भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त कोथरूड येथील गांधी भवन येथे विशेष व्याख्याने आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना प्राध्यापक परिमल माया सुधाकर यांनी, पंडित नेहरू यांच्याशिवाय देशाचा इतिहास अपूर्ण राहील, असे मत व्यक्त केले. प्रा. सुधाकर म्हणाले की, पंडित नेहरूंनी 'ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' या पुस्तकात भारताला वगळून जगाचा इतिहास लिहिता येणार नाही, असे वेळोवेळी सांगितले आहे. कारागृहात खडतर जीवन जगत असताना त्यांनी वाचन आणि लिखाण केले. देशाचा अभिमान बाळगण्यासाठी भूतकाळातील घटनांचा विचार करणे आवश्यक असल्याचे ते मानत होते. त्यामुळे अशोक आणि अकबर यांच्याप्रमाणेच पंडित नेहरू यांच्याशिवाय भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. या कार्यक्रमात पंडित नेहरूंनी तुरुंगवासात असताना लिहिलेल्या 'ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' आणि 'द डिस्कवरी ऑफ इंडिया' या दोन पुस्तकांवर आधारित व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. तसेच, ज्येष्ठ लेखक प्रा. शंकर निकम यांनी लिहिलेल्या 'गैरसमजाच्या विळख्यातील नेहरू' या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी झाले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. परिमल माया सुधाकर, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, प्रा. शंकर निकम, डॉ. शिवाजी कदम, ॲड. अभय छाजेड, डॉ. एम.एस. जाधव आणि अन्वर राजन उपस्थित होते. प्रा. परिमल माया सुधाकर यांनी 'ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री' या ग्रंथाबद्दल अधिक माहिती दिली. नेहरू यांनी हा ग्रंथ १९३१ ते १९३४ या काळात, वयाच्या ४१ ते ४४ व्या वर्षी लिहिला. जगाच्या इतिहासात पाच हजार वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सभ्यता आणि संस्कृतींचे स्थान नगण्य होते, असे त्यांनी नमूद केले. तुरुंगात असताना त्यांनी आपली कन्या इंदिरा हिला जगाची माहिती देण्यासाठी तीन वर्षांत १६० हून अधिक पत्रे लिहिली, ज्याचे प्रारूप म्हणून या ग्रंथाकडे पाहिले जाते. नेहरूंनी भारत आणि परदेशातील भेटींमधील ऐतिहासिक महत्त्वाच्या नोंदी पुस्तकात घेतल्या आहेत. त्यांनी ऐतिहासिक वस्तू ज्या दृष्टिकोनातून पाहिल्या, त्याचा उल्लेखही आढळतो. जगाच्या इतिहासात केवळ भारत आणि चीनमध्ये निरंतर संस्कृती टिकून राहिली, याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विविध साम्राज्यांचा उदय आणि अस्त तसेच धार्मिक प्रभावांबद्दल त्यांनी केवळ अभ्यासच केला नाही, तर विश्लेषणात्मक लिखाणही केले.
पालिका निवडणुकीतील पहिला गुन्हा:हिंगोलीत मतदारांना 'खिचडी'चे प्रलोभन, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
हिंगोली शहरात पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना खिचडी वाटप करून प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांवर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी तारीख 14 गुन्हा दाखल झाला आहे. पालिका निवडणुकीतील हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे हिंगोली जिल्ह्यांमध्ये हिंगोली सह कळमनुरी व वसमत नगरपालिकाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीमध्ये सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राजकीय पक्षांसह अपक्षांची धावपळ सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता केवळ तीन दिवस शिल्लक असल्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांकडून शक्ती प्रदर्शनाद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान दुसरीकडे पालिका निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी निवडणूक विभाग व पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. त्यासाठी निवडणूक विभागाने पथकांची स्थापना केली असून या पथकांद्वारे उमेदवारांच्या खर्चांवर लक्ष ठेवले जात आहे. तर पोलिस विभागाने स्थापन केलेल्या पथकाकडून शहरामध्ये येणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान आज शहरातील एका जिनिंग जवळील मोकळ्या मैदानावर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना खिचडी वाटप करून प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप मोदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संजय तोडेवाले, अशोक धामणे, शेख मुजीब, गणेश लेकुळे, संतोष करे, गणेश वाबळे यांच्या पथकाने आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पाहणी केली. यावेळी तेथे जमलेल्या लोकांना खिचडी वाटप करून प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून आले. यावरून जमादार तोडेवाले यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी शेख अनवर शेख रहमान याच्यासह एका महिलेविरुद्ध निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांना खिचडी वाटप करून प्रलोभन दाखविण्याचा प्रयत्न करणे तसेच लोकसेवकाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. जमादार शेख, जमादार संजय मार्के पुढील तपास करीत आहेत
शेयर मार्केटमध्ये ‘बुल्स रन’; आयटीत मात्र विक्रीचा दबाव
मुंबई : वृत्तसंस्था बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात दिवसभर मोठी अस्थिरता दिसून आली. सकाळी गॅप-डाऊन ओपनिंग झाल्यानंतर बाजार जवळपास पूर्ण वेळ लाल निशाणीवर ट्रेड करत होता. मात्र, मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात एनडीए युतीला स्पष्ट बहुमत मिळण्याचे चित्र स्पष्ट होताच, बाजारात अचानक मोठी तेजी आली आणि प्रमुख निर्देशांक हिरव्या निशाणीवर बंद झाले. हा ट्रेंड […] The post शेयर मार्केटमध्ये ‘बुल्स रन’; आयटीत मात्र विक्रीचा दबाव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
७ देशातील ३२ कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेने भारत आणि चीनसह सात देशांमधील ३२ कंपन्या आणि व्यक्तींवर निर्बंध लादण्याची घोषणा केली. इराणच्या क्षेपणास्त्र विकास आणि इतर शस्त्रास्त्रांना रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही कारवाई असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितले की, त्यांनी चीन, इराण, हाँगकाँग, संयुक्त अरब अमिराती, तुर्की आणि भारतासह इतर देशांमध्ये असलेल्या तब्बल ३२ संस्था […] The post ७ देशातील ३२ कंपन्यांवर अमेरिकेची मोठी कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘एआय’ वापरून केली बातमी; पेपरमध्ये प्रॉम्प्ट मात्र ‘जैसे थे’!
इस्लामाबाद : वृत्तसंस्था पाकिस्तानमधील सर्वाधिक खपाच्या ‘डॉन’ या दैनिकाने कार विक्रीवरील एका रिपोर्टमध्ये चक्क ‘एआय’ प्रॉम्प्ट प्रकाशित केला. ‘एआय’चा वापर करून लिहिलेल्या बातमीमधील प्रॉम्प्ट छपाईवेळी तसाच राहिला. प्रकाशित झालेल्या बातमीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तुफान चर्चा रंगली आणि हा वादाचा विषय ठरला आहे. अखेर दिलगिरी व्यक्त करत या चुकीवर पडदा टाकण्यात आला आहे. पाकिस्तानमधील […] The post ‘एआय’ वापरून केली बातमी; पेपरमध्ये प्रॉम्प्ट मात्र ‘जैसे थे’! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शेख हसिना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार? १७ रोजी निकाल; स्फोट, जाळपोळ, कडक बंदोबस्त
ढाका : वृत्तसंस्था सरकारने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्ध गुन्ह्यांच्या आरोपांत फाशीची शिक्षा सुनावण्याची तयारी केली आहे. देशातील ‘आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने’ घोषणा केली की, या प्रकरणाचा अंतिम निकाल १७ नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे. या घोषणेनंतर ढाकामध्ये तणावाचे वातावरण आहे. माजी पंतप्रधानांचा पक्ष असलेल्या आवामी लीगने ‘ढाका बंद’चे आवाहन केले आहे. अल-जझीराच्या वृत्तानुसार, बुधवारी […] The post शेख हसिना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार? १७ रोजी निकाल; स्फोट, जाळपोळ, कडक बंदोबस्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
१५० वर्षाचे आयुष्य देणार ‘अॅँटी एजिंग’ गोळी!
शेन्झेन : वृत्तसंस्था चीनचे शास्त्रज्ञ आता एक अशी गोळी विकसित करत आहेत जी माणसांचं आयुष्य थेट १५० वर्षांपर्यंत वाढवू शकते. शेन्झेनची बायोटेक कंपनी लॉनवी बायोसायन्सेस या औषधावर काम करत आहे. गोळीतील मुख्य घटक प्रोस्यानिडिन सी१ (पीसीसी१) आहे, जो द्राक्षाच्या बियांच्या अर्कामध्ये आढळतो. कंपनीचा दावा आहे की, ही गोळी कमकुवत पेशी नष्ट करेल आणि चांगल्या पेशींचे […] The post १५० वर्षाचे आयुष्य देणार ‘अॅँटी एजिंग’ गोळी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नारी शक्तीने बिहारचा डाव फिरवला!
– ‘जीविका दीदी’, दारूबंदीमुळे महिलांचा एकतर्फी पाठिंबा – यादवांना भाऊबंदकी भोवली; महिला योजना ‘एनडीए’च्या पथ्यावर! पाटणा : वृत्तसंस्था लालू प्रसाद यादवांच्या भावकीतील वाद आणि नितीशकुमार यांच्या महिलांसाठीच्या योजना यामुळे ‘एनडीए’ने घवघवीत यश संपादन केल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये ‘एनडीए’ने जोरदार आघाडी घेतली असून, या अभूतपूर्व यशामागे महिला मतदारांची निर्णायक […] The post नारी शक्तीने बिहारचा डाव फिरवला! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केदार जाधव यांचा विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र:बांधकाम कामगारांच्या गुणवंत मुलांचा बीएआय सत्कार
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) पुणे सेंटरतर्फे बांधकाम कामगारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध क्रिकेटपटू केदार जाधव यांनी विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र दिला. तसेच, सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रेय पवार यांनी कामगारांना कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले. हा कार्यक्रम शनिवार पेठेतील विष्णुकृपा हॉलमध्ये पार पडला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केदार जाधव म्हणाले, की यशस्वी होण्यासाठी जिद्द, परिश्रम, सातत्य, संगत आणि शिस्त अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या जडणघडणीत कुटुंबीय, आसपासचे लोक, शाळा आणि शिक्षकांचा मोठा परिणाम होतो, त्यामुळे संगत उत्तम ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. ज्यांचे सुरुवातीचे संघर्ष तीव्र असतात, ते अधिक सक्षमपणे पुढे जातात आणि मोठी आव्हाने पेलू शकतात, असेही जाधव यांनी नमूद केले. यशस्वी व्यक्ती कसे वागतात, बोलतात, त्यांची देहबोली आणि भाषा कशी असते, याचे विद्यार्थ्यांनी निरीक्षण करून त्यातून शिकले पाहिजे. स्वतःवर आणि स्वतःच्या अनुभवांवर विश्वास ठेवून, जे कराल त्याची जबाबदारी स्वीकारण्याचा सल्लाही त्यांनी दिला. सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रेय पवार यांनी कामगारांच्या पुढच्या पिढ्यांना उत्तम शिक्षण घेऊन करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या या सोहळ्याचे कौतुक केले. ते म्हणाले, राज्याच्या कामगार विभागांतर्गत कल्याणकारी मंडळ कार्यरत आहे. कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांसाठी आणि त्यांच्या पाल्यांसाठी विविध कल्याणकारी योजना आहेत. कामगारांनी आपल्या नावाची पुराव्यासह नोंदणी कल्याणकारी मंडळात केल्यास, अनेक योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल, असे आवाहन त्यांनी केले. विशेषतः कामगारांच्या पाल्यांसाठी शिक्षणाच्या अनेक योजना असूनही, कामगार नोंदणी करत नसल्याने निधी शिल्लक राहतो, हे चित्र बदलले पाहिजे. कामगारांनी स्वतःची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करून स्मार्ट कार्ड घ्यावे आणि योजनांचा लाभ मिळवावा, असेही पवार यांनी सांगितले. या सत्कार समारंभाला क्रिकेटपटू केदार जाधव, सहायक कामगार आयुक्त दत्तात्रेय पवार, प्रेरक वक्ते समृद्धी जाधव, 'बीएआय'चे अध्यक्ष अजय गुजर, उपाध्यक्ष राजाराम हजारे व महेश मायदेव, कोषाध्यक्ष महेश राठी, बीएआयचे महाराष्ट्र अध्यक्ष जगन्नाथ जाधव, सचिव मनोज देशमुख आणि माजी अध्यक्ष सुनील मते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी नुकतेच सांगितले की, कायद्याची प्रभावी व्यूहरचना, धाडसी नेतृत्व आणि राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर मुंबईतील गुन्हेगारीला आळा घालण्यात पोलिसांना यश आले. पुणे येथे 'द ब्रह्मास्त्र अनलीश्ड' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. ध्यास फाउंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी डीजीपी (निवृत्त आयपीएस) डी. शिवानंधन यांनी लिहिलेल्या 'द ब्रह्मास्त्र अनलीश्ड' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. महाराष्ट्राचे माजी डीजीपी (निवृत्त आयपीएस) ए.व्ही. कृष्णन् आणि डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर ध्यास फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष (निवृत्त आयपीएस) डॉ. माधव सानप, प्रसिद्ध लेखक वि.दा. पिंगळे आणि लेखक डी. शिवानंधन उपस्थित होते. डॉ. माशेलकर म्हणाले की, एकेकाळी सर्वसामान्यांचे शहर, काम देणारी मुंबई आणि देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई गुन्हेगारीची राजधानी बनली होती. गुन्हेगारांच्या दहशतीमुळे सधन कुटुंबातील व्यक्तींना लग्नकार्य, वाहन किंवा गृह खरेदीही मनमोकळेपणाने करता येत नव्हती. नव्वदच्या दशकात टोकियो, यासुका, कोलंबिया, न्यूयॉर्कसारख्या जागतिक शहरांमध्येही माफियांचा धुमाकूळ होता. मात्र, धाडसी आणि कणखर नेतृत्वाने कायद्याच्या चौकटीत राहून या गुन्हेगारांना आवरले. आज डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाच्या सहज उपलब्धतेमुळे गुन्हेगारीचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे या नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी पोलिसांना सज्ज राहावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी बोलताना ए.व्ही. कृष्णन् यांनी सांगितले की, मुंबईतील गुन्हेगारी केवळ एन्काऊंटरने संपण्यासारखी नव्हती, तर त्यासाठी कायद्याचा धाक आवश्यक होता. मोक्कासारख्या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे पोलिसांनी मुंबईतील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढली. 'द ब्रह्मास्त्र अनलीश्ड' या पुस्तकाचे लेखक डी. शिवानंधन यांनी ९० च्या दशकातील परिस्थिती स्पष्ट केली. दाऊद इब्राहिम, छोटा शकील, छोटा राजन यांसारख्या गुन्हेगारांनी दहशतवादी हल्ले, खंडणी आणि खुनांच्या सत्राद्वारे मुंबईत दहशत निर्माण केली होती. एके-४७ सारख्या अत्याधुनिक शस्त्रांनी मुंबई अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी त्यांना कायद्याच्या चौकटीत आणले. वि.दा. पिंगळे यांनी पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवताना सांगितले की, मुंबईतील गुन्हेगारीमुळे शहराचा विकास खुंटला होता आणि शांतता भंग पावली होती. डी. शिवानंधन यांच्यासारख्या धाडसी आणि करारी पोलीस अधिकाऱ्यांमुळे धास्तावलेल्या मुंबईकरांना मोकळा श्वास घेता आला आणि सुरक्षित वाटू लागले.
वसमत तालुक्यातील जुनूना येथे जमीनीच्या कारणावरून झालेल्या खून प्रकरणात चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश अनुसुचीत जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. धर्मपाल मेश्राम यांनी शुक्रवारी ता. १४ महसूल व पोलिस प्रशासनाला दिले आहेत. वसमत तालुक्यातील जुनूना येथे जमीनीच्या कारणावरून झालेल्या वादानंतर खूनाची घटना घडली होती. त्यानंतर आज अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. धर्मपाल मेश्राम यांनी जूनूना येथे भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, तहसीलदार शारदा दळवी, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. मेश्राम यांनी प्रकरणाची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन करून या समितीला तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच खून प्रकरणातील सविस्तर माहिती व घटनाक्रम, तपासाची सध्याची स्थिती याची माहिती सादर करण्याच्या सूुचनाही पोलिस अधिक्षक कोकाटे यांना दिल्या आहेत. सद्यस्थितीत जुनुना गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि गावातील प्रत्येक समाजाचा एक प्रतिनिधी सहभागी करून ग्रामपातळीवरील शांतता समिती तातडीने स्थापन करावी. तसेच या समितीने दर पंधरा दिवसाला आढावा बैठक घेऊन गावातील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, अशी सूचना त्यांनी केली. यासोबतच एकसदस्यीय चौकशी समिती, पोलीस विभागाचा सविस्तर तपास अहवाल आणि ग्रामस्तरीय शांतता समित्यांच्या अहवालासह सर्व तीन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आयोग अंतिम निर्णय देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी युसीआय (युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल) मानकांनुसार सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सुमारे ५० देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस आणि परिवहन विभागासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आणि पुणे ग्रँड चॅलेंज टूरचे तांत्रिक संचालक पिनाकी बायसक उपस्थित होते. स्पर्धेदरम्यान गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षा पासेस, सायकलपटूंची वाहतूक, ट्रॅकवरील सुविधा, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांचे प्रशिक्षण यावर प्रामुख्याने लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शहरी तसेच ग्रामीण भागातील भौगोलिक परिस्थिती, गर्दी आणि परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावरही भर देण्यास सांगितले. पोलीस अधिकारी आणि सायकल संघटनांमध्ये योग्य समन्वय साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संपूर्ण रस्त्याची लांबी सुरक्षादृष्ट्या तपासणी करावी. या कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण द्यावे आणि त्यानंतर नियोजनात कोणताही बदल करू नये, असे डुडी म्हणाले. विशेषतः ग्रामीण मार्गावर प्राणी येणार नाहीत याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले. शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत स्पर्धा होणार असल्याने पोलिसांचे एकच पथक कॉन्व्हॉयसोबत असावे. खेळाडूंच्या आगमनापासून ते प्रयाणापर्यंत ग्रीन कॉरिडोर तयार करावा आणि सुरक्षा पासेस देण्याबाबतही नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, स्पर्धेवेळी मुख्य मार्गावर वाहतूक नियोजन आणि गर्दीचे व्यवस्थापन ही मोठी जबाबदारी आहे. यासाठी परिसरातील नागरिकांची जनजागृती करणे आवश्यक आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असेही पाटील म्हणाले.पुणे ग्रँड चॅलेंज टूरचे तांत्रिक संचालक पिनाकी बायसक यांनी स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या मार्गाची तपासणी, गर्दी व वाहतुकीचे व्यवस्थापन, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती व प्रशिक्षण याबद्दल माहिती दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर या स्पर्धेचे महत्त्व, सहभागी खेळाडूंद्वारे होणारे सुरक्षेचे मूल्यांकन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळताना घ्यावयाची काळजी यावरही त्यांनी प्रकाश टाकला. स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत करण्यात येणाऱ्या सुरक्षात्मक उपाययोजना, पोलीस विभाग आणि सायकल संघटनांमधील समन्वय यावर बायसक यांनी भर दिला. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन हे आपल्या देशाची प्रतिमा उंचावणारे असल्याने संपूर्ण स्पर्धेदरम्यान चोख पोलीस सुरक्षा पुरवण्यासह गर्दी व वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला पाहिजे, असेही बायसक यांनी नमूद केले.
'संघर्षगाथा माझ्या आयुष्याची' आत्मकथनाचे प्रकाशन:सुनील देवधर म्हणाले, देशसेवेसाठी जात-भाषा भेद विसरा
भारतीय जनता पक्षाचे माजी सचिव आणि माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी नुकतेच 'संघर्षगाथा माझ्या आयुष्याची' या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी बोलताना देवधर यांनी देश आणि समाजसेवेसाठी जात, धर्म, प्रांत आणि भाषेच्या पलीकडे जाऊन कार्य करण्याचे आवाहन केले. हे पुस्तक अमितकुमार बॅनर्जी यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित आहे. बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधून येऊन महाराष्ट्रात 'संपर्क' संस्थेच्या माध्यमातून बालग्रामसारखे मोठे उपक्रम राबवले आहेत. महाराष्ट्रातील वंचित आणि अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे देवधर यांनी कौतुक केले. देवधर म्हणाले की, संपर्क संस्थेचे बालग्राम उपक्रमाचे संस्थापक अमितकुमार बॅनर्जी हे महाराष्ट्राचा अभिमान आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील असंख्य अनाथ मुलांना ममता मिळाली आहे. प्रत्येक व्यक्तीने समाजाकडून मिळालेल्या गोष्टींची सेवाभावातून परतफेड करावी, असे आवाहन त्यांनी केले. सेवाकार्य निरपेक्ष, पवित्र असावे आणि त्यात भ्रष्टाचार नसावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, माजी शिक्षणाधिकारी डॉ. अनिल गुंजाळ, साहित्यिक प्रसाद मिरासदार, अमितकुमार बॅनर्जी, रत्ना बॅनर्जी, उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशी, सुधीर राशिनकर आणि अण्णा कातळे आदी मान्यवर उपस्थित होते. अमितकुमार बॅनर्जी यांनी आपल्या प्रवासाविषयी सांगितले की, सुमारे ३५ वर्षांपूर्वी ७ अनाथ मुलांसह मातीच्या घरातून संस्थेच्या कामाला सुरुवात केली होती. आज देशभरात संस्थेची ११ केंद्रे आहेत. केवळ भावनिक होऊन नव्हे, तर योग्य गणिते सांभाळत हे काम उभे केले. अनेक सहकाऱ्यांच्या मदतीमुळे हे कार्य शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. हे पुस्तक म्हणजे आंदोलन नसून, त्यांच्या कामाचा प्रवास सांगण्याचा प्रयत्न आहे. डॉ. सदानंद मोरे यांनी अमितकुमार बॅनर्जी यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की, त्यांचे काम राष्ट्रीय एकात्मतेचे उत्तम उदाहरण आहे. दुसऱ्या राज्यात येऊन संघर्ष करणे आव्हानात्मक असले तरी, त्यांनी केलेल्या कामाने महाराष्ट्र समृद्ध होईल. हे आत्मकथन अनेकांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील २५ गुणवंत विद्यार्थ्यांची अमेरिकेतील १० दिवसांच्या शैक्षणिक दौऱ्यासाठी निवड झाली आहे. हे विद्यार्थी नासा येथे अभ्यासदौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात या विद्यार्थी चमूला प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू तसेच काही शिक्षक व पालक उपस्थित होते. डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा येथे भेट देण्याची ही एक मोठी आणि अभिमानास्पद संधी आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना अमेरिकेतील शिस्त व शिष्टाचाराचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, अनोळख्या वस्तूंना हात न लावणे, एकमेकांना मदत करणे, एक संघ म्हणून काम करणे, शिक्षकांच्या सूचनांचे पालन करणे आणि तब्येतीची काळजी घेणे यावर त्यांनी भर दिला. या दौऱ्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थी नासा केनेडी स्पेस सेंटर, स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम, नासा अर्थ इन्फॉर्मेशन सेंटर, तसेच सॅन फ्रान्सिस्कोमधील प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांना भेट देणार आहेत. हे शिष्टमंडळ १५ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे मुंबई येथून प्रस्थान करणार आहे. या दौऱ्यात इयत्ता ६ वी व ७ वी मधील ९ मुली आणि १६ मुलांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत आयुकाचे शास्त्रज्ञ समीर दुर्डे, शिक्षिका माया लंघे (हवेली), प्रमिला जोरी (आंबेगाव), सुनीता खलाटे (बारामती) आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला साळुंके (दौंड) यांचाही समावेश आहे. हा कार्यक्रम 'पुणे मॉडेल स्कूल प्रकल्पातील' एक महत्त्वाचा उपक्रम असून, पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी 'आयुका'च्या (IUCAA) सहकार्याने केली जात आहे. या उपक्रमाला ग्रामीण विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, ज्यात १७,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये काटेकोरपणे पूर्ण करण्यात आली. नासाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयुकाने विशेष तयारी वर्गांचे आयोजन केले होते, ज्यात वैज्ञानिक विषय, आंतरराष्ट्रीय संशोधन पद्धती आणि अवकाश विज्ञान संकल्पनांची ओळख करून देण्यात आली. शिक्षकांसाठीही प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले, ज्याद्वारे त्यांना अन्वेषण-आधारित शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वर्गात प्रभावीपणे आणण्याच्या पद्धती शिकविण्यात आल्या.
