SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
...

भव्य आतिषबाजीने उजळला लातूरमधील महात्मा बसवेश्वर चौक

लातूर : प्रतिनिधी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महराज यांच्या जयंतीनिमित्त बसवेश्वर चौक येथे नव्या एलईडी नामफलकाचे थाटामाटात अनावरण पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर, उपमहापौर अ‍ॅड.स्रेहलजी उटगे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यावेळी करण्यात आलेल्या भव्य आतिषबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि उपस्थित नागरिकांनी जल्लोषात सहभाग घेतला. महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित […] The post भव्य आतिषबाजीने उजळला लातूरमधील महात्मा बसवेश्वर चौक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 10:59 pm

लातुरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात

लातूर : प्रतिनिधी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा जयघोष करत संपूर्ण लातूर शहरात बसवेश्वर महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध भागातही महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आझाद चौकातून महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने […] The post लातुरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 10:56 pm

लातूरच्या राजकारणातील ‘तात्या’ हरपले

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेचे माजी महापौर आणि शहराच्या राजकीय व सामाजिक पटलावरील एक सर्वसमावेशक नेतृत्व सुरेश (तात्या) निवृत्तीराव पवार यांचे आज, रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण लातूर शहरावर शोककळा पसरली आहे. एका अत्यंत मनमिळावू आणि जनसामान्यात प्रेमळ प्रतिमा असलेल्या नेत्याच्या जाण्याने, लातूरकरांनी आपल्या परिवारातील सदस्य गमावल्याची भावना […] The post लातूरच्या राजकारणातील ‘तात्या’ हरपले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 10:55 pm

मुलीच्या मैत्रिणीवरच नराधम बापाकडून लैंगिक अत्याचार:पीडितेने विष प्रश्न केल्याने खळबळ, आरोपीला अटक; भंडाऱ्यात संतापाची लाट

भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा गावातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली असून, एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्याच मैत्रिणीच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भीषण कृत्यामुळे मानसिक धक्क्यात असलेल्या पीडित मुलीने विषप्राशन करून टोकाचे पाऊल उचलले असून, सध्या तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आरोपी नराधम सोमा सालिक मेश्राम (37) याला अटक केली असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. भंडारा तालुक्यातील मोहदुरा गावात मैत्रीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली असून, एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्याच जिवाभावाच्या मैत्रिणीच्या वडिलांनी अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. पीडित मुलगी आणि आरोपी सोमा मेश्रामची मुलगी एकाच वर्गात शिकत असल्याने त्यांच्यात घट्ट मैत्री होती, याच विश्वासाचा गैरफायदा नराधम चुलत्याने घेतला. गुरुवारी रात्री पीडित मुलगी मैत्रिणीकडे मुक्कामी असताना, आरोपीने तिला दुचाकीवर फिरायला नेण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेले आणि गुंजेपार परिसरातील एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या अघोरी कृत्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कडक कारवाईची मागणी होत आहे. शुक्रवारी सकाळी घरी परतल्यानंतर पीडित मुलीने आपल्यावर ओढवलेला भीषण प्रसंग कुटुंबीयांना सांगितला. ही बातमी गावात समजताच सर्वत्र संतापाची लाट उसळली, मात्र समाजात होणारी चर्चा आणि झालेल्या अत्याचारामुळे प्रचंड मानसिक तणावात असलेल्या पीडित मुलीने टोकाचे पाऊल उचलत विषप्राशन केले. तिला तात्काळ भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत भंडारा पोलिसांनी तातडीने हालचाली करत नराधम आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू असून, या धक्कादायक प्रकारामुळे पुन्हा एकदा महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी संतप्त भावना नागरिकांमधून व्यक्त होत असून या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 10:51 pm

खासदार वानखडेंनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी अर्ज भरला:'मी स्पर्धेत नाही', 28 एप्रिलनंतर नवे नेतृत्व जाहीर होणार

अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या अर्जामुळे अध्यक्षपदाच्या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मावळते अध्यक्ष बबलू देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. वीरेंद्र जगताप, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सुधाकरराव भारसाकळे आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे हे देखील या शर्यतीत आहेत. जिल्ह्याला २८ एप्रिलनंतर नवे नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी देशभरात 'सृजन संघटन अभियान' सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नवे पदाधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ग्रामीण आणि शहर असे दोन्ही जिल्हाध्यक्ष निवडले जाणार आहेत. यासाठी मुलाखती आणि कार्यकर्त्यांचा कौल जाणून घेण्यासाठी केंद्रीय निरीक्षक आफताब अहमद (हरियाणा आमदार) आणि राज्याचे निरीक्षक भाई जगताप (आमदार) हे चार दिवस अमरावतीत होते. या काळात निरीक्षकांनी विश्रामगृहावर अनेक पदाधिकाऱ्यांशी 'वन टू वन' संवाद साधला. काही जणांनी सामूहिकरित्याही आपली भूमिका मांडली. पक्षाचा नवा जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष कोण असावा, याबाबत त्यांनी मते जाणून घेतली. ही मते बंद लिफाफ्यात एका अहवालाच्या स्वरूपात २३ किंवा २४ एप्रिल रोजी पक्षश्रेष्ठींकडे सादर केली जातील. त्यानंतर साधारणतः २८ एप्रिलच्या आसपास नव्या नेतृत्वाची निवड घोषित होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठीच्या दावेदारांबद्दलचा अहवाल पाठवताना सर्वसाधारण (खुला प्रवर्ग), इतर मागासवर्गीय (ओबीसी), अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), विमुक्त जाती (व्हीजे-एनटी), अल्पसंख्याक आणि महिला अशा प्रत्येक संवर्गातून संभाव्य नावे समाविष्ट करावीत, असा पक्षादेश आहे. त्यामुळे निरीक्षकांकडून पक्षश्रेष्ठींकडे पाठविल्या जाणाऱ्या अहवालात या सातही संवर्गातील नावांचा समावेश असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीबाबतही जोरदार चर्चा सुरू आहे. विद्यमान अध्यक्षांना विरोध असल्याने या पदासाठी १४ जणांनी अर्ज भरले आहेत. या संदर्भात खासदार बळवंतराव वानखडे यांनी म्हटले आहे की, मी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे, परंतु मी स्पर्धेत नाही. निरीक्षकांसमोर झालेल्या चर्चेदरम्यान बहुतेक तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी बबलू देशमुख यांनाच पुन्हा संधी देण्याची मते मांडली आहेत, असेही ते म्हणाले. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे वानखडे यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 10:41 pm

अमरावतीत रोज 64 जणांना श्वानदंश:मोकाट श्वानांसाठी निवारा केंद्र अद्यापही नाही

अमरावती जिल्ह्यात मोकाट श्वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज सरासरी ६४ नागरिकांना श्वानदंश होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महापालिकेकडून भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारणीला अद्याप गती मिळालेली नाही, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकूण २३,३९९ नागरिकांनी सरकारी रुग्णालयांमध्ये श्वानदंशावर उपचार घेतले आहेत. ही आकडेवारी केवळ सरकारी रुग्णालयांमधील असून, खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या यात समाविष्ट नाही. त्यामुळे श्वानदंशाची खरी आकडेवारी याहून अधिक भयावह असण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांना मोकाट श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, अमरावती महानगरपालिका प्रशासनाने भटक्या श्वानांची मोजदाद आणि त्यांच्यासाठी निवारा केंद्र उभारणीच्या कामाला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. मनपा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, निवारा केंद्रासाठी जागेची निश्चिती झाली असून, लवकरच बांधकाम पूर्ण होऊन केंद्र कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे. मात्र, अद्यापही प्रत्यक्ष कामाला अपेक्षित वेग आलेला नाही, त्यामुळे नागरिकांकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 10:41 pm

अल्पवयीन मुलींच्या गैरवर्तनाप्रकरणी आरोपीवर तात्काळ कारवाईची मागणी:शिवसेना माजी जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी पोलिस अधीक्षकांना दिले निवेदन

परतवाडा येथील अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन करून त्यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीवर तात्काळ कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी केली आहे. सेनेच्या एका प्रतिनिधीमंडळाने अमरावती येथे जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. शिवसेनेच्या मते, ही घटना अत्यंत धक्कादायक, गंभीर आणि निंदनीय आहे. या घटनेतील मुख्य आरोपी मो. अयाज मो. अहमद याने काही मुलींचे लैंगिक शोषण केले. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत आहे. सदर घटनेतील आरोपींवर आणि त्याच्या सहकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांना कठोरात कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी अरबट यांनी केली. अशा प्रकारच्या घटनांना आळा बसण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणात आदर्श उदाहरण निर्माण करणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी महिला जिल्हाप्रमुख अरुणा इंगोले, उपजिल्हाप्रमुख सुनील केने, महानगर प्रमुख रश्मी तायडे, तसेच सुधीर खंडार, गजानन कात्रे, यश बनसोड, मंगेश ढोके, गणेश भुजाडे, संजय देशमुख, शहर प्रमुख वृंदा मुक्तेवार, अस्मिता बोडे, अर्चना कांबळे, ज्योती राईकवार, सागर गेठे, राहुल भुंबर, गणेश गावंडे, विनय गावंडे आणि इतर महिला शिवसैनिक उपस्थित होते. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्याची बदनामी झाली असून, अनेक संस्था, संघटना आणि लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची निंदा केली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. एक दिवसापूर्वीच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या घटनेची दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरण समजून घेतले आणि योग्य ते निर्देश दिले.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 10:20 pm

शिक्षण विभागाच्या निर्णयांविरोधात शिक्षक सेनेचे अमरावतीत आंदोलन:उपसंचालकांना निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा

शिक्षण विभागातील वाढत्या अनियमितता आणि अन्यायकारक निर्णयांविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने अमरावती येथे आंदोलन केले. संघटनेने शिक्षण उपसंचालकांना निवेदन सादर करत आपल्या मागण्या मांडल्या. निवेदन देण्यापूर्वी, संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ पदाधिकारी सुनील केणे, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राजनकर, अध्यक्ष रूपेश टाले, सरचिटणीस निलेश टोम्पे आणि कार्याध्यक्ष विनायक पवार यांनी केले. शिक्षकांचे वेतन थांबवणे, वर्षानुवर्षे थकित देयके मंजूर न करणे, शिक्षकांना निवडणूक तसेच इतर अशैक्षणिक कामांमध्ये सक्तीने गुंतवणे, परीक्षा काळात पटपडताळणीचे अव्यवहार्य आयोजन करणे आणि संचमान्यतेतील गंभीर त्रुटी यांसारख्या निर्णयांविरोधात शिक्षक सेनेने एल्गार पुकारला आहे. हे आंदोलन त्याच मालिकेचा एक भाग होते. या आंदोलनाद्वारे अतिरिक्त शिक्षकांचे तात्काळ समायोजन, थकित देयकांचे वितरण, बी.एल.ओ. कामातून शिक्षकांची मुक्तता, परीक्षा काळातील पटपडताळणीला स्थगिती, त्रुटीग्रस्त संचमान्यता तातडीने निकाली काढणे, वेतनातील विलंब थांबवणे, विना-अनुदानित शाळांना मूल्यांकनाची पुन्हा संधी आणि विदर्भातील शाळा २६ जूननंतरच सुरू करण्याची मागणी करण्यात आली. राज्यात वाढत असलेल्या प्रशासकीय दुर्लक्षावर टीका करताना अध्यक्ष रूपेश टाले यांनी उपस्थितांना संबोधित केले. शासनाने मागण्या तात्काळ मान्य न केल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, महिला शिक्षिका आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, इतर शिक्षक संघटनांनीही प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. तापमानातील वाढ लक्षात घेता शाळांच्या वेळा बदलण्यात याव्यात, निकाल घोषित करण्यापूर्वी पेपर तपासणीसाठी पुरेसा वेळ मिळावा आणि शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करावा, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. म. रा. प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक संघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ आणि कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक भारती या संघटनांनीही या मागणीसाठी पाठिंबा दर्शवला आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 10:19 pm

सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडून १० लाखांचे दागिने लंपास

कुर्डूवाडी : बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारत सुमारे १० लाखांचे दागिने लंपास केले. ही घटना दि. १७ एप्रिल रोजी सकाळी १० वा. पासून ते दि. १८ रोजी सायं ८ वा दरम्यान कुर्डूवाडी शहराजवळील छोरिया टाऊनशीप, कुर्डू हद्दीत (ता.माढा) येथे घडली. याबाबत विठ्ठल निवृत्ती ननवरे यांनी कुर्डूवाडी पोलिसांत फिर्याद […] The post सेवानिवृत्त शिक्षकाचे घर फोडून १० लाखांचे दागिने लंपास appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 10:16 pm

चाकूर हादरले: दोन चिमुकले बेपत्ता, एकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

चाकूर (लातूर): चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अल्पवयीन मुले बेपत्ता होऊन त्यापैकी एकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास युद्धपातळीवर सुरू केला असून दुसऱ्या मुलाचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. जुने महादेव मंदिर गल्लीतील साइचरण दिनेश स्वामी (१० वर्षे) आणि देवंश मंगेश स्वामी (७ वर्षे) ही दोन […] The post चाकूर हादरले: दोन चिमुकले बेपत्ता, एकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 10:10 pm

स्कॉलर्स प्वाईंट सचिवांचा मृतदेह माडू नदीपात्रात आढळला:आत्महत्या की इतर कारणे? पोलिस तपास सुरू

मोर्शी येथील माडू नदीपात्रात स्कॉलर्स प्वाईंट इंग्लिश स्कूलचे सचिव गजानन उद्धवराव शहाणे (वय ५५, रा. दुर्गानगर, मोर्शी) यांचा मृतदेह आढळून आला आहे. शनिवार सकाळपासून बेपत्ता असलेल्या शहाणे यांचा मृतदेह अमरावती येथील शोध व बचाव पथकाच्या जवानांनी रविवारी बाहेर काढला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन शहाणे शनिवारी सकाळी नऊ वाजता घरातून कोणालाही न सांगता निघून गेले होते. ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शनिवारी सायंकाळी मोर्शी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मोर्शी-वरुड रोडवरील माडू नदीच्या मध्यभागी एक मृतदेह तरंगताना दिसला. ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शोध व बचाव पथकाचे व्यवस्थापक सुरेंद्र रामेकर यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ एक पथक घटनास्थळी पाठवले. घटनास्थळी पोहोचलेल्या आपदा मित्रांनी पोलीस व महसूल प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली लाइफ जॅकेट, दोरी आणि बांबूच्या स्ट्रेचरच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी आपदा मित्र सागर तायडे, प्रियंशू तायवाडे, विवेक सावरकर यांच्यासह पोलीस व महसूल प्रशासनाने सहकार्य केले. गजानन शहाणे यांनी आत्महत्या केली की यामागे अन्य काही कारण आहे, याचा तपास मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली निरंजन उकंडे, स्कॉड विभागाचे स्वप्निल बायस्कर, छत्रपती करपते, शेखर वाडीभस्मे, अथर्व कोहळे आणि प्रितेश कांबळे करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 10:03 pm

पंजाबचे लखनौला २५५ धावांचे लक्ष्य

मोहाली : आयपीएलच्या २९ व्या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपरजायंट्ससमोर २५५ धावांचे लक्ष्य ठेवले. न्यू चंदीगड येथे एलएसजीने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने ७ गडी गमावून २५४ धावा केल्या. ही या हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी बंगळूरने चेन्नईविरुद्ध २५० धावा केल्या होत्या. पंजाबकडून प्रियांश आर्याने ९३ धावा आणि कूपर कॉनॉलीने ८७ धावा केल्या. या दोघांनी […] The post पंजाबचे लखनौला २५५ धावांचे लक्ष्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 10:00 pm

डेंग्यूविरुद्धच्या पहिल्या लसीला भारताची मंजुरी

नवी दिल्ली : देशात दरवर्षी पावसाळ्यात डेंग्यूचे संकट अक्राळविक्राळ रूप धारण करते. डेंग्यूचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य क्षेत्रातून अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली असून डेंग्यूवरील पहिल्या लसीला म्हणजेच टीएके-००३ अर्थात (क्युडेन्गा) ला भारत सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे. औषध महानियंत्रकांच्या तज्ज्ञ समितीने ४ ते ६० वयोगटातील लोकांसाठी ही लस सुरक्षित असल्याचे मानले आहे. जपानच्या […] The post डेंग्यूविरुद्धच्या पहिल्या लसीला भारताची मंजुरी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 9:50 pm

पुण्यात धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचे उद्घाटन:उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले- शिवसेना सामान्यांच्या सेवेसाठी तत्पर

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुण्यात 'धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षा'चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना सामंत यांनी सांगितले की, शिवसेना सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सदैव तत्पर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सारसबागेजवळील शिवसेना भवनात हा कक्ष सुरू झाला. शिवसेनेचे राज्य निवडणूक समन्वयक वैभव वाघ यांच्या पुढाकाराने या कक्षाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, रमेश कोंडे, सुधीर कुरूमकर, आबा बागुल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. सामंत यांनी शिवसैनिकांना आवाहन केले की, शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे. ही सहाय्यता कक्षाची चळवळ गावागावात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. अशा उपक्रमांमुळे समाज घडतो आणि नेतृत्वही विकसित होते, असे ते म्हणाले. वैभव वाघ यांच्यासारख्या तरुणाच्या पुढाकारातून हा उपक्रम पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात प्रभावीपणे राबवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, शासनामार्फत विविध योजना आणि आरोग्य सुविधांसाठी निधी उपलब्ध असतो, परंतु माहितीअभावी त्या गरजूंपर्यंत पोहोचत नाहीत. हा कक्ष अशा योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी मदत करेल. अडचणीच्या काळात मदतीसाठी येणाऱ्या लोकांसाठी शिवसेना भवन हे दिघे साहेबांच्या आनंदाश्रमाप्रमाणे वाटावे, असे कार्य येथून व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 9:42 pm

भोंदू राजेंद्र गडगेच्या 'दत्तधाम दरबार'वर पोलिसांची कारवाई:स्पॉट पंचनामा करत विविध औषधी जप्त; बीडच्या तरुणाची फसवणूक केल्याचे उघड

संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तथाकथित ‘दत्तधाम दरबार’वर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून, भोंदू बाबा राजेंद्र गडगे याच्या या दरबाराचा संपूर्ण परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल चार तास परिसराची कसून झाडाझडती घेत सविस्तर स्पॉट पंचनामा केला. यावेळी दरबारात भक्तांना दिल्या जाणाऱ्या विविध संशयास्पद औषधांचे नमुनेही पोलिसांनी जप्त केले असून, या धडक कारवाईने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांची फसवणूक आणि अंधश्रद्धा पसरवल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या राजेंद्र गडगेला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, गडगेच्या या कथित दरबारामागील आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीचे जाळे उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कारवाईमुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली भोंदूगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, या प्रकरणाचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीडच्या तरुणाकडून 22 हजार रुपये उकळले अहिल्यानगरमधील संगमनेरचा तथाकथित भोंदू बाबा राजेंद्र गडगे याच्या कारनाम्यांची व्याप्ती आता राज्याच्या इतर भागांतही पसरल्याचे उघड झाले असून, बीडमधील एका तरुणाची फसवणूक केल्याचे नवे प्रकरण समोर आले आहे. पोटाचा आजार बरा करणे आणि विवाह जमवून देण्याच्या नावाखाली या भोंदूने माजलगाव येथील एका तरुणाकडून तब्बल 22 हजार रुपये उकळल्याचा गंभीर आरोप आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणाने या भोंदू विरोधात माजलगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून यामुळे खळबळ उडाली आहे. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे 'दत्तधाम सरकार' या नावाने दरबार भरवून मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा खोटा दावा करणाऱ्या या भोंदूला पोलिसांनी आधीच बेड्या ठोकल्या आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुढाकार घेऊन तक्रार दिल्यानंतर संगमनेर पोलिसांनी राजेंद्र गडगेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला सध्या पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, त्याच्या दरबारातील संशयास्पद व्यवहारांची आणि फसवणुकीच्या जाळ्याची पोलीस सखोल चौकशी करत आहेत. कॅन्सरसारखे आजार मंत्रोच्चाराने बरे केल्याचा दावा राजेंद्र गडगे आपल्या 'दत्तधाम सरकार' दरबारात कॅन्सर, सांधेदुखी आणि मणक्याच्या त्रासासारखे गंभीर आजार केवळ मंत्रांच्या जोरावर बरे केल्याचे बनावट दावे करत असे. या कथित चमत्कारांचे व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करून तो ग्रामीण भागातील भोळ्याभाबड्या नागरिकांना जाळ्यात ओढायचा. व्यवसायातील नुकसान भरून काढण्याचे आणि वैयक्तिक समस्या सोडवण्याचे आमिष दाखवून तो लोकांच्या अज्ञानाचा आर्थिक फायदा घेत असल्याचे आता समोर येत असून, कोठडीदरम्यान त्याचे आणखी अनेक कारनामे उघड होण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 9:17 pm

नांदेड पोलिस दलातील लिपीकाच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या:अनैसर्गिक संबंधांसाठी लावला होता तगादा, गुन्हा दाखल

कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील एका तरुणाला अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावणाऱ्या नांदेडच्या पोलिस अधिक्षक कार्यालयातील लिपीकाच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून रविवारी ता. १९ आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर तब्बल २२ तासांनी मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील वडगाव येथील नवनाथ लाखाडे (२४) या तरुणाची नांदेड पोलिस अधिक्षक कार्यालयातील लिपीक अभिषेक सातपुते याच्या सोबत मैत्री होती. मागील आठ ते दहा वर्षापासून ते चांगले मित्र होते. त्यानंतर शनिवारी ता. १८ दोघेही वडगाव येथे भेटले होते. त्यानंतर ते आखाडा बाळापूर येथे आले. सायंकाळच्या सुमारास पुन्हा वडगाव शिवारात गेले. यावेळी अभिषेक याने नवनाथ याच्याकडे अनैसर्गिक संबंध ठेऊ दे असा तगादा लावला. यापुर्वीही त्याने असा तगादा लावला होता. मात्र नवनाथ याने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र शनिवारी ता. १८ अभिषेक याने सकाळपासूनच त्याच्याकडे या प्रकाराचा तगादा लावला. त्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून नवनाथ याने वडगाव शिवारात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत नवनाथ यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र जो पर्यंत अभिषेक याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेहावर उत्तरीय तपासणी करू देणार नाही अशी भुमीका मयत नवनाथ याच्या कुटुंबिय व गावकऱ्यांनी घेतली होती. त्यानंतर आज आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात महिला व पुरुषांचा जमाव एकत्र आला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे यांच्या पथकाने तातडीने आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात जाऊन जमावासोबत संवाद साधला. सायंकाळी उशीरा नागनाथ लाखाडे यांच्या तक्रारीवरून अभिषेक सातपुते याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. त्यानंतर २२ तासानंतर मयत नवनाथ याच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक गणेश घोटके, एस. पी. रोहिणकर यांच्या पथकाने अधिक तपास सुरु केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 8:56 pm

