SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

32    C
... ...View News by News Source

पुतिन यांच्या दौ-यानंतर पाक टेन्शनमध्ये

इस्लामाबाद : रशियाचे राष्ट प्रमुख व्लादिमीर पुतिन चार वर्षांनी भारत दौ-यावर आले होते. दिल्लीत पुतिन यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले. पण या दौ-यामुळे सर्वात जास्त अस्वस्थ पाकिस्तान होता. त्यांना मुख्य टेन्शन होते, पुतिन भारताला आणखी कोणती घातक शस्त्र देणार. एस-४०० ची कमाल त्यांनी पाहिलीच आहे. त्यामुळे पाकिस्तान पुतिन यांच्या भारत दौ-यामुळे टेन्शनमध्ये होता. पण […] The post पुतिन यांच्या दौ-यानंतर पाक टेन्शनमध्ये appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 6:28 pm

ही त्यांची जुनी पोटदुखी:उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचा पलटवार, महाविकास आघाडीवरही साधला निशाणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला 5 डिसेंबर 2025 रोजी एक वर्ष पूर्ण झाले असतानाच, राज्यातील राजकीय वातावरण मात्र विरोधी पक्षनेतेपदावरून चांगलेच तापले आहे. सरकारला वर्ष उलटूनही विधानसभेत विरोधी पक्षनेता का नेमला नाही, यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जर नियमांवर बोट ठेवून विरोधी पक्षनेतेपद दिले जात नसेल, तर संविधानात नसलेले उपमुख्यमंत्रिपदही तात्काळ रद्द करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केल्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. सरकारच्या कारभारावर आणि विरोधी पक्षाला डावलण्याच्या नीतीवर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, सरकार विरोधी पक्षाला का घाबरत आहे? तुम्ही आम्हाला नियम आणि कायदे दाखवत असाल, तर संविधानात उपमुख्यमंत्रिपदाबाबत कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे हे पद घटनाबाह्य असून ते रद्द केले पाहिजे. यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. भाजप हा महायुतीतील शिंदे आणि पवार गटाला अ‍ॅनाकोंडासारखा गिळल्याशिवाय राहणार नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली. शिंदे आणि पवार गट ही भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोपही त्यांनी केला. एकनाथ शिंदेंचा पलटवार उद्धव ठाकरे यांच्या या मागणीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी ठाकरेंच्या टीकेला 'पोटदुखी'ची उपमा दिली. शिंदे म्हणाले, काही लोकांना अजूनही पोटदुखी आहे. मी मुख्यमंत्री होतो, तेव्हाही त्यांना पोटदुखी होती आणि आता मी उपमुख्यमंत्री झालो आहे, तरीही त्यांची पोटदुखी कायम आहे. त्यांच्या उपचारासाठी आम्ही 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजना सुरू केली, पण तरीही फरक पडत नाही. एकनाथ शिंदे यांनी पुढे ठाकरेंच्या 'वर्क कल्चर'वरही टीका केली. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा ते मला घटनाबाह्य म्हणत होते, आता उपमुख्यमंत्रिपदाला घटनाबाह्य म्हणत आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तुम्ही घरात बसून राहिलात, बाहेर पडलाच नाही. त्यामुळेच जेव्हा पत्रकार विचारतात की मविआ कुठे आहे, तेव्हा आम्ही सांगतो की ते घरी बसले आहेत, असा सणसणीत टोला शिंदे यांनी लगावला. दरम्यान, महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेतेपद आणि उपमुख्यमंत्रिपदाची वैधता यावरून सुरू झालेली ही राजकीय जुगलबंदी पाहता, आगामी काळात आणि विधिमंडळ अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 6:25 pm

भारताकडून रशियाला अब्जावधींची निर्यात होणार

नवी दिल्ली : खाद्यान्न, औषधे, दैनंदिन वापराच्या वस्तूंची रशिया मोठ्या प्रमाणावर आयात करते. तिथे भारताला बरीच व्यवसाय संधी असून २०३० पर्यंत निर्यात ३५ अब्ज डॉलरवर नेता येऊ शकते असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हने (जीटीआरआय) म्हटले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौ-यावर आले आहेत. यात दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याचा निश्चय करण्यात आला. […] The post भारताकडून रशियाला अब्जावधींची निर्यात होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 6:18 pm

अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, हे सरकार लोकशाहीविरोधी:अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भास्कर जाधवांचा हल्लाबोल; विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवण्यावरून संताप

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेत महायुती सरकारच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. सरकारच्या 'एककल्ली, मनमानी आणि भ्रष्ट' कारभाराचा तीव्र निषेध करत विरोधकांनी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानावर बहिष्कार टाकला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्ला चढवत, या सरकारने भ्रष्टाचाराच्या आणि मनमानीच्या सर्व सीमा ओलांडल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेता नसणे हा संविधानाचा अवमान चहापानाचे निमंत्रण नाकारताना भास्कर जाधव यांनी सरकारवर लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप केला. ते म्हणाले, विरोधी पक्षनेतेपदाची दोन्ही सभागृहातील पदे रिक्त ठेवणे हा संविधानाचा अवमान आहे. हे पद केवळ परंपरा नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संवैधानिक पद आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी 10 टक्के सदस्यसंख्येची अट असल्याचा सरकारचा दावा 'संपूर्ण खोटा' असल्याचे सांगत, त्यांनी याबाबत प्रधान सचिवांच्या लेखी उत्तराचा दाखला दिला. क्लीन चिट देणारे सरकार आणि विकलांग महाराष्ट्र राज्यात दोन उपमुख्यमंत्री हे पद संविधानात नसतानाही केवळ राजकीय तडजोडीसाठी निर्माण केले गेले आणि आज सत्तेतील तिन्ही पक्ष भ्रष्टाचाराच्या स्पर्धेत उतरले आहेत, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. विरोधी पक्षांच्या आमदारांना निधी न देऊन या सरकारने अर्धा महाराष्ट्र विकलांग केला आहे, असा घणाघात त्यांनी केला. तसेच, राज्यात गुन्हे घडले की मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून आरोपींना लगेच 'क्लीन चिट' दिली जाते, ज्यामुळे कायद्याचा धाक उरलेला नाही, असेही ते म्हणाले. राम शिंदे यांच्यावरही निशाणा रोहित आर्या प्रकरण आणि सभापतींवर टीका कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवताना भास्कर जाधव यांनी रोहित आर्या कंत्राटदार प्रकरणाचा उल्लेख केला. या प्रकरणात पुरावे नष्ट करण्यासाठीच सरकारने गोळीबार घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. यावेळी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावरही निशाणा साधण्यात आला. लोकशाही नको आणि मनुस्मृती हवी, हीच त्यांची मानसिकता आहे, असा टोला लगावत, गेली अडीच वर्षे सभापतीपद रिक्त ठेवणाऱ्यांनी आता परंपरांचे दाखले देऊ नयेत, असे खडे बोल जाधव यांनी सुनावले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 5:53 pm

कार्यालयीन वेळेनंतर वरीष्ठ फोन करून त्रास देऊ शकणार नाहीत

नवी दिल्ली : देशातील नोकरदार वर्गासाठी एक अत्यंत दिलासा देणारे विधेयक संसदेत सादर झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात राईट टू डिसकनेक्ट बिल, २०२५ हे खासगी सदस्य विधेयक लोकसभेत सादर केले. या विधेयकामुळे कर्मचा-यांना कार्यालयीन वेळेनंतर कामाशी संबंधित कॉल, ईमेल किंवा मेसेजला उत्तर देणे […] The post कार्यालयीन वेळेनंतर वरीष्ठ फोन करून त्रास देऊ शकणार नाहीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 5:47 pm

भाजपचा मुख्य फंडा धार्मिक ध्रुवीकरण, मतचोरी:बाळासाहेब थोरात यांचे 'लोकशाहीची हत्या' प्रदर्शनातून पुणेकरांना आवाहन

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. सत्तेत राहण्यासाठी भाजप धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरीचा वापर करत असून, ईव्हीएम प्रक्रियेबाबतही गंभीर शंका निर्माण झाल्याचे ते म्हणाले. लोकशाही वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित 'सेवा, कर्तव्य, त्याग' सप्ताह कार्यक्रमात 'लोकशाहीची हत्या व वोटचोरी' या विषयावरील विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन थोरात यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. थोरात यांनी आपल्या भाषणात सांगितले की, २००४ ते २०१४ या काळात काँग्रेस सरकारने अन्न सुरक्षा कायदा, शैक्षणिक योजना, भू-अधिग्रहण कायद्यात सुधारणा आणि पोलिओ निर्मूलन यांसारखे अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबवले. मात्र, २०१४ नंतर भाजपने तांत्रिक साधने, अफवा आणि जातीय ध्रुवीकरणाचा वापर करून सत्ता मिळवली आणि देशाची दिशा भरकटवली. महाराष्ट्र हा संतांची परंपरा जपणारा प्रदेश असताना, आज धर्माचे उघडपणे राजकारण केले जात आहे, यावर थोरात यांनी चिंता व्यक्त केली. सोनम वंगचुक, हरियाण्यातील शेतकरी आंदोलन, महिला ऑलिम्पिक विजेत्यांचे आंदोलन यांसारख्या घटनांनंतरही समाजाची उदासीनता लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत त्यांनी मांडले. यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की, मोदी सरकार मतचोरीच्या विशिष्ट पॅटर्नवर सत्तेत आले आहे, जी जनतेची आणि लोकशाहीची मोठी फसवणूक आहे. निवडणुकांचे निकाल पुढे ढकलणे आणि ईव्हीएमच्या जोरावर सत्ता मिळवणे ही पद्धत लोकशाहीसाठी धोकादायक आहे. मोदी सरकारला रोखण्यासाठी जनआंदोलन उभारण्याची आणि सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले की, विविध राष्ट्रीय मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी आवाज उठविल्यामुळे जनजागृतीला गती मिळाली आहे. आपले मत नक्की कुठे आणि कसे जाते याचा शोध घेण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात आला असून आर्थिक भ्रष्टाचारासोबत मतचोरी ही भाजपची मोठी चाल असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 5:45 pm

समुद्राचे पाणी विषारी होतेय, समुद्री जीवसृष्टी धोक्यात

स्कॉटलंड : स्कॉटलंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँर्ड्यूज येथील एका नवीन संशोधनाने गंभीर इशारा दिला आहे की, जगातील अनेक किनारी भाग पूर्वीच्या अंदाजे वेगापेक्षा अधिक जलद गतीने आम्लधर्मी (अ‍ॅसिडिक) होत आहेत. ‘नेचर कम्युनिकेशन्स’मधील प्रकाशित अभ्यासानुसार, कॅलिफोर्निया करंटसारख्या ‘अपवेलिंग’ क्षेत्रांमध्ये ही प्रक्रिया, वातावरणातील कार्बन डायऑक्साइडच्या वाढीमुळे होणा-या सामान्य अ‍ॅसिडिफिकेशनपेक्षा वेगवान आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात येत आहे. […] The post समुद्राचे पाणी विषारी होतेय, समुद्री जीवसृष्टी धोक्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 5:38 pm

मस्क्युलर डिस्ट्रॉफीवरील लसीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार:एकनाथ शिंदे यांची ग्वाही; गरजू रुग्णांसाठी 100 अतिरिक्त इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा

मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा जरी दुर्मीळ आणि आव्हानात्मक आजार असला, तरी यावर मात करण्यासाठी झगडणाऱ्या मुलांची इच्छाशक्ती अत्यंत प्रबळ आहे. त्यांच्या या 'विलपॉवर'ला सलाम करत राज्य शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. इतकेच नव्हे, तर या आजारावर लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करेल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. स्वर्गीय गंगुबाई शिंदे सभागृहात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात मस्क्युलर डिस्ट्रॉफीने ग्रस्त मुले आणि गरजू रुग्णांना इलेक्ट्रिक व्हीलचेअर तसेच ‘वॅटमेड बायपॅप’ मशीनचे वितरण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, डॉ. मंगेश पेडामकर आणि हरिश्चंद्र सावंत उपस्थित होते. सार्वजनिक वाहतूक 'दिव्यांग-स्नेही' करणार रुग्णांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करताना शिंदे यांनी सांगितले की, एसटी, मेट्रो आणि मोनोरेल यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांच्या प्रवासासाठी अनुकूल आणि विशेष सुविधा निर्माण केल्या जातील. तसेच, या रुग्णांसाठी फिजिओथेरपी अत्यंत महत्त्वाची असल्याने त्याचा खर्च कमी करण्यासाठी सीएसआर निधी, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि लोकसहभागातून व्यापक मदत उभी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरात लवकरच सुसज्ज 'थेरपी सेंटर' उभारण्याबाबतच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. 100 अतिरिक्त व्हीलचेअरची तत्काळ मदत रुग्णांची वाढती गरज पाहता, एकनाथ शिंदेंनी कार्यक्रमातच तत्काळ 100 अतिरिक्त इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा केली. यासोबतच गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि पोर्टेबल व्हेंटिलेशन उपकरणे उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. या मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य टिकवण्यासाठी जे शक्य आहे, ते सर्व प्रयत्न शासन करेल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 5:31 pm

वांद्रे आणि वरळीतील राड्यानंतर मातोश्रीवर खलबते:उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक; भाजपची मक्तेदारी मोडून काढा, ज्येष्ठ नेत्यांना सूचना

मुंबईत गेल्या काही दिवसांत वांद्रे आणि वरळी येथील सेंट रेजिस हॉटेलमध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झालेल्या राड्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कामगार क्षेत्रात भाजपची वाढती घुसखोरी रोखण्यासाठी आणि त्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी 'मातोश्री'वर अखिल भारतीय कामगार सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी भाजपची मक्तेदारी मोडून काढण्याचे आदेश देतानाच, पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांची चांगलीच शाळा घेतली. भारतीय कामगार सेना ही कुणाचीही वैयक्तिक जहागिरी नाही, त्यामुळे एकसंघ राहून काम करा, अशा कडक शब्दांत ठाकरेंनी नेत्यांचे कान टोचले आहेत. बैठकीत नेमके काय घडले? राज्यातील विविध भागांतील कामगार सेनेच्या युनिट्सचे पदाधिकारी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर दाखल झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या अंतर्गत कारभारावर बोट ठेवले. कामगारांच्या हितासाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी कामगार सेनेने आपला आवाज अधिक तीव्र केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संघटनेत गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, भारतीय कामगार सेना म्हणून सर्वांनी एकजूट दाखवावी, असा सज्जड दमही त्यांनी भरला. भाजपला शह देण्यासाठी रणनीती शिवसेना ठाकरे गटाचा कणा मानल्या जाणाऱ्या कामगार सेनेचे जाळे मुंबईसह राज्यभरातील हॉटेल्स, विमानतळ, मोठे कारखाने आणि कंपन्यांमध्ये पसरलेले आहे. मात्र, अलीकडच्या काळात भाजपनेही स्वतःच्या कामगार संघटना स्थापन करून शिवसेनेच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपच्या या रणनीतीला शह देण्यासाठी आता स्वतः उद्धव ठाकरे यांनी कामगार सेनेच्या कामकाजात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. आजच्या बैठकीत त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच, जिथे भाजप कामगार संघटना घुसखोरी करतील किंवा दादागिरी करतील, तिथे त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचे आणि पलटवार करण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. भाजपचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी आता कामगार सेनेने जुन्या आक्रमक शैलीत काम करावे, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला आहे. आगामी काळात मुंबई महापालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामगार सेनेची ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. हे ही वाचा... विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवून संविधानाचा अवमान:विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, शेतकरी प्रश्नांवरून वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवणे हा संविधानाचा अपमान असून, सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पूर्ण बातमी वाचा...

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 5:03 pm

सत्ताधारी पक्षाचाच शासकीय यंत्रणेवर अविश्वास?:शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराची ईव्हीएमसाठी 'खासगी' सुरक्षा; जळगावात राजकीय चर्चांना उधाण

एकीकडे महाविकास आघाडीकडून ईव्हीएममध्ये फेरफार होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच, आता खुद्द सत्ताधारी पक्षातील आमदाराचाच प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेवर भरोसा नसल्याचे धक्कादायक चित्र जळगावात पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा आणि भडगाव येथील ईव्हीएम 'स्ट्राँग रूम'च्या बाहेर चक्क स्वतःचे खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. पोलिस बंदोबस्त असतानाही खासगी फौजफाटा लावल्याने जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत पाचोरा आणि भडगाव या दोन्ही ठिकाणी शिवसेना शिंदे गट आणि भाजप या मित्रपक्षातच अटीतटीचा सामना रंगला आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन्स स्ट्राँग रूममध्ये सील करण्यात आल्या असून, 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र, निकालाची धाकधूक आणि स्थानिक पातळीवरील तीव्र स्पर्धेमुळे उमेदवारांच्या आग्रहाखातर आमदार किशोर पाटील यांनी शासकीय सुरक्षेच्या जोडीला गणवेशधारी खासगी रक्षकांचा पहारा बसवला आहे. हे खासगी रक्षक स्ट्राँग रूमच्या परिसरावर करडी नजर ठेवून आहेत. विशेष म्हणजे, स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी नियमानुसार चोख पोलिस बंदोबस्त तैनात असतो. असे असतानाही सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था उभारल्याने, सरकार आपल्याच पक्षाचे असूनही प्रशासनावर विश्वास नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. ईव्हीएम सुरक्षिततेबाबत खुद्द सत्ताधाऱ्यांच्या मनातच शंका असल्याने हा मुद्दा आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. एरंडोल येथील स्ट्रॉंग रूमबाहेरील सीसीटीव्ही बंद दरम्यान, जळगाव जिल्ह्यात इतरत्रही ईव्हीएम सुरक्षेवरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. एरंडोल येथे स्ट्राँग रूमबाहेरील सीसीटीव्ही डिस्प्ले तब्बल अडीच तास बंद पडल्याचा प्रकार समोर आला. यावर आक्षेप घेत उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. तर धरणगावमध्ये विरोधी पक्षाचे कार्यकर्ते स्वतः रात्रभर जागी राहून स्ट्राँग रूमवर पाळत ठेवत आहेत. राज्यभरात ईव्हीएमवरून गदारोळ सुरू असताना जळगावातील या घडामोडींनी निवडणुकीच्या निकालाबाबतची उत्सुकता आणि तणाव वाढवला आहे. स्ट्राँग रूमबाहेर उमेदवारांचा कडक पहारा परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी स्ट्राँग रूमवर 24 तास पहारा देत आहे.तंत्रज्ञानाचे युग असल्यामुळे आम्हाला कोणावर विश्वास नसल्यामुळे आम्ही पहारा देत असल्याचा कार्यकर्त्यांनी सांगितले. प्रत्येक प्रभागाच्या दोन नगरसेवक 24 तास स्ट्रॉंग रूममध्ये पहारा देत आहे.जिंतूर नगरपालिकेत भाजप राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी लढत रंगली आहे. मतदान यंत्र सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा नाशिक जिल्ह्यातील येवला येथील मतदान यंत्र सुरक्षा कक्षे बाहेर पोलिसांसह उमेदवारांची खाजगी सुरक्षा लावण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपेश दराडे यांनी मतदान यंत्र सुरक्षा कक्षे बाहेर खाजगी सुरक्षा रक्षक नेमले. सीसीटीव्ही आणि पोलिसांचा मतदान यंत्र सुरक्षा कक्षे बाहेर खडा पहारा देत आहेत. मतमोजणीपूर्वी सुरू झालेली सुरक्षा स्पर्धा जनतेत आणि कार्यकर्त्यांत कुतूहलचा विषय ठरला आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 5:01 pm

दोन कोटींची लाच आणि पाच कोटींची फसवणूक:वादग्रस्त पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी सेवेतून बडतर्फ, पोलिस आयुक्तांची कठोर कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलिस दलाला काळीमा फासणाऱ्या एका गंभीर प्रकरणात पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आणि 'दाम दुप्पट' योजनेच्या नावाखाली नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याला अखेर शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. चिंतामणीच्या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांची आणि गैरव्यवहारांची गंभीर दखल घेत आयुक्तांनी हे आदेश जारी केले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2 नोव्हेंबर रोजी केलेल्या धडक कारवाईत प्रमोद चिंतामणी याला रंगेहाथ पकडले होते. आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना एका प्रकरणात तडजोड करण्यासाठी त्याने तब्बल दोन कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील 46 लाख 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने सापळा रचून त्याला अटक केली. या कारवाईनंतर तपास पथकाने त्याच्या घराची झडती घेतली असता, तिथेही 51 लाख रुपयांची बेहिशोबी रोकड आढळून आली होती. पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष केवळ लाचखोरीच नव्हे, तर चिंतामणी याने सर्वसामान्यांचीही मोठी फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील 40 हून अधिक नागरिकांना पैसे दुप्पट करून देतो असे आमिष दाखवून त्याने तब्बल 5 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या काळ्या धंद्यातील पैसे त्याने स्वतःच्या मेहुण्याच्या बँक खात्यावर वळते केले होते. या संदर्भात फसवणूक झालेल्या अनेक पीडित नागरिकांनी भोसरी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. एका जबाबदार पदावर असताना अधिकारांचा गैरवापर करणे आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी होणे, या बाबी पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या ठरल्या आहेत. चिंतामणी याच्यावर झालेले गंभीर आरोप आणि तपासात समोर आलेले पुरावे पाहता, त्याला शासकीय सेवेत ठेवणे अयोग्य असल्याने पोलिस आयुक्तांनी त्याला बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला. या कठोर कारवाईमुळे पोलिस दलातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पुण्यात आठ कोटींच्या लाच प्रकरणी लिक्विडेटर आणि ऑडिटर जाळ्यात पुण्यात सहकार क्षेत्राला हादरवून सोडणारी एक मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. एका सहकारी संस्थेच्या सभासदांकडून तब्बल आठ कोटी रुपयांची लाच मागणाऱ्या लिक्विडेटर आणि ऑडिटरला शनिवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. या प्रकरणी सहकार विभागातील लिक्विडेटर विनोद देशमुख आणि ऑडिटर भास्कर पोळ या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या दोघांनी तक्रारदाराकडे शेअर सर्टिफिकेट देण्यासाठी आणि जागेच्या विक्री परवानगीसाठी एकूण आठ कोटींची मागणी केली होती. या रकमेतील पहिला हप्ता म्हणून 30 लाख रुपये स्वीकारताना एसीबीने शनिवार पेठ येथील एका कार्यालयासमोर सापळा रचून ही धडक कारवाई केली. या प्रकरणाची पार्श्वभूमी धनकवडी येथील 'एकता सहकारी संस्थे'शी संबंधित आहे. 2005 साली स्थापन झालेल्या या संस्थेत 32 सभासद असून, त्यांच्यात 2020 मध्ये वाद झाल्यानंतर हे प्रकरण सहकार विभागाकडे गेले होते. 2024 मध्ये विनोद देशमुख यांची संस्थेवर लिक्विडेटर म्हणून नियुक्ती झाली होती. लिक्विडेटर पदाचा गैरवापर करत देशमुख याने सभासदांना शेअर सर्टिफिकेट देण्यासाठी तीन कोटी रुपये, तर संस्थेच्या मालकीची मोक्याची जागा विक्री करण्यास परवानगी देण्यासाठी पाच कोटी रुपये, अशी एकूण आठ कोटींची प्रचंड लाच मागितली होती. या मागणीनंतर सभासदांनी एसीबीकडे धाव घेतली आणि या मोठ्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 4:39 pm