बालकांच्या हक्कांचे संरक्षण करून पुरोगामी महाराष्ट्र अधिक मजबूत करूया, असे आवाहन महिला व बाल विकास आयुक्तालयाचे सह आयुक्त राहुल मोरे यांनी केले. बालदिनानिमित्त आयोजित बाल हक्क संरक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, विभागीय उपायुक्त संजय माने, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे प्रतिनिधी रितू यादव, प्रेरणा कौशिक आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे उपस्थित होते. मोरे यांनी सांगितले की, महिला व बाल विकास विभागामार्फत गर्भधारणेपासून ते १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत बालकांसाठी विविध योजना व उपक्रम राबवले जातात. विभागाने १० हजारांहून अधिक अनाथ बालकांना प्रमाणपत्र दिले आहे. अनाथांना शासकीय नोकरीत १ टक्के आरक्षण देण्यात आले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करत आतापर्यंत वर्ग १ ते वर्ग ४ या पदांवर सुमारे एक हजार अनाथांना शासकीय नोकरी मिळाली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पोर्टलद्वारे बालकांचे पुनर्वसन केले जात आहे. 'मिशन वात्सल्य'च्या माध्यमातून हरवलेल्या मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडे परत सोपवले जात आहे. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्हास्तरावर बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण कक्ष कार्यालयामार्फत मदत पुरवली जाते. आरोग्य विभाग, पोलीस विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा बाल संरक्षण समितीच्या सहकार्याने महिला व बालविकास विभाग बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे मोरे यांनी नमूद केले. यावेळी बोलताना सोनल पाटील म्हणाल्या की, बालकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी कुटुंबासह शालेय पातळीवर समुपदेशन करणे आवश्यक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बालकांच्या समुपदेशनासाठी शाळा आणि सामाजिक संस्थांनी पुढे येऊन सक्रियपणे काम करावे. बालगुन्हेगारीशी संबंधित सर्व कायद्यांची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी घेऊन त्यांची योग्य अंमलबजावणी करावी. अनाथ, निराश्रित आणि वंचित बालकांना शासकीय यंत्रणांनी मदत करून त्यांना समाजात ओळख निर्माण करून द्यावी, ज्यामुळे त्यांना खरा आधार मिळेल. १८ वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने मदत केली जाईल, असे आवाहन पाटील यांनी केले. त्यासाठी प्राधिकरणाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पुण्यात 27, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 रोजी एमईए आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्स्पो 2026 चे आयोजन करण्यात येणार आहे. कृषी मैदानावर होणाऱ्या या एक्स्पोची घोषणा मराठा उद्योजक संघटना (एमईए) च्या वतीने कार्यकारी अध्यक्ष विक्रम गायकवाड आणि क्रेडाई राष्ट्रीयचे माजी अध्यक्ष सतीश मगर यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘एकतेपासून समृद्धीकडे’ या संकल्पनेवर आधारित हा भारतातील सर्वात मोठा कम्युनिटी लीड बिझनेस एक्स्पो असेल. मराठा समाजात उद्योजकता वाढवणे आणि तरुणांना उद्योग क्षेत्रातील सखोल ज्ञान देणे हा एमईएचा गेल्या 14 वर्षांपासूनचा उद्देश आहे. याच ध्येयाचा भाग म्हणून हे आंतरराष्ट्रीय एक्स्पो आयोजित केले जात आहे. परदेशातील मराठा उद्योजक, व्यावसायिक आणि नेते यांना एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न यातून होईल, असे गायकवाड यांनी सांगितले. या एक्स्पोमध्ये बांधकाम, उत्पादन, आयटी, एफएमसीजी, कृषी-तंत्रज्ञान, जीवनशैली, शिक्षण, आदरातिथ्य, सेवा, आयात-निर्यात, ऑटोमोबाईल, आरोग्य, बँकिंग-वित्त अशा विविध क्षेत्रांचा समावेश असेल. 500 हून अधिक स्टॉल्स, आंतरराष्ट्रीय व्यापारी संस्था, सरकारी प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि तज्ज्ञ यांची उपस्थिती हे या एक्स्पोचे वैशिष्ट्य असेल. हे व्यासपीठ उद्योजकांना व्यवसायवृद्धी, गुंतवणूकदार आणि धोरणकर्त्यांशी संपर्क, ब्रँड जागतिकीकरण, नव्या बाजारपेठा शोधणे आणि तज्ज्ञांचे ज्ञान मिळवणे यांसारख्या अनेक संधी उपलब्ध करून देईल. एमईएचे माजी अध्यक्ष अरुण निम्हण, सचिव राजेश कु-हाडे, सई बहिरट पाटील, नितीन भोसले, सागर तुपे आदी यावेळी उपस्थित होते. गायकवाड यांनी सांगितले की, एमईए संघटना मागील 15 वर्षांहून अधिक काळ मराठा समुदायाच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी कार्यरत आहे. एमईएकडे 2000 हून अधिक सदस्य आणि 200 यशस्वी कार्यक्रमांचा विक्रम आहे. स्वावलंबी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक मराठा व्यवसाय समुदाय घडवणे हे संघटनेचे ध्येय आहे. हे एक्स्पो केवळ एक प्रदर्शन नसून मराठा समाजाची एक प्रगतीशील चळवळ आहे. यातून नव्या संधी शोधल्या जातील आणि समुदायाचे आर्थिक भविष्य घडवले जाईल, असेही गायकवाड यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला मुंबईतील फुटपाथ विकल्याची घटना समोर आली आहे. हा 3 लाख रुपयांचा व्यवहार 2 वर्षांपूर्वी पार पडला. पण आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तो उजेडात आला. यासंबंधीच्या माहितीनुसार, मुलुंड येथे फुटपाथवर पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या संतोष गुप्ता यांना बीएमसीचा फुटपाथ विकत घेतला आहे. त्यांनी आपण हा फुटपाथ शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी अविनाश बागुल यांच्याकडून विकत घेतल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, अविनाश बागुल यांनी 2023 मध्ये फुटपाथचा एक भाग आपल्याला 3 लाखांत विकला. ही रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून बागुल यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. ही रक्कम त्यांनी कर्ज व आपल्या आईचे दागिने गहाण ठेवून जमवले. पण या जागेमुळे आपले नशीब पालटेल अशी त्यांना आशा होती. पण झाले ते भलतेच. संतोष गुप्ता मागील 2 वर्षांपासून या व्यवहाराचे दस्तऐवज तयार करण्यासाठी अविनाश बागुल यांच्या मागे लागला होता. पण ते टाळाटाळ करत होते. अखेर कंटाळून गुप्ता यांनी आपले पैसे परत मागितले. पण त्यांना ना ही जागा मिळाली ना दिलेले पैसे मिळाले. त्यानंतर आता त्यांना ज्या जागेसाठी आपण हा व्यवहार केला ती मुंबई महापालिकेची संपत्ती असल्याचे समजले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि हा घोटाळा उजेडात आला. 'मुंबई मिरर'ने हे वृत्त दिले आहे. तीन चेक दिले, पण सर्व बाऊन्स झाले संतोष गुप्ता यांनी अविनाश बागुल यांच्याकडे आपल्या पैशांची विचारणा केली, तेव्हा त्यांनी एक जुना चेक दिला. पण तो बाऊन्स झाला. त्यानंतर त्यांनी आणखी 2 चेक दिले. पण ते ही बाऊन्स झाले. संतोष गुप्ता यांनी बागुल यांच्यावर एका डोसेवाल्याकडून दरमहा 17 हजार रुपयांची वसुली करण्याचाही आरोप केला आहे. गुप्ता यांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर बागुल यांनी त्यांना दीड लाखांचा चेक दिला. पण त्यांनी ज्या बँकेचा चेक दिला त्यात तेवढी रक्कमच शिल्लक नव्हती. त्यामुळे तो चेक वठला नाही. त्यामुळे आता पोलिसांनी गुप्ता यांना कोर्टातून आदेश आणण्यास सांगितले आहे. बागुल यांनी फेटाळले गुप्ताचे आरोप दुसरीकडे, अविनाश बागुल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. संतोष गुप्ता व माझ्यात कोणताही करार झाला नव्हता. त्याने माझ्याकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. ते मी त्याला परत केले. माझ्यावरील आरोप राजकीय कटाचा भाग आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीए आघाडीवर असून जवळपास विजय हा निश्चितच झाल्याचे दिसत आहे. यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशात जो विषारी प्रचार चालवला आहे, त्याला जनतेने उत्तर दिल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे राजधानी दिल्ली येथे असून पत्रकारांशी संवाद साधताना बिहार निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, भाजप आणि एनडीए या सर्व घटक पक्षांच्या बिहार युनिटचे मी अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचे आभार मानतो. त्यांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, नितीश कुमार यांच्या सुशासनावर विश्वास ठेऊन आणि आमच्या घटक पक्षाला त्या ठिकाणी एनडीएच्या माध्यमातून प्रचंड मोठे बहुमत दिले आहे. 2010 चा सुद्धा रेकॉर्ड तुटू शकेल इतके बहुमत मिळाले आहे. कॉंग्रेस एमआयएम पेक्षाही खाली गेली पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, दुसरे महत्त्वाचे असे आहे की या विजयानंतर खऱ्या अर्थाने कॉंग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी देशात जो विषारी प्रचार चालवला आहे, त्याला जनतेने उत्तर दिले आहे. सातत्याने संवैधानिक संस्थांचा अपमान करणे, जनतेच्या मॅनडेटला विरोध करणे, कुठेतरी जनतेला हे लक्षात येत आहे की आम्ही ज्या सरकारला निवडून देतो हा त्या सरकारचा अपमान नाही तर आमच्या मताचा अपमान आहे. कॉंग्रेस एमआयएम पेक्षाही खाली गेली आहे. मला असे वाटते की कॉंग्रेसचा बिहारच्या इतिहासात सर्वात कमी मत मिळाली आहेत. राहुल गांधी यांनी तिथे मतचोरी मुद्दा चालवला, त्यावर त्यांनी यात्रा काढली, नदीत उडी टाकली. पण लोकांचा विश्वास हा मोदींवर आणि नितीश कुमार यांच्यावर आहे. मला असे वाटते की जोपर्यंत कॉंग्रेस आणि त्यांच्यासोबतचे पक्ष जोपर्यंत आत्मपरीक्षण करत नाहीत तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधक सत्य पचवत नाहीत तोपर्यंत त्यांचा पराभव होत राहणार पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, विकास आणि सुशासन हाच प्रमुख मुद्दा ठरला आहे. आणि हे लक्षात येत होते की खूप चांगल्या परिस्थितीत एनडीए आहे. पूर्वीपेक्षा जास्त चांगली परिस्थिती यावेळी दिसून आली आहे. अक्षरशः त्याचा निकाल आज आपण पाहत आहोत. मला असे वाटत होते की आपण 160 च्या पुढे जाऊ, पण त्याही पेक्षा आपण पुढे गेलो आहोत. तसेच जोपर्यंत हे लोक सत्य पचवत नाहीत तोपर्यंत त्यांचा पराभव होत राहणार, असे म्हणत फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? बिहारच्या मुख्यमंत्री पदावर कोण येणार यावर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली आहे, आता मुख्यमंत्री पदासाठी आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. यात मला बोलण्याचा अधिकार नाही. अमित शहा यांनी देखील स्पष्टपणे सगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे मी त्यावर काही बोलू शकत नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा पुरस्कार राम सुतार जे अतिशय ज्येष्ठ शिल्पकार आहेत. देशभरात त्यांच्या एवढ्या मूर्ती कोणीच तयार केलेल्या नाहीत. त्यांनी 100 वर्ष वयाचे पूर्ण केले आहेत. आता लवकरच त्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देणार आहोत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
राज्यात साथीच्या आजारांचा उद्रेक
मुंबई : राज्यात अनियमित पाऊस, साचलेले पाणी आणि बदलते हवामान या कारणांमुळे डासांची उत्पत्ती वाढली असून, मलेरिया, डेंग्यूचा, चिकनगुनियाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात मुंबई मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाची हॉटस्पॉट ठरली आहे. यंदा मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली होती. हा पाऊस नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरूच होता. या कालावधीत हवामानात सातत्याने बदल होत असल्याने साथीच्या आजारांनी डोके […] The post राज्यात साथीच्या आजारांचा उद्रेक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तलाठ्यामुळे वाचवली सरकारी जमीन
पुणे : बोपोडी येथील सरकारी मालकीची जमीन कुळमालकाच्या नावे लावण्याचा कारनामा तत्कालीन तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी केल्याचा प्रकार जिल्हा प्रशासनात प्रशासनाच्या नजरेत आला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. असाच प्रकार ताथवडे येथील सातबारा उता-यातील इतर हक्कात सरकारी विभागाचे नाव असतानाही जमिनीच्या विक्रीचा प्रकार सजग तलाठ्याच्या कृतीमुळे उघड झाला आहे. खरेदीखत झाल्यानंतरही त्याचा अंमल फेरफारमध्ये न करता […] The post तलाठ्यामुळे वाचवली सरकारी जमीन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले असून एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. बिहारमधील 243 जागांपैकी जवळपास 200 पेक्षा जास्त जागांवर भाजप-जदयू आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेस-आरजेडी महागठबंधन फक्त 35 च्या आसपास जागांवर समाधान मानावे लागले आहे. बिहारमध्ये एनडीएचा असा मोठा विजय मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील 2025 च्या विधानसभा निवडणुकांची आठवण अनेकांना झाली आहे. कारण दोन्ही राज्यांत विरोधकांच्या मोठ्या लाटेच्या दाव्यांना निकालांनी छेद दिला आहे. बिहारचे राजकीय चित्र स्पष्ट होताच महाराष्ट्रातील नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून भाजप नेत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. बिहारमधील निकाल जाहीर होताच भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनीही या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. वोट चोरीचा मुद्दा उचलून विरोधकांनी जनतेची दिशाभूल केली, पण बिहारी जनतेने निकालातूनच स्पष्ट संदेश दिला, असे साटम यांचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, विरोधकांकडून उभा केलेला वोट चोरीचा कथित कथानक म्हणजे जनतेचाच अपमान असून निकालानंतर हा संपूर्ण मुद्दा कोसळला आहे. साटम यांनी म्हटले की बिहारची निवडणूक म्हणजे फक्त ट्रेलर आहे आणि खरा चित्रपट मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पाहायला मिळेल. त्यांच्या वक्तव्याने मुंबईतील आगामी निवडणुकीसाठी भाजपने आपला सूर अधिक आक्रमक ठेवला आहे, हे स्पष्ट झाले. दुसरीकडे, शिवसेना आणि काँग्रेसकडूनही या निकालांची वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या करण्यात आली. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या प्रतिक्रियेत केंद्र सरकार, यंत्रणा आणि स्वायत्त संस्थांवरच या निकालाचे श्रेय टाकले. त्यांचा आरोप असा की, सत्ताधाऱ्यांनी वातावरण तयार करणे, विरोधकांचे आवाज दाबणे आणि सरकारी संस्थांचा प्रभाव वापरणे यामुळे निकाल एका बाजूला झुकला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर निवडणूक आयोगाचा दाखला देत बिहारचे चित्र आणि महाराष्ट्रातील काही जुन्या प्रसंगांची तुलना केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, विरोधकांना निवडणुकीबाबत समान संधी मिळाल्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे बिहारचा निकाल फक्त राजकीय विजय नसून सत्तेचा परिणाम आहे, असे ते म्हणाले. राहुल गांधींशी हातमिळवणी करणारे नेते पराभूत होत आहेत -साटम बिहारमध्ये एनडीएचा विजय साजरा करताना अमित साटम यांनी मुंबई महापालिकेवरही निशाणा साधला. त्यांनी ठामपणे दावा केला की, मुंबईत येणाऱ्या निवडणुकीत भगवा झेंडा लहरविल्याशिवाय मुंबईकर शांत बसणार नाहीत. या वक्तव्यासह त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही टीका केली. राजकारणाचे खरे पप्पू राहुल गांधीच, अशी टीका करत साटम यांनी तेजस्वी यादव आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष भाष्य केले. त्यांच्या मते, राहुल गांधींच्या राजकीय सल्ल्यामुळे त्यांच्याशी हातमिळवणी करणारे नेते पराभूत होत आहेत. त्यामुळे बिहारमधील एनडीएचा विजय, विरोधकांच्या भूमिका आणि आगामी निवडणुकांतील समीकरणांचा हा सगळा भाग एकमेकांशी थेट संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोन्ही बाजूंनी राजकीय संदेश स्पष्ट करायला सुरुवात बिहार निवडणुकीतील निकालांमुळे राष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांच्या राजकारणालाही ऊत आला आहे. बिहारमध्ये जनतेने स्थिरता आणि नेतृत्वावर विश्वास दाखवला, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. तर विपक्ष या सर्व घडामोडींकडे वेगळ्या नजरेने पाहत आहे. मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना दोन्ही बाजूंनी आपापले राजकीय संदेश स्पष्ट करायला सुरुवात केली आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबई येथील हॉटेल ताज लँडच्या बाहेर राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी ठाकरे गटाचे आमदार व नेते अनिल परब देखील आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांची फसवणूक करत भाजप प्रणीत संघटनांमध्ये घेत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यानंतर शिवसैनिक हॉटेलच्या बाहेर जमले असता गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. अखिल भारतीय कर्मचारी संघ ही भाजप प्रणीत संघटना आहे, तर भारतीय कामगार सेना ही शिवसेनेची संघटना आहे. या दोन्ही संघटनांमध्ये वाद झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते हॉटेल ताज येथे दाखल झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत अनिल परब देखील उपस्थित होते. ताज लँड हॉटेलमध्ये भाजपच्या प्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी अनिल परब त्या ठिकाणी आले असता त्यांना पोलिसांनी अडवले. त्यानंतर परब यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. अनिल परब यांचा संताप कोणत्याही परिस्थितीत मी माझ्या कार्यकर्त्यांना अडवू शकत नाही, असे म्हणत अनिल परब यांनी पोलिसांनाच जाब विचारला. यामुळे येथे काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी भाजप नेत्यांशी चर्चा करण्यासाठी फक्त अनिल परब आणि इतर काही लोकांनीच जावे असे पोलिसांनी सांगितले. त्याला अनिल परब यांनी विरोध केला. माझ्यासोबत किमान 25 लोक मी आतमध्ये घेऊन जाणार. सत्तेत आहेत म्हणून त्यांना इतका माज आलाय का? असा संतप्त सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला. कामगारांची फसवणूक केल्याचा ठाकरे गटाचा आरोप भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांना फसवून भाजपच्या अखिल भारतीय कर्मचारी संघात घेतले जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. कामगारांना फसवून त्यांच्या सह्या घेण्यात आल्याचा आरोप अनिल परब यांनी केला. भाजपकडून हॉटेलमध्ये चुकीच्या पद्धतीने कामगार संघटना स्थापन करण्यात आली आहे, त्यात शिवसेनेच्या कामगार संघटनेच्या कामगारांच्या सह्या फसवून घेतल्याचा दावा परब यांनी केला.
राज्यात तब्बल ८ पक्षांची व्यापक महाआघाडी
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत. २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी असल्याने सर्व पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. बदलापुरातील या ऐतिहासिक युतीची औपचारिक घोषणा महाविकास आघाडीकडून झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी(शरद पवार), मनसे, वंचित बहुजन […] The post राज्यात तब्बल ८ पक्षांची व्यापक महाआघाडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने उल्लेखनीय यश मिळवत बहुमताचा टप्पा सहज पार केला आहे. महागठबंधन अनेक अपेक्षा बाळगत निवडणुकीत उतरले असले तरी निकालांनी त्यांचे गणित पूर्णपणे बदलून टाकले. एनडीएच्या या विजयात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कारभाराबरोबरच भाजपने आखलेली रणनीती आणि व्यापक प्रचार मोहिमाही तितकीच महत्त्वाची ठरली. निकाल जाहीर होण्यास सुरुवात होताच एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे संकेत मिळाले. यामुळे पुढील सत्तास्थापनेची चर्चा सुरू झाली असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आता एनडीएतील पाचही पक्ष एकत्र बसून घेणार असल्याची माहिती भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी दिली. विनोद तावडे यांनी स्पष्ट केले की, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही निवडणूक लढलो. आता पुढे मुख्यमंत्रीपदाबाबत कोणता निर्णय घ्यायचा, हे एनडीएतील सर्व पक्ष मिळूनच ठरवतील. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. आगामी दोन ते चार दिवसांत मुख्यमंत्रीपदासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे तावडे यांनी सांगितले. यामुळे एनडीएतील अंतर्गत चर्चांना वेग आला असून नव्या सरकारची रूपरेखा कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिहारमध्ये भाजपने या निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत महागठबंधनला जोरदार टक्कर दिली. प्रचाराच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जंगलराजाचा मुद्दा उचलून विरोधकांना चांगलेच घेरले. यामुळे मतदारांना पुन्हा एकदा मागील काळातील अस्थिरता, कायदा-सुव्यवस्था आणि विकासाच्या अडचणींची आठवण झाली. मोदी-नितीश यांच्या जोडीला मिळालेला प्रतिसाद हा एनडीएच्या विजयाचा मोठा आधार मानला जातो. कालांतराने मतदारांचा कलही स्पष्टपणे एनडीएकडे झुकताना दिसला. या निकालामुळे एनडीएच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यात मतदारांनी पुढाकार घेतला आहे. तावडे यांची सूक्ष्म रणनीती महत्त्वाची ठरली एनडीएच्या विजयानंतर भाजपातील काही प्रमुख रणनीतीकारांचे नाव विशेष चर्चेत आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतच भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांचे नाव सर्वाधिक पुढे आहे. बिहारमध्ये उमेदवार निवड, प्रचाराची आखणी, बूथस्तरापर्यंत संघटनाचे नियोजन आणि महत्त्वाच्या सीटांवर विशेष लक्ष ठेवणे यामध्ये तावडे यांनी विशेष मेहनत घेतल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे की, बिहारमध्ये एनडीएला मिळालेल्या मोठ्या आघाडीच्या मागे तावडे यांची सूक्ष्म रणनीती महत्त्वाची ठरली. विशेष म्हणजे मैथिली ठाकूर यांना उमेदवार करणार्या निर्णयामागेही त्यांची मोठी भूमिका असल्याचे बोलले जाते. भाजप तावडेंना मोठी जबाबदारी देऊ शकते या पार्श्वभूमीवर विनोद तावडेंना आता मोठे पक्षपद मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. बिहारमध्ये नव्या सरकारच्या शपथविधीनंतर भाजप तावडेंना राज्यात मोठी जबाबदारी देऊ शकते, असे कयास लावले जात आहेत. काही सूत्रांचे मत आहे की त्यांना भाजपच्या बिहार राज्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. निवडणुकीतील त्यांच्या नियोजनाची पक्षाने दखल घेत पक्ष संघटनात त्यांना अधिक महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. एनडीएच्या विजयामुळे बिहारची राजकीय दिशा पुढील काही दिवसांत अधिक स्पष्ट होईल. नितीश कुमार कायम मुख्यमंत्रिपदावर राहणार की नव्या नेतृत्वाची निवड होणार? हे आगामी बैठकीनंतर स्पष्ट होणार असून बिहारची राजकीय समीकरणे आता निर्णायक टप्प्यात येत आहेत.
बाल दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील १४ ब या विशेष मुलांच्या शाळेत एका अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल ग्रुप आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनने संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यात विशेष मुलांनी विविध खेळांचा आनंद लुटला. यावेळी रिद्धी हिंगोरानी, भाविका हिंगोरानी, निकिता अरोरा, ग्लोबल ग्रुपच्या एचआर उपाध्यक्ष जयश्री राव आणि त्यांच्या टीमचे सदस्य अल्तमश इनामदार व रेखा भोसले यांनी विशेष मुलांसोबत संगीत खुर्ची, पासिंग बॉल, बाऊची यांसारखे विविध खेळ खेळले. दिव्यांग असूनही मुलांनी अत्यंत उत्साहाने सर्व खेळ खेळून पारितोषिके जिंकली. मुलांनी कसरती, प्रार्थना आणि राष्ट्रगीताचे प्रात्यक्षिकही सादर केले. ग्लोबल ग्रुपचे संचालक मनोज हिंगोरानी आणि संजीव अरोरा यांनी सांगितले की, त्यांच्या मुलांना समाजकार्याची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी समाजातील वंचित घटकांप्रती आपले कर्तव्य बजावावे, या हेतूने त्यांना अशा उपक्रमांसाठी प्रेरित केले जाते. क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले की, नवीन पिढीमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी आणि आपल्याकडील जास्तीच्या वस्तू दुर्लक्षित व वंचित घटकांना देण्याची सवय लागावी यासाठी फाउंडेशन प्रयत्नशील आहे. रिद्धी हिंगोरानी, भाविका हिंगोरानी आणि निकिता अरोरा यांनी स्पष्ट केले की, या मुलांसोबत वेळ घालवणे हा त्यांच्यासाठी खूप सुखद क्षण होता. यापुढे राष्ट्रीय दिवस, सण, वाढदिवस आणि इतर प्रसंगी अशा विविध शाळांमध्ये जाऊन कार्यक्रम आयोजित करण्याचा आणि मदत करण्याचा त्यांचा मानस आहे. क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी हा क्षण भावनिक असल्याचे नमूद केले. केवळ भेटवस्तू किंवा निधीची मदत न करता, या मुलांसोबत वेळ घालवणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विशेष मुलांसाठी फुटबॉल, कॅरम बोर्ड, बॅडमिंटन सेट, रिंग, आर्ट क्राफ्ट बुक, रंगकाम बुक, चित्रकला वही, कलर, ब्रश, एक रेघी, दोन रेघी, चार रेघी व चौकोनी वह्या, पेन्सिल खोडरबर सेट, व्हॉलीबॉल आणि इतर शैक्षणिक व क्रीडा साहित्य भेट देण्यात आले.
