SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

24    C
... ...View News by News Source

चाकूर येथील पाटील यांची गढी झाली पोरकी!

चाकूर : अ. ना. शिंदे चाकुरातील पाटील यांच्या गढीला साधारण तीनशे ते साडेतीनशे वर्षांचा इतिहास आहे. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्यामुळे चाकूरच्या गढीचे वैभव सर्वदूर पोहोचले. मुळात महान व्यक्तिमत्त्वासोबत परिसरही मोठा होतो. परिसराला वैभव प्राप्त होते. त्यानंतर ते वैभव एकट्याचे राहत नाही. पाटील यांच्या गढीचेही तसेच झाले आहे. या गढीच्या परंपरेतील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व […] The post चाकूर येथील पाटील यांची गढी झाली पोरकी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Dec 2025 1:44 am

सुसंस्कृत, अभ्यासू नेता हरपला

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन लातूर : प्रतिनिधी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, पंजाबचे माजी राज्यपाल, भारतीय राजकारणातील सुसंस्कृत, निष्कलंक, अभ्यासू आणि संसदीय परंपरा जपणारे नेते, लातूरचे सुपुत्र शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज (शुक्रवारी) सकाळी ६.३० वाजता देवघर या त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन […] The post सुसंस्कृत, अभ्यासू नेता हरपला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 13 Dec 2025 1:40 am

स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांना मोठा दिलासा:आता ‘ऑफलाईन’ही अर्ज भरता येणार, राज्य निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय

महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांना पारंपरिकरीत्यादेखील ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे केले. स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आज राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्यासह विविध अधिकारी आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये उमेदवार व राजकीय पक्षांची मागणी लक्षात घेवून नामनिर्देशनपत्रे ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन पद्धतीनेदेखील दाखल करण्याची मूभा देण्यात आली होती. आता महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी इच्छूक उमेदवारांना पारंपरिकरीत्या ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्रे दाखल करता येईल.त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिका, 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे नियोजन केले आहे. संभाव्य दुबार मतदारांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सर्व संबंधित महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त त्यांचे स्तरावर कार्यवाही करीत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणाली (ॲप्लिकेशन) विकसित केली आहे. त्याद्वारे आणि घरोघरी जावून संभाव्य दुबार मतदारांचा शोध घेण्याची दक्षता घेण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे; तसेच ‘मताधिकार’ हे मोबाईल ॲपदेखील विकसित केले आहे. ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे, असेही वाघमारे यांनी सांगितले. यावेळी आयोगाचे सचिव सुरेश काकाणी, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी/ प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 11:17 pm

सवाई गंधर्व महोत्सवाचा तिसरा दिवस रंगला:सत्येंद्रसिंह सोलंकी, श्रीनिवास जोशींच्या संतूर-गायन मैफलीने पूर्वार्ध गाजवला.

पुणे येथे सुरू असलेल्या ७१ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा तिसरा दिवस संतूरवादन आणि गायनाच्या मैफलीने रंगला. युवा संतूरवादक सत्येंद्रसिंह सोलंकी यांच्या बहारदार वादनानंतर पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांच्या दमदार गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या प्रांगणात हा महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारी महोत्सवाच्या पूर्वार्धात सत्येंद्रसिंह सोलंकी यांनी आपल्या संतूर वादनाने रसिकांना आनंद दिला. पं. ओमप्रकाश चौरसिया यांचे शिष्य असलेल्या सत्येंद्रसिंह यांनी दाक्षिणात्य राग 'वाचस्पती' निवडला होता. आलाप, जोड, झाला अशा क्रमाने वादन करताना त्यांनी पखवाजच्या साथीने रागाचा विस्तार केला. धृपद गायनाची तालीम घेतल्यामुळे त्यांच्या वादनाला धृपद गायकीचे एक वेगळे अंग लाभले होते. त्यांनी तबल्याच्या साथीने तिस्र आणि चतुस्र जातीत वादन केले. त्यानंतर रूपक आणि त्रितालातील रचनांमधून लयकारीचे प्रभावी दर्शन घडवले. मिश्र पहाडीमधील एका आकर्षक धूनने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर रामेंद्रसिंह सोलंकी आणि पखवाजवर अखिलेश गुंदेचा यांनी उत्कृष्ट साथ दिली. यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि सुपुत्र श्रीनिवास जोशी यांचे गायन झाले. त्यांनी राग 'पूरिया' मध्ये एकतालातील 'पिया गुणवंता' आणि त्रितालातील 'घडिया गिनत' या रचनांचे दमदार सादरीकरण केले. त्यानंतर राग 'सुहा कानडा' मध्ये 'ए दाता हो...' ही झपतालातील रचना त्यांनी सादर केली, जी विशेष रंगतदार ठरली. श्रीनिवास जोशी यांनी संत तुकाराम महाराज यांच्या 'अणुरणिया थोकडा तुका आकाशाएवढा...' या लोकप्रिय अभंग गायनाने मैफलीची सांगता केली. या अभंगाने संपूर्ण वातावरण भक्तीरसपूर्ण झाले. त्यांना तबल्यावर पांडुरंग पवार, हार्मोनिअमवर अविनाश दिघे, पखवाजवर गंभीर महाराज, गायनसाथीला विराज जोशी, टाळवर माऊली टाकळकर आणि तानपुऱ्यावर लक्ष्मण कोळी व मोबिन मिरजकर यांनी साथसंगत केली.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 10:22 pm

पुण्यात राष्ट्रीय ऑन्कोलॉजी परिषदेचे उद्घाटन:देशभरातील 200 हून अधिक तज्ज्ञ आणि जागतिक ऑन्कोलॉजिस्ट सहभागी

पुण्यात तीन दिवसीय 'ऑन्को 360 2025' या राष्ट्रीय ऑन्कोलॉजी परिषदेला सुरुवात झाली आहे. एमओसी कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटरच्या वतीने कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टिन येथे १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यात देशभरातील २०० हून अधिक नामवंत ऑन्कोलॉजिस्ट आणि आठ आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. या परिषदेत प्रिसिजन ऑन्कोलॉजी, टार्गेटेड थेरपी, मॉलेक्युलर ऑन्कोलॉजी, थोरॅसिक ऑन्कोलॉजी आणि प्रगत उपचार धोरणे यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. रुग्णांच्या वास्तविक केसेसवरील संवादात्मक सत्रे आणि वैज्ञानिक वादविवाद यांमुळे भारतीय संदर्भात जागतिक नवोपक्रम कसे राबवता येतील, यावर प्रकाश टाकला जाईल. आंतरराष्ट्रीय पाहुण्यांमध्ये मॅकारी युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे डॉ. अॅलिसन झँग, युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्गचे डॉ. अॅडम ब्रफ्स्की, मायो क्लिनिकचे डॉ. अॅक्सेल ग्रॉथी, यूटी हेल्थ सॅन अँटोनियोचे डॉ. दारुका महादेवन आणि युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो कॅन्सर सेंटरचे डॉ. रॉस कॅमिज यांचा समावेश आहे. उद्घाटनप्रसंगी एमओसीचे सीनिअर ऑन्कोलॉजिस्ट डॉ. तुषार पाटील म्हणाले, “ऑन्को 360 हे जागतिक संशोधन आणि भारतीय क्लिनिकल प्रॅक्टिस यांच्यातील एक मजबूत दुवा आहे. अर्थपूर्ण संवाद आणि सहकार्याद्वारे देशभरातील कर्करोग रुग्णांना उत्तम उपचार परिणाम मिळवून देण्याचे आमचे ध्येय आहे. ऑन्कोलॉजीतील सर्वोत्तम बुद्धिमत्तांना एकत्र आणणारा हा मंच तयार केल्याचा आम्हाला अभिमान आहे.” ही परिषद भारतीय कर्करोग उपचार क्षेत्राला नवी दिशा देणारी ठरेल, तसेच उपचार पद्धती मध्ये मूलभूत बदल करण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 10:20 pm

हडपसर सह्याद्री रुग्णालयावर हल्ला; डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर मारहाण:आयएमए पुणेने तीव्र निषेध करत कठोर कारवाईची केली मागणी

पुण्यातील हडपसर येथील सह्याद्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एका रुग्णाच्या निधनानंतर काही व्यक्तींनी तोडफोड करत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) पुणे शाखेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या हिंसाचारामुळे रुग्णालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, इतर गंभीर रुग्णही भीतीपोटी डिस्चार्ज घेऊन जात आहेत. रुग्णालय प्रशासन आणि आयएमएने दिलेल्या माहितीनुसार, गंभीर अवस्थेतील रुग्णावर सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) सुरू असतानाच काही नातेवाईक आणि बाहेरील लोक जमावाने रुग्णालयात घुसले. त्यांनी आरडाओरड करत डॉक्टरांना मारहाण केली, वैद्यकीय उपकरणे फोडली आणि रुग्णालयात दहशत निर्माण केली. आयएमए पुणेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील आणि सचिव डॉ. अभिजित सोन्नवणे यांनी सांगितले की, सीपीआर ही जीव वाचवणारी शास्त्रोक्त पद्धत आहे. रुग्णाच्या नातेवाईकांच्या अशा अज्ञानामुळे डॉक्टर भविष्यात सीपीआर देण्यास घाबरतील, ज्याचा थेट परिणाम हजारो रुग्णांच्या जीवावर होईल. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत रुग्णालय किंवा डॉक्टरांची कोणतीही चूक दिसत नाही. आयएमएने या घटनेचा निषेध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये महाराष्ट्र मेडीकेअर ऍक्ट-२०१० अंतर्गत त्वरित आणि कठोर कारवाई करणे, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कार्यवाही करणे, सर्व रुग्णालय परिसर 'सेफ झोन' घोषित करणे आणि रुग्णालयांमध्ये २४ तास पोलीस संरक्षण व तात्काळ हस्तक्षेप यंत्रणा उभी करणे यांचा समावेश आहे. डॉक्टर समाजाने यापुढे अशा हिंसाचाराविरुद्ध एकजूट दाखवत कामबंद आंदोलनाचा इशाराही दिला आहे. डॉक्टर हे समाजाला अत्यावश्यक सेवा देत असून, त्यांच्यावर असे हल्ले होणे आणि रुग्णालयाची तोडफोड करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 10:18 pm

3 तहसीलदारांसह 4 मंडल अधिकारी, 2 तलाठी निलंबित:पुण्यातील अवैध गौण उत्खनन प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात झालेल्या ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खननाप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली. या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या चार तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी अशा नऊ जणांचे निलंबन करण्यात आले. परवानगीपेक्षा ९० हजार ब्रास अधिक उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणीत निष्पन्न झाले असून, यावर फौजदारी व महसूली अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आमदार सुनील शेळके यांनी मावळ येथील उत्खनन गैरव्यवहाराबाबत आज विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. उत्खनन प्रकरणात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती दिली असून, अधिकारी आठ महिने टाळाटाळ करत अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप शेळके यांनी केला होता. विभागीय आयुक्तांच्या चौकशीत निष्पन्न महसूल मंत्र्यांनी सांगितले की, विभागीय आयुक्तांनी दोनदा चौकशी केली. गट क्रमांक ३६, ३७, आणि ३८ मध्ये खाणपट्टे मंजूर होते, मात्र ३५, ४१, ४२, आणि ४६ या गट क्रमांकांवरही गौण खनिजाचे तात्पुरत्या स्वरूपाचे उत्खनन झाले आहे. परवानगीपेक्षा जादा उत्खनन ईटीएस मोजणीमध्ये ३ लाख ६३ हजार ब्रासची परवानगी असताना तब्बल ४ लाख ५४ हजार ब्रास उत्खनन झाल्याचे आढळले. म्हणजेच, ९० हजार ब्रास जास्तीचे उत्खनन झाले आहे. निलंबित अधिकाऱ्यांची नावे गैरव्यवहारात कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तलाठी (२): दीपाली सनगर आणि गजानन सोटपल्लीवार. मंडळ अधिकारी (४): संदीप बोरकर, माणिक साबळे, अजय सोनवणे आणि रमेश कदम. तहसीलदार (४): जोगेंद्र कटियार, मनजीत देसाई, मधुसूदन बारगे, विक्रम देशमुख. (या काळात कार्यरत असलेले चार तहसीलदार.)दंड आणि महसूली कारवाई ९० हजार ब्रास जादा उत्खननासाठी संबंधितांवर गुन्हा दाखल करणे, दंड आकारणी करणे, सातबारा उताऱ्यावर नोंदी घेणे आणि दंड न भरल्यास व्याजासह वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.विभागीय चौकशी निलंबित अधिकाऱ्यांची तीन महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल आगामी अधिवेशनात पटलावर ठेवला जाईल, असे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले. वनिकरणाचा मुद्दा आमदार शेळके यांनी वनीकरणासाठी राखीव असलेल्या क्षेत्रात उत्खनन झाल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर बोलताना महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ती खाजगी जमीन आहे. गुगल इमेजमध्ये फक्त १५ झाडे होती आणि ती तोडण्यासाठी परवानगी घेण्यात आली होती. महसूल मंत्र्यांनी सांगितले की, वन अधिकाऱ्यांनी हा 'फॉरेस्ट झोन' नसल्याचे लेखी कळवले आहे, म्हणूनच खाणपट्ट्याला परवानगी मिळाली. तथापि, पीएमआरडीएच्या प्रस्तावीत विकास आराखड्यात (Proposed DP) ही जमीन खाजगी वनीकरणासाठी राखीव दर्शवण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहिती असल्यास स्वतंत्र बैठक घेऊन चर्चा करण्याची तयारी मंत्र्यांनी दर्शविली. राज्यभरात ईटीएस सर्वे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यभरातील अवैध उत्खननाला लगाम लावण्यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावाचा ईटीएस सर्वे सुरू करण्यात आला आहे. यामुळे किती परवानग्या दिल्या आणि किती अवैध उत्खनन झाले, याची माहिती मिळेल व त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 10:12 pm

वाल्मीक कराडच संतोष देशमुख हत्याकांडाचा 'मास्टरमाइंड':सरकारी वकिलांचा हायकोर्टात दावा, जामीन अर्जावर जोरदार युक्तिवाद

बीड जिल्ह्यासह राज्याला हादरवून सोडणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महत्वपूर्ण सुनावणी पार पडली. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, वाल्मीक कराड हाच या निर्घृण हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असून, त्यानेच फोनवरून हत्येचे निर्देश दिले होते, असा जोरदार युक्तिवाद मुख्य सरकारी वकिलांनी केला. या युक्तिवादानंतर खंडपीठाने पुढील सुनावणी 16 डिसेंबर रोजी निश्चित केली आहे. वाल्मीक कराडच्या वतीने बाजू मांडताना बचाव पक्षाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 'मिहीर शहा' निवाड्याचा आधार घेतला. आरोपीला अटकेची कारणे लेखी देणे बंधनकारक असताना ती दिली नाहीत, तसेच मोक्का कायदा चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला आहे, असा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे, घटनेच्या दिवशी कराड घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होता, त्याचा या हत्याकांडाशी संबंध नसून त्याला यात गोवण्यात आले आहे, असा युक्तिवाद करत जामिनाची मागणी करण्यात आली. सरकारी वकिलांचा जोरदार युक्तीवाद सरकारी वकील ॲड. अमरजितसिंह गिरासे यांनी बचाव पक्षाचे मुद्दे खोडून काढत पुराव्यांची साखळीच न्यायालयासमोर मांडली. त्यांनी घटनेचा तपशीलवार क्रम, साक्षीदारांचे जबाब, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स (CDR), सीसीटीव्ही फुटेज, ऑडिओ क्लिप्स आणि न्यायवैद्यक अहवाल सादर केला. गिरासे यांनी युक्तिवाद केला की, कराडने अवादा कंपनीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. सुदर्शन घुले याने देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर कराडनेच आपल्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी 'देशमुखला आडवा करा' असा आदेश दिला. या आदेशानुसार सुदर्शन घुले आणि साथीदारांनी उमरी टोलनाक्यावरून देशमुखांचे अपहरण केले. त्यांना निर्जन स्थळी नेऊन मारहाण केली जात असताना आरोपी सतत वाल्मीक कराड, विष्णू चाटे यांच्या संपर्कात होते. कराड फोनवरूनच मारेकऱ्यांना सूचना देत होता. दरम्यान, दोन्ही बाजूनच युक्तिवाद ऐकल्यानंतर आता, हायकोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणीसाथी 16 डिसेंबर तारीख दिली आहे. बीड कोर्टातील पुढील सुनावणी 19 डिसेंबरला एकीकडे हायकोर्टात सुनावणी सुरू असतानाच, दुसरीकडे बीड सत्र न्यायालयातही या खटल्याची समांतर सुनावणी पार पडली. बीडमध्ये आज दिवसभरात तब्बल तीन तास न्यायालयाचे कामकाज चालले. सरकारी पक्षाने आजच आरोपींवर दोषारोप निश्चिती करण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, सरकारी पक्षाकडून काही कागदपत्रे आणि पुराव्यांची प्रत न मिळाल्याचे सांगत आरोपीच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बीड न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 डिसेंबर रोजी ठेवली आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 9:54 pm

'बामु'च्या ग्रेड पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या नोकरीवर गदा?:हायकोर्टाच्या भरतीत अर्ज भरताना अडचण, उपाययोजनेची SFIची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पदवीधर झालेले तसेच सध्या शिक्षण घेत असलेले विद्यार्थी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मा. उच्च न्यायालय, मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठांतर्फे विविध पदांसाठी प्रसिद्ध झालेल्या भरती जाहिरातींमध्ये प्रत्येक सेमिस्टरमध्ये किती पैकी किती गुण व त्याची टक्केवारी नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र विद्यापीठाच्या प्रत्येक सेमिस्टरच्या गुणपत्रिकेत SGPA/CGPA प्रमाणे ग्रेड आणि फक्त शेवटच्या सेमिस्टर मध्ये एकूण टक्केवारी दर्शवली जाते ,त्यामुळे अर्ज करताना विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती सादर करणे अशक्य झाले आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की –विद्यापीठाकडून मिळणाऱ्या गुणपत्रिकेत फक्त ग्रेड गुणांकन असते, तर रूपांतरण प्रमाणपत्रामध्ये (Conversion Certificate) सर्व सेमिस्टर मिळून संपूर्ण पदवीचे एकूण गुण आणि Percentage दिलेली असते; परंतु किती पैकी किती गुण मिळाले हे कुठेही नमूद केले नसल्याने भरती प्रक्रियेत अर्ज स्वीकारला जात नाही. एमकेसीएल (MKCL) प्रणालीवर विद्यार्थ्यांच्या PRN क्रमांकाद्वारे प्रत्येक सेमिस्टरचे ‘किती पैकी किती गुण’ मिळाले ते उपलब्ध होतात. यासाठी प्राचार्याची सही-शिक्का असलेले एम.के.सी.एल.चे गुणपत्रक अधिकृतपणे वापरता येते या आशयाचे विद्यापीठाने जाहीर परिपत्रक काढावे व एम.के.सी.एल.च्या गुणपत्रकाच्या प्रतीवर सही शिक्का देण्याबाबत सर्व महाविद्यालयांना सूचना करावी विद्यार्थ्यांची मागणी आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठास तीन पर्याय सुचविले आहेत अथवा विद्यापीठाने थेट मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्याशी पत्रव्यवहार करून ग्रेड पद्धतीनुसार अर्ज स्वीकारण्याची विनंती करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. सध्या खालील पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत अत्यंत निकट असल्याने विद्यार्थ्यांना तातडीची मदत आवश्यक आहे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, विद्यापीठाच्या सध्याच्या ग्रेड पद्धतीमुळे त्यांचे रोजगाराच्या संधींवर गंभीर परिणाम होत असून, “आमचे प्रचंड नुकसान टाळण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा” अशी कळकळीची विनंती त्यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत राज्यपाल, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच परीक्षा व मूल्यमापन विभागाला पाठवण्यात आली आहे. या प्रसंगी एसएफआय जिल्हा सचिव अरुण मते, समाधान बारगळ, सुरज देवकर व विद्यार्थी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 9:33 pm

मनोज जरांगे पाटलांना थेट राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर:करुणा मुंडेंची मोठी घोषणा, पार्थ पवार जमीन घोटाळ्यावरून भाजपबाबत मोठा गौप्यस्फोट

मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्यामुळे राज्यात 'किंगमेकर' ठरलेले मनोज जरांगे पाटील यांना आता थेट एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी जरांगे पाटील यांना आपल्या पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याचे खुले निमंत्रण दिले आहे. एका बाजूला जरांगे यांना ऑफर देतानाच, दुसरीकडे करुणा मुंडे यांनी भाजपवर सडकून टीका करत पार्थ पवार प्रकरण आणि महायुतीतील राजकारणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या संघर्षामुळे हैदराबाद गॅझेट लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे म्हणाल्या, मी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळीच जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन दिले होते. मनोज जरांगे यांच्यासारख्या लढवय्या नेतृत्वाची आज महाराष्ट्रातील १८ पगड जातींना आणि सर्व समाजघटकांना गरज आहे. त्यामुळे त्यांनी स्वराज्य शक्ती सेनेचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी माझी त्यांना विनंती आहे आणि मी ते पद त्यांना द्यायला तयार आहे. गोपीनाथरावांचा खरा वारसा माझ्याकडेच! यावेळी बोलताना करुणा मुंडे यांनी परळीच्या राजकारणावरही भाष्य केले. धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे काय करत आहेत, हे जनता पाहत आहे. मात्र, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सायकलवरून फिरून ज्याप्रमाणे संघर्ष केला, तोच वारसा घेऊन मी एकटी महिला असूनही महाराष्ट्र पिंजून काढत आहे. त्यामुळे मुंडे साहेबांचा खरा राजकीय वारसा माझ्याकडेच आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच वाल्मीक कराड प्रकरणामुळे आमच्या घराण्याची आणि कुळाची बदनामी झाल्याचेही त्यांनी म्हटले. अजित पवारांना संपवण्यासाठी पार्थ पवारांचा वापर? पार्थ पवार यांच्या कंपनीच्या कथित जमीन घोटाळ्यावरून करुणा मुंडे यांनी भाजपबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय. भाजपनेच पार्थ पवार यांचा घोटाळा पुढे आणला आहे. इतकी वर्षे हा विषय गप्प का होता? निवडणुकीच्या वेळीच तो का बाहेर काढला? राष्ट्रवादीत अजित पवार यांचे खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांना अडचणीत आणण्यासाठीच भाजपने हा डाव टाकला आहे, असे करुणा मुंडे म्हणाल्या. पार्थ पवारांना कोण वाचवतंय? पुढे बोलताना त्यांनी थेट सवाल केला की, जर भाजपने घोटाळा उघडकीस आणला आहे, तर पार्थ पवार अजून जेलमध्ये का नाहीत? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा आहे म्हणून त्यांना वाचवले जात आहे का? कायदा सर्वांसाठी समान असायला हवा. भाजपवर 'हुकूमशाही'चा आरोप भाजप मित्रपक्षांना संपवत असल्याचा आरोपही करुणा मुंडे यांनी केला. उद्धव ठाकरे असो वा एकनाथ शिंदे, भाजपला या दोन्ही शिवसेना संपवायच्या आहेत. भाजप हा कोणाचाच पक्ष नाही, त्यांना केवळ हिटलरप्रमाणे हुकूमशाही गाजवायची आहे. देवेंद्र फडणवीस यांना हेच हवे आहे. पण तुम्ही आज सत्तेत आहात, उद्या दुसरे कोणीतरी असेल, याची जाणीव ठेवा, असा इशाराही करुणा मुंडे यांनी दिला.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 7:29 pm

हिवाळी अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही:‘हम करे सो कायदा’ पद्धतीने काम रेटण्याची फडणवीसांची पद्धत, काँग्रेसची टीका

नागपूरचे हिवाळी अधिवेशन अवघे एक आठवड्याचे घेऊन भाजपा महायुती सरकारने विदर्भ कराराचा अनादरच केला आहे. शेतकरी, कामगार, बेरोजगार, कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार महिला सुरक्षा यासारखे असंख्य प्रश्न असताना अधिवेशनात त्यावर चर्चा होत नाही आणि कुठे कुत्री पकडा, बिबटे सोडा यावर चर्चा होत आहे. सत्ताधारी पक्षाला अधिवेशनाचे काही गांभिर्यच राहिलेले नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. नागपूर विधान भवनात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज भ्रष्टाचाराची एक एक प्रकरणे उघड होत आहेत. पैशांचा सुळसुळाट सुरु आहे. भ्रष्टाचार हेच सरकारचे ब्रिद वाक्य़ आहे. ‘न खाऊंगा, न खाने दुंगा’, पासून झालेली सुरुवात आता ‘मिल बाट के खायेंगे’ पर्यंत आली आहे. राज्यातील भ्रष्टाचारावर श्वेतपत्रिका काढून त्यावर चर्चा झाली पाहिजे पण सत्ताधारी पक्षच सभागृहाचे कामकाज सुरुळीत चालू देत नाहीत. गंभीर विषय सुरु असताना सत्ताधारी पक्षाचे सदस्य़ विनोद करत असतात. लोकशाहीचा कटेलोट होताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षातीलच काही सदस्य भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, सरकारने आतातरी डोळे उघडावे, असे सपकाळ म्हणाले. सत्ताधारी राजधर्म पाळत नाही विरोधी पक्ष नेते पदाबद्दल बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदासाठी १० टक्के सदस्यसंख्येचा दाखला दिला जात आहे, असे असेल तर वरच्या सभागृहात १० टक्के सदस्यसंख्या आहे व सरकारला प्रस्तावही दिलेला आहे. मग तेथे विरोधी पक्षनेत्य़ाचा निर्णय का घेतला जात नाही? लोकशाही व्यवस्थेत काही प्रथा, परंपरा व संकेत पाळले जातात, दोन्ही सभागृहाचे प्रस्ताव आहेत पण सरकारला संविधानानुसार कामकाज करायचे नाही, हम करोसे कायदा पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामकाज रेटत आहेत. फडणविसांनी लोकशाहीची बूज राखली पाहिजे. ते एवढा आव आणत असतात पण हा आव आणत असताना त्यांनी संकेत, निय़म पाळले पाहिजेत. विरोधी पक्षनेतेपद देणे हा राजधर्म आहे पण फडणवीस त्यापासून पळ काढत आहेत, असेही सपकाळ म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 6:37 pm

शेतकऱ्यांना ‘बळीराजा रस्ते’ योजनेचा आधार:सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा, महसूल विभागाचे महत्वाचे निर्णय

राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या शेत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र योजना राबविण्यासह, मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करणारे तसेच वर्ग २ च्या जमीनी वर्ग १ करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. असे महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चार निवेदने सादर केली. 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना' ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यासाठी बारमाही आणि मजबूत रस्ते उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महसूल विभागामार्फत 'मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना' राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा मुंबईतील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारती मोडकळीस आल्या असून, त्यांना स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन देणारा निर्णय घेण्यात आला आहे. वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यास मुदतवाढ भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-१ (फ्री होल्ड) मध्ये सवलतीच्या दराने रूपांतर करण्याच्या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यांचे दर सुधारित मुंबई शहर व उपनगरातील शासकीय जमिनींवर ९०, ९९ किंवा ९९९ वर्षांच्या दीर्घ मुदतीचे भाडेपट्टे आहेत, त्यांच्या दरात सुधारणा करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. ज्या जमिनींच्या करारात विशिष्ट कालावधीनंतर दर सुधारण्याची तरतूद आहे, तिथे शासनाच्या २५ टक्के मूल्यांकनावर सुधारित भाडेपट्ट्याची रक्कम निश्चित करून वसूल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, मूळ भाडेपट्टाधारकाकडून जमिनीचा ताबा सहकारी संस्थेकडे हस्तांतरित झाला असल्यास, अनर्जित उत्पन्न वसूल करून संस्थेच्या नावे भाडेपट्टा नूतनीकरण केले जाईल.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 6:31 pm

मंत्री सभागृहात येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा:सुधीर मुनगंटीवार संतापले, घरकूल निधीवरूनही रोष केला व्यक्त

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी रौद्ररूप धारण केलेले पाहायला मिळाले. मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून आणि घरकुल योजनेच्या रखडलेल्या निधीवरून मुनगंटीवार यांनी सभागृहात आक्रमक होत स्वतःच्याच सरकारला धारेवर धरले. सभागृहात मंत्री येत नसतील, तर त्यांच्यावर बिबटे सोडा, हे धंदे आता बंद करा, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी आपला संताप व्यक्त केला. विधिमंडळ सभागृहात अर्धा तास चर्चा सत्रात मुनगंटीवार बोलण्यासाठी उभे राहिले असता, संबंधित विभागाचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावरून त्यांचा पारा चढला. त्यांनी तालिका अध्यक्षांना सुनावले, मंत्री महोदयांना सभागृहात आणण्याची जबाबदारी आमची नाही, ती तुमची आहे. आमदार उपस्थित असताना मंत्री गैरहजर राहतात हे चालणार नाही. मंत्री येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा, हे धंदे आता बंद करा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. भारत माता माझी आई, डोके ठेवायला जागा नाही चंद्रपूर जिल्ह्यातील 'यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने'च्या रखडलेल्या निधीवरून मुनगंटीवार अधिकच आक्रमक झाले. भारत माता माझी आई, पण डोकं ठेवायला जागा नाही, अशी गरिबांची अवस्था झाली आहे. मुंबईत असलेल्यांसाठी सरकारकडे ११ लाख कोटी आहेत, पण आमच्या चंद्रपूरमधील तुटक्या-फुटक्या घरात राहणाऱ्या गरिबांसाठी लागणारे ९६ कोटी ३६ लाख रुपये मिळत नाहीत. ज्या अधिकाऱ्यांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे, त्यांनी कोरड्या विहिरीत जीव दिला पाहिजे, अशा तिखट शब्दांत त्यांनी प्रशासनाचे वाभाडे काढले. बिरबलाची खिचडी शिजेल, पण तुमचा निधी येणार नाही सरकारच्या कारभारावर टीका करताना मुनगंटीवार यांनी अस्सल म्हणींचा वापर केला. ते म्हणाले, या योजनेचा एक हप्ता मिळाल्यावर दुसऱ्या हप्त्यासाठी गरिबांना चातक पक्ष्यापेक्षा जास्त वाट पाहावी लागते. मंत्री महोदय, कापूसकोंड्याची गोष्ट संपेल, बिरबलाची खिचडी शिजेल, चिऊताई दरवाजा उघडेल, पण तुमचा निधी काही येत नाही. अधिकाऱ्यांनी लिहून दिलेली उत्तरे वाचू नका, तर निधी कधी देणार ते स्पष्ट सांगा, असा थेट जाब त्यांनी मंत्री अतुल सावे यांना विचारला. मंत्र्यांनी लागलीच मागणी मान्य केली दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी परखड शब्दांमध्ये घरकुल योजनेबाबतची आपली तक्रार मांडल्यानंतर ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी निधी लवकरात लवकर दिला जाईल असं आश्वासन दिलं. “पुरवणी मागण्यांमध्ये या योजनेसाठी ३०० कोटी मंजूर झाले आहेत. चंद्रपूरला विहीत १०० टक्के निधी तातडीने दिला जाईल. आपण नवीन घरकुलं पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून देत आहोत. पण आधीच्या घरकुल योजनेसाठी आपण ३०० कोटींची व्यवस्था केली आहे. ताबडतोब त्यावर कार्यवाही होईल”, असं ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 6:14 pm

‘एआय’ तुमचा स्पर्धक नाही, मदतनीस!:संशोधनात डोळस वापर करा, राष्ट्रीय परिसंवाद डॉ. दीपक शिकारपूर यांचे प्रतिपादन

संशोधनाच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) डोळसपणे वापर करणे आवश्यक आहे. हे तंत्रज्ञान तुमचा स्पर्धक नसून, त्याचा मदतनीस म्हणून वापर करा, असा सल्ला तंत्रज्ञान क्षेत्रातील डिजिटल साक्षरता कार्यकर्ते डॉ. दीपक शिकारपूर यांनी दिला. तंत्रज्ञानावर पूर्णपणे विसंबून न राहता, त्याविषयी अद्ययावत ज्ञान मिळवत राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. पुण्यात राष्ट्रीय पातळीवरील दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सेंटर फॉर सोशल रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट पुणे, साऊथ एशियन जर्नल ऑफ पार्टिसिपेटिव्ह डेव्हिलपमेंट, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस पुणे आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा परिसंवाद पार पडला. या परिसंवादात डॉ. शिकारपूर यांनी शुक्रवारी 'द फ्युचर ऑफ रिसर्च इन द एरा ऑफ आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स' या विषयावर शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 'रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट इन द एरा ऑफ आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स: स्ट्रेन्थनिंग रिसर्च फॉर विकसित भारत @ २०४७' या अनुषंगाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा कसा वाढविता येईल, यावर प्रामुख्याने चर्चा झाली. यात ११ राज्यातील २०० हून अधिक शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले होते. डॉ. दीपक शिकारपूर यांनी पुढे सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानातील जनरेटिव्ह एआयचा अयोग्य वापर अत्यंत घातक ठरू शकतो. हे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत असल्याने महाविद्यालयीन अभ्यासक्रम सातत्याने अद्ययावत करणे आवश्यक आहे. तांत्रिक विषयात शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांनी उद्योग क्षेत्राशी जोडून घेतल्यास विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी सहज उपलब्ध होतील. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ५० टक्के तांत्रिक अभ्यासक्रम आणि ५० टक्के प्रत्यक्ष अनुभव अशा पद्धतीने कार्य करणे आवश्यक आहे. शिक्षकांनी 'स्मार्ट टिचर' बनून विद्यार्थ्यांशी भावनिक नाते निर्माण करावे, जेणेकरून उत्तम विद्यार्थी घडतील आणि शिक्षकांनाही समाधान मिळेल. कृत्रिम बुद्धिमत्तेवर पूर्णपणे अवलंबून राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 5:05 pm

