एक पेड मा के नाम':वाडा फॉर्म जि.प.शाळेत वृक्षारोपण, उपक्रमांतर्गत पाहुण्यांच्या हस्तेवृक्ष लागवड
तालुक्यातील वाडा फॉर्म येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये एक पेड मा के नाम' या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक किशोर सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती वाडा येथील वंदना भगत यांची होती. भगत यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्त्व पटवून दिले. वृक्ष ही निसर्गाची देणगी असून, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी देखील एक वृक्ष लावण्याचा संकल्प केला. कार्यक्रमात शिक्षक किशोर सुर्वे यांनी वृक्षांचे फायदे उलगडून सांगत विद्यार्थ्यांना वृक्षांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. या वेळी शिक्षिका मनिषा नालिदे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत शिक्षिका कविता आवारे उपस्थित होत्या. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा जयश्री रोकडे, पोलिस पाटील विनोद मनवर तसेच गावातील अनेक नागरिक व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन आणि सहकार्य आकाश रोकडे यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती निर्माण करण्यात आली. वृक्षारोपणाच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनी गोडी वाढली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत जिल्ह्यात ८२ टक्क्यांवर पेरणी आटोपली आहे. मेळघाटमधील धारणी तालुक्यात ९५ टक्के पेरणी पूर्ण झाल्याने हा तालुका सर्वात पुढे आहे. मात्र अचलपूर तालुक्यात केवळ ६१ टक्के पेरणी झाली असून, जिल्ह्यात हा तालुका सर्वात मागे आहे. . सोयाबीन, कापूस व तूर ही तिन्ही पिके नगदी पिके म्हणून ओळखली जातात. या वर्षीही जिल्ह्यात या तीन पिकांनी अधिक क्षेत्र व्यापले आहे. जिल्ह्यात एकूण पेरणीयोग्य क्षेत्र ६ लाख ८२ हजार ९९२ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी २ लाख १३ हजार ६०४ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. तर कापसाची १ लाख ९८ हजार २९८ हेक्टरवर लागवड झाली आहे. तसेच ९५ हजार ३६० हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी करण्यात आली. मूग, ज्वारीकडेही कल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तृणधान्याच्या पेरणीकडेही लक्ष दिले असून, मूग (६५९ हेक्टर), उडीद (३०८ हेक्टर) क्षेत्रात तर ज्वारी (३७३४ हेक्टर), बाजरी (२५६ हेक्टर), धान (५४२८ हेक्टर) या पिकांचीही पेरणी झाली असल्याची नोंद कृषी विभागामार्फत शासनाकडे सादर करण्यात आलेल्या अहवालात आहे. कोणत्या तालुक्यात किती टक्के पेरणी? शासनाकडील अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंतची तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (टक्केवारी). धारणी-९५, चिखलदरा -८७, अमरावती-९१, भातकुली-८४, नांदगाव खं.-८१, चांदूर रेल्वे-९२, तिवसा -६५, मोर्शी-८६, वरुड-८०, दर्यापूर-६८, अंजनगाव सुर्जी-९०, अचलपूर-६१, चांदूर बाजार-८३ व धामणगाव रेल्वे-८७ आठवड्यात पूर्ण पेरणी ^जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत पेरणीच्या कामाने वेग घेतला असून, पेरणीचा आकडा ८२ टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. दरम्यान याच वेगाने पेरणी झाल्यास येत्या आठवडाभरात १०० टक्के क्षेत्राची पेरणी पूर्ण झालेली असेल. - राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती.
विठ्ठल.. विठ्ठल.. विठ्ठला.., पांडुरंग विठ्ठलाच्या जयघोषात परिसरातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रविवारी आषाढी एकादशीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात प्रामुख्याने विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा, भजन, कीर्तन, दिंडी सोहळे आणि उपवासाचे पदार्थ भाविकांना वाटप होणार आहे. दिवसभर मंदिरामध्ये भाविकांची दर्शन घेण्यासाठी मांदियाळी असणार आहे. तसेच शहरातील अंबागेट बुधवारा या ठिकाणी असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही अभिषेक व महाआरती सोहळा पार पडणार आहे. आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे. वैष्णवांसाठी या पवित्र दिनाचे विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. तसेच कौंडण्यपुरातही भाविक दर्शनासाठी येतात. कौंडण्यपूर हे रुक्मिणी मातेचे आणि पाच सतीचे माहेर आहे. प्रभू रामचंद्राची आजी, राजा दशरथाची आई इंदुमती, अगस्ती ऋषीची पत्नी लोपामुद्रा, भगीरथ राजाची माता केशिनी व नल राजाची राणी दमयंती तसेच चौरंगीनाथाचे जन्मस्थान आहे. महाभारतकालीन या पुरातन तीर्थक्षेत्रात रुक्मिणीचे जन्मस्थान आणि पाच सतीचे माहेर आहे. जवळच अंबिका मातेचे पुरातन मंदिर आहे. याच मंदिरातून भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीमद् भागवतात याचा उल्लेख आहे. वशिष्ठा (आजची वर्धा) नदीच्या काठावर पुरातन मंदिर आहे. येथे जवळपास ४५१ वर्षांपूर्वी संत सदगुरु सदाराम महाराज होऊन गेले. सदाराम महाराजांनी कौंडण्यपूर ते पंढरपूर अशी वारी १५९४ मध्ये सुरू केली. ती परंपरा अजूनही सुरू असून वारीचे (पायदळ दिंडीचे) हे ४३१ वे वर्ष आहे. रुक्मिणी मातेच्या माहेराहून निघालेली ही महाराष्ट्रातील एकमेव मानाची पालखी आहे. सदाराम महाराजांनी कारंजा लाड व कौंडण्यपूर या दोन्ही कर्मभूमीत विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर बांधले. पांडुरंगाच्या आज्ञेवरून सदाराम महाराजांनी वारकरी संप्रदायाचा प्रचार केला. तेव्हापासून कार्तिक आणि आषाढी मासात येथे यात्रा भरते. विदर्भातून अनेक पायदळ दिंड्या येतात व प्रतिपदेला दहीहंडी सोहळा होतो. पांडुरंगाचा या ठिकाणी वास असतो, अशी भक्तांची श्रद्धा आहे. तसेच जे भाविक पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊ शकले नाही. ते आषाढी एकादशीच्या दिवशी कौंडण्यपूर येथे दर्शनासाठी येतात. पहाटे ५ वाजता विठ्ठल रुक्मिणी अभिषेक सोहळा होणार आहे. त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत सकाळी ६ वाजता महाआरती होईल. नंतर दिवसभर मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. या वेळी रुक्मिणी मातेला हार श्रीफळ, वटी अर्पण करण्यात येते. तसेच भाविक वर्धा नदीवर स्नान करून पूजा करतात. येथे दिवसभर मंदिर संस्थांच्या वतीने भाविकांसाठी फराळ वाटप करण्यात येणार आहे. यासाठी मंदिर विश्वस्त मंडळ परिश्रम घेत आहे. कौंडण्यपूर येथून गेलेली पालखी ही ११ तारखेला परत येते. त्यानंतर दिवसभर पायदळ वारकरी भक्तांच्या पालखीचे स्वागत व दर्शनासाठी एकत्र येतात. या वेळी विदर्भातून सर्व पालख्या जमा होतात. त्या आधी अनेक ठिकाणी रिंगण सोहळा पार पडणार आहे. याच दिवशी दुपारी ४ वाजता दहीहंडी उत्सव सोहळा साजरा होणार आहे. या दिवशी परिसरात मंदिर परिसरात यात्रा भरते. तसेच दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते.
पालखी, दिंड्यांनी आज गजबजणार मिनी पंढरपूर:दासटेकडीवर 2 दिवस आषाढी एकादशी महोत्सव
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संकल्पित रामकृष्णहरी मानवता मंदिर दासटेकडी म्हणजे विदर्भातील मिनी पंढरपूर होय. याठिकाणी यंदाही ६ व ७ जुलै असे दोन दिवस आषाढी एकादशी महोत्सवाचे आयोजन केले आहे. परिसरातून ६० दिंड्या व पालख्या यात सहभागी होणार आहेत. पंढरपूरची वारी करण्यास लांब लांब का जाता, इथेच येऊनी सदा बसावे, वाटतसे भगवंता..! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एका भजनात पंढरपूरला जाण्यापेक्षा रामकृष्णहरी मंदिर दासटेकडी येथेच विठ्ठल रुक्मिणी अवतरल्याचा अनुभव येणार, असे सांगितले. त्यानुसार दरवर्षी श्री क्षेत्र गुरुकुंज मोझरीतील दासटेकडी येथे जणू काही विठ्ठल रुक्मिणी अवतरले असा प्रत्यय या मिनी पंढरपूर असलेल्या पवित्र स्थळी पाहायला मिळतो. ६ जुलै रोजी पहाटे ४ वाजता रामकृष्णहरी भगवंतांची महापूजा व अभिषेक वरोरा येथील चेतन शर्मा व आराधना चेतन शर्मा, सूर्यप्रकाश जयस्वाल व ममता सूर्यप्रकाश जयस्वाल, सतीश बोथे व चित्रा बोथे यांच्या हस्ते होईल. त्यानंतर सामुदायिक ध्यान व चिंतन प्रा. अरविंद राठोड यांचे होईल. सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत दिंडी पालखी सोहळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी ते रामकृष्णहरी मंदिर दासटेकडीपर्यंत होईल. या वेळी राष्ट्रसंतांच्या पालखीचे पूजन लक्ष्मणराव गमे व सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांच्या हस्ते होईल. मंदिरावर बाहेरगावाहून आलेल्या दिंड्यांचे स्वागत प्रकाश तारेकर व रेखा तारेकर करतील. सकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत जय चव्हाण व अजय चव्हाण यांचा अभंग रंगले पांडुरंगी हा गीतगायनाचा कार्यक्रम होईल. दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत श्रीगुरुदेव भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम व त्यानंतर नीलेश महाराज गावंडे यांचे प्रवचन होईल. दुपारी ३ ते ५ पर्यंत विलास महाराज साबळे याचे हरिकीर्तन होईल. रात्री ८ ते ९ या वेळेत राजाराम चव्हाण यांचा भजनाचा कार्यक्रम होईल. सोमवार, ७ जुलै रोजी आषाढी द्वादशीला सकाळी १० ते १२ या वेळेत गोपालकाल्याचा व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रामकृष्णहरी मानवता मंदिर विभाग समितीने केले आहे.
जनसामान्याच्या हितासाठी त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी व रोगाचे योग्य निदान करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांनी मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. त्यानुसार नांदगाव शहरातील बारी समाज भवनात डॉ. राजेंद्र गोडे वैद्यकीय रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांनी ४११ रुग्णांच्या तपासण्या करून नि:शुल्क महाआरोग्य शिबिर पार पडले. शिबिराच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात करण्यात आली. यामध्ये डोळे तपासणीत मोतीबिंदूचे ११० रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले, काही रुग्णांच्या शुगर, बीपी व हाडाचे दुखणे, हृदयरोग तपासणी, कान, नाक, घसा तपासणी, गरोदर स्त्रियांच्या तपासण्या, थायरॉईड तपासणी, दमा वातविकार तपासणी, अस्थिरोग तपासणी इत्यादी तपासण्या मोफत करून मोतीबिंदूसह एकूण १९७ रुग्णांना पुढील तपासण्या व नंतर शस्त्रक्रिया औषधोपचाराकरिता डॉ. राजेंद्र गोडे रुग्णालय अमरावती येथे मोफत नेण्यात येणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरात ग्रामीण रुग्णालयातील आरबीएसके व एनसीडी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी मोफत रक्त तपासणी केली. या शिबिराचे आयोजन शिवसेना विधानसभा समन्वयक प्रकाश मारोटकर यांनी केले. या शिबिरासाठी बाळासाहेब राणे, डॉ. वीरेंद्र खापरी, वासुदेव लोखंडे, नीलेश इखार, सुनील गुरमुळे, भूषण दुधे, चेतन डकरे, रवी ठाकूर, नितीन दुधे, डॉ. अरुण बेलसरे, रेखा नागोलकर, छाया भारती, अक्षय हिवराळे आदींनी परिश्रम घेतले. ११० रुग्णांवर करणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया नांदगाव शहरातील गोरगरीब नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. ७ जुलैला वयोवृद्ध ११० रुग्णांना मोफत नेऊन तपासण्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतील, असे शिबिराच्या आयोजक प्रकाश मारोटकर यांनी सांगितले.
आदिवासी भागातील शाळा या २० पेक्षा कमी पटसंख्या असल्याच्या कारणाने बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशा शाळा कमी पटसंख्येमुळे बंद होणार नाहीत. याबाबत शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार संजय खोडके यांनी अधिवेशनात केली आहे. संचमान्यतेशिवाय शाळा चालू शकत नाही. चिखलदरा, धारणी भागातील शाळा सुद्धा संचमान्यतेशिवाय चालू शकणार नसल्याने याबाबत शासनाने ठोस भूमिका घेण्याची गरज आहे, असे आमदार संजय खोडके यांनी सभागृहासमक्ष अवगत केले. यावर शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी उत्तर देताना सांगितले की, कुठल्याही शाळा बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यावेळी आमदार खोडके यांनी म्हटले की, मंत्र्यांनी दिलेले उत्तर आम्ही आदेश समजायचे का किंवा याबाबत किती दिवसांत निर्णय घेणार आहात. दरम्यान पीठासीन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुद्धा या विषयाला गांभीर्याने घेतले. सभागृहात उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले कमी पटसंख्येमुळे शाळा बंद होणार नाही. याबाबत संचमान्यतेनुसार शिक्षकांचे समायोजन करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. वरिष्ठ सभागृहाचे काम अंत्यत महत्त्वाचे विधानपरिषद हे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहातील कामकाज हे सर्व दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. सभागृहातील प्रस्ताव व चर्चा ही देखील तितकीच महत्वाची आहे. तसेच महत्वपूर्ण प्रस्तावातील चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी नोंदी घ्याव्यात. अधिकारी उपस्थित नसल्याने नाराजी सभागृहात प्रस्तावावर चर्चा होत असताना संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित नसल्याने आ. संजय खोडके यांनी सभागृहासमक्ष खंत व्यक्त केली. प्रस्तावातील चर्चेदरम्यान अधिकाऱ्यांनी नोंदी घेवून माहिती देण्याची सूचना आ.संजय खोडके यांनी केली. या वेळी अधिकारी उपस्थित असणे आवश्यक होते. यावर अधिकाऱ्यांनी नोंदी घेणे गरजेचे आहे, असे विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी अलिकडेच अमरावती जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी येथील जिजाऊ कमर्शियल को-ऑप. बँकेला भेट दिली. सदर बँकेचे कामकाज हे सहकार क्षेत्रासाठी अनुकरणीय असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख को-ऑप. बँकेचे अध्यक्ष नरेश पाटील, महात्मा फुले को-ऑप बँकेचे अध्यक्ष लोखंडे, जिजाऊ बँकेच्या संचालक डॉ. पल्लवी बारब्दे, तज्ज्ञ संचालक विजय जाधव, संचालक श्रीकांत टेकाडे, अरविंद गावंडे, व्यवस्थापन मंडळाचे संगणक तज्ञ प्रा.डॉ.सूरेंद्र दाळू, बँकिंग तज्ञ भैय्यासाहेब निचळ, अध्यक्ष अविनाश कोठाळे उपस्थित होते. नागरी सहकारी बँका महाराष्ट्रात अत्यंत दर्जेदार सेवा देत आहेत. खाजगी तथा कार्पोरेट आणि राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा नागरी तथा ग्रामीण क्षेत्रातील ग्राहकांना उत्कृष्ठ सेवा देत आहेत. त्यामुळे आधुनिक काळातसुद्धा सहकार वृद्धींगत होत आहे. ही बाब सहकाराप्रती लोकसहभाग व सहकारावरील विश्वास दर्शवते, असेही अनासकर यांनी स्पष्ट केले. प्रारंभी अनासकर यांनी बँकेच्या विविध विभागांची पाहणी केली. बँकेत असलेल्या पायाभूत सुविधा, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यासंदर्भात उपलब्ध असलेल्या सेवा तसेच इमारत याचीही त्यांनी प्रशंसा केली. कार्यक्रमादरम्यान बँकेतर्फे विद्याधर अनासकर यांना शाल, श्रीफळ,स्मृतिचिन्ह, पुस्तक भेट देऊन सत्कार केला. याप्रसंगी नरेश पाटील, अध्यक्ष लोखंडे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक कराळे यांचाही जिजाऊ बँकेतर्फे सत्कार करण्यात आला. बँकेची वाटचाल योग्य दिशेने बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी बँकेच्या आजवरच्या वाटचालीची मांडणी केली. बँकेची वाटचाल आणि ग्राहकांचे समाधान याचा संपूर्ण आढावा त्यांनी अनासकर यांच्या पुढे मांडला. त्याचवेळी सहकार क्षेत्राकडून असलेली अपेक्षाही व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातील दीप प्रज्वलन आणि राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या पूर्णाकृती प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर लक्ष्मण हाके यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली. त्यामुळे अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संतप्त झाले. त्यांचे पडसाद शहरात उमटले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, इर्विन चौक येथे राकाँ जिल्हा ग्रामीणची निषेध सभा घेण्यात आली. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी करत आंदोलनही केले. या आंदोलनाप्रसंगी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या सुरेखा ठाकरे यांनीही निषेध व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे म्हणाले, की लक्ष्मण हाकेचे आंदोलन म्हणजे फक्त स्टंटबाजी होय. अजित पवार यांना टार्गेट करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्यावर एकांगी टीका केल्याने प्रसिद्धी मिळत असल्यामुळे असंवैधानिक पद्धतीने कुठलाही अभ्यास न करता काहींना सोबत घेऊन केलेली स्टंटबाजी आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा हाके यांचा गोरखधंदा आहे. अजित पवार कधीही जातीभेदात अडकून पडत नाहीत. ते सर्व समाज घटकाला समान न्याय देण्याचा प्रयत्न करतात, असेही संतोष महात्मे म्हणाले. महाराष्ट्रातील दोन समाजात नाहक वाद निर्माण होत आहे. त्यामुळे लक्ष्मण हाकेसारख्या स्वयंघोषित पुढाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी संतोष महात्मे यांनी रेटून धरली आहे. या वेळी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या सुरेखा ठाकरे, निषेध सभेचे आयोजक तथा राकाँ अमरावती जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे, निखिल ठाकरे, महिला आघाडीचे अध्यक्ष शोभना देशमुख, सारिका बोरकर, अनिता गावंडे, अंकुश घारड, अथर्व चुनडे, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी सईद भाई, धामणगाव रेल्वे तालुकाध्यक्ष बच्चू ठाकूर, दर्यापूरचे नीलेश मोपारी, अमोल गहेरवाल, कुलदीप काळे, किशोर अब्रुक, धारणीचे रोहित पाल, परतवाडा शहर अध्यक्ष रिंकू शुक्ला, नानू जयशिंगणी, राजेश बर्वे, प्रवीण भुजाडे, प्रवीण रडके, संजय गुर्जर, अंजनगाव सुर्जीचे राजेंद्र बारबदे, नितीन मेटकर, जानराव कोकरे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीणचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांसोबत झाली शाब्दिक चकमक या वेळी निषेध सभेच्या शेवटी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके यांचा प्रतिकात्मक पुतळा बाहेर काढला. मात्र, पोलिसांना ते लक्षात आल्यावर पुतळा घेण्यासाठी धाव घेतली. यामध्ये कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. संतप्त कार्यकर्त्यांनी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी रेटून धरली होती.
चिखलदऱ्यामध्ये 5 शिक्षक, एक ग्रामसेवक निलंबित:सीईओंचा पाहणी दौरा; इतर 6 कर्मचाऱ्यांना ‘शो कॉज’
चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या ५ शिक्षकांसह एका ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले तर इतर सहा कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जि. प.च्या सीईओ संजीता महापात्र यांनी ही कारवाई केली. या सर्वांवर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप ठेवण्यात आला. साप्ताहिक क्षेत्र भेट कार्यक्रमांतर्गत सीईओंनी शुक्रवारी आकस्मिकपणे चिखलदरा तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अनेक गावांना भेटी देऊन तेथील शाळा, अंगणवाड्या, दवाखान्यांची पाहणी केली. प्रसंगी एका नदीपात्रातून त्यांना पायी चालत काही अंतरही कापावे लागले. दरम्यान पाहणीवेळी काही शिक्षक, केंद्रप्रमुख, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका आदी कर्मचारी विना परवानगी अनुपस्थित आढळून आले. त्यातील पाच शिक्षक व एकताईचे ग्रामसेवक (ग्रामपंचायत अधिकारी) यांची चूक गंभीर असल्यामुळे त्यांना लगेच निलंबित करण्यात आले, तर इतर सहा जणांना कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यांना तत्काळ स्पष्टीकरण सादर करण्यास सांगण्यात आले आहे. निलंबित शिक्षकांमध्ये हिल्डाचा एक शिक्षक, एकताईचे ग्रामसेवक व दोन शिक्षक तसेच कुटीदा येथील दोन शिक्षकांचा समावेश आहे. हतरुचे ग्रामसेवक, एकताई आणि कुटीदाच्या अंगणवाडी सेविका, हतरुच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका, हतरु येथीलच केंद्रप्रमुख आणि चिखलदरा येथील शालेय पोषण आहार अधिकारी यांना सीईओंनी शो कॉज बजावली आहे. जि. प. प्रशासनाने या अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करण्यास असमर्थता दर्शवली. मात्र एकाचवेळी डझनभर कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि ‘शो कॉज’ची कुऱ्हाड कोसळल्याने चिखलदरा तालुक्यासह संपूर्ण मेळघाट क्षेत्रातील प्रशासन हादरले आहे. सीईओंच्या या दौऱ्याची कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे सीईओंना मेळघाटातील वस्तुस्थिती बघावयास मिळाली. सीईओंनी स्वत: घेतला वर्ग या दौऱ्यामध्ये सीईओंनी स्वत: एका शाळेत विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती कशी आहे. शिक्षकांनी त्यांना किती प्रमाणात शिकवले, त्यांचे शिकवणे विद्यार्थ्यांना खरेच आत्मसात झाले का, भाषा, गणित आदी मुद्द्यांबाबत विद्यार्थी किती जागरूक आहेत. त्यांना या दोन्ही विषयाचे ज्ञान खरेच आहे का, हे मुद्देही यावेळी जाणून घेण्यात आले. विशेष म्हणजे सीईओंनी वर्ग सोडेपर्यंतही त्या शाळेचे शिक्षक शाळेत पोहोचले नव्हते. या दौऱ्यात त्यांनी शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचे हजेरी रजिस्टरही तपासले. त्यात अनेकांनी स्वाक्षरीच केलेली नव्हती. शाळांमधील वर्गखोल्या आणि परिसर स्वच्छतेसंदर्भात देण्यात आलेल्या सूचनांचेही शिक्षकांकडून पालन झाले नसल्याचे समोर आले.
येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या नावाने ‘मराठी गजल’ अध्यासन केंद्र स्थापन करण्याची मागणी स्थानिक साहित्यिकांनी केली आहे. सदर निवेदनावर कवी विष्णू सोळंके यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक सुरेश अकोटकर, अरुण सांगोळे, सेवानिवृत्त प्राचार्य तथा ज्येष्ठ नागरिक महासंघाचे पदाधिकारी डॉ. दिलीपसिंह खांबरे, माजी प्राचार्य डॉ गावंडे यांच्या सह्या आहेत. या संदर्भात कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांना निवेदन देण्यात आले. कुलगुरूंच्या अनुपस्थितीत त्यांचे स्वीय सहायक आर. एम. जाधव यांनी हे निवेदन स्वीकारले. सुरेश भट यांनी आयुष्यभर साहित्याची विशेषत: कविता-गजलांची सेवा केली. त्यांच्या गझलेवर अनेकांनी शोधप्रबंध सादर करून या साहित्याला अधिक समृद्ध केले आहे. त्यामुळे हा विषय मराठी भाषेच्या शिक्षणापुरता मर्यादित न ठेवता त्यासाठी स्वतंत्र अध्यासन उघडले जावे, असे संबंधित निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सुरेश भट यांचे जन्मगाव अमरावती आहे. त्यांनी मराठी गजलेला वेगळाच आयाम दिला. त्यांच्यानंतर आजही राज्यात चारशेहून अधिक साहित्यिक मराठी गजलेचा प्रचार-प्रसार करत आहेत. त्यामुळे भट यांच्या जन्मगावच्या विद्यापीठात या विषयाचे स्वतंत्र अध्यासन असणे अधिक प्रासंगिक ठरते, असेही या साहित्यिकांचे म्हणणे आहे. निवेदन देताना ज्येष्ठ नागरिक सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुरेशपंत नांदुरकर इतर पदाधिकारी पळसोदकर, अविनाश राजगुरे, सुधीर देशमुख, वसंतराव सराफ आदी मान्यवरही उपस्थित होते.
पोटफुगीच्या विकार झालेल्या १० दिवसांच्या बाळावर वृद्ध महिलेने अघाेरी उपचार केले. गरम विळ्याने त्याच्या पोटावर ३९ चटके दिले. हा प्रकार घटनेनंतर ७ दिवसांनी समोर आला. रिचमू धोंडू सेलूकर (२५, रा. दहेंद्री) असे या बाळाच्या आईचे नाव असून तिनेच पोलिसांत तक्रार दिली आहे. रिचमू हिने १५ जून रोजी मुलीला जन्म दिला. तिची प्रकृतीही उत्तम होती. पण दहा दिवसांनी मुलीला सर्दी झाली. तिचे पोटही फुगले. त्या वेळी नर्स घरी आली व तिने औषधोपचार केला तसेच काही औषधेही दिली होती. २५ जूनला गावातीलच एक परिचित महिला रिचमू सेलूकरच्या घरी आली. तिने या बाळाला पाहिले आणि सांगितले की, तिचे पोट फुगले आहे, नाकातून पाणी वाहत आहे. बाळाला डंबा (चटके) दिला तर तब्येत ठणठणीत होईल असे सांगत काही वेळातच तिने विळ्याने बाळाच्या पोटावर चटके दिले. दरम्यान, ४ जुलैला परिचारिका बाळाची प्रकृती जाणून घेण्यासाठी घरी आली असता तिला बाळाच्या पोटावर चटक्यांचे व्रण दिसले. तिने बाळाला तातडीने काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर अचलपूरच्या स्त्री रुग्णालयात दाखल केले. बाळावर उपचार करून ५ जुलैला रुग्णालयातून बाळाला सुटी देण्यात आली आहे. बाळाची प्रकृती चांगली असल्याचे अचलपूर स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय शिरसमकर तसेच उपचार करणारे बालरोगतज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल यांनी ‘दिव्य मराठी’सोबत बोलताना सांगितले. चटके देणाऱ्या महिलेविरुद्ध चिखलदरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सांगितले. डंबा दिल्यामुळे पोटफुगी कमी होते ही अंधश्रद्धाच विविध कारणांनी लहान बाळांचे पोट फुगते, पोट फुगल्यानंतर त्याच्या पोटावर चटके (डंबा) दिले की पोटफुगी बरी होते, असा ग्रामीण तथा आदिवासी समाजात अनेकांचा गैरसमज (अंधश्रद्धाही) आहे. चार महिन्यांपूर्वीही चिखलदरा तालुक्यातीलच थिमोरी गावातील एका २२ दिवसांच्या बाळालासुद्धा अशाच प्रकारे डंबा देण्यात आला होता.
१९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे पहिले सरकार स्थापन करण्यासाठी अपक्षांची मोट बांधणारे गंगापूर तालुक्यातील डोणगाव येथील माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचे शनिवारी सकाळी ११ वा. निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. संभाजीनगर येथील सहकारनगरमधील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी सकाळी ११ वा. डोणगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. १९७८ ते १९८० या काळात त्यांनी डोणगाव येथून सरपंचपदावरून राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर तुर्काबाद जि. प. सर्कलमधून निवड झाली. जि. म. सहकारी बँक, भूविकास बँकेचे पाच वर्षे संचालक होते. १९८० ते १९८५ या काळात गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून आमदार, तर १९९५ ते १९९९ या काळात अपक्ष आमदार राहिले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा किरण डोणगावकर, राहुल डोणगावकर, आ. मोनिकाताई राजळे, वैशालीताई सावंत असा परिवार आहे. ‘युतीच्या झेंड्याला अपक्षांचा दांडा...’ १९९५ मध्ये शिवसेनेचे ७३ आणि भाजपचे ६५आमदार निवडून आले. युतीला सर्वाधिकजागा मिळाल्या, पण बहुमत नव्हते. त्यावेळी ४५ अपक्ष विजयी झालेहोते. त्यामध्ये गंगापूरमधूनविजयी झालेले अशोक पाटील डोणगावकर यांचासमावेश होता. युतीच्यासरकारला अपक्षांच्यापाठिंब्याची गरज होती. त्यावेळी डोणगावकरयांनी अपक्षांची मोट बांधली आणि युतीचेसरकार प्रथमच सत्तेत आले. अपक्षआमदारांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यातआले. त्यात डोणगावकर राज्यमंत्री झाले.सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा बँकेचेसंचालक आदी पदेही त्यांनी भूषविली. अपक्ष आमदारांची बाजूशिवसेनाप्रमुखांसमोर मांडण्याचे कामडोणगावकर करीत असत. ‘विधानसभेवरयुतीचा झेंडा फडकला,’ असे शिवसेना,भाजपचे नेते भाषणांमध्ये सांगत असत.त्यावेळी डोणगावकर यांनी खास शैलीतअपक्षांच्या पाठिंब्याकडे लक्ष वेधले.‘युतीच्या झेंड्याला अपक्षांचा दांडा आहे,’ हेत्यांचे वक्तव्य त्यावेळी गाजले होते.मराठवाड्याचे प्रश्न ते आग्रहीपणे मांडतअसत. काँग्रेसच्या विभाजनानंतर १९८०मध्येविधानसभा निवडणुकीत त्यांना इंदिरागांधींच्या काँग्रेस (आय) पक्षाकडूनउमेदवारी देण्यात आली. त्यांनी काँग्रेस(एस) पक्षाचे लक्ष्मणराव मनाळ यांचा ७०८५मतांनी पराभव केला. त्यानंतर १९९०च्यानिवडणुकीत त्यांना शिवसेनेकडून पराभवस्वीकारावा लागला. १९९५ मध्ये निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणूनलढविली व शिवसेनेच्या उमेदवाराचा ६,५०७मतांनी पराभव केला होता. त्यावेळी राज्यातकाँग्रेसला सत्ता गमवावी लागली.युतीबरोबरच अपक्ष आमदारही मोठ्यासंख्येने विजयी झाले होते. १९९९च्याविधानसभेत मात्र त्यांना पराभव स्वीकारावालागला होता.
विश्वाला एकतेचा संदेश दिलेल्या साईबाबांच्या शिर्डीत ११७ व्या गुरुपौर्णिमा उत्सवास ९ जुलैपासून सुरुवात होत आहे. तीन दिवस साजऱ्या होत असलेल्या या उत्सवासाठी देशभरातून ५० च्या आसपास पायी पालख्यांद्वारे लाखांवर भाविक शिर्डीत दाखल होतील. साईबाबा संस्थानकडून उत्सव काळात ४ लाखांवर भाविकांसाठी दर्शनाचे नियोजन केले आहे. भाविकांना सुकर दर्शन व्हावे, एकाच वेळा मोठी गर्दी होऊ नये यासाठी उत्सवाच्या मुख्य दिवशी (१० जुलै) मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. शिर्डीतील हॉटेल, लॉजेस, भक्तनिवासात बुकिंगला ऑनलाइन पसंती मिळत आहे. दोन हजार पाचशे भाविकांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था साईसंस्थानकडून करण्यात आली आहे. अमेरिकेतील भाविकांच्या दानातून साई मंदिर व परिसर विविध प्रकारच्या फुलांनी सजवले जात असून, मंदिर परिसर आणि शिर्डी शहर विद्युत रोषणाईने झळाळून निघणार आहे. शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव काळात होणारी गर्दी विचारात घेऊन भाविकांनी आगाऊ निवास व्यवस्थेसाठी साई संस्थानची ९० टक्के भक्तनिवास आरक्षित केले. शिर्डी व परिसरातील हॉटेल, लॉजेसही ८० टक्के ऑनलाइन बुक झाल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी संस्थानकडून साईनगर, भक्तनिवास परिसर, शताब्दी मैदान आदी ठिकाणी २९ हजार ५०० चौरस फूट मंडप टाकून तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा २५०० भाविकांना लाभ होणार आहे. तात्पुरत्या निवासाच्या ठिकाणी भाविकांना मोफत गादी, चादर, अंघोळीची व्यवस्था तसेच मोबाइल टॉयलेटची व्यवस्था केली आहे. भक्त निवासात १७ हजार ७५९ भाविकांची निवासाची सोय करण्यात आली. पालख्यांच्या मुक्कामाच्या स्थळी जनरेटरसह सुरक्षा व्यवस्थापक साई संस्थानकडून पुरवण्यात आली आहे. विमान, रेल्वेचे रिझर्व्हेशन बुक विमानतळ, रेल्वे प्रवासालाही भाविकांनी पसंती दिली असल्याने दिल्ली, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आदी ठिकाणांहून येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांचे बुकिंग पूर्ण झाले. रेल्वे प्रवासासाठी भाविकांची झुंबड उडाली असून हैदराबाद, चेन्नई, मुंबई, बंगळुरू, दिल्ली आदी ठिकाणांहून रेल्वेच रिझर्व्हेशन फुल्ल झाले आहेत. ५९ पालख्यांची नोंदणी ९ जुलैला स्विट, दोन भाज्या, डाळ-भात, चपाती१० जुलै रोजी स्विट, दोन भाज्या, डाळ-भात, चपाती११ जुलै रोजी स्वीट/ बर्फी, दोन भाज्या, डाळ-भात, चपाती असा मेनू असणार आहे. ४ लाख लाडू प्रसाद पाकिटांची निर्मिती, १४ लाडू विक्री केंद्रे उभारलीत. बुंदी प्रसादाची ३.७० लाख पाकिटे तयार शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी उदी व बुंदी प्रसाद पाकिटे ३ लाख ७० हजारांवर तयार करण्यात आली असून ४ लाखांवर लाडू प्रसाद पाकिटे तयार करण्यात आली आहेत. मागील उत्सव काळात १ लाख ९१ हजार भाविकांना साई संस्थानच्या प्रसाद भोजनाचा लाभ घेतला होता. यंदा ३ लाख भाविकांना मोफत भोजन प्रसादाची व्यवस्था साई संस्थानकडून करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी सात हजार कर्मचारी उत्सव काळात भाविकांना सुकर दर्शनासाठी साई संस्थानचे ७ हजार कर्मचारी तैनात असून भाविकांच्या सुरक्षेसाठी साई संस्थानचे एक हजार सुरक्षारक्षक, २०० पोलिस, ३०० स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. भाविकांना दर्शनरांगेतून एक ते दोन तासांत सुकर दर्शनासाठी सुरक्षा व्यवस्थेचे कर्मचारी काम करणार आहेत. भाविकांना दर्शनरांगेत चहा, पाणी व्यवस्था करण्यात आली.
पैशाच्या हव्यासापोटी निर्दयी आई-वडिलांनी स्वतःच्या ४० दिवसांच्या बालिकेची साडेतीन लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली आहे. मीनल ओंकार सपकाळ (३०, रा. बिबवेवाडी, पुणे) ओंकार औदुंबर सपकाळ (२९, रा. बिबवेवाडी, पुणे), साहिल अफजल बागवान (२७, रा. सातारा), रेश्मा शंकर पानसरे (३४, रा. येरवडा, पुणे), सचिन रामा अवताडे (४४, रा. येरवडा, पुणे), दीपाली विकास फटांगरे (३२, रा. संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी बाल न्याय अधिनियमासह विविध कलमांन्वये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनल सपकाळ ही पहिल्या पतीपासून वेगळी राहत आहे. तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. सध्या ती ओंकार सपकाळ याच्यासोबत राहत आहे. २५ जून रोजी मीनल प्रसूत झाली. तिला मुलगी झाली. मीनल प्रसूत झाल्यानंतर मध्यस्थ बागवान, पानसरे, अवताडे यांनी तिच्याशी संपर्क साधला. ४० दिवसांची मुलगी दीपाली फटांगरे हिला देण्यास सांगितले. त्या बदल्यात साडेतीन लाख रुपये देतो, असे आमिष मध्यस्थांनी दीपालीला दाखवले. मध्यस्थांनी दोन लाख रुपये सपकाळ दांपत्याला दिले. आरोपींनी यापूर्वी असा प्रकार केला का? याचाही पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. सध्या मुलीची काळजी ही बालकांची काळजी घेणारी संस्था घेत आहे. दरम्यान,पुण्यात गेल्या काही दिवसांपासून लहान मुले चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचेही सांगण्यात येत आहे. मध्यस्थांना जास्त पैसे दिल्यानंतर प्रकरण बाहेर मध्यस्थांना फटांगरेने जास्त रक्कम दिल्याचा संशय सपकाळ यांना आला. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सपकाळ येरवडा पोलिस ठाण्यात गेले. मुलगी पळवून नेल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मध्यस्थ आणि मुलगी विकत घेणारी दीपाली फटांगरे यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आई-वडिलांनी मध्यस्थांमार्फत बालिकेची फटांगरेला विक्री केल्याचे उघडकीस आले. फटांगरेला कायदेशीर दत्तक विधान प्रक्रिया पार न पाडता साडेतीन लाख रुपयांत सपकाळने विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी सपकाळ यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. सुरुवातीला मुलगी पळवून नेल्याची तक्रार देण्यासाठी सपकाळ आले होते. चौकशीत सपकाळ यांनी तिची मध्यस्थांमार्फत फटांगरेला साडेतीन लाख रुपयांत विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात पोलिस फिर्यादी झाले असल्याचे येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे अन् बळीराजाचे भले व्हावे:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विठ्ठल चरणी साकडे
पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले. आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी कैलास दामु उगले, कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वारीची परंपरा सातत्याने वाढत आहे आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम केलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरीता या ठिकाणी आले. ज्या दिंड्या आहेत त्या सोबत तर वारकरी आलेच परंतु पायी चालत ही मोठ्या प्रमाणात वारकरी आले. विशेषत: या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासन व प्रशासनाने वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. राज्याच्या गतीमध्ये अध्यात्मिक प्रगती महत्त्वाची असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सर्वसामान्य भाविकांचा श्री विठ्ठल दर्शनाचा कालावधी पाच तासाने कमी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आज आषाढी एकादशी, या निमित्ताने अनेक संत महात्म्यांनीही रचलेले अभंग आपण नेहमीच ऐकले किंवा गायले असतील. अभंग, किर्तन, भारूड या माध्यमातून विठ्ठल भक्तीचे अनोखे रूप आपण पाहत आलो आहोत. मात्र महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककला पोवाडा या माध्यमातून विठ्ठलाची भक्ती सांगण्याचा प्रयत्न हा दुर्लभच म्हणावा लागेल. असाच प्रयत्न छत्रपती संभाजीनगर येथील शाहीर अजिंक्य लिंगायत यांनी केला आहे. 'दिव्य मराठी' च्या वाचकांसाठी त्यांनी या पोवाड्याचे सादरीकरण देखील केले. आषाढी एकादशी निमित्ताने शाहीर अजिंक्य लिंगायत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विठ्ठल भक्तीचा महात्म्य सांगणारा हा पोवाडा सादर केला आहे. हा पोवाडा स्वतः अजिंक्य लिंगायत यांनीच रचला असून जगभरातील मराठी शाहिरांसाठी तो खुला देखील केला आहे. शाहिरी कला, परंपरा अजरामर ठेवण्यात देखील शाहीर अजिंक्य लिंगायत प्रयत्न करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शाहिरी परंपरा जपण्याचे, संवर्धनाचे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचे कार्य ते करत आहेत. या पोवाड्याविषयी सांगताना ते म्हणतात की, खरंतर विठ्ठलाचे अभंग गायले जातात, गाथा सांगितली जाते, कीर्तनातून, भारुडांतून विठ्ठल भक्तीचे महात्म्य सांगितले जाते. पण संत काळात तर काही शाहिरांनी खऱ्या अर्थाने श्री विठ्ठलाचे, श्रीरामाचे, श्रीकृष्णाचे पोवाडे भेदक रूपातून गायले आहेत. तसा विठ्ठलाचा पोवाडा म्हणजे जरा दुर्लभच विषय....म्हणून सर्वसामान्यांसाठी विठ्ठल भक्तीचे, वारीचे महात्म्य सांगण्यासाठी हा भक्ती पोवाडा सुचला आणि तो विठ्ठलाच्या कृपेने लिहिला गेला. यामध्ये विठ्ठलाचे खरे असणारे रूप आणि वारकऱ्यांची प्रामाणिक, सविनय, सांप्रदायिक भक्ती आणि शक्तीचा संगम या शाहिरी पोवाड्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विविध विषयांवर पोवाड्याची रचना योगविद्येचा पोवाडा, प्रभू श्रीराम हिंदी पोवाडा, महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा पोवाडा, भारतीय नौसेना दिन पोवाडा, राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांचा पोवाडा, रुबेला लसीकरण पोवाडा, शिवराज्याभिषेक गीत आदी पोवाडे देखील अजिंक्य लिंगायत यांनी रचले आहेत. शाहीर कलेतील तिसरी पिढी शाहीर अजिंक्य लिंगायत यांची कलेतील तिसरी पिढी आहे. यांचे पंजोबा स्व. काशिनाथराव तावरे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसोबत तबलावादनासाठी साथसंगत करत होते. यानंतर यांचे आजोबा शाहीर अंबादास तावरे यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून पद भूषवीत शाहिरीच्या प्रचार – प्रसार आणि प्रशिक्षणार्थ शाहीर महर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंचाची स्थापना करून नवीन कलावंत तयार व्हावा या हेतूने आयुष्यभर कार्य केले. यासोबत शाहीरांच्या वडिलांचे वडील (आजोबा) हे कुष्ठरोगाचे डॉक्टर होते, व उत्तम असा चौघडा वाजवीत होते. आणि यांच्या पुढची पिढी म्हणून शाहीर अजिंक्य लिंगायत हे नवीन लोककलावंत नवा शाहीर तयार झाला पाहिजे, या हेतूने लोककलेच्या संगोपन – संवर्धन आणि प्रशिक्षणाचे कार्य करीत आहेत. प्रचार, प्रसार तसेच संवर्धनाचे कार्य शाहीर अजिंक्य हे लोककला अभ्यासक, लोककला प्रशिक्षक आणि लोककला प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे समन्वयक म्हणून काम करत आहेत. यासोबतच ते छत्रपती संभाजीनगरच्या गरवारे कम्युनिटी सेंटरमधील लोककला अध्यासन केंद्राचे विभागप्रमुख देखील आहेत. शाहीर महर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंचाचे ते महाराष्ट्र राज्याचे सचिव म्हणूनही काम करत आहेत. भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये विविध शालेय शिक्षण संस्था, शासकीय शिक्षण संस्था, विद्यापीठ, स्वायत्त शिक्षण संस्था तसेच आवश्यक त्या ठिकाणी लोककला अध्यासन केंद्रासारखे लोककला प्रशिक्षण केंद्र, लोककला अध्यासन केंद्र, लोककला अभ्यासक्रम सुरू करून शाहिरीचे व लोककलेचे प्रचार – प्रसार – प्रशिक्षण व संगोपन – संवर्धनाचे कार्य हे करीत आहेत. विठ्ठलाचा पोवाडा सादर करण्यासाठी लाभलेली साथ संगत शाहीर अजिंक्य यांनी रचलेला विठ्ठलाचा पूर्ण पोवाडा देखील वाचा.... धन्य धन्य पंढरपुरी। उभा विटेवरी। सावळा हरी।जगाच्या कल्याणासाठी ।भक्तीचा वाहे पूर ओटी।घुमला गजर संत ओठी ॥ जी ॥ सुंदर असे ते ध्यान। शोभे ते छान। मोहिले मन ।तुळशी माळ गळा कासे पितांबर।भक्तीचा हाची विश्वंभर ।झुके ब्रह्मांड चरणावर ॥ जी ॥ प्रेमळ सावळी मूर्ती । संत संगती। शाहीर वर्णिती ।ग्यानबा तुकाराम म्हणती ।टाळ मृदुंग वाजे भोवती ।राम कृष्ण हरी गजर गाती ॥ जी ॥ आषाढाची धन्य ही वारी। पृथ्वीतलावरी। कल्याण करी।तुळशीची गळा घालूनी माळ।फुगड्या दिंडीची वारकरी चाल।हाती घेऊन एकतारी टाळ ॥ जी ॥ विठ्ठलाचा गजर चालला । सोहळा रंगला। ध्वज फडकला।साधू संत वैष्णव मेळा जमला।चंद्रभागेचा तीर सजला।एकादशीच्या पर्व काळाला ॥ जी ॥ भक्त पुंडलिकाच्यासाठी। चंद्रभागेतटी। उभा कर कटी। आशीर्वाद देती।देऊनी भक्तीची ती कास।आत्मस्वरूपी लागली आस ।मुक्तीचा मार्ग खरा हा खास ॥ जी ॥ विठ्ठल विठ्ठल म्हणा। पंढरीचा राणा। राहतो जना।विठ्ठल रखुमाईच्या पायी।शाहीर हा भक्तीगान गाई।गुरूंची कृपा मज डोई।आई वडिलांची पुण्याई।राजयोगी धन्य मी होई ॥ जी ॥ जयजयकार विठू माऊलीचा । साधू संताचा। वारकऱ्यांचा ।भक्ती सळसळते रोमारोमात ।अजिंक्य शाहीर पोवाडा लिहितात ।गाती शाहीर अभिमानात ।मुजरा तुम्हा करतो स्वाभिमानात || जी || एकादशीच्या सोहळ्याला शाहीर गरजला।खरोखर शाहीर गरजला ।राम कृष्ण हरी विठ्ठल जय जय बोला ॥ जी ॥