बावनकुळेंची नोटीस अद्याप मिळालेली नाही:कोणत्याही परिस्थितीत माफी मागणार नाही, सुलेखा कुंभारेंचा महसूलमंत्र्यांवर पलटवार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कायदेशीर नोटीस पाठवल्याची बातमी मीडियात पसरवली असली तरी, मला अद्याप कोणतीही नोटीस मिळालेली नाही, असा दावा माजी राज्यमंत्री तथा बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्षा अॅड. सुलेखा कुंभारे यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत माफी मागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एका निवेदनाद्वारे कुंभारे यांनी बावनकुळेंच्या कृतीचा जाहीर निषेध केला. महसूलमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री यांसारख्या जबाबदार पदावर असलेल्या मंत्र्याने अशा पद्धतीने खोटी बातमी मीडियात पसरवणे अशोभनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी बावनकुळेंच्या कायदेशीर नोटीसची वाट पाहत आहे. नोटीस मिळाल्यास कायदेशीर भाषेत चोख उत्तर देणार असल्याचे कुंभारे यांनी सांगितले. आम्ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भीमसैनिक आहोत, आम्ही लढायला भीत नाही. ताकदीने लढाई लढणार आणि जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बावनकुळेंनी मीडियातून माफी मागण्याची किंवा कायदेशीर लढाईला तयार राहण्याची धमकी दिली आहे. मात्र, मी माझ्या शब्दावर ठाम असून कोणत्याही परिस्थितीत माफी मागणार नाही, असे कुंभारे यांनी स्पष्ट केले. त्यांची लढाई कामठी नगरपरिषद निवडणुकीत भाजप उमेदवारांकडून मतचोरीसाठी झालेल्या गंभीर प्रकाराबाबत आहे. मोठ्या प्रमाणावर पैशांचा गैरवापर करून अग्रवाल भवन आणि एस. फार्मवर घडलेल्या गैरकायदेशीर प्रकाराने निवडणूक आचारसंहितेचे भाजप उमेदवारांकडून थेट उल्लंघन झाले. त्याविरुद्ध आवाज उचलण्याचा लोकशाहीत आम्हाला अधिकार आहे, असे कुंभारे म्हणाल्या. एस. फार्मवर मिळालेले आक्षेपार्ह साहित्य, भाजप उमेदवार अग्रवाल यांचा पुतण्या, बोगस मतदार आणि बोटाची शाई मिटवणारे लिक्विड घटनास्थळी निवडणूक अधिकारी व पोलीस प्रशासनाने जप्त केले होते. हा प्रकार बावनकुळेंना मान्य असेल, तर या मतचोरीला बावनकुळेंचे राजकीय संरक्षण आहे, असा आरोपही कुंभारे यांनी केला. याशिवाय, पुण्यातील महारवतनाच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवार हे मुख्य आरोपी आहेत, असे कुंभारे यांनी म्हटले आहे. पार्थ अजित पवार यांच्याकडे कंपनीचे ९९% शेअर्स असतानाही त्यांचे एफआयआरमध्ये नाव नाही किंवा त्यांना अटकही झाली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हा घोटाळा महसूल खात्यांतर्गत झालेला आहे. बावनकुळे महसूलमंत्री असल्याने या मोठ्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन करून सरकारने पळवाट काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मी बोललेल्या शब्दांवर कायम आहे. या जमीन घोटाळ्याला बावनकुळे स्वतः जबाबदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे, अशी मागणीही कुंभारे यांनी या निवेदनात केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 4:36 pm

39 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये विजेत्यांची घोषणा:इथिओपियाचा टेरेफे हैमानोत पुरुष गटात, तर साक्षी जडियाल महिला गटात अव्वल

39व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत रविवार, 7 डिसेंबर रोजी पूर्ण मॅरेथॉन पुरुष गटात इथिओपियाच्या टेरेफे हैमानोतने (2 तास 20 मिनिटे 08 सेकंद) तर महिला गटात भारताच्या साक्षी जडियालने (2 तास 39 मिनिटे 37 सेकंद) विजेतेपद पटकावले. 42.195 किमीच्या या पूर्ण मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात इथिओपियाचा मिको देरेजे अलेनू (2 तास 20 मिनिटे 09 सेकंद) दुसऱ्या स्थानावर राहिला, तर भारताच्या त्रिथा पुनने (2 तास 20 मिनिटे 17 सेकंद) तिसरा क्रमांक पटकावला. महिलांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये इथिओपियाची इडो टूलो (2 तास 40 मिनिटे 56 सेकंद) दुसऱ्या स्थानी, तर इथिओपियाची वारे डेमिसी (2 तास 50 मिनिटे 46 सेकंद) तिसऱ्या स्थानी राहिली. अर्ध मॅरेथॉन पुरुष गटात भारताच्या सचिन यादवने (1 तास 3 मिनिटे 43 सेकंद) प्रथम क्रमांक मिळवला. राज तिवारी (1 तास 3 मिनिटे 44 सेकंद) दुसऱ्या स्थानी, तर मुकेश कुमार (1 तास 4 मिनिटे 3 सेकंद) तिसऱ्या स्थानी होते. महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये भारताच्या भारती (1 तास 13 मिनिटे 59 सेकंद) हिने विजेतेपद पटकावले. रविणा गायकवाड (1 तास 15 मिनिटे 58 सेकंद) दुसऱ्या, तर तसेहय देसजन (1 तास 18 मिनिटे 19 सेकंद) तिसऱ्या क्रमांकावर राहिली. या प्रमुख स्पर्धांव्यतिरिक्त 10 किमी, 5 किमी आणि व्हीलचेअर स्पर्धाही उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचा प्रारंभ पहाटे 3 वाजता सणस मैदानाजवळच्या हॉटेल कल्पना - विश्व चौकातून ऍड. अभय छाजेड यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून करण्यात आला. सर्व गटांतील स्पर्धकांचे सामने पूर्ण झाल्यानंतर सणस मैदानावर बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार, अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, विशाल चोरडिया, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, आबा बागुल, प्रशांत जगताप, संजय मोरे, सुनील शिंदे, लता राजगुरू, डॉ. सतीश देसाई, संगीता तिवारी, डॉ. राजेंद्र जगताप, सचिन आडेकर, यासिन शेख, अक्षय जैन, रेस डायरेक्टर सुमंत वायकर, जॉईंट रेस डायरेक्टर रोहन मोरे आणि गुरुबंस कौर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे विश्वस्त ऍड. अभय छाजेड यांनी स्वागत केले. यावेळी बोलताना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खेळाडूंच्या एकजुटीचे कौतुक केले आणि नागरिकांनी देशाच्या प्रगतीसाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले. आजची मेरेथॉनची गर्दी त्यादृष्टीने खूप आश्वास्क आहे असे सांगून त्यांनी आयोजक अभय छाजेड व संयोजकांचे कौतुक केले. यास्पर्धेला पुणे महानगरपालिकेने 35 लाख रुपयांची बक्षिसे दिली. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व गटातील सर्व खेळाडूंना फिनिशिंग मेडल देण्यात आले. 15 हजारहून अधिक धावपटू यात सहभागी झाले होते. कार्यक्रमच्या शेवटी रेस डायरेक्टर सुमंत वायकर यांनी आभार मानले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 4:27 pm

सुप्रिया सुळे, कंगना रणौत अन् महुआ मोईत्रांचा एकत्र डान्स:भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नातील व्हिडिओ व्हायरल

संसदेत एकमेकींच्या विरोधात आगपाखड करणाऱ्या आणि विचारधारांच्या भिंती उभ्या असणाऱ्या नेत्या जेव्हा खासगी कार्यक्रमात 'डान्स फ्लोअर'वर एकत्र येतात, तेव्हा भुवया उंचावणे साहजिक आहे. भाजप खासदार नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नसमारंभात असाच एक प्रसंग घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, तृणमूलच्या महुआ मोईत्रा आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी एकाच गाण्यावर ठेका धरला असून, त्यांच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे, कंगना रनौट आणि महुआ मोईत्रा यांचा नृत्याची रिहर्सल करतानाचा फोटो समोर आला होता. आता प्रत्यक्ष कार्यक्रमाचा व्हिडिओ समोर आला आहे. यात या तिन्ही नेत्या 'ओम शांती ओम' चित्रपटातील गाण्यावर उत्साहात नृत्य करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यजमान आणि भाजप खासदार नवीन जिंदाल हेदेखील व्यासपीठाच्या मध्यभागी उपस्थित असून त्यांनीही या आनंदाच्या क्षणी ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. नेटकऱ्यांचा संताप : 'जनतेला मूर्ख बनवताय का?' राजकीय मतभेद बाजूला ठेवून नेत्यांनी एकत्र येणे ही चांगली बाब असली तरी, या व्हिडिओवरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. 'राजकीय वैर फक्त कॅमेऱ्यापुरते असते, प्रत्यक्षात हे सर्वजण एकच आहेत,' अशा शब्दांत नेटकरी आपला रोष व्यक्त करत आहेत. विशेषतः कंगना रणौतने यापूर्वी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांचे पडसाद या व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा उमटले आहेत. सोशल मीडियावरील 'डॉ. निमो यादव' आणि 'अमॉक' या हँडल्सवरून या प्रकारावर सडकून टीका करण्यात आली आहे. ज्या कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटले होते, त्याच कंगनासोबत भाजपविरोधी बाकांवरील सुप्रिया सुळे आणि महुआ मोईत्रा डान्स कसा करू शकतात? असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा राजकारण्यांच्या दुटप्पीपणाचा कळस असून, सामान्य जनतेला मूर्ख बनवण्याचा हा प्रकार असल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. रिहर्सलच्या फोटोवरूनच सुरू होती चर्चा लग्नापूर्वी कंगना रणौतने आपल्या सोशल मीडिया खात्यावरून नृत्याच्या तालीमचा फोटो शेअर केला होता. 'सहकारी खासदारांसोबत सिनेमातील क्षण अनुभवले,' असे कॅप्शन तिने दिले होते. तेव्हापासूनच या अनोख्या 'राजकीय जुगलबंदी'ची चर्चा रंगली होती.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 4:24 pm

मृदुला गर्ग यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन

पुणे : प्रतिनिधी पुढील महिन्यात सातारा येथे होत असणा-या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे. दि. १ ते ४ जानेवारी या कालावधीत संमेलन होत असून भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती […] The post मृदुला गर्ग यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 4:20 pm

स्मृती मानधनानेच पलाशसोबतचे लग्न मोडले; स्वत: केली पोस्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाबद्दल सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. स्मृती मानधनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक महत्त्वाची घोषणा करत, पलाश मुच्छलसोबतचा तिचा विवाह सोहळा रद्द झाल्याचे जाहीर केले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून स्मृती आणि पलाशच्या लग्नाबद्दल जोरदार चर्चा होती. लग्नापूर्वी […] The post स्मृती मानधनानेच पलाशसोबतचे लग्न मोडले; स्वत: केली पोस्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 4:19 pm

‘हापूस ‘नामांकनावरून विरोधकांचा आरोप

रत्नागिरी : प्रतिनिधी महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले गेल्याचा आरोप नेहमीच होतो. आता महाराष्ट्राचा आणि कोकणचा हापूस जगप्रसिद्ध आहे, मात्र येथेही गुजरातकडून महाराष्ट्रात घुसखोरी आणि पळवापळवी होत असल्याचे समोर आले आहे. गुजरातमधील वलसाडच्या आंब्याला हापूस नामांकन मिळावे यासाठी अर्ज करण्यात आला आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी […] The post ‘ हापूस ‘ नामांकनावरून विरोधकांचा आरोप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 4:18 pm

कोल्हापूरच्या राजकारणात मोठी घडामोड:माजी महापौर सई खराडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश, शिंदे गटाची ताकद वाढणार

कोल्हापूर शहराच्या राजकारणात आज अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घडामोड घडत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या माजी महापौर सई खराडे या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत. ठाणे येथे हा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला असून, स्वतः एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सई खराडे यांचा पक्षात सन्मानपूर्वक प्रवेश होणार आहे. या पक्षप्रवेशामुळे कोल्हापुरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर हे देखील विशेष उपस्थित राहणार आहेत, ज्यामुळे या कार्यक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे सई खराडे यांच्यासह त्यांचे चिरंजीव शिवतेज खराडे हे सुद्धा शिंदे गटात सामील होत आहेत. केवळ सई खराडेच नव्हे, तर त्यांच्यासोबत युवा पिढीतील शिवतेज खराडे यांच्या प्रवेशामुळे पक्षाला तरुण रक्ताची आणि नव्या उर्जेची साथ मिळणार आहे. सई खराडे यांची कोल्हापूरच्या राजकारणात एक अनुभवी नेत्या अशी ओळख आहे. त्यांनी यापूर्वी शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर प्रभागातून दोन वेळा कोल्हापूर महानगरपालिकेत प्रतिनिधित्व केले आहे, तसेच 2005 साली त्यांनी कोल्हापूरचे महापौरपदही भूषविले होते. त्या कृषीभूषण कै. महिपतराव उर्फ पापा बेंद्रे यांच्या कन्या आणि माजी नगराध्यक्ष कै. सखारामबापू खराडे यांच्या स्नुषा आहेत. असा भक्कम राजकीय आणि सामाजिक वारसा त्यांच्या पाठीशी असल्याने त्यांच्या या निर्णयाचे मोठे वजन मानले जात आहे. सई खराडे यांच्या या प्रवेशामुळे कोल्हापूरमध्ये शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे. आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, एका अनुभवी माजी महापौरांची साथ मिळाल्याने शिंदे गटाचे स्थान शहरात अधिक बळकट होईल. राज्य आणि जिल्हास्तरीय नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सोहळ्यामुळे कोल्हापूरच्या स्थानिक राजकारणावर आणि महानगरपालिकेच्या गणितांवर दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 4:16 pm

उद्या मुंबईही गुजरातची झालेली दिसेल!

नागपूर : प्रतिनिधी जर चेतक घोड्याची आई गुजराती असू शकते, तर हापूस आंबा का असू शकत नाही? उद्या मुंबईही गुजरातची झालेली दिसेल! अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत सत्ताधा-यांवर ‘इतिहास बदलण्याचा प्रयत्न’ केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. हापूसवरील हा कृषी-आर्थिक वाद आता स्पष्ट राजकीय रंगात परिवर्तित झाला आहे. स्थानिक स्वराज्य […] The post उद्या मुंबईही गुजरातची झालेली दिसेल! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 4:16 pm

‘मोटा हो जाऊंगा’ म्हणत रोहितने नाकारला केक

मुंबई : प्रतिनिधी रोहित शर्मा आणि किस्से सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतात. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिस-या वनडेत रोहित आणि कुलदीप यादव यांच्यात डीआरएसवरून रंगलेली मजेशीर जुगलबंदी सगळ्यांनीच अनुभवली. सामना संपल्यानंतर रोहितचा आणखी एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहितने गेल्या काही महिन्यांमध्ये जिममध्ये घाम गाळत मेहनतीने वजन कमी केले आहे. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याची चपळता वाखाणण्याजोगी […] The post ‘मोटा हो जाऊंगा’ म्हणत रोहितने नाकारला केक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 4:14 pm

महिलेवर सामूहिक अत्याचार; आरोपीला अटक

ठाणे : प्रतिनिधी ठाण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाणे फॅमिली न्यायालयाच्या आवारात एका महिलेला तिच्या वाढदिवसाच्या केकमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे, तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. पोलिस या घटनेचा सविस्तर तपास करत असून ठाण्यासारख्या गजबजलेल्या परिसरात ही घटना […] The post महिलेवर सामूहिक अत्याचार;आरोपीला अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 4:13 pm

इंडिगो पूर्ववत होतेय पण कारवाई होणार; मंत्री मोहोळांचे स्पष्टीकरण

पुणे : प्रतिनिधी केंद्रातील नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी (ता. ७ डिसेंबर) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेले काही दिवस विमानप्रवाशांना खूप त्रास झाला आहे. प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. खरं तर इंडिगोच्या व्यवस्थापनाने मागील दोन-तीन महिन्यांत ज्या तांत्रिक गोष्टी करायला हव्या होत्या, त्या केल्या नाहीत आणि […] The post इंडिगो पूर्ववत होतेय पण कारवाई होणार; मंत्री मोहोळांचे स्पष्टीकरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 4:12 pm

विधिमंडळ अधिवेशनात बोलू दिले जात नाही:काँग्रेस प्रतोद राजेश राठोड म्हणाले- मुख्यमंत्र्यांसमोर दोन माइक, विरोधीपक्ष नेत्यासमोर एकही नाही!

महायुती सरकारला राज्यात विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेता नकोच आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी मागील अधिवेशनात विधान परिषदेत चक्क विरोधी पक्षनेत्यासमोरचा माईक काढून तो मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला, असा आरोप काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद राजेश राठोड यांनी दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना केला आहे. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, प्रलंबित विरोधी पक्षनेतेपदावरून त्यांनी सरकारवर तोफ डागली. राजेश राठोड यांनी गेल्या अधिवेशनातील प्रसंग सांगताना सभापतींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, सभागृह नेता आणि विरोधी पक्षनेता यांना समान दर्जा असतो. मात्र, मागील काळात विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्याला बोलता येऊ नये म्हणून त्यांच्यासमोरील कायम सुरू असणारा माईक काढून केवळ सभापतींच्या नियंत्रणाखालील माईक ठेवण्यात आला. तर, दोन्ही 'ऑन' असणारे माईक मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. उजवा आणि डावा असा भेद सभापतींना करता येत नाही, तरीही विरोधकांना प्रश्न मांडू दिले जात नाहीत. सत्ताधारी बोलू देत नाही सभागृहातील गोंधळावर भाष्य करताना आमदार राजेश राठोड म्हणाले की, आम्ही प्रश्न विचारण्यासाठी हात वर करून थकतो, पण संधी दिली जात नाही. आम्ही बोलायला लागलो की बेल वाजवली जाते किंवा सत्ताधारी पक्षाचे आमदार गोंधळ घालून आमचा आवाज दाबतात. हे लोकशाहीसाठी घातक आहे. मविआत सामंजस्याने बदल होऊ शकतो आमदार राजेश राठोड म्हणाले की, विधानसभेत शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने तिथे त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार असेल, तर विधान परिषदेत काँग्रेसचे संख्याबळ अधिक असल्याने हे पद काँग्रेसलाच मिळावे. जर शिवसेनेला विधान परिषदेचे पद हवे असेल, तर महाविकास आघाडीत सामंजस्याने बदल करून काँग्रेसला विधानसभेतील पद देण्यात यावे. विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसमध्ये सतेज पाटील यांच्या नावाला सर्वांची पसंती आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींनी मराठवाडा किंवा विदर्भाचा विचार केल्यास माझ्यासह प्रज्ञा सातव, धीरज लिंगडे किंवा अभिजित वंजारी यांच्या नावांचाही विचार होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेता घोषित करावा राजेश राठोड म्हणाले की, महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेत कधीही विरोधी पक्षनेता नाही असे घडले नाही, याची आठवण करून देताना राठोड म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून विधानसभेत आणि ऑगस्टपासून विधान परिषदेत हे पद रिक्त असणे हे महाराष्ट्राच्या वैभवाला शोभणारे नाही. विरोधी पक्षनेता हा शेतकरी, कष्टकरी, महिला आणि तरुणांचा आवाज असतो. सभापतींनी संख्याबळ पाहून त्वरित काँग्रेसच्या नेत्याची या पदावर घोषणा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 2:44 pm

तपोवनातील 'झाडांसोबत एक कविता, एक दिवस':साधूग्राममध्ये साहित्यिकांचे सरकारच्या विरोधात शोक संमेलन, राज्यभरातील कवींची हजेरी

नाशिकचे वैभव असलेल्या तपोवनातील झाडे सध्या धोक्यात आली आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधूग्रामच्या उभारणीसाठी साठी तपोवनातील शेकडो डेरेदार वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. याला विरोध करण्यासाठी येथे रोज विविध उपक्रम राबविले जात आहेत. या 'वृक्षहत्ये'च्या सरकारी निर्णयाचा निषेध करण्यासाठी आता महाराष्ट्रातील संवेदनशील कवी आणि साहित्यिक सरसावले आहेत. याचाच भाग म्हणून आज, रविवारी (दि. 7) तपोवनातील साधूग्रामच्या जागेवर ‘झाडांसोबत एक कविता, एक दिवस’ या घोषवाक्याने सरकारच्या नावे शोक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात झाली असून त्यासाठी तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पासाठी 1800 झाडांची तोड होणार असल्याची माहिती समोर येताच संतापाची लाट उसळली आहे. साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करावी लागणार आहे. या निर्णयाचा नागरिक, पर्यावरणप्रेमी, स्थानिक संघटना तसेच अनेक कलाकारांनी याला जोरदार विरोध केला आहे. कुऱ्हाडीच्या घावावर कवितेची फुंकर तपोवनातील झाडे वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लढा देत आहेत. रोज विविध उपक्रम राबवून प्रशासनाचे लक्ष वेधले जात आहे. या लढ्याला बळ देण्यासाठी आणि निसर्गाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘झाडांसोबत एक कविता, एक दिवस’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन आज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत तपोवनातील नियोजित वृक्षतोडीच्या ठिकाणी पार पडत आहे. शोक संमेलनाला राज्यभरातील कवींची उपस्थिती विशेष म्हणजे, तपोवनमधील वृक्षतोडीविरोधातील हे केवळ स्थानिक राहिले नसून त्याला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले आहे. या शोक संमेलनाचे आयोजन नांदेड येथील प्रसिद्ध कवी श्रीकांत देशमुख आणि पुण्यातील मंगेश काळे यांनी पुढाकार घेऊन केले आहे. झाडांच्या वेदना मांडण्यासाठी आणि सरकारी अनास्थेवर शब्दांचे आसूड ओढण्यासाठी राज्यभरातून कवी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये नाशिकचे ज्येष्ठ कवी अरुण गवळी, सत्यजित पाटील, अहिल्यानगरचे (अहमदनगर) श्रीकांत ढेरंगे, हिंगोलीचे आण्णासाहेब जगताप यांच्यासह अनेक मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. एरवी साहित्याचा उत्सव साजरा करण्यासाठी संमेलने होतात, पण निसर्गाचा ऱ्हास होत असताना सरकारच्या संवेदना मेल्या आहेत, असे मानून हे अनोखे 'शोक संमेलन' भरवण्यात येत आहे. निर्णय मागे घेण्यासाठी शब्दांचा सत्याग्रह पर्यावरणाचा बळी दिला जात असताना, समाज म्हणून आपण गप्प बसू शकत नाही, ही भूमिका घेऊन साहित्यिक रस्त्यावर उतरले आहेत. या संमेलनात कवी आपल्या कवितांमधून निसर्गाचे महत्त्व, झाडांचे दुःख आणि मानवी स्वार्थ यावर भाष्य करत आहेत. प्रशासनाने वृक्षतोडीचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी हा शब्दांचा सत्याग्रह आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 2:08 pm

ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने मारहाण

बीड : प्रतिनिधी बीडमधील मारहाणीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. गेवराई तालुक्यात अशीच एक घटना घडली असून नांदगाव ग्रामसेवकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली. जालिंदर सुरवसे असं ग्रामसेवकाचं नाव असून त्याला गावगुंडांनी मारहाण केली. या प्रकरणी तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. ग्रामसेवकाला करण्यात आलेली मारहाण ही जबर होती. त्यामध्ये ग्रामसेवकाच्या अंगावर मारहाणीचे वळ […] The post ग्रामसेवकाला लोखंडी रॉडने मारहाण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 1:31 pm

हिवाळी अधिवेशनालाही ‘इंडिगो’चा फटका

मुंबई : प्रतिनिधी देशातील सर्वात मोठी एअरलाइन कंपनी असलेल्या इंडिगो एअरलाइन्सची सुविधा कोलमडली आहे. गेल्या पाच दिवसांपासून या कंपनीची विमानसेवा विस्कळीत झाली असून याचा हजारो प्रवाशाां फटका बसला आहे. इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेचा केवळ सामान्य नागरिकांना किंवा अभिनेत्री-अभिनेत्यांनाच फटका बसलेला नाही तर याचा फटका महाराष्ट्रातील मंत्री, आमदार आणि अन्य नेतेमंडळींनाही बसला आहे. सोमवारपासून (ता. ७ डिसेंबर) […] The post हिवाळी अधिवेशनालाही ‘इंडिगो’चा फटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 1:27 pm

हुरड्याला मागणी वाढली; दर तेजीत

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी कडाक्याची थंडी पडल्यानंतर राज्यभर हुरडा पार्ट्यांची संख्या वाढली आहे. जागोजागी हॉटेल, ढाबे, स्टॉलवर हुरडा खाण्यासाठी आणि खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढली आहे. यंदा अतिवृष्टीमुळे हुरडा उत्पादन घटले असून, बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे. हुरड्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे. ज्वारीच्या कोवळ्या हिरव्या दाण्यांना ‘हुरडा’ म्हणतात. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात हुरड्याचा हंगाम सुरू […] The post हुरड्याला मागणी वाढली; दर तेजीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 1:18 pm

नागपुरात उद्यापासून हिवाळी अधिवेशन:विरोधकांचा शासनाच्या चहापानावर बहिष्कार, इंडिगोच्या विस्कळीत सेवेचा नेत्यांनाही फटका

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी नागपूर सज्ज झाली असून, उद्या सोमवारपासून अधिवेशनाचे बिगुल वाजणार आहे. मात्र, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच 'इंडिगो' एअरलाईन्सच्या विमानांचे वेळापत्रक कोलमडल्याने मंत्री, आमदार आणि सनदी अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ऐनवेळी विमाने रद्द झाल्याने अनेक नेत्यांनी रस्ते मार्गाचा, तर काहींना रेल्वेचा पर्याय निवडला. दरम्यान, विरोधकांनी आजच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. 8 ते 14 डिसेंबर दरम्यान, अवघा एक आठवडा चालणाऱ्या या अधिवेशनासाठी राजकीय वातावरण तापले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज (रविवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'रामगिरी' या शासकीय निवासस्थानी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, परंपरा कायम राखत विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार टाकला. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठकही पार पडली, ज्यात अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यानंतर महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, अभिजित वंजारी, प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधव, सुनील प्रभू, अनिल परब उपस्थित होते. नेत्यांना इंडिगो विमानसवेचा फटका अधिवेशनासाठी आज अनेक मंत्री आणि आमदार नागपुरात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, इंडिगोच्या मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर विमानांच्या गोंधळामुळे नियोजनाचा बोजवारा उडाला. मुंबई आणि पुण्याहून येणारी उड्डाणे रद्द झाल्याने अनेक लोकप्रतिनिधींना नाईलाजाने विमानवारी सोडून 'समृद्धी महामार्गा'ने नागपूर गाठावे लागले आहे. तर काही नेते रेल्वेने नागपूरमध्ये दाखल झाले. नागपुरात सर्वत्र होर्डिंग्स, CM, दोन्ही DCM चे जंगी स्वागत महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन असल्याने नागपुरात जंगी तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी भव्य होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. विमानतळापासून विधानभवनापर्यंतच्या रस्त्यावर नेत्यांच्या स्वागताचे फलक लक्ष वेधून घेत असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 1:15 pm