‘एफडीए’च्या कारभारावर सत्ताधारी आमदारांचीच नाराजी:विक्रमसिंह पाचपुते आणि मुनगंटीवारांनी विधानसभेत टोचले कान, मंत्री झिरवळ हतबळ

राज्यातील अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाच्या कार्यपद्धतीवर खुद्द सत्ताधारी भाजपच्या आमदारांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हिवाळी अधिवेशनात बोलताना भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एफडीएच्या ढिसाळ कारभाराचे वाभाडे काढले. अधिवेशन आले की एफडीएला जाग येते आणि कारवाया सुरू होतात, एरवी हा विभाग सुस्त असतो, अशा शब्दांत पाचपुते यांनी विभागाचे कान टोचले. विशेष म्हणजे, मंत्री नरहरी झिरवळ हे देखील हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. सभागृहात बोलताना आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी प्रशासनाला धारेवर धरले. ते म्हणाले, मागील अधिवेशनात मी ‘फेक पनीर’ आणि ‘ॲनालॉग चीज’चा मुद्दा मांडला होता, तेव्हा एफएसएसएआयने (FSSAI) याची गंभीर दखल घेतली होती. मात्र, एफडीएचे अधिकारी केवळ अधिवेशन सुरू असतानाच कारवाया दाखवतात. यंदाच्या अधिवेशनात या विभागाचा प्रश्न नव्हता, त्यामुळे कारवाईही शून्य आहे. कफ सिरपमुळे नुकतेच 25 मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा दाखला देत पाचपुते यांनी महाराष्ट्रात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी वेळीच सावध राहण्याचा इशारा दिला. तसेच निधीच्या कमतरतेवर बोट ठेवले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विभागासाठी 200 कोटींची घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात हातात केवळ 30 कोटी पडले. निधीशिवाय सुधारणा कशी होणार? असा सवालही विक्रमसिंह पाचपुते यांनी सभागृहात उपस्थित केला. 90 अधिकाऱ्यांवर राज्याचा डोलारा? सुधीर मुनगंटीवार यांनीही विभागाच्या प्रशासकीय अनागोंदीवर टीका केली. शासन गंभीर नाही, शब्द देऊनही पैसे दिले जात नाहीत. बिंदू नामावलीमध्ये (Roster) सुधारणा करण्यासाठी एकही पाऊल उचलले नाही. संपूर्ण राज्याचा कारभार केवळ 90 अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सुरू आहे. दुसरीकडे, नवीन अधिकारी प्रशिक्षण पूर्ण करून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, तरीही त्यांना सेवेत घेतले जात नाही, असे सांगत मुनगंटीवार यांनी सरकारला आरसा दाखवला. मंत्री नरहरी झिरवाळ हतबल दरम्यान, आमदार विक्रमसिंह पाचपुते आणि सुधीर मुनगंटीवार हे एफडीएच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत असताना, मंत्री नरहरी झिरवळ हे हतबल झाल्याचे दिसून आले. आमदार पाचपुते आणि मुनगंटीवार हे दोघेही एफडीएचे कामकाज थातूरमातूर आणि ढिसाळ असल्याचे स्पष्ट करत असताना, मंत्री नरहरी झिरवळ यांनी एफडीएच्या ढिसाळ नियोजनाची कबुली दिल्याचे पाहायला मिळाले.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 4:58 pm

माजी मंत्री नितीन राऊतांना कोण धमकी देतंय?:विधानसभेत सांगितला थरारक अनुभव; लेटरहेडचा गैरवापर झाल्याचीही दिली माहिती

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी एका तरुणाने आपल्याला आपल्या कार्यालयात शिरून धमकी दिल्याची बाब विधानसभेच्या निदर्शनास आणून दिली. माझ्या लेटरहेडचा गैरवापर करून पास काढण्यात आली. आज चक्क एक एक लांब केसांचा तरुण माझ्या घरातील कार्यालयात शिरला. त्याने आरडाओरडा करत आम्हाला धमकावले. यामुळे माझ्या व माझ्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या या माहितीनंतर अध्यक्षांनी या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली. नितीन राऊत हे काँग्रेसचे उत्तर नागपूरचे आमदार आहेत. त्यांनी शुक्रवारी विधानसभेच्या अध्यक्षांकडे एका गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, एक तरुण आज सकाळी दुचाकीवरून माझ्या कार्यालयालगत आला. तो कुठे आहे त्याला फोन करा असे म्हणत त्याने आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर तो माझ्या कार्यालयात शिरला. त्यावेळी माझ्या कार्यालयात बौद्ध भिक्षू बसले होते. या प्रकारामुळे ते घाबरले. त्यांनी मला त्याची माहिती दिली. त्यानंतर मी पोलिसांना बोलावले. अशा घटना घडल्यास माझ्या व आमदारांच्या सुरक्षेचे काय होईल? मुलालाही धमकावले नितीन राऊत म्हणाले, सदर तरुणाने माझा मुलगा कुणाल याच्याविषयीही विचारणा केली. धमकी दिली. मी आजपर्यंत कोणतीही सरकारी सुरक्षा वापरली नाही. पण आता अशा धमक्या दिल्या जात आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार कृष्णा खोपडे यांनीही आपल्या धमक्या मिळत असल्याची तक्रार सभागृहात केली. नागपूरच्या दोन आमदारांना अशा धमक्या मिळत असतील तर संपूर्ण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत, असे ते म्हणाले. आमदारांचे मुख्यमंत्र्यांना गंभीर दखल घेण्याचे आवाहन काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली. अशा प्रकारच्या गुंडगिरीला कोण आश्रय देत आहे? त्यांना एवढे धाडस कुठून मिळाले? महाराष्ट्र बिहारला मागे टाकत आहे का? असे विविध प्रश्न त्यांनी या प्रकरणी उपस्थित केले. तसेच राऊत यांच्यासह इतर सदस्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना तत्काळ दखल घेण्याचे आवाहन केले. लेटरहेडचा गैरवापर करणारा सापडला दुसरीकडे, नितीन राऊत यांच्या लेटरहेडचा गैरवापर करून रविकांत तिवारी व नीतेश पारेपार यांनी पास बनवल्या. विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी शुक्रवारी यासंबंधीचा आपला अहवाल विधानसभेत सादर केला. विधानसभा अध्यक्ष या प्रकरणी म्हणाले, विद्यासागर जनार्दन राऊत हा या प्रकरणातील संशयित आहे. त्याने हे कृत्य केल्याचे मान्य केले आहे. पुढील कारवाई करण्यात येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 4:46 pm

मुंबईतील बाबुलनाथ मंदिराच्या जागेचा प्रश्न मार्गी:अवघ्या 1 रुपयांत भाडेपट्टा नूतनीकरण; फडणवीस यांचा निर्णय, बावनकुळेंची माहिती

मुंबईतील गिरगाव जवळील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जागेचा (भाडेपट्टा) प्रश्न राज्य सरकारने निकाली काढला आहे. या जागेचा भाडेपट्टा आता 'बाबुलनाथ चॅरिटी ट्रस्ट'ला अवघ्या 1 रुपया या नाममात्र दराने 30 वर्षांसाठी नूतनीकरण करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदनाद्वारे ही माहिती दिली. मलबार-कंबाला हिल महसूल विभागातील 'भुकर क्रमांक 435 पार्ट' या मिळकतीचा हा विषय होता. या निर्णयानुसार, एकूण 718.23 चौ.मी. क्षेत्रफळापैकी 135 चौ.मी. क्षेत्राचा वापर हा 'वाणिज्यिक' (Commercial) कारणांसाठी होत असल्याने ते क्षेत्र वगळण्यात आले आहे. उर्वरित 583.23 चौ.मी. जागेचा वापर हा केवळ बाबुलनाथ मंदिराकडे जाणाऱ्या मार्गिकेसाठी (पायऱ्या व रस्ता) होत असल्याने, या जागेचा भाडेपट्टा नूतनीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. बाबुलनाथ मंदिर हे मुंबईतील अतिशय प्राचीन आणि जागृत शिवमंदिर आहे. श्रावण महिना आणि महाशिवरात्रीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या आणि मार्गिकेची जागा ही शासकीय जमिनीवर (लीझवर) होती. या लीझचे नूतनीकरण वेळेवर न झाल्याने काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. तसेच, मलबार हिलसारख्या उच्चभ्रू आणि महागड्या परिसरात ही जागा असल्याने, त्याचा बाजारभावानुसार कर भरणे चॅरिटी ट्रस्टला अवघड होऊ शकले असते. या जागेच्या भाडेपट्ट्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. शासनाने आता यावर कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. असा झाला निर्णय वाणिज्यिक वापर वेगळा काढून, धार्मिक वापराच्या जागेसाठी 1 रुपया दर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले की, मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आणि ट्रस्टच्या कार्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे अधिकृत आदेश तातडीने निर्गमित करण्यात येत आहेत. शासनाने यात वाणिज्यिक वापर वेगळा काढून, केवळ धार्मिक आणि सार्वजनिक वापराच्या जागेसाठी 1 रुपया नाममात्र दर आकारल्याने ट्रस्टला मोठा दिलासा मिळाला आहे. तर विधानसभा आणि विधानपरिषदेतील सदस्यांनी महसूलमंत्र्यांचे अभिनंदन करत भक्तांच्या मागणीचा विचार केल्याबद्दल आभारही मानले.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 4:34 pm

पुण्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू:हडपसर परिसरात पादचारी आणि दुचाकीस्वार ठार

पुणे शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हडपसर परिसरात या घटना घडल्या असून, मृतांमध्ये एका पादचारी तरुणाचा आणि एका दुचाकीस्वाराचा समावेश आहे. दोन्ही अपघातांची नोंद हडपसर आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पहिला अपघात हडपसरमधील माळवाडी परिसरात साडेसतरानळी रस्त्यावर घडला. भरधाव मोटारीने धडक दिल्याने खंडू भगवान गायकवाड (वय ३४, रा. नेहरुनगर, वागळे इस्टेट, ठाणे, मूळ रा. सास्तूर, जि. धाराशिव) या पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर मोटारचालक घटनास्थळावरून पसार झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संबंधित पसार झालेल्या वाहन चालकाची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहे याप्रकरणी खंडूचे वडील भगवान नामदेव गायकवाड (वय ७५) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर जखमी झालेल्या खंडू गायकवाडचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लोणी काळभोर पोलीस अज्ञात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहेत. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरा अपघात पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर भागातील उड्डाणपुलावर घडला. भरधाव वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार यल्लापा शरणप्पा इंगलागी (वय २७, रा. कुंद्री सालावड, जि. विजापूर, कर्नाटक) याचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला. यल्लापाचा भाऊ जगदीश इंगलगी (वय २४) याने हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक परवेज शिकलगार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 4:21 pm

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या दगावल्या:वन विभागाच्या पथकाकडून घटनास्थळाची पाहणी; शेतकरी, शेतमजूरांना दक्ष राहण्याचे आवाहन

कळमनुरी तालुक्यातील पोतरा तेलंगवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या दगावल्याची घटना शुक्रवारी ता. १२ सकाळी निदर्शनास आली आहे. वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असून परिसरातील शेतकरी व शेतमजूरांनी काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. कळमनुरी तालु्क्यातील पोतरा तेलंगवाडी शिवारात काशीराम मोदे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतातील आखाड्यावर शेळ्या बांधून ठेवण्यात आल्या होत्या. रात्रीच्या वेळी काशीराम हे घरी गेले होते. रात्रीच्या सुमारास बिबट्याने आखाड्यावर येऊन दोन शेळ्यांचा फडशा पाडला. आज सकाळी काशीराम हे शेतात गेले असतांना त्यांना शेतातील दोन शेळ्या मृतावस्थेत दिसून आल्या. सदर शेळ्या बिबट्यानेच खाल्ल्याची चर्चा सुरु झाली. या घटनेची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल शिवाजी काळे, कृष्णा चव्हाण, वनरक्षक खंडागळे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनास्थळावर बिबट्याच्या पायचे ठसे आढळून आले नसले तरी शेळ्यांच्या मानेवर झालेल्या हल्यामुळे हा बिबट्याच असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तसेच पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांच्या पथकाला पाचारण करून मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. या घटनेमध्ये काशीराम यांना तातडीची शासकीय आर्थिक मदत मंजुरीची कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांच्या पथकाने सुरु केली आहे. दरम्यान, सदर क्षेत्रात बिबट्या असल्याची खात्री वन विभागाने केली असून शेतकरी, शेतमजूरांनी काळजी घ्यावी. शेतात रात्री-पहाटे एकट्याने जाणे टाळावे. शेतात जाणे आवश्‍यक असल्यास गटाने जावे. तसेच गावात व आखाड्यावर घराच्या बाहेर झोपणे टाळण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. ट्रॅप कॅमेरे लावण्याच्या हालचाली या भागात वन विभागाने ट्रॅप कॅमेरे बसविण्याच्या हालचाली सुरु केल्या असून दोन ट्रॅप कॅमेरे बसविले जाणार असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. वन व वन्यजीवाच्या संदर्भात संरक्षण, वन गुन्हा किंवा संघर्षाची स्थिती निदर्शनास आल्यास तत्काळ हेलो फॉरेस्ट १९२६ या हेल्प लाईनवर संपर्क साधण्याचे करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 4:20 pm

तपोवन वृक्षतोडीला NGT चा ब्रेक:एकही झाड 15 जानेवारीपर्यंत तोडता येणार नाही; कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कामाला बंदी

नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला अखेर मोठा धक्का बसला असून राष्ट्रीय हरित लवादाने (NGT) 15 जानेवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती जारी केली आहे. या ठिकाणी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा वाढता विरोध, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन आणि अखेर मनसेने दाखल केलेल्या जनहित याचिकेनंतर आज लवादाने महत्त्वपूर्ण निर्णय देत सर्व प्रकारच्या तोडीवर स्थगिती दिली आहे. यामुळे तपोवनातील हरितपट्टा उद्ध्वस्त होणार की संरक्षित राहणार, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. लवादासमोर सुनावणीदरम्यान वृक्षतोडीमागील परवानग्या, उद्देश आणि पर्यावरणीय आघाताशी संबंधित अनेक मुद्द्यांची दखल घेण्यात आली आणि अंतिम निर्णय येईपर्यंत तातडीची स्थगिती देणे आवश्यक असल्याचे NGT ने नमूद केले. मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी दाखल केलेल्या याचिकेत तपोवनातील झाडांची होणारी मोठ्या प्रमाणातील तोड थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. याचिकेनुसार, या परिसरातील झाडे नाशिकच्या पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाची असून त्यांची तोड झाल्यास संपूर्ण परिसराचा जैवविविधतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. तसेच, वृक्षतोड करून त्या जागी बांधकाम करण्याची शक्यता व्यक्त करत याला ठोस विरोध नोंदवण्यात आला होता. या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेत NGT ने प्रशासनाकडून संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया, परवानग्यांची नोंद आणि वृक्षतोडीमागील प्रत्यक्ष गरज याबाबत सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. NGT च्या आदेशामुळे प्रशासनात अचानक हलचल सुरू झाली आहे. वृक्षतोड थांबवावी लागणार असल्याने संबंधित विभागांनी प्रस्तावित कामकाजावर पुनर्विचार सुरू केला आहे. विशेष म्हणजे, नाशिकमधील तपोवन परिसर शहराच्या फुफ्फुसांसारखा मानला जातो. अनेक धार्मिक स्थळे, गोदाकाठचा प्रदेश, नैसर्गिक जलस्रोत आणि समृद्ध वृक्षसंपदा यामुळे हा भाग पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे येथे होणारी कोणतीही प्रकल्पगत हस्तक्षेप प्रक्रिया अधिक सावधगिरीने हाताळण्याची गरज असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे. NGT च्या आदेशानंतर आता प्रशासनावर संपूर्ण प्रकल्पाची पर्यावरणीय शाश्वततेच्या दृष्टीने नव्याने मांडणी करण्याचा दबाव वाढला आहे. दरम्यान, याचिका दाखल करणारे मनसेचे नितीन पंडित यांनी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले आहे. तपोवन परिसरातील झाडे तोडली गेली तर नाशिकच्या हवामानावर आणि भविष्यातील शहरी नियोजनावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतील, असे त्यांनी सांगितले. तसेच, प्रशासनाने जनतेचे म्हणणे ऐकून प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, पर्यायी उपाय शोधावेत आणि हरित पट्ट्यांचे संरक्षण करण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. स्थानिक नागरिकांमध्येही दिलासा व्यक्त केला जात असून सोशल मीडियावर ‘सेव्ह तपोवन’ मोहीम पुन्हा जोर धरताना दिसत आहे. NGT ची अंतरिम स्थगिती मिळाल्याने तपोवनातील झाडांसमोर तातडीचा ‘धोका’ टळला असला, तरी पुढील सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद महत्त्वाचे ठरणार आहेत. 15 जानेवारीपर्यंत सर्व संबंधित कागदपत्रांचे परीक्षण, प्रशासनाची बाजू आणि याचिकाकर्त्यांचा पर्यावरणीय आधार असलेला दृष्टिकोन यावर लवाद अंतिम निर्णय घेणार आहे. त्यामुळे पुढील काही आठवडे नाशिककरांसाठी निर्णायक ठरणार असून तपोवनचा हिरवा पट्टा वाचणार की विकासकामांसाठी मार्ग मोकळा होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 4:17 pm

वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होणार नाही:स्वतंत्र विदर्भ मागणाऱ्यांनी विदर्भासाठी अधिवेशनात काय केले हे सांगावे, उद्धव ठाकरे संतापले

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. विदर्भ हा महाराष्ट्राचा असून, महाराष्ट्र विदर्भाचा आहे. महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करणारा महाराष्ट्राचा नाही. वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांनी अधिवेशनात आतापर्यंत विदर्भासाठी काय केले ते सांगावे, असे ते म्हणालेत. उद्धव ठाकरे यांनी आज विरोधी पक्षनेत्यांच्या नियुक्तीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या मुद्यावरून सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, दोन्ही सभागृहांना सध्या आज विरोधी पक्षनेते नाहीत. महाराष्ट्राच्या इतिहासातील विरोधी पक्षनेत्यांशिवाय होणारे हे पहिले अधिवेशन आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही विरोधी पक्षनेते म्हणून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली होती. पण अजूनही त्यावर निर्णय झाला नाही. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही रिक्त झाले. त्याविषयीही आम्ही सभापतींना पत्र लिहिले. मुख्यमंत्र्यांच्या मते, विरोधी पक्षनेता नियुक्त करण्याचा अधिकार अध्यक्षांचा आहे. त्यानुसार आम्ही अध्यक्ष व सभापतींकडे जाऊन हा मुद्दा निकाली काढण्याची विनंती केली आहे. त्यावर त्या दोघांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांनी गेल्या अधिवेशनातही लवकरात लवकर नियुक्ती करण्याचा शब्द दिला होता. आता तो किती लवकर निर्णय होतो हे पहावे लागेल. पण हा निर्णय हे अधिवेशन संपण्यापूर्वी निकाली काढावा असा आमचा आग्रह आहे. दिल्लीत केजरीवालांनी 3 आमदार असताना विरोधी पक्षनेतेपद दिले होते उद्धव ठाकरे म्हणाले, जनतेचे प्रश्न उठवणे हे आमच्यासह सर्वच लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. विरोधी पक्षनेत्याला एक दर्जा असतो. एक मान असतो. तो प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून एका अधिकारांतर्गत बोलू शकतो, त्यांच्याकडून माहिती घेऊ शकतो. त्यानुसार सभागृहात आपली मांडणी तो योग्यपणे करू शकतो. त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी दोन्ही सभागृहांत विरोधी पक्षनेते असणे महत्त्वाचे आहे. सध्या पद आहे, पण त्यावर माणसे नाहीत. ही नेमणूक लवकरात लवकर व्हावी अशी आमची मागणी आहे. या प्रकरणी नियमांची आडकाठी आणली तर उपमुख्यमंत्रीपदही अवैधच आहे. उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक पद नाही. त्यामु्ळे विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत नियमांची आडकाठी येत असेल तर उपमुख्यमंत्रीपदाची बिरुदावली मिरवणाऱ्यांची पदेही तत्काळ रद्द झाली पाहिजेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री होते. पण तेव्हा सभागृहात विरोधी पक्षनेते होते. माझे म्हणणे हे आहे की, नियम सगळीकडे सारखा असला पाहिजे. नियमांची फुटपट्टी विरोधी पक्षनेत्यांना लावली जात असेल तर तीच फुटपट्टी उपमुख्यमंत्र्यांनाही लागली पाहिजे. दिल्लीतील तत्कालीन अरविंद केजरीवाल सरकारच्या 70 पैकी 67 जागा निवडून आल्या होत्या. तेव्हा भाजपच्या केवळ 3 जागा निवडून आल्या होत्या. पण त्यानंतरही त्यांनी भाजपला विरोधी पक्षनेतेपद देण्याचे औदार्य दाखवले होते. त्यामुळे दिल्लीत असे घडत असेल तर ते महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. शेतकरी कर्जमाफीवरून सरकावर निशाणा उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकरी सध्या कधी नव्हे एवढ्या मोठ्या संकटात सापडला आहे. एखादा घाव बसतो तेव्हाच त्यावर औषधोपचार करण्याची गरज असते. त्यानुसार आज शेतकऱ्याला तत्काळ मदत करण्याची गरज आहे. कर्जाचे पुनर्गठन फार वाईट शब्द आहे. त्यात कर्ज माफ होत नाही. पण कर्जावर कर्ज चढत जाते. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाची टांगती तलवार आहे. बँकेकडून कर्जासाठी तगादा लावला जात आहे. कर्ज पुनर्गठन केल्यास ते काही काळासाठी थांबेल. पण कर्जाचा प्रश्न सुटत नाही. मी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांनी मागितली नसताना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली होती. वेगळ्या विदर्भाच्या मागणीवर संतापले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार व भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला होता. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, वेगळ्या विदर्भाची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. विदर्भ हा महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्र विदर्भाचा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विदर्भाचे आहेत. पण बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून जे त्यांच्या कच्छपी लागलेत त्यांची यावर काय भूमिका आहे? सरकारने आता जाहीर केले पाहिजे की, तुम्ही महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छिता की महाराष्ट्राचे तुकडे पाडू इच्छिता. कारण, हा महाराष्ट्राच्या मुळावर आघात करण्याचा प्रश्न आहे. जो कुणी महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करेल, तो महाराष्ट्राचा नाही. वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांनी आतापर्यंत अधिवेशनात विदर्भासाठी काय केले हे सांगावे, असे ठाकरे म्हणाले. शिवराज पाटलांना श्रद्धांजली अन् सत्ताधाऱ्यांना टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनावरही शोक व्यक्त केला. शिवराज पाटील चाकूकर एक सुसंस्कृत, सभ्य व्यक्तिमत्त्व गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. ते राजकारणात होते तेव्हा काँग्रेस व शिवसेना एकमेकांविरोधात लढत होते. पण त्यांच्यातील एक वेगळेपणा मला आवर्जुन सांगावा वाटतो. त्यांच्यावर त्यांच्या पक्षाने ज्या - ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या - त्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. ते संरक्षण मंत्री होते, लोकसभेचे अध्यक्ष होते, गृहमंत्री होते. ते गृहमंत्री असताना मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला होता. या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अशी नैतिकता हल्लीच्या राजकारणात फार अभावाने आढळते. एखादी गोष्ट ज्याच्यात आपण अपयशी ठरलो किंवा त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा देणे हे हल्लीच्या राजकारण्यांत दिसत नाही. पण ती हिंमत शिवराज पाटलांनी दाखवली होती. त्यांनी जनतेचे संरक्षण करण्यात अपयश आले म्हणून आपले गृहमंत्रिपद सोडले होते, असे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 4:12 pm

विधानसभेत आदित्य ठाकरेंची जादू की झप्पी:भास्कर जाधवांची सूचना, नितेश राणेंची मिश्कील प्रतिक्रिया; पापलेटवरून रंगली चर्चा

राज्याच्या हिवाळी अधिवेशनात कोकणातील दोन परस्परविरोधी नेत्यांची अनपेक्षित जुगलबंदी चर्चेचा विषय ठरली. एकमेकांविरोधात नियमित टीका करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि भाजप सरकारमधील मंत्री नितेश राणे हे दोघेही मच्छिमारांच्या प्रश्नावर एकाच बाजुने दिसले. जाधव यांनी मत्स्यव्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करताच राणेंनी उत्तर देताना संवादात आदित्य ठाकरेंचा उल्लेख ओढत वातावरण रंगतदार केले. या चर्चेची रंगत वाढताना सभागृहातच आदित्य ठाकरे यांनी भास्कर जाधव यांना अचानक मिठी मारली आणि संपूर्ण सभागृहात हशा पिकला. विरोधक आणि सत्ता पक्षाचे दोन नेते एका क्षणासाठी एकत्र आल्याचे हे दृश्य विधिमंडळ परिसरात चर्चेचा मुद्दा ठरले. मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात सुरुवातीला सरकारचा महत्त्वाचा निर्णय जाहीर करत राज्याचा राज्यमासा, म्हणून सिल्व्हर पापलेट जाहीर झाल्याची माहिती दिली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी पापलेट संदर्भातून मच्छिमार धोरणांचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, मी मंत्री असताना माथाडी कामगार मंडळाच्या धर्तीवर आम्ही मच्छीमारांसाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन केला होता. पण इतक्या वर्षांनंतरही या बोर्डाला मुंबईत स्वतःची जागा नाही. जाधव यांनी पुढे स्पष्ट केले की समुद्रात आठ ते दहा दिवस राहणाऱ्या मच्छिमारांना या बोर्डामार्फत आर्थिक मदत मिळणे अपेक्षित होते. बोर्डाला निधी, जागा आणि पुनरुज्जीवनाची गरज तातडीची असून कोकणातील मंत्री म्हणून नितेश राणेंनी याकडे लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांनी केली. आवश्यकता भासल्यास मदत करण्याची तयारीही त्यांनी जाहीर केली. भास्कर जाधव यांच्या सूचनेला उत्तर देताना नितेश राणेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि लगेचच सभागृहात वातावरण हलके-फुलके करणारा टोमणा मारला. जाधव साहेबांच्या सूचना नेहमीच मोलाच्या असतात. मी ऐकतोही. पण त्यांच्या आवाजाचा टोन आदित्यजी शेजारी असतील तर वेगळा आणि नसतील तर वेगळा असतो, असा मिश्कील टोला राणे यांनी लगावला. राणेंनी केलेल्या या टिप्पणीने सभागृहात हशा पिकला. राणेंनी पुढे म्हटले की, काल जाधव साहेब थोडे तापले होते, पण बाहेर भेटलो तर ते मला मिठी मारतात. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया म्हणून आदित्य ठाकरे यांनी तत्काळ उठून भास्कर जाधव यांना मिठी मारली. सभागृहात क्षणभरात पुन्हा आनंदी वातावरण निर्माण झाले आणि राणेंनीही त्याला हसून प्रतिसाद दिला. मच्छीमार बोर्डाच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन सभागृहातील या प्रसंगानंतर चर्चेचा विषय एका वेगळ्याच दिशेने वळला असला तरी मुख्य मुद्द्यावर राणेंनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यांनी जाधव यांची सूचना मान्य करत मच्छीमार बोर्डाच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन व्यक्त केले. आपल्या अनुभवाचा फायदा आम्हाला, कोकणला आणि मच्छिमारांना व्हायलाच हवा. मी आपल्या उपस्थितीतच बैठक बोलावतो, असे ते म्हणाले. राणेंच्या या भूमिकेमुळे मच्छिमारांच्या प्रश्नावरील पुढील निर्णय प्रक्रियेत सहकार्याचे वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जाधव यांनीही राणेंच्या प्रतिसादाचे स्वागत केले. कोकणातील दोन विरोधी गटातील नेते एका मुद्द्यावर एकत्र या संपूर्ण घटनेने सभागृहातील वातावरण राजकीय तणावापासून थोड्या वेळासाठी दूर नेत आनंदी क्षण निर्माण केला. कोकणातील दोन विरोधी गटातील नेते एका मुद्द्यावर एकत्र आले, एकमेकांवर टोमणेही मारले आणि त्याचवेळी मिठी मारून संवादाची नवी पायरीही दाखवली. आदित्य ठाकरे यांची मधली 'जादू की झप्पी' आणि राणेंच्या मिश्कील टिप्पण्या सोशल मीडियावरही चर्चेत आल्या आहेत. मच्छिमारांच्या प्रश्नावर आता सरकारने पुढील पावले कितपत तातडीने उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 3:40 pm

साधू संत झाडावर राहतात काय?:अण्णा हजारेंचा संतप्त संवाल; आज लोक बोलत नसले तरी एक दिवस चले जाव म्हणतील, सरकारला इशारा

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीवरून सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला. या प्रकरणी त्यांनी 'साधू संत झाडावर राहतात काय?' असा सवाल करत एक दिवस लोकच या सरकारला चले जाव म्हणतील असा इशारा दिला. आज लोक बोलत नसले तरी एक दिवस येईल आणि ते चीड व्यक्त करत या सरकारला चले जाव म्हणतील. तो दिवस दूर नाही, असे ते म्हणालेत. अण्णा हजारे नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीसाठी मैदानात उतरलेत. त्यांनी गुरुवारीच या वृक्षतोडीला कडाडून विरोध करत त्याविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशीही त्यांनी या प्रकरणी आपला संताप व्यक्त केला. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, साधू संत झाडावर राहतात काय? ते जंगलात राहतात. हे झाडांचे जंगल आहे. तुम्ही झाडे तोडता. ही विसंगती आहे. हे बरोबर नाही. हे या देशाचे दुर्दैव आहे. एखाद्याने झाडाची फांदी तोडली तरी मला वेदना होतात. मी कुणालाही झाडे तोडू देत नाही. लावतो, पण तोडत नाही. देशात स्वार्थी लोकांची संख्या वाढली या देशात स्वार्थी लोक वाढत चाललेत. समाज व देशाच्या हितासाठी बलिदान करण्याची तयारी कमी होत चालली आहे. आमच्यासारखे काही लोक आहेत. ते वेळ पडली तर येतील. समाजासाठी आपले बलिदान देतील असा माझा विश्वास आहे. मला ठाम विश्वास आहे की, लोक आज जरी बोलत नसले तरी एक दिवस लोकांचा संताप उफाळून येईल. त्यानंतर लोक चले जाव म्हणतील. हा दिवस फार दूर नाही. लोकांना पटत नसेल तर चले जाव. लोकांच्या हातात आहे. या देशात जनता मालक आहे. तुम्ही सेवक आहात. मंत्री असेल, संत्री असेल, कुणीही असेल तरी तो सेवक आहे. जनता मालक आहे. मालकांना अधिकार आहे. म्हणून मालकांना अधिकार असताना त्यांचे अधिकार तुडवणे बरोबर नाही, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. वृक्षतोडीविरोधात साधू महंतही आक्रमक दुसरीकडे, तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता साधू महंतही आक्रमक झालेत. तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिर, साक्षी गोपाळ मंदिर, शुर्पणखा मंदिर आदीसह अनेक मंदिरांना मनपा प्रशासनाने रस्ते व विकास कामांसाठी नोटीसा बजावल्या आहेत. या प्रकरणी आकांडतांडव झाल्यानंतर प्रशासनाने या नोटीसा चुकून पाठवण्यात आल्याचे स्पष्ट केले. कुंभमेळ्याला येणारे साधू संत मंदिरात नव्हे तर कुठे राहणार? एकीकडे बाबरी मशिद तोडून राम मंदिर बनवण्यात आले आणि इकडे मंदिरांना नोटीसा बजावण्यात आल्या. हे राजकारण समजण्यासारखे नाही, असे मत या प्रकरणी महंत राम स्नेहीदास महाराज यांनी व्यक्त केले आहे. फाशीच्या डोंगरावर वृक्ष लागवड नाशिक महापालिकेने फाशीचा डोंगर येथे वृक्षलागवड केली आहे. पण आता त्यावरून वाद सुरू झाला आहे. या डोंगरावर 7300 झाडे लावण्यासाठी जवळपास 75 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. पण प्रत्यक्षात या डोंगरावर करण्यात आलेली वृक्ष लागवड शास्त्रीय पद्धतीने करण्यात आली नाही. हा डोंगर खडकाळ आहे. त्यामुळे येथे लावण्यात आलेली जवळपास 70 ते 80 टक्के झाडे वाळली आहेत, असा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 2:48 pm

मोठी बातमी:कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, पाच आरडीएक्स बॉम्ब लावल्याचा उल्लेख;BDDS, अग्निशमन, पोलिसांचा मोठा ताफा तैनात

