SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
... ...View News by News Source

शिंदे गटातील २२ आमदार भाजपमध्ये जाणार

नागपूर : प्रतिनिधी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज सत्तेतील एका पक्षात दोन गट पडले असून, त्यातील २२ आमदारांचा एक गट भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला. यामुळे ब्रेकिंग न्युज सुरू झाल्यानंतर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी कोणतीही शक्यता नाही, शिंदे शिवसेना ही आमचा मित्र पक्ष आहे. त्यांचे आमदार आमच्याकडे येण्याचा प्रश्नच उद्भवत […] The post शिंदे गटातील २२ आमदार भाजपमध्ये जाणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 7:08 pm

वेगळ्या विदर्भाचा आमचा अजेंडा कायम:महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा, म्हणाले- आम्ही त्यावर काम करत आहोत

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, वेगळ्या विदर्भावर आम्ही काम करत असून आमची त्याबाबतची भूमिका कायम आहे, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. या विषयावर पक्षाची भूमिका स्पष्ट करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासूनच वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भूमिका मांडली आहे. त्यामुळे या विषयावर आमचा अजेंडा आजही कायम आहे आणि आम्ही त्यावर काम करत आहोत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या विदर्भाच्या प्रश्नावर उत्तर देताना बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिले. नागपुरात आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आधीच तापले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी पक्षांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. त्याचवेळी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा वेगळ्या विदर्भाची जोरदार मागणी करून सरकारला धारेवर धरले होते. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या विदर्भाच्या मागणीकडे पुन्हा लक्ष वेधले गेल्याने अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विकास अशक्य- विजय वडेट्टीवार वेगळ्या विदर्भासंदर्भात बोलताना कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, विदर्भाचा वर्षानुवर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढायचा असेल, तर 'वेगळा विदर्भ' हाच एकमेव पर्याय आहे. जोपर्यंत सत्तेत योग्य वाटा मिळत नाही, तोपर्यंत विदर्भाला न्याय मिळणे कठीण आहे, अशी रोखठोक भूमिका वडेट्टीवारांनी मांडली आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भातील जनता आणि विविध संघटना वेगळ्या विदर्भाची मागणी करत आहेत. मात्र, अनेकदा या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जातो. आता खुद्द महसूलमंत्र्यांनीच 'आम्ही काम करत आहोत' असे सांगितल्याने विदर्भवाद्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, तर विरोधक यावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 6:52 pm

पुण्यात भाजप उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी:पहिल्याच दिवशी दोन हजार अर्जांची मागणी, मनपा निवडणुकीची तयारी

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. यावेळी भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी दिसून आली. पुणे महापालिका निवडणूक लवकरच होणार असून, विविध राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांत प्रचाराची कामे सुरू केली आहेत. पुण्यात भाजपचे १०० पेक्षा अधिक नगरसेवक असल्याने, पक्षाकडून उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे. अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून २ हजार अर्जांची मागणी करण्यात आली, ज्यामुळे भाजपला मोठी पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याने भाजप समोर देखील उमेदवारी देताना आता अडचण निर्माण होणार आहे. दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने सोमवारी कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत पुणे महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पक्षासोबत महायुतीतून लढवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. पक्षाच्या उमेदवार निवडीसंदर्भात महत्त्वाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांच्या अर्जांचे वाटप आणि अर्ज स्वीकृती १० ते १३ डिसेंबर २०२५ या कालावधीत पक्षाच्या मुख्य कार्यालयात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. पक्षाने इच्छुक उमेदवारांना निर्धारित सर्व माहिती अचूकपणे भरून नियोजित वेळेत अर्ज जमा करण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीला शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, शहर प्रभारी शैलेंद्र चव्हाण, अशोक शिरोळे, मोहन जगताप, बाबूराव धाडगे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, शहर महिला अध्यक्षा हिमाली कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 6:37 pm

देशातील सर्वात मोठे 'किसान' कृषी प्रदर्शन पुण्यात:10 ते 14 डिसेंबर दरम्यान पीआयईसीसी मोशी येथे आयोजन

देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान २०२५’ येत्या १० ते १४ डिसेंबर दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र (पीआयईसीसी), मोशी येथे भरत आहे. किसान मालिकेतील हे ३३ वे प्रदर्शन ३० एकरांवर पसरले असून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुले राहील. या प्रदर्शनाचे उद्घाटन १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता शेतकऱ्यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनात ६०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था व स्टार्टअप्स सहभागी होणार आहेत. ते शेतीतील नवीन तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, बी-बियाणे, खते, संरक्षित शेती, पशुधन, जैविक खत आणि सौरऊर्जा आदींचे प्रदर्शन करतील. आयोजकांनी दिलेल्या अंदाजानुसार, देशभरातून दोन लाखाहून अधिक शेतकरी व उद्योजक या प्रदर्शनाला भेट देतील. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग तसेच अनेक मान्यवर संस्थांचा या प्रदर्शनाला सहभाग लाभला आहे. यंदा ‘मातीमोल’ (मातीच्या आरोग्यावर जनजागृती), ‘मनाची मशागत’ (शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आयपीएच सोबत विशेष उपक्रम) आणि ‘किसान जागर’ असे तीन विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. प्रदर्शनाची पूर्वनोंदणी मोबाईलद्वारे करता येते. आतापर्यंत ३० हजार हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून ही संख्या १ लाख ओलांडण्याची शक्यता आहे. ‘किसान’ मोबाईल ॲपवर सर्व प्रदर्शकांची उत्पादने व सेवांची माहिती उपलब्ध असून, या माध्यमातून देशभरातील १० लाख शेतकऱ्यांपर्यंत डिजिटल पद्धतीने पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हेच ‘किसान’ प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 6:35 pm

विरोधी पक्षनेता नसणे हे लोकशाहीची थट्टा:सत्ताधाऱ्यांना शर्म वाटली पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल

सत्ताधाऱ्यांना शर्म वाटली पाहिजे की ते अधिवेशन समोर रेटत आहेत. अधिवेशन कमी काळाचे आहे आणि विरोधी पक्षनेता नसणे हे लोकशाहीची थट्टा असल्याची टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. 10 टक्के निकष हा कुठलाही संकेत नाही किंवा संवैधानिक स्वरूपात त्याचा उल्लेख नाही. वरच्या सभागृहात कॉंग्रेसचे 10 टक्के सदस्य आहेत. त्या अनुषंगाने आम्ही आमचा प्रस्ताव सादर केलेला आहे, असेही सपकाळ यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, लोकशाहीची पायमल्ली न करता संविधानाचे पुरोगामित्व जोपासले जावे अशी अपेक्षा आहे. विरोधक आवश्यक आहेत. तुकाराम महाजांचा जो महाराष्ट्र धर्म आहे तो सरकारने जोपासावा. अर्धा वेळ सत्ताधारी आणि अर्धा वेळ विरोधकांनी चर्चा करावी तेवढा वेळ त्यांना द्यावा. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेत्याचा जो प्रश्न आहे तो निकाली काढावा. तसेच जर असे ते करत नसतील तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही असा अर्थ असल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री पदावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, उपमुख्यमंत्री पद हे निश्चितच असंवैधनिक आहे. जे संवैधानिक आहे विरोधी पक्षनेते पद ते आपण देत नाही. या संविधानाला सभ्यतेला आणि महाराष्ट्र धर्माला दाखवलेल्या वाकोळ्या आहेत. खालच्या सभागृहात शिवसेनेचे जास्त सदस्य आहेत. शिवसेनेने मागील विधानसभेत त्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे. प्रस्ताव नसेल तर पुन्हा पाठवता येईल, खोळंबा करण्याची आवश्यकता नाही. स्वामिनाथन आयोग शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालणारा पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकऱ्यांसाठीच्या स्वामिनाथन आयोगावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, स्वामिनाथन आयोग विदर्भातील शेतकऱ्यांच्या जखमांवर फुंकर घालणारा होता. नुसत्या घोषणांचा पाऊस न पाडता, शेतकऱ्यांना थेट दिलासा देणे, हे निर्णय शासनाने घेतले पाहिजे अशी अपेक्षा या अधिवेशनात असल्याचे सपकाळ म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 6:14 pm

उद्धव ठाकरेंचे 13 आमदार माझ्या संपर्कात:मंत्री संजय शिरसाट यांचा मोठा दावा; आमदार ठाकरेंच्या कार्यपद्धतीला कंटाळल्याचे सूतोवाच

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अर्ध्याहून अधिक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. हे आमदार ठाकरेंच्या कार्यपद्धतीला कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत येण्याचा मानस व्यक्त केला आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी आपल्याकडे या आमदारांची नावे असल्याचाही व प्रसंगी ते जाहीर करण्याचाही इ्शारा दिला. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आमदार विरोधी पक्षनेते होणार असल्याच्या चर्चेचे पेव फुटले. पत्रकारांनी याविषयी आदित्य यांना छेडले असता त्यांनी या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी शिंदे गटाचेच 20 आमदार कुठेतरी (भाजप) जाणार असल्याची चर्चा आपल्या कानावर असल्याचे सांगितले. त्यांच्या या विधानामुळे शिंदे गटाच्या आमदारांचा एक मोठा गट भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाट यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना वरील दावा केला आहे. काय म्हणाले मंत्री संजय शिरसाट? शिवसेनेच्या ठाकरे गटाचे 13 आमदार माझ्या संपर्कात आहेत. या सर्व आमदारांची नावे माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावर मी ती सांगेन. या आमदारांनी ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीला वैतातगून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत येण्याचा मानस व्यक्त केला आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. शिरसाट यांच्या या दाव्यामुळे आपले आमदार एकसंध ठेवण्याच्या प्रयत्नांत असलेल्या उद्धव यांच्या प्रयत्नांना झटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. शिंदेसेना आमचा मित्रपक्ष, त्यांचे आमदारही आमचेच - फडणवीस दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंचे 20 आमदार भाजपच्या गळाला लागल्याचा आदित्य ठाकरे यांचा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे. आदित्य ठाकरेंच्या म्हणण्यात कोणतेही तथ्य नाही. उद्या कुणी असेही म्हणेल की, आदित्य ठाकरेंचे 20 आमदार भाजपच्या गळाला लागलेत. असे उगीच काहीतरी म्हटल्याने काहीही होत नाही. आम्हाला शिंदेसेनेचे आमदार घेऊन काय करायचे आहे? ते आमचेच आहेत. शिंदेसेना आमचा मित्रपक्ष आहे. ती खरी शिवसेना आहे. त्यामुळे मित्रपक्षांना पक्षात घेण्याचे कारण नाही. आम्ही तसे राजकारण करत नाही. उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी उभे आहोत. निश्चितपणे भविष्यात आमची महायुती अजून मजबूत होताना दिसेल, असे ते म्हणालेत. आत्ता पाहू काय म्हणाले होते आदित्य ठाकरे? पत्रकारांनी आज आदित्य ठाकरे यांना त्यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्याची चर्चा सुरू असल्याच्या मुद्यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर आदित्य यांनी ही पेरलेली बातमी असून, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्ट केले. तसेच कोणत्या तरी गटाचे 22 आमदार दुसरीकडे जाणार असल्याची चर्चा आपल्या कानावर असल्याचेही ते यावेळी म्हणाले. माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवण्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. ही पेरलेली बातमी आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. पण मीच 22 आमदार कोणत्या तरी गटातून दुसरीकडे जात आहेत हे ऐकले आहे, असे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 5:53 pm

  संविधानिक पद रिक्त ठेऊन कामकाज करणार का?

नागपूर : प्रतिनिधी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ८ डिसेंबर पासून नागपूर येथे सुरुवात झाली. या अधिवेशनात पहिल्यांदाच विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहेत. जाणुनबुजून सरकार विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला तर विरोधी पक्षनेते निवडीचा अधिकार मुख्यमंत्री किंवा सरकारकडे नाहीत तो अधिकार विधिमंडळाचे अध्यक्ष, सभापतींचा आहे असे सत्ताधा-यांकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे […] The post संविधानिक पद रिक्त ठेऊन कामकाज करणार का? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 5:17 pm

डुकरांना‘आफ्रिकन स्वाइन फ्ल्यू’

राहाता : प्रतिनिधी शहराशेजारील साकुरी गावातील डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फ्ल्यू आढळला आहे. गावात डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फ्ल्यू आढळून आल्याने जिल्हा पशुवैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल झाले आहे. साकुरी गावात गेल्या काही दिवसांपासून डुकरांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. गावातील काही जागरूक नागरिकांनी यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही […] The post डुकरांना‘आफ्रिकन स्वाइन फ्ल्यू’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 5:14 pm

हिंगोलीत जिल्हा परिषदेचे अधिकारी सामूहिक रजेवर:घरकुल, हमी योजनेतील जबाबदारी निश्‍चित करणारा अध्यादेश जारी करण्याची मागणी

राज्यात घरकुल योजना व हमी योजनेमध्ये जबाबदारी निश्‍चित करणारा अध्यादेश जारी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील अधिकाऱ्यांनी सोमवारपासून ता. ८ सामुहिक रजा आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत सर्व अधिकारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे सर्व विभागातील प्रस्ताव स्वाक्षरी अभावी धुळखात पडले आहेत. राज्यात घरकुल व हमी योजनेमध्ये जबाबदारी निश्‍चित करणारा अध्यादेश स्पष्ट झालेला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. घरकुल योजनेत ग्रामसभेने निवडलेला लाभार्थी नंतर अपात्र ठरणे, लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम न करता तसेच जुने घर दाखवून लाभ मिळविणे, घरकुल योजनेत प्रत्येक तालुक्यात मंजूर घरकुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून प्रत्येक काम गटविकास अधिकाऱ्यांना पाहणे शक्य नाही त्यामुळे केवळ डीजीटल स्वाक्षरीच्या आधारावर गटविकास अधिकाऱ्यांना जबाबदार धरणे अन्यायकारक आहे. त्यामुळे या सर्व बाबींसाठी गटविकास अधिकाऱ्यांना जबाबदार धरू नये. या शिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये देखील अशीच परिस्थिती असून त्यामुळे या दोन्ही योजनेमध्ये जबाबदारी निश्‍चित करणारा अध्यादेश जारी करणे आवश्‍यक आहे. या मागणी संदर्भात यापुर्वी शासनाकडे निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये मागणी मान्य न झाल्यास सोमवारपासून (ता.८) सामुहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज जिल्हा परिदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, संजय कुलकर्णी, गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड, अमितकुमार मुंडे, सुरेश कांबळे, गोपल कल्हारे, गणेश बोथीकर, सुनील अंभुरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी सामुहिक रजा आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेत विविध विभागांमध्ये कामे सुरु असली तरी अधिकाऱ्यांच्या आंदोलनामुळे अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी अभावी प्रस्ताव धुळखात पडले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 5:12 pm

बोगस दिव्यांग ४०० कर्मचा-यांना प्रशासनाचा दणका

मुंबई : प्रतिनिधी तुकाराम मुंडे यांनी दिव्यांग कल्याण आयुक्ताचा पदभार घेतल्यानंतर राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या कर्मचा-यांच्या तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार बीड जिल्ह्यात तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी ४०० कर्मचा-यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. बीड जिल्हा परिषदेतील सुमारे ४०० कर्मचा-यांच्या दिव्यांगात्वाची आता थेट रुग्णालयांमध्ये तपासणी केली जाणार आहे. […] The post बोगस दिव्यांग ४०० कर्मचा-यांना प्रशासनाचा दणका appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 5:11 pm

मुंबईत होणाऱ्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला विरोध:नशा विरोधी अभियानाची कार्यक्रम रद्द करण्याची मागणी

वादग्रस्त ठरलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ यावर्षी गोवा आणि अन्य ठिकाणांवरून हद्दपार झाल्यानंतर १९ ते २१ डिसेंबर दरम्यान मुंबईतील शिवडी येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा आणि सामाजिक अस्मितेला धक्का पोहोचवणारा तसेच व्यसनाधीनता वाढवणारा हा कार्यक्रम तत्काळ रद्द करावा, अशी मागणी नशा विरोधी संघर्ष अभियानाचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्राचे मार्गदर्शक हभप भानुदास वैराट महाराज, अधिवक्ता मुग्धा बिवलकर, हिंदुत्वनिष्ठ ऋतुजा माने आणि हिंदु जनजागृती समितीच्या युवा संघटक प्राची शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. चंद्रकांत वारघडे म्हणाले , सनबर्न फेस्टिव्हलमुळे युवा पिढीच्या आरोग्य व सुरक्षिततेवर गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तातडीने तक्रारही दाखल करण्यात आली आहे. यापूर्वीच्या उत्सवांमध्ये अमली पदार्थांचे सेवन व वितरणाचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. याशिवाय, वर्ष २००९, २०१४ आणि २०२० मध्ये फेस्टिव्हल आयोजकांनी गोवा सरकारचा तब्बल ६ कोटी २९ लाख रुपयांचा कर बुडवला होता. त्या प्रकरणात सप्टेंबर २०२५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ‘सनबर्न फेस्टिव्हल’ची १ कोटी १० लाख रुपये सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्याचा आदेश दिल्याचे संघटनेने सांगितले. या पार्श्वभूमीवर, करचुकवेगिरी करणाऱ्या आणि तरुण पिढीला नशेकडे ढकलणाऱ्या अशा कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी का दिली? असा सवालदेखील संघटनेने उपस्थित केला आहे. त्यामुळे प्रशासनाने हा कार्यक्रम तातडीने रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 5:09 pm

वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विकास अशक्य:विजय वडेट्टीवारांची रोखठोक भूमिका; निधी वाटपावरून राज्य सरकारवर हल्लाबोल

विदर्भाचा वर्षानुवर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढायचा असेल, तर 'वेगळा विदर्भ' हाच एकमेव पर्याय आहे. जोपर्यंत सत्तेत योग्य वाटा मिळत नाही, तोपर्यंत विदर्भाला न्याय मिळणे कठीण आहे, अशी रोखठोक भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था, ओबीसी समाजावरील अन्याय आणि निधी वाटपातील तफावतीवरून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सामाजिक समीकरणांचा आधार वेगळ्या विदर्भाची मागणी करताना विजय वडेट्टीवार यांनी सामाजिक समीकरणांकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, विदर्भात ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाचे प्राबल्य आहे. मात्र, या बहुजन समाजाला सत्तेत पुरेशी संधी मिळालेली नाही. सत्ताधाऱ्यांमध्ये जोपर्यंत या घटकांचा थेट सहभाग वाढत नाही, तोपर्यंत या भागाचा विकास खुंटलेलाच राहील. त्यामुळे भविष्यात वेगळा विदर्भ होणे ही काळाची गरज असून ती आमची ठाम मागणी आहे. राज्यात सुव्यवस्था नाही, तर कुव्यवस्था राज्य सरकारच्या कामगिरीचा समाचार घेताना विजय वडेट्टीवार यांनी सरकारला पासिंग मार्क्स मिळणेही कठीण असल्याचे सांगितले. राज्यात सध्या कायदा आणि सुव्यवस्था नसून केवळ 'कुव्यवस्था' असल्याचे चित्र आहे, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे लक्ष कदाचित दिल्लीकडे लागले असावे, त्यामुळेच त्यांचे महाराष्ट्राकडे आणि विशेषतः विदर्भाकडे दुर्लक्ष होत आहे. विदर्भाचे मुख्यमंत्री असूनही येथील तरुणांना आजही नोकरीसाठी पुणे, मुंबई किंवा हैदराबादची वाट धरावी लागत आहे, हे दुर्दैव आहे. तसेच राज्यातील महामंडळांना देण्यात येणाऱ्या निधीवरून विजय वडेट्टीवार यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. 'सारथी', 'बार्टी', 'तार्टी' आणि 'महाज्योती' या संस्थांना मिळणाऱ्या निधीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात तफावत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. ओबीसी समाजाला कमी निधी विजय वडेट्टीवार यांनी आकडेवारी मांडताना सांगितले की, राज्यात 40 ते 45 टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाला (महाज्योती) 300 कोटी मिळतात. दुसरीकडे, 16 टक्के लोकसंख्या असलेल्या मराठा समाजासाठी (सारथी) तेवढेच 300 कोटी आणि 13 टक्के व 9 टक्के प्रमाण असलेल्या अनुसूचित जाती-जमातींसाठीही 300 कोटींची तरतूद केली जाते. लोकसंख्येचा विचार करता ओबीसी समाजाला मिळणारा हा निधी कमी असून हा सरळसरळ अन्याय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळावर वर्चस्व नाही मुख्यमंत्री जरी विदर्भाचे असले तरी मंत्रिमंडळात त्यांचे प्राबल्य नसल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला. मंत्रिमंडळावर मराठा समाजाचा प्रभाव अधिक असून, विदर्भाच्या अनुशेषासाठी मिळणारा निधी आणि 'महामुंबई' प्रोजेक्टसाठी दिला जाणारा निधी यात मोठी तफावत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 5:08 pm

पुरंदर विमानतळ प्रकल्पबाधित शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा:राज्य शासन सकारात्मक, मुख्यमंत्री लवकरच बैठक घेणार, कलेक्टर डुडी यांची माहिती

पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मागण्यांवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज सकारात्मक चर्चा केली. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच प्रतिनिधीमंडळासोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी जमीनदर व मोबदला निश्चिती संदर्भातील बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पबाधित शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. यामध्ये जमिनीचा दर व मोबदला, घरांसाठी जागा, मोबदल्यावर आयकरातून सूट, पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत, प्रकल्पग्रस्त व भूमिहीन प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र, वाढीव एफएसआय (FSI) आणि पीएआरडीए (PARDA) मार्फत भूखंड विकासाचे नियोजन या मागण्यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, परिसरातील पायाभूत सुविधा आराखडा, विमानतळ परिसरातील विकसित भागांना महापुरुषांची नावे देण्याचा प्रस्ताव, शेती पिकांचे मूल्यांकन, भूमिपुत्रांना विमानतळात कायमस्वरूपी नोकरीची संधी, भूखंडात आरक्षण, हक्काची घरे, व्यवसाय व रोजगारासाठी कर्ज व्याजदरात सवलत आणि शैक्षणिक शुल्कात सवलत यांसारख्या मागण्यांवरही चर्चा करण्यात आली. पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी सात गावांतील सुमारे तीन हजार एकर क्षेत्राचे भूसंपादन केले जाणार आहे. या प्रक्रियेस शेतकऱ्यांनी वेळोवेळी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे जिल्हाधिकारी डुडी यांनी नमूद केले. संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया पूर्ण पारदर्शकतेने राबवली जाईल आणि कोणावरही अन्याय होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, सर्व प्रकल्पग्रस्त नागरिकांना भूसंपादन आणि पीक सर्वेक्षणाबाबतची माहिती नियमितपणे दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी व ग्रामस्थांना कौशल्यविषयक प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाईल. एकही प्रकल्पबाधित नागरिक वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासन घेईल, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले. यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 5:08 pm

आपलं घर संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाला सुरुवात:पुण्यात २५ शाळांमध्ये स्वच्छतागृहे, आरोग्य सेवा पुरवणार; समीर चौघुले उपस्थित

पुण्यातील 'आपलं घर' या स्वयंसेवी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने संस्थेने येत्या वर्षभरात पुण्याच्या आसपासच्या दुर्गम भागातील २५ शाळांमध्ये मुलींसाठी स्वच्छतागृहे बांधण्याचा आणि त्यांची देखभाल करण्याचा संकल्प केला आहे. यासोबतच, मोबाइल क्लिनिकद्वारे आरोग्य सेवा पुरवण्याचेही नियोजन आहे. विजय आणि साधना फळणीकर या दाम्पत्याने 'आपलं घर' संस्थेची स्थापना केली आहे. कॅन्सरने मुलाचे निधन झाल्यानंतर त्यांनी दुःखावर मात करत समाजसेवेचा मार्ग स्वीकारला. ही संस्था निराधार मुले-मुली आणि आजी-आजोबांसाठी काम करते. रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभारंभाचा विशेष कार्यक्रम एरंडवणे येथील शकुंतला शेट्टी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे संस्थापक विजय फळणीकर यांनी संस्थेच्या आगामी योजनांची माहिती दिली. त्यांनी लोककला जिवंत ठेवण्यासाठी दशावतारसारखे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा मानसही व्यक्त केला. कार्यक्रमाला मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते-लेखक समीर चौघुले, त्यांच्या पत्नी कविता चौघुले, लघाटे रिअल्टर्सचे अमित लघाटे, शास्त्रीय गायिका मनीषा निश्चल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी १० लाख रुपयांची बॅग परत करणाऱ्या कचरावेचक अंजू माने यांचाही यावेळी समीर चौघुले यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. अंजू माने यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचा आदर्श म्हणून हा गौरव करण्यात आला. 'वैभव फळणीकर मेमोरियल फाउंडेशन' अंतर्गत 'आपलं घर' संस्था सध्या ४८ निराधार मुले-मुली आणि ११ निराधार आजी-आजोबांचे संगोपन करत आहे. संस्थेद्वारे कौशल्या कराड धर्मादाय रुग्णालयासारख्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयातून आणि मोबाईल क्लिनिकच्या माध्यमातून आरोग्य सेवाही पुरवली जाते. विजय फळणीकर यांनी सांगितले की, आजवर संस्थेतून १५० हून अधिक मुले स्वावलंबी झाली आहेत. संस्थेचे कार्य कोणत्याही सरकारी मदतीशिवाय समाजातील दानशूर नागरिकांच्या सहकार्याने सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 5:03 pm