गोव्यातील नाइट क्लबमध्ये सिलिंडरचा स्फोट, २५ ठार

पणजी : प्रतिनिधी गोव्यातील उत्तरेला असलेल्या अर्पोरा भागातील एका नाइट क्लबला शनिवारी (ता. ६ डिसेंबर) रात्री उशिरा आग लागली. ‘बर्च बाय रोमियो लेन’ असे या नाइट क्लबचे नाव असून या घटनेत एकूण २५ जण ठार झाले आहेत. या नाइट क्लबमधील सिलिंडर ब्लास्टमुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत क्लबमधील जवळपास ५० […] The post गोव्यातील नाइट क्लबमध्ये सिलिंडरचा स्फोट, २५ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 12:58 pm

मुंबई महापालिकेने कबुतरखान्यासाठी दिलेले 4 ही पर्यायी स्थळ मान्य नाहीत:मागन्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करणार- जैन मुनी नीलेशचंद्र

दादर येथील ऐतिहासिक कबूतरखाना बंद करण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयावरून जैन समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. जैन धर्मातील 'जीवदया' तत्त्वाचे पालन करण्यासाठी हा कबूतरखाना त्वरित सुरू करावा, या मागणीसाठी जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी प्रशासनाला आणि सरकारला थेट आव्हान दिले असून, मागणी पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने दादरचा कबूतरखाना बंद केला आहे. मात्र, हा कबूतरखाना 100 वर्षांहून अधिक जुना असून तो जैन समाजाच्या श्रद्धेचे प्रतीक असल्याचे मुनींचे म्हणणे आहे. पालिकेने कबूतरखान्यासाठी सुचवलेल्या चारही पर्यायी जागा आम्हाला मान्य नाहीत. कबूतर 4 ते 7 किलोमीटर लांब उडून जाऊ शकत नाहीत. जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत आम्ही यासाठी लढू असेही त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. आझाद मैदानात आंदोलन या मागणीसाठी मुनींनी आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर आणि 15 दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर मुनींनी तात्पुरते उपोषण मागे घेतले. अजूनही सरकारने काहीही केलेले नाही, याचा अर्थ त्यांच्यात जीवदया उरलेली नाही, अशी तोफ मुनींनी आश्वासन पूर्ण न झाल्याने डागली आहे. ..तोच मुंबईवर राज्य करेल जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी स्वतःला 'कट्टर सनातनी' संबोधत राजकीय नेत्यांनाही सूचक इशारा दिला आहे. मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही, केवळ जीवदयेसाठी हे करत आहे. पण लक्षात ठेवा, मुंबईवर तोच राज्य करेल जो भूतदया दाखवेल, असे ते म्हणाले. तसेच, आम्हाला 'हिंदूराष्ट्र' बनवायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. जैन प्रार्थनास्थळे आणि कबूतरखान्यांच्या संरक्षणासाठी गोरक्षक बोर्डाप्रमाणेच स्वतंत्र बोर्ड स्थापन करावे.धर्मासाठी प्रसंगी तीव्र पावले उचलण्याचा इशाराही त्यांनी दिला होता, मात्र नंतर शांततामय मार्गाने सत्याग्रह करणार असल्याचे स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 12:53 pm

उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त त्यांना टोमणे मारणे हाच एक उद्योग राहिलाय:आमचा पक्ष शिंदेंच चालवतात, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त झाल्याने त्यांना टोमणे मारणे आणि टीका करणे हाच एक उद्योग राहिला आहे. महायुतीमध्ये आम्ही काय सुरू आहे, याच्याशी तुम्हाला काय करायचे आहे? तुम्ही तुमचे पाहा ना? असा टोला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, तुमचे अस्तित्व काय आहे यावर तुम्ही बोलले पाहिजे. स्वत:च पक्ष सोडून इतरांच्या पक्षात नाक खूपसण्याचे कारण काय? असा सवाल शिरसाट यांनी केला आहे. आम्ही कसे काम करतो हे महाराष्ट्रातील जनतेनी पाहिले आहे. त्यांना माहिती आहे की आम्ही कसे काम करतो. तुमच्या सांगण्यामुळे काही फरक पडतो असे समजू नका. तुमच्या सांगण्याने पक्ष चालेल का? संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये भेटी घेण्यासाठी चालले आहेत. त्यांना तिथे जाऊन गळा भेट घेत आम्हाला पदरात घ्यावे असे काहीही म्हणावे. पण असे बोलून स्वत:चे हसू का करुण घेतात. आमच्या पक्षाची चिंता तुम्हाला काबर आहे तुमच्या सांगण्याने पक्ष चालेल का? आमच्या नेत्यांना कसा पक्ष चालवायचा हे समजत नाही का? आमचा पक्ष कोणी चालवत नाही आमचा पक्ष एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अजित पवार चालवतात असे म्हणत शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंची टीका काय? उद्धव ठाकरें म्हणाले की, महायुतीमधील तीनही पक्षाचे नेते एकच आहेत. तिन्ही पक्षाचं चिन्ह, नाव, वेगवेगळं असलं तरी त्यांचा मालक एकच आहे. त्यांच्या (भाजप) या बी टीम आहेत. मी काही दिवसांपूर्वी एक शब्द वापरला होता की अ‍ॅनाकोंडा. आता या अ‍ॅनाकोंडाचा प्रत्येय महायुतीमधील पक्षांना यायला लागलेला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय राहणार नाही. विरोधी पक्षनेतेपद व उपमुख्यमंत्रीपद या दोन गोष्टी आहेत. कारण, विरोधी पक्षनेतेपद हे सरकारने द्यायलाच हवे. आम्ही पहिल्याच अधिवेशनात तशी मागणी केली होती. एक वर्ष होऊन गेले. त्यात सरकारने जाहिरातींशिवाय दुसरे काहीच केले नाही. कदाचित विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाला वर्षभर विरोधी पक्षनेता नसण्याची ही पहिलीच वेळ असावी. हे सरकार विरोधी पक्षनेतेपदाला का घाबरत आहे? हे अत्यंत मजबूत सरकार आहे. त्यांना दिल्लीचाही पाठिंबा आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 11:31 am

कोर्टाच्या आवारात महिलेवर कारमध्ये सामूहिक अत्याचार:बर्थडेसाठी बोलावले, केकमध्ये गुंगीचे औषध देऊन पाशवी कृत्य; ठाण्यातील घटना

न्यायदेवतेच्या मंदिरात जिथे अन्यायाविरुद्ध दाद मागितली जाते, त्याच ठाणे फॅमिली कोर्टाच्या आवारात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. 'बर्थडे' सेलिब्रेशनच्या बहाण्याने एका विवाहित महिलेला कारमध्ये बोलावून, तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. 25 ऑगस्ट 2025 रोजी घडलेल्या या संतापजनक प्रकाराचा उलगडा तब्बल तीन महिन्यांनी झाला असून, पीडितेने हिंमत एकवटून तक्रार दाखल केल्यानंतर ठाणे नगर पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित विवाहितेने सोशल मीडियावर कामासंदर्भातील जाहिरात पाहिली होती. चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या आशेने तिने संबंधित नंबरवर संपर्क साधला. संशयित आरोपींनी तिचा विश्वास संपादन करत तिला ठाण्यातील एका स्पा सेंटरमध्ये काम मिळवून दिले. केक कापण्याचा बहाणा आणि काळरात्र घटनेच्या दिवशी, म्हणजेच 25 ऑगस्ट 2025 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास एका आरोपीने स्पा सेंटरमध्ये जाऊन पीडितेकडून मसाज करून घेतला. त्यानंतर 'आज माझा वाढदिवस आहे, केक कापायचा आहे' असे सांगून तिला बाहेर उभा असलेल्या 'इर्टिगा' कारमध्ये बोलावले. आरोपींनी गाडी थेट ठाणे फॅमिली कोर्टाच्या अंधाऱ्या पार्किंगमध्ये नेली. तिथे केक कापताना त्यांनी त्यात आधीच गुंगीचे औषध मिसळले होते. हा केक खाल्ल्यानंतर पीडितेची शुद्ध हरपली. याच संधीचा फायदा घेत गाडीतील दोन्ही नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. इतकेच नाही, तर या पाशवी कृत्याचे त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरणही केले. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी रात्री 11 वाजता पीडितेला रस्त्यावर सोडून देताना, वाच्यता केलीस तर व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी आरोपींनी दिली. बदनामीच्या भीतीने पीडितेने तीन महिने हे दुःख मनात दाबून ठेवले. मात्र, आरोपींनी या व्हिडिओचा आधार घेत तिला सातत्याने ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. अखेर हा त्रास सहन न झाल्याने पीडितेने 5 डिसेंबर 2025 रोजी एका वकिलाच्या आणि मैत्रिणीच्या मदतीने ठाणे नगर पोलिस ठाणे गाठले आणि आपबीती सांगितली. एकास अटक, दुसऱ्याचा शोध सुरू पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, हिरालाल केदार या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर रवी पवार हा फरार आहे. पोलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके त्याचा शोध घेत आहेत. न्यायालयाच्या आवारातच अशी घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 11:15 am

सोलापुरात स्वयंपाकासाठी स्वस्त गॅस देण्याची महत्त्वाकांक्षी योजना रखडली:30 हजारांपैकी फक्त 500 घरांत पाइपने गॅस; पालिकेकडून दंडाच्या धास्तीने ठेकेदार पळाले

सोलापूर शहरातील 30 हजार घरांना पाइपलाइनद्वारे घरगुती गॅस (पीएनजी) पुरवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडला आहे. त्याचे कारण कंपनीला मुदतीत काम करता आले नाही. दुसरीकडे दिरंगाई, रस्ते खोदाईमुळे महापालिका सातत्याने दंड करत असल्याने कंपनीने कामच थांबवले. त्यांनी नियुक्त केलेले ठेकेदार पळून गेले. ‘पाइप्ड नॅचरल गॅस’ (पीएनजी) पाइपलाइनद्वारे घरगुती व औद्योगिक ग्राहकांना पुरवला जाणारा नैसर्गिक वायू आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी स्वस्त गॅस मिळणार आहे. चेन्नईच्या आयएमसी कंपनीला हे काम देण्यात आले. त्यांनी गेल्या 4 वर्षांत 30 पैकी 11 हजार घरांना मीटर लावले आणि फक्त 500 घरांपर्यंत गॅस पोहोचला. उर्वरित कामासाठी महापालिकेने 3 महिन्यांची मुदत दिली. पण ते शक्य नसल्याने कंपनीने अंग काढून घेतले. त्यामुळे उर्वरित 29,500 घरांपर्यंत गॅस पोहोचलाच नाही. सव्वाकोटी रुपये भरून खोदाईची परवानगी घेतली, तरी मनपाकडून दंडाचा सपाटा सुरू कंपनीने 300 कोटी रुपयांची गुंतवणूक करून प्रकल्प सुरू केला. 11 हजार घरांना मीटर बसवले. पाइपलाइनसाठी रस्ते खोदाईला परवानगी घेतली. त्यासाठी सव्वा कोटी रुपये भरले. तरीही मनपाकडून दंडाचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे काम करणे अवघड झाले. खड्डे खोदण्यासाठी नियुक्त केलेले ठेकेदारही निघून गेले. महापालिकेचे सहकार्य नसल्यानेच हे सारे घडून आले.- हेमंतकुमार, आयएमसीचे उपाध्यक्ष प्रत्येक वेळी रस्ता फोडता येणारच नाही आयएमसी कंपनीकडून एक-दोन घरांना कनेक्शन देण्यासाठी सतत रस्ता फोडला आहे.‌ परवानगी घेतली असली तरी प्रत्येक वेळी रस्ता खोदता येणार नाही. ज्या भागामध्ये कनेक्शन द्यायचे, अशा भागातील सर्व कामांचे क्लबिंग करून एकदाच परवानगी घ्या, अशा सूचना केल्या. परंतु ते संपूर्ण शहरासाठी एकदाच परवानगी मागत आहेत. तसे होणार नाही. - डॉ. सचिन ओम्बासे, आयुक्त महापालिका रस्ते खोदण्याच्या परवानगीलासव्वाकोटी भरले, पुन्हा दंड..? आयएमसी कंपनीने महापालिकेची परवानगी न घेता, पाइपलाइनसाठी खड्डे खोदले. त्यामुळे महापालिकेने नोव्हेंबर महिन्यात कंपनीला 2 लाख 50 हजार रुपयांचा दंड केला. त्यानंतर कंपनीने रीतसर परवानगीसाठी अर्ज केला. त्यासाठी 1 कोटी 25 लाख रुपये भरले. तरीही पुन्हा महापालिकेकडून दंड कशासाठी आकारला जातो? असा कंपनीचा प्रश्न आहे. शिवाय 29 हजारांवर घरांपर्यंत गॅस पोहोचवण्याच्या उर्वरित कामासाठी फक्त तीन महिन्यांची मुदत दिली. इतक्या कमी कालावधीत तेही रस्ते न खोदता काम कसे होईल? म्हणून कंपनीने काम थांबवले आहे. बीपी, एचपी गॅस दर 860 रुपयेपीएनजी 672, 188 रुपये स्वस्त पीएनजी स्टँडर्ड क्यूबिक मीटरमध्ये मोजला जातो. प्रती क्यूबिक मीटरसाठी 48 रुपयांचा दर आहे. एका सिलिंडरमध्ये 14 किलो गॅस असतो. तेवढाच पीएनजी वापरला तर 672 रुपये मोजावे लागतील. बीपी, एचपी कंपनी गॅसच्या तुलनेत 188 रुपयांची बचत होते. त्यामुळे पीएनजीला मागणी वाढली आहे. सोलापूरकरांना त्याची प्रतीक्षा आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 11:02 am

नाशिकच्या 'ग्रीन कुंभ'साठी सरकारचे 'डॅमेज कंट्रोल':विरोध सुरू असताना गिरीश महाजन राजमुद्रीत पोहोचले, 'आधी लागवड, मगच तोड'चा फॉर्म्युला

पुढील वर्षी 2027 मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीने वेग घेतला असला, तरी नियोजित साधूग्रामसाठी तपोवनातील 1800 झाडे तोडली जाणार या बातमीने नाशिककरांसह राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचा वाढता रोष पाहता, आता राज्य सरकारने तातडीने 'डॅमेज कंट्रोल' सुरू केले आहे. तपोवनातील एकाही झाडाला हात लावण्यापूर्वी शहरात तब्बल 15 हजार देशी वृक्षांची लागवड केली जाईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, यासाठी थेट दक्षिण भारतातील 'राजमुद्री' (आंध्र प्रदेश) येथून 15 फूट उंचीची झाडे मागवण्यात येत आहेत. कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी सुमारे 1150 एकरांवर साधूग्राम उभारण्याचे सरकारचे नियोजन आहे. मात्र, यासाठी तपोवन परिसरातील 1800 झाडे अडथळा ठरत असल्याने ती तोडण्याचा प्रस्ताव पुढे आला. या विरोधात पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटना आणि काही सेलिब्रिटींनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आता वृक्षारोपणाचे मोठे मिशन हाती घेतले आहे. यासाठी गिरीश महाजन हे राजमुद्री येथे दाखल झाले आहेत. मंत्री महाजनांची 'राजमुद्री'वारी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः आंध्र प्रदेशातील राजमुद्री येथे जाऊन नर्सरीची पाहणी केली. तेथून वड, पिंपळ, लिंब, जांभूळ आणि आंबा यांसारखी 15 फूट उंचीची 15 हजार पूर्ण वाढ झालेली झाडे निवडली आहेत. यातील पहिली खेप म्हणून एक ते दोन हजार झाडे येत्या आठवडाभरात नाशिकमध्ये दाखल होतील. मनपा उद्यान विभागामार्फत ठिबक सिंचन आणि सेंद्रिय खतांचा वापर करून या वृक्षांचे जतन केले जाईल. ...तरच तपोवनातील झाडांना हात लावणार सरकारची भूमिका स्पष्ट करताना महाजन म्हणाले की, साधूग्रामच्या जागेवरील एक्झिबिशन सेंटरचे टेंडर रद्द केले आहे. आधी शहरात 15 हजार नवीन वृक्ष लावू, त्यानंतरच तपोवनातील झाडांबाबत विचार होईल. तोडण्याऐवजी जास्तीत जास्त झाडांचे पुनर्रोपण करण्यावर आमचा भर असेल. उद्या तोडगा निघणार? दरम्यान, वृक्षतोडीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आंदोलकांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे. उद्या (ता. 8) होणाऱ्या या बैठकीत प्रशासनाची भूमिका आणि पर्यावरणप्रेमींच्या मागण्या यावर चर्चा होईल. साधूग्रामसाठी झाडे काढावीच लागतील, या प्रशासनाच्या भूमिकेवर तोडगा निघतो की आंदोलन आणखी चिघळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 10:59 am

जळगावात इकडे कोंडी, तिकडे पोलिस मोबाइलवर व्यग्र‎:टॉवर, बेंडाळे, नेरीनाका, अजिंठा चौफुली चौकात दर अर्धा तासाच्या अंतराने वाहतूक ठप्प‎

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ‎चौकाचौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक ‎करण्यात आली आहे. नियमांची पायमल्ली ‎केल्यावर ते दंडही करतात. मात्र, बहुतांश‎वेळा इकडे वाहतूक कोंडी झालेली असताना‎ तिकडे वाहतूक पोलिस मोबाइलवर व्यग्र राहत ‎असल्याचे चित्र ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने‎ शुक्रवारी शहरात केलेल्या पाहणीतून समोर ‎आले आहे.‎ ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने शहरातील‎ प्रमुख 10 चौकांसह वर्दळीच्या चौकांत ही‎ पाहणी केली. त्यात शहरातील टॉवर, कोर्ट,‎बेंडाळे, नेरीनाका, इच्छादेवी, शिव कॉलनी,‎दाणाबाजार, घाणेकर चौक, गोकूळ स्वीट‎मार्ट, बसस्थानक, स्वातंत्र्य चौक, पांडे‎डेअरी, सिव्हिल परिसरात दर पाच ते 30‎ मिनिटांत कोंडी होत असल्याचे समोर आले.‎ सामान्य लोक सकाळी आणि सायंकाळी ‎दररोज तासन‌्तास वाहतूक कोंडीत‎ अडकताहेत. एवढेच नव्हे तर वाहतूक‎ पोलिस तैनात असताना सुद्धा वाहनधारक ‎सिग्नल तोडतात किंवा रस्त्याच्या चुकीच्या‎ बाजूला गाडी चालवत आहेत. लोक जिथे‎ कुठेही छोटीशी जागा पाहतात तिथे वळत आहेत. रस्त्यावर कोंडी होत‎असतानाही ती कोंडी न सोडवता कर्मचारी केवळ ‎मोबाइलवर बोलण्यात व्यग्र दिसतात. टॉवर चौक,‎सुभाष चौक, दाणाबाजरात रिक्षांमुळे कोंडी होत‎ असतानाही त्यांना हटवण्यासाठी वाहतूक‎ पोलिसांकडून प्रयत्न होताना दिसत नाही.‎ डाव्या बाजूला वळण घ्यायचे कसे?... शिव‎कॉलनी आणि कालिंका माता चौफुलीवर वाहतूक‎ कर्मचारी नेमले जात होते पण, आता तेथेही‎ कर्मचारी नेमणे बंद केले आहे. सुभाष चौकात‎ रिक्षा चालकांकडून रस्ता बंद होतो हे सुद्धा वाहतूक ‎पोलिसांना दिसते. पण कारवाई होत नाही. टॉवर‎चौक, बेंडाळे चौक, नेरी नाकासह आकाशवाणी ‎चौकावर डाव्या बाजूला जाण्यासाठी रस्ताच‎ शिल्लक राहत नाही. ही समस्या आता गंभीर होत‎चालली आहे. पण, डाव्या बाजूचा रस्ता मोकळा‎ ठेवण्यासाठी सुध्दा प्रयत्न होताना दिसून येत नाही.‎ एक फिरती चारचारकी व दोन दुचाकी पथक‎शहरात वाहतूक सुरळीत करताना दिसून येत नाही.‎केवळ हे पथक महामार्गावर फिरतात.‎ दाणाबाजारात कर्मचारीत नसतो दाणाबाजारात पायी चालणेही सर्वसामान्यांना‎ कठीण झाले आहे. या ठिकाणाची वाहतूक‎ सुरळीत ठेवण्यासाठी सकाळी 9 ते दुपारी 1 आणि ‎सायंकाळी 5 ते 8 या वेळेत ड्यूटी लावली जाते‎पण, एकही वाहतूक पोलिस येथे दिसून येत नाही.‎मग, हा कर्मचारी असतो कुठे? असा प्रश्न ‎उपस्थित होतो आहे.‎ वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन चारचाकी‎ आणि दोन दुचाकी पथक असून, केवळ पोलिस‎ निरीक्षकांचे वाहन शहरात फिरताना दिसते. एक‎वाहन महामार्गावर असल्याचे सांगण्यात आले.‎तर दोन दुचाकी पथक शहरात दिसले नाही.‎पोलिस निरीक्षकांनंतर दुसरे अधिकारी पद वाहतूक‎ शाखेत नाही.‎ इच्छादेवी : सर्वाधिक वर्दळ अजिंठा चौफुली आणि‎ इच्छादेवी चौफुली येथे असते. संभाजीनगरकडे जाणाऱ्या ‎रस्त्यावर नेहमीच कोंडी होते. पण, वाहतूक पोलिस वाहनाच्या ‎शोरूमजवळ बसून राहतात. इच्छादेवी चौकातही शुक्रवारी‎ वाहतूक पोलिस नियोजित ठिकाणी दिसून आले नाही.‎ शहरातील प्रचंड वर्दळीच्या पुष्पलता बेंडाळे ‎चौकातही शुक्रवारी दुपारी वाहतूक कोंडी ‎झाली होती. येथे एक पुरुष आणि दुसरी‎ महिला पोलिस कर्मचारी तैनात होते.‎वाहतूक कोंडी झाल्यावर हळूच थोड्या‎वेळाने पुरुष कर्मचारी चौकातील कोंडी‎ सोडवण्यासाठी पुढे आला तर महिला ‎कर्मचारी आपल्या मोबाइलवर सतत व्यग्र‎ असल्याचे दिसले. कारवाईसाठी एक वाहन‎या ठिकाणी थांबवून ठेवण्यात आले होते.‎ नेरीनाका : शहरातील नेरीनाका चौक ओलांडणे हे फार‎जिकिरीचे आहे. शुक्रवारी या ठिकाणी एक वाहतूक कर्मचारी‎ दिसून आला. तो एका दुकानात बसून होता. येथे वाहनचालक‎जागा दिसेल तेथून वाहने काढण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र,‎हा प्रकार वेळप्रसंगी जीवघेणा ठरण्याची शक्यता अधिक आहे.‎ कर्मचारी कमी‎ हॉकर्सवर कारवाईसह‎पिवळे पट्टे, पांढरे पट्टे‎ आखण्यासाठी मनपाला ‎पत्र दिले आहे. वाहतूक ‎सुरळीत करण्यासाठी‎ चौकात कर्मचारी‎ असतात. सुमारे 90‎ कर्मचारी असून,‎ आणखी 35 कर्मचारी ‎नव्याने हवे आहेत.‎- पवन देसले,‎वाहतूक निरीक्षक‎ टॉवर चौकाकडून शिवाजीनगर पुलाजवळ ‎शुक्रवारी दुपारी कोंडी होत असतानाही ‎महिला पोलिस कर्मचारी आपल्या जागेवर‎ मोबाइलवर बोलण्यात व्यग्र असल्याचे दिसून आले. वाहतुकीची कोंडी झालेली‎ असताना रिक्षाचालकांना तेथून हटवण्याची‎ आणि एसटी बस रस्त्याच्या कडेला ‎थांबवण्याची सूचना केली नाही. त्यामुळे ‎पंधरा ते 20 मिनिटे वाहतूक कोंडीचा त्रास‎ वाहनचालकांना सहन करावा लागला.‎