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी सकाळी अचानक निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीने प्रशासन पूर्णपणे सावध झालं. 12 डिसेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत ई-मेलवर एका अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या धमकीमुळे कार्यालयात क्षणात खळबळ उडाली. या मेलमध्ये थेट कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे कार्यालयीन कामकाज काही काळ थांबवण्यात आले. मेल पाहताच अधिकाऱ्यांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन त्वरित जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली आणि जिल्हाधिकाऱ्यांनीही क्षणाचाही विलंब न करता वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तातडीचे निर्णय घेण्याचे निर्देश दिले. धमकीच्या मेलने प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कारण त्या ई-मेलमध्ये थेट कार्यालयात लावलेले पाच आरडीएक्स बॉम्ब लवकरच फुटतील, असा स्पष्ट उल्लेख होता. अशा प्रकारच्या धमकीला हलक्याने न घेता जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना तातडीने बाहेर सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. कार्यालय परिसर तात्पुरता रिकामा करण्यात आला आणि प्रवेशबंदी लागू करण्यात आली. सर्वसामान्य नागरिकांना कार्यालय परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. घटनेनंतर बॉम्बशोधक आणि नाशक पथक (BDDS) अल्पावधीतच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीतील प्रत्येक मजला, प्रत्येक कक्ष आणि संपूर्ण परिसर याची काटेकोर तपासणी सुरू केली. आधुनिक उपकरणांच्या मदतीने सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व तपासण्या करण्यात येत आहेत. अग्निशामक दलालाही सतर्कतेच्या दृष्टीने बोलावण्यात आले असून संपूर्ण पथक अग्निशमन गाड्यांसह परिसरात तैनात आहे. तपासणीदरम्यान एकाही संशयास्पद वस्तू आढळलेली नसली तरी परिस्थितीचा पूर्ण आढावा घेण्यासाठी तपास अद्याप सुरू आहे. परिसरातील सर्व CCTV फुटेजची तपासणी पोलिस प्रशासनाने घटनास्थळी मोठा बंदोबस्त उभा केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारांवर कडक तपासणी यंत्रणा आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी परिसरात सामान्य नागरिकांना प्रवेश देणे बंद केले आहे. याशिवाय परिसरातील सर्व CCTV फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. कुणीही ओळखीचे किंवा संशयास्पद हालचाली करणारे व्यक्ती आढळतात का, याचा आढावा घेतला जात आहे. प्रशासन कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दिवसभर तणावाची भावना दरम्यान, धमकीदेणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर सेलने तपास सुरू केला आहे. ई-मेल कुठून पाठवला गेला, कोणाचा IP अॅड्रेस आहे, कोणती व्यक्ती किंवा गट यामागे असू शकतो, याबद्दल प्राथमिक तपास सुरू झाली आहे. ई-मेलचा स्रोत ओळखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात असून, पोलिसांनी या धमकीला अत्यंत गंभीरतेने घेतले आहे. कोणत्याही परिस्थितीत आरोपीला शोधून काढण्याचा निर्धार सायबर सेलने व्यक्त केला आहे. संपूर्ण घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दिवसभर तणावाची भावना वाढली असून नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 2:23 pm

सभागृहात प्रसाद लाड यांना बसला शॉक:म्हणाले, मला काही झालं तर राज्याचं नुकसान; तर दरेकरांचा पुतळा उभारण्याचा टोमणा; महत्त्वाच्या कामकाजात पिकला हशा

नागपुरात सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शुक्रवारचा दिवस अनपेक्षित आणि विनोदी घडामोडींनी रंगला. विधान परिषदेच्या कामकाजादरम्यान भाजपचे आमदार प्रसाद लाड अचानक शॉक बसल्याचा दावा करत उभे राहिले आणि काही क्षणांसाठी सभागृहाचे वातावरण पूर्णपणे वेगळ्या दिशेने वळले. बोलण्यासाठी उभे राहताच त्यांच्या बाकाजवळ विद्युत धक्का बसत असल्याचे त्यांनी सांगितले. मला इकडे शॉक बसतोय, असा आवाज करत त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या अनपेक्षित तक्रारीमुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर लगेच सभागृहात जोरदार हास्याचा फवारा उडाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. घटनेनंतर प्रसाद लाड यांनी मिश्कील शैलीत विधान परिषदेला उद्देशून केलेला उल्लेख अधिकच चर्चेचा विषय ठरला. मला काही झालं तर राज्याचं नुकसान होईल, असे ते म्हणताच विरोधक आणि सत्तापक्षीय सदस्य दोघांनीही हशा पिकवला. त्यांच्या या विनोदी शैलीमुळे सभागृहातील वातावरण हलकंफुलकं बनलं. परंतु त्याच वेळी लाड यांच्या बाकाजवळ प्रत्यक्षात काय घडत आहे, याबद्दल सभागृहातील सदस्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. कामकाजादरम्यान असा प्रकार घडल्याने सुरक्षेचे आणि उपकरणांच्या दुरुस्तीचे प्रश्नही समोर आले. याच दरम्यान भाजप नेते आणि परिषदेत लाड यांच्या जवळ बसलेले प्रविण दरेकर यांनीही हजरजबाबी टिप्पणी करत सभागृहाला पुन्हा एकदा खळखळून हसवले. लाड यांनी राज्याच्या नुकसानीचा उल्लेख करताच दरेकर खाली बसून म्हणाले, तुम्हाला काही झालं तर तुमचा पुतळा उभारू. त्यांच्या या विधानावर सभागृहात पुन्हा हास्यकल्लोळ झाला. एवढ्यावरच न थांबता दरेकर यांनी पुढे एक उपरोधिक विधान करत म्हटले की, त्यांची आत्ताच एक चौकशी झाली आहे, आणि या वक्तव्यानंतर सभागृहातील वातावरण संपूर्णपणे मिश्कील झाले. या प्रकरणावर शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी लगेच प्रतिक्रिया देत या शॉक प्रकरणाची तपासणी करण्याची मागणी सभागृहात केली. या घटनेची एसआयटी चौकशी केली पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा काही काळ गंभीर दिशेला वळली. घटनास्थळी प्रत्यक्ष तपास करून नेमके काय झाले याचा उलगडा होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तथापि, इतर सदस्यांच्या विनोदी प्रतिक्रियांमुळे पुन्हा सभागृह हलकं झालं आणि चर्चेची दिशा विनोद, चिमटे आणि मिश्कील टिप्पणींकडे झुकली. तक्रारीची नोंद घेऊन उपकरणांची तपासणी करण्याचे आश्वासन घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सभापती राम शिंदे यांनी अखेरीस हस्तक्षेप केला. प्रसाद लाड यांच्या दिशेने पाहत सभापती म्हणाले, तुम्ही सभागृहाचे लाड आहात... तुम्हाला काही होऊ देणार नाही. काळजी घेतली जाईल. यामुळे परिस्थिती स्थिर झाली आणि सभागृहातील सर्व सदस्यांनी हसतच त्यांच्या विधानाचे स्वागत केले. लाड यांनी सांगितलेल्या शॉक प्रकरणामुळे जरी सभागृहाची काही मिनिटे गल्लत झाली असली, तरी त्यांच्या तक्रारीची नोंद घेऊन उपकरणांची तपासणी करण्याचे आश्वासन देण्यात आले. अधिवेशनातील हा प्रसंग केवळ विनोदी नव्हता, तर अधिवेशनातील गतीमान कामकाजादरम्यान अधूनमधून उद्भवणाऱ्या अनपेक्षित घटनांची आठवण करून देणारा ठरला.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 2:11 pm

कोरेगाव भीमा शौर्यदिनी दर्जेदार सुविधा द्या:समन्वय समिती अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

येत्या 1 जानेवारी रोजी होणाऱ्या कोरेगाव भीमा जयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांना अधिक दर्जेदार आणि सुयोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुविधांमध्ये वाढ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शौर्य दिनाच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, नियोजन, सुरक्षा आणि सुविधांबाबतची संयुक्त बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीला विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान, कोरेगाव भीमा जयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी अनुयायांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांची गुणवत्ता सुधारण्याची मागणी केली. या सुविधा दर्जेदार, अचूक आणि सर्वसमावेशक असाव्यात, असे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले. डंबाळे यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली हा सातवा उत्सव होत आहे, त्यामुळे यंदाचा उत्सव अधिक परिपूर्णतेकडे जात आहे. प्रशासनाने देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा अधिक सक्षम कराव्यात यासाठी आम्ही जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाशी सातत्याने पाठपुरावा करणार आहोत. या बैठकीत एकूण 25 प्रतिनिधींनी विविध सूचना व मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सर्व मागण्या अंतिम नियोजनामध्ये समाविष्ट करण्यात येतील, असे स्पष्ट आश्वासन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत प्रशासनाने केलेल्या कामाचा आढावा घेतला आणि अनुयायांकडून येणाऱ्या अपेक्षा व अडचणी जाणून घेतल्या. शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय सेवा, निवारा आणि प्रकाशयोजना यासह सर्व सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 1:59 pm

सोशल मीडियावरील वादग्रस्त कंटेंटवर कठोर कारवाई करा:भाजप खासदार मेधा कुलकर्णींची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या वादग्रस्त, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आणि अश्लील कंटेंटवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. शहा यांनी या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी गृहमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंदू देव-देवतांचे एआय-आधारित डीपफेक आणि अश्लील स्वरूपातील चित्रे व व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत. यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत असून, युवकांच्या मानसिक व सामाजिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत आहे. या संदर्भात अनेक नागरिकांनी प्रा. डॉ. कुलकर्णी यांच्या कार्यालयाकडे चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आणि पोस्ट्स तरुणांवर चुकीचा प्रभाव टाकत असून, समाजात गैरसमज, संभ्रम आणि सामाजिक तणाव वाढवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या पोस्ट्स सायबर व आयटी नियमांनुसार 'हानीकारक, दिशाभूल करणाऱ्या किंवा भडकावू' श्रेणीत येतात का, याची तपासणी करण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. सोशल मीडिया हे सांस्कृतिक देवाणघेवाणीचे माध्यम असले तरी, काहीवेळा त्याचा वापर भावनिक दिशाभूल किंवा सामाजिक ध्रुवीकरण वाढवण्यासाठी केला जातो, असेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. गृहमंत्रालयाने प्राथमिक चौकशी करून सायबर मॉनिटरिंग यंत्रणांचा सहभाग आवश्यक असल्यास विचारात घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली. या मागणीचा उद्देश सेन्सॉरशिप नसून, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर चाप लावणे हा आहे. आयटी कायद्यांतर्गत आवश्यक ती कारवाई करण्यासाठी संबंधित यंत्रणांना सूचना देण्याची विनंती त्यांनी गृहमंत्रालयाला केली. याच मुद्द्यावर प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी राज्यसभेतही निवेदन सादर केले होते.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 1:55 pm

सवाई महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला:पद्मा देशपांडे यांचे गायन; सतार-सॅक्सोफोनचे अनोखे सहवादन

सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा उत्तरार्ध विदुषी पद्मा देशपांडे यांच्या परिपक्व गायनाने आणि जॉर्ज ब्रुक्स (सॅक्सोफोन) व पं. कृष्ण मोहन भट (सतार) यांच्या अनोख्या सहवादनाने अविस्मरणीय ठरला. या दिवशी रसिकांना विविध रागांचा आणि वाद्यांच्या सुमधुर संयोगाचा अनुभव घेता आला. विदुषी पद्मा देशपांडे यांनी राग शामकल्याण सादर करत 'जियो मेरो लाल...' हा पारंपरिक ख्याल दमदारपणे पेश केला. त्यांनी त्रितालात निबद्ध 'रघुनंदन खेलत...' ही स्वरचित बंदिशही गायली. गायन क्षेत्रातील दीर्घ अनुभव, घराणेदार तालीम आणि सादरीकरणातील परिपक्वता त्यांच्या गायनातून स्पष्ट दिसली. सोहनीबहार रागातील 'नाथ देहो मोहें...' ही एकतालातील बंदिश सादर केल्यानंतर, त्यांनी 'संगीत स्वयंवर' नाटकातील 'करीन यदुमनी सदना...' या नाट्यपदाने आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना धनंजय खरवंडीकर (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) तसेच श्रुती देशपांडे व सुनीता कुलकर्णी यांनी तानपुऱ्यावर साथ केली. ज्येष्ठ वादक जॉर्ज ब्रुक्स आणि सतारवादक पं. कृष्ण मोहन भट यांचे सॅक्सोफोन आणि सतार सहवादन हा महोत्सवातील एक अप्रतिम स्वरानुभव ठरला. राग चारुकेशीच्या माध्यमातून या दोन्ही सिद्धहस्त कलाकारांनी आपापल्या वाद्यांवरील प्रभुत्व दाखवले. रूपक तालाच्या साथीने वाद्यांच्या सौंदर्य निर्मितीच्या विविध शक्यतांचा स्वरपट त्यांनी उलगडला. सतारीचे नाजूक झंकार सॅक्सोफोनच्या गंभीर नादाशी एकरूप झाले होते. त्यानंतर त्यांनी मांड रचना आणि राग वृंदावनी सारंगमधील रचना सादर केली. उस्ताद झाकीर हुसैन यांच्यासोबतच्या सांगीतिक प्रकल्पातील अहिरी रागावर आधारित रचनेने या सहवादनाची सांगता झाली. तबलावादक ओजस अढिया यांच्या नजाकतदार वादनाने या रंगतीत अधिक भर पडली, तर संदीप जाधव यांनी तानपुऱ्यावर साथ दिली. रसिकांशी संवाद साधताना जॉर्ज ब्रुक्स यांनी पं. कृष्णमोहन भट यांच्यासोबतची आपली 40-45 वर्षांची मैत्री सांगितली. पंडित भट यांनीच आपल्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ओळख करून दिली आणि त्यांच्यासोबत राहूनच आपण शास्त्रीय संगीताचा अभ्यास केल्याचे ब्रुक्स म्हणाले. पं. भट यांना ऐकणे हा अविस्मरणीय अनुभव असून, सतार हे वाद्य विलक्षण आहे आणि पं. भट ते छेडतात तेव्हा निर्माण होणारी जादू अद्भुत असते, असे त्यांनी नमूद केले. पं. भीमसेन जोशी यांनी दिल्लीत सादर केलेला दरबारी राग अजूनही आपल्या लक्षात असल्याचे ब्रुक्स यांनी सांगितले. पं. कृष्णमोहन भट यांचा एकदा अपघात झाला होता, ज्यात ते कारबाहेर फेकले गेले आणि त्यांना अनेक जखमा झाल्या होत्या. सहा महिने रुग्णालयात राहिल्यानंतरही आज ते मंचावर सादरीकरण करत आहेत, हा खरोखर एक चमत्कार आहे, असेही ब्रुक्स यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 1:51 pm

अर्धा किलो सोन्याचे आमिष दाखवून पुण्यात महिलेला 25 लाखांचा गंडा:पुण्याच्या उत्तमनगर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल

एका महिलेस 25 लाख रुपयांत तब्बल अर्धा किलो सोने देण्याच्या आमिष दाखवून 25 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका 58 वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पवन मकसूद ठाकूर (वय 39, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, मालाड, मुंबई), राजू गिट्टी या आरोपींच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि आरोपी ठाकूर यांची ओळख झाली होती. तक्रारदार महिला एनडीए रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहे. आरोपींनी महिलेला 25 लाख रुपयांमध्ये अर्धा किलो सोने देण्याचे आमिष दाखविले होते.आरोपींनी महिलेकडून वेळोवेळी 25 लाख रुपये घेतले. पैसे दिल्यानंतर आरोपींनी महिलेला सोने दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक एन धनवडे पुढील तपास करत आहेत. आयपीओमध्ये गुंतवणुकीच्‍या बहाण्याने 11 लाखांना गंडा शेअर मार्केटमधील आयपीओमध्ये गुंतवुणक करण्याच्‍या बहाण्याने तब्‍बल 10 लाख 98 हजारांचा गंडा सायबर चोरट्यांनी एकाला घातला. याप्रकरणी विशाल सक्‍सेना (49, रा. लोहगावरोड, धानोरी) यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून हा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. दि. 16 मे ते 8 जुलै दरम्‍यान हा प्रकार घडला. याप्रकरणी संबधीत मोबाईलधारक व्यक्‍ती, बँक खातेधारक व्यक्‍ती यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 1:49 pm

गिरीश महाजन यांना मस्ती आली, त्यांना राजकारणातून बाहेर फेका:अंजली दमानिया यांचा थेट हल्ला; वृक्षतोडीवरून विरोध तीव्र

नाशिकमधील तपोवन परिसरात सुरू असलेल्या वृक्षतोड प्रकरणावरून राज्यभरात वातावरण तापले असताना, या प्रकरणाचा विस्तार आता राजकीय पातळीवर पोहोचला आहे. शहरातील चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारासाठी जवळपास साडेबाराशे झाडे तोडण्यात आल्याचे नाशिक महापालिकेने जाहीर केल्यानंतर पर्यावरणप्रेमींसह विविध सामाजिक संस्थांनी संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर थेट निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला आहे. शहरात आधीच तपोवन परिसरातील साधूग्राम प्रकल्पामुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीवरून विरोध तीव्र होत असताना, महापालिकेच्या नव्या खुलास्याने चर्चा अधिक चिघळली आहे. अंजली दमानिया यांनी आपल्या वक्तव्यात सरकार आणि स्थानिक प्रशासनावर तीव्र टीका करताना गिरीश महाजन यांना थेट लक्ष्य केले. राज्यभरातून विरोध होत असूनही, नाशिकमधील झाडे तोडण्याची गिरीश महाजन यांना इतकी मस्ती आली आहे की लोकांनी आंदोलन केलं, तरी काही फरक पडत नाही, असे दमानिया यांनी कठोर शब्दात म्हटले. त्यांनी नागरिकांना आवाहन करत अशा वृत्तीनं वागणाऱ्या नेत्यांना राजकारणातून बाहेर फेका, अशी हाक दिली. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून पर्यावरणीय प्रश्नांवरून पुन्हा एकदा सरकारला धारेवर धरले जात आहे. नाशिकच्या नागरिकांमध्येही या प्रकरणाबद्दल असंतोष मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. दरम्यान, महापालिकेने सादर केलेल्या अहवालानुसार पंचक, चेहडी, आगार टाकळी आणि तपोवन येथील चार मलनिस्सारण प्रकल्पांच्या विस्तारासाठी एकूण 1,728 झाडे तोडण्याचा प्रस्ताव होता. मात्र त्यातील 458 झाडे वाचविण्यात महापालिकेला यश आले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. उर्वरित 270 झाडांची तोड करण्यात आली असून, या बदल्यात मनपाच्या मलनिस्सारण विभागाने 1 कोटी 76 लाख रुपयांचा पर्यावरणीय भरपाई निधी जमा केला आहे. हा निधी पुढील पर्यावरण संवर्धन प्रकल्पांसाठी वापरण्यात येईल, असे मनपाने स्पष्ट केले. तसेच फाशीच्या डोंगर परिसरात 17,680 झाडांची नव्याने लागवड केल्याचेही सांगण्यात आले असून, या रोपांमध्ये स्थानिक प्रजातींचा समावेश असल्याचा दावा मनपाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. राजमुद्री येथे जाऊन विशेष झाडांची निवड याशिवाय तपोवन परिसरातील प्रस्तावित साधूग्राम प्रकल्पामुळे सुमारे 1,800 झाडे तोडली जाण्याची शक्यता असल्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध सुरू आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याची घोषणा केली आहे. गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी दक्षिण भारतातील राजमुद्री येथे जाऊन विशेष झाडांची निवड केली होती. त्यानुसार जवळपास 15 फूट उंचीची 15 हजार देशी प्रजातींची झाडे ज्यात वड, पिंपळ, निंब, जांभूळ आणि आंबा यांसारख्या प्रजातींतील झाडे टप्प्याटप्प्याने नाशिकमध्ये दाखल होऊ लागली आहेत. पहिला ट्रक नुकताच शहरात दाखल झाला असून या झाडांच्या देखभालीसाठी ठिबक सिंचन प्रणालीपासून ते जैविक खतांपर्यंत विस्तृत व्यवस्था करण्यात आल्याचे उद्यान विभागाने सांगितले. प्रौढ झाडांची तोड पर्यावरणीय दृष्टीने मोठा तोटा सोमवारपासून गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत वृक्षलागवडीच्या या विशेष मोहिमेला औपचारिक सुरुवात होत आहे. तथापि, एका बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि दुसऱ्या बाजूला झाडांची लागवड, या दोन्ही गोष्टींनी शहरात द्वंद्व निर्माण झाले आहे. पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे की लागवड महत्त्वाची असली तरी प्रौढ झाडांची तोड पर्यावरणीय दृष्टीने मोठा तोटा आहे. दमानिया यांच्या आक्रमक प्रतिक्रियेमुळे हा विषय अधिक तीव्र झाला असून पुढील काही दिवसांत या वादाचा राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर आणखी विस्तार होण्याची चिन्हे आहेत. नाशिकच्या हरित वारशासमोर उभ्या राहिलेल्या या प्रश्‍नाला नागरिक, कार्यकर्ते आणि सरकार यांच्यातील संघर्षाची नवी दिशा लाभण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 1:47 pm

पुण्यात लग्नाच्या आमिषाने महिलेवर बलात्कार:आक्षेपार्ह फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन 10 लाखांची मागणी

पुण्यात विवाहाचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने महिलेचे आक्षेपार्ह फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 31 वर्षीय पीडित महिलेने वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोलापूर येथील बुधवार पेठेत राहणाऱ्या 33 वर्षीय वीरेन धीरजकुमार रणशृंगारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला आणि आरोपी रणशृंगारे यांची दोन वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला. जेव्हा महिलेने लग्नाबद्दल विचारणा केली, तेव्हा आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आरोपीने महिलेचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मोबाईलमध्ये काढले होते. हे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने महिलेकडून 1 लाख 22 हजार रुपये उकळले. यानंतर आरोपीने हे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ महिलेच्या बहिणीला आणि तिच्या पतीला दाखवले. 'हे फोटो प्रसारित केल्यास समाजात बदनामी होईल, हा विषय मिटवण्यासाठी 10 लाख रुपये द्या,' अशी धमकी त्याने त्यांना दिली. या धमक्यांना कंटाळून आणि घाबरून अखेर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपी याला पीडित महिलेने वारंवार समजून सांगितले मात्र त्याने त्यानंतरही तिला धमकावणे सुरूच ठेवले त्यामुळे तिने आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज बागल करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 1:45 pm

देवेंद्र फडणवीस-मायक्रोसॉफ्ट सीईओ सत्या नडेला यांची महत्त्वपूर्ण बैठक:महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक जाहीर; 45 हजार रोजगार मिळणार

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्यात आज मुंबईत बैठक झाली. हिवाळी अधिवेशन सोडून मुख्यमंत्री तातडीने मुंबईत पोहोचले.बैठकीत मायक्रोसॉफ्टच्या भारतातील गुंतवणुकीच्या योजना, विशेषतः महाराष्ट्रासाठी होणाऱ्या प्रकल्पांवर चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की,मायक्रोसॉफ्टचा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचा विचार आहे. मायक्रोसॉफ्टसोबत GCC Global Capability Centers हा महत्वकांशी प्रकल्प करण्याचा प्रयत्न आहे. नडेला यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला AI हब बनवण्याबाबत मायक्रोसॉफ्ट सकारात्मक आहे. बैठकीत प्राईम AI OS ची चित्रफीत दाखवण्यात आली. तसेच, इतर क्षेत्रांमध्ये AI चा वापर कसा करता येईल, यावरही सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती त्यांनी दिली. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी यावेळी मोठी घोषणा केली. मायक्रोसॉफ्ट भारतात 17.5 अब्ज डॉलरची आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे. CM Devendra Fadnavis at the 'Microsoft AI Tour, Mumbai' programme, where a keynote was presented by Satya Nadella, Chairman and CEO Microsoft. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'मायक्रोसॉफ्ट एआय टूर, मुंबई' या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती, जेथे मायक्रोसॉफ्टचे मुख्य… pic.twitter.com/o8K1whAV9b— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 12, 2025 महाराष्ट्रात 23 लाख चौ. फुटांचे 'जीसीसी' देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मायक्रोसॉफ्ट महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सकारात्मक आहे. मायक्रोसॉफ्टसोबत GCC (Global Capability Centers) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. हा जीसीसी प्रकल्प तब्बल 23 लाख स्क्वेअर फुटांवर महाराष्ट्रात उभारण्यात येईल.या जीसीसीमुळे राज्यात सुमारे 45 हजार लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. याबाबत लवकरच सामंजस्य करार करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले. चाकूरकरांचे नाव अत्यंत मोठे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवराज पाटील चाकूरकर हे अत्यंत मोठे नाव आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अशी मोठी पदे भूषवली आहेत. त्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. त्यांच्याकडे अत्यंत हुशार राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. सभ्यता पाळणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्याबद्दल सर्व पक्षातील लोकांना आदर आहे. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मी कधी चांगले निर्णय घेतले तर त्यांनी स्वत:हून मला फोन केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 1:35 pm

शिवरायांचा इतिहास फक्त 68 शब्दांचा:CBSE च्या अभ्यासक्रमातील वस्तुस्थिती, सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला मुद्दा

सीबीएसईच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास अवघ्या 68 शब्दांत मांडण्यात आल्याचा आरोप अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत केला. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर फक्त 68 शब्दांत माहिती असणे, ही संपूर्ण देशातील नागरिकांच्या दृष्टीने खेदाची बाब आहे, असे ते म्हणाले. आमदार सत्यजीत तांबे यांनी शुक्रवारी सकाळी विधानपरिषदेतील अर्धातास चर्चेत सहभाग घेतला. त्यात त्यांनी सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अत्यंत संक्षिप्त स्वरुपात मांडण्यात आल्याचा संताप व्यक्त केला. तसेच सरकारला पेटून उठण्याचेही आवाहन केले. ते म्हणाले, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सीबीएसई बोर्डाच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर फक्त 68 शब्दांत माहिती आहे. ही संपूर्ण देशातील नागरिकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत खेदाची बाब आहे. हे शालेय शिक्षण विभागाचे अपयश छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यानंतरही शिवरायांचा इतिहास देशपातळीवर पोहोचू शकत नसेल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे. या अभ्यासक्रमात शिवाजी महाराज वगळता इतर राज्यांविषयी भरभरून माहिती देण्यात आली आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी वारंवार सभागृहात प्रश्न मांडावे लागतात. हे शालेय शिक्षण विभागाचे अपयश आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही, असे तांबे म्हणाले. ते पुढे म्हणाले, सीबीएसई बोर्ड छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ 68 शब्दांत सांगत असेल तर सरकारने पेटून उठले पाहिजे. राज्य सरकारने या प्रकरणी स्वतः अभ्यासक्रम तयार करून तो सीबीएसई बोर्डाला सादर करण्याची गरज होती. आम्ही तुम्हाला छत्रपतींचा इतिहास लिहून देतो, तुम्ही त्याचा तुमच्या अभ्यासक्रमात समावेश करा, असा प्रयत्न या प्रकरणी सरकारकडून करण्याची गरज होती, असे सत्यजीत तांबे म्हणाले. शिक्षकांच्या रिक्त जागांवरून वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा दुसरीकडे, काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांवरून आज महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले, एकीकडे शिक्षकांची पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे राज्यात 55 हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याच्या बातम्या येतात. शिक्षण हा इतका महत्वाचा विषय असूनही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सात वर्ग आणि फक्त तीन शिक्षक अशी स्थिती आहे. त्या स्थितीत विद्यार्थी काय शिकणार? त्यामुळे सरकारने राज्यात शिक्षकांची किती पदे रिक्त आहेत हे स्पष्ट करून एका मर्यादित कालावधीत या जागा भराव्यात, असे ते म्हणाले. यावर उत्तर देताना मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यात 15 हजार शिक्षकांची पद रिक्त असल्याची माहिती सभागृहात दिली. वडेट्टीवारांनीही त्यावरही आक्षेप घेतला. राज्यात 37 हजार शिक्षकांची पद रिक्त आहेत. अधिकारी सरकारची दिशाभूल करत आहे. सरकारच्या पोर्टलचे नाव पवित्र असले तरी अपवित्र काम सुरू आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर मंत्री गोरे यांनी मान्य केले चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षकांची 472 जागा रिक्त आहेत. राज्यात शिक्षक भरतीबाबत नवीन पद्धत आणण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 1:17 pm

वैद्यकीय देयकांसाठीची आर्थिक मागणी थांबणार:प्रक्रिया ऑनलाइन सुरू करणार, आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांचे स्पष्टीकरण

वैद्यकीय देयकांसाठी होणारी आर्थिक मागणी थांबवण्यासाठी प्रक्रिया ऑनलाइन सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) दहा वर्षे सलग सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती सेवा व शर्तीच्या नियमांचा अभ्यास करून अहवाल सादर करेल. त्यानंतर, दहा वर्षे सलग सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कालबद्ध पद्धतीने कायमस्वरूपी केले जाईल, असे आरोग्यमंत्री आबीटकर यांनी प्रश्नावरील चर्चेदरम्यान सांगितले. कर्मचाऱ्यांच्या एकूण १३ मागण्यांपैकी बहुतांश मागण्यांची पूर्तता झाल्याचेही त्यांनी नमूद केले. आमदार समाधान अवताडे आणि भास्कर जाधव यांनी या संदर्भात प्रश्न विचारले. कोल्हापूर येथील सी.एस.च्या केबिनमध्ये मिळालेल्या डायरीचा उल्लेख भास्कर जाधव यांनी केला. या डायरीत वैद्यकीय देयकांच्या प्रतिपूर्तीसाठी मागितलेल्या पैशांची माहिती नमूद होती. यावर कारवाई करणार का, असा सवाल जाधव यांनी केला. यावर आरोग्यमंत्र्यांनी हा मुद्दा केवळ कोल्हापूरपुरता नसून संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले. वैद्यकीय देयकांसाठी होणाऱ्या आर्थिक मागणीला आळा घालण्यासाठी प्रक्रिया ऑनलाइन केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यक्रमाची मिशन मोडवर अंमलबजावणी होत असल्याने पुनर्नियुक्ती देताना कामाचे मूल्यांकन (परफॉर्मन्स रिपोर्ट) करणे आवश्यक आहे. या आधारे, २०२५-२६ या वर्षात कर्मचाऱ्यांना १५% (५% सरसकट आणि १०% कार्यक्रमाच्या निर्देशांक मूल्यांकन अहवालावर आधारित) मानधनवाढ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, चंद्रपूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरपर्यंतचे मानधन देण्यात आले असून, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे मानधन तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित असल्याची माहिती लेखी उत्तरात देण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 12:40 pm

उमेद प्रकल्प बंद होणार नाही:मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही; वर्षभरात पहिल्या दहा मॉल उभारणीचे प्रयत्न

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, म्हणजेच 'उमेद' प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली. केंद्रात आणि राज्यात सरकार असेपर्यंत उमेद प्रकल्प बंद होणार नाही, असे ते लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान म्हणाले. संतोष बांगर, देवराव भोंगळे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी ही लक्षवेधी उपस्थित केली होती. आतापर्यंत ६ लाख ५३ हजार बचत गट स्थापन झाले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याची मागणी आहे. यावर बोलताना मंत्री गोरे यांनी, बिहारमध्ये उमेद कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोणती मदत करण्यात आली, याची माहिती एका महिन्यात मागवली असल्याचे सांगितले. अधिवेशन संपल्यानंतर १५ दिवसांच्या आत संबंधित संघटनांसोबत बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, ३ लाख महिला बचत गटांना २,२२२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. लक्षवेधीवरील उत्तरात मंत्री जयकुमार गोरे यांनी सुरुवातीला नागपुरातील मोर्चासाठी दहा ते पंधरा हजार महिला आणण्यात आल्या होत्या, त्यांची चौकशी केली जाईल, असे म्हटले होते. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र आक्षेप घेतला. 'सरकार भाजपचे आणि उत्तर काँग्रेसचे आहे असे वाटत आहे. गरीब महिला कुठून आल्या याची चौकशी कशी केली जाऊ शकते,' असा सवाल त्यांनी केला. यानंतर जयकुमार गोरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. मार्च २०२६ रोजी उमेद प्रकल्पाची मुदत संपत असली तरी, त्यानंतरही उमेद सखींचे भविष्य चांगलेच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. सुनील प्रभू, संजय कुटे, योगेश सागर, गोपीचंद पडळकर, नाना पटोले, नमिता मुंदडा, मुरजीभाई पटेल आदींनी यावर प्रश्न विचारले. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्यात येतील, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांत आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यांमध्ये उमेद मॉलची उभारणी केली जाईल. उमेद सखींचा शासन निर्णय लवकरच जारी केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. संजय कुटे यांनी आकर्षक पॅकेजिंग युनिट आणि 'एक जिल्हा एक ब्रँड' योजनेबद्दल विचारले असता, जिल्हास्तरावर उत्तम पॅकेजिंग युनिट सुरू केले असल्याचे मंत्री गोरे यांनी सांगितले. उमेद मॉलसाठी दहा जिल्ह्यांची निवड अद्याप झालेली नाही, मात्र मोक्याच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी २०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. येत्या एका वर्षात पहिले दहा मॉल उभारण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 12:38 pm

महायुतीचे मनपा निवडणुकीत पानिपत होणार:जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल रोष, मनसेबद्दल मविआची चर्चा नाही- नाना पटोले

