SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

29    C
... ...View News by News Source

AIMIM चा मुंबईत कोणाला पाठिंबा?:ओवेसींनी स्पष्ट केली भूमिका, नगरसेवकांना दिला कडक इशारा; फोडाफोडीवरून विरोधकांनाही सुनावले

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने बहुमत मिळवत, २५ वर्षांपासूनची ठाकरेंची सत्ता उलथवून टाकली. याचदरम्यान AIMIM पक्षाने देखील चांगली कामगिरी करत, ८ नगरसेवक निवडून आणले. आता महापौरपदाच्या निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून, AIMIM पक्ष कोणला पाठिंबा देणार‌? याबाबत पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर एमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. मुंबई महानगरपालिकेत भाजप किंवा उद्धव ठाकरे गटाला पाठिंबा देण्याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू असताना, ओवेसी यांनी AIMIMच्या भूमिकेबाबत सूचक वक्तव्य केले आहे. नेमके काय म्हणाले ओवेसी? मुंबईत एमआयएमचे ८ नगरसेवक निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय वैयक्तिक स्तरावर घेता येणार नाही, असे ओवेसींनी बजावले आहे. महापालिकेत कोणासोबत जायचे किंवा नाही, हा निर्णय सर्वस्वी पक्ष पातळीवर घेतला जाईल. जर एखाद्या नगरसेवकाने पक्षाची 'लाईन' सोडून स्वतंत्र निर्णय घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देखील ओवेसी यांनी आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना दिला आहे. फोडाफोडीच्या राजकारणावरून इशारा एमआयएमचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न झाल्यास गप्प बसणार नाही, असेही ओवेसी यांनी स्पष्ट केले. जर कोणी आमच्या नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न केला, तर पक्ष त्याविरोधात ठोस पावले उचलेल. कोणाच्याही दबावाखाली येऊन निर्णय घेतला जाणार नाही. बिहारमध्येही आमचा पक्ष तोडण्याचे प्रयत्न झाले, पण जनतेने त्यांना धडा शिकवला आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिला. सर्व समुदायांचे मानले आभार आमच्या विजयात केवळ मुस्लीमच नव्हे, तर हिंदू बांधव, दलित आणि इतर समुदायांचेही मोठे योगदान आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे हे फळ आहे, असे म्हणत ओवेसी यांनी मतदारांचे आभार मानले. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रभागात उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकाने विजय मिळवल्याचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवरही भाष्य केले. महाराष्ट्रात एमआयएमची मोठी झेप ओवेसी यांनी यावेळी महाराष्ट्रातील एमआयएमच्या कामगिरीचा आढावा मांडला. संपूर्ण महाराष्ट्रातून एमआयएमचे १२५ नगरसेवक निवडून आले आहेत. मुंबईत ८, छत्रपती संभाजीनगरमध्ये ३३, तर अमरावती आणि अकोला येथेही पक्षाला चांगले यश मिळाले आहे, असे त्यांनी सांगितलै.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 4:19 pm

देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल:उद्धव ठाकरेंचं सूचक विधान; विजयाचं श्रेय स्वतःकडे न घेता पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या चरणी

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बोलताना ठाकरे यांनी, आमच्यात आणि भाजपमध्ये मूलभूत फरक आहे. त्यांना वाटतं कागदावरची शिवसेना त्यांनी संपवली, पण जमिनीवरची शिवसेना ते कधीच संपवू शकत नाहीत, असा खणखणीत टोला लगावला. भाजप आणि शिंदे गट जमिनीवर राहू शकत नाहीत, हेच त्यांचं अपयश असल्याचंही त्यांनी सूचित केलं. महापौरपदाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केलं. आपला महापौर व्हावा, हे स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल, असं म्हणत त्यांनी आशा कायम असल्याचं संकेत दिले. मात्र, त्यांनी सत्तेच्या गणितांपेक्षा लढ्याच्या मूल्यांवर अधिक भर दिला. गद्दारी करून जो विजय मिळवला जातो, तो मुंबई गहाण ठेवण्यासाठीच असतो, असा गंभीर आरोप त्यांनी केला. या पापाला मराठी माणूस कधीही माफ करणार नाही, असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचं कौतुक करत विजयाचं संपूर्ण श्रेय कार्यकर्त्यांनाच दिलं. या निकालाचे खरे मानकरी तुम्ही सगळे आहात. आम्ही फक्त निमित्त ठरलो, असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचा गौरव केला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत जो निकाल लागला, तो अभिमानास्पद असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. सत्तेचा गैरवापर, यंत्रणांचा दबाव आणि साम-दाम-दंड-भेद या सगळ्या गोष्टी असूनही शिवसैनिकांनी जिद्दीने लढा दिला, याचा आपल्याला अभिमान असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांनी गद्दारीच्या मुद्द्यावरही थेट हल्ला चढवला. गद्दार निघून गेले, पण ते आमची निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत, असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर टीका केली. आपण सर्व शिवसैनिकांना मानाचा मुजरा करतो, कारण या लढाईनंतर प्रत्येकाची जबाबदारी अधिक वाढली आहे, असं त्यांनी नमूद केलं. सत्ता आणि पैशाच्या जोरावर राजकारण जिंकता येईल, असा गैरसमज काहींनी करून घेतला, पण निष्ठा आणि जिद्द पैशाने विकत घेता येत नाही, हे या निकालातून पुन्हा सिद्ध झालं, असा टोला त्यांनी लगावला. ठाकरे यांनी सांगितलं की, निवडणूक प्रचारादरम्यान आपण कार्यकर्त्यांना कोणत्याही विशेष सोयी-सुविधा देऊ शकलो नाही. आपल्याकडे तन-मन आहे, त्यांच्याकडे फक्त धन आहे, असं म्हणत त्यांनी संघर्षातील तफावत अधोरेखित केली. तरीही कार्यकर्त्यांनी केवळ शक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर विरोधकांना घाम फोडला, असं त्यांनी सांगितलं. हीच ताकद भविष्यातही एकत्र ठेवा, कारण पुढच्या पिढीलाही तुमचा अभिमान वाटला पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. उद्धव ठाकरे यांनी विजयाचं श्रेय स्वतःकडे न घेता पूर्णपणे कार्यकर्त्यांच्या चरणी अर्पण केलं. मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन हा विजय तुम्हालाच समर्पित करतो, असं भावनिक विधान त्यांनी केलं. ही लढाई अजून संपलेली नाही, तर ती केवळ एका टप्प्यावर आली आहे, असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. जिद्द हा सर्वात मोठा भांडवल असून ती कोणीही विकत घेऊ शकत नाही, याची आठवण त्यांनी करून दिली. भविष्यातील राजकीय संघर्षाबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी आत्मविश्वास व्यक्त केला. जिद्दीच्या जोरावर आणि निष्ठेच्या बळावर आपण पुन्हा जिंकू, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. सत्ता येते-जात असते, पण शिवसेनेची ओळख ही जमिनीवर काम करणाऱ्या शिवसैनिकांमुळे कायम आहे, असं सांगत त्यांनी संघर्ष सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट संदेश दिला. मातोश्रीवर झालेल्या या भेटीतून ठाकरे गटाने पराभवानंतरही आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिका घेतल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 4:08 pm

ठाकरे बंधू छत्रपती संभाजीराजेंना पकडण्यात मदत करणाऱ्यांसारखेच:जयचंद आरोपावर भाजपचा पलटवार;नितेश राणेंचे प्रत्युत्तर

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने विजय मिळवत सत्ता हस्तगत केली, तर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पराभव स्वीकारावा लागला. केवळ मुंबईच नव्हे तर राज्यातील 29 महापालिकांपैकी सुमारे 25 महापालिकांमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. या निकालानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करताच भाजपचे मंत्री नितेश राणे यांनीही तितक्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी मुंबईतील सत्तांतरासाठी थेट एकनाथ शिंदेंना जबाबदार धरत अत्यंत जहाल शब्दांत टीका केली. एकनाथ शिंदे जयचंद झाले नसते, तर भाजपच्या शंभर पिढ्या उतरल्या असत्या तरी मुंबईवर महाराष्ट्रद्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता, असा आरोप त्यांनी केला. मराठी साम्राज्याचा जरीपटका खाली उतरवून त्याच हाताने ब्रिटिशांचा युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकवणाऱ्या बाळाजी पंत नातू आणि जयचंद यांच्या अवलादी असल्याचा घणाघाती हल्ला राऊतांनी केला. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलं असून भाजपकडून तत्काळ पलटवार करण्यात आला. या टीकेवर भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना अत्यंत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव असा आरोप केला होता. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, काहींना चंगेज मुलतानींच्या घशात घालणं चालतं, बुरखेवाली मानसिकता चालते; पण अदानींसारख्या उद्योगपतींच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास होतो, ते यांना मान्य नाही. मुंबईचा विकास करणाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणं आम्हाला मान्य आहे, पण जिहादी विचारधारेच्या घशात मुंबई घालणं आम्हाला कधीही मान्य नाही, असा जोरदार टोला त्यांनी लगावला. राऊत यांनी शिंदे जयचंद नसते तर भाजपचा महापौर बसला नसता या विधानावरही नितेश राणे भडकले. त्यांनी ठाकरे बंधूंवर थेट गद्दारीचा आरोप करत ऐतिहासिक संदर्भांचा वापर केला. ज्या शिर्केने छत्रपती संभाजीराजेंची माहिती मुघलांना दिली आणि संगमेश्वरला त्यांना पकडण्यात मदत केली, त्यांच्यात आणि ठाकरे बंधूंमध्ये काहीच फरक नाही, अशी अत्यंत आक्रमक तुलना राणेंनी केली. या विधानामुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंवर हिंदू समाजात फूट पाडण्याचाही आरोप केला. पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाची स्क्रिप्ट मुंबईत वाचून दाखवण्याचं काम हे लोक करत होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठीच ठाकरे बंधूंना सुपाऱ्या देण्यात आल्या होत्या, असं म्हणत त्यांनी राऊत आणि ठाकरे गटावर थेट निशाणा साधला. दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा ज्यांची दाढी कुरवाळत होते, त्यांनाच जाऊन उत्तर द्या, असा सल्लाही राणेंनी दिला. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा निकाल केवळ सत्तांतरापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो मराठी अस्मिता, हिंदुत्व, विकास आणि राजकीय निष्ठा या मुद्द्यांभोवती केंद्रित होताना दिसत आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या विजयानंतर ठाकरे गटाकडून भावनिक आणि आक्रमक प्रतिक्रिया येत असताना, भाजप नेतेही तितक्याच धारदार भाषेत प्रत्युत्तर देत आहेत. यामुळे येत्या काळात विधानसभेपासून लोकसभेपर्यंत या वादाचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. एकीकडे भाजप राज्यातील बहुसंख्य महापालिकांमध्ये सत्ता मिळवून आपलं वर्चस्व अधोरेखित करत असताना, दुसरीकडे ठाकरे गट आक्रमक भूमिकेतून राजकीय संघर्ष अधिक तीव्र करत असल्याचं चित्र आहे. राऊत आणि राणेंमधील शब्दयुद्ध हे केवळ दोन नेत्यांमधील संघर्ष नसून, मुंबई आणि महाराष्ट्राच्या सत्तेसाठी सुरू असलेल्या दीर्घ राजकीय लढाईचं प्रतीक मानलं जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 3:48 pm

शिंदे-अजित पवारांच्या गैरहजरीत देवेंद्र फडणवीस सरकारचे मोठे निर्णय:नगरविकास विभागासह पुण्यालाही निधी; अंतर्गत तणाव उघड की तात्पुरती नाराजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले असले, तरी या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष वेधलं गेलं ते वेगळ्याच कारणामुळे. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, हे या कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहिले. विशेष म्हणजे, दोघेही राज्यातच उपस्थित असतानाही त्यांनी बैठकीस हजेरी लावली नाही. एकनाथ शिंदे मुंबईत तर अजित पवार पुण्यात असतानाही कॅबिनेटला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर निर्माण झालेली अस्वस्थता आणि नाराजी याचं प्रतिबिंब थेट प्रशासनावर पडतंय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील सत्तासमीकरणं ढवळून निघाली आहेत. विशेषतः मुंबई महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष, नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याची सुरू असलेली ‘हॉटेल पॉलिटिक्स’ आणि त्याचवेळी कॅबिनेट बैठकीकडे दुर्लक्ष, या सगळ्या घडामोडी एकमेकांशी जोडल्या जात आहेत. निवडणुकीतील अपेक्षाभंगामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सरकारमध्ये सर्वकाही आलबेल आहे का, महायुतीतील अंतर्गत समन्वयाला तडे गेलेत का, असे सवाल राजकीय विश्लेषक उपस्थित करत आहेत. एकीकडे सत्तास्थापन टिकवण्यासाठी आटापिटा सुरू असताना, दुसरीकडे सर्वोच्च प्रशासकीय बैठकीत गैरहजेरी ही बाब सरकारसाठी अस्वस्थ करणारी मानली जात आहे. 1 हजार 901 पदांच्या आकृतीबंधास मान्यता दरम्यान, या सर्व राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या 1 हजार 901 पदांच्या आकृतीबंधास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, या संचालनालयाचे नाव आता ‘अर्थ व सांख्यिकी आयुक्तालय’ असे करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समित्या, सहआयुक्त (नियोजन), विभागीय आयुक्त कार्यालय, मानव विकास कार्यक्रम, वैधानिक विकास मंडळ, तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम तसेच नक्षलवाद विशेष कृती आराखडा कक्ष यांच्यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. यामुळे नियोजन विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अटल सेतूवरील पथकर सवलत आणखी एक वर्ष नगरविकास विभागाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णयही या बैठकीत घेण्यात आले. अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरील पथकर सवलत आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. तसेच मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा–2 (MUTP-2) साठी सुधारित खर्चास आणि शासनाचा हिस्सा उचलण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली. तिरूपती देवस्थानास पद्मावती देवी मंदिरासाठी उलवे येथील दिलेल्या भूखंडाचे शुल्क माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास पनवेल (पश्चिम) येथील भूखंड देण्यास मान्यता देण्यात आली असून, तेथे मुख्यालय आणि बहुउद्देशीय इमारत उभारली जाणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी एक हजार ई-बस शहरी वाहतूक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांवरही सरकारने भर दिला आहे. पीएम-ई ड्राईव्ह योजनेंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी एक हजार ई-बससाठी निधी वळता करण्याच्या थेट प्रणालीस मान्यता देण्यात आली आहे. पेमेंट सिक्युरिटी मेकॅनिझम अंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या खात्यातून डायरेक्ट डेबिट मॅन्डेटद्वारे संबंधित कंपन्यांना थेट देयके अदा केली जाणार आहेत. यामुळे सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम आणि पर्यावरणपूरक होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मल्टी-मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केट उभारण्यास मंजुरी ग्रामीण आणि कृषी क्षेत्रालाही मंत्रिमंडळाने प्राधान्य दिले. भाजीपाला निर्यातीसाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे बापगाव (ता. भिवंडी) येथे सर्वोपयोगी मल्टी-मॉडेल हब आणि टर्मिनल मार्केट उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी राज्य कृषी पणन महामंडळाला 7 हेक्टर 96.80 आर जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. येथे व्हेपर हिट ट्रीटमेंट, प्लांट विकिरण, पॅक हाऊस सुविधा तसेच फळे-भाजीपाला साठवणुकीसाठी आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. दुसरीकडे, यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा नदी प्रकल्पासाठी 4 हजार 775 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली असून, या प्रकल्पामुळे पाच तालुक्यांतील 52 हजार 423 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील मौजा धामकच्या पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे. मुंबई पोलिस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्पास मंजुरी गृह आणि कौशल्य विकास क्षेत्रातही मोठे निर्णय घेण्यात आले. मुंबईतील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 45 हजार शासकीय निवासस्थाने उभारण्याच्या मुंबई पोलिस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्पास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे मुंबई शहर व उपनगरातील पोलीस कर्मचाऱ्यांचा निवासाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे. तसेच राज्यातील युवकांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतीशीलता आणि क्षमता संस्था’ म्हणजेच ‘महिमा’ स्थापन करण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. ही संस्था प्रशिक्षित आणि कुशल युवकांना जागतिक रोजगार बाजाराशी जोडण्याचं महत्त्वाचं काम करणार आहे. अंतर्गत तणाव उघड की तात्पुरती नाराजी एकूणच, एकीकडे कॅबिनेट बैठकीत घेतलेले व्यापक आणि दूरगामी निर्णय सरकारची प्रशासनिक गती दर्शवतात, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्र्यांची गैरहजेरी आणि निवडणूक निकालानंतर सुरू असलेली अस्वस्थता राज्याच्या राजकारणात नवे प्रश्न उभे करत आहे. महायुतीतील अंतर्गत तणाव उघड होतो आहे का, की ही केवळ तात्पुरती नाराजी आहे, याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 3:00 pm

भुसेंचा फॉर्म्युला कोसळला

नाशिक : प्रतिनिधी सत्तेच्या अपेक्षेने महापालिका निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाले. त्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने ‘सर्व’ प्रयोग केले होते. मात्र जनतेने दिलेला कौल आता नवे प्रश्न निर्माण करणार आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपला ७२ जागा मिळाल्या. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने ठरविलेली रणनीती या निमित्ताने यशस्वी झाली. भाजपची सदस्य संख्या ५७ […] The post भुसेंचा फॉर्म्युला कोसळला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 2:45 pm

भाजपा नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

अकोला : प्रतिनिधी महापालिका निवडणूक २०२६ च्या निकालानंतर अकोल्यात मोठा राजकीय वाद पेटला आहे. अकोल्यातील अकोट फैल भागात भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर भाजपाच्याच पराभूत उमेदवार गटाकडून हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक २ मधून भाजपा नगरसेवक शरद तुरकर हे निवडून आले. निकालानंतर त्यांच्यावर हल्ला झाला. भाजपाच्या पराभूत उमेदवाराकडून हा हल्ला झाल्याची चर्चा सध्या […] The post भाजपा नगरसेवकावर प्राणघातक हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 2:38 pm

महापौर निवडीआधी एकनाथ शिंदेंचा मोठा डाव:शिवसेना नगरसेवक ताज लँड्स एंडमध्ये शिफ्ट; मंत्रिमंडळ बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर

मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, महापौर निवडीपर्यंतची सत्ता-समीकरणं अधिकच तापली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं एक महत्त्वाचं पाऊल उचलत ‘हॉटेल पॉलिटिक्स’ सुरू केल्याचं चित्र समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या सर्व निर्वाचित नगरसेवकांना आज दुपारी 3 वाजता वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये हजर राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. महापौर निवडीपर्यंत नगरसेवकांची एकजूट आणि सुरक्षितता राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, याच दिवशी राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे मुंबईत उपस्थित असतानाही, तर अजित पवार पुण्यात असतानाही कॅबिनेट बैठकीला पोहोचले नाहीत. निवडणूक निकालांनंतर झालेल्या पराभवामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री नाराज असल्याचं बोललं जात असून, त्याचा परिणाम थेट प्रशासकीय कामकाजावरही दिसून येत आहे. एकीकडे महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी सुरू असलेली हॉटेल पॉलिटिक्स आणि दुसरीकडे कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी, यामुळे राज्याच्या राजकारणात नवे संकेत मिळत आहेत. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 2:29 pm

दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र!

बारामती : प्रतिनिधी कृषी २०२६ प्रदर्शनाच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादीतील प्रमुख नेते शनिवारी बारामतीत आहेत. या नेतेमंडळींनी एकत्रितपणे कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. राज्यातील महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींना जोरदार झटका बसल्यानंतर शनिवारी बारामतीत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याकडे महत्त्वाची […] The post दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 2:28 pm

पुणे मनपा निकाल वाद:प्रभाग 25 चा निकाल रुपाली ठोंबरे यांनी फेटाळला, ‘नगरसेवक निवडून आलेले नाहीत, बसवले गेले

पुण्याच्या प्रभाग नंबर 25 मधील माझा पराभव हा जनतेने केला नाही तर तो सत्ताधाऱ्यांनी आणि EVM आणि भ्रष्ट निवडणूक अधिकारी काळे यांनी केलेला आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे यांनी आपल्याला पराभव मान्य नसल्याचे सांगितले आहे. पुणे येथे मनपा प्रभाग क्रमांक 25 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला. न्यू इंग्लिश स्कूल येथे 17 ईव्हीएम बदलण्यात आल्याचा आरोप ठोंबरे यांनी केला. त्यामुळे मतमोजणी दोन तास थांबून धरल्याने तणाव निर्माण झाला होता. रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, मतदारांनी भाजपचे नगरसेवक निवडून दिलेले नाही. हे सत्ताधाऱ्यांनी बसवलेले नगरसेवक आहेत. मतमोजणीला कितीही वेळ लागला असता तर काही हरकत नव्हता. पण कसबा-विश्रामबागमधील अधिकारी हे पूर्ण मॅनेज होते. आमच्या EVM मशिनचे फुटेज आम्हाला देणं गरजेचे होते पण ते देण्यात आले नाहीत. आम्ही ते मान्य केले. मशीन बंद केले हे देखील आम्ही समजून घेतले. पण त्यासाठी लागणारी पारदर्शकता ठेवण्यात आलेली नाही. मशीनमध्ये मेमरी कार्ड असते त्यावर सील असते. येणाऱ्या मशीनचे सील उघडे नव्हते.आम्हाला लीगल प्रत देऊन तु्म्ही मशीन बदलतात. मेमरी कार्ड ठेवून तुम्ही मतदान बदलून प्रभाग 25 आणि प्रभाग 27 मध्ये सत्ताधारी भाजपचे पॅनल निवडून आणले. मशीनमधील मेमरी कार्डचा नंबर आम्हाला देण्यात आला नाही. ब्राह्मण समाज अत्यंत सुज्ञ रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, प्रभाग 25 मधील पराभव मला मान्य नाही. कारण लोकांनी आम्हाला हरवलेले नाही. भाजपने EVM मध्ये घोटाळा करत, पोलिस यंत्रणा आणि अधिकारी हाताशी धरत त्यांनी आमचा पराभव केला आहे. तो आम्हाला मान्य नाही. आमच्या प्रभागात 30 टक्के ब्राह्मण समाज आहे तर 70 टक्के बहुजन समाज आहे, आमचा ब्राह्मण समाज हा अत्यंत शिकलेला आणि सुज्ञ आहे. काम करणाऱ्या लोकांना तो मतदान देतो. त्यांनी मतदान केले. त्यांनी मतदान भाजपला केलेले नाही. लोकांनी दिलेले मतदान ते मशीन बदलून देत असतील तर लोकांना पडलेले नाही, की सर्वांनी चालवले आहे का नाही हे बघायला. हा कौल माझ्या मतदारांचा नाही रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, आम्ही मतदारांना का बोलू? मतदारांना तेवढा वेळ आहे का? प्रत्येक मतदाराला विचारावे का कोणाला मतदान दिले. ही सर्व लोकं काम करणाऱ्या व्यक्तीला मतदान देतात. हा कौल माझ्या मतदारांचा नाही, हा भाजपचा आणि अधिकाऱ्यांनी दिलेला कौल मला मान्य नाही. मी लोकांसाठी काम करत आली आहे आणि करत राहणार. माझ्या पराभवात मतदार बंधू-भगिणींचा यात कोणताही दोष नाही. त्यांनी भाजपचे नगरसेवक निवडून दिलेले नाहीत. तर भाजपचे नगरसेवक हे डोक्यावर बसवलेले आहेत सत्ताधाऱ्यांनी.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 2:15 pm

राज ठाकरेंचा 'अदानी' विरोध धारावीत चालला:7 पैकी 6 जागांवर महायुतीचा पराभव; 4 जागांवर ठाकरे, 2 जागांवर काँग्रेस विजयी