आजचा भारत हा अनेक वर्षांचा संघर्ष, त्याग व असंख्य व्यक्तींच्या योगदानातून घडला आहे. स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, विचारवंत, उद्योजक व सामान्य नागरिकांनी आपापल्या परीने देशाच्या प्रगतीसाठी घाम गाळला. अनेक पिढ्यांनी एकत्र येऊन हा देश उभा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज आपण एका प्रगत व विविधतेने नटलेला भारत पाहतो. धीरूभाई अंबानी भारताचे असेच एक अप्रतिम उद्योग रत्न होते. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या या माणसाने आपले कष्ट व नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाच्या माध्यमातून भारतीय उद्योग जगताला एक नवे क्षितिज दाखवले. देशाच्या आर्थिक इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. भारताच्या आर्थिक प्रगतीला गती देऊन कोट्यवधी भारतीयांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा दिली. धीरूभाईंचा आज सृतीदिन... चला तर मग आज 'धुरंधर'मध्ये पाहूया भारताच्या उद्योग जगताला एक नवी दिशा देणाऱ्या या असामान्य स्वप्नाळू उद्योगपतीची अनोखी कथा... चोरवाडच्या शिक्षकाच्या घरी जन्म धीरूभाई अंबानी यांचा जन्म 28 डिसेंबर 1933 रोजी गुजरातच्या चोरवाडा या छोटाशा गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हीराचंद अंबानी, तर आईचे नाव जमनाबेन असे होते. हीराचंद शिक्षक होते. जमनाबेन गृहिणी होत्या. धीरूभाई यांना 2 भाऊ (रमणीकलाल व नथुभाई) व 2 बहिणी (त्रिलोचनाबेन व जसुमतीबेन) होत्या. धीरूभाईंचे बालपण गरिबीत गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण चोरवाडच्याच शाळेत झाले. पण त्यांना शिक्षणात फारसा रस नव्हता. त्यांचा कल उद्योग व व्यवसायात होता. त्यामुळे ते बालपणी गावात भरणाऱ्या यात्रेत काहीतरी व्यवसाय करत. धीरूभाई गावच्या धार्मिक व सामाजिक कार्यक्रमात फार सक्रिय राहत. येमेनमध्ये पेट्रोल पंपावर केले काम धीरूभाईंना वयाच्या 16 व्या वर्षी आपले शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले. त्यानंतर भावाच्या मदतीने नोकरीच्या शोधात ते येमेनच्या एडनला गेले. तिथे त्यांनी एका कंपनीच्या पेट्रोल पंपावर काम मिळाले. या काळात त्यांनी तेथील व्यापार, बाजारपेठ व व्यवसायाचे बारकावे शिकून घेतले. त्याचा भविष्यात त्यांना मोठा लाभ झाला. ते कमालीचे जिद्दी व स्वप्नाळू होते. त्यांनी आपल्या कुटुंबाला गरिबीतून वर काढण्याचा संकल्प केला. याच दृढनिश्चयाने त्यांनी रिलायन्सचे बलाढ्य साम्राज्य उभारले. माती विकण्याचा अनोखा किस्सा 1958 साली स्थापन झालेल्या रिलायन्सने भारतात व्यवसाय करण्याचे अनेक नियम व कायदे बदलले. धीरूभाईंच्या आयुष्याशी संबंधित एक अनोखा सांगितला जातो. हा किस्सा म्हणजे त्यांनी साधी माती विकून हवी ती रक्कम कमावली. कदाचित त्यांच्या व्यवसायातील या कौशल्यामुळे रिलायन्सला एवढे यश मिळाले. त्याचे झाले असे की, धीरूभाईंनी भारतात व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काही दिवस येमेनमध्ये काम केले होते. या आखाती देशातील एका शेखला आपल्या बागेत गुलाब लावायचे होते. त्यासाठी त्यांना सुपीक मातीची आवश्यकता होती. धीरूभाई अंबानींना हे कळताच त्यांनी भारतातून आपल्या संपर्कांद्वारे ही माती अरबी शेखपर्यंत पोहोचवली. त्या मोबदल्यात, शेखने त्यांना मागेल की किंमत दिली. या घटनेनंतर काही दिवसांनी धीरूभाईंनी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला आणि स्वतःचा विमल ब्रँड तयार केला. पहिल्या ऑफिसमध्ये 1 टेबल 3 खुर्च्या धीरूभाईंनी बिझनेसच्या जगात पाऊल ठेवले तेव्हा त्यांच्याकडे ना वडिलोपार्जित संपत्ती होती ना बँक बॅलन्स. 1958 साली ते येमेनहून मुंबईत परतले. तिथे त्यांनी व्यापार सुरू केला. त्यांनी त्याचवर्षी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन नावाने आपला पहिला उद्योग सुरू केला. हा एक ट्रेडिंग व्यवसाय होता. तो प्रामुख्याने मसाले व पॉलिस्टर धाग्याच्या आयात - निर्यातीवर केंद्रित होता. मुंबईतील त्यांच्या किरायाच्या कार्यालयात केवळ 1 टेबल व 3 खुर्च्या होत्या. 1977 साली पहिला IPO आणला धीरूभाईंनी 1966 साली त्यांनी रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. 1973 मध्ये रिलायन्स टेक्सटाईलला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) म्हणून संबोधले गेले. रिलायन्सने 1977 साली आपला पहिला IPO आणला. कंपनी मुंबई स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध झाली. यामुळे कंपनीला आर्थिक स्थैर्य लाभले. भारतीय भांडवली बाजारासाठी हे एक नवे व धाडसी पाऊल होते. पण या एका निर्णयाने धीरूभाई अंबानी यांच्या कंपनीला केवळ आर्थिक ताकदच मिळाली नाही, तर त्यांना एक अग्रणी उद्योगपती म्हणूनही प्रस्थापित केले. रिलायन्सने 1980 साली पॉलिस्टर व पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात प्रवेश केला. याच काळात कंपनीने बॅकवर्ड इंटिग्रेशन रणनीती स्वीकारली. या अंतर्गत कच्चा माल ते तयार उत्पादनापर्यंत संपूर्ण प्रक्रिया नियंत्रित केली गेली. याच दशकात धीरूभाईंनी रिलायन्स इंडस्ट्रीजला एक प्रमुख जागतिक कंपनी बनवण्याच्या दिशेने काम केले. कर्मचाऱ्यांवर होता पूर्ण विश्वास धीरूभाई यांचा आपल्या कर्मचाऱ्यांवर फार विश्वास होता. आपले कर्मचारी कोणत्याही कठीण परिस्थितीत आपले स्वप्न पूर्ण करू शकतात, असा त्यांचा व्होरा होता. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबतचे संबंध मालक व कर्मचारी असे पारंपरिक न ठेवता जिव्हाळ्याचे ठेवले. त्यांनी त्यांचे महत्त्व जाणले. यामुळेच रिलायन्सने केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातील आंतरराष्ट्रीय बाजारातही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. मुलांना मोठी स्वप्ने पाहण्याचे धडे धीरूभाईंचे 1955 साली कोकिलाबेन यांच्याशी लग्न झाले. त्यांना मुकेश व अनिल अंबानी ही दोन मुले व नीना कोठारी व दीप्ती साळगावकर ह्या 2 मुली झाल्या. धीरूभाईंनी आपल्या मुलांना मोठी स्वप्ने पाहण्याचे धडे दिले. पण सोबतच त्याची सुरूवात छोट्या पायऱ्यांनी करण्याचा सल्ला दिला. माणसाची स्वप्ने मोठी असावीत. पण त्याची सुरूवात छोट्या पायऱ्यांनी करावी. एकाचवेळी सर्वकाही मिळवण्याची धडपड करण्यापेक्षा लहान - लहान टप्पे पूर्ण करत पुढे जाणे योग्य असते. त्यामुळे आपण आपली उद्दीष्ट साध्य करण्यासाठी छोट्या गोष्टींपासूनच सुरूवात केली पाहिजे, असा त्यांचा विचार होता. मुकेश व अनिल अंबानींना गॅरेजमध्ये कोंडले होते धीरूभाई अंबानी अत्यंत कडक शिस्तीचे होते. मुकेश अंबानी यासंबंधीचा एक किस्सा सांगतात. ते म्हणतात, एकेदिवशी सायंकाळी आमच्याकडे काही पाहुणे येणार होते. मी त्यावेली 10-11 वर्षांचा होतो, तर अनिल 9 वर्षांचा होता. आम्ही दोघेही फार खोड्या करायचो. आई पाहुण्यांसाठी जेवण आणायची, पण ते आम्हीच फस्त करून टाकायचो. आमच्या वडिलांनी मोठ्या संयमाने आम्हाला समजावून सांगितले की, आता बस्स झाले. शांत बसा. पण आमचे स्वतःचे जग होते. आम्ही एका सोफ्यावरून दुसऱ्या सोफ्यावर उड्या मारत होतो. खूप खोड्या सुरू होत्या. दुसऱ्या दिवशी वडिलांनी आम्हाला बोलावले. मुकेश - अनिल, आजपासून दोन दिवस जोपर्यंत तुम्ही शहाण्यासारखे वागणार नाही तोपर्यंत तुम्ही दोघेही गॅरेजमध्ये राहणार आहात. तुम्हाला पश्चाताप होईपर्यंत तुम्हाला बाहेर येता येणार नाही. माझ्या आईने मुले लहान असल्याचे सांगत त्यांना सोडण्याची विनंती केली. पण पप्पा बधले नाही. पुढचे दोन दिवस आम्ही गॅरेजमध्ये राहिलो. आम्हाला केवळ रोटी व पाणी मिळाले. यामु्ळे आम्हाला आमच्या चुकांची जाणीव झाली. या काळात आम्हा दोघा भावांतील प्रेमही वाढले. मग आम्ही केव्हाच खोडसाळपणा केला नाही. मुकेश सांगतात, आमच्या पालन-पोषणासंबंधी बाबांचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा होता. शॉर्टकट ऐवजी कष्ट करण्याची तयारी धीरूभाईंनी आपल्या आयुष्यात केव्हाच शॉर्टकट मार्ग अवलंबला नाही. ते नेहमी मेहनतीला प्राधान्य देत. त्यांनी त्यांच्या मुलांनाही तेच शिकवले. ते म्हणत, कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी अथक परिश्रमाची गरज असते. मेहनत व सातत्य हेच यशाचे खरे रहस्य आहे. आपण आपल्या ध्येयांच्या मागे लागलो व कष्ट केले, तर यश निश्चितच मिळवता येईल. धोके पत्करण्याचा सल्ला धीरूभाईंनी रिलायन्सचा विस्तार करताना अनेक धोके पत्करले. पण त्यांनी केव्हाही हार मानली नाही. त्यांनी आपल्या मुलांना शिकवले की, धोके पत्करल्याशिवाय मोठे यश मिळवता येत नाही. आपण आपल्या आयुष्यात धोके पत्करण्यास शिकले पाहिजे. सुरूवातीला अपयश मिळाले तरी हे अपयशच भविष्यात आपल्याला योग्य ते मार्गदर्शन ठरते. धीरूभाईंनी नात्यांना व विश्वासाला नेहमीच महत्त्व दिले. त्यांचे म्हणणे होते की, व्यवसायात यश मिळवण्यासाठी नाती व विश्वास अत्यंत महत्त्वाचे आहेत. संकटांचा सामना धैर्याने करण्याची शिकवण धीरूभाईंनी संकटांना घाबरून आपला मार्ग सोडला नाही. संकटे व अडचणी या गोष्टी सर्वच यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात येत असतात, पण त्यांचा सामना धैर्याने व शहाणपणाने करणे आवश्यक असते. त्यांनी आपल्या उद्योगपती मुलांनाही संकटात शांत राहून योग्य निर्णय घेण्याचा सल्ला दिला होता. नीता अंबानींनी सांगितलेला एक किस्सा धीरूभाई अंबानींचे व्यक्तिमत्व विषद करणाऱ्या अनेक कथा आहेत. मुकेश यांच्या पत्नी नीता अंबानी त्यांचा एक किस्सा सांगताना म्हणतात, त्यावेळी माझे व मुकेशचे लग्न झाले नव्हते. 1984 च्या ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा संपला होता. मी एका डान्स शोमध्ये परफॉर्म करत होते. प्रेक्षकांमध्ये एक महिला होती. ती माझ्याकडे टक लावून पाहत होती. त्या मुकेशच्या मातोश्री कोकिलाबेन असल्याचे मला माहिती नव्हते. माझ्या मते, त्या घरी गेल्यानंतर माझ्याविषयी धीरूभाईंशी बोलल्या असाव्यात. नीता पुढे सांगतात, त्यानंतर दोन-तीन दिवसांनी मला फोन आला. फोन करणारा म्हणाला - नमस्कार मी धीरूभाई अंबानी... मी नीताशी बोलू शकतो का? मला वाटले की, समोरचा माणूस माझी मस्करी करत आहे. मी फोन ठेवला. त्यानंतर पुन्हा फोन वाजला... फोन करणारा पुन्हा म्हणाला - नमस्कार मी धीरूभाई अंबानी बोलतोय. मी नीताशी बोलू शकतो का? यावेळी मला खूप राग आला. मी अभ्यास करत होते. माझी परीक्षा होती. मी ताडकन म्हणाले - तुम्ही धीरूभाई अंबानी असाल, तर मी एलिझाबेथ टेलर आहे. असे म्हणच मी फोन ठेवला. काही वेळाने पुन्हा फोन पुन्हा वाजला. यावेळी मी माझ्या वडिलांना फोन उचलण्यास सांगितले. त्यांनी फोन उचलला. स्पीकरवर आवाज ऐकताच बाबांचा चेहरा बदलला, कारण तो खरोखर धीरूभाई अंबानी बोलत होते. त्यांनी मला फोन दिला व म्हणाले - नीता.. कृपया बोल, आणि नीट बोल. मी फोन लाईनवर आले आणि म्हणाले- गुड इव्हिनिंग अंकल. अशा प्रकारे अंबानी कुटुंबाशी माझा संपर्क झाला. सरकारशीही दोनहात करण्यास मागेपुढे पाहिले नाही धीरूभाईंनी आपल्या उद्योगाचा विस्तार अत्यंत आक्रमकपणे केला. प्रसंगी त्यांनी सरकारशी दोनहात करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. औद्योगिक महत्त्वकांक्षा राजकीय समर्थनाशिवाय पूर्ण करता येत नाही हे त्यांना ठावूक होते. त्यामुळे त्यांनी इंदिरा गांधी यांच्याशी संपर्क प्रस्थापित केला. पण 31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. धीरूभाईंना वाटले की, आपला संपर्क राजीव यांच्या काळातही अबाधित राहील. पण ते शक्य झाले नाही. राजीव गांधी मंत्रिमंडळात व्ही पी सिंह यांनी अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांची गोची झाली. व्ही पी सिंह यांनी अर्थमंत्री होताच काही कडक पाऊले उचलली. त्यांनी धीरूभाई अंबानी व अमिताभ बच्चन यांच्यासह अनेकांच्या ठिकाणांवर छापेमारी करण्याच्या निर्णय घेतला. यामु्ळे काँग्रेस त्यांच्यावर नाराज झाली. पण त्यांना मंत्रिमंडळातून हटवणे सोपी गोष्ट नव्हती. परिणामी, त्यांना एका मार्गाने मंत्रिमंडळाबाहेर काढून दुसऱ्या मार्गाने पुन्हा संरक्षण मंत्री म्हणून सरकारमध्ये घेण्यात आले. धीरूभाईंना आपल्या कापडाच्या कारखान्यासाठी (पॉलिस्टर धाग्यासाठी) 'पीटीए' अर्थात 'प्यूरिफाईड टॅरेफ्थॅलिक ॲसिड' आयात करावे लागत होते. पण व्ही पी सिंह अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी पीटीएला ओपन जनरल लायसन्स कॅटेगरीतून वगळून परिमिशिबल लिस्टमध्ये टाकले. त्यामुळे पीटीएची आयात करण्यासाठी सरकारची परवानगी बंधनकारक झाली. ही घटना 1985 मधील आहे. धीरूभाईंना सरकारच्या या निर्णयाची कुणकुण लागली. त्यांनी त्यावर उपाय शोधला. त्यांनी काही बँकांशी संपर्क साधून लेटर ऑफ क्रेडिट (एलसी) जारी करून घेतले. त्या आधारावर त्यांनी पुढील वर्षभर कोणत्याही अडथळ्याशिवाय पीटीएची आयात केली. पण त्यांनी हा निर्णय सरकारने निर्णयापूर्वी काही दिवस अगोदरच घेतला होता. त्यामुळे मोठा वाद झाला. ही गोष्ट व्ही पी सिंह यांच्या कानावर पडली. ते जाम भडकले. त्यांनी पीटीएच्या आयातीवर तत्काळ 50 टक्के आयात शुल्क लावले. येथूनच धीरूभाई व व्ही पी सिंह यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडली. यामुळे रिलायन्सला काही अडचणींचा सामना करावा लागला. आईसक्रीमसाठी थेट समुद्रात मारली उडी मुकेश अंबानी अनेकदा त्यांच्या वडिलांचे किस्से सांगतात. त्यांनी लेखक ए. के. गांधी यांना धीरूभाईंनी आईस्क्रीमसाठी थेट समुद्रात उडी मारण्याचा एक रंजक किस्सा सांगितला. हा किस्सा ए के गांधी यांनी आपल्या अ कम्प्लिट बायोग्राफी ऑफ मुकेश अंबानी या पुस्तकात नमूद केला आहे. मुकेश यांच्या मते, एकदा माझे वडील जहाजावरील एका पार्टीला हजर होते. जहाजापासून किनारा 1 किलोमीटर लांब होता. जहाजावरील काही लोक पैज लावत होते. त्यांनी अशी पैज लावली की, जो कुणी जहाजातून थंड पाण्यात उडी मारून किनाऱ्यावर पोहोचेल त्याला आईस्क्रीम मिळेल. हा एक विनोद होता. तो कुणीही गांभीर्याने घेतला नाही. पण माझ्या वडिलांनी ते गांभीर्याने घेतले. त्यांनी विचारले - ही डील आहे का? सर्वांना वाटले की ते फक्त विनोद करत आहेत. पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्यांनी चटकन आपला शर्ट काढला आणि पाण्यात उडी मारली. ते पोहत किनाऱ्यापर्यंत पोहोचले. ते अशा पठडीतील व्यक्ती होते. हृदयविकाराच्या झटक्याने निधन अन् मालमत्तेचा वाद धीरूभाई अंबानी यांना 24 जून 2002 रोजी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते तब्बल 11 दिवस कोमामध्ये होते. अखेर 6 जुलै 2002 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग जगतातील एका युगाचा अंत झाला. त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा फोर्ब्स इंडियाने त्यांना जगातील 138 वे श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान दिले होते. त्यावेळी त्यांची संपत्ती तब्बल 2.9 अब्ज डॉलर्सच्या आसपास होती. धीरूभाईंच्या निधनानंतर रिलायन्स समूहाचे विभाजन झाले. यासंबंधी झालेल्या वादांनी भारतीय उद्योगजगतात दीर्घकाळ चर्चा घडवली. कोकिलाबेन अंबानी यांच्या मध्यस्थीमुळे मुकेश व अनिल अंबानी यांच्यात व्यवसायाचे समान वाटप झाले. पण या दोन भावांमधील वैयक्तिक व व्यावसायिक दुरावा कायम राहिला. मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला एका नव्या उंचीवर नेले, तर अनिल अंबानी यांच्या व्यवसायांना आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला. हा वाद केवळ कौटुंबिक नव्हता, तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि रिलायन्सच्या प्रतिमेवरही खोल परिणाम झाला. आता धीरूभाई अंबानी यांचे काही किस्से 1. येमेनमधील नाण्याची कहाणीधीरूभाई अंबानी यांनी आपल्या करिअरची सुरुवात येमेनमधील एका कंपनीत कनिष्ठ कर्मचारी म्हणून केली. त्यावेळी येमेनमध्ये चांदीच्या नाण्यांना (रियाल) खूप मागणी होती. धीरूभाईंनी या संधीचा फायदा घेतला. येमेनमध्ये चांदीच्या नाण्यांचे मूल्य त्यातील चांदीच्या किमतीपेक्षा जास्त आहे हे त्यांनी हेरले. त्यानंतर त्यांनी ही नाणी वितळवून चांदी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. या छोट्या पण हुशारीच्या निर्णयाने त्यांना पहिली मोठी कमाई मिळवून दिली. यातून त्यांच्या प्रचंड व्यावसायिक बुद्धिमत्तेचे दर्शन घडते. 2. 'विमल' ब्रँडची निर्मिती1960 च्या दशकात धीरूभाईंनी विमल नावाचा कापड ब्रँड सुरू केला. धीरूभाई यांच्या सासूचे नाव विमलाबेन असे होते. त्यांनी या ब्रँडला त्यांचे नाव दिले. त्यांनी गुजरातमधील नरोडा येथे छोटा कारखाना उभारला. त्यावेळी बाजारात विदेशी व महागड्या कापडांचे वर्चस्व होते, पण धीरूभाईंनी दर्जेदार व परवडणारी कापड उत्पादने सादर केली. त्यांनी डीलर्सना थेट फायदा देण्याची रणनीती अवलंबली. यामुळे विमल ब्रँड घरोघरी पोहोचला. एका साध्या ट्रेडरपासून ते कापड उद्योगातील दिग्गज बनण्याचा हा प्रवास धीरूभाईंच्या नाविन्याचा पुरावा आहे. 3. शेअर बाजारातील क्रांती रिलायन्सने 1977 मध्ये पहिल्यांदा IPO आणला. धीरूभाईंनी सामान्य गुंतवणूकदारांना कंपनीत सहभागी करून घेतले. त्यांना शेअर बाजाराची ताकद समजावून सांगितली. त्यांनी गुजरातमधील छोट्या गावांमध्ये जाऊन लोकांना रिलायन्सचे शेअर्स खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे सामान्य माणसाला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची संधी मिळाली. रिलायन्सच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळवून दिला. यामुळे धीरूभाईंची लोकप्रियता प्रचंड वाढली. 