SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

23    C
... ...View News by News Source

बिहारमध्येही मतचोरी?

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने द्विशतकी मजल मारली. गत निवडणुकीच्या तुलनेत या वेळी सत्ताधारी आघाडीने चांगली कामगिरी केली असे म्हणावे लागेल. या वेळी एनडीएने २४३ पैकी २०२ जागा जिंकल्या. महागट बंधनाला ३५ जागांवरच समाधान मानावे लागले. भाजप आणि जदयूने प्रत्येकी १०१ जागा लढवल्या होत्या. भाजपने ८९ तर संयुक्त जनता दलाने ८५ जागांवर विजय मिळवला. म्हणजे […] The post बिहारमध्येही मतचोरी? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Nov 2025 12:26 am

रंगकर्मींच्या त्यागातूनच नाट्य चळवळ जिवंत : डॉ. आरदवाड

लातूर : प्रतिनिधी लातूरची नाट्य परंपरा खुप मोठी आहे. ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम गोजमगुंडे, प्राचार्य के. ह. पुरोहीत, प्रा. मिरजकर, प्रा. गोवंडे या मंडळींनी लातूरच्या नाट्य चळवळीचा पाया रचला आणि आज नाट्यकर्मींच्या त्यागातूनच नाट्य चळवळ जीवंत आहे, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अशोक आरदवाड यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या […] The post रंगकर्मींच्या त्यागातूनच नाट्य चळवळ जिवंत : डॉ. आरदवाड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Nov 2025 12:24 am

मराठवाड्यातील सर्वांत मोठा ‘स्टडी अ‍ॅब्रॉड फेअर’ लातूरमध्ये

लातूर : प्रतिनिधी विलासराव देशमुख फाउंडेशन, लातूर आणि अलिफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाड्यातील पहिला आणि सर्वात मोठा ‘स्टडी अ‍ॅब्रॉड फेअर’ दि. १९ नोव्हेंबर रोजी व्ही. डी. एफ. कॅम्पस (नवीन एमआयडीसी, एअरपोर्ट रोड, लातूर) येथे आयोजित करण्यात येत आहे. लातूरच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करणारा हा एक ऐतिहासिक क्षण आहे. जगभरातील नामांकित विद्यापीठे एकाच […] The post मराठवाड्यातील सर्वांत मोठा ‘स्टडी अ‍ॅब्रॉड फेअर’ लातूरमध्ये appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Nov 2025 12:23 am

२५ डिसेंबर रोजी आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद  

लातूर : प्रतिनिधी बौद्ध धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त लातूरकरांच्या वतीने दि. २५ डिसेंबर रोजी लातूर तालुक्यातील रामेगाव येथील महाविहार, धम्म केंद्र सातकर्णीनगर येथे आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. धम्म परिषदेत संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजक भिक्खू पय्यानंद थेरो यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. […] The post २५ डिसेंबर रोजी आठवी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Nov 2025 12:22 am

ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात

लातूर : प्रतिनिधी येथील ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचे १३ वे वार्षिक स्नेहसंमेलन दि. १५ नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित पालक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे डॉ. विठ्ठल लहाने, प्रा. शिवराज मोटेगावकर, उद्योजेक तुकाराम पाटील, तालमणी डॉ. राम बोरगावकर, डॉ. हनुमंत किनीकर, पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या हस्ते […] The post ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Nov 2025 12:21 am

नगराध्यक्ष पदासाठी १०३ तर नगरसेवक पदासाठी १२५७ नामनिर्देशनपत्र दाखल 

लातूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील चार नगरपरिषदांसह एका नगरपंचायतीची निवडणुक प्रक्रिया सुरु झाले. नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दि. १७ नोव्हेंबरच्या शेवटच्या दिवशी असंख्य इच्छूक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. चार नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदासाठी एकुण १०३ तर नगरसेवकपदासाठी १ हजार २५७ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. निवडणुक कार्यक्रमानूसार आज दि. १८ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्रांच्या छाननीनंतर […] The post नगराध्यक्ष पदासाठी १०३ तर नगरसेवक पदासाठी १२५७ नामनिर्देशनपत्र दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 18 Nov 2025 12:19 am

…तर ५०० टक्के टॅरिफ लादणार

न्यूयॉर्क : अमेरिकेने गेल्या काही दिवसांपासून जगभरातील देशांवर टॅरिफ लादले आहे. अशातच आता रशियाची कोंडी करण्यासाठी अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. रशियासोबत व्यापार करणा-या देशांना ट्रम्प यांनी गंभीर इशारा दिला आहे. रशिया आणि यु्क्रेन यांच्यातील युद्धात रशिया माघार घ्यायला तयार नाही, त्यामुळे रशियावर दबाव टाकण्यासाठी अमेरिका आता मोठा निर्णय घेणार असल्याचे समोर आले आहे. डोनाल्ड […] The post …तर ५०० टक्के टॅरिफ लादणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 11:49 pm

सौदीमध्ये तेलंगणातील ४५ प्रवाशांचा कोळसा

दुबई : वृत्तसंस्था सौदी अरेबियात झालेल्या भीषण रस्ते अपघातात ४५ भारतीयांचा मृत्यू झाला. मक्काहून मदीनाला जाणा-या त्यांच्या बसने डिझेल टँकरला धडक दिली आणि आग लागली. मृतांमध्ये १८ महिला, १७ पुरुष आणि १० मुले यांचा समावेश आहे. या अपघातातून फक्त एकच व्यक्ती वाचली. त्याचे नाव मोहम्मद अब्दुल शोएब (२४) असे आहे. शोएब ड्रायव्हरच्या शेजारी बसला होता. […] The post सौदीमध्ये तेलंगणातील ४५ प्रवाशांचा कोळसा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 11:11 pm

१८०० कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही

मुंबई : मनसेचे युवा नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंवर नवी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून धुळ खात पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यामुळे अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर आमदार आदित्य ठाकरे आपल्या भावाच्या समर्थनार्थ पुढे आले. शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून घाणेरड्या कापडाने झाकून ठेवला होता. […] The post १८०० कोटींचा जमीन घोटाळा पण गुन्हा दाखल नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 10:56 pm

काँग्रेसचे अक्षय पारसकर भाजपमध्ये:नांदगाव खंडेश्वरमध्ये शेवटच्या दिवशी 11 नगराध्यक्ष, 87 नगरसेवक उमेदवारी अर्ज दाखल

नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी राजकीय घडामोडींनी वेग घेतला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष अक्षय पारसकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करत सर्वांना धक्का दिला. याचवेळी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे दिसून आले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कोणत्याही पक्षाशी युती न करता नगराध्यक्ष आणि सर्व १७ नगरसेवक पदांसाठी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले. दुसरीकडे, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी युती केली, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचीही युती झाल्याचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या युतींनीही नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवक पदांसाठी अर्ज भरले. भाजपमधील बंडखोरी स्पष्टपणे समोर आली. भाजपच्या बंडखोर सुरेखा शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच, भाजपच्या कल्पना मारोटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – शिवसेना (शिंदे गट) युतीकडून उमेदवारी अर्ज भरला. प्रभाग १७ मधून भाजपचे विशाल गुल्हाने यांनीही बंडखोरी करत अपक्ष म्हणून नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केला. वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष आणि युवा स्वाभिमान पक्षानेही काही प्रभागांमध्ये नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे केले आहेत. नांदगाव खंडेश्वर शहरात एकूण १७ प्रभाग आहेत. शहरात एकूण १२,०३९ मतदार असून, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ९८ उमेदवारांनी आपले अर्ज भरले. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी ११ आणि नगरसेवक पदासाठी ८७ अर्जांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अश्विनी जाधव, नगर पंचायतीचे प्रशासक निवृत्ती भालकर, सर्व कर्मचारी तसेच ठाणेदार श्रीराम लांबडे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 10:47 pm

सातारा पालिका निवडणुकीत हायव्होल्टेज नाट्य!:पी. डी. पाटलांच्या कुटुंबातून एकही अर्ज नाही; तर फलटणमध्ये रामराजेपुत्राने हाती घेतला 'धनुष्यबाण'

सातारा जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झालेच, परंतु अनेक ठिकाणी नाट्यमय घडामोडी देखील पाहायला मिळाल्या. सलग 42 वर्षे कराडचे नगराध्यक्षपद भूषविलेल्या ज्येष्ठ नेते दिवंगत पी. डी. पाटील यांच्या कुटुंबातील एकही उमेदवारी अर्ज रिंगणात नाही तर फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर यांचा मुलगा अनिकेतराजे यानी धनुष्यबाण हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे अनेक दिवसांपासून दिल्लीत होते. त्यामुळे निवडणुकीबद्दलचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांना घेता येत नव्हता. पृथ्वीराज चव्हाण रविवारी सकाळी कराडमध्ये दाखल झाले. त्यानंतर निवडणुकीची बोलणी सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही आघाडीबरोबर काँग्रेसने चर्चा केली. मात्र त्यांचे सूर जुळले नाहीत. अखेर शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासह 20 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उर्वरित जागांवर काँग्रेस अपक्षांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. बऱ्याच राजकीय घडामोडीनंतर साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मनोमिलनातुन भाजपच्या प्रदेश श्रेष्ठींनी केलेल्या शिक्कामोर्तव्यानुसार शिवेंद्रसिंह भोसले यांचे समर्थक व माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांना सातारा नगर परिषदेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आले व त्यांनी उमेदवारी अर्ज ही दाखल केला तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने महायुतीच्या राजकीय घडामोडी व लक्ष ठेवलेल्या राजकीय चाणक्यांनी आश्चर्यकारकरीत्या भाजप प्रदेश महिला आघाडीच्या पदाधिकारी सुवर्णाताई पाटील यांनाच उमेदवारी जाहीर केली त्यामुळे साताऱ्यात पाटील विरुद्ध मोहिते असा सामना रंगणार आहे. म्हसवड पालिका (नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला)एकूण उमेदवारी अर्ज 12 प्रभाग संख्या 10एकूण उमेदवारी अर्ज 123 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 10:45 pm

नगराध्यक्ष पदासाठी १४, नगरसेवक पदासाठी २४० नामनिर्देशनपत्र दाखल

अहमदपूर : प्रतिनिधी अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून २५ नगरसेवक पदांसाठी एकूण २४० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे यांची युती फिस्कटली असून महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार, भारतीय काँग्रेस, शिवसेना उबाठा […] The post नगराध्यक्ष पदासाठी १४, नगरसेवक पदासाठी २४० नामनिर्देशनपत्र दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 10:38 pm

हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी एका अधिसूचनेद्वारे ही घोषणा केली. या अधिवेशनात राज्यातील कळीचे कायदे, जनहिताचे प्रश्न व विभागीय विकास आदी मुद्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगला आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी येत्या २ […] The post हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 10:38 pm

काँग्रेसचा झेंडा फडकावण्याचा निर्धार

रेणापूर : प्रतिनिधी रेणापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठीच्या उमेदवारांनी रेणापूर तहसील कार्यालयात एकत्रित जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी सर्व उमेदवारांनी लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या रेणुका मातेचे व त्यानंतर महेबुब सुभानी दर्गा येथे दर्शन घेऊन रेणापूर नगरपंचायतीसाठी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आ.अमित […] The post काँग्रेसचा झेंडा फडकावण्याचा निर्धार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 10:37 pm

कृषी विकासासाठी 'बीज महाकुंभ':एआय, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन

राज्याच्या आणि देशाच्या कृषी विकासात बीजांच्या गुणवत्ता आणि संशोधन/विकास (आर आणि डी) यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भर दिला आहे. मुंबई येथे सुरू झालेल्या 'एशियन सीड काँग्रेस (एएससी) २०२५' च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या परिषदेत ४० हून अधिक देशांचे प्रतिनिधी आणि विविध कंपन्यांनी स्टॉल्स लावले आहेत, जे आकर्षण ठरले आहेत. 'एपीएसए' आणि नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया (एनएसएआय) यांनी संयुक्तपणे या अधिवेशनाचे आयोजन केले आहे. उच्च गुणवत्तेसाठी तंत्रज्ञानाची जोड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एशियन सीड काँग्रेस २०२५' ला कृषी संशोधकांसाठीची 'ग्लोबल चौपाल' असे संबोधले. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची दर्जेदार बीजांची गरज वाढली आहे. 'एआय' आणि 'ब्लॉकचेन' यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, निकृष्ट दर्जाचे बीजे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील बीज उद्योगाच्या मोठ्या विकासावर त्यांनी जोर दिला. खाद्य सुरक्षा आणि उद्योगाची भूमिका केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बीज उद्योगाला खाद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भागीदार म्हटले. देशातील खाद्यान्न आणि कृषी उत्पादन वाढविण्यात बीज उद्योगाचे मोठे योगदान आहे. भविष्यात शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे, रसायनांमुळे होणारे नुकसान कमी करणे आणि उत्पादित अन्नधान्याची पौष्टिकता वाढवणे, ही देशासमोरची प्रमुख आव्हाने असतील. या आव्हानांवर मात करण्यासाठी बीज उद्योग महत्त्वाची भूमिका निभावू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले. भारतीय बीज उद्योगाची स्थिती

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 10:34 pm

सौर पथदिव्यांनी उजळला नांदेड रस्ता

लातूर : प्रतिनिधी शहराच्या शाहू चौक ते विवेकानंद चौकापर्यंतच्या रस्ता दुभाजकांमध्ये बसविण्यात आलेले सौर पथदिवे सुरू करण्यात आले आहेत. यामुळे हा परिसर प्रकाश झोताने उजळून निघाला आहे. लातूर शहराला जिल्हा नियोजनच्या विशेष निधीतून सौर पथदिव्यांसाठी ८० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्यातून शहराच्या विवेकानंद चौक शाहू चौकापर्यंतच्या रस्ता दुभाजकांत २० पथदिवे बसविण्यात आले आहेत. […] The post सौर पथदिव्यांनी उजळला नांदेड रस्ता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 10:34 pm

पाणबुडी चोरी प्रकरणातील सर्व मोटारी आरोपींकडून जप्त 

लातूर : प्रतिनिधी लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हददीतील गंगापूर शिवार व सारोळा परिसरातील सात शेतक-यांच्या विहिरींमध्ये बसवलेल्या एकूण सात पाणबुडी मोटारी किंमत अंदाजे १ लाख ५ हजार रुपये अज्ञात व्यक्तींनी चोरल्याची घटना घडली होती. पोलीसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेत चोरी गेलेल्शा पानबुडी मोटारी जप्त करत त्या शेतक-यांना परत केल्या आहेत. पोलीस अधीक्षक अमोल […] The post पाणबुडी चोरी प्रकरणातील सर्व मोटारी आरोपींकडून जप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 10:33 pm

दारूची दुकाने फोडणा-या व वाहने चोरणा-यांना अटक

लातूर : प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये चार चाकी दुचाकी वाहने चोरीच्या तसेच बियर बार व देशी दारू दुकान फोडून दारू चोरीच्या घटना घडत होत्या. या संदर्भातील अनेक गुन्हे लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले होते. सदरील गुन्हे करणा-या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४६ लाख ४५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह […] The post दारूची दुकाने फोडणा-या व वाहने चोरणा-यांना अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 10:31 pm

अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल:आई शर्मिला ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या- मला खूप अभिमान आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विनापरवाना उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला होता की हा पुतळा गेल्या चार महिन्यांपासून उद्घाटनावाचून झाकून ठेवलेला होता. याच पार्श्वभूमीवर रविवारी अमित ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यानंतर नवी मुंबईत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर, या संपूर्ण प्रकरणावर त्यांच्या मातोश्री शर्मिला ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना शर्मिला ठाकरे यांनी मला याचा अभिमान वाटतोय अशी प्रतिक्रीया दिली आहे. त्या म्हणाल्या, मला अभिमान आहे, खूप अभिमान आहे. मी पण वाट बघते माझ्यावर कधी केस होते. त्यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज पाहिजेत. आता परवाच साहेब म्हणालेत की आता किल्ल्यावर सरकार नमो सेंटर उभारणार आहेत. महाराजांपेक्षा यांचा किल्ले हायजॅक करण्याचा प्रयत्न आम्ही होऊ देणार नाही. तसेच पंतप्रधान येऊन गेले, त्यांना वेळ मिळाला नसेल. मी पण पाहिले किती धुळीने भरलेला पुतळा होता. पुढे बोलताना शर्मिला ठाकरे यांनी वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीवरून पण संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, राज्यातील किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. परंतु, वांद्रे येथील किल्ल्यावर दारू पार्टी झाली आहे. या पार्ट्यांना कोणी परवानगी दिली? किल्ल्यांवर झोपडी बांधायला कोणी परवानगी दिली? इथे काय केले तर लगेच पोलिस येतात मग तिकडे का नाही पोलिस बघत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सुप्रीम कोर्टात निकाल लागत नाही मला सुप्रीम कोर्टालाही प्रश्न विचारायचा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस तीन वर्षांपासून सुरू आहे. सुप्रीम कोर्ट एवढे बिझी आहे की, त्यांना वेळच देत नाही. कोणाला बोलायचे हाच प्रश्न आहे.पक्षच बळकावून घेतले जात आहेत. आता जानेवारीमध्ये निकाल देणार आहेत, तोपर्यंत निवडणुका होऊन जातात. तुम्हाला निवडून येणार अशी खात्री आहे, तर मग तुम्ही मैदानात या आणि निवडणूक लढा, असे आव्हानही शर्मिला ठाकरे यांनी शिवसेना व राष्ट्रवादीला दिले. बिहारमध्ये जास्तीचे मतदान झाले खोटं बोला पण रेटून बोला असं काम सध्या सुरू आहे. बिहारमध्ये आकडेवारीनुसार 3.50 कोटी मतदार होते, आणि 7 कोटी मतदान झाले आहे. मुंबईसह राज्यातून ट्रेन भरून तिकडे गेल्या आहेत, ते तिकडे आणि इकडेही मतदान करणार. एखाद्या माणसाचा पक्ष बळकावून घेताय आणि मग तुमच्याकडे कोण पाहणार? निवडणुका निघून जातील मग सुनावणी घेऊन काय होणार? अशा शब्दात शर्मिला ठाकरे यांनी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीवरुन नाराजी व्यक्त केली. कबुतरांपेक्षा महाराजांसाठी गुन्हा दाखल झाला हे चांगले- अमित ठाकरे अमित ठाकरे यांच्यावर अद्याप एकही गुन्हा दाखल नव्हता. पहिलाच गुन्हा हा महाराजांसाठी दाखल झाला हे चांगले आहे, असे अमित ठाकरे म्हणाले, कबुतरांपेक्षा शिवाजी महाराज यांच्यासाठी गुन्हा दाखल होत असेल तर ते चांगले आहे. तसेच राज ठाकरे यांच्या घरात वाढलोय, त्यामुळे याला कोर्टात सामोरे जाईन, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले, राज ठाकरे यांना ही गोष्ट समजली तेव्हा ते फक्त हसले. गेल्या चार महिन्यांपासून हा पुतळा झाकून आहे. पंतप्रधान मुंबईत आले, त्यांनी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन केले. दहीहंडीच्या दिवशी अनेक नेते आले, जाहिरातबाजी केली. पण एकानेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले नाही. त्यामुळे आम्ही त्या पुतळ्याचे अनावरण केले, असे अमित ठाकरे यांनी म्हटले.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 10:29 pm

आयएएस अधिका-याच्या मुलाची आणि गरीब मजुरांच्या मुलांची परिस्थिती सारखी कशी?