पुणे : पिंपरी-चिंचवड परिसरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण भागात खळबळ उडवली आहे. चारोळीतील अलंकारपूरम ९० फूट रोडवर एका व्यावसायिकाचा त्याच्याच ओळखीतील व्यक्तींनी फॉर्च्युनर कारमध्ये बसवून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीची ओळख नितीन शंकर गिलबिले (३८, रा. वडमुखवाडी, चहोली) अशी झाली आहे. जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आणि हॉटेल व्यवसाय करणारे […] The post व्यावसायिकाचा मित्राकडून खून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एनडीएच्या बिहारमधील विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बिहारमध्ये महाराष्ट्रात वापरण्यात आलेले फंडेच वापरण्यात आले. यामुळे तेथील निवडणूक प्रक्रिया निकोप होती का? हा प्रश्न उपस्थित होत आहे, असे ते म्हणालेत. बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीए विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या निकालाचे संपूर्ण देशात पडसाद उमटत आहेत. सत्ताधारी पक्ष विशेषतः भाजपने मतचोरीच्या मुद्यावरून काँग्रेससह संपूर्ण विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी एनडीएच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातील फंडे बिहारमध्ये वापरले गेले. त्यामुळे लोकशाहीसाठी अशी निवडणूक प्रक्रिया खरेच योग्य आहे का? याचा विचार जनतेने केला पाहिजे. लोकशाही निरोगी व निकोप आहे का?बिहारमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावर महाआघाडीमध्ये काही गोंधळ होता का? त्यामुळेच हा पराभव झाला का? असा प्रश्न यावेळी थोरातांना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, याविषयी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून सविस्तर निवेदन केले जाईल. नेमका काय गोंधळ झाला हे तेच अधिक विस्ताराने सांगू शकतील. पण जे महाराष्ट्रात झाले तेच बिहारमध्ये घडले हेच सर्वांना वाटत आहे. महाराष्ट्रात वापरण्यात आलेले फंडे तिथे वापरण्यात आले. ही वस्तुस्थिती दिसत आहे. आपली लोकशाही निकोप पद्धतीने वाटचाल करत आहे का? ती निरोगी आहे का? कोणत्या पद्धतीने आपल्या निवडणुका घेतल्या जातात व जिंकल्या जातात याचा विचार जनतेने केला पाहिजे. विशेषतः निरोगी लोकशाहीसाठीची लढाई आम्हाला यापुढेही कायम ठेवावी लागेल. पराभवाचे आत्मचिंतन, अभ्यास करावा लागेल बाळासाहेब थोरात म्हणाले, बिहारमधील पराभवाचे आत्मचिंतन व अभ्यास करावा लागेल याविषयी कोणतेही दुमत नाही. पण आमची लढाई आहे ती निकोप लोकशाहीसाठी. जय - पराजय हा निवडणुकीचा भाग आहे. आपल्या संविधानाने पक्ष - पक्षांतर, मत - मतांतरे दिली आहेत. सत्ता दिली, विरोधी पक्ष दिला. पक्ष दिले. असे असताना निकोप पद्धतीने ही प्रक्रिया होते का? तर नाही असे माझे उत्तर आहे. सत्ता मिळवण्यासाठी अनेक फंडे वापरले जातात. बिहारमध्ये महाराष्ट्रासारखाच निकाल उल्लेखनीय बाब म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रासारखाच विरोधकाचा पुरता सफाया झाला आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी 206 जागांवर एनडीएने आघाडी घेतली आहे. तर राजद - काँग्रेस आघाडीला अवघ्या 30 जागांवर आघाडी मिळाली आहे. अनेक मतदारसंघांत अजूनही मतमोजणी सुरू असल्यामुळे या आकड्यांत बदल हो शकतो. हे ही वाचा... बिहारमध्ये अजितदादांचे सर्व उमेदवार 500 च्या आत:राष्ट्रवादीने 14 जागांवर लढवली होती निवडणूक; कुणालाही पाडता आली नाही छाप मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एनडीएने विरोधी बाकावरील महाआघाडीचा पुरती दाणादाण उडवली आहे. बिहारमध्ये पुन्हा मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. त्यात आता वेगवेगळ्या पक्षांनी केलेली सुमार कामगिरीही समोर येत आहे. वाचा सविस्तर
सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयाबद्दल लाडक्या बहिणींचे आभार मानले आहेत. लाडक्या बहिणींनी हिरीरीने मतदान केल्यामुळेच बिहारमध्ये एनडीएचा लँडस्लाईड विजय झाला, असे ते म्हणालेत. बिहारच्या जनतेने या जनादेशामुळे लालूंचे जंगलराज नाकारल्याचेही ते यावेळी म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीत राजद व काँग्रेसच्या महाआघाडीचा पार धु्व्वा उडाला आहे. तर सत्ताधारी एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीएचे सरकार सलग पाचव्यांदा येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एनडीएच्या या विजयात बिहारमधील महिलांना निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या करण्यात आलेल्या मदतीचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याची पुष्टी केली आहे. लाडक्या बहिणींमु्ळेच बिहारमध्ये भाजपला दैदिप्यमान विजय मिळाल्याचे ते म्हणालेत. लाडक्या बहिणींमुळे एनडीएचा मोठा विजय एकनाथ शिंदे म्हणाले, बिहारमध्ये एनडीएचा मोठा विजय झाला. तेथील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारमध्ये केलेल्या विकासावर विश्वास ठेवला. त्यामुळे मी त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. एवढेच नाही तर मी लाडक्या बहिणींचेही अभिनंदन करतो. कारण, लाडक्या बहिणींनी तिथे मोठ्या प्रमाणात मतदान केले. महाराष्ट्रात लाडक्या बहिणींचे मतदान वाढल्यामुळे लँडस्लाईड व्हिक्ट्री मिळाली. तशीच लँडस्लाईड व्हिक्ट्री बिहारमध्ये लाडक्या बहिणींमुळे मिळाली. बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारले आणि विकासराज स्वीकारले. त्यामुळे एनडीएला अशा प्रकारचा विजय मिळाला. जब तक रहेगा आलू, तब तक रहेगा विकास का राज चालू शिंदे म्हणाले, पूर्वी लोक घोषणा द्यायचे की, जब तक रहेगा समोसे में आलू, तब तक बिहारमध्ये रहेगा लालू. पण आता असे झाले आहे की, जब तक रहेगा आलू तब तक रहेगा विकास का राज चालू. बिहारच्या लाडक्या बहिणींनी विकासाला महत्त्व दिले आहे. त्यामुळे तिथे विकासाची राजवटच सुरू राहील. लोकांनी लालूंचे जंगलराज नाकारले. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचे सरकार होते तेव्हा जनतेची सायंकाळी 6 वाजेनंतर रस्त्यावर फिरण्याची हिंमत होत नव्हती. व्यापारी आपली दुकाने बंद करत होते. मी बिहारमध्ये प्रचाराला गेलो तेव्हा लोक तेथील जंगलराजविषयी सांगत होते. तिथे दिवसाढवळ्या हत्या, लूट व बलात्कार होत होते. पण नितीशकुमार यांच्या काळात हे सर्व चित्र बदलले. त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो. विरोधकांना सुबुद्धी आली पाहिजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने बिहारमध्ये डबल इंजिनचे सरकार विकासाचे काम पुढे नेईल. मतदारांनीही डबल इंजिनच्या सरकारवर विश्वास दाखवला आहे. विशेष म्हणजे बिहारमधील एसआयआर नंतरचा हा पहिला विजय आहे. याचा अर्थ निवडणूक प्रक्रियेत पूर्णतः पारदर्शकता आली. पण त्यानंतरही हे विरोधक त्यावर टीका केल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे काम टीका करण्याचे आहे. आता तरी त्यांचे डोळे उघडले पाहिजेत. त्यांना सुबुद्धी आली पाहिजे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यातील १६.३ टक्के बालकांचा न्यूमोनियामुळे मृत्यू
अकोला/नागपूर : राज्यातील एकूण बाल मृत्युपैकी १६.३ टक्के मृत्यू हे न्यूमोनिया आजारामुळे होतात. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आजारावर समाजामध्ये जागृती करणे, आजारापासून संरक्षण करणे, आजाराचा प्रतिबंध करणे याविषयी माहिती प्रचार-प्रसिद्धी करण्याचे उद्देशाने विशेष मोहीम राबवली जात आहे. तीव्र श्वसनदाह आजारामुळे होणारे बाल मृत्यू टाळण्यासाठी राज्यात सांस मोहीम सुरू झाली. सांस मोहिमेद्वारे ‘न्यूमोनिया यशस्वीपणे निष्फळ करण्यासाठी […] The post राज्यातील १६.३ टक्के बालकांचा न्यूमोनियामुळे मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोलीच्या एसपींची बदली होणार?:पालिका निवडणुकीच्या तोंडावर चर्चेला उधाण, राजकीय दबाव असल्याचा दावा
हिंगोली जिल्हयातील नगर पालिका निवडणुकीत पोलिस अधिक्षकांच्या बदलीच्या चर्चेला उधाण आले असून केवळ राजकिय दबावापोटी त्यांची बदली केली जात असल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे नागरीकांमधून मात्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. हिंगोली जिल्हा पोलिस दलात मागील सुमारे दीड वर्षापुर्वी रूजू झालेले पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यात गुन्हेगारांवर चांगलाच वचक बसविला आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले. तर अवैध व्यवसाय करणाऱ्यांना तंबी देऊन त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई देखील केली आहे. जिल्ह्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल झालेल्या गुन्हेगारांची माहिती सादर करण्याच्या सूचना ठाणेदारांना दिल्या होत्या. यामध्ये गंभीर गुन्हे असलेल्या तब्बल ५५ पेक्षा अधिक गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असून पाच पेक्षा अधिक गुन्हेगारांना स्थानबध्द करण्यात आले आहे. त्यामुळे अवैध व्यवसाय व गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे. या शिवाय महसूल पथकाच्या बरोबरीने पोलिस विभागाने वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या ४० पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात पोलिस विभागाची कामगिरी चांगली असतांनाही आता पालिका निवडणुकीत पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या बदलीची चर्चा सुरु झाली आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांकडूनच राजकिय दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची नागरीकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. या बदलीच्या चर्चेने नागरीकांमधून मात्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे. सत्ताधारांच्या कुरघोडीच्या वादात पोलिस अधीक्षकांच्या बदलीचा प्रयत्न सुरु झाल्याचे चित्र दिसू लागले असून बदलीच्या दररोजच अफवा पसरू लागल्याने नागरीकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाटना : बिहार निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. २४३ जागांसाठीच्या कलांमधून एनडीएला स्पष्ट यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. एनडीए २०० जागांवर आघाडीवर आहे आणि महाआघाडी ३९ जागांवर आघाडीवर आहे. २०२० च्या तुलनेत एनडीएला ६५ पेक्षा जास्त जागा मिळत आहेत, तर महाआघाडीला जवळजवळ तितक्याच जागांचे नुकसान होत आहे. गेल्या वेळी ४३ जागांपर्यंत मर्यादित असलेले जेडीयू […] The post बिहारमध्ये एनडीएचे द्विशतक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अहिल्यानगर : लेकीच्या साखरपुड्यात पैशांची उधळण, गाड्यांचा ताफा, थाटमाट यावरून लोकांनी त्यांना सुनावलं. मात्र आता या सर्व टीकेला इंदुरीकर महाराज यांनी थेट उत्तर दिले असून त्यावर भाष्य करत टीकाकारांना सुनावले असून लेकीचे लग्न आतातर टोलेजंगच करणार असल्याचा निर्धार इंदुरीकर महाराज यांनी केला आहे. नुकतेच त्यांचे कीर्तन पार पडले, त्यावेळी त्यांनी टीकाकारांना खडेबोल सुनावले. माझ्यापर्यंत ठीक […] The post लेकीचे लग्न टोलेजंग करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अर्ज भरल्यानंतरच उमेदवारांची यादी जाहीर करणार
मुंबई : नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठीची उमेदवार यादी आधी जाहीर करण्याऐवजी १७ नोव्हेंंबरला म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुदत संपल्यानंतर ती जाहीर करण्याचा विचार प्रदेश भाजप करत आहे. बंडखोरीवर हा उपाय शोधल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. भाजपचे उमेदवार निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, निवडणूक प्रमुख व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी […] The post अर्ज भरल्यानंतरच उमेदवारांची यादी जाहीर करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कात्रज प्राणिसंग्रहालयाच्या तिकीट दरात वाढ होणार
पुणे : महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेश शुल्कामध्ये(तिकीट दर) ५० टक्के वाढ होणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव उद्यान विभागाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे. प्राणिसंग्रहालयातील उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. कात्रज येथे असलेले हे संग्रहालय पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे प्राणिसंग्रहालय आहे. त्यामुळे राज्यासह पुणे शहरातील पर्यटक […] The post कात्रज प्राणिसंग्रहालयाच्या तिकीट दरात वाढ होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जेसीबी अंगावर घालून तहसीलदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न
आष्टी (जि. बीड) : आष्टी तालुक्यात तहसीलदार वैशाली पाटील यांनी सीना नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणा-या माफियांवर मोठी कारवाई केली आहे. मात्र, कारवाईनंतर महसूल पथकातील कर्मचा-यांना वाळू माफियांनी शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे. तहसीलदार वैशाली पाटील यांना गुप्त बातमीदारांमार्फत सीना नदीपात्रात संगमेश्वर मंदिराजवळ, हिंगणी येथे अवैध गौण […] The post जेसीबी अंगावर घालून तहसीलदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सत्ताधारी शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांचे जावई तथा माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत पिछाडीवर पडलेत. शिवदीप लांडे बिहारमध्ये दबंग पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी पोलिस सेवेचा राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती. पण आज त्यांना मानहाणीकारक पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शिवदीप लांडे यांनी बिहारच्या अररिया विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. ते अपक्ष म्हणून रिंगणात होते. ते या निवडणुकीत कशी कामगिरी करतात? याकडे अनेकांचे लक्ष होते. पण तूर्त ते मतमोजणीत पिछाडीवर पडल्याचे चित्र आहे. पण त्यांच्यामुळे जदयु व काँग्रेसमधील लढाई अत्यंत चुरशीची बनली आहे. या मतदार संघात काँग्रेसचे विद्यमान आमदार अबिदुर रहमान व जदयुच्या त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शगुफ्ता अझीम यांच्यात जोरदार चुरस सुरू आहे. याठिकाणी जनसुराज्य पक्षाचे उमेदवार फरहत आरा बेगमही रिंगणात आहेत. पोस्ट मतमोजणीत काँग्रेसचे अबिदुर रहमान आघाडीवर होते. पण त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीत शगुफ्ता अझीम यांनी त्यांचा यशस्वी पाठलाग गेला. या घटनाक्रमात शिवदीप लांडे बरेच पिछाडीवर पडले. ते विजयी होणार का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. निवडणुकीसाठी पोलिस सेवेचा राजीनामा उल्लेखनीय बाब म्हणेज शिवदीप लांडे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या पोलिस सेवेचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. सुरुवातीला ते आपले सासरे विजय शिवतारे यांच्या मतदारसंघातून म्हणजे पुरंदर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे सांगण्यात येत होते. पण तसे घडले नाही. त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत स्वतःचे नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही ते पिछाडीवर पडलेत. शिवदीप लांडे मूळचे महाराष्ट्रातले शिवदीप लांडे हे मुळचे महाराष्ट्रातील आहेत. त्यांचा जन्म अकोल्यात झाला. महाराष्ट्र ही त्यांची जन्मभूमी असली तरी बिहार हीच त्यांची कर्मभूमी राहिली आहे. ते बिहारमध्ये एक सिंघम अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी बिहारची राजधानी पाटणा, अररिया व पूर्णिया जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर राज्यपालांचे एडीसी म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली. काही काळासाठी त्यांची महाराष्ट्रात बदली झाली. तेव्हा ते एटीएसमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी होते. आपल्या धाडसी वृत्तीमुळे ते बिहारच्या युवकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. हे ही वाचा...
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासोबत कोणतेही कागदपत्रे सादर (अपलोड) करण्याची आवश्यकता नाही. संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्रांची आणि शपथपत्राची छापील प्रत (प्रिंटआउट) घेवून व त्यावर सही करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करणे आवश्यक आहे, असे स्पष्टिकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरणे आवश्यक आहे. परिपूर्ण माहिती भरल्यानंतर संकेतस्थळावरून त्याची मुद्रित प्रत (Print Out) काढून त्यावर उमेदवाराची स्वत:ची व सूचकांची स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्या मूळ प्रतीसह अन्य आवश्यक कागदपत्रांचा (उदा. नगरपरिषद/ नगरपंचायतीचे नादेय प्रमाणपत्र, शौचालय वापराबाबतचे प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणापत्र, निवडणुकीसाठी बॅंक खात्याचा तपशील, राखीव जागांवरील उमेदवार असल्यास जातप्रमाणपत्र, पक्षाचा उमेदवार असल्यास ‘जोडपत्र- 1’ किंवा ‘जोडपत्र- 2’ इत्यादी) संपूर्ण संच विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे बंधनकारक आहे. इच्छूक उमेदवारांना नोंदणीसाठी सुरुवातीपासून सुरू केलेले संकेतस्थळ 17 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत 24 तास सुरू असेल. तोपर्यंत त्यावर इच्छूक उमेदवारांना कोणत्याही वेळी नोंदणी करता येते व नोंदणी करताना तयार केलेला लॉगीन आयडी व पासवर्ड आपल्याकडे जपून ठेवावा लागतो. कारण नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्रातील माहिती भरण्यासाठी ते आवश्यक असते. सही केलेल्या प्रिंटआऊटसह आवश्यक त्या संपूर्ण कागदपत्रांचा संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला विहित मुदतीत म्हणजे 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. नामनिर्देशनपत्र सुटीच्या दिवशीसुद्धा स्वीकारण्यात यावेत सर्व कागदपत्रांसह नामनिर्देशनपत्र शनिवारी, 15 नोव्हेंबर 2025 या सुटीच्या दिवशीसुद्धा स्वीकारण्यात यावेत, अशा सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र रविवारी (ता. 16) ते स्वीकारण्यात येणार नाहीत. इच्छूक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचेही निर्देश सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींना देण्यात आले आहेत, असे राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.
पुण्यातील मुंबई-बंगळुरु महामार्गावरील नवले पूल परिसर अपघातांसाठी कुप्रसिद्ध आहे. गुरुवारी येथे दोन कंटेनर आणि एका कारचा भीषण अपघात झाला, ज्यात आठ जणांचा मृत्यू झाला तर 20 ते 25 जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांच्यासह मनपा आणि एनएचएआयचे अधिकारी उपस्थित होते. मोहोळ यांनी सांगितले की, या भागातील सततचे अपघात टाळण्यासाठी केंद्रीय रस्तेमंत्री नितीन गडकरी यांनी 32 किलोमीटरचा उन्नत मार्ग मंजूर केला असून, त्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल. मोहोळ यांच्या माहितीनुसार, नऱ्हेमधील जांभूळवाडीतील अक्षरधाम मंदिर ते सुतारवाडी आणि तेथून रावेत दरम्यान 32 किलोमीटरचा हा उन्नत मार्ग असेल. या प्रकल्पाचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार होऊन त्याला मंजुरीही मिळाली आहे. हा प्रकल्प सहा हजार कोटी रुपयांचा असून, तो आता लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मोहोळ यांनी सांगितले की, मागील काळात जांभूळवाडी ते वडगाव दरम्यान होणाऱ्या अपघातांबाबत तातडीने उपाययोजना करण्यात आल्या होत्या. सन 2021-22 दरम्यान झालेल्या एका मोठ्या अपघातानंतर कात्रज बोगदा ते नवले पूल दरम्यान स्पीडगन बसवण्यात आल्या, वाहनांचा वेग मंदावण्यासाठी रंबल स्ट्रिप्स टाकण्यात आल्या आणि पंक्चर सर्व्हिस रोड बंद करण्यात आले. यामुळे मागील दोन वर्षांत अपघातांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, गुरुवारी घडलेला अपघात दुर्दैवी असून, भरधाव ट्रकचा ताबा सुटल्याने पुढील वाहनांना धडक बसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याबाबत तपास सुरू आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक झाले आहे. काही रंबल स्ट्रिप्सची उपाययोजना करणे, सर्व्हिस रस्ते तयार करणे आणि विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधणे या गोष्टी करण्यात येतील. तसेच, ओव्हरलोड ट्रकची खेड शिवापूर टोलनाक्यावर तपासणी केली जाईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या ठिकाणच्या अपघातांबाबत यापूर्वी दिल्लीत बैठक घेतली होती. सर्व्हिस रस्ता तयार करण्याबाबत सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक 15 नोव्हेंबर रोजी सर्किट हाऊस येथे घेण्यात येईल. तीव्र उतार, ओव्हरलोड गाड्या आणि वेगाने येणारी वाहने ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात हे अपघात होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन मोहोळ यांनी दिले.
बिहार निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय:नवले पूल अपघातामुळे पुण्यात जल्लोष नाही- धीरज घाटे
बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पुणे भाजपने या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या धोरणाला दिले आहे. तसेच, बिहार भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, पुण्यातील नवले पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातामुळे शहर हादरले आहे. या अपघातात अनेक नागरिक जखमी झाले असून, काही जणांना जीव गमवावा लागला आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल संवेदना व्यक्त करत, पुणे शहर भाजपने बिहार विजयाचा कोणताही सार्वजनिक जल्लोष किंवा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले की, मृतांना शांती मिळो आणि जखमींना लवकर बरे वाटावे अशी प्रार्थना आहे. अपघातग्रस्त कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जाईल. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीए सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. लोक प्रगतीलाच मतदान करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली कामे आणि बिहारमध्ये आलेले मोठे प्रकल्प जनतेने पाहिले आहेत. त्यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला आहे. राहुल गांधी यांनी मतदार यादीतील घोळावर पत्रकार परिषद घेऊन 'हायड्रोजन बॉम्ब' फोडण्याची घोषणा केली होती, मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही, असे वाटते का, या प्रश्नावर मोहोळ म्हणाले, राहुल गांधी यांचा 'हायड्रोजन बॉम्ब' नव्हे, तर 'लवंगी बॉम्ब' निघाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत बिहारमध्ये झालेले काम जनतेने पाहिले आहे. त्यामुळेच मोदी सरकार, अमित शाह यांचे नेतृत्व आणि नितीश कुमार यांचे नेतृत्व जनतेने स्वीकारले आहे. मोहोळ यांनी पुढे सांगितले की, बिहार निवडणुकीत भाजप-जेडीयू युतीला मजबूत आघाडी मिळाली असून, विकासाच्या मुद्द्यांवर जनतेने एनडीएला पाठिंबा दिला आहे.
मुंबई : टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव लवकरच विवाहबद्ध होणार आहे. याच कारणासाठी त्याने बीसीसीआयकडे काही दिवसांच्या सुट्टीची मागणी केली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली असून त्यानंतर वनडे आणि टी २० सीरीजही खेळल्या जाणार आहेत. सुट्टीची परवानगी मिळाल्यास कुलदीप सीरीजच्या मध्यातच संघातून बाहेर जाऊ शकतात. कुलदीप महिन्याच्या शेवटच्या […] The post कुलदीप यादव लग्नाच्या तयारीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बिहारमध्ये काही दिवस भाजपवाले नितीशकुमार यांनाच मुख्यमंत्री ठेवतील त्यानंतर मात्र भाजपचा मुख्यमंत्री होईल. मित्र पक्षांना संपवणे हा त्यांचा अजेंडा आहे. नितीशकुमार यांना ते सोडतील असे मला वाटत नाही. नितीश कुमारांसोबत बिहारमधील मागासवर्ग आणि महिलांची ताकद आहे. त्यामुळे तिथे सत्ता बदल झाला नाही. त्यांची तब्येत बरी नाही म्हणून त्यांना भाजप टकमक टोकाकडे घेऊन जाईल. लगेच नितीशकुमारांना दूर करणे भाजपला परवडणारे नाही पण त्यांना दूर करणे हाच भाजपचा छूपा अजेंडा आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आज पराभव झाल्यानंतर आमच्या मित्रपक्षांच्या नेत्याने आमच्यावर टीका करणे हे घाईघाईने आहे.बिहारमध्ये काँग्रेस कमी जागेवर लढली हे देखील खरे आहे. राहुल गांधी तिथले सर्वात मोठे प्रचारक होते. या निकालाकडे महाराष्ट्राच्या किंवा बिहारच्या चश्मा तून न बघता देशाच्या लोकशाहीवर भाजप नावाचे जे संकट आले आहे, विरोधी पक्ष या नात्याने त्याकडे पाहिले पाहिजे.बिहारच्या संदर्भाने आज बोलणं गरजेचे नाही. अंबादास दानवे यांना कदाचित बिहारमधील माहिती नसावी म्हणून ते घाईघाईने काही तरी बोलत आहेत. बिहारमध्ये ठरलेल्या तारखेवर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर झाला आहे. याची माहिती दानवेंनी घ्यावी. काँग्रेसने जास्त उमेदवार देणं गरजेचे होते हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बिहारच्या निकालाच्या संदर्भाने महाराष्ट्रात चूक झाली असे अंबादास दानवे यांचे वक्तव्य योग्य नाही या निकाला धरुण महाराष्ट्रावर बोलणं अयोग्य. बिहारमध्ये ज्या गोष्टी जशा ठरल्या होत्या त्या तशाच केल्या गेल्या.काँग्रेसने तिथे जास्त जागा लढायला हव्या होत्या कमी लढलो हाच मुद्दा तिथे होता पण आता हा विषय राहिला नाही. सर्व काही ठरल्याप्रमाणे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आमची लढाई ही मुल्यांची लढाई आहे ती आम्ही लढत राहू. पराभवाचे बाप हजार असतात त्यामुळे तेजस्वी यांचा चेहरा घोषित करायला वेळ झाला असे 100 मुद्दे पुढे येणार आहेत. तेजस्वी यादव यांचे जे नाव जाहीर केले होते ते नियोजनानुसार होते. ठरल्यानुसार सर्व काही घडले, लवकर आणि उशिरा असे त्यामध्ये काही नाही. ठाकरेंचा चेहरा घोषित केले असते तर चित्र वेगळे असते- अंबादास दानवे बिहार विधानसभेच्या निकालातून काँग्रेसने काय शिकावे असा प्रश्न यावेळी अंबादास दानवेंना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवेळीच हा धडा घ्यायला हवा होता. पण त्यांनी बिहारमध्येही तीच चूक केली. महाराष्ट्राच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना निवडणुकीच्या अगोदरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केले असते आणि वेळेतच जागावाटप केले असते तर परिणाम निश्चितच वेगळे दिसले असते. पण जी चूक महाराष्ट्रात झाली तीच चूक पुन्हा एकदा बिहारमध्ये झाली आहे, असे ते म्हणाले.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नॅशनल क्रश म्हणून गिरीजा ओकला ओळखले जात आहे. गिरीजाचे साडीतील फोटो देशभरात व्हायरल झाले आणि तिला नॅशनल क्रश हा टॅग मिळाला. अशातच प्रिया बापटने नुकतेच सोशल मीडियावर गुलाबी साडीतील फोटो पोस्ट केले होते. या फोटोच्या खाली एका चाहत्याने गिरीजा ओकचा उल्लेख करत प्रियाच्या फोटोवर खोचक कमेंट केली. त्यावर प्रियाने दिलेला […] The post गिरीजा ओक बनली ‘नॅशनल क्रश’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आजारपणामुळे उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक जीवनातून दूर होते. मात्र, आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले आहे. या दरम्यान आज लागलेल्या बिहार निवडणूक निकालावर त्यांनी भाष्य केले आहे. बिहारमध्ये जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती, त्यांना 50च्या आत संपवले असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग आणि भाजप यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या ठिकाणी एकदम महाराष्ट्र पॅटर्न दिसत असल्याचा दावा देखील राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी केलेली पोस्ट देखील पहा... या संदर्भात आपल्या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी म्हटले की, बिहाराच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते! एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले! बिहारमध्ये एनडीएची स्थिती मजबूत बिहार निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. 243 जागांसाठीच्या कलांमधून एनडीएला स्पष्ट यश मिळत असल्याचे दिसून येत आहे. एनडीए 198 जागांवर आघाडीवर आहे आणि महाआघाडी 39 जागांवर आघाडीवर आहे. 2020 च्या तुलनेत एनडीएला 65 पेक्षा जास्त जागा मिळत आहेत, तर महाआघाडीला जवळजवळ तितक्याच जागांचे नुकसान होत आहे. गेल्या वेळी 43 जागांपर्यंत मर्यादित असलेले जेडीयू यावेळी 75+ जागांवर आघाडीवर आहे. याचा अर्थ नितीशकुमार सरकार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता आहे आणि नितीशकुमार दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. दरम्यान, 90 जागांवर आघाडी घेऊन भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. महाआघाडीत, राजद 29 जागांवर आघाडीवर आहे, तर 61 जागांवर निवडणूक लढवणारा काँग्रेस फक्त 4 जागांवर आघाडीवर आहे. 243 जागांवर निवडणूक लढवणारा प्रशांत किशोर यांचा पक्ष, जनसुराज, आपले खाते उघडू शकलेला दिसत नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे मतमोजणीत घोळ होत असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा केला आहे. सरकारचे बुजगावणे झालेली यंत्रणा व निवडणूक आयोग यामुळे लोकशाही व पर्यायाने आरक्षण व संविधान धोक्यात आले आहे, असे ते म्हणालेत. बिहार विधानसभा निवडणुकीत राजद व काँग्रेसच्या महाआघाडीचा पार धु्व्वा उडाला आहे. तिथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, हरियाणा, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल होता. हे चित्र पोस्टल मतदानात देखील स्पष्ट झाले होते. EVM व्होटिंगदरम्यान पहिला एक तास हा कल पोस्टलप्रमाणेच राहिला. परंतु पुढच्या एक दीड तासात सर्व चित्र पालटले. भाजपा आश्चर्यकारक रित्या पुढे गेली आणि धक्कादायक निकाल समोर आला. लोकशाही, आरक्षण, संविधान धोक्यात आज सेम-टू-सेम याच पद्धतीचे चित्र बिहार निवडणुकीचे निकाल येताना दिसत आहे. येणाऱ्या निकालाने मतदान मोजणीत घोळ होतो यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सरकारचं बुजगावणं झालेल्या यंत्रणा, निवडणूक आयोग यामुळे एकंदरीतच लोकशाही आणि पर्यायाने आरक्षण व संविधान धोक्यात आलंय हे नक्की! महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा गुवाहाटी व्हाया सुरत जसा प्रवास झाला तसाच निवडणूक निकाल लावण्याचा आयोगाचा प्रवास हरियाणा टू बिहार व्हाया महाराष्ट्र असा दिसून येतो. असो,हि निवडणूक थेट बिहारची जनता विरुद्ध इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्यात आहे. तेजस्वी यादव यांना मिळालेला प्रतिसाद त्यांच्या सभांमध्ये उसळलेला जनसागर आणि त्यांनी युवांचे, शेतकऱ्यांचे मांडलेले प्रश्न बघता आजचा निकाल काहीही लागला, तरी जनतेची खरी पसंद आणि जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मात्र तेजस्वी यादव आहेत यात तिळमात्र शंका नाही, असे ते म्हणालेत. लोकशाही टिकेल का? ही चिंता - वडेट्टीवार दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बिहार विधानसभेच्या निकालामुळे या देशात लोकशाही टिकणार का? हा खरा प्रश्न उपस्थित झाल्याचे म्हटले आहे. बिहारमध्ये महाआघाडीच्या नेत्यांच्या सभांना लोकांना बसण्यास खुर्च्या मिळत नव्हत्या. लोक खाली बसत होते. हे चित्र सर्वांनी पाहिले. त्यानंतरही हा निकाल आला. शेवटी जय-परायज असतो. आम्ही तो स्वीकारला. पण देशात लोकशाही टिकणार आहे का? ही भविष्यातील चिंता आहे, असे ते म्हणालेत. महाराष्ट्रात सर्वच पक्षांनी घोळ घातला विजय वडेट्टीवार यांनी यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी घोळ घातल्याची बाबही निदर्शनास आणून दिली आहे. आत्ता महाराष्ट्राच्या निकालाविषयी बोलायचे तर त्याला सर्वचजण जबाबदार आहेत. कुणी उघडपणे घोळ घातला तर सर्वांनीच घातला. जागावाटपाचा तिढा सर्वांमुळेच शेवटपर्यंत ताणला गेला. हे सर्वश्रूत आहे. आत्ता घडलेल्या घटनांवर चर्चा करण्यापेक्षा नव्याने आपण पुढे जाण्याची तयारी ठेवली पाहिजेत. यासंदर्भात आपण महाविकास आघाडी म्हणून सर्वच निवडणुकांत एकत्र येण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणालेत.
