हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचे अतुलनीय योगदान
परभणी : हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी मानवतेच्या रक्षणासाठी व धार्मिक स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करून संपूर्ण जगाला सहिष्णुतेचा, सत्याचा व त्यागाचा मार्ग दाखविला आहे. भारत ही संत, थोर महापुरुष आणि वीर योद्ध्यांची भूमी आहे. या योद्ध्यांनी भारताचे अनेक पातळ्यांवर रक्षण केले आहे. त्यामधील एक अत्यंत महत्त्वाचे कार्य हिंद की चादर […] The post हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींचे अतुलनीय योगदान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असले, तरी हे बहुमत काठावरचे असल्याने राजकीय वर्तुळात 'घोडेबाजारा'ची चर्चा सुरू झाली आहे. फोडाफोडीच्या भीतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्या 29 नगरसेवकांना मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवले आहे. महापालिकेत महापौर आणि स्थायी समिती सभापती यांसारखी महत्त्वाची पदे मिळवण्यासाठी आपली 'बार्गेनिंग पॉवर' वाढवण्याचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. या अनपेक्षित हालचालीमुळे आगामी काळात सत्तास्थापनेसाठी महायुतीमध्ये अंतर्गत रस्सीखेच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींवर राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या असताना, शिवसेना शिंदे गटाच्या महिला प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी या कृतीमागचे नेमके कारण स्पष्ट करत विरोधकांचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे. नवख्या नगरसेवकांसाठी हॉटेलमध्ये शिबिर शीतल म्हात्रे म्हणाल्या, आम्ही महायुती म्हणून लढलो आणि जिंकलो आहोत, पाठीत खंजीर खुपसण्याची आमची भूमिका नाही. आम्ही महायुती म्हणूनच सत्तेत येणार आहोत. तसेच नगरसेवकांना हॉटेलवर ठेवण्यात आल्यासंदर्भात त्या म्हणाल्या, आमचे जवळपास 20 नगरसेवक नवखे आहेत, त्यांना मनपाचे कामकाज माहित नाही. त्यामुळे त्यांच संदर्भाने दोन दिवसीय शिबिर घेतले आहे. त्यासाठीच हे नगरसेवक हॉटेलमध्ये आहेत. हे उबाठाच्या नगरसेवकांना हरवून आले आहेत, असेही म्हात्रे म्हणाल्या. इतकेच नव्हे तर महायुती ही बाळासाहेब यांनी केलेली नैसर्गिक युती आहे. बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठीचा हा विषय नसल्याचेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. संजय राऊतांवर बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाश्ता करण्यासाठी हॉटेल ताज लँड्स एन्डमध्ये जाणार आहेत, यावर शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देताना बोचरी टीका केली आहे. त्या म्हणाल्या, संजय राऊत म्हणजे चाकरी सिल्व्हर ओकची आणि भाकरी मातोश्रीची असे आहे. सगळ्यांना खड्ड्यात घातले, खासदारकी संपत आली आहे. तीही शिंदेंच्या कृपेमुळे आली होती. नगरसेवकांना मस्का मारायला येणार असतील नाहीतर मला शिंदेंकडे घेऊन चला म्हणायला येतील, असा टोलाही म्हात्रे यांनी लगावला आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत बहुमतासाठी आवश्यक 114 हा आकडा गाठण्यासाठी भाजपकडे 89 जागा असल्याने त्यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची मदत घेणे अपरिहार्य ठरले आहे. या स्थितीचा फायदा घेत शिंदे गटाकडून महापौरपदाचे अडीच-अडीच वर्षांचे सूत्र आणि स्थायी समितीसह अन्य महत्त्वाच्या समित्यांमध्ये प्रभावी प्रतिनिधित्वाची मागणी केली जाण्याची दाट शक्यता आहे. सत्तास्थापनेसाठी सुरू असलेल्या या अटी-शर्तींच्या राजकारणामुळे आणि संभाव्य वाटाघाटींमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत असून, महायुतीमधील सत्तेचे हे समीकरण नेमके कसे जुळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे तर त्यांचा पक्ष प्रवेशाचा मुहूर्त देखील ठरला असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. पक्षप्रवेश ही फक्त टेक्निकल बाब आता राहिलेली आहे, ती पण लवकरच पूर्ण होईल, असे विधान पाटील यांनी केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून समरजित घाटगे हे शरद पवार गटाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. घाटगे हे पुन्हा एकदा भाजपच्या ब्रॉड कोल्डमध्ये आलेले आहेत. पक्षप्रवेश ही फक्त टेक्निकल बाब आता राहिलेली आहे, ती पण लवकरच पूर्ण होईल, असे विधान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच घाटगे यांचे कार्यकर्ते जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढवणार असल्याची माहिती देखील चंद्रकांत पाटलांनी दिली आहे. तसेच समरजित घाटगे हे महायुतीच्या बैठकीला देखील उपस्थित असल्याचे समजते. विधानसभेच्या वेळी केला होता शरद पवार गटात प्रवेश कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर, समरजितसिंह घाटगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. मुश्रीफ यांच्या विरोधात त्यांनी आक्रमकपणे निवडणूक लढवली, मात्र या थेट लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणुकीतील या पराभवानंतर घाटगे यांची पुढची राजकीय वाटचाल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच स्थानिक राजकारणात एक अनपेक्षित वळण पाहायला मिळाले. अनेक वर्षांचा राजकीय संघर्ष बाजूला सारून, कागल नगरपरिषद निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांनी ऐतिहासिक आघाडी केली. या नव्या समीकरणाने निवडणुकीत मोठी किमया साधली असून, शिवसेना शिंदे गटाचा दारुण पराभव करत मुश्रीफ-घाटगे आघाडीने 23 पैकी 23 जागांवर विजय मिळवून पूर्ण 'व्हाईट वॉश' केला आहे. नगराध्यक्षपदी सविता प्रताप माने यांची निवड झाली असून, या एकतर्फी विजयामुळे कागलमधील दोन्ही दिग्गज नेत्यांच्या एकत्र येण्यावर मतदारांनी मोहोर उमटवल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सोमनाथाचे मंदिर गजनीच्या मेहमुदने उद्धवस्थ केले त्याचपद्धतीने भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला आहे. भाजप व नरेंद्र मोदी यांना अहिल्यादेवींच्या स्मृती पुसून टाकायच्या आहेत, म्हणूनच अत्यंत निर्दयी व विकृतपणे घाट व घाटावरील मूर्ती नष्ट करण्यात आल्या आहेत, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, अहिल्यादेवींचा 300 वा जन्मशताब्दी उत्सव साजरा करण्यासाठी भाजप सरकार एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करत आहे तर दुसरीकडे मात्र अहिल्यादेवींच्या स्मृती पुसण्याचे पाप करत आहे. हिंदुत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या भाजपचा हा दुटप्पीपणा जनतेच्या समोर उघड झाला आहे. नरेंद्र मोदींच्या अंगात गजनीचे भूत शिरले आहे, असा हल्लाबोल सपकाळ यांनी केला आहे. अहिल्यादेवींचा अपमान महाराष्ट्राची जनता कदापी सहन करणार नाही. भाजप व मोदींच्या या कृतीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल, असा इशाराही सपकाळ यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेत ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे म्हणाले, अहिल्यादेवींनी 1771 मध्ये वाराणसी मणिकर्णिका घाट बांधला, या घाटावर 10 जानेवारी रोजी भाजप सरकार व नरेंद्र मोदी यांनी बुलडोझर चालवला. यावेळी अहिल्यादेवींच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली, हे सर्व धनगर समाजाचा स्वाभिमान दुखवणारे आहे. 27 तारखेपर्यंत मोदींनी जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपच्या एकाही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या घाटावर बुलडोझर चालवून धनगर समाजाचा घोर अपमान केल्यानंतरही भाजपा आमदार गोपीचंद पडळकरसारखे धनगर समाजाचे नेते म्हणवणारे गप्प कसे बसले, असा सवालही यशपाल भिंगे यांनी केला आहे.
बीडमध्ये अधिका-याचा संशयास्पद मृत्यू
बीड : बीडमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. जीएसटी विभागातील अधिका-याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सचिन जाधवर असे मृत अधिका-याचे नाव आहे. ते मागील २४ तासांपासून बेपत्ता होते. सोलापूर-धुळे महामार्गालगत कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. धक्कादायक म्हणजे कारमध्ये पोलिसांना कोयता आणि मडकं आढळल्याने खळबळ उडाली आहे. जाधवर यांच्या कारमध्ये एक पत्रही मिळाले […] The post बीडमध्ये अधिका-याचा संशयास्पद मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवार, दि. २८ जानेवारी ते रविवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२६ या दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. या महोत्सवात भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा पद्मपाणि पुरस्कार चित्रपट संगीताला नवी दिशा देणारे ज्येष्ठ भारतीय संगीतकार, पद्मविभूषण श्री. इलयाराजा (राज्यसभा सदस्य) यांना जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा महोत्सवाचे संस्थापक व संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम व महोत्सवाचे मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर यांनी केली आहे. पद्मपाणि पुरस्कार निवड समितीने श्री. इलयाराजा यांची निवड केली असून या समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक लतिका पाडगांवकर तर सदस्यपदी चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर व चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश होता. पुरस्काराचे स्वरूप पद्मपाणि सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व दोन लक्ष रूपये असे आहे. पद्मपाणि पुरस्कार प्रदान सोहळा मान्यवरांच्या हस्ते महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता रुक्मिणी सभागृह, एमजीएम परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. तर महोत्सव पुढील पाच दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ इलयाराजा यांनी भारतीय चित्रपटसंगीतात सातत्यपूर्ण आणि सर्जनशील योगदान दिले आहे. आतापर्यंत त्यांनी ७,००० हून अधिक गाणी तसेच १,५०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी संगीत निर्मिती केली आहे. तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदी, मराठी आदी विविध भारतीय भाषांमधील त्यांच्या संगीतरचनांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. कर्नाटकी संगीत, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व लोकसंगीताच्या बाजावर आधारलेले, तसेच पाश्चात्त्य सिम्फनीची शिस्त लाभलेले संगीत ही त्यांची प्रमुख ओळख आहे. चित्रपटातील प्रसंगांना भावनिक खोली देणारे पार्श्वसंगीत आणि कथानकाला पूरक ठरणारी संगीतरचना हि इलयाराजा यांची प्रमुख ओळख आहे. कला, करुणा आणि सर्जनशील साधनेचे प्रतीक मानल्या जाणार्या पद्मपाणि पुरस्कारासाठी इलयाराजा यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या संगीतातील आध्यात्मिकता, शिस्त आणि मानवी संवेदनशीलतेमुळे ते जनमानसात ‘इसैग्नानी’ (संगीतक्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्व) म्हणून ओळखले जातात. नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत असून प्रोझोन मॉल यांचे विशेष सहकार्य या फेस्टिव्हलला मिळालेले आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. सॉलीटेअर टॉवर्स, कालिका स्टील, डेली हंट हे या महोत्सवाचे सह आयोजक आहेत. मराठवाड्याचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्या या महोत्सवात देशभरातील नागरीकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, सतीश कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, सहसंचालक जयप्रद देसाई व ज्ञानेश झोटींग, डॉ. अपर्णा कक्कड, श्वेता कागलीवाल, डॉ.आशिष गाडेकर, कला संचालक डॉ.शिव कदम, डॉ.रेखा शेळके, डॉ.प्रेरणा दळवी, शिव फाळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, सुबोध जाधव, अमित पाटील, निखील भालेराव आदींनी केले आहे.
मुंबई : बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा आणि सुनीता आहुजा त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतात. सुनीता अनेकदा तिचा पती गोविंदासोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे बोलली आहे. सुनीता अनेक वेळा गोविंदाच्या अफेअरच्या अफवांवरही बोलली आहे. आता, तिने पुन्हा एकदा तिच्या पतीच्या अफेअरवर मत व्यक्त केले आणि धक्कादायक खुलासा केला आहे. नवीन पॉडकास्ट मिस मालिनीशी झालेल्या मुलाखतीत […] The post मी त्याला माफ करणार नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अकोल्यात बंडखोर आशिष ठरणार गेम चेंजर
अकोला : अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. अकोला महापालिकेत एकूण ८० जागा आहेत. बहुमतासाठी ४१ चा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सत्तेच्या चाव्या दोन अपक्ष, शिंदे आणि शरद पवारांच्या प्रत्येकी एका नगरसेवकांच्या हाती आहेत. दोनपैकी एक अपक्ष भाजपचे बंडखोर आशिष पवित्रकार आहेत. भाजपाचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित […] The post अकोल्यात बंडखोर आशिष ठरणार गेम चेंजर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नामनिर्देशित नगरसेवकांसाठी इच्छुकांची लॉबिंग
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्ष हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. निवडणूकपूर्व त्यांची शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती होती. आता दोन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापन करतील. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुंबई महापालिकेचा महापौर ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत ज्यांना पक्षाने तिकिट नाकारले, तिकिटाच्या चढाओढीत ज्यांना मागे थांबावे लागले अशा नेत्यांना आता स्वीकृत सदस्यपदाची […] The post नामनिर्देशित नगरसेवकांसाठी इच्छुकांची लॉबिंग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कल्याण-डोंबिवलीत फोडाफोडीचे राजकारण?
कल्याण : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला, अनेकांना पक्षांनी तिकिट दिले नाही म्हणून त्यांनी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणूक लढवली. आता ते नगरसेवक पुन्हा आपल्या जुन्या पक्षाकडे परत जाणार का? अशी चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे कल्याण-डोंबिवलीमधील रात्री झालेल्या गाठीभेटी… कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले. यातील प्रभाग […] The post कल्याण-डोंबिवलीत फोडाफोडीचे राजकारण? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत अखेर तांत्रिक बिघाडांमुळे रखडलेले दोन निकाल 'पाडू' (PADU - Printing Auxiliary Display Unit) या यंत्राच्या सहाय्याने निकाली काढण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी या यंत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र, निवडणूक आयोगाने या यंत्राचा आधार घेत कुर्ला आणि घाटकोपरमधील दोन प्रभागांतील निकाल घोषित केले असून, येथे अनुक्रमे भाजप आणि शिंदे गटाने बाजी मारली आहे. मतदान यंत्रात (EVM) तांत्रिक बिघाड झाल्यास मतमोजणीत अडथळा येऊ नये, यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने 'पाडू' यंत्राचा पर्याय निवडला होता. मात्र, मतदानाच्या काही तास आधीच या यंत्राचा वापर होणार असल्याचे जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले होते. हे यंत्र म्हणजे ईव्हीएममधील डेटा चोरण्याचा किंवा त्यात फेरफार करण्याचा प्रकार आहे, अशी टीका करत दोन्ही ठाकरे बंधूंनी याला कडाडून विरोध केला होता. मात्र, प्रशासनाने तांत्रिक पेच सोडवण्यासाठी या यंत्राचा वापर करणे अपरिहार्य असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. कुर्ला प्रभाग १५९: प्रकाश मोरे यांची सरशी सर्वात मोठी चुरस कुर्ला येथील 'एल' वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १५९ मध्ये पाहायला मिळाली. येथे भाजपचे प्रकाश मोरे आणि काँग्रेसचे प्रल्हाद शेट्टी यांच्यात काटाजोड लढत होती. दुसऱ्या फेरीत एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मोजणी थांबवण्यात आली होती. इतर सर्व मशिनची मोजणी पूर्ण झाल्यावर मोरे आणि शेट्टी यांच्यात केवळ ४८३ मतांचा फरक होता. बिघडलेल्या मशिनमध्ये ५३१ मते होती, ज्यामुळे जय-पराजयाचे पारडे कोणत्याही बाजूला झुकू शकले असते. अखेर 'पाडू' यंत्राच्या सहाय्याने या ५३१ मतांची मोजणी करण्यात आली, ज्यामध्ये प्रकाश मोरे यांना अधिक मते मिळाल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आले. घाटकोपर प्रभाग १२५: शिंदे गटाचे सुरेश आवळे विजयी असाच तांत्रिक पेच घाटकोपर येथील 'एन' वॉर्डमधील प्रभाग क्रमांक १२५ मध्ये निर्माण झाला होता. येथेही ईव्हीएम सुरू होत नसल्याने मतमोजणीमध्ये अडथळा निर्माण झाला होता. उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण असताना प्रशासनाने 'पाडू' यंत्राचा आधार घेतला. या यंत्राद्वारे आकडेवारी स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार सुरेश आवळे यांनी विजय संपादन केल्याचे जाहीर करण्यात आले. भविष्यातील राजकीय संघर्षाची नांदी तांत्रिक अडथळ्यांमुळे रखडलेले कुर्ला आणि घाटकोपर येथील निकाल 'पाडू'मुळे मार्गी लागले असले, तरी या यंत्राच्या वापरामुळे विरोधकांच्या हाती नवीन कोलीत मिळाले आहे. ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होतोच कसा आणि त्यात 'पाडू'सारख्या बाह्य यंत्राचा हस्तक्षेप का केला जातो? असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत या यंत्राच्या विश्वासार्हतेवरून न्यायालयीन लढाई किंवा मोठे राजकीय आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई : राज्यात भाजपने दणदणीत यश मिळवले आहे. आता महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अशी विविध पदे निवडून आलेल्या नगरसेवकांना खुणावत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून प्रशासक राज होते. त्यामुळे अनेकांनी या पदासाठी फिल्डिंग, लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. पण या सगळ्यांच्या अपेक्षांवर सध्या पाणी फेरले गेले आहे. ही सर्वच प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे समोर येत आहे. राज्यात […] The post राज्यात महापौर निवड लांबणीवर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मॅरेथॉनमध्ये आमिर खानने घेतला भाग
मुंबई : प्रतिनिधी रविवार, १८ जानेवारी रोजी मुंबई मॅरेथॉनमध्ये ६५ हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. या गोल्ड लेबल इंटरनॅशनल शर्यतीची एकूण बक्षीस रक्कम जवळपास ३.५४ कोटी रुपये आहे. ४२ आणि २१ किलोमीटरच्या या शर्यतीत सहभागी होणा-या धावपटूंना कोस्टल रोडवर धावण्याची संधी मिळाली आहे. मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात पहिल्यांदाच कोस्टल रोडचा समावेश करण्यात आला आहे. सर्वसामान्यांसह या […] The post मॅरेथॉनमध्ये आमिर खानने घेतला भाग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागांमधील १७५ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांचा 'शाळा परिवर्तन प्रकल्प' (स्कूल ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्प) अंतर्गत कायापालट करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेला हा प्रकल्प, शासन आणि खासगी भागीदारीतून गुणवत्तापूर्ण, समावेशक आणि भविष्यमुखी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरत आहे. या प्रकल्पाची सुरुवात ८ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय देयके महामंडळ (NPCI) आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करारानंतर झाली. राष्ट्रीय देयके महामंडळ या प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य पुरवत असून, लर्निंग लिंक्स फाउंडेशनमार्फत त्याची अंमलबजावणी केली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेत जिल्हा परिषद, शालेय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र शासन यांचा सक्रिय समन्वय आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जात आहे. डिसेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पहिल्या ते चौथ्या टप्प्यात एकूण १२५ शाळांचा विकास करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या पाचव्या टप्प्यात (जून २०२५ ते नोव्हेंबर २०२६) आणखी ५० शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आरमोरी, आहेरी, चामोर्शी, देसाईगंज (वडसा), धानोरा, गडचिरोली, कोरची आणि कुरखेडा या आठही तालुक्यांमधील एकूण १७५ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांपर्यंत प्रकल्पाची व्याप्ती वाढली आहे. या प्रकल्पांतर्गत शाळांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. यामध्ये माहिती व तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट वर्गखोल्या, अद्ययावत ग्रंथालये, विज्ञान प्रयोगशाळा, गणित व क्रीडा शिक्षण साधने यांचा समावेश आहे. तसेच, 'इमारतच शिक्षणाचे साधन' (Building as Learning Aid) या संकल्पनेनुसार शैक्षणिक भित्तीचित्रे, शाळा परिसर व दर्शनी भागांचे सौंदर्यीकरण, आधुनिक स्वच्छतागृहे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची (जलशुद्धीकरण यंत्रणा) व्यवस्था केली जात आहे. याव्यतिरिक्त, शिक्षक प्रशिक्षण व क्षमता वृद्धी कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य व तंदुरुस्ती उपक्रम, शाळा व्यवस्थापन समित्यांचे बळकटीकरण आणि समुदाय सहभागाला प्रोत्साहन दिले जात आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच गोष्टीऑनलाइन झाल्या आहे. महत्त्वाचीकागदपत्रे डिजिलॉकरमध्येऑनलाइन ठेवून सुरक्षित करण्यातयेत आहे. याच डिजिलॉकरमध्येआता आधार कार्ड, ड्रायव्हिंगलायसेन्स, उत्पन्नाचा दाखला,जातीचा दाखला यासोबतच ग्राहकक्रमांक टाकून विजेची बिलेदेखील ठेवता येणार आहे. महत्त्वाची कागदपत्रे हवे तेव्हाउपलब्ध करून देणाऱ्या केंद्रसरकारच्या डिजिलॉकर याऑनलाइन सुविधेत आतावीजबिलेही उपलब्ध झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीअत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचावापर करून वीज ग्राहकांना‘इजऑफ लिव्हिंग’च्या आधारेअधिकाधिक सेवा देण्याची सूचनाकेली आहे. त्यानुसार महावितरणनेकेंद्र सरकारच्या डिजिलॉकरशीवीज बिले जोडली आहेत. त्यामुळेवीज ग्राहकांना आपल्या मोबाइलफोनमध्ये डिजिलॉकर ॲपमध्येठेवलेल्या महत्त्वाच्यादाखल्यांसोबतच वीज बिलेहीउपलब्ध झालेली आहेत. कामाची माहिती- अशी करावी प्रक्रिया मोबाइलमधील डिजिलॉकर अॅप सर्वात आधी उघडावे.किंवा digitallocker.gov.inया वेबसाइटला भेट द्या. तुमच्याआधार नंबर व पिनच्या मदतीनेलॉगिन करा. होम स्क्रीनवर‘Search'' (भिंगाचे चिन्ह) यापर्यायावर क्लिक करा. तिथे‘Utilities'' पर्याय निवडा किंवासर्च बारमध्ये ‘ElectricityBill'' असे टाइप करा. आता वीज कंपन्यांची यादी दिसेल. तुमच्या वीज पुरवठादार कंपनीचे नाव निवडा. त्यानंतर ग्राहक क्रमांक टाका. आवश्यक असल्यास बिलिंग युनिट भरा. माहिती भरल्यानंतर ‘GetDocument'' या बटणावर क्लिक करा. सिस्टिम तुमच्याकंपनीच्या डेटाबेसमधून बिल शोधून काढेल. काही सेकंदात वीजबिल डिजी लॉकरमध्ये दिसेल. आता हे बिल तुमच्या‘Issued Documents'' याविभागात कायमस्वरूपी सेव्हहोईल आणि पाहता येईल.