अमरावती : देशाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई अमरावती येथे कार्यक्रमात बोलत असताना सांगितले आहे की अनुसूचित जाती आरक्षणात क्रीमी लेयर वगळले पाहिजे. मुख्य न्यायाधीश गवई म्हणाले की आर्थिकदृष्ट्या सुसज्ज घटकांसाठी आरक्षणाचा लाभ मर्यादित केला पाहिजे एखाद्या आयएएस अधिका-याच्या मुलाला आणि गरीब शेतक-याच्या मुलाची परिस्थिती सारखी कशी असू शकते. त्यांनी इंद्रा स्वाहनी खटल्यातील न्यायनिर्णयास संदर्भ देत […] The post आयएएस अधिका-याच्या मुलाची आणि गरीब मजुरांच्या मुलांची परिस्थिती सारखी कशी? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 10:20 pm

बिबट नसबंदीला केंद्र सरकारची मान्यता:वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून उपाययोजनांच्या सूचना

वनमंत्री गणेश नाईक यांनी मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. बिबट नसबंदीला केंद्र सरकारची मान्यता मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पुणे येथे आयोजित बैठकीत त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर आणि जागतिक स्तरावरील उपाययोजना अंमलात आणण्याच्या सूचना दिल्या. वनसंरक्षक (प्रादेशिक) यांच्या सभागृहात मानव-बिबट संघर्ष उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, मुख्य वनसंरक्षक मल्लिकार्जुन (नाशिक), आशिष ठाकरे (वनसंरक्षक, पुणे वनवृत्त), महादेव मोहिते (उपवनसंरक्षक, पुणे), प्रशांत खाडे (उपवनसंरक्षक, जुन्नर), श्रीधर्मबीर सालचिठठल (उपवनसंरक्षक, अहिल्यानगर), विवेक होशिंग (उपवनसंरक्षक, वन्यजीव), जयरामगौडा (उपवनसंरक्षक, शिक्षण), कुलराज सिंह (उपवनसंरक्षक, सोलापूर), सिध्देश सावडेकर (उपवनसंरक्षक, नाशिक) आणि पंकज गर्ग (उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण) यांच्यासह अनेक वनअधिकारी उपस्थित होते. नाईक यांनी नाशिकमधील वनकर्मचाऱ्यांवर झालेल्या बिबट हल्ल्याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवले. मानव-बिबट संघर्षात वनकर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असल्याने त्यांना आवश्यक ते सर्व साहित्य पुरवण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा योजनेतून आकस्मिक निधी त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. बांबू लागवड करून बिबट्यांना अटकाव करता येईल का, याबाबत अभ्यास करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीत खांडेकर यांनी ऊस शेती, बिबट अधिवास आणि प्रभावी उपाययोजनांबाबत माहिती दिली. यामध्ये साखर कारखान्यांनी करावयाची कार्यवाही, टायगर फाऊंडेशनवर आधारित नियोजन, बिबट्यांची गणना, बिबट्यांचे मायक्रोमॅपिंग, पोल्ट्री आणि हॉटेल वेस्टची विल्हेवाट, रेस्क्यू सदस्यांचा विमा, बेस कॅम्पचे सक्षमीकरण, कुरण विकास करून बिबट्यांसाठी अधिवास तयार करणे, तसेच मेंढपाळ आणि ऊस कामगारांसाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. प्रशांत खाडे यांनी मानव-बिबट संघर्षाबाबत केलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले, तर महादेव मोहिते यांनी टीटीसी बावधनमधील कामांची माहिती दिली. जून २०२६ पर्यंत ८० हून अधिक बिबट्यांवर उपचार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. आशिष ठाकरे यांनी पिंपरखेडमधील शोध अभियान सुरू ठेवण्याबाबत आणि त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या. बिबट्यांच्या संख्या नियंत्रणासाठी इम्युनो-कॉन्ट्रासेप्टिव्ह पद्धतीला केंद्र शासनाची परवानगी मिळाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 9:53 pm

निवडणूक निरीक्षकांनी दर्यापुरात आचारसंहितेचा आढावा घेतला:स्थानिक नगरपालिका निवडणुकीच्या तयारीची केली पाहणी

विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार, निवडणूक निरीक्षक प्रमोद दंडोले यांनी दर्यापूर शहराला भेट देऊन स्थानिक नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचा आढावा घेतला. त्यांनी निवडणुकीच्या तयारीचा आणि कामकाजाचा सखोल अभ्यास केला. या भेटीदरम्यान, दंडोले यांनी निवडणुकीची सुरक्षा व्यवस्था, आवश्यक मनुष्यबळ आणि एकूण नियोजनाची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीचे कामकाज व्यवस्थित पार पाडण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी दादासाहेब दराडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रवींद्रकुमार कानडजे, मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे, दर्यापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी, ठाणेदार सुनील वानखडे आणि सीडीपीओ अमोल मेरगळ यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक निरीक्षक प्रमोद दंडोले यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश दिले की, आगामी नगरपालिका निवडणूक निर्भय, निःपक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 9:49 pm

ट्रान्स पुरुषाचे स्त्री बीज सुरक्षित ठेवण्यास विरोध; एआरटी अ‍ॅक्ट लागू नसल्याचा केंद्राचा युक्तिवाद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ट्रान्सजेंडर व्यक्तींना सहायक प्रजनन तंत्रज्ञान (असिस्टेड रिप्रॉडक्शन टेक्नॉलॉजी अर्थात एआरटी) अ‍ॅक्ट लागू होत नाही. कायदा ट्रान्सजेंडरला आपले स्त्री बीज जतन करून ठेवण्याची परवानगी देत नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. २८ वर्षीय ट्रान्सजेंडर हरी देवगीथ जन्मली तेव्हा मुलगी होती. नंतर तिने शस्त्रक्रिया करून घेऊन पुरुष म्हणूनच राहायचे ठरवले. २०२३ मध्ये […] The post ट्रान्स पुरुषाचे स्त्री बीज सुरक्षित ठेवण्यास विरोध; एआरटी अ‍ॅक्ट लागू नसल्याचा केंद्राचा युक्तिवाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 9:19 pm

मानसिक तणाव : ‘एआय’ची मदत घेणा-यांत पुरुषच अधिक

पुणे : प्रतिनिधी तरुणांमध्ये मानसिक ताणतणाव, भावनिक गोंधळ आणि असुरक्षिततेच्या स्थितीत मदत मिळवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्लॅटफॉर्मचा वापर झपाट्याने वाढत आहे. पुण्यातील ‘कनेक्टिंग ट्रस्ट’ या मानसिक आरोग्य व आत्महत्या प्रतिबंधासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थेच्या हेल्पलाइनवर गेल्या वर्षभरात मिळालेल्या सुमारे ९ हजार फोन कॉल्सपैकी तब्बल ९०० कॉल्स एआय प्लॅटफॉर्म्सकडून सुचविण्यात आल्याचे समोर आले आहे. तरुणांनी ‘एआय’ला मन […] The post मानसिक तणाव : ‘एआय’ची मदत घेणा-यांत पुरुषच अधिक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 9:17 pm

डोनाल्ड ट्रम्प यांची माघार; भारतासोबत करार होणार! भारत-अमेरिका व्यापार करारातील अडथळा दूर

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेने भारतावर २५ टक्के अतिरिक्त शुक्ल लादले होते, ते आता मागे घेण्यास डोनाल्ड ट्रम्प तयार आहेत. तसेच भारत अमेरिकेच्या कृषी उत्पादनांसाठी आपल्या देशाील बाजारपेठ खुली करण्यास तयार असल्याचेही समोर आले आहे. तसेच दोन्ही देशांदरम्यान अलिकडच्या काळात वाढलेला व्यापारातील तणाव कमी करण्यास तयार आहेत. रशियाकडून तेल खरेदीमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता, […] The post डोनाल्ड ट्रम्प यांची माघार; भारतासोबत करार होणार! भारत-अमेरिका व्यापार करारातील अडथळा दूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 9:16 pm

‘एससी’च्या आरक्षणात ‘क्रिमिलेअर’ लागू करा! सरन्यायाधीश गवई यांचा पुनरुच्चार

अमरावती (आंध्र प्रदेश) : वृत्तसंस्था अनुसूचित जातींमधील (एससी) आरक्षणातही क्रिमिलेअर (उत्पन्न मर्यादा) लागू करण्याच्या आपल्या भूमिकेचा सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. आरक्षणाच्या बाबतीत एका आयएएस अधिका-याच्या मुलाची आणि एका गरीब शेतमजुराच्या मुलाची बरोबरी करता येणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. भारत आणि ७५ वर्षांतील जिवंत भारतीय संविधान या विषयावरील कार्यक्रमात […] The post ‘एससी’च्या आरक्षणात ‘क्रिमिलेअर’ लागू करा! सरन्यायाधीश गवई यांचा पुनरुच्चार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 9:14 pm

‘लाडकी’च्या ‘ई-केवायसी’ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या ज्या महिलांचे ई केवायसी अद्याप झालेले नाही त्यांच्यासाठी आता महत्त्वाची बातमी आहे. या योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी १८ नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले होते. आता त्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती […] The post ‘लाडकी’च्या ‘ई-केवायसी’ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 9:12 pm

ज्वालामुखीचा उद्रेक : ४ किमी उंच उसळल्या आगीच्या ज्वाळा

सकुराजिमा : वृत्तसंस्था जपानच्या कागोशिमा प्रदेशातील सकुराजिमा ज्वालामुखीचा भीषण उद्रेक झाला, ज्यामुळे आकाशात तब्बल ४,४०० मीटर उंच राख, धूर आणि आगीचे प्रचंड लोळ उसळले. लालसर दगड आणि स्फुल्लिंग हवेत वेगाने उडताना दिसले आणि काही क्षणांत संपूर्ण परिसर राखेच्या धुक्यात गायब झाला. सकुराजिमा हा जपानमधील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखींमध्ये गणला जातो. या उद्रेकानंतरही ज्वालामुखी शांत न झाल्याने […] The post ज्वालामुखीचा उद्रेक : ४ किमी उंच उसळल्या आगीच्या ज्वाळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 9:09 pm

लहान जंतूने उलगडले दीर्घायुष्याचे रहस्य!

नवी दिल्ली : प्रतिनिधी दीर्घायुष्यासाठी पौष्टिक आहार घेणे कितीही फायदेशीर असले, तरी ते कायम पाळणे अवघड असते. यावर उपाय शोधणा-या शास्त्रज्ञांनी सी. एलिगन्स (एक छोटासा जंतू) या मॉडेल जीवावर संशोधन केले आहे. या संशोधनातून असे दिसून आले आहे की, स्पर्श आणि वास यांसारख्या संवेदी अनुभवांमुळे दीर्घायुष्य वाढवणारे परिणाम नष्ट होऊ शकतात. युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनच्या संशोधनातून […] The post लहान जंतूने उलगडले दीर्घायुष्याचे रहस्य! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 9:07 pm

सीईओ संजीता महापात्रांनी दिव्यांग जागृती रथाला हिरवी झेंडी दाखवली:चांदूरबाजार तालुक्यात विविध विभागांच्या कामकाजाचा घेतला आढावा

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्रा यांनी नुकतीच चांदूरबाजार तालुक्याला भेट दिली. या भेटीदरम्यान, त्यांनी पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच, स्थानिक पंचायत समितीने सुरू केलेल्या दिव्यांग जागृती रथाला हिरवी झेंडी दाखवून या मोहिमेचा शुभारंभ केला. हा रथ ग्रामीण भागातील सर्व गावे आणि शाळांमध्ये जाऊन दिव्यांगांसह नागरिकांमध्ये सामाजिक जागृती निर्माण करेल. समाजात आजही दिव्यांगांबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. तसेच, काही शालेय विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना त्यांच्या अल्पशा दिव्यांगत्वाची जाणीव नसते, ज्यामुळे ते शासनाच्या मदतीपासून वंचित राहतात. ही मोहीम याच उद्देशाने हाती घेण्यात आली आहे. शासनाने दिव्यांगत्वाचे २१ प्रकार निश्चित केले आहेत. यामध्ये अंधत्व, अंशतः अंधत्व, कर्णबधिर, वाचा दोष, अस्थिव्यंग, मानसिक आजार, अध्ययन अक्षमता, मेंदूचा पक्षाघात, स्वमग्नता, बहुविकलांग, कुष्ठरोग, बुटकेपणा, बौद्धिक अक्षमता, अविकसित मांसपेशी, मज्जा संस्थेतील आजार, मल्टीपल स्क्लेरोसिस, थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, ॲसिड हल्लाग्रस्त पीडित आणि कंपवात रोग यांचा समावेश आहे. या रथाचा मुख्य उद्देश या २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करणे, दिव्यांगांचा शोध घेणे, त्यांना योग्य औषधोपचार, आवश्यक सुविधा आणि शासकीय मदत पोहोचवणे हा आहे. याच भेटीदरम्यान, सीईओ महापात्रा यांच्या हस्ते राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम, मुख्यमंत्री ग्राम समृद्धी पंचायत अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला. त्यांनी तालुक्यातील शिरजगाव बंड, बेलोरा आणि चिंचोली काळे या गावांना भेटी देऊन नागरिक, शाळा आणि अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंचायत समितीच्या सभागृहात त्यांनी सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि पंचायत समिती अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील सातनवारी ग्रामपंचायतीप्रमाणे डिजिटल कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चांदूरबाजार तालुक्यातील २३ ग्रामपंचायती आता डिजिटल झाल्या आहेत. या संपूर्ण दिवसाच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत गट विकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी गणेश घोगरकर, गट शिक्षण अधिकारी कुचे, पंचायत विस्तार अधिकारी रामेश्वर रामागडे, सुरेश लांडगे, बांधकाम अभियंता राजेश अडगोकार, निखिल नागे, राजकुमार वसुले, सरपंच भैय्यासाहेब कडू, अरुणा काळे, नंदा वाकोडे, उमेदचे सागर वानखेडे, सुभाष तांबे, अरविंद मून यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि गट साधन केंद्राच्या महिला शिक्षिका उपस्थित होत्या.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 8:57 pm

दर्यापुरात नगराध्यक्षपदासाठी 7, नगरसेवकपदासाठी 139 अर्ज दाखल:आज नामनिर्देशन पत्राची छाननी; माघारीकडे सर्वांचे लक्ष

दर्यापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया १७ नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली. नगराध्यक्षपदासाठी ७, तर नगरसेवकांच्या २५ जागांसाठी १३९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ही निवडणूक २ डिसेंबर रोजी होणार आहे. १८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यामुळे कोणत्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरतात आणि कोणाचे रद्द होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २६ नोव्हेंबरपर्यंत असल्याने माघारीच्या काळात कोण कोण अर्ज मागे घेतो, याबाबतही उत्सुकता आहे. नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या मंदाकिनी भारसाकळे, भाजपच्या नलिनी भारसाकळे, शिवसेना शिंदे गटाचे प्रदीप मलीये, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बबलू कुरेशी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या प्रा. डॉ. भावना भुतडा (गावंडे), एमआयएमचे अदनान मारचिया आणि दे दणका पार्टीचे रमेश पुंडलिकराव वर्धे यांचा समावेश आहे. नगराध्यक्षपदासाठी ७ अर्ज दाखल झाल्याने दर्यापूर नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करताना रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. प्रत्यक्ष प्रचाराला अजून वेळ असला तरी, उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी आतापासूनच प्रचाराच्या नियोजनावर भर दिला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती होती. काँग्रेसच्या उमेदवारासोबत खासदार बळवंतराव वानखडे आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासोबत अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे होते, तर शिवसेना उमेदवाराचा अर्ज दाखल करताना माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि रवींद्र गणोरकर उपस्थित होते. जिल्ह्यात इतरत्र कुठेही आमदार, खासदार किंवा माजी खासदारांची अशी उपस्थिती दिसली नाही, ज्यामुळे दर्यापूरची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 8:55 pm

माझी बॅटिंग अजून सुरू व्हायचीये:आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार आपण बाहेर काढणार, सतेज पाटलांचा सरकारला इशारा

माझी बॅटिंग अजून सुरू व्हायची आहे, हलगी आता कुठे तापू लागली आहे. जसजशी निवडणूक लागेल तसतशी हलगी वाजणार असून, आरोग्य खात्यातील भ्रष्टाचार आपण बाहेर काढणार आहोत, असा इशारा कॉंग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात शिंदे गटाकडून सुरू असलेल्या नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी शिवसेना शिंदे गटावर देखील निशाणा साधला आहे. सतेज पाटील म्हणाले, या निवडणुकीमध्ये पैशाचा महापूर आणण्याचा प्रयत्न केला जाईल. पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच आहे. मात्र, माझी बॅटिंग अजून सुरू व्हायची आहे. हलगी आता कुठे वाजू लागली आहे. जसजशी निवडणूक लागेल तसतशी हलगी वाजणार आहे आणि या सर्वांचा समाचार आपण या प्रचारांमध्ये घेणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला. भ्रष्टाचाराचा पैसा, आरोग्य खात्यातील पैसा कसा वॉर्डात वाटला जाईल, याची सर्व कागद देणार असल्याचा इशाराही पाटील यांनी दिला आहे. प्रकाश आबिटकरांचे सतेज पाटलांना प्रत्युत्तर सतेज पाटील यांनी केलेल्या आरोपानंतर प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, सतेज पाटील यांच्याकडूनच मी समजून घेईन आरोग्य विभागामध्ये नेमके काय भ्रष्टाचार झाले आहेत. आम्ही दोघे मिळून ते भ्रष्टाचार बाहेर काढू, असा टोला सतेज पाटलांना लगावला. तसेच आम्हाला लोकांनी संधी दिली आहे ते चांगले काम करण्यासाठी, भ्रष्टाचार करण्यासाठी नाही. पाटील यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही समुदायिकपणे भ्रष्टाचार बाहेर काढू. वस्तुनिष्ठ परिस्थितीनुसार आम्ही महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे आबिटकर म्हणाले. अंजली दमानियांच्या आरोपांवर आबिटकरांचे स्पष्टीकरण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ५०० कोटींचे हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप करत हल्लाबोल केला आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, (नाव नमूद नसलेले नेते/अधिकारी) आबिटकर यांनी स्पष्ट केले आहे की, दमानिया यांनी केलेल्या ट्वीटचा आरोग्य विभागाशी कोणताही संबंध नाही. आरोग्य विभागामध्ये अशा पद्धतीची कोणतीही अनियमितता झालेली नाही. त्यामुळे, अंजली दमानिया यांना नेमके काय म्हणायचे आहे, हे पहिल्यांदा समजून घ्यायला हवे, असे मत आबिटकर यांनी व्यक्त केले.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 8:54 pm

स्फोटात स्विस अ‍ॅप ‘थ्रीमा’चा वापर

नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासाला आता एक महत्त्वाचे डिजिटल वळण मिळाले आहे. या हल्ल्यातील संशयितांनी गोपनीयतेसाठी ओळखल्या जाणा-या स्विस मेसेजिंग अ‍ॅप थ्रीमा चा वापर केल्याचे सुरक्षा यंत्रणांनी उघड केले आहे. या अ‍ॅपची अत्यंत मजबूत एन्क्रिप्शन प्रणाली आणि युजरची ओळख लपवण्याची क्षमता यामुळे तपास अधिका-यांसाठी हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. […] The post स्फोटात स्विस अ‍ॅप ‘थ्रीमा’चा वापर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 8:52 pm

चिमुकला रेल्वे बर्थवरून खाली पडले आणि चमत्कार आणि बाळ खुदकन हसले

नागपूर : पालकांचे थोडेसे दुर्लक्ष झाले आणि दीड वर्षाचा चिमुकला बर्थवरून खाली पडला. पालकच नव्हे तर कोचमधील सर्वच प्रवाशांच्या काळजात धस्स करणारा हा प्रसंग होता. निरागस चिमुकला शांत झाल्याने पालकांनी आक्रोश सुरू केला. मात्र, प्रसंगावधान राखत रेल्वे कर्मचा-यांनी तातडीने उपाययोजना केली आणि काही वेळेतच चिमुकला हसू लागला. ट्रेन नंबर १२६२५ केरळ एक्सप्रेसमध्ये अनेकांचा जीव भांड्यात […] The post चिमुकला रेल्वे बर्थवरून खाली पडले आणि चमत्कार आणि बाळ खुदकन हसले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 8:40 pm

उद्धव-राज ठाकरे यांचे शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाला एकत्र अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिल्यानंतर मतभेद गाडून एकत्र आलेल्या उद्धव व राज ठाकरे या बंधूंनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजीपार्क येथील स्मृतिस्थळावर एकत्र येऊन अभिवादन केले. दोन्ही भावांनी एकत्र यावे ही बाळासाहेबांची इच्छा होती व तब्बल १३ वर्षांनंतर स्मृतिस्थळावर एकत्र येऊन ठाकरे बंधूंनी अभिवादन केले. स्व. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त केंद्रीय […] The post उद्धव-राज ठाकरे यांचे शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळाला एकत्र अभिवादन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 8:07 pm

काशीनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशाला स्थगिती

मुंबई : प्रतिनिधी पालघर हत्याकांड प्रकरणातील साक्षीदार काशीनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशावरून विरोधकांनी जोरदार टीका केल्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी काशीनाथ चौधरींच्या प्रवेशाला स्थगिती दिली आहे. पालघर जिल्हाध्यक्ष भारत राजपूत यांना याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे. काशिनाथ चौधरी यांना पालघर साधू हत्याकांड प्रकरणावरून भाजपने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार असताना रान […] The post काशीनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशाला स्थगिती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 8:02 pm

बाळासाहेबांनी हिंदूंकडे कधीच व्होटबँक म्हणून पाहिले नाही

मुंबई : प्रतिनिधी बाळासाहेबांनी हिंदूंकडे कधीच व्होटबँक म्हणून पाहिले नाही. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता. तसेच बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणा-यांची किंवा त्यावर मतं मागणा-यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आज टीकास्त्र सोडले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब […] The post बाळासाहेबांनी हिंदूंकडे कधीच व्होटबँक म्हणून पाहिले नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 7:58 pm

पर्यावरणवादी असूनही एसटीपी प्लांट का नाही:अमित साटम यांचा आदित्य ठाकरेंवर थेट हल्ला; 'बालबुद्धी' म्हणत कारशेडच्या विरोधावरून टोला

आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजप नेत्यांनी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी नुकतेच 'मुंबई व्हिजन' नावाच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मराठी टक्का, हिंदी भाषेची सक्ती आणि मुंबईतील विकास कामांवरून त्यांनी ठाकरे बंधूंवर टीकास्त्र सोडले. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना अमित साटम म्हणाले, जे स्वतःला पर्यावरणवादी समजतात त्यांनी एसटीपी प्लांट का केला नाही. महानगरपालिकेमध्ये एवढे पैसे आहेत, आंतरराष्ट्रीय शहर आहे तरीदेखील एसटीपी प्लांट नाही. रस्ते धुवून काढण्यासाठी त्यांनी बजेट द्यायला पाहिजे, मुंबईतली हवा चांगली आहे. बालबुद्धी असल्यामुळे अरे कार शेडला विरोध झाला. तसेच काही लोक स्वतःला युवा नेते म्हणून घेतात, पण या युवा नेत्यांनी युवांसाठी काहीच केले नाही, असे म्हणत टोला लगावला आहे. अमित साटम यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून ठाकरेंना लक्ष्य केले. ते म्हणाले, मराठी टक्का आज मुंबईमध्ये 35 टक्के आहे. आधी फक्त मराठी माणसाच्या गप्पा व्हायच्या, आता काम होत आहेत. बीडीडी चाळीचे संपूर्ण काम देवेंद्र फडणवीस यांनी केले, पण काही लोक निवडणुकीनंतर मराठी माणसांचा फक्त वापर करतात. आम्ही मराठी तरुणांना नोकऱ्या आणि स्टार्टअप्ससाठी प्रोत्साहन देत आहोत, पण काही लोक फक्त मराठी माणसांचा आणि तरुणांचा राजकारणासाठी फायदा घेतात, असे म्हणत साटम यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून अमित साटम यांनी दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, तुम्ही तुमच्या मुलांना बॉम्बे स्कॉटिश शाळेत टाकले, तुमची मुले जर्मन आणि इंग्लिश शिकली. मग, तुमचा हिंदीला विरोध का? ही दुटप्पी भूमिका का घेता? तसेच, 'खान' प्रवृत्तीवर टीका करताना त्यांनी स्पष्ट केले की, पाकिस्तानी झेंडा लावणे, बॉम्बस्फोटमधील आरोपीसोबत प्रचार ही 'खान' प्रवृत्तीची ओळख आहे. त्यामुळे या मुंबईला 'खान' महापौर नको, ही आमची भूमिका आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 7:47 pm

बनावट पॅनकार्डप्रकरणात आझम खानसह मुलाला ७ वर्षांची शिक्षा

रामपूर : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला यांना प्रत्येकी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रामपूरच्या खासदार/आमदार न्यायालयाने सोमवारी बनावट पॅन कार्ड प्रकरणात त्यांना दोषी ठरवले. त्यानंतर लगेचच शिक्षा जाहीर करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही बाजूंना प्रत्येकी ५०,००० रुपयांचा दंडही ठोठावला. निकालानंतर पोलिसांनी आझम खान आणि अब्दुल्ला यांना न्यायालयात ताब्यात घेतले. […] The post बनावट पॅनकार्डप्रकरणात आझम खानसह मुलाला ७ वर्षांची शिक्षा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 7:06 pm

परवडणाऱ्या घरांसाठी घर हक्क परिषदेची आता रस्त्यावरची लढाई:नागपूर अधिवेशनावर भव्य मोर्चा काढणार- विश्वास उटगी

घर हक्क परिषदेच्या माध्यमातून विविध ३१ संघटना एकत्र आल्या असून परवडणारी घरे मिळाली पाहिजेत यासाठी या संघटना लढा देत आहेत. भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची घरे मुंबईतच मिळाली पाहिजे, मुंबई बाहेर शेलू वांगणी सारख्या दूर जागी जाणार नाही असा स्पष्ट इशारा देत बंद पडलेल्या गिरण्या व कारखान्यांच्या फक्त ३३ टक्के जागेवर नाही तर संपूर्ण जागेवर ही घरे द्यावीत. हक्कांच्या घरासाठी सर्व संघटना एकत्र येऊन तीव्र लढा येणार असून नागपुरच्या अधिवेशनावर भव्य मोर्चा काढून सरकारलाही जागे करु, असे घर हक्क परिषदेच्या वतीने विश्वास उटगी यांनी म्हटले आहे. गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी म्हणाले की, सरकार आम्हाला जमीन देत नाही मात्र काही उद्योगपतींना या जमिनी देत आहे. भाड्याच्या घरात राहणारे, पागडीवर राहणारे, झोपडपट्टीत राहणारे तसेच जुन्या इमारातींच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न आहे पण सरकार या लोकांचे हक्काच्या घराचे अधिकार दडपून टाकत आहे. या जागा बिल्डरांना देऊन मुळ भूमीपूत्रांना मात्र मुंबईच्या बाहेर घालवले जात आहे. १ लाख १० हजार गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी नोंदणी झालेली आहे पण मागील २५ वर्षात अवघी १५ हजार घरे देण्यात आली. आहेत. लाखो कामगारांना त्वरित घरे का मिळाली नाहीत? मुंबई बाहेरील धुळे, सोलापूर, इचलकरंजी, नागपूर अशा अनेक ठिकाणी बंद पडलेल्या NTC मिल कामगारांना न्याय कधी मिळणार? राज्य सरकारने १ ऑगस्ट २०१९ ला जीआर काढून शेलू, वांगणीला घरे देऊ असे म्हटले आहे. हा जीआर रद्द करण्याची मागणी असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सरकारमधील मंत्र्यांना तसे निवेदन दिलेले आहे, जीआर बदलण्याचे आश्वासन दिले आहे पण अजून अंमलबजावणी मात्र झालेली नाही. राज्य सरकारचे गृहनिर्माण धोरण हे परवडणारी हक्काची घरे नाकारणे आहे. या भूमिपुत्रांनी कुठे जायचे, या प्रश्नावर न्यायलयात लढा सुरु असून भूमिपुत्रांच्या बाजूने निकाल असतानाही त्याची अंमलबजावणी केली जात नाही म्हणून सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. २३ नोव्हेंबरला पहिली सभा शैलेंद्र विद्यालय दहिसर पूर्व येथे हेाईल तर दुसरी सभा कांजूर मार्ग/ भांडूप येथील वस्त्या मध्ये हेाईल, त्यानंतर ठाणे, पनवेलसह इतर भागातील वस्त्यांमध्ये या सभा घेतल्या जाणार आहेत. हक्कांच्या घरासाठी सर्व राजकीय पक्षांची मदत घेऊ तसेच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना निवेदनही देणार आहोत असे विश्वास उटगी यांनी सांगितले. यावेळी धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, शिशिर ढवळे, दत्तात्रय अट्याळकर, आसिष मिश्रा आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 6:59 pm

कबुतरांपेक्षा महाराजांसाठी गुन्हा दाखल झाला हे चांगले:राज ठाकरेंच्या घरात वाढलोय, कोर्टात जाईन; अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

कबुतरांपेक्षा महाराजांसाठी जर गुन्हा दाखल होत असेल तर ते चांगले आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिली आहे. तसेच अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे देखील अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले की, शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून घाणेरड्या कापडाने झाकून ठेवला होता. अमितने त्याचे अनावरण करून सन्मान राखला, तरीही त्याच्यावर गुन्हा दाखल करता? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच ही दादागिरी मोडून काढू असा इशाराही त्यांनी दिला आहे. अमित ठाकरे यांच्यावर अद्याप एकही गुन्हा दाखल नव्हता. पहिलाच गुन्हा हा महाराजांसाठी दाखल झाला हे चांगले आहे, असे अमित ठाकरे म्हणाले, कबुतरांपेक्षा शिवाजी महाराज यांच्यासाठी गुन्हा दाखल होत असेल तर ते चांगले आहे. तसेच राज ठाकरे यांच्या घरात वाढलोय, त्यामुळे याला कोर्टात सामोरे जाईन, असेही ते म्हणाले. पुढे बोलताना अमित ठाकरे म्हणाले, राज ठाकरे यांना ही गोष्ट समजली तेव्हा ते फक्त हसले. गेल्या चार महिन्यांपासून हा पुतळा झाकून आहे. पंतप्रधान मुंबईत आले, त्यांनी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन केले. दहीहंडीच्या दिवशी अनेक नेते आले, जाहिरातबाजी केली. पण एकानेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले नाही. त्यामुळे आम्ही त्या पुतळ्याचे अनावरण केले, असे अमित ठाकरे यांनी म्हटले. आदित्य ठाकरे काय म्हणाले? आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत अमित ठाकरे यांना पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणाले, आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! 4 महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमितने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने, त्या पुतळ्यावरचे कापड काढून अनावरण केले, महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता? मोडून काढू ही दादागिरी, निवडणूक आयोग सरकारची! असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 6:43 pm

'जागर विश्वजननीचा' ग्रंथाचे पुण्यात प्रकाशन:डॉ. विद्यासागर म्हणाले, स्त्रीशक्ती जीवनाचा मूळ आधार

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित भालचंद्र विद्यासागर यांनी स्त्रीशक्तीला जीवनाचा मूळ आधार म्हटले आहे. भारतीय परंपरेत स्त्रीशक्तीला आदराचे स्थान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. विश्वकर्मा पब्लिकेशन्सतर्फे डॉ. कल्याणी हर्डीकर लिखित ‘जागर विश्वजननीचा’ या ग्रंथाचे प्रकाशन डॉ. विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात झाले. पुणे येथील श्रीवासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त 'नारायणरत्न' शरद जोशी महाराज यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते, लेखिका डॉ. कल्याणी हर्डीकर, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी आणि संपादक संदीप तापकीर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. पंडित भालचंद्र विद्यासागर म्हणाले की, आजही स्त्रीशक्ती प्रकर्षाने पुढे येत असून त्याचे स्वागतच केले पाहिजे. स्त्रीशक्तीचा जागर भारतीय परंपरेत वैश्विक दृष्टिकोन ठेवून केला गेला आहे. स्त्रित्वाचा जागर म्हणजे पूजन, आकलन, नम्र स्वीकार आणि आचरण अपेक्षित आहे. स्त्री-पुरुष समानता म्हणजे स्त्रियांना विकासाच्या समान संधी मिळणे, त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार व अन्याय होऊ न देणे, त्यांना तुच्छ न लेखणे ही खरी समानता आहे. 'नारायणरत्न' शरद जोशी महाराज यांनी स्त्रीला चैतन्यशक्ती आणि लक्ष्मी संबोधले. स्त्रियांचे अष्टभुजा आणि दशभुजा रूप समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवले पाहिजे, असे ते म्हणाले. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते यांनी स्त्री संतांची हस्तलिखिते संकलित करून त्यांचे साहित्य पुढे आणण्याची गरज व्यक्त केली. आजही मोजक्याच स्त्री संत साहित्यिकांचे साहित्य उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ पत्रकार वर्षा कुलकर्णी म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीत स्त्रियांना आदराचे स्थान आहे. आपल्या संस्कृतीत नदीलाही मातेचा दर्जा दिला आहे. पाश्चात्त्य देशातील विचारवंतही भारतीय अध्यात्म आणि परंपरेचा आधार घेत त्यांच्या समस्यांवर उत्तरे शोधत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 6:09 pm

पुण्यात तरुणावर कोयत्याने वार, डोक्यात दगड घालून खून:सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील घटना; अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

पुणे शहरात गुन्हेगारी माेठ्या प्रमाणात वाढलेली असून आता सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक या ठिकाणी साेमवारी मीनाक्षीपुरम येथील कृष्णकुंज साेसायटीच्या पार्किंगमध्ये एका २२ वर्षीय तरुणावर टाेळक्याने धारदार काेयत्याने सपासप वार करुन आणि डाेक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला आहे. खून केल्यानंतर पाच आराेपी हे घटनास्थळावरुन पसार झाले असून त्यांचा शाेध पाेलिसांनी सुरु केला आहे. ताैफीर रफीक शेख (वय- २२,रा.काेंढवा,पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे सदर परिसरात खळबळ उडून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मयत ताैफीर शेख हा काेंढवा भागात रहाण्यास असून ताे साेमवारी वडगाव बुद्रुक येथील सिंहगड काॅलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कृष्णकुंज इमारतीच्या पार्किंग मध्ये बसला हाेता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याठिकाणी अचानक पाचजणांचे टाेळके हातात काेयते घेऊन आले. त्यांनी तरुणावर थेट काेयत्याने हल्ला केल्याने ताैफीर याचा रक्ताच्या थाराेळयात पडला. त्यानंतर आराेपींनी त्याच्या डाेक्यात दगड घालून त्याचा क्रुरपणे खून केला आहे. यानंतर आराेपी हे पसार झाले. पाेलिसांना याबाबत माहिती मिळताच, सिंहगड राेड पाेलिस ठाण्याचे पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ताैफीर याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेला. प्रथमदर्शनी पाेलिसांनी हा खूनाचा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याचे सांगितले आहे. यामधील आराेपींचा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन सहभाग निष्पन्न करण्यात येत आहे. सिंहगड रस्ता पाेलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात आराेपी विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 6:08 pm

पुण्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा:प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन; पुढील टप्पा असहकार

महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी पुण्यात भव्य मोर्चा काढला. शनिवारवाडा ते शिक्षण आयुक्तालयापर्यंत काढलेल्या या मोर्चात हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाच्या नेतृत्वाखालील या मोर्चात राज्यभरातून सुमारे सात ते आठ हजार कर्मचारी सहभागी झाले होते. कंत्राटी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीमुळे बदलापूर येथील लैंगिक अत्याचारासारख्या गंभीर घटना घडल्याचा आरोप संघटनेने केला. त्यामुळे शासनाने तात्काळ नियमित भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर शासनाने शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा अध्यादेश काढला असला तरी, प्रत्यक्ष भरती प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. २००५ नंतर चतुर्थश्रेणी पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शाळांमध्ये कंत्राटी कर्मचारी नेमले जातात, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. याशिवाय, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची २४ वर्षांनंतरची वेतननिश्चिती पूर्वीप्रमाणे S5 श्रेणीत करावी, नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजना (१०-२०-३०) लागू करावी, पात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक पदावर विनाअट पदोन्नती द्यावी आणि अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे डिमोशन थांबवावे, अशा विविध मागण्या संघटनेने लावून धरल्या आहेत. मोर्चाचे नेतृत्व करणारे संघटनेचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी हा मोर्चा केवळ एक इशारा असल्याचे सांगितले. त्यांनी चेतावणी दिली की, मागण्या मान्य न झाल्यास पुढील टप्प्यात तीव्र असहकार आंदोलन छेडले जाईल. हिवाळी अधिवेशनात हजारो कर्मचारी पुन्हा एकत्र येतील आणि शेवटचा पर्याय म्हणून दहावी-बारावीच्या परीक्षा, निवडणूक काम आदी सर्व शासकीय कामांवर बहिष्कार टाकला जाईल. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी शासनाने ५२ हजार शिक्षकेतर पदे रद्द केल्याचा निषेध केला. त्यांनी कंत्राटी भरती थांबवून नियमित भरती सुरू करावी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षक मतदारसंघात मतदानाचा हक्क द्यावा, अशी मागणी केली. संघटनेचे अध्यक्ष अनिल माने, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, खांडेराव जगदाळे, हरिषचंद्र गायकवाड, शिवाजी कामाथे आदींसह अनेक संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. शिक्षण विभागाकडे निवेदन सादर करून मोर्चाची सांगता झाली. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास संघटनेने उग्र आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने शिक्षण खात्यासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 6:05 pm

पुण्यात दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र?

पुणे : प्रतिनिधी आगामी काळात पुणे जिल्हयात होत असणा-या दोन महानगर पालिका निवडणुकीसाठी दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पातळीवरील नेत्यांनी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.त्यामुळे जेष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्तरावरची परिस्थिती पाहून स्थानिक नेत्यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची तयारी दाखवली आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीची प्रक्रिया […] The post पुण्यात दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 5:53 pm

कागलमध्ये अनपेक्षित युती!:हसन मुश्रीफांचे राजकीय कौशल्य पणाला, कट्टर विरोधक असलेल्या समरजित घाटगेंसोबत आघाडी

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक मतदारसंघांमध्ये राजकीय समीकरणे देखील बदलत असल्याची दिसत आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कागलमध्ये मागील 24 तासांत महत्त्वाच्या घडामोडी घडल्याचे दिसून आले आहे. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सुरुवातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे समरजित घाटगे आणि शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक एकत्र आले होते. मात्र, मुश्रीफ यांनी आपले राजकीय कौशल्य पणाला लावत कट्टर विरोधक असलेल्या समरजित घाटगे यांच्यासोबतच आघाडी केली. मुश्रीफ गटाला नगराध्यक्ष पद तर घाटगे गटाला उपनगराध्यक्ष पद दिले आहे. त्यामुळे आता माजी खासदार संजय मंडलिक एकटे पडल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच कागल नगरपालिकेत राष्ट्रवादी आणि छत्रपती शाहू आघाडीची अनपेक्षित युतीवर हसन मुश्रीफ म्हणाले, आज राष्ट्रवादी व छत्रपती शाहू आघाडी- कागल यांची कागल नगरपरिषदेमध्ये आघाडी झाली. ही घटना इतकी अनपेक्षितपणे घडली की, प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत न करता आली नाही. याबाबत मी या सर्वांची माफी मागतो. तसेच माझे ज्येष्ठ मित्र माजी आमदार संजयबाबा घाटगे व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घ्यावा लागला. त्याबद्दल त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. पुढे बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, या आघाडीमुळे त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांना जास्त दिलासा कसा मिळेल, याबाबत मी प्रयत्न करेल. माझ्या व संजयबाबांच्या चर्चेमधून गैरसमज सुद्धा दूर होईल, अशी खात्री मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 5:49 pm

कडाक्याच्या थंडीतही नागपूर तापणार:8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन; शेतकरी प्रश्न, बेरोजगारी, महागाईवर होणार मंथन

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी एका अधिसूचनेद्वारे ही घोषणा केली. या अधिवेशनात राज्यातील कळीचे कायदे, जनहिताचे प्रश्न व विभागीय विकास आदी मुद्यांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात झालेल्या दिरंगाईवरही या अधिवेशनात गरमागरम चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगला आहे. राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदा व महापालिकांचीही निवडणूक होणार आहे. त्याची घोषणा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या घटनाक्रमामुळे राज्य विधिमंडळाचे नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन लांबणीवर पडेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सोमवारी एका अधिसूचनेद्वारे हे अधिवेशन 8 डिसेंबरपासूनच सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले. सरकार व विरोधकांत होणार जोरदार खडाजंगी या अधिसूचनेत विधानसभा व विधानपरिषदेचे कामकाज 8 डिसेंबर 2025 रोजी अनुक्रमे सकाळी 11 वा. व दुपारी 12 वा. सुरू होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यात हे अधिवेशन किती दिवसांचे असेल म्हणजे ते केव्हा संपुष्टात येईल याचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे हे अधिवेशन सरकार एक किंवा दोन आठवड्यांत आटोपते घेईल असे मानले जात आहे. या अधिवेशनात महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज दरवाढ, बेरोजगारी, कथित मतचोरी, कळीचे कायदे आदी मुद्यांवरून सरकार व विरोधकांत जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. सरकारकडून अधिवेशनाची तयारी पूर्ण दुसरीकडे, राज्य सरकारने या अधिवेशनासाठी तयारीला सुरुवात केली आहे. अधिवेशनाच्या सुरक्षेच्या तसेच लॉजिस्टिक दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. विधिमंडळ सचिवालयाने अधिवेशनासाठी सर्व सदस्यांना सूचना पाठवल्या आहेत. या अधिवेशनासाठी सर्व मंत्र्यांचे निवास व कार्यालये काही काळासाठी नागपुरात हलवण्यात येते. त्यामुळे पुढील काही दिवसांत नागपूरमध्ये राजकारण्यांची ये-जा वाढणार आहे. राज्य शासनाकडून अधिवेशनासाठी सुरक्षेच्या तसेच लॉजिस्टिक दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. विधिमंडळ सचिवालयाने अधिवेशनासाठी सर्व सदस्यांना सूचना पाठवल्या असून, नागपूरमध्ये रेल्वे व हवाई सेवांमध्येही अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी विधिमंडळ परिसरा व नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. नागपुरात केव्हापासून होते हिवाळी अधिवेशन? उल्लेखनीय बाब म्हणजे राज्य विधिमंडळाचे पावसाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला होते. तर नागपूर करारानुसार, हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. 1960 मध्ये पहिल्यांदा नागपुरात हिवाळी अधिवेशन झाले होते. ते 10 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर असे 27 दिवसांचे अधिवेशन होते. तेव्हापासून कधी 3 आठवडे, तर कधी 2 आठवड्यांचे हिवाळी अधिवेशन होत आहे. 1968 साली सर्वाधिक दिवसांचे हिवाळी अधिवेशन झाले होते. त्यावेळी 18 नोव्हेंबर ते 27 डिसेंबर असे एकूण 28 दिवसांचे अधिवेशन नागपुरात झाले होते. पण त्यानंतर या अधिवेशनाचा कालावधी सातत्याने कमी होत आहे. यंदाही हे अधिवेशन एक किंवा दोन आठवड्यांचे होण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 5:49 pm

नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचे दर्शन:भोसला मिलिटरी स्कूल परिसरात बिबट्या; मधल्या सुटीनंतर शाळा सोडली, विद्यार्थी-पालकांमध्ये भीती

नाशिकमध्ये सोमवारी पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिले. त्याने चक्क सुप्रसिद्ध अशा भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात प्रवेश केला. ही बातमी हां-हां म्हणता शहरभर झाली. बिबट्याच्या भीतीमुळे चक्क मधल्या सुटीनंतर शाळा सोडून देण्यात आली. वनविभागाने बिबट्याच्या शोधाची जोरदार मोहीम सुरू केलीय. ड्रोनच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला जातोय. विशेष म्हणजे नाशिकच्या गंगापूर भागात गुरूवारीही एक बिबट्या जेरबंद करण्यात आलाय. पालकांची झाली कोंडी नाशिकच्या सुप्रसिद्ध अशा भोसला मिलिटरी स्कूलच्या परिसरात बिबट्या शिरल्याचे समजताच शिक्षक आणि शाळेच्या स्टाफची घाबरगुंडी उडाली. गंगापूर रोडवर शाळा विस्तीर्ण परिसरात आहे. त्यामुळे तातडीने विद्यार्थ्यांच्या पालकांना ही माहिती कळवण्यात आली. अनेक पालकांनी बातमी समजताच शाळेकडे धाव घेतली. अनेक विद्यार्थ्यांचे पालक नोकरीनिमित्त बाहेर होते. त्यामुळे त्यांची काही प्रमाणात अडचण आणि धावपळ झाली. मधल्या सुटीनंतर विद्यार्थ्यांना घराकडे पाठवून शाळेला बिबट्यामुळे सुटी देण्यात आली. ड्रोनच्या माध्यमातून शोध वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित निर्मळ म्हणाले की, आम्हालाही भोसला मिलिटरी स्कूल परिसरात बिबट्या दिसल्याचे समजले. सुरक्षेच्या दृष्टीने शाळा परिसर निर्मनुष्य केला असून, वनविभागाच्या पथकाकडून तपास सुरू आहे. ड्रोनच्या माध्यमातूनही बिबट्याचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 5:21 pm

काशिनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती

पालघर : प्रतिनिधी काशिनाथ चौधरी यांच्या भाजप पक्षप्रवेशाला प्रदेश कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पत्र पाठवत काशिनाथ चौधरी यांचा पक्षप्रवेश तातडीने रोखण्याचे आदेश दिले. गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणात भाजपने मागील काळात काशिनाथ चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याच चौधरी यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राज्यभरातून […] The post काशिनाथ चौधरींच्या भाजप प्रवेशाला स्थगिती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 5:05 pm

शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिका-यांचे सामूहिक राजीनामे

नशिक: प्रतिनिधी येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला मोठा धक्का बसला आहे. युवा सेना तालुका उपाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष यांच्यासह अनेक पदाधिका-यांनी सामूहिक राजीनामे सादर करत पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष नेतृत्वाने निवडणूक प्रक्रियेत स्थानिक पदाधिका-यांना विश्वासात न घेता परस्पर उमेदवार जाहीर केला, तसेच पक्षासाठी सातत्याने काम करणा-यांकडे दुर्लक्ष करून ऐनवेळी […] The post शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिका-यांचे सामूहिक राजीनामे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 5:02 pm

राजन साळवींच्या मुलाला उमेदवारी नाकारली

रत्नागिरी : प्रतिनिधी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेलेल्या राजन साळवी यांना रत्नागिरीमध्ये मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत राजन साळवी यांच्या मुलाला उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस असल्याचे समोर आल्याची चर्चा आहे. राजन साळवी अन् उदय सामंत यांच्यातील अंतर्गत कलहाची चर्चा कोकणाच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुलाला […] The post राजन साळवींच्या मुलाला उमेदवारी नाकारली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 5:00 pm

2 महिन्यांपूर्वी शिंदेसेनेत आलेल्या 'मारोती'ची भाजपमध्ये उडी:मारोती क्यातमवार यांनी वसमत नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल

वसमत येथे दोन महिन्यांपूर्वीच काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेसेनेत दाखल झालेल्या डॉ. मारोती क्यातमवार यांनी सोमवारी ता. १७ अचानक भाजपामध्ये उडी घेतली. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी वसमतच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देखील दाखल केली. त्यांच्या या हनुमान उड्या नागरीकांसाठी चर्चेचा विषय बनल्या आहेत. वसमत येथील वैद्यकिय व्यवसायीक डॉ. मारोती क्यातमवार हे खासदार राजीव सातव यांचे निकटवर्तीय मानले जात होते. खासदार सातवांमुळेच ते काँग्रेसमध्ये रमले होते. मात्र खासदार सातवांच्या निधनानंतर त्यां्चे काँग्रेसमध्ये मन रमलेच नाही. त्यातच राष्ट्रवादीच्या (अजित पवारगट) नेत्यासोबत बेबनाव झाला. त्यावेळी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना मदतही केली नाही. त्यामुळे नाराज होत त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून मुंबई येेथे शिंदेसेनेत प्रवेश केला. दरम्यान, डॉ. क्यातमवार यांच्या शिंदेसेनेच्या प्रवेशामुळे वसमत तालुक्यात पक्षाला बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. तर पालिका निवडणुकीत त्यांच्या पक्ष प्रवेशाचा फायदा होईल असे बोलले जात होते. मात्र वसमत पालिकेमध्ये राष्ट्रवादी (अजित पवारगट) व शिंदेसेनेची युती झाली आहे. त्यातच नगराध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्यात आले. या संदर्भात आमदार राजेश नवघरे व आमदार संतोष बांगर यांच्यात चर्चाही झाली असून नगरसेवक पदाचे जागा वाटपही झाले. दरम्यान, शिेंदेसेनेने नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे दिल्यामुळे डॉ. क्यातमवार पुन्हा एकदा नाराज झाले. त्यामुळे त्यांनी शिंदेसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहिर केला. त्यांनी भाजपात प्रवेश करून जय श्रीरामचा नारा देत भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. त्यांच्या हनुमान उड्यांमुळे वसमतच्या राजकिय वर्तुळातून चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. या संदर्भात डॉ. क्यातमवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याचे स्पष्ट केले असून वसमतच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून उमेदवारी दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 5:00 pm

रामराजे हाती घेणार ‘धनुष्यबाण’?

सातारा : प्रतिनिधी फलटण तालुक्याला राजकीय भूकंप नवीन नाहीत. प्रत्येक निवडणुकीत फलटण तालुक्यात नवीन समीकरण पाहायला मिळते. यातच आता विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे नवीन समीकरण जोडून पाहत आहेत. नगरपालिका निवडणुकीत रामराजे नाईक-निंबाळकर हे ‘धनुष्यबाणा’ने विरोधकांचा सामना करणार असल्याची चर्चा फलटण तालुक्यात सुरू आहे. रामराजे नाईक-निंबाळकर हे दौन दिवसीय मुंबई दौ-यावर होते. त्यावेळी […] The post रामराजे हाती घेणार ‘धनुष्यबाण’? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 4:58 pm

अनगर नगरपंचायतीत भाजपचा विक्रम:17 पैकी 17 नगरसेवकांची झाली बिनविरोध निवड; आता नगराध्यक्षपदासाठी होणार निवडणूक

सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीत भाजपचे 17 पैकी 17 उमेदवार नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेत. त्याची अधिकृत घोषणा लवकरच होईल. आता या ठिकाणी केवळ नगराध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. त्यासाठी येथे मोठे राजकीय नाट्य रंगले आहे. राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊ निकाल जाहीर होणार आहे. पण तत्पूर्वीच अनगर नगरपंचायतीचा निकाल लागला आहे. येथील भाजपचे सर्व 17 उमेदवार नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेत. भाजप नेते राजन पाटील यांच्या नेतृ्त्वात हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. पण या मुदतीत कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराने आपला अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे भाजपच्या सर्व 17 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच होईल. नगराध्यक्षपदासाठी होणार निवडणूक दुसरीकडे, अनगर नगरपंचायतीत नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली असली तरी नगराध्यक्षपदासाठी मात्र भाजप व अजित पवार गटाच्या उमेदवारात लढत होणार आहे. भाजपने ही निवडणूकही बिनविरोध करण्यासाठी ताकद लावली होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी आज पहाटे 5 च्या सुमारास नगरपंचायत गाठून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे भाजपच्या बिनविरोध नगराध्यक्ष निवडून आणण्याच्या प्रयत्नांना सुरूंग लागला आहे. उज्ज्वला थिटे यांचे राजन पाटलांवर गंभीर आरोप उल्लेखनीय बाब म्हणजे उज्ज्वला थिटे यांनी भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांच्यावर उमेदवारी दाखल करण्याच्या आपल्या मार्गात आडकाठी आणल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्या म्हणाल्या, अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मी अर्ज भरू नये म्हणून माजी आमदार राजन पाटील, विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील यांनी मागील 8 दिवसांपासून ट्रॅप लावला होता. त्यांचे ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न होते. लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पण मला निवडणूक लढवण्यापासून रोखले जात होते. यासाठी त्यांनी सगळीकडे माणसे उभी केली. माझ्या मागे गाड्या लावल्या. पण त्यानंतरही मी पहाटे 5 वा. नगरपंचायत गाठून आज आपला अर्ज दाखल केला, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या आरोपामुळे अगरचे राजकारण चांगलेच तापले आहे. नेमका काय आहे अनगर नगरपंचायतीचा वाद? मागील 2 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायत अचानक प्रकाशझोतात आली आहे. गत अनेक वर्षांपासून मोहोळ तालुक्यावर राजन पाटील यांच्या सत्ता आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून येत होते. पण गत विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांच्यात व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. अनगर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे राजन पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्धार केला होता. पण राष्ट्रवादीने उज्ज्वला थिटे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि त्यांच्या प्रयत्नांना धक्का बसला. त्यातून उज्ज्वला थिटे यांचा मार्ग अडवण्यासारखे प्रकार घडले असे सांगितले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 4:56 pm

संत ज्ञानेश्वर पारमार्थिक लोकशाहीचे जनक - डॉ. अरुणा ढेरे:750 व्या संजीवन समाधी दिनानिमित्त पुणे विद्यापीठात कार्यक्रम

“संत ज्ञानेश्वर महाराज हे खऱ्या अर्थाने पारमार्थिक लोकशाहीचे जनक आहेत,” असे उद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानदेव अध्यासनाच्या प्रमुख डॉ. अरुणा ढेरे यांनी आज काढले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या संजीवन समाधी दिनानिमित्त विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ. ढेरे म्हणाल्या की, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत साहित्य सर्वसामान्यांच्या भाषेत – मराठीत – आणून समाजजोडणीचे महान कार्य केले. अमृतानुभव, चांगदेव पासष्टी यांसारख्या ग्रंथांद्वारे त्यांनी मराठी भाषेला आध्यात्मिक आणि सामाजिक उंची दिली. माऊलींच्या प्रेमभावातून समाजातील सर्व स्तरांतील संत एकत्र आले आणि अध्यात्माद्वारे सामाजिक एकात्मतेचा संदेश दृढ झाला. “ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस” या ओळी ज्या परंपरेचे वर्णन करतात, त्यात गोरा कुंभार, सावता माळी, चोखा महार, संत जनाबाई, संत सोयराबाई आदी संतांनी समाजप्रबोधनाची परंपरा पुढे नेल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे आणि संत ज्ञानदेव अध्यासनप्रमुख डॉ. अरुणा ढेरे यांनी श्री संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सदर कार्यक्रमास वित्त व लेखा अधिकारी सीएएमए चारूशीला गायके, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे, सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे, शिवाजी उतेकर, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब आंत्रे, पत्रकार उद्धव धुमाळ, सोनाजी गाढवे तसेच कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन जाधव यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 4:43 pm

शिवाजी महाराज पुतळा अनावरण प्रकरण:भावासाठी आदित्य ठाकरे आले धावून, म्हणाले - आमच्याच दैवताचा नाही तर कोणाचा सन्मान करायचा?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी रविवारी नवी मुंबईतील नेरूळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. स्थानिक पोलिसांनी या घटनेची नोंद घेत अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता अमित ठाकरे यांच्यासाठी चुलत बंधू आणि आमदार आदित्य ठाकरे धावून आले आहेत. आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. नवी मुंबईतील नेरूळ परिसरात चार महिन्यांपासून झाकून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी परवानगी न घेता अनावरण केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अमित ठाकरे यांच्या राजकीय प्रवासातील हा पहिलाच गुन्हा आहे. महाराजांसाठी शेकडो केसेस लागल्या तरी त्याची आम्ही पर्वा करणार नाही, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली. आता या प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरेंची पाठराखण केली असून, निवडणूक आयोगाचे सरकार म्हणत महायुतीवर निशाणा साधला आहे. नेमके काय म्हणाले आदित्य ठाकरे? आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! 4 महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमितने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने त्या पुतळ्यावरचे कापड काढून अनावरण केले, महाराजांचा सन्मान राखला, तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता? अशी विचारणाही आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच निवडणूक आयोग सरकारची ही दादागिरी मोडून काढू, असा इशाराही त्यांनी महायुती सरकारला दिला. नेमके प्रकरण काय? नेरूळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या चार महिन्यांपासून अनावरणाशिवाय तसाच कापडाने झाकलेला होता. नागरिकांकडून या संदर्भात तक्रारी येत असतानाही अधिकृत अनावरणासाठी कोणत्याही मंत्री किंवा पदाधिकाऱ्याला वेळ न मिळाल्याचा स्थानिकांचा आरोप होता. ही बाब अमित ठाकरेंना कळताच त्यांनी कोणतीही परवानगी न घेता मनसैनिकांच्या उपस्थितीत पुतळ्यावरील कापड हटवून अनावरण पूर्ण केले. या वेळी पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही बाजूंमध्ये ढकलाढकलीही झाली. महाराजांची मूर्ती लोकांच्या मागणीनुसार उभारली. पण चार महिने कोणीच अनावरणासाठी आला नाही. इतक्या काळ पुतळ्यावर धूळ साचत आहे, हे बघवेना म्हणून अनावरण केलं, असे अमित ठाकरे म्हणाले. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ आणि माहिती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईची पावले उचलली. परवानगीशिवाय केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमामुळे पोलिस अधिनियम आणि संबंधित कलमांनुसार अमित ठाकरेंवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. अमित ठाकरे यांच्यासोबत उपस्थित असलेल्या 70 मनसैनिकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 4:35 pm

सिंधुदुर्गात महायुतीत तणाव:शिंदेंचे आमदार नीलेश राणेंची ठाकरे गटासोबत जाण्याची तयारी, ‘इगो’मुळे युती मोडल्याचा आरोप

सिंधुदुर्गात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीचे प्रयत्न फिसकटल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शिंदे गटाचे कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांनी आज कणकवलीत बोलताना, मालवणमध्ये युतीचा प्रस्ताव सर्वात आधी शिवसेनेनेच दिला होता; मात्र काही लोकांच्या 'इगो'मुळे युती होऊ शकली नाही, अशी खंत व्यक्त केली. यासोबतच, त्यांनी थेट ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या 'शहर विकास आघाडी'सोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना आता आमनेसामने पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या शहर विकास आघाडीसाठी दिलेल्या निमंत्रणाला निलेश राणे यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात युती होण्याची शक्यता आता धूसर होत चालली असून, आता भाजपा आणि शिवसेना आमनेसामने पाहायला मिळण्याची शक्यता आहे. गुलाल आणि फटाके शिवसेनेचेच उडणार आमदार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मालवणमध्ये शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी बोलताना राणे यांनी नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदाच्या सर्व 20 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला. मालवण शहरात गुलाल आणि फटाके शिवसेनेचेच उडणार. आम्ही कुठेही कमी पडणार नाही. जे करायचे ते जिद्दीवर करायचे, ही शिकवण आमच्यावर आहे, असे म्हणत राणे यांनी 'एकला चलो रे' चा नारा दिला. विरोधकांना लक्ष्य करताना राणे म्हणाले, तुम्ही कोणाला थकवायला बघताय? आम्हाला! प्यादाच वजीर होऊ शकतो, वजीर प्यादा होऊ शकत नाही. बुद्धिबळाचा खेळ मला माहिती आहे. हे हत्ती, घोडे या सगळ्यांना बाजूला करून हा प्यादा वजीरच होणार आहे, असा विश्वास नीलेश राणे यांनी व्यक्त केला. 'इगो'मुळे युती फिसकटली युती न झाल्याबद्दल नीलेश राणे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. मी स्वतः दोन पराभव पाहिले आहेत. कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये, त्यांच्यावर विजयाची टांगती तलवार असू नये, यासाठी माझ्या स्वभावात नसतानाही मी सातत्याने युतीसाठी प्रयत्न करत होतो, पण प्रयत्न काही यशस्वी झाले नाहीत, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. राजकारणामध्ये कार्यकर्त्यांच्या भरवशापेक्षा काहींचा इगो महत्त्वाचा आणि मोठा असतो. हा इगो आम्ही कधीच केला नाही. खासदार नारायण राणे यांची इच्छा होती, युती व्हायला हवी, असे सांगत राणे यांनी युती न होण्यास काही नेत्यांचा 'फुकटचा आत्मविश्वास' आणि 'इगो' जबाबदार असल्याचा आरोप केला. नारायण राणेंचा शब्द पडू देणार नाही युती फिसकटल्यामुळे आता विरोधकांना त्यांची 'जागा दाखवण्याची वेळ आली' आहे, असा इशारा नीलेश राणे यांनी दिला. ही खासदार नारायण राणेंची निवडणूक आहे. राणे साहेबांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे. राणेंचा शब्द पडू देणार नाही, मालवण नगरपालिका राणे साहेबांना भेट म्हणून देणार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मालवण नगरपालिकेचा कारभार लोकांना अभिप्रेत असा पारदर्शक आणि निष्कलंक उमेदवार देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 3:54 pm

मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात?

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस् यांचे चुलत मामेभाऊ यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली आहे. आल्हाद कलोती हे चिखलदरा नगर परिषदेतून नगरसेवक पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. तर यंदा पहिल्यांदाच निवडणूक लढवीणा-या आल्हाद कलोती यांच्या उमेदवारीमुळे चिखलदरा नगर परिषद निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. चिखलद-याच्या विकासाला […] The post मुख्यमंत्री फडणवीसांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 3:54 pm

गडकिल्ल्यांना 'नमो टुरिझम' नव्हे, 'शिवाजी महाराज' नाव द्या:खासदार नीलेश लंके यांची मागणी; जातीभेद विसरून आदर्श घेण्याचे आवाहन

अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी गडकिल्ल्यांना 'नमो टुरिझम' हे नाव देण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी केली आहे. किल्ल्यांकडे केवळ पर्यटन स्थळ म्हणून न पाहता त्यांचे पावित्र्य जपले पाहिजे, असे त्यांनी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत म्हटले आहे. नीलेश लंके म्हणाले की, गडकिल्ले हे छत्रपती शिवरायांचा पराक्रम आणि मावळ्यांचा इतिहास सांगतात. पण आज महाराजांच्या नावाचा विसर पडला आहे. ज्यांना त्यांच्या नावाने राजकारण करायचे आहे, त्यांनी शिवरायांचा आदर्श घेतला पाहिजे, कारण त्यांनी कधीही जातीभेद केला नाही. महाराष्ट्रामध्ये समाजकारण आणि राजकारण करताना आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो, परंतु महाराजांच्या गडकिल्ल्यांची दुरवस्था झाली आहे. यावर उपाय म्हणून, खासदार लंके यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक संकल्प केला आहे. त्यानुसार, महिन्यातील एक दिवस किल्ल्यांवर जाऊन स्वच्छता, वृक्षारोपण, दिशादर्शक फलक लावणे आणि डागडुजी करणे हा उपक्रम 'आपला मावळा' संघटनेमार्फत राबवला जात आहे. या उपक्रमाची सुरुवात शिवनेरी किल्ल्यापासून झाली असून, आतापर्यंत सात किल्ल्यांवर ही मोहीम राबवण्यात आली आहे. आठवा किल्ला म्हणून सिंहगड निवडण्यात आला असून, २३ नोव्हेंबर रोजी ही मोहीम राबवली जाईल. या मोहिमेला विविध गिरिप्रेमींचे सहकार्य मिळत आहे. राजकारणात केवळ टीका-टिप्पणी करण्याऐवजी काहीतरी काम केले पाहिजे, या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे समाजातील सर्व जाती आणि धर्म यांना एकत्रित घेऊन वाटचाल करत होते, हे विचार यातून अधोरेखित होतात. या मोहिमेचा केवळ स्वच्छतेचा हेतू नसून, किल्ले संवर्धनासाठी पाठपुरावा देखील केला जात आहे. यासाठी केंद्र सरकारसोबत पुरातत्व खात्याला पत्र पाठवणे, किल्ल्यांच्या दुरवस्थेचे फोटो आणि माहिती देणे असे काम सुरू आहे. किल्ल्यांवरील मंदिरे देखील जीर्ण झाली आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने गडकिल्ल्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हे किल्ले तरुणांचे प्रेरणास्थान असल्याने ते आगामी काळात भक्कमपणे उभे राहणे आवश्यक आहे. मागील संसद अधिवेशनात मी एक मागणी केली आहे की, केंद्राची कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक एक दिवस रायगडावर घ्यावी, ज्यामुळे एक नवीन आदर्श उभा राहील. यासोबतच, किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढली गेली पाहिजेत, अशी मागणीही खासदार नीलेश लंके यांनी केली.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 3:50 pm

भगवान बिरसा मुंडांना दीप मानवंदना:इतिहास प्रेमी मंडळ आणि स्वरूपवर्धिनीने पुण्यात केले आयोजन

पुणे प्रतिनिधी: महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त इतिहास प्रेमी मंडळ आणि स्वरूपवर्धिनी यांनी त्यांना दीप मानवंदना दिली. मंगळवार पेठेतील स्वरूपवर्धिनी संस्थेच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात १५० पणत्या प्रज्वलित करून बिरसा मुंडांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सभागृह भगवान बिरसा मुंडा यांच्या जयजयकाराने दुमदुमून गेले. कार्यक्रमाची सुरुवात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. यावेळी इतिहास जागरणाचे त्यांचे कार्य पुढे चालू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. यानंतर देशभक्तीपर समूह गायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, बिरसा मुंडा यांचा जन्म बिहार येथील छोटा नागपूर येथे गरीब वनवासी समाजात झाला होता. शिक्षण घेण्यासाठी त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला. मात्र, ब्रिटिशांचे अन्यायी स्वरूप लक्षात येताच ते संतापले. त्यांनी वनवासी युवकांना संघटित व सुसंस्कारित केले आणि एक दिवस इंग्रजांविरुद्ध 'उलगुलान' नावाचे बंड पुकारले. शेटे पुढे म्हणाले की, अत्यंत अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असलेल्या इंग्रजांशी धनुष्यबाणांनी संघर्ष करत हजारो वनवासी वीरांनी छोटा नागपूर परिसर स्वतंत्र केला. दुर्दैवाने या लढ्यास अपयश आले आणि इंग्रजी कैदेतच बिरसा मुंडा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सारा देश पारतंत्र्यात असताना अशिक्षित वनवासी तरुणांनी दिलेला हा लढा सर्व देशासमोर एक नवा आदर्श उभा करणारा ठरला. अवघे पंचवीस वर्षे आयुष्य लाभलेले बिरसा मुंडा सर्व भारतीयांना वंदनीय आहेत आणि ते सर्व भारतीयांचे प्रेरणास्थान आहेत, असेही मोहन शेटे यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 3:48 pm

