मराठवाड्यात आतापर्यंत २ लाख २६ हजार कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप
छ. संभाजीनगर : मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने नोंदी आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये २ लाख २६ हजार २१७ कुणबी जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. तसेच, ३९७ अर्ज नाकारण्यात आलेले आहेत. यात सर्वाधिक १ लाख ५३ हजार ३५६ प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात […] The post मराठवाड्यात आतापर्यंत २ लाख २६ हजार कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विष्णूमय जग, वैष्णवांचा धर्मभेदाभेद भ्रम, अमंगळ ।कोणाही जीवाचा, न घडो मत्सरवर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।या संतोक्तीप्रमाणे सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी निघालेला माऊलींचा सोहळा गुरुवारी दुपारी तोंडले येथे दुपारी जेवणासाठी विसावला होता. घराची रंगरंगोटी, दारापुढे रेखाटलेल्या आकर्षक रांगोळ्या, हार, फुलं, अबीर- गुलाल आदी पूजेचे साहित्य आणण्याची लगबग सुरु होती. माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व बांधण्याच्या जागेत मांडव उभारण्यात आला, त्या भोवती रांगोळीच्या पायघड्या घालण्यासाठी तोंडले (ता. माळशिरस) येथील इक्बाल मुजावर यांची धडपड सुरु होती. तोंडले येथे माऊलींच्या पालखीचा विसावा असतो. त्यावेळी येथील मुजावर कुटुंबीयांच्या घरी माउलींच्या पालखी सोहळ्यातील अश्व थांबतात. सोहळ्यातील अश्वांच्या स्वागतासाठी मुजावर कुटुंबीय महिनाभरापासून प्रयत्नशील होते. तोंडले गावामध्ये पालखी दाखल होताच सोहळ्यावर फुलांचा वर्षांव करण्यात आला. सोहळ्यातील अश्व थेट मुजावरांच्या दारापुढे येऊन उभे राहिले. तुतारीचा निनाद झाला पूजेची लगबग सुरु झाली. पायावर पाणी घातले, अबीर-गुलालाची मुक्त उधळण झाली, अश्वांना हरभऱ्याची दाळ अन् गुळ भरवण्यात आला. अश्व स्वारांना ओटीचे साहित्य, श्रीफळ देण्यात आले. अश्वांना मुजावर यांनी स्वत: दारासमोरच्या मांडवात बांधले अन् त्यास वैरण, पाणी करण्यात आले. स्वार व त्यांच्या समवेत असलेल्या लोकांना जेवणाच्या पंगती मुजावरांच्या घरामध्ये बसल्या होत्या. मुजावर यांच्या घरातील दोन खोल्यांमध्ये वारकरी, सेवेकरी दुपारी विसावा घेतात. त्यांच्यासाठी मुजावर कुटुंबातील महिला स्वयंपाक करतात. यंदाच्यावर्षी जेवायला गोड पदार्थ कोणता हवाय? कोण-कोणते पदार्थ करावेत, अशी विचारणा आळंदी येथून सोहळ्याच्या प्रस्थानापूर्वी अश्वस्वार, सेवकांना संपर्क साधून विचारतात. त्यांच्या आवडीचे स्वयंपाक मुजावर कुटुंबीय करतात. या सेवेबाबत विचारले असता, मुजावर म्हणाले,“माझे वडील, त्यांच्या वडीलांनी माऊलींची सेवा केली होती. ही सेवा अनेक वर्षांपासून आमच्या कुटुंबात आहे, माझी मुलं व नातवंडे देखील या सेवेत सक्रीय आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या घरी उत्साह, चैतन्य निर्माण होते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अश्वस्वार तुकाराम कोळी म्हणाले, तोंडले गावामध्ये मुजावर कुटुंबाच्या घरी अश्वांचे उत्साहात स्वागत करून पूजा करण्यात येते. मागील अनेक वर्षांपासून मुजारवर कुटुंबाच्या घरी ही सेवा आहे. अश्वाच्या सर्व सेवेकऱ्यांसह, सोहळ्यात तुतारी (शिंग) वाजविणाऱ्यांना मान, सन्मान करण्यात येतो.
भेट संतबंधूंची, आभाळ आले भरून, पालखी त्या दोघांची आपल्या मार्ग निघाली.. या काव्यपंक्ती प्रमाणे कैवल्य साम्राज्य संत ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ सोपान काका महाराज या संत बंधूंच्या भेटीचा हृदय सोहळा गुरुवारी (दि. ३) दसूर (ता. माळशिरस) जवळ झाला. तोंडले येथील विसाव्यानंतर वारकऱ्यांना संत बंधूंच्या भेटीच्या सोहळ्याची आस लागली होती. भेटी सोहळ्याच्या दरम्यान आकाश ढगांची दाटी झाली, मधूनच पडणाऱ्या पावसाच्या सरी अशा प्रसन्न वातावरणात बंधू भेटीचा हृदय सोहळा पाहताना भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा बंधू ज्ञानदेवाच्या भेटीसाठी दसूर पाटीजवळ रस्त्याच्या उजवीकडील बाजूस ज्येष्ठ बंधू ज्ञानदादाची वाट पहात थांबला होता. त्या सोहळ्यातील वारकऱ्यांनी फुगड्या अन् भारुडांचे सादरीकरण करीत वारकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. याच दरम्यान अचानक पावसाला सुरवात झाली अन् सोहळ्यातील भाविक चिंब न्हाऊन निघाले. दुपारी पावणेचार वाजता माऊलींचा पालखी सोहळा बंधू भेटीसाठी दाखल झाला. माऊलीचा रस्त्याच्या डाव्या बाजूला येऊन थांबल्यामुळे सोपानकाकांचा सोहळा माऊलीच्या बाजूला गेला. दोन्ही संतबंधूंचा रथ एकमेकांच्या जवळ येताच, भाविकांनी ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम...’ असा संतांच्या नावाचा जयघोष करीत टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी स्थानिक गावकऱ्यांनी जेसीबीतून फुलांची उधळण करीत बंधूभेटीच्या सोहळ्याचा उत्साह अधिक वाढविला. सुरवातीला संत सोपान काकांच्या सोहळ्यातील अश्वांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख योगी निरंजनदास, डॉ. भावार्थ देखणे, राजाभाऊ चोपदार यांनी संत सोपानकाका सोहळ्याचे प्रमुख अॅड. त्रिगुण गोसावी यांना मानाचा श्रीफळ दिला. त्यानंतर दोन्ही सोहळ्यातील मानकऱ्यांनी एकमेकांना श्रीफळ देत सस्नेह भेट घेतली. बंधू भेटीचा क्षण पाहण्यासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली. भेटीनंतर संत सोपान काकांचा सोहळा भंडीशेगावकडे मुक्कामी गेला. तर, माऊलींचा ही सोहळा याच मार्गाने पुढे गेला. असाही योगायोग.. सावळ्या विठूरायाच्या दर्शनासाठी माऊलींचा पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवल्यानंतर तो सासवड येथे मुक्कामी असतो. त्याच दिवशी सासवड येथून संतश्रेष्ठ सोपान काका महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतो. अठरा दिवसांच्या प्रवासानंतर सोहळा सोपानकाकांचा सोहळा पंढरीत दाखल होतो. माऊलींचा सोहळा सासवड मुक्कामी असतो, त्याच दिवशी बंधू सोपानकाकांचा सोहळा पांढरीकडे प्रस्थान ठेवतो. त्या बंधूंची भेट पंढरपूर तालुक्याच्या उंबरठ्यावर होते. सोपानकाकांच्या सोहळ्यावर फुलांची आरास संत सोपानकाकांच्या महाराजांच्या पालखी रथास दररोज फुलांची आकर्षक सजावट करण्यात येते. बंधू भेटीचा सोहळा असल्याने पालखी रथाच्या दर्शनी भागात फुलांद्वारे ‘बंधूभेट’ असे आकर्षक पद्धतीने लिहिले होते.
हाकेंची चड्डी पिवळी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीची
पुणे : दोन समाजात तेढ निर्माण व्हावी, म्हणून जाणीवपूर्वक लक्ष्मण हाके स्टंटबाजी करत आहेत. राष्ट्रावदी युवक काँग्रेस त्यांची चड्डी पिवळी केल्याशिवाय राहणार नसल्याची टीका राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केली. पुढील आठ दिवसांत लक्ष्मण हाकेची चड्डी पिवळी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी आहे. लक्ष्मण हाकेंची हालत भटक्या कुत्र्यासारखी करू असा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे. लक्ष्मण […] The post हाकेंची चड्डी पिवळी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीची appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे बिघडले आहेत. त्या घटनेनंत भारताने सिंधू पाणी करार स्थगित करणे, सीमा बंद करणे आणि पाक नागरिकांना परत पाठवण्यासारखे मोठे निर्णय घेतले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानीहॉकी संघाला भारतात खेळण्याची परवानगी मिळाली आहे. पुढील महिन्यात होणा-या आशिया कपसाठी पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येईल. क्रीडा मंत्रालयातील एका सूत्राने […] The post पाकिस्तानी संघ भारतात येणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ठाकूर बुवा मंदिर येथे पोहोचली असता, यावेळी वारकऱ्यांनी गोल रिंगण तयार केले. याचे ड्रोनद्वारे काढलेले फोटो.
रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका
नवी दिल्ली : बाबा रामदेव यांच्या पंतजलीला दिल्ली उच्च न्यायालयाने झटका दिला असून पंतजली आयुर्वेदकडून डाबर च्यवनप्राश बद्दल जी जाहिरात केली जात आहे त्यासंदर्भात न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. डाबर च्यवनप्राशबद्दल जी दिशाभूल करणारी आणि नकारात्मक जाहिरात केली जात आहे, ती बंद करा असे न्यायालयाने पंतजलीला सांगितले. डाबर इंडियाने पंतजली आयुर्वेद विरोधात उच्च न्यायालयात धाव […] The post रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अलकनंदाच्या पाण्याच्या पातळीत वाढ
अलकनंदाच्या पाण्याच्या पातळीत वाढ
आजच्या घटकेला सायबर सुरक्षा हा विषय महत्वाचा बनला आहे, त्यामुळे भविष्यात सायबर सुरक्षेचे कल्चर सर्वत्र रुजवण्याची आवश्यकता असल्याचे मत क्विकहिल कंपनीचे सह संस्थापक व सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी व्यक्त केले. सॉफ्टवेअर एक्सपोर्टर अशोसिएशन पुणे यांची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमाला काटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना बोलत होते. सीपचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवराज साबळे, उपाध्यक्षन शिवेष विश्वनाथन, सचिव विद्याधर पुरंदरे, खजिनदार आनंद रानडे आणि माजी अध्यक्षा विनिता गेरा यावेळी उपस्थित होते. सायबर सुरक्षा हा विषय दिवसेंदिवस अधिक महत्वाचा बनत चालला आहे, त्यामुळे प्रत्येकाने त्याकडे अधिक बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे असणारा डेटा सुरक्षित ठेवण्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सायबर चोरटे माहिती चोरून त्याचा वापर वेगळ्या कामासाठी करू शकतात. अलीकडच्या काळात रॅमसनवेअर अटॅक, डेटा एक्स्टर्शन, बिझनेस इमेलची चोरी करून त्याच्या आधारे फसवणूक करणे, एएआय तंत्राचा वापर करून फसवणूक करणे असे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सुमारे सात हजार कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे, त्यामुळे प्रत्येकाने त्याबाबत अधिक काळजी घेण्याची गरज असाल्याचे काटकर यावेळी म्हणाले. एआय तंत्राचा वापर करण्याचे प्रमाण वाढत आहे. आगामी काळात त्याचा वापर हा सायबर सुरक्षेमध्ये देखील करता येऊ शकतो, त्यामुळे कामामध्ये सुलभता येण्यास मदत होऊ शकते. सॉफ्टवेअर कंपनीच्याबरोबर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी आपली सॉफ्टवेअरची यंत्रणा कायम अपडेट ठेवणे, भक्कम पासवर्ड ठेवणे, कर्मचारी वर्गाला सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण देणे, सिक्युरिटीच्या बाबत अधिक माहिती देऊन त्याचे सायबर सुरक्षेचे ज्ञान वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे काटकर यावेळी म्हणाले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सीच्या तंत्रामुळे पुढल्या दहा वर्षांमध्ये पुण्याचा चेहरा बदलला जाणार आहे, त्यामुळे इथे काम करण्याच्या मोठ्या संधी असल्याचे सॉफ्टवेअर एक्सपोर्टर अशोसिएशन पुणेचे नवनियुक्त अध्यक्ष शिवराज साबळे यावेळी म्हणाले. तंत्रज्ञानामध्ये नवीन बदल होत आहेत, त्याचा लाभ घेऊन नवीन प्रयोग करण्याच्या संधी उपलब्ध आहेत. समाजातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र करून त्यांच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, पुण्याचा आवाज होणे, भविष्याचा वेध घेत नव्या योजना तयार करून त्याची अंमलबजावणी करणे असे उपक्रम आगामी काळात राबवण्याचे नियोजन असल्याचे साबळे यावेळी म्हणाले.
कृष्णा आंधळेपासून देशमुख कुटुंबाला धोका
केज : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला तब्बल २०५ दिवस उलटले असले तरी, या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. त्याच्यापासून आमच्या कुटुंबीयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे अशी भीती व्यक्त करत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिस प्रशासनाला इशारा दिला. जर कृष्णा आंधळेला तत्काळ अटक झाली नाही, तर लवकरच […] The post कृष्णा आंधळेपासून देशमुख कुटुंबाला धोका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य
मुंबई : राज्यातील अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. सन २०२४-२५ मध्ये होणा-या विविध स्पर्धा परीक्षांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना एकरकमी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट-ब पूर्व परीक्षा २०२४ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी १० […] The post यूपीएससी, एमपीएससीसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून अर्थसहाय्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शाळाबाहय विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणार
मुंबई : शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबा विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवत आहे. यू-डायस प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात आहे, असे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले. नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेला उत्तर देत मंत्री भुसे […] The post शाळाबाहय विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भौगोलिक परिस्थितीनुसार पारंपरिक कृषि पंप देण्याचा शासनाचा विचार
मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषि पंप देण्यावर भर दिला आहे. मात्र भौगोलिक परिस्थितीनुसार सौर पंप देणे शक्य नसल्यास त्या ठिकाणी पारंपरिक कृषि पंप देण्याबाबत शासन विचार करेल. शेतक-यांसाठी कृषि पंपांना वीज जोडणी देण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात […] The post भौगोलिक परिस्थितीनुसार पारंपरिक कृषि पंप देण्याचा शासनाचा विचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केनिया मधील नैरोबी येथे झालेल्या पहिल्या जूनियर रोलबॉल विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेते ठरलेल्या रोलबॉल संघांचा आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात रोलबॉलचे संस्थापक आणि इंटरनॅशनल रोल बॉल फेडरेशनचे सचिव राजू दाभाडे तसेच महिला संघाची कर्णधार प्रांजल जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सत्कार सोहळ्याचे आयोजन नवी पेठेतील पत्रकार भवन येथे करण्यात आले होते. यावेळी ससून रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव, कॉसमॉस कन्स्ट्रक्शन ग्रुप संचालक मेहुल शाह, राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, राज्य रोलबॉल संघटना अध्यक्ष संदीप खर्डेकर, आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते. प्रशिक्षक हेमांगिनी काळे, फिटनेस ट्रेनर तेजस्विनी यादव, तसेच टीम सपोर्टर प्राची फराटे, मिलिंद क्षीरसागर, आणि फोटोग्राफर सुभाष सुर्वे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. डॉ. यल्लप्पा जाधव म्हणाले, जागतिक रोलबॉल स्पर्धेतील मुलींची कामगिरी प्रेरणादायी आहे. आजच्या काळात विविध कारणांनी मानसिक ताण वाढला आहे. अशा वेळी योग, ध्यान आणि सकारात्मक संवादाद्वारे मानसिक आरोग्य जपणे ही आपली जबाबदारी आहे. संदीप वांजळे म्हणाले, रोलबॉल हा अत्यंत चांगला खेळ आहे. आता खेळाडूंना चांगले दिवस आले आहेत. खेळांमध्ये करिअर केले जाऊ शकते आणि सोबतच आरोग्यही उत्तम राहते. खेळातून केवळ शरीरसंपदा नव्हे, तर मानसिक ताकदही वाढते. भारताने वर्ल्ड कप जिंकणं ही खूप मोठी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले. संदीप खर्डेकर म्हणाले, रोलबॉल या खेळाचा जन्म २० वर्षांपूर्वी पुण्यात झाला आणि आज हा खेळ ५७ देशांमध्ये खेळला जात आहे. ही पुणेकरांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. खेळ झपाट्याने वाढत असून त्याचे जनक म्हणजेच राजू दाभाडे यांचे हे यश आहे. हेमंत जाधव म्हणाले, रोल बॉल विश्वचषक जिंकणे भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद यश आहे. विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे प्रांजल जाधव ही पुण्यातील मुलगी या जागतिक विजेत्या संघाची कर्णधार आहे. हा फक्त क्रीडाजगतासाठी नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे.
