करमाळा करमाळा जिल्ह्यातील सर्वाधिक दुग्ध उत्पादन करणारा तालुका व्हावा याकरिता सर्वांनी एकजूट होऊन प्रयत्न करावेत, दुधापासून प्रक्रिया करून विविध दुग्धजन्य पदार्थ तयार करावेत, लोकमंगल बँकेच्या विविध महामंडळाच्या (व्याज परतावा ) योजनांचे तसेच फूड प्रोसेसिंग योजनेचा लाभ देऊन मदत करण्यास मी तयार आहे, असे मत लोकमंगल बँकेचे अध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. लोकमंगल बँक व दूध डेअरी चेअरमन असोसिएशन करमाळा व छत्रपती दूध संकलन व शीतकरण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहसंवाद मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी छत्रपती दूध संकलन केंद्राचे अजिंक्य पाटील व शिवाजी पाटील, लोक विकास डेअरीचे चेअरमन दीपक देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे महेश चिवटे, बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय आडसुळ उपस्थित होते. करमाळा येथे आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन आमदार सुभाष देशमुख. समोर उपस्थितीत शेतकरी. दूध उत्पादन वाढीसाठी बँकेच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्याची देशमुख यांनी ग्वाही दिली. प्रातिनिधिक स्वरुपात दूध संकलन केंद्र चालकांना बँकेच्या वतीने अण्णासाहेब पाटील महामंडळ अंतर्गत मंजूर झालेल्या कर्जाच्या धनादेशाचे वितरण केले. दूध संस्था चालकांनी पशुखाद्य निर्मिती करून शेणखत तयार करून, गोमूत्र प्रक्रिया उद्योग सुरू करावेत. शेतकऱ्यांनी दुधाचे उत्पादन वाढवून आर्थिक सक्षम व्हावे, असे आवाहन केले.
सिध्दापूर येथील भीमा नदीच्या पात्रात स्वयंभू मातृलिंग नावाने आेळखल्या जाणाऱ्या स्वयंभू गणेशाची बुधवारी सूर्यादयास सुरु झालेली यात्रा सूर्योस्ताला संपली. नदीपात्रात पाणी असल्यामुळे भाविकांना मुख्य मंदिरापर्यंत जाता आले नाही, त्यामुळे मुख्य यात्रा झाली नाही. उत्सव मूर्तीची पूजा करून मूर्तीचे दर्शन घेऊन भाविकांना समाधान मानावे लागले गुरुवारी पहाटे ६ वाजता संत दामाजी मंदिर समितीचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे ,युवानेते प्रणव परीचारक,पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.वेदपंडीत राम कुलकर्णी यानी पुजेचे पौरहित्य केले. भक्त आपले नवस फेङण्यासाठी सोन्याचादीचे कडदोरे,जानवे ,पाळने पैजन,पादुका वस्तु दान देत होते. संध्याकाळी ७ वाजता श्री मातृ लिंग गणेशाची उत्तर पूजा प्रांताधिकारी बी.आर .माळी व तहसीलदार मदन जाधव यांच्या हस्ते करण्यात आली.त्यानंतर गावात श्री च्या पालखीचे सवाध्य मिरवणूक काढण्यात आली. संध्याकाळी श्रीच्या पालखीसमोर शोभेच्या दारुकामाची अतिषबाजी करण्यात आली. रात्री ९.३० वाजता भाविकाच्या मनोरंजनासाठी कन्नड सामाजिक नाटक मगा तंद मांगल्या अर्थात छल साधीसिद चतुरचे सादरीकरणमातृलिंगमं दीर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. मंदीर समिती ट्रस्टकडुन बापुराया चौगुले यांच्याकडून स्वागत करण्यात येत होते.दिवसभरात भैरवनाथ कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत, जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख यांनी दर्शन घेतले. पाण्यासाठी भाविकांची गैरसोय, चोरीच्या चार घटना सलग पाच वर्षापासून यात्रेस विक्री करण्यासाठी येणाऱ्या विक्रेत्यांकडून यात्राकर न घेतला जात नव्हता, प्रथमच यात्रेकरूंकडून जागेचा कर घेतल्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली,भाविकांना त्याठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणीव स्वच्छतागृहाची व्यवस्था नव्हती ,यात्रेमध्ये दुचाकी व चारचाकीवाहनांना पार्किंगची व्यवस्था करण्यात आली नव्हती. पोलिसांचा बंदोबस्त असतानाही चोरीच्या चार घटना घडल्या. कुडल संगमच्या धर्तीवर सिध्दापूर येथे विकास करण्याची मागणी भाविकांतून होत आहे.
अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग ग्रंथ दाखवतात. समाजात घडत असलेल्या घटनांचे, परिस्थितीचे वास्तव चित्र साहित्य समोर ठेवते. माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे. माणसातील माणूसपण जागं करण्यासाठी वाचन आवश्यक आहे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. डॉ. भगवान आदटराव यांनी केले. ते मंद्रूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात रासेयो, भाषा विभाग व आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमांतर्गत वाचन कौशल्य कार्यशाळेप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. जवाहर मोरे होते. या वेळी समन्वयक ग्रंथपाल प्रा. विनायक गडगी, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. एच. एल. जाधव, प्रा. आर. एम. काळे उपस्थित होते. ग्रंथालय विभागात दि. ६ रोजी सामूहिक वाचन झाले. तर दि. ११ रोजी वाचन कौशल्य कार्यशाळा झाली. दि. १५ रोजी ग्रंथ परीक्षण स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. संतोष पाटील महाविद्यालयात ग्रंथ परीक्षणातील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्र. प्राचार्य डॉ. जवाहर मोरे, प्रा. डॉ. भगवान आदटराव, प्रा. डॉ. एच. एल. जाधव, प्रा. विनायक गडगी आदी. ग्रंथ वाचनाने येते प्रगल्भता, क्रमिकबरोबर अन्य पुस्तके वाचा विविध प्रकारच्या ग्रंथांचे वाचन केल्याने प्रगल्भता येते. इतिहासाची जाण आणि वर्तमानाचे भान ग्रंथांमुळे येण्यास मदत होते. त्यामुळे क्रमिक पुस्तकांबरोबरच विद्यार्थ्यांनी नियमित अवांतर वाचन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्र. प्राचार्य डॉ. जवाहर मोरे यांनी केले.
