील लोकांना एकदा संधी देऊन बघा. अजित पवारांचे हे उमेदवार विजयी प्रभाग क्रमांक 2 अ मधून अनुप्रिति तांबेप्रभाग क्रमांक 5 अ मधून किशोर मासाळप्रभाग क्रमांक 6 अ मधून अभिजीत जाधवप्रभाग क्रमांक 8 अ मधून श्वेता नाळेप्रभाग क्रमांक 17 ब मधून शर्मिला ढवानप्रभाग क्रमांक 20 ब मधून आफ्रिन बागवानप्रभाग क्रमांक 18 अ मधून अश्विनी सुरज सातवप्रभाग क्रमांक 2 ब मधून अनुप्रिता रामलिंग तांबे डांगे

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 11:53 am

आधी कडाक्याचे भांडण नंतर वारंवार कॉल:अनंत गर्जेने कोस्टल रोडवरून गाडी का वळवली? दुसऱ्या पीएच्या फोनवरून व्यथित अवस्थेत कॉल

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला असून त्यांनी मध्यरात्री पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. या घटनेनंतर अनंत गर्जे यांची भूमिका आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्यात मोठी खळबळ उडवणारी घटना म्हणून वरळी बीडीडी चाळीत घडलेला डॉ. गौरी गर्जे- पालवे यांच्या मृत्यूचे प्रकरण वेगाने वळण घेत आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी यांनी घरात गळफास लावून आपले आयुष्य संपविल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. मात्र तिच्या कुटुंबीयांनी थेट अनंत आणि त्यांच्या घरच्यांवर मानसिक छळाचा आरोप केला आहे. यामुळे या प्रकरणावरून राज्यभरात चर्चांना उधाण आले आहे. अनंत गर्जे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास आता अधिक गतीने सुरू झालेला आहे. घटनाक्रम पाहता मृत्यूपूर्वी पती-पत्नीमध्ये तीव्र वाद झाल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्यानंतर अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमासाठी घरातून बाहेर पडले. ते कोस्टल रोडकडे जात असताना त्यांनी पत्नीला सातत्याने फोन केले, मात्र ती कॉल न उचलल्याने संशय निर्माण झाला. अनंत यांनी तात्काळ गाडी परत फिरवून घराकडे धाव घेतली. दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीतून आत पाहिले असता गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. या घटनेनंतर अनंत गर्जे यांनी रविवारी रात्री एक वाजता वरळी पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे. गौरीच्या कुटुंबीयांनी मात्र तिची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा ठपका ठेवत कठोर तपासाची मागणी केली आहे. अनंत गर्जे यांच्या कथित महिला संबंधांमुळे गौरीला मानसिक त्रास होत असल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक अंगांनी तपास करणे आवश्यक असल्याची भावना पोलिसांकडून व्यक्त होत आहे. मुंडे यांना दुसऱ्या पीएच्या फोनवरून व्यथित अवस्थेत कॉल या संपूर्ण घटनेनंतर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही निवेदन जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, 22 नोव्हेंबरच्या संध्याकाळी अनंत गर्जे यांनी दुसऱ्या पीएच्या फोनवरून त्यांना अत्यंत व्यथित अवस्थेत कॉल केला आणि पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. मुंडे यांनी याला धक्कादायक घटना म्हटले असून पोलिसांनी कोणतीही कसूर न करता तपास करावा, असे निर्देश दिले असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गौरीच्या वडिलांशी बोलून त्यांना धीर देण्याचाही प्रयत्न केला. एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू असते, हे समजणे कठीण असते, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. संपूर्ण प्रकरण राजकीयदृष्ट्याही संवेदनशील दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण राजकीयदृष्ट्याही संवेदनशील ठरत असून पुढील काही दिवसांत नवीन तथ्ये समोर येण्याची शक्यता आहे. वरळी पोलिस या प्रकरणाचे तांत्रिक पुरावे, कॉल डिटेल्स, घटनास्थळावरील परिस्थिती आणि कुटुंबीयांचे जबाब यांच्या आधारे तपास पुढे नेत आहेत. गौरी पालवे यांच्या मृत्यूने समाजातही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. वैयक्तिक आयुष्यातील ताणतणाव, नातेसंबंधातील तणाव आणि मानसिक आरोग्याचे प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत. हे प्रकरण नेमके कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 11:35 am

ठाकरे गटाला लातूर जिल्ह्यात जबर झटका:रेणापूर नगरपंचायतीत 16 पैकी 11 उमेदवारांची माघार; पक्षावर सहकार्य न करण्याचा केला आरोप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत जबर झटका बसला आहे. पक्षाच्या येथील 16 पैकी 11 उमेदवारांनी पक्षावर सहकार्य न करण्याचा ठपका ठेवत निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. आता हे उमेदवार या निवडणुकीत तटस्थ राहतील. राज्यात सध्या 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांचा फड रंगला आहे. यात रेणापूर नगरपंचायतीच्या रणधुमाळीचाही समावेश आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने येथे 16 उमेदवार दिले होते. पण आता यापैकी 11 उमेदवारांनी अचानक निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. माघार घेतेल्या उमेदवारांत ललिता बंजारा या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचाही समावेश आहे. याशिवाय अनुसया कोल्हे, महेश व्यवहारे, गोविंद सुरवसे, रेखा शिंदे, रेहानबी कुरेशी, छाया आकनगीरे, राजन हाके, धोंडीराम चव्हाण, शांताबाई चव्हाण व बाबाराव ठावरे यांचाही माघार घेणाऱ्या उमेदवारांत समावेश आहे. वरिष्ठांच्या निवडणूक ताकदीने लढण्याच्या सूचना, पण... उल्लेखनीय बाब म्हणजे ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या सर्वच उमेदवारांना नगरपंचायतीची निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचे आदेश दिले होते. पण उमेदवारांनी पक्षातील अडथळ्यांमुळेच आमच्यावर माघार घेण्याची वेळ आल्याचा आरोप केला आहे. रेणापूर नगरपंचायतीची 2016 मध्ये स्थापना झाली. त्यानंतर 2017 मध्ये येथे निवडणुका झाल्या होत्या. पहिल्या निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली. त्यानंतर 3 वर्षे प्रशासकांचा काळ राहिला. यंदा याठिकाणी भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट व राष्ट्र्रवादीच्या शरद पवार गटात चौरंगी लढत होणार आहे. पण ठाकरे गटाच्या 11 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे या निवडणुकीला वेगळाच रंग चढला आहे. उमेदवारांच्या माघारीमागे काँग्रेसचा हात दुसरीकडे, लातूर ग्रामीणचे काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी भाजपला आव्हान देण्यासाठी या 11 उमेदवारांना माघार घेण्यास सांगून शिवसेनेला दुबळे केल्याचा आरोप केला जात आहे. विरोधकही असाच आरोप करत आहेत. ठाकरे गटाच्या 11 उमेदवारांना स्थानिक पातळीवर आपल्या बाजूने वळवण्यासाठी माघार घ्यायला लावणे ही काँग्रेसचीच खेळी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. अहमदपूर नगरपरिषदेतही घडामोडींना वेग दुसरीकडे, अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील भाजपाचे सर्व आमदार या प्रकरणी एकत्र येत आहेत. यासंबंधी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना राजकीयदृष्ट्या घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीत गद्दारी केली. आता गद्दारांना क्षमा नाही असे विधान भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे. त्यामुळे येथील वातावरण चांगलेच तापले आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 11:31 am

साधना ताई, चव्हाण, सावकारेंच्या पत्नींची उमेदवारी घराणेशाही नाही का?:नगराध्यक्ष तिकीट वाटपावरून एकनाथ खडसेंचा भाजपावर हल्लाबोल

