अफगाणिस्तान-हाँगकाँगमधील व्यक्तींशी भारतविरोधी संभाषणे
पुणे : कोंढवा परिसरातून अटक करण्यात आलेल्या दहशतवादी जुबेर हंगरगेकर याचे अफगाणिस्तान आणि हाँगकाँगमधील आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्कशी थेट संबंध असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जुबेरच्या मोबाईलमधून भारतविरोधी अनेक आक्षेपार्ह संभाषणे सापडली असून ती अफगाणिस्तान व हाँगकाँगमध्ये बसलेल्या व्यक्तींशी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जुबेरच्या टेलीग्राम ग्रुपमधील १०२ आयडीपैकी चार आयपी अॅड्रेस मिळाले आहे. त्यातील तीन […] The post अफगाणिस्तान-हाँगकाँगमधील व्यक्तींशी भारतविरोधी संभाषणे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बेकायदेशीर स्थलांतरितांवर सरकारची कारवाई योग्य : शशी थरूर
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी गुरुवारी देशात बेकायदेशीरपणे राहणा-या लोकांविरुद्ध (अवैध स्थलांतरित) सरकारच्या कारवाईला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, देशाच्या सीमांचे संरक्षण करणे आणि स्थलांतर व्यवस्था (इमिग्रेशन सिस्टीम) योग्यरित्या सांभाळणे ही सरकारची जबाबदारी आहे. थरूर म्हणाले की, जर भारतात घुसखोरी होत असेल किंवा लोक व्हिसाची मुदत संपल्यानंतरही राहत असतील, तर हे प्रणालीचे […] The post बेकायदेशीर स्थलांतरितांवर सरकारची कारवाई योग्य : शशी थरूर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नगर परिषद निवडणुकीतील पराभवानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना 'अपशकुनी' म्हणत भुसावळमधील पराभवाचे खापर त्यांच्यावर फोडले होते. या बोचऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसे यांनी महाजनांना चांगलेच धारेवर धरले. मी आता भाजपचा विरोधक आहे, त्यामुळे माझ्यामुळे जर भाजपचा पराभव झाला असेल तर ती माझ्यासाठी आनंदाचीच बाब आहे, असा खोचक टोला खडसे यांनी लगावला. पराभवाची जबाबदारी झटकू नका! भुसावळसह जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावरून महाजनांवर निशाणा साधताना खडसे म्हणाले की, गिरीश महाजन आपल्या सोयीनुसार बोलतात. जिल्ह्यात ज्यांनी विजयाची जबाबदारी घेतली होती, तेच आता या पराभवाला जबाबदार आहेत. मग या पराभवाचे खापर दुसऱ्यांवर का फोडता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट) रिंगणातच नसल्याने तिथे आमचा पराभव झाला असे म्हणणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रभारी पदाबाबत केला खुलासा जळगाव महापालिका निवडणुकीच्या प्रभारी पदावरून सुरू असलेल्या चर्चांनाही खडसे यांनी पूर्णविराम दिला. संतोष चौधरी यांची प्रभारी म्हणून झालेली नियुक्ती ही आपल्याला विश्वासात घेऊनच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मी आजवर कुठल्याही निवडणुकीत प्रभारी पद स्वीकारलेले नाही. महापालिका निवडणुकीत गल्लीबोळांत फिरावे लागते, मात्र माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला ते शक्य नाही. म्हणूनच मी स्वतः हे पद नाकारले आहे, मला डावलले गेलेले नाही, असे स्पष्टीकरण खडसेंनी दिले. जळगावात संघर्ष पेटणार आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या दोन दिग्गज नेत्यांमधील कलह जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. महाजनांची 'अपशकुनी' ही टीका आणि खडसेंनी दिलेले 'आनंदाची बाब' हे उत्तर, यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून येत्या 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांनी वेग घेतला असून, पिंपरी-चिंचवडमध्ये एक मोठी खळबळजनक घडामोड समोर आली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांमध्ये आज एक गुप्त बैठक पार पडली असून, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीला शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार आणि अजित पवार गटाचे नेते अजित गव्हाणे उपस्थित होते. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत जागावाटपाच्या मुद्द्यावरून मोठी खलबते रंगल्याची माहिती आहे. ज्या जागांवर अजित पवार गटाने दावा केला आहे, त्याच ठिकाणी शरद पवार गटाच्या इच्छुकांनीही शड्डू ठोकल्याने पेच निर्माण झाला आहे. तसेच, महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना सोबत घ्यायचे की नाही, यावरही सविस्तर चर्चा झाल्याचे समजते. या गुप्त बैठकीनंतर अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांनी माध्यमांना 'नो कमेंट्स' म्हणत टाळले आणि तातडीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले. या बैठकीबाबत अधिक माहिती देताना अजित गव्हाणे यांनी सांगितले की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने कोल्हे आणि पवार हे आज रात्रीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले असताना, दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेने महापालिका निवडणुकीतील रंगत वाढली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातही युतीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे बोलले जात आहे.
अमरावती येथील मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात पहिले डॉ. पंजाबराव देशमुख विचार साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात मराठी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अविनाश आवलगावकर यांनी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे विचार आणि कार्य विदर्भाबाहेर देशभर पोहोचणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व बहुपेडी आणि राष्ट्रीय स्तरावरील होते, मात्र त्यांचे कार्य विदर्भापुरते मर्यादित राहिल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या संमेलनाचे उद्घाटन डॉ. आवलगावकर यांच्या हस्ते झाले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सत्राध्यक्ष म्हणून भूमिका बजावली, तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश तराळ संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनाचे प्रास्ताविक व स्वागतपर भाषण स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांनी केले. त्यांनी संमेलनाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करत डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. महाविद्यालयात भाऊसाहेबांवरील पहिले विचार साहित्य संमेलन आयोजित होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी बोलताना प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांना दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व म्हटले. त्यांनी कृषी आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले, ज्यामुळे बहुजन समाज मोठ्या प्रमाणात शिक्षित झाल्याचे ढोरे यांनी नमूद केले. संमेलनाध्यक्ष डॉ. सतीश तराळ यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'कृषीरत्न', 'लोकमहर्षी', 'शिक्षणमहर्षी', 'कर्मयोगी', 'ज्ञानयोगी', 'प्रेषित', 'कोहिनूर', 'कल्पतरू', 'युगंधर', 'शुक्रतारा' यांसारख्या विशेषणांचा उल्लेख केला. मात्र, ते कोणत्याही एका विशेषणात सामावत नाहीत, असे ते म्हणाले. गांधीजी आणि गाडगेबाबांप्रमाणे त्यांनाही उपमा देता येत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. तराळ पुढे म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख हे महात्मा फुले यांचे सच्चे वारसदार, शक्तिशाली लोकनेते, महान समाजसुधारक, समाजशास्त्रज्ञ, शिक्षणशास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांचे कैवारी होते. संसदेतील त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे असून संविधान निर्मिती आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ते खरे राष्ट्ररत्न, धर्ममीमांसक आणि भारताचे भावी पंतप्रधान होते, असेही तराळ यांनी सांगितले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात 'डॉ. पंजाबराव देशमुख यांचे अलौकिक कार्य' या विषयावर परिसंवाद झाला. जनसारस्वत डॉ. सुभाष सावरकर या सत्राचे अध्यक्ष होते. या परिसंवादात डॉ. राजेश मिरगे, प्रा. संदीप तडस, प्रा. अनिल प्रांजळे, डॉ. योगिता पिंजरकर आणि प्रा. ममता म्हस्के यांनी आपले विचार मांडले. तिसऱ्या 'काव्य बोली' सत्रात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यावर कविता लिहिलेल्या कवींचे कवी संमेलन पार पडले, ज्याचे अध्यक्षस्थान प्राचार्य राज यावलीकर यांनी भूषवले.
अर्जुन नगरमध्ये सांडपाणी व्यवस्थेचा बोजवारा:नाली-पाइपलाइन नाही; नागरिकांनाच करावी लागते स्वच्छता
अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरातील नलिनीकृष्णपुरम आणि राष्ट्रसंत कॉलनी या वसाहतींमध्ये सांडपाणी व्यवस्थेचा प्रश्न अनेक वर्षांपासून गंभीर बनला आहे. या भागातील घरांतून बाहेर पडणारे सांडपाणी वाहून नेण्यासाठी कोणतीही नियोजित उघडी नाली किंवा भूमिगत पाइपलाइन उपलब्ध नाही. यामुळे सांडपाणी मोकळ्या जागांमध्ये, झुडपांमध्ये आणि रस्त्यांच्या कडेला साचत आहे, ज्यामुळे परिसरात भीषण अस्वच्छता निर्माण झाली आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे सर्वत्र चिखल, प्लास्टिक आणि घरगुती कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत. संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, डास आणि इतर कीटकांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि टायफॉइडसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढला आहे. लहान मुले, वृद्ध, महिला आणि आजारी व्यक्तींचे आरोग्य यामुळे थेट धोक्यात आले आहे. स्थानिक रहिवाशांनी स्वच्छता विभाग, ड्रेनेज विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. तात्पुरते उपायही न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता असून, साचलेले सांडपाणी घरांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेने तातडीने या परिसराची जबाबदारी घ्यावी, साचलेले सांडपाणी आणि कचरा पूर्णपणे हटवावा, तसेच दोन्ही वसाहतींचे सांडपाणी मुख्य नालीशी जोडण्यासाठी योग्य उघडी नाली किंवा भूमिगत ड्रेनेज (पाइपलाइन) बांधावे, अशी मागणी पुढे आली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास नागरिकांना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही स्थानिक रहिवाशांनी दिला आहे. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे, महानगरपालिकेने आजवर या भागात कोणतीही स्वच्छता मोहीम राबवलेली नाही. मूलभूत नागरी सुविधा पुरवण्यात महानगरपालिका याठिकाणी सपशेल अपयशी ठरली आहे. मनपा प्रशासन या भागातील स्वच्छतेकडे नेहमीच दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांना वेळोवेळी स्वतःच स्वच्छता करावी लागते.
नगराध्यक्षपदावर विजय मिळवूनही अनेक नगरपालिकांमध्ये नगरसेवकांच्या संख्याबळाअभावी पक्षांना उपाध्यक्षपद आणि स्वीकृत नगरसेवकांच्या जागा मिळवणे कठीण झाले आहे. सहा नगराध्यक्ष जिंकूनही भाजपला तीन ठिकाणी उपाध्यक्षपद गमवावे लागण्याची शक्यता आहे, तर केवळ दोन नगराध्यक्ष जिंकणाऱ्या काँग्रेसला सहा ठिकाणी उपाध्यक्षपदाची संधी निर्माण झाली आहे. मोर्शीमध्ये तीन प्रमुख पक्षांचे प्रत्येकी सहा नगरसेवक असल्याने तिथे राजकीय पेच निर्माण झाला आहे. चांदूर रेल्वेमध्ये वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्षपद जिंकले असले तरी, भाजपने निम्म्याहून अधिक नगरसेवक जिंकल्यामुळे वंचितला आपले वर्चस्व राखणे आव्हानात्मक ठरत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेक ठिकाणी निवडणुकीनंतर महायुती आणि महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. काही पक्ष इतरांना सोबत घेऊन स्वतंत्र मान्यताप्राप्त गट स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा गटांनाच उपाध्यक्षपद आणि स्वीकृत नगरसेवकांच्या जागा मिळवता येणार आहेत. यामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे उदयास येत आहेत. भाजपने धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, धारणी, वरुड आणि शेंदुरजनाघाट येथे नगराध्यक्षपदे जिंकली आहेत. यापैकी धामणगाव रेल्वे, वरुड आणि शेंदुरजनाघाट या तीन नगरपालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे या तीन ठिकाणी भाजपला उपाध्यक्षपद सहज मिळू शकते, परंतु स्वीकृत सदस्यांसाठी त्यांना अधिक प्रयत्न करावे लागतील. याउलट, दर्यापूर आणि चिखलदरा येथे नगराध्यक्षपद जिंकणाऱ्या काँग्रेसला संख्याबळाच्या जोरावर संधी आहे. भाजपकडे नगराध्यक्षपद असलेल्या अचलपूर, अंजनगाव सुर्जी आणि धारणी तसेच शिवसेनेने (उबाठा) जिंकलेल्या नांदगाव खंडेश्वर येथे महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करून काँग्रेसला उपाध्यक्षपद आणि स्वीकृत नगरसेवकांच्या जागा मिळवता येऊ शकतात. धामणगाव रेल्वे नगरपालिकेत भाजपने नगराध्यक्षपदासह एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे त्यांना उपाध्यक्षपद आणि स्वीकृत नगरसेवकांची जागा मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. वरुडमध्येही भाजपने २६ पैकी १८ जागा जिंकून आघाडी घेतली आहे, त्यामुळे तिथे उपाध्यक्षपद सहजपणे मिळवता येईल. मात्र, वरुडमध्ये नगरसेवकांच्या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांची तीन पदे मिळवणे भाजपसाठी आव्हानात्मक ठरू शकते. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, काँग्रेसचे २ आणि प्रहारचा १ सदस्य एकत्र आल्यास ते एक स्वीकृत नगरसेवक पद मिळवू शकतात. पहिल्याच बैठकीत उपाध्यक्षांच्या निवडणुकीसोबतच स्वीकृत नगरसेवकांचीही निवड केली जाणार आहे. एकूण सदस्यांच्या दहा टक्के जागा स्वीकृत सदस्यांसाठी राखीव असतात. ही पदे आपल्याकडेच यावीत यासाठी सर्वत्र राजकीय चढाओढ सुरू आहे.
मेळघाटातील बागलिंगा गाव 14 गावांना पाणी देणार:सातपुडा पायथ्याशी लघु जलसिंचन प्रकल्प अंतिम टप्प्यात
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बागलिंगा गावात एक लघु जलसिंचन प्रकल्प (धरण) आकार घेत आहे. या प्रकल्पामुळे बागलिंगासह १४ गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्याची आशा निर्माण झाली आहे, ज्यामुळे हे छोटेसे गाव मेळघाटाच्या केंद्रस्थानी आले आहे. मेळघाटात मुसळधार पाऊस पडत असला तरी, पाणी साठवणुकीच्या ठोस योजनांअभावी आदिवासी गावांना वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, या धरणामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये येणारा हा लघु जलप्रकल्प मुख्य अभयारण्यापासून ८.५ किलोमीटर अंतरावर आहे. मोठ्या धरणांच्या तुलनेत हा प्रकल्प लहान असला तरी, यात पाणी साठवून एकूण १४ गावांना पिण्याचे पाणी पुरवले जाणार आहे. याशिवाय, लगतच्या गावातील शेतीलाही याचा फायदा होईल, असे बागलिंगा गावाच्या सरपंच निर्मला धांडेकर यांनी सांगितले. प्रकल्पासाठी सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेली शेतजमीन सरकारने संपादित केली असून, शेतकऱ्यांना योग्य मोबदलाही मिळाला आहे. या प्रकल्पाची सुरुवात २००९ साली झाली असून, राज्य वन्यजीव मंडळानेही याला परवानगी दिली आहे. येथे खोदकाम करून एक भव्य तलाव निर्माण करण्यात आला आहे, ज्यात आता पावसाळ्यात पाणी साचले आहे. प्रकल्पाच्या खालच्या बाजूला पाणी शुद्धीकरण केंद्राद्वारे प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य बनवले जाईल. बागलिंगा ग्रामपंचायत अंतर्गत लगतच्या १४ गावांना पाणीपुरवठा केला जाईल, असे सरपंच धांडेकर यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. बागलिंगा गावात जलशुद्धीकरण केंद्राचे काम वेगाने सुरू असून, पाणी साठवणुकीसाठी एक मोठी टाकीही बांधली जात आहे. यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, वर्षभरात या प्रकल्पाची सर्व कामे पूर्ण होतील. या प्रकल्पातून बागलिंगा, चिचखेडा, कुलंगणा, मोझरी, वस्तापूर, सोमवारखेडा, मलकापूर, रामटेक, डोमनबल्ला, हरदामल, चिवाती, बदनापूर आणि कालापाणी या १४ गावांना पाणीपुरवठा केला जाईल.
सामाजिक क्षेत्रातील अंधार दूर करण्यासाठी कृतीशील हातांची गरज आहे, असे मत अहिल्यानगर येथील स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. 'चिदानंद फाउंडेशन'च्या दुसऱ्या वर्षाच्या देणगी प्रदान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम भारत इतिहास संशोधक मंडळाच्या वि. का. राजवाडे सभागृहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित विजय कोपरकर, 'चिदानंद फाउंडेशन' पुणेचे संचालक चिंतामणी वैजापूरकर आणि संचालिका नेहा चिंतामणी वैजापूरकर उपस्थित होते. या प्रसंगी स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी, उमेद परिवारचे राकेश सणस आणि सेवा सहयोग फाउंडेशन संचलित चेतना संस्थेच्या अनिता घाटणेकर यांना देणगीचे धनादेश प्रदान करण्यात आले. डॉ. गिरीश कुलकर्णी पुढे म्हणाले की, समाजात अनेक जटिल प्रश्न असून केवळ एक संस्था ते सोडवू शकत नाही. सक्षम संस्था आणि कार्यकर्ते यांच्या एकत्रिकरणातूनच हे प्रश्न सोडवता येतात. सामाजिक जाणीवा बाळगून काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या मागे उभे राहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ते म्हणाले की, १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात सामाजिक संवेदनशीलता आणि जागरूकता बाळगणारे नागरिक किती आहेत, हा प्रश्नच आहे. 'सिव्हिल सोसायटी' कमी होत जाणे हे सामाजिक स्वास्थ्यासाठी धोक्याचे लक्षण आहे. कोणताही सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी केवळ शासन किंवा समाजातील प्रभावी व्यक्तींवर विसंबून राहणे पुरेसे ठरणार नाही. डॉ. कुलकर्णी यांनी युनेस्कोच्या अहवालाचा संदर्भ देत सांगितले की, महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांमध्ये आजही बालविवाहासारखा सामाजिक प्रश्न अस्तित्वात आहे. जुने सामाजिक प्रश्न नव्या रूपाने पुढे येत असून, काळानुरूप नवीन प्रश्नही निर्माण होत आहेत. त्यामुळे समाज पुन्हा त्याच टप्प्यावर येऊन थांबला आहे की काय, अशी शंका येते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पंडित विजय कोपरकर म्हणाले की, एकीकडे हव्यासापोटी धावपळ करणारा समाज पाहिला की त्यांची कीव करावीशी वाटते. लाखो रुपयांचे पॅकेज मिळूनही त्यांच्या मनात समाधानाची वृत्ती नसते. स्वतःच्या मुलांकडे लक्ष न देणाऱ्या अशा पालकांकडे पाहिले असता, सामाजिक समस्यांकडे ते कोणत्या संवेदनशीलतेने पाहतील, हा चिंतनाचाच विषय आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शुक्रवार, २६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. पुण्यातील भरत नाट्य मंदिर येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, अंतिम फेरीतील महाविजेता संघ रविवार, २८ जानेवारी रोजी निश्चित होईल. पुणे, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि कोल्हापूर येथील केंद्रांवर झालेल्या स्पर्धांमधून निवडलेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय आणि सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका या महाअंतिम फेरीत सहभागी झाल्या आहेत. २६ आणि २७ जानेवारी रोजी सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांत स्पर्धा पार पडेल, तर २८ जानेवारी रोजी सकाळी अंतिम सत्र होईल. स्पर्धेच्या महाअंतिम फेरीसाठीचे लॉट्स २५ जानेवारी रोजी काढण्यात आले. शुक्रवार, २६ जानेवारी रोजी सादर झालेल्या एकांकिकांमध्ये सकाळी ९ वाजता अमरावती येथील विद्याभारती महाविद्यालयाचे 'लगीन', नागठाणे येथील आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजचे 'सोयरिक' आणि अमरावती येथील श्री ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचे 'स्वधर्म' यांचा समावेश होता. सायंकाळी ५ वाजता हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे 'काही प्रॉब्लेम ये का' आणि गणेशखिंड येथील मॉडर्न कला-विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे 'वामन आख्यान' सादर झाले. शनिवार, २७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाची 'अस्तित्व', बडनेरा येथील प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्चची 'अर्बन' आणि कोल्हापूर येथील दे. भ. रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सची 'ग्वाही' या एकांकिका सादर होतील. सायंकाळी ५ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभागाचे 'खोडाला फांदीचा आधार', रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाचे 'जाळ्यातील खिळे', फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नॉलॉजी, रत्नागिरीचे 'ठोंग्या', नागपूर येथील वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्थेचे 'गोष्टीचा खेळ' आणि छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे 'बुजगावणं' सादर केले जातील. रविवार, २८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता रत्नागिरी येथील फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजीची 'तुकारामाची टोपी', छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालय नाट्यशास्त्र विभागाचे 'वयाचं गणित', छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 'जिव्हाळा' आणि पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालय (स्वायत्त) ची 'आतल्या गाठी' या एकांकिका सादर होतील. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाला ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अजित पवार गटाकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर
मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून १५ जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आपली रणनीती स्पष्ट करत ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्या पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी अजित पवार गटाने अनुभवी नेत्यांसह युवा […] The post अजित पवार गटाकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारतीय अवकाश संशोधन संस्था ‘इस्रो’ने ६ हजार १०० किलो वजनाच्या उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करून नवा इतिहास निर्माण केला आहे. इस्रोच्या ‘बाहुबली’ अग्निबाणाच्या सहाय्याने हे प्रक्षेपण बुधवारी सकाळी ८ वाजून ५५ मिनिटे ३० सेकंदांनी श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून करण्यात आले. या उपग्रहाचे नाव ‘ब्ल्यूबर्ड ब्लॉक-२’ असे आहे. इस्रोने आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांमध्ये हा सर्वाधिक वजनाचा […] The post ‘बाहुबली’चे यशस्वी उड्डाण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर मल्टीस्टेटला ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड-२०२५’ पुरस्कार
लातूर : प्रतिनिधी ग्रीन वर्ल्ड आणि कॉसमॉस बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार मंथन-२०२५ या सहकार परिषदेत लातूर मल्टीस्टेटच्या यशाच्या प्रवासात आणखी एक गौरवशाली क्षण जोडला गेला आहे. सामाजिक जबाबदारीचे भान आणि आर्थिक व्यवहारातील पारदर्शकतेसाठी संस्थेला ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड-२०२५’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे आयोजित या सहकार परिषदेत सहकार आयुक्त दीपक तावरे […] The post लातूर मल्टीस्टेटला ‘ग्रीन वर्ल्ड को-प्राईड-२०२५’ पुरस्कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मांजरा कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ
लातूर : प्रतिनिधी राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नवनवीन तंत्रज्ञान वापरत मांजरा परिवारातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ३० टनी नवीन बॉयलरचा अग्नी प्रदीपन समारंभ कारखान्याचे चेअरमन राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाला. यावेळी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक काळे, कारखान्याचे संचालक शंकर […] The post मांजरा कारखान्याच्या गाळप क्षमतेत वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जळकोट तालुक्यात टपाल सेवा आजही भक्कम
जळकोट : प्रतिनिधी भारत देशात सर्वात जुनी आणि सर्वसामान्य ग्रामीण व शहरी भागात टपाल सेवा ही फार महत्त्वाची होती. इंग्रजांच्या काळापासून ही टपाल सेवा सुरू आहे. यात मुलींसाठी समृद्धी, सुकन्या योजना, स्पीड पोस्ट, आरटीजीएस, बचत खाते, आरडी ठेव, विमा सेवा या योजना आहेत. व्याजदर कमी असला तरी विश्वासार्हतेमुळे अनेक वर्षापासून या सेवेवर जनतेचा विश्वास दृढ […] The post जळकोट तालुक्यात टपाल सेवा आजही भक्कम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे शहरातील कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत काकडे वस्ती, गल्ली नंबर २ येथे गुरुवारी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अफरोज पठाण आणि डीबी पथकाने संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारूसाठा आणि एक कोटी ८५ हजार रुपयांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली. या कारवाईदरम्यान विविध प्रकारची देशी आणि विदेशी दारू आढळून आली. यामध्ये ५० एमएलचे ८० फुगे (किंमत ₹१,६००), ७० लिटर दारू (₹२८,०००), २२० नग नंबर १ व्हिस्की (₹४८,४००), १८३ नग आयबी व्हिस्की (₹४०,२६०), २२४ नग आर.एस. १८० एमएल (₹५६,०००) आणि इतर अनेक ब्रँड्सच्या दारूचा समावेश होता. जप्त केलेल्या दारूसाठ्याची एकूण किंमत २ लाख ५ हजार ९०० रुपये इतकी आहे. दारूसाठ्यासोबतच सुरुवातीला १ लाख ४१ हजार ५० रुपये रोख रक्कमही जप्त करण्यात आली. त्यामुळे दारूसाठा आणि ही रोख रक्कम मिळून एकूण ३ लाख ४६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणात अमर कौर उर्फ मद्रीकौर दादासिंग जुनी, दिलदार सिंग दादासिंग जुनी आणि देवाश्री जुनी सिंग हे तिघे बेकायदेशीर दारू विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या ताब्यात रोख रक्कम आढळून आल्याने देवाश्री जुनी सिंग हिच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान बेडरूममधील कपाटाच्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये लपवून ठेवलेली तब्बल १ कोटी ८५ हजार ९५० रुपये इतकी रोख रक्कम आढळून आली. सदर रक्कम पंचनामा करून जप्त करण्यात आली आहे. या मोठ्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कोंढवा पोलिस पुढील तपास करत आहेत.