4. पोलादी हात, पण हळवे हृदयधीरूभाई कठोर व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी ओळखले जात होते, पण त्यांचे हृदय तेवढेच हळवे होते. एकदा एका कर्मचाऱ्याने कंपनीत आर्थिक गैरव्यवहार केल्याचे त्यांना समजले. हा कर्मचारी धीरूभाईंना भेटला, तेव्हा त्यांनी त्याला दंड न करता दुसरी संधी दिली. त्याला प्रामाणिकपणे काम करण्याचा सल्ला दिला. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी आदर व निष्ठा निर्माण झाली. 5. जामनगर रिफायनरीचे स्वप्न धीरूभाईंनी 1990 च्या दशकात गुजरातच्या जामनगर येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी उभारण्याचे स्वप्न पाहिले. अनेकांनी याला अशक्य मानले, कारण हा प्रकल्प प्रचंड खर्चिक व जोखमीचा होता. पण धीरूभाईंचा दृष्टिकोन व कठोर परिश्रमामुळे 1999 मध्ये ही रिफायनरी कार्यान्वित झाली. आज ती रिलायन्सच्या यशाचा कणा आहे. ही रिफायनरी धीरूभाईंच्या महत्त्वाकांक्षेचे प्रतीक मानली जाते. 6. ग्रोथ इज लाइफचा मंत्रधीरूभाईंना एकदा एका पत्रकाराने विचारले, तुम्ही एवढ्या वेगाने विस्तार का करता? त्यावर धीरूभाई म्हणाले, तुम्ही वाढ होत नसेल, तर तुम्ही मरत आहात. हा मंत्र आजही रिलायन्सच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या व व्यवसाय रणनीतीच्या केंद्रस्थानी आहे. 7. राजकीय व सामाजिक प्रभावधीरूभाईंचा व्यवसायाबरोबरच राजकीय व सामाजिक क्षेत्रातही प्रभाव होता. असे म्हटले जाते की, धीरूभाईंचे अनेक राजकीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. यामुळे त्यांना सरकारी धोरणांचा फायदा मिळाला. तथापि, त्यांनी नेहमीच आपल्या व्यवसायाला प्राधान्य दिले आणि सामान्य माणसाला सक्षम बनवण्यावर भर दिला. धुरंधर मालिकेतील खालील स्टोरीज वाचा... धुरंधर-31; राजर्षी शाहू महाराज:अस्पृश्याला मानाचे पान अन् नांगरासाठी तोफा वितळवून लोखंड देणारे शाहू महाराज ग्रेट का होते? धुरंधर-30; चे गेव्हारा:अन्यायाविरोधात लढण्याची जिद्द जागवून अवघ्या जगातील क्रांतीचा चेहरा बनलेला तुमच्या 'T शर्ट'वरील क्रांतिदूत धुरंधर-29; संत कबीर:पैशांच्या मागे पळणाऱ्यांचा देव कसा? असा परखड सवाल करत समस्त मानवतेला साधेपणाचा संदेश देणारा महानायक धुरंधर-28; राणी चेन्नम्मा:स्वकियांची फंदफितुरी जमिनीत गाडून 1857 च्या सशस्त्र उठावापूर्वी इंग्रजांना धूळ चारणारी 'कर्नाटकची लक्ष्मीबाई' धुरंधर-27; अहिल्याबाई होळकर:न्यायबुद्धीने स्वतःच्या नवऱ्याला धारेवर धरत चोराच्याही पोटाचा प्रश्न सोडवणाऱ्या दूरदृष्टीच्या शासक धुरंधर-26; डॉ. जयंत नारळीकर:ब्रह्मास्त्र होते तर रामाच्या राज्यात वीज होती का? असा झोंबणारा प्रश्न करणारा भारताचा मराठमोळा शास्त्रज्ञ धुरंधर-25; मुथुलक्ष्मी रेड्डी:महिला हक्क अन् आईचे 'देवदासी'पण पाहून त्याविरोधात लढा पुकारणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला आमदार धुरंधर-24; कुलदीपसिंग चांदपुरी:पाकच्या 2000 हून अधिक सैनिकांना 120 जवानांच्या बळावर धूळ चारणारा लढवय्या; '1971' ची अमर गाथा धुरंधर-23; चंद्रप्रभा सैकियानी:पडदा प्रथेवर लाथ घालून महिलांना आभाळ खुले करणारी आसामची हिरकणी; कुमारी माता झाली तरी डगमगली नाही धुरंधर-22; कर्मवीर भाऊराव पायगौंडा पाटील:महाराष्ट्राच्या मातीत शिक्षणाचा सूर्य पेरून उपेक्षितांच्या झोपडीत ज्ञानाचे पीक काढणारा खरा 'धुरंधर' धुरंधर-21; प्रबोधनकार ठाकरे:मराठी समाज मनात मोक्याच्या ठिकाणी पक्क्या गाठी मारून जातिभेदांच्या जखमांचा खोलवर शोध घेणारा बहुजन हिंदुत्त्ववादी धुरंधर-20; भीमराव रामजी आंबेडकर:चवदार तळ्याला ताळ्यावर आणणारा दलितोद्धारक अन् सामाजिक समरसतेचा खरा विवेकी शिल्पकार धुरंधर-19; जिगर मुरादाबादी:'शराब पीने दे मस्जिद में बैठ कर, या वो जगह बता जहाँ खुदा नहीं,' असे म्हणत मौलवींकडून टाळ्या पिटवून घेणारा सूफी शायर धुरंधर-18; आनंदीबाई जोशी:'पृथ्वीच्या पाठीवर हिंदुस्तान इतका दुसरा रानटी देश नाही', असे ठणकावून सांगणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर धुरंधर-17; भगतसिंग:'बॉम्ब अन् पिस्तुले क्रांती आणत नाहीत, क्रांती लोकांच्या मनात जन्मते', असे ठामपणे सांगणारा 'शहीद ए आझम' धुरंधर-16; शहाजीराजे भोसले:छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रेरणास्थान अन् बृहन्महाराष्ट्राची स्थापना करणारा धोरणी राजा धुरंधर-15; ई. व्ही. रामासामी:देव आहे हे सिद्ध करण्याचे आव्हान देत तर्कशुद्ध अन् निर्भय मतांद्वारे समाजात क्रांती घडवणारा भारताचा 'पेरियार' धुरंधर-14; कार्नेलिया सोराबजी:रूढी परंपरांना आव्हान देत शिक्षण, समानता अन् मानवी हक्कांसाठी अथक झगडणारी भारताची पहिली महिला बॅरिस्टर धुरंधर-13; खासेराव जाधव:बहुजन समाजाच्या खांद्यावरील निरक्षरतेचे 'जू' काढून त्यांना उच्च शिक्षणाच्या गंगेचे पाणी पाजणारा अवलिया धुरंधर-12; तंट्या भिल्ल:आदिवासींमध्ये राष्ट्रीयत्व जागवणारा 'रॉबिनहूड', थोर स्वातंत्र्यसैनिक; वाचा स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचे सोनेरी पान धुरंधर-11; विठ्ठल सखाराम पागे:उकिरड्याला खरकटे माहिती नसल्याच्या काळात 'भूकबळी'वर नामी उपाय शोधणारा राजकारणी धुरंधर-10; मोहन हिराबाई हिरालाल:विनोबा भावेंचे 'सर्वायतन' नक्षलग्रस्त गडचिरोलीत रुजवणारा अन् गरिबांना लक्ष्मीदर्शन घडवणारा अवलिया धुरंधर-9; फातिमा शेख:सावित्रीमाईंची मैत्रीण अन् भारताची पहिली मुस्लिम शिक्षिका; फातिमा एक काल्पनिक पात्र होत्या का? तुम्हीच ठरवा धुरंधर-8; एकनाथ दगडू आवाड:बापाचा बुचडा कापून 'पोतराज' प्रथेवर घाव घालणारा पोरगा; कथित गुन्हेगारीने बदनाम झालेल्या बीडचा थोर माणूस धुरंधर-7; स्वामी विवेकानंद:मानवतेचा उत्कृष्ट प्रेमी, महान निधर्मी तत्ववेत्ता; नरेंद्रनाथ दत्त यांचे अखेरचे काही तास कसे होते? धुरंधर-6; कंदुकुरी वीरेशलिंगम पंथुलु:अंधश्रद्धेवर लाथ घालून विधवा पुनर्विवाह अन् ज्ञानाची वात पेटवणारा आंध्रचा 'लेखणी'सम्राट धुरंधर-5; भाऊराव कृष्णराव गायकवाड ऊर्फ दादासाहेब गायकवाड:दोन वेळा वाचवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राण धुरंधर-4; डॉ. विश्राम रामजी घोले:महिला उत्थानासाठी पेटून उठलेला सुधारक, ज्यांची 'बाहुली' ठरली स्त्री शिक्षणाची पहिली बळी धुरंधर-3; पार्वतीबाई आठवले:वैधव्य अन् परावलंबन दैवी भोग मानणारी, पण पोटच्या गोळ्याच्या काळजीने असामान्य झालेली एक निरक्षर स्त्री धुरंधर-2; बसव प्रेमानंद:अंधश्रद्धेच्या खाटेवर आजारी पडलेल्या समाजाला विज्ञानाचे औषध देऊन चमत्कारांची पुरती हवा काढणारा थोर दार्शनिक धुरंधर-1; नरहर अंबादास कुरुंदकर:विचारांची श्रीमंती वाढवणारा अन् आजच्या किर्र वैचारिक काळोखात प्रकाशवाट दाखवणारा थोर विचारवंत
आषाढीनिमित्त पंढरपुरात १३ लाख भाविक दाखल
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची महापूजा पंढरपूर / अपराजित सर्वगोड भूवैकुंठ पंढरीनगरीत साजरा होणा-या विठुरायाच्या आषाढी एकादशी सोहळ््यासाठी संतांच्या पालखी सोहळ््यासोबत १३ लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. भाविक पांडुरंगाची मूर्ती पाहून हेच माझ्या जीवनातील सर्वोच्च सुख आहे, अशा भावना व्यक्त करत आहेत. दिंड्या आणि भगव्या पताकांनी पंढरीनगरी गजबजून आणि विठूनामाच्या गजराने दुमदुमून गेली आहे. […] The post आषाढीनिमित्त पंढरपुरात १३ लाख भाविक दाखल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या चरणी सोन्याचा पोषाख अर्पण
पंढरपूर /प्रतिनिधी श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या चरणी नाव न सांगण्याच्या अटीवर दानशूर भाविकाकडून सोन्याचा पोषाख व चांदीने मढविलेले सागवानी लाकडाचे पाट अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. श्री विठ्ठलासाठी तांबड्या रंगाची वेलवेट अंगी, अंगीच्या गळ््याला ३ पदरी मोत्याची माळ, गळपट्टीला सोन्याची चैन, खांद्याला दोन बाजूबंद, बंधाला मोत्याचे लटकन व सोने, दोन्ही […] The post श्री विठ्ठल-रूक्मिणीमातेच्या चरणी सोन्याचा पोषाख अर्पण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक!
पाच वर्षांचे नियोजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन पंढरीत ‘कृषी पंढरी’ प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पंढरपूर /प्रतिनिधी शेती फायद्याची व्हावी, कमी उत्पादन खर्चात उत्पादन वाढ यावर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी येत्या ५ वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित ‘कृषी […] The post कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज-उद्धव ठाकरे एकत्र, एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी : उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी ठाकरेंचा पुढाकार मुंबई : प्रतिनिधी हिंदीसक्तीबाबत सरकारला माघार घ्यायला भाग पाडल्यानंतर आज झालेल्या विजय मेळाव्याच्या निमित्ताने मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १९ वर्षांनंतर एका व्यासपीठावर आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असे […] The post मराठीसाठी ऐक्याची वज्रमूठ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नेत्यांचा कंठ दाटला, डोळे पाणावले
परब, नांदगावकर, पेडणेकरांना बाळासाहेब आठवले मुंबई : प्रतिनिधी राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी आणि शिवसेना-मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत भावूक आणि अभिमान वाटावा, असा आजचा क्षण होता. मुंबईतील वरळी डोम येथे मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंचा विजयी जल्लोष सोहळा ग्रँड झाला. यावेळी अनेकांना दिवंगत बाळासाहेबांची आठवण झाली तर मनसेच्या स्थापनेअगोदर शिवसैनिक असलेल्या मनसेच्या नेत्यांनीदेखील आजच्या क्षणावर […] The post नेत्यांचा कंठ दाटला, डोळे पाणावले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदीला अमेरिकेत अटक
ईडी, सीबीआयची मोठी कारवाई वॉशिंग्टन : वृत्तसंस्था पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात फरार असलेल्या नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदीला अमेरिकेत अटक करण्यात आली. अमेरिकेच्या अधिका-यांनी ही माहिती भारत सरकारला दिली. नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदी याला ४ जुलै रोजी अमेरिकेत अटक करण्यात आली. ही अटकेची कारवाई भारतातील दोन मोठ्या यंत्रणा ईडी आणि सीबीआयने केलेल्या एक्स्ट्राडिशन […] The post नीरव मोदीचा भाऊ नेहाल मोदीला अमेरिकेत अटक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सहकारमंत्र्यांनी हाडोळतीच्या शेतक-याचे कर्ज फेडले
अहमदपूर : प्रतिनिधी अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांच्या शेतात स्वत: नांगर ओढतानाचे छायाचित्र व्हायरल झाले होते. यानंतर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तातडीने या शेतक-याशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. तसेच त्यांचे पीककर्ज फेडण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार सहकार मंत्र्यांनी आज हाडोळती येथे पवार यांची भेट घेऊन त्यांच्यावर असलेले […] The post सहकारमंत्र्यांनी हाडोळतीच्या शेतक-याचे कर्ज फेडले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कंटेनर-दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू
निटूर : प्रतिनिधी निटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन मुलास घेऊन गावाकडे जात असताना शेतमालकांच्या दुचाकीस कंटनेरने पाठीमागून जोराची धडक दिल्याची घटना निटूरजवळील पेट्रोलपंपाजवळ येथे घडली. या आपघातामध्ये ९ वर्षीय मुलाचा आणि शेतमालक सुधाकर कवठकर यांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील बाकली येथील किरण सुभाष कांबळे (वय ३७) हे सुधाकर कवठकर (वय […] The post कंटेनर-दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आषाढी एकादशीचा फराळ १० टक्क्यांनी महागला
लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीला आबालवुद्धापासून लहानांपर्यंत सर्वजण उपवास करतात. त्यासाठी लागणारे साबुदाणा, भगर यांची मागणी वाढली असून रताळे, केळी आदी फळाची बाजारात मोठी प्रमाणात आवक झाली आहे. वर्षातून एकदा येणा-या या मोठया उपवासानिमित्त शहरातील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्नाटक राज्यातून गेल्या तीन ते चार दिवसापासून रताळयांची आवक होत आहे. या रताळ्याला शनिवारी […] The post आषाढी एकादशीचा फराळ १० टक्क्यांनी महागला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी
लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार ग्रुपच्या वतीने वारक-यांना मोफत बस सेवा व अल्पउपहार सेवा केली जाते. याही वर्षी दि. ५ जुलै रोजी सकाळी लातूर, छत्रपती संभाजीनगर, उदगीर, अंबाजोगाई, अहमदपूर येथून ३७ एस. टी. बसेसच्या माध्यातून १५०० ते १८०० वारक-यांना पंढरपुर वारीसाठी विनामुल्य मार्गस्थ करण्यात आले. यावेळी द्वारकादास शामकुमारचे संचालक तुकाराम […] The post द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर शहरात वारकरी भवन निर्माण करू
लातूर : प्रतिनिधी लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत, लातूरच्या जनतेने मलाही मुंबईला पाठवले, विठ्ठलाचा वारकरी ओठात ते पोटात असाच असतो, असे सांगून वारकरी परंपरा कायम राहावी यासाठी कायम सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, तसेच वारक-यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि लातूर येथे वारकरी भवन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख […] The post लातूर शहरात वारकरी भवन निर्माण करू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नेहमी कचरा पडणा-या ठिकाणांचे सुशोभीकरण
लातूर : प्रतिनिधी शहरातील प्रभाग क्रमांक १३, झोन ‘ए’ मधील संविधान चौक येथे नेहमी कचरा पडलेला असायचा. त्या ठिकाणाचे सुशोभीकरण करून तेथे लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने वाचन कट्टा सुरू करण्यात आला आहे. आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांनी स्वच्छता निरीक्षकांची बैठक घेऊन शहर स्वच्छतेबाबत निर्देश दिले होते. त्यांच्या संकल्पनेतून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.त्यानुसार उपायुक्त […] The post नेहमी कचरा पडणा-या ठिकाणांचे सुशोभीकरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
त्रिभाषा सूत्राविरोधात जनतेच्या दबावामुळे राज्य सरकारला माघार घ्यावी लागली. ठाकरे बंधूंच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले. सरकारने घेतलेल्या माघारीनंतर मुंबईत शनिवारी विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोघेही उपस्थित होते. या ऐतिहासिक मेळाव्याचे आता तामिळनाडूमधूनही स्वागत होत असून, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सोशल मीडियावर तमिळ भाषेत ट्विट करून ठाकरे बंधूंचे भरभरून कौतुक करत भाजप सरकारवर कडाडून टीका केली आहे. एम. के. स्टॅलिन यांचे ट्वीट काय? ‘हिंदी लादण्याचा विरोध करण्यासाठी द्रविड मुन्नेत्र कळघम आणि तमिळनाडूच्या लोकांनी पिढ्यानपिढ्या चालवलेला भाषा हक्कांचा संघर्ष आता राज्यांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रात निषेधाच्या वादळासारखा जोर धरू लागला आहे. तामिळनाडूच्या शाळांमध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून शिकवले तरच निधी दिला जाईल असे सांगून बेकायदेशीर आणि अराजकतेने वागणाऱ्या भाजपला लोकांच्या बंडाच्या भीतीने महाराष्ट्रात दुसऱ्यांदा माघार घ्यावी लागली आहे. हिंदी लादण्याच्या विरोधात बंधू #उद्धव_ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत झालेल्या विजयी रॅलीतील उत्साह आणि प्रभावी वक्तृत्व आपल्याला प्रचंड उत्साहाने भरून टाकते. मला चांगलेच माहिती आहे की, पूर्णवेळ हिंदी आणि संस्कृतच्या प्रचाराला प्राधान्य देणाऱ्या केंद्र सरकारकडे श्री. #राजठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे नाहीत: “उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवली जाते?” आणि “हिंदी भाषिक राज्ये मागे आहेत – तुम्ही प्रगतीशील बिगर-हिंदी भाषिक राज्यांच्या लोकांवर हिंदी का लादत आहात?” केंद्र सरकार एकात्मिक शिक्षण योजनेअंतर्गत (समाग्र शिक्षा अभियान) २,१५२ कोटी रुपयांचा निधी देण्याचा आपला सूड घेण्याचा दृष्टिकोन बदलेल का, जर तामिळनाडूने तीन भाषांच्या धोरणाच्या नावाखाली हिंदी आणि संस्कृत लादणारे नवीन शिक्षण धोरण स्वीकारले तरच? तामिळनाडूच्या शालेय मुलांच्या शिक्षणासाठी कायदेशीररित्या देणे असलेला निधी ते ताबडतोब सोडेल का? हिंदी वर्चस्वाविरुद्ध तामिळनाडूच्या लोकांनी चालवलेला संघर्ष केवळ भावनिकच नाही तर बौद्धिक देखील आहे! ते तार्किक आहे! ते भारताच्या बहुलवादी संस्कृतीच्या रक्षणासाठी आहे! ते द्वेषाने प्रेरित नाही! हिंदी लादल्यामुळे नष्ट होणाऱ्या असंख्य भारतीय भाषांच्या इतिहासाची माहिती नसलेले आणि भारताला हिंदी राष्ट्रात बदलण्याचा अजेंडा समजून घेण्यात अयशस्वी झालेले काही भोळे लोक “हिंदी शिकल्याने तुम्हाला नोकऱ्या मिळतील” असे वाक्ये बोलतात. त्यांनी आता सुधारणा करावी. महाराष्ट्रातील उठाव त्यांचे शहाणपणाचे डोळे उघडेल! तमिळसाठी निधी वाटपात होणारा भेदभाव किंवा कीझाडी संस्कृतीला मान्यता देण्यास नकार देण्याचा अहंकार आम्ही चालू ठेवू देणार नाही. भाजपने तमिळ आणि तमिळनाडूशी केलेल्या विश्वासघाताचे प्रायश्चित्त केले पाहिजे. जर नाही तर, तामिळनाडू पुन्हा एकदा भाजप आणि त्यांच्या नवीन मित्रपक्षांना असा धडा शिकवेल जो ते कधीही विसरणार नाहीत! चला, आपण एकत्र येऊया! तामिळनाडू लढेल! तामिळनाडू जिंकेल!’ हे ही वाचा... कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा:राज ठाकरे म्हणाले - मुंबई वेगळी करता येते का, यासाठीच भाषेला डिवचले; आमची रस्त्यावर सत्ता म्हणत सरकारला इशारा सन्माननीय उद्धव ठाकरे म्हणत राज ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरवात केली. दोघांची भाषणे संपले की एकत्र आरोळ्या ठोकल्या. आज मोर्चा निघायला पाहिजे होता, मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो, याचे एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभे राहिले असते. नुसत्या मोर्चाच्या चर्चेने माघार घ्यावी लागली असे म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा...