जागतिक क्रीडा कॅलेंडरमध्ये पुण्याचे नाव स्थापित होणार : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : राज्य शासनाच्या सहकार्याने पुणे जिल्हा प्रशासन व सीएफआयच्या सयुंक्त विद्यमाने होणा-या पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर च्या माध्यमातून वार्षिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेचे आयोजन अतिशय स्तुत्य उपक्रम असून पुण्याला प्रमुख पर्यटन आणि जागतिक क्रीडा केंद्र म्हणून प्रस्थापित करणे या भव्य स्पर्धेमुळे शक्य होणार आहे. पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर स्पर्धा येत्या तीन चार वर्षांत निश्चितचं […] The post जागतिक क्रीडा कॅलेंडरमध्ये पुण्याचे नाव स्थापित होणार : मुख्यमंत्री फडणवीस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बँक ऑफ इंडियाची ९७.५० लाखांची फसवणूक:गृहकर्जासाठी बनावट कागदपत्रे सादर करून दोघांनी केला गैरव्यवहार
गृहकर्ज मिळविण्याच्या बहाण्याने बँकेकडे खोटी कागदपत्रे सादर करून तब्बल ९७ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नईम गफुर शेख (३९) आणि सतीश सावंत ग्रुपचे संचालक सतीश सावंत यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनिलकुमार श्रीवास्तव (५५ रा. सहकारनगर,पुणे) यांनी तक्रार दिली. बी. टी. कवडे रोड येथील दोन सदनिका खरेदी करण्याच्या बहाण्याने आरोपींनी खोटी कागदपत्रे बँकेकडे सादर केली. त्या आधारे त्यांनी ९७ लाख ५० हजारांचे कर्ज मंजूर करून घेतले. परंतु, आरोपींनी एकही कर्जाचा हप्ता बँकेला दिला नाही. दरम्यान बँकेची फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात बँक आॅफ इंडियाची फसवणूक करण्यात आली. पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत. कंपनीच्या पैशाचा अपहार करणार्यांवर गुन्हा दाखल कंपनीकडून ग्राहकांपर्यंत वस्तू पोहचविण्यासाठी वेंडर म्हणून नियुक्त केल्यानंतर वस्तुंची आलेली रक्कम कंपनीला न भरता 8 लाख 97 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहार केल्याप्रकरणी डिलिव्हरी वेंडरवर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय ढोणे ( रा. निंबाळकर वस्ती, गुजर निंबाळकरवाडी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओंकार शिवतारे (25, रा. आंबेगाव पठार,पुणे) याने फिर्याद दिली आहे. ढोणे याला वेंडर म्हणून नियुक्त करण्यात आल्यानंतर त्याने अमेझॉन कंपनीची 37 साहित्यही ग्राहकांपर्यंत न पोहोचवता त्याचा अपहार केला.
बीड येथे ‘सीट्रिपलआयटी’ उभारणीच्या कामाला गती
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बीड येथे ‘टाटा टेक्नॉलॉजी’च्या माध्यमातून सुरू करण्यात येणा-या ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅण्ड ट्रेनिंग’ अर्थात ‘सीट्रिपलआयटी’साठी बीड एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राच्या सुविधा क्रमांक तीन मधील चार हजार चौरस मीटर जागा तसेच केंद्र उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय ‘एमआयडीसी’च्या संचालक मंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे बीड जिह्यातील […] The post बीड येथे ‘सीट्रिपलआयटी’ उभारणीच्या कामाला गती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
५० रेडे घेऊन जाणारा कंटेनर पकडला:१७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, आखाडा बाळापूर पोलिसांची कामगिरी
हरियाणाकडून आंध्रप्रदेशात ५० रेडे व म्हैस घेऊन जाणारा कंटेनर आखाडा बाळापूर पोलिसांच्या पथकाने गुरुवारी ता. ३ पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास साळवा फाटा शिवारात पकडला आहे. पोलिसांनी एकूण १७.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कंटेनर चालका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश घोटके, जमादार राजेश घोंगडे, गणेश गायकवाड, पुंजाजी गायकवाड, शिवाजी पवार यांचे पथक गस्तीवर होते. यावेळी पहाटेच्या सुमारास एका कंटेनरमधून काही जनावरांची वाहतूुक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून या पथकाने साळावा फाटा शिवारात वाहनांची तपासणी मोहिम सुरु केली. यामध्ये पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी एक कंटेनर थांबविला. पोलिसांनी चालक इर्शाद मेहू (रा. घासेरा, जि. मेवाट) याची चौकशी सुरु केली. मात्र या चौकशीमध्ये तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी कंटेनरची तपाशणी केली असता त्यात ५० रेडे व म्हैस दाटीवाटीने कोंबून बसविलेले आढळून आले. पोलिसांनी वाहतुकीचा परवाना मागितला असता चालक इर्शाद याने परवाना नसल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी कंटेनर, रेडे, म्हैस असा १७.५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणला. पोलिसांनी इर्शाद याची प्राथमिक चौकशी केली असता त्याने सदर जनावरे आंध्रप्रदेशात शेतीकामासाठी नेले जात असल्याचे सांगितले. मात्र अधिक माहिती तो देऊ शकला नाही. या प्रकरणी जमादार पुंजाजी गायकवाड यांच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिसांनी इर्शाद मेहू याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जमादार राजेश घोंगडे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी सदर जनावरे येडशी येथील गोशाळेत दाखल केले आहेत.
‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या प्रांजलीचा डबल सुवर्ण धमाका!
पुणे : प्रतिनिधी एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणेच्या स्कुल ऑफ बायोइंजिनिअरिंगची विद्यार्थीनी प्रांजली विनोद सुरदुसे हिने नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या १०वी वरिष्ठ गट राष्ट्रीय मिनी गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेच्या स्ट्रोक महिला सांघिक गटात व श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिबरेवाल विद्यापीठ, मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ मिनि गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेच्या एकेरी स्ट्रोक […] The post ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या प्रांजलीचा डबल सुवर्ण धमाका! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पूरपरिस्थितीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून दुपारी बारा वाजता ३७१६ वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरीत सुरू झाला. नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पुराचे पाणी लागले आहे. दुसरीकडे आषाढी एकादशीच्या निमित्ताने येणा-या भाविकांमुळे उजनी धरणात होणारा पाण्याचा विसर्ग […] The post राज्यातील धरणांमधील आवक वाढली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विधानसभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून 50 हजार रुपये देण्यात यावे, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. भास्कर जाधव म्हणाले, मे महिन्यात अवेळी पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. 14 मे पासून रोजच पाऊस सुरू झाला. या पावसाने मोठी दाणादाण उडवली आहे. मराठवाड्यातील व विदर्भातील 267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही आकडेवारी जानेवारी ते मार्च पर्यंतच्या आहेत. वर्षभरात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मागच्या निवडणुकीच्या वेळी त्यांना आश्वासने दिली होती. आम्ही सात बारा कोरा करू असे सांगण्यात आले. पण आता हे सरकार म्हणत आहे कर्जमाफी करू, पण योग्यवेळी करू. लाडक्या बहिणींना म्हणाले 2100 रुपये देणार, नाही दिले. हे आश्वासने केवळ निवडणुकीपुरते होते. नुकसानभरपाई म्हणून 50 हजार रुपयांची मदत करावी पर हेक्टरी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून किमान 50000 रुपयांची तात्काळ मदत करण्याची गरज आहे. पंचनामे झालेले नाहीत. ऑनलाइन पद्धतीने पंचनामे केले जात आहेत, पण त्या ठिकाणी नेटवर्कच नसेल तर काय करणार? शेतकऱ्यांना माहिती देणे गरजेचे आहे. ऑफलाइन पद्धतीने देखील पंचनामे केले जावेत, अशी माझी मागणी आहे. शेतकऱ्यांचे कर्जमाफी केले जावे, सौरऊर्जा प्रकल्प मोफत देण्यात यावे, किती जणांकडे आहे सौरऊर्जा प्रकल्प? एक रुपयात पिकविमा ही योजना फसवी ठरली. शेतकऱ्यांची चेष्टा केली जाते शेतकऱ्यांची चेष्टा केली जात आहे. कृषिमंत्री स्वतः टिंगल टवाळी करतात, कर्जमाफीच्या पैशातून काय मुली बाळांचे लग्न करायचे आहेत का? असे त्यांनी म्हटले होते. शेतकऱ्यांनी असे स्वप्न कधी बघू नये का? असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. आजकाल भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयांत पिकविमा दिला, असेही विधान कृषिमंत्र्यांनी केले होते. ती योजनाच रद्द झाली. तुमच्या काय ढेकळाचा पंचनामा करायचा का? असेही ते म्हणाले, असे कोणी शेतकऱ्यांना म्हणू शकते का? पण हा सत्तेचा माज आहे. भास्कर जाधव म्हणाले, बबनराव लोणीकर म्हणतात तुमच्या आईच्या अंगावरचं पातळ माझ्या बापामुळे येतात. तुमच्या अंगावरचे कपडे माझ्या बापामुळे येतात. 2014 पूर्वी सरकार नव्हते का? ही लोकशाही आहे. कोणाचा उपमर्द करण्याचा अधिकार कोणी दिला? माणसाचा मोठेपणा तेव्हाच असतो जेव्हा त्याच्याकडे नम्रता असते. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील नाते कसे असले पाहिजे, जेव्हा आम्ही सत्तेत होतो, कॉंग्रेस सत्तेत होती, तेव्हा विरोधी पक्षातील लोक अश्लाघ्य भाषेत बोलायचे आणि आम्ही ऐकून घेत होतो. आता हे सरकार एक शब्द सुद्धा ऐकून घेत नाहीत.
घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यात लवकरच नवे धोरण
मुंबई : राज्यातील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात ग्रामपंचायतींपासून ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाच्या अडचणी लक्षात घेऊन लवकरच व्यापक धोरण लागू करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य प्रज्ञा सातव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते. यावेळी सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, निरंजन डावखरे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला. मुंबईत दररोज सुमारे […] The post घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्यात लवकरच नवे धोरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांच्या कार्यपद्धतीत समानता, सुसुत्रता आणणार
मुंबई : बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार असून या संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य संजय खोडके, अभिजीत वंजारी यांनी ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव […] The post बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांच्या कार्यपद्धतीत समानता, सुसुत्रता आणणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘कर्करोग निदान व्हॅन’ची स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून खरेदी
मुंबई : कर्करोगाचे निदान वेळेवर होऊन कर्करुग्णांना तातडीने उपचार मिळण्यासाठी राज्यात आठ कर्करोग निदान व्हॅनची खरेदी करण्यात आली आहे. ही खरेदी जेम पोर्टलवर स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून करण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये ४४ नग वैद्यकीय उपकरणे असून फर्निचर आणि कस्टमायझेशन यांचा समावेश आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात […] The post ‘कर्करोग निदान व्हॅन’ ची स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून खरेदी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आस्थापनांनी खासगी सुरक्षा रक्षकांना द्यावयाच्या लाभाबाबत तपासणी मोहीम राबविणार
मुंबई : महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९८१ अंतर्गत, तसेच इतर कामगार कायद्यातील तरतुदीनुसार सुरक्षा रक्षकांना असणारे सर्व लाभ या आस्थापनांनी अदा करणे बंधनकारक आहे. मात्र सुरक्षा मंडळात नोंदीत नसलेल्या आस्थापना खासगी सुरक्षा रक्षकांना लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. आस्थापनांनी खासगी सुरक्षा रक्षकांना द्यावयाच्या लाभाबाबत जिल्हानिहाय तपासणी मोहीम राबविण्यात येईल, […] The post आस्थापनांनी खासगी सुरक्षा रक्षकांना द्यावयाच्या लाभाबाबत तपासणी मोहीम राबविणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ठाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात ११.३३ कोटींची औषध खरेदी
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून २०२४- २५ मध्ये ५० कोटींची औषध खरेदी नसून ११ कोटी ३३ लाख रुपयांची औषध खरेदी करण्यात आली आहे. आयुक्त आरोग्य सेवा, एकात्मिक आदिवासी विकास योजना आणि नियोजन समितीच्या निधीतून ही औषध खरेदी करण्यात आली आहे, असे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात […] The post ठाणे जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात ११.३३ कोटींची औषध खरेदी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवे वळण आले आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी कुठलाही घातपात नसल्याचे एसआयटीच्या चौकशीत समोर आले आहे. एसआयटीने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात याचा खुलासा करण्यात आला आहे. या प्रकरणातील करण्यात आलेले आरोप हे निराधार असल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. तपासात काय समोर आले? या प्रकरणातील इमारतीचे सीसीटीव्ही तपासण्यात आले असता त्यात काही आढळून आले नाही. तसेच घटनेच्या रात्री उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींचे कॉल रेकॉर्डिंग तपासण्यात आले, त्यातही काही आढळून आले नाही. शवविच्छेदन अहवाल तपासले असता त्यात शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार झाल्याचे कुठलेही चिन्ह दिसली नाहीत. माझा त्या विषयाशी संबंध नाही - आदित्य ठाकरे विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधत असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिशा सालियान मृत्यू प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, मी त्यावेळी पण सांगितले होते की ज्या विषयाशी संबंध नाही त्यावर मी बोलत नाही. मी आज देखील तुम्हाला सांगतो, आज देखील माझी भूमिका हीच आहे की ज्या विषयाची माहिती नाही आणि संबंध नाही त्यावर मी कशाला बोलू? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नितेश राणेंनी नाक घासून माफी मागितली पाहिजे - संजय राऊत याच प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, तुमच्याच माध्यमातून सत्य समोर आले आहे. आता काय करणार, सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला हवी. त्यानंतर नारायण राणेंचा एक मुलगा आहे मंत्री, एवढा आहे बघा तो, काहीतरी बडबडत असतो नेपाळ्या सारखा. त्याने माफी मागायला पाहिजे. नाक घासून. यंत्रणेचा गैरवापर करता, पण लक्षात ठेवा डाव उलटला जाईल केव्हातरी तुमच्यावर, तुम्हाला सुद्धा यातूनच जावे लागेल. उद्धव ठाकरे सरकारने पुरावे का नष्ट केले? - राम कदम शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली असली तरी भाजपच्या नेत्यांचा या निर्णयावर आक्षेप घेतल्याचे दिसत आहे. भाजपचे नेते राम कदम दिशा सालियान मृत्यू प्रकरणी बोलताना म्हणाले, माझी मागणी आहे की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने पुरावे का नष्ट केले, कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला? जारी कोर्टात न्याय मिळाला नाही, ईश्वराच्या कोर्टात न्याय आहे. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने हात जोडून दिशा सालियान परिवाराची माफी मागितली पाहिजे.