महाराष्ट्रात भाजप आणि एमआयएम हे दोन जातीयवादी विचारांचे पक्ष आहे. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांची दोघांची युती आहे. एमआयएम आणि भाजप हे महाराष्ट्र धर्मासाठी बाधक आहेत, त्यांनी फिक्स करत ही निवडणूक लढवली, यामुळे त्यांच्या दोघांची ताकद वाढलेली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. जिन्ना आणि हिंदू महासभेची युती होती. बंगालमध्ये मुस्लीम लीगचा मुख्यमंत्री, तर जनसंघाचे मुखर्जी हे उपमुख्यमंत्री होते. ही दोघांची नैसर्गिक युती आहे, जी या निवडणुकीत समोर आली. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्रातील जनता जर वेळीच सावध झाली नाही तर ही लोकं राज्याचे वाटोळे केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे औवेसी(एमआयएम) आणि देवेंद्र फडणवीस(भाजप) यांची जी मैत्री आहे एकाच विचाराने ते दोघे पुढे वाटचाल करत आहेत, हे आपण ओळखले पाहिजे. हा काय नवीन विषय नाही. वंचितसोबत सत्तेसाठी नाही विचारांसाठी युती हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस आणि शिवसेना गेली अनेक वर्षे मुंबई मनपा एकमेकांच्या विरोधात लढत आहे. मुंबईमध्ये काँग्रेसने वंचितसोबत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.आमच्यावर होणारी टीका ही चुकीची आहे. वंचित आघाडीच्या नेत्यांची भावना आम्ही जाणून घेणार आहोत. वंचितचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. पण जय-पराजय नाही तर आमच्यासाठी विचारांचा मेळ आहे. गांधी-आंबेडकर पॅटर्नने आम्हाला पुढे जायचे आहे त्या दृष्टीने आम्ही युती केली. गायकवाड-जगताप यांच्यात समन्वय घडवणार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे पक्षांतर्गत आहे त्यावर कारवाई सुरू आहे. भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्यातील अंतर्गत संघर्षावर लवकरच समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. आम्ही सर्व काँग्रेस नेते एकत्रित काम करत आहोत. या टीम वर्कच्या माध्यमातून आम्ही एकत्र येत पक्ष पुढे नेणार आहोत.
२०२५ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीसाठी कोविडनंतरचे सर्वात यशस्वी वर्ष ठरले आहे. तिकीट खिडकीवरील कमाईत वार्षिक आधारावर १३ टक्क्यांनी वाढ झाली. या वाढीमध्ये तिकीट दरातील २० टक्के वाढीचाही मोठा वाटा आहे. हिंदीत या वर्षी कमी चित्रपट आले असले तरी 'धुरंधर 'सारख्या चित्रपटामुळे हिंदी सिनेमाने पॅन इंडिया स्तरावर मोठी झेप घेतली. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने देशात ९५० कोटी आणि जगभरात १३०० कोटींहून अधिक व्यवसाय केला. यामुळे हा हिंदी चित्रपट इतिहासातील (या संदर्भात) सर्वात यशस्वी चित्रपट मानला जात आहे. याव्यतिरिक्त 'छावा', 'सैयारा' आणि 'वॉर-२' सारख्या हिंदी चित्रपटांनीही टॉप-१० मध्ये स्थान मिळवले. देशभरात ३७ चित्रपटांनी १०० कोटींहून अधिक कमाई केली. २०२४ मध्ये ही संख्या केवळ २२ होती. मल्याळम चित्रपटांचा व्यवसाय २०२४ मधील ५७२ कोटींवरून वाढून १,१६५ कोटींवर पोहोचला. तमिळ सिनेमाच्या तिकीट विक्रीत १७ टक्के, तर तेलुगू सिनेमात १५ टक्क्यांनी घट झाली. ९ वर्षांत चौथ्यांदा हिंदी चित्रपट कमाईत अव्वल
महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईच्या महापौरपदावरून रंगलेल्या चर्चेत आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. उद्धव ठाकरे सध्या डिप्रेशनमध्ये गेले असून ते जे बोलतात त्याला वास्तवाचा कोणताही आधार नाही. ज्यांच्याकडे संख्याबळ नाही, त्यांचा महापौर काय आकाशातून पडणार का? अशा बोचऱ्या शब्दांत राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने यश मिळवत बहुमत प्राप्त केले आहे. ठाकरे बंधुंना केवळ ७२ जागांवर समाधान मानावे लागले. महापौरपदाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केले. आपला महापौर व्हावा, हे स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असे म्हणत त्यांनी आशा कायम असल्याचे संकेत दिले. उद्धव ठाकरेंच्या या सूचक विधानावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी उपरोक्त विधान केले. नेमके काय म्हणाले नारायण राणे? उद्धव ठाकरे यांनी 'देवाच्या इच्छेने महापौर आमचाच होईल' असे विधान केले होते. त्यावर टोला लगावताना राणे म्हणाले, उद्धव ठाकरे आता देवावर विसंबून राहत आहेत, पण त्यांनी देवाला आतापर्यंत कधी जोडलेच नाही. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत आहे. मग तुमचा महापौर कसा होणार? एकदा संख्याबळ तपासून बघा. एवढा मोठा फरक तुम्ही कसा भरून काढणार? त्यांचा महापौर काय आकाशातून पडणार का? ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीवरही नारायण राणेंनी निशाणा साधला. सुरुवातीला जेव्हा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र होते, तेव्हा ते काही करू शकले नाहीत. वेगळे झाल्यावरही त्यांना काही करता आले नाही आणि आता पुन्हा एकत्र येऊनही ते काही करू शकले नाहीत. आम्हाला बाहेरचा मार्ग दाखवल्यामुळे आता नफा-तोटा काय असतो, याचा अनुभव उद्धव ठाकरेंना येत आहे. त्यांची शिवसेना आता फक्त नावाला उरली आहे, असे राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंना दिला घरी बसण्याचा सल्ला राज्यातील राजकीय स्थितीवर भाष्य करताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना घरी बसण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे आता देवावर विसंबून राहताय का? पण देवाला आतापर्यंत कधी जोडले नाहीत. त्यांनी संख्या बघावी. त्यांचा महापौर कसा होणार? त्यामुळे उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत. ते बोलतात ते वास्तव नाही. भाजप, शिवसेना शिंदे युतीची महाराष्ट्रातील जवळपास २५ महानगरपालिकांमध्ये सत्ता आली आहे. आता तरी शहाणे बनून घरी बसावे आणि जे ऑपरेशन करायचे ते करून घ्यावे”, असा बोचरा सल्ला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत हे आज मोठ्या शिष्टमंडळासह स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या ‘जागतिक आर्थिक परिषदेसाठी’ रवाना होत आहेत. 19 ते 23 जानेवारीदरम्यान होणाऱ्या या पाच दिवसीय दौऱ्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मात्र, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरून सरकारवर टीका करत गुंतवणुकीच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये जागतिक कंपन्या महाराष्ट्राऐवजी इतर राज्यांना पसंती देत असल्याची उदाहरणे दिली आहेत. मनोरंजन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘डिस्ने’ आणि सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील ‘हनीवेल’ यांनी विस्तारासाठी बंगळुरूची निवड केल्याचे त्यांनी नमूद केले. डिस्नेने बंगळुरूमध्ये 1.74 लाख चौरस फूट, तर हनीवेलने 4 लाख चौरस फूट जागा भाड्याने घेतली आहे. तसेच, डेलॉइटने मंगळुरूमध्ये 50 हजार नोकऱ्यांची घोषणा केली असून, मारुती सुझुकीने 35 हजार कोटींची गुंतवणूक करून गुजरातमध्ये नवीन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. देशाचे आर्थिक इंजिन असलेल्या महाराष्ट्राला जागतिक कंपन्यांची गुंतवणूक का मिळत नाही, असा थेट सवाल करत रोहित पवार यांनी सरकारच्या गुंतवणूक धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दावोस दौऱ्यात मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांनी प्रत्यक्ष गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी ठोस प्रयत्न करावेत आणि राज्यातील बेरोजगार तरुणांना खऱ्या अर्थाने दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. केवळ कागदावरचे सामंजस्य करार न करता प्रत्यक्ष उद्योग उभे राहावेत, असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडताना मागील वर्षीच्या दावोस दौऱ्याचे यश अधोरेखित केले आहे. गेल्या वेळी झालेल्या सामंजस्य करारांपैकी सुमारे 72 टक्के करार प्रत्यक्षात उतरल्याचा दावा त्यांनी केला आहे. मागील वर्षी 16 लाख कोटी रुपयांचे करार झाले होते आणि यंदाही तितकीच गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
महानगरपालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी राजकीय वादाच्या घटना समोर येत आहेत. नाशिकमध्ये विजयाचा जल्लोष करताना एका भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला करून आग लावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरीकडे, नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या एकमेव नगरसेविका आभा पांडे यांनी भव्य रॅली काढत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये राजकीय वाद विकोपाला गेला आहे. येथील शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका पूजा नवले आणि त्यांच्या समर्थकांवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रभागातील भाजपच्या पराभूत उमेदवार पुष्पा ताजनपुरे यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुष्पा ताजनपुरे यांच्या दाव्यानुसार, विजयाची रॅली काढत असताना नवले यांच्या कार्यकर्त्यांनी ताजनपुरे यांच्या घरात शिरून अश्लील कृत्य केले आणि घरावर ज्वलनशील पदार्थ फेकून आग लावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी नवनिर्वाचित नगरसेविका पूजा नवले, त्यांचे पती प्रवीण नवले यांच्यासह १५ ते २० संशयित समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे. एकटी लढली अन् जिंकली, आभा पांडेंचे शक्तीप्रदर्शन नागपूर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला मोठा धक्का बसला असला तरी, प्रभाग २१ मधून निवडून आलेल्या आभा पांडे यांनी पक्षाची अब्रू राखली आहे. आज त्यांनी शांती नगर परिसरातून भव्य 'आभार रॅली' काढून मतदारांचे आभार मानले. रॅली दरम्यान बोलताना आभा पांडे म्हणाल्या की, माझ्या विरोधात स्थानिक आमदारांनी हिंदी भाषक कार्ड आणि पैशांचा वारेमाप वापर केला होता. मात्र, जनतेने माझ्या कामावर विश्वास दाखवला. अजित पवार यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला होता, तो मी सार्थ ठरवला आहे. आता यापुढेही जनतेच्या प्रश्नांसाठी मी कटिबद्ध राहीन. निकालानंतर शिंदे समर्थकाच्या कारला आग दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये देखील महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर शिंदे समर्थकाच्या कारला आग लावल्याची घटना समोर आली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री एका कारला जाणीवपूर्वक आग लावण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही कार आकाश बारणे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. आकाश बारणे हे शिंदे शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराचे चुलत भाऊ असून, प्रभाग क्रमांक 23 म्हणजेच थेरगाव परिसरात ही घटना घडली. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानेच त्यांची कार पेटवल्याचा आरोप आकाश बारणे यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत आज दावोसकडे (स्वित्झर्लंड) रवाना झाले आहेत. 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या (WEF) वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला असून, राज्यासाठी जास्तीत जास्त गुंतवणूक खेचून आणणे हे या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १९ ते २३ जानेवारी २०२६ पर्यंत दावोसमध्ये असतील. त्यांच्यासोबत वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळही उपस्थित राहणार आहे. मागील वर्षी राज्य सरकारने दावोसमध्ये १६ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) केले होते. त्यापैकी जवळपास ७२ टक्के करार प्रत्यक्षात उतरले असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला होता. यंदा हा आकडा पार करून १६ लाख कोटींहून अधिकच्या गुंतवणुकीवर राज्य सरकारचा भर असणार आहे. मुंबईच्या महापौर निवडीसाठी प्रतिक्षा राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. मात्र, मुख्यमंत्री पुढचे पाच दिवस विदेश दौऱ्यावर असल्याने आणि शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्ये असल्याने, महापौर निवडीची प्रक्रिया आता मुख्यमंत्र्यांच्या पुनरागमनानंतरच म्हणजेच २३ जानेवारीनंतरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर राऊतांची टीका दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री दावोसमधून गुंतवणूक आणतात असे म्हणतात. ते अनेक वर्षांपासून दावोसला जात आहेत, पण महाराष्ट्र गुंतवणूक काही दिसत नाही. त्यांची सगळी गुंतवणूक नगरपालिकांपासून बीएमसीपर्यंतच्या निवडणुकीत असते. त्यामुळे परदेशातून जी गुंतवणूक यायला पाहिजे, ती आम्हाला कधीच दिसली नाही. दावोसमध्ये बसून देखील ते महानगरपालिकेचेच राजकारण करणार आहेत. त्यापेक्षा इथे बसून दावोसमधील गुंतवणूक इकडे आणा, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. हे ही वाचा… आमदारांना पळवणारे आता नगरसेवकांसाठी का घाबरले?:शिंदेंना फडणवीसांच्या राजवटीचीही भीती वाटतेय, राऊतांचा बोचरा प्रहार महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौर कोणाचा होणार? यावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ज्यांनी स्वतः शिवसेनेचे आमदार फोडले, त्यांना आज स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटतेय, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी 'हास्यजत्रा' आहे, अशा शब्दांत राऊतांनी उपरोधिक टोला लगावला. सविस्तर वाचा…
महापालिका निवडणुकीत 87 जागा घेऊन भाजपने सोलापुरात इतिहास रचला. आता महापौर कोण याची उत्सुकता लागून राहिली. त्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या गटातील विनायक कोंड्याल, प्रथमेश कोठे यांच्या नावांची चर्चा आहे. दुसरीकडे आमदार विजयकुमार देशमुख गटाचे किरण देशमुख, अनंत जाधव, अमर पुदाले, राजश्री कणके, शिवानंद पाटील यांच्या नावांची चर्चाही सुरू झाली आहे. पक्षीय पातळीवरच त्याचा निर्णय होईल. परंतु भाजपमध्ये आता दोन गट कायम असतील. एक कोठे गट आणि दुसरा देशमुख गट. त्यामुळे महापौर कोठे गटाचा की देशमुख गटाचा याची उत्सुकता लागली आहे. कोठे गटाच्या सर्वाधिक जागा आल्याने त्यांच्याच गटाला महापौर पदाची संधी मिळेल, असे सांगण्यात येते. तसे झाल्यास कोठे यांचे भाऊजी विनायक कोंड्याल अथवा त्यांचे चुलत बंधू प्रथमेश कोठे यांची वर्णी शक्य आहे. नाराज देशमुखांना जवळ करण्याच्या हेतूने काही हालचाली झाल्यास डॉ. किरण देशमुख, अमर पुदाले, राजश्री कणके, शिवानंद पाटील आणि अनंत जाधव यांच्या नावांचा विचार होऊ शकेल. पालकमंत्री घेणार उद्या बैठक पालकमंत्री जयकुमार गोरे सोमवारी (ता. 19) सोलापुरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत नूतन नगरसेवकांची बैठक होईल. सर्वांचा सत्कार, संवाद असा कार्यक्रम आयोजित केला आहे. नरेंद्र काळे : पक्षात उत्तम संघटक, हिंदुत्वाचा चेहरा. विरोधी पक्षनेत्याचा अनुभव, अभ्यासपूर्ण मुद्दे आणि प्रभावी चेहरा. प्रथमेश कोठे : माजी महापौर स्व. महेश कोठे यांचे चिरंजीव. आमदार कोठे यांच्या शब्दावरून भाजपमध्ये आले. किरण देशमुख : उच्च शिक्षित, भाजप युवा मोर्चाचे पद सांभाळले होते. गेली पाच वर्षे नगरसेवक म्हणून उत्तम कामगिरी. विनायक कोंड्याल : सर्वाधिक मतांनी विजयी. तीनवेळा सलग निवडून आले. आमदार देवेंद्र कोठे यांचे समर्थक. विरोध झाला तर...डॉ. देशमुख यांना आमदार कोठे गटाकडून तर काळेंना आमदार सुभाष देशमुखांकडून विरोध. देशमुख आणि कोठे यांच्या गटातच असणार मोठी रस्सीखेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शनिवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांचे पेढा भरवून अभिनंदन करताना फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठीही शुभेच्छा दिल्या. विमानसेवा, आयटी पार्क यामुळे सर्वाधिक जागा मिळाल्याचे गोरेंनी सांगितले. आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या सहकार्याने जिंकल्याचे म्हणाले. आठ दिवसांत पदाधिकाऱ्यांच्या निवडी 39 व्या महापौर निवडीसाठी आता आठ दिवस राहिले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कौन्सिल हॉलमधील सभागृह सजले आहे. महापौरांच्या खुर्चीसह सदस्यांच्या बाकांचे नूतनीकरण करण्यात आले. त्यामुळे सभागृहाचे रूपडेच पालटून गेले. सभागृहासह महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभागृह, पक्षनेता, विरोधी पक्षनेता, महिला व बालकल्याण समिती सभापती आदींच्या कक्षांची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यावर 70 लाख रुपयांचा खर्च होत आहे. पुढील आठ दिवसांत सुशोभीकरणाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 1964 मध्ये पहिले महापौर होण्याचा मान स्व. पारसमल जोशी यांना मिळाला होता. 1997 मध्ये शेवंता पवार या पहिल्या महापौर ठरल्या होत्या. 1964 ते 2022 पर्यंत 38 महापौर होऊन गेले. पुढील आठ दिवसांत 39 वे महापौर विराजमान होतील. महापौर निवासही तयारीत रेल्वेलाइन्स परिसरातील महापौर बंगल्यातही काही कामे करण्यात आली. प्रशासकीय कारकिर्दीत आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे काही काळासाठी या बंगल्यात वास्तव्यास होते. नव्या महापौरांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांच्या इच्छेनुसार काही कामे होणार आहेत.
बीएमसीच्या निवडणूक निकालांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन पेच निर्माण झाला आहे. भाजप मुंबईत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. पहिल्यांदाच भाजपचा महापौर होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या 29 नवीन नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये हलवले आहे. बाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिंदे गटाचे म्हणणे आहे की 2026 हे शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे किमान अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर असावा. यावरून भाजप-शिंदे गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. दरम्यान, रविवारी उद्धव गटाचे संजय राऊत यांनी दावा केला आहे की एकनाथ शिंदे यांना स्वतःला बीएमसीमध्ये भाजपचा महापौर नको आहे. त्यामुळेच त्यांनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. तर, मुंबईत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (यूबीटी) पक्षाने असे सांगून अटकळांना आणखी खतपाणी घातले की, जर ‘देवाची’ इच्छा असेल तर त्यांच्या पक्षाचा महापौर होऊ शकतो. हॉटेलमधूनच निवडणार नेता, 2022 च्या बंडखोरीच्या आठवणी ताज्या मुंबईतील 227 प्रभागांपैकी भाजपने 89 प्रभाग जिंकले आहेत. शिंदे गटाने 29 प्रभाग जिंकले आहेत. बहुमताचा आकडा 114 गाठण्यासाठी भाजपला शिंदे गटाच्या 29 नगरसेवकांची गरज आहे. उद्धव यांनी ‘मराठी कार्ड’ खेळल्यामुळे शिंदे गटाच्या नगरसेवकांची संख्या मर्यादित राहिली. आता शिंदे गटाने महापौरपदाचा डाव टाकला आहे. भाजपने ही मागणी मान्य न केल्यास सत्तेचे समीकरण बिघडू शकते. यामुळे शिंदे यांनी हॉटेलमध्येच बैठक घेऊन पक्षनेत्याची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाने नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवणे, 2022 च्या त्या बंडखोरीची आठवण करून देत आहे, ज्यामुळे शिवसेना फुटली होती. खरं तर, मे 2022 मध्ये महाराष्ट्र सरकारमधील नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांसह बंड केले होते. शिंदे यांनी मणिपूरमधील नबाम रेबिया प्रकरणाचा फायदा घेतला होता, ज्यात सर्वोच्च न्यायालयाने सत्तेतून बंड केलेल्या आमदारांचे सरकार स्थापन केले होते. त्याचबरोबर शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेत उपसभापतींविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती, जेणेकरून उपसभापती शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेऊ शकणार नाहीत. या संपूर्ण घडामोडींदरम्यान शिवसेनेचे 15 आमदार, 10 अपक्ष आमदारांसह 20 जून 2022 रोजी आधी सुरतला आणि नंतर गुवाहाटीला गेले. 23 जून रोजी शिंदे यांनी दावा केला की त्यांना 35 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यानंतर फ्लोअर टेस्ट, उद्धव यांच्या राजीनाम्यानंतर 30 जून 2022 रोजी शिंदे मुख्यमंत्री झाले. मुंबई काँग्रेसमध्ये ‘गृहयुद्ध’ बीएमसी निवडणुकीतील पराभवानंतर मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत कलह रस्त्यावर आला आहे. पराभवाचे खापर मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यावर फोडणाऱ्या नेते जगताप यांना काँग्रेस हायकमांडने ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
छत्रपती संभाजीनगर मनपा निवडणुकीत एमआयएमने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील कमालीचे उत्साहात आहेत. मुंबईत मनसे आणि राष्ट्रवादीपेक्षाजास्त जागा जिंकणे असो वा संभाजीनगरमध्ये 33जागांचा टप्पा गाठणे, इम्तियाज यांनी या यशाचे विश्लेषण करताना विरोधकांवर सडकून टीका केली. या विजयानंतर त्यांच्याशी साधलेला हा संवाद... प्रश्न: भविष्यातील मजलीस'' चीवाटचाल कशी असेल? इम्तियाज जलील: आम्ही एक मोठीशक्ती म्हणून उदयास आलो आहोत.सोलापूर, मुंब्रा, अमरावती अशा सर्वच ठिकाणी आमचे प्रतिनिधित्व वाढले आहे.आम्ही केवळ 7-8 जागा अतिशय कमी फरकाने हरलो, नाही तर हा आकडा आणखी मोठा असता. एमआयएम हा आता केवळ एक पक्ष नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा किरदार''बनला आहे. प्रश्न: आता महापालिकेत तुमची भूमिका काय असेल? भाजपला साथ देणार का? इम्तियाज जलील : आमची भूमिका स्पष्ट आहे. शहराच्या विकासासाठी चांगले निर्णय असतील, तर आम्ही भाजपला नक्कीच साथ देऊ. पण, जर कुणी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हिडन अजेंडा घेऊन येत असेल, तर आम्ही खंबीर विरोध करू. जसा आम्ही समांतर पाणी योजनेला केला होता. मी सर्वपक्षीय नेत्यांना आवाहन करतो की, आता निवडणुका संपल्या आहेत, एकमेकांवरची चिखलफेक थांबवून शहराच्या प्रगतीसाठी एका प्लॅटफॉर्मवर या. प्रश्न: महाराष्ट्रात एमआयएमने मोठी मुसंडी मारली आहे, या निकालाकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण कसा अर्थ लावता?इम्तियाज जलील : हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. बेटर लेट दॅन नेव्हर'' महाराष्ट्राच्या जनतेने आता एमआयएमला मनापासून स्वीकारले आहे. लोकांना जाणीव झालीआहे की केवळ एमआयएमच त्यांच्यासाठी लढू शकते. आज संपूर्णमहाराष्ट्रात आमचे 125 नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईत आमचे 8 नगरसेवक आहेत, ही संख्या राज ठाकरेंची मनसे आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षाही जास्त आहे. प्रश्न: एमआयएम पक्षावर नेहमीच जातीयवादी असल्याचा शिक्का मारला जातो, यावर तुमचे काय म्हणणे आहे? इम्तियाज जलील : गेल्या 70 वर्षांपासून हेच आरोप ऐकतोय. हे आरोप करणारे कोण आहेत? तेच लोक जे मुस्लिम समाजाला आपली जहागीर समजायचे. निवडणुका आल्या की भाजप आणि शिवसेनेची भीती दाखवून मते लाटायची, हा यांचा धंदा होता. स्वतःला सेक्युलर म्हणवणारे नेते आज भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.आम्ही काहीही झाले तरी भाजपसोबत जाणार नाही, हे आता जनतेला उमजले आहे. म्हणूनच एमआयएम आज मालेगाव (21), धुळे (10),नांदेड (14) अशा सर्वच ठिकाणी निर्णायक भूमिकेत आहे. प्रश्न: संभाजीनगरमध्ये पक्षांतर्गत बंडाळी आणिआरोप झाले, तरीही यश कसे मिळाले? इम्तियाज जलील: शहराच्या जनतेचे मी आभार मानतो. गेल्या वेळी 25 जागा होत्या,या वेळी 33 जागा जिंकून आम्ही ताकदीने मुख्य विरोधी पक्ष म्हणून समोर आलो आहोत. माझ्यावर भ्रष्टाचाराचे, पक्षविकल्याचे आरोप झाले. पण गंमत पाहा,जोपर्यंत या लोकांना उमेदवारीची आशा होती,तोपर्यंत इम्तियाज जलील जगातील सर्वात चांगला माणूस होता. तिकीट कापले गेल्यावर मी लगेच भ्रष्ट झालो? बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसींचा माझ्यावर विश्वास आहे आणि त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ दिलेला नाही, हे निकालांनी सिद्ध केले.
महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौर कोणाचा होणार? यावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ज्यांनी स्वतः शिवसेनेचे आमदार फोडले, त्यांना आज स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटतेय, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी 'हास्यजत्रा' आहे, अशा शब्दांत राऊतांनी उपरोधिक टोला लगावला. नगरसेवकांना मुंबईतील हॉटेल्समध्ये ठेवण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवताना राऊत म्हणाले की, आमदारांना घेऊन ते सुरतला सुरक्षित ठिकाणी गेले होते. मग नगरसेवकांनाही सुरत किंवा अहमदाबादला न्यायला हवे होते. त्यांना मुंबईतच का कोंडून ठेवले आहे? स्वतःच्या राज्यात उपमुख्यमंत्री असतानाही जर नगरसेवक पळवले जातील किंवा त्यांचे अपहरण होईल अशी भीती वाटत असेल,तर ही महाराष्ट्राच्या राजकारणीतील फार मोठी हास्यजत्रा आहे. मराठी अस्मितेची मशाल अजूनही धगधगतेय हॉटेलमध्ये असलेल्या नगरसेवकांबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, तुम्ही या नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार? हे नगरसेवक मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांच्या मनात आजही मराठी अस्मितेची मशाल धगधगत आहे. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही, हे जवळजवळ सर्वांनीच ठरवले आहे. येणाऱ्या काळात काय होते ते बघुयात. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
नाशिक महापालिकेवर 2017 च्या तुलनेत सहा अधिक जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता मिळवताना मतांमध्येही 1,07,155 ने वाढ नोंदवली आहे. 2017 नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये पडलेल्या फुटींनंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक होती. दोन्ही शिवसेनेला नाशिकमध्ये पडलेल्या एकत्रित मतांची बेरीज गेल्या वेळच्या तुलनेत अडीच लाखांनी जास्त आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची एकत्रित मते गत निवडणुकीच्या तुलनेत अवघ्या 6 हजार 687 ने वाढली आहे. दुसरीकडे मनसेच्या मतांमध्ये तब्बल 1 लाख 61 हजार 278 मतांची तर काँग्रेसच्या 56 हजार 500 मतांची घट झाली आहे. मागील निवडणुकीनंतर भाजपचा जनाधार वाढल्याचे दिसत असून मूळच्या शिवसेनेचे तसेच राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्यानंतर त्यांच्या मतांमध्येही वाढ झाली आहे. दोन्ही सेनेच्या एकूण जागा वाढल्या मागील मनपा निवडणुकीत शिवसेनेला 35 जागा मिळाल्या होत्या. पक्ष फुटीनंतर यंदाच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेनेने एकत्रित 41 जागांवर विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादीला मागील निवडणुकीत 6 जागा मिळाल्या होत्या, मात्र यंदा त्यात दोन जागांची घट झाली आहे. पंचवटी विभागात भाजपला सर्वाधिक मतदान पंचवटी विभागातील प्रभाग एक ते सहामध्ये भाजपला मतदारांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. या सहाही प्रभागांमध्ये 2 लाख 95 हजार 242 मतदारांनी भाजपला मतदान करत त्यांचे उमेदवार विजयी केले. मनसे, काँग्रेसला सर्वाधिक फटका या निवडणुकीत मतदार राजाने मनसे व काँग्रेसला नाकारले. मनसेच्या 4 तर काँग्रेसच्या 3 जागा घटल्या आहेत. (संदर्भ : राज्य निवडणूक आयोग)
मुंबई भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आणि दक्षिण मुंबईतील प्रभावशाली नेते राज के. पुरोहित (७१) यांचे आज मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक अभ्यासू, अनुभवी आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. राज के. पुरोहित यांचे पार्थिव उद्या, रविवार दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या वेळेत राजहंस बिल्डिंग, जी रोड, मरीन ड्राइव्ह, मुंबई येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. दक्षिण मुंबईतील अजेय नेतृत्व राज के. पुरोहित हे मुंबई भाजपमधील एक सामर्थ्यशाली नाव होते. विशेषतः दक्षिण मुंबईत त्यांचा मोठा राजकीय दबदबा होता. मुंबईतील उत्तर भारतीय समुदायाचे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. विधिमंडळातील त्यांचा अभ्यास आणि प्रशासनावरील पकड यामुळे त्यांनी राज्य सरकारमध्ये मंत्रीपदही भूषविले होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी अत्यंत मजबूत केली होती. राजकीय वारसा आणि प्रवास नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत त्यांचे चिरंजीव आकाश पुरोहित यांनी वॉर्ड क्रमांक २२१ मधून विजय मिळवून आपला राजकीय वारसा पुढे सुरू ठेवला आहे. आपल्या मुलाच्या विजयाचा आनंद साजरा करत असतानाच राज पुरोहित यांचे जाणे हे त्यांच्या कुटुंबासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही वर्षांत कुलाबा मतदारसंघात राहुल नार्वेकर यांच्या वाढत्या प्रभावामुळे राज पुरोहित राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर झाले होते. मात्र, तरीही पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत आणि मार्गदर्शनासाठी ते नेहमीच सक्रिय राहिले. त्यांच्या निधनानंतर भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आणि मुंबईतील जनतेने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवडी पाटीजवळ रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल (जि. रायगड) येथून सहा मित्र एर्टिगा कारने (क्रमांक MH-46 Z 4536) अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघाले होते. शनिवारी (१७ जानेवारी २०२६) रात्री ११:३० च्या सुमारास ही कार मोहोळ जवळील देवडी पाटी परिसरात आली असता, चालकाचा वाहनावरील ताबा अचानक सुटला. भरधाव वेगातील ही कार महामार्गापासून सुमारे १० ते १५ फूट दूर झुडपांमध्ये जाऊन एका मोठ्या झाडावर जोरात आदळली. पाच जणांचा जागीच मृत्यू हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. धडकेचा आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये ३ पुरुष आणि ३ महिला असे एकूण ६ प्रवासी होते. यापैकी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह वाहनामध्ये पूर्णतः अडकलेल्या अवस्थेत होते. या अपघातातून ज्योती जयदास टाकले (रा. सेक्टर ७, पनवेल) या महिला सुदैवाने बचावल्या आहेत. पोलिस मदत आणि बचावकार्य घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. जखमी ज्योती टाकले यांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, मोहोळ येथे दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रात्रीची वेळ आणि वेगाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत व्यक्तींची सविस्तर नावे आणि पत्ते शोधण्याचे काम सध्या पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. हे सर्व जण पनवेल परिसरातील रहिवासी असून ते एकमेकांचे मित्र होते, असे समजते. महामार्गावर झुडपांमध्ये ही कार अडकल्याने रात्रीच्या वेळी मदतकार्यात काही अडचणी आल्या होत्या.
औंढा नागनाथ तालु्क्यातील जवळाबाजार शिवारात कालव्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल चार दिवसानंतर रविवारी ता. 18 घटनास्थळापासून चार किलो मिटर अंतरावर वडद शिवारात सापडला आहे. औंढा पोलिस व महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. विशेष म्हणजे तरुणाच्या मृतदेह शोधण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी तीन ते चार वेळा रास्ता रोको केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील तरुण दीपक काळे (28) हा बुधवारी ता. 14 सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास जवळाबाजार शिवारातील कालव्यात पडला होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे नातेवाईक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कालव्यात दीपक याचा शोध सुरु केला होता. मात्र कालव्यात पाणी जास्त असल्यामुळे तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे मृतदेह शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान, दीपक यांचा मृतदेह शोधावा या मागणीसाठी त्याच्या कुटुंबियांनी तसेच नातेवाईकांनी जवळा बाजार येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. पोलिस विभागाने पाटबंधारे विभागाला कळवून कालव्याचे पाणी बंद करून दीपकचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र कालव्याचे पाणी कमी झाले नसल्याने अडचणी कायम होत्या. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी रविवारी ता. 17 थेट महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले होते. यावेळी पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत यांनी आंदोलकांशी संवाद साधल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिस, गावकऱ्यांनी कालव्यात शोध मोहिम सुरु केली. दरम्यान, आज सकाळी घटनास्थळापासून चार किलो मिटर अंतरावर वडद शिवारातील कालव्यात दीपक याचा मृतदेह आढळून आला. यावेळी पोलिस निरीक्षक राहिरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत, जमादार राजू ठाकूर, आंबादास बेले, रामा गडदे, शेख इम्रान, माजी सरपंच राजू पवार, हनुमान काळे, गोविंद काळे, बालाजी काळे यांची वडद शिवारातील कालव्यातून मृतदेह बाहेर काढला आहे. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत दीपक यांचा घातपात केल्याचा आरोप मयत दीपक यांना बुधवारी कोणीतरी बोलावून नेले त्यानंतर त्याता घातपात करून मृतदेह कालव्यात फेकल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला असून काही जणांची चौकशी केली जात असल्याचे सुत्रांनी सांगितले.
महानगरपालिका निवडणुकीच्या विजयाचा गुलाल उधळताना सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीच कायद्याचे धिंडवडे काढल्याचा प्रकार घडला, शिंदेसेनेकडून विजयी झालेल्या उमेदवार आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट यांच्यासह राजू राजपूत आणि अभिजित जीवनवाल यांनी भररस्त्यात तलवारी नाचवली. याप्रकरणी अभिजित जीवनलाल यांच्यावर वेदांतनगर पोलिस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली. तलवारी भिरकावत कायद्याला चॅलेंज मिळालेल्या माहितीनुसार, विजयानंतर हर्षदा शिरसाट आणि त्यांच्या समर्थकांनी शहरात मोठी विजयी मिरवणूक काढली. या वेळी वाहनावर उभे राहून नवनिर्वाचित नगरसेविका हर्षदा शिरसाट, राजू राजपूत आणि अभिजित जीवनवाल यांनी हातात तलवारी घेऊन त्या हवेत भिरकावल्या. कायदा हातात घेणाऱ्या नवनिर्वाचित नगरसेवकांवर पोलिस प्रशासन काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे भाजप उमेदवाराच्या घरासमोर दोन तास थरार भाजपचे उमेदवार संजय बारवाल यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. बारवाल कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार, अभिजित जीवनवाल आणि त्यांच्या समर्थकांनी बारवाल यांच्या दारासमोर दोन तास धुमाकूळ घातला. तलवारी नाचवून दहशत निर्माण केली. इतकेच नव्हे तर आमच्या मुलालाही मारहाण करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप चारवाल कुटुंबाने केला आहे.
महानगरपालिका निवडणुकीचा निकालशुक्रवारी जाहीर झाल्यानंतर लागलीचदुसऱ्या दिवसांपासून सत्ता स्थापनेसाठीरस्सीखेच सुरू झाली आहे. सत्तेसाठीसमिकरणांची जुळवाजुळव करण्याच्याकामास भाजप, काँग्रेसह विविध राजकीयपक्षांतर्फे वेग आला आहे. महापालिकेतसत्ता स्थापन करण्याकरिता भाजप आणिकाँग्रेसला स्पष्ट बहुमत नसल्याने तेमिळवण्यासाठी निर्णायक असलेले अपक्षउमेदवार आशिष पवित्रकार, शिंदे सेनेच्याउषाराणी विरक या दोघांपैकी कोण साथदेणार त्यावर सत्ता स्थापनेचे गणितअवलंबून दिसत आहे. दरम्यान पवित्रकारयांची भाजपात सन्मानजनक ‘घरवापसी’ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.दुसरीकडे भाजपसह मित्रपक्ष वगळता काँग्रेस आणि इतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात सत्ता स्थापनेसाठी मोटबांधण्याची तयारी चालवली आहे. त्यातस्वतंत्र निवडणूक लढलेल्या शिवसेनेच्याएकमेव सदस्य उषाराणी विरक आणिअपक्ष आशिष पवित्रकार काय भूमिकाघेतात, याकडे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या निवडणुकीनंतरआता सत्ता कुणाची बसणार यावरून चर्चासुरू झाली आहे. मतदारांनी कुठल्याहीएका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. ८०पैकी ३८ जागा जिंकत भाजप सर्वांत मोठापक्ष ठरला. भाजपसोबत युती केलेलेराष्ट्रवादी अजित पवार गट आणि महानगरविकास समितीचे प्रत्येकी एक नगरसेवकधरून भाजप ४० पर्यंत पोहोचू शकेल. बहुमतासाठी आणखी एका नगरसेवकाची गरज आहे. भाजप, राष्ट्रवादी अजित पवारगट आणि महानगर विकास समिती युतीचे८० पैकी ४० जागा निवडून आल्या आहेत.काँग्रेसच्या २१ नगरसेवकांसहसर्व विरोधीपक्ष व अपक्ष मिळून विरोधकांचे ४० चेसंख्याबळ होते. काँग्रेस, शिवसेना ठाकरेगट, वंचित बहुजन आघाडी,‘एआयएमआयएम’, राष्ट्रवादी शरद पवारगट, शिवसेना शिंदे गट व अपक्ष यांचेमिळून एकूण ४० संख्याबळ होते. भाजपलासत्तेपासून दूर ठेवण्यासाठीविरोधकांकडूनही मोट बांधली जातअसून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापालिकेचे सत्ता समीकरणजुळवण्यासाठी ८० पैकी ४१ नगरसेवकांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. भाजपचे ३८, राष्ट्रवादी अजित पवार गट व महानगरविकास समिती एक असे एकूण भाजपयुतीचे ४० नगरसेवक निवडून आले आहेत.सत्तास्थापन करण्यासाठी भाजपला केवळएका नगरसेवकाच्या पाठिंब्याची गरजराहील. बंडखोर अपक्ष नगरसेवकपवित्रकार हे देखील पूर्वाश्रमीचे भाजपचेचआहेत. शिवाय इतर काही नगरसेवकांनासोबत घेण्याचा प्रयत्न देखील भाजप करूशकतो. महापालिकेची निवडणुकीतअटीतटीची झाली असून, मतदारांनीकुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत दिलेलेनाही.
मोतीरामजी ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ, कासोळा यांच्या वतीने संचालित यशवंतराव चव्हाण विद्यालय, मंगरूळपीर येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ओ. एस. गोरे होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून मोटार वाहन निरीक्षक, वाशीम येथील विनोद घनवट उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जे. व्ही. इंगोले, चोपडे यांनीही उपस्थिती लावली. मार्गदर्शन करताना विनोद घनवट यांनी इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. पॉवर पॉईंट सादरीकरण व अपघातांचे चित्रीकरण दाखवून वाहतूक नियमांचे पालन न केले. त्यामुळे होणाऱ्या दुर्घटनांची तीव्रता त्यांनी प्रभावीपणे विद्यार्थ्यांसमोर मांडली. हेल्मेट वापर, सीट बेल्ट, वेगमर्यादा, चुकीची ओव्हरटेकिंग व मोबाईल वापर यासारख्या बाबींमुळे जीविताला निर्माण होणाऱ्या धोक्याविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करणे म्हणजे स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारणे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सूत्रसंचालन संतोष राऊत यांनी केले तर आभार पोहाणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
वाढदिवसानिमित्त आणलेला केक खराब:केक शॉपवर कारवाई करण्याची केली मागणी
शहरातील पातूर ते बाळापूर महामार्गावरील माँ भवानी बिकानेर स्वीट अँड बर्थडे केक शॉपमधून वाढदिवसानिमित्त आणलेला केक सडलेला निघाला. त्यात अळ्या पडलेल्या दिसून आल्या. यामुळे सागर इंगळे याच्यासह युवकांनी अकोला येथील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) तक्रार करत संबंधित माँ भवानी बिकानेर स्वीट्स अँड बर्थडे केक शॉपवर कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, सदर दुकानात निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले जात आहे. यापूर्वी दिवाळीतही भेसळयुक्त निकृष्ट पदार्थांची विक्री केल्याने नागरिकांना आजारांनी ग्रासले होते. हा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ असून या दुकानावर कठोर कारवाई करावी. मंगळवारी (दि.१३) वाढदिवसानिमित्त सदर दुकानातून केक विकत घेतला असता तो सडलेला निघाला. तक्रारदार दुकानमालकाला विचारणा करण्यासाठी गेले असता चुकीच्या भाषेत बोलून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तक्रारदाराकडे सदर दुकानातील सडलेला केक, त्याचे फोटो आणि व्हिडिओ आहेत. संबंधित दुकानदारावर तत्काळ कारवाई करावी, असे बुधवारी (दि.१४) दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीच्या सत्यप्रती आमदार अमोल मिटकरी तथा जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा पाठवण्यात आल्या आहेत. भेसळयुक्त निकृष्ट पदार्थांची विक्री केल्याने आता अन्न व औषध प्रशासन विभाग काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. चौकशी केल्यावर कारवाई करणार ^मी सध्या निवडणुकीनिमित्त कर्तव्यावर आहे. त्यानंतर फोन करतो. तसेच याप्रकरणाची चौकशी करून संबंधितावर कारवाई केली जाईल. - रवींद्र सोळंके, अन्न व औषध प्रशासन अधिकारी, अकोला.