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका व्यक्तीला प्राण्यांची तस्करी करताना पकडण्यात आले आहे. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी आरोपीच्या बॅगेतून रॅकून, काळ्या रंगाची कोल्हा आणि इगुआनासह 45 जंगली प्राणी जप्त केले आहेत. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी एका प्रवाशाकडून 'रॅकून', काळ्या रंगाची कोल्हा आणि 'इगुआना' सह 45 जंगली प्राणी जप्त करण्यात आले. थाई एअरवेजच्या विमानाने पहाटे येथे पोहोचल्यावर या प्रवाशाला पकडण्यात आले. तपासादरम्यान सापडले प्राणी सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीच्या बॅगेची तपासणी केली असता, त्यांना धक्काच बसला. त्यांना त्या व्यक्तीच्या बॅगेत 45 प्राणी आढळले. यामध्ये 'रॅकून', 'हायरेक्स (जो सशासारखा दिसतो)', काळ्या रंगाची कोल्हा आणि 'इगुआना' इत्यादींचा समावेश होता. या प्राण्यांची ज्या पद्धतीने तस्करी केली जात होती, त्यामुळे अनेकांचा गुदमरून मृत्यू झाला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'रेस्कुइंक असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर' च्या तज्ञांनी प्राण्यांची काळजी घेण्यात आणि त्यांना स्थिर करण्यात मदत केली. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवले जाईल. एकाला 47 विषारी साप आणि कासवांसह झाली होती अटक गेल्या महिन्यात कस्टमच्या तपासणीत एका भारतीय प्रवाशाकडून अधिकाऱ्यांनी 47 विषारी साप आणि पाच कासवे जप्त केली होती. प्रवाशाजवळ साप सापडल्याने सुरक्षा कर्मचारीही घाबरले होते. ज्या प्रवाशाकडून विषारी साप सापडले होते तो थायलंडला गेला होता. त्याने भारतात येण्यासाठी बँकॉकमधून विमान पकडले होते. त्या प्रवाशाला अटक करण्यात आली होती. ट्रॉली बॅगमध्ये 40 प्राण्यांसह प्रवाशाला अटक आणखी एका प्रकरणात, बँकॉकमधून एक व्यक्ती अशाच प्रकारे अनेक प्राणी घेऊन विमानतळावर पोहोचला होता. त्याने आपल्या ट्रॉली बॅगेत सुमारे 40 प्राणी लपवले होते. कस्टम अधिकाऱ्यांनी तपासणी केली, तेव्हा त्यांना धक्का बसला. प्रवाशाच्या बॅगेतील अनेक प्राणी मृत अवस्थेत होते. यामध्ये इगुआना (गोधा), ब्राचिपेल्मा टॅरेंटुला, ल्यूसिस्टिक शुगर ग्लायडर, हनी बिअर, चेरी हेड टर्टल, टेल सनबर्ड यांसारख्या प्राण्यांचा समावेश होता. हे ही वाचा... पती प्लॅटफॉर्मवर राहिल्याने महिलेची धावत्या रेल्वेतून उडी:पोलिसाच्या सतर्कतेमुळे जीव वाचला, कर्जत रेल्वे स्थानकावरील घटना मुंबई लोकल रेल्वे ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असली तरी, प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अपघातांची मालिका काही थांबताना दिसत नाही. आज पुन्हा एकदा कर्जत आणि मुंब्रा रेल्वे स्थानकावर प्रवासी रेल्वेतून खाली पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे लोकलच्या प्रवासातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पूर्ण बातमी वाचा...
मुंबई लोकल रेल्वे ही लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असली तरी, प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अपघातांची मालिका काही थांबताना दिसत नाही. आज पुन्हा एकदा कर्जत आणि मुंब्रा रेल्वे स्थानकावर प्रवासी रेल्वेतून खाली पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळे लोकलच्या प्रवासातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कर्जत स्थानकावर महिलेची धावत्या लोकलमधून उडी रायगड जिल्ह्यातील कर्जत रेल्वे स्थानकावर आज दुपारी 3.15 च्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला. सुनैना अखिलेश यादव (वय 25) ही महिला आणि त्यांचे पती अखिलेश यादव (वय 34) हे खोपोलीतील शास्त्रीनगर येथील रहिवासी असून ते कर्जत–खोपोली लोकल पकडण्यासाठी स्टेशनवर आले होते. सुनैना लोकलच्या डब्यात चढल्या, मात्र त्यांचे पती काही कारणास्तव प्लॅटफॉर्मवरच राहिले. पतीला प्लॅटफॉर्मवर पाहून गोंधळलेल्या सुनैनांनी थेट धावत्या लोकलमधून बाहेर उडी मारली. सुदैवाने, तेथे उपस्थित असलेल्या सतर्क रेल्वे पोलिसाने त्यांना पकडल्याने त्यांचा जीव वाचला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून, तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंब्रा स्थानकाजवळ पुन्हा अपघात; इसम जखमी दरम्यान, मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळच्या कुप्रसिद्ध वळणावर आज संध्याकाळी सव्वाचारच्या सुमारास आणखी एक अपघात झाला. कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल मार्गावर एका अंदाजे 40 ते 45 वर्षीय अज्ञात पुरुषाचा अपघात झाला असून तो गंभीर जखमी झाला आहे. प्रथम कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात मोठा अपघात घडला होता, आणि आज पुन्हा त्याच ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर या घटनांमुळे रेल्वे प्रशासनासमोर प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दररोज लाखो प्रवासी वापरत असलेल्या लोकलमध्ये गर्दी, उतरण्याची घाई, प्लॅटफॉर्मवर चढउतार करताना निष्काळजीपणा यामुळे अशा घटना घडत आहेत. विशेषतः मुंब्रा स्थानकाजवळील वळण हे अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने सुरक्षिततेसंबंधी उपाययोजना राबवण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला एकात्मिक सनियंत्रण कक्ष, हरित वारीच्या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या 'हरित वारी' ॲपचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, समाधान आवताडे, डॉ. बाबासाहेब देशमुख, अभिजित पाटील, सचिन कल्याणशेट्टी, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते. आषाढी वारी मार्ग, नदी पात्र, वाळवंट, वाखरी पालखी तळ, ६५ एकर परिसर, पत्रा शेड, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर या ठिकाणी ड्रोन कॅमेरे तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अहोरात्र गर्दीचे संनियंत्रण केले जात आहे. कोठे काही घटना घडल्यास तत्काळ नियंत्रण कक्षातील स्क्रीनवर दिसत असल्याने त्या ठिकाणी गतीने पोहोचून स्थिती नियंत्रणात आणता येत आहे असे, पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. या एकात्मिक सनियंत्रण कक्षाद्वारे प्राप्त चित्रीकरणाच्या विश्लेषणातून आषाढी वारीसाठी कालपर्यंत पंढरपूर शहरात सुमारे १४ लाख वारकरी दाखल झाल्याचा अंदाज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. 'हरित वारी' ॲपचे उद्घाटन सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत 'हरित वारी' हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याच्या संनियंत्रणासाठी तयार करण्यात आलेल्या 'हरित वारी' ॲपचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. 'हरित वारी' उपक्रमांतर्गत सुमारे दीड लाखावर वृक्षांची लागवड सोलापूर ग्रामीण हद्दीत विविध ठिकाणी करण्यात येणार आहे. प्रत्येक झाडाला स्वतंत्र क्यूआर कोड दिला जाणार आहे. ह्या क्यूआरच्या माध्यमातून प्रत्येक झाडाची जात, त्या झाडाचे जिओ लोकेशन आणि त्याच्या सद्यस्थितीबाबत माहिती उपलब्ध असणार आहे. ॲपचा वापर करण्याचे प्रशिक्षण ठाणे अंमलदारांना देण्यात आले आहे. हे ॲप ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असल्याने वृक्षारोपण मोहिमेतील विश्वासार्हता, पारदर्शकता आणि डिजिटल ट्रॅकिंग शक्य होणार आहे, असे यावेळी श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. देवस्थान समितीला इलेक्ट्रिक वाहन प्रदान यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्यावतीने विठ्ठल रुख्मिणी देवस्थान समितीला भक्तांच्या सेवेसाठी इलेक्ट्रिक वाहन प्रदान करण्यात आले. यावेळी बँकेचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कार, मुख्य सरव्यवस्थापक डॉ. अशोक माने, देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवनाचे स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, अभिजित पाटील, गोपीचंद पडळकर, सचिन कलशेट्टी, डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.
मराठी अस्मिता आणि मातृभाषेच्या सन्मानासाठी लढणाऱ्या ठाकरे बंधूंच्या भूमिकेला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, अशी भूमिका काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी घेतली. मराठी विरोधकांच्या विरोधात एकत्र उभे राहण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. तसेच शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. भाजपच्या महाराष्ट्रद्रोही आणि मराठीद्वेषी भूमिकेविरोधात ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेचे काँग्रेस पक्ष स्वागत करतो. माय मराठीच्या अस्मितेसाठी, सन्मानासाठीच्या लढ्यात आम्ही सहभागी आहोत, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. तसेच महाराष्ट्र पहिलीपासून हिंदी सक्तीला सर्वांचाच विरोध आहे. पण भाजप जाणीवपूर्वक हिंदीची सक्ती करत होता. जनतेच्या रेट्यामुळे त्यांना जीआर रद्द करावा लागला आहे. हिंदी, उर्दू, तेलुगू, कन्नड या भाषाही राज्यात शिकवल्या जातात, पण त्याची सक्ती नाही, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. एकनाथ शिंदेंनी आपली लाचाही दाखवली वर्षा गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकेची झोड उठवली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातची घोषणा देऊन आपली लाचारी दाखवत महाराष्ट्राचा अपमान केला. शिंदेसेना अन् आमदार गायकवाडांनी माफी मागावी तसेच शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या छत्रपती संभाजीराजेंबाबतच्या वक्तव्यावरही वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला. आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज व मराठीचा अपमान केला. शिंदेसेना व एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी देखील वर्षा गायकवाड यांनी केली आहे. हे ही वाचा... छत्रपती संभाजीराजेंनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का?:मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना शिंदेच्या आमदाराचे संतापजनक व्यक्तव्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मेळाव्यानंतर प्रतिक्रिया देताना तसेच मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे बोलताना गायकवाड यांनी ठाकरे बंधूंवर टीका करताना छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अपमानास्पद शब्द वापरले. छत्रपती संभाजीराजे यांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? असा संतापजनक सवाल संजय गायकवाड यांनी केला. शिवाय बाळासाहेब असतानाही ठाकरे ब्रँड नव्हता, अशी टीकाही त्यांनी केली. पूर्ण बातमी वाचा... मराठी एकजुटीवर 18 वर्षांनंतर उद्धव-राज एकाच मंचावर:राज म्हणाले- बाळासाहेब जे करू शकले नाहीत, ते फडणवीसांनी केले; उद्धव ठाकरेंकडून एकत्र येण्याचे संकेत राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने निर्णय मागे घेतला. या निर्णयानंतर आता ठाकरे बंधूंचा विजयी झाला.मराठी माणसाच्या या दबावामुळे विजय मिळाल्याचे म्हणत दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच विजयी मेळाव्या निमित्तने 18 वर्षानंतर एका व्यासपीठावर आले. पूर्ण बातमी वाचा...
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पंढरपूरला देवदर्शनासाठी निघालेल्या आणि चहा पिण्यासाठी तसेच वॉशरूमकरिता थांबलेल्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गळ्याला कोयता लावून जबरदस्तीने घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला होता. तसेच इतर महिलांच्या गळ्यातील दीड लाखांच्या आसपास सोन्या चांदीचे दागिने लुटून आरोपी पसार झाले होते. याबाबत पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी यांचा माग काढत समीर ऊर्फ लकी पठाण आणि विकास नामदेव सातपुते या दोघां आरोपींना चिंचोली परिसरातील एका मठातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत दौंड पोलिस ठाण्यात आरोपींवर कलम 64, 309(6), 351(2), 3(5) बी एम एस सह कलम 4, 6 बाल अत्याचार अधिनियम कलम 4, 23 शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी आरोपी अमीर सलीम पठाण (वय. 30 वर्षे, राहणार. अकलूज , तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर), विकास नामदेव सातपुते (वय. २८ वर्षे, राहणार. तक्रारवाडी, भिगवन स्टेशन, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून इको चार चाकी गाडीतुन एक कुटुंब पंढरपूरला देवदर्शनसाठी जात असताना सोमवारी (दि.३०) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांना भिगवण जवळ आरोपी यांनी हेरले. यावेळी गाडीत ७ जण होते. त्यामध्ये ७० वर्षीय वाहन चालक, ३ महिला, एक १७ वर्षाची मुलगी आणि दोन १७ वर्षाचे मुले होती. दरम्यान ,चालकाने गाडी रोडच्या बाजूला लावून लघवीसाठी गेला, त्याच वेळी त्याठिकाणी २ अनोळखी इसम गाडीच्या जवळ आले आणि त्यांनी धारदार शस्त्र दाखवून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने त्याच्याकडून काढून घेतले. त्याच वेळी त्या दोन्ही आरोपी मधून एकाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला टपरीच्या पाठीमागे असलेल्या नाल्या शेजारील झाडीमध्ये अंधारात फरपटत नेऊन तिच्याबरोबर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता, त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती.
अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कविश्रेष्ठ सुरेश भट यांच्या नावाने ‘मराठी गजल’ अध्यासन केंद्र स्थापन करण्याची मागणी स्थानिक साहित्यिकांनी केली आहे. सदर निवेदनावर कवि विष्णू सोळंके यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक सुरेश अकोटकर, अरुण सांगोळे, सेवानिवृत्त प्राचार्य तथा ज्येष्ठ नागरिक महासंघाचे पदाधिकारी डॉ. दिलिपसिंह खांबरे, माजी प्राचार्य डॉ गावंडे यांच्या स्वाक्षरी आहेत. या संदर्भात कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांना निवेदन सादर करण्यात आले असून त्यामध्ये या मागणीवर जोर देण्यात आला आहे. कुलगुरुंच्या अनुपस्थितीत त्यांचे स्वीय सहायक आर. एम. जाधव यांनी हे निवेदन स्वीकारले. सुरेश भट यांनी तहहयात साहित्याची विशेषत: कविता-गजलांची सेवा केली. त्यांच्या गजलेवर अनेकांनी शोधप्रबंध सादर करुन या साहित्याला अधिक समृद्ध केले आहे. त्यामुळे हा विषय मराठी भाषेच्या शिक्षणापुरता मर्यादित न ठेवता त्यासाठी स्वतंत्र अध्यासन उघडले जावे, असे संबंधित निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे. विशेष असे की सुरेश भट यांचे जन्मगाव अमरावती आहे. त्यांनी मराठी गजलेला वेगळाच आयाम दिला. त्यांच्यानंतर आजही राज्यात चारशेहून अधिक साहित्यिक मराठी गजलेचा प्रचार-प्रसार करीत आहेत. त्यामुळे भट यांच्या जन्मगावीच्या विद्यापीठात या विषयाचे स्वतंत्र अध्यासन असणे अधिक प्रासंगिक ठरते, असेही या साहित्यिकांचे म्हणणे आहे. निवेदन सादर करतेवेळी ज्येष्ठ नागरिक सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुरेशपंत नांदुरकर, इतर पदाधिकारी पळसोदकर, अविनाश राजगुरे, सुधीर देशमुख, वसंतराव सराफ आदी मान्यवरही उपस्थित होते.
प्रगतीशील लेखक संघाचे राज्य संघटक व ख्यातनाम साहित्यिक प्रा. प्रसेनजीत तेलंग यांच्या ‘कूप’ या कथेला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. ही स्पर्धा आकांक्षा प्रकाशनाने आयोजित केली होती. रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. येत्या काही दिवसांत आयोजित केल्या जाणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार बहाल केला जाईल. प्रा.प्रसेनजीत तेलंग हे चांदूर रेल्वे येथील रहिवासी आहेत. ते ललित लेख, काव्य, समीक्षा आणि वैचारिक लेखन सातत्याने करत असतात. परिवर्तनवादी चळवळीत आणि वाड्मयीन चळवळीत ते गत २५ वर्षे सक्रियपणे कार्यरत आहेत. अलीकडे चांगल्या कथा मराठी मध्ये वाचनात येत नाहीत. कथा लोप पावत चालली की काय ? अशा प्रकारचे प्रश्न वारंवार ऐकू येतात. या पार्श्वभूमीवर हे सकारात्मक चित्र पुढे आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम कथालेखक गवसू शकतात, हा विश्वासही बळावला आहे. आकांक्षा प्रकाशन ही संस्था गेली अनेक वर्षे साहित्य व सामाजिक क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवत असते. त्यातीलच एक भाग म्हणून दरवर्षी राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. हे या स्पर्धेचे चवथे वर्ष आहे. या स्पर्धेला राज्यभरातून व बाहेरून सुद्धा भरपूर प्रतिसाद मिळाला, असे आयोजकांचे म्हणणे आहे. सदर स्पर्धेचा प्रथम पुरस्कार कामठी-नागपुर येथील लिलाधर दवंडे यांच्या ‘पोळा’ कथेला प्राप्त झालेला आहे. दवंडे कथाकार आणि कवी आहेत. त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. अनेक सामाजिक संघटनांशी त्यांचा संबंध आहे. तृतीय पुरस्कार नागपुर येथील सोनाली करमरकर यांच्या ‘चक्रव्यूह’ आणि चंद्रपुरच्या संध्या दानव यांच्या ‘मामंजी’ कथेला विभागून देण्यात आला आहे. सोनाली करमरकर यांच्या कथा आतापर्यंत अनेक दिवाळी अंकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यांचा एक कथासंग्रहही प्रकाशित आहेत, तर संध्या दानव यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्या चंद्रपूरला दूरदर्शनला वृत्त उद्घोषिका आहेत. वऱ्हाडी, ग्रामीण, कथा लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे.
दि ऑर्डन्नस फॅक्टरी एम्प्लॉइज एज्युकेशन सोसायटीच्या (रेंजहिल्स सेकंडरी स्कूल ग्रुप) च्या अनुदानित शाळेमधील विद्यार्थ्यांकडून आता कोणत्याही प्रकारचे शुल्क न घेण्याचा निर्णय आय आय जम्मू चे अध्यक्ष व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे संस्थापक तसेच नुकताच या संस्थेचा अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेले पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी आज संस्थेच्या कार्यकारणीच्या पहिल्याच बैठकीत अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे . अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यांनंतर त्यांनी शनिवारी संस्थेच्या कार्यकारणीची बैठक बोलावली होती त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. रेंजहिल्स स्कूल चा येत्या वर्षभरात कायापालट करणार असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.तसेच मागेल त्याला प्रवेश देण्याचा निर्णय ही यावेळी घेण्यात आला .पुणे शहरातील आणि रेंझिल्स कर्मचारी,कामगारवर्ग,खडकी ,दापोडी आणि झोपडपट्टी परिसरातील गरीब व गरजू आणि आर्थिक दृष्टा दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपल्या संस्थेच्या वतीने विशेष अभियान राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला. खडकी एम्युनेशन फॅक्टरी च्या कर्मचारी व परिसरातील वंचित घटकातील मुलांना शिक्षण देण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून चालू आहे .या संस्थेची स्थापना 1966 साली करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शैलेंद्र जगताप,सहसचिव राजेंद्र साळवे ,संचालक गौतम भोसले तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते .
महिलांवरील वाढत्या अत्याचारांसंदर्भात राज्य सरकार आरोपींवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा' (मकोका) लावण्याच्या तयारीत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून, विधी व न्याय विभागाला तपासणी करण्याचे आदेश दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. याबाबत बोलताना पवार म्हणाले, की महिलांची सुरक्षा हा प्राधान्याचा विषय आहे. म्हणूनच याबाबत कायदा आणि सुव्यवस्था चांगली रहावी, यासाठी सरकारची भूमिका ही कठोर अशीच आहे. त्यादृष्टीने कायदे करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशी प्रकरणे घडल्यानंतर आरोपी, तपास, चौकशी, पुरावे आदी न्यायालयीन प्रक्रियेत खटला सुरूच असतो. तोपर्यंत आरोपीवर ‘मकोका'सारखे कलम लावण्यासंदर्भात सरकार चाचपणी करत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारीही सकारात्मक आहेत. त्यामुळे महिला अत्याचाराच्या प्रकरणात या कायद्याची अंमलबजावणी करता येणार का, याबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाला सूचना केल्या आहेत. वस्तुस्थिती समोर येईपर्यंत संयम ठेवावा महिला अत्याचाराची घटना घडल्यानंतर समाजातून तीव्र भावना व्यक्त केल्या जातात. सत्ताधारी, सरकार, पोलीस-तपास यंत्रणांवर टीका करण्यात येते. मात्र, वस्तुस्थिती समोर येईपर्यंत संयम ठेवणे आवश्यक आहे, असे मत पवार यांनी कोंढव्यातील घटनेचा दाखला देत व्यक्त केले. कोंढवा घटनेत तरुणीची चौकशी करावी कोंढवा येथील घटनेसंदर्भात पोलिसांनी तपास केला. या तपासादरम्यान वेगळय़ाच गोष्टी समोर आल्या आहेत. संबंधित तरुण-तरुणी गेल्या अनेक दिवसांपासून मित्र आहेत. ते नियमित एकमेकांना भेटायचे, दोघांमध्ये संभाषण असायचे. तरुणीनेच त्याला फोन करून घरी बोलावले होते, कुठलाही स्प्रे मारला नाही, असे तपासात समोर आले. परंतु, समाजात वेगळीच माहिती गेली असून पोलीस आयुक्तांना पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती समोर मांडण्याच्या सूचना केल्या आहेत. संबंधित तरुणीने तक्रार करण्याचे कारण काय? याबाबतही तपास करण्याबाबत आदेश दिले आहेत, असेही पवार यांनी नमूद केले.