कनेक्टिंग ट्रस्टतर्फे आंतरराष्ट्रीय परिषद:'आत्महत्या प्रतिबंध' आणि मानसिक आरोग्य यावर होणार तीन दिवस विचारमंथन

कनेक्टिंग ट्रस्टतर्फे नोव्हेंबर २०२५ मध्ये तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ही परिषद पुण्यात होणार आहे. 'आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्यासाठी नवीन दृष्टिकोन' या विषयावर या परिषदेत विचारमंथन केले जाईल. पुण्यातील हॉटेल तरवडे क्लार्क्स इन, शिवाजीनगर येथे ही परिषद पार पडेल. कनेक्टिंग ट्रस्टच्या सँडी अर्नाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी ट्रस्टचे सल्लागार मंडळ सदस्य वीरेन राजपूत, अमीना अजाने, प्रशिक्षक डॉ. आदिती आर., स्वयंसेवक दीपाली वीरमालवार आणि लॉरेन डेव्हिड उपस्थित होते. सँडी अर्नाडे यांनी सांगितले की, आत्महत्या प्रतिबंधासाठी खुला संवाद, सामायिक अंतर्दृष्टी आणि सामूहिक कृती यांवर परिषदेत लक्ष केंद्रित केले जाईल. आत्महत्यांचे प्रमाण का वाढत आहे आणि कोणते उपाय प्रभावी ठरत आहेत, यावर चर्चा होईल. ही परिषद मानसिक आरोग्य व्यावसायिक, स्वयंसेवक, समाजसेवक, विद्यार्थी आणि संबंधित क्षेत्रांतील स्वयंसेवी संस्थांसाठी उपयुक्त ठरेल. या परिषदेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रख्यात मानसिक आरोग्य व्यावसायिक मुख्य भाषणे, चर्चासत्र आणि कौशल्य-आधारित सत्रांमध्ये सहभागी होतील. हे तज्ज्ञ मानसिक आरोग्य, आत्महत्या प्रतिबंध, स्वानुभव, युवा, शिक्षण आणि समुदाय कार्य यांसारख्या विविध पैलूंचे प्रतिनिधित्व करतील. त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून सध्याच्या कामातील सकारात्मक बाबी अधोरेखित होऊन सामूहिक कृतीसाठी नवीन शक्यतांचा शोध घेतला जाईल. दीपाली वीरमालवार यांनी परिषदेच्या वेळापत्रकाची माहिती दिली. २८ नोव्हेंबर रोजी पूर्व-परिषद कार्यशाळा आयोजित केली आहे. २९ नोव्हेंबर रोजी परिषदेचा पहिला दिवस आत्महत्या प्रतिबंधातील प्रमुख विषयांवर आधारित असेल, ज्यात स्वानुभव आणि सामाजिक संदर्भांवर भर दिला जाईल. मारीवाला हेल्थ इनिशिएटिव्हचे संचालक राज मारीवाला यांचे बीजभाषण होईल. या दिवशी चर्चासत्रे, कौशल्य-निर्माण सत्रे आणि चिंतनात्मक बैठका होतील. परिषदेचा दुसरा दिवस, ३० नोव्हेंबर, आत्महत्या प्रतिबंधातील कृती-आधारित मार्गांवर केंद्रित असेल. विस्कॉन्सिन विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापिका डॉ. अरुणा झा यांचे बीजभाषण होईल. याव्यतिरिक्त, भविष्य-केंद्रित भाषणे, पुरावा-आधारित सादरीकरणे आणि कौशल्य-विकास सत्रे आयोजित केली जातील.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 3:47 pm

पीएमपी बसमध्ये मंगळसूत्र चोरीचा प्रयत्न:महिला आरोपी अटकेत; प्रवासी महिलेच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी केली कारवाई

पुण्यात पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कटरने कापण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. प्रवासी महिलेच्या सतर्कतेमुळे ही आरोपी पकडली गेली. ही घटना छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर घडली. या प्रकरणी अश्विनी अविनाश भोसले (वय २९, रा. गंगेवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) हिला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. एका ५३ वर्षीय महिलेने यासंदर्भात फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात राहतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला महापालिका ते वसंत चित्रपटगृह दरम्यान पीएमपी बसने प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दीचा फायदा घेत आरोपी भोसले हिने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र कटरने तोडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच महिलेने आरडाओरडा केला. या झटापटीत आरोपी भोसलेने धावत्या बसमधून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने तक्रारदार महिलेच्या हातावर कटरने वार केला, ज्यामुळे त्यांना दुखापत झाली. मात्र, तक्रारदार महिलेच्या सतर्कतेमुळे आणि अन्य प्रवाशांच्या मदतीने भोसलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी अश्विनी भोसलेने पीएमपी प्रवासी महिलांचे दागिने चोरण्याचे आणखी काही गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलिस करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गोरे करत आहेत. रोगनिदान केंद्रात दागिने चोरी दरम्यान, शहरात आणखी एका चोरीची घटना समोर आली आहे. मंगळवार पेठेतील एका खासगी रोगनिदान केंद्रात तपासणीसाठी आलेल्या एका महिलेच्या पिशवीतून ४५ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोथरूड येथे राहणाऱ्या एका महिलेने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला तपासणीसाठी रोगनिदान केंद्रात आल्या होत्या. त्यांनी आपले दागिने आणि रोकड पिशवीत ठेवली होती. महिलेचे लक्ष नसताना चोरट्याने दागिने आणि रोकड असलेली पिशवी चोरून नेली. तपासणीनंतर ही बाब लक्षात आल्यावर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार मनीषा पुकाळे करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 3:44 pm

सायबर चोरट्यांकडून ९७ लाखांची फसवणूक:गुंतवणूक, नोकरी, सरकारी कारवाईच्या धमक्या देऊन नागरिकांना गंडा

पुण्यात सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक सुरूच आहे. शेअर बाजारात गुंतवणूक, घरबसल्या ऑनलाइन कामाची संधी आणि सरकारी यंत्रणांच्या कारवाईची धमकी अशा विविध आमिषांचा वापर करून अनोळखी चोरट्यांनी पुणेकरांची एकूण ९७ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच वेगवेगळ्या गुन्हे दाखल केले आहेत. कात्रज परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाला शेअर बाजारात आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून २९ लाख ६९ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. सुरुवातीला थोडा नफा दाखवून विश्वास संपादन केल्यानंतर, ज्येष्ठ नागरिकाने मोठी रक्कम गुंतवली. त्यानंतर चोरट्यांनी मोबाईल बंद करून संपर्क तोडला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे तपास करत आहेत. याचप्रकारे, काळेपडळ परिसरातील एका तरुणाची शेअर बाजाराच्या नावाने ३३ लाख १२ हजार रुपयांची, तर बिबवेवाडीतील दुसऱ्या तरुणाची चार लाख रुपयांची फसवणूक झाली. या दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलीस निरीक्षक अमर काळंगे आणि सूरज बेंद्रे तपास करत आहेत. महात्मा फुले पेठेतील एका तरुणाला घरबसल्या ऑनलाइन टास्कचे आमिष दाखवून ११ लाख ३५ हजार रुपये उकळण्यात आले. सुरुवातीला कमी पैसे देऊन विश्वास जिंकल्यानंतर, चोरट्यांनी मोठी रक्कम मागितली. खडक पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल झाली असून, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार तपास करत आहेत. कोंढवा येथील एका ज्येष्ठ नागरिकाला ईडी, नार्कोटिक्स ब्युरो आणि सीबीआयच्या कारवाईची धमकी देऊन १९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. अशा प्रकारची प्रकरणे सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तपास करत आहेत. या वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अनोळखी व्यक्तींकडून येणारे शेअर ट्रेडिंग, ऑनलाइन नोकरी किंवा सरकारी कारवाईचे मेसेज-कॉल यांना बळी पडू नये. पैसे हस्तांतरित करण्यापूर्वी कुटुंबीय किंवा पोलिसांशी निश्चितपणे सल्ला घ्यावा. पुणे पोलिसांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष मोहीमही हाती घेतली आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 3:39 pm

दुष्यंत गुणशेखर यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार:तामिळनाडू शाळांमध्ये थिएटर अभ्यासक्रमाचा भाग बनविल्याबद्दल सन्मान

तामिळनाडूतील शाळांमध्ये थिएटरला शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग बनविल्याबद्दल दुष्यंत गुणशेखर यांना 'तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार २०२५' प्रदान करण्यात आला. भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या तामिळनाडूमध्ये त्यांनी हा यशस्वी प्रयत्न केला आहे. पुण्यातील रुपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समकालीन भारतीय रंगभूमीचे प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. अभिलाष पिल्लई यांच्या हस्ते गुणशेखर यांचा गौरव करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह आणि ७५ हजार रुपये रोख असे होते. टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील श्रीराम लागू रंग अवकाश येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, रुपवेध प्रतिष्ठानचे आनंद लागू, महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष एस. पी. कुलकर्णी, पुरस्कार विजेते दुष्यंत गुणशेखर आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे प्रसाद वनारसे आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना दुष्यंत गुणशेखर म्हणाले की, पुणे हे माझे दुसरे घर आहे आणि इथे आल्यावर मला घरी आल्यासारखे वाटते. मराठी प्रायोगिक रंगभूमीची अनेक रूपे श्रीराम लागू रंग अवकाश या जागेने जवळून पाहिली आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणे आणि तन्वीर नाट्यधर्मी पुरस्काराने सन्मानित होणे हा मी माझा गौरव समजतो. ते पुढे म्हणाले, क्रिया शक्ती या संस्थेच्या माध्यमातून 'क्रिया प्ले' हा आमचा उपक्रम संस्थेच्या कामांचा एक महत्त्वाचा गाभा आहे. याद्वारे आम्ही शालेय विद्यार्थ्यांपर्यंत प्रायोगिक रंगभूमी घेऊन जात आहोत. प्रत्येक मुलाला त्याचा आवाज शोधण्याचा अधिकार असून रंगभूमी हा माझ्यासाठी एक लोकशाही कलाप्रकार आहे. गुणशेखर यांनी मत व्यक्त केले की, मुले मोठी झाल्यावर ती वेगवेगळ्या क्षेत्रांत जातात, तेव्हा रंगभूमीच्या या ओळखीमुळे अनेक गोष्टी शिकतात. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येतो, योग्य दिशेने विचार करण्याची त्यांची क्षमता विकसित होते, ते एकत्रितपणे काम करू शकतात आणि खऱ्या अर्थाने 'वर्क स्पेसेस' ला 'ह्युमन स्पेसेस' बनविण्याचा प्रयत्न करू शकतात. हे सर्व लक्षात घेता, शालेय शिक्षणात थिएटरचा समावेश महत्त्वपूर्ण ठरतो. आज क्रिया प्ले अंतर्गत आम्ही इंग्रजी व तमिळ भाषेतील नाटके रंगमंचावर आणत असून सरकारी व खाजगी अशा दोन्ही शाळांमध्ये थिएटर संबंधित शैक्षणिक अभ्यासक्रम राबवीत आहोत अशी माहिती गुणशेखर यांनी दिली. आज क्रिया शक्ती संस्थेच्या वतीने ९० हून अधिक नाटके रंगभूमीवर आली असून त्यांचे १७०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. या प्रयोगांद्वारे आज ८०० कलाकारांना रोजगार तर ५० कलाकारांना दरमहा मानधन मिळत असून १४० हून अधिक शाळांमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रम देखील सुरु आहे. या अभ्यासक्रमाचा लाभ १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला आहे अशी माहिती देखील गुणशेखर यांनी दिली.आपल्या देशात मराठी, बंगाली, गुजराथी अशा प्रादेशिक रंगभूमी या त्या त्या भागापुरते रिजनल सेंट्रिक काम करत आहेत असे जाणवते. या उलट या सर्व रंगभूमींनी राष्ट्रीय पातळीवर एकत्रितपणे काम करायला हवे असे मला वाटते. प्रादेशिक रंगभूमीच्या भिंती तोडून त्यामध्ये आज पूल बांधायला हवे आहेत, एकमेकांशी स्पर्धा करण्यापेक्षा या रंगभूमींनी एकत्रित काम करायला हवे जेणे करून भारतीय रंगभूमीचे भविष्य उज्ज्वल होईल असा आशावाद गुणशेखर यांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 3:38 pm

नाशिक नगरपरिषद निवडणुकीतून मनसेची माघार:राज ठाकरेंचा धक्कादायक निर्णय; काँग्रेसच्या विरोधामुळे माघार घेतल्याची चर्चा

नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या निवडणुकांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा आणि धक्कादायक निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या निवडणुकांमधून मनसेने माघार घेतली असून, आपला एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणार उतरवणार नाही. राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, मनसेला महाविकास आघाडीत घेण्याबाबत काँग्रेस विरोध असल्याने राज ठाकरेंनी निवडणुकीतून माघार घेतली का? अशी चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आता सर्व पक्षांकडून शक्तीप्रदर्शन, समन्वय बैठकांचा धडाका आणि शेवटच्या क्षणापर्यंत चालणारी धावपळ पाहायला मिळणार आहे. एकीकडे आज सर्वपक्षीय नेते शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरत असताना, राज ठाकरे यांनी मात्र, नाशिक जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतला. नाशिकमधील 11 नगर परिषदेतील एका जागेवरही अधिकृत उमेदवार न उभा करण्याच्या स्पष्ट सूचना स्वतः राज ठाकरे यांनी दिल्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आगामी निवडणुकांमध्ये एकत्र येऊन 'ठाकरे पॅटर्न' तयार करतील, अशा चर्चांना जोर आला होता. नाशिक नगर परिषद निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याच्या शक्यताही वर्तवल्या जात होत्या. राज ठाकरे यांनी अचानक माघार घेतल्यामुळे मनसे आणि महाविकास आघाडी यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांना तात्पुरता ब्रेक लागला आहे. नाशिकमध्ये आघाडीची हालचाल आणि वादळ मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र येण्याची चर्चा नाशिकमध्ये चांगलीच रंगली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल दिवे यांनी मनसेसोबत जाण्याची भूमिका मांडली होती. मात्र, काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास स्पष्ट विरोध दर्शवला होता. काँग्रेसच्या विरोधामुळे निवडणुकीतून माघार? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र काँग्रेसने मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्यास विरोध दर्शविल्याचे याआधी दिसून आले होते. मनसेला महाविकास आघाडीत घेण्यावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या मतभेदामुळेच राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 3:22 pm

काशिनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशास स्थगिती:चौधरी पालघर साधू हत्याकांडातील आरोपी; प्रवेशाने भाजपची झाली होती राजकीय कोंडी

भाजपने पालघर साधू हत्याकांडातील कथित मुख्य आरोपी काशिनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशास तत्काळ स्थगिती दिली आहे. चौधरी यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपवर चौफेर टीका सुरू झाली होती. विशेषतः भाजपच्या कार्यकर्त्यांतही या मुद्यावरून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला होता. यामुळे राजकीय कोंडी होत असल्याचे लक्षात येताच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशास तत्काळ स्थगिती देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पालघर साधू हत्याकांडातील मुख्य आरोपी भाजपात:काशिनाथ चौधरी यांना वॉशिंग मशीनमध्ये घालून पक्षात घेतले, पवारांच्या NCP चा आरोप 16 एप्रिल 2020 रोजी पालघरमध्ये साधू हत्याकांड घडले होते. त्यात साधू चिन्मयानंद व सुधाम महाराज यांच्यासह त्यांच्या चालकाची जमावाने निर्घृण हत्या केली होती. या भागात मुले चोरणारी टोळी फिरत असल्याच्या संशयावरून हे हत्याकांड घडले होते. त्यात या तिघांचा नाहक बळी गेला होता. भाजपने या हत्याकांडाचा संबंध हिंदुत्त्वाशी जोडून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकावर टीकेची झोड उठवली होती. पण आता भाजपने या प्रकरणातील मुख्य आरोपी काशिनाथ चौधरी यांनाच पक्षात घेतल्यामुळे भाजपवर टीकेची झोड उठली होती. वादानंतर चौधरींच्या पक्षप्रवेशास स्थगिती भाजपच्या गोटातूनही या पक्षप्रवेशावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या नाराजीची दखल घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काशिनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाला तत्काळ स्थगिती देण्याची घोषणा केली. पालघर जिल्ह्यातून पक्षात प्रवेश दिलेल्या काशिनाथ चौधरी यांच्या बाबत पालघर साधू हत्याकांडाशी संबंधित चर्चा पुन्हा प्रसिद्धी माध्यम व सामाजिक माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर प्राथमिक विचार करून तथ्यांवर आधारित त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पण या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन काशिनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशास तत्काळ स्थगिती देण्यात येत आहे, असे रवींद्र चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. भाजपने आपल्याच कार्यकर्त्यांना दिला होता धक्का उल्लेखनीय बाब म्हणजे पालघर साधू हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी 200 जणांना ताब्यात घेतले होते. तर 108 साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. काशिनाथ चौधरी तेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते. भाजपने या घटनेमागील मुख्य सूत्रधार चौधरी हेच असल्याचा आरोप केला होता. पण आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपने त्यांना आपल्या पक्षात घेत त्यांच्या हाती कमळ सुपूर्द केले होते. या माध्यमातून भाजपने पालघर साधू हत्याकांडावरून महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या आपल्याच कार्यकर्त्यांना धक्का दिला होता. रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, भाजपने पालघर साधू हत्या प्रकरणात ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांच्याच पक्षप्रवेश करून घेतला आणि आज तोच पक्षप्रवेश कसा योग्य असल्याचे मुख्यमंत्री ठासून सांगत होते. आता मात्र चौफेर टीका होताच भाजपा प्रदेशाध्यक्षांनी सदरील पक्षप्रवेश स्थगित केला. “ना नीती ना मत्ता, प्रिय फक्त सत्ता” या तत्वाने चालणाऱ्या नव्या भाजपला उशिरा का होईना शहाणपण सुचले हे महत्वाचे आहे. असो प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची क्लिनचीट देण्याची परंपरा तर खंडित केलीच शिवाय मुख्यमंत्र्यांच्या गृहविभागापेक्षा प्रदेशाध्यक्षांची तपास यंत्रणा मजबूत असल्याचं देखील दाखवून दिलं. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री महोदय प्रदेशाध्यक्षांच्या तपास यंत्रनेची मदत घेतील ही अपेक्षा, असे ते म्हणालेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 3:15 pm