येथून थोड्याच अंतरावर असलेल्या मौजे सवडद गंगाभारती जन्मभूमी येथील सिध्दविनायक मंदिरावर २० जानेवारी पासून गणेश जयंती महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात कथाकार अशोक महाराज घायाळ यांच्या त्रिदिवसीय गणेश पुराण कथेसह सकाळी साडेदहा मोफत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अमित आरसोडे, डॉ. उमेश गुंजकर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी, नारायणा नेत्रालय शाखा मेहकरच्या वतीने मोफत चष्मा वाटप व नेत्र तपासणी, रक्त तपासणी, दुपारी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी याबाबत पोलिस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांचे व्याख्यान, सायंकाळी संत दुनियादास बाबा भजनी मंडळाचा सांगीतिक कार्यक्रम, २१ रोजी दुपारी तीन वाजता शाळा आणि विद्यार्थ्यांचे कर्तव्य यावर दिलीपराव खंडारे यांचे व्याख्यान, सायंकाळी महाराष्ट्रातील पहिले तृतीय पंथी कीर्तनकार समा महाराज दौंडकर उर्फ (समा माय) अहिल्यानगर यांचे कीर्तन होणार आहे. दुसऱ्या दिवशी दि. २२ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता कीर्तन केसरी भरत महाराज जाधव दुधा ब्रम्हपुरी यांचे काल्याचे कीर्तन तद्नंतर श्रीमज्जगद्गुरु पलसिध्द महास्वामी मठाचे मठाधिपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज, केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव, आमदार मनोज कायंदे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब गावंडे, आमदार श्वेता महाले, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार सिद्धार्थ खरात, ठाणेदार गजानन करेवाड, मुकूंद दंडे, रावसाहेब देशपांडे, रवी पाटील, बाबुराव मोरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाराज वितरण रात्री शिवशाहीर देवानंद वानखेडे मेहकर यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. अशी माहिती संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त संतोष गाडेकर यांनी दिली आहे कालांतराने येथे वटवृक्ष असल्याने येथे एक चौथरा उभारण्यात आला. दरम्यान, गावात गणेशोत्सवाची प्रचंड अहमहमिका असल्याने येथेही छत्रपती गणेश मंडळाच्या वतीने गणेश स्थापना केली जायची. पाच वर्षे या ठिकाणी गणेश स्थापना होत असल्याने शेवटच्या दिवशी मिरवणुकी दरम्यान वादाची ठिणगी पडायची. त्यामुळे येथे भाविकांनी थेट मंदिर उभे केले आहे.. अशी आहे परंपरा सवडद गावात उकिरडा आणि त्यातच दारूचे बॉक्स पुरून ठेवले जायचे. गावातला हा दारूचा अड्डाच होता. मात्र ग्रामस्थांनी वाढते तंटे बघता या ठिकाणी १२ डिसेंबर २०१२ रोजी गणरायाचे प्रशस्त मंदिर उभे केले. आता ते परिसरातील गणेश भाविकांचे हे जागृत देवस्थान झाले आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान:सीईओ संजीता महापात्रा यांची सांगवा बुद्रूक ग्रामपंचायतीला भेट
दर्यापूर पंचायत समिती दर्यापूर अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील सांगवा बुद्रुक ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत अमरावती जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी भेट दिली. भेटीदरम्यान ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत केलेल्या विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम, मकर संक्रांति निमित्त महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम, स्वयंरोजगारा बाबत महिलांचे विशेष प्रशिक्षण शिबीर, प्रधानमंत्री आवास अंतर्गत घरकुलाचे उद्घाटन, अनेक उपक्रमांस भेटी दिल्या व केलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. दरम्यान गावकऱ्यांसोबत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मध्ये लोकसहभाग वाढवणे लोकवर्गणी तसेच अभियानातील निकषांबाबत मार्गदर्शन केले. तसेच उमेद अंतर्गत ग्राम संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी दर्यापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सी.जे.ढवक, विस्तार अधिकारी पंचायत संदीप देशमुख,विस्तार अधिकारी राजकुमार चांदुरकर, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ, गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे, तसेच दर्यापूर पंचायत समीतीमधील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सांगवा बुद्रुक सरपंच श्रीकृष्ण कराळे, उपसरपंच विजय सगणे, ग्रामपंचायत अधिकारी सुरज भोपसे गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनशी संवाद साधताना सीईओ संगिता महापात्रा व उपस्थित ग्रामस्थ व महिला.
इतिहासकार प्रा. डॉ. रामचंद्र श्रीराम मोरवंचीकर (८८) यांचे शनिवारी (१७ जानेवारी) अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर रविवारी सकाळी ११ वाजता प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी प्रमुख, तसेच पर्यटन प्रशासन विभागाचे माजी संचालक म्हणून कार्य केलेले डॉ. मोरवंचीकर यांनी सुमारे ४० वर्षे अध्यापन केले. राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल २०० संशोधनात्मक निबंध, तर इतिहास व इतर विषयांतील १६ ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी संशोधन केले. पैठण येथील उत्खननात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. भारतीय जल संस्कृती मंडळाचे संस्थापक उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी योगदान दिले. काही दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
अंजनगाव बारीतून जाणारा राजमार्ग झाला अपघात मार्ग:एक किलोमीटर पर्यंतच्या अंतरात नाही एकही गतिरोधक
नजिकच्या अंजनगाव बारी गावातून जाणाऱ्या नागपुर-मुंबई राजमार्गावर १ किलोमीटर अंतरापर्यंत सिमेंट क्राँक्रीटीकरण करण्यात आले आहे. परंतु या अंतरामध्ये कोठेही गतिरोधक नसल्याने सुसाट जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची भीती वाढली आहे. सध्या या मार्गाचे सौंदर्यींकरण होत आहे. त्यादरम्यान या बाबीकडे लक्ष पुरवले जावे, अशी नागरिकांची मागणी आहे. आजतागायत या मार्गावर अनेक किरकोळ अपघाताबरोबरच गंभीर अपघातही झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या रबरी गतिरोधकाचे नियोजन केले होते. परंतु या गतिरोधकांनी अवघ्या ३ महिन्यातच मार्गासोबतचा आपला संबंध तोडला. यामुळे दोन्ही बाजुंनी येणारी वाहने सुसाटपणे धावतात. या मार्गावर बस स्टॉप, शाळा, महाविद्यालय, आरोग्य केंद्र, पशु चिकित्सालय, तीर्थक्षेत्र कोंडेश्वर, आठवडी बाजार, स्मशान भूमी, भिवापूर तलाव, अनेक मंदिरे आहेत. त्यामुळे मार्ग ओलांडताना पायी चालणाऱ्यांची, तसेच वाहनधारकांची गैरसोय होत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व रुग्णांना अतिशय दक्षता बाळगावी लागते. मार्गावर दुतर्फा झाडाझुडपांचे प्रमाण वाढत असून, या झुडपांच्या काटेरी फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. या फांद्या बसच्या खिडक्यांवर आघात करित असल्याने प्रवाशांची शारीरीक हानी होण्याची शक्यता आहे. शिवाय यापासुन इतर वाहनचालकांचीही गैरसोय होत आहे. सौंदर्यीकरणाचा एक प्रमुख भाग म्हणून १ हजार मीटरपर्यंत या मार्गाचे मधोमध रस्ता दुभाजक बांधून त्यावर पथदिव्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पूर्वीच्या अर्ध्या खांबावरिल पथदिवे गेल्या ४ महिन्यांपासुन बंद करण्यात आले आहे. तालुका क्रीडा संकुलचा परिसर वगळता या राजमार्गाच्या दुतर्फा नागरीकांनी अतिक्रमण केल्याने, रोडवरील पाणी वाहून जाण्यासाठी नालीचे नियोजन करणे कठीण झाले आहे. वरिल सर्व बाबी लक्षात घेता अपघातावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने आणि नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या अनुषंगाने या मार्गावर मजबूत व टिकाऊ गतिरोधक, झाडा- झुडपांची छाटणी, पथदिव्यांची दुरुस्ती आवश्यक झाली आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार दिली असून सदर विभागाने या सर्व बाबींची दखल घ्यावी, अशी मागणी पुढे आली आहे. या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. मार्गात दुतर्फा झाडा-झुडपांचे वाढते प्रमाण, गतीरोधकांचा अभाव, पथदिवे असूनही सध्या अंधार, आदी अडचणी आहेत. रस्त्याच्या बाजूने नागरी अतिक्रमणही वाढत आहे. त्यामुळे हा मार्ग अपघात प्रवर्ण मार्ग बनला आहे. हा राजमार्ग अमरावतीवरून अंजनगावबारी मार्गे वर्धा- नागपूर, यवतमाळ- हिंगणघाटला जोडला आहे. त्यानुसार या मार्गावरुन परिवहन महामंडळाच्या बससेही सुरु झाल्या आहेत. त्यामुळेच या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष पुरवणे गरजेचे आहे.
बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील चांदणी नदीमध्ये दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदीचा मूळ रहिवासी असलेला परकीय ‘सकर माउथ कॅटफिश’ आढळून आला आहे. या माशाच्या शिरकावामुळे नदीच्या नैसर्गिक परिसंस्थेवर मोठे संकट ओढावले असून, स्थानिक माशांच्या अस्तित्वासाठी तो घातक ठरत आहे. वेगाने वाढणारा आणि अत्यंत सहनशील असलेल्या या माशामुळे चांदणी नदीची जैवविविधता कायमची नष्ट होण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ‘सकर माउथ कॅटफिश' हा मासा आपल्या तोंडाच्या सक्शन कपसारख्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे नदीच्या तळाशी आणि खडकांना घट्ट चिकटून राहतो. हा मासा मोठ्या प्रमाणात शेवाळ, सूक्ष्म जलचर आणि प्रामुख्याने स्थानिक माशांची अंडी खातो. यामुळे रोहू, कटला, मृगल यांसारख्या देशी प्रजातींच्या प्रजननावर विपरीत परिणाम होऊन त्या नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, नदीतील संपूर्ण अन्नसाखळी विस्कळीत होत आहे. चांदणी नदी ही परिसरातील शेती, पशुधन आणि पारंपरिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे. मात्र, या परकीय माशाच्या वाढत्या संख्येमुळे नदीतील नैसर्गिक समतोल ढासळत आहे. याचा फटका केवळ माशांपुरता मर्यादित नसून, जलचर वनस्पती, पक्षी आणि संपूर्ण जलपरिसंस्थेवर याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. लोकांच्या अज्ञानातून ओढावलेले संकट पर्यावरण अभ्यासकांच्या मते, हा मासा अनेकदा घरगुती अॅक्वेरियममध्ये शोभेसाठी पाळला जातो. मात्र, माशाचा आकार मोठा झाल्यानंतर अनेक नागरिक तो नदी, ओढा किंवा तलावात सोडून देतात. नागरिकांच्या अशा निष्काळजी कृतीमुळेच हे परकीय मासे भारतीय नद्यांमध्ये पसरत असून, आता चांदणी नदीलाही त्याचा फटका बसला आहे.
लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात झालेल्या सहकारमहर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय रौप्य करंडक वादविवादचा यावर्षीच्या पद्मश्री विखे पाटील रौप्य करंडकावर पुणे येथील कला, वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडी येथील विद्यार्थ्यांनी नाव कोरले. कनिष्ठ गटामध्ये पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील ३४ महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला. यंदा संयोजन समितीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासास पूरक ठरेल’ हा विषय वादविवादासाठी ठेवला होता. या प्रस्तावाच्या अनुकूल आणि प्रतिकूल बाजूने विद्यार्थ्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मते मांडली. ही स्पर्धा वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन गटात झाली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भेंडा येथील जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे, सहसचिव भारत घोगरे, डॉ.भास्कर शेळके, डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे,उपप्राचार्य डॉ. आर. ए. पवार आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण डॉ. जितेंद्र पाटील, राजेंद्र जोरवर, साहित्यिक प्रा. शशिकांत शिंदे यांनी केले. या स्पर्धेमध्ये सांघिकमध्ये अनिकेत वनारे आणि नितीन गागरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय वारजे माळवाडी पुणे यांनी करंडक मिळवला. वरिष्ठ गटामध्ये आरडीआयके महाविद्यालय बडनेरा येथील आदित्य डोळे यांनी प्रथम, वारजे माळवाडी पुणे येथील अनिकेत वनारे यांनी द्वितीय तर याच महाविद्यालयाचा नितीन गागरे यांनी तृतीय क्रमांक तर अळकुटी येथील महाविद्यालयातील मुस्कान शेख यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. कनिष्ठ गटात प्रथम- पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, लोणी येथील अंकिता जगताप, प्रियंका सिनारे द्वितीय, अगस्ती विद्यालय अकोले येथील दर्शन चौधरी तृृृृतीय तर उत्तेजनार्थ प्रवरा पब्लिक स्कूल येथील स्वरुप भोसले यांनी यश मिळविले. यावेळी भारत घोगरे, प्रा.जितेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. ए. पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. एस. एम. वाकोळे, प्रा. डी. के.खेमनर यांनी आभार डॉ. शांताराम चौधरी यांनी मानले.
येथील ऋतुजा संजय धनेश्वर हीने अखंड साधना, शिस्त आणि श्रद्धेच्या बळावर इतिहास घडवला आहे. तिच्या भरतनाट्यम साधनेचा २५ वर्षांचा रौप्यमहोत्सव शहरातील साई गोल्ड इन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. ऋतुजा हीने वयाच्या चौथ्या वर्षापासून भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती. सन २००८ मध्ये सह्याद्री वाहिनीवरील दम दमा दम या कार्यक्रमात तिला कारकिर्दीतील पहिले पारितोषिक मिळाले होते. तिने राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर भरतनाट्यमच्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि भरतनाट्यमच्या सर्व परीक्षा ती डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाली. या तपश्चर्येचे फलित म्हणजे ‘मास्टर्स इन भरतनाट्यम’ ही पदवी आणि भारत सरकारची प्रतिष्ठित ‘सीसीआरटी स्कॉलरशीप’ या सोहळ्याप्रसंगी लेखक रवींद्र जोशी यांनी ऋतुजाच्या नृत्यकलेचे कौतुक केले. ऋतुजाचा समावेश भारतातील पहिल्या ३० दिग्गज भरतनाट्यम नृत्यकांमध्ये झाला आहे. या यशामागे ऋतुजाबरोबरच तिच्या कुटुंबाचा त्याग आणि समर्पण तितकेच महत्त्वाचे आहे. तिचे वडील संजय धनेश्वर यांनी आपले संपूर्ण आयुष्य साईचरणी अर्पण केले आहे. आई सुनिता धनेश्वर आणि बहीण पल्लवी यांनी २५ वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न आज साकारताना पाहून संपूर्ण सभागृह भावूक झाले होते. ब्राह्मण एकता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय पाटील यांनी ऋतुजाला ‘समाजभूषण रत्न’ पुरस्कार देऊन गौरविले. या कार्यक्रमासाठी ऋतुजाचे गुरु मुठाळ, खेडकर मॅडम, डुबल, चौरे आणि आरती भणगे यांचे देखील यावेळी अनेकांनी कौतुक केले आहे.
राहुरी राज्यात नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक संधी निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे असून आधुनिक काळात शेतीक्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यभवनाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. कृषी महाविद्यालय, पुणे येथे विकसित करण्यात येत असलेल्या वसुंधरा नैसर्गिक शेती आधारित प्रात्यक्षिक प्रक्षेत्र व देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. प्रशांत नारनवरे बोलत होते. याप्रसंगी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, राजभवनातील उपसचिव डॉ. राममूर्ती व नियंत्रक डॉ. नितीन देशपांडे, डॉ. महानंद माने, डॉ. सुभाष भालेकर आदी उपस्थित होते. डॉ. नारनवरे पुढे म्हणाले, नैसर्गिक शेतीच्या यशासाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधनांची निर्मिती होणे अत्यावश्यक आहे. कृषी विद्यापीठातील नामवंत प्राध्यापकांनी पायाभूत विषयांवरील आपली व्याख्याने सुलभ व शेतकरी सुलभ पद्धतीने तयार करून याचे व्हिडिओ माध्यमातून थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रातील विविध विषयांमधील ज्ञान व कौशल्य यांच्या आधारे उद्यमशील कृषी उद्योजक घडविणे ही आजच्या काळाची गरज आहे. कृषी पदवीधरांना अधिक प्रात्यक्षिकाधिष्ठित शिक्षण देणे आवश्यक असून पाश्चिमात्य शिक्षण पद्धतीमुळे निर्माण झालेली ज्ञान व कौशल्यतील तफावत दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासूनच व्यापक कार्यक्षेत्रातील लोकाभिमुख ज्ञान व कौशल्य विकसित करण्याच्या तंत्राचा समावेश अभ्यासक्रमात करावा असे त्यांनी स्पष्ट केले. आपली पारंपारिक भारतीय शेतीपद्धती ही पशुपालनावर आधारित असल्यामुळे अधिक सुरक्षित होती मात्र वाढती लोकसंख्या आणि रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीची सुपीकता घटत चालली आहे ही चिंतेची बाब आहे. कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी सचिवांनी मांडलेल्या मुद्द्यानुसार विद्यापीठ कार्यरत असून विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या उद्यमशीलतेला चालना देऊन त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. तसेच विद्यापीठाच्या विविध प्रक्षेत्रांवर नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक संसाधन निर्मितीचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर विकसित करून त्यांचा प्रभावी प्रचार व प्रसार केला जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या भेटीप्रसंगी या केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी प्रकल्पामध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालय, पुणे येथील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकपीक पद्धतीने जमिनीचे आरोग्य बिघडते एकपीकपद्धतीमुळे जमिनीचे नैसर्गिक आरोग्य बिघडत असून त्यामध्ये बदल करणे आवश्यक आहे. मातीचा दर्जा टिकून ठेवण्यासाठी पीक फेरपालट अत्यावश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यातील दरी कमी करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या एसटी महामंडळाची मुहूर्तमेढ अहिल्यानगरमध्ये रोवली गेली होती. पहिल्या बसपासून ते आताच्या इलेक्ट्रिक वातानुकुलीत बसगाडीपर्यंतचा प्रवास राज्याने पाहिला आहे. टप्प्याटप्प्याने जुन्या बसची जागा आता, नव्या गाड्या घेत आहेत. परंतु, दहा ते बारा वर्षे जुन्या खिळखिळ्या गाड्यांची दुरावस्था झाली आहे. अहिल्यानगर विभागांतर्गत ११ आगार आहेत. कोरोनापूर्वी जिल्ह्यात सुमारे ७३० बसमार्फत सेवा दिली जात होती. परंतु टप्प्याटप्प्याने कालबाह्य झालेल्या गाड्यांचे निर्लेखन करण्यात आले. त्यामुळे ही संख्या कमी होऊन ६५० पर्यंत घसरली. रस्त्यावर ज्या जुन्या गाड्या धावत आहेत, त्यांची अवस्था बिकट आहे. दिव्य मराठीने मागील काही दिवसांत केलेल्या पाहणीत प्रवासी घेऊन निघालेल्या बस रस्त्यात बंद पडलेल्या आढळून आल्या. तर काही बसमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत असल्याने प्रदूषण निर्माण होत आहे. दरम्यान, राज्यातली पहिली इलेक्ट्रिक बस १ जून २०२२ रोजी अहिल्यानगर ते पुणे मार्गावर धावली होती. आता या बसची संख्या वाढत आहे. त्यासाठी तारकपूर स्थानकांत स्वतंत्र चार्जिंग स्टेशनची उभाण्यात आले आहे. एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत अहिल्यानगर विभागाकडे १९ शिवाई बसमार्फत सेवा दिली जात आहे. परंतु, वारंवार बंद पडणाऱ्या बसच्या जागेवर नव्या लालपरी द्याव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खैरेवाडी गावाकडे जाणारा चिंचलेखैरे - खैरेवाडी या तीन किमी रस्त्याच्या कामासाठी प्रस्थाव पाठवण्यात आला होता. त्यापैकी प्रशासनाकडून ८०० मीटर रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. मात्र आठ महिने उलटूनही अद्याप रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या आदीवासी बांधवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामाचा कालावधी १२ महिने असताना अद्यापही रस्त्याचे काम अपूर्णच आहे. यामुळे येथील आदिवासी बांधवांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रस्त्याअभावी आठवडाभरापूर्वी ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष कायम आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम न केल्यास बेमूदत उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.या रस्त्याची पाहणी तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली होती. मात्र त्यानंतरही रस्त्याच्या कामाला कोणतीही गती आठ महिने उलटूनही केवळ ७०० मीटर रस्त्यावर फक्त मातीचा भराव टाकण्यात आला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदारांनी या रस्त्याचे उद्घाटन केले होते. मात्र प्रत्यक्षात काम कासवगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यात या मार्गावरून महिला, विद्यार्थी व रुग्णांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. रस्त्याच्या प्रश्नामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. गोरगरीब आदिवासी बांधवांकडे शासनाचे लक्ष नाही. खैरेवाडीकडे जंगलातून जावे लागते. जाताना ३ ओहळ लागतात. पावसाळ्यात तर फारच अडचण आहे. रस्त्याची समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. - पांडूरंग पारधी, अध्यक्ष, आदिवासी राया ठाकर संघटना. चिंचलेखैरे ते खैरेवाडी हा ८०० मीटरचा रस्ता आदिवासी उपाययोजनेतून मंजूर करण्यात आला आहे. १ मार्च २५ ते १ मार्च २६ पर्यंत १ वर्ष कामाची मुदत आहे. वन विभागाच्या विविध परवानग्यांमुळे रस्त्याचे काम रखडले होते. अजून ४ महिने शिल्लक आहेत. मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे. साधारणत: १ महिन्यात काम करण्याचे उद्दिष्ट असून, संबंधित ठेकेदाराला काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - अनिल बैसाने, उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
प्लास्टिकच्या वाढत्या वापराला आळा घालण्यासाठी सटाणा नगरपरिषदेतर्फे कागदी व कापडी पिशव्या निर्मिती केंद्र सुरु करण्यात आले असून स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी नगरपरिषदेने कागदी व कापडी पिशव्यांचे निर्मिती केंद्राचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या अभिनव उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या सहभागावर भर देण्यात आला असून, घराघरांतून उपलब्ध असलेले पुनर्वापरयोग्य कागद, कापड आदी साहित्य उपयोगात आणले जाणार आहे. नागरिकांनी त्यांच्या घरी असलेले वापरात नसलेले स्वच्छ कपडे व कागद संकलन करण्यासाठी नगरपरिषदेने संकलन केंद्र सुरु केले असुन नागरिकांनी आपल्याकडे असलेले कागद व कपडे येथे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.हे साहित्य नागरिकांनी विनामूल्य स्वरूपात सटाणा नगरपरिषद कार्यालयात किंवा नेमलेल्या संकलन केंद्रात जमा करावेत. जमा झालेल्या साहित्यापासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक पिशव्या नगरपरिषद कार्यालयाजवळील केंद्रावर, तसेच शहरातील बाजारपेठा व विविध दुकानांमध्ये नाममात्र दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी नांदगाव रेल्वे स्थानकाला भेट देत रेल संचलना संबंधित महत्वाच्या असणाऱ्या सर्व तांत्रिक प्रणालींचा आढावा घेतला. स्थानकावर अमृत भारत योजने अंतर्गत झालेल्या कामांना आणि निर्माणाधिन कामांना भेट देत स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शनिवारी (दि.१७) पथकाने येथील ऑटोमेटेड संचलित कृ लॉबी, सिग्नल यंत्रणा, तिसरी मार्गिका, बुकिंग ऑफिस या नियमित रेल संचलनाच्या दृष्टीने महत्वाच्या विभागांना भेटी दिली. तसेच येथील कामकाज सुरक्षित मापदंडांच्या निकषानुसार होत आहे का ? हे सुनिश्चित केले. नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याला भाविकांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज आहे. ऐनवेळी प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी नांदगाव रेल्वे स्थानक महत्वाचे असल्याने येथील प्रवासी सुविधांचाही अधिकारी वर्गाने आढावा घेत संबंधितांना सूचना केल्या. दरम्यान, महाप्रबंधकांनी कामकाजाची पाहणी केल्याने प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोविड काळात तात्पुरत्या स्वरुपात येथील प्रवासी गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते. हे थांबे पूर्ववत करण्यात यावे अशी मागणी शिवसेना व सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली. युवा फाउंडेशनने महाप्रबंधक गुप्ता यांचे जनसंपर्क अधिकारी यांची भेट घेऊन येथील मोकळ्या भूखंडाचा विकास, अंडरपासमध्ये कायम पाणी तुंबत असल्याने फुट ओव्हर ब्रीज बांधून देण्याची मागणी केली.