निवृत्त सहायक आयुक्तांकडून अडीच कोटींची फसवणूक:पत्नी, मुलासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुण्यात जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने एका निवृत्त सहायक पोलीस आयुक्ताने व्यावसायिकाची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निवृत्त सहायक पोलीस आयुक्तासह त्यांची पत्नी, मुलगा आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुशील शंकरराव कदम, नंदा कदम, अनिकेत कदम (तिघे रा. फर्ग्युसन रस्ता, डेक्कन जिमखाना), दत्ता केदारी (रा. बोरज) आणि बाळासाहेब वाळुंज (रा. कामशेत, ता. वडगाव मावळ, जि. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिजित विलास उंद्रे (वय ३५, रा. मांजरी खुर्द) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सहायक पोलीस आयुक्त पुणे ग्रामीण आणि पुणे शहर पोलीस दलात कार्यरत होते. तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. सहायक आयुक्तांनी २०२६ मध्ये खेड तालुक्यातील बोरज येथे मुंबईतील एका व्यावसायिकाची १२ एकर जमीन विक्रीसाठी असल्याचे सांगितले. ही जमीन खरेदी केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल, असे आमिष त्यांनी दाखवले. त्यानंतर सहायक आयुक्तांनी मुंबईतील व्यावसायिकाच्या नावाने एका बँकेत खाते उघडले आणि तक्रारदाराकडून ५० लाख रुपये घेतले. तसेच, सोलापूर येथील एका बँकेत खासगी कंपनीच्या नावाने बनावट खाते उघडून आरटीजीएसद्वारे २५ लाख रुपये घेतले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी व्यावसायिकाकडून आणखी पैसे घेण्यात आले. खरेदीखत करायचे असल्याचे सांगून सहायक आयुक्ताने तक्रारदार व्यावसायिकाकडून १ कोटी ३५ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. खेडमधील जमीन मुंबईतील व्यावसायिकाची होती, मात्र तो हयात असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगून व्यवहार पुढे ढकलण्यात आला. जेव्हा तक्रारदार व्यावसायिकाने पैसे परत मागितले, तेव्हा सहायक आयुक्तांनी टाळाटाळ केली आणि त्यांना धमकावले, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपासात असे उघड झाले आहे की, सहायक आयुक्तांनी काही रक्कम पत्नी आणि मुलाच्या खात्यात जमा केली होती. या व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्या इतर दोघांविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एन. जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 8:50 pm

संगणक अभियंता महिलेसह दोघींची आत्महत्या:छळामुळे आत्महत्या केल्याचे उघड; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

वाघोली परिसरात छळाला कंटाळून एका संगणक अभियंता महिलेसह दोन महिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, एका प्रकरणात संगणक अभियंता महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत, वाघोली येथे एका ३७ वर्षीय संगणक अभियंता महिलेने आत्महत्या केली. तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी तिचा पती अभिषेक गुप्ता (वय ३१) याला अटक केली आहे. या प्रकरणात सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरोधातही आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी उत्तर प्रदेशातील आग्रा येथील रहिवासी आहेत. फिर्यादीनुसार, आरोपी पतीने संगणक अभियंता महिलेकडे १० लाख रुपये हुंड्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न केल्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून तिने वाघोलीतील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत, वाघोलीतील आव्हाळवाडी परिसरात २१ वर्षीय विवाहित तरुणी प्रतीक्षा जयसिंग कदम हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा पती जयसिंग मधुकर कदम (वय २९) याला अटक करण्यात आली असून, सासू हौसाबाई (वय ५५) हिच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, पतीने प्रतीक्षाकडे माहेरहून सोन्याची अंगठी आणण्याची मागणी केली होती. तसेच, मोटारीचे हप्ते भरण्यासाठी पैशांची मागणी करून तिचा छळ करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 8:48 pm

हिंगोलीत वन विभागाची धडक कारवाई:विनापरवाना सागवान लाकडासह टेम्पो जप्त, उमरा फाटा शिवारात तस्करांचा डाव उधळला

हिंगोली ते कळमनुरी मार्गावर उमरा फाटा शिवारात वन विभागाच्या पथकाने रविवारी ता. १९ सागवान लाकडाची वाहतूक करणारा टेम्पो अन लाकुड जप्त केले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरु असल्याचे वन विभागाच्या सुत्रांनी सांगितले. वन विभागाच्या या कारवाईमुळे सागवान तस्करांमधून खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्यात जंगलामधून अवैध वृक्षतोड करून वाहतूक करण्याचे प्रकार रोखण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे. त्यासाठी विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने, वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, विश्‍वनाथ टाक, माधव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यात पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकाकडून पहाटे, दुपारी तसेच रात्रीच्या वेळी जंगल परिसरात गस्त घातली जात आहे. दरम्यान, आज दुपारी उमरा फाटा शिवारातून एका टेम्पोमध्ये सागवान लाकुड भरून वसमतकडे नेला जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यावरून वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल काळे, वनरक्षक अशोक चव्हाण यांच्यासह पथकाने वाहनांची तपासणी सुरु केली होती. यावेळी एक टेम्पो उमराफाटा शिवारातून वसमतकडे जात असतांना वन विभागाच्या पथकाने टेम्पो चालकास थांबण्याची सूचना केली. त्यानंतर चालकाची चौकशी सुरु केली असता त्याला समाधानकारक उत्तरे देता आली नाही. याप्रकारामुळे वन विभागाच्या पथकाने टेम्पोची तपासणी केली असता त्यात सागवून लाकूड भरलेले दिसून आले. सदर सागवानाचा वाहतुकीचा तसेच तोडणीचा परवाना नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने टेम्पो व लाकुड जप्त केले आहे. या प्रकरणी वन विभागाच्या पथकाकडून पुढील कारवाई केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 8:47 pm

पंढरपुरात श्री रुक्मिणी मातेस अलंकार परिधान

पंढरपूर : विशेष प्रतिनिधी हिंदू वर्षातील महत्वाचे साडेतीन मुहुर्तापैकी अक्षय तृतीया एक मुहूर्त आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व असते. त्यानिमित्ताने पंढरपुरातील श्री रूक्मिणी मातेस अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली. यामध्ये श्री रूक्मिणी मातेस सोने मुकुट वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंच पेटी तांबडी, जव मणी पदक, जवेच्या […] The post पंढरपुरात श्री रुक्मिणी मातेस अलंकार परिधान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 8:46 pm

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार:आरोपी अभिजीत गाडेविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिस तपास सुरू

चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने एका तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अभिजित गाडे (वय २७, रा. थेरगाव, पिंपरी-चिंचवड) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका पीडित तरुणीने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि पीडित २४ वर्षीय तरुणीची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर आरोपीने तिला जाळ्यात ओढले. तिला चित्रपटात काम मिळवून देणार असल्याचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. चित्रपटात काम मिळवून न दिल्याने तरुणीने विचारणा केली. तेव्हा आरोपीने तरुणीची छायाचित्रे समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे तपास करत आहेत. नदीपात्रात एकाचा गळा चिरून खून झेड ब्रीज जवळील व लकउी पुल यांच्‍या मधील नदीपात्राजवळील मोकळ्या जागेत एका अज्ञात तरूणाचा गळा चिरून खून केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार रविवारी सकाळी साडेसात वाजता समोर आला आहे. खून झालेलया तरूणाची अद्याप ओळख पटली नसून याप्रकरणी मात्र डेक्‍कन पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस अमंलदार आकाश बाळासाहेब सोनवणे (32, रा. शिवाजीनगर पोलिस वसाहत) यांनी डेक्‍कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्‍थळी भेट दिली मात्र मृत्‍यू झालेल्‍याची ओळख अद्याही पटू शकली नाही. पुढील तपास डेक्‍कन पोलिस करत आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 8:02 pm

बीडच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, ॲकॅडमीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा:संस्थेच्या निष्काळजीपणामुळे नैराश्यातून टोकाचे पाऊल

पुण्यातील हांडेवाडी येथील करिअप्पा कॅम्पस परिसरातील यशोतेज ॲकॅडमीमध्ये शिक्षण घेणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने १० नोव्हेंबर २०२५ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या प्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र पोलीस तपासात ही आत्महत्या नैराश्यातून आणि संस्थेच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी ॲकॅडमीचे संस्थापक तेजस पाटील, संचालक व सीईओ विकास पाटील आणि वॉर्डन वसंत सरकटे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवधूत उल्हास बडे (वय १६, मूळ रा. बीड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने निवासी खोली क्रमांक ५१३ मध्ये पंख्याला चादरीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले होते. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अवधूतवर त्याच्या रूममेटचे तीन हजार रुपये चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या प्रकरणानंतर वॉर्डनने त्याला ॲकॅडमीमधून काढून टाकण्याची सूचना दिली होती. या दबावामुळे अवधूत मानसिक तणावाखाली आणि नैराश्यात गेला होता. महत्त्वाचे म्हणजे, अवधूत अल्पवयीन असतानाही अशा परिस्थितीत त्याचे योग्य समुपदेशन करण्यात आले नाही. तसेच, घडलेल्या प्रकाराची माहिती त्याच्या पालकांनाही वेळेत देण्यात आली नाही. संबंधित पदाधिकाऱ्यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने आणि आवश्यक काळजी न घेतल्याने ही घटना घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अवधूतचे आई-वडील दोघेही शिक्षक असून, तो यशोतेज ॲकॅडमीमध्ये ११ वीचे शिक्षण घेण्यासोबतच एनडीए प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. फुरसुंगी पोलीस ठाण्यात अवधूतचे वडील उल्हास बडे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शंभुराज जाधव करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 8:00 pm

आदिवासी मुलींच्या तस्करीचे मोठे रॅकेट!:कथित ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक वास्तव उघड; कठोर कारवाईची मागणी

राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच, यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी मुलींच्या तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा खळबळजनक आरोप भाजपने केला आहे. एका कथित व्हायरल ऑडिओ क्लिपचा हवाला देत भाजप जिल्हाध्यक्षांनी हा गंभीर दावा केल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या कथित रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर उभे राहिले आहे. भाजप जिल्हाध्यक्षांनी उघड केलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये एक तरुण आणि तरुणी यांच्यातील संवादातून मुलींच्या तस्करीचे भयावह वास्तव समोर आले आहे. या तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातून मुलींना फूस लावून पुण्यात नेले जात असून यामागे एक मोठे रॅकेट सक्रिय आहे, ज्यात काही महिलांसह अनेक लोकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या तस्करीसाठी मुलींची नकली आधार कार्ड तयार केली जात असल्याची धक्कादायक बाबही या संवादातून उघड झाली आहे. हे काम जरी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर वाटत असले, तरी ते 'शाप' देणारे आहे, अशी कबुलीही त्या तरुणीने दिली असून, या प्रकारामुळे यवतमाळ जिल्ह्यात सध्या मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात भाजप जिल्हाध्यक्षांनी कडक कारवाईची मागणी केली असून, आदिवासी भागातील निरागस मुलींना जाळ्यात ओढून त्यांची तस्करी करणे हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार असल्याचे म्हटले आहे. या रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ जेरबंद करण्याची मागणी आता जोर धरत आहे. विशेष म्हणजे, व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये 'शुभम मामा', 'कल्याणी आत्या' आणि 'मजहर कुरेशी' अशा नावांचा स्पष्ट उल्लेख असल्याने हे सर्वजण या रॅकेटचे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप केला जात आहे. या धक्कादायक खुलाशानंतर आता पोलिस प्रशासनाकडून नेमकी काय पावले उचलली जातात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ऑडिओ क्लिपमधील संवाद (दिव्य मराठी या कथित ऑडिओ क्लिपमधील संवादाची पुष्टी करत नाही) मुलगा: काय म्हणते, काय चाललंय?मुलगी: मी पोरींना घेऊन पुण्याला कामासाठी चालले आहे.मुलगा: अच्छा-अच्छा.मुलगी: मी एकटी नाहीये, मग काय दहा जण नेणार का? शुभम मामा आहे ना… पोरी काढणारा (पुरवणारा).मुलगा: शुभम मामा कोण? कुठला आहे तो?मुलगी: आपल्याच गावातला आहे, फुकट नगरचा.मुलगा: ते कल्याणी आत्या करते ना हे काम?मुलगी: हो, तीच.मुलगा: तिने काम सोडलं होतं ना?मुलगी: नाही, सोडलं नाहीये.मुलगा: ती आपल्या गावात घरापाशीच दिसते… कल्याणी आत्या.मुलगी: ती आता सगळं काम मोबाईलवरूनच करते.मुलगा: अच्छा, असं आहे का?मुलगी: तिला या कामासाठी आधी जेल झाली होती, तेव्हापासून ती फक्त मोबाईलवरूनच सगळं हाताळते. तिचं काम नील (निकाली) झालं की ती आता जाईलच.मुलगा: तिचा नवरा?मुलगी: कल्याणी आत्याच्या बापाने तिचं लग्न लावून दिलं होतं, तिथून ती निघाली होती.मुलगा: मजहर कुरेशी?मुलगी: हो, त्याच्यासोबत करून दिलं होतं. हे फार खतरनाक काम आहे.मुलगा: मदन कुरेशी हे काम करतो का?मुलगी: हो, ते कुरेशी हेच काम करतात. पैसा लय भेटतो, पण लोकांची बदुआ लागते.मुलगा: मग तुला काय वाटतं, हे चांगलं काम आहे का?मुलगी: मला चांगलं नाही वाटत बा, मी फक्त सांगत आहे. पैसा मिळतो पण बदुआ लागते.मुलगा: अच्छा, मग मुली काढण्यात आणि विकण्यात हे तिघे-चौघेच आहेत का?मुलगी: बापरे! तिघे-चौघे नाही, यात लय जण आहेत. हे पूर्ण रॅकेट आहे. यात पूनम आत्या आहे, आणखी किती जण आहेत हे मी सांगूच शकत नाही.मुलगा: बापरे! मग यात मेन (प्रमुख) कोण आहे?मुलगी: यात कुणी एक मेन नाही, जे काम लावून देतात ते मेन आहेत. माझ्या आईची पोरगी, पूनम आत्या आणि कल्याणी आत्या काम लावून देतात. मग त्यांना घेऊन जावं लागतं. त्यासाठी आधार कार्ड लागतं, माझ्या आईचं नकली आधार कार्ड बनवलं आहे… आणि आता मम्मी पुण्याला चालली आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 7:44 pm

बोरिवलीचा 'मंगलकुंज' घोटाळा:200 गुजराती कुटुंबांची पुनर्विकासात फसवणूक; राहिवाशांची थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव

बोरिवली (पश्चिम) येथील ऐतिहासिक इंद्रप्रस्थ शॉपिंग सेंटरच्या समोरील 'मधुमिलन को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी' (मंगलकुंज) सध्या भ्रष्टाचार आणि गंभीर प्रशासकीय अनियमिततेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 66 वर्षे जुन्या असलेल्या या प्रतिष्ठित सोसायटीत 90 टक्के रहिवासी गुजराती भाषक असून, त्यामध्ये कच्छी जैन समाज आणि इतर गुजराती समुदायाचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. मॅनेजिंग कमिटीने पुनर्विकासाच्या नावाखाली केलेल्या फसवणुकीमुळे आणि 79 लाख रुपयांच्या टॅक्स घोटाळ्यामुळे या 200 कुटुंबांचे भविष्य आता टांगणीला लागले आहे. याप्रकरणी रहिवाशांनी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे. गोपनीयतेच्या नावाखाली पुनर्विकासाचा 'गुप्त' प्लॅन सोसायटीच्या सदस्यांनी मॅनेजिंग कमिटीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. लोकशाही आणि सहकारी संस्थांच्या नियमांना हरताळ फासत कमिटीने कामकाज चालवल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. कोणतीही सर्वसाधारण सभा (GBM) न घेता किंवा सदस्यांची अधिकृत संमती न घेताच, कमिटीने मुंबई महानगरपालिकेत (BMC) पुनर्विकासाचा एक गुप्त आराखडा सादर केला. पालिकेच्या फाईल्समधून या छुप्या कारभाराचे दस्तऐवज जेव्हा सदस्यांच्या हाती लागले, तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सोसायटीचे सदस्य विरल सावला यांनी थेट सचिव देवेंद्र सयानी यांच्यावर निशाणा साधला आहे. सयानी यांनी स्वतःला सर्वसत्ताधीश समजून हा कट रचल्याचा आरोप सावला यांनी केला. मूळ दुकानदारांना इमारतीच्या मागील बाजूस ढकलून, समोरील मोक्याची आणि कोट्यवधींची व्यावसायिक जमीन हडपण्याचा हा डाव असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. 79 लाखांचा कर हडपला; कमिटी बरखास्त या भ्रष्टाचाराचे पुरावे केवळ कागदपत्रांपुरते मर्यादित नाहीत, तर आर्थिक व्यवहारातही मोठा गैरप्रकार समोर आला आहे. सदस्यांकडून वसूल केलेला 79 लाख रुपयांचा मालमत्ता कर (Property Tax) सरकारी तिजोरीत जमाच करण्यात आला नाही. या गंभीर आर्थिक अनियमिततेची दखल घेत उपनिबंधकांनी (Sub-Registrar) विद्यमान मॅनेजिंग कमिटी तत्काळ प्रभावाने बरखास्त केली आहे. तसेच, सहनिबंधकांनीही या कमिटीला कोणत्याही प्रकारचे नवीन प्रशासकीय किंवा आर्थिक निर्णय घेण्यास मज्जाव केला आहे. प्रशासकीय अभद्र युती आणि सद्यस्थिती कमिटी बरखास्त होऊनही जुने सदस्य पडद्यामागून सूत्रे हलवत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. दरम्यान, सचिव देवेंद्र सयानी यांनी या सर्व आरोपांवर मौन बाळगले आहे. बोरिवलीसारख्या प्रमुख गुजराती बहुल भागात घडलेल्या या घोटाळ्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता मुख्यमंत्री कार्यालय (मंत्रालय) या बिल्डर आणि भ्रष्ट कमिटीच्या अभद्र युतीतून 200 कुटुंबांना कसा दिलासा देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 7:11 pm

लातूर हादरले!:दोन भाऊ बेपत्ता, घरापासून 60 फुटांवर चिमुकल्याचा मृतदेह; दुसरा अद्याप बेपत्ता

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात दोन सख्खे चुलत भाऊ घरातून बेपत्ता झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, यातील 6 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह घराच्या अवघ्या 60 फुटांवर आढळल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास स्वामी कुटुंबातील देवांश (6 वर्षे) आणि साईचरण (11 वर्षे) हे दोघेही बेपत्ता झाले होते, ज्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. शोधमोहीम सुरू असतानाच देवांशचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला, मात्र 11 वर्षांचा साईचरण अद्यापही बेपत्ता असून पोलिस त्याचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात भीतीचे आणि शोकाकुल वातावरण पसरले आहे. 11 वर्षीय साईचरण दिनेश स्वामी हा अद्याप बेपत्ता असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. ही मुले बेपत्ता होण्यामागचे नेमके कारण काय आणि 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू हा घातपात आहे की अपघात, याबाबत अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरित असून पोलिस तपासातूनच यावर प्रकाश पडणार आहे. दरम्यान, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चाकूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लातूर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट टीम, श्वान पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. चिमुकल्याच्या संशयास्पद मृत्यूचा छडा लावण्यासाठी आणि बेपत्ता असलेल्या दुसऱ्या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र तपास पथके तयार केली असून, या घटनेमागील गूढ उकलण्यासाठी सर्व यंत्रणांच्या माध्यमातून युद्धपातळीवर तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांगितले की, घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेसह लातूर आणि अहमदपूर येथील पोलिसांची पथके चाकूर येथे दाखल झाली आहेत. जवळपास दहा पथके तयार करण्यात आली असून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर बेपत्ता असलेल्या मुलाबाबत माहिती गोळा करून त्याचा शोध घेण्यावर विशेष भर दिला जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 6:55 pm

छत्रपती संभाजीनगरमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी:हजारो समाज बांधवांची भव्य दुचाकी रॅली

छत्रपती संभाजीनगर येथे जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची ८९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली, ज्यात हजारो लिंगायत समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅलीदरम्यान समाज बांधवांनी हातात झेंडे घेऊन, घोषणाबाजी करत आणि ढोल-ताशांच्या गजरात शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण केले. ही रॅली आकाशवाणी येथील महात्मा बसवेश्वर चौकात पोहोचली, जिथे महामानवांना अभिवादन करण्यात आले. चौकात महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. त्यानंतर आयोजित भव्य कार्यक्रमात विविध मान्यवरांनी उपस्थिती लावून बसवेश्वरांच्या समानता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यक्रमाला मंत्री संजय शिरसाट, अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, आमदार संजय केनेकर, उबाठा नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे आणि बसवराज मंगरुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. हजारो लिंगायत समाज बांधवांनी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंतीचा उत्साह वाढवला.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 6:30 pm

रक्ताच्या नात्याला काळिमा:जमिनीच्या वादातून सख्ख्या चुलत्याने 21 वर्षीय पुतण्याचा काटा काढला; चाकूने सपासप वार करून हत्या

धाराशिव जिल्ह्यातील खामसवाडी परिसरात माणुसकीला काळिमा फसणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ जमिनीच्या वादातून एका सख्ख्या चुलत्याने आपल्या 21 वर्षांच्या पुतण्याचा खून केला आहे. विलास शेळके असे आरोपीचे नाव असून त्याने सुजित शेळके या तरुणावर चाकूने वार करत जीव घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विलास शेळके आणि त्याचा पुतण्या सुजित शेळके यांच्या कुटुंबात जमिनीच्या व्यवहारावरून मागील अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती. याच वादातून विलासच्या मनात सुजितबद्दल कमालीचा द्वेष निर्माण झाला होता, ज्याचे पर्यावसान अखेर एका भीषण घटनेत झाले. रात्री साडेदहाच्या सुमारास हा जुना वाद उफाळून आला आणि रागाच्या भरात विलासने पुतण्यावर हल्ला चढवला, ज्यामुळे या कौटुंबिक वादाचा अंत एका दुर्दैवी घटनेने झाला. घटनेच्या रात्री सुजित आपल्या आजी-आजोबांसोबत झोपलेला असताना आरोपी विलासने तिथे येऊन त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वादाचे पर्यावसान काही वेळातच भीषण हल्ल्यात झाले; विलासने संतापाच्या भरात आपल्याकडील चाकूने सुजितच्या पोटावर सपासप वार केले. या रक्तरंजित हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुजितचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. खामसवाडी गावात भररात्री घडलेल्या या थरारक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, जमिनीच्या हव्यासापोटी सख्ख्या चुलत्यानेच पुतण्याचा काटा काढल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी मृत सुजित शेळकेच्या आईने दिलेल्या जबाबावरून शिराढोण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपीला जेरबंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रक्ताच्या नात्यात जमिनीच्या वादातून घडलेल्या या भीषण हत्याकांडाने संपूर्ण गाव हादरले आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 6:23 pm

दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत

तेहरान : आयआरजीसी अर्थात इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स या इराण लष्कराचा भाग असलेल्या नौदलाने होर्मुझ सामुद्रधुनी पार करत असलेली दोन तेल जहाजे परत पाठवली आहे. आयआरजीसीशी संलग्नित असलेल्या तस्रीम वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये इराणच्या नौदलाने नाकेबंदी सुरू केली असून, इराणच्या सशस्त्र दलाने रविवार दि. १९ एप्रिल रोजी दोन तेल जहाजांना परत पाठवले. […] The post दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 6:00 pm

फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट, २० कामगार ठार

विरधुनगर : तामिळनाडूतील विरधुनगर जिल्ह्यातील एका फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट झाला असून या स्फोटात २० कामगारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सहा कामगार जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात The post फटाक्याच्या फॅक्टरीत मोठा स्फोट, २० कामगार ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 5:47 pm

एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वीच साताऱ्यात वातावरण तापले:शिवसेना शिंदे गटाच्या बॅनरवरून महेश शिंदेंचा फोटो गायब, पक्षविरोधी भूमिकेमुळे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा

साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शहरात लावण्यात आलेल्या बॅनर्सवरून शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचा फोटो गायब असल्याचे समोर आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीदरम्यान घेतलेल्या पक्षविरोधी भूमिकेमुळे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा असून, याच रागातून सभेच्या ठिकाणच्या आणि शहरभरातील बॅनर्सवर महेश शिंदेंना स्थान देण्यात आले नसल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात आता तर्कवितर्कांना उधाण आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महेश शिंदे यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून फारकत घेत भाजपशी हातमिळवणी केल्याचा आणि पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. या पक्षविरोधी भूमिकेमुळे शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, त्यातूनच बॅनर्सवरून त्यांचे फोटो गायब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, जिल्हाप्रमुख रणजीत भोसले यांनी हा वाद सावरण्याचा प्रयत्न केला असून, बॅनर्सवर फोटो नसणे ही केवळ काही कार्यकर्त्यांकडून चुकून झालेली गोष्ट असल्याचे स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे. सोमवारी एकनाथ शिंदे यांची सभा होणार असून त्यांच्या सभेला महेश शिंदे उपस्थित राहणार का, तसेच ते व्यासपीठावर दिसणार का, याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष असणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे शिवसेना शिंदे गटात अंतर्गत मतभेद असल्याचे समोर आले आहे. सातारा जिलहा परिषद निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीला बहुमत असतानाही भाजपने सदस्य फोडून सत्ता मिळवली. या प्रक्रियेत शिवसेना शिंदे गटाचे सदस्य भाजपच्या बाजूने गेल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. तसेच निवडणुकीच्यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की देखील झाली होती.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 5:43 pm

भगवान चवलेंनी माउंट धौलागिरी केले सर:जगातील सातवे उंच शिखर पादाक्रांत, अनेक अष्टहजारी शिखरेही समिट

पुण्यातील गिर्यारोहक भगवान चवले यांनी जगातील सातवे सर्वात उंच शिखर माउंट धौलागिरी यशस्वीरित्या सर केले आहे. १८ एप्रिल २०२४ रोजी त्यांनी हे शिखर पादाक्रांत केले. मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या लव्हार्डे येथील रहिवासी असलेले चवले हे एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. धौलागिरी हे ८,१६७ मीटर (२६,७९५ फूट) उंचीचे शिखर पश्चिम-मध्य नेपाळमध्ये स्थित आहे. 'धवल' (पांढरा) आणि 'गिरी' (पर्वत) या संस्कृत शब्दांवरून याचे नाव 'पांढरा पर्वत' असे पडले आहे. काली गंडकी नदीच्या जगातील सर्वात खोल दऱ्यांपैकी एक असलेल्या खोऱ्याच्या पश्चिमेस हे शिखर आहे. याची १५ हजार फूट उंचीची दक्षिणेकडील भिंत चढाईसाठी अत्यंत आव्हानात्मक मानली जाते. यापूर्वी, भगवान चवले यांनी १७ मे २०१८ रोजी सकाळी ६:३० वाजता जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर केले होते. एव्हरेस्ट सर करण्यापूर्वी त्यांनी चार वर्षे कठोर प्रशिक्षण घेतले होते. २०१७ मध्ये खराब हवामानामुळे त्यांना शिखर माथ्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावरून परत फिरावे लागले होते, मात्र २०१८ मध्ये त्यांनी पुन्हा प्रयत्न करून यश मिळवले. एव्हरेस्टपूर्वी त्यांनी सह्याद्रीतील खडापारसी, वजीर, ड्युक्स नोज, लिंगाणा, तैलबैल, ढाकभैरी यांसारखी कठीण शिखरे आणि हिमालयातील स्टोक कांगरी, घोलप कांगरी, भागीरथी, आयलंड पीक सर केली आहेत. एव्हरेस्टनंतर त्यांनी जगातील पाचवे सर्वात उंच शिखर माउंट मकालू देखील पादाक्रांत केले आहे. माउंट धौलागिरीच्या यशस्वी चढाईसह, भगवान चवले यांनी नेपाळमधील सर्व सात अष्टहजारी (८,००० मीटरपेक्षा उंच) शिखरे सर करण्याचा विक्रम केला आहे. यामध्ये माउंट एव्हरेस्ट, माउंट कांचनजंगा, माउंट मकालू, माउंट ल्होत्से, माउंट मनास्लु, माउंट अन्नपूर्णा १ आणि आता माउंट धौलागिरी यांचा समावेश आहे. असे करणारे ते कदाचित देशातील पाचवे गिर्यारोहक ठरले आहेत. धौलागिरी शिखराचा शोध १८०८ मध्ये लागला, तेव्हा काही काळ त्याला जगातील सर्वात उंच पर्वत मानले जात होते. १३ मे १९६० रोजी स्विस-ऑस्ट्रियन पथकाने (मॅक्स आयसेलिन यांच्या नेतृत्वाखाली) पहिल्यांदा हे शिखर सर केले. महाराष्ट्रातील प्रसाद जोशी, केवल कक्का आणि जितेंद्र गवारे यांनी यापूर्वी धौलागिरी सर केले आहे. या मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील अजून २ गिर्यारोहकांनी हे शिखर सर केले पीआय शिवाजी ननावरे व एसपीआय द्वारका ढोके या दोघांनीही या शिखराला यशस्वी गवसणी घातली. हे दोघेही पोलिस प्रशासनातील अधिकारी आहेत. यामुळे महाराष्ट्र पोलिससाठी सुध्दा गौरवाची बाब आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 5:37 pm

नागपूरच्या कामठीत सिलिंडरचा स्फोट:40 वर्षीय तरुणाचा गुदमरून मृत्यू तर 10 जखमी; गॅस गळतीमुळे लागली आग

नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील गांधीनगर भाजी मंदी परिसरात सकाळच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अतुल उर्फ बंटी पानतावणे या 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून सुमारे 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पानतावणे कुटुंब सकाळी घरात असताना स्वयंपाकघरात गॅस गळतीमुळे आग लागली आणि त्यानंतर अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अतुल पानतावणे यांच्या पत्नी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असता गॅस गळतीमुळे आग लागली. त्यानंतर काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला आणि संपूर्ण घरात आग पसरली. घरातील जीवनावश्यक वस्तू, सोन्याचे दागिने, टीव्ही, फ्रीज, कपडे यांसह सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग लागल्यानंतर पत्नी व मुले घराबाहेर पाडण्यात यशस्वी झाले. मात्र अतुल हे बेडरूममध्येच अडकून पडल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. घरात लागलेल्या आगीला विझवण्यासाठी विनय पानतावणे, नितीन पानतावणे तसेच शेजारी संध्या ढवळे यांच्यासह इतर काहीजणांनी प्रयत्न केले. यात ते देखील जखमी झाले. या सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली असली तरी तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. याप्रकरणी जुनी कामठी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत जुमडे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीष हिवरकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून, या घटनेचा पुढील सखोल तपास सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 5:20 pm

भारत-रशियात करार लागू

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट संरक्षण करार आता लागू झाला आहे. या अंतर्गत दोन्ही देश एकमेकांच्या भूमीवर ३००० सैनिक तैनात करू शकतील. यासोबतच ५ युद्धनौका आणि १० लष्करी विमानांच्या तैनातीलाही परवानगी देण्यात आली आहे. दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्या लष्करी तळ, हवाई तळ आणि बंदरांचा वापर करू शकतील, ज्यामुळे […] The post भारत-रशियात करार लागू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 5:18 pm

सुमारे ५० अब्ज डॉलर्सचे तेल गेले वाया

तेहरान : इराणवरील अमेरिका-इस्रायल युद्ध केवळ लष्करी संघर्षापुरते मर्यादित राहिले नाही. त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. अंदाजे ५० दिवसांत ५० ​​अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे कच्चे तेल वाया गेले आहे. त्याचा परिणाम येत्या काही महिन्यांपर्यंत आणि वर्षांपर्यंत जाणवेल, असे एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. विश्लेषकांच्या मते, फेब्रुवारीच्या अखेरीस संघर्ष सुरू झाल्यापासून अंदाजे ५० […] The post सुमारे ५० अब्ज डॉलर्सचे तेल गेले वाया appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 5:03 pm

कळमनुरी-आखाडा बाळापूर मार्गावर दोन ट्रकची भीषण धडक:एकाचा मृत्यू, 3 जण गंभीर

कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर कामठा फाटा शिवारामध्ये भरडा ट्रकची सभासमोर धडकून झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी तारीख 19 पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमींना उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर डोंगरगाव पूल जवळ पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे या महामार्गावर एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर वाहने एकाच मार्गावरून धावतात. दरम्यान आज पहाटे हिंगोली कडून एक ट्रक ( RJ 09 GC 0967 ) नांदेड कडे जात होता. सदर ट्रक कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर कामठा फाटा शिवारात आला असताना नांदेड कडून येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाली. सदर अपघातामध्ये चालक आशीम सलीम घाची (वय 30वर्षे रा.अरवली जिल्हा गुजरात) जागीच ठार झाला. तर तुफान गवारवाल राठोड (वय 35 वर्षे रा.रावनखेडी ता.झालडा जिल्हा उज्जैन), बाबुलाल ज्ञानुराम मकवाना (वय 40वर्षे रा. धाबलाहारदू ता.तुशना जिल्हा उज्जैन), हफीज आझम मुलतानी (वय 35 वर्षे रा.मुदुसा अरवली गुजरात) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळतात महामार्ग पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ अनमोड,जमादार सोपान थिटे, गजानन कोरडे, प्रवीण राठोड पथकाने तातडीने धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील जखमींना तातडीने आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती मात्र पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. सदर अपघात एवढा भीषण होता की दोन्ही ट्रकच्या केबिनचा चुराडा झाला. या घटनेची आखाडा बाळापुर पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 5:03 pm

मराठी भाषेचा अभिजात दर्जा उपक्रमांनी अधोरेखित होईल:रोटरी क्लबच्या विश्व मराठी एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आनंद इंगळे यांचे मत

मराठी भाषा प्राचीन असून उपक्रमशीलतेद्वारे मराठी भाषेचा अभिजाततेचा दर्जा अधोरेखित होत राहिल, असा विश्वास प्रसिध्द सिने- नाट्य कलावंत आनंद इंगळे यांनी व्यक्त केला. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेजतर्फे अभिमंच, अॅमस्टरडमच्या संयुक्त विद्यमाने विश्व मराठी एकांकिका, बालनाट्य आणि कविता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नवलमल फिरोदिया सभागृह संपन्न झाला, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंगळे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांतपाल नितीन ढमाले, उद्योजक दिलीप कोटीभास्कर, हेरिटेज क्लबचे अध्यक्ष शुभ्रो सेन आणि सचिव सोनाली चौबळ उपस्थित होत्या. यावेळी बोलताना आनंद इंगळे म्हणाले की, मराठी भाषा टिकविण्यात अशा उपक्रमांचे योगदान मोठे असून अशा स्पर्धा सातत्याने आयोजीत करणे आणि त्यात भाग घेत राहणे आवश्यक आहे. यावेळी बोलताना नितीन ढमाले म्हणाले की, मराठी भाषा टिकण्यासाठी आणि ती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्या दृष्ट्रीने हा उपक्रम स्तुत्य असून कला आणि साहित्याच्या माध्यमातून मराठी भाषा नवीन पिढीपर्यंत पोहोचवली जात आहे. यावेळी प्रसिद्ध उद्योजक दिलीप कोटीभास्कर यांनी मनोगत व्यक्त केले. लीना गोगटे आणि अविनाश ओगले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेबाबत माहिती देताना अविनाश ओगले म्हणाले की, या स्पर्धेसाठी बेल्जियम आणि स्विझरलँड येथून प्रथमच प्रवेशिका आल्या असून १२ देशांतून २९ संघांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 4:52 pm

अमिता पैठणकर यांना दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्कार:प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, गझलेत आशय आणि शब्दांचा ओलावा महत्त्वाचा

रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे गझलकारा अमिता पैठणकर यांना दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ व्याख्याते व लेखक प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा. जोशी यांनी गझल लेखनात आकृतीबंधाबरोबरच आशय आणि शब्दांचा ओलावा असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. १९) पार पडला. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे संस्थापक भूषण कटककर, मैथिली आडकर आणि प्रज्ञा महाजन या प्रसंगी मंचावर उपस्थित होते. प्रा. मिलिंद जोशी यांनी गझल लेखनावर मार्गदर्शन करताना सांगितले की, गझल लिहिताना आकृतीबंधाचा विचार महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे लिखाणात आशय आणि शब्दांचा ओलावा असावा. गझल लेखनात आचारसंहिताही पाळली गेली पाहिजे. उत्तम गझल निर्मितीसाठी तंत्र, प्रतिभा आणि अनुभव यांचा मिलाफ आवश्यक असतो. सुरुवातीस तंत्र, नंतर स्वत:तील प्रतिभेचा शोध आणि अनुभव अशा प्रक्रियेतून आतून उमलून आल्यानंतर उत्तम गझलेची निर्मिती होते, असे त्यांनी नमूद केले. कसदार लेखनासाठी पुनर्लेखन अत्यंत आवश्यक असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. लोकांतात समाजदर्शन घडते तर एकांकात आत्मदर्शन घडते, असेही ते म्हणाले. ज्या वेळेला आत्मदर्शन आणि समाजदर्शन एकरूप होते, त्या वेळेला अप्रतिम गझलेची निर्मिती होते. उत्तम कलाकृतींचे सृजन व्हावे आणि दुय्यम कलाकृतींचे हनन व्हावे यासाठी संपादन व समीक्षण होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आज साहित्य क्षेत्रात समीक्षकांची वानवा असून समीक्षेचे अध:पतन म्हणजेच साहित्य क्षेत्राचे अध:पतन होय, असे प्रा. जोशी म्हणाले. गझलकारांमध्ये आढळणारा मोकळेपणा कवींमध्ये दिसून येत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ॲड. आडकर यांनी या पुरस्काराच्या माध्यमातून सहकाऱ्याच्या स्मृती जपून ठेवण्याचे उदात्त कार्य केले आहे. दीपक करंदीकर हे साहित्याच्या सर्व प्रांतात लीलया संचार करणारे, संस्थात्मक कार्य करत लेखन व सादरीकरण करणारे उत्तम व्यक्तिमत्त्व होते, असेही प्रा. जोशी यांनी सांगितले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अमिता पैठणकर म्हणाल्या की, आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर कवितेने मला साथ दिली तर गझलेने जगण्याचे भान दिले. गझलेतून व्यक्त होत मानसिकदृष्ट्या सबल झाले. कविता आणि गझल माझ्या जगण्याचे स्फुरण आहेत. हा सन्मान माझ्यासाठी एक जबाबदारी असून लेखनात नाविन्य ठेवण्याचा प्रयत्न करेन. कार्यक्रमाच्या सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली आणि दीपक करंदीकर यांच्यासमवेतच्या मैत्रीचा धागा उलगडला.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 4:50 pm

'नोटसम्राट 2' पुस्तकाचे प्रकाशन:नोटबंदीच्या लढ्यावर आधारित, मोदींच्या निर्णयांचे समर्थन

प्रा. विनायक आंबेकर लिखित 'नोटसम्राट 2 - नोटबंदीचा लढा' या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात झाले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांच्या हस्ते 'अग्निपंख प्रकाशना'ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि लेखक प्रा. आंबेकर उपस्थित होते. यावेळी बोलताना केशव उपाध्ये यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, पंतप्रधानांना देशातील प्रत्येक जिल्ह्याचा प्रवास केल्यामुळे जनतेच्या प्रश्नांची सखोल जाणीव आहे. जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा ही त्यांच्या योजना आणि विकासकामांमागील मुख्य भूमिका होती. उपाध्ये यांनी पुढे नमूद केले की, जनहिताचे निर्णय घेताना पंतप्रधान मोदी कधीही कचरले नाहीत. त्यांच्या दूरदृष्टीच्या भूमिकेमुळे सर्वसामान्यांचा विकास झाला. विरोधकांनी मात्र केवळ राजकीय विरोधासाठी मोदीजींना विरोध केला, असेही त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व काळाच्या कसोटीवर सिद्ध होत असून, गेल्या बारा वर्षांत घेतलेल्या निर्णयांचे सकारात्मक परिणाम समाज अनुभवत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या अभय कुलकर्णी यांनी माहितीच्या युद्धावर भाष्य केले. ते म्हणाले की, विषय तज्ज्ञांनी त्यांची तांत्रिक माहिती सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिणे आवश्यक आहे. सध्या माहितीचे युद्ध हे कुठल्याही देशाच्या थेट आक्रमणापेक्षा गंभीर आहे. डिजिटल माध्यमांमध्ये पाश्चिमात्य देशांकडून अधिक आशय निर्मिती होते, तर आपल्याकडून मर्यादित प्रमाणात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात डिजिटल माध्यमांमध्ये वेगाने आशय निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पुस्तकाचे लेखक प्रा. विनायक आंबेकर यांनी नोटबंदीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर माहिती दिली. ते म्हणाले की, भारतात 1996 पर्यंत बनावट नोटांची समस्या नव्हती. त्यानंतर प्रथमच भारताच्या नोटा परदेशात छापल्या गेल्या आणि तेव्हापासून बनावट नोटांचा प्रश्न सुरू झाला. आंबेकर यांनी पुढे सांगितले की, पाकिस्तानने भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापून भारतात पाठवायला सुरुवात केली. 2004 ते 2014 या काळात देशांतर्गत झालेल्या 500 अतिरेकी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे हे पैसे वापरले गेले. त्यामुळे पंतप्रधान मोदींना स्वेच्छेने नव्हे, तर अनिवार्यता म्हणून नोटबंदी करावी लागली. हे पुस्तक ही सर्व माहिती रंजक पद्धतीने कथानकाच्या स्वरूपात मांडते.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 4:50 pm

बदलत्या हवामानामुळे मनुष्याच्या जीवितास धोका

नवी दिल्ली : भारतात ‘दमट उष्णता’ हवामान बदलाचे सर्वात धोकादायक रूप बनत चालली आहे. हे वाढते तापमान व जास्त आर्द्रता यांचे असे समीकरण आहे, ज्यामध्ये शरीर घामाच्या माध्यमातून स्वत:ला थंड करू शकत नाही. जर्नल क्लायमेट डायनॅमिक्समधील अभ्यासानुसार केरळमध्ये याचा जास्त धोका आहे. भारतात आतापर्यंत उष्णतेच्या लाटेची ओळख मुख्यत्वे तापमानाच्या मर्यादेवरून केली जात असे. परंतु अभ्यासानुसार, […] The post बदलत्या हवामानामुळे मनुष्याच्या जीवितास धोका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 4:35 pm

रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभवडे, सागवे आणि नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पामुळे स्थानिक जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना ठाकरे गटाने या प्रकल्पाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली असून, कोकणच्या पर्यावरणाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. सुमारे १४४.९५ हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प प्रस्तावित असून, दरवर्षी ०.९ दशलक्ष टन बॉक्साईट उत्खनन […] The post रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 4:33 pm

अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीने मोडले रेकॉर्ड

जळगाव : प्रतिनिधी राज्यात अक्षय्य तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अक्षय्य म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेली गुंतवणूक किंवा खरेदी घरात कायमस्वरूपी समृद्धी घेऊन येते. त्यामुळे अनेक जण या दिवशी सोने खरेदी करण्याला प्राधान्य देत असतात. याच पार्श्वभूमीवर आज सराफा बाजारात मोठी गर्दी […] The post अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीने मोडले रेकॉर्ड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 4:30 pm

सरसंघचालकपदी महिलांना संधी देणार का?:विजय वडेट्टीवार यांचा सवाल; मोदींचे भाषण आचारसंहितेचे भंग करणारे असल्याचा आरोप

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजपत महिलांना दुय्यम स्थान दिले जात असल्याचा आरोप केला. भाजपने जे विधेयक आणले त्यात अनुसूचित जाती, जमाती विशेषतः ओबीसी महिलांच्या आरक्षणाची कोणतीही तरतूद नव्हती. मनुस्मृती मानणाऱ्या भाजपत महिलांना नेहमी दुय्यम स्थान दिले जाते, असे ते म्हणालेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा एखाद्या महिलेच्या हातात देणार का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी संघाला केला. विजय वडेट्टीवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून भाषण केले. ते भाषण देशाच्या पंतप्रधानांचे नव्हे, तर भाजपच्या नेत्याचे व आचारसंहितेचा भंग करणारे होते. महिला आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना मोदींनी 50 हून अधिकवेळा काँग्रेसचे नाव घेतले. यावरून भाजपला काँग्रेसची किती भीती वाटते हे स्पष्ट होते. पंतप्रधानांचे भाषण राजकीय प्रचारासारखे होते. त्यांनी आचारसंहितेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. काँग्रेसने देशाला पहिली महिला राष्ट्रपती, पहिल्या महिला पंतप्रधान व पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा दिल्या आहेत. काँग्रेसनेच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण दिले. 2023 मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी मतदारसंघांची पुनर्रचना होईपर्यंत रोखून धरण्याचे कारण काय होते? सत्ता कायम आपल्या हाती ठेवण्याचा हा भाजपचा कुटिल डाव होता. तो विरोधकांनी हाणून पाडला, असे वडेट्टीवार म्हणाले. भाजपच्या विधेयकात एससी, एसटीसाठी काहीच नव्हते भाजपने आणलेल्या विधेयकात अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी महिलांच्या आरक्षणाची कोणतीही तरतूद नव्हती. 33 टक्के आरक्षण देताना बहुजन समाजातील महिलांचा हक्क डावलून केवळ आपल्या मर्जीतील लोकांना सत्तेत बसवण्याचे ते षडयंत्र होते. मनुस्मृतीचा विचार मानणारी भाजप महिलांना आपल्या संघटनेत केवळ दुय्यम स्थान देते. ते संघाच्या प्रमुखपदी एखाद्या महिलेला नियुक्त करण्याचे धाडस दाखवणार का? भाजपचा देशाचा नकाशा बदलून संविधानावर हल्ला करण्याचा डाव होता. तो असफल ठरला, असेही विजय वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले. सर्वच उद्योग गौतम अदानींच्या घशात विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सर्व नियम धाब्यावर बसवून उद्योग गौतम अदानींच्या घशात घालण्याचे काम सुरू असल्याचाही आरोप केला. देशातील रेल्वे, विमानतळ, वीज, सिमेंट, स्टील प्रकल्प हे सर्व नियम धाब्यावर बसवून अदानींच्या घशात घातले जात आहेत. देशातील जनता गरीब होत आहे. याऊलट अदानी श्रीमंत होत आहेत. भाजप व अदानी एकमेकांना पुरक आहेत. ते देशाची लुट करत आहेत, असे ते म्हणाले. महिलांना भाजपचा कावा समजेल हा विश्वास भाजप पुरस्कृत भोंदूबाबा व धर्मांध शक्ती देशात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे महिलांच्या नावाखाली स्वतःची सत्ता वाचवण्याचे प्रयत्न देशातील जागरूक महिलांना नक्कीच समजतील असा आम्हाला विश्वास आहे. अत्याचार व शोषणाच्या घटनेत जात-धर्म शोधणे घृणास्पद आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नवनीत राणा व डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारे डॉक्टर अनिल बोंडे यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल केले पाहिजे, असेही वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 4:30 pm

पाकिस्तानी फुगे मिळाल्याने खळबळ

भरमौर/चंबा : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात शनिवारी शेतात एक संशयास्पद फुगा सापडल्याने खळबळ उडाली. त्यावर पीआयए असे लिहिलेले होते, तसेच उर्दूमध्ये काही शब्द आणि पाकिस्तानचा झेंडा काढलेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी एक ग्रामीण आपल्या जनावरांना चरायला घेऊन शेतात गेला होता. याचवेळी त्याची नजर या असामान्य फुग्यावर पडली. जवळ जाऊन पाहिल्यावर फुग्यावर बनवलेली चिन्हे आणि […] The post पाकिस्तानी फुगे मिळाल्याने खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 4:29 pm

राळेगावमध्ये ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता

यवतमाळ : प्रतिनिधी सध्या राज्यात महिला अत्याचाराचे अनेक गुन्हे समोर येत आहेत. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरातून तब्बल ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मानवी तस्करी आणि अल्पवयीन मुली बेपत्ता होणे ही एक अत्यंत गंभीर आणि थरकाप उडवणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. राळेगावातील जवळपास ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या […] The post राळेगावमध्ये ३४ अल्पवयीन मुली बेपत्ता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 4:27 pm

राज्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खान्देश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्याच्या हवामान अंदाजानुसार १९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट […] The post राज्यात वादळी वा-यासह पावसाची शक्यता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 4:21 pm

डॉक्टरांच्या हलगर्जीने एकाचा मृत्यू?