काँग्रेस संपवणारा अजून जन्मला नाही:काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा पीएम मोदींना टोला; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नार्को टेस्टची केली मागणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बिहार निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस संपल्यासंबंधी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. काँग्रेस हा भारताच्या डीएनएतून तयार झालेला व कसलेला विचार आहे. हा विचार चंद्र - सूर्य असेपर्यंत कायम राहील. त्यामळुळे काँग्रेसला संपवणारा अजून कुणीही जन्माला आला नाही, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे व सत्ताधारी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नार्को टेस्टचीही मागणी केली. मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आपल्याला ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. तर धनंजय मुंडे यांनी हा आरोप धुडकावून लावत आपल्यासह जरांगेंच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. या दोघांतील आरोप प्रत्यारोपामुळे मराठवाड्याचे विशेषतः बीड जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे मराठा व ओबीसी समाजात वितुष्टही निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करून खळबळ उडवून दिली आहे. जरांगे - मुंडे वादात फडणवीस मुख्य आरोपी ते म्हणाले, धनंजय मुंडे व मनोज जरांगे पाटील यांच्यातील वादात कुणी मुख्य आरोपी असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मराठा आंदोलक आंतरवाली सराटीत आंदोलन करत होते, तेव्हा त्यांनी पोलिसांच्या माध्यमातून त्यांच्यावर अमानुष अत्याचार केला. यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक विण उद्ध्वस्त झाली. आंतरवाली सराटीच्या निमित्ताने फडणवीसांनी एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात व एका प्रवर्गाला दुसऱ्या प्रवर्गाविरोधात उभे केले. यामुळे महाराष्ट्राचे वातावरण गढूळ झाले. त्यामुळे या प्रकणी कुणाची नार्को टेस्ट करायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांची झाली पाहिजे. फडणवीसांनी महाराष्ट्राचा खेळखंडोबा कसा केला, जातीपातीत कशी भांडणे लावली, कुणाच्या खिशात सरकारी जमिनी टाकल्या, याची चौकशी त्या नार्को टेस्टमध्ये झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात गुंडाराज स्थापन करण्याचा प्रयत्न हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने गुंडांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे. मटका किंग, आका-खोका, कोयता गँग अशांचे सत्ताधारी पक्षात रेड कार्पेट घालून स्वागत केले जात आहे. या सर्व गुंडांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घेऊन जात आहेत. या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस महाराष्ट्रात गुंडाराज स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. बांद्रा किल्ल्यावर दारू पार्टी सपकाळ यांनी फडणवीसांच्या राज्यात आता किल्ल्यांवरही दारू पार्टी होत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने मुंबईतील बांद्रा किल्ल्यावर दारू पार्टी सुरू असल्याची घटना गंभीर आहे. बांद्रा किल्ल्याला पोर्तूगीज, ब्रिटीश, मराठा साम्राज्याचा इतिहास लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच स्वराज्यासाठी लढणाऱ्या हजारो मावळ्यांचा स्पर्श इथल्या मातीला, दगडांना झाला असेल, तिथेच आज दारूच्या बाटल्या सरकार पर्यटकांना पुरवतंय, हे माझ्यासारख्या माणसाला चिड आणणारं आहे. जनतेने विचार करावा. यांना फक्त पैसा महत्वाचा आहे. आपला इतिहास, अस्मिता तर यांच्यासाठी अगदी क्षुल्लक गोष्ट. काँग्रेस संपवणारा अजून जन्मला नाही बिहार विधानसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस संपल्याचा दावा केला होता. हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी त्याचाही समाचार घेतला काँग्रेसला संपवणारा अजून कुणीही जन्माला आला नाही. काँग्रेस हा भारताच्या डीएनएतून तयार झालेला व कसलेला विचार आहे. हा विचार चंद्र - सूर्य असेपर्यंत कायम राहील, असे ते म्हणाले. समृद्धी महामार्ग हा भ्रष्टाचाराचा महामार्ग होता. त्यात 20 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला. पण त्यात कुठेही सुरक्षेचा विचार केला गेला नाही. त्यामुळे हा महामार्ग सदोष आहे, असे ते म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी शताब्दी हॉस्पिटलच्या मुद्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, राज्यात अनेक घोटाळे सुरू झालेत. एकेक करून त्याचा पर्दाफाश होणार आहे. सत्ताधारी पक्षांकडून सरकारी जमिनी व वादग्रस्त जमिनी गिळंकृत करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. यात भाजप मोठा चॅम्पियन पक्ष आहे. सरकारने याची श्वेतपत्रिका काढावी. हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात एक दिवस चर्चा केली जावी.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 2:53 pm

धनंजय मुंडेंचे अजित पवारांसमोर लोटांगण:चौकशीतून वाचवण्याची केली विनवणी, मनोज जरांगेंचा दावा; फडणवीसांवरही साधला निशाणा

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठा दावा करत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या कार्यशैलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मला या चौकशीतून वाचवा, अशी विनवणी करत, धनंजय मुंडे यांनी अजित पवारांसमोर लोटांगण घातल्याचा मोठा दावा मनोज जरांगे यांनी केलाय. मोठा घातपात घडवून आणल्याचा कट असतानाही सरकार मुंडेंना 'क्लीन चीट' देणार असेल, तर हा अत्यंत वाईट प्रकार असून आपला या 'नालायक' सरकारवरील विश्वास उडाला आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा एक मोठा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार ११ दिवसांपूर्वी उघडकीस आला. जरांगे पाटलांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. “माझ्या हत्येची सुपारी आमदार धनंजय मुंडे यांनी दिली आहे” असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. तर धनंजय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत, नार्को टेस्ट करून चौकशीला सामोरे जाण्याचे आव्हान जरांगेंना दिले होते. मनोज जरांगेंनी देखील हे आव्हान स्वीकारले होते. आता मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंबाबत उपरोक्त मोठा गौप्यस्फोट केलाय. नेमके काय म्हणाले मनोज जरांगे? धनंजय मुंडे बोलून बाजूला होऊन जातात. आमिष दाखवून, ब्रेन वॉश करून, तरुणांना गुन्हेगारी वळवतात आणि कट घडवून आणतात, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला. मला या चौकशीपासून लांब ठेवा, मी चौकशीला सामोरे गेलो, तर मराठा समाजाचे लोक मारतील, असे मुंडेंनी अजित पवारांना दिवसांपूर्वी भेट घेऊन सांगितले, असा दावा मनोज जरांगे यांनी केला. मोठा घातपात घडवून आणत असताना, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडेंना क्लीन चीट देणार असतील, तर ही वाईट गोष्ट आहे. इतके नालायक सरकार मी आतापर्यंत कधीच बघितले नाही, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. सरकारला दुष्परिणाम भोगावे लागतील धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची नुकतीच भेट घेतल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे. मागील दोन वर्षांत आम्हाला मिळालेल्या सर्व माहिती खऱ्या झालेल्या आहेत. एका विद्रोही, नीच प्रवृत्तीच्या माणसाला सरकार वाचवणार असेल, तर ही साधी गोष्ट नाही. याचे दुष्परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. आम्हाला तुमचे पोलिस संरक्षण नको आम्ही उद्या-परवा सरकारने दिलेले पोलिस संरक्षण नाकारणार आहोत. त्यासाठी आम्ही स्वत: अर्ज करणार असून, तुमचे संरक्षण आम्हाला नको. कारण आता तुमच्यावर आमचा विश्वासच राहिला नाही. फडणवीसांनी आम्हाला दिलेले सर्व संरक्षण काढून घ्यावे. माझे रक्षण करायला मी समर्थ आहे. माझा मराठा समाज माझ्यामागे उभा आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठिशी घालून तुम्ही सरकार चालवणार आहात का? असा सवालही मनोज जरांगे यांनी केला.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 2:48 pm

शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन : मुख्यमंत्र्यांसह शहा, योगींनी केले अभिवादन

मुंबई : प्रतिनिधी १७ नोव्हेंबर रोजी वंदनीय शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा तेरावा स्मृतीदिन. त्यानिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करून अमित शहा म्हणाले की, राष्ट्रवादी विचारसरणीचे प्रखर पुरस्कर्ते आणि सनातन संस्कृतीचे खंदे पहारेकरी आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींच्या […] The post शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन : मुख्यमंत्र्यांसह शहा, योगींनी केले अभिवादन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 2:47 pm

इंदुरीकर महाराजांचा प्री वेडिंग शूटबद्दलचा व्हिडीओ व्हायरल

अहमदनगर : प्रतिनिधी सध्या इंदुरीकर महाराज मुलीच्या साखरपुड्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. लेकीचा शाही पद्धतीने केलेल्या साखरपुड्यामुळे इंदुरीकर महाराज टीकेचा धनी झाले आहेत. इंदुरीकर यांच्या कीर्तनातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. त्यामध्येच त्यांचा अजून एक प्री- वेडिंग व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये प्री- […] The post इंदुरीकर महाराजांचा प्री वेडिंग शूटबद्दलचा व्हिडीओ व्हायरल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 2:28 pm

आचारसंहितेपूर्वीच इच्छुकांचा सोशल मीडियावर प्रचार सुरू

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. पण जर आचारसंहिता लागली की, प्रचार करता येणार नाही. त्यामुळे आरक्षण सोडत जाहीर झाल्यावर अनेक राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या पक्ष नेत्यांकडून उमेदवारी जाहीर झालेली नसतानाही अगोदरच सोशल मीडियावर आपल्या खास, मर्जीतील्या कार्यकर्त्यांद्वारे प्रचार आणि प्रसार करण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास येते. मुंबई महापालिकेची निवडणूक […] The post आचारसंहितेपूर्वीच इच्छुकांचा सोशल मीडियावर प्रचार सुरू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 2:17 pm

एकतर्फी प्रेमातून सांगली हादरली:तरुणाचा प्रेयसीच्या वडिलांवर खुरप्याने हल्ला, बापाला वाचवण्यास धावलेल्या प्रेयसीचेही तुटले बोट

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या वडिलांवर गवत काढण्याच्या खुरप्याने हल्ला केल्याची भयंकर घटना सांगलीच्या मिरज तालुक्यातील टाकळी गावात घडली आहे. या घटनेत वडील जखमी झाल्याचे पाहून त्यांच्या बचावासाठी धावलेल्या प्रेयसीचेही बोट तुटले आहे. सध्या या दोघांवरही मिरजेच्या शासकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, अक्षय सुभाष पाटील असे आरोपीचे नाव आहे. त्याचे गावातीलच एका व्यक्तीच्या मुलीवर प्रेम होते. अक्षयने या मुलीचा हात तिच्या वडिलांकडे मागितला. पण वडिलांनी त्याची मागणी फेटाळून लावली. हा नकार अक्षयला पचवता आला नाही. तो भयंकर रागावला होता. नातेवाईक व स्थानिक गावकऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तो त्या मुलीशी लग्न करण्यावर ठाम होता. त्यातच त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्या एका मुलाशी लग्न ठरले. तिचा रविवारी साखरपुड्याचा कार्यक्रम ठरला. ही गोष्ट कानावर पडताच अक्षय रागाने लालबुंद झाला. प्रेयसीच्या वडिलांच्या डोक्यात घातले खुरपे अक्षयने घरातील गवत काढण्याचे खुरपे आपल्याजवळील बॅगेत लपवले आणि तो तसाच मुलीच्या घरी जाऊन पोहोचला. तिथे त्याने पुन्हा मुलीच्या वडिलांकडे प्रेयसीला मागणी घातली. पण पुन्हा मुलीच्या वडिलांनी त्याची मागणी फेटाळली. त्यामुळे संतापाच्या भरात त्याने बॅगमधील खुरपे काढून त्यांच्या डोक्यात घातले. यामुळे प्रेयसीचे वडील रक्तबंबाळ झाले. हा प्रकार पाहून त्याची प्रेयसी घाबरली. ती आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी त्यांच्या दिशेने धावली. पण अक्षयचा वार रोखण्याच्या प्रयत्नात तिच्या हाताचे एक बोट तुटून खाली पडले. या हल्ल्यानंतर अक्षय पाटील हा घटनास्थळावरून पळून गेला. त्यानंतर स्थानिकांनी खुरप्याच्या हल्ल्यात जखमी झालेली प्रेयसी व तिचे वडील या दोघांनाही तत्काळ मिरजच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे त्या दोघांवरही उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिस रुग्णालयात पोहोचले. त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. उत्तम मोहितेंची मंगळवारी झाली होती निर्घृण हत्या उल्लेखनीय बाब म्हणजे मंगळवारी रात्रीच सांगलीच्या इंदिरा नगर भागात दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांचा खात्मा करण्यात आला होता. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गणेश मोरे, सतीश लोखंडे, शाहरूख शेख, बन्या उर्फ यश लोंढे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे व समीर ढोले या 8 जणांवर गुन्हा दाखल केला. पण यापैकी शाहरूख शेख याचा या घटनेत मृत्यू झाला. कशी घडली होती घटना? उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता. वाढदिवसाचा कार्यक्रम संपवून ते घराकडे निघाले होते. तेव्हा गणेश मोरे व त्याचे साथीदार शिवीगाळ करत त्या ठिकाणी आले. त्यांच्या हातात धारदार शस्त्रे होती. ही शस्त्रपाहून मोहिते यांना आपल्यावर हल्ला होणार असल्याची कल्पना आली होती. त्यामुळे ते धावतच आपल्या घरात गेले. पण ते दरवाजा लावून घेण्यापूर्वीच हल्लेखोरांनी एक दगड त्यांच्या दरवाजात लावला. यामुळे मोहितेंना दरवाजा लावता आला नाही. यामुळे मागून धावत आलेल्या हल्लेखोरांनी दरवाजा काढला. त्यावेळी उत्तम मोहिते स्वयंपाकघरात शिरले. पण तिथे हल्लेखोरांनी त्यांना आडवे पाडून त्यांच्यावर गुप्ती, दांडके आदींनी मारहाण केली. त्यात उत्तम मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला. या झटापटीत शाहरूख शेख याच्या पायाला खोलवर जखम आझाली. त्याच्या पायाची मुख्य रक्तवाहिनी तुटली. त्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाला. त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 1:51 pm

सैन्य भरतीत चेंगराचेंगरी, दोघे जखमी

कोल्हापूर : प्रतिनिधी टीए बटालियनच्या सैन्य भरतीपूर्वी सायबर कॉलेजच्या पाठीमागील मैदानात हुल्लडबाजांनी केलेल्या चेंगराचेंगरीत दोन तरुण जखमी झाले. शुभम नामदेव पाटील (वय २३, रा. बेलवळे खुर्द, ता. कागल) आणि आदित्य दत्तात्रय तहसीलदार (२३, रा. तुरंबे, ता. राधानगरी) अशी जखमींची नावे आहेत. हा प्रकार रविवारी (दि. १६) सकाळी सहाच्या सुमारास घडला. हुल्लडबाजीमुळे भरतीसाठी पूर्वतयारी करून आलेल्या […] The post सैन्य भरतीत चेंगराचेंगरी, दोघे जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 1:24 pm

स्थानिकच्या निवणुकीत MP च्या EVM:राजापूर नगरपालिकेसाठी आणलेल्या EVM वर मध्यप्रदेश निवडणूक अशी नोंद; काँग्रेसची हरकत

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आणण्यात आलेल्या मतदान यंत्र अर्थात ईव्हीएमवर मध्यप्रदेश निवडणूक असा नामोल्लेख आढळला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अजीम जैतापकर यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम आणल्याचा आरोप केला जात आहे. राज्यात बऱ्याच वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगला आहे. त्यानुसार, राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. प्रशासनाने या निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आणलेल्या मतदान यंत्रावर मध्यप्रदेश निवडणूक असे नाव आढळल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. काँग्रेसचे राजापूर शहराध्यक्ष अजीम जैतापकर यांनी या प्रकरणी आपला आक्षेप नोंदवला आहे. काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार जैतापकर यांनी याविषयी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांच्याकडे तक्रार दाखल केली. 'शुक्रवारी ईव्हीएम सील करताना नगरपरिषदेकडून त्यांना उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली होती. त्यावेळी मशीनच्या पेट्या उघडून पाहण्यात आला. त्यात सर्व ईव्हीएमवर मध्य प्रदेश निवडणूक अशी नोंद दिसून आली. महाराष्ट्रातील राजापूर नगरपालिकेची निवडणूक असताना इथे इतर राज्यातून आलेल्या मशीनवर निवडणूक घेणे संशयास्पद आहे. त्यामुळे या मशीनचा वापर का केला जात आहे? याचा प्रशासनाने खुलासा करावा किंवा महाराष्ट्रातील ईव्हीएम मशीन बदलून देण्यात यावी,' अशी अजीम जैतापकर यांनी एका निवेदनाद्वारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी काय म्हणाले? दुसरीकडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणी आपली बाजू स्पष्ट केली आहे. प्रस्तुत ईव्हीएम मशीन आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्या आहेत. त्याविषयी काही शंका असल्यास त्यांच्याकडे दाद मागावी. त्यानुसार जैतापकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र पाठवून या मशीनविषयी तक्रार दाखल केली आहे. आता या तक्रारीननंतर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असा आहे स्थानिकच्या निवडणुकीचा कार्यक्रम

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 1:23 pm

कोल्हापुरात भीषण अपघात; २ ठार

कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. ऊस वाहतूक करणा-या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत सैन्य भरतीसाठी उतरलेल्या २ तरूणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तरूणांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे ते जागीच ठार झाले. या घटनेनंतर गावात शोककळा पसरली आहे. पारस आनंदा परीट (वय २१) आणि सुरेश ज्ञानदेव उंड्रीकर (वय […] The post कोल्हापुरात भीषण अपघात; २ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 1:21 pm

पुण्यात धावत्या रेल्वेने तिघांना चिरडले

पुणे : प्रतिनिधी पुण्यामध्ये भीषण रेल्वे अपघाताची घटना घडली. भरधाव ट्रेनने ३ तरुणांना धडक दिली. या अपघातामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मांजरी रेल्वे स्थानकाजवळील गोपाळपट्टी परिसरात ही घटना घडली. पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने जाणा-या ट्रेनने त्यांना धडक दिली. हे तिन्ही तरून फुटबॉलसारखे उडाले. या रेल्वे अपघातामुळे पुण्यात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, ही रेल्वे अपघाताची घटना रविवारी […] The post पुण्यात धावत्या रेल्वेने तिघांना चिरडले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 1:19 pm

कर्जमाफी अंतिम उपाय नाही:CM देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने वातावरण तापले; पालघरच्या पक्ष प्रवेशावर मांडली भूमिका

शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. अलीकडच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात झालेले शेतीचे नुकसान, त्यावरचे भरपाईचे पॅकेज आणि कर्जमाफीची मागणी, या सर्वांवर विरोधक सरकारला घेरत असतानाच फडणवीस यांनी कर्जमाफी ही अंतिम उपाययोजना नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे सरकारची भूमिका नेमकी काय? असा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे. मराठवाड्यात मागील काही दिवसांत अतिवृष्टी झाली आणि अनेक भागामध्ये शेतजमिनी, पिके, गुरेढोरे वाहून गेली. या अनपेक्षित आपत्तीमुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले. राज्य सरकारने नुकसानभरपाईसाठी पॅकेज जाहीर केले असले तरी ते अत्यल्प असून शेतकऱ्यांच्या दु:खाला न्याय देणारे नाही, अशी टीका विरोधकांनी केली. उद्धव ठाकरे स्वतः मराठवाड्यात दौऱ्यावर गेले होते आणि त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी राज्य सरकारची पहिल्या टप्प्यातील मदत प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का, याचा आढावा घेत सरकारवर तीव्र टीका केली. तसेच आमच्या सरकारने सर्वसमावेशक कर्जमाफी केली होती, याच धर्तीवर या सरकारनेही तत्काळ कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना कर्जमाफीबाबत मोठे विधान केले. ते म्हणाले की, कर्जमाफी नक्कीच महत्त्वाची आहे. आम्ही ती महत्त्वाचीच मानतो. पण कर्जमाफी हे शेती समस्येचं अंतिम उत्तर नाही. यामुळे तात्पुरता दिलासा मिळतो, पण भविष्यातील संकट टळत नाही. फडणवीस पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मिशननुसार राज्यातील 25 हजार हेक्टर शेती नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी बियाणे कंपन्यांना आवश्यक ते मार्गदर्शन देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शेती शाश्वत झाली पाहिजे - फडणवीस कर्जमाफीच्या चर्चेपलीकडे जाऊन फडणवीस यांनी शेतीमधील शाश्वततेवर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, अंतिम उपाय म्हणजे शेतीमध्ये शाश्वतता आणणे. उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, उत्पादकता वाढली पाहिजे, तेव्हाच शेतकऱ्यांची खरी प्रगती होईल. त्यांनी सांगितले की शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट प्रकल्प आणि आधुनिक पद्धतींचा वापर हा काळाचा गरज असून याच माध्यमातून शेती नफ्यात आणता येईल. मराठवाड्यातील नुकसानीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा मुद्दा विशेषत्वाने मांडला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी त्यांना विनम्र अभिवादनही केले. कर्जमाफीच्या वेळेबाबतचे विवादित वक्तव्य पुन्हा चर्चेत फडणवीस यांचे काही दिवसांपूर्वीचे एक वक्तव्यही पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी म्हटले होते की, जूनमध्ये कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होणार नाही. सध्या कर्जमाफी केली तर बँका जास्त लाभात जातील. या विधानावरून विरोधकांनी त्यांची जोरदार टीका केली होती. शेतकऱ्यांच्या हितापेक्षा बँकांचा विचार केला जातोय का? असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला होता. त्यातच आता दिलेले नवे विधान पाहता फडणवीस कर्जमाफीबाबत सावध भूमिका घेत असल्याचे स्पष्ट होते. पालघर साधू हत्याकांडातील मुख्य आरोपी भाजपत - भूमिका केली स्पष्ट पालघर प्रकरणातील आरोपीचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला असल्याचा आरोप केला जात आहे. याविषयी देखील मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली. या संदर्भात फडणवीस म्हणाले की, मी संपूर्ण माहिती घेतली आहे. जोपर्यंत ते त्यांच्यासोबत होते, तो पर्यंत आरोप झाले नाहीत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच आरोप करण्यात येत असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी घेतलेला हा निर्णय असला तरी देखील त्यांनी सर्व शहानिशा करून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी मला सांगितले आहे. असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. डबेवाला संघटनेचा पाठिंबा आमच्यासाठी माऊलींचा आशीर्वाद डबेवाला संघटनेचे आभार मानता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक देखील केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा अभ्यास केला जातो. डबेवाल्यांच्या घराचा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. श्रीकांत भारतीया यांनी आंतरराष्ट्रीय केंद्र देखील सुरू केले. त्यामुळे त्यांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर निर्माण झाला आहे. या डबेवाल्यांमध्ये सर्व माळकरी आणि वारकरी आहेत. अतिशय सहकारी लोक आहेत. त्यांचा पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी त्यांना राजकारणात ओढू इच्छित नाही. मात्र त्यांचा पाठींबा आमच्यासाठी माऊलींचा आशीर्वाद असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. काँग्रेसला भवितव्य नसल्याची टीका काँग्रेसने स्वबळावर निवडून लढवली किंवा आघाडीत लढले तर त्याचा फार परिणाम होणार नाही. जोपर्यंत काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व हे भारताच्या मतदारांची नाडी समजून घेत नाही. भारताच्या मतदारांची मानसिकता समजून घेत नाही. जमिनीवर उतरून खऱ्या प्रश्नांचे राजकारण करत नाही. ते केवळ सोशल मीडियाचे हवेतला राजकारण करतील, तोपर्यंत काँग्रेसला भवितव्य नसल्याची टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 1:16 pm