भाजप नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी गुरूवारी दिशा सालियन प्रकरणात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना सूचक इशारा दिला. दिशा सालियनच्या वडिलांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे व डिनो मोरिया याच्यासह अनेकांची नावे घेतली आहेत. या प्रकरणी येत्या 16 तारखेला सुनावणी होणार असून, तोपर्यंत थांबा, असे ते म्हणालेत. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय व वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झाले नाही, असा दावा मुंबई पोलिसांनी हायकोर्टात दाखल केलेल्या आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. विशेषतः यात त्यांनी आदित्य ठाकरे यांचा या हत्येशी कोणताही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर नीतेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना 'पिक्चर अभी बाकी हैं' चा इशारा दिला. पूर्ण पिक्चर अजून संपला नाही नीतेश राणे गुरूवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, दिशा सालियन प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. त्यावर किती भाष्य करू शकतो याविषयी प्रश्नचिन्ह आहे. मुळात हा फक्त नीतेश राणे किंवा राजकीय आरोपांचा विषय नाही. दिशा सालियन यांच्या वडिलांनी स्वतःची मुलगी गमावली. ते सुद्धा राजकीय आरोप करणार आहेत का? ते सुद्धा कुणाचे नाव मुद्दाम घेणार आहेत का? त्यांनी स्वतः दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे, डिनो मोरिया आदींची नावे घेतली आहेत. एक लक्षात घ्या. मी एवढेच सांगेन की, पिक्चर अभी बाकी हैं. पूर्ण पिक्चर अजून संपला नाही. कोर्टाने 16 तारीख दिलेली आहे. त्या तारखेला या प्रकरणात काय होते ते आपण पाहू. काही हरकत नाही. 16 तारखेला काय होते ते पाहू राज्य सरकार व आत्ताच्या पोलिसांनी त्यांना जे नजरेसमोर दिसले असेल त्यानुसार आपला अहवाल सादर केला असेल. तुम्हाला आठवत असेल, या प्रकरणी एसआयटी स्थापन झाली तेव्हा मी एक पत्र दिले होते. त्यात मी एका अधिकाऱ्यावर दिशा सालियन हत्या प्रकरणात हात असल्याचा आरोप केला होता. त्याला बदलण्याची मागणी मी केली होती. त्यामुळे जे काही प्रतिज्ञापत्र देण्यात आले आहे ते कोर्टात सादर करण्यात आले आहे. कोर्ट त्यावर योग्य तो निर्णय घेईल. दिशा सालियनचे वडील याविषयी काउंटर प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. याविषयी 16 तारखेला काय होते ते पाहू, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरेंवर खोटे बोलण्याची याचिका नीतेश राणे पुढे म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी यासंबंधी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपण आमदार असल्याचे लपवले आहे. त्यांनी स्वतःला समाजसेवक व उद्योजक आहे अशी खोटी माहिती त्यांनी दिली आहे. त्याविरोधातही एक याचिका दाखल करण्यात आली आहे. म्हणजे कोर्टाला खोटे बोलणारे तुमच्याकडे येऊन किती खरे बोलत असतील हे येणाऱ्या दिवसांत कळेल. त्यामुळे या प्रकरणी कुणीही अर्धवट माहितीच्या आधारे वार्तांकन करू नये. घाईगडबड करू नये. हे प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट आहे. एका मुलीने आपले आयुष्य गमावले आहे. एका वडिलांनी आपली मुलगी गमावली आहे. त्यामुळे आपण कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणावर भाष्य करू नये, असे ते म्हणाले. हे ही वाचा... ठाकरे बंधूंची स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपड:त्यांनी एकमेकांना मिठ्या माराव्यात, पण मराठीसाठी एकत्र येण्याचे भासवू नये -नारायण राणे मुंबई - भाजप खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर टीका केली. राज व उद्धव ठाकरे हे दोघे बंधू स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत. या दोघांचीही सध्या स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे, असे ते म्हणालेत. राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. वाचा सविस्तर
शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्याचे नियोजन
सोलापूर : शासनाच्या अमृत २योजनेंतर्गत९८२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव महापालिकेकडून अखेर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे (एमजेपी) सादर करण्यात आला आहे. एमजेपीकडून हा प्रस्ताव साधारणतः दोन आठवड्यात शासनाकडे पाठविण्यात येईल. अत्याधुनिक पाणीपुरवठा यंत्रणेसह दररोज पाणीपुरवठ्याचे नियोजन यामध्ये प्रस्तावित आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली. सोलापूर शहरातील अंतर्गत जलवाहिनी तसेच नव्या पाण्याच्या टाक्या या […] The post शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्याचे नियोजन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांच्या वतीने मराठीच्या मुद्यावरून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून राज आणि उद्धव ठाकरे हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या अधिकृत अकाउंटवर राज ठाकरे यांचा फोटो असलेले पोस्टर पोस्ट करण्यात आले आहे. मुंबईमध्ये होणारा विजयी मेळावा हा कोणत्याही पक्षाचा मेळावा नाही. त्यामुळे या व्यासपीठावर किंवा मेळावा परिसरात कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह असणार नाही. मात्र, या मेळाव्यातून पुन्हा एकदा ठाकरे ब्रँड स्थापित करण्याचा प्रयत्न केला जातोय. या मेळाव्याचे मुख्य आकर्षण हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हेच असल्याचे खासदार संजय राऊत यांनी देखील म्हटले आहे. त्यामुळे व्यासपीठावर देखील केवळ प्रमुख नेत्यांनाच संधी दिली जाणार आहे. मेळाव्याचे मुख्य आकर्षण उद्धव-राज ठाकरे विजयी मेळावा पण पक्षाचे लेबल नाही अध्यादेश रद्द झाल्यानंतर पाच तारखेला मोर्चा ऐवजी विजयी मेळावा घेण्याचा निर्णय उद्धव आणि राज ठाकरे यांनी घेतला आहे. मात्र, या मेळाव्याला कोणत्याच पक्षाचे लेबल नसेल. या विषयाला सर्वांनी पक्षाच्या पुढे जाऊन पाहिले पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. युती होतील, तुटतील मात्र मराठी भाषा एकदा तुटली तर ती परत येणार नाही. मराठी भाषेच्या माध्यमातून संस्कृती टिकून आहे. ती जर गेली, युती-आघाड्यांना काय अर्थ? असा प्रतिप्रश्न राज यांनी उपस्थित केला होता. निवडणुका आल्यानंतर युतीचा विचार करू. मात्र आता सध्या या सर्व गोष्टीकडे संकट म्हणून पहावे, त्याला राजकीय लेबल लावू नये, असे आवाहन राज यांनी केले होते. त्यानुसार हा मेळावा कोणत्याही पक्षाच्या लेबल शिवाय असणार आहे.
युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांचा सत्कार
सोलापूर- काँग्रेस भवन सोलापूर येथे देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ,खासदार प्रणिती शिंदे,माजी आमदार प्रकाश यलगुलवार सर, शहर काँग्रेस कमिटी चेतन नरोटे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांची भारत सरकारच्या मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या मनोगतात म्हणाले गणेश […] The post युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांचा सत्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एक वृक्ष आईच्या नावे:हिंगोलीत अखिल भारतीय अग्रवाल महासभेचा उपक्रम, १ हजार वृक्षलागवडीचा संकल्प
हिंगोलीत अखील भारतीय अग्रवाल महासभेच्या वतीने एक वृक्ष आईच्या नावे या उपक्रमाला गुरुवारपासून ता.३ सुरवात करण्यात आली आहे. या उपक्रमातून पहिल्याच दिवशी ५० झाडे लावण्यात आली असून पुढील काही दिवसांतच एक हजार झाडे लाऊन त्यांचे संगोपन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंगोली येथील अखील भारतीय अग्रवाल महासभेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत एक वृक्ष आईच्या नावे हा उपक्रम राबविण्याचा निर्णय महिला सभेच्या वतीने घेण्यात आला. त्यानुसार शहरातील ओपनस्पेस व रस्त्याच्या दुतर्फा रोपांची लागवड करून त्याचे संगोपन करण्याचेही ठरविण्यात आले. या रोपांना ट्री गार्ड बसवून त्याची सुरक्षा ठेवणे व पावसाळ्यानंतर या वृक्षांना पाणी देऊन त्यांची काळजी घेतली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने देशी वाणांची झाडे लावली जाणार असून त्यात वड, पिंपळ, आवळा, जांभूळ, सिताफळ, करंज, आंबा या प्रमुख झाडांचा समावेश आहे. शहरासह जिल्हाभरातील नर्सरीतून देशी वाणांची रोपे उपलब्ध करून घेतली जाणार आहेत. त्यानुसार आज या उपक्रमाला सुरवात झाली असून शहरालगत श्रीनगर भागात रस्त्याला लागूनच वृक्षारोपन करण्यात आले. महासभेच्या प्रांतीय अध्यक्षा सीमा पंच, पुष्पा बगडीया यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आलेल्या या उपक्रमात आज ५० झाडे लावण्यात आली आहेत. यावेळी महासभेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. निता बगडीया, डॉ. कंचन बगडीया, रश्मी केडीया, नेहा अग्रवाल, रक्षा बगडीया, कुसुम अग्रवाल, मीनाक्षी बगडीया, स्वप्ना अग्रवाल, रुपाली बगडीया, नीता कयाल, रुचीता अग्रवाल, टीना लदनीया, किरण अग्रवाल, अभिलाषा भारूका यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती. एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प सध्या ग्लोबल वार्मिंगसाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय आहे. या शिवाय कोविड काळात प्रत्येकालाच ऑक्सीजनचे महत्व पटले आहे. त्यामुळेच महासभेने वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला असून यावर्षी पावसाळ्यात एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प आहे, असे अग्रवाल महासभेच्या जिल्हाध्यक्षा डॉक्टर नीता बगडिया यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे. मात्र भौगोलिक परिस्थितीनुसार सौर पंप देणे शक्य नसल्यास त्या ठिकाणी पारंपरिक कृषी पंप देण्याबाबत शासन विचार करेल. शेतकऱ्यांसाठी कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या उत्तरात दिली. विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात लावण्यात आलेल्या सीआरआय कंपनीच्या सोलार पंपाच्या तक्रारी बाबत मुद्दा उपस्थित केला होता. या चर्चेत सदस्य शेखर निकम यांनीही सहभाग घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत देशातील ५० टक्के वीज अपारंपरिक स्त्रोतांतून निर्मित करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. त्याला अनुसरून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यातही सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन दिले असून मागेल त्याला सौर पंप देण्याची योजना सुरू केली आहे. विशेष म्हणजे सौर पंप घेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.चंद्रपूर जिल्ह्यात सी.आर.आय. कंपनीमार्फत लावण्यात आलेल्या सौर कृषी पंपांबाबत आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन कंपनीला १३ लाखाचा दंडही करण्यात आला असल्याचे राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी सांगितले. या कंपनीच्या सौर कृषी पंपांबाबत १८३ शेतकऱ्यांनी ५४४ तक्रारी नोंदवल्या होत्या. यातील ५४२ तक्रारींचे निवारण करण्यात आले असून, उर्वरित दोन तक्रारी पाण्याचा स्त्रोत कोरडा झाल्यामुळे निर्माण झालेल्या आहेत. जिथे पाण्याची पातळी खालावली आहे, अशा ठिकाणी बुस्टर पंप बसवून नदी किंवा जलस्रोतांमधून शेतापर्यंत पाणी पोचविण्यात येत आहे, असेही राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले. पारंपरिक कृषी पंप देण्याचा विचार राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंपांना प्राधान्य दिले आहे. ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली. भौगोलिक परिस्थितीमुळे सौर पंप देणे शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देण्याचा विचार शासन करणार आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी पंपाच्या वीज जोडणी संदर्भात लवकरच बैठक होणार आहे. विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सीआरआय कंपनीच्या सोलार पंपांबाबत तक्रारींचा मुद्दा उपस्थित केला होता. बुस्टर पंप बसवून नदी किंवा जलस्रोतांमधून शेतापर्यंत पाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३० पर्यंत देशात ५० टक्के वीज अपारंपरिक स्रोतांतून निर्मित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्यात 'मागेल त्याला सौर पंप' ही योजना सुरू आहे. शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत शासनाकडून अनुदानही मिळते. चंद्रपूर जिल्ह्यात सी.आर.आय. कंपनीच्या सौर कृषी पंपांबाबत १८३ शेतकऱ्यांच्या ५४४ तक्रारी होत्या. कंपनीवर १३ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ५४४ पैकी ५४२ तक्रारींचे निराकरण झाले आहे. उर्वरित दोन तक्रारी पाण्याचा स्त्रोत कोरडा पडल्यामुळे आहेत. पाण्याची पातळी खालावलेल्या ठिकाणी बुस्टर पंप बसवून नदी किंवा जलस्रोतांमधून शेतापर्यंत पाणी पोहोचवले जात आहे.
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा रूपात संक्रमित होणाऱ्या थॅलेसमिया या रूग्णांच्या समस्येकडे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे व मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभेत लक्ष वेधले. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी याची गांभीर्याने दखल घेत उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. थॅलेसेमिया रुग्णांना खाजगी कंपनीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या आयर्न केलेशन गोळ्यांची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन बोर्डीकर यांनी सभागृहात दिले. तसेच, या औषधांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.एकाचवेळी मायनर आणि मेजर थॅलेसेमिया रुग्ण आढळतात, अशा प्रकरणांमध्ये एचपीएलसी चाचणी सक्तीची करण्यासाठी लवकरच शासन नियमावली आणणार आहे. यासोबतच विवाहपूर्व एचपीएलसी चाचणी सक्तीची करता येईल का, याचा अभ्यास करण्यात येईल. या चाचण्या करून भविष्यात थॅलेसेमियासारखा गंभीर आजार रोखता येऊ शकतो असे बोर्डीकर यांनी आ. ठाकरे यांच्या प्रश्नावर सांगितले.सध्या राज्यात एकूण १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण असून, यामध्ये सर्वाधिक रुग्ण विदर्भात आणि विशेषतः नागपूरमध्ये असल्याचे आमदार विकास ठाकरे*यांनी सांगितले. त्यांनी मध्य नागपूरमधील डागा रुग्णालयात बांधण्यात आलेले पण अजूनही सुरू न झालेले सीव्हीएस केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. याशिवाय, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी रुग्णांना १५ लाख रुपयांची विशेष आर्थिक मदत देण्याची योजनाही सुरू करण्याची त्यांनी मागणी केली. आमदार यावेळी दटके यांच्या प्रश्नाला उत्तर देताना परभणीच्या धर्तीवर संपूर्ण राज्याकरिता एसओपी तयार केली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याचे आरोग्य राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.
पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झालेल्या बाली नावाच्या मांजरीला उपचारासाठी पुण्यातील स्मॉल अॅनिमल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले. भारतातील आघाडीचे पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले असून तब्बल सहा महिन्यांनंतर कोणत्याही वेदनेशिवाय ती पुन्हा चालू लागली आहे. वेळीच उपचार केल्याने आज बालीला जगण्याची दुसरी संधी मिळाली आहे. उपचारापूर्वीच बाली अतिशय खेळकर आणि उत्साही होती. जरी ती रस्त्यावर राहत असली तरी ती प्राणिप्रेमी राधिका दीक्षित यांच्या जीवनाचा एक भाग बनली होती. दररोज सकाळी, बाली तिचे डोळे मिचकावून राधिकाचे स्वागत करत असे तसेच आशेने खाऊ आणि काही क्षण खेळण्याची वाट पाहत असे. दिवसेंदिवस त्यांचे भावनिक बंध अधिक घट्ट होत गेले. एकेदिवशी जेव्हा राधिकाला बाली रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळली. त्याक्षणी तिला पाहून राधिकाला मोठा धक्काच बसला. त्यादिवशी राधिका बालीला घरी घेऊन गेली, तिला सुरक्षित वातावरण उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला. २ सप्टेंबर २०२४ रोजी, राधिका बालीला नियमित तपासणीसाठी क्लिनिकमध्ये घेऊन गेली. डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली, तिला लसीकरण करण्यात आले आणि तिचे डिवर्मींग करण्यात आले.त्यानंतर २६ जानेवारी २०२५ रोजी, बालीला आपत्कालीन स्थितीत क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले कारण तिने तिची चालण्याची क्षमता गमावली होती. एक्स-रेमध्ये पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले आणि तिच्या रक्त चाचण्यांमध्ये अनेक कमतरता दिसून आल्या. डॉ. परदेशी यांनी ताबडतोब तिला वेदना कमी करण्यासाठी आणि तिची प्रकृती सुधारण्यासाठी विटकोफोल इंजेक्शन आणि मेलोफ्लेक्स लिक्विडसह औषधे देण्यास सुरुवात केली. तिच्या प्रकृतीचे निरीक्षण केल्यानंतर, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले. प्रक्रिया यशस्वी झाली, परंतु शस्त्रक्रियेनंतर काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे होते. डॉ. परदेशी यांनी बालीला शस्त्रक्रियेच्या जागेवर चाटणे किंवा चावणे टाळण्यासाठी ताबडतोब एलिझाबेथ कॉलर वापरण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने, बालीने स्वतःच्याच डाव्या बाजूच्या मागच्या पायाला चावले, ज्यामुळे टिबिया आणि फायब्युला हाडे मोडली.त्यानंतर पुढील काही महिने जखमेची काळजी घेण्यात आली, जिथे टीमने बालीचा पाय आणि जीव वाचवण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली. तिने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. जून २०२५ मध्ये, तिच्या पाठीचा पूर्णतः बरा झाला असून आता बरी पुर्ववत आयुष्य जगु लागली आहे. स्मॉल अॅनिमल क्लिनिकमधील पशुवैद्यकीय सर्जन डॉ. नरेंद्र परदेशी म्हणाले की, बालीचे हे प्रकरण आम्ही हाताळलेल्या सर्व प्रकरणांमध्ये भावनिकदृष्ट्या अधिक गंभीर होते. तिने सर्व काही सहन केले व जगण्याची कधीच गमावली नाही.
भंडारा जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तसेच गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने गोसेखुर्द धरणाच्या ३३ दारांपैकी नऊ दारे गुरुवारी (दि. 3 जुलै) सकाळी उघडण्यात आली. यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच गोसेखुर्द धरणाची नऊ दारे अर्धा मीटरने उघडण्यात आली असून ७३०.७४ क्युमेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. याशिवाय धापेवाडा धरणाची ७ दारे उघडली असून ८९०.९ क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वैनगंगा नदीची कारधा येथील धोक्याची पातळी २४५.५० मी असून सध्या पाण्याची पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. गोसेखुर्द धरणाची नऊ दारे उघडल्यामुळे वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रामध्ये पूर नियंत्रण करिता आज ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नऊ वक्रद्वारे खुली करून अंदाजे ५३० क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. दोन्ही जलविद्युत प्रकल्पांचा १७८ क्युमेक्स विसर्ग पकडून एकूण अंदाजे ७०८ क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने करण्यात आले आहे.