मंत्री गिरीश महाजन, सावकारे आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नींना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली. हे लोक माझ्यावर घराणेशाहीचा आरोप करत होते पण आता यांच्या पत्नींना उमेदवारी मिळाली तर घराणेशाही नाही का? असा सवाल करत एकनाथ खडसेंनी भाजपच्या दुहेरी भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, साधना ताईंना बिनविरोध निवडून आणले ही घराणेशाही आहे का नाही? असा सवाल खडसेंनी केला आहे. तुम्ही जे घडले ते माझ्यामुळे घडले असे चित्र आहे असेही त्यांनी म्हटले आहे. नेमके खडसे काय म्हणाले? एकनाथ खडसे म्हणाले की, गिरीश महाजन यांनी माझ्यावर नेहमी आरोप केला की मी घराणेशाही राबवतो. रक्षा खडसे-रोहिणी खडसे यांच्या राजकारणातील सहभागावरही त्यांनी माझ्यावर हे आरोप केले आहे. बरं झाले त्यांची पत्नी निवडून आल्यापासून त्यांना तोंड बंद झाले आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. सावकारे यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली ते मंत्री आहेत तिकीट मंत्र्यांच्या बायकोला देण्यात आले आहे. आम्ही केली तर घराणेशाही आणि आता तुम्ही करता आहेत ते काय आहे असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे. साधना ताईंना बिनविरोध निवडून आणले ही घराणेशाही आहे का नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपचे मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या पत्नीला तिकीट दिले ही घराणेशाही आहे का नाही? पाचोऱ्याचे आमदार किशोर अप्पा यांनीही त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली मग ही घराणेशाही नाही का? असा सवाल खडसेंनी केला आहे. तुम्ही जे घडले ते माझ्यामुळेच एकनाथ खडसे म्हणाले की, तुम्ही सर्वांनी इतके दिवस माझी टिंगल केली खरंतर माझी 40-50 वर्षांची मेहनत आहे. तुम्ही जे घडले ते माझ्यामुळे घडले असे चित्र आहे. माझ्यावर टीका करत असताना घराणेशाहीचा आरोप करत असताना आता तुम्ही कुठे गेले. महाभारतामध्ये एक म्हण आहे की तेव्हा कोठे गेला होता राधासूता तुझा धर्म? असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. तुम्ही घराणेशाही केली नाही का? एकनाथ खडसे म्हणाले की, अनेक कार्यकर्त्यांना नगराध्यक्षपदी उमेदवारी मिळावी असे वाटत होते पण त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. या लोकप्रतिनिधींच्या पत्नींना उमेदवारी देण्यात आली. प्रमोद नेमाडे सारखे अनेक जण यासाठी इच्छूक होते,पण त्यांना संधी मिळाली नाही. खडसेंनी एकतरी नगरपंचायत निवडून आणून दाखवावी- महाजन गिरीश महाजन यांनी यावेळी एकनाथ खडसे यांना जिल्ह्यातील एखादी तरी नगरपंचायत निवडून आणून दाखवण्याचेही आव्हान दिले. आता एकनाथ खडसेंचे काहीही शिल्लक राहिले नाही. जिल्ह्यात निकाल लागल्यानंतर कुणाची ताकद किती अर्थात ठाकरे गटाची ताकद किती, काँग्रेसची ताकद किती व शरद पवारांच्या पक्षाची ताकद किती हे कळेल. खडसेंनी जिल्ह्यातील एखादी तरी नगरपालिका निवडून आणून दाखवावी, असे ते म्हणाले. एकनाथ खडसे सध्या कोणत्या पक्षात आहेत हे ही कळत नाही. त्यांच्याविषयी बोलण्यासारखे आता काहीही राहिले नाही. खडसेंनी लोकसभा निवडणुकीत आपल्या सुनेला मदत केल्याचा दावा केला. ते प्रत्येक निवडणुकीत स्वतःची भूमिका बदलत असतात. एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि घरातल्या घरात राजकारण करायचे असे त्यांचे सध्या चालले आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 11:16 am

गौरी गर्जे प्रकरणात पंकजा मुंडेंचे स्टेटमेंट धक्कादायक:तुमचा पुत्र समान PA फरार का झाला? तुम्ही पोलिसांना का कळवले नाही? - दमानिया

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी डॉक्टर गौरी पालवे - गर्जे आत्महत्या प्रकरणात मंत्री पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी या प्रकरणी पंकजांवर विविध प्रश्नांची सरबत्ती करत एकप्रकारे त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे अधोरेखित केले आहे. अनंत गर्जे हा तुम्हाला मुलासारखा होता ना? मग सेलटमेंट करा म्हणून पोलिस ठाण्यात कोण गेले होते? याची चौकशी करण्याची मागणी तु्म्ही करणार का? तुमचा पुत्र समान PA फरार का झाला? तुम्ही पोलिसांना का कळवले नाही? असे विविध प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केलेत. डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या नसून हत्या:करुणा मुंडे शर्मा यांचा दावा; या प्रकरणात हात असणाऱ्यांच्या सखोली चौकशीची केली मागणी पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे - गर्जे यांनी शनिवारी सायंकाळी वरळी स्थित आपल्या राहत्या गळफास लावून आत्महत्या केली होती. अनंत गर्जे व गौरी यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. पण त्यानंतर अनंतचे कथित विवाहबाह्य संबंध असल्याची बाब गौरी यांच्या निदर्शनास आली होती. या अनैतिक संबंधांना कंटाळून गौरी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. या प्रकरणी गौरी यांच्या माहेरच्या लोकांनी अनंत गर्जे यांच्यासह त्यांची बहीण शीतल गर्जे - आंधळे व दीर अजय गर्जे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमासह इतर प्रकरणांत गुन्हा दाखल केला आहे. अनंत सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तुम्ही घटनास्थळी का गेला नाहीत? अंजली दमानिया म्हणाल्या, पंकजा मुंडे यांचे कालचे स्टेटमेंट वाचून धक्का बसला. संध्याकाळी 6.30 ते 6.45 पीए अनंत चा फोन, दुसऱ्या पीए च्या फोन वर आला, तो खूप रडत होता, पत्नीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्यांनी तुम्हाला सांगितले, तर तुम्ही पुढे काय केलं? तुम्ही घटनास्थळी का गेला नाहीत, तुम्हाला जमत नव्हते, तर तुमच्या कार्यालयाकडून कोणी उपस्थित का नव्हते? तुमच्या कार्यालयाने हे पोलिस ला कळविले का? पुत्रसमान पीएला तत्काळ मदतीला का गेला नाहीत? तुमचा पुत्र समान पीए नायर हॉस्पिटल मधून गायब का झाला? जर ही आत्महत्या होती तर सासरच्या लोकांपैकी एकही व्यक्ती का हजार नव्हते? आई-वडील तरी 3.30 ला बीड हून मुंबईला पोहोचले, पण पोलिसांनी सकाळी 7 वाजेपर्यंत तक्रार का घेतली नाही? आपण पोलिस स्टेशन ला येऊन, नायर हॉस्पिटल ला येऊन, परिवाराची मदत का केली नाही? पुत्रसमान होता ना अनंत? मग सेटलमेंट करा म्हणून सांगायला पोलिस स्टेशनवर कोण गेले होते ह्याच्या चौकशीची मागणी तुम्ही करणार का? सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार का? तुम्ही रविवारी दुपारपर्यंत यावर काहीच का बोलता नाहीत? सगळ्यात महत्वाचे म्हणजे, काल दुपारपर्यंत तुम्ही ह्यावर काहीच का बोलला नाही? त्याच्या लग्नात उपस्थित राहून ट्वीट केलेत, मग पत्नीचा मृत्यू झाल्यावर संध्याकाळी 6.45 पासून काहीच का बोलला नाहीत? त्या पालवे कुटुंबाला तुमची मदत का झाली नाही हे स्पष्ट करावे ही विनंती. मला ह्यात राजकारण आणायचं नव्हत्ते, पण, मी माध्यमांशी बोलताना, तुम्ही फोन न केल्याच्या उल्लेखनानंर तुम्ही वडिलांशी बोलत त्याबद्दल धन्यवाद, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. आत्ता पाहू काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे? पंकजा मुंडे या प्रकरणी म्हणाल्या होत्या, काल दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6.30 ते 6.45 वा. सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला. तो खूप रडत होता. पत्नतीने आत्महत्या केल्याचे अत्यंत आक्रोशाने त्याने मला सांगितले. ही गोष्ट माझ्यासाठी ही खूप धक्कादायक होती. पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये व त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावे असे माझे म्हणणे आहे. तसे मी पोलिसांना देखील सांगितले आहे. गौरीच्या वडिलांशीही मी बोलले. ते प्रचंड दुःखात आहेत हे मी समजू शखते. अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात. कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असते हे अनाकलनीय आहे. अचानक धक्कादायक अशी ही घटना घडली असल्याने मलाही अस्वस्थ वाटत आहे. गौरीने आत्महत्या केली तेव्हा अनंत गर्जे कुठे होता? घटना घडली त्यावेळेस मी घरी नव्हतो, घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतील बाजूने बंद होते. घाबरुन इमारतीच्या 31व्या मजल्यावरुन खिडकीच्या माध्यमातून मी 30 व्या मजल्यावरील माझ्या घरात प्रवेश केला, तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती, असे अनंत गर्जेने सांगितले आहे. मुलीला समजावून सांगा, असा फोन अन् आत्महत्या अनंत गर्जेने गौरीचे वडील अशोक पालवे यांना फोन करून तुमची मुलगी आत्महत्या करतेय तिला समजावून सांगा असा फोन केला होता. त्यावेळी वडिलांनी गौरीकडे फोन द्या असे सांगितले. पण नंतर अनंत म्हणआला की, मी तिला दवाखान्यात घेऊन जात आहे. पण लगेचच अनंत गर्जेने गौरीच्या आईला फोन करुन त्यांच्या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले. यानंतर पालवे कुटुंबीय तडक मुंबईकडे निघाले. गौरीच्या आईने 50 हून अधिक फोन केले. पण अनंतने एकाही फोनचे उत्तर दिले नाही, अशी माहिती समोर आली आहे. एक कागद सापडला अन् सर्वकाही बदलले गत सप्टेंबर महिन्यात अनंत गर्जे व गौरी गर्जे यांनी राहते घर बदलले. त्यावेळी गौरीला काही कागदपत्र सापडले. त्यात एका महिलेचा पती म्हणून अनंत गर्जेच्या नावाचा उल्लेख होता. ही बाब गौरीने तिच्या वडिलांना सांगितली. त्यावर तुझे आई-वडील मला जाब विचारायला आले तर मी चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन आणि चिठ्ठीमध्ये तुझ्या नावाचा उल्लेख करेन, अशी धमकी अनंतने तिला होती, असेही या प्रकरणी सांगितले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 10:51 am