रशियाचा युक्रेनवर हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जखमी
कीव : वृत्तसंस्था रशियाने युक्रेनची राजधानी कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाला आणि किमान २६ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियाने हल्ल्याच्या सुरुवातीला ५५० ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केला, ज्यामुळे कीवमधील अनेक भागांमध्ये मोठा विध्वंस झाला आहे. रशियाच्या या हल्ल्यानंतर युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे अध्यक्ष […] The post रशियाचा युक्रेनवर हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जखमी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘वन बिग ब्युटिफुल बिल’चे बहुमताने कायद्यात रूपांतर
वॉशिंग्टन : वृत्तसंस्था अमेरिकेतील बहुचर्चित प्रमुख कर आणि खर्च विधेयक असलेल्या ‘वन बिग ब्युटिफुल बिल’वर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी स्वाक्षरी केली. हे विधेयक अमेरिकेच्या संसदेत २१८ विरुद्ध २१४ मतांनी मंजूर झाले. २१८ खासदारांनी विधेयकाच्या बाजूने, तर २१४ खासदारांनी विरोधात मतदान केले. आता या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे. अमेरिकेची जनता पूर्वीपेक्षा अधिक समृद्ध, सुरक्षित […] The post ‘वन बिग ब्युटिफुल बिल’चे बहुमताने कायद्यात रूपांतर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्रातील शेतक-यांवर ८,३८,२४९ कोटींचा बोजा!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबत नसतानाच देशभरातील शेतक-यांवर १२ लाख १९ हजार ५१६ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. महाराष्ट्रातील शेतक-यांवर सर्वाधिक म्हणजे ८,३८,२४९ कोटींचे कर्ज थकीत असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली होती, ती पुन्हा चर्चेत आली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार […] The post महाराष्ट्रातील शेतक-यांवर ८,३८,२४९ कोटींचा बोजा! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अवघ्या चार महिन्यांत २२ वाघ, ४० बिबट्यांचा मृत्यू! तीन वर्षांत १०७ वाघ दगावले
मुंबई : प्रतिनिधी राज्यात जानेवारी ते एप्रिल २०२५ या काळात २२ वाघांचा मृत्यू झाला अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२४ या दरम्यान राज्यात विविध कारणांनी १०७ वाघांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. यापैकी नैैसर्गिक कारणामुळे १३, विजेच्या धक्क्यामुळे ४, रस्ता, रेल्वे व विहीर अपघातात चार […] The post अवघ्या चार महिन्यांत २२ वाघ, ४० बिबट्यांचा मृत्यू! तीन वर्षांत १०७ वाघ दगावले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
टोल टॅक्समध्ये दुरूस्ती; ५० टक्के होणार कपात
नवी दिल्ली : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गावरील टोलमध्ये ५० टक्के कपात होणार असून वाहन धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. बांधकाम असलेल्या मार्गांवर प्रवाशांकडून प्रति किलोमीटर १० पट टोल आकारला जात होता. यामागील उद्देश या महागड्या बांधकामांचा खर्च वसूल करणे होता. परंतु यामुळे प्रवाशांवरील आर्थिक भार वाढत होता. परंतु हा नियम बदलला आहे. राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणा-या […] The post टोल टॅक्समध्ये दुरूस्ती; ५० टक्के होणार कपात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंगोली शहरात अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या पथकाने पाठलाग करून पकडले असून या प्रकरणी टिप्पर चालक व मालकावर शनिवारी ता. ५ सायंकाळी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ, तलाठी बी. के. वाबळे, सय्यद अब्दुल यांचे पथक आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास कलबुर्गा येथे रस्त्याच्या पाहणीच्या कामासाठी निघाले होते. यावेळी हिंगोली शहरातील नांदेड नाका भागात त्यांचे वाहन आल्यानंतर समोरच अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे टिप्पर दिसून आले. मात्र तहसीलदारांचे वाहन पाहताच टिप्पर चालकाने वाहनासह पळ काढला. त्यामुळे या पथकानेही टिप्परचा पाठलाग सुरु केला. दरम्यान, महसुलचे पथक पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच चालकाने टिप्पर आझम कॉलनी भागात नेले. मात्र या पथकाने त्या ठिकाणी जाऊन टिप्पर पकडले. टिप्परमध्ये दोन ब्रास वाळून आढळून आली. मात्र सदर वाळू कोठून आणण्यात आली याबाबत चालकाला उत्तर देता आले नाही. त्यानंतर तातडीने शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल महिपाले, जमादार संजय मार्के, सय्यद अमजद यांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन टिप्परसह चालकाला ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणी तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात अविनाश सरकटे, कुंडलीक नागरे (रा. अंभेरी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात गौण खनीज अधिनियम १९५७ अंतर्गत कलम ४, २१ नुसार गुन्हा दाखल झाला असून यामध्ये महसूल प्रशासनाचा दंड भरावाच लागणार आहे तर राज्यातला अशा प्रकारचा पहिलाच गुन्हा असल्याचे महसूलच्या सूत्रांनी सांगितले.
आजही भारतात शिक्षण, माध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रात समाजवाद मार्क्सवाद जिवंत आहे. गुलामगिरीची व्यवस्था आणि संस्कृती संपवण्याच्या दृष्टीने हा मार्क्सवाद चुकीचा आहे. त्या ऐवजी धर्म, मोक्ष, काम यावर आधारीत असलेली माणसाला माणूसपण बहाल करणारी भारतीय विचारसरणी, जी विवेकानंदांना अभिप्रेत होती, तदनुसारच हे विश्व चालले तरच जगाचे आणि मानवी संस्कृतीचे उत्थान होईल, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी) चा मराठी प्रकाशन विभाग आणि विवेकानंद केंद्र पुणे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मार्क्स आणि विवेकानंद (एक तौलनिक अध्ययन)' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ भारतीय इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक व भाजपा प्रवक्ते माधव भांडारी होते. प्रमुख वक्ते म्हणून 'चाणक्य मंडल' चे संस्थापक अविनाश धर्माधिकारी व अभिजीत जोग उपस्थित होते. स्व. पी. परमेश्वरन लिखित आणि स्व. चं. प. भिशीकर अनुवादित या पुस्तकामध्ये मार्क्स आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा तुलनात्मक अभ्यास मांडण्यात आला आहे. कार्यक्रमात विवेकानंद केंद्र (कन्याकुमारी) च्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर , विवेकानंद पुणे केंद्राचे संचालक माधव जोशी, पुस्तकाचे संपादक आनंद हर्डीकर उपस्थित होते. धर्माधिकारी म्हणाले, भारतीय संस्कृती आणि विचार हे समानतेवर अवलंबून असून ते भांडवलशाही अर्थव्यवस्था वा दुसऱ्याच्या लुटीवर अवलंबून नाहीत. मार्क्सचा जडवाद हाच मुळी अंधश्रद्धेचा विचार होता हे आता सिद्ध झाले आहे, आणि विवेकानंदांना अभिप्रेत असलेला हिंदू धर्म हाच सर्व धर्मांची जननी आहे, हा विचार आजच्या जागतिकीकरणामुळे पुढे येत आहे.मार्क्सची पूर्ण मांडणी ही केवळ आर्थिक विकास, अर्थ व्यवस्था या मुद्द्यावर होती तर विवेकानंदांची मांडणी ही अध्यात्मिक आणि संपूर्ण विश्वातील मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणाची होती, असेही धर्माधिकारी म्हणाले. माधव भांडारी म्हणाले, भारतातील मार्क्सवाद-समाजवाद संपला अशी हाकाटी मारली जाते, पण ते काही खरे नसून आजही भारतात समाजवाद, मार्क्सवाद जिवंत आहे, आज जरी समाजवादाचा राजकीय निवडणुकीत पराभव झालेला दिसत असला तरी, या विचारांचा प्रभाव अजूनही लोकांच्या मनात कायम आहे. त्याचा मतपेटीतून आविष्कार होताना दिसत नाही ही त्यांना चिंता आहे. परंतु हा विचार पुन्हा प्रभावी होऊ शकतो, असे मत भांडारी यांनी व्यक्त केले.
दहशत माजवणारे 7 सराईत आरोपी जेरबंद:देशी बनावटीच्या पिस्तुलासह कोयते जप्त, चतु:शृंगी पोलिसांची कारवाई
पुणे शहरात ओैंध भागात दहशत माजवून पसार झालेल्या सराईतांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तीन कोयते. मोटार, दुचाकी असा सात लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रतीक सुनील कदम (वय २६), अमीर अल्लाउद्दीन शेख (वय २८), , समीर अल्लाउद्दीन शेख (वय २६), जय सुनील घेंगट (वय २१), अभिषेक अरुण आवळे (वय २४, सर्व रा. कस्तुरबा गांधी वसाहत, ओैंध),अतुल श्याम चव्हाण (वय २८, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत,ओैंध), रॉबिन दिनेश साळवे (वय २६, रा.दर्शन पार्क, ओैंध) अशी अटक करण्यात आलेल्यां आरोपीची नावे आहेत. याबाबत एका तरुणाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार तरुण आणि त्याचे मित्र ओैंधमधील विधाते वस्ती भागात २८ जून रोजी गप्पा मारत थांबले होते. आरोपी आणि फिर्यादी तरुणाचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता. आरोपी आणि त्यांच्याबरोबर असलेले साथीदार विधाते वस्ती परिसरात आले. तरुण, तसेच त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना शिवीगाळ केली. दांडके आणि कोयते उगारून परिसरात दहशत माजवली. तरुण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रावर कोयत्याने वार करुन आरोपी पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा लावून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तीन कोयते, मोटार आणि दुचाकी जप्त करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अश्विनी ननावरे, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी श्रीकांत वाघवले, इरफान मोमीन, बाबासाहेब दांगडे, बाबुलाल तांदळे, श्रीधर शिर्के, महेंद्र वायकर यांनी ही कामगिरी केली. तरुणाचा खुनाचा प्रयत्न करत पसार झालेला आरोपी अटकेत पुण्यातील हडपसर भागात तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन पसार झालेल्या सराइताला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले. विनीत रवींद्र इंगळे (वय २४, रा. सातववाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वैमनस्यातून विनीत इंगळे, साथीदारांनी दीपक विजय कलादगी (वय २१, रा. पवार कॉलनी, हडपसर) याच्यावर २० मार्च रोजी धारदार शस्त्राने वार केले होते. या घटनेत कलादगी गंभीर जखमी झाला होता. गेले चार महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता. इंगळे हा हडपसर भागातील लोहिया गार्डनजवळ थांबल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी महेश चव्हाण आणि अभिजित राऊत यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले.
अधिक पैशांसाठी आई वडिलांनी स्वतःच्या ४० दिवसांच्या बालिकेची साडेतीन लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. याप्रकरणी मुलीस विकल्याची बाब उघड झाल्यावर याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आई-वडिलांसह सहा जणांना अटक केली आहे. मीनल ओंकार सपकाळ (वय ३०, रा. बिबवेवाडी,पुणे) ओंकार औदुंबर सपकाळ (वय २९, रा. बिबवेवाडी,पुणे), साहिल अफजल बागवान (वय २७, रा. सातारा), रेश्मा शंकर पानसरे (वय ३४, रा. येरवडा,पुणे), सचिन रामा अवताडे (वय ४४, रा. येरवड,पुणे), दीपाली विकास फटांगरे (वय ३२, रा. संगमनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी बाल न्याय अधिनियमासह विविध कलमांन्वये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीनल सपकाळ ही पहिल्या पतीपासून वेगळी राहत आहे. तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. सध्या ती ओंकार सपकाळ याच्यासोबत राहत आहे. २५ जून २०२५ रोजी मीनल प्रसृत झाली. तिला मुलगी झाली. मीनल प्रसृत झाल्यानंतर मध्यस्थ बागवान, पानसरे, अवताडे यांनी तिच्याशी संपर्क साधला. ४० दिवसांची मुलगी दीपाली फटांगरे हिला देण्यास सांगितले. त्याबदल्यात साडेतीन लाख रुपये देतो, असे आमिष मध्यस्थांनी दीपालीला दाखविले. मध्यस्थांनी दोन लाख रुपये सपकाळ दाम्पत्याला दिले. मधस्थांना फटांगरेने जास्त रक्कम दिल्याचा संशय सपकाळ यांना आला. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर सपकाळ येरवडा पोलिस ठाण्यात गेले. आमची मुलगी पळवून नेली असे सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी मध्यस्थ आणि मुलगी विकत घेणारी दीपाली फटांगरे यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आई-वडिलांनी मध्यस्थांमार्फत बालिकेची फटांगरेला विक्री केल्याचे उघडकीस आले. फटांगरेला हिला कायदेशीर दत्तक विधान प्रक्रिया पार न पाडता साडेतीन लाख रुपयांत सपकाळने विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी सपकाळ यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. सुरुवातील मुलगी पळवून नेल्याची तक्रार देण्यासाठी सपकाळ आले होते. चौकशीत सपकाळ यांनी तिची मध्यस्थांमार्फत फटांगरे सााडेतीन लाख रुपयांत विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणात पोलिस फिर्यादी झाले असल्याचे येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी सांगितले.
भविष्य सांगणे, तसेच जीवनातील अडीअडचणी दूर करण्याच्या आमिषाने एका तरुणाच्या बोटातील ६० हजारांची सोन्याची अंगठी लांबविण्यात आल्याची घटना नारायण पेठेत घडली. याप्रकरणी एका चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण पेठेतील श्री माणकेश्वर विष्णू मंदिराच्या परिसरात चोरटा थांबला होता. तक्रारदार तरुण कोथरूडमधील रामबाग कॉलनीत राहायला आहे. तेथून जात असलेल्या तरुणाने चोरट्याला पाहिले. चोरटा तेथून जाणाऱ्या नागरिकांकडे भविष्य सांगण्याची बतावणी करत होता. तक्रारदार तरुण चोरट्याजवळ गेला. चोरट्याने त्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी दूर करतो, तसेच भविष्य सांगण्याची बतावणी केली. त्यानंतर चोरट्याने तरुणाला बोटातील अंगठी दाखविण्यास सांगितले. चोरट्याने त्याच्या बोटातील अंगठी काढून देण्यास सांगितले. चोरट्याने बोटातील अंगठी काढल्यानंतर ती तोंडात टाकण्याचा बहाणा केला. तरुणाने त्याला अंगठी परत मागितली. अंगठी तुझ्या घरी कागदात गुंडाळून येईल, अशी बतावणी केली. त्यानंतर चोरटा तेथून पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक एन पाटील तपास करत आहेत. रस्त्यावर दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू पुणे-सातारा रस्त्यावर दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.अजय दत्तात्रय जेधे (वय ३०, रा. जेधेवाडी, ता. भोर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई संतोष कराड यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अजय जेधे हे मध्यरात्री दीडच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरुन निघाले होते. कात्रज भागातील बीआरटी मार्ग परिसरात भरधाव दुचाकी घसरली. अपघातात दुचाकीस्वार जेधे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघाताच्या घटनेची नोंद भारती विद्यापीठ पोलिसांनी केली असून, हवालदार एन भोसले तपास करत आहेत.
देशाच्या आर्थिक विकासात शेतीचा सर्वाधिक वाटा आहे. मात्र अलिकडच्या काळात रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीचा कस कमी होत आहे.तो वाढविण्यासाठी शास्त्रशुद्ध नैसर्गिक शेतीची गरज आहे, असे मत देशाचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयात 'शाश्वत कृषी संजीवनी' या अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. सर अल्बर्ट हॉवर्ड यांनी १०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'अॅन अॅग्रिकल्चरल टेस्टामेंट' इंग्रजी पुस्तकाचे प्रा. अनिल व्यास यांनी अनुवाद केला आहे. डॉ. शिरनामे सभागृहात आयोजित कार्यक्रमाला राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शरद गडाख, खासदार मेधा कुलकर्णी, आनंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मदनगोपाल वार्ष्णेय, भारतीय किसान संघाच्या प्रांत उपाध्यक्षा स्नेहलता सावंत, सेवावर्धिनीचे कार्यवाह सोमदत्त पटवर्धन, प्रकाशक रविंद्र घाटपांडे उपस्थित होते. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, शेतीच्या उत्पन्नवाढीसाठी सरकार प्रयत्न करत असून, सेंद्रीय शेती, माती परिक्षण आणि बियाणांच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. या पुस्तकाचा विद्यार्थी आणि संशोधकांना कृषी संशोधनात नक्कीच फायदा होईल. देशाच्या प्रगतीत कृषी क्षेत्राचा सर्वाधिक वाटा असल्याचे मत खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या,रासायनिक खते आणि किटकनाशकांच्या वापरातून शेतीचे अपरिमित नुकसान होत आहे. त्यामुळे आपल्याला जैविक शेतीकडे वळायला हवे. आधुनिकतेबरोबरच शाश्वत पारंपारिक शास्त्राचाही वापर व्हायला हवा. कृषी उत्पादनांच्या वाढीसाठी भूमी सुपोषण होणे गरजेचे असल्याचे सांगत प्रा. वार्ष्णेय म्हणाले, भारतीय शेतीचा २५ वर्षे अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या सर अल्बर्ट हार्वर्ड यांनी १०० वर्षांपूर्वी हे पुस्तक लिहिले. त्यांनी नैसर्गिक शेतीचा आणि एकात्म कृषी संशोधनाचा केवळ पुरस्कार केला नाही तर इंदोरच्या होळकारांनी दिलेल्या ७५ एकर जमिनीवर कृषी संशोधन केंद्रही स्थापन केले. प्रा. गडाख यावेळी म्हणाले, यांत्रिक शेतीकडून आपण आता डिजीटल शेतीकडे जात आहोत. देशाची अन्नधान्याची गरज भागवत भारतीय शेतकऱ्यांनी जगभरात निर्यात सुरू केली आहे. रासायनिक शेतीमुळे आज जीवनशैलीशी निगडीत गंभीर आजारांत वाढ झाली आहे. त्यामुळे आज जगाला विषमुक्त अन्नाची गरज आहे. विद्यापीठ म्हणून आम्ही जैविक आणि नैसर्गिक शेतीवर संशोधन करत आहोत. लवकरच त्याचे निष्कर्ष आपल्या हाती लागतील. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठीही कृषी विद्यापीठात संशोधन होत आहे. पुस्तकाचे लेखक प्रा. अनिल व्यास म्हणाले, जमीनीची सुपिकता ही राष्ट्राची संपत्ती असल्याचे ऋग्वेदातील श्री सुक्तात सांगितले आहे. तोच धागा १०० वर्षांपूर्वी सर अल्बर्ट हावर्ड यांनी पकडला होता. या सुक्तामध्ये मातीच्या ह्युमस (कर्बक), कवक आणि मुळांच्या सहअस्तित्वातून जमिनीची सुपिकता वाढते हे सांगण्यात आले आहे.
मूर्तीशास्त्राने सर्वसामान्यांचे चर्मचक्षू आणि भावचक्षू, यांचा सूक्ष्म विचार केला आहे. श्री विठ्ठलाची मूर्ती याच विचारांची परिणती आहे. विठ्ठलमूर्ती ही सामाजिक अभिसरण आणि प्रबोधनाचा संदेश देणारी आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ मूर्तिशास्त्रतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी शनिवारी येथे केले. तत्कालीन सामाजिक परिस्थितीची गरज म्हणून सर्व समाजघटक एकत्र यावेत, त्यांनी एकाच देवतेची उपासना करावी, या संतविचारांची पार्श्वभूमी यामागे आहे, असेही ते म्हणाले. इंडी हेरिटेज तर्फे सुरु करण्यात आलेल्या मास्टर क्लास उपक्रमाचा शुभारंभ डॉ. देगलूरकर यांच्या विठ्ठल मूर्ती’ या विषयावरील व्याख्यानाच्या माध्यमातून झाला. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या फिरोदिया सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. मूर्तिशास्त्राचा उल्लेख पाणिनी, कौटिल्य या सारख्या धुरिणांनी केला आहे. सुरवातीला पाषाणखंड रूपात आढळणाऱ्या मूर्ती कालांतराने मनुष्य रूपात घडवल्या जाऊ लागल्या. देवतेचे श्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी मूर्तीला अधिक हात, मस्तके, अलंकार अशी सजावट सुरू झाली', असे सांगून डॉ. देगलूरकर यांनी मूर्तिशास्त्राचा प्रारंभ, विकासाचे टप्पे याविषयीचे विवेचन केले. इसवी सनाच्या १२ व्या शतकापर्यंत मूर्तिकला परिणत अवस्थेत पोहोचली होती. उपासकांच्या कल्पनेनुसार मूर्तींची घडण केली जाऊ लागली. मूर्तीच्या माध्यमातून तत्त्वविचार, अध्यात्म हेही सांगितले जाऊ लागले. उपासकांमध्ये मतभेद होऊ लागल्यावर आणि परकीय आक्रमणांचे संकट ओढवल्यावर समाजघटकांचे विखुरलेपण संपवून, समाज एकत्र यावा, सामाजिक अभिसरण घडावे, अशा उदात्त हेतूने संतपरंपरेने विठ्ठल या देवतेच्या माध्यमातून महत्त्वाचे सामाजिक योगदान दिले, असे डॉ. देगलूरकर म्हणाले. विठ्ठल म्हणजेच विष्णू असून विठ्ठलमूर्ती ही योगस्थानक मूर्ती आहे', असे सांगून देगलूरकर म्हणाले, विठ्ठलमूर्तीला दोनच हात आहेत कारण योगमूर्ती असल्याने चक्र, गदेसारखी शस्त्रे अप्रस्तुत ठरतात. माढा येथील मूर्ती ही मूळ मूर्ती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. विवेचनाच्या ओघात देगलूरकर यांनी शारंगधर विष्णू, उपेंद्र, वीस हातांचा विष्णू (विश्वरूप), धन्वंतरी विष्णू, वैकुंठ विष्णू आणि वासुदेव विष्णू, अशा मूर्तींच्या स्लाईड्सच्या माध्यमातून विठ्ठल म्हणजेच विष्णू, हे देखील स्पष्ट केले. इंडी हेरीटेजचे तुषार जोशी म्हणाले, भारतीय विद्या (इंडॉलॉजी) चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर, या क्षेत्रात काही योगदान देण्याची इच्छा झाली. त्यातून ‘इंडी हेरीटेज'ची सुरवात होत आहे. मास्टर क्लास आणि डायलॉग अशा दोन उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय विद्या या क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ञांचे व संशोधकांचे विचार व काम जनमानसापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जाईल.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मेळाव्यानंतर प्रतिक्रिया देताना तसेच मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे बोलताना गायकवाड यांनी ठाकरे बंधूंवर टीका करताना छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात अपमानास्पद शब्द वापरले. छत्रपती संभाजीराजे यांनी 16 भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? असा संतापजनक सवाल संजय गायकवाड यांनी केला. शिवाय बाळासाहेब असतानाही ठाकरे ब्रँड नव्हता, अशी टीकाही त्यांनी केली. राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने निर्णय मागे घेतला. या निर्णयानंतर मराठी माणसाच्या या दबावामुळे विजय मिळाल्याचे म्हणत दोन्ही ठाकरे बंधूंचा आज विजयी मेळावा पार पडला. या विजयी मेळाव्या निमित्ताने ठाकरे बंधून पहिल्यांदाज 18 वर्षानंतर एका व्यासपीठावर आले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर त्यांच्यावर टीका करताना संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले. त्यांच्या या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नेमके काय म्हणाले संजय गायकवाड? मराठी आणि हिंदी भाषेच्या वादावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, विषय फक्त हिंदीचा नाही, जगात आज टिकायचे असेल तर तुम्हाला अनेक भाषा शिकल्या पाहिजेत. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या. ते मुर्ख होते का? असा प्रश्न करत शिवाजी महाराजही बहुभाषिक होते. जिजाऊ, ताराराणी, येसूबाई यांनी अनेक भाषा शिकल्या. ते सर्व लोक काही मूर्ख होते का? असे अपशब्द संजय गायकवाड यांनी वापरले. ठाकरे ब्रँड उरला नाही, असता तर... राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर भाष्य करताना संजय गायकवाड म्हणाले, पंधरा वर्षांपूर्वीच ते एकत्रित आले असते तर काही फरक पडला असता. पण बाळासाहेबांचा विचार उद्धव ठाकरे सोडून गेले. त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिलेले नाही. राज ठाकरे यांनी टाळीला टाळी देण्यासाठी खूप उशीर केलेला आहे. आता ठाकरे नावाचा ब्रँड राहिलेला नाही. आता तुम्ही किती लोकांची काम करतात यावर सगळे ठरते. ठाकरे नावाचा ब्रँड जर असता तर, बाळासाहेब जिवंत असतानाच 288 जागा निवडून आल्या असत्या. त्यावेळीही 70-74 च्या पुढे शिवसेना जात नव्हती. आता हे दोघे एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नाही. मराठी पुरेशी नाही, उर्दूसुद्धा शिकायला हवी संजय गायकवाड पुढे म्हणाले, आपण परराज्यात गेल्यावर तिथे मराठीत बोलणार का? जगात टीकायचे असेल तर सगळ्या भाषा अवगत असल्या पाहिजेत. पाकिस्तानचा दहशतवाद ओळखायचा, रोखायचा असेल तर आपणाला उर्दू भाषा ही अवगत असली पाहिजे. तसेच जो कोणी महाराष्ट्रात राहून मराठी बोलण्याची लाज वाटते म्हणतो त्याचे थोबाड फोडले पाहिजे. मराठीचा अपमान आपण सहन करता कामा नये असेही आमदार संजय गायकवाड म्हणाले.