​लातूर : लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक अत्यंत संतापजनक बातमी समोर आली असून एका १७ वर्षांच्या कोवळ्या तरुणाला साध्या शस्त्रक्रियेसाठी दाखल केले पण डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे त्या तरुणाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ​लातूरचे शासकीय रुग्णालय आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अभिजीत आनंद काळे, वय अवघे १७ वर्ष. कानाच्या वर असलेल्या साध्या चरबीच्या गाठीवर शस्त्रक्रिया […] The post डॉक्टरांच्या हलगर्जीने एकाचा मृत्यू? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 4:09 pm

परतवाडा प्रकरणात पोलिसांना मोठे यश:आरोपींच्या 5 पैकी 3 मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात यश; मोठा पर्दाफाश होणार?

अमरावती पोलिसांना परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात जप्त केलेल्या आरोपींच्या 5 पैकी 3 मोबाईल्सचा डेटा रिकव्हर करण्यात यश मिळाले आहे. यामुळे या प्रकरणातील अनेक गुपिते समोर येण्याची शक्यता वाढली आहे. परतवाडा लैंगिक शोषणाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणातील आरोपींवर पीडित तरुणींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करण्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीचे 5 मोबाईल फोन जप्त केले होते. या मोाईल्समध्ये सर्व आक्षेपार्ह व्हिडिओ, फोटो व चॅट्स होते. आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी ते डिलीट केले होते. स्थानिक पातळीवर हा डेटा रिकव्हर करणे अवघड होते. त्यामुळे पोलिसांनी हे पाचही मोबाईल तांत्रिक विश्लेषणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळे पाठवले होते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, 3 मोबाईलमधील डेटा पूर्णपणे रिकव्हर झाला आहे. त्यामुळे डिलीट केलेले व्हिडिओ व फोटो पुन्हा रिस्टोअर झालेत. या रिकव्हर डेटाच्या मदतीने आता पोलिस या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का? तसेच या प्रकरणी आणखी काही तरुणींची फसवणूक झाली आहे का? याचा धुंडाळा घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. या प्रकरणी आरोपींच्या बँक खात्यांची व आर्थिक व्यवहाराचीही चौकशी केली जाणार आहे. 15 वर्षीय पीडितेचा जबाब नोंदवण्यात यश दुसरीकडे, पोलिसांनी या प्रकरणातील एका 15 वर्षीय पीडितेचा जबाब नोंदवला आहे. या प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओ व फोटो व्हायरल झाल्यानंतर 2 मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील पीडितांना न घाबरता समोर येण्याचे आवाहन केले होते. अमरावतीचे ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने यासंबंधी रात्रंदिवस तपास करून या पीडित मुलीचा नागपुरात शोध घेतला होता. अखेर ती शनिवारी अमरावतीत आली आणि तिने आपला जबाब नोंदवला. नेमके काय आहे परतवाडा प्रकरण? अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे तरुणींना प्रेम जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण व ब्लॅकमेल करण्याची गंभीर समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अयान अहमद नामक मुख्य आरोपीसह इतर काही जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीने सोशल मीडियाच्या मदतीने पीडित तरुणींशी मैत्री केली. त्यानंतर त्यांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केली. त्यांचे अश्लील व्हिडिओ व फोटोही व्हायरल केले. पोलिसांनी या प्रकरणी आता आरोपींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून आरोपींची चौकशी सुरू केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 3:51 pm

रूपाली ठोंबरे विधान परिषदेसाठी इच्छुक:सक्षम, अभ्यासू व लढाऊ महिला प्रतिनिधी म्हणून संधी द्यावी, सुनेत्रा पवारांकडे पत्राद्वारे मागणी

राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी विधानपरिषदेवर संधी मिळावी, अशी अधिकृत मागणी पक्षाकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सुनेत्रा पवार यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. विधान परिषदेत सक्षम आणि लढाऊ महिला प्रतिनिधीची गरज असल्याचे सांगत त्यांनी आपली दावेदारी प्रबळ असल्याचे ठामपणे मांडले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 30 एप्रिल 2026 असणार आहे. 2 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 4 मे आहे. तर 12 मे रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेनंतर निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूपाली ठोंबरे यांनी उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. रूपाली ठोंबरे यांचे पत्र जशास तसे रूपाली पाटील ठोंबरे आपल्या पत्रात लिहितात की, मी अॅड. रूपाली पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती म्हणून मागील अनेक वर्षांपासून मा. अजित पवार दादा यांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणे कार्यरत आहे. तसेच माझी राजकीय कारकीर्द मागील वीस वर्षांची असून या काळात मी जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्यांने लढा दिला आहे. माजी नगरसेविका व शहर सुधारणा समिती अध्यक्षा म्हणून काम करताना मी प्रशासनावर प्रभावी पकड ठेवून अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. पुणे महानगरपालिका तसेच पदवीधर निवडणुका लढविताना मला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे, ज्यातून माझे जनाधार व संघटन कौशल्य मी सिद्ध केले आहे. मला सभागृहाचे नियम, प्रक्रिया व कामकाजाचे सखोल ज्ञान असून, मी प्रश्न मांडणे, शासनाला जबाबदार धरणे व जनतेच्या मुद्यांवर ठाम आणि आक्रमक भूमिका घेणे यात पारंगत आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच अन्यायाविरोधात ठामपणे उभी राहिले आहे आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी प्रभावी आवाज बनले आहे. आज पक्षाला अशा अभ्यासू, लढाऊ व निष्ठावंत महिला नेतृत्वाची गरज आहे, जी सभागृहात पक्षाची भूमिका ठामपणे मांडू शकेल आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देईल. त्या दृष्टीने मी स्वतःला सक्षम उमेदवार म्हणून आपणासमोर उमेदवारीची मागणी करत आहे. म्हणून आपणास नम्म्र विनंती आहे की, माझ्या कार्याचा व अनुभवाचा विचार करून मला विधानपरिषदेवर संधी द्यावी, ही नम्र विनंती, असे रूपाली पाटील यांनी पत्रात लिहिले आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण रूपाली पाटील-ठोंबरे या पुण्यातील एक आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. विविध सामाजिक प्रश्नांवर त्या नेहमीच मीडियामध्ये सक्रिय असतात. सध्या महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच, रूपाली पाटील यांनी थेट उमेदवारीची मागणी केल्यामुळे पुणे राष्ट्रवादीत आता कोणाचे नाव निश्चित होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझ्या कार्याचा आणि अनुभवाचा विचार करून मला विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी आग्रही विनंती त्यांनी पत्राच्या शेवटी केली आहे. आता पक्षश्रेष्ठी रूपाली पाटील यांच्या या मागणीवर काय निर्णय घेतात आणि पुण्यातील राष्ट्रवादीच्या कोट्यातून कोणाची वर्णी लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 3:35 pm

राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी संपावर!

मुंबई : प्रतिनिधी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून (२१ एप्रिल) राज्यातील सरकारी कर्मचा-यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास तब्बल १७ लाख कर्मचारी रस्त्यावर उतरणार असल्याचे सांगण्यात आले. संपामुळे सरकारी कार्यालयांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. तसेच शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि अन्य अत्यावश्यक सेवांवरही मोठा परिणाम होऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी […] The post राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचारी संपावर! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 3:31 pm

लेन्सकार्टच्या ‘टिकली-हिजाब’वादाचे वादळ शमेना; सीईओ पियुष बन्सल यांच्या स्पष्टीकरणानंतरही संताप कायम

नवी दिल्ली: प्रसिद्ध आयवेअर ब्रँड ‘लेन्सकार्ट’ (Lenskart) सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कंपनीच्या एका लीक झालेल्या ‘ड्रेस कोड’ पॉलिसीवरून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. या पॉलिसीमध्ये ‘हिजाब’ला परवानगी देण्यात आली होती, मात्र ‘टिकली’ (Bindi) आणि ‘टिळा’ (Tilak) लावण्यावर बंदी घालण्यात आली होती. कंपनीचे सीईओ पियुष बन्सल यांनी यावर स्पष्टीकरण देऊन माफी मागितली […] The post लेन्सकार्टच्या ‘टिकली-हिजाब’ वादाचे वादळ शमेना; सीईओ पियुष बन्सल यांच्या स्पष्टीकरणानंतरही संताप कायम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 3:15 pm

मिशन कर्मयोगीउपक्रमात हिंगोली जिल्हा परिषदेचा राज्यात डंका:95 टक्के कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करत प्रथम क्रमांक

केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. देशभरातील राज्याच्या कामगिरीमध्ये हिंगोली जिल्हयाचा मोलाचा सहभाग रहिला आहे. हिंगोली जिल्हा परिषद प्रथम आल्याचे कळताच कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. या प्रशिक्षणामुळे आता कामांमध्ये अचूकता अन गतीमानता येणार आहे. केंद्र सरकारने मिशन कर्मयोगी उपक्रम देशभरात हाती घेतला आहे. या उपक्रमांमध्ये विविध प्रशिक्षण, अभ्यासक्रमासह इतर उपक्रम जिल्हा परिषद व इतर शासकिय कार्यालयांनी राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या अभियानांतर्गत केंद्राच्या सूचने नुसार ता. २ ते ता. ८ एप्रील या कालावधीत साधना सप्ताह राबविण्यात आला. या सप्ताहात जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून एआय च्या प्रशिक्षणासोबतच इतर चार तासाचे प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने, केशव गड्डापोड, विजय बोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, समाज कल्याण अधिकारी गिता गुठ्ठे, शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागांमधून सुमारे ५०९८ कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ५०२२ कर्मचाऱ्यांनी कोर्सस पूर्ण केले. तर ४७२२ कर्मचाऱ्यांनी चारतासाचा कोर्स पूर्ण केला आहे. त्यामुळे राज्यात इतर जिल्हयांच्या तुलनेत हिंगोली जिल्हा परिषदेच्या ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी कोर्सस पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. हिंगोली जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याचे कळताच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. देशभरात या अभियानांमध्ये महाराष्ट्राने मोठी कामगिरी केली असून राज्याच्या या कामगिरीमध्ये हिंगोलीचा मोलाचा सहभाग राहिला आहे. या शिवाय मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद (९० टक्के) सहाव्या क्रमांकावर, नांदेड जिल्हा परिषद (८५टक्के) चौदाव्या क्रमांकावर, लातुर जिल्हा परिषद (८४ टक्के) सतराव्या क्रमांकावर, जालना जिल्हा परिषद (८३ टक्के), एकेवीसाव्या क्रमांकावर, बीड जिल्हा परिषद (७८ टक्के) सव्वीसाव्या क्रमांकावर, धाराशिव (७४टक्के) एकतीसाव्या तर परभणी जिल्हा परिषद (६८ टक्के) बत्तीसाव्या क्रमांकावर आली आहे. कामामध्ये सुधारणा अन गतीमानता येणार - सीईओ विवेक गायकवाड हिंगोली जिल्हा परिषदेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला हि जिल्हयासाठी आनंदाची बाब आहे. या प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांच्या कामकाजात सुधारणा येणार असून कामात गतीमानता व अचुक कामे होतील. त्यामुळे प्रशासन गतीमान होऊन नागरीकांची कामे जलदगतीने होतील.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 2:57 pm

भोंदू खरातचा कोठडीतला मुक्काम वाढला:पाचव्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलिस कोठडी; व्हीसीद्वारे सुनावणी, कोर्टात काय घडले?

नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचा पोलिस कोठडीतील मुक्काम आता अधिक लांबला आहे. शनिवारी चौथ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर, रविवारी (दि. १९) 'एसआयटी'ने (SIT) त्याला पाचव्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयासमोर उभे केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातला २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १५ गुन्हे दाखल झाले असून, त्याच्या पापाचा पाढा वाचताना पोलिसही चक्रावून गेले आहेत. यातील ८ गुन्हे हे थेट महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे आहेत, तर उर्वरित ७ गुन्हे खंडणी, बेकायदेशीर सावकारी आणि फसवणुकीशी संबंधित आहेत. एका बाजूला पोलिस कोठडीतून सुटका होत नाही, तर दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाने (ED) खरातच्या १०० कोटींहून अधिक मालमत्तेची आणि आर्थिक साम्राज्याची मुळे खणून काढण्यास सुरुवात केल्याने त्याच्या अडचणीत दुपटीने वाढ झाली आहे. कोर्टात काय घडले? अशोक खरात याला पाचव्या गुन्ह्यासाठी कोर्टासमोर हजर केले होते. आजची ही महत्त्वाची सुनावणी सुरक्षेच्या कारणास्तव 'व्हिडिओ कॉन्फरन्सिंग'द्वारे पार पडली. यावेळी सरकारी वकिलांनी कोठडीची गरज स्पष्ट करताना महत्त्वाचा मुद्दा मांडला. आरोपीची पद्धत एकच असली, तरी प्रत्येक पीडित महिला वेगळी आहे. महिलांना गुंगीचे पदार्थ देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. ते द्रव्य कुठून आणले आणि यामागे कोणाचे मोठे षडयंत्र आहे का, याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपीची कोठडी आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी ही मागणी खोडून काढताना सांगितले की, पोलिस तेच जुने मुद्दे मांडून पुन्हा पुन्हा कोठडी मागत आहेत. द्रव्य कुठून आणले आणि इतर बाबींचा तपास आधीच झाला असल्याने पुन्हा कोठडीची गरज नाही. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि पीडितांची वाढती संख्या विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. खरातचे डोके दुखायचे थांबेना, पेनकिलरचाही फायदा नाही दरम्यान, अशोक खरातच्या वकिलांनी कोर्टाकडे एक मागणी केली आहे. अशोक खरातच्या खांद्याचे ऑपरेशन झाले आहे, त्याचे डोकेही दुखत आहे. त्याच्या वेदनांवर पेनकिलर गोळ्या, औषधांनी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे खरातला वैद्यकीय तपासणीवेळी न्यूरोसर्जनकडे घेऊन जावे. त्यासाठी नवीन अर्ज करण्याची गरज भासू नये, अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी केली. यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांना आवश्यक ते औषधोपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अद्याप ११ गुन्ह्यांची चौकशी बाकी आतापर्यंत अशोक खरातच्या केवळ ४ गुन्ह्यांचा प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे. उर्वरित ११ गुन्ह्यांमध्ये अद्याप त्याची सखोल चौकशी होणे बाकी आहे. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या पाचव्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात त्याला आता पोलिस प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. एसआयटीने खरातच्या विरोधात भक्कम पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे मोठे दुवे समोर येण्याची शक्यता आहे. तपासातील ७ धक्कादायक आणि थरारक बाबी : रिमोट कंट्रोलचा साप: भक्तांच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी खरात २० फुटांचा एक बनावट नाग 'रिमोट कंट्रोल'ने फिरवत असे. या 'चमत्कारा'ला नागरिक दैवी शक्ती मानून घाबरत होते. बनावट चमत्कार: दुर्मिळ जडीबुटी आणि हरणाची कस्तुरी यांसारख्या वस्तूंचा वापर करून तो चमत्काराचा बनाव करायचा. बड्या हस्तींशी 'कनेक्शन': तपासादरम्यान खरातचे अनेक बडे नेते आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी असलेले जवळचे संबंध उघड झाले आहेत. त्या संदर्भातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ५०० कोटींची मालमत्ता: खरातची संपत्ती ५०० कोटींपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. 'ईडी' आता त्याच्या मालमत्तेची चौकशी करत आहे. पत्नी अद्याप फरार: खरातची पत्नी कल्पना ही या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा संशय असून ती सध्या फरार आहे. अटकेपासून वाचण्यासाठी तिचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू आहेत. गुंगीच्या द्रव्याचा वापर: पीडित महिलांना बेशुद्ध करण्यासाठी किंवा गुंगी येण्यासाठी तो विशिष्ट औषधांचा वापर करत असल्याचे तपासात समोर आले आहे. ब्लॅकमेलिंगचे रॅकेट: फसवणूक आणि अत्याचारासोबतच खंडणी उकळण्याचे मोठे रॅकेट तो चालवत होता.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 2:48 pm

'जनाब' म्हणवून घेताना हिंदूंची आठवण आली नाही का?:धर्मांतराच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे गप्प; मतांसाठी तडजोड केली- नवनाथ बन

हिंदू खतरे मै कुठे आहे असा सवाल संजय राऊत विचारत आहेत, 1992 ला शिवसेना रस्त्यावर उतरली हे सांगत आहे. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आहे, औरंगजेब फॅन क्लब चालवत आहात? अफजल खानाच्या पिल्लावळींना सांभाळत आहात? आता अचानक तुम्हाला हिंदूंबद्दल ऐवढी काळजी वाटू लागली का? आजान स्पर्धेवेळी ही काळजी कुठे गेली होती, जनाब राऊत म्हणून घेत होतात तमेव्हा काळजी नव्हती का? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. नवनाथ बन म्हणाले की, जनाब बाळासाहेब ठाकरे असा उल्लेख झाला त्यावेळी तुम्ही गप्प होतात त्यावेळी तुम्हाला हिंदूची काळजी नव्हती का? याकूब मेमनच्या कबरींचे सुशोभीकरण झाले त्यावेळी तु्म्हाला हिंदूची काळजी नव्हती का? महाराष्ट्रात अनेक धर्मांतरण झाले त्यावेळी तुम्हाला हिंदूची काळजी नव्हती का? टीसीएसवर बोलण्याची हिंमत उद्धव ठाकरेंची झाली नाही. म्हणून त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. तुम्हाला दाढ्या कुरवळायच्या आहेत हे जनतेला माहिती आहे. उबाठा गट लुळा-पांगळा नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटे बोलण्याचा राष्ट्रीय रोग झाला आहे असे संजय राऊत यांनी टीका केली होती यावर बोलताना नवनाथ बन म्हणाले की, जनतेने तुम्हाला लुळं पांगळं केले आहे. विधानसभा निवडणूक असो स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक उबाठा गट लुळा-पागळा केला आहे. नरेंद्र मोदी हे आजार नाही तर देशाचा आधार आहेत. ते राष्ट्राला पुढे नेण्याचे काम करत आहे. राऊतांनी पाकिस्तानी जनतेला संबोधित करावे नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांना देशाबद्दल काही वाटत नाही कारण त्यांचे पाकिस्तानवर प्रेम आहे. महिला विधेयक बिल मंजूर झाले नाही हा देशाला अपमान झाला आहे. महिलांना सन्मान देण्याचा तो प्रयत्न भाजप सरकारने केला, पण तुम्ही ते मंजूर न करू देत नारी शक्तीचा अपमान करण्याचे काम केले आहे. 2023 मध्ये तत्वत मान्यता मिळालेल्या या विधेयकाच्या अंमलबजावणीस अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला, याचा हिशेब जनता नक्कीच घेईल. तुम्ही माध्यमांचा वापर कसा करायचा हे सांगू नका. राऊतांनी पाकिस्तानच्या जनतेनला संबोधित करावे त्यांना तिथले लोकं ऐकतील. उबाठाची अवस्था बघा नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसचे नाव किती वेळा घेतले हे मोजत बसण्यापेक्षा आपल्यापक्षाची अवस्था बघितली असती तर किमान उबाठा गट महाराष्र्टात वाढला असता. काँग्रेस मुक्त देश करण्याचे काम जनतेने केले आहे. काँग्रेसला किंमत नाही हे जनतेने दाखवून दिले आहे. लोकसंख्या वाढल्याने खासदारांची संख्या वाढणे गरजेचे आहे. तुम्ही त्याला विरोध का केला. दक्षिण राज्यातील खासदार संख्या वाढणार होती त्यांचे संजय राऊत यांनी नुकसान केले आहे. त्यावेळी मोदी सरकार गप्प बसले नाही नवनाथ बन म्हणाले की, पहलगाम हल्यानंतर मोदी सरकार गप्प बसले नाही. हल्ला करणाऱ्या एकाएका दहशतवाद्यांना मारण्याचे काम सैनिकांनी आणि मोदी सरकारने केले आहे. उलट पहलगाममध्ये धर्म विचारत लोकांना मारलेच नाही असे मुक्ताफळे काँग्रेसच्या लोकांनी उधळली होती. त्यावर संजय राऊत गप्प बसले होते. उत्तर VS दक्षिण संघर्ष इंडिया आघाडीला पेटवायचा आहे. कारण त्यांना वाटते की यामुळे आपल्याला राजकीय फटका बसू शकतो.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 2:37 pm