सोलापूर मंगळवारी प्रयागराज येथे निधन झाल्यानंतर बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास जुना पुणे नाका स्मशानभूमीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी महापौर महेश कोठे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी सायंकाळी ४.१५ वाजता कोठे यांचे पार्थिव विमानाने सोलापूर विमानतळावर आणण्यात आले. तेथून सजविण्यात आलेल्या वाहनातून विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे शाळेच्या प्रांगणात पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथे शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने तेथे एक तास नागरिकांची रांग लागली होती. विडी घरकुल येथून महेश कोठे यांचे पार्थिव मुरारजी पेठेतील राधाश्री निवासस्थानी ६.४५ वाजता आणण्यात आले. तेथे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पार्थिवाचे पुष्पहार घालून दर्शन घेतले. निवासस्थानी गर्दी झाल्याने तेथेही तासभर वेळ लागला. या ठिकाणी महेश कोठे यांचे पुतणे आमदार देवेंद्र कोठे आणि कुटुंबियांचे मान्यवरांनी सांत्वन करीत दुःख व्यक्त केले. ७.४५ वाजता कोठे राजकीयसह विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांनी घेतले अंतिम दर्शन काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य, खासदार प्रणिती शिंदे, पोलिस आयुक्त एम राजकुमार, माजी आमदार दिलीप माने, सिद्धाराम म्हेत्रे, प्रकाश यलगुवार, विश्वनाथ चाकोते, माजी महापौर शोभा बनशेट्टीे, आरिफ शेख, जनार्दन कारमपुरी, पद्मशाली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष कंदकटला स्वामी, सोलापूरचे अध्यक्ष सुरेश फलमारी आदी आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी | नाझरे विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीबरोबरच विविध प्रकारच्या कलागुणांचा विकास करणे, त्या विद्यार्थ्यास समाजात सक्षम नागरिक म्हणून तयार करणे या तत्त्वाने विद्यामंदिर परिवारातील प्रत्येक शिक्षक काम करत आहे. विद्यामंदिरच्या कोणत्याही शाखेत प्रवेश म्हणजे विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाची हमी असते. सर्वगुण संपन्न विद्यार्थी निर्माण करणे हेच विद्यामंदिर परिवाराचे ब्रीद असल्याचे प्रतिपादन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले. नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित केलेल्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे कवी ज्ञानेश डोंगरे, प्राचार्य बिभीषण माने, प्राचार्य मंगल पाटील, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रियांका कांबळे, गुणवंत विद्यार्थी पालक कन्हैया देशपांडे, रवी चव्हाण आदी उपस्थित होते. नाझरा विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलचे दुसरीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले. प्राचार्य मंगल पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे कवी ज्ञानेश डोंगरे यांनी विविध प्रकारच्या कवितांचे गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विविध प्रकारचे अनुभव व विनोद सांगत विद्यार्थ्यांना हसता हसता अंतर्मुख केले. सीनियर केजीमधील विद्यार्थी कैवल्य देशपांडे व इयत्ता चौथीतील श्रेया चव्हाण यांना गुणवंत विद्यार्थी म्हणून ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. स्वप्निल मिसाळ व गोरख आदाटे यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी रक्कम दिल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन पल्लवी शिंदे यांनी केले. प्रमाणपत्र वाचन ज्योती आदाटे, मोनिका यलमार, पल्लवी सरगर यांनी केले. या वेळी विद्यार्थी उपस्थित होते. विविध स्पर्धा विजेत्यांना पदक अन् प्रमाणपत्र स्नेहसंमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा, आठवडी बाजार, डान्स स्पर्धा तसेच माता पालकांसाठीच्या स्पर्धा कप मनोरा, संगीत खुर्ची, बँगल्स गेम इत्यादी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण झाले. रंग उत्सव सेलिब्रेशन मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या थम्ब पेंटिंग, कलरिंग कॉम्पिटिशन, हॅन्ड रायटिंग कॉम्पिटिशन इत्यादी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. क्रीडा स्पर्धामध्ये मुलांनी सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक व प्रमाणपत्र देण्यात आले.