तीन वर्षांपूर्वी धो डाला, अब उठेगा नहीं साला, हा डायलॉग उद्धव ठाकरेंना शोभून दिसतो. तीन वर्षांपूर्वी दाढीवरून अर्धाच हात फिरवल्याने ते आडवे झाले, अजून सावरले नाहीत. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे उठेगा नहीं असे डायलॉग बोलणे त्यांना शोभत नाही. अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही, त्यासाठी मनगटात जोर लागतो, असेही शिंदे म्हणाले. एकाने मराठीबद्दल असलेली तळमळ बोलून दाखवली. दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. झेंडा नाही, अजेंडा नाही असे काही लोक म्हणत होते. पण एका वक्त्याने ते पथ्य पाळले, मात्र दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंग शारदेच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. मराठीबाबत बोलायचे झाले, तर त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यगीत म्हटले, यासाठी त्यांचे अभिनंदन. पण महाराष्ट्राच्या राज्यगीताला मी मुख्यमंत्री असताना मान्यता दिली आणि ते राज्यगीत सुरू केले. मी मुख्यमंत्री असताना, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आमच्या टीमने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी होकार देत तत्काळ मान्यता दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणाऱ्यांनाही त्यांनी सोडले नाही. त्यामुळे आजच्या मेळाव्यातील भाषणातून आगपखाड, द्वेष, जळजळ, मळमळ दिसून आली. आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत...
“सिंहासन खाली करो, ठाकरे आए हैं!” अशी घोषणा करत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशारा दिला. दोन्ही ठाकरे बंधूंच्या वतीन आयोजित मराठी विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी दोन्ही बंधू 100 एकत्र येणार, असा विश्वासही व्यक्त केला. शिवाय एकनाथ शिंदे आणि नारायण यांना मोदी - शहांनी हवा भरलेले फुगे म्हणत जोरदार टोले लगावले. राज ठाकरे व उद्धव ठाकरे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी व हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात मिळालेल्या यशाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आज एकत्र आले. मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या या मनोमिलनाद्वारे मराठी भाषा व संस्कृतीच्या हितासाठी एकजुटीचे दर्शन घडले. महाराष्ट्राच्या राजकीय व सांस्कृतिक इतिहासातील हा एक महत्त्वाचा क्षण असल्याचे मानले जात आहे. मेळाव्याच्या यशानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला असता उपरोक्त घोषणा दिली. नेमके काय म्हणाले संजय राऊत? आम्ही राजकारणात आहोत. समाजकारणात आहोत. पक्षात आहोत. कुटुंबासोबत आहोत. आम्ही जन्मत:च ठाकऱ्यांसोबत आहोत. कुठे काही मिठाचा खडा पडला असेल तर तो काढण्यासाठी आमचा प्रयत्न कामी पडत असेल तर आम्ही तो प्रयत्न केला, असे संजय राऊत म्हणाले. सुदैवाने दोन्ही ठाकऱ्यांशी मी त्याच प्रेमाने बोलू शकतो. बोलत राहिलो. त्यातून आजचे चित्र उभे राहिले, असेही त्यांनी म्हटले. राज ठाकरे आणि माझा कायम संवाद राहिला. हा संवाद राहिल्यामुळेच हे सर्व घडू शकले. राजकारणात संवाद पाहिजे. जे टीकाकार आहेत, ज्यांच्याशी मतभेद आहेत त्यांच्याशी उत्तम संवाद करण्याला राजकारण म्हणतात. मित्र म्हणून, सहकारी म्हणून, भाऊ म्हणून माझा कायम संवाद राहिला. तो संवाद कायम राहिला पाहिजे. आजच्या मेळाव्याच्या यशासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपरोधिकपणे श्रेय दिले. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता, होय, खरंय. मीही त्यांना श्रेय देतो. त्याच चिडीतून आणि जिद्दीतूनच माझ्यासारखा कार्यकर्ता उभा राहिला, असे ते म्हणाले. आपण एकत्र आले पाहिजे, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या शत्रूंना धडा शिकवला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. मला 100 टक्के खात्री उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत पूर्ण आत्मविश्वास व्यक्त करत राऊत म्हणाले, मला 100 टक्के खात्री आहे. तसे नसते तर हा सोहळा पार पडला नसता. पहिल्या रांगेतही ठाकरे आहे. दोन्ही कुटुंब बसले होते. मी राखणदार आहे. मागे बसलो. सिंहासन खाली करो, ठाकरे आए है संजय राऊत यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. सत्तेत बसलेल्या महाराष्ट्राच्या शत्रूंनी आवराआवर केली पाहिजे. सिंहासन खाली करो, ठाकरे आए है ही घोषणा आम्ही देणार आहोत. राणे वगैरे कसले विरोधक आहेत. मोदी आणि शहा यांनी हवा भरलेले फुगे आहेत. कोण शिंदे? कोण राणे? हे मोदी-शाह हवा भरतात म्हणून फुगले. टाचणी मारली तर फुटून जातील, असा घणाघात राऊत यांनी केला. हे ही वाचा... एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक:एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने राज व उद्धव ठाकरे यांच्या 18 वर्षांनंतर झालेल्या मनोमिलनावर हल्ला चढवला आहे. दोन भावांतील एक जण प्रबोधक असून, दुसरा प्रक्षोभक आहे. एक मराठी प्रेमी तर दुसरा खुर्चीप्रेमी. एक मराठीचा पुरस्कर्ता, तर दुसरा तिरस्कर्ता आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा...
पुणेकरांनी घेतली ‘संतवाणी’ची अनुभूती
पुणे : प्रतिनिधी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या ‘संतवाणी’ची अनुभूती पुणेकरांनी पुन्हा एकदा घेतली.निमित्त होते आषाढी एकादशीचे औचित्य साधत आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संतवाणी’ या विशेष कार्यक्रमाचे. गायकांच्या अभंग सादरीकरणाने ‘संतवाणी’ कार्यक्रम रसिकांना आत्मानंदाची अनुभूती देणारा ठरला. भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे शिष्य व किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं […] The post पुणेकरांनी घेतली ‘संतवाणी’ची अनुभूती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘वारकरी’ अत्याचार प्रकरणातील दोन्ही आरोपी जेरबंद
पुणे – पुण्याजवळील दौंड परिसरात पंढरपूरसाठी निघालेल्या वारक-यांना कोयत्याच्या धाकाने लुबाडल्याची घटना घडली होती. इतकेच नाही तर वारक-यांसोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारही करण्यात आले. याप्रकरणी दोन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर आरोपींना पकडण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची दहा वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली होती. तर आज दौंड लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोन्ही आरोपींना […] The post ‘वारकरी’ अत्याचार प्रकरणातील दोन्ही आरोपी जेरबंद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी ही भाषा सक्तीची केली होती. या निर्णयाला राज्यभरातून तीव्र विरोध झाला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आवाज उठवत 5 मार्च रोजी मुंबईत मोठा मोर्चा काढण्यासह आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही जीआर मागे घेतले. या निर्णयानंतर आता ठाकरे बंधूंचा विजय झाला. मराठी माणसाच्या या दबावामुळे विजय मिळाल्याचे म्हणत दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच विजयी मेळाव्या निमित्ताने 18 वर्षानंतर एका व्यासपीठावर आले. मुंबईतील वरळी डोम मध्ये हा विजयी मेळावा पार पडला असून, यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. या मेळाव्यासाठी वरळी डोम गच्च भरले होते. डोममध्ये बसायला जागा नसल्याने कार्यकर्त्यांना बाहेरच थांबवण्यात आले होते. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ठाकरे बंधूंच्या एंट्रीपूर्वी डोममधील लाइट्स बंद करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मोबाईलच्या फ्लॅश लावून दोन्ही ठाकरेंच्या एंट्रीची वाट पाहत होते. लाइट्स ऑन झाले आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एंट्री होताच, कार्यकर्त्यांनी होत उंचावून घोषणाबाजी करत डोम दणाणून टाकला. संपूर्ण सभास्थळी ठाकरे प्रेमाने भारलेले वातावरण होते. काही कार्यकर्त्यांचे डोळे पाणावलेलेही दिसले, तर अनेक तरुणांनी आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात हा क्षण कैद करत, 'ठाकरे रिटर्न्स'चा जल्लोष साजरा केला. खाली पाहा ठाकरे बंधूंच्या एंट्रीलाच तुफान प्रतिसादाचा व्हिडिओ हे ही वाचा... कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा:राज ठाकरे म्हणाले - मुंबई वेगळी करता येते का, यासाठीच भाषेला डिवचले; आमची रस्त्यावर सत्ता म्हणत सरकारला इशारा सन्माननीय उद्धव ठाकरे म्हणत राज ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरवात केली. दोघांची भाषणे संपले की एकत्र आरोळ्या ठोक्या. आज मोर्चा निघायला पाहिजे होता, मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचे एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभे राहिले असते. नुसत्या मोर्चाच्या चर्चेने माघार घ्यावी लागली असे म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा... मराठी एकजुटीवर 18 वर्षांनंतर उद्धव-राज एकाच मंचावर:राज म्हणाले- बाळासाहेब जे करू शकले नाहीत, ते फडणवीसांनी केले; उद्धव ठाकरेंकडून एकत्र येण्याचे संकेत राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने निर्णय मागे घेतला. या निर्णयानंतर आता ठाकरे बंधूंचा विजयी झाला.मराठी माणसाच्या या दबावामुळे विजय मिळाल्याचे म्हणत दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच विजयी मेळाव्या निमित्तने 18 वर्षानंतर एका व्यासपीठावर आले. पूर्ण बातमी वाचा...
कुरिअर बॉय निघाला ‘ती’चा मित्र; कोंढवा अत्याचार प्रकरण
पुणे : कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या प्रकरणातील आरोपीला शुक्रवारी सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, हा आरोपी कुरिअर बॉय नसून पीडित तरुणीचा मित्रच असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. पीडितेने तक्रार देताना ही बाब पोलिसांपासून लपवून ठेवली होती. तसेच या घटनेमध्ये बेशुद्ध करणा-या कोणत्याही स्प्रेचा […] The post कुरिअर बॉय निघाला ‘ती’चा मित्र; कोंढवा अत्याचार प्रकरण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘तहात’ जिंकण्याचा प्रयत्न ; भाजपाचा पलटवार
मुंबई : प्रतिनिधी वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषेसाठी एकाच मंचावर एकत्र आले. याच दरम्यान उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. यानंतर आता भाजपाने यावर पलटवार केला आहे. भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच… निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब ‘तहात’ जिंकण्याचा प्रयत्न! असे म्हणत निशाणा साधला आहे. […] The post ‘तहात’ जिंकण्याचा प्रयत्न ; भाजपाचा पलटवार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महिला अत्याचार प्रकरणांत ‘मोक्का’ लागू ?
पुणे : प्रतिनिधी महिलांवरील अत्याचाराच्या गंभीर घटनांमध्ये ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम’ (मोक्का) लावण्याचा विचार सुरू आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून, कायदेशीर बाबी तपासण्याच्या सूचना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली. चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित ‘गुरुजन गौरव’ समारंभात अजित पवार यांच्या हस्ते उद्योजक अरुण फिरोदिया, ज्येष्ठ […] The post महिला अत्याचार प्रकरणांत ‘मोक्का’ लागू ? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी महाराष्ट्रातील अनेकांची इच्छा होती. मराठीच्या मुद्द्यावरून हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यातील असे प्रमुख 10 क्षणचित्रे येथे देत आहोत. ठाकरे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात या छायाचित्रांची आठवण कायम राहिल. एकदा ही छायाचित्रे नक्कीच पहा.... आणि हे 11 वे छायाचित्र....
पक्षाच्या कामासह सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा
सोलापूर-सध्या महाराष्ट्रात व केंद्रात भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार आहे. या दोन्ही सरकारकडून विकासाची कामे जोमाने चालू आहेत. त्यामुळे जगात भारताने विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम करण्याबरोबरच सरकारी योजनाही जनतेपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून द्यावा, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मंत्री […] The post पक्षाच्या कामासह सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचा मृतदेह ठेवून एनटीपीसीसमोर आंदोलन
दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथील एनटीपीसी या वीज निर्मिती कंपनीमध्ये कामाला घेत नसल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने वैतागून आपल्या भावाच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कंपनीमुळे आत्महत्या केल्याचा आरोप करीत संतप्त कुटुंबाने अधिकारी, कंत्राटदार आणि दलालावर कारवाई व्हावी या मागणीसाठी मृतदेह एनटीपीसी प्रकल्पासमोर ठेवून तब्बल अकरा तास आंदोलन केले. मिथुन […] The post प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचा मृतदेह ठेवून एनटीपीसीसमोर आंदोलन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘उत्तर’मधील गावांना निधी कमी पडू देणार नाही : खरे
उत्तर सोलापूर-जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बळीरामकाका साठे यांच्यामुळे मी आमदार झालो, त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही. त्यांच्या कार्याचा वारसा जितेंद्र साठे यांनी पुढे चालू ठेवावा, असे सांगून वडाळा गावासह उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ गावांना विकासनिधी कधीच कमी पडू देणार नसल्याची ग्वाही आमदार राजू खरे यांनी दिली. तर राजकीय आणि सामाजिक कार्यात साठे यांची साठ वर्षांची तपश्चर्या […] The post ‘उत्तर’मधील गावांना निधी कमी पडू देणार नाही : खरे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सोलापूर : पंढरपूर तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर वुमेन प्रोटेक्शन ॲक्शन कमिटी स्थापना करा . अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौ अस्मिता गायकवाड यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे केली. पंढरपूर ही भारताची दक्षिणकाशी म्हणून ओळखली जाते आषाढी एकादशीला तिथे सर्वात मोठी यात्रा भरते महाराष्ट्रासह आंध्र कर्नाटक तेलंगाना याशिवाय इतर प्रांतातून ही या तीर्थक्षेत्राला लाखोच्या […] The post पंढरपूर तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर वुमेन प्रोटेक्शन ॲक्शन कमिटी स्थापना करा : अस्मीता गायकवाड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
स्मार्ट मीटरविरोधात काँग्रेसच्यावतीने खासदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने
सोलापूर : शहर व जिल्ह्यात नागरिक घरात नसतानाही जबरदस्तीने अदानी कंपनीकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. यास जनतेमधून तीव्र विरोध होत आहे. महायुती सरकार स्मार्ट मीटर जनतेवर थोपवत आहे. स्मार्ट मीटरमुळे नागरिकांना पूर्वीपेक्षा दुप्पट, तिप्पट वीज बिल येणार आहे. किरकोळ वापरकर्त्यांनासुद्धा भरमसाठ वीज बिलाचा भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर हटवून जनतेची लूट थांबविण्यात […] The post स्मार्ट मीटरविरोधात काँग्रेसच्यावतीने खासदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
हिंदी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळी डोम मध्ये एकत्र मेळावा घेतला. या मेळाव्यात सुरुवातीला राज ठाकरे यांनी तर नंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. मात्र, राज ठाकरे यांनी आपल्याकडून भाषणात उल्लेख राहून गेला, असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच मनापासून आभार देखील मानले आहेत. यासाठी राज ठाकरे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हिंदी सक्तीच्या विरोधात राज्यात दबावगट तयार झाला. या दबाव गटामुळेच राज्य सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला. या सर्वात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रे, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबाव गट, तसेच मोजके कलाकार हे या लढ्यात ठामपणे उभे राहिले. या सर्वांचे आपण अभिनंदन करत असून आभार मानत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील, असा विश्वास देखील राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा... हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसाने सरकारला झुकवलं त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला, त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो. हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार. मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो. - राज ठाकरे भाषणातही सरकारला सुनावले राज ठाकरे म्हणाले की, मी एक पत्र लिहले, दुसरे लिहले मग दादा भुसे माझ्याकडे आले. मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो समजून घ्या. ऐकूण घ्या. म्हटले दादा तुम्हाला एक सांगतो तुम्ही काय सांगता ते ऐकूण घेईल पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्र हे केवळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील दूवा म्हणून आणण्यात आले. आज सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात इंग्रजी आहे तिथे हे सूत्र नाही. केंद्रीय शैक्षणिक धोरणातही हे सूत्र नाही.इतर कोणत्या राज्यात ही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करुण पाहिला. दक्षिणेतील राज्य तर यांना विचारतही नाही. पण महाराष्ट्र पेटून उठला की काय होते हे सत्ताधाऱ्यांना दिसले असेल. त्याशिवाय का माघार घेतली.