नाशिक TCS प्रकरणातील पीडितेची आपबीती:म्हणाली - आरोपीने लग्नाची गोष्ट लपवली, मला रिसॉर्टवर नेऊन बळजबरीने अत्याचार केला

नाशिक येथील टीसीएस कंपनीत घडलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात आता अत्यंत खळबळजनक माहिती पुढे येत आहे. पीडितांपैकी एका तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीने आपले लग्न झाल्याची गोष्ट लपवून तिच्याशी जबरदस्थीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्यावर धर्मांतर करण्याचा दबाव टाकला. पीडितेने पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत आरोपी व आपली ओळख 4 वर्षांपूर्वी झाल्याचे सांगितले आहे. महाविद्यालयात एकत्र शिकत असताना त्यांच्यात मैत्री झाली होती. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टीसीएसमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. जुलै 2022 मध्ये त्याने पीडितेवर पहिल्यांदा बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्याचे अगोदरच लग्न झाले होते. पण त्याने ही वस्तुस्थिती लपवून पीडितेपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. काही काळानंतर पीडितेला टीसीएसच्या नाशिक येथील युनिटमध्ये नोकरी मिळाली. तेव्हा आरोपीही तिथे कार्यरत होता. ऑगस्ट 2024 मध्ये आरोपी पीडितेला एका रिसॉर्टवर घेऊन गेला. तिथे त्याने तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीच्या पत्नीनेच पीडितेशी साधला संपर्क या घटनेनंतर फेब्रुवारी 2026 मध्ये पीडितेला आरोपी विवाहित असल्याची व त्याला 2 मुले असल्याची बाब समजली. ही माहिती मिळताच तिच्या पायाखालची वाळू सरकली. विशेष म्हणजे आरोपीच्या पत्नीने स्वतः पीडितेशी संपर्क साधून तिला ही माहिती दिली. त्यानंतर पीडितेने या प्रकरणी आरोपीला जाब विचारला. तेव्हा त्याने स्पष्ट् केले की, त्याचा तिच्याशी लग्न करण्याचा कोणताही हेतू नव्हता. कारण, तो अगोदरच विवाहित होता. पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपी हा आपल्या इतर 2 सहकाऱ्यांसोबत कंपनीच्या उपहारगृहात तिच्याशी वारंवार भेटत होता. हे तिघे मिळून अनेकदा देवदेवतांविषयी अवमानकारक शेरेबाजी करत होते. आरोपी तरुणाने आपल्यावर धर्मांतर करण्याचा दबाव टाकला. त्याच्यासह त्याच्या इतर सहकाऱ्यांनी माझे लैंगिक शोषण केले. मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. निदा खान अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात दुसरीकडे, या प्रकरणातील अन्य एक संशयित निदा खान हिने कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. त्यावर उद्या सोमवारी सुनावणी होणार आहे. निदाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला आहे की, एका महिलेवर दुसऱ्या महिलेच्या विनयभंगाचा आरोप ठेवता येत नाही. शिवाय, निदा खान 2 महिन्यांची गर्भवती असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आहे. जामीन मंजूर करण्यासाठी हे तथ्य एक आधार म्हणून सादर करण्यात आले आहे. निदा खान सध्या फरार आहे. तिच्या शोधासाठी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात पोलिसांचे एक पथक तळ ठोकून आहे. टीसीएसची काय आहे भूमिका? टीसीएसने शुक्रवारी स्पष्ट केले की, निदा खान ही कंपनीमध्ये 'एचआर मॅनेजर' (HR Manager) या पदावर कार्यरत नव्हती. प्राथमिक चौकशीच्या आधारे, कंपनीला 'नैतिकता' (Ethics) किंवा 'POSH' (लैंगिक छळ प्रतिबंधक) यंत्रणांद्वारे अशा प्रकारची कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही. कंपनीने पुढे असेही नमूद केले की, ते या प्रकरणाला गांभीर्याने घेत आहेत; यासाठी एका देखरेख समितीची (Oversight Panel) स्थापना करण्यात आली आहे. तपासात मदत करण्यासाठी बाह्य संस्थांचीही (External Agencies) मदत घेतली जात आहे. कोणत्याही प्रकारची सक्ती, छळवणूक किंवा गैरवर्तन याबाबत कंपनीच्या धोरणात 'शून्य सहनशीलता' (Zero Tolerance) बाळगली जाते. पीडितेला अश्लील मेसेज पाठवल्याचे स्पष्ट न्यायालयाने या प्रकरणातील रजा मेमन व शफी शेख या 2 अन्य सहआरोपींची पोलिस कोठडीत 20 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप संभाषणांतून (चॅट्समधून) असे उघड झाले की, आरोपींनी पीडितेला अश्लील संदेश पाठवले होते आणि त्याद्वारे तिच्या विनयभंगाचा प्रयत्न केला होता. लैंगिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या तक्रारींनंतर, नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणी एकूण 9 एफआयआर (FIR) दाखल केले आहेत. तसेच या संदर्भात 8 जणांना अटकही करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी एका उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी या प्रकरणाची अत्यंत सखोल व सर्वंकष चौकशी करण्याचे निर्देश दिले. राज्यात धर्मांतराशी संबंधित घटना कदापि खपवून घेतल्या जाणार नाहीत. त्यामुळे या घटनेच्या चौकशीत कोणत्याही पैलूकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी, असे ते म्हणालेत. हे प्रकरण उजेडात आणल्याप्रकरणी त्यांनी नाशिक पोलिसांचे कौतुकही केले.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 2:33 pm

गुलशन कुमार यांचे बंधू दर्शन कुमार यांचे निधन

मुंबई : टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे धाकटे बंधू दर्शन कुमार यांचे शनिवारी (दि. १८ एप्रिल २०२६) दिल्लीत निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दर्शन कुमार हे जरी प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिले असले, तरीही या उद्योगामध्ये एक दयाळू आणि उदार मनाचे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. […] The post गुलशन कुमार यांचे बंधू दर्शन कुमार यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 2:18 pm

दीपिका-रणवीर पुन्हा होणार आई-बाबा

मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी त्यांच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. ही जोडी दुस-यांदा आई-बाबा होणार असून, रविवारी सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली. या घोषणेनंतर सिनेसृष्टीसह चाहत्यांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. दीपिका आणि रणवीरने इन्स्टाग्रामवर एक अतिशय गोंडस फोटो शेअर करत ही […] The post दीपिका-रणवीर पुन्हा होणार आई-बाबा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 1:59 pm

काँग्रेसने महिलांना संसदेत येण्यापासून रोखले:केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आरोप; देशभर रस्त्यावर उतरण्याचा इशारा

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर महिलांना संसदेत येण्यापासून रोखल्याचा गंभीर आरोप केला आहे. महिला आरक्षण विधेयकामुळे सामान्य महिलांना संसदेत येण्याची संधी होती, मात्र विरोधी पक्षांनी हे प्रयत्न हाणून पाडले, असे आठवले म्हणाले. महिलांना लोकसभेत आरक्षण मिळवून देण्याच्या सरकारच्या चांगल्या प्रयत्नांना विरोधी पक्षांनी धुळीस मिळवले, असे आठवले यांनी सांगितले. या विरोधात रिपब्लिकन पक्ष (रिपाइं) देशभरात काँग्रेसविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. आठवले यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने महिलांना आरक्षण दिल्यामुळे देशभरात लोकसभेच्या जागा वाढणार होत्या. नियमानुसार, दक्षिण आणि उत्तर दोन्हीकडील राज्यांच्या जागा समसमान वाढणार होत्या, त्यामुळे कोणत्याही राज्याला झुकते माप देण्याचा प्रश्नच नव्हता. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहार यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये त्यांच्या सध्याच्या जागेनुसार जागा वाढल्या असत्या. हे सर्व माहीत असतानाही, केवळ सत्ताधारी पक्षांना याचा फायदा होईल या एकाच भावनेपोटी महिलांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले, असा आरोप रामदास आठवले यांनी केला. या प्रकरणी रिपाइंच्या माध्यमातून देशभरात महिलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील राजकीय स्थितीवर बोलताना आठवले म्हणाले की, राज्यात रिपाइंला एक विधान परिषद सदस्य (MLC) आणि दोन महामंडळांची अध्यक्षपदे राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपाइंला जागा न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही सरकारने महामंडळांची पदे भरण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे महामंडळांचा कालावधी निघून जात असून कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याचे आठवले यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण इंगळे, युवक उपाध्यक्ष शरद शेगावकर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबुराव कदम, युवक अध्यक्ष पप्पू कागदे, मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके, राज्य उपाध्यक्ष ब्रह्मानंद चवहाण, राज्य उपाध्यक्ष दौलत खरात, गजानन बागुल, संतोष सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 1:41 pm

अक्षय्य तृतीयेनिमित्ताने ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महाभोग

पुणे : प्रतिनिधी अक्षय्य तृतीयेनिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महाभोग दाखवण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी दरवर्षी हा महानैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. याच दिवशी गणरायाचे दर्शन व्हावे, याकरिता भाविकांनी पहाटेपासून मंदिरात रांगा लावल्या होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात […] The post अक्षय्य तृतीयेनिमित्ताने ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महाभोग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 1:38 pm

समृद्धी महामार्गावर बस अपघात; चिमुकली ठार, २५ प्रवासी जखमी

मेहकर: प्रतिनिधी समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळी सहाच्या सुमारास चालकाच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघात झाला. मुंबईहून पुसदकडे जाणारी खाजगी प्रवासी बस मेहकर टोल नाक्याजवळ अपघातग्रस्त झाली. या दुर्घटनेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ती पुढील कारवर आदळली, ज्यामुळे कारचेही […] The post समृद्धी महामार्गावर बस अपघात; चिमुकली ठार, २५ प्रवासी जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 1:33 pm

माजी महापौर सुरेश पवार यांचे निधन

लातूर : प्रतिनिधी अनेक वर्षांपासून लातूरच्या राजकारणात कार्यरत असणारे माजी सुरेश पवार यांचे निधन झाले आहे. पुणे येथे त्यांच्या मुलीकडे गेले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे अकाली निधन झाले. अनेक वर्ष लातूरच्या राजकारणात कार्यरत असताना कधी कोणाशीही मनभेद , वैरभाव नसणारे सर्वांचे तात्या, यशस्वी राजकारणी एक चांगले व्यक्तिमत्व जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. […] The post माजी महापौर सुरेश पवार यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 1:22 pm

विरोधकांच्या ताकदीपुढे मोदी सरकार अक्षरशः थंड पडले:भाजपची उलटगणती सुरू, MIM चा मोदींच्या संबोधनाचा दाखला देत दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला उद्देशून केलेले संबोधन पाहता विरोधकांच्या ताकदीपुढे केंद्र सरकार अक्षरशः थंड पडल्याचे स्पष्ट होते, अशी टीका एमआयएम नेते वारिस पठाण यांनी केंद्रावर निशाणा साधताना केली आहे. सत्ताधारी भाजपची सत्तेतून उलटगणती सुरू झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला संबोधित केले. पंतप्रधानांचे हे संबोधन, जे साधारणपणे अर्धा तास चालले, ते 'नारी शक्ती वंदन अधिनियम' या विषयावर केंद्रित होते. त्यात त्यांनी विरोधी पक्षांवर विशेषतः काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. त्यांच्या या संबोधनानंतर आता त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एआयएमआयएमचे (AIMIM) नेते वारिस पठाण यांनी पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर सडकून टीका केली आहे. मोदींचे भाषण पाहता आता सत्ताधारी भाजपची सत्तेतील उलटगणती सुरू झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. भाजपची उलटगणती सुरू झाली वारिस पठाण रविवारी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र यांचे भाषण काही वेळच पाहिले. आता भाजपची उलटगणती सुरू झाली आहे. पंतप्रधानांचे रडगाणे व विलाप हे त्याचे द्योतक आहे. नेमक्या याच कारणामुळे मी त्यांचे भाषण बंद करून आयपीएल पाहण्याचा आस्वाद घेतला. याच सरकारने 2023 मध्ये 5 दिवसांचे अधिवेशन बोलावले होते. त्यात महिला आरक्षण विधेयकावर चर्चा ते पारित करण्यात आले. हे विधेयक 2024 मध्ये लागू करण्याची गरज होती. पण त्यांनी ते केले नाही. आता पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम व पद्दुचेरी या 5 राज्यांत विधानसभेची निवडणूक सुरू आहे, असे ते सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना म्हणाले. मोदींचे रडगाणे हा जनतेला मूर्ख बनवण्याचा फंडा माझ्या मते आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. याहून अधिक महिलाचा सन्मान काय असू शकतो? सरकारने हे विधेयक का आणले? त्यांचा हेतू काय आहे? हे जनतेला समजले आहे. त्यामुळे हे रडगाणे केवळ मूर्ख बनवण्याचे काम आहे. आज 12 वर्षांत पहिल्यांदाच भाजप सरकारने आणलेले एखादे विधेयक पडले आहे, असे वारिस पठाण यावेळी बोलताना म्हणाले. देशाच्या जनतेला वाटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या संबोधनात देशाच्या विकासाची गोष्ट करती. पण त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते की, ते घाबरलेले आहेत. विरोधकांची ताकद पाहून सरकार अक्षरशः थंड पडले आहे. नरमले आहे, असेही वारिस पठाण यावेळी बोलताना म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 1:20 pm

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंबा खरेदीदारांसाठी पुणेकरांची गर्दी

पुणे : प्रतिनिधी अक्षय्य तृतीयेला आंब्यांचा नैवेद्य देवाला दाखवण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा ही परंपरा खिशाला कात्री लावणारी ठरली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आंब्याचे दर २० ते ४० टक्क्यांनी वाढले आहे. मार्केटयार्ड गुलटेकडी घाऊक फळ बाजार शनिवारी बंद असतो. मात्र (दि. १९) रविवारी अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंबा खरेदीदारांसाठी बाजार […] The post अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंबा खरेदीदारांसाठी पुणेकरांची गर्दी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 19 Apr 2026 1:08 pm

कोणतं ऑपरेशन कधी करायचं हे मला ठाऊक:जयकुमार गोरेंचा सोलापुरात शिवसेनेला टोला, म्हणाले- शरद पवार गटाने वारकरी संप्रदायाला बदनाम करू नये

कोणतेही ऑपरेशन हे त्याच्या आवश्यकतेनुसारच करायचे असते. मला पक्के ठाऊक आहे की कोणते ऑपरेशन केव्हा करायचे. त्यामुळे कोणीही चिंता करण्याचे कारण नाही, योग्य वेळी योग्य 'सर्जरी' होईल आणि त्याचे परिणामही सर्वांना दिसतील, अशा शब्दांत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरला मिश्किल टोला लगावला. तसेच, वारकरी संप्रदायावरून सुरू असलेल्या वादात उडी घेत, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) संप्रदायाला बदनाम करत असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला. सोलापूर जिल्ह्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा रंगली आहे. या प्रवेश सोहळ्यात भालके यांनी जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर, 'ऑपरेशन लोटस' थंडावले आहे का? असा प्रश्न विचारला असता गोरे यांनी आपल्या खास शैलीत राजकीय विरोधकांना सूचक इशारा दिला. राजकारणात वेळ महत्त्वाची असते, आणि आमची शस्त्रक्रिया कधी करायची हे आम्हाला माहित आहे, असे म्हणत त्यांनी आगामी काळात मोठ्या राजकीय उलटफेरचे संकेत दिले आहेत. वारकरी संप्रदायाचा अपमान खपवून घेणार नाही दुसरीकडे, वारकरी संप्रदाय आणि शरद पवार गट यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावरही पालकमंत्र्यांनी कडक भूमिका घेतली. खासदार शरद पवार यांनी संप्रदायात 'प्रतिगामी शक्ती' शिरल्याचे विधान केले होते, त्यानंतर पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह अनेक वारकरी नेत्यांवर सोशल मीडियातून टीका केली होती. पवार गटाने बदनाम करू नये याचा निषेध करत जयकुमार गोरे म्हणाले, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा मानबिंदू आणि आमचा अभिमान आहे. राजकीय स्वार्थासाठी या पवित्र परंपरेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. संप्रदायाची स्वतःची एक स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यात आपली राजकीय विचारधारा घुसवून त्याला डाग लावण्याचे काम पवार गटाने थांबवावे. ..तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार दरम्यान, विकास लवांडे यांच्या विधानामुळे वारकरी संप्रदाय प्रचंड आक्रमक झाला आहे. पंढरपूर येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत लवांडे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. शासनाने कारवाई न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वारकरी संप्रदायाने दिला आहे. आता पालकमंत्र्यांनी या वादात थेट भूमिका घेतल्याने हा वाद राजकीय पटलावर अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 12:51 pm

अक्षय्य तृतीयेला होणारे बालविवाह रोखा:महिला व कल्याण मंत्र्यांचे प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश; बालविवाह रोखण्यास कडक उपाययोजना

अक्षय्य तृतीयेच्या या शुभमुहूर्तावर राज्यात मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळ्यांचे आयोजन होत असल्याने बालविवाह रोखण्यासाठी राज्य प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. आज झालेल्या राज्यस्तरीय दूरदर्शन प्रणालीद्वारे व्हिडीओ कॉन्फरासिंगद्वारे महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत विविध यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका यांना गावामध्ये होणाऱ्या विवाहांपूर्वी मुलगा व मुलगी यांच्या वयाची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः अक्षय्य तृतीयेच्या दिवशी होणाऱ्या विवाह सोहळ्यांवर लक्ष ठेवून बालविवाह होणार नाहीत यासाठी पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाला समन्वयाने काम करण्यास सांगितले आहे. तालुका व ग्रामस्तरावर विशेष पथके स्थापन करून देवस्थान, मंगल कार्यालये आणि इतर विवाहस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार आहे. बालविवाहाचे कोणतेही प्रकरण आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, पोलिस व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जिल्हानिहाय कृती आराखडे तयार केले जात आहेत. सर्व तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे निर्देश आहेत. याशिवाय, विवाहाशी संबंधित सेवा देणारे जसे की मंगल कार्यालये, केटरर्स, प्रिंटिंग प्रेस, फोटोग्राफर, वाजंत्री तसेच धर्मगुरू यांनी मुलगा-मुलगी यांच्या वयाची खात्री केल्याशिवाय कोणतीही सेवा देऊ नये, अन्यथा त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई होणार आहे. बालविवाहाविरोधात जनजागृती वाढवण्यासाठी गावोगावी दवंडी, पोस्टर मोहीम, विशेष ग्रामसभा, शाळांमध्ये पालक बैठक तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रचार केला जाणार आहे. दरम्यान, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, बालविवाहासंदर्भातील कोणतीही माहिती चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा डायल 112 वर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, राज्यात बालविवाहास आळा घालण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या या मोहिमेला समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे आवाहन राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर यांनी यावेळी केले आहे. वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी ‘एआय’चा वापर करा - मुख्यमंत्री वीजनिर्मिती व वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी ‘एआय’चा वापर करून यासंदर्भातील व्यवस्थापन करण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उन्हाळ्याच्या काळातील ‘पीक डिमांड’ संदर्भात वीज वितरण आढावा बैठकीत बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उन्हाळा व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात. यासाठीच्या व्यवस्थापनासाठी तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी ‘एआय’चा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 12:30 pm

तू घुसखोर आहेस, तुला इथून उचलून घेऊन जाईन:म्हाडाच्या कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्या रहिवाशालाच अधिकाऱ्यांची दमदाटी

गोरेगाव पश्चिम येथील ऐतिहासिक मोतीलाल नगर १, २ आणि ३ च्या पुनर्विकासाचा म्हाडाचा मास्टर प्लॅन सादर होत असताना, म्हाडा अधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शांततेच्या मार्गाने प्रश्न विचारणाऱ्या एका स्थानिक रहिवाशाला म्हाडाचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी भरसभेत तू घुसखोर आहेस, तुला इथून उचलून घेऊन जाईन अशी धमकी दिल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) नुकताच गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरच्या पुनर्विकासासाठीचा सर्वसमावेशक मास्टर प्लॅन सादर केला, ज्याअंतर्गत ३,७०० हून अधिक कुटुंबांना १,६०० चौरस फूट (रेरा कार्पेट एरिया) क्षेत्रफळाची घरे मिळणार आहेत. म्हाडाने मोतीलाल नगर पुनर्विकासासाठीचा सर्वसमावेशक मास्टर प्लॅन सादर करण्यासाठी रहिवाशांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात एक स्थानिक रहिवासी शांततेने आणि संविधानिक अधिकारानुसार आपली मागणी मांडत होता. मात्र म्हाडाच्या अधिकाऱ्याने त्याला दमदाटी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत नेमके काय? गोरेगावच्या मोतीलाल नगर येथे म्हाडाचा पुर्नवसन संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एका स्थानिकाने आपल्या हातात पोस्टर घेऊन आपली मागणी मांडत प्रकल्पाला विरोध दर्शवला. पण म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी त्यालाच धमकावले. तरुणाने आपले प्रश्न मांडताच, तुम्हाला मराठी येत नाही का? अशी विचारणा म्हाडाचे सीईओ संजय जयस्वाल यांनी केली. त्यावर मला मराठी येत नसल्याचे तरुणाने सांगितले. यानंतर जयस्वाल यांनी तरुणाला खाली बसण्यास सांगितले. तरुण खाली बसल्यानंतर, त्या माणसाचे ओळख पत्र माझ्याकडे आणून द्या. अशा सूचना पोलिसांना केल्या. जयस्वाल त्या तरुणाला म्हणाले, तुझे आयकार्ड आम्हाला द्या. तुझी शहानिशा मी करतो. कुठून आला? कधी आला? कोणत्या वर्षी आला? येथे जन्म झालाय की नाही? ही सर्व माहिती मी काढतो. तुझ्याबद्दल सर्व माहिती मिळवतो. जर तू घुसखोर निघालास, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन, अशा भाषेत दमदाटी केली. अधिकाऱ्यांनी संवाद न साधताच सभा गुंडाळली हा प्रकार झाल्यानंतर तुमचा इथे संवाद करण्याची इच्छा नाहीये. तुमची पुर्नवसनसाठी इच्छा नाहीये. याच कारणामुळे मी सभा संपवतोय, असे म्हणून संजय जयस्वाल यांनी संवाद न साधताच सभा गुंडाळली आणि तिथून निघून गेले. आपल्या हक्कांची मागणी करणे गुन्हा आहे का? दरम्यान, शांततेने आपल्या हक्कांची मागणी करणं हा गुन्हा आहे का? भारतासारख्या लोकशाही देशात, नागरिकांना प्रश्न विचारण्याचा आणि न्याय मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. मोतीलाल नगर हे केवळ एक प्रकल्प नाही, तर हे हजारो कुटुंबांचं घर, इतिहास आणि आयुष्य आहे. ५०+ वर्षांपासून येथे राहणाऱ्या लोकांना त्यांच्या भविष्यासंदर्भात विश्वासात का घेतलं जात नाही? असा सवाल नागरिकांकडून सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. समान आणि योग्य अटी का दिल्या जात नाहीत? रहिवाशांनी यापूर्वीही अन्यायाविरुद्ध एकजूट दाखवली आहे. आजही त्यांची मागणी एकच आहे न्याय्य, पारदर्शक आणि सन्मानपूर्वक पुनर्विकास. शेजारील प्रकल्पांमध्ये (उदा. पत्रा चाळ, उन्नत नगर) जे अनुभव आले जसे की उशीर, विस्थापन, असमान फायदे त्यातून धडा घेणे आवश्यक आहे. मग मोतीलाल नगरच्या रहिवाशांना समान आणि योग्य अटी का दिल्या जात नाहीत? पुनर्विकास हा लोकांसाठी असतो, लोकांवर लादण्यासाठी नाही. रहिवाशांचा सहभाग, विश्वास आणि सन्मान हाच कोणत्याही प्रकल्पाचा पाया असायला हवा, असे मत नागरिकांनी व्यक्त केले. लोकशाही फक्त कागदावरच का? आम्ही राज्य सरकार आणि संबंधित सर्व निर्णयकर्त्यांना विनंती करतो की, रहिवाशांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात आणि एक सकारात्मक, विश्वासार्ह वातावरण निर्माण करावं. लोकशाही फक्त कागदावर नसावी. ती प्रत्यक्षातही जाणवली पाहिजे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 12:26 pm