यशस्वीतेचे कोणतेही मोजमाप नसते : दिलीपराव देशमुख
लातूर : प्रतिनिधी मानवी जीवनात यशस्वीतेचे कोणतेही मोजमाप नसते. तसेच कुठल्याही चांगल्या कामाला उशीर झालेला नसतो, असे प्रतिपादन माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले. येथील अभिनव मानव विकास संस्थाद्वारा संचालित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन गुरुवारी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून आपले विचार व्यक्त […] The post यशस्वीतेचे कोणतेही मोजमाप नसते : दिलीपराव देशमुख appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रख्यात अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्या हस्ते आज कल्याण ज्वेलर्सच्या लातूर शोरूमचे उद्घाटन
लातूर : प्रतिनिधी भारतातील सर्वात विश्वसनीय आणि आघाडीच्या ज्वेलरी ब्रँड्सपैकी एक, कल्याण ज्वेलर्सच्या लातूरमधील कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मेन रोड येथील नवीन शोरूमचे उद्घाटन आज दि. २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रख्यात अभिनेत्री जेनेलिया रितेश देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. पश्चिम भारतातील सर्व महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये कल्याण ज्वेलर्सने आपले पाय रोवले आहेत, महाराष्ट्रामध्ये हे त्यांचे २९ […] The post प्रख्यात अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्या हस्ते आज कल्याण ज्वेलर्सच्या लातूर शोरूमचे उद्घाटन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातुरात बुध्दसृष्टी उभारण्यासाठी आवश्यक ती मदत करू : आमदार अमित देशमुख
लातूर : प्रतिनिधी लातूरच्या सातकर्णीनगरमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचा जागर होतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जोपासणारी आपण माणसं आहोत आणि तेच कार्य या ठिकाणी होत आहे. याचा आपल्याला अभिमान आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बुद्धसृष्टी उभी करण्यात अमित देशमुख कुठेही मागे राहणार नाही, असे आश्वासन माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिले. लातूर […] The post लातुरात बुध्दसृष्टी उभारण्यासाठी आवश्यक ती मदत करू : आमदार अमित देशमुख appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सह्याद्रीच्या द-याखो-यात ‘तारा’ वाघीणीचा भीमपराक्रम
शिराळा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सह्याद्रीच्या जंगलात नुकतेच आगमन झालेल्या ‘तारा’ वाघिणीने आपल्या अचाट साहसाने वनविभागाच्या अधिका-यांनाही थक्क केले आहे. मोठ्या मगरींचा वावर असलेल्या वारणा धरणाच्या अथांग बॅकवॉटरमध्ये तब्बल दीड किलोमीटरचे अंतर अवघ्या ४५ मिनिटांत न थांबता पोहून पार करत ताराने राज्यातील व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासात एका ऐतिहासिक नोंदीची भर घातली आहे. ताडोबा येथून आणलेल्या ताराला […] The post सह्याद्रीच्या द-याखो-यात ‘तारा’ वाघीणीचा भीमपराक्रम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
व्हिसाबाबत ट्रम्पच्या निर्णयावर अमेरिकी कोर्टाचे शिक्कामोर्तब
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘एच-१बी’ व्हिसाचे शुल्क वाढवल्यानंतर अनेकांनी थेट कोर्टात धाव घेतली. याबद्दल नुकतीच सुनावणी पार पडली. डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘एच-१बी’ व्हिसासाठी आकारलेले शुल्क बरोबरच असल्याचे कोर्टाने म्हटले. यामुळे आता ‘एच-१बी’ व्हिसाधारकांना एक प्रकारे अत्यंत मोठा धक्काच बसला आहे. या प्रकरणावर बोलताना कोर्टाने म्हटले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कायदेशीर अधिकारांच्या […] The post व्हिसाबाबत ट्रम्पच्या निर्णयावर अमेरिकी कोर्टाचे शिक्कामोर्तब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्लॅन २०४९ : अरुणाचल काबीज करण्याची तयारी! चीनी विस्तारवादाचा भारताला धोका
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आर्थिकदृष्या प्रबळ होत असलेल्या चीनने आपल्या विस्तारवादी धोरणाला पुन्हा एकदा आक्रमक रूप देण्यास सुरुवात केली असून, चीनच्या या विस्तारवादी धोरणामुळे भारतासमोरही येत्या काही वर्षांत मोठा धोका उद्भवण्याचे संकेत मिळू लागले आहेत. भारतासोबतच्या सीमावादाबाबतही चीनचा भयानक डाव अमेरिकन काँग्रेसला पेंटागॉनने सादर केलेल्या अहवालामधून समोर आला आहे. पेंटागॉनच्या रिपोर्टमधील माहितीनुसार चीनने अरुणाचल प्रदेशवरील […] The post प्लॅन २०४९ : अरुणाचल काबीज करण्याची तयारी! चीनी विस्तारवादाचा भारताला धोका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नववर्षात कार महागणार; ३ टक्के दरवाढीचे संकेत!
नवी दिल्ली : प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे २०२५ च्या सुरुवातीलाच देशातील आघाडीच्या ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या कारच्या किमतीत वाढ करण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि ऑडी यांसारख्या मोठ्या ब्रँड्सनी आधीच किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने बहुतांश वस्तूंवरील जीएसटी घटविला होता. यामध्ये ४ मीटरच्या आतील कारही होत्या. तसेच मोठ्या कारही होत्या. एकंदरीतच सर्वच […] The post नववर्षात कार महागणार; ३ टक्के दरवाढीचे संकेत! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कंबोडियातील विष्णूची भव्य मूर्ती थायलंडकडून जमीनदोस्त
बॅँकॉक : वृत्तसंस्था थायलंड आणि कंबोडिया यांच्यात गेल्या ६ महिन्यांपासून भगवान विष्णूची भव्य मूर्ती उभारण्यात आलेल्या प्रीह विहार मंदिराच्या परिसरावरून वाद सुरू आहे. जूनमध्ये दोन्ही देशांमध्ये युद्धही झाले होते. मात्र, ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर युद्धबंदी झाली होती. दरम्यान, विष्णूची ही भव्य मूर्ती थायलंडने जेसीबी लावून जमीनदोस्त केली. या कारवाईवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने हरकत नोंदविली होती. आता […] The post कंबोडियातील विष्णूची भव्य मूर्ती थायलंडकडून जमीनदोस्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पृथ्वीवर सर्वात कमी -५६ अंश से. तापमान रशियात
मॉस्को : वृत्तसंस्था रशियातील याकुतियामध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. येथे तापमान -५६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे, जे सध्या पृथ्वीवरील सर्वात कमी तापमान मानले जात आहे. इतक्या थंडीत मोकळ्या जागेत काही मिनिटांत शरीर बधिर होऊ शकते. हवामान विभागाने इशारा दिला आहे की, येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढू शकते आणि तापमान -६० अंश सेल्सिअसपर्यंत खाली […] The post पृथ्वीवर सर्वात कमी -५६ अंश से. तापमान रशियात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई अदानीला विकणे म्हणजे मराठी माणसांसाठी काम नव्हे : संजय राऊत
मुंबई : प्रतिनिधी ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर प्रश्नांचा भडिमार सुरू केला असून प्रदेश भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना तुम्ही मराठी माणसाच्या हितासाठी काय केले? असा सवाल केला. राऊत हे मराठी माणसासाठी नाही तर पत्राचाळ घोटाळ्यामुळे तुरुंगात गेले. राऊत यांनी आयुष्यात मराठी माणसाच्या भल्यासाठी केलेले एक तरी काम […] The post मुंबई अदानीला विकणे म्हणजे मराठी माणसांसाठी काम नव्हे : संजय राऊत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उत्तर प्रदेशातील बहुचर्चित उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य दोषी आणि माजी भाजप आमदार कुलदीपसिंह सेगर याला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा स्थगित करताना सेगरने सात वर्षांहून अधिक काळ कारावास भोगल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले, मात्र या निर्णयाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या पीडितेच्या आईला आणि पीडितेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने संताप अधिकच वाढला आहे. या गंभीर घटनेवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली असून, पीडित कुटुंबावर होणाऱ्या या कारवाईबद्दल त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले की, उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी, भाजपचे माजी आमदार कुलदीप यांची शिक्षा स्थगित केल्याने जगभरात संतापाची लाट उसळली आहे. याशिवाय, बलात्कारी व्यक्तीविरुद्ध निषेध करणाऱ्या पीडितेला आणि तिच्या आईला पोलिसांनी केलेली मारहाण धक्कादायक आहे. निवडणुकीच्या काळात भाजपने लाडकी बहीणसारख्या घोषणा दिल्या आणि योजना आखल्या. मात्र, आज पीडितेसोबत आणि आंदोलन करणाऱ्या तिच्या कुटुंबीयांसोबत काय घडत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या घटनेचा निषेध करणे थांबवूच नये पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, जगभरातील देश आणि लोक हे पाहतील, यावर बोलतील. परंतु भारतात आंदोलनकर्त्यांवरच हुकूमशाही पद्धतीने टीका होत असून मंत्री देखील या पीडितांच्या आंदोलनाची टिंगल करतात. आपण हेच करायला आलो आहोत का? बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेल्या माणसाला सर्वात कठोर शिक्षा मिळायला हवी होती, पण त्याला जामीन का मिळाला? हा न्याय आहे का? हे मानवीय आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तसेच, जोपर्यंत दोषींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत सर्वांनी याबद्दल बोलणे पाहिजे, तसेच या घटनेचा निषेध करणे थांबवूच नये, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. सीबीआयचा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय दरम्यान, उन्नाव बलात्कार पीडित प्रकरणातील आरोपी आमदार कुलदीपसिंह सेंगर याच्या जामीनाला हरकत घेत सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं सीबीआयने स्पष्ट केलं आहे.
डिव्हायडरवर कार धडकून स्फोट; एकाचा होरपळून मृत्यू
नांदेड : जिल्ह्यातील नांदेड-लातूर महामार्गावरील कलंबर फाटा जवळ डिव्हायडरवरती कार चढून झालेल्या भीषण अपघातात कारचा मोठा स्फोट होऊन आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नांदेड लातूर महामार्गावर सोनखेड जवळील कलंबर फाट्याजवळ लातूरहून नांदेडकडे येणा-या एमएच २६ एके ६४४४ या हयूंडाई कारने डिव्हायडरला जबरदस्त दिल्यामुळे कारचा जागीच स्फोट झाला यात चालक होरपळून गेला असून […] The post डिव्हायडरवर कार धडकून स्फोट; एकाचा होरपळून मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ब्रेकिंग………. डिव्हायडरवर कार धडकून स्फोट
नांदेड : जिल्ह्यातील नांदेड-लातूर महामार्गावरील कलंबर फाटा जवळ डिव्हायडरवरती कार चढून झालेल्या भीषण अपघातात कारचवा मोठा स्फोट होऊन आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त लवकरच……………. The post ब्रेकिंग………. डिव्हायडरवर कार धडकून स्फोट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून 15 जानेवारी रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने आपली रणनीती स्पष्ट करत 40 'स्टार प्रचारकांची' यादी जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्या पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी अजित पवार गटाने अनुभवी नेत्यांसह युवा चेहऱ्यांनाही या 40 स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान दिले आहे. आगामी काळात होणाऱ्या सभा आणि प्रचाराच्या फेऱ्यांमध्ये हे नेते राज्यभर फिरून पक्षाची भूमिका मांडणार आहेत. सुनील तटकरे यांनी या यादीची घोषणा केल्यानंतर आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या निवडणुकीत अनेक अनपेक्षित युती पाहायला मिळत आहेत. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी एकत्र येत युतीची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युतीबाबत अंतिम चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही राष्ट्रवादी गटांनी देखील एकत्र निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरू केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
राज्यातील नगर परिषद निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या पराभवानंतर भाजपमध्ये उडालेला अंतर्गत संघर्षाचा धुरळा आता खाली बसताना दिसत आहे. ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी असलेला संघर्ष मिटवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्षांनी सुवर्णमध्य साधला असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी नवीन जबाबदाऱ्यांचे वाटप जाहीर केले आहे. नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत भाजपला चंद्रपुरात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या निकालामुळे व्यथित झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षश्रेष्ठींच्या कार्यपद्धतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर, मुनगंटीवार यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. जिल्ह्यातील राजकीय गणिते आणि कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता यावर दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. जोरगेवारांची 'निवडणूक प्रमुख' पदी वर्णी चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या नियोजनावरून पक्षात दोन गट पडल्याचे चित्र होते. सुरुवातीला आमदार किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, मात्र मुनगंटीवार समर्थकांच्या नाराजीनंतर तातडीने निर्णय बदलून अजय संचेती यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली. यामुळे जोरगेवार गट दुखावला जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. अखेर, कोणालाही नाराज न करता पक्षाने पुन्हा एकदा फेरबदल करत जोरगेवार यांची 'निवडणूक प्रमुख' पदी वर्णी लावली आहे. चैनसुख संचेती यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक आता आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाईल. यामुळे जिल्हयातील मुनगंटीवारांचे वर्चस्व मान्य करण्यात आले आहे. दुसरीकडे, किशोर जोरगेवार यांच्याकडे निवडणूक प्रमुखपद कायम ठेवतानाच, प्रक्रियेत पारदर्शकता आणि समतोल राखण्यासाठी चैनसुख संचेती यांची 'निवडणूक निरीक्षक' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गटबाजी रोखण्याचे आव्हान नगर परिषद निवडणुकीतील पराभवाचा पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपने हा सावध पवित्रा घेतला आहे. जोरगेवार आणि मुनगंटीवार या दोन्ही नेत्यांच्या ताकदीचा वापर करून घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमधील गटबाजी संपवण्यासाठी 'बाहेरचा' निरीक्षक (चैनसुख संचेती) नेमणे हा पक्षाचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. आता या नव्या त्रिमुर्तीच्या नेतृत्वात भाजप चंद्रपूर महापालिकेत कमळ फुलवणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
निलंबित कृषी सेवकाचा कोयत्याने कार्यालयात हल्ला:संगणक फोडला, कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी
एरंडवणे येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात एका निलंबित कृषी सेवकाने कोयत्याने हल्ला करत तोडफोड केली. सचिन कांबळे असे आरोपीचे नाव असून, त्याने कार्यालयातील संगणक फोडला आणि कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे कार्यालयात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. अलंकार पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन कांबळे हातात धारदार कोयता घेऊन कार्यालयात बळजबरीने शिरला. त्याने थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात प्रवेश केला. त्यावेळी जिल्हा अधीक्षक दौऱ्यावर असल्याने सहायक अधिकारी योगेश गडपायले यांनी त्याला माहिती दिली. मात्र, कांबळे संतप्त झाला आणि त्याने शिवीगाळ करत कक्षातील टेबलावरील संगणक फोडला व तोडफोड सुरू केली. कार्यालयातील वरिष्ठ लिपिक रमेश लक्ष्मण सकपाल (वय ५७) आणि इतर कर्मचारी त्याला अडवण्यासाठी गेले असता, आरोपीने कोयता काढून सर्वांना धमकावले. कोणीही या कार्यालयात काम करू नये, जो करेल त्याला जीवे मारून टाकीन, अशी धमकी त्याने दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ ११२ आणि १०० या क्रमांकांवर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच, काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी सचिन कांबळे याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून कोयता जप्त केला. पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे पुढील अनर्थ टळला. तक्रारदार रमेश सकपाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी सचिन कांबळे याची २६ मार्च २०१३ रोजी राजगुरुनगर येथील चिकित्सालय जिल्हा मध्यवर्ती फल रोपवाटिकेत कृषी सेवक म्हणून नियुक्ती झाली होती. नियुक्तीनंतर सहा महिन्यांत जात प्रमाणपत्र सादर न केल्याने त्याची सेवा थांबवण्यात आली होती. नंतर प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्याला पुन्हा नोकरी आणि पदोन्नती मिळाली. मात्र, जून २०१६ पासून तो कामावर हजर राहिला नाही. कामावर गैरहजर राहिल्यामुळे त्याचे वेतन आणि भत्ते बंद झाले होते. १७ जुलै २०१४ रोजी त्याला निलंबित करण्यात आले होते. वेतन न मिळाल्याच्या रागातून सचिन कांबळे याने हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी सचिन कांबळे याच्याविरोधात शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम २५ आणि ४, सार्वजनिक संपत्ती नुकसान निवारण अधिनियम १९८४ च्या कलम ३(१) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५२, ३५१(३), ३२४(३) आणि १३२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप येसणे करत आहेत.