कर्करोग संशोधन आणि उपचार प्रगतीवर मार्गदर्शन:आबड होमिओपॅथिक महाविद्यालयात चर्चासत्र
अलिकडच्या वर्षांत कर्करोगाच्या अभ्यासात आणि उपचारांमध्ये प्रगती झाली आहे. याबाबत येथील के. बी. आबड होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालयामार्फत विद्यार्थी व शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर ‘कर्करोग संशोधन आणि उपचारातील अलीकडील प्रगती' या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात कर्करोग तज्ज्ञ डॉ. मुकुल घरोटे यांनी या चर्चसत्रात कर्करोगाचे निदान, उपचार तसेच आहारासंदर्भात सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, प्रबंध समिती अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष दिनेशकुमार लोढा, अरविंदकुमार भन्साळी, सचिव जवाहरलाल आबड, महाविद्यालयाचे समन्वयक नंदकुमार ब्रम्हेचा, डॉ. सुनीलकुमार बागरेचा, सुमतीलाल सुराणा, डॉ. विवेक जैन, डॉ. आकाश जैन, पंकज चोपड़ा यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय दहाड, उपप्राचार्य डॉ. संगीता दोषी यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. मुकेश पारेवाल, डॉ. अर्पणा पारिक, डॉ. मृगेश शाह यांनी सूत्रसंचालन केले. चर्चसत्रास शिक्षक व महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत १८३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून पंचायत समिती निवडणुकीसाठी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. तर, जिल्हा परिषदेसाठी अद्याप एकही अर्ज दाखल झाला नसल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. प्रतिनिधी | फुलंब्री सध्या जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीच्या गणांसाठी निवडणूक लागली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्जासोबत देण्यात येणाऱ्या शपथपत्रासाठी नोटरी किंवा बाँडची गरज नसून, स्वयंघोषित शपथपत्र पुरेसे आहे, अशी माहिती फुलंब्री निवडणूक अधिकारी नीलम बाफना यांनी दिली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात तहसील कार्यालयात पत्रकार परिषद झाली. या वेळी उपनिवडणूक अधिकारी तहसीलदार योगिता खटावकर प्रमुख उपस्थित होत्या. नीलम बाफना यांनी निवडणुकीसंबंधी महत्त्वाची माहिती दिली. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारावर कडक कारवाई होईल, असाही इशारा या वेळी देण्यात आला. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना जिल्हा परिषदेसाठी १ हजार रुपये, पंचायत समितीसाठी ७५० रुपये डिपॉझिट भरावे लागेल. इतर मागासवर्गीय उमेदवारांना जिल्हा परिषदेसाठी ७५० रुपये, पंचायत समितीसाठी ३५० रुपये डिपॉझिट लागेल. महिला उमेदवारांना सर्व प्रवर्गात ५० टक्के सवलत मिळणार आहे. पक्षाकडून अर्ज भरलेला असून बी फॉर्म दिला नसेल, तर तो अर्ज अपक्ष मानला जाईल. ज्या गटातून उमेदवार उभा राहणार आहे, त्या गटातील एक सूचक आवश्यक आहे. उमेदवाराचा पती किंवा पत्नी सूचक होऊ शकतात. मात्र तेही त्याच गटातील असणे आवश्यक आहे. दुसऱ्या गटातून निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराला त्या गटातीलच सूचक लागेल. उमेदवारी अर्जासाठी स्वतंत्र खिडकी योजना राबवली जात आहे.
गंगापूरला उपनगराध्यक्षपदी अमोल जगताप यांची निवड:स्विकृत सदस्यपदी जाधव, गंगवाल यांची निवड
गंगापूर नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी अमोल सुभाषराव जगताप यांची बिनविरोध निवड झाली. स्वीकृत सदस्य म्हणून सुवर्णा संजय जाधव आणि शीतल संदेश गंगवाल यांची निवड करण्यात आली. नगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्ष संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. उपाध्यक्षपदासाठी अमोल जगताप यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. सूचक फैसल चाउस आणि अनुमोदक संतोष अंबिलवादे यांनी अर्जावर सह्या केल्या. ठरलेल्या वेळेपर्यंत दुसरा अर्ज न आल्याने अमोल जगताप यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. स्वीकृत सदस्यपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून गटनेते सुवर्णा जाधव यांचे नाव सुचवले. भाजपकडून गटनेते विजय पानकडे यांनी शीतल गंगवाल यांचे नाव दिले. पीठासीन अधिकारी संजय जाधव यांनी दोन्ही नावांची घोषणा केली. मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी नवीन सदस्यांचे स्वागत केले. निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
अजिंठा घाटात केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. शुक्रवारी रात्री ११.३० वाजता ही घटना घडली. ट्रक रस्त्यावर आडवा पडला. ट्रकमधील २९ टन केमिकलचे ड्रम २०० फूट खोल दरीत कोसळले. ट्रकचे मोठे नुकसान झाले. विशाखापट्टणम येथून टाईल्स बनवण्यासाठी लागणारे केमिकल घेऊन ट्रक (एपी. १६ टीक्यू २२५६) निघाला होता. अजिंठा घाट उतरताना ब्रेक निकामी झाले. चालकाचा ताबा सुटला. एका अवघड वळणावर ट्रक उलटला. ड्रम दरीत पडले. केमिकल सर्वत्र पसरले. अपघातात चालक शेक करीम मुल्ला (४६, विजयवाडा) किरकोळ जखमी झाला. क्लिनर तिरुपतीराव रघुपतीराव (५२, विजयवाडा) याचा उजवा हात निकामी झाला. दोघांवर फर्दापूर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले.
शिवना येथील अजिंठा-बुलढाणा महामार्गावरील पेट्रोल पंपाच्या मागे राहणाऱ्या मानकर कुटुंबाचे घर गॅसचा भडका उडाल्याने जळून खाक झाले. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. सुदैवाने घरात असलेल्या पाच जणांचे प्राण वाचले. मात्र संपूर्ण संसार उपयोगी वस्तू आगीत भस्मसात झाल्या. अंदाजे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. मगन पुंडलिक मानकर हे गेल्या अनेक वर्षांपासून टिन पत्र्यांच्या घरात राहत होते. शुक्रवारी दुपारी चहा बनवताना गॅस पेटवण्यात आला. त्यावेळी गळतीमुळे बर्नरजवळ मोठा भडका उडाला. नळीने जोरात पेट घेतल्याने आग वेगाने पसरली. त्याच वेळी मुलगा आकाश याने पत्नी, लहान मुलगी, आई संगीता आणि बहिणीला बाहेर काढले. शेजाऱ्यांनी मदतीचा प्रयत्न केला. पण आग आटोक्यात आली नाही. या आगीत घरातील सोफासेट, फ्रिज, टीव्ही, कुलर, फॅन आणि अन्नधान्य जळून गेले. स्फोट होईल या भीतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी आल्या. कुटुंब उघड्यावर पडले आहे. नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. शनिवारी मंडळ अधिकारी विजय शेळके यांनी पंचनामा करून प्राथमिक अहवाल सादर केला.
राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती ढोरकीनमध्ये साजरी
ढोरकीन पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षिका दीपाली जाधव व प्रमुख पाहुणे म्हणून सहशिक्षक होरकटे प्रामुख्याने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात जिजाऊ वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्याविषयी भाषणे केली. यावेळी शिक्षक शिंदे यांनी स्वामी विवेकानंद यांच्याविषयीचे विश्वबंधुत्वाचे विचार मांडले, तर औटी यांनी आपल्या मार्गदर्शनातून मुलींना जिजाऊंच्या ममत्व, शौर्य, दृढनिश्चयी रुपाचे दर्शन घडविले. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र कोलते व उपक्रमशील तथा सांस्कृतिक विभागप्रमुख सिराज पठाण यांनी कार्यक्रमाच्या आयोजक विद्यार्थ्यांचे व वर्गशिक्षिकांचे कौतुक केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी उपस्थित होते. ढोरकीन येथील जिल्हा परिषद शाळेत प्रतिमांना पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवर.
पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणी पुरवले जात आहे. नागरिकांनी जारचे पाणी घेऊ नये, असे आवाहन मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी शनिवारी केले. पाणी पिण्यास अयोग्य असल्याची अफवा चुकीची आहे. नागरिकांनी अशा अंधश्रद्धेतून बाहेर यावे, असेही त्यांनी सांगितले. लांडे यांनी जलशुद्धीकरण केंद्रावर जाऊन पाणीपुरवठा, वितरण आणि शुद्धीकरण प्रक्रियेचा आढावा घेतला. कन्नड शहराची लोकसंख्या ५० हजारांहून अधिक आहे. शहराला अंबाडी प्रकल्पातून पाणी पुरवले जाते. १९९२ आणि २००५ मध्ये दोन जलशुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आल्या. जुन्या यंत्रणेची क्षमता साडेचार एमएलडी आणि नव्या यंत्रणेची साडेतीन एमएलडी आहे. एकूण क्षमता आठ एमएलडी आहे. सध्या पाचव्या किंवा सहाव्या दिवशी पाणीपुरवठा होतो. हे अंतर कमी करून दोन दिवसांवर आणण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, पंपिंग यंत्रणा १५ ते २० वर्षे जुनी आहे. त्यामुळे पंपिंग क्षमता कमी झाली आहे. विद्युत पॅनल बोर्डही जुने असल्याने वारंवार बिघाड होतो. पंपही पूर्ण क्षमतेने काम करत नाहीत. कन्नड शहरात सध्या ६ हजार ४५४ नळ जोडण्या आहेत. शहराची रोजची पाण्याची गरज ६० लाख लिटर आहे. मात्र, चार जलकुंभांमध्ये एकूण ३२ लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. इंदिरा नगर जलकुंभाची क्षमता साडेपाच लाख लिटर, गिरणी ग्राउंडची सात लाख लिटर, विश्रामगृहाची साडेतीन लाख लिटर आहे. विश्रामगृहातील जलकुंभ १९५६ चा असून दुसरा जलकुंभ १९७२ चा आहे. हे दोन्ही जलकुंभही जुने झाले आहेत. विज पुरवठ्याची डीपी क्षमता १०० केव्ही आहे. प्रत्यक्षात २०० केव्ही क्षमतेची गरज आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियमित होण्यासाठी सुधारणा आवश्यक आहेत. या वेळी पाणीपुरवठा प्रमुख बाजीराव थोरात, शुभम मगर, रोहित कामतीकर, भैय्या साळवे उपस्थित होते. जलशुद्धीकरण केंद्रावर अशी होते प्रक्रिया अंबाडी धरण शहरापासून तीन किलोमीटरवर आहे. तेथून पाणी पंप करून जलशुद्धीकरण केंद्रावर आणले जाते. फाउंटनमध्ये पाणी ढवळले जाते. नंतर तुरटी आणि क्लोरीन टाकून शुद्धीकरण होते. तुरटीने माती आणि गाळ वेगळा होतो. क्लोरीनने निर्जंतुकीकरण होते. त्यानंतर ट्यूब सेटलरमधून पाणी स्थिर केले जाते. नंतर नर्मदा वाळूतून गाळून जलकुंभात साठवले जाते. तेथून नागरिकांना वितरित केले जाते.
अनुदानासाठी गोदावरी पुलावर शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन
अतिवृष्टी नुकसानभरपाईत तफावत झाल्याने शेतकऱ्यांनी नागमठाण येथील गोदावरी नदीच्या पुलावर जलसमाधी आंदोलन सुरू केले. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर १७ हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान मिळावे, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. सध्या प्रशासनाने फक्त ६,५०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणेच मदत दिली आहे. शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. अजित काळे आणि तालुका अध्यक्ष गणेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन गुरुवारी १५ जानेवारी रोजी सकाळपासून सुरू झाले. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी आणि ई-केवायसीची अट रद्द करून तात्काळ अनुदान थेट खात्यात जमा करावे, अशीही मागणी केली. याआधी अनेक वेळा उपोषण करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. . या आंदोलनात साहेबराव चोरमळ, नामदेव अदिक, शरद असणे, सचिन वेताळ, पंडित अण्णा शिंदे, वैभव सावंत, वाल्मीक गिरी, महेश तांबे, किरण सावंत, देविदास शिरसाठ, सुरेश शिरसाठ, राजू खुर्द, गणेश वाडेकर, रोहित साबदे, दत्ता नरहरे, रमेश अण्णा सवाई, सुनील गायकवाड, कैलास सवाई, विकास तांबे, बाबुराव तांबे, गणेश गायके, शरद वाडे, मोहन दिवटे, बाबासाहेब सोनवणे यांचा सहभाग होता. पोलीसांनी मध्यस्थी केली. आमदार रमेश बोरणारे आणि माजी सभापती अविनाश गलांडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन काही काळासाठी स्थगित केले. या आंदोलनाला आमदार रमेश पाटील बोरणारे, बाजार समितीचे अध्यक्ष रामहरी जाधव, भागिनाथ मगर, माजी सभापती अविनाश गलांडे, माजी जिप अध्यक्ष लताताई पगारे, संजय बोरणारे, शिवसेना उपतालुका प्रमुख डॉ. प्रकाश शेळके, बाळासाहेब जानराव, आदींचा पाठिंबा मिळाला.
खुलताबाद शहरालगत असलेल्या शेकडो वर्षे जुन्या धरम तलावाच्या सुशोभीकरणातून नव्या उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे. या पुलामुळे बनी बेगम बाग व वेरूळ महामार्ग थेट शहराशी जोडले जाणार आहेत. तलावातील साचलेले पाणी बाहेर काढल्याने ‘धरम तलाव फुटला’ अशी अफवा पसरली होती. मात्र, ही केवळ सुशोभीकरणाची पूर्वतयारी असल्याचे स्पष्ट झाल्याने संभ्रम दूर झाला आहे. तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने ‘धरम तलाव फुटला’ अशी चर्चा वेरूळ परिसरात झाली होती. डमडम तलाव परिसरातील शेतकऱ्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. राज्य शासनाच्या ५४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून बनी बेगम बागेचा विकास प्रकल्प सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून धरम तलावाचे सौंदर्यीकरण व उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. तलावातील जुनी पाळ काही अंशी तोडून पाणी बाहेर काढण्यात आले. गाळ काढणे, पाळीची भिंत उंच करणे व जलसाठा क्षमतेत वाढ करणे ही कामे सुरू आहेत. पाळ उंच झाल्याने अधिक पाणी साठवता येणार आहे. तलावावर असलेला जुना अरुंद पूल पाडण्यात आला आहे. त्या जागी मोठा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पुलामुळे पर्यटकांना थेट चारचाकी व दुचाकी वाहनांनी बनी बेगम बागेत जाता येणार आहे. खुलताबादेतील निम्म्याहून अधिक भागासाठी शहरात येण्याचा सोपा मार्ग तयार होणार आहे. वेरूळ महामार्ग व शहर यांची जोडणी अधिक सुलभ होणार आहे. यापूर्वी पर्यटकांना वेरूळ-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून बनी बेगम बागेत पायी जावे लागत होते. वाहनांसाठी शहरातील गर्दीतून फेरी मारावी लागत होती. हा अडथळा आता दूर होणार आहे. धरम तलावातून खुलताबाद शहरासाठी नवा मार्ग केला जात असून, सुरू असलेले काम. तलावाची साठवण क्षमता वाढेल नगर परिषदेचे नगर अभियंता ऋषिकेश जोशी यांनी सांगितले की, शहरालगत असलेल्या धरम तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी पाणी बाहेर काढण्यात आले आहे. वेरूळ महामार्ग ते खुलताबाद शहर जोडणारा नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार असून तलावातील गाळ काढून पाळची भिंत उंच करण्यात येईल. यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता वाढेल. अर्थकारणाला चालना पर्यटकांची संख्या वाढून शहराच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे. धरम तलावाचा कायापालट आणि नव्या उड्डाणपुलामुळे खुलताबाद व बनी बेगम बागेला ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या नवे रूप मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत बाळापुरात तालुकास्तरीय कार्यशाळा
पिंपळदरी राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा मौजे बाळापुर, तालुका सिल्लोड येथे प्रगतशील शेतकरी अशोक सूर्यवंशी यांच्या शेतात पार पडली. कार्यशाळेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी बहुपीक पद्धतीचे महत्त्व सांगितले. कार्यशाळेचे आयोजन तालुका कृषी अधिकारी डॉ. संदीप जगताप यांच्या नेतृत्वाखाली झाले. त्यांनी तालुक्यातील विविध कृषी योजना, अनुदान, तांत्रिक सहाय्य आणि उपलब्ध सुविधा यांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. कार्यशाळेदरम्यान शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी थेट शेतात जाऊन उत्तरे दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना बहुपीक पद्धत, केसर आंबा शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान याबाबत नवी दिशा मिळाली. या कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी परीक्षित पाटील, नंदू जटोटे, संभाजी पाटील, उमेश सरोदे, स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या गावसखी, पिंपळदरीच्या मास्टर ट्रेनर पूजा गव्हाणे, कृषी विभागाचे कर्मचारी आणि पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीआयएसएच, लखनऊ येथील शास्त्रज्ञ डॉ. राजीव जयस्वाल आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील डॉ. मुजफ्फर सय्यद यांनी वैज्ञानिक शेती पद्धतींची माहिती दिली. उत्पादन खर्च कसा कमी करावा आणि नफा कसा वाढवावा, यावर मार्गदर्शन केले. केशर आंबा शेतीवर सखोल मार्गदर्शन कार्यशाळेत केशर आंबा शेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांनी केसर आंब्याच्या लागवडीपासून ते दर्जेदार व निर्यातक्षम उत्पादन घेण्यापर्यंतच्या यशस्वी तंत्राबाबत सखोल मार्गदर्शन केले. योग्य जातींची निवड, छाटणी, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण तसेच बाजारपेठेतील संधी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
मतमोजणी केंद्रात शुक्रवारी (१६ जानेवारी) पोलिसांनी माजी महापौर विकास जैन यांच्यावर केलेल्या मारहाणी प्रकरणाने शनिवारी वेगळी कलाटणी मिळाली. याप्रकरणी शुक्रवारी सहायक पोलिस आयुक्तांच्या फिर्यादीनुसार, जैन यांच्यासह तिघांवर पोलिसांना धक्काबुक्की व शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले ओळखपत्र पाहूनच मतमोजणी केंद्रावर शुक्रवारी सर्वांना आत सोडले जात होते. या वेळी विकास जैन यांनी ओळखपत्र न दाखवता पोलिसांशी हुज्जत घातली. मी कोण आहे हे माहीत नाही का, असे म्हणत त्यांनी गेट ढकलून आत जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी जैन यांनी निरीक्षक प्रमोद कठाणे आणि सहायक निरीक्षक मिरधे यांना धक्काबुक्की करून त्यांचा गळा धरला. हा वाद सोडवण्यासाठी सहायक आयुक्त सागर देशमुख पुढे आले असता जैन यांनी त्यांनाही मागे ढकलले. त्यांच्यासोबतच्या शिवा राजपूत आणि अभिषेक जीवनवाल यांनीही गेट ढकलून आत प्रवेश केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला, असे या तक्रारीत नमूद केलेले आहे. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, कोर्टात दाद मागू मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या प्रकरणात चर्चा केली आहे. या प्रकरणात कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या प्रकरणात पोलिस आयुक्त व अन्य पोलिस अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. -संजय शिरसाट, पालकमंत्री निलंबनाच्या धास्तीने माझ्याविरुद्ध तक्रार मी ६१ वर्षांचा ज्येष्ठ नागरिक आहे, पोलिसांनी मला ज्या पद्धतीने मारले, ती वागणूक सराईत गुंडासारखी होती. अधिकारी सागर देशमुख त्या वेळी माझ्यापासून बरेच दूर होते. निलंबनाच्या भीतीने त्यांनी तक्रार दिली आहे. मारहाणीची घटना कॅमेऱ्यात कैद आहे. मी पोलिस आयुक्तांकडे तक्रार करणार आहे. -विकास जैन, माजी महापौर
महापालिका निवडणुका होताच मित्रपक्षांव्यतिरिक्त इतर पक्षांतील ५ नगरसेवक येऊन भेटल्याचे भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. शहराचा विकास करण्याची क्षमता भाजपमध्ये आहे. केंद्र आणि राज्याच्या निधीतून शहराच्या विकासाचे स्वप्न भाजप साकारेल, असे सांगत ५ नगरसेवकांनी बिनशर्त पाठिंबा देण्याचे निश्चित केल्याचे शितोळे यांनी स्पष्ट केले. मात्र, शिंदेसेनेसोबत युती करण्याबद्दल त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. भाजपला निवडणुकीत ५७ जागा मिळाल्या असून, बहुमतासाठी केवळ एक नगरसेवक आवश्यक आहे. शिवसेना शिंदे गटाचे १३ नगरसेवक विजयी झाले आहेत. स्वबळावर महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचा सभापती करायचा झाल्यास भाजप शिंदेसेनेला खो देऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. यातच आता भाजप शहर जिल्हाध्यक्ष शितोळे यांनी सूचक इशारा दिला आहे. इतर पक्षाच्या ५ नगरसेवकांना घ्यायचे की नाही, यासंदर्भातील आपण निर्णय करू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोअर कमिटी प्रथम विचार करेल आणि त्यानंतर प्रदेश भाजपकडे अहवाल सादर केला जाईल. प्रदेशाकडून यासाठी हिरवा कंदील मिळाला तरच पुढे जाता येईल, असेही शितोळे यांनी या वेळी बोलताना सांगितले. मित्रपक्षांवर दबाव आणण्याची खेळी भाजपला बहुमतासाठी केवळ एकाच जागेची गरज असल्याने भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. महापौरपदाचे आरक्षण अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे पुढील कोणताही निर्णय घेण्यासाठी आणखी १०-१२ दिवसांचा अवधी आहे. अशा स्थितीत राज्याच्या सत्तेत सोबत असलेल्या शिंदेसेनेने महापालिकेतही साथ द्यावी. मात्र, युती करताना फारशा अटी घालू नयेत. पदांच्या मागण्या करू नयेत म्हणून भाजपकडून दबावतंत्राची खेळी म्हणून शितोळे यांच्या वक्तव्याकडे पाहिले जात आहे. आप्तस्वकीयांना उमेदवारी देणाऱ्यांचे बेहाल भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपने महापालिका निवडणुकीत जाणीवपूर्वक मंत्री, खासदार, आमदार यांच्या पुत्रांना उमेदवारी नाकारली. पक्षासाठी आयुष्यभर राबणारा कार्यकर्ता सर्वतोपरी आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत आप्तस्वकीयांना उमेदवारी देणाऱ्या पक्षांचे बेहाल झाले असल्याची प्रतिक्रिया भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी दिली. उमेदवारी न मिळाल्यामुळे अरविंद डोणगावकर यांनी आपल्या पत्नी सविता यांच्यासाठी क्रांती चौक प्रभागातून बंडखोरी केली. त्यांनीही किशोर शितोळे यांची भेट घेऊन यशाबद्दल अभिनंदन केले.