शिंदेंचे 20 आमदार भाजपच्या गळाला लागले का?:शिंदेसेनेचे आमदार आमचेच आहेत, उगीच काहीतरी म्हटल्याने काही होत नाही -फडणवीस

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे 20 आमदार भाजपच्या गळाला लागल्याचा दावा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. शिंदे गटाने त्यांचा हा दावा फेटाळला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या प्रकरणी ठाकरे गटाला खडेबोल सुनावलेत. उद्या कुणी आदित्य ठाकरेंचे 20 आमदार भाजपच्या गळाला लागल्याचे म्हटले तर काय होईल? शिंदेसेनेचे आमदार आमचेच आहेत, काहीही म्हटल्याने काही होत नाही, असे ते म्हणालेत. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते होणार असल्याची चर्चा सुरू झाली. आदित्य यांनी पत्रकारांशी बोलताना ही अफवा असल्याचे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे 20 आमदारच कुठेतरी (भाजप) जाणार असल्याची चर्चा आपल्या कानावर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकारांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छेडले असता त्यांनी या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? मुख्यमंत्री म्हणाले, आदित्य ठाकरेंच्या म्हणण्यात कोणतेही तथ्य नाही. उद्या कुणी असेही म्हणेल की, आदित्य ठाकरेंचे 20 आमदार भाजपच्या गळाला लागलेत. असे उगीच काहीतरी म्हटल्याने काहीही होत नाही. आम्हाला शिंदेसेनेचे आमदार घेऊन काय करायचे आहे? ते आमचेच आहेत. शिंदेसेना आमचा मित्रपक्ष आहे. ती खरी शिवसेना आहे. त्यामुळे मित्रपक्षांना पक्षात घेण्याचे कारण नाही. आम्ही तसे राजकारण करत नाही. उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी उभे आहोत. निश्चितपणे भविष्यात आमची महायुती अजून मजबूत होताना दिसेल. मुख्यमंत्र्यांनी यावेळी वंदे मातरममध्ये काँग्रेसने काटछाट केल्याचाही दावा केला. वंदे मातरमवर कधी बंदी लागली नाही. वंदे मातरवर जे काही आघात व कुठाराघात झाले त्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे. काँग्रेसनेच प्रस्ताव पारित करून वंदे मातरममध्ये काटछाट केली. अर्धेच वंदे मातरम म्हटले जाईल असे सांगितले. त्याच काँग्रेसच्या गळ्यात गळा घालून आदित्य ठाकरे रोज फिरतात. त्यामुळे त्यांनी वंदे मातरमविषयीचा प्रश्न भाजपला नव्हे तर काँग्रेसला विचारला पाहिजे. भाजपच्या कार्यकाळात वंदे मातरमचा केवळ सन्मान झाला आहे. कोणतीही बंदी घालण्यात आली नाही, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारने वंदे मातरमवर बंदी घातल्याचा आरोप केला होता. फडणवीस त्याविषयी बोलत होते. आत्ता पाहू काय म्हणाले होते आदित्य ठाकरे? पत्रकारांनी आज आदित्य ठाकरे यांना त्यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्याची चर्चा सुरू असल्याच्या मुद्यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर आदित्य यांनी ही पेरलेली बातमी असून, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्ट केले. तसेच कोणत्या तरी गटाचे 22 आमदार दुसरीकडे जाणार असल्याची चर्चा आपल्या कानावर असल्याचेही ते यावेळी म्हणाले. माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवण्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. ही पेरलेली बातमी आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. पण मीच 22 आमदार कोणत्या तरी गटातून दुसरीकडे जात आहेत हे ऐकले आहे, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का? - आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या या दाव्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांचा एक गट कथितपणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेचे पेव फुटले आहे. पण शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी जोरकसपणे त्यांचा हा दावा फेटाळला आहे. ते म्हणाले, आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का ते? त्यांचे आमदार किती राहिलेत? त्यांचे वीसच राहिलेत ना. त्यामुळे त्यांनी नको त्या विषयात हात घालू नये. त्यापेक्षा त्यांनी एखाद्या विधायक सामाजिक मुद्यावर चर्चा करावी. नको त्या विषयात म्हणजे जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये, असे नीलेश राणे यांनी म्हटले आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 4:18 pm

तुकाराम मुंढेंविरोधात अधिवेशनात लक्षवेधी मांडणार?:भाजप आमदार कृष्णा खोपटे यांना धमकीचा फोन; 'तुम्हाला बघून घेऊ' म्हणत दिला इशारा

राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजपचे आमदार अधिवेशनात लक्षवेधी मांडून त्यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. मुंढे यांच्याविरोधात हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडण्याच्या तयारीत असलेले भाजपचे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांना धमकीचे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. आम्ही मुंढे समर्थक आहोत, तुम्हाला बघून घेऊ, असा इशारा अज्ञातांनी खोपडे यांना फोनवरून दिला आहे. नागपूर येथे आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात भाजप आमदार आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कारभाराविरोधात आणि त्यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी विशेष लक्षवेधी सूचना मांडणार असल्याचे वृत्त माध्यमांत आले होते. हे वृत्त प्रसारीत होताच, आमदार खोपडे विधानभवनात प्रवेश करत असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तींनी फोन केले. फोन करणाऱ्यांनी स्वतःला तुकाराम मुंढे यांचे समर्थक असल्याचे सांगत तुम्हाला बघून घेऊन अशी धमकी दिल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला. मराठवाड्यातून हा धमकीचा फोन केल्याचेही खोपडे यांनी सांगितले. पोलिसांत तक्रार करणार या धमकीच्या फोनप्रकरणी आमदार खोपडे हे विधिमंडळ सचिवालय आणि मुख्यमंत्री कार्यालयाला रीतसर माहिती देणार असून, संबंधित धमकी देणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप आमदारांचे मुंढेंवरील आरोप काय? तुकाराम मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना, शासनाकडून अधिकृत नियुक्ती नसतानाही त्यांनी नियमबाह्य पद्धतीने 'स्मार्ट सिटी प्रकल्पा'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा प्रभार स्वतःकडे घेतला होता, असा भाजपचा मुख्य आरोप आहे. या पदावर असताना त्यांनी आपल्या मर्जीतील काही कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केले. तसेच, काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचे गंभीर आरोपही त्यांच्यावर आहेत. या दोन्ही प्रकरणी त्यावेळी पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल झाले होते. मात्र, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या दबावामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असा भाजपचा दावा आहे. आता ही प्रकरणे पुन्हा एकदा विधिमंडळाच्या पटलावर मांडून त्यांच्यावर कारवाईसाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. मुंढेंच्या 20 वर्षांच्या कार्यकाळात 24 बदल्या तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. प्रशासनात काम करताना नियमांवर बोट ठेवून काम करण्याची त्यांची पद्धत सर्वश्रुत आहे. मात्र, राजकीय हस्तक्षेप आणि नियमबाह्य कामांना नकार देण्याच्या त्यांच्या भूमिकमुळे ते कोणत्याही सत्ताधाऱ्यांना फारसे पचनी पडत नाहीत. राजकीय नेतृत्वाला, मंत्र्यांना आपल्या मनाप्रमाणे नियमबाह्य गोष्टी करण्यामध्ये तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी अडथळे ठरतात. परिणामी, एका पदावर तीन वर्षे काम करणे अपेक्षित असताना, मुंढे यांची सरासरी वर्षभरातच उचलबांगडी केली जाते. गेल्या 20 वर्षांच्या सेवेत त्यांची तब्बल 24 वेळा बदली झाली आहे, जो प्रशासकीय सेवेतील एक विक्रमच मानला जातो. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, आता हिवाळी अधिवेशनात भाजप आमदारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे या 'डॅशिंग' अधिकाऱ्यासमोर नवीन संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 4:12 pm

उस्ताद अब्दुल वहीद खाँ यांच्या गायकीचे मर्म उलगडले:'किराणा परंपरा' मालिकेत स्वरमयी गुरुकुलने तिसरे पुष्प केले सादर

डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन संचलित स्वरमयी गुरुकुलतर्फे आयोजित 'किराना परंपरा' या मालिकेतील तिसरे पुष्प नुकतेच सादर झाले. यात किराणा घराण्याचे युगप्रवर्तक कलाकार उस्ताद अब्दुल वहीद खाँ यांच्या गायकीचे मर्म उलगडण्यात आले. संगीत शास्त्राचे अभ्यासक डॉ. केशव चैतन्य कुंटे आणि डॉ. प्रभा अत्रे यांचे शिष्य, गायक डॉ. अतींद्र सरवडीकर यांनी या विषयावर सविस्तर मांडणी केली. उस्ताद अब्दुल वहीद खाँ हे समर्पण वृत्तीने रागाला शरण जाऊन त्याची सिद्धी प्राप्त करण्याचा विचार जपणारे कलाकार होते. छोटा ख्यालपेक्षा बडा ख्याल गाण्याची आवड जपत रागविस्तार करण्याची भूमिका मांडणारे युगप्रवर्तक कलाकार म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी आपल्या गायन तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. हा कार्यक्रम स्वरमयी गुरुकुल सभागृह, संभाजी उद्यानासमोर, पुणे येथे पार पडला. 'सरताज-ए-मौसिकी' अशी पदवी प्राप्त झालेल्या उस्ताद अब्दुल वहीद खाँ यांच्या गायकीच्या विविध पैलूंवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. किराणा घराण्याच्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांचे कार्यकर्तृत्व उलगडून दाखवणारी 'किराना परंपरा' ही विशेष कार्यक्रम मालिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आली आहे. या मालिकेचे डिजिटल स्वरूपात दस्तावेजीकरण करण्यात येत आहे. सुरांचा दर्जा आणि लगाव ही वैशिष्ट्ये जपत उस्ताद अब्दुल वहीद खाँ यांनी किराणा घराण्याच्या अतिविलंबित गायकीच्या परंपरेला सुरुवात केली. मंद्र सप्तकाचा वापर, तान फिरतीचे वेगळेपण, सरगममध्ये गमकचा प्रयोग आणि मेरुखंडाने प्रभावित आलापी अशी त्यांची शैली होती. त्यांनी राग-बंदिशींची संख्या वाढविण्याऐवजी ठराविक रागांचा सातत्याने रियाज करत उच्च दर्जाचे गाणे आत्मसात केले. त्यांच्या गायनाला आध्यात्मिक बैठक होती. दीर्घ व विस्तृत आलापचारी हे अब्दुल वहीद खाँच्या गायकीचे प्रधान अंग होते. खंडमेरूचा स्वरप्रस्तार करत, धिम्या लयीत शिस्तबद्ध व पद्धतशीरपणे विस्तार करीत गाणे ही त्यांची खासियत होती. आलापचारीबरोबरच गुंतागुंतीची तनैयत करण्यातही ते पारंगत होते. कार्यक्रमात उस्ताद अब्दुल वहीद खाँ आणि उस्ताद अब्दुल करीम खाँ यांच्याविषयी तौलनिक विश्लेषणात्मक माहिती देण्यात आली. त्यांच्या शिष्यांविषयी माहिती देत आणि त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये उलगडत त्यांच्याच आवाजातील राग पटदीप आणि मुलतानी यांचे ध्वनिमुद्रण ऐकविण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 4:01 pm

पुण्यात 20 डिसेंबरपासून भीमथडी जत्रा महोत्सव:देशभरातील 12 राज्ये, 24 जिल्हे होणार सभागी; 320 स्टॉल स्वागताला सज्ज

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आयोजित १९ वी भीमथडी जत्रा २० ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत पुण्यात होणार आहे. या जत्रेत यंदा ३२० स्टॉल असतील, ज्यात राज्यातील २४ जिल्ह्यांसह देशातील १२ राज्यांतील कारागीर आणि महिला बचत गट सहभागी होणार आहेत. संस्थेच्या वतीने गेली १८ वर्षे ग्रामीण भागातील महिला बचत गटांसह महिला उद्योजिकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले जात आहे. आयोजक सुनंदा पवार यांनी सांगितले की, ही जत्रा हजारो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत असून त्यांचा आत्मविश्वास वाढवत आहे. पवार यांच्या माहितीनुसार, यंदाच्या भीमथडी जत्रेत एकूण ३२० स्टॉल असतील, त्यापैकी ९० स्टॉल खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी आहेत. मागील वर्षी भीमथडीला पावणेदोन लाख लोकांनी भेट दिली होती आणि सात कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली होती. या वर्षीच्या भीमथडीची थीम भारतातील स्थानिक फुले अशी आहे, ज्यामुळे देशातील स्थानिक वनस्पतींच्या जतनाला प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अर्बन/किचन गार्डनिंगमध्ये कमी जागेत, कमी खर्चात विषमुक्त भाजीपाला घरच्या घरी कसा पिकवता येतो, याचे प्रात्यक्षिक पुणेकरांना पाहता येणार आहे. पाणी बचत आणि कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय निविष्ठांचा वापर यावरही भर दिला जाईल. या वर्षी भीमथडी जत्रेत प्रवेश करताना ग्राहकांचे मुगल बागेच्या सौंदर्यावर आधारित फुलांनी सजवलेल्या भव्य प्रवेशद्वारावर स्वागत केले जाईल. महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे दर्शन घडवणारे कलाकार आणि त्यांच्या कलाकृतींचे रेखाटन असलेल्या भव्य व सुंदर रांगोळ्या स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून साकारण्यात येतील. यात गोंधळी, पोतराज, भारुड, पाथरवट, बुरुड, केरसोनीवाले, नंदीबैल यांसारख्या पारंपरिक कलांचा समावेश असेल. भीमथडी प्रदर्शनामध्ये मिलेट उत्पादनांसह विषमुक्त भाजीपाला, भौगोलिक मानांकन (जीआय) असलेले पदार्थ तसेच महिला सबलीकरणाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी बनवलेल्या हस्तकला, उन्हाळी पदार्थ, चटण्या, मसाले, लोणचे, मिलेट चिवडा, मातीची भांडी यासह विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असतील.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 3:56 pm

पुणे शहरात दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू:खराडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. खराडी भागात टँकरच्या धडकेत एका सायकलस्वार महिलेचा मृत्यू झाला, तर हडपसर भागात रस्ता ओलांडणाऱ्या एका ज्येष्ठ पादचारी महिलेला पीएमपी बसने धडक दिली. या दोन्ही घटनांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खराडी येथील अपघातात सुनीता गजानन ताठे (वय ३४, रा. थिटे वस्ती, खराडी) या सायकलस्वार महिलेचा मृत्यू झाला. त्यांचे पती गजानन ताठे (वय ४०) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी टँकरचालक गणेश ज्ञानोबा कांगणे (वय २३, रा. काळूबाईनगर, थिटे वस्ती, खराडी) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताठे दाम्पत्य नांदेड जिल्ह्यातील टाकळगावचे रहिवासी असून, ते थिटे वस्ती परिसरात भाड्याने राहत होते. रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास सुनीता ताठे सायकलवरून खराडी परिसरातून जात असताना, झेन्सार आयटी पार्कसमोर भरधाव टँकरने त्यांना धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक एस. आवारे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसऱ्या घटनेत, हडपसर भागात पीएमपी बसच्या धडकेत सोजर भीमराव कुंभार (वय ७२, रा. जगताप चाळ, हडपसर) या पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंभार यांची विवाहित मुलगी धनश्री सोमनाथ कुंभार (वय ४०, रा. काळेपडळ, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सोजर कुंभार या रविवारी सकाळी अकराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील १५ नंबर चौकातून जात होत्या. त्यावेळी भरधाव पीएमपी बसने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या कुंभार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक एन. कवळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 3:51 pm

रिक्षा धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू; चालक दिल्लीतून जेरबंद:उपचारांऐवजी झाडीत टाकून पसार झालेल्या आरोपीला पाच महिन्यांनी बेड्या

पुणे शहरातील बाणेर भागात रिक्षाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका ज्येष्ठाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याऐवजी खडकीतील लोहमार्गाजवळील झाडीत टाकून पसार झालेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने त्या ज्येष्ठाचा मृत्यू झाला होता. बाणेर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत पाच महिन्यांनंतर आरोपीला जेरबंद केले. अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव इसाराईल मंगला गुर्जर (वय २२, सध्या रा. महिपालपूर, दिल्ली, मूळ रा. नौनेर, अमरोही, उत्तर प्रदेश) असे आहे. ही घटना २० जुलै रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास बाणेरमधील बालेवाडी फाटा चौकात घडली होती. रस्ता ओलांडत असताना एका ज्येष्ठाला भरधाव रिक्षाने धडक दिली, ज्यात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिक जमा झाले. त्यावेळी रिक्षाचालक गुर्जर याने ज्येष्ठाला उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन जातो, असे भासवून नागरिकांच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. मात्र, त्याने ज्येष्ठाला रुग्णालयात दाखल न करता, गणेशखिंड रस्त्यावरून खडकीतील रेंजहिल्स परिसरात नेले आणि लोहमार्गाजवळील दाट झाडीत जखमी अवस्थेत सोडून तो पसार झाला. ज्येष्ठ नागरिक घरी परतले नाहीत म्हणून त्यांच्या मुलाने बाणेर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. दुसऱ्या दिवशी खडकीतील लोहमार्गाजवळ त्या ज्येष्ठाचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या मुलाने मृतदेहाची ओळख पटवली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत बालेवाडी फाटा येथे रिक्षाने धडक दिल्याने ते जखमी झाल्याचे आणि चालकाने त्यांना रुग्णालयात नेण्याचे नाटक केल्याचे समोर आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध सुरू असताना, तो दिल्लीतील महिपालपूर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बाणेर पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना झाले आणि आठ दिवस शोध घेतल्यानंतर गुर्जरला ताब्यात घेतले. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अलका सरग, सहायक पोलीस निरीक्षक के. बी. डाबेराव, रायकर, पोलीस कर्मचारी गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रीतम निकाळजे, शरद राऊत, गजानन अवतिरक यांनी ही कामगिरी यशस्वी केली.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 3:48 pm

रेल्वे स्थानकाच्या फलकावर शहराचे नाव उर्दूत लिहा:'एसडीपीआय'चे छत्रपती संभाजीनगरमध्ये 'रेल रोको', भाषा संपवण्याचा डाव असल्याचा आरोप

औरंगाबाद शहराचे छत्रपती संभाजीनगर नामांतर झाल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या नामफलकावरून हटवण्यात आलेले उर्दू नाव पुन्हा लिहिण्यात यावे, या मागणीसाठी 'सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया' (SDPI) या संघटनेने आज (सोमवारी) आक्रमक पवित्रा घेत 'रेल रोको' आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच रोखल्याने पोलीस आणि कार्यकर्ते आमनेसामने आले होते. आंदोलकांनी दिलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे रेल्वे स्थानक परिसर दणाणून गेला होता. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या नामफलकावर शहराचे नाव मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहे, मात्र नामांतर प्रक्रियेनंतर येथील उर्दू नाव वगळण्यात आले आहे. हे नाव पुन्हा सन्मानाने लावले जावे, यासाठी एसडीपीआयने प्रशासनाला दहा दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज संघटनेने रेल रोकोची हाक दिली होती. रेल्वे बोर्डाला जीआर लागू होत नाही आंदोलकांनी आपली भूमिका मांडताना रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहराचे नाव बदलल्यानंतर रेल्वेने जीआरचे कारण देत उर्दू नाव हटवले, मात्र रेल्वेला हा जीआर लागू होत नाही. २०१७ च्या रेल्वे कायद्यानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ज्या भागात विशिष्ट भाषिकांची लोकसंख्या जास्त आहे, तिथे त्या भाषेत नाव असणे बंधनकारक आहे. उर्दू ही केवळ मुस्लिमांची भाषा नसून ती हिंदुस्थानची भाषा आहे. मराठवाड्यातील इतर आठ जिल्ह्यांच्या रेल्वे स्थानकांवर उर्दूत नावे आहेत, मग छत्रपती संभाजीनगरमध्येच का नाही? असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला. भाजपकडून उर्दू भाषा संपवण्याचा प्रयत्न भाजप सरकार उर्दू भाषा संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. भाजप पदाधिकारी संजय केनेकर यांच्या मुलाच्या सांगण्यावरून हे नाव हटवण्यात आल्याचा गंभीर दावा आंदोलकांनी केला. यातून उर्दू ही एका समुदायाची भाषा असल्याचा संदेश सरकार देत असल्याचे आंदोलक म्हणालेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात उर्दू वृत्तपत्रांचे योगदान असून, पूर्वजांनी याच भाषेच्या माध्यमातून लढा दिला होता, याची आठवणही यावेळी आंदोलकांनी करून देण्यात आली. 'छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक' नावाला केंद्राची मंजुरी दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या 'छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानक' अशा नामांतराला २५ ऑक्टोबर २०२५ मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या रेल्वेस्थानकाच्या नावापुढील 'औरंगाबाद' हे नाव मिटवून 'छत्रपती संभाजीनगर' हे नाव लिहिले जात आहे. केंद्राने 2022 मध्ये औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर रेल्वे स्थानकाचे नाव बदलल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या स्थानकाचा नवीन स्टेशन कोड CPSN आहे. रेल्वेनुसार, महाराष्ट्र सरकारच्या शिफारशी व गृह मंत्रालयाच्या मान्यतेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. स्टेशनचे छत्रपती संभाजीनगर हे नवे नाव मराठा योद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि ऐतिहासिक योगदानाचा सन्मान करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बदलानंतर, स्टेशनशी संबंधित सर्व माहिती आणि तिकिटे प्रवाशांना नवीन नावाने दिली जातील. रेल्वेने यासंबंधीची आवश्यक ती सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली आहे. आता, रेल्वेस्टेशनवरील उद्घोषणाही छत्रपती संभाजीनगर या नव्या नावानेच होईल.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 3:29 pm

अखेर 21 डिसेंबरची MPSC परीक्षा लांबणीवर:आता 4 जानेवारीला होणार परीक्षा, आयोगाची माहिती; 21 तारखेच्या मतमोजणीचा फटका

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमुळे 21 डिसेंबर रोजी होणारी महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलली आहे. आता ही परीक्षा नववर्षाच्या पहिल्या रविवारी म्हणजे 4 जानेवारी 2026 रोजी होईल. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत...