बिहार विधानसभा निवडणुकीतील हाराकिरीनंतर काँग्रेसची महाराष्ट्रातील वाटचाल बिकट झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी काँग्रेसवर टीकेची झोड उठवत काँग्रेसने महाराष्ट्रात जी चूक केली, तीच चूक बिहारमध्ये केल्याचा ठपका ठेवला आहे. एवढेच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही काँग्रेसकडून उगीचच अधिकच्या जागांचा हव्यास केल्या जात असल्याचेही ठाकरे गटाने म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेसने ठाकरे गटाचे आरोप फेटाळत महाराष्ट्रातील हाराकिरीला सर्वचजण जबाबदार असल्याचे जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत राजद व काँग्रेसच्या महाआघाडीचा पार धु्व्वा उडाला आहे. तिथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आता इंडिया आघाडीतील घटकपक्ष काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एवढेच नाही तर आगामी सर्वच निवडणुकांत काँग्रेसने उगीचच वाढीव जागांचा हट्ट धरता येणार नाही, असेही संकेत दिले आहेत. ठाकरे गटाचे आमदार तथा विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणी काँग्रेसला खडेबोल सुनावलेत. जागावाटपाचा घोळ नसला पाहिजे अंबादास दानवे म्हणाले, विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा घोळ शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होता. हा घोळ नसला पाहिजे. आत्ता आम्ही नगरपालिका व नगरपरिषदांचे काम करत आहोत. त्यात कित्येक ठिकाणी काँग्रेससोबत वाद आहे. काँग्रेसचे नेते इच्छा नसतानाही ही जागा द्या, ती जागा द्या, ती तुम्ही लढा, ही आम्ही लढतो, असे करत आहेत. कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन करून आमच्या पंजावर लढण्याचा प्रस्ताव देत आहेत. असे थोडेच चालते. हे काही योग्य नाही. उद्धव ठाकरेंना चेहरा घोषित केले असते तर चित्र वेगळे असते बिहार विधानसभेच्या निकालातून काँग्रेसने काय शिकावे असा प्रश्न यावेळी अंबादास दानवेंना करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीवेळीच हा धडा घ्यायला हवा होता. पण त्यांनी बिहारमध्येही तीच चूक केली. महाराष्ट्राच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना निवडणुकीच्या अगोदरच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केले असते आणि वेळेतच जागावाटप केले असते तर परिणाम निश्चितच वेगळे दिसले असते. पण जी चूक महाराष्ट्रात झाली तीच चूक पुन्हा एकदा बिहारमध्ये झाली आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसचे ठाकरे गटाला जशास तसे प्रत्युत्तर दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला नसल्याचा आरोप फेटाळला आहे. ते म्हणाले, बिहारमध्ये महाआघाडीच्या नेत्यांच्या सभांना लोकांना बसण्यास खुर्च्या मिळत नव्हत्या. लोक खाली बसत होते. हे चित्र सर्वांनी पाहिले. त्यानंतरही हा निकाल आला. शेवटी जय-परायज असतो. आम्ही तो स्वीकारला. पण देशात लोकशाही टिकणार आहे का? ही भविष्यातील चिंता आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केले होते हे अंबादास दानवे यांना माहिती नाही काय? त्यांनी माहिती घ्यावी. त्यांना उगीच काहीतरी बोलायचे असेल तर बोलूद्या. पण बिहारमध्ये तेजस्वी यादव यांचाच चेहरा काँग्रेसने घोषित केला होता. उलट भाजचेच तळ्यात मळ्यात सुरू होते. महाराष्ट्रात सर्वांनीच घोळ घातला - वडेट्टीवार आत्ता महाराष्ट्राच्या निकालाविषयी बोलायचे तर त्याला सर्वचजण जबाबदार आहेत. कुणी उघडपणे घोळ घातला तर सर्वांनीच घातला. जागावाटपाचा तिढा सर्वांमुळेच शेवटपर्यंत ताणला गेला. हे सर्वश्रूत आहे. आत्ता घडलेल्या घटनांवर चर्चा करण्यापेक्षा नव्याने आपण पुढे जाण्याची तयारी ठेवली पाहिजेत. यासंदर्भात आपण महाविकास आघाडी म्हणून सर्वच निवडणुकांत एकत्र येण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणालेत. काँग्रेस जागावाटपात मोठा वाटा मागतो. मग पराभवातही त्याचा मोठा वाटा असतो, असेही अंबादास दानवे म्हणालेत. त्यावरही विजय वडेट्टीवार यांनी आपले मत व्यक्त केले. आम्ही बिहारमध्ये फार काही जागा लढवल्या नाही. राजदनेच सर्वाधिक 150 जागा लढवल्या. आम्ही केवळ 56 जागा लढवल्या. आपण महाराष्ट्राच्या मुद्यावर स्वतंत्र चर्चा करू. त्यावर अंबादास दानवे यांच्या सल्ल्याची गरज पडली तर तो अवश्य घेतला जाईल, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेसवरील दबाव वाढला उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यात ठाकरे गटाने मनसेला सोबत घेत ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक ठिकाणी विशेषतः मुंबई महापालिकेत या दोन पक्षांची युती होणार असल्याचे निश्चित झाले आहे. पण काँग्रेसने हिंदी भाषिक मतदारांना चुचकारण्यासाठी मनसेला सोबत घेण्यास विरोध दर्शवला आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या या पक्षाने ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी केल्यामुळे भाजप प्रणित महायुतीच्या विजयाचा मार्ग सुकर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण आता बिहार विधानसभेच्या निकालामुळे काँग्रेसवर दबाव येऊन ती घटकपक्षांना अधिक मोकळी जागा देईल असे मानले जात आहे.
नोकरानेच दुकानातील 20 लाखांचा मुद्देमाल पळविला:कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल, फरार आरोपीचा शोध सुरू
कळमनुरी शहरात दुकानातील नोकरानेच 20 लाखांचा मुद्देमाल पळवल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 13 गुन्हा दाखल झाला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच नोकर फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम उदावंत यांचे कळमनुरी येथील पोस्ट ऑफीस रोड भागात सोने चांदीचे दुकान आहे. या ठिकाणी सोने, चांदी विक्री सोबतच मोड देखील खरेदी केली केला जाते. व्यापारी शाम उदावंत यांना सतत बाहेरगावी जावे लागत असल्यामुळे त्यांनी सन 2021 पासून दुकानात नदीम पठाण (रा. मसोड, ता. कळमनुरी) यास कामासाठी ठेवले होते. व्यापारी शाम यांच्या सततच्या प्रवासामुळे दुकानातील सर्व व्यवहार नदीम हाच पहात होता. दरम्यान, नदीम याच्यावर विश्वास ठेऊन व्यापारी शाम यांनी कधीही हिशेब जुळवला नाही. मात्र मागील काही दिवसांत त्यांना शंका आल्यामुळे त्यांनी हिशेब तपासण्यास सुरवात केली. यामध्ये नदीम याने ता. 1 सप्टेंबर 25 ते ता. 29 सप्टेंबर 25 या कालावधीतच दुकानातील हिशेब तपासणी केली असता त्यात 10 लाख रुपयांची रक्कम व सुमारे 10 लाख रुपये किंंमतीचे मोड आलेले सोन्या चांदीचे दागिने कमी असल्याचे दिसून आले. या प्रकरणी व्यापारी शाम यांनी कळमनुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये नदीम पठाण याने 10 लाख रुपये व मोडी मध्ये आलेले 10 लाख रुपयांचे दागिने असा 20 लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे नमुद केले. यावरून पोलिसांनी नदीम पठाण याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच नदीम फरार झाला असून पोलिस निरीक्षक प्रेमकुमार माकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, जमादार गजानन होळकर पुढील तपास करीत आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. एका मुलाखतीतील तिचा निळ्या साडीतील लूक व्हायरल झाल्यानंतर तिच्यावरील पोस्ट, मीम्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडू लागला. मात्र या ट्रेंडचा गैरफायदा घेत काहींनी तिचे एआय जनरेटेड व मॉर्फ केलेले अश्लील फोटो तयार करून प्रसारित केल्याने गिरीजा संतापली असून तिने याबाबत नेटकऱ्यांना भावनिक आवाहन केले आहे. गिरीजा ओक म्हणाली की, गेल्या काही दिवसांत मला मिळणारे प्रेम, कमेंट्स, संदेश यामुळे खूप आनंद वाटतोय. अनेक मित्र-नातेवाइकांनी मला विविध पोस्ट, मीम्स पाठवले. त्यातील काही खूप क्रिएटिव्ह आहेत, असे सांगत गिरीजा म्हणाली, पण याचबरोबर काही अत्यंत अश्लील, एआय वापरून विकृत केलेले फोटोही माझ्यापर्यंत पोहोचले. सोशल मीडियावर व्हायरल होताना असे फोटो तयार केले जातात, हे सर्वांनाच माहिती आहे. पण जेव्हा हे स्वतःबद्दल पाहते, तेव्हा त्या क्षणी काय वाटते, हे शब्दात सांगता येत नाही. तेव्हा माझ्या मुलाला काय वाटेल? गिरीजा म्हणाली की, माझा 12 वर्षांचा मुलगा आहे. सध्या तो सोशल मीडिया वापरत नाही. पण पुढे कधीतरी वापरेलच. इंटरनेटवरून काहीही काढता येत नाही. उद्या मोठे झाल्यावर त्याने माझे मॉर्फ केलेले फोटो पाहिले, तर त्याला काय वाटेल? हे विचारल्यावर उरतात फक्त अस्वस्थता आणि भीती. लाइक करणाऱ्यांनीही विचार करावा गिरीजा म्हणाली की, मला माहिती आहे की मी फारसे काही करू शकत नाही. पण पूर्णपणे गप्प बसणेही योग्य वाटले नाही. जर अशा प्रकारचे फोटो तयार करत असाल तर थोडा विचार करा. आणि जर बनवत नसाल पण ते फोटो पाहत असाल, लाइक करत असाल, तर त्याला तुम्हीही काही प्रमाणात जबाबदार आहात. हे स्वतःला विचारून पाहा. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गिरिजाने एका चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीतील तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये गिरिजाने निळी साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊज वेअर केला आहे. याच मुलाखतीतील तिचे काही क्लिप्स आणि फोटो अचानक ट्रेडिंगमध्ये आले. ज्यावर गिरिजाने तिची प्रतिक्रिया देत भीती व्यक्त केली आहे.
पुण्यातील नवले पुलाजवळ सोमवारी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा मुद्दा गंभीरपणे समोर आणला आहे. या अपघातात काही नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. याआधीही या ठिकाणी अनेकदा अपघात होऊन जीवितहानी झाली आहे. या सततच्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. शहरांच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यांची तातडीने सुरक्षा ऑडिट करण्याची तसेच प्रलंबित असलेली पायाभूत कामे तातडीने सुरू करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. खासदार सुळे यांनी या संदर्भात एक सविस्तर पोस्ट करत नवले पूल परिसरातील वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, या ठिकाणी मागील काही वर्षांत अनेक अपघात झाले असून त्यात अनेकांनी प्राण गमावले आहेत. अशा घटना वारंवार होण्यामागे रस्त्यांची रचना, वाहतूक कोंडी, वेगावर नियंत्रण नसणे आणि सुरक्षा उपाययोजनांचा अभाव हे प्रमुख मुद्दे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी रस्ते सुरक्षित बनवणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी मांडले. एलिव्हेटेड मार्ग केवळ पर्याय नाही तर गरज या पोस्टमध्ये सुळे यांनी नऱ्हे ते रावेत या मार्गावरील एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या कामाचा मुद्दाही उपस्थित केला. या मार्गासाठी मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. नवले पूल परिसरात वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने एलिव्हेटेड मार्ग केवळ पर्याय नाही तर अत्यावश्यक गरज बनली आहे. या प्रकल्पामुळे अपघातांचे प्रमाण कमी होऊन वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एलिव्हेटेड मार्ग सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरील दबाव कमी होऊन पर्यायी मार्ग उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले. एक विशेष मोहिम राबवण्याची गरज खासदार सुळे यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना या संदर्भात नम्र विनंती केली आहे. नऱ्हे ते रावेत दरम्यानच्या एलिव्हेटेड मार्गाचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्यात, अशी विनंती त्यांनी पोस्टमध्ये केली. तसेच, रस्ते सुरक्षेसाठी राष्ट्रीय स्तरावर एक विशेष मोहिम राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. अपघात टाळण्यासाठी वेग मर्यादा, वाहतूक चिन्हे, रस्त्यांची दुरुस्ती आणि जागरूकता मोहिमा प्रभावीपणे राबवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. ठोस पावले उचलली जातील, अशी नागरिकांची अपेक्षा नवले पूल परिसरातील हा अपघात रस्ते सुरक्षा या विषयाला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणून ठेवत आहे. पुण्यासह राज्यातील अनेक महामार्ग शहरांच्या अगदी जवळून जातात. अशा ठिकाणी वाहतुकीची घनता जास्त असल्याने अपघाताची शक्यता कायम असते. त्यामुळे शहरांच्या जवळील रस्त्यांचे सखोल सुरक्षा ऑडिट केले तर संभाव्य जोखीम वेळेत ओळखता येईल. तसेच, रस्ते सुरक्षित करण्यासाठी योग्य उपाययोजना करता येतील. नागरिकांच्या सुरक्षेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सुप्रिया सुळे यांनी केलेल्या मागण्यांमुळे या मुद्द्याला वेगळी गती मिळू शकते आणि पुण्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. सुप्रिया सुळे यांनी केलेली पोस्ट देखील पहा... नवले पूल येथे काल झालेला अपघात अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेत काही नागरीक मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले. यापुर्वीही येथे झालेल्या अपघातात जिवितहानी झाली आहे. हे रोखण्यासाठी नऱ्हे ते रावेत या मंजूर असलेल्या एलिव्हेटेड मार्गासह इतर एलिव्हेटेड मार्गांचे काम तातडीने सुरु करण्याची गरज आहे. यासोबतच रस्ते सुरक्षेबाबत देखील सातत्याने जनजागृती करण्याची तसेच शहरांच्या जवळून जाणाऱ्या रस्त्यांचे तातडीने 'सुरक्षा ऑडीट' होण्याची गरज आहे. माझी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन जी गडकरी यांना नम्र विनंती आहे की कृपया आपण नऱ्हे ते रावेत दरम्यानच्या एलिव्हेटेड मार्गाचे काम तातडीने सुरु करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्या. यासह रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मोहिम हाती घ्यावी.
पुण्यातील नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात तब्बल 8 जणांचा मृत्यू झाला, तर 13 हून अधिक जण जखमी झाले. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरचे ब्रेक फेल होऊन ही दुर्घटना घडली. विशेष म्हणजे नवले पुलावर अपघात होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. नवले पूल हा पुणे शहरातील अपघातप्रवण ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखलेल्या गेलेल्या 19 रस्त्यांच्या यादीत अग्रस्थानी आहे. त्यामुळे येथे वारंवार असे अपघात घडतात. तज्ज्ञांच्या मते, कात्रज बोगद्यापासून सुरू होणाऱ्या उतारामुळे नवले पुलावर ही गंभीर स्थिती उद्भवते. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) एका अधिकाऱ्याने TOI शी बोलताना सांगितले की, शिंदेवाडी बोगद्यातून बाहेर पडल्यापासून नवले पूल येईपर्यंत सलग उतार आहे. त्यामुळे ट्रक व कंटेनर चालक इंधन वाचवण्यासाठी अनेकदा वाहने न्यूट्रल गिअरमध्ये चालवतात. अनेक प्रकरणांत असे निष्पन्न झाले आहे की, न्यूट्रलमध्ये असताना ब्रेक्सचा सतत वापर केल्यामुळे ब्रेक फेल होऊन अपघात होण्याची शक्यता वाढते. नोव्हेंबर 2022 मध्येही असाच एक अपघात झाला होता. त्यात 25 वाहनांचे नुकसान झाले होते. तर 20 जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातानंतर सुरक्षा सल्लागार सेव्ह लाईफ फाउंडेशन व स्थानिक प्रशासनाशी सल्लामसलत करून प्रतिबंधक सुरक्षा उपाययोजना अंमलात आणल्या गेल्या. यामुळे अपघाताच्या संख्येत मोठी घट दिसून आली, असे हा अधिकारी म्हणाला. रस्ते अभियांत्रिकीत बदल करण्याची गरज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे माजी सदस्य बाबा शिंदे यांनी याविषयी सांगितले की, या मार्गावर अवजड वाहनांचा अनेकदा वेग वाढतो. त्या स्थितीत एखाद्या वाहनाचे ब्रेक फेल झाले तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वाढते. आम्ही गत अनेक वर्षांपासून या मार्गाच्या रस्ते अभियांत्रिकीची तपासणी करून बदल करण्याची मागणी करत आहोत. पण या समस्येकडे अजूनही गंभीरपणे पाहिले गेले नाही. या मार्गावरील उतार कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. आतापर्यंत अपघातप्रवण क्षेत्रालगत केलेल्या सूचनाफलक, रम्बल स्ट्रिप्स किंवा स्पीड अरेस्टर्स आदी सर्व उपायोजना तात्पुरत्या स्वरुपाच्या आहेत. या मार्गाचा घेण्यासाठी व सुधारणात्मक उपाययोजना सूचवण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याची गरज आहे. पुण्यात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) सारख्या सुप्रसिद्ध संस्था आहेत. त्यांच्या प्रतिनिधींचा या समितीत समावेश करावा. प्रशासनाने उतार कमी करण्यासह तीव्र वळणे काढून टाकण्यासारख्या दीर्घकालीन उपायांवर काम करावे. कारण, अवजड वाहनांच्या चालकांना तीव्र उतार व वळणे हाताळणे कठीण असते. नवले पूल मृत्यूचा सापळा का बनला? नवले पूल हा पुणे शहरातील ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 19 रस्त्यांपैकी एक आहे. हा सर्वात धोकादायक रस्ता मानला जातो. 2021 मध्ये या 19 ठिकाणी 200 अपघात झाले होते. त्यात 106 मृत्यू व 126 जण गंभीर जखमी झाले होते. नवले पुलावरच्या गुरुवारच्या अपघातालाही कात्रज बोगद्यापासून पुलाकडे येणाऱ्यार स्त्यावर असणारा तीव्र उतार कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे. सद्यस्थितीत या रस्त्याचा उतार 4.3 टक्के आहे. तज्ज्ञांच्या मते, ते 3 टक्के किंवा त्याहून कमी असावा. वाहतूक तज्ज्ञ, वारंवार प्रवास करणारे नागरीक व या भागातील रहिवासी यांनी या वारंवार होणाऱ्या अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या भागात होणारी जीवितहानी टाळण्यासाठी त्यांनी रस्ते अभियांत्रिकीत मोठे बदल करण्याची मागणी केली आहे. आमदार भीमराव तापकीर काय म्हणाले? खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर यांनीही कालच्या घटनेवर भाष्य केले. ते म्हणाले, अपघाताच्या समस्येविषयी आम्ही वारंवार अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आहोत. एनएचएआय, पीएमआरडीए, वाहतूक पोलिस व पीएमसी यांनी संयुक्तपणे काम करून शहरात सर्व्हिस रोड विकसित केले पाहिजेत. सुरक्षा उपाययोजना लागू केल्या पाहिजेत. या प्रकरणी आमच्या प्रशासनासोबत अनेक बैठक झाल्यात. आम्ही पुन्हा प्रशासनाला सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्याची सूचना करू. सर्वच उपाययोजना अपयशी ठरल्या नऱ्हे परिसरातील स्थानिक नेते धनंजय बेंकर यांनी याविषयी बोलताना सांगितले की, नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वच उपाययोजना अपयशी ठरल्या आहेत. उतार टाळण्यासाठी पूल बांधण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. पण त्यावर कोणतेही काम झाले नाही. अधिकाऱ्यांनी रस्ते तज्ज्ञांच्या मदतीने पुन्हा एकदा या संपूर्ण मार्गाची तपासणी करावी. त्यानंतर ठोस पाऊले उचलावीत. कारण, अपघातांमुळे केवळ जीवितहानीच होत नाही, तर कात्रज - देहू रोड बाह्यवळणाच्या या व्यस्त मार्गावरील वाहतुकीतही मोठे अडथळे येतात. ते पुढे म्हणाले, एनएचएआयने या प्रकरणी डीपीआर तयार करण्यासाठी व तीव्र उताराची समस्या सोडवण्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती केली होती. त्यानुसार इंडियन रोड्स काँग्रेस (IRC) च्या 3 टक्के किंवा त्याहून कमी मानकाप्रमाणे उताराची पुनर्रचना करणे हा प्रस्तावित उपायांपैकी एक उपाय होता. पुणे महापालिकेने या प्रकरणई पुढाकारही घेतला होता. त्यांनी पुलाच्या दोन्ही बाजूंना 12 मीटर रुंदीचे सर्व्हिस रोड बांधण्याचा निर्णय घेतला. रस्त्याच्या कामात कोणताही विलंब होऊ नये म्हणून मोठ्या पाणीपुरवठा पाईपलाईन्स आणि भूमिगत विद्युत केबल्स हलवण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. हे काम अजूनही चालू आहे. 'ब्लॅक स्पॉट' म्हणजे काय? केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय व इंडियन रोड काँग्रेसने निश्चित केलेल्या नियमांनुसार, मागील 3 वर्षांत 500 मीटरच्या रस्ते पट्ट्यात 5 किंवा त्याहून अधिक अपघात, ज्यात मृत्यू किंवा गंभीर जखमा झाल्या आहेत, अशा ठिकाणाला 'ब्लॅक स्पॉट' म्हटले जाते. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील जिल्हास्तरीय रस्ते सुरक्षा समिती ही नोडल संस्था ब्लॅक स्पॉट्स व अपघात होण्याचा धोका कमी करण्यासाठी संबंधित भागधारक संस्थांनी केलेल्या सुधारणात्मक उपायांवर लक्ष ठेवते. अपघात होण्याची इतर संभाव्य कारणे
राजाभाऊ वाजे यांना मोठा धक्का:काका हेमंत वाजे भाजपत, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची जोरदार चर्चा
सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर नाशिकच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते राजाभाऊ वाजे यांचे काका आणि सिन्नरमधील प्रभावी नेते हेमंत वाजे यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या एका प्रवेशाने सिन्नरमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा पक्षप्रवेश म्हणजे सिन्नरमध्ये वर्चस्व असलेल्या राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटासाठी निवडणुकीच्या तोंडावर बसलेला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. भाजप-शिंदे सेना युतीच्या या चालीमुळे सिन्नर नगर परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजप-शिंदे गट एकत्र सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र मैदानात उतरणार असल्याची अधिकृत घोषणा माजी खासदार हेमंत गोडसे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत केली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर अखेर दोन्ही पक्षांनी युतीवर शिक्कामोर्तब केला असून नगराध्यक्षपदाची जागा भाजप लढवणार असल्याचे बच्छाव यांनी स्पष्ट केले. यामुळे हेमंत वाजेंना नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी भूषवली अनेक पदे माजी नगराध्यक्ष आणि राज्यातील पहिल्या महिला आमदार रुक्मिणीबाई विठ्ठल वाजे यांचे चिरंजीव हेमंत वाजे यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला.या प्रवेशानंतर वाजे हेच भाजपचे प्रमुख नगराध्यक्षपदाचे चेहरे असल्याची चर्चा अधिक बळकट झाली आहे. वाजे यांनी यापूर्वी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व गटनेते अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांच्या वडिलांनी, स्व. विठ्ठल वाजे यांनीही नगराध्यक्षपद भूषवले होते. त्यामुळे त्यांच्या आगमनाने सिन्नरमधील भाजपची ताकद लक्षणीय वाढेल, असे मानले जात आहे. उमेदवार श्रेष्ठीच ठरवणार दोन दिवसांत सर्व्हेच्या माध्यमातून जागा व उमेदवारी वाटप केले जाणार आहे. थेट नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून नावांची चर्चा सुरू असून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी येत्या दोन दिवसांत घेणार आहेत. - सुनील बच्छाव, जिल्हाध्यक्ष पक्षाच्या चिन्हावर लढणार थेट नगराध्यक्षपदाचा निर्णय झाला असला तरी अन्य जागावाटपाबाबत स्थानिक पदाधिकारी समन्वय साधून निर्णय घेणार आहेत. भाजप व सेना पक्षाच्या चिन्हावर या निवडणुकीत मैदानात उतरतील. - हेमंत गोडसे, माजी खासदार
इंदुरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यावरून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. साधेपणाने विवाहसोहळे करावेत असा नेहमी संदेश देणाऱ्या महाराजांनी स्वतःच्या मुलीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात केला, अशी टीका काही नेटिझन्सनी केली. या टीकेत वैयक्तिक पातळीवरून उलटसुलट बोलणे सुरू झाल्याने इंदुरीकर महाराज मानसिक तणावात असल्याचे दिसून आले. अखेर एका कीर्तनात त्यांनी या प्रकरणाबद्दल मनातील वेदना व्यक्त करत कीर्तन सोडण्याचा विचार जाहीर केला. त्यामुळे त्यांच्या भक्तांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या संपूर्ण घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी समर्थकांचा सूर छेडत इंदुरीकर महाराजांना धीर देणारी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये महाराजांना फेटा खाली ठेवू नका असा भावनिक संदेश दिला. रूपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले की, महाराजांनी वर्षानुवर्षे वारकरी समाजासाठी, महिलांसाठी आणि तरुणांसाठी अपार काम केले आहे. समाजप्रबोधनातून ते हजारो कुटुंबांना चांगल्या विचारांची दिशा देत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील काही विकृत टिप्पणी करणाऱ्यांकडे लक्ष न देता महाराजांनी आपले कार्य सुरू ठेवावे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पुढे बोलताना रूपाली ठोंबरे पाटील यांनी इंदुरीकर महाराजांवर होत असलेल्या टीकेचा जोरदार निषेध केला. अशा लोकांच्या शब्दांना किंमत देऊ नका, कारण ते समाजात अफवा आणि नकारात्मकता पसरवतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराजांना उद्देशून त्या म्हणाल्या की, तुम्ही घराघरात हरवलेल्या माणसांना योग्य मार्ग दाखवला आहे. तुमच्यासारखे लोक नसतील तर अनेकांचे आयुष्य अंधारात जाईल. तुमच्यासाठी महाराष्ट्र उभा आहे. तुम्ही डगमगू नये हीच आमची इच्छा. तसेच स्वतःला इंदुरीकर महाराजांच्या कुटुंबातील लेक म्हणत त्यांनी महाराजांना भावनिक आधार दिला. महाराज कीर्तन थांबवणार का? दरम्यान, इंदुरीकर महाराजांनी कीर्तनात मांडलेली वेदना अनेकांना चटका लावून गेली. लोक आता माझ्या मुलीच्या कपड्यांवरून कमेंट्स करत आहेत. तुम्हाला माझ्यावर टीका करायची असेल तर करा, पण माझ्या मुलांवर टीका नका करू, असे ते म्हणाले होते. 31 वर्षे कीर्तनातून समाजसेवा करूनही आता व्यक्तीगत जीवनावर हल्ले होत असल्याने ते व्यथित असल्याचे त्यांनी सांगितले. मी दोन-तीन दिवसांत मोठा निर्णय घेईन, असे त्यांनी जाहीर करताच भक्तांमध्ये खळबळ उडाली. महाराज कीर्तन थांबवणार का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. टीकेच्या वादळातही मोठा वर्ग इंदुरीकर महाराजांसोबत इंदुरीकर महाराजांवरील टीका आणि त्यातून निर्माण झालेला उद्वेग पाहता अनेकांनी त्यांच्या समर्थनार्थ पुढे येत प्रतिक्रिया दिल्या आहेत. महाराज विसावा घेतात की आपले कार्य सुरू ठेवतात, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र रूपाली ठोंबरे पाटील यांनी दिलेला भावनिक संदेश आणि महाराष्ट्रातील लाखो भक्तांचा पाठिंबा हे निश्चितच महाराजांसाठी मोठे बळ ठरणार आहे. सोशल मीडियावरील टीकेच्या वादळातही समाजातील मोठा वर्ग इंदुरीकर महाराजांसोबत ठामपणे उभा असल्याचे या सर्व प्रकरणातून दिसून आले आहे.