जि. प.साठी भाजपने युतीचा निर्णय आताच घ्यावा:शिवसेनेची भूमिका, शेवटपर्यंत चर्चा चालणार नाही- शिरसाट
जिल्हा परिषदेची निवडणुकीसाठी युती करायची की नाही, याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने येत्या २ ते ३ दिवसांत घ्यावा. अन्यथा शिवसेना स्वबळावर लढणार आहे, असे शिंदेसनेने सूचित केले आहे. मनपा निवडणुकीत शेवटच्या दिवसापर्यंत युती करायची की नाही, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, शेवटच्या दिवशी युती तुटली. त्याचा फटका शिवसेनेला बसला. या पार्श्वभूमीवर पक्षाने ही भूमिका घेतली आहे. पैठणमध्ये शिवसेनेचे आमदार विलास भुमरे आणि खासदार संदिपान भुमरे यांनी तयारी केली आहे. शनिवारी मेळावादेखील घेण्यात आला. याबाबत दिव्य मराठीशी बोलताना खासदार संदिपान भुमरे यांनी सांगितले की, स्वबळाच्या निवडणुकीसाठी आम्ही तयारी केली आहे. मात्र, याचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत. त्यासाठी बैठक होणार आहे. आमची तयारी सुरू जिल्हा परिषदमध्ये भाजपसोबत युती व्हावी यासाठी आम्ही अनुकूल आहोत. मात्र, मनपासारखी शेवटपर्यंत चर्चा करता येणार नाही. दोन ते तीन दिवसांत काही िनर्णय झाल्यास चर्चा होईल, अन्यथा आम्ही तयारी सुरू केली आहे. - संजय शिरसाट, पालकमंत्री
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला असला, तरी २६ जागांवर शिवसेना तर २३ ठिकाणी उबाठा दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष ठरला आहे. यावरून शिवसेनेची ताकद कमी झालेली नसल्याचे स्पष्ट होते. पक्ष फुटला नसता तर महापालिका निकालाचे चित्र काहीसे वेगळेच दिसले असते. शिवसेना आणि शिवसेना उबाठा या दोन्ही पक्षांना विजयाने हुलकावणी दिली असली, तरी अनेक प्रभागांत या दोन्ही गटांनी आपली ताकद सिद्ध केली आहे. दोन्ही शिवसेनेचा शहरावरील प्रभाव कायम शिवसेनेने २६ प्रभागांत दुसरा क्रमांक तर दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) २३ प्रभागांत दुसऱ्या क्रमांकावर राहिली. विजयाचे अंतर अल्प असलेल्या अनेक जागांवर या दोन्ही पक्षांनी प्रस्थापित उमेदवारांना घाम फोडला. या आकडेवारीवरून शहरात आजही शिवसेनेची वैचारिक पकड कायम असल्याचे चित्र स्पष्ट होते. शिंदेसेना महापालिकेत भाजपबरोबर सत्तेत सहभागी होऊ शकते. उद्धवसेनेला मात्र लोकसभा निवडणुकीपर्यंत कार्यकर्त्यांना कार्यक्रम द्यावा लागेल. इतर पक्षांची स्थिती अशी... केवळ दोन्ही शिवसेनाच नव्हे, तर भाजप, काँग्रेस आणि एमआयएमनेही अनेक प्रभागांत चुरशीची लढत दिली. शहरात भाजपनंतर सर्वाधिक यश मिळालेल्या एमआयएम पक्ष ७ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर एमआयएमची बहुतांश प्रभागात थेट लढत असलेला काँग्रेस पक्ष ११ जागांवर तर वंचित बहुजन आघाडी ही १२ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहिली. विजयी गणित अन् चुरशीची लढत भाजप ५७ जागांसह बहुमताजवळ पोहोचला, एमआयएम ३३ जागांसह दुसरा मोठा पक्ष ठरला आहे. प्रभागामुळे क्रॉस व्होटिंग झाली, तरी त्याचा फायदा काही पक्षांना झाला. मात्र एमआयएमच्या प्रभागांमध्ये केवळ पतंगाला लक्षात ठेऊनच मतदान झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. क्लोज फाइट ठरलेल्या पक्षांचे प्रभाग आणि मतांची आकडेवारी ही भविष्यातील राजकारणातील वेगळे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे मुस्लिमबहुल भागात एमआयएम, काँग्रेस आणि वंचित, तर हिंदूबहुल भागात भाजप आणि शिंदे गटात थेट संघर्ष पाहायला मिळाला. काही ठिकाणी भाजप आणि एमआयएममध्येही थेट लढती झाल्या.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता आणली असून भाजपचे तब्बल ११९ नगरसेवक निवडून आले आहेत. तर दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक प्रचार केलेला असताना त्यांना कमी जागा मिळाल्या आहेत. पुणेकरांनी अजितदादांना नाकारले का, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, मी असे म्हणणार नाही की पुणेकरांनी त्यांना नाकारले. पण मी असे म्हणेन की, पुणेकरांनी मोदींना, भाजपला आणि आमच्या नेत्यांना स्वीकारले. पुण्यात शनिवारी फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे ग्रँड टूरचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबाबत फडणवीस म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही ठिकाणच्या नागरिकांचे आभार मानतो. त्यांनी भाजपवर प्रचंड मोठा विश्वास ठेवला. ज्या पद्धतीचा विजय पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील नागरिकांनी दिला आहे, त्याचा आनंद तर आहेच, पण त्याहीपेक्षा जबाबदारीचे भान आहे. जनतेने जो विश्वास व्यक्त केला आहे त्याला पात्र होण्यासाठी आम्हाला जास्त मेहनत करावी लागणार आहे. जे व्हिजन दिले आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत, असे या वेळी फडणवीस म्हणाले. भारतभूषण बराटेंना २५ हजारांचे मताधिक्य प्रभाग ३२-ब मधून भारतभूषण बराटे यांना २५ हजारांचे, तर प्रभाग ४-ब मधून रत्नमाला सातव यांना २३ हजारांचे मताधिक्य मिळाले. मुंबई महापालिकेत नील सोमय्या यांनी १५ हजार मतांचे मताधिक्य मिळवत प्रथम क्रमांक मिळवला असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नितीन निकाळजे हे सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. राघवेंद्र मानकर २६ हजारांवर मते घेऊन राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी पुणे| पुण्यासह राज्यातील २८ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालाची मतमोजणी शुक्रवारी जाहीर झाली. यामध्ये राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवत पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक २५-ब येथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राघवेंद्र बापू मानकर हे तब्बल २६ हजार ४९७ मतांच्या फरकाने विजयी ठरले आहेत. भाजपच्या माध्यमातून त्यांनी ही निवडणूक लढवली होती. “दादा’ जनता अन् आम्ही सेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “पुण्याचे दादा कोण?’ असे विचारले असता ते म्हणाले की, पुण्याचे दादा हे पुण्याची जनता असून आम्ही त्यांचे सेवक आहोत. मुंबईच्या यशावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, मुंबईत महायुतीला ११९ जागा मिळाल्या असून आमच्या १४ जागा कमी मतांनी हरलो आहोत. एवढ्या जागा ३ निवडणुकांत शिवसेना एकसंघ असताना त्यांना मिळाल्या नाहीत.
टीका:भाजप आम्हाला संपवू शकत नाही- उद्धव ठाकरे, जमिनीवर शिवसेना अजून कायम
“भाजपने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून आणि नियम बदलून कागदावर शिवसेना संपवली असेल; पण जमिनीवरची शिवसेना संपवू शकले नाहीत. कालच्या निवडणुकीत मुंबईकरांनी आणि कडव्या शिवसैनिकांनी हे दाखवून दिले आहे की, पैशाच्या धबधब्यासमोर आजही निष्ठा ताठ मानेने उभी आहे,” अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. या वेळी त्यांना नगरसेवक भेटायला आले होते. आकड्यांच्या खेळात आमचा महापौर होताना दिसत नसला, तरी शिवसेनेने दिलेली झुंज ही ऐतिहासिक आहे, असे त्यांनी नमूद केले. “त्यांच्या विजयावर गद्दारीचा आणि भ्रष्टाचाराचा डाग आहे, पण आमच्या पराजयाला स्वाभिमानाचे तेज आहे,” असे सांगताना त्यांनी शिवसैनिकांचे मनोबल उंचावले. एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांना भाजपने अडीच वर्षे सत्तेसाठी वापरले, त्यांना आता फेकून देण्याची वेळ आली आहे. “माझा पक्ष फोडून त्यांनी मुख्यमंत्री बनवला, आता भाजप आपला महापौर बसवण्यासाठी शिंदे गटाचीच पार्टी फोडेल का?” असा मिश्किल सवाल त्यांनी उपस्थित केला. या वेळी ठाकरे यांनी नगरसेवकांशी संवाद साधला. मुंबईची अस्मिता विकणाऱ्यांना जनता कधीच माफ करणार नाही, ही तर केवळ एका मोठ्या संघर्षाची सुरुवात आहे,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. भाजपचे हिंदुत्व केवळ ढोंग भाजपचे हिंदुत्व हे केवळ ढोंग असून, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मराठीबहुल परिसरातील शिवसेनेचा गड शाबूत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. ठाकरे म्हणाले की, चार दिवस पैसे वाटून निष्ठा विकत घेता येत नाही. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी मुंबईच्या तिजोरीवर लक्ष ठेवून असतील.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७५ जागा जिंकून एकतर्फी वर्चस्व गाजवले असले तरी युतीचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने आता थेट ‘विरोधात बसण्याची’ तयारी दर्शवून सर्वांनाच धक्का दिला आहे. “सत्ता अमर्याद नसावी, त्यावर अंकुश हवा,’ अशी भूमिका घेत भाजप नेत्यांनी थेट संघर्षाचे संकेत दिले आहेत. ठाण्यातील १३१ जागांपैकी महायुतीने १०३ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७५ जागा जिंकल्या आहेत. भाजपला २८ जागांवर यश मिळाले असून शरद पवार गटाने १२, अजित पवार गटाने ९ आणि उद्धव ठाकरे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. ठाण्यात उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत माजी खासदार राजन विचारे यांच्या पत्नीचाही पराभव झाला. त्यामुळे ठाण्यात ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. भाजपची सत्तेतील वाट्यासाठी दबावतंत्राची खेळी शिवसेना फुटीचा फायदा थेट भाजपला होईल असे म्हटले जात होते. पण त्याचा काहीच फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. शिंदेंचे एकतर्फी वर्चस्व असले तरी “सत्ता अमर्याद नसावी’ म्हणत भाजप शिंदेंच्या प्रभावावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. महापौरपदासाठी स्वतःहून न जाण्याचा पवित्रा घेऊन भाजपने सत्तेत सन्मानजनक वाट्यासाठी दबावतंत्राची खेळी खेळली आहे. राज्यात युती असली तरी स्थानिक पातळीवर “शरण’ न जाता आक्रमक विरोधकाची भूमिका घेत भाजपने आपली भविष्यातील विस्ताराची रणनीती स्पष्ट केली आहे. महापौरपदासाठी चर्चा करायला जाणार नाही महत्त्वाची बाब म्हणजे भाजपने स्पष्ट केले आहे की ते महापौरपदाच्या चर्चेसाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत. “त्यांना (शिवसेनेला) चर्चा करायची असेल तर ते येतील, आम्ही जाणार नाही,’ असे म्हणत भाजपने आपला कडक पवित्रा जाहीर केला आहे. “सत्ता अमर्याद नसावी, त्यावर कुणाचे तरी नियंत्रण हवे,’ या विधानामुळे ठाण्याच्या राजकारणात आता चर्चांना उधाण आले आहे. एकूणच एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेना-भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचेच यावरून स्पष्ट होत आहे. मात्र भाजपच्या या भूमिकेवर शिंदे गटाकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. येत्या काही दिवसांत हा वाद आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. जागावाटपावरून सुरू झालेला हा सुप्त संघर्ष आता सत्ता स्थापनेबाबत टोकाला पोहोचला असल्याचेही दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवू, भाजप आमदारांचा पवित्रा भाजपचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. केळकर म्हणाले की, “आम्ही ४० जागा लढवल्या आणि २८ जागांवर यश मिळवले. २०१७ च्या तुलनेत आमच्या ५ जागा वाढल्या आहेत. आम्ही सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम करू. वेळ पडली तर विरोधात बसायलाही आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले आहे. भाजपच्या या भूमिकेवर आता ठाण्यातील शिंदेसेनेचे स्थानिक पदाधिकारी काय निर्णय घेतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. निवडणुकीपूर्वी भाजपची युती नकोची होती भूमिका ठाण्यात निवडणुकीपूर्वी भाजपने शिवसेनेशी युती नको अशीच भूमिका घेतली होती. भाजपच्या १८ प्रांत अध्यक्षांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदारांना पत्र पाठवले होते. मात्र, भाजपतील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार युतीत निवडणुका लढवण्यात आल्या. आता निकालानंतर पुन्हा भाजपचा विरोधी सूर आल्याने भाजप-शिवसेनेतील शीतयुद्ध संपले नसल्याचे दिसून येत असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेषतः सत्तेत समसमान वाटा मिळावा यासाठी स्थानिक स्तरावर प्रचंड दबाव असल्याने, युतीमधील ही अंतर्गत धुसफूस उघडपणे चव्हाट्यावर आली.
उत्तर प्रदेशातील धर्मांतर रॅकेटचा सूत्रधार व स्वयंघोषित धर्मगुरू छांगुरबाबाच्या ‘धर्मांतर सिंडिकेट’ चे धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचले असून राजस्थान, लखनऊ, बलरामपूर व पुण्यानंतर यूपी एटीएसने नागपूर एटीएस व स्थानिक पोलिसांच्या मदतीने जरीपटका भागातून इरदुल इस्लाम वल्द गुलाम येजदानी या त्याच्या सहकाऱ्याला शनिवारी अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, आशी नगर येथील गवसीया मशीद परिसरातील घरातून शनिवारी पहाटे ५. ३० वाजता अटक केली. छांगूर बाबाच्या नेटवर्कसाठी निधी व लॉजिस्टिक्स व्यवस्थापन पाहत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. कोण आहे छांगूरबाबा? इरदुलच्या बँक खात्यावर कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार इरदुल इस्लाम हा मूळचा नागपूरचा रहिवासी असून त्याचा सोलर पॅनेल इन्स्टॉलेशनचा व्यवसाय आहे. छांगुरबाबाच्या आश्रमात सोलर पॅनेल बसवण्याचे काम मिळाल्याने त्यांच्या संपर्कात आलो, धर्मांतराशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा इरदुलने केला आहे. पण इरदुलच्या बँक खात्यातील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार एटीएसच्या रडारवर आहेत. हा पैसा नेमका कुठून आला, तो धर्मांतर रॅकेटसाठी वापरला गेला का, याचा तपास पोलीस करत आहेत. उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील छांगूर बाबा उर्फ जलालुद्दीन उर्फ करीमुल्ला शाह हा ‘धर्मांतर सिंडीकेट’चा सूत्रधार आहे. त्याचे नागपुर शहरात जुने संबंध होते. त्यानंतर त्याने उत्तर प्रदेशात जाऊन धर्मांतराचे मोठे जाळे उभारले असून तो तरुणी, मजूर, विधवा आणि निराधार तरुणीना मोठे आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर करत असल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. छांगूर बाबाला गेल्या वर्षी ५ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. त्याची सहकारी नीत रोहरा उर्फ नसरीनही अटकेत आहे. या रॅकेटला आखाती देशांतून १०० कोटींचा निधी मिळाल्याची माहिती समोर आली.
विठ्ठल-रुक्मिणी विवाह सोहळ्याची जय्यत तयारी:23 जानेवारीला परंपरेनुसार भाविकांच्या उपस्थितीत सोहळा
पंढरपूर येथे माघ शुद्ध १ ते ५ या कालावधीत संपन्न होणाऱ्या श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आली असून, वसंत पंचमी अर्थात २३ जानेवारी रोजी परंपरेनुसार विवाह सोहळा होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. यानिमित्ताने साध्वी अनुराधा (दिदी) राजेंद्र शेटे यांचे रूक्मिणी स्वयंवर कथेचे आयोजन दिनांक १९ ते २२ जानेवारी या कालावधीत दररोज दुपारी ४. ते ६. या वेळेत करण्यात आले आहे. वसंत पंचमी दिनी सकाळी १० ते १२ या वेळेत विठ्ठल रूक्मिणीमातेचा विवाह सोहळा विधिवत मंत्रोच्चारात संपन्न होणार आहे. पहाटे काकडा आरतीवेळी विठ्ठलास सोन्याच्या मुकुटाऐवजी मंदिरातील पांढरे पागोटे परिधान करण्यात येते. या दिवसापासून रंगपंचमीपर्यंत श्री विठ्ठलास पांढरा पोशाख परिधान केला जातो. यानिमित्त सकाळी ११ वाजता श्री विठ्ठलाची तुळशी पूजा करण्यात येईल. त्यानंतर श्री विठ्ठलास विवाह स्थळी येण्याचे निमंत्रण देण्यात येते. श्री रूक्मिणी मातेस पांढरा पोशाख व पारंपारिक अलंकार परिधान करून पाद्यपूजा, नैवेद्य व आरती होते. दुपारी १२ वाजता श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मूर्ती श्री विठ्ठल सभामंडपात आणून विवाह सोहळा विधीवत पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी ४.०० वाजता पोशाखानंतर पाद्यपूजा करण्यात येणार आहे. प्रतीकात्मक मूर्तींची सवाद्य शोभायात्रा काढण्यात येणार श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेच्या प्रतिकात्मक मूर्तींची सवाद्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सदर शोभायात्रा व्ही.आय.पी. गेट, श्री संत नामदेव पायरी, महाद्वार पोलीस चौकी, कालिका देवी मंदिर, काळा मारुती चौफाळा, नाथ चौक, तांबडा मारुती मंदिर, माहेश्वरी धर्मशाळा, महाद्वार पोलीस चौकी, पश्चिम द्वार, व्ही.आय.पी. गेट या मार्गाने निघणार आहे. भाविकांना हा सोहळा घरबसल्या पाहता येणार भाविकांना सोहळा पाहता यावा यासाठी चौफाळा व महाद्वार पोलीस चौकी येथे एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार असून, विविध समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना हा सोहळा घरबसल्या पाहता येणार आहे. तसेच वसंत पंचमीच्या दिवशी दुपारी १२.०० ते सायंकाळी ७.०० वाजेपर्यंत अन्नछत्र सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री. संदेश भोसले यांनी दिली.