समाजवादी पार्टी पुणे मनपा निवडणूक लढवणार:40 उमेदवार रिंगणात, पहिली यादी जाहीर
समाजवादी पार्टीने आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याची घोषणा केली आहे. पक्षाने निवडणुकीसाठी ४० उमेदवार रिंगणात उतरवले असून, त्यांची पहिली यादीही जाहीर केली आहे. ही माहिती पुणे येथील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला समाजवादी पार्टीचे पुणे शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर उपस्थित होते. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अनिस अहमद, पुणे जिल्हा महिला जिल्हाध्यक्षा साधनाताई शिंदे, पुणे शहर सरचिटणीस दत्ता पाकिरे, तसेच विनायक लांबे, अशोकराव गायकवाड, अनिरुद्ध सूर्यवंशी, शहाजहान झारी, जावेद शेख, प्रकाश डोंबाळे, इब्राहिम यवतमाळवाले, अजिम शेख, भारत मालुसरे आणि सलिम बडगेर यांसारखे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीची पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार, खालील मतदारसंघ आणि प्रभागांमध्ये समाजवादी पार्टी आपले उमेदवार उभे करणार आहे. यात छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ७ (गोखलेनगर – वाकडेवाडी) आणि प्रभाग क्रमांक १२ (छत्रपती शिवाजीनगर – मॉडेल कॉलनी) यांचा समावेश आहे. हडपसर मतदारसंघातून प्रभाग क्रमांक १७ (रामटेकडी – माळवाडी) आणि प्रभाग क्रमांक १९ (कोंढवा खुर्द – कौसरबाग) येथे उमेदवार असतील. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १८ (वानवडी – साळुंखे विहार), खडकवासला मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ३२ (वारजे – पॉप्युलर नगर), वडगाव शेरी मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १ (कळस – धानोरी) आणि प्रभाग क्रमांक ५ (कल्याणी नगर – वडगाव शेरी) येथेही पक्ष उमेदवार देणार आहे. याशिवाय, कसबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ – नाना पेठ) आणि प्रभाग क्रमांक २२ (काशेवाडी – डायस प्लॉट) येथेही समाजवादी पार्टीचे उमेदवार असतील. पुणे शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी, विकासाभिमुख आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर समाजवादी पार्टी आगामी महापालिका निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
राहुल गांधींच्या परदेश दौ-यावर पाळत
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांच्या परदेश दौ-यांवरून देशातील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा आणि आरोप प्रत्यारोप होत असतात. दरम्यान, इंडियन ओव्हरसिज काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधी यांच्या परदेश दौ-यांवरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहे. परदेश दौ-यांदरम्यान, राहुल गांधींवर केंद्र सरकारकडून पाळत […] The post राहुल गांधींच्या परदेश दौ-यावर पाळत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्याचसोबत अनेक ठिकाणी नाराजी नाट्य देखील पाहायला मिळत आहे. पुण्यात शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्याचे ताजे असतानाच आता ठाण्यात शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून या पदावर काम करण्यास असमर्थ असल्याने राजीनामा देत असल्याचे कारण मीनाक्षी शिंदे यांनी दिले आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेसाठी हा धक्का असल्याचे मानले जात आहे. आता यावर पक्ष प्रमुख तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वादाचे मूळ प्रभाग क्रमांक 3 (मनोरमा नगर) मधील राजकीय घडामोडींमध्ये आहे. माजी नगरसेवक भूषण भूईरे यांना पुन्हा तिकीट मिळू नये, यासाठी काही शाखाप्रमुखांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यामध्ये विक्रांत वायचळ यांचा पुढाकार होता. मात्र, ही कृती 'पक्षविरोधी' ठरवत शिवसेनेने वायचळ यांची तडकाफडकी हकालपट्टी केली. वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे या कारवाईचा थेट फटका शिंदे गटाला बसला आहे. मीनाक्षी शिंदे यांनी 2017 मध्ये ठाणे महापालिकेत शिवसेनेला बहुमताचा आकडा (67 जागा) गाठून दिल्यानंतर महापौरपद भूषवले होते. शिवसेनेतील फुटीच्या काळातही त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ खंबीरपणे दिली होती. मात्र, आपल्या समर्थकावर झालेल्या कारवाईमुळे त्या कमालीच्या व्यथित असून त्यांनी राजीनामा अस्त्र उपसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. निवडणुकीपूर्वी पेच वाढला ऐन निवडणुकीच्या धामधुमीत ठाण्यातील हा अंतर्गत वाद पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. मीनाक्षी शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते काय प्रयत्न करतात आणि ठाण्यातील या नाराजी नाट्याचा शेवट कसा होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
राजकीय पक्षांना ‘इलेक्टोरल ट्रस्ट’कडून तब्बल ३,८११ कोटी देणगी
नवी दिल्ली : इलेक्टोरल बॉन्डवरील सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतर, पहिल्या आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये राजकीय पक्षांना नऊ इलेक्टोरल ट्रस्ट्सद्वारे ३,८११ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. यापैकी ३,११२ कोटी रुपये केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला (भाजप) मिळाले. ही माहिती इलेक्टोरल ट्रस्ट्सनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या या अहवालानुसार, इतर […] The post राजकीय पक्षांना ‘इलेक्टोरल ट्रस्ट’कडून तब्बल ३,८११ कोटी देणगी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. भाजपमध्ये सत्तेसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असून, बाहेरून येणाऱ्यांना डोक्यावर बसवले जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. निष्ठावंतांना घरी बसवा आणि बाहेरच्यांना वर बसवा, हेच आज भाजपचं धोरण झालं आहे, असा घणाघाती आरोप करत त्यांनी भाजपच्या पक्षप्रवेश मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सत्तेच्या हव्यासापोटी भाजप कोणालाही जवळ करत असल्याचा टोला देत त्यांनी पक्षातील अंतर्गत अस्वस्थतेकडे लक्ष वेधलं आहे. नाशिकमध्ये नुकत्याच घडलेल्या भाजप पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक आमदार आणि कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला. नाशिकमध्ये भाजपच्या पक्षप्रवेश कार्यक्रमामुळे एका आमदाराच्या डोळ्यात पाणी आलं, ही परिस्थिती खूप काही सांगून जाते, असं म्हणत त्यांनी भाजपवर हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेतल्याचा आरोप केला. स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता वरून लादलेले निर्णय घेतले जात असल्याने भाजपमध्ये अंतर्गत लोकशाही संपुष्टात आली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सत्तेसाठी कोणताही विचार न करता पक्षप्रवेश स्वीकारले जात असल्याने भाजप हा सत्तेसाठी झपाटलेला पक्ष बनल्याची टीका वडेट्टीवार यांनी यावेळी केली. भाजपवर आणखी आक्रमक शब्दांत टीका करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्ता मिळवण्यासाठी भाजपला सगळे चालतात. चोर, बलात्कारी, खुनी, तसेच ईडी आणि सीबीआयच्या कारवायांशी संबंधित लोकही भाजपसाठी चालतात. या शब्दांत त्यांनी भाजपच्या राजकारणावर गंभीर आरोप केले. भाजप सत्तेचा वापर तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांवर दबाव आणण्यासाठी करत असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. भाजपसाठी सत्ता हाच एकमेव अजेंडा राहिल्यामुळे पक्षातील मूळ कार्यकर्ते आणि निष्ठावंत नेते बाजूला पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मुंबईतील दादर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. या बैठकीत राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांचा सखोल आढावा घेण्यात आला. स्थानिक परिस्थिती, संभाव्य उमेदवार, संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांची मनोभूमिका यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्येक महानगरपालिकेची राजकीय स्थिती वेगळी असल्याने एकसारखा निर्णय लादला जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी स्थानिक नेतृत्वाला महत्त्व दिले जाणार असल्याचे सांगितले. काँग्रेस कोणत्याही दबावाखाली निर्णय घेणार नाही महापालिका निवडणुकांबाबत काँग्रेसची रणनीती स्पष्ट करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, जिथे शक्य असेल तिथे आघाडी करून निवडणूक लढवली जाईल आणि जिथे आघाडी शक्य नाही, तिथे काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाईल. स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. काँग्रेस कोणत्याही दबावाखाली निर्णय घेणार नसून, जनतेच्या प्रश्नांवर आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या सत्ताकेंद्रित राजकारणाच्या विरोधात काँग्रेस लोकशाही, संघटन आणि स्थानिक नेतृत्वावर आधारित लढाई उभी करेल, असा निर्धार वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
देशभरात सर्वत्र मकर संक्रांत उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. संक्रांत सण जवळ आला की आकाशात पतंगांची अक्षरशः गर्दी दिसायला लागते. मात्र, हा पतंग उडवण्यासाठी नायलॉन दोऱ्याचा वापर गेल्या काही वर्षात वाढला असून यामुळे अनेक अपघात घडत असल्याचे समोर आले आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांचे गळे देखील चिरल्याच्या घटना घडत आहेत. या नायलॉन मांजाच्या विरोधात नागरिकांनी आता थेट न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने देखील याची गंभीर दखल घेत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने नायलॉन मांजा प्रकरणी गंभीर दखल घेत नागरिकांच्या सूचना व हरकती मागवल्या आहेत. अन्यथा नायलॉन मंजाचा वापर करणाऱ्या मुलांच्या पालकांना आणि विक्री करणाऱ्यांना मोठ्या दंडाची शिक्षा सुनावली जाणार आहे. तसेच या संदर्भात गृह विभागाच्या सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्रे पाठवली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्राणघातक नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर अडीच लाख आणि वापरणाऱ्यांवर 50 हजार रुपये दंड ठोठावण्याच्या सूचना विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नायलॉन मांजाच्या वाढत्या वापरामुळे उद्भवणाऱ्या धोक्यांची दखल घेत, न्यायालयाने 2021 मध्ये स्वतःहून दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. गेल्या तीन वर्षांत परिस्थितीत कोणताही समाधानकारक बदल न झाल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर आणि तो वापरून पतंग उडवणाऱ्यांवर आता कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा ठाम निर्धार न्यायालयाने व्यक्त केला असून प्रशासनाला त्याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 27 डिसेंबर रोजी सर्व वर्तमानपत्रांच्या मुखपृष्ठावर जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नोटीसद्वारे दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात येणार असून, नायलॉन मांजा वापरणारा मुलगा अल्पवयीन असल्यास त्याच्या पालकांना आणि सज्ञान असल्यास संबंधित व्यक्तीला 50 हजार रुपये, तर मांजा विक्रेत्यांना अडीच लाख रुपयांचा दंड का ठोठावण्यात येऊ नये, अशी विचारणा केली जाणार आहे. संबंधितांना सुनावणीची संधी देऊन ही दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. पोलिस अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने नायलॉन मांजाप्रकरणी आता पोलिस प्रशासनाची जबाबदारी निश्चित केली असून, ज्या क्षेत्रात अशा प्रकारची अनुचित घटना घडेल, त्या भागातील संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. या आदेशानुसार, 29 डिसेंबरपूर्वी सर्व पोलिस उपायुक्त व इतर संबंधित अधिकाऱ्यांना या कारवाईबाबत रीतसर सूचना देण्यात याव्यात आणि अशी कारवाई का केली जाऊ नये, याबाबत त्यांचे काही आक्षेप असल्यास त्यांना न्यायालयात आपली बाजू मांडण्याची संधी दिली जावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग:प्रशांत जगताप यांचा राजीनामा, काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना उधाण
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवारांची आणि शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या अनुषंगाने दोन्ही पक्षात बैठका देखील सुरू आहेत. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार यावरून शरद पवार गटात नाराजी दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणजे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा. बुधवारी पत्रकार परिषद घेत प्रशांत जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट करत अखेर राजीनामा दिला. आता ते कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा पुण्यात रंगली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांत जगताप हे कॉंग्रेसमधील नेत्यांच्या संपर्कात आहेत. पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. तसेच पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे आता प्रशांत जगताप नेमका काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच प्रशांत जगताप यांनी आपण कॉंग्रेसच्या विचारांचे असल्याचे स्पष्ट केले होते, त्यामुळे जगताप कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. बुधवारी आपला राजीनामा देताना प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली होती. ते म्हणाले होते की, 27 वर्षांपूर्वी मी सामाजिक व राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले, तेव्हा कुठल्या पदासाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी मी कार्यरत झालो. आज 27 वर्षांनंतरही हेच एकमेव ध्येय माझ्या मनात आहे. यापुढेही पुरोगामी विचारांसाठी माझी सामाजिक व राजकीय वाटचाल सुरूच असेल असे जगताप म्हणाले. आजपर्यंत अत्यंत निष्ठेने मला साथ देणाऱ्या, यापुढेही संघर्षाच्या वाटेवर माझ्यासोबत येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या होत्या. पुढे बोलताना प्रशांत जगताप म्हणाले होते, एका पराभवामुळे भीती बाळगणारा मी नाही. विधानसभेत मी हरलो पण मला तिथल्या सगळ्या लोकांच्या प्रती मला आदर आणि मान आहे. पार्टी कशी निवडणूक लढवेल याची मी तयारी केली होती. माझ्यासारखा कार्यकर्ता व्यथित झाला होता. माझ्या मनात विचारांची घालमेल होती. पण घालमेल माझ्या आयुष्यावर उलटल्याचे प्रशांत जगताप म्हणाले. सद्विवेक बुद्धीला जागरूक ठेवून आणि सगळे प्रसंग डोळ्यासमोर ठेऊन आणि सगळ्या नेत्यांचा मान ठेऊन मी शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडत आहे. मी राजकारणातून बाहेर गेलो नाही असेही त्यांनी सांगितले.
एक कोटीचा इनाम असलेला माओवादी गणेशचा खात्मा
गडचिरोली : छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या ओडिशा राज्यातील माओवादभावित भागात सुरक्षादलाने २५ डिसेंबर रोजी पहाटे मोठे यश मिळवले आहे. ओडिशा-छत्तीसगड सीमेवरील कंधमाल व गंजाम जिल्ह्याच्या सीमावर्ती जंगलात झालेल्या जोरदार चकमकीत दोन महिला माओवाद्यांसह चार माओवादी ठार झाले आहेत. यात संघटनेचा सेंट्रल कमिटी सदस्य व एक कोटी रुपयांचा इनामी कुख्यात माओवादी कमांडर गणेश उईके(६०) याचाही समावेश […] The post एक कोटीचा इनाम असलेला माओवादी गणेशचा खात्मा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी प्रस्तावित असलेली जमीन खासगी विकासकाकडून परत घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) घेतला आहे. या निर्णयाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वागत केले असून, खासगी विकासकाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली आहे. पुण्यातील मंगळवार पेठ परिसरात असलेली अंदाजे ८,९०० चौरस मीटर क्षेत्रफळाची ही जमीन MSRDC ने पुन्हा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात MSRDC ने खासगी विकासक एनजी वेंचर्स, कोरेगाव पार्क, पुणे यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. MSRDC आणि एनजी वेंचर्स यांच्यात ४ सप्टेंबर २०२४ रोजी या जमिनीचा भाडेपट्टा करार झाला होता. मात्र, ही जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असल्याने, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ती परत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महामंडळाने पाठवलेल्या पत्रानुसार, एनजी वेंचर्सला पत्राची प्राप्ती झाल्यापासून १५ दिवसांच्या आत दोनपैकी एक पर्याय निवडण्यास सांगण्यात आले आहे. पहिल्या पर्यायानुसार, कंपनीने भरलेला लीज प्रीमियम, लीज भाडे आणि परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिटची संपूर्ण रक्कम MSRDC कडून परत केली जाईल. दुसऱ्या पर्यायानुसार, MSRDC च्या ताब्यात असलेली कोणतीही पर्यायी जमीन वाटप करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. या जमिनीच्या मागणीसाठी विविध आंबेडकरवादी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा आणि आंदोलने केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनांनुसार आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मध्यस्थीने संघटनांचे पदाधिकारी, नगरविकास विभाग, परिवहन विभाग, महसूल विभाग यांच्यात वेळोवेळी बैठका घेऊन समन्वय साधण्यात आला. या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याचे या कार्यवाहीतून स्पष्ट होत आहे. या निर्णयामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून, सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
१ जानेवारी २०२६ रोजी मौजे पेरणे येथे होणारा २०९ वा कोरेगाव भीमा जयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. जिल्हा प्रशासनाने सुमारे २० लाख भीम अनुयायांना सर्व पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ दिन समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी जास्तीत जास्त आंबेडकरी अनुयायांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांना पिण्याचे पाणी, पार्किंग, शौचालये यासह सर्वच पायाभूत सुविधा दरवर्षीपेक्षा अधिक संख्येने पुरवण्यात येणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीसोबत समाजबांधवांच्या व समन्वय समितीच्या सहापेक्षा अधिक बैठका पार पडल्या आहेत. या बैठकांमध्ये नागरिकांकडून प्राप्त सूचनांच्या आधारे अंतिम नियोजन करण्यात येत आहे, ज्यामुळे यावर्षीचे नियोजन अधिक दर्जेदार व सुविधांनी युक्त राहणार आहे. समाजकंटक व चोरट्या लोकांवर लक्ष केंद्रित करून त्यांचा उपद्रव उत्सवावर होऊ नये यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयातर्फे पहिल्यांदाच ड्रोनद्वारे फेस स्कॅनिंग यंत्रणेचा वापर करून कारवाई करण्यात येणार आहे. अनुयायांची संख्या आणि यापूर्वीच्या अप्रिय घटना लक्षात घेऊन तब्बल १३ हजारपेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त पुणे शहर व पुणे ग्रामीण या दोन्ही मार्फत या ठिकाणी पुरवण्यात येणार आहे. नागरिकांना सुरक्षितता आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण न होऊ देणे या बाबीला प्राधान्य देत सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात पोलिसांनी सर्वतोपरी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन समन्वय समितीच्या वतीने सुमारे एक लाख अनुयायांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव विजय स्तंभाला भेट देण्याच्या घटनेला पुढील वर्षी १०० वर्षे पूर्ण होत असल्याने यंदाचे वर्ष हे बाबासाहेबांच्या मानवंदनेचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. याची सुरुवात १ जानेवारी रोजी होत आहे. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत विजय स्तंभावर अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांचे कुटुंबीय यांचे संयुक्त अभिवादन विजय स्तंभाला करण्याचा विशेष कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. शौर्यस्तंभावरून महार रेजिमेंटची स्थापना करण्याची मागणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली केली होती. या घटनेच्या अनुषंगाने दरवर्षी महार रेजिमेंटचे निवृत्त सैनिक या ठिकाणी लष्करी इतमामात मानवंदना देत आहेत. यावर्षी यशसिद्धी आजी माजी सैनिक फाउंडेशनच्या वतीने सुमारे ३ हजार निवृत्त सैनिकांची मानवंदना राष्ट्रगीताद्वारे दिली जाणार आहे.
मुंबई : प्रतिनिधी बुधवारी रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात मुंबईकडून खेळताना दिसला. जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियमवर मुंबई आणि सिक्किम यांच्यात सामना सुरू होता. यावेळी रोहित बाऊंड्री लाईनवर फील्डिंग करत असताना प्रेक्षकांमधून एका चाहत्याने प्रश्न विचारला, ‘रोहित भाई, वडापाव खाणार का?’ हा प्रश्न ऐकताच रोहित शर्मा हसला आणि हात हलवून नकार दिला. हा साधा, पण […] The post रोहित शर्माला वडापावची ऑफर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘थ्री-इडियट्स’चा सिक्वेल येणार?
मुंबई: ‘३ इडियट्स’ या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वेलबाबत सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. १६ वर्षांनंतर आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत माहिती नसली तरी सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये या चर्चेमुळे प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. गाजलेला चित्रपट ‘थ्री-इडियट्स’ने सर्वांनाच वेड लावले होते. आमिर खान, आर. माधवन, […] The post ‘थ्री-इडियट्स’चा सिक्वेल येणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : प्रतिनिधी प्रकाश आंबेडकर यांनी धर्माच्या नावावर होणा-या ध्रुवीकरणावर प्रहार करताना सांगितले की, भाजप आणि आरएसएसने जाणीवपूर्वक लोकशाहीला हुकूमशाहीत परिवर्तित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तुम्ही धर्मांतर करणार नसाल तर मग धर्माला धोका आहे, हा त्यांचा मुद्दा तुम्हाला पटतोच कसा? हा केवळ जनतेला गुमराह करण्याचा प्रकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आम्ही आणीबाणी भोगली […] The post धर्माच्या नावावर ध्रुवीकरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. काही जागांवर महायुती एकत्र लढणार आहे, तर काही जागांवर स्वबळावर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असतानाच आता ठाण्यातही त्याच दिशेने हालचाल सुरू असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला हे एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. परंतु, नजीब मुल्ला यांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. जितेंद्र आव्हाड हे आमचे दुश्मन नाहीत, आम्हाला जर कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवू आणि त्यावर विचार करू, असे मोठे वक्तव्य नजीब मुल्ला यांनी केले आहे. त्यामुळे ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत- नजीब मुल्ला नजीब मुल्ला म्हणाले, जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. 30 तारखेपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार आणि त्यावर विचार करणार. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणायचे आहे. ठाणे शहरात जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी आता विचार करावा, असे सूचक विधान जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी केले आहे. दरम्यान, बुधवारी महाविकास आघाडीची बैठक ठाण्यात पार पडली. मात्र, जागा वाटप अजून जाहीर झालेली नाही. अजित पवार गटाचे नजीब मुल्ला आणि शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे कट्टर विरोधक मानले जातात. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महायुतीमधून निवडणूक लढवली होती. आता त्या ठाण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी - मनसे एकत्र दरम्यान, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. माजी खासदार राजन विचारे, जितेंद्र आव्हाड, मनसेचे अविनाश जाधव आणि कॉंग्रेसचे विक्रांत चव्हाण यांच्यात बैठक झाली आहे. मात्र, जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप गुलदस्त्यात आहे.
नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या राजकारणात खळबळजनक घडामोडी घडत आहेत. काल मुंबईत वरळीच्या ब्लू सी हॉटेलमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाच्या युतीची घोषणा झाली. त्यानंतर २५ डिसेंबरच्या सकाळपासून नाशिकमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ सुरू झाले आहे. दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षाला भाजपकडून धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. विनायक पांडे आणि यतीन वाघ हे भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर […] The post नाशिकमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विजयी उमेदवाराच्या घराबाहेर कोयत्याने हल्ला; बीड पुन्हा हादरले
बीड : प्रतिनिधी बीडमध्ये नगर परिषद निवडणुकीनंतर धक्कादायक प्रकार घडला आहे. विजयी उमेदवाराच्या घराबाहेर कोयता फिरवत आरोपीने दहशत माजवली. तुझी भावजय नगरसेवकपदी निवडून कशी काय आली? असा जाब विचारत आरोपीने कोयता फिरवला, दोन दुचाकींची तोडफोड केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […] The post विजयी उमेदवाराच्या घराबाहेर कोयत्याने हल्ला; बीड पुन्हा हादरले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असून, हिंगोली शहर स्वच्छ व सुंदर शहर ही संकल्पना राबविली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष रेखा श्रीराम बांगर यांनी गुरुवारी ता २५ दिली. हिंगोली पालिकेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार त्यांनी आज स्वीकारला. यावेळी आमदार संतोष बांगर, ॲड मनीष साकळे, युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम, नगरसेवक श्रीराम बांगर, ॲड अविनाश बांगर, अनिल नैनवाणी यांच्यासह शिंदेसेनेचे नगरसेवक, पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा बांगर व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला यावेळी हिंगोली पालिकेचा पदभार घेतल्यानंतर बोलताना नगराध्यक्ष रेखा बांगर म्हणाल्या की, आमदार संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहराच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हिंगोली शहरातील पाणी प्रश्न महत्त्वाचा असून सर्व प्रभागांना नियमितपणे पाणीपुरवठा होण्यासाठी योग्य नियोजन केले जाईल. त्यासाठी वेळप्रसंगी नवीन जलकुंभ उभारणीचे काम हाती घेतली जाईल. तसेच नवीन वसाहतीमध्ये जलवाहिन्या टाकल्या जातील. यातून नवीन वसाहतीला पाणीपुरवठा केला जाणार आहे. याशिवाय शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे सर्व प्रभागातील ओला व सुका कचरा घंटागाड्यांच्या माध्यमातून एकत्रित करून डम्पिंग ग्राउंड वर कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाणार आहे. या खताचा वापर शहरातील नवीन वसाहती मोकळे मैदान या ठिकाणी लावल्या जाणाऱ्या झाडांसाठी केला जाणार आहे. शहरातील भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून सांडपाणी व्यवस्थापन केले जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात नाल्या तुंबण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. शहरातील सर्व प्रभागांमध्ये रस्ते, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, पथदिवे यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व नगरसेवक व पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून प्रयत्न केले जाणार आहे. नागरिकांनीही त्यांचे प्रश्न पालिका प्रशासनाकडे कळविल्यानंतर तातडीने या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्याचे प्रयत्न आहेत. हिंगोली शहर स्वच्छ व सुंदर शहर ही संकल्पना आगामी काळात राबविली जाणार असून या संकल्पनेसाठी नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा बांगर यांनी केले.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबईत महापौर कोणाला करायचं, यासाठी आमची लढाई नाही, तर महायुतीची सत्ता आणून मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना पुन्हा संधी द्यायची आहे, असा ठाम दावा करत फडणवीसांनी भावनिक राजकारणावरही निशाणा साधला. भ्रष्टाचार, विश्वासघात आणि स्वहिताच्या राजकारणाचा ट्रॅक रेकॉर्ड जनता विसरणार नाही, असा इशारा देत त्यांनी आगामी बीएमसी निवडणूक ही केवळ सत्तेची नव्हे, तर विचारांची लढाई असल्याचं स्पष्ट केलं आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची लढत सर्वाधिक चर्चेत आली असून, राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापताना दिसत आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेतील सत्तासमीकरणे, मराठी अस्मिता आणि नेतृत्वाचा मुद्दा यामुळे निवडणूक प्रचाराला वेगळीच धार प्राप्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार, असा ठाम विश्वास व्यक्त केला होता. या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर या भूमिकेला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीची अधिकृत घोषणा केली. या पत्रकार परिषदेत दोघांनीही महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणूस या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवत निवडणूक रणनितीची दिशा स्पष्ट केली. संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी आपल्या वक्तव्यामागील भावना स्पष्ट करताना सांगितले की, कुठलाही वाद, भांडण किंवा राजकीय मतभेद यापेक्षा महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे. हे विधान केवळ एखाद्या मुलाखतीपुरते मर्यादित नसून, ती त्यांच्या मनातील खोल भावना असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. मुंबईचा कारभार मराठी माणसाच्या हातात असावा, ही भूमिका त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मुंबईच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली असून, विशेषतः महापौरपदाच्या चर्चेला जोर आला आहे. मराठी अस्मितेचा मुद्दा निवडणुकीत केंद्रस्थानी ठेवण्याचे संकेत या युतीतून देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून येणाऱ्या प्रतिक्रियांकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. राज ठाकरे यांच्या मुंबईचा महापौर मराठीच होणार, या विधानावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आणि आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत कोणाला महापौर बनवायचं, यासाठी आमची लढाई नाही, तर मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता आणणं हेच आमचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मुंबई ही कोणाच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा विषय नसून, मुंबईकरांसाठी चाललेली लढाई आहे. मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढायचं आहे, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर टीका केली. तसेच जिहादी मानसिकतेला ठेचण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो असल्याचं सांगत त्यांनी निवडणूक ही केवळ सत्तेसाठी नसून, विचारांची लढाई असल्याचा दावा केला.देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपाच्या इतिहासाचाही उल्लेख करत सांगितले की, मुंबईतच अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा जन्म झाला. त्यामुळे अटलजींचं भव्य आणि योग्य स्मारक मुंबईत उभारलं जावं, ही आमची भूमिका आहे. कोणाला महापौर बनवायचं यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मुंबईकरांच्या विकासासाठी कोण काम करू शकतो, याचा विचार व्हायला हवा, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भावनिक मुद्द्यांपेक्षा कामगिरी महत्त्वाची ठरेल, असा दावा करत त्यांनी महायुतीच्या विकासकामांवर विश्वास व्यक्त केला. मुंबईत सत्तेसाठी नव्हे, तर मुंबईकरांच्या हितासाठी आम्ही लढत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. विरोधकांनी मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचं पाप केले विरोधकांवर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणत्याही पक्षाला निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जे काही करावं लागतं, तेच आज काही पक्ष करत आहेत. निवडणुकीसाठी दोन-चार पक्ष किंवा नेते सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीचं काम पाहूनच मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी आरोप केला की, विरोधकांनी सातत्याने मुंबईकरांचा विश्वासघात केला असून, मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचं पाप केलं आहे. त्यामुळे मराठी जनता आता त्यांच्या सोबत उभी राहणार नाही. यांचा ट्रॅक रेकॉर्ड केवळ भ्रष्टाचार आणि स्वहिताचा राहिला असून, निवडणुका जवळ आल्या की भावनिक भाषणं केली जातात. मात्र आता जनता अशा भावनिक घोषणांना भुलणारी नसून, कामाच्या आधारे निर्णय घेणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक केवळ राजकीय नव्हे, तर विचारधारांचा संघर्ष ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
एका भरधाव वाहनाने ऊसतोड कामगारांच्या बैलगाड्यांना धडक दिल्याची भयंकर घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घडली आहे. या घटनेत 14 ऊसतोड कामगार जखमी झाले असून, एका बैलाचाही मृत्यू झाला आहे. ही धडक एवढी भीषण होती की, बैलगाड्या तब्बल 200 फुटांपर्यंत फरफटत गेल्या. यासंबंधीच्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील काही ऊसतोड कामगार गुरुवारी पहाटे आपल्या बैलगाड्यांसह वृद्धेश्वर साखर कारखाना (पिंपळगाव कासार) येथे ऊसतोडणीसाठी जात होते. त्यांच्या बैलगाड्यांना पहाटे 6 च्या सुमारास तिसगाव - शेवगाव रस्त्यावर समोरून येणाऱ्या एका भरधाव वेगातील वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, बैलगाड्या तब्बल 200 फूट लांब वाहनासोबत फरफटत केल्या. या घटनेत 14 कामगार जखमी झाले. तर एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. इतर 5 बैल गंभीर जखमी झालेत. जखमी कामगारांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. गंभीर जखमींना नगरला हलवले या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तिसगाव येथील श्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवले. तर नाना शेंडगे व शरद शेंडगे या गंभीर जखमींना अहिल्यानगर येतील इम्पल्स रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तिसगाव येथे अभिषेक मरगळ, विशाल मरगळ, कोमल ठेंगल, राणी ठेंगल, अशोक ठेंगल, सीमा शेंडगे, संगीता शेंडगे, बबन शेंडगे, लिलाबाई शेंडगे, आदित्य शेंडगे, तुळजाई शेंडगे व राणी गोल्हार यांच्यावर उपचार सुरू आहेत. बहुतांश जखमींना गंभीर स्वरुपाचे फ्रॅक्चर व अंतर्गत जखमा झाल्या आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनीही या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून रुग्णवाहिका व मदतीची व्यवस्था केली. त्यांनी रुग्णालयात जाऊन तेथील डॉक्टरांशीही चर्चा केली. तसेच जखमींच्या कुटुंबीयांना धीर दिला. या अपघातानंतर स्थानिकांत कमालीचा रोष उसळला आहे. त्यांनी दोषी वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे ऊसतोडणी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरर आला आहे. हे ही वाचा... मी खरा वाघ, ठाकरे बंधू केवळ कागदी:रावसाहेब दानवे यांची टीका; उद्धव ठाकरे शेपटी खाली घालून विधान परिषदेवर गेल्याचा दावा भाजप नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मी ठाकरे बंधूंसारखा कागदी वाघ नाही. मी खरा वाघ आहे. मी डरकाळ्या मारत विधानसभा व लोकसभेत गेलो. आताच्या निवडणुकीनंतर ठाकरेंचे पक्ष अस्तित्वातही राहणार नाहीत, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर
मी गेल्या ४० वर्षांपासून पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती आहे. पक्षासाठी मी कधीही स्वतःची भूमिका जाहीरपणे मांडली नाही, पण आज माझ्या डोळ्यासमोर सामान्य कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल, तर ते मी सहन करू शकत नाही, अशा शब्दांत नाशिक भाजपच्या महापालिका निवडणूक प्रमुख आणि आमदार देवयानी फरांदे यांनी आपली खंत व्यक्त केली. नाशिकमधील बड्या पक्षप्रवेशांनंतर माध्यमांशी बोलताना फरांदे कमालीच्या भावूक झाल्या होत्या, त्यांच्या डोळ्यांत पाणी आले होते. नाशिकमध्ये आज भाजपने 'इनकमिंग'चा धडाका लावत विरोधी पक्षांतील अनेक बड्या मोहऱ्यांना आपल्या गळाला लावले. मात्र, या पक्षप्रवेशावरून नाशिक भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. विशेषतः माजी महापौर यतीन वाघ यांच्या प्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांचा कडाडून विरोध होता. तरीही त्यांच्या शब्दाला डावलून हे पक्षप्रवेश झाल्याने त्या पक्षप्रवेश सोहळ्याला अनुपस्थित राहिल्या. आता देवयानी फरांदे यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. नेमके काय म्हणाल्या देवयानी फरांदे? मी विरोध करण्यापेक्षा त्या मतदारसंघाची आमदार म्हणून माझे असे होते की, त्या ठिकाणी सक्षम उमेदवार बबलू शेलार यांचा प्रवेश झालेला होता. बाहेरून आलेला एक आणि त्याच्यासोबत आमचे उर्वरित तीन उमेदवारांना सोबत घेऊन पक्षाचे पॅनल केले गेले असते, तर ते शंभर टक्के निवडून आले असते, असे लोकप्रतिनिधी या नात्याने माझे मत होते. याशिवाय कुणाच्या पक्षप्रवेशाला विरोध करायचे कारण नाही. कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करतात, जर निवडून येण्याचे संकेल आपल्याल दिसत आहेत, असे मला वाटत होते. यासाठी मी आजची भूमिका मांडलेली होती, असे देवयानी फरांदे यांनी स्पष्ट केले. निष्ठावाणांना कुणी पाठबळ द्यायचे? देवयानी फरांदे म्हणाल्या, गेल्या ४० वर्षांमध्ये मी स्वत:साठी कधीही जाहीर भूमिका घेतली नाही आणि भविष्यात कधी घेणा नाही. मी पक्षाची निष्ठावान कार्यकर्ती आहे. परंतु सर्वांनीच नेते व्हायचे आणि आपापले बघायचे, मग पक्षाच्या निष्ठावान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कुणी पाठबळ द्यायचे? त्यामुळे मी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. देवयानी फरांदे झाल्या भावुक माध्यमांसमोर आपली भूमिका मांडताना देवयानी फरांडे भावून झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मी एक सामान्य कार्यकर्ती आहे. माझ्या डोळ्यासमोर कार्यकर्त्यांचा बळी दिला गेला जात असेल, तर हे मला योग्य वाटले नाही, असे सांगताना आमदार देवयानी फरांदे यांना गहिवरून आले. जे आज पक्षात आलेत, पक्षाचे वरिष्ठ अधिकारी म्हणून मी त्यांचे स्वागत करते. पण आज जे काही घडले, ते मला आवडलेले नाही, असे सांगताना देवयानी फरांदे यांचे डोळे पाणावले. ज्यांना मला कोंडित पकडायचं, त्यांनी पकडावं मला कुणी कोंडित पकडत असतील, तर त्यांनी जरून पकडावे. मी कशालाही घाबरत नाही. परंतु, या सगळ्या विषयांच्या माध्यमातून मला असे वाटते की, माझ्या भूमिकांच्या सोबत आमच्या पक्षाच्या जुन्या नेत्यांनी यामध्ये उभे राहिले असते, तर आज पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगळा संदेश गेला असता. काही दलालांचे महाजनांना चुकीचे ब्रीफिंग मी गिरीश महाजन यांच्यावर अजिबात नाराज नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केले गेले. काही दलाल आणि ज्यांचा काही स्वार्थ की, आपल्याच घरात तिकीटे मिळावी या स्वार्थातून हे सगळे राजकारण झालेले आहे. याविषयावर मला अधिक बोलायचे नाही, असे देवयानी फरांदे यांनी म्हटले. कार्यकर्त्यांची भूमिका वरिष्ठांकडे पोहोचवणार पक्षाच्या दृष्टीकोनातून प्रवेश होतो, तेव्हा पक्ष मोठा होतो. परंतु, पक्ष मोठा होत असताना, निष्ठावंतावर अन्याय व्हायला नको, एवढीच भूमिका मी मांडत होते. आलेल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. परंतु मी वरिष्ठांकडे कार्यकर्त्यांची भूमिका निश्चितपणे पोहोचवेल. गिरीश महाजनांनी मला सांगितले की, आज प्रवेश झालेला असला, तरी उमेदवाऱ्या अद्याप अंतिम झालेल्या नाहीत, असे देवयानी फरांडे यांनी म्हटले.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला धक्का देणाऱ्या प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या एका वक्तव्याने चर्चेला वेग आला आहे. प्रशांत जगताप यांना शुभेच्छा… रोज नई सुबह है; माझं पोट खूप मोठं आहे, असे म्हणत सुळेंनी केवळ प्रतिक्रिया दिली नाही, तर पक्षातील नाराजी, बंडखोरी आणि संभाव्य युतीवर अप्रत्यक्ष पण ठोस संदेश दिला आहे. राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर आलेलं हे विधान केवळ शब्दांचा खेळ नसून, आगामी महापालिका निवडणुकांआधी राष्ट्रवादीतील राजकीय समीकरणांची दिशा स्पष्ट करणारे मानले जात आहे. पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना मंगळवारी घडली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतः हा निर्णय जाहीर केला. जवळपास 27 वर्षांची राजकीय-सामाजिक कारकीर्द असलेल्या जगताप यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपल्या निर्णयामागील भूमिका मांडत, आजवर मिळालेल्या संधींसाठी पक्षनेतृत्वाचे आभार मानले. पद किंवा सत्तेसाठी नव्हे, तर पुरोगामी विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी आपण राजकारणात प्रवेश केला होता आणि हेच ध्येय पुढेही कायम राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशांत जगताप म्हणाले की, 27 वर्षांपूर्वी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पाऊल टाकताना कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती. समाजपरिवर्तनाच्या विचारांशी निष्ठा राखत मी काम करत राहिलो. आजही माझी वैचारिक भूमिका बदललेली नाही. यापुढेही सामाजिक आणि राजकीय जीवनात मी पुरोगामी विचारांसाठी कार्यरत राहीन, असे त्यांनी स्पष्ट केले. आजपर्यंत अत्यंत निष्ठेने साथ दिलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी मनापासून आभार मानले. तसेच, भविष्यातही संघर्षाच्या वाटेवर जे सहकारी माझ्यासोबत राहतील, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा अत्यंत विचारपूर्वक घेतलेला असून, तो कोणत्याही क्षणिक भावनेतून घेतलेला नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मोजक्या पण अर्थपूर्ण शब्दांत प्रतिक्रिया दिली. पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रशांत जगताप यांना मनापासून शुभेच्छा. रोज नई सुबह हैं. याच वेळी त्यांनी आपल्या स्वभावाची झलक दाखवत, माझं पोट खूप मोठं आहे, असे विधान केले. दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार का, तसेच महापालिका निवडणुकांतील जागावाटपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर सुळे म्हणाल्या की, अद्याप अंतिम प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आला की माध्यमांना बोलावून सगळी माहिती दिली जाईल. किती जागा ठरल्या आहेत, याची माहिती सध्या माझ्याकडे नाही. स्थानिक पातळीवर विशाल तांबे, अंकुश काकडे आणि वंदना चव्हाण यादी तयार करतील आणि ती शशिकांत शिंदे यांच्याकडे सादर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार हे महापालिका किंवा स्थानिक निवडणुकांमध्ये थेट सहभागी नसतात, ते देशपातळीचे नेते आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. नगरसेवक पदाची निवडणूक आपण नक्की लढवणार - प्रशांत जगताप राजीनाम्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना प्रशांत जगताप यांनी आपण राजकारणातून बाहेर पडलो नसल्याचे स्पष्ट शब्दांत सांगितले. एका पराभवामुळे मी कधीच घाबरलो नाही. विधानसभेची निवडणूक हरलो, मात्र त्या मतदारसंघातील नागरिकांबद्दल माझ्या मनात आजही आदर आणि कृतज्ञता आहे, असे त्यांनी सांगितले. पक्ष कशी निवडणूक लढवेल, यासाठी मी तयारी करत होतो. मात्र एक कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. ही घालमेल माझ्या आयुष्यावर आणि विचारांवर परिणाम करत होती. सर्व नेत्यांचा मान राखत, सद्विवेक बुद्धीला जागरूक ठेवून आणि सर्व बाजूंनी विचार करून मी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. आपण शशिकांत शिंदे यांना ई-मेलद्वारे राजीनामा पाठवला असून, आगामी काळात नगरसेवक पदाची निवडणूक आपण नक्की लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील युतीला जगताप यांचा विरोध दरम्यान, येत्या 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका होत असताना, पुण्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेले आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांचा राजीनामा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 22 डिसेंबर रोजीच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमधील संभाव्य युतीला जगताप यांनी तीव्र विरोध दर्शविल्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. सलग दोन दिवस त्यांनी सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर अखेर शहराध्यक्ष पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आपल्या राजकीय प्रवासात संधी दिल्याबद्दल त्यांनी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आभार मानले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून आलो असलो, तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना हडपसर-वाणवडी परिसरातील नागरिकांनी मला मोठा पाठिंबा दिला. रस्त्यावर उतरून काम करण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान आहे, असे सांगत प्रशांत जगताप यांनी आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
भाजप नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मी ठाकरे बंधूंसारखा कागदी वाघ नाही. मी खरा वाघ आहे. मी डरकाळ्या मारत विधानसभा व लोकसभेत गेलो. आताच्या निवडणुकीनंतर ठाकरेंचे पक्ष अस्तित्वातही राहणार नाहीत, असे ते म्हणालेत. ठाकरे गट व मनसेची बुधवारी बहुप्रतिक्षित युती झाली. राज व उद्धव ठाकरे यांनी एका हॉटेलमध्ये या युतीची घोषणा केली. यावेळी पत्रकारांनी या युतीवर रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेविषयी प्रश्न केला होता. त्यावर राज ठाकरे यांनी उत्तरे देवाला दिली जातात, दानवांना नाही, असे म्हणत दानवेंना टोला हाणला होता. रावसाहेब दानवेंनी गुरुवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना राज यांच्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ठाकरेंचा एकेक शिलेदार त्यांना सोडून जात आहे रावसाहेब दानवे म्हणाले, ठाकरे बंधू एकत्र आले त्याचा आम्हाला आनंदच आहे. आता दोघांनी पुढच्या काळात पुन्हा विभक्त होण्याची पाळी येऊ नये असे वागू नये. 2019 व 2024 च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी अनैसर्गिक युती केली. ते भाजपला सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. त्यांचे अडीच वर्षांचे सरकार या राज्यातील जनतेला आवडले नाही. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. त्यांचा एकेक शिलेदार त्यांना सोडून गेला. एकीकडे त्यांच्या युतीची पत्रकार परिषद सुरू होती आणि दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून जात होते. माझा मुलगा तिसऱ्यांदा आमदार झाला उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवेंना आता भाजपत कुणीही विचारत नसल्याचीही टीका केली होती. यावर दानवे म्हणाले, भाजपने मला सभापती, आमदार, खासदार, दोनदा केंद्रात मंत्री व राज्यात पक्षाचा अध्यक्ष केले. मला पक्षात कुणी विचारत नसते तर असे केले असते का? माझा मुलगा तिसऱ्यांदा आमदार झाला. उद्धव ठाकरेंसारखा काळा बुरखा घालून, शेपटी खाली घालून मी विधान परिषदेत गेलो नाही. मी खरा वाघ आहे. त्यांच्यासारखा कागदी वाघ नाही. मी डरकाळ्या मारत विधानसभा व लोकसभेत गेलो. मी म्हणालो हे पक्ष निवडणुकीनंतर अस्तित्वात राहणार नाहीत. कारण, प्रचारासाठी फिरताना मला ते समजत होते. ते आता हरले तर कार्यकर्त्यांना त्यांच्यासोबत राहून काही अस्तित्वच राहणार नाही. म्हणून त्यांचे सर्व कार्यकर्ते त्यांना सोडून जातील. दोन्ही भावांवर एकदाट टीका नको. त्यांचे एका होऊन जाऊ द्या, असेही दानवे यावेळी बोलताना म्हणाले. आत्ता पाहू काय म्हणाले होते राज ठाकरे? ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला होता. ही उद्धव ठाकरे यांची ही शेवटची निवडणूक आहे. त्यानंतर त्यांच्या पक्षात कार्यकर्तेच राहणार नाहीत असे लोक म्हणत आहेत. त्यावर राज ठाकरे म्हणाले, लोक म्हणजे कोण? त्यावर पत्रकाराने भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे नाव घेतले. त्यावर राज ठाकरे हे आपले बंधू उद्धव यांच्या मदतीला धावून आले आणि म्हणाले, मला असे वाटते उत्तरे देवाला द्यावीत, दानवांना नाही.
सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर निशाणा साधला होता. या प्रकरणी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मुंबई व तेथील मराठी माणसांसाठी काय केले? असा खोचक सवाल उपस्थित केला होता. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी शिंदेंच्या 2020 मधील एका ट्विटचा दाखला देत ठाकरेंनी मुंबईसाठी काय केले हे दाखवून दिले आहे. तसेच शिंदेंना ही पोस्ट डिलीट न करण्याची गळही घातली आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युती करण्याची घोषणा केली आहे. यामुळे महायुतीचे मुंबईतील राजकीय समीकरण बिघडल्याचा दावा केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी ठाकरे बंधूंवर निशाणा साधत त्यांनी मुंबई व तेथील मराठी माणसांसाठी काहीच केले नसल्याचा दावा केला होता. त्यांच्या या टीकेनंतर सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांची एक जुनी पोस्ट पोस्ट शेअर केली आहे. फक्त पोस्ट डिलीट करू नका - सुषमा अंधारे उद्धव साहेबांनी मुंबई आणि मुंबईतल्या मराठी माणसासाठी काय केलं याचा लेखाजोखा तुम्ही स्वतः मांडत आहात. फक्त पोस्ट डिलीट करू नका तुम्हाला तुमचे गुरु आनंद दिघे यांची शपथ आहे, असे सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. आध्यात्मिक समागम आहे का? सुषमा अंधारेंनी अन्य एका ट्विटद्वारे भाजपवरही निशाणा साधला. ठाकरेंनी युती केली म्हणजे सत्तेसाठी असं जर फडणवीसंच म्हणणं असेल तर मग अजित पवार अशोक चव्हाण आणि शिंदे सोबत असणारे तमाम भ्रष्टाचारी यांच्यासोबत भाजपने केलेली युती म्हणजे काय आध्यात्मिक समागम आहे का? असा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला. काय आहे एकनाथ शिंदेंच्या पोस्टमध्ये? एकनाथ शिंदे आपल्या 23 फेब्रुवारी 2020 च्या पोस्टमध्ये म्हणतात, गिरणी कामगारांच्या घरांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. याप्रसंगी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे,माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे,मुख्य सचिव अजोय मेहता,गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर उपस्थित होते. म्हाडाच्या मुंबईतील 3900 घरांची लॉटरी प्रक्रिया 1 मार्चपासून आणि MMRDA च्या रेंटल हाऊसिंग स्कीममधील 2000 हून अधिक घरांची लॉटरी प्रक्रिया 1 एप्रिल पासून सुरुवात करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री यांनी दिले. ठाणे परिसरातील 36 हेक्टर जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी हस्तांतरित करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. शिंदेंनी ठाकरे बंधूंवर काय केली होती टीका? एकनाथ शिंदे ठाकरे बंधूंवर टीका करताना म्हणाले होते, लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जनतेचा महायुतीला कौल मिळाला आहे. त्यामुळे सत्तेसाठी झालेल्या युत्यांमुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही. यांनी मुंबई महापालिकेकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिले. आता ती कोंबडीच कापून खाण्याचे काम सुरू आहे. ठाकरे बंधूंची युती ही स्वार्थासाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. जनता त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवेल. युती झाली तरी विठ्ठल आमच्याकडे आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेत मुंबईच्या विकासावर एक शब्दही बोलला गेला नाही. त्यांच्याकडे मुंबईच्या विकासाचा अजेंडा नाही. यांचा अजेंडा फक्त सत्तेसाठी आहे. बाळासाहेबांचा विचार ज्यांनी सोडला, त्यांना जनतेने आधीच त्यांची जागा दाखवली आहे. असली आणि नकली काय, हे नगरपालिकेच्या निवडणुकांत स्पष्ट झाले. आमचा अजेंडा स्पष्ट आहे, मुंबईचा विकास. त्यांनी मुंबईसाठी नेमकं काय केले हे सांगावे. मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला, त्याला हेच जबाबदार आहेत. त्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आम्ही करणार आहोत. रमाबाई आंबेडकर नगरमधील 17 हजार घरांचा प्रकल्प आम्ही मार्गी लावला आहे. त्यांच्या अजेंडामध्ये असे काय आहे? असा सवाल शिंदेंनी केला. निवडणुका आल्या की, ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार’ असे फलक लावले जातात. पण मुंबईकर सुज्ञ आहेत. त्यांना विकास हवा आहे. आमचे निर्णय मुंबईकरांच्या हिताचे आहेत. पुढील सहा महिन्यांत मुंबई खड्डेमुक्त होईल. कोरोनाच्या काळात फक्त पैसे खाल्ले गेले. जे स्वतःच्या पोरांना सांभाळू शकत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
विजयाचा गुलाल उधळल्यानंतर नगरसेविका भाग्यश्री जगताप करताहेत फळविक्री
पुणे : नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अनेक विजयी उमेदवार आपल्या समर्थकांसह अद्यापही विजयोत्सव साजरा करीत आहेत. पण निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन अवघे केवळ २४ तास उलटत नाहीत तोच एक नगरसेविका आपल्या हातगाडीवर फळविक्री करताना दिसल्या. संघर्ष, कष्ट व जिद्दीचा हा प्रवास आज विजयात बदलल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. मावळ व लोणावळा परिसरात […] The post विजयाचा गुलाल उधळल्यानंतर नगरसेविका भाग्यश्री जगताप करताहेत फळविक्री appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर?
पुणे : शरद पवार गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मी पक्षातून राजीनामा देईन, असा इशारा दिला होता. मात्र, प्रशांत जगताप यांच्या या इशा-याने पक्षाने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. अखेर सुप्रिया सुळेंच्या पत्रकार परिषदेनंतर प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, […] The post प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चंद्रपुरात भीषण अपघात; चार महिला ठार, पाच जण जखमी
चंद्रपूर : नागपूरहून कागजनगरकडे जात असलेली मारुती सुझुकी इर्टिका कार पुलाखाली कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (२५ डिसेंबर) पहाटे सुमारे दीडच्या सुमारास राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ घडली. टीएस ०२ ईएन ५५४४ क्रमांकाची इर्टिका कार सोंडो गावाजवळील वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा […] The post चंद्रपुरात भीषण अपघात; चार महिला ठार, पाच जण जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कुड्डालोर : वृत्तसंस्था तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात रात्री झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. चार जण गंभीर जखमी झाले. तिरुचिरापल्लीहून चेन्नईला जाणा-या एका रोडवेज बसचे टायर फुटल्याने राज्य महामार्गावर अपघात झाला. टायर फुटल्यानंतर बस अनियंत्रित झाली, दुभाजकावर चढली आणि विरुद्ध लेनमध्ये गेली, ज्यामुळे समोरून येणा-या दोन कार चिरडल्या गेल्या. दोन्ही कार बसखाली अडकून पूर्णपणे चिरडल्या […] The post धावत्या बसचे टायर फुटून ९ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने आपली रणनीती स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत आमची सकारात्मक चर्चा सुरू असून २८ स्थानिक पातळीवर दोन्ही संघटनांचे नेते संवाद साधत आहेत. मात्र, 'मनसे'सोबत चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसची भूमिका मांडली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाच्या बैठक आज मुंबईत पार पडली. पहिल्या सत्रात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला महापालिकांचा आढावा घेण्यात आला. बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळ माध्यमांशी बोलत होते. 'वंचित'सोबत युतीसाठी सकारात्मक पाऊल प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याबाबत सपकाळ म्हणाले की, मुंबईत वंचित आणि काँग्रेसने एकत्र यावे, अशी अनेकांची इच्छा आहे. नगरपालिका निवडणुकीच्या वेळी आम्ही सर्व निर्णय जिल्हा स्तरावर सोपवले होते, त्याचप्रमाणे आताही २८ ठिकाणी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये युतीबाबत चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांच्या 'काँग्रेस युती करत नाही' या आरोपावर बोलताना, हा 'नरेटिव्ह'चा गुंता सुटला पाहिजे आणि दोन्ही बाजूंनी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे सूत्र सपकाळ यांनी स्पष्ट केले की, महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना (ठाकरे गट) सोबत चर्चा सुरू असून त्याबाबतच्या सूचना संघटनेला आधीच देण्यात आल्या आहेत. 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या व्यतिरिक्त सध्या कोणाचाही प्रस्ताव काँग्रेसकडे आलेला नाही. जर कोणाचा नवीन प्रस्ताव आला, तर त्यावर विचार केला जाईल, असे संकेत त्यांनी दिले. युती-आघाडीचा स्थानिक नेतृत्वाकडे अधिकार नगरपालिका निवडणुकीच्या अनुभवावरून काँग्रेसने आगामी महापालिकांसाठी देखील 'स्थानिक पातळीवर अधिकार' देण्याचे धोरण अवलंबले आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि तेथील राजकीय समीकरणे पाहूनच अंतिम निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील बदलत्या समीकरणांवर भाष्य करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन गोष्टी स्पष्ट केल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत काँग्रेस कधीही जाणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा काँग्रेस करणार नाही, असे सपकाळ म्हणालेत.
हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला उभारी देण्यासाठी प्रदेश पातळीवरून हालचाली सुरु झाल्या असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली आहे. त्यांना मुंबई येथे चर्चेसाठी येण्याचे निमंत्रणही दिले आहे. त्यामुळे जिल्हयातील राजकिय हालचाली गतीमान झाल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची अंतर्गत गटबाजीने वाताहात झाली आहे. कळमनुरीचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे, हिंगोलीचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, दिलीप देसाई यांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून पक्षाचे राजिनामे दिले आहेत. त्यामुळे पक्षामध्ये वसमत तालुका वगळता इतर ठिकाणी मोठा नेताच शिल्लक राहिला नाही. त्यातच आता विधान परिषद सदस्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी पदाचा राजिनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यामुळे पक्षाची स्थिती अत्यंत दयनिय झाली आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरु झाले आहेत. या संदर्भात पक्ष निरीक्षक साहेबराव कांबळे यांनी जिल्हयातील सर्व घटनाक्रमाची माहिती वरिष्ठ नेत्यांच्या कानावर टाकली आहे. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून हिंगोली जिल्हयाकडे विशेष लक्ष देण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्कही साधला आहे. त्यांना काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेशाची गळ घातली आहे. त्यासाठी चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्याचे निमंत्रणही दिले आहे. तर दुसरीकडे हिंगोलीच्या माजी पालकमंत्री खा. वर्षा गायकवाड यांनीही डॉ. टारफे यांच्यासह त्यांच्या समर्थकांशी संपर्क साधला असून पक्षात पुन्हा परतण्याची अटकळ घातली आहे. त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवरूनच राजकिय हालचाली गतीमान झाल्या आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे हिंगोली जिल्हा निरीक्षक साहेबराव कांबळे यांनी लवकरच हिंगोलीत येणार असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन नव्याने कार्यकारीणी जाहिर केली जाणार असल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी पदे रिक्त आहेत त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची निवड केली जाणार असूुून बुथ पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंतच्या कार्यकारीणीत बदल केले जाणार असल्याचे सांगितले. माजी आमदार डॉ. टारफेंचा वेट अँड वॉच काँग्रेसच्या प्रदेशपातळीवरील नेत्यांनी संपर्क साधला असला तरी दुसरीकडे मात्र माजी आमदार डॉ. टारफे यांनी वेट ॲण्ड वॉचची भुमीका घेतली आहे. या संदर्भात त्यांच्याकडून कुठलेही भाष्य करण्याचे करण्याचे टाळले जात आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी 'दशावतार' चित्रपटातील 'बाबुली मेस्त्री' ही भूमिका आव्हानात्मक वाटल्याने स्वीकारल्याचे सांगितले. कोहिनूर कट्टा प्रस्तुत 'दशावतार नाबाद १००' या कार्यक्रमात ते बोलत होते. या चित्रपटाने १०० दिवसांचा यशस्वी प्रवास पूर्ण केल्यानिमित्त कलाकारांचा सत्कार आणि संवाद सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे येथे पार पडला. कोकणातील परंपरा, वारसा, संस्कृती आणि पर्यावरण रक्षण यावर भाष्य करणारा 'दशावतार' चित्रपट २०२५ मधील बहुचर्चित चित्रपटांपैकी एक आहे. कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे कार्यकारी संचालक प्रकाश मगदूम, लागू बंधूंचे सारंग लागू आणि संयोजक वीरेंद्र चित्राव यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. या दृक्-श्राव्य कार्यक्रमात दिलीप प्रभावळकर यांच्यासह दिग्दर्शक सुबोध खानोलकर, निर्माता सुजय हांडे, कलाकार सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शनी इंदलकर आणि पर्यावरणतज्ज्ञ डॉ. गुरुदास नूलकर यांचा सहभाग होता. अजित भुरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी चित्रपट निर्मितीतील काही महत्त्वपूर्ण क्षण आणि प्रसंग दाखवण्यात आले. प्रभावळकर यांनी 'बाबुली मेस्त्री' भूमिकेसाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिक तयारी करावी लागल्याचे सांगितले. चित्रपटाची संहिता मानसिक तयारीसाठी उपयुक्त ठरली, तर दिग्दर्शकाचे मार्गदर्शन आणि तरुण सहकलाकारांचे सहकार्य भावनिक तयारीसाठी महत्त्वाचे ठरले. त्यांच्यातील उत्साह आणि ऊर्जेचा सकारात्मक परिणाम झाल्याचे त्यांनी नमूद केले. या भूमिकेसाठी तयारी करताना त्यांनी दशावताराचा प्रत्यक्ष प्रयोग पाहिला, अनेक कलाकारांच्या भेटी घेतल्या आणि दशावतारी कलाकारांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा केली. मिताभिनय आणि जोरकस अभिनय यांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला. कोकणातील मूळ दशावतारी कलाकारांनी चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही आमचे प्रतिनिधित्व केले अशी दिलेली दाद आपल्यासाठी खूप मोलाची ठरल्याचे प्रभावळकर यांनी सांगितले.
पुणे येथे आयोजित हिंदुत्व जागृती सभेत हिंदुत्ववादी पक्षांना इशारा देण्यात आला आहे. हिंदुत्वाची उपेक्षा थांबवून मुस्लिमांचे लांगुलचालन न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. अन्यथा, भारतीय जनता पक्षाची (भाजप) अवस्था काँग्रेससारखी दयनीय होईल, असे वक्तव्य सभेत करण्यात आले. दहशतवादमुक्त आणि सुरक्षित पुण्यासाठी भाजपची उमेदवारी यादी मुस्लिममुक्त असावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. 'ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याला मतदान टाळा' या मोहिमेसाठी समस्त हिंदू आघाडीच्या वतीने शिवाजीनगर येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये या हिंदुत्व जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. हभप संग्रामबापू भंडारे, क्रांतिकारी देशभक्त समीर कुलकर्णी आणि मिलिंद एकबोटे यांनी सभेला संबोधित केले. भाजप नेत्यांचा गुंडांना पाठिंबा मिलिंद एकबोटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पुण्यात हिंदुत्वाची उपेक्षा सुरू आहे. भाजपचे नेते गुंडांना पाठिंबा देत असून, हिंदू बांधवांवर हल्ले करणाऱ्या मुस्लिमांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह करत आहेत. हे चित्र दुर्दैवी असून, यामुळे धर्मासाठी आणि देशासाठी आयुष्य वेचणाऱ्या प्रामाणिक नेत्यांवर अन्याय होत आहे. एकबोटे यांनी पुढे म्हटले की, या विशिष्ट राजकीय धोरणामुळे पुण्यातील सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत आहे. दिल्लीतील कार स्फोटाचे संबंध कोंढव्यातील अतिरेक्यांपर्यंत पोहोचतात आणि कोंढव्यातील अतिरेकी प्रवृत्तीचा विस्तार शहरभर झाला आहे, ही गंभीर बाब आहे. स्थानिक शीर्ष नेतृत्व भाजपची पुण्याई वाया घालवत आहे. हज हाऊस बांधण्यासाठी आग्रही असणारेच आज पुन्हा मुस्लिमांना उमेदवारी देण्यात आघाडीवर आहेत. या निवडणुकीत हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्या नेत्यांना व पक्षाला जागा दाखवून देऊ, मग तो पक्ष भाजप असो की शिवसेना, असे आवाहन त्यांनी केले. 'ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याला मतदान टाळा' हा वेदमंत्र अमलात आणून येणाऱ्या निवडणुकीत हिंदू उमेदवारालाच मतदान करून हिंदुत्व भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मिलिंद एकबोटे यांनी केले. हिंदू सहिष्णू, पण त्याच्यावर सातत्याने आघात हभप संग्रामबापू भंडारे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, हिंदू सहिष्णू असून सर्व धर्मियांना सोबत घेऊन जाणारा धर्म आहे. मात्र, यावर सातत्याने आघात होत आहेत. अशा परिस्थितीत आपले हिंदुत्व जागृत ठेवण्याची गरज आहे. हिदूंची ताकद विभागली गेली समीर कुलकर्णी म्हणाले, हिंदुत्वाशी पंगा घेणाऱ्यांना तोंड दाखवायलाही जागा राहत नाही, हे आजच्या काँग्रेसच्या परिस्थितीवरून दिसून येते. हिंदूंची ताकद विभागली गेली आहे. त्यामुळे या राजकीय पक्षांचे फावले आहे. यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी हिंदुत्वाची ताकद एकवटली पाहिजे. देव, धर्म आणि देश हाच आपल्या जगण्याचा पाया आहे. परिवर्तन घडवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. त्यामुळे जिहाद्यांना खांद्यावर घेऊन मिरवण्याचे प्रकार बंद व्हावेत. आचार आणि विचार यामध्ये अंतर असता कामा नये. मात्र, आज हिंदुत्वाचा विचार घेऊन राजकारण करणाऱ्यांचे आचरण पाहिले, तर संताप यावा, अशी स्थिती आहे. हिंदू बांधव आणि हिंदुत्वाच्या विचारांवर चालणाऱ्या मतदारांमुळे आपल्या हाती सत्ता मिळाली, याचा विसर सत्ताधाऱ्यांनी पडू देऊ नये.
राज्यभरात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक शहरात इच्छुक उमेदवार, पक्षनेते आणि कार्यकर्ते सक्रिय झाले असून, सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेची. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएमसीच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते. याच पार्श्वभूमीवर काल मुंबईत मोठी राजकीय घडामोड घडली. अनेक वर्षांच्या मतभेदांनंतर मनोमिलन होत ठाकरे बंधू, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढवण्याची अधिकृत घोषणा केली. या घोषणेसह बीएमसी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला असून, महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा थेट सामना रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या घडामोडींमुळे मुंबईच्या राजकारणात एकीकडे चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे विधीज्ञ गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. आपल्या हटके वक्तव्यांमुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे ओळखले जाणारे गुणरत्न सदावर्ते हे विशेषतः ठाकरे बंधूंवर सातत्याने टीका करताना दिसतात. ठाकरे बंधूंविरोधातील त्यांच्या वक्तव्यांमुळे ते यापूर्वीही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधू विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असताना, सदावर्ते यांनी पुन्हा एकदा वेगळ्याच कारणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी त्यांच्या वक्तव्यांपेक्षा त्यांच्या एका अनोख्या खुर्चीची अधिक चर्चा होताना दिसत आहे. सध्या गुणरत्न सदावर्ते हे मुंबईतील परळ परिसरात असलेल्या क्रिस्टल टॉवर या इमारतीत वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे, या इमारतीच्या अगदी समोरच त्यांचे अत्याधुनिक आणि सुसज्ज असे कार्यालय आहे. याच कार्यालयात ते अनेकदा पत्रकार परिषद घेऊन राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडताना दिसतात. आतापर्यंत साध्या खुर्चीवर बसून पत्रकारांशी संवाद साधणारे सदावर्ते आता मात्र एका वेगळ्याच खुर्चीवर विराजमान होताना पाहायला मिळणार आहेत. कमळाच्या रचनेवर आधारित, महाराजांच्या सिंहासनासारखी भासणारी ही भव्य खुर्ची सध्या माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. या खुर्चीमुळे सदावर्तेंची प्रतिमा आणखी वेगळ्या पद्धतीने समोर येत असल्याचे दिसून येते. या कमळ प्रतिकृती असलेल्या खुर्चीमागचा नेमका हेतू काय, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. गुणरत्न सदावर्ते हे अनेक वेळा सार्वजनिक मंचांवर आणि माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उघडपणे प्रशंसा करताना दिसले आहेत. त्यामुळे कमळाच्या आकाराची ही खुर्ची राजकीय संकेत देणारी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, यावर सदावर्ते यांच्याकडून अद्याप कोणतेही स्पष्ट स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे ही खुर्ची केवळ एक वैयक्तिक आवड आहे की आगामी राजकीय भूमिकेचा संकेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. दरम्यान, ठाकरे बंधूंची युती, बीएमसी निवडणूक आणि सदावर्तेंची ही ‘राजेशाही खुर्ची’ या सगळ्या गोष्टी एकत्र येत मुंबईच्या राजकारणाला वेगळीच धार मिळताना दिसत आहे. कमळ सदृश खुर्चीमागील अर्थाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या पार्श्वभूमीवर नजर टाकली तर ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून, शिक्षणासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई येथे वास्तव केले आहे. त्यांनी एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण घेतले असून, विद्यार्थी दशेतच विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. पुढे त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात प्रवेश केला आणि मुंबईत स्थायिक होऊन वकिली सुरू केली. 2018 साली महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास (SEBC) प्रवर्गाअंतर्गत दिलेल्या आरक्षणाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्या खटल्यामुळे ते राज्यभर चर्चेत आले. ते आणि त्यांची पत्नी वकील जयश्री पाटील हे दोघेही विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर सातत्याने व्यक्त होत असतात. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदावर्ते पुन्हा चर्चेत आले असून, त्यांच्या पुढील भूमिकेकडे आणि या कमळसदृश खुर्चीमागील अर्थाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगपात यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची अक्षरशः लायकी काढली आहे. मी विचारधारा मान्य करून लोकांच्या मतांवर निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे. अमोल मिटकरी यांच्यासारख्या विदूषक व फुटकळ आमदाराच्या विधानावर मी भाष्य करत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुण्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट या निवडणुकीला एकत्रपणे सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाशी वाटाघाटी सुरू आहेत. त्याला विरोध म्हणून प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी प्रशांत जगताप यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता प्रशांत जगताप यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरींची ग्रामपंचायतही निवडून आणण्याची लायकी नाही मी विचारधारा मान्य करून लोकांच्या मतांवर निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे. अमोल मिटकरी यांच्यासारख्या विदूषक व फुटकळ आमदाराच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही. ज्यांची ग्रामपंचायत ही निवडून येण्याची लायकी नाही, त्यांच्यावर मी काय बोलावे? अमोल मिटकरी हे तडजोड करणारे विदुषी व फुटकळ नेते आहेत. जे लोकांतून निवडून आले असतील, त्यांनी माझ्याशी बोलावे, असे प्रशांत जगताप यांनी आमदार अमोल मिटकरी यांचा खरपूस समाचार घेताना म्हटले आहे. आत्ता पाहू काय म्हणाले होते अमोल मिटकरी? प्रशांत जगपात यांच्या राजीनाम्यानंतर अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. या प्रकरणी त्यांनी त्यांना स्वतःची खुमखुमी दाखवण्यासाठी स्वतःचा पक्ष काढण्याचा उपरोधिक सल्ला दिला होता. ते म्हणाले होते, अजितदादांच्या पुण्याईने विविध पदांवर पुण्यात शेखी मिरवणाऱ्या पुण्याच्या माजी महापौराला कोर कमिटी व ज्येष्ठ नेत्यांच्या एकत्र येण्याच्या निर्णयाने चांगलाच जुलाब लागलाय. मागच्या काळात राजकीय संन्यास घेणार, राजीनामा देणार, अशा वल्गना करत निष्ठावंत वगैरे बिरुदावली चढवत भावी खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या उपटसुंभाचा पीळ स्वभावाप्रमाणे कायम राहणार यात शंका नाही. खरच पुण्यात स्वतःच अस्तित्व दाखवायची खुमखुमी असेल तर स्वत:चा एखादा पक्ष काढ की बाबा. पुण्याचा भावी “खाज”दार, असे ते म्हणाले होते. हे ही वाचा... दोन शून्यांची बेरीज शून्याएवढीच असते:ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भाजपने मांडले मतांचे गणित; वाचा काय आहे मतांचे समीकरण? मनसे व ठाकरे गटाच्या युतीची काल घोषणा झाली. यामुळे मुंबईतील भाजपचे मतांचे गणित बिघडल्याचा दावा केला जात असताना भाजपने ठाकरे बंधूंच्या युतीचा आपल्याला मतांच्या राजकारणाला कोणताही फटका बसणार नसल्याचा दावा केला आहे. दोन भावांच्या ‘एकत्र येण्याचा आनंद’ म्हणून जो भावनिक महापूर दाखवला जातोय, तो ओसरल्यानंतर वास्तवातला मतांचा दुष्काळ दिसणारच आहे. कारण राजकारणात घोषणा नाही, आकडेवारी बोलते. निव्वळ भावना मतपेटी भरत नाहीत. दोन शून्यांची बेरीज शून्याएवढीच असते, असे भाजपने म्हटले आहे. वाचा सविस्तर
कर्नाटकात भीषण अपघाताने वाहनांना आग, ९ ठार
चित्रदुर्ग : वृत्तसंस्था कर्नाटकातील चित्रदुर्गात गुरुवारी (२५ डिसेंबर) पहाटे एक भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झालाय. एका लॉरीची एका खासगी ट्रॅव्हल बसशी जोरदार टक्कर झाल्याने हा अपघात झाला असून, धडकेनंतर बस आणि लॉरी दोघांनाही आग लागली. या अपघातात बस पूर्णपणे जळून खाक झाली असून, अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, […] The post कर्नाटकात भीषण अपघाताने वाहनांना आग, ९ ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे-नगर रस्त्यावर वाहतुकीत बदल:जयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे निमित्त; कोरेगाव भीमाला कसे जायचे? वाचा
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०२६ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजल्यापासून हे बदल लागू होतील. राज्याच्या विविध भागांतून आंबेडकरी चळवळीतील अनुयायी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे वाहतूक बदल १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली. पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव चौफुला, न्हावरा, शिरूरमार्गे नगर रस्त्याकडे जावे. सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरून विश्रांतवाडीकडे जाऊन तेथून आळंदी आणि चाकणकडे जावे. मुंबईकडून नगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नगरकडे जावे. हलक्या वाहनांसाठी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे नगरकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध असेल. कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रजमार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी हडपसर येथून केडगाव चौफुलामार्गे शिरूरकडे जावे. इंद्रायणी नदीवरील आळंदी-तुळापूर पूल जड वाहतुकीस बंद करण्यात आला असून, या पुलावरून केवळ अनुयायांच्या हलक्या वाहनांना प्रवेश दिला जाईल. विश्रांतवाडी, लोहगावमार्गे वाघोलीकडे जाणारी जडवाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे. जयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनाने वाहनतळांची सोय केली आहे. लोणीकंद येथील आपले घर, बौद्ध वस्ती, तुळापूर फाटा स्टफ कंपनीशेजारी (मोटारी व हलकी चारचाकी वाहने), आपले घर शेजारील वाहनतळ, मोनिका हॉटेलशेजारी, तुळापूर फाटा रौनक स्वीटजवळ (दुचाकी वाहने), तसेच थेऊर रस्ता, खंडोबाचा माळ, लोणीकंद आपले घर सोसायटीजवळील मोकळी जागा (बस, टेम्पो) येथे वाहने उभी करता येतील. याव्यतिरिक्त पेरणे गाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील मोकळे मैदान, थेऊर रस्ता, ज्ञानमुद्रा ॲकॅडमी मैदान आणि सोमवंशी ॲकॅडमी येथेही पार्किंगची व्यवस्था आहे. शहरात जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. लोणी काळभोर परिसरातील थेऊर फाटा, खडकीतील हॅरीस पूल, विश्रांतवाडीतील बोपखेल फाटा, बाणेरमधील राधा चौक, सिंहगड रस्ता भागातील नवले पूल, कात्रज चौक, कोंढव्यातील खडी मशीन चौक, फुरसुंगीतील मंतरवाडी फाटा, मरकळ पूल येथून शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद असेल.
