जिल्हा बँकेतून शेतक-यांना मदत करणार
तरुणाई, महिलांना काम देण्याचा प्रयत्न, सहकारमंत्री पाटील यांची ग्वाही औसा : प्रतिनिधी देशातील तरुणाई व महिलांना सहकाराच्या माध्यमातून काम देण्याचा प्रयत्न सरकार करीत असून सेवा सोसायटी आता केवळ शेती पुरत्या मर्यादित न राहता विविध प्रकारचे ५१ व्यवसाय या माध्यमातून उभा करता येतात, यासाठी आता प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील […] The post जिल्हा बँकेतून शेतक-यांना मदत करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्वत:ला नौदलाचा माजी ‘कॅप्टन’ म्हणवून घेणा-या सिन्नर तालुक्यातील श्री शिवनिका संस्थानचा अध्यक्ष अशोक खरात याला महिलेवरील अत्याचार प्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने अटक केली. बुधवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या कार्यालयातून ५८ आक्षेपार्ह चित्रफिती जप्त केल्या. खरात हा भविष्य सांगत असल्याने त्याच्याकडे अनेक बड्या राजकीय नेत्यांसह इतर सर्वच क्षेत्रांतील मातब्बरांचा राबता होता. २०२२ मध्ये […] The post ऐसे कैसे झाले भोंदू…! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
गारपिटीने २०० हेक्टरवरील पिके बाधीत
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हयात दि. १७ व २० मार्च रोजी देवणी, निलंगा तालुक्या बरोबरच इतर तालुक्यात झालेल्या गारपिटीच्या पावसाने सुमारे २०० हेक्टरवरील रब्बी हंगामातील पिके, भाजीपाला, फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानीचे पंचानामे करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. लातूर जिल्हयात रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू आदी पिके सध्या काढणीच्या आवस्थेत आहेत. कांही […] The post गारपिटीने २०० हेक्टरवरील पिके बाधीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की एक महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केले जात आहे. मी व माझ्या कुटुंबाने खरातला गुरु मानले होते. परंतु, त्यांची दुसरी बाजू आम्हाला माहीत नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या, शिवनिका संस्थान या संस्थानात जे महादेव मंदिराचे ट्रस्ट आहे, मी प्रदेशाध्यक्ष होते तेव्हापासून सदस्य म्हणून काम केले आहे. माझ्यासमवेत समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, अनेक मान्यवर ट्रस्टवर होते. त्यानंतर मी आयोगाची अध्यक्षा झाले. आणि मला हे सांगायचे आहे की या ट्रस्टचा कार्यकाल हा 8 ऑगस्ट 2025 रोजी संपलेला आहे. खरात पती-पत्नीला आमच्या कुटुंबाने गुरु मानले होते पुढे बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, समाजात आपण आयुष्य जगत असताना कोणाला तरी गुरु मानत असतो. खरात पती-पत्नीला आमच्या कुटुंबाने गुरु मानले होते. काही वेळा तिथे होत असलेला कार्यक्रम, मग तो महाशिवरात्रीचा असेल, गुरुपौर्णिमेचा असेल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप असेल, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहत होतो. यात एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानले आहे आणि त्या निमित्ताने आम्ही संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित राहत होतो. पोलिसांनी खोलवर निष्पक्ष तपास करावा माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे फोटो किंवा व्हिडिओ हे काही वर्षांपूर्वीचे आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेकांनी पाद्यपूजा केली, तशी मी माझ्या पतीने देखील केली होती. 5-6 वर्षांपूर्वी ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो, ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचे आयुष्य, कृत्य, वागणूक याबाबत आपल्याला कल्पना नसते. आज आपण ज्यांच्यासोबत असतो, ते पुढे जाऊन कसे वागणार आहेत, ही कल्पना आपल्या कोणाला नसते. त्यामुळे मी ही घटना समजली तेव्हा मला धक्का बसला. त्यामुळे मी सुरुवातीला ट्विट देखील केले होते की या ट्रस्टसोबत आमचे संबंध आहे. पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहीत असायचे कारण नव्हते. यात पोलिसांनी खोलवर निष्पक्ष तपास करावा. त्यासाठी आज मी पोलिस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या घटनेचा तपास पारदर्शकपणे व्हावा, अशी मागणी केल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी केली. आरोपीला कठोर कारवाई करावी रुपाली चाकणकर म्हणाल्या, आपण काही लोकांवर विश्वास ठेवतो, एक आध्यात्मिक श्रद्धा असते. माझे संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे, त्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टीने होती आणि त्यामुळेच आम्ही त्या देवस्थानशी जोडले गेलो होतो. पण याची दुसरी जी बाजू आहे, ती कधी आमच्यासमोर आली नाही. आम्ही कार्यक्रमांसाठी काही काळासाठीच तिथे असायचो. त्यामुळे जे काही घडले आहे, ते अत्यंत चुकीचे आणि घाणेरडे कृत्य आहे. पोलिसांनी सखोल तपास करावा आणि आरोपीला कठोर कारवाई करावी, अशी मागणी चाकणकर यांनी केली. चुकीच्या बातम्या चालवल्या त्याचा निषेध पुढे बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, एका दैनिकाचे पत्रकार आहेत, त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात एक बातमी दिली होती 19.03.2025 रोजी. ही बातमी आमच्या समुपदेशकांकडे आली. त्यानंतर समुपदेशकाने त्यांना एक पत्र पाठवले होते 8 तारखेला. त्या पत्रात स्पष्ट दिले आहे की, आपल्या बातमीमध्ये काही मोघम गोष्टी आल्या आहेत. या संदर्भात तुमच्याकडे काही माहिती असेल तर सविस्तर आयोगाला कळवावी. दुसरे पत्र आहे पोलिस आधीक्षकांना, त्यांच्याकडे जी काही माहिती असेल त्यानुसार कारवाई करावी. तसेच आम्ही कोणाला काही अडचण असेल तर थेट पोलिसांकडे जाऊन तक्रार करावी. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी आम्हाला सांगितले की कोणतीही तक्रार आली नाही, कोणत्याही महिलेची तक्रार नाही. त्यानंतर त्या पत्रकाराने पत्र पाठवले की आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. मागील दोन दिवसांपासून ज्या बातम्या चालवल्या, त्याचा मी तीव्र निषेध करते. आलेल्या तक्रारींवर कारवाईच्या सूचना रुपाली चाकणकर म्हणाल्या, दुसरी गोष्ट मला दाखवायची आहे म्हणजे माझ्याकडे 5 तारखेला एका मुलीचा मेल आला. या मेलमध्ये त्या मुलीने खरातच्या ऑफिसमध्ये पूर्वी काम करणाऱ्या एका माणसाच्या संदर्भात तक्रार होती. खरातचा यात कुठेही उल्लेख नाही. तातडीने त्याच दिवशी आमचे पत्र पोलिसांना गेले आहे. मी स्वतः हे पत्र पाठवले. यात जे कोणी असेल त्याचा तपास करावा, अशी सूचना आम्ही दिली. त्यानंतर पोलिसांनी स्वतः पत्र दिले की आम्ही कारवाई करत आहोत. कोणालाही, कुठल्याही संस्थेला पाठीशी घातले नाही. तोपर्यंत खरातचे कुठेही नाव नव्हते. त्यानंतर 17 तारखेला तेजस्वी सातपुते यांचे पत्र आले आणि त्यांनी सांगितले की आम्ही कारवाई करत आहोत. पत्रकार परिषद घेऊन चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार चुकीच्या बातम्या सुरू आहेत. त्या व्यक्तीसोबत अनेकांचे फोटो आहेत. पण केवळ महिला म्हणून सॉफ्ट टार्गेट केले जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. काही लोकांनी पत्रकार परिषद घेत चुकीच्या बातम्या पसरवल्या, असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. माझे फोटो चुकीच्या तारखेला दाखवण्यात आले आहेत. माझ्या सोशल मीडियावर अजूनही ते फोटो आहेत, तुम्ही पाहू शकता. कायद्याच्या चौकटीतून आम्ही या लोकांना नोटीस पाठवू, खोट्या बातम्या पसरवणे या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.
जळकोट-उदगीर महामार्गावर गाव तिथे गतिरोधक बसवा
जळकोट : प्रतिनिधी नांदेड ते बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० वर जळकोट ते उदगीर दरम्यान अपघाताचे प्रमाण वाढले आहे. महिनाभरातून या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे तर अनेक जण जखमी होत आहेत. याला कारणीभूत वाहनांची अतिरिक्त गती हे असून, गावाजवळ गतिरोधक नसल्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहत नाही. यामुळे […] The post जळकोट-उदगीर महामार्गावर गाव तिथे गतिरोधक बसवा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर शहरात स्वच्छता व आरोग्याचा जागर
लातूर : प्रतिनिधी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा लातूर शहराचे आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर शहरात ‘स्वच्छता आणि आरोग्य’ यांचा जागर करण्यात आला. विलासराव देशमुख फाउंडेशन आणि लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक १२ मध्ये ‘माझा प्रभाग, स्वच्छ प्रभाग’या अभिनव संकल्पनेचा औपचारिक […] The post लातूर शहरात स्वच्छता व आरोग्याचा जागर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आज शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा
लातूर : प्रतिनिधी लातूरच्या सावली सेंटर फॉर मेंटल हेल्थ अँड रिसर्चच्या द्विदशकपूर्तीचे औचित्य साधून शिक्षकांसाठी ‘विद्यार्थ्यांची मानसिकता : शिक्षकांना काय माहिती असायला हवे’, या विषयावरील विशेष कार्यशाळेसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. मिलिंद पोतदार, डॉ. मुग्धा पोतदार यांनी दिली. आज शनिवार दि. २१ मार्च २०२६ रोजी दुपारी अडीच वाजता लातूर आणि परिसरातील शिक्षकांसाठी […] The post आज शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सकाळी ९.३० वाजता ईद-उल-फित्रची नमाज
लातूर : यंदा १९ फेबु्रवारी रोजी पवित्र रमजान महिन्यास प्रारंभ झाला होता. संपूर्ण महिना रोजा (उपवास), नमाज, ईबादतमध्ये मुस्लिम बांधव राहिले. दि. २० मार्च रोजी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने आज दि. २१ मार्च रोजी रमजान ईद (ईद-उल-फित्र) साजरी केली जाणार आहे. आज सकाळी ९ वाजता येथील ईदगावर मुफ्ती ओवेस यांचे ईदच्या संदर्भाने बयान(प्रवचन) होईल. त्यानंतर ९.३० […] The post सकाळी ९.३० वाजता ईद-उल-फित्रची नमाज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भादा-औसा परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही
लातूर : भादा व औसा परिसरात भूगर्भातून आवाज आल्याची माहिती दि. २० मार्च रोजी स्थानिक प्रशासनास प्राप्त झाली होती. सदर घटनेची माहिती जिल्हा प्रशासनामार्फत तात्काळ ठं३्रङ्मल्लं’ उील्ल३ी१ह्याङ्म१ री्र२ेङ्म’ङ्मॅ८ (ठउर), नवी दिल्ली यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली. त्यांच्या तपासणीनुसार भादा-औसा परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे सदरील घटना भूगर्भातील नैसर्गिक हालचालींमुळे निर्माण […] The post भादा-औसा परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘स्थायी’च्या सभापतीपदी बंडापल्ले यांची निवड निश्चित
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेत सर्वात महत्वाची समिती मानल्या जाणा-या स्थायी समिती सभापतीपदासह परिवहन समिती सभापतीपदाच्या उमेदवारांचे अर्ज दि. २० मार्च रोजी नगरसचिवांकडे दाखल करण्यात आले. काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सचिन बंडापल्ले यांनी स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी तर काँग्रेसचेच फैसलखान कायमखानी यांनी परिवहन समितीच्या सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगरपालिकेत काँग्रस-वंचित बहुजन आघाडीचे बहूमत असल्याने […] The post ‘स्थायी’च्या सभापतीपदी बंडापल्ले यांची निवड निश्चित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत असलेल्या अशोककुमार एकनाथ खरात उर्फ 'कॅप्टन' याच्या संपत्तीचे आणि बड्या ओळखींचे धागेदोरे आता वेगाने समोर येत आहेत. त्याच्या आश्रमात अनेक दिग्गज राजकारणी आणि उद्योजकांची नियमित ये-जा असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत असतानाच, आता खरातच्या अफाट मालमत्तेचाही उलगडा झाला आहे. नाशिक आणि शिर्डी परिसरातील शेतजमिनी, प्लॉट्स आणि भागीदारीतील अनेक मालमत्तांची कागदपत्रे तपासयंत्रणांच्या हाती लागली असून, ही संपत्ती त्याने स्वतःच्या कुटुंबीयांच्या आणि नातेवाईकांच्या नावावर दडवून ठेवल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासामुळे खरातच्या आर्थिक व्यवहारांचे आणि बेकायदेशीर साम्राज्याचे धक्कादायक वास्तव आता प्रकाशात येत आहे. महिला अत्याचार प्रकरणातील संशयित अशोक खरात याने अंकशास्त्राच्या नावाखाली सुमारे 200 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जमवल्याची खळबळजनक माहिती समोर आली असून, काही कागदपत्रांनुसार या संपत्तीचा आकडा त्याहूनही मोठा असण्याची शक्यता आहे. या अफाट मालमत्तेत नाशिकच्या गोविंदनगरमधील एक आलिशान बंगला, कॅनडा कॉर्नर येथील कार्यालय, पाथर्डी परिसरातील 30 एकर जमीन, तसेच सिन्नर, ओझर विमानतळ आणि शिर्डी परिसरातील कोट्यवधींच्या जमिनींचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. 150 कोटी रुपये किमतीची 30 एकर शेतजमीन अशोक खरातचे सिन्नरमधील मिरगाव येथे आलिशान फार्महाऊस असल्याचे समोर आले आहे. खरातची सर्वाधिक संपत्ती नाशिकमधील पाथर्डी गावात एकवटली असून, या भागात त्याच्या मालकीची 20 हून अधिक ठिकाणी मालमत्ता आहे. ज्यामध्ये बाजारभावानुसार सुमारे 150 कोटी रुपये किमतीची 30 एकर शेतजमीन समाविष्ट आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या जमिनींपैकी एक शेतजमीन अतिरिक्त जिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या पत्नी प्रिती आणि अशोक खरातची मुलगी तृप्तीबाला यांनी एकत्रितपणे खरेदी केल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले असून, यामुळे या प्रकरणाला आता नवीन प्रशासकीय वळण प्राप्त झाले आहे. पत्नी कल्पनाच्या नावे 273 चौरस मीटरचा भूखंड पाथर्डी येथील 40 गुंठे जमिनीचा काही हिस्सा अशोक तर उर्वरित भाग पत्नी कल्पना खरात हिच्या नावावर आहे. तसेच याच भागात भाऊ दत्तात्रय खरातच्या नावे 5 एकर आणि मुलगी सृष्टीच्या नावेही जमीन आढळली आहे. नाशिक शहरात पत्नी कल्पनाच्या नावे 273 चौरस मीटरचा भूखंड असून, गोळावणे गावात 2 एकर आणि आडगावमध्येही तिच्याच नावे मालमत्तांची नोंद आहे. याव्यतिरिक्त, विल्होळी गावात सुरेखा दिलीप खरातच्या नावावर एक बिनशेती भूखंड असल्याचे समोर आले असून, खरातच्या या अफाट बेनामी संपत्तीचा तपास आता अधिक तीव्र झाला आहे. शिर्डीमध्ये कल्पना खरातच्या नावे 30 गुंठे जमीन शिर्डीमध्ये कल्पना खरातच्या नावे 30 गुंठे जमीन असून, राहाता तालुक्यातील निमगाव कोऱ्हाळे येथे अशोक खरातच्या नावे एक बिनशेती प्लॉट आहे. तसेच, राहाता तालुक्यातीलच निघोजमध्ये या दोघांच्या नावे 1 हेक्टर 60 गुंठे इतकी मोठी शेतजमीन आढळली आहे. याव्यतिरिक्त, सिन्नरमध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी आणि कुंदेवाडीमध्ये तीन ठिकाणी खरात कुटुंबाचे भूखंड असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, खरात, त्याची पत्नी, दोन्ही मुली, आई आणि इतर नातेवाईकांच्या नावे एकूण 50 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असल्याचे समोर आले आहे. 'कॅप्टन' पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर अंकशास्त्राच्या नावाखाली भविष्य सांगण्याचा व्यवसाय आणि भोंदूगिरीच्या माध्यमातून त्याने हे अफाट आर्थिक साम्राज्य उभे केल्याचे दिसून येत आहे. ही संपत्ती केवळ आतापर्यंत उघड झालेल्या कागदपत्रांवर आधारित असून, पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास या भोंदूबाबाचे आणखी अनेक काळे कारनामे आणि बेनामी संपत्ती उजेडात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भागवत कथा श्रवण केल्यानंतर मानवाचे जीवन पवित्र होते, तर रामकथा केवळ ऐकण्यासाठी नसून प्रभू श्रीरामांच्या आदर्श मार्गावर चालण्याचा संदेश देते असे प्रतिपादन प. पूज्य रमेशभाई ओझा यांनी शुक्रवारी ता. २० येथे केले. येथील रामलीला मैदानावर गजराज बाल गणेश मंडळाच्या वतीने आयोजित श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रमेशभाई ओझा यांनी अनेक दाखले देत भागवत कथा मानवाच्या जीवनात काय परिवर्तन घडवून आणते यांचे स्पष्टीकरण दिले. रामायण व महाभारतातील उदाहरणे देत सांगितले की, भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांसारख्या अवतारांनाही जीवनात अनेक दुःख व संकटांचा सामना करावा लागला. त्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींचे फारसे मोल नाही, तर त्यातून मार्ग काढण्याची शिकवण महत्त्वाची आहे. भगवान श्रीरामांनी आपल्याला संकटांशी लढण्याची प्रेरणा दिली, तर भगवान श्रीकृष्णांनी जीवनातील संघर्षात कसे झुंजायचे, याचे तत्त्वज्ञान दिले असल्योच सांगत त्यांनी दोन्ही अवतारांच्या जीवनातील गुढ अर्थ उलगडून सांगितला. भागवत कथेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, भागवत कथा हीच सर्वोत्तम साधना आहे. भागवत आणि रामकथेचे आयोजन आपण का करतो? त्यामागचे खरे प्रयोजन काय आहे?” यावर त्यांनी उत्तर देताना सांगितले की, केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर आत्मपरिवर्तनासाठी कथा ऐकणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नवविधा भक्तीमध्ये श्रवण करणे हि देखील एक प्रकारची भक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने मंत्र-तंत्र आणि संमोहनाच्या जोरावर महिलांचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक माहिती समोर येत असतानाच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणात अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. खरात हा 'व्हायग्रा' मिश्रित एक विशेष 'जल' तयार करत असे आणि ते मिळवण्यासाठी अनेक बड्या राजकीय व्यक्तींची त्याच्याकडे रांग लागायची, असा दावा दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणाच्या वाढत्या व्याप्तीमुळे त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली असून, या नव्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, अशोक खरात हा एक ओशनो जल बनवायचा. एका कफ सिरपमध्ये पाणी टाकायचा आणि त्यामध्ये कुटून कुटून व्हायग्रा टाकायचा आणि हे ओशने जल बनवायचा. हे ओशने जल घेण्यासाठी अनेक राजकारणी त्यांच्या गाड्या आणि हेलिकॉप्टर पाठवायचे. त्यामध्ये एक व्यक्ती तर तिरूपति बालाजी मंदिराचा ट्रस्टी आहे, असा आरोप दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत याला 'महाराष्ट्राची एपस्टीन फाईल' असे संबोधले असून, सर्वपक्षीय नेते त्याच्याकडून सल्ला आणि 'ओशनो जल' मागवत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगतानाच, दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांचा एक जुना व्हिडिओ समोर आणला आहे, ज्यामध्ये त्यांनी खरातची तुलना थेट पांडुरंगाशी केली होती. या पार्श्वभूमीवर, चाकणकर यांचा राजीनामा का घेतला जात नाही आणि त्यांना कोणाचे संरक्षण लाभत आहे, असा संतप्त सवाल विचारत दमानिया यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
रमजान ईदनिमित्त पुण्यात वाहतूक बदल:गोळीबार मैदान चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली
रमजान ईदनिमित्त पुण्यात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. लष्कर भागातील गोळीबार मैदान चौकातील ईदगाह मैदानावर शनिवारी (२१ मार्च) होणाऱ्या सामुहिक नमाज पठणामुळे सकाळी ६ ते ११:३० वाजेपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. या नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे. गोळीबार मैदान चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या जड वाहनांना पुणे-सोलापूर रस्त्यावरील भैरोबा नाला चौकातून वानवडी आणि लुल्लानगर चौकातून इच्छितस्थळी जावे लागेल. तसेच, गोळीबार मैदान चौकातून स्वारगेट किंवा शहरात येणाऱ्या वाहनांनी भैरोबा नाला चौकातून एम्प्रेस गार्डन आणि घोरपडीमार्गे प्रवास करावा. लष्कर भागातील मम्मादेवी चौक ते गोळीबार चौक दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. सीडीओ चौकातून गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. या वाहनांनी खटाव बंगला चौकातून नेपियर रस्तामार्गे बिशप स्कूल रस्त्याचा वापर करावा. खटाव बंगला चौकातून उजवीकडे वळण्यास तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. स्वारगेटकडून सोलापूर रस्त्याने हडपसरकडे जाणाऱ्या वाहनांनी शंकशेठ रस्त्यावरील चिमणराव ढोले पाटील चौकातून (सेव्हन लव्हज चौक) गुलटेकडी मार्ग सॅलिसबरी पार्क चौकाकडे जावे. खटाव बंगला चौकातून नेपियर रस्त्याने किंवा लुल्लानगरमार्गे सोलापूर रस्त्याकडे जाता येईल. सोलापूर बाजार पोलीस चौकी ते गोळीबार मैदान चौक दरम्यानची वाहतूक देखील बंद ठेवण्यात येणार आहे. लुल्लानगर चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे येणाऱ्या जड वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.