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 10:55 am

जालना रोडवर 10 चौ.मीटरसाठी 9 लाखांचा टीडीआर:मालमत्ताधारकांना भूसंपादनाची भरपाई देण्यासाठी मनपाकडे पैसे नसल्याने टीडीआर देण्यावर भर

महापालिकेने छत्रपती संभाजीनगरमधील रस्ते विकास आराखड्यानुसार (डेव्हलपमेंट प्लॅन) रुंद करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी रस्त्याच्या आड येणाऱ्या मालमत्ता पाडण्यात येत आहेत. मनपाने सुमारे 5 हजार मालमत्ता पाडल्या. त्यापैकी काही सरकारी जागांवर अतिक्रमणे होती, तर काही मालमत्ता अधिकृत होत्या. रस्ता रुंद करण्यापूर्वी मनपाला या मालमत्तांचे संपादन करावे लागणार. एवढ्या मोठ्या प्रमाणात भूसंपादन प्रक्रिया राबवताना संबंधित मालमत्ताधारकाला भरपाई द्यावी लागणार आहे. भूसंपादनासाठी लागणारी रक्कम मोठी असल्याने महापालिका आता मालमत्ताधारकांना टीडीआर अर्थात ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राइट्स या स्वरूपात मोबदला देण्यात येणार आहे. संबंधित भागात असलेल्या रेडीरेकनरच्या दरानुसार टीडीआरचे मूल्य निश्चित केले जाते. कोणत्या भागात किती मूल्याचा ‘टीडीआर’ मिळू शकेल हा विषय सध्या ऐरणीवर आहे. राज्य शासनाने जानेवारी 2016 मध्ये ‘टीडीआर पॉलिसी’ लागू केली. नगरविकास खात्याने सर्व महापालिका व नगरपालिकांसाठी त्यांच्या हद्दीत एकसमान बांधकाम विकास नियमावली लागू केली आहे. त्यानुसार 9 मीटरपेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यांवर टीडीआर वापरण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. ‘दिव्य मराठी’ने तज्ज्ञांच्या मदतीने किती ‘टीडीआर’ मिळेल, याची माहिती घेतली. त्यानुसार, जालना व जळगाव रस्त्यावर सर्वाधिक ‘टीडीआर’ मिळणार आहे. भूसंपादनाच्या दुप्पट टीडीआर अधिकृत मालमत्तेचे भूसंपादन करायचे असल्यास बाधित होणाऱ्या मालमत्तेच्या दुप्पट क्षेत्रफळाचा लाभ टीडीआरच्या रूपाने दिला जातो. भूसंपादन झाले तेव्हाच्या रेडीरेकनर दरानुसार नोंद होते. अशा नोंदीचे प्रमाणपत्र महापालिकेकडून मालमत्ताधारकास दिले जाते. त्यास डीआरसी (बांधकाम हक्क प्रमाणपत्र) म्हणतात. 10 चौरस मीटर जागा भूसंपादनात गेली तर टीडीआर 20 चौरस मीटर क्षेत्रफळाचा मिळतो. परंतु, प्रत्यक्षात विक्री होते तेव्हा त्याला मूळ क्षेत्रफळावरच विकत घेतले जाते. टीडीआर घेण्यासाठी हे करावे लागेल विक्रीची नोंद रजिस्ट्री कार्यालयात होते. एखाद्याच्या मालमत्तेचे भूसंपादन केल्यानंतर महापालिका संबंधित मालमत्ताधारकाला ‘डीआरसी’ प्रमाणपत्र देते. याची नोंद मनपाने संगणकीकृत केलेली असते. बिल्डर्स ‘टीडीआर’ खरेदी करताना नोंदणी कार्यालयात रीतसर मालमत्तांच्या खरेदी व्यवहाराप्रमाणे रजिस्ट्री करतात. टीडीआर विकत घेतल्यानंतर मनपाच्या रजिस्टरमध्ये आपल्या बांधकाम प्रकल्पावर ‘लोड’ केल्याची नोंद करतात. खरेदी केलेल्या ‘टीडीआर’चीच नोंद केली जाते. उर्वरित टीडीआर खात्यावर शिल्लक दाखवला जातो. सरसकट सक्ती नको व्यावसायिक वापरासाठी टीडीआरची सक्ती जरूर करावी, त्यात काहीच गैर नाही. परंतु, ही सक्ती वैयक्तिक बांधकामे, चॅरिटेबल ट्रस्ट, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, स्वत:चे घर बांधकाम आदींसाठी करू नये. बांधकाम व्यावसायिकांना आग्रह केल्यामुळे टीडीआरचे महत्त्व वाढेल. बांधकाम व्यावसायिकांना याद्वारे अधिक नफा कमावता येतो. टीडीआरला भाव मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे. मोबदला सुलभपणे द्यावा विकासाचे काम असल्याने जनतेने सहकार्य करावे. परंतु, मोबदला देताना मनपाने चकरा मारायला लावू नये. एकत्रित मोजणी नकाशे तयार करण्याचे पत्र भूमी अभिलेख कार्यालयास दिले तर एकाच ठिकाणी सर्वांच्या बाधित मालमत्तेचे विवरण प्राप्त होईल. मोबदला सुलभ पद्धतीने दिला जावा. - प्रवीण सोमाणी, बांधकाम व्यावसायिक. 10 मीटरसाठी कमीत कमी 2 लाख 80 हजार रुपये ते जास्तीत जास्त सरासरी 4 लाख 40 हजार होतात.दुप्पट भरपाईच्या नियमानुसार कमीत कमी 5 लाख 60 हजार आणि जास्तीत जास्त 8 लाख 80 हजार रुपयांचा टीडीआर मिळेल. गुलमंडीच्या टीडीआरला सर्वाधिक महत्त्व शहरात सर्वाधिक दर गुलमंडी, एन-3, एन-4, एन-1, ज्योतीनगर, बन्सीलालनगर, समर्थनगर अशा उच्चभ्रू वसाहतींमध्ये आहे. चिकलठाणा, पडेगाव, जळगाव रोड, बीड बायपास येथील टीडीआरची किंमत अशा वसाहतींमध्ये कमी होते. उच्चभ्रू वसाहतीमधील टीडीआरची टक्केवारी इतर भागात जास्त मोजली जाते. रेडीरेकनर दर सर्वात कमी तेथील टीडीआरची किंमत रेडीरेकनर असलेल्या भागात कमी होते. जास्त रेडीरेकनर दर असलेल्या भागातील टीडीआरची किंमत कमी दराच्या भागात वाढलेली असते. मनपाकडे वसाहतीनिहाय तक्ते तयार आहेत. टीडीआर देण्यासाठी अडचण टीडीआरचा लाभ मालमत्ताधारकांना देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी नकाशे तयार केले जातात. भूमी अभिलेख विभाग 20 गुंठे जागेचे नकाशे तयार करतो, तर त्याखालील क्षेत्रफळाचे नकाशे तयार केले जात नाही. छोटे नकाशे बनवण्यासाठी मनपाचे विशेष पत्र प्रत्येक बाधित अधिकृत मालमत्ताधारकास मनपाकडून घ्यावे लागेल. रस्ते रुंदीकरणासाठी मनपा एकच पत्र तयार करू शकते. असे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मालमत्ताधारकांना मनपाचे उंबरठे झिजवावे लागतील.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 10:44 am

महापौर, नगरसेवक पदांचे थेट 'लिलाव'च करा:गुंड, गुन्हेगारांना संधी द्या, अधिवेशनात विधेयक मांडा; शिंदेंच्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती आणि आघाडीची गणिते बिघडलेली असतानाच, आता खुद्द सत्ताधारी पक्षातूनच एक अजब मागणी पुढे आली आहे. निवडणुकांमध्ये होणारा वारेमाप खर्च आणि पैशांचा पाऊस पाहता, 'निवडणुका घेण्याऐवजी महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगरसेवक पदांचे थेट जाहीर लिलावच करावेत,' अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या एका नेत्याने केली आहे. सांगलीतील शिंदे गटाचे पदाधिकारी वीर कुदळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हा 'घरचा आहेर' दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आष्टा नगरपालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आणि वाळवा तालुका संघटक असणारे वीर कुदळे यांनी मुख्यमंत्र्यांसह निवडणूक आयोग आणि राष्ट्रपतींना हे पत्र पाठवले आहे. नुकत्याच झालेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये मते मिळवण्यासाठी पैशांचे वाटप झाल्याचे आरोप होत असताना, कुदळे यांनी लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निष्ठावंतांना डावलले जात असल्याने आणि पैशांच्या जोरावरच सर्व चालत असल्याने, निवडणुकांचा हा सोहळा नको, त्यापेक्षा थेट लिलाव पुकारून ज्याच्याकडे पैसा आहे, त्याला पद द्यावे, असा उपरोधिक टोला वीर कुदळे यांनी लगावला आहे. गुंड-गुन्हेगारांसाठी विधेयक आणा एवढ्यावरच न थांबता नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारने या लिलाव प्रक्रियेचे विधेयकच सादर करून ते मंजूर करून घ्यावे, अशी खोचक मागणी कुदळे यांनी केली आहे. जेणेकरून, राजकारणापासून वंचित असलेल्या गुंड आणि गुन्हेगारांनाही अधिकृतपणे संधी मिळेल, असे मत त्यांनी आपल्या पत्रातून मांडले आहे. त्यांनी या मागणीचे निवदेन निवडणूक आयोग आणि राष्ट्रपतींनाही पाठवले आहे. स्वतःच्याच पक्षाच्या नेत्याने व्यवस्थेचे वाभाडे काढल्याने शिंदे गटाची चांगलीच अडचण झाली आहे. विधिमंडळाचे अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांविना होणार दरम्यान, महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूर येथे सुरू होत आहे. मात्र, 58 वर्षांनंतर पहिल्यांदाच विधिमंडळाचे अधिवेशन विरोधी पक्षनेत्यांविना होणार आहे. त्यामुळे विरोधकांची सरकारविरुद्धची लढाई नेतृत्वहीन होण्याची भीती राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. ​अधिवेशनात विरोधकांकडे नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोड, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि मतदार यादीतील त्रुटींवरून राज्य निवडणूक आयोगावर हल्लाबोल करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. परंतु, विधानसभेतील संख्याबळ महायुती सरकारच्या बाजूने असल्याने हे ज्वलंत मुद्दे किती प्रभावीपणे मांडले जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अनेक निर्णयही बहुतमताच्या बळावर रेटून नेले जाऊ शकतात.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 10:42 am

बंदुकीच्या गोळ्यांच्या ‘ब्रास कप’ची ‘समृद्धी’वर चोरी:अंबरनाथमधील आयुध निर्माणीमधून जबलपूर येथे नेण्यात येत होता गोळ्या तयार करण्याचा कच्चा माल

समृद्धी महामार्गावर दौलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत संरक्षण मंत्रालयाच्या आयशर ट्रकमधून बंदुकीच्या गोळ्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘ब्रास कप’चे 42 नग चोरट्यांनी लंपास केले. हा प्रकार 4 डिसेंबर रोजी घडला. या प्रकारामुळे घाबरलेल्या चालक व त्याच्या सहकाऱ्याने बुलढाणा जिल्ह्यातील बिबी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्यावर ‘डायल 112’वर संपर्क साधून चोरीची माहिती दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंबरनाथ येथील आयुध निर्माणीमधून जबलपूरकडे मनीष नेवंदराम लोहानी (38, रा. अंबरनाथ वेस्ट, जि. ठाणे) हे 3 डिसेंबरला आयशर ट्रकमधून (एमपी 04 जीबी 4464) 280 गोण्यातून ब्रास कप घेऊन निघाले होते. 4 डिसेंबरला दुपारी समृद्धीवरील चॅनल क्रमांक 451 जवळ चालकाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ट्रक थांबवला होता. दरम्यान, ट्रकच्या मागून आवाज आला. त्या वेळी चालकासह मागे जाऊन पाहिले असता एक व्यक्ती ताडपत्रीची दोरी कापून वर चढत होता. त्याच्यासोबतची दुसरी व्यक्ती दुचाकीवर होती. आम्हाला पाहून ते पळून गेले, असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराने गोंधळून गेल्याने बुलढाणा जिल्ह्यात गेल्यावर त्यांनी डायल 112 वर संपर्क साधला. त्यानंतर बिबी पोलिस स्टेशनचे हवालदार राजेश सरदार यांच्यासह चालकाने ट्रक दौलताबाद येथे आणला. तेथे पोलिसांच्या सूचनेवरून ट्रकमधील मालाची मोजणी केली असता 71 हजार 568 रुपयांचे ब्रास कपचे 42 नग गायब असल्याचे दिसले. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अनुत्तरित प्रश्न, निर्मनुष्य दौलताबाद परिसरामुळे परिसरात चोऱ्या दौलताबाद हद्दीत असलेल्या समृद्धीवर यापूर्वी ट्रकमधून साहित्य चोरीच्या घटना घडल्या आहेत. 2 दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथील एका ट्रकमधून चोरट्यांनी 30 हजार रुपये किमतीची तूरडाळ चोरीला गेली होती. दौलताबाद परिसरातील डोंगर व निर्मनुष्य असल्यामुळे या भागात काही टोळ्या सक्रिय आहेत. बाहेरराज्यातील वाहनांमधून चोरी झाल्यामुळे चालकही तक्रार द्यायला पुढे येत नाही. त्यामुळे या चोरट्यांचे बळ अधिक वाढले आहे. हायवे पोलिसांची मदत लवकर मिळत नसल्याचाही काही ट्रकचालकांचा अनुभव आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 10:41 am

विचारांतून हृदयात पोहोचावे, चमत्कारांनी नव्हे‎- कनकेश्वरी देवी:गोशाळेच्या भूमिपूजनासाठी आलेल्या महामंडलेश्वर कनकेश्वरीदेवी यांच्याशी संवाद‎

उज्जैनमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात महामंडलेश्वर ‎‎उपाधी मिळालेल्या कनकेश्वरी देवी कथा‎सांगण्याच्या ओघवत्या शैलीमुळे भाविकांमध्ये ‎‎‎लोकप्रिय आहेत.‎‎रामकथा, शिवपुराण‎‎कथा, भगवद्गीता अशा ‎‎‎विविध विषयांवर 700‎‎हून अधिक कथा त्यांनी ‎‎‎केल्या आहेत. ‎‎‎चितेगावजवळील‎‎केसापुरी गावात‎गुरुगोविंद गोशाळेच्या भूमिपूजनासाठी शहरात ‎‎आलेल्या असताना दिव्य मराठीने त्यांच्याशी संवाद ‎‎साधला...‎ प्रश्न : गोशाळेच्या उभारणीचा ‎काय फायदा वाटतो? ‎ कनकेश्वरी देवी - गोमातेच्या प्रत्येक ‎गोष्टीचा फायदा आहे, हे संशोधने सांगतात. ‎गोमूत्र, शेण, दूध सर्वच मानवासाठी उपयुक्त ‎आहे. गोमातेमध्ये 33 कोटी देवांचा वास आहे ‎हे आपली शास्त्रे सांगतात. तिच्या शिंगामधून ‎निघणारे तरंग वातावरण सकारात्मक ‎करतात. त्यामुळे गोमातेची सेवा, संगोपन ‎अत्यंत मोलाचे आहे. आजच्या युगात ‎प्रत्येकाला ते शक्य नाही अशावेळी गोशाळा ‎महत्त्वाची भूमिका निभावेल. समाजात ‎गोशाळा वाढल्या तर आपोआपच ‎रुग्णालयांची संख्या कमी होईल. असा माझा ‎विचार आहे. ‎ प्रश्न : शिक्षण काय आहे ? कथेचे ‎कौशल्य कसे आत्मसात केले? ‎ कनकेश्वरी देवी - मी कोणतेही लौकिक ‎शिक्षण घेतले नाही. पण, आश्रमात रामकथा, ‎शिवपुराणकथा, हनुमान कथा, भगवद्गीता ‎यांचे धडे रोजच गिरवत होते. देवाच्या ‎स्मृतीसाठी अभ्यासाची गरज नसते. ‎जीवनसाधनेतून त्याची अनुभूती घ्यायची ‎असते ती मी घेत होते. त्यामुळे 17 व्या वर्षी ‎कथा सांगण्याला सुरुवात केली ते सर्वांनाच ‎अपील झाले. आतापर्यंत 700 हून अधिक ‎कथा झाल्या आहेत. प्रत्येक कथेतून ‎भाविकांना आंतरिक ज्ञान मिळते. जीवन ‎जगण्याची दिशा आल्या पौराणिक कथांतून ‎मिळते. याचा भाविकांनी लाभ घ्यावा. ‎ प्रश्न : धर्मगुरू चमत्कार‎दाखवतात, हे योग्य वाटते काय?‎ कनकेश्वरी देवी - आताच्या काळातील‎कुणाबद्दल बोलणे उचित होणार नाही.‎कारण, धर्मक्षेत्रात येणारा प्रत्येक जण‎धर्मकार्य करणारा असतो. पण, भाविकांनी हे‎लक्षात घ्यायला हवे की संतांकडे‎ईश्वरप्राप्तीसाठी जायला हवे. तात्कालिक‎समस्या सोडवण्याच्या चमत्कारासाठी नाही.‎कारण, खरा चमत्कार फक्त ईश्वर करू‎शकतो. जेव्हा तो चमत्कार करतो तेव्हा‎आयुष्यातील सर्व समस्या कायमच्या‎संपतात. मानवी चमत्काराने एक समस्या‎तात्पुरती संपेल, पण पुन्हा नवी समस्या‎निर्माण होऊ शकते. याचा विचार करावा.‎ प्रश्न : कथाकार होण्याचा तुमचा‎प्रवास कसा सुरू झाला?‎ कनकेश्वरी देवी - वयाच्या दहाव्या वर्षी‎पहिल्यांदा गिरनार येथील केशवानंद‎महाराजांच्या संपर्कात मी आले. त्याच वेळी‎त्यांनी माझ्या पालकांना सांगितले, या‎मुलीमध्ये भक्तिभाव ओतप्रोत आहे. हिला‎ईश्वरचरणी अर्पण करा. लोकसेवेतून‎ईश्वरभक्तीची जागृती करणे, हेच हिचे ध्येय‎आहे. त्यानंतर 15 दिवस विचार करून माझ्या‎आई-वडिलांनी गुजरातमधील महाराजांच्या‎आश्रमात मला पाठवले. त्यानंतर‎महाराजांच्या सान्निध्यात राहिले. 16 वर्षांची‎झाल्यावर संन्यास दीक्षा मिळाली. त्यानंतर‎वर्षभराने मी कथा करू लागले.‎

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 10:22 am

कारमध्ये महिलेला रुग्णालयात नेत ‎असताना अपघात; 3 ठार, 2 गंभीर‎:वसमत रोडवर राहाटी परिसरात दोन कारची समोरासमोर धडक‎

छातीत दुखत असल्याने आरळ येथून स्विफ्ट‎ डिझायर कारने महिलेला परभणीला रुग्णालयात ‎नेत असताना वसमत रोडवरील राहटी पाटी‎जवळ या कारला भरधाव क्रेटा कारने समोरून ‎जोराची धडक दिली. यात तीन ठार, तर दोन‎ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात परभणी ‎शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर वसमत‎ रस्त्यावरील राहटी परिसरातील विश्वशांती ‎ज्ञानपीठसमोर शनिवारी पहाटेच्या सुमारास ‎झाला. जखमींवर परभणी येथील जिल्हा‎ शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या‎प्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध ताडकळस ‎पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.‎ फिर्यादी सखाराम सटवाजी साखरे यांचे‎ चुलत भाऊ बाबाराव दत्तराव साखरे यांच्याकडे ‎स्विफ्ट डिझायर कार (एमएच 38 एडी 3541)‎आहे. त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या कांताबाई‎ कातोरे यांच्याकडे त्यांच्या पिंगळी येथील नणंद ‎विमलबाई जाधव या भेटण्यासाठी रात्री 10:30‎ वाजता आरळ येथे आल्या होत्या. त्यांच्या‎ अचानक छातीत दुखत असल्याने त्यांना स्विफ्ट ‎डिझायर कारमध्ये आरळ येथून परभणीच्या‎ दिशेने रुग्णालयात नेत असताना परभणीकडून‎ वसमतकडे जात असलेली क्रेटा कारच्या‎ अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला.‎ घटनेची माहिती मिळताच ताडकळस पोलिसांचे‎ सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन मोरे, रणखांब ‎यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी सखाराम‎ सटवाजी साखरे (रा. आरळ, ता. वसमत) यांच्या‎ फिर्यादीवरून क्रेटा कारच्या (एमएच 22 बीसी‎7888) चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.‎ (एमएच 22 बीसी 7888)‎चालकाने निष्काळजीपणे आणि‎ भरधाव कार चालवून समोरून‎ जोरदार धडक दिली. अपघातानंतर‎ क्रेटा कारचा चालक अंधाराचा ‎फायदा घेत पसार झाला. या ‎अपघातात फिर्यादीचा चुलत भाऊ‎बाबाराव दतराव साखरे (रा.‎आरळ, ता. वसमत), विमलबाई‎ बालासाहेब जाधव (रा. पिंगळी,‎ता. परभणी) आणि कांताबाई ‎अंबादास कातोरे (रा. आरळ, ता.‎वसमत) हे जागीच ठार झाले.‎ त्यांच्या सोबतचे साईनाथ रामचंद्र‎ काकडे (रा. आरळ, ता. वसमत) ‎आणि हरी बालासाहेब जाधव (रा.‎पिंगळी, ता. परभणी) हे दोघे गंभीर‎ जखमी झाले.‎ पोलिस, मित्रांना केला फोन‎ अपघात घडला त्या वेळी मी व्यवसायाच्या ‎ठिकाणांहून घरी जात होतो. हा अपघात माझ्या‎ डोळ्यासमोर झाला. मी त्वरित पोलिसांना ‎भ्रमणध्वनीद्वारे कळवले. मी अपघातात जखमींना‎ वाचवण्यासाठी आजूबाजूच्या गावातील माझ्या‎मित्रांना फोन करून बोलावून घेतले.‎

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 10:15 am

पुणे पदवीधर नोंदणीत यंदा निम्म्याने घट:शिक्षणाचे माहेरघर पुणेही मागे, दरवर्षी होतात एक लाखावर नवे पदवीधर

2026 च्या अखेरीस पदवीधरांच्या हक्काच्या मतदारसंघात आमदारकीची निवडणूक होणार आहे. त्यासाठी मतदार नोंदणी अभियान घेण्यात आले, पण यापूर्वी निवडणूक झालेल्या 2020 साली पुणे विभागात 4 लाख 20 हजार 896 मतदार नोंदणी झालीहोती. या वेळी 2025 मध्ये किमान एक लाखाने भर पडायला हवी होती, पण केवळ 2 लाख 72 हजार 061 इतकी म्हणजे निम्म्यापेक्षा कमी मतदार नोंदले गेले. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातही हीच स्थिती राहिल्याने पदवीधरांची उदासीनता स्पष्ट दिसते आहे. पुणे विभागात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे पाच जिल्हे येतात. अपर आयुक्त तुषार ठोंबरे यांनी माहिती दिली की, 18 डिसेंबर 2025 हरकती दाखल करता येतील. त्यावर 5 जानेवारीपर्यंत निकाल होईल. त्यानंतर 12 जानेवारी 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. नोंदणीसाठी प्रवृत्त करावे अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असली तरी मतदार नोंदणीची प्रक्रिया निवडणूक जाहीर होईपर्यंत सुरू राहील. राजकीय पक्षांनी पात्र मतदारांना नाव नोंदणीसाठी प्रवृत्त करावे. -डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त, पुणे किमान लाखाने वाढ हवी, आहे त्यात निम्मी घटली दरवर्षी विविध विद्यापीठांतून पदवीधरहोऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या एक लाख १० हजारांच्या वर, त्यामुळे किमान मागील नोंदीतील पदवीधर आणि नव्याने झालेले पदवीधर अशी संख्या विचारात घेतली तर किमान एक लाखाने मतदारसंख्या वाढायला हवी, पण उलट गेल्या वेळीहोती त्यापेक्षाही निम्म्याने कमी संख्येने पदवीधर नोंदले गेले आहेत. त्यामुळे आता उमेदवारांची मोठी कसरत होणार आहे. प्रायव्हेट कॉलेजेस वाढले, राजकीय संबंध घटतोय गेल्या पाच वर्षांत खूप बदल झाला आहे. प्रायव्हेट कॉलेजातून पदवीधरहोऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढतेय. अशा पदवीधरांचा राजकीय प्रक्रियेबरोबर फारसा संबंध येत नाही आणि पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार त्या काळात पदवीधरांपर्यंत पोहोचत नाहीत. थेट संबंधही राहिला नाही अशी सध्याची स्थिती आहे. -परिमल माया सुधाकर, सहयोगी प्राध्यापक, स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, एमआयटी

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 10:06 am

राज्यात स्वच्छ भारत मिशनच्या 1500 कंत्राटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ:तीन महिन्यापासून मानधनच नाही, खर्चाच्या तुलनेत मानधन देण्याचा निर्णय अडचणीचा