अकोला अकोलेकरांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या डाबकी रेल्वे गेट अंडरपासच्या कामाला नुकतीच मंजूरी मिळाली आहे. कामासाठी आवश्यक टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अंडरपासचे डिझाईन आयआयटीच्या प्राध्यापकांनी तयार केले आहे. ते अंतिम टप्प्यातील मंजुरीसाठी एनआयटी भोपाळकडे आहे. दोन दिवसात तिही प्राप्त होणार आहे. परिणामी बांधकामासाठी आवश्यक जवळपास सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या २५ जानेवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. रेल्वेने काढली निविदा खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. नुकतीच या कामाला मंजूरी मिळाली. मध्य रेल्वेने ४४ कोटीची निविदा काढली आहे. यात तीन ठिकाण रेल्वे अंडरपास तयार करण्यात येणार आहे. यात अकोला डाबकी रेल्वे अंडरपासचा(१२ कोटी) समावेश आहे. उड्डाणपूल झाल्यानंतरही रेल्वे गेट बंद असल्यास छोटे वाहन चालक, दुचाकीस्वारांना ताटकळत उभे राहावेच लागते किंवा त्यांना लांबचे अंतर पार करून उड्डाणपुल चढून मुख्य मार्गावर यावे लागते. भुयारी मार्गाचा सर्वाधिक लाभ छोटी वाहने, दुचाकीस्वारांना होणार आहे. तसेच निमकर्दा, पारस, तेल्हारा, कंचनपूरकडे मुख्यत्वेकरून शिक्षणासाठी छोट्या वाहनांनी अकोल्यात येणारे विद्यार्थी-विद्यार्थ िनींना होणार आहे. दुचाकीस्वारांना फटका डाबकी रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाचे ११ नोव्हेंबर २०२३ रोजी लोकार्पण झाले. डाबकी, गायगाव, शेगाव, तेल्हारा, अकोटकडे जाण्यासाठी व येण्यासाठी उड्डाणपूल महत्त्वाचा ठरत आहे. वाढत्या जड वाहतुकीच्या समस्येपासून सुटका झाली. मात्र दुचाकीस्वारांना रेल्वे गेट बंदचा फटका बसतो. दुचाकीस्वार, लहान वाहनधारकांना होणार सर्वाधिक लाभ निविदा प्रक्रिया पूर्ण ^डाबकी रेल्वे गेट अंडरपासला शासनाकडून मंजूरी मिळाली आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जवळपास सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. अंडरपासचे डिझाईन अंतिम टप्प्याच्या मंजुरीसाठी एनआयटी भोपाळकडे आहे. लवकरच ते उपलब्ध होईल. जानेवारी महिन्याच्या शेवटी प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. - अतुलकुमार सक्सेना, सहाय्यक कार्यकारी अभियंता, मध्य रेल्वे
अकोल्यातून 500 स्वयंसेवक सेवेत दाखल:प्रयागराजमधील कुंभमेळ्यात जिल्ह्यातील 5000 भाविक होणार सहभागी
प्रयागराजमधील कुंभमेळ्यासाठी अकोला येथून ५०० स्वयंसेवकांचे पथक प्रयागराज येथे दाखल झाले आहे. जिल्ह्यातून ५ हजारावर भाविक महोत्सवात सहभागी होणार आहेत. धार्मिक मान्यतेनुसार, पुण्य प्राप्त करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण संधी मानली जाते. यामुळे मोठ्या संख्येत साधू, संत व भाविक कुंभमेळ्याला हजेरी लावतात. यंदा १३ जानेवारीपासून सुरू झालेला कुंभमेळा ५० दिवस चालणार आहे. या निमित्ताने अकोला जिल्ह्यातून वांगेश्वर संस्थानचे प्रमुख स्वामी कमलेशानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनात प्रयागराज येथे अन्नक्षेत्र, तसेच राहण्याची व प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच येथे वैराग्य, पुरुषोत्तम कुटिया उभारणी करण्यात आली. तसेच श्याम कुमार खंडेलवाल व अॅड. महेंद्र शुक्ला यांचा परिवार कारसेवा करण्यासाठी सज्ज आहे. याशिवाय उत्तरकाशी वृंदावन मिर्जापूर येथे महामंडलेश्वर कमलेशानंद सरस्वती स्वतः सेवा देत आहे. यांच्याकडून देण्यात येत आहे कुंभमेळ्यात सेवा अकोला येथून विलास भारती महाराज वाडेगाव यांची १०० स्वयंसेवकांचे पथक, पंचमुखी हनुमान मंदिराचे २५ स्वयंसेवक, अॅड. श्यामकुमार खंडेलवाल यांच्या नेतृत्वात २०० स्वयंसेवक, महेंद्र शुक्ल यांच्यासह १०० स्वयंसेवक महाकुंभमेळ्यात सेवा देत आहेत. याशिवाय विश्व हिंदू परिषदेच्या वतीने ३० लाख भाविकांसाठी दरम्यानच्या काळात अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. अविस्मरणीय अनुभवासाठी अकोल्यातून सेवेकरी रवाना ^अकोल्यातून अनेक धार्मिक संस्थानचे प्रतिनिधी सेवा देण्यासाठी प्रयागराज येथे रवाना झाले आहेत. तसेच समूहाने भाविक स्नानासाठी हजेरी लावत आहेत. हा अनुभव भाविकांसाठी अविस्मरणीय आहे. २६ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातून ५ हजारावर नागरिक कुंभमेळ्या सहभागी होतील, असा प्राथमिक अंदाज आहे. ही संख्या पुढे वाढू शकते. - गिरिष जोशी, जानकी वल्लभो सेवा समिती
‘सॉफ्टवेअर अपडेट’ पूर्ण; आजपासून करवसुली:पंधरा दिवसांपासून करवसुलीचे काम होते ठप्प
अपेक्षित कर वसुली नसल्याने महापालिकेने स्वाती इंडस्ट्रीजचे कर वसुलीचे कंत्राट ३१ डिसेंबर रोजी रद्द केले. त्यानंतर पंधरा दिवस झाले तरी सॉफ्टवेअर अपडेट नसल्याने मनपाने कर्मचाऱ्यांकडून कर वसुलीचे काम सुरू केले नव्हते. दरम्यान, कर वसुलीसाठीचे सॉफ्टवेअर बुधवारी सायंकाळी अपडेट झाले. त्यात आधीचा संपूर्ण डाटा अपलोड झाल्यामुळे गुरुवार, १६ जानेवारीपासून महापालिकेत कर वसुलीचे काम सुरु होईल, अशी माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली. स्वाती इंडस्ट्रीजने ८.४९ टक्के कमिशनवर त्यांच्याकडील सॉफ्टवेअरच्या आधारे वसुली केली. परंतु आता मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी त्यांचे कंत्राट रद्द केल्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्याला मालमत्ता कराची वसुली करावी लागणार आहे; परंतु त्यासाठी आवश्यक महानगर असत असलेले सॉफ्टवेअर मनपा प्रशासनाकडे नाही. महापालिका प्रशासनाने शहरातील स्थापत्य कंपनीकडून सॉफ्टवेअर घेतले असून, हे सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाने स्वाती इंडस्ट्रीजकडून कर वसुलीचा डेटा घेतला असून, हा डेटा अपलोड करण्यात वेळ जात असल्याने, मालमत्ता करवसुली कामास विलंब होत आहे. त्यामुळे महापालिकेत किंवा शहरातील महापालिकेच्या झोन कार्यालयांमध्ये कराचा करण्यासाठी येणाऱ्या मालमत्ताधारकांना परत पाठवण्यात येत होते. युद्धपातळीवर काम सुरू ^महापालिकेने एका कंपनीकडून सॉफ्टवेअर घेतले असून, सॉफ्टवेअर विकसित करुन त्यात करासंबंधीचा संपूर्ण डेटा त्यात अपलोड करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्याची चाचणी यशस्वी झाली. वसुलीचे काम लवकर सुरू व्हावे यादृष्टीने युद्धपातळीवर काम करण्यात येत आहे. गुरुवारपासून वसुलीचे काम तातडीने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. - विजय पारतवार, कर अधीक्षक, मनपा.
