SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
...

भोसी कॅनलमध्ये भोकर येथील २ युवक वाहून गेले

भोकर : प्रतिनिधी भोकर तालूक्यातील भोसी परिसरात कॅनलमध्ये २ युवक वाहून गेल्याची दुदैर्वी घटना घडली गुरूवारी सायंकाळी ५ वाजता घडली. त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून मोठे प्रयत्न सुरू होते मात्र, या गंभीर परिस्थितीत प्रशासनाकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्राप्त माहितीनुसार, शेख रिजवान शेख शादुल (१७ ) व नुमान बेग […] The post भोसी कॅनलमध्ये भोकर येथील २ युवक वाहून गेले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 9:48 pm

शाळेच्या नावात दिशाभूल करणारे शब्द वापरण्यास प्रतिबंध

मुंबई : प्रतिनिधी शाळेच्या नावात इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो यासारखे शब्द वापरून पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करणा-या शिक्षण संस्थांना सरकारने चाप लावला आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राज्य मंडळ, केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा (सीबीएसई) किंवा आंतरदेशीय मंडळांशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थांना त्यांच्या शाळेच्या नावात इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो यासारखे शब्द वापरण्यास प्रतिबंध केला […] The post शाळेच्या नावात दिशाभूल करणारे शब्द वापरण्यास प्रतिबंध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 9:47 pm

सातारा जिल्हा परिषद विशेष सभेसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू:सभागृहाच्या 100 मीटर परिसरात ठराविक व्यक्तींनाच प्रवेश

सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण, महिला व बालकल्याण तसेच इतर दोन विषय समित्यांच्या सभापती पदासाठी ४ एप्रिल २०२६ रोजी दुसरी विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा परिषद इमारतीच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या घटक पक्षाने सावध भूमिका घेत आपली रणनीती स्पष्ट केली आहे. सभापतीपदी महायुतीचे घटक पक्षांना न्याय मिळणार का भारतीय जनता पार्टी त्यांचेच सदस्यांना संधी देणारी याविषयी मोठी उत्सुकता आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर सभापती पदाच्या निवडी शनिवार दि. ४ एप्रिल रोजी सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये होत आहेत. मागील राजकीय गोंधळाचा व राड्याचा अनुभव लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जाहीर केले आहेत. हे आदेश शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून सभा संपेपर्यंत लागू राहणार आहेत. आदेशानुसार, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि बंदोबस्तावर नियुक्त पोलीस अधिकारी यांच्याशिवाय इतर कोणालाही या परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महायुतीच्या घटक पक्षांची सावध भूमिका भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आपल्या सदस्यांना महाबळेश्वर येथे विशिष्ट ठिकाणी बैठकीच्या निमित्ताने बोलावून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. काही पदाधिकाऱ्यांचा अपवाद वगळता बहुतांश जिल्हा परिषद सदस्य महाबळेश्वर येथील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती आहे. भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी याबाबत बातो बातोमे सुचक इशारा दिला. मात्र या माहितीला अधिकृतपणे दुजेरा देण्यास नकार दिला. भारतीय जनता पार्टीचेच सभापती होतील असा दावा करण्यात आला आहे मात्र प्रदेश कार्यकारणीच्या सूचनेनंतर महायुतीतील मोठा भाऊ असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या साताऱ्यातील नेत्यांनी पुन्हा दोस्तीचा सूर अळवला आहे. कराड उत्तर दक्षिण तसेच पाटण या तीन मतदारसंघातून किमान दोन सभापती पदांवर काही समर्थकांना संधी दिली जाऊ शकते. राष्ट्रवादीचे नेते मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, शिवसेनेचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आक्रमक रणनीती आखली आहे पाच पैकी किमान दोन सभापती पदांवर संधी मिळावी या दृष्टीने राजकीय मोर्चा बांधणी सुरू आहे .शासकीय ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने महायुतीचे सर्व नेतेमंडळी एकत्र आले होते. मात्र त्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सभा होण्यापूर्वी साताऱ्यात महायुतीच्या घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 9:28 pm

सरकारी खात्यातील सल्लागारांच्या मनमानी भरतीला चाप

मुंबई : प्रतिनिधी विविध सरकारी खाती, महामंडळे, प्राधिकरणे यात होणा-या आयटी आणि नॉन आयटी सल्लागारांच्या खोगीर भरतीला राज्य सरकारने चाप लावला आहे. प्रत्येक विभागाला आता दोनपेक्षा अधिक आयटी सल्लागार नेमता येणार नाहीत तसेच नॉन आयटी सल्लागार नेमण्यासाठी संबंधित विभाग, महामंडळ, प्राधिकरणाला विहित प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. सरकारच्या विविध विभागात, क्षेत्रीय कार्यालये तसेच महामंडळे आणि […] The post सरकारी खात्यातील सल्लागारांच्या मनमानी भरतीला चाप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 9:20 pm

राज्यातील १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातल्या काही भागात झालेल्या अवकाळी पावासाचा आणि गारपिटीचा शेतक-यांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारांहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. केळी, गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, कलिंगड, भाजीपाला, डाळिंब, कांदा, संत्रा, द्राक्ष तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले. मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यभर मोठे […] The post राज्यातील १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 9:18 pm

बॉक्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा वाद:प्रवीण दरेकर आणि राहुल शेवाळेंमध्ये जुंपली; एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, बॉक्सिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. या पदावरून भाजप नेते प्रवीण दरेकर आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. प्रवीण दरेकर यांनी राहुल शेवाळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत या वादात उडी घेतली आहे. आम्ही काही लपून-छपून निवडणूक लढवलेली नाही, एकदा झालेली निवडणूक पुन्हा कशी काय होऊ शकते? असा सवाल उपस्थित करत दरेकर यांनी राहुल शेवाळे यांच्या आरोपांना 'चोराच्या उलट्या बोंबा' असे संबोधले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, राहुल शेवाळे यांनी नितीन गडकरी यांची दिशाभूल केल्याचा दावाही दरेकर यांनी केला आहे. नितीन गडकरी यांना या प्रकरणाची चुकीची माहिती देण्यात आली असून, आपण स्वतः त्यांना भेटून वस्तुस्थिती मांडणार असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले. पुढे बोलताना त्यांनी शेवाळे यांच्यावर वैयक्तिक टीका करत म्हटले की, राज्यसभा खासदारकी न मिळाल्यामुळे शेवाळे आता बॉक्सिंग फेडरेशनच्या माध्यमातून दिल्ली गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. ही सर्व केवळ 'नुरा कुस्ती' सुरू असून शेवाळे यांचे छुपे राजकारण आता चव्हाट्यावर आल्याची बोचरी टीका दरेकरांनी केली आहे. प्रवीण दरेकर नेमके काय म्हणाले? प्रवीण दरेकर म्हणाले, चोराच्या ऊलट्या बोंबा आहेत. आम्ही काही लपवून छपून निवडणूक लढलो नाही. ही सगळी नुरा कुस्ती सुरू आहे. राहूल शेवाळेंना राज्यसभा खासदारकी मिळाली नाही म्हणून ते बीएफआयच्या माध्यमातून दिल्ली गाठायचा प्रयत्न करत आहेत. शेवाळेंना बॉक्सिंगमधील काय समजते? शेवाळे यांच्या निवडीचा प्रकार कायदा गुंडाळून झाला. कोर्टाने निकाल दिल्यानंतर रडीचा डाव सुरू आहे. निवडणूक चॅरीटी कमिशनने घेतली. बीएफआय आणि जय कवळी यांच्यातील प्रकरण प्रलंबित असल्याचे दरेकर म्हणाले. राहुल शेवाळेंचे दरेकरांना प्रत्युत्तर प्रवीण दरेकर यांना राहुल शेवाळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, प्रवीण दरेकरांनाच अभ्यास करण्याची गरज आहे. मला बॉक्सिंगमधले काय कळते असे दरेकर म्हणाले, पण माझा मुलगा बॉक्सर आहे. दरेकरांनी माझ्या राजकीय भवितव्याची काळजी करू नये. मी राजकीय मार्गानेच दिल्लीला जाईन. दरेकरांना एवढेच सांगायचे आहे की त्यांची संघटना वेगळी आहे, आमची संघटना वेगळी आहे. त्यामुळे वाद होण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही सगळ्या कायदेशीर बाबींची पुर्तता केलीये, दुर्दैवाने त्यांनी जे विधान केले ते योग्य नाही. आम्ही घटनात्मक बाजूने सक्षम आहोत.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 9:05 pm

परभणी जिल्हा परिषदेत महिलाराज

परभणी : परभणी जिल्हा परिषद सभापती पदासाठी गुरूवार, दि.२ एप्रिल रोजी निवड प्रक्रीया पार पडली. यात चारही विषय समित्यांच्या सभापतीपदी महिला सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यामुळे अध्यक्षासह सभापती व मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त कार्यकारी अधिकारीपदी महिला अधिकारीच विराजमान असल्यामुळे जिल्हा परिषदेत ख-या अर्थाने महिलाराज सुरु झाले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी जिंतूर तालुक्यातील सावंगी म्हा. […] The post परभणी जिल्हा परिषदेत महिलाराज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 8:57 pm

‘नक्षत्रांचे देणे’ कवि संमेलनाचे सोमवारी आयोजन

परभणी : न्यायालयीन कर्मचारी साहित्य, कला आणि संस्कृती प्रतिष्ठान परभणीच्या नक्षत्रांचे देणे या समुहाच्या वतीने १० व्या पुष्पातंर्गत जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कवि संमेलन वसमत रोडवरील सारंग स्वामी विद्यालय जवळील आचार्य नगर मधील श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर परिसरात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. […] The post ‘नक्षत्रांचे देणे’ कवि संमेलनाचे सोमवारी आयोजन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 8:54 pm

औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर अपघात:गोळेगाव शिवारात भरधाव ॲटो उलटला, 9 गंभीर जखमी

औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर गोळेगाव पाटीजवळ भरधाव ऑटो उलटून झालेल्या अपघातात नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी तारीख दोन घडली आहे. जखमींना औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी औंढा नागनाथ येथील आठवडी बाजार असल्याने परिसरातील ग्रामीण भागातील गावकरी आठवडी बाजारसाठी औंढा नागनाथ येथे आले होते. सायंकाळच्या सुमारास हे गावकरी ऑटोने (एम एच ३८ -४६५१) आपापल्या गावी परत जात होते. प्रवासी घेऊन जाणारा ऑटो औंढा नागनाथ ते जिंतूर मार्गावर गोळेगाव शिवारामध्ये आला असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामध्ये ऑटो उलटून रस्त्याच्या खाली खड्ड्यात गेला. या अपघातात परमेश्वर उत्तम नरोटे (वय ३०, रा. धार), सर्जेराव मारोतराव पोले (६०, रा. माथा) परमेश्वर काशीराम कराळे (३५, रा. जांभरून ) मिथुन उत्तम व्यवहारे (रा. मोजा) राजू जालिंदर खंदारे (२७, रा. नागेशवाडी) रेखा राजू सुतारे (४०, रा. माथा) लताबाई विलास मुकाडे (४०, रा. संतुक पिंपरी ) रंजनाबाई राजेंद्र कांबळे (४५, रा. माथा), गंगुबाई प्रभाकर नाईक (३५, रा. राजापूर) हे जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक शेख खुदुस, उपनिरीक्षक दत्ता कानगुले, जमादार वसीम पठाण, रविकांत हरकाळ, ओंकारेश्वर रांजणेकर, वसंत चव्हाण, इक्बाल शेख, महामार्ग पोलीस खयामोद्दीन खतीब, राजाराम कदम, प्रमोद थोरात यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना रुग्णवाहिक द्वारे औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले असून गंभीर जखमी असलेल्या सर्वांनाच पुढील उपचारासाठी हिंगोली व नांदेड येथे पाठविण्याची तयारी ग्रामीण रुग्णालयाने चालवली होती.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:42 pm

हिंगोली जिल्ह्याचा विकास:जिल्हा नियोजन समितीला मिळालेला 311 कोटी रुपयांचा निधी खर्च, गतीमान प्रशासनाचा अनुभव

हिंगोली जिल्हा नियोजन समितीला मागील आर्थिक वर्षात मिळालेला ३११ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असून ता. ३१ मार्च अखेर १०० टक्के निधी खर्च झाल्याने जिल्हा प्रशासनाचा गतीमानतेचा अनुभव यंत्रणेला आला आहे. या निधीतून मोठ्या संख्येने विकास कामे केली जात आहेत. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यासाठी मागील आर्थिक वर्षात शासनाच्या नियोजन विभागाने ३११ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यातून पालकमंत्री नरहरी झिरवाळ, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजेश नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे यांनी सर्व यंत्रणांकडून विकास कामांचे प्रस्ताव मागवून त्यांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार जिल्हयात विकास कामांना सुरवात झाली आहे. दरम्यान, शासनाकडून प्राप्त झालेला सर्व ३११ कोटी रुपयांचा निधी यंत्रणांना देऊन खर्च करण्यात आला आहे. यामध्ये जलसंधारण विभागाला ६.५० कोटी, पशुसंवर्धन विभाग ९.९२ कोटी, वन विभाग २९ कोटी, शिक्षण विभाग २७ कोटी, आरोग्य विभाग ४४ कोटी, नगर विकास विभाग ४० कोटी, महिला बालकल्याण विभाग ११.६१ कोटी, ऊर्जा विभाग १८.५० कोटी, रस्ते दुरुस्तीसाठी २३.५० कोटी, इमारत बांधकामसाठी १५ कोटी, यात्रा व तिर्थक्षेत्रासाठी ८.५० कोटी, पर्यटन १२ कोटी, पोलिस विभाग ९ कोटी, रस्ते सुरक्षा विभाग १.५० कोटी रुपयांचा निधी वाटप झाला आहे. दरम्यान, नियोजन विभागाने १०० टक्के निधी खर्च झाल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे यांनी स्पष्ट केले. यामध्ये आता विकास कामे सुरु असून चालू आर्थिक वर्षात ३३८ कोटींचा आराखडा असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:36 pm

लातूरात परशुराम जयंतीची जोरदार तयारी

लातूर : प्रतिनिधी राजराजेश्वर भगवान परशुराम जन्मोत्सव सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने यंदाही उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या उत्सवात व्याख्यानमाला, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, महिलांसाठी विविध उपक्रम तसेच समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. भगवान परशुराम मंदिरात यज्ञयागाचाही विशेष कार्यक्रम होणार आहे. यावर्षी प्रथमच डॉ. संतोष देशपांडे यांची अध्यक्षपदी निवड झाली असून बैठकीत ब्राह्मण सेवा […] The post लातूरात परशुराम जयंतीची जोरदार तयारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 8:32 pm

हमखास यशासाठी नियोजनाला शिस्तीची जोड हवी 

लातूर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम ठरवून त्या दृष्टीने पूढे गेले पाहिजे. प्लॅनिंग करण्यात चुक झाली की, तुम्ही अपयशाचे प्लॅनिंग केले हे लक्षात घ्यावे. एकदा नियोजन ठरले की, त्यात कसलाही बदल झाला नाही पाहिजे. स्वत:चे स्वप्न साकार करा. त्यासाठी नियोजनाला शिस्तीची जोड द्या, यश हमखास मिळते, असा कानमंत्री जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी विद्यार्थ्यांना दिला. […] The post हमखास यशासाठी नियोजनाला शिस्तीची जोड हवी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 8:31 pm

पुण्यात पावसाळी लाईन कामांचा हिशेब जाहीर करा:माजी पदाधिकाऱ्यांची मनपा आयुक्तांकडे मागणी

शहरात अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या पार्श्वभूमीवर, गेल्या चार वर्षांत करण्यात आलेल्या पावसाळी लाईन (स्टॉर्म वॉटर ड्रेनेज) कामांचा सविस्तर अहवाल जाहीर करावा, अशी मागणी आपले पुणे आपला परिसर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. नुकत्याच झालेल्या प्रचंड वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश भागांत पाणी तुंबले होते. यामुळे रस्ते, सोसायट्या आणि सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले, ज्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर, पावसाळी लाईनची कामे प्रत्यक्षात किती झाली आणि ती पूर्ण झाली की अर्धवट राहिली, याचा आढावा घेणे आवश्यक असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. गेल्या चार वर्षांत या कामांवर सुमारे दीडशे कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. या खर्चाचा तपशील आणि कामांची ठिकाणनिहाय माहिती पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे प्रशासनाला कामांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करता येईल आणि आगामी पावसाळ्यासाठी योग्य नियोजन करणे शक्य होईल, असे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी संयुक्तपणे सांगितले. या मागणीसोबतच, नगर अभियंता यांना तातडीने या कामांचा सविस्तर आढावा घेण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही करण्यात आली आहे. हा विषय केवळ आरोप-प्रत्यारोपांचा नसून, शहरातील पावसाळी व्यवस्थापन सुरळीत राहावे हाच या मागणीमागील मुख्य उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर तरी महापालिका प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहेत. शहरातील सर्व नगरसेवक, राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज बाधित नागरिक व्यक्त करत आहेत. पावसाळ्यापूर्वीच ज्या ठिकाणी वारंवार पाणी साचते, त्या ठिकाणांची नोंद घेऊन तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. नालेसफाई, पावसाळी लाईनची दुरुस्ती, अडथळे दूर करणे तसेच जलनिस्सारण व्यवस्थेची क्षमता वाढवणे या कामांना प्राधान्य दिल्यास आगामी पावसाळ्यात अशा समस्या टाळता येऊ शकतात. संबंधित यंत्रणांनी आणि लोकप्रतिनिधींनी समन्वय साधून नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास शहराला दिलासा मिळू शकतो.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:30 pm

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी घेतले मांजरेश्वर हनुमानाचे दर्शन

लातूर : प्रतिनिधी शक्ती आणि ज्ञानाचे प्रतीक असलेले व दु:ख नाहीसे करणारे संकटमोचन श्री हनुमान यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी गुरुवारी विलासनगर १२ नंबर पाटी येथील श्री मांजरेश्वर हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले, आरती केली, मनोभावे सेवा केली, आशिर्वाद घेतला. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध […] The post माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी घेतले मांजरेश्वर हनुमानाचे दर्शन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 8:30 pm

चिपळूणमधील 'सूटकेस' मर्डर मिस्ट्री उलगडली!:एका 'क्लू'मुळे 5 महिन्यांनंतर लागला छडा; प्रियकर-प्रेयसीला बेड्या

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण पोलिसांनी एका थरारक खून प्रकरणाचा उलगडा केला असून, पाच महिन्यांपूर्वी मुंबईत घडलेल्या या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केली आहे. नोव्हेंबर महिन्यात विशाल खोडदेकर आणि त्याची प्रेयसी जन्नातूनिसा खान यांनी एका व्यक्तीची हत्या करून त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि तो चिपळूणमधील रामापूर-आवटेवाडी येथील एका आंब्याच्या बागेत आणून पुरला होता. हा अत्यंत गुप्त असलेला प्रकार पाच महिन्यांनंतर उघडकीस आला असून, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाची चक्रे फिरवून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. सध्या न्यायालयाने या दोघांनाही 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून या निर्घृण हत्येचा अधिक तपास पोलिस करत आहेत. चिपळूणमधील रामपूर-आवटेवाडी येथील आंबा बागेत 31 मार्च रोजी जळालेल्या अवस्थेत मानवी हाडे सापडल्याने खळबळ उडाली होती. या गुढ प्रकरणाचा छडा लावण्यात चिपळूण पोलिसांना अवघ्या 24 तासांत यश आले आहे. संशयित आरोपी विशाल खोडदेकर याचा मोबाईल बंद असला तरी त्याचे फेसबुक खाते सुरू होते, ज्याचा आधार घेत पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे त्याला मुंबईतील मालाडमधून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच, पैशांच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादात एजाज कुरेशी याला मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची कबुली खोडदेकरने दिली. मारहाणीत एजाजचा मृत्यू तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, विशाल खोडदेकरची प्रेयसी जन्नतुनिसा खान हिने दोन वर्षांपूर्वी एजाज कुरेशीकडून मालाडमध्ये 'हेवी डिपॉझिट' तत्त्वावर घर भाड्याने घेतले होते. या डिपॉझिटच्या पैशांच्या परताव्यावरून जन्नतुनिसाने एजाजकडे तगादा लावला होता. याच वादाचे पर्यावसान हत्येत झाले असून, मारहाणीत एजाजचा मृत्यू झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह चिपळूणला आणून जाळण्यात आला होता. पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. नेमके प्रकरण काय आहे? मुंबईतील मालाड येथील रहिवासी एजाज कुरेशी यांची आर्थिक व्यवहाराच्या वादातून विशाल खोडदेकर आणि त्याची प्रेयसी जन्नतुनिसा खान यांनी निर्घृण हत्या केली होती. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि विशालच्या गावी असलेल्या आंब्याच्या बागेत फेकून दिला. 15 नोव्हेंबर 2025 रोजी बागेत टाकलेला हा मृतदेह सुटकेसबाहेर पडून अस्ताव्यस्त झाल्याचे लक्षात येताच, विशालने फेब्रुवारी महिन्यात पुन्हा गावी येत डिझेलच्या साहाय्याने मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी मिळालेली मानवी हाडे, एक अंगठी आणि शरीरातील लोखंडी रॉड यांसारख्या पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगवान केली. तांत्रिक तपासाच्या जोरावर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत विशाल खोडदेकर आणि जन्नतुनिसा खान या दोघांना बेड्या ठोकल्या. या धक्कादायक हत्याकांडातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 7:54 pm

चांदणी चौक-भूगाव मार्गासाठी फेरप्रस्ताव सादर करा:200 कोटींच्या पुनर्विकास आराखड्याला स्थायी समितीची सध्या स्थगिती

पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने चांदणी चौक ते भूगाव मार्गाच्या सुमारे २०० कोटी रुपयांच्या पुनर्विकास आराखड्याला सध्या स्थगिती दिली आहे. समितीने प्रशासनाला या प्रकल्पाचा सुधारित फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ७२ (ब) कलमानुसार एवढी मोठी आर्थिक तरतूद करणे कठीण असल्याचे कारण देत हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, चांदणी चौक ते भूगाव हा मार्ग सध्या तीव्र वाहतूक कोंडीचा प्रमुख केंद्रबिंदू बनला आहे. परिसरातील सध्याची सुमारे ९० हजार लोकसंख्या पुढील काही वर्षांत २ ते ३ लाखांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, त्यामुळे या मार्गाचा तातडीने आणि नियोजनबद्ध पुनर्विकास आवश्यक आहे. महापालिकेच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या कामासाठी १६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मूळ प्रस्तावानुसार, फेज १ अंतर्गत ६७.८५ कोटी रुपये आणि फेज २ अंतर्गत १३५.७६ कोटी रुपयांची कामे हाती घेण्याचे नियोजन होते. सध्या १० मीटर रुंद असलेल्या या रस्त्याची नियमानुसार रुंदी ६० मीटर असणे अपेक्षित आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तीन प्रमुख चौकांवर उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याची योजना होती. या योजनेनुसार, पीव्हीपीआयटी कॉलेज चौकात ४३० मीटर लांबीचा (१२० मीटर आरसीसी) ग्रेड सेपरेटर सुमारे २७ कोटी रुपये खर्चाने उभारण्याचा प्रस्ताव होता. तसेच, एम्ब्रोसिया आणि पाटील नगर चौकात ८७० मीटर लांबीचा (५४४ मीटर आरसीसी) उड्डाणपूल सुमारे ८२ कोटी रुपये खर्चाने उभारण्याचे नियोजन होते. याव्यतिरिक्त, राम नदीवर ३० मीटर लांबीचा आणि ७० मीटर रुंदीचा पूल उभारण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे नदी ओलांडताना होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. हा मार्ग पिरंगुट, रोहा, माणगाव यांसारख्या औद्योगिक क्षेत्रांना तसेच हिंजेवाडी आयटी पार्कला जोडणारा असल्याने त्याच्या विकासाला विशेष महत्त्व आहे. मागील बैठकीत ७२ (ब) कलमांतर्गत पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने २०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. तथापि, एवढ्या मोठ्या निधीची उपलब्धता कठीण असल्याने स्थायी समितीने प्रशासनाला अधिक व्यवहार्य आणि सुधारित फेरप्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 7:06 pm

महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर:मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय; 35 हजार 876 पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल

राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महसूल विभागाच्या रचनेत मोठे बदल होणार असून एकूण ३५ हजार ८७६ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. मुद्रांक, भूमी अभिलेख आणि महसूल विभाग या तिन्ही विभागांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. तब्बल वीस वर्षांनंतर महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध सरकारने मान्य केला असून आज याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे. याआधी, महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध २००६ मध्ये झाला होता. मागील वीस वर्षांत महसूल व बिगर महसुली कामात अनेक बदल झाले, त्यामुळे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने या आकृतिबंधाला मान्यता दिली. महसूल विभागातील ३४ हजार ५७६ नियमित व १३०० बाह्यस्रोतांद्वारे असे मिळून ३५,८७६ पदांचा आकृतीबंध महाराष्ट्र शासनाने मान्य केला आहे. प्रशासकीय पुनर्रचना आणि नवीन कार्यालये शासनाने महसूल विभागाची नवीन संरचना निश्चित केली असून, यामध्ये विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवरील कार्यालयांचा समावेश आहे. यात ६ विभागीय आयुक्तालये, ३६ जिल्हाधिकारी कार्यालये, १९२ महसूल उपविभागीय कार्यालये आणि ३६० तहसीलदार कार्यालयांचा समावेश आहे. तसेच क्षेत्रीय स्तरावर २,६२५ मंडळ कार्यालये आणि १५,७४७ तलाठी साजांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. प्रशासकीय सोयीसाठी ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये आणि ८ नवीन उपविभागीय कार्यालय, २ तहसीलदार कार्यालय, ६९ अपर तहसीलदार कार्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. कामकाजात आधुनिकता आणि वेग येणार राज्यातील महसूल यंत्रणा अधिक लोकाभिमुख आणि सक्षम करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. उमाकांत दांगट समितीच्या शिफारशींनुसार हा सुधारित आराखडा तयार करण्यात आला असून, यामुळे महसूल विभागाच्या कामकाजात आधुनिकता आणि वेग येणार आहे. नवीन कार्यालयांचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया आता जिल्हाधिकारी स्तरावर वेगाने पूर्ण केली जाणार आहे. गतिमान प्रशासनासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल - चंद्रशेखर बावनकुळेमहसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून, काळानुरूप वाढलेला कामाचा व्याप आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन हा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. यामुळे प्रशासकीय कामात अधिक सुसूत्रता येईल, नवीन कार्यालयांमुळे जनतेला कामासाठी दूर जावे लागणार नाही आणि कामकाजात मोठी गती येईल. पारदर्शक आणि गतिमान प्रशासनासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे महसूल मंत्री, चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 7:06 pm

पुण्यात अवकाळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित:झाडे पडली, पाणी साचले; दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू

पुणे शहर आणि परिसरात गुरुवारी (२ मे) दुपारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वादळ झाले. यामुळे अनेक अतिउच्चदाब व उच्चदाब वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला, परिणामी शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. सुमारे एक तास झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांवर झाडे पडली. काही ठिकाणी फिडर बॉक्समध्ये पाणी शिरल्याने वीजवाहिन्या बंद पडल्या, तर विजेच्या कडकडाटामुळेही काही वाहिन्या बाधित झाल्या. अनेक भागांचा वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यात आला आहे. कोथरूड भागात कुंदनगरी फिडरवर विजेच्या कडकडाटामुळे आकाशातील विजेला अटकाव करणारी यंत्रणा बाधित झाली. यामुळे संबंधित वाहिनीचा वीजपुरवठा ठप्प झाला होता, मात्र पर्यायी मार्गाने तो सुरळीत करण्यात आला. सध्या केवळ दोन रोहित्रे बंद आहेत. नांदेडसिटी अतिउच्चदाब वाहिनीवर ट्रिपिंग आल्याने कोथरूड विभागातील वीजपुरवठा अर्धा तास बाधित झाला होता, जो पाऊस थांबताच पूर्ववत झाला. शिवाजीनगर विभागातील विद्यापीठ, खडकी, बावधन, बाणेर आणि शिवाजी हाऊसिंग सोसायटी या वाहिन्यांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. यापैकी विद्यापीठ वाहिनी सुरू करण्यात यश आले आहे. पिंपरी/भोसरी भागातील रावेत २२ केव्ही वाहिनीचा वीजपुरवठा खंडित झाला असून, यावरील ५८ रोहित्रे बंद पडली आहेत. महावितरणचे कर्मचारी पर्यायी मार्गाने ती सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. पर्वती भागातील महावितरणच्या जुन्या पर्वती वीज उपकेंद्रातील फिडरवर झाड पडले होते. ते हटवून वीजपुरवठा सुरू करण्याचे काम सुरू आहे. प्रयेजा व मधुकोश वाहिनीच्या इनकमिंग फिडर बॉक्समध्ये पाणी साचल्याने वीजपुरवठा बंद झाला आहे. खडकवासला आणि श्रवण वाहिनीच्या पेट्रोलिंगचे काम हाती घेतले असून, बिघाड सापडताच दुरुस्ती केली जाईल. बंडगार्डन विभागातील वडाचीवाडी येथील उपरी वीज वाहिनीवर झाडाच्या फांद्या पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता, तर वाडिया वाहिनी तासाभरात पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आली. रास्तापेठ विभागातील कोंढवा, येवलेवाडी भागाला वीजपुरवठा करणाऱ्या अतिउच्चदाब वाहिनीवरही परिणाम झाल्याने वीजपुरवठा बाधित झाला. याव्यतिरिक्त, काही भागांमध्ये लघुदाब वाहिन्यांवरही पावसाचा परिणाम झाला असण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 7:05 pm

पुण्यात झाड कोसळून महिलेचा मृत्यू:सिंहगड रोडवर फुल विक्रेत्या रंजना गिरी यांचा दुर्दैवी अंत

पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात अवकाळी पावसात एक दुर्दैवी घटना घडली असून नवश्या मारुती मंदिराशेजारील पिंपळाचे भले मोठे झाड अचानक कोसळल्याने एका साठ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव रंजना नवनाथ गिरी (वय 60) असे असून त्या परिसरात फुल विक्रीचा व्यवसाय करत होत्या. दररोजप्रमाणे त्या मंदिराजवळ आपला व्यवसाय करत असताना अचानक हे झाड कोसळले. झाड कोसळण्याचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत महिलेस झाडाखालून बाहेर काढले. मात्र त्यावेळी त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर नागरिकांनी महापालिकेच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त केला आहे. परिसरातील अनेक जुनी व धोकादायक झाडे वेळोवेळी छाटणी न केल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांच्या आसपास असलेल्या झाडांची नियमित तपासणी व देखभाल करणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांनी नमूद केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. तसेच परिसरातील इतर धोकादायक झाडांची पाहणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सिंहगड रोड परिसरात हळहळ व्यक्त केली.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 7:03 pm

डोंबिवली हादरली!:एकाच दिवशी दोन संतापजनक घटना; 5 वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग, तर 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार

सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या दोन अत्यंत घृणास्पद घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत, एका पाच वर्षांच्या चिमुरडीचा विनयभंग करणाऱ्या 46 वर्षीय हरीष भावे या नराधमाला टिळकनगर पोलिसांनी तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. तर, दुसऱ्या धक्कादायक घटनेत एका 22 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तीन रिक्षा चालकांना पोलिसांनी अटक केली आहे. एकाच वेळी उघडकीस आलेल्या या दोन्ही घटनांमुळे डोंबिवली परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील आरोपी हरीष भावे याने एका चिमुरडीच्या असहायतेचा फायदा घेत हे निंदनीय कृत्य केले. पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर असल्याचे पाहून आरोपीने तिच्याशी अश्लील चाळे केले. पीडित चिमुरडीने घडलेला सर्व संतापजनक प्रकार पालकांना सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या पोटच्या गोळ्यासोबत घडलेल्या या प्रकारामुळे हादरलेल्या पालकांनी तातडीने पोलिसांत धाव घेत या प्रकरणाला वाचा फोडली. आरोपी लोकांच्या घरी जाऊन पूजा सांगायचा पालकांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विलंब न लावता मुलीसह टिळकनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्वरित हालचाली करत गुन्हा दाखल केला आणि आरोपी हरीष भावे याला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, अटक करण्यात आलेला आरोपी लोकांच्या घरी जाऊन पूजा सांगण्याचे काम करायचा, अशी माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 22 वर्षीय महिलेवर अत्याचार डोंबिवलीत महिलांवरील अत्याचाराची दुसरी घटना समोर आली असून, सोलापूरची रहिवासी असलेल्या आणि डोंबिवलीतील एका सुरक्षा रक्षक एजन्सीमध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला आहे. ओळखीच्या रिक्षाचालक मित्रांनी तिला पार्टीच्या बहाण्याने खंबाळपाडा येथील एका घरात नेले. तिथे पार्टी केल्यानंतर मुख्य आरोपीने तिला मारहाण व शिवीगाळ करत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित महिलेने तातडीने टिळकनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदम आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अवघ्या काही वेळातच शोधमोहीम राबवून उमेश वर्मा, चेतन चव्हाण आणि हेमंत चव्हाण या तीन रिक्षाचालक आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यातील उमेश वर्मा हा मुख्य आरोपी असून, हे तिन्ही आरोपी डोंबिवली परिसरात रिक्षा चालवण्याचे काम करतात, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 7:01 pm

पुण्यात वादळी पावसाचा कहर, गारपिटीनेही धडकी:पिंपळाचे वृक्ष कोसळल्याने साठ वर्षीय महिलेचा मृत्यू; अचानक हवामानात मोठा बदल

पुणे शहरात गुरुवारी दुपारनंतर अचानक हवामानात मोठा बदल झाला आणि भर उन्हातच काळोख दाटून आला. त्यानंतर काही मिनिटांतच मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले. अनेक भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला, तर काही ठिकाणी गारपिटीची नोंदही झाली. या अचानक बदलामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. पुण्यात सिंहगड रोडवरील नवश्या मारुती मंदिरा शेजारील पिंपळाचे भले मोठे वृक्ष कोसळले. यात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या या पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाणी साचले. काही ठिकाणी तर रस्त्यांवरून अक्षरशः पाण्याचे प्रवाह वाहताना दिसले. सिंहगड रोड, मणिकबाग, कोंढवा बुद्रुक, प्राईड हॉस्पिटल परिसर, धानोरी आणि बालाजीनगर या भागांत पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही वाहनं पाण्यात अडकून थांबली, तर अनेकांनी वाहनांच्या हेडलाईट सुरू करूनच प्रवास केला. उन्हाळ्याचा काळ असल्याने नागरिक छत्री किंवा रेनकोट न घेता घराबाहेर पडले होते. त्यामुळे अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची चांगलीच धांदल उडाली. जवळपास तासभर सुरू असलेल्या मुसळधार सरींमुळे शहरात वाहतुकीवर परिणाम झाला. पिंपरी-चिंचवड परिसरातही याच स्वरूपाचा पाऊस पडला आणि उद्योगनगरीतही अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. या अवकाळी पावसाचा परिणाम केवळ शहरापुरता मर्यादित राहिला नाही. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही जोरदार पावसाची नोंद झाली असून, काही ठिकाणी गारपिटीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषतः मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची ये-जा सुरू असल्याने शेतीपिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान अनिश्चित राहण्याची शक्यता दरम्यान, हनुमान जयंतीच्या उत्सवातही या पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी मंदिर परिसरात आणि मंडपात पाणी साचले. भाविकांची गैरसोय झाली असली तरी, या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. वातावरणात अचानक झालेल्या गारव्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी अवकाळी पावसाच्या या तडाख्याने पुढील काही दिवस हवामान अनिश्चित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 6:23 pm

भारत आमचा मित्र, काळजी नसावी

तेहरान : अमेरिका-इस्रायल यांनी केलेल्या हल्ल्यानंतर इराणने जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला समुद्री मार्ग रोखून धरला आहे. यानंतर मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्ष सध्या शिगेला पोहोचला असून याची झळ जगभरातील देशांना बसत आहे. यादरम्यान इराणने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टच्या माध्यमातून एक खास संदेश जारी करत होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत भारताला आश्वस्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर […] The post भारत आमचा मित्र, काळजी नसावी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 6:21 pm

खरीप हंगामावर खतटंचाईचे सावट!; रसायनांच्या दरात १५ ते ५० टक्के वाढ

मुंबई : प्रतिनिधी सध्या शेतक-यांवर चहूबाजूंनी संकट उभे ठाकले आहे. ‘एल निनो’मुळे वेळेत आणि पुरेसा पाऊस पडेल का? खरीप हंगामातील पेरण्या वेळेत झाल्या तर खतांच्या वाढत्या किमती यामुळे बळिराजा चिंतेत आहे. आखाती युद्धामुळे जागतिक पातळीवर रासायनिक खतांची पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा परिणाम जाणवत आहे. खते तयार करण्यासाठी लागणा-या विविध रसायनांच्या किमती १५ ते ५० टक्क्यांनी […] The post खरीप हंगामावर खतटंचाईचे सावट!; रसायनांच्या दरात १५ ते ५० टक्के वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 5:59 pm

आदिश जैन फाऊंडेशनतर्फे ममता सपकाळ यांना 'कार्यगौरव' पुरस्कार प्रदान:सामाजिक कार्य आणि साहित्यातील योगदानाबद्दल सन्मान

आदिश जैन फाऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ समाजसेविका आणि गझलकारा ममता सपकाळ यांना २०२६ सालचा 'कार्यगौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्य आणि साहित्यातील त्यांच्या समर्पित योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला. यावेळी सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि रोख रक्कम देऊन सपकाळ यांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक म. भा. चव्हाण, गझलकार सुधीर मुळीक, ॲडव्होकेट व समाजसेविका प्रार्थना सदावर्ते आणि संस्थेच्या अध्यक्षा मृणाल जैन उपस्थित होत्या. यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक म. भा. चव्हाण म्हणाले, स्त्रियांचे पूजन करून अघोरी प्रकार केले जात असतील, तर ते किती वाईट आहे, याचा समाजाने विचार करणे गरजेचे आहे. ते पुढे म्हणाले की, स्त्रियांना आरक्षण दिले नाही तरी चालेल; मात्र त्यांना संरक्षण देणे अत्यावश्यक आहे. स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी निर्भयता बाळगावी आणि एकमेकींना सहकार्य करावे. समाज अजूनही स्त्रियांप्रती संवेदनशील झालेला नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. चव्हाण यांनी असेही नमूद केले की, एखाद्या धर्मग्रंथात स्त्रियांचा अवमान असेल, तर त्यात बदल झाला पाहिजे. त्यांनी 'रडायला नको, लढायला शिकवा' असा संदेश दिला आणि पुरुषांकडून आता क्रांतीची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही, असेही ते म्हणाले. संस्थेच्या अध्यक्षा मृणाल जैन यांनी फाऊंडेशनची उद्दिष्टे स्पष्ट केली आणि मागील सहा महिन्यांतील संस्थेच्या कामगिरीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर वैष्णवी पाटांगणकर यांनी सरस्वती वंदना सादर केली. नीलिमा फाटक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रार्थना सदावर्ते यांनी मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात महिला गझल मुशायरा रंगला. प्रभा सोनवणे, सुनीती लिमये, सुजाता पवार, स्वाती यादव, वैशाली माळी आणि नीलिमा फाटक या ज्येष्ठ गझलकारांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 5:50 pm

हडपसरमध्ये एसटीत चढताना ज्येष्ठ महिलेची लूट:गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी 15,500 रुपयांचा ऐवज लंपास केला

एसटीमध्ये प्रवेश करताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी जेष्ठ महिलेकडील पाच हजारांची रोकड, मोबाइल असा १५ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ३१ मार्चला सकाळी नउच्या सुमारास हडपसरमधील रवीदर्शन चौकात घडली आहे. याप्रकरणी हडपसरमध्ये राहणार्‍या ६३ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला हडपसरमध्ये राहायला असून, ३१ मार्चला सकाळी नउच्या सुमारास रवीदर्शन चौकात एसटीची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याठिकाणी एसटी आल्यानंतर तक्रारदार महिला एसटीमध्ये प्रवेश करीत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेकडील पाच हजारांची रोकड, मोबाइल असा १५ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस अमलदार ए.एच. कचरे तपास करीत आहेत. कॅम्पमधील बेकरीतून ४६ हजारांची रोकड चोरीला बेकरीच्या मागील बाजूला असलेल्या पत्र्याच्या उघड्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करीत चोरट्यांनी ४६ हजारांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना ३० ते ३१ मार्चला कॅम्प परिसरातील भीमपुर्‍यातील न्यू अक्सा बेकरीत घडली आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लष्कर परिसरात राहायला असून, त्यांची बेकरी आहे. ३० ते ३१ मार्चला चोरट्यांनी त्यांच्या बेकरीच्या मागील बाजूस असलेल्या दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश केला. ४६ हजारांची रोकड घेउन चोरटे पसार झाले. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस अमलदार अतुल मेंगे तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 5:48 pm

रिपब्लिकन पार्टीच्या राज्य कार्यकारिणीची पुण्यात बैठक:संघटना मजबूत करण्यासह महाड सत्याग्रह शताब्दी महोत्सवावर चर्चा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. कॅम्प येथील रेसिडेन्सी क्लब येथे दुपारी १२.३० वाजता ही बैठक पार पडेल. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. महाड चवदारतळे सत्याग्रह शताब्दी महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच, पक्ष नेतृत्वाच्या सूचनेनुसार इतर महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा होणार असल्याचे पुण्याचे उपमहापौर आणि पक्षाचे राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर यांनी माहिती दिली. बैठक केवळ निमंत्रितांसाठीच, अनधिकृत व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही या बैठकीला प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, महासचिव अविनाश महातेकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय व राज्य कार्यकारिणीतील निमंत्रित प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही बैठक केवळ निमंत्रितांसाठीच असल्याने अनधिकृत व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही, असेही परशुराम वाडेकर यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 5:47 pm

कन्हानमध्ये 10 वर्षीय मुलीची आत्महत्या:आईच्या मृत्यूचा धक्का आणि एकाकीपणा ठरला कारणीभूत

कन्हान परिसरात एका 10 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रीती सत्यनारायण तिवारी असे मृत मुलीचे नाव असून, ती नारायणा विद्यालयात पाचवीत शिकत होती. आईच्या अकाली मृत्यूचा धक्का आणि एकाकीपणामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. प्रीतीचे वडील कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी मुंबईत नोकरी करतात. त्यामुळे ती आजी-आजोबांसोबत राहत होती. तिची देखभाल तिची 24 वर्षीय चुलत बहीण करत होती. प्रीती केवळ चार वर्षांची असताना तिच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना प्रीतीच्या डोळ्यासमोर घडली होती, ज्यामुळे तिच्या बालमनावर खोलवर परिणाम झाला होता. आत्महत्येच्या दिवशी प्रीतीने स्वतःला खोलीत बंद करून घेतले. तिने स्टूलवर उभे राहून ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. काही वेळाने तिच्या काकांना संशय आल्याने त्यांनी खिडकीतून पाहिले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ आत जाऊन तिला खाली उतरवले आणि रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रीतीचा स्वभाव हट्टी होता आणि ती कधीकधी स्वतःला खोलीत बंद करून घ्यायची. तसेच, ती 'क्राइम पेट्रोल' ही मालिका नियमितपणे पाहत असल्याचेही तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बालकांच्या मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 5:44 pm

राज्यात अवकाळीचा फटका:पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे आश्वासन

राज्यात वादळी वारा व गारांच्या पावसामुळे (अवकाळी) 1 लाख 22 हजार हेक्टरहून (3 लाख 5 हजार एकर) अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यभरातील नुकसानीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन तातडीने पंचनामे पूर्ण करुन बाधित शेतक-यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज भोर तालुक्यातील वडगाव डाळ येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गावातील नुकसान झालेल्या आंब्याच्या बागांचे तसेच विविध शेती पिकांचे प्रत्यक्ष पाहणी केली. अवकाळी पावसामुळे आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी निदर्शनास आले. अनेक ठिकाणी फळगळ, झाडांचे नुकसान तसेच उभ्या पिकांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यभर मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः नाशिक (29,812 हेक्टर), अहिल्यानगर (23,633 हेक्टर), जळगाव (22,361 हेक्टर), धुळे (14,832 हेक्टर), बुलढाणा (8,507 हेक्टर) व छत्रपती संभाजीनगर (8,445 हेक्टर) आदी जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. राज्यात केळी, गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, कलिंगड, भाजीपाला, डाळिंब, कांदा, संत्रा, द्राक्ष आदी पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणी कांदा कुजला असून पपईची रोपेही खराब झाली आहेत. शेतात पाणी साचल्याने उभी पिके आडवी झाली असून मजुरी व खतांचा खर्च वाया गेला आहे. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, अशी सर्व बांधवांना विनंती आहे. पुण्यात पावसामुळे पूरपरिस्थितीचे दृश्य

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 5:42 pm

आयएएस तुकाराम मुंडे यांना मातृशोक

मुंबई : प्रतिनिधी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आईचं निधन झालं आहे. आयएएस तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं पुण्यात निधन झालं. त्यांचं पार्थिव बीडच्या ताडसोना या मूळगावी नेण्यात येणार आहे. आसराबाई यांच्या पार्थिवावर ३ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तुकाराम मुंढे हे सध्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या […] The post आयएएस तुकाराम मुंडे यांना मातृशोक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 5:42 pm

चॅट जीपीटी तुमच्या मेंदूला करतेय कमकुवत

नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्स(एआय) संदर्भात फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ रिओ डी जानेरोच्या नवीन अभ्यासानुसार, चॅट जीपीटीसारख्या एआय टूल्सचा वापर तुमच्या मेंदूवर परिणाम करू शकतो. प्रत्येक गोष्टीसाठी एआय टूल्सवर अवलंबून राहिल्यामुळे मेंदूची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होऊ शकते. याशिवाय तुमची कल्पक विचारसरणी देखील मर्यादित होऊ शकते. या रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे की, जे विद्यार्थी पूर्णपणे […] The post चॅट जीपीटी तुमच्या मेंदूला करतेय कमकुवत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 5:39 pm

पिक विमा योजनेत मोठे बदल अपेक्षित:जुने ट्रिगर लागू होण्याची शक्यता, उंबरठा उत्पादन 100 टक्के करण्याचे संकेत

पंतप्रधान पिक विमा योजनेत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून पिक विम्यातील जुने 'ट्रिगर' पुन्हा लागू करण्याचे निर्देश महाराष्ट्राला दिले जाऊ शकतात. तसेच, उंबरठा उत्पादन 100 टक्के करण्याबाबतही सकारात्मक हालचाली सुरू असल्याची माहिती कृषीभूषण अॅड. प्रकाश पाटील यांनी दिली आहे. हे प्रस्तावित बदल लागू झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता केंद्राच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या महाराष्ट्रात पिक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई दिली जाते. यामुळे पेरणी न होणे, पावसाचा खंड, अतिवृष्टी यांसारख्या नुकसानीला पुरेशी भरपाई मिळत नाही. पीक विम्यात 2015 पूर्वीप्रमाणे सर्वसमावेशक संरक्षण राहिलेले नाही, या मुद्द्यावर एका शिष्टमंडळाने दिल्लीतील कृषी भवनात अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळाने कमी पावसामुळे पेरणी न होणे, पावसाचा खंड, अतिवृष्टी, कापणीनंतरचे नुकसान आणि पिक कापणी प्रयोग या बाबींवर भरपाई देणारे जुने ट्रिगर लागू करण्याची मागणी केली. केंद्राने ही मागणी योग्य मानत राज्याला आवश्यक निर्देश देण्याचे आश्वासन दिले आहे. पिकाच्या उत्पादनाची आकडेवारी पिक कापणीनुसार न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काढण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने यावर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे थांबवले होते. आता पिक उत्पादनाच्या आकडेवारीत सुधारणा करण्यासाठी 80-85 टक्के डेटा आधुनिक तंत्रज्ञानातून आणि 15-20 टक्के पिक कापणी प्रयोग 'तपासणी'साठी असा फॉर्म्युला लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे नुकसान भरपाई अधिक अचूक मिळेल. सध्या महाराष्ट्रात जोखीम स्तर 80 टक्के ठेवण्यात आला आहे. परंतु, मागील पाच वर्षांच्या सरासरीवर आधारित उंबरठा उत्पादन कमी होत असल्याने अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित राहतात. यामुळे उंबरठा उत्पादन 100 टक्के करण्याची मागणी करण्यात आली असून, त्यावरही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. उंबरठा उत्पादन 100 टक्के केल्यास अधिक शेतकरी विमा संरक्षणाखाली येतील, नुकसान भरपाईत वाढ होईल, नैसर्गिक आपत्तीत जलद दिलासा मिळेल आणि आकडेवारी अधिक पारदर्शक होईल.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 5:22 pm