भंडाऱ्यात माणुसकीला काळिमा:मुलीच्या मैत्रिणीला निर्जनस्थळी नेऊन अत्याचार, पीडितेचे केले विषप्राशन, आरोपीला अटक

भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा गावातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या स्वतःच्या मुलीच्या अल्पवयीन मैत्रिणीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रसंगामुळे हादरलेल्या पीडित मुलीने विषप्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. आरोपी सोमा मेश्राम (36) याची मुलगी आणि पीडिता या एकाच वर्गात शिकतात. गुरुवारी पीडिता तिच्या मैत्रिणीच्या (आरोपीच्या) घरी थांबली असताना, सोमा मेश्रामने तिला दुचाकीवर फिरवून आणण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला एका निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. शुक्रवारी सकाळी पीडितेने घरच्यांना हा आपबिती सांगितली. पीडितेची प्रकृती आणि पोलिसांची कारवाई या घटनेच्या मानसिक धक्क्यातून पीडितेने विषप्राशन केले. तिला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. भंडारा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी सोमा मेश्राम याला तातडीने अटक केली आहे. त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. नाशिकमध्ये तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठीही दबाव पंचवटी परिसरात आणखी एक लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अभियंता तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तीचे लैंगिक शोषण केलेच पण तिची धार्मिक ओळख पुसून टाकण्याचाही प्रयत्न केला. पंचवटी पोलिसांनी संशयित तांजिर इनामदार याला अटक केली. शनिवारी (दि.19) त्याला न्यायालयात हजर केले असता 22 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याबाबत पीडित तरुणीने तक्रार दिली. पंचवटीतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना 2024 मध्ये संशयित तांजिर सोबत ओळख झाली. फिरण्याचा बहाणा करत मेरी, म्हसरुळ परिसरातील सार्वजनिक उद्याने, लॉजमध्ये नेत बळजबरीने मिठी मारत तिच्या गळ्याला लव्ह बाईटच्या नावाखाली गंभीर जखमा करत मोबाईलमध्ये फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली. निरीक्षक ज्योती आमणे तपास करत आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 12:25 pm

भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याला 'लिव्ह इन' महागात:अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात गोवेन म्हणणाऱ्या महिलेवर हिंगोलीत गुन्हा दाखल

हिंगोलीच्या भाजपाच्या माजी पदाधिकाऱ्याशी जवळीस साधून अत्याचाऱ्या खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत पैशाची मागणी करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील एका महिलेवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील बळसोंड भागातील भाजपाचे माजी पदाधिकारी आशिष वाजपेयी हे युवा विकास सोसायटी अंतर्गत शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेमध्ये काम करतात. बेरोजगार तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी त्यांनी नांदेड जिल्ह्यात काम सुरु केले होते. यामध्ये त्यांनी नांदेड जिल्ह्यातील एका महिलेची समन्वयक म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर मागील दोन वर्षापासून त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. त्यानंतर ते लिव्ह इनमध्ये आले. या जवळीकतेचा गैरफायदा घेत त्या महिलेने आशिष यांच्याकडे सतत पैशाची मागणी सुरु केली. त्यानंतर त्यांनी महिलेस वीस लाख रुपये व पाच तोळे सोने दिले. त्यानंतरही पुन्हा पैशाची मागणी केली जात असल्याने त्यांनी एका वेळी एक लाख, तीन लाख व सहा लाख रुपयांच्या रकमेचे धनादेश त्या महिलेला दिले. दरम्यान, त्या महिलेकडून वारंवार पैशाची मागणी केली जात होती. काही दिवसांपुर्वीच तिने पैशाची मागणी केली. पैशासाठी ती महिला ता. 15 एप्रिल रोजी बळसोंड येथील घरी देखील आली होती. त्या महिलेकडून वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीला कंटाळून आशिष यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे त्या महिलेने समाजात बदनामी करेल तसेच अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करून पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे आशिष यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी त्या महिले विरुध्द ता. 17 एप्रिल रोजी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, जमादार बाळासाहेब खोडवे पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 11:52 am

हिंगोलीच्या 'येलो गोल्ड'ची देशभर मोहिनी:पूजा महिला बचत गटाच्या 'टर्मरिक शॉट्स'ला मुंबई, पुणे, दिल्ली येथील नागरीकांनी नोंदवली 9000 बॉटल्सची मागणी

हिंगोलीचा येलो गोल्ड ब्रँण्डला आता देशभरातून मागणी होऊ लागली असून पुजा महिला बचतगटाने हळदी पासून तयार केलेल्या उत्पादनांची नागरीकांनी मागणी नोंदवली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली येथील नागरीकांनी टर्मरिक शॉटस या प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या तब्बल 9 हजार बॉटल्सची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे आता बचतगटातील महिलांनी दिवसरात्र एक करुन काम सुरु केले आहे. हिंगोलीच्या मातीतील पिवळे सोने म्हणून ओळख असलेल्या हळदीला जागतिक दर्जाची ओळख निर्माण करत आहे. हिंदू ऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राने हळदीचे संशोधन सुरु केले असून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या हळदीला चांगला भाव मिळावा यासाठी हळदीला भौगोलिक मानांकन मिळवून दिले आहे. दरम्यान, जिल्ह्यात हळदीवर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करणारे महिलांचे बचतगट असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी हिंगोली येलो गोल्ड या ब्रँडखाली पूजा महिला बचत गटाने तयार केलेल्या उत्पादनांची ब्रँण्डींग करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई, दिल्ली, पुणे येथे जिल्हाधिकारी गुप्ता यांनी हळदीच्या वस्तूंचे बॉक्स लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना भेटस्वरुपात देऊन त्यांची माहिती दिली. एवढेच नव्हे तर मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हळदीपासून तयार केलेल्या वस्तूंचे बॉक्स दिले. या शिवाय मुंबई येथे झालेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनामध्ये महिलांनी उत्पादीत वस्तूंची माहिती दिली. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टॉलवर हळदीपासून तयार केलेल्या वस्तूंना मोठी मागणी मिळाली होती. या ठिकाणी चार दिवसांतच तब्बल 10 लाख रुपयांचा व्यवसाय झाला होता. दरम्यान, यानंतर आता मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद, नागपूर, गोवा, बेंगलुरुया ठिकाणावरून यलो गोल्ड बॉक्सची मागणी सुरु झाली आहे. या संदर्भात बचत गटाच्या वनिता दंडे यांनी सांगितले की, टर्मरिक शॉटच्या माध्यमातून प्रतिकार शक्ती वाढविणारे औषध तयार केले असून त्यांची नोंदणी अन्न व औषध प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यानंतर आता त्यांची विक्री सुरु झाली असून तब्बल 9000 बॉटल्सची मागणी आली आहे. या शिवाय सौंदर्यप्रसाधनामध्ये टर्मरिक क्रिमची 1700 बॉक्स, टर्मरिक साबण 2500 बॉक्सची मागणीही नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यातून बचतगटातील दहा महिलांना दररोज रोजगार उपलब्ध झाला असून बचतगटाची आर्थिक उलाढाल देखील लाखोंच्या घरात गेली आहे. नैसर्गिक उत्पादने आरोग्यासाठी वरदान- वनीता दंडे, सदस्या पुजा महिला बचतगट हळदीपासून बनवलेली ही नैसर्गिक उत्पादने नागरीकांच्या आरोग्यासाठी वरदान ठरत आहेत. महिलांच्या कष्टाला आता खऱ्या अर्थाने ग्लोबल ब्रँडची ओळख मिळाली आहे. या शिवाय महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 11:45 am

दगडूशेठ गणपतीला अक्षय्यतृतीयेनिमित्त 11 हजार आंब्यांचा महाभोग:भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लावल्या

अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 11 हजार आंब्यांचा महाभोग अर्पण करण्यात आला. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात रांगा लावल्या होत्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील प्रसिद्ध आंबा व्यापारी देसाई आंबेवालेचे संचालक मंदार देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांनी हा महानैवेद्य अर्पण केला. या मंगलदिनी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. रविवारी पहाटे 3 वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक करण्यात आला. त्यानंतर पहाटे 4 वाजता गायिका विदुषी मंजुषा पाटील यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी 8 वाजता गणेशयागही संपन्न झाला. अर्पण करण्यात आलेला आंब्याचा प्रसाद ससून रुग्णालयातील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना, तसेच वृद्धाश्रम आणि दिव्यांग मुलांच्या संस्थांना वाटण्यात येणार आहे. याशिवाय, मंदिरात उपस्थित भाविकांनाही हा प्रसाद दिला जाईल. अक्षय तृतीयेनिमित्त मध्यभागात वाहतूक बदल - छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीस बंद अक्षय तृतीयेनिमित्त रविवारी (19 एप्रिल) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी गर्दी विचारात घेऊन वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. ‘अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते. रविवारी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात करण्यात आले आहे. भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त दुचाकी फेरी मध्यभागातून काढण्यात येणार आहे. भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन रविवारी सकाळपासून मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे. ‘गर्दी ओसरेपर्यंत मध्यभागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि परिसरातील रस्त्यांवर वाहतूक बदल करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवावगळता पीएमपी बस, तसेच अन्य वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे’, असे त्यांनी नमूद केले

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 11:38 am

नवनीत राणा म्हणजे जातीय विष पेरणारी 'विषवल्ली:राणा अन् बोंडे यांच्यावर गुन्हे दाखल करा, महिलांच्या अत्याचारात जात-धर्म येतोच कुठे?- विजय वडेट्टीवार

माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांच्यासोबतच डॉ.अनिल बोंडे यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्यांनी अमरावती प्रकरणी चुकीची माहिती दिली आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, नवनीत राणा ही जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली एक विषवल्ली आहे, असे मी मानतो. जात आणि धर्मामध्ये भांडण लावून सत्तेची पेाळी कशी शेकता येईल, अशा प्रकारे पाणी घालून पोसलेली विषवल्ली आहे, असे म्हणत त्यांनी नवनीत राणांवर एकेरी टीका केली आहे. अत्याचार प्रकरणात जात-धर्म नसतो विजय वडेट्टीवार म्हणाले की, महिलांवर अत्याचार झाला असेल तर तिथे जात-धर्म-पंथ येतो कुठे? असे कृत्य करणारा नालायकच असतो त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अमरावती प्रकरणी कोणी बुरख्या वाल्या नव्हत्या म्हणता ते त्यांना कसे माहिती? कशाच्या आधारावर हे बोलल्या? या बाईची सवय आहे ही अतिशय जातीयवादी आणि धर्मांदली आहे. लोकांनी निवडणुकीत पाडले आणि जिरवली तरी हे शुद्धीवर येत नाही. तुमच्याकडे पोलिस आहे सर्व यंत्रणा आहेत तुम्ही प्रकरणाची माहिती घ्या, उगाच तोंडाचा वाफा कशाला काढत आहात, तुमच्या शब्दांना आवर घाला, माहिती घेऊन बोला. राणांनी खरातबद्दल ब्र शब्द काढला नाही विजय वडेट्टीवार म्हणाले की, अमरावती प्रकरणातील मुली या कोण आहेत हे महत्त्वाचे नाही. या प्रकरणात काय जात आणि धर्म महत्त्वाचा नसतो. खरात संदर्भात ब्र शब्द न काढणारी बाई मुस्लीम तरुण दिसताच बावचळल्यासारखी बोलते हे अत्यंत घृणास्पद आहे, त्यांचा निषेध करावा तितका कमी आहे. महायुती म्हणजे ट्रिपल इंजिन मलिदा गँग काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी कुंभमेळ्यासारख्या पवित्र धार्मिक कार्यात कोट्यवधींचा कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. भ्रष्टाचार संपवण्याच्या नावाखाली सत्तेत आलेले बोके स्वतःच भ्रष्टाचाराचे लोणी खाण्यात मग्न झालेत. कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्यात भ्रष्टाचार करणाऱ्या ट्रिपल इंजिन मलिदा गँगला या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावाच लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 11:22 am

रोहित पवारांचा PM मोदींना टोला:पराभवाचेही भांडवल करून त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजपइतके जगात कुणीही माहीर नाही

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महिला आरक्षणाच्या मुद्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कालचे भाषण सत्यापासून कोसो दूर होते. महिला आरक्षणाच्या मुद्यावर संसदेत झालेल्या पराभवाचेही भांडवल करून त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजपएवढे जगात कुणीही माहीर नसेल, असे ते म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला संबोधित केले. त्यात त्यांनी महिला आरक्षणाला विधेयकाला कथित विरोध केल्याप्रकरणी काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यांच्या या भूमिकेवर आता राजकीय वर्तुळात संमिश्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी उपरोक्त टीका केली आहे. ते म्हणाले, पराभवाचंही भांडवल करुन त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजपइतकं माहीर जगात कुणीच नसेल…! सत्यापासून कोसो दूर असलेलं आजचं भाषण म्हणजे कालच्या पराभवाचं भांडवल करुन त्यावर आगामी तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीत सत्तेचा डाव जिंकता येतो का, यासाठी केलेला एक प्रयत्न दिसतो. या तिन्ही ठिकाणी कमळ काही फुलणार नाहीच, पण एकमात्र खरंय की, आजच्या भाषणात तीन प्रमुख पक्षांचा चार-चार वेळा झालेला उल्लेख ऐकून तमिळनाडूमध्ये DMK, प. बंगालमध्ये TMC आणि उत्तर प्रदेशात सपा-काँग्रेस युतीची सत्ता येणार असल्याचा तर 2029 मध्ये देश INDIA आघाडीला साथ देणार असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला, असे ते म्हणाले. अर्थव्यवस्थेवरूनही साधला निशाणा रोहित पवार यांनी यावेळी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या घसरगुंडीवरूनही सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, जगाची चौथी अर्थव्यवस्था बनण्याचा मार्गावर असलेली आपली अर्थव्यवस्था एका वर्षातच सहाव्या क्रमांकावर घसरली असून युके आणि जपानच्या अर्थव्यवस्थेने आपल्याला मागे टाकले आहे. गेल्या वर्षी भारत चौथी अर्थव्यवस्था होणार असल्याचा अंदाज IMF ने दिला असता संपूर्ण देशभर स्वतःची वाहवा करून घेणारे केंद्र सरकार आज आपला देश पुन्हा सहाव्या स्थानावर घसरल्याच्या IMF च्या अंदाजावर गप्प का आहे ? केंद्र सरकारची धरसोडीची धोरणे त्यांच्या आश्वासनाप्रमाणेच अत्यंत volatile असल्यानेच भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. केंद्र सरकार यामागचे कारण जीडीपी मोजण्याची बदललेली पद्धत सांगत आहे. जेव्हा नवी पद्धत सुरू केली तेव्हा मात्र नव्या पद्धतीमुळे accuracy येईल, अचूक मोजणी करता येईल असे सांगणारे केंद्र सरकार आज जीडीपी मोजण्याच्या पद्धतीवर आपल्या अपयशाचे खापर फोडत आहे, हे दुर्दैवी नाही का ? केंद्र सरकारची चुकीची धोरणे, रुपयाचे सतत होणारे अवमूल्यन, जगात होणारी सततची युद्धे, या युद्धाच्या संदर्भात आपल्या सरकारने घेतलेल्या संदिग्ध भूमिका, जागतिक स्तरावर असलेली मोठी अनिश्चितता आणि त्याहून अनिश्चित असलेली आपल्या सरकारची भूमिका, कच्चे तेल आयातीसाठी असणारे अवलंबित्व, अमेरिकेने केलेला एकत्तर्फी आणि भारतासाठी मारक असलेला व्यापारी करार आणि एकंदरीतच जागतिक पटलावर केंद्र सरकारकडून आवश्यक असलेल्या डिप्लोमसीचा अभाव यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर हा परिणाम झाल्याचं स्पष्ट असून सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसणार आहे. असो, केंद्र सरकारला वेळेत जाग येईल ही अपेक्षा, असे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 11:12 am

पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोटे बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलाय:देशाला फक्त काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते, हे मोदींनीच सिद्ध केले- खासदार संजय राऊत

नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे देश गांभीर्याने पाहात नाहीत. ते नियमबाह्य आणि निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होईल असे वर्तन पंतप्रधान करत असतात. कायदा माझे काय वाकडे करणार या भूमिकेत ते असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोटे बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, महिला विधेयकाची गो हत्या सत्ताधाऱ्यांनी केली आहे. ते विधेयक 2023 मध्येच मंजूर झाले आहे. त्यानंतर तुम्ही राष्ट्राला संबोधित सुद्धा केले होते ते भाषण ऐका. देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट बघा. 2023 ला मंजूर झालेले विधेयक अमलात आणले नाही म्हणून तुम्ही माफी मागितली पाहिजे. खोटे अश्रू पाहून देशातील जनता आता फसणार नाही. एक विधेयक मंजूर झाले नाही हे काही राष्ट्रावर संकट नाही तर भाजपवर संकट आहे. त्यांच्या पक्षावरील संकटासाठी राष्ट्राला संबोधन करणे योग्य नाही. तुमच्यासाठी देशाचे माध्यमे वापरणे अगदी चुकीचे आहे. 2023 मध्ये संसदेत काय झाले हे एकदा तपासले पाहिजे. म्हणून भाजपला 850 जागा हव्या संजय राऊत म्हणाले की, मोदी यांनी कालच्या भाषणामध्ये 86 वेळा काँग्रेसचा उल्लेख केला. जे काँग्रेसमुक्त भारत करायला निघाले होते त्यांच्या डोक्यातून काँग्रेस निघायला तयार नाही. त्यांच्या नसात, आणि रक्तात काँग्रेस आहे. काँग्रेसशिवाय देशाला कोणी नेतृत्व देऊ शकत नाही हे मोदी त्यांच्या कृतीमधून सिद्ध करत आहेत. भाजपला लोकसभेच्या 850 जागा करायच्या होत्या त्यापासून आम्ही त्यांना रोखले, त्यांचा आणि महिला आरक्षणाचा काहीही संबंध नाही. 543 पैकी 33 टक्के जागा महिलांना देण्यास आमची काही हरकत नाही. पण त्यामुळे भाजपच्या नेत्यांच्या जागा आरक्षित होऊ शकतात. त्या होऊ नये म्हणून त्यांना 850 जागा करायच्या आहेत. खोटे धंदे बंद करा संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा देश कायम पेटवायचा होता. कधी लव्ह जिहादच्या नावावर, कधी काय खावे हे मुद्दे निर्माण करतात. पण त्यांना कधी असे काही वाटत नाही काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या घरातील महिलांचा आक्रोश त्यांना कधी दिसला नाही, तुम्ही हे खोटे धंदे बंद करा. आम्ही सर्वांनी मिळून या बिलाचा पराभव केला. 1992 मध्ये घरात बसले होते संजय राऊत म्हणाले की, दक्षिणेतील राज्यांवर त्या बिलामुळे अन्याय झाला असता. भाजप देश तोडायला निघाले आहे. तोडा-फोडा आणि राज्य करा हे त्यांचे काम सुरू आहे. पण आम्ही सर्व जण एकत्र येत त्यांचा पराभव केला. धर्मांतरण विरोधी कायदा आणला असला तरी प्रकरणाचा संपूर्ण तपास झाला पाहिजे. सरकारपेक्षा आमच्याकडे जास्त माहिती असते. खरात जर सलीम असता तर आतापर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली असती. खरात भाजपचे प्रचारक असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. पण टीसीएस प्रकरणी जसे काही खूप मोठे झाले असा कांगावा करत हिंदू खतऱ्यामध्ये आला असे सांगातात. 1992 मध्ये आम्ही रस्त्यावर होतो तेव्हा हे लोकं घरात बसले होते.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 11:00 am

अशोक खरात प्रकरण उघड झाल्याबद्दल शिंदेंचे आभार मानले पाहिजे:तपास का होतोय? प्रा. श्याम मानव यांनी मांडले धक्कादायक तर्क

