वसई-विरार महानगरपालिका निवडणुक : महायुतीत अंतर्गत तणाव
मुंबई : प्रतिनिधी वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येऊ लागला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट भाजपवर गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे. राजाराम मुळीक यांनी भाजपवर थेट विश्वासघाताचा आरोप करताना सांगितले की, निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या नावाखाली सातत्याने बैठका होत होत्या. या […] The post वसई-विरार महानगरपालिका निवडणुक : महायुतीत अंतर्गत तणाव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विद्येचे माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात आज उत्तर प्रदेश आणि बिहारमधील राजकारणाची आठवण करून देणारे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. कुख्यात 'आंदेकर टोळी'चा म्होरक्या आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गुंड बंडू आंदेकर याने आज पोलिसांच्या कडक बंदोबस्तात, हातात बेड्या आणि गळ्यात दोरखंड असलेल्या स्थितीत महापालिका निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष न्यायालयाने दिलेल्या सशर्त परवानगीनंतर आंदेकर कुटुंबातील तिघांनी तुरुंगातून बाहेर येत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या येरवडा कारागृहात असलेला बंडू आंदेकर आज दुपारी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात दाखल झाला. पोलिसांनी त्याला दोरखंडाने जखडलेले होते आणि सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या चेहऱ्याला काळे कापड बांधले होते. मात्र, अर्ज भरण्यासाठी कार्यालयात जाताच आंदेकरने 'व्हिक्ट्री साईन' दाखवत घोषणाबाजी सुरू केली. नेकी का काम, आंदेकर का नाम, अशा घोषणा देत त्याने परिसर दणाणून सोडला. बघा, मला लोकशाहीत कसं आणलंय. मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही. आंदेकरांना मत म्हणजे विकासाला मत, असे ओरडून तो उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. आंदेकर कुटुंबातील तिघांनी भरला अर्ज केवळ बंडू आंदेकरच नव्हे, तर त्याच्या कुटुंबातील आणखी दोन महिलांनीही तुरुंगातूनच अर्ज भरले आहेत. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हेदेखील 5 कोटी 40 लाखांच्या खंडणी प्रकरणात जेलमध्ये आहेत. या दोघींनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. बंडू आंदेकर हा प्रभाग क्रमांक 24 मधून अपक्ष किंवा राष्ट्रवादीकडून लढण्याची शक्यता आहे. विशेष न्यायालयाने या तिघांनाही आगामी महापालिका निवडणुकीत उमदेवारी अर्ज भरण्यास परवानगी दिली. मात्र बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, भाषण, घोषणाबाजी करायला कोर्टाने मनाई केली. असे असतानाही बंडू आंदेकरने केलेल्या घोषणाबाजीमुळे न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन झाले का? याची आता चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार गटाची 'सावध' साथ? दरम्यान, आंदेकर कुटुंबातील सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा आयुष कोमकर हत्याकांडाशी थेट संबंध नसल्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी म्हटले. त्यामुळे या दोघींनाही राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. मात्र, आरोपी बंडू आंदेकरला 'घड्याळ' मिळणार की त्याला अपक्ष लढावे लागणार, यावर अद्याप सस्पेन्स कायम आहे. आंदेकर कुटुंब पुण्याच्या प्रभाग क्रमांक 22, 23 आणि 24 मधून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. पुणेकरांच्या काळजात धडधड एकेकाळी टोळीयुद्धामुळे हादरलेल्या पुण्यात आता थेट गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक तुरुंगातून निवडणूक लढवत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांच्या दोरखंडात जखडलेला उमेदवार जेव्हा विकासाच्या गप्पा मारतो, तेव्हा ती लोकशाहीची थट्टा आहे की मजबुरी? असा सवाल आता पुणेकर विचारत आहेत.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोलापूर महापालिकेसाठी जागावाटपाची घोषणा केली आहे. त्यात काँग्रेस सर्वाधिक 45 जागांवर लढणार असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 30 जागांवर लढणार आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष व माकपलाही सन्मानकारक जागा देण्यात आल्या आहेत. काँग्रेसने आपल्या 20 उमेदवारांच्या नावाची घोषणाही केली आहे. 102 सदस्यीय सोलापूर महापालिकेत सत्ताधारी महायुती विरुद्ध विरोधी बाकावरील महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीने जागावाटपाचा मुद्दा निकाली काढून महायुतीवर आघाडी घेतली आहे. मविआच्या जागावाटपानुसार, काँग्रेस 45, ठाकरे गट 30, शरद पवार गट 20 व माकप 7 जागांवर निवडणूक लढणार आहेत. महाविकास आघाडी 4 जानेवारी रोजी आमच्या प्रचाराचा नारळ फोडेल. खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, नरसय्या आडम मास्तर, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदी नेते प्रचाराच्या शुभारंभाला उपस्थित राहतील, असे ठाकरे गटाचे शहरप्रमुख अजय दासरी यांनी सांगितले. जागावाटपावर ठाकरे गटात किरकोळ नाराजी महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक जागा आल्यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. ठाकरे गटाचे उत्तर विधानसभा प्रमुख महेश धाराशिवकर यांनी या प्रकरणी अजय दासरी यांना जाब विचारला. यावेळी त्यांच्यात काहीशी बाचाबाचीही झाली. ही बाचाबाची एकमेकांना पाहून घेण्यापर्यंत गेली. याामुळे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे ठाकरे गटाला निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे. वंचितचा महाविकास आघाडीला प्रतिसाद नाही महाविकास आघाडीने सोलापुरात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीलाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वंचितसह आम आदमी पक्षालाही सोबत येण्याचे आवाहन केले. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. माजी आमदार नरसय्या आडम यांनीही ही माहिती दिली. ठाकरे गट मनसेला आपल्या कोट्यातून जागा देणार ठाकरे गटाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांनी यावेळी आपला पक्ष आपल्या कोट्यातून मनसेला काही जागा सोडणार असल्याचे स्पष्ट केले. जागावाटप करताना आम्ही सर्वच पक्ष दोन-दोन पाऊले मागे आलो आहोत. निवडून येणे हा एकमेव निकष या प्रकरणी आम्ही ठरवला आहे. मनसेने 5 जागांची मागणी केली आहे. आम्ही आमच्या कोट्यातून त्यांना जागा देऊ. आम्ही हा प्रश्न समन्वयाने निकाली काढू. निवडणुकीत आघाडी म्हटले की काही वाद होतातच. त्यावर तोडगा काढला जाईल, असे त्या म्हणाल्या. काँग्रेसचे 20 उमेदवार जाहीर दुसरीकडे, नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. आता पक्ष महानगरपालिका निवडणुकांसाठी जय्यत तयारीनिशी उतरत आहे. त्यानुसार, आज काँग्रेसने सोलापूर महापालिकेसाठी 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दोन दिवसापूर्वी मुंबईत राज्य निवड मंडळाच्या बैठकीत हे उमेदवार निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार सोलापूरसाठी ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयाने दिली आहे.
सलमान खानचे ६० व्या वर्षात पदार्पण
मुंबई : प्रतिनिधी सलमान खान नावच पुरेसे आहे. सलमानचे नाव जिभेवर येताच मनात अनेक गोष्टींचा विचार सुरू होतो. सलमान हिंदी सिनेसृष्टीतील सर्वांत यशस्वी सुपरस्टारपैकी एक आहे. २७ डिसेंबर रोजी ‘दबंग’ खान आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. हिंदी सिनेसृष्टीत सलमान खानचे चांगलेच वर्चस्व आहे. सलमान ज्या व्यक्तीवर आपला हात ठेवतो, त्या व्यक्तीचे नशीब उजळते, […] The post सलमान खानचे ६० व्या वर्षात पदार्पण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी लढणा-या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सततचे दौरे आणि दगदगीमुळे त्यांना शारीरिक थकवा जाणवत होता, मात्र आज ताप भरल्याने त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज भासली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील यांना गेल्या काही […] The post मनोज जरांगे रुग्णालयात दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा धुरळा आता अधिकच उडू लागला आहे. एका बाजूला ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) युतीच्या माध्यमातून मैदानात उतरले असताना, दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत 'स्वबळावर' लढण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आज संध्याकाळपर्यंत आपल्या 100 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असून, यामध्ये माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश आहे. आमदार सना मलिक यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. मुंबई महापालिकेच्या रणांगणात नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तिघे जण उतरणार आहेत. नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक हे प्रभाग क्रमांक 165 मधून नशिब आजमावणार आहेत. कप्तान मलिक यांच्या सून बुशरा मलिक या प्रभाग क्रमांक 170 मधून निवडणूक लढणार आहेत. तर नवाब मलिक यांची बहीण सईदा खान प्रभाग क्रमांक 168 मधून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. सईदा खान या माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत. विशेष म्हणजे, कप्तान मलिक यांचा जुना प्रभाग (170) यंदा महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या सुनेला (बुशरा मलिक) त्या प्रभागातून संधी दिली असून, स्वतः प्रभाग 165 मधून निवडणूक लढवणार आहेत. घराणेशाही नाही, तर कार्यकर्त्यांचा आग्रह - सना मलिक एकाच कुटुंबातील तीन जणांना उमेदवारी मिळाल्याबाबत स्पष्टीकरण देताना सना मलिक म्हणाल्या, माझ्या वडिलांची (नवाब मलिक) भूमिका स्पष्ट होती की, त्यांच्या विधानसभा मतदारसंघात कुटुंबातील कोणालाही संधी द्यायची नाही. मात्र, 165 प्रभागातील कार्यकर्त्यांचा आणि लोकांचा आग्रह होता की कुटुंबातील सदस्यानेच नेतृत्व करावे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही मुंबईत जवळपास 100 जागांवर उमेदवार उभे करणार आहोत आणि आमची कामगिरी नक्कीच चांगली असेल. एनसीपीकडून सर्वच समाजाच्या उमेदवारांना संधी सना मलिक म्हणाल्या, आम्ही मुस्लीम लोकांना उमेदवारी देत नाही, संध्याकाळी यादी आली की तुम्हाला लक्षात येईल, आम्ही सर्व समाजाच्या लोकांना संधी दिली आहे. शरद पवार गटासोबतच्या युतीबाबत काय झाले? असे विचारले असता, आम्ही स्थानिक पातळीवर चर्चा करत होतो, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांसोबत युतीबाबत काय झाले माहिती नाही, असे सना मलिक यांनी स्पष्ट केले. राजकीय पेच वाढणार? राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीमधील जागावाटपाच्या गणितावर याचा काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. विशेषतः मानखुर्द-शिवाजीनगर आणि अणुशक्ती नगर परिसरातील मलिकांच्या प्रभावाखालील जागांवर राष्ट्रवादीची ताकद मोठी असल्याने अन्य पक्षांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
आगामी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने (भाजप आणि शिवसेना शिंदे गट) मोठी आघाडी घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटपाचा तिढा अखेर आज सुटला असून, बहुतांश जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. खासदार भागवत कराड यांच्या निवासस्थानी आज तब्बल पाच तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत या जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड यांच्यासह भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रत्येक वॉर्डातील ताकद आणि उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, रस्सीखेच असलेल्या जागांवरही आता सामंजस्याने तोडगा काढण्यात आला आहे. याद्या वरिष्ठांना पाठवल्या - राजेंद्र जंजाळ या बैठकीनंतर शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, शिवसेना-भाजप नैसर्गिक युतीमध्येच छत्रपती संभाजीनगर महापालिका लढवण्याचे वरिष्ठांचे आदेश होते. त्या आदेशाच्यादृष्टीने आम्ही तीन-चार बैठका केलेल्या आहेत. आज भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांच्या संभाव्य वॉर्डाची आणि उमेदवारांच्या याद्या बनवण्यात आल्या आहेत. दोन्ही याद्या वरिष्ठांकडे पाठवल्या जातील. आज संध्याकाळपर्यंत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडून दोन्ही यांद्यावर मंजुरी देतील आणि त्यानंतर महायुतीची एकत्रित बैठक घेऊन जागावाटप जाहीर केले जाईल. इच्छुकांची उत्सुकता शिगेला महायुतीचे जागावाटप अंतिम झाल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय मैदानात निवडणुकीचा ज्वर अधिकच चढणार आहे. शिवसेनेच्या 'बाण' आणि भाजपच्या 'कमळ' चिन्हावर कोण-कोणते उमेदवार रिंगणात उतरतात, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. हे ही वाचा... पुण्यात राष्ट्रवादीची युती तुटली:165 जागांसाठी महाविकासचा फॉर्म्युला, पण वंचितच्या मागणीने पेच; शिंदे-अजित पवार जवळ येणार? पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचं प्राथमिक सूत्र ठरवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेत एकूण 165 जागा असून, त्यापैकी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांनी प्रत्येकी 50 जागांवर निवडणूक लढवण्यावर तिन्ही पक्षांमध्ये प्राथमिक एकमत झालं आहे. उरलेल्या 15 जागा या वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पक्षासाठी खुल्या ठेवण्याची तयारी या तिन्ही पक्षांनी दर्शवली आहे. महाविकास आघाडी अधिक व्यापक करण्यासाठी वंचित आणि आपचा समावेश करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. सविस्तर वाचा...
पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचं प्राथमिक सूत्र ठरवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महापालिकेत एकूण 165 जागा असून, त्यापैकी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांनी प्रत्येकी 50 जागांवर निवडणूक लढवण्यावर तिन्ही पक्षांमध्ये प्राथमिक एकमत झालं आहे. उरलेल्या 15 जागा या वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पक्षासाठी खुल्या ठेवण्याची तयारी या तिन्ही पक्षांनी दर्शवली आहे. महाविकास आघाडी अधिक व्यापक करण्यासाठी वंचित आणि आपचा समावेश करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. महाविकास आघाडीत नव्या पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न असला, तरी वंचित बहुजन आघाडीने थेट 28 जागांची मागणी केल्यामुळे ही चर्चा सध्या अडचणीत सापडली आहे. वंचितची ही मागणी आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांना मान्य होईल का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे वंचित महाविकास आघाडीत सहभागी होणार की नाही, यावर सध्या प्रश्नचिन्ह आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबतही महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मनसेला स्वतंत्र कोटा न देता, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आपल्या वाट्यातून काही जागा देण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. यामुळे पुण्यातील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनत चालली आहेत. दरम्यान, पुणे महापालिकेत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत सुरू असलेली दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची चर्चा अखेर फिस्कटल्याचं स्पष्ट झालं आहे. शुक्रवारी झालेल्या चर्चांमध्ये अजित पवार गटाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 30 ते 35 जागा देऊ केल्याची आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावरच निवडणूक लढण्याची अट घातल्याची माहिती समोर आली. ही अट शरद पवार गटाला मान्य नसल्यामुळे ही संभाव्य युती तुटली. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे काल रात्री झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिले होते. त्यानंतर पुणे महापालिकेची निवडणूक आम्ही महाविकास आघाडीतूनच लढणार असल्याचं स्पष्ट विधान अंकुश काकडे यांनी केलं आहे. राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या युतीच्या चर्चांना वेग पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या वाटेवर जात असतानाच, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये संभाव्य युतीच्या चर्चांना वेग आला आहे. पुणे महानगरपालिकेत ही नवी युती आकाराला येऊ शकते, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केली आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात जागावाटपावरून अजूनही ठोस निर्णय होत नसल्याने, अजित पवार गट आणि शिंदे गट एकत्र लढण्याच्या पर्यायावर विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपकडून मानपान नको, मात्र कार्यकर्त्यांचा अपमानही नको, अशी भूमिका आम्ही वरिष्ठांपुढे मांडली असल्याचंही धंगेकर यांनी स्पष्ट केलं. कार्यकर्त्यांना योग्य संधी मिळावी, हीच आमची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं असून, दुपारपर्यंत शिवसेना शिंदे गटाची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी पुण्याच्या उलट चित्र पिंपरी-चिंचवडमध्ये दिसून येत आहे. तेथे केवळ निवडणूक चिन्हामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी तुटणार नसल्याचं संकेत मिळाले आहेत. अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांनी एक पाऊल मागे घेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तुतारी या चिन्हावर लढायचं असेल तर घड्याळाचा आग्रह धरणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे. जागावाटपामुळे आघाडी तुटू नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शहराध्यक्ष योगेश बहल यांनी तर थेट विधान करत, अजित पवारांनी जर शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत यांना माझ्या प्रभागातून उमेदवारी देण्यास सांगितलं, तर मी स्वतः निवडणूक लढवणार नाही, असं म्हटलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं असलं, तरी अधिकृत घोषणा होईपर्यंत या चर्चांवर विश्वास ठेवायला अनेकजण तयार नाहीत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडींमुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
‘वेलकम टू द जंगल’चा टीझर रिलीज
मुंबई : प्रतिनिधी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचे दरवर्षी ४-५ चित्रपट प्रदर्शित होतात. तो त्याच्या चित्रपटांची घोषणा खूप आधी करतो. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याचे फॅन्स त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. अक्षय ब-याच काळापासून ‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटावर काम करत होता. माहितीनुसार, या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. ख्रिसमसच्या दिवशी अक्षय कुमारने […] The post ‘वेलकम टू द जंगल’चा टीझर रिलीज appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नाशिक स्थित तपोवनातील वृक्षतोडीवरून सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली. प्रभू श्रीरामांच्या पंचवटीत झाडे तोडण्याचे काम राक्षसच करू शकतात. हे लोक साधुग्रामच्या नावाखाली जागा बिल्डरांच्या घशात घालण्याच्या प्रयत्नांत आहेत, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी नाशिकच्या तपोवनाला भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधून वृक्षतोडीला जोरदार विरोध केला. ते म्हणाले, प्रभू श्रीरामांच्या पंचवटीत झाडे तोडम्याचे काम राक्षसच करू शकतात. या लोकांचा साधूग्रामच्या नावाखाली तपोवनाची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव आहे. भाजपचे हिंदुत्त्व चुनावी आहे. भाजप देशात रामराज्य नव्हे तर रावण राज्य आणण्याच्या प्रयत्नांत आहे. भाजप म्हणजे बिल्डर जनता पार्टी आहे. भाजप आमदार होता म्हणून बलात्कार करूनही एका आमदाराला जामीन मिळाली. ज्याला फाशीवर चढवायला हवे, त्याला बेल मिळाली. भाजपने साधू हत्याकांडातील आरोपीला का प्रवेश दिला? बिलकिस बानोच्या कुटुंबाला तिच्या डोळ्यापुढे मारून टाकले. लाडकी बहीणवर बोललो म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिडले होते. पण ते राज्यातील वाढती गुन्हेगारी व बेरोजगारीवर काहीही बोलत नाही. भाजप धर्माचे राजकारण करतो. मग त्यांनी पालघर साधू हत्याकांडातील आरोपीला का प्रवेश दिला? खोटे बोलायचे आणि रेटून बोलायचे अशी त्यांची सवय आहे, असे ते म्हणाले. 24 तासांत युतीची गोड बातमी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत 4 मेडिकल कॉलेज आणले. आपल्याला नाशिक महापालिकेत किमान एक मेडिकल कॉलेज आणायचे आहे. नाशिकमधील प्रत्येक वॉर्डात सुसज्ज शाळा आणायच्या आहेत. आम्ही हे मुंबईत करून दाखवले आहे. ते आता नाशिकमध्ये करायचे आहे. आपल्याला तपोवन वाचवायचे आहे. भाजपने फक्त कर वाढवला. आपण प्रत्यक्षात परिवर्तन घडवून आणणार आहोत. आपले चिन्हच मुळात परिवर्तनाचे आहे. युतीची गोड बातमी पुढच्या 24 तासांत मिळेल, असेही आदित्य ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. ते पुढे म्हणाले, आम्ही मुंबई महापालिकेत करून दाखवले. आता तुमची सत्ता राज्यात व केंद्रातही आहे. तुम्ही स्वतः केलेले एखादे काम दाखवा. तुम्ही फक्त फोडाफोडीचे राजकारण केले. जेवढे इनकमिंग भाजपत होईल, तेवढा इथल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना मान मिळेल. भाजप व संघाला एक प्रश्न आहे. सगळे भ्रष्टाचारी लोक तुमच्या पक्षात आहेत. ज्यांच्यावर खोटे आरोप होते, ते आमच्याकडे आहेत. पण भाजपत सर्वच कलंकित नेते आहेत. ते त्यांनी जनतेला विचारून घेतले का हे सांगावे, असे ते म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमच्या एका उमेदवाराला दुसऱ्या एका इच्छुक उमेदवाराच्या समर्थकांनी मारहाण घडल्याची घटना घडली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 12 मधील किराडपुरा भागात ही घटना घडली. त्याचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात इच्छुक उमेदवाराचे समर्थक अधिकृत उमेदवाराला मारहाण करताना दिसून येत आहेत. यासंबंधीच्या माहितीनुसार, एमआयएमने दोन दिवसांपूर्वीच शहरातील 8 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात प्रभाग क्रमांक 12 मधील पक्षाचे अधिकृत उमेदवार मोहमद असरार यांनी शुक्रवारी सायंकाळी किराडपुरा भागात रॅली काढली. यावेळी तिकीट न मिळालेल्या माजी नगरसेविका नसीम बी सांडू खान यांचा मुलगा हाजी इसाक यांचे समर्थक असरार यांच्या रॅलीत पोहोचले. त्यांनी त्यांना उमेदवारीविषयी जाब विचारला. यावेळी त्यांच्यात बाचाबाची आणि अखेर हाणामारी झाली. ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी मोठी गर्दी गोळा झाली होती. गर्दीतील काही नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन स्थितीवर नियंत्रण मिळवले. यामुळे वातावरण शांत झाले. उल्लेखनीय बाब म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील मुस्लिम बहुल भागात एमआयएमची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार स्पर्धा आहे. येथील अनेक पक्षांनी बंडखोरीच्या भीतीने अद्याप उमेदवारीची घोषणा केली नाही पण एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी काही उमेदवारांची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. नेमकी कशी घडली घटना? प्रभाग क्रमांक 12 क (खुला प्रवर्ग) मधील एमआयएमचे उमेदवार मोहमद असरार यांनी शुक्रवारी किराडपुरा राम मंदिर रोडवरून रॅली काढली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थक होते. ही रॅली मंदिरापुढे येताच इच्छुक उमेदवार हाजी इसाक यांचे समर्थक तिथे पोहोचले. त्यांचा चेहरामोहरा पाहून मोहमद असरार आपल्या गळ्यात घातलेल्या हारतुऱ्यासह समोर निघाले. पण हाजी इसाक यांच्या समर्थकांनी त्यांचा मार्ग अडवला. एमआयएमने असरार यांना दिलेल्या उमेदवारीचा फेरविचार करावा, अशी मागणी हाजी इसाक यांच्या समर्थकांनी केली. यावरून त्यांची असरार यांच्या समर्थकांशी बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही गट जिन्सी पोलिस ठाण्यात पोहोचले. तिथे अफसर खान हुसेन खान यांच्या तक्रारीनुसार मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या गटाने कोणतीही तक्रार दिली नव्हती. पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी याची पुष्टी केली आहे. काय म्हणाले इम्तियाज जलील? दुसरीकडे, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी या घटनेवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, पक्षाचा निर्णय, माझा नाहीपक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनी मला उमेदवारी घोषित करण्याचे आदेश दिले. मी त्यानुसार उमेदवारी घोषित करीत आहे. कोणाला उमदेवारी द्यायची हा निर्णय कोअर कमिटी आणि पक्ष ठरवत असतो. उमेदवारी निश्चित करणे हा माझ्या एकट्याचा निर्णय नाही. काय म्हणाले इच्छुक उमेदवार हाजी इसाक खान? प्रभाग क्रमांक 12 मधील क हा खुला प्रवर्ग आहे. तेथून मी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मी संपूर्ण तयारी केली. ऐनवळी दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आली. आता पक्षाने मला ओबीसी महिला प्रवर्गातून लढण्याचा सल्ला दिला. यापूर्वी मी आईला निवडून आणले. आता परत महिला प्रवर्गातून का निवडणूक लढवावी? पक्षाने न्याय द्यावा अशी विनंती मी इम्तियाज जलील यांच्याकडे केली, असे हाजी इसाक खान यांनी याविषयी बोलताना सांगितले.