भाईंदर : काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत राहर्णाया महिलेला तिच्या नव-याची आणि भावाची दारू सोडवतो सांगत भोंदू बाबाने महिलेकडून दागिने आणि रोख रक्कम अशी ६ लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी भोंदू बाबाला अटक करण्यात आली आहे. काशीगाव येथील जनता नगर झोपडपट्टीमध्ये राहणा-या महिलेला त्यांच्या चाळीमध्ये राहणारे अयोध्या प्रसाद गिरी हे दारु सोडविण्याचे औषध देतो, मला तंत्र […] The post भोंदू बाबाकडून महिलेची फसवणूक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २०२५ सुरू झाल्यापासून विरोधकांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. बुधवारी (२ जून) विधानसभेत विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी (३ जून) विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्ष नव्हे तर सत्ताधारी असलेल्या पक्षातील नेते सुधीर मुनगंटीवार यांनीच सरकारला धारेवर धरले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या […] The post कामाचा वेग संथ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सालियन प्रकरणात राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागितली पाहिजे
मुंबई : दिशा सालियन प्रकरणात सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे, त्यानंतर नारायण राणेंचा मुलगा जो मंत्री आहे त्याने नाक घासून माफी मागितली पाहिजे, अशी टीका राऊतांनी केली. सत्ता आणि यंत्रणेचा गैरवापर करून तुम्ही एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करायला बघता, लक्षात ठेवा एक दिवस तुमच्यावर डाव उलटणार, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत माध्यमांशी […] The post सालियन प्रकरणात राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागितली पाहिजे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी एसटी महामंडळाचा संचित तोटा १० हजार ९६२ कोटींचा आहे. एसटीमध्ये अधिका-यांच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळला आहे. अधिका-यांचे सिंडिकेट आहे. दोन हजार कोटींचे एसटी बस खरेदीचे कंत्राट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रद्द केले तरी या घोटाळ्याचे सूत्रधार असलेल्या अधिका-यांवर कारवाई झालेली नाही. भ्रष्ट अधिका-यांमुळे ‘आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं’ अशी स्थिती एसटी […] The post एसटीचा तोटा १०,९६२ कोटींचा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सावत्र बापाकडून चिमुरड्याचा खून
अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट येथे ही अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे. दर्शन वैभव पळसकर (वय ९) या निष्पाप मुलाचा सावत्र वडील आकाश साहेबराव कान्हेरकर याने गौरव वसंतराव गायगोले या मित्राच्या मदतीने गळा आवळून खून केला आणि त्याचा मृतदेह अकोला व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात फेकून दिला. २ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता […] The post सावत्र बापाकडून चिमुरड्याचा खून appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ठाण्यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुजराती दुकानदाराला मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता. या घटनेचा तीव्र निषेध करत आज संपूर्ण मीरा भाईंदर मधील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आपला संताप व्यक्त केला. तसेच या मारहाण केल्यावरून या व्यापाऱ्यांनी मार्च देखील काढला. मात्र, हा मोर्चा व्यापाऱ्यांचा नसून भारतीय जनता पक्षाचा आरोप मनसेने केला आहे. या संदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी भाजपविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. सदरील प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला. मात्र, त्या आधी तो व्यापारी काय म्हणाला? ते समोर आलेले नाही. त्या व्यापाऱ्याने मजुरीची भाषा केली, त्यामुळे त्याला आधी हात जोडून विनंती केली. नंतर हात सोडून विनंती केली असल्याचे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मराठी भाषेचा कोणत्याही प्रकारचा अपमान सहन करणार नसल्याचेही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. मराठीचा अपमान केला तर कानाखाली पडणारच, अशी प्रतिक्रिया देशपांडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत...
मनसेविरोधात अमराठी व्यावसायिकांची एकजूट
मुंबई : प्रतिनिधी मीरा रोड येथील शांती पार्क परिसरात असलेल्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीन या दुकानाच्या मालकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज संपूर्ण मीरा-भाईंदर शहरातील व्यावसायिक आणि व्यापा-यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. मारहाण झालेल्या व्यावसायिकासोबत जे घडले, ते भविष्यात इतर कोणासोबतही घडू शकते, अशा चिंतेतून व्यापा-यांनी स्वत:च्या सुरक्षेच्या मुद्यावर एकजूट दाखवत […] The post मनसेविरोधात अमराठी व्यावसायिकांची एकजूट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आरोग्य विभागातील ‘व्हॅन’ खरेदीत घोटाळा
मुंबई : प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचे निदान करण्यासाठी आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी केली आहे. पण या व्हॅन दुप्पट-तिप्पट दराने खरेदी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात गैरव्यवहार झाला आहे, याची चौकशी होऊन अधिवेशन संपण्याच्या आत त्याचा अहवाल सभागृहासमोर मांडावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारने आठ कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनची खरेदी […] The post आरोग्य विभागातील ‘व्हॅन’ खरेदीत घोटाळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण गुरुवारी ( दि.3) वेळापूरजवळील ठाकूरबुवा समाधीसमोर असलेल्या मोकळ्या जागेत पार पडले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चोपदारांनी आखलेल्या या रिंगणात वारकऱ्यांनीही ज्ञानोबा-माऊलीच्या गजरात तेवढ्याच शिस्तीने मृदंगाच्या तालावर टाळाचा ठेका धरला. सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. जिल्ह्यात सोहळा दाखल झाल्यानंतर पहिल्यांदा पावसाच्या हलक्या सरी पडल्या. या गोल रिंगणात तीन प्रकारे वारकरी टाळाच्या तालावर नामस्मरणात रममाण होतात. एक म्हणजे बसून टाळाचा नाद, दुसरे दंडवत घातल्याच्या स्वरुपात पालथे पडून विठुरायाचे नामस्मरण आणि तिसरे म्हणजे आकाशाकडे तोंड करून उपडे होत नामस्मकरण केले. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या वेळी वारकऱ्यांच्या अंगी असलेली शिस्त आणि विठुरायाच्या भेटीच्या आगतिकतेने निर्माण झालेली धार्मिक भावना रिंगण सोहळ्यात दिसत होती. या रिंगणाने अनेकांच्या डोळ्याचे पारण फिटले. निमाले भेद सारे,अवघा होई काला...फुगड्या, हनुमान उड्या खेळ असा रंगलामेघ सावळे, आकाशातून उतरले खेळाया, दंग वारकरी हरिनाम गाया...या उक्ती प्रमाणे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात गुरुवारी चित्र होते. अर्धनारी नटेश्वराच्या वेळापूर नगरीतून माउलींच्या पालखीचे सकाळी प्रस्थान झाले. त्यानंतर सोहळा ठाकूरबुवाची समाधी समोरील मोकळ्या रानामध्ये रिंगण सोहळ्यासाठी थांबला. चोपदारांनी आखलेल्या रिंगणाची पाहणी केली. भोपळे दिंडीने जरपताकाचा ध्वज घेऊन रिंगणात फेऱ्या मारल्या. त्यानंतर सुरु झाला देवाचा अश्व व माउलीच्या अश्वाचा पाठशिवणीचा खेळ. चौखूर उधळत दोन्ही अश्वांनी रिंगण पूर्ण केले. भाविकांनी माऊलीच्या नावाचा जयघोष केला. अश्वाच्या टापा-खालची माती कपाळी लावण्यासाठी वारकऱ्यांची लगबग सुरु होती. रिंगण सोहळ्यानंतर वारकऱ्यांनी मैदानात पाऊल, हनुमान उड्या, हुतुतू या खेळांसह महिलांनी फेर धरला, भुई फुगड्या खेळल्या. पंढरी-नाथाची नगरी जवळ आल्याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वहात होता. चालून थकल्याचा शिणवटा विविध खेळांद्वारे दूर केला. विविध दिंड्यांनी रिंगण करीत पाऊल, हनुमान उड्या खेळल्या. त्यानंतर पालखीच्या सभोवताली मानाच्या दिंड्यांचा टाळ-मृदंगाच्या तालात ठेका अन् उड्यांचा खेळ सुरु झाला. चोपदारांनी मानाच्या दिंड्यांना खेळासाठी निमंत्रण दिले. वारकऱ्यांनी त्यांच्या दिंडी मालकास खांद्यावर बसवून उड्या, टाळांच्या खेळासाठी पालखी जवळच्या रिंगणात आणले. ‘ज्ञानोबा- माऊली...’ गजरात एकाच ताल, सुरात वाजणारे टाळ-मृदंगाच्या निनादाने संपूर्ण आसमंत निनादून गेले. त्यानंतर ठाकूर बुवांच्या समाधीवर माउलींच्या पादुका ठेवून अभिषेक झाल्यानंतर सोहळा तोंडले गावातील नंदाच्या आेढ्यालगत दुपारच्या जेवणासाठी विसावला.
भाजप खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर टीका केली. राज व उद्धव ठाकरे हे दोघे बंधू स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र येत आहेत. या दोघांचीही सध्या स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे, असे ते म्हणालेत. राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख यांनी मराठीच्या मुद्यावरून एकत्र येण्याची घोषणा केली आहे. त्यांचा पहिला संयुक्त मेळावा 5 जुलै रोजी मुंबईत होणार आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राज व उद्धव ठाकरे स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत. ते सध्या स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी एकत्र येत आहेत. हे दोन भाऊ एकत्र येणार असतील तर त्याचा एवढा गवगवा करण्याची गरज नाही. त्यांनी एकमेकांना घरी बोलवावे, एकत्र जेवावे, एकमेकांना मिठ्या माराव्यात. पण त्यांनी आम्ही मराठीसाठी एकत्र येत आहोत असे भासवण्याचा प्रयत्न करू नये. या दोघांनी आतापर्यंत मराठीसाठी मराठी तरुणांच्या नोकरी व रोजगारासाठी काय केले? हिंदी भाषा लादण्याच्या निर्णयावर कुणाची स्वाक्षरी आहे? उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना हा निर्णय रद्द का केला नाही? असा सवाल नारायण राणे यांनी यावेळी ठाकरे बंधूंवर निशाणा साधताना केला. मुंबईत किती टक्के मराठी माणूस राहिला? ते पुढे म्हणाले, कौटुंबिक वाद चव्हाट्यावर आणणे योग्य नाही. राज ठाकरे यांनीच त्यावर बोलावे. पण उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवसेनेत राणे अवघड केले होते हे सत्य आहे. राज यांचा एकही निर्णय तेव्हा मान्य केला जात नव्हता. उद्धव यांच्यासोबत आज कुणीही नाही. दोन भाऊ एकत्र येण्याचा आनंद आहे. पण आज किती टक्के मराठी माणूस मुंबईत राहिला आहे? याला जबाबदार कोण? हे सोयीचे, फायद्याचे व कुटुंबाच्या स्वार्थाचे राजकारण आहे. ठाकरे एकत्र आल्याने भाजपला फरक पडणार नाही राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही. आम्ही मराठी नाही का? आम्ही त्यांच्याहून जास्त मराठी माणसांसाठी काम केले आहे. मला उद्धव ठाकरे यांचा एकही चांगला गुण माहिती नाही. पण राज ठाकरे यांचा स्वभाव रोखठोक आहे. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांत सत्ता व हिंदुत्व दोन्ही गमावले. आत्ता राज ठाकरे चुकत आहेत किंवा नाही हा माझा प्रश्न नाही. पण त्यांच्या हाती काहीही लागणार नाही, असे ते म्हणाले. दिशा सालियन प्रकरणावरही केले भाष्य नारायण राणे यांनी यावेळी दिशा सालियन प्रकरणावरही भाष्य केले. ते म्हणाले, माझी दिशा सालियन प्रकरणावर बारीक नजर आहे. एसआयटीने दिलेला रिपोर्ट खराच असेल असे नाही. अनेक पोलिस रिपोर्ट खोटे असतात. पोलिसांचा रिपोर्ट काहीही असला तरी माझा त्यावर विश्वास नाही. कोर्ट अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत मी त्यावर विश्वास ठेवणार नाही, असे ते म्हणाले.
महायुतीत आमदार नाराजीचे सत्र सुरूच
मुंबई : महायुती सरकारमध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी मिळत नसल्याची तक्रार केली जात होती. मात्र आता महायुतीच्या आमदाराची निधी मिळत नसल्याची तक्रार समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार परिणय फुके यांनी भर सभागृहातच निधी मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली. हा आमच्यावर दुजाभाव असून आमदार निधीही दिला जात नाही अशी तक्रारही त्यानी सभापतींकडे […] The post महायुतीत आमदार नाराजीचे सत्र सुरूच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
न्यायालयाच्या सफाईगार पदासाठी एम.एस्सी., बी.एड उमेदवारांनी केले अर्ज
चंद्रपूर : प्रतिनिधी जिल्हा न्यायालय, चंद्रपूर येथे आस्थापनेवरील सफाईगार या निम्नश्रेणी पदाच्या अवघ्या चार जागांसाठी तब्बल ८५० वर अर्ज आले आहेत. यात एम.एस्सी., डी.एड., बी.एड. अशा उच्चशिक्षित उमेदवारांनी देखील अर्ज केले आहेत. परिणामी शिक्षणाच्या शिखरावर पोहोचलेले हात आता झाडूकामासाठी पुढे येत असल्याचे वास्तव या भरतीतून पुढे आले आहे. सद्यस्थितीत स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-यांची संख्या मोठ्या […] The post न्यायालयाच्या सफाईगार पदासाठी एम.एस्सी., बी.एड उमेदवारांनी केले अर्ज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बीडमध्ये गतिमंद तरुणीवर अत्याचार
बीड : प्रतिनिधी बीडच्या केज तालुक्यामध्ये एका गतिमंद तरुणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. २ जून रोजी सदर तरुणी आपल्या नातेवाईक महिलेसोबत आरोग्य उपकेंद्रात जात असताना एकेठिकाणी थांबली होती. यावेळी नानासाहेब चौरे या नराधमाने या गतिमंद तरुणीवर अत्याचार केला. आरोपी नानासाहेब चौरे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर आता केज पोलिस ठाण्यात गुन्हा […] The post बीडमध्ये गतिमंद तरुणीवर अत्याचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वातावरण आधीच तापलेले असताना, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेत गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलन छेडले आहे.महाज्योती योजनेच्या निधीअभावी ओबीसी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात आहे, हे कारण देत हाके यांनी थेट समुद्रात उतरून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. हाके यांच्यासह विद्यार्थी व कार्यकर्ते थेट समुद्रात उतरले. उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो! अशा घोषणांनी चौपाटी दणाणून सोडली. आंदोलनावेळी सरकारमधील ओबीसी नेते आणि मंत्र्यांचा देखील तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून हाके आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले. महाज्योतीवरून नाराजीचा उद्रेक हाके यांनी स्पष्टपणे सांगितले की, सारथी व बार्टीला कोट्यवधींचा निधी मंजूर होत असतानाही महाज्योती योजनेला तीन वर्षांपासून सातत्याने डावलले जात आहे. यामुळे हजारो ओबीसी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून शासनाने याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. अजित पवारांना थेट इशारा यावेळी हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट तोफ डागली. लक्ष्मण हाके म्हणाले की, अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे ओबीसी समाज त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे. जर मुख्यमंत्री शिंदे यांनी यामध्ये हस्तक्षेप केला नाही, तर महाज्योतीच्या प्रश्नावर राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडले जाईल. ..तर उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या लक्ष्मण हाके म्हणाले की, जर अजित पवारांना अर्थखात्याच्या जबाबदाऱ्यांची जाणीव नसेल, तर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि माळेगाव तालुका अध्यक्ष म्हणूनच काम पाहावं. पैसा आणि सत्तेच्या राजकारणाचं धोरण हे पवार कुटुंबाची परंपरा आहे, असा घणाघात करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही हल्ला चढवला.
नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्यास परवानगी द्या
मुंबई : प्रतिनिधी भाजप आमदार सत्यजित देशमुख यांनी सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा शहरात नागपंचमीला जिवंत सापांची पूजा करण्याची प्रथा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. इतर अनेक आमदारांनी या मुद्याला पाठिंबा दिला. दरम्यान, नागपंचमीला जिवंत सापांची पूजा पुन्हा सुरू करण्याच्या मागणीला महाराष्ट्र विधानसभेत मोठा राजकीय पाठिंबा मिळाला आहे. बुधवारी भाजप आमदार सत्यजित देशमुख यांनी या मुद्यावरील […] The post नागपंचमीला जिवंत नागाची पूजा करण्यास परवानगी द्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूरच्या वृद्ध बळिराजाच्या मदतीला धावला सोनू सूद
मुंबई : प्रतिनिधी लातूरमधील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. शेत नांगरणीसाठी बैल किंवा इतर कोणतीच उपकरणे नसल्याने या वृद्ध शेतक-याने स्वत:लाच औताला जुंपले आहे. हा व्हीडीओ पाहिल्यानंतर सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला. दरम्यान, एकीकडे सरकार शेतक-यांसाठी विविध योजना राबवत असताना अजूनही राज्यातील असंख्य शेतकरी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. याचेच […] The post लातूरच्या वृद्ध बळिराजाच्या मदतीला धावला सोनू सूद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका
मुंबई : प्रतिनिधी आपल्यातल्या आपल्यात महायुतीत वाद होईल, अशा कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करू नका. एखादे वादग्रस्त वक्तव्य करून पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका किंवा टीका करायला संधी देऊ नका अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील वादग्रस्त वक्तव्ये करणा-या आमदारांना दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बुधवारी रात्री […] The post विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कोंढव्यात २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार
पुणे : प्रतिनिधी पुणे शहरातील कोंढवा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणा-या २५ वर्षीय तरुणीवर बुधवारी रात्री साडेसातच्या सुमारास अज्ञात तरुणाने अत्याचार केला. विशेष म्हणजे, आरोपीने महिलेच्या मोबाईलमधून स्वत:चा सेल्फी काढून ‘मी पुन्हा येईन’ असा संदेश ठेवला आहे. या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील एका गार्डेड सोसायटीमध्ये […] The post कोंढव्यात २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चिट
मुंबई : सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नवा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चिट मिळाली आहे. दिशाची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियनची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून […] The post दिशा सालियन मृत्यू प्रकरणातआदित्य ठाकरेंना क्लीन चिट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मीरा रोडच्या शांती पार्क परिसरातील जोधपूर स्वीट्स अॅण्ड नमकीन या दुकानाच्या मालकाला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. या घटनेचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल झाला होता. या घटनेचा तीव्र निषेध करत आज संपूर्ण मीरा भाईंदर मधील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आपला संताप व्यक्त केला. तसेच या मारहाण केल्यावरुन या व्यापाऱ्यांनी मार्च देखील काढला. ही घटना केवळ एका व्यक्ती पुरती मर्यादित न राहता भविष्यात कोणत्याही व्यावसायिकासोबत घडू शकते, अशी भीती व्यापाऱ्यामध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांकडून आज शहरातील सर्व दुकाने बंद ठेवली. आम्ही मराठी भाषा तसेच महाराष्ट्राचा सन्मान करतो. मात्र, कोणीही मारहाण करु नये. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे या व्यापाऱ्यांनी म्हटले आहे. ठाण्यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुजराती दुकानदाराला मारहाण केली होती. दुकानदाराने त्यांना फक्त मराठी बोलणे का आवश्यक आहे? असे विचारले होते. त्याला उत्तर देताना कार्यकर्ते म्हणाले की, हा महाराष्ट्र आहे, म्हणून येथे मराठी बोलावे लागेल. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर मंगळवारी पोलिसांनी काशिमीरा पोलिस ठाण्यात 7 मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रथम कार्यकर्त्यांनी दुकानदाराला धमकावले, नंतर मारहाण केली व्हिडिओमध्ये मनसेचे अनेक कार्यकर्ते दुकानदाराला घेरून त्याच्याशी वाद घालताना दिसत आहेत. एक सदस्य दुकानदाराला म्हणतो, 'तू मला विचारले होते की मराठी का बोलावे? जेव्हा तुला काही अडचण आली तेव्हा तू मनसे कार्यालयात आलास.' दुकानदाराने उत्तर दिले की त्याला माहिती नाही की आता मराठी बोलणे अनिवार्य झाले आहे. यावर, एक कार्यकर्ता दुकानदाराला शिवीगाळ करतो आणि त्याला इशारा देतो की त्याला या भागात व्यवसाय करू दिला जाणार नाही. जेव्हा दुकानदार म्हणतो की त्याला मराठी शिकावी लागेल, तेव्हा एक मनसे सदस्य म्हणतो, हो, तेच सांगतोय. पण तू मराठी का शिकावे असे का विचारत आहेस? हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जाते? जेव्हा दुकानदार म्हणतो- 'सर्व भाषा', तेव्हा एक माणूस त्याला थप्पड मारतो, नंतर दुसरा माणूस त्याला दोनदा मारतो. दुकानदार काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला आणखी चार वेळा थप्पड मारली जाते.
वसमत येथील बाळासाहे ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राने तयार केलेल्या 2 लाख प्रोट्रे हळदीच्या रोपांचे बुुकींग झाले असून गुरुवारपर्यंत ता. 3 मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांनी 1.50 लाख रोपांची उचल केली आहे. दीड महिन्याची तयार रोपे मिळत असल्यामुळे हळद लागवडीनंतर दीड महिन्याचा व्यवस्थापनाच्या खर्चात बचत झाली आहे. राज्यात सर्वात जास्त हळदीचे उत्पादन हिंगोली जिल्हयात विशेषतः वसमत तालुक्यात घेतले जात असल्याने शासनाने वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राला मंजूरी दिली आहे. त्यानुसार मागील दोन वर्षापासून या केंद्राच्या कामाला सुरवात झाली आहे. या शिवाय या केंद्राच्या माध्यमातून राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना हळदीचे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वाण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. दरम्यान, या केंद्रातून शेतकऱ्यांना प्रोट्रेच्या माध्यमातून तयार केलेली रोपे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मागील वर्षी पासून प्रायोगिक तत्वावर रोपे तयार करण्यास सुरवात केली. त्यानुसार मागील वर्षी तयार केलेली 50 हजार रोपे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता यावर्षी केंद्राकडून तब्बल 2 लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने सेलम या वाणासह फुले स्वरुपा, पीडीकेव्ही वायगाव, मेदुकर, एसबी 10843, रोमा, दुग्गीराला रेड, सुदर्शना या रोपांचा समावेश आहे. मात्र सेलम हे वाण राज्यातील वातावरणाशी अनुकुल असल्याने या वाणांची मोठी मागणी झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आता पर्यंत सर्व 2 लाख रोपांचे बुकींग झाले असून गुरुवारी ता. 3 पर्यंत 1.50 लाख रोपांची उचल करण्यात आली आहे. सदर रोपे शेतकऱ्यांना तीन रुपये दराने विक्री करण्यात आली आहे. दीड महिन्याच्या या रोपामुळे शेतकऱ्यांचे दीड महिन्याचे शेतीमधील व्यवस्थापन खर्चात बचत झाली आहे.त्यामुळे लागवडीच्या खर्चात काही प्रमाणात का होईना बचत होणार आहे. पुढील वर्षी जास्तीत जास्त रोपे देणार- हेंमत पाटील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेंमत पाटील म्हणाले की, या केंद्राच्या माध्यमातून हळद उत्पादक शेतकऱ्यांना वातावरणाला अनुकुल असणारे वाण उपलब्ध करून दिले जात आहे. यावर्षी शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेता पुढील वर्षी किमान 4 लाख रोपे तयार करून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
राज्यात सध्या ठाकरे बंधूंमध्ये एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे. मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट देखील एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास काँग्रेससाठी आघाडी ठेवणं अवघड होईल, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे. काँग्रेस शरद पवार-उद्धव ठाकरेंशीच चर्चा करणार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेस केवळ उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशीच आघाडीबाबत चर्चा करेल. राष्ट्रवादी जर एनडीएसोबत गेली, तर महाराष्ट्रात काँग्रेससाठी त्यांच्यासोबत आघाडी कायम ठेवणे शक्य नाही, हे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. ..राज ठाकरे हे गर्दी खेचणारे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, उद्धव आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे हा कौटुंबिक मुद्दा आहे. मात्र ते एकत्र आल्यास शिवसेनेच्या पारंपरिक मतांची एकजूट होऊ शकते आणि त्याचा त्यांना राजकीय फायदा होऊ शकतो. राज ठाकरे हे गर्दी खेचणारे नेते आहेत, मात्र त्यांच्या गर्दीचे मतांमध्ये रूपांतर होत नाही. म्हणूनच सध्या विधानसभेत त्यांचे अस्तित्व नाही. .. तर आघाडी तुटू शकते राष्ट्रवादीच्या गटविलीनीकरणावर भाष्य करताना चव्हाण म्हणाले की, तोही त्यांच्या कुटुंबातील विषय आहे. पण जर हा गट एनडीएमध्ये सामील झाला, तर काँग्रेसला त्यांच्याशी आघाडी शक्य होणार नाही. त्यामुळे आघाडी तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण हा सुद्धा कौटुंबिक मुद्दा आहे. कोणी कोणात विलीन व्हायचे आणि त्या पक्षाचा प्रमुख कोण असेल, हे तेच ठरवतील. प्रतिनिधीमंडळाचा भाग असल्याने थरुर यांच्याकडून समर्थन पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, शशी थरूर हे परदेशात पाठवण्यात आलेल्या प्रतिनिधीमंडळाचा भाग होते आणि एक सदस्य म्हणून सरकारच्या भूमिकेचे समर्थन करणे, त्यांचे कर्तव्य होते, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
सर्वांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अभिनेता सोनू सूद याने बैलाच्या जागी स्वतःला औताला जुंपणाऱ्या लातूरच्या वृद्ध शेतकऱ्याला मदतीचा हात देऊ केला आहे. त्यांनी या शेतकऱ्याशी संपर्क साधत त्यांना बैलजोडी देण्याची ग्वाही दिली आहे. या निमित्ताने सोनू सूदच्या मोठ्या मनाचा पुन्हा एकदा प्रत्येय आला आहे. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना आर्मनिर्भर अर्थात स्वावलंबी बनवण्याचे अनेक दावे करते. पण या दाव्यांची चिरफाड करणारा एक व्हिडिओ लातूर जिल्ह्यातून समोर आला. या व्हिडिओत एका 65 वर्षीय शेतकऱ्याने बैल नसल्यामुळे स्वतःला त्याच्या जागी जुंपल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर अभिनेता सोनू सूद यांनी या शेतकऱ्याला बैलजोडी देण्याची घोषणा केली आहे. आप नंबर भेजिए, हम बैल भेजतें हैं, अशी एका वाक्यातील प्रतिक्रिया सोनूने या प्रकरणी दिली. स्थानिक प्रशासनही झाले सक्रिय सोनू सूदच्या मदतीनंतर स्थानिक प्रशासनही सक्रिय झाले. कृषी विभागाने या शेतकऱ्याला सवलतीच्या दरात उपकरणे पुरवण्याची व ओळखपत्रे बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लातूरचे तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी वृद्ध अंबादास पवार यांच्या शेताला भेट दिली. त्यांच्याकडे कोरडवाहू जमीन असून, शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर कृषी विभागाने त्यांना सबसिडीवर उपकरणे व ट्रॅक्टर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.अंबादास पवार यांच्याकडे कृषी ओळखपत्र नसल्याने त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच त्यांना 1.25 लाख रुपयांपर्यंत अनुदान व शेतीसाठी आवश्यक साधने मिळणार आहेत, अशी माहिती कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी दिली आहे. अहमदपूरच्या शेतकऱ्याचा होता व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ हा लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावचा आहे. त्यात अंबादास पवार व त्यांच्या पत्नी शांताबाई पवार हे दोघे बैल नसल्यामुळे स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन शेतीची मशागत करताना दिसून येत आहेत. अंबादास पवार याविषयी बोलताना सांगतात, कुटुंबाचा चरितार्थ चालवताना आमच्यावर ही वेळ आली. सध्या मजुरीचा खर्च अमाप वाढला आहे. ट्रॅक्टरने पेरणी करणे परवडत नाही. आम्ही बैल बारदानाही घेऊ शकत नाही. शेतीत जेवढे पैसे लावले, त्याहून कमी पैसे हातात येतात. आम्ही बँकेकडून 40 हजारांचे कर्ज घेतले आहे. ते कर्ज आम्ही दरवर्षी भरतो. पुन्हा काढतो. आमचे गळ्याएवढे सोयाबीनचे पोते 4 हजार रुपयांना जाते. पण अवघ्या 25 किलोची सोयाबीनच्या बियाण्यांची बॅग 3 हजार घ्यावी लागते. खताचा भाव 1200 ते 1500 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे शेतीतून जेवढे उत्पन्न निघते. तेवढ्यातच भागवावे लागते. सरकारने कर्जमाफी देऊन दिलासा द्यावा शांताबाई पवार यांनी यावेळी सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली. आमच्याकडे 5 एकर सामायिक जमीन आहे. पण पाण्याची सोय नाही. आमचा मुलगा पुण्यात जाऊन पोट भरतो. मुलगा शिकला नाही म्हणून ही वेळ आली आहे. आमच्या नातवंडांवर तरी अशी वेळ येऊ नये. त्यामुळे जोपर्यंत हात-पाय चालत आहेत, तोपर्यंत आम्ही शेतात काम करतो. हे काम करण्याशिवाय आमच्यापुढे दुसरा कोणता पर्यायही नाही. शासनाने आमचे कर्ज माफ करून खते व बियाण्यांची व्यवस्था करावी, असे त्या म्हणाल्या. समस्या ओळखून उपाययोजना करण्याची गरज उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र हे भारताचे कृषिप्रधान राज्य आहे. शेती हा येथील लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे. पण दुष्काळ, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा, बाजारातील अस्थिरता आणि पुरेशा सरकारी पाठबळाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांचे जीवन सतत संकटात सापडले आहे. या परिस्थितीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, शेतकऱ्यांचे सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य धोक्यात आले आहे. या समस्येचे मूळ शोधून त्यावर उपाययोजना करणे आजच्या काळाची गरज आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला असून यात ते म्हटले की, महाराष्ट्रात अवघ्या 3 महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांनी सरकारला प्रश्नार्थक पद्धतीने विचारले की, हा फक्त एक आकडा आहे का? यावेळी राहुल गांधींनी कर्जमाफी बाबतही सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर अवघ्या 3 महिन्यांत 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हा फक्त एक आकडा आहे का? नाही. ही 767 उध्वस्त घरे आहेत. 767 कुटुंबे कधीही सावरू शकणार नाहीत आणि सरकार गप्प आहे. ते दुर्लक्षित पणे पाहत आहे. शेतकरी दररोज कर्जात बुडत आहेत. बियाणे, खते आणि डिझेल महाग आहेत पण सरकारी एमएसपीची हमी नाही. जोपर्यंत शेतकरी कर्जमाफीची मागणी करत नाहीत तोपर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. उद्योजकांच्या कर्ज माफीवर प्रश्नचिन्ह उद्योजकांच्या कर्ज माफीवरून राहुल गांधींनी सरकारवरही निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, आजच्या बातम्या पहा, अनिल अंबानींचा 48000 कोटी रुपयांचा एसबीआय घोटाळा. राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबद्दल बोलले होते पण आज परिस्थिती अशी आहे की अन्नदात्याचे आयुष्य अर्धे होत चालले आहे. ही व्यवस्था शांतपणे शेतकऱ्यांना मारत आहे. पण मोदीजी स्वतःच्या जनसंपर्काचा तमाशा पाहत आहेत. भाजपने दिले होते कर्जमाफीचे आश्वासन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकार स्थापन होऊन 6 महिने उलटूनही सरकारला हे आश्वासन पूर्ण करता आलेले नाही. मात्र, या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, कर्जमाफीच्या सरकारच्या घोषणेची वाट पाहण्याऐवजी शेतकऱ्यांनी त्यांच्या पीक कर्जाचे हप्ते वेळेवर भरावेत. त्याच वेळी, एकनाथ शिंदे म्हणाले की, जाहीरनाम्यातील आश्वासने पूर्ण करण्याबाबत सरकार सतर्क आहे. केवळ कर्जमाफीच नाही तर प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल.
पुण्यातील खासगी बस सेवा आजपासून बंद:राज्यव्यापी वाहतूक संपात एक हजार बसधारकांचा सहभाग
राज्यात ट्रक, टँकरसह प्रवासी आणि माल वाहतूकदार संघटनांनी पुकारलेल्या संपामध्ये आता खासगी लक्झरी बस धारकांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनने गुरुवारी (दि. 3) मध्यरात्रीपासून संपूर्ण चार्ट (बुकिंग सेवा) बंद ठेवून संपामध्ये सहभागी होण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यव्यापी संपाची व्याप्ती आणखी वाढली असून याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. ई-चलनाच्या नावाखाली जबरदस्ती दंडवसुली सुरू असल्याचा आरोप करीत राज्यातील माल व प्रवासी वाहतूकदारांनी आक्रमक भूमिका घेतली असून, 2 जुलैच्या मध्यरात्रीपासून राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन छेडले आहे. वाहतूकदारांनी सरकारकडे प्रमुख पाच मागण्या केल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेतला जाणार नसल्याचे वाहतुकदारांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनाला मुंबईत मोठा प्रतिसाद मिळत असून न्हावा शेवा, पोर्ट प्लाझा या गजबजलेल्या ठिकाणी शुकशुकाट पहायला मिळाला. मुंबईसह राज्यातील इतर भागात देखील संपला प्रतिसाद मिळत आहेत. तर, काही संघटना पुढील काही दिवसांत संपात सहभागी होणार आहेत. पंढरपूरची वारी असल्याने काही संघटनानी उशिरा संपात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, पुण्यातील लक्झरी बस असोसिएशनने गुरुवारी मध्यरात्रीपासून संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब खेडेकर म्हणाले की, पार्किंगच्या समस्येचे निराकरण, शहर वाहतूक विभागाकडून होणारी ई-चलन संबंधित कारवाई आणि प्रवासी पिकअप संदर्भातील अडचणी या मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही बेमुदत संपाची घोषणा करत आहोत. राज्यव्यापी संपात सहभागी होत आहोत. या निर्णयाची नोंद सर्व लक्झरी बस व्यावसायिक, बस मालक, ऑपरेटर, बुकिंग एजंट आणि संबंधित सभासदांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे आता पुण्यातून खासगी बसने राज्यभरात जाणाऱ्या नागरिकांना फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही संपावर ई चलनाद्वारे बसेसवर होणारी कारवाई आणि अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून आम्ही संप पुकारणार आहोत. पुण्यातून राज्यभरात जाणारे सुमारे एक हजार बसधारक यात सहभागी होतील. -बाळासाहेब खेडेकर, अध्यक्ष, पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशन, पुणे.
आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये उद्धव ठाकरे गटाला अक्षरशः सुरुंग लागले आहे. नाशिक मधील ठाकरे गटाचे अनेक महत्त्वाचे नेते पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होत आहेत. नाशिकचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर हे अलीकडेच भारतीय जनता पक्षात सामील झाले होते. तर त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले विलास शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. चारच दिवसांपूर्वी महानगर प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले मामा राजवाडे हे आता भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. सुधाकर बडगुजर यांनी पक्ष सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाशिक महानगर प्रमुख प्रमुख पदाची जबाबदारी ही विलास शिंदे यांच्यावर सोपवली होती. मात्र विलास शिंदे यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे घाई घाईने उद्धव ठाकरे यांनी मामा राजवाडे यांच्याकडे महानगर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. मात्र, आता तेच मामा राजवाडे हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये भाजपने पक्षप्रवेशाचा सपाटा लावला असून ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी आणि माजी नगरसेवक हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. मामा राजवाडे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी महानगर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवल्या नंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावर मारहाणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे मामा राजवाडे आणि सुनील बागुल हे गेल्या काही दिवसांपासून फरार होते. मात्र ते आता भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असून आता त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मामा राजवाडे यांच्या सोबतच ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका सीमा ताजणे, कमलेश बोडके, प्रशांत दिवे हे देखील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. तर शरद पवार गटाचे गणेश गीते हे देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश सुरू असल्याचे दिसून येत आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत....
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना कोणताही पुरावा आढळलेला नसल्याचं मुंबई पोलिसांनी हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. दिशा सालियन हिची हत्या व लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता. यासंदर्भात हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, शवविच्छेदन अहवालात दिशाच्या शरीरावर कोणताही लैंगिक किंवा शारीरिक अत्याचार झाल्याचे संकेत नाहीत. तिच्या मृत्यूचे कारण डोक्याला जबर मार लागल्यामुळे झालेलं आहे. पोलिसांनी हेही नमूद केलं की, दिशा प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात कोणतेही थेट पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे या आरोपांना कोणताही कायदेशीर आधार नाही. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसंदर्भातील याचिका फेटाळण्याची विनंतीही पोलिसांनी केली आहे. आदित्य ठाकरेंवर व्यक्त केला होता संशय दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती, आणि सुशांतच्या मृत्यूनंतर या दोन्ही प्रकरणांना जोडून काही नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर संशय व्यक्त केला होता. मात्र, आता पोलिसांच्या सखोल तपासानंतर त्या आरोपांना अधिकृतरीत्या खोटं ठरवलं गेलं आहे. डोक्याला मार लागल्याने दिशाचा मृत्यू पोलिसांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिशावर कोणताही लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच तसेची तिची हत्या केली नसल्याचे देखील सांगितले. दिशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचेबाबत तिच्या शवविच्छेदन अहवालातून तिच्या डोक्याला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसानी स्पष्ट केले. तसेच न्यायालयात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात केलेल्या याचिका फेटाळण्याची मागणी देखील पोलिसांनी केली आहे. फडणवीस-राणेंनी माफी मागावी- राऊत संजय राऊत म्हणाले की, दिशा सालियान प्रकरणी आता राणेंनी नाक घासून माफी मागावी. शेवटी सत्य समोर येत आहे. सर्वात पहिले देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे. त्यानंतर नारायण राणेंच्या मुलाने माफी मागावी. तो नेपाळ्यासारखे काही तरी बडबड करत असतो. ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांनी माफी मागणं गरजेचे आहे.
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. मागील 4 दिवसांत विधिमंडळात भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांविरोधात केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणी विरोधकांनी सभात्याग करत सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कारही टाकला. विशेषतः या प्रकरणी झालेल्या गदारोळात काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्यावर एका दिवसाच्या निलंबनाची कारवाई करण्याची वेळही आली. त्यानंतर आजही काँग्रेस वेगवेगळ्या मुद्यांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला धारेवर धरण्याची चिन्हे आहेत.
आजचा भारतीय जनता पक्ष म्हणजे डरपोक लोकांची 'डी गँग' असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. नाशिक मधील उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजप उद्या दाऊद इब्राहिम याला देखील पक्षात प्रवेश देईल, असा आरोप केला. इतकेच नाही तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांना देखील त्यांनी प्रत्युत्तर दिली आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत...
पुणे शहरातील कोंढवा परिसरात बोपदेव घाटात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार घटना घडल्याने खळबळ उडाली होता. आता पुन्हा एकदा कोंढवा मध्ये एक उच्चभ्रु सोसायटीत धक्कादायक घटना घडली आहे. कुरिअर डिलिव्हरी बॉय असल्याचे सांगत घरात शिरलेल्या एका 22 वर्षीय तरुणाने संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पसार झालेल्या आरोपीचा मागा काढण्यासाठी पोलिसांची दहा पथके कार्यरत झाली आहे. याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार एका 28 ते 30 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता मूळ अकोलाची रहिवासी असून मागील दोन वर्षापासून पुण्यात भावासोबत राहते.तरुणी कल्याणीनगर येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. कोंढव्यातील एका उच्चभ्रु सोसायटीत तरुणी तिचा भावा सोबत राहते. तिचा भाऊ परगावी कामानिमित्त गेला होता. बुधवारी (2 जुलै) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तरुणी घरात एकटीच होती. त्यावेळी आरोपी फ्लॅट जवळ दारात आला आणि त्याने दरवाजा वाजविला. तरुणीने घराचे सेफ्टी डोअर उघडले. तेव्हा त्याने कुरिअर कंपनीतील कामगार असल्याचे सांगितले आणि बँकेचे कुरिअर आहे असे सांगितले.तरुणीने त्याला कुरिअर माझे नसल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने कुरिअर कागदपत्रांवर स्वाक्षरी करावी लागेल, असे तिला सांगितले आणि दरवाजा उघडण्यास भाग पाडले .तरुणीला बोलण्यात गुंतवून आरोपीने तिच्या चेहऱ्यावर अचानक स्प्रे मारला. स्प्रे मारल्यानंतर तिचे डोळे जळजळले त्यानंतर आरोपी तरुण घरात बळजबरीने शिरला. त्याने तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. पसार झालेल्या आरोपीने मोबाइलमध्ये तरुणीचे आक्षेपार्ह छायाचित्र काढले आहे. मी परत येईल, असा मेसेज देखील मोबाइलमध्ये लिहिला आहे, असे पीडित तरुणीने फिर्यादीत सांगितले आहे. घाबरलेल्या तरुणीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, कोढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित परिसरात भीतीचे असुरक्षित वातावरण आहे. पोलिसांनी सोसायटीच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. तरुणीने पोलिसांना आरोपीचे वर्णन दिले आहे. त्याआधारे आरोपीचा शाेध घेण्यात येत आहे.
कळमनुरी तालुक्यातील जरोडा शिवारात केबळ पळविणाऱ्या टोळीतील दोघांना आखाडा बाळापूर पोलिसांच्या पथकाने गुरुवारी ता. 3 पहाटे ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक पीकअप वाहन जप्त केले आहे. मात्र पोलिसांना पाहताच अंधाराचा फायदा घेऊन चौघे जण फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यात मागील काही दिवसांत केबल चोरी तसेच जनावरांची चोरी होण्याचे प्रकार वाढले होते. रात्रीच्या वेळी शेतातील आखाड्यावर जाऊन जनावरे पळविली जात होती तर केबल वायर पळविले जात होते. मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. दरम्यान, या भागातील चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी स्वतंत्र पथके स्थापन करण्याच्या सुचना आखाडा बाळापूर पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश घोटके, जमादार शिवाजी पवार, राजेश घोंगडे, गणेश गायकवाड, राहूल राठोड यांचे पथक स्थापन केले आहे. या पथकाने बुधवारी ता. 2 रात्री कामठाफाटा, जरोडा शिवारात गस्त सुरु केली होती. यावेळी जरोडा शिवारात एका ठिकाणी काही जण संशयास्पद स्थितीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांना पाहताच चौघे जण अंधाराचा गैरफायदा घेत पळून गेले तर दोघांना पोलिासांनी पाठलाग करून पकडले. यामध्ये एक जण वसमत तालुक्यातील तर एक जण अर्धापूर तालुक्यातील अस्लयाचे पोलिसांनी सांगितले. त्यांची अधिक चौकशी केली असता ते केबल चोरण्यासाठी या भागात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक पीकअप वाहन जप्त केले आहे. यादोघांची सखोल चौकशी केली जात असून फरार असलेल्या चौघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले
नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वरील धरणांतून गोदावरी नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने जायकवाडी धरणात पाण्याची आवक सध्या ६ हजार ८७४ क्युसेकने सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा ४५ टक्क्यांवर आला असून मागील वर्षाच्या तुलनेत ४० टक्के पाणीसाठा अधिक आहे. मागील वर्षी याच दिवशी जायकवाडीत ४.५४ टक्के साठा होता. जायकवाडी धरण क्षेत्रात पाऊस नसला तरीही वरील भागात पाऊस झाल्याने गोदावरीवरील अनेक छोट्या-मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठाही वाढला असून, मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातसुद्धा पाण्याची आवक दहा दिवसांपासून सुरू आहे. सध्या धरणात आवक सुरू असून धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी आतापासून नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. शिवाय शेतकरी राजादेखील समाधानी झाला असल्याची माहिती आमदार विलास भुमरे यांनी दिली. सध्याचा पाणीसाठा बघता मराठवाड्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून पावणेदोन लाख हेक्टर शेतीलादेखील पाणी यातून मिळेल एवढे पाणी सध्या जायकवाडीत उपलब्ध आहे. आणखी आवक सुरू असल्याने जायकवाडी पुढील दोन-तीन दिवसांत पन्नास टक्क्यांवर जाईल, असे पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले.
कोकडा, थ्रीप्स, पांढरी माशी व अज्ञात रोगांच्या प्रादुर्भावाने उन्हाळी मिरची पीक उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी मोठा फटका सहन करावा लागला. याही वर्षी तशीच परिस्थिती ओढवल्याने उभ्या मिरचीचे पीक उपटून फेकण्याची नामुष्की आली आहे. जिल्हाधिकारी स्वामी यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा व्यथा जाणून घेतल्या. पण, ‘साहेब आमच्याही बांधावर या’ अशी शिवना परिसरातील शेतकऱ्यांनी आर्त हाक दिली आहे. महागडी औषध फवारणी, खते वापरूनही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कृषी विभागाला पाझर फुटत नसल्याने मार्गदर्शन कोण करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. साधारणतः शेतकऱ्यांनी एक मार्चपासून उन्हाळी मिरची लागवडीला सुरुवात केली होती. बळीराम, ज्वेलरी, शिमला, पिकाडोर, शार्क वन, शिवण, तेजा फोर, अग्निशिखा, दिल्ली हार्ट, ज्वाला, लालपरी, अग्नी, इगल या जातीच्या वाणांना पसंती देत जवळपास तालुक्यात यंदाही ६,८०० हेक्टरवर मिरची पिकाची लागवड झाली आहे. सुरुवातीला पिके चांगली होती, पण माल लगडताच अचानक कोकडा रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. निदान खर्च निघावा म्हणून शेतकरी महागडी औषध फवारणी करीत आहेत. प्रमोद डापके, कृषी अधिकारी, सिल्लोड ^आतापर्यंत एकरी जवळपास दीड लाखाचा खर्च झाला आहे. कोणत्याही औषध फवारणीचा परिणाम होताना दिसत नाहीये. ज्या झाडावर प्रादुर्भाव होतो आहे ते उपटून फेकावे लागत आहे. पण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली झाडे उपटून फेकताना काळजावर दगड ठेवावा लागतो. - दादाराव राऊत, प्रगतिशील शेतकरी सध्या मिरचीला ५५ पर्यंत भाव आहे. आवक असली तरी मिरचीचे पीक खराब झाले आहे. पुढील काळात बांगलादेश व इतर बाजार सुरू झाल्यास भाव वाढेल.
कन्नड सैनिक सीमेवर उभे राहून बंदूक हातात घेऊन देशाचे रक्षण करतात, मातृभूमीची सेवा करतात. शेतकरीसुद्धा आपल्या सर्व बांधवांना विषमुक्त अन्न पुरवून एक प्रकारे देशभक्तीच करू शकत असल्याचे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांनी केले. हरितक्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी विभागाने बंदिस्त वातावरणात साजरा न करता आदर्श बहिरगावात बळीराजासोबत साजरा केली. या प्रसंगी कृषी अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच डॉ. केशव शिरसे तर प्रमुख पाहुणे म्हणून कन्नडचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे उपस्थित होते. कृषी विभागाचे चोंधे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी उपस्थित शेतकरी वर्गाला सेंद्रिय शेतीतज्ज्ञ कृषिभूषण अजय जाधव, कृषी प्रेरणा पुरस्कार विजेते ज्ञानेश्वर डगळे, उद्यान पंडित पुरस्कार विजेते राजेश इंगळे यांनी मार्गदर्शन करत शेतकऱ्याने फक्त पारंपरिक शेती न करता त्याचे व्यवस्थित व्यवस्थापन, अभ्यास करून योग्य मोबदला मिळण्यासाठी व्यापार करावा, तसेच नवनवीन तंत्र वापरून शेती करावी. सेंद्रिय शेती परवडत नाही हा गैरसमज मनातून काढून टाकावा व शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, असे आवाहन केले. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दारकुंडे, देवगावचे मंडळ कृषी अधिकारी जे. एस. गायकवाड, चिंचोलीचे आर. व्ही. डोंगरदिवे, कन्नड येथील मनोज सैंदाणे, पिशोरचे तेजस नंदवळकर, उप कृषी अधिकारी आर. डी. शिंदे, नवनीत गावित, दीपक बिरारे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. प्रथम स्वत:साठी विषमुक्त भाजीपाला खा ः गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे म्हणाले, शेतकऱ्यांनी किमान आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी तरी एक विषमुक्त कोपरा शेती करून आपण स्वतः प्रथम त्याचा लाभ घ्यावा. नंतर सेंद्रिय शेती करून सर्वांना विषमुक्त अन्नपुरवठा करण्याचे शिवधनुष्य पेलावे.