गुडधी येथे टाळमृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वरी भावकथा व निरुपण सोहळ्याची सांगता झाली. यावेळी आयोजित आरोग्य शिबिरात अनाथ आश्रमातील मुलांसह २७० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सोहळा हनुमान नवयुवक मंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता. गुडधी येथील हनुमान नवयुवक मंडळातर्फे रविवारी ज्ञानेश्वरी भावकथा व निरुपण सोहळ्याला प्रारंभ झाला होता. कार्यक्रम गुडधी येथील मेन रोडवरील सद्गुरु बिछायत केंद्रा समोरच्या जागेवर पार पडला कथेचा लाभ भक्तांना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील हभप मुकुंदा महाराज पहूर यांच्या अमृत वाणीतून घेतला. रोज राज्यातील हभप यांचे हरिकीर्तन झाले. यात किशोर महाराज पागृत (मोरगाव सादिजन), रमेश महाराज दुबे (दारव्हा), मंगळवारी गोपाल महाराज (भागवताचार्य, आळंदी), गुरुवर्य तुकाराम महाराज सखरामपूरकर (इलोरा), भरत महाराज (म्हैसवाडीकर), दत्तात्रय महाराज (चाळीसगावकर), पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलडाणा), गुरुवर्य गोपाळ महाराज (उरळ) यांचे कीर्तन झाले. आरोग्य तपासणी शिबिर : ज्ञानेश्वरी भावकथा व निरुपण सोहळ्यात गोदावरी फाऊंडेश, जळगाव व रक्ताचं नातं गृपतर्फे आरोपी, हदयरोग तपासणी, मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. आयोजनासाठी श्री संत सखाराम संस्थान (इलोरा, साखरामपूरकर) यांचेही सहकार्य लाभले. शिबिरासाठी रक्ताचं नातं गृपचे संस्थापक विजय गावंडे व संजय तांगडे यांनी नियोजन केले. असा झाला सोहळा ज्ञानेश्वरी भावार्थ कथा दुपारी १२ ते ४ पर्यंत झाला. काकडा पहाटे ५ ते ६ या वेळेत झाले. हरिपाठ सायंकाळी ६ ते ७ या वेळेत झाला. त्यानंतर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले. समारोपप्रसंगी सकाळी ८ ते १० वाजतापर्यंत ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले. दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे वितरण करण्यात करण्यात आले. सोहळा तुकाराम महाराज सखारामपूरकर (इलोरा) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
डॉ. आनंदीबाई जोशी (मुलींच्या) शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राजमाता जिजाऊ तथा स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तथा प्राचार्य शरदचंद्र ठोकरे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य शरद झोडपे, संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य विलास अनासाने होते. मुख्य मार्गदर्शक विकास पल्हाडे, गटनिदेशक रणजीत महल्ले, मुख्य लिपिक जयंत गणोजे उपस्थित होते. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथील विविध व्यवसायातील प्रशिक्षणार्थी, ज्यांनी आपापल्या व्यवसायातून प्रथम द्वितीय तथा तृतीय गुणानुक्रम मिळवला त्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त संस्थेमधून प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक झालेल्यांचा सत्कार करण्यात आला. विकास पल्हाडे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शिल्पनिदेशक प्रशांत बोकाडे यांनी केले. प्रास्ताविक शुभांगी गोपनारायण यांनी केले. भाग्यश्री इंगळे यांनी आभार मानले. आयटीआयमध्ये राष्ट्रीय युवा दिनी गुणवंत प्रशिक्षणार्थींचा सत्कार करण्यात आला.