वाॅर्डन वाढवले, बॅरिकेड्समुळे फुटली काेंडी:गाेविंदनगरला दाेन्ही बाजूंच्या समांतर रस्त्यांवर 50 पोलिस कर्मचारी तैनात

नाशिक गाेविंदनगर बोगदा वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर शनिवारी (दि. 22) मुंबईनाका परिसरात 5 ते 6 तास कोंडी हाेऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. कोंडी कशामुळे झाली याची ‘दिव्य मराठी’ने पडताळणी केल्यानंतर ग्रेड सेपरेटर फ्लायओव्हरचे काम सुरू करण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पोलिसांच्या अटी व शर्तींचे पालन न करताच काम सुरू केल्याने वाहतुकीचा बोजवरा उडाल्याचे समाेर आले. याबाबत रविवारी (दि. 23) ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी केली असता, दाेन्ही बाजूंच्या समांतर रस्त्यावर जागाेजागी 50 हून अधिक पाेलिस कर्मचारी आणि त्यांच्यासाेबत ट्राफिक वाॅर्डन तैनात असल्याचे दिसून आले. उशिराने जाग आलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने काेंडी फाेडण्यासाठी वार्डन संख्या चारवरून 8 केल्याने वाहतूक सुरळीत असल्याचे सायंकाळी दिसून आले. संपूर्ण मार्गावर सूचनाफलक लावल्यात येणार आहेत. रविवारी लेखानगर, गाेविंदनगर बाेगदा, मुंबईनाका येथे ‘प्रवेश बंद, एकेरी मार्ग’ याबाबतचे सूचना फलक लावण्यात आले. यामुळे सकाळचा अपवादवगळता दिवसभर या मार्गावर वाहतूक सुरळीत असल्याचे दिसून आले. वेळेत काम पूर्ण व्हावे पाेलिसांसह महामार्ग प्राधिकरणने काम पूर्ण हाेईपर्यंत या भागात बंदाेबस्त ठेवावा. वेळेत काम पूर्ण व्हावे. जेणेकरून वाहनधारकांची गैरसाेय टळेल. - अनूज उदावंत, वाहनचालक कर्मचारी संख्या वाढवली कोंडी फोडण्यासाठी वाहतूक आणि शहर पोलिसांची संख्या वाढवली आहे. गाेविंदनगर भागातील दाेन्ही बाजूंच्या समांतर रस्त्यांवर पुरेसे कर्मचारी नियुक्त केले आहेत. नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही सुरू आहे. - अद्विता शिंदे, सहायक आयुक्त, वाहतूक अटी-शर्तींचे पालन सुरू एकेरी, तसेच पर्यायी मार्गावर जागाेजागी सूचना फलक लावत आहाेत. जसे जसे काम सुरू आहे, तसे उपाययाेजनांकडेही लक्ष दिले जात आहे. ट्राफिक वाॅर्डन, बॅरिकेड‌िंगही वाढवले आहे. - श्रीकांत ढगे, प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे आढळले ‘दिव्य मराठी’च्या पडताळणीत.. गाेविंदनगर बाजूकडील समांतर रस्त्यावर एकेरी मार्ग केल्यानंतर पाेलिस कर्मचारी नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना दिसून आले.वेळ 5 : 37 वा.मुंबईनाक्यावर पाेलिसांकडून कारवाईबाेगद्याच्या दुतर्फा बॅरिकेडिंग व ट्राफिक वार्डन नियुक्त करण्यात आले. त्यांच्याकडून वाहतून नियमन केले गेल्याने काेंडी फुटली.वेळ 4 : 46 वा.बाेगद्याच्या दुतर्फा ट्राफिक वाॅर्डन नियुक्तलेखानगर यू टर्नवर बॅरिकेड‌्स लावण्यात येऊन एकेरी मार्ग, प्रवेश बंदचे फलकही लावण्यात आले. पाेलिस कर्मचारी व वार्डन उभे हाेते.वेळ 5 : 13 वा.लेखानगर यू टर्नवर बॅरिकेड्स व फलकएकेरी मार्ग करण्यात आल्यानंतरही इंदिरानगरकडून मुंबईनाक्याकडे विरुद्ध दिशेने धावणारी वाहने. रस्त्यावर कुठेही सूचनाफलक नाहीत.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 10:33 am

दिव्य मराठी अपडेट्स:मुंबई-देहरादून इंडिगो फ्लाइटची लँडिंगदरम्यान पक्ष्याशी टक्कर; सर्व 186 प्रवासी सुरक्षित

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 10:31 am

कुंभमेळा तयारीत मोठी झाडतोड:1862 वृक्षतोडीबाबत आज सुनावणी; पर्यावरणप्रेमींकडून 900 हरकती दाखल