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 3:22 pm

बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’चा धुमाकूळ

मुंबई : प्रतिनिधी सिनेसृष्टीत सध्या एकच चित्रपट सर्वत्र चर्चेत आहे. ‘धुरंधर’. प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे केवळ तब्बल तीन दिवसांत या चित्रपटाने वर्ल्डवाइड भक्कम कमाई करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पहिल्या तीन दिवसांतील वर्ल्डवाईड गल्ला पाहता या चित्रपटाने विक्रमी कामगिरी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोशल […] The post बॉक्स ऑफिसवर ‘धुरंधर’चा धुमाकूळ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 3:16 pm

दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

मुंबई : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय मुंबई उपनगरच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी विशेष क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडांगणावर दिव्यांग खेळाडूंनी सहभाग नोंदवत जिद्द, क्षमता व क्रीडाप्रतिभा प्रभावीपणे सादर केली. या स्पर्धेसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मनोगतात त्यांनी दिव्यांग व्यक्तींना समाजातील सर्व क्षेत्रात […] The post दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 3:13 pm

१० ते १४ डिसेंबर मोशी येथे ‘किसान’कृषि प्रदर्शन

पुणे : प्रतिनिधी भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन ‘किसान’ येत्या दि १० ते १४ डिसेंबर दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन मोशी येथे आयोजित करण्यात आले आहे. सुमारे ३० एकरावर किसान प्रदर्शनात ६०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनाच्या कालावधीत देशभरातून दोन […] The post १० ते १४ डिसेंबर मोशी येथे ‘किसान’कृषि प्रदर्शन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 3:07 pm

‘लाडकी’चा नोव्हेंबर हप्ता रखडला

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचे १५०० रूपये अद्याप जमा झालेले नाहीत. राज्यात कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुका लागू शकतात. त्यामुळे महायुती सरकारकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे ३००० रूपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर टाकले जाऊ शकतात. नोव्हेंबर महिन्याचे १५०० रूपये ७ डिसेंबर पर्यंत खात्यावर येतील, असा अंदाज वर्तवला जात होता. पण अद्याप […] The post ‘लाडकी’चा नोव्हेंबर हप्ता रखडला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 3:06 pm

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा:विरोधकांची आग्रही मागणी; मुख्यमंत्री फडणवीसांनी दाखवले कोरोना काळातील अधिवेशनांकडे बोट

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. या अधिवेशनाचे अवघ्या आठवड्याभरातच सूप वाजणार आहे. त्यामुळे विरोधकांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात केवळ 3-4 दिवसांचे अधिवेशन व्हायचे असे सांगत त्यांची मागणी टोलवून लावली. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. हे अधिवेशन 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अल्प अधिवेशनावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी कामकाजाला सुरुवात होताच हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राचे एकत्रिकरण झाल्यानंतर नागपुरात किमान 2 महिन्यांचे अधिवेशन व्हावे असे निश्चित करण्यात आले. आमचे मित्र विरोधी पक्षात असताना एक महिना अधिवेशन चालायचे. ठीक आहे. पण आज सरकार घाईघाईने पुरवणी मागण्या मांडत आहे. सरकारला एवढी घाई का आहे? असे ते म्हणाले. संशयाचे वातावरण निर्माण करू नका - भास्कर जाधव पटोलेंनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनीही अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली. हिवाळी अधिवेशन हे विदर्भाचे असल्याने ते विदर्भ करारानुसार व्हावे अशी भूमिका नाना पटोले यांनी घेतली आहे. त्यावर तुम्ही निर्णय देणार, हे ठीक आहे. पण तुम्ही असा संदेश पाठवला की, आम्ही तिथे या गोष्टींना परवानगी दिली होती. आम्ही तिथे आमचे मत मांडले होते. आम्ही 8 ते 19 डिसेंबरपर्यंत अधिवेशन व्हावे असा आग्रह धरला होता. अधिवेशनाचा कालावधी एखाद्या आठवड्याने वाढवण्याची आमची मागणी होती. निर्णय झाला ठीक आहे, पण तुम्ही आमच्याविषयी संशयाचे वातावरण निर्माण करू नका, असे भास्कर जाधव म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे कोरोना काळातील अधिवेशनांकडे बोट त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोन्ही नेत्यांच्या मागणीला उत्तर दिले. ते म्हणाले, नाना पटोले यापूर्वी पीठासीन अधिकारी होते. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपण पुरवणी मागण्या सादर करतो, जी विधेयके पारित करायची आहेत त्याची ओळख पहिल्या दिवशी करून दिली जाते हे त्यांना ठावूक असावे. विशेषतः अध्यादेश पहिल्या दिवशी दाखवण्याचा नियम आहे. मागील 25-30 वर्षांतील अधिवेशनांच्या पहिल्या दिवसाची माहिती काढली तर यापेक्षा वेगळा अजेंडा दिसणार नाही. अधिवेशन अधिकाधिक दिवसांपर्यंत चालावे अशी आमचीही भावना आहे. मागील 25 वर्षांत नागपूरमध्ये सर्वाधिक काळ अधिवेशन हे मी मुख्यमंत्री असतानाच चालले. ते पुढेही चालेल. पण आता आचारसंहिता सुरू आहे. पुढे कधीही आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे पहिला आठवा व आणखी 2 दिवस एवढे अधिवेशन चालवण्याचे आपण निश्चित केले. आता अधिवेशनाचे उर्वरित दिवस पुढच्या वर्षीच्या अधिवेशनात समायोजित करून टाकू. पण मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे. नाना पटोले यांचा अधिवेशनासाठी कितीही आग्रह धरला तरी ते अध्यक्ष असताना विधिमंडळाची मुंबईतील अधिवेशनेही 3 व 5 दिवसांची झाली होती. इतर राज्यांत अधिवेशने सुरुळीत सुरू होती. तिथे कोरोना नव्हता का? बाकी राज्यांत 15-20 दिवस अधिवेशने चालायची. पण महाराष्ट्रात केवळ 3-4 दिवस कामकाज चालायचे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 3:04 pm

बेळगावात अधिवेशनाआधी मराठी नेत्यांची धरपकड:सीमाभागात तणाव, कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक; महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा बंद

कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषिकांच्या मेळाव्यासाठी जाणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (MES) नेत्यांची कर्नाटक पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. या दडपशाहीचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले असून, कोल्हापुरात शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक झाली आहे. या संघर्षात खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांनी आंतरराज्य बससेवा तात्पुरती स्थगित केली असून, हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. बेळगावात आजपासून (सोमवार) हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या वेळी मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने व्हॅक्सीन डेपो मैदानावर 'महामेळावा' आयोजित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्नाटक प्रशासनाने याला परवानगी नाकारत सकाळपासूनच कारवाईचे सत्र सुरू केले. माजी आमदार मनोहर किनेकर, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, नेते आर. एम. चौगुले, प्रकाश मरगाळे यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतले. व्हॅक्सीन डेपो परिसराला पोलिसांनी छावणीचे स्वरूप दिले असून, मेळावा उधळून लावण्यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तरीही, “रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में!” अशा घोषणा देत कार्यकर्ते ठाम आहेत. कोल्हापुरात ठाकरे गट आक्रमक कर्नाटकातील दडपशाहीविरोधात कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार आणि जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात जोरदार निदर्शने केली. यावेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कर्नाटकच्या बसेस रोखण्यात आल्या. काही कार्यकर्त्यांनी बसेसवर 'जय महाराष्ट्र' लिहून आपला निषेध नोंदवला. बससेवा बंद, प्रवाशांचा खोळंबा या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनांच्या भीतीने दोन्ही राज्यांच्या परिवहन महामंडळांनी बससेवा थांबवली आहे. कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (KSRTC) बसेस निपाणी आगारातच थांबवण्यात आल्या असून, पुढे महाराष्ट्रात पाठवण्यात आलेल्या नाहीत. तर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे सीमेवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. कर्नाटक नवनिर्माण सेनेचे आकांडतांडव कर्नाटक नवनिर्माण सेना श्री रामेगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी बेळगावाच्या अथनी शहरात महाराष्ट्राच्या बस थांबवून निषेध नोंदवला आहे. तत्पूर्वी कोल्हापूरमध्ये शिवसेना नेत्यांनी कर्नाटक परिवहन बस थांबवली होती. कर्नाटक बस थांबवल्याचा निषेध करण्यासाठी कर्नाटक नवनिर्माण सेनेनेही संताप व्यक्त केला आहे. कन्नड वेदिकेचा उद्दामपणा कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा उद्दामपणा सुरूच आहे. कर्नाटकातील अथनी येथील एसटी बसवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी 'जय कर्नाटक' लिहिल्याने वाद चिघळला आहे. कोल्हापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक बसवर जय 'महाराष्ट्र लिहिल्याने' अथनीत त्याचे पडसाद उमटले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 2:45 pm

संभाजीनगरात 27 डिसेंबरपासून प्रगतिशील साहित्य संमेलन:गीतकार प्रशांत मोरेंच्या हस्ते उदघाटन; समारोपाला लेखक राकेश वानखेडे!

छत्रपती संभाजीनग येथील विवेकानंद कॉलेजमध्ये २७ डिसेंबरपासून प्रगतिशील साहित्य संमेलन रंगणार आहे. ज्येष्ठ ग्रामीण कथाकार तथा कादंबरीकार उत्तम बावस्कर हे संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले असून, स्वागताध्यक्ष म्हणून विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव श्रीमंतराव शिसोदे हे असतील. माजी संमेलनाध्यक्ष ॲड. मिर्झा अस्लम यांची प्रमुख उपस्थिती राहील. मुंबई येथील प्रसिद्ध लोककवी तथा गीतकार प्रशांत मोरे हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. नाशिक येथील प्रसिद्ध कादंबरीकार तथा प्रगतिशील लेखक संघाचे राज्य महासचिव राकेश वानखेडे हे समारोपाचे प्रमुख अतिथी म्हणून तर ज्येष्ठ विज्ञान लेखिका प्रा. सुनीती धारवाडकर आणि प्राचार्य डॉ. दादाराव शेंगुळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संमेलनात उद्घाटन समारंभ आणि समारोप समारंभ याशिवाय 'माध्यमे आणि लोकशाही प्रजासत्ताकात विचार स्वातंत्र्याची आवश्यकता' या विषयावर ज्येष्ठ विचारवंत प्रा. जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात वेगवेगळ्या माध्यमांच्या अनुषंगाने डॉ. किशोर शिरसाट, रोशनी शिंपी, दत्ता कानवटे, अनिकेत मोहिते भाष्य करतील. 'संविधान मूल्यांचे संवर्धन व प्रतिष्ठा' या विषयावर ॲड. अभय टाकसाळ यांच्या अध्यक्षतेखाली खुली चर्चा होणार असून, संविधान अभ्यासक अनंत भवरे हे संवाद साधणार आहेत. शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर आत्माराम पाटील यांच्या शाहीरीवर आधारित 'अजिंक्य शाहीरी' हा कार्यक्रम शाहीर अजिंक्य लिंगायत आणि संच सादर करणार आहे. समारोपानंतर कवयित्री उर्मिला चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक खुल्या कवी संमेलनात मान्यवर कवींसह नवोदित कवींना एकत्रित सहभागी करून घेतले जाणार आहे. संमेलनाचे आयोजन प्रगतिशील लेखक संघ, छत्रपती संभाजीनगर ही संस्था विवेकानंद महाविद्यालयाच्या सहकार्याने करीत आहे. प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने शहरात सातत्याने लोकवर्गणीतून साहित्यिक उपक्रम चालविले जाते. साहित्य रसिकांनी व श्रोत्यांनी या संमेलनात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर शेंडगे, विवेकानंद महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख तथा मराठी संशोधन केंद्र प्रमुख डॉ. दत्तात्रय डुंबरे, प्रगतिशीलचे उपाध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने, सचिव डॉ. समाधान इंगळे, सहसचिव आशा डांगे, मराठवाडा संघटक सुनील उबाळे, कोषाध्यक्ष डॉ. सोमनाथ वांजरवाडे, सदस्य डॉ. सविता लोंढे, चक्रधर डाके, माधुरी चौधरी, डॉ. नवनाथ गोरे यांनी केले आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 2:40 pm

धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट:अजित पवार अन् राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्लाही हजर; तर्कवितर्कांना उधाण

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार व राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्लाही हजर होत्या. यावेळी त्यांच्यात कोणती चर्चा झाली? त्याचा तपशील मिळाला नाही. पण ही भेट मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अवतीभोवती फिरणारी होती, असा दावा सूत्रांनी केला आहे. नागपुरात आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या दिवगंत माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर आजचे कामकाज स्थगित झाले. त्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला उपस्थित होत्या. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारही हजर होते. या चौघांत यावेळी काय चर्चा झाली? हे समजू शकले नाही. पण सूत्रांनी त्यांच्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण व तत्सम मुद्यांवर चर्चा झाल्याचा दावा केला आहे. काय म्हणाले धनंजय मुंडे? पत्रकारांनी या भेटीविषयी धनंजय मुंडे यांना छेडले असता त्यांनी आपण आपल्या मतदारसंघातील कामांविषयी मुख्यमंत्र्यांना भेटल्याचे सांगितले. मी 1 लाख 40 हजार मतांनी निवडून आलो आहे. माझी काही जबाबदारी आहे की नाही? बीडच्या संदर्भातील काही काम होते. त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. आता आशा करतो की, कामे लवकर होतील, असे ते म्हणाले. यावेळी त्यांना मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांविषयी विचारले असता त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. मी मनोज जरांगे यांच्या आरोपांवर बोलणार नाही. या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. मागील एका वर्षापासून मला टार्गेट केले जात आहे. का करण्यात येत आहे? याचा विचार पत्रकारांनी करायला हवा, असे ते म्हणाले. धनंजय मुंडेंनी माझी सुपारी दिली - जरांगे दुसरीकडे, मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी दिल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडे यांनी माझा घातपात करण्याची सुपारी दिली आहे. पोलिसांच्या ताब्यातील 3 आरोपींनी त्यांचे नाव घेतले आहे. मुंडेंना माझ्या अंगावर गाडी घालायची आहे. पण अद्याप जालना पोलिस व गृह मंत्रालयाने त्यांना अटक केली नाही. मी पोलिस बंदोबस्त नाकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना सांभाळत आहेत. त्यांनी त्या क्रूर माणसाला सांभाळू नये. फडणवीस पूर्वीसारखे वागले तर गरिबांना न्याय मिळेल. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. माझी व धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करा, असे ते म्हणालेत. जरांगेंनी यावेळी राज्य सरकारने सारथीच्या योजना थांबवल्याचाही दावा केला. ते म्हणाले, सरकारने सारथीच्या योजना थांबवल्यात. मराठा तरुणांना शिष्यवृत्ती मिळत नाही. त्यांची हेळसांड केली जात आहे. सरकारने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करावी. त्यांना पीकविमा द्यावा. त्यांच्या मालाला भाव द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांनी मतदानातून सरकार पाडावे. भीती निर्माण केली तरच राजकारणी घाबरतील. 2029 च्या निवडणुकीत महायुती सरकारला मोठा फटका बसणार आहे. कारण, हे लोक घातपात करणाऱ्यांना पाठिशी घालत आहेत, असे जरांगे म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 2:36 pm

मोठी बाती:राज्यात ऑपरेशन टायगर सुरुच; शिंदेंच्या सेनेच्या नेत्यासोबत ठाकरेंच्या नेत्याच्या भेटीचा VIDEO व्हायरल, शिवसेनेतील सत्ता संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर

महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाने तापलेल्या नागपूरमध्ये, कोकणातील ज्येष्ठ नेते आणि ठाकरे गटाचे प्रमुख आमदार भास्कर जाधव व शिंदे गटातील मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अनपेक्षित भेटीने नवे राजकीय वादळ उभे केले आहे. विधानभवन परिसरात ही भेट झाली, आणि काही क्षणांचा संवाद कॅमेऱ्यात टिपला गेल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. गेल्या काही दिवसांत ठाकरे गटात नाराजी वाढल्याच्या राजकीय चर्चांदरम्यान ही भेट घडल्याने तिचे महत्त्व अधिक वाढले आहे. विशेषतः विरोधी पक्षनेतेपद जाधवांना नाकारले जाण्याच्या चर्चेनंतर, या भेटीने ठाकरे गटातील वरिष्ठ नेते दुसऱ्या दिशेला वळतायत का? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. प्रताप सरनाईक यांनी मात्र या भेटीमागे कोणताही राजकीय डाव नसल्याचे स्पष्ट केले आहे. भास्कर जाधव यांच्या मतदारसंघात एसटी सेवांबाबत काही अडचणी आहेत. त्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही भेट झाली. आमदार हा जनतेची कामं घेऊन मंत्र्याकडे जात असतो; पक्ष पाहून नाही, असे ते म्हणाले. परंतु त्याच वेळी, ऑपरेशन टायगर सुरू आहे, अशी त्यांनी कबुली दिल्यानंतर या स्पष्टीकरणावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. कारण विरोधकांचे स्पष्ट मत आहे—शिंदे गटाचे लक्ष्य अजूनही ठाकरे गटातील उरलेले शिलेदार आपल्या बाजूला खेचणे आहे. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मंत्री उदय सामंत यांनी नुकताच दावा केला होता की, उद्धव ठाकरे कधीच भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेते होऊ देणार नाहीत. सामंत यांच्या वक्तव्यानेच ठाकरे गटातील नाराजीवर शिक्कामोर्तब झाल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. आता या भेटीनंतर जाधव कोणते पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोकणात आपला प्रभाव वाढवण्यासाठी शिंदे गट प्रयत्नरत असल्याच्या चर्चा आधीच आहेत, आणि त्यामुळे ही भेट अधिक चर्चेचा विषय ठरतेय. अंतर्गत तणावाची जाणीव या आरोप-प्रत्यारोपात ठाकरे गटही मागे राहिला नाही. पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत म्हटले की, भास्कर जाधव हे पदलालसेचे राजकारण करणारे नेते नाहीत. जनतेशी त्यांची नाळ घट्ट आहे. ते उदय सामंत यांच्यासारखे खुर्ची पाहून धावणारे नाहीत. ठाकरे गटाने जरी ही भेट साधी-सोपी म्हणून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला असला तरी, अंतर्गत तणावाची जाणीव त्यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट होते. शिवसेनेतील सत्ता संघर्ष अजून संपलेला नाही सध्याचे महाराष्ट्राचे राजकारण पूर्णपणे सत्ता, संख्या आणि नेतृत्वाचा प्रभाव टिकवण्याच्या शर्यतीत अडकले आहे. एका बाजूला सत्तेसह शिंदे गटाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न, तर दुसरीकडे कमी आमदारसंख्येतही नेतृत्व टिकवण्याचा उद्धव ठाकरे यांचा संघर्ष, या संपूर्ण पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये घडलेली ही भेट केवळ धागा नसून, राजकीय संकटाचा नवीन टप्पा असल्याचे विश्लेषकांचे निरीक्षण आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत या भेटीचे खरे राजकीय परिणाम उलगडतील. शिवसेनेतील सत्ता संघर्ष अजून संपलेला नाही, उलट तो आता निर्णायक वळणावर पोहोचत आहे, हेच या भेटीचे मुख्य संकेत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 1:56 pm

तहसीलदाराने 85.50 लाखांची थकबाकी भरली रोख:तहसीलदार मुंढवा प्रकरणातील आरोपी; एवढी रोख कशी आली? RTI कार्यकर्त्यांचा सवाल

मुंढवा भूखंड घोटाळ्यातील आरोपी असलेल्या एका निलंबित तहसीलदाराने आपल्या कुटुंबीयांच्या नावे असलेली सुमारे 85.50 लाख रुपयांची थकबाकी रोख स्वरुपात भरली आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार व अंजली दमानिया यांनी या प्रकरणी एका सरकारी अधिकाऱ्याकडे एवढी रोख कशी आली? असा सवाल उपस्थित करत चौकशीची मागणी केली आहे. हा सरळ सरळ मनी लाँड्रिंगचा प्रकार असल्याचे ते म्हणालेत. पुण्यातील मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार अडचणीत सापडले. त्यांच्या अमेडिया कंपनीवर 1800 कोटींची महार वतनाची जमीन अवघ्या 300 कोटींत घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी ही जमीन अमेडियाला विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शीतल तेजवानी नामक महिलेला अटक केली आहे. या प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण आता या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच सूर्यकांत येवले यांनी आपल्या कुटुंबीयांच्या नावे असलेली सुमारे 85.50 लाख रुपयांची थकबाकी रोख स्वरुपात भरल्याचे समोर आले आहे. विजय कुंभार यांनी सोमवारी एका पोस्टद्वारे हा मुद्दा उजेडात आणला आहे. मुंढवा जमीन घोटाळ्यातील आरोपी, निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांने कुटुंबियांची पतसंस्थेची थकबाकी ₹85.50 लाख रोख भरले. मुंढवा प्रकरण सुरू असतानाच ही रक्कम भरली गेलीय. एका सरकारी अधिकाऱ्याकडे एवढी रोख रक्कम आली कुठून? हा सरळ सरळ भ्रष्टाचार आणि मनी लॉन्डरिंगचा प्रकार दिसतो! ED व सरकारने तात्काळ चौकशी करून दोषींना अटक करावी, असे ते म्हणालेत. कुंभार यांनी या प्रकरणी अंजली दमानियांसोबत प्रशासनाला एक निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी या प्रकरणाच्या चौाकशीची मागणी केली आहे. खाली वाचा त्यांचे निवेदन जशास तसे विजय कुंभार व अंजली दमानिया म्हणतात, पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील एक प्रमुख आरोपी पुण्यातील निलंबित तहसीलदार सूर्यकांत गुलाबराव येवले यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींची कर्ज खाती नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., बावडा, ता. खंडाळा, जि. सातारा येथे आहेत. 1) चंद्रकांत गुलाबराव येवले, मु. पो. भोगाव, ता. वाई, जि. सातारा - कर्ज खाते क्र. 195/99 थकबाकी - 52.50 लाख 2) बाळकृष्ण जगू जाधव, मु. पो. खानापूर, ता. वाई, जि. सातारा - कर्ज खाते क्र. 295/132. थकबाकी - 33 लाख. वरील दोन्ही खात्यांना आरोपी सूर्यकांत येवले हे जामीनदार आहेत. दोन्ही खात्यांची एकूण थकबाकी 85 लाख 50 हजार एवढी होती. दैनिक पुढारी व 7/12 यावरूनही सूर्यकांत येवले यांच्या दोन्ही मिळकतींवर जप्ती आदेशाने नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचा बोजा असल्याचे दिसते. आमच्या माहितीनुसार, दिनांक 10 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सूर्यकांत येवले यांनी एकूण 85.50 लाख इतकी संपूर्ण रक्कम रोख स्वरुपात नागरी सहकारी पतसंस्थेत जमा केली असल्याचे दिसून येते. या संदर्भात गंभीर शंका निर्माण करणारे मुद्दा पुढीलप्रमाणे - एका सामान्य शासकीय अधिकाऱ्याने एवढी मोठी रक्कम रोख स्वरुपात कशी जमा केली?सहकारी पतसंस्था एकाच व्यक्तीकडून एवढी मोठी रोख रक्कम कायद्याने स्वीकारू शकते का? ही रक्कम मुंढवा जमीन घोटाळ्यातील गैरव्यवहारातून आली असण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे. अशा स्वरुपातील व्यवहार काळा पैसा पांढरा करण्याचा (मनी लाँड्रिंग) गंभीर प्रयत्न असण्याची शक्यता आहे. म्हणूनच आमची आपणास विनंती आहे की, सूर्यकांत येवले यांनी जमा केलेल्या 85.50 लाखांच्या मूळ स्त्रोताची अतिशय सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. या व्यवहारात सहभागी नागेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, तिचे पदाधिकारी व कर्मचारी यांच्या भूमिकेची चौकशी करावी. हा व्यवहार मुंढवा जमीन घोटाळ्यातील पैसे वळवण्यासाठी वापरला गेला का? याची स्वतंत्र चौकशी आर्थिक गुन्हे शाखा/ अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत केली जावी. सदर व्यवहारातील कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधित आरोपी, जामीनदार, तसेच संस्थेतील जबाबदार पदाधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या गंभीर प्रकणातील आर्थिक बाबींमागे प्रचंड गैरव्यवहार, भ्रष्टाचार व मनी लाँड्रिंगचा ठोस व स्पष्ट संशय निर्माण होत आहे. त्यामुळे तत्काळ व प्रभावी कारवाई होणे अत्यावश्यक आहे. आपण याबाबत त्वरीत चौकशी करून सर्व संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ही विनंती, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 1:52 pm

अजितदादांचा राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण?:अंजली दमानिया 'सुपारीबाज', त्यांचा बोलविता धनी वेगळाच; NCPच्या आमदाराचा घणाघात

पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यावरून आता राजकारण तापले असून, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार अनिल पाटील यांनी दमानिया यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. अंजली दमानिया या सुपारी घेऊन काम करत असून, त्या राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करणाऱ्या 'मास्टरमाइंड'च्या इशाऱ्यावर चालत आहेत, असा गंभीर आरोप अनिल पाटील यांनी केला आहे. नागपूर येथील विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना अनिल पाटील यांनी दमानियांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले. आमच्या नेत्याचा राजीनामा मागणाऱ्या अंजली दमानिया या कोण? त्यांना हा अधिकार कोणी दिला? असा सवाल पाटील यांनी केला. कधी अजित पवार, तर कधी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करायचे; ज्यांची सुपारी घेतली असेल, त्यांचा राजीनामा मागायचा, हाच यांचा उद्योग आहे, अशी तिखट टीका पाटील यांनी केली. सुपारी सोडून समाजकार्याकडे लक्ष द्यावे पार्थ पवार यांच्या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना पाटील म्हणाले की, या प्रकरणात दोन समित्या नेमण्यात आलेल्या आहेत. चौकशी सुरू असून, कारवाई देखील झालेली आहे. इतके सगळे केल्यानंतर, केवळ अजित पवारांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसे बदनाम करता येईल, याची सुपारी अंजली दमानिया यांना दिलेली आहे. त्या सुपारीला सोडून समाजकार्याकडे लक्ष दिले पाहिजे, असा खोचक टोला सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी अंजली दमानिया यांना लगावला. अंजली दमानिया दुसऱ्याच्या डोक्याने चालतात अंजली दमानिया या स्वतःच्या बुद्धीने चालत नसून त्या दुसऱ्या कुणाच्या तरी डोक्याने चालत आहेत, असा दावा पाटील यांनी केला. अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ज्यांना 'ॲलर्जी' किंवा भीती वाटते, असा कुणीतरी 'मास्टरमाइंड' यामागे आहे. हा मास्टरमाइंड कोण हे शोधणे गरजेचे असून तो लवकरच जनतेसमोर उघडा पडेल, असेही अनिल पाटील यांनी स्पष्ट केले. हे ही वाचा... तुकाराम मुंढेंविरोधात भाजप आमदार आक्रमक:हिवाळी अधिवेशनात करणार निलंबनाची मागणी, नियमबाह्य काम केल्याचा आरोप राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात नेहमीच आपल्या धडाडीच्या कार्यपद्धतीमुळे चर्चेत राहणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार मुंढे यांच्या विरोधात विशेष लक्षवेधी सूचना मांडून त्यांच्या थेट निलंबनाची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर महानगरपालिकेतील त्यांच्या जुन्या कार्यकाळातील वादग्रस्त निर्णय आता पुन्हा उकरून काढले जाणार असल्याने विधिमंडळाचे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 1:05 pm

सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट:तपोवनातील वृक्षतोडीवर केली चर्चा; सरकार शत्रू नाही, पण झाडेही जगली पाहिजेत - सयाजी शिंदे

अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्यावर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सयाजी शिंदेंनी कुंभमेळा व्हायला पाहिजे, पण झाडेही जगली पाहिजे. सरकारने नवीन झाडे लावण्याचा दाखला देत फसवणूक करू नये, असे ते म्हणालेत. नाशिकमध्ये लवकरच सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यानिमित्ताने तपोवनात साधूसंतांसाठी साधूग्राम बांधले जाणार आहे. पण त्यासाठी तेथील तब्बल 1800 झाडे तोडली जाणार आहेत. या झाडांची ओळखही पटवण्यात आली आहे. पण अभिनेते सयाजी शिंदेंसह अनेकांनी या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेनेही या प्रकरणी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सयाजी यांनी सोमवारी राज यांची भेट घेऊन त्यांच्याशी या मुद्यावर चर्चा केली. राज ठाकरेंच्या भेटीनंतर सयाजी शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, राज ठाकरे यांनी तपोवनातील वृक्षतोडीला विरोध केला. त्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे आम्हाला आनंद झाला. त्यामुळे मी त्यांची भेट घेण्यासाठी आलो होतो. तपोवनातील झाडे कशी वाचली पाहिजेत? यावर त्यांच्याशी चर्चा झाली. भविष्यातही अशी झाडे वाचावीत यावरही त्यांच्यासोबत उहापोह झाला. या प्रकरणी झाडे इकडून तिकडे लावण्याने काही होत नाही. 15 फुटी झाडे लावण्याचा मुद्दा तर निव्वळ मजाक आहे. ज्या जागी झाडे आलीच नाही, त्या ठिकाणी ही झाडे कशी येतील? वनराई फुलली पाहिजे तिथे मातीच तशी नसेल. पाणीही नसेल. त्यामुळे आहे ती झाडे कशाला तोडायची? सरकारने आहे ती झाडे तोडू नये. कुंभमेळा झाला पाहिजे. परंपरेनुसार सर्वकाही झाले पाहिजे. आमचा त्याला विरोध नाही. आम्ही त्याचा आदरच करतो. पण ही नवीन झाडांच्या माध्यमातून फसवणूक होऊ नये. महाराष्ट्रातील वनराई, देवराई कशी टिकली पाहिजे, फुलली पाहिजे, नवीन कशी तयार झाली पाहिजे यावर आपण विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर भाष्य करण्यास नकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपोवनातील वृक्षतोडीला राजकीय हेतूने प्रेरित पर्यावरणवादी विरोध करत असल्याची टीका केली होती. त्यांचा रोख सयाजी शिंदेंकडेच होता. पत्रकारांनी या प्रकरणी सयाजी यांना छेडले. पण त्यांनी त्यावर भाष्य करणे टाळले. मला झाडांशिवाय असले काही कळत नाही. त्यामुळे त्यावर काय व्यक्त व्हावे हे मला कळत नाही. हा आपला प्रांत नाही, असे ते हसत म्हणाले. सरकार आमचे शत्रू नाही. आम्ही झाडांसाठी आंदोलन केले. आम्हाला झाडे हवी आहेत. ती आपली आई-वडील आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी एकत्र येणारे सर्वचजण आमचे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी झाडांसाठी घेतलेली भूमिका पाहून मला खूप चांगले वाटले. या प्रकरणी सर्वच अभिनेत्यांनी या प्रकरणी पुढे येऊन बोलले पाहिजे असे काही नाही. त्या सर्वांचे मत असे आहे की, झाडे वाचली पाहिजेत. पण काही पर्यावरणवादी झाडे वाचली नाही पाहिजे असे म्हणत असतील तर त्यांचा विचार करावा लागेल. पण वृक्षतोड व्हावी असे कुणालाच वाटत नाही, असेही सयाजी शिंदे या प्रकरणी बोलताना म्हणाले. तपोवनातील वृक्षतोडीवर आज नाशकात बैठक तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात आज नाशिक महापालिकेत महत्त्वाची बैठक होणार आहे. पर्यावरणप्रेमींचे प्रतिनिधी आणि मनपा अधिकारी यांच्यात ही बैठक होणार आहे. या बैठकीत या मुद्यावर योग्य तो निर्णय होईल असे सांगितले जात आहे. कुंभमेळानिमित्ताने साधुग्राम तयार करण्यासाठी तपोवनात वृक्षतोड करावी लागणार, ही मनपा प्रशासनाची ठाम भूमिका आहे. पण पर्यावरणवाद्यांचा त्याला विरोध आहे. तपोवनातील एकही झाड तोडून देणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 1:01 pm

नागपूर विधिमंडळ अधिवेशन:सोलापूरच्या 4 सत्ताधारी भाजप आमदारांचे तब्बल 152 प्रश्न; मात्र 90 टक्के फेटाळण्याची शक्यता, कारण काय?

सोमवारी ८ डिसेंबरपासून नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर यंदा फक्त आठच दिवसांचे कामकाज होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांना यात किती न्याय मिळेल, याविषयी जनतेला जशी शंका आहे, तशी लोकप्रतिनिधींनाही शंका आहे. सोलापूरमधील सत्ताधारी चार एकूण १५२ प्रश्न विचारले आहेत, मात्र त्यापैकी ९० टक्के प्रश्न फेटाळले जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक आमदाराचे फक्त ३ ते ५ प्रश्न स्वीकारले जातील, त्यापैकी चर्चेला किती येतील विषयी अनिश्चितता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. आ. सुभाष देशमुख यांचे ४८, शहर उत्तरचे आ. विजयकुमार देशमुख यांचे ४४, मध्यचे आमदार १० व अक्कलकोटचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी सर्वाधिक ५० तारांकित प्रश्न विचारले आहेत. कल्याणशेट्टी यांच्या मतदारसंघात सोलापूर शहराचाही काही भाग येतो. हे चारही आमदार सत्ताधारी भाजपचे आहेत. त्यांचे किती प्रश्न चर्चेला येतील, याविषयी या आमदारांनाच शंका आहे. नियमानुसार प्रत्येक आमदाराचे ५ प्रश्न स्वीकारले जातात, म्हणजेच कोठेंचा अपवाद वगळता इतरांचे ९०% प्रश्न फेटाळले जाण्याचीच शक्यता आहे. ‘सीव्हीसी’ घोटाळ्याचा प्रश्न आ. देशमुखांनी पुन्हा मांडला १. जिल्हाधिकारी कार्यालयात बड्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने १६ कॉमन सर्व्हिस सेंटरच्या आकडेवारीत ट्रॅन्झेंक्शन घोटाळा झाला, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई विलंब का? २. महा- ई- सेवा केंद्रांसह व इतर ऑनलाइन केंद्रांवर विद्यार्थ्यांची लूट होतेय. तक्रारी असूनही प्रशासनाची कारवाई का नाही? ३. गरीब रुग्णांच्या खिशावरील औषधांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी शासनाने २०२३ मध्ये झीरो प्रिस्क्रिप्शन योजनेची घोषणा केली. त्याचे काय झाले? ४. सोलापूर बसस्थानकावरील गाड्यांची वर्दळ पाहता जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे बस स्थानकाचे विस्तारीकरण कधी होणार आहे? ५. सोलापूरमध्ये प्लाझ्माची वाहतूक करणारे वाहन पकडले. गुजरामध्ये त्याची तस्करी करणाऱ्यावर काय कारवाई? ६. गेंट्याल चौकात अपघातात जखमी झालेल्या एका मुलाला सिव्हिलमध्ये वेळेत उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याबाबत काय कारवाई झाली? आ. देवेंद्र कोठे यांचे प्रमुख प्रश्न... गुंठेवारीवर काय कार्यवाही? १. सोलापुरातील गुंठेवारीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर काय कार्यवाही ? २. शेळगी, विडी घरकुल, अक्ककोट रोड, वसंत विहार, सोरेगाव, नीलम नगर या भागातील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले होते, या समस्येवर कायमस्वरूपी उपाय काय? ३. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील रिक्तपदांची भरती कधी? ४. अदिला नदीवरील अतिक्रमणे काढण्यासाठी कारवाई काय? नदीच्या पुनरूज्जीवनासाठी प्रशासनाला काही सांगितले आहे काय? त्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करणार काय? कोणाचे किती प्रश्न? १. आ. सचिन कल्याणशेट्टी -५०२. आ. सुभाष देशमुख - ४८३. आ. विजयकुमार देशमुख - ४४४. आ. देवेंद्र कोठे - १० विधिमंडळाचे निवृत्त सचिव अनंत कळसे म्हणाले - आमदारांनी कितीही प्रश्न विचारले, तरी कार्यवाही होते पाच प्रश्नांवरच Q अधिवेशनात आमदारांचे प्रश्न मोजकेच चर्चेला येतात. बाकी प्रश्नांचे काय होते? A अधिवेशनासाठी आमदारांची ५ गटात विभागणी होते. त्यात मंत्र्यांचाही समावेश असतो. एकूण ३५ विभाग आहेत. सोमवार ते शुक्रवार या काळात ते ५ विभागात हे गट विभागले जातात. प्रत्येक गटात आमदारांना पाचच प्रश्न विचारता येतात. असा नियम आहे. Q लेखी उत्तरे दिली जातात, ती आमदारांपर्यंत पोहोचतात का? A आमदारांनी विचारलेले ५ पैकी ३ प्रश्नच यादीत येऊ शकतात. त्यांना लेखी उत्तरे मिळतात. आमदारांनी १०० - २०० असे कितीही प्रश्न विचारले तरी ५ प्रश्नांवर प्रक्रिया होते. विधिमंडळाचा तसा नियमच आहे. त्यात बदल होत नाही. Q लेखी उत्तरांवर कार्यवाही होते? A लेखी उत्तरांची यादी प्रिंट होते. ती आदल्या दिवशी आमदारांना दिली जाते. एका आमदाराचे जास्तीत जास्त ३ स्वीकृत प्रश्न त्या यादीत राहतात. लेखी उत्तरांवर कार्यवाही होते. रोज एक तासाचा प्रश्नोत्तराचा तास असतो. त्यात जास्तीत जास्त ५- ६ प्रश्न चर्चेला येतात. उरलेल्या लेखी उत्तरावर कार्यवाही दिलेली असते. Q काही प्रश्न मतदारसंघाबाहेरील असतात, असे चालते का? A कोणतेही आमदार महाराष्ट्रातील कुठलाही प्रश्न उपस्थित करू शकतात. वेळेअभावी बहुतांश वेळा ते चर्चेलाच घेतले जात नाहीत. Q किती प्रश्न विचारण्याचा अधिकार? A मर्यादा नाही. पण पाचच प्रश्न स्वीकृत होतात. इतर लॅप्स होतात.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 12:55 pm

निवडणुकीपूर्वीचा वाद, अधिवेशनातले सामंजस्य:महायुतीचे राजकीय गणित बदलणार? नीलेश राणे - रवींद्र चव्हाण भेटीमागे काय?

मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या दरम्यान भाजप आणि शिवसेना-शिंदे गटात वाढलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये एक वेगळेच दृष्य समोर आले. ज्याने महाराष्ट्रात राजकीय चर्चांना नवी दिशा दिली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना-शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे, या दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. विधानभवन परिसरात त्यांनी एकमेकांना गळाभेट दिली, हसतखेळत संवाद साधला. या भेटीनंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये ज्या आरोप-प्रत्यारोपांची खळबळ होती, त्यात एक प्रकारची शांतता निर्माण झाल्यासारखी अवस्था दिसली. मात्र हा शांति नाही, तर पुढील राजकीय रणनीतीसाठी सुरुवात आहे, असा अंदाज अनेकांचा आहे. ही भेट इतकी अनपेक्षित होती कारण मागील काही दिवसांपासून मालवणमध्ये नेमक्या प्रश्नांवर कटु राजकीय वाद रंगला होता. 26 नोव्हेंबर रोजी, नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी, नीलेश राणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर पैसे वाटपाचा आरोप करून एक प्रकारचे स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यांच्या दाव्यानुसार, भाजपचे पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या निवासी पत्त्यावर गेल्यावर तिथे बेहिशोबी रोख 25 लाख रुपये सापडले. या रोख रक्कमेसह हिरव्या पिशवीत पैसे असल्याचे आणि हा प्रकार पैसे वाटपाच्या पद्धतीतून निवडणुकीसाठी चालत असल्याचे राणेंनी आरोप केला. त्यांनी म्हटले की, भाजपचे नाव येते तेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला वेगळा रंग मिळतो; पैसे वाटपाचा आणि दबावाचा वातावरण तयार होते, अशी तक्रार त्यांनी केली. या आरोपांमुळं राज्यभरात वाद वाढला आणि भाजपने हे आरोप फेटाळले. किनवडेकर यांनी मालवण पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा गुन्हा नोंदवला होता. त्यांनी नीलेश राणे यांनी बेकायदेशीररित्या त्यांच्या घरात घुसून हे स्टिंग केल्याचा दावा केला. या गुन्ह्यानुसार राणेंवर आरोपपत्र झाल्याचे सांगितले जाते. मात्र, आज नागपूरमध्ये त्यांची ही भेट काहींसाठी प्रकरण मिटवण्यात आल्याचे संकेत असल्याचे मनले जात आहे. नीलेश राणे यांनी मीडिया समोर स्पष्ट केले की, रवींद्र चव्हाण हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत, आणि जे काही झाले ते फक्त निवडणुकीपुरते होते, असे त्यांनी सांगितले. भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी तणाव निवळल्याचे संकेत मालवण नगरपरिषद निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिवसेना-शिंदे गट यांच्यात निर्माण झालेला तणाव आज नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात नरम पडल्याचे चित्र दिसले. शिवसेना-शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विधानभवन परिसरात हसतखेळत भेट घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांना गळाभेट देत जे काही वाद होते ते निवडणुकीपुरतेच होते, अशी प्रतिक्रियाच दिली आहे. या भेटीला महत्त्व आहे कारण काही दिवसांपूर्वीच नीलेश राणेंनी मालवणमध्ये भाजप नेते विजय किनवडेकर यांच्या घरी धाड टाकून हिशोबबाह्य 25 लाख रुपये आढळल्याचा दावा केला होता. त्यांनी चव्हाण यांच्यावर पैसे वाटपाचे राजकारण केल्याचा थेट आरोप करत स्टिंग ऑपरेशनही केले होते. यानंतर किनवडेकर यांनी राणेंवर बेकायदेशीरपणे घरात घुसल्याचा गुन्हा दाखल केला होता. या घटनांनी महायुतीत तणाव वाढवला होता. पण अधिवेशनातील झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी तणाव निवळल्याचे संकेत दिले. आता ही भेट खरोखर वादाची अखेर ठरणार की पुढील राजकीय डावपेचांची सुरुवात? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 12:52 pm

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचे अपघाती निधन

गडचिरोली : प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचे पाचगाव येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. रविवारी उशिरा रात्री ही घटना घडली असून त्यांच्या अचानक जाण्याने गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. गीताताई हिंगे या रविवारी ७ डिसेंबर रोजी खाजगी कामानिमित्त नागपूरला […] The post राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचे अपघाती निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 12:49 pm

अहिल्यानगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात

अहिल्यानगर : प्रतिनिधी अहिल्यानगरमध्ये खासगी बसला भीषण अपघात झाला. बसने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. अहिल्यानगर -पुणे महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातामध्ये बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातामध्ये बसच्या चालकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अहिल्यानगर पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात […] The post अहिल्यानगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 12:45 pm

एका गटाचे 22 आमदार दुसरीकडे जाणार:आदित्य ठाकरे यांचे शिंदे गटाकडे बोट; नको त्या विषयात हात घालू नका, नीलेश राणेंचा पलटवार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील 22 आमदार दुसरीकडे जाणार असल्याच्या चर्चेचे पेव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात फुटले आहे. आदित्य ठाकरे यांनी सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्याला हवा देत शिंदे गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण शिंदे गटाने त्यांना त्यांच्याकडे केवळ 20 आमदार राहिल्याची आठवण करून देत त्यांचा हल्ला परतावून लावला. आदित्य ठाकरे यांनी नको त्या विषयाला हात घालू नये. आपली ताकद नाही त्या विषयात बोलू नये, असे शिंदे गटाने म्हटले आहे. सत्ताधारी महायुतीमध्ये सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही चर्चा आतापर्यंत अनेकदा फेटाळली आहे. पण या चर्चेला अद्याप पूर्णविराम मिळाला नाही. त्यातच आता शिंदे गटाचे 20 हून अधिक आमदार लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचाही दावा विरोधकांकडून केला जात आहे. यामुळे शिंदे गटात खळबळ माजली असताना आता आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा या विषयाला हात घातला आहे. एका गटाचे 20 आमदार दुसरीकडे जाणार आहेत - आदित्य ठाकरे पत्रकारांनी आज आदित्य ठाकरे यांना त्यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवण्याची चर्चा सुरू असल्याच्या मुद्यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर आदित्य यांनी ही पेरलेली बातमी असून, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्ट केले. तसेच कोणत्या तरी गटाचे 22 आमदार दुसरीकडे जाणार असल्याची चर्चा आपल्या कानावर असल्याचेही ते यावेळी म्हणाले. माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवण्याच्या चर्चेत कोणतेही तथ्य नाही. ही पेरलेली बातमी आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. पण मीच 22 आमदार कोणत्या तरी गटातून दुसरीकडे जात आहेत हे ऐकले आहे, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का? - आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या या दाव्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांचा एक गट कथितपणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेचे पेव फुटले आहे. पण शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी जोरकसपणे त्यांचा हा दावा फेटाळला आहे. ते म्हणाले, आदित्य ठाकरे ज्योतिषी आहेत का ते? त्यांचे आमदार किती राहिलेत? त्यांचे वीसच राहिलेत ना. त्यामुळे त्यांनी नको त्या विषयात हात घालू नये. त्यापेक्षा त्यांनी एखाद्या विधायक सामाजिक मुद्यावर चर्चा करावी. नको त्या विषयात म्हणजे जिथे आपली ताकद नाही तिथपर्यंत बोलू नये, असे नीलेश राणे यांनी म्हटले आहे. चंद्रकांत खैरे यांनी केला होता दावा उल्लेखनीय बाब म्हणजे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दाखला देत शिंदेंचे 20 आमदार भाजपत जाणार असल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते, शिंदे गटाचे आमदार भाजपत जाणार असल्याच्या बातम्यांमुळे शिंदे नाराज झालेत. त्यांचे 20 आमदार मागेच त्यांना सोडण्यासाठी तयार झाले होते. माझ्या मते ते भाजपमध्ये जाण्यासाठी शिवसेना सोडतील. मला त्यांचे काही लोक भेटले. तेव्हा समजले. तुम्ही शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबाला सोडले, आता तुमच्यासोबतही असेच होईल. ही नाराजी अशीच सुरू राहील. पुढे जाऊन त्यात आणखी भर पडले. त्यानंतर महिना-दोन महिन्यात चित्र खूप बदललेले दिसेल. राजकारणात कोणतीही उलथापालथ होऊ शकते. भाजप या सर्वांना सरळ करेल. त्याची सुरुवात आता झाली आहे. शिंदेंचे नाराज आमदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातात. पण फडणवीस त्यांना कोणताही थारा देत नाहीत. मुंबईतल्या एका मोठ्या नेत्याने मला ही माहिती दिली. कुणीही गेले तरी फडणवीस त्याचे काम करत नाहीत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा ते त्यांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व आमदारांना भरभरून द्यायचे. त्यावेळी त्यांना भाजपला देताना हात आखडता घेतला. आता फडणवीस तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांना देत आहेत, असे ते म्हणाले होते.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 12:22 pm

शिंदे गटाचा आदित्य ठाकरेंच्या नावाला विरोध:UBT आमदारांना आता 2019 सारखा अनुभव येईल -देसाई; आदित्य ठाकरेंनी चर्चा फेटाळली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद सुपूर्द करण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या नावाला कडाडून विरोध करत आदित्य यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले तर 2019 मध्ये शिवसेना आमदारांना जो अनुभव आला तोच अनुभव आता ठाकरे गटाच्या आमदारांना येईल, असे ते म्हणालेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर येथे सुरुवात झाली. या अधिवेशनात पहिल्यांदाच विधानसभा व विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. विरोधकांनी सरकारवर हे पद हेतुपुरस्सर रिक्त ठेवण्याचा आरोप केला आहे. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेतेपद निवडीचा अधिकार मुख्यमंत्री किंवा सरकारकडे नाही, तर विधिमंडळाचे अध्यक्ष व सभापतींकडे असल्याचे सांगत हा आरोप फेटाळून लावला आहे. काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांचे नाव पुढे केले आहे. तर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाच्या आमदारांना 2019 चा अनुभव येईल पण आज अचानक राजकीय वर्तुळात विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद भास्कर जाधव यांच्या जागी आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली. यामुळे भास्कर जाधव दुखावले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी आदित्य यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. ते याविषयी बोलताना म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवणे हे 2019 च्या महाविकास आघाडीच्या मंत्रिंमडळाच्या रचनेसारखे झाले. सरकार बनवताना उद्धव ठाकरे यांनी आमच्या आमदारांच्या बैठकीत सांगितले की, मला तुमच्यातील शिवसैनिक मुख्यमंत्री करायचाय. त्यानंतर मुख्यमंत्रीचा मुद्दा आला तेव्हा त्यांनी स्वतःचे नाव सुचवले. ते स्वतः मुख्यमंत्री झाले. एवढेच नाही तर त्यांनी स्वतःच्या मुलालाही कॅबिनेट मंत्री केले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे येत असेल तर 2019 मध्ये शिवसेना आमदारांना जो अनुभव आला, तोच अनुभव आता ठाकरे गटाच्या आमदारांना येईल, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी फेटाळली चर्चा दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांनी आपण विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मला विरोधी पक्षनेतेपद देण्याची बातमी पेरलेली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे ते म्हणालेत. विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदावरून सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 1980 मध्ये भाजपाचे 14 आमदार होते, 1985 मध्ये 16 आमदार होते. पण तेव्हाही विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. पण नियत नसेल तर त्याला काही बोलू शकत नाही. हे सरकार घटनात्मक पद रिक्त ठेऊन कामकाज करत आहे. हा मनमानी कारभार आहे. तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद नियुक्त करायला काय दुखणे आहे, आम्ही नाव दिले आहे. जो काही असेल तो निर्णय घ्या. लोकशाहीवर आधारित सरकार चालवायचे नसेल तर त्यांना संविधानाप्रमाणे सरकार चालवायचे नाही असा अर्थ होतो. रेटून कारभार करत जनतेला न्याय द्यायचा नसेल. सरकारच्या गैरप्रकारावर कुणी अंकुश ठेवू नये असं वाटत असेल तर त्यांनी करू नये, असे ते म्हणाले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 11:57 am

प्रवचनातून झालेला वाद, काडसिद्धेश्वर स्वामींविरोधात तक्रार:जात-धर्मिय भावना दुखावल्याच्या आरोपाखाली स्वामींवर गुन्हा

कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर यांच्यावर, गडचिरोली जिल्ह्यातील बिळूर येथे केलेल्या प्रवचनातील विधानांमुळे जात-धर्मिय भावना दुखावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना चर्चेचा विषय बनली असून, त्यांच्या विरोधात न्यायव्यवस्थेत काय कारवाई होईल, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. गडचिरोली आणि जत येथील बिळूर गावावरून प्रसिद्ध असलेल्या कणेरी मठाचे स्वामी काडसिद्धेश्वर यांच्या विरोधात जात-धर्म व समाजभावना दुखावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. बिळूर परिसरातील एका सामाजिक संघटनेने दिलेली तक्रार पोलिसांनी मान्य करून, संबंधित गुन्हा नोंदवला आहे. असे म्हटले जाते की, स्वामी यांच्या एका प्रवचनात त्यांनी कर्नाटकमधील लिंगायत समाज आणि धर्म-आरक्षण याविषयी केलेल्या वक्तव्यांमुळे काही नागरिकांची भावना दुखावली गेली. या प्रकरणाची तक्रार प्रथम कर्नाटकमधील बसवन पोलिस ठाण्यात दाखल झाली होती; पण पुढे ती जळगावजमोड येथील जत पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली. बिळूर मठात 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या प्रवचनातले विधान हे तक्रारीचे केंद्र असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तक्रारीनुसार, समाजात एकोप्याला धक्का देणारे, विभाजन पेरणारे विधान केले गेले; त्यामुळे गुन्ह्याची नोंद झाली. गुन्हा दाखल झाल्यानंतर काडसिद्धेश्वर स्वामी यांनी विरोधकांनी राजकीय दबावाखाली तक्रार दाखल केली असल्याचा आरोप केला आहे. माझ्या प्रवचनात काहीही असा बोलले नाही, मी फक्त सत्य बोललो, असे त्यांनी म्हटले. तसेच सांगितले की, समाजात वाद लावणे, तोडणे हे माझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. हे गुन्हे दाखल करणे हा खोडसाळपणा आहे. स्वामींच्या कार्यपद्धतीत समाजातील एकोपा, आत्मनिर्भरता आणि सकारात्मक बदल कणेरी मठाचे पूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी हे समाजासाठी सतत कार्यरत असलेले प्रतिष्ठित आध्यात्मिक नेते मानले जातात. 1989 साली त्यांनी मठाधिपती पदाची सूत्रे हातात घेतली आणि त्यानंतर आरोग्य, शिक्षण, शेती, संस्कृती व ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामे सुरू केली. समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास आणि दुर्बल कुटुंबांना सक्षम बनवणे हे त्यांचे मुख्य ध्येय राहिले आहे. 1991 पासून कणेर्‍या गावाला त्यांनी आपली कर्मभूमी म्हणून स्वीकारले आणि गाव विकासासाठी सरकारवर अवलंबून न राहता गावकऱ्यांनीच पुढाकार घ्यावा, हा संदेश दिला. विशेषतः युवकांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. स्वामींच्या कार्यपद्धतीत समाजातील एकोपा, आत्मनिर्भरता आणि सकारात्मक बदल यांना नेहमीच सर्वोच्च स्थान दिले जाते. त्यांच्या या कार्यामुळे ते ग्रामीण विकासाचे प्रेरणास्रोत बनले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 11:47 am