फुलंब्री तालुक्यातील आळंद गावात संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर बिनधास्तपणे गाड्या पार्क केल्या जात आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. शिवाजी महाराज चौकासह मुख्य रस्त्यांवर वारंवार वाहतूक विस्कळीत होते. अपघाताची शक्यता वाढली आहे. गावात शाळा, महाविद्यालये, प्रशासकीय कार्यालये, दवाखाने आहेत. त्यामुळे दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच गर्दी असते. मात्र, वाहनचालक रस्त्यांवरच गाड्या उभ्या करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. पायी चालणाऱ्यांना आणि वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. अनेकदा कोंडीतून बाहेर पडणे कठीण होते. शिवाजी चौकात खासगी वाहनचालक प्रवासी मिळवण्यासाठी रस्त्याच्या मधोमध गाड्या उभ्या करतात. इतर वाहनधारकांनी विरोध केला तर हे चालक मुजोरी करतात. बरेचदा वाद हाणामारीपर्यंत जातात. तक्रारी करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे या खासगी वाहनचालकांची हिंमत वाढली आहे. वाहनचालकांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. वडोदबाजार पोलिस ठाणे अवघ्या तीन किलोमीटरवर आहे. तरीही आळंद बस्थानक परिसरात वाहतूक कोंडी वाढत आहे. अपघातही वाढले आहेत. पोलिसांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील इंगळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. बसचा अधिकृत थांबा कुठे कळेना आळंद बस्थानकावर शहरात किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी परिसरातील नागरिक, विद्यार्थी यांची गर्दी असते. मात्र, बस थांबा कुठे हा प्रश्न नागरिकांना पडलेला असतो. या बेशिस्त पण लागलेल्या वाहनांमुळे बस कधी अंधारी फाटा कधी शिवाजी महाराज चौक कधी पुलावर कुठे पण थांबत यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडते. एक तासाने मिळाली बस ^मी बोरगाव अर्जवरून संभाजीनगर जाण्यासाठी आळंद बस्थानकावर एक तासापासून उभा होतो. मात्र बस थांबायला जागा नसल्याने बस कधी मागे तर कधी पुढे थांबत होती. कळत नव्हते कुठे उभे राहावे. - कृष्णा बलांडे, प्रवासी, बोरगाव अर्ज ता. फुलंब्री. दोन दिवसांत कारवाई करणार ^आळंद बस्थानक परिसरात अवैध पद्धतीने जे दुचाकीस्वार, चार चाकी वाहनधारक रस्त्यावर गाड्या लावताना दिसतील त्यांच्यावर दांडात्मक कार्यवाही करण्यात येईल. ही कार्यवाही दोन दिवसात होईल. -श्रीकांत दांडगे, बीट जमादार, वाहतूक शाखा, वडोदबाजार बसेस अशा स्थानकाच्या पुढे जाऊन मोकळ्या जागेत जाऊन थांबत आहेत. छत्रपती संभाजीनगर - जळगाव महामार्गावरील आळंद गावात बसथांबा आता वाहन पार्किंगमध्ये हरवल्याने बसेसला पुढे जाऊन उभा रहावे लागते. छाया : भाऊसाहेब चोपडे
राज्यात हवामान विभागाने मुसळधार पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः मुंबई–ठाणे–पालघर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. इतर भागातही हलका ते मध्यम स्वरूपातील पाऊस पडणार असून, काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच समुद्रकिनार्यावर हाय टाइट आणि मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी आणि किनारपट्टी तील रहिवाशांनी सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील प्रवासी वाहतूक, लोकल ट्रेन सेवा व विमान वाहतूक यावर देखील परिणाम होऊ शकतो. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, दोन्ही दिवस विजांसह मध्यम ते जोरदार पावसासह वातावरण ढगाळ राहणार आहे. हवामान विभागाने या भागासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. आजही हलक्या सरी पडू शकतात व दुपारी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर उद्या संध्याकाळी अचानक जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज IMD ने दिला आहे. मराठवाडा विभागातील बीड, लातूर, जालना, परभणी, नांदेड व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण व घाटमाथ्यांविषयी हवामान विभागाच्या वतीने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भागात सतत पावसामुळे दरड कोसळण्याची, पाणी साचण्याची, आणि रस्त्यांवर वाहतूक बंद होण्याची भीती आहे. प्रशासनाने NDRF व स्थानिक बचाव दल तैनात केले आहेत. बुलडाणा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा असून, तिथेही यलो अलर्ट देण्यात आला आहे. या परिसरात पावसाचे स्वरूप सौम्य असले तरी, नदी-नाल्यांच्या काही ठिकाणी पाणी साचलेले असल्यामुळे स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुलडाणा, वाशीम व यवतमाळ मध्ये पूर-स्थिती निर्माण झाली असून, काही मार्ग अडथळ्यात निर्माण झाले आहेत. या भागात प्रशासन मदत कार्यासाठी कार्य करीत आहे. शाळा आणि विद्यार्थांना देखील विशेष इशारा राज्यातील पुणे, सातारा आणि रत्नागिरी या घाट भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. येथील परि-दृश्यात पावसाने, विजांचा कडकडाट व वाऱ्याची घनता वाढू शकते. पुणे महानगरात महत्त्वाचे पोर्टल मार्ग, तालुका रस्ते व वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने तत्परतेची भूमिका घेतली आहे. शाळा आणि विद्यार्थी प्रवासांना देखील विशेष इशारा दिला गेला आहे. खरीप हंगामाचे नियोजन करण्याचे आवाहन संपूर्ण राज्यात या लागोपाठ आलेल्या पावसामुळे सर्वत्र मान्सूनचे सक्रिय स्वरूप दिसून येत आहे. तापमानात काहीशी घट जाणवून दिलासा मिळाला असून जलसाठा वाढला असून धरणांचा जल-स्तर सुधारला आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी महत्वाचा आहे. मात्र अचानक पावसामुळे सिंचन व पिकांवर प्रभाव संयमाने हाताळावे असा सल्ला हवामान खात्याकडून दिला गेला आहे. राज्यातील मुसळधार पावसानंतर, पुढील काही दिवस ही परिस्थिती वादळी ठरण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण व घाटमाथा या प्रदेशांवर गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आदिशक्ती संत मुक्ताई आषाढी वारी पालखी सोहळा जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यातून प्रवास करत आता शेवटच्या जिल्ह्यात म्हणजेच सोलापूर जिल्ह्यात येऊन पोहोचला आहे. आज ३ जुलै रोजी हा सोहळा पंढरपूरला पोहोचणार आहे. २८ दिवसांच्या पायी प्रवासात या पालखी सोहळ्याने ६०० किमी अंतर कापले आहे. ३० जून रोजी, वाकडी (ता.परंडा, जि. धाराशिव) येथील दुपारच्या विसाव्यानंतर पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. हजारो भाविकांनी एकत्र येत “जय मुक्ताई” च्या जयघोषात पालखीचे स्वागत केले. पताका, पुष्पवृष्टी, रांगोळ्या आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखीचे स्वागत झाले. या प्रसंगी अनेक गावातील ग्रामस्थ, वारकरी संघटनांचे प्रतिनिधी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी सोहळ्याचा ३० जूनचा रात्रीचा मुक्काम शेंद्री (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथे झाला गावकऱ्यांनी भोजनाची व्यवस्था केली होती. २८ दिवसांत ६०० किमी पायी प्रवास केला पूर्ण २ जुलै रोजी पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यातील वडाचीवाडी येथे दुपारचा विसावा घेऊन आष्टी येथे मुक्कामासाठी थांबला. पालखी गुरुवारी रोपडे येथे दुपारचा विसावा घेणार आहे. रोपडे येथून पालखी सोहळा पंढरपूर येथे पोहोचणार आहे. त्या ठिकाणी संत नामदेव महाराज आजेगुरू व संत मुक्ताई पालखी सोहळा भेट विसावा दुपारी ४ वाजता होणार आहे. तसेच संत मुक्ताई पादुकांचे चंद्रभागा स्नान व पंढरपूर प्रवेश होऊन पालखी सोहळा मुक्ताई मठ दत्त घाट येथे आषाढीपर्यंत मुक्कामी राहिल.
शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. यामुळे रस्त्याच्या साइड पट्ट्यांवर टाकण्यात आलेल्या लाल मातीमुळे पडणाऱ्या पावसात चिखल होत आहे. त्यामुळे महामार्गावर अपघात होत आहेत. रस्त्यावर चिखल येत असल्याने वाहने घसरतात अथवा माती कोरडी झाल्यानंतर डोळ्यात धूळ जाऊन त्रास होत आहे. महामार्गालगत हॉटेल व्यावसायिकांनी आपले व्यवसाय मांडले आहेत. पाऊस झाल्यानंतर हॉटेलच्या आवारामध्ये चिखल जमा होतो. या ठिकाणाहून वाहन महामार्गावर आल्यानंतर चाकाला चिखल लागून महामार्गावर चिखल साचत असतो. या चिखलावरून वाहने घसरून अथवा माती कोरडी झाल्यानंतर वाहनाच्या वेगाने माती उडून वाहनधारकांच्या डोळ्यात जाते, यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. याबाबत योग्य ती कार्यवाहीची मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हाधिकारी व प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्याकडे केली होती. यानुसार मंगळवारी या रस्त्यावरील माती स्वच्छ करण्यात आली व हॉटेल चालकाला देखील तंबी देण्यात आली आहे. निष्काळजीपणामुळे महामार्गावर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू यासाठी महामार्ग प्राधिकरणाने वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे, असे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले. चिखली ते तरसोद फाट्या दरम्यान अनेक ठिकाणी अनधिकृतपणे दुभाजक तोडून रस्ते तयार करण्यात आले आहे. एका बाजूकडून हॉटेलमध्ये जात असताना अपघात होतात. याबाबत मात्र महामार्ग प्राधिकरण बघायची भूमिका घेत असून दररोज महामार्ग प्राधिकरणाची गाडी देखरेख करत असते. मात्र, ही बाब दुर्लक्षित होत असल्याने महामार्ग प्राधिकरण व हॉटेल व्यवसाय यांचे साटेलोटे तर नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.
वरणगाव नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱ्या सिद्धेश्वर नगरातील नागरीक गेल्या अनेक महिन्यांपासून पायाभूत सुविधांच्या अभावामुळे त्रस्त झाले आहेत. महिलांनी एकत्र येत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना निवेदन देत समस्यांकडे लक्ष वेधले. सुविधा मिळत नसल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. सिद्धेश्वर नगरात सध्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. महात्मा गांधी विद्यालय ते सिद्धेश्वर नगर रस्ता खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यात रेल्वे पुलाखाली पाणी साचल्याने मार्ग बंद होतो. विद्यार्थी, शेतकरी तसेच वाहनधारक नागरिकांना २ किमी वळसा घालून नागेश्वर मंदिरमार्गे आम्ही नियमित कर भरतो, पण मूलभूत सुविधा शून्य निवेदनात महिलांनी सांगितले की, आम्ही कर नियमित भरतो, पण सुविधा शून्य. आता जर मागण्या मान्य केल्या नाहीत, तर सिद्धेश्वर नगरमधून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. निवेदनात शिवसेना उपजिल्हा प्रमुख सविता माळी, लक्ष्मी बैरागी, सरूबाई वाघमारे, निर्मला जवरे, आशाबाई मराठे, पायल कोळी, इंदुबाई वंजारी, योगीता चौधरी, ज्योती मराठे, रत्नानाबाई माळी आदी महिलांच्या स्वाक्षरी आहेत. थ्रीफेज विजेची मागणी : ग्रामीण वस्ती म्हणून वंचित गेल्या २२ वर्षांपासून या भागात केवळ सिंगल ज वीज योजना राबवली जात आहे. वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. शहराचा भाग असूनही वीज वितरण कंपनीने या भागाला ग्रामीण योजनेत टाकले आहे. थ्रिफेज वीज पुरवठा सुरु करायची मागणी करण्यात आली असून ही बाब नागरिकांच्या रोषाचा केंद्रबिंदू ठरली आहे. प्रवास करावा लागतो. तसेच सम्राट नगर, लहुजी साळवे नगर व हाउसिंग सोसायटीत पाण्याची टंचाई भासत असून, १५ ते २० दिवसांनी एकदाच पाणीपुरवठा केला जातो. त्यातही विजेची अडचण असल्यास पाणी मिळण्यास आणखी विलंब होतो. महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मंत्री संजय सावकारे यांना निवेदन देताना सिध्देश्वर नगरातील महिला.
हिंगोली ते कळमनुरी मार्गावर मसोडफाटा शिवारात भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी ट्रक चालका विरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 2 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी ट्रक चालकाचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कनका येथील विठ्ठल मांदळे (50) हे मसोड फाटा शिवारात एका हॉटेलवर स्वयंपाकी म्हणून काम करतात. नेहमी प्रमाणे काम आटोपून ते दुचाकी वाहनाने कनका येथे गावी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी मसोड फाटा शिवारात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात विठ्ठल हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील नागरीकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. या अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक घटनास्थळी सोडून पळ काढला. कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे, जमादार किसन डवरे, प्रशांत शिंदे, गजानन होळकर यांच्या पथकाने घटानास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणी शंकर मांदळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिसांनी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक भिंगारे यांच्या पथकाने ट्रक चालकाचा शोध सुरु केल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत विठ्ठल मांदळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कृषी दिन तथा माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त भोरखेडा (ता.शिरपूर) येथील वनश्री ऑक्सिजन पार्कमध्ये बांबू लागवडीचा पाचवा वाढदिवस साजरा करण्यात आला. येथे शिवाजी राजपूत यांनी २०२० मध्ये ५० एकर क्षेत्रावर विविध भागात १९ प्रजातींच्या बांबूची लागवड केली होती. बांबू लागवड म्हणजे शाश्वत आर्थिक प्रगतीचा मार्ग असल्याचे राजपूत म्हणाले. शिवाजी राजपूत यांनी निसर्ग संवर्धनाचा उपक्रम म्हणून बांबू लागवडीसाठी पुढाकार घेतला. बांबू लागवड म्हणजे हरित क्रांतीचा नवीन अध्याय आहे. त्यातून मिळणारे फायदे हे केवळ पर्यावरणापुरते मर्यादित नाहीत तर शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन शाश्वत आर्थिक प्रगतीचा मार्ग आहे, असे ते म्हणाले. बांबूच्या विविध प्रजातींमुळे जमिनीची गुणवत्ता सुधारते. पाण्याचे संचयन होते, जमिनीची धूप थांबते. बांबूपासून कागद, इंधन, बांधकाम साहित्य, हस्तकला साहित्य तयार केले जाते, अशी माहिती त्यांनी दिली. शिरपूरचे प्रांत शरद मंडलिक, डीवायएसपी सुनील गोसावी, सामाजिक वनीकरण विभागाचे राधिका फलफले, वन विभागाचे अधिकारी भूषण पाटील, शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर परदेशी, थाळनेरचे एपीआय शत्रुघ्न पाटील, तहसीलदार महेंद्र माळी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी गोमाई नदी पुलाची केली पाहणी
शहादा तालुक्यातील प्रकाशा-डामरखेडा रस्त्यावरील गोमाई पुलाची जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी बुधवारी दुपारी पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पाइपलाइनचे सुरू असलेले काम एक महिन्याच्या आत कंपनी पूर्ण करणार आहे. प्रकाशा चौफुलीवर लावण्यात आलेले बॅरिकेट्स पुढे सरकवण्याच्या सूचना दिल्या. प्रकाशा पुलाचे एक साईट पूर्ण झाली असून दुसरी साईट पुढील २० दिवसांत पूर्ण होईल. १५ ऑगस्टपर्यंत पूल सुरू करण्यात येईल. गोमाई नदीवरील पुलाचे काम ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात आले. काथरदा पूल दुरुस्तीबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. धुळे येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अधिकाऱ्यांसोबत बोलून गोमाई नदीवरच्या जुना पूल दुरुस्तीसाठी एका आठवड्याच्या वेळ लागेल म्हणून दरम्यानच्या काळात वाहतूक बंद ठेवावी लागेल. त्याबाबत योग्य उपाययोजना कशा करण्यात येतील, त्या संदर्भातही जिल्हाधिकारी डॉ.सेठी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस., शहाद्याचे प्रांताधिकारी कृष्णकांत कनवरिया, तहसीलदार दीपक गिरासे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, पोलिस निरीक्षक नीलेश देसले, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, पीडब्लूडीचे अधिकारी उपस्थित होते.
जामनेर येथील जैन नॉलेज सिटीत वाळू, मुरूमचा साठा:महसूलसह बांधकाम विभागाकडून तपासणी
पळासखेडा शिवारात असलेल्या प्रकाशचंद जैन संस्थेच्या आवारात शेकडो ब्रास वाळू व मुरुमाचा अवैध साठा असल्याचे निदर्शनास आले आहे. तहसीलदारांच्या आदेशानुसार महसूल विभाग व सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपासून मोजणी सुरू केली. जामनेर येथील प्रकाशचंद जैन संस्थेने पळासखेडा ग्रामपंचायतीचे बनावट दाखले बनवून वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळवल्याची तक्रार पहूर येथील ललित लोढा यांनी केली आहे. त्यासोबतच अवैध गौण खनिजासह इतरही तक्रारी करण्यात आल्या आहेत. प्राप्त तक्रारी पाहता तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी स्वतः पाणी करून मंडळ अधिकारी व सा.बा.विभागाचे उपअभियंता सुरेश चासकर यांना पोलिस बंदोबस्तात चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून प्रकाशचंद संस्थेच्या पळासखेडा आवारातील अवैध वाळू व मुरूमच्या साठ्याचे मोजमाप सुरू करण्यात आहे. प्रकाशचंद जैन संस्थेच्या आवारात मुरूम व वाळूचा मोठ्या प्रमाणावर अवैध साठा करण्यात आला आहे. उर्वरित. पान ४ ७ रोजी चौकशी समिती प्रत्यक्ष तपासणी करणार जामनेर येथील प्रकाशचंद जैन संस्थेतर्फे पळासखेडा शिवारात शाळा, महाविद्यालय उभारण्यात आले आहे. त्यांच्या परवानगीसाठी ग्रामसेवकाच्या बोगस स्वाक्षऱ्याकरून ग्रा.पं.चे बनावट दाखले तयार करण्यात आले आहे. त्याचबरोबर बांधकामासाठीचे क्षेत्र अ-कृषक करण्यापासून तर अवैध मुरूम व वाळू साठ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने विविध विभागाची चौकशी समिती नेमण्यात येऊन सोमवार ७ रोजी ही समिती प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन चौकशी करणार आहे.
