SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
...

भारत ११४ राफेल फायटर जेटस खरेदी करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत फ्रान्सकडून ११४ नवीन राफेल फायटर जेट्स खरेदी करत आहे. त्यानंतर हे फायटर जेटस् स्वदेशी क्षेपणास्त्रे आणि शस्त्र प्रणालीने सुसज्ज केले जातील, असे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले. या फायटर जेटस्मुळे भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. फ्रान्ससोबतच्या करारात इंटरफेस कंट्रोल डॉक्युमेंट समाविष्ट करण्याची तयारी सुरू आहे, जेणेकरून स्वदेशी प्रणाली […] The post भारत ११४ राफेल फायटर जेटस खरेदी करणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Apr 2026 1:10 am

१० हजारांवरील यूपीआय व्यवहारासाठी आता प्रतीक्षा

सुरक्षिततेच्या दृष्टीने १ तासानंतर व्यवहार पूर्ण होणार नवी दिल्ली : वृत्तसंस्था रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजीटल फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी नवा नियम लागू करण्याची शक्यता आहे. नव्या नियमानुसार यूपीआयद्वारे पेमेंट करताना ते पूर्ण होण्यासाठी १ तासांचा वेळ लागू शकतो. डिजीटल फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी आरबीआय १० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे यूपीआय किंवा डिजीटल ट्रान्सफरचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी […] The post १० हजारांवरील यूपीआय व्यवहारासाठी आता प्रतीक्षा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Apr 2026 1:06 am

देशभरात गॅसचा पुरवठा सुरळीत

इंधनाचाही पुरेसा साठा, केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण नवी दिल्ली : वृत्तसंस्था इराणमधील युद्धविरामानंतर देशात एलपीजी, पीएनजी तसेच पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेवर केंद्र सरकारने आज मोठा खुलासा करत दिलासा दिला. सरकारकडे इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. अमेरिका-इस्रायल आणि इराकमध्ये युद्ध सुरू झाल्याने कच्चे तेल आणि गॅसचा पुरवठा विस्कळीत […] The post देशभरात गॅसचा पुरवठा सुरळीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Apr 2026 1:02 am

बैठकीवर अनिश्चिततेचे सावट

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष इस्लामाबादेत, इराणची अनुपस्थिती? इस्रायल-लेबनॉन संघर्षामुळे इराणची नाराजी, व्हान्स यांचा इशारा तेहरान : वृत्तसंस्था अमेरिका, इराण यांच्यात २ आठवडे शस्त्रसंधीवर एकमत झाल्यानंतर पाकिस्तान आणि इतर देशांच्या मध्यस्थीने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादेत अमेरिकेसह इराणच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेण्याचे ठरले. त्यानुसार आता अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स पाकिस्तानात दाखल झाले असून, इराणने ही चर्चा गांभीर्याने घ्यावी अन्यथा गंभीर परिणाम […] The post बैठकीवर अनिश्चिततेचे सावट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Apr 2026 12:59 am

वैभवचे वादळ, राजस्थान विजयी

गुवाहाटी : वृत्तसंस्था गुवाहाटी येथील बरसापारा स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज झालेल्या आयपीएल २०२६ च्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा युवा सनसनाटी खेळाडू वैभव सूर्यवंशी याने पुन्हा एकदा आपला स्फोटक फॉर्म दाखवला. २०२ धावांचे लक्ष्य गाठताना वैभवने आरसीबीच्या तगड्या गोलंदाजांची धुलाई करीत अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकून विक्रम नोंदविला. याच्या जोरावरच राजस्थान रॉयल्सने […] The post वैभवचे वादळ, राजस्थान विजयी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Apr 2026 12:53 am

विविध योजनांची माहिती, समस्यांचे निवारण

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी तालुक्यातील साकोळ येथे महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली व नागरिकांना विविध विभागांच्या प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगत शेतकरी माधवराव बर्गे हे होते. या प्रसंगी तहसीलदार किशोर यादव, नायब […] The post विविध योजनांची माहिती, समस्यांचे निवारण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 10:29 pm

देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा : डॉ. तोगडिया

लातूर : प्रतिनिधी समग्र हिंदू समृद्ध आणि सुरक्षेसाठी देशात हिंदू बहुमत कायम ठेवण्यासाठी देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यासाठी डॉ. प्रवीण […] The post देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा : डॉ. तोगडिया appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 10:26 pm

रविवारी लातुरात रंगणार काव्य मैफल 

लातूर : प्रतिनिधी लातूर शहर व परिसरातील रसिक श्रोत्यांसाठी महाराष्ट्रातील नामवंत कवींनी साकारलेली बहारदार काव्यमैफल ‘काव्यगंध-दरवळ कवितांचा’ कार्यक्रम काव्यगंध रसिक मंडळी, लातूर यांच्या वतीने येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात रविवार दि. १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम पूर्णपणे बिगर-व्यावसायिक असून रसिक श्रोत्यांसाठी तो विनामूल्य खुला आहे. मराठी साहित्याचा समृद्ध […] The post रविवारी लातुरात रंगणार काव्य मैफल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 10:24 pm

जिल्हा रुग्णालयासाठी २५.७० कोटींचा निधी मंजूर 

लातूर : प्रतिनिधी गेल्या काही वर्षांपासून लातूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उभारणीचा प्रश्न प्रलंबीत होता. शासनाने राष्ट्रीय आरोेग्य अभियानांतर्गत १०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णाल इमारत (विद्युतीकरणासह) बांधकामासाठी २५ कोटी ७० लागला आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक जागेच्या मोबदल्यासाठी ३ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीला पुरवणी मागण्यांमध्ये मंजुरी देण्यात आली होती. सन २०१३ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास […] The post जिल्हा रुग्णालयासाठी २५.७० कोटींचा निधी मंजूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 10:22 pm

आंबेडकर जयंती मिरवणुकीसाठी महापौरांचे महत्त्वाचे निर्देश:पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट्ससह सर्व सुविधा पुरवण्याचे आदेश

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी निघणाऱ्या मिरवणुकीदरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी दिले आहेत. मिरवणूक मार्गावर पिण्याच्या पाण्याची आणि मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महानगरपालिकेतर्फे आंबेडकर जयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरीये, आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, कल्पिता पिंपळे, शहर अभियंता संजय कोंबडे, कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) अमोल कुलकर्णी, मोहिनी गायकवाड, विजय गोरे तसेच सर्व सहाय्यक आयुक्त व वॉर्ड अभियंते उपस्थित होते. महापौरांनी निर्देश देताना सांगितले की, मिरवणूक मार्गावरील सर्व खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत. तसेच, उघडे ढापे बंद करून पथदिवे सुरळीत सुरू राहतील आणि मिरवणूक मार्गावर स्वच्छता राखली जाईल, याची खात्री करावी. सदर मिरवणूक क्रांती चौक – पैठण गेट – सिटी चौक – पोस्ट ऑफिस मार्गे भडकल गेटपर्यंत काढण्यात येणार आहे. या संपूर्ण मार्गाची महानगरपालिका, पोलीस प्रशासन, महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागांनी संयुक्त पाहणी करून जयंतीच्या एक दिवस आधी सर्व अडथळे दूर करावेत, असेही त्यांनी नमूद केले. मिरवणूक मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेट्स आदी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या. याशिवाय, दरवर्षीप्रमाणे भडकल गेट येथे स्टेज आणि पुतळ्याची व्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाने करावी. विद्युत रोषणाई, म्युझिक सिस्टम आणि सुशोभीकरणाची जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी, असेही ते म्हणाले. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी निर्देश दिले की, मिरवणुकीच्या स्वागतासाठी उभारण्यात येणारे स्टेज दिलेल्या परवानगीनुसारच बांधलेले आहे का, याची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करावी. नियोजित जागेपेक्षा अधिक जागा व्यापल्यास मिरवणुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्थायी समिती सभापती अनिल मकरीये यांनी मिरवणूक मार्गावर तसेच भडकल गेट येथे ॲम्बुलन्स व डॉक्टरांची व्यवस्था ठेवण्याची सूचना केली. आयुक्त अमोल येडगे यांनी मुख्य कार्यक्रम स्थळी उभारण्यात येणाऱ्या स्टेजची क्षमता आणि भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन नियोजन करण्याचे निर्देश दिले.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 9:06 pm

महावितरणच्या मान्सूनपूर्व कामांना वेग:छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी अनेक भागांत दुरुस्ती

येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन होणार असल्याने, महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळात मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्ती कामांना वेग आला आहे. पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीज उपकेंद्रांतील आणि वीजवाहिन्यांवरील यंत्रणेची दुरुस्ती केली जात आहे. या कामांसाठी शुक्रवारी अनेक भागांत वीजपुरवठा खंडित करून दुरुस्ती करण्यात आली. पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी, वीजपुरवठा खंडित होणे टाळण्यासाठी आणि विद्युत सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी ही कामे प्रामुख्याने दर शुक्रवारी केली जातात. ग्राहकांना याची पूर्वसूचना दिली जाते. महापारेषण आणि महावितरणच्या समन्वयातून ही कामे सुरू आहेत. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे ग्राहकांना वीज बंद होण्याबाबत कळवले जाते, तसेच बाधित क्षेत्रांत पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाते. या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती कामांमध्ये वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडणे, तुटलेले पिन व डिस्क इन्सुलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रे, फिडर पिलर, रिंगमेन युनिटचे अर्थिंग तपासणे, ऑइल फिल्टरेशन व ऑइल टॉप-अप करणे यांचा समावेश आहे. याशिवाय, रोहित्राच्या वितरण पेटीची दुरुस्ती, नादुरुस्त लाईटनिंग अरेस्टर बदलणे, वीजखांब व तारांचे मजबुतीकरण, तारांमधील झोल काढणे, गंजलेले खांब बदलणे, जुन्या वीजतारा बदलणे, फिडर पिलरची साफसफाई, इन्सुलेशन स्प्रे मारणे, उच्च व लघुदाब वीजतारांना गार्डिंग करणे, उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जिंग, पॉवर ट्रान्सफॉर्मरची देखभाल व ऑइल टॉप-अप यांसारखी विविध कामे केली जात आहेत. शुक्रवारी (१० एप्रिल) विविध ३३ केव्ही उपकेंद्रांत व त्यावरील वाहिन्यांवर नियोजित देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आली. खाजगी किंवा विविध संस्थांच्या मालकीच्या जागेतील झाडांच्या मोठ्या फांद्या वादळ व मुसळधार पावसामुळे कुंपणाबाहेरील वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी, संबंधित मालकांनी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेऊन किंवा त्यांच्या मदतीने अशा झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असेही महावितरणकडून कळवण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 9:04 pm

पुणे प्रदूषण वाढले: RMC, हॉटमिक्स प्लांट शहराबाहेर हलवणार:स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची घोषणा, नागरिकांच्या आरोग्यासाठी निर्णय

पुणे शहराच्या वायू प्रदुषणात वाढ होत आहे. यामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात अनेक भागात खाजगी तसेच महापालिकेचे आरएमसी प्लांटस् , डांबर प्लांटस् (हॉटमिक्स प्लांट) आहेत. यामुळे प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन प्रामुख्याने महापालिकेचे आरएमसी प्लांट आणि डांबर प्लांट शहराबाहेर हलविण्यासाठी प्रशासनाने काम करावे. तसेच शहरात प्रदूषण नियामक मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या प्लांटस्वर तातडीने कारवाई करावी, असे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. नगरसेवक हरिदास चरवड यांनी वडगाव परिसरात सुरू असलेल्या आरएमसी प्लांटस्मुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याने कारवाई करावी. दाट लोकसंख्येच्या ठिकाणी असलेले हे प्लांटस् हलवावेत असा प्रस्ताव स्थायी समितीला दिला होता. यावर आज स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा झाली. प्रदूषण नियामक मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेले आरएमसी तसेच डांबर प्लांटवर तातडीने कारवाई करावी, असे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच नजीकच्या काळात शहराच्या हद्दीवर लोकसंख्या कमी असलेल्या भागांमध्ये हे प्रकल्प हलवण्याबाबत खाजगी व्यावसायीकांना देखिल आवाहन करण्यात येणार आहे. महापालिकेचा देखिल येरवडा येथे डांबर प्लांटस् आहेत. लवकरच हे डांबर प्लांटस् देखिल शहराच्या हद्दीवरील चार कोपर्‍यांमध्ये विभागण्यात येतील. यासाठी जागांचा शोध सुरू असून शिंदेवाडी जकातनाका आणि वाघोली येथील जागेत नव्याने प्लांटस उभारण्याची पुढील सहा महिन्यांत कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत, असे श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.|

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 9:02 pm

पीएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्तपदी के. मंजुलक्ष्मी रुजू:जनहितार्थ प्रकल्पांना गती देण्यावर भर देणार

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अतिरिक्त महानगर आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी (१० मे) पदभार स्वीकारला. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी त्यांचे स्वागत करत पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकारल्यानंतर के. मंजुलक्ष्मी यांनी ‘पीएमआरडीए’च्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, पुणे महानगर प्रदेशाचा विस्तार लक्षात घेता, ‘पीएमआरडीए’मार्फत राबविण्यात येणाऱ्या जनहितार्थ प्रकल्पांना आणि पायाभूत सुविधांच्या योजनांना गती देण्यावर माझा भर राहील. महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांशी समन्वय साधून नियोजित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी नमूद केले. के. मंजुलक्ष्मी या २०१३ च्या बॅचच्या महाराष्ट्र कॅडरच्या आयएएस अधिकारी आहेत. २०२० ते २०२३ या कोविड काळात त्यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी म्हणून तीन वर्षे यशस्वीपणे काम केले आहे. यापूर्वी त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक म्हणून अडीच वर्षे आणि आयुक्त म्हणून तीन महिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कोल्हापूरमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासोबतच शहर विकासावर त्यांनी विशेष भर दिला. केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी, महालक्ष्मी मंदिराजवळील सरस्वती टॉकीजचे पार्किंग कार्यान्वित करणे, शहरी विकास आणि शहर स्वच्छता या बाबतीत त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. ‘पीएमआरडीए’मार्फत राबविण्यात येणारा हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो मार्गिका ३, रिंग रोड आणि प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना के. मंजुलक्ष्मी यांच्या अनुभवामुळे अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. यावेळी सहआयुक्त रूपाली आवले-डंबे, पूनम मेहता, मुख्य वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, संचालक (विकास परवानगी) अविनाश पाटील, उपसंचालक स्मिता कलकुट्टी, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, उपायुक्त हिंमत खराडे, राजेश माशेरे, तहसीलदार आशा होळकर, जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे आदी अधिकारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 9:02 pm

नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण लवकरच:पंकजा मुंडेंची घोषणा; सांडपाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी नदी सुशोभीकरणापेक्षा तिच्या प्रदूषणमुक्तीवर अधिक भर देण्याची भूमिका मांडली आहे. राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पुण्यात सांगितले. आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला आमदार उमा खापरे, आमदार शंकर जगताप, महापौर रवी लांडगे, 'पीएमआरडीए' चे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे सहसचिव रमेश मनाले, 'पीएमआरडीए' चे अतिरिक्त आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे आदी उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी संस्था आणि उद्योगांकडून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाल्याचे पंकजा मुंडे यांनी नमूद केले. अनेक उद्योगांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले जातात, मात्र योग्य देखभालीअभावी ते बंद अवस्थेत असतात. यापुढे अशा उद्योगांवर केवळ नोटीस न बजावता थेट आणि कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांना नदीपात्रातील अतिक्रमणे तातडीने काढण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. प्रत्येक गृहनिर्माण संस्थेस (सोसायटी) ‘एसटीपी’ सक्तीचा करावा आणि आपल्या हद्दीतील प्रत्येक नाला ‘एसटीपी’ला जोडून केवळ प्रक्रिया केलेलेच पाणी नदीत जाईल, याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले. जलप्रदूषणासोबतच बैठकीत वाढत्या वायुप्रदूषणाच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. बांधकामाच्या ठिकाणी इमारती योग्य प्रकारे झाकल्या न गेल्याने हवेतील धुलीकणांचे प्रमाण वाढते. त्यामुळे अशा उघड्यावर सुरू असलेल्या बांधकामांना तत्काळ नोटिसा बजावून हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना सक्ती करण्याचे निर्देश मंत्री मुंडे यांनी 'पीएमआरडीए' व महानगरपालिकेला दिले. या बैठकीत ‘पीएमआरडीए’ व पिंपरी-चिंचवड महापालिकेने (पीसीएमसी) इंद्रायणी, पवना व मुळा-मुठा नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले. ‘पीएमआरडीए’चे मुख्य अभियंता रिनाज पठाण व महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सविस्तर तांत्रिक माहिती दिली. लोकप्रतिनिधींनी शहरातील जल व वायुप्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत राज्यशासनाने भरीव सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली, ज्यावर मंत्री मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पंकजा मुंडे यांनी प्रतिपादन केले की, 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना' ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगारक्षम बनवून त्यांना 'महाराष्ट्राचा आर्थिक कणा' बनवण्यावर भर देत आहे. ही योजना ग्रामीण पशुपालकांच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे एक सशक्त माध्यम ठरणार आहे.पशुसंवर्धन आयुक्तालयातील कामधेनू सभागृहात 'मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना' सादरीकरण व अंमलबजावणी कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुदंडा, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील, दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोड, बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे, विभागाचे सहसचिव निवृत्तीनाथ मऱ्हाळे, तसेच प्रादेशिक व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त उपस्थित होते.मुंडे म्हणाल्या की, या योजनेद्वारे ग्रामीण युवकांना पशुपालनाकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता, एक व्यावसायिक उद्योजकता म्हणून पाहण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळी-मेंढी पालनासाठी तांत्रिक व आर्थिक मदत देऊन ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढवणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. पशुपालनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुजन्य उत्पादनांची उत्पादकता वाढवणे आणि स्थानिक स्तरावर स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगार विकासाच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्यावर पशुसंवर्धन विभागाचा भर आहे.पशुसंवर्धन विभागाच्या या पुढाकारामुळे राज्याच्या ग्रामीण विकास प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे. त्यामुळे योजनेत पात्र लाभार्थ्यांची निवड करावी आणि योजनेत गैरप्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. ही योजना प्रभावीपणे राबवून यशस्वी करण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करावेत. योजनेचे जिल्हा, तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करावीत, तसेच योजनांची अधिकाधिक जनजागृती करावी. कामाचा महिनानिहाय आढावा घेण्यात येईल आणि येत्या काळात लाभ वाटपाबाबत भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.मुंडे यांनी पुढे सांगितले की, पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन आदी व्यवसाय करून शेतकऱ्यांमधून उद्योजक निर्माण होत आहेत. पशुसंवर्धनाला उद्योजकाचा दर्जा दिला पाहिजे आणि ग्रामीण युवकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. येत्या काळात वराहपालन व्यवसायावर भर द्यावा, अंड्याचा ब्रँड निर्माण करण्याकरिता सामूहिक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करावेत. पशुसंवर्धन क्षेत्रात 'एक जिल्हा एक उत्पादन' या तत्वावर काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.डॉ. रामास्वामी एन. यांनी यावेळी सांगितले की, महाराष्ट्र हे पशुसंवर्धन क्षेत्राला कृषीचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य आहे. त्यामुळे विभागाला कृषीचा दर्जा निर्माण करायचा आहे. महाराष्ट्र शासनाच्या 'व्हिजन डॉक्युमेंट' विकास क्षेत्रात कृषी आणि पशुसंवर्धन यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:59 pm

पोलिसच बनले पोलिसांचे वैरी!:गुप्तधनाच्या तपासादरम्यान अकोला पोलिसांचा बुलढाणा पोलिसांवर हल्ला, गुन्हा दाखल

बुलढाणा जिल्ह्यातील तामगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुप्तधन प्रकरणाच्या तपासासाठी गेलेल्या बुलढाणा पोलिसांवर अकोला पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन जिल्ह्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या या थेट संघर्षामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस दलातील या अंतर्गत वादाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. तामगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी संतोष आखरे आणि प्रमोद मुळे हे गुप्तधन प्रकरणाच्या तपासासाठी रात्रीच्या वेळी कवठळ गाव परिसरात गेले असताना, त्यांना तिथे दोन संशयित व्यक्ती आढळल्या. पोलिसांनी या व्यक्तींना रात्रीच्या वेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि या वादाचे रूपांतर थेट हिंसक हल्ल्यात झाले. संबंधित संशयितांनी केलेल्या या हल्ल्यात संतोष आखरे आणि प्रमोद मुळे हे दोन्ही पोलिस कर्मचारी जखमी झाले. तामगाव पोलिसांवर हल्ला करणारे संशयित दुसरे कोणी नसून अकोला पोलिस दलात कार्यरत असलेले राजेश गव्हाळे आणि मनोज गव्हाळे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या हल्ल्यात तामगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी संतोष आखरे आणि प्रमोद मुळे हे दोघे जखमी झाले असून, याप्रकरणी तामगाव पोलिसांनी संबंधित हल्लेखोर कर्मचाऱ्यांविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस दलातीलच कर्मचाऱ्यांनी सहकाऱ्यांवर हल्ला केल्याच्या या प्रकरणाचा पुढील तपास सध्या गांभीर्याने सुरू आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना तातडीने शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक पंडितराव सोनवणे करत आहेत. मात्र, अकोला पोलिस दलातील हे कर्मचारी रात्रीच्या वेळी बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेत नेमके कोणत्या कारणासाठी आले होते, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असून त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:47 pm

युद्धविराम धोक्यात

इराणसोबत झालेल्या युद्धविरामानंतरही इस्रालयने लेबनॉनची राजधानी बैरूतवर भीषण हल्ले चढवल्यामुळे तणाव वाढला आहे. मंगळवारी रात्री जाहीर झालेल्या युद्धविरामावर उभय देशांनी विजयाचा दावा केला असला तरी शनिवारी होणा-या चर्चेबाबत आता अनिश्चितता निर्माण झाली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये सुरुंग पेरल्याचे संकेत दिल्याने खनिज तेलाच्या जागतिक वाहतुकीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. कराराचे पालन न झाल्यास यापूर्वीपेक्षाही […] The post युद्धविराम धोक्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 8:34 pm

वेरूळमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात होणार साजरी:बॅनर ओपनिंग आणि डीजेच्या गजरात भीम सैनिकांचा उत्सव

छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वेरूळमध्ये भीम सैनिक मित्र मंडळाच्या वतीने उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बॅनर ओपनिंग आणि डीजेच्या गजरात भीम सैनिकांनी बाबासाहेबांना अभिवादन करत जयंती साजरी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी वेरूळमध्ये मोठा बॅनर उभारण्यात आला. बॅनर ओपनिंग सोहळा डीजेच्या गजरात पार पडला. या प्रसंगी भीम सैनिकांनी “जय भीम” च्या घोषणांनी परिसर दणाणून टाकला. सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा संदेश कार्यक्रमादरम्यान भीम सैनिक मित्र मंडळाने बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित भाषणे दिली. त्यांनी सामाजिक न्याय, समानता आणि बंधुतेचा संदेश देत बाबासाहेबांच्या कार्याची महती सांगितली. कार्यक्रमात वेरूळमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. युवा वर्गाने उत्साहाने डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार केला आणि समाजात एकतेचा संदेश दिला. आंबेडकर जयंतीचे हे आयोजन वेरूळमधील सामाजिक एकतेचे प्रतीक ठरले आहे. भीम सैनिक मित्र मंडळाने बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत स्थानिकांना प्रेरणा दिली. जय भीम!