नाशिक सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर तपाेवन परिसरात साधुग्राम साकारण्यासाठी पालिकेच्या वतीने 1862 वृक्षतोडले जाणार आहे. या विराेधात तब्बल 900 हुन अधिक हरकती दाखल झाल्या आहेत. साेमवारी (दि. 24) पंचवटीतील पलुस्कर सभागृहात दुपारी 12 पासून सुनावणी घेण्यात येणार आहे. ही वृक्षतोड थांबवावी यासाठी 900 हून अधिक नाशिककर‎पर्यावरणप्रेमींची वृक्ष ताेड करु‎नये अशी मागणी हाेत आहे.‎याबाबत प्रशासनाने याेग्य निर्णय‎घ्यावा.- महंत भक्तीचरण‎दास‎ नाशिकचा विचार नाही साधूग्रामसाठी झाडं तोडण्याच टेंडर, पुन्हा साधुग्रामच वेगळं टेंडर आणि पुन्हा 1च्या बदल्यात 10 झाडे लावण्यासाठी टेंडर” यातच संबंधितांना रस आहे. नाशिकचा विचार काेणीच करत नाही. - राजाभाऊ वाजे, खासदार प्रशासन याेग्य निर्णय घेईल तपाेवन परिसरात 54 एकर जागा कुुंभमेळ्यासाठी राखीव आहे. त्याच ठिकाणी साधुमहंतांची निवास व्यवस्था केली जाते. या परिसरातील वृक्षताेडीबाबत दाखल हरकतीबाबत प्रशासन याेग्य निर्णय घेईल. -देवयानी फरांदे, आमदार साधूग्राम उभारणेही गरजेचे‎ तपाेवनातील ५६ एकर जागा ही वर्षांनुवर्ष कुंभमेळ्यातील साधूग्रामसाठी‎आरक्षित केलेली आहे. या जागेवरील काही प्रमाणात वृक्षांची ताेड‎करण्याबाबत कुंभमेळा मंत्री आणि प्रशासनाकडून याेग्य ताे ताेडगा काढला‎जाईल.- आमदार राहुल ढिकले‎ साधुग्राम कुठे उभारणार‎ कुंभमेळ्यासाठी आलेल्या‎साधू-महंतांसाठी त्या ठिकाणी‎ आखाडे उभारले जातात.‎पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष‎महत्त्वपूर्ण आहे मात्र साधुग्राम कुठे‎करणार, असा प्रश्न निर्माण हाेईल.‎-सीमा हिरे, आमदार‎

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 10:22 am

डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या नसून हत्या:करुणा मुंडे शर्मा यांचा दावा; या प्रकरणात हात असणाऱ्यांच्या सखोली चौकशीची केली मागणी

मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे - गर्जे यांची आत्महत्या नसून, त्यांची हत्या झाल्याचा दावा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी अनंत गर्जे यांच्यासह या प्रकरणाच्या मागे असणाऱ्या सर्वांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे - गर्जे यांनी शनिवारी सायंकाळी वरळी स्थित आपल्या राहत्या गळफास लावून आत्महत्या केली होती. अनंत गर्जे व गौरी यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. पण त्यानंतर अनंतचे कथित विवाहबाह्य संबंध असल्याची बाब गौरी यांच्या निदर्शनास आली होती. या अनैतिक संबंधांना कंटाळून गौरी यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. या प्रकरणी गौरी यांच्या माहेरच्या लोकांनी अनंत गर्जे यांच्यासह त्यांची बहीण शीतल गर्जे - आंधळे व दीर अजय गर्जे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमासह इतर प्रकरणांत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी अनंतला अटकही केली आहे. त्या दिवशी मध्यरात्री मला एकाचा फोन आला या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे शर्मा यांनी सोमवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांची आत्महत्या नसून, हे हत्येचे प्रकरण आहे असा दावा केला आहे. त्या म्हआल्या, आज महाराष्ट्रात महिलांच्या बाबतीत काय घडत आहे? बीडमध्ये महिलांची परिस्थिती इतकी बिकट आहे की, त्यांचे शारीरीक, मानसिक व आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यानंतरही शासन त्याची काही दखल घेत नाही. मला दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री म्हणजे गौरीची 'हत्या' ज्या दिवशी झाली त्या दिवशी एक फोन आला होता. तेव्हा तिच्या एका नातेवाईकाने पोलिस तक्रार नोंदवून घेत नसल्याची तक्रार केली होती. त्यावर मी फोन पोलिसांना फोन देण्यास सांगून पोलिसांना तक्रार दाखल करून घेण्याची विनंती केली होती. गौरी खूप चांगली मुलगी होती. ती शिकलेली होती. डॉक्टर होती. ती कशाला उगीच आत्महत्या करेल? आज राज्यात काय होतंय हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे. अनंत गर्जेला अटक झाली आहे. पण या मागे अजून कोण आहेत याचीही सखोल चौकशी होण्याची गरज आहे. ही आत्महत्या नव्हे तर हत्या आहे करुणा शर्मा पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रात डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण झाले. महिलांचे सातत्याने बळी जात आहेत. पण त्यानंतरही शासन, प्रशासन गप्प आहे. महाराष्ट्रातील अशा वाढत्या घटना पाहून मी निःशब्द आहे. आज बीडमध्ये जे काही सुरू आहे त्यावर शासन, प्रशासन कोणतेही पाऊल उचलत नाही. त्याची गंभीर दखल घेत नाही. ही आत्महत्या नव्हे तर हत्या आहे. माझे त्यांच्या आई-वडिलांशी बोलणे झाले नाही. मी आज त्यांची भेट घेऊन पुढे काय करायचे यावर चर्चा करेन. हे ही वाचा... मंत्री पंकजा मुंडे यांच्या PA ला अटक:पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा ठपका, मध्यरात्री 1 वाजता आला वरळी पोलिसांना शरण मुंबई - राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे PA अर्थात स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांना स्वतःच्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गर्जे रविवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास स्वतःहून पोलिसांना शरण आले होते. आज त्यांना कोठडीसाठी पोलिस कोर्टात उभे करणार आहेत. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 10:14 am

छत्रपती संभाजीनगरात वाहतूक पोलिसावर रिक्षा चढवली:20 फूट फरफटत नेले, अंमलदार गंभीर जखमी, पाठलागात दुचाकीला धडक, अखेर अटक

भगवान महावीर चौकात एका रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर रिक्षा घालून 20 फूट फरफटत नेले. रविवारी (23 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजता ही थरारक घटना घडली. या हल्ल्यात छावणी वाहतूक शाखेचे अंमलदार तुकाराम टाकसाळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक सचिन मिरधे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक युसूफ मोहंमद अली अन्सारी (27, रा. मोमीनपुरा) असे आरोपीचे नाव आहे. अंमलदार टाकसाळे हे पंचवटी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर ड्यूटीवर होते. त्यांनी युसूफला विना-गणवेश रिक्षा (एमएच 20 ईके 4632) चालवताना पाहून थांबण्याचा संकेत दिला. मात्र, युसूफने थांबण्याऐवजी रिक्षा टाकसाळे यांच्यावरच घातली. यात अंमलदार गंभीर जखमी झाले. पाठलाग करतानाही धुमाकूळ टाकसाळे यांना जखमी करूनही युसूफ पळतच राहिला. पोलिस पाठलाग करत असताना एका दुचाकीस्वारालाही धडक दिली. एवढ्यावरही तो थांबला नाही. रिक्षातील तीन प्रवाशांपैकी एक जणही रस्त्यावर पडला, तरी चालकाने रिक्षा न थांबवता पळ काढला. पोलिसांनी रिक्षाचा नंबर ओळखून त्याला अटक केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:49 am

मंत्री पंकजा मुंडे यांच्या PA ला अटक:पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा ठपका, मध्यरात्री 1 वाजता आला वरळी पोलिसांना शरण