उद्धव ठाकरेंना BMC निवडणुकीपूर्वी जबर झटका:डबेवाल्यांच्या मराठमोळ्या संघटनेने काढला पाठिंबा; महायुतीला दिला पाठिंबा

मुंबईतील डबेवाल्यांच्या मराठमोळ्या संघटनेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर या संघटनेने हा निर्णय घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांना जबर झटका बसला आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा फड रंगला आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी आघाड्या व युत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण उद्धव ठाकरे यांच्या भात्यातील मात्र एकेक बाण निखळून पडताना दिसून येत आहे. मुंबईतील बहुतांश माजी नगरसेवकांनी साथ सोडल्यानंतर आता डबेवाला असोसिएशननेही ठाकरे गटाला दिलेला आपला पाठिंबा मागे घेण्याची घोषणा केली आहे. गत निवडणुकीत ठाकरे गटाने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्यामुळे या संघटनेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे अगोदरच राजकीय कोंडीत सापडलेल्या ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. एकही आश्वासन पूर्ण न केल्याचा ठपका 2017 च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेने मुंबईतील डबेवाल्यांना विविध सोयीसुविधा व विकासात्मक योजना देण्याचे आश्वासन दिले होते. यात डबेवाल्यांना संघटित करून स्वतंत्र कंपनी स्थापन करणे, त्या कंपनीला पहिल्या वर्षी किमान 5 कोटींचे भांडवल उपलब्ध करून देणे, सायकलींची खरेदी व सायकल पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे, मुलांच्या शिक्षणासाठी व कुटुंबासाठी आरोग्यसेवा देण्यासाठी कॉर्पोरेट व सामाजिक संस्थांमार्फत मदत मिळवूनी देणे आणि डबेवाला भवन उभारणे आदी आश्वासनांचा समावेश होता. पण ठाकरे गटाला केवळ डबेवाला भवन उभारण्याचे आश्वासन काहीअंशी पूर्ण करण्यात यश आले. त्यांनी उर्वरित आश्वासने पूर्ण करण्यात कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी म्हटले आहे. डबेवाल्यांच्या या निर्णयाचा परिणाम मुंबईतील शिवसेनेच्या इतर पारंपरिक मराठी मतदारांवरही पडण्याची शक्यता आहे. घरांचा प्रश्न सोडवल्याने महायुतीला ताकद सुभाष तळेकर यांनी यावेळी आगामी निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला पाठिंबा देण्याचीही घोषणा केली आहे. महायुती सरकारने डबेवाल्यांचा घरांचा प्रलंबित प्रश्न सोडवला आहे. ही आघाडी भविष्यात आमचे इतरही प्रश्न सोडवण्याचा विश्वास वाटत असल्यामुळे आम्ही महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबई डबेवाला असोसिएशनने यापूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला पाठिंबा दिला होता. हे ही वाचा... अजित पवारांच्या नातेवाईकांना 500 कोटींचे हॉस्पिटल?:फडणवीस अख्खा महाराष्ट्र नेत्यांच्या घशात घालून मोकळे व्हा, दमानियांचा संताप मुंबई - महायुती सरकारने 580 खाटांचे एक हॉस्पिटल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घशात घालण्याचा कट रचल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री फडणवीस एक काम करा, एकदाचा अख्खा महाराष्ट्र सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालून मोकळे व्हा, असे त्या म्हणाल्यात. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 12:46 pm

सौदी अरबमध्ये भीषण अपघात; ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सौदी अरेबियाला हज यात्रेसाठी गेलेल्या भारतीयांवर काळाने घाला घातला आहे. मक्काहून मदीनाकडे जाताना भारतीय प्रवाशांच्या बसला एका डीझेल टँकरने जोरात धडक दिली. मध्यरात्री दीड वाजता टँकर अन् बसची जोरात धकड झाली. बसमधील सर्वजण झोपेत असतानाच काळाने घाला घातला अन् क्षणात परिसरात हाहाकार उडाला. बसमधील ४२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यांच्या किंकाळ्याने […] The post सौदी अरबमध्ये भीषण अपघात; ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Nov 2025 12:30 pm

अजित पवारांच्या नातेवाईकांना 500 कोटींचे हॉस्पिटल?:फडणवीस अख्खा महाराष्ट्र नेत्यांच्या घशात घालून मोकळे व्हा, दमानियांचा संताप

महायुती सरकारने 580 खाटांचे एक हॉस्पिटल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घशात घालण्याचा कट रचल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री फडणवीस एक काम करा, एकदाचा अख्खा महाराष्ट्र सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालून मोकळे व्हा, असे त्या म्हणाल्यात. TOI च्या वृत्तानुसार, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नातेवाईकांकडून चालवण्यात येणाऱ्या ट्रस्टने गोवंडीत नव्याने बांधण्यात आलेल्या शताब्दी रुग्णालयातील 580 खाटांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज ताब्यात घेण्यात रस दर्शवला आहे. विशेषतः सामाजिक संघटना, रहिवासी व आरोग्य कार्यकर्त्यांनी या सार्वजनिक - खासगी भागीदारी प्रकल्पाला विरोध दर्शवल्यानंतरही हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने हे हॉस्पिटल बांधण्यासाठी सुमारे 500 कोटींचा खर्च केला. हा भाग मुंबईतील झोपडपट्टी भाग म्हणून मानला जातो. हॉस्पिटलच्या बोलीत आता केवळ 2 पक्ष प्रस्तुत हॉस्पिटल चालवण्यासाठी 3 संस्थांनी रस दाखवला. यापैकी एका पक्षाची निविदा तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे फेटाळण्यात आली. त्यामुळे आता बोली प्रक्रियेत केवळ 2 पक्ष शिल्लक आहेत. यात सुनेत्रा पवार यांचे सावत्र भाऊ पद्मसिंह पाटील यांच्या नेतृत्वातील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, ज्याचे विश्वस्त पवार यांचे भाचे व तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजतिसिंह पाटील यांचा समावेश आहे. याशिवाय तेलंगणातील सिद्दीपेट स्थित सुरभी एज्युकेशनल सोसायटीनेही शताब्दी कॅम्पस चालवण्यात रस दाखवला आहे. येथील प्रस्तावित 580 बेडपैकी 264 बेड्स मुंबई महापालिकेच्या रुग्णांसाठी राखीव असतील. शताब्दीच्या एम-ईस्ट वॉर्डमध्ये येणारी दुसरी सुविधा म्हणजे 480 खाटांची क्षमता असणारे लल्लूभाई कंपाउंड हॉस्पिटल. हे रुग्णालय पुनर्वसन झालेल्या झोपडपट्टीवासीयांनी वेढलेले आहे. या रुग्णालयातही बीएमसीच्या रुग्णांसाठी 150 खाटा राखीव ठेवण्यात येणार आहे. या रुग्णालयाचेही खासगीकरण केले जाणार आहे. अंजली दमानियांची सरकावर टीका दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. आता आणि एक 500 कोटीची हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना? शताब्दी हॉस्पिटल हे एक 580 बेड चे हॉस्पिटल, BMC ने बांधले. विरोध असतांना देखील PPP तत्वाने देण्याचा घाट घातला आणि योगायोगाने ह्यात पद्मसिंह पाटील ह्यांच्या तेरणा पब्लिक चैरिटेबल ट्रस्ट ने bid केले आहे. ह्याच्याच जवळ RSS एक हॉस्पिटल बांधत आहेत आणि हे तयार हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना बहाल केले जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस, एक काम करा, एकदाचा अख्खा महाराष्ट्र हा सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालून मोकळे व्हा, असे त्यांनी म्हटले आहे. तेरणाला हॉस्पिटल देण्यास विरोध पीपीपीला विरोध करणाऱ्या जन स्वास्थ अभियानाचे सदस्य डॉक्टर अभय शुक्ला यांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. हा हितसंबंधांचा स्पष्ट संघर्ष आहे. असे निर्णय घेतले जातात तेव्हा सत्तेचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैद्यकीय महाविद्यालय चालवणे फायद्याचे असते. त्यामुळे राजकीय प्रभाव वाढण्यास मदत होते. या प्रकरणी तेरणाची रुग्णालय चालवण्यासाठी निवड झाली, तर जबाबदारी निश्चित करण्याचा कोणताही मार्ग उरणार नाही, असे ते म्हणालेत. भूषण गगराणींकडून निर्णयाचा बचाव दुसरीकडे, मुंबई महापालिकेचे आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी या निर्णयावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, प्रस्तुत प्रकरणात तेरणालाही इतर पक्षांसारखेच नियम व कायदे लागू होतील. ही प्रक्रिया सर्वच पात्र पक्षांसाठी खुली आहे. ही ट्रस्ट यापूर्वीच नवी मुंबईत एक वैद्यकीय महाविद्यालय चालवते. आम्ही शताब्दी वैद्यकीय महाविद्यालय चालवण्यासाठी खासगी भागीदार शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. यासाठी आगाऊ भांडवली खर्चाची गुंतवणूक हे एक कारण असू शकते. पण वैद्यकीय महाविद्यालये 7-8 वर्षांनीच यशस्वी होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 12:23 pm

दाभोलकर लोकविद्यापीठाचे उद्घाटन, दहा पुस्तिकांचे प्रकाशन:विवेकाचे शिवधनुष्य उचलण्याची शक्ती समाजाला मिळावी - प्रा. सुहास पळशीकर

पुणे येथे डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठाचे उद्घाटन आणि त्यांच्या दहा पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. या सोहळ्यात राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांनी 'विवेकाचे शिवधनुष्य उचलण्याची शक्ती या समाजाला मिळावी' असे प्रतिपादन केले. प्रा. पळशीकर म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून ज्या अविवेकाने केला, त्या समाजात विवेकवादी विचार रुजवणे हे मोठे आव्हान आहे. सध्या ज्ञानविरोधी लोक मोकाट आहेत, तर ज्ञानमार्गी लोक मुकाट आहेत. कुतूहल जागृत करणे आणि प्रश्न विचारायला लावणे हे विद्यापीठाचे मूलभूत कार्य आहे, परंतु सामाजिक सत्ताव्यवहारामुळे विद्यापीठे ज्ञाननिर्मितीपासून दूर जात आहेत. ते पुढे म्हणाले की, सध्या प्रश्न विचारले की भावना दुखावल्या जातात, त्यामुळे विचार मांडण्याचा अवकाश आकुंचन पावत आहे. व्यक्तिगत विवेक आणि सामाजिक विवेक यात फरक का पडत आहे, या प्रश्नाला विवेकवाद्यांनी सामोरे जावे लागेल. या कार्यक्रमाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या म्हणाल्या, 'मी ज्या क्षेत्रात काम करते, त्याला एक वेगळे ग्लॅमर आहे. त्याचा उपयोग अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी होईल, या भावनेने मी आज येथे आले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठाचा प्रसार मी हिरीरीने करेन.' डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहा पुस्तिकांचा इंग्रजी अनुवाद विल्सन कॉलेजमध्ये इंग्रजीचे अध्यापन करणाऱ्या प्रा. राही डहाके यांनी केला आहे. त्या म्हणाल्या, 'डॉ. दाभोलकरांच्या पुस्तिकांचा अनुवाद करताना मला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे मी डॉ. दाभोलकरांच्या अन्य साहित्याचा अनुवादही आनंदाने करेन.' कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले की, डॉ. नरेंद्र दाभोलकरांची सत्यशोधक विद्यापीठ सुरू करण्याची इच्छा होती. ही कल्पना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आता डिजिटल स्वरूपात प्रत्यक्षात आणत आहे. शेतीतज्ञ श्री. अ. दाभोलकर 'मोकाट विद्यापीठ' ही संकल्पना मांडायचे, जिथे कोणीही येऊन शिकू शकतो आणि प्रश्न विचारू शकतो. या लोकविद्यापीठातही सर्वांना प्रवेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय श्रीपाल लालवणी यांनी करून दिला. मुक्ता दाभोलकर यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर लोकविद्यापीठ या उपक्रमाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमास अंनिस ट्रस्टचे विश्वस्त गणेश चिंचोले, दीपक गिरमे, डॉ. शैला दाभोलकर, मिलिंद देशमुख, प्रवीण देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 12:13 pm

हिंदू अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच:त्यांना न ओळखणारेच हिंदुत्वाचे वारस? राज ठाकरेंची थेट टोलेबाजी, पोस्टमुळे चर्चांना उधाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावनिक संदेश जारी केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचे स्मरण करताना त्यांची राजकीय भूमिका, हिंदुत्त्व या विषयावरील दृष्टीकोन आणि समाजकारणाला दिलेले प्राधान्य यावर प्रकाश टाकला. परंतु या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे बाळासाहेबांनी उभा केलेला वारसा कोणाचा? या प्रश्नावर राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये बाळासाहेबांची ओळख केवळ शिवसेना प्रमुख म्हणून नाही, तर भाषिक अस्मितेवर मोठी चळवळ उभारणारे नेते म्हणून केली. त्यांनी म्हटले की, देशाच्या इतिहासात भाषिक ओळख आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात राजकीय चळवळ चालवणारे आणि त्या चळवळीतून राजकीय पक्ष निर्माण करणारे बाळासाहेब एकमेव होते. त्याचबरोबर हिंदू अस्मितेला बळकटी देण्याचे कामही बाळासाहेबांनी त्या काळात केले, जेव्हा देशात कमंडलवाद वाढू लागला नव्हता. राज यांच्या या विधानातून त्यांनी हिंदू राजकारणाची मुळे शिवसेनेनेच रुजवली, अशी भूमिका मांडल्याचे स्पष्ट होते. आपल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदू राजकारणाचे वेगळेपणही अधोरेखित केले. त्यांनी म्हटले की, बाळासाहेबांनी कधीही हिंदूंना व्होटबँक म्हणून पाहिले नाही. त्यांच्या दृष्टीने हिंदुत्व हा विषय श्रद्धा, अस्मिता आणि धर्माबद्दलच्या प्रेमाचा होता. त्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचा तर्कवादही दिसते. बाळासाहेबांची हिंदूप्रेमी भूमिका असूनही त्यांची चिकित्सक वृत्ती कधीच कमी झाली नाही, असेही राज यांनी नमूद केले. पुढे त्यांनी असेही म्हटले की, आज बाळासाहेबांच्या प्रतिमेचा वापर करून हिंदुत्वाचे वारस असल्याचा दावा करणाऱ्यांना ना बाळासाहेब माहिती आहेत, ना प्रबोधनकार. वाचण्याची, ऐकण्याची सवय नसल्यामुळे या नेत्यांना ठाकरे कुटुंबाच्या विचारांची खोली मुळीच कळत नसल्याची टीका राज ठाकरेंनी केली. टीका म्हणजे निवडणुकीपूर्वीचे संकेत राज ठाकरे यांच्या या वाक्यांमुळे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर थेट निशाणा साधल्याचे मानले जात आहे. कारण शिवसेनेच्या मूळ नेतृत्वाचा वारसा आपल्या बाजूने असल्याचा दावा शिंदे गट वारंवार करतो. बाळासाहेबांच्या नावाने मत मागणाऱ्यांवर राज यांनी केलेली टीका ही निवडणुकीपूर्वीचे संकेत मानली जात असून, त्यामुळे राजकीय वातावरणात नवे समीकरण सुरू होण्याची चर्चा रंगली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्वाचे राजकारण कोणाकडे आणि विचारांचा खरा वारसा कोणाकडे, या प्रश्नांवरून आधीच वातावरण तापलेले असताना राज ठाकरे यांच्या या पोस्टने आणखी खळबळ उडवली आहे. राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा... शिवसेना पक्षाचे संस्थापक, हिंदुहृदयसम्राट आणि माझे काका स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब. आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडलवाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच. पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून नाही पाहिलं. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. आणि हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहित आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत, ( अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे ) त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती ह्या पुसटशी देखील कल्पना नाही ! फक्त मतं, सत्ता मिळवणे आणि ती सत्ता मिळाल्यावर वाट्टेल तसं ओरबाडणं म्हणजे राजकारण हे रूढ होत असताना, समाजकारण आधी आणि मग राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र अभिवादन!

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 12:10 pm

डॉ. सीमा काळभोर इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी:अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त महिलांना प्रेरणादायी निर्णय; अरुण बोऱ्हाडे यांची माहिती

पवित्र इंद्रायणी नदीच्या काठावर, तीर्थक्षेत्र आळंदी व देहू च्या कुशीत वसलेल्या आणि श्री नागेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मोशी गावात अहिल्याबाई होळकर साहित्य नगरी येथे चौथे एक दिवसीय इंद्रायणी साहित्य संमेलन रविवारी (दि.२३ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा मान डॉ. सीमा सागर काळभोर यांना देण्यात आला आहे. त्या इंद्रायणी साहित्य परिषदेची स्थापना झाल्यापासून संस्थेत सक्रिय आहेत. त्यांची निवड इतर महिला साहित्यिकांना देखील प्रेरणादायी आहे असे इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांनी दिली. अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून संमेलनाच्या या वर्षीच्या अध्यक्षपदाचा मान स्थानिक महिला साहित्यिकांना देण्याचा निर्णय परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतला. डॉ. काळभोर यांनी विवाहानंतर वाचन, लेखन, भटकंती, सामाजिक कार्य तसेच साहित्यिकांशी संपर्कात राहून त्यांचे विचार ग्रहण करण्याची आवड जोपासत उच्च शिक्षण घेतले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २०१५ साली त्यांना पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीचे शिल्पकार माजी खासदार अण्णासाहेब मगर यांचे जीवन चरित्र म्हणजेच महाराष्ट्रातील ग्रामीण नेतृत्व आणि सहकार चळवळ अण्णासाहेब मगर विशेष अभ्यास या विषयावर पीएचडी पदवी प्रदान केली आहे. इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेल्या गाव खेड्यातील साहित्यिकांना पाठबळ व व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे या उद्देशाने इंद्रायणी साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आली. लेखक, साहित्यिक, वाचक, प्रकाशक यांच्याशी समन्वय साधून साहित्य संमेलना बरोबरच अनेक उपक्रम वर्षभर राबविले जातात.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 12:05 pm

नांदेडमध्ये मध्यरात्री फरार गुंड अन् पोलिसांत चकमक:घराच्या छतावरून पळून जाणाऱ्या गुंडाला पोलिसांनी घातल्या गोळ्या, जखमी

नांदेड शहरात शनिवारी मध्यरात्री पोलिसांची एका कुख्यात फरार गुंडासोबत चकमक झाली. त्यात गुंड गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. हा गुंड पोलिसांना पाहून आपल्या घराच्या छतावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांच्यावर पिस्तूल रोखले. त्यातून ही चकमक घडली. यासंबंधीच्या माहितीनुसार, रबज्योतसिंग उर्फ गब्या असे या कुख्यात गुंडाचे नाव आहे. तो अनेक गंभीर गुन्ह्यांत पोलिसांना हवा होता. पण तो पोलिसांच्या हाती सापडत नव्हता. अखेर शनिवारी रात्री तो शहरातील भगतसिंग रस्त्यावरील निधानसिंग कॉलनीतील आपल्या घरी आल्याची खबर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी तत्काळ त्याच्या घराबाहेर सापळा रचला. मध्यरात्री 12.30 च्या सुमारास पोलिसांचा फौजफाटा त्याच्या घराबाहेर पोहोचला. त्याच्या घराला चारही बाजूंनी वेढा घातला. यामुळे घाबरलेल्या गब्याने घराच्या छतावर गेला आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांवर पिस्तूल रोखताच गोळीबार गब्या छतावर गेल्याचे पाहून पोलिसही त्याच्या मागे छतावर पोहोचले. त्यांनी त्याला शरण येण्याचे आवाहन केले. पण त्याने पोलिसांच्या आवाहनाला कोणताही प्रतिसाद दिला नाही. उलट त्याने त्यांच्या दिशेने पिस्तूल रोखले. यामुळे पोलिस अंमलदार गणेश धुमाळ यांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई करत त्याच्या पायाच्या दिशेने गोळी झाडली. पण रबज्योतसिंग त्याचवेळी खाली वाकला आणि गोळी थेट त्याच्या कंबरेत घुसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी छतावरच त्याच्या मुसक्या आवळल्या आणि खाली आणले. त्यानंतर त्याला तत्काळ विष्णूपुरी स्थिती शासकीय इस्पितळात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नांदेड शहर मध्यरात्री गाढ झोपेत असताना शहराचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगतसिंग रस्त्यावर हा सिनेस्टाईल थरार घडला. त्यामुळे स्थानिक रहिवाशी काय घडले? हे पाहण्यासाठी घटनास्थळी जमले. पोलिस अंमलदार गणेश धुमाळ यांच्या फिर्यादीनुसार, या प्रकरणी इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक भारती या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. गब्या अनेक गुन्ह्यांत पोलिसांना हवा होता उल्लेखनीय बाब म्हणजे रबज्योतसिंग उर्फ गब्यावर स्थानिकांना धमकावणे, खंडणी उकळणे, गुन्हेगारी टोळ्यांमार्फत वसुली व प्राणघातक हल्ला करणे आदी विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो अनेक वर्षांपासून पोलिसांना हवा होता. पण पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी होत होता. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यामुळे त्याच्या कारवायांवर नियंत्रण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गब्याच्या अटकेमुळे नांदेडमधील गुन्हेगारी जगताला मोठा हादरा बसला आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 11:54 am