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप - शिंदे गटाचा विजय झाला. तर ठाकरे बंधूंच्या युतीला अवघ्या 71 जागांवर समाधान मानावे लागले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निवडणुकीत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीकेची झोड उठवली. धारावीच्या माध्यमातून अदानी अख्खी मुंबई गिळंकृत करण्याचा डाव रचत असल्याचा आरोप करत त्यांनी धारावीकरांना याविरोधात ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले होते. त्याला आता निवडणूक निकालात जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. धारावीतील 7 पैकी 6 जागांवर ठाकरे बंधू व काँग्रेसचा दणदणीत विजय झाला आहे. धारावीच्या वॉर्ड क्रमांक 185 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार टी एम जगदीश यांनी भाजपच्या रवी राजा यांचा 2 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. रवी राजा हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. ते मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते होते. ते सायन - कोळीवाड्यातून लढत होते. धारावी त्यांचा मूळ मतदारसंघ नव्हता. याऊलट जगदीश हे याच वॉर्डाचे माजी नगरसेवक असल्यामुळे त्यांचा मतदारांवर प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी आपल्या अचूक रणनीतीच्या जोरावर भाजप उमेदवार रवी राजा यांना अस्मान दाखवले. दुसरीकडे, वॉर्ड क्रमांक 186 मध्ये ठाकरे गटाच्या अर्चना शिंदे यांचा विजय झाला. त्यांनी भाजपच्या नीला सोनवणे यांचा पराभव केला. अर्चना शिंदे यांना 6731, तर सोनवणे यांना 5690 मते मिळाली. वॉर्ड क्रमांक 187 मध्येही ठाकरे गटाचे जोसेफ कोळी विजयी झाले. त्यांना 7067 मते मिळाली. या ठिकाणी काँग्रेसच्या आयशा खान 5753 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. शिंदे गटाच्या उमेदवाराचा काठावर विजय वॉर्ड क्रमांक 189 मध्ये ठाकरे गटाच्या हर्षला मोरे यांनी भाजपच्या आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवार मंगला गायकवाड यांचा तब्बल 4479 मतांनी पराभव केला. हर्षला मोरे यांना 8081 मते मिळाली. उल्लेखनीय बाब म्हणजे वॉर्ड क्रमांक 185 व 189 मध्ये मतमोजणीवेळी ईव्हीएममध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे निकाल लागण्यास काहीसा विलंब झाला. पण अखेरीस ठाकरेंच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला. काँग्रेसचा 2 जागांवर विजय धारावीतील 2 मतदारसंघांत स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला. वॉर्ड क्रमांक 183 मध्ये आशा काळे यांनी शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा 1254 मतांनी पराभव केला. तर वॉर्ड क्रमांक 184 मध्ये साजिदा बब्बू खान यांनी वर्षा नाकाशे यांचा 2 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. धारावीत महायुतीच्या केवळ एका उमेदवाराचा विजय झाला. वॉर्ड क्रमांक 188 मध्ये शिंदे गटाच्या भास्कर शेट्टी यांनी अवघ्या 460 मतांच्या फरकाने विजय मिळवला. ठाकरे बंधूंच्या सभेने बदलले होते वातावरण ठाकरे बंधूंची मुंबईतील शिवतीर्थावर सभा झाली होती. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अदानींचे साम्राज्य मुंबीत कशा पद्धतीने वाढत आहे हे सांगितले होते. या प्रकरणी त्यांनी एक व्हिडिओही दाखवला होता. तसेच आपल्याला वाचवायला कोण आहे आहे? हे लक्षात ठेवून मुंबईकरांना मतदान करण्याचेही आवाहन केले होते. ठाकरे बंधूंच्या या सभेने मुंबईतील वातावरण पालटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे घरे गमावण्याची भीती, स्थलांतराची चिंता व भवितव्याची अनिश्चितता या सगळ्या गोष्टींचा थेट परिणाम येथील मतदानावर दिसून आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 2:14 pm

निकालानंतर शिंदे समर्थकाच्या कारला आग, CCTVत थरार कैद:बाटलीतला ज्वलनशील द्रव आणि काडेपेटीचा वापर; पराभूत उमेदवाराच्या नातेवाइकाचा आरोप

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच थेरगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री एका कारला जाणीवपूर्वक आग लावण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय तणाव अधिकच वाढला आहे. विशेष म्हणजे, ही कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या नातेवाइकाची असल्याने, या घटनेला राजकीय वळण मिळाले आहे. आरोपी हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा थेट आरोप करण्यात आला असून, पोलिसांकडून मात्र अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये धक्कादायक तपशील स्पष्टपणे दिसून येतात. एका अज्ञात व्यक्तीने आधी एका बाटलीतून ज्वलनशील द्रव थेट उभ्या असलेल्या कारवर फेकल्याचे या दृश्यांमध्ये स्पष्ट होते. त्यानंतर त्या व्यक्तीने काडेपेटीचा वापर करून क्षणार्धात कारला आग लावली आणि घटनास्थळावरून पळ काढला. काही क्षणांतच संपूर्ण कारने पेट घेतल्याचे या व्हिडीओत दिसते. ही घटना इतकी नियोजित आणि थंड डोक्याने करण्यात आल्याचे चित्रण सीसीटीव्हीमधून समोर येत असून, त्यामुळे हा अपघात नसून जाणीवपूर्वक केलेला जाळपोळ प्रकार असल्याचा संशय अधिक बळावला आहे. ही कार आकाश बारणे यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे. आकाश बारणे हे शिंदे शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराचे चुलत भाऊ असून, प्रभाग क्रमांक 23 म्हणजेच थेरगाव परिसरात ही घटना घडली. निकालानंतर काही तासांतच अशी घटना घडल्याने ती निवडणूक निकालाशी संबंधित राजकीय आकसातून घडली का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. आकाश बारणे यांनी थेट आरोप करत सांगितले आहे की, एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानेच त्यांची कार पेटवली आहे. या संदर्भात त्यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सादर करण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणात अद्याप पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल न केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट पुरावे दिसत असतानाही कार जाळण्यासारख्या गंभीर गुन्ह्यात विलंब का केला जात आहे, असा सवाल स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळातून केला जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत का, असा संशयही व्यक्त केला जात आहे. निवडणूक निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असताना, अशा घटनांवर तातडीने कारवाई होणे अपेक्षित असते. मात्र या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर थेरगाव परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मध्यरात्री उभ्या असलेल्या वाहनाला अशा पद्धतीने आग लावली जाऊ शकते, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित होत आहे. निवडणुकीनंतर राजकीय वाद विकोपाला जाऊन हिंसक स्वरूप धारण करत असल्याचं चित्र पिंपरी-चिंचवडमध्ये दिसत असल्याने, नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. राजकीय मतभेद हे लोकशाहीचा भाग असले तरी त्यातून जाळपोळ, हिंसाचार आणि मालमत्तेचे नुकसान होणे अत्यंत गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. प्रशासनावरही दबाव वाढण्याची शक्यता या संपूर्ण प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निकालानंतरची राजकीय धुसफूस आता रस्त्यावर उतरल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. एकीकडे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट पुरावे समोर असताना दुसरीकडे पोलिसांकडून ठोस कारवाई न होणं, यामुळे प्रशासनावरही दबाव वाढण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणात गुन्हा दाखल होणार का, आरोपीचा शोध घेतला जाणार का आणि राजकीय दबावाखाली तपास दडपला जाणार का, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे. निवडणुकीनंतर शांतता राखण्याची जबाबदारी प्रशासनावर असताना, अशा घटनांमुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण आणखी पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 2:01 pm

बाणेरमध्ये भाजपला धक्का:अमोल बालवडकर यांचा विजय, कार्यकर्ता विरुद्ध नेता लढाईत कार्यकर्ता जिंकला

पुणे शहरातील बाणेर-बालेवाडी प्रभागातील (क्रमांक ९) पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल बालवडकर यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला आहे. भाजपने ऐनवेळी तिकीट नाकारल्यानंतर बालवडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत भाजपचे लहू बालवडकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या विजयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे, असे मानले जात आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व यंत्रणांचा वापर केला होता. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल बालवडकर यांना पाठबळ दिल्याने ही निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत चुरस कायम होती, ज्यात अमोल बालवडकर यांनी विजय मिळवला. पुणे शहरात भाजपला एकूण ११९ जागा मिळाल्या असल्या तरी, बाणेरमधील हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. ही लढाई 'कार्यकर्ता विरुद्ध नेता' अशी होती आणि यात कार्यकर्ताच सरस ठरल्याची भावना अमोल बालवडकर यांनी व्यक्त केली. आपल्या विजयानंतर बोलताना अमोल बालवडकर म्हणाले की, माझा विजय हा कार्यकर्त्यांचा विजय आहे, कारण त्यांनी मागील १५ दिवसांत खूप मेहनत घेतली. भाजपच्या काही नेत्यांनी ऐनवेळी तिकीट नाकारल्याने मी निराश झालो होतो, परंतु पालकमंत्री अजित पवारांनी मला साथ दिली आणि मी निवडणुकीत उभा राहिलो. त्यांनी पुढे सांगितले की, जनतेने माझा संघर्ष पाहिला असून त्यांनाही या अन्यायाबद्दल चीड होती. बालवडकर यांच्या मते, माझी राजकीय हत्या झाली होती, पण अजित पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला. भाजपने मला फसवले नाही, तर काही नेत्यांनी मला दगा दिला. मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बळावरच हा विजय मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. मोठ्या नेत्यांनी छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नये, असा संदेश जनतेने दिला आहे, असेही ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 1:48 pm

अश्लील चाळे करणाऱ्याला हटकल्याने ज्येष्ठ नागरिकाला मारहाण:पुण्यातील घटना, आरोपी तरुणाविरोधात वाघोली पोलिसांत गुन्हा

सोसायटीच्या आवारात अश्लील चाळे करणाऱ्या युगुलाला हटकल्याने ज्येष्ठाला मारहाण करण्यात आल्याची घटना वाघोली परीसरात घडली. या प्रकरणी आरोपी तरुणा विरुद्ध वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एका तरणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे वाघोलीतील एका सोसायटीत राहायला आहेत. ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या आवारातून पायी जात होते. त्यावेळी सोसायटीच्या परिसरात आरोपी आणि त्याची मैत्रीण थांबली होती. दोघेजण अश्लील चाळे करत असल्याचे ज्येष्ठ नागरिकाने पाहिले. ज्येष्ठ नागरिकाने आरोपी तरुणाला हटकले. सोसायटीच्या परिसरात अश्लील चाळे करु नका, असे ज्येष्ठ नागरिकाने तरुणाला सांगितले. या कारणावरुन तरुणाने त्यांना शिवीगाळ केली. काही वेळानंतर तरुणाने सोसायटीच्या आवारात प्रवेश केला. ज्येष्ठाला शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्यात हातातील लोखंडी कडे मारले. ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्याला दुखापत झाली. पसार आलेल्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करत आहेत. किरकोळ कारणावरुन भाजी विक्रेत्याला मारहाण पुणे किरकोळ कारणावरुन भाजी विक्रेत्याला मारहाण करण्यात आल्यची घटना लोणी काळभोर परिसरात घडली.या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भाजी विक्रेता अक्षय अशोक चव्हाण (वय ३४, रा. जाधव वस्ती, थेऊर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका भाजीपाला विक्रेत्यासह पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार चव्हाण यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा परिसरात ते भाजी विक्री करतात. आरोपी भाजीपाला विक्री करतो. तक्रारदार भाजीपाला विक्रेत्याचे काका कडीपत्ता विक्री करतात. चव्हाण याच्या काकांनी आरोपीला कडीपत्याचे पाच बंडल देण्यास सांगितले होते. आरोपीने त्यांच्याकडे आणखी सात बंडल मागितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपीने साथीदारांना बोलावून घेतले. चव्हाण आणि त्यांचा चुलतभाऊ प्रशांत यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. चव्हाण यांच्या डोक्यात दगड घातला, तसेच त्यांना बांबूने मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 1:46 pm

पुण्यात पराभवानंतर कुटुंबाला शिवीगाळ:भाजप उमेदवाराच्या समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे महापालिका निवडणुकीत पराभव झाल्याच्या रागातून भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराच्या समर्थकाने एका तरुणासह त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना भवानी पेठेत घडली आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणेश शिवाजी लडकत (वय ५३, रा. भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, मंदार लडकत, प्रीतम बनकर, रोहित शिंदे आणि प्रज्ञा लडकत यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या भवानी पेठ-कासेवाडी प्रभागातून गणेश लडकत यांचे चुलतभाऊ आणि भाजपचे उमेदवार संदीप लडकत यांचा पराभव झाला होता. तक्रारदाराच्या कुटुंबाने संदीप लडकत यांच्या विरोधात प्रचार केल्यामुळे त्यांचा पराभव झाला, असा आरोपींना संशय होता. याच रागातून आरोपी गणेश लडकत यांच्या घरात घुसले आणि त्यांनी लडकत तसेच त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अनोळखी चोरट्यांकडून घरफोडी पुणे शहरात धनकवडी परिसरात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना घडली. याबाबत संजय सदाशिव दिघे (वय ५५, रा. राजमुद्रा सोसायटी, ओंकार पार्क इमारत, धनकवडी ) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार धनकवडीतील राजमुद्रा सोसायटीत राहायला आहेत. मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेचे कुलूप तोडले. चोरट्यांनी दिघे यांच्या सदनिकेत प्रवेश केला. बेडरूम मध्ये कपाटावरील मोकळ्या जागेत दिघे यांनी एका बॅगेत एक लाखांची रोकड ठेवली होती. चोरट्यांनी कपाटावर ठेवलेली बॅग चोरून नेली. सहायक पोलीस फौजदार बापू खुटवड तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 1:43 pm

पुणे मनपा निवडणुकीत भाजपच्या 67 महिला विजयी:एकूण 8 महिला मनपा सभागृहात होणार सहभागी

पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) 92 महिला उमेदवारांपैकी 67 महिलांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीमुळे एकूण 87 महिला नगरसेविका पुणे मनपा सभागृहात सहभागी होणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला होता, तसेच आरपीआयच्या उमेदवारांनाही कमळाच्या चिन्हावर संधी दिली. एकूण 165 जागांपैकी तब्बल 92 जागांवर भाजपने महिलांना उमेदवारी दिली होती, ज्यामुळे महिलांना प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने संधी मिळाली. भाजपच्या 67 महिला उमेदवारांव्यतिरिक्त, विविध विरोधी पक्षांनी दिलेल्या उमेदवारीतून 20 महिलांनी विजय मिळवून नगरसेवक पद पटकावले आहे. पुणे मनपाच्या एकूण 165 जागांपैकी 83 जागा महिलांसाठी आरक्षित होत्या, त्यामुळे राजकीय पक्षांना या जागांवर महिलांना उमेदवारी देणे बंधनकारक होते. भाजपने केवळ आरक्षित जागांवरच नव्हे, तर सर्वसाधारण गटात चार आणि अनुसूचित जातीच्या गटात पाच महिला उमेदवारांना तिकीट देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. निवेदिता एकबोटे, पल्लवी जावळे, रंजना टिळेकर, अर्चना जगताप, संगीता दांगट आणि वीणा घोष यांनी महिला आरक्षित नसलेल्या जागांवर विजय संपादन करत आपले कर्तृत्व सिद्ध केले. प्रभाग क्रमांक 12, 18, 20, 22, 23, 24, 25, 26 आणि 29 मध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांचे प्रमाण अधिक होते. याचा लाभ महिला उमेदवारांना मिळाला आणि त्यांच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. महिला उमेदवार यांनी पुरुषांच्या बरोबरीने निवडणुकीत प्रचारात हिरारीने सहभाग घेतल्याचे देखील यावेळी दिसून आले आहे. विकासाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत असतानाच ,नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांमध्ये देखील ओळखीतील महिला उपयोगी पडू शकते असे देखील महिला उमेदवारांनी घरोघर जाऊन प्रचार केला.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 1:01 pm

ओबीसी बहुजन आघाडी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढवणार:प्रकाश शेंडगे यांची घोषणा

ओबीसी बहुजन आघाडी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लढवणार असल्याची घोषणा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांना आव्हान देण्यासाठी ओबीसी, दलित आणि अल्पसंख्याकांना एकत्र आणून ही आघाडी ताकदीने निवडणूक लढवेल, असे शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शेंडगे म्हणाले की, भावी लोकप्रतिनिधी घडवण्यासाठी हे एक हक्काचे व्यासपीठ आहे. निवडणुकीत पराभव झाला तरी त्यातून अनुभव घेऊन पुढील काळात पुन्हा लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ओबीसी नेते मंगेश ससाणे, चंद्रकांत बावकर आणि अस्लम बागवान उपस्थित होते. शेंडगे यांनी सांगितले की, 'ओबीसी बहुजन आघाडी' या नावाने पक्ष स्थापन करण्यात आला आहे. अनेक वर्षे काम करूनही प्रस्थापित पक्ष ओबीसी कार्यकर्त्यांना संधी देत नाहीत. त्यामुळे आता ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून प्रथमच निवडणुकीला सामोरे जात आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनच नेते तयार होतात आणि आता ओबीसी कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची प्रतीक्षा संपली आहे, असे ते म्हणाले. प्रस्थापित पक्ष बोगस कुणबी दाखले वापरून ओबीसींच्या हक्काच्या जागा बळकावत असल्याचा आरोप शेंडगे यांनी केला. याविरोधात न्यायालयात दाद मागण्यासोबतच निवडणुकीत अशा उमेदवारांना पराभूत करण्यासाठीही काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कमी वेळ दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी पुणे महानगरपालिकेत बोगस कुणबी दाखल्यांच्या आधारे अनेकांनी निवडणुका लढवल्याचा आरोप केला. यामुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा आली आहे. ओबीसींसाठी असलेल्या 27 टक्के आरक्षणावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला जात असून, पुणे मनपातील 44 ओबीसी जागांपैकी 26 जागांवर 'खोटे' ओबीसी निवडून आले आहेत, असे ससाणे यांनी नमूद केले. याविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 12:59 pm

पुण्यात विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार:कोंढवा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला

पुण्यात विवाहाचे आमिष दाखवून एका 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गणेश पिल्ले (वय 19, रा. चिंचवड, पुणे) असे आरोपीचे नाव असून, पीडित तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी आणि आरोपी पिल्ले यांची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत पिल्ले याने तरुणीला लग्नाचे वचन दिले. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीवर बलात्कार केला. तरुणीने या कृत्याला विरोध केला असता, पिल्ले याने तिला धमकावले. घाबरलेल्या तरुणीने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवराज खराडे करत आहेत. मुलींची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला धक्काबुक्की कोंढव्यातील येवलेवाडी परिसरात मुलींची छेड काढल्याचा जाब विचारणाऱ्या एका महिलेला धक्काबुक्की करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव घाटोळे (रा. टिळेकनगर, कोंढवा बुद्रुक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने येवलेवाडी पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी घाटोळे तक्रारदार महिलेच्या दोन मुलींकडे पाहून शिट्टी वाजवून त्यांची छेड काढत असे. या प्रकाराबाबत महिलेने घाटोळेला जाब विचारला असता, त्याने महिलेला धक्काबुक्की केली आणि तिचा विनयभंग केला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रसाद जाधव करत आहेत. एकतर्फी प्रेमातून एका तरुणीला मारहाण एकतर्फी प्रेमातून एका तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. समीर अकबर हाश्मी (वय 25, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित 19 वर्षीय तरुणीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत असून, आरोपी हाश्मी तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. तरुणीने त्याच्या प्रेमास नकार दिल्याने तो संतप्त झाला. आरोपी तरुणीच्या घरात शिरला आणि 'तू माझ्यावर प्रेम केले नाहीस, तर तुला शिक्षण घेऊ देणार नाही,' अशी धमकी दिली. तरुणीने त्याला धक्का दिल्यानंतर तो अधिक चिडला आणि त्याने तिला मारहाण केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ नाळे करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 12:57 pm

ठाकरे बंधूंनी खूप चांगली लढत दिली:राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांचा दावा; भाजपवर पैसे ओतून, माणसे चोरून इलेक्शन जिंकल्याचा आरोप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी अभिमानास्पद लढत दिल्याचा दावा केला आहे. ठाकरे बंधूंनी सगळीकडेच खूप चांगली लढत दिली. आम्हाला त्याचा अभिमान आहे. पण भाजपने अमाप पैसे ओतून व माणसे चोरून निवडणूक जिंकली, असे त्या म्हणाल्यात. आम्ही उद्यापासून पक्षबांधणीच्या कामाला लागणार असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. मनसेच्या मुंबई विजयी उमेदवारांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे औक्षण केले. राज ठाकरे यांनी यावेळी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शर्मिला यांनी भाजप व शिंदे गटाचा विजय पैशाच्या जोरावर झाल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या, सत्ताधारी महायुतीने कल्याण डोंबिवली येथील आमच्या दिसतील त्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना उचलून नेले. त्यानंतरही आमचे 5 उमेदवार तिथे निवडून आले. त्यांनी पैसे ओतले, माणसे चोरली, त्यानंतरही आम्ही नवी मुंबईत खाते उघडले. त्यामुळे मला अभिमान आहे. आमची अशीच घोडदौड सुरू राहील. सत्ताधाऱ्यांची एकमेकांवरच चिखलफेक त्या म्हणाल्या, सत्ताधारी महायुतीचे घटकपक्ष एकमेकांवरच आरोप - प्रत्यारोप करत आहेत. भाजपने पहिल्यांदा अजित पवारांच्या फायली आम्ही अजून बंद केल्या नसल्याचा इशारा दिला. त्यानंतर त्यांनी त्यांनाही सोबत घेतले. लोकांनी डोळे उघडले पाहिजे. हे सत्ताधीश लोक निवडणुकीत एकमेकांविरोधात काय बोलत होते यावर लक्ष दिले पाहिजे. म्हणजे माझ्याकडे तुमच्याविरोधात पुरावे आहेत, पण मी सत्ता उपभोगतो तोपर्यंत मी ते देणार नाही असा हा प्रकार आहे. आम्ही खूप चांगली लढत दिली शर्मिला ठाकरे म्हणाल्या, मी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे व आमच्या सर्वच नेत्यांचे अभिनंदन करेन. आमचे शून्य नगरसेवक होते. ठाकरे गटाचे त्यांनी 60-65 नगरसेवक पळवून नेले होते. त्यांच्याकडे केवळ 20 उरले होते. त्यानंतर आमचे आज 6 नगरसेवक निवडून आले, तर ठाकरे गटाचेही 65-66 नगरसेवक निवडून आले. त्यामुळे आम्ही खूप चांगली लढत दिली आहे. सैन्याला निदान धान्य वगैरे तरी पुरवावे लागते. तेवढे धान्यच आम्ही पुरवले. याऊलट विरोधकांकडे मिसाईल्स असूनही चांगली लढत दिली. अरे तुम्ही तुमची माणसे तयार करा ना ठाण्यात मनसेची एकही जागा आली नाही. शर्मिला यांनी त्यावरही भाष्य केले. ठाण्यात उपमुख्यमंत्र्यांनी आमच्या काही उमेदवारांचे फॉर्म असेच रद्द केले. तिथेही आमचेही उमेदवार पळवण्यात आले. शाखाध्यक्ष, विभागाध्यक्ष पळवले. अरे, तुमचे पक्ष एवढ्या वर्षांचे आहेत ना. तुम्ही तुमची माणसे का तयार करत नाही. आम्ही आमचे कार्यकर्ते निर्माण करतो. आता आमचे हे नगरसेवक निवडून आलेत. उद्यापासून आम्ही आमची पक्षबांधणी सुरू करणार. आमच्याकडे पुढची फळी पुढे यायला तयार आहे. काम करायला. आम्ही ते तयार करणार आणि असेच लढणार, असे शर्मिला म्हणाल्या. महायुतीच्या पैशांपुढे आम्ही कुठेच नव्हतो अनेक ठिकाणी आमच्या जागा फार कमी मतांनी पडल्या. महायुतीकडे अमाप पैसा होता. त्या तुलनेत आम्ही कुठेही नव्हतो. कमळाच्या पाकिटातून पैसे वाटण्यात आले. शिंदे भाजपच्या लोकांना पकडत होते. भाजप शिंदेंच्या लोकांना पकडत होते. ते एकेका मताला 5 ते 10 हजार रुपये देत होते. आम्हाला तसे करायचे नाही. आम्हाला पैसे वाटून मतदान करायचे नाही, असेही शर्मिला ठाकरे यावेळी बोलताना म्हणाल्या.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 12:52 pm

मुंबई जिंकली, पण महापौर कोण? भाजप-शिंदे सेनेत पडद्यामागे जोरदार हालचाली:जानेवारीअखेर महापौर निवड; सत्ता स्थापन होणार कशी?