सायबर चोरट्यांकडून तिघांची 22 लाखांची फसवणूक:कर्ज मंजुरी आणि शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा
पुण्यात सायबर चोरट्यांनी कर्ज मंजुरी आणि शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची २२ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे सत्र सुरूच असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होते. आंबेगाव येथे एका ३७ वर्षीय महिलेची खासगी वित्तीय संस्थेकडून कर्ज मंजूर करण्याच्या आमिषाने ५ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाईलवर संपर्क साधून स्वतःला वित्तीय संस्थेचे प्रतिनिधी भासवले. कर्ज मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करण्याच्या नावाखाली चोरट्यांनी महिलेकडून वेळोवेळी ऑनलाइन पैसे घेतले. पैसे जमा केल्यानंतरही कर्ज मंजूर न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून,याबाबत आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने अधिक तपास करत आहेत. शेअरमध्ये आमिषाने ज्येष्ठाची आर्थिक फसवणूक शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर तपास करत आहेत. ऑनलाइन पद्धतीने वस्तूंची विक्री करणारी एजन्सीचे काम मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची पाच लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश हांडे तपास करत आहेत.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या सविस्तर चर्चेनंतर, मुख्यमंत्र्यांनी चाकणकर यांना तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळत आहे. या आदेशामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, खरात प्रकरण आता चाकणकरांच्या पदावर बेतल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, अद्याप राजीनामा दिल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या अशोक खरातसोबत रुपाली चाकणकर यांचे काही फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले होते. या गंभीर प्रकरणामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत होता आणि विविध राजकीय स्तरांतून त्यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली जात होती. महिलांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षपदावर असूनही अशा वादग्रस्त व्यक्तीसोबतचे संबंध समोर आल्याने निर्माण झालेल्या नैतिक पेचप्रसंगामुळे अखेर सरकारने हा कठोर निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, आज मुंबई येथे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेत त्यांना राज्य महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले. या पत्रात अशोक खरात महिला अत्याचार प्रकरणाचा सखोल व वस्तुनिष्ठ तपास व्हावा तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करत या प्रकरणातील सत्यता बाहेर यावी व आरोपीवर कारवाई होण्याकरता आपल्या स्तरावरून निर्देश देण्याच्या सूचना दिल्याची माहिती दिली आहे. उद्या दुपारी 12 पर्यंत रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या:लक्ष्मण हाकेंची सुनेत्रा पवारांकडे मागणी, अन्यथा घराबाहेर आंदोलनाचा दिला इशारा नाशिकमधील महिला अत्याचार प्रकरणात अटक झालेला भोंदू बाबा अशोक खरात याच्यासोबतचे पाद्यपूजन करतानाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली असून, आता सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनीही या वादात उडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी हाके यांनी केली असून, या सर्व घडामोडींमुळे चाकणकर यांच्या पदावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. वाचा सविस्तर
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेने महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मंजूर केले. हे विधेयक मांडत असताना विरोधकांनी याला जोरदार विरोध केला होता. तसेच हे विधेयक एका समाजाला टार्गेट करत असल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. आता यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, धार्मिक धर्मांतरांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेले 'महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक, 2026' हे कायदेशीर कसोटीवर टिकणार नाहीये. कारण ते संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करते. ज्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा कायदा स्वीकारला गेला आहे, तिथेही त्याला कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. गेल्या आठ वर्षांत, नऊ राज्यांनी ज्यापैकी बहुतांश राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे, तिथे हिंदू महिलांचे सक्तीचे विवाह आणि धर्मांतर रोखण्यासाठी, तसेच कथित 'लव्ह जिहाद'ला आळा घालण्यासाठी अशाच प्रकारचे कायदे मंजूर केले आहेत. पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले, हे प्रकरण उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, सत्ताधारी भाजपच्या बहुमतामुळे या विधेयकाला विधानसभा आणि विधानपरिषदेत मंजुरी मिळू शकते. परंतु, त्याहूनही मोठा प्रश्न हा आहे की, हे विधेयक कायदेशीर कसोटीवर टिकेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भारतीय संविधानाने धर्माबाबत व्यक्तीला वैयक्तिक अधिकार प्रदान केले आहेत. संविधानाने व्यक्तीला विवाहाचा अधिकारही दिला आहे. त्यामुळे, कोणत्याही बहाण्याने या मूलभूत अधिकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा कोणताही कायदा कायदेशीर आणि घटनात्मक वैधतेच्या कसोटीवर टिकणार नाही. अशा प्रकारचे कायदे संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करतात, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. हा कायदा म्हणजे भाजपचा 'राजकीय अजेंडा' असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. ते म्हणाले, समाजाचे हिंदू-मुस्लिम किंवा हिंदू-ख्रिश्चन असे ध्रुवीकरण करून आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी भाजपकडून असे प्रयत्न केले जात आहेत. जर एखाद्या व्यक्तीवर जबरदस्तीने धर्मांतर करण्यासाठी अन्याय किंवा अत्याचार होत असेल, तर त्यासाठी सध्याचे कायदे पुरेसे आहेत. पीडित व्यक्ती पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करू शकते. त्यामुळे या नवीन आणि कडक कायद्याची गरज नव्हती. त्या कायद्या आडून आरएसएस-भाजपला धार्मिक ध्रुवीकरण करायचे आहे. भाजपला जातीय अजेंडा जिवंत ठेवायचा असल्याची टीका आंबेडकरांनी केली आहे.
नाशिकमधील महिला अत्याचार प्रकरणात अटक झालेला भोंदू बाबा अशोक खरात याच्यासोबतचे पाद्यपूजन करतानाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी लावून धरली असून, आता सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण हाके यांनीही या वादात उडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत चाकणकर यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी हाके यांनी केली असून, या सर्व घडामोडींमुळे चाकणकर यांच्या पदावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. लक्ष्मण हाके म्हणाले, हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील राजकारण्यांना, मंत्रिमंडळाला जर भोंदू बाबांनी विळखा घातला असेल, जादूटोणावाल्यांनी विळखा घातला असेल तर पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. या रुपालीताई चाकणकरांचा उद्या 10, 11, 12 वाजेपर्यंत सुनेत्राताईंनी राजीनामा घ्यावा, नाही तर सुनेत्राताईंच्या घरासमोर आम्हाला उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा हाके यांनी दिला आहे. पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सुमार दर्जाची महिला ठेवली. महाराष्ट्राने जादूटोणाविरोधी, भोंदूगिरी विरोधी कायदा केला आहे. स्वर्गीय आर.आर. आबा पाटलांनी पुढाकार घेऊन कायदा बनवला आहे. हा कायदा पायदळी तुडवण्याचे काम मंत्रिमंडळात बसलेले नेते करत असतील, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसलेल्या रुपालीताई करत असतील तर याच्याहून वाईट काय असू शकते, असेही हाके म्हणाले. उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत रुपालीताईंचा राजीनामा आला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रात वेगळे आंदोलन उभे करावे लागेल. महिलांनी या रुपालीताईंकडून काय न्याय मागायचा. हे प्रकरण एपस्टीन फाईल पेक्षा वेगळे आहे. सुनेत्राताईंकडे विनंती आहे, उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत रुपालीताईंचा राजीनामा घ्यावा. राजीनामा घेतला नाही तर सुनेत्राताईंच्या बारामती, पुणे किंवा मुंबईतील घराबाहेर जाऊन बसू आणि आंदोलन करू, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
अमेरिकेला लष्करी तळ देणे म्हणजे हल्ल्यात सहभागी होणे
तेहरान : मागील काही दिवसांपासून मध्य पूर्वेत तणाव सुरू आहे. इराण-अमेरिकेतील युद्धाला २१ दिवस पूर्ण झाले असून तणाव कमी होण्याऐवजी वाढत आहे. या युद्धात आखाती देशांना सर्वाधिक फटका बसला आहे. शुक्रवारी सकाळी, कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने सांगितले की, आज सकाळी मीना अल-अहमदी रिफायनरीवर ड्रोन हल्ले झाले, ज्यामुळे अनेक युनिट्सना आग लागली. कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने ‘एक्स’ या […] The post अमेरिकेला लष्करी तळ देणे म्हणजे हल्ल्यात सहभागी होणे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या शुक्रवार दि. 20 मार्च रोजी झालेल्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठ्याचा प्रश्न चांगलाच पेटला. अनियमित, कमी दाबाने व कमी पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले. शहरातील तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिका सभागृहात पाणी प्रश्नावर जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकावरून सत्ताधारी नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. […] The post महापालिकेच्या सभेत पाणी पेटले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाला आता मोठे राजकीय वळण लागले असून, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ आणि त्याच्यासोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या गंभीर प्रकारामुळे चाकणकर यांच्यावर चोहोबाजूंनी टीकेची झोड उठली असून, विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी लावून धरली आहे. या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, रुपाली चाकणकर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी नुकतीच पुणे डीजींची भेट घेतली असून, आता त्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान त्या नाशिक भोंदूगिरी प्रकरणाबाबत आणि व्हायरल फोटोंबाबत आपले म्हणणे मांडण्याची शक्यता आहे. या महत्त्वपूर्ण भेटीनंतर शासन स्तरावर काय निर्णय घेतला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिक येथील भोंदूगिरी आणि महिला शोषणाच्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली असून, आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकामार्फत या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. या पार्श्वभूमीवर, सरकार चाकणकर यांच्यावर नेमकी काय कारवाई करणार किंवा त्यांचा राजीनामा घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत आक्रमक निशाणा साधत त्यांच्या तातडीने अटकेची मागणी केली आहे. चाकणकर यांची 'नार्को टेस्ट' करण्यात यावी, अशी मागणी करत त्यांनी अशोक खरात आणि चाकणकर यांचे काही व्यावसायिक संबंध होते का, याचाही सखोल तपास करण्याची विनंती केली आहे. अंधारे यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला असून, आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तेल-गॅस पुरवठ्यासाठी पाईपलाईन उभारा
जेरूसलेम : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत असून होर्मुझ सामुद्रधुनी मार्गावरील अडथळ्यांमुळे तेल आणि गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. अशा परिस्थितीत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ऊर्जा पुरवठ्यासाठी पर्यायी मार्गाचा प्रस्ताव मांडला असून नेतन्याहू यांनी सुचवले की अरब देशांमधून इस्रायलपर्यंत आणि तेथून भूमध्य समुद्रातील बंदरांपर्यंत तेल आणि गॅस वाहतुकीसाठी पाइपलाइन उभारावी. […] The post तेल-गॅस पुरवठ्यासाठी पाईपलाईन उभारा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
रामकृष्ण अण्णा सातव पाटील कर्तव्य फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतींनंतर अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. पुणे येथे झालेल्या या स्पर्धेत माती आणि गादी विभागातील ६१ किलो आणि ८६ किलो वजनी गटांतील अंतिम फेरीसाठी मल्लांनी स्थान निश्चित केले. काही लढती एकतर्फी झाल्या, तर काही ठिकाणी चुरशीची टक्कर पाहायला मिळाली. माती विभागातील ६१ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या अजय कापडेने साताऱ्याच्या गोरख कोळेकरचा १०-० गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य लढतीत पुण्याच्या अमोल वालगुडेने पुणे शहराच्या अमित कुळालला ११-० अशा गुणाधिक्याने हरवून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. ८६ किलो वजनी गटाच्या माती विभागातील उपांत्य फेरीत बीडच्या अविनाश शिंदेने सोलापूरच्या प्रणव हांडेचा १२-२ अशा फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. याच गटातील दुसरी उपांत्य लढत सोलापूरच्या बिरुदेव बनसोडे आणि पुण्याच्या अनिल कचरे यांच्यात झाली. ही लढत अत्यंत चुरशीची असतानाच दुसऱ्या फेरीत अनिल कचरेच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला लढतीतून माघार घ्यावी लागली आणि बिरुदेव बनसोडेचा अंतिम फेरीचा मार्ग सुकर झाला. गादी विभागातील ६१ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या विवेक धावडेने धुळ्याच्या महेश चौधरीचा १०-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या लढतीत कोल्हापूर शहराच्या वैभव पाटीलने पुण्याच्या वेंकटेश देशमुखला ११-० अशा एकतर्फी फरकाने हरवून अंतिम फेरीत धडक मारली. या दोन्ही मल्लांनी आपापली पदकेही निश्चित केली आहेत. गादी विभागातील ८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या विकास कार्येने कोल्हापूरच्या नितीन चव्हाणवर मात करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. दुसऱ्या उपांत्य लढतीत ठाण्याच्या सुरज मानेने सोलापूरच्या गोपीनाथ सुतारचा ८-४ अशा गुणाधिक्याने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. आजच्या उपांत्य फेरीतील निकालांमुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अंतिम लढती अधिक रंगतदार होणार असून, विविध जिल्ह्यांतील आघाडीचे मल्ल विजेतेपदासाठी सज्ज झाले आहेत.
रडारला चकवा देणारे सर्वात महागडे विमान पाडले
तेहरान : जगातील सर्वात प्रगत, महागडे आणि रडारच्या नजरेतून निसटणारे अमेरिकेचे एफ-३५ स्टील्थ फायटर जेट इराणने पाडल्याचा दावा केला आहे. रडारला चकवा देण्यात प्रसिद्ध असलेल्या या पाचव्या पिढीतील विमानाला इराणच्या क्षेपणास्त्राने लक्ष्य केल्याने जागतिक संरक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशन गार्ड्स कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, मध्य इराणी हवाई हद्दीत स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री २:५० […] The post रडारला चकवा देणारे सर्वात महागडे विमान पाडले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आयोजित 'वल्लभेश मंगलम्' विवाह सोहळा चैत्र शुद्ध द्वितीयेला दगडूशेठ गणपती मंदिरात थाटात पार पडला. सकाळी १० वाजून ५७ मिनिटांनी श्री गणेश आणि देवी वल्लभा यांचा हा विवाह सोहळा संपन्न झाला. हा अनुपम सोहळा अनुभवण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. शुभमंगल सावधानचे मंगल सूर, अक्षता व फुलांची उधळण, ब्रह्मवृंदांनी केलेले मंत्रपठण आणि 'मोरया, मोरया'च्या जयघोषात हा सोहळा उत्साहात साजरा झाला. श्री गणेश व देवी वल्लभा यांच्या मूर्ती सभामंडपात ठेऊन सर्व पारंपरिक विधी पार पडले. सभामंडपात विविधरंगी फुलांची आकर्षक आरास करून लग्नमंडपाचे स्वरूप देण्यात आले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी सोहळ्याचे पौरोहित्य केले. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते वऱ्हाडी मंडळीच्या भूमिकेत पारंपरिक वेशात लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते. गाणपत्य संप्रदायात भगवान श्री गणेशांच्या विविध शक्तींचा उल्लेख आहे. परब्रह्म परमात्मा भगवान श्री गणेश जेव्हा एकटे विद्यमान असतात, तेव्हा त्यांना अनेकत्त्वाची इच्छा जागृत होते. या इच्छेच्या पूर्तीसाठी ते आपल्या योगमायेला जागृत करतात. ही योगमायाच देवी वल्लभा नावाने ओळखली जाते. मोरयाची अत्यंत प्रिय असल्याने तिला वल्लभा असे म्हणतात. एकट्याच मोरयाच्या स्वरूपात सर्व विश्वाचा आरंभ आहे. देवी वल्लभेच्या प्रगटीकरणाची आणि मोरयाने तिच्यासह नटण्याची तिथी चैत्र शुद्ध द्वितीया असते. निर्गुण निराकार परब्रह्म म्हणजे भगवान श्री गणेश, तर आत्ममायायुक्त सगुण साकार परब्रह्म म्हणजे श्री गुणेश. देवी वल्लभा आणि तिच्यासह असणाऱ्या भगवान वल्लभेशांच्या महामीलनाचा महोत्सव म्हणजे 'वल्लभेश मंगलम्' होय.