भाजपने एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात आक्रमक प्रचार सुरू केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी या प्रकरणी एकनाथ शिंदे यांचा चिमटा काढला. एकनाथ शिंदे यांच्या मागे सध्या राहू किंवा शनिदोष आहे का? याची खात्री त्यांनी एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन करून घेतली पाहिजे. राहू, केतू आदी ग्रह त्यांना शांतपणे जगू देतील का? अशी शंका या प्रकरणी येत आहे, असे ते म्हणालेत. विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मुंबईतील वंचित बहुजन आघाडीसोबतच्या आघाडीच्या चर्चेसह विविध मुद्यांवर प्रकाश टाकला.वंचित बहुजन आघाडीने मुंबईत काँग्रेसला 60 जागा मागितल्याची माहिती आहे. यावर वडेट्टीवार म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने कोणत्या जागांवर दावा केला आहे हे मला माहिती नाही. मी त्या प्रक्रियेत नाही. आमच्या मुंबईतील नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर मी हे सांगू शकेन. पण आज सायंकाळी किंवा रात्री उशिरा चर्चा पूर्ण होईल. उमेदवारी दाखल करण्यास आणखी 2 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यात दोन पाऊल मागे - पुढे करून कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. राज्यात कुणाचा पायपोस कुणाशी नाही सध्या दोन्ही राष्ट्रवादीची एकत्र निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू आहे. पण शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी ही चर्चा फिस्कटल्याचा दावा केला आहे. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, दुसऱ्याच्या घरात काय चालले आहे ते डोकावून पाहण्याचा अधिकार मला नाही. पण त्यांच्या चर्चा पुढे खूप गेल्याचे मी ऐकले आहे. त्यांच्यात घड्याळावर लढा व तुतारीवर लढा असा विषय सुरू आहे. मला ज्यावेळी यासंदर्भात त्यांच्या बैठका झाला, त्याचवेळी आम्ही निर्णय घेतला की, शरद पवार अजित पवारांसोबत जात असतील तर आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची असे आम्ही यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांनी काय करायचे, त्यांच्याकडे कसे बघायचे हे आमचा अधिकार नाही. त्यांचे कार्यकर्त्यांकडे हा अधिकार आहे. जनता हा सगळा धिंगाणा पाहत आहे. कुणाचा पायपोस कुणाशी नाही. वाटेल त्या पद्धतीच्या आघाड्या व युत्या होत आहेत. राजकारणाचा चिखल झाला आहे. त्या चिखलात सर्वांच्या अंगावर डाग पडत आहेत. कितीही धुतले तरी हे डाग साफ होतील असे दिसत नाही. एवढ्या खालच्या पातळीवरचे राजकारण व गोंधळलेली परिस्थितीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच निर्माण झाली आहे. यापूर्वी केव्हाही अशी परिस्थिती निर्माण झाली नाही. एकनाथ शिंदेंना ज्योतिषाकडे जाण्याचा सल्ला भाजपने ठाण्यात नमो भारत, नमो ठाणे असा प्रचार सुरू केला आहे. पत्रकारांनी याविषयी वडेट्टीवारांना छेडले असता त्यांनी एकनाथ शिंदे यांना आपली पत्रिका एखाद्या ज्योतिषाकडे दाखवण्याचा सल्ला दिला. मी यावर काय बोलू. कुणी नमो म्हणो, कुणी सुमो म्हणो, कुणी रमो म्हणो. हा त्यांचा प्रश्न आहे. पण एक आहे की, सध्या एकनाथ शिंदेंच्या मागे राहू दोष किंवा शनी दोष आहे का? याची खात्री त्यांनी एखाद्या ज्योतिषाकडे जाऊन करून घेतली पाहिजे. राहू, केतू आदी ग्रह त्यांना शांतपणे जगू देतील का, त्यांच्या मागे काही अडचणी आहेत का अशी शंका या प्रकरणी येत आहे, असे ते म्हणाले. महायुती सरकार जनतेच्या परीक्षेत नापास विजय वडेट्टीवार यांनी यावेळी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बोलावण्याच्या मुद्यावरूनही भाजप व महायुती सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांत योगींची गरज वाटत असेल, तर हे भाजपचे अपयश आहे. राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्ष जनतेच्या परीक्षेत नापास झालेत. त्यामुळे भाजपवर दुसऱ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला बोलावून पास होण्यासाठी मदत घेण्याची वेळ आली आहे. योगींची गरज वाटते म्हणजेच आपल्या हेडमास्तरला वर्ग सांभाळता येत नाही. त्यामुळे प्रिन्सिपलला आणून हा महाराष्ट्र पुन्हा सांभाळायचा अशी परिस्थिती दिसत आहे. निवडणुकीत ध्रुवीकरण करण्याची भाजपची जुनी परंपरा आहे. ध्रुवीकरण केल्याशिवाय राजकारण करताच येत नाही. त्यांना यशही मिळत नाही. ते मते मिळवण्यासाठी प्रांतवाद आणतील, पण बोट दुसऱ्याकडे दाखवतील. धर्मवाद आणतील, पण बोट दुसऱ्याकडे दाखवतील. या सगळ्या गोष्टी ते आणतील. सगळ्या प्रकारचे फंडे करून निवडणूक कोणत्याही परिस्थिती जिंकायची हा त्यांचा प्रयत्न आहे. सगळ्या गोष्टी करून यश दिसत नसेल, तर शेवटी निवडणूक आयोग त्यांच्या मदतीला आहे, असे ते म्हणाले.
मुंबई महानगर परिसरासह राज्यातील पुणे, नाशिक यांसारख्या प्रमुख महापालिकांमध्ये मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये युती जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीच्या प्रत्यक्ष रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. युती जाहीर होताच उमेदवार निश्चितीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, अनेक ठिकाणी एबी फॉर्म वाटप, अर्जांची तयारी आणि जागावाटपाचे अंतिम टप्पे गाठले जात आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या काही जागांवर अद्याप चर्चा सुरू असली तरी, त्याआधीच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेने आक्रमक पवित्रा घेत थेट 50 जागांवर दावा ठोकल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मनसेकडून या जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यात आले असून, त्यांना अधिकृत एबी फॉर्मही पाठवण्यात आले आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत एकूण 112 जागा आहेत. यापैकी 50 जागांवर मनसेकडून तयारी पूर्ण करण्यात आली असून, या जागांसाठी उमेदवारांची अंतिम यादी तयार झाली आहे. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी थेट शिवतीर्थावरून उमेदवारांचे अर्ज घेऊन रवाना होत या तयारीला अधिकृत स्वरूप दिले आहे. उर्वरित जागा या ठाकरे गटाची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात आल्या आहेत. पुढील 48 तासांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील मनसे उमेदवारांना एबी फॉर्मचे औपचारिक वाटप होणार असून, शेवटच्या दोन दिवसांत सर्व उमेदवार आपले अर्ज दाखल करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या हालचालींमुळे कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीचा प्रचार आणि हालचालींना वेग आला आहे. दुसरीकडे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युती होणार की दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. युतीसंदर्भात दोन्ही पक्षांच्या समन्वयक समित्यांच्या बैठका सुरू असतानाच, भाजपच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी थेट शिवसेनेसोबत युती नको, स्वबळावरच निवडणूक लढवावी, असा ठाम आग्रह धरला आहे. युती झालीच, तर भाजपला महापौरपदासह स्थायी समितीतील महत्त्वाची पदे मिळाली पाहिजेत, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांची ही भावना उघडपणे मांडल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. भाजपकडून कल्याण-डोंबिवलीत महापौरपद आणि किमान तीन वर्षांसाठी स्थायी समिती सभापती पदाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, या मागण्यांवर अंतिम निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. नरेंद्र पवार यांनी सांगितले की, भाजपचे बहुतांश कार्यकर्ते स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेत आहेत. युती झाल्यास अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळणार नाही आणि त्यामुळे नाराजी वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक कार्यकर्ता निवडणूक लढवण्यास उत्सुक असल्याने, युतीमुळे भाजपचं नुकसान होऊ शकतं, असा दावाही त्यांनी केला आहे. युती झाली, तर बंडखोरीची शक्यता नाकारता येणार नाही आणि त्यातून अंतर्गत संघर्ष वाढू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण अधिक तापत चालले आहे. एका बाजूला मनसे-शिवसेना युतीने उमेदवार निश्चितीला गती दिली असून, प्रत्यक्ष निवडणूक तयारी सुरू केली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप-शिवसेना युतीवरून भाजपमध्येच अस्वस्थता आणि मतभेद उफाळून आले आहेत. या सगळ्या घडामोडींमुळे आगामी महापालिका निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, युती, बंडखोरी आणि स्वबळाच्या निर्णयांमुळे कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण मुंबई महानगर परिसरातील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
छ. संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांचा तुफान राडा
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी छ. संभाजीनगरमध्ये एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलयं. प्रभाग क्रमांक १२ मध्ये एमआयएम पक्षाकडून मोहंमद इसरार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काढण्यात आलेल्या आनंद रॅलीमध्ये पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. इसरार यांच्या समर्थकांनी रॅली काढली असता, याच प्रभागातून इच्छुक असलेल्या हाजी इसाक यांच्या समर्थकांनी रॅली अडवली. या […] The post छ. संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांचा तुफान राडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येऊ लागला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट भाजपवर गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी केला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुतीत एकत्र लढण्याची चर्चा सुरू होती, मात्र प्रत्यक्षात भाजपकडून कोणतीही जागा देण्यात न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा स्पष्ट निर्णय घेतला आहे. या घोषणेमुळे वसई-विरारमधील राजकारणात मोठा स्फोट झाल्याचे चित्र आहे. राजाराम मुळीक यांनी भाजपवर थेट विश्वासघाताचा आरोप करताना सांगितले की, निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीच्या नावाखाली सातत्याने बैठका होत होत्या. या बैठकींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने युतीधर्म पाळत सहभाग घेतला, चर्चा केल्या आणि समन्वयाची भूमिका ठेवली. मात्र प्रत्यक्ष जागावाटपाच्या टप्प्यावर भाजपने एकही जागा न देता आश्वासनांवर पाणी फेरल्याचा आरोप त्यांनी केला. जो पक्ष आपल्या सहकाऱ्यांशी प्रामाणिक राहत नाही, तो मतदारांशीही कधीच प्रामाणिक राहू शकत नाही, असा थेट टोला त्यांनी लगावला. युती केवळ कागदावर होती, प्रत्यक्षात आम्हाला डावलण्यात आले, असेही मुळीक यांनी ठामपणे सांगितले. या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर आणखी एक गंभीर आरोप करत म्हटले की, आमच्या पक्षाची ताकद नसती तर भाजपने आमचे उमेदवार फोडण्याचे प्रयत्न केले नसते. आमचे उमेदवार पळवले गेले, ही बाबच आमच्या पक्षाची ताकद दाखवणारी आहे, असा दावा करत मुळीक यांनी भाजपच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एखादा पक्ष आमच्याशी युती करत नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस थांबणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे वसई-विरारमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वबळावर मैदानात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, यामुळे थेट आणि तीव्र लढतीची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. दरम्यान, वसई-विरारमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेही स्वतंत्र वाटचाल करण्याचे संकेत दिले आहेत. ठाकरे गटाने आपल्या इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्याची घोषणा केल्याने त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सुमारे 100 इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून बहुजन विकास आघाडी, काँग्रेस आणि मनसे यांच्यात संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू होती, मात्र सध्याच्या घडामोडींमुळे त्या चर्चांवरही अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात मात्र जागावाटपाची बोलणी पूर्ण झाल्याचे समजते आणि हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. परिणामी, वसई-विरारमध्ये आता बहुपक्षीय, तिरंगी किंवा चौथ्या आघाड्यांची शक्यता अधिक बळावली आहे. राज्यातील सर्वांत चुरशीच्या निवडणुकांपैकी एक ठरणारवसई-विरार महानगरपालिकेचा राजकीय आणि प्रशासकीय आढावा घेतला असता, येथील निवडणूक अधिक महत्त्वाची ठरणार आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ 28 जून 2020 रोजी संपल्यानंतर विविध कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आणि महापालिकेत प्रशासक राजवट लागू राहिली. सध्या वसई-विरार महापालिकेत 29 प्रभाग असून एकूण 115 नगरसेवकांची संख्या आहे. यापैकी 58 जागा महिलांसाठी आणि 57 जागा पुरुषांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी प्रत्येकी 5 जागांचे आरक्षण असून त्यातील प्रत्येकी 2 जागा महिलांसाठी राखीव आहेत. उर्वरित 74 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत. 2015 च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने 106 जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती, भाजपला एक, शिवसेनेला पाच जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नव्हती. या पार्श्वभूमीवर आता बदललेली समीकरणे, फुटलेली युती आणि उघड आरोप-प्रत्यारोप यामुळे वसई-विरारची निवडणूक राज्यातील सर्वांत चुरशीच्या निवडणुकांपैकी एक ठरणार, यात शंका नाही.
संजय राऊत यांचा आणखी एक भाऊ निवडणूक रिंगणात:BMC लढवणार? आमदार भावाच्या मतदार संघातून आजमावणार नशीब
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचे छोटे बंधू संदीप उर्फ अप्पा राऊतही यंदा मुंबई महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यांनी आपले मोठे बंधू आमदार सुनील राऊत यांच्या मतदारसंघातील विक्रोळीतील एका वॉर्डातून आपले नशीब आजमावण्याची तयारी सुरू केली आहे. पण या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने दावा ठोकला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी शरद पवार गटाच्या आग्रहावरच अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीतील पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे. अनेक ठिकाणी या आघाड्यांमधील घटकपक्ष एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. यामुळे निवडणुकीत रंगत आली असताना संजय राऊत यांचे छोटे बंधू संदीप राऊत बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती मिळाली आहे. विक्रोळीतील वॉर्डातून निवडणूक लढवणार यासंबंधीच्या माहितीनुसार, संदीप राऊत हे आपले बंधू आमदार सुनील राऊत यांच्या विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील 111 नंबरच्या वॉर्डातून निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत. पण ते ज्या वॉर्डासाठी इच्छुक आहेत, तिथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने दावा केला आहे. यामुळे पेच निर्माण झाला आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी शुक्रवारीच या प्रकरणी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची चर्चा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे शरद पवार गट या जागेवरून माघार घेणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वॉर्ड क्रमांक 111 मध्ये शरद पवार गटाचे धनंजय पिसाळ इच्छुक विक्रोळीतील वॉर्ड क्रमांक 111 मध्ये ठाकरे व शरद पवार गटात वाद सुरू आहे. या वॉर्डातून यापूर्वी राष्ट्रवादीचे धनंजय पिसाळ निवडून आले होते. त्यामुळे ही जागा आपल्याकडेच राहावी अशी शरद पवार गटाची इच्छा आहे. पण ठाकरे गट या प्रकरणी संदीप राऊत यांच्यासाठी जोर लावत आहे. मुंबई निवडणुकीत या दोन्ही पक्षांची युती झाली नाही, तर या जागेवरून संदीप राऊत हे ठाकरे गटाचे उमेदवार असतील हे जवळपास फायनल झाले आहे. शरद पवार गटाशी सकारात्मक चर्चा - राऊत दुसरीकडे, संजय राऊत यांनी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केला आहे. आमची शरद पवारांच्या पक्षाशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांना ज्या जागा हव्या होत्या, त्यातील बहुतेक जागा त्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आमच्या आघाडीत सध्या तरी काही अडचण दिसत नाही. आम्ही त्यांचे समाधान केले आहे. शरद पवारांचा पक्ष आमच्यासोबत असावा अशी आमची इच्छा आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना आमच्या वाट्याच्या जागा दिल्या आहेत. आमचे नुकसान झाले, पण ठीक आहे. आमचे लोक नाराज झालेत. पण युतीमध्ये हे सर्वकाही चालते. यावेळी पत्रकारांनी संजय राऊत यांना संदीप राऊत यांच्या उमेदवारीविषयी विचारणा केली. त्यावर संजय राऊत यांनी आपल्याला याची कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. संदीप राऊत यांच्याविषयी मला काहीही माहिती नाही, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामु्ळे संदीप राऊत निवडणूक लढवणार किंवा नाही याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून वसई-विरार महानगरपालिकेबाबत मोठी राजकीय हालचाल समोर आली आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील सर्व महापालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीत असताना वसई-विरारमध्ये मात्र समीकरणे पूर्णपणे बदलताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि बहुजन विकास आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत. या युतीमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून अनेक पक्षांची गणितं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनसे आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातील युती जवळपास निश्चित झाली असून अंतिम घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. वसई-विरारमध्ये मनसेची सध्या एकही नगरसेवकाची जागा नसल्याने पक्ष विस्तारासाठी मनसेने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे बहुजन विकास आघाडीने युतीसाठी अट ठेवली असून, भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर आपल्या पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवावी लागेल, अशी भूमिका बविआकडून मांडण्यात आली आहे. या चिन्हाच्या अटीवर मनसेमध्ये अंतर्गत चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसांत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या युतीमुळे वसई-विरारमधील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात. दरम्यान, या घडामोडींमध्ये ठाकरे गटाची शिवसेना मात्र स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. मनसे आणि बविआसोबत जाण्याबाबत ठाकरे गटाकडून सकारात्मक प्रतिसाद नसल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे वसई-विरारमध्ये यावेळी त्रिकोणी किंवा चौरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे बविआ-मनसे युती, दुसरीकडे भाजप-शिंदे गट आणि त्याचवेळी ठाकरे गटाची शिवसेना स्वतंत्र मैदानात उतरणार असल्याने निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची जुळवाजुळव, जागावाटप आणि प्रचार रणनीती यावर सध्या सर्वच पक्षांचे लक्ष केंद्रित झाले आहे. वसई-विरार महानगरपालिकेचा राजकीय इतिहास पाहिला तर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व याठिकाणी कायम राहिले आहे. नगरसेवकांचा कार्यकाळ 28 जून 2020 रोजी संपल्यानंतर विविध कारणांमुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आणि महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू राहिली. सध्या वसई-विरार महानगरपालिकेत एकूण 29 प्रभाग असून 115 नगरसेवकांची सदस्यसंख्या आहे. यापैकी 58 जागा महिलांसाठी तर 57 जागा पुरुषांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी प्रत्येकी 5 जागांचे आरक्षण असून त्यापैकी प्रत्येकी 2 जागा महिलांसाठी राखीव आहेत. उर्वरित 74 जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत. या आरक्षणाच्या गणितामुळे उमेदवार निवडीत पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे. 2015 च्या वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने एकतर्फी वर्चस्व गाजवत 106 जागा जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीत भाजपला केवळ एकच जागा मिळाली होती, तर शिवसेनेला 5 जागांवर समाधान मानावे लागले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती, तर 3 जागा अपक्ष आणि इतरांच्या खात्यात गेल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता मनसेसोबत युती केल्यास बविआ आपले वर्चस्व टिकवते का, की नव्या समीकरणांमुळे सत्तासंघर्ष अधिक रंगतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी निवडणूक वसई-विरारच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरणार, यात शंका नाही.
एका अज्ञात प्राण्याने आईच्या कुशीत झोपलेल्या एका 6 महिन्यांच्या चिमुकलीला उचलून नेऊन तिला ठार मारल्याची भयंकर घटना नागपूरच्या नरसाळा भागात घडली आहे. या घटनेत प्राण्याने चिमुकलीच्या छातीसह दोन्ही हात खाल्लेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, हुडकेश्वर पोलिस ठाणे हद्दीतील नरसाळा परिसरात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथील स्मशानभूमी लगतच्या नाल्याच्या मागे असलेल्या मजुरांच्या झोपडपट्टीत अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात अवघ्या 6-7 महिन्यांच्या एका चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. अनुष्का रवी मेळा असे मृत मुलीचे नाव आहे. ती मध्य प्रदेशातील सेलमिया गावची रहिवासी होती. ठेकेदाराच्या कामासाठी तिचे कुटुंब नागपुरात आले होते. ते सध्या नरसाळा परिसरातील झोपडपट्टीत वास्तव्यास होते. मध्यरात्री 2 च्या सुमारास घडली घटना अनुष्का शुक्रवारी रात्री आपल्या आईच्या कुशीत झोपली होती. मध्यरात्री केव्हातरी एका अज्ञात प्राण्याने तिला तेथून अलगद उचलून नेले. काही वेळाने मध्यरात्री 2 च्या सुमारास तिच्या आईला जाग आली असता त्यांना अनुष्का दिसली नाही. त्यामुळे त्यांनी व कुटुंबीयांनी तिचा शोधाशोध सुरू केला. रडारड सुरू केली. हा आवाज ऐकूण शेजारी गोळा झाले. त्या सर्वांनी अनुष्काचा शोध घेतला असता झोपडपट्टीलगतच तिचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. छात व दोन्ही हात खाल्ले स्थानिकांच्या माहितीनुसार, अज्ञात प्राणाने अनुष्काच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले आहेत. तिची छाती व दोन्ही हात खाल्लेत. या परिसरात रात्रीच्या वेळी रस्त्यावर दिवे नाहीत. त्यामुळे अंधाराचा फायदा घेत ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पण हा हल्ला करणारा प्राणी नेमका कोणता होता? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. विशेषतः रोजीरोटीसाठी बाहेर गावाहून आलेल्या मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही यामुळे गंभीर बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, हुडकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. वनविभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. हे ही वाचा... भाजपने मुंबईसाठी कंबर कसली:परप्रांतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी स्टार प्रचारकांची रणनीती; वाचा कुणावर जबाबदारी? भाजपने मुंबई महापालिकेचा गड जिंकण्यासाठी उत्तर भारतीयांची मने जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी भाजपने महापालिका निवडणुकीच्या प्रचारात हिंदी भाषिक स्टार प्रचारकांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आमदार व गायिका मैथिली ठाकूर, मनोज तिवारी यांच्यासह अनेकांचा समावेश असणार आहे. वाचा सविस्तर
नागपूर येथील वर्धा रोड स्थित हाॅटेल रोयाल वीलामध्ये आई आणि मुलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटनेत मुलाचा मृत्यू झाला तर आई गंभीर आहे. आईचे नाव जयंती तर मुलाचे नाव सुरज आहे. दोघेही बंगळुरू येथील रहिवासी आहे. सुरजचे २६ वर्षीय गानवी उर्फ राशीसोबत २९ ऑक्टोबर, २०२५ रोजी लग्न झाले होते. सुरज बेंगुळुरू येथील बेल लेआऊट, विद्यारण्यपुरा येथे राहात होता. तर गानवी राममूर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बी. चन्नासंद्रा येथे राहात होती. सुरजची पत्नी गानवी हीने बंगळुरूमध्ये बुधवार २४ च्या रात्री तिच्या आई वडीलांच्या घरी गळफास घेतला. घरच्यांनी तिला तत्काळ खासगी रूग्णालयात दाखल केले. तिथे शर्थीचे प्रयत्न करूनही तिचा गुरूवारी मृत्यू झाला. ४० लाख रूपयांच्या हुंड्यासाठी तिचा छळ होत असल्याचा आरोप करत मृत तरुणीच्या नातेवाईकांनी बंगळुरू येथील स्थानिक पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केले होते. दरम्यान गानवीच्या मृत्यू नंतर बंगळुरूमध्ये आंदोलन सुरु असतांना आई आणि मुलगा नागपुरात दाखल झाले होते. दोघांनीही स्थानिक हॅाटेल राेयाल वीलामध्ये मुक्काम केला होता. याच हाटेलमध्ये दोघांनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पीडित आणि घटना २६ वर्षीय गणवी उर्फ राशीने २९ ऑक्टोबर, २०२५ रोजी एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या सूरजशी लग्न केले. तिच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, लग्नानंतर लगेचच सूरज आणि त्याच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. लग्नाच्या स्वागत समारंभासाठी ४० लाख रुपयांची मागणी करीत तिचा छळ केला. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेतील त्यांच्या हनिमूनदरम्यानही हा छळ सुरूच होता. त्यामुळे गणवीने हनिमून अर्धवट सोडून आपल्या माहेरी परत आली. तिथे ती नंतर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. २६ डिसेंबर, २०२५ रोजी एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिस ठाण्यासमोर निदर्शने शवविच्छेदनानंतर, गाणवीच्या कुटुंबीयांनी तिचा मृतदेह बंगळुरू येथील सुरजच्या घरी नेला आणि आरोपी कुटुंबातील सदस्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करीत निदर्शने केली. विद्यारण्यपुरा पोलिसांनी हस्तक्षेप करून कुटुंबीयांना मृतदेह परत नेण्यासाठी समजावले आणि कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले होते. पोलिसांची कारवाई गानवीच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, बंगळुरू येथील राममूर्तीनगर पोलिसांनी सुरुवातीला हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. तिच्या मृत्यूनंतर, गुन्ह्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि भारतीय न्याय संहिता व हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांखाली तिच्या पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुणे शहरातील कोथरूड भागात एका बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सहा लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आझादनगर येथील सुखाई कॉम्प्लेक्स सोसायटीत ही घटना घडली. फिर्यादी ५ डिसेंबर रोजी परगावी गेले होते. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील दागिने चोरले. फिर्यादी नुकतेच परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी तपास सुरू केला असून, पोलीस उपनिरीक्षक एस. चव्हाण अधिक तपास करत आहेत. दहशत निर्माण करणारा आरोपी जेरबंद दरम्यान, बिबवेवाडी पोलिसांनी अल्पवयीनाला जीवे मारण्याची धमकी देऊन दहशत माजविल्याप्रकरणी गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. संदेश दिलीप सौदागर (वय २२, रा. मार्केट यार्ड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. १६ जून रोजी आरोपी सौदागर आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारांनी बिबवेवाडी परिसरात कोयते उगारून दहशत माजवली होती. त्यांनी एका अल्पवयीन मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर सौदागर फरार झाला होता. पोलिसांनी अप्पर इंदिरानगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ तो थांबल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल माने, पोलीस कर्मचारी गायकवाड, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, रक्षित काळे आणि सुमीत ताकपेरे यांनी केली.
पुणे शहरातील कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील एका लॉजमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसाय फुरसुंगी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. पोलिसांनी लॉजवर छापा टाकून देहविक्रय करणाऱ्या तरुणींना ताब्यात घेतले. याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय म्हस्के, अक्षय, सुधाकर, पवन सोनपारखे आणि बिंदा नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक तेहसीन बेग यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील क्रिस्टल लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली आणि लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी बाणेर भागातील एका लॉजवर छापा टाकून पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यावेळी लॉज व्यवस्थापकाला अटक करून तरुणींना ताब्यात घेण्यात आले होते. बाणेर, बालेवाडी आणि कोरेगाव पार्क या भागांमध्ये असे प्रकार अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. कोरेगाव पार्क भागातील एका मसाज पार्लरमध्ये सुरू असलेला वेश्याव्यवसायही पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी सिल्व्हर सोल स्पा नावाच्या मसाज पार्लरमधून तरुणींना ताब्यात घेतले. याप्रकरणी मसाज पार्लरचा व्यवस्थापक फैजल अजिहूर रेहमान अहमद उर्फ समीर (वय ३८, रा. कोणार्क व्हयू सोसायटी, केशवनगर, मुंढवा) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वणवे यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. सहायक पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो-शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोके तपास करत आहेत.