गत ७५ वर्षांपासून शैक्षणिक सेवा देणाऱ्या राधाकिसन प्लॉट परिसरातील बक्षीराम रुडमल अर्थात बी. आर. हायस्कूलच्या ७५ वर्षानिमित्त अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या निमित्त संस्थेच्या अहिल्यादेवी इंग्लिश प्रायमरी स्कूलचा रौप्य महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली. शुक्रवार, १७ ते सोमवार २० जानेवारीपर्यंत बी. आर. हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित या अमृत महोत्सवात शाळेच्या माजी विद्यार्थिनी, आंतरराष्ट्रीय उद्योजिका पद्मश्री कल्पना सरोज या उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार, १७ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता संविधान दिंडीने या महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. शनिवार, १८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता संस्थेचे अध्यक्ष दिलीप पांडे यांच्या अध्यक्षतेत महोत्सवाचा उद्घाटन सोहळा होणार असून यात प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद नाईक, नाना मोहरील, गिरीश समुद्र, अनंता चोपडे, मुकुंद जालनेकर, राजन सोनटक्के, हरेश शहा, अजय सेंगर, श्याम गोटफळे, विकास मस्के आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुपारी २.३० वाजता शाळेच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक सोहळा होणार आहे. १९ जानेवारीला विविध कार्यक्रम, तसेच सोमवार, २० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता प्रदर्शनी व महोत्सवाचा समारोप सोहळा खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर, आ. वसंत खंडेलवाल, माजी महापौर विजय अग्रवाल, जैनेंद्र लुंकड, दिलीप पांडे आदी उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात विद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी, पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. या पत्रकार परिषदेत यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिलीप पांडे, भूषण बापट, सी. जे. कुलकर्णी, जयप्रकाश पाटील, पुरुषोत्तम खोत, अजय सेंगर, श्याम गोटफोडे, विकास मस्के, प्रवीण सैतवाल, विद्या मोहरीर, छगन खंडारे, सुभाष धार्मिक, अनिल खडसे, प्रवीण झळके, प्रसिद्धी प्रमुख सुहास देशपांडे व समीर थोडगे आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन रविवार, १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट निर्मित २ हजार क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा जिल्हाधिकारी अजित कुंभार, अधीक्षक बच्चन सिंह, मनपा आयुक्त सुनील लहाने यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानंतर माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन होणार असून अजय सेंगर यांच्या अध्यक्षतेत आयोजित या संमेलनाचे उद्घाटन पद्मश्री, डॉ. कल्पना सरोज यांच्या हस्ते होणार आहे. सायं . ५.३० वाजता विद्याभारती विदर्भ संस्कार साधना वार्षिकांक प्रकाशन सोहळा होणार असून यामध्ये विद्याभारती विदर्भ प्रांत अध्यक्ष राम देशमुख, कुमार शास्त्री उपस्थित राहतील.
दर्यापूर येथील साईनगर परिसरातील वसंतनगरात एका घरात भाड्याने राहणाऱ्या १३ तरुणांना मुंबई पोलिस पथकाने बुधवारी १५ जानेवारीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मुंबई पोलिस एका ऑनलाइन फ्रॉडच्या तपासात दर्यापुरात पोहोचले होते. चौकशीअंती बुधवारी रात्री मुंबई पोलिसांनी दोघांना नोटीस दिली आणि चौकशीसाठी मुंबईत बोलवले आहे. मुंबई पोलिसांच्या या कारवाईने शहरात खळबळ उडाली. दरम्यान या १३ तरुणांना दरमहा १५ हजार पगार देऊन ‘वर्क फ्रॉम होम’ सांगून सायबर गुन्हेगारीत ओढण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. मुंबई येथील ना. मा. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात ऑक्टोबर २०२४ मध्ये एका महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल आहे. त्या महिलेची अज्ञात सायबर गुन्हेगारांनी ओटीपी मागून १ लाख ९४ हजारांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी दर्यापुरातील या १३ जणांपैकी एका तरुणाच्या मोबाइलचा आयपी ॲड्रेस तपासात समोर आला. त्या ॲड्रेसच्या लोकेशनवरुन मुंबई पोलिस दर्यापुरात पोहोचले. मुंबई पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने दर्यापुरातील वसंत नगर येथे एका घरात धाड टाकली. त्यावेळी या घरात एकाच ठिकाणी १३ युवक होते. पोलिसांनी या १३ जणांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले होते. पाच ते सहा तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी मुंबईतील गुन्ह्यात सहभाग आढळल्यानंतर दोघांना नोटीस देवून चौकशीसाठी बोलवले आहे. दरम्यान पोलिसांनी तरुणांना ताब्यात घेतानाच २२ मोबाइल, दहा लॅपटॉपसह अन्य साहित्य सुद्धा जप्त केले. या तरुणापैकी दोघांचा समावेश मुंबईतील गुन्ह्यात समोर आला आहे. मात्र या सर्वच तरुणांना १५ हजार महिना देऊन डेटा एन्ट्रीचे काम करावे लागेल, असे सांगण्यात आले होते, मात्र हे तरुण प्रत्यक्षात सोशल मीडियावरील एका ॲपद्वारे युटीआर तपासणे, तसेच ही तपासलेली माहिती समोर देत होते, त्या माहितीचा वापर सायबर गुन्हेगारीसाठी होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान तरुणांना काम देणारा कोण, त्याचा शोध पोलिस घेणार आहेत. ^आमच्या ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आमचे पथक दर्यापुरात पोहोचले आहे. काही तरुणांची चौकशी केली, त्यापैकी दोघांचा समावेश गुन्ह्यात असल्यामुळे त्या दोघांना नोटीस दिली आहे. अरविंद चंदनशिवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ना. मा. जोशी मार्ग, पोलिस ठाणे, मुंबई. याच घरातून तरुणांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते तरुणांना काम देणारा कोण? पोलिस घेणार आहेत शोध या तरुणांना जेवण पुरवणारा पोहोचला पोलिस ठाण्यात भाड्याने वास्तव्यास असलेल्या युवकांना मागील दोन महिन्यांपासून त्याच परिसरातील एक युवक सकाळ-संध्याकाळ २० जेवणाचे डबे पोहोचवत होता. दरम्यान या १३ युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच डबे पोहोचवणारा युवक थेट पोलिस अधीकाऱ्यांसमोर पोहोचला आणि त्याने अश्रूंना वाट मोकळी केली. साहेब मी यांना मागील दोन महिन्यांपासून जेवणाचे डबे दिले आहे व त्या डब्यांचे २० हजार रुपयांवर पैसे घेणे बाकी असल्याचे सांगत होता. या वेळी मुंबईच्या पोलिस अधीकाऱ्यांनी तुझे पैसे मिळवून देणार असल्याचे त्याला सांगितले.