राज्याच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे PA अर्थात स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांना स्वतःच्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गर्जे रविवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास स्वतःहून पोलिसांना शरण आले होते. आज त्यांना कोठडीसाठी पोलिस कोर्टात उभे करणार आहेत. अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे - गर्जे यांनी शनिवारी सायंकाळी वरळी स्थित आपल्या राहत्या गळफास लावून आत्महत्या केली होती. अनंत गर्जे व गौरी यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. पण त्यानंतर अनंत यांचे कथित विवाहबाह्य संबंध असल्याची बाब गौरी यांच्या निदर्शनास आली होती. या अनैतिक संबंधांना कंटाळून गौरी यांनी हे पाऊल उचलले होते. या प्रकरणी गौरी यांच्या माहेरच्या लोकांनी अनंत गर्जे यांच्यासह त्यांची बहीण शीतल गर्जे - आंधळे व दीर अजय गर्जे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमासह इतर प्रकरणांत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अनंत हे फरार झाले होते. अखेर अनंत गर्जे रविवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास स्वतःहून वरळी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना आज कोर्टापुढे हजर करून त्यांची पोलिस कोठडी मागण्यात येणार आहे. यावेळी पोलिसांकडून कोर्टात काय युक्तिवाद केला जाईल? व त्याला गर्जे यांच्याकडून काय प्रत्युत्तर दिले जाईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या युक्तिवादातूनच या प्रकरणाची खरी माहिती समोर येणार आहे. गौरीने आत्महत्या केली तेव्हा अनंत गर्जे कुठे होता? घटना घडली त्यावेळेस मी घरी नव्हतो, घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतील बाजूने बंद होते. घाबरुन इमारतीच्या 31व्या मजल्यावरुन खिडकीच्या माध्यमातून मी 30 व्या मजल्यावरील माझ्या घरात प्रवेश केला, तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती, असे अनंत गर्जेने सांगितले आहे. मुलीला समजावून सांगा, असा फोन अन् आत्महत्या अनंत गर्जेने गौरीचे वडील अशोक पालवे यांना फोन करून तुमची मुलगी आत्महत्या करतेय तिला समजावून सांगा असा फोन केला होता. त्यावेळी वडिलांनी गौरीकडे फोन द्या असे सांगितले. पण नंतर अनंत म्हणआला की, मी तिला दवाखान्यात घेऊन जात आहे. पण लगेचच अनंत गर्जेने गौरीच्या आईला फोन करुन त्यांच्या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले. यानंतर पालवे कुटुंबीय तडक मुंबईकडे निघाले. गौरीच्या आईने 50 हून अधिक फोन केले. पण अनंतने एकाही फोनचे उत्तर दिले नाही, अशी माहिती समोर आली आहे. एक कागद सापडला अन् सर्वकाही बदलले गत सप्टेंबर महिन्यात अनंत गर्जे व गौरी गर्जे यांनी राहते घर बदलले. त्यावेळी गौरीला काही कागदपत्र सापडले. त्यात एका महिलेचा पती म्हणून अनंत गर्जेच्या नावाचा उल्लेख होता. ही बाब गौरीने तिच्या वडिलांना सांगितली. त्यावर तुझे आई-वडील मला जाब विचारायला आले तर मी चिठ्ठी लिहून आत्महत्या करेन आणि चिठ्ठीमध्ये तुझ्या नावाचा उल्लेख करेन, अशी धमकी अनंतने तिला होती, असेही या प्रकरणी सांगितले जात आहे. अनंत गर्जे यांनी जारी केले निवेदन दुसरीकडे, अनंत गर्जे यांनी या घटनेविषयी एक निवेदन जारी करून आपण पोलिसांच्या चौकशीस तयार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, पत्नीच्या दुर्दैवी व मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर अनंत गर्जे 24 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री वरळी पोलिस ठाण्यात हजर झाले. कायद्याची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य रितीने पार पडावी यासाठी अनंत गर्जे यांनी स्वखुशीने पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. तपासाला सहकार्य करण्यासाठी त्यांनी स्वतःहून पोलिसांपुढे हजर होण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण प्रकणाचा तपास निष्पक्ष व्हावा व सत्य जनतेपुढे यावे यासाठी ते तपास यंत्रणांना आवश्यक ती सर्व माहिती व मदत करण्यास तयार आहेत. अंजली दमानियांचे मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून उचलण्यात येणाऱ्या पावलांवर गंभीर शंका उपस्थित केली आहे. गौरी पालवे यांच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांना वेदना सहन कराव्या लागत आहेत. गौरीने गळफास लावून घेतल्यानंतर अनंत गर्जे यांनी तिचा मृतदेह नायर रुग्णालयात आणला. त्यावेळीच पोलिसांनी त्यांना अटक का केली नाही? त्यावेळी त्यांना का सोडून देण्यात आले? असे विविध प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:31 am

देश सशक्त, आत्मनिर्भरसाठी एकात्मतेशिवाय पर्याय नाही:उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिला एकतेचा संदेश‎

देश सशक्त व आत्मनिर्भर होण्यासाठी प्रत्येकाने आपसातील मतभेद, जात-पात विसरून मी भारतीय आहे, एवढेच लक्षात ठेवून एकात्मतेने नांदावे. देशाला सर्व स्तरावर आत्मनिर्भर बनवण्यासाठी परिश्रम करणे गरजेचे आहे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाला व कार्याला डोळ्यासमोर ठेऊन देशाच्या उज्वल भविष्यासाठी पदभ्रमण करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी केले. ते युनिटी मार्चच्या समारोप प्रसंगी बोलत होते. या मार्चमधून एकतेचा संदेश देण्यात आला. प्रारंभी लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन' औचित्य साधून यापूर्वी पोलिस दलातर्फे जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सार्वजनिक ठिकाणी पोलिस बँड पथकाचे देशभक्ती पर सादरीकरण, वॉक, शपथ असे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पोलिस मुख्यालयात जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत पोलिसांनी आयोजित केलेल्या रन फॉर युनिटी' या ३ किमी धावण्याच्या उपक्रमात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, शनिवारी मूर्तिजापूर येथे समारोप कार्यक्रम तालुका क्रीडा संकुल येथे पार पडला. कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच युवक, युवती, नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाला तहसीलदार शिल्पा बोबडे, मेरा युवा भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी महेश सिंह शेखावत, प्रा. मनीषा यादव, प्रा. गोरखेडे, प्राचार्य खाडे, मुख्याध्यापक राठोड आदी उपस्थित होते. उपस्थितांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे उपस्थित हस्ते पूजन करून हरार्पण करण्यात आले. त्यानंतर पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचे संचालन विलास नसले यांनी केले. पदयात्रेत मेरा युवा भारत केंद्राचे तालुका समन्वयक विलास वानखडे यांच्यासह शासकीय कर्मचारी, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, पोलिस कर्मचारी, विविध शाळेचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, एनर्जेटिक फिटनेस कल्ब, पतंजली योग समिती, फौजी फिजिकल अकॅडमी, जीके अकॅडमी, सोल्जर फिटनेस अकॅडमी इत्यादींनी सहभाग घेऊन एकतेचा संदेश दिला. प्रास्ताविक महेश सिंह शेखावत यांनी केले. आभार ज्ञानेश टाले यांनी मानले केले. अशी निघाली पदयात्रा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त शनिवारी युनिटी मार्च या पदयात्रेला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून उपविभागीय अधिकारी अपार यांच्या हस्ते पदयात्रेला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली होती. पदयात्रा श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय, भगतसिंग चौक, आठवडे बाजार, तहसील कार्यालय मार्गाने काढण्यात आली. समारोप क्रीडा संकुलात करण्यात आला. विविध शाळांचे विद्यार्थी तसेच फौजी अकॅडमी आणि मेजर अकॅडमीचे युवा विविध संदेशाचे फलक हाती घेऊन पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:29 am

शिक्षक पात्रता परीक्षा झाली सुरळीत; 814 परीक्षार्थी राहिले अनुपस्थित:पेपर एक 5,530 तर पेपर दोनला 8,856 उमेदवार हाेते उपस्थित‎

जिल्ह्यात रविवारी ३६ केंद्रांवर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत जिल्ह्यात पेपर एकसाठी ५ हजार ८६५ तर पेपर दोनसाठी ९ हजार ३६५ नोंदणी केली. यापैकी पेपर एकसाठी ५ हजार ५३० तर पेपर दोनसाठी ८ हजार ८५६ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. तर या दोन्ही सत्रातील पेपरला ८१४ उमेदवार हे विविध कारणांनी गैरहजर राहिले. ही परीक्षा सर्व केंद्रांवर सुरळीतपणे पार पडली. असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.सर्व परीक्षा केंद्रांवर निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते.तत्पूर्वी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. यामध्ये जिल्हा परिषद कन्या शाळा, ज्ञानमाता हायस्कूल आणि होली क्रॉस शाळा आदींचा समावेश आहे. ही परीक्षा सुरळीत होण्यासाठी उर्वरित. पान ४

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:12 am

वीकेंडमुळे गजबजली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे‎:मेळघाट व्याघ्र प्रकल्प, चिखलदरा व इतर पर्यटनस्थळांवर वाढली गर्दी‎