महाराणी ताराराणींचे स्वराज्य टिकवण्यात मोठे योगदान - संभाजीराजे:'छत्रपती महाराणी ताराराणी' पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन

छत्रपती महाराणी ताराराणी यांचे हिंदवी स्वराज्य टिकवण्यात मोठे योगदान आहे, असे मत युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य टिकवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपलीच आहे, या भावनेतून त्यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर स्वराज्य टिकवण्याचे कार्य केले. त्यांच्याकडे उत्तम युद्ध आणि प्रशासकीय कौशल्य होते, ज्याच्या जोरावर त्यांनी औरंगजेबाशी सात वर्षे लढा दिला. महाराणी ताराराणींचे हे कार्यकर्तृत्व समाजापर्यंत पोहोचू शकले नाही. 'छत्रपती महाराणी ताराराणी' या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचे महात्म्य आणि स्वराज्य टिकवण्यासाठी केलेला संघर्ष समाजापर्यंत पोहोचेल, असा विश्वास युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. सरहद पुणे, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली आणि मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे महाराणी ताराराणी यांच्या ३५१व्या जयंती वर्षानिमित्त महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने गुरुवारी (दि. २) 'छत्रपती महाराणी ताराराणी' या पुस्तकाचे प्रकाशन आणि महाराणी ताराराणी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी युवराज संभाजीराजे छत्रपती बोलत होते. हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडला. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, सरहदचे संस्थापक संजय नहार, विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, अनुज नहार, पुस्तकाचे लेखक मयूर मसूरकर आणि गोपाळ कांबळे मंचावर उपस्थित होते. पुस्तक प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याने दिल्ली येथे आयोजित संमेलनाच्या कार्याचा शुभारंभ झाला. या सोहळ्यात अबोली राऊत, डॉ. लीना बोकील, ममता सपकाळ, मेजर डॉ. मोनिका बारणे, अंजू माने, साधना चव्हाण, सुवर्णा गोखले, आशा खेडकर, अलका गुनजाळ आणि स्वाती डिंबळे यांना 'छत्रपती महाराणी ताराराणी सन्मानाने' गौरवण्यात आले. छत्रपती महाराणी ताराराणी यांचे कार्य प्रेरणादायक असून त्यांचे युद्ध आणि प्रशासकीय कौशल्य युवा पिढीला मार्गदर्शक ठरेल, असे युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 'समाजाचे देणे लागतो' या भावनेतून कार्यरत असलेल्या सन्मानित महिलांचे कार्य अभिनंदनीय आहे. विघातक समाजासाठी विधायक कार्य होणे आवश्यक आहे आणि या सन्मानार्थी महिला महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांच्या वारसदार आहेत, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी प्रास्ताविकात सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी मुंबईतील मंत्रालयात आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदनात छत्रपती महाराणी ताराराणी यांचे तैलचित्र नसल्याचे निदर्शनास आणले. यावर युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, मंत्रालयात आणि महाराष्ट्र सदनात छत्रपती महाराणी ताराराणी यांचे तैलचित्र लावण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांना फोन करतील. तैलचित्रासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याबरोबरच वेळप्रसंगी त्यांच्यावर दबाव टाकण्याची भूमिकाही घेईल, असे त्यांनी जाहीर केले.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 5:19 pm

पशुपालकांसाठी माहितीचा खजिना:‘महापशुधन वार्ता’मधून शासनाच्या योजना, नवनवीन तंत्रज्ञान, यशस्वी प्रकल्पांची शेतकऱ्यांना घरबसल्या मिळतेय माहिती

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने प्रकाशित होणारे ‘महापशुधन वार्ता’ हे डिजिटल ई-मासिक पशुपालक, शेतकरी, उद्योजक, पशुवैद्यकीय विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांसाठी उपयुक्त माहितीचे प्रभावी माध्यम ठरत आहे. पशुपालन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील शासनाच्या योजना, नवनवीन तंत्रज्ञान, यशस्वी प्रकल्प, प्रशिक्षण उपक्रम, रोगनियंत्रण, तसेच विभागाच्या कार्याची सविस्तर माहिती या मासिकातून शेतकऱ्यांना नियमितपणे घरबसल्या मिळत आहे. पशुसंवर्धन सचिव डॉ. रामास्वामी एन. यांच्या संकल्पनेतून या मासिकाची निर्मिती झाली. मे २०२५ रोजी या मासिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला होता. आतापर्यंत या मासिकाचे ११ अंक प्रसिद्ध झाले आहेत. या मासिकामध्ये राज्यातील विविध भागातील यशस्वी पशुपालकांच्या प्रेरणादायी यशोगाथा, आधुनिक शेळीपालन, कुक्कुटपालन, गो-आधारित शेती, बायोफ्लॉक मत्स्यपालन, लसीकरण मोहिमा, तसेच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांचे क्षेत्रीय दौरे व उपक्रम यांच्या माहितीचा समावेश असतो. त्यामुळे हे मासिक केवळ माहितीपर न राहता मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आहे. पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत हे मासिक प्रकाशित केले जाते. पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळाबरोबरच आता हे मासिक महाविस्तार अॅपमध्येही वाचता येणार आहे. मार्च २०२६ च्या अकराव्या अंकात नुकत्याच परळी वैजनाथ येथे झालेल्या अखिल भारतीय स्तरावरच्या महापशुधन एक्स्पो विषयाची माहिती, छायाचित्रे देण्यात आली आहेत. त्याशिवाय आत्मनिर्भर गोशाळा व नैसर्गिक शेतीची गरज, लडाखमधील पशुधनासाठी महाराष्ट्राची मदत, नंदुरबार जिल्ह्यातील दुग्धविकास क्षेत्राला मिळणार चालना आदी विविध विषयांवरील माहितीचाही समावेश आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या मासिकाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “पशुपालन व दुग्धव्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. विभागामार्फत प्रकाशित होणारे हे मासिक पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना व यशस्वी प्रयोगांची माहिती देणारे प्रभावी साधन आहे. महापशुधन वार्ता हे डिजिटल ई मासिक पशुपालक शेतकरी बांधवांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत आहे. प्रत्येक पशुपालक, तरुण उद्योजक आणि विद्यार्थ्यांनी हे मासिक नियमित वाचावे,” असे आवाहन त्यांनी केले. पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनीही या मासिकाच्या वाचनाचे आवाहन करताना सांगितले की, “राज्यात गुणात्मक पशुधनांची पिढी तयार करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रभावी धोरण राबवित आहे. त्या अनुषंगाने शेतकरी व पशुपालकांशी संवाद साधण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ‘महापशुधन वार्ता’ हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पशुपालन क्षेत्रात गुणवत्ता, उत्पादकता व उत्पन्न वाढीसाठी ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. हे मासिक डिजिटल स्वरूपात सर्वांसाठी मोफत उपलब्ध असून, पशुपालकांपर्यंत थेट शास्त्रीय व व्यवहार्य माहिती पोहोचवण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. अधिकाधिक नागरिकांनी या मासिकाचा लाभ घ्यावा.” पशुपालकांना नियमित मार्गदर्शन करण्यासाठी तसेच विभागाअंतर्गत सुरू असलेले कार्य, मोहिमा, उपक्रम व योजना यासह तांत्रिक माहिती या मासिकाच्या माध्यमातून पशुपालकांपर्यंत पोचविले जाते. हे मासिक पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुक वाचकांनी ते डाउनलोड करून वाचावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रदीपकुमार देवरे यांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 5:12 pm

हेड-नेक कॅन्सरचा धोका ३० टक्क्यांनी वाढला

मुंबई : तोंडात किंवा घशामध्ये झालेली जखम, गाठ किंवा आवाजात झालेला बदल याकडे अनेकदा दुुर्लक्ष केले जाते. मात्र हीच लक्षणे हेड आणि नेक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. भारतात सर्व कॅन्सर रुग्णांपैकी अंदाजे २६ % ते ३० % रुग्णांना हेड आणि नेक कॅन्सर असल्याची माहिती आहे. ज्याचे प्रमुख कारण तंबाखू, […] The post हेड-नेक कॅन्सरचा धोका ३० टक्क्यांनी वाढला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 5:06 pm

आळंदीत 6 वर्षीय चिमुकलीचा गळा आवळला:तिला सांभाळणाऱ्या वृद्ध महिलेचाही खून, दुहेरी हत्याकांडाने खळबळ

वारकरी संप्रदायाची पावन नगरी असलेल्या आळंदीतील केळगाव-हनुमानवाडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बुधवार, 1 एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपीने एका 6 वर्षीय चिमुरडीची गळा आवळून, तर तिला सांभाळणाऱ्या 79 वर्षीय वृद्ध महिलेची डोक्यात वार करून निर्घृण हत्या केली. ठाकरवाडी येथे घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, या क्रूर कृत्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, हनुमानवाडी येथील रहिवासी संगीता गवारी या नेहमीप्रमाणे इंद्रायणी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीच्या कामावर गेल्या असताना, घरी त्यांची 6 वर्षांची नात धनश्री केदारी आणि शेजारी राहणाऱ्या 79 वर्षीय मंगल शिंदे या दोघीच होत्या. या संधीचा फायदा घेत मध्यरात्री एका अज्ञात इसमाने घरात शिरून गाढ झोपेत असलेल्या चिमुरडीचा गळा आवळला, तर मंगल शिंदे यांच्या डोक्यावर जीवघेणा प्रहार करून दोघांचीही निर्घृण हत्या केली. एकाच कुटुंबावर ओढवलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वारकरी संप्रदायाची पावन नगरी असलेल्या आळंदीत अशा प्रकारची क्रूर घटना घडल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता असून, सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास चक्रांना वेग दिला आहे. या भीषण कृत्यामागे नेमका चोरीचा हेतू होता की हे पूर्ववैमनस्यातून घडलेले कांड आहे, याचा सखोल तपास सध्या सुरू आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी परिसरात पोलिस गस्त वाढवण्याची आग्रही मागणी केली आहे. अशा प्रकारच्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात आणि आरोपींचा लवकरात लवकर माग काढून त्यांना कठोर शासन करावे, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 4:59 pm

पटेल-सुनिल तटकरेंच्या मदतीला पार्थ पवारांची धाव:त्यांच्यावरील आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा ठाम दावा, अंतर्गत हालचाली वाढल्या

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत चर्चांना आता नवं वळण मिळालं आहे. सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान प्रफुल्ल पटेल यांच्या अनुपस्थितीवरून रंगलेल्या चर्चांमध्ये पार्थ पवार यांनी उडी घेत, पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावरील आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा ठाम दावा केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. प्रफुल पटेल कुठे आहेत? या पत्रकारांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवार यांनी ते कधी येतात, कधी जातात हे तुम्हालाच माहिती असेल, असा टोला लगावल्याने चर्चांना अधिकच उधाण आलं. या पार्श्वभूमीवर पक्षात सर्व काही सुरळीत आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या सर्व चर्चांमध्ये आता पार्थ पवार यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्याविरोधात सुरू असलेल्या बातम्या पूर्णपणे निराधार असल्याचं म्हटलं आहे. अनेक दशकांपासून या नेत्यांनी पक्षासाठी दिलेलं योगदान मोठं असून, त्यांच्या नेतृत्वामुळेच पक्षाला दिशा मिळत असल्याचं पार्थ पवार यांनी नमूद केलं. तसेच, केवळ तर्क-वितर्कांवर आधारित कथा पसरवून वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करणं अत्यंत दुर्दैवी असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हातात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद वाढल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर पक्षातील समीकरणांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यातच, दिल्ली दौऱ्यात दोन्ही वरिष्ठ नेते सुनेत्रा पवार यांच्यासोबत दिसले नाहीत, यामुळे या चर्चांना अधिक बळ मिळालं. विशेष म्हणजे, प्रफुल्ल पटेल दिल्लीमध्ये असल्याची माहिती असूनही ते सुनेत्रा पवार यांच्या बैठकीत दिसले नाहीत. दुसरीकडे, सुनिल तटकरे हे हनुमान जयंतीनिमित्त रायगडमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. या दोन्ही नेत्यांची एकाच वेळी अनुपस्थिती राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी वेगळं घडत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचाल याशिवाय, पक्षाच्या संविधानात झालेल्या बदलांमुळेही वाद वाढला आहे. 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाला पाठवलेल्या मिनिट्समध्ये बदल झाल्याचं समोर आलं आहे. नव्या संविधानात काही फ्रंटल सेल वगळण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली अंतर्गत हालचाल अधिकच तीव्र झाली असून, पुढील काळात या वादाचं रूप काय घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 4:42 pm

४० उत्पादनांवरील आयात शुल्क हटवले

नवी दिल्ली : पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला १ महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या युद्धामुळे जगभरात महागाईचा धोका वाढला आहे. दरम्यान, भारत सरकारने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सरकारने मोठा निर्णय घेत पेट्रोकेमिकल उत्पादनांसह ४० उत्पादनांवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे. जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होणे आणि […] The post ४० उत्पादनांवरील आयात शुल्क हटवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 4:40 pm

अशोक खरातच्या फरार पत्नीच्या विरोधात लुकआऊट नोटीस:देशातील सर्व विमानतळांवर पोलिसांची नजर; परदेशात पळून जाण्याचे मार्ग बंद

शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक पीडित महिला आता धैर्याने पुढे येऊन त्याच्याविरुद्ध तक्रारी नोंदवत असून, यामध्ये केवळ लैंगिक शोषणाचेच नव्हे तर आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हेही समोर येत आहेत. खरात हा बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या काळ्या धंद्यात त्याची पत्नी कल्पना खरात हिचादेखील सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात सहआरोपी म्हणून नाव येताच कल्पना खरात फरार झाली असून पोलिस तिचा कसून शोध घेत आहेत. ती देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी प्रशासनाने आता तिच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. या नोटिसीमुळे तिचा परदेशात पळण्याचा मार्ग आता पूर्णपणे बंद झाला असून, पोलिस लवकरच तिला बेड्या ठोकतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशोक खरातनेही परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न केला होता शिर्डीत शेतकरी फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीच्या गुन्ह्यात अडकलेली भोंदू अशोक खरातची पत्नी, कल्पना खरात हिच्याविरोधात शिर्डी पोलिसांनी आता 'लुकआऊट नोटीस' जारी केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात फरार असून पोलिस तिचा कसून शोध घेत आहेत. यापूर्वी अशोक खरातनेही परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, जो पोलिसांनी हाणून पाडला होता. आता त्याची पत्नीदेखील देशाबाहेर पलायन करण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही कडक पाऊले उचलली आहेत. देशातील सर्व विमानतळांवर कल्पना खरातची माहिती लुकआऊट नोटीस जारी झाल्यामुळे देशातील सर्व विमानतळांवर कल्पना खरातची माहिती देण्यात आली असून, तिच्या परदेश प्रवासावर पूर्णपणे बंदी आली आहे. पोलिसांनी तिची सर्व बाजूंनी नाकेबंदी केली असून कोणत्याही मार्गाने ती देश सोडू शकणार नाही याची खबरदारी घेतली आहे. या कारवाईमुळे फरार आरोपी कल्पना खरातच्या मुसक्या आवळण्यासाठी आता पोलिसांना मोठे यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. कल्पना खरातवर जमीन बळकावल्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा शिर्डी येथील 4 एकर भूखंडाच्या खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातसह पाच जणांविरुद्ध शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खरात कुटुंबाने त्यांना व्याजाने पैसे देऊन सावकारी पाशात ओढले आणि कर्जफेडीच्या बहाण्याने त्यांची जमीन बळकावली. याप्रकरणी पोलिसांनी फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे आणि अशोक तांबे यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 4:27 pm

इंदुमिल स्मारक उभारणीसाठी सरकारचा पुढाकार महत्वाचा:गाझियाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या कामाची उपाध्यक्षांसह शिस्थमंडळाने केली पाहणी

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. मुंबईतील इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या या पुतळ्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या पाहणीवेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलचे पदाधिकारी व इतर शिष्टमंडळ उपस्थित होते. २०१८ साली या पुतळ्याच्या उभारणीचे कंत्राट राम सुतार यांच्या कारखान्याला देण्यात आले होते. मात्र, २०२६ पर्यंत या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने शासनाने किंमतीतील तफावत तातडीने कंत्राटदाराला देण्याची गरज असल्याचे अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात त्यांनी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रकल्पातील आर्थिक तफावत दूर करण्यासोबतच MMRDA कडून कंत्राटदारांना वेळेत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, ३५० फूट उंचीच्या या भव्य पुतळ्यापैकी सध्या सुमारे ५० फूट काम पूर्ण झाले आहे. पुतळ्याचे बूट आणि पॅंटचा काही भाग तयार झाला असून उर्वरित काम गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू आहे. हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.मात्र स्मारकाच्या कामाला २०२८ उजाडणार असल्याचे चित्र आहे. या स्मारकाबाबत बोलताना अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे भविष्यात एक मोठे पर्यटन आणि प्रेरणास्थळ ठरणार आहे. देश-विदेशातील लाखो अनुयायांसाठी हे केंद्र आकर्षणाचे ठिकाण ठरेल, तसेच बाबासाहेबांच्या विचारांचे जतन करणारे एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणूनही ते ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 3:49 pm

कधी मिळणार PM E Bus:छत्रपती संभाजीनगरच्या 100 शहर बसबाबत करारच नाही, गरज पूर्ण कशी होणार?

छत्रपती संभाजीनगरची वाढती लोकसंख्या आणि विस्तार पाहता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नावालाच आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात किमान 35 + 100 वातानुकुलीत ई शहर बस मिळणे आवश्यक आहेत. 35 बस मिळण्याची तीन वर्षांपासून प्रतिक्षाच आहे. तर 100 पंतप्रधान ई-बससाठी करारच झालेला नसल्याचे माहिती अधिकार अर्जातून पुढे आले आहे. त्यामुळे तत्काळ पावले उचलली नाही, तर भविष्यात उद्योग आणि पर्यटननगरीचा विकास खुंटल्याशिवाय राहणार नाही. ‘स्वच्छ हवा, स्वच्छ शहर’ साध्य करण्यासाठी ‘आम्ही पर्यावरण प्रेमी’ मंचच्या माध्यमातून विविध संस्था एकत्र काम करत आहेत. ‘हवी शुद्ध हवा’ अभियानाअंतर्गत ‘डबल द बस’ हा उपक्रम देखील राबवण्यात येत आहे. त्यासाठीच उद्योजक, निवृत्त अधिकारी, पत्रकार आणि विविध मान्यवरांनी स्मार्ट सिटी बस प्रशासनाशी चर्चा केली. मंच काय करेल आणि प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत, असे 15 सूचना, मागण्यांचे पत्र देण्यात आले. त्यानंतर स्मरणपत्रे देऊन, फोनवरूनही विचारणा करण्यात आली. मात्र, त्यावर कारवाई झाली नव्हती. वरिष्ठ स्तरावरून पाठपुरावा केल्यानंतर आता कारवाई सुरू करण्यात आली आहे. शंभर बस, अभी दिल्ली दूर शहराची लोकसंख्या 16 लाख गृहित धरली तर किमान 1 हजार बसची गरज आहे. 500 बस मिळाल्या तरी काम भागू शकते असे स्मार्ट सिटीला वाटते. पण सध्या उपलब्ध 100 बसचा (80 रोज उपयोगात) आकडा त्यापासूनही फार दूर आहे. 35 बसची संपूर्ण प्रक्रिया झाली असुनही त्या मिळालेल्या नाहीत. तर आणखी 100 पंतप्रधान ई बस योजनेतून मिळू शकतात. मात्र, त्याचा करारच झालेला नाही. करार झाल्यानंतरही या बस तीन टप्प्यात मिळतील. त्यामुळे ‘दिल्ली बहोत दूर है’ असे चित्र आहे. पण राजकीय इच्छाशक्ती दाखवून पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले तर पर्यटननगरीचे चित्र काही अंशी बदलू शकेल. अनावश्यक उशीर, तरी कारवाईचे स्वागत बहुतांश नागरिकांना चलो बस ॲपची माहिती नाही. त्याचा प्रसार करणे, रेल्वे स्थानकावरील शहर बसस्थानक प्रवाशांना दिसत नाही. त्यामुळे दर्शनी भागात शहर बस स्थानकाचे दिशा दर्शक फलक लावावे, बस थांब्यांची देखभाल दुरूस्ती, बस थांब्यांवर वेळापत्रक, एक दिवसाच्या पासचा प्रसार करण्याबाबत लिहिले होते. त्यानुसार उशिरा का होईना आता कारवाई सुरू केली आहे. विविध एजन्सींना पत्र पाठवून काम करण्याचे आदेश स्मार्ट सिटी बस प्रशासनाने दिले आहेत. डेड किलोमीटर कमी करा जाधववाडी येथे एकाच ठिकाणी सर्व बस ठेवल्या जाणार आहेत. तिथेच या बस चार्ज होऊन निर्धारित मार्गाने जातील. यामुळे ‘डेड किलोमीटर’ म्हणजेच प्रवाशांशिवाय बसचा प्रवास वाढेल. सोबतच एकाच मार्गावरून बस ये जा करणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ शकते. ही बाब मूळ उद्देशालाच फाटा देणारी आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक, बसस्थानक, वाळूज, बीड बायपास अशा काही भागांमध्ये छोटे आगार बनवण्याची गरज आम्ही पर्यावरण प्रेमीकडून अधोरेखित करण्यात आली. त्यानुसार वाळूज महानगर येथील सिडकोची जागा देण्यासाठी 13 मार्च रोजी स्मरणपत्र देण्यात आले आहे. ही जागा मिळावी यासाठी मंत्री महोदयांनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. शिवाय इतर ठिकाणी छोटे डेपो बनवण्यासाठी आतापासूनच प्रयत्न आवश्यक आहेत. सीएमपीची गरज शहर बस वाहतूक आराखड्याची प्रत मागण्यात आली होती. सविस्तर आराखडा 135 बस आल्यानंतर तयार करण्यात येईल असे उत्तर देण्यात आले आहे. एकुणच बस मिळण्याची गती पाहता पुढील काही वर्षे आराखडा तयार होणार नसल्याचे दिसते. ही एक गंभीर बाब आहे. आम्ही हात पुढे केला, प्रशासनाने टाळी द्यावी गेल्या काही वर्षात अनियमित, अपुरी शहर बस वाहतूक राहिल्याने लोकांची सवय तुटली आहे. लोकांच्या प्राधान्यक्रमातून सार्वजनिक वाहतूक बाद झाली आहे. पण उद्योग, पर्यटन विकास पाहता आताच जागे होण्याची गरज आहे. हे काम मिळून करावे लागेल. आम्ही स्वतःहून सहकार्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे. प्रशासनानेही ‘टाळी’ द्यावी. - समन्वयक, आम्ही पर्यावरण प्रेमी संबंधित वृत्त: छत्रपती संभाजीनगरला मे अखेर मिळणार 34 वातानुकूलित ई शहर बस: निर्माता कंपनीला चौथी नोटीस, चारवेळा ब्लॅक लिस्टचा इशारा

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 3:47 pm

न्यायालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा अटकेत

म्हैसूर : देशभरातील उच्च न्यायालये, जिल्हा न्यायालये आणि सरकारी संस्थांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देऊन खळबळ उडवून देणा-या एका उच्चशिक्षित व्यक्तीला दिल्ली पोलिसांनी अटक केली. श्रीनिवास लुईस (४७) असे या आरोपीचे नाव असून तो कर्नाटकच्या म्हैसूर येथील रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने म्हैसूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात […] The post न्यायालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा अटकेत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 3:42 pm