राज व उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादच मलाच मिळतील, अशा उपरोधिक सूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज व उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनावर भाष्य केले आहे. मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी दोन बंधू एकत्र आणण्याचे श्रेय मला दिले. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. पण मला असे सांगण्यात आले होते की, तिकडे विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी केवळ रुदालीचे भाषण झाले, असे ते म्हणाले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पंढरपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथील नियोजनाचा आढावा घेत प्रशासनाने केलेल्या तयारीचे तोंड भरून कौतुक केले. आपल्या प्रशासनाने येथे अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे. आता उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. निश्चितपणे यावेळी जशी उत्तम व्यवस्था झाली. आषाढीचे पर्व संपल्यानंतर काही उणिवा राहिल्या काय? हे पुन्हा पाहिले जाईल. पुढच्या वर्षी याहून चांगली व्यवस्था करू, असे ते म्हणाले. मी राज ठाकरे यांचे आभार मानतो यावेळी पत्रकारांनी त्यांचे राज व उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाकडे लक्ष वेधले. त्यावर फडणवीस उपरोधिकपणे म्हणाले, मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी दोन बंधू एकत्र आणण्याचे श्रेय मला दिले. श्रद्धेय बाळासाहेबांचे आशीर्वाद हे मलाच मिळत असतील. पण मला असे सांगण्यात आले होते की, तिकडे विजयी मेळावा होणार आहे. पण त्या ठिकाणी रुदालीचे भाषण झाले. मराठीवर एक शब्दही न बोलता, आमचे सरकार गेले, आमचे सरकार पाडले, आम्हाला सरकारमध्ये न्या, आम्हालाच निवडून द्या असे म्हटले गेले. हा मराठीचा विजयोत्सव नव्हता, ही रुदाली होती. या रुदालीचे दर्शन आपल्याला त्या ठिकाणी झाले. मुळात मुंबई महापालिका 25 वर्षे त्यांच्या ताब्यात होती. त्यानंतरही त्यांना दाखवण्यासारखे एकही काम करता आले नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही मुंबईचा चेहरा बदलला. त्यांच्या काळात मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला. उलटपक्षी आम्ही बीडीडी चाळीतील मराठी माणसांना, पत्राचाळीतील मराठी माणसांना, अभ्युदय नगर येथील मराठी माणसांना त्याच ठिकाणी हक्काचे मोठे घर दिले. याची असुया त्यांच्या मनामध्ये आहे. आमच्यासोबत मराठी, अमराठी सर्वच ये पब्लिक है सब जानती है. त्यामु्ळे मुंबईतील मराठी असो की अमराठी माणूस असो, सर्वच आमच्यासोबत आहेत. आम्ही मराठी आहोत. आम्हाला मराठी असल्याचा अभिमान आहे. मराठी भाषेचा अभिमान आहे. पण त्याचवेळी आम्ही हिंदू आहोत. आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे. आमचे हिंदुत्व हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ठणकावून सांगितले. राज यांनी दिले होते फडणवीसांना श्रेय तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपरोधिकपणे दोन्ही भावांना एकत्र आणण्याचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. मी मागे माझ्या मुलाखतीत म्हटले होते की, कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा माझ्यासाठी महाराष्ट्र व मराठी माणूस मोठा आहे. त्या वक्तव्यापासून राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. पण एक गोष्ट खरी, जे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जमले नाही, राज्यातील कुठल्याही नेत्याला किंवा व्यक्तीला जमले नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमले. आम्हा दोघांना एकत्र आणणे फडणवीसांना जमले, असे ते म्हणाले होते. हे ही वाचा... आमच्यातील आंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला:उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर घणाघात; राज यांचा सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच्यावर सडकून टीका केली. आमच्यात (राज व उद्धव) असणारा आंतरपाट आज अनाजीपंतांनी दूर केला. आम्ही एकत्र आलोत. एकत्र राहण्यासाठी. हे पाहून अनेक बुवा- महाराज आज बिझी आहेत. कुणी लिंबू कापतंय, कुणी टाचण्या मारतंय, तर कुणी गावी जाऊन अंगारे-धुपारे करत आहेत. कदाचित रेडेही कापत असतील, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदीची सक्ती तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही सत्ताधारी भाजपला दिला. वाचा सविस्तर
राज व उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यात आगामी निवडणुकांसाठी एकत्र येण्याचे संकेत दिलेत. त्यांच्या या युतीवर सत्ताधारी भाजपने सडकून टीका केली आहे. वरळीचा कार्यक्रम हा कौटुंबिक स्नेहमिलनाचा होता. ही भाषेसाठी नव्हे तर निवडणुकीसाठी केलेली जाहीर मनधरणी होती, असे भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले आहे. आशिष शेलार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, ही भाषेसाठी नाही तर निवडणुकीसाठी केलेली जाहीर मनधरणी आहे. महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता भाऊबंदकी आठवली. ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता. त्यात भाषेचे प्रेम वगैरे काही नव्हतेच... आणि ते यांच्या लेखी नाहीच! महापालिकेतील सत्ता मिळवण्यासाठी आणि पुन्हा मुंबईची लुटमार... त्यासाठी सत्ता.. यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड आहे. श्रीमान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे.. निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब तहात जिंकण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीकेची झोड तत्पूर्वी, उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात हिंदीच्या सक्तीवरून भाजप विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आज आम्ही (राज व उद्धव) एकत्र आलो आहोत. पुन्हा आपल्यात काड्या घालण्याचे काम होईल. अनाजी पंतांचा तो धंदाच आहे. कुणाच्याही लग्नाला भाजपवाल्यांना बोलावू नका. ते येतील श्रीखंड, बासुंदी खातील आणि नवरा बायकोत भांडणे लावून दुसऱ्या लग्नाला जेवायला जातील. बरे, एवढे केले तर पुरे. पण ते पोरीलाच पळवून घेऊन जातील. कारण, यांचे स्वतःचे असे काहीच नाही. भाजप कोणत्याही लढ्यात नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही तो नव्हता. भाजप हा सर्वात शेवटी आला आणि 57 ची निवडणूक झाली की हे सर्वात अगोदर बाहेर पडले. तेव्हा त्यांचे नाव जनसंघ असे नाव होते. आम्ही त्यांच्याकडून देशाभिमान व महाराष्ट्राभिमान शिकायचा का? हे लोक मुंबईच्या चिंधड्या उडवत आहेत. अख्खी मुंबई एका व्यक्तीच्या घशात घालत आहेत. आपण केवळ बघत बसायचे का. आज मुंबईतील सर्वात जास्त जागेचा कुणी मालक असेल तर तो यांच्या मालकाचा मित्र आहे तो म्हणजे अदानी. कुणाची जागा? कुणी रक्त सांडले? हुतात्माच्या बलिदानाने मिळालेली मुंबई आपण राखू शकणार नसू, तर आपल्याला लाज वाटली पाहिजे. त्यामुळे आपण रक्ताची शपथ घेऊन आपण मुंबई व मराठीच्या रक्षणासाठी उभे राहिले पाहिजे. यापुढे आम्ही मराठी व महाराष्ट्र धर्माचे रक्षण करणार, असे ते म्हणाले होते. हे ही वाचा... आमच्यातील आंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला:उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर घणाघात; राज यांचा सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख मुंबई - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच्यावर सडकून टीका केली. आमच्यात (राज व उद्धव) असणारा आंतरपाट आज अनाजीपंतांनी दूर केला. आम्ही एकत्र आलोत. एकत्र राहण्यासाठी. हे पाहून अनेक बुवा- महाराज आज बिझी आहेत. कुणी लिंबू कापतंय, कुणी टाचण्या मारतंय, तर कुणी गावी जाऊन अंगारे-धुपारे करत आहेत. कदाचित रेडेही कापत असतील, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदीची सक्ती तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही सत्ताधारी भाजपला दिला. वाचा सविस्तर
नाशिक जिल्ह्यात मोठा भूखंड घोटाळा उघड
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील संगमेश्वर परिसरात गट क्रमांक १४/अ या ग्रीन झोन क्षेत्रातील जमिनीवर अवैध भूखंड वाटपाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जमिनीचे १६ मोठ्या तुकड्यांमध्ये विभाजन करून त्यातून तब्बल २७२ लहान भूखंड तयार करण्यात आले. विशेष म्हणजे, यापैकी २५८ भूखंडांची नोंदणीही अधिका-यांकडून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी तत्कालीन प्रांताधिकारी उदय […] The post नाशिक जिल्ह्यात मोठा भूखंड घोटाळा उघड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
चाकणकर-खडसे यांच्यात पुन्हा जुंपली
जळगाव : प्रतिनिधी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीचे अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप झाले. रोहिणी खडसे यांनी चाकणकर यांची योग्यताच काढली. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. रोहिणी खडसे यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि त्यांच्या पत्नी सीमा नाफडे यांच्यात कौटुंबिक वाद आहे. या […] The post चाकणकर-खडसे यांच्यात पुन्हा जुंपली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मनसैनिकांनी फोडले सुशील केडियांचे ऑफिस
मुंबई : प्रतिनिधी मुंबईतल्या वरळी डोममध्ये एकीकडे मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आज विजयी मेळावा पार पडतो आहे. तर दुसरीकडे मराठी भाषेवरून राज ठाकरे यांना चॅलेंज देणा-या सुशील केडियांचे ऑफिस मनसे कार्यकर्त्यांनी फोडले आहे. सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत थेट आव्हान दिले होते. आता मनसैनिकांनी त्यांच्या स्टाईलमध्ये केडिया यांना […] The post मनसैनिकांनी फोडले सुशील केडियांचे ऑफिस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्यातील कंत्राटदारांचे ८९ हजार कोटी रुपये थकले
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कंत्राटदार आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंते संकटात सापडले आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून या कंत्राटदारांची बिले मिळालेली नाहीत. त्यामुळे राज्यभर ठीकठिकाणी आंदोलने होऊ लागली आहेत. महाराष्ट्र शासन एकीकडे हजारो कोटींच्या नव्या योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे दावे करतात. प्रत्यक्षात मात्र राज्य शासनाकडे विकास […] The post राज्यातील कंत्राटदारांचे ८९ हजार कोटी रुपये थकले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबईतील एका व्यक्तीने आपल्या मेहुण्याला लग्नात मदत करण्याच्या उद्देशाने आपल्या पत्नी आणि सासूला काळ्या जादूशी संबंधित काही विधी विवस्त्र होऊन करण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपीने त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे नग्न फोटो काढले. त्यानंतर त्याने या फोटोंसह तिला अजमेरला बोलावले. पीडिता जेव्हा अजमेरला फोटो घेऊन गेली तेव्हा आरोपीने ते फोटो महिलेच्या वडिलांना आणि भावाला व्हाट्सअॅपवर पाठवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा उत्तर प्रदेशातील देवरियाचा रहिवासी आहे. ही संपूर्ण घटना एप्रिल ते जुलै दरम्यान नवी मुंबईतील आरोपीच्या घरी घडली. पीडितेने ३ जुलै रोजी वाशी पोलिस ठाण्यात धाव घेतली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात जादुटोणाविरोधी कायदा लागू आहे महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि मानवबळी विरोधी कायदा २०१३ आहे. या कायद्याचा उद्देश समाजात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र, काळी जादू, मानवीबळी आणि अघोरी कुप्रथा थांबवणे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे आहे. या कायद्यानुसार, मानवी बलिदानाची योजना आखणे किंवा ते करणे आणि काळी जादू करून, भूतबाधा करून किंवा देव-देवतांच्या नावाखाली घाबरवून एखाद्या व्यक्तीचे शोषण करणे किंवा मानसिक त्रास देणे हा कायदेशीर गुन्हा आहे. नग्न पूजा करून, शारीरिक छळ करून, राख देऊन किंवा ताबीज देऊन समस्या सोडवण्याचा दावा करणे हा गुन्हा आहे. महिलांचे लैंगिक शोषण करणे किंवा त्यांच्यावर मानसिक दबाव आणून तांत्रिक विधी करणे हे दंडनीय आहे. भूत, ग्रह, तारे, देव किंवा शापांच्या नावाखाली पीडितेला घाबरवण्यासाठी आणि धर्माच्या नावाखाली फसवणूक किंवा अमानुष वर्तन करण्यासाठी देखील शिक्षा होऊ शकते.
त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदी सक्तीला विरोध करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 18 वर्षानंतर एका व्यासपीठावर आले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वच राजकीय पक्षातील उपस्थित नेते यांना देखील व्यासपीठावर आमंत्रीत करण्यात आले होते. मात्र या सर्वात आदित्य ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही एकत्र व्यासपीठावर आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी हात पकडून आदित्य ठाकरे यांना राज ठाकरे यांच्या बाजूला उभे केले. तर उद्धव ठाकरे यांनी देखील अमित ठाकरे यांना आपल्या बाजूला बोलावून घेतले. या विजयी मेळाव्यानंतर ठाकरे कुटुंबांनी एकत्र येत फोटो काढले. यावेळी आदित्य ठाकरे हे राज ठाकरे यांच्या बाजूला तर अमित ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या बाजूला उभे होते. सुप्रिया सुळे यांनी या दोघांना बाजूला उभे केले. त्यामुळे ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्याची इच्छा असणाऱ्या अनेकांचे नेत्र सुखावले, असेच म्हणावे लागेल. उद्धव ठाकरेंकडून अनाजीपंत म्हणत फडडणवीसांचा उल्लेख या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आमच्या दोघांमध्ये जो अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काही तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलोत. एकत्र राहण्यासाठी... मला कल्पना आहे की, अनेक बुवा, महाराज हे बिझी आहेत. कुणी लिंबू कापतंय, कुणी टाचण्या मारतंय, कुणी गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल, रेडे कापत असतील. त्या सर्वांना सांगतो की, या भोंदूपणाविरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही तुमच्यापुढे उभे टाकलो आहोत. ते पुढे म्हणाले, भाषेवरून एखादा विषय निघतो, तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही. मधल्या काळात अगदी दोघांनी म्हणजे मी व राज काय आपण सर्वांनी या नतदृष्टांचा अनुभव घेतला आहे. वापराये आणि फेकून द्यायचे. आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आजपर्यंत वापर करून घेतलात, अरे डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत होते. कोणत्या भाषेत बोलत होतात. राज यांनी सर्वांच्या शाळा काढल्या, पण मोदींची शाळा कोणती? सर्वात उच्चशिक्षित आहेत.
संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे आषाढी एकादशी निमित्त रविवारी ता. 6 सुमारे 1.50 लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज असून त्यादृष्टीने संस्थानकडून जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी किर्तनकार यांनी दिली आहे. संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण मराठवाड्यातून भाविक दर्शनासाठी येतात. भाविकांची सोय व्हावी तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेऊन संस्थानच्या वतीने 60 बाय 140 व 30 बाय 130 चौरस फुट आकाराचे दोन वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी ता. 6 सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते महापूजा होणार आहे. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, संस्थानचे विश्वस्त मनोज आखरे, द्वारकादास सारडा, भिकुलाल बाहेती, माजी सभापती संजय उर्फ भैय्यासाहेब देशमुख, ब्रिजलाल तोष्णीवाल, राहुल नाईक यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. सकाळी महापूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. आषाढी एकादशीमुळे सकाळपासूनच भाविकांची गर्दी होणार असून दिवसभरात सुमारे 1.50 लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. या भाविकांसाठी गिलोरी येथील माणिकराव लोडे यांच्या वतीने सुमारे 40 ते 50 क्विटल साबुदाणा खिचडीचे वाटप केले जाणार आहे. या शिवाय नर्सी नामदेव पोलिस ठाणे व पोलिस मुख्यालयातील सुमारे 100 पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दिव्यांग भाविकांना थेट दर्शनाची सोय यावेळी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दिव्यांग भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दर्शनासाठी आलेल्या दिव्यांग भाविकांना थेट दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी स्वंयसेवक मदत करणार त्यांना मदत करणार असल्याचे संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी किर्तनकार यांनी सांगितले.
मराठी बोलणार नाही, काय करायचे ते करून घ्या, असे वक्तव्य करत महाराष्ट्रामध्ये वादाची ठिणगी टाकणारे मुंबईतील गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी अखेर माफी मागितली आहे. सुशील केडिया यांचे कार्यालय मनसैनिकांनी आज सकाळीच फोडले होते. त्यानंतर सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांची माफी मागितली आहे. या संदर्भात केडिया म्हणाले की, मला माफ करा, माझे वक्तव्य मी मागे घेतो. मात्र राज्यातील खराब झालेले वातावरण ज्यांना शक्य असेल त्यांनी नीट करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील त्यांनी मराठी जनतेची आणि राज ठाकरे यांची माफी मागितली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडले मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुप्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांचे कार्यालय फोडले आहे. केडिया यांनी परवा एका पोस्टद्वारे मी मराठी बोलणार नाही असे ठणकावून सांगितले होते. तसेच तुम्हाला काय करायचे ते करा असे आव्हानही त्यांनी राज ठाकरे यांना दिले होते. त्यांच्या या विधानामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी आज सकाळी त्यांच्या कार्यालयावर दगडफेक केली होती. काय म्हणाले होते सुशील केडिया? मागील 30 वर्षे मी मुंबईत राहिलो. त्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तसेच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात, ते पाहता तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. काय करावे लागेल बोल? असे सुशील केडिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. केडिया यांनी आपले हे ट्विट थेट राज ठाकरे यांनाही टॅग केले होते. त्यामुळे या प्रकरणी मोठा वाद निर्माण झाला होता.
राज्य सरकारने इयत्ता पहिलीपासून तृतीय भाषा शिकवण्याचा घेतलेला निर्णय अखेर मागे घेतला असून, यानंतर ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या विजयी मेळाव्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला. मराठी भाषेच्या सन्मानासाठी उभारलेल्या लढ्याला मिळालेलं हे यश म्हणजे मराठी अस्मितेच्या संघटीत शक्तीचं प्रतीक असल्याचे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. यामुळे आता आगामी निवडणुकीत नवी राजकीय समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही पहिल्यांदाच एका मंचावर एकत्र आले. “मोर्चा निघाला असता, तर मराठी माणसाची एकजूट संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली असती. मात्र, फक्त चर्चा झाल्यावरच सरकारने पावले मागे घेतली,” असे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावर उद्धव ठाकरे यांनीही सरकारच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टीका केली. 'हे' राजकीय नेते होते उपस्थित या विजयी मेळाव्याला राज्यातील विविध राजकीय पक्षांचे नेतेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे, रासपचे महादेव जानकर, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, रिपब्लिकन पार्टीचे सचिन खरात, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, प्रकाश रेड्डी यांच्यासह अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित होते. या एकत्रित उपस्थितीमुळे राज्याच्या राजकारणात नवा बदल घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. राज ठाकरे काय म्हणाले? राज ठाकरे म्हणाले की, मी एक पत्र लिहले, दुसरे लिहले मग दादा भुसे माझ्याकडे आले.मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो समजून घ्या. ऐकूण घ्या. म्हटले दादा तुम्हाला एक सांगतो तुम्ही काय सांगता ते ऐकूण घेईल पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्र हे केवळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील दूवा म्हणून आणण्यात आले. आज सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात इंग्रजी आहे तिथे हे सूत्र नाही. केंद्रीय शैक्षणिक धोरणातही हे सूत्र नाही.इतर कोणत्या राज्यात ही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करुण पाहिला. दक्षिणेतील राज्य तर यांना विचारतही नाही. पण महाराष्ट्र पेटून उठला की काय होते हे सत्ताधाऱ्यांना दिसले असेल. त्याशिवाय का माघार घेतली. उद्धव ठाकरेंचे वक्तव्य काय? बऱ्याच दिवसानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. त्याने माझा उल्लेख सन्मानीय असा केला. त्याचेही कर्तुत्व आपण सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे मी देखील सन्मानीय राज ठाकरे यांचा असा उल्लेख करतो. आज आम्ही एकत्र आलो हे जास्त महत्त्वाचे असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सरकार येते, सरकार जाते. मात्र, आपली ताकद एकजुटी मध्ये असायला हवी. सरकार येईपर्यंत मराठी माणूस एकत्र येतो. आणि सरकार आले की, एकमेकांचे पाय खेचतो, अशी खंत देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावर बसले असल्याचेही उद्धव यांनी म्हटले आहे.
एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच
मुंबई : प्रतिनिधी तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच अशी मोठी घोषणा केली. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा सूत्रातील हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज मुंबईत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विजयी मेळावा पार […] The post एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सन्माननीय उद्धव ठाकरे, जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो…
मुंबई : राज्यात ‘हिंदी सक्ती’चा निर्णय महायुती सरकारकडून झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच संतापाची लाट पसरली. याविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच सरकारला हिंदी सक्तीचा जीआर रद्द करावा लागला. या सर्व पार्श्वभूमीवर आज (५ जुलै) विजय मेळावा वरळी डोममध्ये झाला. या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी हिंदी […] The post सन्माननीय उद्धव ठाकरे, जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो… appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ठाकरे बंधूंना पाहण्यासाठी मराठी माणूस एकवटला
मुंबई : प्रतिनिधी ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला याचि देही, याचि डोळा अनुभवण्यासाठी नागरिकांनी वरळी डोमबाहेर गर्दी केली . डोममधील आसनव्यवस्था पूर्ण भरलेली असतानाही त्यापेक्षा दुप्पट गर्दी डोमबाहेर झालेली पाहायला मिळाली. ज्यानंतर गेटबाहेर उभ्या असलेल्या नागरिकांनी गेट तोडून आतमध्ये प्रवेश मिळवला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव […] The post ठाकरे बंधूंना पाहण्यासाठी मराठी माणूस एकवटला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
५ लाख विद्यार्थ्यांनी घेतला ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’चा लाभ
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील काही भागात १६ जूनपासून शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणा-या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येत आहेत. केवळ १५ दिवसांत म्हणजे १६ ते ३० जून या कालावधीत तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष […] The post ५ लाख विद्यार्थ्यांनी घेतला ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’चा लाभ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सन्माननीय उद्धव ठाकरे म्हणत राज ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरवात केली. दोघांची भाषणे संपले की एकत्र आरोळ्या ठोक्या. आज मोर्चा निघायला पाहिजे होता, मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचे एक चित्र मोठ्या प्रमाणावर उभे राहिले असते. नुसत्या मोर्चाच्या चर्चेने माघार घ्यावी लागली असे म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मराठी हा मोर्चाचा अजेंडा, कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जे बाळासाहेबांना जमले नाही ते आज घडले. आजचा हा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. संपूर्ण मैदान ओसंडून वाहिले असते. पाऊस असल्याने जागा मिळत नाही म्हणून हा कार्यक्रम इथे करावा लागला. माझ्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे.आज जवळपास 20 वर्षांनंतर मी आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येत आहोत. जे माननीय बाळासाहेब ठाकरे यांना जमले नाही, जे अनेकांना जमले नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचे ते देवेंद्र फडणवीस यांना जमले. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात राज ठाकरे म्हणाले की, मुळ विषय सोडून अनेकांना बाकीच्या गोष्टीमध्ये जास्त रस असतो. सायंकाळी आता चर्चा सुरू होतील की कोण कमी हसले, कोण कमी बोलले. आजचा हा मेळावा कुठलाही झेंडा न घेता मराठी ही अजेंडा समोर ठेवून घेण्यात आला आहे. महाराष्ट्राकडे कुणी वेडा वाकड्या नजरेने पाहायचे नाही. हिंदीचा प्रश्नच नव्हता अचानक कुठून हा विषय आला. लहान मुलांना हिंदी शिकावी ही जबरदस्ती तुम्ही करत आहात.कुणाला काहीच विचारायचे नाही शिक्षण तज्ञांचे मत विचारात घ्यायचे नाही. केवळ आमच्याकडे बहुमत आहे म्हणून आम्ही निर्णय लादणार.तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात रस्त्यावर आमच्याकडे सत्ता आहे. फक्त महाराष्ट्रात प्रयोग केला राज ठाकरे म्हणाले की, मी एक पत्र लिहले, दुसरे लिहले मग दादा भुसे माझ्याकडे आले.मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो समजून घ्या. ऐकूण घ्या. म्हटले दादा तुम्हाला एक सांगतो तुम्ही काय सांगता ते ऐकूण घेईल पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्र हे केवळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील दूवा म्हणून आणण्यात आले. आज सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात इंग्रजी आहे तिथे हे सूत्र नाही. केंद्रीय शैक्षणिक धोरणातही हे सूत्र नाही.इतर कोणत्या राज्यात ही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करुण पाहिला. दक्षिणेतील राज्य तर यांना विचारतही नाही. पण महाराष्ट्र पेटून उठला की काय होते हे सत्ताधाऱ्यांना दिसले असेल.
राजधानी रायगडावर 70 वर्ष हिराबाईंचा ताक विक्रीचा व्यवसाय
राजधानी रायगडावर 70 वर्ष हिराबाईंचा ताक विक्रीचा व्यवसाय
ठाकरे बंधुंनी एकत्र यावे आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. ते दोघे एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे आमच्या शुभेच्छा आहेत. दोघे भाऊ एकत्र यावे, एकत्र रहावे. आवश्यक असेल तर दोन पक्षाचा एक पक्ष करावा असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. सुधीर मुनगंटीवार पुढे बोलताना म्हणाले की, मराठी माणसांनी इंग्रजरी शिकणं हा अभिमान आणि पराक्रम आहे.पण हिंदी शिकणं म्हणजे मराठीचा अवमान हे मात्र अजून मला समजले नाही.कदाचित अजून 50 ते 100 पुस्तक वाचले की ते माझ्या लक्षात येईल असा टोलाही त्यांनी लगावला आहे. सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले? सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मराठी या विषयावर दुरपूर्यत काही राजकारण झालेले नाही. हा गैरसमज का पसरवला जात आहे. उद्धव ठाकरे मुचख्यमंत्री असताना एक समिती नियुक्त करण्यात आली होती. त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषा ही पाचवीपासून सक्तीची आहे, ती पहिलीपासून मराठी आणि इंग्रजीसोबतच बालवयात तिसरी भाषा सुद्धा शिकता यावी म्हणून उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेल्या समितीने शिफारस केली. मराठी, इंग्रजीसोबतच पहिल्या वर्गापासून हिंदी शिकवली तर शिकता येते. यात मराठीचा काय संबंध? मराठी आनिवार्य आहे, आणि राहणारच आहे याबद्दल कुठेही प्रश्नचिन्ह नाही. शिंदेंच्या वक्तव्यांचे केले समर्थन सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, काँग्रेसने स्पष्ट केले आहे की ठाकरे बंधू जर एकत्र आले तर आपण यांच्यासोबत जायचे नाही. या वातावरणामध्ये कारण नसताना राज्यात गैरसमज कसे पसरतील हे महत्त्वाचे आहे. एकनाथ शिंदेंनी जय गुजरात म्हटले म्हणून वादंग निर्माण करण्याचे काम काय आहे. राष्ट्रगीत म्हणताना सर्वच राज्यांचा आपण जयजयकार करतोच ना? प्रतिज्ञा म्हणत असताना आपण भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे असे म्हणतो ना? आम्ही सर्व एक आहोत. जय गुजरात आणि जय उत्तर प्रदेश म्हटले म्हणून आम्ही छोटे होतो का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुप्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांचे कार्यालय फोडले आहे. केडिया यांनी परवा एका पोस्टद्वारे मी मराठी बोलणार नाही असे ठणकावून सांगितले होते. तसेच तुम्हाला काय करायचे ते करा असे आव्हानही त्यांनी राज ठाकरे यांना दिले होते. त्यांच्या या विधानामुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी आज सकाळी त्यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याच्या या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे मुंबईतील तणाव वाढण्याची शक्यता आहे. आम्ही हे सातत्याने अपडेट करत आहोत...