देशातील पहिल्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला मुंबईत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे सुरू असलेल्या बुलेट ट्रेन स्थानकाच्या बांधकामात वायू प्रदूषणाचे नियम पायदळी तुडवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई महानगरपालिकेने या प्रकल्पाचे काम तातडीने थांबवण्याची नोटीस बजावली आहे. या कारवाईमुळे बुलेट ट्रेनच्या कामाला तात्पुरता 'ब्रेक' लागला आहे. बीकेसी परिसरात बुलेट ट्रेनच्या स्थानकाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या बांधकामामुळे परिसरात धुळीचे लोट उसळत असून प्रदूषणात प्रचंड वाढ होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. पालिकेच्या पथकाने तपास केला असता, या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या पाणी फवारणीच्या नियमांचे पालन केले जात नव्हते. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मुंबई महापालिकेने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. जोपर्यंत प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक सुधारणा केल्या जात नाहीत, तोपर्यंत काम सुरू करू नये, असा इशारा पालिकेने दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाची कडक भूमिका मुंबईतील हवेची खालावलेली गुणवत्ता लक्षात घेता, मुंबई उच्च न्यायालय या प्रकरणावर स्वतः देखरेख करत आहे. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, जेथे नियमांचे उल्लंघन होईल, तेथे काम थांबवण्याचे आदेश देण्यात यावेत. न्यायालयाने पालिका आयुक्त आणि एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेवरही ताशेरे ओढले असून, अधिकाऱ्यांनी वैयक्तिकरीत्या स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. पॅनेलच्या अहवालात धक्कादायक वास्तव दक्षिण मुंबईतील फोर्ट, कफ परेड आणि कुलाबा भागातील विविध बांधकामांच्या पाहणीसाठी नेमलेल्या समितीने धक्कादायक माहिती समोर आणली आहे. या ठिकाणांवर एअर क्वालिटी मॉनिटर चक्क तळमजल्यावर लावला होता, ज्यामुळे अचूक माहिती मिळत नव्हती. कल्पतरू चेंबर्स, डीजी चेंबर आणि मॅजेस्टिक आमदार निवास या तीनही ठिकाणी नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे आढळले. स्मॉग गन, फॉगिंग आणि पाणी फवारणी केवळ अधिकाऱ्यांच्या पाहणीपुरती किंवा मर्यादित स्वरूपात केली जात असल्याचे निरीक्षण समितीने नोंदवले आहे. पायाभूत प्रकल्पांना 'प्रदूषण' नियमांचे बंधन केवळ खासगी विकासकच नव्हे, तर बुलेट ट्रेन आणि मेट्रोसारख्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही आता प्रदूषण नियंत्रणाचे कडक नियम पाळावे लागणार आहेत. जर या नियमांचे पालन झाले नाही, तर यापुढे आणखी कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संकेत मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत. प्रदूषण आणि विकास यांच्यात समतोल राखण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनासमोर उभे ठाकले असून, बुलेट ट्रेनचे काम पुन्हा कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, मुदखेड तालुक्यात खळबळ
नांदेड/ मुदखेड : प्रतिनिधी एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे उघडकीस आली. मृतांमध्ये आई-वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे सदर घटना संशयास्पद असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मुदखेड तालुक्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथील दोन मुलं रेल्वे खाली कटली आहेत. तर त्या मुलाच्या आई-वडिलांनी […] The post एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, मुदखेड तालुक्यात खळबळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मंगळवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे शरद पवार गटाला जबर झटका बसल्याचे मानले जात आहे. त्यातच सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा माजी मंत्री रवींद्र धंगेकर यांनी त्यांना शरद पवारांची साथ न सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या सल्ल्याची स्थानिक राजकारणात खमंग चर्चा रंगली आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने पुण्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट या निवडणुकीला एकत्रपणे सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाशी वाटाघाटी सुरू आहेत. त्याला विरोध म्हणून प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर यांनी त्यांना शरद पवारांची साथ न सोडण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याचा सल्ला दिला आहे. प्रशांतदादा एक चांगला कार्यकर्ता - रवींद्र धंगेकर रवींद्र धंगेकर गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, प्रशांतदादा एक चांगला कार्यकर्ता आहे. त्यांनी पुणे शहरात महापौर पदासह इतर पदांवर चांगले काम केले आहे. कार्यकर्ता एका दिवसात घडत नाही. त्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात. मी दुसऱ्या पक्षात असलो तरी किंवा विरोधक असलो तरी त्याला सन्मान देण्याचे काम सर्वांनी करायचे असते. प्रशांत जगपात यांनी प्रचंड विचार करून आपला निर्णय घेतला पाहिजे. कारण, एकदा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा उभे राहण्यासाठी परत अनेक संकटे पार करावी लागतात. यावेळी त्यांना तुम्हाला प्रशांत जगताप यांच्यावर अन्याय झाला असे वाटते का? असा प्रश्न करण्यात आला असता रवींद्र धंगेकर म्हणाले, पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यानंतर अन्याय बाजूला ठेवावा लागतो. कारण, पक्षप्रमुखांना त्यांच्या पक्षाची व कार्यकर्त्यांची काळजी असते. अजून निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी 30 तारखेपर्यंतची मुदत आहे. त्यांनी अजूनही आपल्या निर्णयावर फेरविचार करावा. राजकारणात आपल्याला आवडत नसले तरी पक्षप्रमुखांच्या पुढे आपण जाता कामा नये. कुठेही गेले तरी पक्षप्रमुखांच्या भूमिका वेगवेगळ्या असतात. प्रशांत जगताप यांची भूमिका योग्य असू शकते, पण पक्ष म्हणून त्यांनी विचार केला पाहिजे. मी त्यांना योग्य तो निर्णय घेण्याचा निरोप पाठवला आहे. प्रशांतदादा पुणेकरांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. त्यांनी आपल्या डोक्यात चांगला विचार घ्यावा. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. पुण्यात अनेक जुनेजाणते राजकारणी लोक आहेत. त्यांनी त्या लोकांशी संवाद साधावा. प्रशांतदादा तसा हुशार आहे. पण कधीकधी चांगल्या माणसासोबतही दगाफटका होतो. त्यामुळे निर्णय घेताना त्यांनी अनेकांशी चर्चा केली पाहिजे, असे धंगेकर म्हणाले. पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे नेमके काय सुरू? पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्यावर चर्चा सुरू केली आगहे. यासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा समावेश आहे. या समितीने महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षासोबत युती करण्याची जाहीर भूमिका मांडली होती. त्याला प्रशांत जगताप यांनी कडाडून विरोध केला होता. त्यांनी या प्रकरणी शरद पवारांची भेट घेऊन आपला विरोध दर्शवला आहे. अजित पवारांशी आघाडी केल्यास मी राजकारणातून संन्यास घेईन, असेही ते म्हणाले होते. पण गत काही दिवसांपासून पुण्यात तुतारीचे (शरद पवार गट) उमेदवार घड्याळ (अजित पवार गट) चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. याविषयी दोन्ही पक्षांच्या प्रमुखांमध्ये चर्चा झाल्याचेही सांगण्यात येत आहे. यासंबंधीचा निर्णय कोणत्याही क्षणी जाहीर करण्याची चिन्हे असताना प्रशांत जगताप यांनी आपली वेगळी वाट निवडली आहे.
एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात घडली आहे. या कुटुंबातील 2 मुलांनी रेल्वेसमोर उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. तर त्यांच्या आई-वडिलांचे मृतदेह घरातच झोपलेल्या स्थितीत आढळले. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ माजली असून, ही घटना आत्महत्या आहे की घातपात? याविषयी उलटसूलट चर्चा रंगली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. बजरंग रमेश लखे (22), उमेश रमेश लखे (25) व रमेश होनाजी लखे (51) व राधाबाई रमेश लखे (44) अशी मृतांची नावे आहेत. बजरंग व उमेश हे सख्खे बंधू आहेत. रमेश व राधाबाई असे त्यांच्या आई-वडिलांची नावे आहेत. उमेश लखे हा मनसेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती आहे. तो सामाजिक कार्यात सक्रिय होता. नेमकी घटना काय घडली? जवळा मुरार येथे रमेश लखे व राधाबाई लखे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांना बजरंग व उमेश ही 2 मुले होती. हे एक सर्वसाधारण कुटुंब होते. अल्पभूधारक असूनही मोठ्या कष्टाने ते आपल्या संसाराचा गाडा ओढत होते. पण बजरंग व उमेश या दोघांनी आज गावाजवळून जाणाऱ्या रेल्वेखाली उडी घेऊन आपले आयुष्य संपवले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली असता त्यांचे आईवडीलही घरातील पलंगावर मृतावस्थेत आढळले. हे पाहून गावात एकच खळबळ माजली. गावकऱ्यांनी पोलिसांना त्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा तपास सुरू केला. टोकाचे पाऊल उचलले का? हे प्रकरण आत्महत्येचे आहे की, घातपाताचे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण एकाच कुटुंबातील 4 जणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे यांनी याविषयी बोलताना सांगितले की, आई-वडील घरात मृतावस्थेत आढळले असून, मुलांनी रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. घटनेचा उलगडा करण्यासाठी न्यायवैद्यक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. तपासानंतरच सत्य समोर येईल. पोलिसांनी चारही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेत. तसेच या कुटुंबाचा कुणाशी वाद होता का? कौटुंबिक वादातून त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलले का? किंवा त्यांचा काही घातपात झाला का? या अंगानेही पोलिस तपास करत आहेत.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून, नाशिक शहरातील राजकारण सध्या विशेष चर्चेत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विविध पक्षांतील नेते पक्षांतराच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत असतानाच नाशिकमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकचे दोन माजी महापौर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील दिग्गज नेते विनायक पांडे आणि यतिन वाघ हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ व प्रभावशाली नेते शाहू खैरे हे देखील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या संभाव्य पक्षप्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, ही घडामोड अशा वेळी घडत आहे जेव्हा नुकतीच मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यात युतीची घोषणा झाली असून, त्याचा जल्लोष नाशिकसह संपूर्ण राज्यात पाहायला मिळाला होता. बुधवारी झालेल्या या युतीच्या घोषणेच्या वेळी विनायक पांडे हे स्वतः उपस्थित राहून आनंदोत्सवात सहभागी झाले होते. मात्र, अवघ्या काही तासांतच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विनायक पांडे हे ठाकरे गटातील अत्यंत विश्वासू, आक्रमक आणि संघटनात्मक ताकद असलेले नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्यासोबत माजी महापौर यतिन वाघ यांचेही भाजपकडे वळणे हे ठाकरे गटासाठी मोठे खिंडार मानले जात आहे. मनसे-शिवसेना युतीच्या जल्लोषानंतर लगेचच ही उलथापालथ झाल्याने नाशिकमधील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा बदलताना दिसत आहेत. या संभाव्य पक्षप्रवेशाला भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील प्रभावी नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे पाठबळ असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली विनायक पांडे, यतिन वाघ आणि शाहू खैरे यांचा भाजप प्रवेश सोहळा पार पडणार आहे. गिरीश महाजन यांना भाजपचे ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाते आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक राजकीय समीकरणे त्यांनी यशस्वीपणे हाताळलेली आहेत. नाशिकसारख्या महत्त्वाच्या शहरात एकाच वेळी ठाकरे गट आणि काँग्रेसमधील बडे चेहरे भाजपमध्ये आणणे ही भाजपची मोठी रणनीती असल्याचे बोलले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजप शहरात आपली ताकद अधिक मजबूत करत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. दुसरीकडे, काँग्रेससाठीही ही घडामोड मोठा धक्का ठरणार आहे. नाशिकमधील काँग्रेसचे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते म्हणून शाहू खैरे यांची ओळख आहे. दीर्घकाळ पक्षासाठी काम केलेला हा चेहरा भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसच्या स्थानिक संघटनावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शाहू खैरे यांचा शहरातील विविध सामाजिक आणि राजकीय घटकांवर प्रभाव असून, त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. एकाच वेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांतील प्रभावशाली नेत्यांना भाजपमध्ये खेचण्याची ही खेळी महाविकास आघाडीसाठी गंभीर इशारा मानली जात आहे. नाशिकमध्ये महाविकास आघाडीची पकड सैल करण्याच्या दृष्टीने भाजपने उचललेले हे पाऊल असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. नाशिकच्या राजकारणात कोणते नवे समीकरण तयार एकूणच पाहता, नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही पक्षांतरांची लाट शहराच्या राजकारणाला नवे वळण देणारी ठरणार आहे. मनसे-शिवसेना युतीमुळे ठाकरे गटाला मिळणारा संभाव्य फायदा कमी करण्यासाठी भाजपने आक्रमक रणनीती आखल्याचे चित्र आहे. विनायक पांडे, यतिन वाघ आणि शाहू खैरे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास नाशिकमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का ठरेल, तर भाजपसाठी ही निवडणूकपूर्व मोठी ताकदवाढ ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आता या पक्षप्रवेशाचा अधिकृत कार्यक्रम कधी होतो आणि त्यानंतर नाशिकच्या राजकारणात कोणते नवे समीकरण तयार होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सेनगाव पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात घटस्फोटीत महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २४ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचे एक पथक आरोपीच्या अटकेसाठी रवाना करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील राजेश बाबुराव वाघमारे उर्फ मोरे हा सुमारे दिड वर्षापुर्वीपासून सेनगाव तालुक्यात एका फायनांन्स कंपनीमध्ये काम करीत होता. यावेळी वसूली व इतर कारणावरून त्याचे बाहेरगावी दौरे होत होते. यामध्ये त्यांचे एका घटस्फोटीत महिलेसोबत सुत जुळविले. त्याने महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्याशी वारंवार संवाद साधण्यास सुरवात केली. त्यानंतर त्याने महिलेस लग्नाचे अमिष दाखविले. तु्झ्या सोबत लग्न करतो तसेच तुझ्या मुलाचा सांभाळ करतो असे म्हणत ता. १३ जानेवारी २५ ते ता. १९ सप्टेंबर पर्यंत तिला सेनगाव, नांदेड, वाशीम येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मागील काही दिवसांपासून त्या महिलेने लग्न करण्याचा तगादा लावल्यानंतर त्याने महिलेस टाळण्यास सुरवात केली तसेच महिलेस जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी त्या महिलेने सेनगाव पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी राजेश वाघमारे उर्फ मोरे याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार सुभाष जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे. उपनिरीक्षक खंदारे पुढील तपास करीत आहेत.
राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीमुळे महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असतानाच, आता पुण्यातही 'ठिणगी' पडली आहे. पुण्यात जर दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार असतील, तर काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असे मोठे विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. यामुळे मुंबईनंतर पुण्यातही काँग्रेसचे बिनसल्याचे दिसून येत आहे. पुणे महानगरपालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणे लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. मागील काही दिवसांपासून दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये बैठकी सुरू आहेत. यावर आपली भूमिका स्पष्ट करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याचे आम्ही ऐकले आहे. या संदर्भात आमचे शरद पवार यांच्याशी बोलणे सुरू होते. मात्र, जर दोन्ही राष्ट्रवादी खरोखरच एकत्र येणार असतील, तर काँग्रेसकडे कोणताही पर्याय उरणार नाही. अशा परिस्थितीत आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू. मुंबईतही काँग्रेस मविआत नाही ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर काँग्रेसने यापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती. मुंबईत काँग्रेसला शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यासोबत निवडणूक लढवायची होती, मात्र मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध होता, असे विजय वडेट्टीवार यांनी आधीच सांगितले होते. आता पुण्यातही राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य युतीमुळे काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे मुंबईनंतर पुण्यातही महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. पुण्यात महायुतीतही 'जागा'वाटपाचा तिढा दरम्यान, एकीकडे मविआमध्ये कुरबुरी सुरू असताना, सत्ताधारी महायुतीतही सर्व काही आलबेल नाही. पुणे महापालिकेसाठी भाजपने आपली ११५ उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे. मात्र, मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने ३५ जागांची मागणी लावून धरली आहे. भाजप केवळ १८ जागा देण्याच्या मानसिकतेत आहे. तर शिवसेनेला किमान २० ते २५ जागा मिळाल्या तरीही युतीचा मार्ग मोकळा होईल, असे समजते. मात्र, जागावाटपाचा हा आकडा न जुळल्यास महायुतीमध्येही 'बिघाडी' होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुण्याच्या राजकारणात रंगत वाढली पुणे महानगरपालिकेत सध्या प्रत्येक पक्ष सावध पवित्रा घेत आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी कोण कोणाशी हातमिळवणी करणार आणि कोण स्वबळावर शड्डू ठोकणार, याचे चित्र येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, विजय वडेट्टीवार यांच्या विधानामुळे पुण्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी येताना दिसत आहे. मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा संभाव्य संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संकेत काही दिवसांपासून मिळत होते. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील काही भागांत “उत्तर भारतीय बटोगे… तो पिटोगे…” अशा आशयाचे बॅनर झळकले आणि या पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. या बॅनरला उत्तर देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर आक्रमक पोस्ट करत मराठी अस्मितेचा अपमान सहन केला जाणार नसल्याचा थेट इशारा दिला. या घटनेमुळे निवडणुकीआधीच मुंबईतील राजकारण तापले असून भाषिक ध्रुवीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. संदीप देशपांडे यांनी या बॅनरवर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, हा वाद मराठी विरुद्ध उत्तर भारतीय असा नसून, जाणीवपूर्वक राजकीय फायद्यासाठी तो निर्माण केला जात आहे. त्यांनी थेट भारतीय जनता पक्षावर आरोप करत म्हटले की, एआय जनरेटर वापरून तयार केलेल्या पोस्टरमागे भाजपचा हात आहे आणि उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुद्दाम हा वाद पेटवला जात आहे. मराठी माणसाचा अपमान सहन केला जाणार नाही, हा संदेश देण्यासाठीच आपण सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईकरांच्या भावना, भाषा आणि अस्मिता यांचा वापर फक्त मतांसाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. मराठी माणूस कुणाच्या विरोधात नाही, पण त्याच्या स्वाभिमानावर आघात झाला तर उत्तर देणे अपरिहार्य ठरेल, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. भाषिक मुद्द्यापुरतेच न थांबता संदीप देशपांडे यांनी सत्ताधाऱ्यांवर विकासाच्या मुद्द्यावरूनही जोरदार हल्ला चढवला. मुंबईकरांचा खरा ‘हॅपिनेस इंडेक्स’ किती आहे, याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकीकडे अटल सेतूसारख्या मोठ्या प्रकल्पांचे श्रेय घेतले जाते, मात्र दुसरीकडे मुंबईतील रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. रोजच्या जगण्यात सामान्य मुंबईकरांना कोणत्या सुविधा मिळतात, हा खरा विकासाचा निकष असल्याचे त्यांनी सांगितले. दोन-दोन हजार कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप होत असताना सत्तेत असलेले पहारेकरी झोपेत होते का, असा उपरोधिक सवालही त्यांनी उपस्थित केला. गेली 25 वर्ष सत्ता उपभोगूनही मुंबईच्या मूलभूत समस्यांवर तोडगा न निघाल्याचा आरोप करत त्यांनी भाजपच्या कारभारावर टीका केली. या साऱ्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये संदीप देशपांडे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्यावरही जोरदार टीका केली. शेलार यांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नसल्यामुळे ते रामदास आठवले यांच्याशी जवळीक वाढवत असल्याचा टोला त्यांनी लगावला. सत्तेत असलेले लोक जर गुंडांसारखे वागू लागले आणि भ्रष्टाचार करू लागले, तर त्यावर प्रश्न उपस्थित होणारच, असे म्हणत त्यांनी अनेक नेत्यांच्या नातेवाईकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. ही यादी अजून मोठी होऊ शकते, असा इशारा देत “बात निकलेगी तो लंबी जाएगी” असे सूचक विधानही त्यांनी केले. अडाणी कुटुंबासाठीच महापालिकेवर ताबा हवा आहे का, असा सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विकास मॉडेलवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. किरीट सोमय्यांनी हातोडा घेऊन केलेल्या आरोपांचे काय झाले सोशल मीडियावर केलेल्या पोस्टबाबत स्पष्टीकरण देताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, हे त्यांनी कौतुक म्हणून ट्विट केले असून त्यामागे स्पष्ट राजकीय संदेश आहे. आशिष कुरेशी यांच्यावरही त्यांनी टीका करत त्यांना मुंबईला लागलेली बुरशी, असे संबोधले. रझा अकादमीच्या मोर्चाच्या वेळी भाजपचे हिंदुत्व कुठे होते, असा सवाल उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर बोट ठेवले. नवाब मलिक, भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्याशी भाजपच्या जवळकीवर प्रश्न उपस्थित करत फडणवीस सरकारवर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांनी हातोडा घेऊन केलेल्या आरोपांचे पुढे काय झाले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. शेवटी, मराठीचा अपमान केला तर उत्तर दिले जाईल, असा स्पष्ट इशारा देत संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेची आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे.
दिल्ली स्थित एका न्यायालयाने दहशतवादी कृत्यांत कथित हात असणाऱ्या 2 आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. अब्दुल सुभान कुरेशी व अरीज खान अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी अब्दुल सुभान कुरेशीला 2006 चा मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट व गुजरात बॉम्बस्फोटाप्रकरणी अटक करण्यात आली होती. यासंबंधीच्या माहितीनुसार, अब्दुल कुरेशीवर इंडियन मुजाहिदीन (आयएम) या अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप आहे. कतर दुसरा आरोपी अरीज खान याच्यावर इंडियन मुजाहिदीन व सिमी या अतिरेकी संघटनांना पुनरुज्जीवित करण्याचा ठपका आहे. दोन्ही आरोपींवर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. कुरेशीला पूर्व दिल्लीतील गाझीपूर येथून 23 जानेवारी 2018 रोजी अटक करण्यात आली होती. तर अरीज आखान हा बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणानंतर देशातून पळून गेला होता. त्याला 14 फेब्रुवारी 2018 रोजी त्याला भारत - नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली होती. काय म्हणाले पटियाला कोर्ट? कोर्टाने आपल्या निर्णयात प्रस्तुत दोन्ही आरोपी बंदी असलेल्या संघटनांचे सदस्य असल्याचे किंवा त्यांनी भारतविरोधी कृ्त्यांमध्ये सहभाग घेतल्याचे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवले. पटियाला हाऊस कोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश अमित बन्सल आपल्या निकालात म्हणाले, आरोपींविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात कोणतेही ठोस पुरावे नाहीत. तसेच ते सिमी व इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनांशी संबंधित असल्याचे किंवा त्या संघटनांना पुनरुज्जीवित केल्याचे अथवा त्यांनी भारतविरोधी कृत्य केल्याचेही कोणते ठोस पुरावे नाहीत. आरोपपत्रात आरोपींनी दिलेला जबाब व त्यांच्यावर दाखल इतर गुन्हे व त्या गुन्ह्यांशी संबंधित आरोपपत्र जोडण्यात आलेत. आरोपींनी पोलिसांना दिलेला जबाब न्यायालय ठोस पुरावे असल्याशिवाय ग्राह्य धरत नाही. तसेच आरोपपत्रात साक्षीदारांच्या यादीत मुख्यतः ड्यूटी अधिकारी व रेकॉर्ड नोंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. त्यामुळे संबंधित प्रकरणात आरोपी दोषी असल्याचे दिसून येत नाही, असे कोर्ट म्हणाले. आत्ता पाहू काय आहे नेमके प्रकरण? राजस्थानच्या बिजनौर जिल्ह्यात 12 सप्टेंबर 2014 रोजी एक स्फोट झाला होता. त्यानंतर पोलिसांनी दिल्ली व उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेलगत असलेल्या भागांत छापेमारी केली होती. 20 ऑक्टोबर 2014 रोजी सिमी व इंडियन मुजाहिदीनशी संबंधित असलेले अतिरेकी दिल्ली व आसपासच्या भागात दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती. बिजनौरमध्ये झालेल्या हल्ल्यात कुरेशी व अरीज खानचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार, अब्दुल सुभान कुरेशी व अरीज खान यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर यूएपीए कायद्यांतर्गत कलम 18 व आयपीसी 120 ब नुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने 20 डिसेंबर रोजी या दोघांची या प्रकरणी ठोठावण्यात आलेल्या न्यायालयीन कोठडीतून निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिलेत. दोन्ही आरोपींवर इतर प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत. त्या प्रकरणात त्यांच्यावर न्यायालयीन खटला सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात नगरपरिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपला चांगले यश प्राप्त करता आले नाही. भाजपने जिल्ह्यात पक्षाला ताकद दिली नसल्यानेच पक्षाला अपयश मिळाले असल्याचा आरोप माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर त्यांनीच आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर लगेचच चंद्रपूर भाजपमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे मुनगंटीवार यांची नाराजी दूर करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे बालले जात आहे. चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच भारतीय जनता पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडपणे समोर आले आहेत. निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाकडून नियुक्त करण्यात आलेले आमदार किशोर जोरगेवार यांना अचानक निवडणूक प्रमुखपदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या जागी माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हा निर्णय भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने घेतल्याची चर्चा असून, या बदलामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर नेतृत्वात बदल झाल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि सत्तासंघर्ष पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या बदलामागे केवळ प्रशासकीय कारणे नसून, भाजपमधील दीर्घकालीन अंतर्गत संघर्ष हे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. आमदार किशोर जोरगेवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला तणाव सर्वश्रुत आहे. या दोन्ही नेत्यांमधील मतभेद अनेकदा अप्रत्यक्षपणे समोर आले असून, पक्षातील कार्यकर्त्यांमध्येही दोन गट स्पष्टपणे दिसून येतात. मुनगंटीवार यांच्या नाराजीचा विचार करूनच जोरगेवार यांच्याकडून निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी काढून घेण्यात आल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. अजय संचेती यांची नियुक्ती ही मुनगंटीवार गटाला दिलेला दिलासा मानला जात आहे. या घडामोडींची पार्श्वभूमी पाहता, सुरुवातीला प्रदेश भाजपच्या निर्देशानुसार किशोर जोरगेवार यांची चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याच वेळी शहर भाजपचे अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्याकडे इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्याची जबाबदारी देण्यात आली होती. पक्षाने दिलेल्या या आदेशानुसार इच्छुक उमेदवारांनी जोरगेवार यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहनही करण्यात आले होते. मात्र, याच दरम्यान मुनगंटीवार गटाशी संबंधित माजी शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी वेगळेच आवाहन करत इच्छुक उमेदवारांनी थेट सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे सांगितले. या परस्परविरोधी सूचनांमुळे भाजपमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आणि पक्षातील अंतर्गत वाद अधिकच तीव्र झाला. राहुल पावडे यांच्या या भूमिकेला विद्यमान शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी तीव्र शब्दांत विरोध केला होता. पक्षशिस्तीचा भंग झाल्याचा आरोप करत त्यांनी पावडे यांच्यावर कारवाईचे संकेतही दिले होते. मात्र, या संपूर्ण वादावर राहुल पावडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. या घडामोडींनंतरच आता आमदार किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुखपदावरून गच्छंती झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्या जागी माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संचेती हे मुनगंटीवार गटाशी जवळीक असलेले नेते मानले जात असल्याने, या नियुक्तीकडे मुनगंटीवार यांच्या नाराजीची दखल घेऊन केलेला निर्णय म्हणून पाहिले जात आहे. चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघड दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आमदार किशोर जोरगेवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अशा प्रकारची कोणतीही अधिकृत माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही. अजय संचेती हे निरीक्षक असून, निवडणूक प्रमुख हा स्थानिक नेता असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. निरीक्षक किंवा प्रभारी हे बाहेरून येणारे असतात आणि निवडणूक प्रमुखपदावरून हटवण्याचे काहीही कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, सुधीर मुनगंटीवार यांची नाराजी ही केवळ चंद्रपूरपुरती मर्यादित नसून राज्यपातळीवरील विषयांशी संबंधित होती, असेही त्यांनी नमूद केले. मुनगंटीवार हे पक्षातील मोठे नेते असून त्यांची ताकद कमी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत त्यांनी या चर्चांना अप्रत्यक्षपणे फेटाळले. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घडामोडींमुळे चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला असून, त्याचा परिणाम आगामी महानगरपालिका निवडणुकीवर कसा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसे व ठाकरे गटाच्या युतीची काल घोषणा झाली. यामुळे मुंबईतील भाजपचे मतांचे गणित बिघडल्याचा दावा केला जात असताना भाजपने ठाकरे बंधूंच्या युतीचा आपल्याला मतांच्या राजकारणाला कोणताही फटका बसणार नसल्याचा दावा केला आहे. दोन भावांच्या ‘एकत्र येण्याचा आनंद’ म्हणून जो भावनिक महापूर दाखवला जातोय, तो ओसरल्यानंतर वास्तवातला मतांचा दुष्काळ दिसणारच आहे. कारण राजकारणात घोषणा नाही, आकडेवारी बोलते. निव्वळ भावना मतपेटी भरत नाहीत. दोन शून्यांची बेरीज शून्याएवढीच असते, असे भाजपने म्हटले आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी मंगळवारी वरळी येथील एका खासगी सभागृहात मनसे व ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. तूर्त ही युती मुंबई महापालिकेसाठी झाल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. पण भविष्यात ही युती राज्यभर होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी त्यांनी मराठी मतदारांना आपल्या युतीमागे एकसंधपणे उभे राहण्याचेही आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने ठाकरे गट व मनसेच्या युतीला शून्याची उपमा दिली आहे. काय म्हणाले केशव उपाध्ये? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये बुधवारी यासंबंधी म्हणाले की, मनसे - उबाठा युती म्हणजे, आषाढीच्या घरी महाशिवरात्र! किंवा ग्रामीण म्हणीत सांगायचं तर - उघड्याशेजारी दुसरा उघडं गेल, रातभर थंडीने काकडून मेल… दोन भावांच्या ‘एकत्र येण्याचा आनंद’ म्हणून जो भावनिक महापूर दाखवला जातोय, तो ओसरल्यानंतर वास्तवातला मतांचा दुष्काळ दिसणारच आहे. कारण राजकारणात घोषणा नाही, आकडेवारी बोलते. निव्वळ भावना मतपेटी भरत नाहीत. थोडं वास्तव पाहूया… फक्त मुंबईची आकडेवारी. गेल्या तीन विधानसभा निवडणुकांत भाजपा मुंबईत क्रमांक १ चा पक्ष आहे. सर्वाधिक आमदार भाजपाचे निवडून येतात लोकसभेत भाजपा–सेना युती विरुद्ध उबाठा–मविआ अशी लढत होती. भाजपने काय मांडले मतांचे गणित? मुंबईत भाजपा, मते – 15,30,853शिवसेना, मते – 11,43,380महायुतीची एकत्रित मते – 26,74,233 उबाठा – 16,94,326कॉंग्रेस – 7,68,083मविआची एकत्रित मते – 24,62,409 विधानसभा 2025 मध्ये मनसे स्वतंत्र लढली.भाजपा – 18,90,931शिवसेना – 10,09,083महायुती – 29,00,020 उबाठा – 13,95,303कॉंग्रेस – 6,82,532मविआ – 20,77,835 मनसे – 4,10,735 आता हिशोब सरळ आहे.उबाठा + मनसे = 18,02,678 महापालिकेत उबाठा सोबत कॉंग्रेस नाही, फक्त उबाठा - मनसे युती आहे. आणि ही आकडेवारी थेट सांगते - ही मते भाजपाच्या मतांपेक्षा कमी आहेत. म्हणूनच राजकारणात लक्षात ठेवा - दोन अपूर्णांक एकत्र आले म्हणून ते प्रत्येकवेळी पूर्णांक होतातच असे नाही. किंबहुना, दोन शून्यांची बेरीज एका शून्याएवढीच असते, असे उपाध्ये यांनी सांगितले आहे.
ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या 'बाळबोध' टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अत्यंत जळजळीत शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. जर या युतीमुळे तुम्हाला काहीच फरक पडणार नसेल, तर मग त्यावर प्रतिक्रिया का देत आहात? तोंडाची डबडी का वाजवताय? असा थेट सवाल राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे. तसेच, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, तर तुम्ही सगळे एकमेकांना चंपी-मालिश करायला एकत्र आलात का? असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. संजय राऊत यांनी भाजपच्या 'मराठी अस्मिते'च्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसासाठी आतापर्यंत काय केले? दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा अपवाद वगळता, भाजपच्या एकाही नेत्याने अखंड महाराष्ट्र, बेळगाव-कारवार सीमा प्रश्न किंवा मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कधी आवाज उठवला आहे का? मराठी माणसासाठी केलेली तुमची केवळ १० कामे आम्हाला दाखवा. बावनकुळेंच्या विधानावरून घेरले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिवेशन काळात 'वेगळा विदर्भ' करण्याबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ देत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. बावनकुळे जेव्हा महाराष्ट्र तोडण्याची भाषा करत होते, तेव्हा त्यांच्याविरोधात ठाकरे उभे राहिले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना जाब विचारण्याचे कर्तव्य फडणवीसांचे होते, पण त्यांनी ते केले नाही. मग आता आम्हाला मराठी माणसाच्या गोष्टी का शिकवताय? असा संतप्त सवाल राऊत यांनी केला. अदाणीला मुंबई विकणे मराठी माणसाची केलेली सेवा नाही ठाकरे होते म्हणून तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात. नाहीतर तुम्हाला राज्याच्या तुकडा पाडून, त्या लहानशा तुकड्याचे मुख्यमंत्री व्हावे लागले असते. पण आम्ही ते होऊ देत नाहीत. मुंबई वेगळी होऊ देत नाही. आम्ही मुंबईला अजुनपर्यंत संघर्ष करून महाराष्ट्रात ठेवले, हीच तुमची पोटदुखी आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. तुम्ही मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी काय केले? मराठी माणसासाठी केलेली दहा कामे दाखवा. गौतम अडाणीच्या घशात मुंबई घालणे म्हणजे महाराष्ट्रासाठी केलेले काम किंवा मराठी माणसासाठी केलेली सेवा नाही, अशी टीका संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. तुम्ही एकमेकांची चंपी करायला एकत्र आलात का? आमचे दोन ठाकरे एकत्र आलेत, तुम्ही तुमचे बघा. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, तर तुम्ही सगळे एकमेकांना चंपी-मालिश करायला एकत्र आलात का? इतर पक्षातील भ्रष्टाचारी नेते घेऊन तुम्ही कोणते दिवे लावत आहात? तुम्ही आमची शिवसेना फोडली हे तुमचे महाराष्ट्राच्या बाबतीत केलेले कर्तव्य आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसांची संघटना निर्माण केली, ती तोडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एका लफंग्याच्या हातात दिलीत, हे तुमचे मराठी प्रेम? राजकीय मतभेद असतील, पण मराठी माणसाची संघटना फोडण्याचे पाप तुम्ही केले. यासाठी महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. याचा बदला मुंबई महानगरपालिकेत घेतला जाईल, असा संताप संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. त्या पक्षाचा बापच अनौरस,शिंदेंवर बोचरी टीका एकनाथ शिंदेंच्या पक्षाची मुले ही अनौरस आहेत. स्वतःची मुले नाहीत, त्यांचा पक्ष चोरीचा आहे. अमित शाह यांनी या पक्षाला आपले नाव दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाची मुले सांभाळावीत. भारतीय जनता पक्ष त्यांची मुले पळवणार आहे. कुत्रे पकडण्याच्या गाड्या असतात. तसे पिंजरे भाजपने लावली आहेत. महापालिका निवडणुकीनंतर कुणाची मुले, कोण पळवतंय हे समोर येईल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय मैदानात रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, यंदाची निवडणूक केवळ पक्षीय संघर्षाची नसून ती 'घराणेशाही'च्या वर्चस्वाची ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरसह कोल्हापूर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बड्या नेत्यांनी आपल्या मुला-मुलींसाठी, पत्नीसाठी आणि नातेवाईकांसाठी फिल्डिंग लावली जात आहे. यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून, पक्षश्रेष्ठी या 'वजनदार' मागण्यांना कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या (भाजप-शिवसेना) माध्यमातून निवडणूक लढवली जाणार असली, तरी सुमारे २ हजार इच्छुक मैदानात आहेत. त्यात नेत्यांच्या नातेवाईकांची संख्या लक्षणीय आहे. कोल्हापुरातही राजकीय वारसदार आपली ताकद आजमावण्यासाठी सज्ज झाले आहेत. औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवडमध्ये घराणेशाही दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर: युतीत इच्छुकांची गर्दी शिवसेना (शिंदे गट): पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आपला मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदासाठी तिकीट मागितले आहे. आमदार प्रदीप जैस्वाल यांनी मुलगा ऋषिकेशसाठी, तर किशनचंद तणवाणी यांनी मुलगा आणि भावासाठी फिल्डिंग लावली आहे. माजी महापौर नंदू घोडेले आणि विकास जैन यांनी स्वतःसह पत्नीसाठी उमेदवारी मागितली आहे. भाजप: खासदार भागवत कराड यांनी मुलगा हर्षवर्धन आणि बहीण उज्वला दहिफळे यांच्यासाठी, तर आमदार नारायण कुचे यांनी पत्नी शीतलसाठी मागणी केली आहे. आमदार संजय केनेकर यांचा मुलगा हर्षवर्धन आणि गुजरातचे मंत्री सी. आर. पाटील यांची कन्या धर्मिष्ठा चव्हाण देखील शर्यतीत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) व इतर: अंबादास दानवे यांनी भाऊ राजेंद्र दानवे यांच्यासाठी, तर चंद्रकांत खैरे यांनी मुलगा ऋषिकेश आणि पुतण्या सचिन यांच्यासाठी तिकीट मागितले आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा मुलगा बिलाल देखील निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. २. कोल्हापूर: मैदानात 'नवे' गडी खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर आणि माजी आमदार जयश्री जाधव यांचे चिरंजीव सत्यजित जाधव रिंगणात उतरणार आहेत. पिंपरी-चिंचवड: वर्चस्वाची लढाई अजित पवार गट: विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे प्रभाग ९ मधून नशीब आजमावणार आहेत. शिवसेना (शिंदे): खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजित आणि पुतणे निलेश बारणे या दोघांना प्रभाग २४ मधून मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे. भाजप: आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे, आमदार उमा खापरे यांचे पुत्र जयदीप खापरे (प्रभाग १९) आणि आमदार अमित गोरखे यांच्या आई अनुराधा गोरखे (प्रभाग १०) यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा आहे. कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता एकीकडे बड्या नेत्यांचे नातेवाईक तिकीटासाठी दावेदारी करत असताना, दुसरीकडे वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. जागावाटपाचा तिढा सुटताना पक्षश्रेष्ठी गुणवत्तेला प्राधान्य देतात की नेत्यांच्या दबावापुढे झुकून घराणेशाहीला खतपाणी घालतात, याचे उत्तर लवकरच उमेदवारांच्या पहिल्या यादीतून मिळणार आहे.