संभाजीनगरची बेंगळुरू, मुंबई विमानसेवा 15 पर्यंत स्थगित:सॉफ्टवेअरच्या बिघाडामुळे निर्णय, ‘सचखंड’सह विमानेही ‘लेट’

ऐन पर्यटन हंगामात छत्रपती संभाजीनगर शहराची बेंगळूरू आणि मुंबईची महत्त्वपूर्ण विमानसेवा १५ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय इंडिगो प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे पर्यटन व्यावसायिकांसह इतर क्षेत्रांमध्ये संतापाची लाट आहे. यापूर्वी हैदराबादची दुपारची विमानसेवा देखील १५ ते ३१ डिसेंबर दरम्यान स्थगित केली आहे. इंडिगोच्या सॉफ्टवेअरमधील बिघाड तसेच क्रू मेंबरची कमतरता यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. या अडचणींमुळे कंपनी लहान शहरांच्या सेवा खंडित करून मोठ्या शहरांच्या सेवा सुरू ठेवण्यावर भर देत आहे. बेंगळूरू-छत्रपती संभाजीनगर ही आठवड्यातून तीन दिवस असणारी विमानसेवा ९ ते १५ डिसेंबर दरम्यान स्थगित करण्यात आली आहे. तसेच, मुंबई-छत्रपती संभाजीनगर ही सायंकाळची सेवाही १५ डिसेंबरपर्यंत स्थगित केल्याचे प्राथमिक दृष्ट्या स्पष्ट होत आहे. ‘सचखंड’सह विमानेही ‘लेट’उत्तर भारतातील धुक्यामुळे सचखंड एक्स्प्रेस सुमारे ६ तास उशिराने छत्रपती संभाजीनगर स्थानकावर दाखल झाली. रोज सकाळी ९.४० वाजता पोहोचणारी ही रेल्वे रविवारी (७ डिसेंबर) दुपारी ३.४० वाजता स्थानकावर पोहोचली. त्याचबरोबर दिल्लीहून येणारे इंडिगोचे विमान अर्धा तास, तर एअर इंडियाचे सकाळचे दिल्लीचे विमान २० मिनिटे विलंबाने दाखल झाले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 11:34 am

आदित्य ठाकरेंकडे विरोधी पक्षनेतेपद?:भास्कर जाधव यांना वगळून ठाकरेंना संधी मिळण्याची शक्यता; उदय सामंतांनी दिले संकेत

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची आज सुरूवात होत आहे आणि नेहमीप्रमाणेच या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे प्रश्न चर्चेला येणार आहेत. मात्र यंदाच्या अधिवेशनाची सुरुवातच मोठ्या राजकीय तणावाने होत आहे. कारण, महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात हा पहिलाच प्रसंग आहे की, विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद अद्याप निश्चित झालेले नाही. यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचा दावा आहे की, नियमांप्रमाणे निर्णय हा अध्यक्ष आणि सभापती यांनी घ्यायचा असून त्यात सरकारचा हस्तक्षेप नसतो. त्यामुळे या मुद्द्यावरून सुरु झालेली राजकीय खडाजंगी पुढे किती तापेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेतेपद कोणाला द्यायचे यावर मोठे राजकीय गणित सुरू असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आता नवे नाव पुढे केले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत ज्येष्ठ आमदार भास्कर जाधव यांचे नाव या पदासाठी चर्चेत होते. पण आता स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नावाची शिफारस विधिमंडळाध्यक्षांकडे पाठवण्यात आली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या हिवाळी अधिवेशनात युवा नेतृत्वाला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. विरोधी पक्षनेतेपद ही केवळ प्रतिष्ठेची नाही तर सरकारी निर्णयांना थेट आव्हान देण्याची भूमिका असल्यामुळे, या पदावर कोण बसणार हे राज्याच्या राजकारणात प्रचंड महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच्या पहिल्या अधिवेशनापासूनच हा प्रश्न चर्चेत आहे. विधानसभेत संख्याबळाच्या आधारे प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरे गटाचा अधिकार निर्विवाद असल्याचे महाविकास आघाडीत मान्य करण्यात आले होते. त्यामुळे या पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव पाठवले गेले होते. पण प्रत्यक्ष निर्णय लांबणीवर टाकण्यात आला. शिवाय अधिवेशन जसे जवळ येऊ लागले तसे नेतृत्वाबाबत गटात पुन्हा विचार सुरू झाल्याचे समोर आले आहे. आदित्य ठाकरेंना आक्रमक भूमिका, तरुणांतील लोकप्रियता आणि राज्यभरातील आंदोलनांत सक्रिय सहभाग या कारणांमुळे त्यांचे नाव पुढे आणले गेल्याचे बोलले जात आहे. याच मुद्द्यावरून आता नवे राजकीय संकेतही मिळत आहेत. मंत्री उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांच्या नावाबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, जाधव साहेब आक्रमक नेते आहेत. ते पक्ष बदलण्याचा विचार करू शकतात, म्हणून त्यांना शांत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपदाचे आश्वासन देण्यात आले. परंतु अंतिम निवड होताना त्यांचा विचार केला जाण्याची शक्यता कमी आहे. सामंतांच्या विधानानेच ठाकरेंच्या गटात नावांबद्दल गंभीर विचार सुरू असल्याचे संकेत मिळाले आहेत. राजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हेच विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहतील का, याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे. तरुण नेतृत्वामुळे विरोधकांची ताकद अधिवेशनात अधिक प्रभावी होईल, असा विश्वास शिवसेना उद्धव गटाला आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी मात्र या चर्चेवर मौन बाळगले आहे. विरोधी पक्षनेतेपदासंबंधीचा निर्णय अधिकृतरीत्या जाहीर होईपर्यंत राजकीय चर्चांना वेग मिळत राहणार आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर हे पद कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 11:26 am

राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा गीता हिंगे यांचे अपघाती निधन:राजकारण व समाजकार्याची सांगड घालणाऱ्या गीताताईंचा दुर्दैवी मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीता हिंगे यांच्या अचानक निधनाची बातमी समोर आली आहे. रविवारी रात्री उशिरा नागपूरवरून गडचिरोलीला परत येताना पाचगाव परिसरात झालेल्या भयंकर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या गाडीला समोरून येणाऱ्या कारने जबर धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. धडक इतकी प्रचंड होती की घटनास्थळीच गीता हिंगे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तर त्यांच्या पतींच्या हाताला झालेली जखम किरकोळ असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात पाठवले. अपघातानंतर पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला असून अपघाताचे अचूक कारण समोर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गीता हिंगे या गडचिरोली जिल्ह्यातील महिलांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व होते. राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी भारतीय जनता पक्षातून केली. जिल्ह्यातील संघटन बांधणी, जनसंपर्क, महिलांसोबत सतत सक्रिय उपस्थिती यामुळे त्या भाजपमधील लोकप्रिय चेहरा बनल्या. जिल्हा अध्यक्षपद, जिल्हा महामंत्री अशा महत्त्वाच्या पदांची त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. आगामी नगरपरिषद निवडणुकीपूर्वी नगराध्यक्षपदाचे तिकीट नाकारल्याने त्यांनी भाजपचा त्याग केला. मात्र राजकीय प्रवास थांबवता न, नव्या वाटेवर पाऊल टाकत 26 नोव्हेंबर 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला. पक्षात दाखल होताच त्यांची महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटनेला नवी उमेद मिळेल, नवीन नेतृत्व तयार होईल अशी मोठी अपेक्षा होती. पण त्या अपेक्षांना काळाने क्रूरपणे छेद दिला. राजकारणासोबतच गीता हिंगे या सामाजिक कार्यातही अग्रेसर होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली आधार विश्व फाउंडेशन या संस्थेमार्फत गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला जात होता. कोविड महामारीच्या संकटकाळात त्यांनी वैयक्तिक पुढाकार घेत अनेक गरजू नागरिकांना अन्नधान्य, औषधे व आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. समाजातील वंचित घटकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी त्यांनी दिवसरात्र धावपळ केली. मुलांचे शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण, आरोग्यविषयक शिबिरे, रक्तदान उपक्रम अशा अनेक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यांच्या या मानवसेवेची दखल सर्व स्तरांवर घेतली गेली आणि त्यांची कार्यशैली जनतेच्या मनात घर करून गेली. गीता हिंगे यांच्या निधनाने गडचिरोलीने एक कार्यक्षम, मनमिळावू, नि:स्वार्थी आणि जिद्दी नेतृत्व गमावले आहे. लोकांशी संवाद साधण्याची त्यांची सहज पद्धत आणि समस्यांकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे त्या प्रत्येक घरात आपुलकीचे नाते जोडण्यात यशस्वी ठरल्या होत्या. अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी त्या नेहमी पुढे असायच्या. नेतृत्वाचा हा उज्वल प्रवास अचानक थांबला याचे दु:ख व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडतात. त्यांच्या जाण्यामुळे झालेल्या पोकळीची भरपाई होणे कठीण आहे, असे अनेक स्थानिक नागरिक सांगत आहेत. नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला या दुर्घटनेने संपूर्ण राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. सर्वच पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना व पक्ष बांधवांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी अशा भावना सर्व स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत. गीता हिंगे यांचा जनतेशी असलेला जवळचा नातेसंबंध, राजकीय समर्पण आणि सामाजिक बांधिलकी कायम स्मरणात राहील.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 11:08 am

येहळेगाव सोळंके येथे कर्ज व नापिकीमुळे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या:औंढा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथे शेतकऱ्याने कर्ज व नापिकीला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात रविवारी ता. ७ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके येथील गोविंदरा सोळंके यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या पावने दोन एकर शेतीवर सन २०२३ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक औंढा नागनाथ शाखेतून ४५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र मागील सततची नापीकी असल्यामुळे कर्ज कसे फेडावे असा प्रश्‍न त्यांच्या समोर उभा राहिला होता. यावर्षी खरीप हंगामामध्ये सततच्या अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. लागवडीचा खर्चही निघाला नसल्यामुळे आता उदरनिर्वाह कसा करावा तसेच कर्ज कसे फेडावे याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. शेतात जाऊन येतो असे सांगून ते घरून निघाले होते. त्यानंतर ते घरी आलेच नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी शेतात एकच गर्दी केली होती. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी मंगलबाई सोळंके यांच्या माहितीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात सोमवारी ता. ७ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक जी. एस. राहिरे, जमादार रवीकांत हरकाळ पुढील तपास करीत आहेत. मयत गोविंदराव यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परिवार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 10:24 am

शिरजगाव मोझरीला बिबट्याचा वावर; श्वानांच्या पिलांची शिकार:भीतीमुळे शेतकऱ्यांचे कापसाचा वेचा आणि पेरणीचे काम ठप्प‎

प्रतिनिधी | तिवसा येथील कोळवण परिसराच्या पाणंद रस्त्यावरील राजेंद्र कडू यांच्या शेतातील कुत्र्याच्या पिलाची बिबट्याने शिकार केली. या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थनिकांच्या मते गेल्या ८ दिवसांपासून शिरजगाव मोझरी गावातील नागरिकांना सभोवताली बिबट दिसून येत आहेत. बिबटाच्या अशा वावरामुळे शेतातील कामे ठप्प झाली आहेत. रब्बीची पिक पेरणी, कापसाचा वेचा आणि पिकांचे ओलीत थांबले असल्याने शेतकरीही अडचणीत सापडला आहे. आज सकाळच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर या भागात बिबट्याचे ठसेही आढळून आले. त्यानंतर येथील काही तरुणांच्या आग्रहाखातर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ड्रोनच्या आधारे सदर बिबट्याचा शोध सुरु केला. परंतु अद्याप काहीही सापडले नाही. यावेळी वनपाल खेडकर, वनरक्षक जांभे व गवई, वनमजूर गजानन राऊत यांच्यासह स्थानिक शेतकरी देवेंद्र घाटोळ, सागर बालपांडे, रवी जामगडे, अनुप वैद्य, प्रशांत शेंडे, सतीश बेहरे, धनराज शेलोकार, विनोद मेश्राम, विक्रम मोहोड, प्रमोद सहारे, प्रथमेश कडू, प्रशांत कांबळे आदी गावकरीही उपस्थित होते. आज, रविवारी दुपारी १२ वाजताच्याा दरम्यान शिरजगाव मोझरी गावातील कोळवण परिसर, शिवणगाव, परिसर, वऱ्हा पाणंद रस्ता परिसर आणि गावाच्या सभोवताल बिबट्याची पाहणी केली. परंतु बिबट कोठेही आढळून आला नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वनविभागाच्या अंदाजानुसार सदर बिबट्या धोत्रा, सालोरा शिवारात गेल्याची शक्यता आहे. दरम्यान कोळवण परिसरातील राजेंद्र कडू यांच्या शेतात ज्या दिशेने ठसे उमटलेले दिसून आलेत आणि ज्या दिशेने दोन पिल्यांची शिकार दिसून आली आहे. तो मार्ग धोत्रा सालोरा शिवाराकडे जातो. त्यामुळे कोळवण शिवारातील बिबट पुढे सरकला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चांदूर रेल्वेकडेही तक्रार बिबट्याने दोन पिल्लांची शिकार करून पुढे गेल्याची शक्यता वनविभागाने वर्तवल्यानंतर आरएफओ शीतल धुते यांच्याकडे येथील युवा कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी वनविभागाकडे तक्रार करून तातडीने धोत्रा, सालोरा शिवारात सर्च ऑपरेशन राबवण्याची मागणी केल. त्यानंतर दुपारी ३ वाजताच वनकर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पाहणी करण्याचे आदेश दिल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:55 am

पत्नीने ३० लाखांच्या वादात पतीचे गोदामच दिले पेटवून:पैशांच्या वादात पत्नीची धक्कादायक कृती : २५ लाखांचे नुकसान‎

प्रतिनिधी | अमरावती शहरात राहणाऱ्या एका ४४ वर्षीय व्यावसायिकाचे पत्नीसोबत पटत नाही. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून पती, पत्नी एकत्र राहत नाहीत. दरम्यान त्या व्यावसायिकाच्या पत्नीने त्याला फोन करुन ३० लाख रुपये मागितले. रक्कम न दिल्यास सीट कव्हरचे गोदाम जाळून टाकेल, अशी धमकी दिली. त्याने रक्कम देण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळातच पत्नीने पतीच्या गोदामाला आग लावली. या आगीमुळे जवळपास २५ लाख रुपयांचे साहीत्य जळून खाक झाल्याची तक्रार पतीने पोलिसात दिली. या तक्रारीवरुन राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आग लावणाऱ्या महिलेविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. ७) दुपारी दसरा मैदान परिसरात घडली आहे. तक्रारदार व्यक्तीचे नाव मनिष असून त्यांचे शहरातील दसरा मैदानासमोर सीटकव्हरचे दुकान व त्याच ठिकाणी कुशन, वाहनांच्या ऑडीओ, व्हिडीओ सिस्टीम विक्रीचे गोदाम आहे. मनिष व त्यांच्या पत्नीचे मागील तीन वर्षांपासून पटत नाही. त्यामुळे त्यांची पत्नी मुलीसह दिल्लीला राहते. दरम्यान २ डिसेंबरला मनिष यांच्या पत्नीने त्यांच्या दुकानात जाऊन ५० लाख रुपयांची मागणी केली. न दिल्यास प्रॉपर्टी जाळून टाकू, अशी धमकीसुद्धा दिली होती. त्यानंतर सहा डिसेंबरला सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मनीष हे दुकानात असतानाच त्यांची पत्नी व तीच्यासोबत दिल्लीतील एक मैत्रीण या दोघी दुकानात आल्यात. ३० लाख रुपये मनिष यांना मागितले, मात्र मनीष यांनी पैसे देण्यास नकार दिला. सात डिसेंबरला दुपारी साडेबारा वाजता मनिष त्यांच्या भावाच्या घरी असताना आग लावली. काही वेळातच गोदाम असलेल्या इमारतीमधील एका परिचिताने मनिष यांना फोन करून सांगितले की, तुमच्या पत्नीने गोदामाला आग लावलेली आहे. त्यामुळे मनिष तातडीने गोदामाजवळ पोहोचले. या आगीत एकूण २५ लाख रुपयांच्या साहीत्यांचे नुकसान झाल्याचे त्यांनी पोलिस तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी मनिष यांची पत्नी व तिच्या एका मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मुलीच्या गळ्यावर रक्त दिसणारे फोटो पाठवले मनिष यांच्या पत्नीने त्यांना सोशल मीडियावर त्यांच्या मुलीच्या गळ्यावर रक्त आहे असे चित्र दिसेल, अशा पद्धतीचे फोटो तयार करुन पाठवले. त्यानंतर मनीष यांनी तत्काळ पोलिसांच्या मदतीने असे काही घडले आहे का? याबाबत घटनेची शहानिशा केली. मात्र तसे काही नसून ते फोटो बनावट असल्याचे समोर आले होते.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:55 am

१६९ दात्यांनी रक्तदानातून दिली बाबासाहेबांना आदरांजली:कार्यक्रमांद्वारे दिल्या संविधानाच्या उद्देशिका; प्रश्नमंजूषा स्पर्धेचेही करण्यात आले आयोजन‎

प्रतिनिधी | अकोला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अशोक वाटिका येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १६९ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. शिबिर वंचित बहुजन आघाडीचे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई मित्र परिवार, अॅड. आकाश भगत मित्र परिवार, अकोला बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम, प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमांमध्ये संविधानाच्या उद्देशिका देऊन प्रश्नमंजूषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान अशोक वाटिका येथे महापरिनिर्वाण दिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. प्रा. प्रसन्नजित गवई, नंदकुमार डोंगरे, प्रमोद देंडवे, गजानन गवई, ॲड. मोतीसिंह मोहता, वंदना वासनिक, विद्या देशमुख, सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे ठाणेदार संजय गवई, मनोरमा गवई, खदानचे ठाणेदार मनोज केदारे आदी उपस्थित होते. शिबिरात पोलिस कर्मचारी राजेश वानखडे व त्यांची पत्नी भारती वानखडे यांनी रक्तदान केले. अनेक युवकांनी आपल्या आयुष्यातील प्रथमच याच शिबिरात रक्तदान करून ज्ञानाच्या अथांग महासागरास अभिवादन केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपिढीने रक्त संकलनाचे कार्य केले. रक्तदात्यांमध्ये राहुल तायडे, राज गावंडे, दीपक तायडे, पंकज दामोदर, अजय वानखडे, यश इंगळे, शुक्लोदन वानखडे, संतोष खंडारे, नकुल जोहार, हर्षल वानखडे आदी होते.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:52 am

हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस:दोन्ही सभागृहांचे कामकाज 'विरोधी पक्षनेत्या'विना, आज पुरवणी मागण्या सादर होणार

उपराजधानी नागपूरमध्ये आजपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र, यंदा विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांचे कामकाज विरोधी पक्षनेत्याशिवाय चालणार आहे. विरोधकांकडे संख्याबळ नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. विरोधी पक्षनेता नसला तरी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, राज्यातील वाढती गुन्हेगारी, महिलांवरील वाढते अत्याचार आणि तरुणांच्या हाताला नसलेला रोजगार या मुद्द्यांवरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज दोन्ही सभागृहात पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. त्यानंतर शासकीय कामकाज आटोपून शोकप्रस्ताव मांडला जाईल आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले जाईल. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यामुळे या निवडणुकांचा प्रभाव पुरवणी मागण्यांवर दिसणार का आणि सरकार जनतेला खूश करण्यासाठी काही नवीन घोषणा करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:38 am

सेनगावात 10 हजार रुपयांसाठी एकावर तलवारीने प्राणघातक हल्ला:तीन जणांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक

सेनगाव येथे १० हजार रुपये परत का मागितले या कारणावरून एकावर तलवार व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी तिघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात रविवारी ता. ७ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य एका आरोपीचा शोध सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील चिखलागर येथील शेकुराव गडदे यांना बोरकर नावाच्या व्यक्तीला १० हजार रुपये उसनवारीवर दिले होते. त्यानंतर गडदे यांनी बोरकर यांना १० हजार रुपये परत मागितले होते. मात्र त्याने पैसे देतो असे सांगितले. त्यानंतर गडदे हे चिखलागर येथून सेनगाव येथे आले असतांना येलदरी टी पॉईंटवर दिलीपसिंग, गौतम जाधव व रोशन उर्फ गोलू कुऱ्हे यांनी गडदे यांची कार अडविली. यावेळी त्यांनी बोरकर यांना दिलेले पैसे परत का मागितले या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरवात केली शाब्दिक चकमकी नंतर वाद वाढत गेला. त्यानंतर दिलीपसिंग याने त्याच्या जवळील तलवारीने गडदे यांच्या डोक्यात वार केला त्यानंतर लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. अचानक झालेल्या मारहाणीमुळे गडदे यांना प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही. तु पुन्हा सेनगाव येथे आला तर जिवे मारु अशी धमकी देण्यात आला. यावेळी मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या गडदे यांना तेथेच सोडून तिघांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सेनगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार सुभाष चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व गावकऱ्यांनी जखमी गडदे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाख केले. या प्रकरणी गडदे यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी दिलीपसिंग, गौतम जाधव, रोशन उर्प गोलु कुऱ्हे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गौतम व रोशन यांना अटक केली असून दिलीपसिंग याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपनिरीक्षक खंदारे पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:37 am

कृषी:शेतकऱ्याने तयार केलेल्या ‘जुन्नर गोल्ड’ या आंबा वाणाला ‘शेतकरी जात’ म्हणून मान्यता; प्रयोगातून घडवलेला शेतकरी-ब्रँड आता झळकणार भारतीय वाणांच्या नकाशावर

प्रतिनिधी | आळेफाटा जुन्नर तालुक्यातील बुचकेवाडीचा प्रयोगशील शेतकरी भरत जाधव यांनी तयार केलेल्या ‘जुन्नर गोल्ड’ या अनोख्या आंबा वाणाला दिल्लीतील केंद्र शासनाच्या 'प्रोटेक्शन ऑफ प्लॅन्ट व्हरायटी अँड फार्मर्स राईट अथोरिटी' (पीपीव्ही अँड एफआरए ) या संस्थेकडून हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. प्रयोगातून घडवलेला शेतकरी-ब्रँड आता अधिकृतपणे भारतीय वाणांच्या नकाशावर झळकणार आहे, हेच त्याचे वैशिष्ट्य. नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली या वाणाची वैज्ञानिक तपासणी, प्रयोगशाळा अहवाल आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. दोन वर्षांच्या प्रयत्नांना आता केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. ‘जुन्नर गोल्ड’चा प्रसार आणि हक्क आता अधिकृतरीत्या भरत जाधव यांच्याकडे राहणार आहेत. गेल्या २२ वर्षांपासून दोन हेक्टर जिरायत जमिनीत आंब्याची बाग उभी केलेल्या जाधव यांच्या बागेत ४०० हून अधिक विविध वाणांची झाडे आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि सातत्यपूर्ण प्रयोगशीलता यांच्या जोरावर त्यांनी ‘जुन्नर गोल्ड’ घडवला आणि आता तो राष्ट्रीय मानांकनापर्यंत पोहोचला. आता ‘जुन्नर गोल्ड’ फक्त स्थानिक वाण नाही; तो शेतकऱ्याने घडवलेला राष्ट्रीय दर्जाचा आंबा आहे. जाधव यांच्या या बागेत हापूस, केशर आणि राजापुरी या तिन्ही जातींची संमिश्र चव असलेली आंब्याची काही झाडे असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांना दोन वर्षापूर्वी मिळाली होती. या वैशिष्ट्यपूर्ण आंबा वाणाची माहिती घेण्यासाठी अध्यक्ष मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रातील उद्यानविद्या विषयतज्ञ भरत टेमकर, पीक संरक्षण विषयतज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी विकसित पीक जाती संरक्षण कायद्या अंतर्गत नोंदणीसाठी प्रस्ताव तयार केला. यासाठी लागणारी तांत्रिक माहिती, प्रयोगशाळेतील नमुन्यांचे पृथक्करण आणि नाशिक येथील फळ व अन्न पदार्थ तपासणी करणाऱ्या 'अश्वमेघ इंजिनिअर्स व कन्सल्टट' यांच्या प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेला अहवाल आदि बाबींची पूर्तता करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. अहिल्यानगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादनाकडे वळाला आहे. त्यात केशर वाणाला मोठी पसंती मिळते. आता जुन्नर गोल्ड या वाणाच्या यशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातही शेतकरी या वाणाकडे वळण्याची शक्यता आहे. हे आहे ‘जुन्नर गोल्ड’ आंब्याचे वैशिष्ट्ये एका फळाचे वजन तब्बल ९००-९७० ग्रॅम, हापूस,केशर, राजापुरी या तिन्हींचा मिश्र स्वाद,राजापुरीसारखा भव्य आकार आकर्षक, चमकदार केसरी रंग,पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने उत्पादन. रंग : आकर्षक केसरी रंग उत्पादन : दरवर्षी फळधारणा होणारे वाण