राज्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यरत सुमारे 1500 कंत्राटी कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यापासून मानधन नसल्यामुळे कर्मचारी व कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. निधी खर्चाच्या तुलनेतच मानधन देण्याच्या शासनाच्या निर्णयाचा या कर्मचाऱ्यांना फटका बसू लागला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांतून असंतोष निर्माण झाला असून पुर्वी प्रमाणेच दरमहा मानधन देण्याच्या मागणीसाठी आता कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची तयारी चालवली आहे. राज्यात प्रत्येक जिल्हा व तालुकास्तरावर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास सल्लागार, स्वच्छता व आरोग्य सल्लागार, महिती शिक्षण संवाद सल्लागार, संनियंत्रण व मुल्यमानपन सल्लागर, लेखाधिकारी यासह विविध पदे कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांकडून गाव पातळीवर जाऊन स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे लागत आहे. या शिवाय सार्वजनिक स्वच्छतागृह बांधकाम तसेच वैयक्तिक स्वच्छतागृहाचे बांधकाम करून त्याचा वापर करण्याबाबत जागृती केली जात आहे. त्यातून गाव पाणंदमुक्त केले जात आहे. मागील 15 ते वीस वर्षापासून हे कर्मचारी कार्यरत आहेत. राज्यात नियुक्त करण्यात आलेल्या सुमारे 1500 कर्मचाऱ्यांना शासनाकडून दरमहा 25 ते 50 हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र यावेळी खर्चावर आधारित मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने कर्मचाऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे. मागील तीन महिन्यापासून शासनाकडून मानधनासाठी निधीच मिळाला नसल्यामुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होऊ लागली आहे. या संदर्भात कर्मचारी संघटनेने शासनाकडे वेळोवेळी निवेदन देऊनही त्याचा उपयोग झाला नसल्याने आता कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यामध्ये राज्यातील सर्व कर्मचारी शासनाच्या सर्व व्हाटस्‍ अप ग्रूप मधून बाहेर पडले आहेत. त्यानंतर ता. 8 डिसेंबर पासून काळ्या फिती लाऊन काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतरही शासनाने पूर्वी प्रमाणेच दरमहा मानधन न दिल्यास असहकार आ्ंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. हिंगोलीत संघटनेचे निवेदन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना पुर्वी प्रमाणेच दरमहा मानधन द्यावे या मागणीसाठी संघटनेचे अमोल देशपांडे, विष्णू मेहेत्रे, रघुनाथ कोरडे, राधेशाम गंगासागर, विशोर पडोळे, शामसुंदर मस्के, प्रथमेश धोंगडे, रेणुकादास कठारे, राजेंद्र सरकटे, प्रशांत कांबळे, दुर्वेश हिवरे यांनी जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे निवेदन दिले आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 9:14 am

हिंगोलीत क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले:दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, एकास अटक

हिंगोली शहरातील जिजामाता नगर भागातील चौकामध्ये एका व्यक्तीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. त्या व्यक्तीस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी दोघांवर रविवारी ता. 7 पहाटे हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी एका आरोपीस अटक केली असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील जिजामाता नगरातील प्रकाश सरगड व गजानन वाघमारे हे एकाच गल्लीत राहतात. दोन दिवसांपुर्वी तू मला जोरात का बोलला या कारणावरून गजानन याने प्रकाश यांच्यासोबत वाद घातला होता. शाब्दिक चकमकीनंतर वाद मिटला होता. मात्र गजानन याच्या मनात प्रकाश यांच्याबद्दल राग कायम होता. दरम्यान, शनिवारी ता. 6 सायंकाळच्या सुमारास प्रकाश हे जिजामाता नगर भागातील चौकात उभे होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या गजानन व त्याचा मित्र गोलू पुंडगे यांनी पुन्हा एकदा प्रकाश यांच्याशी वाद सुरु केला. त्यानंतर गोलू याने प्रकाश यांचे हात धरले तर गजानन याने बाटलीत आणलेले पेट्रोल प्रकाश यांच्या अंगावर ओतून पेटवून दिले अन घटनास्थळावरून पळ काढला. अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रकाश घाबरून गेले. प्रसंगावधान राखत प्रकाश यांनी त्यांच्या गळ्यातील रुमाल काढून फेकून दिला. मात्र यामध्ये त्यांची मान भाजल्या गेली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप मोदे, उपनिरीक्षक राहुल महिपाळे, जमादार अशोक धामणे, शेख मुजीब, संजय मार्के, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, शंकर ठोंबरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी प्रकाश यांना उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी प्रकाश यांच्या तक्रारीवरून गजानन व गोलू यांच्या विरुध्द जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली. यामध्ये गजानन हा माळधामणी (ता.हिंगोली) येथे त्याच्या नातेवाईकांकडे लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक केली आहे. तर गोलू याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:58 am

6 महिन्यांपासून सतत छेडखानी; 13 वर्षीय मुलीने संपवले आयुष्य:मुलगा सतत करायचा पाठलाग, सोशल मीडियावरूनही केले मेसेज‎

अकोला शहरातील राहत्या घरात एका सातव्या वर्गातील १३ वर्षीय शाळकरी मुलीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. शाळेतीलच इयत्ता आठवीतील एका मुलाकडून सतत सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले, असा गंभीर आरोप मुलीच्या वडिलांनी जुने शहर पोलिस ठाण्यात शनिवारी दिलेल्या तक्रारीत केलाआहे. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून अल्वयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात केली तर त्याच्या वडीलांना अटक केली. शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर ही शाळकरी मुलगी घरी परतली, त्यावेळी घरी कुणीच नव्हते. वडील देखील घरगुती कामानिमित्त बाहेर गेलेले होते. तिने आतून दरवाजा बंद करून खोलीतीलच फॅनला ओढणीने गळफास घेतला. थोड्यावेळाने कुटुंबातील सदस्य घरी परतले. उर्वरित. पान ४ ‘माझी मुलगी तिच्या शाळेतीलच एका अल्पवयीन मुलाच्या सोशल मीडियावरील मानसिक त्रास आणि छेडखानीचा बळी ठरली. ती जर जीवाने गेली. पण असा प्रकार यापुढे कुण्या मुलींबाबत होऊ नये, यासाठी कठोरात कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना शहरातील शाळा व्यवस्थापन आणि पोलिसांच्या दामिनी पथकाने करावी, अशी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. - अल्पवयीन मृत मुलीचे वडील. या घटनेतील मृत मुलीचे वय १३ तर तिला त्रास देणाऱ्या मुलाचे वय १५ वर्षे आहे. हा मुलगा गेल्या ६ महिन्यांपासून संबंधित मुलीच्या मोबाइलवर सतत मेसेज, पोस्ट करुन तिला मानसिक त्रास द्यायचा. शाळेत जाताना रस्ता अडवायचा. हा प्रकार नित्याचाच झाल्याने शुक्रवारी दुपारी संबंधित मुलीच्या दहावीत शिकणाऱ्या भावाने या त्रास देणाऱ्या मुलास याबाबत विचारणा केली. यावेळी दोघांमध्ये शिवीगाळ आणि जोरदार वाद झाले. मुलीच्या भावाने या छेडखानी काढणाऱ्या मुलाला मारहाण करुन यापुढे असे करु नको, अशी समज दिली होती. हा प्रकार घडल्यानंतर भेदरलेल्या अल्पवयीन मुलीने तणावात घरातील फॅनला दुपट्याने गळफास घेतला, अशी माहिती मुलीचे कुटुंबीय व शाळेच्या विद्यार्थ्यांच्या चर्चेतून मिळाली. मुलाच्या वडिलांकडे केली होती तक्रार या घटनेतील मृत मुलगी शहरातील एका खासगी शाळेत सातवीत शिक्षण घेत होती. याच ठिकाणी आपल्या मुलीला तिच्याच शाळेतील आठवीतील मुलगा त्रास देत असल्याची माहिती कुटुंबियांनी ‘त्या’ मुलाच्या वडिलांना सहा महिन्यांपूर्वी फोनवरून दिली होती. मात्र, त्यानंतरही पाहिजे तसा धाक त्याच्यावर कुटुंबीयांनी दिला नव्हता. संबंधित शाळेच्या शिक्षकांनाही महिन्यापूर्वी याची कल्पना दिली होती. तिच्या मोबाइलवर मेसेज सुरु असायचे. मुलीचा भाऊ आणि संबंधित मुलाचा शाळेत झाला होता वाद दामिनी पथकाची गस्त वाढवणार ^महिला, विद्यार्थिनी यांची सार्वजनिक ठिकाणी होणारी छेडछाड, ट्यूशन क्लासेस, शाळा, कॉलेज ठिकाणी तरुणांकडून होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी महिला पोलिसांचे ‘दामिनी’ पथक नियमित कार्यरत आहे. शहरातील ट्यूशन एरिया परिसरातील ले-आऊट परिसरात सक्षमपणे पेट्रोलिंग आणि मार्गदर्शन केले जात आहे. पथकाची गस्त वाढवण्यात येईल. - चंद्रकला मेसरे, दामिनी पथकप्रमुख, अकोला. ^या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा संबंधित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी छेडखानी काढणारा तिच्याच शाळेतील इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तर मुलाच्या वडीलांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे. - नितीन लेव्हलकर, पोलिस निरीक्षक, जुने शहर पोलिस स्टेशन

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:54 am

सौर कृषीपंप योजनेने गाठला उच्चांक:राज्यातील विक्रमात एकट्या अकोला जिल्ह्यातच लागले 136 पंप‎

‘मागेल त्याला सौर कृषिपंप' योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे. महावितरण कंपनीने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषी पंप लावण्याचा जागतिक उच्चांक गाठला आहे. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे. विश्वविक्रमात लावलेल्या ४५ हजार ९११ पंपात जिल्ह्यातील १३६ पंपांचा समावेश आहे. तसेच मागेल त्याला सौरपंप योजनेत जिल्ह्यात एकूण ५०३ सौरकृषी पंप आतापर्यंत लावण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना केवळ दहा टक्के रक्कम भरून सौर पॅनल्स आणि कृषिपंप असा संपूर्ण संच देण्याच्या ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वाधिक सौर पंप बसवण्याचा उच्चांक गाठला आहे. ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ या योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारकडून ३० टक्के तर राज्य सरकारकडून ६० टक्के अनुदान मिळते. त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषिपंपासह संपूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो. असे होते योजनेचे उद्दिष्ट साडेदहा लाख सौर कृषिपंप बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे कृषी पंपासाठी पैसे भरून वीज जोडणीची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा ‘पेड पेंडिंग’चा प्रश्न सुटणार आहे. ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेसाठी महावितरणने स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांनी पंपासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर महावितरणकडून अर्ज मंजूर केला जातो. त्यानंतर शेतकऱ्याने त्याचा हिस्सा भरायचा असतो. शेतकऱ्याकडून पंप बसवण्यासाठी एजन्सीची निवड केली जाते. पंप बसविण्याच्या ठिकाणाची महावितरण, एजन्सी व शेतकरी अशी तिघांकडून संयुक्त पाहणी केली जाते, त्यानंतर कार्यादेश दिला जातो आणि शेतात पंप बसविला जातो. पंप बसवणाऱ्या एजन्सीवर पुढच्या काळात देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:53 am

भिमराया घे पुन्हा जन्म या लेकरांसाठी...‎:महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन; अनेक ठिकाणी प्रबाेधनपर कार्यक्रम

भीमराया घे पुन्हा जन्म लेकरांसाठी’, हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि त्यांच्या विचारांना अभिवादन करणारे जयभीम गीत गुणगुणत भीम अनुयायांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंदना अर्पण केली. अनुयायांच्या मनात प्रज्ञासूर्य, महामानवाप्रती असलेला नितांत आदर व त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी पुन्हा एकदा मार्गदर्शनाची गरज व्यक्त करण्यात आली. या गीतातून बाबासाहेबांच्या कार्याचा वारसा पुढे चालवण्याची, त्यांच्या स्वप्नातील समाज घडवण्याची आणि त्यांच्या विचारांना जीवंत ठेवण्याची भावना दर्शवण्यात आली. अशोक वाटिकेसह शाळा, महाविद्यालये, संस्थांसह नागरी वस्त्यांमध्येही भारतीय घटनेचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रतिनिधी |अकोला वाशीम बायपास, मोडके वाडी स्थित खेंडकर ज्ञानगंगेमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित इयत्ता ५ ते १० वीतील विद्यार्थ्यांमध्ये भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खेंडकर शाळेचे मुख्याध्यापक निलेश खेंडकर होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष व खेंडकर प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अल्केश खेंडकर यांची होते. दरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले. प्रतिनिधी |अकोला कुंभारी येथील श्री गणेश कला महाविद्यालयात नुकताच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना ही जगातील सर्वोत्तम राज्यघटना असून ती संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाची गुरुकिल्ली आहे, असे प्रा. मेघराज गाडगे म्हणाले. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.व्ही.मेहरे हे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.मेघराज गाडगे व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जयंत राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा.रश्मी दहापुते, प्रा. सतीश जमधाडे, प्रा.संतोष धंदरे आदींनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.बी.यु.जामनिक यांनी तर आभार संगीत विभागाचे प्रा.डॉ.सुधाकर मनवर यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप ढोमणे, गजानन निंबाळकर इत्यादींनी परिश्रम घेतले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:52 am

पंचशीलनगरातून निघाला कँडल मार्च:डॉ.आंबेडकरांना अभिवादन

वाशीम बायपास रोडवरील पंचशीलनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बौद्ध वंदनेने करण्यात आली. त्यानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच परिसरातून कॅन्डल मार्च काढून त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विचार मांडताना उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मितीतील योगदानाबद्दल आणि सामाजिक न्याय, समानता व बंधुता या मूल्यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन व स्त्री-पुरुष समानतेवरील बाबासाहेबांच्या विचारांचा आजच्या काळात अवलंब करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. अभिवादन कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या गीता गजानन गवई, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या मंगलाबाई तेलगोटे, कुसुम वाकोडे, वच्छलाबाई दा‌भाडे, देवका अंभोरे, चंद्रकला जामनिक, विमल सदांशिव, कमला आठवले, फुलावती वानखडे, छाया पाखरे, रुंदा तेलगोटे, विमल तायडे, अनिता दाभाडे, संगीता उपर्वट, अनिता अंभोरे, मंगला तायडे, मंगला वरठे, चंद्रकला तायडे, विशाखा तेलगोटे, स्वाती सुरवाडे, माला शेगोकार, कांता शिरसाट, बबली गवई, प्रमिला इंगळे, गौकर्णा हिवराळे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:51 am

शिवापूर परिसरात सुरू होणार 100 खाटांचे जिल्हा रुग्णालय:90 टक्के बांधकाम पूर्ण,उर्वरित कामाचा वेग संथ असल्याने नाराजी‎

शहरापासून जवळच असलेल्या मलकापूर- येवता रस्त्यावरील शिवापूर येथील १०० खाटांच्या नव्या जिल्हा रुग्णालयाचे (सिव्हिल हॉस्पिटल) काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी, उद्घाटनासाठी नागरिकांना आणखी सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रकल्पाचे ९० टक्के बांधकाम पूर्ण असूनही उर्वरित कामाचा वेग संथ असल्याने रुग्णांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. शहरालगतच्या मलकापूर-येवता रस्त्यावर शिवापूर शिवारात ५ एकर शासकीय जागेवर सव्वा एकरात १०० खाटांचे स्वतंत्र जिल्हा सामान्य रुग्णालय नवीन वर्षात सुरू होणार आहे, तर या रुग्णालयाशेजारीच ५० बेडचे क्रिटीकल केअर रुग्णालय होणार आहे. शिवापूर परिसरात जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रुग्णाल आतापर्यंत ९० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. या रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया गृह, विविध वॉर्ड आणि जिल्हा शल्य चिकित्सकांचे कार्यालय असेल. नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत हे काम होत आहे. साधारणतः जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी दिली या प्रकल्पासाठी ४६.१२ कोटी रुपये शासनाकडून पूर्वीच उपलब्ध झाले असून, निधीअभावी कामाची गती थांबलेली नसतानाही काम संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागासह शहरातील हजारो रुग्णांमध्ये या रुग्णालयाबाबत मोठी अपेक्षा असून, उशीर वाढत असल्याने नाराजगी व्यक्त होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने २०१७ मध्ये सादर केलेल्या प्रस्तावानुसार, शिवापूर (ता. अकोला) येथील गट क्रमांक ४६ मधील ९.२२ हेक्टर आर. पैकी १.४० हेक्टर आर. जागा संत गाडगे महाराज सूतगिरणी संस्थेच्या पर्यायी जागा म्हणून उपलब्ध झाली. तसेच गट क्रमांक ६४ मधील शासनाची ०.६० हेक्टर आर. जागा मिळून एकूण २.०० हेक्टर आर. क्षेत्रावर बांधकाम सुरू करण्यात आले आहे. जिल्हा रूग्णालयात कोणत्या सुविधा जिल्हा रुग्णालयात इतर काही महत्त्वाचे प्रकल्पही उभे राहत आहेत. यामध्ये प्रशस्त बाह्यरुग्ण विभाग, अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष, महिला व बालरुग्णांसाठी स्वतंत्र विभाग, अत्यावश्यक औषधोपचार आणि आयसीयू सुविधा राहणार आहेत. १६ कोटींच्या क्रिटिकल केअर युनिटची उभारणीही जिल्हा सामान्य रुग्णालयासोबतच येथे १६.२३ कोटींच्या निधीतून क्रिटिकल केअर युनिट उभारण्यात येणार आहे. गंभीर रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा मिळावी, हा उद्देश असल्याचे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:50 am

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नका; शिक्षक परिषदेची मागणी:शिक्षणाधिकाऱ्यांसाेबत समस्या सोडवण्यासाठी केली चर्चा‎

कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत शासनाकडून वारंवार आढावा घेतला जात आहे असून, ग्राम पंचायत व शालेय व्यवस्थापन समितीचे मत विचारात घेऊन सदर शाळा बंद न करता पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले. जिल्हा परिषदअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या अनेक सेवाविषयक समस्या, या गत काही दिवसांपासून प्रलंबित आहेत. शिक्षकांच्या मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या पदाधिकाऱ्यांनी (प्राथमिक विभाग) शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रतनसिंग पवार यांची भेट घेतली. यावेळी संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर, जिल्हाध्यक्ष सचिन काठोळे, कार्यवाह विजय वाकोडे, कार्यकारी अध्यक्ष देवेंद्र वाकचवरे, कार्याध्यक्ष सुनील माणिकराव आदी होते. त्यांनी निवेदन सादर केले. मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. लवकरच शिक्षकांच्या प्रलंबित सर्व मागण्या सोडविण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्याचे पदाधिकाऱ्यांने म्हणणे आहे. प्रामुख्याने पुढील प्रलंबित समस्यांबाबत सकारात्मक चर्चा शिक्षक-शिक्षणाधिकाऱ् यांमध्ये झाली. जिल्हात विस्तार अधिकारी शिक्षण, केंद्र प्रमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापक व विषय शिक्षक अनेक पदे रिक्त आहेत त्यामुळे सदर पदांचा अतिरिक्त प्रभार हा सहायक शिक्षकांकडे आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर होतो. करिता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासण्यासाठी सर्व रिक्त पदे पदोन्नती द्वारे भरण्यात यावीत तसेच प्रतिक्षा यादी तयार करण्यात यावी. वेतन श्रेणींबाबत करण्यात आली चर्चा वरिष्ठ श्रेणी चटोपाध्याय बाबत एकाच पदावर व एकाच वेतन श्रेणीत बारा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी चटोपाध्याय त्वरित लागू करावी शिवाय याबाबत एक निश्चित वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी शिक्षकांनी केली. तसेच निवड वेतनश्रेणीवरही चर्चा झाली. सेवेची २४ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करण्याबाबत सर्व तालुक्यांकडून प्रस्ताव मागवून प्राधान्याने व कालमर्यादेत कार्यवाही व्हावी, असे शिक्षक म्हणाले. आधी मंजूर झालेल्या; मात्र वित्त विभागात वेतन निश्चितीची पडताळणी करतांना निर्माण झालेली अडचण दूर होण्यासाठी ईतर जिल्ह्यांमध्ये केलेल्या वेतन निश्चिती नुसार अकोला जिल्ह्यातही वेतन निश्चिती व्हावी यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा, असा मुद्दा शिक्षकांनी मांडला. सन २०१८ मधे दर्जोन्नत करण्यात आलेल्या विषय शिक्षकांना पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता ६ ते ८ ला विषय शिक्षक नियुक्त करणे बंधनकारक असतानाही २०१८ पासून आजपर्यंत सदर नियुक्तया करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विशेषता गणित विज्ञान विषयाची अनेक पदे रिक्त आहेत तसेच याचा परिणाम जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेवरही झाला आहे त्यामुळे २०२६ ची बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी विषय शिक्षक पदस्थापना करण्यात यावी, असे शिक्षक म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:49 am

अज्ञात वाहनाच्या धडकेत 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू:दर्यापूर-अकोला मार्गावरील लासूर जवळील घटना‎

दर्यापूर येवदा पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लासूर गावाजवळील एका पोल्ट्री फॉर्मजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना शुक्रवार (दि.५) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. श्रीकांत प्रभाकर बावनेर (३७, रा. भांडपूरा चौक, जुने शहर अकोला) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेच्या वेळी मृतक श्रीकांत बावनेर हा दुचाकी (क्र. एम.एच.३०, बी झेड ८९५६) या गाडीने गावी अकोल्याकडे जात होता. दरम्यान दर्यापूर-अकोला मार्गावर लासूर गावाजवळील मुख्य रस्त्यावर एका पोल्ट्री फॉर्म जवळच्या कॉर्नरवर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेचा पुढील तपास येवदा पोलिस करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:33 am

उर्ग्येन संघरक्षित स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात:तीन दिवस शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन, विद्यार्थी, शिक्षकांचा मोठा सहभाग

अमरावती संविधान हे देशाच्या लोकशाहीचे पायाभूत दस्तऐवज मानले जाते. नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्ये, शासन पद्धती, न्यायव्यवस्था आणि केंद्र-राज्य संबंध यांची स्पष्ट मांडणी या संविधानात करण्यात आली आहे. जगातील सर्वांत मोठे आणि सविस्तर लिखित संविधान म्हणून भारताचे संविधान ओळखले जाते. त्यामुळेच मोठ्या उत्साहात २६ नोव्हेंबरला ‘संविधान दिवस’ उर्ग्येन संघरक्षित इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागसेन ज्ञान प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा धम्मचारिणी पद्ममणी (हिरा रक्षित), आनंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप रक्षित (धम्मचारी रत्नराज), स्मिता रक्षित, मुख्याध्यापिका प्रविणा चिंचोळे, सर्व शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आदर्शाची पूजा करून अत्त दीप भव या प्रार्थना गीताने करण्यात आली. संविधान दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. सलग तीन दिवस शाळेमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. २४ नोव्हेंबर रोजी संविधानावर आधारित नाट्य करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये हात धरून साखळी तयार करून संविधानावर आधारित घोषवाक्य म्हणण्यात त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी शाळेमध्ये चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. त्यामध्ये नर्सरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग होता. सुंदर प्रकारे विद्यार्थ्यांनी चित्र काढले. २६ नोव्हेंबर रोजी मुख्य कार्यक्रम घेण्यात आला.त्यानंतर सर्वांच्या उपस्थित भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन करण्यात आले. संविधानावर आधारित एक पथनाट्य सादर करण्यात आले. त्यामध्ये वर्ग सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.त्यानंतर संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. वर्ग एक ते वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहाय्यक शिक्षिका चारुशीला पंडित यांनी संविधानाविषयी मुलांना महत्त्व पटवून दिले. भारताचे संविधान हे आपल्या देशातील सर्वोच्च आणि पवित्र दस्तऐवज आहे. देश कसा चालवायचा, शासनाची रचना कशी असावी हे संविधान ठरवते. संविधान नागरिकांना मूलभूत अधिकार देते, ज्यामुळे प्रत्येकाला समानता, स्वातंत्र्य, न्याय मिळतो. हे नागरिकांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करते. त्यांच्या जीवनात सुरक्षितता निर्माण करते. संविधानामुळे देशात लोकशाही मजबूत राहते. शासन, न्यायालये, प्रशासन यांच्यातील अधिकार, जबाबदाऱ्या संविधान स्पष्ट करते. विविधतेने नटलेल्या भारतात एकता राखण्याचे काम संविधान करते. जात, धर्म, भाषा यावर आधारित भेदभावास मनाई करून ते समतेचे मूल्य जपते. कर्तव्यांची जाणीव करून देणे हेही संविधानाचे एक महत्त्वाचे काम असल्याचे त्यांनी सांगितले. संविधानामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आणि नियमांच्या चौकटीत राहण्याची संधी मिळते याचे महत्त्व मुलांना सांगितले. संविधानाचे वाचन तसेच प्रतिज्ञा करताना विद्यार्थी व उपस्थित शिक्षक. महिनाभर कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे शाळेने एक नवीनच उपक्रम केला की, ज्यामध्ये पूर्ण महिना हा संविधान महिना म्हणून घोषित केला. त्यामध्ये सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संविधानाविषयी माहिती दिली. त्यामध्ये सर्व कलमांची संक्षिप्त माहिती देण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:32 am