खासदार राघव चड्डा यांची राज्यसभा उपनेतेपदावरून उचलबांगडी

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून जनहिताचे विविध प्रश्न उपस्थित केल्याने आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्डा हे समाजमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले होते. मात्र एकीकडे राघव चड्डा हे जनमानसात लोकप्रिय होत असतानाच आम आदमी पक्षाने त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. तसेच त्यांची पक्षाच्या राज्यसभेच्या उपनेतेपदावरून उचलबांगडी केली आहे. आम आदमी पक्षाने या संदर्भात राज्यसभा सचिवालयाला […] The post खासदार राघव चड्डा यांची राज्यसभा उपनेतेपदावरून उचलबांगडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 3:32 pm

रायलसिमा एक्सप्रेसचा परभणीपर्यंत विस्तार करा : खा. संजय जाधव यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्याना साकडे

परभणी : निझामाबाद ते तिरुपती एक्सप्रेस रेल्वेचा परभणीपर्यंत विस्तार करण्याच्या बालाजी भक्तांच्या मागणीची खा. संजय जाधव यांनी दखल देत आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी लेखी पत्र देऊन ही एक्प्रेस रेल्वे परभणीहून सोडण्याची मागणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून बालाजी भक्तांची मागणी असलेल्या निझामबाद- तिरुपती सुपर फास्ट रेल्वे गाडीला परभणी येथून सोडण्यात यावी […] The post रायलसिमा एक्सप्रेसचा परभणीपर्यंत विस्तार करा : खा. संजय जाधव यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्याना साकडे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 3:30 pm

भोंदूबाबा अशोक खरातचा नवा खेळ उघड:शेकडो खात्यांचा नॉमिनी बनून कोट्यवधींचे व्यवहार? आधार-पॅनचा गैरवापर करून उभं केलं साम्राज्य

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत असून आता या प्रकरणाला आर्थिक गैरव्यवहारांचा गंभीर वळण मिळत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या आरोपांनंतर आता आर्थिक व्यवहारांमध्येही मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केल्याचा संशय तपास यंत्रणांना आला आहे. अनेक नागरिकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्डचा वापर करून खरातने मोठे आर्थिक जाळे उभे केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने विविध पतसंस्थांमध्ये शेकडो बँक खात्यांवर स्वतःला नॉमिनी म्हणून नोंदवून घेतल्याचा संशय आहे. या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे अनेक खात्यांशी एकाच मोबाईल नंबरची लिंक आढळली असून तो नंबर स्वतः खरात वापरत असल्याचा संशय आहे. त्यामुळे या सर्व व्यवहारांवर त्याचा थेट ताबा होता का, याचा तपास सध्या सुरू आहे. दरम्यान, तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा समोर आला आहे. काही खात्यांमध्ये एका राजकीय व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीच्या नावाचाही वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खरातशी संबंधित विविध पतसंस्था, खातेधारक आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत एसआयटी अधिक खोलवर चौकशी करत आहे. या माध्यमातून निधीचा प्रवाह आणि व्यवहारांची साखळी उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर अशोक खरातच्या कारवायांचा आणखी एक मोठा पैलू उघडकीस येत आहे. बनावट ‘फार्मर प्रोड्यूसर कंपन्या’ स्थापन करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. केंद्र सरकारच्या नाफेडमार्फत होणाऱ्या शेतमाल खरेदी प्रक्रियेचा गैरफायदा घेत, बनावट कंपन्यांद्वारे व्यवहार केल्याचा संशय आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून कांदा, मका यांसारख्या पिकांच्या खरेदीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचे संकेत आहेत. आर्थिक आणि शेतकरी फसवणुकीचे धागेदोरे समोर व्यंकटेश फार्मर प्रोड्यूसर कंपनी, या नावाची कंपनी विशेष चर्चेत आली असून, या कंपनीत अशोक खरात आणि त्याची पत्नी संचालक असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय आणखी 15 ते 16 कंपन्यांमध्येही त्याचा सहभाग असण्याची शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात श्रीरामपूर येथील नीलेश शेडगे यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला असून, संबंधित अधिकाऱ्यांची ईडीमार्फत चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एकूणच, आधीच गंभीर असलेल्या या प्रकरणात नवे आर्थिक आणि शेतकरी फसवणुकीचे धागेदोरे समोर येत असल्याने तपास अधिकच गडद होत चालला आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 3:28 pm

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार:ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील व साहित्यिक प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांना जाहीर

साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील व साहित्यिक प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांना जाहीर झाला आहे. थोर समाजसेवक बाबा आमटे आणि त्यांच्या कार्याला खंबीर साथ देणाऱ्या साधनाताई आमटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे (१९२६–२०२६) औचित्य साधून २०२६ पासून 'साधनाताई बाबा आमटे सहजीवन गौरव पुरस्कार' एका दांपत्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष असून शाल, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पहार व एक लक्ष रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली. दगडू लोमटे हे गेली 40 वर्षे आनंदवनाशी जोडले आहेत. त्यांनी पुरस्कार सुरू करावा असा प्रस्ताव मांडला. संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी तो मान्य केला. पुरस्कार निवडीसाठी अमर हबीब, डॉ. शैलजा बरुरे व बालाजी सुतार यांची निवड समिती नेमली होती. त्यात दगडू लोमटे व डॉ. शुभदा लोहिया यांनी संस्थेचे सदस्य म्हणून काम केले. या पुरस्काराचा वितरण समारंभ, ठिकाण व तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. अनुराधा पाटील अनुराधाताई पाटील यांनी ’दिगंत’, ’तरीही’, ’दिवसेंदिवस’, ’वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’, ’कदाचित अजूनही’, ’आता वह्या सगळ्या बुडीत खाती’ हे कवितासंग्रह, ’नवसाला पावली डॉक्टरीण’ हा प्रौढ साक्षरांसाठी दीर्घ कथासंग्रह व ’दरअसल’, ’अनुराधा पाटील री टाळावीं मराठी कवितावां’ राजस्थानी व ’हत्या केवल शब्द नही हैं’ हे हिंदी अनुवादित कविता संग्रह प्रकाशित आहेत. त्याच बरोबर उडिया कविता, हिंदी कथा व कवितांची मराठीतील भाषांतरे प्रकाशित आहेत. त्यांच्या कवितांचे हिंदी, उर्दू, उडिया, पंजाबी, राजस्थानी, मल्याळम, बंगाली, जपानी, इंग्रजी या भाषेतील नियतकालिकेतून त्यांचे साहित्य अनुवादित होऊन प्रकाशित झाले आहे. त्यांच्या साहित्य कार्याला साहित्य अकादमी, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील मान्यताप्राप्त साहित्य संस्थांचे मानाचे २५ हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार निवड समितीच्या तज्ज्ञ परीक्षक, जैन फौउंडेशन पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्ष, राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय (विविधभाषा) कवी संमेलन, चर्चा सत्रे, प्रतिष्ठेच्या केरळ साहित्य महोत्सव, जयपूर साहित्य महोत्सव, मुंबई साहित्य महोत्सवात मराठी भाषेच्या कवी म्हणून निवड झाली होती. विविध भाषिक संमेलनाच्या उद्घाटक, अनेक संमेलनात व आकाशवाणी दूरदर्शनवर मुलाखती झाल्या. शालेय अभ्यासक्रमात व अनेक विद्यापीठात मराठी अभ्यासक्रमात त्यांची अनेक पुस्तके लागलेली आहेत. मराठवाडा साहित्य परिषद, , प्रतिष्ठान मासिकाचे संपादक मंडळ, साहित्य अकादमी महाराष्ट्र, राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, भारतीय भाषा परिषद कलकत्ता या संस्थांचे त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे. महत्वाचे साहित्य अकादमी दिल्ली येथे पाच वर्षे सदस्य म्हणून उत्तम कार्य केले आहे. प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील कौतिकराव ठाले पाटील हे उत्तम प्रशासक, लेखक, संघटक, शिक्षणतज्ज्ञ म्हणून सुपरिचित आहेत. त्यांची ’संमेलनाच्या मांडवाखालून’, ’मराठी भाषिक आणि साहित्य– संकृती’, हे ग्रंथ व ’वाचनवेध’, ’शेतकऱ्याचा आसूड’, व प्रतिष्ठानच्या अनेक विशेषांकाचे संपादन केले आहे. महात्मा गांधी मिशन, संभाजीनगर, व परळी, माहूर, येथील साहित्य सेवा पुरस्कारा बरोबरच महाराष्ट्र शासनाचा मंगेश पाडगावकर ’भाषा संवर्धन पुरस्कार’ प्राप्त आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे दोन वर्षा पेक्षा जास्त काळ प्रशासक म्हणून कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, भाषा मंडळाचे अध्यक्ष व कला शाखेचे अधिष्ठाता म्हणून कार्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते कांहीं काळ हंगामी कुलगुरू म्हणून कार्यरत होते. मराठी भाषेच्या अध्यापनापासून सुरू झालेली मराठी साहित्याची सेवा ते आजही करीत आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचे काही काळ सचिव व 26 वर्षांपेक्षा अधिक परिषदेचे अध्यक्ष म्हणून महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले व करीत आहेत. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे ते तीन वर्षे सचिव व दोन वेळा 6 वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी कारकिर्द गाजवली आहे. नॅशनल बुक ट्रस्ट दिल्लीचे भाषा सल्लागार व साहित्य अकादमी दिल्लीचे व महाराष्ट्र शासन साहित्य पुरस्कार समितीचे पाच वर्षे सदस्य म्हणून काम केले. राष्ट्रीय भाषा चर्चा सत्रातील त्यांचा सहभाग, कार्यशाळेतील त्यांची भाषणे दिशादर्शक ठरली आहेत. 2004 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे पारपडलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते. हे संमेलन सर्वार्थाने मराठी साहित्यातील मूल्य संस्कृतीची श्रीमंती दर्शविणारे ठरले होते. विश्व मराठी साहित्य संमेलनाची कल्पना प्रथम त्यांनी मांडली. प्रचंड टीका व विरोधाला न डगमगता त्यांनी अमेरिका व दुबई येथे ही संमेलने घेतली. मराठवाडा साहित्य परिषदेचा विस्तार व प्रादेशिक संमेलने घेऊन महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या दोघांच्या साहित्य कार्याचा महत्त्वपूर्ण सहभाग व महत्व पाहता अनुराधाताई पाटील व कौतुकराव ठाले पाटील यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 3:27 pm

अश्विनी बोर्डे राष्ट्रीय ‘नारी रत्न’ पुरस्काराने सन्मानित

परभणी : मागील अनेक वर्षांपासून कुठलाही गाजावाजा न करता निराधार व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य भेट देण्यासह आवश्यक ती मदत देण्याचे कार्य परभणी शहरातील आचार्य नगर मधील रहिवासी असलेल्या अश्विनी गोपाळराव बोर्डे करीत आहेत. या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्रच्या वतीने अश्विनी बोर्डे यांना राष्ट्रीय नारी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले […] The post अश्विनी बोर्डे राष्ट्रीय ‘नारी रत्न’ पुरस्काराने सन्मानित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 3:27 pm

शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा पुन्हा बदलला

मुंबई : गेल्या काही काळापासून वादाचा मुद्दा राहिलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात पुन्हा बदल करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतून जाणारा हा मार्ग आता सातारा जिल्ह्यातूनही जाणार आहे. त्यामुळे ८०२ किलोमीटरच्या या मार्गाची लांबी आता ८५६ किलोमीटरवर गेली आहे. नागपूर-गोवा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग म्हणजेच महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाच्या आखणीला फेब्रुवारी २०२४मध्ये मान्यता देण्यात आली […] The post शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा पुन्हा बदलला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 3:21 pm

…मोठ्या मनाने मला क्षमा करा

नागपूर : प्रतिनिधी रोखठोक आणि परखड मतांसाठी नेहमीच चर्चेत राहणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहेत. नागपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी मनुस्मृतीबद्दल केलेल्या विधानावरून गेल्या दोन दिवसांपासून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. या वक्तव्यानंतर सर्वच स्तरांतून त्यांच्यावर टीकेचा वर्षाव सुरू झाला होता. या वादाचे गांभीर्य लक्षात घेता, शरद पोंक्षे यांनी त्यांची […] The post … मोठ्या मनाने मला क्षमा करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 3:15 pm

बळिराजा पुन्हा संकटात!

धुळे : प्रतिनिधी निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि भीषण गारपिटीमुळे रबी पिकांचे कंबरडे मोडले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी पूर्णत: हवालदिल झाला आहे. निसर्गाचा कोप थांबण्याचे नाव घेत नसून, बुधवारी धुळे जिल्ह्याच्या साक्री आणि शिंदखेडा […] The post बळिराजा पुन्हा संकटात! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 3:08 pm

'आयएएस' तुकाराम मुंढे यांना मातृशोक:आईचे पुण्यात झाले निधन, उद्या बीड जिल्ह्यातील ताडसोना या मूळगावी होणार अंत्यसंस्कार

'आयएएस' तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांचे वय शंभर असल्याचे समजते. त्यांच्यावर बीड जिल्ह्यातील ताडसोना या मूळगावी उद्या 3 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. तुकाराम मुंढे हे पश्चिम बंगालच्या निवडणूक कर्तव्यावर आहेत. त्यांना आईच्या निधनाची माहिती समजताच हे पुण्याकडे रवाना झालेत, अशी माहिती मुंढे परिवाराकडून देण्यात आली. आसराबाई मुंढे यांना गावकरी, कुटुंबीय, नातेवाईकांनी श्रद्धांजली अर्पण केली.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 3:01 pm

एकनाथ शिंदेंच्या नावावरून थेट पोलिसांची फसवणूक:मी OSD, म्हणत थेट पोलिस कार्यालयात प्रवेश; हिंजवडीत आरोपी अटकेत

पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून स्वतःला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी यंत्रणेत ओएसडी पदाला असलेला मान आणि प्रभाव याचा गैरफायदा घेत आरोपीने थेट पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश मिळवला. या प्रकरणामुळे प्रशासनातही खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रद्युम्न श्रीहरी पाटील (वय 47, रा. हिंजवडी) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने स्वतःला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातील ओएसडी असल्याचे सांगत पुण्यातील परिमंडल एकचे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांच्या कार्यालयात थेट प्रवेश केला. कोणतीही अधिकृत ओळख नसताना अशा पद्धतीने सरकारी कार्यालयात घुसखोरी केल्याने हा प्रकार गंभीर मानला जात आहे. ओएसडी पद हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या कामकाजासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या पदावरील व्यक्ती अनेकदा प्रशासकीय कामे पाहत असल्याने त्यांचा प्रभाव मोठा असतो. याच पार्श्वभूमीवर आरोपीने त्या पदाचा धाक दाखवत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, पोलिसांनी वेळीच सावधगिरी बाळगत या संशयास्पद हालचालींची दखल घेतली. कठोर कारवाई करण्याची यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपासात त्याने अशाच प्रकारे इतरत्रही स्वतःची बनावट ओळख वापरली आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे शासकीय यंत्रणेत ओळख पडताळणीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून अशा बनावट अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 2:50 pm

करवसुलीत नवी मुंबई महापालिकेचा विक्रम:876 कोटींचा टप्पा पार; डिजिटल पद्धतीचा फायदा,अभय योजनेचा मोठा परिणाम

नवी मुंबई महानगरपालिकेने 2025-26 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीत उल्लेखनीय यश मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत तब्बल 876 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असून, महापालिकेच्या स्थापनेनंतर एका वर्षात झालेली ही सर्वाधिक कर वसुली ठरली आहे. विशेष म्हणजे, एमएमआरडीए क्षेत्रातील इतर महापालिकांच्या तुलनेतही नवी मुंबई महापालिका करवसुलीत आघाडीवर राहिली आहे. नियोजनबद्ध मोहिमा आणि अभय योजनेचा प्रभाव यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कर वसुली प्रक्रियेत पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर हा या यशाचा महत्त्वाचा घटक ठरला. नागरिकांना ऑनलाईन माध्यमातून कर भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे एकूण वसुलीपैकी सुमारे 60 टक्के रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा झाली आहे. याशिवाय एसएमएस, व्हॉट्सअॅप संदेश, नोटीस आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला. यामुळे करदात्यांचा प्रतिसाद वाढला आणि वसुली प्रक्रियेला गती मिळाली. सुट्ट्यांच्या दिवशीही कर संकलन केंद्र सुरू ठेवून महापालिकेने विशेष प्रयत्न केले. थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी 10 मार्च ते 31 मार्च 2026 दरम्यान अभय योजना राबवण्यात आली होती. या योजनेअंतर्गत निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्ता कराची थकबाकी एकरकमी भरल्यास विलंब शुल्कात 50 टक्क्यांची सवलत देण्यात आली. या सवलतीमुळे अनेक मालमत्ताधारकांनी थकबाकी भरून प्रतिसाद दिला, ज्याचा थेट फायदा महसूल वाढीस झाला. सोयीस्कर सेवा देण्याचा प्रयत्न महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने केलेल्या नियोजनबद्ध कार्यपद्धती, डिजिटल सुविधा आणि नागरिकांशी सातत्याने संवाद या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामामुळे यंदाची करवसुली विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. भविष्यातही अशाच पद्धतीने अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर सेवा देण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 2:30 pm

जमिनीच्या व्यवहारावरून अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल वादाच्या भोवऱ्यात:मावळमधील 30 गुंठे जमिनीवरून कोर्टात वाद

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचे पती गोल्डी बेहल यांच्याविरोधात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जमिनीच्या व्यवहारावरून कायदेशीर वाद निर्माण झाला आहे. उकसान गावातील सुमारे 30 गुंठे जमिनीच्या खरेदीत नियमभंग आणि फसवणूक केल्याचा आरोप करत स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे या सेलिब्रिटी जोडप्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दाव्यात मौजे उकसान येथील सर्व्हे क्रमांक 121/1 मधील जमीन परस्पर खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदार चंद्रकांत शिंदे यांच्या वतीने वकील वनराज शिंदे यांनी ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमीन ही त्यांच्या कुटुंबाच्या वहिवाटीत असून 1957 पासून त्यांच्या आजोबा केसू बाबाजी शिंदे यांच्या नावावर आहे. त्यामुळे या जमिनीवर कुळ हक्क असल्याचा दावा करण्यात आला आहे. तक्रारदारांच्या मते, मूळ मालकाने ही जमीन बेकायदेशीरपणे दुसऱ्या व्यक्तीला विकली आणि त्यानंतर कुळ हक्काची माहिती लपवून ती पुढे सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांना विकण्यात आली. याशिवाय, डिसेंबर 2025 मध्ये या जागेवर भेट दिली असता सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांनी तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांशी वाद घातल्याचाही आरोप करण्यात आला आहे. फक्त सातबारा आणि खरेदीखतावर नाव असणे म्हणजे मालकी सिद्ध होत नाही. कुळ हक्क लपवून व्यवहार करण्यात आला आहे, असा दावा तक्रारदारांच्या वकिलांनी केला आहे. दरम्यान, या सर्व आरोपांना बचाव पक्षाने ठामपणे फेटाळले आहे. सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांच्या वतीने वकील राजू शिंदे यांनी सांगितले की, संबंधित जमीन प्रत्यक्षात सोनाली बेंद्रे यांच्या नावावर नाही, त्यामुळे त्यांचा या व्यवहाराशी थेट संबंध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच 8 जून 1965 रोजी तत्कालीन तहसीलदारांनी दिलेल्या आदेशानुसार केसू शिंदे हे त्या जमिनीचे मालक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष याशिवाय, यापूर्वीही या प्रकरणावर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी स्तरावर अनेक वेळा सुनावण्या झाल्या असून प्रत्येक वेळी निर्णय तक्रारदारांच्या विरोधात गेला असल्याचा दावा बचाव पक्षाने केला आहे. ऑक्टोबर 2025 मध्येही मावळ तहसीलदारांनी तक्रारदारांचे अपील फेटाळले होते. त्यामुळे केवळ पैसे उकळण्यासाठी वारंवार हे प्रकरण उकरून काढले जात असल्याचा आरोप बचाव पक्षाने केला आहे. आता या प्रकरणावर न्यायालयात पुढील सुनावणी काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 2:05 pm

शासकिय रुग्णालयात सामाजिक कार्यकर्त्याची गांधीगिरी:लिफ्टच्या दरवाजावर वाहिली फुले, गणवेशात नसलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

हिंगोलीचया शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील बंद लिफ्टच्या दरवाजावर फुले वाहून तसेच गणवेशात नसलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करून सामाजिक कार्यकर्ते निनाजी कांडेलकर यांनी गुरूवारी ता. २ गांधीगिरी केली. या शिवाय मुख्य प्रवेशद्वारावरही त्यांनी फुले वाहिली. त्यांच्या गांधीगिरीनंतर तरी रुग्णालय प्रशासनाला जाग येणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील एमआरआय मशीन सुरुच करण्यात आली नाही. कोट्यावधी रुपये खर्चुन रुग्णांसाठी उपलब्ध केलेली मशीन अद्यापही सुरुच झाली नसल्याने रुग्णांची एमआरआयसाठी नांदेडवारी सुरुच आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या शिवाय रुग्णालयातील लिफ्ट बंद असून शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील वॉर्डमध्ये नेतांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागले. लिफ्ट सुरु करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते कांडेलकर यांनी वेेळोवेळी केली मात्र त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. यासोबतच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही अनेक कर्मचारी गणवेश परिधान करून येत नाहीत. त्यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक कोण अन रुग्णालयातील कर्मचारी कोण याची ओळख होत नाही. विशेष म्हणजे रुग्णालयाचे आधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी गणवेशामध्ये कर्तव्यावर हजर रहावे असे स्पष्ट आदेश असतांनाही त्यांच्या आदेशाकडे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र होते. या सर्व प्रकारामुळे सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्ण कल्याण समितीचे माजी सदस्य निनाजी कांडेलकर यांनी आज रुग्णालयाच्या लिफ्टच्या दरवाजावर फुले वाहिली. त्यानंतर एमआरआय विभागात जाऊन मशीनला फुले वाहिली तर तेथील कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला यासोबतच गणवेश परिधान न करता कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व अधिष्ठाता डॉ. मुंगल यांनी काढलेल्या आदेशाचे पालन करावे अशी विनंती करून गांधीगिरी केली.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 1:49 pm

राष्ट्र सेवा दलाचा पुणे येथे निर्धार मेळावा:संविधान मूल्यांच्या संवर्धनासाठी 4 अन् 5 एप्रिल रोजी आयोजन

राष्ट्र सेवा दलाचा निर्धार मेळावा 4 व 5 एप्रिल 2026 रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. साने गुरुजी स्मारक येथे होणाऱ्या या मेळाव्यात राज्यभरातून 500 हून अधिक सक्रिय कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. संविधान मूल्यांच्या संवर्धनासाठी कृती आराखडा निश्चित करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त तसेच महाडच्या चवदार तळ्याच्या संघर्षाच्या शताब्दीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे. बदलत्या राष्ट्रीय परिस्थितीत संघटनेला नव्या जोमाने उभारी देण्यासाठी आणि राज्य व देशातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून धोरणात्मक चर्चा करण्यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्र सेवा दलाने सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकशाही चळवळींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महाराष्ट्रात अनेक जनआंदोलने उभी करून विविध क्षेत्रांत नेतृत्व घडवण्याचे कार्य या संघटनेने केले आहे. मेळाव्याच्या पहिल्या दिवशी, शनिवार, 4 एप्रिल रोजी सायंकाळी 'गांधी टॉक' या चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण होणार आहे. यावेळी दिग्दर्शक किशोर बेळेकर यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रविवार, 5 एप्रिल रोजी सकाळी ध्वजारोहण व उदघाटन समारंभ पार पडेल. या मेळाव्याचे उदघाटक म्हणून संपादक संजय आवटे आणि सचिन गोस्वामी उपस्थित राहतील. 'आजचा आणि पुढचा भारत' या विषयावर मार्गदर्शनासाठी प्रा. डॉ. अजय गुडावर्थी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. 'साधना'चे संपादक विनोद शिरसाठ आणि विवेक सावंत हे देखील उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात विविध विषयांवर गटचर्चा करून त्यावर सादरीकरण केले जाईल, ज्यामुळे पुढील दिशा निश्चित केली जाईल. सायंकाळी समारोपाने या दोन दिवसीय मेळाव्याची सांगता होईल. या मेळाव्यास राज्यभरातून किमान 500 क्रियाशील कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती मेळाव्याचे प्रमुख प्रकाश कांबळे यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील संजय गायकवाड, विलास किरोते, दत्ता पाकिरे, संदेश दिवेकर, बाळासाहेब गायकवाड, प्रकाश डोंबाळे, भिमराव अडसूळ, अश्विनी सातव आणि मनिषा पाटील हे कार्यकर्ते आयोजनात सक्रिय सहभागी आहेत.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 1:33 pm

लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेलो, राजकीय चर्चा नाही:शिंदे गटाच्या स्नेहभोजनावरून राजकारण तापलं; ठाकरेंच्या नेत्याचा खुलासा

शिवसेना शिंदे गटाच्या स्नेहभोजनानंतर निर्माण झालेल्या राजकीय चर्चांवर आता ठाकरे गटाच्या खासदारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नांदेडचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आम्ही केवळ शुभेच्छा देण्यासाठीच गेलो होतो, कोणत्याही राजकीय चर्चेसाठी नाही, असं स्पष्ट केलं आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या खळबळीला उत्तर देताना त्यांनी ऑपरेशन टायगर, सारख्या चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं सांगितलं. केंद्रीय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या डिनर कार्यक्रमाला ठाकरे गटाचे दोन खासदार, नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख हजर राहिले होते. या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं. विशेषत: राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा रंगत असताना या भेटीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे ही केवळ सामाजिक भेट की त्यामागे राजकीय संदेश आहे, याबाबत चर्चा सुरू झाली. मात्र नागेश आष्टीकर यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सांगितलं की, प्रतापराव जाधव यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होता आणि सभागृहातच त्यांनी निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे आम्ही त्यांच्या घरी जाऊन 5 ते 10 मिनिटांत शुभेच्छा देऊन परतलो. याचा अर्थ कुठल्याही गुप्त बैठकीचा किंवा राजकीय हालचालींचा लावू नये, असं त्यांनी स्पष्ट केलं. एकाच सभागृहातील सदस्य असल्याने सुख-दु:खात भेटणं स्वाभाविक आहे, असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपशी संबंधित मोहित कंबोज यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्या पार्श्वभूमीवर आष्टीकर यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सांगितलं की, त्या भेटीचा आणि आमच्या उपस्थितीचा काहीही संबंध नाही. आदित्य ठाकरे हे आमचे नेते आहेत, आम्ही त्यांच्याच नेतृत्वात काम करतो. प्रतापराव जाधव यांच्या घरी जाणं ही फक्त सौजन्याची भेट होती, असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं. ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे सहा आणि शरद पवार गटाचे सहा खासदार आपल्या बाजूला वळवण्याची रणनीती आखली असल्याची चर्चा आहे. सध्या शिंदे गटाकडे सात खासदार असून, ही संख्या 19 पर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. मात्र या हालचालींना भाजपकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नसल्याची माहिती सूत्रांकडून दिली जाते. त्यामुळे सध्या तरी या भेटीमुळे निर्माण झालेलं राजकीय वातावरण आणि चर्चांचा वेग कायम असला, तरी ठाकरे गटाने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 1:31 pm

प्रवीण मसाले कंपनीच्या कार्यालयात आग:शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय; जीवितहानी नाही, मोठे नुकसान

पुण्यातील हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या प्रवीण मसाले कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात गुरुवारी अचानक आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची चार वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. जवानांनी तत्परतेने परिस्थिती हाताळत बी.ए. सेट परिधान करून धुराने भरलेल्या कार्यालयात प्रवेश केला. त्यांनी दोन्ही जिन्यांच्या साहाय्याने वरती पाण्याच्या लाईन नेल्या आणि कार्यालयाच्या खिडक्या उघडून धूर बाहेर जाण्यास मार्ग मोकळा केला. यानंतर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. जवानांच्या वेगवान आणि नियोजनबद्ध कामगिरीमुळे आग इतर भागात पसरू न देता वेळेत विझवण्यात यश आले. या आगीत कार्यालयातील एसी, फर्निचर, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. सदर आगी मध्ये नेमके किती नुकसान झाले आहे याबाबतचा पंचनामा पोलिसांकडून करण्यात येत आहे. या बचावकार्यामध्ये हडपसर अग्निशमन केंद्रासह बी.टी. कवडे रोड, काळेपडळ अग्निशमन केंद्र आणि सेंट्रल फायर स्टेशन येथील जवानांचा सहभाग होता. सर्वांनी समन्वयाने काम करत परिस्थिती लवकर नियंत्रणात आणली. घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आग आटोक्यात आल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. पुढील तपास सुरू असून नुकसानाचे नेमके मूल्यांकन करण्यात येत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 1:31 pm

शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले:तक्रार अर्जाच्या चौकशीसाठी मागितले होते दोन हजार रुपये

शिरूर तालुक्यातील कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीतील एका कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. तक्रार अर्जाची चौकशी करून वरिष्ठांकडे अहवाल पाठवण्यासाठी त्याने ही लाच मागितली होती. भरत पोपट गायकवाड (वय ४६, रा. कान्हूरमेसाई, ता. शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी गायकवाड याच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कान्हूरमेसाई गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या जागेत गावातील काही जणांनी अतिक्रमण करून घर बांधले होते. तसेच, ग्रामसेवकाने कोणतीही कागदपत्रे न पाहता ‘८ अ’ उतारा तयार करून दिला होता. याबाबत तक्रारदाराने गटविकास अधिकारी, पंचायत समिती, शिरूर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. गटविकास अधिकाऱ्यांनी हा अर्ज कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक घासले यांच्याकडे चौकशीसाठी पाठवला होता. याच अर्जाची चौकशी करून गटविकास अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी गायकवाड याने तक्रारदाराकडे सुरुवातीला दहा ते पंधरा हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तडजोडीअंती गायकवाड याला दोन हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला आणि गायकवाड याला रंगेहाथ पकडून अटक केली. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त सतीश वाळके आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 1:28 pm

हिंजवडीत 27 लाखांचे एमडी जप्त, दोन आरोपी गजाआड:पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी मोहीम यशस्वी

हिंजवडी पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई केली आहे. एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 27 लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी ही माहिती दिली आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत 24 मार्च 2026 रोजी ही कारवाई करण्यात आली. हिंजवडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ पांचाळ आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथक हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विनोदे वस्ती, वाकड परिसरात एक व्यक्ती चारचाकी वाहनातून एमडी अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि अतुल शंकर बालगुडे (वय 35, रा. पाथरगाव, ता. मावळ, जि. पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 42 ग्रॅम वजनाचा, सुमारे 4 लाख 20 हजार रुपये किमतीचा एमडी अंमली पदार्थ आणि 3 लाख 24 हजार 200 रुपये किमतीचे चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. तपासादरम्यान, बालगुडेचा साथीदार शाहरुख उर्फ सद्दाम इक्बाल अन्सारी (रा. गोवंडी, मुंबई) यालाही मुंबईतून अटक करण्यात आली. अन्सारीकडून 200 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची किंमत सुमारे 20 लाख रुपये आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ पांचाळ करत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलिसांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 1:24 pm

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता कायम:सभापती पदाची निवडणूक बिनविरोध, औपचारिकता बाकी

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सभापती पदावरही भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. अध्यक्षपदानंतर आता सभापती पदाची निवडणूकही बिनविरोध होणार आहे, ज्यामुळे भाजपची सत्ता अधिक मजबूत झाली आहे. महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील डोणगावकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून वरून पाथ्रीकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले होते. मात्र, निर्धारित वेळेत अर्ज दाखल न केल्याने त्यांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सभापती पदासाठीची निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे. भाजपने मीनाक्षी पवार आणि अनिता मोठे यांना सभापती पदासाठी संधी दिली आहे. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून बालाजी सोनटक्के आणि अपक्ष असूनही भाजप पुरस्कृत सचिन गरड यांचाही समावेश आहे. दुपारी दोन वाजेनंतर अधिकृत विजयाची घोषणा अपेक्षित आहे. यापूर्वी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेना गट एकत्र येऊन भाजपविरोधात समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा होती. मात्र, भाजपने अपक्ष सदस्यांची साथ मिळवत सत्ता आपल्या बाजूने खेचण्यात यश मिळवले. यामुळे जिल्हा परिषदेवर भाजपचे वर्चस्व अधिक बळकट झाले आहे. कृष्णा डोंणगावकरांनी घेतला होता अर्ज उबाठा गटाचे जिल्हा परिषद सदस्य कृष्णा डोंणगावकर यांनी पक्षाचा 'व्हीप' झुगारत उमेदवारी अर्ज विकत घेतला. यानंतर त्यांनी शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांची भेट घेत तुमचे आणि भाजपचे पटत नसेल, तर तटस्थ राहण्याऐवजी मला मतदान करून मदत करा, असे म्हटले. मात्र दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असताना त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. यामुळे आता भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 1:15 pm

पुण्यात भोंदूबाबा 'मामा'चे कारनामे:चांडोलीतल्या शिवदत्त आश्रमात महिलांचे लैंगिक शोषण; महाराज नवनाथ गवळीविरोधात गुन्हा, पीडितेने मांडली कैफियत

नाशिकच्या अशोक खरातचे लैंगिक शोषण प्रकरण सुरू असतानाच आता नेमका असाच प्रकार पुणे जिल्ह्यातल्या शिवदत्त आश्रमात समोर आलाय. या प्रकरणी नवनाथ पंढरीनाथ गवळी उर्फ मामा या भोंदूबाबाविरोधात राजगुरू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झालीय. त्यानंतर हा भोंदूबाबा फरार झाल्याचे समजते. पुण्यातल्या या भोंदूबाबाविरोधात तक्रार देऊनही पोलिस कारवाई करत नाहीत, असा आरोप पीडितेने एका व्हिडिओद्वारे केलाय. खरेच पोलिस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत का, अशी चर्चा आता सुरू झालीय. नेमके प्रकरण काय? पुण्यातील खेड तालुक्यात चांडोलीमध्ये नवनाथ गवळी हा शिवदत्त आश्रम चालवतो. त्याला अनेकजण आदराने मामा म्हणतात. हा मामा आश्रमात आलेल्या महिलांशी अश्लील चाळे करतो. अनेकांकडे त्यांने शारीरिक संबंधांची मागणी केली. महिलांचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचे समोर आले आहे. महिलेने दाखवले धाडस भोंदूबाबाच्या या छळाविरोधात एका महिलेने धाडस दाखवत राजगुरूनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर आरोपी फरार झाला. मात्र, त्यावर कसलिही कारवाई होत नाही, अशी खंत पीडित महिलेने एका व्हिडिओद्वारे मांडली आहे. दरम्यान, भोंदू पंढरीनाथ गवळीच्या शोधासाठी पथके रवाना झाल्याचे समजते. पीडिता काय म्हणाली? पीडित महिलेने एका व्हिडिओतून आपली कैफियत मांडली. ती म्हणाली, ‘नवनाथ पंढरीनाथ गवळी असा हा भोंदूबाबा. ज्याच्या आश्रमात मी काही दिवसांपूर्वी जात होते. त्याने माझ्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. हीच गोष्ट मी माझ्या मिस्टरांना सांगितली. माझ्या मिस्टरांनी मला विश्वासात घेऊन पोलिस कंप्लेन केली.' अजून कारवाई नाही पीडिता पुढे म्हणाली की, 'आम्ही पोलिसांत तक्रार दिली. मात्र, अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. मला असे वाटते, माझ्याबाबत जो प्रकार झाला. तोच प्रकार कोणत्याही महिलेबाबतीत होऊ नये. त्यामुळे याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. याचा आश्रम चांडोली येथे आहे. याला सगळे मामा मामा म्हणून बोलतात. मात्र, याचे भोंदूगिरीचे प्रकार अजूनही सुरूच आहेत.’ अशोक खरातची पुनरावृत्ती नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातने महिला भाविकांचे लैंगिक शोषण केले. त्याने विविध पूजा, विधी याचे निमित्त साधून महिलांशी शोषण केल्याचे समोर आले आहे. त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर सरकारने हे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याविरोधातही कारवाई करणे सुरू केले. मात्र, पुण्यातला हा बाबा भोंदूबाबा अजूनही फरार आहे. वसईतही भोंदूबाबा वसईतील एका स्वयंघोषित भोंदू बाबाचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. स्वतःला शंकर म्हणवून घेत मी शंकर, तर तू माझी पार्वती आहेस असे सांगत एका महिलेवर बलात्कार करणाऱ्या ऋषिकेश वैद्य याच्याविरुद्ध वसईच्या माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भोंदूबाबाला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 1:14 pm

मोठ्याने बोला! न्यायालयात अशोक खरात गोंधळला; हात जोडून दिलं उत्तर:न्यायाधीशांचे दोन प्रश्न, खरात मूक; नेमके काय घडले

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज जिल्हा सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली. सुरक्षेच्या कारणास्तव आरोपी अशोक खरात याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. विशेष तपास पथकाने यासाठी अर्ज केला होता, जो न्यायालयाने मान्य केला. न्यायालयात चार स्क्रीनच्या माध्यमातून ही ऑनलाईन सुनावणी पार पडली. या प्रकरणाचे तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी आणि सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली. सुनावणीदरम्यान सुरुवातीलाच न्यायाधीशांनी आरोपीला त्याचे नाव विचारले. मात्र आवाज स्पष्ट ऐकू न आल्याने न्यायाधीशांनी जरा मोठ्याने बोला, असे सांगितले. त्यानंतर पुढील प्रश्न विचारण्यात आला की, तुमचे वकील म्हणून भाटे वकील इथे बाजू मांडत आहेत, तेच तुमचे वकील आहेत का? यावर अशोक खरातने होकारार्थी उत्तर दिले. सुनावणीच्या शेवटी न्यायाधीशांनी त्याला तुम्हाला काही सांगायचे आहे का? असा प्रश्न विचारला असता, खरातने हात जोडून नाही असे उत्तर दिले. या सुनावणीत तपास अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप न्यायालयासमोर मांडले. त्यांनी सांगितले की, आरोपीकडून एका महिलेसोबत अत्याचार करण्यात आला असून ती गर्भवती राहिली होती. त्यानंतर तिला काही औषधे देऊन गर्भपात घडवून आणल्याचा संशय आहे. ही औषधे कुठून आणली, त्यामध्ये नेमके काय होते, याचा तपास अद्याप सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आरोपी पीडितांकडून आधारकार्ड आणि पॅनकार्ड मागत होता, त्यामागील उद्देश काय होता, याचाही तपास बाकी असल्याचे सांगण्यात आले. सरकारी वकिलांनीही या प्रकरणातील गंभीर बाजू अधोरेखित केली. त्यांनी न्यायालयात सांगितले की, आरोपी पीडित महिलांना फसवण्यासाठी तू अप्सरा आहेस, अशा शब्दांचा वापर करत होता. जडीबुटीच्या नावाखाली दिली जाणारी औषधे नेमकी काय होती, हे शोधणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच पीडितांच्या नातेवाईकांकडून कागदपत्रे मागण्यामागे मालमत्तेचा काही डाव होता का, याचाही तपास करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे तपासासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली. दुसरीकडे, बचाव पक्षाने या मागणीला विरोध केला. आरोपीच्या वकिलांनी सांगितले की, हा दुसरा गुन्हा असून याआधीच 14 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. तसेच अद्याप त्यांच्याकडे पूर्ण फिर्याद पोहोचलेली नाही. गर्भपाताच्या आरोपांबाबतही नेमका कालावधी काय होता, हे स्पष्ट नाही, असे त्यांनी मांडले. सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यावरही गुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. सरकारी वकिलांनी पुन्हा युक्तिवाद करताना आरोपी हा मास्टरमाईंड, असल्याचा दावा केला. गंभीर स्वरूपाचे गुन्हे करण्यात आले असून आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे सखोल चौकशीसाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे स्पष्ट करत त्यांनी कोठडी वाढवण्याचा आग्रह धरला. या सर्व युक्तिवादानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवत दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. खरात याला 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी शेवटी न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत अशोक खरात याला 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. म्हणजेच पुढील सात दिवस एसआयटीला तपासासाठी मिळणार आहेत. या कालावधीत प्रकरणातील विविध पैलूंवर सखोल चौकशी होण्याची शक्यता आहे. वाढत्या आरोपांमुळे आणि नव्या खुलाशांमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनत असून पुढील सुनावणीपर्यंत काय नवे उघड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 1:11 pm

७१ लाख बहिणींना योजनेतून वगळले

मुंबई : प्रतिनिधी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लाडकी बहीण योजनेचे श्रेय अनेकांनी घेतले. निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून निकष, नियम न बघता राज्याच्या तिजोरीतून पैसे वाटण्यात आले. आता आर्थिक बोजा पडू लागला म्हणून नियम, निकष लावण्यात आले आणि आता ७१ लाख बहीणींना त्यापासून वंचित केले जात असून एक प्रकारे महिलांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस […] The post ७१ लाख बहिणींना योजनेतून वगळले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 2 Apr 2026 12:55 pm

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत:मालमत्ता बळकावण्याचा कट अन् बळजबरीने गर्भपाताचा SIT ला संशय

महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे धागेदोरे आता अधिक खोलवर जात आहेत. खरातवर असलेल्या प्रचंड रागामुळे आणि त्याच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता, आजची न्यायालयीन सुनावणी अत्यंत कडक बंदोबस्तात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे पार पडली. विशेष तपास पथकाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी सुरक्षेच्या कारणास्तव खरातला न्यायालयात आणणे जोखमीचे असल्याचे अर्जाद्वारे कळवले होते. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्याने कोर्ट रूममध्ये चार मोठे स्क्रीन बसवून सुनावणी पार पडली. यावेळी आरोपी खरात, न्यायाधीश आणि वकील यांच्यात थेट संवाद झाला. महिलेचा गर्भपात घडवला सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात खरातच्या कृत्यांचा पाढा वाचला. खरातने एका महिलेला तू अप्सरा आहेस असे सांगून धार्मिक भुरळ घातली आणि तिचे लैंगिक शोषण केले. या अत्याचारातून पीडिता गर्भवती राहिली असता, खरातने तिला अज्ञात गोळ्या आणि जडीबुटीचे औषध देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. हे औषध त्याने कुठून आणले आणि यामागे आणखी कोणाचे हात आहेत, याचा तपास SIT करत आहे. खरातकडून तपासात सहकार्य नाही तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे की, खरात हा पीडितेच्या नातेवाईकांकडे वारंवार आधार कार्ड आणि पॅन कार्डची मागणी करत होता. याद्वारे तो संबंधितांची मालमत्ता स्वतःच्या नावावर हडपण्याच्या बेतात होता का? या दिशेने आता SIT ने तपासाची चक्रे फिरवली आहेत. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा दावाही सरकारी पक्षाने केला. खरातच्या वकीलाचा पोलिस कोठडीला विरोध सुनावणीदरम्यान न्यायाधीश बी. एन. ईचपुरानी यांनी खरातला तुला काही सांगायचे आहे का? असे विचारले, त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले. खरातच्या वकिलांनी कोठडीला विरोध करताना सांगितले की, ही घटना 2022 मधील असून आरोपीने यापूर्वी 14 दिवस कोठडी भोगली आहे, त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज नाही. मात्र, गुन्ह्याचे स्वरूप आणि खरातची गुन्हेगारी कार्यपद्धती पाहता, न्यायालयाने त्याला पुन्हा पोलिस कोठडी सुनावली. एका कुटुंबाला मृत्यचे भय दाखवून रचला ‘कुटिल डाव’ अध्यात्म आणि दैवी शक्तीच्या नावाखाली सर्वसामान्यांपासून धनिकांपर्यंत सर्वांनाच लुटणाऱ्या भोंदू खरातचे काळे कारनामे आता एकामागून एक समोर येत आहेत. भोंदूगिरीच्या बळावर त्याने केवळ लोकांची दिशाभूलच केली नाही, तर चक्क “मृत्यूची भीती’ दाखवून मोक्याच्या जमिनी कवडीमोल भावात लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिन्नरच्या मिरगाव येथील एका कुटुंबाने 1997 मध्ये 16 लाखांची शेतजमीन घेतली होती. शेजारीच जमीन घेणाऱ्या भोंदू खरातची या जमिनीवर नजर होती. त्याने ‘तुमची जमीन शापित असून ती न विकल्यास घरात अनर्थ होईल’, अशी अंधश्रद्धेची भीती घातली. दरम्यान, कुटुंबातील एका तरुण मुलीचा मृत्यू झाला. या घटनेचा गैरफायदा घेत खरातने, ‘जमीन न विकल्यास घरातील आणखी दोघांचा मृत्यू अटळ आहे’, अशी भीती दाखवत त्या कुटुंबाला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त केले. पत्नी कल्पना खरातच्या नावावर करून घेतली हडपलेली जमीन कुटुंब मुलीच्या मृत्यूनंतर भयग्रस्त असताना खरातने 2003 मध्ये आपला कुटिल डाव यशस्वी केला. 1997 मध्ये 16 लाखांना घेतलेली जमीन त्याने अवघ्या 4 लाखांत स्वतःच्या आणि पत्नी कल्पना खरातच्या नावावर करून घेतली. या जमिनीवर नंतर त्याने मंदिर उभारले, जेणेकरून कुणालाही संशय येऊ नये आणि कुणी विरोध करण्याचे धाडस करू नये. गरीब शेतकऱ्यांना भीती दाखवून जमिनी लाटताना खरातने अधिकाऱ्यांना हाताशी धरून या व्यवहारांवरील सरकारचा महसूलही बुडवल्याचेदेखील या भागातील रहिवाशांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 12:51 pm

अवकाळीग्रस्तांना दिलासा!:पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती

मराठावाडा, विदर्भ आणि राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. सर्वेक्षण करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणात पोलिसांकडून सर्व बाजूने योग्य तपास सुरू आहे. पोलिसांकडे जी माहिती येते आहे त्या आधारावर पोलिस काम करत आहे. कोणाकडे अजून काही माहिती असेल त्यांनी जर ती पोलिसांना दिली तर तपासाला चालना मिळेल. या प्रकरणी संपूर्ण चौकशी पारदर्शकपणे सुरू आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी कोणालाही सोडणार नाही असे सांगितले आहे. खरात प्रकरणी चौकशी सुरू चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, खरात प्रकरणी एसआयटी चौकशी सुरू आहे. त्यांना जे जमीनीचे गैरव्यवहार दिसून येतील त्यानंतर त्यावर आम्ही चौकशी करू. पोलिस तपास सुरू असताना दुसऱ्या चौकशा लावणे योग्य नाही. यापुढे कोणाला गैरफायदा घेता येणार नाही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, लाडकी बहीण योजनेचा काही लोकांनी गैरफायदा घेतला असेल तर शासन ते शोधून काढते. नंतर मात्र त्यांना लाभ होणार नाही. काही लोकांनी योजनेचा गैरफायदा घेतला तसा घ्यायला नको होता पण यापुढे त्यांना लाभ मिळणार नाही. राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील गोष्टींबद्दल मला काही माहिती नाही, असे म्हणत त्यांनी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहलेल्या पत्रावर बोलणं टाळले. राहुल गांधींवर टीका राहुल गांधी यांना 'वंदे मातरम'चा नेमका अर्थही माहित नाही. त्यांनी हे राष्ट्रगीत कधी मनापासून वाचले नाही आणि समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. वस्तुस्थिती तर अशी आहे की, त्यांना 'वंदे मातरम'च्या चार ओळीही नीट म्हणता येत नाहीत, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर राष्ट्रभक्तीच्या मुद्द्यावरून तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 12:31 pm

बारामती पोटनिवडणुकीची वाढली चुरस:तब्बल 30 जणांनी नेले उमेदवारी अर्ज; 6 एप्रिलला अर्ज भरण्याची अंतिम तारीख

बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा तापमानाचा पारा चढला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीने आता खऱ्या अर्थाने वेग घेतला आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात असताना, अचानक 30 जणांनी उमेदवारी अर्ज नेल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीभोवती रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. 6 एप्रिल रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होणार असून या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. पक्षाने बारामती शहर आणि तालुक्यात ‘घोंगडी बैठकां’च्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. कार्यकर्ते गावागावांत जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. केवळ विजयच नव्हे, तर दिवंगत अजित पवारांपेक्षा अधिक मतांनी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. 30 अर्जांनी वाढवली उत्सुकता महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, तब्बल 30 जणांनी अर्ज नेल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, यापैकी किती जण प्रत्यक्ष अर्ज भरतात? किती अर्ज वैध ठरतात? आणि किती जण माघार घेतात? यावरच या निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. राजकीय वर्तुळात बारामतीत एकतर्फी विजय होणार की थेट चुरस पाहायला मिळणार अशी एकच चर्चा सुरू आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीरबारामती पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रमही जाहीर झाला आहे: आतापर्यंत तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात सतीश कदम (हिंदुस्थान जनता पार्टी), सागर भिसे (अपक्ष), राजू घुटूकडे (न्यू राष्ट्रीय समाज पार्टी) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही उमेदवार बारामतीबाहेरील असल्याने स्थानिक पातळीवरील समीकरणे अजून स्पष्ट झालेली नाहीत. विरोधकांचा आक्रमक पवित्रा दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. “आम्ही आमचा उमेदवार उभा करणारच. मी स्वतः उभा राहणार की अन्य कोणी, हे लवकरच स्पष्ट करू,” असे त्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी पवार कुटुंबीयांवर टीकाही केली. “निवडणुकीत आश्वासने दिली जातात, पण ती पाळली जात नाहीत,” असा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. राजकीय समीकरणे आणि मोठे प्रश्न या पोटनिवडणुकीत केवळ एक जागा भरली जाणार नाही, तर सहानुभूतीची लाट निर्णायक ठरणार का? विरोधक एकत्र येऊन लढत देणार का? की शेवटच्या क्षणी बिनविरोधाचा मार्ग मोकळा होणार? असे अनेक मोठे प्रश्नही उपस्थित झाले आहेत. बारामती केवळ एक मतदारसंघ नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा ‘पॉवर सेंटर’ मानली जाते. त्यामुळे येथील प्रत्येक हालचाल राज्यभर परिणाम घडवू शकते. सध्या तरी 30 अर्जांनी निवडणुकीत रंगत आणली आहे. पुढील काही दिवसांत माघारी, उमेदवारी आणि राजकीय चर्चांच्या फेऱ्यांमुळे चित्र अधिक स्पष्ट होईल. बिनविरोध असो किंवा थेट लढत— बारामतीचा निकाल आता संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 12:28 pm

उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार:राऊत म्हणजे नव्या काळातील 'भोंदू बाबा', MLC साठी सोनिया गांधींना मुजरा करावा लागेल- नवनाथ बन

भोंदू बाबा अशोक खरातनंतर आता संजूबाबा राऊत ने नवा धंदा उघडला आहे. जसा खरात लोकांना फसवायचा तसे राऊत भविष्यवाणी सांगत लोकांना फसवण्याचे काम करत आहे.कोणाचा पक्ष भाजपमध्ये विलीन होईल आणि कोण कुठे जाईल हे सांगण्याच्या भानगडीत राऊत यांनी जाऊ नये, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे आणि त्यांची सुपारी संजय राऊत यांनी घेतली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे वेगळे अस्तित्व आहे ते लोकांमधून निवडून आलेले आहेत. खरात सारखे संजूबाबा राऊत हे दुसरे दुकान मांडत आहेत. नवनाथ बन म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाची याचा निकाल जनतेने विधानसभा निवडणूक, जिल्हा परिषद आणि मनपा निवडणुकीतून दिला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी सुनेत्रा अजित पवारांची आहे यावर शिक्कामोर्तब झाला आहे. आता कोर्ट काय निर्णय देईल तो नक्की देईल. उबाठा गटाचा शिवसेनेवर आणि धनुष्यबाणावर हक्क उरला नाही हे आता सिद्ध झाले आहे. तुम्ही हरामशास्त्री अन् कामशास्त्री नवनाथ बन म्हणाले की, कोण रामशास्त्री आहे आणि कोण कामशास्त्री आहेत हे सांगण्याच्या भानगडीत संजय राऊतांनी पडू नये. कारण संजय राऊत आणि उबाठा गट स्वत: हरामशास्त्री आहेत. कामशास्त्रांत तर त्यांची पीएचडी झाली आहे. अलिबागच्या बंगल्यात तुम्ही काय पीएचडी करता हे जनतेने पाहिले आहे. तिथले काळे कारनामे समोर आले तर तुम्हाला जनतेच्या समोर जाता येणार नाही. तुम्ही हरामशास्त्री आणि कामशास्त्री आहात. .. काँग्रेसच्या उपकारावर आमदारकी नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी विधीमंडळात जावे असे संजय राऊत यांना वाटते आहे. पण जनतेने तुम्हाला नाकारले आहे. उद्धव ठाकरे विधीमंडळात जाणार का नाही, त्यांना संधी मिळणार का नाही हे तुमच्या हातात नाही तर काँग्रेस ठरवणार आहे. काँग्रेसने उपकार केले त्यांनी आशीर्वाद दिले तरच उद्धव ठाकरेंना विधीमंडळात जाता येणार आहे. एक काळ होता शिवसेनेला स्वाभिमान होता. आता आमदारकीसाठी सोनिया गांधीसमोर मुजरा करावा लागणार आहे. ..देवाभाऊंनी काय बोलावे हे राऊतांनी सांगू नये नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी काय बोलावे हे संजय राऊत यांनी सांगू नये. शिवरायांच्या वंशजांना पुरावे मागणाऱ्या माणसांनी दुसऱ्यांना काही सल्ले देऊ नये. सौदेबाजीची भाषा तर तुम्ही करूच नये. कारण तुम्ही सौदेबाजी करत पक्ष काँग्रेसला विकला, हिंदूत्व सोडले. यामध्ये राऊतांना राज्यसभेची पुन्हा संधी मिळावी हे तुमचे डील राहुल गांधीसोबत सुरू आहे. देवाभाऊ जनतेमधून निवडून आले आहेत, ते मागच्या दाराने राजकारण करत नाही. त्यांनी काय बोलावे हे राऊतांनी सांगायची गरज नाही.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 12:10 pm

डिनर डिप्लोमसी:ठाकरेंच्या 2 खासदारांची शिंदे गटाच्या डिनरला हजेरी; राज्यात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेला उधाण

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाली वेग घेताना दिसत आहेत. सत्ताधारी गट आणि विरोधकांमधील दरी कमी होतेय की राजकीय समीकरणांची नवी जुळवाजुळव सुरू आहे, असा प्रश्न निर्माण करणारी घटना नुकतीच घडली. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) दोन खासदार उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ‘डिनर डिप्लोमसी’ने खळबळ या स्नेहभोजनाला नांदेडचे खासदार नागेश आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख उपस्थित होते. शिंदे गट आणि ठाकरे गटातील तीव्र राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही उपस्थिती ‘साधी शिष्टाचार भेट’ की काही मोठ्या राजकीय हालचालींचा इशारा, यावर खमंग चर्चा रंगली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा चर्चेत गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगर या कथित राजकीय रणनीतीची चर्चा सुरू होती. विरोधी पक्षातील खासदारांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या बातम्या आधीपासूनच समोर येत होत्या. अशातच ठाकरे गटाचे दोन खासदार शिंदे गटाच्या कार्यक्रमाला हजर राहिल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. आष्टीकरांचे स्पष्टीकरण दरम्यान, नागेश आष्टीकर यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. “हा केवळ वैयक्तिक कार्यक्रम होता. आम्हाला सभागृहात निमंत्रण देण्यात आले होते. आम्ही फक्त 5-10 मिनिटांसाठी जाऊन शुभेच्छा दिल्या. यामागे कोणतीही राजकीय चर्चा नव्हती,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “एकाच सभागृहात काम करत असल्याने सुख-दुःखात भेटणे स्वाभाविक आहे,” अशी पुस्तीही त्यांनी जोडली. मोठी राजकीय गणिते सुरू? राजकीय सूत्रांनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दीर्घकालीन रणनीती मोठी असल्याची चर्चा आहे. शिवसेना (शिंदे गट) कडे सध्या 7 खासदार आहेत. जर ठाकरे गटाचे 6 आणि शरद पवार गटाचे 6 खासदार त्यांच्याकडे आले, तर एकूण संख्या 19 पर्यंत पोहोचू शकते. अशा संख्याबळामुळे केंद्रात आणि राज्यात शिंदे गटाची ‘बार्गेनिंग पॉवर’ मोठ्या प्रमाणात वाढू शकते. 2029च्या निवडणुकांसाठीही ही रणनीती महत्त्वाची मानली जात आहे. भाजपकडून अद्याप ‘ग्रीन सिग्नल’ नाही? मात्र, या कथित रणनीतीला अद्याप भाजपकडून पूर्ण पाठिंबा मिळालेला नाही, अशीही माहिती समोर येत आहे. विश्वसनीय सूत्रांनुसार, अलीकडील दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदे यांची भेट घेतली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या संपूर्ण ‘ऑपरेशन’बाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. सध्या तरी ठाकरे गटाच्या खासदारांची ही उपस्थिती ‘सौजन्य भेट’ म्हणूनच सांगितली जात असली, तरी महाराष्ट्राच्या राजकारणात यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. राजकीय हालचालींच्या या पार्श्वभूमीवर, येत्या काळात कोणते नवे समीकरण तयार होते आणि ‘ऑपरेशन टायगर’ खरोखरच आकार घेते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 11:50 am

निवडणुकीसाठी तिजोरीवर डल्ला, 71 लाख बहिणींना योजनेतून वगळले:आधी सरसकट वाटप, आता नियम-अटी, शशिकांत शिंदेंचा सरकारवर घणाघात

लाडकी बहीण योजनेचे श्रेय अनेकांनी घेतले. निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून निकष ,नियम न बघता राज्याच्या तिजोरीतून पैसे वाटण्यात आले. आता आर्थिक बोजा पडू लागला म्हणून नियम, निकष लावण्यात आले आणि आता 71 लाख बहीणींना त्यापासून वंचित केले जात आहे. आम्ही तेव्हाही सांगत होतो हे सरकार केवळ मतांसाठी राजकारण करते, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशी सुरू आहे. त्यामध्ये बरेच काही माहिती समोर येत आहे. आपण पोलिस आणि एसआयटी चौकशीला वेळ दिला पाहिजे. खरातची पत्नी दोन दिवसांपासून फरार आहे त्या का भेटत नाही याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. ..अजितदादांच्या पक्षावर आम्ही बोलणार नाही शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षाने जर जय पवारांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतले असेल तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांनी राजकारणात यायला काही अडचण नाही. जय पवारांनी त्यांचे कर्तृत्व दाखवावे. त्यांच्या पक्षाची अंतर्गत काही चर्चा झाली यावर आम्ही बोलणे योग्य नाही. पण सुनेत्रा पवारांनी घेतलेला निर्णयावर त्या सांगू शकतील. अजित पवार यांच्यापक्षाबद्दल बोलण्याचा माझा काहीही संबंध नाही. त्यावर मी बोलणार नाही. त्यांनी सत्य तरी मान्य केले शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत आमची विलनीकरणाबद्दल चर्चा झालीच होती हे आम्ही अधीच सांगितले होते. जे काही त्या चर्चेत ठरले होते ते ठरले होते. आता काही लोकांनी सत्य सांगितले आहे. आता त्यावर काही लोकांनी उशिरा का होईना सत्य मान्य केले. हे वृत्तही वाचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 71 लाख महिला अपात्र:ई-केवायसीसाठी 30 एप्रिलपर्यंत संधी! 1 कोटी 75 लाख महिलांना मिळणार लाभ राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आता मोठ्या वादाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेत तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या अपात्र महिलांच्या खात्यावर गेल्या 20 महिन्यांत सरकारने सुमारे 21 हजार 300 कोटी रुपये जमा केले आहेत. वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 11:38 am

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 71 लाख महिला अपात्र:ई-केवायसीसाठी 30 एप्रिलपर्यंत संधी! 1 कोटी 75 लाख महिलांना मिळणार लाभ

राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आता मोठ्या वादाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेत तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या अपात्र महिलांच्या खात्यावर गेल्या 20 महिन्यांत सरकारने सुमारे 21 हजार 300 कोटी रुपये जमा केले आहेत. 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू असून महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होत आहेत. सुरुवातीला तब्बल 2 कोटी 62 लाख अर्ज दाखल झाले होते. मात्र, छाननीमध्ये अनेक त्रुटी समोर आल्या. चारचाकी वाहन असणे, कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत असणे किंवा तांत्रिक कारणांमुळे जवळपास 10 लाख महिला आधीच अपात्र ठरल्या होत्या. योजनेत अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर पात्र महिलांची खातरजमा करण्यासाठी राज्य सरकारने ई-केवायसी बंधनकारक केली होती. 30 एप्रिलपर्यंत करा दरम्यान, ई-केवायसी करताना अनेक लाभार्थींना अनेक तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागल्याने तसेच राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे या योजनेतील अनेक पात्र लाभार्थीना ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नव्हती. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही अनेक महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. विशेषतः कुटुंबातील सरकारी नोकरीबाबत चुकीचा पर्याय निवडला गेल्याने अनेक बहिणींचे 1500 रुपये बंद झाले होते. या तक्रारींची आणि ज्या महिलांची ई-केवायसी प्रलंबित राहिली होती, त्याची दखल घेत सरकारने पून्हा 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.. ज्या महिला आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांच्या खात्यात मे महिन्यापासूनचे पुढील हप्ते जमा केले जाणार नाहीत. तसेच, त्यांचे नाव तात्पुरते निलंबित होऊ शकते. या योजनेत अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या आणि सरकारी नोकरीत असूनही लाभ घेणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढल्याचे सरकारच्या निदर्शनास आले होते. ‘अर्ज भरा आणि लाभ मिळवा’ या धोरणामुळे लाभार्थ्यांचा आकडा 2 कोटी 47 लाखांवर गेला होता. मात्र, आता ई-केवायसी आणि डेटा शुद्धीकरण मोहिमेत यातील 71 लाख महिला निकषात बसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकारचे दरमहा 1065 कोटी वाचणार महिला व बालविकास विभागाने केलेल्या या पडताळणीमुळे आता सरकारचे दरमहा होणारे 1065 कोटी रुपयांचे नुकसान टळणार आहे. एप्रिल 2026 पासून या अपात्र महिलांना मिळणारे 1500 रुपये बंद केले जाणार आहेत. मात्र, गेल्या 20 महिन्यांपासून जे मानधन दिले गेले, त्या अवाढव्य खर्चाची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न आता विरोधकांकडून विचारला जाण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 11:12 am

सेनगाव-रिसोड मार्गावर एका कारसह 5.30 लाखांचा गुटखा जप्त:दोघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सेनगाव ते रिसोड मार्गावर सेनगाव शिवारात पोलिसांच्या पथकाने एका कारसह 5.30 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी भोगाव (ता.जिंतूर) येथील दोघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 2 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील रिसोड येथून एका कारमध्ये गुटख्याची पोते सेनगाव मार्गे जिंतूरकडे नेला जाणार असल्याची माहिती सेनगाव पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मक्के, जमादार तुकाराम मारकळ, गजानन सरकटे, सुभाष चव्हाण, विष्णू डांगे, संतोष जाधव, क्षिरसागर यांच्या पथकाने बुधवारी ता. 1 रात्री पासून सेनगाव ते रिसोड मार्गावर वाहन तपासणी सुरु केली. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास एक कार पोलिसांनी थांबवली. पोलिसांनी कारमधील दोघांची चौकशी सुरु केली. मात्र पोलिसांना पाहताच कारमधील दोघांची घाबरगुंडी उडाली. पोलिसांनी त्यांची नांवे विचारली असता त्यांनी योगेश मेगुणे , पांडुरंग तुरे (रा. भोगाव, ता. जिंतूर) असे सांगितले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यात राजनिवास सुगंधित पानमसाला तसेच जाफरानी जर्दा असा गुटखा पोत्यांमध्ये आढळून आला. पोलिसांनी कार व गुटखा असा 5.30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सेगनाव पोलिस ठाण्यात आणला. या प्रकरणी जमादार मारकळ यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी योगेश व पांडूुरंग या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांची प्राथमिक चौकशी केली असता सदर गुटखा रिसोड येथून जिंतूरकडे नेला जात असल्याचे दोघांनी सांगितले. त्यावरून आता पोलिसांनी रिसोड येथील गुटखा विक्रेत्याचा शोध चालविला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 10:39 am

दोन हजार केळीचे घड जागेवरच पिकले:सोयाबीनचे दोन क्विंटल उत्पादन, कर्जफेडीच्या चिंतेने कुरुंदा येथे शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील अल्पभुधारक तरुण शेतकऱ्याने नापीकी अन कर्जाला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 1 अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील शेतकरी गजानन माणिकराव दळवी (40) यांना कुरुंदा शिवारात साडेचार एकर शेत आहे. या शेतीच्या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या शेतीवर त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक कुरुंदा शाखेतून दोन वर्षापुर्वी 1.48 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र मागील दोन वर्षापासून नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. यावर्षी त्यांनी शेतात केळीची 2 हजार झाडे लावली होती. आता केळीचे घड विक्रीसाठी आले होते. मात्र आखाती युध्दाच्या परिस्थितीत केळीला भाव मिळत नसल्याने व्यापाऱ्यांनीही केळी विक्रीकडे पाठफिरवली. त्यामुळे दोन हजार केळीचे घड शेतातच पिकले. तर सोयाबीनचे केवळ दोन क्विंटल उत्पादन मिळाले. लागवडीचाही खर्च निघाला नसल्याने आता कर्ज कसे फेडावे तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा यामुळे ते अस्वस्थ होते. दरम्यान, शेतात हळद काढणीचे काम सुरु होते. मात्र हळदीचे उत्पन्नही हाती आले नसल्याने त्यांनी शेतातच विषारी औषध पिले. सदर प्रकार काही वेळानंतर हळद काढणीचे काम करीत असलेल्या त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आला. त्यांनी तातडीने गावात नातेवाईकांना फोन करून बोलावले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले. मयत गजानन यांच्या पश्‍चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी त्यांचे भाऊ कामाजी दळवी यांनी दिलेल्या माहितीवरून कुरुंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, जमादार भगवान वडकिले पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे गावकऱ्यांतून हळहळ व्यक्त होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 10:36 am

शिंदे-अजित पवार गटाचे 25 ते 30 आमदार भाजपमध्ये विलीन होणार:सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश मोदी-शहांचे गुलाम झालेत- संजय राऊत

सुनेत्रा पवार यांचा पक्ष वेगळा आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांचे सहकारी होते. ते सुनेत्रा पवारांचे सहकारी असतीलच असे नाही. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत गोष्टीवर दुसऱ्या पक्षाने का बोलावे. त्यांनी पत्रात काय लिहले हा त्यांचा विषय आहे. भविष्यात हा पक्ष 25 ते 30 आमदारांसह भाजपमध्ये विलीन होईल, त्यासोबतच शिंदेंचेही 25 ते 30 आमदार भाजपमध्ये विलीन होतील, त्यांची तशी मानसिकता आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, त्या आमदारांना काळी काळ थांबवण्यासाठी सांगण्यात आले आहे. या दोन्ही पक्षाला भाजपमध्ये विलीन व्हावेच लागेल. शिवसेना पक्ष-चिन्हावरील सुनावणी प्रत्येकवेळी पुढे ढकलली जाते. मग सुप्रीम कोर्टावर विश्वास कोण ठेवणार? 50-50 वेळा घटनात्मक पीठ असलेल्या खटल्याच्या सुनावण्या पुढे ढकलल्या जातात. हे काम मुख्य न्यायाधीश करतात. हे नरेंद्र मोदी, अमित शहांचे गुलाम झाले आहे. या प्रकरणी एकदाच निर्णय देता येत नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टावरच संशय संजय राऊत म्हणाले की, न्याय व्यवस्था ही राजकारण्याच्या दबावाखाली आहे. तसे नसते तर गौतम अदानींच्याविरोधात इतके खटले सुप्रीम कोर्टात गेले आणि एकाही खटल्यात ते हरले नाही. शिवसेना,राष्ट्रवादीच्या सुनावणीसंदर्भात विचार केला तर ते गंभीरपणे घेतले जात नाही. न्यायाधीशांना दबाव असेल तर सांगितले पाहिजे. यावर काहीतरी उत्तर मिळावे म्हणून आम्ही कोर्टात गेलो आहोत. निवडणूक आयोगावर संशय घेता येत नाही असे म्हणणाऱ्या सुप्रीम कोर्टावरच संशय यायला लागला आहे. संविधानिक संस्थेवरच लोकांना संशय येत आहे. अनेक राज्यात बोगस मतदान झाले. त्याच पद्धतीने पश्चिमबंगालमध्ये होणार. नाहीतर कोण एकनाथ शिंदे त्यांचे इतके उमेदवार कसे विजयी होतात. विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंचं बोलतील संजय राऊत म्हणाले की, आमच्या पक्षासंदर्भातील निकाल पुढे ढकलले जात आहेत कारण सर्वांना माहिती आहे की पक्षांतर बंदी कायद्यानुसार पक्ष आणि चिन्ह शिंदे गट आणि अजित पवार गटाला मिळूच शकत नाही. एकतर ते स्थगित होईल. किंवा आम्हालाच मिळेल. फुटीर गटाच्या बाजूने निर्णय असता तर आतापर्यंत निकाल लागला असता. हे लोकं भाजपमध्ये विलीन होतील. विधान परिषद निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंनी पु्नहा विधान परिषदेत जावे ही आमची इच्छा आहे. पण त्यावर उद्धव ठाकरेंच बोलतील. ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची इच्छा आहे.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 10:33 am

कार्यकारी अभियंत्यांना पत्र:सहा महिन्यांत रस्त्यांवर पडल्या भेगा; शिवसेना करणार शांतीसाठी होम, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झाले तीन रस्ते‎

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बांधलेल्या रस्त्याची सहा महिन्यातच दूरवस्था झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. याबाबत कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले होते. आता अत्यंत निकृष्ट व जीवघेण्या रस्त्यांच्या शांती पूजन व होमहवन कार्यक्रमास आपणास प्रमुख यजमान म्हणून निमंत्रित करण्यात येत आहे, असे गांधीगिरी पद्धतीने आंदोलनाचे पत्र शिवसेनेने कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. या रस्त्यावर तब्बल ४६.४० कोटी रुपये झाले असून, सिमेंट काँक्रीट रस्त्यांची अवस्था अवघ्या सहा महिन्यांतच दयनीय झाली आहे, असे शिवसेनेचे म्हणणे होते. जिल्ह्याला जोडणाऱ्या अनेक रस्त्यांची कामे होत असून, अनेक कामे ही रखडली आहेत. काही कामेही संथ गतीने सुरू असून, याचा फटका परिसरातील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात मुख्यत्वे करून अतिवृष्टीच्या काळात तर रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली. अकोला तालुक्यात आपल्या विभागामार्फत उभारण्यात आलेले बाभुळगाव ते गुडधी-अलियाबाद- घुसर रस्ता, उगवा- घुसर रस्ता तसेच घुसर ते दोनवाडा हे सुमारे ४६.४० कोटी रूपयांचे रस्ते आज नागरिकांसाठी विकासाचे प्रतीक नसून धोका आणि दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण बनले आहेत, असा खेद शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केला आहे. मार्च महिन्यात शिवसेनेने अभियंत्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करीत गांधीगिरी पद्धतीने निषेधही नोंदवला होता. आता थेट रस्त्यावर उतरून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. असे आहेत ते तीन रस्ते : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बाभुळगाव ते गुडधी-अलियाबाद-घुसर हा १०.७५ कि.मी. लांबीचा सिमेंट काँक्रीट रस्ता सुमारे २१ कोटी रुपयांत बांधण्यात आला. तसेच उगवा ते घुसर हा ६ कि.मी. लांबीचा रस्ता १२ कोटी रुपयांच्या खर्चातून, तर घुसर ते दोनवाडा हा ७.१० कि.मी. लांबीचा रस्ता १३.६७ कोटी रुपयांत उभारण्यात आला. अवघ्या सहा महिन्यात सदर तीनही रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. तीन रस्त्यांवर मोठ्या भेगा, उभे तडे आणि उखडलेले काँक्रीट दिसून येत असल्याने या कामातील दर्जाहीनता आणि भ्रष्टाचार समोर आल्याचा आरोप शिवसेनेने केला. दुचाकी व चारचाकी वाहनचालकांसाठी हा रस्ता धोकादायक ठरत आहे. या प्रकरणात संबंधित कंत्राटदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकावे, तसेच कोणताही अतिरिक्त निधी न देता त्याच्याकडूनच गुणवत्तापूर्ण पद्धतीने रस्ते नव्याने करून घ्यावेत, अशी मागणीही करण्यात आली. रस्त्यांची दूरवस्था झाल्याने वाहनचालकांसाठी धोका