मनपा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये मनसेला घ्यायचे की नाही याबद्दल आमची चर्चा झालेली नाही. मनपाच्या निवडणूक अजून जाहीर झालेली नाही. पण महायुतीने एवढ्या लोकांना प्रवेश दिला आहे आता त्यांच्यातील किती लोकांना सांभाळतात हे बघावे लागेल. महायुतीने एकत्र निवडणूक लढवली तरी त्यांचा फटका मविआला बसणार नाही. कारण जनतेमध्ये महायुतीच्याविरोधात राग आहे, या निवडणुकीत त्यांचे पानिपत होणार आहे, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. नाना पटोले म्हणाले की, महायुतीचे लोक कितीही एकत्र झाले तरी चोर-चोर मौसेरे भाऊ असतात. हे तिघे मिळून ज्या पद्धतीने राज्य लुटत आहे. आणि एकमेकांना वाचवत आहेत. लुटीनंतर आता जनतेमध्ये रोष आहे. जनतेची तिजोरी लुटून त्यांचा फायदा मुठभर लोकांना आणि राज्यकर्त्यांना कसा होतो हे लोकांना कळतंय. राज्याच्या कृषी धोरणातील अपयश नाना पटोले म्हणाले की, शेतकऱ्यांच्या दैनंदिन आयुष्यात वाढत्या आर्थिक ताणामुळे चिंतेची परिस्थिती निर्माण झाली असून, पटोले यांनी आत्महत्येच्या प्रश्नालाही अधिवेशनात अधोरेखित केले. दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत, ही बाब केवळ लाजीरवाणी नव्हे, तर राज्याच्या कृषी धोरणातील गंभीर अपयशाचे द्योतक आहे, असे ते म्हणाले. त्यांनी सरकारवर संवेदनाशून्य आणि बोथट, असल्याचा आरोप करत सांगितले की, शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी सरकारकडून तत्परता नसल्याने त्यांच्या वेदना अधिकच वाढत आहेत. त्यांना हमीभाव, विमा, नुकसान भरपाई, तांत्रिक मदत-कसलीही मदत वेळेवर मिळत नसल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे, असे पटोले यांनी सभागृहात सांगितले. मुंबईत शिवसेना-भाजप एकत्र दुसरीकडे नागपूरमध्ये सुरू असलेल्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या हिवाळी अधिवेशनाच्या धामधुमीतच महायुतीचे (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस) नेते आगामी महानगरपालिका (मनपा) निवडणुकांच्या रणनीतीवर तयारीला लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीने निवडणुकीचा अंतिम जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. विशेष म्हणजे, बुधवारी रात्री भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीचा संपूर्ण आढावा चव्हाण यांनी तातडीने शहा यांना सादर केल्याची माहिती आहे. यामुळे महायुतीच्या मनपा निवडणुकीच्या तयारीला वेग येण्याची चिन्हे आहेत. मनपा निवडणुकीचा अंतिम फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घटकपक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नयेत, यासाठी महायुतीने हा फॉर्म्युला निश्चित केला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि नागपूर या प्रमुख महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही पक्षांची ताकद समसमान असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई मनपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 12:26 pm

राजकारणातील संयमी व स्वच्छ प्रतिमेचा आवाज थांबला:चाकूरकर यांच्या निधनाने मोदी, फडणवीस, शिंदे यांची शोकप्रतीक्रिया; अनुभवी नेतृत्व गमावल्याची भावना

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाने देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या निधनावर देशभरातून शोकसंदेशांचा वर्षाव होत आहे. पहाटे अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवल्याची बातमी समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांसारख्या अनेक मान्यवरांनी सोशल मीडियावरून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राजकारणात स्वच्छ, अभ्यासू आणि संयमी नेता म्हणून ओळख असलेल्या पाटील चाकूरकर यांच्या जाण्याने देशाला अनुभवी नेतृत्वाचा आधार गमवावा लागल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या दशकांतील सार्वजनिक कार्य, लोकसभाध्यक्ष म्हणून केलेली कामगिरी, तसेच केंद्रात विविध मंत्रालयांची जबाबदारी सांभाळताना दाखवलेले नेतृत्व याची आठवण अनेकांनी आपल्या शोकसंदेशातून करून दिली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच लातूरसह राज्यातील विविध भागांत हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या राजकीय प्रवासातील सुसंस्कृत शैली आणि शालीन आचरणाची देशभरात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मान्यवरांनी व्यक्त केल्या संवेदना पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री शिवराज पाटील जी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. ते एक अनुभवी नेते होते. सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले. समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याच्या ध्येयाने ते झपाटले होते. ​गेल्या काही वर्षांत त्यांच्यासोबत माझे अनेक वेळा संवाद झाले, त्यापैकी सर्वात अलीकडील भेट काही महिन्यांपूर्वीच जेव्हा ते माझ्या निवासस्थानी आले होते तेव्हा झाली होती. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. ओम शांती. काँग्रेस नेते राहुल गांधी माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील जी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले आहे आणि पक्षाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. सार्वजनिक सेवेतील त्यांचे समर्पण आणि राष्ट्रासाठी त्यांचे योगदान नेहमीच लक्षात राहील. या दुःखाच्या वेळी मी संपूर्ण पाटील कुटुंब, त्यांचे हितचिंतक आणि समर्थकांसह संवेदना व्यक्त करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरजी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे.लोकसभेचे अध्यक्ष, केंद्रात गृह, संरक्षण खात्याचे मंत्री, राज्यपाल अशा विविध भूमिकांमधून काम करताना त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडली. लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी संसदेशी निगडित अनेक अभिनव उपक्रमांना चालना दिली. तत्वनिष्ठ, अभ्यासपूर्ण आणि ठामपणे मांडणी करणारे नेतृत्व म्हणून त्यांना देशाच्या राजकारणात आदराचे स्थान होते. त्यांच्या निधनामुळे राजकारण-समाजकारणातील उत्तुंग अशा मार्गदर्शक नेतृत्वाला आपण मुकलो आहोत. महाराष्ट्राच्या राजकीय सुसंस्कृततेचा लौकिक जपणारे व्यक्तिमत्व म्हणून ते कायम स्मरणात राहतील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.ॐ शांती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार, खासदार, महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष, लोकसभेचे माजी सभापती, माजी केंद्रीय गृहमंत्री, देशाचे संरक्षणमंत्री, पंजाबचे माजी राज्यपाल अशा विविध भूमिका समर्थपणे सांभाळत आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीला प्रतिष्ठा मिळवून देणारे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या दु:खद निधनामुळे राजकारण व समाजकारण यांची सुयोग्य सांगड घालणारा अनुभवी, सुसंस्कृत व सेवाभावी आदर्श काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हा आघात सहन करण्याची शक्ती त्यांच्या परिवारास मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शिवराज पाटील यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली. उपमुख्यमंत्री अजित पवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, लोकसभेचे माजी अध्यक्ष, देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानं देशाच्या राजकारणातील एक सभ्य, सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आपण गमावलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शिवराज पाटील चाकूरकर यांनी लोकसेवेचा नवा आदर्श निर्माण केला होता. साधेपणा आणि नैतिक मूल्यांचे ते प्रतीक होते. आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंजाबचे राज्यपाल अशी विविध पदं भूषवत असताना त्यांनी राजकारणातील नैतिकता कायम जपली. लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करत असताना लोकसभेचे आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण, नवीन ग्रंथालय इमारत यासारख्या उपक्रमांना त्यांनी गती दिली. त्यांच्या कारकिर्दीतच उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू झाले. भारतीय संविधानाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 12:23 pm

कुणबी प्रमाणपत्र वितरणात दिरंगाई का?:सरकार आणि अधिकाऱ्यांना जरांगे पाटील यांची चेतावणी; जीआर निघूनही कामाचा वेग मंद; त्रुटी उघड

हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदींच्या आधारे मराठा समाजातील पात्र अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मुंबईतील विशाल आंदोलनानंतर सरकारने जीआर काढत ही मागणी मान्य केली होती. मात्र, मागणी मंजूर होऊन तीन महिने उलटूनही प्रमाणपत्र वितरणाचा वेग अत्यंत कमी असल्याचे अधिकृत आकडेवारीतून समोर आले आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधून फक्त 594 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी केवळ 98 अर्जांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अर्जांची संख्या अत्यल्प आहे, तर काही ठिकाणी अर्ज सादर जरी झाले असले तरी मंजुरीच्या बाबतीत प्रशासनाचा वेग अत्यंत संथ असल्याचे दिसून येत आहे. यामुळे समाजात अस्वस्थता वाढत असून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आणि प्रशासनावर लक्ष वेधत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या अर्जांमध्ये सर्वाधिक प्रमाण परभणी जिल्ह्यात दिसून आला. परभणीत 445 अर्ज नोंदवले गेले असून त्यापैकी 47 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात 78 अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी आठ अर्ज वैध ठरले. संभाजीनगरमध्ये मात्र परिस्थिती उलट असून 14 अर्जांपैकी एकाही अर्जाला मंजुरी मिळालेली नाही. लातूर आणि बीड दोन्ही ठिकाणी 12-12 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी नऊ-नऊ अर्ज मान्य झाले आहेत. हिंगोलीमध्ये पाच अर्जांपैकी तीन अर्ज मंजूर झाले. तर नांदेडमध्ये प्राप्त झालेल्या सर्व पाच अर्जांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. धाराशिवमध्ये 13 अर्जांपैकी केवळ चार अर्जांना मान्यता मिळाल्याचे अहवालात नमूद आहे. एकूणच पाहता, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे आकडे समोर आले असून अर्जदारांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने अर्ज प्रक्रियेत कमी प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर सवाल उपस्थित केले आहेत. सरकारने प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत कसलाही विलंब करू नये. समाजाने एकजुटीने लढा देऊन गॅझेटरी नोंदी बहाल करण्याचा आदेश मिळवला असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठा समाजाने स्वतः पुढाकार घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे, त्यानंतरच कुणबी प्रमाणपत्र मिळू शकते, अशी आठवण त्यांनी करून दिली. अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, प्रशासनाला स्पष्ट आदेश देऊन अर्ज मिळताच त्यावर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. गॅझेटिअरचा जीआर हा आमचा मोठा विजय आहे. पण आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी वेगाने झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. प्रभावी अंमलबजावणी होईल याची जबाबदारीही सरकारनेच घ्यावी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना थेट संदेश दिला आहे. त्यांनी सांगितले की, सरकारने मराठा समाजासाठी जीआर काढला आहे तर त्याची प्रभावी अंमलबजावणी होईल याची जबाबदारीही सरकारनेच घ्यावी. शिंदे समितीला तातडीने आदेश द्या की त्यांनी हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदी वेगाने शोधाव्यात. नोंदी उपलब्ध होताच कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. तसेच, अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक तालुक्यांमध्ये अधिकारी अर्ज कसे करायचे याबद्दल नागरिकांना योग्य माहिती देत नाहीत. काही ठिकाणी तर अधिकारी आम्हाला आदेशच मिळाले नाहीत, असे सांगत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे प्रशासनच प्रक्रियेचे मोठे अडथळे बनले असल्याचा त्यांचा इशारा आहे. फडणवीस यांच्याकडेही अधिकाऱ्यांना सक्त आदेश देण्याची मागणी अर्जांची कमी संख्या का दिसते, याबद्दल बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील अनेक मराठा कुटुंबांना अजूनही अर्ज प्रक्रिया समजत नाही. गावपातळीवर अर्ज मार्गदर्शनासाठी समित्या स्थापन करण्याचे ठरले होते, पण अनेक ठिकाणी त्या समित्या अद्याप अस्तित्वातच नाहीत. खेड्यापाड्यातील गरीब लोकांना अर्ज कुठे करायचा हेही समजत नाही. त्यामुळे अर्ज कमी प्रमाणात येत आहेत. सरकारने तातडीने जनजागृती आणि मार्गदर्शन सुरू केले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही अधिकाऱ्यांना सक्त आदेश देण्याची मागणी केली. हैदराबाद गॅझेटचा जीआर काढला आहे, आता लोकांना अर्ज करण्याचे आवाहन करा आणि ज्याने अर्ज केला आहे त्याला तातडीने कुणबी प्रमाणपत्र दिले जावे, असे ते म्हणाले. संपूर्ण प्रक्रियेत वेग आणण्यासाठी आणि अर्जदारांना अडथळेविना प्रमाणपत्र मिळावे यासाठी त्यांनी पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 12:13 pm

मुंढवा जमीन गैरव्यवहारात नवा ट्विस्ट; शितल तेजवानीचे 300 कोटी गायब?:शीतल तेजवानी पोलिसांची दिशाभूल करत असल्याचा खुलासा

मुंढव्यातील शासकीय जमिनीत झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणात मुख्य संशयित शीतल तेजवानी हिच्यावर अधिकाधिक गंभीर बाबी उघड होत चालल्या आहेत. पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, तेजवानीने 300 कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराबाबत चुकीची किंवा अपूर्ण माहिती देत पोलिसांची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या नावावर असलेल्या बँक खात्यांची तपासणी केली असता, इतक्या मोठ्या रकमेचे कोणतेही डिजिटल व्यवहार आढळलेले नाहीत. त्यामुळे ही रक्कम रोखीने घेतली का किंवा वेगळ्या मार्गाने व्यवहार केला गेला का, याबाबत पोलिसांना गंभीर शंका निर्माण झाली आहे. घटनास्थळाशी संबंधित महत्वाची कागदपत्रे तिच्या घरझडतीतून सापडली नाहीत. यामुळे तिची आणखी काही घरे किंवा कार्यालये लपवून ठेवली असल्याची शक्यता पोलिसांनी न्यायालयात मांडली आहे. याशिवाय, जमिनीच्या कब्जा हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेला 11 हजार रुपयांचा डीडी तिने नेमक्या कोणाच्या सांगण्यावरून भरला, याचे उत्तर ती अद्याप टाळत आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली शीतल तेजवानी ही मूळची मुंबईतील नरिमन पॉइंटची रहिवासी असून सध्या कोरेगाव पार्क येथील ऑक्सफर्ड हॉलमार्क सोसायटीच्या बी-901 मध्ये राहत असल्याचे दस्ताऐवजांवरून स्पष्ट आहे. 3 डिसेंबर रोजी तिची अटक केल्यानंतर गुरुवारी तिची कोठडी संपल्याने तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीदरम्यान पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, तेजवानीचा ‘अमेडिया इंटरप्रायझेस एलएलपी’ कंपनीशी संपर्क कसा आला, तिने कोणाच्या ओळखीतून हा जमीन व्यवहार साधला, याबाबत ती स्पष्ट माहिती देत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जमिनीच्या गैरव्यवहारातील पैशांचा उगम, त्याची पद्धत, रक्कम कोणाकडून आली आणि ती कुठे वापरली गेली, याबद्दल ती जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. तपास अधिक खोलात गेल्यानंतर पोलिसांच्या हातात दोन महत्त्वपूर्ण दस्तऐवजी पुरावे लागले आहेत. तेजवानीकडून 2006 सालातील 33 नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्रे आणि 2008 मधील 45 रिव्होकेबल कुलमुखत्यारपत्रे जप्त करण्यात आली आहेत. 2006 च्या दस्तऐवजांमध्ये 144 वारसदारांची नावे आहेत, तर 2008 च्या रेकॉर्डमध्ये 239 वारसदारांची नावे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्हींच्या आधारे तिने 272 वारसदारांच्या वतीने खरेदी खत केल्याचा दावा केला आहे. मात्र पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, तिच्या ताब्यात आलेली कुलमुखत्यारपत्रे अपूर्ण असून, सर्व 272 वारसदारांकडून अधिकृत प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. त्यामुळे उर्वरित कागदपत्रे तिने कुठे दडवून ठेवली आहेत किंवा इतर कोणाकडे लपवली आहेत, हे तपासणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. यामुळे या व्यवहाराची गुंतागुंत आणि त्यामागील संभाव्य मोठे रॅकेट याबद्दल अधिक शंका निर्माण झाल्या आहेत. 11 हजार रुपयांचा डीडी हा महत्त्वाचा धागाशीतल तेजवानीने जिल्हाधिकारी कार्यालयात भरलेला 11 हजार रुपयांचा डीडी हा या प्रकरणातील एक महत्त्वाचा धागा मानला जात आहे. हा डीडी कोणत्या व्यक्तीच्या सूचनेवरून जमा करण्यात आला, याबाबत ती उत्तर देण्यास टाळाटाळ करत आहे. तिच्या घरातून कोणतीही महत्त्वाची कागदपत्रे न सापडल्याने, ती गुन्ह्याशी संबंधित रेकॉर्ड इतर कशा ठिकाणी ठेवत होती किंवा इतर लोकांच्या मदतीने व्यवहार करत होती का, यावर संशय अधिक बळावला आहे. याच कारणावरून पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, तिच्याकडे इतर संपत्ती, निवासस्थाने, ऑफिसेस किंवा कागदपत्रे असण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे. तसेच 300 कोटींच्या व्यवहारासाठी कोणते मार्ग वापरण्यात आले, बँकिंग सिस्टीमला चुकवण्यासाठी कोणती रचना तयार करण्यात आली, याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे आहे. तिची चौकशी पुढे न गेल्यास संपूर्ण प्रकरणातील आर्थिक साखळी समोर येणे अवघड असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला स्पष्ट केले. जमिनीच्या मोठ्या गैरव्यवहाराचे आणखी धागेदोरे समोर येण्याची या सर्व गंभीर बाबींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी न्यायालयाकडे कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. पोलिस पक्षाचे वकील अमित यादव यांनी न्यायालयाला सांगितले की, उर्वरित कुलमुखत्यारपत्रांचा शोध घेण्यासाठी, आर्थिक व्यवहारांची शृंखला उलगडण्यासाठी आणि तिच्या इतर संभाव्य ठिकाणांची तपासणी करण्यासाठी अजून चौकशी आवश्यक आहे. न्यायालयानेही पोलिसांच्या या युक्तीवादाची दखल घेत शीतल तेजवानीची पोलिस कोठडी 15 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. पुढील काही दिवसात तिच्याकडून शासकीय जमिनीच्या मोठ्या गैरव्यवहाराचे आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता असून, या प्रकरणात इतर प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग उघडकीस येईल का, याबद्दल उत्सुकता वाढली आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 11:48 am

मुंबईतील मुस्लिमबहुल भागात शिंदेंना पसंती:भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत दावा; शिंदे म्हणाले - योजना आणताना कुणाशीही भेदभाव केला नाही

मुंबईतील मुस्लिमबहुल भागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेला सर्वाधिक पसंती असल्याची बाब भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत समोर आली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईतील मुस्लिमबहुल भागात शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार मैदानात उतरल्याचे दिसून येतील असा दावा केला जात आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य करताना आमच्या सरकारने लाडकी बहीण योजनेसारख्या लोकाभिमुख व कल्याणकारी योजना आणताना कुणाशीही भेदभाव केला नसल्याचे सांगितले आहे. राज्यात लवकरच महापालिका निवडणुकांचा फड रंगणार आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने विशेषतः ठाकरे गटाने चांगलाच जोर लावला आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत मुंबईतील मुस्लिमबहुल भागात भाजपला विरोध, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पसंती मिळत असल्याची बाब समोर आली आहे. या सर्व्हेनुसार, मुंबईतील 18 वॉर्डांत मुस्लिम लोकसंख्या 50 टक्क्यांहून जास्त आहे. या भागांत सत्ताधारी महायुतीचा घटकपक्ष असणाऱ्या भाजपला विरोध आहे. पण तिथे लाडकी बहीण योजनेमुळे शिंदेंच्या नावाला पसंती असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या भागात शिवसेनेचा उमेदवार दिला तर त्याचा महायुतीला फायदा होईल. मुस्लिमबहुल भागात शिंदेंच्या नावाला पसंती भाजपच्या उच्चपदस्थ नेत्यांनीही याची पुष्टी केली आहे. त्यांच्या मते, मुंबईतील मुस्लिम बुहल भागात एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती आहे. त्या जागा शिंदेंना द्यायला भाजपकडून फारसा विरोध होणार नाही. दुसरीकडे, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने नवाब मलिक यांच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करण्यास नकार दिल्याची चर्चा आहे. पण शिंदेंनी आज पत्रकारांशी बोलताना असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीला बाजूला ठेवण्यावर चर्चा नाही एकनाथ शिंदेंना आज पत्रकारांनी मुंबईतील काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला बाजूला ठेवले जाईल का? असा थेट प्रश्न करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, कुणालाही बाजूला ठेवण्यावर चर्चा झाली नाही. आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. आमच्यात आता स्थानिक व वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. आम्ही महायुती म्हणून अत्यंत मजबुतीने निवडणूक लढवू. आमच्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रात विकासाचे प्रकल्प, लोकाभिमुख कल्याणकारी योजना जनतेच्या समोर आहेत. त्यामुळे आम्ही कामाच्या व विकासाच्या जोरावर या निवडणुकीला सामोरे जाऊ. महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरे जाऊ ते पुढे म्हणाले, 3 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व माझी बैठक झाली. त्यात महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झाला. कालही रवींद्र चव्हाणांशी चर्चा झाली. त्यातही महायुती करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, पुढील रणनीती ठरवली जात आहे. स्थानिक पातळीवरही स्थानिक कमिट्यांशी चर्चा केली जाईल. जिथे कुठे अडचण येईल, तिथे वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील. आदित्य, उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा यावेळी त्यांनी ठाकरेंना केवळ बिल्डरांचीच भाषा समजत असल्याचीही टीका केली. ते म्हणाले, मुंबईत पागडीमध्ये राहणारे लोक हे बिल्डर नाहीत सर्वसामान्य आहेत. हे प्रथम त्यांनी समजून घेतले पाहिजे. ज्यांना कायम बिल्डरांचीच भाषा समजते, त्यांच्याविषयी काय बोलणार. हा निर्णय ऐतिहासिक आहे. क्रांतिकारी आहे. मुंबईतील लाखो लोकांना दिलासा देणारा आहे. सरकारने ओसीचाही निर्णय घेतला आहे. ओसीमुळे पुनर्विकास थांबला आहे. विजेचे व पाण्याचे बिल निवासीला दुप्पट असते. कमर्शिअला चौपट असते. त्यामुळे ट्रान्झॅक्शन होत नाही, बँकांची लोन होत नाही. पुनर्विकासात अडथळे येतात. ओसीच्या 28 हजार केसेस प्रलंबित आहेत. त्यामुळे 28 हजार इमारती व पागडीच्या लोकांना दिलासा मिळणार आहे. आता काय होणार? आता मुंबईकरांचे गत अनेक वर्षांपासूनचे प्रश्न सोडवले आहेत. यामुळे विरोधकांची पंचाईत झाली आहे. आम्ही महायुती म्हणून काम करत आहोत. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसेल. शेवटी मुंबईकर सुज्ञ आहेत. आम्ही मुंबईसाठी केलेले काम ते पाहत आहेत. विरोधकांनी मुंबईसाठी कोणतेही काम केले नाही. त्यांनी मुंबईची केलेली अवस्था जनता पाहत आहे. आमचे सरकार मुंबईबाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत. विरोधकांना आपला पराभव दिसत आहे. त्यामुळे ते आमच्यावर टीका करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 11:40 am

महायुती स्थानिक निवडणुकीचे निकाल फिरवत आहे:घुघूस निवडणूक थांबवण्यासाठी महायुतीच्या आमदारांचा दबाव- विजय वडेट्टीवार

महायुतीचे लोकं निवडणूक 20 दिवस पुढे ढकलून त्यांचे निकाल फिरवण्याचे काम करत आहेत. घुघूस नगरपालिकेचे कोणताही विषय हायकोर्टात नसताना तिथल्या आमदारांच्या दबावाने निवडणूक आयोगाने हराम.. पणा करत त्या घुघूस निवडणूक थांबवली कारण तिथे आम्ही जिंकत होतो म्हणून,असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, महायुतीच्या लोकांना माहिती आहे की राज्यातील स्थानिक निवडणूक ही त्यांच्याविरोधात जात आहे. जनतेचा कौल आमच्याकडे आहे हा फिरवण्यासाठी निकाल पुढे ढकलण्यात आहे. बावनकुळे हे निवडणूकीपूर्वीच आम्ही इतक्या जागा जिकंणार असे सांगतात. हे कशाच्या आधारावर याचा अर्थ हे सर्व चोरी आणि EVM वर करत आहे. राणांच्या घरी 4-5 बिबटे द्या विजय वडेट्टीवार म्हणाले की, रवी राणा यांच्या घरी 4 ते 5 बिबटे सांभाळण्यासाठी दिले पाहिजे. त्यांना सांगितले पाहिजे की तुम्ही संपूर्ण कुटुंबाने बिबट्या पोसा आणि मग इतरांना आपले अनुभव सांगा. की ते पाळीव प्राणी आहे की हिस्त्र प्राणी आहे. त्यांच्या अनुभवानंतर सत्ताधारी आमदारांना 2- दोन बिबटे द्यावे मग उरलेच तर आम्ही निर्णय घेऊ. मुनगंटीवार विदर्भाच्या विकासासाठी बोलतात विजय वडेट्टीवार म्हणाले की, सुधीर मुनगंटीवार जे बोलत आहे ती अगदी योग्य आहे. विदर्भाच्या विकासासाठी ते नेहमी आग्रही असतात. सरकारला घरचा आहेर म्हणाण्यापेक्षा त्यांनी सरकारला आरसा दाखवण्याचे काम केले असे म्हणावे लागेल, त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. राजकीय आरक्षणावर निवडणुकीनंतर बोलू विजय वडेट्टीवार म्हणाले की, मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटचा फायदा झाला का नाही यांची मी माहिती घेतो. पण मनोज जरांगे यांचे आंदोलन संपवण्यासाठी जर सरकारने जर बोळवण केली असेल तर मात्र हे फार धोकादायक आहे. एकीकडे मराठा समाज आणि दुसरीकडे ओबीसींना भडकवून आपली पोळी भाजून घ्यायची. मराठा समाजातील अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवलेले आहे. ते तुम्हाला जिल्हा परिषद आणि मनपा निवडणुकीनंतर दिसून येईल. ओरिजनल ओबीसींचा वाटा कुणी हिरावला हे आज सांगायची गरज नाही. त्यासाठी निवडणुकीनंतर बोलणार आहे. पण जरांगेंचे आंदोलनानंतर जर हैदराबाद गॅझेट काढूनही फायदा होत नसेल तर चूक सरकारची की जरांगे यांची याचा विचार जनता करेल. विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने ठरवले आहे की स्थानिक निवडणुकीसाठी कास्ट प्रमाणपत्राच्या भरोश्यावर फार्म भरता येईल हे ठरवले आहे. त्यासाठी 6 महिन्याची मुदत दिली आहे. यामुळे आता त्यांवर बोलून काही फायदा होणार नाही. निवडणूक झाली की यावर बोलू असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. पडळकरांवर साधला निशाणा विजय वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने कुणाला पाठीशी घालू नये. मुंबई विधिमंडळ परिसरात जो राडा झाला होता त्यांचे आम्ही साक्षीदार आहोत. सत्ताधारी असो की विरोधी असो कोणीपण चूक केली त्याच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. तो सुटता कामा नये त्याला अटक झाली पाहिजे. कायद्याचा धाक राहिला पाहिजे. राजकारणासाठी विधिमंडळात राडे होत असतील तर कारवाई झाली पाहिजे. सरकारने ही हिंमत दाखवली पाहिजे. ज्यांनी हे घडवून आणले त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 11:32 am

तिरुपतीच्या दर्शनासाठी भाविकांची ‎परवड:रेल्वेकडून नियोजन चुकलेले; ‎छत्रपती संभाजीनगरच्या वाट्याला केवळ 45 जागा‎

दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद आणि दक्षिण‎रेल्वे चेन्नई यांनी केवळ दक्षिण भारतातील ‎‎भाविकांच्या सोयीच्या रेल्वे चालवल्या आहेत.‎मराठवाड्यातील भाविकांच्या सोयीची दखल‎दक्षिण मध्य रेल्वेकडून घेतली जात नाही. चेन्नई‎ते नगरसोल रेल्वेदेखील शिर्डीसाठी येणाऱ्या‎भाविकांची सोय लक्षात घेऊन केली आहे.‎नव्याने घोषित केलेली तिरुपती श्रीसाईनगर‎शिर्डी रेल्वे शिर्डीत पोहोचल्यानंतर नऊ तासांनी‎पुन्हा परत तिरुपतीसाठी रवाना केली जाते.‎शिर्डी येथे दोन ते तीन तासांत श्रीसाईबाबांचे‎दर्शन होते आणि भाविकांचा शिर्डीत मुक्काम ‎‎वाचतो. अशा प्रकारे तिरुपतीहून सोयीची रेल्वे ‎‎भाविकांसाठी असावी, अशी मागणी आता जोर ‎‎धरत आहे.‎ तिरुपती येथे जगभरातून भाविक येत‎असल्याने दर्शनासाठी किमान २४ तासांचा ‎‎कालावधी राखून ठेवावा लागतो. कधी कधी‎तेथे पोहोचल्यानंतर दोन तासांत दर्शन होत नाही. ‎‎सहा ते सात तास दर्शनासाठी लागत असल्याने ‎‎तिरुपती येथे रेल्वे पोहोचल्यानंतर किमान २४ ‎‎तासांचा अवधी भाविकांकडे असल्यास त्यांना‎परत येता येईल. परंतु अशा प्रकारची व्यवस्था ‎‎रेल्वेकडून करण्यात आलेली नाही.‎ तिरुपतीहून छत्रपती संभाजीनगरसाठीची वेळ‎ तिरुपतीसाठी छत्रपती ‎संभाजीनगरहून रेल्वे‎ कोटा अत्यल्प‎ दक्षिण भारताचे प्रवासी‎डोळ्यासमोर ठेवून दक्षिण मध्य‎रेल्वे नवीन गाड्या सुरू करते.‎जास्तीत जास्त कोटा शिर्डी,‎मनमाड, नगरसोल येथून‎राहील. छत्रपती‎संभाजीनगरच्या वाट्याला‎अवघ्या ४० ते ४५ जागा‎मिळतील. छत्रपती‎संभाजीनगरकरांना तिरुपतीला‎जाताना रेल्वे असली तरी‎परतीसाठी २४ तास वेटींग आहे.‎ इनसाइड स्टोरी‎: नवीन रेल्वे दक्षिण‎ भारतीयांसाठी सोयीची‎ तिरुपती ते श्रीसाईनगर शिर्डी नवीन‎ नियमित रेल्वेची घोषणा करण्यात‎ आली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव‎यांनी उद्घाटनाच्या रेल्वेला ९‎ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. हिरवी ‎झेंडी दाखवली. त्यानंतर १४ ‎डिसेंबरपासून संबंधित रेल्वे नियमित ‎धावेल. प्रत्येक रविवारी सकाळी ४‎ वा. तिरुपतीहून निघून सोमवारी ‎सकाळी ६.१५ वा. छत्रपती‎ संभाजीनगरला पोहोचेल. शिर्डीला ‎सकाळी १०.४५ वा. पोहोचल्यानंतर ‎परतीसाठी सोमवारी सायंकाळी ७.३५‎वा. निघेल. छत्रपती संभाजीनगर ‎येथून रात्री ११.१० वा. तिरुपतीसाठी ‎रवाना होईल. एकाच दिवसात दक्षिण‎ भारतातील भाविकांना शिर्डीतील‎ श्रीसाईबाबांचे दर्शन घेऊन परतेल.‎

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 11:19 am

पुणे विमानतळावरील बिबट्या अखेर पकडला:आठ महिन्यांच्या प्रयत्नानंतर वनविभागाला यश

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात गेल्या आठ महिन्यांपासून वावर असलेला बिबट्या अखेर पकडण्यात आला आहे. पुणे वनविभाग, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय हवाई दल आणि विमानतळ प्राधिकरणाच्या संयुक्त पथकाने ही मोहीम यशस्वी केली. हा बिबट्या सर्वप्रथम 28 एप्रिल 2025 रोजी कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसला होता. तेव्हापासून तो विमानतळाच्या भूमिगत बोगदे, दाट झुडपे आणि कमी वर्दळीच्या भागांतून फिरत होता. विमानतळाचा परिसर संवेदनशील आणि विस्तृत असल्याने त्याला पकडणे आव्हानात्मक ठरले होते. अनेक महिने कॅमेरा ट्रॅप, लाइव्ह कॅमेरे आणि पिंजरे लावूनही तो सापळ्यात अडकला नव्हता. 4 डिसेंबर रोजी बिबट्या पुन्हा भूमिगत बोगद्यात शिरल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ सर्व बाहेर पडण्याचे मार्ग बंद करून अतिरिक्त कॅमेरे बसवण्यात आले. अखेर 11 डिसेंबर रोजी सुमारे 30 सदस्यांच्या पथकाने नियोजित मोहीम राबवली. बिबट्याला अंदाजे 80 फूट लांब बोगद्यात नियंत्रित करून वन्यजीव वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. गौरव मंगला यांनी अरुंद जागेतून यशस्वीपणे डार्ट केले. बिबट्याने यापूर्वी दोन लाइव्ह कॅमेरेही नष्ट केले होते, तरीही पथकाने संयमाने काम करत मोहीम फत्ते केली. पकडलेला बिबट्या सध्या पूर्णपणे स्थिर असून, पुढील वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी बावधन येथील रेस्क्यूच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी या मोहिमेचे कौतुक करत, हे “सामंजस्य आणि सतत तयारीचे उत्तम उदाहरण” असल्याचे म्हटले. रेस्क्यूच्या नेहा पंचमिया यांनी सांगितले की, प्रत्येक प्राणी बचाव मोहीम वेगळी असते आणि त्यासाठी संयम व योग्य रणनीती आवश्यक असते. या यशस्वी मोहिमेमुळे पुणे विमानतळाची सुरक्षा पुन्हा पूर्णपणे सुनिश्चित झाली असून, मानव-वन्यजीव संघर्ष हाताळण्यात भारतीय यंत्रणांची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 10:47 am

विधिमंडळ कामकाज:विधिमंडळात आजही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होणार; अशासकीय ठरावही सादर होणार

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. आज दोन्ही सभागृहांत पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह राज्यभरातील भूखंड घोटाळे, आर्थिक प्रश्न व बेरोजगारीच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यात विरोधक सरकारवर चौफेर टीका करून धारेवर धरण्याचा प्रयत्न करतील, तर सत्ताधारी तेवढ्याच ताकदीने त्यांचे आरोप फेटाळून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतील. या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपण पाहूया हिवाळी अधिवेशन व त्यासंबंधीच्या बातम्यांचा इत्यंभूत आढावा....