निकष चुकीचेच .:किसान सन्मान, ई- केवायसी अभावी 3224 जण लाभाविना, ई-केवायसी नाही, अनेकांचे रखडले हप्ते

पीएम किसान सन्मान योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झाला. मात्र, २० वा हप्ता दिल्यानंतर केंद्र सरकारने योजनेत अनेक निकष (फिल्टर्स) लावल्याने तसेच आधार व ई-केवायसी रखडल्याने जिल्ह्यातील ३ हजार २२४ लाभार्थी या योजनेतून वगळले आहेत. बँकिंगच्या व्यवहारासाठी केवायसी आवश्यक असताना केवायसीच्या कारणामुळे पुढचा हप्ता बंद होतो. नंतर केवायसी केले तरी सुरू होत नाही. पीएम किसान सन्मानचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर रोजी २,६९,९७४ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. प्रत्येक हप्ता जमा करताना शेतकरी संख्या कमी होत आहे. या वेळी ३ हजार २२४ शेतकरी जिल्ह्यात कमी झाले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पात्र व यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. दोन हजारांनी तीन टप्प्यांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. योजनेच्या सुरुवातीला ज्याच्या नावावर सातबारा त्याच्या बँक खात्यावर पीएम किसान सन्मान योजनेचे पैसे जमा होत होते. मात्र, नवनवे निकष लावल्याने लाभार्थी संख्या प्रत्येक हप्त्याला कमी होत आहे. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा झाले आहेत. जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या २.६९ लाखांवर असताना रब्बी हंगामादरम्यान केंद्र शासनाची अर्थिक मदत मिळाली आहे. शेतकरी नोंदणी २,९१,९०८ ई-केवायसी पूर्ण २,८४,७७० डेटा सिडींग पूर्ण २,७३,१८८ लाभार्थी २,६९,९६४ फिल्टर लागलेले ३,२२४ {योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजारांची आर्थिक मदत दिली जाते. दाम्पत्याच्या नावे जमीन, पत्नीला लाभ एकत्र कुटुंबात दोघांच्या नावावर जमीन असल्यास पात्रतेनुसार फक्त एकालाच लाभ मिळू शकतो. जिल्ह्यात अशा काही प्रकरणांत पती-पत्नी दोघेही लाभ घेत असल्याचे आढळल्याने, पडताळणीनंतर असंख्य लाभार्थी अपात्र ठरवले आहे. एकापेक्षा जास्त लाभार्थी कर भरणारे ^नवीन नियमांमुळे योजनेला अधिक पारदर्शकता मिळाली आहे. वगळलेले लाभार्थी मुख्यतः कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य, आयकर भरणारे आणि ई-केवायसी अपूर्ण आहेत. वरुण देशमुख, उपसंचालक कृषी एका कुटुंबात एकालाच लाभ योजनेत एकाच कुटुंबातील फक्त एका सदस्यालाच पीएम किसानचा लाभ मिळू शकतो. वडील, आई, मुलगा असे सर्व मिळून एकच कुटुंब ग्राह्य धरले जाते. अनेक ठिकाणी एकाहून अधिक सदस्यांना पैसे मिळत असल्याचे आढळल्याने व्यापक फिल्टर करण्यात आले. योजनेची स्थिती

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:32 am

पाळा ते भिवकुंडी रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याची मागणी:अन्यथा जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार, पाळा ग्रामस्थ आक्रमक‎

तालुक्यातील भिवकुंडी पाळा रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. तत्काळ रस्त्याचे काम सुरू न केल्यास पाळा ग्रामस्थांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. येथील सातपुडा पर्वत रांगेला लागून मध्य प्रदेश सीमेलगत भिवंकुंडी गावाला जाणारा रस्ता हा पाळा ते भिवकुंडी खराब झाला असून अक्षरशः दीड-दोन फुटाचे खड्डे पडलेले आहे, साध्या दुचाकी वाहनाने सुद्धा रस्त्याने प्रवास करणे अशक्य आहे. रस्त्यावर अनेक वेळा अपघात झाले आहे. या रस्त्याच्या कामाकरिता मंजुरी मिळाली होती, मात्र, आठ महिने उलटल्यानंतरही अद्याप रस्त्याचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आठ महिन्यापूर्वी मंजूर झालेला हा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभाग व वन विभागाच्या काही क्षुल्लक तांत्रिक अडचणीमुळे रखडला आहे. आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकून आमरण उपोषणाचा इशारा गावकऱ्यांनी दिला. यावेळी पाळा येथील रुपेश राणे यांच्या नेतृत्वात पाळा नागरिकांनी सदर रस्त्यावर निदर्शने केली.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:31 am

बाबासाहेब फक्त वंदनेपुरते राहू नये- डॉ. शेंडे:डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात महापरिनिर्वाणदिनी मानवंदना‎

श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती द्वारा संचालित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयातील एन. सी. सी. पथकाच्या संचलनात डॉ. वसंत शेंडे यांच्या प्रमुख उपस्थित पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. याप्रसंगी वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर महाविद्यालयाच्या कोलंबिया सभागृहात सुप्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत प्रा. डॉ. वसंत शेंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाचा विषय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजचा विद्यार्थी आणि वैश्विकता’ हा होता. सभागृहाला संबोधित करताना ते म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती आणि स्मृतिदिनानिमित्त वंदन करण्यापुरतेच मर्यादित न ठेवता त्यांचे विचार आणि तत्त्वज्ञान कृतीत उतरावे. यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यात समता, न्याय, बंधुता या मूल्यांची जोपासना करावी’ असे आवाहन त्यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्याम तंत्रपाळे हे विराजमान होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये प्राध्यापक पी. आर. एस. राव, सी.ई.ओ. श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती, चक्रपाणी, प्राचार्य नालंदा औद्योगिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आणि प्रा. डॉ. शुद्धोधन कांबळे, समन्वयक आय. क्यू. ए. सी. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे संचालन समीर वाघमारे यांनी केले तर दिव्या सगळे हिने आभार केले. पुस्तकांचे भव्य प्रदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित पुस्तकाचे भव्य प्रदर्शन देखील यादिवशी भरवण्यात आले. महाविद्यालयातील ग्रंथालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बौद्ध धम्म साहित्य, भारतीय संविधान या विषयावर अनेक दुर्मिळ ग्रंथ आहेत. या दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शन ग्रंथपाल डॉ. सुधीर सांगोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भेट दिल्या.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:30 am

महापरिनिर्वाण दिनानिमित्त 18 तास अभ्यास:संविधान मूल्य जपण्याची अनुयायींनी घेतली शपथ, विविध उपक्रमातून साजरा‎

अक्क लकोट शहर तालुक्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरि िर्वाण दिनानिमित्त विविध उपक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले. येथील खेडगी महाविद यालयात सलग १८ तास अभ्यास करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. वंचित घटकातील लोकांना न्याय देण्यासाठी बाबासा ेबांनी लढा दिले त्याच्या जीवनात आलेले संघर्ष खूप मोठे असून त्यांना अनेक मान अपमान यांना तोंड द्यावे लागले तरी देखील त्यांनी समाजाच्या हिताचे लढा थांबवले नाही शेवटच्या घटकांपर्यंत न्याय देण्यासाठी लढा देत राहिले सर्व जाती धर्मातील लोकांनी या देशात गुण्या गोविंदाने व सुरक्षित आहेत ते फक्त बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधा नामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधा नामुळे आज गरीब श्रीमंत यांना एकच मतांचा अधिकार मिळाले आहे यामुळेच आज भारतातील लोकशाही टिकून राहिले आहे अशा महामा नवाचे आदर्श आजच्या युवा पिढी घ्यावे असे कमलाकर सोनकांबळे यांनी सांगितले. तालुक यातील गोगांव येथे भारतीय राज्य टनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरि िर्वाण दिनानिमित्त ग्रामप ंचायत, जिल्हा परिषद शाळा, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महामानव भारतरत्न डॉ.बाब ासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर त्रिशरण पंचशील घेऊन सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत विनम्र अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा गोगांव येथे आयोजित कार्यक्रम अध्यक् स्थानी निवृत्ती सुरवसे हे होते. प्रतिमा पूजन प्रदीप जगताप कल्याणराव बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले नेहा डिजिटल सेवा वतीने विध्यार्थीना एक वही एक पेन वाटप उपसरपंच कमलाकर सोनका ंबळे, पोलीस पाटील चंद्रकला गायकवाड यासह मान्यव राच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्या ध्यापक फुंडलिक वाघमारे, शंकर कारभारी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधीर जगताप, आयोजन नितीन गायकवाड, सूर्यकांत जिरगे शरणपा कलशेट्टी यासह गावकरी मोठया संख्येने उपस्थिती होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आयोजित कार्यक्रम अध्यक्षस्थानी आकाश गायकवाड हे होते प्रतिमा पूजन प्रदीप जगताप दयानंद जिरगे यांच्या हस्ते करण्यात आले. नागणसूर येथील एच.जी. चंडे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:20 am

ऊसतोड मजुरांचे पाल जळून भस्मसात:आपुलकी प्रतिष्ठानकडून तातडीची मदत

वाढेगाव- मेडशिंगी रस्त्यावर ऊस तोडीसाठी आलेल्या अमरावती जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांचे दोन झोपड्या शुक्रवारी सायंकाळी जळून भस्मसात झाल्या. त्यांना तातडीची मदत म्हणून आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने ब्लॅंकेट, बेडशीट, आणि किराणा माल देऊन मदत करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील दिया या गावचे चंदुलाल मुनशी मावसकर व त्यांचे नातेवाईक ऊस तोडणीसाठी सांगोला तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून फिरत आहेत. वाढेगाव मेडशिंगी रस्त्यावर ऐवळे यांच्या शेताजवळ त्यांचा सध्या मुक्काम आहे. शुक्रवारी दुपारी ऊस तोडणीसाठी गेल्यानंतर राहत असलेल्या पालाला / झोपडीला आग लागून संपूर्ण झोपडी भस्मसात झाली. झोपडीत असलेले अन्नधान्य, कपडे, अंथरून, पांघरून जळाल्यामुळे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती प्रा. सहदेव ऐवळे यांनी आपुलकी प्रतिष्ठानला दिल्यानंतर आपुलकी प्रतिष्ठानने त्यांना तातडीची मदत म्हणून ब्लॅंकेट, बेडशीट व किराणा माल देऊन तातडीची मदत केली. यावेळी हायकोर्टाचे वकील बी. आर. माने म्हणाले की, कसलाही संबंध नसताना केवळ आपुलकीच्या भावनेतून जळीतग्रस्तांना अगदी वेळेत योग्य ती मदत केली आहे. खऱ्या अर्थाने माणुसकी जोपासण्याचे काम आपुलकी प्रतिष्ठान करत आहे. त्यामुळे मन भरून आल्याशिवाय राहत नाही. प्रा. सहदेव ऐवळे यांनीही आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, कैलास कांबळे, दत्तात्रय नवले, अमर कुलकर्णी आदींसह ऊसतोड मजूर उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:19 am

शिक्षकांवरील अन्यायकारक निर्णय शासनाने तातडीने मागे घ्यायला हवे

टीईटी सक्ती, चुकीचा संच मान्यता शासन निर्णय, जुनी पेन्शन आणि इतर अनेक प्रश्नांमुळे शिक्षकांवर असे अन्यायकारक निर्णय होणे योग्य नाही. सरकारने या सर्व मुद्द्यांवर तातडीने फेरविचार करून न्याय देणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या योग्य हक्कांसाठी तसेच या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा निघेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करत राहणार असल्याचे प्रतिपादन माढा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने सामूहिक रजा, शाळा बंद आंदोलन व जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा करण्यात आला होता. यावेळी आमदार अभिजीत पाटील सहभागी झाले होते.माढा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे ८०० शिक्षक सामुहिक रजेवर गेले होते. तर ४४ जिल्हा परिषदेचे शिक्षक आंदोलनामध्ये सहभागी झाले नाहीत. तर माध्यमिकचे ४०० शिक्षक आंदोलनामध्ये सहभागी झाले. सर्व संघटनेतून शिक्षक बंदमध्ये सहभागी झाल्याची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य उपाध्यक्ष राजन सावंत यांनी दिली. शिक्षकांना टीईटी उत्तीर्णतेची सक्ती, जुनी पेन्शन योजना पुनस्थापित करणे, शिक्षण सेवक योजना रद्द करणे, शिक्षकेतर भरतीची रखडलेली प्रक्रिया सुरु करणे, आश्रमशाळेतील कंत्राटी भरती रद्द करणे यासह इतर मागण्यांसाठी ३६ शिक्षक कर्मचारी संघटनांनी एकत्र येत शुक्रवारी शाळा बंद आंदोलन करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:19 am

उत्तरेतील वाऱ्यामुळे डिसेंबर राहणार तीव्र थंडीचा:अहिल्यानगर शहराचे किमान तापमान 16 तर कमाल तापमान 30 अंशावर‎

गेल्या ५ दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी शहराच्या किमान तापमानात ७ अंशाने वाढ होऊनही थंडीचा कडाका कायम आहे. शुक्रवारी शहराचे किमान तापमान १६ तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. पुढचे २ दिवस हे किमान तापमान १५ ते १६ अंशावर कायम राहण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून, ९ डिसेंबर तापमानात पुन्हा घट होऊन थंडी आणखी वाढणार आहे. उत्तरेतील निरंतर वाऱ्यामुळे यंदाचा डिसेंबर महिना हा तीव्र थंडीचा राहणार आहे. शहराचे गेल्या ४ वर्षांत प्रथमच १ डिसेंबरलाच किमान तापमान ९ अंशावर गेले होते.त्यानंतर २,३ डिसेंबर या कालावधीत किमान तापमान ९ अंशावर कायम होते.४ डिसेंबरला किमान तापमान १२.५ अंशावर गेले होते. त्यामुळे थंडी काही प्रमाणात घट झाली होती. तर ५ डिसेंबरला शहराचे किमान तापमान १४ तर कमाल तापमान २८ अंशावर होते. शुक्रवार (६ डिसेंबर) ला किमान तापमान १६ तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. किमान तापमान गेल्या ४ दिवसांच्या तुलनेत ७ अंशानी वाढवूनही थंडीचा कडाका कायम होता. यंदा नोव्हेंबर महिन्यातच किमान तापमान घरसले होते. १७ नोव्हेंबर ला शहराचे तापमान ९ अंशावर गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (१८ नोव्हेंबर) ला यात पुन्हा घसरण होऊन किमान तापमान ८ अंशावर गेले होते. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला होता, त्यानंतर मात्र ‘सेनियार’ व ‘दिटवा’ चक्रीवादळामुळे किमान तापमान वाढले असतानाच ढगाळ वातावरणामुळे थंडीत घट झाली होती. त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशीच शहराचे किमान तापमान ९ अंशावर गेले होते. Q: तापमात वाढ कशामुळे होत आहे ? A:.वाऱ्याचा कमी झाल्याने किंचित तापमान वाढले आहे Q: थंडी कधीपासून वाढेल ? A: ९ डिसेंबरपासून पुन्हा थंडीत वाढ होईल Q: पुढचे २५ दिवस थंडी कशी असेल ? A: डिसेंबर महिना हा तीव्र थंडीचा असेल

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:10 am

दत्त जयंती सांगता सोहळ्याला भाविकांची गर्दी‎:दातरंगे मळ्यात बनले भक्तीमय वातावरण, भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

दातरंगे मळा, दत्त कॉलनी येथे श्री सूर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठानच्यावतीने दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक धार्मिक उपक्रम, सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारपासून सुरू झालेल्या दत्त जयंती सोहळ्याची सांगता ५६ भोग नैवेद्य व हनुमान चालीसा पठणाने करण्यात आली. उत्सवाच्या दिवशी सकाळी महारुद्राभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर श्री दत्त पादुका पालखी सोहळा ढोल-ताशांच्या गजरात शहरातून काढण्यात आला. पालखी मिरवणुकीत महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या, तर सुमारे ५० वारकरी-टाळकरींच्या सहभागामुळे वातावरण भक्तिमय झाले. २१ जोडप्यांच्या हस्ते होम-हवन विधी पार पडला. प्रतिष्ठानतर्फे पाच हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावर्षी महिलांनी एकत्र येत पारंपरिक नैवेद्य तयार केला होता. सायंकाळी श्रीराम भक्त हनुमान सत्संग मंडळ, नवी पेठ यांच्यावतीने हनुमान चालीसा कार्यक्रम पार पडला. परिसरातील नागरिकांनी दीपप्रज्वलन करून महाआरती केली. कार्यक्रमाची भक्तिमय चालीसा पठणाने करण्यात आली. सामाजिक उपक्रमांतर्गत आनंदऋषीजी ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात १११ जणांनी रक्तदान करून समाजात आदर्श निर्माण केला. तसेच दत्त जयंतीचे औचित्य साधून पाच गरजू विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप राजाभाऊ कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी आयोजित नृत्य स्पर्धेत तब्बल ९६ स्पर्धकांनी सहभाग घेऊन उत्तम सादरीकरण केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक उपक्रमांचे शहरात कौतुक दत्त जयंतीनिमित्त मागील सहा दिवसांपासून प्रतिष्ठानने विविध उपक्रम राबविले. समाजोपयोगी आणि धार्मिकतेचा संगम असलेल्या या कार्यक्रमांची शहरभर प्रशंसा झाली. प्रतिष्ठानने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले होते.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:09 am

जमिनीच्या आरोग्य संवर्धनासाठी द्यावे लागेल नैसर्गिक शेतीला प्राधान्य:महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांचे मत‎

हरित क्रांतीनंतर हायब्रीड बियाणे व रासायनिक खते आल्यानंतर उत्पादन वाढले असले तरी या काळात जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर पाण्याचे दुर्भिक्ष्य, शेणखताचा कमी वापर, सेंद्रीय खताचा जास्त वापर न करणे यामुळे नैसर्गिक शेतीकडे वळावे लागत आहे. या पुढील काळात जमिनीच्या आरोग्याच्या संवर्धनासाठी नैसर्गिक शेतीला अधिक प्राधान्य द्यावे लागणार आहे, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाअंतर्गत पुणे कृषि महाविद्यालयातील मृद विज्ञान विभागाच्या वतीने निरोगी शहरांसाठी निरोगी माती या संकल्पनेवर आधारित ,१२ वा जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला. यावेळी , पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या मृद विज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. अजितकुमार देशपांडे, डॉ. अर्जुन बांगर, डॉ. अशोक पाटील, भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री चंदन पाटील, ज्येष्ठ मृदा शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद जगताप, आयसीआयसीआय फाऊंडेशनचे पश्चिम विभाग प्रमुख दिपक पाटील, मिटकॉनचे विशाल डावखर आदी उपस्थित होते. कुलगुरु खर्चे म्हणाले, जमिनीचा विषय हा सर्वाच्या जिव्हाळ्याचा आहे. मागील काही वर्षात जमीनीचा आरोग्य हे निश्चितच खालावले आहे. त्यातील कर्बाचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्याचे परिणाम पिक उत्पादन आणि मानवी आरोग्यावर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवरून विविध कार्यक्रम घेतले जात आहे. गेल्या पंधरा वर्षापासून आपण सेंद्रीय शेतीवर काम करत आहे. परंतु आता २०२५ मध्ये सेंद्रीय शेतीखाली किती क्षेत्र आले आहे हा प्रश्न आहे. सेंद्रीय शेती ही अलीकडच्या काळातील संकल्पना असली तरी तशी ती जुनी आहे. त्याचे अवलंबन व त्याखालील क्षेत्र फारसे वाढलेले दिसत नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत. त्यांना बाहेर काढण्याची गरज आहे. त्यासाठी नैसर्गिक शेतीचे संशोधन करावे लागणार आहे. त्यासंबधी शासन स्तरावरून अभ्यासक्रम तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चारही कृषी विद्यापीठात नैसर्गिक शेती करावी लागणार आहे. त्यामुळे नैसर्गिक शेतीमध्ये नवीन संशोधन करून शास्त्रीय पुरावे लोकांपुढे आणावे लागणार आहे. त्यासाठी शास्त्रज्ञांनी पुढाकार घ्यावा. यासोबत हवामान बदलाशी सुसंगत असे नवे तंत्रज्ञान, नवीन बियाणे हे विकसित करण्यावर भर द्यावा लागणार आहे, असे कुलगुरु डॉ. खर्चे म्हणाले. मृद विज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. जालंदर पाटील म्हणाले, शेतीत ए आय चे तंत्रज्ञान आले आहे. त्याचा वापर विद्यार्थ्यांनी करून शेतकऱ्यांना पोहचले पाहिजे. परंतु अनेक अडचणी आपल्यासमोर असल्या तरी विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत संशोधनाचे काम खरंच पुढे जाऊ शकते का अशीही खंतही त्यांनी व्यक्त केली. प्रा. डॉ. अविनाश गोसावी यांनी प्रा. डॉ. धर्मेंद्र फाळके यांनी संशोधन व विस्तार कार्याचा आढावा घेतला. जमिनीत वेगवेगळे घटक संतुलित प्रमाणात राहिले तरच ही माती टिकणार आहे. त्यासाठी वेळोवेळी माती परिक्षण करणे गरजेचे आहे. परंतु आपण रासायनिक खते जमिनीत टाकत असलो तरी त्याचा फारसा परिणाम होतो, असे म्हणता येणार आहे. कारण परदेशात आपल्यापेक्षा अधिक प्रमाणात रासायनिक खताचा वापर होत आहे. तरीही आपल्याकडे शेतकरी घेत असलेल्या विविध पिकांमुळे मातीतील अन्नद्रव्य शोषून घेत असल्यामुळे मातीचे आरोग्य टिकवणे हे मोठे आव्हान आहे, असे कोकण कृषि विद्यापीठच्या मृद विज्ञान विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. सुभाष ढाणे म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:08 am

शहरातील मतदार यादीत श्रीगोंदेतील 4,371 मतदार:बोगस, दुबार मतदार यादीतून वगळण्याची कळमकरांची मागणी

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील मतदार यादीमध्ये श्रीगोंदे तालुक्यातील ४३७१ मतदार आहेत. २००९ पासून मतदारसंख्या वाढीचा ट्रेंड पाहिल्यास दर पाच वर्षाला सुमारे आठ ते दहा हजार मतदारांची संख्या वाढली. परंतू, २०२४ च्या लोकसभेत ही संख्या २.९९ लाखांवर पोहोचली तर त्यानंतर झालेल्या २०२४ च्या विधानसभेत ही संख्या ३.१६ लाखांवर पोहोचली. तसेच दुबार नावे मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे दुबार नावे वगळून टाकावीत, अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी केली. कळमकर म्हणाले, हा लढा माझा नाही…, तुमचा-आपला आहे. लोकशाहीच्या गळ्यावर साधाऱ्यांनी आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या प्रशासनाने फास बसवला आहे. हा फास आम्ही कधीच बसू देणार नाही, अशा शब्दात कळमकरांनी सुरुवातीलाच प्रशासनाची कानउघडणी केली. श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातील तब्बल ४,३७१ मतदारांची नावे कोणतीही कारणे नोंद न करता अहिल्यानगर शहर मतदारसंघात जोडण्यात आली आहेत. आयुक्त आणि मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी कोणती उपाययोजना करत आहेत? त्यांना ‘डबल स्टार’ मतदान चालू आहे का ? असा सवाल उपस्थित केले. एकाच पत्त्यावर १५० मतदार एका पत्त्यावर 100–150 मतदार, पुरुषांचे लिंग स्त्री आणि स्त्रीचे पुरुष, एकच नाव पण वेगवेगळे फोटो, तीन पत्ता, वास्तव्याचा पुरावा नसलेले मतदार असल्याचा आरोप कळमकर यांनी केला. मतदार यादी स्क्रिनवर दाखवून, यादीमधील चुकांकडे त्यांनी लक्ष वेधले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:07 am