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:58 am

श्रवण भक्तीच्या माध्यमातून शाश्वत सुखाची प्राप्ती शक्य:राजेंद्र महाराज वकटे यांचा हिताेपदेश; कर्ता हनुमान मंडळाचे आयोजन‎

कलियुगात नाम साधना ही भगवंत प्राप्तीच्या मार्गात ज्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे कलियुगात श्रवण भक्ती ही श्रेष्ठ आहे. भगवंताचे नाम श्रवण कथा कीर्तनाच्या अनुषंगाने करून शाश्वत सुखाची प्राप्ती श्रवण भक्तीच्या माध्यमातून करणे, या कलियुगात अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राजेंद्र महाराज वकटे यांनी केले. ते डाबकी रोडच्या कर्ता हनुमान मंडळाच्या वतीने कर्ता हनुमान मंदिरात सुरू असलेल्या संगीतमय शिवपुराण कथेत हितोपदेश करत होते. पाळोदी येथील कथाकार राजेंद्र महाराज वकटे यांनी कथेचे पंचम पुष्प गुंफले. ते म्हणाले, भक्तीचे आपल्या परंपरेत अनेक मार्ग आहेत. यामध्ये श्रवणभक्ती असून यात भगवंताच्या कथा, पुराण, गीतासारख्या धार्मिक ग्रंथांचे श्रवण करण्यात येत असते. त्याचप्रमाणे दुसरी कीर्तनभक्ती असून यात भजन, संकीर्तन, नामसंकीर्तन, गायनाद्वारे भगवन्नामाचा उच्चार करण्यात येतो. तृतीय श्रेणी ही स्मरणभक्ती होय. यात मनात नेहमी भगवंताचे स्मरण केले जाते. त्याचप्रमाणे पादुका भक्ती असून यात भगवंताच्या पादुकांची, शाब्दिक किंवा आध्यात्मिक रूपाने सेवा केली जाते. या नंतर अर्चनभक्ती येते. यात मूर्ती, प्रतिमा, तुलसी, देवगृहाची पूजा, नैवेद्यदान आदी केले जाते. वंदनभक्तीमध्ये भगवंताला प्रणाम, नमस्कार, शिरनमस्कार करून भक्ती केली जाते. या नंतर दास्यभक्ती येते. यात भगवंताला स्वामी' मानून दासासारखे विनम्र भावनेने उभा राहणे होय. हनुमान, विठ्ठलभक्त संत हे याचे उत्तम उदाहरण असल्याचे वकटे यांनी सांगितले. गुरुवारीपर्यंत रोज सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत आयोजित या कथेचा लाभ घेण्याचे आवाहन हनुमान मंडळाचे अध्यक्ष सुभाष म्हैसने, माजी नगरसेविका मंगला म्हैसने, विठ्ठलराव चिकटे, वसंत जायदे, शरद कोकाटे, विलास आगरकर, गजानन धरमकर, अनिल गावंडे, चंद्रकांत ताठे, प्रभाकर ठाकरे, संजय देशमुख, वसंत माळी, संजय वैद्य, संतोष जाधव आदींनी केले आहे. नामश्रवणातून भगवंताला प्राप्ती शक्य : सख्यभक्ती ही या भक्ती प्रकारात येत असून, यामध्ये भगवंताशी मैत्रीचा भाव, समान वातावरणातील सख्य केली जाते. यात सुदामा, अर्जुन आदींची उदाहरणे येत असल्याचे वकटे महाराज यांनी सांगिले. आत्मनिवेदनभक्ती या भक्तीचा प्रकार येतो. यामध्ये भगवंताजवळ पूर्ण स्वतःच्या सुख‑दुःख, भावना, जीवनाचा सर्वस्व भगवंताला समर्पित केली जातात. सर्वच भक्तीचे प्रकार भगवंताला प्राप्त करण्यासाठी सुयोग्य व अधिकृत असतानाही ज्याप्रमाणे कलींयुगात नामाचे महिमा श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे या धकाधकीच्या व्यवस्थेत प्रभूच्या नामश्रवणाच्या माध्यमातून आपण भगवंताला प्राप्त करू शकतो. यासाठी नामस्मरणाच्या माध्यमातून प्रभुला प्राप्त करून आपले जीवन कृतार्थ करण्याचे आवाहन वकटे महाराज यांनी केले. जाणता राजा महिला भजनी मंडळाकडून सादरीकरण कार्यक्रमात बालिका शिवाई सचिन म्हैसने हिने छत्रपती शिवाजी महाराज व माता जिजाबाई यांची शौर्य गाथा सादर करून आपल्या वकृत्व कलेची चुणूक दाखवली. यावेळी टाळ्यांच्या गजरात तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम मंडळाचे अध्यक्ष सुभाष म्हैसने व माजी नगरसेविका मंगला म्हैसने यांनी वकटे महाराज यांचे स्वागत केले. तर दैनिक अन्नदाते अजिंक्य येंडोले तथा रमेशराव बोराखडे यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन गजानन धरमकर यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:58 am

आलेगाव, पातुरात पाऊस; आजही शक्यता:ढगाळ वातावरणामुळे पारा घटला, शहराचे तापमान 40.1 अंशांपर्यंत खाली‎

शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे शहराचे तापमान ४०.१ अंशांपर्यंत खाली आले आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी गार वारे सुटले होते. तसेच मंगळवारी रात्री जिल्ह्यातील आलेगाव, पातूरसह काही भागात पावसाची सरी कोसळल्या. जिल्ह्यातील कडक ऊन आणि अरबी समुद्रावरून आलेल्या आर्द्रतेचे एकत्रीकरण झाल्यामुळे कडक ऊन ते पाऊस हा बदल केवळ दोन दिवसात झाल्याचे दिसून येत आहे. शहरात प्रचंड उष्णतेमुळे जमीन तापते व हवा हलकी होऊन ती वर जाते. उर्वरित पान ४ प्रा. डॉ. सुरेश चोपने, हवामानतज्ञ. आंबा, कांद्याचे नुकसान कांदा, आंबा आदी पिकांचे या अवकाळी पावसामुळे नुकसान होत आहे. काही शेतकऱ्यांचे गव्हाचे पीक काढायचे आहे. वादळी वारे व अवकाळी पावसामुळे गव्हाचे पीक झोपले आहे. गहू पाण्याने भिजून त्याचा दर्जा घसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच यामुळे गहू काळे पडण्याची शक्यता असून यामुळे शेतकऱ्यांना कमी दर मिळण्याची शक्यता शेतकरी वर्तवत आहेत. तसेच शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले किंवा वाळत घातलेले तूर, गहू आदी पावसाने भिजून नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताडपत्रीच्या मदतीने धान्य झाकून त्याचे संरक्षण आवश्यक आहे. यामुळे उन्हाळ्यात पाऊस कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले जातात. ते उष्ण हवेला मिळाल्यानंतर पावसाचे वातावरण होते. एप्रिलमध्ये वाऱ्यांची दिशा बदलते. यामुळे अरबी समुद्रावरील बाष्पयुक्त वारे विदर्भाच्या दिशेने येतात. उन्हामुळे या बाष्पाचे ढगात रुपांतर होऊन पाऊस पडतो.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:57 am

पाणीपट्टी वसुलीमध्ये ऊर्ध्व वर्धा प्रकल्प अव्वल:51.51 कोटी रुपयांची झाली वसुली, विभागाच्या आवाहनामुळे मोहिम यशस्वी‎

पश्च‍िम विदर्भातील ऊर्ध्व वर्धा प्रकल्प सर्वात मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची निर्म‍ित सिंचन क्षमता ही ८५ हजार ००२ हेक्टर, तर जलसाठा ५६४.०५ दलघमी आहे. या प्रकल्पातून अमरावती व वर्धा तालुक्यामध्ये कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यात येते. या प्रकल्पाचे पाणीपट्टी वसुलीत अव्वल स्थान पटकावले आहे. २०२५-२६ या वर्षाकरीता सिंचनासाठी २.१६४ कोटी रुपये वसुली करण्याचे उद्द‍िष्ट विभागाला देण्यात आले होते. २०१६ मध्ये ऊर्ध्व वर्धा प्रकल्प विभागाचे रूपांतरण सिंचन पाटबंधारे विभागामध्ये करण्यात आले. कामाचे नियोजन व सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्यांमुळे थकीत लाभधारकांना पाणीपट्टी भरण्यासाठी केलेल्या आवाहनामुळे या विभागाने सुमारे ०.७६ कोटी रुपये वसुली केली आहे. तसेच या प्रकल्पामधून बिगर सिंचनासाठी पाणी उचल करणाऱ्या सर्व यंत्रणांना मार्च २०२६ पूर्वी थकबाकीचा भरणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. बिगर सिंचनासाठी ४० कोटी उद्द‍िष्टांपैकी ५०.७५ कोटी रुपयांचा विक्रमी वसुली झाल्याची माहिती कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत यांनी दिली. सिंचन व बिगर सिंचन पाणीपट्टी मिळून सुमारे ५१.५१ कोटी रुपये सर्वाधिक वसुलीच्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. इतिहासामध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात सिंचन पाणीपट्टी वसुली झाली आहे. उद्द‍िष्ट साध्य करण्यासाठी अधीक्षक अभियंता मनिष राजभोज यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. यामुळे उद्द‍िष्टाच्या १२२.१७ टक्के उद्द‍िष्ट गाठले आहे. सर्व वसुलीच्या मोहिमेमध्ये बिगर सिंचन पाणीपट्टी वसुलीचे योगदान महत्वाचे आहे. या मोहिमेत सहभागी सर्व उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कालवा निरिक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून व तसेच सर्व क्षेत्रीय तथा विभागीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:56 am

सोलापूरच्या विक्रम गायकवाडने मारली बाजी‎:नेहरू मैदान येथे पुरुष व महिला भव्य शिवकेसरी कुस्ती स्पर्धा

नमो युवक क्रीडा संस्था, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, करण डेंढवाल व मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने तसेच विदर्भ कुस्तीगिर संघाच्या मान्यतेने नेहरू मैदानावर झालेल्या पुरुष व महिला शिवकेसरी कुस्ती स्पर्धेत पुरुष गटामध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांक सोलापूरच्या विक्रम गायकवाडने पटकावला. त्याला चांदीची गदा व ७१ हजार रु. रोख रकमेचा पुरस्कार देण्यात आला. वाशीमच्या विजय शिंदेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याला ४१ हजार रु. रोख देण्यात आले. विदर्भस्तरीय गटात प्रथम क्रमांक अकोल्याच्या सिद्धार्थ गवईने पटकावला. त्याला चांदीची गदा व ३१ हजार रु. रोख रकमेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमरावतीच्या अर्जुन यादवला उपविजेतेपद मिळाले. त्याला २१ हजार रु. रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिलांच्या विदर्भस्तरीय गटामध्ये वाशीमच्या कल्याणी गादेकरने सहकारी अनुष्का गादेकरला नमवून विजेतेपद पटकावले. महिला केसरी गटातील प्रथम बक्षीस २१ हजार रु. रोख कल्याणी गादेकरला तसेच द्वितीय बक्षीस ११ हजार रु. रोख अनुष्का गादेकरला देण्यात आले. इतर सहभागी स्पर्धकांना लाखो रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीससुद्धा देण्यात आले. दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेला शहरातील कुस्तीप्रेमींकडून जोरदार प्रतिसाद मिळाला. दोन्ही दिवस मोठ्या संख्येत कुस्तीप्रेमी उपस्थित होते. नेहरू मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य शिवकेसरी २०२६ कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यांना उपस्थित राहण्याचा मला अतिशय आनंद व अभिमान वाटतो. या स्पर्धेत हजारो प्रेक्षकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. खेळाडूंना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मन भारावून गेले. कुस्ती हा आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे. हा अभिमान वाटावा असा खेळ आहे. या स्पर्धेमुळे आपल्या तरुण पिढीमध्ये खेळाची आवड वाढीस लागते. त्यांना स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळते, असे वायएसपीचे मार्गदर्शक सुनील राणा म्हणाले. पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांचे तसेच महिला गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सर्व विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन! त्यांच्या मेहनती, जिद्दी व चिकाटीचे हे यश आहे. सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेची शोभा वाढवल्याचे इतर मान्यवरांनी सांगितले. यावेळी स्थायी सभापती अविनाश मार्डीकर, नगरसेवक व कुस्ती मार्गदर्शक डॉ. संजय तीरथकर, नगरसेवक प्रशांत देशपांडे, आशिष अतकरे, प्रशांत वानखडे, पोलीस निरीक्षक राजुरकर, नितीन बोरेकर, विनोद गुहे, विनोद जायलवाल, दिनेश सेठीया, समाधान वानखडे, किशोर पिवाल, जितू ठाकूर, अॅड. परवेज खान, बाळू इंगोले, अनुप अग्रवाल, श्रीकांत इंगळे, पराग चिमोटे, बंटी इंगळे, अविनाश काळे, विजय खंडेलवाल, सतीश कागडे, सतपाल रुपनवार, मोहनजी जाधव, क्यामउद्दिन पठान, मिथुन बारसे, राहुल सारवान, साक्षी उमक, शुभम उंबरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाचवेळा विदर्भ केसरी पुरस्कार पटकावणारे डॉ. संजय तीरथकर यांच्या मार्गदर्शनात जितेंद्र भुयार, समीर देशमुख, राहुल बागडे, आरिफ खान, नदिम खान, जितेंद्र डिके, रोहित बोखडे, त्रिदेव ढेडवाल, समीर डोंगरे, लखन शेरेकर, रोहित बकरे, नितीन इंगोले, भूषण वाटकर, किसना श्रीवास, राम अहेरवार, गोलु पार्डीकर, विशाल वन्ने, अर्जुन डेढवाल, उमेश संकत, रिंकू काकडे यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. शिव केसरी ही शहरात मागील काही वर्षांत झालेली मोठी कुस्ती स्पर्धा ठरली. कारण, विविध गटात सुमारे २०० पहिलवान या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांनी विजेतेपदाच्या शर्यतीत आपले कसब पणाला लावले. अमरावती हा विदर्भातील कुस्तीचा गड समजला जातो. परंतु, सध्या अमरावतीत तगड्या पहिलवानांची उणीव निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या स्पर्धेत अर्जुन यादव वगळता इतर पहिला फारशी छाप पाडू शकले नाहीत. त्यामुळे अमरावतीत उत्तम पहिलवान घडवण्यासाठी आखाड्यांना आता आधीसारखेच परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:55 am

दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ब्रिज कोर्स’:18 दिवसीय अभ्यासक्रमाचे नि:शुल्क आयोजन, विविध विषयांचे तज्ज्ञ करताहेत‎

दहावीची परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी मोकळे असतात. तसेच त्यांच्यासह पालकांनाही आता पुढे काय करायचे, कशाप्रकारे १२ व्या वर्गातील परीक्षेची तयारी करून घ्यायची, कुठे शिकवणी लावायची, जेईई करायचे की नीटसाठी विविध संस्थांमध्ये प्रवेश घेऊन तयारी करून घ्यायचे, असे अनेक प्रश्न त्रस्त करीत असतात. शैक्षणिक भविष्याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये, यासाठी ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयाने मागील चार वर्षांपासून नि:शुल्क ‘ब्रिज कोर्स' तयार केला असून दरवर्षी आवश्यकतेनुसार त्यात नवीन अभ्यासक्रमविषयक बाबींचा अंतर्भाव केला जातो. १८ दिवसांच्या या ‘ब्रिज कोर्स'नंतर विद्यार्थी, पालकांच्या मनात कोणताही संभ्रम राहत नाही. ते आत्मविश्वासाने १२ वीच्या परीक्षेची तयारी करतात, असा मागील तीन वर्षांचा अनुभव असल्याची माहिती दीपक धोटे यांनी दिली. बुधवार १ रोजी या ‘ब्रिज कोर्स'चे उद्घाटन अगदी साधेपणाने करण्यात आले. याप्रसंगी नुकतीच दहावीची परीक्षा दिलेले १५० विद्यार्थी उपस्थित होते. या ‘ब्रिज कोर्स'करिता एकूण २५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गुरुवार २ रोजी स. ८ ते ११ या वेळेत १८ एप्रिलपर्यंत होणाऱ्या या ‘ब्रिज कोर्स'ला नियमितपणे उपस्थित राहतील. यातून त्यांची फसवणूक टळली तर आम्हाला निश्चितच आनंद होईल, असे ‘ब्रिज कोर्स'करिता झटणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी सांगितले. सोबतच कोणकोणत्या नव्या क्षेत्रात भविष्य करता येईल, यासाठीही मार्गदर्शन करतो, असेही ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:52 am

चांदूर रेल्वे नगर परिषदेत मार्चमध्येच वसुली जोमात;2.25 कोटी कर जमा:अभय योजनेचा लाभ, नगराध्यक्षांचे नेतृत्व, कर्मचाऱ्यांच्या मेहनतीला फळ‎

मालमत्ता करावरील ५० टक्के शास्ती (दंड) माफी योजनेला नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चांदूर रेल्वे नगर परिषदेने मार्च महिन्यात विक्रमी कर वसुली करत इतिहास घडवला आहे. अवघ्या महिनाभरात २.२५ कोटी रुपयांच्या जवळपास मालमत्ता कर जमा झाल्याने नगर परिषद प्रशासनात समाधानाचे वातावरण आहे. नगराध्यक्षा प्रा. प्रियंका निलेश विश्वकर्मा यांनी केलेल्या आवाहनाला शहरवासीयांनी सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात थकीत कर भरला. ‘अभय योजना’मुळे दंडात मिळालेल्या सवलतीचा लाभ घेत नागरिकांनी पुढाकार घेतल्याने कर वसुलीला मोठी गती मिळाली. या ऐतिहासिक वसुलीत नगर परिषद कर्मचाऱ्यांनी घेतलेले विशेष परिश्रम मोलाचे ठरले. मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर प्रशासन विभागाने घराघरात संपर्क साधत कर भरण्याबाबत जनजागृती केली. परिणामी कर संकलनात अभूतपूर्व वाढ झाली. चांदूर शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर वसुली झाल्याबद्दल नगराध्यक्षांनी शहरवासीयांचे मनःपूर्वक आभार मानले. “शहराच्या विकासासाठी नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे,” असे त्यांनी सांगितले. तर या यशात विशेष योगदान दिल्याबद्दल नगराध्यक्षांनी मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे तसेच कर प्रशासन विभागातील कर्मचारी कर निरीक्षक शारदा कावळे, कनिष्ठ लिपिक विशाल सुरकार व कॉम्प्युटर ऑपरेटर सागर हटवार यांचा शाल देऊन सन्मान केला. सत्कारानंतर तिन्ही कर्मचाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की, “याआधी कोणत्याही नगरपालिकेत आमच्या कामाचा असा सन्मान झाला नव्हता. आमच्या कार्याची पावती म्हणून सर्व कर्मचाऱ्यांसमोर आमचा गौरव करणाऱ्या या पहिल्या नगराध्यक्षा आहेत. अभय योजनेचा लाभ, नगराध्यक्षांचे नेतृत्व आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळे चांदूर रेल्वे नगर परिषदेत झालेली ही विक्रमी कर वसुली शहराच्या विकासासाठी मोठे पाऊल मानले जात आहे. शहरवासीयांचे आभार ^निवडणुकीच्या काळात नागरिकांना दिलेल्या मालमत्ता कर माफीच्या आश्वासनाची पूर्तता करण्यात आम्हाला यश आले , याचा मनापासून आनंद व समाधान वाटते. चांदूर रेल्वे शहरातील नागरिकांनी या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात कर भरून नगरपरिषदेला मोलाचे सहकार्य केले, याबद्दल मी सर्व शहरवासीयांची मनःपूर्वक आभारी आहे. नागरिकांच्या या सकारात्मक सहभागामुळे शहराच्या विकासकामांना गती मिळण्यास मोठी मदत होणार आहे. - प्रा. प्रियंका निलेश विश्वकर्मा, नगराध्यक्ष, चांदूर रेल्वे

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:50 am

वादावर पडदा:अंजनगावात रातोरात पुतळा; दोन गटात तणाव, शिवरायांच्या पुतळ्यावरून गावात सामाजिक तणाव

महापुरुषांचे पुतळे रातोरात उभे करण्याच्या अनोख्या 'पॅटर्न'ने आता माढा तालुक्यातील अंजनगाव (खे.) येथे प्रशासकीय आणि सामाजिक पेच निर्माण केला आहे. गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा विनापरवाना आणि रातोरात बसवल्याने दोन समाजांत वादाची ठिणगी पडली. तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन दिवसभर पोलिस गावात ठाण मांडून होते. एकगट मंदिर परिसरात रातोरात बसवलेला पुतळा हटवण्यासाठी तर दुसरा गट पुतळा तेथेच ठेवण्याची भूमिका घेऊन मैदानात उतरला होता. दिवसभर हा हाय व्होल्टेज ड्रामा चालला. रात्री ८ नंतर पोलिस बंदोबस्तात पुतळा काढताना हिंसक वळण लागले. परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली होती. दुपारी या प्रकरणी माढा पोलिसांत दाखल तक्रारीवरून तिघांना ताब्यात घेतले होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी झाल्यानंतर मंदिराचे मानकरी फरांडे महाराज, आप्पाराव वाघमोडे यांच्यासह ग्रामस्थांना पुतळा उभारल्याचे समजताच माढा पोलिस ठाण्यात धाव घेत मंदिर परिसरात उभारलेला पुतळा हटवण्याची मागणी केली. याची तात्काळ दखल घेत माढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला. परंतू दुसरा गट पुतळा हलवण्यास तयार नसल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, पोलिस उपविभागीय अधिकारी अंजना कृष्णमूर्ती, गटविकास अधिकारी सुळे यांच्यासह महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पुतळा हटवण्यासाठी अंजनगाव खे व परिसरातील महिला व ग्रामस्थांनी सुमारे एक तास रस्ता रोको करत रस्त्यावर ठिय्या मांडला. या दरम्यान वाघमोडे यांनी समाजात तेढ निर्माण करण्यासाठी महाराजांचा पुतळा मंदिर परिसरात उभारला असल्याची तक्रार दाखल केले. ४.२० पहाटे पुतळा उभा ५.०० पोलिस पाटलांकडून खबर ५.३० माढा पोलिस दाखल ६.०० ग्रामस्थांचा जमाव ९.०० माढा पोलिसांत तक्रारदार ९.३० अंजना कृष्णमूर्ती घटनास्थळी दाखल १०.०० प्रांताधिकारी आव्हाड दाखल १२.०० प्रांताकडून जमावबंदी आदेश १.०० तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले १.३० समर्थकांचा आंदोलनाचा इशारा ४.०० पर्यायी जागेवर प्रशासनाची तयारी ६.३० पर्यायाअभावी जमाव बंदीची सूचना ७.३० पुतळा हटवण्याची प्रशासनाची तयारी ७.४० पुतळा ताब्यात देण्याची मागणी ८.४५ प्रशासनाने क्रेन बोलावले तीन आठवड्यापूर्वी दत्तात्रय पाटेकर,ओंकार चव्हाण आणि गजानन कृपाळ यांनी अंजनगाव खे ग्रामपंचायतीकडे पुतळा उभा करण्यासाठी अर्ज केला होता. ग्रामपंचायत प्रशासनाने रितसर परवानगी घेऊन पुतळा उभारण्याचे सांगत अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. पोलिस प्रशासनास माहिती कळल्यानंतर पोलिसांनी तिघांना नोटिस बजावली होती, असे साहा.पोलिस निरीक्षक शिंदे यांनी सांगितले. पुतळा उभा केल्याने दोन गटात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी जयश्री आव्हाड यांनी दुपारी बारा वाजता जमाव बंदीचा आदेश दिला होता. परंतु पोलिस प्रशासनाने याची तात्काळ अंमलबजावणी न केल्याने सायंकाळ पर्यंत परिस्थिती तणावपूर्ण राहिली. सायंकाळी ६ च्या सुमारास पोलिसांनी जमाव बंदीची अंमलबजावणी करीत गर्दी पांगवली. परंतु वातावरणातील तणाव कायम होता. मागील महिन्यात चिखलठाण व पूनवर (ता.करमाळा), मोहोळ, कुरूल (ता.मोहोळ), पडसाळी, मोडनिंब (ता. माढा), या ठिकाणी रातोरात पुतळे उभारण्यात आले आहेत. हे सत्र सुरूच असून अंजनगाव खे. येथे पुतळा उभारण्यात आला. ^खेलोबा देवा प्रमाणेच आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आमचे कुलदैवत मानतो. परंतु ज्या जागेवर शिवरायांचा पुतळा उभा केला आहे, ती जागा मंदिराच्या प्रवेशद्वारावर येत असल्याने धार्मिक विधी करण्यास अडथळा निर्माण होणार आहे. संबंधितांनी इतर ठिकाणी महाराजांचा पुतळा उभा करावा, आम्ही त्यास मदत करू. राजाभाऊ वाघमोडे महाराज, मुख्य मानकरी ^महापुरुषांचा पुतळा शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार परवानगी घेऊनच उभारावा. नियमबाह्य पध्दतीने पुतळा उभा केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. नियम डावलून पुतळा उभा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. रोहित शिंदे, साहा. पोलिस निरीक्षक, माढा