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. 25 वर्षांपासून शिवसेना आणि ठाकरे गटाच्या ताब्यात असलेली बृहन्मुंबई महानगरपालिका अखेर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीकडे गेली. या निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला. यामुळे मुंबईच्या सत्ताकेंद्रात पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकणार हे स्पष्ट झालं असलं, तरी आता सर्वाधिक उत्सुकता आहे ती मुंबईचा महापौर नेमका कोण होणार, याकडे. निवडणुकीपूर्वीच मुंबईच्या महापौरपदावरून वातावरण तापलं होतं. ठाकरे बंधूंनी जाहीरपणे मुंबईचा महापौर मराठीच असेल, अशी भूमिका घेतली होती. याच पार्श्वभूमीवर सुरुवातीला भाजपकडून महापौर हिंदू असेल, अशी भूमिका मांडली गेली होती. मात्र प्रचाराच्या उत्तरार्धात वाढता वाद पाहता भाजपलाही मुंबईचा महापौर मराठी व्यक्तीच होईल, असं स्पष्ट करावं लागलं. आता भाजपने निवडणूक जिंकल्यानंतर या भूमिकेची अंमलबजावणी कशी होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या महापौरपदाचा निर्णय तात्काळ होणार नाही. जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात नगरविकास खात्याकडून महापौर पदासाठी सोडत काढली जाणार असून, या सोडतीनंतर साधारण दहा दिवसांनी महापौराची अधिकृत निवड होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तोपर्यंत मुंबईच्या महापौरपदावर सस्पेन्स कायम राहणार आहे. संख्याबळाचा विचार केला तर भाजपने 89 आणि शिंदे सेनेने 29 जागा जिंकल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी किमान 114 जागांची आवश्यकता आहे. भाजप एकट्याला हा बहुमताचा आकडा गाठता येत नसल्यामुळे शिंदे गटाची साथ अपरिहार्य ठरणार आहे. यामुळेच महापौरपदावर भाजपचा नैसर्गिक दावा असला, तरी शिंदे सेनेचे काही नेतेही महापौरपदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. सत्तास्थापन करताना महापौरपदावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. या निवडणुकीत मुंबईतील मतदारवर्गाचं चित्रही वेगळं पाहायला मिळालं. मराठीबहुल भागांमध्ये ठाकरे बंधूंच्या आघाडीला तुलनेने यश मिळालं, तर अमराठी लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारली. अमराठी मतदारांनी भाजपला एकगठ्ठा मतदान करत त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबई हे आंतरराष्ट्रीय आणि कॉस्मोपॉलिटन शहर असल्यामुळे, अमराठी व्यक्ती महापौर झाल्यास त्यात गैर काय? असा युक्तिवादही काही राजकीय वर्तुळातून पुढे येत आहे. त्यामुळे भाजप खरंच अमराठी व्यक्तीला महापौरपदी संधी देणार का, हा प्रश्नही चर्चेत आहे. महापौर कोण? हा राज्यासाठी उत्सुकतेचा विषय दरम्यान, भाजपमध्येच महापौरपदासाठी अनेक इच्छुक नगरसेवक रिंगणात असल्याचं बोललं जात आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे, शिंदे गट महापौरपदासाठी कितपत ताणून धरेल, यावर सत्तास्थापनेचं गणित ठरणार आहे. 25 वर्षांनंतर मुंबईच्या सत्तेत झालेल्या या मोठ्या बदलानंतर आता महापौर कोण होणार, हा प्रश्न मुंबईकरांसह संपूर्ण राज्यासाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 12:39 pm

संभाजीनगरातील सर्व 29 प्रभागांचे निकाल एका क्लिकवर:भाजप मोठा भाऊ, शिवसेनेला फटका, एमआयएमचा प्रयोग यशस्वी; वाचा प्रभागनिहाय विश्लेषण

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सर्व 29 प्रभागांच्या निकालांची सविस्तर माहिती तुम्हाला येथे मिळेल. या निकालात भाजप मोठा भाऊ ठरला असून, युती तोडणाऱ्या शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. तसेच खासदार इम्तियाज जलील यांचा राजकीय प्रयोग यशस्वी ठरल्याचे चित्र दिसून येत आहे. पाहा यादी…

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 12:17 pm

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप उमेदवाराच्या घरावर दगडफेक:शहरात दहशत, शिंदे गटाच्या उमेदवारासह अनेकांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीनंतर शहरात विजयी जल्लोष सुरू असतानाच गांधी नगर भागात राजकीय हिंसाचाराची धक्कादायक घटना घडली. भाजपचे उमेदवार बंटी चावरिया यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या घरावर लाठ्या-काठ्यांनी सज्ज झालेल्या टोळक्याने जोरदार दगडफेक केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे सेनेचे उमेदवार मिल्लू चावरिया हे देखील याच प्रभागातून निवडणूक लढवत होते. तुमच्यामुळेच माझा पराभव झाला, असा आरोप करत मिल्लू चावरिया यांच्या समर्थकांनी जुन्या वादातून आणि निवडणुकीतील पराभवाच्या संतापातून बंटी चावरिया यांच्या घराला लक्ष्य केल्याचे बोलले जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसतंय हा संपूर्ण हल्ला परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडिओमध्ये काही तरुण हातात लाठ्या-काठ्या घेऊन घराच्या दिशेने दगडफेक करताना स्पष्टपणे दिसत आहेत. या दगडफेकीत घराच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून उभ्या वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 14 जणांवर गुन्हा दाखल या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापले आहे. बंटी चावरिया यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिल्लू चावरिया यांच्यासह एकूण 14 जणांविरोधात दंगल घडवणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि धमकावणे या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी गांधी नगर परिसरात बंदोबस्त वाढवला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कडक पावले उचलली जात आहेत. अकोटमध्ये पराभवाच्या रागातून विजयी उमेदवारावर ‎जीवघेणा हल्ला मनपा निवडणुकीत भाजपच्या ‎‎नवनिर्वाचित नगरसेवकावर ‎प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ‎‎अकोट फैल भागात शुक्रवारी रात्री ‎‎नऊच्या सुमारास घडली. शरद‎ श्रीराम तुरकर असे हल्ला झालेल्या ‎‎नगरसेवकाचे नाव आहे. या भागात ‎‎तोडफोड देखील झाली. पोलिसांनी‎ सौम्य लाठीमार केला. या घटनेमुळे ‎‎शहरात मोठी खळबळ उडाली.‎ जखमी नगरसेवकाला रुग्णालयात ‎‎दाखल करण्यात आले असून‎ उपचार सुरू आहेत.‎ शहरातील प्रभाग क्रमांक 2 ‘ब’‎मधील भाजपचे विजयी उमेदवार‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा‎ चाकूहल्ला. भाजपचेच प्रभाग 2 ‘ड’‎गटातील पराभूत उमेदवार नितीन‎ राऊत आणि समर्थकांनी हल्ला ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎केल्याचे सांगण्यात येत आहे.‎ दरम्यान, या घटनेनंतर वाहनांच्या‎ तोडफोडीनंतर पोलिसांनी सौम्य ‎लाठीमार केला.निवडणूक निकालानंतर राजकीय वाद पेटला आहे. अकोट फैल भागात‎ भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर भाजपच्याच पराभूत उमेदवार ‎गटाकडून चाकू हल्ला करण्यात आला.‎ वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 12:16 pm

लाडक्या बहिणींनी अडवला मुंबई-कोलकाता महामार्ग:दोन महिन्यांचे पैसे न मिळाल्याने भंडाऱ्यात संताप; सरकारविरोधात ठिय्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचा हप्ता वर्ग करण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात राज्यातील अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात अजूनही हे पैसे जमा झालेले नाहीत. या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, त्याचा थेट उद्रेक भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळाला. शनिवारी सकाळी संतप्त लाडक्या बहिणींनी मुंबई़़-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवत आंदोलन केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात महिलांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही वेळातच वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि प्रवाशांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. अचानक झालेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांसह खासगी वाहनेही अडकून पडली होती. या दृश्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलन करणाऱ्या महिलांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे पैसे खात्यात का जमा झाले नाहीत? असा थेट सवाल महिलांनी उपस्थित केला. महानगरपालिका निवडणुकीआधी दोन महिन्यांचे मानधन एकाचवेळी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात अनेक महिलांना एकही हप्ता मिळालेला नाही, अशी तक्रार यावेळी करण्यात आली. तातडीने पैसे जमा न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही काही महिलांनी दिला. दरम्यान, या योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या काही महिलांची नावे यादीतून गहाळ झाल्याचंही समोर आलं आहे. तांत्रिक अडचणी, कागदपत्रांमधील त्रुटी किंवा माहिती अपलोडमध्ये झालेल्या चुका यामुळे काही लाडक्या बहिणींना मानधन मिळालं नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या कारणांमुळे महिलांच्या संतापात काहीही फरक पडलेला दिसून आला नाही. योजना आमच्यासाठी आहे, मग चुका आम्ही का भोगायच्या? असा सवाल आंदोलक महिलांनी केला. महिलांनी महामार्ग रोखल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी महिलांशी संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. संबंधित खात्याशी संपर्क साधून तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर पैसे खात्यात जमा केले जातील, असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं. तसेच ज्यांची नावे यादीतून वगळली गेली आहेत, त्यांची पुन्हा पडताळणी केली जाईल, असंही सांगण्यात आलं. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आणि वारंवार समजावणी केल्यानंतर अखेर महिलांनी आंदोलन मागे घेतलं. त्यानंतर काही वेळातच महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. मात्र या आंदोलनामुळे अनेक तास महामार्गावर वाहतूक विस्कळीत राहिली आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही वाहनचालकांनी प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली. इतर जिल्ह्यांमध्येही असाच संताप उसळण्याची शक्यता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. मात्र हप्ते वेळेवर न मिळणे, यादीतील त्रुटी आणि तांत्रिक अडचणी यामुळे योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भंडाऱ्यातील आंदोलनानंतर आता इतर जिल्ह्यांमध्येही असाच संताप उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने तातडीने या समस्यांकडे लक्ष देऊन सर्व पात्र लाडक्या बहिणींना त्यांचा हक्काचा मानधन वेळेत मिळेल याची खात्री करावी, अशी मागणी महिलांकडून होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 12:15 pm

गावठी चाणक्यांना साधे शतक गाठता आले नाही:सुषमा अंधारेंची भाजप, शिंदेंवर टीका; भाजपच्या जागा फक्त 4 ने वाढल्याचा दावा

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजप - शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने या दोन्ही पक्षांवर उपहासात्मक टीका केली आहे. गावठी चाणक्यांनी एवढ्या सगळ्या स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवूनही त्यांना मुंबईत साधे शतकही काढता आले नाही, असे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचे केवुळ 20-25 नगरसेवक होते. आज त्यांचा आकडा 65 वर पोहोचल्याचे एक वेगळे गणितही त्यांनी या प्रकरणी मांडले आहे. मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालाने सूप वाजले. त्यात मुंबई महापालिकेतील ठाकरेंची जवळपास 25 वर्षांची सत्ता संपुष्टात येऊन तिथे भाजप- शिंदे गटाचा झेंडा फडकला. त्यानंतर आता या निकालाचे राजकीय पक्षांचे नेते आपापल्या दृष्टिकोनातून विश्लेषण करत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुंबईत भाजपच्या केवळ 4 जागा वाढल्याचे गणित मांडले आहे. सुषमा अंधारेंनी काय मांडले आहे गणित? सुषमा अंधारे आपल्या पोस्टमध्ये भाजप व शिंदे गटाला खोचक टोला हाणताना म्हणाल्या, गावठी चाणक्यांनी एवढ्या सगळ्या स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवून सुद्धा मुंबईत साधं शतक गाठता आलं नाही. कोट्यावधींचा पाऊस पाडून फक्त 4. शिवसेना UBT चे 20/25 नगरसेवक होते. आज 65 आहेत. मनसेचे 6 नगरसेवक हा फायदा वेगळाच. शाहसेनेचे 53 नगरसेवक होते. आज 28 आहेत. भाजपाचे 84 नगरसेवक होते. ते 4 ने वाढले. 27 महापालिका आम्ही जिंकू म्हणणारी भाजपा प्रत्यक्षात फक्त 9 ठिकाणी स्वबळावर तर 15 ठिकाणी कुबड्यावर उभी राहण्याचा प्रयत्न करतेय. काय भक्तुल्यानो, कळलं का? बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. सुषमा अंधारे यांच्या या टीकेवर भाजपने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. काय आहे मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल उल्लेखनीय बाब म्हणजे 227 सदस्यीय मुंबई महापालिकेत भाजपला सर्वाधिक 89 जागा मिळाल्यात. तर शिंदे गटाला अवघ्या 29 जागांवर समाधान मानावे लागले आहे. याऊलट ठाकरे गटाला 65, मनसेला 6, काँग्रेसला 24, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. 10 जागांवर इतर उमेदवार निवडून आलेत. हे ही वाचा… सर्व 29 महापालिकांचे निकाल एका क्लिकवर:भाजप, महायुतीचा डंका; NCP ची हाराकिरी, ठाकरेंची BMC गेली, पण मराठी मते शाबूत राज्यातील मुंबईसह 29 महापालिकांचे निकाल काल हाती आले. त्यात सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वातील महायुतीने मुंबईसह बहुतांश महापालिका आपल्या खिशात घातल्या. यात अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी व त्यांना साथ देणाऱ्या शरद पवार गटाची पुरती हाराकिरी झाली. या निवडणुकीत मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसेच्या युतीची हार झाली. पण त्यांची तेथील मराठी मते शाबूत असल्याचे सिद्ध झाले. पण आता तिथे भाजपसमोरील विरोधी बाकावर बसावे लागेल. या बातमीत आपण राज्यातील सर्व 26 महापालिकांतील पक्षीय बलाबल पाहूया… वाचा सविस्तर

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 11:30 am

बाळासाहेब ठाकरेंच्या पहिल्या महिला शिलेदाराचा अखेरचा निरोप:शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे निधन

शिवसेनेच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा अध्याय शुक्रवारी रात्री संपुष्टात आला. पक्षाच्या पहिल्या महिला आमदार आणि ज्येष्ठ नेत्या नीला देसाई यांचे शुक्रवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. अचानक आलेल्या तीव्र हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे शिवसेनेत आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात शोककळा पसरली आहे. नीला देसाई या शिवसेनेच्या जुन्या, निष्ठावंत आणि अभ्यासू नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या काळात राजकारणात महिलांचा सहभाग अत्यंत मर्यादित होता, त्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत नेतृत्वाची संधी दिली होती. त्या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आणि पुढे विधान परिषदेच्या सदस्य म्हणूनही त्यांनी प्रभावी भूमिका बजावली. स्पष्ट मत मांडणी, पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक कामातील अनुभव यामुळे त्यांचा पक्षात वेगळा सन्मान होता. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर आधीच उद्धव ठाकरे गटात निराशेचं वातावरण पसरलेलं असताना नीला देसाई यांच्या निधनाने दुःखात आणखी भर पडली आहे. निवडणुकीतील अपेक्षित यश न मिळाल्याची खंत आणि त्याचवेळी पक्षाच्या अनुभवी नेत्या गमावल्याचं दु:ख असा दुहेरी आघात ठाकरे गटाला सहन करावा लागत आहे. देसाई या पक्षासाठी केवळ नेत्या नव्हत्या, तर मार्गदर्शक आणि अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान होत्या. नीला देसाई यांच्या निधनाचं वृत्त समजताच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विविध पक्षांचे नेते, माजी आमदार, सामाजिक कार्यकर्ते यांनी त्यांच्या कार्याची आठवण करून देत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार होणार असून, यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सुमारे 52.94 टक्के मतदान नोंदवले गेले. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी किमान 114 जागा जिंकणं आवश्यक असते. बहुमताचा हा आकडा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने गाठला आहे. या निवडणुकीत मुंबईतील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाने राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती केली, तर या आघाडीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाला होता. दुसरीकडे, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईतील सत्ता हस्तगत करण्यासाठी आक्रमक प्रचार करत संपूर्ण ताकद पणाला लावली होती. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरली होती, तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने युती करून लढण्याचा निर्णय घेतला होता. अशा राजकीय घडामोडींच्या गदारोळात नीला देसाई यांच्या निधनाने निवडणूक निकालांच्या चर्चेला क्षणभर थांबवले. शिवसेनेच्या इतिहासातील या कर्तृत्ववान नेत्या कायम स्मरणात राहतील, अशी भावना व्यक्त होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 11:09 am

सर्व 29 महापालिकांचे निकाल एका क्लिकवर:भाजप, महायुतीचा डंका; NCP ची हाराकिरी, ठाकरेंची BMC गेली, पण मराठी मते शाबूत

राज्यातील मुंबईसह 29 महापालिकांचे निकाल काल हाती आले. त्यात सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वातील महायुतीने मुंबईसह बहुतांश महापालिका आपल्या खिशात घातल्या. यात अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी व त्यांना साथ देणाऱ्या शरद पवार गटाची पुरती हाराकिरी झाली. या निवडणुकीत मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसेच्या युतीची हार झाली. पण त्यांची तेथील मराठी मते शाबूत असल्याचे सिद्ध झाले. पण आता तिथे भाजपसमोरील विरोधी बाकावर बसावे लागेल. या बातमीत आपण राज्यातील सर्व 26 महापालिकांतील पक्षीय बलाबल पाहूया… मुंबई महापालिका (227/227) पुणे महापालिका (165/165) नागपूर महापालिका (151/151) छत्रपती संभाजीनगर (115/115) पिंपरी चिंचवड महापालिका (128/128) ठाणे महापालिका (131/131) नाशिक महापालिका (122/122) नवी मुंबई महापालिका (111/111) कोल्हापूर महापालिका (81/81) सांगली मिरज कुपवाड महापालिका (78/78) सोलापूर महापालिका (102/102) लातूर महापालिका (70/70) अहिल्यानगर महापालिका (68/68) अमरावती महापालिका (87/87) नांदेड वाघाळा महापालिका (81/81) जळगाव महापालिका (75/75) जालना महापालिका (65/65) चंद्रपूर महापालिका (66/66) वसई विरार महापालिका (115/115) मालेगाव महापालिका (84/84) अकोला महापालिका (80/80) पनवेल महापालिका (78/78) मिरा-भाईंदर महापालिका (91/95) धुळे महापालिका (74/74) परभणी महापालिका (65/65) उल्हासनगर (78/78) भिवंडी निजामपूर महापालिका (90/90) इचलकरंजी महापालिका (65/65) कल्याण डोंबिवली महापालिका (122/122)

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 11:07 am

डिग्रस फाटावर अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी पकडले:महसूल विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरु

हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर डिग्र फाटा येथे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनीच अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले आहे. याप्रकरणी महसूल विभागाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सुत्रांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांत अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. जिल्हयातील कयाधू, पूर्णा नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक होत असल्याने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी महसूल व पोलिस विभागाची पथके कार्यरत ठेवली आहे. या पथकाकडून दररोज वाहनांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान, सेनगाव, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यात महसूल व पोलिस पथकाकडून कारवाईचा धडका सुरु झाला असून मागील आठ दिवसांत तब्बल 15 पेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी वाहन चालकासह वाहन मालकावर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे त्यांच्या पथकासह शुक्रवारी ता. 16 हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावरून जात होते. यावेळी डिग्रस फाट्या जवळ एक टिप्पर दिसून आले. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी टिप्पर थांबवून तपासणी केली असता टिप्पर मध्ये अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले. यावरून जिल्हाधिकारी गुप्ता यांनी टिप्पर चालकाची चौकशी केली. यामध्ये त्याने वाळू वाहतूकीच्या पावत्या तसेच परवाना नसल्याचे स्पष्ट केले. यावरून सदर टिप्पर जप्त करून हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. याप्रकरणी हिंगोली ग्राामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे महसूल विभागाच्या पथकाने सांगितले. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनीच केलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:50 am

महापालिका निकालांवर संजय राऊतांची तोफ:एकनाथ शिंदे नसते तर भाजपचा महापौर अशक्यच; जयचंदाचा शिक्का

महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील राजकारण अधिक तापले असून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जोरदार टीका करत अनेक राजकीय मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. मुंबई महापालिकेतील सत्ता परिवर्तन, एकनाथ शिंदे यांची भूमिका, मनसेचा निकाल, तसेच काँग्रेसची रणनीती यावर भाष्य करत राऊतांनी आक्रमक शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला. विशेषतः मुंबईत भाजपचा महापौर होण्यामागे एकनाथ शिंदे कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे शिवसेनेचे ‘जयचंद’ झाले नसते, तर मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर कधीच झाला नसता. मराठी जनतेने शिंदेंना इतिहासात जयचंदच्या भूमिकेतच लक्षात ठेवावं लागेल, अशी टीका त्यांनी केली. शिंदेंमुळेच मराठी माणसाची सत्ता मुंबईतून गेली, असा आरोप करत राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रात या निर्णयामुळे प्रचंड संतापाची लाट असून, भविष्यात शिंदेंना मोकळेपणाने फिरणंही अवघड होईल, असा इशाराही त्यांनी दिला. मनसेच्या कामगिरीवर भाष्य करताना संजय राऊत यांनी थेट अपेक्षा व्यक्त केली. त्यांच्या मते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किमान 10 ते 12 जागा मिळणं आवश्यक होतं. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर लढणाऱ्या पक्षाला यापेक्षा जास्त यश मिळायला हवं होतं, असं मत त्यांनी मांडलं. निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने मराठी मतांचे विभाजन झाल्याचं चित्र समोर आलं असल्याचंही त्यांनी सूचित केलं. तरीही, सत्तेबाहेर असताना लढाईला वेगळीच धार आणि रंग असतो, असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षांच्या संघर्षाचं महत्त्व अधोरेखित केलं. सत्ता नसतानाची लढाई अधिक प्रामाणिक आणि आक्रमक असते, असं मत राऊतांनी स्पष्टपणे मांडलं. सत्ता हातात असताना मर्यादा येतात, पण सत्तेबाहेर राहून लढताना जनतेशी थेट संवाद साधता येतो, असं त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी हीच खरी संघर्षाची वेळ असल्याचं ते म्हणाले. महापालिका निवडणुकांचे निकाल हे अंतिम सत्य नसून, पुढील काळात जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा संकेतही त्यांनी दिला. काँग्रेसच्या भूमिकेबाबत बोलताना संजय राऊत यांनी तुलनेने सकारात्मक भूमिका घेतली. महापालिका निवडणुकीत काँग्रेसची स्ट्रॅटेजी योग्य होती, असं मत त्यांनी व्यक्त केलं. काही ठिकाणी अपेक्षित यश मिळालं नसलं, तरी पक्षाने ज्या पद्धतीने निवडणूक लढवली, ती राजकीयदृष्ट्या योग्य दिशेने होती, असं राऊत म्हणाले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रितपणे पुढील राजकीय लढाईची दिशा ठरवण्याची गरज असल्याचंही त्यांनी सूचित केलं. एकूणच, संजय राऊत यांच्या या पत्रकार परिषदेने महापालिका निकालांनंतरच्या राजकीय संघर्षाला अधिक धार दिली आहे. एकनाथ शिंदेंवर केलेले गंभीर आरोप, मनसेच्या निकालावरची अपेक्षा, सत्तेबाहेरच्या संघर्षाचं महत्त्व आणि काँग्रेसच्या रणनीतीवर दिलेली दाद, या सगळ्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारण अधिक आक्रमक आणि संघर्षमय होण्याचे संकेत मिळत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:50 am

स्वामी विवेकानंद जनसेवा प्रेरणा पुरस्कारांचे वितरण उत्साहात:अ. भा. मराठा सेवा संघ, निर्भय बनो जन आंदोलनाचा पुढाकार‎

स्वामी विवेकानंद जनसेवा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय संघटक प्रा. दादाराव पाथरीकर तसेच जिल्हाध्यक्ष व राज्य उपाध्यक्ष गजानन हरणे यांनी डी. एम. के. सेवा मंडळ व निर्भय बनो जन आंदोलन' यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार सोहळा आयोजित केला होता. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार प्रदीप खाडे यांना त्यांच्या विविध सामाजिक कार्याबद्दल स्वामी विवेकानंद जनसेवा प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. इलना, सिफा व किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांचे हस्ते त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला. राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या समारंभात शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांना राष्ट्रीय डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी समाज हितासाठी कार्य करणाऱ्या धनंजय मिश्रा, दिवाकर गावंडे, अक्षय राऊत, प्रा. डॉ. ममता इंगोले, दत्तात्रेय निघाने वैशाली राऊत, डॉ. अर्चना देशमुख, ललिता पात्रीकर भारती पात्रीकर, शंकरराव बोर्डे, प्रदीप गावंडे , सिद्धार्थ तायडे सुरेश पात्रीकर, डॉ. चंद्रशेखर गोंधळ, बळवंतराव कडू, बाळाभाऊ पात्रीकर यांच्यासह विविध समाजसेवकांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जनसेवा पुरस्कार बहाल करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था अकोटचे अध्यक्ष ह. भ. प. वासुदेवराव महल्ले पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी नेते प्रकाश पोहरे, माजी प्राचार्या प्रतिभा पाथरीकर, किसान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिवाकर गावंडे, प्रख्यात समाजसेवक धनंजय मिश्रा, प्रख्यात लेखिका प्रा. डॉ. ममता इंगोले, पंढरपूरचे सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब मोरे, सामाजिक कार्यकर्ते शंकरराव बोर्डे, माजी सैनिक प्रभू इंगळे उपस्थित होते.कार्यक्रमास भानुदास कराळे, दीपक आखरे, संदीप देशमुख, सुरेश महल्ले, नंदकुमार गावंडे प्रभाकर चेहे, डॉ. कृष्णकांत वक्ते तन्मय हरणे यांचे सह इतरही प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गजानन हरणे यांनी केले. असा झाला सोहळा सर्वप्रथम अतिथींच्या हस्ते राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, कृषिरत्न डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रारंभी युगेश्वरी हरणे यांनी जिजाऊ वंदना व स्वागत गीत सादर केले. प्रा. दादाराव पाथरीकर यांनी प्रास्ताविक करून पुरस्कार वितरणाचा हेतू विशद केला. याप्रसंगी प्रकाश पोहरे, ममता इंगोले, अक्षय राऊत, प्राचार्य प्रतिभा पात्रीकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:34 am

सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपकडून जल्लोष साजरा:मिठाईचे वितरण; पक्ष कार्यालयाबाहेर ढाेल ताशांचा गजर‎

सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून शुक्रवारी संध्याकाळी जल्लोष करण्यात आला. पक्ष कार्यालयाबाहेर आतषबाजी करीत मिठाईचे वितरण करण्यात आले. मुंबईसह महाराष्ट्रातील २४ नगरपालिकेमध्ये महायुतीला यश मिळाल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. महानगरपालिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भरघोस यश मिळाल्याचे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. या विजयाबद्दल भारतीय जनता पार्टी कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृह, जयप्रकाश नारायण चौकात विजयोत्सव साजर करण्यात आला. यावेळी प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खा. अनुप धोत्रे, आ. वसंत खंडेलवाल, निवडणूक प्रमुख विजयअग्रवाल, महानगराध्यक्ष जयंत मसणे, संतोष शिवरकर, किशोर पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी, सिद्धार्थ शर्मा आदी होते. विश्वासाला तडा नाही मूलभूत सुविधांसह अकोलेकरांच्या विश्वासाला तडा जाणार नाही. विकासावर लक्ष केंद्रीत करून भाज प आणि महायुती काम करेल असे आ. रणधीर सावरकर म्हणाले. महायुतीचा महापौर करण्यासाठी जनतेने पाठिंबा दिला. अकोलेकरांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी भाजपा लोकप्रतिनिधी पार पाडतील, असे खासदार अनुप धोत्रे म्हणाले. भाजपा- राष्ट्रवादी काँग्रेस अकोला महाविकास आघाडीला कौल दिला आहे. जनतेने दाखवलेला विश्वास आणि त्यांची ताकद ही विकासासाठी प्रेरणा देत असल्याची प्रतिक्रिया जयंत मसने यांनी व्यक्त केली.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:33 am