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:20 pm

भारतीय स्टेट बँकेकडून निधी पुरवठ्याचा अभाव:हळद खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प, व्यापारी महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

हिंगोलीच्या भारतीय स्टेट बँकेकडून इतर बँकांना निधीचा पुरवठा होत नसल्याने बाजार समिती अंतर्गत हळद व इतर शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले असून या प्रकरणात आता तातडीने लक्ष घालून बँकेला आवश्‍यक सूुचना देण्याची मागणी व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे शुक्रवारी ता. १० केली आहे. यासंदर्भात व्यापारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अनिल नैनवाणी, प्रशांत सोनी, पवन मुंदडा, राजेश मुंढे, विक्रम गोविंदवार, आशिष हेडा यांच्यासह व्यापाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी गुप्ता यांची भेट घेतली. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील एक प्रमुख कृषी बाजारपेठ असून येथे विशेषतः हळदीचा मोठ्या प्रमाणावर व्यापार केला जातो. सध्या हळदीचा हंगाम सुरू असून बाजारात आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यावर्षी जिल्ह्यात “एक जिल्हा एक उत्पादन” या उपक्रमांतर्गत हळदीची मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्यामुळे बाजारपेठेत हळदीची आवक लक्षणीयरित्या वाढली आहे. मात्र बँकेकडून इतर बँकांना आवश्‍यक निधीचा पुरवठा केला जात नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतीय स्टेट बँकेला चेस्ट बँक म्हणून प्राधिकृत केलेले असून, या बँकेमार्फतच इतर बँकांना रोख निधीचा पुरवठा केला जातो. परंतु सध्याच्या परिस्थितीत या बँकेकडून इतर बँकांना त्यांच्या मागणीप्रमाणे व आवश्यकतेनुसार निधी पतपुरवठा केला जात नसल्यामुळे संपूर्ण बँकिंग व्यवस्थेत अडथळे निर्माण झाले आहेत. सदर परिस्थिती हिंगोली जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या व व्यवहार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जाणवत असून संपूर्ण जिल्ह्यात समान अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे व्यापाऱ्यांना त्यांच्या खात्यातील उपलब्ध रक्कमही वेळेवर मिळत नाही, परिणामी शेतकऱ्यांना देयके अदा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आहे. तर बाजारातील खरेदी-विक्री व्यवहार मंदावले असून मोंढ्यातील व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित बँकांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात अशी मागणी व्यापारी महासंघाने केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:13 pm

साध्या थकव्याचे रूपांतर दुर्मिळ कॅन्सरमध्ये:नाशिकच्या 55 वर्षीय शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज यशस्वी; 14 सेंमी आकाराचा आढळून आला ट्यूमर

अनिल कदम यांचा व्यवसाय सर्वाधिक खडतर कष्टांची मागणी करणारा अर्थात शेतीचा होता. त्यामुळे नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांना थकवा जाणवायला लागला तेव्हा हे कामामुळेच होत असणार असाच त्यांच्या कुटुंबातल्या सर्वांचा समज झाला. ही लक्षणे बळावल्यावर, त्यांना उलट्या सुरू झाल्यावर तसंच गिळताना त्रास होऊ लागल्यावर मात्र त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि नाशिकच्या या ५५ वर्षीय शेतकऱ्याच्या साध्या थकव्याच्या तक्रारीतून सुरू झालेलं हे प्रकरण एका दुर्मिळ आणि जीवाला धोका निर्माण करणाऱ्या कर्करोगाच्या निदानापर्यंत पोहोचले. या आजारातून त्यांचे प्राण वाचविण्यासाठी लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दीपक छाब्रा यांच्या नेतृत्वाखाली पोटाच्या काही सर्वाधिक जटिल शस्त्रक्रियांमध्ये गणली जाणारी शस्त्रक्रिया पार पाडावी लागली. अनिल यांची नेहमीची रक्ततपासणी करण्यात आली व त्यातून त्यांची हिमोग्लोबीनची पातळी भयंकर खाली म्हणजे ३.५ g/dL पर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. यातून त्यांना तीव्र अनिमिया असल्याचे सिद्ध झाल्याने तातडीने रक्त चढविण्यात आले. अधिकच्या तपासणीमधून शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्याचे उघड झाले. एंडोस्कोपीमधून अल्सरयुक्त वाढीचे निदान झाले व बायोप्सीमधून हा एक गॅस्ट्रोइंटेस्टिनल स्ट्रोमल ट्यूमर (जीआयएसटी), नावाचा पचनमार्गाचा एक दुर्मिळ कॅन्सर असल्याचे निश्चित झाले. आजाराची संपूर्ण व्याप्ती मात्र प्रगत इमेजिंगनंतरच स्पष्ट झाली. एका कॉन्ट्रास्ट-एनहान्स्ड सीटी स्कॅनमधून १४ सेंमी आकाराचा एक प्रचंड मोठा ट्यूमर जेज्युनमधून म्हणजे लहान आतड्याच्या मधल्या भागातून उगम पावत असल्याचे दिसून आले. जीआयएसटी इथे सहसा तयार होताना दिसत नाही. ट्यूमरने उदर, पॅन्क्रियाज (स्वादुपिंड), स्प्लीन (प्लीहा) आणि लहान व मोठे आतडे या दोहोंच्याची काही भागात आधीच शिरकाव केलेला होता. या स्कॅनमधून इंटर्नल नेक्रॉसिसने (अंतर्गत उतींचा नाश) ग्रस्त असे काही भागही दिसून आले, ज्यांच्यामुळे रक्तस्त्रावाचा धोका लक्षणीयरित्या वाढलेला होता. ट्यूमर असा मोठ्या प्रमाणात पसरलेला असूनही अनिल यांना केवळ अशक्तपणा जाणवत होता. पोटातील कॅन्सर्स प्रगत टप्प्यांवर पोहोचपर्यंत किती घातकरित्या छुप्या स्थितीत राहतात, हे यातून ठळकपणे दिसून आले. आपल्या वडिलांच्या निदानाविषयी बोलताना त्यांच्या कन्या भक्ती म्हणाल्या, “आम्ही लिलावती हॉस्पिटलमध्ये आलो, व इथल्या डॉक्टरांनी आम्हाला हा गॅस्ट्रोइंटेन्सिटनल स्ट्रोमल ट्यूमर (जीआयएसटी) असल्याचे जवळजवळ खात्रीपूर्वक सांगितले. माझ्या वडिलांवर यापूर्वी १९९६ मध्ये पोटाची शस्त्रक्रिया झाली होती, त्यामुळे सुरुवातीला आम्ही हे प्रकरण कितपत गंभीर आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो. फेब्रुवारी महिन्यात आम्ही नाशिकला परतलो आणि त्यांनी ट्यूमरचा आकार कमी व्हावा यासाठीची औषधे सुरू केली. या काळात, त्यांना वरचेवर अस्वस्थ वाटायचे. त्याचं मन जरा दुसऱ्या गोष्टींत रमावे म्हणून एक दिवस आम्ही त्यांना शेतात थोडं चालण्यासाठी घेऊन गेलो, पण अचानक ते प्रचंड घामाघूम झाले. आम्ही त्यांना घरी आणलं, तर ते कोसळले, त्यांचे हात पांढरे पडले होते आणि त्यांच्या शौचातून रक्त जाऊ लागले होते.” “GIST खूप मोठ्या आकाराचा असल्याचे डॉक्टरांनी आम्हाला सांगितले होते आणि मुख्यत: सततच्या रक्तस्त्रावामुळे तो घातक बनला होता. आजुबाजूच्या अवयवांमध्येही तो पसरला होता आणि प्लीहा व पोटाच्या इतर भागांवर त्याचा परिणाम होत होता, ज्यामुळे शस्त्रक्रिया करणं प्रचंड आव्हानात्मक झाले होते.” त्या पुढे म्हणाल्या. अनिल यांना इमॅटिनिब (Imatinib) हे औषध सुरू करण्यात आले, जी जीआयएसटीसाठी वापरण्यात येणारी एक टार्गेटेड थेरपी आहे. मात्र, पहिल्या डोसनंतर लगेचच त्यांना प्रचंड अंतर्गत रक्तस्त्राव सुरू झाला. यामुळे हिमोग्लोबीनची पातळी अधिकच खाली गेल्याने तातडीने रक्त चढवावे लागले व त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. या टप्प्यावर फक्त वैद्यकीय थेरपी पुरेशी ठरणे शक्य नव्हते. सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दीपक छाब्रा यांनी लिलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे उच्च जोखमीची, क्युरेटिव्ह सर्जरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. ट्यूमरचा आकार आणि त्यात अनेक अवयवयांचा समावेश असणे लक्षात घेता, या प्रक्रियेसाठी असाधारण दर्जाची अचूकता आणि नियोजन गरजेचे होते. टीमने मल्टीव्हिसेलर रिसेक्शन पार पाडले, ज्यात उदराचा भाग, स्वादुपिंडाचे टोक व प्लीहा तसेच लहान व मोठ्या आकड्याचे काही भाग यांच्यासकट ट्यूमर काढून टाकण्यात आला. ट्यूमर पसरण्यापासून रोखण्यासाठी व ऑन्कोलॉजिक सुरक्षेसाठी सर्व प्रभावित अवयव एका सलग भागाच्या रूपात काढून टाकण्यात आले. या प्रक्रियेविषयी बोलताना लिलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजीस्ट डॉ. दीपक छाब्रा म्हणाले, “ट्यूमर काढून टाकल्यानंतर, पुनर्बांधणीची एक गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडण्यात आली, ज्यात Roux-en-Y पुनर्बांधणी व आतड्यांची पुनर्जोडणी यांचा सहभाग होता. यातून पचनमार्गाची सलगता पूर्ववत करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी प्रगत तांत्रिक कुशलतेची गरज होतीच पण विशेषत: आधीच नऊ युनिट्स रक्ताची गरज भासलेल्या या रुग्णाच्या बाबतीत शस्त्रक्रियेच्या आधी, दरम्यान आणि नंतर काळजीपूर्वक केल्या जाणाऱ्या आनुषंगिक कामांच्या व्यवस्थापनाचीही गरज होती. ही केस विशेषत्वाने आगळीवेगळी असल्याची नोंद आम्ही घेतली, कारण यात अशक्तपणा हे एकच लक्षण दिसत होते, ट्यूमरचा आकार १४ सेंमी, म्हणजे असाधारणपणे मोठा होता जो जेज्युनमसारख्या अत्यंत दुर्मिळ जागी तयार झाला होता, यात अनेक अवयवांचा समावेश होता आणि टार्गेटेड थेरपी सुरू केल्यानंतर तीव्र रक्तस्त्राव सुरू झाला होता. अशी सर्व आव्हाने असूनही एकाच टप्पातील क्युरेटिव्ह शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.” “हॉस्पिटलच्या प्रगत पायाभूत सोयीसुविधांमुळे हा परिणाम साध्य करणे शक्य झाले. यात हाय-रेझोल्युशन इमेजिंग, स्पेशलाइज्ड निदानात्मक तपासण्या, एक संपूर्णतया सुसज्ज अशी रक्तपेढी आणि अतिदक्षता विभागाचे पाठबळ व सुसंयोजित मल्टिडिसिप्लिनरी देखभाल यांचा सहभाग होता.” डॉ. दीपक छाब्रा पुढे म्हणाले. अकारण जाणवणारा सततचा अशक्तपणा किंवा तीव्र अनिमिया या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये, कारण ती अंतर्गत रक्तस्त्रावाची किंवा छुप्या कर्करोगाची प्रारंभिक चिन्हे असू शकतात हे अनिल यांच्या प्रकरणातून ठळकपणे दिसून येते. लवकर झालेले निदान आणि वेळच्यावेळी केलेला वैद्यकीय हस्तक्षेप या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. साध्या थकव्याच्या तक्रारीपासून सुरू झालेले हे दुखणे जटिल कॅन्सरसंबधी आणीबाणीपर्यंत पोहोचले, पण शस्त्रक्रियेच्या निर्णयाबाबत खंबीरपणे केलेले नेतृत्व आणि सर्वसमावेशक देखभाल यांच्या माध्यमातून आम्हाला एक प्राणरक्षक परिणाम मिळविणे शक्य झाले. कर्करोगावरचे आधुनिक उपचार व त्यांना तज्ज्ञांचे व पायाभूत सोयिसुविधांचे मिळालेले पाठबळ यांच्या मदतीने अगदी सर्वाधिक आव्हानात्मक स्थितीही कशाप्रकारे हाताळता येते हे या प्रकरणातून ठळकपणे दिसून येते. रुग्णाची तब्येत पूर्ववत होत असली तरीही डॉक्टरांकडून कधी एकदा पुन्हा काम सुरू करण्याची परवानगी मिळते व कधी एकदा आपण आपल्या प्रिय जमिनीकडे परततो, शेताची मशागत करतो आणि मातीशी नव्याने नाते जोडतो याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत. अंतर्गत अवयवांच्या अनेक पुनर्जोडण्यांचा समावेश असलेली इतकी मोठी शस्त्रक्रिया होऊनही रुग्णाची तब्येत सुरळीतपणे पूर्ववत होत आहे. शस्त्रक्रियेनंतर नवव्या दिवशी त्यांना घरी पाठवण्यात आले ही गोष्ट स्वत: एक आयुर्वेदिक डॉक्टर असलेली त्यांची कन्या भक्ती यांनी सांगितल्याप्रमाणे, शस्त्रक्रियेच्या वाखाणण्याजोग्या कौशल्यांविषयी खूप काही सांगून जाते.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:01 pm

केंद्रीयमंत्री डॉ. मांडवियांच्या हस्ते 'जन सेहत सेतू'चे लोकार्पण:'निरोगी भारत' संकल्पनेसाठी आरोग्य क्षेत्राची मोठी जबाबदारी: डॉ. मांडविया

केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी 'निरोगी भारत, समृद्ध भारत व विकसित भारत' या संकल्पनेसाठी आरोग्य क्षेत्राची मोठी जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसह प्रत्येकाने यात योगदान देणे आवश्यक आहे. त्यांनी 'जन सेहत सेतू' आरोग्य शिबीर कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले, जिथे महिन्यातून एक दिवस मोफत आरोग्य तपासणी व उपचार उपलब्ध करून दिले जातील. डॉ. मांडविया 'जन सेहत सेतू' शिबिराच्या उद्घाटन व पोर्टलच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. सिम्बॉयसिस ऑडिटोरियम, विमाननगर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, फोर्स वनचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. कृष्णप्रकाश, आरोग्य अधिकारी नीना बोराडे, न्यूरोमायलिटिस ऑप्टिकाचे अध्यक्ष अमोल लुंकड आणि संघटक प्रशांत चौधरी यांच्यासह विविध संघटना व सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. मांडविया पुढे म्हणाले की, देशातील नागरिकांना निरोगी ठेवण्याची जबाबदारी वैद्यकीय व्यावसायिकांवर आहे. ७५ वर्षांपूर्वी आरोग्य सेवा सहज उपलब्ध नव्हत्या; त्यावेळी वेदशाळांच्या माध्यमातून उपचार केले जात होते आणि पैशाला प्राधान्य दिले जात नव्हते. त्यामुळे डॉक्टरांचे काम केवळ व्यवसाय नसून एक मोठी जबाबदारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पुणे शहरातील विविध संघटना व संस्थांनी एकत्र येऊन दर महिन्याच्या ९ तारखेला मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी 'जनसेहत सेतू अभियान' राबवण्याचा घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. प्रत्येकाने आपला वेळ, संपत्ती आणि ज्ञानाचे दान देऊन समाजाची सेवा करावी. आशासेविका, सेवाभावी संस्था आणि संघटनांनी या शिबिरांविषयी जनजागृती करून हे अभियान राष्ट्रव्यापी बनवावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, राज्यातील नागरिकांना तत्पर, दर्जेदार व मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे हे शासनाचे प्राधान्य आहे. आजारांचे स्वरूप आणि उपचारांच्या खर्चाबाबत नागरिकांमध्ये भीती असते. 'जन सेहत सेतू' अभियानाच्या माध्यमातून एक दिवस सेवेसाठी समर्पित करणे हे महाराष्ट्र आणि देशासाठी एक आदर्श उदाहरण ठरेल. देशातील महत्त्वपूर्ण आरोग्य सेवा शिबिरांची सुरुवात पुण्यातून होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 7:32 pm

स्वारगेटमध्ये खुनाचा प्रयत्न:वर्षभर पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर अटकेत

स्वारगेट परिसरात एका व्यक्तीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा हा सराईत गुन्हेगार अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. राजसिंग युवराजसिंग जुनी (वय २८, रा. पाटील इस्टेट, मुंबई-पुणे रस्ता, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जुनी याच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो गेले वर्षभर पोलिसांना गुंगारा देत होता. आरोपी एका इमारतीच्या तळमजल्यावर थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस कर्मचारी विशाल दळवी आणि आझिम शेख यांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला गुन्हे शाखेने पुढील कारवाईसाठी स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, साधना ताम्हाणे, संदीप शिर्के, विशाल दळवी, शंकर कुंभार, शंकर नेवसे, आझीम शेख, विजयकुमार पवार, ऋषीकेश व्यवहारे आणि सद्दाम तांबोळी यांनी ही कारवाई यशस्वी केली. अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या एका दुकानदाराविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचारी राहुल डोके (वय २९) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील सुतारदर दवाखान्याजवळ महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात येत होती. त्या वेळी दुकानाबाहेर प्लास्टिकचे ड्रम ठेवण्यात आले होते. अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांनी पदपथावर ठेवलेले ड्रम जप्त केले. कारवाई केल्याने अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन कारवाईस विरोध केला, तसेच धमकावले. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दुकानदाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 7:24 pm

संतोष देशमुखांच्या हत्येची तक्रार मागे घ्या!:आरोपींचा धनंजय देशमुखांना प्रस्ताव, जेलमधून बाहेर आलेल्या दादासाहेब खिंडकरांचा दावा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर हे तब्बल 13 महिन्यांच्या कारावासानंतर अखेर तुरुंगाबाहेर आले आहेत. एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता, ज्यासाठी त्यांना वर्षभरापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावे लागले. कारागृहातून सुटका झाल्यानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पगुच्छ आणि ओवाळणी करत खिंडकर यांचे जंगी स्वागत केले. तुरुंगातून बाहेर आल्यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना खिंडकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. आपल्याला एका जुन्या व्हिडिओच्या आधारे खोट्या प्रकरणात जाणीवपूर्वक फसवण्यात आले असून, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला होता, असे त्यांनी सांगितले. ही तक्रार मागे घेण्याच्या बदल्यात सुटकेचा प्रस्ताव धनंजय देशमुखांसमोर ठेवण्यात आला होता, असा गंभीर आरोपही खिंडकर यांनी यावेळी केला. अनेक लोकांवर असे खोटे गुन्हे दाखल केले दादासाहेब खिंडकर म्हणाले, मला फसवण्यात आलेला हा जुना व्हिडिओ आहे. हे सगळे लोक पैसे घेतात, नशा करतात आणि खोटे गुन्हे दाखल करतात. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली, ते प्रकरण दाबण्यासाठी या प्रकरणाचा वापर करण्यात आला. याच लोकांनी गावातल्या अनेक लोकांवर असे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. याच आरोपींनी अनेक लोकांना मारहाण केली. परंतु, त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात येत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तक्रार मागे घेण्याचा प्रस्ताव पुढे बोलताना दादासाहेब खिंडकर म्हणाले, आपल्यावर जुन्या व्हिडिओच्या माध्यमातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. आणि तुरुंगात टाकण्यात आले. आपण तुरुंगात असताना आपल्यावर ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केला त्यांनी धनंजय देशमुख यांना एक प्रस्ताव दिला. दादासाहेब खिंडकरला सोडवायचे असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तक्रार मागे घ्या असा प्रस्ताव धनंजय देशमुख यांना देण्यात आला होता. तसेच आपल्यावर ज्यांनी खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्यामागे मोठी राजकीय शक्ती असल्याचा दावाही दादासाहेब खिंडकर यांनी केला आहे. तसेच या सर्वांनी गावातील अनेक लोकांना मारहाण केली आहे. त्याचे अनेक व्हिडिओ आपण पोलिसांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच या आरोपींवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा दावाही खिंडकर यांनी केला आहे. देशमुख कुटुंबासोबत कायम असून हा लढा सुरूच असेल दरम्यान, आपण देशमुख कुटुंबासोबत कायम असून हा लढा सुरूच असेल, जीव गेला तरी यातून आपण माघार घेणार नसल्याचे दादासाहेब खिंडकर यांनी सांगितले आहे. तसेच खिंडकरचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, 1 मार्च रोजी माझा वाढदिवस होता. तुरुंगात असल्यामुळे मित्रांना तो साजरा करता आला नाही. त्यामुळेच त्यांनी जल्लोषात स्वागत केल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 6:24 pm

भारताची 65 टक्के लोकसंख्या 27 वर्षांखालील:शिक्षण, कौशल्य विकासच भविष्याची गुरुकिल्ली: कौस्तुभ धवसे

भारताची 65 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या 27 वर्षांखालील आहे. या निर्णायक टप्प्यावर शिक्षण, कौशल्य विकास आणि योग्य धोरणे भारताच्या आर्थिक व जागतिक भविष्याला दिशा देतील, असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक आणि धोरण विभागाचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी म्हटले आहे. 2029 पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टाचा उल्लेख करत, आज घेतलेले निर्णय भविष्यातील सक्षम मनुष्यबळ घडवण्यासाठी महत्त्वाचे ठरतील, असे त्यांनी सांगितले. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या संयुक्त विद्यमाने सिंबायोसिस विद्यापीठाच्या लवळे कॅम्पसमध्ये तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थित्यंतरातील आंतरराष्ट्रीय शिक्षण: पद्धती, धोरणे आणि दृष्टिकोन या संकल्पनेवर आधारित या परिषदेत शैक्षणिक, शासकीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमधील मान्यवर सहभागी झाले आहेत. या परिषदेचा उद्घाटन सोहळा आणि प्रमुख भाषण सत्र 10 एप्रिल रोजी विद्यापीठाच्या सभागृहात पार पडले. या सत्रात कौस्तुभ धवसे आणि डिकिन विद्यापीठाचे कुलगुरू व अध्यक्ष प्रा. आयन मार्टिन यांनी मार्गदर्शन केले. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. विनय पाठक, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या धोरणात्मक दृष्टिकोनावर अधिक प्रकाश टाकताना धवसे यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात जागतिक सहकार्य आणि नवोपक्रमावर भर दिला. त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ उभारण्यात येणाऱ्या 300 एकरच्या ‘इंटरनॅशनल एज्यु-सिटी’ प्रकल्पाची माहिती दिली. या प्रकल्पाद्वारे जागतिक दर्जाच्या विद्यापीठांना आकर्षित करून संशोधन, सहकार्य आणि नवकल्पनांसाठी सक्षम परिसंस्था निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. 2032 पर्यंत सुमारे 75 हजार विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची योजना असून, यामुळे भारताला जागतिक ज्ञान व कौशल्य केंद्र म्हणून स्थान मिळेल, असे ते म्हणाले. डिकिन विद्यापीठाचे कुलगुरू व अध्यक्ष प्रा. आयन मार्टिन यांनी जागतिक दृष्टिकोन मांडताना सांगितले की, ट्रान्स नॅशनल शिक्षणाची यशस्विता एकतर्फी नसून, समतोल व परस्पर सहकार्यावर आधारित भागीदारीमध्ये आहे. समान उद्दिष्टे, समान लाभ आणि वेळ, कौशल्य तसेच संसाधनांमध्ये समतोल गुंतवणूक या तत्त्वांवर आधारित सहकार्यच प्रभावी ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले. भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील वेगवान बदलांचा उल्लेख करताना प्रा. मार्टिन यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हे जागतिक सहकार्याला चालना देणारे महत्त्वाचे पाऊल असल्याचे नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 5:52 pm

सहकार भारतीमुळे सहकार चळवळीला नैतिक अधिष्ठान:विद्याधर अनास्कर यांचे मत, तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन

पुणे येथे सुरू झालेल्या तीन दिवसीय 'सहकार महोत्सवा'च्या उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सहकार भारतीमुळे सहकार चळवळीला नैतिक अधिष्ठान लाभले असल्याचे मत व्यक्त केले. सहकार क्षेत्राला लाभलेल्या सहकार भारतीच्या नेतृत्वामुळे ही चळवळ सर्वार्थाने प्रगती करत असल्याचेही ते म्हणाले. सहकार भारती पुणे विभाग आणि अस्तित्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून सुरू झालेला हा महोत्सव रविवार, १२ एप्रिलपर्यंत सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानाशेजारील कलाग्राम येथे सुरू राहणार आहे. कोणतीही चळवळ यशस्वी होण्यासाठी किंवा ती लयास जाण्यासाठी तिचे नेतृत्व महत्त्वाचे असते. सहकार भारतीच्या सक्षम नेतृत्वामुळेच सहकार चळवळ अधिक बळकट झाली असून तिला योग्य दिशा मिळाली आहे, असे अनास्कर यांनी नमूद केले. यावेळी सहकार भारती पुणे महानगराचे अध्यक्ष सीए दिनेश गांधी, अस्तित्व फाउंडेशनच्या संचालक डॉ. राजश्री जायभाये, सहकार भारती राष्ट्रीय प्रकाशन प्रसिद्धी प्रमुख भालचंद्र कुलकर्णी, राष्ट्रीय महिला प्रमुख रेवती शेंदुर्णीकर, सहकार भारती पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर, पुणे जिल्हा गृहनिर्माण फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, सहकार महोत्सवाचे प्रमुख श्रीकृष्ण घोलप, सहकार भारती पुणे जिल्हा बँक प्रकोष्ठ प्रमुख सीए डॉ. केतन जोगळेकर, सहकार भारती राष्ट्रीय पतसंस्था प्रकोष्ठ प्रमुख शिरीष देशपांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. रवींद्र शिंगणापूरकर, सहकार भारती ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनायक तांबे, सहकार भारती पिंपरी चिंचवड महानगरचे अध्यक्ष दशरथ जाधव आणि सहकार भारतीचे प्रदेश कोषप्रमुख औदुंबर नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 5:48 pm

भाडेतत्त्वावर परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा:यासाठी एक पोर्टलही विकसित करावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाडेतत्त्वावर परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने भाडेतत्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा उभारून कार्यान्वित करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच यासाठी एक पोर्टल विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईसह अन्य महानगरांमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त आलेल्या नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात भाडेतत्वावरील घरे असली पाहिजेत. मागणीनुसार पुरवठा या तत्त्वावर भाडेतत्वाने घरे उपलब्ध होतील, याची काळजी घेण्यात यावी. घरांसाठी मागण्यांसंदर्भातील करारानुसार सर्व कार्यवाही होईल. याबाबत यंत्रणेने दक्षता घेतली पाहिजे. उपलब्ध असलेल्या भाडेतत्वावरील घरांबाबत यंत्रणेने समन्वयाने कार्यवाही केल्यास मालक व भाडेकरू या दोघांनाही अडचण येणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच पुढे बोलताना महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999 अंमलबजावणीच्या सक्षमीकरण व सुलभी करणाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, या कायद्याअंतर्गत सक्षम प्राधिकारी म्हणून पोलीस उपायुक्त यांना नियुक्त करावे. पोलिस स्टेशन अथवा पोलिसांचे परिक्षेत्र वाढल्यास त्यानुसार आपोआप सक्षम अधिकारी वाढतील, अशी व्यवस्था करावी. पोलिस उपायुक्तांच्या कामकाज यादीमध्ये सक्षम प्राधिकारी म्हणून काम पाहण्याच्या कामकाजाचा समावेश करण्यासाठी अधिसूचना काढण्याची कार्यवाही करावी. भाडेदर संदर्भातील न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यासाठी 100 विशेष न्यायालये स्थापन करावी. यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, न्यायालयाच्या परवानगीने भाडेदर संदर्भातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सायंकाळचे न्यायालय सुरू करावे, या न्यायालयांसाठी जागा नसल्यास भाडेतत्त्वावर जागा घेण्यात याव्यात. यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली निघतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. दारम्यान, या बैठकीला गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, पोलिस आयुक्त देवेन भारती, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, राधिका रस्तोगी, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव दिलीप घुमरे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 5:46 pm