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:20 am

भानसहिवरे शाळेत दिव्यांग सप्ताह अंतर्गत क्रीडा स्पर्धा:शाळेचे मुख्याध्यापक राजेश जगताप यांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

प्रतिनिधी |नेवासेफाटा भानसहिवरे (ता.नेवासे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिव्यांग सप्ताह साजरा करण्यात आला. नेवासे पंचायत समितीचे विशेष शिक्षक सचिन खारगे यांनी दिव्यांगाच्या योजनाची माहिती यावेळी उपस्थितांना देवून दिव्यांग प्रमाणपत्र काढणे विषयी विशेष मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक राजेश जगताप यांच्या हस्ते विविध क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये लिंबू चमचा,सुई दोरा ओवणे,पोता शर्यत,तीन पायाची शर्यत,संगीत खुर्ची,गीत गायन,वकृत्व,हस्ताक्ष र अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र पाचे,श्रीधर साळुंके,महेश देवतरसे,दत्ता चौथे,अशोक ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचे परीक्षक म्हणून शाळेतील शिक्षिका आशा गवळी, सुमन सोळसे, वर्षा कुऱ्हाडे यांनी काम पाहिले मान्यवरांच्या उपस्थितीत पहिल्या तीन विजेत्या स्पर्धकांना शालेय साहित्य देऊन सन्मान करण्यात आला. स्पर्धा यशस्वीपणे राबवल्याबद्दल नेवासे तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, विस्ताराधिकारी मीरा केदार,केंद्रप्रमुख रवींद्र कडू यांनी केले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:19 am

तुकाराम मुंढेंविरोधात भाजप आमदार आक्रमक:हिवाळी अधिवेशनात करणार निलंबनाची मागणी, नियमबाह्य काम केल्याचा आरोप

राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात नेहमीच आपल्या धडाडीच्या कार्यपद्धतीमुळे चर्चेत राहणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार मुंढे यांच्या विरोधात विशेष लक्षवेधी सूचना मांडून त्यांच्या थेट निलंबनाची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर महानगरपालिकेतील त्यांच्या जुन्या कार्यकाळातील वादग्रस्त निर्णय आता पुन्हा उकरून काढले जाणार असल्याने विधिमंडळाचे अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी अशी तुकाराम मुंढेंची ओळख आहे. प्रशासकीय काम करताना नियमावर बोट ठेवून काम करणाऱ्या तुकाराम मुंढे यांची कोणत्याही सरकारच्या कार्यकाळात एकाच पदावर जास्त काळ नियुक्ती झाली नाहीय. त्यांच्या कार्यशैलीमुळे ते कोणत्याही सत्ताधाऱ्यांना पंसत नसल्याचं दिसून येते. त्यामुळे ते जास्ती जास्त वर्षभर एका पदावर राहिलेत. आता हिवाळी अधिवेशनात भाजप आमदारांकडून तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आमदारांचे मुंढेंवरील आरोप काय? तुकाराम मुंढे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना, शासनाकडून अधिकृत नियुक्ती नसतानाही त्यांनी नियमबाह्य पद्धतीने 'स्मार्ट सिटी प्रकल्पा'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा प्रभार स्वतःकडे घेतला होता, असा भाजपचा मुख्य आरोप आहे. या पदावर असताना त्यांनी आपल्या मर्जीतील काही कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांचे नियमबाह्य पेमेंट केले. तसेच, काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचे गंभीर आरोपही त्यांच्यावर आहेत. या दोन्ही प्रकरणी त्यावेळी पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल झाले होते. मात्र, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या दबावामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही, असा भाजपचा दावा आहे. आता ही प्रकरणे पुन्हा एकदा विधिमंडळाच्या पटलावर मांडून त्यांच्यावर कारवाईसाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. 20 वर्षांत 24 बदल्यांचा 'विक्रम' तुकाराम मुंढे हे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. प्रशासनात काम करताना नियमांवर बोट ठेवून काम करण्याची त्यांची पद्धत सर्वश्रुत आहे. मात्र, राजकीय हस्तक्षेप आणि नियमबाह्य कामांना नकार देण्याच्या त्यांच्या भूमिकमुळे ते कोणत्याही सत्ताधाऱ्यांना फारसे पचनी पडत नाहीत. राजकीय नेतृत्वाला, मंत्र्यांना आपल्या मनाप्रमाणे नियमबाह्य गोष्टी करण्यामध्ये तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी अडथळे ठरतात. परिणामी, एका पदावर तीन वर्षे काम करणे अपेक्षित असताना, मुंढे यांची सरासरी वर्षभरातच उचलबांगडी केली जाते. गेल्या 20 वर्षांच्या सेवेत त्यांची तब्बल 24 वेळा बदली झाली आहे, जो प्रशासकीय सेवेतील एक विक्रमच मानला जातो. ऑगस्ट 2025 मध्ये त्यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, आता हिवाळी अधिवेशनात भाजप आमदारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे या 'डॅशिंग' अधिकाऱ्यासमोर नवीन संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:19 am

जिर्णोद्धार कामाला वेग, आतापर्यंत पंचवीस फुटापर्यंत मंदिराची उभारणी:परभणी जिल्ह्यातील दहा कारागीर करताहेत काम

प्रतिनिधी |पाथर्डी शहर तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत चैतन्य कानिफनाथ मंदिर जिर्णोद्धाराच्या कामाला वेग आला आहे. लोकसहभागातून सुमारे सहा कोटी रुपये खर्च या मंदिर उभारणीच्या कामासाठी केला जाणार आहे. हेमांडपंथी स्वरूपाचे हे दगडी मंदिर आहे. उभारणीसाठी लागणारा संपूर्ण दगड नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून आणला जात आहे. श्रीक्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांची संजीवन समाधी आहे. राज्यातील लाखो भाविक मढीला नाथांच्या दर्शनाला जाण्या अगोदर बहुतांश भाविक मिरी येथील चैतन्य कानिफनाथांच्या भूमीचे दर्शन घेतात आणि त्यानंतरच पुढे मढीकडे मार्गस्थ होतात. त्यामुळे मिरी येथील चैतन्य कानिफनाथ देवस्थानला देखील महत्त्व आहे. देवस्थान कमिटी, मिरी ग्रामस्थ व भाविक भक्त यांच्या लोकसहभागातून या ठिकाणी हेमाडपंथी स्वरूपाचे दगडी बांधकामात मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत पंचवीस फुटापर्यंत दगड कामात मंदिराची उभारणी झाली आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील दहा कारागीर दररोज या ठिकाणी दगडाची घडई आणि जुडईचे काम वेगाने करत आहेत. एक कारागीर दिवसभरात तीन ते चार दगडांना आकार देण्याचे काम करत आहे. काळपट रंगाच्या दगडांमध्ये या मंदिराची संपूर्ण उभारणी सुरू असून मंदिराचे काम वेगाने सुरू असल्याने नवीन मंदिर देखील आता भाविक भक्तांच्या नजरेत शोभून दिसत आहे. मिरी येथे लोकसहभागातून चैतन्य कानिफनाथ मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे काम हाती घेण्यात आले असून मंदिराची उंची सुमारे ८० फूट आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मंदिराच्या इतर बांधकामासाठी देखील मोठा खर्च अपेक्षित असल्याने भाविक भक्तांनी मंदिराच्या उभारणीसाठी देवस्थान कमिटीकडे आर्थिक स्वरूपात मदत करावी असे आवाहन कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष अशोक झाडे,खजिनदार बहिरू गुंड यांनी केले आहे. या मंदिराच्या प्रत्येक दगडावर कोरीव काम केले जात आहे. दिवसभरात एक कारागीर तीन ते चार दगड घडवण्याचे काम करतो. या कोरीव घडई आणि जुडईच्या कामासाठी खूप मोठा वेळ लागत असल्याचे कारागीर रमेश गुट्टे,विष्णू नरवड,सुभाष गोंडवड यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:19 am

महाराष्ट्र राज्य संघात नगरचा खेळाडू शौर्य देशमुखची निवड:१६ वर्षांखालील महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल सत्कार

प्रतिनिधी|अहिल्यानगर येथील एस के क्रिकेट अकॅडमीचा अष्टपैलू खेळाडू शौर्य सम्राट देशमुख याची १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव गणेश गोंडाळ, डॉ. हर्षवर्धन तन्वर, प्रशिक्षक संदीप आडोळे, करण कराळे, केशव नागरगोजे, सम्राट देशमुख, उषा देशमुख आदी उपस्थित होते. अहिल्यानगरमध्ये विविध क्रीडा क्षेत्रामध्ये चांगले खेळाडू असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची खरी गरज आहे क्रिकेट या खेळामध्ये एकग्रता मेहनत, जिद्द, चिकाटी ज्या खेळाडूंमध्ये असेल तो यशाचे शिखर नक्कीच गाठेल. शौर्य देशमुख हा अष्टपैलू खेळाडू असून आतापर्यंत त्याने क्रिकेट क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली असून तो तितकाच नम्र देखील आहे. आता त्याची १६ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये निवड झाल्याचे डॉ. हर्षदवर्धन तन्वर यांनी यावेळी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:17 am

विविध स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडू घडत असतात - आ. संग्राम जगताप:बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन, २७ संघांचा सहभाग‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर आपल्या जिल्ह्यातील आणि शहरातील क्रिकेट या खेळामध्ये खेळाडू घडविण्याचे काम सुरू असून क्रिकेटचे धडे देण्याचे काम बाळासाहेब पवार स्मृती करंडक स्पर्धेच्या माध्यमातून होत असते. या स्पर्धेतील क्रिकेटर किरण चोरमले, अनुराग कवडे यांनी आपल्या खेळाच्या माध्यमातून भारतीय संघामध्ये स्थान मिळवले ही कौतुकास्पद बाब आहे. स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडू घडत असतो. ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडत असून क्रिकेट प्रेमी या स्पर्धेचा आनंद घेत असतात. बाल वयातच टर्फ विकेटवर चांगला खेळाडू निर्माण होत असून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे शहराचे नावलौकिक होत आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. नगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आ. जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रणजीपटू अनुपम संकलेचा, शहर बँकेचे उपाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, डॉ. हर्षवर्धन तनवर, सुमतीलाल कोठारी, डॉ. अमित सपकाळ आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील २७ संघांनी सहभाग घेतला असून या स्पर्धेमध्ये ४०० पेक्षा जास्त खेळाडू खेळणार असून ही स्पर्धा २४ दिवस चालणार आहे. ही स्पर्धा आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली होत असून चांगले खेळाडू निर्माण केले होत आहेत. राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर खेळाडू खेळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सुमतीलाल कोठारी म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्याला क्रिकेटची ओळख स्व. माजी आमदार अरुण जगताप यांनी करून दिली. पूर्वी या खेळाकडे कोणीही लक्ष देत नव्हते, हा खेळ शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम काकांनी केले. बाळासाहेब पवार यांनी स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटची ओळख निर्माण करून दिली. आज आपल्या शहरांमध्ये विविध वयोगटातील स्पर्धेचे आयोजन करून बालवायातच मुलांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले जाते ही कौतुकास्पद बाब आहे, या माध्यमातून चांगले खेळाडू निर्माण होतील असे ते म्हणाले. दरम्यान, या जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण २७ क्रिकेट संघांनी सहभाग घेतला आहे. वाकोडी येथील साईदीप मैदानावर १२, १४ आणि १६ वर्षांखालील क्रिकेट संघांचे सामने होणार असल्याची माहिती स्पर्धेच्या आयोजकांनी यावेळी दिली. या स्पर्धेतील सामने आता सुरू झाले आहेत. या सामन्यांसाठी नागरिकही मोठी गर्दी करत आहेत. जवळपास २४ दिवस या स्पर्धा सुरू राहणार आहेत. स्पर्धेमध्ये २७ क्रिकेट संघांचा सहभाग या जिल्हास्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण २७ क्रिकेट संघांनी सहभाग घेतला आहे. वाकोडी येथील साईदीप मैदानावर १२, १४ आणि १६ वर्षांखालील क्रिकेट संघांचे सामने होणार असल्याची माहिती स्पर्धेच्या आयोजकांनी यावेळी दिली.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:16 am

पूर्व वैमनस्यातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू:जांभळी गावात खळबळ

प्रतिनिधी |पाथर्डी शहर तालुक्यातील जांभळी गावात रविवारी सकाळी दोन गटांमध्ये उसळलेल्या हाणामारीत दिलीप अश्रुबा आव्हाड (वय ३५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पूर्वीच्या वैमनस्यातून सुरू झालेल्या या भांडणात धारदार शस्त्रे, लाठ्या-काठ्या व दगडांचा वापर झाला. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे जांभळी गावात खळबळ उडाली आहे. सकाळी अकराच्या सुमारास जांभळी गावातील दोन कुटुंबांतील जुन्या वैमनस्यातून वाद चिघळला. हा वाद मारामारीत परावर्तीत झाला. मारहाणीत दिलीप आव्हाड गंभीर जखमी झाले. त्यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी अहिल्यानगर येथे हलवण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या हाणामारीत दुसऱ्या गटातील सोमनाथ भगवान आव्हाड यांच्या पोटात चाकूने वार करण्यात आला. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:16 am

संगमनेरात स्ट्राँग रुमचे कॅमेरे एक तास बंद:उमेदवारांची घटनास्थळी धाव, नागरिकांत संभ्रम

मोहित मंडलिक, सीसीटीव्ही तज्ज्ञ. प्रतिनिधी |संगमनेर संगमनेर नगर पालिकेसाठी झालेल्या मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्राँग रूम मध्ये ठेवण्यात आले आहेत. मात्र या स्ट्राँग रूमवर नियंत्रण करणारे सीसीटीव्ही कॅमेरे रविवारी एक तास बंद झाल्याने शहरात संभ्रम निर्माण झाला आहे. याप्रकारामुळे सर्व उमेदवारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्राँग रूम मध्ये संगमनेरातील एक ते पंधरा प्रभागांतील ईव्हीएम मशीन ^ स्ट्रॉंग रूम मध्ये आठ आठ कॅमेऱ्याचे दोन सेट आहेत. त्यामुळे एका सेटची हार्ड डिस्क बदलली. मात्र एक सेट चालूच असल्याने रेकॉर्डिंग सुरूच आहे. मतमोजणी लांबल्याने हार्ड डिस्क कॅपॅसिटी संपत आली आहे. त्यामुळे ती बदलणे गरजेचे होते. स्ट्राँग रूम बाहेर एलईडी स्क्रीन उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना दाखवण्यासाठी ठेवली आहे. त्यातून लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. - धीरज मांजरे , तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी . ठेवले आहेत. हे ईव्हीएम सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी व शासकीय प्रतिनिधी यांच्या साक्षीने बंद करण्यात आले आणि त्यावर सीसीटीव्ही लावले आहेत. मात्र रविवारी हे उर्वरित पान ४ रेकॉर्डिंग बॉक्स किती चॅनल्सचा आहे. किती दिवसांसाठी त्याची रेकॉर्डिंग हवी आहे. त्यानुसार हार्ड डिस्क ठेवायची होती. न्यायालयाच्या निर्णयानंतर २१ तारखेला मतमोजणी होणार होती. तर दोन तारखेलाच हार्ड डिस्क बदलणे गरजेचे होते. हार्ड डिस्क ज्या कंपनीची आहे. त्यानुसार त्याची कॅपॅसिटी ठरलेली असते. ज्याने हे काम पाहिले. त्याने प्रशासनाला ही माहिती देऊन हार्ड डिस्क वेळीच बदलणे गरजेचे होते.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:15 am

उंदिरगावात सलग दुसऱ्या‎दिवशी पकडला बिबट्या‎:दोन्ही बिबटे डिग्रस नर्सरीत स्थलांतरित‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर अहिल्यानगर शहरात केडगाव येथील बिबट्या जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्याला बिबट्याने गुंगारा दिला आहे. तर दुसरीकडे श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगावात एकाच ठिकाणी दोन दिवसांत दोन बिबटे जेरबंद झाले आहेत. या भागात आणखी बिबटे असल्याचा अंदाज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार पिंजरा पुन्हा लावण्यात आला आहे. केडगाव उपनगरात शाहूनगर भागात, हजारे वस्तीवर बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले. वनविभागाच्या पथकाने वस्तीवरील शेतात पिंजरा लावला आहे. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे रात्री गस्त सुरू आहे. परंतू, बिबट्या जेरबंद झाला नाही. दुसरीकडे श्रीरामपूर तालुक्यात मात्र, बिबट्यांचा उपद्रव वाढला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव शिवारात बिबट्याने शेळीवर हल्ला केल्याची घटना ४ डिसेंबरला समोर आली होती. या ठिकाणी वनक्षेत्रपाल निलेश रोडे यांच्या निर्देशानुसार वनपाल विठ्ठल सानप, वनरक्षक अक्षय बडे, राहूल कानडे, विलास डगळे यांनी पिंजरा लावला. वाईल्ड लाईफ रेस्क्यू टिमचे प्रा. रोहित बकरे, सार्थक शिंदे, तुषार बनकर आदींनी पिंजरा लावून परीसराची पाहणी केली होती. राजेंद्र पाऊलबुद्धे यांच्या शेतात ५ डिसेंबरला एक बिबट्या जेरबंद झाला. तर दुसरा बिबट्या रविवारी (७ डिसेंबर) जेरबंद झाला. या बिबट्यांना डिग्रस येथील नर्सरीत स्थलांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती समजली.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 9:14 am

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन:यंदा विधान भवनातील अनावश्यक गर्दीला 'चाप'; सभापती अन् उपसभापतींकडून तयारीचा आढावा

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी सज्ज झाली असून, यंदा विधान भवनातील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. अधिवेशनादरम्यान विनापास प्रवेश करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिला. रविवारी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या आढावा बैठकीला विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे, मेघना तळेकर, डॉ. विलास आठवले, शिवदर्शन साठ्ये यांच्यासह विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेचे सीईओ विनायक महामुनी उपस्थित होते. बैठकीनंतर मान्यवरांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली. वेगवेगळ्या रंगांचे पास आणि स्वतंत्र गेट सभापती शिंदे यांनी सांगितले की, सुरक्षेच्या दृष्टीने आणि कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी गर्दीचे नियोजन करण्यात आले आहे. व्हीआयपींना देण्यात येणारे पास वेगवेगळ्या रंगांचे असतील आणि त्यांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार (गेट) ठेवण्यात येणार आहेत. विनापास व्यक्तीने विधान भवनात प्रवेश केल्यास त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निवास आणि इंटरनेट सुविधेवर भर सभापती आणि उपसभापतींनी रविभवन आणि नागभवन येथील कुटीरमधील व्यवस्थेची पाहणी केली. मंत्री आणि विधिमंडळ सदस्यांच्या निवासाची सोय, इंटरनेट आणि वायफाय सुविधा, आणि आरोग्य सेवेचा आढावा घेण्यात आला. विशेषतः महिला आमदारांची निवास व्यवस्था सुरक्षित आणि सुसज्ज असावी, तसेच राजकीय पक्षांच्या प्रतोदांच्या कार्यालयात वीज, लिफ्ट आणि अग्निशमन यंत्रणा सुरळीत असावी, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. विमानांची गैरसोय टाळण्यासाठी 'नोडल अधिकारी' सध्या विमान सेवेबाबत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, अधिवेशनासाठी येणाऱ्या कोणत्याही सदस्याला उशीर होऊ नये म्हणून एका स्वतंत्र 'नोडल अधिकाऱ्या'ची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, अधिवेशन संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी १४ डिसेंबरच्या रात्री आणि १५ डिसेंबरला विशेष रेल्वे सोडण्याची सूचना रेल्वे विभागाने मान्य केल्याची माहिती सभापती शिंदे यांनी दिली. हे ही वाचा... विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याची परंपरा पाळली:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला, भास्कर जाधवांसह वडेट्टीवारांचाही घेतला समाचार नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विरोधी पक्षांनी या चहापानच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाने परंपरा पाळत बहिष्कार टाकला असे म्हणत खोचक टोला लगावला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 8:59 am

टायर फुटल्याने कार कंटेनरवर आदळली‎:बायपासवरील घटना; दाेन जखमीत कारचालक गंभीर, तातडीने मुंबईला हलवले‎

प्रतिनिधी | जळगाव शहराच्या बाहेरून गेलेल्या पाळधी-तरसोद बायपासवर रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नशिराबादकडून पाळधीकडे जात असलेल्या इको कारचे टायर फुटून पलटी मारून ती समोरून येणाऱ्या कंटेनरवर आदळली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला. त्याला मुंबई येथे हलवण्यात आले. नशिराबाद येथून पाळधी येथे जात असलेली पांढऱ्या रंगाची इको कारचे (क्रमांक १९ ईजी १८७८) टायर आव्हाणे शिवारातून बायपासवरून जात असताना पुलाच्या पुढे अचानक फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून कार तीन पलट्या मारून विरुद्ध बाजूने पाळधीहून नशिराबादकडे जात असलेल्या डिझेल टँकरवर (सीजी ०७ बीआर ३७१२) आदळली. अपघातात यश रमेश शिंपी (वय २३, रा. पाळधी) व पल्लवी छाडीकर (वय २०, रा. मेहरूण) हे दोघे जखमी झाले. हे दोघे शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये -उर्वरित.पान४

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 8:56 am

दिंडोरीत राज्यमार्गावरच आठवडे बाजार:अपघाताच्या धाेक्याने नागरिकांचा जीव टांगणीला; बाजारासाठी जागेचे नियाेजन करण्याची मागणी‎

प्रतिनिधी | दिंडोरी शहरात दर रविवारी भरणारा आठवडे बाजार हा सरळ राज्यमार्गावरच भरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यामुळे शहराची लोकसंख्या वाढत असताना बाजारपेठेचे योग्य नियोजन न झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. रविवारच्या बाजाराच्या दिवशी राज्यमार्गावरच गर्दी उसळते आणि त्यातून वाहनेही जातात. एखादे वाहन अनियंत्रीत झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. बाजारासाठी सुरक्षित ठिकाण निश्चित करण्याचे नियोजन अद्याप झालेले नाही. राज्य आणि केंद्र सरकार नगर विकास योजनांमधून मोठा निधी उपलब्ध करून देतात; मात्र प्रत्यक्षात शहरात अपेक्षित विकास झालेला दिसत नाही. उलट वाढत्या अतिक्रमणामुळे बाजारपेठेतील रस्ते अधिक अरुंद होत आहेत. वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असतानाही शहरात पार्किंगची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे वाहनधारक रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या करतात आणि वाहतूक कोंडी वाढते. नागरिक आणि विविध संघटनांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. उड्डाणपुलाचा प्रस्ताव वाढती लोकसंख्या व मालवाहतूक गाड्यांच्या संख्येत वाढ झाली असून त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. सुरक्षित व अडथळ्याच्या प्रवासावर उपाययोजना म्हणून शहरातून जाणाऱ्या गुजरात राज्य मार्गावरील उड्डाणपुलाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पडून आहे.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 8:40 am

जायकवाडी वसाहत हटवण्याची कारवाई तूर्तास नाही, आज बैठकीत होईल निर्णय:शाळांचा विचार करून तीन महिने मुदत द्यावी, विद्यार्थ्यांची मागणी‎

प्रतिनिधी | पैठण जायकवाडी शासकीय वसाहतीतील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सोमवारपासून (दि. ८) होणार होती. मात्र ही कारवाई आता पुढे ढकलण्यात आली आहे. सोमवारी विभागीय आयुक्तांकडे पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतरच घरे पाडण्याबात निर्णय घेतला जाणार आहे. जायकवाडी वसाहत कालबाह्य झाली आहे. त्यामुळे ती हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण हटवण्याच्या हालचाली सुरू होत्या. यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार होता. सोमवारी ही कारवाई करण्याची अंतिम तारीख होती. मात्र आता बैठकीत नेमके काय होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या वसाहतीत शाहू विद्यालय आणि प्राथमिक शाळा आहे. येथे सुमारे ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अतिक्रमण हटवले तर त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे हे शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत तरी आम्हाला येथे राहू द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या वसाहतीबाबत आज होणाऱ्या बैठकीत नेमके काय ठरतेय, याकडे वसाहतीसह परिसरात राहणाऱ्या नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. विद्यार्थ्यांसाठी रस्त्यावर आंदोलन करू : महिला या वसाहतीत अनेक ज्येष्ठ नागरिक राहतात. आमचे संपूर्ण आयुष्य येथे गेले. आता कुठे जायचे, असा प्रश्न शेखलाल भोटकर यांनी उपस्थित केला. हे घर आमचे आधार होते, आता ते राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. जायकवाडी परिसरातील शेकडो महिला आणि विद्यार्थी एकत्र आले. प्रशासनाने पुढील तीन महिने तरी वेळ द्यावी, जेणेकरून मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही महिलांनी दिला.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 7:40 am

भावापाठोपाठ बहिणीचाही झाला मृत्यू, आई-वडिलांना भेटण्याचे स्वप्न अधुरेच:सुटीमुळे गावाकडे जाताना अपघात, करंजखेड्यात एकाचवेळी अंत्यसंस्कार‎