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असतानाच, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी या प्रकरणासंदर्भात अत्यंत स्फोटक दावे केले आहेत. हे प्रकरण आज घरोघरी पोहोचले कारण याचे धागेदोरे थेट सत्ताधाऱ्यांशी जोडलेले आहेत. हा बाबा जर एकनाथ शिंदे यांचा नसता आणि रूपाली चाकणकर यांची त्याच्यावर भक्ती नसती, तर कदाचित पोलिसांनी हे प्रकरण दाबले असते, असा खळबळजनक दावा श्याम मानव यांनी केला आहे. प्रा. श्याम मानव यांनी या प्रकरणाच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठीच या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना मिळाले आहेत. खरातचे आयपीएस महिला अधिकारी आणि अनेक बडे अधिकारी शिष्य आहेत. राजकीय वरदहस्त आणि प्रशासकीय पाठबळामुळेच या भोंदूचे प्रस्थ वाढले होते. बनावट 'आयटी' रेड आणि खंडणीचे रॅकेट अशोक खरातच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकताना श्याम मानव यांनी सांगितले की, हा भोंदू बाबा अत्यंत चलाखीने लोकांच्या काळ्या कमाईची माहिती काढायचा. त्यानंतर स्वतःचे बनावट 'इन्कम टॅक्स ऑफिसर' तयार करून तो संबंधित व्यक्तीवर धाडी टाकायचा आणि या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळायचा. विशेष म्हणजे, या संपूर्ण गैरप्रकारात आतापर्यंत कोणाही पोलीस अधिकारी किंवा राजकीय नेत्याने हस्तक्षेप केला नाही, ही चिंतेची बाब आहे. महिला स्वतःला बाबांना अर्पण करतात, ही देशाची शोकांतिका देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना श्याम मानव यांनी तीव्र खंत व्यक्त केली. खरात सोबतच्या महिलांचे व्हिडिओ कदाचित बघितले असतील. कोणत्याही महिलांचे कपडे त्या बाबाने काढले नाही. जे बाबा महिलांना भीती दाखवतात ते मूर्ख आहेत. कारण, बाबाला काहीही करायची गरज नाही, फक्त जाहीर करायचं 'मी गुरु आहे तुमचा', बसं सगळं संपलं. सर्व आयतं उपलब्ध होत, नंबर लागत नसल्याची परिस्थिती राहते. आज देशात इतकी भयावह परिस्थिती आहे. आज एखाद्या महिलेची छेड काढली तर हाणामारीचे प्रसंग येतात. आणि याचं देशात हजारोच्या संख्येने महिला स्वतःला बाबाला अर्पण करत आहे. हजारो वर्षांपासून या देशात हे बिंदासपणे सुरु आहे, नव्हे तो आपल्या कल्चरचा भाग मानला जातोय, असेही श्याम मानव यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्र्यांचे 'आभार' मानण्यामागचा टोला हा बाबा एकनाथ शिंदे यांचा बाबा नसता, आणि अजित पवारांच्या गटातील रूपाली चाकणकर यांची भक्त नसती तर कधीच हा बाबा उघड झाला नसता. कदाचित पहिलेच प्रकरण पोलिसांनी त्यांच्या पातळीवर दाबवून टाकावे, अशा सूचना मिळाल्या असत्या. पण, एकनाथ शिंदें आणि राष्ट्रवादीला धडा शिकवायचा आहे, म्हणून उत्तम प्रकारे प्रकरण हाताळण्याच्या सूचना पोलिसांना मिळाल्या. एकनाथ शिंदे, रूपाली चाकणकर यांच्यासारख्या मित्र पक्षातल्या नेत्यांचा संबंध खरातशी समोर आल्यामुळे या प्रकरणाचा तपास करू देत आहेत. अशोक खरात या भोंदू बाबाचे प्रकरण उघड झाल्याबद्दलं 'एकनाथ शिंदे' यांचे आभार मानले पाहिजे. म्हणूनचं खरात प्रकरणाचा सर्वार्थाने तपास होतोय, असा टोलाही त्यांनी लगावला.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 10:42 am

शिक्षण मंडळ कर्मचाऱ्यांचे साेमवारपासून आंदोलन:दहावी-बारावीच्या निकालावर परिणाम हाेण्याची चिन्हे

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातील कर्मचारी संघटना आणि बहुजन कर्मचारी कल्याण महासंघ यांनी सोमवार (दि. 20) पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे. याचा परिणाम पेपर तपासणी आणि पर्यायाने दहावी-बारावीच्या निकालावर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मंडळातील बढती व बदली संदर्भातील पूर्वनियोजित निकष रद्द करून नव्याने शासनपद्धती लागू केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. नोव्हेंबर 2025 पासून नियुक्त आयएएस अधिकाऱ्यांच्या निर्णयशैलीवर “हुकूमशाही”चा आरोप होत आहे. मंडळ ही स्वायत्त संस्था असल्याने व मंडळाची महाराष्ट्रभर नऊ कार्यालय असल्याने कर्मचाऱ्याऱ्यांच्या बढती, बदली संबंधी मंडळ प्रशासन व कर्मचारी संघटनांसोबत करार होऊन बढतीसंबंधी निकष तयार करण्यात आलेले होते. मात्र, मंडळात नोव्हेंबर 2025 पासून आयएएस अधिकारी राज्यमंडळ अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. सदर अधिकाऱ्याने मंडळाच्या कामकाजाची व कर्मचाऱ्यांची कोणतीही पूर्वमाहिती न घेता हुकूमशाही सुरू केल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी करताना थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कामाचा अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ताण मंडळात एकूण 891 पदांपैकी तब्बल 386 पदे रिक्त असल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन अपरिहार्य ठरत असून, त्याचा थेट परिणाम दहावी-बारावीच्या निकाल प्रक्रियेवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तातडीने तोडगा काढण्याची मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 10:33 am

देशातील प्रत्येक 5 व्या महिलेला मिळतो सरकारी ‘फ्रीबीज’चा लाभ:‘लाडकी’सह 16 राज्यांत 2.82 लाख कोटी खर्च

महिलांच्या बँक खात्यात थेट ‘कॅश ट्रान्सफर’ करणे आता निवडणूक जिंकण्याचा ‘हीट फॉर्म्युला' ठरला आहे. 2020 दरम्यान आंध्र प्रदेशातील योजनेपासून सुरू झालेला ‘फ्रीबीज’चा हा फंडा आता 16 राज्यांनी लागू केला आहे. 2020 मध्ये यावर अवघे 1600 कोटी खर्च झाले होते. आता 6 वर्षांत हा खर्च (2026) 2.82 लाख कोटींवर पोहोचला आहे. ‘दिव्य मराठी'च्या डेटा इन्व्हेस्टिगेशनमध्ये लोकसंख्येतील 72 कोटी महिलांपैकी 13.5 कोटी महिला ‘फ्रीबीज’चा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच देशातील प्रत्येक पाचवी महिला आता लाभार्थी बनली आहे. 4 राज्यांत 24 हजार कोटींचा पाऊस आता तामिळनाडूत समर पॅकेजचे प्रत्येक महिलेला 2 हजार मिळाले. आसामात बिहू सणासाठी 4 हजार दिले. बंगालमध्ये लक्ष्मीर भांडार योजनेत 500 रुपये वाढवले. केरळने डिसेंबर-2025 मध्ये स्त्री सुरक्षेसाठी एक हजार दिले. 4 राज्यात 17.89 कोटी पैकी 4 कोटी (23 %) महिला आहेत. 242 विद्यापीठे किंवा 2 समृद्धी महामार्ग बनले असते महाराष्ट्रात महिलांसह पुरुषांच्या ‘फ्रीबीज’ वर वर्षाला 1.21 लाख कोटी खर्च होताहेत. त्यात लाडकी बहीणवर 36,000 कोटी, शेतकरी कर्जमाफी अन् मोफत वीजवर प्रत्येकी 20,000 कोटी.अन्नपूर्णा योजना : 10,200 कोटी, या योजनेत राज्याचा वाटा : 8,500 कोटी. शेतकरी सन्मान निधीत 7,000 कोटीजलयुक्त शिवार व इतर कृषी सबसिडी 6,000 कोटी. युवा प्रशिक्षण योजना 5,500 कोटी एसटी प्रवास 4,500 कोटी मुलींना मोफत उच्च शिक्षण 2,500 कोटी.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 10:25 am

जागतिक वारसा दिनानिमित्त वेरूळ लेणीला 6 हजार पर्यटकांची उपस्थिती:अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी न्याहाळले 'कैलास'चे सौंदर्य

आज जगप्रसिद्ध वेरूळ येथे वेरूळ लेणी परिसरात जागतिक वारसा दिनाचे (World Heritage Day) औचित्य साधून जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे पर्यटकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. या खास प्रसंगी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी वेरूळ लेणीला भेट देऊन भारतीय स्थापत्यकलेचा हा अजोड नमुना न्याहाळला. वारसा दिनानिमित्त लेणी प्रवेश मोफत असल्याने सुमारे साडेपाच ते सहा हजार पर्यटकांनी या जागतिक वारशाचा आनंद घेतला. मुख्यमंत्र्यांकडून कैलास लेण्याचे कौतुक मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी शनिवारी वेरूळ लेणीला भेट दिली. यावेळी त्यांनी विशेषतः १६ क्रमांकाच्या 'कैलास लेण्या'ची पाहणी केली. एकाच अखंड पाषाणात कोरलेल्या या भव्य मंदिराचे सौंदर्य पाहून त्यांनी भारतीय कारागिरांच्या कौशल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. भारतीय संस्कृती आणि इतिहासाचा हा वारसा थक्क करणारा असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. ६ हजार पर्यटकांनी लुटला मोफत प्रवेशाचा आनंद भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे (ASI) दरवर्षी १८ एप्रिल रोजी जागतिक वारसा दिनानिमित्त ऐतिहासिक वास्तूंमध्ये पर्यटकांना मोफत प्रवेश दिला जातो. या सवलतीचा फायदा घेत सकाळपासूनच वेरूळ परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. वेरूळ लेणीचे मुख्य अधिकारी निलेश कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ५.५ ते ६ हजार पर्यटकांनी लेणीला भेट दिली. पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रशासनातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली होती. अशी माहिती वेरूळ लेणी प्रमुख निलेश कोळी यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा वारसा दिनाचे महत्त्व तरुण पिढीला समजावे, या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथील पी. यु. जैन विद्यालय आणि वेरूळ लेणी प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत ऐतिहासिक वारशाचे संवर्धन या विषयावर आपले विचार मांडले. हर्ष कोपरेकर ठरला विजेता या निबंध स्पर्धेतून एकूण पाच उत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये हर्ष कोपरेकर याने प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली. विजेत्या विद्यार्थ्यांचे अधिकारी निलेश कोळी आणि शाळा प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले. आपल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे संदेश या उपक्रमातून देण्यात आला. एकीकडे मुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची भेट आणि दुसरीकडे हजारो पर्यटकांचा उत्साह, यामुळे यंदाचा जागतिक वारसा दिन वेरूळ लेणीमध्ये मोठ्या दिमाखात साजरा झाला.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 10:22 am

VSR कंपनीची बहुतांश विमाने सदोष:विमाने उडवण्यासाठी आता पायलटही घाबरताहेत, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

अजितदादांच्या बारामती येथील विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच, आता या प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. ज्या 'व्हीएसआर' (VSR) कंपनीच्या विमानात हा अपघात झाला, त्या कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांच्याविरोधात रोहित पवारांनी आघाडी उघडली आहे. VSR ची विमाने म्हणजे उडते 'डेथ ट्रॅप' असून, आता खुद्द कंपनीचे पायलट आणि कर्मचारीही या विमानात बसण्यास घाबरत आहेत, असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला आहे. व्हीएसआर कंपनीची नुकतीच झालेली बैठक वादळी ठरली आहे. कंपनीची विमाने सदोष असल्याचा आरोप कंपनीचे कर्मचारी आणि पायलटने केला आहे. कंपनी कर्मचाऱ्यांच्या या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली असून, याविषयीचा खुलासा आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, महाराष्ट्रातील काही नेत्यांचा वरदहस्त असल्याचाही आरोप केला आहे. नेमके काय म्हणाले रोहित पवार? रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, अजितदादांच्या विमान अपघाताला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीची बहुतांश विमाने सदोष असून उड्डाणासाठी अत्यंत धोकादायक असल्याने आता कंपनीचे पायलट आणि क्रू मेंबर यांना देखील अपघाताची भीती वाटतेय. दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या कंपनीच्या बैठकीत पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांनी सदोष विमानात बसण्याची भीती बोलून दाखवली, परंतु सरकारमधील काही लोकांचा वरदहस्त असल्याने ‘सरकार आपल्या पाठीशी आहे, घाबरू नका’ असा शाब्दिक धीर त्यांना देण्यात आला. पण दुर्दैवाने अपघात झाला तर व्यवस्थापनाने त्यांना दिलेल्या या शाब्दिक धीराने त्यांचा जीव वाचणार आहे का, असा प्रश्न पडतो. व्ही. के. सिंग सरकारपेक्षाही वरचढ झाला का? एकीकडे अजितदादांच्या अपघातानंतर महाराष्ट्र सरकारने VSR कंपनीची ८० कोटींची बिलं अदा केली, दुसरीकडे नियम आणि कायद्यांना पायदळी तुडवूनही VSR कंपनीवर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळंच या कंपनीचा मालक व्ही. के. सिंग याला कुणाचीही भीती राहिली नसून दिवसेंदिवस त्याची गुर्मी वाढतच चालल्याचं दिसतंय..! तो सरकारपेक्षाही वरचढ झाला का? ज्यामुळं सरकार त्यावर कारवाई करायला घाबरतंय! अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान, विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच आता उघडपणे भीती व्यक्त केल्यामुळे, व्हीएसआर कंपनीच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या दाव्यांनंतर आता राज्य सरकार आणि नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) यावर काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हे ही वाचा… चालक-वाहकाच्या स्टंटबाजीमुळे चिमुकल्याचा बळी:रील बनवण्यात दंग असताना बसचा अपघात, 25 जण जखमी; समृद्धी महामार्गावरील घटना सोशल मीडियावरील 'रील' बनवण्याचे वेड किती जीवघेणे ठरू शकते, याचा भयावह अनुभव समृद्धी महामार्गावर आला आहे. चालक आणि वाहक रील बनवण्याच्या नादात असताना, मुंबईहून पुसदकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका दीड वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, २५ प्रवासी जखमी झाले आहेत. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 9:42 am

पावसाळ्यापूर्वी फिडर सेपरेशन पूर्ण करा; वीजपुरवठा होणार सक्षम

अकोला महावितकरण कंपनीच्या अकोला परिमंडळात सुरू असलेल्या फिडर सेपरेशनच्या कामामुळे वीज पुरवठ्याच्या गुणवत्तेत सुधारणा होवून वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार असून या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्य अभियंता . राजेश नाईक यांनी दिले आहेत. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ६५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.विद्युत भवन येथे झालेल्या पायाभूत आराखडा विभागाच्या आढावा बैठकीत त्यांनी फिडरनिहाय कामाचा आढावा घेतला. यावेळी अधीक्षक अभियंता दिपक सोनोने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता यामिनी पिंपळे, तसेच विभागातील क्षेत्रीय सहाय्यक अभियंते आणि कंत्राटदार एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. कामाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त करत मुख्य अभियंत्यांनी कंत्राटदारांना वेळेत काम पूर्ण करण्याच्या कडक सूचना दिल्या. तसेच दर आठवड्याला प्रगती आढावा बैठक घेण्याचे निर्देशही देण्यात आले. असा होतोय खर्च आरडीएसएस योजनेअंतर्गत अकोला परिमंडळात कृषी व गावठाण फिडरचे विलगीकरण करण्यात येत असून या कामासाठी एकूण २६५.८४ कोटी रुपयांचा खर्च होत आहे. या प्रकल्पात १७८ नवीन फिडर उभारले जात असून २५२९ किमी नवीन वीजवाहिन्या, ९६ किमी भूमिगत केबल, १६४ किमी लघुदाब वाहिन्या, ९५ एसडीटी आणि ७७१ नवीन वितरण रोहित्रांची उभारणी केली जात आहे. फिडरची लांबी कमी होऊन वितरणातील वीज हानीत लक्षणीय घट होणार आहे. परिणामी शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज उपलब्ध होणार असून इतर ग्राहकांना २४ तास अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा देणे शक्य होणार आहे, असा दावा आहे. अशी आहे फिडरची संख्या परिमंडळातील १७८ फिडरपैकी अकोला जिल्ह्यात ९६ फिडर असून त्यापैकी ३७ कार्यान्वित झाले आहेत, २० पूर्ण झाले असून ३९ प्रगतीपथावर आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ६३ फिडरपैकी ४३ कार्यान्वित, ६ पूर्ण व १४ प्रगतीपथावर आहेत. वाशिम जिल्ह्यातील १९ फिडरपैकी ५ कार्यान्वित, ४ पूर्ण व १० फिडरचे काम सुरू आहे. एकूणच, फिडर सेपरेशन प्रकल्पामुळे अकोला परिमंडळातील वीज पुरवठा अधिक सक्षम, स्थिर आणि गुणवत्तापूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 9:26 am

चालक-वाहकाच्या स्टंटबाजीमुळे चिमुकल्याचा बळी:रील बनवण्यात दंग असताना बसचा अपघात, 25 जण जखमी; समृद्धी महामार्गावरील घटना

सोशल मीडियावरील 'रील' बनवण्याचे वेड किती जीवघेणे ठरू शकते, याचा भयावह अनुभव समृद्धी महामार्गावर आला आहे. चालक आणि वाहक रील बनवण्याच्या नादात असताना, मुंबईहून पुसदकडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका दीड वर्षीय निष्पाप चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, २५ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सदर खाजगी बस (मुंबई ते पुसद) शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास मेहकर टोल नाक्याजवळ आली होती. बसमधील प्रवाशांनी दिलेल्या धक्कादायक माहितीनुसार, बसचा चालक आणि वाहक दोघेही मोबाईलवर 'रील' बनवण्यात दंग होते. याच नादात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव बस एका कारवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील २५ प्रवासी जखमी झाले, तर कारचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दीड वर्षांच्या चिमुकल्याचा अंत या अपघातातील सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे, एका दीड वर्षांच्या लहान मुलाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. जखमींपैकी ६ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. प्रशासनाचा निष्काळजीपणा; डॉक्टर गायब! अपघातानंतर जखमींना तातडीने मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे पोहोचल्यानंतर प्रशासनाचा आणखी एक गलथान कारभार समोर आला. गंभीर जखमी रुग्ण रक्ताच्या थारोळ्यात असतानाही रुग्णालयात तब्बल एक तास एकही डॉक्टर हजर नव्हता. वेळेवर उपचार मिळत नसल्याने जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयातच मोठा आक्रोश केला. डॉक्टरांच्या या अनुपस्थितीमुळे जखमींच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर दरम्यान, समृद्धी महामार्ग प्रवासासाठी खुला झाल्यापासून त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आजच्या अपघातात चालक आणि वाहकाची चुकी असली तरी, इतर अपघातासाठी मात्र विविध कारणे कारणीभूत आहेत. 17 दिवसांपूर्वीच भरधाव कंटेरनने महिला मजुरांच्या पिकअपला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघात झाला होता. या घटनेत ८ महिला मजूर ठार झाल्या तर ३ जखमी झाले होते. या मजूर महिला समृद्धीवर साफसफाईचे काम आटोपून घरी परतत होत्या. वाढत्या अपघातांमुळे समृद्धी महामार्गावरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 9:16 am

100 हून अधिक घरी चारचाकी; 60 कुटुंबांचा ‘गृहप्रवेश’चा योग:इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीत 10 टक्क्यांची वाढ‎

वर्षभरातील साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या उद्या, रविवारच्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नागरिकांनी घर, फ्लॅट, प्लॉट, शेती, दागीने, वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या बुकींग तसेच खरेदीकडे मोर्चा वळविला आहे. यासंदर्भात सदर प्रतिनिधीने संबंधित व्यसायिकांशी संपर्क साधला असता भाववाढ आणि इतर बाबींचा यावर कोठलाही परिणाम झाल्याचे पुढे आले नाही. उलट गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये बऱ्यापैकी वाढ असल्याची वास्तविकता त्यांनी स्पष्ट केली. दरम्यान उद्या, रविवारी शहरातील सुमारे ६० कुटुंब नव्या घरात प्रवेश करणार आहेत. काहींनी गुंतवणुकीचे उत्तम पर्याय तर काहींनी गरज म्हणून सोने-चांदी व डायमंड ज्वेलरीला पसंत केले आहे. घर, फ्लॅट, प्लॉट आणि शेतीच्या बाबतीतही असेच आहे. आजची खरेदी म्हणजे भविष्यातील फायदा, असे सूत्र या व्यवहारामागे असल्याचे काही खरेदीदारांनी सांगितले. अमरावती महानगरात चारचाकी वाहनांपासून ते गृहपयोगी वस्तूंचे उर्वरित.पान,४ इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंच्या विक्रीत १० टक्के वाढ ^गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि एसी सयंत्राला ग्राहकांनी पसंती दर्शविली आहे. नव्या घरांसाठी नव्या वस्तू लागतात म्हणूनही नागरिकांनी त्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. बुकींगबद्दल बोलायचे तर गतवर्षीच्या तुलनेत ८ ते १० टक्के वाढ आहे. यात यापेक्षाही अधिक वाढ झाली असती, परंतु सध्याची युद्धजन्य स्थिती पाहू जाता स्पेअर पार्टस् च्या किंमतीत मोठी वाढ झाली असल्याने त्याचा काहीसा परिणाम बुकींगवरही झाला आहे. - निलेश साबू, संचालक, दूरदर्शन (इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दालन) ‘मारुती’ कंपनीचे शहरात दोन शो रुम आहेत. येथून मारुतीच्या सर्वच चारचाकी वाहनांची विक्री केली जाते. याबाबत संचालक रणजीत बंड म्हणाले, अरिना (शोरुमचे नाव) येथून उद्या, रविवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर साधारणत: ४५ वाहनांची डिलीव्हरी केली जाईल. त्याचवेळी नेक्सा या शोरुममधून १७ वाहनांच्या चाव्या खरेदीदारांना दिल्या जाणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीही नागरिकांनी मारुतीच्या वाहनांना बऱ्यापैकी पसंती दर्शविली आहे. बुकींगसह, गृहप्रवेशाचाही बेत ^घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यातही त्याला मुहूर्ताची जोड ही ठरलेलीच. यावर्षीदेखील अनेकांनी गेल्या महिनाभरापासूनच आज, शनिवारपर्यंत बुकींगकडे कल वळविला आहे. गेल्या महिनाभरात सुमारे १२० नागरिकांनी बुकींग केले. यापैकी निम्म्या खरेदीदारांनी खरेदीचा व्यवहार पूर्ण केला असल्याने ते उद्या, रविवारी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर गृहप्रवेश करणार आहेत. तर साधारणत: तेवढ्याच नागरिकांनी उद्याच्या मुहूर्तावर व्यवहार पूर्ण करण्याचे ठरविले आहे. - राजन पाटील, अध्यक्ष, क्रेडाई. सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने चमकले ^अक्षय्य तृतीया या वर्षभरातील साडे तीन मुहूर्तांपैकी एक आहे. त्यामुळे या मुहूर्तावर शुभकार्य आदीच्या अनुषंगाने सोन्याचे दागीने आणि डायमंड ज्वेलरीला ग्राहकांनी बऱ्यापैकी पसंत केले आहे. सोने-चांदीचे दर वाढले असले तरी गतवर्षीच्या तुलनेत ग्राहकांच्या संख्येत वाढच झाली आहे. - बापूसाहेब कारवाड, सेल्स हेड, पीएनजी, अमरावती.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 9:08 am

पक्ष्यांची तहान भागवणारी माणुसकी:वन्यजीवप्रेमींच्या संवेदनशील उपक्रमाची सर्वत्र चर्चा‎