सहावीतील विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण

परभणी : डी.के. इनामदार विद्येचे मंदिर मानल्या जाणा-या शाळेत एका १२ वर्षांच्या निष्पाप विद्यार्थ्याला प्राण्यासारखी वागणूक दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धमार्पुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान या नामांकित शाळेत एका शिक्षकाने आपल्या क्रूरतेच्या मर्यादा ओलांडत, इयत्ता सहावीत शिकणा-या अदित्य माधवराव अवकाळे याला प्लायवूडने बेदम मारहाण केली आहे. मारहाण इतकी भयानक होती की, आदित्यच्या कोवळ्या पाठीवर […] The post सहावीतील विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 5:39 pm

भाजपापेक्षा साप बरा

परगणा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर तीव्र टीका करत बंगाली जनतेला तृणमूल काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील तेंतुलिया येथे आयोजित निवडणूक सभेत बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधत सापावर विश्वास ठेवता येईल, पण भाजपवर नाही असे वक्तव्य केले.राज्य सुरक्षित ठेवायचे असेल तर टीएमसीला मतदान करा. संपूर्ण राज्यात टीएमसीची […] The post भाजपापेक्षा साप बरा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 5:32 pm

मोदी महिलांची दिशाभूल करतात

नवी दिल्ली : महिला आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पंतप्रधानांवर महिलांच्या मुद्यावर दिशाभूल करणारी भूमिका घेतल्याचा आरोप करत त्यांनी महिलांची माफी मागावी असे म्हणटले आहे. जयराम रमेश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान […] The post मोदी महिलांची दिशाभूल करतात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 5:23 pm

आता रशिया-युक्रेनमध्ये युद्धविराम

मास्को : मध्य पूर्वेमध्ये गेल्या ४० दिवसांसाठी सुरू असलेले युद्ध तुर्तास थांबले आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये १४ दिवसांच्या तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा झाली. त्यानंतर आता गेल्या ४ वर्षांपासून सुरू असलेल्या रशिय- युक्रेन युद्धाबाबतही मोठी बातमी आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी ३२ तासांच्या युद्धविरामाची घोषणा केली असून युक्रेनही याचे पालन करेन असा विश्वास व्यक्त केला […] The post आता रशिया-युक्रेनमध्ये युद्धविराम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 5:16 pm

प्रियंका चतुर्वेदींच्या खासदारकीवरून आदित्य ठाकरेंवर नाराज:ते कधी ना कधी आमच्याकडे येतीलच, मंत्री प्रतापराव जाधव यांचा दावा

महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा असून यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरू होतील असेही बोलले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाकरेंच्या खासदारांची बैठक झाल्याचा दावाही केला गेला. मात्र हा दावा एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. आता शिंदेगटाच्या मंत्र्यांनी मोठा दावा केला आहे. ते खासदार कधी ना कधी आमच्याकडे येतीलच, असा दावा मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे. मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, ठाकरे गटातील खासदार कधी ना आमच्याकडे येतीलच. तसेच या आधी प्रियंका चतुर्वेदी यांना खासदारकी दिल्यामुळे ठाकरेंचे खासदार आदित्य ठाकरेंवर नाराज होते, असा दावाही जाधव यांनी केला आहे. तसेच ते म्हणाले की ठाकरे गटाचे खासदारच नव्हे तर आमदारही अस्वस्थ आहेत. आमच्या तेव्हा काही तक्रारी होत्या, त्याच तक्रारी आज त्यांच्याकडील आमदार-खासदारांच्या आहेत, असे जाधव यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले, आम्हाला चांगली वागणूक मिळत नाही, आम्हाला कोणी विचारात नाही. लक्ष देत नाही, हे दुःख आमच्याकडे ते व्यक्त करतात. आमचे मित्रच आहेत ते सगळे. आता मुख्य नेते एकनाथ शिंदे ठरवतील तेव्हा पुढचे पाऊल उचलले जाईल. उद्धव ठाकरेंना आश्चर्य वाटेल असे लोक येतील आमचे मित्र आहेत दुःखी असतात. आम्ही त्यांना सांगतो, फार सहन करू नका. तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुमचे स्वागत आहे. कोण पाऊल पुढे टाकणार याची प्रत्येकजण वाट पाहतोय. हे कधी ना कधी होणार आहेच. पण उद्धव साहेबांना आश्चर्य वाटेल असे लोक आमच्याकडे येतील, असा दावाही प्रतापराव जाधव यांनी केला आहे. अशी कोणतीही बैठक झाली नाही- एकनाथ शिंदे दरम्यान, ठाकरेंच्या खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याचे वृत्त एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावले आहे. ते म्हणाले की, अशी कोणतीही बैठक झालेली नाही. गेल्या दीड वर्षांपासून अशा प्रकारच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत. परंतु, या बातम्यांमध्ये काडीचेही तथ्य नाही. केवळ राजकीय गैरसमज आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा वावड्या उठवल्या जात आहेत. अशी कोणतीही बैठक झाली नाही आणि त्या केवळ अफवा आहेत. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे निराधार असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 5:14 pm

‘एलपीजी’ गॅसच्या वाटपात वाढ

नवी दिल्ली : इराण आणि अमेरिकेत या देशांमध्ये शस्त्रसंधीनंतर एलपीजी गॅस पुरावत्याची स्थिती सुधारत आहे. त्यामुळे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने औद्योगिक वापरासाठी द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एलपीजी) सातत्याने उपलब्ध राहावा यासाठी आदेश जारी केला आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला एलपीजी गॅसचा पुरवठा वाढून त्यांची अडचण दूर होणार आहे. भारत सरकारमधील सर्व सचिव आणि सर्व राज्ये […] The post ‘एलपीजी’ गॅसच्या वाटपात वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 4:31 pm

ऑपरेशन टायगर कुठेही अस्तित्वात नाही:सगळे खासदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी एकजुटीने उभे, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा असून लवकरच मोठे पक्षांतर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच ऑपरेशन टायगर सुरू असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख म्हणाले, असे आहे की या सर्व बातम्या पेरल्या जातात. त्यामुळे ऑपरेशन टायगर कुठेही अस्तित्वात नाही. आणि ज्या पद्धतीने एकजुटीने सर्व ठाकरे गटाचे खासदार उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमागे आहेत त्यामुळे असे घडणार नाही, अशी मला खात्री आहे, असे देशमुख यांनी म्हटले आहे. खासदारांसोबत माझी कोणतीही बैठक झालेली नाही- एकनाथ शिंदे दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाल्याचेही बोलले जात आहे. यावर खुद्द शिंदेंनीच स्पष्टीकरण देत अशी कुठलीही बैठक झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून अशा प्रकारच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत. परंतु, या बातम्यांमध्ये काडीचेही तथ्य नाही. केवळ राजकीय गैरसमज आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा वावड्या उठवल्या जात आहेत. पुढे बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, उबाठाच्या खासदारांसोबत माझी कोणतीही बैठक झालेली नाही. अशी कोणतीही बैठक झाली नाही आणि त्या केवळ अफवा आहेत. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे निराधार असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. उबाठाकडून लोकप्रतिनिधींची बदनामी- नरेश म्हस्के शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, अशा पद्धतीची कुठलीही बैठक झालेली नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार-खासदार आमच्याकडे घेण्याची गरज वाटत नाही. काही नाराजी असेल तर आमदार-खासदारांची बदनामी उबाठाच्या नेत्यांनी करू नये, असा खोचक सल्लाही म्हस्के यांनी दिला आहे. पुढे बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की, दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील जवळपास सर्वच खासदार एकत्र असतात. आपल्या राज्यातील मंत्र्यांने चहा पानाला बोलावले तर जातात. प्रतापराव जाधवांकडे जेवनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा खासदार होते. त्यामुळे काहीही बातम्या पसरू नये. अरविंद सावंत यांचे पक्षातील विरोधक त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असावे. उबाठातीलच काही लोकं या अफवा पसरवत लोकप्रतिनिधींना बदनाम करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 4:25 pm

यवतमाळ बसस्थानकावर बॉम्बचा थरार

यवतमाळ : बसस्थानक परिसरात सकाळच्या वेळी सर्वत्र प्रवाशांची गर्दी असताना अचानक पोलिसांची वाहने सायरन वाजवत बसस्थानकात शिरले. पोलिसांचा ताफा, शस्त्रधारी पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले. बसस्थानकात बॉम्ब असल्याचे सांगताच प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. मात्र थोड्याच वेळात हे पोलिसांचे मॉकड्रिल असल्याचे उघडकीस आल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. सकाळी ९:२५ च्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती […] The post यवतमाळ बसस्थानकावर बॉम्बचा थरार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 4:09 pm

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भोंदूगिरीचा सुळसुळाट

नागपूर : महाराष्ट्र ही संताची भूमी म्हणून ओळखल्या जाते. अंधश्रधा, अनिष्ट प्रथांना त्यांनी विरोध करीत विज्ञानवादी बनण्याचा संदेश दिला. शिक्षणाचे महत्त्व सांगत प्रचार प्रसार केला, शिक्षणाचा टक्काही वाढत आहे. परंतु अंधश्रद्धा कमी होताना दिसत नाही. लोक आजही भोंदूबाबांना बळी पडत आहे. विशेष म्हणजे यात उच्च शिक्षित आणि स्वत:ला विज्ञानवादी, तर्कवादी असलेल्यांचाही समावेश आहे. नाशिकमधील भोंदूबाबा […] The post मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भोंदूगिरीचा सुळसुळाट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 4:06 pm

नाशिकच्या IT कंपनीत तरुणींचे लैंगिक शोषण:भाजपची कंपनीवर धडक; कर्मचाऱ्यांना चारित्र्य पडताळणी अनिवार्य करण्याची मागणी

नाशिक येथील आयटी कंपनीत कार्यरत तरुणींचे लैंगिक शोषण होत असल्याची बाब पुढे आल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सत्ताधारी भाजपने शुक्रवारी या प्रकरणी सदर कंपनीवर मोर्चा काढला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी कंपनीत शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. महिला नोकरदारांनी तक्रार केल्यानंतरही कंपनी व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी या प्रकरणी भाजपने केली आहे. नाशकातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत महिला नोकरदारांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे व धर्मांतराचा प्रकार घडल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 9 गुन्हे दाखल करत 6 संशयितांना अटक केली आहे. मागील 4 वर्षांपासून हा प्रकार घडत होता. पण त्याकडे कंपनी व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले होते. अखेर ही बाब उजेडात आल्यानंतर सत्ताधारी भाजपने या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. आज भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, भाजयुमोचे शहराध्यक्ष प्रवीण मोरे, मनपा गटनेते श्याम बडोदे आदींच्या नेतृत्वात कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. काहींनी थेट कंपनीत शिरण्याचा प्रयत्न केला. यामुळे घटनास्थळी काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संबंधितांना रोखले. पण त्यानंतर भाजपच्या निवडक कार्यकर्त्यांच्या एका शिष्टमंडळाला कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्यासाठी आत सोडण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनावर अनेक गंभीर आरोप केले. भाजपचे कंपनी व्यवस्थापनावर गंभीर आरोप ते म्हणाले, कंपनीत घडलेली घटना अत्यंत गंभीर व धक्कादायक आहे. ही बाब संस्थेच्याच नव्हे, तर महिलांच्या सुरक्षिततेला व सन्मानला धक्का पोहोचवणारी आहे. व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. कंपनीत शिस्त व नियंत्रणाचा पूर्णतः अभाव दिसून येतो. यामुळे महिला कर्मचाऱ्यांना असुरक्षित वातावरणात काम करावे लागते. कंपनी परिसरात कर्मचाऱ्यांचे बेशिस्त वर्तन दिसून येते. त्यामुळे कंपनीत सध्या कार्यरत असलेल्या व नव्याने भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी करणे अनिवार्य करण्यात यावे. महिला कर्मचाऱ्यांचे शोषण व धर्मांतराच्या तक्रारींची स्वतंत्र व सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. विशेषतः कंपनी परिसरात गैरवर्तन करणारे व सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी अंतर्गत यंत्रणा तातडीने कार्यान्वित करम्यात यावी. या प्रकरणी 2 दिवसांत योग्य ती कारवाई झाली नाही, तर भाजप पुन्हा कंपनीवर धडक देईल, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 4:06 pm

जामदया शिवारातील तरुणाच्या खूनाचे गुढ उकलले:अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुणाचा प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन काढला काटा, तिघांना अटक

सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारातील तरुणाच्या खूनाचे गुढ उकलले असून लोणार तालुक्यातील वढव येथे अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुण मुलाचा त्याच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने २५ हजार रुपयांमध्ये सुपारी देऊन खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका महिलेसह तिघांना शुक्रवारी ता. १० अटक केली आहे. सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारातील नाल्यात दोन दिवसांपुर्वी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. तरुणाचा चेहरा दगडाने ठेचला होता. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात ता. ८ एप्रील रोजी खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, मयुर रसाळ यांनी तपासासाठी गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक स्थापन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सेनगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक दिलीप मोरे, जमादार नलवार, संदीप जाधव, विकी कुंदनानी, धनंजय क्षिरसागर, पांडूरंग राठोड, रवी स्वामी, पाईकराव, इंगोले, महिला पोलिस कर्मचारी सुरेखा अत्राम, सायबर सेसचे दत्ता नागरे, इरफान पठाण यांच्या पथकाने मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी परिसरात बेपत्ता व्यक्तीचा शोध घेतला. त्यानंतर सदर मृतदेह लोणार तालुक्यातील वढव येथील सचिन राजगुरु (२४) याचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर या पथकाने दोन दिवस त्याच भागात माहिती घेतली असता मयत सचिन याची आई लिलाबाई हिचे गावातील रामदास तनपुरे (६५) याच्या सोबत अनैतिक संबंध होते. सचिन हा पुणे येथे कामाला असल्याने त्याची माहिती त्याला मिळाली नाही. मात्र काही दिवसांपुर्वी तो परत गावी आल्याने त्याला या संबंधाची कुणकुण लागली. त्यामुळे त्याला संपविण्याचा कट लिलाबाई व रामदास यांनी रचला होता. यासाठी त्यांनी नरेश पवार याला सचिन याचा खून करण्यासाठी २५ हजार रुपये देण्याचे कबुल केले. त्यारून नरेश व रामदास यांनी सचिन यास पाहुण्यांकडे जाऊन येऊ असे सांगत सोबत घेतले अन त्याला साखरा येथे भरपेट दारू पाजली. त्यानंतर उमरदरा शिवारात त्याचा दगडाने खून करून मृतदेह फेकून दिल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांनाही अटक केली असून त्यांनी अनैतिक सबंधात अडथळा येत असल्याने सचिन याचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 3:50 pm

ऑपरेशन टायगर; मध्यरात्री गाठीभेटी आणि बैठका

मुंबई : शिंदे शिवसेनेचे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना आज एक कथित भेटीचे वृत्त समोर आले. ही भेट आहे एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांची ठाण्यात ही भेट एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या खासदारांची घेतली आणि त्यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिल्याचे या वृत्तामध्ये म्हटले. तेव्हा पुन्हा एकदा दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी या वृत्तावर आणि या कथेत […] The post ऑपरेशन टायगर; मध्यरात्री गाठीभेटी आणि बैठका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 3:48 pm

रुपाली चाकणकरांच्या बहिणीला नोटीस:पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहाराप्रकरणी नोटीस; 2 कोटी 40 लाखांचा द्यावा लागणार हिशोब

शिर्डी पोलिसांनी भोंदू अशोक खरात प्रकरणाशी संबंधित असलेल्या समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहाराप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिणी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावली आहे. यामुळे पोलिसांनी रुपाली चाकणकर यांच्या चौकशीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणी खरातविरोधात शिर्डीत बेकायदा सावकारी व आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील समता पतसंस्थेत त्याच्याशी संबंधित अनेक संशयास्पद खाते आढळलेत. यात प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलांच्या नावे असणाऱ्या 4 खात्यांचाही समावेश आहे. या खात्यांवरून तब्बल 2 कोटी 40 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची बाब पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे. या आर्थिक व्यवहाराचा सावकारी व्यवसायाशी काही संबंध आहे का? तसेच हे पैसे कुणाचे आहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या दोन वेगवेगळ्या पत्त्यांवर पोस्टाद्वारे नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून 5 दिवसांच्या आत त्यांना चौकशी व जबाब नोंदवण्यासाठी शिर्डी पोलिस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा? अशोक खरातने या पतसंस्थेच्या माध्यमातून आपला काळा पैसा पांढरा केल्याचा संशय आहे. कारण, समता पतसंस्थेत खरात नॉमिनी असलेले 100 हून अधिक खाती आढळलेत. ही खाती 57 वेगवेगळ्या लोकांच्या नावे आहेत. त्यावरून 60 कोटींहून अधिकचा व्यवहार झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 33 खातेदारांची चौकशी पूर्ण झाली आहे. यापैकी बहुतांश लोकांना या पतसंस्थेत आपले खाते असल्याचेच माहिती नाही असा जबाब दिला आहे. आता पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांनाही चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. त्यामुळे त्यांचा जबाब या प्रकरणाच्या तपासातील एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. दुसरीकडे, जगदंब पतसंस्थेतही खरात नॉमिनी असलेली 32 खाती आढळली आहेत. यामुळे पोलिस ही खाती व त्याच्यावर झालेल्या व्यवहाराची कसून चौकशी करत आहेत. रुपाली चाकणकरांचा पाय खोलात उल्लेखनीय बाब म्हणजे भोंदू अशोक खरातशी असणाऱ्या कथित संबंधांवरून रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यानंतर त्यांना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदावरही पाणी सोडावे लागले आहे. खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने या प्रकरणी रुपाली चाकणकर यांना समन्स बजावल्याची माहिती आहे. पण त्याची पुष्टी होऊ शकली नाही. तूर्त सध्याचा घटनाक्रम पाहता त्यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 3:43 pm

राज्यातील ८२ टक्के शिक्षक मातृभाषेच्या प्रशिक्षणापासून वंचित

पुणे : राज्यातील ८२ टक्के शिक्षक मातृभाषेच्या प्रशिक्षणापासून वंचित असल्याचे वास्तव युनेस्कोच्या अहवालातून उघड झाले असून अभिजात भाषेचे स्वप्न अधांतरीच राहणार असल्याची शक्यता शिक्षण तज्ज्ञांनी वर्तविली आहे. महाराष्ट्राने मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळवून भाषिक अस्मितेचा लढा जिंकला असला, तरी प्रत्यक्ष वास्तव मात्र अस्वस्थ करणारे आहे. ‘युनेस्को’च्या ताज्या ‘भाषेचे महत्त्व : शिक्षण स्थिती अहवाल-२०२५’ अहवालाने राज्याच्या […] The post राज्यातील ८२ टक्के शिक्षक मातृभाषेच्या प्रशिक्षणापासून वंचित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 3:18 pm

..तर ‘लाडकी बहीण’ योजना बंद करावी

मुंबई : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन व अन्य लाभ देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर ‘लाडकी बहीण’ योजना बंदी केली पाहिजे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील एका निवृत्त महिला कर्मचा-याला सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन व अन्य लाभ पालिकेने न दिल्याने तिने उच्च न्यायालयात धाव घेतली. […] The post ..तर ‘लाडकी बहीण’ योजना बंद करावी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 3:01 pm

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1769 रुग्णांना सुमारे 14.25 कोटींची मदत:देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी 'आधार' ठरत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आर्थिक वर्षात १७६९ रुग्णांना सुमारे १४ कोटी २५ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रूग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक साहाय्य मिळत आहे. २० गंभीर आजारासाठी मदत कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष २ ते ६), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी अर्थसाहाय्य दिले जाते. सामंजस्य करारातून मदतीचा मार्ग मोकळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत. आर्थिक वर्षातील मदत १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यातील तब्बल ४० हजार ७७६ रुग्णांना ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७६९ रुग्णांना सुमारे १४ कोटी २५ लाख ०२ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. पेपरलेस अर्ज प्रक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या जिल्हा कक्ष, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, सामंजस्य करार आदीमुळे रूग्णांना वेळेत अर्थसाहाय्य होत आहे. गरजू रूग्णांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता आणि अधिक माहितीकरिता १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 2:50 pm

बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष पुढाकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बालकांमधील असंसर्गजन्य आजारांवर (एनसीडी) प्रभावी नियंत्रणासाठीनागपूर येथील एम्स, बालरोग विभागासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. कराराच्या माध्यमातून बालकांसाठी अधिक सुरक्षित, निरोगी आणि समर्थ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे. या सामंजस्य कराराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बालकांचे आरोग्य हे राज्याच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे ही केवळ आरोग्य क्षेत्राची जबाबदारी नसून समाजाची एकत्रित बांधिलकी आहे. या कराराच्या माध्यमातून आपण मुलांसाठी अधिक सुरक्षित, निरोगी आणि समर्थ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकत आहोत. हा करार नागपूर येथील एम्स, बालरोग विभागासोबत करण्यात आला असून, या अंतर्गत राज्यातील जिल्हा रुग्णालयांमध्ये चाइल्डहुड एनसीडी क्लिनिक्स स्थापन व कार्यान्वित करण्यात येणार आहेत. या उपक्रमातून टाईप-1 मधुमेह, जन्मजात हृदयरोग, दमा, स्थूलता, सिकलसेल, मानसिक आरोग्य आणि विकासात्मक विकार यांसारख्या आजारांचे प्रतिबंध, लवकर निदान आणि प्रभावी उपचार सुनिश्चित करण्यात येणार आहेत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मानकीकृत उपचार पद्धती, डेटा संकलन प्रणाली आणि तज्ज्ञ मार्गदर्शन यावर विशेष भर दिला जाणार आहे. करार पुढील तीन वर्षांसाठी कार्यान्वित सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातून करण्यात आलेले हा सामंजस्य करार पुढील तीन वर्षांसाठी कार्यान्वित असणार आहे. या करारांमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेत गुणवत्ता, उपलब्धता आणि सर्वसमावेशकता वाढवण्यास मोठी चालना मिळणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे, उपसचिव विलास बेंद्रे तसेच डॉ प्रशांत जोशी, एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक, डॉ मीनाक्षी गिरीश, बालरोग तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते. एम्स, नागपूर संस्थेचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 2:47 pm

धनंजय मुंडेंना मंत्री केले, तर सत्ता जाणार:करुणा मुंडेंचा महायुतीला इशारा; ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी, एकनाथ शिंदेंना टोला

आमदार धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले तर महायुतीची सत्ता जाईल आणि तो पक्ष पुन्हा केव्हाही सत्तेत येणार नाही, असा इशारा धनंजय यांच्या पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनी दिला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. त्यांनाच या महाराष्ट्रात न्याय मिळणार नसेल, तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल उपस्थित करत करुणा यांनी यावेळी आपण दादांना न्याय मिळवून देण्यासाठी बारामतीची पोटनिवडणूक लढवत असल्याचेही जोर देऊन सांगितले. सत्ताधारी शिवसेनेचे ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. करुणा मुंडे शर्मा या बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी महायुतीला उपरोक्त इशारा दिला. त्या म्हणाल्या, वंजारी समाजाने आमदार धनंजय मुंडे यांना नाकारले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्री केल्यास त्यांना मंत्री करणाऱ्या पक्षाची सत्ता जाईल. त्यानंतर तो पक्ष पुन्हा केव्हाही सत्तेत येणार नाही. हा एका स्त्रीचा शब्द आहे. धनंजय यांनी स्वतःच्या बायकोला तुरुंगात डांबले. अनेक लोकांना जेलमध्ये टाकले. अशा 1000 लोकांची माझ्याकडे यादी आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. त्यांना पुन्हा मंत्री केले तर मी मंत्रालयापुढे आंदोलन करेन. अजित पवारांना न्याय देण्यासाठी पोटनिवडणुकीत उडी करुणा मुंडे यांनी यावेळी आपण बारामतीची पोटनिवडणूक का लढवत आहोत? हे ही स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, मी बारामतीची पोटनिवडणूक अजित पवारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढवत आहे. कारण, अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. सुनेत्रा पवार स्वतः उपमुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांनी एफआयआर दाखल केला नाही. या महाराष्ट्रात अजित पवारांना न्याय मिळाला नाही, मग सर्वसामान्यांचे काय? एवढे दिवस झाले, पण हा घात होता अपघात हा मुद्दा कुणीही उचलला नाही. काँग्रेसने या निवडणुकीत आपला डमी उमेदवार उभा केला. नंतर माघार घेतली. मलाही खूप काही ऑफर आल्या. अनेक नेत्यांचे फोन आले. खासदार पार्थ पवार यांचाही फोन आला. पण मी माघार घेतली नाही. माझा विजय झाला तर सर्वप्रथम मी अजित पवारांच्या अपघाताचा एफआयआर दाखल करण्यासाठी लढा देईन. महाराष्ट्रात अजित पवारांना न्याय भेटणार नसेल, तर कुणाला भेटणार? असे करुणा म्हणाल्या. ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी करुणा मुंडे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांकडे काम घेऊन गेले की, ते दुसऱ्या दरवाज्यातून बाहेर निघून जातात. त्यामुळे जनतेने मला संधी दिली, तर मी त्या संधीचे 100 टक्के सोने करेल. आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची आहे. हा सर्वात मोठा मुद्दा आहे. भाजप व ट्रिपल इंजिन सरकार केवळ धूर काढणारे इंजिन आहे. हे सरकार लोकांना ईडी, सीडी व कुठेतरी अडकवण्याची भीती दाखवून आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करते. ऑपरेशन टायगर हे ऑपरेशन टायगर नव्हे, तर ऑपरेशन मेंढी आहे. रवींद्र वायकरांवरील ईडी कारवाईवरही भाष्य या लोकांनी रवींद्र वायकर यांच्या घरी ईडी पाठवली होती. मध्यरात्री 2 वाजेपासून ईडीचे लोक त्यांना त्रास देत होते. त्यांच्या जवळच्या व्यक्तीने मला ही गोष्ट सांगितली. रवींद्र वायकर यांनी मला घेऊन चला, पण मी शिवसेना सोडणार नाही असा पवित्रा घेतला. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला. ईडीचे लोक रवींद्र वायकर यांच्या पत्नीलाही घेऊन जाणार होते. त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला, असे करुणा मुंडे शर्मा म्हणाल्या. दरम्यान, भोंदू अशोक खरातच्या टोळीला संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करुणा मुंडे यांनी यावेळी केली.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 2:40 pm