प्रतिनिधी | फुलंब्री आडगाव बुद्रुक गावाजवळ शनिवारी रात्री दुचाकीला पिकअपने जोरदार धडक दिल्याने भावाचा मृत्यू झाला होता, तर बहीण गंभीर जखमी होती. उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला असून, दोघांवरही करंजखेडा येथे एकाचवेळी रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघेही बहीण- भाऊ छत्रपती संभाजीनगर येथे नोकरीला होते. रविवारी सुटी असल्याने ते शनिवारी सायंकाळी गावाकडे दुचाकीवरून जात होते. गणेश संजय सुरडकर (३०) व निशा संजय सुरडकर (२५) अशी मृतांची नावे आहेत. निशा ही छत्रपती संभाजीनगर येथील निमाई हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. गणेश एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. रविवारी दोघांनाही सुटी होती. सायंकाळी सातच्या सुमारास ते दुचाकीने (एमएचक्यू ३२६०) गावाकडे निघाले होते. आडगाव बुद्रुकजवळ समोरून आलेल्या पिकअपने धडक दिली. दोघेही रस्त्यावर पडले. महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिकेचे चालक विजय देवमाळी यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि एक विवाहित मोठी बहीण असा परिवार आहे. पिकअप चालक फरार झाला आहे. या संदर्भात वडोद बाजार पोलिसांचा निष्काळजीपणा दिसून आला आहे. रात्री अपघात घडला असताना वडोद बाजार पोलिस रविवारी सकाळी अपघातस्थळी पोहोचले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 7:38 am

कन्नड पालिकेच्या जागेवर अतिक्रमण, अनेकांनी गाळे बांधून दिले किरायाने:बाळासाहेब पवार चौक, अण्णा भाऊ साठे चौक बनला मृत्यूचा सापळा

राजानंद सुरडकर | कन्नड शहरातील पिशोर नाका, बाळासाहेब पवार चौक, अण्णा भाऊ साठे चौक येथे चोहू बाजूंनी अतिक्रमण झाले आहे. अनेकांनी नगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण व बांधकाम करून ती जागा आता भाड्याने दिल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे एका दुकानदाराने तर ३० हजार रुपये भाडे असून मालकाला दिड लाख रुपये डिपॉझिट दिले असल्याचे सांगितले आहे. अण्णा भाऊ साठे चौकात महावीर स्तंभ उभारला आहे. त्याच्या भोवतीही अतिक्रमण करून अनेकांनी दुकाने थाटली आहेत. या स्तंभाला वंदन करण्यासाठीही आता तेथे जाता येत नाही. त्याला लागूनच लोकमान्य टिळक पुतळा आहे. महात्मा फुले पुतळा, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानाभोवतीही अतिक्रमण करून दुकाने थाटण्यात आली आहेत. त्यामुळे मुख्याधिकारी शहराच्या बाहेर असलेल्या पाणी शुध्दीकरण प्रकल्पातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानी राहण्यासाठी गेले आहेत. पिशोर नाका येथे नेहमी अपघात घडत आहेत. शहरातून कन्नड- धुळे, सुरत, छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड अशी प्रवाशी वाहतूक सुरू असते. याच ठिकाणी विविध बॅँका, विविध कार्यालये आहेत. त्यातच ऊसाच्या वाहनांची ये-जा सुरू असते. दररोज अपघात घडत आहे. या ठिकाणी पोलिस चौकी आहे. मात्र वाहतूक कोंडी थांबत नाही. वेळीच याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या संदर्भात क्षेत्रीय अधिकारी पवन परदेशी म्हणाले की, संबंधित अतिक्रमणधारकांना सोमवारी (दि. ८) नोटीस बजावणार आहे. प्रशांत देशपांडे, पालिका कार्यालयीन अधीक्षक Q अतिक्रमण धारकांवर काय कारवाई करणार? A. चौकशी करण्यात येईल. अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या दोन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कारणा दाखवा नोटीस बजावू. Q अतिक्रमणाकडे डोळेझाक कशी झाली? A. आताही सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभाग यांचेही सहकार्य घेऊन उचित कारवाई करण्यात येईल. Q पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी काय करणार? A. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देवून पुन्हा अतिक्रम करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. आम्ही न्यायालयात जाणार सिद्दीक चौक ते सिध्दीविनायक हॉटेलपर्यंत २८८ जणांनी अतिक्रमण केलेल्या जागेवर दुकाने थाटण्यात आली आहेत. अनेकांनी परस्पर बॉण्ड पेपरवर ते दुसऱ्या दुकानदारांना भाड्याने दिले आहेत. या संदर्भात मी छत्रपती संभाजीनगर न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. नंतर पालिकेने थोडीफार कारवाई केली होती. आता पुन्हा आम्ही न्यायालयात जाणार आहोत. -शेख पाशू, सामाजिक कार्यकर्ते

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 7:38 am

अंचलगाव शाळेला दिले बेंचेस:साई स्वाध्याय मंडळ, गोवा यांच्या सहकार्याने आकर्षक, आधुनिक आणि मजबूत बेंचेस

प्रतिनिधी | लोणी खुर्द वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंचलगाव येथे साई स्वाध्याय मंडळ, गोवा यांच्या सहकार्याने आकर्षक, आधुनिक आणि मजबूत बेंचेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुख्याध्यापक मल्हारी गोसावी यांनी देशपांडे (रत्नागिरी), उमाप (सोलापूर) आणि निचळ (बार्शी) यांचे आभार मानले. या उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर व केंद्रप्रमुख सुनील गंगवाल यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन करून शाळेच्या प्रगतीचे कौतुक केले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर कोकाटे, उपाध्यक्ष पांडुरंग वाघचौरे, पंजाबराव साळुंखे, प्रकाश नन्नावरे, योगेश कोळसे, संदीप कंकाळ, विष्णू जाधव, बाळू सुराशे, दादासाहेब निकम आदी उपस्थित होते. वैजापूर तालुक्यातील अंचलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला बेंचेस देण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 7:36 am

पैठण आगारातील वाहकाचा प्रामाणिकपणा:हरवलेली पर्स शोधून दिली महिला प्रवाशाला

प्रतिनिधी | पैठण पैठण ते छत्रपती संभाजीनगर या इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची पर्स हरवल्याची घटना घडली. पर्स हरवल्याचे लक्षात येताच त्या महिलेने बसमधील वाहक एकनाथ केदार यांना याबाबत माहिती दिली. प्रामाणिकपणाची आणि दक्षतेची जाणीव दाखवत केदार यांनी तत्काळ संपूर्ण बसची झाडाझडती घेतली. या तपासादरम्यान एका सीटच्या पाठीमागे ती हरवलेली पर्स सापडली. पर्समध्ये महागडा मोबाईल फोन आणि काही रोख रक्कम होती. पर्स सापडल्यानंतर वाहक एकनाथ केदार यांनी कोणताही विलंब न लावता ती पर्स पैठण बस स्थानकावर कार्यरत पोलीस हेड कॉन्स्टेबल खान आणि महिला होमगार्ड यांच्या उपस्थितीत संबंधित महिला प्रवाशाला सुपूर्द केली. आपली हरवलेली पर्स सुरक्षितपणे परत मिळाल्याने त्या महिलेने वाहक एकनाथ केदार यांचे तसेच सर्व एसटी कर्मचारी बांधवांचे आभार मानले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 7:35 am

सिल्लोडमध्ये कॅँडल मार्च:डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजन

प्रतिनिधी | सिल्लोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सिल्लोड शहरात शनिवारी कॅँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजता प्रियदर्शनी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराजवळ आंबेडकर प्रेमी एकत्र जमले. रात्री ७.३० वाजता कॅँडल मार्चला सुरुवात झाली. सराफा गल्ली मार्गे हा मार्च डॉ. आंबेडकर नगरातील पूर्णाकृती पुतळ्याजवळ पोहोचून संपला. प्रत्येकाने हाती घेतलेल्या मेणबत्त्या पुतळ्यासमोर लावण्यात आल्या. मेणबत्तीच्या उजेडात परिसर उजळून निघाला. पुतळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणे झाली. यावेळी जी. एस. आरके, संजय आरके, रोहित आरके, पवन भूईगळ, अभिषेक आरके, धम्मा आरके, शुभम आरके, सागर आरके, संगीता आरके, सुनिता आरके, निर्मला पाईकराव, जिजाबाई आरके, रत्नमाला भुईगळ, कल्याणी आरके, दगडाबाई उगले, अमिता आरके, सविता आरके उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 7:35 am

राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेत निखिल अंभोरे आला प्रथम:१९ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक पटकावला

प्रतिनिधी | खुलताबाद येथील राजीव गांधी आर्ट््स अ‍ॅण्ड सायन्स ज्युनिअर कॉलेजमधील निखिल अनिल अंभोरे याने राज्यस्तरीय शालेय स्क्वॅश स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक पटकावला. पुणे येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत त्याने दमदार खेळ करत विजेतेपद मिळवले. या यशामुळे खुलताबादचे नाव राज्यपातळीवर उजळले आहे. निखिलच्या या कामगिरीबद्दल नगर परिषद लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात सत्कार करण्यात आला. माजी उपसभापती दिनेश अंभोरे, आरपीआय तालुका अध्यक्ष फकिरराव भालेराव, ज्येष्ठ समाजसेवक कारभारी ढवळे, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक अप्पाराव काळे यांच्या हस्ते निखिलला गौरविण्यात आले. काशीनाथ तुपे, शंकर अंभोरे, कानडगावचे सरपंच योगेश साबळे, अण्णा जाधव, पंडित बनकर, अशोक तुपे, कैलास गिरी, शेख अजहर, शुभम मोरे आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 7:34 am

एकत्रित वाचन करून विद्यार्थ्यांनी केले डॉ. आंबेडकरांना अभिवादन:महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम‎

प्रतिनिधी | फुलंब्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फुलंब्री येथील न्यू ओअॅसिस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अभिवादनपर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. मुख्याध्यापिका करुणा दांडगे, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाषणातून डॉ. आंबेडकरांचे विचार मांडले. सर्व विद्यार्थ्यांनी दहा मिनिटे वाचन करून आगळी श्रद्धांजली वाहिली. राजेंद्र वाघ यांनी सांगितले की, डॉ. आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचित, गोरगरिबांसाठी समर्पित केले. ते आजही सर्व समाजाच्या विचारांत जिवंत आहेत. संविधानामुळे देशात एकोपा, शांतता आणि समता टिकून आहे, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला करुणा दांडगे, संघप्रिया पैठने, पूनम दांडगे, अश्विनी जाधव, स्वाती खोजे, स्वाती उंबरकर, इंदू जाधव, प्रियांका गोरे, भाग्यश्री खिल्लारे, पूनम दाभाडे, सपना सोनवणे, माधवराव पाटील, प्रकाश मोटे, सोमनाथ भालेराव, इमरान खान, स्वप्निल बडक, रुपेश ठाकूर, करण खंडारे, रोशन ओइम्बे यांच्यासह विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 7:34 am

जंजाळ यांनी त्यांना हवा असलेला पर्याय शोधावा:पालकमंत्री संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर

‘त्यांनी कुठला पर्याय आहे हे शोधावे. याबाबत मी योग्य वेळी सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. राजेंद्र जंजाळ यांना मी जिल्हाप्रमुख केले हे त्यांनी विसरू नये. या प्रश्नावर निर्णय झाल्यानंतर मी सविस्तर बोलणार आहे,’ असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिरसाट यांनी वापरून घेतले. आता निवडणूक संपल्याचे सांगत तुपे यांना जिल्हाप्रमुख पदाचा पर्याय निवडला जात असेल तर आपल्यालाही पर्याय असल्याचे जंजाळ यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होेते. त्यावर शिरसाट यांनी त्यांनी त्याचा पर्याय निवडावा, असे प्रत्युत्तर दिले. त्र्यंबक तुपे यांना जिल्हाप्रमुख करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, जंजाळ यांना मी जिल्हाप्रमुख केले होते हे त्यांनी विसरू नये, असेही पालकमंत्री म्हणाले. दरम्यान, या वादावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोडगा काढणार आहेत. यापूर्वी श्रीकांत शिंदे यांच्यासोबत जंजाळ यांनी भेट घेतली होती. मात्र, खासदार शिंदे लोकसभा अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संभाजीनगरची बैठक आयोजित केल्याचे सूत्रांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 6:58 am

दिव्य मराठी एक्स्पोज:बाण, बांबू अन् ब्लेडने बाळंतपण; सुरक्षित मातृत्व वाऱ्यावर नंदुरबारमध्ये पुरुष दायांच्या भरवशावर आजही हाेताहेत प्रसूती

राज्यातील माता मृत्यू, अर्भक मृत्यू, नवजात मृत्यू कमी व्हावेत म्हणून महाराष्ट्र शासनाने गेल्या दीड वर्षात ७७१ कोटींचा निधी खर्च केला. मात्र दुर्गम भागात ना योजना पोहोचल्या ना शासनाची आरोग्य यंत्रणा. त्यामुळे आजही बांबूच्या काड्या, बाणाची पाती आणि दाढीच्या ब्लेडने प्रसूती केल्या जात असल्याचा हा धक्कादायक रिपोर्ट. कहर म्हणजे वेदना कमी करण्यासाठी येथे बाळंतिणीला मोहाची दारू पाजली जाते. यामध्ये किती बाळं दगावली जातात आणि किती मातांचे मृत्यू लपवले जातात याची नोंदच होत नसल्याचं भीषण वास्तव चिमलखेडेचे नुरजी वसावे यांनी मांडलं. ६ कोटी खर्च करून बांधलेल्या जांगठी पीएचसीपासून अवघ्या ७ किलोमीटरवरील ही परिस्थिती. धडगाव आणि अक्कलकुव्यामध्ये शेकडाे बाळंतपणं करणारे वाहाऱ्या अन‌् हिंद्या बाई अडली की पहाडातून लोकं येतात. आतापर्यंत हजारो बायकांची सुटका केली. एकदा बाळ पोटात गेलं होतं. त्याचे ब्लेडने तुकडे करून काढले. बाई अडली असेल तर तिच्या खाटेखाली गरम शेगडी ठेवतो, तिला गरम पाणी प्यायला देतो. मंत्र म्हणतो ब्लेड आणि नाळ खड्ड्यात पुरतो. माझ्या वडलांपासून हे काम आम्ही करतो. मी आतापर्यंत शेकडो बायकांची बाळंतपणं केली. आता माझा मुलगाही करतो. तेल लावून तिची वार पाडतो. वेदना थांबत नसतील तर थोडी मोहाची दारू पाजतो. बोटीत घालून गुजरातच्या दवाखान्यात नेतात.बोट नसते तेव्हा मलाच घेऊन जातात.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 6:53 am

मांजा वापरणाऱ्या मुलांच्या पालकांवर गुन्हा नाेंदवणार:पोलिस आयुक्तांचे मांजाविराेधात कठाेर पाऊल

नायलॉन व चायनीज मांजाने होणारे अपघात आणि जीवितहानी लक्षात घेता शहर पोलिसांनी कठोर पाऊल उचलले. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी भा.ना.सु. संहितेच्या कलम १६३ अंतर्गत मांजावर पूर्णपणे बंदी घातली. नायलॉन मांजा बाळगणारे सज्ञान तसेच अल्पवयीन मुलांच्या पालकांवर थेट कलम ११० नुसार ‘सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न’ गुन्ह्याखाली कारवाई केली जाईल. दरम्यान, ४ डिसेंबर राेजी ३ वर्षांचा चिमुकला स्वरांशाचा गळा मांजामुळे चिरल्याप्रकरणी सिडकाे ठाण्यात अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल झाला आहे. यापुढे असेच गुन्हे दाखल करू, असा आयुक्तांनी इशारा दिला आहे. नायलॉन किंवा चायनीज मांजामुळे लहान मुले, दुचाकीस्वार आणि पादचारी जखमी होतात किंवा त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय मांजा विद्युत तारेवर पडून शॉर्टसर्किट आणि आगीच्या घटनाही घडतात. अनेक वन्य पक्ष्यांचा जीव मांजामुळे जातो. त्यामुळे नागरिकांच्या आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. ऑनलाइन मांजा विक्रीबंदीसाठी आज बैठक शहरात पतंग व मांजा विक्री दुकानदारांना पोलिसांनी सूचना केल्या आहेत. नायलॉन मांजा ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातूनही शहरात येतो. त्यावर बंदी आणण्यासाठी सोमवारी शहरातील सर्व कुरिअर चालकांची बैठक घेणार आहे. अशा पद्धतीचे पार्सल कोणी मागवले त्यांची नावे घेणार आहे, पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा दिला. वापरणाऱ्यांवर सक्त कारवाई नागरिकांनी जीवघेणा नायलॉन मांजा वापरू नये. या मांजामुळे कोणाचा जीव धोक्यात आल्यास संबंधित विक्रेता आणि वापरकर्त्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात येईल. जर वापरकर्ते अल्पवयीन मुले असल्यास त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. -प्रवीण पवार, पोलिस आयुक्त.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 6:37 am

अपघातात भावापाठोपाठ ‎जखमी बहिणीचाही मृत्यू‎:कन्नड तालुक्यातील करंजखेडा येथे अंत्यसंस्कार‎

आडगाव बुद्रुक गावाजवळ शनिवारी ‎‎रात्री दुचाकीला पिकअपने जोरदार‎धडक दिल्याने भावाचा मृत्यू झाला‎होता, तर बहीण गंभीर जखमी होती. ‎‎उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला ‎‎असून, दोघांवरही करंजखेडा येथे ‎‎एकाचवेळी रविवारी अंत्यसंस्कार ‎‎करण्यात आले.‎ दोघेही बहीण- भाऊ छत्रपती‎संभाजीनगर येथे नोकरीला होते.‎रविवारी सुटी असल्याने ते शनिवारी‎सायंकाळी गावाकडे दुचाकीवरून‎जात होते. गणेश संजय सुरडकर‎(३०) व निशा संजय सुरडकर (२५)‎अशी मृतांची नावे आहेत. निशा ही‎येथील निमाई‎हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत‎होती. गणेश एका खासगी कंपनीत‎नोकरी करत होता. रविवारी दोघांनाही‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎सुटी होती. सायंकाळी सातच्या‎सुमारास ते दुचाकीने (एमएचक्यू‎३२६०) गावाकडे निघाले होते.‎आडगाव बुद्रुकजवळ समोरून‎आलेल्या पिकअपने धडक दिली.‎दोघेही रस्त्यावर पडले. महात्मा फुले‎क्रीडा रुग्णवाहिकेचे चालक विजय‎देवमाळी यांनी त्यांना रुग्णालयात‎दाखल केले होते. त्यांच्या पश्चात‎आई-वडील आणि एक विवाहित‎मोठी बहीण असा परिवार आहे.‎घटनेमुळे हळहळ व्यक्त झाली.‎

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 6:33 am

रोहयोच्या कामांसाठी मजुरांचा ‎एकच फोटो; 5 कोटी हडपले‎:फुलंब्रीत 7 रोजगार सेवकांची सेवा समाप्त; 11 जणांना नोटीस‎

फुलंब्री तालुक्यातील रोजगार हमी योजनेंतर्गत‎३३ गावांतील ९६ कामांसाठी चक्क मजुरांचे‎एकच सामूहिक छायाचित्र वापरल्याचा ‎‎धक्कादायक प्रकार समोर आला आहे.‎त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी ‎‎अधिकारी, प्रशासक अंकित यांनी ७ रोजगार ‎‎सेवकांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले आहेत. ‎‎त्याचबरोबर २ सहायक कार्यक्रम अधिकारी,‎७ अभियंता आणि २ संगणक ऑपरेटर अशा‎११ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस‎बजावली आहे. या कामांमध्ये ५ कोटी १८ ‎‎लाखांची बिले उचलण्यात आली आहेत.‎तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मातोश्री‎पाणंद रस्ते योजनेच्या कामातील‎गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली‎आहे. फुलंब्री तालुक्यातील ३३ गावांतील ९६‎कामांसाठी मजुरांचा एकच सामूहिक फोटो,‎महिला मजुरांच्या जागेवर पुरुषांचे, तर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पुरुषांच्या जागेवर महिलांचे फोटो अपलोड‎करून ५ कोटी १८ लाख रुपयांची बिले‎उचलल्याचा प्रकार ६ व ७ जुलै रोजी‎उघडकीस आला होता. याची दखल घेऊन‎राज्याचे रोहयो आयुक्त, जिल्हाधिकारी आणि‎जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने दखल घेत‎चौकशीचे आदेश दिले.‎ प्रकरणाची दोन वेळा चौकशी‎जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी‎अंकित यांनी ७ जुलै रोजी यासाठी चौकशी‎समिती स्थापन केली हाेती. समितीने दिलेला‎पहिला अहवाल अपूर्ण असल्याने दुसऱ्यांदा‎चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.‎त्यानुसार दुसऱ्यांदा संबंधित समितीने अहवाल‎दिल्यानंतर सीईओ अंकित यांनी गटविकास‎अधिकाऱ्यांना संबंधित ग्रामपंचायतींमध्ये‎ग्रामसभा घेऊन ७ रोजगार सेवकांची सेवा‎समाप्त करण्याचे निर्देश दिले आहेत.‎

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 6:32 am

विद्यार्थ्यांच्या तणावमुक्तीसाठी ‘शनिवार 1 तास पॉज’ उपक्रमातून दिसला बदल:कलाकुसरीचा आनंद; नो मोबाइल गेम, नाे रिल्स

खेळाचे साहित्य आहे, पण मूल त्यात रमत नाही. मैदानी खेळांची जागा मोबाइल गेम्स, रील्सने घेतली आहे. याचा परिणाम मुलांच्या बालपणावर होतोय. बालपण हरवू नये, मैदानी खेळांची माहिती होण्याबरोबरच तणावमुक्त जीवन जगता यावे यासाठी पायोनियर्स सेकंडरी शाळेसह बालविकास विद्यामंिदरमध्ये सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास “शनिवार एक तास पॉज’ उपक्रम सुरू केला आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो आहे.आठवडाभर शाळेतील अभ्यास, गृहपाठ नंतर खासगी क्लास यात एका मशीनप्रमाणे विद्यार्थी जुंपले जात आहेत. वर्षभरापूर्वी मॅडमकडे काही तरी वेगळं शिकवा म्हणून विद्यार्थ्यांनी हट्ट केला. त्यातूनच तणाव मुक्तीसाठी एक दिवस एक तास पॉज हवा. म्हणून “शनिवार पॉज तास’ हा उपक्रम सुरु करण्यात आल्याचे शिक्षिका आशा मालटे यांनी सांगितले. यात शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आट्या पाट्या, धप्पा कुटी, लिंगोरचा, आंधळी कोशिंबर, आपडी थापडी असे खेळ शनिवारी रंगतात. यामुळे विद्यार्थ्यांचे मनोरंजन आणि तणावमुक्तीसाठी मदत होते. विद्यार्थ्यांचा स्वविकास अभ्यासक्रमात स्वविकास आणि विद्यार्थ्यांसोबत होत असलेल्या चर्चेतून तणावमुक्त कसे ठेवता येईल. यासाठी उपक्रम राबविला जातो. ज्यात जुने पारंपरिक खेळ विद्यार्थी खेळतात. यातूनही त्यांना अभ्यासातील गोष्टी शिकविल्या जातात. -आशा माल्टे, शिक्षिका शालेय विद्यार्थी खेळाने तणाव विसरले मी दहावीत आहे. बऱ्याच वेळा अभ्यासाचा ताण पडतो. भीती वाटते. या तणावातून मुक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना पॉज हवा. तो शनिवारच्या उपक्रमामुळे मिळतोय. ताण कमी होतो. आम्ही कधी शिवणकाम, विणकाम करतो, सारिपाट खेळतो. आमचे छंद या उपक्रमातील कलाकुसरीने जपतो. -संस्कृती शहरवाले, विद्यार्थिनी

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 6:29 am

संगीताने उपचार:संगीत थेरपीने चार महिन्यांत ताणतणावआणि नैराश्याने ग्रस्त 25 रुग्ण बरे झाले; ‘द म्युझिकल मुड्स’चा पुढाकार

महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर) येथे संगीत थेरपीने चार महिन्यांत २५ रुग्ण बरे केले आहेत. आजारपणामुळे या रुग्णांची जगण्याची इच्छाच संपली होती. सामाजिक कार्यकर्त्या सरोज आल्हाट आणि त्यांची टीम येथे मोफत संगीत थेरपी कार्यक्रम चालवत आहेत. “द म्युझिकल मूड्स” या संगीतकारांची एक टीम आजारी लोकांच्या घरी भेट देते आणि त्यांच्यासोबत बसून त्यांची आवडती गाणी, भक्तिगीते आणि गझल वाजवते. अजित सिंग आणि सुधीर मुळे गिटार वाजवतात, तर सिंथेसायझर आणि गायकांमध्ये अजिंक्य चौसाळकर, शिरीष लाड, ऑक्टोपॅड प्रशांत त्रिभुवन आणि अजय ससाणे यांचा समावेश आहे. सरोज स्पष्ट करतात, “९० वर्षांची आजी मोठ्या शस्त्रक्रियेनंतर अंथरुणाला खिळली होती. आम्ही तिची काळजी आणि संगीत थेरपी देत ​​होतो. आता ती वॉकरच्या मदतीने चालते. मनावर सखोल परिणाम संगीताच्या सुरांचा मानवी मनावर खोलवर परिणाम होतो. कर्करोग, पार्किन्सन, ताणतणाव आणि बोलण्यात अडचण असलेल्या रुग्णांसाठी संगीत चिकित्सा फायदेशीर आहे. - डॉ. सचिन आहेर, एमडी, जनरल, अहिल्यानगर वृद्धांची काळजी घेणे सरोज गार्डियन एंजल्स या संस्थेच्या माध्यमातून आजारी आणि वृद्धांची काळजी घेते. त्या दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना डायपर बदलण्यापासून ते त्यांना खायला घालण्यापर्यंत दैनंदिन कामांमध्ये मदत करतात. यातून त्यांची सेवा घडते.