दिवाळी झाली तशी थंडीला सुरुवात झाली. काही दिवसांच्या तुलनेत यंदा थंडीही काहीशी कमी झाली, त्यामुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन व धार्मिक स्थळे पर्यटकांनी गजबजायला लागली. जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी नागरिक त्यांच्या वाहनाने कुटुंबासह शनिवार व रविवारी घराबाहेर पडताहेत. यात हिल स्टेशन चिखलदरा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सेमाडोह, अप्पर वर्धा धरण, मालखेड येथील पक्ष्यांसाठी प्रसिद्ध सरोवर, येथील बांबू गार्डन, मुक्तागिरी, लासूरचे आनंदेश्वर मंदिर, सालबर्डी अशा पर्यटन व धार्मिक स्थळांचा समावेश आहे. थंडीला सुरुवात झाली की, चिखलदरा, मेळघाटचे सौंदर्य खुलते. धुक्याच्या चादरीने हा परिसर वेढला जातो. चिखलदऱ्यातील भीमकुंड, किचकदरी, वैराट देवी, सुर्यास्त पॉईंट, बीर धरण, पंचबोल पॉईंट येथील निसर्गाने उधळण केलेले सौंदर्य, येथील खाद्य पदार्थ, आल्हाददायक वातावरण पर्यटकांना आकर्षित करत आहे. सेमाडोह व्याघ्र प्रकल्प, हत्तीची सफारी, रात्री तंबूत वास्तव्य हा एक आनंद आहे. त्यामुळे येथे पर्यटक येत आहेत. सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिण बाजूला असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात हिवाळ्यात वाघ, अस्वल, बिबट,चंदेरी अस्वल, तृणभक्षी प्राणी, पक्षी पाहण्याची चंगळ असते. थंडीत प्राणी पाणवठ्यांजवळ येतात, त्यामुळे त्यांना पाहणे सोपे होते. चिखलदरा येथे गाविलगड किल्ला आहे. पचबोल पॉइंट दऱ्या, टेकड्यांचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी हा पॉइंट आहे. चिखलदऱ्यामध्ये मेघदूत हे उद्यान आहे. गुरुकुंज मोझरी येथे संत तुकडोजी महाराजांची समाधी , मुक्तागिरी मंदिर हे धार्मिक स्थान आहे. बांबू गार्डनमध्ये विविध प्रकारचे बांबू, कॅक्टसची झाडे आहेत. वडाळी तलाव, अप्पर वर्धा धरण मोर्शी तालुक्यातील सिंभोरा येथे आहे. येथे निसर्गाची शांतता अनुभवता येते. दर्यापूर जिल्ह्यातील लासूर येथील आनंदश्वर शिव मंदिर हे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून ते वरच्या बाजुने उघडे असल्याने येथे ऊन, सावलीचा खेळ बघण्यासारखा असतो. त्याचप्रमाणे सालबर्डी येथेही निसर्गरमणीय ठिकाणी शिव मंदिर असून नदी, नाला, उंच सखल रस्ता, घनदाट वृक्षांमधून मार्ग काढत भुयारात असलेल्या या मंदिरापर्यंत जावे लागते. येथील निसर्ग सौंदर्यासोबतच कच्चा चिवडा, बोरकूट खाण्यासाठी पर्यटक येथे भेट देतात.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:11 am

पर्यावरणपूरक मूर्तींसह फोटोंचे संकलन उपक्रमांतर्गत मूर्तींची सन्मानाने विल्हेवाट:महापालिकेची राज्यासाठी आदर्श मॉडेल ठरण्याच्या दिशेने वाटचाल‎

पर्यावरण संवर्धन, धार्मिक साहित्याची सन्मानपूर्वक विल्हेवाट आणि शहरातील जलस्रोतांचे संरक्षण यांचा उत्कृष्ट समन्वय साधत महापालिकेतर्फे राबवलेल्या मूर्ती व धार्मिक फोटोंच्या संकलन आणि विसर्जन उपक्रमाची सांगता छत्री तलाव परिसरात करण्यात आली. नागरिकांनी त्यांच्या घरातील श्री लक्ष्मीच्या मूर्ती कुठेही न टाकता त्या मनपाच्या झोन कार्यालयात आणून द्याव्यात, त्यांची पर्यावरणपूरक व सन्मानपूर्व विल्हेवाट लावण्यात येईल, असे मनपाने सांगितले होते. त्याची अंमलबजावणी केली. महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवला. हा उपक्रम राज्यातील इतर महापालिकांसाठी आदर्श ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी प्रसंगी केले. त्यांनी सांगितले की, “ शहरातील नागरिकांनी पर्यावरण आणि परंपरेचा समतोल साधत ज्या जाणीवेने सहभाग नोंदवला, तो कौतुकास्पद आहे. मनपा, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नातून शहरात पर्यावरणपूरक सणसंस्कृती दृढ होत असल्याचे, अतिरिक्त आयुक्त म्हणाल्या. मनपा सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे यांनी सांगितले की, धार्मिक साहित्याचा सन्मान राखून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी पांडे यांचे सातत्यपूर्ण कार्य प्रशंसनीय आहे.या उपक्रमात विविध एनजीओ, सामाजिक संस्था, स्वयंसेवक, विद्यार्थी आणि यंग मार्व्हल टीमने सक्रिय सहभाग नोंदवून संकलन, वर्गीकरण, मार्गदर्शन व जनजागृतीची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. मनपाच्या पाचही झोनमधील ज्येष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व सफाई कर्मचारी यांनी घराघरांतून मिळालेल्या मूर्तींचे संकलन, नोंद, वाहतूक आणि व्यवस्थापन काटेकोरपणे पूर्ण केले. आजच्या सांगता कार्यक्रमास जिजाऊ बँकेचे उपमुख्य अधिकारी हरिश नसीरकर, मराठी विज्ञान परिषद अध्यक्ष प्रा. प्रवीण गुल्हाने, प्रा. समीर चौधरी, अंजली प्रमोद पांडे, छाया किशोर कडू, संध्या अवसरे, मोनाली आगाशे, आशादीप फाउंडेशनच्या आशा दरणे व आनंद दरणे, शंतनू पाटील, मनीष जाधव, शुभम गाढवे, मनपाचे विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी मनपा सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, नितीन बोबडे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता )डॉ. अजय जाधव, स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक श्वेता बोके, यंग मार्व्हल ग्रुपचे सदस्य, सर्व झोनमधील ज्येष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि सफाई कर्मचारी उपस्थित होते. मनपा प्रशासनाने हा उपक्रम वर्षभर सातत्याने राबवण्याचा मानस व्यक्त केला असून, शहरात कायमस्वरूपी संकलन केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे. पर्यावरण संवर्धन, प्रदूषण नियंत्रण, धार्मिक साहित्याची सन्मानपूर्वक विल्हेवाट आणि जनजागृती यासाठी मनपा, सामाजिक संस्था व नागरिकांच्या सहकार्याने उपक्रम राबवण्यात येतील. मनपाचा हा उपक्रम धार्मिक परंपरेचा सन्मान राखत पर्यावरण संरक्षणाची जबाबदारीही पूर्ण करणारा असल्याने राज्यातील इतर शहरांसाठी आदर्श ठरत आहे. ५४२ लक्ष्मी मूर्तींचे विसर्जन पाचही मनपा झोनमधून संकलित एकूण ५४२ लक्ष्मीमूर्तींचे शास्त्रोक्त विधीनंतर पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. याशिवाय नागरिकांनी जमा केलेल्या मूर्ती व धार्मिक फोटोंनाही वैज्ञानिक पद्धतीने सन्मानपूर्वक विल्हेवाट लावली. हा उपक्रम तीन वर्षांपासून प्रभावीपणे राबवत असून, यामध्ये माजी महापौर प्रमोद पांडे आणि त्यांचा एम.एच.२७ एटीएस ग्रुप अग्रस्थानी राहिला आहे. संकलनासाठी स्वतंत्र वाहन, रस्त्याकडेला वा नाल्यात पडलेल्या मूर्ती, फोटोंचे संकलन आणि जनजागृती यांत त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:10 am

यावली शहीद येथे महिला सभेला प्रतिसाद:महिला सक्षमीकरण, शासकीय योजनांची दिली माहिती, महिलांची माेठी उपस्थिती‎