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:39 am

विद्यार्थ्यांनो , जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोनाने अभ्यास करा:यश मिळतेच, कल्याणशेट्टी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात मार्गदर्शन‎

विद्यार्थ्यांनो चिकाटी, जिद्द, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करा, यश नक्की मिळेल, परंतु त्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात, असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले. महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचालित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयात आयोजित केलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते, व्यासपीठावर संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ. एस. आर. लोखंडे, ज्युनिअर विभाग प्रमुख पूनम कोकळगी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, क्रिस्टोयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेसी, नीरज चोप्रा या खेळाडूंनी कठोर परिश्रम करून सराव आणि सातत्य यांच्या जोरावर जगात आपले वेगळे स्थान निर्माण केले. विद्यार्थ्यांनी देखील केवळ अभ्यासातच नव्हे, तर क्रीडा आणि इतर उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेऊन यश मिळवावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पारितोषिकाचे अहवाल वाचन प्रा. राजशेखर पवार, मनीषा शिंदे, भीम सोनकांबळे, सोनाली कटकधोंड व सौरभ भस्मे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. आर. गुणवंत शिक्षक आणि महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्याविद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करताना मान्यवर. लोखंडे यांनी केले. तसेच आपले वेगळे स्थान निर्माण केले. विद्यार्थ्यांनी देखील केवळ अभ्यासातच नव्हे, तर क्रीडा आणि इतर उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेऊन यश मिळवावे सूत्रसंचालन प्रा. डॉ. शीतल झिंगाडे भस्मे यांनी केले, आभार प्रा. भीम सोनकांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शरणय्या मसुती, बसवराज कामाठी, प्राची गणेचारी, डॉ. बाळासाहेब पाटील, मधुबाला लोणारी, शीतल फुटाणे, हर्षदा गायकवाड, विद्याश्री वाले यांनी प्रयत्न केले. कल्याणशेट्टी महाविद्यालय अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रातील विद्यार्थिनी कुमारी प्रियंका गोंडाळ हिने एम. कॉम.च्या परीक्षेत ७९.६७ टक्के गुण मिळवून विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यामुळे महाविद्यालयाच्या वतीने तिचा गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:31 am

कुरुलमध्ये आनंद बाजार, 22 हजारांची उलाढाल:विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे ग्राहकांशी संवाद कौशल्य शिकण्याची अनोखी संधी मिळाली‎

कुरुल ( ता. मोहोळ ) येथील जि.प. शाळेतील आयोजित ‘बाल आनंद बाजार’ उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून तब्बल २२ हजार रुपयांची उलाढाल झाल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. या उपक्रमाचे उद्घाटन माजी पोलिस अधीक्षक शशिकांत माने यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी सभापती जालिंदर लोंडे, पंचायत समिती सदस्य धनाजी माळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शेतातील व परिसरातील ताज्या भाज्या व फळांचे स्टॉल लावून विक्री केली. यामध्ये शेवगा, वांगी, टोमॅटो, पालक, मेथी, कोथिंबीर तसेच कैरी, चिकू यांचा समावेश होता. या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, खरेदी-विक्री प्रक्रिया आणि ग्राहकांशी संवाद कौशल्य शिकण्याची अनोखी संधी मिळाली. काही विद्यार्थ्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर्स व सवलतीही दिल्या. ज्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नफिसा शेख, युवराज खराडे, संतोष इंगे, कमलाकर बनकर, संगीता सावंत-खराडे, अंजली डोले, रुपाली डोके, सुवर्णा तोडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:30 am

चिमुकल्यांची होतेय परवड, 4082 पैकी1264 अंगणवाड्यांना नाही स्वतः चे अंगण:जिल्ह्यातील 41 अंगणवाडी भाडेतत्वावर, माढा तालुक्यात 4 इमारती जीर्ण‎

सोलापूर जिल्ह्यातील बालविकास प्रकल्पांतर्गत चालणाऱ्या अंगणवाड्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात एकूण ४०८२ अंगणवाड्या कार्यरत असताना, त्यापैकी तब्बल १२६४ अंगणवाड्यांकडे स्वतःचे स्वतंत्र अंगणच उपलब्ध नाही. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी ही महत्त्वाची शैक्षणिक व पोषण केंद्रे मानली जातात; मात्र आवश्यक भौतिक सुविधांच्या अभावामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या या अंगणवाड्या विविध पर्यायी ठिकाणी चालवल्या जात आहेत. काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये, तर काही ठिकाणी ग्रामपंचायत इमारती, समाज मंदिर, खाजगी विनाभाडे जागा किंवा भाड्याच्या इमारतींमध्ये अंगणवाड्या भरल्या जात आहेत. या ठिकाणी जागेची मर्यादा, स्वच्छतेची समस्या आणि सुरक्षिततेच्या बाबीमुळे बालकांना अपेक्षित वातावरण मिळत नाही.अंगणवाडीमध्ये लहान बालकांना खेळत-खेळत शिक्षण देणे, पोषण आहार देणे आणि आरोग्य तपासणी करणे या महत्त्वाच्या सेवा दिल्या जातात. यासाठी खुल्या जागेची, म्हणजेच अंगणाची गरज अत्यावश्यक असते. अंगण नसल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी योग्य योग्य जागा मिळत नाही, त्यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढते. तसेच गर्दीच्या जागेमुळे स्वच्छता राखणे कठीण जाते आणि संसर्गजन्य आजारांचा धोका देखील वाढतो.अनेक अंगणवाडी सेविका आणि पालकांनीही या समस्येबाबत नाराजी व्यक्त केली आहे. स्वतंत्र इमारत आणि अंगण नसल्यामुळे काम करताना अडचणी येतात, असे मत काही सेविकांनी मांडले आहे. पालकांच्या दृष्टीनेही मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासन व लोक प्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात खूप ठिकाणी ग्रामपंचायतची जागा मिळत नाही. काही ठिकाणी अतिक्रमण झाले असून त्याबाबत कोर्टमध्ये केसेस चालू आहेत. नवीन जागा उपलब्ध नसल्याने आज ही अंगणवाड्या ना अंगण नाही. इमारती देण्याचे नियोजन सुरू ^यापूर्वी मिनी अंगणवाडी इमारत बांधकाम केले जात नव्हते. परंतु मागील वर्षी १००० मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाड्यामध्ये श्रेणी वर्धन झाल्याने त्या अंगणवाड्यांना इमारती देण्याचे नियोजन सुरू आहे. प्रसाद मोरकले, महिला व बालविकास विभाग

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:29 am

द्राक्षाला उच्चांकी दर मिळू लागल्याने शेतकरी समाधानी:द्राक्षाचे दर वधारले,‎बेदाण्याला मागणी‎

प्रतिनिधी | कुर्डुवाडी अमेरिका- इराण युद्धाच्या सावटामुळे व्यापाऱ्यांनी द्राक्ष दर ३०-४० रुपयांपर्यंत खाली आणले होते. निसर्ग आणि हवामान बदलांमुळे ५० टक्के उत्पादनच निघाले. दराबाबत शेतकरी चिंतेत होते. आता मात्र बेदाणा निर्मितीला वेग आला असून मार्केट द्राक्षालाही उच्चांकी दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. उच्च प्रतीच्या बेदाण्याला प्रति किलो २५० ते ३५० रुपये मिळत आहेत, तर मार्केट द्राक्षांना ६० ते ८० रुपये भाव लाभला आहे. माढा, उत्तर सोलापूर, बार्शी, पंढरपूर तालुक्यांत द्राक्षबागा प्रमुख उत्पन्नस्रोत आहेत. गेल्या चार वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांनी बागा काढल्या होत्या. २०२२- २३ मध्ये जिल्ह्यात २.७० लाख मॅट्रिक टन बेदाणा तयार झाला होता. बदलत्या हवामानामुळे यंदा ५० टक्क्यांपर्यतच द्राक्ष उत्पादन झाले असतानाही व्यापाऱ्यांकडून दर कमी केल्याने द्राक्ष बागायतदारांकडून चिंता व्यक्त होत होती. यंदा अवघे १.५ लाख टन होण्याची शक्यता आहे. कमी पुरवठ्यामुळे उच्च दर शेवटपर्यंत टिकतील, असे तज्ज्ञ सांगतात. युरोपमधून मागणीत वाढ बेदाणाला २५० ते ३५० रुपये, मार्केट द्राक्षाला ६० ते ८० रुपये मिळत आहेत. उत्पादन ५० टक्के असल्याने दर उच्च राहतील. युरोपमधून मागणी वाढली आहे, युद्धाचा फारसा परिणाम नाही. कमी भावात विक्री करू नका, असे कृषीनिष्ठ परिवाराचे अध्यक्ष नितीन कापसे, कापसेवाडी यांनी आवाहन केले.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:28 am

सुधारित शक्तिपीठ महामार्ग आता वैराग- पंढरपूर मार्गे माळशिरसकडे:शेतकऱ्यांनी विरोध केल्याने मार्गात केला बदल, सुमारे 54 किमीने वाढलेे अंतर‎

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला वैराग भागातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवल्याने शासनाने महामार्गात बदल करुन सातारा जिल्ह्यातून नेला जाणार आहे. सुमारे ५४ किलोमीटरने अंतर वाढले असून पूर्वी मोहोळ, पंढरपूर, सांगोल्याहून आटपाडी तालुक्यातून महामार्ग जाणार होता. सांगली जिल्ह्यातील १० टक्के क्षेत्र कमी करुन धाराशिव जिल्ह्यातून बार्शी तालुक्यातील गौडगाव, रुई, मालेगाव, रातंजन सर्जापूर, राळेरास, सासुरे, तडवळे मार्गे माढ्यामधून पंढरपूरच्या करकंबमार्गे माळशिरस तालुक्यात वळवला असल्याचे सांगण्यात येते. सुधारित आराखड्यास मिळालेल्या मंजुरी नुसार हा महामार्ग सुमारे ८५६.७६४ किमी लांबीचा असणार आहे. या महामार्गामुळे नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १० जिल्ह्यांमध्ये वाहतूक सुलभ होणार आहे. धार्मिक पयर्टनाबरोबर तसेच ग्रामीण भागातील संपर्क वाढून आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होणार आहे. शासन निर्णयानंतर आता भूसंपादन, तांत्रिक मंजुरी आणि प्रत्यक्ष कामांना लवकरच सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. सुधारित आराखड्याला मंजुरी मिळाल्याने राज्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात मोठी झेप घेण्याची संधी निर्माण झाली आहे. . माळशिरस तालुक्यातील वेळापूर, पिलीव परिसरातून शिखर शिंगणापूरच्या जवळून मायणीकडे शक्तिपीठ नेण्यात येत आहे. तेथून येरळा-कृष्णा नदी ओलांडून हा मार्ग सागरेश्वर अभयारण्याजवळ पोहोचेल. ईश्वरपूर, आष्टा या दोन गावांच्या परिसरातून तुजारपूर-इटकरे जवळून पुणे- बंगळुर हायवे क्रॉस करेल. . शिराळा तालुक्याला स्पर्श करत पन्हाळा परिसरात जाईल. कोडोली जवळून पुढं जोतिबा डोंगराला लांबून वंदन करून हा हायवे कोल्हापूर शहराच्या पश्चिमेकडून सह्याद्री घाटातून राधानगरी तालुक्याच्या सीमेजवळून भुदरगड तालुक्यात सरकेल. बाळू मामांच्या आदमापूरचं दर्शन घेत आजऱ्या जवळ पोहोचेल. तेथून चंदगडला येऊन ठेपणार आहे. ^बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मात्र या नव्या झालेल्या शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला आहे. आम्ही १३ जिल्ह्यातून विविध मोर्चा काढून शासनाला नव्याने झालेल्या नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गाला देखील विरोध दर्शवणार आहोत. सुहास गायकवाड, शेतकरी, शेळगाव आर. आराखड्यातील महत्त्वाचे बदल १-पूर्वी मंजूर झालेल्या आराखड्यात काही तांत्रिक व स्थानिक अडचणी लक्षात घेऊन सुधारणा करण्यात आल्या आहेत. संबंधित विभागांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहण्या, लोकप्रतिनिधींच्या सूचना आणि मंत्रिमंडळाच्या चर्चेनंतर हा अंतिम निर्णय घेण्यात आला. २-सध्या नागपूर ते गोवा प्रवासासाठी लागणारा वेळ मोठा आहे. मात्र या नवीन महामार्गामुळे प्रवासाचा वेळ सुमारे १८ तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूक अधिक वेगवान होईल. ३-महामार्गामुळे औद्योगिक गुंतवणूक वाढण्याची शक्यता असून, कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ होणार आहे. विशेषतः शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला बाजारपेठेत जलद पोहोच मिळेल. तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:26 am

भोंदूबाबाचे राजकीय वरदहस्त शोधणे सुरु:साळुंखे म्हणाले, माझा तर विणेलाच हात, भोंदूबाबाच्या स्थानिक कनेक्शनच्या शोधात नेटिझन्स, चुकीची माहिती पसरवून प्रतिमा मलिनचा प्रयत्न- साळुंखे‎

खरात दाम्पत्याला तुळशी माळ घालून सत्कार होत असतानाचा व्हायरल फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांची उपस्थिती असल्याने, भोंदूबाबाचे स्थानिक राजकीय वरदहस्त शोधण्याचे काम नेटिझन्सनी सुरू केल्याचे दिसून आले. दरम्यान साळुंखे यांनी मी केवळ एका कार्यक्रमात विणेला हात लावला, सार्वजनिक जीवनात अनेकांच्या भेटी होतात, यापलिकडे काही नाही, असे स्पष्टीकरण माध्यमांना’ दिले आहे. महिला अत्याचाराच्या गंभीर आरोपाखाली जेरबंद असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्या पाप कर्माचे पाढे वाचले जात असतानाच, स्थानिक राजकीय कनेक्शन समोर येऊ लागल्याने खळबळ उडाली आहे. खरात दांपत्यासोबतचा माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांचा एक फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, यामुळे सांगोल्याच्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. साळुंखे-पाटील यांनी आपण केवळ एका सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित होतो. त्या वेळी कुणीतरी खरात यांना वीणा दिली होती, त्याला आपण फक्त हात लावला. आपला कोणताही संबंध नसल्याचा पुनरुच्चार केला. काहीजण जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. अंधारे यांनी केलेल्या आरोपावर त्यांनी पुरावे सादर करावेत. तालुक्यातील असंतुष्टांचा यामध्ये हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे . . व्हायरल फोटोची सत्यता पडताळणी नसली तरी सांगोल्यातील वासूद व चिणके येथील दोन कार्यकर्ते दिसत असल्याने नेटिझन्सना फोटो स्थळाची उत्सुकता लागली आहे. . उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी साळुंखे-पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. खरात यांच्या मुलीसाठी लाखो रुपयांचा फ्लॅट देण्यात आल्याचे म्हटले आहे. फोटोतून वासूद, चिणकेचे कार्यकर्ते स्थळाची उत्सुकता

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:25 am

ब्रिटीशांची मग्रुरी मोडून रणरागिणींनी ओढला हनुमानाचा रथ:97 वर्षांच्या शौर्याची परंपरा,संगमनेरमध्ये आजही रथ ओढण्याचा पहिला मान महिलांचाच‎

आज संगमनेरमध्ये जेव्हा हनुमान जयंतीचा रथ ओढला जातो, तेव्हा पहिला मान महिलांना मिळतो. ही केवळ परंपरा नाही, तर ब्रिटीश सत्तेचा मग्रुरी उतरवणाऱ्या एका अचाट साहसाची स्वाक्षरी आहे. १९२९ साली ५०० सशस्त्र पोलिसांच्या संगिनींना न डगमगता संगमनेरच्या लेकींनी जो गनिमी कावा' केला, त्याचा हा रोमहर्षक थरार..! स्वातंत्र्यपूर्व काळात १९२७ पासून ब्रिटीश प्रशासन आणि संगमनेरकर यांच्यात रथाच्या मार्गावरून तीव्र संघर्ष सुरू होता. १९२९ साली तर मारुती मंदिराभोवती ५०० सशस्त्र पोलिसांचा वेढा होता. कलेक्टर आणि मॅजिस्ट्रेट यांनी स्थानिक लोकांना धमकावूनही जनसमुदाय मागे हटला नाही. सकाळी ९:३० च्या सुमारास वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले असतानाच, महिलांचा एक मोठा जमाव रथापाशी पोहोचला. यामध्ये झुंबराबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि पार्वतीबाई संत या रणरागिणी अग्रभागी होत्या. या महिलांनी अत्यंत शिताफीने गनिमी काव्याचा वापर केला. एका मुलाला अटक करताना पोलिसांचे लक्ष विचलित झाले आणि नेमक्या त्याच क्षणी झुंबराबाईंनी विजेच्या वेगाने रथावर उर्वरित पान ४ ब्रिटिशांवर बत्ताशांचा केला महिलांनी मारा पोलिसांनी एका तरुणाला पकडताच तिथे वाद निर्माण झाला होता. सर्व पोलीस तिकडे धावले. हीच संधी साधून झुंबराबाई अवसक क्षणात रथावर चढून मारुतीची प्रतिमा आत ठेवली. अडीचशे महिलांनी गुलालाच्या मुठी पोलिसांच्या डोळ्यांत फेकल्या व प्रसादासाठी आणलेल्या बत्ताशांचा मारा केला. महिलांनी ‘गनिमी कावा’ वापरुन रथ पुढे नेला. ब्रिटिशांविरुद्ध नागरी उठाव, महिलांचे धाडस ^ संगमनेरचा हा लढा केवळ धार्मिक नव्हता, तर तो ब्रिटीश सत्तेविरुद्धचा नागरी उठाव होता. महिलांनी दाखवलेले धाडस आणि गनिमी कावा हे तत्कालीन स्वातंत्र्य चळवळीतील महिलांच्या वाढत्या सहभागाचे उत्तम उदाहरण आहे. हा वारसा संगमनेरची अस्मिता असून तो आजही तितकाच प्रेरणादायी आहे. – डॉ. संतोष खेडलेकर, इतिहास अभ्यासक.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:14 am

बहिरवाडीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारायणाची सांगता:सभागृह क्षमतेपेक्षा अधिक भाविकांची उपस्थिती,दर्शनासाठी मंदिरात गर्दी‎

तालुक्यातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र बहिरवाडी येथे श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त आयोजित त्रिदिनात्मक नामसप्ताह व पारायण सोहळ्याची बुधवारी देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली. मुख्य यात्रा असल्याने सकाळी आठ वाजता गंगेवरून आणलेल्या कावडीच्या पाण्याने भगवान कालभैरवनाथांना जलाभिषेक करण्यात आला. त्यानंतर भास्करगिरी महाराज व मध्यमेश्वर देवस्थानचे प्रमुख महंत ऋषिनाथ महाराज यांनी मूर्तीचे पूजन करून दर्शन घेतले. टाळ-मृदुंगाच्या गजरात भजने गात भास्करगिरी महाराजांचे स्वागत करण्यात आले. भास्करगिरी महाराज म्हणाले, बहिरवाडी येथील श्री कालभैरवनाथ हे जागृत दैवत असून दृष्ट प्रवृत्तीचा संहार करण्यासाठी ते अवताररूपाने कार्य करतात. त्यांच्या भक्तीमुळे परिसराचा कायापालट झाला असून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. या भागातील युवा संत मंडळीही उत्तम कार्य करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पारमार्थिक कार्याची ज्योत तेवत ठेवत नियम व शिस्तीने देवस्थानाचे धार्मिक वैभव जपण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे उपस्थित होते. बहिरवाडीकडे येणाऱ्या रस्त्याच्या कामांना खडीकरणाने सुरुवात झाल्याने भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते आमदार लंघे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच या सोहळ्यात योगदान देणाऱ्या दात्यांचा व संत मंडळींचा श्री कालभैरवनाथ देवस्थानच्यावतीने गौरव करण्यात आला. यावेळी देवगडचे सेवेकरी बाळू महाराज कानडे, तात्या महाराज शिंदे, नारायण महाराज ससे, रामनाथ महाराज पवार, लक्ष्मण महाराज नांगरे, विजय महाराज पवार, शुभम महाराज बनकर, गणेश महाराज तनपुरे यांच्यासह श्री कालभैरवनाथ पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष-विश्वस्त, समस्त ग्रामस्थ, श्री कालभैरवनाथ युवा मंच, श्री कालभैरव तरुण मंडळ, श्री कालभैरवनाथ यात्रा समितीचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते. बहिरवाडी येथे आयोजित त्रिदिनात्मक नामसप्ताह व काल्याच्या कीर्तनासाठी उभारण्यात आलेल्या सभागृहाची क्षमता सुमारे ७ हजार होती. मात्र यापेक्षाही अधिक भाविक उपस्थित राहिल्याने परिसरात मोठी गर्दी झाली. टाळ-मृदुंगाच्या गजरात भजने, कीर्तन व धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:12 am

संतांच्या विचारांमधून समाजाला मिळते योग्य दिशा:हभप श्वेताताई महाराज बडे यांचे प्रतिपादन, अखंड हरिनाम सप्ताहास भाविकांची गर्दी‎

मनुष्याने समाजामध्ये वावरताना नम्रता अंगिकारणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जागी स्थिर राहायचे असेल तर त्याने नम्रतेने वागले पाहिजे. संतांच्या जीवनात नम्रता, प्रेम, दया आणि जगाच्या कल्याणासाठी असलेले धार्मिक विचार यांचा मोठा साठा आहे. त्यांच्या विचारांमुळेच समाजाला योग्य दिशा मिळते असे प्रतिपादन हभप श्वेताताई महाराज बडे यांनी केले. नालेगाव येथील गाडगीळ पटांगण येथे श्री हनुमान जयंतीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात हभप श्वेताताई महाराज बडे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. या कीर्तनातून संत विचारांचे महत्त्व, परमार्थाची गरज यावर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. संतांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि आपल्या जीवनामध्ये त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. संतांचे विचार हे प्रेरणादायी असून आजच्या काळात त्यांची खरी गरज आहे. जसे भाजीमध्ये मीठ महत्त्वाचे असते, तसेच आपल्या जीवनामध्ये संतांचे स्थान आहे. संतांचे विचार नसतील तर जीवनाला चव राहत नाही. आपल्या जीवनामध्ये साधू सेवा, परमार्थ आणि चांगले कार्य असणे गरजेचे आहे. आपल्याला मिळालेला मानव जन्म काहीतरी चांगले करण्यासाठी आहे. संत आपल्याला थेट धन देत नाहीत, मात्र मिळालेले धन कसे जपायचे, कसे योग्य वापरायचे याचे ज्ञान देतात. त्यांच्या विचारांमधून जीवन जगण्याची योग्य दिशा मिळते, असेही त्यांनी नमूद केले. कीर्तनादरम्यान संतांच्या जीवनातील विविध उदाहरणे देत त्यांनी उपस्थित भाविकांना संत विचारांचा संदेश दिला. या प्रभावी कीर्तनामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले होते. टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि हरिनामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. यावेळी माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांनी सांगितले की, गेल्या ३४ वर्षांपासून श्री हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 2 Apr 2026 8:11 am