जामखेड बसस्थानकात चोऱ्या वाढल्या, स्वच्छतेचा अभाव

पाच जिल्ह्यांच्या सिमेवर व २४ तास बससेवा देणारे जामखेड बसस्थानक सध्या प्रवाशांच्या गंभीर गैरसोयीचे केंद्र बनले आहे. बसस्थानकातील सुरक्षेचे प्रश्नही गंभीर झाले आहेत. लाडक्या बहिणी सुरक्षित नसल्याची भावना व्यक्त होत आहे. चोरट्यांचे प्रमाण वाढल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. परिसरातील अस्वच्छता देखील वाढत आहे. या साथ आजारांचा धोका निर्माण झाला आहे. बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कारणास्तव गेली चार वर्षे उपहारगृह, जनरल स्टोअर्स आणि अन्य वाणिज्य आस्थापने बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना चहा-नाश्त्यापासून जेवणाची सुविधा मिळत नाही. वाढीव दराने बाहेरील हॉटेलमध्ये जेवण करण्याशिवाय पर्याय राहत नसल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्यापासून नाश्त्यापर्यंत सर्वच सुविधा दुरापास्त झाल्या आहेत. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. बसस्थानकातील सुरक्षेचे प्रश्नही गंभीर झाले आहेत. लाडक्या बहिणी सुरक्षित नसल्याची भावना व्यक्त होत आहे. चोरट्यांचे प्रमाण वाढल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. परिसरातील अस्वच्छता देखील वाढत आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जामखेड बसस्थानकातील या समस्यांकडे एसटी महामंडळाने तातडीने लक्ष देऊन प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी प्रवाशांची तीव्र मागणी आहे. जामखेड बस स्थानकाचे काम का थांबले आहे, हा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:07 am

माजी नगरसेवक संदीप गायकवाडवर गुन्हा दाखल:नृत्यांगना दीपाली पाटील आत्महत्या प्रकरण‎

येथील नृत्यांगना दीपाली पाटील हिने साई लॉजमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तिला आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा माजी नगरसेवक संदीप गायकवाड यांच्याविरुद्ध जामखेड पोलिसात दाखल झाला. गायकवाड यांची पत्नी लता संदीप गायकवाड या नगरपरिषद निवडणुकीत मध्ये प्रभाग क्रमांक पाच मधून भाजप चिन्हावर निवडणूक लढल्या आहेत. मैत्रिणींना बाजारात जाते असं सांगून बाहेर पडलेल्या दीपाली पाटील परत न आल्याने मैत्रिणींनी शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला. आमदार रोहित पवारांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली. दीपाली हीस आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा संदीप गायकवाडविरुद्ध दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली पाटील या काही मैत्रिणींसोबत तपनेश्वर भागात राहत होत्या. गुरुवारी सकाळी त्या मैत्रिणींना 'मी बाजारात जाऊन येते' असं सांगून बाहेर पडल्या. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या परत न आल्याने मैत्रिणींनी त्यांची शोधाशोध सुरू केली. ज्या रिक्षाने त्या साई लॉजपर्यंत गेल्या होत्या, त्या रिक्षाचालकाकडून चौकशी केली असता त्याने त्यांना लॉजमध्ये सोडल्याचं सांगितलं. सायंकाळी मैत्रिणी लॉजमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिले की रूम आतून बंद होती. लॉज कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता, दिपाली यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.या प्रकरणी दीपालीची मैत्रीण हर्षदा रविंद्र कामठे हिने दिलेल्या तक्रारीवरून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 8:03 am

उघड्यावर मद्यपान, वणी पोलिसांचा चोप:गोंधळ घालणाऱ्या‎ मध्यपींवर कारवाई‎

दामोदरनगर परिसरात दारू दुकान आणि वाइन शॉपमुळे परिसर मध्यपींचा अड्डा बनला आहे. येणाऱ्या जाणाऱ्या यातून होत असलेला त्रास आणि त्यातून होणारे लहान-मोठे होणारे अपघात होत आहे. यामुळे येथील नागरिक त्रस्त होते ‘दिव्य मराठी’त या बाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच पोलिसांनी दखल घेतली व या भागात उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांना चांगलाच चोप दिला. मंगळवारी रात्री साधारणपणे नऊच्या सुमारास मद्यधुंद चालकाने सापुतारा महामार्गाच्या कडेला उभी असलेली एमएच ४१ ई ३५१४ ही काळी-पिवळी जीप वेगात दामोधर नगरमधील शॉपिंग सेंटरच्या समोरील जागेत घुसली. वेग जास्त असल्याने एका स्टॉलचे छत आणि काही भाग हवेत उडाले. यानंतर वळण घेत जीप थेट समोरील गटारीतील मोठ्या खड्ड्यात गेली. सुदैवाने त्या वेळी ठिकाणी वर्दळ कमी असल्याने मोठा जीवितहानीचा अनर्थ थोडक्यात टळला. जीपचे मालक सनी निकम काही वस्तू घेण्यासाठी गाडी रस्त्याच्या कडेला लावून गेले होता. तेवढ्यात एका मद्यधुंद व्यक्तीने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. आणि सुसाट वेगात अपघात घडवला. या घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दामोदरनगर परिसरात काही दिवसांपासून असलेला मद्यपींचा उच्छाद, तक्रारींचा भडिमार आणि मद्यविक्री दुकानांच्या नादाने वाढलेल्या गुंडगिरीची पोलिसांनी दखल घेतली. सहायक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांनी पथकासह परिसरात धडक मोहीम राबवली. उघड्यावर दारू पिणारे, शिवीगाळ करणारे व रस्त्यावर धिंगाणा करणाऱ्यांना चोप देत चांगलाच धडा शिकवला. या परिसरातबरोबरच इतरही सार्वजनिक ठिकाणी असे गोंधळ घालणाऱ्या मध्यपींवर कारवाई होतच राहील. आणि येथील विक्रेत्यांना देखील समज दिली आहे. - गायत्री जाधव, सहायक पोलिस निरीक्षक

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 7:44 am

मनमाडला कँडल मार्च, बुद्धवंदनेतून अभिवादन:महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयाेजन, मुंबईला जाणाऱ्यांना अन्नदान‎

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त शहरात विविध ठिकाणी आदरांजली वाहण्यात आली. महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात कँडल मार्चच्या आयोजनासह बुद्धवंदना, अन्नदान, रक्तदान आदी विविध सामाजिक उपक्रमाद्वारे महामानवास अभिवादन करण्यात आले. शुक्रवारी रात्री १२ वाजता शहरातील विविध ठिकाणाहून समाजबांधवातर्फे बुद्धविहारात बुद्धवंदना घेऊन कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी शुभ्र वस्रे परिधान केलेल्या शेकडो स्री-पुरुष, तरुण-तरुणींनी हातात कँडल घेऊन शहराला प्रदक्षिणा मारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कँडल लावून अभिवादन केले. चैत्यभूमीला जाणाऱ्या अनुयायांना येथील साई यात्री रिक्षा -टॅक्सी युनियन व ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने अन्नदान करण्यात आले. बौद्धजन उपासक संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सकाळी बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी समाजबांधव उपस्थित होते. पंचवटी एक्स्प्रेसच्या इंजिनवर सजावट रेल्वे कर्मचाऱ्यांनी महामानवाला आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन केले. मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे सुपरवायझर रोहित भालेराव व सुभाष बोराडे यांच्या संकल्पनेतून पंचवटी एक्स्प्रेसच्या इंजिनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिकृती तसेच भगवान बुद्ध यांची प्रतिमा लावत इंजिनला फुले व निळे ध्वज लावून सुशोभित करण्यात आले. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी पहाटेच मनमाड रेल्वे स्थानकात पुष्प वाहून व बुद्धवंदना घेत डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 7:40 am

दरोड्याच्या तयारीतील तिघे‎अटकेत, तीन महिला फरार:एअरगन, चाकू, 9 लोखंडी हेक्सा ब्लेडसह 1.77 लाखांचा मुद्देमाल जप्त

डीएमआयसी बिडकीन परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केली. तीन पुरुषांना अटक करण्यात आली. तीन महिला अंधाराचा फायदा घेऊन फरार झाल्या. आरोपींकडून १.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पैठण- छत्रपती संभाजीनगर मार्गावरील सी-१० /डी-१० चौकाजवळ काही जण वाहनांना अडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. ही माहिती मिळताच रात्री १०.५० वाजता सहायक पोलिस निरीक्षक निलेश शेळके, पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील आणि त्यांच्या पथकाने परिसरात धाव घेतली. पोलिस वाहनं पाहताच तीन पुरुष आणि तीन महिला दोन दुचाकींवरून शिवनाईकडे पळाले. पोलिसांनी पाठलाग करत तीन पुरुषांना पकडले. महिलांनी अंधारात पळ काढला. अटक करण्यात आलेल्यामध्ये असलम मंजूर शेख (३२, साईनगर, चितेगाव), गणेश भाऊसाहेब तित्तर (२५, मुलानी वाडगाव) आणि राजू भाऊसाहेब नजन (२७, किनगाव) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून एअरगन, गुप्ती, फोल्डिंग चाकू, ९ लोखंडी हेक्सा ब्लेड, कटर, ब्लेड साठे, मोबाईल, स्कुटी (एमएच-१६-डीके-०८०७), दुचाकी (एमएच-२०-एचई-६४६०) असा एकूण १,७७,९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मनोज पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे करत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 7:20 am

जिल्ह्यात 4.74 लाख क्विंटल साखर उत्पादन:7 कारखान्यांकडून 5.97 लाख टन ऊस गाळप‎

जिल्ह्यात चालू हंगामात सात साखर कारखान्यांनी ५ लाख ९७ हजार ७५ टन उसाचे गाळप केले. यातून चार लाख ७३ हजार ९३५ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले. साखर उतारा सरासरी ७.९४ टक्के नोंदवला गेला. गेल्या वर्षी याच काळात दोन लाख ८० हजार ५४० टन ऊस गाळप झाला होता. त्यातून दोन लाख १५ हजार ७६५ क्विंटल साखर तयार झाली होती. त्या वेळी साखर उतारा ८.५३ टक्के होता. यंदा साखरेचे उत्पादन मागच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात सहा कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला होता. यंदा सात कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले आहे. यात मुक्तेश्वर शुगर धामोरी, बारामती अॅग्रो कन्नड, छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग चित्तेपिंपळगाव, घृष्णेश्वर शुगर खुलताबाद, रेणुकादेवी सहकारी साखर कारखाना विहामांडवा, पंचगंगा शुगर अँड पॉवर महालगाव वैजापूर आणि सचिन घायाळ पैठण यांचा समावेश आहे. जय हिंद शुगर गंगापूरचे गाळप उशिरा सुरू झाल्याने त्याची आकडेवारी साखर आयुक्तालयाकडे उपलब्ध नाही. देवगिरी सहकारी साखर कारखाना पुढील महिन्यात गाळप सुरू करणार असल्याची शक्यता आहे. कन्नड येथील बारामती अॅग्रोने सर्वाधिक एक लाख ५७ हजार ८०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले. दुसऱ्या क्रमांकावर छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग आहे. त्यांनी ६८ हजार ५२८ टन ऊस गाळप करून ६८ हजार ३७० क्विंटल साखर तयार केली. यंदा नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून गाळप सुरू झाले. मागील वर्षी विधानसभा निवडणुकांमुळे कारखाने दीपावलीनंतर सुरू झाले होते. त्यामुळे गाळपाच्या कालावधीत फरक पडला आहे. यंदाचे उत्पादन नोव्हेंबरमधील ३० दिवसांचे आहे. मागील वर्षीचे उत्पादन २० नोव्हेंबरनंतरचे होते. कन्नडचा बारामती अॅग्रो आघाडीवर

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 7:18 am

दोन स्विफ्ट कारची समोरासमोर‎ भीषण धडक:जाखमतवाडी शिवारातील तिहेरी अपघातामध्ये आठ जण जखमी

दोन स्विफ्ट कारची समोरासमोर भीषण धडक होऊन शनिवारी दुपारी वैजापूर- गंगापूर रोडवरील जाखमतवाडी शिवारात मोठा अपघात घडला. दरम्यान, अपघात टाळण्याच्या प्रयत्नात आलेल्या मोटारसायकलचाही या अपघातात समावेश झाला. एकूण ८ जण यात जखमी झाले असून दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. स्विफ्ट कार (एमएच ०६ एझेड ७७७०) मधून बगेल कुटुंबीय वैजापूरकडून गंगापूरकडे येत होते. त्याच वेळी समोरून येणारी स्विफ्ट कार (एमएच ०४ डीएन ७१७४) ओव्हरटेक करताच दोन्ही गाड्यांची जोरदार समोरासमोर धडक झाली. धडक इतकी तीव्र होती की दोन्ही कारचा चक्काचूर झाला. दरम्यान, वैजापूरकडून एक दांपत्य दुचाकीवरून (एमएच २० डीएक्स २४४९) येत होते. ही दुचाकीही अपघात टाळण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटून कारला धडकली. यात मोटारसायकलवरील दांपत्यही जखमी झाले. जखमींमध्ये अमरसिंग भय्यासिंग बगेल (६०), विजया अमरसिंग बगेल (५५), सौरभ अमरसिंग बगेल (२८, रा. पीडब्ल्यूडी वसाहत, गंगापूर) व दुसऱ्या कारमधील बिलाल इक्बाल पठाण (२०), फैजल अन्सार शहा (२९), मुस्तकीन बाबू शहा (२३, रा. गंगापूर) तर दुचाकीवरील दादासाहेब मारुती साळुंके (६३) व मीनाबाई दादासाहेब साळुंके (५८) हे जखमी झाले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 7:17 am

डाव्या कालव्यातून आवर्तन, दीड लाख हेक्टरला फायदा:संभाजीनगरसह परभणी, जालना जिल्ह्यांतील शेती बागायती‎

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा शंभर टक्के असल्याने डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी ५०० क्युसेकने पहिली पाणी पाळी सोडण्यात आली आहे. उजव्या कालव्यामधूनही पाणी सोडण्यात येणार आहे. याचा मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यातील १ लाख ४१ हजार ६४० हेक्टरवरील सिंचन क्षेत्राला फायदा होईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली. जायकवाडीतून सोडलेल्या पाण्यामुळे कालव्यालगतच्या विहिरींना मुबलक पाणी आले आहे. एक पाणी पाळी साधारणपणे २१ दिवस सुरू राहते. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हातातून खरीप पिके वाया गेली होती. आता शेतकऱ्यांची रब्बी पिकांवर आस आहे. शिवाय जास्तीत जास्त रब्बीचा पेरा वाढावा, यासाठी कृषी विभागाने नियोजन केले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी िदली. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचा छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी जिल्ह्याला फायदा होतो. या पाण्यावर ऊस, गहू, ज्वारीचे पीक घेतले जाते. रब्बी हंगामात, विशेषतः जानेवारी ते मार्च या काळात, हवामान कोरडे होते आणि जमिनीतील ओलावा कमी होतो. यावेळी पिकांना पाण्याची नितांत गरज असते, पण यंदा जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. यामुळे कालव्याचे पाणी पिकांना त्यांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर निश्चितपणे मिळेल. यामुळे पाण्याअभावी होणारे उत्पादन घटणे हे यंदा टळेल. जायकवाडी धरण यंदा चर्चेत राहिले आहे. कारण, यावर्षी धरणातून सर्वाधिक पाणी विसर्ग करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात धरणाचे सर्व २७ दरवाजे उघडून ३,०८,८२४ क्युसेक एवढा विक्रमी पाणीसाठा गोदावरी नदीत सोडण्यात आला होता. तसेच धरणात करण्यात येणारा विसर्ग कमी- अधिक प्रमाणात आजवर सुरू होता. धरणाच्या डाव्या कालव्यावरून १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर तर उजव्या कालव्यातून ४१ हजार ६८२ हेक्टर असे एकूण १ लाख ८३ हजार ३२२ हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येते. यंदा ‘जायकवाडी’तून रब्बीसाठी तीन पाणी पाळी सोडण्याचे नियोजन झाले आहे. रब्बी हंगामासाठी आता कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिके घेण्यास मदत होईल. कालव्याला पाणी सुटल्याने याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, अशी माहिती आमदार विलास भुमरे यांनी दिली. जायकवाडी धरणाचा डावा कालवा २०८ किलोमीटर लांबीचा आहे. यावर तीन जिल्ह्यांतील १ लाख ४१ हजार ६४० हेक्टर जमीन ओलिताखाली येते, तर उजवा कालवा १३२ किलोमीटर लांबीचा आहे. तीन जिल्ह्यांतील ४६ हजार ६४० हेक्टर जमीन ओलिताखाली येते.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 7:16 am

ट्रॅक्टर खड्ड्यात कोसळले; खाली दबून एकाचा मृत्यू:पैठण तालुक्यातील गेवराई खुर्द शिवारात घडली घटना‎

प्रतिनिधी आडूळ पैठण तालुक्यातील गेवराई खुर्द शिवारात शनिवारी सायंकाळी ४:३० वाजता ट्रॅक्टर खड्ड्यात कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. पंढरीनाथ ज्ञानदेव चव्हाण (५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते गेवराई खुर्द येथील अल्पभूधारक शेतकरी होते. गावालगत गट क्रमांक १२४ मध्ये दीड एकर शेती होती. याच शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. शनिवारी दिवसभर ते डाळिंबाच्या झाडांना शेणखत टाकत होते. सायंकाळी ट्रॅक्टर चालवत असताना शेजारील नदीकाठी असलेल्या मोठ्या खड्ड्यात ट्रॅक्टर कोसळले. ट्रॅक्टरखाली दबून त्यांचा जागीच मृत्यू झाला. खड्ड्यात सुमारे वीस फूट पावसाचे पाणी साचले होते. ट्रॅक्टर कोसळताना मोठा आवाज झाला. आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी हळहळ व्यक्त केली जात आहे. पंढरीनाथ चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, एक मुलगा, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. या

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 7:15 am

रक्तदान शिबिरे, रॅलीने महामानवास अभिवादन:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फुलंब्री, घाटनांद्र्यात अभिवादन‎

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्त मान्यवरांनी ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच रक्तदान शिबिरे, रॅलीचे ठिकाठिकाणी आयोजन करण्यात आले होते. घाटनांद्रा येथे मुख्याध्यापक कृष्णा दहेतकर, जितेंद्र गायकवाड, भरत सुपेकर, कय्युम शहा, संदीप सपकाळ, पवन मंडळकर, शेख इब्राहिम आदींच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हा परिषद प्रशाला, जोगेश्वरी माध्यमिक विद्यालय, इंद्रगढी प्राथमिक शाळा, एकता उर्दू प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नॅशनल मराठी व उर्दू प्राथमिक शाळा, मौलाना आझाद उर्दू या शाळांमध्येही अभिवादनपर कार्यक्रम झाला. शिक्षकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना संविधान, शिक्षण, समता व सामाजिक न्यायाच्या मूल्यांचे महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनीही विचारप्रवर्तक भाषणे, कविता, गीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या योगदानाचे स्मरण केले. कार्यक्रमासाठी गुंफा आंदे, विजय पानतावणे, वाल्मीक घुगे, अमोल चौधरी, संदीप पिवळ, अविनाश देशमुख, योगेश पवार, प्रशांत देशमुख, रोहिदास मोरे, विजय साळवे, अण्णा खंबाट, ईश्वर तांगडे, विशाल झलवार आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फुलंब्रीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी उबाठा शिवसेनेचे नेते राजेंद्र ठोंबरे, राजू प्रधान, जमीर पठाण, नरेंद्र सीमंत, प्रशांत नागरे, मुदस्सर पटेल, रऊफ कुरेशी, विलास राजपूत आदींची उपस्थिती होती. (दुसऱ्या छायाचित्रात) घाटनांद्रा येथील इंद्रगढी प्राथमिक शाळेमध्ये महामानवाला अभिवादन करताना शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 7:13 am

गणोरीच्या रोहितचे चित्रपट सृष्टीत पदार्पण:नामवंतांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने अभिनंदनाचा वर्षाव‎

श्री माउली वारकरी गुरुकुल आश्रम (निल्लोड फाटा, ता. सिल्लोड) येथील विद्यार्थी रोहित जाधव याचे थेट मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले आहे. अनाथांची माउली रामेश्वर महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माउली वारकरी गुरुकुल आश्रम तथा संत ज्ञानेश्वर विद्यालय व अनाथालय हे निल्लोड फाटा येथे २००७ पासून कार्यरत आहे. फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील रहिवासी असलेला रोहित कडूबा जाधव याला त्याच्या आजोबांनी वारकरी शिक्षण तसेच शालेय शिक्षणासाठी महाराजांच्या आश्रमात दाखल केले होते. महाराजांनी त्याला अनेक अभंग, गौळणी आणि संत वाङ्मय यांची शिकवण दिली. रोहितने बोबड्या आवाजातील गायलेली ‘राधे राधे खरं सांग' ही गवळण यापूर्वी सोशल मीडियावर गाजलेली आहे. या गवळणीचे गायक ऋषिकेश रिकामे आहेत. रोहितच्या आवाजातील गोडवा आणि त्याचे अफाट कौतुक पाहून, हर्ष-विजय यांनी त्याला एका चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. मराठी शाळेबद्दल जागरूकता दाखवणाऱ्या एका चित्रपटासाठीच्या गाण्यासाठी त्यांनी महाराजांकडे रोहितला तयार करण्याची आणि पाठवण्याची विनंती केली, ज्याला महाराजांनी लगेच होकार दिला. आज गणोरी गावच्या या रोहितचा आवाज केवळ महाराष्ट्रभर नव्हे, तर संपूर्ण देशभरात ऐकला जात आहे. रोहित जाधवला अभिनेते सचिन खेडेकर, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपूटकर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी, क्षिती जोग, कादंबरी कदम यांसारख्या नामवंत कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. आजवर ‘माउली वारकरी गुरुकुल’मधून अनेक जण घडलेले आहेत. १८ वर्षांपूर्वी लावलेले हे रोपटे आज मोठ्या दिमाखात उभे आहे. मात्र, यामागे अनेक कष्ट भोगावे लागले आहेत. कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन आम्ही अनेक गोरगरीब मुलांना शिकवले आहे. रोहितचे हे यश एका दिवसाचे नाही. जवळपास पाच वर्षांपासून त्याचा रियाज सुरू आहे. रोहित मुळातच साधा आणि मवाळ स्वभावाचा असल्यामुळे त्याने संस्थेतील सर्वांचीच मने जिंकली होती. तो सर्वात लहान असल्यामुळे सर्वजण त्याच्याकडे अधिक लक्ष देत असत आणि तोही त्याच पद्धतीने वागत असल्यामुळे आज तो गाजत आहे. शासनाने आमच्याकडे लक्ष दिल्यास, अनेक कलाकार आणि गोरगरिबांची मुले मोठ्या पदापर्यंत पोहोचवण्याचे काम मी नक्कीच करेन, असा आशावाद संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज पवार यांनी व्यक्त केला. शासनाने लक्ष द्यावे, दिग्गज कलाकार घडवू ः रामेश्वर महाराज

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 7:13 am

छत्रपती संभाजीनगरमध्ये माथेफिरूने रात्री 5 दुचाकी जाळल्या; नागरिकांत दहशत:राजनगरकडे जाण्यास रस्ता नसल्याने लोहमार्गाच्या अलीकडे झाडाखाली उभी केलेली वाहने लक्ष्य

मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळील राजनगर परिसरात रात्री अज्ञात माथेफिरूने ५ दुचाकी वाहने पेटवून दिल्याची घटना ६ डिसेंबर रोजी पहाटे उघडकीस आली. या आगीत सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांत दहशतीचे वातावरण आहे. याप्रकरणी राजेंद्र लादूलालजी शर्मा (४३, रा. राजनगर) यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शर्मा हे स्वयंपाकाचे काम करतात आणि त्यांच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे ते व परिसरातील रहिवासी त्यांच्या दुचाकी जयभवानीनगरमधील जांभळाच्या झाडाजवळील मोकळ्या जागेवर पार्क करतात. ५ डिसेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांनी त्यांची दुचाकी जांभळाच्या झाडाखाली उभी केली. आरडाओरड ऐकून जाग मध्यरात्री एकच्या सुमारास रात्रीच्या ड्यूटीवरून येणाऱ्या नागरिकांनी गाड्या जळत असल्याची आरडाओरड केली. यामुळे शर्मा यांना जाग आली आणि आपली दुचाकी व्यवस्थित आहे का, हे पाहण्यासाठी गेले. त्या वेळी त्यांची दुचाकी जळत असल्याचे निदर्शनास आले. त्याचबरोबर अन्य रहिवाशांच्या दुचाकीही जळत होत्या.भानुदास विश्वनाथ मोरे, संतोष प्रभाकर प्रभाताराव, उद्धव सीताराम वाघ , कृष्णा रमेश सूर्यवंशी यांची वाहने अज्ञात समाजकंटकांनी जाळली. यामध्ये अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात रात्री नशेखोरांचा वावर राजनगर या भागात मोठ्या प्रमाणात नशेखोर मोकळ्या जागांवर रात्रभर फिरतात. या भागात रेकॉर्डवरील गुन्हेगारदेखील आहेत. झोपडपट्टी भाग असल्याने या भागात सीसीटीव्हीची कमतरता आहे. जळालेल्या दुचाकी पेट्रोल टाकून पेटवल्या आहेत. रात्री दहानंतर या भागात नागरिकांचा वावर नसतो. त्यामुळे नशेखोरांचे फावते. गाडी पार्किंगचा प्रश्न, वाहने जाळल्याने परिसरात दहशत मी अनेक दिवसांपासून येथे गाडी लावत आहे. आता रात्री गाडी कुठे लावावी, हा प्रश्न आहे. कामधंद्यावर जाण्यासाठी कोणतेही साधन उरले नाही. ही जाळपोळ केवळ आर्थिक नुकसान नसून परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. गुन्हेगाराला तातडीने पकडावे. - राजेंद्र शर्मा, रहिवासी