वाकड आणि पुनावळे येथील स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी आणि गीत फुलोरा निर्मित 'चैत्रपाडवा' गीताचे लोकार्पण कस्पटेवस्ती सकल हिंदू संमेलनामध्ये मान्यवरांच्या हस्ते गुरुवार, दिनांक 19 मार्च 2026 रोजी करण्यात आले. गुढीपाडव्या निमित्त सकल हिंदू संमेलनाचे वाकड येथील कस्पटेवस्ती येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अतुल अग्निहोत्री, ह.भ.प. महादेवमहाराज भुजबळ, सुधीर आयाचित, संतोष कस्पटे, संदीप चिलेकर यांच्या शुभहस्ते विराट हिंदू संमेलनामध्ये सादरीकरणासह या गीताचे लोकार्पण करण्यात आले. शुभारंभ करी शक गणनेचाकरुनी पराभव दुष्ट जणांचाशालिवाहन नृपती आठवा चैत्र मासीचा गुढीपाडवा... कवयित्री मंगला गोखले यांच्या ह्या गीतास अभयार्पिता यांनी संगीतबद्ध केले असून अभय कुलकर्णी, अर्पिता कुलकर्णी, अथर्व कुलकर्णी आणि भाग्यदा यांनी या गीताचे गायन केले आहे. लोकार्पणानंतर स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमी वाकड आणि पुनावळे येथील विद्यार्थ्यांनी या गीताचे सादरीकरण केले. मराठमोळ्या पोशाखातील सादरीकरणाला सर्वांची उत्स्फूर्त दाद लाभली. हे गीत गीत-फुलोरा 'Geetfulora' यूट्यूब चैनलवर उपलब्ध असून सर्वांनी जरूर ऐकावे, असे आवाहन या गीताचे संगीतकार आणि गायक अभयार्पिता यांनी केले आहे. अतुल अग्निहोत्री आणि ह.भ.प. महादेवमहाराज भुजबळ यांनी या औचित्यपूर्ण गीताच्या निर्मितीबद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे संयोजक संतोष कस्पटे आणि संदीप चिलेकर यांनी या गीतास भरभरून शुभेच्छा दिल्या. स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी ह्याच कार्यक्रमामध्ये अभयार्पिता यांनी संगीतबद्ध केलेले आठ भाषेतील हिंदू ऐक्य गीत, संपूर्ण वंदे मातरम् गायले. पिंपरी - चिंचवड सन्मानप्राप्त अथर्व कुलकर्णीने गणनायकाय... गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. नगरसेवक संदीप कस्पटे तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला, आबालवृद्ध सर्वांची भरभरून उपस्थिती होती. स्वरोपासना आणि गीत फुलोरा तर्फे भारतीय संस्कृतीला पूरक अशा गीतांची निर्मिती केली जाते. या आधी मराठी भाषा दिवस, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, वंदे मातरम् 150 वर्षपूर्ती आणि श्रीराम मंदिर सोहळा निमित्ताने गीतनिर्मिती करण्यात आलेली होती.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड प्रक्रियेत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच आपली सत्ता प्रस्थापित केली असली, तरी या निवडीला हिंसक वळण लागल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रक्रियेदरम्यान झालेल्या प्रचंड गोंधळात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या डाव्या हाताला जखम झाली असून, त्यांना भाजप कार्यकर्त्यांकडूनच धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या अनपेक्षित प्रकारामुळे साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सत्तेच्या जल्लोषाला गालबोट लागले आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेदरम्यान भाजपा, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या जोरदार राड्यामुळे तणाव निर्माण झाला. या गोंधळात पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याने त्यांच्या हाताला जखम झाली आहे. गर्दीत सुरुवातीला नेमका धक्का कसा लागला हे समजले नाही, मात्र जेव्हा रक्त येऊ लागले तेव्हा दुखापतीची जाणीव झाली, अशी प्रतिक्रिया देसाई यांनी दिली असून, या घटनेनंतर त्यांचे समर्थक कमालीचे आक्रमक झाले आहेत. या प्रकारामुळे साताऱ्याच्या राजकारणात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिस बळाचा चुकीचा वापर या प्रकरणावर राज्याचे पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पोलिस बळाचा चुकीचा वापर करून विरोधी सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. जर थेट मंत्री आणि लोकप्रतिनिधींवरच पोलिस धावून येत असतील, तर ही लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर बाब आहे, असे पाटील म्हणाले. रस्त्यावरची लढाई लढू- शशिकांत शिंदे तर दुसरीकडे आमदार शशिकांत शिंदे यांनी थेट रस्त्यावरच्या लढाईचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, भाजपच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असतानाही पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने सभागृहाबाहेर काढले. प्रशासनाचा गैरवापर करून आमच्या सदस्यांवर दबाव टाकण्यात आला आणि त्यांना हात वर करण्यास भाग पाडले, असा आरोप त्यांनी केला. तसेच आम्ही हा अन्याय सहन करणार नाही, आता या विरोधात रस्त्यावरची लढाई लढू, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट
मथुरा : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूउत्तर प्रदेश दौ-यावर असून त्यांनी आज वृंदावनमध्ये प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राष्ट्रपती मुर्मू आणि प्रेमानंद महाराज यांच्यात अध्यात्म, समाजसेवा आणि जनकल्याण अशा विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. या आठवड्यात प्रेमानंद महाराजांचा वाढदिवस असल्याने ही भेट विशेष ठरली. राष्ट्रपतींनी आश्रमात महाराजांचे प्रवचन ऐकले आणि त्यांना नम्रतापूर्वक […] The post राष्ट्रपती मुर्मू यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केरळ मुख्यमंत्रिपदाचा मी दावेदार नाही : थरूर
नवी दिल्ली : काँग्रेसकडून केरळच्या मुख्यमंत्रिपदाचा मी संभाव्य दावेदार नाही अशी स्पष्टोक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी गुरुवारी दिली. मुख्यमंत्री आदर्श पद्धतीने निवडून आलेल्या आमदारांतून निवडले गेले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत थरूर यांनी आपण निवडणूक लढवत नसल्याचे स्पष्ट करून राज्याच्या कोनाकोप-यात जाऊन प्रचार करण्यासाठी आपण आतुर आहोत असे त्यांनी म्हटले […] The post केरळ मुख्यमंत्रिपदाचा मी दावेदार नाही : थरूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारतीय कॅप्टन राकेश रंजन यांचा मृत्यू
नवी दिल्ली : इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाचा जगभर परिणाम झाला होत असल्याचे दिसत आहे. २८ फेब्रुवारीपासून होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन राकेश रंजन सिंह यांचे निधन झाले आहे. त्यांचे कुटुंब रांचीच्या अर्गोरा येथील वसुंधरा अपार्टमेंटमध्ये राहत आहे. ते मूळचे बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बिहार शरीफचे रहिवासी आहेत. कॅप्टन राकेश रंजन सिंह यांच्या निधनाच्या बातमीने त्यांचे संपूर्ण कुटुंब […] The post भारतीय कॅप्टन राकेश रंजन यांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्लीत ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शना’चे दिमाखदार उद्घाटन
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात गुरुवारी महाराष्ट्र साडी प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्राची समृद्ध वस्त्रपरंपरा आणि कलाकुसरीचे दर्शन घडवणा-या या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रदर्शनात कोल्हापुरी चपलेलाही ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. गुरुवारपासून (१९ मार्च) सुरू झालेले हे प्रदर्शन २२ मार्च पर्यंत असणार आहे. महाराष्ट्र साडी प्रदर्शनाचे […] The post नवी दिल्लीत ‘महाराष्ट्र साडी प्रदर्शना’चे दिमाखदार उद्घाटन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नाशिकमध्ये गुंगीचे औषध देऊन महिलांवर अत्याचार केल्याच्या गंभीर आरोपाखाली कॅप्टन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीला 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील धक्कादायक खुलासे समोर येत असतानाच पोलिस आता खरातच्या गुन्ह्यांची व्याप्ती आणि तांत्रिक पुराव्यांचा कसून तपास करत आहेत. दुसरीकडे, या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा अशोक खरातसोबतचा पाद्यपूजेचा व्हिडिओ आणि विविध कार्यक्रमांतील फोटो समोर आल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, रूपाली पाटील-ठोंबरे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे हे महाडमधील एका कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना तटकरे यांना पत्रकारांनी रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्या विषयी प्रश्न विचारला असता ते चांगलेच संतापले होते. ते म्हणाले, ही जागा बोलायची नाही. मी योग्यवेळी बोलेन. मला घटनेने अधिकार दिला आहे, मला ज्यावेळी बोलायचे आहे, त्यावेळी बोलेन, असे तटकरे यांनी म्हटले आहे. संजय राऊतांचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील एक ट्विट करत अशोक खरात यांच्यावर टीका केली आहे. केसरकर शिक्षण मंत्री असताना शिक्षण खात्यातील सर्व बदल्या आणि बढत्या याच खरात बाबाच्या शिफारशीने होत असत. त्या कामी बाबा अनेकदा नरिमन पॉइंट ट्रायडेंट मध्ये मुक्कामास असत, अशी धक्कादायक माहिती राऊत यांनी ट्विट करत दिली आहे. रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या:सुषमा अंधारे यांचा खळबळजनक आरोप; अमावस्येला अनामिका कापल्याचाही दावा दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केलेत. रुपाली चाकणकर व भोंदूबाबा अशोक खरात याच्यात घरगुती संबंध होते. त्या तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिकाही कापली होती. या प्रकरणी त्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर
भारतातील वैद्यकीय पर्यटनाला मोठा फटका
मुंबई : पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाचे पडसाद आता भारताच्या वैद्यकीय पर्यटन क्षेत्रावर उमटू लागले आहेत. उड्डाणांवरील निर्बंध, प्रवासातील अनिश्चितता आणि भीतीचे वातावरण यामुळे परदेशी रुग्णांच्या भारतातील आगमनात मोठी घट झाली असून खासगी रुग्णालयांच्या उत्पन्नावर त्याचा थेट परिणाम होत आहे. उद्योगातील सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही आठवड्यांत पश्चिम आशियातून भारतात येणा-या रुग्णसंख्येत तब्बल ५० ते ७५ […] The post भारतातील वैद्यकीय पर्यटनाला मोठा फटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
यूपीमधील ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त
अहमदाबाद : गुजरात एटीएसने नुकतेच अहमदाबादच्या दाणीलीमडा येथे ४.६ ग्रॅम ड्रग्जसह एका तरुणाला अटक केली होती. आरोपीची चौकशी केली असता त्याचे धागेदोरे यूपीपर्यंत पोहोचले होते, जिथे गुजरात एटीएसने ड्रग्ज बनवणा-या कारखान्यावर छापा टाकून २ जणांना अटक केली. यासोबतच कारखान्यातून ६ किलो एमडी, ५० किलो लिक्विड आणि २०० किलो कच्चा माल जप्त करण्यात आला. गुजरात एटीएसने […] The post यूपीमधील ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिमाचलमध्ये बर्फवृष्टी, भूस्खलन, मुसळधार
शिमला : हिमाचल प्रदेशातील उंच पर्वतांवर जोरदार बर्फवृष्टी होत आहे आणि मध्यम व खालच्या भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अटल बोगदा रोहतांगच्या उत्तर आणि दक्षिण पोर्टलवर अडीच फुटांपेक्षा जास्त ताजी बर्फवृष्टी झाली आहे. यामुळे लाहौल स्पीति जिल्ह्याचा उर्वरित जगाशी संपर्क तुटला आहे. रोहतांग खिंड आणि शिंकुला खिंडीत तीन फूट, किन्नौरमधील कल्पा, आसरंग, रोपा व्हॅली, सांगला, […] The post हिमाचलमध्ये बर्फवृष्टी, भूस्खलन, मुसळधार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चाकणकरांची वकिली सोडून अवकाळीवर लक्ष द्या
पुणे : अवकाळी पावसामुळे बेजार झालेल्या एका शेतक-याने थेट राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन करून त्यांना रुपाली चाकणकर यांची वकिली करण्यापेक्षा राज्यातील शेतक-यांवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार व नाना पटोले यांनीही मंत्री भरणेंचे कान टोचले आहेत. पुण्यातील दत्ता पवार नामक शेतक-याने शुक्रवारी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन केला. […] The post चाकणकरांची वकिली सोडून अवकाळीवर लक्ष द्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे जग आज विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे. या पार्श्वभूमीवर, केवळ भारतच ही युद्ध संपुष्टात आणू शकतो, असे सूर जगभरातून उमटत आहेत. कारण केवळ एकता, शिस्त आणि धर्माचे आचरण यांतूनच चिरस्थायी शांतता साध्य होऊ शकते हा भारताचा स्वभाव जगालाही माहिती आहे, असे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. नागपूर येथे विश्व हिंदू परिषदेच्या विदर्भ प्रांत कार्यालयाची कोनशिला बसवल्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करत होते. डगमगत असलेल्या जगाला धर्माचा भक्कम पाया देऊन, त्यात पुन्हा समतोल प्रस्थापित करणे ही भारताचीच जबाबदारी आहे. सर्वजण परस्परांशी जोडलेले आहेत आणि एकाच सूत्रात बांधलेले आहेत ही भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेची शिकवण आहे. स्वार्थी हितसंबंध आणि वर्चस्वाची लालसा हीच जगातील संघर्षांची मूळ कारणे आहेत. ती टाळून जगाने सलोखा व सहकार्याकडे वळण्याचे आवाहन केले. गेल्या दोन हजार वर्षांपासून जगाने संघर्ष सोडवण्यासाठी विविध विचारांचे प्रयोग केले आहेत; मात्र त्यात त्यांना फारसे यश लाभलेले नाही. धार्मिक असहिष्णुता, सक्तीचे धर्मांतर आणि श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या कल्पना आजही अस्तित्वात आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भारत मानवतेवर विश्वास ठेवतो, तर इतर अस्तित्वासाठीच्या संघर्षावर आणि जो बलवान तोच टिकेल' यावर विश्वास ठेवतात, असे सांगून त्यांनी जगाला संघर्षाची नव्हे, तर सलोख्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले.
बलात्कार सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी भोंदूबाबा व स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातला नाशिकच्या गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने दोन दिवसांपूर्वी अटक केली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या खरातचे पाद्यपूजन केल्याचा व्हिडिओ समोर आल्यावर या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे. तसेच अशोक खरातचे आता अनेक लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ समोर आले असून या प्रकरणाची सध्या एसआयटी चौकशी सुरू आहे. अशोक खरातचे लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ समोर येत असतानाच आणखी धक्कादायक खुलासे देखील होत आहेत. आता अशोक खरातच्या लैंगिक शोषणाचा पॅटर्न देखील समोर आला आहे. एका महिलेने दाखल केलेल्या एफआयआरमधून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. महिलांना गुंगी आली की त्यांचे लैंगिक शोषण करायचा महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, अशोक खरात हा स्वतःला कृष्णाचा अवतार सांगायचा. 'मी कृष्णाचा अवतार आहे, तू मागच्या जन्मातील माझी राधा होती', असेही खरातने या महिलेला म्हटल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. महिलेच्या डोक्यावर तांब्या-लोटा ठेऊन खरात कानाजवळ पुटपुटायचा, त्याआधी तो पेढा आणि कडवट-खारट चव असलेले पाणी प्यायला द्यायचा. महिलांना गायत्री मंत्र म्हणायला लावायचा आणि लगेच स्पर्श करायला सुरुवात करायचा. महिलेसोबत आलेल्या व्यक्तींना ध्यानस्थ पूजेच्या नावाखाली केबिनच्या बाहेर ठेवायचा. तसेच महिलांना गुंगी आली की त्यांचे लैंगिक शोषण करायला सुरुवात करायच, असा अशोक खरातचा लैंगिक शोषणाचा पॅटर्न होता. नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत संशयित आरोपी खरात याने शहरातील 'कॅनडा' इमारतीमधील आपल्या कार्यालयात पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. खरातने प्रथम महिलेचा भावनिक व धार्मिक विश्वास संपादन केला आणि त्यानंतर तिला मंत्र-तंत्राच्या विधीच्या बहाण्याने कार्यालयात बोलावून गुंगीकारक पदार्थमिश्रित पाणी पाजले. यानंतर ती महिला संमोहित अवस्थेत असताना तिला तिच्या पतीच्या मृत्यूची भीती घालून आणि आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन त्याने हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 100 हून अधिक व्हिडिओ पोलिसांच्या हाती अशोक खरातने केलेल्या लैंगिक शोषणाचे 100 हून अधिक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले असून, धर्माच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. आरोपीने या व्हिडिओं द्वारे पीडितांवर दबाव निर्माण केल्याचेही प्राथमिक चौकशीत दिसून येत आहे. आयपीएस तेजस्विनी सातपुते यांच्याकडे तपासाचे नेतृत्व या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी राज्य सरकारने तातडीने विशेष तपास पथकाची स्थापना केली असून, आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्याकडे या तपासाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. सातपुते यांनी नाशिकमध्ये दाखल होत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत सुमारे दीड तास आढावा बैठक घेतली. या एसआयटी मध्ये नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील 12 हून अधिक अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, तांत्रिक पुरावे आणि जप्त केलेले व्हिडिओ यांच्या आधारे आता अधिक वेगाने तपास सुरू आहे.
अवकाळी पावसामुळे बेजार झालेल्या एका शेतकऱ्याने थेट राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन करून त्यांना रुपाली चाकणकर यांची वकिली करण्यापेक्षा राज्यातील शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार व नाना पटोले यांनीही या प्रकरणी भरणेंवर टीका केली आहे. राज्य सरकारची प्रतिमा जनतेच्या मनात किती खालावली आहे हे यातून लक्षात येते, असे हे नेते म्हणालेत. पुण्यातील दत्ता पवार नामक शेतकऱ्याने शुक्रवारी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन केला. हा फोन भरणे यांच्या पीएने उचलला. त्यांनी त्या शेतकऱ्याला थोड्या वेळाने फोन करण्याची विनंती केली. पण सदर शेतकऱ्याने कृषिमंत्र्यांना चाकणकरांची वकिली सोडून राज्यात अवकाळी पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीकडे लक्ष केंद्रीत करण्याचा आपला निरोप कृषिमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. त्यांच्यातील एका संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार व नाना पटोले यांनी या व्हिडिओचा दाखला देत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भरणेंनी राजीनामा देऊन चाकणकरांची वकिली करावी -वडेट्टीवार विजय वडेट्टीवार या प्रकरणी म्हणाले की, कृषिमंत्री राजीनामा द्या, मग पूर्णवेळ चाकणकरांची वकिली करा, एकीकडे राज्यातील शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे अस्मानी संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या कृषिमंत्र्यांनी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश देणे, शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे होते. मात्र कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या संकटाकडे दुर्लक्ष करून एका बलात्कारी बाबाची व त्या बाबाच्या चरणी लीन असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षांची वकिली करण्याला प्राधान्य दिले. त्यांची ही वकिली शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे. शेतकऱ्यांना आपल्या राज्याच्या कृषिमंत्र्यांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून द्यावी लागते,ही वेळ आली आहे..म्हणूनच, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना शेतकऱ्यांपेक्षा बलात्कारी बाबा आणि त्यांची शिष्य महत्वाची वाटत असेल तर त्यांनी कृषिमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि पूर्णवेळ चाकणकरांची वकिली करत बसावे, असे ते म्हणाले. जनतेच्या मनात सरकारची प्रतिमा खालावली - पटोले आमदार नाना पटोले यांनीही या प्रकरणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, पुणे जिल्ह्यातील दत्ता पवार या शेतकऱ्याने राज्याच्या कृषिमंत्र्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत बलात्कारी लोकांना गुरु मानणाऱ्या लोकांची वकिली न करण्याचा सल्ला दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. राज्य सरकारची प्रतिमा जनतेच्या मनात किती खालावली आहे हे यातून लक्षात येते. आज राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा असताना राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी भोंदूबाबा कॅप्टन खरात प्रकरणात नाव समोर आलेल्या लोकांना क्लीनचिट देण्यात व्यस्त आहेत. कृषिमंत्र्यांना राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे नाहीत का? जगात एपस्टिन फाईल्स आणि महाराष्ट्रात कॅप्टन फाईल्स सारखे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. या कॅप्टन फाईल्स प्रकरणात केंद्र व राज्य सरकारमधील अनेक लोकांचे संबंध समोर येत आहेत. मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. राज्यातील या भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि त्याच्या हस्तकांना वाचवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. कृषिमंत्र्यांनी कुणाला क्लीनचिट देण्यापेक्षा राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, असे पटोले म्हणालेत.