बालकांचे हक्क, बालविवाहावर प्रबोधन:रेल, धारेल येथे केली जनजागृती; कायदे, हक्कांविषयी देण्यात आली सविस्तर माहिती‎

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, मिशन शक्ती सखी वन स्टॉप सेंटर आणि एन्करेज एज्युकेशनल फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने बालविवाहमुक्त भारत- १०० दिवस संकल्प अभियानांतर्गत मंगळवारी जिल्हा परिषद शाळा रेल व धारेल येथे जनजागृती करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा बालकल्याण समिती सदस्य प्रांजली जैस्वाल, सखी वन स्टॉप केंद्राचे प्रशासक ॲड. मनीषा भोरे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील लाडूलकर, एन्करेज एज्युकेशनचे महेंद्र गणोदे, पॅरामेडिकल स्टाफ प्रिया इंगळे उपस्थित होते. १०० दिवस संकल्प अभियान अंतर्गत विद्यार्थी व उपस्थितांकडून बालविवाह मुक्त भारताची प्रतिज्ञा घेण्यात आली. दोन्ही शाळांमध्ये मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढण्यास मदत झाली. बालकांचे हक्क, बालविवाहाचे दुष्परिणामावर प्रबोधन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बालकांचे हक्क व अधिकार, सुरक्षित व असुरक्षित स्पर्श, चाइल्ड हेल्पलाइन १०९८, बाल विवाहाचे दुष्परिणाम, माझे आरोग्य या विषयांवर सविस्तर व मार्गदर्शक माहिती देण्यात आली. बालविवाह कायद्याने गुन्हा असून तो समाजासाठी घातक आहे, याबाबत उपस्थितांमध्ये प्रबोधन करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:32 am

सिल्वरसिटी हॉस्पिटलमध्ये आजपासून आयसीयू सुविधा मिळणार:रुग्णांची हेळसांड थांबणार, डॉ. अशोक बावस्कर यांची पत्रकार परिषदेत माहिती‎

येथील सिल्वर सिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यासह तालुकापरिसरातील जनतेच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधेसह नवीन आय सी यू सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अशोक बावस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील सिल्वर सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या अत्याधुनिक सुविधायुक्त नूतन आयसीयूचे उद्घाटन शनिवारी १७ जानेवारी रोजी राज्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्या हस्ते व नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष अपर्णा सागर फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. खामगाव येथे दहा वर्षांपूर्वी सिल्वरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल क्रिटिकल केअर व ट्रामा सेंटरची सुरुवात झाली आहे. जागतिक स्तरावरील अत्याधुनिक उपकरणे व उत्कृष्ट उपचार पद्धती अत्यंत माफक दरात एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्यामुळे रुग्णांना सोयीचे झाले आहे. मागील दहा वर्षात अत्यंत अत्यावस्त व किचकट रुग्णावर आयसीयूमध्ये उच्च दर्जाचे उपचार करण्यात आले. वाढत्या रुग्णसंखेमुळे नवीन आधुनिक वैद्यकीय उपकरणे व रुग्णांच्या दैनंदिन प्रगतीवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अतिदक्षता विभागाची गरज भासू लागली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा विचार करून अत्याधुनिक सुविधेसह नवीन आयुष्याचा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. अशी माहिती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ.अशोक बावस्कर यांनी दिली. ते असेही म्हणाले की, अनेकदा रुग्णांना आयसीयू सुविधा नसल्याने त्यांना मोठ्या शहराकडे धाव घ्यावी लागत होती. यासाठी त्यांनी जास्तीचे पैसे देखील मोजावे लागत होते. परंतू सिल्वरसिटीमध्ये ही अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांची पायपीट थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यवस्थापकीय संचालक डॉ. पंकज मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पराग महाजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गौरव लढ्ढा, संचालक डॉ. प्रशांत कावडकर, डॉ. भगतसिंग राजपूत, डॉ. निलेश टीबडेवाल, डॉ. गणेश महाले, डॉ. मनीष अग्रवाल, डॉ. गौरव गोयनका, डॉ. आनंद राठी यांची उपस्थित होती.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:21 am

महापालिका निकालात असदुद्दीन ओवैसींनी राज ठाकरेंनाही टाकलं मागे:शहरी राजकारणाला नवा वळण; मनसेपेक्षा AIMIM जास्त जागांवर विजयी

महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांनी महाराष्ट्राच्या शहरी राजकारणात एक महत्त्वाचा संकेत दिला आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपेक्षित यश न मिळता, असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM ने थेट मनसेपेक्षा अधिक जागा जिंकत आपली ताकद दाखवून दिली आहे. विशेषतः मुंबईत AIMIM ने मनसेला मागे टाकत उपस्थिती ठळक केली असून, हा निकाल ठाकरे विरुद्ध ओवैसी अशी नवी राजकीय तुलना समोर आणणारा ठरला आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले आणि या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली. बहुतांश महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. विशेषतः सर्वांचे लक्ष लागलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजप सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे. मात्र या निकालात सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे AIMIM ची कामगिरी, ज्याने थेट राज ठाकरेंच्या मनसेपेक्षा अधिक जागा जिंकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांचे निकाल जाहीर झाले असून, भाजपने 89 जागांवर विजय मिळवत आघाडी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 29 जागा जिंकल्या असून, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे 65 उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसने 24 जागांवर यश मिळवलं आहे. तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. शरद पवार गटाला केवळ 1 जागा मिळाली असून, समाजवादी पक्षाने 2 जागा जिंकल्या आहेत. महापौर निवडीसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा 114 असून, भाजप आणि शिंदे गटाची एकत्रित ताकद 118 इतकी होते. त्यामुळे मुंबईत यंदा महायुतीचाच महापौर होणार, हे जवळपास निश्चित झालं आहे. राज्यात भाजपचा बोलबाला असतानाच AIMIM नेही दमदार कामगिरी करत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. AIMIM ने राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये एकूण 114 जागांवर विजय मिळवला आहे. पक्षाचे नेते शारिक नक्षबंदी यांनी ही माहिती दिली आहे. मागील निवडणुकांमध्ये अत्यंत कमी फरकाने झालेल्या पराभवामुळे कार्यकर्त्यांनी यावेळी विजयासाठी विशेष मेहनत घेतल्याचं त्यांनी सांगितलं. शहरी मतदारांमध्ये आपली पकड वाढवण्यात पक्ष यशस्वी ठरल्याचं या निकालांतून स्पष्ट झालं आहे. AIMIM च्या यशावर पक्षप्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. घरोघरी जाऊन केलेला प्रचार आणि मागील निवडणुकांतील अनुभव याचा यावेळी मोठा फायदा झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये AIMIM ने 33 जागा, मालेगावमध्ये 21, अमरावतीत 15, नांदेडमध्ये 13, धुळ्यात 10, सोलापुरात 8, मुंबईत 6, ठाण्यात 5, जळगावमध्ये 2 आणि चंद्रपूरमध्ये 1 जागा जिंकली आहे. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवातीला अंतर्गत आव्हानं असतानाही ओवैसींच्या रॅलींनंतर पक्षाने मोठं यश मिळवलं, असं नक्षबंदी यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरेंच्या मनसेला अवघ्या 6 जागांवरच विजय या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची स्थितीही चर्चेचा विषय ठरली आहे. बीएमसी निवडणुकीत युती करूनही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना फारसा फायदा झाल्याचं चित्र नाही. उद्धव ठाकरे गटाला 65 जागा मिळाल्या असल्या, तरी सत्ता स्थापनेपासून ते दूर राहावं लागणार आहे. तर राज ठाकरेंच्या मनसेला अवघ्या 6 जागांवरच विजय मिळवता आला. विशेष म्हणजे, मुंबईत AIMIM ने 8 जागा जिंकून मनसेपेक्षा अधिक प्रभाव दाखवून दिला आहे. यामुळे शहरी राजकारणात मनसेची घटती ताकद आणि AIMIM चा वाढता प्रभाव यावर चर्चा सुरू झाली आहे. शहरी राजकारणातील बदलत्या मतदारवृत्तीचं प्रतीक एकूणच, महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांनी भाजपला स्पष्ट आघाडी दिली असली, तरी राज ठाकरे आणि असदुद्दीन ओवैसी यांच्यातील तुलनेमुळे राजकीय चर्चेला नवी दिशा मिळाली आहे. मनसेपेक्षा AIMIM जास्त जागांवर विजयी होणं हे केवळ आकड्यांपुरतं मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या शहरी राजकारणातील बदलत्या मतदारवृत्तीचं प्रतीक मानलं जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:13 am

‘एमआयएम’ची कामगिरीत सुधारणा:वंचित बहुजन आघाडीची यशस्वी ‘एन्ट्री'

महानगर पालिका निवडणुकीत २०१७ मध्ये ४५ उमेदवारांसह बहुमत मिळवणाऱ्या भाजपला ‘धक्का' देत युवा स्वाभिमानने (वायएसपी) यंदाच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. भाजपाचे यंदा २५ उमेदवार निवडून आले. २०१७ मध्ये युवा स्वाभिमानचे ३ उमेदवार विजयी झाले होते. यंदा त्यांचे १५ उमेदवार विजयी झालेत. गेल्या वेळच्या तुलनेत वायएसपीचे १२ उमेदवार वाढले आहेत. आश्चर्याची बाब अशी की, भाजपाने निवडणुकीच्या चार दिवस आधी वायएसपीसोबत युती तोडली होती. दोन्ही पक्षांची युती असतील तर दोघांचे एकूण ४० उमेदवार विजयी झाले असते. येथे भाजपाचा डाव त्यांच्याच अंगलट आला. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीत पवार गटाने यंदा प्रथमच निवडणुकीत सर्वाधिक ८५ उमेदवार दिले होते. मात्र, त्यांचे ११ उमेदवारच निवडून आले आहेत. मात्र, या पक्षाच्या जिल्ह्यातील पक्षनेतृत्त्वाने २३ ते २५ उमेदवार निवडून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. ती फोल ठरली. विशेष बाब अशी की, यंदा मतदारांनी सर्वच अपक्षांना नाकारले तर एमआयएमने गेल्या वेळच्या कामगिरीत सुधारणा करीत १२ उमेदवार निवडून आणले. उर्वरित.पान४

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:07 am

स्व. बाबासाहेब सांगळूदकर म्हणजे जनसामान्यांना हृदयात ठेवणारे नेते:सांगळूदकर महाविद्यालयात व्याख्यानमाला व वार्षिकोत्सवाचे उद्घाटन‎

जनसामान्यांप्रती विशेष आस्था स्व. बाबासाहेब सांगळूदकर यांना होती. त्यांनी सामान्य माणसाच्या कामाला व भावनेला नेहमीच महत्व दिले. आजही त्यांचे स्मरण या परिक्षेत्रातील प्रत्येक घटकाला होते. याचे कारण ते जनसामान्यांना कवटाळणारे व त्यांना हृदयात ठेवणारे नेते होते. असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले. जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात आयोजित स्व. बाबासाहेब सांगळुदकर यांच्या पुण्यस्मृतिनिमित्त आयोजित व्याख्यानमाला व वार्षिकोत्सव उद्घाटन समारंभ प्रसंगी कार्यक्रमाध्यक्षा म्हणून हर्षवर्धन देशमुख बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार गजानन लवटे तसेच प्रमुख उपस्थितीत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. जयवंत पुसदेकर, केशव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारणी सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशव गावंडे, सुरेश खोटरे, प्रा.सुभाष बनसोड, जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा कांचनमाला गावंडे, महाविद्यालय विकास व शाळा समितीचे सदस्य अण्णासाहेब रेचे, डॉ.वसंतराव टाले, प्रा. प्रभाकर कोलखेडे, शिवाजी देशमुख, नरेशचंद्र लढ्ढा, प्रदीप देशमुख, शेषराव काळे, कांता मुळे, प्राचार्य डॉ.अतुल बोडखे, समन्वयक डॉ.मिलिंद भिलपवार, प्राचार्य डॉ.अविनाश चोखंडे व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना संस्था अध्यक्ष देशमुख यांनी स्वर्गीय बाबासाहेब सांगळूदकर व कोकीळाबाई गावंडे यांच्या अनेक आठवणी व प्रसंग वर्णन केले. भविष्याची आव्हाने पेलण्यासाठी आजच्या तरुणाईने स्वतःला सक्षम बनवण्यासाठी उपलब्ध संसाधनाचा पूर्ण उपयोग घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच नवीन शैक्षणिक धोरणावर सुद्धा प्रकाश टाकला. डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या संस्थेत शिकून गोरगरीब, वंचित तथा बहुजनांच्या विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षण घेऊन आपल्या आयुष्याच सोनं करावा अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्यात. याप्रसंगी उद्घाटनपर भाषणात आमदार गजानन लवटे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करून महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. व भविष्यात विद्यार्थ्यांसाठी या महाविद्यालयाला लागणाऱ्या अनेक बाबींमध्ये मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाविद्यालयाच्या अस्मिता वार्षिकांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ.अतुल बोडखे यांनी महाविद्यालय विकासाचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ.नरेंद्र माने यांनी केले तर आभार प्रा.डॉ. वृषाली देशमुख यांनी मानले. स्वागत गीत व गौरव गीत डॉ.सुरेंद्र शेजे, डॉ.राजेश उमाळे व संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केले.महाविद्यालयातर्फे देण्यात येणाऱ्या स्व.राधाबाई शामराव देशमुख शिष्यवृत्ती प्रत्येकी ५ हजार रुपये अनुराधा थोरात, पायल गोतरकर व श्रुतिका अरबट यांना यावर्षी प्रदान करण्यात आली. तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून कल्याणी मेहेर व उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून श्रेया गायगोले तसेच महाविद्यालयातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा विविध शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आला. पीएचडी प्राप्त प्राध्यापक डॉ.मनीष होले, डॉ.वैशाली चोरपगार, डॉ.हिमांशू जयस्वाल, संशोधन कार्यासाठी डॉ.संतोष उके, डॉ.देवल देशमुख तथा डॉ.सुरेंद्र शेजे व प्रा. इर्शाद अहमद तसेच पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. सुरवातीला श्रद्धांजली सुरुवातीला सकाळी स्व. बाबासाहेब सांगळूदकर व स्व. श्रीमती कोकिळाबाई गावंडे यांच्या समाधीस्थळी उपस्थित मान्यवरांकडून पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी संस्थेचे आजीवन सभासद, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, माजी प्राचार्य, माजी प्राध्यापक व कर्मचारी, माजी विद्यार्थी तथा महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश चौखंडे व तेथील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:03 am

या.द.व. देशमुख महाविद्यालयामध्ये माँ जिजाऊ, विवेकानंद यांना अभिवादन:महाविद्यालयाचे आश्रयदाते यादवराव उपाख्य अण्णाजी देशमुख यांची 115 वी जयंती‎

या.द.व.देशमुख वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व आयक्यूएससी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व.यादवराव उपाख्य अण्णाजी देशमुख यांची ११५ वी जयंती तथा स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती संयुक्त पणे साजरी करण्यात आली. महाविद्यालयीन अभ्यास मंडळ उद्घाटन, महाविद्यालय विद्यार्थी परिषद उद्घाटन कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत आर. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना युवा दिनाचे महात्मा समजावून सांगितले तसेच युवकांना सतत उद्योगी राहण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय अमरावतीचे प्राचार्य डॉ. दीपक धोटे यांनी डिग्री आहे, पण दिशा नाही, या विषयावर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना बालपणापासूनच स्वराज्य स्थापनेचे स्वप्न दाखविले आणि ते पूर्ण करण्यासाठी महाराजांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांचे युवकांना संदेश, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे युवकांना संदेश याबाबत माहिती देऊन देशातील बेरोजगारीचे भयावह चित्र विद्यार्थ्यांसमोर सादर केले. विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी आवाहन केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रकाश बोके यांनी अण्णासाहेबांची दानवृत्ती यावर प्रकाश टाकला. त्यांनी महाविद्यालयाच्या इतिहासाबद्दल विस्तृत मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य रमेश बोके उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्रा. भरत गोंजारे यांच्या संकल्पनेतून बँक प्रतिकृती उद्घाटन कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांनी पाहुण्यांना बँकेचा कारभार याबाबत माहिती दिली आणि स्वतः बँकेमध्ये करिअर म्हणून निवड करेल.अशी शाश्वती दिली. महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेतून अभ्यास मंडळाची स्थापना करून त्याचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान युवा दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाला शंतनु देशमुख, बापूराव देशमुख, सुरेंद्रराव देशमुख, गोपाल देशमुख, इब्राहिम खान, मधुकर केचे, डॉ. सावरकर आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉ. कुसुमेंद्र सोनटक्के यांनी केले. संचालन प्रा.खुशबू कुथे यांनी तर आभार डॉ. गणेश खेकाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:02 am

विदर्भस्तरीय भजन स्पर्धेत 33 मंडळांचा सहभाग:संत बिरबलनाथ महाराज भजन मंडळाने मिळवला प्रथम क्रमांक, मान्यवरांची उपस्थिती‎

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दर्यापूर बाजार समितीतर्फे नुकतीच दोन दिवशीय विदर्भ स्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विदर्भातील ३३ भजन मंडळानी या भजन स्पर्धेत सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेच्या निकालाअंती प्रथम क्रमांक संत बिरबलनाथ महाराज भजन मंडळ गिंभा ता.मंगरूळ जिल्हा वाशिम यांनी पटकवीला, द्वितीय क्रमांक गुरुदेव मित्र भजन मंडळ वरवट खंडेराव तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा यांनी पटकाविला, तृतीय क्रमांक गुरुदेव सेवा भजन मंडळ साखरी अचलपूर, चतुर्थ क्रमांक माऊली गुरुदेव सेवा भजन मंडळ आमंतवाडा, पाचवा क्र. श्री गुरुदेव भजन मंडळ वस्तापूर चिखलदरा, सहावा क्र. श्री गुरुदेव भजन मंडळ कंजरा मूर्तिजापूर यांनी पटकवीला आहे. यावेळी उत्कृष्ट गायक म्हणून किशोर धुमाळे दोनोडा, उत्कृष्ट तबलावादक गौरव खातखेडे गोपालखेड, उत्कृष्ट हार्मोनियम वादक दिपक खडके बोरी, उत्कृष्ट खंजिरी वादक अजय येवतकार मागरूळ कांबे, उत्कृष्ट कोरस जगेश्वर भजन मंडळ कंजरा, शिस्तबद्ध मंडळ चंपा माता भजन मंडळ माळेगाव यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमास उद््घाटक म्हणून खासदार बळवंत वानखडे, तर अध्यक्षस्थानी सुधाकर भारसाखळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरंग अरबट, दिनकरराव गायगोले, बाजार समिती सभापती सुनील गावंडे, जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार, खरेदी विक्री अध्यक्ष गजाननराव जाधव, संजय बेलोकार, प्रदीप देशमुख, बाजार समिती उपसभापती राजु कराळे, खरेदी विक्री उपाध्यक्ष प्रभाकर कोरपे उपस्थित होते‌. दरम्यान दुसऱ्या सत्रात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारणी सदस्य हेमंत काळमेघ, बाळासाहेब टोळे, विलास टाले, गजानन देशमुख, संजय कोल्हे, किशोर गणोरकर, दिनकर देशमुख, दिलीप गावंडे तसेच सर्व बाजार समितीचे संचालक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील पाटील तर संयुक्तरीत्या संचालन बाजार समितीचे संचालक अनिल भारसाखळे व गणेश साखरे यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:01 am

अंजनगाव सुर्जीच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या मालठाणे:उबाठाच्या नगरसेवकांनीच भाजपाला साथ देत स्वतःच्याच उमेदवाराचा केला पराभव‎

अंजनगाव सुर्जी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आज, शुक्रवारी अनेकानेक राजकीय घडामोड़ी झाल्या. शेवटच्या क्षणापर्यंत कोण बाजी मारणार, याबाबत अनिश्चितता असताना अखेर भाजपाच्या प्रियंका शंकर मालठाणे यांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) च्या नगरसेवकांनीच पक्षादेश झुगारत भाजपाला साथ देत स्वतःच्याच उमेदवाराचा पराभव केला. अंजनगाव सुर्जीचे आमदार गजानन लवटे हे शिवसेना (उबाठा) पक्षाचे असल्यामुळे या निवडणुकीबाबत उत्सुकता ताणली गेली होती. सभागृहातील संख्याबळ पाहता अंजनगाव सुर्जी नगरपालिकेत महाविकास आघाडीचाच उपनगराध्यक्ष होणार, असे जवळपास निश्चित मानले जात होते. काँग्रेसचे ९, शिवसेना (उबाठा) चे ७, समाजवादी पक्षाचे २ आणि १ अपक्ष नगरसेवक असे आघाडीचे भक्कम संख्याबळ होते. मात्र, स्थानिक पातळीवर घडलेल्या घडामोडींनी हे गणित पूर्णपणे उलटे केले. स्थानिक आमदार गजानन लवटे आणि खासदार बळवंतभाऊ वानखडे यांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शेवटच्या क्षणी शिवसेना (उबाठा) भाजपाला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट झाल्याने राजकीय समीकरणे बदलली. प्रारंभी उपनगराध्यक्षपदासाठी काँग्रेस, भाजप, शिवसेना (उबाठा) आणि शिवसेना (शिंदे गट) अशा चारही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र समन्वय होत नसल्याचे लक्षात येताच काँग्रेसचे उमेदवार शोएब खान युसुफ खान यांनी शिवसेना (उबाठा) चे उमेदवार सुयोग खाडे यांच्या समर्थनार्थ उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे लढत अधिकच चुरशीची झाली. अखेर प्रियंका शंकर मालठाणे (भाजप) यांना १५, सुयोग खाडे (शिवसेना उबाठा) यांना ११ आणि राम आवंडकर (शिवसेना शिंदे गट) यांना ३ मते मिळाली. स्वीकृत सदस्यांची निवड : याच बैठकीत तीन स्वीकृत सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. भाजपाकडून संतोष वर्मा, शिवसेना (उबाठा) कडून पंकज मोदी, काँग्रेसकडून अब्दुल कलिम अब्दुल कलाम यांची निवड करण्यात आली आहे. अभद्र युतीला जबाबदार कोण? या निकालानंतर अंजनगाव सुर्जी शहरात भाजप आणि शिवसेना (उबाठा) यांच्यातील तथाकथित ‘अभद्र युती’ जोरदार चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेना (उबाठा) चे ६ नगरसेवक आणि समाजवादी पक्षाचे २ नगरसेवक भाजपाच्या बाजूने वळल्याने संपूर्ण चित्र बदलले. या राजकीय उलथापालथीमागे आमदार गजानन लवटे यांच्या मुलाचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभव कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर ‘मनी फॅक्टर’ने मोठी भूमिका बजावल्याचा संशयही नागरिकांकडून व्यक्त केला जात असून, या युतीमुळे राजकारणाची पातळी घसरल्याची टीका होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 10:00 am

पराभवाच्या रागातून विजयी उमेदवारावर जीवघेणा हल्ला:पोलिसांचा लाठीमार, भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर जखमी, अकोट फैल भागात राडा‎

मनपा निवडणुकीत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना अकोट फैल भागात शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. शरद श्रीराम तुरकर असे हल्ला झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. या भागात तोडफोड देखील झाली. पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली. जखमी नगरसेवकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक २ ‘ब’ मधील भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकर यांच्यावर जीवघेणा चाकूहल्ला. भाजपचेच प्रभाग २ ‘ड’ गटातील पराभूत उमेदवार नितीन राऊत आणि समर्थकांनी हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर वाहनांच्या तोडफोडीनंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. उर्वरित पान ४

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 9:59 am

वाचन हीच यशस्वी अभियंत्याची खरी ओळख- डॉ. एस.पी पाटील:कर्मयोगीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात‎

पंढरपूर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. या उद्देशाने शेळवे येथील कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा बुधवार दि. १५ जानेवारी रोजी विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. वाचन पंधरवड्याच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन, तांत्रिक व अवतांत्रिक पुस्तकांचे वाचन, पुस्तक परीक्षण तसेच थोर शास्त्रज्ञ व साहित्यिकांच्या ग्रंथांचे व पुस्तकांचे प्रदर्शन यावेळी आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथालयाचा वापर वाढला असून वाचनसंस्कृतीला चालना मिळाल्याचे चित्र दिसून आले. वाचन पंधरवडा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन रोहन परिचारक यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी.पाटील, प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके, उपप्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.राहुल पांचाळ, विभाग प्रमुख डॉ. एस.एम.लंबे, डॉ. एस. व्ही. एकलारकर, डॉ. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 9:38 am

स्वामी विवेकानंद यांनी मांडलेला कर्मयोगाचा सिद्धांत जीवनाचा गाभा:स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कन्याकुमारी केंद्र शाखा बार्शी येथे व्याख्यान‎