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 10:39 am

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:निवडणूक इफेक्ट! अपूर्ण 50 रस्त्यांची कामे‎सुरू करा, अन्यथा नव्याने निविदांचे नियाेजन‎

शहरात गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त‎ कालावधीपासून सुमारे 175 कोटींच्या ‎कामांना मंजुरी आहे. रस्त्यांची कामे‎ करताना मक्तेदार वाट्टेल तेव्हा कामे ‎सुरू करतात आणि बंद करतात.‎अर्धवट कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. शहरात ‎सध्या 50 पेक्षा अधिक कामे अर्धवट‎ आहेत. मक्तेदारांच्या कार्यपद्धतीला ‎आळा घालण्यासाठी सार्वजनिक‎ बांधकाम विभागाने ‘कामे सुरू करा‎ अन्यथा रद्द करून नवीन निविदा काढू’‎असा इशारा दिला आहे. कामे रद्द करून‎ शिल्लक कामांसाठी नव्याने निविदा‎ काढण्यात येणार आहेत.‎ जळगाव शहरातील लहान मोठ्या ‎रस्त्यांच्या कामांसाठी तीन वेगवेगळ्या ‎योजनांमधून 175 कोटींची कामे मंजूर‎ करण्यात आली आहेत. यातील बरीच‎ कामे पूर्ण झाली असली तरी दोन वर्षे ‎उलटूनही अजूनही प्रमुख रस्ते अर्धवट ‎अवस्थेत आहेत. मनपा निवडणुकीच्या‎ पार्श्वभूमीवर नागरिक लोकप्रतिनिधींना‎ जाब विचारत आहेत. या पार्श्वभूमीवर‎ही तंबी देण्यात आल्याचे दिसते आहे.‎ अपूर्ण रस्त्यांमुळे हा त्रास‎ नेरीनाका स्मशानभूमी, स्टेडियम चौकासह ‎नवीन बसस्थानक परिसरातील अर्धवट रस्ते ‎धोकादायक झाले आहेत. त्यावरून वाहने ‎घसरून अपघाताचा धोका आहे. रस्ते‎ ओलांडणे जिकिरीचे आहे. एसटी वर्कशॉप‎ रस्त्यावर प्रचंड धूळ उडते. रस्त्यावर अनेक ‎ठिकाणी खड्डे पडले आहेत. पिंप्राळा बाजार‎रस्त्याची खडी बाहेर निघाली आहे. त्यामुळे ‎वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी‎ लागते. हीच स्थिती शहरातील खोटेनगर ते‎चंदूअण्णानगर रस्त्याची आहे. नागरिकांना ‎इथे उंटसवारीचा अनुभव घ्यावा लागतो.‎ काँक्रीट, डांबरीकरण थांबले‎ मक्तेदाराला मार्चपर्यंत कामाची मुदत‎ प्रश्न : रस्त्यांची कामे का थांबली आहेत?‎उत्तर : निधीच्या अडचणीमुळे काही कामे थांबली ‎होती. पण, ती सुरू होतील यासाठी प्रयत्न आहेत.‎प्रश्न : अर्धवट रस्ते कधीपर्यंत पूर्ण होतील?‎उत्तर : मार्चअखेरपर्यंत अपूर्ण राहिलेले संपूर्ण मंजूर‎ रस्ते मार्गी लागतील. तशा सूचना केल्या आहे.‎प्रश्न : रस्ते न करणाऱ्यांवर कारवाई होईल का?‎उत्तर : सांगूनही काम करत नसेल तर त्या ठेकेदाराचे‎ काम काढून घेतले जाईल, नवीन टेंडर काढले जाईल.‎प्रश्न : कोणत्या रस्त्यांची कामे मार्गी लागतील?‎उत्तर : एसटी वर्कशॉपसह रिंगरोड, अपूर्ण समांतर ‎रस्त्यांचे कामही पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.‎ आता थेट कामे रद्द करणे हाच पर्याय‎ दोन वर्षांपासून शहरात काँक्रीट व डांबरीकरणाची‎ कामे सुरू आहेत. त्यातील काहींची मुदत संपली ‎आहे; परंतु 50 ते 100 मीटरचे काम सोडून कामे केली‎ आहेत. कुठे चांगला तर कुठे खराब रस्त्यांचा सामना ‎करावा लागतो. त्यामुळे मक्तेदाराने तातडीने कामे‎ सुरू न केल्यास ती कामे रद्द करणे हाच पर्याय आहे.‎कामे रद्द करून पुन्हा निविदा राबवली जाणार आहे.‎यादृष्टीने पीडब्लूडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 10:31 am

विजापूर रोडवर 16हजार चौरस फुटात उभारतेय उत्तरादी मठाचे बालाजी मंदिर‎:आजपासून मठाच्या इमारत स्लॅबचे काम सुरू, सकाळी सात पासून विविध धार्मिक कार्यक्रम

मध्व संप्रदायाचा महाराष्ट्रातील सर्वात ‎मोठा उत्तरादी मठ विजापूर रोडवरील ‎सैफुल परिसरात होत आहे. या मठाच्या ‎छत बांधकामास (स्लॅब)‎ शुक्रवारपासून प्रारंभ होणार आहे. सन ‎2024 पासून श्री श्री 1008‎ श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांच्या ‎अध्यात्मिक नेतृत्वात या मठाचे‎ बांधकाम शुभारंभ सुरु झाले आहे.‎ श्री व्यंकटेश्वर देवस्थान श्री उत्तरादी‎मठ, सोलापूर येथे तब्बल 16 हजार ‎700 चौरस फूट जागेवर हा मठ व भव्य ‎बालाजी मंदिर उभारण्यात येत आहे.‎त्याचे काम डिसेंबर 2027 मध्ये पूर्ण ‎होईल, अशी माहिती विश्वमध्व ‎महापरिषदेचे सोलापूर शहराचे अध्यक्ष‎बी. जी. कुलकर्णी यांनी दिली.‎ छत बांधकाम प्रारंभानिमित्त शुक्रवारी‎ विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन‎ करण्यात आले आहे. सकाळी 7‎ वाजल्यापासून श्री विष्णुसहस्त्रनाम, श्री‎सुंदरकांड, श्री व्यंकटेश्वर स्तोत्र, श्री‎राघवेंद्र स्वामी अष्टोत्तर तसेच‎ सोलापुरातील विविध भजनी‎ मंडळाकडून भजने सादर करण्यात‎ येणार आहेत.‎ उंचीची असेल बालाजी मूर्ती‎ सोलापुरातील हे दुसरे बालाजी मंदिर ‎असेल. तिरुपती बालाजीच्या ‎मंदिरातील मूर्तीप्रमाणे मात्र अर्धा‎फूट कमी उंचीची मूर्ती या मंदिरात‎ असेल. बांधकामाचे काम सुरु‎ असून, शुक्रवारी स्लॅबचे काम सुरु होईल. महाराष्ट्रातील सर्वात मोठा ‎हा उत्तरादी मठ असेल.‎

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 10:23 am

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला:पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात आणखी वाढ होणार; हवामान विभागाचा यलो अलर्ट

उत्तर भारतातून येणाऱ्या तीव्र थंड वारा आता महाराष्ट्रात झंझावाती वेगाने प्रवेश करत असून, त्याचा परिणाम राज्यातील तापमानावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान सातत्याने खाली येत असून गुरुवारी रात्रीही राज्यातील अनेक शहरांचा पारा 10 अंशांच्या खाली सरकला. मुंबईचे किमान तापमान 15 अंशांवर तर पर्यटकांच्या आवडीचे माथेरान 17 अंशांवर नोंदले गेले. मात्र यापेक्षा तीव्र गारठा अहिल्यानगरमध्ये जाणवला, जिथे तापमान 6.6 अंशांवर पोहोचले. पुणे व नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक शहरांत पारा 7-8 अंशांदरम्यान स्थिरावला असून नागरिक अक्षरशः थरथरत आहेत. हवामान विभागाने याला पुढे आणखी तीव्रता येण्याचा इशारा दिला आहे. अहिल्यानगरने सलग तिसऱ्या दिवशीही राज्यातील सर्वात थंड जिल्हा म्हणून नोंद कायम ठेवली आहे. 6.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाने येथील थंडीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. मध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही किमान तापमान सातत्याने घसरत आहे. अनेक ठिकाणी रात्रीचा पारा नेहमीच्या सरासरीपेक्षा 4 ते 6 अंशांनी कमी नोंदला जात आहे. हवामान विभागानुसार, उत्तर भारतात तयार झालेली थंड वाऱ्यांची लाट वेगाने दक्षिणेकडे सरकत असून याचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. पुढील दोन दिवस राज्यभर गारठा अधिक प्रखर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गारांचा स्पर्श असलेल्या या थंडीत ग्रामीण, शहरी भागात रात्रीचे जीवन जणू थांबले आहे. अनेक ठिकाणी एक अंकी पारा गुरुवारी नोंदलेल्या किमान तापमानाच्या आकडेवारीत राज्यातील मोठ्या भागात शीतलहरीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. अहिल्यानगर 6.6, पुणे 7.9, जळगाव 7.0, मालेगाव 8.8, नाशिक 8.2, गोंदिया 8.0, नागपूर 8.1 अशी तापमान–नोंद झाली. महाबळेश्वर 11.1 आणि सांगली 12.3 अंशांवर नोंदले गेले. सोलापूर 13.2 तर कोल्हापूर 14.4 अंशांवर स्थिरावले. वर्धा 9.9, यवतमाळ 10, परभणी 10.4, अकोला 10.0 आणि अमरावती 10.2 अंश नोंदले गेल्याने विदर्भातही गारठा तीव्र असल्याचे दिसले. नाशिक जिल्ह्यातील निफामध्ये पारा थेट 6.1 अंशांवर घसरला, तर धुळे आणि अहमदनगरच्या काही भागांत तापमान 4 अंशांपर्यंत घसरण झाल्याची नोंद आहे. या परस्थितीमुळे मैदानी भागातही सर्वसामान्य नागरिकांनी रात्री घराबाहेर पडणे कमी केले आहे. राज्यात ऑरेंज-यलो अलर्ट; ला निनो प्रभावामुळे थंडी वाढण्याची चिन्हे राज्यातील वाढत्या थंडीमुळे हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड परिसरांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, नागपूर, गोंदिया, वर्धा अशा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तरेकडील लहरींचा वेग वाढत असल्याने पुढील काही आठवड्यांत तापमानात आणखी मोठी घसरण होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ला निनो, या हवामान प्रक्रियेच्या प्रभावामुळे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही महिने राज्यासाठी सर्वाधिक थंड ठरण्याची शक्यता आहे. हवामान बदलाचा परिणाम राज्याच्या सर्व भागात स्पष्टपणे दिसत असून, शेतकरी आणि सर्वसामान्यांनी सावधगिरी बाळगावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. पुढील 48 तास थंडीचा कडाका कायम हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात आणखी वाढ होणार आहे. विशेषत: मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, नांदेड आणि लातूर, विदर्भातील गोंदिया व नागपूर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शीतलहरीचा फटका बसल्याने सकाळ–संध्याकाळ गारठा प्रचंड वाढला असून नागरिक उबदार कपड्यांचा वापर करत आहेत. राज्यातील बहुतांश भागात दिवसा सूर्यप्रकाश दिसत असला तरी त्यात उबदारपणा कमी आहे. हवामान विभागाचा अंदाज स्पष्ट आहे, ही थंडी अजून काही काळ सोबत राहणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 10:16 am

अवास्तव भाड्यामुळे तिसरी निविदा मुदतही संपली:ट्रक टर्मिनस धूळखात, अंबड एमआयडीसीच्या आडमुठे धोरणाचा फटका

उद्योजक आणि वाहतुकदार यांच्या पाठपुराव्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अंबड एमआयडीसीसाठी ट्रक टर्मिनसची मागणी मान्य केली. यासाठी 5 कोटींतून टर्मिनस उभारण्यातही आला. मात्र अवास्तव भाडे दरामुळे चालविण्यासाठी काढलेल्या तिसऱ्या निविदेची मुदतही आता संपली आहे. त्यामुळे हे टर्मिनस धूळखात पडले आहे. अंबड एमआयडीसीतील ॲमिनिटी 57 या भुखंडावर हा ट्रक टर्मिनस उभारण्यात आला आहे. एप्रिलमध्ये तो चालविण्यास देण्यासाठी पहिली, त्यानंतर अधिक भाडेदरामुळे दुसरी आणि त्यालाही प्रतिसाद न आल्याने तिसरी निविदा काढण्यात आली. आता त्याचीही मुदत संपली आहे. दुसरीकडे औद्योगिक वसाहतीत वाहतुक कोंडीचा उद्योजक, अधिकाऱ्यांसह लाखभर कामगारांना दररोज जाच सहन करावा लागत आहे. मुळात या जाचातून सुटका व्हावी या मुख्य उद्देशाने हा ट्रक टर्मिनस उभारण्यात आला आहे. प्रकल्प चालवू मात्र भाडेरक्कम अवास्तव आम्ही ट्रक टर्मिनस प्रकल्प चालविण्यास तयार आहोत. तशी मागणीही आम्ही एमआयडीसीकडे केली आहे. मात्र, यासाठी लावलेले भाडे अवास्तव आहे. - राजेंद्र फड, अध्यक्ष, ट्रान्सपोर्ट असो. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी केवळ दर जास्त असल्याने निविदांना प्रतिसाद मिळत नसल्याचे आम्ही एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. आशिष नहार, अध्यक्ष, निमा जादा भाड्यामुळे प्रकल्प रिकामेच

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 10:09 am

जयपूरवाडीत झटका मशीन लावण्याच्या कारणावरून दोघांवर केले चाकूने वार:हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली तालुक्यातील जयपूरवाडी येथे शेतात झटका मशीन लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांना मारहाण करून चाकूने वार करीत जखमी करणाऱ्या दोघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 11 गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली तालुक्यात मागील काही दिवसांपासून वन्य प्राण्यांची संख्या वाढली असून वन्य प्राणी शेतात येऊन पिकांचे नुकसान करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने रोही, हरीण, रानडुकरा या प्राण्यांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी कळपाने फिरणारे वन्य प्राणी शेतात येऊन हरभरा, गहू या पिकांची नासाडी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, वन्य प्राण्यांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी शेताला तारेचे कुंपन लावून त्यावर झटका मशीन लावली जात आहे. या ताराला जनावरांचा स्पर्श झाल्यास त्यांना विजेचा शॉक बसल्यासारखा झटका बसतो व वन्य प्राणी शेतात येऊ शकत नाहीत. या प्रकारामुळे पिकांचे रक्षण करण्यासाठी जयपूरवाडी येथील माधव गाडे हे शेतात झटका मशीन लावत असतांना उत्तम गाडे व रामेश्‍वर गाडे तेथे आले. त्यांनी झटका मशीन लावण्याच्या कारणावरून माधव यांच्यासोबत वाद घातला. शाब्दिक चकमकीनंतर वाद वाढत गेल्याने हाणामारी झाली. यामध्ये माधव यांना चाकूने मारहाण झाली. सदर भांडण सोडविण्यासाठी माधव यांचे भाऊ शंकर हे मधे पडले असता त्यांनाही चाकूने मारहाण करण्यात आली. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी माधव यांच्या तक्रारीवरून उत्तम गाडे व रामेश्‍वर गाडे यांच्या विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, जमादार आकाश पंडीतकर पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 9:57 am

शिवराज पाटील चाकूरकर- अनुभवी नेतृत्वाची, साधेपणाची आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीची ओळख:ग्रामीण पायातून घडलेले नेतृत्व

देशाच्या राजकारणातील स्वच्छ, अभ्यासू आणि संयमी नेतृत्वासाठी ओळखले जाणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी, शुक्रवार, 12 डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ढासळलेली होती. अल्प आजाराने त्यांचे निधन झाल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली. राजकारणातून काही वर्षांपासून ते पूर्णपणे निवृत्त होते. मात्र, त्यांच्या अनुभवी नेतृत्वाची, साधेपणाची आणि शिस्तबद्ध कार्यपद्धतीची ओळख आजही कायम आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातून उदयास आलेले शिवराज पाटील चाकूरकर हे नाव आज स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण विकास आणि शैक्षणिक क्षेत्रातील उपक्रमांमुळे व्यापकपणे चर्चेत आहे. शांत स्वभाव, स्पष्ट बोलणे आणि सातत्याने कामाला प्राधान्य देणारी वृत्ती ही त्यांच्या नेतृत्वशैलीची ओळख मानली जाते. राजकारणात प्रवेश केलेल्या अनेक नव्या चेहऱ्यांमध्ये शिवराज पाटील चाकूरकर हे व्यक्तिमत्त्व वेगळे ठरते, कारण त्यांनी सत्ता किंवा पदापेक्षा कामाला अधिक महत्त्व दिले आहे. चाकूर तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग दिसतो आणि त्यामुळे ते एक विश्वासार्ह समाजनेते म्हणून ओळखले जातात. शिवराज पाटील चाकूरकर हे भारतीय राजकारणातील स्वच्छ, प्रामाणिक आणि अभ्यासू नेत्याचे प्रतीक मानले जातात. राज्यापासून दिल्लीतील सत्ता, केंद्रापर्यंत त्यांनी उच्च पदे भूषवली, पण तरीही त्यांनी कधीही आक्रमक राजकारणाचा अवलंब केला नाही. बालपण आणि शिक्षण : ग्रामीण पायातून घडलेली नेतृत्वाची पायाभरणी शिवराज पाटील चाकूरकर यांचा जन्म साध्या शेतकरी कुटुंबात. कुटुंबाची आर्थिक स्थिती मर्यादित असली तरी शिक्षणाबाबत घरात नेहमी सकारात्मक वातावरण होते. लहानपणापासूनच शिस्त, मेहनत आणि प्रामाणिकपणा या मूल्यांचा त्यांच्या स्वभावावर खोलवर परिणाम झाला. ग्रामीण भागातील सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांनी शिक्षणाची वाटचाल केली, पण शैक्षणिक गुणवत्तेबाबत ते सदैव कटाक्षाने प्रयत्नशील राहिले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चाकूर तालुक्यातील स्थानिक शाळांमधून पार पडले. महाविद्यालयीन काळात त्यांना सामाजिक कामांची विशेष आवड निर्माण झाली. युवक मंडळे आणि विद्यार्थी संघटनांमध्ये काम करताना नेतृत्वाची ताकद त्यांच्यात विकसित झाली. ग्रामीण भागातील बेरोजगारी, पायाभूत सुविधांची कमतरता आणि शिक्षणात जाणवणाऱ्या अडचणी त्यांनी जवळून पाहिल्या. याच काळात समाजासाठी काहीतरी करायचे हे ध्येय त्यांच्या मनात घट्ट रुजले. जन्म आणि शिक्षण सामाजिक कार्यातून राजकारणाकडे वाटचाल महाविद्यालयीन शिक्षणानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांनी गाव आणि तालुक्यातील सामाजिक प्रश्नांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली. शेतकरी सल्ला शिबिरे, युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन यामध्ये त्यांनी नेतृत्व केले. त्यांची कार्यशैली संयमी, प्रभावी आणि परिणामकारक अशी राहिली. त्यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे त्यांची ओळख स्थानिक प्रशासन आणि राजकीय वर्तुळात वाढू लागली. गांवपातळीवरील समस्यांचा अभ्यास करताना त्यांनी जाणीवपूर्वक राजकीय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. राजकारणात प्रवेश हा त्यांच्यासाठी सत्तेचा मार्ग नव्हता, तर समाजकार्यासाठी अधिक मोठी व्यासपीठ मिळवण्याचा प्रयत्न होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. सार्वजनिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे, ग्रामसभांमध्ये भाग घेणे, भ्रष्टाचार व निष्क्रियतेवर उघडपणे टीका करणे यामुळे ते लवकरच लोकांमध्ये लोकप्रिय झाले. त्यांच्या संवादकौशल्यामुळे आणि समस्यांवरील सखोल अभ्यासामुळे ते सर्वसामान्यांना सहज पटत गेले. नगरपालिकेतून सुरू झालेला प्रवास थेट दिल्लीपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात— 1991–1996 : लोकसभा अध्यक्षपद शांत, संयमी आणि नियमप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख याच काळात अधिक दृढ झाली. लोकसभा अध्यक्षपद भूषवताना त्यांनी अनेक संसदीय रितीरिवाज दृढ केले. 2004–2008 : केंद्रीय गृहमंत्रीपद 2004 मध्ये लोकसभेत पराभव झाल्यानंतरही काँग्रेसने त्यांच्या अनुभवाचा सन्मान ठेवत त्यांना राज्यसभेतून केंद्रीय गृहमंत्रीपदाची धुरा सोपवली. 2004 ते 2008 या काळात त्यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. 26/11 नंतरचा राजीनामा 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेले दहशतवादी हल्ले हा देशाच्या सुरक्षाव्यवस्थेचा काळा दिवस ठरला. या घटनेनंतर त्यांच्या गृहमंत्रिपदावर टीका झाली. जबाबदारी स्वीकारत शिवराज पाटील चाकूरकर यांनी 30 नोव्हेंबर 2008 रोजी स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यांचा हा निर्णय त्या काळात त्यांच्या नैतिकतेचे आणि जबाबदार नेतृत्वाचे प्रतीक ठरला. नेतृत्वशैली : लोकांमध्ये मिसळणारा, व्यवहारकुशल आणि स्पष्टवक्ते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचा जमिनीवरचा संपर्क. चाकूर तालुक्यातील प्रत्येक प्रभागात जाऊन प्रत्यक्ष संवाद साधण्याची त्यांची सवय आजही कायम आहे. त्यांची बैठकशैली अक्राळविक्राळ राजकारण्यांसारखी नसून शांत, विचारपूर्वक आणि चर्चेसाठी खुली अशी आहे. प्रश्नांची सखोल जाण, आकडेवारीसह विश्लेषण आणि स्पष्ट भूमिका मांडण्याची क्षमता यामुळे ते स्थानिक प्रशासनालाही पटवून देतात. त्यांचा मतदारांशी असलेला सहज संवाद हा त्यांच्या लोकप्रियतेचा मुख्य गाभा मानला जातो. लोकांच्या तक्रारी ऐकून घेणे, त्यावर तातडीने पावले उचलणे आणि कामाच्या प्रगतीचा आढावा घेणे, हे त्यांच्या दैनंदिन कामात नेहमी दिसते. अखंड कार्य, स्वच्छ प्रतिमा आणि अभ्यासू नेतृत्व शिवराज पाटील चाकूरकर यांनी कोणत्याही पदावर असताना कायम शांतपणे, अभ्यासपूर्वक आणि कोणत्याही दिखाव्याशिवाय काम केले. त्यांनी कधीही आक्रमक, संघर्षपूर्ण किंवा सनसनाटी राजकारणाचा मार्ग स्वीकारला नाही. त्यांचा मोजक्या शब्दांत बोलण्याचा आणि तितक्याच प्रभावीपणे मुद्दे मांडण्याचा स्वभाव आजही अनेकांना आदर्श वाटतो. गीतेची तुलना कुराणशी केल्याने वादात शिवराज पाटील यांनी गीता आणि कुराणची तुलना करणारे वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते की, जिहाद केवळ इस्लाममध्येच नाही, तर भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मातही अस्तित्वात आहे. पाटील म्हणाले की, गीतेत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहादबद्दल सांगितले. 2022 मध्ये, माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवाई यांच्या चरित्राच्या प्रकाशनादरम्यान, शिवराज पाटील म्हणाले होते की, केवळ कुराणातच नाही, तर गीतेच्या एका भागात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जिहादबद्दल सांगतात. हे फक्त कुराण किंवा गीतेतच नाही, तर ख्रिश्चन धर्मातही आहे. ख्रिश्चनांनी असेही लिहिले आहे की ते केवळ शांतता प्रस्थापित करण्यासाठी आलेले नाहीत, तर त्यांच्यासोबत तलवारीही घेऊन आले आहेत. राजकीय प्रवास

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 9:56 am

शासकीय सेवेतील प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा हे प्रभावी माध्यम:कुलगुरू डॉ. गडाख यांचे मत; स्पर्धा परीक्षा मंचचा 23 वा स्थापना दिन उत्साहात‎

आपल्या युवकांच्या देशातील बहुतांश शिक्षित तरुणाई शासकीय सेवेत समाविष्ट होण्यासाठी परिश्रमांची पराकाष्ठा करत असून स्पर्धात्मक परीक्षांच्या माध्यमातून अपेक्षित शासकीय सेवांमध्ये सहभागी होत आहेत. हे सांगतानाच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी भविष्यात कौशल्ययुक्त रोजगार तथा स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उलगडून सांगितल्या. कृषी पदवीधरांना उज्वल भविष्याविषयी अवगत केले. देशपातळीवर सर्वश्रुत कृषीचे शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ प्रशासनाच्या मदतीने स्थापन केलेल्या व आजवर शेकडो कृषी पदवीधरांना विविध शासकीय विभागांमध्ये नोकरी मिळवून देणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख स्पर्धा परीक्षा मंचच्या २३ व्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध स्पर्धा परीक्षांत यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालक भुवनेश्वरी एस. आणि फोरमचे माजी विद्यार्थी तथा उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, कुलसचिव डॉ. सतीश ठाकरे, वनविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेश हरणे, कृषी महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुधीर दलाल, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, पंजाबराव देशमुख स्पर्धा परीक्षा फोरमचे प्रभारी अधिकारी डॉ. हर्षवर्धन देशमुख, फोरमचे अध्यक्ष स्वस्तिक प्रधान, उपाध्यक्ष योगेश उगले, विद्यार्थिनी प्रतिनिधी प्राजक्ता गोमासे आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या अ, ब, आणि क वर्गातील २२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन साक्षी वांदे, कुंदन पेंडोर, वैभव ताजणे, नम्रता वानखेडे यांनी केले. आभार फोरमचे सचिव अनिकेत हरके यांनी केले. यशस्वितेसाठी फोरमचे अध्यक्ष स्वस्तिक प्रधान, उपाध्यक्ष योगेश उगळे, सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. काटेकोर नियोजनानेच स्पर्धा परीक्षेत यश ​ प्रमुख पाहुण्या बुवनेश्वरी. एस यांनी शेतीला व्यवसाय म्हणून बघितल्यास सर्वाधिक फायदेशीर करिअरचे क्षेत्र असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत कार्यरत राहून समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. त्यांचे स्पर्धा परीक्षा अभ्यास काळातील अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांची उकल केले. काटेकोर नियोजनानेच स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होता येते हे अनुभवातून सांगितले. उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांनी विद्यार्थ्यांनी झोपण्यापूर्वी केलेला अभ्यास पुन्हा एकदा मनन करावा व त्यातील न समजलेल्या गोष्टी दुसऱ्या दिवसाच्या नियोजनात अंतर्भूत कराव्या, असे सांगितले. समूह चर्चा सर्वात प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 9:19 am

माजी केंद्रीय गृहमंत्री, लातूरचे सुपुत्र शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन

लातूर (प्रतिनिधी) : माजी केंद्रीय गृहमंत्री तथा राजकीय क्षेत्रातील एक सुसंस्कृत, अभ्यासू व्यक्तिमत्त्व लातूरचे सुपुत्र शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवार, दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता येथील देवधर या त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने एक अनुभवी, सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न राजकारणी गमावला असून, कॉंग्रेस पक्षाची अपरिमित हानी झाली आहे. लातूर जिल्ह्याच्या राजकीय, […] The post माजी केंद्रीय गृहमंत्री, लातूरचे सुपुत्र शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Dec 2025 9:19 am

मूर्तिजापुरातील केंद्रांवर 68 हजार क्विंटल कापूस खरेदी:यंदा शेतकऱ्यांची सोयाबीनऐवजी कापसाला जास्त पसंती‎

यावर्षी अतिवृष्टी व पुरामुळे तालुक्यातील हजारो हेक्टरवरील सोयाबीन तसेच मूग, उडीद, तूर आणि शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाच्या पिकाचे नुकसान झाले होते. तर यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी कापसाला पसंती दिल्याने कापूस पिकाच्या आधाराने शेतकरी कसे तरी धरून असल्याचे दिसून येत आहे. शासनाने सीसीआयमार्फत खरेदीला सुरुवात केल्यानंतर आतापर्यंत तालुक्यातील सीसीआय केंद्रांवर ११ डिसेंबरपर्यंत ६८,९८१.१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. सद्यःस्थितीत कापसाचे पीक शेतात असून शेतकऱ्यांना पर्यावरणातील बदलत्या घडामोडींमुळे लाल्या रोग तसेच फुलपाती झडती आणि थंडीमुळे कापूस फुटत नसल्याने बोंडअळीच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. त्यासोबतच सर्वात मोठे आव्हान म्हणजे रानडुकरांनी मांडलेला उच्छाद आहे. रानडुकरे कापसाची बोंड खात असून कापसाची उभी झाडे मोडत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. शासनाने शेतकऱ्यांना शेती संरक्षण कुंपण निर्मिती करिता अर्थसाहाय्य करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.शेतकऱ्यांच्या एकरी उत्पन्नात घट होत असून दुसरीकडे मजुरांचा प्रश्न वाढत चालला असून कापूस वेचायचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. कापूस वेचाही प्रति किलो बारा रुपयापर्यंत पोहोचली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी झाली आहे. काही भागातील पराठीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे शेतकरी सांगत आहे. तालुक्यात एकूण ११,८१६ हेक्टर शेत जमिनीवर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ जुळेना; मजुरी परवडेना ^मी ६ एकर शेतात कापसाची लागवड केली. आतापर्यंत एकरी ५ ते ६ क्विंटल कापूस निघाला. सोयाबीन एकरी दोन क्विंटल झाले. संपूर्ण वर्ष कसे निघेल, याची चिंता आहे. कापूस वेचण्याचा खर्च १२ रुपये किलो असून मजुरी परवडेनासी झाली आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसे नासा झाला आहे. - नितीन अवघाते, शेतकरी, दुर्गवाडा. वातावरण बदलाने फुलपात्या गळाल्या; शेतकरी संकटात ^मी चार एकरात कापसाची लागवड केली. आतापर्यंत एकरी तीन क्विंटल कापूस झाला. वातावरण बदलामुळे फुलपात्या गळाल्या. थंडीमुळे कापूस फुटत नसल्याने बोंड अळीचा धोका निर्माण झाला आहे. रानडुकरांचा त्रास वाढला असून रानडुकरे झाडे तोडून बोंड खात आहेत. त्यामुळे रात्री- बेरात्री शेतात जावे लागते. शासनाने शेतकऱ्यांना कुंपणासाठी आर्थिक सहाय्य करावे. - महादेवराव नवघरे, शेतकरी, लाखपुरी.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 9:17 am

शहरात पाच लाख 39 हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त:आरोपींवर सदोष मनुष्य वधाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल‎

सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपुरी जिन परिसरात असलेल्या जनसेवा ट्रान्सपोर्ट येथे पोलिसांनी छापा टाकून ५ लाख ३९ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित चायनीज नायलॉन मांजाच्या रिल्स जप्त केल्या. मोहम्मद राजीक मोहम्मद इसाफ, रा. भारत नगर, अफोट फैल, अकोला यास अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी शेख अन्सार, रा. नायगाव, अकोट फैल अकोला याचा शोध घेणे सुरू आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसात सदोष मनुष्य वधाचा प्रयत्नाखाली गुन्हा नोंद केला आहे. चायनीज मांजा पतंग उडवण्याकरीता वापरल्यामुळे दुचाकी चालक, पादचारी तसेच पशु पक्षी इत्यादींचा जीव जाण्या इतपत गंभीर दुखापती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेते आपणास आढळून आल्यास त्याबाबत माहीती देण्याचे आवाहन अकोला जिल्हा पोलिस दलाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. मकर संक्रांतीच्या काळात मोठ्या प्रमाणावर पतंगोत्सव साजरा करण्यात येतो. पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा चायनीज नायलॉन मांजा वापरण्यावर अथवा विक्री करण्यावर शासनाने बंदी घातली आहे, असे असतानाही शहरात खुलेआम चायनीज नायलॉन मांजाची विक्री होताना दिसते. दरवर्षी मांजामुळे नागरिक, पक्षी गंभीर जखमी होण्याच्या घटना घडतात. मात्र मांजा शहरात येतो कसा? साठेबाज, डीलर कोण? त्यांच्यावर ठोस कारवाई होताना दिसत नाही. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप पळसपगार, हेड कॉन्स्टेबल अनिल खडेक्कार, विनय जाधव, रवि घिवें, संदीप गुंजाळ, पो. कॉ. शेख नदीम, प्रफुल्ल बांगर यांनी केली. तर पालकांवर गुन्हे दाखल पतंग उडवण्यासाठी नागरिकांनी जीवघेणा नायलॉन मांजा वापरू नये. या मांजामुळे कोणालाही इजा झाली तर संबंधित विक्रेता आणि मांजा वापरणारा दोघांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलेही पतंग उडवताना दिसतात. त्यांच्याकडे मांजा आढळून आल्यास त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिस अधीक्षक चांडक यांनी दिला.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 9:16 am

दिव्य मराठी अपडेट्स:मुंबईत मशिदबंदर वेस्ट परिसरात इमारतीच्या बाल्कनीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू, दोघे जखमी

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 9:15 am

प्रलंबित मागण्यांसाठी मजीप्रा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिवेशनावर दिली धडक:पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून अन्याय होत असल्याचा केला आरोप‎