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत यावली शहीद येथे महिला सभेचे प्रभावी आयोजन करण्यात आले होते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देणे, त्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र महिलांपर्यंत पोहोचवणे. हा या सभेचा प्रमुख उद्देश होता. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिल्पा खवले या होत्या. या वेळी ग्रामपंचायत सदस्य मेश्राम, पंचायत समितीचे बी. एम. सावंत, युवा परिवर्तनच्या जिल्हाध्यक्ष सोनाली पुंडकर, सहाय्यक कृषी अधिकारी ज्योती ठाकरे, ग्रामपंचायत अधिकारी ललित बैलमारे, मनीषा दुधंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. मनीषा दुधंडे यांनी या वेळी मनोगत व्यक्त करत महिला सक्षमीकरणात सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व स्पष्ट केले. सभेमध्ये बचत गटांना निधी उपलब्ध करून देणे, उद्योग वृद्धीसाठी प्रशिक्षण, समाज कल्याण विभागातील विविध शासकीय योजना, मोटर्स ड्रायव्हिंग स्कूल प्रशिक्षण आदी विषयांवर मार्गदर्शन केले . महिलांनीही या सर्व विषयांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांविषयी उत्सुकता दर्शवली. ग्रामपंचायत अधिकारी ललित बैलमारे यांनी घरपट्टी भरण्याचे आवाहन करताना शासनाच्या मागील करावर ५० टक्के सूट देणाऱ्या निर्णयाची माहिती महिलांना दिली. ‘लखपती महिला योजना’ कशी उपयुक्त असून, ती महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवते. याचेही स्पष्टीकरण त्यांनी दिले. सरपंच शिल्पा खवले आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महिला सभा उत्तुंग यशस्वी ठरली. नीलेशा कांडलकर यांनी आभार मानले.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:10 am

म्हाडा वसाहतीमधील 567 गरजू नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी:गुरुकुल संस्था, शालिनीताई मेघे हॉस्पिटलने राबवला संयुक्त उपक्रम‎

शहरातील साईनगरातील म्हाडा वसाहत परिसरातील नागरिकांसाठी रविवार, २३ नोव्हेंबरला मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान महाशिबिर घेतले. गुरुकुल संस्था, शालिनीताई मेघे हॉस्पीटल ॲन्ड रिसर्च सेंटरच्या संयुक्त सहकार्याने आयोजित शिबिराचा ५६७ गरजू नागरिकांनी लाभ घेतला. या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याला खा.डॉ. अनिल बोंडे, प्रा. रवींद्र खांडेकर, डॉ. अश्विन रडके, तुषार भारतीय, चेतन गावंडे, रेखा भुतडा, भाजप महिला आघाडीच्या लता देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.शिबिराचे आयोजन म्हाडा वसाहतीतील रो-हाऊस, नवी म्हाडा वस्ती, अकोली रोड, साईनगर येथे सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० या वेळेत केले होते. या शिबिरात १३ हून अधिक विभागांचे तज्ज्ञ डॉक्टर तपासणीसाठी उपस्थित होते. या शिबिराच्या आयोजनाची धुरा विजय धामोरीकर, अनिल नंदनवार, अनिल पवार, श्रीलेश खांडेकर, कल्पना विघे, प्रमोद मिसाळ, प्रमोद वानखडे, गजानन ठाकरे, महेंद्र गडेकर, पुरुषोत्तम गायकवाड, गजानन नागपुरे, गोपाल दलाल, बंडू विघे तुषार चौधरी या कार्यकर्त्यांनी सांभाळली. कार्यक्रमाचे संचालन मंदार नानोटी यांनी केले. या उपक्रमामुळे म्हाडा वसाहत परिसरातील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी आधार मिळाला मोफत तपासण्यांसह औषध वितरण ः या शिबिरादरम्यान नागरिकांच्या आरोग्याच्या मूलभूत तपासण्या जसे की रक्तदाब, मधुमेहाची तपासणी केली . याव्यतिरिक्त, वजन, एचबी, सीबीसी, थायरॉईड, ईसीजीअशा रक्त तपासण्या व निदान चाचण्या मोफत केल्या . गरजू रुग्णांना तपासणीनंतर औषधी निशुल्क वितरित केली. गंभीर आजारांचे निदान झालेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्याची तयारी संयोजकांनी दर्शवली आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:09 am

तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत; कृषी विज्ञान केंद्राची महत्त्वाची भूमिका:कृषी विज्ञान केंद्र, घातखेड येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम

शेती व्यवसाय हा अन्नधान्य व खाद्य उत्पादनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. परंतु, आजच्या बदलत्या युगात शेतीही आधुनिक पद्धतीने होत आहे. अनेक जैविक व रासायनिक घटकांचा वापर वाढल्याने शेती उत्पादनातील पोषण कमी झाले आहे. परिणामी विषयुक्त अन्न -धान्य हे आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरताना दिसत आहे. उत्तम आरोग्यासाठी पोषण खाद्य महत्वाचे असल्याने नैसर्गिक शेतीतून कसदार व पोषण युक्त व आरोग्यदायी खाद्य उत्पादनाची निर्मिती होणार आहे. नैसर्गिक शेती काळाची गरज असून शेतकऱ्यांमध्ये याबाबत जाणीव -जागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी व्यक्त केले. कृषी विज्ञान केंद्र, घातखेड, अमरावती येथे पी.एम. किसान सन्मान निधी योजना तसेच डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत नैसर्गिक शेती विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र येथील विषय विशेषज्ञ डॉ. ए.पी. फुसे, प्रमोद मेंढे, विषय विशेषज्ञ अमर तायडे , डॉ. प्रणिता कडू, संजय पाचकवडे, राजेश राठोड, बीटीएम आत्मा अमरावतीचे दुबे, शुभम लहाने, शुभम कोंडे, दिगंबर सातंगे, प्रणिता भोंगे, प्रतिक घोगरे , विवेक भटकर, सुधीर भुस्कुटे यांचेसह शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच कृषी विज्ञान केंद्र वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. अतुल कळसकर यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व अधोरेखित केले. शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाधारित, पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक शेती पद्धती आत्मसात करण्यास या प्रशिक्षणातून मोठी मदत मिळणार आहे. असेही ते म्हणाले. प्रशिक्षणादरम्यान विविध विषयावर मार्गदर्शन या दोन दिवसीय प्रशिक्षणात शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची मूलभूत तत्त्वे, तण नियंत्रणाच्या पद्धती, विविध नैसर्गिक फॉर्म्युलेशनची निर्मिती व वापर, नैसर्गिक कीटकनाशके, ट्रायकोडर्मा उत्पादन, जैविक खतांची तयारीवर प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. परिसरातील १४० शेतकरी सहभागी कार्यक्रमासाठी धारणी तालुक्यातील ४० शेतकरी तसेच इतर तालुक्यांतील १०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली. या प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांचे दोन गट तयार करून त्यांनी नैसर्गिक शेतीतील वापरात येत असलेले तंत्रज्ञान बाबत सादरीकरण सादर केले. तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयक तांत्रिक पुस्तिका वाटप करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:09 am

एचआयव्ही संक्रमितांना दिलासा देण्यात एनएसएस, रेड रिबन क्लबचा सहभाग:कार्यक्रम अधिकारी, रेड रिबन क्लबच्या नोडल अधिकारी, सदस्यांची कार्यशाळा‎