महावितरणच्या कारवाईमध्ये 30 लाखांची वीज चोरी उघड:54 ग्राहकांना 29 लाख 40 हजारांचा ठोठावला दंड
शहरात महावितरणने १५ दिवसात केलेल्या कारवाईत ५४ वीज ग्राहकांनी मीटरमध्ये छेडछाड करून मीटर फॉल्टी केल्याचे प्रकार समोर आले . १ लाख २१, ४६० वीज युनिटच्या वीज चोरी पोटी महावितरणने ५४ ग्राहकांवर २९ लाख ४० हजाराचा दंड ठोठावला आहे. महावितरणचे संचालक संचलन अरविंद भादीकर यांनी येथे बैठक घेऊन वितरण हानी कमी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी विभागात वीज चोरी विरोधात मोहिम सुरू केली आहे. शहरात उघड केलेल्या ५४ वीजग्राहकांपैकी २७ जणांनी १८ लाख ३४ हजाराची दंडात्मक रक्कम भरून सुटका करून घेतली . उर्वरित २७ ग्राहकांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रीया सुरू केली. ग्रामीण विभाग ६५ ग्राहकांनी २२ लाखाची, मोर्शीत ५३ ग्राहकांनी १२ लाखांची अचलपुरात ३८ लाखांच्या २०२ वीज चोऱ्या उघड केल्या आहेत. वीज मीटरमध्ये फेरफार, छेडखानी करणे हा विद्युत विद्युत कायद्यानुसार गुन्हा असून या अंतर्गत वीज ग्राहकावर कलम १३५ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. अशा ग्राहकांवर वीज चोरी केलेल्या युनिटच्या दुप्पट रक्कम आकारण्यात येते. प्रति केडब्ल्यूएचपी नुसार औद्योगिक ग्राहकावर १० हजार , वाणिज्यिक ग्राहकावर ५ हजार तर इतर वर्गवारीतील ग्राहकावर २ हजार दंडात्मक कारवाई म्हणून तडजोडीचे शुल्क आकारण्यात येतो. वीज चोरीच्या गुन्ह्यात ३ वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. वीज मीटर मध्ये फेरफारसाठी प्रवृत्त व सहकार्य करणाऱ्यांविरुद्ध विद्युत कायद्यातील कलम १५० नुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूदही आहे.
स्व. बाबासाहेब सांगळूदकर यांनी जनसामान्यांना सदैव हृदयात ठेवले:हर्षवर्धन देशमुख यांचे प्रतिपादन
जनसामान्यांना आपले दैवत मानून त्यांच्या प्रति विशेष आस्था स्व. बाबासाहेब सांगळूदकर यांना होती. त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सामान्य माणसाच्या कामाला व भावनेला महत्त्व दिलं. आजही त्यांचे स्मरण या परिक्षेत्रातील प्रत्येक घटकाला होते. याचे कारण त्यांनी जनसामान्यांना सदैव आपल्या हृदयात ठेवले, असे प्रतिपादन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी केले. शहरातील जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयात आयोजित स्व. बाबासाहेब सांगळुदकर यांच्या पुण्यस्मृतिनिमित्त आयोजित व्याख्यानमाला व वार्षिकोत्सव उद्घाटन समारंभ प्रसंगी कार्यक्रमाध्यक्षा म्हणून हर्षवर्धन देशमुख बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून खा. बळवंत वानखडे तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आ. किरण सरनाईक, आ. गजानन लवटे तसेच प्रमुख उपस्थितीत श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.गजानन पुंडकर, केशव मेतकर, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारणी सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशव गावंडे, सुरेश खोटरे, प्रा.सुभाष बनसोड, स्वीकृत सदस्य नरेशचंद्र पाटील, महाविद्यालय विकास व शाळा समितीचे सदस्य डॉ. रामचंद्र शेळके,अण्णासाहेब रेचे,डॉ.वसंतराव टाले, प्रा. प्रभाकर कोलखेडे, शिवाजी देशमुख, प्रदीप देशमुख, शेषराव काळे, भारती काळे, प्राचार्य डॉ.अतुल बोडखे, समन्वयक डॉ.मिलींद भिलपवार व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना संस्था अध्यक्ष देशमुख यांनी बाबासाहेब सांगळूदकर व कोकीळाबाई गावंडे यांच्या अनेक आठवणी व प्रसंगांचे वर्णन केले. भविष्याची आव्हाने पेलण्यासाठी आजच्या तरुणाईने स्वतःला सक्षम बनवण्यासाठी उपलब्ध संसाधनाचा पूर्ण उपयोग घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच नवीन शैक्षणिक धोरणावरही सविस्तर प्रकाश टाकला. उद्घाटनपर भाषणात खा.बळवंत वानखडे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून भविष्यात मदत करण्याचे आश्वस्त केले. आ. किरण सरनाईक व आ.गजानन लवटे यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांसाठी या महाविद्यालयाला लागणाऱ्या अनेक बाबींमध्ये मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी स्व.बाबासाहेब सांगळुदकर स्मृती ग्रंथ, अस्मिता वार्षिकांक व डॉ.प्रकाश पानतावणे यांचे महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था या तीन ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पर मनोगत प्राचार्य डॉ.अतुल बोडखे यांनी मांडले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.नरेंद्र माने यांनी केले. तर आभार प्रा.विनोद वानखडे यांनी मानले. स्वागत गीत व गौरव गीत डॉ.सुरेंद्र शेजे, डॉ.