भारतीय शास्त्रीय संगीतातूनच संगीताची उत्पत्ती झाल्याचे अनेकांचे मत आहे. अनेक संगीत प्रकारांचे मुळ याच शास्त्रीय संगीतात आहे. सुपरहीट गाणे गाणाऱ्या गायकांनी सुद्धा सुरुवातीला 'साsssss' लावूनच तासंतास रियाज केलेला असतो. त्यामुळेच भारतीय संगीत जर एक विशाल वटवृक्ष समजले तर त्याचा मुळ खोड हा शास्त्रीय संगीताचा आहे आणि या वृक्षाच्या पारंब्या म्हणजे लोकगीत, पारंपरिक गीत, आदिवासी गीत, असे अनेक संगीत प्रकार म्हणजे पारंब्या असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतीय शास्त्रीय संगीतात अनेक महान गायकांनी, वादकांनी, संगीतकारांनी व संगीततज्ञांनी योगदान दिले आहे. तसे पाहायला गेले तर भारतीय शास्त्रीय संगीताचा उल्लेख सामवेदात आढळतो. त्यानंतर भरत मुनी यांनी लिहिलेल्या 'नाट्यशास्त्र' या ग्रंथात शास्त्रीय संगीताची विस्तृत माहिती आपल्याला पाहायला मिळते. शास्त्रीय संगीताचा पाया समजून घेत या संगीताला आणखी समृद्ध करण्यासाठी अनेकांनी अमूल्य योगदान दिले आहे. त्यातलेच एक महान संगीततज्ञ म्हणजे पंडित विष्णू नारायण भातखंडे. 'रागदरबार'च्या आजच्या भागात आपण ज्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला लिपिबद्ध केले अशा पंडित विष्णू भातखंडे यांच्या जीवनाविषयी तसेच त्यांच्या सांगीतिक प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. भारतीय शास्त्रीय संगीताचे मुख्य दोन भाग आहेत. कर्नाटक संगीत आणि हिंदुस्तानी संगीत. कर्नाटक संगीत दक्षिण भारतीय संगीताला म्हटले जाते, तर हिंदुस्थानी संगीत म्हणजे उत्तर भारतीय संगीत. पंडित विष्णू नारायण भातखंडे यांना उत्तर भारतीय संगीताचा प्राणदाताही म्हटले जाते. बाळाचे पाय पाळण्यात: बासरीच्या सुरांनी थांबले रडणे महान संगीततज्ञ पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म 10 ऑगस्ट 1860 साली महाराष्ट्रातल्या वाळकेश्वर नावाच्या गावात कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी झाला. असे म्हणतात बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात, त्याच प्रकारे विष्णू नारायण भातखंडे यांच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला जातो. विष्णू भातखंडे यांचा जन्म झाला आणि जेव्हा ते रडले तेव्हा दूर वरून ऐकू येणाऱ्या बासरीचा आवाज ऐकून त्यांनी रडण्याचे थांबवले आणि हसायला लागले. तेव्हाच विष्णू यांच्या आई-वडिलांना आपल्या मुलामध्ये संगीताविषयी एक वेगळी प्रतिभा असल्याचे समजले. पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म 10 ऑगस्ट 1860 रोजी महाराष्ट्रातील वाळकेश्वर येथे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी झाला. त्यांच्या बालपणातील एक प्रसिद्ध किस्सा 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' या उक्तीची प्रचिती देतो. असे सांगितले जाते की, जन्मानंतर जेव्हा बालक विष्णू रडू लागले, तेव्हा दुरून येणारे बासरीचे मधुर सूर ऐकून त्यांनी तात्काळ रडणे थांबवले आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले. संगीताच्या सुरांना मिळालेली ही उत्स्फूर्त दाद पाहून त्यांच्या आई-वडिलांना आपल्या मुलामध्ये असलेल्या विलक्षण संगीत प्रतिभेची जाणीव झाली, ज्यांनी पुढे जाऊन भारतीय संगीत शास्त्राला एक नवी आणि शिस्तबद्ध ओळख मिळवून दिली. विष्णू भातखंडे हे लहानपणीच बासरी वादन शिकले. महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी सतार वादन शिकले. सुरुवातीला गोपाळगिरी यांच्याकडे व त्यानंतरचे शिक्षण अंध वादक वल्लभदास दामुलजी यांच्याकडे त्यांनी सतार वादनाचे धडे घेतले. मुंबई येथील एल्फिन्स्टंट महाविद्यालयातून त्यांनी 1885 मध्ये बीए व त्यापुढे एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. 1884 मध्ये विष्णू भातखंडे पारशी संगीत प्रेमींनी चालवलेल्या 'गायनोत्तेजक मंडळी'मध्ये सहभागी झाले होते. इथे त्यांना त्या काळातील नामांकित गायक वादकांचे गायन व वादन ऐकण्याची संधी मिळाली. ही संस्था त्यांच्या व्यासंगाची गंगोत्रीच ठरली व तिथे त्यांच्या संशोधनाला चालनाही मिळाली. संगीतशास्त्राच्या पुनर्रचनेचा पाया पंडित विष्णू भातखंडे यांनी 'गायनोत्तेजक मंडळी' या संस्थेत अनेक वर्षे विनावेतन संगीत अध्यापनाचे कार्य केले. या काळात त्यांनी केवळ विद्यादान केले नाही, तर अनेक दिग्गज कलाकारांकडून धृपद, ख्याल, होरी, तराणे आणि ठुमरी अशा विविध प्रकारच्या दुर्मिळ पारंपरिक चिजांचे संकलनही केले. या सखोल अभ्यासात त्यांच्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, ती म्हणजे प्रत्यक्ष गायले जाणारे राग आणि प्राचीन ग्रंथांमधील रागांचे वर्णन यात मोठी तफावत आहे. त्याकाळी स्वरलेखन पद्धती प्रचलित नव्हती आणि गायकांनाही राग-उत्पत्तीचे शास्त्रीय ज्ञान नव्हते. त्यामुळे मूळ रागांमध्ये बदल होऊन नवीनच प्रकार रूढ होत होते. जुने ग्रंथ संदिग्ध आहेत आणि त्यांचा व सध्याच्या गायकीचा ताळमेळ बसत नाही, हे विष्णू भातखंडे यांनी वेळीच ओळखले. त्यामुळे त्यांनी केवळ जुन्या ग्रंथांवर अवलंबून न राहता, सध्या उपलब्ध असलेली गायकी व 'चिज' हाच आधार मानून संशोधनाला सुरुवात केली. संगीतशास्त्र आणि प्रत्यक्ष सादरीकरण यांच्यातील दरी मिटवून, काळाशी सुसंगत अशी संगीतशास्त्राची नव्याने आणि शास्त्रशुद्ध मांडणी करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी हाती घेतले. संशोधन, संस्था आणि शास्त्र: भातखंडे यांची त्रिसूत्री आपल्या चालत्या वकिली व्यवसायावर तुळशीपत्र ठेवून पंडित विष्णू भातखंडे यांनी स्वतःला पूर्णतः संगीत संशोधनासाठी वाहून घेतले. या कार्यासाठी त्यांनी स्वतःवर अत्यंत कडक शिस्त लादली होती. 1904 ते 1909 या काळात त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती केली. या प्रवासात विविध संगीत केंद्रांना भेटी देऊन, तिथल्या विद्वान आणि कलाकारांशी चर्चा करून त्यांनी संगीताचा सखोल अभ्यास केला. दुर्मिळ ग्रंथ आणि हस्तलिखिते शोधून, त्यांचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी भारतीय संगीताची नव्याने मांडणी केली. रागविचार, थाटपद्धती, वादी-संवादी आणि आरोह-अवरोह यांसारख्या क्लिष्ट विषयांवर त्यांनी ग्रंथांतून शास्त्रीय भाष्य केले. त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी विकसित केलेली सोपी आणि सुसूत्र 'स्वरलेखन पद्धती' (ज्याला भातखंडे लिपी असेही म्हटले जाते), ज्यामुळे संगीत कागदावर उतरवणे शक्य झाले. 1908 ते 1933 या काळात त्यांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. भातखंडे यांचे त्यांचे कार्य प्रामुख्याने तीन स्तंभांवर उभे होते: 1. प्राचीन संगीत विद्येचे संशोधन. 2. आधुनिक काळाला साजेशा संगीतशास्त्राची नव्याने उभारणी. 3. या शास्त्राचा सर्वसामान्यांत प्रचार व प्रसार. संस्थात्मक उभारणी आणि वारसा केवळ पुस्तकी ज्ञान न देता, पंडित भातखंडे यांनी प्रत्यक्ष शिक्षणासाठी संस्थांचे जाळे विणले: बडोदे (1916): श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी आपली सरकारी संगीत पाठशाळा भातखंडे यांच्याकडे सोपवली. ग्वाल्हेर (1918): महाराज माधवराव शिंदे यांच्या मदतीने 'माधव संगीत महाविद्यालया'ची स्थापना केली. लखनौ (1926): स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ऐतिहासिक ‘मॉरिस कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्युझिक’ स्थापन केले, जे आज ‘भातखंडे संगीत संस्थान’ म्हणून ओळखले जाते. या संस्थांसाठी त्यांनी पद्धतशीर अभ्यासक्रम आखला आणि त्यासाठी आवश्यक 'क्रमिक पुस्तके'ही तयार केली. संगीतावर चर्चा घडावी आणि विचारांची देवाणघेवाण व्हावी, या हेतूने 'संगीत परिषदा' भरवण्याची मूळ संकल्पनाही भातखंडे यांचीच होती. त्यांच्या पुढाकाराने बडोदे, दिल्ली, वाराणसी आणि लखनौ येथे ऐतिहासिक संगीत परिषदा पार पडल्या. पंडित भातखंडे यांची ग्रंथसंपदा पंडित भातखंडे यांनी केवळ संशोधन केले नाही, तर ते संशोधन पुढच्या अनेक पिढ्यांना उपलब्ध व्हावे यासाठी विपुल लेखनही केले. त्यांची ही ग्रंथसंपदा संगीत क्षेत्रातील दीपस्तंभ मानली जाते. त्यांच्या या कार्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मराठी भाषेत लिहिलेला सुमारे अडीच हजार पानांचा 'हिंदुस्थानी संगीतपद्धती' हा विशाल ग्रंथ आणि विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरलेली 'क्रमिक पुस्तक मालिका'. या सहा भागांच्या मालिकेतून त्यांनी तब्बल 1852 चिजांचे स्वरलेखन करून रागांचे मोठे भांडारच खुले केले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी संस्कृतमध्ये 'श्रीमल्लक्ष्यसंगीतम्', 'अभिनवरागमञ्जरी' तसेच इंग्रजी भाषेतूनही भारतीय संगीताचा इतिहास आणि तुलनात्मक अभ्यास मांडणारे ग्रंथ लिहिले. स्वतःच्या लेखनासोबतच त्यांनी प्राचीन आणि दुर्मिळ संस्कृत ग्रंथांचे पुनरुज्जीवन करण्याचे महतकार्य केले. पुंडरीक विठ्ठल, लोचन कवी, व्यकंटमखी, भावभट्ट अशा अनेक प्राचीन शास्त्रकारांचे लुप्त होत चाललेले ग्रंथ त्यांनी संपादित करून पुन्हा प्रकाशित केले, ज्यामुळे जुन्या संगीतशास्त्राचा वारसा टिकून राहिला. भातखंडे यांच्या लेखनाचे आणखी एक रंजक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी धारण केलेली विविध टोपणनावे. त्यांनी स्वतःच्या नावाचा बडेजाव न करता, वेगवेगळ्या हेतूंसाठी वेगवेगळी नावे स्वीकारली. 'लक्ष्यसंगीत' ग्रंथासाठी त्यांनी 'भरतपूर्वखंडनिवासी चतुर पंडित' हे नाव घेतले, तर 'हिंदुस्थानी संगीतपद्धती'साठी 'विष्णुशर्मा' हे नाव वापरले. त्यांनी रचलेल्या बंदिशींमध्ये 'चतुर' आणि 'हररंग' ही नावे आजही गाजतात, तर जुन्या संस्कृत ग्रंथांच्या प्रकाशनासाठी त्यांनी 'भारद्वाजशर्मा' हे नाव स्वीकारले होते. त्यांच्या या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन भारत सरकारने 1961 मध्ये त्यांच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट प्रकाशित करून त्यांना आदरांजली वाहिली.
नगरसेवक तयार, मात्र महापौरपदाचे आरक्षण गुलदस्त्यात बुधवारी आरक्षणाच्या सोडतीची शक्यता मुंबई : प्रतिनिधी निवडणुकीपूर्वी आरक्षण काढल्यास पाडापाडीचे राजकारण होईल, या भीतीने नगर विकास विभागाने महापौर पदाचे आरक्षण आजवर काढले नव्हते. आता निवडणूक संपल्यानंतर महापौरपदाची लॉटरी काढण्यासाठी नगर विकास विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येणा-या बुधवारी आरक्षणाची सोडत काढली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता महापालिकांचे निकाल […] The post आता आरक्षण सोडतीवर नजर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारताच्या एआय, सेमीकंडक्टर क्षेत्राला धक्का!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिका आणि तैवान यांच्यात नुकताच एक मोठा व्यापारी करार झाला आहे. हा करार ५०० डॉलरचा आहे. या अंतर्गत तैवानच्या वस्तूंवर आकारला जाणारा कर २० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपर्यंत कमी केला जाणार आहे. या बदल्यात तैवान अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रात २५० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. यामध्ये कारखाने, रिसर्च लॅब आणि औद्योगिक उद्यानांचा समावेश […] The post भारताच्या एआय, सेमीकंडक्टर क्षेत्राला धक्का! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मंत्रिमंडळ बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती
शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांत नाराजी?, फडणवीसांचेही सुतोवाच मुंबई : प्रतिनिधी महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर होताच दुस-याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन बरेच महत्त्वाचे निर्णय घेतले. परंतु या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहिले. त्यामुळे पुन्हा उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. अजित पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या विरोधात […] The post मंत्रिमंडळ बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विकासाच्या अजेंड्याला मुंबईकरांचे समर्थन : मुख्यमंत्री मुंबई : प्रतिनिधी मुंबईत आज महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले आहे. भाजपा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. काही जागा अगदी थोडक्या मतांनी पराभूत झाल्या अन्यथा आज आपण सेंच्युरी मारली असती. मराठी माणसाला जे स्वत:ची जहागीर समजत होते, त्यांनाही मुंबईचा मराठी माणूस भाजप आणि विकासासोबतच आहे हे समजले असेल. लोकांनी पंतप्रधान […] The post मुंबई आता थांबणार नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईत ठाकरेंचा बॉम्ब, शिंदेंच्या पोटात गोळा!, नगरसेवक सुरक्षितस्थळी मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिकेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. परंतु तिन्ही पक्षांनी जोर लावूनही त्यांना काठावरच बहुमत मिळविता आले. कारण ठाकरे बंधूंनी जोर लावल्याने उद्धव ठाकरे यांची शिवसेना दुस-या क्रमांकाचा पक्ष बनला तर शिंदे सेना तिस-या क्रमांकावर फेकली गेली. त्यामुळे महापौरपदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वी समीकरणे जुळविण्याच्या […] The post समीकरणांची जुळवाजुळव! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे. जिल्ह्यात अजितदादांनी सर्वच प्रमुख विकासकामे मार्गी लावली आहेत. पालककमंत्री असताना तसेच आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांचे सातत्याने जिल्ह्यावर लक्ष राहिले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून हा जिल्हा राष्ट्रवादीच्या पाठिशी आहे. पवार साहेब अजितदादांना मानणारा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. महायुतीमधील आमचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपचे नेते स्वबळावर लढण्याचे सूतोवाच करत आहेत. अशा परिस्थितीत स्वकियांची मोट बांधून आम्ही निवडणुकीला सामोरे जावून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत ठेवू, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मकरंद पाटील म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या 200 पेक्षा जास्त उमेदवारांनी दोन दिवसांत राष्ट्रवादीतर्फे मुलाखती दिल्या आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सकारात्मक भावना जनतेमध्ये आहे. भाजप हा महायुतीमधील प्रमुख पक्ष आहे. मात्र, त्यांच्या नेत्यांनी स्वबळावरच निवडणूक लढण्याचं सुतोवाच केले आहे. अशा परिस्थितीत जी मंडळी आमच्यासोबत येण्याचे मान्य करत आहेत, अशा समविचारी पक्षांशी चर्चा करुन समन्वयाने पुढे कसे जाता येईल, अशी वाटचाल आमची राहिल. जयकुमार गोरे यांनी फलटण येथे केलेल्या टिकेबाबत छेडले असता मकरंद पाटील म्हणाले, निवडणुका म्हटल्यावर टीका होणार, हे चालत राहणार आहे. मकरंद गोरे यांनी केलेल्या टीकेची मी त्याची माहिती घेतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर एकाच चिन्हावर लढणार का? असे विचारले असता निवडणुकीला सामोरे जाण्याबाबतची चर्चा झाल्यानंतर एकत्र येवून कुठल्या चिन्हावर लढायचे? हे ठरविण्यात येईल, असेही मकरंद पाटील यांनी सांगितले.
काँग्रेस-वंचितच्या विजयी उमेदवारांशी आमदार अमित देशमुख यांनी साधला संवाद
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दि. १७ जानेवारी रोजी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेले मतदार, काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस […] The post काँग्रेस-वंचितच्या विजयी उमेदवारांशी आमदार अमित देशमुख यांनी साधला संवाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
काँग्रेसचा उत्साह शिगेला; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची अभूतपूर्व गर्दी
लातूर : प्रतिनिधी लातूर महानगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे मोठे वातावरण असून, आगामी लातूर जिल्हा परिषद निवडणूक २०२६ साठी काँग्रेसने जोरदार कंबर कसली आहे. दि. १७ जानेवारी रोजी विविध तालूक्यासह काँग्रेस भवन, लातूर येथे लातूर व रेणापूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. जिल्हा भरातील विविध तालुक्यातून जवळपास ४५१ जणांनी काँग्रेस पक्षाकडे […] The post काँग्रेसचा उत्साह शिगेला; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची अभूतपूर्व गर्दी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कॉटन सॅनिटरी पॅड वापरणे आरोग्य व पर्यावरणासाठी आवश्यक : डॉ. जोशी
लातूर : प्रतिनिधी प्लास्टिक पॅड्स पर्यावरणासाठी घातक असून त्यांची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणे आवश्यक आहे. प्लॅस्टिकचा वापर टाळून कॉटन पॅड्स वापरण्याचे आवाहन उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी यांनी केले. दयानंद कला महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्यावतीने आणि प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार, ‘मासिक पाळीतील सॅनिटरी पॅड जनजागृती’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. […] The post कॉटन सॅनिटरी पॅड वापरणे आरोग्य व पर्यावरणासाठी आवश्यक : डॉ. जोशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची मनपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी घेतली भेट
लातूर : प्रतिनिधी लातूर महानगर पालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने ४७ जागेवर ऐतिहासिक विजय संपादन केला असून याबद्दल शहरातील विविध प्रभागातील नवनिर्वाचित नगरसेवक, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शनिवारी आशियाना निवासस्थानी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची भेट घेतली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकाचे अभिनंदन करून दिलीपराव देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या व […] The post माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची मनपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी घेतली भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाचा तपास एसआयटीकडे
लातूर : प्रतिनिधी येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणा-या अनुष्का किरणकुमार पाटोळे (वय १२) हिचा ४ जानेवारी रोजी झालेला मृत्यू हा खूनाचा नाही असे प्राथमीक तपासात निदर्शनात येत आहे. या प्रकरणी राज्य शासनाने नांदेडच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची एसआयटी नेमण्यात आली असून आजपासून आपण तपासाला सुरूवात करीत असल्याची माहिती […] The post नवोदय विद्यालयातील अनुष्का पाटोळे मृत्यू प्रकरणाचा तपास एसआयटीकडे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सीमा सुरक्षा दलातील ३३४ हवालदारांचा शपथविधी
चाकूर : प्रतिनिधी सीमा सुरक्षा दल, चाकूर (महाराष्ट्र)च्या सहाय्यक प्रशिक्षण केंद्राच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज परेड ग्राउंडवर सीमा सुरक्षा दलातील ३३४ नवीन हवालदारांचा शपथविधी समारंभ परेड उत्साहात पार पडली. या शपथ परेडची सलामी विनीत कुमार, महानिरीक्षक, सहायक प्रशिक्षण केंद्र, सीमा सुरक्षा दल, चाकूर यांनी घेतली. या नेत्रदीपक परेडचे नेतृत्व प्रशिक्षीत हवालदार अंबर पांडे यांनी केले. […] The post सीमा सुरक्षा दलातील ३३४ हवालदारांचा शपथविधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
येवद्यात जलपुरवठा चौकशीवर नागरिकांना संशय:मानवाधिकार आयोगाच्या पथकावर थातुरमातुर चौकशीचा आरोप
येवदा गावात अशुद्ध जलपुरवठा आणि पाइपलाईन गळतीबाबत दाखल तक्रारीच्या चौकशीवर नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्या चौकशी पथकाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी संगनमत करून चौकशी केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश शर्मा, नितीन बढे आणि गावातील इतर नागरिकांनी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई येथे या संदर्भात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आयोगाकडून पोलीस निरीक्षक (अन्वेषण विभाग) दयानंद सरवदे आणि त्यांचे सहकारी स्वप्निल पाटील यांनी १४ जानेवारी रोजी येवदा गावात पाहणी केली. मात्र, हे पथक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह त्यांच्याच वाहनातून गावात पोहोचल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तक्रारदार ओमप्रकाश शर्मा यांनी चौकशीदरम्यान आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला आहे. जीवन प्राधिकरणाने आधीच ठरवून काही निवडक व्यक्तींचे जबाब नोंदवले. परंतु, गावाच्या जलपुरवठा समस्येशी थेट संबंधित असलेले सरपंच अमानुल्ला पठाण, तंटामुक्ती अध्यक्ष भरत गावंडे आणि इतर ग्रामपंचायत सदस्य यांचे जबाब घेण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांच्या जबाबाची आवश्यकता नाही, असे उत्तर दिल्याचे शर्मा यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या मते, जीवन प्राधिकरणाने चौकशी पथक येण्यापूर्वी दोन दिवसांपूर्वीच घाईघाईने काही दुरुस्त्या केल्या. या दुरुस्तीचे फोटो काढण्यात आले, परंतु सध्या सुरू असलेल्या अनेक गळतींपैकी केवळ दोन-तीन गळतींचेच फोटो घेतले गेले. विशेष म्हणजे, जीवन प्राधिकरणाचे कर्मचारी ज्या पद्धतीने बोलत होते, त्याच पद्धतीने चौकशी अधिकारीही संवाद साधत असल्याचे दिसून आले. ओमप्रकाश शर्मा यांनी सांगितले की, चौकशी अधिकारी गावात येताच जलपुरवठ्याची वास्तविक समस्या पाहण्याऐवजी त्यांच्या घरच्या नळजोडणीची चौकशी करू लागले. मीटर, पाणीबिल आणि मोटार यासंबंधी प्रश्न विचारून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी त्या दिवशी सुरू असलेल्या गळती दाखवल्या, मात्र त्यांचे फोटो घेण्यात आले नाहीत. त्यांच्या म्हणण्यानुसार जबाब नोंदवण्यात आला नाही आणि सरपंचांचे जबाब घेण्याची मागणी केली असता त्यास नकार देण्यात आला. यामागे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असल्याचा संशय शर्मा यांनी व्यक्त केला.