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांच्या वेतन व सेवानिवृत्ती वेतनाची जबाबदारी शासनाकडे स्वीकारून मजीप्राच्या कर्मचाऱ्यांना न्याय दिला. परंतु सदर शासन निर्णयाची पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडून सतत अवेलहना करण्यात येत आहे. त्यामुळे शासन निर्णय होवूनही मजीप्रा कर्मचाऱ्यांना पूर्णपणे न्याय मिळाला नाही. मजीप्रा कर्मचारी मागील मागील पाच वर्षांपासून न्याय हक्कासाठी संघर्ष करत आहे. मात्र अजूनही त्यांना पुर्णपणे न्याय मिळाला नाही. दरम्यान त्याच प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्यावतीने गुरूवारी (दि. ११) नागपूर हिवाळी अधिवेशनात धडक दिली होती. २३ मार्च २०१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे मजीप्रा कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्याबाबतचा स्वतंत्र शासन निर्णय काढणे, सातवा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू करणे, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणे. शासन निर्णयाप्रमाणे ८० वर्षांनंतर सेवानिवृत्ती वेतन वाढ मिळणे, २४ वर्षानंतरची दुसरी कालबद्ध, आश्वासित प्रगती योजना पदोन्नती मिळणेबाबत, मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार अनुकंपा तत्त्वावर भरती करणे, रेखा / चित्रशाखा यांची २००६ ते २०११ ची थकबाकी मिळणे यासह इतर सर्व मागण्या त्वरित मान्य करण्याची मागणी आहे. या वेळी मजीप्रा संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष अरुण निरभवणे, सरचिटणीस गजानन गटलेवार, उपाध्यक्ष लक्ष्मणराव उपगंलावार, सहसचिव बाळकृष्ण जाधव, साधना भगत, दशरथ पिपरे, अरविंद परदेशी, रामेश्वर सुपकर, विजय गाडगे, चंद्रकांत चांदुरकर, रमण डागा, शरद निंबेकर, संतोष गिरी, विरेंद्र ठाकरे, भास्कर गोरे, सुभाष मेहरे, विजय देवळे, सुधाकर नेरकर, शरदसिंग चव्हाण यांच्यासह असंख्य कर्मचारी, सेवानिवृत कर्मचारी यांची उपस्थित होती. मजीप्रा संघर्ष कृषी समिती मोर्चा घेवून पोहचल्यानंतर शिष्टमंडळाने स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या वेळी मंत्री व इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी शिष्ठमंडळाने म्हणने ऐकून घेतले. तसेच समस्या सोडवण्याबाबत चर्चा केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 9:12 am

रेल्वे स्टेशनचे स्थलांतर, बंद ‘आरओबी’च्या मुद्द्यावर मोर्चा:‘विरा’ समितीच्या नेतृत्वात राजकमल चौकात केले आंदोलन‎

अमरावती मॉडेल रेल्वे स्टेशन स्थलांतर रद्द करावे आणि राजकमल चौकातील सर्वात जुना रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करावा, या मागणीसाठी आज, बुधवारी विदर्भ राज्य समितीसह (विरा) सर्वपक्षीयांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान आंदोलनावेळी सभाही घेण्यात आली. विदर्भ राज्य समितीचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्राचार्य डॉ. पृथ्वीराजसिंह राजपूत, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रंजना मामर्डे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र आगरकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. रेल्वे पूल बंद करुन आता रेल्वे स्टेशन स्थानांतराची मांडणी करण्यामागे काही लोकप्रतिनिधी आणि शहरातील भूमाफीयांचा हात असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. डॉ. राजपूत यांच्या मांडणीनुसार अमरावतीचे रेल्वे स्टेशन म्हणजे केवळ एक वास्तू नसून शहराचा इतिहास, संस्कृती, लोकव्यवहार, अर्थकारण, सामाजिक व शैक्षणिक जीवन, आवागमन आदींशी घट्ट जोडलेले नाते आहे. याचे स्थलांतरण म्हणजे फक्त लोखंडी ट्रॅक हलवणे नव्हे, तर शहराच्या चेहऱ्या-मोहऱ्यावर आणि नागरिकांच्या हक्कांवर गंभीर परिणाम करणारा प्रहार आहे. { उर्वरित पान ४ या संघटनांनी नोंदवला सहभाग राष्ट्र सेवा दल, संविधान संवाद समिती, आम्ही भारतीय जनसंस्कृतिक चळवळ, जाणीव प्रतिष्ठान, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट, संभाजी ब्रिगेड, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हज् असोसिएशन, समाजवादी शिक्षण हक्क सभा, शिक्षक भारती, राणी दुर्गावती बहुउद्देशीय संस्था, बहुजन संघर्ष समिती, प्रगतिशील लेखक संघ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार मंच, आसरा संघटना, आयटक, आम्ही भारतीय महिला समिती, ह्युमन फाऊंडेशन, पदवीधर बेरोजगार संघटना, ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन आदी संघटनाचा सहभाग होता.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 9:11 am

एमओयू बदलासाठी खलबते; डीन नागपुरात‎:‘जीएमसी’ला केवळ इर्विन नव्हे, डफरीन, सुपरच्या इमारतीची आवश्यकता, मंत्र्यांनी केले पाचारण‎

वर्षभरापूर्वी येथे सुरु झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) सध्या वेगवेगळ्या अडचणींचा सामना करीत आहे. यावर्षी सदर महाविद्यालयाच्या दुसऱ्या बॅचसाठीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे एकूण विद्यार्थी संख्या २०० वर पोहोचली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, मुला-मुलींची वसतिगृहे आदींसाठी सध्याची इमारत अपुरी पडत असल्याने जीएमसीला नव्या इमारतींची गरज आहे. त्यासाठी केवळ इर्विन हॉस्पीटलच नव्हे तर जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) व संदर्भ सेवा रुग्णालयाची (सुपर स्पेशालीटी) इमारतही हवी आहे. या पार्श्वभूमीवर जीएमसीचे अधिष्ठाता (डीन) डॉ. नंदकिशोर राऊत गेल्या दोन दिवसांपासून नागपूरात तळ ठोकूण आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व संबंधित विभागाच्या सचिवांनी त्यांना पाचारण केले आहे. तेथे होणाऱ्या बैठकीत इमारत, मनुष्यबळ, उपकरणे, यंत्रे आदी गरजेच्या बाबींवर चर्चा सुरु आहे. सूत्रांच्या मते इर्विनचे प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागादरम्यान झालेला जुना एमओयु (सामंजस्य करार) बदलवून नवा करार लवकरच केला जाणार आहे. जुन्या एमओयुनुसार केवळ इर्विनची इमारत जीएमसीला दिली जाणार आहे. त्यासाठीच्या तयारीचा एक भाग म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी त्याबाबत पत्रही जीएमसी प्रशासनाला लिहिले आहे. परंतु दरवर्षी वाढणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांसाठी केवळ इर्विनची इमारत पुरेशी नाही. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याच अधिपत्याखाली असलेले जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलदेखील जीएमसीला हवे आहे. ही बाब सदर बैठकीत तत्वत: मान्य झाल्याने त्यासंदर्भातील प्रत्यक्ष कृती लवकरच सुरु होणार आहे.यावर्षी नव्याने प्रवेश घेतलेल्या एमबीबीएसच्या शंभर विद्यार्थ्यांमुळे जीएमसीची सध्याची विद्यार्थी संख्या २०० वर पोहोचली आहे. पुढील वर्षी ती ३०० आणि त्यापुढील वर्षी ती ४०० वर पोहोचलेली असेल. दरम्यान एबीबीएसच्या द्वितीय वर्षीच्या विद्यार्थ्यांपासून पुढे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिकासाठी रुग्ण आणि दवाखाना या दोन्हींची गरज असते. त्यामुळे इर्वीनची इमारत ताब्यात घ्यावी लागेल, हे गतवर्षीच स्पष्ट झाले होते. परंतु सध्या रुजू झालेले कायमस्वरुपी डीन डॉ. राऊत यांच्या निरीक्षणानुसार केवळ तेवढ्याने भागणार नाही, भविष्यातील अचडणींवर मात करण्यासाठी इर्विन प्रशासनाच्या ताब्यातील दोन्ही रुग्णालये आणि रुग्णालयाशी संबंधित असलेले सुपर स्पेशालिटी त्यांच्या ताब्यात असणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना डॉक्टर्सपासून ते शिपायापर्यंतचे पुरेसे मनुष्यबळही लागणार आहे. या सर्व मुद्यांची मांडणी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांपुढे करण्यात आली आहे. मध्यंतरी वाढीव इमारतीचा भाग म्हणून ‘प्री फॅब’च्या इमारतीचा मुद्दाही पुढे आला होता. परंतु निधीअभावी त्याचीही दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे आहे, त्याच इमारतीत जीएमसीचे काम भागवले जात आहे. कोरोना काळात नागरिकांना क्वारंटाईन करण्यासाठी नव्या व स्वतंत्र इमारतींची गरज होती. त्यासाठी काही कार्पोरेट कंपन्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या ‘सीएसआर’ निधीतून जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या परिसरात प्री फॅबची इमारत उभी करण्यात आली आहे. कालांतराने कोरोना संपुष्टात आला. त्यामुळे ही इमारत जीएमसीला वापरण्यासाठी काहीही अडचण नव्हती. परंतु त्यात आवश्यक ते बदल करण्यासाठी जीएमसीला निधीच उपलब्ध झाला नाही. त्यामुळे ती नवीन इमारत आता गवत आणि कचऱ्याचे घर बनली आहे. ^केवळ इर्विनची इमारत ताब्यात घेऊन भागणार नाही. या रुग्णालयाच्या परिसरात नवे काहीही बांधता येणार नाही. याऊलट डफरीन आणि सुपर स्पेशालिटीचा परिसर मोठा आहे. विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने विद्यादान करण्यासाठी तिन्ही रुग्णालयांच्या इमारतींची गरज आहे. - डॉ. नंदकिशोर राऊत, अधिष्ठाता, जीएमसी, अमरावती. प्री फॅबचा मुद्दा अडगळीत नव्या इमारतीला वाव नाही

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 9:10 am

दुर्लक्ष:वाढीव पाइपलाइनचे काम रखडले; बहिरम यात्रेमध्ये पाणीटंचाई कायम, प्रशासकीय मान्यता मिळूनही पाणीपुरवठा योजनेचे काम थंडबस्त्यात‎

विदर्भात सर्वाधिक दीड महिना चालणारी बहिरम यात्रा सुरू होण्यासाठी केवळ नऊ दिवस उरले आहेत. असे असतानाही जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अमरावतीकडून पाणी पुरवठ्यासारख्या प्राथमिक गरजेकडे दुर्लक्ष केले जात आहे. या यात्रेत दररोज हजारो भाविक दर्शनसाठी येतात. त्यामुळे प्राथमिक सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. यापुर्वी सोयी सुविधेबाबत आलेल्या अडचणींवर उपायोजना करण्याबाबत निर्देश देऊनही लक्ष दिले जात नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. १५ डिसेंबर २०२३ ला येथील पाणी टंचाई संदर्भात उपाययोजना करण्याबाबत पत्रही देण्यात आले होते. यात्रेत येणारे भाविक, व्यावसायिक, दुकानदार, यात्रेकरूंना पाण्याची अडचण निर्माण होऊ नये, याकरिता वाढीव पाईपलाइन विश्रामगृहापर्यंत टाकण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद यांनी २०२३-२४ या वर्षाकरिता बोरवेल, हातपंप व जलवाहिनीसाठी राखीव (५ टक्के बंधित)निधीतील आराखड्यातून ६ लाख रुपयांना प्रसाशकीय मान्यताही प्रदान केली. तरीही अद्यापपर्यंत या कामाला सुरुवात करण्यात आली नाही. यात्रेत दरवर्षी होणारी पाणी टंचाई बघता तत्काळ पाणी संदर्भातील उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून ठोस उपाययोजनेला दिरंगाई होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. योजनेसाठी तत्काळ निधी मंजूर करून द्यावा. तसेच पाणी पुरवठा योजना तत्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष घालून ही समस्या निकाली काढणे गरजेचे आहे. ^पाणी टंचाई संदर्भात विभागाकडून आवश्यक ती कारवाई करण्यात आली आहे. प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. २ ते ३ दिवसांत निधी मंजूर होताच काम प्रारंभ केले जाईल. - मैताली उमक, अभियंता,पाणी पुरवठा विभाग जि.प.चांदूर बाजार

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 9:09 am

नांदगाव खंडेश्वर तहसीलला अखेर मिळाले दोन नायब तहसीलदार:एका नायब तहसीलदारासह काही पदे अद्यापही रिक्तच‎

गेल्या अनेक वर्षांपासून नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांसह अनेक महत्त्वाची पदे रिक्त होती. त्यामुळे तालुक्यातील सामान्य नागरिकांची कामे मोठ्या प्रमाणात रखडली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने येथे सुनील राठोड, सदानंद देशपांडे या दोन नायब तहसीलदारांची नियुक्ती करण्यता आली आहे. मात्र अद्यापही एका नायब तहसीलदारासह येथील इतर काही पदे अजूनही रिक्तच आहेत. प्रशासनाने त्याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विविध विभागांचे अतिरिक्त काम असल्याने येथील कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला होता. ही बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर येथे दोन नायब तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये सुनील राठोड, सदानंद देशपांडे यांचा समावेश आहे. राठोड यांच्याकडे निवासी नायब तहसीलदार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सदानंद देशपांडे यांची महसूल नायब तहसीलदारपदी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या दोन्ही नियुक्त्यांमुळे महसूल, प्रमाणपत्रे, फेरफार, नोंदणी, तक्रार निवारण आदी महत्त्वाच्या कामांना गती येण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.वृद्ध, दिव्यांग, निराधार महिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार पदावर मात्र अद्याप नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे पेन्शनसाठी अर्ज करणाऱ्या वृद्धांना पायपीट करावी लागत आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 9:08 am

विज्ञान प्रदर्शनात धानोरा म्हाली, जिंगलबेल शाळेची बाजी:प्राथमिक 37, माध्यमिक 22, शिक्षक गटात 1 प्रतिकृतींचा समावेश‎

शिक्षण विभाग पंचायत समिती चांदूर रेल्वे, तालुका मुख्याध्यापक संघ व विज्ञान अध्यापक मंडळ आदींच्या संयुक्त विद्यमाने ५३ वी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दि. ८ ते १० डिसेंबर दरम्यान स्व.अतुल जगताप माध्यमिक विद्यालय चांदूर रेल्वे येथे करण्यात आले होते. या प्रदर्शनात प्राथमिक गटातून जिल्हा परिषद पूर्व मा. शाळा धानोरा म्हाली, माध्यमिक गटातून श्री जिंगल बेल इंग्लिश स्कूल चांदूर रेल्वे यांनी बाजी मारली. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे ९ डिसेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ यांनी उद्घाटन केले. या वेळी राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पराग वडनेरकर हे अध्यक्षस्थानी होते. उपशिक्षणाधिकारी निखील मानकर, विस्तार अधिकारी रवींद्र दिवाण, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण दिवे, सचिव प्रदीप नानोटे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रदीप तळोकर, सचिव उमेश ढगे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभागातून ३७ व माध्यमिक गटात २२ प्रतिकृती मांडण्यात आल्या. तसेच शिक्षक गटात एका प्रतिकृतीचा समावेश होता. स्पर्धेत प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक अनस्ता छोटू खान (जि.प.पूर्व मा.शाळा धानोरा माली), द्वितीय क्रमांक माही काळमेघ (राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल चांदुर रेल्वे) व तृतीय क्रमांक अभिजात भरडे (समता विद्यालय, जळका जगताप) यांनी तर माध्य. गटातून प्रथम क्रमांक अनुष्का नागमोते (जिंगल बेल इंग्लिश स्कूल चांदुर रेल्वे), द्वितीय क्रमांक रश्मी लीलाधर लोमटे (श्री संत लहानुजी महाराज विद्यालय कवठा कडू) तर तृतीय क्रमांक अर्पित पोकळे (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मालखेड रेल्वे) यांनी पटकावला. प्राथमिक शिक्षक गटातून निलेश इंगोले (सरस्वती प्रा. शाळा चांदूर रेल्वे) यांनी यश संपादन केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. डॉ. प्रवीण सरदार, प्रा. संपदा पाथरकर, प्रा. रोशनी भगत व प्रा. डॉ. सुरेंद्र वाणी यांनी केले. बक्षीस वितरण कार्यक्रम डॉ. पराग वडनेरकर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या वेळी विशाल भोयर, श्रीनाथ वानखडे, प्रदीप तळोकर, प्रताप बोदिले, पूंजाजी आंधळे आदी उपस्थित होते. संचालन प्रा. अन्ना पाटील, श्वेता पिंजरकर, तर आभार काकडे, प्रदीप तळोकर यांनी मानले. चिमुकल्यांवर झाला कौतुकांचा होतोय वर्षाव विज्ञान प्रदर्शनात प्रथमच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालखेड रेल्वे येथील इयत्ता दुसरी मधील सई सागर पटले, अनन्या मंगेश इंगळे या चिमुकल्यांनी हवेचे प्रयोग सादर केले. यासह इतर विद्यार्थ्यांनीही नेत्रदीपक प्रयोग सादर केले ते बघून परीक्षक व पाहुणेही आनंदीत झाले. कारण, या प्रयोगांमध्ये एकसारखेपणा नव्हता. वेगवेगळी विषय हाताळण्यात आले होते. अगदी बालवयातील चिमुकल्यांचा उत्साह व हजरजबाबीपणा पाहून परीक्षक व इतर पाहुण्यांनी चिमुकल्यांचे कौतुक केले.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 9:08 am

ऊस दरासाठी ‘सीताराम’चे गाळप बंद, 2 तास रास्ता रोको‎:गव्हाणीत उड्या घेऊन ‘सीताराम’ केला बंद; आज विठ्ठल आणि पांडुरंग कारखान्यावर शेतकऱ्यांचा मोर्चा‎

ऊस दराच्या मागणीसाठी पंढरपूर तालुक्यात सुरू झालेले आंदोलनाने अधिक उग्र स्वरुप घेतले. गुरुवारी सर्वाधिक रहदारीचा पालखी महामार्ग शेतक-यांनी रोखल्याने तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सीताराम शुगरच्या गव्हाणीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उड्या टाकून कारखान्याचे गाळप बंद पाडले. शुक्रवारी श्री विठ्ठल सहकारी आणि श्री पांडुरंग सहकारी या दोन्ही साखर कारखान्याचे गाळप बंद पाडण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिलेला आहे. दरम्यान, चौथ्या दिवशीही उपोषणकर्त्यांची प्रकृती आणखीच खालावली आहे. डॉक्टरांनी उपचार घेण्याची विनंती केली, तरीही आंदोलक उपचार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे दक्षता म्हणून बुधवारी रात्रीपासून कर्डियाक रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक आंदोलन स्थळी ठेवले आहे. गुरुवारी दिवसभरात हजारो शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांना पाठिंबा जाहीर केला आहे. वाखरी ( तालुका पंढरपूर ) येथील पालखी तळावर सोमवारपासून ऊस दर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण आंदोलन सुरू आहे. परंतु शासन व प्रशासन स्तरावरुन यासंदर्भात कसलीच दखल न घेतल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते समाधान फाटे, गणेश कौलगे, बाळासाहेब जगदाळे आणि राहुल पवार हे चार जण उपोषण करत असून त्यांची प्रकृती खालावली आहे. गुरुवारी चौथ्या दिवशी आंदोलन अधिक उग्र झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी येथील पालखी तळ चौकात शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी संघटनेचे तानाजी बागल, सचिन पाटील, दीपक भोसले यांच्यासह विठ्ठल सहकारीचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके उपस्थित होते. यावेळी जवळपास एक हजाराहून अधिक शेतकरी दोन कारखान्याच्या कार्यकारी संचालक राजलक्ष्मी गायकवाड यांनी यावेळी आंदोलकांशी चर्चा केली. सध्या कारखान्याने २८०० रुपये प्रतिटन उचल दिलेली आहे. मात्र संघटनेचा आग्रह लक्षात घेता ३ हजार रुपये पहिली उचल देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. तशा प्रकारची घोषणा गायकवाड यांनी आंदोलनासमोर येऊन केली. यानंतरही पहिली उचल ३५०० रुपये द्यावी, मागणीवर आपण ठाम आहेत. दोन आंदोलकांना रुग्णालयात हलवले गुरुवारी सायंकाळी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर राहुल पवार आणि बाळासाहेब जगदाळे या दोन आंदोलकांना रात्री पावणे नऊ वाजता उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दोघा आंदोलनांचा रक्तदाब आणि शुगर पातळी कमी झाली आहे. तसेच एका आंदोलकाचा पाय जड झाल्याची तक्रार असल्याने डॉक्टरांनी दोघांनाही उपचारासाठी दवाखान्यात हलवले आहे. ^सीताराम साखर कारखान्याने मागील सर्व हंगामात शेतकऱ्यांना चांगला भाव दिलेला आहे. चोख वजन काटा असल्यामुळे शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्वास आहे. यंदाच्या हंगामातही पहिली उचल २ हजार ८०० रुपये प्रतिटन देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्यास भरपूर ऊस पुरवठा केलेला आहे. परंतु शेतकरी संघटनांची आग्रही मागणी लक्षात घेता, सर्व बाजूने आर्थिक गणित जुळवण्याचा प्रयत्न असून पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये देण्याची आमची तयारी आहे. - राजलक्ष्मी गायकवाड, कार्य.संचालक, सीताराम शुगर्स, खर्डी ^एक टन ऊसापासून किमान ११ टक्के साखर उतारा गृहीत धरल्यास ११० किलो साखर तयार होते, त्यामुळे साखरेचे ४२०० रुपये मिळतात आणि बगॅस, मळी, सह वीजनिर्मिती, इथेनॉल आदी उप पदार्थ मधून प्रतिटन सातशे ते आठशे रुपये मिळतात. असे एकंदरीत एक टन ऊसापासून ५ हजार ते ५२०० रुपये साखर कारखान्यास मिळतात. त्यापैकी ऊस तोडणी, वाहतूक, आणि साखर निर्मिती प्रक्रिया खर्च ९०० रुपये ते एक हजार रुपये येतो, असे साखर कारखान्यांच्या वार्षिक अहवालात नमूद केलेले आहे. संग्राम गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष, बळीराजा शेतकरी संघटना युवा आघाडी रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला मोर्चा खर्डी येथील सिताराम शुगर कडे वळवला. कारखान्यावर जाऊन शंभराहून अधिक शेतकऱ्यांनी ऊस गव्हाणीत उड्या मारल्या आणि गाळप बंद पाडले. यावेळी कारखाना प्रशासन, कर्मचारी आणि पोलिस यांच्यात जोरदार वादावादी झाली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, तालुका पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा होता. शुक्रवारी शेतकरी संघटनेचे आंदोलक शुक्रवारी ऊस दराच्या मागणीसाठी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना येथे आंदोलन करून गाळप बंद करणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेकडून देण्यात आली आहे. तास रस्त्यावर ठिय्या मारून बसले होते. ऊस दर प्रश्नी आडमुठी भूमिका घेतल्याबद्दल साखर कारखानदार आणि बघायच्या भूमिकेत असलेले सरकार यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र स्वरूपात भावना व्यक्त केल्या. सुमारे दोन तास संपूर्ण वाहतूक ठप्प झाल्याने पंढरपूर - पुणे पालखी महामार्ग आणि पंढरपूर सातारा या मार्गावरील सर्व वाहतूक जाग्यावर थांबलेली होती. एक मोटार सायकल सुद्धा आंदोलकांनी सोडली नव्हती. त्यामुळे चार मार्गावर सुमारे दोन किमी हून अधिक लांब वाहनांच्या रांगा दुतर्फा लागलेल्या होत्या. मागील अनेक वर्षात गुरुवारचे रास्ता रोको आंदोलन सर्वात मोठे असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तालुक्यातील सर्व साखर कारखानदारांना त्यांच्या मागण्यांचा विचार करून ऊस दर जाहीर करण्याचा इशारा देतानाच यापुढे ऊस तोडणी, ऊस वाहतूक बंद केली जाईल, साखर कारखानदारांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा प्रकारचे इशारे देण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 8:56 am

मराठा आरक्षणावर हायकोर्टात जोरदार युक्तिवाद:राज्य सरकारचा अधिकार मर्यादेबाहेर असल्याचे याचिकाकर्त्यांचे मत; पुढील सुनावणी 17 जानेवारी रोजी

मराठा समाजाला मागासवर्गात समाविष्ट करताना राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालावर मुंबई उच्च न्यायालयात मोठी कायदेशीर लढत सुरू आहे. विविध याचिकाकर्त्यांनी न्यायालयात मांडलेल्या आक्षेपांमध्ये राज्य सरकारने घेतलेला निर्णय संविधानिक मर्यादेबाहेर असल्याचे ठाम मत व्यक्त करण्यात आले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी संमत केलेल्या कायद्याला आव्हान देत, या निर्णयाचा अधिकार मूलत: केंद्र सरकारकडे असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडत राज्य सरकारने संविधानातील तत्त्वांना धक्का दिल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा कायदेशीर आणि राजकीयदृष्ट्या केंद्रस्थानी आला आहे. या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या पूर्णपीठासमोर प्रकरणाचे विस्तृतपणे विवेचन करण्यात आले. याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर यांनी आपल्या मांडणीत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल त्रुटीपूर्ण असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी स्पष्ट केले की, सामाजिक आणि शैक्षणिक निकषांवर आधारित आरक्षण आणि जातीय निकषावर दिले जाणारे आरक्षण यांमध्ये मूलभूत फरक आहे. मात्र, मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण हे समाजाच्या एकूण जातीच्या आधारावर दिले गेले असून ते संविधानाच्या चौकटीबाहेर असल्याचा दावा त्यांनी खंडपीठासमोर मांडला. राज्य सरकारने स्वतःच्या मर्यादा ओलांडत केंद्राच्या अधिकारक्षेत्रातील मुद्द्यात हस्तक्षेप केला आहे, असेही त्यांनी नमूद केले. याचिकाकर्त्यांचा मुख्य आक्षेप 50 टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेभोवती केंद्रित होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेली आरक्षण मर्यादा राज्याने मागील कायद्यांच्या धर्तीवर तोडली असून हे संविधानिक उल्लंघन मानले पाहिजे. राज्याच्या कायद्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले असले तरी ते वैध नाही आणि न्यायालयाने ते रद्दबातल ठरवावे, अशी विनंती करण्यात आली. याच संदर्भात काही याचिकाकर्त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील निष्कर्षांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अहवालातील आकडे, सामाजिक सर्वेक्षण आणि त्यातून काढलेले निष्कर्ष हे अपुरे आणि तांत्रिकदृष्ट्या कमकुवत असल्याचेही युक्तिवादात नमूद करण्यात आले. मराठा आरक्षणाला समर्थन देणाऱ्या याचिकाही न्यायालयात दाखल दुसऱ्या बाजूला, मराठा आरक्षणाला समर्थन देणाऱ्या याचिकाही न्यायालयात दाखल झालेल्या आहेत. या याचिकांमधून राज्य सरकारचा निर्णय योग्यच असल्याचे प्रतिपादन केले जात आहे. मात्र, आजच्या सुनावणीमध्ये प्रामुख्याने विरोधकांचा पक्ष मांडण्यात आला. अनिल अंतुरकरांनी केंद्र सरकारच सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातील बदल करण्याचा एकमेव अधिकार राखून ठेवते, असा मुद्दा ठामपणे मांडत राज्य सरकारचा निर्णय एकूणच कायदेशीर निकषांनुसार टिकणारा नाही असे सांगितले. त्यांनी दाखवून दिले की, सरसकट समाजाला मागास घोषित करून अतिरिक्त आरक्षण देणे हे संविधान आणि न्यायालयीन निर्णयांच्या विरोधात आहे. या सर्व मुद्द्यांवर न्यायालयाने गंभीरपणे नोंद घेतली आहे. पुढील सुनावणी 17 जानेवारी रोजी होणार वेळेअभावी आजचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने पूर्णपीठाने पुढील सुनावणी 17 जानेवारी रोजी होणार असल्याचे घोषित केले. या सुनावणीत दोन्ही बाजूंचे युक्तिवाद सविस्तररीत्या ऐकले जाण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षण हा राज्यातील अत्यंत संवेदनशील आणि मोठा राजकीय प्रश्न असल्याने या खटल्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. न्यायालयाचा अंतिम निर्णय राज्यातील आरक्षण रचनेवर आणि पुढील धोरणांवर दूरगामी परिणाम करू शकतो. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत काय निष्पन्न होते, हे पाहण्यासाठी समाज, राजकीय पक्ष, तसेच कायदा तज्ञ यांच्यात उत्सुकता वाढली आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 8:55 am

मोहोळ सर्व्हिस रोडवर दररोजचीच कोंडी:बससह जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग द्यावा, वाहतुकीसंदर्भातील बैठक झालीच नाही, अधिकाऱ्यांची पाहणी कागदावरच‎‎

मोहोळ शहरासह तालुक्यातून कन्या प्रशाला, नेताजी प्रशाला, स्वामी विवेकानंद, प्राथमिक कन्या प्रशाला, नेताजी कला व विज्ञान ज्युनिअर कॉलेज, देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय, इंग्लिश मीडियमसह इतर स्कूलमध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पुणे, मुंबई, सांगली, पंढरपूर, सांगोला येथून मोहोळ बसस्थानकावर येणाऱ्या एसटी बससह खाजगी वाहतुकीमुळे सर्व्हिस रोडवरती वाहनांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितेस संभाव्य अपघाताचा धोका निर्माण झाल्याने पर्यायी व्यवस्था करण्याची मागील अनेक वर्षापासून पालकांसह विद्यार्थ्यांतून मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसह राष्ट्रीय दळणवळणाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती केली गेली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशासह सोलापूर, पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेऊन रुंदीकरण केले. मात्र मोहोळ शहरातील उड्डाण पुलावर पंढरपूर, सांगोला, पुणे, मुंबईसह इतर ठिकाणावरून मोहोळ बस स्थानकावर येणाऱ्या बस गाड्या सोलापूरकडे जात असताना सदर गाड्यांना उड्डाणपुलावर जाण्यासाठी मार्ग केला गेला नाही. त्यामुळे सदर गाड्या सर्व्हिस रोडवरून मोहोळ शहराच्या मुख्य वर्दळीच्या ठिकाणावरून जात आहेत. सदर सर्व्हिस रोडवरून ५ विद्यालयांसह कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थिनी जात आहेत. सदर ठिकाणी वाहनांची पूर्वीपेक्षाही मोठी गर्दी होत असल्याने अनेकदा लहान-मोठे अपघात झाले आहेत. काहींना कायमचे दिव्यांग तर काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. सदरची वाहतूक कोंडी रोखण्यासाठी मोहोळ बस स्थानकासमोरील पुणेकडे जाण्यासाठी ब्रिजवरती ज्या पद्धतीने रॅप करण्यात आला. त्याच पद्धतीने सोलापूरकडे जात असताना हॉटेल लोकसेवा नजीक असणाऱ्या बोगद्याच्या बाजूस असणाऱ्या चारशे फूट लांबी, ४० फूट रुंदी, अनावश्यक सोडलेल्या रिकाम्या जागे जागे वरती बसस्थानका समोरील रॅप प्रमाणेच रॅप केल्यास वाहतूक रोखण्यास मदत होईल. तसेच सोलापूरवरून मोहोळ बस स्थानकाकडे येणाऱ्या वाहनांसाठी हॉटेल शिवम जवळ मोहोळ पोस्ट ऑफिस कार्यालयासमोर केलेल्या रॅप प्रमाणे उतरण्यासाठी रॅप केल्यास विद्यार्थ्यांच्या जीवतेस होणारा धोका टाळण्यास मदत होईल. परंतु अनेकदा मागणी केली असता एनएचआय कंपनीसह प्रशासन या महत्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहावयास मिळत आहे. मुलांच्या जीवितास धोका निर्माण ^मुलांना शाळेमध्ये सोडण्यासाठी येत असताना सर्व्हिस रो वरती मोठी गर्दी होत असल्याने गर्दीतून अपघात होण्याची शक्यता वाटत असल्याने येण्यासाठी भीती वाटत आहे. आमच्यासह आमच्या मुलांच्या जीवेतेस होणारा धोका टाळण्यासाठी सर्व्हिस रोडवरील दोन्ही बाजूची वाहतूक राष्ट्रीय महामार्गावरून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. बंटी क्षीरसागर, पालक लोकेशन पाठवा सदर ठिकाणची पाहणी करतो ^स्पॉट समजण्यामध्ये अडचण होत आहे. मला लोकेशन पाठवा सदर ठिकाणची पाहणी करतो. पांडे, एनएचआय अधिकारी रॅप केल्यास अपघात टाळण्यास होईल मदत सर्व्हिस रोडवरून होणाऱ्या गर्दीचा विचार करून कुरुलकडे वळणाऱ्या उड्डाणपूला नजीक अनावश्यक सोडलेली जागा यावरून स्वतंत्र सर्व्हिस रोड किंवा मोहोळ बसस्थानकासमोरील पद्धतीने रॅप केल्यास राष्ट्रीय मार्ग क्र.६५ वर गर्दी आटोक्यात येण्यास मदत होईल. तर शुभम हॉटेलसमोर मोहोळ पोस्ट ऑफिससमोर केलेल्या रॅम्पप्रमाणे उतरण्यास रॅप केल्यास गर्दीसह अपघाताचा धोका टाळण्यास मदत होईल.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 8:54 am

आयुष्यमान योजना व्हेंटिलेटरवर, केवळ 97 हजार 14 लाभार्थ्यांनी केली नोंदणी:मोहोळ तालुक्यातील 101 गावात शिबिरे घेण्याचे आरोग्य विभागाचे नियोजन‎