इंदोर हैदराबाद ७५३ एल या रस्त्यासाठी जमीन अधिग्रहीत केलेल्या शेतकऱ्यांना अत्यल्प दराने मोबदला मिळाल्याच्या निषेधार्थ शेतकरी गेल्या साडेचार महिन्यांपासून खामखेडा पुलाजवळ धरणे आंदोलन करत आहेत. बुधवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान नायगाव फाट्याजवळ महामार्गाची काम चालू असताना शेतकरी आंदोलकांनी रस्त्याची काम थांबवण्याचा प्रयत्न केला असता, शासकीय कामात अडथळा म्हणून पोलिसांनी तातडीने कारवाई करत शेतकऱ्यांना ताब्यात घेत त्यांना स्थानबद्ध केले व पोलिस बंदोबस्तात पुलाचे व रस्त्याचे कामाला सुरुवात केली. इंदूर हैदराबाद ७५३ या रस्त्यासाठी तालुक्यातील अंतुर्ली ते घोडसगाव पर्यंत शेतकऱ्यांच्या शेकडो हेक्टर जमिनी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. या जमिनीच्या मोबदल्यात शासनाने अत्यल्प दर दिलेला आहे. सन २०१३ मध्ये याच जमिनीसाठी ३२०० रुपये भाव शेतकऱ्यांना दिलेला असताना विद्यमान काळात मात्र केवळ २८० रुपये भाव देण्यात आल्याने शासनाने एका अर्थाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे. त्याच्या निषेधार्थ गेल्या साडेचार महिन्यापासून खामखेडा पुलाजवळ शेतकरी आंदोलन करत आहेत. तब्बल चार आरसीपी प्लाटून व स्थानिक पोलिसांनी नायगावजवळ सुरू असलेल्या महामार्गावर शासकीय कामात अडथळा होवू नये यासाठी कर्की फाट्यापर्यंत काम सुरू असलेल्या महामार्गावर पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. मंत्री गिरीश महाजनांची भेट ठरली निष्फळ आमदार चंद्रकांत पाटील, आमदार एकनाथ खडसे यांनी आंदोलनाला पाठिंबा वेळोवेळी दर्शवला आहे व शासनाशी चर्चा करून शेतकऱ्यांचा प्रश्न तत्काळ सोडवण्याची मागणी केली आहे. प्रत्यक्षात मात्र शासनाने त्यांना भाव वाढवून दिलेला नाही. मागील आठवड्यातच मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असे सांगण्यात आले होते.
येथील धी. शेंदुर्णी से.एज्यु.को-ऑप सोसा. लि.संचलित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात भविष्यातील शेती या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. विशेष समारंभात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी कृषी व उद्योजकतेशी संबंधित अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. माती परीक्षण, बँक भेट, जैन हिल्स (जळगाव) येथे शेती तंत्रज्ञानावरील अभ्यास दौरा तसेच विविध शेतकरी प्रकल्पांना दिलेल्या भेटी यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव व व्यावसायिक दृष्टिकोन लाभला. या भेटींनी विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय, आर्थिक शिस्त व नवनवीन तंत्रज्ञान समजून घेण्याची जाणीव निर्माण केली. तसेच विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित ज्ञान, उद्योजकतेचे मूलभूत तत्त्व, उत्पादन निर्मिती व सादरीकरण यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांचा या उपक्रमांतर्गत आत्मविश्वास द्विगुणित झाला. तसेच नवोपक्रमशील दृष्टिकोनात वाढ झाली. या उपक्रमाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक आर.एस. चौधरी,व्ही.एम. शिरपुरे,आर.के. गरुड ,राहुल गरुड, व्ही.एस.पाटील, आर.आर सोनवणे तसेच कृषी शिक्षक कुलदीप तेलंग सर उपस्थित होते. या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले. फाली उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवावर आधारित, प्रात्यक्षिक स्वरूपाचे प्रशिक्षण अनुभवण्यास मिळत असून भविष्यातील कृषि तज्ज्ञ आणि उद्योजक घडवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे. असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले.
वैद्यकीय क्षेत्रातील व्यस्त दिनक्रमातून वेळ काढत नगरमधील १५ डॉक्टरांनी सायकलवरून पंढरपूर वारी करत सामाजिक आणि धार्मिकतेचा अनोखा संगम घडवून आणला. सलग तिसऱ्या वर्षी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या या वारीत २५० किलोमीटरचे अंतर डॉक्टरांनी दोन दिवसांत पार केले. नागरिकांसाठी आरोग्य विषयी सकारात्मक संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही वारी शनिवारी (२८ जून) पहाटे ५ वाजता इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिश्रा यांच्या हस्ते चांदणी चौकात झेंडा दाखवून सुरू झाली. या उपक्रमात नगरच्या विविध भागांतील डॉक्टरांनी सहभाग घेतला. यात डॉ. प्रशांत तुवर, डॉ. राहुल पंडीत, डॉ. रामदास बांगर, डॉ. प्रदीप चोभे, डॉ. गणेश बडे, डॉ. अशोक पाटील, डॉ. दिनेश पाटोळे, डॉ. बाळासाहेब देवकर, डॉ. अमित थोपटे, डॉ. शिवराज गुंजाळ आदींची त्यात समावेश होता. संपूर्ण वारीदरम्यान सहभागी डॉक्टरांचा उत्साह व सातत्य उल्लेखनीय होते. सायकल चालवणे आरोग्यास फायदेशीर आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा, असा संदेश त्यांनी दिला. पुढील वर्षीही अशीच वारी करण्याचा निर्धार या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. दोन दिवसांत डॉक्टरांनी गाठले पंढरपूर पहिल्या दिवशी सायकल वारीने रूईछत्तीशी, मिरजगाव, निमगाव डाकू, करमाळा आदी गावांतून जात नगर ते शेटफळ हे १७३ किमी अंतर कापले. प्रत्येक ठिकाणी स्थानिकांनी चहा, नाश्ता व जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती. दिवसअखेर शेटफळ गावात मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सर्व सहभागी वारकरी पोशाखात सायकलवरून पंढरपूरला (३० किमी) गेले. चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठल मंदिरात मनोभावे दर्शन घेतले.
नेवासे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी सोहळा भविष्यात देहू-आळंदीच्या दिंडीप्रमाणेच भव्य आणि वैभवशाली होईल, असा आशीर्वाद जोग महाराज शिक्षण संस्थेचे गुरुवर्य शांतीब्रह्म मारुतीबाबा कुऱ्हेकर यांनी या सोहळ्यास दिला. त्यांनी भक्तिभावाने पालखीचे दर्शन घेतले आणि ज्ञानेश्वरीच्या पादुकांना वंदन करत भाविकांमध्ये भक्तीरस जागवला. नेवासेतील या दिंडी सोहळ्याचे यंदा ५६ वे वर्ष आहे. गाथा मूर्ती रामभाऊ महाराज राऊत आणि देविदास महाराज म्हस्के यांच्या प्रेरणेतून हा सोहळा अधिक व्यापक झाला आहे. यात २८ दिंड्या सहभागी असून, नव्याने तयार करण्यात आलेल्या भव्य चांदीच्या रथात ज्ञानेश्वरीची पालखी मिरवते आहे. पालखी ज्या ज्या ठिकाणी थांबते, तेथे भाविक भक्तिभावाने तिचे स्वागत करतात. या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळत आहे. अहिल्यानगर येथे निवृत्ती महाराजांच्या पादुकांचे ज्ञानेश्वरीच्या पादुकांनी वंदन केले. ही गुरुबंधूंची भेट वारकरी वर्तुळात आणि विविध माध्यमांत चर्चेचा विषय ठरली आहे. दिंडीच्या मार्गावर अनेक संत, महंत, राजकीय नेते आणि वारकरी या सोहळ्यास भेट देऊन दर्शन घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवर्य मारुतीबाबा कुऱ्हेकर यांनीही विशेष उपस्थिती दाखवत पालखीचे दर्शन घेतले आणि दिंडी मार्गदर्शक देविदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला. गुरुवर्य कुऱ्हेकर महाराजांनी नेवासेच्या ज्ञानेश्वर मंदिर निर्मितीतील बन्सीबुवा तांबे यांच्या योगदानाचा गौरव केला. मामा दांडेकर यांच्या आदेशाने ज्ञानेश्वरी देवस्थानाचा जीर्णोद्धार करणाऱ्या तांबे बुवांचे स्मरण करत त्यांनी सांगितले की, नेवासे येथील पैस खांब हा परिस खांब आहे त्याचे दर्शन घेणाऱ्या भाविकांचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. नेवाशाच्या पावन भूमीतून निघणाऱ्या या ज्ञानेश्वरी दिंडीला भविष्यात देहू-आळंदीच्या पंढरीप्रेमींच्या दिंड्याइतकेच महत्त्व प्राप्त होईल. ही दिंडी नेवासे तालुक्यातील वारकरी परंपरेची साक्ष आहे आणि तिचा पहिल्याच वर्षी गौरव दिवसेंदिवस वाढत असल्याचे या सोहळ्याच्या भव्यतेवरून स्पष्ट दिसते.
अहिल्यानगरच्या तलवारबाजांकडे राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व
छत्रपती संभाजीनगर येथे २७ ते २९ जूनदरम्यान पार पडलेल्या १० व १२ वर्षांखालील राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी करीत सांघिक पातळीवर तृतीय क्रमांक पटकावला. युवा खेळाडूंच्या या यशाने जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेत तलवारबाजी संघटनाच्या संघाने १० वर्षांखालील मुलींच्या ‘इपी' गटात वसुधा साठेने तृतीय क्रमांक पटकावला. १० वर्षांखालील मुलींच्या ‘फॉईल' गटात काव्या धनगेकर हिने द्वितीय, तर निधी देशमुख हिने तृतीय क्रमांक मिळवून जिल्ह्याची मान उंचावली. १० वर्षांखालील मुलांच्या ‘इपी' गटात अक्षद दौंड याने तृतीय क्रमांक मिळवला. १२ वर्षांखालील गटातही अहिल्यानगरच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम राखला. १२ वर्षांखालील मुलींच्या ‘सेबर' गटात रिद्धी महाडिकने तृतीय क्रमांक, तर १२ वर्षांखालील मुलांच्या ‘सेबर' गटात प्रज्ज्वल सत्रे याने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. या खेळाडूंसोबतच प्रांजल बडगू, गौरी झिरपे आणि आर्यन सत्रे यांनीही स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सुनील गोडळकर, ओंकार सुरग व वैष्णवी गोडळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल त्यांचा सत्कार अहिल्यानगर जिल्हा तलवारबाजी संघटना व अहिल्यानगर ऑलिम्पिक असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शैलेश गवळी, विशाल गरजे, प्रवीण कोंडावळे, राम गोडळकर, केदार देशमुख, वेदिका गोडळकर आदी उपस्थित होते.
एक हात व एक पाय नसतानाही भिक्षा न मागता स्वाभिमानाने साईबाबांचे लॉकेट विकणारा पवन रावत हा साईबाबा संस्थानच्या मदतीने पुन्हा दोन पायांवर उभा राहिला आहे. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील सल्हा या छोट्याशा आदिवासी गावात पवनचा जन्म झाला. बालपणीच आई-वडिलांचं छत्र हरपलं. एकदा घराबाहेर खेळताना विजेच्या तारेचा शॉक लागून त्याचा डावा हात व पाय गमावला. या अपघातानंतर त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. गावकऱ्यांनी त्याला साईबाबांच्या शिर्डीमध्ये जाण्याचा सल्ला दिला. मोफत राहण्याची अन् जेवणाची व्यवस्था असल्याने थोडी मदत मिळेल, अशी त्याला आशा होती. शिर्डीत आल्यानंतर काही दिवस पवन रस्त्यावर फिरत होता. अनेकांनी भिक्षा मागण्याचा सल्ला दिला, पण त्याने भिक्षेऐवजी कष्टाची वाट निवडली. एका पायावर उभा राहत आणि एका हाताने साईबाबांचे लॉकेट आणि फोटो विक्री करीत तो उदरनिर्वाह करू लागला. त्याच्या कष्टाची आणि स्वाभिमानाची जाणीव झाल्याने अनेक श्रद्धाळू भाविक त्याच्याकडूनच वस्तू विकत घेऊ लागले. कामातून स्थैर्य मिळाल्यानंतर पवन आपल्या गावी गेला असता, त्याची भेट प्रेयसी जयकुमारी हिच्याशी झाली. दोघेही शिर्डीत आले. लग्न केले. संसार थाटला. त्यांच्या संसारवेलीवर ‘नैना’ व ‘दुर्गा’ या दोन मुलींच्या रूपानं फुलं उमलली. आज पवन आणि जयकुमारी आपल्या दोन मुलींना घेऊन शिर्डीत आनंदात राहतात. कृत्रिम पाय मिळाल्याने पवन आता दोन पायांवर उभा आहे, पण अजूनही त्याला एका कृत्रिम हाताची गरज असल्याची अपेक्षा साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी व्यक्त केली. साई संस्थानमुळे मिळाला कृत्रिम पाय पवनच्या परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्याला कृत्रिम पाय बसवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी जयपूर फूट कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पवनसाठी कृत्रिम पाय मिळवून दिला. कंपनीचे अधिकारी स्वतः साईभक्त असल्याने त्यांनीही तात्काळ मदतीस सहमती दर्शवली. पवनला मुंबईत बोलावून कृत्रिम पाय बसवण्यात आला. त्याच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च संस्थानने केला. आज पवन पुन्हा दोन पायांवर उभा आहे.
पोलिसांनी रस्त्यावर उतरून लावली वाहतुकीला शिस्त
पाथर्डी शहर परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी आपल्या विशेष पथकासह शहरातील बेशिस्त वाहतूक, अवैध व्यवसाय आणि कायदा व सुव्यवस्था न पाळणाऱ्यांवर थेट रस्त्यावर उतरून धडाकेबाज कारवाई केली. शहरातील नाईक चौक, कोरडगाव चौक, जुना बसस्टँड परिसर व शेवगाव रोड या शहरातील प्रमुख ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. काळ्या काचा लावलेल्या गाड्यांना थांबवत त्या तात्काळ काढायला लावून दंड आकारण्यात आला. विना नंबरप्लेटशिवाय फिरणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली. बुलेटचे कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सरही त्वरित काढून घेण्यात आले. काही संशयित अवैध धंद्यांवरही खाडे यांच्या पथकाने कारवाई केली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना खाडे यांच्या पथकाने चांगलेच वठणीवर आणले. ही संपूर्ण कारवाई एखाद्या अॅक्शन चित्रपटात शोभेल, अशी होती. मात्र, त्याचा परिणाम सकारात्मक ठरला. ही कारवाई पाहण्यासाठी तरुणांनी खाडे यांच्यामागे शेकडोंच्या संख्येने गर्दी केली होती. शहरात कायदा-सुव्यवस्थेचा ठाम संदेश गेला असून, अनेक वाहनचालकांनी स्वतःहून नियम पाळायला सुरुवात केली. रस्त्यावर विक्री करणारे फेरीवाले, अस्ताव्यस्त दुचाकी, चारचाकी पार्किंग करणारे नागरिक शिस्तीत वागायला लागले आहेत. कारवाईदरम्यान माजी नगरसेविका मंगल कोकाटे यांनी खाडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
खरमाळे यांच्या पर्यावरण संरक्षण कामाचा ‘मन की बात'मध्ये गौरव
आळेफाटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२९ जून) झालेल्या ‘मन की बात' कार्यक्रमात जुन्नर तालुक्यातील वनरक्षक रमेश खरमाळे यांनी केलेल्या पर्यावरण रक्षणाच्या कामाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, की जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनेक उपक्रम राबवले. पुणे जिल्ह्यातील रमेश खरमाळे यांनी पर्यावरण रक्षणासंदर्भात केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. आठवड्याच्या अखेरीस बहुतेक जण घरी बसून आराम करतात. मात्र, रमेश खरमाळे व त्यांचे कुटुंबीय कुदळ, फावडे घेऊन घराबाहेर पडतात. खरमाळे कुटुंबीय डोंगरांवर जमिनीत पाणी मुरवण्यासाठी चर खणतात, बिया लावतात. फक्त २ महिन्यांमध्ये त्यांनी ७० चर खणले आहेत. खरमाळे यांनी अनेक लहान, लहान तळी तयार केली आहेत, शेकडो झाडे लावली. ते ऑक्सिजन पार्कदेखील उभारत आहेत. या सगळ्यांचा परिणाम असा झाला की, या भागात पक्षी परतू लागले आहेत. वन्यजीवनाला नवीन आयुष्य लाभले असल्याच्या शब्दांत खरमाळे यांच्या कामाचा मोदींनी गौरव केला. धामणखेल येथील रमेश खरमाळे व त्यांच्या पत्नी स्वाती खरमाळे यांनी मिळून जे साध्य केलं, ते केवळ प्रेरणादायी नाही, तर अविश्वसनीयही आहे. माजी सैनिक असलेल्या रमेश खरमाळे यांनी देशासाठी तब्बल १७ वर्षे सेवा दिली. २०१२ साली आईच्या आजारपणामुळे त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतला. वृक्षलागवड करताना खरमाळे.