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 6:26 am

प्रगतिशील शेतकरी:पारनेरमधील शेतकऱ्याने 8 एकरावर लावली 2500 चंदनाची झाडे, 15 वर्षांनी प्रति एकरी मिळेल कोट्यवधींचे उत्पन्न

चंदन शेती हा भारतातील शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारी प्रयोग ठरत आहे. चोरीची अधिक भीती असल्याने या शेतीकडे बहुतांश शेतकरी वळत नाहीत. परंतु पारनेर तालुक्यातील गोरेगावचे शेतकरी अंबादास काकडे यांनी २०१६ मध्ये आठ एकर क्षेत्रावर चंदनाचा प्रयोग यशस्वी केला. विशेष म्हणजे चंदनाची झाडे चोरी जाऊ नयेत यासाठी होस्ट म्हणून घायपाताचे कुंपण त्याला करण्यात आले आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून चंदनाला संरक्षित करण्याचा हा उत्तम पर्याय मानला जात आहे. चंदन शेतीचा प्रयोग म्हणजे पारंपरिक शेतीपलीकडे जाऊन दीर्घकालीन, उच्च उत्पन्न देणाऱ्या वनस्पतीची लागवड. चंदन हे स्वतंत्रपणे अन्न शोषण करत नाही, त्यासाठी 'होस्ट' झाडांची गरज असते. काकडे यांनी हा प्रयोग वैज्ञानिक पद्धतीने राबवला. प्रथम, आठ एकरावर सुमारे अडीच हजार चंदनाची रोपे लावली. दोन झाडांमधील अंतर १२ फूट आणि दोन ओळींमधील अंतर १० फूट ठेवले, ज्यामुळे झाडांची वाढ चांगली झाली. सुरुवातीला तूर आणि शेवगा यांसारखी लहान होस्ट दिली, तर दोन-तीन वर्षांनंतर कडूनिंब, बाभूळ, सीताफळ आणि जांभूळ यांसारखी कायमस्वरूपी होस्ट लावली. चंदनाला संरक्षणाची मोठी गरज असल्याने, काकडे यांनी कृत्रिम आणि नैसर्गिक संरक्षणाची व्यवस्था केली. प्रत्येक चंदनाच्या झाडाभोवती १० ते २० घायपाताची रोपे लावली. घायपात हे काटेरी वृक्ष असल्याने चोरांना झाडापर्यंत पोहोचणे कठीण होते – प्रथम घायपात काढण्यासाठी १०-१५ मिनिटे लागतात. यामुळे दुहेरी फायदा झाला. होस्ट मिळाला आणि सुरक्षा वाढली. हा प्रयोग राबवताना काकडे यांनी पारंपरिक पद्धतींचा अवलंब केला. एका एकरात ४०० ते ५०० झाडे पहिल्या चार-पाच वर्षांत शेणखत आणि हिरवळीचे खत भरपूर दिले, ज्यामुळे झाडांची वाढ वेगवान झाली. चंदनाला १० वर्षांनंतर गाभा तयार होतो आणि १५ वर्षांनंतर परिपक्व होतो. एका झाडापासून १०-१५ किलो गाभा मिळतो, ज्याचा २०२५ मधील दर १० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. यामुळे एका झाडापासून १ ते १.५ लाख रुपये उत्पन्न मिळते. एका एकरात ४०० ते ५०० झाडे लावता येतात, ज्यामुळे १५ वर्षांनंतर एकरी ४ कोटी रुपयांपर्यंत कमाई शक्य असल्याचे या क्षेत्रातील तज्ञ सांगतात. मध्यम जमिनीतही चंदन लागवड यशस्वी पूर्वी चंदनाची लागवड फक्त जंगलात नैसर्गिकरित्या होत असे आणि तस्करीमुळे हा दुर्मीळ वृक्ष बनला होता. मात्र, २०१५ मध्ये भारत सरकारने आणि २०१६ मध्ये महाराष्ट्र शासनाने चंदन शेतीला परवानगी दिली. यामुळे शेतकरी या मौल्यवान वनस्पतीकडे वळू लागले. महाराष्ट्रात चंदन शेतीला प्रति एकर २० हजार रुपयांचे अनुदान मिळते, मात्र फक्त १०-१५ शेतकऱ्यांनी ते घेतले आहे. काकडे यांच्या प्रयोगाने दाखवले की, मध्यम जमिनीतही चंदन यशस्वी होऊ शकते. शेतकरी मोबाईल नंबर - अंबादास काकडे, गोरेगाव (पारनेर) - 9822274727

दिव्यमराठी भास्कर 8 Dec 2025 5:00 am

१२३ कोल्हापुरी बंधा-यांतून गेटअभावी पाण्याचा विसर्ग

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हयात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतक-यांच रब्बी हंगामाची चिंता मिटली आहे. पावसाळा संपून दिड-दोन महिने होत आहेत. पाण्याचा प्रवाह कमी होत असल्याने जिल्हयातील २९५ पैकी १२३ कोल्हापूरी बंधा-यातून वाहते पाणी साठवून ठेवण्यासाठी गेट बसवणे आवश्यक आहे. त्यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे ८२ लाख ३१ हजार […] The post १२३ कोल्हापुरी बंधा-यांतून गेटअभावी पाण्याचा विसर्ग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 12:46 am

शेतक-यांचे गोठा, विहीर, कुशलचे बिल रखडले

जळकोट : प्रतिनिधी युपीए सरकारच्या काळामध्ये नरेगा (राष्ट्रीय रोजगार हमी योजना) सुरू झाली. यानंतर मागेल त्या मजुरास काम मिळू लागले. त्यामुळे याचा फायदा मजुरांना झाला परंतु रोजगार हमी योजनेकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर काम केलेल्या मजुरांना पैसे देण्यासाठी सरकारजवळ निधी उपलब्ध नाही, अशी ओरड आता सुरू झाली आहे. […] The post शेतक-यांचे गोठा, विहीर, कुशलचे बिल रखडले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 12:45 am

रेल्वे मार्गाचा प्रश्न अधिवेशनात मांडावा

जळकोट : प्रतिनिधी लातूर रोड जळकोट बोधन हा रेल्वेमार्ग सन २०१६ यावर्षी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंजूर केला होता. या रेल्वे मार्गास मंजूर होऊन तब्बल दहा वर्षे झाले आहेत, असे असले तरीही या रेल्वेमार्गाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात होऊ शकली नाही. उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे […] The post रेल्वे मार्गाचा प्रश्न अधिवेशनात मांडावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 12:44 am

गौरव खन्ना बिग बॉस १९ चा विजेता

मुंबई : प्रतिनिधी सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बिग बॉस शोच्या १९ व्या पर्वाचा विजेता गौरव खन्ना ठरला आहे तर फरहाना भट्ट हा उपविजेता ठरला. मराठमोळा प्रणीत मोरे हा तिस-या क्रमांकावर राहिला. गौरव खन्नाने ५० लाखांच्या बक्षिसासह बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केली. बिग बॉस १९ शो सलमान खानने होस्ट केला होता. चाहत्यांनी बिग बॉस १९ […] The post गौरव खन्ना बिग बॉस १९ चा विजेता appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 12:44 am

पूरग्रस्त शेतक-यांना उर्वरित मदत मिळणार

मिलिंद साठे राज्याचे नवे महाधिवक्ता नागपूर : प्रतिनिधी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रासाठी दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात अतिवृष्टीमुळे ज्या शेतक-यांचे मोठे नुकसान झाले, त्यांना मोठी मदत मिळणार आहे. पूरग्रस्त शेतक-यांसाठी उर्वरित रक्कम देण्याबाबतच्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली. यामुळे १० लाख ६७ शेतक-यांना मोठा दिलासा […] The post पूरग्रस्त शेतक-यांना उर्वरित मदत मिळणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 8 Dec 2025 12:37 am

तीन कवितासंग्रहांना अक्षर क्रांती पुरस्कार जाहीर:अमरावतीच्या 'फुलकई'सह 27 डिसेंबरला नागपुरात वितरण

अक्षर क्रांती फाऊंडेशनने जाहीर केलेल्या प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांमध्ये यावर्षी तीन कवितासंग्रहांना सन्मानित करण्यात आले आहे. यात अमरावतीच्या डॉ. मंदा नांदुरकर यांच्या 'फुलकई' या बालकवितासंग्रहाचा समावेश आहे. या पुरस्कारांचे वितरण २७ डिसेंबर रोजी नागपूर येथील रेशीमबाग येथे आयोजित अक्षरक्रांती जिल्हा साहित्य महोत्सवात केले जाईल. डॉ. मंदा नांदुरकर यांच्या 'फुलकई' या बालकवितासंग्रहासह अकोल्याचे कवी दिनेश गावंडे यांच्या 'लख्ख कंदीलाच्या उजेडात' आणि नाशिकचे कवी किरण भावसार (सिन्नर) यांच्या 'घामाचे संदर्भ' या कवितासंग्रहांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अक्षरक्रांती साहित्य पुरस्कार दरवर्षी दर्जेदार कवितासंग्रहांना दिला जातो. कोरोनामुळे वितरण थांबल्याने, जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२४ पर्यंत प्रकाशित झालेले सुमारे २५० कवितासंग्रह या पुरस्कारासाठी मागवण्यात आले होते. त्यातून या तीन कवितासंग्रहांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सोहळा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र शासन अनुदानित दोन दिवसीय 'अक्षरक्रांती जिल्हा साहित्य महोत्सवा'चा भाग आहे. हा महोत्सव महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग, नागपूर येथील सभागृहात सकाळी १० वाजता सुरू होईल. अक्षरक्रांती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शंकर घोरसे आणि कला गौरव संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संगीता बानाईत यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ साहित्यिक वसंत वाहोकर महोत्सवाचे अध्यक्ष असतील, तर वनराई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. विदर्भ साहित्य संघांचे अध्यक्ष प्रदीप दाते यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य पत्रकार श्रीपाद अपराजित, माजी संमेलनाध्यक्ष सुरेश पाचकवडे आणि जपानमधील प्रसिद्ध कादंबरीकार उर्मिला देवेन टोकियो उपस्थित राहणार आहेत. समारोपीय सत्राचे अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य मंडळाचे सदस्य डॉ. गजानन नारे असतील. तसेच, डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. तीर्थराज कापगते, अशोक मानकर आणि अबुधाबी येथील प्रसिद्ध कवी मनोज भारशंकर यांचीही प्रमुख उपस्थिती असेल. अक्षरक्रांती फाऊंडेशनतर्फे सध्या केवळ उत्कृष्ट कवितासंग्रहांना पुरस्कार दिला जातो. परंतु, पुढील वर्षापासून कविता संग्रहांसोबतच इतर साहित्य प्रकारांनाही पुरस्कार योजनेत समाविष्ट करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे आयोजकांनी कळवले आहे. सध्या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ असे आहे.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 11:00 pm

'वारकरी' नाटक राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत:अमरावती केंद्रातून प्रथम पारितोषिक जिंकले, 'दशानन'लाही संधी

६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अमरावती केंद्रातून अंबापेठ क्लबच्या ॲड. प्रशांत देशपांडे निर्मित ‘वारकरी’ या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावले आहे. तसेच, सरकार बहुउद्देशीय संस्थेच्या ‘दशानन’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे. या यशांमुळे दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी हा निकाल घोषित केला. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पंचशील बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्था, परतवाडाच्या ‘उत्तरायण’ नाटकाला तृतीय पारितोषिक मिळाले. वैयक्तिक पुरस्कारांमध्ये, दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक वैभव देशमुख (दशानन), द्वितीय पारितोषिक डॉ. चंद्रकांत शिंदे (वारकरी) आणि तृतीय पारितोषिक गणेश वानखेडे (उत्तरायण) यांना प्रदान करण्यात आले. प्रकाश योजनेचे प्रथम पारितोषिक अनुप बहाड (दशानन), द्वितीय पारितोषिक दीपक नांदगांवकर (जेंडर आयडेंटीटी) आणि तृतीय पारितोषिक गायत्री गुडधे (वारकरी) यांना मिळाले. नेपथ्यासाठी प्रथम पारितोषिक ॲड. प्रशांत देशपांडे (वारकरी), द्वितीय पारितोषिक शुभम ठाकरे (दशानन) आणि तृतीय पारितोषिक संजय काळे (उत्तरायण) यांना जाहीर झाले. रंगभूषेचे प्रथम पारितोषिक निलेश ददगाळ (दशानन), द्वितीय प्रतिक्षा गडकरी (वारकरी) आणि तृतीय अभिजित देशमुख (श्वेतवर्णी शामकर्णी) यांना मिळाले. पार्श्वसंगीतासाठी प्रथम पारितोषिक प्रथमेश पुरभे (वारकरी), द्वितीय अंकित शर्मा (दशानन) आणि तृतीय वैभव ओगले (उत्तरायण) यांना देण्यात आले. वेशभूषेचे प्रथम पारितोषिक ॲड. श्रध्दा पाटेकर (वारकरी), द्वितीय अभिजित झाडे (दशानन) आणि तृतीय किर्ती देशमुख (श्वेतवर्णी शामकर्णी) यांना मिळाले. उत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक (पुरुष) वैभव देशमुख (दशानन) आणि (स्त्री) रिया गिते (वारकरी) यांना मिळाले. या स्पर्धेत एकूण १४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते, ज्यांची निवड १४ ते २० नोव्हेंबर दरम्यान सादर झालेल्या २५ नाटकांतून करण्यात आली. छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह, अमरावती येथे ही स्पर्धा पार पडली. परीक्षक म्हणून श्री. मुकुंद महाजन, श्री. गुरु वठारे आणि श्रीमती विजया कुडव यांनी काम पाहिले. विशाल फाटे यांनी अमरावती केंद्रावर समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली. पूर्वीचे समन्वयक तथा अमरावती जिल्हा नाट्य परिषदेचे अध्यक्ष ॲड. चंद्रशेखर डोरले यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून त्यांना अंतिम स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 10:30 pm

मुंबई मेट्रोचा खोळंबा:तांत्रिक बिघाडामुळे मार्गिका 2 अ आणि 7 ची सेवा विस्कळीत, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

रविवारी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांना संध्याकाळी मनस्तापाला सामोरे जावे लागले. तांत्रिक बिघाड उद्भवल्याने मुंबई मेट्रोच्या मार्गिका 2 अ आणि 7 वरील सेवा डीएन नगर ते गुंदवली स्थानकादरम्यान विस्कळीत झाली. गेल्या दीड तासांपासून मेट्रो सेवा ठप्प असल्याने स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. रविवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ऐन गर्दीच्या वेळी मेट्रो सेवा कोलमडल्याने प्रवाशांचे हाल झाले. या संदर्भात मुंबई मेट्रो प्रशासनाने सोशल मीडियाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाने म्हटले आहे की, काही तात्पुरत्या तांत्रिक अडचणीमुळे मेट्रो मार्गिका 2 अ आणि 7 वरील सेवांमध्ये विलंब होत आहे. प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. मेट्रो सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आमची टीम युद्धपातळीवर कार्यरत आहे. मेट्रो प्रशासनाने हा तांत्रिक बिघाड लहान स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट केले असले, तरी प्रवाशांना मात्र वेगळाच अनुभव आला. जर बिघाड किरकोळ असता, तर तब्बल दीड तास सेवा खंडित राहिली नसती, असा सूर प्रवाशांमधून उमटत आहे. सुट्टीच्या दिवशी सहकुटुंब बाहेर पडलेल्या नागरिकांना आणि चाकरमान्यांना या अनपेक्षित गोंधळाचा मोठा फटका बसला आहे. सेवा पूर्ववत करण्यासाठी तांत्रिक पथक प्रयत्न करत असले तरी स्थानकावरील गर्दीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 9:59 pm

विरोधी पक्षनेते पद नाकारणारे महायुती सरकार संविधानविरोधी

नागपूर : प्रतिनिधी राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद नाकारणारे सरकार लोकशाहीविरोधी आहे. इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहे विरोधी पक्षनेत्यांविना आहेत. विरोधकांचा आवाज दाबून सरकारला आपले पाप लपवता येणार नाही. शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी साठी दिलेली तुटपुंजी मदत यावर सरकारला जाब द्यावाच लागेल असे ठणकावत विरोधी पक्षाने आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला. सोमवारपासून विधीमंडळाचे […] The post विरोधी पक्षनेते पद नाकारणारे महायुती सरकार संविधानविरोधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 7 Dec 2025 9:16 pm

शिरजगाव मोझरीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, श्वानांच्या पिलांची शिकार:भीतीमुळे शेतीची कामे ठप्प, वनविभागाकडून ड्रोनद्वारे शोध सुरू

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी गावात बिबट्याच्या हल्ल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोळवण परिसरातील राजेंद्र कडू यांच्या शेतात बिबट्याने कुत्र्याच्या पिलांची शिकार केली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतीची कामे ठप्प झाली आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते, गेल्या आठ दिवसांपासून शिरजगाव मोझरी गावाच्या सभोवताल बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्याच्या या वावरामुळे रब्बी पिकांची पेरणी, कापसाचा वेचा आणि पिकांचे ओलीत थांबले आहे, ज्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आज सकाळी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान या भागात बिबट्याचे ठसे आढळून आले. त्यानंतर काही तरुणांच्या आग्रहाखातर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ड्रोनच्या मदतीने बिबट्याचा शोध सुरू केला. यावेळी वनपाल खेडकर, वनरक्षक जांभे व गवई, वनमजूर गजानन राऊत यांच्यासह स्थानिक शेतकरी व गावकरी उपस्थित होते. रविवार दुपारी १२ वाजताच्या सुमारास कोळवण परिसर, शिवणगाव परिसर, वऱ्हा पाणंद रस्ता परिसर आणि गावाच्या सभोवताल बिबट्याची पाहणी करण्यात आली. मात्र, बिबट कोठेही आढळून आला नाही, त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वनविभागाच्या अंदाजानुसार, बिबट्या धोत्रा, सालोरा शिवारात गेल्याची शक्यता आहे. या घटनेनंतर प्रशांत कांबळे यांनी चांदूर रेल्वे वनविभागाच्या आरएफओ शीतल धुते यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी धोत्रा, सालोरा शिवारात तातडीने शोधमोहीम राबवण्याची मागणी केली. त्यानंतर दुपारी ३ वाजताच वनकर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पाहणी करण्याचे आदेश वनाधिकाऱ्यांनी दिले. बिबट्याच्या वावराची मालिका ३० नोव्हेंबर रोजी रात्री कोळवण परिसरात किसनराव हटवार यांच्या मुलीला बिबट्या दिसल्यापासून सुरू झाली. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी सकाळी रमेश हिवराळे यांना वऱ्हा पाणंद रस्त्यावरील नदीवर बिबट दिसला. आज सकाळी अविनाश लंगडे आणि मधुकरराव ढोबळे यांनाही शिवणगाव शिवारात बिबट दिसल्यानंतर श्वानांच्या पिलांची शिकार उघड झाली.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 9:13 pm

पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाचा अमृत महोत्सव सोहळा संपन्न:माजी विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांची उपस्थिती; विविध उपक्रमांचे आयोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाचा अमृत महोत्सव सोहळा ७ डिसेंबर २०२५ रोजी भूशास्त्र विभागाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या सोहळ्याला देशभरातून सुमारे ३५० आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात चहापान आणि 'अमृत महोत्सवी वर्ष' बिल्ला वितरणाने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. विद्यापीठ गीत आणि महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ झाला. महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन विभागाचे माजी सचिव आणि भूगोल विभागाचे १९६५-१९६७ बॅचचे विद्यार्थी शिवाजीराव देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले, तर प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. अमित धोर्डे यांनी स्वागतपर भाषण करताना विभागात कार्यरत राहिलेल्या दिवंगत शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. कुलगुरूंच्या हस्ते विभागाच्या समृद्ध परंपरेत योगदान देणाऱ्या २० माजी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अमृत महोत्सवाचा लोगो, या वर्षात होणाऱ्या परिषदेची पुस्तिका आणि प्रा. सुधाकर परदेशी यांच्या भूस्खलनावरील पुस्तकाचे प्रकाशनही झाले. या सोहळ्यात आयआयटी मुंबईचे मोहम्मद कासिम खान, जे FOSSEE GIS (MoS) चे राष्ट्रीय समन्वयक आहेत, यांनी भूगोल विभागासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागाची 'ओपन-सोर्स जिओस्पेशियल नॉलेज पार्टनर' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानुसार, भूस्थानिक शिक्षण, संशोधन आणि जनसंपर्क उपक्रमांच्या समन्वयासाठी विभाग प्रमुख नोडल युनिट म्हणून कार्य करेल. फोसी GIS प्रकल्पातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे विद्यापीठाला 'सर्वोत्तम विद्यापीठ पुरस्कार' देखील प्रदान करण्यात आला. या घोषणेमुळे उपस्थितांमध्ये आनंद व अभिमानाची भावना व्यक्त झाली. प्रमुख पाहुणे शिवाजीराव देशमुख यांनी भूगोल विभागाच्या ७५ वर्षांच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरवपूर्ण आढावा घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी विभागाच्या विकासासंदर्भात आपले विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. डॉ. गोसावी यांनी विभागासोबतचे आपले अनुभव कथन केले. दुपारचे सत्र डॉ. सपना ससाणे यांच्या सूत्रसंचालनाखाली सुरू झाले. प्रा. अमित धोर्डे यांनी विभागातील विद्यमान शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ओळख करून दिली. प्रा. रवींद्र जायभाय यांनी डिजिटल सादरीकरणाद्वारे विभागाच्या ७५ वर्षांच्या आठवणी प्रभावीपणे मांडल्या. प्रा. सुधाकर परदेशी यांनी जिओइन्फॉर्मेटिक्स शाखेची प्रगती आणि विभागातील साधनसंपत्तीची माहिती दिली.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 9:12 pm

पुणे मनपा निवडणूक मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात:भाजप तयार करणार वचननामा, पुणेकरांशी साधणार संवाद

आगामी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष (भाजप) वचननामा तयार करणार आहे. यासाठी पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन पुणेकरांशी संवाद साधतील आणि त्यांच्या अपेक्षा जाणून घेतील, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी दिली. यावेळी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घोषणा केली की, ही निवडणूक मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात लढवली जाईल. महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, रविवारी मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहर कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्राचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, ज्येष्ठ नेते दिलीप कांबळे, खासदार मेधा कुलकर्णी, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर, आमदार भिमराव तापकीर, आमदार सुनिल कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार योगेश टिळेकर आणि श्रीनाथ भिमाले यांच्यासह विस्तारित कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. मोहोळ यांनी सांगितले की, ही बैठक महापालिका निवडणुकांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नियमित प्रक्रियेचा भाग म्हणून घेण्यात आली. भाजपची यंत्रणा वर्षभर कार्यरत असते, परंतु निवडणुकीच्या दृष्टीने शहर पातळीवर पुढील नियोजन या बैठकीत करण्यात आले. पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी संख्या लक्षात घेता इच्छुकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून दोन दिवस शहर कार्यालयात अर्ज मागवले जातील. हे अर्ज प्रदेश कार्यालयाकडे पाठवले जातील आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार कोअर कमिटी पुढील निर्णय घेईल. भाजपचा वचननामा तयार करण्याचे कामही सुरू झाले आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात कार्यकर्ते घरोघरी जाऊन पुणेकरांशी चर्चा करतील. पुढील २५-५० वर्षांतील पुण्याचे भवितव्य आणि विकासाबाबत पुणेकरांच्या अपेक्षा जाणून घेतल्या जातील. यात सर्वसामान्यांच्या अपेक्षांबरोबरच विविध विषयातील तज्ज्ञांशीही संवाद साधून त्यांचे मत विचारात घेतले जाईल. या माहितीवर आधारित वचननामा तयार केला जाईल आणि पुढील पाच वर्षांत त्याची १०० टक्के अंमलबजावणी केली जाईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले. याशिवाय, शहराध्यक्षांच्या स्तरावर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह प्रत्येक प्रभागात संघटनात्मक बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या जातील. महायुतीबाबत बोलताना मोहोळ म्हणाले की, आम्ही महायुतीचे घटक आहोत. 'युतीधर्म' पाळा, अशी भूमिका आमच्या नेत्यांनी मांडली आहे. स्थानिक परिस्थिती पाहून सामंजस्याने जिथे शक्य असेल तिथे महायुती म्हणून निवडणूक लढू. जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढाई होईल. वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल, असे मोहोळ यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 7 Dec 2025 9:02 pm