२ गाड्यांच्या धडकेत ६ ठार

कांकेर : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात रात्री उशिरा झालेल्या भीषण रस्ते अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला, तर ३ इतर लोक गंभीर जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग-३० वर दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला. ही घटना कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंब कांकेर जिल्ह्यातील उडकुडा येथील रहिवासी होते. असे सांगितले जात […] The post २ गाड्यांच्या धडकेत ६ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 2:36 pm

स्पाइसजेटमध्ये २० टक्के कर्मचा-यांची कपात

नवी दिल्ली : देशातील खासगी विमान कंपनी स्पाइसजेट गंभीर संकटातून जात आहे. कार्यक्षमतेत घट झाल्यामुळे कंपनीने २०% कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये ५०० हून अधिक कर्मचा-यांना विनावेतन सुटीवर पाठवले जाऊ शकते. विमान कंपनीकडे ६,८०० कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे फक्त १३ विमाने शिल्लक आहेत, ज्यात १० बोइंग आणि ३ क्यू ४०० यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, […] The post स्पाइसजेटमध्ये २० टक्के कर्मचा-यांची कपात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 2:31 pm

उरमोडी धरणाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ नाव:राज्य शासनाचा निर्णय, इतिहास, परंपरा अन् लोकभावनेचा सन्मान

सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव व माण तालुक्यातील सिंचन व्यवस्थेला उरमोडी धरणाने भक्कम आधार दिला आहे. जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणार्‍या उरमोडी धरण जलाशयाचे ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. विशेष बाब म्हणून जलसंपदा विभागाचा हा शासन निर्णय इतिहास, परंपरा आणि लोकभावनेचा सन्मान करणारा ठरला आहे. उरमोडी धरणामुळे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला मोठा फायदा झाला आहे. विशेषत: पावसावर अवलंबून असलेल्या माण, खटाव तालुक्यातील शेतकर्‍यांना या धरणामुळे दिलासा मिळाला आहे. या धरणाच्या जलाशयाला ऐतिहासिक व स्थानिक महत्त्व असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे नावे देण्याची मागणी बर्‍याच वर्षांपासून शासनाकडे होत होती. उरमोडी धरण जलाशयाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नाव दिल्याने स्थानिक पातळीवर ऐतिहासिक परंपरेचा गौरव होणार असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. शिवाय, सातारा जिल्ह्याच्या सामाजिक व सांस्कृतिक ओळखीला नवे कोंदण मिळाल्याची भावना जनमाणसात निर्माण झाली आहे. उरमोडी धरणाच्या उभारणीत स्व. अभयसिंहराजे भोसले यांचा मोलाचा वाटा आहे. सातारा, खटाव व माण तालुक्यातील कोरडवाहू शेतीला भक्कम आधार मिळाला आहे. या धरणामुळे वर्षभर पाणी उपलब्ध झाल्याने पिकांची उत्पादकता आणि पीकपद्धतीत मोठे बदल झाले आहेत. दुष्काळी परिस्थितीतही शेतकर्‍यांना स्थैर्य देणारा जलस्रोत म्हणून उरमोडी धरण महत्त्वाचे ठरले आहे. सिंचनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळून रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. स्व. छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा जिलह्याच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व निर्माण केले. सहकार क्षेत्रात त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून शेतकरी व सामान्यांच्या विकासाला गती दिली. सामाजिक कार्यातून त्यांनी शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकासात भरीव योगदान दिले. स्थानिक पातळीवर लोकसंपर्क व विकासकामांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. त्यामुळे उरमोडी जलाशयाला त्यांचे नाव देणे हा स्थानिक लोकभावनेचा सन्मान मानला जात आहे. स्व. छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचाच वारसा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे चालवताना दिसत आहेत. त्यांच्या माध्यमातून उरमोडी धरण प्रकल्पच्या दोन्ही कालव्यांचे काम मार्गी लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 2:25 pm

रुपाली ठोंबरे यांचा मोठा आरोप:म्हणाल्या - पक्षात शून्य किंमत असलेल्या महिलेने पत्रकारांच्या मदतीने माझ्या बदनामीचा कट रचला

पक्षात शून्य किंमत असाऱ्या एका महिलेने 25 लाख रुपयांची खंडणी घेऊन काही पत्रकारांच्या मदतीने माझ्या बदनामीचा कट रचल्याचा आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. ठोंबरे यांनी ही महिला नेता कोण? हे स्पष्ट केले नाही. पण त्यांच्या या आरोपामुळे राष्ट्रवादी पक्षातील महिला नेत्यांतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेला संबोधित केले. त्यात त्यांनी उपरोक्त आरोप केला. त्या म्हणाल्या, पक्षातील 'शून्य किंमत' असलेल्या एका महिलेने 25 लाख रुपयांची खंडणी घेऊन काही पत्रकारांच्या मदतीने माझ्या बदनामीचे षडयंत्र रचले आहे. या कटाचा भाग म्हणून जय महाराष्ट्र चॅनेलचे पत्रकार रोहन कदम तीन दिवसांपूर्वी बुधवार पेठेतील एका लॉजमध्ये गेले होते. तिथे त्यांनी दारू पिऊन शेजारील खोलीतील एका महिलेचे चित्रीकरण केले. त्यानंतर संबंधित महिलेने कदम यांना मारहाण केली आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली असता, कदम यांनी आपण 'स्टिंग ऑपरेशन' करत असल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत आणखी दोन ते तीन पत्रकार या कटात सहभागी असल्याचा संशय आहे, असे त्या म्हणाल्या. रुपाली पाटील ठोंबरे यांनी स्पष्ट केले की, त्या अशा कोणत्याही षडयंत्राविरोधात पाऊल उचलण्यास सक्षम आहेत. त्यांनी पुन्हा आरोप केला की, पक्षातील संबंधित महिलेने पत्रकारांना हाताशी धरून 25 लाख रुपयांची 'डील' केली आहे. रोहन कदम हा केवळ प्यादा असून, मुख्य आरोपीने तीन पत्रकारांना प्रत्येकी दोन लाख रुपये दिल्याचेही त्यांनी नमूद केले. लॉज रुपाली ठोंबरेंशी संबंधित असल्याचा दावा यावेळी ॲड. विजय पाटील यांनी सांगितले की, ते सहसा पत्नीच्या राजकारणात पडत नाहीत, परंतु एखाद्या महिलेची राजकीय कारकीर्द बिघडवणे दुर्दैवी आहे. रोहन कदमने पोलिसांना दिलेल्या जबाबात सदर लॉज रुपाली पाटील यांच्याशी संबंधित असून, त्यांना बोलावण्यास सांगितले होते, असा दावा ॲड. पाटील यांनी केला. ॲड. पाटील यांच्या मते, रोहन कदम लॉजपासून केवळ ४०० मीटर अंतरावर राहतो. स्टिंग ऑपरेशनसाठी गेल्यावर त्याने आपल्या कार्यालयातील वरिष्ठांना याबाबत माहिती दिली नाही. रुपाली पाटील महिला शोषणाविरोधात आवाज उठवतात, त्यामुळे त्यांना लक्ष्य केले जात आहे. रोहन कदमला ताब्यात घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. यापूर्वीही रुपाली पाटील यांच्याबाबत चुकीच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्या. रोहन कदम लॉजवर गेल्याचे सर्व चित्रीकरण उपलब्ध असून, प्रत्यक्षदर्शींचे जबाबही आहेत. हे प्रकरण दाबण्यासाठी मोठा दबाव टाकला जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 2:02 pm

कर्नल पुरोहित आता ब्रिगेडियर पदावर

मालेगाव : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रदीर्घ कायदेशीर लढा देणारे कर्नल श्रीकांत पुरोहित यांना भारतीय लष्करात मोठी बढती मिळाली आहे. सशस्त्र बल न्यायाधिकरणाने दिलेल्या निकालानंतर लष्कराने त्यांना ब्रिगेडियर पदावर पदोन्नती करण्यास मंजुरी दिली आहे. कर्नल पुरोहित ३१ मार्च २०२६ रोजी लष्करी सेवेतून निवृत्त होणार होते, मात्र त्यांच्या निवृत्तीला आता स्थगिती देण्यात आली आहे. २००८ च्या मालेगाव […] The post कर्नल पुरोहित आता ब्रिगेडियर पदावर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 2:01 pm

उरमोडी धरणाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ नाव:राज्य शासनाचा निर्णय; परंपरा आणि लोकभावनेचा सन्मान

सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव व माण तालुक्यातील सिंचन व्यवस्थेला उरमोडी धरणाने भक्कम आधार दिला आहे. जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणार्‍या उरमोडी धरण जलाशयाचे ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. विशेष बाब म्हणून जलसंपदा विभागाचा हा शासन निर्णय इतिहास, परंपरा आणि लोकभावनेचा सन्मान करणारा ठरला आहे. उरमोडी धरणामुळे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला मोठा फायदा झाला आहे. विशेषत: पावसावर अवलंबून असलेल्या माण, खटाव तालुक्यातील शेतकर्‍यांना या धरणामुळे दिलासा मिळाला आहे. या धरणाच्या जलाशयाला ऐतिहासिक व स्थानिक महत्त्व असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे नावे देण्याची मागणी बर्‍याच वर्षांपासून शासनाकडे होत होती. उरमोडी धरण जलाशयाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नाव दिल्याने स्थानिक पातळीवर ऐतिहासिक परंपरेचा गौरव होणार असल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे. शिवाय, सातारा जिल्ह्याच्या सामाजिक व सांस्कृतिक ओळखीला नवे कोंदण मिळाल्याची भावना जनमाणसात निर्माण झाली आहे. उरमोडी धरणाच्या उभारणीत स्व. अभयसिंहराजे भोसले यांचा मोलाचा वाटा आहे. सातारा, खटाव व माण तालुक्यातील कोरडवाहू शेतीला भक्कम आधार मिळाला आहे. या धरणामुळे वर्षभर पाणी उपलब्ध झाल्याने पिकांची उत्पादकता आणि पीकपद्धतीत मोठे बदल झाले आहेत. दुष्काळी परिस्थितीतही शेतकर्‍यांना स्थैर्य देणारा जलस्रोत म्हणून उरमोडी धरण महत्त्वाचे ठरले आहे. सिंचनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळून रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. स्व. छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा जिलह्याच्या राजकारणात प्रभावी नेतृत्व निर्माण केले. स्थानिक लोकभावनेचा सन्मान सहकार क्षेत्रात त्यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून शेतकरी व सामान्यांच्या विकासाला गती दिली. सामाजिक कार्यातून त्यांनी शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकासात भरीव योगदान दिले. स्थानिक पातळीवर लोकसंपर्क व विकासकामांमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. त्यामुळे उरमोडी जलाशयाला त्यांचे नाव देणे हा स्थानिक लोकभावनेचा सन्मान मानला जात आहे. स्व. छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांचाच वारसा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे चालवताना दिसत आहेत. त्यांच्या माध्यमातून उरमोडी धरण प्रकल्पच्या दोन्ही कालव्यांचे काम मार्गी लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 1:56 pm

महिला अधिका-याच्या घरात कोट्यवधींचे घबाड

अमरावती : आंध्र प्रदेशलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत देवस्थान विभागाच्या सहाय्यक आयुक्त कलिंगिरी शांती यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात अटक केली आहे. एसीबीने ७ एप्रिल रोजी विजयावाडा आणि विशाखापट्टणम येथे एकाच वेळी छापे टाकून कोट्यवधी रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा पर्दाफाश केला. एसीबी अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, शांती यांनी त्यांच्या उत्पन्नापेक्षा कितीतरी पटीने अधिक मालमत्ता जमा […] The post महिला अधिका-याच्या घरात कोट्यवधींचे घबाड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 1:52 pm

कोलकात्यात ‘ईडी’ची कारवाई

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये २३ एप्रिल रोजी होणा-या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी ईडीने मोठी कारवाई केली आहे. एजन्सीच्या कोलकाता झोनल कार्यालयाने शहरात ८ ठिकाणांवर छापे टाकले. ही कारवाई बिस्वजीत पोद्दार ऊर्फ ‘सोना पप्पू’, जय एस. कमदार आणि इतरांविरुद्ध सुरू असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात करण्यात आली आहे. या छापेमारी दरम्यान ईडीने तब्बल १.४७ कोटी रुपये रोख, […] The post कोलकात्यात ‘ईडी’ची कारवाई appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 1:41 pm

राजकारण नीतिमत्ताहीन

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फोडाफोडीला ऊत आला असून, राजकारणात कोणतीही नीतिमत्ता उरलेली नाही. कोणाला तरी आधी डोक्यावर घ्यायचे आणि नंतर पायाखाली तुडवायचे ही आता एक फॅशन झाली आहे, अशा शब्दांत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी फोडाफोडीचे राजकारणावर टीका केली. राज्यातील सत्ताधारी गोटात सर्व काही आलबेल नसल्याचे सांगत वडेट्टीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे […] The post राजकारण नीतिमत्ताहीन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 1:28 pm

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार ‘ईव्हीएम’ची तपासणी

मुंबई : राज्यात बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची धामधूम सुरू आहे. तर इकडे देशातील निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच ईव्हीएम तपासण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. चांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काँग्रेसचे पराभूत उमेदवार नसीम खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर हा निकाल देण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार दिलीप […] The post देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार ‘ईव्हीएम’ची तपासणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 1:25 pm

खासदार फुटण्याच्या बातम्या निव्वळ अफवा:कोणतीही बैठक झालेली नाही- एकनाथ शिंदे, उबाठातीलच लोकं खासदारांना बदनाम करताय- म्हस्के

उबाठाचे खासदार फुटणार असल्याच्या आणि त्यांच्यासोबत गुप्त बैठक पार पडल्याच्या चर्चांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्णविराम दिला आहे. या बातम्या पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात उबाठा गटाचे काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असून लवकरच मोठे पक्षांतर होणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. यावर भाष्य करताना शिंदे म्हणाले की, गेल्या दीड वर्षांपासून अशा प्रकारच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत. परंतु, या बातम्यांमध्ये काडीचेही तथ्य नाही. केवळ राजकीय गैरसमज आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा वावड्या उठवल्या जात आहेत. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे निराधार शिंदे यांनी पुढे स्पष्ट केले की, उबाठाच्या खासदारांसोबत माझी कोणतीही बैठक झालेली नाही. अशी कोणतीही बैठक झालेली नाही आणि त्या केवळ अफवा आहेत. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे निराधार असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.या स्पष्टीकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, खासदारांच्या कथित बंडाच्या वावड्या केवळ 'राजकीय स्टंट' असल्याचे समोर आले आहे. नेमके शिंदेंची पोस्ट काय? एकनाथ शिंदे म्हणाले की, उबाठाच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचे वृत्त पूर्णपणे निराधार, खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारे आहे. अशी कोणतीही बैठक झालेली नाही. उबाठाचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या एक-दीड वर्षांपासून पसरवल्या जात आहेत. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नाही. ती केवळ अफवा आहे. त्यामुळे सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या देणे माध्यमांनी टाळले पाहिजे. उबाठाकडून लोकप्रतिनिधींची बदनामी?- म्हस्के अशा पद्धतीची कुठलीही बैठक झालेली नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. त्यांच्या पक्षाचे आमदार-खासदार आमच्याकडे घेण्याची काही गरज वाटत नाही. त्यांच्यामध्ये काही नाराजी असेल तर आमदार-खासदारांची बदनामी करणे उबाठाच्या नेत्यांनी करू नये. तुमच्यासोबत असलेल्या लोकांची बदनामी करण्याचे काम उबाठाच्या नेत्यांनी करू नये, असे खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. नरेश म्हस्के म्हणाले की,दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील जवळपास सर्वच खासदार एकत्र असतात. आपल्या राज्यातील मंत्र्यांने चहा पानाला बोलावले तर जातात. प्रतापराव जाधवांकडे जेवनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा खासदार होते. त्यामुळे काहीही बातम्या पसरू नये. अरविंद सावंत यांचे पक्षातील विरोधक त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असावे. उबाठातीलच काही लोकं या अफवा पसरवत लोकप्रतिनिधींना बदनाम करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 1:07 pm

तो लय बेक्कार मारतो!

मुंबई : आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जाएंट्स यांच्यातील रंगतदार सामन्यात मुकुल चौधरीच्या रुपात नव्या हिरोने सुपर हिट ट्रेलर रिलीज केला. लखनौच्या संघाकडून सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मुकुलने वादळी खेळी करत हातून निसटलेल्या सामन्यात एलएसजीच्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला. पहिल्या दोन सामन्यात एकही षटकार न मारणा-या २१ वर्षीय बॅटरने ७ गगनचुंबी […] The post तो लय बेक्कार मारतो! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:48 pm

राऊतांचा एक पाय काँग्रेसमध्ये, दुसराही लवकरच जाणार!:त्यांची निष्ठा ठाकरेंकडे नाही तर सोनिया गांधी अन् 'सिल्व्हर ओक'च्या दारात- नवनाथ बन

देवाभाऊंनी कोणत्याही पक्षाची डेड बॉडी केलेली नाही, तो अधिकार जनतेला असतो. उबाठा गटाची डेड बॉडी करण्याचे काम जनतेने केले आहे. जनतेने तुम्हाला विधानसभेला 20 तर एकही मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती तुमच्याकडे दिली नाही, तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर टीका करूच नका, जनतेने तुमच्या कानाखाली मारली आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांचे नाव ऑलरेडी काँग्रेसच्या ऑपरेशनमध्ये आले आहे. ते काँग्रेस पक्षामध्ये जाणार आहेत, ते ठरलेले आहे. पुढच्या वेळी त्यांना खासदारकी मिळणार नाही, ती मिळावी यासाठी ते राहुल गांधी यांच्या संपर्कात असून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ही पांढऱ्या दगडावरची काळी रेष आहे. तुमची निष्ठा ही उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी नाही तर सोनिया गांधी, राहुल गांधी, आणि उरली सुरली सिल्वर ओकच्या दारात ठेवलेली आहे. तुम्ही निष्ठेच्या गप्पा मारू नका, तुमचा एक पाय काँग्रेसमध्ये आहे, दुसरा कोणत्याही क्षणी जाईल. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांच्या पक्षाची डेड बॉडी करण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. तुमचा पक्ष अस्तित्वाला उरलेला नाही. महाराष्ट्रातील जनतेने ही तुमची अवस्था केली आहे. ऑपरेशन लोटस, टायगर सांगण्यापेक्षा पक्ष कसा वाढेल याकडे लक्ष द्या. ज्या दिवशी ऑपरेशन होईल त्या दिवशी तुम्हाला समजणार सुद्धा नाही. मविआचे सरकार असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचे 40 आमदार निघून गेले. त्या सरकारचे सर्वेसर्वा संजय राऊत हे होते. तरीही 40 आमदार गेले तुम्हाला कळले नाही,आता काय कळेल. राऊतांनी बालीश वक्तव्ये करू नये, स्वत:च्या पक्षाचे किती लोकप्रतिनिधी आहेत याकडे लक्ष द्या. नवनाथ बन म्हणाले की, संजूबाबा राऊत हे बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या मु्द्द्यावर भाजपवर टीका करत आहेत. त्यांना आठवण करुण देतो गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर प्रीतम मुंडे उमेदवार असताना त्यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार दिला होतो. अन् निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. ही प्रथा मोडण्याचे काम राहुल गांधी यांच्या काँग्रेसने केले आहे,हे राऊतांनी लक्षात ठेवले पाहिजे. आम्ही असे काही सुरू केले या भानगडीत राऊतांनी पडू नये. जेव्हा आर.आर. पाटील यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिला नव्हता. पण काँग्रेसने तसे सौजन्य बीड लोकसभेच्या वेळी दाखवले नाही. काल पण 4 वेळा विनंती केल्यावर काँग्रेसने उमेदवारी अर्ज पराभवाच्या भीतीने मागे घेतला.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 12:42 pm

कर्नल पुरोहित यांना वर्षभरात दुसऱ्यांदा प्रमोशन:आता ब्रेगिडियर पदावर पदोन्नती; गत सप्टेंबर महिन्यात झाली होती कर्नलपदी बढती

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या कर्नल श्रीकांत पुरोहित यांची ब्रिगेडियर पदावर पदोन्नती होणार आहे. सशस्त्र बल न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीकांत पुरोहित यांची गतवर्षी सप्टेंबर महिन्यातच कर्नलपदी बढती झाली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यांतच त्यांना पुन्हा एकदा पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे हे विशेष. कर्नल श्रीकांत पुरोहित हे 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एक आरोपी होते. या प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांचे लष्करी करिअर पूर्णतः ठप्प झाले होते. त्यांनी तब्बल 9 वर्षे तुरुंगात काढली. त्यानंतर 2017 मध्ये जामीन मंजूर झाला आणि ते पुन्हा लष्करात रुजू झाले. पण त्यांच्या बढतीचा व सेवाज्येष्ठतेचा मुद्दा प्रलंबित होता. गतवर्षी जुलै महिन्यात मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने त्यांची मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यातून निर्दोष सुटका केली. त्यानंतर 2 महिन्यांतच म्हणजे सप्टेंबर 2025 मध्ये त्यांना कर्नल पदावर बढती मिळाली होती. त्यानंतर कर्नल श्रीकांत पुरोहित यांनी सशस्त्र बल न्यायाधिकरणाकडे एका याचिकेद्वारे आपल्या ज्युनिअर अधिकाऱ्यांच्या बरोबरीने प्रमोशन व इतर लाभ मिळावेत अशी मागणी केली होती. त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती राजेंद्र मेनन यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने त्यांची मागणी मान्य केली. कर्नल श्रीकांत पुरोहित यांचा पदोन्नतीवर असलेला दावा न्याय आहे. त्यांना ब्रिगेडियर पदावर पदोन्नत करण्यास मंजुरी देण्यास हरकत नाही. त्यांच्या तक्रारीचे निवारण होईपर्यंत त्यांची निवृत्ती स्थगित ठेवण्यात यावी, असे खंडपीठाने 16 मार्च 2026 रोजी दिलेल्या आपल्या निकालात म्हटले आहे. कर्नल पुरोहित 31 मार्च 2026 रोजी लष्करी सेवेतून निवृत्त होणार होते. पण आता त्यांच्या निवृत्तीला स्थगिती मिळाली आहे. भारतीय लष्करातील सूत्रांच्या माहितीनुसार प्रस्तुत बढती म्हणजे कर्नल पुरोहित यांच्या तुरुंगवास व खटल्यादरम्यान वाया गेलेल्या वर्षांची एकप्रकारे भरपाईच आहे. त्यांची कारकीर्द विनाव्यत्यय सुरू राहिली असती, तर आज ते मेजर जनरल पदापर्यंत पोहोचले असते. आता ब्रिगेडियर म्हणून ते एका वरिष्ठ कमांडरच्या भूमिकेत पुन्हा एकदा सक्रिय होतील. कोण आहेत कर्नल पुरोहित? लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित हे भारतीय लष्करातील एक अनुभवी अधिकारी आहेत. ते लष्करी गुप्तचर विभागात कार्यरत होते. त्यांना हिंदी, संस्कृत आणि मराठी भाषांचे उत्तम ज्ञान आहे. जम्मू-कश्मीरमधील अतिरेकी कारवायांवर नियंत्रण ठेवण्याच्या मोहिमांमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. मालेगाव शहरात 2008 मध्ये बॉम्बस्फोट झाला. त्यात 6 जण ठार, तर 100 हून अधिक जण जखमी झाले. हा स्फोट एका दुचाकीमध्ये लपवलेल्या स्फोटकांद्वारे झाला होता. तपासात ही दुचाकी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर झालेल्या तपासात कर्नल पुरोहित यांचे नाव पुढे आले होते. कर्नल पुरोहित यांनी अभिनव भारत नामक संघटना स्थापन करून त्या संघटनेच्या माध्यमातून या स्फोटाचा कट आखला, तसेच स्फोटासाठी स्फोटकेही पुरवली, असा त्यांच्यावर आरोप होता.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 12:36 pm

सलमानच्या आगामी सिनेमात राजपाल

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी बिग बजेट अ‍ॅक्शन चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता या चित्रपटाबाबत एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून दिग्गज कॉमेडियन राजपाल यादवची या चित्रपटात एन्ट्री झाली आहे. सलमान खानच्या या बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शन एंटरटेनरमध्ये राजपाल यादव एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात दाक्षिणात्य सुंदरी नयनतारा मुख्य […] The post सलमानच्या आगामी सिनेमात राजपाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:26 pm

आयटी कंपनीत लैंगिक अत्याचार:नोकरीच्या आमिषाने 'विकेंड ट्रिप' अन् धर्मांतराचा दबाव, सलग दोन वर्षे महिनाभर उपवास अन् 'लिप्स्टिक'वरही बंदी!

नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत सुरू असलेल्या ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या धक्कादायक प्रकाराचा पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि गोपनीयपद्धतीने पर्दाफाश केला आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून, वेशांतर करून या कॉर्पोरेट जाळ्याचा भांडाफोड करणाऱ्या महिला पोलिसांचे धाडस आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या 9 धाडसी मुलींमुळे हे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 9 गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वत: उपआयुक्त मोनिका राऊत या महिला अधिकाऱ्याची निवड केली. त्यांच्यासोबत स्वतंत्र तीन महिला अधिकारी, कर्मचारी अशा मोजक्याच 7 कर्मचाऱ्यांची टीम तयार करून सर्व सूचना दिल्या. अतिशय बारकाईने व सर्वंकष नियोजन करून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणण्यात आला. सामाजिक दडपण आणि कुटुंबाच्या भीतीपोटी पीडित युवती गप्प होत्या. मात्र, 9 धाडसी मुलींनी आणि धर्मांतराचा प्रयत्न झालेल्या देवळाली कॅम्पमधील तरुणाने पुढे येऊन तक्रार नोंदवल्याने या संपूर्ण प्रकरणाला वाचा फुटली. आरोपी इतके निर्ढावलेले होते की, एखादी मुलगी कामावर आली नाही तर ते थेट तिच्या आईशी संपर्क साधून तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असत. या प्रकरणात कंपनीतील पुण्यातील महिला एचआर आणि असिस्टंट मॅनेजर स्तरावरील व्यक्तींचाही सहभाग असल्याने त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. ‘विकेंड ट्रिप’च्या बहाण्याने शोषण तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सफी भिकन शेख, असिफ आफताब, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, दानिश शेख आणि तौसीफ आत्तर यांसारख्या जिहादी मानसिकतेच्या व्यक्तींनी कंपनीत टीम लीडर सारख्या पदांचा गैरवापर केला. नोकरीच्या आमिषाने आलेल्या मुलींना सुरुवातीला विश्वासात घेतले जायचे. त्यांना अल्पावधीतच प्रमोशन देण्याचे तर काहींना कंपनीच्या मुंबई, पुण्याच्या शाखेत मोठ्या पदावर संधी उपलब्ध करून देण्याचे आमीष दाखवायचे. त्यानंतर त्यांना मोठ्या रिसॉर्ट्स किंवा वॉटरपार्कच्या ठिकाणी ‘विकेंड ट्रिप’च्या बहाण्याने नेले जात असे. तिथे नियोजनपूर्वक त्यांच्या भावनांशी खेळून, त्यांना फसवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले जात आणि धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असे. पीडितेचे राहणीमानही बदलले तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी पीडितेच्या मनावर इतका पगडा निर्माण केला होता की, तिने स्वतःच्या धर्मातील रूढी-परंपरा सोडून संशयितांच्या धार्मिक प्रथांचे पालन करण्यास सुरुवात केली होती. पीडित तरुणी गेल्या दोन वर्षांपासून सलग महिना-महिनाभर उपवास (रोझा सदृश उपवास) धरत होती. हिंदू मैत्रिणींनी तिला जेवणासाठी कितीही आग्रह केला किंवा घरी बोलावले, तरी ती त्यांना स्पष्टपणे नकार देत असे. आरोपींच्या प्रभावामुळे पीडितेने तिचे राहणीमानही पूर्णपणे बदलले होते. गेल्या वर्षभरापासून तिने 'लिप्स्टिक' लावणेही बंद केले होते. तिच्या नैसर्गिक पेहरावात आणि वागण्याबोलण्यात झालेला हा बदल पाहून तिचे जवळचे लोकही अवाक झाले होते. असा झाला तपासाचा थरार महिला पोलिसांचे वेशांतर हे रॅकेट अत्यंत संघटित आणि कॉर्पोरेट स्तरावर कार्यरत असल्याने त्याचे पुरावे गोळा करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. तपासादरम्यान महिला पोलिसांनी धाडसी पाऊल उचलले. अधिकाऱ्यांनी वेशांतर करून संबंधित कंपनीत आणि संशयित ठिकाणी वावर ठेवला. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी या जाळ्यातील व्यक्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवले. आरोपींची कार्यपद्धती, त्यांच्या संभाषणाची पद्धत आणि मुलींना कशा प्रकारे जाळ्यात ओढले जाते, याचे ठोस पुरावे गोळा केले. काही ठिकाणी योग्य ऑडिओ व्हिज्युअल पुरावेदेखील गोळा केले. 40 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी महिला पोलिस अधिकाऱ्याच्या पथकाने सलग 10 दिवस कधी दिवसा तर कधी रात्री उशिरापर्यंत आयटी कंपनीच्या कार्यालयात वेशांतर करून तिथे वावर ठेवला. एवढेच नव्हे तर संशयितांचे संभाषण, त्यांचा वावर, त्यांची मुलींवर असणारी नजर, टोमणे मारणे, हेतूत: जवळ जावून स्पर्श करणे, त्यांच्या चेहऱ्याला, गालाला हात लावणे, खुर्चीवरून उठल्यावर अथवा बसताना पार्श्व भागावर हात फिरवणे असे प्रकार नजरेस आले. पोलिसांनी 40 ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमरे तपासले. त्याचबरोबर या पीडित महिलांना तास-तास भर भेटून त्यांच्या व्यथा समजून घेत त्यांना धीर दिला. संपूर्ण पोलिस यंत्रणा तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिल्याने त्या अन्यायाच्या विरोधात पुढे आल्या. तो खुर्चीजवळ माझ्या अंगाला स्पर्श होईल, असा उभा होता मला वाटलं होतं की ही मोठी, बहुराष्ट्रीय आयटी कंपनी आहे. तिथे आपल्यासाठी चांगल्या कामाचे वातावरण असेल. पण हळूहळू लक्षात आले की तिथे कामापेक्षा माझा धर्म आणि माझ्या विचारांबद्दल जास्त बोललं जातंय. माझ्या मनात माझ्याच धर्माबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात ‘जिहाद’पेरला जात असल्याचे वेळीच लक्षात आलं. एवढंच नव्हे तर तौसिफ अत्तार नावाचा प्रोसेस लीडर एकदा माझ्या अंगाला स्पर्श होईल अशा पद्धतीने माझ्या खुर्चीजवळ उभा होता. हे शब्द आहेत नाशिक येथील आयटी कंपनीत लैंगिक अत्याचार झालेल्या 25 वर्षीय तरुणीचे. तिने ‘दिव्य मराठी’ला सांगितलेली आपबिती तिच्याच शब्दांत. मी प्रोसेस असोसिएट पदावर होते. प्रोसेस लीडर तौसिफ अत्तारशी नेहमी कामानिमित्त बोलणं होत असे. दुसऱ्या विभागातील काही जणींना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी एचआर हेडकडे झाल्याचे माझ्या कानावर आलं होतं. एकदा ऑफिसच्या लॉबीमध्ये मी आणि दोन मैत्रिणी ताक पीत होतो. फोन आल्याने दोघीजणी निघून गेल्यावर दोन पाच मिनिटात तौसिफ आला. बहुतेक तो दोघी जाण्याची वाट बघत असावा. मग मी बसलेल्या खुर्चीजवळ अंगाला स्पर्श होईल असा तो उभा राहिला. माझ्याकडे वेगळ्याच नजरेने एकटक रोखून बघत होता. मी ताक पिताना त्याने ‘क्या पी रही हो’ असे विचारलं. मी त्याला ‘छांस पी रही हूं’ असे सांगितले. तेव्हा तौसिफने स्वत:च्या गुप्तांगाकडे इशारा करून ‘मेरे पास भी छांस है, तुझे चाहिये क्या’ असे विचारत अश्लील हावभाव केले. कायद्याच्या बालेकिल्ल्यात भरपेट ‘पाहुणचार’ या प्रकरणातील पाच संशयितांना कायद्याच्या बालेकिल्लामध्ये हजर करत भरपेट पाहुणार करण्यात आला. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने आज (दि. 10) त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. दरम्यान, फरार एचआर मॅनेजर अश्विनी चेनानी यांना गुन्हे शाखेच्या पथकाने कात्रज येथून ताब्यात घेतले. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी या संशयितेचाही चांगलाच ‘पाहुणाचार’ केला.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 12:17 pm

महाराष्ट्रातील बड्या नेत्याची VSR कंपनीच्या मालकाशी भेट:विमान प्रवासात अजितदादांच्या विमानाच्या मृत पायलटचा मुलगाही सोबत

व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाने महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याची विमानतळावर भेट घेतली. यावेळी दिवंगत अजित पवार यांच्या विमानाच्या मृत पायलटचा मुलगाही उपस्थित होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजितदादा अपघात प्रकरण हलक्यात घेऊ नका, व्ही के सिंगला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका आणि स्वतःही त्या विमानाने प्रवास करणे टाळा, अन्यथा सर्व काही अडचणीचे ठरेल, असा इशारा त्यांनी या प्रकरणी दिला आहे. अजित पवार यांचा गत 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा अपघात की घातपात? अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी या प्रकरणी उपरोक्त आरोप केला आहे. रोहित पवार शुक्रवारी एका पोस्टमध्ये म्हणाले, दिल्लीत पत्रकार रजत शर्मा यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेलेला महाराष्ट्रातला अत्यंत मोठा नेता VSR च्या विमानाने परत येतो, प्रायव्हेट चार्टर टर्मिनलवर त्या नेत्याला VSR चा मालक व्ही. के. सिंग रिसिव्ह करतो, त्या नेत्याशी हस्तांदोलन करतो, त्या नेत्याच्या पीएच्या हातात काही कागद देतो, विशेष म्हणजे अजितदादांच्या अपघातातील मृत पायलट कपूरचा मुलगा त्या नेत्याच्या विमानाचा पायलट असतो. हे सगळं आश्चर्यचकित करणारं नाही का? माझं आजही सांगणं आहे की, अजितदादा अपघात प्रकरण हलक्यात घेऊ नका… व्ही. के. सिंगला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका.. आणि स्वतःही त्या विमानाने प्रवास करणं टाळा आणि स्वतःचीही काळजी घ्या.. VSR वर एवढा विश्वास ठेवू नका, नाहीतर सगळं काही खूप अडचणीचं ठरू शकतं. महाराष्ट्र शासनसोबत आधी केवळ विमानसेवेपुरता मर्यादित असलेला व्ही. के. सिंग ज्याप्रकारे आंध्रप्रदेशमध्ये तेथील नेत्यांशी आर्थिक संबंध असल्याने तेथील मोठ्या प्रकल्पांच्या कामांसाठी मध्यस्थ / दलाल म्हणून काम करत होता त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रकल्पांच्या कामासाठी मध्यस्थ / दलाल म्हणून भूमिका बजावत असल्याची नवी माहिती समोर येत आहे. ही माहिती सत्य असेल तर महाराष्ट्र सरकार अजून किती खालच्या पातळीला जाणार आहे? असा प्रश्न पडतो. इतकं सर्वकाही असताना सत्तेत असलेला पक्ष शांत बसून AAIB च्या अहवालाची प्रतीक्षा करतोय, याचं अधिक दुःख वाटतं. याप्रकरणी सीबीआय कडून अधिक सखोल चौकशी होईल, ही अपेक्षा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. कर्नाटकचे प्रशासन संविधानानेच चालते रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी थेट कर्नाटकात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दाखल केलेला झिरो एफआयआर नंतर कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रात वर्ग केला आहे. पण अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. रोहित पवार यांनी या प्रकरणीही संताप व्यक्त केला आहे. ते यासंबंधी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले होते, अनेक प्रयत्न करुनही अजितदादांच्या विमान अपघाताचा गुन्हा दुर्दैवाने महाराष्ट्रात दाखल होऊ शकला नाही, पण कोणताही वशिला न विचारता कर्नाटक पोलिसांनी झिरो नंबरने हा गुन्हा दाखल करुन महाराष्ट्राकडं वर्ग केला आणि कर्नाटकातील प्रशासन हे संविधान आणि नियमानुसारच चालतं, हेही यानिमित्ताने दाखवून दिलं. खुद्द अजितदादा उपमुख्यमंत्री असलेल्या गृहराज्यातील त्यांच्याच युतीचं सरकार असूनही दादांना न्याय मिळाला नाही पण कर्नाटकने मात्र त्यांना न्याय देण्याचं काम केलं. प्रशासनाकडून कसं काम करुन घ्यायचं हे त्या विभागाचे प्रमुख म्हणून मंत्री महोदयांवर अवलंबून असतं. त्यामुळं न्यायाच्या या लढाईत केलेल्या सहकार्याबद्दल कर्नाटकचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांचे आभार, असे ते म्हणालेत.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 12:08 pm

ईव्हीएमची 'अग्निपरीक्षा':इतिहासात पहिल्यांदाच होणार 'डायग्नोस्टिक टेस्ट', 2024 च्या निवडणुकीत 20,625 मतांनी खान पराभूत!

निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम (EVM) यंत्रांची 16 आणि 17 एप्रिल रोजी 'डायग्नोस्टिक टेस्ट' केली जाणार आहे. माजी मंत्री नसीम खान यांनी निवडणूक निकालाला कायदेशीर आव्हान दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, देशाच्या निवडणूक इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच तांत्रिक तपासणी ठरणार आहे. बीईएलचे इंजिनिअर्स करणार तपासणीसर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल 2024 मधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 टक्के ईव्हीएमची पडताळणी करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'चे (बीईएल) तज्ज्ञ अभियंते चांदिवलीतील कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅटमधील मायक्रोकंट्रोलरची तपासणी करतील. या प्रक्रियेत यंत्राच्या 'बर्न मेमरी'मधील डेटा आणि प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी यांचा ताळमेळ तपासला जाईल. निकालावर टांगती तलवार 2024 च्या विधानसभा निवडणुकीत चांदिवलीतून शिवसेनेचे (शिंदे गट) दिलीप लांडे यांनी नसीम खान (काँग्रेस) यांचा अत्यंत निसटत्या फरकाने पराभव केला होता. मात्र, मतमोजणीत तफावत असल्याचा दावा करत खान यांनी न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी या तक्रारीची दखल घेत तपासणीचे आदेश दिले आहेत. यामुळे सध्याच्या निकालावर कायदेशीर टांगती तलवार निर्माण झाली आहे. दिव्य मराठी नॉलेज काय आहे 'डायग्नोस्टिक टेस्ट'? हा लोकशाहीच्या विजयाचा पहिला टप्पा आहे. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आता तांत्रिक मोहोर उमटेल. 16 आणि 17 एप्रिलला होणाऱ्या या तपासणीतून सत्य जनतेसमोर येईल.— नसीम खान, याचिकाकर्ते 20,625 मतांच्या फरकाने नसीम खान पराभूतचांदिवली विधानसभा मतदारसंघातील हायव्होल्टेज लढतीत शिवसेनेचे (शिंदे गट) दिलीप लांडे यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते नसीम खान यांचा पराभव करत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. 2019 च्या निवडणुकीत अवघ्या 409 मतांच्या निसटत्या फरकाने विजय मिळवणाऱ्या लांडेंनी 2024 मध्ये मात्र ही आघाडी तब्बल 20,625 मतांपर्यंत खेचून नेली. चांदिवलीत एकूण 53% मतदान झाले. यात दिलीप लांडे यांनी 1,24,641 मते मिळवून विजयाचा गुलाल उधळला, तर नसीम खान यांना 1,04,016 मतांवर समाधान मानावे लागले. 2019 च्या 'काट्याच्या' लढतीनंतर नसीम खान यावेळी मुसंडी मारतील अशी शक्यता वर्तवली जात होती; मात्र लांडेंनी मोठ्या फरकाने खान यांना अस्मान दाखवत राजकीय धक्का दिला आहे. दरम्यान, या निकालातील मतमोजणीच्या तफावतीवरून आता ईव्हीएमच्या 'डायग्नोस्टिक टेस्ट'ची चर्चा रंगली आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 11:49 am

ईव्हीएमची 'अग्निपरीक्षा':इतिहासात पहिल्यांदाच 17 तारखेला मतदान यंत्राची होणार 'डायग्नोस्टिक टेस्ट'; नेमके काय होणार? वाचा

निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम (EVM) यंत्रांची १६ आणि १७ एप्रिल रोजी 'डायग्नोस्टिक टेस्ट' केली जाणार आहे. माजी मंत्री नसीम खान यांनी निवडणूक निकालाला कायदेशीर आव्हान दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, देशाच्या निवडणूक इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच तांत्रिक तपासणी ठरणार आहे. बीईएलचे इंजिनिअर्स करणार तपासणी सर्वोच्च न्यायालयाच्या एप्रिल २०२४ मधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ टक्के ईव्हीएमची पडताळणी करण्याची तरतूद आहे. त्यानुसार, 'भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड'चे (बीईएल) तज्ज्ञ अभियंते चांदिवलीतील कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅटमधील मायक्रोकंट्रोलरची तपासणी करतील. या प्रक्रियेत यंत्राच्या 'बर्न मेमरी'मधील डेटा आणि प्रत्यक्ष मतदानाची आकडेवारी यांचा ताळमेळ तपासला जाईल. निकालावर टांगती तलवार २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत चांदिवलीतून शिवसेनेचे (शिंदे गट) दिलीप लांडे यांनी नसीम खान (काँग्रेस) यांचा अत्यंत निसटत्या फरकाने पराभव केला होता. मात्र, मतमोजणीत तफावत असल्याचा दावा करत खान यांनी न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी या तक्रारीची दखल घेत तपासणीचे आदेश दिले आहेत. यामुळे सध्याच्या निकालावर कायदेशीर टांगती तलवार निर्माण झाली आहे. काय आहे 'डायग्नोस्टिक टेस्ट'? हा लोकशाहीच्या विजयाचा पहिला टप्पा आहे. ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबाबत आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आता तांत्रिक मोहोर उमटेल. १६ आणि १७ एप्रिलला होणाऱ्या या तपासणीतून सत्य जनतेसमोर येईल, असे मत या प्रकरणी याचिकाकर्ते नसीम खान यांनी व्यक्त केले. २०,६२५ मतांच्या फरकाने नसीम खान पराभूत चांदिवली विधानसभा मतदारसंघातील हायव्होल्टेज लढतीत शिवसेनेचे (शिंदे गट) दिलीप लांडे यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते नसीम खान यांचा पराभव करत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. २०१९ च्या निवडणुकीत अवघ्या ४०९ मतांच्या निसटत्या फरकाने विजय मिळवणाऱ्या लांडेंनी २०२४ मध्ये मात्र ही आघाडी तब्बल २०,६२५ मतांपर्यंत खेचून नेली. चांदिवलीत एकूण ५३% मतदान झाले. यात दिलीप लांडे यांनी १,२४,६४१ मते मिळवून विजयाचा गुलाल उधळला, तर नसीम खान यांना १,०४,०१६ मतांवर समाधान मानावे लागले. २०१९ च्या 'काट्याच्या' लढतीनंतर नसीम खान यावेळी मुसंडी मारतील अशी शक्यता वर्तवली जात होती; मात्र लांडेंनी मोठ्या फरकाने खान यांना अस्मान दाखवत राजकीय धक्का दिला आहे. दरम्यान, या निकालातील मतमोजणीच्या तफावतीवरून आता ईव्हीएमच्या 'डायग्नोस्टिक टेस्ट'ची चर्चा रंगली आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 11:43 am

ऑपरेशन टायगर हे काही सांगून केले जाणार नाही:उबाठात लवकरच स्फोट होणार, आमदार, खासदार, पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या संपर्कात- संजय शिरसाट

ऑपरेशन टायगर हे काही सांगून केले जाणार नाही. एकनाथ शिंदे निर्णय घेतील त्यावेळेसच आपल्याला कळेल. कोणतेही ऑपरेशन करताना ते काही बँडबाजा लावून केले जात नाही. आमदार, खासदार आणि पदाधिकारी आहेत जे रोज एकनाथ शिंदेंना सांगत असतात पण योग्य वेळी निर्णय घेणं ही शिंदेंची ख्याती आहे, असे शिवसेना प्रवक्ते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. संजय शिरसाट म्हणाले की, या महिनाभरात तुम्हाला ऑपरेशल टायगर आहे की आणखी काही आहे हे महिनाभरात कळेल. आता सर्व काही शेवटच्या टप्प्यात आहे, तुम्हाला काही जास्त वाट पाहावी लागणार नाही. लवकरच उबाठामध्ये तुम्हाला स्फोट झालेला बघायला मिळेल. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगर या चर्चेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील आठ खासदारांसोबत गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावर बोलाताना शिरसाट यांनी हे वक्तव्य केले आहे. शिंदेंसोबत जाणार नाही- सावंत अरविंद सावंत यांनी या सर्व बातम्यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. मी सध्या रागातही आहे आणि मला कीवही येते, अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. सकाळी अचानक ही बातमी पाहून धक्का बसल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, कालपर्यंत इतर खासदारांची नावे घेतली जात होती, मात्र आज अचानक त्यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे.शिंदे यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केली आहे. सध्या ते शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन करत आहे. राऊत यांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चांनाही फेटाळून लावत ठाकरे गटातील एकजूट अधोरेखित केली. आमचे नऊ खासदार एकत्र आहेत. काही नावं वाचून मला हसू आलं. उद्या माझं आणि आदित्य ठाकरे यांचंही नाव टाकतील, या प्रकारच्या बातम्या केवळ वातावरण तापवण्यासाठी किंवा काहीतरी घडत असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी पसरवल्या जात आहेत.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 11:24 am

फोडा, तोडा अन् राज्य करा हीच नवी फॅशन!:उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत हा निव्वळ आरोप, सत्ता असूनही एकनाथ शिंदे अस्वस्थ- विजय वडेट्टीवार

महाराष्ट्र आणि देशामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला उत आलाच आहे. फोडा, तोडा, मोडा आणि राज्य करा असे सुरू आहे. आता नैतिकता, नीतिमत्ता काहीच राहिलेली नाही, कुठेही जावं, कुणाच्याही मांडीवर बसावं, कुणी कुणाला डोक्यावर घ्यावे अन् डोक्यावर घेत पायाखाली तुडवावे ही एक फॅशन झाली आहे, बघू पुढे काय होते ते, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. देशात जे सरकार आहे त्यांच्या काळात देश कर्जबाजारी झाला आहे. जनता परेशान आहे. या परिस्थितीत फोडा फोडीचा विचार येणाऱ्यांना देव सदबुद्धी देईल. विजय वडेट्टीवार म्हणाले की, मतदारसंघातील कामांसाठी उबाठाचे खासदार सत्ताधाऱ्यांकडे जाऊ शकतात, सत्ता त्यांच्याकडे असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही सुद्धा जात असतो. मतदारसंघातील कामे असतात त्यासाठी जाण्यात गैर काय? उद्धव ठाकरे वेळ देत नाही हा केवळ आरोप आहे, आम्ही ज्या ज्या वेळी त्यांची वेळ मागितली त्यांनी आम्हाला भेटीसाठी वेळ दिली आहे. कोणाचे जेवन चांगले वाटले म्हणून खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे गेले असतील. यावर जास्त काही बोलणं योग्य नाही. पक्ष फुटण्याची काही चिन्ह आता तरी काही दिसत नाही. विजय वडेट्टीवार म्हणाले की, एकनाथ शिंदे सत्तेत असूनसुद्धा अस्वस्थ आहेत. त्यांचे अनेक मंत्री अस्वस्थ आहेत. हे पाहता पुन्हा एकमेकांची तारीफ करत एकमेकांच्या जवळ येणं हे चांगले संकेत आहे असे मी मानतो. त्यांना वेगळ्या ॲंगलने पाहण्याची गरज नाही. राजकारण हे निवडणुकीपुरते असायला हवे. निवडणुकीनंतर भाजपच्या नगरसेवकाला जास्त आणि दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांना कमी निधी असे महाराष्ट्रात असे कधीही झाले नाही. सरकारने सर्वांना विकासाच्या दृष्टीने मदत करण्याचा विचार केला आहे. पण आता ही नवीन पद्धत रुजली आहे की विरोधकांना पैसे द्यायचे नाही, त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा नाही. विजय वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेसमध्ये काहीही मतभेद नाहीत. आम्ही सर्व जण एकमेकांच्या संपर्का असतो. बारामतीबद्दल सुद्धा प्रदेशाध्यक्षांनी दोन ते 3 वेळा फोन करत काय भूमिका घ्यावी या संदर्भात आमच्याशी चर्चा केली. मी पण त्यांना फोन केला की आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे. एकीकडे फोन करत विनंती करायची आणि दुसरीकडे विरोधी वक्तव्ये करायची याला काहीही अर्थ नाही. तुम्ही तुमच्या नेत्यांचा अपमान करत आहात. मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रदेशाध्यक्षांना विनंती केली म्हणून माघार केली.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 11:03 am

ऑपरेशन टायगर किती खरे - किती खोटे:ठाण्यातील व्होल्टास कंपनी परिसरात बुधवारी पहाटेपर्यंत बैठक; खासदारांच्या ताबडतोब प्रतिक्रिया

राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दिल्लीतील नेतृत्वाकडून यासाठी एकनाथ शिंदे यांना हिरवा कंदील मिळालेला नसल्याची चर्चा असली तरी, पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे अजूनही गुप्तपणे ठाकरे गटाच्या खासदारांशी संपर्क साधत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात झालेल्या कथित बैठकीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ऑपरेशन टायगरच्या संदर्भात एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटातील काही खासदारांची गुप्त बैठक झाली. या बैठकीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी खळबळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत शिंदे हे आपले प्रयत्न यशस्वी करून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना मातोश्रीवर बोलावून संवाद साधला होता. त्या बैठकीत सर्व खासदारांनी पक्षाशी निष्ठावंत राहण्याची ग्वाही दिली होती. मात्र, आता नव्याने समोर आलेल्या या भेटीच्या वृत्तामुळे त्या भूमिकेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे ठाकरे गटात अंतर्गत हालचालींना वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री झालेल्या या बैठकीत ठाकरे गटातील आठ खासदार सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, त्या रात्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अचानक वेगळ्या मार्गाने वळल्याने संशय निर्माण झाला. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात ही बैठक झाल्याचा दावा केला जात आहे. ही बैठक उशीरा रात्री सुरू होऊन पहाटेपर्यंत चालल्याची माहिती आहे. यावेळी शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते, असेही सांगितले जाते. या बैठकीला ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते, अशी चर्चा आहे. तर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह आणखी दोन खासदार व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी झाल्याचेही सांगितले जाते. या बैठकीत संबंधित खासदारांना शिंदे गटात सामील होण्याची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या सर्व दाव्यांवर संबंधित खासदारांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ओमराजे निंबाळकर यांनी अशा कोणत्याही बैठकीची माहिती नसल्याचे सांगत, बैठक झाली असेल तर फोटो दाखवा, असे खुले आव्हान दिले. अरविंद सावंत यांनीही ठामपणे सांगितले की, काहीही झालं तरी मी शिंदे यांच्यासोबत जाणार नाही. त्यामुळे ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे निर्माण झालेला गोंधळ अधिकच वाढला असून, या प्रकरणात नेमके सत्य काय, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. राज्यात सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान ठाण्यात कथित गुप्त बैठक झाल्याच्या बातम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, या बैठकीत सहभागी असल्याचे सांगितल्या गेलेल्या ठाकरे गटाच्या खासदारांनी आता या सर्व दाव्यांना ठामपणे नकार दिला आहे. एकामागोमाग एक खासदार पुढे येत आपली भूमिका स्पष्ट करत असल्याने या चर्चांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खासदार संजय जाधव परभणीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी या प्रकरणी थेट भूमिका मांडली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातच आहे. त्यामुळे ठाण्यात झालेल्या कोणत्याही बैठकीशी माझा संबंध नाही. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, ते कोणत्याही बैठकीला गेले नाहीत आणि कोणाशीही संपर्क झालेला नाही. सध्या ते आपल्या कामात व्यस्त असून पक्षांतराचा कोणताही विषय नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. खासदार नागेश पाटील आष्टीकर याचप्रमाणे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही या कथित बैठकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सूत्रांकडून त्यांच्या नावाचाही या बैठकीत समावेश असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यांनी या सर्व बातम्यांना स्पष्टपणे फेटाळले. अशी कोणतीही बैठक झाली आहे, याची मला माहितीच नाही. मी त्या बैठकीला उपस्थित नव्हतो, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे चर्चांना आणखी धक्का बसला आहे. खासदार संजय देशमुख यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनीही अशाच प्रकारे या बैठकीत सहभाग नाकारला आहे. त्यांनी सांगितले की, मी प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन कोणत्याही बैठकीत सहभागी झालो नाही. मला या बैठकीचे ना निमंत्रण होते, ना कुणी बोलावले. त्यामुळे अशा बैठकीला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे या चर्चांची विश्वसनीयता आणखी कमी झाली आहे. राजकारण आणखी तापण्याची शक्यता या खासदारांच्या प्रतिक्रियांमुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. एकीकडे गुप्त बैठकीचे दावे केले जात असताना, दुसरीकडे संबंधित खासदारच या दाव्यांना नकार देत असल्याने नेमकं सत्य काय, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता राजकीय वर्तुळासह जनतेचंही लक्ष लागले आहे.एकूणच, ठाकरे गटातील खासदारांनी एकमुखाने दिलेल्या इन्कारामुळे सत्ताधाऱ्यांच्या हालचालींवर संशय व्यक्त केला जात आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 10:56 am

शशिकांत शिंदेंना शिवसेनेत येण्याची ऑफर:शिंदे मूळचे शिवसैनिकट, ते आमच्यासोबत आल्यास सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करेन - महेश शिंदे

सत्ताधारी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक आहेत. ते आमच्या पक्षात आले तर सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करेन, असे शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी म्हटले आहे. महेश शिंदे यांच्या या विधानामुळे शिवसेना शरद पवार गटाच्या नेत्यांना फोडण्याच्या प्रयत्नांत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्षांत सध्या राजकीय पदाधिकारी फोडण्याची स्पर्धा लागली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यापुढे शिवसेनेत येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ते म्हणाले, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत मीच करेन. मी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नेतृत्व स्वीकारून भाजपमध्ये येण्याचा सल्लाही दिला आहे. शशिकांत शिंदे शिवसेनेत आले पाहिजेत. ते तिकडे कशाला थांबलेत माहिती नाही. त्यांनी इथे यावे, असे ते म्हणालेत. प्रिया शिंदेंच्या कुणबी दाखल्याचा वाद न्यायप्रविष्ट साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व आमच्यात कोणतेही मतभेद नसून, आगामी काळात सर्वकाही व्यवस्थित होईल, असा दावाही महेश शिंदे यांनी यावेळी केला. तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या कुणबी प्रमाणपत्राचा वाद न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर भाष्य करण्यासही नकार दिला. आमच्याकडून ओबीसी बांधवांवर कोणताही अन्याय झाला नाही. प्रतिस्पर्धी पक्षाने कुणबी उमेदवार दिल्यामुळे आम्हीही कुणबी उमेदवार दिला. प्रिया शिंदे यांच्या माहेरकडील वंशावळीमध्ये कुणबी हा उल्लेख आहे. त्यामुळे त्यांचा दाखला वैध आहे. ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याचे त्याची कुणीही मीडिया ट्रायल करू नये, असे ते म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे राज्यातील लोकसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच्या सर्वच निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आता पक्ष संघटनेचा विस्तार व पक्ष बळकटीला प्राधान्य देत आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकार्यक्षम नेत्यांना घरी बसवण्याचा इशारा दिल्यामुळे शिवसेनेतील सर्वच नेते अंग झटकून पक्ष विस्ताराच्या कामाला लागलेत. या पार्श्वभूमीवर महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यापुढे शिवसेनेत येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. एकनाथ शिंदे व ठाकरेंच्या 8 खासदारांची गुप्त बैठक दुसरीकडे, एकनाथ शिंदे व ठाकरे गटाच्या 8 खासदारांची बुधवारी रात्री गुप्त बैठक पार पडल्याचे वृत्त फुटल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बुधवारी रात्री एकनाथ शिंदेंची गाडी अचानक ताफा सोडून वेगळ्या मार्गाने गेली. त्यानंतर ठाण्यातील व्होल्टास कंपनीच्या परिसरात शिंदे व ठाकरे गटाच्या खासदारांची भेट झाली. ही बैठक गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू होती असा दावा केला जात आहे. या बैठकीला शिंदेंसोबत त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदेही हजर होते, तर ठाकरे गटाकडून खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह दोन खासदारांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून या बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत शिंदेंनी या खासदारांना आपल्या पक्षात येण्याचे आवाहन केल्याची माहिती आहे. दरम्यान, ओमराजे निंबाळकर व अरविंद सावंत यांनी या बैठकीचे वृत्त फेटाळून लावले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 10:53 am

शहीद झालेल्यांच्या पुत्रांना पीएसआयपदी थेट नियुक्ती:‘गडचिरोली विशेष परिक्षेत्रात’ काम करण्याची अट

नक्षलविरोधी कारवाईत शौर्य गाजवताना वीरमरण आलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शहीद पोलिस उपनिरीक्षक संतोष महिपत घाग आणि शहीद पोलिस हवालदार हरिदास चिंतामण सयाम यांच्या वारसांना पोलिस उपनिरीक्षक गट-ब (अराजपत्रित) या पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश गृह विभागाने गुरुवारी जारी केला. नक्षलविरोधी कारवाईत शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना गट-अ आणि गट-ब संवर्गात नियुक्ती देण्याची तरतूद 1009 च्या शासन निर्णयानुसार आहे. याच तरतुदीचा आधार घेत, विराज संतोष घाग आणि विकास हरिदास सयाम यांची शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन त्यांना ही विशेष नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणून ही नियुक्ती करताना त्यांना ‘गडचिरोली विशेष परिक्षेत्रात’ काम करण्याची अट घालण्यात आली आहे. एकूणच शहिदांच्या वारसांना यामुळे न्याय मिळाला आहे. शहिदांच्या त्यागाची दखल नक्षलविरोधी कारवायांमध्ये प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बलिदानाचा सन्मान करणे आणि त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर न सोडता सामाजिक सुरक्षा प्रदान करणे ही सरकारची मुख्य भूमिका आहे. ‘विशेष बाब’ म्हणून थेट ‘गट-ब’ अधिकारी पदावर नियुक्ती देऊन सरकारने एक संवेदनशील प्रशासकीय पाऊल उचलले आहे. कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या जवानांच्या कुटुंबाची जबाबदारी शासन घेते, हा सकारात्मक संदेश पोलिस दलात आणि समाजात पोहोचवणे हा या निर्णयाचा उद्देश आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 10:30 am

ऑपरेशन टायगर वरून राजकारण पेटलं:माझं नाव घालून खोटी बातमी, अरविंद सावंतांचा संतप्त इशारा; बातमीनंतर ठाकरे गट आक्रमक

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगर या चर्चेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील आठ खासदारांसोबत गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर हे खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध स्तरांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. या कथित आठ खासदारांमध्ये खासदार अरविंद सावंत यांचे नावही समाविष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अधिकच खळबळ उडाली. सावंत हे ठाकरे गटातील महत्त्वाचे आणि अनुभवी नेते मानले जात असल्याने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने या चर्चेला अधिक वजन मिळाले. मात्र, ही माहिती समोर येताच सावंत यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद सावंत यांनी या सर्व बातम्यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. मी सध्या रागातही आहे आणि मला कीवही येते, अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. सकाळी अचानक ही बातमी पाहून धक्का बसल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, कालपर्यंत इतर खासदारांची नावे घेतली जात होती, मात्र आज अचानक त्यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. सावंत यांनी स्पष्टपणे सांगितले की, शिंदे यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. त्यांनी या प्रकाराला कडाडून विरोध दर्शवत अशा बातम्या पसरवणाऱ्यांवर टीका केली. त्यांच्या मते, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेनेही अशा खोट्या बातम्यांबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली असली तरी ठाकरे गटातील नेत्यांनी मात्र एकमुखाने या दाव्यांना फेटाळले आहे. कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा पुन्हा एकदा पुढे आला आहे. त्यामुळे या चर्चांमागे नेमकं काय आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. एकूणच, ऑपरेशन टायगर मुळे निर्माण झालेल्या राजकीय वातावरणात आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. अरविंद सावंत यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. येत्या काळात या चर्चांचा नेमका परिणाम काय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 10:21 am

अकोल्यात पत्नीचा चाकूने भोसकून खून;‎ 2 चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले‎:‘मुलाला मारू नका'' म्हणून आईमध्ये पडली अन् गेला जीव‎

येथून जवळच असलेल्या बोरगाव‎ मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ‎‎यावलखेड येथे गुरुवारी सकाळी ‎‎‎घडलेल्या ‎‎‎धक्कादायक ‎‎‎घटनेत पतीने ‎‎‎कौटुंबिक‎‎ वादातून‎‎ पत्नीवर ‎‎धारदार शस्त्राने ‎‎‎हल्ला करून‎ तिची हत्या केल्याची घटना‎ उघडकीस आली. या घटनेमुळे ‎‎परिसरात मोठी खळबळ उडाली ‎‎असून, दोन लहान मुलांचे मातृछत्र ‎‎हरपले आहे. शहरातील डाबकी‎रोड पोलिस ठाणे हद्दीत अन्नपूर्णा‎माता मंदिर परिसरात पतीने ‎पत्नीचा खून करुन जाळून ‎टाकण्याची घटना ताजी‎ असतानाच गेल्या तीन दिवसांत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची ‎हत्या करण्याची गुरुवारी घडलेली‎ही दुसरी घटना आहे. यामुळे ‎जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली ‎जात आहे.‎ याबाबत दीपक लक्ष्मण‎ पिंजरकर यांनी बोरगाव मंजू ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत‎ म्हटले आहे की, मृत महिलेचे नाव‎ वृषाली अनिल निंबोकार ‎(32),रा. गजानन नगर‎ यावलखेड, ता. अकोला असून,‎ती यावलखेड येथील गायत्री ‎ऑर्गेनिक प्रॉडक्ट्स कंपनीत‎ कामाला होती. पती अनिल ‎निंबोकार (42), सासरे व प्रथमेश ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎उर्फ समर्थ व कार्तिक या दोन ‎मुलांसह गायत्री ऑरगॅनिक ‎प्रॉडक्ट्स कंपनीच्या समोरील‎ बाजूच्या गजानन नगर,‎ यावलखेडमध्येच मागील दोन ‎वर्षांपासून राहत होते. वृषाली व‎ अनिल निंबोकार या‎पती-पत्नीमध्ये नेहमीच कौटुंबिक‎वाद होत असत. गुरुवारी सकाळी‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎सुमारे 9.15 ते 9.30 च्या सुमारास‎पती मोठा मुलगा समर्थ याला मारत ‎होते. ‘मुलाला मारू नका म्हणून‎ आईमध्ये पडली त्यामुळे पतीचा ‎राग अनावर झाला. या वादाचे ‎रूपांतर हिंसाचारात झाले आणि‎ अनिल निंबोकार याने वृषालीवर ‎चाकूने सपासप वार केले.‎ घटनेदरम्यान घराचा दरवाजा आतून बंद‎ होता. शेजाऱ्यांनी दरवाजा ‎उघडून आत प्रवेश केला आणि‎ त्यांनी आरोपीला साडीने बांधून‎ ताब्यात ठेवण्यात आले. जखमी ‎अवस्थेतील वृषालीला तातडीने‎ येथील शासकीय ‎रुग्णालयात नेण्यात आले.‎ मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले. या‎प्रकरणी बोरगाव मंजू पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात‎ आला असून, आरोपी अनिल ‎निंबोकार (42) यास अटक ‎केली आहे. अकोला स्थानिक ‎गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ‎शंकर शेळके यांच्यासह‎ बोरगाव मंजूचे प्रभारी ठाणेदार ‎पोलिस उपनिरीक्षक अजित ‎जाधव, पोलिस उपनिरीक्षक ‎मनोज उघडे, पोलिस‎ उपनिरीक्षक रवींद्र धुळे, हेड ‎कॉन्स्टेबल आकाश यादव,‎ सुदिप राऊत, प्रशांत विधळे,‎अक्षय देशमुख, शिवहरी‎ लांडगे तपास करत आहेत. या‎ घटनेमुळे यावलखेड परिसरात ‎भीती आणि संतापाचे ‎वातावरण निर्माण झाले आहे.‎ आईला मारत असताना ‎मुलगा होता रडत‎ घरातून आरडाओरडा ऐकू येत‎ असताना मोठा मुलगा प्रथमेश उर्फ‎ समर्थ ‘बाबा आईला मारत आहेत’‎अशी हाक मारत बाहेर आला.‎ शेजाऱ्यांनी दरवाजा उघडण्याचा ‎प्रयत्न केला. दरवाजा ‎उघडल्यानंतर वृषाली रक्ताच्या‎ थारोळ्यात पडलेली दिसली, तर‎ अनिलच्या हातात चाकू होता.‎शेजाऱ्यांनी तत्काळ अनिलला ‎पकडून त्याच्या हातातील चाकू‎ काढून घेतला. त्याने त्यानंतर ‎विषारी कीटकनाशक पिण्याचा‎ प्रयत्न केला, मात्र उपस्थितांनी तो‎ प्रयत्न हाणून पाडला.‎ जिल्ह्यात आठवडाभरात गुन्हेगारी घटना वाढल्या‎ शहरासह जिल्ह्यात सर्वच ‎भागांमध्ये गुन्हेगारीने डोके वर‎ काढले असून, गेल्या 1 ते 9‎ एप्रिल या नऊ दिवसांत जिल्ह्यात कौटुंबिक वादातून दोन खून, दोन ‎जबर हाणामाऱ्या, एक आर्थिक ‎फसवणूक, दोन महिला‎ अत्याचाराच्या घटना घडल्या.‎ बाळापूर पोलिस ठाणे हद्दीत 112‎ किलो गांजा सापडला. गेल्या ‎आठवडाभरातील विविध‎ प्रकारच्या घटना पाहता ‎जिल्ह्याचा क्राइम रेट वाढल्याचे ‎दिसून येत आहे. शहरातील‎ गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने‎ वाढ होत असताना पुन्हा एकदा ‎थरारक हत्याकांड उघडकीस‎ आले आहे. अकोला शहरात‎ गावगुंडांची वाढती दहशत, लहान‎ सहान घटनांवरून निघणारे चाकू,‎ सुरे पाहता तसेच गांजाच्या ‎आहारी गेलेले अल्पवयीन‎ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नांग्या‎ कायमच्या ठेचण्याची वेळ आली‎ आहे. पोलिस प्रशासनाने या सर्व‎ प्रकरणांची गंभीर दखल घेण्याची ‎गरज निर्माण झाल्याचा सूर‎ जनतेतून उमटत आहे.‎

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 10:20 am

वृद्धेचे तोंड दाबून चाकूच्या धाकाने सव्वा तोळ्याचे गंठण हिसकावले:शिवगंगा नगरमध्ये चेन स्नॅचिंगसाठी घुसले थेट घरात

चेन स्नॅचिंग प्रकारात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरात घुसून चाकूचा धाक दाखवत अंगावरील सव्वातोळे सोन्याचे मिनी गंठण हिसकावण्याचा प्रकार उघडकीस आला. शिवगंगा नगरात एका वृद्ध महिलेच्या घरात ही घटना झाली. या प्रकरणी जयश्री अरुण केत (वय 72, रा. शिवगंगा नगर भाग 4, मजरेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरावर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. आतापर्यंत रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावण्याचे प्रकार झाले. आता चोरांचे धाडस इतके वाढले की, घरात घुसून शस्त्रांचा धाक दाखवत लुटायला सुरुवात केली. घरातील वृद्धांना त्यांनी ‘लक्ष्य’ केल्याचे दिसून येते. त्यासाठी पाळत ठेवूनच हा प्रकार होत असावा, असे या घटनेवरून दिसून येते. केत यांचे किराणा दुकान आहे. गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांनी दुकानासमोर साफसफाई केली. घरात गेल्यानंतर दबा धरून बसलेल्या चोरांना कापडाने त्यांचे तोंड दाबले आणि चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सव्वातोळ्याचे मिनी गंठण लंपास केले. आरडाओरड करेपर्यंत चोर पसार झाला. केत पती-पत्नी दोघेच राहतात. गुरुवारी पहाटे पती अरुण केत दुकानातील काही साहित्य आणण्यासाठी बाहेर पडले होते. जयश्री केत यांनी स्वच्छता दुकानाचे शटर खाली खेचले. त्यानंतर घरात गेल्या. दबा धरून बसलेला 25 ते 30 वर्षांचा असावा. त्याने चेहऱ्याला काळे कापड बांधले होते. त्याच्या हातातील पांढऱ्या ओढणीने त्याने जयश्री केत यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. केत यांनी प्रतिकार केला. त्या वेळी आरोपीने खिशातून चाकू काढला. जीवाच्या भीतीने केत गप्प झाल्या. त्यांच्या गळ्यातील 78 हजार रुपये किमतीचे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेला. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिवे करत आहेत. त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोराचा माग काढता आलेला नाही, असे ते म्हणाले. यापूर्वीचे चेन स्नॅचिंग... यापूर्वीच्या चेन स्नॅचिंग प्रकारात चोरांनी रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांना ‘लक्ष्य’ केले होते. दुचाकीवर डबलसीट येणारे चोर हेल्मेट वापरत होते. मागून येत चेन हिसकावली की, धूम ठोकायचे. परंतु शिवगंगा नगरातील प्रकारातील चोर वेगळे आहेत. यातील चोराने चेहरा काळ्या कापडाने झाकलेला होता. तो घरातच दबा धरून बसलेला असावा. आणण्यासाठी बाहेर पडले होते. जयश्री केत यांनी स्वच्छता दुकानाचे शटर खाली खेचले. त्यानंतर घरात गेल्या. दबा धरून बसलेला 25 ते 30 वर्षांचा असावा. त्याने चेहऱ्याला काळे कापड बांधले होते. त्याच्या हातातील पांढऱ्या ओढणीने त्याने जयश्री केत यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. केत यांनी प्रतिकार केला. त्या वेळी आरोपीने खिशातून चाकू काढला. जीवाच्या भीतीने केत गप्प झाल्या. त्यांच्या गळ्यातील 78 हजार रुपये किमतीचे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेला. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चंदनशिवे करत आहेत. त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोराचा माग काढता आलेला नाही, असे ते म्हणाले. पाळत ठेवल्याचा संशय चोर ज्या अर्थी पहाटेच घरात दबा धरून बसला, त्याअर्थी त्याने या घरावर पाळत ठेवली होती. घरात कोण कोण आहेत, पहाटे किती वाजता उठतात, पती कधी बाहेर पडतो. या बाबी हेरूनच चोर परिसरात गेला. पती बाहेर गेले, पत्नी झाडू घेऊन बाहेर आल्या आणि चोर घरात शिरून दबा धरून बसला. पाळत ठेवूनच असा प्रकार करता येतो, असे पोलिस म्हणाले. चेहऱ्यावर काळ्या रंगाचे कापड घालून घरातच दबा धरून होता चोर जीवाच्या भीतीने केत गप्प झाल्या आणि चोराने त्यांच्या गळ्यातील गंठण घेतले.वयोवृद्ध किंवा महिला पहाटेच्या सुमारास लवकर उठल्यानंतर आसपास संशयित ये-जा करणाऱ्या प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवले पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काही चोरटे पाहणी करून निर्जन ठिकाणी दबा धरून बसतात. अचानक पाठीमागून येऊन झडप घालतात. काही कळण्याच्या आगोदर दागिने घेऊन लंपास होतात. अशा वेळी शक्य असल्यास घरात परिसरात किंवा दुकानासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून चोरट्याचा शोध घेता येईल.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 10:05 am

शिंदखेड्यातून नाशकात चोरटी वाळू वाहतूक:6 डंपरसह मुरुमाचे 2 ट्रॅक्टर जप्त, सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांची छापेमारी

शिंदखेड्याच्या तापी नदीतून अवैधरित्या उपसा करून 30 ब्रास वाळूची नाशिकला चोरटी वाहतूक करणारे 6 डंपर व मुरूमचे दोन ट्रॅक्टर महसूलच्या तीन विशेष पथकांनी जप्त केले. गुरुवारी (दि.9) सकाळी मनमाड चौफुली व सवंदगाव परिसरात केलेल्या कारवाईत हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी सिध्दार्थ रामकुमार यांनी सिन्नर महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही छापेमारी केली. . मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज वाहतूक होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची खात्री करत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार सहाय्यक जिल्हाधिकारी रामकुमार हे तीन पथकांसह मालेगावात पोहोचले. त्यांनी मनमाड चौफुली परिसरात सापळा रचला. यावेळी तब्बल सहा डंपर वाळू वाहतूक करताना मिळून आले. पथकांनी पाठलाग केल्याने काही संशयितांनी वाहनांसह पळ काढला. मात्र, पथकाने पोलिसांच्या मदतीने सर्व डंपर पकडले. वाळू उत्खनन तसेच वाहतुकीचा कुठलाही परवाना डंपरचालकांकडे आढळून आला नाही. यादरम्यान दुसरी कारवाई सवंदगाव परिसरात करण्यात आली. बाजारभावाच्या पाच पटीने 21 लाखाचा दंड सहा डंपरमध्ये प्रत्येकी पाच यानुसार 30 ब्रास वाळू आढळली. बाजारभावाच्या पाच पटीने 21.44 लाग रुपयांचा दंड करण्यात आला आहे. मुरूमचा स्वतंत्र दंड आकारला जाणार आहे. पथकाने किल्ला व मालेगाव तालुका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कारवाया केल्या आहेत. मंत्री बावनकुळेंच्या आदेशाने कारवाई महसूलमंत्री बावनकुळे यांनी मागील आठवड्यात बैठक घेतली होती. मालेगावात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू असताना गौण खनिजची महसूल वसुली खूपच कमी असल्याचे लक्षात आल्याने कारवाईचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार कारवाई करण्यात आली. -आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 9:56 am

बारामतीत 23 उमेदवार रिंगणात:काँग्रेसच्या माघारीनंतर लढत एकतर्फी? 30 जणांनी घेतली माघार; आता कोण टक्कर देणार, वाचा नावे

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता एकूण 23 उमेदवार रिंगणात उरले असून, या निवडणुकीचं चित्र पूर्णपणे बदलल्याचं दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक सरळ झाली आहे. विशेष म्हणजे या 23 उमेदवारांपैकी केवळ 10 उमेदवार बारामती मतदारसंघातील आहेत, तर उर्वरित 13 उमेदवार बाहेरील भागातील आहेत. सोलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि पुणे या भागांतून आलेले उमेदवारही या लढतीत उतरले आहेत. या निवडणुकीत महत्त्वाचा टप्पा ठरला तो काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांच्या माघारीचा. धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आकाश मोरे हे सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठं आव्हान उभं करू शकतील, अशी चर्चा होती. बारामतीत धनगर समाजाची मतसंख्या लक्षणीय असल्याने त्यांच्या उमेदवारीमुळे मताधिक्य कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा दिलासा मिळाला आहे. बारामतीत अजित पवार यांनी नेहमीच मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे या पोटनिवडणुकीतही सुनेत्रा पवार यांना दणदणीत विजय मिळवून देणे, ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची बाब बनली आहे. यासाठी पवार कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्यांनी सक्रिय भूमिका घेतली. अखेर काँग्रेसला माघार घ्यायला राजी करण्यात यश आले आणि त्यामुळे निवडणुकीतील मुख्य स्पर्धा कमी झाल्याचे चित्र आहे. आता या निवडणुकीत चर्चेत राहू शकतील अशी दोनच नावे पुढे येत आहेत, ती म्हणजे अभिजित बिचुकले आणि करुणा शर्मा मुंडे. मात्र हे दोघेही बारामतीबाहेरील असल्याने ते प्रत्यक्षात कितपत प्रभाव टाकू शकतील, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासमोर सध्या कोणतेही ठोस आव्हान नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया 23 एप्रिल रोजी पार पडणार आहे, तर निकाल 4 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीत उरलेल्या उमेदवारांची यादी पाहिली असता विविध भागांतील आणि विविध पार्श्वभूमी असलेले उमेदवार रिंगणात असल्याचे दिसते. त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता पूर्णपणे संपलेली नाही. खरी लढत कोण देणार, याकडे सर्वांचे लक्ष उमेदवारांच्या यादीत प्रमुख नाव म्हणून सुनेत्रा अजित पवार (बारामती, राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत हे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे उमेदवारांची संख्या मोठी असली तरी खरी लढत कोण देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 9:43 am