अल्पसंख्याक शिक्षण संस्थामध्ये सरकारचा हस्तक्षेप अवैध
नागपूर : कायदेशीर अधिकार नसतानाही राज्यातील शिक्षणाधिका-यांद्वारे अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या कर्मचारी नियुक्तीमध्ये हस्तक्षेप केला जात आहे. गेल्या काही महिन्यांत अशी अनेक प्रकरणे निदर्शनास आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्षणाधिका-यांवर नाराजी व्यक्त केली. तसेच, जागृती करण्यासाठी या निर्णयाची प्रत विदर्भातील सर्व शिक्षणाधिका-यांना पाठविण्यात यावी, असे निर्देश सरकारी वकील कार्यालयाला दिले. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील शाहबाबू […] The post अल्पसंख्याक शिक्षण संस्थामध्ये सरकारचा हस्तक्षेप अवैध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सुनेत्राकाकी, पार्थ-जय यांनी काळजी घ्यावी
पुणे : महिलांचे शोषण केल्याचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. अशोक खरात याने राजकीय मंडळी, प्रशासनातील बड़े अधिकारी, तसेच सेलेब्रिटी यांना जाळ्यात ओढून अमाप माया जमविली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. भोंदूबाबा अशोक खरात याच्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आहेत. यावरून राजकीय वर्तुळातून […] The post सुनेत्राकाकी, पार्थ-जय यांनी काळजी घ्यावी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रात सध्या हवामानाचे दोन टोकाचे चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला काही भागात उन्हाची तीव्रता वाढत असताना, दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने या भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतकरी आणि नागरिक दोघांनाही सावधगिरी बाळगावी लागणार आहे. विदर्भात दुपारनंतर हवामान अधिक सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे. विशेषतः नागपूर, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुलढाणा, अकोला, चंद्रपूर आणि भंडारा या भागांत ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. वर्धा, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम येथेही काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, तेथेही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या बदलत्या हवामानामुळे शेतीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि अहिल्यानगर या भागांतही काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. मात्र, कोकण किनारपट्टीवर चित्र वेगळे असून पुढील दोन दिवसांत तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवणार आहे. दरम्यान, दुपारनंतर पावसाची शक्यता लक्षात घेता काढणीला आलेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली उभे राहणे टाळावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. हवामानातील या अचानक बदलामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
‘यूपीएससी’मध्ये महाराष्ट्राचा टक्का घसरला
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२६ च्या निकालात देशभरातून ९५८ उमेदवारांची विविध अखिल भारतीय व केंद्रीय सेवांसाठी निवड झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील ६० विद्यार्थ्यांनी यश मिळवले असले, तरी मागील काही वर्षांच्या तुलनेत राज्यातील निवडीचा आकडा लक्षणीयरीत्या घटल्याचे दिसून येत आहे. कोव्हिडपूर्व काळात महाराष्ट्रातून शंभरच्या पुढे उमेदवार निवडले जात असताना, आता हा आकडा यंदा ६० च्या आसपास […] The post ‘यूपीएससी’मध्ये महाराष्ट्राचा टक्का घसरला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पोलिसांविरोधात कारवाईच्या मागणीची याचिका फेटाळली
मुंबई : २०१९ मध्ये वडाळा ट्रक टर्मिनस पोलिस ठाण्यात मुलाचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याने संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारी मुलांच्या वडिलांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. पोलिसांविरुद्धचे आरोप असमर्थनीय आहेत, असे म्हणत न्यायालयाने सीबीआयच्या अहवालाला मान्यता दिली. सीबीआयने पोलिसांना क्लीन चिट देण्यात आली असून ज्या व्यक्तींची मृत व्यक्तीशी झटपट झाली होती त्यांनाही […] The post पोलिसांविरोधात कारवाईच्या मागणीची याचिका फेटाळली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भोंदू अशोक खरात व अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा अप्रत्यक्षपणे संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवारांच्या घराबाहेर जादूटोणा केल्याचा आरोप केला जात आहे. असे असेल तर त्या काळात 27 जानेवारीला भोंदू अशोक खरातशी जवळीक असणारे कोण कोण व का आले होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व त्यांच्या दोन्ही मुलांना स्वतःची काळजी घेण्याचेही आवाहन केले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज अजित पवारांच्या निधनापूर्वी त्यांच्या सहयोग सोसायटी परिसरातील निवासस्थानाबाहेर अघोरी पूजेचा प्रकार झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याचा दाखला देत रोहित पवार यांनी भोंदू खरात व अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. ते अमोल मिटकरींचे ट्विट रिट्विट करताना म्हणाले, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदुगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही, परंतु आ. अमोल जी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदुबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते. नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदुबाबाबाला भोंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरिवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे. मा. सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही... आता पाहू काय म्हणाले अमोल मिटकरी? तत्पूर्वी अमोल मिटकरी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले होते, ह्या तारखा नीट बघा. 18/19/20 नोव्हेंबर 2025 ! या दिवशी अनुक्रमे शिवरात्री,व अमावस्या होत्या. याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. लिंगपिसाट भोंदू बाबा कॅ अशोक खरात ह्याचा शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. ह्या आश्रमात अघोरी पूजा चलायच्या? शिवाय बाबांचे भक्त त्याच्या आदेशावरून राजकीय लाभापायी ह्या पुजा आदेश मानून करू शकतात. मी अजित दादांच्या इतक्या वर्षाच्या सहवासात एक गोष्ट अनुभवली होती दादा अजिबात कर्मकांड मानत नव्हते. अशा थोतांडाना थारा देत नव्हते. मात्र या प्रकरणा अशोक खरात चे VSR कनेक्शन उघड झाले आहे. आता प्रश्न असा आहे की 27 जानेवारीला कार ने पुण्याला जाणारे दादा 28 ला सकाळी VSR ने कुणाच्या सल्ल्यावरून गेले? या भोंदू बाबाचा कोण भक्त होता?या बाबाचे व आश्रमातील पुजाऱ्यांचे 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारी या दरम्यानचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला हा सगळा चित्रपट स्पष्ट होईल. गुजोबावी धुके की धोका?? अघोरी पूजा कुणाची? पाणी इथे पण मुरतांना दिसतंय, असे ते म्हणाले होते.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडे बहुमताचे संख्याबळ असतानाही भाजपने शेवटच्या क्षणी बाजी मारत सत्ता आपल्या ताब्यात घेतली. या नाट्यमय घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना या निकालाने मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत भाजपने 32 सदस्यांचे संख्याबळ दाखवत अध्यक्षपदी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची निवड केली. उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी अखेरपर्यंत जोरदार प्रयत्न करूनही केवळ 31 सदस्यच एकत्र करू शकले. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना अपयश आले आणि सत्ता हातातून निसटली. देसाई यांच्या हाताला दुखापत दरम्यान, बहुमत नसतानाही भाजपने विरोधी पक्षातील सदस्यांना फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. काही सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा कथित डाव आखल्याचीही चर्चा होती. या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिसांच्या नजरेत असलेल्या सदस्यांना स्वतःच्या वाहनातून सुरक्षित सभागृहात पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली. या गडबडीत झालेल्या झटापटीत देसाई यांच्या हाताला दुखापत झाल्याचेही समोर आले. शिवसेनेने सदस्य एकत्र ठेवण्यासाठी ताकद लावली तसेच मकरंद पाटील यांच्या वाहनातूनही काही सदस्यांना सभागृहात आणण्यात आले. कामेस कांबळे, अनिल देसाई यांच्यासह काही सदस्यांना लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपले सर्व सदस्य एकत्र ठेवण्यासाठी पूर्ण ताकद लावली. तरीही शेवटच्या क्षणी झालेल्या घडामोडींमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. साताऱ्यातील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलली संख्याबळाचा विचार करता, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 20, शिवसेनेकडे 15, काँग्रेसकडे 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे 1, भाजपकडे 27 आणि एक अपक्ष सदस्य असे एकूण 65 सदस्य होते. बहुमतासाठी 33 सदस्यांची गरज होती. भाजपच्या बैठकीला 28 सदस्य उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादीचे 2 आणि शिवसेनेचे 2 सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा असून त्यामुळे भाजपची संख्या 32 वर पोहोचली. या संपूर्ण घडामोडींमुळे साताऱ्यातील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलली असून फोडाफोडीच्या राजकारणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निवड प्रक्रियेतील महत्त्वाच्या घडामोडी
दानवेंनी ओलिस ठेवून १८ कोटींत केला सौदा
वैजापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमचा १८ कोटी रुपयांना सौदा केला. त्यातील ४ कोटी रुपये स्वत: हडपले, असा आरोप शिऊर गटाचे उद्धवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. स्व:पक्षाच्या काही सदस्यांवर पैसे खाल्ल्याचा आरोप दानवे यांनी केला […] The post दानवेंनी ओलिस ठेवून १८ कोटींत केला सौदा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचे नाव आल्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे. या प्रकरणी चाकणकरांवर टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी या प्रकरणात नाव आलेल्या सर्वांवर कारवाई करण्याचे विधान केले आहे. त्यामुळे रुपाली चाकणकरांवर कारवाई होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. राज्यातील अनेक महिलांना गुंगीचे औषध देऊन त्याचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 24 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या खरातची पाद्यपूजा केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याशिवाय त्यांचे अनेक फोटोही समोर आलेत. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील - ठोंबरे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यास अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिलेत. राष्ट्रवादी काँग्रेस योग्य ती कारवाई करेल प्रपुल्ल पटेल या प्रकरणी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीत नाव आलेल्या सर्वांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल. ही कारवाई तातडीने व सक्तीने केली गेली पाहिजे. काही राजकीय लोकांचे नाव आले आहे. त्यांच्यावरही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून योग्य ती कारवाई करणार. हे तुम्हाला पुढील एक-दोन दिवसांत दिसून येईल. सुनील तटकरेंनी भाष्य करणे टाळणे दुसरीकडे, पत्रकारांनी रुपाली चाकणकरांविषयी प्रश्न केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे चांगलेच संतापल्याचे दिसून आले. सुनील तटकरे यांनी आज महाड येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमांनंतर पत्रकारांनी तटकरेंना रुपाली चाकणकरांविषयी प्रश्न केला. त्यावर ते चांगलेच संतापले. ही जागा त्या प्रकरणावर बोलण्याची नाही. मी त्यावर योग्यवेळी भाष्य करेन. मला घटनेने अधिकार दिला आहे. मला ज्यावेळी बोलायचे आहे, त्यावेळी बोलेन, असे म्हणत सुनील तटकरे पत्रकारांना टाळून तातडीने निघून गेले. सुषमा अंधारेंचे रुपाली चाकणकरांवर धक्कादायक आरोप उल्लेखनीय बाब म्हणजे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केलेत. त्या म्हणाल्या, रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिक कापली होती. हे कृत्य अशोक खरातपुढे झाले होते. खरातनेच कर्मकांडासाठी त्यांना अनामिक कापण्यास सांगितले होते. त्यातून त्यांच्या बोटाला जखम झाली. ती जखम तब्बल 4 महिने तशीच होती. याचा एक फोटो माझ्याकडे आहे. त्यात चाकणकरांनी अनामिकाला बँडेज लावल्याचे दिसून येत आहे. अशोक खरात - चाकणकरांत घरगुती संबंध सुषमा अंधारे पुढे बोलताना म्हणाल्या, रुपाली चाकणकर व अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर उपस्थित होत्या. एवढेच नव्हे तर चाकणकरांच्या घरात खरात यांची भाची राहते. प्रस्तुत प्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यामुळे त्यांची तत्काळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली पाहिजे. त्या फरार होण्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांनी यापूर्वीही आपल्या पदाचा दुरुपयोग करून या प्रकरणी अनेकांवर दबाव आणला आहे. त्या मध्यरात्री 2-2 वाजता फोन करून पीडितांना धमकी देत होत्या. त्यामुळे त्यांचा सीडीआर तपासला गेला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे व त्यांची नार्को टेस्ट केली गेली पाहिजे.
पुणे/मुंबई/नाशिक : खरातच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हीडीओ क्लिप्स सापडल्या असून त्यामुळे सत्ताधारी गटातील काही नेते तणावात आहेत. या प्रकरणात राज्यातील काही मंत्रीही त्याचे भक्त होते. ते त्याच्याकडे जाऊन विचित्र आणि घृणास्पद विधी करत होते, असा आरोप त्यांनी केला. हे व्हीडीओ सार्वजनिक झाले तर महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकते, असा धक्कादायक इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे […] The post ‘खरात फाईल्स’; सरकार धोक्यात? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एकीकडे पत्नीच्या अब्रूसाठी पोलिसांत धाव घेऊन न्याय मागितला, मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांतच पतीने मृत्यूला कवटाळल्याची हृदयद्रावक घटना लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे घडली आहे. कौटुंबिक वादातून संतापलेल्या शुभम देवीदास चित्रीत (३२) या तरुणाने राहत्या घराच्या पोर्चमध्ये नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेची पार्श्वभूमी अशी की, १५ मार्च रोजी शुभमची पत्नी गावातीलच एका भाजीपाल्याच्या नर्सरीत कामाला गेली होती. सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास ती नर्सरीत एकटी असल्याचे पाहून स्थानिक रहिवासी मुकेश रामदास उके (३६) याने तिची छेड काढली. पीडित महिलेने हा सर्व प्रकार पती शुभमला सांगितला. आपल्या पत्नीसोबत घडलेल्या या प्रकारामुळे शुभम प्रचंड मानसिक तणावात होता. या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी शुभम आणि त्याची पत्नी १८ मार्च रोजी दिघोरी (मोठी) पोलिस ठाण्यात गेले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुकेश उके याच्याविरुद्ध विनयभंगाचा (कलम ३५४) गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिस ठाण्यातून न्याय मागून घरी परतल्यानंतर पती-पत्नीमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार खडाजंगी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापलेल्या आणि वैफल्यग्रस्त झालेल्या शुभमने रात्री ८:०० वाजेच्या सुमारास घरातील नायलॉनची दोरी घेतली आणि घराच्या पोर्चमध्येच गळफास लावून घेतला. शुभमने गळफास घेतल्याचे लक्षात येताच पत्नी आणि शेजाऱ्यांनी आरडाओरडा केला. ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत पोलिसांना पाचारण केले. दिघोरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. याप्रकरणी दिघोरी पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पत्नीच्या विनयभंगाचा मानसिक धक्का आणि त्यानंतर झालेला घरगुती वाद, या दोन टोकाच्या कारणांमुळे शुभमने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. पोलिस आता या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत असून या मृत्यूमागे अन्य काही कारणे आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.
नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणी बोलताना शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या भोंदू बाबाला 'पितृतुल्य' म्हटल्याचा संदर्भ देत अत्यंत तिखट शब्दांत चाकणकरांचा समाचार घेतला आहे. ज्या खुर्चीतून न्याय मिळायला हवा, तिथेच भोंदूपणासमोर गुडघे टेकले गेले आहेत, अशा शब्दांत कोल्हेंनी आपल्या संतापाला वाट करून दिली. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, महिला आयोगातील जिजाऊंच्या फोटोला ताड्कन तडा गेला, जेव्हा तिथल्या खुर्चीला रांझ्याच्या पाटील पितृतुल्य झाला!.त्या खुर्चीतून बेगडी नैतिकता ओसंडून वाहिली.सामाजिक, कौटुंबिक की वैयक्तिक सारी सीमारेषाच पुसट झाली.काठी आधाराची होती खरी, पण स्वार्गापायी मोडून पडली, न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्येची पुन्हा एकदा शिळा झाली.सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर झुकली, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म साऱ्या साऱ्या अक्षरधनाची अक्षरश: होळी झाली, असे म्हणत खासदार कोल्हेंनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर भोंदू बाबा खरात प्रकरणावरुन अप्रत्यक्ष टीका केली आहे. अशोक खरात - चाकणकरांत घरगुती संबंध सुषमा अंधारे पुढे बोलताना म्हणाल्या, रुपाली चाकणकर व अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर उपस्थित होत्या. एवढेच नव्हे तर चाकणकरांच्या घरात खरात यांची भाची राहते. प्रस्तुत प्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यामुळे त्यांची तत्काळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली पाहिजे. त्या फरार होण्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांनी यापूर्वीही आपल्या पदाचा दुरुपयोग करून या प्रकरणी अनेकांवर दबाव आणला आहे. त्या मध्यरात्री 2-2 वाजता फोन करून पीडितांना धमकी देत होत्या. त्यामुळे त्यांचा सीडीआर तपासला गेला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे व त्यांची नार्को टेस्ट केली गेली पाहिजे. राज्यात संतापाची लाट दरम्यान, अशोक खरातविरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, 18 मार्च रोजी पहाटे त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त असून, अंकशास्त्रज्ञ म्हणून त्याने नाव कमावले होते. मात्र, या गंभीर आरोपांनंतर त्याची प्रतिमा पूर्णपणे डागाळली असून, या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
वन्यजीव व मानवी संघर्षाची एक भीषण घटना जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील बांपेवाडा येथे घडली आहे. मोहफुले वेचण्यासाठी जंगलाकडे गेलेल्या एका ५५ वर्षीय व्यक्तीचा वाघाने बळी घेतला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. मृतक वसंत गणपत मेश्राम (५५, रा. बांपेवाडा) हे गुरुवारी सकाळी आपल्या मुलीसह गावाजवळील शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेले होते. सकाळी १० च्या सुमारास त्यांनी मुलीला घरी परत पाठवले आणि स्वतः काम सुरू ठेवले. मात्र, दुपार उलटूनही वसंत घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. शोध घेतला असता, एका ठिकाणी त्यांचे साहित्य विखुरलेले आढळले आणि काही अंतरावर त्यांचा अर्धवट खाल्लेला मृतदेह सापडला. वाघाने त्यांचा मृतदेह अर्धा किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, संतप्त गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना रोखून धरले. मृताच्या पश्चात आई, पत्नी आणि चार मुली असा परिवार असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंबाला तातडीने मोठी आर्थिक मदत मिळावी. कुटुंबातील एका सदस्याला वनविभागात नोकरी द्यावी. या मागण्यांवरून काही काळ घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता, जो प्रशासनाच्या आश्वासनानंतर निवळला. वनविभागाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मृताच्या कुटुंबाला तातडीची मदत जाहीर केली आहे. त्यात रोख स्वरूपात २० हजार रुपये तर शासकीय नियमानुसार ठरलेल्या २५ लाखांच्या मदतीपैकी १० लाख रुपयांचा धनादेश रुग्णालयातच मृताच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आला. वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या भागात जाताना गावकऱ्यांनी समूहाने जावे आणि वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
म्हसवड (ता. माण, जि. सातारा) येथे अल्पवयीन मुलाची बेकायदेशीररीत्या धिंड काढून मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याच्या गंभीर प्रकरणात अद्याप कोणतीही कायदेशीर कारवाई न झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी २३ मार्च २०२६ पासून कोल्हापूर येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या प्रकरणावर प्रश्नांची सरबत्ती करत करचे यांनी पोलीस प्रशासनाला थेट लक्ष्य केले आहे. “अल्पवयीन मुलाची धिंड काढणारे पोलीस अजूनही मोकाट कसे? त्यांना संरक्षण कोण देतंय?” असा पहिला थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “पुरावे असूनही गुन्हा दाखल होत नाही. हा न्याय आहे की आंतरिक ‘सेटिंग’?” असा आरोप करत त्यांनी या प्रकरणातील विलंबावर गंभीर शंका उपस्थित केली. “सामान्य नागरिक असता तर आतापर्यंत अटक झाली असती—पोलिसांसाठी वेगळा कायदा आहे का?” असा सवाल करत त्यांनी कायद्याच्या समानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “बाल न्याय कायदा फक्त कागदावरच आहे का? की तो पोलिसांसाठी लागूच होत नाही?” असा संतप्त प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात आधीच दि. ११ मार्च रोजी म्हसवड येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई न झाल्याने संताप अधिक तीव्र झाला आहे. “धरणे आंदोलनानंतरही कारवाई नाही—म्हणजे प्रशासनाला आंदोलनाचीही भीती उरलेली नाही का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. यासोबतच, “आज त्या मुलाची धिंड काढली… उद्या इतरांच्या मुलांची काढली तर जबाबदार कोण?” असा भावनिक व तीव्र प्रश्न उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले. दरम्यान, “हा केवळ निष्काळजीपणा नाही, तर जाणीवपूर्वक आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न आहे का?” असा गंभीर आरोप करत करचे यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. त्यामुळे आता या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी न झाल्यास सोमवार दि. २३ मार्च २०२६ पासून कोल्हापूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. “न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” असा इशारा देत, या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस पोलीस प्रशासनच जबाबदार राहील, असेही त्यांनी नमूद केले.
धनंजय मुंडे आणि अशोक खरात यांची वृत्ती एकसारखीच आहे. तपास केल्यास त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध उघड होऊ शकतात. धनंजय मुंडे अनेकदा 'नाशिकला जात आहे' असे सांगत असत, परंतु ते नेमके कुठे आणि कोणाला भेटायला जात होते, याची त्यांच्या फोन रेकॉर्ड्सवरून (CDR) चौकशी व्हायला हवी, असे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. करुणा मुंडे म्हणाल्या की, रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे इतके फोटो व्हायरल झाले आहेत. ते एकमेकांना खावू घालताना दिसून येत आहे. त्यांचे पाय धुतांना दिसून येत आहे. चाकणकरानी जर त्यांच्या पदासाठी इतकी निष्ठा दाखवली असती तर राज्यातील महिलांची जी बिकट परिस्थिती आहे ती सुधारली असती. ..म्हणून राज्याची ही अवस्था झाली धनंजय मुंडे आणि अशोक खरात हे एकाच वृत्तीचे लोकं आहेत. तपास केला तर मुंडे आणि खरातांचा संबंध आहे हे उघड होऊ शकते असे मला वाटते. रुपाली चाकणकर यांना पाठिशी घालण्याचा खूप लोकं प्रयत्न करत आहेत. यापूर्वी सुद्धा असे दिसून आले की लोकप्रतिनिधीवर काही आले की त्यांना पाठिशी घातले जाते, यामुळेच राज्याची ही अवस्था झाली आहे, असे म्हणत करुणा मुंडे यांनी निशाणा साधला आहे. खरातकडे 2 ते 3 हजार कोटींची संपत्ती असू शकते करुणा मुंडे म्हणाल्या की, खरात यांच्याकडे 200 -300 कोटींची नाही तर 2 ते 3 हजार कोटी रुपयांची संपत्ती असेल.आमदार आणि मंत्र्यांचे त्यांच्यासोबत फोटो आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा त्यांच्याशी संबंध असू शकतो. कारण धनंजय मुंडे आणि अशोक खरात हे एकाच वृत्तीचे लोकं आहेत. या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांचे सीडीआर काढले पाहिजे. धनंजय मुंडे अनेक वेळा नाशिक चाललो असे सांगत होते. कुठे जात होते हे माहिती नाही ते तिथे जात होते का हे तपासले पाहिजे. खरातला राष्ट्रवादीचा पाठिंबा करुणा मुंडे म्हणाल्या की, माझा नवरा सुद्धा अशा साधू, संत, सन्यासी लोकांमध्ये असतो धनंजय मुंडे यांनी माझ्यासह मुलांवर काळी जादू केली होती. खरातला राष्ट्रवादी काँग्रेसचे पाठबळ असल्याचे दिसून येत आहे. कोणता शर्मा आहे त्यांची सुद्धा कुंडली काढली पाहिजे.