२० महिन्यांपासून फरार आरोपी अटकेत:पुण्यात किरकोळ वादातून तरुणाला कालव्यात ढकलून दिले होते
किरकोळ वादातून एका तरुणाला कालव्यात ढकलून खून केल्याप्रकरणी गेल्या २० महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला हडपसर पोलिसांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथून अटक केली आहे. वैभव मनोज जाधव (वय २४, रा. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना ५ मे २०२४ रोजी हडपसरमधील उन्नतीनगर भागातील कालव्यात घडली होती. विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. दिवा, जि. ठाणे) हे कालव्यात बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी शार्दुल यांना तातडीने कालव्यातून बाहेर काढून ससून रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान, आरोपी जाधवने किरकोळ वादातून शार्दुल यांना कालव्यात ढकलून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. घटनेनंतर आरोपी जाधव फरार झाला होता. पोलिसांकडून तेव्हापासून फरार आरोपीचा शोध सुरू होता. तपासात आरोपी जाधव उत्तराखंडमध्ये पसार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, हडपसर पोलिसांचे एक पथक हरिद्वार येथे रवाना झाले. आरोपी एका लॉजमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून गुरुवारी (२५ डिसेंबर) त्याला ताब्यात घेतले. परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त सागर कवडे आणि सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस कर्मचारी दीपक कांबळे, भाऊसाहेब खटके, निलेश किरवे, बापू लोणकर, विजय कानेकर, अजित मदने आणि भगवान हंबर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीला अटक करून पोलीस पथक पुण्याकडे रवाना झाले आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणं झपाट्याने बदलत असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. आमच्या पक्षाचे नुकसान होत असतानाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जागा देण्याची भूमिका घेतली होती, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. राजकीय तडजोडी करताना केवळ स्वार्थ न पाहता व्यापक राजकीय हिताचा विचार केला गेला, असे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार आमच्यासोबत असावेत, ही केवळ पक्षाची नाही तर आघाडीतील सर्वांचीच भावना असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी, आम्ही आमच्या हक्काच्या आणि आधीपासून अस्तित्वात असलेल्या ‘सीटिंग’ जागादेखील सोडल्या, असेही नमूद केले. या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटप, अंतर्गत समन्वय आणि भविष्यातील राजकीय भूमिका यावर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर अत्यंत तीव्र शब्दांत टीका केली. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर रशीद मामू यांच्या पक्षप्रवेशावरून भाजपकडून शिवसेनेवर करण्यात आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राऊत यांनी भाजपच्या राजकीय धोरणांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जात असल्याचा आरोप केला. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने तत्वं बाजूला ठेवली असून, पूर्वी ज्यांना भ्रष्टाचाराचे प्रतीक ठरवले होते, त्यांच्याशीच आज हातमिळवणी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. संजय राऊत यांनी थेट नावं घेत भाजपच्या भूमिकेवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यावर यापूर्वी गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, याची आठवण करून देत राऊत म्हणाले की, आज त्याच नेत्यांसोबत भाजप सत्तेसाठी तडजोड करत आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराबाबत भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचे स्पष्ट होते, असा टोला त्यांनी लगावला. एका बाजूला विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक जिंकण्यासाठी त्यांच्याशीच युती करायची, ही भाजपची सवय बनली असल्याचे त्यांनी नमूद केले. हे सर्व नेते एकाच राजकीय व्यवस्थेचे भाग असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. पैशाच्या जोरावर लोकांना फोडले जाते भाजप सत्तेत आल्यानंतर राज्यातील राजकीय संस्कृती बदलली असून, निवडणुकांमध्ये बंडखोरी वाढल्याचा आरोपही राऊत यांनी केला. पूर्वी निवडणूक लढवणाऱ्या पक्षांची संख्या मर्यादित होती, मात्र आता दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी निर्माण झाल्या आहेत. असंतुष्ट नेत्यांना पर्याय उपलब्ध करून दिले जात असून, पैशाच्या जोरावर लोकांना फोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत बंडखोरी वाढत असून, राजकीय अस्थिरता निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर ठेवला. सत्तेचा गैरवापर करून राजकीय तोडफोड केली जात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. भाजप मुंबईला दोन भागांत विभागत आहे मुंबईतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उत्तर भारतीय मतदारांना लक्ष्य करण्यासाठी बाहेरील राज्यांतील नेत्यांना प्रचारासाठी आणले जात असल्यावरूनही संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारमधील नेते आणि अन्य राज्यांतील चेहरे मुंबईत प्रचारासाठी आणण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप मुंबईला दोन भागांत विभागत असल्याचे त्यांनी म्हटले, एक परप्रांतीयांसाठी आणि दुसरी मराठी माणसांसाठी. शिवसेनेसाठी मुंबई अखंड असून, प्रत्येक मुंबईकर एकसमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन मतदान करावे, असे आवाहन करत भाजपवर प्रांतवाद, जातवाद आणि धर्मवादावर आधारित राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. स्थानिक नेतृत्वाच्या बळावर निवडणूक जिंकून दाखवावी भाजपच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत राऊत यांनी थेट आव्हान दिले. मुंबईतील मतदार जर मुंबईकर असतील, तर त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील भाजप नेते का जात नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जर भाजप इतकी सक्षम असेल, तर बाहेरील राज्यांतील मुख्यमंत्री, नेते प्रचारासाठी का बोलवावे लागत आहेत, असा सवालही त्यांनी केला. इतकी वर्षे मुंबई आणि महाराष्ट्रात सत्ता उपभोगूनही भाजपला स्थानिक नेतृत्वावर विश्वास नसल्याचे यावरून दिसते, असे राऊत म्हणाले. जिंकण्याच्या घोषणा करणाऱ्यांनी स्थानिक नेतृत्वाच्या बळावर निवडणूक जिंकून दाखवावी, असे खुले आव्हान देत संजय राऊत यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली.
पुढील 25 वर्षे महाविकास आघाडीच झळकत राहील अशा पोकळ घोषणा करणाऱ्या मविआचे आता राजकीय विसर्जन झाल्याचा दावा भाजपने केला आहे. महाविकास आघाडीला ना विचारधारा होती, ना दिशा, ना भविष्यदृष्टी. फक्त भाजप विरोध हा एकमेव धागा धरून एकत्र आलेले स्वार्थी पक्ष फार काळ टिकत नाहीत हे या निमित्ताने पुन्हा सिद्ध झाले, असे भाजपने म्हटले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे बिनसले आहे. मनसेला सोबत घेण्याच्या मुद्यावरून काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी तयारीही सुरू केली आहे. दुसरीकडे, शरद पवार गट व ठाकरे गटातील जागावाटपाचा तिढा अजून सुटला नाही. मुंबईतील ही स्थिती राज्यातील इतरही बहुतांश महापालिकांमध्ये दिसून येत आहे. विशेषतः पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने महाविकास आघाडी नावाची एक फसवी एकजूट इतिहासजमा झाल्याचा दावा केला आहे. तीन पक्षांची तोंडे तीन वेगवेगळ्या दिशांना भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये याविषयी म्हणाले, महापालिका निवडणुकांचे अर्ज भरायला सुरुवातही झालेली नाही, तोवरच एक मोठा निकाल लागला आहे. “पुढील 25 वर्षे मविआ झळकत राहील” अशा पोकळ घोषणा करणाऱ्या मविआचे आता राजकीय विसर्जन झाले आहे. मविआतील तीन पक्षांची तोंडे आता तीन वेगवेगळ्या दिशांना फिरली आहेत.उबाठा आणि काँग्रेस वेगळे लढणार, शरद पवार गट राष्ट्रवादीसोबत जाणार, म्हणजेच मविआ नावाची फसवी एकजूट आता इतिहासजमा झाली आहे. हे होणारच होते. कारण या आघाडीला ना विचारधारा होती, ना दिशा, ना भविष्यदृष्टी. फक्त “भाजपा विरोध” हा एकमेव धागा धरून एकत्र आलेले स्वार्थी पक्ष फार काळ टिकू शकत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सत्तेची लालसा असलेली युती जनतेच्या कसोटीवर कधीच उतरू शकत नाही. आणि मविआ त्याचे जिवंत उदाहरण ठरली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे अनेक कार्यकर्ते भाजपत केशव उपाध्ये यांनी नाशिकमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ढोल पिटणारे कार्यकर्ते दुसऱ्याच दिवशी भाजपत गेल्याचाही दावा केला आहे. ते म्हणाले, नाशिकमध्ये “ठाकरे बंधू एकत्र” आल्यावर ढोल पिटणारे कार्यकर्ते अवघ्या दुसऱ्याच दिवशी भाजपात सामील होतात तेव्हा त्यावर संजय राऊत दुःख व्यक्त करत नैतिकतेचे प्रश्न विचारतात, हा सरत्या वर्षांतील सर्वात मोठा राजकीय विनोद म्हणावा लागेल. राजकारणात कार्यकर्त्यांसमोर नैतिकतेचा आदर्श नेत्यांनीच ठेवायचा असतो. पण तो आदर्श केव्हाच उद्ध्वस्त झाला. 28 नोव्हेंबर 2019 रोजी, मुख्यमंत्रीपदाच्या मोहापोटी, उद्धव ठाकरे यांनी कोणताही वैचारिक विधीनिषेध न पाळता, क्षणार्धात भूमिका बदलत काँग्रेससोबत आघाडी केली. त्या दिवशी केवळ सत्ता-समीकरण बदलले नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील मूल्यांची घसरण सुरू झाली… आणि नैतिकता थेट रसातळाला गेली. ज्या नेतृत्वाने स्वतः विचार, भूमिका आणि शब्द यांची किंमत शून्यावर आणली, ते आज कार्यकर्त्यांना नैतिकतेचे धडे देत आहेत… हा दुटप्पीपणाचा कळस आहे. नेतेच जर संधीसाधूपणाचे प्रतीक बनले असतील, तर कार्यकर्त्यांकडून निष्ठेची अपेक्षा तरी कोणत्या तोंडाने करणार? आज जे घडते आहे ते अचानक नाही; ते 2019 मध्ये पेरलेल्या संधीसाधू राजकारणाचेच पीक आहे. नैतिकतेवर प्रश्न विचारण्याचा अधिकार ज्यांनी आधी गमावला आहे, त्यांनी उपदेश करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे अधिक योग्य ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
अकोला महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 10-15 जागा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप व शिवसेनेवर संताप व्यक्त करत 'तुमचा मान, सन्मान नकाच देऊ, पण अपमानही कसा सहन करायचा?' असा उद्विग्न सवाल केला आहे. सत्ताधारी महायुतीने म्हणजे भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने विदर्भातील चारही महापालिका मिळून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण अकोला महापालिका निवडणुकीवरून महायुतीत वादंग होण्याची शक्यता वाढली आहे. 2017 च्या निवडणुकीत अकोला महापालिकेच्या 80 पैाकी सर्वाधिक 48 जागा भाजपच्या ताब्यात होत्या. तर शिवसेना व राष्ट्रवादीला अनुक्रमे 8 व 5 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे यंदा तिन्ही पक्षांच्या ताब्यात असलेल्या 61 जागा सोडून इतर 19 जागांचे तिन्ही पक्षांत वाटप करण्याचा निर्णय झाला आहे. त्यात शिंदे गटाला 7-8, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5-6 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार, एकूण जागावाटपात भाजपला 55, शिंदे गट 15 व राष्ट्रवादी 10 असे असण्याची शक्यता आहे. पण आता आमदार अमोल मिटकरी यांनी या जागावाटपावरून शिंदे गट व भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. काय म्हणाले अमोल मिटकरी? अमोल मिटकरी या प्रकरणी आपला संताप व्यक्त करताना म्हणाले, तुमचा मान, सन्मान नकाच देऊ..परंतू अपमानही सहन कसा करायचा? 10 - 15 जागांवर बोळवण करून राष्ट्रवादी पक्षाला ग्राह्य धरत नसाल, तर अकोल्यात 'मैत्रीपूर्ण' ताकद दाखवत प्रेमाने लढावे लागेल. पक्षातील जिल्ह्यातील नेत्यांच माहीत नाही, पण तळागाळातील सामान्य कार्यकर्ता अजून जिवंत आहे. माझा पक्ष, माझा स्वाभिमान. मिटकरींच्या या भूमिकेमुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अकोल्यात काही जागांवर महायुतीत तिढा उल्लेखनीय बाब म्हणजे भाजप व शिंदे गटात सध्या प्रभाग क्रमांक 17 वर चर्चा सुरू आहे. या प्रभागावर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. या प्रभागात ठाकरे गटातून शिंदे गटात आलेल्या राजेश मिश्रा यांनी तयारी केली आहे. त्यामुळे ते हा प्रभाग सोडण्यास तयार नाहीत. त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल करत 2500 मते घेतली होती. यामुळे भाजप उमेदवार भाजप उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यामुळे भाजप कोणत्याही स्थितीत या वॉर्डात राजेश मिश्रा यांच्यासोबत हातमिळवणी करण्याच्या मूडमध्ये नाही. यामुळे शिंदे गट व भाजपत वादावादी सुरू आहे. खाली वाचा अकोला महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीचे पक्षीय बलाबल
भाजपने मुंबई महापालिकेचा गड जिंकण्यासाठी उत्तर भारतीयांची मने जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासाठी भाजपने महापालिका निवडणुकीच्या प्रचारात हिंदी भाषिक स्टार प्रचारकांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आमदार व गायिका मैथिली ठाकूर, मनोज तिवारी यांच्यासह अनेकांचा समावेश असणार आहे. सत्ताधारी महायुतीचा जागावाटपाचा घोळ आता जवळपास संपल्यात जमा आहे. भाजप व शिवसेना ही निवडणूक एकत्रपणे लढणार आहेत. तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर या निवडणुकांना सामोरा जाणार आहे. भाजप ही निवडणूक जिंकण्यासाठी आकाश - पाताळ एक करत आहे. यासाठी या भगव्या पक्षाकडून वेगवेगळ्या रणनीती आखल्या जात आहेत. यात उत्तर भारतीय मतदारांना पक्षाकडे खेचण्यासाठी त्यांच्याच भागातील स्टार प्रचारकांना प्रचारासाठी बोलावण्याच्या रणनीतीचाही समावेश आहे. कुणाकुणाला प्रचाराच्या मैदानात उतरवणार? यासंबंधीच्या माहितीनुसार, भाजपने उत्तर भारतीयांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आमदार मैथिली ठाकूर, मनोज तिवारी, निरुहुआ व रवी किशन यांना प्रचारासाठी बोलावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. मतांचे समीकरण पाहता उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डांमध्ये भाजपकडून या प्रचारकांना मैदानात उतरवण्यात येईल. त्यामुळे येत्या काही दिवसांत या स्टार प्रचारकांची मांदियाळी मुंबईच्या हिंदी भाषिक बहुल भागात दिसून येईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेनेही या कामी अभिनेता गोविंदा यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. जागांच्या अदलाबदलीवर चर्चा दुसरीकडे, भाजप व शिवसेनेच्या समन्वय समितीची सध्या चर्चा सुरू आहे. त्यात जागांची अदलाबदल, उमेदवारांची देवाणघेवाण व प्रचाराच्या स्ट्रॅटजीवर चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे दोन्ही पक्ष 10-12 जागांवरील उमेदवारांची अदलाबदल करण्याच्या मुद्यावर संवाद साधत आहेत. यापैकी काही जागांवर दोन्ही पक्ष अडून बसलेत. त्यामुळे त्यावर विचारपूर्वक तोडगा काढला जात आहे. मुंबई महापालिकेत महायुतीचाच उमेदवार बसवण्याचा निर्धार शिवसेना व भाजपने केला आहे. त्यामुळे जागांच्या अदलाबदलीच्या प्रक्रियेत कोणताही अडसर येणार नाही याची काळजी दोन्ही पक्षांकडून घेतली जात आहे. मुंबईत निवडणुकीत भाजपच मोठा भाऊ एका वृत्तानुसार भाजप मुंबईत 140, तर शिंदे गट 87 जागांवर लढणार असल्याची माहिती आहे. यामुळे या दोन्ही पक्षांत भाजप मोठा भाऊ राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ 3 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांकडून आज रात्री उशिरा किंवा उद्यापासून एबी फॉर्मचे वाटप सुरू केले जाणार असल्याची माहिती आहे. पण सर्वांनी आपापल्या पात्र उमेदवारांना यापूर्वीच कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय हालचाली वेग घेत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका अचानक निर्णयाने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणताही पोलिस बंदोबस्त किंवा सरकारी ताफा न घेता अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून एकटेच बाहेर पडले आणि थेट त्यांच्या जिजाई निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर जिजाई निवासस्थानी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची झालेली बंद दरवाजामागील बैठक ही अनेक राजकीय तर्क-वितर्कांना जन्म देणारी ठरली. या अचानक भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यातील महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. बैठका, गाठीभेटी, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, जागावाटपाच्या चर्चा अशा घडामोडींनी राजकीय वातावरण तापलेले असतानाच आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानक सर्वांनाच चकित करणारी हालचाल केली. पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांचा मुक्काम होता. येथेच ते पक्षातील इच्छुक उमेदवारांशी संवाद साधत होते, बैठका घेत होते आणि आगामी निवडणुकांसाठी रणनीती ठरवत होते. मात्र, आज सकाळी कोणालाही काहीही न सांगता, नेहमीचा पोलिस बंदोबस्त, पायलट कार आणि सुरक्षारक्षकांचा ताफा मागे ठेवून अजित पवार एकटेच बाहेर पडले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. सकाळच्या वेळेत अजित पवार बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्या सोबत नेहमी दिसणारा पोलिस फौजफाटा तिथेच थांबलेला होता. विशेष म्हणजे, कोणतीही सरकारी गाडी न घेता आणि कोणत्याही सुरक्षेची साथ नसताना अजित पवारांनी एकटेच निघण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय इतका अचानक होता की त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनाही याची कल्पना नव्हती. त्यामुळे अजित पवार नेमके कुठे गेले? का गेले? आणि एवढ्या गुप्तपणे जाण्याचं कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. काही वेळातच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. कुणी हे कौटुंबिक कारण असावं असं म्हणू लागलं, तर कुणी यामागे मोठं राजकीय कारण असल्याचा अंदाज बांधायला सुरुवात केली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत होती. महानगरपालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का, यावर बैठका आणि चर्चा सुरू होत्या. जागावाटपाचं सूत्र जवळपास ठरल्याचंही बोललं जात होतं. मात्र ऐनवेळी निवडणूक चिन्हावरून- घड्याळ की तुतारी, कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, यावरून या चर्चा फिसकटल्याची माहिती समोर आली आहे. ही चर्चा अयशस्वी ठरल्यानंतरच अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार गटाशी चर्चा फिसकटल्यानंतर अजित पवारांचा हा निर्णय केवळ योगायोग नसून त्यामागे ठोस राजकीय कारण असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. जिजाई निवासस्थानी अजित पवार आणि अमोल कोल्हेंची गुप्त बैठक काही वेळानंतर अजित पवारांचं वाहन त्यांच्या जिजाई निवासस्थानी पोहोचल्याचं स्पष्ट झालं. सुरुवातीला अजित पवार नेमके कुठे आहेत, याबाबत संभ्रम होता. मात्र नंतर त्यांनी आपला ताफा मागवून घेतल्याची माहिती समोर आली. याच दरम्यान शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे हे देखील जिजाई निवासस्थानी दाखल झाल्याचं कळलं. अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात जवळपास अर्धा तास बंद दरवाजामागे चर्चा झाली. या बैठकीनंतर अमोल कोल्हे निवासस्थानातून बाहेर पडले. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींमध्ये ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. चर्चांना उधाण, राजकीय वर्तुळात खळबळ अजित पवारांचा अचानक एकटेच बाहेर पडण्याचा निर्णय, त्यानंतर जिजाई निवासस्थानी अमोल कोल्हेंशी झालेली बैठक आणि त्याआधी फिसकटलेल्या राष्ट्रवादीतील चर्चांमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांचा बाजार तापला आहे. ही भेट केवळ चर्चा होती की भविष्यातील मोठ्या राजकीय घडामोडींची नांदी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मोठे निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित पवार यांच्या हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं असून, पुढील काही दिवसांत या गुप्त भेटीचे राजकीय परिणाम स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दोन्हे नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या मुद्यांवर चर्चा अजित पवार आणि शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे यांच्यात जिजाई निवासस्थानी झालेल्या गुप्त बैठकीमागे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा केंद्रबिंदू असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. अजित पवारांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 30 ते 35 जागा देण्याचा प्रस्ताव देत घड्याळ या चिन्हावरच निवडणूक लढवण्याची अट घातल्याने पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींमधील आघाडीची चर्चा फिसकटली. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गट पुन्हा महाविकास आघाडीकडे झुकत असल्याचे संकेत मिळाले असून, त्यासाठीच अंकुश काकडे आणि विशाल तांबे हे मविआ बैठकीला उपस्थित होते. मात्र पुण्यात समीकरणे बिघडलेली असली तरी पिंपरी-चिंचवडमध्ये वेगळे गणित मांडले जात आहे. येथे मविआला बाजूला ठेवून केवळ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात का, यावर अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात सखोल चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवडसाठी ‘घड्याळ’ चिन्हाची अट अजित पवारांनी पुढे न ठेवल्याने चर्चा पुढील टप्प्यावर पोहोचली आहे. काँग्रेसने या आघाडीत सहभागी होणार नसल्याचा निरोप दिल्यानंतरही, किमान पिंपरी-चिंचवडमध्ये तरी दोन्ही पवारांनी एकत्र यावे, यासाठी तडजोडीचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
हिंगोली तालुक्यातील भिंगी येथील तरुण अभियंत्याचा नागपूर येथे अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी ता. २७ सकाळी मृतदेहावर नागपूर येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. मयत अभियंता तेजस निमदेव (२५) हा आठ महिन्यापुर्वीच अभियंता नागपूर मनपाच रुजू झाला होता. या घटनेमुळे निमदेव कुटूुंबासह गावावर शोककळा पसरली आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील मुळचे भिंगी येथील रहिवासी असलेले शिक्षक बालासाहेब निमदेव कुटुंबिय मागील काही वर्षापासून हिंगोली येथील बळसोंड भागात राहतात. त्यांचा मुलगा तेजस निमदेव (२५) हा सुमारे आठ महिन्यापुर्वीच नागपूर महानगर पालिकेत अभियंता पदावर रुजु झाला होता. दरम्यान, नागपूर येथे रूजू झाल्यानंतर तेजस याने व्यायामासाठी जीम लावली होती. नेहमी प्रमाणे सोमवारी ता. २२ पहाटे तो त्याच्या दुचाकी वाहनावर जीम कडे निघाला होता. यावेळी त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वाहन एका खांबावर जाऊन आदळले. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये अतिरक्तस्त्राव झाला. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नागपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या तेजस यास उपचारासाठी रुग्णालयात हलविले. त्यानंतर त्याच्या कुटुंबियाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. नागपूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया देखील झाली. मात्र मागील दोन दिवसांत त्याची प्रकृती आणखीनच खालावली अन शुक्रवारी ता. २६ त्याचा मृत्यू झाला. मृतदेहावर नागपूर येथे शनिवारी ता. २७ उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे निमदेव कुटूुंबियांसह भिंगी गावावर शोककळा पसरली आहे. मयत तेजस याच्या पश्चात आई, वडिल एक भाऊ असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
बाष्पयुक्त हवेने कमाल व किमान पाऱ्यात फरक तर आठवडाभर रात्रीचे तापमान कमी
जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून कमाल व किमान तापमानातील फरक कमी होत चालला आहे. ढगाळ वातावरण, वाऱ्याच्या दिशेत झालेला बदल आणि हवामानातील बदलामुळे किमान तापमान वाढत चालले आहे. तसेच कमाल तापमानही ३०.२ अंशांवर पोहोचले आहे. अकोल्याचे शुक्रवारचे (दि.२६) कमाल तापमान ३०.२ अंश राहिले तर कमाल तापमान १२.३ अंशांपर्यंत वाढले आहे. दरम्यान, ढगाळ व बाष्पयुक्त हवामानामुळे रात्रीची थंडी कमी होते. यामुळे दिवसाचे तापमान आणि रात्रीच्या तापमानात अधिक तफावत जाणवत आहे, असे हवामानतज्ञ सुरेश चोपने यांनी सांगितले. तसेच जागतिक हवामानातील बदलामुळे तापमानात चढ- उतार होतात. त्याचा परिणाम हिवाळ्यात थंडी कमी होण्यात होतो, असे तज्ञांनी सांगितले. दरम्यान, वातावरणातील हा बदल आठवडाभर कायम राहणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवस कमाल व किमान वातावरणातील फरक कमी राहणार आहे, असे हवामान तज्ञांनी सांगितले. उष्ण वाऱ्यांमुळे थंडी कमी ^आग्नेयेकडून येणारे वारे उष्णता घेऊन येतात. हे वारे विदर्भ मध्य भारताजवळ असल्यामुळे आपल्याकडे पोहोचत आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी थंडीचा गारठा काही प्रमाणात कमी झाल्याचे आढळून येत आहे. वाऱ्यांची बदललेली दिशा आणि वाष्पयुक्त हवा आदी घटकांच्या परिणामी तापमान कमी झाले आहे. - सुरेश चोपने, हवामान अभ्यासक
प्रभू येशू ख्रिस्तांनी दिलेली प्रेम, बंधुभाव आणि त्यागाची शिकवण आचरणात आणा. तसेच समाजात वावरताना सत्य, खरेपणाचा अवलंब करा, जगाला तारण, शांती, प्रेम, आनंद देण्यासाठी देवाने प्रभू येशू यांना भूतलावर पाठवले, असे प्रतिपादन रेव्हरंड निलेश अघमकर यांनी केले. ते प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मदिवसानिमित्त खदान खिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्च येथे आयोजित प्रार्थना सभेमध्ये बोलत होते. गुरुवार, २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस अर्थात नाताळ हा सण जगभरात साजरा केला जातो. अकोला महानगर आणि जिल्ह्यातही येशू खिस्तांचा जन्मदिवस अर्थात नाताळ हा सण मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. या वेळी खिश्चन बंधू - भगिनींनी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन केले. ख्रिसमसनिमित्त सुमारे १६० वर्षांचा इतिहास असणारी अकोल्यातील एकमेव खिश्चन कॉलनी घरांना करण्यात आलेल्या रंगरंगोटी, रोषणाईने झगमगून, उजळून निघाली आहे. खिश्चन धर्मियांच्या धार्मिकस्थळांची म्हणजेच चर्चची देखील सजावट आणि रोषणाई करण्यात आली आहे. विविध ठिकाणी खिसमस ट्री आणून त्यांच्यावर रोषणाई करण्यात आली आहे. अनेक चर्चेसमध्ये येशूच्या जन्माचे देखावे सादर करण्यात आले आहेत. २४ डिसेंबरच्या रात्री ख्रिश्चन अबालवृद्धांनी विविध चर्चेसद्वारे आयोजित कॅरल पार्टीमध्ये सहभागी होऊन रात्रभर घरोघरी भेटी देऊन खिस्तजन्माची गीते गायिली. एकमेकांना खिस्तजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सांताक्लॉजच्या वेषातील युवक - युवती यावेळी सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. प्रार्थनेतून ख्रिसमसचा संदेश गुरुवार, २५ डिसेंबर रोजी सकाळी सर्वच चर्चेसमधून प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते. ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चमध्ये रेव्हरंड निलेश अघमकर यांनी ख्रिसमसचा संदेश दिला. इतरही चर्चेसमधून धर्मगुरुंनी ख्रिस्तजन्मावर आधारित संदेश दिले. संघर्ष, अराजकतेची परिस्थिती पाहता जगाला प्रभू येशूने दिलेल्या शांती, प्रेम, बंधुभाव, त्याग, शिकवण आचरणात आणावी.
मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीमध्ये जागावाटपाबाबत मोठ्या प्रमाणावर एकमत झाल्याचं चित्र समोर आलं आहे. उपलब्ध माहितीनुसार, मुंबईतील एकूण 227 जागांपैकी जवळपास 210 जागांवर दोन्ही पक्षांमध्ये सहमती तयार झाली आहे. मात्र उर्वरित 17 जागांवर अजूनही मतभेद कायम असून, हा तिढा सोडवण्यासाठी युतीच्या वरिष्ठ पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखा जवळ येत असल्याने वेळेचा दबाव वाढला आहे. त्यामुळे महायुतीतील नेते सलग बैठका, चर्चा आणि मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या खलबतांमधून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. युतीतील चर्चांचा भाग म्हणून शुक्रवारी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी तिसरी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, भाजपचे नेते रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे आणि आमदार नरेश म्हस्के उपस्थित होते. या बैठकीत ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच मुंबई महापालिकेतील जागावाटपावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. मुंबईसंदर्भातील बऱ्याच जागांवर सहमती झाली असली, तरी अंतिम निर्णयावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत जागावाटप निश्चित करून उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी देण्याचं मोठं आव्हान युतीच्या नेत्यांसमोर उभं आहे. मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा महायुतीचाच महापौर बसावा, असा निर्धार भाजप आणि शिंदे गटाने केला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवून तयार झालेल्या या युतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. या सूत्रानुसार भाजप 140 जागांवर, तर शिंदे गटाची शिवसेना 87 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्याबाबत दोन्ही पक्ष सावध भूमिका घेत आहेत. यादी लवकर जाहीर केल्यास इच्छुकांमधील नाराजी आणि बंडखोरी वाढू शकते, हीच भीती नेत्यांना सतावत आहे. त्यामुळे योग्य वेळ साधून उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईत बऱ्याच अंशी गणित जुळलं असलं, तरी शेजारच्या ठाणे महानगरपालिकेत मात्र जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. ठाण्यात भाजपकडून 40 ते 45 जागांची मागणी करण्यात येत आहे. मात्र शिवसेना शिंदे गटाला हा आकडा मान्य नसल्याचं समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रभारी निरंजन डावखरे आणि आमदार संजय केळकर यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे. या चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील स्वतंत्र बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाण्यातील जागावाटपावर अंतिम निर्णय कधी होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुण्यातील नाराजी आणि नीलम गोऱ्हेंवर कार्यकर्त्यांचा रोष दुसरीकडे, पुण्यात शिवसेना शिंदे गटामध्ये अंतर्गत अस्वस्थता वाढताना दिसत आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. भाजपसोबतच्या जागावाटपाच्या चर्चांमध्ये त्या पुरेशा ठामपणे भूमिका मांडत नसल्याचा आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे. पुण्यात शिवसेनेकडून 35 जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र भाजपने केवळ 15 जागांची तयारी दाखवल्याने शिवसेना नेत्यांनी आता निर्णायक इशारा दिल्याचं बोललं जात आहे. एकीकडे मुंबई आणि ठाण्यात जागावाटप अंतिम टप्प्यात असताना, पुण्यातील हा तणाव युतीसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे.
पातूर तालुक्यातील मळसूरसह अकोला जिल्ह्यात पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांश शेतांमतील तूर पिकांचे अगोदरच नुकसान झाले होते. मात्र गत काही दिवसांपासून थंडी, हवा, धुके व दुपारचे ऊन, अशा हवामानामुळे हाताशी आलेले तुरीच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. अकोला जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन व तुरीच्या पिकाचा पेरा झाला होता. सुरवातीला दोन्ही पिके जोमात होती. परंतु जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये राज्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यात सोयाबीन पीक हे शेंगांच्या व काही ठिकाणी फुलांच्या अवस्थेत असल्याने रात्रंदिवस पडलेल्या पावसामुळे सोयाबीनची फुलगळ झाली होती. बऱ्याच ठिकाणी अती पावसामुळे शेंगा काळ्या होऊन जमिनीवर पडल्या होत्या. यामुळे यावर्षी जिल्हाभरात सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. बऱ्याच शेतकऱ्यांना एकरी एक क्विंटलभर सोयाबीनही झाले नाही. अशी परिस्थिती असताना मात्र तुरीच्या पिकाकडून शेतकऱ्यांना थोडीफार आशा होती. मात्र, अगोदरच अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणचे तुरीचे पीक जळाले होते. मात्र, जे काही राहिले त्या पिकावर सध्याचे विषम हवामान व रोगराईमुळे तुरीचे पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. गत काही दिवसांपासून जिल्ह्यात अती थंडी, हवा, धुके तर दिवसा ऊन असल्याने जवळपास ९० टक्के शेतातील शेंगा भरल्या नाहीत. तसेच यावर्षी मोठ्या प्रमाणात मूळकूज रोगाचा तुरीवर प्रादुर्भाव झाल्याने बहुतांश शेतातील तुरीचे उभे पीक वाळले आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली असून शासनाने खरिपातील सोयाबीन, तूर पिकाचा विमा शेतकऱ्यांना द्यावा. पीकविमा देण्याचे आदेश द्या ^यंदा अतिवृष्टी व विषम हवामानामुळे सोयाबीन व तुरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येत असून शासनाने त्वरित सोयाबीन व तुरीचा पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश पीकविमा कंपनीला द्यावे. यामुळे शेतकरी उन्हाळी पिकांची पेरणी करू शकतील. - विनोद शालिग्राम राऊत, समन्वयक, शेतकरी संघटना, मळसूर, अकोला. उत्पादन खर्चही निघाला नाही ^यावर्षी अती पावसामुळे माझ्या शेतातील सोयाबीन व तूर पीक वाळले असून उत्पादन खर्चही निघाला नाही. लवकरात लवकर पीकविमा द्यावा. - संजय देवकते, शेतकरी, मळसूर. मूळकुजमुळे तुरीचे पीक वाळले ^यावर्षी थंडी व धुक्याने माझ्या शेतातील तुरीच्या पिकावर मूळकूज रोग आल्यामुळे तुरीचे पीक शेंगा न भरता वाळले आहे. सरकारने पिकविम्यासह आर्थिक मदत करावी. - विठ्ठल माहुलकर, शेतकरी, मळसूर.
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने मागील सात वर्षांपासून थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या उपचारासाठी राबवण्यात येणाऱ्या रद्दी संकलन उपक्रमातून जमा झालेला निधी गुरुवारी (दि.२५) छोटेखानी कार्यक्रमात समर्पित करण्यात आला. या वर्षीच्या उपक्रमातून संकलित करण्यात आलेला निधी पाच थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या संपूर्ण वर्षभराच्या वैद्यकीय उपचार व रक्त संक्रमणासाठी डॉ. हेडगेवार रक्तपेढीस समर्पित करण्यात आला. समाजातील नागरिकांनी दिलेल्या रद्दीच्या स्वरूपातील योगदानातून या उपक्रमाला बळ मिळाल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय देशपांडे, प्रमुख पाहुणे भास्करराव कीटुकले, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे निलेश जोशी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीपराव देशपांडे यांनी केले. मान्यवरांनी थॅलेसेमिया आजाराबाबत माहिती देताना सांगितले की, या आजाराने ग्रस्त मुलांना दर १५ ते २० दिवसांनी रक्तसंक्रमणाची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत समाजातील व्यक्ती, संस्था व दात्यांचे सहकार्य मोलाचे ठरते. अॅड. धनश्री देव स्मृती सेवा उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. मानवतेचे घडवले दर्शन मागील सात वर्षांपासून या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य देण्यात आले. सामाजिक बांधिलकी, सेवाभाव व मानवतेचे दर्शन या उपक्रमातून घडत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. समारोपप्रसंगी जयंतराव सरदेशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमातून समाजात सकारात्मक संदेश देण्यात आला.
नगर परिषद, नगर पंचायतची निवडणूक पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुकीचीही रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक तातडीने घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद, पंचायत समिती आजी-माजी पदाधिकारी आणि सदस्य असोसिएशन केली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्यच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. १३ ऑक्टोबर रोजी जि.प., पं.स.च्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली होती. मात्र आरक्षणाची टक्केवारी ५० टक्के पेक्षा जास्त झाली. दरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समिती आजी-माजी पदाधिकारी, सदस्य असोसिएशनने िनवडणुकीबाबत निवडणूक आयोगाला निवेदन सादर केले आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. अनेक विकास योजना टप्पे झाल्या असून, नागरिकांचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. शिष्टमंडळामध्ये कैलास गोरे पाटील (सोलापूर), सुभाष घरत (माजी उपाध्यक्ष ठाणे), उदय बने (माजी उपाध्यक्ष,रत्नागिरी जिल्हा परिषद),शरद बुट्टे पाटील (माजी.सभापती पुणे जिल्हा परिषद),अमोल पवार (उपसभापती, पंचायत समिती खेड),भारत शिंदे (मा.सभापती सोलापूर), गोपाल कोल्हे (विदर्भ अध्यक्ष जिल्हा परिषद असोसिएशन), प्रभाकर सोनवणे (माजी सभापती जळगाव), नितीन मकाते (जिल्हा परिषद सदस्य सोलापूर), अरुण बालघरे (जिल्हा परिषद सदस्य सांगली), शिवाजी मोरे जिल्हा परिषद सदस्य कोल्हापूर), विकास गरड, सुधाकर घोलप यांचा समावेश होता. ...त्यामुळे निवडणुका तातडीने करा जाहीर: सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी पूर्वी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. तथापि अजूनही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली नाही. राज्य सरकारने जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समितीचे गण यांची रचना अंतिम केलेली आहे. जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समितीचे गण यांचे आरक्षणदेखील अंतिम झाले आहे. मतदार यादी अंतिम देखील झाली आहे. त्यामुळे तातडीने जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाहीर करावी, अशी आग्रही मागणी शिष्टमंडळांने केली. असे आहेत फॉर्म्युले सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आरक्षणाची टक्केवारी ५० पेक्षा कमी हवी. सर्वसाधारणसाठी पाच सर्कल, ओबीसींकरिता १४ असलेले सर्कल ९ होण्याची शक्यता आहे. . पहिल्या फॉर्म्युल्यानुसार सध्या जि.प.चे ५२ सर्कलमधील अनुसूचित जातासाठीचे १२ व अनुसूचित जमातीसाठीचे ५ सर्कल कायम राहणार आहेत. उर्वरित ३५ सर्कलमधून ९ सर्कल ओबीसींसाठी राखीव होऊ शकतात. . दुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार सध्या ओबीसीसाठी राखीव असलेल्या १४ सर्कलमधून ५ सर्कल सर्वसाधारण करून उर्वरित ९ सर्कलही ओबीसींसाठी राखीव करण्यात येतील. आयोगाकडून कशी सोडत होते हे पाहणे, औत्सुक्याचे राहणार आहे. सन २०२१मध्ये ओबीसींच्या मुद्दावरून १४ जणांचे जि.प. सदस्यत्व रद्द झाले होते. मात्र नंतर झालेल्या पोट निवडणुकीत राजकीय पक्षांनी सर्वसाधारणमधूनही ओबीसींनाच संधी देत सोशल इंजिनिरींगचा प्रयोग केला होता. आता यावेळी सर्वसाधारणसाठीचे सर्कल वाढणार असले तरी खुल्या जागांवरही ओबीसींना संधी देतात की अन्य सोयीची रणनिती राजकीय पक्ष आखतात, हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे. एकूणच सर्वसाधारणसाठीचे सर्कल वाढल्याने पक्षाअंतर्गत रस्सीखेच वाढणार आहे. सर्वाधिक चढाओढ एकूण २८ सदस्य असलेल्या सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीत होणार आहे.
स्व. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ क्रीडांगणावर २७ ते २९ डिसेंबरदरम्यान राज्यस्तरीय ॲग्रोटेक’ कृषी प्रदर्शनी, कृषी महोत्सव, पुष्प प्रदर्शनी, पशुप्रदर्शनी व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवासाठी चार मोठे डोम तयार करण्यात आले असून, ५५० पेक्षा अधिक स्टॉल उभारण्यात आले आहेत. यामध्ये राज्यभरातील विद्यापीठांमध्ये निर्मित प्रगत कृषी तंत्रज्ञान, कृषी विभाग, जैविक शेती मिशन, महाबीज, नैसर्गिक शेती अभियानासह विविध राष्ट्रीय व राज्य पातळीवरील शेती व ग्रामविकासाशी संबंधित संस्था, कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्या, यंत्र-अवजारे निर्माण करणाऱ्या कंपन्या, बि- बियाणे, खते, औषधे, सेंद्रिय निविष्ठा उत्पादक कंपन्यांसह कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निविष्ठा उत्पादक कंपन्या, कृषी उद्योजक, कृषी पदवीधरांची दालने, विदर्भातील स्वयंसहायता बचत गटांद्वारानिर्मित कृषीपूरक उत्पादने व खाद्यपदार्थांचे स्टॉल समाविष्ट आहेत. स्वतंत्र डोममध्ये पूष्प प्रदर्शनात विविध शोभिवंत झाडे, फुलझाडे, वेली, बोन्साय, इनडोअर प्लांट्स ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्रातून नागरिक, शेतकरी बंधू-भगिनी, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. प्रदर्शनीत साहित्य, पुष्परचना गट, सिंगल कट फ्लॉवर गट, विविध फुले झाडांच्या कुंड्या, इनडोअर प्लांट्स कुंडी, विविध शोभिवंत झाडे कुंडी, विविध वेली, फर्न प्लांट्स, पामकुंड्या, सिंगल पॉट कॅक्टस व सकुलंट बोन्साय, कल्पक प्रकार, हैंगिंग पॉट्स, हारांचे विविध प्रकार इत्यादी वर्गवारी केली आहे. झाडे, फुले, कुंड्या प्रदर्शनासाठी कृषी विद्यापीठातील विभागप्रमुख पुष्पशास्त्र व प्रांगण विद्या विभाग याच्याशी संपर्काचे आवाहन पुष्प शास्त्र विभागप्रमुख प्रा. नितीन गुप्ता, प्रा. नवीन राठोड, डॉ. मनिषा देशमुख, डॉ. सपना राजदेरकर, लीना शिरसाट, अनुज राऊत, परमेश्वर सवडे यांनी केले. स्वयंसहायता गटांना मिळेल स्वतंत्र दालन शेतकरी उत्पादक कंपन्या, स्वयंसहाय्यता बचत गटांना स्वतंत्र दालन उपलब्ध आहे. या माध्यमातून प्रदर्शनीला भेट देणारे शेतकरी, उत्पादक, ग्राहक साखळी अधिक भक्कम करत उत्कृष्ट डाळदाणा, हळद, मिरची व इतर प्रक्रियायुक्त घरगुती वापराचे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
पाच मिनिटांच्या अंतरात दोन कार पुलाखाली कोसळल्या:वरुड फाट्याजवळ घटना, कारचे नुकसान; प्रवासी जखमी
aरस्त्यावर पडलेल्या वाळूने घात केल्याने दोन कार अनियंत्रित होवुन पुलाखाली कोसळल्या. ही घटना काल २५ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास वरुड फाट्याजवळ घडली. या घटनेत दोन्ही कार मधील काही जण जखमी झाले असून दोन्ही कारचे नुकसान झाले आहे. मोताळा ते नांदुरा मार्गावर वरुड फाट्याजवळ वळणावरील पुलाजवळ वाळु पडलेली होती. २५ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एम. एच. ०४/ जी.डी. / ८२४५ या क्रमांकाची कार नांदूऱ्याकडुन मोताळ्याकडे येत होती. कार मधील अरुण किसन राजगुरे जखमी झाले आहेत. अपघात घडताच परिसरातील शेतकरी जितेंद्र वराडे, मंगेश फाटे यांच्यासह सहकाऱ्यांनी त्यांना गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलीस ठाण्याचे एएसआय अरुण सपकाळ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून चालक अंकुश वाघ आणि डॉ. अभिजीत काळे यांच्या सहकार्याने रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. एअर बॅगाने जीवित हानी टळली वाळूवरून गेल्यामुळे एम.एच. ०४/ जी. डी. / ८२४५ या क्रमांकाची कार सुरक्षा कठडे तोडून जवळपास तीस फूट खोल नाल्यात कोसळताच कारच्या एअर बॅगा उघडल्या. त्यामुळे एकास मार लागला असून जीवितहानी झाली नाही. दुसऱ्या कारचाही अपघात काही वेळातच पुन्हा त्याच ठिकाणी एम.एच. १९/ सी.एफ. / ००६९ या क्रमांकाची कार वाळूवरून गेल्याने अनियंत्रित होऊन सुरक्षा कठड्यावर आदळली. या अपघातात कारचे नुकसान होऊन कारमध्ये असलेल्या जयश्री गुलाबसिंग पवार यांच्यासह आणखी दोन जण जखमी झाल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली.
डोणगाव येथील स्वस्त धान्य दुकानात आलेली निकृष्ट दर्जाची ज्वारी आज, दि. २६ डिसेंबर रोजी परत पाठवण्यात आली. तसेच मेहकरमधून तांदूळ परत पाठवण्यात आला. दुसरीकडे मात्र दुकानांमध्ये पोहोचलेले धान्य लाभार्थींना वितरीत करणे सुरूच असल्याचे समोर आले आहे. डोणगाव परिसरासह मेहकर तालुक्यातील काही भागात स्वस्त धान्य दुकानांमधून तीन महिन्यांपासून निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वितरण सुरू आहे. या महिन्याही निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप सुरू असल्याने काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि मेहकरच्या तहसीलदारांना गुरुवार, दि. २५ डिसेंबर रोजी पत्र देऊन या धान्याच्या बदल्यात चांगल्या प्रतीचे धान्य देण्याची मागणी केली. मात्र, आज दुसऱ्याच दिवशी डोणगाव येथे वितरणासाठी अत्यंत निकृष्ट दर्जाची ज्वारी पाठवण्यात आली. याबाबत माहिती मिळताच शैलेश सावजी यांनी ती ज्वारी परत पाठवण्यास सांगितले. संबंधित वाहनात ३९४ कट्टे ज्वारी होती. तिचा पंचनामा करत गोडाऊन व्यवस्थापक व पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांनी ती परत पाठवली. दरम्यान, स्वस्त धान्य दुकानांना प्राप्त झालेले निकृष्ट धान्याचे लाभार्थींना वितरण करणे सुरूच असल्याचे दिसून येत आहे. आंदोलन करणार ^डोणगावसह परिसरात वितरित झालेले निकृष्ट दर्जाचे धान्य गुरांना ही खाण्यायोग्य नाही. ते धान्य शासनाने परत घेऊन त्या मोबदल्यात दुसरे धान्य द्यावे. असा निकृष्ट दर्जाचा माल देऊन गोरगरिबांची थट्टा शासनाने करू नये, अन्यथा या विरोधात आंदोलन करावे लागेल. - शैलेश सावजी, जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस
शेतकऱ्यांच्या धान्याला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाच्या वतीने विविध ठिकाणी केंद्रे निर्माण करण्यात आली आहेत. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रथमच सोयाबीन केंद्र सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच याचा लाभ घेता येईल. आपली बाजार समिती नावाजलेली आहे. त्याचप्रमाणे आपले कार्यही दिसून आले पाहिजे. भविष्यात खामगाव बाजार समिती अत्याधुनिक व उच्च प्रतीची होईल. शेतकऱ्यांची ही बाजार समिती फक्त राज्यातच नव्हे तर देशभरात नावारूपाला येईल, अशी कृषी उत्पन्न बाजार समिती आपण निर्माण करू, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या नाफेड (नॅशनल अॅग्रीकल्चर को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड) अंतर्गत स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे २६ डिसेंबर रोजी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांच्या मालाला गुणवत्तेनुसार योग्य भाव मिळावा, हा उदात्त हेतू लक्षात घेता बाजार समितीच्या वतीने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर होते. विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षनेता ज्ञानेश्वर पाटील व वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंट्री बोर्ड सदस्य अशोक सोनोने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन संजय देशमुख यांनी केले. प्रास्ताविक संचालक अशोक हटकर यांनी केले, तर आभार उपसभापती संघपाल जाधव यांनी मानले. शेतकरी सागर भिसे यांचा सत्कार यावेळी सोयाबिन घेऊन आलेल्या शेतकरी सागर भिसे, टेंभुर्णा यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर पाटील व अशोक सोनोने यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी बाजार समितीचे सभापती श्रीकृष्ण टिकार, उपसभापती संघपाल जाधव, शरद वसतकार, सुरेश तोमर, तेजेंद्रसिंग चव्हाण, स्वप्निल ठाकरे, सुरेश वनारे, श्याम पाटेखेडे, अजय तायडे, रामकृष्ण भारसाकळे, बाजार समितीचे संचालक अशोक हटकर, शांताराम पाटेखेडे, राजाराम काळणे, गणेश माने, राजेश हेलोडे, विनोद टिकार, मंगेश इंगळे, श्रीकांत वानखडे, दिलीप मुजुमले, सचिन वानखडे, किमंत कोकरे, संजय झुनझुनवाला, यांच्यासह अडते-व्यापारी, शेतकरी बांधव व कर्मचा-यांची उपस्थिती होती.
ग्रामीण भारत आज अनेक गंभीर आव्हानांचा सामना करीत आहे. जागतिकीकरण, आर्थिक विषमता, हवामान बदल ही आजच्या काळातील प्रामुख आव्हाने आहेत. ग्रामीण भागातील समस्यांवर अभ्यास करणे गरजेचे असून ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी केवळ शासनच नव्हे, तर नागरिकांनी ही जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे, असे आवाहनात्मक प्रतिपादन अभ्यासक व मुक्त पत्रकार जयदीप हर्डीकर यांनी केले. ग्रामीण भारतातील सद्यस्थिती व आव्हाने’ या विषयाची मांडणी करताना ते बोलत होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था व नियमन केंद्र आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. जयवंत पुसदेकर, प्राचार्य डॉ. अंबादास कुलट व नियमन केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे उपस्थित होते. विषयाची मांडणी करतांना जयदीप हर्डीकर म्हणाले, आजच्या प्रसारमाध्यमांवरील वादविवाद बघितले तर आपल्या देशासमोर कुठल्याच समस्या नाहीत असे दिसते. ग्रामीण भागातील प्रश्नांना योग्य कव्हरेज मिळत नाही, जोपर्यंत आपण ग्रामीण भागाला समजून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला देशाचा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक वारसा उमजणार नाही. शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या आहेत. तो कर्जबाजारी का झाला, आत्महत्या का करीत आहे. हे प्रश्न शासनासह जनतेने सुध्दा समजून घेतले पाहिजे. सध्या शहराचा खुप लाड चालला आहे. मेट्रो, चकचकीत रस्ते, स्वस्त भाजीपाला, फाईव्ह - जी, सुविधा यांसारख्या आधुनिक सुविधा पुरविल्या जातात. मात्र दुसरीकडे ग्रामीण भागात आजही शिक्षण, आरोग्य, रस्ते, पाणी व वीज आदी मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील विकासाची दुरी अधिक वाढत आहे. शेतकरी जगतात कसे, नवीन युवकांना शेती का करावीशी वाटत नाही. त्यांच्यात शेतीविषयी अनास्था निर्माण होत असल्यामुळे तो भाग अस्थिर होत असल्याचे ते म्हणाले. भारत हा कृषीप्रधान देश असून शेतीतील उत्पन्नापेक्षा बिगर शेतीतील उत्पन्न अधिक असल्याचे दिसून येते. काही मोजक्याच लोकांकडे देशातील संपत्ती एकवटताना दिसते. हे चित्र अर्बन व रुरल इंडियामध्ये मोठी विषमता निर्माण करित आहे. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे पालकत्व शिक्षण क्षेत्राने स्वीकारले पाहिजे आणि नागरिकांनीही ग्रामीण भागातील सद्यस्थिती सुधारण्यासाठी आणि तेथील आव्हाने दूर करण्यासाठी जबाबदारी घ्यावी, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय भाषण संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. जयवंत पुसदेकर यांनी केले. सुरुवातीला डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शाल, श्रीफळ व ग्रंथ भेट देवून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय नियमन केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे, स्वागतपर भाषण प्राचार्य अंबादास कुलट, संचालन डॉ. प्रवीण हरमकर, तर आभार डॉ. सुवर्णा गाडगे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रवीण रघुवंशी, संचालक डॉ. श्रीकांत पाटील, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी आत्महत्यांंवर विद्यापीठ उपाययोजना सुचवणार : कुलगुरू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते बोलतांना म्हणाले, यवतमाळ व अमरावती सर्वात जास्त आत्महत्याग्रस्त जिल्हे म्हणून ओळखले जातात. शेतक-यांच्या उन्नतीसाठी शासनाने अनेक योजना राबविल्यात, पण आत्महत्या कमी होतांना दिसत नाहीत. आत्महत्यांसाठी ग्राऊंड स्तरावर असलेल्या मुद्यांवर विद्यापीठातील डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था व नियमन केंद्राच्या वतीने तज्ज्ञांच्या समितीचे संशोधन सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर विद्यापीठ ठोस उपाययोजना सूचविणार, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील, असा विश्वास कुलगुरूंनी याप्रसंगी व्यक्त केला.