‘दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी’द्वारा संचालित श्री रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षणासाठी साधने, सुविधा आणि सामाजिक स्वीकार नसतानाही डॉ. बाबासाहेबांनी केलेले अथक प्रयत्न आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक डॉ. किशोर इंगोले यांनी नमूद केले. आजच्या विद्यार्थ्यांनी सिनेअभिनेत्याचे अनुकरण करण्याऐवजी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दि बी.जी.ई. संस्थेचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता होते. प्रमुख अतिथी डॉ. पवन माहेश्वरी, प्रमुख वक्ते व मार्गदर्शक डॉ. किशोर इंगोले, प्राचार्य डॉ. राजेश चंद्रवंशी प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रविण कावळे, गौतम इंगोले, हर्षल बैस, अॅड. आकाश हिवराळे आदी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते डॉ. किशोर इंगोले यांनी विद्यार्थ्यांसमोर डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील विविध प्रसंग उलगडून त्यांच्या संघर्षमय जीवनाचा प्रेरणादायी आढावा मांडला. प्रास्ताविक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गौतम इंगोले यांनी केले. मनोगत डॉ. राजेश चंद्रवंशी यांनी व्यक्त केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा. डॉ. प्रविण कावळे, समन्वयक, समान संधी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. सुजाता ताडम यांनी आणि आभार प्रदर्शन प्रा. गणेश सातपुते यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक, प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शैक्षणिक, प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. साहित्याचे वाचन करावे : आजच्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर मोबाईल फोनच्या जादा वापराचा विपरीत परिणाम होत असल्याची चिंता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अॅड. मोतीसिंह मोहता यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी जास्त वेळ मोबाईलवर घालवण्याऐवजी महापुरुषांच्या जीवनावर आधारित साहित्याचे वाचन करण्यात घालवावा असे आवाहन केले. शिक्षणाच्या बळावर झुंज समाजातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाच्या बळावर डॉ. बाबासाहेबांनी केलेली झुंज विद्यार्थ्यांसमोर डॉ. किशोर इंगोले यांनी उलगडून दाखवली. वर्गाच्या बाहेर बसून गणित शिकण्याची वेळ आलेल्या डॉ.बाबासाहेबांनी पुढे भारताच्या संविधानाचे शिल्पकार म्हणून इतिहास घडवला, असे सांगताना डॉ. इंगोले यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणासाठी साधने, सुविधा आणि सामाजिक स्वीकार नसतानाही डॉ.बाबासाहेबांनी केलेले अथक प्रयत्न आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. आजच्या विद्यार्थ्यांनी सिनेअभिनेत्याचे अनुकरण करण्याऐवजी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले.
विदर्भ साहित्य संघ, शाखा अकोला तर्फे आयोजित एक दिवसीय लेखिका संमेलनाची जय्यत तयारी सुरु असून, गुरुवार २५ डिसेंबर रोजी प्रभात किड्स स्कूल परिसर, वाशिम रोड येथे राज्यातील नामवंत लेखिकांची मांदियाळी जमणार आहे. लेखिका संमेलनाला ‘स्व.प्रा. भाऊसाहेब मांडवगणे साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले असून संमेलन हे ‘स्व. सीमाताई शेटे-रोठे स्मृति समर्पित’ असणार आहे. सुप्रसिध्द कादंबरीकार प्रा.डॉ. भारती सुदामे यांच्या अध्यक्षतेत हे साहित्य संमेलन होत असून, उद्घाटक म्हणून अभिनेत्री आणि लेखिका डॉ. श्वेता पेंडसे उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका नीलिमा विलास पाटील असणार आहेत. यावेळी विदर्भ साहित्य संघ, नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते, सरचिटणीस विलास मानेकर, अ.भा. मराठी साहित्य महामंडळ, पुणेचे सदस्य डॉ. दादा गोरे, िशक्षण उपसंचालक डॉ. सुचिता पाटेकर, विदर्भ साहित्य संघ शाखा अकोला चे अध्यक्ष विजय कौसल, लेखिका संमेलनाचे मुख्य कार्यवाह तथा अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ. गजानन नारे उपस्थित राहणार आहेत. लेखिका संमेलनाचा समारोप समारंभ हा संमेलनाध्यक्ष डॉ. भारती सुदामे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या समारंभात ज्येष्ठ लेखिकांचा सत्कार होणार असून त्यामध्ये पद्मा मांडवगणे, मीराताई ठाकरे, शीलाताई गहलोत, देवकामाई देशमुख, डॉ. विमल भालेराव, डॉ. लीना आगाशे, वीणा मालशे, प्रेमा शुक्ल आणि प्रा.डॉ. अनघा सोनखासकर यांचा समावेश आहे. या संमेलनास सुजाण साहित्य रसिकांनी उपस्थित राहून आस्वाद घ्यावा, असे आवाहन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष विजय कौसल, मुख्य कार्यवाह डॉ. गजानन नारे आणि संमेलन सरचिटणीस मोहिनी मोडक व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी ग्रंथदिंडी, नावीन्यपूर्ण उद्घाटन सोहळा, अभिनेत्री आणि लेखिका डॉ. श्वेता पेंडसे यांची प्रकट मुलाखत, ‘माझा डेबू संत झाला रे...’ ही कु. कार्तिकी मनोज सोनोने हिची नाट्यछटा, परिसंवाद, निमंत्रितांचे कवयित्री संमेलन, कवयित्री कट्टा, ग्रंथदालन, आकर्षक सेल्फी पॉईंट अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. अभिनेत्री आणि लेखिका डॉ. श्वेता पेंडसे यांची प्रकट मुलाखत मोहिनी मोडक व डॉ. समृध्दी तिडके वर घेणार आहेत. ‘बदलत्या काळातील लेखिकांची भूमिका’ या विषयावर डॉ. दादा गोरे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद. प्रा. मीनल येवले यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होईल.
अमरावती अंबानगरीतील रेल्वे प्रवाशांना येत्या २६ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या रेल्वे तिकीट दरवाढीचा फारसा फटका बसणार नाही. कारण, अमरावतीहून नागपूरला जायचे असल्यास इंटरसिटी किंवा जबलपूर एक्सप्रेसने प्रवासी जातात. नागपूरचे अमरावतीपासूनचे अंतर सुमारे १५० कि.मी. आहे. तसेच, रेल्वे तिकीट दरवाढ ही सामान्य श्रेणीसाठी २१५ कि.मी. अंतरापर्यंत लागू नसल्याने नागपूरहून अमरावतीला येणे किंवा नागपूरला जाणे यासाठी एकही पैसा जास्त खर्च करावा लागणार नाही, ही दिलासादायक बाब आहे. केवळ २१५ कि.मी. पेक्षा जास्त अंतर जायचे असेल तर त्या अंतरावरील रेल्वे स्टेशनपासून पुढे १ पैसा प्रति किलोमीटर वाढीव दर द्यावा लागणार आहे. अर्थात, मेमू आणि इंटरसिटी या गाड्यांनी कोणतेही अतिरिक्त शुल्क न देताच प्रवाशांना नागपूर, अकोला, शेगांव, वरणगांवपर्यंत जाता येईल. अमरावतीहून वरणगांवचे रेल्वेने अंतर २१५ कि.मी. आहे. मात्र, तेथून पुढे प्रति कि.मी. १ पैसा याप्रमाणे अतिरिक्त तिकीट दर द्यावा लागेल. सुरत एक्सप्रेसने जर सामान्य कोचमधून प्रवास करायचा असेल तरीही १ पैसा, मेल, एक्सप्रेस जसे अंबा अमरावती-मुंबई सीएसएमटी, अमरावती-पुणे या गाड्यांसाठी २ रु. प्रति कि.मी. अंतराने शुल्क द्यावे लागेल. तर एसी कोचमध्ये प्रवासाकरिता २ पैसे प्रति कि.मी. दराने वाढीव तिकीट खरेदी करावे लागणार आहे. याचाच अर्थ ५०० कि.मी. पर्यंत नॉन एसीने प्रवास करण्यासाठी १० रु. अतिरिक्त द्यावे लागतील. तर एसी कोचने ५०० कि.मी. पर्यंत प्रवास करण्यासाठी २० रु. लागतील. मेमू, मासिक पासच्या शुल्कात वाढ नाही जे चाकरमाने दररोज नोकरीच्या निमित्ताने जवळच्या शहरांमध्ये रेल्वेने प्रवास करतात, त्यांच्याकडे मासिक पास असते. अशा पासकरिता कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. त्याचप्रमाणे उपनगरीय रेल्वेलाही दरवाढीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे अमरावती-बडनेरा, अमरावती-भुसावळ मेमूच्या तिकिटासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला. एक्सप्रेस आणि मेलच्या एसी प्रथम, द्वितीय श्रेणी तसेच द्वितीय श्रेणी एसीसाठी २ पैसे प्रति कि.मी. तिकीटांमध्ये दरवाढ आहे. उदाहरणच घ्यायचे असल्यास, अंबा एक्सप्रेसने दादरपर्यंत प्रवास करायचा असल्यास एकूण ६६३ कि.मी. अंतर आहे. यासाठी सामान्य श्रेणीसाठी भुसावळ स्टेशनपासून दादरपर्यंत १ पैसा प्रति कि.मी. दराने ४ रु. ४८ पैसे जास्त द्यावे लागतील. कारण हे अंतर ४४८ कि.मी. आहे. मूळ तिकीट खरेदी करतानाच तिकीटामध्ये ही वाढ लागून येईल. मात्र, द्वितीय श्रेणी स्लीपर कोच आणि प्रथम श्रेणी एसीसाठी अमरावती स्टेशनपासूनच दरवाढ द्यावी लागेल. अर्थात, १३ रु. २६ पैसे २६ डिसेंबरपासून अतिरिक्त द्यावे लागतील, अशी प्राथमिक माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ कार्यालयाद्वारे देण्यात आली. २६ रोजी रेल्वेचे सॉफ्टवेअर अपडेट होईल. तिकिटात नेमकी किती दरवाढ झाली ते स्पष्ट होईल, असेही सांगण्यात आले.
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रातील एका ऐतिहासिक पर्वाची आज, २५ डिसेंबर (नाताळ) रोजी सुरुवात झाली आहे. बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून प्रवासी सेवा अधिकृतरीत्या सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी या विमानतळावरून ३० विमानांची रेलचेल असणार असून सुमारे ४ हजार प्रवासी या सुविधेचा लाभ घेणार आहेत. या विमानतळाच्या कार्यान्वित होण्यामुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार ७० टक्क्यांनी कमी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर २०२५ रोजी या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. आजच्या पहिल्या टप्प्यात देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर या कंपन्या आपली सेवा देणार आहेत. पुढील १५ दिवसांत विमानांची ही संख्या दररोज ४८ पर्यंत वाढवण्यात येणार आहे. तसेच, येत्या मार्च २०२६ पासून येथून आंतरराष्ट्रीय विमान सेवा देखील सुरू होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जगातील सर्वांत व्यस्त विमानतळ होण्याचा अंदाज सध्या या विमानतळावर दोन धावपट्ट्या कार्यरत आहेत. मात्र, भविष्यात तिसरी धावपट्टी उभारण्याचे नियोजन आहे. तिसरी धावपट्टी पूर्ण झाल्यानंतर, नवी मुंबई विमानतळ हे जगातील सर्वांत जास्त प्रवाशांची वर्दळ असलेले विमानतळ म्हणून नावारूपाला येईल. पहिल्या टप्प्यात वर्षाला सुमारे २ कोटी प्रवासी येथून प्रवास करतील, असा अंदाज आहे. सध्या विमानतळ १२ तास कार्यरत राहणार आता प्रत्यक्ष सेवा सुरू होत असताना, सुरुवातीच्या काळात हे विमानतळ सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांच्या कालावधीत कार्यरत राहील. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२६ पासून हे विमानतळ २४ तास सुरू करण्यात येईल. नवी मुंबई विमानतळाची खास वैशिष्ट्ये:
महानगर पालिकेतील युतीसंदर्भात बुधवार २४ रोजी दुपारी २ वाजता कॅम्प परिसरातील हॉटेल ग्रॅण्ड महफील येथे भाजपा व शिंदेसेनेच्या नेत्यांमध्ये बैठकीच्या दोन फेऱ्या झाल्या. या चर्चेत शिंदेसेनेकडून ५० जागा मिळाल्या तर आनंद वाटेल, अशी मागणी करण्यात आल्यामुळे भाजपाचे स्थानिक नेते बुचकाळ्यात पडले आहेत. कारण, महानगर पालिकेत ८७ जागा आहेत, त्यापैकी ५० जागा म्हणजे ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. ते बघता युतीतील तिन्ही घटक पक्ष शिंदेसेना, भाजपा व युवा स्वाभिमानपुढे जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचे आव्हान आहे. यासंदर्भात गुरुवार २५ रोजी सकाळी पुन्हा जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत प्रभागनिहाय जागांवर खल होणार आहे. आम्ही प्रभागनिहाय जागांवर चर्चा केल्याचे शिंदेसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी सांगितले तर, आम्ही कोणता उमेदवार या जागेवरून निवडून येणार त्यालाच तिकीट देण्यात यावे, असा आग्रह धरल्याचे भाजपाचे अमरावती जिल्हा निवडणूक प्रभारी आ. संजय कुटे म्हणाले. सोबतच युती ही कायम राहणार, { उर्वरित पान ४ निवडून येणे हाच मुख्य निकष ^युती निश्चित होणारच आहे. आम्ही सकारात्मकतेने पुढे जात आहोत. चर्चेत जागा कमी, जास्त होतील. ज्या जागेवर ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, तेथे त्या पक्षाचा उमेदवार देणार. निवडून येणे हाच मुख्य निकष आहे. चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. - आ. संजय कुटे, भाजपा, जिल्हा निवडणूक प्रभारी. महानगर पालिकेत जागांबाबत सुवर्णमध्य काढला तरच तो युतीसाठी पोषक ठरणार आहे. कारण, ऐन निवडणुकीच्या तोंडावर युतीचे तिन्ही घटक पक्ष जर अडून राहिले, तर यामुळे मतदारांमध्ये वेगळाच संदेश जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. भाजपाला २०१७ मध्ये ४५, शिवसेनेला ७ तर युवा स्वाभिमानला ३ जागा मिळाल्या होत्या. भाजपा २०१७ च्या निवडणुकीत ४५ जागांसह बहुमतात होता. तर शिवसेना चौथ्या व युवा स्वाभिमान सहाव्या क्रमांकावर होता. भाजपा जास्त जागांवर दावा केल्याशिवाय राहणार नाही. त्यांना एकूण सदस्य संख्या ८७ असताना जर ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा जर शिंदेसेनेने मागितल्या तर युवा स्वाभिमानला किती जागा देणार, भाजपा किती जागांवर लढणार हा प्रश्न आहे. युवा स्वाभिमाननेही २० जागांची मागणी केली आहे. यात तिन्ही पक्षांना जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी सुवर्णमध्याचा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. शिंदेसेनेचा हेका; पुन्हा होणार चर्चा आम्हाला अमूक इतक्या जागा हव्यात, असा शिंदेसेनेचा हेका असल्यामुळे चर्चेच्या दोन फेऱ्यांनंतरही जागा वाटपाबाबत निश्चिती झाली नाही. जोवर तिन्ही पक्ष जागांबाबत समाधानी होणार नाहीत, तोवर चर्चेच्या फेऱ्या चालत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, २०१७ च्या निवडणुकीला ८ वर्ष झाली आहे. आता परिस्थिती बदलल्याचे शिंदेसेनेच्या नेत्यांचे मत आहे. भाजपामध्ये असलेले दोन दिग्गज नेते माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख हे आता काँग्रेसमध्ये व माजी मंत्री जगदीश गुप्ता हे आता शिंदेसेनेचे नेते आहेत. या दोघांच्याही नेतृत्त्वात त्यावेळी भाजपने मनपा निवडणूक लढली होती.
भातकुली तालुक्यातील साऊर येथे १८ ते २५ डिसेंबर दरम्यान आयोजित श्रीमद्भ भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह सध्या भक्तिमय वातावरणात सुरू आहे. आपले विचार व्यक्त करताना सुश्री स्नेहगंगाश्री म्हणाल्या की, मुलांच्या शिक्षणात कधीही तडजोड करू नका, संत गांडगेबाबांचा आदर्श घ्यावा.ज्ञानयज्ञ सप्ताहातील प्रवचनात सुश्री स्नेहगंगाश्री आळंदीकर यांनी कर्मयोगी संत गाडगेबाबांचा मुलांना शिक्षण द्या हा अमूल्य संदेश प्रभावी शब्दांत मांडला. मनुष्य जीवन जगत असताना केवळ सुसंस्कृत नव्हे तर सुशिक्षित असणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.गाडगेबाबांच ्या विचारांचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, गरिबांचे लग्न लावून द्या, अनाथांना आसरा द्या, बायकोला कमी भावाचे लुगडे घ्या; पण मुलांच्या शिक्षणात कधीही तडजोड करू नका. विद्यार्थी जीवन कसे असावे आणि विद्यार्थ्यांनी आयुष्य कसे जगावे, हे भागवत कथेच्या माध्यमातून त्यांनी उलगडून सांगितले. आज समाजात पैसा नाही म्हणून शिक्षण सोडणारे अनेक मिळतील. मात्र, पैसा नाही म्हणून दारू सोडणारा एकही सापडणार नाही. असे परखड उपदेश सुश्री स्नेहगंगाश्री यांनी उपस्थितांची मने हेलावून टाकली. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे खरे साधन असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. या ज्ञानयज्ञ सप्ताहामुळे साऊर परिसरात भक्ती, संस्कार आणि विचारांची उर्जा निर्माण झाली असून भाविकांकडून कार्यक्रमाचे विशेष कौतुक होत आहे. या सप्ताहा दरम्यान दररोज विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
स्थानिक कृष्णाबाई दंडाळे कन्या विद्यालय तसेच सनराइज् इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी स्नेहसंमेलनाचे उद्घाटन आमदार राजेश वानखडे, तहसीलदार मयूर कळसे, आरती वानखडे, गंगाधर दंडाळे, छाया दंडाळे, रवी वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते. चार दिवस चालणाऱ्या या स्नेहसंमेलनामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी रांगोळी प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुनील बुरघाटे यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा. निलेश माहोरे व संचालिका कोमल दंडाळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मुख्या. रजनी माहोरे यांनी मानले. या वेळी बाबाराव दंडाळे, प्रमिला दंडाळे, विलास इंगोले, मुख्याध्यापिका एम. टी. फाले, विश्वजीत दंडाळे, कोमल दंडाळे, जयश्री नवले, अशोक वेरुळकर, संजय देशमुख, अजय गुल्हाने, जयश्री गुल्हाने, मयुरी राऊत, समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अडचणींना समोरे जावे तहसीलदार मयूर कळसे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणींना कसे सामोरे जावे, याबद्दल प्रोत्साहन दिले. संस्थेचे अध्यक्ष गंगाधरराव दंडाळे यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी आणि येणाऱ्या परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी कृष्णाबाई दंडाळे कन्या विद्यालय तसेच सनराइज इंग्लिश स्कूल तिवसा च्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौंम्या शर्मा यांच्या मार्गदर्शनात मनपा कॉन्फरन्स हॉल येथे संनियंत्रण समितीची सविस्तर व महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेदरम्यान गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध निगराणी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये स्थिर निगराणी पथक, भरारी पथक, व्हिडिओ सर्वेक्षण पथकांमार्फत निवडणुकीशी संबंधीत सर्वच कारवाईवर सतत लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामध्ये बेकायदेशीर मद्यसाठा, रोख रक्कम, प्रचार साहित्य तसेच इतर वस्तूंच्या वाहतुकीवर कडक नजर ठेवली जाणार आहे. निगराणी पथकांद्वारे जप्त करण्यात येणाऱ्या मद्य, रोख रक्कम, साहित्य व इतर वस्तूंवर तत्काळ व योग्य कार्यवाही करण्यासाठी स्वतंत्र संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत संबंधित अधिकाऱ्यांची अध्यक्ष व सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पथकांकडून कोणतीही कार्यवाही झाल्यास तत्काळ समितीला कळवण्यात येणार आहे. मनपा निवडणूक पूर्णतः पारदर्शक, निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज आहे. सर्व यंत्रणा समन्वयाने काम करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. या वेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, विनय ठमके, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी, उपायुक्त योगेश पिठे, श्यामसुंदर देव, दत्तात्रय फिस्के, शिल्पा पवार, संजय नेवारे आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी | अमरावती शालेय जीवनातील क्रीडा तसेच सांस्कृतिक स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. असे प्रतिपादन डॉ. कमलताई गवई यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक अविष्कार यांचे आयोजन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले होते. त्या वेळी त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्यायाचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या डॉ. कमल गवई, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांच्यासह उप जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, सेवानिवृत्ती कार्यकारी अभियंता उषा ठुसे, अंजली ठाकरे, डॉ. राजकुमार दासरवाड, तुषार शेळके, पुनम कैथवास, आयुक्त राजेद्र जाधवर, सरीता बोबडे उपस्थित होते.
ग्रामीण व सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्यसेवा ही काळाची गरज ओळखून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तालुका जीवन बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नागपूर तसेच शालिनी मेघे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तिवसा येथे निशुल्क महाआरोग्य रोगनिदान शिबिर पार पडले. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ९०० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली असून २३० गरजू रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या ग्रामीण कुटुंबांसाठी हे शिबिर वरदान ठरले आहे. शिबिराचे उद्घाटन तिवसा पोलीस निरीक्षक गोपालजी उपाध्याय, संजय देशमुख, गौरी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. शिबिराचे आयोजन जिल्हा प्रमुख प्रहार योगेश लोखंडे, बाळा देशमुख, सरपंच सुरेंद्र भिवगडे, मनोज काळमेघ, प्रविण केने, नरेंद्र आसोडे, सारंग हिवसे, मंगेश वानखडे, प्रशांत राऊत, पंकज चौधरी, दिलीप गोरडे, अंकुश राऊत, सागर ढोरे, विशाल ठाकूर, अमोल वाढोनकार, लोकेश लावनकर, श्रीकृष्ण पाटील, बबलू महात्मे, सुरज कुरजेकर, मोहन गोरडे, राजा देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. या वेळी मेडिसिन, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, शल्यचिकित्सा, न्यूरोलॉजी (मेंदू शस्त्रक्रिया), किडनी रोग, अस्थिरोग, दंतरोग, कान-नाक-घसा, हृदयरोग अशा विविध विभागातील तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित राहून रुग्णांची सखोल तपासणी केली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक तपासण्या करण्यात आल्या.

25 C