आजच्या युगात बदलत्या काळानुसार उपचार महाग होत चालले आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना अनेक गंभीर आजारांवर उपचार घेणे कठीण होत आहे. हे लक्षात घेऊन,सरकार प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देत आहे. याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना आयुष्मान कार्ड बनवावे लागते मात्र मोहोळ तालुक्यातील २ लाख ८२ हजार ४६५ लाभार्थ्यांपैकी फक्त ९७ हजार १४ लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत कार्डचे काम झालेले असून १ लाख ८५ हजार ४५१ लाभार्थ्यांचे काम राहिले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तालुक्यात सर्वात जास्त काम अनगर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत झाले आहे तर सर्वात कमी काम कामती केंद्राअंतर्गत झाल्याचे निदर्शनास येते. सोमवारी (८ डिसेंबर) रोजी पंचायत समिती येथे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासंदर्भात तसेच लाभार्थ्यांची केवायसी करण्याबाबत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायक, सहायिका, आरोग्य सेवक-सेविका तसेच आशा गटप्रवर्तक यांची तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अरुण पाथरुडकर यांनी मार्गदर्शन सभा घेतली. यात सर्वांना आयुष्यमान भारत कार्ड संबंधित माहिती देत अपूर्ण राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत असणाऱ्या प्रत्येक तालुका लोकसंख्या झालेले राहिलेले अनगर ५२६८० २७००३ २५६७७ अंकोली १९६२७ ५६८८ १३९३९ बेगमपूर २४८९१ ११७४९ १३१४२ कामती २५२८४ ३३०७ २१९७७ कुरुल २४९७२ ८९३९ १६०३३ नरखेड २६३५१ ८०५५ १८२९७ पाटकूल ४७१८३ १३०४२ ३४१४१ शिरापूर ६१४७६ १९२३१ ४२२४५ मोहोळ २८२४६५ ९७०१४ १८५४५१ Share with facebook गावात यासाठी शिबिरे आयोजित करण्यात येणार असून त्याचे नियोजन सुरु असल्याचेही आरोग्य विभागाकडून समजते. अनगर प्राथमिक केंद्राअंतर्गत तालुक्यात सर्वाधिक २७ हजार ३ लाभार्थ्यांचे कार्डचे काम झाले आहे, तर सर्वात कमी फक्त ३ हजार ३०७ लाभार्थ्यांचे काम कामती आरोग्य केंद्राअंतर्गत झाले आहे. लाभार्थ्यांनी सहकार्य करावे ^जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान भारत कार्ड संदर्भात संबंधितांची बैठक घेतली असून त्यांना सूचना दिल्या आहेत. अपूर्ण राहिलेल्या कामासाठी तसेच केवायसी करण्यासाठी तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३९ उपकेंद्र आणि १०१ गावातील सर्व संगणक ऑपरेटर कार्यान्वित करत गावनिहाय शिबिरे ही आयोजित करण्यात येणार आहेत, लाभार्थ्यांनी पुढे येत सहकार्य करावे. डॉ.अरुण पाथरुडकर (तालुका आरोग्य अधिकारी,मोहोळ)

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 8:54 am

शेळगाव वांगी येथे केळी संशोधन केंद्र उभारण्यात यावे:केंद्रीय कृषी मंत्र्याकडून कार्यवाहीचे आश्वासन‎

करमाळा तालुक्यातील शेलगाव (वांगी) येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत ‘केळी संशोधन केंद्र’ स्थापन करण्याची मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन केली. खासदार मोहिते पाटील यांनी कृषीमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, देशातील एकूण केळी उत्पादनात महाराष्ट्राचा १४.२६ टक्के तर भारतातून होणाऱ्या केळी निर्यातीपैकी तब्बल ६३ टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. सोलापूर जिल्हा हा निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी देशभर परिचित असून मागील वर्षी राज्यातील १२.४३ लाख मेट्रिक टन केळी निर्यातीपैकी जवळपास ८.२६ लाख मेट्रिक टन, म्हणजे ६६.४३ टक्के निर्यात केवळ सोलापूर जिल्ह्यातून झाल्याचे सांगितले. केळी उत्पादनात जागतिक स्तरावरील स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी वैज्ञानिक संशोधन, नवीन वाणांची निर्मिती, कीड-रोग व्यवस्थापन व प्रशिक्षण सुविधा अत्यावश्यक असल्याचे सांगत, शेलगाव (वांगी) येथे संशोधन केंद्र तातडीने उभारावे, अशी ठा मागणी खासदार मोहिते पाटील यांनी यावेळी केली आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही मागणी तातडीने विचारात घेऊन पुढील आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे खासदार यांनी माहिती दिली. जिल्ह्यात ३२ हजार हे. क्षेत्र केळी लागवड शेलगाव (वांगी) येथे सुमारे १०० एकर शासकीय जमीन उपलब्ध असून विद्यमान राज्य फळ नर्सरी व शुष्क क्षेत्र संशोधन केंद्राच्या पायाभूत सुविधांमुळे हे ठिकाण केळी संशोधन केंद्रासाठी सर्वाधिक योग्य असल्याचे खासदारांनी स्पष्ट केले. याशिवाय सोलापूर जिल्ह्यात सध्या ३२ हजार हेक्टर क्षेत्रात केळी लागवड होत असल्याची माहिती त्यांनी कृषीमंत्र्यांना सविस्तर दिली.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 8:53 am

शेतकऱ्यांच्या ई- केवायसी कामात हलगर्जीपणा:शाखाधिकाऱ्याच्या बदलीची ग्रामस्थांची मागणी

शेतकऱ्याच्या केवायसी कामात हलगर्जीपणा करून ग्राहकांना त्रास देणाऱ्या शाखा अधिकारी खिलारे यांची तात्काळ बदली करण्याची मागणी गोगांव ग्रामपंचायतीचे उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांनी मुख्य व्यवस्थापक लिड बँक सोलापूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. बदली न झाल्यास वागदरी शाखेत बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. अक्कलकोट तालुक्यातील भारतीय स्टेट बँक शाखा वागदरी या शाखेस गोगांव हे गांव दत्तक असून यासोबत खैराट, किरनळी, भुरीकवठे, घोळसगाव, बोरगाव हे गावे दत्तक आहेत. याठिकाणी जास्ती- जास्त शेतकऱ्याचे खाते नियमित चालु आहे. दरम्यान या बँकेत शेतकरी ई- केवायसी करण्यासाठी बँकेत गेले असताना ग्राहकांना अरेरावी भाषा वापरणे, त्रास देऊन ग्राहक सेवा केंद्राकडे जाणीवपूर्वक पाठवणे. महिला, वृद्ध, लोकांना खात्यावरील पैसे न देता ग्राहक सेवा केंद्रात जाण्यास सांगणे, मुद्दाम शाखेतील केवायसी सिस्टिम बंद असल्याचे सांगून ग्राहक सेवा केंद्रात पाठवू त्याठिकाणी लोकांकडून जास्त पैसे लुटाण्यास सांगून त्यात भागीदारी होणे. शेतकरी पीक कर्ज मागणी केल्यास त्यांना ओरडून बोलणे व शेती कर्ज देत नाही कुणाला सांगायचे त्यांना सांगा असे वक्तव्य करत आहे. शेतकरी कर्जासाठी विनंती केल्यावर अरे रावी बोलणे, पोलिसांची धमकी दाखवणे असे कृत्य करत असून वागदरी परिसरातील ग्राहकांनी त्यांच्या कृत्याने वैतागले आहेत. दत्तक गावामध्ये केवायसी बाबत जनजागृती करून किती गावात शिबीर घेऊन ग्राहकांना लाभ देण्यात आल्याची माहिती सुद्धा देऊ नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. शाखा अधिकारी समोर हलगी आंदोलन करणार ^लोकांच्या समस्या घेऊन विचारपूस केल्यावर अरेरावी शब्द वापरणे, उत्तर न देता पोलिसांची धमकी देऊन शिवीगाळ करणे, अशा अशोभनीय वर्तन व बेजबाबदार काम करणाऱ्या शाखा अधिकाऱ्याला येत्या ८ दिवसांत बदली न केल्यास वागदरी शाखेतील शाखा अधिकारी खिलारे यांच्यासमोर हलगी नाद आंदोलन करून अन्यायग्रस्त शेतकरी व वंचित घटकातील गोरगरीब जनतेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल. कमलाकर सोनकांबळे, उपसरपंच

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 8:52 am

आजच्या समाजाला अध्यात्माची खरी गरज- रामगिरी महाराज:नंदनवननगर येथे काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता, भाविकांची उपस्थिती‎

मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्याचा मनाची वृत्ती बदलली पाहिजे. मनोवृत्तीत बदल झाला तरच खऱ्या अर्थाने सर्वत्र शांतता समाधान नांदेल. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये आहे. आज समाजाला आध्यात्म्याची गरज आहे. यासाठी हरिनाम सप्ताह, शिवकथा असे उपक्रम आवश्यक आहेत. अशा उपक्रमांच्या माध्यमातूनच समाजाला योग्य दिशा मिळते.' असे प्रतिपादन सरालाबेटाचे महंत व प्रसिद्ध कीर्तनकार रामगिरी महाराज यांनी केले. शहरातील नंदनवननगर येथे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्याची सांगता सरलाबेटचे महंत व प्रसिद्ध कीर्तनकार रामगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. भक्तिमय वातावरणात झालेल्या कीर्तनात महंत रामगिरी महाराजांनी केलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या लीलांच्या वर्णनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. या कीर्तन सोहळ्यात रामगिरी महाराजांनी संत परंपरा, श्रीकृष्णाच्या बाललीला, भक्तीचा सार आणि समाजासाठी अध्यात्मिक मार्गदर्शन यांची सांगड घालून विविध दाखल्यांनी भाविकांचे प्रबोधन केले. कीर्तनात टाळ मृदुंगाच्या तालात सादर झालेल्या अभंगांनी वातावरण भक्तीमय झाले. महंत रामगिरी महाराजांनी भगवंताच्या नामघोषात काल्याची दहीहंडी फोडून कीर्तन सोहळ्याची सांगता केली. यावेळी संयोजक व भाविकांनी रामगिरी महाराजांचा सन्मान केला. प्रास्ताविकात विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष कारभारी शेंडे म्हणाले, नंदनवननगरमध्ये झालेला रामेश्वर प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा ऐतिहासिक झाला आहे. सात दिवस चाललेल्या या सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंदिर उभारणीसाठी व महादेव पिंडीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा यशस्वी होण्यासाठी शेकडो दानशूर भाविकांनी सर्व प्रकारची खूप मदत केली. माजी नगरसेवक संपत बारस्कर यांनी आभार मानले. यावेळी समाजिक कार्यकर्ते शिवाजी चव्हाण, विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दीपक दहे, सचिन पवार, नवनाथ एकशिंगे, मनोज लाटे, बाबासाहेब गिरगुणे, सतीश कावरे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सोहळ्यासाठी उपस्थित भाविकांना पुरणपोळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांची अलोट गर्दी सात दिवस चाललेल्या या सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंदिर उभारणीसाठी व महादेव पिंडीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा यशस्वी होण्यासाठी शेकडो दानशूर भाविकांनी सर्व प्रकारची खूप मदत केली.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 8:28 am

शेतकऱ्यांना मिळणार तंत्रज्ञान अन् पीक व्यवस्थापनाचे धडे:कृषीदूत विद्यार्थ्यांचे खेडले काजळीकरांनी केले उत्स्फूर्त स्वागत, नागरिकांची मोठी उपस्थिती‎

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषि महाविद्यालय, सोनई महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक संलग्नक अंतर्गत खेडले काजळी गावात दाखल झाले. या कृषीदूतांचे ग्रामपंचायतीच्यावतीन े स्वागत करण्यात आले. यामध्ये सैवर रुद्र, मोरे ओंकार, पाचोरे सार्थक, चौधरी पृथ्वीराज, साबळे आतिश, ढोके प्रज्वल, शिंदे ज्ञानेश्वर यांचा समावेश आहे. आता हे विद्यार्थी शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत. गावामध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे ग्रामीण जीवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, नैसर्गिक साधन संपत्ती, समाजातील सामाजिक स्थिती, पीक पद्धती या विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही विविध कार्यक्रम व प्रात्यक्षिक दाखविणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. माती व पाणी परीक्षण, विविध पिकांची लागवड तंत्रज्ञान, पिकांवर येणारे रोग व किडी याची माहिती व व्यवस्थापन, जनावरांची काळजी व संगोपन तसेच शेतीशी निगडित विविध समस्यांचे निराकरण, बीज प्रक्रिया या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य प्रा. सुनील बोरुडे , कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल दरंदले, कार्यक्रम अधिकारी श्रीकृष्ण हुरुळे, डॉ. एस. बी. चौगुले, प्रा. डॉ. निर्मला विधाते आदींसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या प्रसंगी सहायक कृषी अधिकारी राहुल दांडगे, माजी सरपंच बाळासाहेब कोरडे, संजय उदे, कल्याण उदे, नारायण उदे, नारायण कोरडे, रविंद्र कोरडे आदींसह ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी तालुक्यातील विविध गावांना भेटी देत आहेत. या माध्यमातून शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, विविध गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना देत आहेत. अलीकडच्या काळात शेतीत कोणते नवे संशोधन झाले आहे, याचीही माहिती शेतकऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी या कृषीदूत विद्यार्थ्यांचे स्वागत होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 8:27 am

नेवासा तालुक्यात कडाक्याची थंडी, तापमानही पोहोचले दहा अंशांवर:शेतीच्या कामांवरही होतोय परिणाम, थंडीपासून संरक्षणासाठी शेकोट्यांचा आधार‎

नेवासा तालुक्यात गुरुवारी सकाळी कडाक्याची थंडी पडली होती. तापमान कमी होऊन दहा अंशांच्याही खाली गेले होते. पर्यावरणीय हवामान बदलामुळे व हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार हवेत मोठ्या प्रमाणावर थंडी वाढली आहे. ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून शेतकरी थंडीपासून स्वतःचे संरक्षण करत असल्याचे दिसत आहे. सकाळी वातावरणात धुके पसरल्याने नागरिकांचा दिवस सकाळी नऊ नंतर सुरू होत आहे. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्व नदी पात्रांमध्ये पाणी वाहिल्याने गारवा निर्माण झाला आहे. तसेच सर्व कोल्हापूर टाईप बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे गारठा वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. थंडीच्या वातावरणामुळे सकाळचे जनजीवन विस्कळित झाले असून शेतीच्या कामांवर देखील याचा परिणाम झाल्याचे दिसत आहे. सध्या ऊसाच्या तोडी, कांद्याची लागवड रब्बीच्या पीक पेरण्या मोठ्या प्रमाणावर सुरू असताना मजुरांची थंडीत चांगलेत हाल होत आहेत. शेतीच्या कामांनाही याचा फटका बसला आहे. सकाळच्या वेळी कडाक्याची थंडी असते. दुपारी काही प्रमाणात उकाडा जाणवतो. त्यानंतर सायंकाळी सूर्यास्तानंतर पुन्हा तापमान कमी होऊन थंडी वाढते. रात्रीच्या वेळी तर वातावरणात गाकठा कमालीचा वाढलेला असतो. ग्रामीण भागात थंडीचा प्रभाव जास्तच जाणवत आहे. याचा परिणाम शेतीच्या कामावर झाल्याचे दिसत आहे. या भागात बिबट्याचीही भीती वाढली आहे. त्यामुळे शेतकरी सायंकाळी शेतीची कामे करताना दिसत नाहीत. थंडीपासून संरक्षणासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 8:27 am

मोबाइलचा मोह टाळून विद्यार्थ्यांनी पुस्तकांबरोबर मैत्री करावी- नगरकर:कर्जत महाविद्यालयात ‎विद्यार्थ्यांत जागरुकता ‎मोहीम‎

येथील महाविद्यालयात डिजिटल डेटॉक्स दिवसानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सांगितले की, काळानुरूप विज्ञानात बदल होत आहेत. मोबाइल ही मूलभूत गरज बनली आहे. आजच्या आजारांमागे मोबाइलचा अतिवापर दिसून येत आहे. मोबाइलच्या आहारी गेल्यास उद्याचा काळ आपल्याला माफ करणार नाही. मोबाइल वापराचा मोह टाळा व पुस्तकांशी मैत्री करा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. या कार्यक्रमप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस मोबाइल न वापरण्याची शपथ देण्यात आली. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. मोबाइलच्या अतिवापराने काय नुकसान होते, मोबाइलचा वापर कसा कमी करावा याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. कार्यक्रमातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोबाइलच्या अतिवापरामुळे काय दुष्परिणाम होतात याची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद परदेशी यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली व कार्यक्रमाचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 8:26 am

रांगोळीतून मांडल्या गावच्या समस्या अन् गरजा:मोरयाचिंचोरे गावच्या कृषिकन्यांनी घेतला गावचा सखोल आराखडा‎

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालय, सोनई येथील कृषिकन्यांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६ अंतर्गत गावाचा सखोल आढावा घेतला. या उपक्रमात कृषिकन्यांनी मोरया चिंचोरे ग्रामपंचायत कार्यालयासमोर रांगोळीच्या माध्यमातून गावाची पीआरए (पार्टीसिपेटरी रूरल अप्रायझल) तंत्रावर आधारित प्रतिकृती साकारली. उपक्रमादरम्यान विद्यार्थिनींनी क्षेत्रीय पाहणी (ट्रान्सेक्ट वॉक) करून गावातील पिके, जलस्रोत, समस्या, संधी, पर्यावरणीय स्थिती तसेच सामाजिक-आर्थिक घडामोडींचे निरीक्षण केले. चालताना स्थानिक नागरिकांशी संवाद साधून गावाची अचूक माहिती गोळा करण्यात आली. पीआरए तंत्राचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या गरजा, संसाधने व समस्या ओळखण्यासाठी सहभागी करून घेत विकास प्रक्रिया अधिक परिणामकारक करणे हा आहे. रांगोळीच्या नकाशामध्ये गावाचा वार्षिक पीक तक्ता, उत्पादन तक्ता, मातीचे प्रमाण, सामाजिक नकाशा, रस्ते-जाळे, रहदारी नकाशा, जलकुंभ, सरकारी कार्यालये आदी महत्त्वाच्या घटकांचा समावेश करण्यात आला. पीआरए ही ग्रामीण लोकांना त्यांच्या समस्या, गरजा आणि संसाधने स्वतः ओळखण्यासाठी सक्रियपणे सहभागी करून घेणारी एक पद्धत आहे. यात नकाशे, तक्ते व क्षेत्रीय पाहणी यांसारख्या साधनांचा वापर होतो. या पद्धतीमुळे अचूक माहिती मिळते, स्थानिक क्षमता वाढते आणि विकास योजना अधिक प्रभावी व शाश्वत बनतात, ज्यामुळे लोकांचा प्रकल्पात सहभाग वाढतो.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 8:25 am

शेतकऱ्यांनी डाळिंबाची निर्यातक्षम शेती करत समृद्ध व्हावे- डॉ. ससाणे:कृषी विद्यापीठात डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर‎

माती पाणी परीक्षण करूनच शेतकऱ्यांनी डाळिंब लागवड करावी. पिकाचे पोषण जमिनीतूनच होत असल्यामुळे जमिनीचे आरोग्य महत्त्वाचे आहे. निर्यातीसाठी महत्त्वाच्या असलेल्या मानकांचा संपूर्ण अभ्यास असला पाहिजे. विद्यापीठाने तयार केलेले डाळिंब लागवड तंत्रज्ञान वापरून व कृषी विभागाच्या योजनांच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी डाळिंबाची निर्यातक्षम शेती करावी व परकीय चलन मिळवावे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागांतर्गत असलेल्या इंडो इस्राइल कृषी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, डाळिंब गुणवत्ता केंद्र व अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. यावेळी वनस्पती रोगशास्त्र व कृषी अनुजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. ज्ञानेश्वर क्षीरसागर, डॉ. सुभाष गायकवाड, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे उपस्थित होते. डॉ. ससाणे पुढे म्हणाले, बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन करायला हवे. शेतीला मूल्यवर्धनाची जोड दिली तरच शेतकरी सक्षम होईल व पर्यायाने देश सक्षम होईल. याप्रसंगी वासुदेव लोंढे, ज्ञानेश्वर गागरे या प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कृषी विद्यापीठातील अधिकार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिराचा नक्कीच फायदा होईल अशी प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांनी डाळिंबाची रोपे विद्यापीठातूनच खरेदी करा डॉ. ज्ञानेश्वर क्षीरसागर म्हणाले, कोरडवाहू शेतीमध्ये डाळिंब पीक महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांनी डाळिंबाची रोपे ही विद्यापीठातूनच खरेदी करावीत. त्याचबरोबर वाणांची निवड सुद्धा शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानेच करावी.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 8:24 am

रहदारीच्या नियंत्रणासाठी मध्य शहरामध्ये सतरा रस्त्यांवर एकेरी वाहतुकीचा पर्याय:जिल्हाधिकाऱ्यांच्या डॉ.आशिया यांच्या बैठकीतील निर्णयानुसार महापालिकेचा प्रस्ताव‎

शहरातील पार्किंग व वाहतुकीच्या नियोजनासाठी पे अँड पार्क, नो पार्किंग झोन, पी १ व पी २ चा निर्णय घेण्यात आला आहे. आता एकेरी वाहतुकीसाठी पूर्वीच्या प्रस्तावित दोन रस्त्यांसह मध्य शहरातील १७ रस्त्यांवर एकेरी वाहतूक प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यावर हरकती दाखल करण्यासाठी १७ डिसेंबर रोजी दुपारी १२ मुदत देण्यात आली आहे. शहर प्रभाग समिती कार्यालय (जुनी मनपा), झेंडीगेट प्रभाग समिती कार्यालय व मुख्य प्रशासकीय कार्यालयात या हरकती नोंदवता येणार आहेत. मध्यवर्ती शहरातील वाढती रहदारी, अरुंद रस्ते यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या उपस्थितीत शहराच्या वाहतूक नियोजनाची बैठक मागील महिन्यात पार पडली. त्यातील सूचनेनुसार शहर वाहतूक शाखेकडून मध्य शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी वाहतूक प्रस्तावित करण्यात आली असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले. .चौपाटी कारंजा ते आनंदी बाजार चौक ते कोर्ट मागील रोड ते झारेकर गल्ली कोपरा .शनिगल्ली ते कोर्टासमोरील बाजू (कोर्ट गल्ली) ते पटवर्धन चौक ते चितळे रोड .आनंदी बाजार चौक ते अमरधाम .शनिमारूती मंदिर (टांगे गल्ली) ते झारेकर गल्ली. अर्बन बँक चौक ते कापड बाजार मुंबई मिठाईवाला .मुंबई मिठाईवाला चौक ते शांती होजिअरी ते अर्बन बँक चौक . लोढा हाईटस ते नवीपेठ रोड ते शहर सहकारी बँक चौक . भिंगारवाला चौक ते कापड बाजार ते बॉम्बे बेकरी चौक . पंचपीर चावडी चौक ते आशा टॉकीज रोड . माणिक चौक ते मदहोशा पीर चौक . जुनी मनपा चौक ते वाडीया पार्क चौक . माळीवाडा वेस ते अप्सरा टॉकीज चौक ते पंचपीर चावडी चौक . कोठी चौक ते हातमपुरा चौक ते सुरेश गेम कॉर्नर .नालबंद खुंट ते धरती चौक ते बंगाल चौकी ते मुंजोबा स्वीट कॉर्नर चौक . रामचंद्र खुंट चौक ते मंगलगेट चौक ते पुणे हायवेपर्यंत . फलटण पोलिस चौकी चौक ते राजेंद्र हॉटेल चौक ते दाळमंडई चौक . फलटण पोलिस चौकी ते हुंडेकरी ऑफिस चौक ते नटराज चौक ते पुणे हायवे ते पुन्हा फलटण पोलिस चौकी पोलिस नसल्याने वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन मध्य शहरात दिवसेंदिवस रहदारी वाढत असताना वाहतुकीच्या नियोजनासाठी कुठेही शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी नियुक्त नसतात. कापड बाजारातील भिंगारवाला चौक ते तेलीखुंट चौकापर्यंत अनेक वर्षांपासून एकेरी वाहतूक आहे. या ठिकाणी वाहतूक शाखेचा कर्मचारी नसल्याने सर्रास विरुद्ध दिशेने वाहने बाजारात प्रवेश करतात. त्यामुळे दररोज कोंडी होते. बेशिस्त पार्किंगकडेही दुर्लक्ष होत असल्याने अस्ताव्यस्त वाहने लावली जातात. पी १, पी २ सह नो पार्किंग झोनची अंमलबजावणी नाही बहुतांशी रस्त्यांवर पे अँड पार्कनुसार पार्किंग शुल्काची वसुली सुरू करण्यात आली आहे. मात्र, ज्या प्रमुख चौकांमध्ये व रस्त्यांवर नो पार्किंग करण्यात आले आहे, त्या ठिकाणीही सर्रास वाहनांचे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. तसेच, १३ प्रमुख रस्त्यांवर पी १ - पी २ प्रस्तावित आहे. काही ठिकाणी फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 8:23 am

स्ट्रॉंग रूमसमोर जॅमर बसवा; उमेदवारांचे आजपासून उपोषण:प्रशासनाच्या दुर्लक्षाचाविराेधात पालिकेत धरणे‎

नगरपालिकेच्या आययूडीपी विभागातील वाचनालय इमारतीच्या स्ट्राँग रूममध्ये मतदानानंतरची ईव्हीएम मशीन सिलबंद ठेवण्यात आली आहेत. मात्र या ठिकाणी संशयास्पद हालचाली दिसल्याचा आरोप करत विविध पक्षीय उमेदवारांनी तीन दिवसांपूर्वीच शहर पोलिस स्थानक आणि नगरपालिका प्रशासनाकडे जॅमर बसविण्याची लेखी मागणी केली होती. प्रशासनाने याकडे दखल न घेतल्याने नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठीचे उमेदवार शुक्रवारी (दि. १२) सकाळी १० वाजता मनमाड नगरपरिषद इमारतीजवळ बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. गुरुवारी (दि. ११) उमेदवारांनी संबंधित प्रशासनाला निवेदन दिले. नगरपालिका इमारतीत धरणे आंदोलन आणि घोषणाबाजीही झाली. जॅमर बसविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र पाठविल्याची माहिती प्रशासनाने दिली. मात्र अशी परवानगी आवश्यक नसून हा निर्णय पालिकेच्या अखत्यारित असल्याचे पोलिसांनीही सांगितल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्वरित जॅमर बसवावा, असा आग्रह त्यांनी प्रशासनाकडे धरला. ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूमसमोरील रस्त्यावरून ६, ७ आणि ८ डिसेंबर रोजी एक पांढरी कार लॅपटॉपसह फिरताना दिसल्याचा संशय उमेदवारांनी व्यक्त केला. त्यामुळे जॅमर बसविण्याची मागणी आणखी तीव्र झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख माधव शेलार यांनी हा मुद्दा मांडला. ^या भागात सुरू असून जॅमर लावण्याची मागणी केली असताना कोणाच्या दबावाने ही कारवाई होत नाही? - प्रविण नाईक, उबाठा थेट नगराध्यक्ष उमेदवार

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 8:04 am

टाळ-मृदंगाच्या तालावर परमपूज्य भगरीबाबांची पालखी मिरवणूक:लासलगावी संगीतमय श्री स्वामी समर्थ चरीत्र कथेची समाप्ती‎

बाल वारकरी आणि महिला भजनी मंडळांनी टाळ-मृदंगाच्या तालावर ठेका धरत प. पू. भगरीबाबांच्या ६१ व्या पुण्यतिथीच्या पालखी सोहळ्याला रंगत आणली. लासलगाव व पंचक्रोशीतील नागरिकांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गांवरून ही भव्य मिरवणूक काढण्यात आली. पुण्यतिथीनिमित्त मंदिर प्रांगणात आठवडाभर संगीतमय श्री स्वामी समर्थ चरित्रकथा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन झाले. बाजार समितीचे सदस्य राजेंद्र बोरगुडे यांच्या शुभहस्ते सपत्नीक बाबांची विधीवत पुजा व उपस्थित पदाधिकारी व भाविकांच्या हस्ते आरती करण्यात आली गणेश महाराज करंजकर (भगुर) यांच्या प्रवचनांना दररोज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी (दि. ११) रोजी सकाळी ६.३० ते ७.३० दरम्यान भगरीबाबांच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत पालखीची सवाद्य मिरवणूक पार पडली. मिरवणुकीनंतर रघुनाथ महाराज खटाणे (खेडलेकर) यांचे काल्याचे कीर्तन झाले. कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने झाला. यावेळी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप, उपसभापती संदीप दरेकर, न्यासाचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, उपाध्यक्ष जयदत्त होळकर, चिटणीस नरेंद्र वाढवणे, विश्वस्त, मंडळाचे पदाधिकारी, व्यापारी, कामगार, शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते. रक्तदान शिबिराला प्रतिसादे ५१ दात्यांचे रक्तदान प. पू. भगरीबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने भगरीबाबा मंदिरात श्री साईनाथ रक्तपेढी, नाशिक यांच्या सौजन्याने सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात बाबांच्या ६१ व्या पुण्यतिथी निमित्त ५१ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. या शिबिराला दात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 8:01 am

काथरगावी वारकरी संप्रदायाला वारकरी साहित्यांची दिली भेट:सोनिया होळकर यांच्या हस्ते साहित्याचे पूजन‎

निफाड तालुक्यातील काथरगाव येथे वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आवश्यक असलेल्या कीर्तनाचे साहित्य केजीएस शुगर कारखान्याच्या संचालिका सोनिया होळकर यांच्या वतीने ग्रामस्थांना देण्यात आले. चैतन्य महाराज नागरे यांनी वारकरी संप्रदायासाठी कीर्तनाच्या साहित्याची मागणी केली होती. काथरगाव येथे वारकरी साहित्याच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमप्रसंगी सोनिया होळकर यांच्या हस्ते वारकरी साहित्याचे विधिवत पूजन करण्यात आले. तबला, पेटी (हार्मोनियम), टाळ, पखावज आणि पारंपरिक कीर्तनांमध्ये वापरली जाणारी वीणा यामहत्त्वाच्या वस्तूंचा समावेश आहे. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. अध्यात्मिक विचारांचे संवर्धन आणि सामाजिक ऐक्य जपण्याचे कार्य या संप्रदायातून होते. या कार्याला हातभार लावणे हे आपले कर्तव्य आहे. ही देणगी केवळ साहित्य नसून, महाराष्ट्राच्या संस्कृतीवरील श्रद्धेची अभिव्यक्ती असल्याचे सोनिया होळकर यांनी स्पष्ट केले. के.जी.एस. शुगर कारखान्याचे जनरल मॅनेजर शेटे , जनरल मॅनेजर शिंदे, सूरज होळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण निकम, चैतन्य महाराज नागरे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 8:00 am

गटारीचे काम न झाल्याने ग्रामपंचायत सदस्याचे थेट गटारीवर बसून आंदोलन:खेडगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांनी व्यक्त केला संताप‎

एकेकाळी महाराष्ट्र शासनाचा संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानाचा जिल्हा प्रथम पुरस्कार मिळवलेल्या खेडगाव ग्रामपंचायतीतील सत्ताधारी गटातीलच एका विद्यमान सदस्याला आपल्या प्रभागातील गटारीचे काम न झाल्याने थेट गटारीवर बसून आंदोलन करावे लागले. या प्रकाराची गावात मोठी चर्चा सुरू आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून ग्रामपंचायत सदस्य असलेले अनिल ठुबे यांनी सत्ताधारी गटाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत हे आंदोलन केले. आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असलेल्या खेडगावमध्ये सुतार गल्लीतील गटारीचे काम वारंवार सांगूनही होत नव्हते. ग्रामसेवकांकडे तक्रार करूनही काही बाहेरील कर्मचाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे काम लांबत असल्याची तक्रार ठुबे यांनी केली. याशिवाय, या परिसरातील एका रहिवाशाने घराचे बांधकाम सुरू केल्याने गटारीपर्यंत जाणारा रस्ता अधिक अरुंद झाला. हे बांधकाम पूर्ण झाले तर गटारीचे काम अशक्य होईल, अशी शक्यता ठुबे यांनी वारंवार ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली होती. तरीही कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी ज्या गटारीवर काम सुरू होणे अपेक्षित होते त्याच गटारीवर बसून आंदोलन सुरू केले. दोन ते तीन तास चाललेल्या या आंदोलनानंतर काही सदस्यांनी काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अनिल ठुबे यांनी आंदोलन मागे घेतले. निधी नसल्याने काम करण्यात अडचण ^अनिल ठुबे यांच्या प्रभागातील गटारीचे काम त्यांनी सांगितले होते, पण निधी नसल्याने ते काम होऊ शकले नाही. शासनाच्या नवीन आदेशामुळे घरपट्टी वसुलीमध्ये ५० टक्के माफीमुळे वसुलीवर परिणाम आता आम्ही ठेकेदारास उधारीत मटेरियल उपलब्ध करून देत काम करण्यास सांगितले. - राजेंद्र थोरात, ग्रामसेवक, खेडगाव

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 7:59 am

नाकोडे वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा:निकृष्ट व दुर्गंधीयुक्त जेवण दिले जात असल्याचा आराेप‎