वनतारात कायद्याचे उल्लंघन नाही
नवी दिल्ली/गांधीनगर : सर्वोच्च न्यायालयाने वनताराविरुद्ध दाखल केलेली एका फाउंडेशनची याचिका फेटाळून लावली. वनताराने कोणत्याही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केले नाही, असे न्यायालयाने म्हटले. वनताराविरुद्ध ही याचिका करणार्थम विरम नावाच्या एका फाउंडेशनने दाखल केली होती. या याचिकेत केंद्र सरकार, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरण आणि इतरांना निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. यात वनतारावर प्राण्यांशी संबंधित […] The post वनतारात कायद्याचे उल्लंघन नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
परदेशी चलन देण्याच्या आमिषाने एकाची साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चार जणं विरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रसन्न मंडावले, शिवम भोजने, राजेश म्हस्के (तिघे रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर)अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे तक्रारदाराच्या ओळखीचे आहेत. आरोपीने त्यांनी अमेरिकन डाॅलर देण्याचे आमिष तक्रारदाराला दाखविले होते. त्यानंतर तक्रारदाराने आरोपींना सात लाख ४५ हजार रुपये आरोपींना दिले. पैसे दिल्यानंतर आरोपींनी त्यांना परदेशी चलन दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक एस शिरसाट पुढील तपास करत आहेत. किशोरवयीन मुलाकडून काम करून घेणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल किशोरवयीन मुलाकडून ज्युससेंटरवर काम करून घेणाऱ्या मालकावर भारतीय न्यायसंहितेच्या कलम 146 आणि बाल न्याय कायदा 79 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सत्तार मर्फत शेख (30, रा. समर्थनगर, खराडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ज्युस सेटंरच्या मालकाचे नाव आहे. याबाबत अशोक लहुराव केदार यांनी खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्तार शेख याने मुलगा हा किशोरवयी असल्याचे माहिती असताना देखील त्याच्याकडून झेनिया सी. टी. व्हिस्टा खराडी येथील आर झेड फ्रेश ज्युस सेंटवर कामाला ठेवून कमी वेतनात जास्त करून करण्यास लावले. त्या मुलाचे आर्थिक, मानसिक व शारीरीक शोषण केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून माणसाला मानवतेची जाणीव करून दिली. या आंदोलनाच्या माध्यमातून भारताला समतेकडे नेले. मुळात अस्पृश्यता व विषमता हा सर्वात मोठा अपराध आहे. त्यामुळे भावी पिढ्यांना समता व विषमता या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाड येथे बोलताना केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्याचे पाणी चाखून ऐतिहासिक सत्याग्रह केला होता. या सत्याग्रहाला आज तब्बल 100 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाडला भेट देऊन चवदार तळे जलशुद्धीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले, आमदार प्रवीण दरेकर आदी नेते व अधिकारी उपस्थित होते. विखंडित समाज नेहमी पराभूत होतो मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले, चवदार तळ्याचा सत्याग्रह हा भारताच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण होता. 'बहिष्कृत भारत'मध्ये 3 एप्रिल 1927 रोजी बाबासाहेबांनी चवदार तळ्याच्या आंदोलनाची माहिती देताना सांगितले होते की, ज्या प्रकारे फ्रेन्च राज्यक्रांतीने जगाचा इतिहास बदलला, अगदी त्याचप्रकारे या आंदोलनाने भारताचे भविष्य बदलणार आहे. गुलामगिरीच्या साखळ्या सोडून एक मोठा न्याय प्राप्त होणार आहे. भारतीय समाजात अनेक वर्षे आपल्याला गुलामगिरीत काढावी लागली. या गुलामगिरीच्या मुळाशी काय आहे? आपण सातत्याने गुलाम का झालो? हे पाहिले तर त्यामागे आमच्या समाजातील अनिष्ठ प्रथा होत्या. आमच्या समाजात अस्पृश्यता होती. आमच्या समाजामध्ये जातीभेद होता. अशा पद्धतीचा विखंडित समाज नेहमी पराभूत होतो. त्यामुळे या पराभवातून शेकडो वर्षांची गुलामगिरी आपल्याला सहन करावी लागली. अशा कुप्रथा आल्या नसत्या तर कदाचित भारत केव्हाच गुलाम झाला नसता, असे ते म्हणाले. चवदार तळे परिसराचे होणार सुशोभीकरण मुख्यमंत्र्यांनी मुख्य सोहळ्यानंतर पत्रकारांशीही संवाद साधला. त्यात त्यांनी सरकार चवदारतळ्याच्या सुशोभीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्या सत्याग्रहाच्या शताब्दीच्या निमित्ताने आम्ही येथे आलो आहोत. सरकारने बाबासाहेबांना वंदन करून चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या व इतर विविध गोष्टी उभारण्याच्या संदर्भात आराखडा तयार केला आहे. त्याचे भूमिपूजनही आम्ही येथे केले आहे. आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, भारताच्या इतिहासात चवदार तळ्याचा सत्याग्रह हा भारताला समतेकडे नेणारा होता. जेव्हा माणूस माणसाला माणूस म्हणून माणण्यास तयार नव्हता. तेव्हा बाबासाहेबांनी या सत्याग्रहाच्या माध्यमातून माणसाला मानवतेची जाणीव करून दिली. तेव्हा या देशात विषमता होती. या विषमतेने जी व्यवस्था निर्माण केली, त्या व्यवस्थेनेच आपल्याला गुलामगिरी स्वीकारावी लागली. त्यामुळे आपल्या देशात पुन्हा अशी विषमता येऊ नये यासाठी काम झाले आहे. अस्पृश्यता व विषमता हा सर्वात मोठा अपराध आहे. त्यामुळे येणाऱ्या पीढ्यांना समता व विषमतेने झालेले नुकसान या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजेत. म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे. या प्रकरणी केवळ जलशुद्धीकरणाचा विकास नव्हे तर सर्वांगीण विकास करण्यावर आमचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दुचाकीस्वार व्यावसायिकाचा ट्रकच्या धडकेत मृत्यू:पुणे-हडपसर-सासवड रस्त्यावर ऊरळी देवाची परिसरात अपघात
हडपसर-सासवड रस्त्यावर ऊरळी देवाची परिसरात ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वार व्यावसायिकाचा मृत्यू झाला. राकेश अंबादास जन्नू (वय ५०, रा. रविराज काॅलेरेडो, कोंढवा) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. फुरसुंगी पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जन्नू यांचा चुलतभाऊ राहुल (वय ४२) यांनी याबाबत फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश जन्नू हे हडपसर-सासवड रस्त्याने जात असताना भरधाव ट्रकने त्यांना ऊरळी देवाची परिसरात धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या राकेश यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक पवार पुढील तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भरधाव वेगामुळे होणाऱ्या गंभीर अपघातांमध्ये पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांचा मृत्यू होत आहे. गेल्या आठवडाभरात अशा वेगवेगळ्या अपघातांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. कात्रज येथील प्राणीसंग्रहालयातून झाडे चोरीचा प्रयत्न पुणे शहरातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या आवारात शिरलेल्या चोरट्यांनी झाडे कापून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चोरट्यां विरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुरक्षारक्षक श्रीपती देवीदास कसबे (वय ३०, रा. शिवनेरीनगर, कोंंढवा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या आवारात मध्यरात्री चोरटे शिरले. चोरट्यांनी आवरातील चंदनाची चार झाडे कापून नेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर चोरटे पसार झाले. यापूर्वी प्राणी संग्रहालयाच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी प्राणीसंग्रहालयास भेट दिली असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. प्राणीसंग्रहालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेेरे बसविण्यात आले आहेत. चित्रीकरण तपासून चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील तपास करत आहेत.
नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या छायाचित्रांमध्ये नीलेश लंके, जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर आणि दीपक केसरकर यांसारख्या अनेक नेत्यांसोबत खरात दिसत आहे. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या संबंधांवरून विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. खरातसोबतचे त्यांचे फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये हार घालताना, पूजा करताना आणि भेट घेतानाचे फोटो व्हायरल झाल्याने या प्रकरणाला अधिक राजकीय रंग चढला आहे. दरम्यान, एका 35 वर्षीय महिलेने केलेल्या तक्रारीनुसार नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयात तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. अशोक खरात याने धार्मिक श्रद्धेचा आधार घेत तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मंत्रतंत्राच्या नावाखाली तिला कार्यालयात बोलावून गुंगीकारक पदार्थ देत अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. धमक्या देऊन आणि भीती दाखवून हा प्रकार वारंवार घडल्याचेही समोर आले आहे. ऐश्वर्यशाली जीवनशैली अशोक खरात हा मर्चंट नेव्हीत 22 वर्षे सेवा करून निवृत्त झाला होता. त्याने 154 देशांचा प्रवास केल्याची चर्चा असून, त्यानंतर तो अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे स्थापन केलेल्या ट्रस्टचा तो अध्यक्ष होता, ज्यामध्ये रुपाली चाकणकर सदस्य असल्याचेही समोर आले आहे. अनेक मोठे नेते आणि सेलिब्रिटी भविष्य जाणून घेण्यासाठी त्याच्याकडे येत असल्याने त्याची ओळख वाढली होती. खासगी विमानाने प्रवास आणि ऐश्वर्यशाली जीवनशैलीमुळे तो नेहमी चर्चेत राहिला होता, मात्र आता या सर्व गोष्टींवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘एआय’मुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ४४२ अब्ज डॉलर्सचा फटका
नवी दिल्ली : जगभरातील आर्थिक फसवणुकीच्या वाढत्या प्रमाणाने आता एका भीषण संकटाचे रूप धारण केले असून, गेल्या वर्षभरात म्हणजेच २०२५ मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला तब्बल ४४२ अब्ज अमेरिकन डॉलर्सहून अधिक रकमेचा फटका बसला आहे. फ्रान्समधील ल्योन येथे मुख्यालय असलेल्या ‘इंटरपोल’ या जागतिक पोलिस सहकार्य संघटनेने आपल्या ‘२०२६ जागतिक आर्थिक फसवणुकीच्या धोक्याचे मूल्यांकन अहवालात ही माहिती प्रसिद्ध […] The post ‘एआय’मुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ४४२ अब्ज डॉलर्सचा फटका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारताने ८८० नागरिकांना आणले मायदेशी
नवी दिल्ली : पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षाने भीषण रूप धारण केले असून, या युद्धाच्या आगीत अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक देशांनी आपले एअरस्पेस बंद केल्यामुळे भारतीयांना मायदेशी आणण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर होते. मात्र, भारताने अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांच्या मदतीने एक नवा सुरक्षित मार्ग […] The post भारताने ८८० नागरिकांना आणले मायदेशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तेहरान : मध्यपूर्वेतील युद्ध आता तेल उत्पादक देशांच्या मुळावर उठले आहे. कतारनंतर आता इराणने कुवेतच्या प्रमुख मीना अल-अहमदी रिफायनरीवर मध्यरात्री मोठा ड्रोन हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे रिफायनरीच्या काही युनिट्समध्ये भीषण आग लागली असून कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने खबरदारीचा उपाय म्हणून तेल उत्पादन तात्पुरते थांबवले आहे. सौदी अरेबियाच्या अधिका-यांनी व्यक्त केलेली भीती आता खरी ठरताना दिसत […] The post कच्चे तेल १८० डॉलर्सवर जाणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
धुरंधर २ ठरला बॉलिवूडचा सगळ्यात मोठा ओपनर
मुंबई : आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ ने प्रदर्शित होताच अख्खे मार्केटच खाऊन टाकले आहे. पहिल्याच दिवशी धुरंधर २ ने बॉक्स ऑफिसवर धुव्वा उडवला आहे. प्रदर्शनाच्या दिवशीच धुरंधर २ ने १०० कोटींच्या पेक्षाही जास्त कमाई केली आहे. केवळ देशातच नाही तर परदेशातही सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. धुरंधर २ च्या पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन […] The post धुरंधर २ ठरला बॉलिवूडचा सगळ्यात मोठा ओपनर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देवाभाऊंच्या नेतृत्वात तिपटीने वाढली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये महाराष्ट्राचा तिपटीने विकास देवाभाऊंच्या नेतृत्वात होत आहे. सर्वाधिक गुंतवणूक देवाभाऊमुळे महाराष्ट्रात येत आहे, राज ठाकरेंना मला सांगायचे आहे की अर्धवट माहितीची आधारे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर टीका करू नका, असे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. देवाभाऊ हे महाराष्ट्र आणि मुंबईला पुढे घेऊन जात आहे. या विकास यात्रेत राज ठाकरेंचे स्वागत आहे, सूचना करा टीका करू नका अन्यथा आकडेवारीसह उत्तर दिले जाईल. नवनाथ बन म्हणाले की, खरात नावाच्या भोंदू बाबाचे भक्त अनेक ठिकाणी होते. पण फोटो काढले म्हणून कोणी दोषी होते असे नाही. एकही मंत्री या कृत्याला साथ दिलेली दिसत नाही. या प्रकरणी सखोल तपास करण्याचे काम सुरू आहे. फोटो आहे म्हणून मंत्र्यांवर कारवाई करता येणार नाही, तपास करत चौकशीअंती जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येतील. नार्वेकर यांचे फोटो समोर आले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राऊत करणार आहेत का? असा सवाल बन यांनी केला आहे. नेत्यांसोबत काढलेल्या फोटोचा गैरफायदा हे भोंदू लोक करत असतात. कुणालाही सोडले जाणार नाही नवनाथ बन म्हणाले की, गुढीपाडव्यानंतर जनाब संजय राऊत यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला दिसतो आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्रकार परिषदेमध्ये कौतुक केले आहे. देवाभाऊंचे कामच असे आहे की गेली 3 टर्म जनता त्यांचे कौतुक करते. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जात नाही, मग तो खरात फाईल्स असो की पाटकर फाईल्सअसो. त्यामुळे राऊतांनी देवाभाऊंचे कौतुक केले आहे. खरात फाइल्समध्ये जे कोणी दोषी आढळेल त्या सर्वांवर कारवाई करण्यात येतील. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. कुणालाही सोडले जाणार नाही. अनेकांचे फोटो समोर नवनाथ बन म्हणाले की, त्या भोंदूसोबत जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर यांचे फोटो समोर आले आहेत. कदाचित संजय राऊत यांच्यासोबतचे असतील मला माहिती नाही. पण फोटो असला म्हणजे संबंध असतीलच असे काही नाही. रुपाली चाकणकर यांचे वेगवेगळे फोटो समोर आले आहेत. त्या प्रकरणी सखोल तपास करत कारवाई झाली पाहिजे. राजकीय लागेबांधे आहेत म्हणून कुणालाही पाठिशी घातले जाणार नाही ते कुणीही असो. गृहविभागाने कारवाई केली नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्राची परंपरा धुळीस मिळवण्याची काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. आमच्या काळात भोंदू बाबा असो की कुणीही चुकीचे काम करणारी व्यक्ती त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार. कारवाई करण्यासाठी धाडस लागते ती गृहविभागाने दाखवली आहे. ठाकरेंनी अनेकांना पाठिशी घातले होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केलेत. रुपाली चाकणकर व भोंदूबाबा अशोक खरात याच्यात घरगुती संबंध होते. त्या तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिकाही कापली होती. या प्रकरणी त्यांना तत्काळ अटक झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भोंदूबाबा अशोक खरातशी कथित संबंध असल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची व त्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी त्यांच्या नार्कोटेस्टचीही मागणी केली. त्या एका पीडितेचा दाखला देत म्हणाल्या, रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिक कापली होती. हे कृत्य अशोक खरातपुढे झाले होते. खरातनेच कर्मकांडासाठी त्यांना अनामिक कापण्यास सांगितले होते. त्यातून त्यांच्या बोटाला जखम झाली. ती जखम तब्बल 4 महिने तशीच होती. याचा एक फोटो माझ्याकडे आहे. त्यात चाकणकरांनी अनामिकाला बँडेज लावल्याचे दिसून येत आहे. अशोक खरात - चाकणकरांत घरगुती संबंध सुषमा अंधारे पुढे बोलताना म्हणाल्या, रुपाली चाकणकर व अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर उपस्थित होत्या. एवढेच नव्हे तर चाकणकरांच्या घरात खरात यांची भाची राहते. प्रस्तुत प्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यामुळे त्यांची तत्काळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली पाहिजे. त्या फरार होण्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांनी यापूर्वीही आपल्या पदाचा दुरुपयोग करून या प्रकरणी अनेकांवर दबाव आणला आहे. त्या मध्यरात्री 2-2 वाजता फोन करून पीडितांना धमकी देत होत्या. त्यामुळे त्यांचा सीडीआर तपासला गेला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे व त्यांची नार्को टेस्ट केली गेली पाहिजे. सुषमा अंधारेंना धमकीचे फोन अंधारे यांनी सांगितले की, प्रस्तुत प्रकरणात अनेक महिलांचा लैंगिक छळ झाला. पण भीतीपोटी त्या त्या अद्याप तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. तपास यंत्रणांनी याची सखोल चौकशी करावी. त्यांच्याकडे तीन पीडित महिलांनी माहिती दिली असून, त्यांना पोलिस संरक्षण पुरवण्याची गरज आहे. मला स्वतःलाही धमकीचे अनेक फोन येत आहेत. पत्रकार परिषदेला येण्यापूर्वी 8 वेगवेगळ्या नंबरवरून हे फोन आले. त्यात अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ करण्यात आली. मी याविषयी पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहे. खरात याच्या ट्रस्टवरील लोकांची माहितीही या प्रकरणी गोळा केली जात आहे. सुनेत्रा पवारांना कारवाईचे साकडे अंधारे यांनी आरोप केला की, गेल्या एक वर्षापासून अशोक खरात विरोधात तक्रारी येत आहेत. पण राज्य महिला आयोगाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. महिला आयोगाचे काम महिलांचे सबलीकरण आणि समुपदेशन करणे असताना, रुपाली चाकणकर यांनी नेहमी याच्या विरोधात काम केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर तातडीने आणि ठोस कारवाई करावी, अशी मागणीही अंधारे यांनी केली.
तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. यामध्ये आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांचे खरातांसोबतचे नवे फोटो पोस्ट केले आहेत. तर दुसरीकडे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे खरातचे फोटो समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. अंजली दमानिया यांनी अशोक खरात आणि रूपाली चाकणकर यांचे एकत्रित फोटो ट्विट केले आहेत. भोंदू बाबा'ला कोणाचे अभय होते, असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे. या फोटोंमुळे महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ह्या रुपाली चाकणकरांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा, अशी मागणी सुद्धा दमानिया यांनी केली आहे. नराधम भोंदू बाबाची मुजोरी...- वडेट्टीवार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणी पोस्ट करत म्हटलंय की, अशोक खरात या अत्याचारी भोंदू बाबाच्या कुटुंबीयांनी मुजोरीची परिसीमा गाठली आहे. त्यांच्या आलिशान बंगल्यातून बाहेरील पत्रकारांवर चपलांचा मारा करत पत्रकारांना कुत्र्याचा धाक दाखवायचा प्रकार खरात कुटुंबीयांनी केला आहे. खरंतर अशोक खरातचे कृत्य त्या बिचाऱ्या श्वानालाही लाजवणारे आहे. मात्र आपले भक्त सत्तेत आहेत, आपलं कोणी काही वाकड करू शकणार नाही हा माज या खरात कुटुंबियांच्या कृत्यातून दिसून येत आहे. राज्य सरकारने या प्रकरणावर अजिबात पांघरून घालू नये, अशोक खरातसह त्याच्या कुटुंबियांवर कारवाई करावी, या खरातच्या चरणी लीन असलेल्या सत्ताधाऱ्यांना पदावरून तातडीने बडतर्फ करावे. अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचा संशय- विखे या प्रकरणी बोलताना सुजय विखे म्हणाले की, मी अशोक खरातला कधीही भेटलेलो नाही किंवा त्याच्याशी संपर्क साधलेला नाही. मात्र त्यांची सिन्नरसह फक्त शिर्डी नव्हे तर अनेक ठिकाणी त्याच्या मालमत्ता असल्याची माहिती माझ्याकडे आहे. शिर्डी सोबतच राहाता, साकुरी आणि अन्य गावांमध्येही त्याने मालमत्ता खरेदी केल्याचे मला कळल्याचे सुजय विखेंनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. सीआयडी-एसआयटी तपास सुरू अशोक खरातच्या अटकेनंतर या प्रकरणाची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून, संबंधित अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य पाहून शासनाने हा तपास सीआयडी (CID) आणि एसआयटी (SIT) कडे सोपवला आहे. या तपासातून खरातच्या अफाट संपत्तीचे आणि त्याच्या जाळ्यात अडकलेल्या इतर बड्या नावांचे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात संतापाची लाट दरम्यान, अशोक खरातविरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, 18 मार्च रोजी पहाटे त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त असून, अंकशास्त्रज्ञ म्हणून त्याने नाव कमावले होते. मात्र, या गंभीर आरोपांनंतर त्याची प्रतिमा पूर्णपणे डागाळली असून, या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
तेलंगणातील आमदार टी राजा सिंह यांनी मोगल बादशहा औरंगजेब याच्याविषयी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. औरंगजेबाची खुलताबादलगतची कबर हटवून त्या जागी मूत्रालय अर्थात शौचालय बनवा, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे औरंगजेबाच्या कबरीचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची येण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथील 'हिंदू राष्ट्र जागृती सभे'च्या रॅलीला मार्गदर्शन करताना टी राजा सिंह यांनी उपरोक्त विधान केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवावी. त्या ठिकाणी मूत्रालय बांधावे. तुम्ही असे केले तर हिंदू तुमचा विजय कायमस्वरुपी निश्चित करतील. ते तुम्हाला कधीही विसरणार नाहीत. हे तत्काळ झाले पाहिजे. कारण, औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या केली होती. संभाजीराजांची हत्या करणाऱ्या व्यक्तीची कबर महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीवर असणे आम्ही कदापि सहन करणार नाही. काही नेते असा प्रश्न उपस्थित करतात की, आम्ही औरंगजेबाची कबर हटवण्याची भाषा का करतो? पण माझ्याही ही बाब तीव्र वेदनेचा स्त्रोत आहे. मी जेव्हा केव्हा संभाजीनगरला येतो तेव्हा औरंगजेबाची कबर पाहताच आमचा अंतरात्मा अस्वस्थ होतो. मन व्यथित होतो. त्यामुळे आम्ही हा विषय असाच सोडून देणार नाही. कबर हटणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही टी राजा सिंह पुढे म्हणाले की, औरंगजेबाच्या कबरीचे नामोनिशाण मिटत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही हा मुद्दा सोडणार नाही. माझ्या बहिणींनी सावध राहावे. औरंगजेबाचे अनुयायी इस्लामिक राष्ट्र स्थापन करण्याचा खूप मोठा कट घेऊन पुढे जात आहेत. लव्ह जिहादच्या नावाने आमच्या मुली-बहिणींची शिकार केली जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे टी राजा यांनी आपल्या भाषणात अनेकदा अपशब्दांचाही वापर केला. तसेच सीटीटीव्ही जिहादवरही भाष्य केले. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणारे काही अतिरेकीही पकडण्यात आलेत. हे अतिरेकी या सीसीटीव्हींच्या माध्यमातून मिळणारे फुटेज पाकिस्तानला पाठवत होते, असे ते म्हणाले. हिंदू महिलांनी धर्माचा प्रचार करावादरम्यान, टी राजा सिंह यांनी यावेळी हिंदू महिलांना धर्माचा प्रचार-प्रसार करण्याचेही आवाहन केले. हिंदू महिलांनी आठवड्यातून किमान 1 तास आपल्या धर्माचा प्रचार - प्रसार करावा. सर्वप्रथम आपल्या नातेवाईकांना हिंदुत्वाविषयी जागृत करावे. त्यांना लव्ह जिहादची माहिती द्यावी. तुमची मुलगी अजून लहान असली तरी तिला व इतर भगिनी व मुलींनाही हे जिहादी कशा प्रकारे आपल्या जाळ्यात ओढतात हे समजावून सांगितले पाहिजे, असे टी राजा सिंह म्हणाले. हे ही वाचा... औरंगजेबाची कबर खुलताबादलाच का?:मातीच्या साध्या कबरीमुळे राज्याच्या शांततेची माती कशी झाली? अखेर कसे गेले औरंगजेबाचे अखेरचे दिवस? औरंगजेबाच्या कबरीमुळे अवघ्या महाराष्ट्राची शांतता भंग पावली आहे. राज्याचे मत्सोद्योग व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी सर्वप्रथम औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली. त्यानंतर एकच कहर झाला. हिंदुत्ववादी संघटनांनी थेट औरंगजेबाची कबरच हटवण्याची घोषणा केली. यासाठी त्यांनी राज्यभर आंदोलन केले. त्याचे तीव्र पडसाद नागपुरात उमटले. तिथे मोठी जाळपोळ झाली. संचारबंदी लावण्याची वेळ आली. चला तर मग या वादाच्या निमित्ताने औरंगजेबाची कबर औरंगाबादच्या खुलताबादमध्येच का बांधण्यात आली? तथा त्याच्या मातीच्या साध्या कबरीमुळे राज्याच्या शांततेची माती कशी झाली? याचा धुंडाळा घेऊया... वाचा सविस्तर
खरात प्रकरणात ऑफिसबॉयचा धक्कादायक कट उघड:नीरज जाधवचा ब्लॅकमेलिंग प्लॅन फसला, खरातचा काळा चेहरा समोर
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली असताना आता या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण मिळाले आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अटकेत असलेल्या खरातच्या कारवायांमागे त्याचाच विश्वासू ऑफिसबॉय नीरज जाधव हा महत्त्वाचा सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महिलांवरील अत्याचारांचे व्हिडिओ वापरून मोठ्या पैशांची मागणी करण्याचा कट उघड झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, खरातने महिलांचे लैंगिक शोषण करत त्याचे व्हिडिओ आणि फोटो कार्यालयातील सीसीटीव्ही प्रणालीत साठवून ठेवले होते. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ‘ओजस प्रॉपर्टीज’ या ठिकाणी हे सर्व प्रकार घडत होते. डिसेंबर 2025 मध्ये नीरज जाधव याने खरातच्या नकळत या 58 महिलांशी संबंधित व्हिडिओ आणि इतर पुरावे चोरून नेले. त्यानंतर पैशांच्या लालसेपोटी त्याने या सामग्रीचा वापर करून ब्लॅकमेलिंगची योजना आखली. सुरुवातीला नीरजने या व्हिडिओंच्या आधारे थेट खरातलाच पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र, खरातने त्याकडे दुर्लक्ष करत उलट त्याच्याविरोधात वावी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचे समोर आले. त्यानंतर नीरजने आपली दिशा बदलत थेट पीडित महिलांनाच लक्ष्य केले. शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहित महिलेला मॉर्फ फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठवून धमकावण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याचदरम्यान, मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका पीडितेला नीरजने प्रत्यक्ष गाठून तिला संबंधित व्हिडिओ दाखवले. घाबरलेल्या महिलेने ही बाब खरातच्या कानावर घातली, मात्र स्वतःची बाजू वाचवण्यासाठी त्याने तिलाच पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान, खरातकडून पैसे मिळण्याची शक्यता कमी झाल्याने नीरजने सिडको येथील दुसऱ्या एका 28 वर्षीय विवाहित महिलेचा व्हिडिओ तिच्या नातेवाईकाला पाठवला. मात्र, याच घटनेमुळे प्रकरण उघडकीस आले आणि पीडितेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष तपास पथक स्थापन या गंभीर प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यासाठी राज्य शासनाने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून पथकाचे नेतृत्व तेजस्वी सातपुते करत आहेत. त्यांनी नाशिकमध्ये येऊन कागदपत्रांची तपासणी करत खरातची सखोल चौकशी केली आहे. दरम्यान, नीरज जाधवला ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाचे धागेदोरे राजकीय नेते, मंत्री आणि सेलिब्रिटींपर्यंत पोहोचत असल्याने तपास अधिकच संवेदनशील बनला आहे.