बार्शी स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तित्व व कर्तृत्व हे सर्वश्रुत आहे. स्वामी विवेकानंदांच्या कर्मयोगाचा सिद्धांत मांडून कर्मयोग हा जीवनाचा गाभा आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्त्या व विचारवंत डॉ.कमलताई ठकार यांनी केले. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा बार्शी व श्री भगवंत देवस्थान ट्रस्ट बार्शी यांच्या वतीने भगवंत मंदिरात ‘स्वामी विवेकानंद कर्मयोगी संत’ या विषयावर त्या व्याख्यान देत होत्या. डॉ. ठकार म्हणाल्या की, स्वामीजींची जीवनयात्रा महान संदेश असून त्यांची भूमिका समजून घेणे काळाची गरज आहे. युवा हे देशाचे आधारस्तंभ असून त्यांनी व्यक्तिगत विकासाबरोबरच समाजहिताचा विचार करणे आवश्यक आहे. जो अभिजात असतो त्याचा संघर्ष स्वतःशी असतो. हा संघर्ष करताना सत्याला अभिनिवेश नसतो. जिथे ज्ञानाचे दर्शन घडते तिथे प्रदर्शन नसते. नैतिकता हा दागिना असून नैतिक मूल्यांचा स्पर्श जेव्हा जीवनाला होतो, ते जीवन आदर्श असते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव यांनी स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रातून युवकांनी बोध घेवून कार्यप्रवण व्हावे असे सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी युवकांच्या क्षमता व कला गुणांना वाव देण्यासाठी अशा धार्मिक सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश जीवनात आचार विचारांची सौम्यता असते ते जीवन वंदनीय असते. कधी मोठ्यांचा सत्कार होतो पण माणुसकीचा होत नाही. जेथे माणूस जोडला जातो, तेथे देश जोडला जातो. जेव्हा संयमाचे बंधन असते, तेव्हा स्वातंत्र्याचा स्वर उमटतो. विवेकांनदाच्या जीवनातील गोष्टींना उजाळा देत मनाची ताकद जग जिंकण्याचे बळ देते. विवेकानंदांचे बालपण बुद्धिमत्ता व जिज्ञासेमुळे प्रसिद्ध होते. त्यांना वेद, उपनिषद, भगवद्गीता यांचा विशेष अभ्यास होता. रामकृष्ण परमहंस यांच्या संपर्कात आल्यानंतर विवेकानंदांनी आध्यात्मिक जीवनाचा स्वीकार केला. धार्मिक सहिष्णुता व मानवतेचा संदेश दिला. अशा कार्यक्रमांची गरज स्पष्ट केली. विवेकांनदाच्या जीवनातील गोष्टींना उजाळा देत मनाची ताकद जग जिंकण्याचे बळ देते. प्रास्ताविक प्रा.ज्योती डोळस यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ.अबोली सुलाखे यांनी करून दिला. तसेच प्रार्थना वंदना कुलकर्णी तर विवेकानंद गीत ॲड. प्रशांत शेटे यांनी प्रस्तुत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किर्ती डोळस तर आभार प्रदर्शन विनोद कबाडे यांनी केले. या कार्यक्रम यशस्वितेसाठी अमृता रंगदाळ, कोमल कबाडे, मुकुंद कुलकर्णी, सुरेश हालमे, प्रा.डॉ.राहुल पालके आदींनी सहकार्य केले.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 9:37 am

सायकलस्वारांनी घेतले स्वामींचे दर्शन:येवला ते अक्कलकोट भक्तीसाठी केला 565 कि.मी.चा प्रवास‎

समाजातील तळागाळातील सामान्य जनतेला कायद्यांबद्दल जनजागृती, तसेच विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्याचा नाविन्य पूर्ण ध्यास घेतले. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील तरुण सायकल स्वारांनी विधी साक्षरतेसह स्वामी भक्तीचा ध्यास घेतला. येवला ते अक्कलकोट सायकल स्वार यात्रेकरू येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात येऊन स्वामी चरणी नतमस्तक झाले. यावेळी सायकल यात्रेतील सातारा न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. विक्रम आव्हाड, सातारा येथील ९ व्या न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. संगीता आव्हाड, संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे, गणेश भोरकडे आदींसह विविध क्षेत्रातील सायकल स्वरांचा वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीच्या वतीने चेअरमन महेश इंगळे यांनी स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देवून यथोचित सत्कार केला. यावेळी महेश इंगळे बोलत होते. याप्रसंगी पिंपळगाव जय भवानी सामजिक व सांस्कृतिक संस्था व अहिल्यानगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने न्यायमुर्ती डॉ. विक्रम आव्हाड यांनी नगरसेवक महेश इंगळे यांचा संस्थेचे सन्मानचिन्ह देवून विशेष सत्कार केला. ^जीवन जगत असतांना बऱ्याच वेळा कळत न कळत आपल्या हातून कायद्याचा भंग होतो, आणि कायद्याची सर्व सामान्यांना माहिती नसल्याने न्यायालयाचे द्वार ठोठावे लागतात. तसेच जर असा प्रसंग ओढवलाच तर विधी सेवा प्राधिकरणामार्फत सर्व सामान्य जनतेला कायद्याच्या चौकटीत राहून कशी व कोणती मदत मिळू शकते. याबाबतची जनजागृती व स्वामी दर्शनाचा संकल्प या सायकल यात्रे दरम्यान पूर्ण केलेली आहे. डॉ.विक्रम आव्हाड, न्यायमूर्ती, जिल्हा न्यायालय ^येवला, तुळजापूर, अक्कलकोट असा ५६५ कि.मी सायकल प्रवास करीत असताना, महाविद्यालय व न्यायालय परिसरात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर केले. बालविवाह प्रतिबंध कायदा , गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ, निसर्ग जोपासना व संवर्धन, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, सायकलचा जास्तीत जास्त वापर म्हणजे प्रदूषणाला आळा, पतंग नायलॉन मांजाचा वापरास प्रतिबंध इत्यादी विषयासंदर्भात सायकलला फलक लावून जनजागृती करण्यात आली. विजय भोरकडे, अध्यक्ष, जय भवानी संस्था सायकल यात्रे दरम्यान स्वामी समर्थांच्या दर्शनाचा संकल्प पूर्ण निसर्ग जोपासना आणि संवर्धन फलक लावून जनजागृती

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 9:03 am

प्रचारापेक्षा इच्छुकांच्या मनधरणी साठी नेत्यांना ताकद खर्ची घालावी लागणार:मोहोळमध्ये जि.प.,पंचायत समितीसाठी पहिल्याच दिवशी 112 उमेदवार अर्जाची विक्री‎

मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद ६ तर पंचायत समिती १२ अशी सदस्य संख्या आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने मोहोळ तहसील कार्यालय येथे नामनिर्देशन पत्र विक्रीच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद साठी ६१ तर पंचायत समितीसाठी ५१ अशी एकूण ११२ नामनिर्देशन पत्राची विक्री झाली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षातील बहुसंख्य कार्यकर्ते इच्छुक असल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांना घाम पुसण्याची वेळ येणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.नामनिर्देशन पत्र विक्री शुक्रवार दि.१६ जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे. नामनिर्देशन अर्जाच्या विक्रीच्या पहिल्याच दिवशी एकूण ११२ नामनिर्देशन पत्राची विक्री झाल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांची धावपळ होणार आहे. त्यामुळे प्रचारापेक्षा मनधरणी करण्यासाठी नेत्यांना अधिक ताकद खर्ची घालावी लागणार आहे, हे मात्र निश्चित आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान भाजपाकडून एबी फॉर्म अचानक काही मिनिटापूर्वी देण्याची व्यवस्था करण्याची वेळ आली होती. याच पद्धतीने मोहोळ जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पुनरावृत्ती करण्याची वेळ येईल काय? असा प्रश्न बेडसावत आहे. पक्षाकडून उमेदवारी मागत असताना सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी आपल्या कार्याचा स्वतः आढावा घेऊन उमेदवारी मागितली ताण तणाव कमी होण्यास मदत होईल.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 9:00 am

पर्यटन विकास उपक्रम; निमगावात अभ्यास सहल‎:जिल्हा पर्यटन सांस्कृतिक अन् ऐतिहासिक आकर्षण म्हणून गावाची पर्यटनाकडून निवड‎

अकलूज निमगाव या गावाची पर्यटन विकास उपक्रमांतर्गत सांस्कृतिक व ऐतिहासिक आकर्षण म्हणून निवड झाल्यानंतर विकास मगर यांच्या शेतावर प्रथमच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल व हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये गावकरी, शासकीय अधिकारी यांच्यासह २१० विद्यार्थी सहभागी झाले होते. नुकतेच निमगाव हे गाव सांस्कृतिक व ऐतिहासिक आकर्षण म्हणून निवडले गेले असून गावातील अशी अनेक स्थळे त्यादृष्टीने विकसीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून तेथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून निघालेली ही सहल महादेव मगर यांच्या केळी बागेची तसेच अशोक मगर यांच्या द्राक्ष बागेची प्रत्यक्ष माहिती घेत खंडोबा मंदिरात आली,तेथे दर्शन घेउन मंदिराचे महात्म्य, पूजा विधी, यात्रा उत्सव याविषयीची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर तेथेच वनभोजनाचा अनुभव घेतला. खंडोबा छबिना पालखी मार्गाने शिवारफेरी करत या विद्यार्थ्यांनी ऊस शेती, मका शेती, ओढा प्रणाली, विविध झाडे, वनस्पती व त्यांचे मानवी जीवनातील महत्त्व प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले. यल्लम्मा देवी मंदिरा नजीकच्या विकास मगर यांच्या बोरीच्या बागेत विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने बोरे तोडून खाण्याचा आनंद घेतला. याठिकाणी विद्यार्थ्यांना उकडलेली मका कणीस वाटप करण्यात आले. यावेळी गावातील नागरीक , प्रशासकीय अधिकारी, पर्यटन विभागाचे अधिकारी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सखी प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद माणदेशी फाउंडेशनच्या शेती व माती परीक्षण केंद्राच्या वतीने सॉईल सखी प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. याठिकाणी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गीत सादर केली, अंकांचा खेळ खेळला. शेवटी या सहलीतील विद्यार्थ्यांना साजूक तुपातील शिरा, चिवडा तसेच सर्व पाहुणे व विद्यार्थ्यांसाठी दही, चटणी, वांग्याचे कालवण, ज्वारी, बाजरी व मकेची भाकरी, ठेचा, भात, वरण असे शुद्ध शाकाहारी जेवण मिळाल्याने चिमुकली व पाहुणे खुश होउन आनंदात परतले.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 8:59 am

समूह, संघटनांची जुळवाजुळव, तंतोतंत ‎नियोजनामुळे युतीला 52 जागांवर यश:भाजप-राष्ट्रवादीचे वर्चस्व सिद्ध, सेनेला 10 जागा, मविआला तीनच जागा‎

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीने सर्वाधिक ५२ जागांवर यश मिळवत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. आमदार जगताप यांच्या एकहाती नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला सर्वाधिक २७ जागा मिळाल्या. तर, राष्ट्रवादीची भक्कम साथ मिळाल्याने यंदा प्रथमच भाजपाने २५ जागांवर विजय मिळवला. महायुतीतून बाहेर पडत स्वबळावर लढलेल्या शिवसेनेला १० जागांवर यश मिळाल्याने त्यांना विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. दरम्यान, प्रमुख विरोधक समजल्या जाणाऱ्या व खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली रिंगणात उतरलेल्या महाविकास आघाडीला अवघ्या तीन जागा मिळाल्या. यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मनपात अस्तित्वही टिकवता आले नाही. काँग्रेसला दोन, तर ठाकरे सेनेला अवघी एक जागा मिळाली. महापालिका निवडणुकीत ६८ जागांपैकी ५ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. राहिलेल्या ६३ जागांसाठी २८३ उमेदवार रिंगणात होते. गुरुवारी (१५ जानेवारी) सुमारे ६५.३४ टक्के मतदान झाले. काल (शुक्रवारी) एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी झाली. दुपारी साडेबारा वाजता प्रभाग सातचा पहिला अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर टप्प्या टप्प्याने प्रत्येक प्रभागाचा निकाल जाहीर झाला. मनपात भाजप व राष्ट्रवादी युतीच्या सर्वाधिक जागा जिंकून आल्या असल्या तरी युतीमध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या. पालकमंत्री विखे, आ. जगताप व सुजय विखे यांनी महायुतीचाच महापौर होईल, भाजपचा की राष्ट्रवादीचा हे ठरले नसल्याचे म्हटले आहे. मात्र, सर्वाधिक जागा असल्याने महापौरपद राष्ट्रवादीकडेच जाण्याची शक्यता आहे. भाजपला राष्ट्रवादीपेक्षा अवघ्या दोनच जागा कमी आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी महापौर पद घेऊन त्या बदल्यात भाजपला उपमहापौर पद व स्थायी समितीचे सभापतिपद देऊ शकते. मात्र, भाजपकडूनही महापौर पदावर दावा केला जाऊ शकतो. त्यामुळे पहिले अडीच वर्षे राष्ट्रवादीकडे व त्यानंतर अडीच वर्षे भाजपला महापौर पद अशी वाटणी होऊ शकते. मात्र, अद्याप महापौर पदाचे आरक्षण शासनाकडून काढलेले नसल्याने महापौर पदासाठी इच्छुकांचे लक्ष आता आरक्षण सोडतीकडे लागले आहे. दरम्यान, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेला विरोधी पक्ष नेते पद द्यावे लागणार आहे. सन २०१८ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेनेला २४, एकत्रित राष्ट्रवादीला १८, भाजपला १४, काँग्रेसला ५, बहुजन समाज पक्षाला ४, समाजवादी पक्षाला १ व अपक्ष २ असे बलाबल होते. त्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी फुटली. अजित पवार राष्ट्रवादीने यंदा २७ जागा जिंकून ९ वाढीव जागा खेचून आणल्या. भाजपने ११ वाढीव जागा घेत २५ उमेदवार निवडून आणले. यंदा शिंदे सेनेला १० व ठाकरे सेनेला १ जागा मिळाली. दोन्ही सेना मिळून १३ जागांचे नुकसान झाले. काँग्रेसला अवघ्या २ जागा मिळाल्या. त्यांचे ३ जागांचे नुकसान झाले. बहुजन समाज पक्षाला १ जागा मिळाल्याने त्यांचे तीन जागांचे नुकसान झाले. मनपात पहिल्यांदाच एमआयएमची दोन जागा जिंकून एन्ट्री झाली आहे. मनपा निवडणूकीत भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा विजयोत्सव आ.संग्राम जगताप व माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी साजरा केला.यावेळी गुलमोहर रोडवरून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्या पर्यंत दुचाकीवरुन रॅली काढली. छाया : सिद्धार्थ दीक्षित निवडणुकीतील प्रमुख पराभूत नगरपालिका व महापालिका मिळून तब्बल नऊ वेळा नगरसेवक झालेले नज्जू पहेलवान उर्फ नजीर अहमद शेख, शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहरप्रमुख प्रमुख सचिन जाधव, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी यांच्या सूनबाई दीप्ती गांधी, शिंदे शिवसेनेचे संपर्क प्रमुख दिलीप सातपुते यांचे सुपुत्र ओंकार सातपुते, राष्ट्रवादीतून एमआयएममध्ये गेलेले समद खान, मनपा स्थायी समितीच्या माजी सभापती सुवर्णा जाधव यांचा प्रमुख पराभूत उमेदवारांमध्ये समावेश आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 8:36 am

विजयाचा जल्लोष, शहरात 25 टन गुलालाची उधळण:कल स्पष्ट झाल्यानंतर यंदा गुलाबी कमी अन् भगव्या गुलालाची जास्त उधळण‎

महानगर पालिकेच्या निकालापूर्वीच विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनी गुलालाचे नियोजन आखले होते. मतमोजणीची प्रक्रिया सुरू असताना, पहिला कल समोर येताच कार्यकर्त्यांनी ढोल, ताशा अन् गुलालाची उधळण केली. यंदा गुलाबीपेक्षा भगव्या रंगाचा गुलाल अधिक दिसून आला. विजयी जल्लोषात कार्यकर्त्यांनी तब्बल २५ टन गुलालाची उधळण केल्या अंदाज गुलाल विक्रेत्यांनी व्यक्त केला. महानगर पालिकेच्या ६४ जागांसाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत कार्यकर्त्यांनी जल्लोषाची जय्यत तयारी केली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपयुतीने सुक्ष्म नियोजनात केलेली मोर्चेबांधणी यशस्वी ठरली. मोजणीला सुरूवात झाल्यानंतर हळूहळू कल स्पष्ट होत गेला. दुपारी बारा वाजेनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोषास सुरूवात केली. फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी अन् गुलालाची उधळण झाली. शहरातील उपनगरात व मध्यशहरात कार्यकर्ते भगव्या गुलालात रंगल्याचे पहायला मिळाले. गुलाल विक्रेत्या व्यापाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी निवडणूक कालावधीत सुमारे २५ टन गुलालाची विक्री झाली. सुमारे अडीच लाखांचा गुलाल ^ शहरात यंदा सुमारे २५ टन गुलालाची उधळण झाल्याचा अंदाज आहे. त्यात भगवा गुलाल मोठ्या प्रमाणात दिसून आला. प्रतिकिलो दहा रुपये दराने गुलाल उपलब्ध होतो. त्यानुसार सुमारे अडीच लाख रुपयांची उलाढाल गुलाल विक्रीतून झाल्याचा अंदाज आहे. भगव्याबरोबरच, गुलाबी रंगाचाही गुलाल उपलब्ध आहे. सुनील छाजेड, व्यापारी.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 8:34 am

जीवन यशस्वी करण्यासाठी भूगोल विषय महत्त्वाचा:कळवण कॉलेजात उपप्राचार्य पगार यांचे प्रतिपादन‎

आजच्या युगात भूगोल विषय शिक्षणापुरता मर्यादित नसून मानवाचे जीवन यशस्वी करण्यासाठी भूगोल हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन उपप्राचार्य एस. एम. पगार यांनी केले. येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात भूगोल दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एस. पगार होते. डॉ. व्ही. एम. पगार प्रा. पुनम वाघेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना पगार म्हणाले की, नवीन संशोधन व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भूगोल विषयाचे स्वरूप बदलून मानवासाठी उपयुक्त ठरले आहे. जीपीएस तसेच उपग्रहामुळे जगाच्या प्रगतीत मोठा हातभार लागला आहे. वाहतूक, शेती, व्यापार, पर्यावरणात होणाऱ्या बदलांचा अंदाज, नैसर्गिक समस्या, पावसाचा अंदाज, तापमान, आरोग्य, वाढती लोकसंख्या यासाठी भूगोलाचे महत्व अफाट आहे. मानव व वित्तहानी थांबविण्यासाठी भूगोलाची योगदान मोठे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी भूगोल हा विषय आत्मसात करून अभ्यास करावा, हा या भूगोल दिनामागचा उद्देश आहे, असे ते म्हणाले. प्राचार्य डॉ. बी. एस पगार यांनी पर्यावरणाचा समतोल बिघडला असून त्याला मानव जबाबदार आहे. आज मानवाने भारतातील सर्व नद्या दूषित केल्या. एक काळ त्या नदीतून पिण्यासाठी पाणीपुरवठा होत असत. वृक्षांचे प्रमाण कमी करून अनेक प्राणी नामशेष होत चालले आहेत. पर्यावरण संवर्धन काळाची गरज असून त्यासाठी तरुण पिढीने पुढे येऊन जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमास डॉ. एच.व्ही.धाडे, प्रा. पी. व्ही नंदनवरे, प्रा. वाय. ए. गांगुर्डे आदींसह विद्यार्थ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 8:12 am

वेळेत उपचार न मिळाल्याने नरुळ आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू:नाशिक येथे अप्पर आयुक्त कार्यालयात संतप्त नातेवाइकांचा ठिय्या‎

तालुक्यातील नरूळ आश्रम शाळेत इयत्ता बारावीत शिकत असलेली अहिवंतवाडी येथील तनुश्री दगु गायकवाड हिचा ताप आल्याने नाशिक उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आश्रमशाळा व्यवस्थापनाने वेळीच उपचार न केल्याने मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत मृताच्या नातेवाईकांनी शुक्रवारी (दि.१६) अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांच्या दालनात दुपारी ठिय्या मांडला. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. बुधवारी (दि. १४) रात्रीच्या सुमारास तनुश्रीला ताप आला होता. आश्रमशाळा व्यवस्थानपाने तिला लगेच दवाखान्यात दाखल न करता तापाचे औषध दिले. गुरुवारी (दि. १५) दुपारी तनुश्रीला कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे तिची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या सगळ्या घडामोडी दरम्यान मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांनी आम्हाला काहीही कळवले नाही. व तिच्यावर लवकरात लवकर उपचार करण्यास विलंब केला, असा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेत अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांच्या कार्यालयात आंदोलन केले. त्यावेळी पावरा यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यांची कमेटी नेमून चौकशी करण्याची ग्वाही दिली. यानंतर मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याबाबत कळवण पोलिसात कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब खरसे यांच्याशी संपर्क साधला अससता यांनी घडलेल्या घटनेची वरीष्ठ व शालेय स्तरावर चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. दि. ८ सप्टेंबर २०१५ रोजी चणकापूर आश्रमशाळेच्या इयत्ता तिसरीच्या रोहित विलास बागुल या विद्यार्थ्याचा उपचारासाठी निष्काळजीपणा झाल्याने मृत्यू झाला होता . त्यामुळे सगळ्याच शाळांची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 8:07 am

रेल्वे महाप्रबंधकांच्या भेटीपूर्वी नांदगावी रंगरंगोटीचे काम सुरू:सुरक्षिततेसह रेल्वेशी संबंधित सर्व विभागांची करणार पाहणी‎

येथील रेल्वे स्थानकाला रेल्वेचे महाप्रबंधक आणि उच्चपदस्थ अधिकारी शनिवारी (दि.१७) भेट देणार आहेत. सकाळी दोन तास भेटीसाठी वेळ निश्चित करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांचे पथक येथील सुरक्षितता मानकांसह रेल्वेशी संबंधित सर्व विभागाची पाहणी करणार असल्याने रेल्वे स्थानकासह संपूर्ण परिसराची साफसफाई आणि रंगरंगोटीचे कामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. तुंबणाऱ्या पाण्यामुळे शहरवासीयांना कमालीचा अडचणीच्या ठरलेल्या येथील अंडरपासच्या भिंतींनाही नवा रंग देण्याची लगबग अंतिम टप्यात आली आहे. भिंतीचे उजळलेले रुप पाहून प्रभावित झालेले नांदगावकर तुंबणाऱ्या पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी करत आहे. कोविड काळात नांदगाव रेल्वे स्थानकावरील काही प्रवासी गाड्यांचे तांबे तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. हे तांबे पूर्ववत करण्यात यावे तसेच येथे शालिमार एक्सप्रेस व हुतात्मा एक्सप्रेस या प्रवासी गाड्यांना थांबे द्यावे, अशी मागणी प्रवासी संघटना महाप्रबंधकांकडे करणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 8:06 am

सटाणा उपनगराध्यक्षपदी‎ भाजपचे वाघ‎:स्वीकृत नगरसेवकपदी नगरसेवक दीपक सोनवणे, अनिल पाकळे यांची निवड

येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे सुमित वाघ यांची अविरोध निवड करण्यात आली. स्विकृत नगरसेवक पदासाठी भाजपचे गटनेते चेतन रौदळ यांनी ॲड दीपक सोनवणे व अनिल पाकळे यांची नावे दिली होती. त्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्याने त्यांच्या नावांची स्वीकृत नगरसेवकपदी सभागृहात घोषणा करण्यात आली. पालिकेच्या सभेत उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक नगराध्यक्ष हर्षादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपनगराध्य पदासाठी सुमित वाघ यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी उपनगराध्यक्ष पदाची घोषणा केली. निवडीनंतर नगराध्यक्ष पाटील यांनी नवनिर्वाचित उपधगराक्ष सुमित वाघ यांचा सत्कार केला. नगराध्यक्ष हर्षदा पाटील म्हणाल्या की, यशवंत नगरीच्या विकासासाठी मतदारांनी आपल्याला विश्वासाने निवडून दिले आहे.राजकीय मतभेद सभागृहाबाहेर ठेवून लोकहिताचे निर्णय घेवून सर्वजण एकत्रित कामकाज करू, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. उपनगराध्यक्ष वाघ यांनी माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ यांचे विचार व शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी राजकारण विरहीत काम करेन, अशी ग्वाही दिली. याप्रससंगी शिवसेनेचे गटनेते राहुल पाटील, अपक्ष गटनेते ॲड मणिषा पवार व नगरसेवक उपस्थितीत होते.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 8:05 am

ग्रामीण खेळाडूंमध्ये देशासाठी खेळण्याची ताकद- सिरसाट

प्रतिनिधी | लासूर स्टेशन गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शंभर मीटर धावणे, दोनशे मीटर धावणे, लांब उडी, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, पोत्यात पळणे, दोरीवर उड्या, रिले, रस्सीखेच, गोळा फेक अशा स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब सिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. विद्यार्थ्यांनी मशाल घेऊन संचलनाद्वारे पाहुण्यांना सलामी दिली. स्पर्धा अग्नी हाऊस, पृथ्वी हाऊस, आकाश हाऊस आणि जल हाऊस या गटांमध्ये पार पडल्या. डॉ. सिरसाट यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये देशासाठी खेळण्याची ताकद आहे. शालेय जीवनात खेळांना महत्त्व दिल्यास हे खेळाडू देशाचं नाव उज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरवण्यात आले. या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे सचिव प्रमोद महाजन, वंदना चव्हाण, भाग्यश्री नरोडे, वंदना कैतके, सोनाली लबडे, शीतल नरोडे, किरण राजपूत, प्रियांका काळवणे, समीर शेख, दत्तू काळवणे, योगेश देवबोने, शिवनाथ चव्हाण, गजानन राऊत यांनी मेहनत घेतली. सिध्दनाथ वाडगाव येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. यात धावताना मुली.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 7:42 am