एप्रिल महिन्यातील कडाक्याच्या उन्हामुळे तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला असून, त्याचा सर्वाधिक फटका वन्यजीव आणि पक्ष्यांना बसत आहे. पाण्याचे स्रोत आटत चालल्याने पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेत तिवसा तालुक्यातील वन्यजीवप्रेमी शुभम विघे आणि सागर अटाळकर यांनी ‘ओंजळभर पाणी, मूठभर दाणे ठेवाल का कुणी आमच्यासाठी ?’ अशी भावनिक साद घालणारा संवाद पुढे करुन एक संवेदनशील व समाजोपयोगी उपक्रम हाती घेतला आहे. ‘पक्ष्यांसाठी अन्न व पाणी’ या उपक्रमांतर्गत त्यांनी मित्रपरिवाराच्या सहकार्याने विविध गावांमध्ये झाडांच्या सावलीत, मोकळ्या जागांमध्ये व सुरक्षित ठिकाणी पाण्याची भांडी (परळ) ठेवण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच पक्ष्यांसाठी धान्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या तिवसा व अमरावती तालुक्यातील मोझरी, अनकवाडी, मालधुर, ब्राम्हणवाडा गोविंदपूर, शिवणगाव आणि काटपूर या गावांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे अनेक पक्ष्यांना उन्हाच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळत असून, स्थानिक नागरिकांकडूनही या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. या उपक्रमात उर्वरित.पान,४ लवकरच तालुकाभर वाढणार व्याप हा उपक्रम केवळ काही गावांपुरता मर्यादित न ठेवता संपुर्ण तालुकाभर राबविण्याचा संबंधितांचा मानस आहे. शिवाय येत्या काही दिवसात भटक्या जनावरांसाठीही पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक पाण्याचे भांडे ठेवले तर अनेक पशु पक्ष्यांचे प्राण वाचू शकतात.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 9:07 am

काँग्रेसच्या सृजन अभियानाचा चांदूरबाजार, तिवस्यात शुभारंभ:नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी आमदार भाई जगताप उपस्थित‎

काँग्रेसला शहर आणि जिल्हास्तरावर नवे पदाधिकारी मिळवून देण्यासाठी सध्या देशभर ‘संघटन सृजन अभियान’ सुरू आहे. या अभियानांतर्गत चांदूर बाजार व तिवसा येथे काँग्रेसच्या सभा पार पडल्या. निरीक्षक म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे पाठविण्यात आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आफताब अहमद व प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी आमदार भाई जगताप उपस्थित होते. या निरीक्षकांनी तेथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्या-त्या शहरासह जिल्ह्याच्या नेतृत्वस्थानी कोण असावे, हेही यावेळी जाणून घेण्यात आले. काँग्रेसला गावपातळीवर मजबूत करण्यासाठी जनतेत कोणते मुद्दे घेऊन जावे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. अचलपूर विधानसभा मतदारसंघात चांदूर बाजार येथे सभा घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीला माजी पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय दुबे, संजय खाडे, माजी आमदार विरेंद्र जगताप, महिला काँग्रेसच्या कांचनमाला गावंडे, वासंतीताई मंगरोळे, अता शाह, नामदेवराव तनपुरे, किशोर देशमुख, श्रीकांत झोडपे, राहुल गवई तसेच इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत विविध विभागांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निष्ठावान काँग्रेस समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यपद्धती अधिक गतिमान करण्यावर यावेळी भर देण्यात आला. “संघटन सृजन अभियानामुळे पक्षाची पाळेमुळे अधिक मजबूत होत आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला जोडून काँग्रेसला पुन्हा जनतेच्या केंद्रस्थानी आणण्याचा आमचा निर्धार आहे. अचलपूरमध्ये संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत राहू,” असे मत यावेळी बबलु देशमुख यांनी व्यक्त केले.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 9:06 am

आता पाणी, शिक्षण, आरोग्य त्रिसूत्रीवर पालकमंत्र्यांचा भर:चार आमदारांसह अधिकारी-पदाधिकाऱ्यां ची जंंबो उपस्थिती‎

शहराचा विकास करताना पाणी, शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर भर द्यावा, अशी सूचना करतानाच अमरावतीकरांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय राखून काम करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. अमरावती शहराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून आज, शनिवारी दुपारी त्यांनी महापालिकेचा आढावा घेतला. आढावा सभेला अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके, बडनेराचे आमदार रवि राणा, विधान परिषद सदस्य संजय खोडके व धीरज लिंगाडे, माजी पालकमंत्री प्रवीण पोटे, तसेच पालिकेच्या बहुतेक सर्वच विभागांचे अधिकारी अशी जम्बो उपस्थिती होती. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी पुढील पाच वर्षांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले. बैठकीस महापौर श्रीचंद तेजवाणी, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, गटनेता डॉ. राजेंद्र तायडे, गटनेता नाना आमले, शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, उपसभापती सुमती ढोके, शिक्षण समिती सभापती अॅड. प्रीती रेवणे, महिला बाल कल्याण समिती सभापती ममता आवारे, उपसभापती लता देशमुख, विधी समिती उपसभापती डॉ. मधुरा काहाळे, आयुक्त वर्षा लड्डा, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, नगरसेवक व विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रासाठी देणार ४५ कोटी शहरातील शाळा, अंगणवाड्या आणि दवाखान्यांची गुणवत्ता फारशी चांगली नाही. वास्तविकता लक्षात घेऊन शिक्षण क्षेत्रासाठी तब्बल ४५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे संकेत पालकमंत्र्यांनी दिले आहेत. अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करून बालकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावरही त्यांचा भर आहे. बेघर नागरिकांची यादी करा तयार पालकमंत्र्यांच्या मते शहरातील बेघर नागरिकांना प्राधान्य देत घरांचे पट्टे (हक्कपत्रे) वाटप करण्यात यावे. ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही, अशा नागरिकांची सर्वंकष यादी तयार करावी. त्यांना विविध गृहनिर्माण योजनांद्वारे घरे उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी. पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी जलविस्तार योजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले. शहरातील सर्व भागांमध्ये नियमित व शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 9:03 am

30 हजार लोकसंख्येचे गाव; बसस्थानक अद्यापही बेवारस:शिरजगाव कसबा बसस्थानकाची दुरवस्था‎

चांदूर बाजार तालुक्यातील तब्बल ३० हजार लोकसंख्या असलेले गाव शिरजगाव कसबा आहे. या गावातून दररोज शेकडो प्रवासी व विद्यार्थी राज्य परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून येथील बसस्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली असून संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी आगारातून येथे नियमित बस फेऱ्या सुरू आहेत. आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी हे गाव शिक्षणाचे केंद्र आहे. त्यामुळे बसस्थानक नेहमीच वर्दळीचे ठिकाण असते. असे असूनही येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानकातील नियंत्रण कक्षाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या कक्षात व बसस्थानक परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दारे-खिडक्या तुटलेल्या आहेत. स्थानक परिसरात प्रवाशांना बसण्यासाठी साधी स्वच्छ जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिक तेथे जाणे टाळतात. परिणामी, चालक बस आत न नेता मुख्य रस्त्यावरूनच वळवतात. तेथे प्रवाशांना जीव धोक्यात घालून चढ-उतार करावा लागतो. लाखो रुपये खर्चून बांधलेल्या या इमारतीत पिण्याच्या पाण्याची व प्रसाधनगृहाची योग्य सोय नाही. तसेच वीजपुरवठा नसल्याने रात्रीच्या वेळी येथे अंधाराचे साम्राज्य असते. यापूर्वी स्थानकावर उभ्या असलेल्या बसमधून डिझेल चोरीच्या घटना घडल्या आहेत. सुरक्षेचा अभाव आहे. त्यामुळे रात्री मुक्कामी असलेल्या बसेस स्थानकावर न लावता पोलीस स्टेशनसमोर उभ्या कराव्या लागतात. बसस्थानकाला संरक्षक भिंत व गेट उभारणे सुरक्षेच्या दृष्टीने गरज बनली आहे. काहींनी बसस्थानक परिसरात अतिक्रमण केले आहे. शेती साहित्य, खाजगी वाहने, शेणाचे ढिगारे लावले आहेत. त्यामुळे परिसर अस्वच्छ झाला आहे. शिरजगाव कसबा हे गाव प्रसिद्ध कार्तिक उत्सवासाठी ओळखले जाते. आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळे गावाला “ब” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. दरवर्षी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून बसस्थानकाचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण करावे. कार्तिक मंदिराचे सुशोभकरण करावे. अशी मागणी ग्रामपंचायत प्रशासक प्रवीण खेरडे यांनी केली आहे. ^येथील बसस्थानकाची दुरवस्था व प्रवाशांच्या तक्रारींबाबत मुख्य कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षात एसटी महामंडळाकडून आवश्यक सोयीसुविधांसाठी निधी उपलब्ध होण्याचे नियोजन झाले आहे. - प्रवीण डायलकर (आगार व्यवस्थापक, चांदूर बाजार) तातडीने सुधारणा करणे गरजेचे ^बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर व परिसरात सांडपाण्याचे डबके साचले आहे. दुर्गंधी पसरली आहे. प्रशासनाने नागरिक व प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करून तातडीने सुधारणा करणे गरजेचे आहे. - अमित लवटे (सामाजिक कार्यकर्ते)

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 9:03 am

एचपीव्ही लसीकरणाने कॅन्सर टाळता येतो‎:डॉ. विकास नेहटकर यांचे गर्भाशय मुखाचा कॅन्सरवर मार्गदर्शन‎

गर्भाशयाचा कॅन्सर हा जगातील कॅन्सरपैकी दुसऱ्या क्रमांकावर आढळणारा गंभीर आजार असून, एचपीव्ही (ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरणाद्वारे हा कॅन्सर टाळता येऊ शकतो, असे प्रतिपादन आयुष्मान आरोग्य मंदिर, शिरजगाव बंड येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. नेहटकर यांनी केले. ज्ञानोदय विद्यामंदिर येथे आयोजित पालक-विद्यार्थी-शिक्षक-कर्मचारी यांच्या सभेत ते बोलत होते. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डकरे तसेच तळवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. नेहटकर (सीएचओ) व सारिका सातव (आरोग्य सेविका) यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. एचपीव्ही विषाणू हा गर्भाशयाच्या कॅन्सरचा प्रमुख कारणीभूत घटक आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने महिला दिनाचे औचित्य साधून राज्यभर एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरू केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली ही लस सुमारे ४ हजार रुपये किमतीची असून, १४ ते १५ वयोगटातील मुलींना ती शासकीय आरोग्य संस्थांमध्ये मोफत दिली जात आहे. जगातील सुमारे १५० देशांमध्ये हे लसीकरण सुरू असून, ५० देशांमध्ये मुलांनाही ही लस दिली जाते. आतापर्यंत जगभरात सुमारे ५० कोटी महिलांनी ही लस घेतली आहे. या मोहिमेदरम्यान लस घेतलेल्या मुलींना कोणताही गंभीर त्रास झाला नसल्याचेही डॉ. नेहटकर त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पालकांनी कोणताही संकोच न बाळगता आपल्या मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने ही लस जवळच्या आरोग्य केंद्रात घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळेस केले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित पालकांनी आपल्या मुलींना लस देण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच ही लस इतर वयोगटातील स्त्री-पुरुषांसाठीही मोफत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती खांडे, आरोग्य सेवक अशोक जावरे, आशा सेविका अर्चना यादव, सोनाली गणोरकर कर्मचारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 8:44 am

56 इंचाची छाती अन् काँग्रेसची इतकी भीती?:महिला आरक्षणावरून केवळ नौटंकी; मणिपूरवर मौन का? नाना पटोलेंचा मोदींच्या भाषणावर सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणाचा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. ५६ इंचाची छाती असल्याचा दावा करणाऱ्या पंतप्रधानांना काँग्रेसची एवढी भीती का वाटते? असा सवाल करत, मोदींनी आपल्या भाषणात १५० पेक्षा जास्त वेळा काँग्रेसचा उल्लेख करून आपली हतबलता दाखवून दिली आहे. महिला आरक्षणावरून केवळ नौटंकी सुरू असून, मणिपूरवर मौन का? असा बोचरा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या या राजकीय कलगीतुऱ्यात नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या प्रत्येक दाव्याचा समाचार घेतला. २०२६ उजाडले, तरी आरक्षणाचे आश्वासन हवेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना नाना पटोले म्हणाले की, २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक आणले तेव्हा सर्व विरोधी पक्षांनी त्याला पाठिंबा दिला होता. त्यावेळी २०२४ मध्ये जनगणना करून मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचे आश्वासन दिले गेले होते. आज २०२६ साल उजाडले आहे, तरीही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. देशाचा पंतप्रधान वारंवार खोटे बोलत असल्याने जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. ओबीसी जनगणना आणि मणिपूरवरून कोंडी राहुल गांधी यांच्या दबावामुळे सरकारने जनगणना सुरू केली, मात्र त्यात ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना (Column) नाही, याकडे पटोले यांनी लक्ष वेधले. यावरून पंतप्रधान बहुजनांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट होते. एकीकडे नारीशक्तीला नमन करायचे आणि दुसरीकडे मणिपूरमध्ये महिलांचे वस्त्रहरण झाले, तेव्हा मौन बाळगायचे, हा कसला सन्मान? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. हे नमन नारीशक्तीला नव्हे, तर खुर्चीला! पंतप्रधानांचे भाषण हे देशातील महिलांसाठी नसून सत्ता टिकवण्यासाठी आणि 'मनूवादी' व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला. हे नारीशक्तीला नमन नसून केवळ खुर्चीसाठी केलेले नमन आहे. पंतप्रधान टेलिप्रॉम्टर समोर येऊन केवळ 'नौटंकी' करत आहेत. त्यांचा नकलीपणा आता देशासमोर आला आहे, अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या भाषणावर टीकास्त्र सोडले. भाजप वि. काँग्रेस: महिला प्रतिनिधित्वाचा आकडा भाजपच्या महिला प्रेमाचा दावा खोडून काढताना पटोले यांनी आकडेवारी सादर केली. लोकसभा निवडणुकीत भाजपने केवळ १० टक्के महिलांना उमेदवारी दिली होती, तर काँग्रेसने १३ टक्के महिलांना संधी दिली. भाजपला प्रत्यक्षात महिला नको आहेत, काँग्रेसनेच नेहमी महिलांचा सन्मान केला आहे, असा दावा त्यांनी केला. बहुजन महिला जागा दाखवेल! तुम्ही कितीही अश्रू ढाळण्याचा प्रयत्न केला किंवा कितीही अभिनय केला, तरी देशातील बहुजन आणि दलित समाज तुम्हाला माफ करणार नाही. बहुजनांना न्याय मिळावा ही भूमिका राहुल गांधींनी सातत्याने मांडली आहे. आगामी काळात देशातील महिलाच तुम्हाला तुमची जागा दाखवतील, असा इशारा देत नाना पटोले यांनी पंतप्रधानांच्या भाषणाचा तीव्र निषेध केला.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 8:43 am

गतवर्षीचा विमा मिळाला नाही; तहसीलवर धडक:रबीची पिके घरी येणार, तर अवकाळी पावसाने घातला खोडा‎

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खंडाळा खुर्द, जावरा मोळवण, रोहना व मुंडवाडा परिसरातील शेतकऱ्यांना गतवर्षीच्या हंगामातील सोयाबीन, तूर व कापूस पिकाची विमा रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसिलदारांपुढे कैफीयत नोंदवली. सप्टेंबर व ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाने पंचनामे करून नुकसानाची नोंद घेतली आणि काही प्रमाणात मदत दिली, मात्र पीक विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही, असे संबंधितांचे म्हणणे आहे. सोयाबीन पीक काढणीच्या टप्प्यावर असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्याची अपेक्षा होती, पण ती अद्याप अपूर्ण राहिली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गावांतील शेतकऱ्यांनी नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयात एकत्र येऊन तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना खंडाळा खुर्दचे सरपंच उमेश दहातोंडे, रोहना येथील सरपंच अमरीश काकडे, तसेच नरेश ठाकरे, निलेश ठाकरे, मोहन ठाकरे, नयन ठाकरे, कैलास लांडे, अर्पित काकडे आणि इतर अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली असून मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. दुष्काळाची मालिका सुरु पीक विम्याची रक्कम न मिळाल्याच्या तक्रारी इतर तालुक्यांतूनही पुढे येत आहेत. पीक विमाच काय, काही शेतकऱ्यांना गतवर्षी झालेल्या नुकसानाचीही भरपाई अद्याप मिळाली नाही. ३३ टक्क्याहून अधिक नुकसान झाले म्हणून या शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल, असे सांगितले होते. परंतु त्यांची शेतं ज्या महसूल मंडळात आहेत, तेथे अतिवृष्टीची नोंद नाही, म्हणून मदत अडली आहे. गतवर्षीची अशी स्थिती असताना यावर्षीच्या खरीपात दुष्काळसदृश स्थितीची नोंद झाली. आता रबीची पिके घरी येणार तर अवकाळी पावसाने खोडा घातला. अशाप्रकारे दुष्काळाची मालिका सुरु झाली.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 8:43 am

आयुष व्यसनमुक्ती केंद्राची नशामुक्तीवर कार्यशाळा:सफाई कामगारांचा जिल्हा नशामुक्तीचा निर्धार‎

जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग व सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जामगाव (ता.बार्शी) येथील आयुष व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्र यांच्या पुढाकारातून सोलापूर महापालिकेतील सफाई कामगारांसाठी शुक्रवारी (दि.१७) हुतात्मा स्मृती मंदिर येथे नशामुक्ती कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत सुमारे ३५० महिला व पुरुष सफाई कामगारांनी सहभाग घेत सोलापूर जिल्हा नशामुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यशाळा सामाजिक न्याय मंत्रालयाच्या नशामुक्त भारत अभियान अंतर्गत आयोजित केली होती. जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यात विविध नशामुक्ती उपक्रम राबविण्यात येत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले तसेच समाजकल्याण निरीक्षक स्वाती गायकवाड उपस्थित होते. कार्यशाळेत विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले. . सूत्रसंचालन मृणालिनी मोरे यांनी केले. शिवाई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज, उमरगा येथील विद्यार्थ्यांनी उपस्थित कामगारांचे मानसिक आरोग्य तपासणी व मूल्यांकन केले.

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 8:33 am

हजरत शहानुरशाह साहेब यांच्या ऊरुसाला आजपासून सुरुवात:बारा गाड्या ओढण्याचा थरार अन् कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगणार‎

मानवतेचा संदेश देणाऱ्या सुफी संतांचा ऊरूस व यात्रा ही भारतीय संस्कृतीची एक फार जुनी परंपरा आहे. ही परंपरा आजही तितक्याच निष्ठेने जोपासली जात आहे. अशा या ऊरूसात राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन घडते, जिथे हजारो भाविक धर्म, जात, पंथ आणि वर्ण असे सर्व भेद विसरून एकत्र येतात. करमाळा तालुक्यातील कंदर येथील हिंदू-मुस्लिम ऐक्यतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजरत सय्यद शहानुरशाह साहेब यांचा ऊरुस येत्या १९ एप्रिलपासून मोठ्या उत्साहात सुरू होत आहे.यात्रेनिमित्त अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कंदर येथील हजरत सय्यद शहानुरशाह साहेब नाना हे परिसरातील एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या ऊरुसाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मुस्लिम बांधवांच्या खांद्याला खांदा लावून हिंदू बांधव सर्व धार्मिक विधी पार पाडतात. आपसातील वैराची भावना मिटवून 'आपण सर्व एकाच परमेश्वराची लेकरे आहोत' हा उदात्त संदेश या निमित्ताने दिला जातो. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि शांततेत साजरा करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला असून यात्रेची तयारी सुरु झाली आहे. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.संदलची मिरवणूक , 'बारा गाड्या ओढण्याचा' उपक्रम , आखाडा व मनोरंजनाच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन आहे. सांस्कृतिक कार्यक्रम

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 8:32 am

माळशिरसमधील 11 गावांची ‘शक्तीपीठ' विरोधात वज्रमुठ:ग्रामसभेत विरोधी ठराव करून प्रशासनाची कोंडी करण्याचा निर्धार‎

शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘शक्तीपीठ महामार्गा' ला माळशिरस तालुक्यातील बागायतदारांनी आता निकराचा विरोध सुरू केला आहे. नेवरे, जांबुडपासून ते तरंगफळ पर्यंतच्या ११ गावांनी या महामार्गा विरोधात ‘आरपारची लढाई' पुकारली आहे. वेळापूर येथे शनिवारी दुपारी झालेल्या बैठकीत या रस्त्याला तालुक्याची वेस ओलांडू न देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. माजी खासदार राजू शेट्टी या आंदोलनात सहभागी होणार असून तालुक्यातील ११ गावांचा विरोध असल्याचा ‘ग्रामसभा ठराव' घेतला जाणार असल्याने प्रशासकीय यंत्रणेची मोठी कोंडी होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. माळशिरस तालुक्यातून शक्तीपीठ महामार्गा विरोधात शेतकरी वर्गात दाहकता वाढत असून दररोज बाधितांच्या बैठका वाढल्या आहेत. आंदोलनात आता स्वाभिमानी शेतकरी संघटना ही उतरत असून त्यासाठी लवकरच माजी खा.राजू शेट्टी या भागात भेट देऊन शेतकऱ्यांच्या लढ्याला बळ देणार आहेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाधितांनी निवेदन दिले आहे. माळशिरस तालुक्यातून हा रस्ता होऊ न देण्याचा निर्धार वेळापुरात जाहीर करण्यात आला. तत्पूर्वी दोन दिवसांपूर्वी निमगाव येथे झालेल्या बैठकीत शेतक-यांनी प्रशासनाशी दोन हात करण्याचा इशारा दिला होता. आता या मार्गावरील ११ गावात ग्रामसभा होऊन त्यामध्ये या महामार्गास विरोध करणारे ठराव करून ते जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास पाठवण्याचा निर्णय झाला आहे. . स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांची भेट घेऊन शेतक-यां यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली, तसेच पंढरपूर येथे आलेल्या उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना पंचायत समिती सभापती दत्ता मगर यांनी भेटून या मार्गास विरोध असल्याचे निवेदन दिले आहे. . वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर मंदिरात या मार्गातील ११ गावच्या बाधित जवळपास १०० शेतकऱ्यांची बैठक झाली. सुमारे २ तास चाललेल्या या बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. . या ११ गावात ग्रामसभा घेऊन विरोधासाठी ग्रामसभेचा ठराव करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनास पाठवण्याचा निर्णय झाला. धरणे, रस्ता रोको, उपोषणे अशा आंदोलनाचा इशारा दिला. . यावेळी भाजप नेते के. के. पाटील, ॲड. लक्ष्मण मगर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर, मदन माने देशमुख, ॲड सागर जाधव, चंद्रकांत मगर आदी उपस्थित होते. ^माळशिरस तालुक्यातून जाणाऱ्या शक्ती पीठ महामार्गाची मला निमगावच्या शेतकऱ्यांनी येऊन माहिती दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध आहे. शेतकरी संघटना या बाधित शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहील. - खा.राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी संघटना. माळशिरस तालुक्यातील नेवरे, जांबुड, विठ्ठलवाडी, माळखांबी, उघडेवाडी, वेळापूर, मगरवाडी, घुमेरा ओढ्यावरील पूल, निमगाव, गारवाड, चांदापुरी, तरंगफळ आदी गावांचा समावेश होत आहे. मात्र या महामार्गास विरोधाची ठिणगी निमगाव मधून पडली. नेवरे ते तरंगफळ गावातून महामार्गाला विरोध सुरु माळशिरस तालुक्यात येऊन आंदोलन करू उपमुख्यमंत्री शिंदे यांना सभापती मगर यांचे निवेदन

दिव्यमराठी भास्कर 19 Apr 2026 8:31 am