इंदुरीकर महाराजांच्या मुलाचाही व्हिडिओ समोर:साखरपुड्याच्या नियोजनाचे कौतुक; प्री-वेडिंग शूटबद्दलही उडवली होती खिल्ली

इंदुरीकर महाराज गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आहेत. साधेपणाने जगण्याचा संदेश देणारे आणि कार्यक्रमांमध्ये साधेपणाचे आवाहन करणारे इंदुरीकर महाराज यांनी आपली लेक ज्ञानेश्वरीचा साखरपुडा मात्र अतिशय दिमाखात पार पाडला. साडेतीन हजाराहून अधिक पाहुणे, खास सजावट, मोठ्या गाड्यांचा ताफा, डीजेचा कार्यक्रम आणि सोन्याचे दागिने, या सर्व गोष्टींमुळे साखरपुड्याला शाही रंग चढला. या सोहळ्याचे विविध व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यानंतर महाराजांवर टीकेचा भडिमार होत आहे. अनेकांनी त्यांच्या उपदेश आणि वास्तविक वर्तनातील फरकावर सवाल उपस्थित केले आहेत. साखरपुड्यावेळी ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांनी रथातून एंट्री घेतली. सनरूफ उघडून नाचत येणारे व्हिडिओही व्हायरल झाले. याच मुद्यावर अनेकांनी महाराजांची खिल्ली उडवली आहे. कारण, महाराजांनी यापूर्वी अशाच पद्धतीने नाचणाऱ्या मुलींवर भाष्य करत त्याला गुड्डीपणा असे संबोधले होते. त्यामुळे स्वतःची ती लक्ष्मी आणि इतरांची ती गुड्डी असा सूर टीकाकारांनी चढवला. दरम्यान, महाराजांच्या शिष्यांनी त्यांचे समर्थन करत सांगितले की, हा प्रसंग एक वडील म्हणून झालेला भावनिक निर्णय आहे आणि मुलीच्या आनंदासाठी त्यांनी सर्व व्यवस्था केली. मात्र सोशल मीडियावर चाललेली टीका अजूनही कमी झालेली नाही. या वादात आणखी तीव्रता तेव्हा आली, जेव्हा महाराजांच्या मुलाने एका व्हिडिओमध्ये साखरपुड्याच्या नियोजनाचे कौतुक केले. त्याने हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मामा आणि लॉन्स व्यवस्थापनाची महत्त्वाची भूमिका होती, असे सांगितले. त्या व्हिडिओमधील गर्दी आणि जल्लोष पाहताच अनेकांनी या सोहळ्यावरील खर्चाबद्दल प्रश्न उपस्थित केले. हे सर्व सुरू असताना महाराजांनी कीर्तनात बोलताना काही वक्तव्ये केली ज्यामुळे चर्चेला अधिक खतपाणी मिळाले. महाराजांनी लग्नात आलेला प्री-वेडिंग शूटचा बावळटपणा म्हटले आणि ते करताना जोडप्यांनी घेतलेल्या फोटो–व्हिडिओंची खिल्ली उडवली. त्यांनी हे प्रकार मुलींच्या मानहानीसारखे असल्याचे मत व्यक्त केले. कीर्तन बंद करण्याचे संकेत या वक्तव्यांचे व्हिडिओ पुन्हा समोर येताच सोशल मीडियावर नवे वादळ उठले. कारण अनेकांनी दाखवले की महाराजांनी जे दोष दाखवले तेच प्रकार त्यांच्या लेकीच्या साखरपुड्यात दिसून येत आहेत. त्यामुळे लोकांनी सरळ उपदेश आणि आचरणातील विसंगती, असा मुद्दा उपस्थित केला. काही वारकरी आणि धार्मिक मंडळींनीही याच कारणाने नाराजी व्यक्त केली. महाराजांविरुद्धचा सूर इतका वाढला की त्यांनी एका कार्यक्रमात या साऱ्या टीकेला कंटाळलो आहे, कीर्तन बंद करावे लागेल, असे वक्तव्य केले. यामुळे त्यांच्या अनुयायांमध्ये चिंता पसरली आणि सोशल मीडियावर सहानुभूती तसेच विरोध अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. हा वाद नेमका कुठे थांबणार वाद, टीका आणि महाराजांचे प्रत्युत्तरे यांच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसली की, हा साखरपुडा केवळ घरगुती कार्यक्रम न राहता एक चर्चेचा विषय बनला आहे. महाराजांच्या लेकीचे लग्न साखरपुड्यापेक्षा अधिक भव्य करणार असल्याचे महाराजांनी स्वतःच सांगितल्याने चर्चा अजून वाढली. दरम्यान, महाराजांच्या अनेक जुन्या कीर्तनातील क्लिप्स पुन्हा समोर येत आहेत. प्री-वेडिंग शूट, डीजे, आधुनिक लग्न सोहळे, परंपरा आणि नैतिकता यावर त्यांनी केलेल्या भाष्यांची तुलना त्यांच्या घरातील ताज्या कार्यक्रमाशी होत आहे. त्यामुळे हा वाद नेमका कुठे थांबणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. पुढील काही दिवसांमध्ये महाराज काय भूमिका घेतात, ते कीर्तन सुरू ठेवतात की खरोखर थांबवतात, याची उत्सुकता वाढली आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 11:53 am

नगराध्यक्ष पदाकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गनिमी कावा:उज्ज्वला थिटे पोलिस संरक्षणात दाखल; पाठलाग केल्याचा आरोप

अनगर नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्जाच्या प्रक्रियेवरून मोहोळ तालुक्यात मोठे राजकीय नाट्य रंगले असून परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी अर्ज भरताना अडथळे निर्माण केल्याचा गंभीर आरोप केल्याने सगळ्या घटनेला अधिकच वाचा फुटली आहे. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने या संपूर्ण प्रकरणाकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. उदयोन्मुख तणाव आणि सुरक्षा धोके लक्षात घेता पोलिसांनी मध्यरात्रीनंतरच अनगर परिसरात मोठा बंदोबस्त उभारला असून अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच नगरपंचायत कार्यालय परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. उज्ज्वला थिटे पहाटे साडेपाचच्या सुमारास अनगर नगरपंचायत कार्यालयात पोहोचल्या. त्यांच्यासमवेत सोलापूर ग्रामीण पोलिसांचा शस्त्रधारी ताफा होता. अनेक जणांनी थिटेंच्या आगमनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दीही वाढू लागली. कार्यालयाबाहेर शेकडो नागरिक उपस्थित राहिल्याने वातावरण तापले होते. सकाळी अकरा वाजता अर्ज स्वीकृती प्रक्रिया सुरू होणार असली तरी त्यापूर्वीच मोठा गोंधळ निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली होती. नागरिकांच्या मोठ्या जमावामुळे आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या हालचालींमुळे ठिकठिकाणी कडक नियंत्रण आणण्यासाठी अतिरिक्त पोलिसांची मदत घेण्यात आली. दोन दिवसांपासून पाठलाग करण्यात येत असल्याचा आरोप दरम्यान, थिटे यांनी भाजप नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यानुसार निवडणूक बिनविरोध करण्याच्या उद्देशाने त्यांना अर्ज भरू न देण्यासाठी ठरवून अडथळे निर्माण करण्यात येत आहेत. रस्त्यांवर उसाने भरलेले ट्रॅक्टर उभे करून जाण्याचे मार्ग अडवले जात असल्याचा त्यांनी दावा केला आहे. एवढेच नाही तर गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा पाठलाग करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला. काल त्यांनी अर्ज भरण्याचा प्रयत्न केल्यावर समर्थकांकडून निर्माण झालेल्या तणावामुळे त्यांना धोका जाणवत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले होते. योग्य संरक्षण न दिल्याचा आरोप करत त्यांनी मोहोळ पोलिस ठाण्यासमोर संतापही व्यक्त केला होता. पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय या सर्व तणावपूर्ण वातावरणात शेवटी पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. अतिरिक्त पोलिस दल, महिला पोलिस, आणि शस्त्रधारी जवानांची फौज अनगरमध्ये तैनात करण्यात आली. पोलिसांनी संपूर्ण मार्ग साफ करून, त्यांना सुरक्षितरीत्या नगरपंचायत कार्यालयात पोहोचवले. संरक्षण मिळाल्यानंतर थिटे यांनी आपला अर्ज भरायला सुरुवात केली असली तरी त्यांचा अर्ज सादर होईल की नाही, याकडे अद्यापही सर्वांचे लक्ष आहे. अनगरमध्ये सकाळपासून असलेली धामधूम पाहता निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन गंभीर पावले उचलताना दिसत आहे. बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप या पार्श्वभूमीवर राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत. अजित पवार गटाकडून उज्ज्वला थिटेंना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपकडून राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील या नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरल्या आहेत. बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून होत असल्याने अनगर नगरपंचायत निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणूक प्रक्रियेतील अडथळे, सुरक्षा वाढ, दोन पक्षांतील आरोप–प्रत्यारोप आणि नागरिकांमध्ये दिसणारा तणाव या सर्व घटनांमुळे पुढील काही तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. अनगरमधील निवडणूक खरोखरच पारदर्शक आणि शिस्तीत पार पडते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 11:34 am

बाळासाहेब ठाकरेंचा 13 वा स्मृतीदिन:ठाकरे बंधू 11 वर्षांनी स्मृतिस्थळी एकत्र, संजय राऊत मास्क लावून शिवतीर्थावर दाखल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 13 वा स्मृतिदिन आहे. या निमित्त बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दादरमधील शिवतीर्थावर शिवसैनिकांची गर्दी जमली आहे. बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे 11 वर्षांनी स्मृतिस्थळी एकत्र आले. याआधी 2014 मध्ये दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेबांना स्मृतिदिनी आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर एकत्र आले होते. राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या नेत्यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मंचावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे हे सोबत बसल्याचे दिसून आले. संजय राऊतांकडून बाळासाहेबांना वंदन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आजारपणातही बाळासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घ्यायला घराबाहेर पडले. शर्ट-पँट अशा पेहरावात ते शिवाजी पार्कवर दाखल झाले. यावेळी संजय राऊत यांच्या तोंडाला संसर्ग टाळण्यासाठी मास्क लावलेला होता. शिवाजी पार्कच्या परिसरात गाडीतून उतरल्यानंतर संजय राऊत हे त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा हात पकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत चालत गेले आणि बाळासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. नेत्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली बाळासाहेब ठाकरे यांना सोशल मीडियावरूनही श्रद्धांजली वाहिली जात आहे. भाजपा नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व विरोधातील अनेक नेतेमंडळींनी बाळासाहेबांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेली एक पोस्ट सध्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे. असा पुरुष सिंह होणे नाही राऊत यांनी 'X' (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बाळासाहेबांना मानवंदना देताना एक संदेश लिहिला. ज्यांच्यामुळे मी घडलो, असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना! असा पुरुष सिंह होणे नाही! असे भावुक उद्गार त्यांनी काढले. तसेच, 'मराठी माणसाने एकजुटीने राहावे आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावे' हीच त्यांना आदरांजली असेल, असे त्यांनी नमूद केले. या पोस्टसोबत त्यांनी शेअर केलेला फोटो मात्र विशेष लक्ष वेधून घेत आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाळासाहेब ठाकरेंचा हात धरून त्यांना नमस्कार करताना दिसत आहेत, तर बाजूला संजय राऊत उभे आहेत. त्यामुळे राऊतांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहण्याच्या निमित्ताने पोस्ट केलेल्या या फोटोची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. राजकारणापलिकडे निःस्वार्थपणे मैत्री जपली - शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा बाळासाहेबांना आदरांजली वाहणारी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “बाळासाहेबांनी आपल्या ठाकरी बाण्याने आणि मुक्तहस्ते विरोधकांवर शब्दांचा मारा केला. त्यांच्या व्यंगचित्रांनी अनेकांना घायाळ केलं. पण आयुष्यभर त्यांनी राजकारणापलीकडे निःस्वार्थपणे मैत्री जपली; त्यात कटुता आणली नाही. महाराष्ट्राचा इतिहास ज्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे राज्याच्या समाजकारणात मोठे योगदान देणारे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!” बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे राजकारणात एकमेकांचे विरोधक जरी असले तरी त्यांच्यातील घनिष्ठ मैत्री ही सर्वश्रुत होती, ज्यामुळे पवारांनी त्यांच्या पोस्टमझ्ये बाळासाहेबांसोबतच्या मैत्रीचा उल्लेख केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 11:31 am

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर फडणवीसांची गुगली:बाळासाहेब स्मारक न्यास अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती, आदित्य ठाकरेंचाही समावेश

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक न्यासाच्या अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०१९ मध्ये त्यांनी राजीनामा दिल्यानंतर तब्बल सहा वर्षांनी त्यांची पुन्हा या पदावर वर्णी लागली आहे. ही नियुक्ती जाहीर होताच ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी राजकीय खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार, अध्यक्षपदी उद्धव ठाकरे, तर सचिवपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांची नियुक्ती झाली आहे. समितीतील सदस्यपदी आदित्य ठाकरे, भाजप आमदार पराग आळवणी, माजी आमदार शिशिर शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या समितीत उद्धव ठाकरे, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल आणि पराग आळवणी, शिशिर शिंदे यांची नियुक्ती पुढील 3 वर्षासाठी असणार आहे. मुख्य सचिव, नगरविकास व विधी-विभागाचे प्रधान सचिव, तसेच मुंबई महापालिकेचे आयुक्त हे पदसिद्ध सदस्य असतील. आणखी दोन सदस्यांची नियुक्ती अद्याप बाकी आहे. फडणवीस सुसंस्कृत विचाराचे सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत विचाराचे आहेत. शेवटी आमच्यात आणि त्यांच्यात कितीही वैचारिक मतभेद असले तरी ते सुसंस्कृत असे नेते आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आम्हाला आनंद झालाय, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली. 2016 मध्ये समितीची स्थापना मुंबईच्या दादर येथील जुन्या महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक उभारले जात आहे. याबाबत सरकारने 15 नोव्हेंबरला अधिसूचना प्रकाशित केली. 2016 मध्ये जेव्हा या स्मारक समितीची स्थापना झाली, तेव्हा उद्धव ठाकरे समितीचे अध्यक्ष होते. 2019 मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर ठाकरेंनी या पदाचा राजीनामा दिला होता. 'शिंदेसेने'ची मागणी फेटाळून फडणवीसांचा निर्णय 2022 मध्ये राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर जवळपास दोन वर्षांपासून ही नियुक्ती प्रलंबित होती. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना या समितीतून हटवण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी फेटाळून लावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांची पुन्हा नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 10:53 am

रिकाम्या मैदानात उभ्या असलेल्या नऊ दुचाकींना अचानक आग:के.एल. कॉलनी परिसरातील घटना; कोणतीही जीवितहानी नाही

ठाणे जिल्ह्यांत आगीच्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. ठाण्यात कोप्री परिसरातील रिकाम्या मैदानात उभ्या असलेल्या नऊ दुचाकींना अचानक आग लागून त्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. सुदैवाने घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील टेकडीवर उभारण्यात आलेल्या मोबाइल टॉवरच्या इलेक्ट्रिक पॅनेललाही आग लागण्याची घटना घडली. या घटनांमुळे अग्निशामक दलाला रात्रीपासून सकाळपर्यंत धावपळ करावी लागली. पहिली घटना ठाणे शहरातील कोप्री येथील गांधी नगरमधील के.एल. कॉलनी परिसरात पहाटे 4.14 वाजता घडली. स्थानिक अग्निशामक केंद्राला अलर्ट मिळताच पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मैदानात उभ्या असलेल्या नऊ मोटारसायकल आणि स्कूटर्स आगीच्या लपेटात सापडल्या होत्या. काही मिनिटांतच ज्वाळांनी जोर पकडला होता. दमकलदलाने वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे आग सुमारे 4.35 वाजता नियंत्रणात आली. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आणि एकही दुचाकी दुरुस्त होण्याजोगी राहिली नाही. सुदैवाने आग लागली तेव्हा परिसरात कोणीही नसल्याने कोणतीही जखमी किंवा मृत्यूची घटना घडली नाही. आगीचे कारण तपासात असून प्राथमिक पाहणी सुरू आहे. जळगाव शहरातील एर्यावर्त केमिकल्स कंपनीत आग दुसरी घटना जळगाव शहरातील एर्यावर्त केमिकल्स कंपनीत सकाळी उघडकीस आली. कारखान्याच्या एका विभागातून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाळा उसळल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच सर्वांना तातडीने बाहेर काढण्यात आले. जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच अग्निशमन दलाची गाड्या काही वेळातच घटनास्थळी दाखल झाल्या. कारखान्यातील सर्व 12 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या पथकाची मदत घेण्यात आली. रसायनांचा साठा असल्याने आग वाढण्याचा धोका होता; मात्र दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. आग कोणत्या कारणामुळे लागली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नसली तरी प्राथमिक तपास सुरु आहे. मोबाइल टॉवरच्या इलेक्ट्रिक सर्व्हर पॅनेलमधून धूर दरम्यान, ठाणे शहरात आणखी एक वेगळी आग लागण्याची घटना नोंदवली गेली. घोडबंदर रोडवरील इंदिरा पाडा टेकडीवर उभारण्यात आलेल्या एका मोबाइल टॉवरच्या इलेक्ट्रिक सर्व्हर पॅनेलमधून धूर येऊ लागल्याने नागरिकांनी तत्काळ प्रशासनाला माहिती दिली. सकाळी 10.25 च्या सुमारास अलर्ट मिळताच दमकल दल, बचाव पथक, विद्युत विभागाचे कर्मचारी आणि संबंधित कंपनीचे तंत्रज्ञ तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुमारे एका तासाच्या प्रयत्नांनंतर ही आग पूर्णपणे विझवण्यात आली. टॉवरमधील यंत्रणा मात्र आगीमुळे काही प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहे. या घटनेतही कुणालाही दुखापत झालेली नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज या तिन्ही वेगवेगळ्या घटनांनी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला सलग धावपळ करावी लागली. वाहनांना लागलेली आग असो किंवा रासायनिक कारखान्यातून उसळलेल्या ज्वाळा, प्रत्येक ठिकाणी अग्निशामक दलाने तत्परता दाखवून मोठी हानी होण्यापासून परिस्थिती वाचवली. आगींची कारणे अजून स्पष्ट नसली तरी विद्युत बिघाड, रासायनिक अभिक्रिया किंवा अन्य तांत्रिक कारणांची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित विभागांनी तपास सुरू केला असून अहवालानंतर अचूक कारणे समोर येणार आहेत. सलग लागलेल्या आगींमुळे नागरिकांमध्ये सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झाले असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 10:49 am

पालघर साधू हत्याकांडातील मुख्य आरोपी भाजपात:काशिनाथ चौधरी यांना वॉशिंग मशीनमध्ये घालून पक्षात घेतले, पवारांच्या NCP चा आरोप

तत्कालीन महाविकास आघाडीच्या काळात घडलेल्या पालघर साधू हत्याकांडातील मुख्य आरोपीला भाजपने आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. भाजपने या हत्याकांडावरून राज्यभर रान पेटवले होते. उद्धव ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली होती. पण आता याच हत्याकांडातील मुख्य आरोपीला पक्षात घेतल्यामुळे विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती. पालघर हत्याकांड भाजपनेच घडवले होते का? असा तिखट सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने उपस्थित केला आहे. 16 एप्रिल 2020 रोजी पालघरमध्ये साधू हत्याकांड घडले होते. त्यात साधू चिन्मयानंद व सुधाम महाराज यांच्यासह त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. या भागात मुले चोरणारी टोळी फिरत असल्याच्या संशयावरून ही घटना घडली होती. त्यात या तिघांचा नाहक बळी गेला होता. भाजपने या हत्याकांडाचा संबंध हिंदुत्त्वाशी जोडून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकावर टीकेची झोड उठवली होती. या प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते काशिनाथ चौधरी यांना मुख्य आरोपी करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी 200 जणांना ताब्यात घेतले होते. तर 108 साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. काशिनाथ चौधरी तेव्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत होते. तेव्हा भाजपने या घटनेमागील मुख्य सूत्रधार तेच असल्याचा आरोप केला होता. पण आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपने चौधरी यांना आपल्या पक्षात घेत त्यांच्या हाती कमळ सुपूर्द केले आहे. यामुळे पालघर साधू हत्याकांडावरून महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्यांना धक्का दिला आहे, डहाणूत भाजपविरोधात सर्व पक्ष एकवटले असताना हा पक्षप्रवेश झाला आहे. चौधरी यांचा पक्षप्रवेश भाजप खासदार डॉक्टर हेमंत सावरा, आमदार हरिशचंद्र भोये यांच्या उपस्थितीत झाला. मग, भाजपनेच पालघर हत्याकांड घडवले का? दुसरीकडे, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. पालघर साधू हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून भाजपने ज्या काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये घालून भाजपने पक्षात घेतलं. मग पालघर हत्याकांडामागे भाजपच होतं, असं म्हणायचं का? हेच भाजपचं ढोंगी आणि बेगडी हिंदुत्व आहे.. राजकारणासाठी भाजप कोणत्याही थराला जाते हे अनेकदा सिद्ध झालं. कोणत्याही विषयाचं राजकारण करून भाजपकडून सत्तेची पोळी भाजली जाते पण यामुळं सामाजिक संतुलन बिघडून त्याचं मोठं नुकसान राज्याला सहन करावं लागतं, याचातरी भाजपने विचार करावा, असे ते म्हणालेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Nov 2025 10:38 am