वीज बंदचे परमिट असताना पुरवठा सुरू; वैजापुरात एकाचा मृत्यू‎:जबाबदारांवर गुन्हा नोंदवा, आघूरमधील मृताच्या नातेवाइकांचा महावितरण कार्यालयाबाहेर संताप‎

शहरात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे एका तरुण झीरो वायरमनला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (१६ जानेवारी) सकाळी घडली. शास्त्रीनगर भागात विद्युत खांबावर काम करत असताना अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. सोमनाथ आसाराम पानडघळे (२९, रा. आघूर, ता. वैजापूर) असे मृताचे नाव आहे. वैजापुरात काही काम करण्यासाठी महावितरणकडून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीज बंदीचे परमिट घेण्यात आले होते. यामुळे सोमनाथ खांबावर काम करीत होता. दरम्यान, वीजपुरवठा अचानक सुरू झाल्याने सोमनाथचा पोलवरच मृत्यू झाला. महावितरणचे अभियंते व ठेकेदार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नातेवाईक व नागरिकांकडून केला जात आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाइकांनी व स्थानिक नागरिकांनी महावितरण कार्यालयाबाहेर गर्दी करत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र या वेळी अभियंते व कर्मचारी कार्यालयाला कुलूप ठोकून मोबाइल ‘नॉट रिचेबल’होत गायब झाल्याने संताप अधिकच वाढला. या घटनेमुळे महावितरणच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांकडून केली जात आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नव्हती. अभियंते नॉट रिचेबल : शहर अभियंता चेतन लिहे तसेच उपकार्यकारी अभियंता दीपक पांडव हे घटनेनंतर संपर्काबाहेर गेले. नागरिक व नातेवाइकांनी वारंवार फोन करूनही दोघांचे मोबाइल ‘नॉट रिचेबल’ लागले. घटनेनंतर मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी महावितरण कार्यालयासमोर टाहो फोडला. दोषी अभियंतांवर गुन्हे दाखल करा, अशी आर्त मागणी केली जात असताना कार्यालयाला कुलूप लावून मोबाइल ‘नॉट रिचेबल’ करत अभियंते गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. न्यायासाठी रडणाऱ्या कुटुंबासमोर प्रशासनाची असंवेदनशीलता उघडी पडली. या घटनेनंतर महावितरणचे अनेक कर्मचारी गायब झाल्याने वैजापूर शहरातील विविध भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक झालेल्या विजेच्या खंडामुळे नागरिकांचे हाल झाले असून संताप व्यक्त केला जात होता. रात्री उशिरापर्यंत अनेक अनेक भागांमधील वीज गायबच होती. नागरिकांनी अंधारात रात्र काढली. रात्रभर काही भाग अंधारात

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 7:41 am

घराच्या अंगणात भाजीपाला पिकवून विषमुक्त शेती करा- मोहन भागवत:देशाच्या भविष्यासाठी चारित्र्यसंपन्न बलशाली हिंदू समाज हवा‎

जगाला हेवा वाटेल असा चारित्र्यसंपन्न बलशाली समाज आपल्याला घडवावा लागेल. त्यासाठी आपला स्वभाव आणि आचरण तसे करावे लागेल. भारताच्या भविष्यासाठी हिंदू समाजच जबाबदार आहे. त्यासाठी हिंदू समाजाने स्वतःच्या आचरणातून समाजपरिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. घराच्या अंगणात भाजीपाला उगवून विषमुक्त शेती करून पर्यावरणाला आपण हातभार लावू शकतो, असेही भागवत म्हणाले. हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचे संरक्षण व संवर्धन या उद्देशाने हिंदू संमेलन समिती, गंगापूर यांच्या वतीने ‘हिंदू संमेलन’ घेण्यात आले. यात उद्बोधन करताना डॉ. भागवत बोलत होते. आपल्याला समाजपरिवर्तन करायचे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागेल. समानता आपल्याला केवळ ओठात नको, कृतीत हवी आहे. त्यासाठी सगळ्या जातीपातीतील आपले मित्र केले पाहिजे. समाजात सद्भावना असायला हवी. सराला बेट संस्थानचे महंत रामगिरी महाराज म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संतांनी सांगितलेले धर्माचे काम करीत आहे, धर्माचे रक्षण आपण केले तर धर्म आपले रक्षण करतो. हिंदू कधी कोणाची हिंसा करीत नाही, परंतु कोणी अन्याय केला तर तो अन्याय सहन करायलादेखील आपला धर्म सांगत नाही. कोणी अन्याय करीत असेल तर त्याला प्रतिकार करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. शांतीगिरी महाराज म्हणाले, हिंदू संस्कृती सोडून पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्याकडे हिंदू समाजाचा कल आहे. परंतु ते अनुकरण करीत असताना त्याचे तोटे लक्षात घेत नाही. त्यामुळे आपले खूप मोठे नुकसान होत असून ते टाळण्यासाठी आपल्या संस्कृतीचे पालन करणे गरजेचे आहे. या वेळी गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचा संदेश मनीष वर्मा यांनी वाचून दाखवला. विदेशी वस्तूंचा वापर करण्यापेक्षा स्वदेशीला प्राधान्य दिले पाहिजे, असे भागवत म्हणाले. राजकीय पुढाऱ्यांनी ब्लॉक स्तरावर एकत्र येऊन समाजाची उन्नती करण्याकरिता आपण हिंदू समाजाचे घटक आहोत हा भाव उत्पन्न करण्याकरिता प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुटुंबामध्ये वागत असताना आपापल्या चालीरीती, रूढी, परंपरा काय आहेत, मुलांवर संस्कार कसे असावेत याबाबत चर्चा होणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे पर्यटनासाठी सिंगापूर, दुबई व परदेशात जातो तसेच आपला ऐतिहासिक ठेवा असलेल्या देवगिरी, रायगड तेथेसुध्दा जाणे आवश्यक आहे. सुनील छत्रे यांनी प्रास्ताविक, अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार कृष्णा मनाळ यांनी मानले. कुटुंबात आपले संस्कार, परंपरांची चर्चा करायला हवी. जगणे जगताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी केली पाहिजे, असे आवाहनही मोहन भागवत यांनी उपस्थितांना यावेळी केले. देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही कृतीने, विचाराने पुढे चालणारी संघटना आहे. मागील शंभर वर्षांत अपमान सहन करीत काम केले. अपमान सोसत काम केले मार्गदर्शन करताना मोहन भागवत. संस्कृतीचे पालन करा

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 7:39 am

विहामांडव्यात अवैध सावकारीवर छापा:संशयित 15 कागदपत्रे जप्त

अवैध सावकारीप्रकरणी सहायक निबंधक, सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक यांच्या पथकाने शुक्रवारी (१६ जानेवारी) विहामांडवा येथे कारवाई केली. या कारवाईत खरेदीखत, इसारपावतींसह १५ आक्षेपार्ह दस्तऐवज जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातील अवैध सावकारांमध्ये खळबळ उडाली आहे. सहायक निबंधकांना प्राप्त तक्रारीच्या आधारे, सखोल पडताळणी झाली. नंतर प्रत्यक्ष ठिकाणी तपासणी करण्याचा निर्णय झाला होता. सहायक निबंधक बलराम नवथर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पाचोड पोलिसांच्या बंदोबस्तात विहामांडवा येथील एका जणाच्या निवासस्थानी छापा टाकला. घरझडतीदरम्यान खरेदी-विक्रीचे दस्तऐवज, इसारपावत्या व अन्य व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे सापडली. ही कागदपत्रे अवैध सावकारी व्यवहाराशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या कारवाईत तुषार ख्रिस्ती, ज्योती चव्हाण, अक्षय रुपनवार, बी. टी. राजाळे, आर. आर. देवरे व राम जाधव सहभागी होते. बंदोबस्तासाठी पोलिस हवालदार किशोर शिंदे व महिला पोलिस अंमलदार चंदा राठोड उपस्थित होत्या. दोषी आढळल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 7:38 am

वायुसेनेतील योद्धे देशासाठी हवेत अविश्रांत काम करतात- ओसवाल:बाळासाहेब पवार वाचनालय, फाउंडेशनच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन‎

कन्नड वायुसेना ही युद्ध नियंत्रणात महत्वाची भूमिका बजावते,ते हवेतले गार्ड म्हणून अविश्रांत काम करतात, असे प्रतिपादन भारतीय वायुदलातील सेवा निवृत्त अधिकारी प्रियंका ओसवाल यांनी गुरुवारी (दि.१५) शिवाजी महाविद्यालयातील तिन दिवसीय व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना केले. बाळासाहेब पवार वाचनालय व फाउंडेशनच्या वतीने लोकनेते बाळासाहेब पवार व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेत स्वयं टॉक्सचे सह संस्थापक नविन काळे यांनी ओसवाल यांची मुलाखत घेऊन त्यांचा वायुसेनेतील प्रवास उलगवडवला. यावेळी बोलताना ओसवाल यांनी वायुसेनेची पूर्व तयारी कशी केली हे सांगितले. समुहाने विचार करून, गतिने हालचाल करावी लागते. हवेत काहीही घडले तरी त्याची माहिती वायूसेनेला असते. प्रत्येक उड्डाण घेणार्या विमानांची, ड्रोन, बलुन्सची माहिती असते म्हणून देश सुरक्षित आहे. प्रथम पोस्टींग झाल्यावर सव्वीस जानेवारीच्या काही दिवस आधी पहिल्याच दिवशी रडावर संशयास्पद हालचाल दिसली. आमच्याकडे निर्णय घेण्यास दोनच मिनेटे होती. मी ही बाब वरीष्ठांच्या निदर्शनास आणून दिली आणि तत्काळ कारवाई करून ते बलुन्स पाडण्यात आले. ही कारवाई केली नसती तर भारताची महत्वाची माहिती शत्रूंना अवगत झाली असती. सिंदूर ऑपरेशन करत भारताने जगाला दाखवून दिले की, तुम्ही आमच्यापर्यंत कधीच पोहचू शकणार नाहीत,कारण आम्ही येथे आहोत. वायुदलात उड्डाण, प्रशासन, यांत्रीकी या शाखा आहेत. अभियंते, वाणिज्य, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनाही या ‌क्षेत्रात करिअरच्या संधी आहेत. एका विद्यार्थिनीने महिला म्हणून काही अडचणी येतात का असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, या क्षेत्रात जेंडर भेदभाव नाही. पुरुष आणि महिलांना एकाच परिक्षेतून, निकषांतून आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागते. या प्रसंगी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मानसिंह पवार, सचिव चंद्रकांत देशमुख, प्राचार्य विजय भोसले, डॉ. राहुल क्षिरसागर, बाबूलाल काळे, विठ्ठल शिरसे, रामकृष्ण पवार, डॉ. रुपेश मोरे उपप्राचार्य बी. के. मगर, प्रा. उदय डोंगरे, प्रा.कारभारी भानुसे, प्रा.शिवाजी हुसे, डॉ . प्रकाश खेत्री, प्रा. रंगनाथ लहाने, रामकृष्ण तुपे, नीता सुराणा आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रशांत शिंदे यांनी केले.आभार उपप्राचार्य संतोष मतसागर यांनी मानले. अद्ययावत राहणे गरजेचे ^ परिक्षा उत्तिर्ण झाल्यानंतर खरा प्रवास सुरू होतो. नवीन विमान आले तर त्याचा अभ्यास करावा लागतो, सतत स्वतःला धक्के मारत अद्ययावत करावे लागते. वायुसेनेत भाषा अडसर नाही. नव्यान्नव टक्के संवाद हिंदीतून होतो. मी मराठी माध्यमातून शिकले. याचा मला सानंद अभिमान आहे. - प्रियंका ओसवाल, वायुदल सेवा निवृत्त अधिकारी

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 7:37 am

विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त लासूरच्या महाविद्यालयात व्याख्यान

लासूर स्टेशन येथील छत्रपती शाहू महाविद्यालय,सांस्कृत िक विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. शिवछत्रपती महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील पाली विभाग प्रमुख प्रा.भारत शिरसाट हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. प्रा.शिरसाट यांनी नामविस्तार चळवळीचा सविस्तर लेखाजोखा मांडताना सांगितले की,“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रातील कर्तृत्व दैदीप्यमान आहे. मराठवाड्यासारख्या शैक्षणिकदृष्ट्या मागास भागाला आत्मभान मिळाले ते त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीमुळे.डॉ. बाबासाहेबांच्या शैक्षणिक क्षेत्रातील विचार सरणीमुळे तळागाळातील समाजातील अनेकांना शिक्षणाची संधी मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. बाळासाहेब पवार यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा विविध अंगांनी वेध घेतला. ते म्हणाले, “आज शिक्षण सहज उपलब्ध होत आहे. अन्यथा उच्च शिक्षणासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना मुंबई किंवा हैदराबादला जावे लागले असते. डॉ. बाबासाहेबांनी शिक्षण क्षेत्रात घडवलेली क्रांती मूलगामी स्वरूपाची आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय ही मूल्ये समाजात रुजविण्याचे कार्य त्यांनी केले असून वैज्ञानिक दृष्टिकोनही समाजात निर्माण केला आहे.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य विलास अहिरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. न. ब. कदम यांनी केले, तर आभार डॉ. मधुकर साठे यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 7:36 am

नाशिककरांचे भाजपला दुसऱ्यांदा बहुमत:शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मैत्रीपूर्ण आव्हान परतवले

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेची सत्ता राखण्यात भाजप पूर्णत: यशस्वी ठरला. १२२ जागांच्या महापालिकेत तब्बल ७२ जागा जिंकून पक्षाने एकहाती सत्ता मिळवण्यात सलग दुसऱ्यांदा यश प्राप्त केले. त्याच वेळी भाजपला आव्हान देऊ पाहणारे राज्यातील सत्तेत मित्रपक्ष असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या युतीने पूर्ण जागांवर उमेदवार देत दिलेली मैत्रीपूर्ण लढत अपयशी ठरली. विशेषत: उद्धव व राज यांनी ‘ठाकरे ब्रँड’ म्हणून एकत्र येत राज्यातील पहिली संयुक्त प्रचारसभा नाशिकमध्ये घेत मैदान मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबतच्या महाविकास आघाडीला मतदारांनी स्पष्टपणे नाकारले. २०१७ मध्ये नाशिक महापालिकेत भाजपने पहिल्यांदाच ६६ जागा जिंकून पूर्ण बहुमताने सत्ता मिळवली होती. याच पार्श्वभूमीवर यंदाही निवडणुकीच्या सुरुवातीलाच महायुतीऐवजी स्वबळावर लढण्याची आणि ‘१०० प्लस’चा नारा देत तोवास्तवात आणण्यासाठी पक्षाकडून नियोजन करण्यात आले. यामध्ये सुरुवातीला सर्व पक्षांमध्ये भाजपकडेच १२२ जागांसाठी तब्बल ११६० इच्छुकांनी उमेदवारीसाठी दावे केले. त्याच वेळी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी महायुती केल्यास बंडखोरी होण्याची व जागा गमावण्याची शक्यता गृहीत धरून स्वबळावरच लढण्याचा आग्रह धरला. यामुळे सहाजिकच शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उघडपणे भाजपवर युती तोडल्याचा आरोप केला. दरम्यान, पक्षांतर्गत गटबाजी, आयारामांना प्रवेश, शहराध्यक्षांना नाराजांनी थेट कोंडून गाजर देण्याचे केलेले अनोखे आंदोलन, एबी फॉर्मवरून झालेला राडा या सर्व पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी सूत्रे ताब्यात घेत प्रचाराची व्यूहरचना आखून एकहाती विजय मिळवला. आधीच राष्ट्रवादीसोबत युती निवडणुकीसाठी राज्यात सत्तेत सहभागी भाजपसोबत शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची महायुती होण्याची शक्यता होती. मात्र, भाजप स्थानिकांनी स्बळाचा नारा दिल्याने व पक्षाकडे ११०० इच्छुक असल्याने नाराजीचा मोठा सामना करावा लागू शकतोहे लक्षात घेता युतीची केवळ चर्चाच केली. मात्र, शिवसेनेकडून अर्ज माघारीपर्यंत भाजप हा घोळ करण्याचा धोका लक्षात घेत आधीच राष्ट्रवादीसोबत युतीची घोषणा करून टाकली. त्यानुसार भाजप ११८, शिवसेना १०१, राष्ट्रवादी ३४ जागांवर युतीत लढले. नेतृत्वाअभावी फक्त उरली नावापुरती भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी स्थापन झाली. ठाकरे बंधूंसह काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गट, इतर पक्षांनाही एकत्रित घेत शंभरहून अधिक जागा लढण्यात यशस्वी ठरले, मात्र ही आघाडी केवळ उमेदवार उभे करण्यापुरतीच राहिल्याचेही दिसून आले आहे. विकासाचा मुद्दा व प्रभावी प्रचार यंत्रणा कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असल्याने सुमारे ३० हजार कोटींचा निधी मंजूर झाल्याचा ऊहापाेह या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने करण्यात आला. यातून शहरालगत ८५ किलोमीटरच्या रिंगरोड, खड्डेमुक्त रस्ते करण्याचे आश्वासन दिले आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 7:27 am

चिंताजनक:पुणे, जालना, सोलापूरमध्ये तुरुंगातील आरोपींचा विजय, गुन्हेगारांना राजकीय मार्ग मोकळा

महापालिकेच्या निकालाने कुख्यात गुन्हेगार असलेल्या काही उमेदवारांना राजकारणाचा मार्ग खुला केला. या काही निकालांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुण्यात खून प्रकरणी तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर आणि त्यांच्या सासूदेखील विजयी ठरल्या. दुसरीकडे, जालन्यात गौरी लंकेश हत्येतील आरोपी श्रीकांत पांगारकर, सोलापुरात खून प्रकरणी तुरुंगात असलेल्या संशयित शालन शिंदे यांचा विजयसुद्धा राजकारणाला नवी कलाटणी देणारा ठरला आहे. जालन्यात लंकेश हत्येतील आरोपी बनला नगरसेवकपत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी जामिनावर असलेला आरोपी श्रीकांत पांगारकर याने जालना महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवला आहे. अपक्ष उमेदवार म्हणून लढताना त्याने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. पांगारकर याने प्रभाग क्रमांक १३ मधून निवडणूक लढवली होती. त्याला २,६६१ मते मिळाली. पुण्यात सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकर जिंकल्या पुण्यातील प्रभाग क्रमांक २३ मधून सोनाली वनराज आंदेकर यांचा दणदणीत विजय झाला. आयुष कोमकर खून प्रकरणात तुरुंगात असताना त्यांनी निवडणूक लढवली होती. तर याच प्रभागात तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्या त्यांच्या सासू लक्ष्मी उदयकांत आंदेकर यांचा देखील कमी फरकाने विजय झाला आहे. मात्र, कारागृहात असलेले बंडू आंदेकर यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांच्या उमेदवारीभोवती सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. त्यामुळेच त्यांचा विजय झाल्याचे मानले जात आहे. ‘अन्यायाविरुद्ध लढणारी महिला” अशी प्रतिमा मतदारांमध्ये रुजली. त्यांच्या समर्थकांनी प्रभागात घरोघरी जाऊन प्रचार केला. सोनाली आंदेकर यांनी याच प्रभागातून निवडणूक लढणाऱ्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी तथा अनुभवी नेत्या प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. सोलापुरात खून प्रकरणातील संशयित शालन शिंदे विजयी सोलापूरचा मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या प्रभाग २ (क) मधील भाजप उमेदवार शालन शिंदे यांचा ६ हजार मताधिक्यांनी विजय झाला आहे. उमेदवारी माघार घेण्यावरून सरवदे यांची हत्या झाली होती. त्यानंतर संशयावरुन शिंदे यांच्यासह १५ जणांना अटक झाली. तेव्हापासून त्या तुरुंगात आहेत. गजा मारणेची पत्नी जयश्री निवडणुकीत पराभूत दुसरीकडे, कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे हिचा देखील निवडणुकीत पराभव झाला. तर सराईत गुन्हेगार बापू नायर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या निवडणुकीत निवडणूक लढवत होता, त्याचा देखील दारुण पराभव झाला आहे.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 7:20 am

घराणेशाहीवरून आगपाखड करणाऱ्या भाजप-शिंदे गटाला जनतेकडून धक्का:नेत्यांच्या नातलगांचा पराभव, काही सहानुभूतीने विजयी

महापालिकांचे निकालासोबतच मतदारांनी राजकारणात घराणेशाहीला नाकारल्याचे स्पष्ट झाले. मुंबई, पुण्यासह प्रमुख महापालिकांमध्ये दिग्गज नेत्यांची मुले, पत्नी, मित्र, नातेवाईक यांच्याकडे थेट पाठ फिरवली. प्रचारात घराणेशाहीवरून विरोधकांवर टीका करणाऱ्या भाजप व शिंदे गटाच्या उमेदवारांचा या पराभूतांमध्ये अधिक भरणा आहे. संभाजीनगर, पुण्यासारख्या काही ठिकाणी नेत्यांच्या नातलगांना यश आले. मात्र, जनतेने सहानुभूती आणि कर्तृत्वाच्या फुटपट्टीवर त्यांना ही संधी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्तेची गणिते मांडताना अनेक पक्षांनी आपले नेत्यांच्या कुटुंबातील सदस्य, नातलगांना उमेदवारी दिली होती. यात विरोधी आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांसोबतच सत्ताधारी भाजप, शिंदे गट आणि अजित गटही मागे नव्हता. पण मतदारांनी खंबीरपणे घराणेशाहीची परंपरा खंडित करत अशा नातलगांना घरचा रस्ता दाखवला. घराणेशाहीवर सातत्याने आगपाखड करणाऱ्या भाजपला आणि शिंदे गटाला जनतेने खऱ्या अर्थाने आरसा दाखवला. पराभूत नातलगांमध्ये सत्तेतील महायुतीचे सर्वाधिक उमेदवार आहेत. पराभव झालेल्यांमध्ये शिंदे गटाचे सदा सरवणकर यांच्या मुलाचा, खासदार रवींद्र वायकर यांच्या कन्येचा तसेच भाजप नेते राहुल शेवाळेंच्या वहिनीचा समावेश आहे. राष्ट्रवादीने मुंबई स्वबळावर लढताना नबाव मलिकांच्या घरातील तिघांना उमेदवारी दिली होती. त्यालाही जनतेने नाकारले. मलिकांचे भाऊ कप्तान मलिक काँग्रेसकडून पराभूत झाले. दुसरीकडे, नाशकात भाजपचे सुधाकर बडगुजर यांचे पुत्रही हरले आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलौती याला अमरावतीत जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे. झटून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून या नातलगांना उमेदवारी दिल्याने पक्षात धुसफूस होती. त्याचाही फटका पक्षाला बसला. ही बाब राजकीय पक्षांना अंजन घालणारी ठरेल, असे मानले जात आहे. मुंबई, नाशकात घराणेशाही अंगलट संभाजीनगर, पुण्यात घराणेशाही मुद्दा ठरला गौण पुण्यात भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांची सून स्वरदा बापट, दिवंगत माजी आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल, पुणे भाजप सरचिटणीस बापू मानकर यांचा विजय.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 7:15 am

कितीही टेरिफ लावा, आम्ही आत्मनिर्भर होऊ-भागवत:गंगापुरातील हिंदू संमेलनात सरसंघचालकांचे खडे बोल

काही देश आपल्या व्यापारावर टेरिफ लावून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, आम्ही कुणाच्याही दबावाखाली काम करणार नाही, तुम्ही कितीही टेरिफ लावा, आम्ही आत्मनिर्भरतेच्या रस्त्याने जाणार आहोत, ज्यामुळे आमच्या देशात रोजगार मिळेल. विदेशातील रोजगार टाळण्याची चिंता आम्ही करणार नाही, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली. गंगापुरात आयोजित हिंदू संमेलनप्रसंगी ते बोलत होते. महंत भास्करगिरी महाराज, महंत रामगिरी महाराज, १००८ शांतीगिरी महाराज यांची उपस्थिती होती. मोहन भागवत म्हणाले, ‘वसुधैव कुटुंबकम् संकल्पनेप्रमाणे संपूर्ण पृथ्वीची काळजी करणारा आपला हिंदू धर्म आहे. सर्व जगाला आपले कुटुंब मानणारा आपला धर्म असून शक्ती संपन्न राष्ट्र उभे करणारा समाज आपल्याला घडवायचा आहे. त्यासाठी आपल्या समाजाची समृध्दी, वैभव निश्चित करून एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ याप्रमाणे प्रत्येकाने काम करावे. वेगवेळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या संस्कृती जोपासणे आपण सर्व एक आहोत, आपल्यावर अनेक परकीय आक्रमणे झाली. परंतु आपण आपली ओळख कायम ठेवली. तेव्हा आपण सर्वस्व गमावल पण स्वभाव नाही. भारताला समर्थशाली बनवण्यासाठी शक्ती, बुध्दी व युक्तीची गरज आहे. सज्जनांच्या शक्तीलाला शिलाच पाठबळ असते, जगाला आवश्यक असलेली मूल्ये, दिशा देण्याची क्षमता भारताकडे आहे’’.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 6:59 am

मतदानासाठी सूक्ष्म नियोजन; प्रभावी अंमलबजावणी:वॉर्डाऐवजी प्रभागरचनेनुसार निवडणूक झाल्याचा लाभ, कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे पक्षाचा स्ट्राइक रेट 61 टक्क्यांवर

मनपा निवडणूक एक वॉर्डाऐवजी प्रभागरचना करून घेण्याचा निर्णय भाजपच्या पथ्यावर पडला. भाजपने निवडणुकीसाठी सूक्ष्म व्यवस्थापन केले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा आणि दीड वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रनिहाय व्यवस्थापनाच्या माध्यमातून भाजपने आपला खुंटा बळकट केला होता. १ बूथ, ३१ यूथ, मतदान केंद्र प्रतिनिधी आणि बूथ पालक ही संकल्पना फलदायी ठरली. शहरासाठी आणलेला मोठा विकास निधी, पाणीपुरवठा योजना, गॅस पाइपलाइनचे काम, एक लाख कोटींचे शहरासाठी आणलेले उद्योग, अतिक्रमण हटवण्याचा घेतलेला निर्णय, शहरात मागील १० वर्षांपासून होत असलेले पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील काम या बाबी भाजपला मताधिक्य देण्यात महत्त्वाच्या ठरल्या. संभाजीनगरमध्ये भाजपचा स्ट्राइक रेट ६१ टक्के इतका राहिला. पक्षाकडे १,४०० उमेदवारांनी उमेदवारी मागितली होती. भाजपमध्ये उमेदवारी मिळाली नसल्याने अनेकांनी बंड केले होते. भाजपकडून उमेदवारी मिळाली नसलेल्यांपैकी १२ जणांना शिंदेसेना, ५ जणांना राष्ट्रवादीने, तर एकाला उबाठाने उमेदवारी दिली होती. ‘ओपन’मध्ये राखीव उमेदवार दिल्याचा फटका भाजपने खुल्या गटातील १३ जागी ओबीसी, भटक्या जमाती, महिला आदी उमेदवार दिले. याचा फटका भाजपला काही ठिकाणी बसला. माजी महापौर भगवान घडमोडे यांच्या पत्नी माजी नगरसेविका सविता घडमोडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रभाग २५ मध्ये भगवान घडामोडे यांनी चार उमेदवारांची मोट बांधली. पण, ते अपयशी ठरले. जातनिहाय प्रचार यंत्रणा राबवण्याचे यश भाजपचा विजय हा निवडणूक व्यवस्थापनाचा भाग आहे. पक्षाने जातीनिहाय प्रभागात प्रचार यंत्रणा राबवली. मतदान करून घेण्याची रणनीती भाजपने आखली. एका मतदाराकडे किमान चार वेळा भेट देण्यात आली. प्रभागात समाजनिहाय मेळावे घेणे. पेजप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, मंडळप्रमुख, विविध आघाड्या या माध्यमातून कार्यकर्त्यांना सतत कामात ठेवले. मतदानाचे नियोजन प्रत्यक्षात उतरवले मतदानाच्या दिवशी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय करायचे, याची जबाबदारी वाटून दिली होती. त्यामुळे प्रत्येकाला कामाबद्दल स्पष्टता होती. मतदारांना केंद्रापर्यंत आणून मतदान करवून घेण्याचे पक्षाचे नियोजन यशस्वी ठरले. प्रत्येक प्रभागातील पॅनलमध्ये एक किंवा दोन प्रबळ, अनुभवी उमेदवार देण्यात आले. त्याचा नवख्या उमेदवारांना फायदा झाला.