नितीशकुमार हे निश्चितपणे बिहारचे मुख्यमंत्री होणार नाही कारण ते मुख्यमंत्री व्हावे असे जनतेलाच वाटत नाही. आमचे महागठबंधनचे सरकार बिहारमध्ये येत आहे. महाराष्ट्रात भाजपकडून अजित पवारांकडे कसे बाण जात आहे हे आपण पाहत आहोत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या ज्या दोन कुबड्या महाराष्ट्रात आहे त्यांनी नितीशकुमार यांच्याकडे पाहावे, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. सचिन सावंत म्हणाले की, भाजपने नेहमीच मित्र पक्षांचा फायदा उचलला आहे, आणि गरज सरो आणि वैद्य मरो ही भूमिका घेतली आहे, त्यामुळे भाजप कसे राजकारण करते हे देशाला दर्शवणारे आहे. 2019 पर्यंत त्यांना एनडीएमध्ये एकही सदस्य राहिला नव्हता, आता एक कुबडी ढासळणार आहे, हा संदेश महाराष्ट्रातही जाणार आहे. केंद्रातील सरकार हे दोन कुबड्यांवर आहे, त्यातली एक कुबडी ढासळली की केंद्र सरकार विकलांग अवस्थेमध्ये जाणार हे निश्चित आहे. महिलांना लुभावण्यासाठी योजना सचिन सावंत म्हणाले की,भाजपने बिहारमध्ये महिलांसाठी 10 हजार रुपयांची जी योजना आणली ती केवळ महिलांना लुभावण्यासाठी आणली होती. कारण हे विकासाच्या मुद्यावर लढवू शकत नाही. निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यावर हे पैसे जनतेच्या खात्यावर येत होते पण निवडणूक आयोगाने काही केले नाही. आचारसंहितेचा भंग त्यांना दिसले नाही, निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने सर्व गोष्टीचा वापर केला, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.अत्यंत खालच्या स्तराला जात प्रचार करत निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला. हे सर्व केल्यानंतरही भाजपचा निवडणुकीत पराभव होताना दिसून येत आहे. आमचेच सरकार येणार सचिन सावंत म्हणाले की, बिहारमध्ये महागठबंधनचे सरकार येणार आम्हाला पूर्ण विश्वास आहे. 20 वर्षांचे कुशासनाचा अंत आता होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे काही विकासाचे दावे करत आहे ते बिहारमध्ये फोल ठरले आहेत. तरी जनतेने त्यांना अनेक वर्षे सत्ता दिली. त्यांना विकासाच्या नावाने मते मागता येत नाही म्हणून त्यांनी धर्म आणि विद्वेषाचे हत्यार त्यांना उगरावे लागले आहे. बिहारमध्ये बेरोजगारीचा मोठा प्रश्न सचिन सावंत म्हणाले की, एनडीएला निवडणूक आयोगाचे सहकार्य घेऊन सुद्धा जे साध्य करायचे होते ते साध्य होताना दिसून येत नाही. राहुल गांधीच्या आणि तेजस्वी यादव याच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत होता. आम्ही ज्या मुद्यावर चर्चा केली ते मुद्दे बिहारची खरी गरज होती. तिथे बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. तिथले लोक मजुरी करण्यासाठी इतर राज्यांमध्ये जातात. तिथे उद्योग आलेली नाही, मोदींनी आश्वासन दिलेले सव्वा लाख कोटी रुपये तिथे आलेले नाही. भाजप मायावी पक्ष सचिन सावंत म्हणाले की, बिहारमध्ये पायाभूत सुविधांची जी मोठ्या प्रमाणात गरज आहे ती अजून एनडीएला पूर्ण करता आलेली नाही. बिहारची जनता विकास शोधत होती पण त्यांना तो दिसलाच नाही. भाजपला खऱ्या अर्थाने मायावी पक्ष म्हणावे लागेल, त्यांच्याकडे नैतिकता हा शब्द नाही. काहीही करत त्यांना सत्ता हवी असते, त्यासाठी ते अधिक क्रूर होत असतात.
केंद्र सरकार मजबूत आहेच पण आजच्या निकालाने आमचे एनडीए मजबूत होईल. एनडीएने सर्वांना मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या निकालाने एनडीएची ताकद वाढलेली आहे. आम्ही एनडीए म्हणून देशभरात जात आहोत आता 2047 पर्यत आमचे सरकार केंद्रात आणि राज्यात राहील, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, बिहार निवडणुकीचा देशभरातील निवडणुकीवर परिणाम होणार आहे.एनडीएवर जनतेचा विश्वास आहे. महाराष्ट्रात देखील आम्ही 51 टक्के घेत जागा जिंकणार आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील जनतेचा सुद्धा डबल इंजिन सरकारवर विश्वास आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमचा विजय पक्का आहे. महाराष्ट्र क्रमांक एक करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प आहे त्याला जनता साथ देईल. काँग्रेसवाले पुन्हा EVM च्या नावाने रडतील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसचे उरलेले लोक पक्षात रहावे, पक्ष किंचित होत चालला आहे तो किमान तसा तरी रहावा आणि राहुल गांधींचे (बाबांचे) नेतृत्व कसे तरी जिवंत ठेवायचे यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केले जातील.जनतेचा कल पाहिला आणि राहुल गांधी विदेशात निघून गेले. राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेतृत्व टिकवण्यासाठी हे लोकं पुन्हा एकदा EVM च्या नावाने रडतील असा टोला बावनकुळेंनी लगावला आहे. हे जनतेला पटत नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्यांनी ज्यांनी मतदारांवर शंका उपस्थित केले ते जनतेला पटत नाही. आम्ही जेव्हाही हरलो तेव्हा EVM वर आरोप केला नाही. पण काँग्रेसकडून केवळ आरोप केले जातात. काँग्रेसवाले हरल्यावर विचार करत नाही पराभव झाला की राहुल गांधी परदेशात निघून जातात आणि पुन्हा EVM आणि मतचोरी झाली असे म्हणतील असा टोला बावनकुळेंनी लगावला आहे. राहुल गांधींनी विकासाचा मुद्दाच मांडला नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, बिहारची जनता ही विकासाच्या बाजूने आहे. त्यांना डबल इंजिन सरकारवर संपूर्ण विश्वास आहे. हे सरकार बिहारचा विकास करु शकते म्हणून जनतेने विश्वास दाखवत एनडीएला मतदान केले आहे. आश्वासन पाळणारा पक्ष म्हणून जनतेने बिहारमध्ये आम्हाला मतदान केले आहे. मतदार यादीमध्ये अनेकांची नावे दुबार आहे ती बदलली गेलीच पाहिजे. पण राहुल गांधींनी जे मतचोरी म्हटले तसे काहीच नाही. राहुल गांधी यांनी कधीही विकसीत बिहारचा मुद्दा घेतला नाही, पण एनडीएकडून मात्र कायम विकसीत बिहारच्या मुद्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, त्यासाठी जनतेने एनडीएला कौल दिला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाला देशातील जनतेची मान्यता नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, बिहारमध्ये एनडीएला मोठे बहुमत मिळताना दिसून येत आहे. देशातील 140 कोटी जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामागे उभी झाली आहे. काँग्रेस पक्ष हा रोजच कमकुवत होत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाला देशातील जनतेची मान्यता नाही. केवळ कार्यकर्ते, पक्ष आणि आपले राजकारण टिकवण्यासाठी मतदार यादीवर दोष देत वेळकाढूपणा काँग्रेसकडून सुरू आहे. त्यांच्याकडे विकासाचा एकही मुद्दा नाही म्हणून जात, धर्म, पंथाचा विषय काढत राजकारण करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. यामुळे त्यांच्या बुडणाऱ्या जहाजावर कुणी बसायला तयार नाही. बिहारच्या जनतेने काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. 2029 मध्ये काँग्रेस सर्वात छोटा पक्ष असेल.
नवले पुलावर सर्वत्र फक्त सांगाडे, भीषण अपघात नेमका कसा घडला?:धक्कादायक तपशील समोर; कारणाचा उलगडा
पुण्यातील नवले पुल परिसरात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था चर्चेत आली आहे. सातारा रोडवरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेत एका ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले आणि काही क्षणांतच मोठा अनर्थ घडला. ट्रक अनियंत्रित झाल्यानंतर त्याने सलग 20 ते 25 वाहनांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, पुढे असलेली एक टुरिस्ट कार दोन कंटेनरमध्ये चेंगरली गेली आणि त्यानंतर कारने तात्काळ पेट घेतला. काही सेकंदांच्या आत आग इतकी वाढली की कार तसेच कंटेनरचा पुढील भाग पूर्णपणे जळून खाक झाला. यात कारमधील पाच प्रवासी आणि कंटेनरमधील दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला. कार व कंटेनरमधील आगीच्या ज्वाळा काही मिनिटांतच उंचावल्या. वाहने रस्त्यावर विखुरली आणि संपूर्ण मार्ग अडला. पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या अवघ्या सात मिनिटांत घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी प्रचंड धुरात व ज्वाळांत जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत वाहनांचे सांगाडेच उरले होते. दाट धुरामुळे नागरिकांना आणि बचाव पथकांना मोठा त्रास झाला. सुदैवाने आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात मृत्यू पावलेल्यांची ओळख आता समोर आली आहे. कारमधील स्वाती नवलकर (37), त्यांच्या सासू शांता दाभाडे (54) आणि सासरे दत्तात्रय दाभाडे (58) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय चिखलीतील तीन वर्षांची मोक्षिता हेमकुमार रेड्डी आणि कारचालक धनंजय कोळी यांचादेखील आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला रोहित कदम (25) याचाही मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे. ट्रकमधील मृत चालक आणि क्लीनर यांची अद्याप ओळख पटलेली नाही. या दुर्घटनेने संपूर्ण पुणे हादरले असून सोशल मीडियावरही या अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. पल्स हॉस्पिटल, नवले हॉस्पिटल आणि अन्य रुग्णालयांत दाखल असलेले जखमी सय्यद कुटुंबातील काही सदस्य, सतीश वाघमारे, सोहेल सय्यद, 79 वर्षीय शामराव पोटे आणि इतरांवर उपचार सुरू आहेत. अनेकांना किरकोळ तर काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत मिळाल्याने अनेकांचा जीव वाचला. घटनेची पोलिसांनी नोंद केली असून मृतांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुलावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नवले पुल परिसरात यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. तीव्र उतार, भरधाव वाहनं आणि अवजड ट्रक यामुळे या ठिकाणी वारंवार भीषण घटना घडत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. ब्रेक फेल होण्याच्या घटना इथे पूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे या पुलावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. ट्रकच्या ब्रेक फेल होण्यामागे तांत्रिक बिघाड होता की वाहनातील अन्य दोष, याचा पोलिस तपास सुरू आहे. अपघाताची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून या दुर्घटनेमुळे नवले पुलावरील वाहतूक आणि वाहन सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अपघाताचे फोटो... अनेक वाहने एकमेकांवर आदळली अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग आटोक्यात आणली. अपघातातील सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक आणि कंटेनर साताराहून पुण्याला जात असताना कार त्यांच्यामध्ये अडकल्याचे वृत्त आहे. या अपघातामुळे नवले पुलावर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. ट्रकला आग लागल्याने ट्रकचा चालक पळून जाऊ शकला नाही आणि तोही जळून मृत्युमुखी पडला. ट्रकच्या मागे असलेल्या एका प्रवासी वाहनालाही आग लागली, ज्यामध्ये 17-18 लोक होते. सर्वजण जखमी झाले. याव्यतिरिक्त, अनेक कार आणि इतर वाहने एकमेकांवर आदळली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मदत जाहीर केली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आणि मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. खासदार सुप्रिया सुळे यांनीही अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पिंपरी-चिंचवड परिसरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण भागात खळबळ उडवली आहे. चारोळीतील अलंकारपुरम 90 फूट रोडवर एका व्यावसायिकाचा त्याच्याच ओळखीतील व्यक्तींनी फॉर्च्युनर कारमध्ये बसवून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडलेल्या या प्रकरणात आरोपींनी व्यावसायिकाला गोळी घालून ठार केले, त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकला आणि कार घेऊन पसार झाले. सम्पूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून फुटेजमधील थरार पाहून सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर आरोपी कोणत्या दिशेने पळाले, ते कोठे लपले आहेत याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली आहे. मृत व्यक्तीची ओळख नितीन शंकर गिलबिले (वय 38, रा. वडमुखवाडी, चहोली) अशी झाली आहे. जमीन-खरेदी-विक्रीचा व्यवसाय आणि हॉटेल व्यवसाय करणारे नितीन बुधवारी संध्याकाळी आपल्या दोन मित्रांसह फॉर्च्युनर कारमध्ये बसून बोलत होते. त्याच वेळी वैयक्तिक कारणावरून तिघांमध्ये वाद झाला. सीसीटीव्ही फुटेजनुसार, काही वेळ कारबाहेर चर्चा झाल्यानंतर नितीन पुढच्या सीटवर परत बसले आणि त्याच क्षणी आरोपींपैकी एकाने अचानक त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. नितीनचा जागीच मृत्यू झाला. त्या धक्क्याने निपचित पडलेले नितीन यांचे शरीर आरोपींनी कारमधून बाहेर फेकले. त्यांचे पाय कारच्या दरवाज्यात अडकले असतानाच आरोपींनी ते जोराने ओढून काढले आणि कार पळवली. इतकेच नाही तर कार पळवत असताना वाहन नितीन यांच्या पायावरून चढल्याचेही सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसते. ही घटना समजताच दिघी पोलिस आणि क्राइम ब्रँचची पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली. प्राथमिक तपासात आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर यांची नावे समोर आली आहेत. नितीन यांचे भाऊ सचिन गिलबिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप खूनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी वैयक्तिक वादातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा माग काढण्यासाठी पाच विशेष पथके तयार केली असून महत्त्वाच्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि संशयितांच्या संपर्कातील लोकांची चौकशी सुरू आहे. पोलिसांना आरोपी लवकर सापडतील याबाबत खात्री असल्याचेही त्यांनी सांगितले. मृतदेह रस्त्याच्या कडेला एका मोकळ्या जागेत टाकला नितीन गिलबिले हे चारोळी-चहोली परिसरातील ओळखले जाणारे व्यावसायिक होते. त्यांनी गेल्या काही महिन्यांत अलंकारपुरम रस्त्यावर हॉटेल सुरू केले होते तसेच व्यावसायिक गाळे बांधून भाड्याने देण्याचाही व्यवसाय सुरू केला होता. बुधवारी ते खडी मशीन रस्त्यावर काही लोकांशी बोलत थांबले असताना आरोपी कार घेऊन तिथे आले. त्यांनी नितीन यांना कारमध्ये बसवले आणि त्यांच्या हॉटेलच्या दिशेने निघाले. काही मिनिटांतच कारमध्ये वाद वाढला आणि परिस्थिती थेट खूनापर्यंत पोहोचली. आरोपींनी गोळीबार करून नितीन यांचा खून केल्यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला एका मोकळ्या जागेत टाकला आणि कार वेगाने पिंपरी-चिंचवडच्या दिशेने घेऊन पळ काढला. आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास सुरू या घटनेमुळे चारोळी, वडमुखवाडी, दिघी परिसरात भितीचे सावट पसरले आहे. कारमध्ये बसवून खून करण्याची ही पद्धत अत्यंत धोकादायक असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. पोलिसांनी तातडीने पथके वाढवून परिसरात गस्त वाढवली आहे. घटनेत सहभागी असलेले आरोपी अजूनही फरार असल्याने त्यांना अटक करण्यासाठी पोलिस सर्वांगाने प्रयत्न करत आहेत. खूनाचे खरे कारण, वैयक्तिक वादातील नेमके मुद्दे आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास सुरू आहे. पुढील काही तासांत तपासात महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता असून पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर ही एक मोठी आव्हानात्मक केस बनली आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय हालचाली वेगवान झाल्या आहेत. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी असल्याने सर्व पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. कुठे महाविकास आघाडी आणि महायुतीत युतीबाबत चर्चा रंगत असताना, काही ठिकाणी स्थानिक समीकरणांनुसार स्वतंत्र पद्धतीने लढण्याचे संकेत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईजवळील बदलापूर नगरपालिकेत मात्र एक मोठं राजकीय समीकरण घडत आहे. येथे आठ पक्षांनी एकत्र येत अनपेक्षित आणि व्यापक आघाडीची घोषणा करून स्थानिक राजकारणात खळबळ उडवली आहे. बदलापुरातील या ऐतिहासिक युतीची औपचारिक घोषणा महाविकास आघाडीकडून झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. शिवसेना (ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), मनसे, वंचित बहुजन आघाडी, बहुजन मुक्ती पार्टी, आम आदमी पार्टी आणि आरपीआय (आर. के. गट), असे आठ पक्ष एकत्र येत 24 पैकी 22 प्रभागांमध्ये जागावाटप निश्चित करण्यात आले आहे. स्थानिक नेतृत्वाने दिलेल्या माहितीनुसार, नगराध्यक्षपदासाठी शिवसेना ठाकरे गटाची प्रिया गवळी आणि मनसेची संगीता चेंदवणकर अशी दोन नावे वरिष्ठांकडे पाठवण्यात आली असून अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या घोषणेनंतर बदलापुरातील निवडणूक अधिकच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर असल्याने सर्व पक्षांचा वेग वाढला आहे. शिवसेना-भाजपच्या महायुतीने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नसली तरी महाविकास आघाडीकडून आठ पक्षांमध्ये 45 जागांचे वाटप करून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या वाटपात शिवसेना ठाकरे गट आणि बहुजन मुक्ती पक्षाला प्रत्येकी 11 जागा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 6, काँग्रेसला 5, मनसेला 3 तर वंचित बहुजन आघाडीला 5 जागा देण्यात आल्या आहेत. आम आदमी पार्टीला 2 आणि आरपीआय आर. के. गटाला 1 जागा मिळाली आहे. बहुजन मुक्ती पक्षाला स्वतःचे चिन्ह नसतानाही 11 जागा मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मतदारांच्या एकत्रीकरणाचा फायदा या जागावाटपावर स्थानिक राजकारणात मिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षाही दुप्पट जागा बहुजन मुक्ती पक्षाला देण्यात आल्यानं ही युती बदलापुरातील दलित आणि बहुजन मतं एकत्र आणण्याचा प्रयत्न असल्याचे काही राजकीय निरीक्षक म्हणतात. तर काहीजणांच्या मते या जागावाटपामुळे महायुक्तीला मोकळं रान मिळू शकतं. मविआतील नेत्यांनी मात्र आरोप फेटाळून लावत हे वाटप पूर्णतः स्थानिक ताकद आणि संघटनशक्ती पाहून करण्यात आल्याचे सांगितले आहे. या युतीमुळे बहुजन, अल्पसंख्याक आणि पारंपरिक आघाडी मतदारांच्या एकत्रीकरणाचा फायदा होईल, असा विश्वास या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. निर्णय निवडणुकीला वेगळं वळण देणारा बदलापूर नगरपालिकेची निवडणूक नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. मुंबई महानगर प्रदेशाशी जोडलेले हे वाढते शहर असल्याने जाती-धर्म, स्थानिक प्रश्न, पायाभूत सुविधा, रोजगार आणि नागरी सुविधांची कमतरता असे अनेक मुद्दे मतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. अशा वेळी एकाच वेळी आठ पक्ष एकत्र येत लढण्याचा निर्णय हा निवडणुकीला वेगळं वळण देणारा आहे. आता आगामी काही दिवसांत महायुतीच्या उमेदवारी घोषणेमुळे आणि प्रचार मोहीम सुरू झाल्यानंतर या निवडणुकीचं समीकरण कोणत्या दिशेने झुकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल, अशा कमी कालावधीत बदलापूरमध्ये राजकीय तापमान उचांक गाठण्याची चिन्हे दिसत आहेत.
उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू–काश्मीरमध्ये वाढलेल्या कडाक्याच्या थंडीचा परिणाम आता महाराष्ट्रातही स्पष्टपणे जाणवू लागला आहे. उत्तरेकडील थंड वारे राज्यात प्रवेश करत असल्याने गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी तापमानात लक्षणीय घट झाली आहे. विदर्भ, कोकण आणि उत्तर महाराष्ट्र या तिन्ही भागांमध्ये हिवाळ्याची चाहूल प्रकर्षाने जाणवत असून, पहाटेच्या वेळी थंडगार वातावरण आणि दुपारी उन्हाचा चटका अशी दैनंदिन स्थिती अनुभवायला मिळत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातही सकाळी गारठा तर दुपारी उष्णता अशी दोन्ही टोकांची परिस्थिती दिसून येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि धुळे जिल्ह्यांमध्ये थंडीने विक्राळ रुप धारण केले असून, गेल्या तीन ते चार दिवसांत तापमानाने नीचांकी पातळी गाठली आहे. जळगावात दोन दिवसांपूर्वी तापमान 9 अंश सेल्सियसपर्यंत खाली आले होते, तर सध्या ते 11अंशांवर स्थिरावले आहे. अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे नागरिकांना पहाटे आणि रात्री थंडीचा सर्वाधिक फटका बसत आहे. रस्त्यांवर शेकोट्या पेटवण्याचे प्रमाण वाढले असून, विशेषतः ग्रामीण भागात लोक गटागटांनी ताप घेण्यासाठी एकत्रित बसताना दिसत आहेत. धुळ्यात तर तापमान 8 अंशांवरून 5 अंशांकडे झेपावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हा राज्यातील सर्वाधिक थंड ठिकाणांपैकी एक बनला आहे. शाळांच्या वेळा बदलाव्यात अशी मागणी हिवाळ्याचा कडाका वाढल्याने जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. सकाळी दाट धुक्याची चादर पसरत असल्यामुळे दृश्यमानतेत घट होत आहे आणि त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावते आहे. रस्त्यांवर सकाळी आणि रात्री फारच कमी नागरिक दिसतात. शाळकरी मुलांना थंडीचा सर्वाधिक त्रास होत असल्याने पालकांकडून अनेक ठिकाणी शाळा सुरू होण्याची वेळ उशिरा करण्याची मागणी केली जात आहे. मात्र अद्याप शिक्षण विभागाकडून या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान, सकाळी व्यायाम करणारे नागरिक, शेतकरी आणि बाजारात जाणारे कामगार एवढेच मुख्यत्वे रस्त्यांवर दिसत असल्यानं थंडीने दैनंदिन हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. उत्तर भारतात हिमवर्षाव; दक्षिणेत पावसाचा अंदाज उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर थंडी वाढली आहे. काश्मीर खोऱ्यात, गुलमर्ग, पहलगाम आणि श्रीनगर या पर्यटनस्थळांवर तापमान शून्याखाली गेले आहे. हिमवर्षावामुळे स्थानिक नागरिकांचे व्यवहार अडखळले असले तरी पर्यटकांसाठी ही नैसर्गिक सुंदरता आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. हवामान विभागाने 16 नोव्हेंबरनंतर नव्या पश्चिमी झंझावाताचा इशारा दिल्याने पुढील काही दिवस या भागात अधिक हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, दक्षिण भारतातील केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि अंदमान–निकोबार येथे पावसाची शक्यता वर्तवली आहे. मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्येही पाऊस आणि थंडी असे दोन्ही वातावरण राहण्याची शक्यता आहे. राज्यात हिवाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपेक्षा यावेळी हिवाळ्याचा जोर अधिक जाणवतो आहे. दिवसागणिक तापमान कमी होत असल्याने पुढील आठवड्यात गारठा आणखी वाढेल, असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तापमान 8 ते 10 अंशांच्या खाली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले असून, वृद्ध, लहान मुले आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी गरम कपड्यांचा योग्य वापर करावा, असे सुचवण्यात आले आहे. राज्यभरातील बदलत्या हवामानामुळे पुढील काही दिवस सकाळ–संध्याकाळच्या वेळेत थंडीचा कडाका जाणवणार असून, राज्यात हिवाळ्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने स्पष्ट केली आहे.