अमरावती महापालिका निवडणुकीत अपक्षांना सपशेल नाकारले:120 पैकी एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही
अमरावती महापालिका निवडणुकीच्या शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत मतदारांनी अपक्ष उमेदवारांना सपशेल नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण ६६१ उमेदवारांपैकी १२० जणांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती, परंतु एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. पालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपक्ष उमेदवारांना किमान २० ते कमाल दीड हजार मते मिळाली आहेत. महापालिकेच्या २२ प्रभागांमधील ८७ जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत सर्वच प्रभागांमध्ये चुरस होती आणि अपक्षांनाही काही जागा मिळतील असा अंदाज होता, मात्र तो फोल ठरला. माघार घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत एकूण ६६१ उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली होती. यापैकी ५४१ उमेदवार विविध राजकीय पक्षांचे होते, तर १२० उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. या १२० अपक्ष उमेदवारांपैकी एकालाही मतदारांनी विजयापर्यंत पोहोचू दिले नाही. मतदारांनी अपक्षांना नाकारण्यामागे काही प्रमुख कारणे असल्याचे दिसून येते. अपक्ष उमेदवार निवडून आल्यास काही वेळा 'घोडेबाजार' होण्याची शक्यता असते, ज्यामुळे मतदारांना नुकसान सोसावे लागते. तसेच, अपक्षांना राजकीय पाठबळ नसल्याने ते प्रभागाच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांकडून पुरेसा निधी मिळवू शकत नाहीत, अशी मतदारांची धारणा आहे. महापालिका निवडणुकांमध्ये अपक्षांना नाकारण्याची ही भूमिका गेल्या काही वर्षांपासून अधिक दृढ होत आहे. दिव्य मराठीच्या आकडेवारीनुसार, १९९२ मध्ये मनपाची पहिली निवडणूक एक सदस्यीय निवड पद्धतीने झाली होती, ज्यात तब्बल २८ अपक्ष उमेदवार निवडून आले होते. त्यानंतर १९९७ मध्ये ही संख्या २५ पर्यंत खाली आली. २००२ मध्ये ५, २००७ मध्ये ७, २०१२ मध्ये ८ आणि २०१७ मध्ये केवळ एक अपक्ष उमेदवार नगरसेवक म्हणून विजयी झाला होता. यंदाच्या निवडणुकीत, तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या या मतदानात अमरावतीकर मतदारांनी एकाही अपक्ष उमेदवाराला निवडून न देण्याचा निर्णय घेतला.
नागपूर-मुंबई राजमार्ग बनला अपघाताचा मार्ग:अंजनगाव बारीत 1 किमी अंतरात गतिरोधक नाहीत; नागरिक त्रस्त
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी गावातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई राजमार्गावरील एक किलोमीटरच्या सिमेंट काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर एकही गतिरोधक नाही. यामुळे या मार्गावरून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. सध्या या मार्गाचे सौंदर्यीकरण सुरू असून, या कामादरम्यान गतिरोधक बसवण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावर यापूर्वी अनेक किरकोळ आणि गंभीर अपघात झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या रबरी गतिरोधकांची व्यवस्था केली होती. मात्र, हे गतिरोधक अवघ्या तीन महिन्यांतच खराब झाले. यामुळे आता दोन्ही बाजूंनी येणारी वाहने वेगाने धावत असल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे. या मार्गावर बस थांबे, शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्र, पशु चिकित्सालय, तीर्थक्षेत्र कोंडेश्वर, आठवडी बाजार, स्मशानभूमी, भिवापूर तलाव आणि अनेक मंदिरे आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडताना पादचारी आणि वाहनचालकांना मोठी गैरसोय होते. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांना विशेष काळजी घ्यावी लागते. या मार्गाच्या दुतर्फा झाडाझुडपांचे प्रमाण वाढले असून, त्यांच्या काटेरी फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. यामुळे बसच्या खिडक्यांवर फांद्या आदळून प्रवाशांना इजा होण्याची शक्यता आहे, तसेच इतर वाहनचालकांनाही गैरसोय होत आहे. सौंदर्यीकरणाचा भाग म्हणून एक हजार मीटरपर्यंत रस्ता दुभाजक बांधून पथदिव्यांचे नियोजन केले आहे. मात्र, यासाठी जुने पथदिवे गेल्या चार महिन्यांपासून बंद ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे रात्रीच्या वेळी अंधार असतो. तालुका क्रीडा संकुलाचा परिसर वगळता, या राजमार्गाच्या दुतर्फा नागरिकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे नियोजन करणे कठीण झाले आहे. अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर मजबूत व टिकाऊ गतिरोधक, झाडाझुडपांची छाटणी आणि पथदिव्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत तक्रार केली असून, विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे, गतिरोधकांचा अभाव, बंद पथदिवे आणि वाढते अतिक्रमण यामुळे हा मार्ग अपघातप्रवण बनला आहे. हा राजमार्ग अमरावतीहून अंजनगाव बारीमार्गे थेट वर्धा-नागपूर, यवतमाळ-हिंगणघाटला जोडतो. या मार्गावरून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवा देखील सुरू झाल्या आहेत, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.
चाकूर तालुक्यात ७४ नामनिर्देशन पत्रांची विक्री
चाकूर : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चाकूर तालुक्यात पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी ७४ नामनिर्देशन अर्ज घेल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. चाकूर तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गण आहेत.जल्हिा परिषद तसेच पंचायत समितीच्या विविध गट व गणांसाठी निवडणूक […] The post चाकूर तालुक्यात ७४ नामनिर्देशन पत्रांची विक्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तिवसा शहरापासून काही अंतरावर असलेल्या वणी फाटा येथे शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले. ही घटना १७ जानेवारी रोजी घडली. नागपूरमार्गे येणारी एम.एच. २७. डी.ई. ४२८२ क्रमांकाची बोलेरो गाडी इंडियन गॅस एजन्सी गोडाऊनकडून अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गाकडे येत होती. याचवेळी बोलेरोने एम.एच. २७. बी.आर. ०२२६ क्रमांकाच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीसह दोन्ही युवक महामार्गालगत काही अंतरावर फेकले गेले. या अपघातात वणी येथील रहिवासी असलेले दुचाकीचालक श्रीकांत सुधीर देशमुख (वय ३५) आणि मंथन बबन देशमुख (वय १८) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ जखमींना तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून, अधिक तपास सुरू आहे.
अमरावती महानगरपालिकेत 4 माजी महापौरांपैकी 3 विजयी:उपमहापौरांमध्ये मात्र एकालाच यश, तिघांचा पराभव
अमरावती पालिका निवडणुकीत ४ माजी महापौर आणि ४ माजी उपमहापौर रिंगणात होते. यापैकी तीन माजी महापौरांनी विजय मिळवला, तर एकाला पराभवाचा सामना करावा लागला. याउलट, माजी उपमहापौरांमध्ये केवळ एकालाच यश मिळाले, तर तिघे पराभूत झाले. विजयी झालेल्या माजी महापौरांमध्ये काँग्रेसचे विलास इंगोले आणि भाजपचे चेतन गावंडे व संजय नरवणे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या चरणजीत कौर उर्फ रिना नंदा यांना मात्र पराभव पत्करावा लागला. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या ४ माजी उपमहापौरांमध्ये भाजपचे चेतन पवार, कुसुम साहू आणि संध्याताई टिकले, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार यांचा समावेश होता. यापैकी केवळ शेख जफर शेख जब्बार यांनाच विजय मिळवता आला, तर इतर तिघांना पराभवाचा सामना करावा लागला. साईनगर, प्रभाग क्रमांक १९ मधून भाजपचे माजी महापौर चेतन गावंडे यांनी निवडणूक लढवली. या प्रभागात आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने पूर्ण ताकद लावली होती आणि तुषार भारतीय यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराचा पराभव केला होता. मात्र, चेतन गावंडे आपला पारंपरिक गड राखण्यात यशस्वी ठरले. भाजपचे संजय नरवणे विलासनगर प्रभागातून विजयी झाले, तर विलास इंगोले यांनी अंबागेटच्या आतील जुन्या अमरावती शहरातून सर्वाधिक मताधिक्य मिळवत विजय संपादन केला. माजी उपमहापौरांच्या बाबतीत या निवडणुकीचा निकाल काहीसा नकारात्मक राहिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार हे प्रभाग क्रमांक १५, छायानगर-पठाणपुरा येथून विजयी झाले. पराभूत झालेल्यांमध्ये प्रभाग क्रमांक १८ राजापेठचे चेतन पवार, प्रभाग क्रमांक ६ विलासनगर-मोरबागच्या कुसुम साहू आणि प्रभाग क्रमांक १० बेनोडा-भीमटेकडी येथील संध्याताई टिकले यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, पराभूत झालेल्या माजी उपमहापौरांपैकी काहींना गेल्या सभागृहात सोबत काम केलेल्या उमेदवारांविरुद्धच निवडणूक लढावी लागली. भाजपचे चेतन पवार यांना शिवसेनेतून (उबाठा) युवा स्वाभिमान पक्षात गेलेले माजी नगरसेवक प्रशांत वानखडे यांनी पराभूत केले. तसेच, कुसुम साहू यांना शिवसेनेच्या माजी नगरसेविका रेखा तायवाडे यांनी हरवले, तर संध्याताई टिकले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवख्या उमेदवार अर्चना पाटील यांनी पराभूत केले.
महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अमरावतीत भारतीय जनता पक्षामध्ये मोठा अंतर्गत स्फोट झाला आहे. भाजपच्या २२ पराभूत उमेदवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पक्षाच्या नेत्या नवनीत राणा यांना पक्षातून निष्कासित करण्याची मागणी केली आहे. आमचा पराभव जनतेने नाही, नवनीत राणांनी केला. नवनीत राणा यांनी निवडणुकीच्या शेवटच्या पाच दिवसांत उघडपणे भाजपच्या विरोधात प्रचार करून पक्षाशी गद्दारी केली, असा खळबळजनक आरोप या उमेदवारांनी केला आहे. अमरावती महानगरपालिकेच्या ८७ जागांपैकी भाजपने २५ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. मात्र, स्पष्ट बहुमतासाठी भाजपला युवा स्वाभिमानी पक्षाच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. या निवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार पराभूत झाले. तर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाने भाजपसोबत युती न करता स्वबळावर निवडणूक लढवली होती. निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या २२ उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात थेट नवनीत राणा यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप केला आहे. नेमके काय म्हटले पत्रात? 'भाजपाच्याच वरिष्ठ नेत्या नवनीत कौर राणा यांनी पक्षाशी खुलेआम गद्दारी केली आहे. भाजपात राहून भाजपाचाच काटा काढण्याचे काम नवनीत कौर राणा यांनी केले आहे. नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्या शिवाय राहणार नाहीत. नवनीत राणा यांनी प्रथम भाजपाचा गड असलेल्या प्रभागात स्वतःचे उमेदवार टाकून त्या संपूर्ण पॅनेलवर वरवंटा कसा फिरवला जाईल, याचे नियोजन केले. एकीकडे भाजपाच्या सर्व पोस्टर्सवर स्वतःचा मोठा फोटो टाकून घेतला. त्यासाठी आमच्यावर शहर अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांचा दबाव होता. नंतर नवनीत राणा यांनी डॉ. धांडे यांच्या माध्यमातून संपूर्ण संघटना घरी बसवली. डॉ. धांडे यांचा वापर करून अधिकृत उमेदवारांची उमेदवारी मागे घेतल्याचे पत्र काढून त्या पत्राचा वापर शहरभर केला. संघटनेचे पदाधिकारी निवडणुकीत कुठेच दिसत नव्हते. शेवटच्या पाच दिवसांत नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उतरल्या, असा आरोप भाजपच्या २२ उमेदवारांनी पत्रात केला आहे. भविष्यात अमरावतीत पक्षाचा नायनाट करतील नवनीत राणा यांना भाजपातून बाहेरचा रस्ता न दाखवल्यास त्या भविष्यात अमरावती शहरात भाजपाचा पूर्णपणे नायनाट केल्या शिवाय राहणार नाहीत. शेवटच्या पाच दिवसात नवनीत राणा खुलेआम भाजपाच्या विरोधात प्रचारात उतरल्या होत्या. भाजपचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे भाजपाचे उमेदवार असा आक्रमक प्रचार केला, असा आरोपही या उमेदवारांनी केला. नवनीत राणांच्या गद्दारीने आमचा पराभव आम्ही सर्वांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा आणि विधानसभा निवडणुकीत आ. रवी राणा यांच्यासाठी झोकून काम केलं.. पण नवनीत राणा यांनी जाहीरपणे आम्हालाच गद्दार ठरवून आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांना उद्ध्वस्त केलं. भाजपाच्या प्रभावक्षेत्रात भाजपाला मूठमाती देऊनच राणा दाम्पत्याने मनपा निवडणुकीत आपली राजकीय ताकद सिद्ध केली. पत्नीला स्टार प्रचारक' भाजपा नेता दर्शवून भाजपा उमेदवारांना योजनापूर्वक पाडण्याचे काम राणा दाम्पत्याने केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभावक्षेत्रात राणा दाम्पत्य फिरकले देखील नाही. तिथे भाजपा कमी करण्याची छुपी व्यूहरचना त्यांनी आखली. आम्ही हरलो. पराभव आम्हाला मान्य आहे. पण आमचा पराभव जनतेने नव्हे नवनीत राणा यांनी गद्दारी करून केला, असेही या पत्रात म्हटले आहे. नवनीत राणा काय म्हणाल्या? या पत्रावर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी देखील प्रतिक्रिया दिली. मी कोणालाही उत्तर देण्यासाठी काम करत नाही मी भाजपसाठी काम करते, असे नवनीत राणा यांनी म्हटले. कोणी काही टीका केली तरी ते मंचावर येऊनच बोलू शकतात. कोणी टीका केली ते समोर बोलले नाहीत, माझ्या पाठीमागे बोलले आहेत, पाठीमागे कोणीही टीका करते म्हणून मी त्या दिवशी म्हटलं तिळगुळ घ्या आणि पाठीमागे गोड गोड बोला, असे त्या म्हणाल्या. … म्हणून रवी राणांनी उमेदवार उभे केले विकास करणारे व्यक्ती म्हणून रवी राणा यांची ओळख आहे, म्हणून मोठ्या प्रमाणात मतदारांनी त्यांचे उमेदवार निवडून दिले आहेत. युवा स्वाभिमान यांच्या सोबत भाजपची युती तुटली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री बावनकुळे आमच्या सोबत होते. १६-१६ वर्ष सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी रवी राणा यांनी उमेदवार उभे केले होते, असे स्पष्टीकरण नवनीत राणा यांनी दिले. … तर ५० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले असते अमरावतीमधील ज्या उमेदवारांना निवडायचे होते त्यांनाच लोकांनी निवडून दिले. भाजपमध्ये तिकीट वाटपात थोडा घोळ झाला होता, त्यामुळे जागा कमी निवडून आल्या ही माहिती भाजपच्या नेत्यांना आम्ही देणार आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपचे तिकीट मिळाले असते तर ५० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले असते, असेही नवनीत राणा यांनी म्हटले.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला पत्कराव्या लागलेल्या दारुण पराभवानंतर आता पक्षांतर्गत कलह उफाळून आला आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार भाई जगताप यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र, सार्वजनिकरित्या पक्षाविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने भाई जगताप यांनाच 'कारणे दाखवा' नोटीस बजावली असून सात दिवसांत स्पष्टीकरण मागितले आहे. बीएसी निवडणुकीपुर्वी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आघाडीसाठी काँग्रेसकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र, राज ठाकरे देखील सोबत येणार असल्याने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आघाडी न करता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. काल निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला असताना काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह उफाळून आला असून वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वावर थेट सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. नेतृत्वाचा अभाव अन् संघटनात्मक अपयश मुंबई महापालिकेचे निकाल काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत निराशाजनक राहिले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना भाई जगताप यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बीएमसी निवडणुकीचे आकडे काँग्रेसच्या इतिहासात दुर्दैवी आहेत. पक्षाची स्थिती यापूर्वी कधीही इतकी वाईट नव्हती. मुंबई काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा तीव्र अभाव होता आणि संघटना ज्या पद्धतीने हाताळायला हवी होती, तशी ती हाताळली गेली नाही, अशी तोफ त्यांनी डागली. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून वर्षा गायकवाड यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही भाई जगताप यांनी केली. भाई जगताप यांना कारणे दाखवा नोटीस दरम्यान, भाई जगताप यांनी माध्यमांमध्ये आणि सार्वजनिक मंचांवर केलेली विधाने ही पक्षाच्या नियमावली, शिस्त आणि नैतिकतेच्या विरोधात असल्याचं नमूद करत काँग्रेसकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीसमध्ये संघटनात्मक कामकाज, नेतृत्व आणि अंतर्गत मतभेद हे पक्षाच्या अंतर्गत मंचांवरच मांडले गेले पाहिजेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक वक्तव्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होते, सामूहिक नेतृत्वाला धक्का बसतो आणि सध्या आवश्यक असलेल्या संघटनात्मक एकतेला बाधा पोहोचते, असा उल्लेखही नोटीसमध्ये करण्यात आला आहे. ७ दिवसांचा अल्टीमेटम नोटीस प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश भाई जगताप यांना देण्यात आले आहेत. निर्धारित कालावधीत समाधानकारक उत्तर न दिल्यास, काँग्रेसकडून पुढील शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे. काँग्रेससमोर मोठे आव्हान मुंबईत भाजपच्या झंझावातासमोर काँग्रेसचा अक्षरशः धुव्वा उडाला आहे. काँग्रेसला आता आपल्या मुंबईतील अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशातच दोन बड्या नेत्यांमधील हा वाद चव्हाट्यावर आल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण असून, दिल्लीतील हायकमांड यावर काय भूमिका घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात अनेक महानगरपालिकांमध्ये भाजप महायुतीने मुसंडी मारली असली, तरी मराठवाड्यातील परभणीत मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तब्बल १९ वर्षांनंतर परभणी महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला असून, या विजयानंतर खासदार संजय जाधव यांनी भाजपवर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. भाजपने एका मताला १५ हजार रुपये वाटले, तरीही जनतेने त्यांना नाकारले, असा दावा करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. महानगरपालिका निवडणूक निकालानंतर परभणीत उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे तसेच काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी खासदार संजय जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले. नेमके काय म्हणाले संजय जाधव? नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना संजय जाधव आक्रमक झाले होते. ते म्हणाले, परभणीत पालकमंत्र्यांनी पैसा, सत्ता आणि सरकारी अधिकाऱ्यांचा प्रचंड गैरवापर केला. मताला १५ हजार रुपये वाटण्यात आले. मात्र, सत्तेची मस्ती असलेल्या पालकमंत्र्यांना स्वतःच्या प्रभागातील उमेदवारही निवडून आणता आला नाही. त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची अवस्था पाहून संजय जाधव यांनी हळहळ व्यक्त केली. ज्यांच्याकडे पैसा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांना पक्षात घेऊन निवडणुका लढवण्याचा धंदा भाजपने सुरू केला आहे. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांनी आता फक्त सतरंज्याच उचलायच्या का? असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरेंना घातली भावनिक साद दरम्यान, संजय जाधव यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना मोगल-इंग्रजांचा दाखला देत खचून न जाता लढण्याचे आवाहन करत, भावनिक साद घातली. ते म्हणाले, ‘या देशावर मोगलांनी आणि इंग्रजांनीही दीर्घकाळ राज्य केलं, पण त्यांचंही साम्राज्य एक दिवस संपलं. भाजपचीही एक्सपायरी डेट आता लवकरच जवळ येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी खचून न जाता ठामपणे लढा सुरू ठेवावा.’’ १९ वर्षांनंतर सत्तांतर; काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला २०११ मध्ये परभणी महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून येथे प्रथम राष्ट्रवादी आणि त्यानंतर काँग्रेसची सत्ता होती. २००७ मध्ये नगर परिषद असताना शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला होता. त्यानंतर तब्बल १९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ६५ जागांपैकी २५ जागा जिंकत शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ही निवडणूक खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पहिल्यांदाच एकत्र येत लढवली असून, या युतीमुळे निवडणुकीला विशेष रंगत आली होती. निकालाने ठाकरे गटाच्या शिवसेनेचा आत्मविश्वास वाढवला असून, मराठवाड्यातील राजकारणाला नवी दिशा मिळाल्याचं चित्र आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ४ वर्षानंतर बुधवारी सुनावणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था तब्बल चार वर्षांनंतर २१ जानेवारी रोजी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सुनावणी होणार आहे. यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये उत्साह संचारला असला तरी न्यायालयीन कामकाजाची रणनीती ठरविण्यासाठी उच्चाधिकार समितीची बैठक होणे अपेक्षित आहे. याबाबत म. ए. समिती नेत्यांनी अनेकदा प्रयत्न केले. परंतु, महापालिका निवडणुकीत गुंतलेल्या महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना अद्याप सवड मिळत नसल्याने मराठी भाषिकांतून संताप […] The post महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ४ वर्षानंतर बुधवारी सुनावणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ट्रम्पना भारताची चपराक; अमेरिकी डाळींवर शुल्क! सिनेटर्सची व्हाईट हाऊसमध्ये आरडाओरड
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत आणि अमेरिका या दोन महासत्तांमधील ‘व्यापार युद्ध’ आता एका अत्यंत निर्णायक वळणावर पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून भारतीय वस्तूंवर लादलेल्या करांना आता भारताने ‘जशास तसे’ उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भारताने अमेरिकन डाळींवर, विशेषत: पिवळ्या वाटाण्यांवर ३०% आयात शुल्क लावून अमेरिकेच्या कृषी क्षेत्राला मोठा धक्का दिला […] The post ट्रम्पना भारताची चपराक; अमेरिकी डाळींवर शुल्क! सिनेटर्सची व्हाईट हाऊसमध्ये आरडाओरड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वॉशिंग्टन/मॉस्को/बिजींग : वृत्तसंस्था जगाच्या नकाशावर उत्तर ध्रुवाजवळ असलेला पांढराशुभ्र ग्रीनलँड आता रक्तरंजित संघर्षाचे केंद्र बनण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड सुरक्षित करण्याच्या हट्टापायी थेट डेन्मार्क आणि नाटो देशांना आव्हान दिले आहे. पण हा संघर्ष केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी नाही, तर आर्क्टिक महासागरातून निर्माण होणा-या नवीन ‘समुद्री कॉरिडॉर्स’वर ताबा मिळवण्यासाठी आहे. तज्ज्ञांच्या मते, हे […] The post रशियाचे ५० लष्करी तळ सज्ज! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : जागतिक राजकारणात भारताचे वजन सातत्याने वाढत असून, २०२६ मध्ये भारत ‘ब्रिक्स’ या शक्तिशाली देशांच्या समूहाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदासाठीची अधिकृत वेबसाइट आणि लोगोचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना त्यांनी भारताचा दृष्टिकोन ‘मानवता प्रथम’ आणि ‘लोककेंद्रित’ असल्याचे स्पष्ट केले. ब्रिक्स २०२६ चा लोगो हा […] The post ‘ब्रिक्स’च्या लोगोचे विमोचन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

26 C