रुपाली चाकणकर मामा मला वाचवा म्हणाले आणि लगेच तुम्ही पळाला का? खरात प्रकरणी मंत्री दत्ता भरणेदेखील लाभार्थी आहेत का? असा सवाल संगिता तिवारी यांनी केला आहे. तर दत्ता भरणे चाकणकरांना का क्लीन चीट देत आहेत? असा सवाल करत त्यांनी दत्ता भरणेंवर टीका केली आहे. संगिता तिवारी म्हणाल्या की, भरणे मामा म्हणताय की रुपाली चाकणकरांची चूक नाही. अहो भरणे मामा तुम्ही काय बोलता आहात? महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांची काही चूकी नाही, अहो मामा त्यांनी मामा मला वाचवा अशी हाक देताच तुम्ही पळत त्यांना वाचवण्यासाठी धावून आलात, तुम्ही त्यामध्ये लाभार्थी आहात का? कशाला बाजू का घेत आहात? टीव्हीवर सगळे काही दाखवत असताना तुम्ही बाजू का घेत आहात? पत्रकार खोटे नाहीत ना? असे म्हणत भरणे यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान या प्रकरणी बोलताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, खरात प्रकरणाची संपूर्ण माहितीच दत्तात्रय भरणे यांच्याकडे नाही. त्यांनी काय सांगितले की मी कार्यक्रमाला जातो, तेव्हा कुणीही फोटो काढतो, नेत्यांसोबत फोटो काढता हे खरे आहे पण कुणीहरी आपल्या मंत्रीपदाच्या लेटर हेडवर पत्र देत नाही. भरणे मामांना संपूर्ण माहितीच नाही. म्हणून त्यांच्याकडून चूकून हे वक्तव्य झाले आहे असे मी म्हणेल. दत्ता भरणे काय म्हणाले? मंत्री दत्ता भरणे यांनी या प्रकरणी बोलताना म्हटले की, या प्रकरणी रुपाली चाकणकर यांचा काही दोष नाही. काही कार्यक्रमानिमित्त चाकणकरांची आणि महाराजांची भेट झाली असेल, शेवटी आपण कुणाला तरी गुरू मानतो, यात रुपाली चाकणकर यांचा काही दोष नाही. कोणासोबत फोटो काढला तर ती काय चूक आहे का? नाही ना. ‘चॉइस पोस्टिंग’साठी सरकारी अधिकारी खरातच्या दरबारात उपजिल्हाधिकारी कधी होणार? अपर जिल्हाधिकारी म्हणून प्रमोशन कधी मिळेल? किंवा पोलिस उपअधीक्षक पदावर पोस्टिंग कुठे मिळेल? एमपीएससी आणि यूपीएससी पास होऊन सनदी अधिकारी झालेले अनेक जण असे प्रश्न ज्योतिषाच्या दारात रांगा लावून विचारत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या या महिला अत्याचारी ज्योतिषी अशोक खरातला स्वतःला कधी अटक होणार, याचे मात्र साधे भविष्यही ओळखता आले नसल्याची चर्चा आता रंगली आहे. याचबरोबर या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील पैशांची खरातच्या माध्यमातूनच जमिनींमध्ये सुमारे 100 कोटींहून अधिक गुंतवणूक केल्याची बाब उघडकीस येण्याची शक्यता आहे. दुसऱ्याचे भविष्य सांगणाऱ्या आणि अधिकारी- राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषाचे स्वतःचे भविष्य आता कोठडीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या अशोक एकनाथ खरात याच्या काळ्या कृत्यांचा पाढा वाचला जात आहे. या भोंदूच्या मायाजालात महसूल आणि पोलिस दलातील बडे अधिकारीही अडकल्याचे उघड होत आहे. थेट मंत्रालयातून हलली सूत्रे हायप्रोफाइल बाबा अशोक खरात ऊर्फ कॅप्टनने पोलिस कोठडीत चुप्पी साधली असून रात्रभर तो गुन्हे शाखेच्या कार्यालयात जप करत स्वतःच्याच भविष्यासाठी अंकगणिताची जुळवाजुळव करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खरातसोबत म्हाडा भूखंड घोटाळ्यातील संशयित हायप्रोफाइल मोनू मनवानी, सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याचाही कायद्याच्या बालेकिल्ल्यात ‘पाहुणचार’ करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करण्याकरता स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात आली असून, प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी खरातच्या अंकगणिताचा दोन तास क्लास घेतला.
नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात मोठी खळबळ उडवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या प्रकरणाची तुलना थेट जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी करत जगात एपस्टीन फाईल्स गाजतात, तसेच महाराष्ट्रात आता खरात फाईल्स गाजत आहेत, असा स्फोटक दावा केला. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे अटकेत असलेल्या अशोक खरात याला न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, राज्यातील काही बडे राजकीय नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटी त्याच्या संपर्कात होते, अशी चर्चा रंगली आहे. याशिवाय त्याने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवल्याचेही आरोप होत आहेत, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. दरम्यान, या कारवाईबाबत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनही केले. त्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून अत्यंत गुप्तपणे या प्रकरणाची चौकशी सुरू होती. गृहखात्याच्या माध्यमातून आखलेल्या कारवाईमुळे या प्रकरणाची पाळेमुळे उखडली जात आहेत. अशा प्रकारच्या घटनांनी महाराष्ट्राची बदनामी होते. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री जर या प्रकरणात स्वच्छता मोहीम राबवत असतील, तर ते कौतुकास पात्र आहे, असेही राऊत म्हणाले. व्हिडिओ सार्वजनिक झाले तर सरकार कोसळू शकते राऊत यांनी पुढे आणखी गंभीर आरोप करत सांगितले की, खरातच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप्स सापडल्या असून त्यामुळे सत्ताधारी गटातील काही नेते तणावात आहेत. या प्रकरणात राज्यातील काही मंत्रीही त्याचे भक्त होते. ते त्याच्याकडे जाऊन विचित्र आणि घृणास्पद विधी करत होते, असा आरोप त्यांनी केला. पोलिसांनी जप्त केलेल्या पेन ड्राइव्हमध्ये 58 व्हिडिओ असल्याचा दावा करत, हे व्हिडिओ सार्वजनिक झाले तर महाराष्ट्रातील सरकार कोसळू शकते, असा धक्कादायक इशाराही त्यांनी दिला. सरकारनेच चाकणकर यांना पदावरून हटवावे याचवेळी, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही राऊत यांनी टीका केली. खरातसोबत त्यांचे फोटो समोर आल्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. त्या स्वायत्त संस्थेच्या प्रमुख असल्या तरी त्यांची नियुक्ती सरकारनेच केली आहे. त्यामुळे सरकारनेच त्यांना पदावरून हटवावे, अशी स्पष्ट भूमिका राऊत यांनी मांडली. या सर्व घडामोडींमुळे खरात प्रकरण आता केवळ गुन्हेगारी चौकशीपुरते मर्यादित न राहता मोठ्या राजकीय वादळात रूपांतरित होताना दिसत आहे.
शहराला गेल्या 25 वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सायफन पद्धतीने पाणी घेण्यास सुरुवात करण्यात आली. नाथसागरातील जॅकवेल 1 तास 20 मिनिटांत 7 फूट भरले. आता सुमारे 38 किलोमीटरची पाइपलाइन महिनाभरात धुऊन 200 एमएलडी वाढीव पाणी नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचणार आहे. हा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मे महिन्याच्या शेवटी शहरात नळाला एक ते दोन दिवसांआड पाणी मिळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यातील नाथसागरातील उद्भव विहिरीत (जॅकवेल) पाणी घेण्याचा गुढीपाडव्याचा मुहूर्त ठरला होता. त्यानुसार सायंकाळी 4.40 वाजता विहिरीत पाणी घेण्यास सुरुवात झाली. त्याआधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्या हस्ते जलपूजन झाले. या वेळी महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जीव्हीआर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक महेंद्र गुगलोथू, खलील खान, मनपा आणि जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. असे योजनेचे टप्पे 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते योजनेचे भूमिपूजन2021 : जीव्हीपीआरसोबत निविदेनुसार करार2022 मध्ये जॅकवेलचे डिझाइन मंजूर2024 : नाथसागरात सौम्य ब्लास्टिंगसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार परवानगी2024 मध्ये पीसीसी सुरू2026 मध्ये जॅकवेलचा पहिला टप्पा पूर्ण19 मार्च 2026 रोजी सायंकाळी जॅकवेलमध्ये पाणी आले ऐन पाडव्याच्या दिवशी जलवाहिनीला भगदाड छत्रपती संभाजीनगर | रेल्वे स्टेशन ते ज्युबिली पार्क ही मुख्य जलवाहिनी फुटल्याने ऐन पाडव्याच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमधील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. परिणामी आता पाण्याचा टप्पा एका दिवसाने पुढे ढकलला जाणार आहे. बुधवारी (18 मार्च) मध्यरात्री दोनच्या सुमारास रेल्वे स्टेशनकडून ज्युबिली पार्ककडे येणारी 700 मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी अचानक फुटली. जलवाहिनीतील पाण्याचा दाब मोठा होता. काही वेळातच रस्त्यावर पाण्याचे लोट वाहू लागले. माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने रेल्वे स्टेशन गेटसमोरील व्हॉल्व्हवरून पाणीपुरवठा तत्काळ बंद केला. या बिघाडामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातील वितरण व्यवस्था कोलमडली. या भागातील पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला. . बुढीलेन, जुना बाजार, आसेफिया कॉलनी, जयभीमनगर, घाटी परिसराला फटका बसला. महिनाभर चालणार पाइपलाइन स्वच्छतेचे काम न्यायालयाच्या आदेशानुसार 22 किंवा 23 मार्चला पंप सुरू करायचे आहेत. 100 एमएलडी पाणी उपसा करणारे 2 पंप तयार आहेत. पाइपलाइनच्या सपोर्टसाठी अनेक ठिकाणी बांधलेले चेअर्स निकृष्ट असल्याचे समोर आले होते. पंप सुरू करताना हे चेअर्स दुरुस्त झाले का, याची शहानिशा होणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतरच पंप सुरू होतील. त्यानंतर पुढील महिनाभर पाइपलाइन स्वच्छ करण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी 12 ठिकाणी पाणी काढून टाकण्यासाठी व्हॉल्व्ह बसवण्यात आले आहेत. सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये पाणी पाणीपुरवठा योजनेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये पाणी घेण्यात यश आले आहे. टेस्टिंग झाल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रातून शहरातील जलकुंभांमध्ये पाणी पोहोचवले जाणार आहे. तेथून घरांपर्यंत पाणीपुरवठा केला जाईल. - मनीषा पलांडे, मुख्य अभियंता, एमजेपी लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याने टप्पा पूर्ण पाणी योजनेचा एक टप्पा पूर्ण झाला ही शहरासाठी आनंदाची बाब आहे. मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट, लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्यामुळे हे काम करता आले. - जी. श्रीकांत, आयुक्त मनपा न्यायालयाच्या रेट्यामुळेच पाणीपुरवठा योजनेला गती 2,740 कोटी रुपयांची ही राज्यातील सर्वात मोठी पाणी योजना असल्याचा गवगवा झाला. निविदा हैदराबादच्या जीव्हीपीआर कंपनीला मिळाली. कोरोना काळात मजूर मिळाले नाहीत. काम रखडले. कंपनी काम सोडणार अशी अफवा पसरली. कंपनीने मे 2024 मध्ये जॅकवेलसाठी पीसीसी सुरू केले. अवघ्या 20 महिन्यांत जॅकवेलचा पहिला टप्पा पूर्ण केला. यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाच्या रेट्यानंतरच कामाला गती मिळाली. कालबाह्य जलवाहिनीमुळे संकट 700 मिमी जलवाहिनीचे आयुष्य 30 वर्षांचे होते. मात्र, ती 50 वर्षांपेक्षा अधिक काळापासून वापरात आहे. यामुळे ही जलवाहिनी वारंवार निखळत असून, त्यामुळे जुन्या शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून उशीर होत असल्याने नागरिकांना या उन्हाळ्यातही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री काळाराम मंदिरावर अयोध्या येथील राममंदिराप्रमाणे धर्मध्वजा फडकणार आहे. मंदिराच्या कळसापासून तब्बल 21 फूट उंच ध्वजदंडावर ही ध्वजा फडकवली जाणार आहे. हा संपूर्ण ध्वजदंड 360 डिग्रीमध्ये फिरेल अशा चेंबरमध्ये स्थापित करण्यात येणार आहे. हा धर्मध्वज मंदिराच्या आध्यात्मिक गौरव, परंपरा आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक ठरणार असल्याचा विश्वास विश्वस्तांनी व्यक्त केला. मंदिरात कुंभमेळ्याच्या दृष्टीने विविध कामे हाती घेणार असल्याचे वासंतिक नवरात्रौत्सव प्रारंभ सोहळ्यात सांगण्यात आले. यावेळी सह धर्मादाय उपायुक्त महावीर योगी, संस्थानच्या अध्यक्षा रेखा पांढरे यांच्यासह संस्थानचे विश्वस्त उपस्थित होते. धर्मध्वजावर दिसणार, सूर्य, ओम अन् कोविदार वृक्ष धर्म, परंपरा, संस्कृतीचे जतन कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संस्थानकडून परंपरेचे जतन करत विकासाला प्राधान्य देण्याचा संकल्प आहे. ही धर्मध्वजा धर्म, परंपरा, संस्कृतीचे जतन करतानाच श्रद्धास्थान ठरणार आहे. - अमित कोठवदे, विश्वस्त
जिल्ह्याच्या राजकारणाचे ‘मिनी मंत्रालय’ समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत भाजपने अनपेक्षित ‘राजकीय सर्जिकल स्ट्राइक’ करत सत्ताहस्तगत केली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या संस्थेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), प्रहार जनशक्ती पक्ष आणि अपक्ष सदस्यांची मोट बांधून बहुमताचा आकडा गाठला. भविष्यात शिवसेनेकडून अविश्वास ठराव आणत सत्तेला सुरुंग लागू नये यासाठी राष्ट्रवादी आणि अपक्षांना सभापती पदासह स्थायी समितीत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मंगळवारपर्यंत शिवसेनेकडे बहुमताचा ‘मॅजिकनंबर’ असल्याचे चित्र होते. मात्र, पडद्यामागून सुरू असलेल्या हालचालींत भाजपने राष्ट्रवादी आणि प्रहारच्या सदस्यांना आपल्या गोटात खेचण्यात यश मिळवले. शिवसेनेच्या रणनीतीला छेद देत भाजपने अविनाश गलांडे आणि जितेंद्र जैस्वाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या सत्तांतरामागे केवळ संख्याबळ नसून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात वर्चस्व निर्माण करण्याची भाजपची दीर्घकालीन खेळी दिसून येते. शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपने पारंपरिक विरोधकांशीही जुळवून घेतल्याचे यातून स्पष्ट होते.जिल्ह्यात 1 खासदार 6 आमदार असूनही मनपा आणि जिल्हा परिषद ताब्यात घेण्यास शिवसेनेला अपयश आले आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री देखील शिवसेनेचाच आहे. सत्तापालट करण्यासाठी शिवसेनेची रणनीती सत्ता हातातून गेल्याने शिवसेना आता आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. कायदेशीर पेच निर्माण करणे किंवा सदस्यांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी‘ फोडाफोडी’चे राजकारण सुरू होऊ शकते. जिल्हा परिषदेवरील या वर्चस्वाचा थेट परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांवर होईल. भाजप आता या सत्तेचा वापर करून ग्रामीण भागात आपली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. मित्रपक्षांना निधी वाटपात देणार अधिक झुकते माप जिल्हा परिषदेतील सर्वात शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या‘स्थायी समिती’मध्ये मित्रपक्षांच्या जास्तीत जास्त सदस्यांना सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. विकास कामांच्या निधी वाटपात मित्रपक्षांच्या मतदारसंघाला प्राधान्य देऊन बंडखोरीची शक्यता कमी करण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. त्यामुळे मित्रपक्षांच्या सदस्यांना निधीची कमतरता नसेल. आव्हान सत्ता टिकवण्याचे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणे जेवढे कठीण होते, तेवढेच ती टिकवणे आता भाजपसमोर मोठे आव्हान आहे.शिवसेनेकडून भविष्यात ‘अविश्वासठराव’ आणला जाऊ नये, यासाठी भाजपने मित्रपक्षांना सत्तेत मोठा वाटा देण्याचे सूत्र निश्चित केले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष सदस्यांना महत्त्वाची सभापती पदे देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाणार आहे. त्यामुळे भाजपने आतापासूनच सावधगिरी बाळगली.
तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच या प्रकरणाने आता स्पष्टपणे राजकीय वळण घेतले आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप खरातवर आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही विरोधकांकडून टीकेची झोड उठत आहे. भाजपचे नेते तुषार भोसले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाकणकर यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, काही दिवसांपूर्वी तुम्ही महिलांना पोथी-पुराणात अडकवून ठेवले जाते असे सांगत होतात. मात्र, अशा भोंदूंच्या मागे लागण्यापेक्षा पवित्र ग्रंथांचे वाचन आणि त्यांचे आचरण करणे कितीतरी चांगले आहे, असे म्हणत त्यांनी थेट हल्ला चढवला. भोसले यांनी पुढे असेही नमूद केले की, समाजाला उपदेश देण्यापूर्वी स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्तीने अशा वादग्रस्त व्यक्तींशी संबंध ठेवणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, या प्रकरणाची तीव्रता अधिक वाढली आहे. दरम्यान, अशोक खरातसोबतचे संबंध उघड झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे. खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे वादग्रस्त व्यक्तींशी संबंध ठेवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशोक खरातविरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर असून, 18 मार्च रोजी पहाटे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त आहे. अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळख निर्माण केलेल्या या व्यक्तीवर गंभीर आरोप झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे पडसाद राजकीय पातळीवरही उमटताना दिसत आहेत. या संबंधीत खालील बातम्या देखील वाचा… अशोक खरात याच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर फरार:रुपाली पाटील-ठोंबरेंच्या आक्रमक पोस्टने खळबळ; आंदोलनाचा इशारा अजित पवारांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा? अशोक खरातवर संशयाची सुई:देवगिरी बंगल्याबाहेर सापडल्या संशयास्पद वस्तू; काळ्या जादूचा आरोप, तपासाची मागणी
तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यभरात खळबळ उडाली असतानाच आता या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप खरातवर आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असताना, त्याच्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशोक खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडिओ आणि विविध कार्यक्रमांतील छायाचित्रे समोर आल्यानंतर चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. रुपाली चाकणकर फरार... बजाव ताली..., अशी पोस्ट त्यांनी शेअर केली असून, त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पत्रकार परिषद घेऊन चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. हा विषय कोणत्याही पक्षाचा किंवा जातीचा नसून महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशोक खरातशी संबंधित ट्रस्टमध्ये चाकणकर यांची भूमिका असल्याचा उल्लेख करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, त्यामुळेच पोलिसांनी कारवाई उशिरा केली का? तसेच, जप्त करण्यात आलेल्या 58 व्हिडिओंच्या पार्श्वभूमीवर किती महिलांवर अत्याचार झाले असतील, याबाबतही त्यांनी गंभीर शंका व्यक्त केली. पाटील-ठोंबरे यांनी पुढे सांगितले की, चाकणकर यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा निष्पक्ष तपास होऊ शकणार नाही. त्या पदावर राहिल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यता असल्याचा आरोपही त्यांनी केला. याशिवाय, हा मुद्दा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर राजीनामा दिला नाही, तर राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्यात संतापाची लाट दरम्यान, अशोक खरातविरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, 18 मार्च रोजी पहाटे त्याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त असून, अंकशास्त्रज्ञ म्हणून त्याने नाव कमावले होते. मात्र, या गंभीर आरोपांनंतर त्याची प्रतिमा पूर्णपणे डागाळली असून, या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक झाल्यानंतर या प्रकरणात नवनवीन दावे समोर येत आहेत. धार्मिक श्रद्धा, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, त्याच्या अटकेनंतर आता राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली असून या प्रकरणाला आणखी एक नवा आयाम मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर मागणी करत, खरातचा संबंध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताशी आहे का, याचा तपास व्हावा असे म्हटले आहे. त्याचवेळी शरद पवार गटाचे प्रवक्ते सुनील माने यांनी अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्याबाहेर तसेच बारामतीतील निवासस्थानाबाहेर जादूटोण्याशी संबंधित वस्तू सापडल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर या कृत्यामागे अशोक खरात किंवा त्याच्याशी संबंधित व्यक्तींचा हात आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या दाव्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर आढळलेल्या वस्तूंचा आणि खरातचा काही संबंध आहे का? त्याने कोणत्याही प्रकारची काळी जादू केली होती का? अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या सर्व दाव्यांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसून, याबाबत सखोल तपासाची मागणी जोर धरत आहे. गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप दरम्यान, अशोक खरातविरुद्ध नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंगीकारक औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला असून, 18 मार्च रोजी पहाटे गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला खरात मर्चंट नेव्हीतून निवृत्त आहे. अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या या व्यक्तीकडे अनेक राजकीय नेते, उद्योजक आणि सेलिब्रिटी मार्गदर्शनासाठी जात असल्याचेही सांगितले जाते. मात्र, त्याच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे आणि नव्याने समोर आलेल्या दाव्यांमुळे राज्यात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
ब्रह्मांड नायिका, जगतजननी आदिशक्ती जगदंबा ही जगातील जीवांच्या उद्धारासाठी या भूतलावर अवतीर्ण झाली. तिने सृष्टीचे सृजन केले आहे. या आदिमायेची कृपा प्राप्त करण्यासाठी मातेचे नित्य स्मरण करून सुख समृद्धी प्राप्त करण्याचा हितोपदेश शास्त्री जनक जोशी यांनी केला. शास्त्रीनगर परिसरातील जय अंबे माता संस्थान व वास्तुशास्त्रज्ञ डॉ. तृप्ती भाटिया यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीनगर परिसरातील जय अंबे माता संस्थान प्रांगणात ऋषीकुमार संदीपनी विद्यानिकेतन पोरबंदरचे शास्त्री जनक जोशी यांच्याद्वारे गुरुवारी श्रीमद् देवी भागवत कथा प्रारंभ झाली. २६ मार्चपर्यंत दररोज दुपारी दोन ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित या संगीतमय देवी भागवत कथेचा प्रारंभ शोभायात्रेने झाला. शास्त्रीनगर परिसरातील वीर हनुमान मंदिरापासून कथास्थळापर्यंत आयोजित कलश शोभायात्रेत कलशधारी महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या. सर्वप्रथम शास्त्री जनक जोशी यांनी यजमान तृप्ती भाटिया, मुकेश भाटिया यांच्यासोबत मंत्रोच्चारात विधियुक्त पूजन केले. यानंतर भाटिया कुटुंबाने देवी ग्रंथ डोक्यावर धारण केला. ढोल ताश्यांच्या गजरात ही शोभायात्रा शास्त्रीनगर परिसरातील अनेक रस्त्यांवरून मार्गक्रमण करत या शोभायात्रेचे समापन भक्तिभावात कथास्थळी करण्यात आले. शुक्रवारी (दि.२०) भगवती आराधना व नवरात्र पूजा विधानावर कथा आहे. शनिवारी, २१ मार्च रोजी कृष्ण अवतार कथा, रविवारी, २२ मार्च रोजी महिषासूर वध, सोमवारी, २३ मार्च रोजी व्यास आत्मकथा व नारदाचे स्त्रिरूप, मंगळवारी, २४ रोजी माँ दुर्गा अवतार व उत्सव वर्णन, बुधवारी, २५ मार्चला सरस्वती पूजन व तुलसी उत्पत्ती कथा होणार आहे. गुरुवारी, २६ मार्च रोजी रुद्राक्ष महात्म्य व अंबा देवीपुराण कथा होऊन महाआरतीने या कथा उत्सवाचे समापन होणार आहे. कथेत दररोज रात्री ८ वाजता भजन गायक उमेश शर्मा, भोलेराम की सेना, प्रदीप शर्मा, राम देशपांडे, राम पांडे यांच्यासह भजन सादर करून रासगारबा साकार केला जाईल. महिलांचा गरबा खेळून जल्लोष; भजने सादर परिसरातील अनेक कुटुंबांनी या शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत केले. महिलांनी सामूहिक गरबा खेळून जल्लोष साजरा केला तर प्रकाश गोडा कुटुंबांनी ताक वितरण केले. कथास्थळी भागवताचार्य गोपाल महाराज कारखेडकर यांनी उपस्थिती दर्शवत देवी ग्रंथाचे पूजन केले. यावेळी कथा उत्सवाचे यजमान भाटिया कुटुंबाने गोपाल महाराज कारखेडकर यांचे स्वागत केले. रात्री जलाराम सेवा भजन मंडळाचा भजन कार्यक्रम संपन्न झाला. यात महादेवराव वनारे यांनी साथसंगत केली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेच्या अधिनस्थ अखिल भारतीय प्रकल्प कापणी पश्चात अभियांत्रिकी तंत्रज्ञान, कृषी अवजारे, कृषी व कृषी उद्योगांमधील ऊर्जा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच तंत्रज्ञान व यंत्र प्रात्यक्षिक मेळावा घेण्यात आला. यात विदर्भातील विविध भागातील शेतकऱ्यांनी भाग घेतला. यात महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. कापणीपश्चात अभियांत्रिकी तंत्रज्ञान केंद्रात निर्मित पीकेव्ही डाळ, ऑइल, बेसन मिल, व गहू सफाई यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच विद्यापीठात विकसित विविध तंत्रज्ञान व पिकांच्या वाणांबद्दल माहिती देण्यात आली. कापणी पश्चात अभियांत्रिकी तंत्रज्ञान विभागामार्फत करडईपासून तेल काढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतीपूरक जोडधंदा उभारण्यास मदत होत आहे. तसेच या संयंत्रात शेंगदाणा, मोहरी व जवसाचे तेल काढता येते. सीताफळ व जांभूळ फळांवर प्रक्रिया करुन गावा-गावात उद्योग निर्मिती करण्यास मदत होत आहे. उद्घाटनप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. आर. गडाख यांनी यांत्रिकीकर्णाचे महत्व सांगितले. डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता, कृषी अभियांत्रिकी यांनी यंत्र प्रात्यक्षिकता का महत्वाची आहे, असे सांगितले. शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कृषी पदवीधर उद्योजकांकडून उद्योग उभारणीचे मार्गदर्शन कृषी उद्योजक नंदकिशोर शेगोकार यांनी कृषी अभियांत्रिकी उद्योग कसा उभारायचा, याबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी शेतकरी उद्योग समूहाची स्थापना करत ट्रॅक्टर सर्व्हिस सेंटरपासून सुरवात केली. शेतकरी मोटर्स टू व्हिलर शोरुमची सुरवात केली. २०१६ पासून ते १५ हजार क्षमतेचे आधुनिक ब्रॉयलर पोल्ट्री एसी फार्मची निर्मिती केली.
महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी आमदार वसंत खंडेलवाल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. विधानपरिषदेत त्यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा मांडल्यानंतर सर्व संबंधित विभागांनी या संदर्भात एक महिन्याच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापतींनी दिले. आमदार खंडेलवाल यांनी लक्षवेधी सूचना क्रमांक ७३२ अन्वये या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले. महाराष्ट्रात विशिष्ट भागातील लोकसंख्या वाढीचा दर आणि स्थलांतरणाच्या प्रमाणामुळे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, सुरक्षेच्या दृष्टीने समस्या निर्माण होत आहेत. राज्यात विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि दत्तक विधान आदी वैयक्तिक बाबींसाठी वेगवेगळ्या समुदायांचे वेगवेगळे कायदे आहेत. यामुळे प्रशासकीय, न्यायिक बाबींमध्ये गुंतागुंत निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद ४४ मध्ये राज्यात नागरिकांसाठी समान नागरी कायदा सुनिश्चित करण्याची मार्गदर्शक तत्व लागू करणे आवश्यक आहे. उत्तराखंडने समान नागरी कायदा लागू केला. समान नागरी कायदा लागू करण्याबाबत शासनाची भूमिका व उपाययोजना करण्याची मागणी आ. खंडेलवाल यांनी लक्षवेधीद्वारे मांडली. सर्व विभागांनी एका महिन्याच्या आत या संदर्भातील लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. या विषयावर एका महिन्यात लेखी उत्तर द्यावे अन्यथा आमदार खंडेलवाल यांनी या संदर्भात सभापती किंवा उपसभापतींकडे माहिती दिल्यानंतर बैठक घेणार, असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. राज्यातील बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालणारे व धर्मांतर प्रक्रियेला कायद्याच्या चौकटीत आणणारे महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक मंगळवारी रात्री विधानपरिषदेत प्रदीर्घ चर्चेअंती बहुमताने मंजूर झाले. विधानसभेत सोमवारी (दि. १६) या विधेयकाला बहुमताने मान्यता दिली होती. विधिमंडळाने विधेयक मंजूर केल्याने बेकायदा धर्मांतराला आळा घालणाऱ्या कायद्याचा मार्ग मोकळा झाला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे तेरावे राज्य ठरेल. बेकायदेशीररित्या होणारे धर्मांतर रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी विधानसभेत हे विधेयक मांडले होते. तेथे मंजूर झाल्यानंतर सरकारने दुसऱ्याच दिवशी मंगळवारी विधेयक विधानपरिषदेत चर्चेसाठी आणले. गृहराज्यमंत्री भोयर यांनी विधेयक सादर करताना सरकारची भूमिका स्पष्ट केली.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला अकोलेकरांनी खरेदीचा मुहूर्त साधला. दरात घसघशीत घसरण झाल्याने सुवर्णपेढ्या झळाळून निघाल्या. फ्लॅट्स खरेदीला जोरदार प्रतिसाद मिळाला. त्यात २-बीएचके फ्लॅट्सला अधिक मागणी होती, असे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले. तसेच दुचाकी, कार व ट्रॅक्टर्स खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची अधिक पसंती दिसून आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. शहरात दिवसभर गुढीपाडव्याचा उत्साह दिसून आला. सकाळी शोभायात्रा निघाल्या तर रात्रीपर्यंत खरेदीला उत्साह दिसून आला. ३५० दुचाकींची विक्री जिल्हाभरात सुमारे चार हजार दुचाकींची विक्री झाली. २५० फ्लॅट्स, ५० ट्रॅक्टर, ३० कारची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. इलेक्ट्रिक दुचाकींना मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याचे टीव्हीएस डेल्टा दालनाचे संचालक अरुण अलीमचंदानी यांनी सांगितले. अनेक ग्राहकांनी गुढीपाडव्यासाठी बुकिंग करुन ठेवले होते. त्यांनी मुहूर्तावर चाव्या घेऊन दुचाकी घरी नेत पूजन केले. जिल्हाभरात सुमारे ३५० इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाल्याचे दुचाकी डिलर्सने सांगितले. किंमत वाढूनही दुचाकी विक्री कायम होती. सोन्याचे दर गुरुवारी ८ ते १० हजार रुपयांनी व चांदीचे दर १५ हजारांनी कमी झाल्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. राणी हार, अंगठी, बांगड्या, पाटल्या, नेकलेस आदींची नागरिकांनी खरेदी केली. तर काही ग्राहकांनी २ ते ५ ग्रॅम दरम्यान खरेदी केली, यात सोन्याचे क्वॉइन, छोट्या अंगठ्या, नथ आदींचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात नागरिकांचे नुकसान झाले. त्यामुळे ते भरुन काढण्यासाठी सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे, असे सुवर्ण व्यावसायिक नितीन खंडेलवाल यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागरिकांनी टू बीएचके फ्लॅट्सची अधिक खरेदी करत स्वतःच्या घराचे स्वप्न केले पूर्ण केल्याचे, बांधकाम व्यावसायिक पंकज कोठारी यांनी सांगितले. वन बीएचके फ्लॅट्सची सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी झाली असेही त्यांनी सांगितले. कच्च्या मालाचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले. परंतु आम्ही सध्या दरवाढ केली नसून जुन्याच दरात फ्लॅट्सची विक्री केल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. आमच्याकडे १० फ्लॅटचे बुकिंग झाले, असेही पंकज कोठारी यांनी सांगितले. २५० फ्लॅट्सची विक्री, घराचे स्वप्न पूर्ण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कार खरेदीला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी छोट्या कारची अधिक खरेदी केली. सोबतच इलेक्ट्रिक कार खरेदीकडे कल वाढला असून मोठ्या प्रमाणात खरेदी केली, असे गद्रे मोटर्सचे संचालक अमोल गद्रे यांनी सांगितले. एक्सईव्ही ९- एस या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. या कारची रेंज ही ५०० किलोमीटर आहे. तसेच किंमत २२ ते ३२ लाखांपर्यंत आहे. नवीन आलेली कार सेव्हन एक्सओ हिला चांगली मागणी आहे, असे अमोल गद्रे यांनी सांगितले.
वाढत्या तापमानाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये. यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा केवळ सकाळच्याच सत्रात भरवण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी तसे पत्र मुख्याध्यापकांना पाठवले आहे. शुक्रवारी २० मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. परंतु त्याचवेळी काही खासगी शाळांना या आदेशाची अंमलबजावणी करणे शक्य होणार नाही. असेही वास्तव पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने काहीशी कठोर भूमिका घेतली आहे. संबंधित शाळांनी पर्यायी व्यवस्था करावी. असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्याहीपुढे जाऊन ज्या शाळांची अडचण आहे, त्या शाळांचे मुख्याध्यापक आणि जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढला जाण्याची शक्यतादेखील निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा सुमारे १५०० शाळांचे जिल्हा परिषदेचे जाळे आहे. या शाळांमधून सुमारे ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्व विद्यार्थ्यांची शाळा शुक्रवारपासून दुपारच्या सत्रात भरणार नाही. याशिवाय शिवाजी शिक्षण संस्था, सातपुडा शिक्षण संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ, एलवायजे लेडीज क्लब, हव्याप्र मंडळ, भगीनी मंडळ अशा काही खासगी व्यवस्थापनाच्याही प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. या सर्व शाळांचे व्यवस्थापन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अखत्यारित येते. त्या शाळासुद्धा उर्वरित. पान ४ शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यासाठी दोन जि.प. च्या शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशात दोन वेगवेगळ्या वेळा सूचविण्यात आल्या आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जारी केलेल्या पत्रात शाळेची वेळ सकाळी ७ ते ११ अशी निर्धारीत केली आहे. त्याचवेळी प्राथमिक विभागाच्या पत्रातील वेळ ७.१५ ते १२.१५ अशी लिहिण्यात आली आहे. येत्या काळात या मुद्द्यावर वाद होऊ शकतो. त्यामुळे सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळांची वेळ सकाळी ७ ते ११अशीच असायला पाहीजे, असे संघटनांचे म्हणणे आहे. प्रा. डॉ. महेंद्र मेटे, अमरावती का बरं, त्यांना उन्हं नाही का लागणार? : शिक्षण विभाग इमारतींची अडचण आहे म्हणून ज्या शाळा दुपारी भरवल्या जातील, त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना उन्हं नाही का लागणार, असा प्रश्न पालकांनी पुढे केला आहे. मुळात निर्णय जर सर्वच माध्यमांच्या व सर्वच व्यवस्थापनांच्या शाळांसाठी झाला असेल तर तो लागू केलाच गेला पाहिजे. भविष्यात दुपारच्या शाळांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर उन्हाचा परिणाम झाला, तर त्याला जबाबदार कोण असेल, असाही त्या पालकांचा प्रश्न आहे. प्रशासनाच्या रोषालाही सामोरे जाण्याची गरज नाही सध्या बहुतेक शाळांचे कोर्सवर्क पूर्ण व्हायला आले आहे. त्यामुळे ज्या शाळांच्या इमारती मर्यादित आहेत, त्या शाळांनी पिरिएडस् चा एकूण वेळ ४५ मिनीटांऐवजी ३० मिनीटे करावा. शिवाय शाळा सुरु करण्याची वेळ आठऐवजी सकाळी सातची करावी. अशाप्रकारे सकाळी ७ ते ११ या चार तासांत दोन शिफ्ट कराव्या.
जुन्या अमरावती येथील हिरे मठ जीर्ण अवस्थेत आहे. हिरे मठ वीरशैव परंपरेतील जुना मठ आहे. त्याचे पुनर्निर्माण करण्यासाठी गुढे परिवार सहकार्य करण्यास तयार आहे. या बांधकामासाठी समाजातून कोणतीही वर्गणीही जमा करणार नसल्याचा पुनरुच्चार अनंत गुढे यांनी केला. तसेच महात्मा बसवेश्वर यांना भारत सरकारने राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिलेला आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयात अक्षय तृतीयेच्या दिवशी म. बसवेश्वर जयंती साजरी करण्याचे शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. त्यामुळे अमरावती शहरात प्रथमच महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यात आल्याने महानगरपालिकेने याठिकाणी म. बसवेश्वर जयंती साजरी करावी, असे आवाहन माजी खा. अनंत गुढे यांनी मनपा आयुक्तांना केले. या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या अनावरण व लोकार्पणप्रसंगी वीरशैव धर्मगुरू श्री सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज साखरखेर्डा व शिवशंकर शिवाचार्य महाराज नेरपिंगळाई यांची विशेष उपस्थिती होती. या पुतळ्याच्या उभारणीसाठी सहकार्य करणारे श्री हिंदू स्मशानभूमीचे अध्यक्ष आर. बी. अटल यांचे विशेष आभार मानून सत्कार करण्यात आला. समाजातील ज्येष्ठ कार्यकर्ते भारत आप्पा मेंडसे यांचीही याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला विशेष अतिथी व सत्कारमूर्ती म्हणून सातत्याने ७ वेळा नगरसेवक म्हणून निवडून येणारे विक्रमादित्य विलास इंगोले यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र वाचन करून सत्कार करण्यात आला. या मानपत्राचे लेखन व वाचन आझाद हिंद मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. किशोर फुले यांनी केले. या सोहळ्यात अंबापेठ प्रभागातील नगरसेवक मिलिंद बांबल, स्वाती कुळकर्णी, जवाहरगेट प्रभागातील नगरसेवक डॉ. संजय शिरभाते, सुनीता मनोज भेले, ललीता सुरेश रतावा, गडगडेश्वर प्रभागातील नगरसेवक आशिष अतकरे, अर्चना अशोक पांडे, प्रियंका भूषण पाटणे, योगेश रघुनाथआप्पा विजयकर, विलास नगर प्रभागातील नगरसेवक पंजाबराव तायवाडे यांची सत्कारमूर्ती म्हणून विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन विलास काळे यांनी केले. आभार प्रदर्शन शिवराज आप्पा पारटकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. महेंद्र गुढे यांनी केले. या कार्यक्रमात संजीवनी भोगावकर, माधुरी मेंडसे, कविता बरमकर, सुरेखा चोंढेकर, अनिता गिलोरकर, किरण काळे, भारती कुऱ्हेकर, सीमा ओडे, मुंजाळे, वृशाली गुढे, वंदना गुढे, विजयाताई गुढे, सविता गुढे उपस्थित होत्या. हा रस्ता महात्मा बसवेश्वर मार्ग म्हणून ओळखला जाईल : विलास इंगोले मी या समाजाचा घटक आहे. आमच्या ज्येष्ठांनी जनतेची सेवा केली तरच जनता तुमची सेवा करेल, ही शिकवण दिली. त्याचाच फायदा मला ७ वेळा निवडून येण्यासाठी झाला. नगरसेवक म्हणजे जनतेचे सेवक. मी माझे मत कधीच विकत घेत नाही. प्रामाणिकपणे प्रत्येकाचे पक्षविरहित काम करण्याला माझे प्राधान्य असते. यापुढे भूतेश्वर चौकापासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता महात्मा बसवेश्वर मार्ग म्हणून ओळखला गेला पाहिजे. याकरिता मी याठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या विधी समितीतून हा प्रस्ताव मंजूर करून घेईन, असे वचन विरोधी पक्षनेता विलास इंगोले यांनी आपल्या भाषणात दिले.
वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने पुढे जात असलेल्या गुरुकुंज आश्रम येथील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने यंदाचा ‘गुढीपाडवा व रामनवमी महोत्सव’ अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जात आहे. ‘श्रीरामकृष्णहरी मानवता मंदिर येथे आयोजित हा सोहळा आगामी २६ मार्चपर्यंत चालणार असून या महोत्सवात अध्यात्म, संस्कार आणि सामूहिकतेचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार आहे. या महोत्सवाची सुरुवात आज १९ मार्च या गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी झाली असून या दिवशी तीर्थ स्थापना, अभिषेक, महापूजा आणि सामुदायिक ध्यान यांसारख्या धार्मिक विधी करण्यात आल्या. त्यामुळे वातावरण अगदी पवित्र झाले आहे. पहाटेच्या वेळी सादर होणारी भजनांजली भक्तांना अध्यात्मिक उर्जा देणारी ठरणार असून या कार्यक्रमाचे आयोजन श्री गुरुदेव सेवा मंडळ शेंदोळा खुर्द यांच्या वतीने करण्यात आले आहे. संपूर्ण आठवडाभर आश्रम परिसरात रामकृष्णहरी नामाचा अखंड गजर, सामूहिक प्रार्थना, ध्यान-चिंतन आणि विविध भक्तीपर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. गावोगावातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असून गुरुकुंज आश्रम परिसरात भक्तीचा दरवळ पसरू लागला आहे. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून त्यामध्ये डॉ. नंदकिशोर काळे, डॉ. डी.एस. निघोट, उद्धवराव वानखडे, डॉ. पी.पी. पाडेकर, डॉ. खारोडे, डॉ. रघुनाथ वाडेकर, संजयभाऊ देशमुख, आशिषदादा कावडे, कैलासजी गिरी, पंकज देशमुख, तसेच सद्गुणदादा ठोसर, जनसेवक जयस्वाल, जीवनजी डाके, अविनाश ठाकरे, बापूराव काळमेघ, सुभाषजी सोनारे, बबलू मकरंदपुरे, विठ्ठलराव उमप यांच्यासह राजेंद्र भुरे, धनराज बारबुदे, हेमंत निखाडे आदींचा समावेश आहे. महोत्सवाच्या निमित्ताने भक्ती, सेवा आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असून सर्व स्तरातील नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन अध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. रामनवमीला होणार सोहळा या महोत्सवाचा मुख्य दिवस असलेल्या रामनवमीला रामकृष्णहरी अभिषेक, भव्य महापूजा, सामुदायिक ध्यान व चिंतन, गोपाळकाला, हरिपाठ व कीर्तन यांचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसाद व सामुदायिक प्रार्थना होणार असून हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे.
अस्सल भारतीय संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी चैतन्याची गुढी उभारणाऱ्या शहर काँग्रेस कमिटीने सिलिंडरच्या दरवाढीविरुद्ध सामाजिक जागृती करत एकाच कार्यक्रमात दोन्ही भावनांचा मेळ साधला. शहराचे हृदयस्थळ असलेल्या राजकमल चौकात हा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. गुढीपाडव्यानिमित्त उंचच उंच गुढी उभारण्याचा विक्रम करणारी नवयुवक विद्यार्थी संघटनादेखील या कार्यक्रमात सहभागी झाली होती. मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा हा सण दरवर्षी राजकमल चौकात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीच्या उत्सवात शहर काँग्रेस कमिटीने सहभागी होत त्याला सामाजिक जाणीवेचेही स्वरुप दिले. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख आणि ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाला महाकाली मंदिरचे पीठाधीश्वर शक्ती महाराज, दत्तमार्गी महंत पद्माकर तायडे महाराज, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक बबलू शेखावत, मनपाचे विरोधी पक्षनेते माजी महापौर विलास इंगोले व मिलींद चिमोटे, नवयुवक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, माजी नगरसेवक बबन रडके, जगदीश गवळी, राजेंद्र परिहार, सुरेश रतावा, अभिनंदन पेंढारी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांसह काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भैय्या पवार, महिला कॉंग्रेस अध्यक्षा जयश्रीताई वानखडे, युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, नगरसेवक संजय शिरभाते, नगरसेविका अर्चना आत्राम, नगरसेविका सुनिता भेले, नगरसेवक विक्की उर्फ विशाल वानखडे, नगरसेविका ललिता रतावा, नगरसेवक धीरज हिवसे, नगरसेविका राजश्री झटाले, नगरसेवक अनिल अग्रवाल, सतीश गवई, संजय वाघ, अविनाश पांडे, अभिनंदन पेंढारी, दीपक हुंदिकार, किरण साउरकर, प्रभाकर वाळसे, राहुल येवले, अनिकेत ढेंगळे, संकेत कुलट, संकेत साहु, पुरुषोत्तम मुंधडा, गजानन राजगुरे, मैथिली पाटील, सागर इंगोले, रफिक भाई चीकुवाले, प्रकाश मामर्डे, प्रमोद इंगोले, माणिक लोखंडे, ममता जावरे, कल्पना इंगोले, अमृता इंगोले, राधा इंगोले, किरण चांदवडकर, नेत्रा दोडके, वंशिता चांदवडकर, सिद्धी मारोडकर, शीतल जाधव, रसिका बल्लाळ, समृद्धी टाले, ऋतिका गौड, आनंदी टाले, भाविका काळबांडे यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते. सिलींडर झाला आडवा, कसा करु गुढीपाडवा ? गुढी उभारल्यानंतर काँग्रेसच्या महिला आघाडीने लगेच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभ्या करण्यात आलेल्या फलकांकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत केले. ‘सिलींडर झाला आडवा, कसा करु गुढीपाडवा’ असा लक्षवेधी संदेश त्या फलकांवर लिहिला होता. फलकाला सिलींडरचाच आकार आणि तसाच रंग देण्यात आल्याने तो अगदी सर्वांच्या नजरेत भरला. यावेळी रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या अनेकांनी क्षणभर थांबून काँग्रेसची भूमिका समजून घेतली. माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी स्वत: पुढाकार घेत आपल्या सहकारी महिलांसह सिलींडरच्या दरवाढीचा निषेधही नोंदवला.
अंजनगाव सूर्जी तालुक्यातील वनोजा बाग येथील लखमाजी महाराज मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उत्सवावर गुरुवार १९ रोजी अचानक आलेल्या वादळी पावसासह तुफान गारपिटीने पाणी फेरले. दुपारी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या या अवकाळी पावसामुळे हजारो भाविक व व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. सुमारे ३०० वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, मुंबई, सुरत, इंदूर आदी भागांतून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल झाले होते. मात्र अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसासोबत गारपिटीमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. गारपिटीपासून बचाव करण्यासाठी भाविकांनी दुकाने, हॉल तसेच उपलब्ध आसऱ्यांचा आधार घेतला. काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. उत्सवासाठी आलेल्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांचे साहित्य पावसात भिजले. अनेक स्टॉल विस्कळीत झाले. दरम्यान, मंदिर परिसर उंचावर असल्याने आणि पावसामुळे चिखल झाल्याने दुचाकी व चारचाकी वाहने अडकली. जंगलात उभी केलेली वाहने काढताना भाविकांची मोठी गैरसोय झाली. गारपिटीमुळे यात्रेतील दुकानांचे झालेले नुकसान, स्टॉल व तंबू उखडले, साहित्य भिजले. भाविकांना पावसाचा फटका पावसाने रोडग्यांचा कार्यक्रम मध्येच रोखावा लागला नवस व रोडगे कार्यक्रम सुरू असताना पावसामुळे ते मध्येच थांबवावे लागले. त्यामुळे अनेक भाविकांचा नवस अपूर्ण राहिल्याची खंत व्यक्त होत आहे. लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांना विशेष त्रास सहन करावा लागला. या अचानक झालेल्या गारपीटीमुळे गुढीपाडव्याच्या उत्सवावर पाणी फिरले असले तरी सुदैवाने गंभीर दुर्घटना घडली नाही.
तालुक्यातील श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथे गुढीपाडवा-रामनवमी यात्रा महोत्सवाला १८ मार्चपासून सुरुवात झाली आहे. आज (दि. १९) गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भाविकांच्या उपस्थितीत ७२ फूट उंच झेंड्यांना नवीन खोळ चढवण्याचा पारंपरिक व थरारक सोहळा यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. सावंगा विठोबा येथे श्री अवधुत महाराज (श्री कृष्णाजी महाराज) यांचे मंदीर आहे. येथील ही यात्रा २७ मार्चपर्यंत चालणार आहे. देव व भक्त या समानतेचे प्रतीक ७२ फूट झेंड्यांना खोळ चढविण्याचा हा चित्तथरारक सोहळा गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी ४ वाजता सुरू झाला. संस्थानचे विश्वस्त चरणदास कांडलकर यांच्या हस्ते महाराजांच्या समाधीचे विधीवत पूजन करून दोन्ही झेंड्यांना नवीन खोळ (कापड) चढविण्यात आली आहे. झेंड्यांना पायाचा स्पर्श होऊ नये म्हणून दोरांच्या सहाय्याने झेंड्यांची जुनी खोळ काढून नवीन खोळ चढवली आहे. अखंड कापूर ज्योती, बासन (टाळ), ढोलकी (मृदंग)चा गजर, लाखोंच्या-हजारोंच्या संख्येने सांवगा विठोबा नगरीत आलेल्या अवधूत भजन मंडळाच्या मांडीचे सुमधुर गायनात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला. १८ मार्च रोजी सकाळी ७ वाजता मंदिर व ग्राम परिसराची स्वच्छता करण्यात आली व अमावस्या निमित्त सायंकाळी ५ वाजता मंदिरात चंदन-उटी व रमणा कार्यक्रम घेण्यात आला. गुढी पाडव्याच्या दिवशी यात्रेत बाहेरगावाहून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी संस्थानची अन्नदान समिती आणि सेवाभावी मंडळाच्यावतीने प्रसाद (अन्नदान) व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, तसेच हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी शांतता, सुव्यवस्था व स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन श्री विठोबा संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. कापूर जाळण्याची परंपरा सावंगा विठोबा येथे श्री अवधुत महाराज (श्री कृष्णाजी महाराज) यांच्या मंदीरात येणाऱ्या प्रत्येक भाविक कापूस जाळतो. या ठिकाणी कापूर जाळ्ण्याची परंपरा आहे. त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी अनेक व्किंटल कापूर भाविकांकडून जाळला जातो, त्याचप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात कापूर जाळण्यात आला आहे.
चैत्र गुढीपाडवा व मराठी नववर्ष प्रारंभाच्या निमित्ताने आज (गुरुवार) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गाभाऱ्यात विविध रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली असून, त्यामुळे श्रींचा गाभारा अत्यंत मनमोहक व प्रसन्न दिसत आहे. फुलांची सजावट विठ्ठल भक्त नानासाहेब दिनकरराव पाचुंदकर पाटील (रा. रांजणगाव महागणपती) यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली असून, सजावटीचे काम डेकोरेटर्स श्री कुमार शिंदे व श्री फ्लॉवर्स, पुणे यांनी पार पाडले. या कामासाठी सुमारे १२ कामगारांनी परिश्रम घेतले. दरवर्षी महत्त्वाच्या सण- उत्सवांच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विशेष फुलांची आरास केली जाते. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी सजलेल्या मंदिरामुळे विठूरायाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत असून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने नववर्षाची सुरुवात करण्यासाठी हजारो भाविक श्री क्षेत्र पंढरपूरात दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच नामगजराने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला आहे. पिंक डेझी २५० बंडल, व्हाइट शेवंती ८०० काडी, गुलाब ५० बंडल, कामिनी ३०० बंडल, जनाडो पत्ता ३० बंडल, आर्किड १० बंडल, झेंडू ७० किलो, शेवंती २० किलो, आदी माळांचा वापर केल्याचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली. विठ्ठल- रुक्मिणी मातेस दुपारच्या पोषाखावेळी अलंकार परिधान करण्यात आले होते. श्री विठ्ठलास सोने पगडी, कौस्तुभ मणी, हि-याचा कंगन जोड, दंडपेट्या जोड मोठा, नाम निळाचा, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी, लहान शिरपेच, नवरत्नाचा हार, तोडे जोड, तुळशीची माळ, मत्स्य जोड, पितांबर व ठुशी तसेच श्री रूक्मिणीमातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळ, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, लक्ष्मीहार, सरी व कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले. याशिवाय, विठ्ठलास रेशमी सोहळे - अंगी व श्री रूक्मिणीमातेस नऊवारी रेशमी साडीचा पोषाख करण्यात आला. त्यामुळे श्रींचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. विठ्ठल रुक्मिणी मातेचे हे मनमोहक रूप पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. वाढत्या तापमानाचा देवाला त्रास होऊ नये, उन्हापासून त्याचे संरक्षण व्हावे म्हणून उन्हाळा संपेपर्यंत दररोज दुपारी चंदन उटी पूजा घातली जाते आणि देवाच्या अंगाला चंदन लेप लावला जातो. आजपासून चंदन उटी पूजा सुरू करण्यात आली आहे.
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त मोडनिंब (ता.माढा) सकल हिंदू समाजाच्या वतीने येथे दि. १८ फेब्रुवारी ते दि. १८ मार्च, फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्यापर्यंत धर्मवीर बलिदान मास साजरा करून छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण व आदरांजली वाहिली. बलिदान मासात रोज सायंकाळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे नित्य पूजन व स्मरण करण्यात आले आहे. युवकांनी सामूहिक मुंडण करून संभाजी महाराज यांना आदरांजली वाहिली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता इतिहास आहे. छत्रपती श्री संभाजी महाराज मृत्युच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर पूर्ण महिनाभर अति धीरोदत्तपणे देहत्याग करीत होते. त्यामुळेच छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान, त्यांनी सहन केलेल्या मरणयातना याची प्रत्येक हिंदू मनाला जाणीव होण्यासाठीच समस्त शिवशंभू पाईकांकडून हा बलिदान मास पाळण्यात येत आहे. प्रतिनिधी | सांगोला सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील स्मारक परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त दि. १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या एक महिन्याच्या कालावधीत सांगोला तालुक्यातील मावळ्यांनी कृतज्ञता प्रार्थना व प्रेरणा मंत्र पठण करून महाराजांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. या उपक्रमांतर्गत अनेक मावळ्यांनी वैयक्तिक त्याग करत अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली. काहींनी आवडते पदार्थ खाणे टाळले, तर काहींनी गोड पदार्थांचा त्याग केला. अनेकांनी संपूर्ण महिनाभर चप्पल न घालण्याचा संकल्प करत आपल्या आचरणातून छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण ठेवले. तालुक्यातील शेकडो नव्हे तर हजारो मावळ्यांचा या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. दि. १८ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता या उपक्रमाचा समारोप मूक पदयात्रेने करण्यात आला. ही पदयात्रा संपूर्ण सांगोला शहरातून शांततेत काढण्यात आली. पदयात्रेत युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचे विशेषत्वाने जाणवले, ज्यामुळे या उपक्रमाला अधिकच उत्साह प्राप्त झाला.शंभू राजांच्या बलिदानाचा विसर पडू नये, त्यांच्या त्यागाची आणि निष्ठेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पदयात्रेनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सर्व मावळ्यांनी एकत्र येऊन प्रार्थना केली व छत्रपती संभाजी महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. या उपक्रमामुळे सांगोला तालुक्यात देशभक्ती व इतिहासाबद्दलची जागृती अधिक दृढ झाल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर ग्रामपंचायत कार्यालयासमोरील प्रांगणात जवळपास दररोज ६० ते ७० युवक नित्यनियमाने उपस्थितीत असत. कार्यक्रमाची सुरुवातीस प्रेरणा मंत्र म्हटला जातो. संभाजी सूर्यहृदय श्लोकाचे वाचन करून, अर्थ सांगितला जातो. सूर्यहृदय श्लोकाचे वाचन
तोंडले येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि कला महोत्सव अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाले. या स्नेहसंमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता पहिली ते चौथी आणि अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांनी यात १०० टक्के सहभाग नोंदवत आपल्या सुप्त गुणांचे दर्शन घडवले. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच भिकाजी लोंढे, उपसरपंच ज्योतीराम चव्हाण आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गोंधळ, देशभक्तीपर गीते, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील गीतांवर बहारदार नृत्य सादर केले. भारूड, गवळण आणि वासुदेव यांसारख्या लोककलांच्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी पल्लवी सुभाष कोळी हिची तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, बाहेरील कोरिओग्राफर न घेता स्वतः सर्व गाणी बसवल्याबद्दल शाळेच्या शिक्षिका प्रिया महामुनी, उर्मिला ढोले आणि अंगणवाडी सेविकांचा गौरव करण्यात आला. उत्कृष्ट नियोजनाबद्दल मुख्याध्यापक विलास कस्तुरे यांचाही सन्मान करण्यात आला. या सोहळ्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक नाईकनवरे, उपाध्यक्ष बाबूराव मोरे, केंद्रप्रमुख प्रदीप आवताडे, नवनाथ कोडक यांच्यासह तोंडले, बोंडले परिसरातील ग्रामस्थ आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यात १०० टक्के सहभाग नोंदवत आपल्या सुप्त गुणांचे दर्शन घडवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद भोसले व सोनाली कस्तुरे-पाटील यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक विलास कस्तुरे यांनी मानले. मान्यवरांची उपस्थिती
मंगळवेढा नगरपालिकेची ही लोकाभिमुख वेबसाइट म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा वापर नाही, तर नागरिक आणि प्रशासन यांच्यात विश्वासाचा नवा पूल उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण प्रयत्न आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जनसहभाग या तीन सूत्रावर उभा असलेला हा उपक्रम मंगळवेढ्याच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असे प्रतिपादन धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन प्रा.शोभाताई काळुंगे यांनी व्यक्त केले, त्या वेबसाइटचे लोकार्पणवेळी बोलत होत्या. धनश्री महिला पतसंस्था चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे, प्रा. तेजस्विनी कदम आणि डॉ. पुष्पांजली शिंदे उपस्थितीत होत्या. पुढे बोलताना म्हणाल्या की, संतांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या मंगळवेढ्यात नगरपालिकेच्या लोकाभिमुख वेबसाइटचे लोकार्पण करून नागरिकांना प्रशासनाशी थेट जोडण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे शहराच्या विकास प्रक्रियेत नागरिकांचा थेट सहभाग वाढणार असून तक्रारींच्या निवारणात ही पारदर्शकता आणि गती येणार आहे. नगराध्यक्षा सुनंदा आवताडे म्हणाल्या ,मंगळवेढ्याच्या संतांनी दिलेल्या एकता, सेवा आणि लोककल्याणाच्या विचारांचा वारसा पुढे नेत लोकाभिमुख प्रशासन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. शहराचा विकास केवळ प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून होत नाही. त्यासाठी नागरिकांचा थेट, सजग आणि सकारात्मक सहभाग मंगळवेढा नगरपालिकेकडून लवकरच ‘स्मार्ट मोबाईल ॲप’ची सुरू करण्यात येणार असून, या ॲप च्या माध्यमातून शहरातील मंदिरे, दवाखाने, हॉटेल्स तसेच महत्त्वाची ठिकाणे एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. बाहेरून येणारे भाविक, पर्यटक आणि नागरिकांना शहरातील आवश्यक ठिकाणांचा सहज शोध घेता येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मंगळवेढ्याला अधिक स्मार्ट, सुसूत्र आणि नागरिकाभिमुख बनविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. ^ही वेबसाइट केवळ तक्रार नोंदवण्याचे साधन नाही, तर मंगळवेढ्याच्या विकासात प्रत्येक नागरिकाला थेट सहभागी करून घेणारे सक्षम व्यासपीठ आहे. सजग नागरिकांच्या सूचना, सहकार्य आणि विश्वासाच्या जोरावर आपण मंगळवेढ्याला आदर्श, पारदर्शक आणि विकासाभिमूख शहर बनवू. सुनंदा आवताडे, नगराध्यक्षा सहभाग आवश्यक असतो, असे त्यांनी सांगितले. या वेबसाइटच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या प्रभागातील नागरी समस्या, विकासकामांबाबतच्या सूचना आणि विविध तक्रारी थेट नोंदवता येणार आहेत. पुढे म्हणाल्या की, उद्याने, वाहतूक कोंडी, तीर्थक्षेत्र सुशोभीकरण, पाणीपुरवठा, स्वच्छता, बंद पथदिवे यांसारख्या विषयांवरील सूचना आणि तक्रारी ऑनलाइन पाठवता येणार आहे. त्या तक्रारीवर कोणती कारवाई झाली, ती कोणत्या टप्प्यावर आहे, याची माहितीही नागरिकांना पाहता येणार आहे. यामुळे शहर विकासाच्या प्रक्रियेत नागरिकांचा विश्वास, सूचना आणि सहभाग यांना केंद्रस्थानी ठेवत मंगळवेढ्याला अधिक सक्षम, उत्तरदायी आणि आधुनिक बनवण्याचा मानस यामागे असल्याचे स्पष्ट झाले. ‘स्मार्ट मोबाईल ॲप’ची मोठी सुविधा विकासात प्रत्येक नागरिकांना सहभाग करून घेणारे सक्षम व्यासपीठ ठरले

25 C