श्रीमद् देवी भागवत कथा ग्रंथचा गुरुवारी भावपूर्ण वातावरणात श्रीगणेशा झाला. देवी भागवत कथा आयोजन समितीच्या वतीने आयोजित या आध्यात्मिक सोहळ्यात राजेश्वर नगरीतून पालखी परिक्रमा काढण्यात आली. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. लाखो भक्तांचे तारणहार पूज्य योगाभ्यानंद श्री माधवनाथ महाराज यांच्या आशीर्वाद आणि प्रेरणेने कथेला प्रारंभ झाला आहे. कथा श्रीनाथ मंदिर संस्थान इंदोर, श्रीनाथ दत्त मंदिर, रामदास पेठ व बिर्ला राम मंदिराच्या यांच्या सहकार्याने सुरु झाली आहे. कथा सोहळ्याचा समारोप १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. कथा दुपारी ४ ते ८ या वेळेत होत आहे. ज्ञानयज्ञात पुणे येथील देवी भागवत कथाकार, दासबोधाचे गाढे अभ्यासक, समर्थ भक्त मकरंद बुवा सुमंत रामदासी हे आपल्या अमृत वाणीतून भागवत कथा सादर करीत आहेत. कथेचे यजमान आर्किटेक्चर संजय महाशब्दे व मंजुषा महाशब्दे यांनी आयोजित केलेल्या या उत्सवात योगाभ्यानंद पूज्य माधवनाथ महाराज यांच्या प्रत्यक्ष उपयोगात आलेल्या पादुकांचे दर्शनही भक्तांना नित्य होणार आहे. श्रीनाथ महाराजांच्या पादुका शहरातील अनेक नाथभक्तांकडे पुजनासाठी घरोघरी देखील जाणार असून तशी नोंदणी करण्यात आली. पादुका पुजनाची तळमळ असलेल्या भक्तांना श्रीनाथ दत्त मंदिरात तशी नोंद आणि मागणी करता येईल. आयोजन समितीने साकारलेली कथा न्यू राधाकिसन प्लॉट परिसरातील मुंगीलाल बाजोरीया प्रांगणात होत आहे. या उत्सवात श्री नागेश मूर्तीकर हे संहिता वाचन करणार आहेत. या कथांचे आहे श्रवण सात दिवसीय कथा ज्ञानयज्ञात श्रीमद देवी भागवत महात्म्याचे श्रवण श्रोत्यांना करता येणार आहे. तसेच मधु कैट्भ, व्यास तपश्चर्या, शुक्राचार्य -जनक संवाद, राजा जनमेजय यांना उपदेश, दैवी विमान, देवीच्या बीज मंत्राचे रहस्य, श्रीरामाची देवी उपासना, कर्मवीपाक सिद्धांत, नरनारायण तपचर्या, कृष्ण जन्मोत्सव, महिषासुर, शुंभ निशूंभ वध, राजा सुरथ व समाधी वैश्य कथा, नारद चरित्र, सुकन्या च्यवन, दाक्षायणी कथा, १०८ शक्तीपीठे, देवी गीता, नरक वर्णन, रुद्राक्ष भस्म महिमा, गायत्री महात्म, परिक्षित मोक्ष आदी कथा श्री मकरंद बुवा सुमंत आपल्या कथेत सादर करणार आहेत. देवी भागवत कथेच्या पूर्व संध्येवर रामदास पेठ परिसरात पू. माधवनाथ महाराज यांच्या पवित्र पादुका व भागवत ग्रंथाची भव्य पालकी परिक्रमा करण्यात आली. कथा वाचक श्री मकरंद बुवा सुमंत रामदासी हे प्रामुख्याने सहभागी झाले. या परिक्रमा सोहळ्यात अनेक महिला पुरुष भक्तांनी ढोल ताशांच्या गजरात गुरूंचा जयघोष करीत सहभाग नोंदवला. पू. योगाभ्यानंद श्री माधवनाथ महाराज यांच्या पावन पादुका व देवी भागवत ग्रंथाचे दर्शन घेतले. पालखीचा प्रारंभ रामदास पेठ येथील दत्त मंदिरातून करण्यात आला. यावेळी कथा यजमान आर्कि संजय महाशब्दे, डॉ मंजुषा महाशब्दे यांनी दत्त दर्शन व पालकी पूजन करून या पालकी परिक्रमास प्रारंभ केला. मंत्रोच्चार पं श्रीराम शास्त्री गदाधर यांनी केला. रामदासपेठ मार्गे गड्डम प्लॉट येथून सुरु झालेल्या पालखी सोेहळ्याचा समारोप दत्त मंदिर येथे सामूहिक आरतीने झाला. पालखी मार्गावर भक्तांनी रांगोळी व आतिषबाजी करून स्वागत केले.
27 वर्षांनंतर शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा:जय बजरंग विद्यालयात सोहळा
येथून जवळच असलेल्या कुंभारी गावातील जय बजरंग विद्यालयात कुंभारी येथे तब्बल २७ वर्षांनंतर माजी विद्यार्थी-विद्यार्थ िनींचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. काळ कितीही पुढे गेला तरी बालपणाच्या आणि शालेय जीवनातील आठवणी कायम मनाच्या कोपऱ्यात जपलेल्या असतात. त्या आठवणींना उजाळा देणारा, डोळ्यांत आनंदाश्रू आणणारा प्रसंग कुंभारी गावात घडला. शाळेचे वर्गमित्र, बालपणीचे सखे-सोबती अनेक वर्षांनी एकत्र आले. कोणाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य तर कोणाच्या डोळ्यांत जुन्या आठवणींचे अश्रू , असे भावनिक दृश्य पाहून वातावरण भारावून गेले. या स्नेहमेळाव्याला जय बजरंग उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालय कुंभारीचे प्राचार्य विलास इंगळे, शरद मैंद, रमेश अढाऊ, सुनील फोकमारे, राजेश आमले, धनंजय पुसेगावकर, सूर्यभान नागुलकर आणि मीना आमले प्रमुख उपस्थित होते. आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना इतक्या वर्षांनंतर पाहून शिक्षकांनीही समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन व संचालन निलेश इंगळे आणि अमोल खाडे यांनी केले. आभार सुषमा नागरे यांनी मानले. माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता आमच्या आयुष्याचा पाया याच शाळेने रचला. आज आम्ही जे काही आहोत, ते आमच्या गुरुजनांमुळेच शक्य झाले, अशा शब्दात माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सभागृहात जुन्या आठवणींची गोडी, बालपणातील खोड्यांची चर्चा आणि सेल्फी-फोटोसेशनने वातावरण अधिकच रंगतदार झाले. अशा स्नेहमेळाव्यांचे आयोजन दर काही वर्षांनी केले जाईल, असेही ठरवण्यात आले.
महानगरपालिका क्षेत्रातील पश्चिम झोन अंतर्गत वाशीम बायपास येथील वॉर्ड क्रमांक बी -१ मालमत्ता क्रमांक ७८५, व्यंकटेश बार ॲण्ड रेस्टॉरंट यांच्याकडे २०२२-२३ पासून आजपर्यंत ३ लाख ४० हजार ३०८ रुपये एवढा मालमत्ता कर थकीत असल्याने त्यांच्या मालमत्तेवर सील लावण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहायक कर अधीक्षक राजेश जाधव, कर वसुली लिपिक अजय शिरसाट, इक्बाल हुसैन, प्रकाश मालगे, मुदस्सीर अमीन आदींची उपस्थिती होती. महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांनी आपला थकीत व चालू वर्षातील मालमत्ता कराचा भरणा एकरकमी करून सील, जप्ती व लिलावसारख्या अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन मनपा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
मेळघाटच्या आरोग्य विभागाने दोन दिवसांपूर्वी सिकलसेलची वाहक व हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्या चार दिवसांच्या बाळंतिणीला कठोर प्रयत्नांनी दवाखान्यात दाखल केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे बाळ व बाळंतीण सुखरूप असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे. दोन किलोमीटर अंतरापर्यंत चादरची झोळी तर त्यानंतरचे अंतर एका शेतातून खाट मागून त्याआधारे कापले गेले. ज्या बाळंतिणीसाठी एवढे परिश्रम घ्यावे लागले, ती खापरखेडा (ता. धारणी) येथील रहिवासी असून ती २५ वर्षांची आहे. या महिलेचा रक्तदाब वाढलेला असल्याने तिचे हिमोग्लोबिन केवळ ५ ग्राम होते. त्यामुळे प्रसूतीपासून दीर्घकाळ तिला व बाळाला डॉक्टरांच्या निगराणीत ठेवणे आवश्यक होते. प्रसूतीपूर्वी तिला चार बॉटल रक्त देण्यात आले. दरम्यान प्रसूतीनंतर चार दिवसांनीच ही माता कुणालाही न सांगता रुग्णालय सोडून घरी निघून गेली. रुग्णालयात असतानाच तिचा रक्तदाब वाढलेला होता. हिमोग्लोबिनही कमी होते. त्यामुळे तिला पुन्हा रुग्णालयात दाखल करून तिच्यावर उपचार करणे आवश्यक होते. ती निघून गेल्यानंतर तिच्या शोधात साद्रावाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका, समुपदेशक, आशा सेविका हे सर्वजण तिच्या खापरखेडा येथील घरी गेले. तेथे पोहोचल्यानंतर ही माता सर्वांना चकमा देत शौचास जाते, असे सांगून घरातून निघून गेली. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रतीक्षा केल्यानंतरही ती परत आली { उर्वरित. पान ४ ही माता लपून बसली, ते शेत गावापासून दूर होते. आजूबाजूला जंगल होते. त्यामुळे रत्नापूर येथील आशा सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका यांनी शेतात जाऊन तिला गाठले. कळमखारचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज सातणकर, दोन समुपदेशक, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, वाहन चालक, ब्लॉक फॅसिलेटर अशी कळमखार व साद्रावाडी येथील १५ जणांची चमू याकामी गुंतली होती. असाही थरारक प्रवास आठवडाभरात ४ घटना ^आरोग्य विभागाला अशा घटनांचा सातत्याने सामना करावा लागतो. गेल्या आठवडाभरात धारणी तालुक्यात चार ठिकाणी अशाप्रकारचे प्रयत्न करून रुग्णांना सेवा द्यावी लागली. एका प्रकरणात तर संबंधित महिलेला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याने परिचारिकेला अख्खी रात्र त्या रुग्ण महिलेच्या घरी जागून काढावी लागली. अशा सर्व कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावणे आवश्यक आहे. -संजीता महापात्र, सीईओ,जि.प.
महापालिकेच्या वतीने प्लास्टिकमुक्त शहर अभियानांतर्गत झोन क्रमांक २ राजापेठ येथील अंबादेवी परिसरात सर्व प्रसाद, पूजा साहित्य विक्रेते व आस्थापनाधारकांना कापडी पिशव्यांची विक्री करण्यात आली. जेणेकरून त्यांनी अंबादेवी व एकवीरा देवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्लास्टिक पन्नी ऐवजी कापडी पिशव्यांमध्ये साहित्य द्यावे. यामुळे आपोआपच बंदी असलेल्या प्लास्टिक पन्नीचा वापर कमी होईल, अशी अपेक्षा मनपा प्रशासनाद्वारे व्यक्त केली जात आहे. कापडी पिशव्या शहरात पुरवण्याचा शुभारंभ अमरावतीकरांचे आराध्य दैवत अंबादेवी, एकवीरा देवीच्या मंदिरापासून करण्यात आला. या परिसरात मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची विक्री करण्यासाठी हॉकर्स उभे राहतात. त्यांच्याकडे प्लास्टिक पन्नी असतात. ते अगदी ५ ते १० रुपयांची वस्तू खरेदी केली तरी ग्राहकांना पन्नी देतात. त्यामुळे साहजिकच प्लास्टिक पन्नीचा वापर वाढत असून शहरात बंदी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर अद्याप नियंत्रणात आला नाही. ते बघता मनपाने नागरिकांना केवळ कापडी पिशव्या देण्याचा उपक्रम महिला बचत गटाच्या माध्यमातून हाती घेतला आहे. यामुळे नागरिकांना कापडी पिशवीचा वापर करण्याची सवय लागेल. जेणेकरून ते प्लास्टिक पन्नीचा वापर करणार नाहीत. महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त प्रशासन यांच्या आदेशानुसार तसेच वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव व सहायक आयुक्त भूषण पुसतकर यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमात ‘अनमोल महिला बचत गटा’च्या अध्यक्ष वर्षा तेलमोरे यांनी सक्रिय सहभाग घेत २०० कापडी पिशव्यांची विक्री केली. प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करत स्वच्छता विभागाने नागरिकांना पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच प्लास्टिकचा वापर करताना आढळलेल्या एका आस्थापनाधारकाला ५ हजार रु. दंड आकारला. सोबतच त्याला कापडी पिशव्यांची विक्री करण्यात आली. या मोहिमेत ज्येष्ठ स्वच्छता निरीक्षक विजय बुरे, प्लॅस्टिक नोडल अधिकारी विकी जेधे, अनिकेत महल्ले, स्वच्छता निरीक्षक धनिराम कलोसे, जीवन राठोड, शक्ती पिवाल, डोंगरे आणि मनीष हडाले उपस्थित होते. मनपाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये प्लास्टिक विरहित जीवनशैलीबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरला आहे. शहरातील हॉकर्स, प्रतिष्ठाने तसेच विविध वस्तूंची विक्री करणाऱ्यांनी बंद असलेल्या प्लास्टिक पन्नीचा वापर टाळावा यासाठी त्यांना पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांची विक्री केली जाणार आहे. तसेही ते प्लास्टिक पन्नी खरेदी करतात. ग्राहकांनी पन्नी मागितली तर त्यांना कापडी पिशवी खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करता येणार आहे. नागरिकांना कापडी पिशवी वापरण्यासोबतच ती सदैव स्वत:कडे बाळगण्याची सवय लागली तर शहरातून प्लास्टिकच्या पन्नी व सिंगल युज प्लास्टिक हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी केवळ मनपानेच पुढाकार घेऊन चालणार नाही तर शहरवासीयांचेही सहकार्य तेवढेच आवश्यक असल्याचे मत मनपा प्रशासनाने व्यक्त केले आहे. शहरातील हॉकर्सलाही कापडी पिशव्या विकणार
महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाला नवी चालना देण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील आठ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण करण्यास पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. तीन नर आणि पाच मादी वाघांच्या या नियोजित स्थलांतर प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून ताडोबातील एक तरुण वाघीण सुरक्षितरीत्या सह्याद्रीत पोहोचवण्यात आली आहे. ऑपरेशन तारा या राज्यव्यापी व्याघ्र संवर्धन मोहिमेअंतर्गत झालेल्या या प्रक्रियेला भारतीय वन्यजीव संस्थेचे वैज्ञानिक मार्गदर्शन लाभले आहे. महाराष्ट्रातील व्याघ्र संख्यावाढ आणि नवीन अधिवास विकसित करण्याच्या दृष्टीने हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. सुमारे तीन वर्षांची ही वाघीण T20-S-2 म्हणून ओळखली जाते. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसांगी परिक्षेत्रातून ती NTCA ने ठरवलेल्या सर्व सुरक्षाविषयक नियमांचे पालन करून पकडण्यात आली. पकडल्यानंतर तिला प्राथमिक उपचार देण्यात आले आणि प्रकृती स्थिर ठेवल्यानंतर विशेष तयार करण्यात आलेल्या वन्यजीव वाहतूक वाहनातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हलवण्यात आले. ही संपूर्ण कारवाई अत्यंत दक्षतेने आणि प्रशिक्षित पथकाच्या उपस्थितीत करण्यात आली. स्थलांतरादरम्यान वाघिणीच्या आरोग्यावर सतत नजर ठेवण्यात आली होती आणि ताडोबातील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर.एस. खोब्रागडे यांनी संपूर्ण आरोग्य तपासणीची जबाबदारी सांभाळली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पोहोचल्यावर वाघीणीला सोनारळी येथील विशेष एनक्लोजरमध्ये सॉफ्ट रिलीज पद्धतीने सोडण्यात आले आहे. या पद्धतीअंतर्गत वन्य प्राण्याला मुक्त जंगलात सोडण्यापूर्वी काही काळ नियंत्रित वातावरणात ठेवून त्याला नवीन अधिवासाशी जुळवून घेतले जाते. पुढील काही आठवड्यांत तिच्या हालचाली, आहार, वर्तन आणि आरोग्याचा तपशीलवार अभ्यास केला जाणार आहे. सर्व निरीक्षणे पूर्ण झाल्यानंतरच तिला सह्याद्रीच्या मूळ जंगलात खुल्या अधिवासात सोडले जाईल. अशा प्रकारचे वैज्ञानिक पुनर्स्थापन जंगलातील जैवविविधता टिकविण्यासाठी आणि व्याघ्रांचे स्वतंत्र प्रदेश निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरते. व्याघ्रसंख्या संतुलित करण्याचा प्रयत्न ऑपरेशन तारा, हे महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासाठी एक दीर्घकालीन आणि समन्वित प्रयत्न आहे. ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांमध्ये गेल्या काही वर्षांत वाघांची संख्या स्थिरपणे वाढत आहे, तर सह्याद्रीत वाघांचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या विस्तीर्ण जंगलात वाघांसाठी योग्य अधिवास निर्माण करण्याचा आणि व्याघ्रसंख्या संतुलित करण्याचा राज्य वन विभागाचा हा प्रयत्न मानला जात आहे. स्थलांतर प्रक्रियेत ताडोबा, सह्याद्री तसेच WII यांच्या तज्ञ पथकांनी घेतलेला समन्वय, काटेकोर नियोजन आणि सावधगिरीमुळे ही कारवाई यशस्वी झाल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. सह्याद्रीला सक्षम, सुरक्षित आणि नैसर्गिक व्याघ्र अधिवास बनविण्यासाठी कटिबद्ध - तुषार चव्हाण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी या यशस्वी स्थलांतराबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की, ऑपरेशन तारा हा सह्याद्रीसाठी ऐतिहासिक टप्पा आहे. सॉफ्ट रिलीजद्वारे वैज्ञानिक पुनर्स्थापना प्रक्रिया प्रभावीपणे सुरू झाली आहे. आमचे पथक या संपूर्ण प्रक्रियेकडे अत्यंत जबाबदारीने पाहत आहे. WII च्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण निरीक्षण सुरू ठेवले जाईल आणि सह्याद्रीला पुन्हा सक्षम, सुरक्षित आणि नैसर्गिक व्याघ्र अधिवास बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या निर्णयामुळे सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धनाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन तडीपारांवर कारवाई:शहरात गुन्हे शाखेकडून विविध ठिकाणी छापेमारी
गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी (दि. १३) शहरातील विविध भागात कारवाई करुन अवैधरित्या गोवंश मांस विक्री करणाऱ्याला पकडले. तसेच अन्य एका कारवाईत अवैधरित्या शस्त्रे बाळगणारा आणि दोन तडीपारांविरुध्द कारवाई केली आहे. नागपुरीगेट हद्दीतील पठाण चौक भागात गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. त्यावेळी पोलिसांनी मासांचे तुकडे व गोमांस विक्रीसाठी ठेवलेले अन्य साहित्य आढळून आले. पोलिसांनी मोहम्मद अलफैज अब्दूल शहीद (२२ वर्ष, रा. सफील गल्ली पठाण चौक) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून २५ किलो गोवंश मांस, विक्रीसाठी व कापण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ८ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध नागपुरीगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी शहरातून तडीपार असलेला लखन गणेश शेरेकर (२६, रा. हमालपुरा अमरावती) हा बेलपुरा नाल्याजवळ उभा आहे. राजापेठ येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अन्य एक तडीपार शुभम उर्फ शाम दिनेश वासनिक हा कांतानगर परिसरात हातामध्ये चाकू घेवून दहशत पसरवत आहे, अशी माहिती मिळाली होती. यावरुन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने दोन व्यक्ती एका दुचाकीने जवाहरनगर चौक येथे हातामध्ये चाकू घेवून उभे आहेत. यावरुन पथकाने घटनास्थळी जावून दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे शाखेचे पीआय संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शानात एपीआय अमोल कडू, एपीआय महेश इंगोले यांच्यासह पथकाने केलेल्या आहेत.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शरीर संपदा कमावत येथील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकली. ९० किलोवरील वजन गटात अमरावतीच्या मोहंमद मुजाहिद अन्वरने सुरेख शरीर सौष्ठवाचे प्रदर्शन करून सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत कल्याण-रत्नागिरी व कोल्हापूर संघाने प्रत्येकी दोन सुवर्ण पदके जिंकली. येथील प्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा संकुलात बुधवारी (दि. १२) सायंकाळी सहा वजनगटामध्ये शरीरसौष्ठव स्पर्धा झाली. यामध्ये तब्बल ४८ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. वीज सेवेचे धकाधकीचे दैनंदिन कामकाज सांभाळून शरीराला सुडौल व सुबद्ध आकार देत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्पर्धेत पिळदार शरीर यष्टीचे दमदार प्रदर्शन केले. सोबतच प्रेक्षकांची वाहवा मिळवली. यात कोल्हापूर संघाने २ सुवर्णपदके व २ रौप्यपदके पटाकवली. त्यानंतर कल्याण-रत्नागिरी संघाने २ सुवर्णपदके व १ रौप्यपदक मिळवले. यजमान अमरावतीच्या वाट्याला या स्पर्धेत एक सुवर्णपदक आले. शरीर सौष्ठव स्पर्धा ही प्रमुख आकर्षण ठरली. मागील अनेक दिवसांपासून सर्वच खेळाडू यासाठी तयारी करीत होते. शरीर सौष्ठव सांभाळण्यासाठी पोषक आहार, प्रथिनयुक्त पदार्थ, जिममध्ये घाम गाळणे, व्यायाम, चालणे असे परिश्रम करावे लागतात. प्रत्येकाने या बाबींकडे विशेष लक्ष देत स्पर्धेत यश मिळवण्यासाठी कंबर कसली. त्यामुळेच त्यांना हे यश मिळाले आहे. ४८ शरीर सौष्ठवपटूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी काहींच्या वाट्याला यश आले तर काहींना कोणतेही स्थान मिळाले नाही. एकूण ५ गटात या स्पर्धा रंगल्या. महावितरणच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये चुरशीचे सामने होत असल्याने अजिंक्यपदासाठी रंगत वाढली आहे. विविध सामन्यांना क्रीडा प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेच्या दोन दिवसांमध्ये टेबल टेनिसमध्ये पुरुष गटामध्ये छत्रपती संभाजीनगर-नांदेड-लात ूर संघाने मुख्यालय-भांडूप संघावर अंतिम फेरीत विजय मिळवत विजेता ठरला. तर महिला गटात अमरावती-अकोला संघ व कल्याण-रत्नागिरी संघात अंतिम लढत होईल. ब्रिज खेळामध्ये अमरावती-अकोला संघाने विजेतेपद पटकावले. कॅरम पुरुष गटामध्ये चुरशीच्या लढतीत छत्रपती संभाजीनगर-लातूर- नांदेड संघाने विजेतेपद पटकावले तर नागपूर-गोंदिया-चंद्र पूर संघाला उपविजेतेपद मिळाले. तसेच टेनिक्वाईटमध्ये महिला गटात कोल्हापूर संघ विजेता ठरला. व्हॉलिबॉल सामन्यात पुणे-बारामती संघाने व छत्रपती संभाजीनगर-नांदेड- लातूर यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. ६५ किलो - १.सुनील सावंत (कल्याण), २. शिवम चौघुले (कोल्हापूर), ७० किलो– १.गोपाल कुलकर्णी (कल्याण), २.अमित पाटील (कोल्हापूर), ७५ किलो- १.नामदेव शिंदे (नाशिक), २.राजेंद्र जाधव (रत्नागिरी), ८० किलो- १.राहुल कांबळे (कोल्हापूर), २.गोकुल सोनवणे (नाशिक), ९० किलो– १.प्रवीण गुणके (कोल्हापूर), २.कैलेश्वर सांगवे (पुणे) आणि ९० किलोवरील वजनगटात १.मोहंमद मुजाहिद अन्वर (अमरावती), २.अपुर्व शिर्के (कल्याण). आदी खेळडूंनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेमध्ये वजनगट निहाय विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे
अंजनगाव सुर्जी केंद्राद्वारे कापूस खरेदीला सुरूवात:उपसभापती सुरेश राऊत यांचे हस्ते शुभारंभ
भारतीय कपास निगमद्वारे (सीसीआय) लाभक्षेत्रातील कापूस खरेदीचा शुभारंभ गुरुवार दि. १३ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आला. प्रारंभी १४ कापूस गाड्या शेतकऱ्यांनी बाजाराच्या यार्डावर विक्रीस आणून शासनाच्या सीसीआय कापूस खरेदीचा लाभ घेतला. तालुक्यात शासकीय खरेदी प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेले प्रथम शेतकरी कैलास दुधरकर व शिवरतन धोटे (तुरखेड)यांचे बाजार समिती उपसभापती सुरेश राऊत यांचे हस्ते शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. सोबतच शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर चोरे, सुरेश आडे, विकास येवले, अंतन रोकडे, संजय काळमेघ, सागर घोगरे, चंद्रशेखर शेळके, शेख जमिल शेख रहेमान, ए. ढोक, प्रभारी सचिव अमर साबळे, सीसीआयचे ग्रेडर दिनेश पाटीदार, सीपीओ ऋषीकेश दामोळे, जिनींग प्रेसींगचे संचालक केशवप्रसाद राठी, बबलू पा.शेळके, कमलेश पटेल, पंकज मोदी, शहजाद, जमीर, गोपाल ईखार, इक्बाल, शेतकरी कर्मचारी आदी उपस्थित होते. तालुक्यात कृषी विभागाचे आकडेवारी नुसार १९ हजार हेक्टर क्षेत्रावर बागायती व कोरडवाहू कपाशीचा पेरा झाला आहे. आगामी कालखंडात कापसाचे आवक वाढणारअसल्याने, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी संपूर्ण दस्तऐवजासह नियमानुसार माल विक्रीस आणावे, शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे. शासकीय खरेदी केंद्रात कापसाला मिळाला दर शासकीय कापूस खरेदी दोन ग्रेडमध्ये ८ टक्के आर्द्रता असलेल्या कापसाला ८०१० व १२ टक्के आर्द्रता असलेल्या कापसाला ७६८९ रुपये क्विंटल इतका दर जाहीर करण्यात आला.