धरणाचे पाणी कोरडवाहू शेतकऱ्यांना का दिले नाही:उपाययोजनेची गरज, प्रा. विधळे यांच्या गौरव समारंभात ज्येष्ठ विचारवंत डॉ. पाटणकर यांचा सवाल‎

कोरडवाहू शेती हा अत्यंत अडचणीचा विषय आहे. सिंचनाची सोय नसणे ही त्यांच्यापुढील सर्वात मोठी अडचण असते. त्यामुळे बरेचदा असे शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. शासन त्यांना धरणाचे पाणी का देत नाही, असा सवाल उपस्थित करून शासनाने योग्य ती उपाययोजना करावी, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी मांडले. धरणग्रस्तांसाठी तहहयात लढणारे कार्यकर्ते प्रा. साहेबराव विधळे यांचा गौरव समारंभ आणि त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘संघर्षधारा’ या गौरवग्रंथाचे विमोचन डॉ. पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई अरविंद वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली अभियंता भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील ज्येष्ठ विचारवंत नागेश चौधरी, मोझरी येथील गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य वेरुळकर गुरुजी, डॉ. प्रतिभा विधळे, पुष्पाताई बोन्डे, माणिकराव गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांची व्यथा मांडताना डॉ. पाटणकर पुढे म्हणाले, विकास प्रकल्पांखाली अनेक गावे आणि शेतजमिनी जातात. अनेकजण विस्थापित होतात. मात्र विस्थापितांचे योग्य प्रकारे पुनर्वसन होत नाही. अशा स्थितीत प्रकल्पग्रस्तांच्या वाट्याला संघर्ष येतो. त्यामुळे त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणे आवश्यक असते. अप्परवर्धा धरणग्रस्तांसाठी असाच लढा प्रा. साहेबराव विधळे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने दीर्घकाळ दिला. त्यांनी त्यांना न्याय मिळवून दिला. ही बाब प्रकल्पग्रस्तांच्या न्यायलढ्याच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाची आहे. यावेळी बोलताना नागेश चौधरी म्हणाले, आज संधीप्राप्त लोक समाजविन्मुख आयुष्य जगण्यावर भर देत आहेत. मात्र प्रा. साहेबराव विधळे यांनी कायम समाजसन्मुख भूमिका अंगीकारून कार्य केले. धरणग्रस्तांचा लढा असो की बहुजन संघर्ष समितीचे प्रबोधनाचे कार्य असो, सर्वांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका घेऊन गुणात्मक कार्य केले. आचार्य वेरुळकर गुरुजी म्हणाले, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांमध्ये पीडित व्यक्तीच्या संघर्षात उभे राहण्याची प्रेरणा आहे. प्रा. साहेबराव विधळे यांनी विविध चळवळींमध्ये केलेले कार्य असेच असल्याने ते अतिशय मोलाचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई अरविंद वानखडे म्हणाले, प्रा. साहेबराव विधळे यांचे जीवनकार्य हे कष्टकरी, बहुजन समाजाच्या न्यायहक्कांसाठी राहिले आहे. धरणग्रस्तांच्या सोबतीने त्यांनी शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न मांडले. मंडल आयोगाच्या प्रबोधन कार्यात हिरीरीने पुढाकार घेतला. तसेच बहुजन संघर्ष समितीतही कार्य केले. फुले-शाहू-आंबेडकरांच ्या विचारांचा वारसा घेऊन त्यांनी मागील पन्नास वर्षे केलेले सामाजिक कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा हा सत्कार एक प्रकारे नव्या सामाजिक चळवळींसाठी ऊर्जा देणारा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेंद्र मेटे यांनी केले. सूत्रसंचालन पूजा गावंडे आणि पल्लवी वानखडे यांनी केले. आभार डॉ. संतोष यावले यांनी मानले. प्रारंभी अहाना पाटील आणि अधिराज या दोन चिमुकल्यांनी गीत गायन केले. इतर चळवळीतील पुढाऱ्यांचाही सत्कार यावेळी सुरेशराव बोरकर, दिवाकर शंभरकर, बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेचे माणिकरावजी गंगावणे, बबलू दुर्गे, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सतीश चौधरी, ओमप्रकाश कुटेमाटे या सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ. भारत पाटणकर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रा. साहेबराव विधळे आणि डॉ. प्रतिभा विधळे यांना मानपत्र व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 9:39 am

वाहनाच्या धडकेत बिबट्याचा तडफडून मृत्यू:बचाव पथक उशिरा पोहोचले, तिवसा जवळ महामार्गावरील घटना‎

रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाची बिबटाच्या बछड्याला जोरदार धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेला हा बछडा घटनास्थळीच दोन ते तीन तास तडफडत राहिला. अखेर वन विभागाच्या शेड्यूल १ बचाव पथकाने घटनास्थळी पोहचून जखमी बिबटावर पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने प्राथमिक उपचार केले. या बिबट्याला तातडीने नागपूर येथे पाठवण्यात आले. परंतु, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. बचाव पथक वेळेवर पोहोचले असते तर बिबट्याच्या बछड्याचे प्राण वाचू शकले असते, अशा प्रतिक्रिया प्राणी मित्रांसह नागरिकांनी व्यक्त केल्या. गुरुवार ९ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास बिबट्याचा बछडा जखमेमुळे विव्हळत असलेला काहींना दिसला. महामार्गावर तिवसा शहरापासून १ कि.मी. अंतरावर एक ते सव्वा वर्षे वयाचा बिबट्याचा बछडा रस्ता ओलांडत असतांना एका अज्ञात वाहनाची त्याला जोरदार धडक बसली. यातच तो गंभीर जखमी स्थितीत रस्त्याच्या बाजूला तो पालापाचोळ्यात उर्वरित, पान ४ जबडा, कंबरेसह पायाला मार कदाचित सकाळी ६ ते ७ वाजता ही घटना घडली असावी,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बिबट्याचा व पालापाचोळ्याचा रंग सारखा असल्याने अनेकांच्या नजरेत प्रथमदर्शनी तो पडला नाही. अखेर कुणाची तरी नजर जखमी बिबटा वर पडली. ही घटना उघडकीस आली. यात बिबट्याच्या जबड्याला व कंबरेसह पायाला जबर मार लागल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. त्यामुळे होणाऱ्या वेदनेने बिबट्याच्या हृदयाचे ठोके वाढल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 9:39 am

सिलिंडर मिळण्याआधी डिलिव्हरीचा संदेश:गॅस एजन्सींचा अजब कारभार, साठा दुप्पट तरीही तुटवडा का? विभागाची आकडेवारी कागदावरच‎

अमेरिका आणि इस्रायलने इराणशी पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून सुरू झालेला घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा अजूनही अमरावतीकरांची पाठ सोडायला तयार नाही. ग्राहकांना आजही रांगेत उभे राहूनच सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागत आहे. कमी-अधिक प्रमाणात भारत, इन्डेन आणि एचपी या तिन्ही प्रकारच्या गॅस वितरकांच्या कार्यालयांसमोरचे हे चित्र आहे. संबंधित प्रतिनिधीने आज, गुरुवारी, सकाळच्या सत्रात काही वितरकांच्या कार्यालयांसमोर पाहणी केली. यावेळी काही ग्राहकांनी सिलिंडर मिळण्याआधीच त्यांना डिलीव्हरीचा संदेश आल्याची धक्कादायक माहिती दिली. यावर संबंधित गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याचे म्हणणे होते की बुकिंग झाल्यानंतर साधारणत: १२ दिवसांत सिलिंडर मिळेल. मात्र काही ग्राहक त्यापेक्षा जास्त काळ लोटल्यानंतरही सिलिंडर मिळालेच नाहीत, अशी तक्रार नोंदवत होते. उर्वरित, पान ४ मला केवायसीसाठी मागितले पैसे ^मी साईनगर भागातील गॅस एजन्सीचा ग्राहक आहे. मला सिलिंडर रिफील करून घ्यायचे आहे. मात्र मी केवायसी केली नाही, असे संबंधित एजन्सीचे म्हणणे आहे. त्यासाठी ३०० रुपयांची मागणी करण्यात आली. माझ्यासमोर एक महिला होती. तिचीही तशीच तक्रार होती. महिलेकडे तेवढीच रक्कम होती. परंतु घरी ये-जा करण्यासाठी पैसे शिल्लक राहायला हवे, म्हणून तिच्याकडून २०० रुपये घेण्यात आले. पैसे नसल्यामुळे मला मात्र परत फिरावे लागले. - संदीप मोरस्कर, म्हाडा कॉलनी, अमरावती. रांगांनी प्रशासनाच्या माहितीला पूर्णपणे खोडून काढले जिल्ह्यात आयओसीचे सर्वाधिक २५, बीपीसीएलचे १७ आणि एचपीसीएलचे १४ गोदाम आहेत. अशाप्रकारे एकूण ५६ गोदामे मिळून दररोज २४ हजार ५७४ सिलिंडर साठवले जातात. एकूण साठवण क्षमता ही रोजच्या वापराच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे रोजच्या आवश्यकतेएवढे सिलिंडर ग्राहकांना निश्चितच पुरविले जात आहेत. परंतु गॅस वितरकांच्या कार्यालयांसमोर कायम असलेल्या रांगांनी प्रशासनाच्या या माहितीला निकषांच्या आधारे खोडून काढले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 9:38 am

अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट:160 जीबी डिजिटल पुरावे, A, B, C कोडवर्ड मधून काळे कारनामे उघड; प्रकरणात मोठी घडामोड

नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता धक्कादायक तपशील समोर येत आहेत. तपास यंत्रणांनी 160 जीबी इतका डिजिटल डेटा जप्त केला असून, या पुराव्यांमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. फॉरेन्सिक तपास पूर्ण करून हा अहवाल विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सादर करण्यात आला आहे. या नव्या पुराव्यांमुळे खरात यांच्या भोवतीचा कायदेशीर फास अधिक घट्ट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. तपासादरम्यान विविध डिजिटल उपकरणांमधून मोठ्या प्रमाणात माहिती मिळाली आहे. तीन पेन ड्राइव्हमध्ये 32 जीबी क्षमतेचा डेटा, त्यात 19 स्वतंत्र फोल्डर, तसेच 64 जीबी क्षमतेचा ओटीजी पेन ड्राइव्ह आणि एक लॅपटॉप यांची तपासणी करण्यात आली आहे. या सर्व उपकरणांमधील माहिती सायबर आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून बारकाईने तपासली जात आहे. या सर्व मिळून 160 जीबीपेक्षा अधिक डेटा तपास पथकाच्या हाती लागला आहे. या डिजिटल पुराव्यांमध्ये नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत घडलेल्या घटनांचा तपशील समोर आला आहे. विशेषतः कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयातून जप्त केलेल्या माहितीमुळे अनेक बाबी उघड होत आहेत. तपास यंत्रणांनी प्रत्येक पुराव्याला वेगळे कोडवर्ड दिले असून ‘A’, ‘B’ आणि ‘C’ अशा स्वरूपात त्यांचे वर्गीकरण केले आहे. त्यापैकी ‘A’ या कोडमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे संकेत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात साक्षीदारांचे जबाबही नोंदवले गेले असून, न्यायालयात सादर करण्यासाठी पुरावे व्यवस्थित संकलित केले जात आहेत. डिजिटल पुराव्यांमधील माहिती आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे तपास अधिक बळकट होत आहे. या सर्व घडामोडींमुळे प्रकरणाचा विस्तार वाढत असून, आणखी नवे पैलू समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील तिसऱ्या गुन्ह्यात अशोक खरात यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयीन सुनावणीदरम्यान काही गंभीर आरोप मांडण्यात आले. एका प्रकरणात पीडितेला विशिष्ट आश्वासन देत तिला फसवण्यात आल्याचा आरोप वकिलांनी केला. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने तपासासाठी अधिक वेळ देत पोलिस कोठडी मंजूर केली. अशोक खरात प्रकरण निर्णायक टप्प्यात एकूणच, डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे अशोक खरात प्रकरण निर्णायक टप्प्यात पोहोचले आहे. तपास यंत्रणा आता या सर्व पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करत असून, येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 9:10 am

बार्शीटाकळी येथे नागरी वस्तीमधून 800 लिटर अवैध डिझेल साठा जप्त:राज्य अन्न आयोग सदस्या व पुरवठा विभागाचा छापा‎

शहरातील इंदिरा आवास भागात गुरुवारी प्रशासनाने एक मोठी कारवाई करत नागरी वस्तीत साठवलेले सुमारे ८०० लिटर अवैध डिझेल जप्त केले आहे. राज्य अन्न आयोगाच्या सदस्य आणि तालुका पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे हा छापा टाकला. दाट लोकवस्ती असलेल्या भागात अशा अत्यंत ज्वलनशील पदार्थाचा साठा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गु्प्त माहितीवरून प्रशासनाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल रोजी बार्शीटाकळी येथील इंदिरा आवास भागात अवैध इंधन साठा असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे महाराष्ट्र राज्य अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या राज्य अन्न आयोग सदस्या माया प्रदीप ईरतकर यांच्या अध्यक्षतेखाली पुरवठा विभागाच्या पथकाने तातडीने छापा टाकला. या पथकात बार्शिटाकळीचे निरीक्षण अधिकारी आनंद गुप्ता (पथक प्रमुख), पुरवठा निरीक्षक नासीरखान, कनिष्ठ लिपिक भूषण भोडणे, तसेच महादेव लुले आणि राजू शिरसाट यांचा समावेश होता. पथकाने इंदिरा आवास येथील सय्यद फैजान सय्यद निसार यांच्या मालकीच्या टिनपत्र्याच्या गोदामावर छापा टाकला. झडती घेतली असता, तेथे २०० लिटर क्षमतेच्या ४ प्लास्टिक टाक्यांमध्ये अंदाजे ८०० लिटर डिझेल सदृश द्रव पदार्थ आढळून आला. यासोबतच १० लिटरची एक प्लास्टिक कॅन ज्यात पेट्रोल सदृश पदार्थ होता, तोही जप्त करण्यात आला. तसेच, इंधनाची अवैध विक्री आणि साठवणुकीसाठी वापरण्यात येणारे २०० लिटरचे ४रिकामे प्लास्टिक ड्रम, ५६ रिकाम्या प्लास्टिक कॅन्स, दीड हॉर्स पॉवरची एक मोटर पंप आणि पाईपचे बंडल असा मुद्देमाल प्रशासनाने हस्तगत केला आहे. या घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळीचे ठाणेदार प्रवीण धुमाळ पोलीस ताफ्यासह घटनास्थळी हजर झाले. राज्य अन्न आयोग सदस्य माया ईरतकर यांनी संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी सय्यद फैजान याच्याविरुद्ध ठाणेदार प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दाट नागरी वस्ती असलेल्या इंदिरा आवास भागात अत्यंत ज्वलनशील असलेल्या डिझेलचा एवढा मोठा साठा करून त्याची बेकायदेशीर विक्री करणे अत्यंत घातक आहे. एखादी छोटीशी ठिणगीसुद्धा येथे मोठी आग लावून भीषण जीवित व वित्तहानी घडवू शकली असती. या गोरखधंद्यामुळे स्थानिक रहिवाशांचा जीव धोक्यात आला होता. टंचाई काळात अवैध साठा सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला असून, पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवत आहे. अशा गंभीर परिस्थितीत तालुक्यात ८०० लिटरचा अवैध साठा मिळून येणे ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. प्रशासनाने तालुक्यात सुरू असलेल्या अशा अवैध पेट्रोल-डिझेल विक्री करणाऱ्यांवर वचक निर्माण करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 9:08 am

पूर्णा नदीवर अडीच कोटीतून उभारणार घाट:आ. सावरकरांच्या हस्ते भूमिपूजन

म्हैसांग येथे पूर्णा नदीवर आमदार रणधीर सावरकर यांच्या अडीच कोटी रुपयांच्या विशेष विकास निधीतून घाट उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन आ. रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आले. विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी अकोला व अमरावती जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने पूर्णा नदीवर येतात. पूर्णा नदीवर दशक्रिया, अस्थी विसर्जन आदी विधी सुद्धा पार पडतात. भाविकांच्या मागणीची दखल घेत आ. रणधीर सावरकर यांनी नदीवर घाट उभारण्याचा निर्णय घेतला. यामुळे भाविकांची सुविधा होणार आहे. घाट उभारुन हिंदू संस्कृती व परंपरा कायम राखण्यास मदत होणार आहे. धार्मिक परंपरा अविरतपणे सुरू राहावी, यासाठी आ. सावरकर यांनी दिशादर्शक कार्य केले आहे, असे प्रतिपादन सुरेश देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला चंद्रशेखर गावंडे, मिलिंद देशमुख, मनोज देशमुख, रुपेश गावंडे, रामकृष्ण साटोटे, विजय देशमुख, अरुण देशमुख, राजेश बेले, अनिल गावंडे, प्रवीण हगवणे, चंदा लव्हाळे आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 9:07 am

जिल्हा सह. बँक अध्यक्षपदी डॉ. कोरपे, उपाध्यक्षपदी ठाकरे

अकोला- वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जयराज संतोषकुमार कोरपे तर उपाध्यक्षपदासाठी रामेश्वर सुभाषराव ठाकरे यांचे एक- एकच अर्ज आले. त्यामुळे अध्यासी अधिकारी गितेशचंद्र साबळे यांनी अध्यक्षपदी डॉ. जयराज कोरपे तर उपाध्यक्षपदी रामेश्वर ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. संतोषकुमार कोरपे यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलने जिल्हा बँकेची सत्ता राखत पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे. २१ पैकी ११ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. निवडणूक झालेल्या १० जागांवरही सहकार पॅनलनेच बाजी मारली आहे. गुरुवारी झालेल्या सभेत बँकेचे संचालक डॉ. संतोषकुमार कोरपे, गोपाल काकड, अजिंक्य राऊत, कल्पना पाचपोर, अरविंद इंगोले, रामेश्वर वाघ, अनिलकुमार जाधव, जावेद खान, हिदायत उल्लाह खान पटेल, डॉ. धीरज देशमुख, उषा हिंगणकर, संदीप खारोडे, अभिषेक तिडके, धनंजय गोरे, शोभा झनक, नितीन जाधव, विश्वनाथ ताथोड, ललीत बहाळे, गीता ठाकरे, अपर्णा धोत्रे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य उपस्थित होते. निवडणुकीत डॉ. संतोषकुमार कोरपे यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलने २१ पैकी १० जागांवर उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ११ जागांवरही सहकार पॅनलने वर्चस्व राखले. बँकेवर कोरपे कुटुंबाचे वर्चस्व अकोला वाशीम जिल्हा सहकारी बँकेवर सहकार पॅनलचे १९६५ पासून वर्चस्व आहे. बँकेचे यश व सहकार पॅनलच्या वर्चस्वाचे शिल्पकार हे सहकारमहर्षी डॉ. वामनराव कोरपे मानले जातात. ते १९६५ मध्ये पहिल्यांदा बँकेचे अध्यक्ष झाले व त्यांच्या कार्यकाळात बँकेने प्रगती केली. तो बँकेचा सुवर्णकाळ मानला जातो. अण्णासाहेब कोरपे यांच्यानंतर त्यांचे पुत्र डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी बँकेचे नेतृत्व सांभाळत वर्चस्व टिकवून ठेवले.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 9:06 am

मल्लिकार्जुन अन् पाचपीर देवाच्या यात्रेला सुरुवात:बोरेगांव यात्रेमुळे हिंदू- मुस्लिम समाजात एकोपा‎

अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन व पाचपीर देवाच्या यात्रेस गुरुवारपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. गुरुवारी श्री मल्लिकार्जुन देवास रुद्राभिषेक घालण्यात आले. त्यानंतर मूर्तीला १०८ बिल्व अर्पण करण्यात आले आहे. पाचपीर देवास गलिपधारण करण्यात आले आहे. त्यानंतर मज्जलसी हा मुख्य धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता पाचपीर देवास दंडवत घालण्यात येणार आहे. त्यानंतर नैवेद्य अर्पण करण्यात येईल सकाळी ८ वाजता श्री मल्लिकार्जुन देवाची पालखी व काठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता हालचिंचोळी येथील श्री माऊली हरिभजन मंडळ व सोलापूर येथील शिवशक्ती भजन मंडळाचे गायक महांतेश घंटे, राजश्री तानवडे, रेणुका हत्ते यांचा भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, रात्री नऊ वाजता स्वरसाधना ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि.११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जय हनुमान भजन मंडळ ( आलूर) व गेनसिद्ध पारिजात भजन मंडळ (कुंभारी) यांचा भजन कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजता जंगी कुस्त्यांचे फड रंगणार आहे. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येईल, रात्री ९ वाजता हुट्टीत मगा विषवाद साकु मगा अमृतवाद हे कौटुंबिक कन्नड नाटक सादर करण्यात येणार आहे. तरी बोरेगाव परिसरातील भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा समिती व ग्रामस्थांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:49 am

मोहोळ येथे सद्गुरु नागनाथ देवाच्या यात्रेला गुरुवारपासून होणार प्रारंभ:रविवार दि.26एप्रिल रोजी सकाळी श्रींचे तेल उतरवण्याच्या कार्यक्रमाने होणार सांगता‎

मोहोळ ग्रामस्थांचे ग्रामदैवत सद्गुरु नागनाथ देवाच्या यात्रेस गुरुवार दि.१६ एप्रिल रोजी सकाळी श्री गवई स्वामी अभिषेक व रात्री श्री गवई स्वामींची पालखीतून सवाद्य मिरवणूक व श्रींची भेट व प्रसाद सुरुवात होणार आहे.तर रविवार दि.२६ एप्रिल रोजी सकाळी श्रींचे तेल उतरवण्याचा कार्यक्रम व प्रसादाने सांगता होणार आहे. मोहोळ ग्रामस्थांचे ग्रामदैवत सद्गुरु नागनाथ देवाच्या यात्रेस दि. १६ रोजी सकाळी श्री गवई स्वामी अभिषेक व रात्री श्री गवई स्वामींची पालखीतून सवाद्य मिरवणूक व श्रींची भेट व प्रसाद सुरुवात होणार आहे. दि. १७ रोजी सकाळी श्रींस तेल लावण्याचा कार्यक्रम व प्रसाद रात्री वसंत पूजा, गाभाऱ्यातील आरती,चंदन उटी व प्रसाद होणार आहे. शनिवार दि. १८ रोजी रात्री वसंत पुजा,गाभान्यातील आरती, चंदन उटी, प्रसाद व नंतर विनायकबुवा मोहोळकर यांचे प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि.१९ रोजी चंदन उटी, प्रसादानंतर रघुनाथबुवा रचित, सोमनाथबुवा कुर्डे (महाराज) यांचे चक्रीभजन, रात्री १ वा. श्रीक्षेत्र वडवाळहून श्रींच्या छत्रीचे आगमन, पहाटे ४ वा.श्रींची पालखीसह स्वर्गाची सवाद्य मिरवणुक, भाकणूक व प्रसाद होणार आहे. सोमवार दि. २० रोजी रात्री वसंत पुजा बाहेरील आरती चंदन उटी व प्रसाद तर मंगळवार दि.२१ रोजी रात्री वसंत पुजा बाहेरील आरती चंदन उटी व प्रसाद श्री क्षेत्र नागनाथ महाराज यात्रेनिमित्त शुक्रवार दि. १७ रोजी रात्री ८ वाजता हभप कृष्णा महाराज जोगदंड कामरखेडा (लातूर) यांचे भारूड कार्यक्रम होणार आहे. सोमवार दि. २० रोजी रात्री ८ वाजता हभप माऊली महाराज कदम यांचे किर्तन होणार आहे. मंगळवार दि. २१ रोजी भरत शिंदे (बाळासाहेब महाराज) कांबळेश्वर यांचे किर्तन तर शुक्रवार दि.२४ रोजी सकाळी १० ते ४ पर्यंत शाहीर राजू बाघमारे व बन्सी कांबळे यांचा कलगी तुरा कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. २६ रोजी संत नामदेव भजनी मंडळ मोहोळ यांचा हरिजागर होणार आहे. प्रसाद होणार आहे. बुधवार दि.२२ रोजी सकाळी श्री भिकलिंग महाराजांना अभिषेक व रात्री श्रींची सवाद्य मिरवणूक युज्य भक्त श्री भिकलिंग महाराजांची भेट व नयनरम्य शोभेचे दारूकाम होणार आहे.गुरुवार दि.२३ रोजी सकाळी श्रींची महापूजा दुपारी ४ वा. श्रींच्या पालखीची गणांसह सवाद्य मिरवणूक, भाकणूक व प्रसाद होणार आहे. शुक्रवार दि. २४ रोजी कलगी-तुरे, भेदीक गाणी यांचा सामना दु. ४ वा. कुस्त्यांचा फड,महाप्रसाद व सायं. ६ वा. श्रींच्या छत्रीचे वडवळाकडे प्रस्थान होणार आहे.रविवार दि.२६ रोजी सकाळी श्रींचे तेल उतरवण्याचा कार्यक्रम व प्रसाद कार्यक्रमाने सांगता होणार आहे. श्री गवई स्वामींची पालखीतून सवाद्य मिरवणूक व श्रींची भेट व प्रसाद सुरुवात होणार आहे.यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी संपूर्ण यात्रेवर सीसीटीव्ही, पोलिस बंदोबस्तासह स्वयंसेवक बंदोबस्त, भाविकांना स्पीकरद्वारे सूचना संदेश, मोटरसायकल पार्किंग, फोर व्हीलर पार्किंग, यात्रेकरूंसाठी बैठक व्यवस्था, व्यापारी दुकानासाठी जागा व्यवस्था, जागोजागी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेबरोबरच अति आवश्यक सुविधांचे आयोजन करण्याचा बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. भक्तांसाठी आवश्यक सोयी- सुविधा