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पअंतर्गत येणाऱ्या नाकोडे येथील शासकीय विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गुरुवारी (दि. ११) प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा काढत निषेध व्यक्त केला. नाकोडे वसतिगृहात अनेक महिन्यांपासून निकृष्ट, अयोग्य पद्धतीने बनवलेले आणि दुर्गंधीयुक्त जेवण देण्यात येत आहे. शासनाच्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना रोज अंडी, केळी, दूध यांसारखे पोषक अन्नपदार्थ देणे बंधनकारक असतानाही तसे होत नसल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा आदिवासी विकास विभागाचा उदासीन कारभार चर्चेत आला आहे. दुधाऐवजी अनेकदा फक्त पांढरे पाणी दिले जाते. भाजी आणि भाताचा दर्जा अतिशय खराब असतो. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याची भावना विद्यार्थ्यांनी संतापाने व्यक्त केली. शिवाय, भोजन पुरवठा करणारा ठेकेदार विद्यार्थ्यांना कमी दर्जाचे अन्न देऊन शासनाच्या निधीचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला असून या ठेकेदाराविरुद्ध कारवाई ची मागणी केली आहे. उपोषण करण्याचा इशारा सहायक प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर मोर्चाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना लिखित निवेदन देत योग्य पोषण आहार, नियमबद्ध खाद्यपदार्थ आणि सुरक्षित वातावरण मिळाले नाही तर आम्ही आमरण उपोषण सुरू करू असा इशारा दिला. विद्यार्थ्यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे प्रशासनात चांगलीच खळबळ उडाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, प्रकल्प कार्यालयाने विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून चौकशी करीत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष बदल हवा नाहीतर आम्ही आमरण उपोषण करणार असा इशारा दिला आहे. तक्रार केल्यावर धमकावण्याचे प्रकार वसतिगृहातील गंभीर बाब म्हणजे, गृहपालाकडून विद्यार्थ्यांना अपमानास्पद व तुच्छ वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर ‘आम्ही तक्रार केली की आम्हाला धाक दाखवला जातो, तसेच अन्न निकृष्ट आहे म्हणताच किंवा तक्रार केली तर शिवीगाळ करून धमकावले जाते’ असे धक्कादायक आरोप विद्यार्थ्यांनी केले आहेत. चौकशी करून कारवाई करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 7:57 am

हेमाडपंती नागनाथ, बालाजी मंदिरामुळे वडवळी प्रसिद्ध:नुकताच बालाजी मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला, विविध विकासकामे मार्गी लागणार‎

रमेश शेळके | पैठण पैठण तालुक्यातील वडवळी (वडवाळी) हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक गाव असून पैठण शहरापासून केवळ ६ किमी अंतरावर असलेले व छत्रपती संभाजीनगरपासून ५६ किमीवर आहे. यामुळे या गावाला भौगोलिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे, या गावाची ओळख आजही श्री नागनाथ हेमाडपंती मंदिरामुळे अधिक सुशोभित झाली आहे. वडवाळी हे गाव पुरातन असून प्रभू रामचंद्र वनवास करत असताना गोदावरीच्या कडेने म्हणजेच दंडकारण्य जंगल असताना प्रभू राम गोदावरी कडेने वडवाळी गावात आले व गावात त्यांनी वडवानेश्वर महादेव मंदिराची स्वतःच्या हाताने स्थापना केली, अशी आख्यायिका गावात प्रसिद्ध आहे. वडवाळी गावात बालाजीचे खूप पुरातन मंदिर आहे. लक्ष्मी बालाजीसहीत असे मराठवाड्यातील एकमेव हेमाडपंती मंदिर वडवाळी गावात आहे. वडवानेश्वर महादेव मंदिर सध्या पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित गेले आहे. या मंदिराला राज्य सरकारने संरक्षित स्मारक दर्जा दिलेला आहे. वेगळेपण : गोदावरी काठावर गाव आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापासून अंतर कनेक्टिव्हिटी : पैठण ते शहागड मार्गावर. 3200 प्रसिद्ध : गावात हेमाडपंती मंदिर हजारो भाविक येतात गावातील हेमाडपंती प्राचीन आणि ऐतिहासिक बालाजी मंदिराला नुकताच ‘ब’ वर्ग दर्जा मिळाला असून वडवाळी येथील जुने बालाजी मंदिर परिसर मराठवाडा आणि महाराष्ट्रातील एक प्रमुख व प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी हजारो भाविक येथे येऊन बालाजींचे दर्शन घेतात. या मंदिराचा इतिहास शेकडो वर्षांचा असून, धार्मिक तसेच सांस्कृतिक वारसा जपणारे हे ठिकाण आहे. सरपंच स्वाती किशोर काळे सह ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 7:39 am

ढवळापुरी परिसरात 2 बछड्यांसह ‎बिबट्याचे वास्तव्य; शेतकरी चिंतेत‎:परिसरात आढळले बछड्याचे ठसे, वन विभागाकडून भीती घालवण्याचा प्रयत्न‎

करमाड सुरुवातीला ढवळापुरी (ता. छत्रपती संभाजीनगर) परिसरात नुसते एका बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून येत होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून बिबट्यासह दोन बछड्यांच्या पायांचे बुधवारी (दि.१०) ठसे आढळून आल्याने परिसरातील शेतकरी आणखी भयभीत झाला आहे, तर तिकडे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा वेळ शेतकऱ्यांच्या मनातील भीती घालवण्यात खर्च होत आहे. दुधना धरण परिसरात हा प्रदेश येत असल्याने शेतकऱ्यांची रब्बीची कामे खोळंबली आहेत. कारण शेतमजूर, महिला शेती कामासाठी येण्यास नकार देत आहेत. गेल्या वीस दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम असून शेतकरी दिवसासुद्धा शेतात जाण्यासाठी घाबरत आहे, तर महिला शेतकरी घरातील एखादा पुरुष शेतात असेल तरच शेतात जात आहे. बिबट्या पिंजरा लावलेल्या परिसरात येत आहे, पण शिकार करण्यासाठी पिंजऱ्यात ठेवलेल्या बकरीजवळ जात नाही. येथे एक वनपाल, पाच वनरक्षक व तीन वन मजुरांची नियुक्ती केली आहे. दरम्यान, शिवारातील कुत्रेही गायब झाले आहे किंवा त्यांना बिबट्याने खाल्ले असावे, अशी भीती शेतकरीवर्ग व्यक्त करीत आहेत. -सागर कुटे, वनपरिक्षेत्र अधिकारी गळ्याला मोठा रुमाल गुंडाळून जावे वयस्कर शेतकरी व लहान मुलांनी शेतात एकट्याने जाण्याचे टाळावे, रात्री शेतात जाताना मोबाइल व हातात लांब काठी व गळ्यात मोठा रुमाल गुंडाळून जावे. रात्रीच्या वेळेस रस्त्याने जाताना मोबाइलवर गाणे वाजवत जाणे. अफवांवर विश्वास न ठेवता वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. बुधवार रोजी गट क्रमांक १५९ मध्ये बिबट्या दिसल्याची घटना घडली. शेतात कापूस वेचणाऱ्या महिलांनी बिबट्या पाहताच घाबरून आरडाओरड केली होती. तत्काळ ही माहिती वनरक्षक बाळू चव्हाण यांना देण्यात आली होती. त्यांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी पाहणी करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, गुरुवारी वन विभागातील एकही कर्मचारी गट क्रमांक १५९ मध्ये फिरकले नसल्याने परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत. गिरजामाता परिसर, देवमाळ व आजूबाजूच्या शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांनी वन विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. फर्दापूर शिवारात शेतात बांधलेल्या जनवारावर बिबट्याने रात्रीच्या सुमारास हल्ला करून एक बैल ठार करून दोन वासरे गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यामुळे शेतकरी व पशुपालकांमधे भितीचे वातावरण पसरले आहे. फर्दापूर तांडा येथील शेतकरी पदम उखा राठोड यांचे फर्दापूर शिवारात गट क्र. १७६ मधे शेत आहे. ते याच शेतात रात्रीचे जनावरे बांधतात. बुधवार रोजी त्यांनी आपले जनावरे चारून त्यांनी आपली जनावरे संध्याकाळी शेतात बांधुन ते घरी गेले.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 7:37 am

गल्लेबोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकच उपलब्ध नाहीत:शाळेतील 543 विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात, पालकांनी व्यक्त केली नाराजी‎

खुलताबाद वंचित घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी म्हणून केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियान राबविले असले तरी खुलताबाद तालुक्याच्या अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गल्लेबोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेकडे मात्र शिक्षण विभागाचे सर्रास दुर्लक्ष सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. या शाळेत तब्बल ५४३ विद्यार्थी शिक्षण घेत असूनही मुलभूत सोयीसुविधांचा प्रचंड अभाव जाणवत आहे. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी अत्यावश्यक असलेले शिक्षक उपलब्ध नाहीत. विशेषत: इंग्रजी, विज्ञान आणि पर्यवेक्षक शिक्षक या तीन महत्त्वाच्या पदांवर कोणतीही नियुक्ती नाही. यामुळे ९वी–१०वीसारख्या निर्णायक वर्गातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे मुलांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागत असल्याची तीव्र नाराजी पालकांनी व्यक्त केली आहे. शाळेत एकूण १२ वर्गखोल्या आहेत. त्यापैकी एक मुख्याध्यापक कक्ष, एक डिजिटल रूम तर उर्वरित १० खोल्यांमध्ये सर्व ५४३ विद्यार्थ्यांना बसवले जाते.बसण्यासाठी केवळ १३५ बेंच असल्याने एका बेंचवर तीन विद्यार्थ्यांना बसावे लागत आहे. अलीकडेच ८वीतील ३३ विद्यार्थ्यांनी ‘कॉलरसिप’ परीक्षेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून मोठा मान मिळवला. सोयीसुविधांचा अभाव असूनही मिळालेला हा यशस्वी निकाल विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचा प्रयत्न दाखवतो. शाळेत व्हॉलीबॉलसह कोणतेही खेळ साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे क्रीडाक्षेत्रातही विद्यार्थी मागे पडत आहेत. गावाच्या सार्वजनिक मुतारीचा शाळेच्या प्रवेशभिंतीला लागून असलेला भाग गंभीर समस्या आहे. दररोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना घाण वासाचा सामना करावा लागत असून याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. आहे. गल्लेबोरगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सुविधांपासून वंचित आहेत. मुख्याध्यापकांचा सतत पाठपुरावा, तरीही डोळेझाक वर्गखोल्यांची दुरुस्ती, क्रीडा साहित्य, शिक्षक भरती तसेच शिपाई पद भरण्यासाठी अनेक वेळा ठिकठिकाणी लेखी पत्रव्यवहार केला आहे. मात्र पाठपुराव्याकडे सतत दुर्लक्ष करण्यात आले आहे. - मुख्याध्यापक एस. एल. वैष्णव

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 7:36 am

गंगापूरराेडला 400 झाडांचा घेतला बळी:तपोवन एसटीपी प्लान्टनंतर दुसऱ्याच दिवशी दिव्य मराठीने उघड केला 2 ठिकाणचा प्रशासनाचा वृक्षसंहार

तपोवानातील साधूग्रामसाठी १८२५ झाडांवरुन आंदोलन सुरू आहे. तर लगतच पालिकेने ३०० झाडांची कत्तल केल्याचे ‘दिव्य मराठी’ने गुरुवारी (दि. ११) उघडकीस आणले. दुसरीकडे आता गंगापूर रोडवरील जेआयटी कॉलेजच्या जवळ असलेल्या वनविभागाच्या १० एकरावरील रोपवाटीकेत ४०० वृक्षांची मुळापासूनच कत्तल केल्याचे ‘दिव्य मराठी‘च्या पाहणीत उघड झाले आहे. कत्तलीचे काम करुन ४ जेसीबीद्वारे खोदकाम आणि सपाटीकरणही सुरू आहे. तर लगतच झाडांच्या लाकडांचे ढीग रचलेले आहेत. या रोपवाटिकेत तोडलेल्या झाडांच्या खोडांचे ढिग रचण्यात आले आहेत. १० एकरपैकी ३ एकरावरील झाडांचे मूळच दाबून त्यावर माती टाकून लेव्हल करण‌े सुरू होते. सुपरवायझरला कामाबाबत विचारले असता आमचे जेसीबी असून सपाटीकरणाचे काम घेतले आहे. चारही बाजूला तोडलेले झाडे बाजूला रचून हे सपाट मैदान केले जात आहे. याठिकाणी रोपवाटिकाच होणार असल्याचे सांगून बाकी काहीच माहित नसल्याचे सांगून हात झटकले. वृक्षतोड कोणी केली यावरहीमौन बाळगले. थेट प्रश्न सविता पाटील, वनक्षेत्रपाल सर्व काम नियम, परवानगीनेच सुरू Q : वनविभागाच्याच रोपवाटीकेत झाडे का तोडली जात आहेत?A : येथे सामाजीक वनीकरण विभागामार्फत इंटीग्रेटेड रोपवाटिका मंजूर झाली आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी आणि जिल्ह्यातील ठिकठिकाणी रोप लागवडीसाठी ३ एकर क्षेत्रावर रोपवाटिका तयार केली जात आहे.Q : मग त्यासाठी ४०० झाडे तोडायची का?A : या ठिकाणी मोठ्या संख्येने सुबाभूळ होते, ते तोडले आहेत.Q : झाडे सरसकट तोडलेली दिसतातA : इतर कुठलीही झाडे तोडण्यात आलेली नाहीत.Q : परवानगी घेतली होती का?A : नवीन जागेत ४ ते ५ लाख रोपे तयार होतील. सुबाभूळसाठी कुठलीही परवानगी लागत नाही. नियम, परवानगीनेच काम सुरू आहे. एकही झाड तोडू देणार नाही या तीन एकर क्षेत्रात ९०० झाडे आहेत. खत प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण व जलप्रदूषण होते. या झाडांमुळे वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे एकही झाड तोडू दिले जाणार नाही. - गणेश बोराडे, स्थानिक रहिवासी आम्ही जनआंदोलन उभारणार खत प्रकल्पामुळे आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. १० किलोमीटर अंतरापर्यंत विहिरी व जलस्त्रोतांत काळे दुषित पाणी येते. कत्तलखान्यासाठी दुसऱ्या जागेचा शोध घ्यावा, अन्यथा जनआंदोलन उभारले जाईल. - त्र्यंबक कोंबडे, स्थानिक रहिवासी ही वनराई राहणार नाही पाथर्डीतील खत प्रकल्प जवळील सर्वे नंबर २६४/१ या आरक्षित जागेवर महापालिकेकडून कत्तलखाना उभारण्यात येणार आहे. या जागेवर ९०० झाडे आहेत. या झाडांची कत्तल करुन येथे कत्तलखाना उभारु नये. पालिकेने नागरिकांच्या या मागणीचा विचार केला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महापालिका आयुक्त मनीषा खत्री, सिडको विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांना देण्यात आला आहे. सन २०००मध्ये पांडवलेण्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या खत प्रकल्पावेळी नागरिकांनी केलेले आंदोलन चिघळल्याने पोलिसांनी केलेल्या गोळीबारात युवकाचा बळी गेला होता. तरी तेथे खत प्रकल्प उभारला आहे. येथे कचरा विघटनाची प्रक्रिया जेव्हा बंद असते तेव्हा पाथर्डीसह परिसरातील १ लाखाहून अधिक रहिवाश्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. आता खत प्रकल्पालगत कत्तलखाना उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी ९०० झाडांची कत्तल होत असल्याने मंगेश धोंगडे, गणेश बोराडे, सुरज चुंभळे, शरद कासार, धनंजय डेमसे यांच्यासह नागरिकांनी विरोध केला आहे. प्रतिनिधी : ही झाडे का तोडली?सुरक्षारक्षक - तुम्ही कोण आहात? येथे फोटो काढू नका.प्रतिनिधी : वृक्षतोड कधीपासून सुरू आहे हे काम ते सांगासुरक्षारक्षक - मला काहीच माहित नाही, १५ दिवसांपासूनच काम सुरू आहे.प्रतिनिधी : आम्हाला काही झाडे विकत घ्यायची आहेत.सुरक्षारक्षक - तुम्ही निघा तर इथून, असा प्रवेश देता येत नाही, माझीनोकरी धोक्यात येईल.प्रतिनिधी : अहो जांभूळ, वड, पिंपळ, आंब्याचे, हिरडा, बकूळाची रोपे हवी आहेत फक्तसुरक्षारक्षक- तिकडे नाशिकमध्ये ऑफिसला जावून चौकशी करा, आधी तुम्ही बाहेर निघा. वृक्षतोडीवर अद्याप निर्णय झालेला नाही पांडवलेणीजवळच्या खत प्रकल्पालगत असलेले्या जागेत अशी वनराई फुललेली आहे. आता येथे कत्तलखाना बांधण्याचे पालिकेचे नियोजन आहे. त्यासाठी येथे असलेल्या ९०० झाडांवर गंडातर येणार असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. वनरक्षकच झाले भक्षक गंगापूररोडवरील वनविभागाच्या १० एकरावरील रोपवाटीकेत ४०० वृक्षांची कत्तल करुन त्याची खोडे अशी सर्वत्र टाकण्यात आली आहेत. तर काही खोडे जमीनित गाडून सपाटीकरणाचे कामही जोरात सुरू असल्याचे दिव्य मराठीच्या पाहणीत उघड झाले आहे. थेट प्रश्न नानासाहेब साळवे, विभागीय अधिकारी Q : खत प्रकल्पाजवळ नवीन कोणता प्रकल्प होणार आहे?A : या ठिकाणी कत्तलखाना उभारण्याची चाचपणी होत आहे.Q : मग काम कसले सुरू आहे.A : या जागी आरक्षण, संरक्षक भितीचे काम सुरू आहे, दीड कोटीचे काम सुरू आहे.Q : मग त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येणार असल्याचा नागरिकांचा आरोप आहे?A : येथे कत्तलखाना उभारण्यासाठी चाचपणी सुरू आहे. वृक्षतोड करण्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 7:33 am

छत्रपती संभाजीनगरच्या पाण्याच्या धमन्या मजबूत:नवीन जलवाहिनीची हायड्रो टेस्ट यशस्वी, 1220 मिमीच्या मुख्य जलवाहिनीने 16 किलो उच्च दाब केला सहन

शहरासाठी सुरू असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील सर्वात महत्त्वाच्या टप्प्याला बुधवारी (११ डिसेंबर) मोठे यश मिळाले आहे. नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रातून एक्स्प्रेस लाइनने शहरात पाणी आणणाऱ्या १२२० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीची हायड्रो टेस्टिंग पूर्ण झाली असून, ती पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्र) चे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गुगलोथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षत्रवाडी ते गोकुळ स्वीटपर्यंतच्या ५०० मीटर लांबीच्या महत्त्वाच्या भागाची हायड्रो टेस्ट १६ किलो उच्च दाबावर घेण्यात आली. नियमित पाणीपुरवठ्यात या लाइनवर केवळ ८ ते ९ किलो दाब येणार असताना, त्याच्या दुपटीपेक्षा जास्त दाब देऊन घेतलेली ही चाचणी निर्णायक ठरली आहे. अल्ट्रा व्हायलेट टेस्ट यशस्वी झाल्यानंतर हाड्रो टेस्ट चाचणीपूर्वी अल्ट्रा व्हायलेट स्कॅनिंग करून पाइपची आंतरिक तपासणी करण्यात आली. कोणताही दोष न आढळल्याने हायड्रो चाचणी घेण्यात आली. शहराला भविष्यात दीर्घकाळ स्थिर, उच्च-दाबाचा पाणीपुरवठा देण्यासाठी ही टेस्ट अत्यंत महत्त्वाची होती. १६ किलो दाब सहन करून लाइन उत्तीर्ण झाली म्हणजे प्रत्यक्ष पुरवठ्यात तांत्रिक त्रुटींची शक्यता नगण्य आहे, असे गुगलोथ यांनी सांगितले. ही चाचणी इतकी महत्त्वाची का शहरात २०० एमएलडी वाढीव पाणी आणण्याच्या संपूर्ण योजनेचा कणा म्हणजे ही १२२० मिमी लाइन.• पुढील २–३ दशके या लाइनवर उच्च दाबाचा भार येणार आहे.• एकदा पाणीपुरवठा सुरू झाल्यावर गळती किंवा फुटीमुळे मोठे नुकसान व शहरात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.• टेस्ट यशस्वी झाल्याने पुढील कार्यवाही जोडण्या, फ्लशिंग, लाइन चार्जिंग निर्धास्तपणे करता येणार आहे. हायड्रो टेस्टिंग म्हणजे काय? • पाइपमध्ये पाणी भरून त्यावर नियमित दबावापेक्षा दीडपट अधिक दाब दिला जातो.• लाइनमध्ये गळती, सूक्ष्म क्रॅक किंवा जोडांमध्ये कमजोरपणा आहे का, हे तपासले जाते.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 7:22 am

गेल्या 9 महिन्यांत 781 शेतकऱ्यांनी संपवले जीवन:नागपूर विभागात सर्वाधिक 296, मराठवाड्यात 212 आत्महत्या

राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा गंभीर प्रश्न विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला. जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत राज्यात एकूण ७८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे, ही बाब मदत व पुनर्वसन विभागाने अंशतः खरी असल्याचे मान्य केले. आमदार सुधाकर आंबले, सचिन अहिर यांच्यासह अनेक आमदारांनी एकत्रितपणे या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांनी नमूद केले की, सावकारी कर्ज, बँकेचे कर्ज, नापिकी आणि अतिवृष्टीमुळे या नऊ महिन्यांत ७८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात विदर्भातील नागपूर विभागात २९६ आणि मराठवाडा विभागात २१२ आत्महत्या झाल्या. राष्ट्रीय गुन्हे अहवाल २०२३ नुसार, देशात झालेल्या दर दोन शेतकरी आत्महत्यांपैकी सरासरी एक आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. ही चिंताजनक आकडेवारीही आमदारांनी सभागृहात सादर केली. मदत व पुनर्वसन मंत्री मिरांद जाधव (पाटील) यांनी या प्रश्नावर लेखी उत्तर दिले. नऊ महिन्यांतील ७८१ आत्महत्या आणि एनसीआरबीचा अहवाल “अंशतः खरा आहे’ असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. विधानसभेत ७५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांना दिली मंजुरी राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यावर भर देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली. विधानसभेत ७५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या बहुमताने मंजूर करण्यात आल्या. पुरवणी मागण्यांवरील चर्चा पूर्ण झाल्यानंतर अजित पवार बोलत होते. डिसेंबर २०२५ मध्ये २८६ कोटी पुरवणी मागण्या प्रस्तावित केल्या. यात पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५ हजार कोटी, मुख्यमंत्री बळीराजा ९ हजार कोटी, नाशिक कुंभमेळा ३ हजार कोटी, महात्मा फुले योजनेत ९०० कोटींची तरतूद केली. केंद्राकडून पन्नास वर्षांच्या परतफेडीने ५,६०० कोटींचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. त्यासाठी तरतूद करणार आहे. डिसेंबरमध्ये ७५ हजार कोटींचा आकडा यापूर्वी कधी आलेला नव्हता हे खरे आहे. पहिले ३३ हजार आणि नंतर ११ हजार असे एकूण ४४ हजार कोटी दिले. त्यामुळे आकडा फुगलेला आहे. मुंबई पगडीमुक्त होईल- शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईबाहेर फेकला गेलेला मूळ मुंबईकर परत आणण्यासाठी निर्णय घेतले. नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाने चांगले निर्णय घेतले. काही नियमांचे उल्लंघन करून मुंबईत उभारलेल्या २० हजार इमारतींना ओसी नाही. ती देण्यात येईल. लवकरच मुंबई पगडीमुक्त होईल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 7:17 am

रवींद्र चव्हाणांनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट:मिशन मनपा, मुंबईत शिवसेना-भाजप एकत्र

नागपूरमध्ये सुरू असलेल्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या हिवाळी अधिवेशनाच्या धामधुमीतच महायुतीचे (भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस) नेते आगामी महानगरपालिका (मनपा) निवडणुकांच्या रणनीतीवर तयारीला लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीने निवडणुकीचा अंतिम जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सकाळी नागपुरातील शासकीय निवासस्थानी महायुतीचे सर्व मंत्री आणि आमदारांना नाश्त्यासाठी आमंत्रित केले आहे. या ‘ब्रेकफास्ट विथ चर्चा’ कार्यक्रमात आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीबाबत, स्थानिक राजकारणातील बदलांवर तसेच विधिमंडळ कामकाजासंदर्भात आमदारांना महत्त्वाच्या सूचना मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, बुधवारी रात्री भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीचा संपूर्ण आढावा चव्हाण यांनी तातडीने शाह यांना सादर केल्याची माहिती आहे. यामुळे महायुतीच्या मनपा निवडणुकीच्या तयारीला वेग येण्याची चिन्हे आहेत. मनपा निवडणुकीचा अंतिम फॉर्म्युला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये घटकपक्षांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नयेत, यासाठी महायुतीने हा फॉर्म्युला निश्चित केला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि नागपूर या प्रमुख महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार आहेत. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही पक्षांची ताकद समसमान असल्याने बंडखोरी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई मनपाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 7:12 am

ग्लोबल फॅशनमध्ये आता ‘कोल्हापुरी’चा दम! प्राडा लिडकॉम-लिडकारचा करार:जागतिक स्तरावर कोल्हापूरच्या चपलेला मिळणार नवीन ओळख

भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रँड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली–भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. शतकांपासून वापरात असलेल्या पारंपरिक चप्पल निर्मितीच्या पद्धती, प्राडाच्या आधुनिक व समकालीन डिझाईन शैली या माध्यमातून चप्पल विकसित केल्या जात आहेत. पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक लक्झरी फॅशनच्या मदतीने पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ मिळणार आहे. या विशेष चप्पला फेब्रुवारी २०२६ मध्ये प्राडाच्या ४० विक्री केंद्रांमध्ये तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. ही भागीदारी म्हणजे सांस्कृतिक आदानप्रदान : लोरेंझो बर्टेली लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या, एक जागतिक ब्रँड थेट महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारागिरांसोबत काम करत असल्याने त्यांच्या या कौशल्याला एक ओळख मिळेल आणि कलेचे पूर्ण श्रेय या कारागिरांना मिळेल. प्राडा समूहाचे लोरेंझो बर्टेली म्हणाले, ही भागीदारी म्हणजे सांस्कृतिक आदानप्रदानाची नवी ओळख आहे. चामड्याची गुणवत्ता चांगली असल्याने अनेक वर्षे टिकतात शुद्ध चामड्याचा वापर : या चपला प्रामुख्याने नैसर्गिक, जाड आणि उच्च प्रतीच्या चामड्यापासून बनवलेल्या असतात.पूर्णपणे हस्तनिर्मित : या चपला स्थानिक कारागिरांद्वारे पूर्णपणे हाताने तयार केल्या जातात.अत्यंत टिकाऊ : चामड्याची गुणवत्ता चांगली असल्यामुळे त्या अनेक वर्षे टिकतात.विशिष्ट पारंपरिक डिझाइन : त्यांचा तळवा सपाट असतो आणि ‘T’ आकाराचा खास पायपट्टा असतो.आरामदायी : वापर जसजसा वाढतो तसतसे चामडे पायाच्या आकारात बसते आणि चप्पल अधिक आरामदायी होते.जीआय टॅग : कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यांची ती पारंपरिक ओळख असल्याने तिला ‘जीआय टॅग’ मिळाला आहे.नैसर्गिक रंग : त्या गडद तपकिरी, लालसर तपकिरी किंवा काळ्या अशा नैसर्गिक रंगात उपलब्ध असतात.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 7:10 am

राज्यात मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी योजनेमध्ये नियोजन विभागाचा खोडा:लवकरच सुरू करण्याची शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती

राज्यात मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी योजना तसेच मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. या योजनेत नियोजन विभागाने काही आक्षेप घेतले आहे. ते दूर करून तसेच मंत्रिमंडळात याची मान्यता घेऊन योजना लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तारांकित प्रश्नावरील चर्चेत दिली. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना सहा महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्याचीही अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले. अमित साटम यांनी अंमलबजावणीला सहा महिने उशीर का लावला? असे विचारले. देवयानी फरांदे यांनीही यासंबंधी प्रश्न उपस्थित केला. दादा भुसे यांनी पूर्वी या योजनेचा १ लाख ६ हजार खर्च होत होता. आता १२ लाख ९६ हजार रुपये खर्च होणार आहे. यामुळे कदाचित विद्यार्थी बाहेरून उपकरणे करून आणतील, ५१ हजार रुपयांना लॉजिक काय लावले, असे आक्षेप नियोजन विभागाने घेतले आहेत. मुख्यमंत्र्यांनी या योजनेला मान्यता दिली आहे हे लक्षात आणून दिले. दरम्यान, या वेळी राज्यातील इतर शैक्षणिक मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. राज्यातील ५१ विद्यार्थ्यांना नासा संस्थेला नेणार मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी योजनेंतर्गत निवड झालेल्या तालुका स्तरावरील २१ विद्यार्थ्यांना नागपूर, पुणे व मुंबई यापैकी एका विज्ञान केंद्राला, जिल्हा स्तरावरील ५१ विद्यार्थ्यांना इस्रोला आणि राज्य स्तरावरील ५१ विद्यार्थ्यांना अमेरिका येथील नासा सेंटरला भेट घडवली जाणार आहे. नमिता मुंदडा, नाना पटोले, योगेश सागर, वरुण सरदेसाई यांनीही प्रश्न विचारले.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 7:08 am

बोगस औषधी प्रतिबंधासाठी ‘ड्रग डिटेक्शन मशीन्स’:आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली दिव्य मराठीला माहिती

सरकारी रुग्णालयात बोगस औषधींचा पुरवठा करणारे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. राज्यातल्या काही रुग्णालयांना पुरवठा केलेल्या बोगस औषधप्रकरणी चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी बोगस औषधी रोखणारे “ड्रग डिटेक्शन मशीन्स’ खरेदी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आरोग्य यंत्रणेला लागलेली बोगस औषधांची किड रोखण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने “ड्रग डिटेक्शन मशीन्स’ खरेदी केल्या आहेत. या मशीन्सच्या माध्यमातून बोगस औषधांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. येत्या १ जानेवारीपासून ही मोहीम सुरू होईल, अशी माहिती आबिटकर यांनी दिली. जंतुसंसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी नागपूर जिल्ह्यासाठी ४ लाख अँटिबायोटिक टॅब्लेट खरेदी करण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना या टॅब्लेटचे वितरणही करण्यात आले. यातील ३ लाख ७८ हजार ४०० टॅब्लेटचे सेवनही रुग्णांनी केले. या औषधाने रुग्णांवर उपचार झाल्यानंतर वर्षभरानंतर ही औषधच बोगस असल्याचे पुढे आले होते. याबाबत आबिटकर यांना विचारले असता त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील ८ झोनमध्ये ४ मशीन्स गरजेनुसार तपासणी करतील. खासगी रुग्णालयात जशा औषधी मिळतात तशा शासकीय रुग्णालयांतही मिळाव्या यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या पायाभूत सुविधा आहेत, मात्र केवळ १० टक्केच त्याचा वापर होतो. तामिळनाडूत ६० टक्के योजनांचा वापर शासकीय रुग्णालयातच होतो. तीन हजार जागा भरणार आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच तीन हजार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठीची निविदा लवकरच काढण्यात येईल. २०० इमारती बांधून तयार आहेत, त्याचा वापर व्हावा यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे आबिटकर यांनी सांगितले. २२ लाखांपर्यंत उपचार महात्मा फुले योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. यापूर्वी केवळ १२५६ आजार होते, ही संख्या वाढवून आता २३९९ करण्यात आली आहे. सध्या पाच लाखांपर्यंत उपचार केले जातात. याचबरोबर विशेष आजारांसाठी उपचारावर ११ ते २२ लाखांपर्यंत खर्च करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अत्याधुनिक रुग्णवाहिका येणार १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची नव्याने खरेदी करण्यात येत आहे. लवकरच २०० गाड्या उपलब्ध होतील. सध्या ५५० गाड्या आहेत. पुढे चालून ही संख्या १७०० च्या वर जाईल. या अत्याधुनिक रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांवर जागेवरच शस्त्रक्रियाही करता येतील. वेळीच उपचार मिळावा हा यामागील उद्देश आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 7:06 am

मराठवाड्यात इनामी जमिनींवर राहणाऱ्या 70 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर:‘मदतमाश’ जमिनी मोफत नियमित होणार

हैदराबाद इनामे व रोखे अनुदाने रद्द सुधारणा विधेयक गुरुवारी विधानसभेत एकमताने मंजूर झाले. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील आणि चंद्रपूरच्या राजुरा भागात इनामी जमिनींवर राहणाऱ्या सुमारे ७० हजार कुटुंबांच्या जमिनी मोफत नियमित होतील. यातून मराठवाड्यातील हजारो कुटुंबांच्या डोक्यावरील टांगती तलवार ‘मदतमाश’ इनामी जमिनींचा प्रश्न अखेर निकाली निघाला. यात देवस्थानांच्या जमिनीचा संबंध नाही, असे महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले. उपजीविकेसाठी शासन किंवा राजाने दिलेली जमीन म्हणजे मदतमाश ‘मदतमाश’ हा शब्द मूळतः मराठवाड्यातील निजामकालीन इनाम जमिनींशी संबंधित आहे. ‘मदतमाश’ जमीन शासन किंवा राजाकडून व्यक्तीच्या उपजीविका किंवा मदतीसाठी दिली जात असे. यात ‘खिदमतमाश’ म्हणजे सेवेच्या बदल्यात आणि देवस्थान इनाम म्हणजे धार्मिक कार्यासाठी दिलेली जमीन असे प्रकार होते. शासनाचे उत्पन्न बुडेल; महायुतीला मनपा, जि.प.त लाभ मोक्याच्या ठिकाणी असलेली ही जमीन आता मोफत नियमित होणार असल्याने सामान्य लोकांना आर्थिक लाभ होईल, तर महायुतीला महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचा लाभ होईल. दुसरीकडे शासनाचे उत्पन्न मात्र बुडणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Dec 2025 6:58 am