भारत सरकारच्या उद्योग उपक्रमांतर्गत अमरावतीमध्ये ‘आकाश मिसाईल’ (भारत डायनॅमिक्स लि.) निर्मितीचा प्रकल्प सुरू व्हावा, अशी मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे. क्रांती ज्योती बिग्रेड संघटनेचे प्रदेश समन्वयक तथा भारतीय वायूसेनेतील निवृत्त अधिकारी फ्लाइट लेफ्टनंट रत्नाकर चरडे यांनी एका निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना त्यासाठी निवेदनही देण्यात आले आहे. निवेदनकर्त्यांच्या मते उपरोक्त प्रकल्पाची घोषणा सन २०११ मध्ये करण्यात आली होती. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने त्यासाठी नागपूर महामार्गावर ५०० एकर जमीनही उपलब्ध करून दिली होती. प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते झाले होते. सन २०१५-१६ पर्यंत उत्पादन सुरू होण्याची तयारी पूर्ण झाली होती. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून कुंपण भिंत व अंतर्गत रस्तेसुद्धा बांधण्यात आले होते. तथापि, नंतर हा प्रकल्प अडगळीत टाकण्यात आला असून, त्याचे भवितव्य आजही अनिश्चित आहे. औद्योगिकदृष्ट्या अवर्षणग्रस्त असलेल्या अमरावती विभागाला या प्रकल्पाची नितांत आवश्यकता आहे, असे चरडे यांनी सांगितले. हा प्रकल्प वेळेत कार्यान्वित झाला असता, तर आज अमरावतीत शेकडो सहयोगी उद्योग निर्माण झाले असते. लाखो युवकांना रोजगार उपलब्ध झाला असता. अमरावती विभागाचा औद्योगिक आणि आर्थिक चेहरामोहराही पूर्णपणे बदलला असता. या संदर्भात फ्ला. ले. चरडे यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांनाही निवेदन दिले आहे. जिल्हाधिकारी अमरावती यांनाही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. निवेदनावेळी रत्नाकर चरडे, क्रांती ज्योती ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष ॲड. नंदेश अंबाडकर, कृषक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रभाकर वानखेडे, प्रदीप गर्गे, अनिल ठाकरे, दिवाकर खरबडे आदी मान्यवर उपस्थित होते. लोकप्रतिनिधी, सैनिकांना संघटनेच्यावतीने आवाहन सदर प्रकल्प सुरु झाल्यास युवकांना रोजगार मिळेल, बेरोजगार युवकांचे मुंबई पुणे येथील स्थलांतर थांबेल. त्यामुळेच स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, युवक वर्ग, सैनिक यांनी सदर प्रकल्प पुन्हा सुरु होण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाठिंबा द्यावा, असे आवाहनही संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमारे गोरे यांच्या माध्यमातून अनेक नेत्यांचा भाजप प्रवेश होत असताना भाऊबंदकीच्या वादातून शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांचा ठरलेला भाजप प्रवेश दोनदा रखडला आहे. शिवाजीराव हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे नेते आहेत. संपूर्ण जिल्ह्यात त्यांची मोठी ताकद असल्याने त्यांना भाजपात घेण्याचे वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू होते. दोन दिवसापूर्वी पंढरपूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी शिवाजीराव सावंत यांची चर्चाही झाली. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी सावंत यांचा भाजपात प्रवेश होईल, अशी शक्यता असताना अचानक त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे. शिवाजीराव हे माजी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. पक्षांतर्गत मतभेदाचे कारण पुढे करत शिवाजीराव सावंत यांनी एकनाथ शिंदे यांना सोडून भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. भाजप प्रवेशाची चर्चा अंतिम टप्प्यात असताना त्यांचा प्रवेश रखडल्याने त्यांचे धाकटे बंधू तानाजी सावंत यांच्या हस्तेक्षेपाममुळे प्रवेश रखडल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्यात सत्तांतर घडताना तानाजीराव सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आग्रहाचा मान ठेवल्याची चर्चा आहे. प्रतिनिधी | सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हाती घेतलेल्या भाजपच्या ‘लोटस मिशन‘ने सर्व राजकीय पक्षात अस्वस्थता आहे. परिणामी चौथ्या दिवसांनंतरही नगराध्यक्षपदासाठी नुकतेच भाजपात दाखल झालेल्या अनगरच्या राजन पाटील यांच्या स्नुषा प्राजक्ता पाटील व जिल्ह्यात नगरसेवकपदासाठी केवळ २१ अर्ज निवडणूक कार्यालयाकडे दाखल आहेत. उमेदवार जाहीर केला अन् तो भाजपच्या गळाला लागला तर पक्षाचे हसे व्हायला नको, म्हणून सगळेच सावध पवित्रा घेत आहेत. नगरसेवकपदासाठी दाखल २१ अर्जांमध्ये ७ अनगर येथून, बार्शीतून १, पंढरपूरमध्ये ६, सांगोल्यामधून ७ दाखल आहेत. बार्शी, पंढरपूर, अकलूजसह सर्वच पालिकांमधील सस्पेन्स कायम आहे. जिपचे माजी जिल्हाध्यक्ष बाबाराजे देशमुख मोहितेंची साथ सोडून भाजपात दाखल होण्याचे संकेत आहेत. ‘लोटस मिशन’चे धक्कातंत्र चालूच असून सांगोल्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. बापूसाहेब झपके यांचे नातू विश्वेश झपके भाजपात जाण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रतिनिधी | नातेपुते सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, अकलूज बाजार समितीचे संचालक, माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील मोहिते पाटील गटाचे ज्येष्ठ नेते शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात असून हा मोहिते पाटलांना धक्का मानला जात आहे. हे केवळ राजकीय पक्षांतर नसून तालुक्यात समाजकारण, राजकारण व सहकार क्षेत्रात उलथापालथ मानली जात आहे. बाबाराजे देशमुख यांचे सहकार क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांचा नातेपुते व परिसरातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आहे. विविध संस्थांमधील त्यांचा सहभाग आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी राजकारणावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. बाबाराजे देशमुख हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे निष्ठावान सहकारी व निकटवर्तीय होते. मोहिते-पाटील गटाच्या अनेक वर्षांच्या राजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग होता. माळशिरसच्या राजकारणात गळती लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बाबाराजे देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यावर व कार्यकर्त्यांची चर्चा करुन निर्णय घेणार, असे सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी बैठक घेतली. नातेपुते शहरासह परिसर विकासासाठी निधी आणून या भागाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासोबत काम करणार असल्याचे बाबाराजे देशमुख यांनी जाहीर केले. Share with facebook Share with facebook पालकमंत्री गोरे यांच्यासह शिंदे बंधू व सावंतांची चर्चा खरे तर दोन दिवसांपूर्वी पंढरपूरमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पहिल्यांदा शिवाजीराव सावंत यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर भाजपात प्रवेश केलेले माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे यांच्याशी वेगळी चर्चा करत पुन्हा तिघांची एकत्रित चर्चा झाली होती. यामुळे शिवाजीराव सावंत हे भाजपात जाणार हे निश्चित ठरले होते, परंतु पुन्हा ब्रेक लागला आहे. विश्वेश झपकेही लागतील भाजपच्या गळाला सांगोला| नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नेते कै. बापूसाहेब झपके यांचे नातू विश्वेश झपके यांची तयारी चालू आहे. झपके कुटुंबाला राजकीय वारसा असल्याने आघाडी अथवा भाजपसह मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याच्या तयारीला ते लागले आहेत. भाजपने सांगोल्यातून अजून उमेदवारी जाहीर केली नाही. यासंदर्भात बोलताना विश्वेश झपके म्हणाले की, मी राजकारणासाठी नव्हे तर जनसेवेसाठी निवडणूक रिंगणात उभा राहणार आहे. अपुरी विकासकामे पूर्ण करण्यासाठी भाजप काय कोणत्याही पक्षाने संधी दिली तर उमेदवारीसाठी इच्छुक आहे. अन्यथा स्वतंत्र पॅनल उभे करू.
मुंबईतील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी नंदनवन निवासस्थानी महत्वाची बैठक बोलावली. या बैठकीला मुंबईतील आमदार, खासदार तसेच महत्त्वाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक जवळ येत असताना, मागील दोन-अडीच वर्षात झालेल्या कामांचा आढावा घेणे आणि पक्षाची संघटन रचना मजबूत करणे या दोन्ही गोष्टींवर शिंदे यांनी भर दिला. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, शिवसेनेसोबत राहून त्यांच्यावर विश्वास ठेवत आलेल्या नगरसेवकांना पुन्हा निवडून आणणे ही जबाबदारी प्रत्येक आमदार व खासदाराने स्वीकारावी. बैठकीदरम्यान शिंदेंनी सांगितले की, 2022 पासून त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत अनेक विकासात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत हीच कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. विशेषतः क्लस्टर डेव्हलपमेंट, कोस्टल रोड, मेट्रो प्रकल्प, गृहनिर्माण विभागाचे पुनर्विकास प्रकल्प अशा योजनांमुळे मुंबईच्या विकासाला मोठा वेग आला असून याचे माहितीपत्रक घरोघरी पोहोचवण्याचे आदेश त्यांनी दिले. आपण जे काम केले आहे त्यावरच निवडणूक लढवा, युतीची चिंता करू नका, असेही शिंदे कार्यकर्त्यांना म्हणाले. जुन्या नगरसेवकांना पुन्हा प्राधान्य देणे गरजेचे शिंदेंनी मुंबईतील घरकुलाच्या समस्येवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले. मुंबईत स्वतःचे घर मिळावे ही प्रत्येक मुंबईकराची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात धोरणात्मक कामे सुरू आहेत, असे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. मतदानाच्या वेळी घरकुल, पुनर्विकास, क्लस्टर प्रकल्प, कोस्टल रोड आणि मेट्रोसारख्या विषयांवर जनतेशी संवाद साधण्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच, जो विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वासोबत उभा राहिला त्या नगरसेवकांना पुन्हा प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे शिंदेंनी ठामपणे सांगितले. नगरसेवकांना युतीत योग्य जागा मिळवून देणे महत्त्वाचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा त्याग करून शिंदे गटासोबत आलेल्या नगरसेवकांना युतीत योग्य जागा मिळवून देणे आणि त्या सर्वांना जिंकवून आणणे ही जबाबदारी पूर्णपणे आमदार आणि खासदारांच्या खांद्यावर दिली आहे. यामुळे या निवडणुकीत खासदार-आमदारांना प्रभागनिहाय रणनीती आखावी लागणार आहे. निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची युती असल्याने जागावाटप कसे होणार यावर अजूनही चित्र स्पष्ट नाही. मात्र शिंदेंनी स्पष्ट केले की, युतीचे तांत्रिक निर्णय वरिष्ठ नेते घेतील आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या क्षमतेनुसार काम करत राहावे. प्रत्यक्ष निवडणूक मोहिमेला सुरुवात मुंबईतील महापालिका निवडणूक गेली अनेक वर्षे रखडलेली असताना, यंदा सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. शिंदे गटाच्या या बैठकीनंतर निवडणुकीची गती आणखी वाढेल असे मानले जाते. शिंदेंच्या निर्देशांनुसार, विभागनिहाय विकासकामांचा अहवाल तयार करून तो जनतेपर्यंत पोहोचवला जाणार आहे. यामुळे निवडणूक प्रचारात विकासाचा मुद्दा अग्रस्थानी राहणार आहे. जागावाटपाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, शिंदे यांनी दिलेल्या आदेशामुळे शिवसेना गटाने आता प्रत्यक्ष निवडणूक मोहिमेला सुरुवात केली आहे.
कुर्डुवाडी माढा तालुक्यातील व्होळे - वरवडे हा चार किलोमीटरचा रस्ता तीन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला. या रस्त्यासाठी दोन कोटी २ लाख ८३ हजार रुपये खर्च करुनही रस्ता तीन महिन्यातच खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावर तीन किलोमीटरचे अंतरात तब्बल ७०० खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वार जीव मुठीत घेऊन गाडी चालवत आहेत. निकृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदार व अभियंत्यांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. व्होळे -वरवडे रस्ता २०२३ मध्ये करायचा होता. परंतु ठेकेदार मे. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनी घाटणे यांनी सवडीने जुलै २०२५ मध्ये ओबडधोबड रस्ता बनवला. चार किलोमीटरचा रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे केला नाही. तसेच रस्ता करताना सिमेंट, प्लास्टिक, कागद, स्टिल वापरण्याचे अंदाजपत्रकात नमूद असूनही त्याप्रमाणे नमूद वस्तूंचा वापर केला नाही. तसेच शाखा अभियंत्यांनी कामावर व्यवस्थित देखरेख ठेवली नाही. निकृष्ट दर्जाचे काम नागरिकांच्या माथी मारण्याचा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्याचा आरोप स्थानिक नागरिक व वाहनचालक करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (कुर्डुवाडी) अभियंत्यांनी ठेकेदाराच्या कामावर दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असल्याचे तक्रारदाराने निवेदनात नमूद केले आहे. तसेच रस्ता करण्यासाठी ऑइलमिश्रित डांबर वापरल्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. सदरील रस्त्याच्या कामाचे थर्ड पार्टी सर्वेक्षण करून पुन्हा रस्ता करावा. ठेकेदार आणि सा. बा. अभियंत्यांची चौकशी करण्याची मागणी कुंदन वजाळे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्र भोसले यांच्याकडे निवेदनातून केली आहे. तसेच ३ नोव्हेंबरला कुंदन वजाळे यांनी कुर्डूवाडी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण केले होते. तरीही कार्यवाही झालेली नाही. ठेकेदाराकडून रस्ता दुरुस्त करून घेणार ^प्रमुख जिल्हा मार्ग हे १५ टन वजन वाहतूक क्षमतेचे असतात. परंतु या रस्त्यावरून ३० ते ४० टनाच्या मुरूम वाहतुकीचे टिप्पर गेले आहेत. ठेकेदाराला पुन्हा रस्ता करण्यासाठी नोटीस काढली आहे. रस्ता दुरुस्त करून घेणार आहे. अभिजित मुळे, शाखा अभियंता रस्ता तत्काळ दुरुस्त करून देणार ^व्होळे-वरवडे रस्त्याचे काम उन्हाळ्यात सुरू होते. परंतु अवकाळी पावसात काम रखडले. तसेच ओल्या कामातच मुरमाने भरलेले मोठे टिप्पर गेले आहेत. त्यामुळे रस्ता खराब झाला आहे. हा रस्ता तत्काळ दुरुस्त करुन देणार आहे. संजय पाटील घाटणेकर, ठेकेदार असे मोजले चार किमी रोडवरील खड्डे व्होळे ते वरवडे दरम्यानच्या चार किलोमीटर रस्त्यावरील खड्डे मोजण्यासाठी आमच्या प्रतिनिधीने शनिवारी (दि.८) या रोडवरुन दुचाकीने प्रवास करण्यात आला. तसेच थोड्या - थोड्या अंतरावर थांबून या रस्त्यावरील मोठे खड्डे मोजले. त्यानुसार या रस्त्यावर एकूण ७०० खड्डे असल्याचे आढळले आहेत. ठेकेदाराला कायमच काळ्या यादीत टाका ^निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या मे. पाटील कन्स्ट्रक्शन घाटणे यांच्या कामाची चौकशी करत त्यांना शासनाने काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कुंदन वाजळे, तक्रारदार.
रिटेवाडी उपसा सिंचन योजने संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक घेतली. वॉटर अॅण्ड पॉवर कन्सल्टिंग सर्व्हिसेसच्या सर्वे नुसार संबंधित अधिकाऱ्यांनी अहवाल देत सकारात्मक पावले उचलण्याचे आदेश दिले असून सरकार या योजनेबाबत सकारात्मक असून ही योजना मार्गी लागेल असे भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी सांगितले. आज मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दालनात बुधवारी ही बैठक झाली. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वजण आग्रही होते. या योजनेचा फायदा तालुक्यातील चाळीस गावांना होणार आहे. कुकडीचे पाणी करमाळा तालुक्याला पूर्ण क्षमतेने मिळण्यासाठी टेल टू हेड या क्रमाने पाणी दिले जाइल. त्याच बरोबर अस्तरीकरणाचे काम देखील केले जाईल, असे विखे पाटील यांनी सांगितल्याचे बागल यांनी सांगितले. माजी मंत्री स्व. दिगंबरराव बागल यांनी आपल्याकडे आग्रह केला होता. तत्कालीन मंत्री स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी मंजुरीचे आदेश दिले. त्यामुळेच सदरील योजना मार्गी लागली असा आवर्जून उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत करुन स्मरण करुन दिले.
मुलभूत बदल घडवून आणण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण आणले. परंतू, आजही अनेक शाळांत विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधा मिळत नाहीत. अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा बद्दी शाळेतील विद्यार्थ्यांना अंगणवाडी सुटेपर्यंत झाडाखाली बसावे लागते. मागील दोन वर्षात जिल्ह्यात ६४ खोल्या धोकादायक असल्याचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर झाले. परंतू, या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून अवघ्या ९ खोल्या पाडण्यास मंजुरी मिळाली. अजूनही २२ शाळांमधील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. शिक्षण खात्याच्या प्रशासकीय कारभाराच्या दिरंगाई विरोधात नागरिकांमध्ये संताप आहे. किमान ४० वर्षे जुन्या शाळा खोल्या पाडल्या जातात. पण सारोळा बद्दी येथील शाळेचे बांधकाम २००४ मध्ये केले आहे. २० वर्षातच इमारतीला भेगा पडल्या, इमारत मोडकळीस आली आहे. पहिली ते सातवी पर्यंतचे ९५ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. इमारत धोकादायक असल्याने पहिली व तिसरीच्या मुलांना अंगणवाडी सुटेपर्यंत झाडाखाली बसावे लागते. त्यानंतर एकाच खोलीत हे दोन्ही वर्ग भरवले जातात. तर दुसरी व चौथीला झाडाखाली बसून शिक्षण घ्यावे लागते,अशी विदारक अवस्था आहे. शिक्षण विभागाकडून दरवर्षी धोकादायक वर्गखोल्यांमध्ये मुलांना न बसवता पर्यायी खोल्यांची व्यवस्था करण्याचे पत्र दिले जाते. परंतू, पर्यायी खोली किंवा जुनी खोली पाडण्याच्या प्रक्रियेला गती दिली जात नाही. जेथे खोल्या नाहीत, तेथे आवश्यकतेनुसार नवीन खोल्या मिळाल्या नाहीत. या खोल्या पाडण्यास दिली मंजुरी जिल्हाभरात २०२३ ते आजपर्यंत ९ खोल्या पाडण्यास मंजुरी दिली. त्यात अकोले तालुक्यातील निंब्रळ शाळेतील ४ खोल्या, नेवासे तालुक्यात शहापूर येथील ४ व अहिल्यानगर तालुक्यातील खोसपुरी येथील १ या खोल्या पाडण्यास मंजुरी आहे. उर्वरित ५४ प्रस्ताव त्रुटींमुळे माघारी पाठवण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. पाडण्याची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. अहवाल देण्याचे आदेश ^ आम्ही सारोळा बद्दीच्या शाळेसंदर्भात गटशिक्षणाधिकारी व उपअभियंत्यांना पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्याध्यापकांनाही प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. शाळा निर्लेखन करताना शाळा केव्हा बांधली, धोकादायक ठरते किंवा नाही हे पाहिले जाते. तसेच निर्लेखन मंजुरीच्या प्रक्रियेला वेळ होत असल्याने, या प्रक्रियेला गती देऊ. - विजय मुळीक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. पत्राकडे दुर्लक्ष सारोळा बद्दी येथील शाळेतील भिंतीला तडे गेले. विद्यार्थी सुरक्षेसाठी खोल्या दुरूस्तीकडे मुख्याध्यापक गजानन जाधव यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांचे लक्ष जुलैमध्ये पत्राद्वारे वेधले होते. परंतू, ४ महिने उलटूनही दुरूस्ती झाली नाही. त्यामुळे विद्यार्थी झाडाखाली शिक्षण घेत आहेत.
गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नेहरू मार्केट संकुलाच्या नव्याने उभारणीसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. मात्र, आधी जागेच्या मोजणीचा वाद, आता जुन्या गाळेधारकांनी तळ मजल्यावरच गाळे पाहिजेत, अशी भूमिका घेतल्याने व आयुक्तांनी त्याला स्पष्ट नकार दिल्याने काम रखडले आहे. याबाबत गुरुवारी मनपात झालेली बैठकही फिस्कटली. नेहरू मार्केच्या प्रस्तावित जागेची मोजणी होऊन खुणा करण्यात आल्या आहेत. या जागेला संरक्षक भिंत उभारून उभारणी सुरू केली जाणार आहे. त्यासाठी ठेकेदाराची नियुक्तीही करण्यात आली आहे. मनपाने जुने गाळेधारक व ओटेधारक भाजी विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. मात्र, गाळेधारकांनी तळमजल्यावर प्रस्तावित असलेले गाळेच द्यावेत, अशी मागणी केली आहे. बैठकीत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही मागणी फेटाळून लावली. संकुलात कुठे गाळे द्यायचे, हा निर्णय महापालिकेचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजी विक्रेता संघटनेचे संजय झिंजे यांनी आयुक्तांच्या या भूमिकेला विरोध केला. त्यामुळे ही बैठक फिस्कटली. जोपर्यंत निर्णय होत नाही, तो पर्यंत बांधकाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. आयुक्त डांगे यांनीही ठाम भूमिका घेत तळमजल्यावर गाळे मिळणार नाहीत, असे स्पष्ट केले. रस्त्यावर भाजी खरेदी करणारा ग्राहक दुसऱ्या मजल्यावर जाणार नाही. संकुलात ६१ गाळे, ७० ओटे; चारचाकी, दुचाकीसाठी पार्किंग नव्याने होणाऱ्या संकुलात तळघर, तळमजला व तीन मजले अशी इमारत असणार आहे. यात तळघरात व तळ मजल्यावर १२ चारचाकी व ७० दुचाकींसाठी पार्किंग सुविधा आहे. तळ मजल्यावर १० गाळे असतील. तर प्रत्येक मजल्यावर १७ याप्रमाणे तीन मजल्यांवर ५१ गाळे असणार आहेत. तसेच, तळ मजल्यावर भाजी विक्रेत्यांसाठी ७० ओटे असणार आहेत.
केडगावमध्ये विकासाबरोबरच क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम सातपुते परिवाराच्या वतीने सातत्याने होत आहे. समाजात एकता, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे साधन म्हणजे खेळ. आज या मैदानावर तरुणांचा उत्साह पाहून आनंद होत आहे. पुढील काळात या भागातील खेळाडूंना चांगल्या सोयी-सुविधा निर्माण करुन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. स्पर्धा म्हणजे जिंकणे-हरणे नव्हे, तर आपल्या क्षमतेचा शोध घेण्याची संधी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी केले. केडगाव, नगर-नेप्ती रोड येथील विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित फ्लडलाईट्स प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. अकरा दिवस रात्री रंगलेल्या या स्पर्धेत शहरासह नगर तालुक्यातील विविध संघांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान स्टेशन स्टार्स संघाने पटकावला, तर एकनाथ नगर संघाने द्वितीय, आणि वांबोरी संघाने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या संघांना अनुक्रमे ३१ हजार, २१ हजार, आणि ११ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. कोतकर यांनी क्रिकेटचा उत्साह पाहून ११ हजारांचे बक्षीस जाहीर केले. तसेच अनेकांनी वैयक्तिक बक्षिसापोटी दिलेल्या रकमेतून तब्बल ५१ हजारांचे बक्षीस विजेत्या संघाला देण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण ज्येष्ठ नेते भानुदास एकनाथ कोतकर यांच्या हस्ते झाले. सागर सातपुते यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा पार पडली. या वेळी गणेश सातपुते, जयदत्त खाकाळ, शशिकांत आठरे, नीलेश सातपुते, अशोक कराळे, भूषण गुंड, सचिन सातपुते, संतोष कोतकर, मयूर जगदाळे आदींसह केडगाव ग्रामस्थ उपस्थित होते. सागर सातपुते म्हणाले, ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या फ्लडलाईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी उत्कृष्ट खेळ करून ग्रामीण क्रिकेटचा दर्जा उंचावला आहे. यामधून अनेक तरुणांना आपल्या खेळगुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. येत्या काळात अशाच स्पर्धा मोठ्या प्रमाणात घेऊन, तरुणांच्या खेळाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भगवान विश्वकर्मा यांचे सुंदर मंदिर अहिल्यानगर शहरात होत आहे. विश्वकर्मा भगवान हे सर्व समाजाचे आराध्य दैवत आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्याने विश्वकर्मा मंदिराची उभारणी झाली आहे. थोड्याच दिवसात मंदिराचे शिखराचे काम पूर्ण होणार आहे.यामुळे विश्वकर्मा मंदिर पूर्णत्वास येत असल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असे प्रतिपादन देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले. देवगड देवस्थानचे श्री विश्वकर्मा मंदिर शिखराचे काम गुरुवर्य हभप भास्करगिरी महाराज(श्रीक्षेत्र देवगड संस्थान) यांच्या हस्ते शीला पूजन करुन विटेचे पूजन करुन कामाला सुरुवात केली. याप्रसंगी श्री विश्वकर्मा त्वष्टा पांचाळ समाजाचे सर्व कार्यकर्ते, सदगुरु किसनगिरी बाबा भक्त मंडळ उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप व विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर येथे श्री विश्वकर्मा मंदिर सभागृहाचे बांधकाम झाले आहे.
तालुक्यातील जागृत असलेल्या श्री क्षेत्र बहिरवाडी येथे पुष्पवृष्टी करून श्री कालभैरवनाथांचा जन्मोत्सव बुधवारी रात्री १२ वाजता साजरा करण्यात आला. देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे श्री काल भैरवनाथांच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तन झाले.यावेळी नाथांच्या नावाने चांगभलच्या गजराने बहिरवाडी क्षेत्र दुमदुमले होते. महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज म्हणाले, बहिरवाडी हे श्री कालभैरवनाथांचे जागृत देवस्थान आहे. श्री कालभैरवनाथांचा पदस्पर्श येथे झाला आहे.श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांनी देखील येथे श्री कालभैरवनाथांची उपासना व सेवा केली आहे. देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली या क्षेत्राचा विकास सुरू आहे, भगवंताला भक्तांच्या उद्धारासाठी याठिकाणी यावे लागले म्हणून श्री कालभैरवनाथांची बहिरवाडी हे क्षेत्र जागृत असे स्थान आहे. नेवाशाची भूमी ही भगवंतांच्या अवताराने व साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून श्री कालभैरवनाथांच्या उपासनेने संकटे दूर होतात,संकटाच्या निवारणासाठी व आपल्या रक्षणासाठी श्री कालभैरवनाथांची नित्यनेमाने उपासना करा असे आवाहन महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी केले. बुधवारी रात्री १२ वाजता झालेल्या श्री कालभैरवनाथांच्या जन्मोत्सव प्रसंगी कालभैरवनाथ महाराज की जय नाथांच्या नावानं चांगभलअसा जयघोष व पुष्पवृष्टी करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री कालभैरवनाथांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी पुष्पांनी सजवण्यात आलेल्या पाळण्यात श्री कालभैरवनाथांची चांदीची मूर्ती ठेवण्यात आली होती.महंत स्वामी श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते विधिवत पूजन करून पाळण्याची दोरी ओढण्यात आली. श्री कालभैरवनाथ मंदिर देवस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळी व ग्रामस्थांच्या वतीने स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे संतपूजन करण्यात आले. जन्मोत्सव प्रसंगी रामनाथ महाराज पवार, विजय महाराज पवार,लक्ष्मण महाराज नांगरे, गिरीजीनाथ महाराज जाधव,बाबासाहेब महाराज सातपुते, अमोल महाराज बोडखे, शुभम महाराज बनकर,गणेश महाराज तनपुरे रोहित महाराज पटारे,अतुल महाराज पटारे,नगर भक्त मंडळाचे सेवेकरी राहुल ठोंबरे आदी उपस्थित होते. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिर प्रांगणात हजारो दीप लावून दीपोत्सव महिलांनी श्री कालभैरवनाथांच्या जन्माचा पाळणा म्हटला. जन्मोत्सवानिमित्त मंदिर प्रांगणात हजारो दीप लावून दीपोत्सव करण्यात आला, तर जन्मोत्सव प्रसंगी बहिरवाडी येथील प्रवरामाईच्या मध्य धारेवर असलेल्या श्री कालभैरवनाथांच्या मूर्तीचे नेवासे येथील श्री मध्यमेश्वर मंदिर देवस्थानचे महंत श्री ऋषिनाथजी महाराज यांनी नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार पूजन केले. देवस्थानच्या सभामंडपात झालेल्या जन्मोत्सव कार्यक्रम प्रसंगी उपस्थित हजारो महिला व पुरुष भाविकांनी श्री कालभैरवनाथांचे दर्शन घेतले.