एचआयव्ही संक्रमितांना दिलासा देण्यात अमरावतीच्या एनएसएस आणि ‘रेड रिबन क्लब’चा प्रभावी सहभाग असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) राज्य संपर्क अधिकारी तथा ओएसडी प्रा. डॉ. मिलींद काळे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि रेड रिबन क्लबच्या नोडल अधिकारी व सदस्यांची एक कार्यशाळा येथे नुकतीच पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. डॉ. काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. रेड रिबन क्लबची कार्यप्रणाली व एचआयव्ही हा या कार्यशाळेचा विषय होता. येथील मोर्शी रोड स्थित ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात पार पडलेल्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे होते. अतिथी म्हणून रासेयोचे जिल्हा समन्वयक प्रा. विशाल गजभिये, प्रा. डॉ. मंदा नांदुरकर, वरिष्ठ बाल रोगतज्ञ डॉ. संदीप दानखडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, जिल्हा पर्यवेक्षक प्रकाश शेगोकार हे मंचांवर उपस्थित होते. रा.से.यो. अधिकारी तथा सदस्य यांची भूमिका विषद करताना डॉ. काळे यांनी नवीन युवक तयार करण्यामध्ये प्राध्यापकांची महत्वाची भूमिका असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना ही एचआयव्हीची जनजागृती करताना बरोबरीची भागीदार असणे तेवढेच महत्वाचे आहे, हेही त्यांनी पटवून दिले. डॉ. दिलीप सौंदळे यांनी कुठलीही भूमिका साकारताना त्यामध्ये जोपर्यंत आपण सर्वस्व देत नाही, तोपर्यंत यश मिळत नाही असे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक अजय साखरे यांनी जिल्ह्यातील एचआयव्हीची परिस्थिती, एड्स आणि इतर आजार यावर विचार मांडले. लैंगिक समस्या आणि उपाय यावर मार्गदर्शन कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात युवक-युवती, तसेच त्यांच्या लैंगिक समस्या आणि उपाय यावर डॉ. संदीप दानखडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात जिल्ह्यातील एचआयव्ही साठी सेवा देणाऱ्या शासकीय संस्थांविषयी प्रमोद मिसाळ यांनी तर अशासकीय संस्थांविषयी ब्रिजेश दळवी यांनी माहिती पुरविली. त्याचवेळी प्रा. विशाल गजभिये यांनी विद्यापीठाची विविध उपक्रमाबाबत असणारी भूमिका विषद केली.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:08 am

अमरावतीमध्ये राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत लक्षवेधी नाटके सादर‎:टाकरखेडा संभूच्या संस्थेची महिलांची भूमिका असलेली सखी ग सखी नाट्यकृती लक्षवेधी

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरी अंतर्गत आज, रविवारी ‘सखी गं सखी’ हे नाटक सादर झाले. फक्त महिलांचा समावेश असलेल्या या नाट्याद्वारे रसिकांना नोकरदार महिलांच्या वेगवेगळ्या भूमिकांची ओळख झाली. संवाद प्रधान असलेले हे नाटक आहे. पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज परिसर येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात नेहमीप्रमाणे सायंकाळी ७ वाजता नाटकाचा प्रारंभ झाला. नाट्य प्रयोगाच्या सुरुवातीला रंगमंचावर एक ‘टॉक शो’ सुरू असतो. तो केवळ स्त्रियांसाठी आणि स्त्रियांच्या अनुभवावर आधारित असतो. या कार्यक्रमाची सूत्र संचालिका प्रगल्भ आणि समजूतदार आहे. स्त्रीच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रवासातले सत्य, माध्यमांचा प्रभाव आणि स्त्रीच्या प्रतिमे वरचा परिणाम, संघर्ष, वाट बघणं, प्रामाणिकपणा आणि आकांक्षा यांचा ताळमेळ दाखवण्याचा प्रयत्न या नाटकातून सादर करण्यात आला. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही राज्य नाट्य स्पर्धा सुरु असून रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेल्या अ. भा. नाट्य परिषदेचे विश्वस्त ॲड. प्रशांत देशपांडे, नाट्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲड. चंद्रशेखर डोरले आणि समन्वयक विशाल फाटे त्यासाठी स्थानिक पातळीवर परिश्रम घेत आहेत. छोट्या गावातील संस्थेची नाट्य निर्मिती भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू या छोट्याशा गावातील समर्पण बहुउद्देशीय संस्था या नाटकाची निर्माती आहे. डॉ. पराग घोंगे यांनी या नाटकाचे लेखन केले असून दिग्दर्शन किशोर पाचकवडे यांचे आहे. यात आंचल गजभिये, सोनू तारपुरे, काजल देशमुख, मयुरी राणे आणि प्रियांका नवाथे यांनी अभिनय केला आहे. नेपथ्य रिंकू सरोदे, पार्श्व संगीत प्रज्वल तायडे, प्रकाशयोजना सागर उदासी, रंगभूषा रवीना भुरभुरे आणि वेशभूषा कुंदाताई वंजारी यांनी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:07 am

हॅपी स्ट्रीट्स; फिटनेस, सामाजिक जागरूकतेचा संगम:‘सनडे बनवा फनडे,’ आबालवृद्धांचा माेठा सहभाग, वाहनमुक्त रस्त्यावर गर्दी‎

मोर्शी रोडवरील वेलकम पॉइंट येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या हॅपी स्ट्रीट्स अमरावती या उपक्रमाने शहरात उत्साह, आनंद आणि आरोग्याचा नवा संमिश्र अनुभव दिला. ‘सनडे बनवा फनडे’ या संकल्पनेला नागरिकांनी प्रतिसाद देत रविवारी २३ नोव्हेंबरला पहाटे ६ वाजतापासूनच वाहनमुक्त रस्त्यांवर गर्दी केली. हॅपी स्ट्रीट्स अंतर्गत फिटनेस, मनोरंजन आणि कुटुंबासाठी उपयुक्त असे अनेक उपक्रम आयोजित केले. वेगवेगळ्या झोनमध्ये रनिंग, अॅरोबिक्स, योगासने आणि इतर फिटनेस सत्रांचे आयोजन केले गेले. प्रशिक्षित झुंबा प्रशिक्षक कविता शेंडे यांच्या नेतृत्वात झालेल्या झुंबा सत्रांनी सर्व वयोगटातील नागरिकांना संगीताच्या तालावर थिरकवत सकाळी नवचैतन्य दिले.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सहभागी करणारे विविध खेळ, मनोरंजन उपक्रम, इंटरअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅक्टिव्हिटीजमुळे परिसरात आनंदी वातावरण निर्माण झाले. शिवाजी आयडियल इंग्लिश स्कूलच्या मेरा भारत स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागरिकांनी स्वच्छता कशी बाळगावी,आत्मरक्षा, मर्दानी खेळ, मुलींनी आपले सरक्षण स्वतः कसे करावे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या प्रेरनेने प्रात्यक्षिक करून दाखवले. नागरिकांनी या दोन्ही प्रात्यक्षिकांचे कौतुक करून मुलांना शिवाजी आयडियल इंग्लिश स्कूलचे नाव विचारत शाळेमध्ये हे छान उपक्रम घेतात व पुढील रविवारलाही यावे, अशी विनंती केली. यामध्ये सहभागी विद्यार्थी आराध्या सगणे, जान्हवी उकिणकर, दृष्टी ठाकूर, दाक्षणी काळे, ईश्वरी ढोणे, सिद्धी नवघरे, प्राजक्ता राऊत, आरोही धोटे, मधुरा म्हसाळ, अक्षदा अत्तरकर , श्रुती खंडारे, लावण्या भेले, राधिका काकळे ,कृष्णाली आगळे, देवराज जगताप, स्वरीत मेहरे, साहिल लुल्ला, अरीन संदीप यावलकर, तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक अमर खंडारे ,मंदार मडावी, शाळेच्या मुख्याध्यपिका वैशाली ठाकरे, पर्यवेक्षिका शारदा फुले यांच्या मार्गर्शनाखाली तयार झाले. अशा उपक्रमांमुळे शहरात आरोग्यदायी व सकारात्मक सकाळीचा नवा संस्कार निर्माण होत, असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. रविवार सकाळचा मोर्शी रोड पूर्णपणे उत्सवमय, कुटुंबप्रधान दिसत होता. पालक, मुले, युवक आणि ज्येष्ठ नागरिक—सर्वांनी मिळून चालणे, सायकलिंग, नृत्य, खेळ व विविध उपक्रमांचा मनसोक्त आनंद घेतला. अनेक कुटुंबांनी सांगितले की,अशा उपक्रमांनी ताणतणावमुक्त जीवनशैलीला चालना मिळते आणि कुटुंबातील नातेसंबंध मजबूत होतात.

दिव्यमराठी भास्कर 24 Nov 2025 9:06 am