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात माणूस सुखाच्या शोधात भरकटत चालला आहे. मात्र खरे सुख हे संपत्ती, पद, प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धीत नसून धर्माचरण, सद्विचार आणि परोपकार यातच दडलेले आहे, असे प्रेरणादायी विचार शिवानंद महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले. परमहंस संत श्री काशिनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित धार्मिक महोत्सवाला गुरुवारपासून मोठ्या भक्ती भावात प्रारंभ झाला. काशिनाथ धाम येथे सुरू असलेल्या शिवमहापुराण कथा वाचनात ते बोलत होते. संत काशिनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे यंदाचे विसावे वर्ष असून, या निमित्ताने नांदगाव पेठ परिसर संपूर्णपणे भक्तीमय आणि आध्यात्मिक वातावरणाने न्हाऊन निघाला आहे. २५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या महोत्सवात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या प्रारंभी सकाळी संत काशिनाथ महाराज मंदिरात विधीवत पूजा व आरती पार पडली. त्यानंतर संत काशिनाथ बाबा सामूहिक चरित्र ग्रंथ पारायण मोठ्या श्रद्धेने करण्यात आले. पुढे काशिनाथ धाम येथे यजमानांच्या हस्ते विधीपूर्वक पूजन करून पुण्यतिथी महोत्सवाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. दुपारी भाविकांसाठी विशेष आकर्षण असंलेले श्री शिव महापुराण कथा वाचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी शिवानंद महाराज शास्त्री यांनी आपल्या सुमधुर, ओघवत्या आणि प्रभावी वाणीने शिवमहापुराण कथेचे वाचन केले. शिवानंद महाराज शास्त्री म्हणाले की, भगवंताच्या कथांचे श्रवण केल्याने मन शुद्ध होते, विचार सकारात्मक बनतात आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. कथा ऐकणे म्हणजे केवळ परंपरा जपणे नव्हे, तर आपल्या जीवनात चांगल्या संस्कारांची रुजवणूक करणे होय.प्रत्येकाने आपल्या जीवनात सत्य, सेवा आणि समर्पण या मूल्यांचा अंगीकार केला, तर समाज नक्कीच सुदृढ, संस्कारक्षम आणि समृद्ध बनेल. संगीतमय कथावाचन, मधुर अभंग, श्लोक आणि नामघोष यामुळे काशिनाथ धाम परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती, अनेक भक्तांनी कथावाचनातून आत्मिक शांती व समाधान मिळाल्याची भावना व्यक्त केली. तत्पूर्वी या पुण्यतिथी महोत्सवात श्री ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरीभजन, शिवमहापुराण कथा, हरिकीर्तन, सामूहिक प्रार्थना आदी विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असून, सप्ताहभर चालणारा हा महोत्सव भाविकांसाठी एक आध्यात्मिक पर्वणी ठरणार आहे.
दानापूर गुरुकृपा व परिसरातील सहा ते सात गावांच्या सहभागातून २१ डिसेंबर रोजी जागतिक ध्यान दिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रामोत्सव व मेडिटेशन कार्यक्रम दानापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम हनुमान प्रसाद प्रसादासह जनता विद्यालय, दानापूर येथे सकाळी १० ते रात्री ९:३० वाजेपर्यंत घेण्यात आला. यात दानापूर, सोगोडा, मुंडगाव, रायखेड, चांगलवाडी, तेल्हारा व हिवरखेड या गावांतील ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला. दिवसभरात जवळपास ६०० हून अधिक स्पर्धकांनी विविध खेळ व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमात हॉलिबॉल, मुला-मुलींसाठी १०० मीटर धावणे, खो-खो, गोळाफेक, थालीफेक, पारंपरिक भजन स्पर्धा, गरबा डान्स, योगा डान्स, सोलो डान्स, कराओके गायन, समाजप्रबोधनपर नाटिका, महाकालेश्वर डमरू पथक दानापूर यांचे विशेष सादरीकरण झाले. या सर्व स्पर्धांचे परीक्षण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जिल्हा महिला प्रचारक संगीता गावंडे यांनी केले. लहानपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग घेतला. खेळ व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य, खेळाडूवृत्ती, सामाजिक एकोपा तसेच सांघिक भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. श्री रविशंकर यांनी ध्यानाच्या माध्यमातून जगाला दिलेल्या आनंद, समाधान व आंतरिक शक्तीच्या अनुभूतीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला. कार्यक्रमांच्या सांगतेनंतर गुरुदेवांसोबत मेडिटेशन केले. स्पर्धेत सर्वांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व सहभागी गावांतील आर्ट ऑफ लिव्हिंग स्वयंसवेकांनी महिनाभर केलेल्या सेवेमुळे कार्यक्रम यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर स्वीप उपक्रमांतर्गत आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौम्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात व्यापक मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (इर्वीन) परिसरातील सेंट कॅथेड्रल चर्चमध्ये ख्रिसमस दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमादरम्यान अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांनी आपला मतदार हक्क बजावावा यासाठी विशेष मतदार शपथ घेण्यात आली. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचे महत्त्व, जबाबदार नागरिक म्हणून सक्रीय सहभाग आणि निर्भय व निष्पक्ष मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिकांना निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदार नोंदणी, मतदानाचा दिनांक, तसेच मतदान करताना पाळावयाच्या नियमांची माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी उपस्थितांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक अमरावतीकर मतदाराने मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच सर्वांनी मतदान दूत’ म्हणून कार्य करत इतर नागरिकांनाही मतदानासाठी प्रेरित करावे, असा संदेश यावेळी त्यांनी दिला. सामाजिक एकोपा, लोकशाही मूल्ये आणि नागरी कर्तव्य यांचा सुरेख संगम साधणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला. यावेळी स्वीप प्लॅन नियंत्रक तथा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, सहायक कार्यक्रम अधिकारी पंकजकुमार सपकाळ, कैलास कुलट, सुमेश वानखडे, शुभांगी सुने, संजय बेलसरे, चेतना बोन्डे, अर्चना रडके, वैशाली दातीर तसेच इतर स्वीप सदस्य उपस्थित होते.
अमरावती मनपा माहिती कक्षामध्ये आगामी निवडणुकीसंदर्भात माहिती संकलन, नोंदी व तांत्रिक तयारीची गुरुवार २५ रोजी पाहणी करत अतिरिक्त आयुक्तांनी माहिती वेळेत व अचूक उपलब्ध राहील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. निवडणूक विभागात मतदार यादी, कर्मचारी नेमणूक, प्रशिक्षण व निवडणूक प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत चर्चा करण्यात आली. नाईक यांनी महानगरपालिकेतील निवडणूक विषयक कामकाजाची सखोल पाहणी केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज राहावे, उद्देशाने ही पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान महानगरपालिकेतील माहिती कक्ष, निवडणूक विभाग, भांडार विभाग, नगर सचिव विभाग येथे सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक विभागातील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करताना त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून निवडणूक संदर्भातील तयारी, कागदपत्रांची स्थिती, मनुष्यबळ नियोजन तसेच आवश्यक साहित्याबाबत माहिती जाणून घेतली. माहिती कक्षामध्ये निवडणूक संदर्भातील माहिती संकलन, नोंदी व तांत्रिक तयारीची पाहणी करत त्यांनी माहिती वेळेत व अचूक उपलब्ध राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. निवडणूक विभागात मतदार यादी, कर्मचारी नेमणूक, प्रशिक्षण, निवडणूक प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले. कोणतीही त्रुटी किंवा विलंब होऊ नये, यासाठी जबाबदारीने काम करण्यावर त्यांनी भर दिला. या पाहणीमुळे महानगरपालिकेतील निवडणूक तयारीला अधिक गती मिळणार आहे. प्रशासन अधिक सक्षमपणे निवडणूक प्रक्रिया राबवण्यास सज्ज असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. या पाहणी दरम्यान शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, नगर सचिव संदिप वडुरकर, मनपा कर्मचारी उपस्थित होते. मनपातील विविध विभागांची पाहणी करताना अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक. निवडणुकीशी संबंधित साहित्याची पाहणी भांडार विभागामध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले साहित्य, उपकरणे व इतर साधनसामग्री उपलब्धतेची तपासणी करण्यात आली. निवडणूक काळात कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये, यासाठी आधीच योग्य नियोजन करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी दिले. नगर सचिव विभागात निवडणूक संबंधित अधिसूचना, पत्रव्यवहार व कायदेशीर बाबींचा आढावा घेण्यात आला. सर्व कामकाज नियम व मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडले जावे, तसेच सर्व नोंदी अद्ययावत ठेवण्यात याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
बेघर बांधवांच्या मदतीस विद्यापीठ तत्पर- कुलगुरू:कुलगुरू डॉ.बारहाते यांची आधार केंद्राला भेट
अमरावती मायबापांना बेघर करणे ही गंभीर समस्या असून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू या नात्याने मला या बेघर बांधवांसाठी जी काही मदत करायची आहे, ती मी नक्कीच करेल. या बेघर बांधवांच्या मदतीसाठी विद्यापीठ सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. बडनेरा स्थित आधार शहरी बेघर लोकांच्या निवारा केंद्राला कुलगुरूंनी सदिच्छा भेट दिली, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी भारतीय जैन समाज संघटनेचे अध्यक्ष सुदर्शन गांग, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद कासट, विदर्भ कुष्ठरोगी सेवा संस्था, तपोवनचे अध्यक्ष डॉ. सुभाष गवई, विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त असलेले डॉ. प्रफुल्ल गवई, महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अरुणा वाडेकर, बार्टीच्या प्रकल्पाधिकारी अनिता गवई आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ समाजसेवक जवाहर गांग यांनीही या निराधार बेघर बांधवांसाठी मदतीचा हात देण्यास सदैव तत्पर असल्याचे मनोगतातून सांगितले. राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत पब्लिक एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटीद्वारे संचालित आधार निवारा केंद्राला सदिच्छा भेट दिल्याबद्दल डॉ. मिलिंद बारहाते यांचा सत्कार केला. आधार केंद्रातील बेघरांना मार्गदर्शन करताना कुलगुरूंसह मान्यवर.
जीवघेणा नायलॉन मांजा केला जप्त:बेलपुरा परिसरातून 20 हजारांचा साहित्य जप्त; खुलेआम विक्रीवर अकुंश
अमरावती शासनाने प्रतिबंधित केलेल्या नायलॉन मांज्याची शहरातील अनेक भागात खुलेआम विक्री सुरू आहे. दरम्यान राजा पेठ ठाण्याच्या हद्दीतील बेलपुरा भागात एका ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या घरी दहा टाकली. यावेळी पोलिसांनी १२ हजाराचा नायलॉन मांजा तसेच आठ हजार रुपयांचे इतर साहित्य असे वीस हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई पोलिसांनी बुधवारी (दि. २४) केली आहे. शशिकांत सुभाषराव काटे (५२, रा. बेलपुरा, अमरावती) याच्याकडून पोलिसांनी नायलॉन मांजा जप्त केला आहे. बेलपुरा परिसरात राहणाऱ्या शशिकांत काटेकडे मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा असून तो सर्रास या मांज्याची विक्री करत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. नायलॉन मांजा हा अतिशय घातक असून आजवर अनेक दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांसाठी हा मांजा अत्यंत धोकादायक ठरलेला आहे. त्यामुळेच शासनाने नायलॉन मांज्याच्या विक्री व वापरावर बंदी घातली आहे. असे असले तरीही शहरातील अनेक भागात नायलॉन मांजाचा खुलेआम वापर करण्यात येतो आहे. पतंगबाजी करण्यासाठी साध्या धाग्याचा वापर करावा, असे आवाहन वारंवार करण्यात येत असले तरीही काही उत्साहींकडून नायलॉन मांजाचा वापर करून दुसऱ्याच्या जीवासाठी धोकादायक ठरत आहे. ही कारवाई राजापेठचे ठाणेदार पुनित कुलट, पीएसआय मिलिंद हिवरे व त्यांच्या पथकाकडून करण्यात आली आहे. जप्त केलेला नायलॉन मांजा व कारवाई करणारे पथक.
औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथील सरपंचाच्या अविश्वास प्रस्तावासाठी बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेत ५२५ पैकी ३१६ गावकऱ्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करून सरपंचांना पदावरून पायउतार केले आहे. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी ता. २६ दुसऱ्यांचा ग्रामसभा पार पडली आहे. औंढा नागनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभूलिंग महाराज यांच्या विरोधात ९ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर झालेल्या बैठकीत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव पारित झाला होता. त्यानंतर सरपंच प्रभूलिंग महाराज यांनी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात अपील दाखल केले. मात्र त्यांची निवड थेट जनतेतून झाल्यामुळे ग्रामसभा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार यापुर्वी ग्रामसभा घेण्यात आली. त्यावेळी ग्रामसभेने सरपंच प्रभूलिंग महाराज यांच्या वरील अविश्वास ठराव बहुमतान पारित केला. या ग्रामसभेच्या निर्णया विरुध्द त्यांनी उच्च न्यायालयात रिट याचीका दाखल केली होती. यामध्ये न्यायालयाने त्यांना दिलासा दिला होता. मात्र पुन्हा एकदा ग्रामसभा घेण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार शुक्रवारी ता. २६ सारंगवाडी येथे विशेष ग्रामसभा बोलाविण्यात आली. यावेळी औंढा नागनाथ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुनील गुठ्ठे, एस. एस. बोबडे, गोपाल मुकीर, एश. एस. शामशेट्टीवार, जी. पी. हलबुर्गे याच्यासह ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी ग्रामसभेत मतदानासाठी शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत नोंदणी करून घेण्यात आली. यामध्ये ५४४ गावकऱ्यांनी मतदानासाठी नोंदणी केली होती. त्यानंतर दुपारी बारा ते सायंकाळी पाच यावेळेत प्रत्यक्ष मतदान घेण्यात आली. त्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत मतदान केंद्र स्थापन करण्यात आले. यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५२५ जणांनी मतदान केले तर १९ जण अनुपस्थित होते. अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदानासाठी वर्तुळ हि निशाणी तर विरोधात मतदानासाठी त्रिकोण हि निशाणी देण्यात आली होती. दरम्यान, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी मतमोजणीला सुरवात झाली. गावकऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या मतमोजणीमध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने ३१६ गावकऱ्यांनी मतदान केले तर १८२ गावकऱ्यांनी विरोधात मतदान केले. तर २७ मते बाद झाली. सायंकाळी उशीरा निर्णय जाहिर होताच गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. दुसऱ्यांचा झालेल्या ग्रामसभेतही गावकऱ्यांनी सरपंच प्रभूलिंग महाराज यांना नाकारले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानंतर घेण्यात आलेल्या ग्रामसभेची प्रक्रिया कुठल्याही त्रुटी राहू न देता पार पाडण्यात आली. आता याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेला कळविला जाणार असल्याचे गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे यांनी सांगितले.
पुण्यातील नाना पेठ परिसरात गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी घडलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणाने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडवली होती. या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आंदेकर टोळीचा प्रमुख मोरक्या बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर यांना आता आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने हा निर्णय देताना काही कठोर अटी घातल्या असून, निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणताही कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा आदेश दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची मिरवणूक, प्रचारयात्रा, घोषणाबाजी किंवा सार्वजनिक भाषण करण्यास मनाई करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणतेही शक्तीप्रदर्शन करता कामा नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे, मात्र त्याचवेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. त्यामुळे या तिघांनाही केवळ अर्ज दाखल करण्यापुरतीच सशर्त मुभा देण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर हे आज, शनिवारी 27 डिसेंबर रोजी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असून, आंदेकर कुटुंबाने पक्षादेशानुसार अर्ज सादर करण्याची तयारी केली आहे. अर्ज दाखल करताना त्यांना सशुल्क पोलिस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणी त्यांच्या वतीने अॅड. मिथुन चव्हाण यांनी न्यायालयात केली होती. या मागणीचा विचार करत, संभाव्य धोका टाळण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आरोपींना पोलिस बंदोबस्तात अर्ज दाखल करण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. सूड उगवण्यासाठी आयुष कोमकरला लक्ष्य केले नाना पेठेतील वर्चस्वाच्या वादातून आणि टोळीयुद्धातून आयुष कोमकर याची गणेश विसर्जन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे आंदेकर टोळीचा हात असल्याचा आरोप असून, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणाचा सूड उगवण्यासाठी आयुष कोमकर याला लक्ष्य करण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. या प्रकरणात बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्याच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांवरही गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. आंदेकरवरील इतर गुन्हे आणि राजकीय चर्चेला उधाण दरम्यान, नाना पेठ परिसरात जामिनीचा बेकायदा ताबा घेतल्याच्या प्रकरणात बंडू आंदेकर याला नुकतेच धुळे कारागृहातून समर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणात त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. एकीकडे गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेले आरोपी आणि दुसरीकडे महापालिका निवडणुकीत त्यांचा सहभाग, यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कायद्याच्या चौकटीत राहून निवडणूक प्रक्रिया पार पडावी, यासाठी न्यायालयाने घातलेले निर्बंध कितपत प्रभावी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या प्रकरणाचे पडसाद निवडणुकीवर आणि शहराच्या राजकारणावर कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मोहोळ येथे श्री नागनाथ केसरी कुस्तीमध्ये सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी, रुस्तम ए हिंद केसरी गंगावेश तालीम कोल्हापूरचा फेडरेला लीमा आंतरराष्ट्रीय विजेता ब्राझील यांच्यात लढत झाली. या लढतीमध्ये सिकंदर शेख यांनी फेडरेला लीमा यांच्यावर निकाल या डावावर मात करून श्री नागनाथ केसरी कुस्तीचा बहुमान पटकावला. तर रोहन पवार महाराष्ट्र चॅम्पियन गंगावेश तालीम कोल्हापूर विरुद्ध शाहरुख खान यांच्यात लढत झाली. या लढतीत रोहन पवार यांनी एक चॉक या डावावर शाहरुख खान यांच्यावर मात करून नागनाथ केसरी कुस्तीचा बहुमान पटकावला. मोहोळ येथे नागनाथ केसरी कुस्ती समिती व बहुउद्देशीय मंडळ मोहोळ यांच्या वतीने नागनाथ विद्यालय येथे नागनाथ केसरी कुस्तीसह निकाली कुस्तीचे जंगी मैदान गुरुवार दि.२५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती मैदानाचे पूजन राजेंद्र खर्गे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. कुस्ती मैदानाचे उद्घाटन आमदार राजू खरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन कुस्ती रणवीर व्यवहारे मुंढेवाडी, विरुद्ध युवराज राऊत नरखेड यांच्यात झाली. या कुस्ती मैदानात वजन गटामध्ये १६० तालुक्यासह महाराष्ट्रातून पैलवानांनी सहभाग नोंदवला होता. या प्रथम नागनाथ केसरी कुस्तीसाठी २ लाखांचे बक्षीस देण्यात आले. चांदीची गदा जयवंत धोंडीबा धोत्रे यांच्या स्मरणार्थ सागर शेख सागर ज्वेलर्स यांच्या वतीने देण्यात आली होती. किताब मारुती गोपीनाथ काळे यांच्या स्मरणार्थ सचिन मारुती काळे यांच्या वतीने देण्यात आले होते. या कुस्त्या समितीचे अध्यक्ष अशोक धोत्रे, सचिव अनंता नागणकेरी, खजिनदार दत्तात्रय डोंगरे, तायाप्पा गावडे, चंद्रराज काळे यांनी कुस्ती मैदान यशस्वी पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली. याप्रसंगी तालुक्यासह महाराष्ट्रातून कुस्तीप्रेमी सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ^नागनाथ केसरी कुस्ती मैदानासाठी तालुक्यासह महाराष्ट्रातून मागील १५ वर्षापासून मदतीसह प्रोत्साहन देण्याचे काम केले. वस्ताद गुंडा पाटील, बाळासाहेब चवरे, शरीफ शेख, अस्मलम काझी, नितीन निळ, राजू पैकेकरी, शामराव बंडगरसह विविध भागातील वस्तादांनी कुस्ती निरीक्षक म्हणून काम पाहिले. त्याबद्दल कुस्ती शौकीनसह प्रेक्षकांचे आभार मानतो. असेच सहकार्य अबाधित ठेवाल, अशी आशा बाळगतो. अनंता नागणकेरी, सचिव १५ वर्षापासून मदतीसह प्रोत्साहन देण्याचे काम
बांगलादेशात हिंदूवर अत्याचार; करमाळ्यामध्ये निषेधार्थ मोर्चा:केंद्र सरकारने ठोस भूमिका घ्यावी
मागील आठवड्यात बांगलादेशमध्ये इस्लामिक जमावाकडून दिपू चंद्रदास या निरपराध हिंदू तरुणाची धार्मिकतेच्या नावाखाली जिवंत जाळून निर्घृण हत्या करण्यात आली. या अमानवी व क्रूर घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली असून विविध ठिकाणी निषेध आंदोलन व मोर्चांचे आयोजन करण्यात येत आहे. बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदू समाजावर अत्याचार, हत्या व धार्मिक छळ होत असल्याच्या घटना समोर येत असून, धार्मिकतेच्या आडून हिंदू समाजाला संपवण्याची सुनियोजित कुटनीती राबवली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाज करमाळा यांच्या कडून शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी करमाळा शहरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुभाष चौक या मार्गावरून काढण्यात आला. मोर्चा दरम्यान ‘बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचार थांबवा’, ‘हिंदूंवरील हत्यांचा निषेध असो’, भारत सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
बार्शी बसस्थनकाची दुरवस्था दूर करणेसाठी शासन स्तरावर प्रयत्न करून पुनर्बांधणीसाठी १० कोटी ७७ लाख रुपयांचा मंजूर निधी व राज्य मार्ग परिवहन मंडळ कडून या कामाची प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा प्रकरणी आमदार दिलीप सोपल व माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी निधी आपणच मंजूर केल्याचे दावा केले असून सोपल व राऊत यांच्यात श्रेय वादाची ठिणगी पडली आहे. याबाबत आ. सोपल म्हणाले, मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेले बार्शी बसस्थानक पश्चिम महाराष्ट्र मधील सर्वाधिक मोठे उत्पन्न देणारे बसस्थानक असताना मोठी दुरावस्था होती. बस स्थानक इमारत व अंतर्गत रस्ते अत्यंत खराब झाल्यामुळे प्रवाशी व नागरिकांतून तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत होता. या पार्श् भूमीवर समाज माध्यमातून तसेच वर्तमानपत्र मधून वारंवार प्रसिद्ध होत असलेली दुरवस्थेची छायाचित्रे बातम्यांचे कात्रणांसह परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना समक्ष भेटून व्यथा मांडली. दरम्यान बीओटी तत्त्वावरील प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित होता. मात्र या बाबतची कार्यवाही पुढे होत नसल्याने शासनाकडे स्व निधीतून दुरावस्था दूर करण्याची मागणी लावून धरल्यानंतर नामदार सरनाईक यांनी याबाबत आदेश व मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला. बस स्थानक चौक येथे होणारी वाहतुकीची कोंडी दूर करण्य ासाठी आगारात येणाऱ्या एस टी बस वेअर हाऊस रोडच्या बाजूने प्रवेशद्वार केल्यास स्टॅंड चौकातील वाहतूक कोंडीतून सुटका होईल तशा सुचना प्रशासनाला दिल्या होत्या त्याप्रमाणे प्रवेश द्वारसाठी भिंत पाडून गेट बसविण्यात आले आहे ते लवकर सुरु करण्याची कार्यवाही देखील लवकरच होईल असेही सोपल यांनी सांगितले. याबाबत माजी आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, आमदार असतानाच जानेवारी २०२४ मध्ये बस स्थानक नव्याने बांधण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १४ कोटीहून अधिकचा निधी मंजूर करून घेतला आहे. पूर्वीच्याच मंजुरीचे नाहक श्रेय विरोधक घेत आहे. राज्य परिवहनने बस स्थानक पुनर्बांधणी बाबत नुकतीच प्रसिद्ध केलेली निविदा ही पूर्वीच्याच मंजुरीचा भाग आहे. बार्शी बस स्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार बस स्थानकाची नव्याने इमारत उभी राहणार असून संपूर्ण स्थानक परिसराचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे तसेच एकूण १६ प्लॅटफॉर्म सह ७ व्यापारी दुकाने, हिरकणी कक्ष,उपहार गृह, पोलिस बूथ, पार्सल ऑफिस, रिझर्वेशन ऑफिस, सुलभ शौचालय, स्थानक प्रमुख ऑफिस, वेटींग हॉल, पार्किंगची स्वतंत्र सोय या सुविधा होणार आहेत.
वैराग जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी मंगळवारी वार्षिक निरीक्षण करण्यासाठी वैराग पोलीस ठाण्यामध्ये आले होते. तेथे भौगोलिक दृष्ट्या विस्तीर्ण आणि संवेदनशील असलेल्या वैराग पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण यावर्षी घटले आहे. यामागे पोलिसांचे अथक प्रयत्न असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी सांगितले आहे. दरम्यान वैराग पोलिस ठाण्यामध्ये गेल्या वर्षभरात दरोडा, जबरी चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल झालेले नाहीत. पोलिस ठाण्यामध्ये अद्यावत यंत्रणा आणि नावीन्यपूर्ण कार्यप्रणाली सुरू करण्यात आली असून याचा फायदा पोलिसांच्या कार्यक्षमतेत होत आहे. मोठमोठ्या चौकांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि मुलींच्या छेडछाडीला आळा घालण्यासाठी निर्भया पथकास अधिक कार्यतत्पर करण्याबाबतच्या सूचना देण्यात आले आहेत. सायबर गुन्हे ऑनलाईन फ्रॉड दोन दिवसात मार्गी लावण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत यासाठी जर तक्रारी अर्ज प्राप्त झाला तर तात्काळ बँकेतील पैसे स्थगित करून या तक्रारीचा निपटारा वेगाने करण्यात येणार आहे. गुन्हा दाखल होताच अवघ्या साठ दिवसांमध्ये तक्रारीचा निपटारा करण्यात येणार असून व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि पंचनामा करण्याचे आदेश देखील यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिले आहेत. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख अतुल कुलकर्णी, बार्शीचे उपविभागीय अधिकारी अशोक सायकर, वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वजीत जगदाळे, पोलिस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव अधिकारी उपस्थित होते.
भाजी विक्रेत्या महिलेचा प्रामाणिकपणा:भाजी खरेदी करताना हरवलेली सोन्याची अंगठी गुरुजींच्या स्वाधीन
वैराग बस स्थानक परिसरात भाजी विक्री करणाऱ्या शोभा काळे या महिलेने हरवलेली सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे तिच्या मालकाच्या स्वाधीन करून समाजासमोर मोलाचा आदर्श ठेवला आहे. या घटनेमुळे संपूर्ण वैराग परिसरात शोभा काळे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मोहोळ तालुक्यातील देगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले सज्जन शेंडगे रविवारी वैरागकडे परतत होते. सायंकाळी वैराग बस स्थानकासमोर भाजी खरेदी करत असताना अंधार पडत असल्याने चोरीचा संशय टाळण्यासाठी त्यांनी हातातील सोन्याची अंगठी काढून पँटच्या वॉच पॉकेटमध्ये ठेवली होती. भाजी खरेदी दरम्यान त्याच खिशातून पैसे काढताना ती सोन्याची अंगठी अनवधानाने शोभा काळे यांच्या भाजीच्या टोपलीत पडली. मात्र हे शेंडगे गुरुजींच्या लक्षात आले नाही. घरी आल्यानंतर रात्री अंगठी ठेवण्यासाठी पाहिले असता ती आढळून आली नाही. त्यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी शोध घेतला तसेच दुसऱ्या दिवशी सकाळीही पाहणी केली; मात्र अंगठी सापडली नाही. याबाबत चौकशी केली असता त्यावेळी शोभा काळे यांनाही अंगठी सापडली नव्हती. दरम्यान, दुपारी भाजीचे टोपले उचलताना टोपलीमध्ये सुमारे एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी त्यांना दिसून आली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तात्काळ शेंडगे गुरुजींशी संपर्क साधून ती अंगठी त्यांच्या स्वाधीन केली.