विधानसभा निवडणुकीत पारनेर - नगर मतदारसंघात किमान ५० हजार मतांची चोरी झाली असल्याचा आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला. मतांच्या हेराफेरीचे ठोस पुरावे माझ्याकडे आहे. ते लवकरच जनतेसमोर सादर करणार असल्याचे ते म्हणाले. बुधवारी (१२ नोव्हेंबर ) जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांच्या उपस्थितीत पारनेर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ.विद्या कावरे यांचा पदग्रहण समारंभ पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात खा.लंके बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती किसनराव रासकर हे होते. बाजार समितीचे उपसभापती किसनराव सुपेकर,कारभारी पोटघन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जून भालेकर,उपनगराध्यक्षा जायदा शेख, संध्या ठुबे, किशोर यादव,दादा शिंदे, चंद्रभान ठुबे, संदीप रोहोकले,दादा दळवी,अरूण पवार, डॉ.आबासाहेब खोडदे,चंद्रकांत कावरे,धोंडीभाऊ ठाणगे,वैभव गायकवाड, ॲड. पी. आर. कावरे, डॉ. बाळासाहेब कावरे,बाळासाहेब नगरे,डॉ.सचिन औटी,सुभाष शिंदे, राजू शेख, बाजीराव कारखिले, सतीश भालेकर,सचिन गवारे उपस्थित होते. खासदार लंके म्हणाले, विधानसभेच्या निकालाने आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांनी हुरळून जाऊ नये. मतदार याद्यांमधील फेरफार, ईव्हीएम घोटाळ्याच्या माध्यमातून काहींचा विजय झाला असला तरी सत्य किती दिवस दडवणार ? जनतेसमोर हे सर्व उघडकीस येणारच आहे. नगराध्यक्षा डॉ. विद्या कावरे यांनी पारनेर शहराला परिवारासारखे जपावे. दररोज नगरपंचायतमध्ये या, लोकांच्या समस्या ऐका. कामामुळे पदाची प्रतिष्ठा वाढते. पद जनतेसाठी असते, स्वतःसाठी नाही, असे खा.लंके म्हणाले. अखेर विजय निष्ठावंतांचाच झाला.. नगराध्यक्ष निवडणुकीदरम्यान घोडेबा जार करण्याचा प्रयत्न झाला. महायुतीकडून नगरसेवकांना अमिष दाखवली, फोन गेले, आर्थिक दबाव टाकला गेला. मात्र आमचे नगरसेवक विकले गेले नाहीत. त्यांनी निष्ठा पाळली. त्यामुळेच आज डॉ. विद्या कावरे नगराध्यक्षपदी बसल्या आहेत. फटाके विरोधकांनी आणले, हेलिपॅड तयार केले, पण विजय मात्र निष्ठावंतांच झाला, असा टोला खासदार लंके यांनी लगावला.
शिंदे, पवार यांनी मुस्लिम समाजाला गृहीत धरू नये:मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझर काझी यांचा इशारा
जामखेड नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण तापले आहे. राजकीय समीकरणांत नवा पेच निर्माण झाला आहे. नगराध्यक्षपदासाठी मुस्लिम समाजाने स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. सभापती प्रा. राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी आमचा समाज गृहीत धरू नये, असा इशारा मुस्लिम पंच कमिटीचे अध्यक्ष अझर काझी यांनी दिला आहे. जामखेडमध्ये मुस्लिम पंच कमिटी व मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. काझी म्हणाले, आजपर्यंत विविध पक्षांनी आमच्या मतांचा वापर केला, पण आमच्या समाजाला कधीही प्रतिनिधित्व दिले नाही. आता आम्ही गप्प बसणार नाही. नगराध्यक्षपदासाठी आमचा स्वतंत्र उमेदवार देणार आहोत. काझी म्हणाले, शेजारील आष्टी व पाटोदा तालुक्यात मुस्लिम समाजाला उमेदवारी मिळते, मग जामखेडमध्ये का नाही? आमच्या समाजाची साडेसात हजार मते असून इतर अल्पसंख्याक समाज आमच्या पाठीशी आहे. आम्ही एकमुखी उमेदवार देऊन विजय मिळवू.”यावेळी आम आदमी पार्टीच्या उमेदवाराबाबत बोलताना ते म्हणाले, आम आदमी पार्टीचा उमेदवार म्हणजे भाजपाची बी टीम आहे. हा उमेदवार भाजपनेच उभा केला आहे. त्यांच्यावर समाजाचा विश्वास राहणार नाही.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान बाल विवाह मुक्त जळगाव जिल्हा करण्यासाठी जस्ट राईट फॉर चिल्ड्रन अंतर्गत आधार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने ग्रुप ग्रामपंचायत चिमणपुरी पिंपळे येथील विद्यार्थी, शिक्षक कॅण्डल मार्च व प्रभात फेरी काढून १०० दिवसीय जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यात माता अन् बालमृत्यू टाळण्याचा व बालविवाहमुक्तीचा संदेश देत जनजागृती करण्यात आली. सर्वांचा एकच विचार, बालविवाह मुक्त परिवार. बालविवाह होत असल्यास त्याची माहिती जाणकार व्यक्तीने तातडीने शासन यंत्रणेच्या निदर्शनास आणून द्यावी, त्यासाठी त्याचे नाव गोपनीय ठेवले जात असल्याचे सांगत आता सर्वांचा एकच विचार, बालविवाह मुक्त परिवार राखण्याचा संदेश कॅन्डल मार्च व प्रभात फेरीतुन देण्यात आला. बालविवाह होत असल्यास त्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक घटकावर गुन्हा दाखल करत दंडही आकारण्यात येत असल्याचेही पटवून देण्यात आले. आयोजित केलेल्या या मार्चमध्ये शेकडो विद्यार्ही हातात मेणबत्त्या घेऊन सहभागी झाले होते. शांततापूर्ण वातावरणात 'बालविवाह थांबवा' आणि 'बालमृत्यू टाळा' असे फलक घेऊन हा मार्च मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आला. यावेळी ग्रामस्थही उपस्थित होते. बालविवाहमुक्त भारताची शपथ समाजात आज ४० टक्के बालविवाह होत आहे. बालविवाहामुळे माता मृत्यू, बालमृत्यू, गर्भपात अशा समाजाच्या काही समस्या निर्माण होतात. परिणामी कमकुवत पिढीसारखी संकटेही राष्ट्रासमोर उभी राहतात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी बालविवाह थांबवण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले. पिंपळे येथील कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयात आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे बालविवाह मुक्त भारताची शपथ घेण्यात आली. तसेच मुंबईच्या सलाम फाउंडेशनतर्फे तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आली. शाळेमार्फत गावात कॅन्डल मार्च व प्रभात फेरीत काढण्यात आली.
स्नेह मेळाव्यामध्ये सोनेरी आठवणींना दिला उजाळा:वरखेडी येथील बडोला विद्यालयात स्नेहसंमेलन
येथील श्रीमती पी. डी. बडोला माध्यमिक विद्यालयात २००५-२००६ या शैक्षणिक वर्षातील मित्र-मैत्रिणी २० वर्षांनंतर स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने नुकतेच एकत्र आले. एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. अध्यक्षस्थानी शिक्षक एस. आर. माने हे होते. यावेळी संस्थेचे आधारस्तंभ आचार्य गजाननराव गरुड विद्येचे दैवत सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले . यावेळी विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त करताना रवींद्र आव्हाड, नम्रता पाटील, सचिन पाटील यांनी गुरुजनांचे महात्मे विशद करून भेटला विठ्ठल हे अतिशय सुरेख गाणे सादर करून गुरुजनांचे महत्त्व पटवून दिले. प्रमुख उपस्थितांमध्ये मुख्याध्यापिका पी.एस. पाटील, कैलास पाटील उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित आपल्या गुरुजनांचे आभार मानत गौरव केला. व आशीर्वाद घेतले. तसेच शिक्षकांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत शालेय जीवनातील सोनेरी आठवणी सांगितल्या. शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.माजी विद्यार्थी प्रफुल्ल गायकवाड, प्रविण भटकर, संकेत तिवारी, गणेश पाटील, वाल्मिक जगताप, राखी तिवारी, रेखा जगताप यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रवींद्र आव्हाड, नम्रता पाटील, सचिन पाटील यांनी केले.
तालुक्यातील कुंभारी बु. येथील विद्यार्थ्यांसाठी सायंकाळी तोंडापूर येथे ५ वाजता जामनेर आगारातून बस सेवा सुरु झाल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत चालक व वाहकाचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. गावात बसचे आगमण झाल्यानंतर ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. कुंभारी बु. येथील विद्यार्थी यांना तोंडापूर येथून सायंकाळी घरी जाण्यासाठी बस नसल्यामुळे प्रभाकर साळवे यांनी ऑगस्ट महिन्यात निवेदन देऊन बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. तरी हि बससेवा सुरू न झाल्याने ऑक्टोबर महिन्यात ग्रामस्थ व प्रभाकर साळवे विद्यार्थी यांनी कुंभारी बु. ते तोंडापूर पायदळ जावून व रस्त्यात बस आडवत आंदोलन केले होते. त्याचाच परिणाम जामनेर आगाराच्या वतीने जामनेर ते कुंभारी बु. दरम्यान सायंकाळी ५ वाजता तोंडापूरला पोहचणारी बससेवा सुरू करण्यात आली. बस सुरु झाल्याने सायंकाळी कुंभारी बस स्थानकावर बस आल्यानंतर चालक वैभव पाटील व वाहक किसन नारोटे यांचा शाल व श्रीफळ देऊन माजी सरपंच सुरतसिंग जोशी, जितेंद्र पाटील, प्रभाकर साळवे, राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा अध्यक्ष हिरामण जोशी, संभाजी जोशी याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या 30 लाखांच्या सभामंडपाचे लोकार्पण:गिरीधरनगरात हरिनामाच्या गजरात सोहळा
सिडको येथील गिरीधरनगर परिसरात ३० लाख रुपयांच्या खर्चातून बांधण्यात आलेल्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिर सभामंडपाचे लोकार्पण आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते झाले. विठ्ठल-रुख्मिणीच्या जयघोषात आणि हरिनाम संकीर्तनाच्या गजरात कार्यक्रमास प्रारंभ झाला. नव्याने सभामंडपामुळे स्थानिक नागरिकांना धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांसाठी एक सुसज्ज व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. विविध सण, उत्सव, कीर्तन, भजन, तसेच समाजोपयोगी कार्यक्रम यासाठी आता या मंडपाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे हा उपक्रम नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सोहळ्यात परिसरातील नागरिक, महिला मंडळे, युवा कार्यकर्ते आणि भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. आमदार सीमा हिरे यांनी मनोगत व्यक्त केले. गिरिधरनगर धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेला परिसर आहे. येथील नागरिकांची भावना लक्षात घेऊन विठ्ठल-रुख्मिणी मंदिर सभामंडप उभारण्यात आला आहे. हा मंडप फक्त धार्मिकच नव्हे, तर सामाजिक एकतेचे प्रतीक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. रेशनकार्ड शिबिरातून प्राप्त झालेले नवीन रेशन कार्ड नागरिकांना वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. यावेळी माजी नगरसेवक भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड, संजय नवले, सोनाली नवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विठ्ठल-रुख्मिणी मंदिराच्या सभापंडप लोकार्पणप्रसंगी मान्यवर.
मनमाडला ऑफलाइन अर्ज परवानगीची मागणी:सर्व्हर डाऊनमुळे उमेदवारी अर्ज भरण्यास उशीर
नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. चार दिवस झाले असले तरी नगरपालिकेकडे गुरूवार पर्यंत एकही उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल झालेला नाही. ऑनलाइन अर्ज करताना सर्व्हर डाऊन होत असल्याने ऑफलाइन अर्ज करण्याची परवाणगी द्यावी, अशी मागणी इच्छूक उमेदवारांकडून होत आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी थेट नगराध्यक्षांसह प्रभागातील नगरसेवकांचा ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरण्याची क्लिष्ट प्रक्रिया, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी होणारी धावपळ, सायबर कॅफेतून अर्ज भरण्यासाठी लागणारा वेळ यामुळे अनेकांच्या मनात आपला अर्ज वेळेत दाखल होतो की नाही, याबाबत धाकधूक सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून अर्ज दाखल करतांना अनेकदा सर्व्हर डाऊन झाले. आज अखेर सकाळपासून सलग चार तास सायबर कॅफेमध्ये बसल्यानंतर अनेकदा अडथळे आल्यानंतर तीन तासानंतर फॉर्म अपलोड झाला. - आनंद बोथरा, उमेदवार
मेंढरे शिवारात घरफोडी:तीन लाखांचा ऐवज लंपास
तालुक्यातील मेंढरे शिवारामध्ये भरदिवसा शेतवस्तीवरील घराचा दरवाजा तोडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह ३ लाख ५६ हजाराचा ऐवज लंपास केला. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार मेंढी येथील आदिनाथ तुळशीराम औताडे (३०) हे कुटुंबासह त्यांच्या गट नं. १८ मधील शेतवस्तीवर राहत आहेत. बुधवार, १२ रोजी दुपारी सर्व कुटुंबीय घरामागील डाळिंबाच्या बागेत काम करीत असताना दोन अनोळखी चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाट उघडून त्यातील तीन तोळे सोन्या-चांदीचे दागिने, किंमत ३,५१,००० आणि रोख ५ हजार असा एकूण ३ लाख ५६ हजारांचा ऐवज लंपास करून पोबारा केला. या वेळी शेजारी राहणाऱ्यांनी दोन्ही चोरांना शाइन मोटारसायकलवरून जाताना पाहिल्यानंतर मूळ मालकाला त्याची कल्पना दिल्यानंतर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पालवे व पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिल्लोड तालुक्यात टाकळी जिवरगसह कायगाव परिसरात सततच्या पावसामुळे कपाशी पिकाचे नुकसान झाले. अपेक्षित दर न मिळाल्याने कपाशी पिकाचा खर्चही निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण भिस्त आता तूर पिकावर आहे. मात्र तुरीवरही अळी व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे ओल्या दुष्काळात शेतकऱ्यांच्या खिशावर जास्तीचा आर्थिक भार पडत आहे. परतीचा पाऊस लांबल्याने कापूस वेचणीला अडचणी येत आहेत. परिणामी शेताची मशागत करण्यात वेळ गेल्याने रब्बी पेरणी उशिराने होणार आहे. यामुळे रब्बी पिकांचे गणित कोलमडण्याची शक्यता आहे. यंदा कपाशीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता त्यांची एकट्या तुरीच्या पिकावर आशा आहे. परतीच्या पावसामुळे शेतजमीन ओली झाल्याने रब्बी हंगामातील पेरणीसाठी कालावधी वाढला आहे. शेतकऱ्यांनी तण काढण्यासाठी तणनाशक फवारणी केली आहे. तर काही ट्रॅक्टरच्या साह्याने रोटावेटर करत आहेत. रब्बी पेरणीचा कालावधी या महिन्यात शेवटच्या टप्प्यात असल्याने लागवड क्षेत्र अजून तयार झाले नाही, मात्र हरभरा आणि गहू पिकांचे क्षेत्र यंदा वाढण्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तवला जात आहे. यंदा जलसाठ्यात भरमसाट पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे उशिरा पेरणी करूनही रब्बी हंगाम चांगला होईल, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. ढगाळ वातावरणाने शेतकरी चिंतेत खरीप हंगामातील तुरीचे पीक सध्या फुलधारणेच्या अवस्थेत असून चांगल्या उत्पादनाची शेतकऱ्यांना आशा आहे, परंतु तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. सतत पाऊस हजेरी लावत असून, अधून-मधून सध्या ढगाळ वातावरण होत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.
खंडाळा गावात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ८४० घरकुले मंजूर झाली. त्यातील ६५४ लाभार्थींना पहिला हप्ता मिळाला. काहींना दुसरा हप्ता देखील मिळाला. मात्र १८६ लाभार्थींना पहिलाच हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे घराचे स्वप्न अधुरे राहिले. या लाभार्थींनी नाराजी व्यक्त केली. रमाई आवास योजनेत ३५ अनुसूचित जातीतील लाभार्थींची निवड झाली. त्यातील ३० जणांना पहिला व दुसरा हप्ता मिळाला. मात्र पाच लाभार्थींना पहिलाच हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर हप्ता वितरित करावा, अशी मागणी होत आहे. खंडाळा गावातील बहुतांश कुटुंबे मजुरी करून उपजीविका चालवतात. शासनाने गरीब कुटुंबांना पक्के घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री, रमाई व शबरी आवास योजना राबविल्या. स्थानिक पातळीवर गरजूंची यादी तयार झाली. शासनाच्या निकषांनुसार मंजुरी मिळाली. सध्या वाळू, सिमेंट, लोखंड, वीट व इतर साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे घरबांधणीचा खर्च वाढला आहे. हप्ता न मिळाल्याने अनेकांचे काम थांबले आहे. त्यामुळे लाभार्थींमध्ये असंतोष वाढत आहे. शासनाकडे निधी उपलब्ध नाही ^दीड महिन्यांपासून पंचायत समिती घरकुल विभागाला निधी प्राप्त झाला नाही. निधी प्राप्त होताच लवकरच वितरित करण्यात येईल. तसेच अनेक लाभार्थींचे आधार शेडिंग व बँक खात्याला आधार लिंक नसल्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. - बाळासाहेब मोरे , कर्मचारी, घरकुल विभाग पंचायत समिती वैजापूर
बुधवारी मध्यरात्री उंडणगावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चार घरांवर धाड टाकून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरली. तीन दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. एका सतर्क महिलेच्या आरडाओरडीमुळे चोरटे गोंधळले. चोरलेल्या दुचाकी गावाजवळ टाकून पळाले. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांनी बाजीराव सांडू पाटील, दादाराव बाजीराव पाटील, तुळसाबाई ओंकार लांडगे आणि राधाबाई दत्तू पाटील यांच्या घरांवर हल्ला केला. कडी-कोंडे तोडून घरात प्रवेश केला. मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. बाजीराव आणि दादाराव पाटील हे रात्री गोळेगाव रोडलगत शेतातील घरी मुक्कामी होते. त्यांच्या घरात कोणीच नव्हते. चोरट्यांनी तिजोरी उचलून गावालगतच्या शेतात नेली. तिजोरी फोडून दागिने आणि रोख रक्कम चोरली. घटनास्थळी तुटलेली तिजोरी, काप्यांचे तुकडे आणि अवशेष पोलिसांना सापडले. ऋषिकेश राजेंद्र पाटील (एमएच-२० जीपी ६९२३), संतोष गंगाराम शिनगारे (एमएच-२० डीबी ३४१५) आणि आणखी एका दुचाकीचे लॉक तोडून गाड्या शेतात नेल्या. चोरटे पुढील तयारीत असताना एका महिलेने त्यांना पाहिले. तिने आरडाओरड केली. चोरटे गोंधळले. दुचाकी शेतातच सोडून पळाले. गुरुवारी सकाळी चोरी उघडकीस आली. गावात खळबळ उडाली. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी श्वानपथक व ठसेतज्ञांनी तपास केला. ठसे आणि पुरावे गोळा करण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. गावात भीतीचे वातावरण पसरलेले दिसत आहे. महिलांमध्ये आणि वयोवृद्धांमध्ये असुरक्षिततेची भावना पोलिसांनी गस्त वाढवावी, सीसीटीव्ही बसवावेत, रात्री राऊंड सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या काही महिन्यांत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. उंडणगावातील ही घटना सर्वात मोठी मानली जात आहे.
पॅलेस्टाइन व गाझामधील नागरिकांना मदतीसाठी ९० लाख ९९ हजार रुपये जमवणाऱ्या महाभागाने त्यातील फक्त १० लाख रुपये पुढे पाठवले, तर उर्वरित रक्कम लाटली असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याने केवळ ९० दिवसांच्या कालावधीतच हा प्रकार केला आहे. आरोपीच्याच खात्यातून ‘गो फंड मी डॉट कॉम’ या पोर्टलवर १४ ट्रान्झॅक्शनद्वारे १० लाख २४ हजार २२० रुपये परदेशात पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले. मात्र आता उर्वरित रकमेचा कुठलाही हिशेब त्याच्याकडे नाही. त्यामुळे ही रक्कम हवाल्याच्या माध्यमातून पाठवण्यात आली की, टेरर फंडिंगसाठी वापरण्यात आली याचा तपास सुरू आहे. सय्यद बाबर अली सय्यद महेमूद अली ऊर्फ सय्यद बाबर अली रजवी कादरी (रा. बदाम गल्ली, किराडपुरा), असे आरोपीचे नाव असून एटीएस (दहशतवादविरोधी पथक) पथकातील कर्मचाऱ्याच्या फिर्यादीनुसार त्याच्यावर सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेत चार तास चौकशी बाबर अलीवर गुन्हा नोंद दाखल होताच आर्थिक गुन्हे शाखेने त्यास चौकशीसाठी बोलावले. त्याची रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे ४ तास चौकशी केली. त्यात त्याने पैसे कुठे पाठवले? किती रक्कम गोळा केली? असे प्रश्न विचारले. शुक्रवारी पुन्हा त्याला चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. महिनाभर पाळत ठेवत एटीएसने ५० रुपये पाठवल्याने अडकला शहरातील पॅलेस्टाइन, गाझाला मदतीसाठी रक्कम स्वीकारण्यात येत आहे. त्याअनुषंगाने एटीएस पथक गेल्या महिनाभरापासून संशयितांवर पाळत ठेवून आहे. त्यातच मेट्रो अपार्टमेंट, शहाबाजार, चंपा चौकात कार्यालय असलेल्या इमाम अहमद रजा फाउंडेशन आणि रजा एम्पॉवरमेंट फाउंडेशनची माहिती मिळाली. त्यानुसार तपास केल्यावर संशय बळावत गेला. त्यांनी मदतीचे आवाहन केलेल्या क्यूआर कोडवर ५० रुपये पाठवले. ही रक्कम कुठल्याही संस्थेच्या खात्यावर जात नसून ही आरोपीच्या खात्यावर जात असल्याचे उघड होताच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...अन् संस्थेची धर्मादायकडे नोंदणीच नाही एटीएस पथकाने दोन्ही संस्थांची माहिती काढली असता इमाम रजा फाउंडेशन या संस्थेची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंद नाही, तर रजा एम्पॉवरमेंट फाउंडेशन ही संस्था रजिस्ट्रेशन ऑफ कंपनी, मुंबई येथे नोंदणीकृत आहे. मात्र, त्यांच्या उद्दिष्टांमध्ये (मेमोरंडम ऑफ असोसिएशन) कुठेही निधी उभारून परदेशात पाठवण्याबाबत नमूद नसल्याचे समोर आले. रोजाबाग एन्काउंटरमध्ये पैशांचाच अपहार
जिल्ह्यात सीसीआयच्या (भारतीय कापूस महामंडळ) ६ केंद्रांवर कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र, शासनाच्या निर्णयानुसार यंदा एकरी ५ ते ६ क्विंटल कापूस खरेदी करण्याची मर्यादा लागू करण्यात आली आहे. ही मर्यादा मागील वर्षी सर्व जिल्ह्यांमध्ये एकरी १२ क्विंटल होती, अशी माहिती नांदेडमधील सीसीआय केंद्राच्या सूत्रांनी दिली. सध्या खुल्या बाजारात कापसाचे किमान दर ६१०० ते कमाल दर ६४०० रूपये क्विंटला दर मिळत आहेत. हमीभावापेक्षा हे दर कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सीसीआयच्या खरेदी केंद्रावर क्विंटलला ७७१० ते ८११० रूपयांच्या हमीभावाने कापूस विक्री करणे फायदेशीर ठरत आहे. परंतू मर्यादित कापूस खरेदीच्या अटीमुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. काही भागात उत्पादन हेक्टरी १८ ते २० क्विंटलपर्यंतही जाते. पण सीसीआय फक्त १३ ते १४ क्विंटलच खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांना उर्वरित कापूस कमी भावात खासगी व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.राज्यातील हवामान, पाऊस आणि उत्पादन क्षमता यांचा एकत्रित विचार करूनच कापूस खरेदीची मर्यादा निश्चित करण्यात आल्याचे सीसीआयकडून सांगितले जात आहे. नोंदणी ८५०६ जणांची,प्रमाणीकरण फक्त २५३ १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर याकालावधीत ‘कपास किसान'' याअॅपद्वारे शेतकऱ्यांना नोंदणी करतायेणार आहे. गुरुवारपर्यंत ८५०६ पेक्षाजास्त शेतकऱ्यांनी नोंदणी केलेलीआहे. परंतु, नांदेड बाजार समितीने२५३ जणांचेच प्रमाणीकरण केले. शासनाने घटवली मर्यादा यंदा शासनाने राज्यात कापूसखरेदीची एकरी मर्यादा कमी केली.अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेआहे. त्यामुळे उत्पादनाची क्षमताघटली आहे. त्यामुळे हा निर्णयघेण्यात आला असावा, असे नांदेडकृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिवएम. टी. पाटील यांनी सांगितले. सीसीआयच्या जाचक अटी, ७७१० ते ८११० रुपये हमीभाव नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील सीसीआयच्या केंद्रावर कापूस खरेदीलासुरूवात झाली आहे. मुहूर्ताला ८ हजार ६० रूपये क्विंटलला भाव मिळाला. बॅनरसमोर फोटो काढणे आवश्यक ॲपमधील अटी शेतकऱ्यांना जाचक ठरतआहेत. तसेच तांत्रिक गोष्टींचे ज्ञान नसल्यामुळेअडथळा निर्माण होत आहे. शेतकऱ्यांनासीसीआयच्या बॅनरसमोर फोटो काढावा लागणारअसून तेव्हाच त्यांचे बिल पास होणार आहे.तसेच शेतकऱ्यांना केंद्रावर हजर राहणेबंधनकारक असणार आहे. तसेच स्लॉट बुकझाल्यानंतर त्याच दिवशी शेतकऱ्यांना येण्यासजमले नाही तर, दोन वेळाच संधी दिली जाईल.त्यानंतर मात्र, संधी नसेल.
नेमका कुठल्या वक्तव्याचा खुलासा करू- रूपाली ठोंबरे:आपल्याच पक्षाला मागितले खुलासा पत्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी प्रवक्त्या रूपाली पाटील ठाेंबरे व राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यातील वाद शिगेला पाेहोचला आहे. रूपाली पाटील यांनी थेट चाकणकर यांच्या विराेधात आंदाेलन करत राजीनाम्याची मागणी केल्यानंतर पक्षाने गंभीर दखल घेत रूपाली पाटील यांना पक्षाकडून आपल्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करू नये, असे पत्र पाठवून सात दिवसांत उत्तर द्यावे, असे सांगितले. त्यावर रूपाली पाटील यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यालयास “नेमका कुठल्या वक्तव्याचा खुलासा केला पाहिजे?’ असे पत्र पाठवले आहे. याबाबत रुपाली ठोंबरे म्हणाल्या, पक्षाने मागितलेल्या खुलासा पत्रात राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष यांच्या बाबतीत प्रसारमाध्यमात केलेले वक्तव्य पक्षशिस्त भंग करणारे आहे व त्यासंर्दभात शिस्तभंगाची कारवाई का करू नये याबाबत मला खुलासा पत्र मागितले आहे. नेमके संबंधित व्यक्तींबाबत मी काेणते वक्तव्य शिस्तभंग करणारे केले आहे, ते सांगावे. याबाबत नाेटीसमध्ये काेणतीही माहिती नसल्याने त्यासंर्दभात खुलासा देणे शक्य नाही. सविस्तर एखादे वाक्य नाेटिसीमध्ये नमूद केले असते तर त्यावर मला खुलासा करणे शक्य झाले असते. तसेच राज्य महिला आयाेग व राष्ट्रीवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र विभाग आहे. फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा यांनी जे वक्तव्य केले हाेते. त्यात समाजात व लाेकांत अत्यंत राेष व असंताेष निर्माण झाल्याचे दिसून येते. राज्य महिला आयाेगाने केलेल्या वक्तव्याने पक्षालादेखील लाेकांच्या राेषाला सामाेरे जावे लागले आहे. पक्षाची बदनामी झाल्याने मी स्वत: बीड येथे महिला डॉक्टरच्या कुटुंबाची भेट घेतली. पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्याशीदेखील कुटुंबाचे बाेलणे मी करून दिले हाेते. मी केवळ राष्ट्रीय अध्यक्षांच्या मताचा सन्मान करून माझे म्हणणे मांडले हाेते. राष्ट्रीय अध्यक्षांची बाजू मांडणे प्रवक्त्यांचे काम असल्याने ही नाेटीस मला का देण्यात आली याबाबत काेणती कल्पना नाही. मी काेणताही शिस्तभंग केलेला नाही.

28 C