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 6:50 am

मुंबईत पहिल्यांदा भाजपची सत्ता:मुंबईत उद्धव-राज एकत्र आले तरीही 28 वर्षांनंतर ठाकरेंनी सत्ता गमावली

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत इतिहास घडला. पहिल्यांदाच भाजपला प्रचंड यश मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीतील शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत भाजप २९ पैकी २५ महापालिकांमध्ये सत्ता स्थापन करत आहे. भाजप-शिंदेसेनेच्या युतीने मुंबईत इतिहास घडवला. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभराचे लक्ष मुंबई महापालिकेकडे लागले होते. मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन उद्धव-राज ठाकरे २० वर्षांनंतर एकत्र आले होते. येथे बहुमतासाठी ११४ जागांची गरज आहे. शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर निकालानुसार २२७ पैकी ११८ वॉर्डांत महायुतीने विजय मिळवला होता. त्यात भाजपने ८९ तर शिंदेसेनेने २९ जागा पटकावल्या. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकवटली होती. पण भाजपने दोन्ही ठिकाणी एकहाती बहुमत मिळवले. नाशिक, सोलापूरमध्ये स्वबळावर लढणाऱ्या भाजपने एकहाती यश मिळवले. संभाजीनगरात भाजपने प्रथमच एकहाती सत्ता काबिज केली आहे. अमराठी मतदार एकवटले, मराठी मतदार विभागले; भाजपने मते मिळवली, ठाकरे बंधूंनी मने जिंकली उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाऐवजी मराठी अस्मितेचा मुद्दा घेतला. त्यासाठी २० वर्षांनंतर राज ठाकरेंना सोबत घेतले. यामुळे अमराठी मतदार ठाकरे बंधूंविरोधात एकवटले. दुसरीकडे ज्या मराठी मतदारांची मते एकगठ्ठा मिळतील अशी अपेक्षा होती, ती पूर्ण झाली नाही. मराठी माणसाने भाजप-शिंदेसेना, ठाकरे बंधूंना मतदान केले. भाजपने २०१७ तसेच २०२४ लोकसभा, विधानसभेचे मतदान लक्षात घेऊन बूथवर भर दिला. शिंदेसेनेला सोबत घेऊन अजित पवारांना स्वतंत्र लढण्यास सांगितल्याने काही मुस्लिम मते फुटली. राज ठाकरेंमुळे काँग्रेसची उद्धवसेनेला साथ मिळणार नाही, अशीही व्यवस्था केली. मुंबई मनपाचे दरवर्षी सुमारे ७५ हजार कोटींचे बजेट भाजपच्या हाती असेल. कोस्टल रोड, मेट्रो जाळ्याचा मुंबईतील कोस्टल रोड, मेट्रोचे जाळे आणि सिमेंटचे रस्ते या विकासकामांचा प्रभाव शहरी मतदारांवर दिसून आला. भाजपने ‘डबल इंजिन’ सरकारचा फायदा घेत विकासाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवला, ज्याला मुंबईकरांनी पसंती दिली. बिगर मराठी एकवटले गुजराती, उत्तर व दक्षिण भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर भाजपला कौल दिला. मुलुंड, कांदिवली, बोरिवलीत भाजपची पकड अधिक घट्ट होऊन ठाकरेंचे मराठी मतांवरील वर्चस्व सत्ता मिळवण्यासाठी अपुरे पडले. जनहितकारी, सुशासन अजेंड्याला आशीर्वाद महाराष्ट्रातील जनतेने प्रगतीला गती देणारा कौल दिला. उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत!

दिव्यमराठी भास्कर 17 Jan 2026 6:47 am

मुंबईत महायुतीचा निसटता विजय

ठाकरे बंधूंची कडवी लढत, मुंबई, ठाण्यासह अनेक महापालिकांत महायुतीला बहुमत -एमआयएमची मुसंडी, राज्यात शंभरहून अधिक नगरसेवक जिंकले मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत भाजपा व महायुतीने मोठे यश मिळवले आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेची सत्ता काबिज करण्यासाठी महायुती व ठाकरे बंधूंमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपा व शिंदेंच्या शिवसेनेने २२७ पैकी ११६ […] The post मुंबईत महायुतीचा निसटता विजय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 1:58 am

मराठवाड्यातही भाजपची बाजी

छ. संभाजीनगर, जालना, नांदेडमध्ये भाजप परभणीत ठाकरे गटाची बाजी, लातुरात कॉंग्रेसची मुसंडी छ. संभाजीनगर : प्रतिनिधी मराठवाड्यात एकूण पाच महापालिकांची निवडणूक झाली असून, या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ३ महापालिकांवर झेंडा फडकविला तर ठाकरे गटाने कॉंग्रेसला सोबत घेऊन परभणीत विजय मिळविला आणि कॉंग्रेस पक्षाने लातूरचा गड राखत महापालिकेवर तिंरंगा फडकविला. महापालिकेच्या लढाईत दोन्ही शिवसेनेला मात्र […] The post मराठवाड्यातही भाजपची बाजी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 1:56 am

१६ मनपांत भाजपची सत्ता!

भाजपच नंबर वन, १४२२ नगरसेवक विजयी, शिंदे सेना दुस-या क्रमांकावर मुंबई : प्रतिनिधी राज्यातील २९ महापालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत २८६९ पैकी १४२२ जागा जिंकून भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ३६६ तर काँग्रेसचे ३३१ नगरसेवक निवडून आले आहेत. २९ पैकी १६ महापालिकेत भाजपाने स्वबळावर बहुमत मिळवले आहे. भाजपने कुठे स्वबळावर तर […] The post १६ मनपांत भाजपची सत्ता! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 1:53 am

ऑगस्ट २०२६ ची मतदार यादी ग्रा  धरण्यात येणार

जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यामध्ये जल्हिा परिषदेचे तीन गट व पंचायत समितीचे सहा गण आहेत यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. कर्मचा-यांची नियुक्तीही करण्यात आली असून १० झोनल अधिकारीही नियुक्त करण्यात आले आहेत . जळकोट तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुका ऑगस्ट २०२६ च्या मतदार यादीनुसार होणार आहेत, अशी माहिती […] The post ऑगस्ट २०२६ ची मतदार यादी ग्रा धरण्यात येणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 1:53 am

जळकोट तालुक्यात भाजपा, शिवसेनेची युती तुटली 

जळकोट : प्रतिनिधी जळकोट तालुक्यात एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. जळकोटमध्ये झालेल्या बैठकीत ही घोषणा केली आहे. त्यामुळे जळकोट तालुक्यात आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना यांची युती होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती मात्र या युतीमध्ये बिघाडी झाली असून . शिवसेनेने जळकोट तालुक्यातील सर्व जागा रबळावर […] The post जळकोट तालुक्यात भाजपा, शिवसेनेची युती तुटली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 1:51 am

ग्रामीण भागातील लाडक्या बहिणी रूसल्या 

किनगाव : प्रतिनिधी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक लाडक्या बहिणी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचे अनुदान डिसेंबरपासून खात्यात जमा न झाल्याने या अनुदानापासून वंचित झाल्या असून शासनाच्या विविध नियमावलीचा लाडक्या बहिणींना फटका बसला आहे. राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जवळपास वर्ष-दीड वर्षापासून सुरू करण्यात आली असून त्यात विविध नियमावलीचा बडगा लावल्याने व केवायसी करण्यास भाग पाडल्याने […] The post ग्रामीण भागातील लाडक्या बहिणी रूसल्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 1:50 am

निलंगा नगरपालिकेत स्थायी समितीत महिलांना संधी

निलंगा : प्रतिनिधी निलंगा नगरपालिकेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व अरविंद पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात भाजपाने नगराध्यक्ष पदासह १५ नगरसेवक निवडून आणले. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या निवडीमध्ये सर्वच ठिकाणी महिलांना संधी दिली आहे. निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. यात स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष संजय हलगरकर तर नियोजन समितीच्या अध्यक्षपदी […] The post निलंगा नगरपालिकेत स्थायी समितीत महिलांना संधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 1:49 am

काँग्रेस-वंचित आघाडीच्या यशाचा पानगावात जल्लोष

रेणापूर : प्रतिनिधी लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने घवघवीत यश संपादन केल्याने रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे कॉग्रेस च्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उत्स्फूर्त आनंद साजरा केला. या यशाच्या आनंदात फटाके फोडून पेढे वाटण्यात आले. लातूर महापालिकेत काँग्रेसझ्रवंचित आघाडीला मिळालेल्या जनतेच्या कौलाचे स्वागत करत पानगावातील कॉग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजयाचा जल्लोष […] The post काँग्रेस-वंचित आघाडीच्या यशाचा पानगावात जल्लोष appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 1:48 am

निलंगा, औराद शहाजानी येथे कार्यकर्त्यांची आतषबाजी

निलंगा : प्रतिनिधी लातूर महानगरपालिकेत काँग्रेस व वंचीत आघाडीची एक हाती सत्ता आल्याने निलंगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात व औराद शहाजानी (ता निलंगा) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करीत एकमेकांना पेढे भरवत निकालाचा जल्लोष करण्यात आला. यावेळी नगरपरिषदेचे गटनेते तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, उपजिल्हाप्रमुख सुधाकर पाटील, […] The post निलंगा, औराद शहाजानी येथे कार्यकर्त्यांची आतषबाजी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 17 Jan 2026 1:47 am

पुणेकरांच्या अपेक्षा जबाबदारीने पूर्ण करू:सत्ता उपभोगण्यासाठी नव्हे, विकासासाठी वापरणार- केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ

पुणेकरांनी भाजपला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत उमेदवार निवडून दिल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ यांनी सर्व पुणेकरांचे मनापासून आभार मानले. मतदान करताना पुणेकरांनी शहराच्या विकासाला, प्रगतीला आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्याला प्राधान्य दिले, असे ते म्हणाले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हीच भावना लक्षात घेऊन आम्ही सत्ता केवळ उपभोगण्यासाठी नव्हे, तर पुणेकरांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी जबाबदारीने काम करू, असे प्रतिपादन मोहोळ यांनी केले. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, भाजपने जाहीरनाम्याच्या माध्यमातून पुणेकरांसमोर मांडलेले संकल्पपत्र पूर्ण करण्याचे भान आम्हाला आहे. पुढील पाच वर्षांत विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरी समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षांत देशभरात झालेल्या विकासाचा परिणाम पुण्यातही स्पष्टपणे दिसून येतो. मेट्रो प्रकल्प, चांदणी चौकाचा विकास तसेच विविध कामांसाठी मिळालेल्या निधीमुळे शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पुण्याशी संबंधित अनेक प्रश्न शासनदरबारी मार्गी लावले. मागील पाच वर्षांत महापालिकेत असताना भाजपने केलेली विकासकामे जनतेसमोर मांडली. तसेच मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०४७ पर्यंत पुण्याचा विकास कसा करायचा, याचे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन नागरिकांसमोर ठेवण्यात आले. हे विचार पुणेकरांना पटल्याने त्यांनी पुन्हा भाजपवर विश्वास दाखवला, असे मोहोळ यांनी नमूद केले. विरोधकांनी निवडणुकीदरम्यान खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका केली, जे लोकशाहीला शोभणारे नाही. त्यांच्या सत्ताकाळातील शहराच्या दुरवस्थेचा अनुभव घेत पुणेकरांनी २०१७ प्रमाणेच यावेळीही भाजपला भरघोस यश दिले. हजारो कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतल्यामुळेच हा विजय शक्य झाला. उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनीही पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले, हा विजय त्यांनाच समर्पित आहे, असे मोहोळ यांनी सांगितले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, भाजपचा हा विजय जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा कौल आहे. कार्यकर्त्यांनी नाराजी बाजूला ठेवून एकनिष्ठेने काम केले. पक्ष भविष्यात त्यांच्या त्यागाची दखल घेईल. नम्रतेने लोकांची सेवा करणे ही आपली संस्कृती असून, मुख्यमंत्री यांच्या आवाहनानुसार बेकायदेशीर फ्लेक्सबाजी टाळावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 10:02 pm

नागपूरला प्रदूषणमुक्त शहर बनवायचेय:सर्व आश्वासने पूर्ण करायची आहेत, नितीन गडकरींच्या विजयी नगरसेवकांना सूचना

नागपूर महापालिकेत विजय मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजयी नगरसेवकांचे अभिनंदन करण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला तसेच गडकरी यांनी नागपूरला सुंदर आणि प्रदूषणमुक्त शहर बनवायचे असल्याचे निर्देश नवनिर्वाचित नगरसेवकांना केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूरच्या जनतेने मोठा विजय आपल्याला दिला आहे. महाराष्ट्रात एकूणच भाजपने या निवडणुकीत मोठा रेकॉर्ड केला आहे आणि 29 पैकी 25 महापालिकांमध्ये आपली सत्ता आली आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष भाजपच आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मी सगळ्यांचे अभिनंदन करतो. मला विश्वास आहे, येत्या काळात विकासाचा अजेंडा जो आहे, तो आपण वेगाने पुढे नेऊ. नितीन गडकरी म्हणाले, आपल्या नागपूरमध्ये यश मिळाले आहे, आपल्या शहरात जे काही उत्तम कार्य आपण केले, त्याचा परिणाम म्हणून आपल्याला चांगले यश मिळाले आहे. आपण आश्वासन दिले आहे की प्रदूषणमुक्त शहर आपण तयार करणार आहोत. ही वचने आपल्याला पूर्ण करायचे आहे. या निवडणुकीत आपल्या कार्यकर्त्यांनी, आमदारांनी उत्तम काम केले आहे. पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, नागपूर शहरात, विदर्भात आणि महाराष्ट्रात चंद्रशेखर बावनकुळे यांनी खूप काम केले आहे. त्यांनी परिश्रम करून विजय मिळवून दाखवला आहे. येणाऱ्या काळात जसा आपल्याला आनंद आहे, तशी जबाबदारी वाढली आहे. जे नगरसेवक निवडून आले आहेत, जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत, जे प्रश्न आहेत, ते सोडवायचे आहेत. हा विजय आपल्या पक्षाचा नेत्रदीपक विजय आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला संधी मिळाली आहे. हा विजय आपल्याला नम्रपणे स्वीकारायचा आहे. जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत, असे आवाहन गडकरी यांनी केले आहे. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी मोठा विजय मेळावा आयोजित करण्याचे आवाहन केले. तसेच या कार्यक्रमात संगीत आणि जेवणाची मेजवानी माझ्याकडून असेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 9:57 pm

पुणे-बंगळुरू महामार्गावर रंगली दोन नेत्यांची गळाभेट:उदयनराजे आणि शंभुराज देसाईंची सलोख्याची भेट, दोघांमध्ये दिलखुलास गप्पा

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील सलोखा आज पुन्हा दिसला. दोन्ही नेत्यांनी पुणे बेंगलोर महामार्गावर एकमेकांची चौकशी करत आवर्जून गळाभेट घेतली . शुक्रवारी सकाळी खा.उदयनराजे भोसले यांनी पुणे-बंगळुरू महामार्गावरुन निघालेला मंत्री शंभुराज देसाई यांचा ताफा अडवून त्यांची गळाभेट घेतली. या भेटीवेळी शंभूराज देसाई यांनी ‘काल तुमचे बंधूराज म्हणाले आहेत, मिटिंग घ्या, घ्यायची का मिटिंग,’ असा प्रश्न विचारुन राजेंची गुगली घेतली. ही गुगली राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकांचे रणांगण हळूहळू तापू लागले आहे. महायुती होणार की नाही यावरुन एकीकडे काथ्याकूट सुरू असताना, भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादीकडून अंतर्गत डावपेचही आखले जात आहेत. मात्र, महायुतीचा निर्णय अद्यापही झालेला नाही. गुरुवारी साताऱ्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ‘मान-सन्मान राखला तरच महायुती होईल, अन्यथा पर्याय खुले आहेत,’ असा इशारा दिला होता. तर शिवेंद्रसिंहराजे यांनी ‘जिल्हा पातळीवर समन्वयाची भूमिका पालकमंत्र्यांनीच घ्यावी,’ अशी स्पष्टोक्ती माध्यमांपुढे केली होती. महायुतीतच युतीवरुन शाब्दिक द्वंद्व सुरू असताना शुक्रवारी शंभूराज देसाई व उदयनराजे भोसले यांची भेट व दोन्ही नेत्यांमध्ये झालेला वार्तालाप चर्चेचा विषय ठरला आहे. शंभूराज देसाई यांनी ‘तुमचे बंधूराज म्हणाले आहेत, मिटिंग घ्या; घ्यायची का मिटिंग? असा प्रश्न विचारत उदयनराजेंना बुचकळ्यात टाकले. मात्र, उदयनराजे यांनी केवळ स्मितहास्य देत या प्रश्नावर बोलणे टाळले.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 9:20 pm

प्रगतीला गती देणारा कौल! महाराष्ट्रातील ‘महाविजया’वर मोदींचे शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महापालिकांच्या निकालांचे कल स्पष्ट झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, “राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे, हेच या निकालातून दिसून येते. हा कौल केवळ राजकीय विजय नसून राज्याच्या प्रगतीला […] The post प्रगतीला गती देणारा कौल! महाराष्ट्रातील ‘महाविजया’वर मोदींचे शिक्कामोर्तब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 9:19 pm

मुंबईकरांनी विकासाला स्वीकारले, भावनिकतेला नाकारले:एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला; म्हणाले- महापौर महायुतीचाच होणार

सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेत आत्तापर्यंत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती आघाडी दिसून येत आहे. ठाकरे बंधू आणि भाजप महायुतीमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मी मुंबईकरांना, ठाणेकरांना आणि राज्यातील सर्व मतदारांना धन्यवाद देतो आणि आभारही मानतो. ठाण्यात 71 जागा आपण जिंकलो आहोत. गेल्या वेळेस 67 होते. आता स्पष्ट बहुमत शिवसेनेला मिळाले आहे. मुंबईत देखील महायुतीला बहुमत लागते त्याच्या अगदी जवळ आम्ही पोहोचलो आहोत. राज्यभरात देखील सर्व महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, सगळीकडेच शिवसेनेने चांगली मुसंडी मारली आहे. मुंबईत देखील महायुतीचा महापौर होईल. आमचा अजेंडा जो आहे विकासाचा, या अजेंडावर आम्ही निवडणूक लढवली. काही लोकांनी भावनेच्या आधारावर ही निवडणूक लढवली. परंतु, तरी सुद्धा लोकांनी महायुतीला कौल दिला आहे. आम्ही साडे तीन वर्षात मुंबईसाठी जे काही विकास कामे केली आहेत, त्याला बघूनच आम्हाला मत मिळाली आहेत. मुंबईकरांनी विकासाला स्वीकारले आहे आणि ज्यांनी विकासाला नाकारले होते त्यांना नाकारले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, विकास हाच ब्रॅंड लोकांनी स्वीकारला आहे. आता मी म्हणेल की मुंबईचा विकास जोरात करायचा आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे इथे जगभरातले लोक येतात आणि मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर झाले पाहिजे. जागतिक दर्जाचे शहर झाले पाहिजे असे मोदी यांनी म्हटले आहे. त्यानुसार महायुती काम करत असल्याचे शिंदे म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 8:57 pm

बांगलादेश निषेधार्थ ब्रिटीश हिंदू रस्त्यावर; संसद संतप्त

लंडन : वृत्तसंस्था बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर सुरू असलेल्या हिंसाचाराचे पडसाद आता सातासमुद्रापार उमटले आहेत. ब्रिटिश संसदेच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये या विषयावर अत्यंत गंभीर चर्चा झाली, ज्यामध्ये लोकप्रतिनिधींनी बांगलादेशातील परिस्थितीला ‘विनाशकारी’ असे संबोधले. कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी मांडलेल्या प्रस्तावाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले असून, युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव […] The post बांगलादेश निषेधार्थ ब्रिटीश हिंदू रस्त्यावर; संसद संतप्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 8:24 pm

सौदी, कतार, ओमानच्या शिष्टाईने महायुद्ध टळले! इराणवरील हल्ल्याचा निर्णय ट्रम्प यांनी मागे घेतला

रियाध : वृत्तसंस्था सौदी अरेबिया, कतार आणि ओमान यांच्या कुटनितीक प्रयत्नांमुळे अमेरिकेचा इराणवरील संभाव्य हल्ला टळल्याचे बोलले जात आहे. आखाती अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांना काही गोष्टी पटवून देण्यासाठी तिन्ही देशांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यामुळे इराणला त्यांची चांगली ‘नियत’ दाखवण्याची संधी मिळेल. महत्वाचे म्हणजे, अमेरिकेने इराणमधील निदर्शकांवरील दडपशाहीविरोधात लष्करी कारवाईची धमकी दिली होती. […] The post सौदी, कतार, ओमानच्या शिष्टाईने महायुद्ध टळले! इराणवरील हल्ल्याचा निर्णय ट्रम्प यांनी मागे घेतला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 8:23 pm

दिल्लीत विषारी हवेचे दररोज २५ जण बळी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीतील वाढते प्रदूषण आणि बदलती जीवनशैली यांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या ताज्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये श्वसनाशी संबंधित आजारांमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या २०२३च्या तुलनेत वाढली आहे, तर हृदयविकार हे मृत्यूचे सर्वात मोठे कारण ठरले आहेत. आकडेवारीचा सरासरी आढावा घेतल्यास, २०२४ […] The post दिल्लीत विषारी हवेचे दररोज २५ जण बळी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 8:22 pm

नागरिकत्वाच्या आधारावर किती जणांची नावे वगळली? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था विशेष सघन पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेत संशयास्पद नागरिकत्वाच्या आधारावर किती मतदारांची नावे वगळली गेली? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारला असून यासंदर्भात माहिती देण्यास सांगितले. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने मतदार वगळण्याच्या मृत्यू, डुप्लिकेशन आणि स्थलांतर अशा केवळ तीन श्रेणी सांगितल्या आहेत. […] The post नागरिकत्वाच्या आधारावर किती जणांची नावे वगळली? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला प्रश्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 8:20 pm

हिमालय, प्रसिद्ध ओम् पर्वतावरील बर्फ गायब

डेहराडून : वृत्तसंस्था उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीच्या कमतरतेमुळे हिमालय काळा पडत चालला आहे. पिथौरागढ जिल्ह्यात असलेले पंचाचूली, हंसलिंग आणि जगप्रसिद्ध ॐ पर्वत हिवाळ्यात बर्फाच्या जाड थराने झाकलेले असायचे, पण आता ते नाममात्र बर्फासह उभे आहेत. ही परिस्थिती केवळ चिंताजनक नाही, तर हिमालयाच्या बदलत्या हवामानाचेही सूचक आहे. जानेवारीचा अर्धा महिना उलटला आहे, पण अजूनही बर्फवृष्टी झालेली […] The post हिमालय, प्रसिद्ध ओम् पर्वतावरील बर्फ गायब appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 8:19 pm

१० वर्षात ‘स्टार्ट अप’ची संख्या २ लाखांवर; २१ लाख नोक-या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत आज जगातील तिसरी सर्वात मोठी इकोसिस्टम आहे. १० वर्षांपूर्वी देशात ५०० पेक्षा कमी स्टार्टअप्स होते, पण आज २ लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. भारतातील तरुणांचे लक्ष वास्तविक समस्या सोडवण्यावर आहे. आमचे तरुण नवोन्मेषक, ज्यांनी नवीन स्वप्ने पाहण्याचे धाडस दाखवले. मी त्या सर्वांचे खूप-खूप कौतुक करतो. पंतप्रधानांनी हे विचार नवी दिल्लीतील भारत […] The post १० वर्षात ‘स्टार्ट अप’ची संख्या २ लाखांवर; २१ लाख नोक-या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 8:18 pm

शाहजहान-मुमताजच्या ख-या कबरी उघडल्या!