विजय निलाखे|बार्शी सोशल मीडियाच्या युगात पत्र लेखन कला जतन व संवर्धन करण्यासाठी येथील टपाल तिकीट संग्राहक उदयकुमार पोतदार हे मागील अनेक वर्षापासून पोस्ट कार्डच्या माध्यमातून नूतन वर्षाच्या स्व हस्तलिखित शुभेच्छा मित्रांना व नातलगांना न चुकता पाठवत असून त्यांच्या या उपक्रमामुळे आजच्या तरुण पिढीला पत्र लेखनाची प्रेरणा मिळत आहे. मोबाईल संस्कृतीपुर्वी सण उत्सव व वाढदिवसाला पोस्टकार्डद्वारे शुभेच्छा संदेश पाठवले जायचे. नवीन वर्ष शुभेच्छा असोत की मकर संक्रातीला तिळगुळ देखील पोस्ट विभागाच्या मदतीनेच पाठवले जायचे. सध्या डिजीटल व मोबाईलच्या जमान्यात शुभेच्छा संदेश देखील मोबाईलवरुनच सेंड केले जातात. मोबाईल वापरून शुभेच्छा देण्या ऐवजी मित्रांना, नातेवाईकाना जिव्हाळा व प्रेम आपुलकीचा ओलावा असलेल्या पोस्टकार्डद्वारे हटके शुभेच्छा संदेश पाठविण्याची सुरवात पोतदार यांनी केली. मोबाईलद्वारे दिलेल्या शुभेच्छा कालांतराने पुसल्या (डिलीट) जाऊ शकतात. मात्र लिखित पत्राद्वारे दिलेल्या शुभेच्छा या पुन्हा देखील वाचता येतात संग्रही ठेवता येतात. पत्रातील भावना , गोडवा कायम आपल्या मनात राहतो यामुळे पत्र लेखनाची आवड जोपासत पोतदार यांनी न चुकता यावर्षी देखील नूतन वर्षाच्या शुभेच्छा पोस्टकार्डने पाठवल्या आहेत. डिजीटल युगात अशा प्रकारे टपाल तिकीटक संग्राहक उदयकुमार पोतदार पोस्ट कार्डच्या माध्यमातून शुभेच्छा देतात याचे विशेष कौतुक होते आहे. डिजीटल युगात सोशल मिडीयाद्वारे आज प्रत्येकजण एकमेकांना नविन वर्षच्या शुभेच्छा देताना दिसून येतात. परंतु, पोत दार यांनी पत्रसंस्कृती जपण्यासाठी विविध सामाजिक विषयावर शालेय पत्रलेखन स्पर्धा घेतल्या आहेत. पोतदार यांच्या या पत्रलेखन कार्याची दखल घेऊन सोलापूर आकाशवाणी केंद्राने मुलखावेगळी माणसं या कार्यक्रमात पत्रलेखन विषयावर पोतदार यांची मुलाखत घेत पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. असा प्रकारची कला जोपासावे असे त्यांनी सांगितले.
जिल्हाभरातील रब्बी पिकांच्या सिंचनासाठी मागील वर्षी १८ डिसेंबरला मुळा धरणातून आवर्तन सोडले होते. यंदा ३.४६ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली. दमदार पावसामुळे अजुनही अनेक भागात ओढे नाले वाहते आहेत. त्यामुळे मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातून आवर्तनाची अद्याप मागणी आलेली नाही. त्यामुळे रब्बीचे आवर्तन महिनाभर उशिराने सोडले जाऊ शकते. मागणी कमी राहिल्यास, आवर्तन कमी कालावधीचे होईल. परिणामी उन्हाळ्यात दोन आवर्तने होऊ शकतील. अहिल्यानगर शहरासह पाच तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या मुळा धरणातून, सिंचन व पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. धरणाची पाणीसाठवण क्षमता २६००० दशलक्ष घनफूट आहे. वर्षभरात सिंचनासाठी शेतकऱ्यांना रब्बी, खरीप व उन्हाळी हंगामात आवर्तन दिले जाते. राहुरी, घोडेगाव, नेवासे, चिलेखनवाडी, अमरापूर या पाच उपविभाग आहेत. या उपविभागांकडे पाणीवापर संस्थांकडून आवर्तनासाठी मागणी नोंदवली जाते. तथापि, मागणी आली नसल्याचा दावा मुळा विभागाकडून केला जात आहे. मागणी आल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखालील कालवासल्लागार समितीची रब्बीसाठी बैठक होणार आहे. यात सिंचनासाठीचे नियोजन आखले जाणार आहे. एका आवर्तनातून सुमारे ४५०० दलघफू पाणी सोडले जाते. परंतू, सद्यस्थितीतील कमी मागणी पाहता, रब्बीचे आवर्तन ३ हजार दलघफू होऊ शकेल असा अंदाज वर्तवला जात आहे. उत्तमराव निर्मळ, निवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा. धरणात आवश्यक पाणी असल्यास उन्हाळ्यात दोन आवर्तन दिले जातात. परंतू, यंदाची स्थिती मागील काही वर्षातील सर्वाधिक चांगली स्थिती आहे. जानेवारीतील रब्बीचे आवर्तन फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुरू राहील. उन्हाळी मार्च ते एप्रिल मध्यापर्यंत, पुन्हा १ मे ते ३१ अन् शेवटचे १५ जून ते १५ जुलैपर्यंत सिंचनास अडचण नाही स्थानिकपातळीवर स्थापन झालेल्या सुमारे २८० पाणीवापर संस्थांमार्फत उपविभागस्तरावर मागणी नोंदवली जाते. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत नेवासे तालुक्यात दोन संस्थांनी मागणी नोंदवली आहे. पुढील काही दिवसांत मागणी वाढल्यास, १० जानेवारीपूर्वी सल्लागार समितीची बैठक होऊन आवर्तन मिळू शकते. ^ पुरेसा पाऊस झाला आहे, त्यामुळे रब्बीच्या आवर्तनासाठी मागणी कमी आहे. मागणी आल्यास शेती सिंचनासाठी पाणी सोडता येईल. रब्बीचे आवर्तन सुमारे तीन टीएमसी होऊ शकते. मागणी आल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवली जाईल. सायली पाटील, कार्यकारी अभियंता. 2024 : एकूण जलसाठा २४२५४ (९३ टक्के), उपयुक्त साठा - १९७५४ दलघफू. 2025 : एकूण जलसाठा २५१२९ (९६ टक्के), उपयुक्त - २०६२९ दलघफू.
बालवयात केलेल्या वाचनाने मुलांची भाषा सुधारण्यास मदत होते. अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन केल्याने व्यक्तिमत्त्व विकास होतो. पालकांनी स्वतः वाचन करून मुलांना देखील त्यांच्या वयाला साजेसे अनेक पुस्तके वाचनासाठी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन उद्योजक तथा लेखक सचिन चोभे यांनी केले. श्री समर्थ विद्यामंदिर प्रशाला प्राथमिक विभाग सावेडी येथे वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. याप्रसंगी सहाय्यक शिक्षण निरीक्षक, जिल्हा परिषद, अहिल्यानगर श्रीराम थोरात तसेच लेखक व व्यावसायिक सचिन चोभे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शालेय समिती चेअरमन सुरेश क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष दीपक ओहोळ, चेअरमन विकास सोनटक्के, श्रीपाद कुलकर्णी, ॲड. किशोर देशपांडे, संध्या कुलकर्णी, स्वप्नील कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या क्रीडा प्रात्याक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रशालेच्या मुख्याध्यापक गुंफेकर यांनी प्रास्ताविकातून मुलांना व पालकांना संदेश दिला. मोबाइलवरील गेम्स खेळण्यापेक्षा मुलांनी मैदानावर जाऊन खेळ खेळावेत यामुळे मुलांमध्ये संघभावना वाढीस लागते. शालेय स्नेहसंमेलनात मिळणारे पारितोषिक हे विद्यार्थ्यांच्या यश, चिकाटी आणि अंगी बाणविलेल्या शिस्तीची पोहोचपावती असते. शालेय समिती चेअरमन सुरेश क्षीरसागर यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजवरच्या प्रगतीचा आढावा अहवालातून घेतला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यश सहज मिळत नाही, त्यासाठी कष्ट, प्रयत्न आणि सातत्य आवश्यक आहे. ही त्रिसूत्री अंगीकारली तरच यशाचे शिखर गाठता येते, असे प्रतिपादन मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल यांनी केले. वसंत टेकडी येथील श्री नाथ विद्या मंदिर विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी दादासाहेब भोईटे, डॉ. रेखा राणी खुराना, प्राचार्य डॉ.श्याम पंगा, डॉ. वेणु कोला, संदीप कांबळे, प्राचार्या अनुराधा चव्हाण, सविता सानप आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या‘गगन भरारी’ या हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गोटीपामुल पुढे म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धा वाढली असून या स्पर्धेत टिकण्यासाठी सतत अपडेट राहणे गरजेचे आहे. मोबाइल व संगणकाचा वापर मनोरंजनापुरता न ठेवता शिक्षण, ज्ञानवृद्धी आणि प्रगतीसाठी करावा. वाचनाची आवड जोपासा. शिक्षकांचा व वडीलधाऱ्यांचा सन्मान ठेवा, पर्यावरणाचे रक्षण करा, देशाला अभिमान वाटेल असे नागरिक बना, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
निर्माण होणारा ई-कचरा (इलेक्ट्रॉनिक कचरा) ही गंभीर समस्या संपूर्ण जगासमोर उभी ठाकली आहे. वापरात नसलेली, खराब झालेली किंवा कालबाह्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली गेली नाहीत तर ती माती, पाणी, हवा आणि मानवी आरोग्यासाठी घातक ठरत आहेत. यामुळे यापुढे ई-कचरा कधीही साध्या कचऱ्यात टाकणार नाही, तसेच घरी जमा झालेला ई-कचरा योग्य ठिकाणी देण्याचा संकल्प करंजी येथील श्री नवनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केला. निमित्त होते विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे व जबाबदार नागरिक घडवणे या उद्देशाने गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेंतर्गत उपक्रमाचे. आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानप्रधान युगात मानवी जीवन अधिकाधिक इलेक्ट्रॉनिक साधनांवर अवलंबून होत चालले आहे. मोबाइल फोन, संगणक, लॅपटॉप, टॅब्लेट, स्मार्ट टीव्ही, चार्जर, बॅटऱ्या, इलेक्ट्रॉनिक खेळणी, वॉशिंग मशीन, फ्रिज यांसारखी साधने मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. वापरात नसलेली, खराब झालेली किंवा कालबाह्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली गेली नाहीत तर ती माती, पाणी, हवा आणि मानवी आरोग्यासाठी घातक ठरतात. या पार्श्वभूमीवर करंजी येथील श्री नवनाथ विद्यालयात जनजागृती उपक्रम राबवण्यात आला. हा उपक्रम मुख्याध्यापक संजय म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली, पर्यवेक्षक जयवंत पुजारी यांच्या देखरेखीखाली व प्रकल्प समन्वयक स्वाती अहिरे यांच्या नियोजनातून पार पडला. मुख्याध्यापक म्हस्के म्हणाले, ई-कचरा हा दिसायला छोटा असला तरी त्यात शिसे, पारा, कॅडमियम यांसारखी विषारी द्रव्ये असतात. ही द्रव्ये माती व पाण्यात मिसळल्यास शेती, पिण्याचे पाणी आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. त्यामुळे ई-कचऱ्याची विल्हेवाट ही शास्त्रीय व नियोजनबद्ध पद्धतीने लावली पाहिजे. या उपक्रमाच्या समन्वयक अहिरे यांनी या उपक्रमाचे नियोजन करताना शिका आणि कृती करा, या तत्त्वावर भर दिला. विद्यार्थ्यांना केवळ माहिती देऊन न थांबता प्रत्यक्ष कृतीत सहभागी करून घेण्यात आले. ई-कचरा वेगळा ठेवण्याची पद्धत, ओला व सुका कचरा आणि ई-कचरा यातील फरक, पुनर्वापर, पुनर्निर्मिती आणि कमी वापर या त्रिसूत्रीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांिगतले.
सोयगाव दीड-दोन वर्षांपूर्वी डी. के चौक परिसरातील जिजामाता उद्यान मार्ग भूमिगत गटारकामी खोदण्यात आला होता. सद्या त्या मार्गाची डागडुजी होत आहे. मात्र खड्डे हे डांबर आणि खडी टाकून बुजविण्यात येत असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. वर्षभर खड्डेमय रस्त्याचा आणि धूळीचा त्रास सहन करूनही पक्का रस्ता का नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. जिजामाता उद्यान मार्गाची अवस्था शहरात सर्वश्रुत आहे. धूळ आणि खड्ड्यांचे साम्राज्य या रस्त्यावर दिसून येते. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रौढ, वयस्कर नागरिकांनाही त्रास सोसावा लागत आहे. वर्षभर खड्ड्यांचा दणका आणि धुळीचा त्रास सोसून अखेर एकदिवस आपल्याला पक्का व मजबूत रस्ता वापरण्यास मिळेल, अशी आशा नागरिकांना होती. मात्र डागडुजीच्या कामामुळे नागरिकांचा हिरमोड झाला आहे. ऐन मनपा रस्त्याची डागडुजी सुरू असताना परिसरातील काही नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली. मात्र, आम्ही गटारासाठी जेवढा रस्ता खोदला आहे, तेवढाच करून देणार आहोत, असे संबंधितानी सांगितले. या प्रकारामुळे, नेमके मालेगाव शहरात चाललेय तरी काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पक्का रस्ता मिळण्याच्या आशेवर परिसरातील रहिवाशांसह वाहनचालकांनी खस्ता खात त्रास सोसला आहे. याची जाणीव देखील संबंधित प्रशासनाला आणि पुढाऱ्यांना नसल्याची शोकांतिका व्यक्त होत आहे. हा मार्ग पक्का व मजबूत होणार आहे की नाही?, होईल तर किती दिवसात, महिन्यात होईल? याचा खुलासा करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, सदर मार्ग पूर्वी डांबरीकरण असलेला कमी रुंदीचा रस्ता होता.त्यातही अनेक ठिकाणी खड्डे पडलेले होते.भूमिगत गटारकामी रस्त्याच्या मधोमध जेसीबीने खोदून पाईप टाकून तसाच दगडमातीने बुजण्यात आला.त्यामुळे संपूर्ण रस्ता ओबडधोबड खड्ड्यांचा आणि प्रचंड धुळीचा झाला आहे. दीड वर्षांपासून खोदून ठेवलेल्या रस्त्याची केलेली डागडुजी पाहून हिरमोड झाला. नवीन चांगला रस्ता तयार होईल, या आशेवर रस्त्यावर खस्ता खाल्ल्या. अशा तकलादू कामाच्या माध्यमातून नागरिकांची बोळवण करणे म्हणजे लोकमताचा अनादर आहे. - वामन पवार, रहिवासी,उद्यान परिसर,सोयगाव जिजामाता उद्यान मार्गावर करण्यात आलेली खड्ड्यांची तकलादू डागडुजी. रस्त्याच्या कामाबाबत अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी जिजामाता उद्यान मार्गाचे काम नेमके मनपा प्रशासनाकडे आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.सदर रस्त्याच्या कामाबाबत दिव्यमराठी प्रतिनिधीने मनपा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला असता या रस्त्याचे काम मंजूर असून ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे आणि कामाची सुरुवात कधी होईल,हे निश्चित सांगता येणार नाही,असे कळविण्यात आले तर सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांशी याबाबत फोनवर विचारणा केली असता या रस्त्याचे काम आमच्या विभागाकडे नसल्याचे सांगण्यात आले. रस्ते कामाची ही टोलवाटोलवी बघून जनतेला जुन्या काळातील 'अशी ही बनवाबनवी'सिनेमाची आठवण करून देणारी ठरणार आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकावर जिवापाड मेहनत घेतली. मात्र, अतिवृष्टीमुळे त्यांच्या हातात काहीच आले नाही. खरिपात झालेला तोटा भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे परिसरातील विहिरींमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. तरीही विजेअभावी सिंचनासाठी धडपड करावी लागत आहे. दरम्यान, शासनाने दिवसा वीज देण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्यापही रात्री पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक मदार खरीप हंगामावर अवलंबून असते. गेल्या काही वर्षांपासून एकही हंगाम शेतकऱ्यांना साथ देत नाही. परिणामी, कर्जाचा डोंगर कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. निराशा झटकून शेतकरी प्रत्येक हंगामात मेहनत करून उत्पन्न काढण्यावर भर देत आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यातून वाचलेले सोयाबीन हाती आले. पहिल्या कापसाच्या वाती झाल्या तर वेचणीला महाग झाला आहे. आता रब्बीसाठी मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करावी लागत आहे. दुसरीकडे, सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी हरभरा, गहू, कापूस, तुर पिकाला पाणी देण्याची धडपड करत आहेत. विद्युत असुविधेमुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. रबी हंगामासह खरीप हंगामातील पिकांना सिंचनाची सुविधा असणारे शेतकरी पिकांना पाणी देण्यावर भर देत आहेत. दुसरीकडे, दिवसा वीज मिळत नसल्याने रात्री शेतात जागरण करावे लागत आहे. दिवसा वीजपुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी सद्यस्थितीत एक आठवडा दिवसा आणि एक आठवडा रात्री असा वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा रात्री पाणी देण्याची वेळ आली आहे. रात्री पाळीत आमच्याकडे त्रिफेज वीज पुरवठा होतो. सध्या कापूस, तुर, गव्हाचे शेत भिजवणे चालू आहे. सध्या बिबट्या दिसल्याची चर्चा आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून रात्र काढावी लागत आहे. त्यात साप, विंचू आदींचा सामना करत रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे लागते, असे शेतकरी चंद्रकांत गुंजाळ यांनी सांगितले.
मराठवाड्याचा सिंचन कणा असलेल्या जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी व बीड या जिल्ह्यांतील शेती या कालव्यांच्या पाण्यावर अवलंबून असताना कालव्यावरील १२० पैकी २५ हून अधिक पूल खचण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत. त्यावरून सध्या उसाची जड वाहतूक सुरू असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. विशेष म्हणजे १४ दिवसांपूर्वी इंदेगाव-विहामांडवा रस्त्यावरचा पूल खचल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जायकवाडी धरणाचा डावा कालवा तब्बल २०८ किमी लांबीचा असून या कालव्यावरून लगतच्या ६० हून अधिक गावांची वाहतूक व दळणवळण सुरू आहे. मात्र, याच पुलांवरून सध्या सुमारे ४० ठिकाणी ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर-ट्रॉली व अवजड वाहने सुरू असल्याने अनेक पूल कमकुवत झाले आहेत. काही दिवसांपूर्वी इंदेगाव येथील पूल खचल्याने रब्बी हंगामातील पहिली पाणीपाळी बंद करण्याची वेळ आली होती. सध्या आखतवाडा परिसरातही पूल खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. १२० पुलांपैकी जवळपास पन्नासहून अधिक पुलांवरील कठडे पूर्णपणे तुटले आहेत. इंदेगाव-विहामांडवा रस्त्यावर असलेला मुख्य पूल असा खचला आहे. निधीची मागणी करणार कालव्यांवरील अनेक पुलांची दयनीय अवस्था झालेली आहे. अशा पुलांवरून उसाची जड वाहतूक टाळणे गरजेचे आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या पुलांची पाहणी करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात देऊन निधीची मागणी केली जाईल, अशी माहिती अभियंता संत यांनी दिली. पूल खचल्यास नुकसान डाव्या कालव्यावरील एक पूल खचल्यामुळे अचानक पाणीपाळी बंद करावी लागली होती. भविष्यात आणखी कुठे पूल खचल्यास वाहतूक ठप्प होऊन उसतोड, पाणीपुरवठा व शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निधी मिळताच दुरुस्तीची कामे सुरू केली जातील, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी दिली. वहनक्षमता निम्म्यावर जायकवाडी धरणाच्या निर्मितीनंतर मराठवाड्याचा सिंचन प्रश्न सोडवण्यासाठी डावा व उजवा कालवा तयार करण्यात आला होता. परंतु, सद्य:स्थितीत कालव्याची दयनीय अवस्था झाली आहे. डावा कालवा अनेक ठिकाणी गाळाने भरला असून वहनक्षमता जवळपास निम्म्यावर आली आहे. कालव्यांपेक्षा उपचाऱ्यांची अवस्था अधिक गंभीर असून पाणी झिरपण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. डावा कालवा २०८ किमी लांबीचा आहे. याची वहनक्षमता १००.०८ घनमीटर/सेकंद असून ओलिताखाली येणारी जमीन १,४१,६४० हेक्टर आहे. तर उजवा कालव्याची लांबी १३२ किमी असून ओलिताखाली येणारी जमीन ४६,६४० हेक्टर आहे.
कार-दुचाकी अपघातात एक जण ठार, एक गंभीर:भेंडाळा फाटा मार्गावर सायंकाळी घडला अपघात
कार-दुचाकीमध्ये झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना गंगापूर ते भेंडाळा छत्रपती संभाजीनगर मार्गावर शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, पेंडापूर येथील राजेंद्र भागचंद पंडित हे दुचाकीने (एमएच २० एचके ४६५०) गंगापूरहून पेंडापूरकडे जात असताना त्यांची हॉटेल विराजसमोर ब्रिजा कारने (एमएच २० जीव्ही ६८७०) धडक दिली . या अपघातात ते स्वतः ठार झाले तर विक्रम जाधव (रा. छत्रपती संभाजीनगर) हे जखमी झाले आहेत. मयत व जखमी दोघेही एस टी महामंडळ मध्ये कार्यरत आहेत. जखमीला छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती कळताच रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ, सौरभ तिखे, ओंकार साळुंखे व नागरिकांनी अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यास सहकार्य केले. अपघातामध्ये कारखाली दुचाकी गेल्याने तिचा चक्काचूर झाला आहे.
वाणेगाव परिसरात मागील चार दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. रस्ते, शेतवस्ती आणि शिवारात बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांना फस्त केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परिसरात ठिकठिकाणी बिबट्याचे पावलांचे ठसे आढळले आहेत. बिबट्याच्या भीतीने शेतकरी शेतात जाणे टाळत आहेत. शेतीकामाच्या वेळाही बदलल्या आहेत. जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली होती. वन विभागाने याची गांभीर्याने दखल घेत मंगळवारी वाणेगाव शिवारात पिंजरा लावला. पण बिबट्या अजूनही जेरबंद झालेला नाही. त्यामुळे शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवाराची पाहणी केली. आढळलेले ठसे बिबट्याचे असल्याचे स्पष्ट झाले. परिसरात वन विभागाची गस्त वाढवण्यात आली आहे.
जायकवाडी जलफुगवटा भागातील शेतकऱ्यांच्या असंपादित जमिनीमध्ये दरवर्षी पाणी येत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मागील १८ वर्षांपासून विविध आंदोलने, न्यायालयीन लढाईत न्यायालयाचे आदेश असूनही केवळ प्रशासकीय यंत्रणेच्या टोलवाटोलवीच्या कारभारामुळे बाधित शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. दरम्यान, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांनी अधिकाऱ्यांना बोलावून प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यासंदर्भात माहिती अशी की, जायकवाडी जलफुगवटा भागातील गंगापूर तालुक्यातील गळनिंब, कायगाव, नेवरगाव, मांगेगाव, सावखेडा, कानडगाव, अमळनेर, लखमापूरसह नेवासा व शेवगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांच्या १४८ हेक्टर जवळपास ४६० एकर बिगरसंपादित जमिनीमध्ये जायकवाडीच्या धरणात ८५ टक्के पाणी आल्यावर उभ्या असलेल्या पिकांमध्ये पाणी शिरत असल्याने लाखो रुपयांचे नुकसान दरवर्षी होत आहे. २००७ पासून बाधित शेतकरी लढताहेत सतत रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई : वरील गावांतील सर्व बाधित शेतकरी २००७ पासून सतत रस्त्यावरची व न्यायालयीन लढाई लढत आहेत. गळनिंब येथील शेतकरी मोहन रंगनाथ टेकाळे यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर न्यायालयाने १९ एप्रिल २०२३ रोजी आदेश देऊन जमीन संपादन करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी २७ सप्टेंबर २०२३ रोजी कार्यकारी संचालक, गोदावरी खोरे विकास महामंडळ यांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनीदेखील ११ ऑक्टोबर २३ रोजी कार्यकारी संचालक गोदावरी खोरे यांना भूसंपादन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. जायकवाडी पाटबंधारे विभागानेही यासंदर्भात जमीन संपादन करून नुकसान भरपाईचा प्रस्ताव ११ एप्रिल २०२३ रोजी दिला होता. याशिवाय खा. कल्याण काळे, किरण पाटील डोणगावकर यांनीदेखील ऑक्टोबर २०२४ मध्ये सर्व संबंधितांची बैठक घेऊन कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या. अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील गाजला होता मुद्दा चालू वर्षाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे व नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी उपस्थित केला होता. परंतु एवढे सगळे होऊनही प्रश्न कायमच आहे.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील व्यवहाराचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथील युनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे शुक्रवारी (२६ डिसेंबर) ‘आनंदनगरी’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेच्या आवारात जणू आठवडी बाजार अवतरल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या उपक्रमाचे उद्घाटन सुलतानपूर–भांडेगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच संजय मोरे, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख सुरेश राहणे व साहेबराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक बबन चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अविनाश वेताळ, सतीश चव्हाण, रवींद्र शिंदे, नितीन वेताळ, बाळू जाधव यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन, स्वच्छ मांडणी आणि विद्यार्थ्यांचा उत्साह सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या वेळी पालक गणेश बन यांनी, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो,” असे मत व्यक्त केले.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैशाली आधाने, दीपाली वेताळ, शीतल बोचरे, रोहिणी परदेशी, अश्विनी जाधव, सारा शेख, श्रद्धा जाधव, वैष्णवी चव्हाण, आसेफ बेग व इम्रान शहा यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार प्राचार्य आदित्य गायके व संस्थाध्यक्ष दादासाहेब खंडागळे यांनी मानले. सुलतानपूर येथे आनंदनगरीत विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ्यांचे स्टॉल लावले होते. खाद्यपदार्थांची मेजवानी आणि कॅशलेस व्यवहार युनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे आनंदनगरीत विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत विविध खाद्यपदार्थांची दुकाने उभारली होती. पाणीपुरी, भेळ, चाट, समोसे, बटाटा भजी, चुलीवर तयार केलेले गरमागरम पदार्थ, लिंबू सरबत, चहा, वडापाव, पोहे आदी पदार्थांनी बाजार गजबजून गेला होता. यामध्ये चविष्ट पाणीपुरी व चुलीवर बनवलेले बटाटा भजे विशेष आकर्षण ठरले. आनंदनगरीत रोख आणि ऑनलाइन व्यवहाराची सुविधा उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांना कॅश व कॅशलेस व्यवहाराचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.