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:49 am

धार्मिक:रामनाम मानवी जीवाला विसावा देणारे ठिकाण, वटवृक्ष मंदिरात पुण्यतिथीच्या धर्मसंकीर्तन महोत्सवात गाडगीळ यांचे निरुपण‎

अक्कलकोट मानवी जिवाला विसावा देणारं ठिकाण म्हणजे रामनाम असल्याचे निरुपण कल्याण येथील हभप गणेश बुवा गाडगीळ यांनी केले. ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान आयोजित श्री.स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन महोत्सवातील कीर्तन सेवेच्या पूर्व रंगात पाचवे पुष्प समर्थ रामदास स्वामींच्या अभंगावर गुंफत निरुपण करताना बोलत होते. कीर्तन सेवेच्या प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी कीर्तनकार हभप गणेश बुवा गाडगीळ व सहकलाकारांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. या कीर्तन सेवेत पुढे निरुपण करताना हभप गणेश बुवा गाडगीळ यांनी मनुष्याने आदर्श जीवन सर्वार्थाने कसे जगावे हे शिकवणारे चरित्र म्हणजे राम. विष प्राशन केल्यावर शंकराचा दाह सुद्धा राम नामाने शांत झाला म्हणून आधी तो गावा सगुण उपासना मग त्याचे ध्यान म्हणजेच सगुणाकडून निर्गुणाकडे मार्गक्रमण आणि समर्थ म्हणतात. त्याप्रमाणे राम सर्व काम पुरवतो, तो राम असे निरूपण करुन प्रत्येकाने रामनाम घेण्यास आपल्या जीवनात आवर्जून स्थान द्यावे असे निरुपण केले. या कीर्तन सेवेत त्यांना तबल्यावर कोल्हापूरचे तबलावादक डॉ. सचिन कचोटे, संवादिनीवर अक्कलकोटचे प्रा.मयूर स्वामी यांनी उत्तम साथसंगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ओंकार पाठक यांनी केले. यावेळी मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वला सरदेशमुख, संपतराव शिंदे, स्वामीनाथ लोणारी, संजय पाठक यांच्यासह सेवेकऱ्यांनी उपस्थित राहून या कीर्तन सेवेचा लाभ घेतला. श्री गणेशाच्या आरतीने सेवेची सांगता पुढे कीर्तन सेवेच्या उत्तर रंगात कैवल्य पद सुद्धा प्राप्त करून देईल असे ज्यांनी आयुष्यात आधी केले मग सांगितले असे गोंदवले येथील गोंदवलेकर महाराज. ‘ज्याचा लवकिक काही नसे ज्याचे घरी पण कुबेर लोळे दारी तो वाटे तेची करी ऐसां नाही पहिला' या श्लोकाचा परिचय देत ज्या राम नामात शक्ती आहे, त्या रामाला शरण जा. तो सर्व इच्छा पूर्ण करतो त्याच्यासाठी राममंदिर स्थापन केले हा कथा भाग घेतला. आजही राम नाम जिथे आपल्या मनाच्या पटलावर गोंदवले जाते ते गोंदवलेकर महाराज सगळ्यांना नाम घेण्याचा आग्रह करतात. तसेच स्वामीचे प्रचलीत वाक्य ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' याचीही विश्लेषण हभप गाडगीळ बुवा यांनी करीत श्री गणेशाच्या आरतीने व श्री स्वामी समर्थ यांच्या नामस्मरणाने या नारदीय कीर्तन सेवेची सांगता करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:48 am

आदिनाथ कारखान्याचा ई-लिलाव; एनसीडीसीकडून 22 मे रोजी प्रक्रिया:कारखान्याकडे एनसीडीसीचे 85 कोटी 12 लाख 75 हजार 464 रुपये कर्ज थकीत

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत मोठी घडामोड समोर आली असून, राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून ‘सरफेसी’ कायद्याअंतर्गत ई-लिलावाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. कारखान्याचे थकीत कर्ज वसूल करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असून दि. २२ मे २०२५ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत ई-लिलाव प्रक्रिया होणार असल्याचे नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रसिद्ध झालेल्या नोटिसनुसार श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडे एनसीडीसीचे तब्बल ८५ कोटी १२ लाख ७५ हजार ४६४ रुपये इतके कर्ज थकीत आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी कारखान्याची मालमत्ता जप्त करून लिलावासाठी काढण्यात आली आहे. या लिलावामध्ये कारखान्याच्या ९५ हेक्टर ७४ आर क्षेत्रातील जमीन, त्यावरील सध्याच्या इमारती तसेच पुढे उभारण्यात येणाऱ्या स्थावर मालमत्तेचाही समावेश करण्यात आला. याशिवाय साखर कारखाना, डिस्टिलरी, को-जनरेशन वीज प्रकल्प, साखर मिल आणि संबंधित यंत्रसामग्री देखील लिलाव प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आली. सध्या आदिनाथ कारखाना करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या ताब्यात असल्याने या नोटीसीमुळे राजकीय व सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. कारखान्याचे भवितव्य काय होणार, याकडे आता शेतकरी, सभासद आणि कामगारांचे लक्ष लागले असून, अनेक शेतकरी व सभासदांनी कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ^आदिनाथ कारखान्याबाबत आलेली ई-लिलाव नोटीस ही बँकेची नियमित प्रक्रिया असून प्रत्यक्ष लिलाव होणार नाही. यापूर्वीही अशाच प्रकारची नोटीस आली होती. यावेळीही चेअरमन, संचालक मंडळ व प्रशासनाच्या संमतीने संबंधित नोटीसला योग्य उत्तर दिले जाणार असून सदर लिलाव प्रक्रिया स्थगित केली जाईल. सर्जेराव राऊत, प्रभारी कार्यकारी संचालक, (आदिनाथ सह. कारखाना.) ^स्व. कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांनी आदिनाथ कारखाना सुरू होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा संकल्प केला होता. मात्र त्यांच्याच पुत्रांच्या अध्यक्षतेत कारखान्यावर दोनदा लिलावाची नोटीस येणे दुर्दैवी आहे. निवडणुकीत सोन्याचा धूर काढण्याची घोषणा झाली, पण प्रत्यक्षात साधा बगॅसचाही धूर निघाला नाही. नारायण पाटील हे निष्क्रिय चेअरमन ठरले आहेत. सुभाष गुळवे, उपाध्यक्ष, बारामती ॲग्रो कारखाना.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:47 am

प्रशासन सतर्क:चुर्मापुरीतील पुतळे कारखाना अतिक्रमण काढणार, विना परवानगी पुतळा बसवल्यास थेट जेलची हवा

मोडनिंब येथील दोन्ही महापुरुषांचे पुतळे ग्रामस्थांनी स्वखुशीने गुरुवारी सायंकाळी सुरक्षित स्थळी हलवले. दरम्यान पुतळे उभा करणारा कोठडीतील मास्टरमाइंड बाळराजे आवारे पाटील याचा चुर्मापुरी (ता.अबंड, जि.जालना) येथील पुतळा तयार करण्याच्या कारखान्याचे अतिक्रमण करुन थाटलेले पत्राशेड हटवण्याचे आदेश तेथील प्रांताधिकारी उमाकांत पारधी यांनी दिले आहेत. महापुरुषांचे पुतळे विना परवानगी रातोरात उभे करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात असल्याने माढा पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. गुरुवारी माढा पोलिस ठाण्यात बैठक घेऊन विना परवानगी पुतळा बसवल्यास थेट जेलची हवा खावी लागेल, असा सज्जड दमच माढा पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी व सपोनि रोहित शिंदे यांनी दिला. या बैठकीसाठी पृथ्वीराज सावंत, दादासाहेब साठे, पीएसआय महम्मद शेख, दिनेश जगदाळे, रवी सरवदे, सुधीर लंकेश्वर, अमर लंकेश्वर, शहाजी ढावरे, शंभूराजे साठे, किरण पवार, नगरसेवक अरुण कदम, बाबा मस्के अरविंद खरात आदी उपस्थित होते. सपोनि रोहित शिंदे यांनी सामाजिक सलोखा बिघडेल किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असे वर्तन कोणीही करू नये अशा सक्त सूचना दिल्या. सोशल मीडियाचा वापर करताना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. चुर्मापुरीच्या कारखान्यात विविध महापुरुषांचे पुतळे अस्ताव्यस्त पडलेले असून ते निकृष्ट दर्जाचे असल्याची शक्यता आहे. आगामी काळात विविध महापुरुषांच्या जयंती, उत्सव साजरे होणार असून या कालावधीत हे अनधिकृत पुतळे विना परवानगी कोणत्याही ठिकाणी बसवले जाण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी भोकरदन, बुलढाणा व सोलापुरात अनधिकृत पुतळे स्थापनेमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता महापुरुषांचे पुतळे उभारताना शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ते उभे करावेत. महापुरुषांना जातीच्या बंधनात आपण कोणीही अडकवू नये. या पुतळ्यामुळे सामाजिक समता धोक्यात येईल असे वर्तन कोणीही करू नये. आवारे पाटलाविरुद्ध महाराष्ट्रभरात गंभीर स्वरूपाचे ८ गुन्हे दाखल असून १७ फेब्रुवारी रोजी माजलगाव (जि. बीड) येथे झालेल्या शिवस्मारक यात्रेच्या समारोप कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण करून महापुरुषांचे पुतळे बसवण्यासाठी कोणत्याही प्रशासनाची परवानगी घेणार नसल्याचे जाहीर केले होते. तसेच जर पोलिसांनी याला विरोध केला तर पोलिसांची वर्दी बाजूला ठेवून फटके दिले जातील' अशी धमकी देऊन पोलिस प्रशासनाला थेट आव्हान दिले होते. दरम्यान, आवारे पाटलाच्या अनधिकृत व बेकायदेशीर कृती आणि चिथावणीखोर वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांततेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:47 am

खा. प्रणितींचा पालकमंत्र्यावर प्रहार, शेतकऱ्यांना धीर‎:अवकाळीने झालेल्या नुकसानीची खासदार प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी, पालकमंत्री गोरे यांच्यावर सडेतोड टीका‎

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी पंढरपूर तालुक्यातील तनाळी या गावांला भेट देत प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. तसेच शासनाने तातडीच्या उपाययोजना करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंढरपूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या अचानक बदललेल्या हवामानामुळे काढणीस आलेली पिके व फळबागा मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याचे दिसत आहे. तालुक्यातील द्राक्ष, केळी, कांदा, पेरू यांसह विविध फळबागा, भाजीपाला आणि काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके पूर्णतः नुकसानग्रस्त झाली आहेत. या पाहणी दौऱ्यावेळी पंढरपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप पाटील, तालुका उपाध्यक्ष सादिक मुलाणी, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, सरपंच सुधाकर मोटे, म्हाळप्पा मासाळ, ज्ञानेश्वर होनमाने, लक्ष्मण श्रीराम, भीमराव पाटील, सुभाष लवटे, विलास रोंगे, पांडुरंग रोंगे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच मार्च व एप्रिल २०२६ महिन्यांत सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. केळी, पपई, डाळिंब, पेरू, आंबा, द्राक्षे, मका व बाजरी या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषांनुसार तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रतिनिधी | मंगळवेढा मी महाविकास आघाडीचे खासदार असल्या कारणाने भाजप सरकार सार्वजनिक कामाची आडवणूक करीत आहे. आम्ही निवडून आलो की लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कोणत्या पक्षाचे राहत नाही. मात्र पालकमंत्री निधीच्या माध्यमातून कामांची अडवणूक करीत असून आमची अडवणूक ही जनतेची आहे, हे यांच्या लक्षात येत नाही, असे मत खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले ते घरनिकी येथे गाव भेट दौऱ्यात बोलत होत्या. यावेळी मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे, ॲड. दत्तात्रय खडतरे, राजू मेतकुटे, अविनाश मोरे, सरपंच सुनीता रणदिवे, उपसरपंच बालाजी गरड, बापू भुसे, सदस्य राजाराम मोरे उपस्थित होते. यावेळी घरनिकी ते खंडोबा नगर खोल वाट रस्ता खराब झाला आहे तो नवीन करावा पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून तो रस्ता बसवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुस्लिम मुस्लिम समाजासाठी सभा मंडपाची ही मागणी यावेळी करण्यात आली. खासदार प्रणिती शिंदे यांनी या सर्वावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच लाईटी संदर्भात निवेदन स्वीकारली नवीन अंगणवाडीचा प्रस्तावित स्वीकारला. तसेच ज्या लोकांना घरकुल मंजूर झालेले आहेत. परंतु त्यांना जागा नाही, अशासाठी गावठाण विस्तार योजना जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून देण्याचे ठरले. यावेळी राजन ठेंगील, ज्ञानेश्वर सोरडीकर, निसार पटेल, बापूनिसार पटेल, बापू अवघडे, सुनीता अवघडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे यांनी केले. ७० रुपयांची द्राक्षे ९ रुपये किलोने विकावी लागली यावेळी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले की, अवकाळी पाऊस येण्यापूर्वी ७० ते ८० रुपये किलो दराने द्राक्षे विकली जात होती.मात्र पाऊस आल्यानंतर बागा पडल्या आहेत. शिवाय पाऊस पडल्याने द्राक्ष घडा मध्ये पाणी साठले आणि, मणी गळती झाली आहे, मणी सडून जात आहेत. त्यामुळे ही द्राक्षे आता वायनरी साठी ८ ते ९ रुपये किलोने मागितली जात आहेत. या दराने घेण्यासाठी वायनरी चालक तयार नाहीत. काढणीचा खर्चही निघत नाही, बळेच द्यावी लागत आहे, अशी खंत शेतकरी ज्ञानेश्वर होणमाने यांनी व्यक्त केली.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:46 am

इतिहासाशी छेडछाड खपवून घेणार नाही, मराठा साम्राज्याचा नकाशा समाविष्ट करा:मराठा महासंघाचा प्रशासनाला इशारा; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन‎

शालेय अभ्यासक्रमातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांना निवेदन देण्यात आले. इतिहासाशी केलेली छेडछाड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा यावेळी महासंघाने दिला. शालेय पुस्तकांत मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत आणि स्पष्ट स्वरूपात द्यावा. डिजिटल माध्यमांद्वारे (QR कोड) नकाशाची सविस्तर माहिती उपलब्ध करून द्यावी. अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. स्वराज्याचा विस्तार विद्यार्थ्यांना नकाशाद्वारे समजणे आवश्यक असताना तो वगळणे ही अस्मितेशी तडजोड आहे, अशी भावना महासंघाने व्यक्त केली. शासनाने यावर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी दिला. या प्रसंगी शिवाजीराव मोरे, हनुमंत कदम, सचिन गंगथडे, वैभव चव्हाण यांच्यासह महासंघाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:44 am

‘प्री-वेडिंग’ टाळा आणि लग्नाच्या जेवणात 50 पदार्थ नकोत:श्री मैड क्षत्रिय सोनार समाजाचे क्रांतिकारी ठराव, दु:खद प्रसंगही साधे असावेत‎

बदलत्या काळातील उधळपट्टीला लगाम लावण्यासाठी श्री मैड क्षत्रिय सोनार समाज महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नगर येथे संपन्न झालेल्या प्रदेश पदाधिकारी बैठकीत, लग्नसमारंभातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी ‘प्री-वेडिंग फोटोशूट’वर बंदी आणि जेवणातील पदार्थांच्या संख्येवर मर्यादा घालण्याचे ऐतिहासिक ठराव मंजूर करण्यात आले आहेत. पुणे येथे सात वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित कार्यकारिणीची ही पहिलीच महत्त्वाची बैठक नगरमध्ये पार पडली. यावेळी उर्वरित पान ४ अनावश्यक खर्च टाळावा या बैठकीत लग्नाशी संबंधित दोन मुख्य विषयांवर चर्चा झाली. सध्याच्या काळात वाढत असलेले ‘प्री-वेडिंग फोटोशूट’ टाळावे, असे आवाहन समाजातर्फे करण्यात आले आहे. तसेच, लग्नामध्ये प्रतिष्ठेपायी अन्नाची नासाडी होऊ नये यासाठी ५० हून अधिक पदार्थ करण्याऐवजी कमीत कमी आणि मोजकेच पदार्थ करावेत, असा ठराव झाला. समाजाचा विकास होईल ^ समाजातील आर्थिक विषमतेची दरी कमी करणे ही काळाची गरज आहे. बहुतांश लग्नसमारंभात वारेमाप खर्च केला जातो. परिस्थिती नसलेल्यांना त्यासाठी कर्ज काढण्याची वेळ येते. त्यामुळे लग्नातील दिखावा कमी करून आपण जर त्या पैशातून गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावला, तर समाजाचा खरा विकास होईल. - गोपालजी वर्मा, अध्यक्ष, युवा मंच

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:29 am

आठवड येथील यात्रा उत्सवात हजारो भाविकांची गर्दी:धार्मिक अन् सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, ग्रामदैवताच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा‎

तालुक्यातील आठवड येथील ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ७ एप्रिल रोजी पहाटे गावातील तरुणांनी पैठण येथून कावडीने पायी आणलेल्या जलाने म्हसोबा महाराज मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. कावड यात्रेची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महापूजा करण्यात आली. भाविकांनी देवदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रात्री ८ वाजता म्हसोबा महाराज पालखी छबीना मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रात्री ११ वाजता लोकनाट्याचा कार्यक्रम झाला. ८ एप्रिलला १० ते १२ या वेळेत कलाकारांची हजेरी कार्यक्रम झाला. त्यानंतर भाविकांसाठी वांगे-भाकरीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. दुपारी ३ ते ६ या वेळेत कुस्त्यांचा जंगी हगामा आयोजित करण्यात आला होता. यात अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील नामवंत कुस्तीपटूंनी हजेरी लावली. पंच म्हणून अतुल लगड, अशोक चोभे, बापूसाहेब गुंजाळ, भगवान लगड, बाळासाहेब लोखंडे, विष्णू घाणमोडे यांनी काम पाहिले. विजेत्या मल्लांना बक्षीसे वाटप नियोजन उपसरपंच शंकर मोरे, माजी उपसरपंच तुकाराम दाताळ, बापूराव चोभे, अक्षय लगड यांनी पार पाडले. रात्री ९ वाजता होम मिनिस्टर कार्यक्रमाचे उद्‌घाटन मागील वर्षीच्या होम मिनिस्टर कार्यक्रमात प्रथम क्रमांक प्राप्त प्रिती मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात गावातील महिला आणि यात्रेसाठी उपस्थित पाहुण्या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील काही दात्यांनी या कार्यक्रमात विजेत्यांना दिलेल्या गृहोपयोगी वस्तू बक्षिसाचे प्रायोजकत्व करून सहकार्य केले. होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे नियोजन माजी उपसरपंच बी. एस. लगड यांनी केले. यावर्षी या कार्यक्रमात आश्लेषा कोरडे यांनी विजेतेपद पटकवले. यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी यात्रा कमेटीने परिश्रम घेताले. दोन्ही दिवस यात्रा शांततेत पार पडावी यासाठी नगर तालुका पोलिस ठाण्याचे चिचोंडी पाटील बीटचे पोलिस हवालदार शैलेश सरोदे आणि पोलिस हवालदार महेश भवर यांना बंदोबस्त ठेवला. यावेळी नगर जिल्ह्यातील भाविकांनीही ग्रामदैवताच्या दर्शनासाठी गावात मोठी गर्दी केली होती. यात्रा उत्सवामुळे गावात नवचैतन्य उत्सवामुळे गावात नवचैतन्य आणि धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्येही वेगळाच उत्साह जाणवत होता. या यात्रा उत्सवासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य केले. ग्रामदैवताच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे आठवड गाव भाविकांच्या गर्दीने गजबजले होते.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:28 am

श्रीरामपूरकरांची तहान भागणार:तलावात फक्त दोन दिवस पुरेल इतकाच साठा, पाण्यासाठी ससाणेंनी भरले 3 कोटी, प्रत्यक्ष साठा होईपर्यंत पाणीपुरवठा विभागाची कसरत‎

श्रीरामनवमी आणि उरूस उत्सवाच्या काळात पाणीवापर वाढल्याने श्रीरामपूर शहरावर पाणीटंचाईचे गडद संकट निर्माण झाले होते. साठवण तलावात केवळ दोन दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पालिकेची धाकधूक वाढली होती. मात्र, नगराध्यक्ष करण ससाणे यांनी पाटबंधारे विभागाची ३ कोटींची थकबाकी भरल्याने गुरुवारी सायंकाळी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार आहे. यामुळे शहरवासीयांवरील पाणीकपातीचे संकट तूर्तास टळले आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणातून सुटलेले पाणी ओझरपर्यंत नदीपात्रातून आणि तिथून कालव्याद्वारे श्रीरामपूरला पोहोचते. उन्हाळ्यामुळे हे पाणी शहरात पोहोचायला किमान तीन दिवस लागतील. सुरुवातीचे गढूळ पाणी सोडून द्यावे लागत असल्याने प्रत्यक्ष साठा होईपर्यंत पाणीपुरवठा विभागाची मोठी कसरत होणार आहे. पूर्वी शेती आणि पिण्यासाठी एकत्रित आवर्तन सुटत असे. मात्र, राजकीय वजन वापरून नेत्यांनी ही आवर्तने स्वतंत्र करून घेतली. परिणामी पाण्याचा अपव्यय वाढला असून ४५ दिवसांच्या आवर्तन चक्रामुळे साठवणुकीवर ताण येत आहे. नगरपालिका दररोज सुमारे दोन कोटी लिटर पाणी पुरवठा करीत आहे.सध्या एकच साठवण तलाव वापरात असल्याने जानेवारी फेब्रुवारी पर्यंत दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. त्यानंतर सण उत्सव, यात्रा आणि उन्हाळा लक्षात घेता रोज पाणी पुरवठा केला जात होता. मिल्लतनगर तलावाचे काम सुरू असल्याने सध्या शहर एकाच तलावावर अवलंबून आहे. जोपर्यंत नवीन आवर्तनाचे पाणी तलावात पडत नाही, तोपर्यंत नागरिकांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. पाणी साठवणुकीचे गणित शहराला दररोज २ कोटी लिटर पाणी लागते, गोंधवणी येथील सिमेंट तलावात ३७५ दशलक्ष लिटर क्षमता, मिल्लतनगर येथील मातीच्या तलावाचे खोलीकरण व अस्तरीकरण सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर शहराची साठवण क्षमता १ हजार दशलक्ष लिटरवर जाईल. दोन-तीन दिवसांत श्रीरामपूर शहरात पाणी येईल ^आम्ही पदभार स्वीकारताच पाटबंधारे विभागाचे ३ कोटी रुपये भरले आहेत. सध्या पालिकेची थकबाकी केवळ २ कोटी १ लाख असून, अतिरिक्त ९९ लाख रुपये आपल्याला परत मिळणार आहेत. गुरुवारी सायंकाळी आवर्तन सुटणार असून दोन-तीन दिवसात पाणी शहरात येईल. - करण ससाणे, नगराध्यक्ष, श्रीरामपूर.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:27 am

तांदुळवाडी जि. प. शाळेत चिमुरड्यांच्या प्रतिभेला बहर:जिल्हा परिषद शाळाच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचा पाया, शिक्षण विस्तार अधिकारी देवरे‎

राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थित पालक आणि ग्रामस्थांची मने जिंकली. या सोहळ्याच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता आणि लोकसहभागाचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखित झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी, राहुरी पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी इंदुमती देवरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, अशा प्रकारचे सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलेला चालना मिळते. जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक संस्था आहेत. शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवणे ही काळाची गरज आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार विनीत धसाळ यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या यशोगाथेवर प्रकाश टाकला. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता टिकून असल्याचे सांगत, त्यांनी पटसंख्या वाढीसाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. वर्षभरात विविध उपक्रमांत चमकदार कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे देऊन गौरवण्यात आले. पुणे येथील उद्योजक शंकर मोरे यांनी विद्यार्थ्यांसाठी सन्मानचिन्हे उपलब्ध करून दिल्याबद्दल, युवा उद्योजक ऋषिकेश मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीते, लावणी आणि कोळीगीतांवर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या सोहळ्याला माजी मुख्याध्यापिका वंदना कांडेकर, प्रभूजी बाचकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळासाहेब पेरणे, माजी अध्यक्ष भास्कर पेरणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्जेराव पेरणे, निसार सय्यद, शिवाजी खडके, स्वाती धसाळ, अश्विनी चव्हाण, विक्रम पेरणे, मच्छिंद्र चव्हाण, अशोक तोडमल, रेवन्नाथ खडके यांच्यासह मोठ्या संख्येने पालक आणि महिला उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका संगीता बेदरे आणि शिक्षक रमेश घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वी झाला. शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी यासाठी परिश्रम घेतले.

दिव्यमराठी भास्कर 10 Apr 2026 8:26 am