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 7:08 am

कल्पनाला आयएएस निकालाची खोटी यादी देणारा शेटे अटकेत:शेटेला 9 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी, कल्पना न्यायालयीन कोठडीत

बोगस आयएएस कल्पना भागवत प्रकरणात भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) निकालाची बनावट यादी बनवून देणाऱ्या चौथ्या आरोपीला सिडको पोलिसांनी श्रीगोंदा येथून शनिवारी (६ डिसेंबर) पहाटे बेड्या ठोकल्या. दत्तात्रय पांडुरंग शेटे (३८, रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. शनिवारी आरोपी कल्पना भागवतची पोलिस कोठडी संपत असल्याने तिला आणि शेटेला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने कल्पना भागवतची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली, तर आरोपी शेटेला ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. पन्हाळे यांनी दिले. चौकशीदरम्यान कल्पनाने सांगितले की, रिअल इस्टेट व्यावसायिक असलेल्या दत्तात्रय शेटे याच्याशी तिची ओळख झाली. “तुला आयएएस बनवून देतो,’ असे सांगून शेटेने कल्पनाला विश्वासात घेतले होते. त्यानंतर त्याने कल्पनाची ओळख मनोज लोढाशी करून दिली. आरोपी शेटे लुंगीवर न्यायालयात हजर संशयित शेटे हा लुंगीवर न्यायालयात आला. यामुळे एक वरिष्ठ पोलिस अधिकारी भडकले. त्यावर कर्मचाऱ्याने तेथील पार्किंग चालकाची दुचाकी घेऊन जात जवळील एका दुकानातून शेटेसाठी चक्क पँट आणली. कर्मचारी ही पँट घेऊन न्यायालयात आला. तेथे त्याने पँट परिधान केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची दिवसभर चर्चा होती. तपास भांबावलेला; बचाव पक्षाचा दावा बचाव पक्षाचे वकील ॲड. अभयसिंह भोसले आणि ॲड. प्रमोद चव्हाण यांनी पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उभे केले. तपासाच्या १३ दिवसांतही पोलिसांना ठोस पुरावे मिळालेले नाहीत. सर्व व्यवहार बँक खात्यातून झाले आहेत. कल्पनाचा कोणत्याही देशविघातक कृत्याशी संबंध नाही, असा युक्तिवाद करत त्यांनी हा तपास भांबावलेला आणि गोंधळलेला असल्याचे सांगितले. भूलथापांमुळे नोकरी सोडली कल्पना भागवत ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नोकरी करत होती. शेटेशी ओळख झाल्यानंतर त्याने तिला मोठे प्रलोभन दिले. मी मोठ्या लोकांची कामे करतो, बदलीसह अनेक कामे मिळवून देतो. एका कामात १० लाख रुपये मिळतील, अशा गोड बोलण्यावर विश्वास ठेवून कल्पनाने विद्यापीठातील नोकरीच सोडून दिली.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 7:05 am

पकडलेल्या 23 बिबट्यांचा खर्च परवडेना, ‘वनतारा’त पाठवण्याचा प्रस्ताव:कारण- नगर जिल्ह्यात रेस्क्यू सेंटर नाही, 7 हजारांचा खर्च

धुमाकूळ घालणाऱ्या २३ बिबट्यांना वन विभागाने पकडून पिंजऱ्यात ठेवले. दररोज त्यांना दीड किलो मांस खाऊ घालावे लागतेय. त्यांच्यावर देखभाल व खाद्यासाठी रोज सुमारे ७ हजार रुपये खर्च होतोय. हा खर्च परवडणारा नाही. तसेच जिल्ह्यात रेस्क्यू सेंटरही नाही. त्यामुळे या २३ बिबट्यांना गुजरातच्या जामनगर येथील वनतारा केंद्रात पाठवण्याचा प्रस्ताव वन विभागाने शासनाकडे पाठवला आहे. त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिनाभरात चार जणांचा मृत्यू झाला. जनता संतप्त झाली व बिबट्यांना पकडण्यासाठी आंदोलनेही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यांत बिबटे जेरबंद होत आहेत. मात्र वन विभागाकडे बिबट्यांवर होणाऱ्या खर्चासाठी तरतूद नसल्याने ४५ लाखांच्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे. थेट सवाल धर्मवीर सालविठ्ठल, प्रधान मुख्य वनसंरक्षक मंजुरीनंतर २३ बिबटे ‘वनतारा’ला पाठवू रबंद केलेले किती बिबटे वन विभागाकडे आहेत ?-जिल्ह्यात २३ बिबटे पिंजऱ्यात ठेवले आहेत.बिबट्यांच्या खाद्याच्या खर्चासाठी काय तरतूद केली?-खाद्याची व्यवस्था केली आहे, पण तरतूद नाही. वाहतूक, खाद्यासाठी ४५ लाखांचा प्रस्ताव पाठवला.आणखी किती दिवस बिबटे विभागाकडे राहतील?-आपण यापूर्वी दोन बिबटे माणिकडोह सेंटरला पाठवले. आणखी २३ वनताराला पाठवण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. अद्याप मंजुरी नाही. बिबट्याला वजनाच्या १०% खाद्य बिबट्या निसर्गात फिरतो तेव्हा त्याला एकदाच शिकार मिळते. अशा वेळी भरपूर खाणे पसंत करतो. आठवडाभर मिळाले नाही तरी अडचण नाही. पण पिंजऱ्यात असल्याने आपल्याला त्याला फूड द्यावे लागते. एका प्रौढ बिबट्याला वजनाच्या प्रमाणात साधारणपणे एक ते दीड किलो खाद्य दिले जाते. अभिजित महाले, रेस्क्यू संस्था, नाशिक

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 6:57 am

वादाची कीड:गुजरातचा ‘हापूस’ टॅगवर दावा; महाराष्ट्रातून संताप, जीआय टॅगसाठी महाराष्ट्र-गुजरात भिडणार

जगात सर्वांचा लाडका आणि कोकणसह महाराष्ट्राचा अभिमान असलेल्या ‘हापूस’च्या भौगोलिक मानांकनावर गुजरातच्या दाव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. गुजरातने ‘वलसाड हापूस’ नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावरून महाराष्ट्रातील हापूस उत्पादक आणि विक्रेते आक्रमक झाले आहेत. याविरोधात न्यायालयीन लढ्याचीही त्यांनी तयारी दर्शवली आहे. कोकणातील हापूस आंब्याला यापूर्वीच जीआय टॅग मिळाला आहे. पण आता गुजरातमधील गांधीनगर व नवसारी विद्यापीठाने २०२३ मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर कायदेशीर सुनावणी सध्या सुरू आहे. त्यामुळे हापूस आंब्याला मिळालेले ‘कोकण हापूस’ हे जगातले पहिले जीआय मानांकन धोक्यात येण्याची शक्यता असल्याने कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. भारतात १२ ते १५ आंबा प्रजातींना जीआय टॅग मिळाला आहे. यात महाराष्ट्रातील कोकणचा हापूस, मराठवाडा केसर, गुजरातचा गीर केसर, उत्तर प्रदेशचा मलिहाबादी दशेहरी, रतौल आंबा, गोव्याचा मानकुराद आंब्यांचा समावेश होतो. ‘वलसाड आंबा’नावाने विका गुजरातला ‘हापूस'चे मानांकन मिळू नये. त्यांनी त्यांच्या आंब्याला ‘वलसाड आंबा' म्हणून विकावे. ‘कोकणचा हापूस’ हे मानांकन आमच्या शेतकऱ्यांसाठी अबाधित राहावे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. गरज पडल्यास हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढायची कोकणी शेतकऱ्यांची तयारी आहे. ‘कोकण हापूस’ला पहिला जीआय टॅग कोकण हापूसला २००८ मध्ये जीआय मानांकन मिळाले. येथील भौगोलिक परिस्थिती, माती आणि विशिष्ट चव (इसेन्स) यावर आधारित सर्व कागदपत्रे २०१८ पर्यंत सादर करण्यात आली होती. ‘बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा’च्या सहभागातून कोकणाला हे मानांकन मिळाले आहे. गाजलेले जीआय टॅग : रसगुल्ला, बासमती, कोल्हापुरी चप्पल 1. रसगुल्ला (प. बंगाल विरुद्ध ओडिशा)वाद ः दोन्ही राज्यांचे म्हणणे ‘रसगुल्ला’ हा त्यांच्या राज्यातून उगम पावला आहे.तोडगा ः २०१७ बंगालला ‘बांगलार रसोगुल्ला’, तर २०१९ मध्ये ओडिशाला ‘ओडिशा रसागोला’साठी टॅग मिळाला.2. बासमती (मध्य प्रदेश विरुद्ध इतर राज्ये)वाद ः पंजाब, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश व काश्मीरच्या काही भागांना आहे. मध्य प्रदेशकडून आता जीआय टॅगची मागणी.लढा सुरू ः उत्तर भारतीय राज्यांनी विरोध केल्याने कायदेशीर लढा सुरू आहे. भारत व पाकिस्तानमध्येही वाद सुरू आहे.3. तिरुपती लाडू (नैवेद्य की व्यापारी वस्तू?)तिरुपती देवस्थानला लाडूसाठी जीआय टॅग मिळाला. त्यावर देवाचा प्रसाद ही व्यापारी वस्तू असू शकते का? अशी याचिका केली गेली. ही याचिका न्यायालयाने फेटाळल्याने वाद निकाली.4. कोल्हापुरी चप्पल (महाराष्ट्र वि. कर्नाटक)वाद ः अनेक लोकांना वाटते की कोल्हापुरी चप्पल फक्त महाराष्ट्राची आहे, पण जीआय टॅगमध्ये तसे नाही.नाराजी कायम ः महाराष्ट्रातील ४ जिल्हे (कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर) व कर्नाटकातील ४ जिल्हे मिळून दिला. याला महाराष्ट्रातील कारागिरांचा विरोध जीआय टॅग म्हणजे काय? जीआय टॅगमुळे उत्पादनाला कायदेशीररीत्या विशिष्ट भौगोलिक ओळख मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारातही उत्पादनाची विश्वासार्हता वाढते. कोणालाही ते नाव वापरण्यास मनाई होते.जुलै २०२५ पर्यंत भारतात ६५८ जीआय टॅग असलेली उत्पादने आहेत. यात १२ ते १५ आंब्यांचे प्रकारही आहेत. दार्जिलिंग चहा असा टॅग मिळवणारे पहिले उत्पादन आहे.डॉ. विवेक भिडे, अध्यक्ष, कोकण आंबा उत्पादक संघ

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 6:53 am

मांजाने चिरला बाळाचा गळा;वडिलांनी एका हाताने जखम दाबत गाठले रुग्णालय:छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याला पडले 20 टाके

४ डिसेंबरचा तो दिवस. खंडोबा मंदिराकडे जात असताना सेंट्रल नाका परिसरात आमच्या (संजीव जाधव) दुचाकीचा वेग केवळ ३० किमी होता. अचानक ‘चट’ आवाज आला आणि माझा ३ वर्षांचा चिमुकला स्वरांश किंचाळला. खाली पाहिले तर नायलॉन मांजाने माझ्या पोटच्या गोळ्याचा गळा अक्षरशः कापला होता. मांजा एवढा तीक्ष्ण होता की, अक्षरशः रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या आणि रक्ताने माझा शर्ट भिजला होता. माझ्या डोक्यात कोणताही विचार नव्हता, फक्त एकच गोष्ट जाणवली, त्याला वाचवायचे आहे. क्षणाचाही विलंब न करता मी माझ्या एका हाताने स्वरांशचा कापलेला, रक्तबंबाळ झालेला गळा दाबून धरला. श्वास घेण्यास त्याला त्रास होत होता, पण रक्त थांबवणे जास्त महत्त्वाचे होते. त्या एका हाताने गळा दाबून आणि दुसऱ्या हाताने दुचाकी चालवत, मी वेगाने त्याला जवळच्या दवाखान्यात घेऊन धावलो. हा १ किलोमीटरचा प्रवास माझ्यासाठी आयुष्यभराचा थरार होता. हा मांजा ‘मृत्यूचा धागाच आहे’ देवाच्या कृपेने रक्तवाहिनी आणि श्वासनलिका वाचली, पण स्वरांशला तब्बल २० टाके पडले. माझा मुलगा वाचला हे खरे, पण रस्त्यावर उडालेल्या रक्ताच्या चिळकांड्या आणि त्याची किंकाळी माझ्या डोळ्यासमोरून जात नाही.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 6:51 am

पार्थ पवारांचा जमीन घोटाळा:1800 कोटींची जमीन 300 कोटींत विकणारी शीतल कोठडीत खातेय 80 रुपयांचे जेवण

मुंढव्यातील १८०० कोटींची ४० एकर सरकारी जमीन शीतल तेजवानीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ याच्या अमेडिया कंपनीला ३०० कोटींत विकली. तिला ३ डिसेंबरला अटक झाली. ११ नोव्हेंबरपर्यंत तिला पोलिस कोठडी मिळाली. कोट्यवधींचा घोटाळा करणारी शीतल कोठडीत रोज ८० रुपयांचे जेवण खाते. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तिच्या पिंपरी व पिंपरी चिंचवड येथील घरांवर छापा टाकला. त्यात महत्त्वाची कागदपत्रे मिळाली नाहीत. सूत्रांनी सांगितले की, ती चपाती, भाजी, डाळ, भात असा ८० रुपयांचा डबा खाते. तिने मूळ महार वतनदारांकडून घेतलेले पॉवर ॲटर्नी, मूळ विकसन करारनामे व इतर कागदपत्रे आढळली नाहीत. अमेडियाचे संचालक पार्थ पवार यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्याशी जमीन व्यवहार करताना डिजिटल उपकरण व लॅपटॉप वापरले असावे. या ४० एकर जमिनीपोटी तिने अमेडिया कंपनीकडून रेडीरेकनर दराशिवाय काही रक्कम घेतली असावी. पण छापेमारीत रोकड तसेच उपकरण, लॅपटॉप आढळले नाही. दरम्यान, तिने कागदपत्रे सादर करण्यास वेळ द्यावा, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. ...तर पोलिसांकडून मिळते दोनदा जेवण कोठडीत नातेवाइकांनी डबा आणला नाही तर महाराष्ट्र पोलिस नियमावलीनुसार कोठडीतील आरोपीला पोलिसांकडून सकाळी १० ते ११ आणि सायंकाळी ५ ते ७ या वेळेत जेवण मागवून दिले जाते. जेवणात मुख्यत: पोळी, भाकरी, डाळ आणि भाजीचा समावेश असतो. नाश्ता, चहाबाबत नियमावलीत स्पष्ट तरतूद नाही.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 6:48 am

15 वर्षीय मुलाच्या छेडछाडीला कंटाळून अकोल्यात 13 वर्षीय मुलीची आत्महत्या:छेड काढणाऱ्याला बालसुधारगृहात पाठवून त्याच्या वडिलांना अटक

छेडछाडीला कंटाळून अकोल्यातील १३ वर्षांच्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली. ती इयत्ता सातवीत शिकत होती. तिच्या शाळेतील इयत्ता आठवीचा विद्यार्थी तिची सतत छेड काढत होता. या प्रकरणी शनिवारी रात्री उशिरा मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मुलीसआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी छेड काढणाऱ्या विधीसंघर्षग्रस्त मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली. या मुलाच्या वडीलांना अटक केली. तिच्या आत्महत्येमागील मूळ कारणाचा तपास सुरू आहे, असे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हलकर यांनी सांगितले. दुपारी शाळेतून आल्यावर अभ्यास करत बसते, असे सांगून ती स्वत:च्या खोलीत गेली. सायंकाळपर्यंत ती खोलीबाहेर आली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी दरवाजा तोडला तिने छताच्या पंख्याला आेढणीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शाळेतील एका अल्पवयीन मुलाकडून तिची छेड काढली जात होती, असा आरोप तिच्या वडिलांनी केला. दामिनी पथकाने कठोर उपाय करावेत : वडिलांची विनंती माझ्या मुलीला तिच्याच शाळेतील आठवीतील मुलगा त्रास देत असल्याची माहिती ‘त्या’ मुलाच्या वडिलांना ६ महिन्यांपूर्वीच मी फोनवरून दिली होती. त्यानंतरही पाहिजे तसा धाक त्याच्यावर कुटुंबीयांचा नव्हता. संबंधित शाळेच्या शिक्षकांनाही महिनाभरापूर्वी याची कल्पना दिली होती. पण त्याच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही. आमची मुलगी गेली, हा धक्का कधीही भरून निघू शकत नाही. मात्र भविष्यात शाळांमध्ये अशा घटना घडू नयेत, यासाठी शाळा प्रशासनाने अधिक गांभीर्याने दखल घ्यावी, असा प्रकार यापुढे होऊ नये, यासाठी कठोर उपाय हवेत, ही माझी विनंती. - अल्पवयीन मृत मुलीचे वडील

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 6:42 am

पाश्चिमात्य देशांकडून रशियाची कोंडी?

खनिज तेलाची वाहतूक रोखण्याचा युरोपियन देशांचा प्रयत्न मॉस्को : वृत्तसंस्था भारत दौ-यावरून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन मायदेशी परतले. यानंतर आता पाश्चिमात्य देशांनी पुतीन यांच्या रशियाची कोंडी करण्याची योजना आखली आहे. जी-७ देश आणि युरोपियन युनियन रशियाच्या खनिज तेलाची वाहतूक रोखण्याच्या विचारात आहेत. यामुळे पाश्चिमात्य देशांची जहाजे आणि विमा कंपन्यांची कोंडी होईल. या कंपन्या आजही रशियाच्या […] The post पाश्चिमात्य देशांकडून रशियाची कोंडी? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 12:49 am

रुद्राणी घोडीची किंमत १ कोटी १७ लाखांवर

सारंगखेड्यात घोडेबाजार, अश्वप्रेमींची गर्दी नंदूरबार : प्रतिनिधी नंदुरबारमधील सारंगखेड्याच्या घोडेबाजारात एक से बढकर एक घोडे दाखल होत आहेत. त्यातच उत्तर प्रदेशच्या महेश्वर येथून आलेली रुद्राणी नावाची घोडी दाखल झाली असून या घोडीची किंमत हजारो आणि लाखात नव्हे तर करोडो रुपये आहे. पंजाबच्या पुष्कर येथे रुद्र आणि या घोडीला एका अश्वप्रेमींनी १ कोटी १७ लाखात मागणी […] The post रुद्राणी घोडीची किंमत १ कोटी १७ लाखांवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 12:47 am

केंद्राचा इंडिगोला दणका

प्रवाशांना रिफंड द्या, आदेशाचे पालन न केल्यास कारवाई नवी दिल्ली : वृत्तसंस्था नागरी उड्डाण मंत्रालयाने इंडिगोला सर्व प्रलंबित प्रवाशांचे रिफंड त्वरित विलंब न करता परत करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. रद्द केलेल्या किंवा विस्कळीत उड्डाणांशी संबंधित सर्व परतफेड रविवार, ७ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. विमानाचे उड्डाण रद्द […] The post केंद्राचा इंडिगोला दणका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 12:44 am

विमानाच्या तिकिट दराची केंद्राकडून मर्यादा निश्चित

अवाजवी पैसे वसुलीला बसणार आळा नवी दिल्ली : वृत्तसंस्था इंडिगो एअरलाइन्सच्या उड्डाणांमधील मोठ्या गोंधळामुळे आणि तिकिटांच्या वाढलेल्या दरांमुळे प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी सरकारकडून पाऊल उचलण्यात आले. नागरी उड्डाण मंत्रालयाने सर्व एअरलाइन्ससाठी तिकिटांच्या दरांची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. यामुळे एअरलाइन्स प्रवाशांकडून अवाजवी पैसे वसूल करू शकणार नाहीत. इंडिगोची सेवा ठप्प असल्याने एअरलाइन्स सेवा आणि […] The post विमानाच्या तिकिट दराची केंद्राकडून मर्यादा निश्चित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 12:42 am

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार!

विरोधक आक्रमक, जमीन घोटाळा, अतिवृष्टीच्या मदतीवरून घेरणार नागपूर : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. हे अधिवेशन केवळ एकच आठवड्याचे असले तरी शनिवार आणि रविवारीही सभागृहाचे कामकाज होणार आहे. सध्या दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीत. त्यांच्या नियुक्तीसाठी विरोधक आक्रमक भूमिका घेणार असून पुणे जमीन घोटाळा, मतदार याद्यांमधील घोळ, राज्य निवडणूक आयोगाच्या […] The post राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 12:40 am

तपोवनमधील वृक्षतोड निविदा प्रक्रियेला स्थगिती

झाडे तोडून डोम उभारण्याचा सरकारचा प्रयत्न अयशस्वी नाशिक : नाशिकच्या पवित्र तपोवन परिसरात प्रस्तावित प्रदर्शन केंद्रासाठी होणा-या वृक्षतोडीच्या निविदा प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. सरकारच्या योजनेनुसार ऐतिहासिक तपोवनातील अनेक झाडे तोडून त्या जागी एक भव्य डोम उभारण्यात येणार होता. याचा वापर पुढील ३२ वर्षांसाठी प्रदर्शन केंद्र म्हणून […] The post तपोवनमधील वृक्षतोड निविदा प्रक्रियेला स्थगिती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 12:38 am

आता बांगलादेशात होणार कांदा निर्यात

कांदा उत्पादकांना मिळणार दिलासा नवी दिल्ली : वृत्तसंस्था बांगलादेश सरकारने ७ डिसेंबरपासून मर्यादित प्रमाणात कांदा आयात पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भारतीय कांदा निर्यातदारांना दिलासा मिळू शकतो. देशांतर्गत बाजार स्थिर ठेवण्यासाठी बांगलादेशने रोज ५० आयात परवाने देण्याची घोषणा केली. आता प्रत्येक परवान्यानुसार ३० टन कांदा आयात करता येणार आहे. या निर्णयाचा थेट […] The post आता बांगलादेशात होणार कांदा निर्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 12:35 am

भीम अनुयायांचा रास्ता रोको

मुंबईत वाहतूक कोंडी, ३ तासांच्या प्रयत्नांनंतर कोंडी फुटली मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील चुनाभट्टी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांना दादरच्या चैत्यभूमीकडे जाण्यापासून रोखण्यात आले. यामुळे मोठा तणाव आणि गोंधळ निर्माण झाला. चुनाभट्टी सायनजवळ पोलिसांनी रिक्षातून आलेल्या अनुयायांना पुढे जाण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे संतप्त अनुयायांनी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक […] The post भीम अनुयायांचा रास्ता रोको appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 12:29 am

रुपयाचे अवमूल्यन, भारतीयांच्या खिशाला चाट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षांत रुपयाचे सातत्याने अवमूल्यन होत आहे. पण भारतीय रुपयाच्या इतिहासात पहिल्यांदाच रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत ९० पेक्षा जास्त रुपयांनी घसरली. त्यामुळे भारतीय बाजारात खळबळ उडाली. कारण हा फक्त आकडा नाही तर येणा-या काही महिन्यात भारतीयांच्या खिशाला चाट बसणार आहे. निर्यातीच्या माध्यमातून भारतात डॉलर्स येतात. वस्तू निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात […] The post रुपयाचे अवमूल्यन, भारतीयांच्या खिशाला चाट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 12:26 am

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाने मालिका जिंकली

एकदिवसीय मालिकेत २-१ ने विजय, हिटमॅन २० हजारी मनसबदार विशाखापट्टणम : वृत्तसंस्था यशस्वी जैयस्वालचे नाबाद शतक, विराट कोहली आणि रोहित शर्माच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने विशाखापट्टणमच्या मैदानावर एकतर्फी सामना जिंकत ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी खिशात घातली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २७० धावा केल्या. त्यानंतर भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि […] The post दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाने मालिका जिंकली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 12:24 am

एक व्यक्ती, एक मत ही बाबासाहेबांचीच ऐतिहासिक देणगी

लातूर : प्रतिनिधी ‘एक व्यक्ती एक मत आणि एकच मूल्य’, ही जगाच्या लोकशाहीसाठी वाट दाखवणारी संकल्पना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना दिलेली अमूल्य देणगी आहे, असे मत केशव कांबळे यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील बौद्धनगरमधील वैशाली बुद्धविहार येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी केशव […] The post एक व्यक्ती, एक मत ही बाबासाहेबांचीच ऐतिहासिक देणगी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 6 Dec 2025 11:22 pm