घाटनांद्र्यामधील आठवडी बाजार फुलला; व्यापाऱ्यांची वाढती गर्दी
घाटनांद्रा गावातील आठवडी बाजार सध्या मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे. पूर्वी दहा ते पंधरा दुकाने असलेल्या या बाजारात आता साठहून अधिक दुकाने लागतात. दर शुक्रवारी भरणाऱ्या या बाजारात आता बाहेरगावाहून येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या वाढली आहे. बाजारात भाजीपाला, कपडे, चपला-बूट, दैनंदिन वापराच्या वस्तू, हॉटेल्स आणि मिठाईच्या दुकानांची रेलचेल असते. त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळत असल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळतो. स्वस्तात आणि चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळत असल्याने खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. महिलांसह युवक आणि ज्येष्ठ नागरिकही आवडीने खरेदी करताना दिसतात. दिवसभर बाजारात चैतन्यपूर्ण वातावरण असते. या बाजारामुळे स्थानिक अर्थकारणाला चालना मिळत आहे. छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसायाची संधी मिळत आहे. बाजार आणखी वाढेल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मात्र बसस्थानक परिसर व्यापाऱ्यांसाठी अपुरा पडतो. त्यामुळे ग्रामपंचायतीने मोठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. गृहिणी सुनिता पाटील म्हणाल्या, आता सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळतात. स्वस्त आणि दर्जेदार वस्तूंमुळे खरेदी सोपी झाली आहे. ग्रामस्थ म्हणतात, आता वेळेसह पैशांची बचत ग्रामस्थ सय्यद तय्यब आली म्हणाले, “पूर्वी दुसऱ्या गावात जावे लागायचे. आता वेळ आणि पैशांची बचत होते. स्पर्धेमुळे दरही परवडतात. विद्यार्थिनी संध्या मोरे म्हणाली, कपडे, पादत्राणे आणि दैनंदिन वस्तू कमी दरात मिळतात. आम्हा विद्यार्थ्यांना बाजार उपयोगी पडतो.” व्यावसायिक सचिन पाटणी म्हणाले, “बाजारामुळे गावाची ओळख वाढते आहे. ग्राहकांची गर्दी वाढल्याने स्थानिक आणि बाहेरगावच्या व्यापाऱ्यांना फायदा होतो आहे.
लामनगाव येथे बाबासाहेब नारायण मालोदे गेल्या १५ वर्षांपासून उसाचे गुरहाळ चालवत आहेत. येथे दररोज चार क्विंटल शुद्ध, नैसर्गिक आणि गावरान गूळ तयार होतो. या गुळाला परिसरात मोठी मागणी आहे. यंदा नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गुऱ्हाळाचा हंगाम सुरू झाला. दररोज दोन कढाया तयार होतात. एका कढईत दोन क्विंटल गूळ तयार होतो. गूळनिर्मितीसाठी ८६०३२, ३१०२, ४१९, २५६ या जातींच्या उसाचा वापर होतो. प्रक्रिया पूर्णपणे पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धतीने केली जाते. प्रथम ऊस चरख्यात टाकून रस काढला जातो. एका तासात रस तयार होण्यासाठी दोन टन ऊस लागतो. त्यानंतर साडेतीन तासांत गूळ तयार होतो. गूळ बनवताना गावरान भेंडीचा वापर होतो. कोणतेही रसायन किंवा कृत्रिम पदार्थ वापरले जात नाहीत. लामणगाव परिसरातील हे एकमेव गुऱ्हाळ आहे. येथे गूळ तयार करण्यासाठी एक कढई, गूळ साठवण्यासाठी हौद, ऊस चरखा, रसासाठी दोन हौद अशी यंत्रणा आहे. बाबासाहेब मालोदे परिसरातील शेतकऱ्यांसाठीही गूळ तयार करून देतात. प्रतिक्विंटल ५०० रुपये दर आकारला जातो. खुलताबाद, राजेराय टाकळी, अब्दुलपूर तांडा, विरमगाव, वेरूळ येथील शेतकरी ऊस घेऊन येतात. गूळ सध्या ५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जातो. छत्रपती संभाजीनगरसह आसपासच्या गावांतील नागरिक गूळ खरेदीसाठी येतात. गावरान गूळ नैसर्गिक पद्धतीने तयार होतो. त्यात रसायन, कृत्रिम रंग नसतो. त्यामुळे तो आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शरीरासाठी हे फायदे गावरान गूळ शरीराला त्वरित ऊर्जा देतो. थकवा कमी करतो. पचनशक्ती सुधारतो. गॅस, आम्लपित्त कमी होतो. रक्त शुद्ध करतो. त्वचेच्या समस्या कमी होतात. लोहयुक्त असल्याने हिमोग्लोबिन वाढते. सर्दी-खोकल्यावर उपयोगी ठरतो. हाडे आणि दात मजबूत करतो. मासिक पाळीतील वेदना कमी करतो. लिव्हर स्वच्छ ठेवतो. वजन नियंत्रणात ठेवतो. मालोदे यांचे गुऱ्हाळ हे पारंपरिक शेती, नैसर्गिक उत्पादन आणि आरोग्यदायी गूळ यांचे उत्तम उदाहरण ठरत आहे. साखरेऐवजी गूळ वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
1,972 बनावट आयडी तयार करून शासनाची 150 कोटींची फसवणूक:शालार्थ आयडी घोटाळ्याचा 2 जानेवारीला अहवाल
नागपूर जिल्ह्यातील शालार्थ आयडी घोटाळ्यात अखेर अंतिम अहवालाचा मुहूर्त निघाला आहे. नवीन वर्षात शुक्रवार, २ जानेवारी २०२६ रोजी अंतिम अहवाल सादर होणार असल्याची माहिती शालार्थ आयडी घोटाळ्याची प्रशासकीय चौकशी करीत असलेले प्राथमिक व माध्यमिक विभाग संचालक महेश पालकर यांनी “दिव्य मराठी’ला दिली. नागपूर विभागात घोटाळ्यात प्रमुख १३ आरोपींनी तब्बल १,९७२ बनावट आयडी तयार करून १५० कोटींची फसवणूक केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. महेश पालकर यांनी अंतरिम अहवाल जून २०२५ च्या शेवटी सादर केला होता. मात्र त्यानंतर मनुष्यबळाच्या कमतरतेचा बाऊ करीत वारंवार अहवाल सादर करण्यास विलंब होत गेला. आता मात्र सर्व फाईली तपासण्यात आल्या असून अंतिम अहवाल तयार झाला आहे. त्यावर संबंधित वरिष्ठांच्या सह्या झाल्यानंतर २ जानेवारी २०२६ रोजी अहवाल सादर केला जाईल असे पालकर यांनी सांगितले. गत सहा महिन्यांपासून पालकर यांच्याकडून अंतिम अहवाल सादर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे घोटाळ्याची चौकशी थांबली आहे. नवीन वर्षात या चौकशीला गती येईल असे चित्र आहे. संस्थाचालकांनी पैसे घेतल्याची पाच शिक्षकांची कबुली “शालार्थ आयडी’ घोटाळ्यामध्ये मोहपा येथी विठ्ठल रुख्मिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व भाजपचे माजी पंचायत समिती अध्यक्ष दिलीप धोटे यांना अटक झाल्यानंतर पाचावर धारण बसलेल्या शिक्षण संस्था चालकांच्या मदतीसाठी अदृश्य हात कार्यरत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र यावर बोलण्यास कोणीच तयार नाही. आतापर्यंत पाच शिक्षकांनी समोर येऊन संस्थाचालकांनी पैसे घेतल्याची कबुली दिली. तर शिक्षण संस्थाचालकांनीही चक्रे फिरवल्याची माहिती आहे. परिणामी या प्रकरणात धोटेंनंतर एकाही शिक्षण संस्थाचालकाला अटक झालेली नाही. शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर त्यांना अटक व चौकशीपासून संरक्षण मिळाले आहे. यांनी तयार केले शालार्थ आयडी चिंतामन वंजारी २५३रवींद्र काटोलकर ३९रोहिणी कुंभार २४४सिद्धेश्वर काळुसे १५४अनिल पारधी ८१वैशाली जामदार २११सतीश मेंढे ८३उल्हास नरड १८७गौतम गेडाम ४०नीलेश वाघमारे ६८० या कलमान्वये गुन्हे दाखल शालार्थ आयडी प्रकरणांत २६ आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखले. यात एकूण ६७३ शिक्षकांचे पगार निघाले. मृतक शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या सहीनेही बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आले. मात्र त्याची संपूर्ण फाइलच शिक्षण विभागातून गहाळ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूण २६ आरोपी अटकेत
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील एन-१२ सिडको, सिद्धार्थनगर, रशीदपुरा, स्वामी विवेकानंदनगर, पवननगर, शताब्दीनगर, एन-११, रायगड कॉलनी आणि पोलिस निवास परिसराला मूलभूत नागरी समस्यांनी ग्रासले आहे. या भागांत अनेक ठिकाणी अंतर्गत रस्ते खड्डेमय झाले आहेत. नवीन ड्रेनेजलाइन टाकलेली नसल्याने जाम होऊन सांडपाणी रस्त्यावर येण्याच्या सर्वाधिक तक्रारी आहेत. विशेष म्हणजे या प्रभागात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो. नागरिकांना रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन जावे लागते. एन-१२ सिडको व पवननगरमध्ये रोडसाइड अनधिकृत पार्किंग, फुटपाथवरील अतिक्रमण आणि फेरीवाल्यांमुळे वाहतूक कोंडी होते. या प्रभागात पाणीपुरवठा वेळेत न होणे व कमी दाबाचा पुरवठा होत आहे. प्रभागात पोलिस वसाहतीलगतच्या रस्त्यावर हरित पट्ट्याच्या संरक्षणासाठी लावलेल्या जाळ्या तुटल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. क्र. ७ सुदर्शननगर, विवेकानंदनगर, पवननगर, शताब्दीनगर २०१५ : पक्ष, नगरसेवक, मतदान वॉर्ड क्र. उमेदवार, पक्ष मतदान९ स्वाती नागरे, अपक्ष १,७७३२८ सीमा खरात, शिवसेना २,४०६३० नितीन चित्ते, भाजप ३,३२८२७ जहांगीर खान, एमआयएम २,१७८प्रभाग आरक्षण : अ – एससी , ब- ओबीसी महिलाक- सर्वसाधारण महिला, ड- सर्वसाधारण पोलिस वसाहतीसमोर हरित पट्ट्यालगतच्या जाळ्या तुटल्या पाण्याच्या वेळा चुकतात, दाबही पुरेसा नसल्याने रहिवासी वैतागलेप्रभागात मागील १० वर्षांत मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला. सुमारे १४० कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी दिली. प्रभागाची व्याप्ती : सिद्धार्थनगर, रशीदपुरा, स्वामी विवेकानंदनगर, पवननगर, एन १२ सिडको, सिद्धार्थनगर, रशीदपुरा, पवननगर, शताब्दीनगर, एन ११, रायगड कॉलनी, पोलिस निवास 1. कचरा संकलन : घंटागाडीच्या वेळा चुकत असल्याने मनस्तापप्रभागात अरुंद गल्ल्या असल्याने अनेक ठिकाणी घंटागाडी येत नाही. त्यातच वेळ चुकवून गाडी येत असल्याने कचरा घरातच पडून राहतो. 2. रस्ते : रस्त्यांवरील पार्किंगमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीरप्रभागात अंतर्गत रस्त्यांचे जाळे मजबूत केले आहे. बहुतांश रस्ते सिमेंटचे झाले आहेत. मात्र, असे असले तरी या रस्त्यावर होणाऱ्या पार्किंगमुळे वाहतुकीची डोकेदुखी ठरत आहे. 3. पाणीपुरवठा : ड्रेनेजचे पाणी जलवाहिनीत शिरण्याचे प्रकार बहुतांश ठिकाणी हर्सूल तलावातील पाणी येते. शहरांप्रमाणेच या ठिकाणीदेखील आठवड्यातून एकदाच पाणी मिळते. काही भागात ड्रेनेजमिश्रित पाणी येते.
भाजप नेते, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजप विभागीय कार्यालयातील अर्ध्या तासाची नियोजित बैठक उमेदवारीवरून नेत्यांत निर्माण झालेल्या दुफळीमुळे पाच तास लांबली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी युतीच्या बोलणीसाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची यादी जाहीर केली. यातून पक्षाचे माजी शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष शिरीष बोराळकर यांना वगळण्यात आले. या बैठकीनंतर बावनकुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. नेत्यांची मुले व जवळचे नातेवाईक यांना ॲडजस्ट करण्यात बावनकुळे यांना तारेवरची कसरत करावी लागली. अनेक प्रभागांतील प्रबळ दावेदारांना रात्री कार्यालयात बोलावून घेण्यात आले होते. उद्धवसेनेतून आलेल्या नगरसेवकांना कसे ॲडजस्ट करावे, कुठून उमेदवारी द्यावी, कुणाची उमेदवारी कापावी हाच पेच आता पक्षश्रेष्ठींसमोर आहे. पालकमंत्र्यांकडे रात्री उशिरापर्यंत बैठक रात्री साडेबाराच्या सुमारास मंत्री बावनकुळे, पालकमंत्री शिरसाट यांच्या उपस्थितीत युतीची बैठक सुरू झाली. या मंत्री अतुल सावे, आ. संजय केणेकर, समीर राजूरकर, किशोर शितोळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, त्र्यंबक तुपे, विकास जैन, हर्षदा शिरसाट उपस्थित होते. या बैठकीतून जागावाटपाचा पेच सुटेल, असे शिरसाट यांनी सांगितले.
महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत झालेली निवडणूक प्रकिया ध्यानात घेऊन दुसऱ्या वेळी मोरेश्वर सावे यांनी खूप काळजी घेतली. त्यातच पहिले महापौर डॉ. शांताराम काळे यांची चूक सावे यांच्या पथ्यावर पडली... पहिल्या महापौर निवडीवेळी सभा सुरू होताच महापौरपदाच्या उमेदवार लता दलाल, चंद्रकांत खैरे, मोतीराम घडामोडे यांनी विषयपत्रिका आणि सभेची नियमावली मराठीतून असावी, असा आग्रह धरला. त्यातून खूप वाद झाला. सभागृहात बाहेर लोक आल्याचं चंद्रकांत खैरे, मोतीराम घडामोडे आणि लता दलाल यांनी सांगितलं. यावरून गोंधळ सुरू असतानाच प्रदीप जैस्वाल यांनी सीलबंद पेटी सभागृहातून उचलून नेली होती. या गोंधळात सभा दोन-तीन वेळा तहकूब झाली. शिवसेनेने निवडणूक पुढं ढकलण्याची मागणी केली होती. ती मागणी मान्य झाली नाही. अखेर मतदान झालं. शिवसेनेने मतदान केलंच नाही. आता वेळ आली होती मोरेश्वर सावे यांची. त्यांनी २८ नगरसेवक सोबत असताना ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले. मतदान प्रक्रिया सुरू झाली. सर्व मतदान पूर्ण झालं. महापौर डॉ. काळे पीठासन अधिकारी होते. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सभागृहाला सांगितलं की, मला माझं मतदान करायचं आहे. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. ‘मतदानाची वेळ टळून गेली आहे. पहिल्या महापौरपदाच्या निवडणुकीत जे नियम आम्हाला सांगण्यात आले तेच नियम आत्ताही आहेत,’ असं शिवसेना नगरसेवकांनी ठासून सांगितले. त्यावर खूप गोंधळ उडाला. अखेर मतमोजणी झाली आणि ३० विरुद्ध २९ मतांनी मोरेश्वर सावे विजयी झाले. त्यावर डॉ. काळे यांना मतदान करू दिलं पाहिजे, अशी मागणी होतच राहिली. काँग्रेसच्या नगरसेवकांनी आग्रह धरून महापौरांचं मत घेण्यास भाग पाडलं. महापौर डॉ. काळे यांची मतपत्रिका त्यांच्या क्रमांकावर टाचणीनं जोडलेली होती. सावे यांना ३० मतं मिळाली त्या वेळी महापौरांनी टाचणीनं जोडून ठेवलेल्या मतपत्रिकेवर त्यांच्याकडं असलेल्या पेननं मत नोंदवलं. महापौर काळे यांनी त्यांचं मतदान वेळेत केलं असतं तर ३०-३० अशी समसमान मतं मिळाली असतं. अखेर महापौरांच्या ‘कास्टिंग व्होट’वर सावेंचा पराभव झाला असता. पण, तसं घडलं नाही. आणि सावे शहराचे दुसरे आणि शिवसेनेचे पहिले महापौर झाले. पुढं हे प्रकरण हायकोर्टात गेलं. वेळ संपल्यानंतर टाकलेलं मत कोर्टानं रद्द ठरवलं...
छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक २७ मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गेलं असता नागरिकांनी पाणी आणि रस्ता या मुद्द्यांवर तीव्र आक्रोश केला. 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' या दिव्य मराठी ऍपच्या टॉक शोला संभाजीनगरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील समस्या आणि येणाऱ्या नगरसेवकांकडून नागरिकांना काय अपेक्षा आहेत. हे या रिपोर्ट मधून जाणून घेऊयात. प्रभागातील शिवाजीनगर भागात असलेला भुयारी मार्ग जणू नागरिकांसाठी मुख्य समस्या बनली आहे. रस्ता कमी आणि गटारच जास्त झालाय असं येथील नागरिकांनी मत व्यक्त केलं आहे. पावसाळ्यात इथे पाणी साचत आणि दररोज रात्री इथे ट्राफिक जाम होत. नुसते पैसे खाण्याचे काम केले असं नागरिकांनी स्पष्ट सांगितलं आहे. शिवाजीनगर खरोखरच भुयार आहे प्रभाग २७ मध्ये येणाऱ्या शिवाजीनगरमध्ये नागरिकांशी साधलेल्या संवादात रहिवासी 'वत्सला रवींद्र पाटील' यांनी सांगितले की, 'पाच वर्षाहून अधिक वर्ष झाले पण अजूनही आम्हाला रस्ता व्यवस्थित नाहीये आणि ना पाणी आहे. आम्हाला टँकरने पाणी आणाव लागत. आमच्या गल्लीच्या बाजूला एक नाला आहे. त्याच सगळं पाणी आमच्या भागात शिरत. त्यामुळे सगीकडे दुर्गंधी आणि आम्हाला अनेक आरोग्याच्या समस्येला सामोरं जावं लागत. ते भुयार बांधून ठेवलंय नुसतं. वाटलं होत की त्याचा काहीतरी उपयोग होईल. पण उपयोग कमी आणि आम्हाला त्याचा त्रासच जास्त होतोय. आमचा भाग म्हणजे नुसतं भुयारच भुयार झालंय. ' भागात गुडघाभर पाणी साचत प्रभागातील रहिवासी असलेल्या सीमा पाटील म्हणाल्या की, आम्हाला गेली अनेक वर्ष झाली रोड झालेला नाहीये. नुसते खड्डे झाले आणि त्यामुळे जेव्हा आमच्याकडे पाणी येत तेव्हा गल्लीत पाणीच पाणीच होत. पावसाळ्यात १२ व्या योजनेतलं ११ व्या योजनेत पाणी येत आणि त्यामुळे जवळजवळ आमच्या अंगणात गुडघाभर पाणी साचत. आम्ही अनेकदा तक्रार केली मात्र तोडगा अजूनही निघाला नाही.' मोकळ्या जागेचा तुटवडा... प्रभाग २७ मध्ये अनेक ठिकाणी मोकळी जागा आहे. मात्र ती नुसती ओसाड जमिनीसारखी पडलेली आहे. ना त्याच नूतनीकरण झालं ना तिथे मुलांना खेळण्यासाठी जागा करून दिली. ही मोकळी जागा म्हणजे एक मोठी कचराकुंडी झाली आहे. असं येथील नागरिकांनी मत व्यक्त केलं. प्रभागातील मुलांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, 'आम्हाला खेळायचं म्हणलं की आम्हाला क्रीडा संकुलला जावं लागत. जे खूप लांब आहे. घरात बसवत नाही आणि बाहेर जावं तर जागा नाही. आम्ही खेळण्यासाठी जावं तर कुठे जावं हेच कळत नाही.' पाईप आले पण पाणी नाही... विजयनगर गारखेडा परिसरातील रहिवासी 'एकनाथ विनायकराव डंख' म्हणतात की, 'आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात पाण्याचे पाईप तर आलेत मात्र पाण्याचा अजूनही पत्ता नाहीये. गेली २० वर्ष झाले आम्ही या भागात राहतोय पण आम्हाला नुसते आश्वासनच दिसले कृतीच्या नावाने सगळी बोंबच आहे. आमच्या मागच्या गल्लीत पाणी येत पुढच्या गल्लीत येत मात्र आम्हाला अजूनही पाणी आलेलं नाहीये. त्यामुळे आम्हाला विकत पाणी आणाव लागतंय. त्यामुळे येणाऱ्या नगरसेवकाने नुसते आश्वासन न देता त्यांनी काम करून दाखवले तर आम्ही मानू की ते खरच कामासाठी निवडून आलेत. नाहीतर काय जैसे थे वैसेच स्थिती राहील.' अशी आहे प्रभागाची व्याप्ती प्रभाग क्रमांक २७ हा नेहरू कॉलेज, गारखेडा गाव, शिवाजीनगर, देशमुख नगर, नाथ प्रांगण, एमराल्ड सिटी, रेणुका नगर, भारत नगर, गणेश नगर, नवनाथ नगर, आनंद नगर, आशा नगर, न्यु बालाजी नगर, चैतन्य हाउसिंग सोसायटी, गजानन कॉलनी, स्वप्रा नगरी, मेहर नगर, तिरुपती विहार भागशः, मोती नगर, सारा राजनगर, सारंग सोसाईटी, विजयनगर, साहस सोसायटी, देशमुखनगर, सह्याद्री हील, मानकनगर, आर.बी. हॉल, मुथीयान, तिरुपती विहार पर्यंत वसलेला आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 46350 इतकी आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शववाहिनीचे दर १० रुपये प्रतिकिमी निश्चित केले आहेत. पण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ग्रामीण भागात शव नेण्यासाठी ३० रुपये प्रतिकिमी घेते. म्हणजे आरटीओने ठरवलेल्या ‘रेट’पेक्षा तिप्पट भुर्दंड सहन करावा लागतो आहे. विशेष म्हणजे, मनपाला ३० लाखांची शववाहिनी सरकारने मोफत दिली. तरीही मनपा मृतांच्या टाळूवरील लोणी खात आहे. पण मनपा यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी म्हणतात, ‘आम्ही शहरात एक हजार घेतो. ग्रामीणला शववाहिनीचे ३० रुपये प्रतिकिमीप्रमाणे पैसे घेतो. आम्ही ॲम्ब्युलन्सचे जेवढे रेट आहेत तेवढे रेट शववाहिनीसाठी घेतो. ड्रायव्हर आणि इंधनाचा खर्च निघावा म्हणून हा रेट आहे. पैसे कमावण्याचा आमचा उद्देश नाही’. ५३ किलोमीटरला ३ हजार रुपये घेतले फुलंब्री तालुक्यातील अपघातग्रस्त महिलेचा छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात (घाटी) मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाइकांनी घाटीच्या अधिष्ठातांकडे शववाहिनी मागितली. पण बाहेर देता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ५३ किलोमीटरसाठी ३ हजार रुपये द्यावे लागले. ‘दिव्य मराठी’ च्या रिपोर्टरने स्वत: चालकाला पैसे दिले. आरटीओने निश्चित केलेले दर प्रकार मनपा हद्दीत हद्दीबाहेर प्रत्यक्षातक्रुझर ६०० (२ तास) १० रु. प्रतिकिमी १७ रुपयेसुमो ६०० (२ तास) १० रु. प्रतिकिमी १७ रुपयेतवेरा ६०० (२ तास) १० रु. प्रतिकिमी १७ रुपयेव्हॅन ६०० (२ तास) ०८ रु. प्रतिकिमी १६ रुपयेटेम्पो ८०० (२ तास) १५ रु. प्रतिकिमी ४२ रुपयेकार्डियाक १५०० (२ तास) २५ रु. प्रतिकिमी ५० रुपये फुलंब्री तालुक्यातील अपघातग्रस्त महिलेचा छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात (घाटी) मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाइकांनी घाटीच्या अधिष्ठातांकडे शववाहिनी मागितली. पण बाहेर देता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ५३ किलोमीटरसाठी ३ हजार रुपये द्यावे लागले. ‘दिव्य मराठी’ च्या रिपोर्टरने स्वत: चालकाला पैसे दिले. सरकारी ॲम्ब्युलन्स फ्री द्याव्यात राज्यात १३२ शववाहिन्या दिल्यात. त्यांनी मोफत सेवा देणे अपेक्षित आहे. पैसे घेणे चुकीचे आहे. पण आमच्याकडे अद्याप एकही तक्रार आली नाही, तर आम्ही कारवाई कशी करणार? जयवंत मुळे, अतिरिक्त उपसंचालक, परिवहन ओळखीचे म्हणून सिल्लोडसाठी ३ हजार रुपये घेऊ रिपोर्टर : भावाचा मृतदेह सिल्लोडला न्यायचा आहे, किती पैसे लागतील?चालक : तुम्ही ओळखीचे असल्यामुळे ३ हजार द्या, अन्यथा आम्ही जास्त घेतो.रिपोर्टर : काही कमी होतील का ?चालक : सिल्लोडचे ३ हजार घेतो. पुढे ३६ किलोमीटर जायचे आहे. जास्त नाही सांगितले.रिपोर्टर : थोडी आणखी चौकशी करतो, मग सांगतो.चालक : आम्ही जाण्या-येण्याचा खर्च घेतो. सिल्लोडसाठी दीड हजाराचे पेट्रोलच लागते. मग आम्हालाही काही उरले पाहिजे.रिपोर्टर : किमीप्रमाणे का घेत नाही?चालक : दुसऱ्या राज्यात जायचे असेल तर आम्ही एका किमीचे १६ ते १७ रुपये घेतो.रिपोर्टर : परराज्यात जाता का?चालक : मी झारखंड, गुवाहाटी, श्रीलंका बॉर्डरपर्यंत गेलो आहे. खासगी रुग्णवाहिकांवर निर्बंध आणावे लागतील प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री शववाहिनीचे धोरण आहे?-नाही, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना शववाहिन्या दिल्यात.शववाहिन्या कमी असल्याने खासगी रुग्णवाहिका घ्यावी लागते?-खासगी रुग्णवाहिकांवर निर्बंध आणण्यासाठी विचार केला जाईल.सरकारने राज्यभरात दिलेल्या १३२ शववाहिन्या धूळ खात आहेत?-मनुष्यबळाचा प्रश्न आहे.गुजरातमध्ये ३ रुपये दर आहे?-त्यांच्या धोरणाची माहिती घेऊ. आपणही तसेच धोरण ठरवू. सात किलोमीटरचे घेतले तब्बल दीड हजार रुपये बीड बायपास परिसरातील एका वयोवृद्धाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी शुक्रवारी (२६ डिसेंबर) शववाहिनी मिळाली नाही. त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेला दीड हजार रुपये द्यावे लागले. ‘दिव्य मराठी’ रिपोर्टरने शववाहिनी बुक केली. घाटीने शववाहिनी दिली नाही.