आग्रा : वृत्तसंस्था मुघल बादशाह शाहजहानचा ३७१ वा उर्स (वाढदिवस) सोहळा सुरू झाला आहे. ताजमहालमध्ये एएसआयचे अधिकारी तळघरात २२ फूट खाली उतरले. शाहजहान-मुमताजच्या ख-या कबरी उघडण्यात आल्या. यानंतर गुसल विधीने (कबरींवर चंदनाचा लेप) उर्सला सुरुवात झाली. येथेच, शाहजहान आणि मुमताजच्या ख-या कबरी आहेत, ज्या मुख्य घुमटाखालील तळघरात आहेत. हा तळघर बनावट कबरींच्या खाली आहे, त्याचा […] The post शाहजहान-मुमताजच्या ख-या कबरी उघडल्या! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 8:16 pm

सोने-चांदीमुळे डायबेटीस, शक्तीवर्धक औषधे महागली!

नवी दिल्ली : प्रतिनिधी चांदीमध्ये बॅक्टेरियाशी लढण्याची क्षमता असते. त्यामुळे याचा उपयोग गंभीर इन्फेक्शन, भाजलेल्या जखमांवरच्या क्रीममध्ये केला जातो. याशिवाय काही वैद्यकीय उपकरणांमध्येही याचा वापर होतो. सोने आणि चांदीचा आयुर्वेदिक आणि भस्म आधारित औषधांमध्ये सर्वाधिक वापर केला जातो. सोने-चांदीच्या दरात प्रचंड वाढ झाल्यामुळे आयुर्वेदिक औषधांच्या किमतीतही वेगाने वाढ झाली आहे. गेल्या एका वर्षात आयुर्वेदिक औषधांच्या […] The post सोने-चांदीमुळे डायबेटीस, शक्तीवर्धक औषधे महागली! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 16 Jan 2026 8:14 pm

छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर राडा!:पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट, एक तास ईव्हीएम बंद असल्याचा वंचितचा दावा

छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीच्या दिवशी सकाळपासूनच अनेक ठिकाणी राडा झाल्याचे पाहायला मिळाले. असाच आणखी एक प्रकार महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये पाहायला मिळाला. येथे वंचित बहुजन आघाडीच्या पॅनलला पराभूत घोषित करण्यात आल्यानंतर ईव्हीएम मशीन बंद असल्याचा आरोप वंचितच्या उमेदवाराने केला. त्यानंतर हा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 24 इथला निकाल जाहीर झाला. या ठिकाणी बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या बहीण गंगाबाई भीमराव भागुरे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यांच्यासोबत कामलाताई रामचंद्र नरोटे, मुक्ता किसन ठुबे आणि सुनील देवदास जगताप हे संपूर्ण भाजपचे पॅनल विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, गंगाबाई भागुरे यांच्या विज्यावर वंचितचे उमेदवार सतीश गायकवाड यांनी आक्षेप घेतला. वंचितचे उमेदवार सतीश गायकवाड यांनी मतमोजणी केंद्रावर एक तास मशीन बंद असल्याचा दावा केला. यावेळी मोतमोजणी केंद्रावर गडबड झाली आणि पोलिस तसेच वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट देखील झाल्याचे पाहायला मिळाले. वंचितच्या कार्यकर्त्यांनी असाही आरोप केला की, वंचितचे पॅनल विजयी घोषित करण्यात आले होते. पण तिथे भाजपच्या उमेदवारांनी फेर मतदान करण्याची मागणी केली. त्यानंतर जिंकलेले वंचितचे पॅनल पराभूत घोषित करण्यात आले. त्यामुळे वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या केले.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:53 pm

निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया:जनतेचा कौल सर्वोच्च, पूर्ण आदरानं स्वीकारतो; अपयशाकडे निराशेने न पाहता, दुप्पट जोमानं काम करण्याचा निर्धार

राज्यातील मुंबईसह विविध महानगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांनी संयमी आणि समतोल भूमिका मांडत प्रतिक्रिया दिली आहे. निकाल काहीही असो, जनतेचा निर्णय अंतिम आणि सर्वोच्च असतो, असा स्पष्ट संदेश त्यांनी आपल्या पोस्टमधून दिला आहे. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतानाच जिथे अपेक्षित यश मिळाले नाही, तिथे आत्मपरीक्षण करून नव्या जोमाने काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेकडे केवळ राजकीय भाष्य म्हणून नव्हे, तर पुढील राजकीय वाटचालीचा संकेत म्हणून पाहिले जात आहे. अजित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्वप्रथम जनतेच्या निर्णयाला नतमस्तक होत, जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदरानं स्वीकारतो, असे ठामपणे नमूद केले आहे. निवडणुकीत विजय मिळवलेल्या सर्व उमेदवारांचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. सत्तेत येणाऱ्या नव्या नगरसेवकांनी केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता, नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे आणि विकासकामांना गती द्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वत्र अपेक्षित यश मिळाले नाही, ही बाब अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे मान्य केली आहे. मात्र, या अपयशाकडे ते निराशेच्या दृष्टीने न पाहता, नव्या जबाबदारीच्या रूपात पाहत असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. जिथे जनतेचा अपेक्षित कौल मिळाला नाही, तिथे जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी अधिक प्रामाणिकपणे, अधिक जबाबदारीने आणि दुप्पट जोमानं काम करत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ही भूमिका राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडवणारी मानली जात आहे. अजित पवार यांनी केवळ आपल्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर निवडणुकीत यशस्वी ठरलेल्या सर्व पक्षांच्या उमेदवारांनाही एक प्रकारचे मार्गदर्शन केले आहे. विजयी उमेदवारांनी आपल्या महानगरपालिकांमध्ये जनतेच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, विकासकामे आणि लोककल्याणाच्या योजनांना गती द्यावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. सत्ता ही सेवा करण्याची संधी असते, हा अप्रत्यक्ष संदेश त्यांच्या वक्तव्यातून देण्यात आला आहे. त्याचबरोबर, जे उमेदवार या निवडणुकीत विजयी होऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठीही अजित पवार यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. पराभवामुळे निराश न होता, जनतेसाठी कार्यरत राहावे आणि जनहित हेच केंद्रस्थानी ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. निवडणूक जिंकली किंवा हरली तरी लोकांसाठी अखंड काम करत राहणे हेच खरे ध्येय असले पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. या भूमिकेमुळे पक्षातील कार्यकर्त्यांना नवी उर्जा आणि पुढील संघर्षासाठी दिशा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ताकदीने काम करण्याचा निर्धार एकूणच, महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर अजित पवार यांनी मांडलेली भूमिका ही आक्रमक राजकारणापेक्षा समतोल, संयम आणि लोकशाही मूल्यांवर आधारित असल्याचे दिसून येते. जनतेचा कौल मान्य करून पुढील काळात अधिक ताकदीने काम करण्याचा निर्धार त्यांनी स्पष्ट केल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील रणनीती ही आत्मपरीक्षण, संघटन मजबूत करणे आणि जनतेचा विश्वास परत मिळवण्यावर केंद्रित असेल, हे त्यांच्या या पोस्टमधून अधोरेखित झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:29 pm

अमृता फडणवीसांचा राज-उद्धव ठाकरेंच्या युतीवर अप्रत्यक्ष निशाणा:म्हणाल्या- भेदभावाचे राजकारण करणाऱ्यांना सूचक संदेश; दिविजाकडूनही आनंद व्यक्त

मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ठाम शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. मराठी माणसाने विकास, प्रगती आणि कामगिरीला प्राधान्य देत भाजपला कौल दिला असून भाषा-प्रांताच्या नावावर भेदभावाचं राजकारण करणाऱ्यांना हा स्पष्ट इशारा आहे, अशा शब्दांत त्यांनी या निकालामागील जनतेचा संदेश अधोरेखित केला आहे. देवेंद्र फडणवीसांची मुलगी दिविजा यांनीही वडीलांना मिठी मारुन आनंद व्यक्त केला. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत ऐतिहासिक यश संपादन केलं आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता स्थापन होत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात हा मोठा राजकीय टप्पा गाठण्यात आला आहे. या निकालामुळे मुंबई महानगरपालिकेत भाजपचा महापौर विराजमान होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनेक दशकांपासून काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या ताब्यात राहिलेल्या बीएमसीत भाजपने अखेर सत्ता मिळवत आपली ताकद सिद्ध केली आहे. या विजयाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून भाजप समर्थकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. मुंबईतील मतदारांनी विकास, पायाभूत सुविधा आणि प्रशासनातील स्थैर्य या मुद्द्यांना प्राधान्य देत भाजपच्या बाजूने कौल दिल्याचं या निकालातून दिसून येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात राबवण्यात आलेल्या विविध विकासकामांचा प्रभाव थेट मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर पडल्याचं राजकीय विश्लेषक मानत आहेत. भाजपच्या या विजयामुळे राज्यात सत्ताधारी पक्षाची पकड अधिक मजबूत झाल्याचंही चित्र आहे. या ऐतिहासिक विजयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी खास प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला. त्यांनी विजयाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं औक्षण करत कुटुंबीय आनंद साजरा केल्याचं पाहायला मिळालं. राजकीय यश केवळ आकड्यांपुरतं मर्यादित नसून, त्यामागे असलेली मेहनत आणि लोकांचा विश्वास याचं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या प्रतिक्रियेतून अधोरेखित केलं. एका पत्नीच्या भूमिकेतून त्यांनी व्यक्त केलेला हा आनंद आणि अभिमान भाजप समर्थकांसाठी भावनिक क्षण ठरला. अमृता फडणवीस यांनी आपल्या शब्दांतून केवळ अभिनंदनच केलं नाही, तर विरोधकांवर सूचक शब्दांत टीकाही केली. आज मराठी माणसाने विकासकामांना महत्त्व देणाऱ्या, प्रगती साधणाऱ्या पक्षाला भरभरून मतदान करून आपली पसंती दिली आहे, असं म्हणत त्यांनी या विजयामागील जनतेची भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर, मराठी माणसावरून, भाषा आणि प्रांतावरून निरर्थक भेदभावाचं राजकारण करणाऱ्यांना हा एक सूचक संदेश आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांच्या राजकारणावर थेट बोट ठेवलं. या शब्दांतून मुंबईच्या मतदारांनी कोणत्या प्रकारचं राजकारण नाकारलं आहे, हेही त्यांनी अधोरेखित केलं. मुंबई महानगरपालिकेतील हा निकाल केवळ एका निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, पुढील राजकीय दिशा ठरवणारा ठरू शकतो. विकासाच्या मुद्द्यावर केंद्रित राजकारणाला जनतेकडून पाठिंबा मिळतो आहे, तर ओळख, भाषा आणि प्रांत यांवर आधारित राजकारणाला मतदारांनी नकार दिल्याचं या निकालातून स्पष्ट होत आहे. भाजपच्या स्पष्ट बहुमतामुळे मुंबईतील निर्णयप्रक्रिया अधिक वेगाने होईल, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. शहराच्या पायाभूत सुविधांपासून ते वाहतूक, स्वच्छता आणि डिजिटल प्रशासनापर्यंत मोठे निर्णय आता सहज शक्य होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला आनंद एकूणच, मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील भाजपचा हा विजय ऐतिहासिक मानला जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाला मिळालेली ही मोठी राजकीय पावती ठरत आहे. अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलेला आनंद आणि त्यांनी दिलेला संदेश हे या विजयाचं भावनिक आणि राजकीय दोन्ही अंग अधोरेखित करतात. मुंबईकरांनी विकासाला दिलेला कौल आणि भाजपवर दाखवलेला विश्वास आगामी काळात शहराच्या कारभाराला नवी दिशा देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अमृता फडणवीस यांची पोस्ट देखील पहा 'आज मराठी माणसाने विकासकामांना महत्व देणाऱ्या, प्रगती साधणाऱ्या पक्षाला भरभरून मतदान करीत आपली पसंती दिली आहे आणि मराठी माणसावरून, भाषा, प्रांतावरून निरर्थक भेदभावाचे राजकारण करणाऱ्यांना सूचक संदेश दिलेला आहे. अभिनंदन देवेंद्र फडणवीस' अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:19 pm

उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्री राम:नीतेश राणे यांची ठाकरे गटावर जहरी टीका; सुषमा अंधारे यांचा 'टिल्लू' म्हणत जोरदार पलटवार

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर पराभवाचे सावट आहे. भाजपचे नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी 'उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्री राम' अशा मोजक्या शब्दांत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. त्यांचा यासंबंधीचा उपरोधिकि हास्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. राज्यात गुरुवारी मुंबईसह 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी पार पडली. त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत भाजपने मुंबईसह बहुतांश मनपांवर आघाडी घेत विरोधकांचा धु्व्वा उडवला आहे. लातूर, चंद्रपूर आदी निवडक ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली आहे. विशेषतः मुंबईत विजयाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ठाकरे बंधूंची पडझड झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, 227 सदस्यीय मुंबई महापालिकेत भाजप व महायुतीने स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे. तर ठाकरे बंधूंचा वारू 70 जागांच्या आसपास उधळत आहे. नीतेश राणेंनी हसण्याचा व्हिडिओ केला पोस्ट या पार्श्वभूमीवर नीतेश राणे एक व्हिडिओ पोस्ट करत ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे. नीतेश राणे आपल्या व्हिडिओत उपरोधिकपणे हसताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अगदी मोजक्या शब्दांत उद्धव ठाकरे व त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धवजी आणि पेंग्विनला जय श्रीराम, असे ते म्हणालेत. त्यानंतर पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी ठाकरेंवर टीका केली. निवडणुकीतून जिहादींना कडक संदेश मिळाला ते म्हणाले, उद्धव ठाकरेंना माझा हसरा चेहरा पाठवा. उद्धव, आदित्य ठाकरे व त्यांच्या सगळ्यांना माझा जय श्रीराम. आज आमचा भगवा झंजावात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दिसून आला. राज्यातील बहुतांश महापालिकांत जय श्रीरामचा महापौर बसवण्याची तयारी झाली आहे. मी मतदारांचे आभार मानतो. त्यांनी या सगळ्या महापालिकांवर जय श्रीराम व आय लव्ह महादेव यांच्या विचारांचे महापौर बसवले. यामुळे महाराष्ट्र व देशाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या जिहादींना कडक संदेश मिळाला आहे. ठाकरे बंधूंनी इस्लामाबादचे विमान पकडण्याचा सल्ला नीतेश राणे यांनी यावेळी ठाकरे बंधूंना पाकिस्तानात जाऊन अल्लाह हू अकबर म्हणण्याचाही खोचक सल्ला दिला. मुंबईतील पराभवानंतर ठाकरे बंधूंनी एकत्र बसावे. संध्याकाळी इस्लामाबादची फ्लाईट आहे. त्यांनी फ्लाईटमध्ये बसून पाकिस्तानला जावे. तिथे अल्लाह हू अकबर म्हणावे, असे ते म्हणाले. दुसरीकडे, सुषमा अंधारे यांनी नीतेश राणे यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. तुझी चूक नाही टिल्लू. बाप आयुष्यभर घोटाळे करण्यात आणि पदासाठी कधी ठाकरे, कधी सोनिया गांधी, फडणवीस यांच्या चरणी लीन होण्यात आयुष्य खर्ची घालत असेल तर पोरगं लायकी दाखवणारच, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, नीतेश राणे यांच्या या टीकेमुळे ठाकरे व भाजपतील वाद एका नव्या टोकाला पोहोचण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:15 pm

जनतेने बदला घेतला आणि कॉंग्रेसला घवघवीत यश दिले:चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवारांचा जल्लोष, म्हणाले- सत्ता स्थापन करण्यास अडचण नाही

राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती आघाडीवर आहे, तर काही ठिकाणी कॉंग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. चंद्रपूरमध्ये कॉंग्रेस आघाडीवर असून जवळपास विजय निश्चित असल्याचे बोलले जात असून कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जल्लोष केला आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर महानगरपालिकेचे संपूर्ण वाटोळे केले होते, त्याचा बदला जनतेने घेतला आणि कॉंग्रेस व मित्र पक्षांना जनतेने जो पाठिंबा दिला त्याचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. चंद्रपूरवासीयांना धन्यवाद की आपण पुन्हा एकदा कॉंग्रेसवर विश्वास ठेवला आणि घवघवीत यश दिले याचे आभार व्यक्त करतो, अशा भावना वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या आहेत. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, आमची नॅचरल युती होती पप्पू देशमुख यांच्यासोबत. पप्पू देशमुख यांना धरून आमच्याकडे 3 आहेत. काही नगरसेवक ज्यांना पक्षाने तिकीट दिले नव्हते ते अपक्ष लढले, ते दोन नगरसेवक आमच्या बरोबर आहेत. आम्ही आता 32 नगरसेवक आहोत. उद्धव ठाकरे पक्षाचे 6 आहेत. इतर ही संपर्कात आहेत. 40 ते 42 पर्यंत आकडा जाईल. बहुमत मिळेल. सत्ता स्थापन करण्यात अडचण येणार नाही. आमचे 16 आमदार आहेत. पण चंद्रपूर, लातूर, भिवंडी, अमरावती, अकोला येथे आम्ही चांगले यश मिळवले आहे. सत्ता, यंत्रणा, पैसे, मतदार यादीतील घोळ याविरोधात आम्ही लढलो. जनतेने या विरोधात कौल दिला आहे. आम्हाला जनतेने पाठिंबा दिला काँग्रेसला चांगले यश मिळाले पुढच्या वाटचालीसाठी आम्हाला पाठबळ मिळाले, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपूरमध्ये कोणाला किती जागा? चंद्रपूर महापालिकेत एकूण 66 जागा आहेत. यात आत्तापर्यंत कॉंग्रेस + 30, भाजप + 24, शिवसेना ठाकरे गट + 06, राष्ट्रवादी + 02 तर इतरांना 04 जागा मिळाल्या आहेत. विजय वडेट्टीवारांचा डान्स करत जल्लोष

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 7:01 pm

मुंबईत ठाकरे कुटुंब 30 वर्षांनंतर सत्तेतून बाहेर:पहिल्यांदाच भाजपचा महापौर बनू शकतो; 4 वर्षांपासून निवडणुका न झाल्यामुळे पद रिक्त

मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर होऊ शकतो. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या निकालात भाजप आघाडीला एकूण 227 जागांपैकी 118 जागांवर आघाडी मिळाली आहे. यामध्ये भाजप 90, शिवसेना शिंदे गट 28 जागांवर पुढे आहे. स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर काँग्रेस आणि शिवसेनेचेच वर्चस्व राहिले आहे. 1947 ते 1967 पर्यंत म्हणजे 20 वर्षे काँग्रेसचा महापौर होता. तर 1992 ते 2022 म्हणजे 30 वर्षे महापौरपदावर शिवसेनेचे वर्चस्व होते. भाजपने 45 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईत आपला महापौर बनवण्याच्या स्थितीत पोहोचली आहे. खरं तर, 1980 मध्ये पक्षाची स्थापना झाल्यानंतर भाजपने 1992 ते 2017 पर्यंत मुंबईत शिवसेनेला पाठिंबा दिला होता. मुंबईच्या महापौरपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या शेवटच्या व्यक्ती शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर होत्या, ज्यांनी 22 नोव्हेंबर 2019 ते 8 मार्च 2022 पर्यंत हे पद सांभाळले होते. त्यावेळी शिवसेनेत फूट पडली नव्हती. त्यानंतर हे पद रिक्त होते. तेव्हापासून, BMC च्या प्रशासनाची जबाबदारी नगर आयुक्त सांभाळत आहेत. महापौरांची निवडणूक कशी होते कोणत्या प्रवर्गातून महापौर, लॉटरी पद्धतीने निर्णय ज्येष्ठ पत्रकार संदीप सोनवलकर यांनी सांगितले की, मुंबईच्या BMC मध्ये महापौर कोणत्या प्रवर्गाचा असेल हे लॉटरी पद्धतीने निश्चित केले जाईल. उदा. ही जागा महिला, ओबीसी किंवा एससी असेल की खुली राहील, याचा निर्णय निवडणूक आयोग लॉटरी पद्धतीद्वारे करेल. महापौरांकडे कोणते अधिकार असतात बीएमसीमध्ये महापौर आणि आयुक्त ही दोन सर्वात मोठी पदे असतात. महापौर महानगरपालिकेच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषवतात. शहराचे औपचारिक प्रतिनिधित्व करतात. प्रस्ताव आणि चर्चांवर विचारविनिमय करतात. म्हणजे महापौरांचे काम बहुतेक औपचारिक आणि प्रतिनिधित्वापुरते मर्यादित असते. तर खरी प्रशासकीय आणि कार्यकारी जबाबदारी आयुक्तांकडे असते. आयुक्त शहराचा दैनंदिन कारभार चालवतात. अर्थसंकल्प, शहरातील पायाभूत सुविधा प्रकल्प आणि कर्मचाऱ्यांवर त्यांचे नियंत्रण असते. आयुक्त सामान्यतः आयएएस अधिकारी असतात. BMC निवडणूक का आहे खास 74,000 कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या आशियातील सर्वात मोठ्या सिव्हिक बॉडी BMC वर अविभाजित शिवसेनेने (1997-2017) पर्यंत राज्य केले होते. तेव्हा भाजप तिचा सहयोगी पक्ष होता. मुंबई महानगरपालिकेचे बजेट गोवा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुराच्या बजेटपेक्षाही मोठे आहे. ------------------ ही बातमी देखील वाचा… संभाजीनगरमध्ये भाजपच ठरला मोठा भाऊ, युती तोडणाऱ्या शिवसेनेला जबर फटका:इम्तियाज जलील यांचा प्रयोग यशस्वी; अंबादास दानवेंना मोठा धक्का लातूरने काँग्रेसची प्रतिष्ठा वाचवली:रवींद्र चव्हाण यांचे विलासरावांवरील विधान भाजपला भोवले, देशमुख बंधू ठरले विजयाचे शिल्पकार कोल्हापुरात सतेज पाटलांचा दबदबा, काँग्रेस मोठा पक्ष, सत्ता मात्र दूर:शरद पवारांची पाटी पूर्णपणे कोरी; महायुतीचा काठावरचा विजय

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 6:59 pm

पठारे कुटुंबाच्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब:प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपला यश, ऐश्वर्या पठारे यांचा विजय

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात प्रभाग क्रमांक ३ (विमाननगर-लोहगाव) मधून भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठा विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या सूनबाई ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी भाजपच्या तिकिटावर लढताना दणदणीत विजय संपादन केला. या विजयामुळे वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून, पठारे कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर ऐश्वर्या पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती, ज्याला राजकीय वर्तुळात 'धक्कातंत्र' मानले गेले. प्रभाग ३ मधील उच्चशिक्षित आणि आयटी क्षेत्रातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने ऐश्वर्या पठारे यांच्यासारखा सुशिक्षित चेहरा समोर केला होता. आज जाहीर झालेल्या निकालात मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवल्याचे स्पष्ट झाले. ऐश्वर्या पठारे यांनी आपल्या प्रचारात महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला होता, ज्याला मतदारांनी पसंती दिली. आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या पठारे हे दोन्ही सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. घरची राजकीय पार्श्वभूमी राष्ट्रवादीची (शरदचंद्र पवार गट) असली तरी, ऐश्वर्या पठारे यांनी भाजपची विचारधारा स्वीकारून ही निवडणूक लढवली. त्यांच्या या विजयाने प्रभाग ३ मध्ये भाजपचे कमळ फुलले असून, विरोधकांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात भाजपला यश आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ऐश्वर्या पठारे यांच्यासह भाजपच्या संपूर्ण पॅनेलने चांगली कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. पाचव्या फेरीअखेर ऐश्वर्या पठारे यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. प्रभाग ३ मधील लोहगाव आणि विमाननगर परिसरातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्याला आपले प्राधान्य असेल, असा विश्वास ऐश्वर्या पठारे यांनी विजयानंतर व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 16 Jan 2026 6:53 pm