तीन मुलींच्या पाठीवर चौथीही मुलगीच झाली म्हणून संतप्त पित्याने नवजात बाळाच्या डोक्यात लाकडी पाट घालून हत्या केली. आधी आईच्या हातातून पडून मुलीचा मृत्यू झाल्याचा बनाव कुटुंबाने केला होता. मात्र, वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांच्या तपासात पित्याने तिचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. जामनेर तालुक्यातील मोराळ येथील रहिवासी कृष्णा लालचंद राठोड व राधिका राठोड यांना तीन मुली आहेत. मुलगा होईल, अशी आशा असताना चौथीही मुलगीच झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या पित्याने तीन दिवसांच्या स्त्री जातीच्या अर्भकाच्या डोक्यात घरातील लाकडी पाट घालून हत्या केली. ही घटना १३ डिसेंबरला मोराळ येथे घडली होती. गावकऱ्यांच्या माहितीच्या आधारे उलगडा.... नवजात अर्भकाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे पोलिसांनी गावातून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास सुरू केला. यासाठी कुटुंबातील सदस्यांचे जाबजबाब नोंदवण्यात आले. त्यात आईच्या हातातून बाळ पडल्याने मृत्यू झाला अशी माहिती समोर आली. परंतु हा बनाव होता. वैद्यकीय अहवाल आणि कुटुंबाच्या माहितीत तफावत आढळून आल्यानंतर तपासाला दिशा मिळाली. त्यानंतर जळगावच्या फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्याच्या तपासणीनंतर वस्तुस्थिती समोर आली.
बहिणीने वडिलोपार्जित मालमत्तेतील हक्क सोडावा म्हणून दोन सख्खे भाऊ आणि एका भावजीने तिचे राहत्या घरातून अपहरण केले. बहिणीला २ दिवस डांबून ठेवत मारहाण केली व मानसिक त्रास दिला. दामिनी पथकाच्या तत्परतेमुळे या महिलेची सुटका झाली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अमोल नारायण तांदळे (३३), सुदाम नारायण तांदळे (३८), सुरेश दादाराव जाधव (४२) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सोनाली नारायण तांदळे (३५, रा. अमर कृष्णकुंज अपार्टमेंट, चिकलठाणा) या २२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या घरात होत्या. या वेळी त्यांचे लहान भाऊ अमोल, मोठा भाऊ सुदाम आणि भावजी सुरेश जाधव तेथे आले. “वडील गाडीत बसलेले आहेत, त्यांना भेटायला बाहेर चल,’ असे कारण त्यांनी सांगितले. सोनाली कारजवळ गेल्या, तेव्हा तेथे वडील नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा तिन्ही आरोपींनी त्यांना ओढून कारमध्ये कोंडले. पीडितेने एसएमएस पाठवल्याने प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला. शेतात घेऊन गेले, नातलगाच्या घरी डांबून केली मारहाण अपहरणानंतर आरोपींनी सोनाली यांना गणोरी (ता. फुलंब्री) येथील शेतात नेले. दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजेपर्यंत कारमध्येच बसवून ठेवले. त्यानंतर त्यांना जटवाडा रोडवरील राधास्वामी कॉलनीतील आतेभाऊ सुरेश चव्हाण यांच्या घरी नेले. तेथे सुदामने सोनाली यांना मारहाण केली. “तू पळून जाण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या मुलीला पहिल्या नवऱ्याकडे सोडून देऊ आणि तुझ्या मित्रालाही बघून घेऊ,’ अशी धमकी आरोपींनी दिली.
मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटला असून यात भाजपने ‘मोठ्या भावाची’ भूमिका कायम राखली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप १४० जागांवर तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ८७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. या जागावाटपाकडे केवळ आकड्यांचा खेळ म्हणून न पाहता, मुंबईवरील राजकीय वर्चस्वाचा ‘पॉवर गेम’ म्हणून पाहिले जात आहे. भाजपने १४० जागा घेऊन शिवसेनेच्या (ठाकरे गट) बालेकिल्ल्यात थेट घुसखोरी करण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८७ जागा पदरात पाडून घेत मुंबईतील मराठी मतांवर आपलाच हक्क असल्याचे सिद्ध करण्याचे आव्हान पेलले आहे. भाजप आपल्या कोट्यात रामदास आठवलेंच्या रिपाइंला सामावून घेणार असल्याने, दलित मतांच्या ध्रुवीकरणाचा लाभ महायुतीला मिळण्याची शक्यता आहे. जागावाटप निश्चित झाले असले तरी नाराजी व बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची पहिली अधिकृत यादी सोमवारी जाहीर करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. कुणाचे काय पणाला? पुण्यातील आघाडीसाठी दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांमध्ये बैठका पुणे | दोन्ही राष्ट्रवादींमध्ये पुण्यात आघाडीच्या निर्णयाची आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. कारण खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी सकाळी अजित पवारांसोबत जाणार असल्याचे संकेत दिले. रविवारी बारामतीत शरद पवार, गौतम अदानी, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकाच व्यासपीठावर येणार असल्याने चर्चांना उधाण आले., खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांसोबत गुरुवारी व शुक्रवारी चर्चा केली. नंतर अंकुश काकडे यांच्यासह स्थानिकांनी अजित पवारांची भेट घेत जागा वाटपाबाबत चर्चा केल्या.
भारतातही १६ वर्षांखालील मुलांनी सोशल मीडियाचा वापर करण्यास बंदी घालण्याची मागणी होत आहे. शुक्रवारी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने केंद्र सरकारला सांगितले की, मुलांना इंटरनेट आणि सोशल मीडियापासून संरक्षण देण्यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्यकता आहे. सरकारने १६ वर्षांखालील मुलांनी इंटरनेटचा वापर नियंत्रित करणारा कायदा करण्याचा विचार करावा. हा कायदा ऑस्ट्रेलियाप्रमाणेच असू शकतो. तेथे मुलांना सोशल मीडियाचा वापर करण्यास मनाई आहे. न्यायमूर्ती जी. जयचंद्रन व न्यायमूर्ती के.के. रामकृष्णन म्हणाले, मुलांना हानिकारक ऑनलाइन सामग्रीपासून संरक्षण देण्यासाठी सोशल मीडिया खात्यांवर वयोमर्यादा निश्चित करावी. असा कायदा लागू होत नाही तोपर्यंत राज्य आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने संयुक्तपणे कृती आराखडा विकसित करावा. एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही टिप्पणी केली. याचिकेत अशी मागणी करण्यात आली होती की, इंटरनेट सेवा प्रदात्यांना पालक विंडो सेवा प्रदान करण्याचे निर्देश द्यावेत आणि मुलांना इंटरनेटच्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी जागरूकता मोहिमा सुरू कराव्यात. याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, ऑनलाइन पोर्नोग्राफिक सामग्री मुलांना सहज उपलब्ध आहे. ही चिंतेची बाब आहे. ऑस्ट्रेलिया कठोर : सोशल मीडिया कंपनीस उल्लंघनाबद्दल शिक्षा भारतात किती मुले सोशल मीडिया वापरतात? असर-२०२४ च्या अहवालानुसार भारतातील १४-१६ वयोगटाची ८२% मुले स्मार्टफोन वापरतात. पाहणीच्या मागील आठवड्यापर्यंत यापैकी ७६% मुले सोशल मीडिया वापरत होती. १६ वर्षांखालील अंदाजे ३५ कोटी मुले आहेत. सोशल मीडिया मुलांच्या मनावर परिणाम करतेय? लोकल सर्कलच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की मुले रोज तीन तासांपेक्षा जास्त वेळ ऑनलाइन घालवतात. ९ ते १७ वयोगटातील मुलांच्या पालकांपैकी जवळ ६६% पालकांचा असा विश्वास आहे की सोशल मीडिया, ओटीटी आणि गेमिंगमुळे मुलांमध्ये अधीरता, राग आणि आळस यासारखे गुण वाढले आहेत. न्यायालयाची चिंता काय आहे? मदुराई न्यायालयाचा असा विश्वास आहे की आजच्या काळात इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणतेही ‘गेटकीपिंग’ नाही. अल्पवयीन मुलाला ड्रग्ज, तंबाखू किंवा पोर्नोग्राफिक सामग्री सहजपणे मिळू शकते. अलीकडील शालेय घटना मुलांमध्ये आत्महत्येच्या प्रवृत्तींमध्ये वाढ दर्शवतात. आक्षेपार्ह साहित्य असल्यास पालकांची जबाबदारी जास्त आहे... इंटरनेटवर काही आक्षेपार्ह साहित्य असेल तर ते पाहण्याचा किंवा न पाहण्याचा पर्याय आणि अधिकार वैयक्तिक आहे, परंतु मुलांच्या बाबतीत धोका खूप जास्त असतो. त्यामुळे आई-वडिलांची जबाबदारीदेखील वाढते.- न्यायमूर्ती जी. जयचंद्रन
वीर बाल दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शुक्रवारी देशातील २० मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने(२०२५) गौरवण्यात आले. छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभागाच्या डॉ. अनुप्रिया महर्षी यांचा १७ वर्षीय मुलगा अर्णव महर्षी यालाही विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनातील समारंभात राष्ट्रपतींनी २० बालकांना पुरस्कार’ प्रदान केले. शौर्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल या बालकांना उर्वरित गौरवण्यात आले. यापैकी दोघांना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार विजेत्यांमध्ये ९ मुले आणि ११ मुलींचा समावेश आहे. पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. काय आहेत इनोव्हेशन १. ॲक्टीव्ह हॅड रिस्ट बॅड लकवाग्रस्त रुग्णांच्या हाताला हा बँड बांधला जातो. यामुळे हालचालींद्वारे रुग्णांचे पुर्नवसन करणे सहज होते. अशा रुग्णांना फिजिओथेरपी अत्यंत गुणकारी ठरते. त्याला सहकार्य करणारे हे उपकरण आहे. याला पेटंटही मिळाले आहे. मागील वर्षभरापासून एमजीएम फिजिओथेरपी रुग्णालयात ते रुग्णांवर वापरले जात आहे. २. फेअर चान्स सॉफ्टवेअर-फेअर चान्स हे सॉफ्टवेअर बनवले आहे. याद्वारे बोटांच्या हालचाली टिपल्या जातात. हे सॉफ्टवेअर एआय बेस्ड आहे. त्याचाही कॉपी राईट मिळवला आहे. सर्वोच्च आनंदाचा क्षण अपघातानंतर एका आईची स्थिती काय असू शकते याची प्रत्येकजण कल्पना करु शकतो. एकुलता एक मुलगा वाचेल की नाही, ही शाश्वती नव्हती. आज त्याच्या २ प्रयोगांची दखल घेतली गेली. याहूनही महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात हजारो लोक याचा फायदा घेतील. यातून त्यांचे आयुष्य आनंद होईल. त्याच्या या प्रयोगांची दखल घेऊन दिलेला हा पुरस्कार मी सर्वोच्च सन्मान मानते, असे डॉ. अनुप्रिया महर्षी यांनी म्हटले. पुरस्कार मिळाल्यानंतर अर्णवने ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत प्रेरणादायी प्रवास सांगितला, तो त्याच्या शब्दांत... ‘१९ मे २०२२ रोजी संभाजीनगरातील डॉक्टरांच्या ग्रुपचा उत्तराखंडात भीषण अपघात झाला. यामध्ये मीदेखील होतो. ११ दिवस मी कोमात होतो. डाव्या डोळ्याची नस पूर्णत:खराब झाली. ६ दात तुटले. जबड्याची हाडे मोडली. शरीर पूर्णत: पॅरालाइज्ड झाले होते. गत ३ वर्षांत रुग्णालयांत उपचारांसाठी जाताना रुग्णांची परिस्थिती पाहून रिस्ट बँड बनवण्याची प्रेरणा मिळाली. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने मला उत्तम उपचार घेता आले. ज्यांच्याकडे सुबत्ता नाही, त्यांनाही उत्तम जगता यावे, या प्रेरणेतून मी हे उपकरण व सॉफ्टवेअर बनवले. एमजीएम फिजिओथेरपी रुग्णालयात उपकरणाचा रुग्णांवर वापर सुरु आहे. अनेकांना फायदा होताना पाहतो हाच खरा पुरस्कार आहे’ सरवण सिंह (१०) ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये फिरोजपूरच्या ‘तारा वाली’ गावात शत्रूचे ड्रोन हल्ले होत असतानाही, सैनिकांपर्यंत रोज दूध, चहा, लस्सी पोहोचवून इतरांना प्रेरणा दिली.
निवडणूक चिन्हावरून मतभेद, शरद पवार मविआसोबत मैदानात अजित पवार यांनी घातली घड्याळावर लढण्याची अट पुणे : प्रतिनिधी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून शहरात शरद पवार आणि अजित पवार गटाच्या स्थानिक युतीची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, आज दुपारी झालेल्या एका निर्णायक बैठकीत या चर्चांना पूर्णविराम मिळाला. जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्यानंतर अजित […] The post राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रीय बाल पुरस्काराने २० बालकांचा सन्मान
छ. संभाजीनगरचा अर्णव महर्षीही सन्मानित नवी दिल्ली : वृत्तसंस्था वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २० मुलांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर येथील अर्णव महर्षीलाही यावेळी गौरविण्यात आले. महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात आयोजित समारंभात […] The post राष्ट्रीय बाल पुरस्काराने २० बालकांचा सन्मान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
एक लाख कोटी डॉलरची उलाढाल दुरापास्त नवी दिल्ली : वृत्तसंस्था चालू आर्थिक वर्षात एक लाख कोटी डॉलरची निर्यात करण्याचे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता धूसर आहे. जागतिक बाजारपेठेतील घटती मागणी, अमेरिकेकडून आकारले जात असलेले अतिरिक्त टेरिफ, तसेच काही देशांतील भू-राजकीय परिस्थितीमुळे हे उद्दिष्ट साधण्यात अडचणी निर्माण झाल्याचे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या अहवालात म्हटले […] The post निर्यातीचे लक्ष्य धूसरच! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न नागरी पुरस्कार उपाधी नाही
मुंबई हायकोर्ट, व्यक्तीच्या नावापूर्वी वापर बेकायदेशीर मुंबई : प्रतिनिधी पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी पुरस्कार उपाधी नाहीत, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे ते एखाद्या व्यक्तीच्या नावापूर्वी किंवा नंतर वापरता येत नाहीत. न्यायालयाने एका याचिकेच्या केस शीर्षकात पद्मश्री शब्दाच्या वापराबद्दल हे निरीक्षण नोंदवले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भातील […] The post पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न नागरी पुरस्कार उपाधी नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारतीय नागरी विमान वाहतूक क्षेत्रात लवकरच मोठी स्पर्धा पहावयास मिळणार आहे. केंद्र सरकारने तीन नवीन एअरलाईन्सना देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यास परवानगी दिली असून यामुळे प्रवाशांना प्रवासाचे नवीन आणि स्वस्त पर्याय उपलब्ध होणार आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने ‘अल हिंद एअर’, ‘फ्लाय एक्स्प्रेस’ आणि ‘शंख एअर’ या कंपन्यांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) जारी केले आहे. उत्तर […] The post ‘इंडिगो’ची सद्दी संपणार? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पोलिसांच्या त्रासास कंटाळून तरुणाची आत्महत्या
निलंगा : प्रतिनिधी तालुक्यातील औराद शहाजानी येथील एका तरुणाने दि २५ डिसेंबर रोजी पोलिसांच्या ससेमी-याला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल करून सायंकाळी शासकीय वनीकरणातील झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली. निलंगा तालुक्यातील औराद […] The post पोलिसांच्या त्रासास कंटाळून तरुणाची आत्महत्या appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शिरूर अनंतपाळ येथे आजपासून दोन दिवसांचा अक्षरोत्सव
शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी साहित्यनगरी म्हणून नवी ओळख निर्माण केलेल्या शिरूरअनंतपाळ येथें आज दि. २७ व २८ डिसेंबर रोजी होणा-या यावर्षीच्या ग्रंथरसिक साहित्यसंमेलनात यावर्षी साहित्यीकांची मुलाखत व बाल मेळावा प्रथमच होणार आहे. प्रसिद्ध साहित्य धनंजय गुडसूरकर यांच्या मुलाखतीसह बालमेळावा व अन्य सत्रांमधून दोन दिवसांत साहित्य रसिकांना अक्षर मेजवानी मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि […] The post शिरूर अनंतपाळ येथे आजपासून दोन दिवसांचा अक्षरोत्सव appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते ‘क्रांतीज्योती’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन
लातूर : प्रतिनिधी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्याचे दर्शन घडवणा-या ‘क्रांतीज्योती’ या प्रतिनिधीक काव्यसंग्रहाचे प्रकाशन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते लातूर येथे करण्यात आले. सदर प्रकाशन प्रसंगी सह्याद्री देवराई प्रकल्प प्रमुख सुपर्ण जगताप, हरिती वाचन चळवळीचे राहुल लोंढे, अॅड. दीपक घटकार, अॅड. विनोद बडगे, अॅड. शैलेश गायकवाड, अॅड. दत्तात्रय येरमुळे, शरद […] The post माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते ‘क्रांतीज्योती’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
शुक्रवारी ८ नामनिर्देशनपत्र दाखल
लातूर : प्रतिनिधी लातूर शहर महानगरपालिकेच्या तिस-या सार्वत्रिक निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सूरु आहे. शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी ८ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. दि. २३ डिसेंबरपासून शुक्रवारपर्यंत एकुण १ हजार ८४ नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे. दि. ३० डिसेंबरपर्यंत नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत आहे. शुक्रवारी प्रभाग क्रमांक १, २, ३ मधून १५१ नामनिर्देनपत्रांची विक्री […] The post शुक्रवारी ८ नामनिर्देशनपत्र दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्या हस्ते कल्याण ज्वेलर्सच्या नवीन दालनाचे उद्घाटन
लातूर : प्रतिनिधी भारतातील सर्वात विश्वसनीय आणि अग्रगण्य ज्वेलरी कंपन्यांपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सने आज महाराष्ट्रातील लातूर येथील को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मेन रोड येथे आपल्या नवीन शोरूमचा शुभारंभ केला. सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया रितेश देशमुख यांच्या हस्ते या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. या शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सची एकापेक्षा एक सरस उत्कृष्ट डिझाइन्स उपलब्ध आहेत, जसे की, मुहूर्त […] The post सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्या हस्ते कल्याण ज्वेलर्सच्या नवीन दालनाचे उद्घाटन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले असून, पुणे व पिंपरी-चिंचवडसह सर्वच ठिकाणी 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू असतानाच, पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या संभाव्य युतीवर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नसतानाच, अजित पवारांनी आता एका तिसऱ्याच नव्या पक्षासोबत हातमिळवणी करण्याची तयारी सुरू केल्याने राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. अजित पवार पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) सोबत युती करण्याची शक्यता आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करताना अजित पवार यांनी लिहिले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे अध्यक्ष सचिन खरात जी यांनी आज माझी सदिच्छा भेट घेतली. पुढे अजित पवार म्हणाले, यावेळी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, सन्मानपूर्वक आघाडी करून काही जागांवर सहमती झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारित सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासासाठी त्यांची एकत्र येण्याची भूमिका स्वागतार्ह आहे. लोकहिताच्या मुद्द्यांवर समान विचारांच्या पक्षांनी एकत्र येऊन काम करणं, ही काळाची गरज आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक चर्चा आणि समन्वयातून पुढील वाटचाल निश्चितच सकारात्मक ठरेल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. सचिन खरात काय म्हणाले? अजित पवारांसोबत झालेल्या भेटीनंतर बोलताना सचिन खरात यांनी म्हटले की, आरपीआय खरात हा पक्ष शरद पवार यांच्या सोबत आहे. आता निवडणुका होत आहेत. अजित पवार यांचा पक्ष शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा आहे. जे पक्ष या विचारांवर चालतात ते पक्ष एकत्रित यावं अस सगळ्यांचे मत आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यासाठी चर्चा सुरू आहेत. यासाठी अजित पवारांची आज भेट घेतली. दादांची भेट घेऊन मी त्यांच्याशी बोललो आहे. आपण समविचारी लोक एकत्रित येऊया अस आमच देखील मत आहे. पुढे बोलताना सचिन खरात म्हणाले की, तुमचा पक्ष देखील फुले शाहू आंबेडकरांचा विचार मानतो असं मी दादांना सांगितलं. आमचा आणि अजित पवारांचा विचार एकच आहे. आम्हाला जर सन्मानपूर्वक जागा दिल्या तर आम्ही अजित पवारांसोबत आघाडी करण्यास तयार आहोत. मी अजित पवारांना पत्र देखील दिल आहे. राज्यात मी पवार साहेबांच्या पक्षासोबत आहे आणि राहणार. पण पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार आमच्या पक्षाला सन्मानपूर्वक जागा देत असतील तर आम्ही विचार करू आणि निवडणुका सोबत लढू.
खोपोली नगरपालिकेतील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची शुक्रवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, आपल्या जीवाला धोका असल्याची पूर्वकल्पना देऊनही कारवाई न केल्याचा ठपका ठेवत संतप्त नातेवाईक आणि शिवसैनिकांनी पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 7 वाजता मंगेश काळोखे यांच्यावर हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवला. काळ्या रंगाच्या वाहनातून आलेल्या या हल्लेखोरांनी काळोखे यांची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तत्काळ नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. माझ्या भावाच्या जीवाला धोका असल्याचे त्याने आधीच लेखी स्वरूपात पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांना कळवले होते. आरोपी रवींद्र देवकर आणि त्याचे साथीदार शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती देऊनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या हत्येला पोलिस प्रशासनच जबाबदार आहे, असा खळबळजनक आरोप मयत मंगेश यांचे आतेभाऊ संदेश पाटील यांनी केला आहे. सचिन हिरे यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला. पोलिस ठाण्यात राडा, कार्यकर्त्यांची धक्काबुक्की या हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींच्या अटकेसाठी शिवसैनिकांनी खोपोली पोलिस ठाण्यावर धडक दिली. यावेळी संतप्त जमावाने ठाण्यातच ठिय्या मांडला. जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठी धक्काबुक्की झाली, ज्यामुळे काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह 10 जणांवर गुन्हे या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले असून, पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचाही समावेश असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार आरोपींचा शोध घेत आहेत. खोपोली हादरली:शिंदे गटाच्या नगरसेविकेचे पती आणि माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या रायगड जिल्ह्यातील खोपोली शहर आज सकाळी घडलेल्या एका भीषण घटनेमुळे हादरून गेलं आहे. खोपोली नगरपालिकेच्या शिंदे गटाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पती मंगेश काळोखे यांची 26 डिसेंबर रोजी सकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या हत्येने खोपोलीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. मंगेश काळोखे हे स्थानिक पातळीवर परिचित व्यक्तिमत्त्व होते आणि यापूर्वी त्यांनी नगरसेवक म्हणूनही काम पाहिलं होतं. वाचा सविस्तर
आपण पाणी मागितले, रस्ते मागितले हे सोडून ते भलते काही बोलतील, कामाचे काही बोलणार नाहीत. हे म्हणतील मेट्रो देतो, यांना सांगा, पाणी द्या मग बाकीचे बोला, हे लोक फक्त लुटालूट करतात, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे क्रांती चौक ते गुलमंडी येथे भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते. आदित्य ठाकरे यांनी शहरातील संस्थान गणपतीला नारळ फोडून महानगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ केला. संस्थान गणपती हे संभाजीनगर शहराचे ग्रामदैवत आहे. बाळासाहेब ठाकरे देखील संस्थान गणपतीला नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करायचे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी गुलमंडी येथे कारच्या बोनेटवर उभे राहून भाषण केले. आदित्य ठाकरे म्हणाले, हे सरकार आपल्याला परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी मोर्चा काढला, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला. पालकमंत्र्यांचे व्हिडिओ येतात, पैसे दिसतात, हे पैसे कुठून येतात? असा सवाल त्यांनी केला. तसेच ते म्हणाले, इथल्या खासदाराची कसली दुकाने आहेत? बॅगमधील पैसा निवडणुकीत बाहेर येईल, त्याला हात लावू नका, असे आवाहन आदित्य ठाकरेंनी जनतेला केले. तसेच ठाकरेंच्या युतीवर बोलताना ते म्हणाले, मुंबईत आपण एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत. सरकारवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, हे लोक फक्त लुटालूट करतात. हे वसुलीबाज, हफ्तेबाज आहेत. ती शिवसेना नाही ती मिंधे चिंधी चोर टोळी आहे. कोणी तरी आपल्यात प्रवेश केला म्हणून टीका करतात, पालघरमधील साधू हत्याकांड बाबत प्रमुख आरोपी भाजपमध्ये का घेतला? ते आधी सांगा, मग आम्हाला प्रश्न विचारा असे आव्हान त्यांनी दिले.

26 C