राजेश उमाळे व संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केले. या कार्यक्रमाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सभासद, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, माजी प्राचार्य, माजी प्राध्यापक व कर्मचारी,माजी विद्यार्थी तथा महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश चौखंडे व तेथील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांकडून समाधीस्थळी श्रद्धांजली ः कार्यक्रमाच्या सुरवातीला स.९ वाजता स्व.बाबासाहेब सांगळूदकर, स्व.श्रीमती कोकिळाबाई गावंडे यांच्या समाधीस्थळी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, आजीवन सभासद, जिजामाता महिला मंडळ व स्व. बाबासाहेब सांगळूदकर स्मृती केंद्राचे पदाधिकारी, श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय व जे.डी.पाटील सांगळूदकर महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक यांनी पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्रदान महाविद्यालयातर्फे देण्यात येणाऱ्या स्व.राधाबाई शामराव देशमुख शिष्यवृत्ती प्रत्येकी ५ हजार रु. अनुराधा थोरात, पायल गोतरकर व श्रुतिका अरबट यांना प्रदान करण्यात आली. तसेच उत्कृष्ट खेळाडू म्हणून सपना बाकोडे व उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून प्रतीक्षा धर्माळे तसेच महाविद्यालयातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा विविध शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आला. डॉ.राजेश बुरंगे व शिक्षकेतर कर्मचारी मनोज गावंडे यांचाही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राज्य क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावतीद्वारे खेळाडूंसाठी क्रीडा स्पर्धांसह खेळविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कारही करण्यात आला. पहाटे ६ वाजता डीएसओद्वारे पं.जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित मॅरेथॉनमध्ये २०० शालेय खेळाडू सहभागी झाले होते. जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी संदीप इंगोले, तालुका क्रीडा अधिकारी संजय पांडे यांनी या मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवली. जिल्हा क्रीडा संकुलासह विभागीय क्रीडा संकुलात कुस्ती, धनुर्विद्या, कुडो, तलवारबाजी, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, टेनिस व्हॉलीबॉल, डग ऑफ वार, दोरीवरच्या उड्या, क्रिकेट, कबड्डी, खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या खेळांमध्ये जिल्ह्यातील शेकडो खेळाडूंनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक सेवा उपसंचालक शेखर पाटील हे प्रमुख अतिथी होते. त्याचप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील निराळे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत कडू, जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थी संघटक संदीप इंगोले, तालुका क्रीडा अधिकारी संजय पांडे, क्रीडा शिक्षक मनोज तायडे, आदेश डोंगरे, तलवारबाजी प्रशिक्षक संगिता येवतीकर, राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते. क्रीडा उपसंचालकांनी खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारांबद्दल मार्गदर्शन केले तर संदीप इंगोले यांनी देशाला कुस्तीत पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे स्व. खाशाबा जाधव यांचा संपूर्ण जीवन परिचय व त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील कृषक विद्यालय, निंभोरा, श्री शिवाजी हायस्कूल, मोर्शी, महानगर पालिका शाळा क्र. ८, अमरावती, निर्मिती पब्लिक स्कूल, चांदूर बाजार, एकलव्य गुरुकुल स्कूल, नांदगाव खंडेश्वर, गोल्डन किड्स शाळेसह जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये, तालुका क्रीडा कार्यालयांमध्ये राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गतवर्षी शालेय स्पर्धेत प्राविण्यप्राप्त खेळाडूंचा शाल, ऑलिम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव यांच्या जीवनावरील पुस्तक, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला. राज्य क्रीडा दिनानिमित्त आयोजित विविध क्रीडा स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना पदक, चषक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पांडे यांनी तर संचालन माजी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये यांनी केले. क्रीडा अधिकारी त्रिवेणी बांते यांनी आभार मानले. याप्रसंगी क्रीडा अधिकारी संतोष विघ्ने, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनात शुभम मोहतुरे, प्रफुल्ल डांगे, स्वप्नील चांदेकर, नितीन जाधव तसेच इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. गोल्डन किड्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये राज्य क्रीडा दिनापासून क्रीडा सप्ताहाला सुरुवात केली. श्री शिवाजी बहुउद्देशीय हायस्कूलमध्येही विविध खेळांचे आयोजन केले . याप्रसंगी शाळांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवणाऱ्या खेळाडूंच्या सत्काराचेही आयोजन केले होते. विविध ठिकाणी खेळांच्या स्पर्धांचा खेळाडूंनी आनंद घेतला.
जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत जिल्हा स्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालाच्या पटांगणात सुरू आहे. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कराआेके गीत,समूह नृत्य,भक्तीगीत,भावगीत , लोकगीत, सिनेगीत, अभिनय ,हास्य जत्रा असे कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी कलेचा आविष्कार सादर केला. सांस्कृतिक कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी डॉ. अरविंद मोहरे, उपशिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने, गंगाधर मोहने, प्रवीण खांडेकर, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुखांची उपस्थिती होती. भातकुली पंचायत समितीतील कानफोडी, वाकी रायपूर शाळेने निदर्शने व नृत्य सादर केले.अंजनगाव पंचायत समितीतील विहिगाव शाळेने ग्रामीण नाट्य व आदिवासी नृत्य सादर केले.वरूड पंचायत समितीतील खाडा शाळेने आदिवासी नृत्य व सावंगी शाळेने एकल नृत्य सादर केले. धारणी पंचायत समितीतील जांबु शाळेने संगीतमय नाटिका, मोगर्दा शाळेने समूह नृत्य तर हातिदा शाळेने लावणी सादर केली.तिवसा पंचायत समितीमधील धोत्रा शाळेच्या गौरी वानखडे हिने लावणी नृत्य सादर केले.दिवाणखेड शाळेने निदर्शने सादर केलीत.धामणगाव पंचायत समितीतील झाडा शाळेने ' सूनो बेटी शस्त्र उठालो ' हा कार्यक्रम सादर केला.तळेगाव दशासर सोशल मीडियाचा गैरवापर यावर निदर्शने सादर केली.तर पिंपळखुटा तेथील इयत्ता पहिलीतील सानवी भोयर या विद्यार्थिनीने ' मी सरपंच बोलते' ही एकपात्री नाटिका सादर केली.दर्यापूर पंचायत समितीमधील रामतीर्थ,करतखेडा व पेठ इबारतपूर शाळेने कार्यक्रम सादर केले.सांस्कृतिक कार्यक्रमांचे परीक्षक म्हणून डॉ.मनोज उज्जैनकर, प्रा.अमोल पानबुडे,जान्हवी काळे हे उपस्थित होते, असे प्रसिद्धी समितीचे प्रमुख विनोद गाढे,विनायक लकडे, शकील अहमद,राजेश सावरकर,श्रीनाथ वानखडे यांनी कळवले आहे. ‘मी सरपंच बोलते’ एकपात्री प्रयोगाने उपस्थितांचे लक्ष वेधण्याचा केला प्रयत्न धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथील जिल्हा परिषद शाळेतील पहिल्या वर्गाची विद्यार्थिनी सानवी भोयरने एकपात्री ‘मी सरपंच बोलते '' ही नाटिका सादर केली तेव्हा उपस्थितांनी उस्फूर्तपणे दाद दिली.प्राथमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनेने यांनी तिला कडेवर उचलून तिचे कौतुक करीत रोख बक्षीस दिले.या विद्यार्थिनीच्या मार्गदर्शक शिक्षिका हर्षाली तरार या आहेत.संविधानाने महिलांना जरी सर्व अधिकार दिले आहे. तरी सुद्धा आज समाजाकडून महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे.या बाबीकडे ‘चिमुकल्या सरपंच बाई''ने समाजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला .त्याच बरोबर आपल्या लेकीला शिकवा, आपले गाव स्वछ ठेवा ,तेव्हाच आपल्या गावाचा आपल्या देशाचा विकास होईल असा संदेशही तिने दिला.
शंकरपटात कमल-चिमणाची जोडी प्रथम:शंकरपट-यात्रा महोत्सव सुरू, कृषक सुधार मंडळातर्फे करण्यात आले आयोजन
तालुक्यातील तळेगाव दशासर येथील शंकरपट व यात्रा महोत्सवाला बुधवारी १५ जानेवारीला सुरुवात झाली. तळेगाव येथील गजानन फटिंग यांच्या कमल-चिमणा या बैल जोडीने ११.३६ सेकंदात ५०० मी.अंतर पार करून शंकरपट गाजवला. दुसरा क्रमांक तळेगाव येथील मयूर वैद्य यांच्या मोती-खरिया या जोडीने ११.८६ सेकंदात अंतर पूर्ण करून पटकावला. तळेगाव येथील मोहम्मद जाबिर यांच्या रॉकेट-रॉकीने ने ११.९२ सेकंदात अंतर कापून तिसरा क्रमांक पटकावला. शेंदूरजना येथील अजू वानखडे यांच्या बादल-जादू जोडीने ११.९३ सेकंदात शर्यत पूर्ण करून चौथा क्रमांक मिळवला.धामणगाव येथील डॉ.आशिष सालनकर यांच्या बादल सुलतान या बैलजोडीने ११.९९ सेकंदात अंतर पार करून पाचवा क्रमांक पटकावला. शंकरपटाचा रोमांच बघण्यासाठी शौकिनांनी शेकडोच्या संख्येत गर्दी केली होती. शंकरपटात सहभागी होण्यासाठी राज्यातील अनेक नामवंत बैलजोड्या दाखल झाल्या आहेत. गुरुवार १६ रोजी एकदानी शंकरपट असून राज्यभरातील स्पर्धक यात सहभागी होणार आहेत. कृषक सुधार मंडळ द्वारा आयोजित ऐतिहासिक व पारंपरिक शंकरपटाचे उदघाट्न वर्धेचे खा. अमर काळे व माजी आ. प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते झाले.यावेळी शिवाजी देशमुख,आनंद देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.बैलजोडीचे पूजन व धुरकरी यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे,माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन सिंगवी,मोहन घुसळीकर,जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुरेश निमकर,पंचायत समितीचे माजी सभापती पंकज वानखडे,नितीन कनौजिया,दिवाकर ठाकरे आदी उपस्थित होते.
पेढी नदीवरील पुलाचे बांधकाम तत्काळ बंद करा:बांधकाम विभागाच्या कार्यालयावर ‘प्रहार’ची धडक
वलगाव येथील पेढी नदीवरील पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र, हा पूल झाला तर नदीचे पाणी गावात जाऊन पूरस्थिती निर्माण होईल. त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलाचे बांधकाम तत्काळ थांबविण्यात यावे. तसेच चांदूर बाजार रस्त्यावरील सती मंदिराजवळील सुकलेले मोठे वृक्ष आहे, ते तत्काळ पाडण्यात यावे. अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदनातून केली आहे. वलगाव येथील पेढी नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्या बांधकामामुळे गावाला धोका निर्माण झाला आहे. नदीचे पाणी हे गावात शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे याकडे प्राधान्याने लक्ष देऊन ते काम तत्काळ थांबविण्यात यावे. तसेच वलगाव ते चांदूर बाजार रस्त्यावरील सती मंदिर परिसरात सर्वात मोठे सुकलेले झाड आहे. या झाडापासून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ते झाड पाडण्यात यावे. अशी मागणी प्रहारने निवेदनातून केली आहे. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख छोटू वसू महाराज, महानगर प्रमुख बंटी रामटेके, नंदू वानखडे, सचिन महल्ले, अभिजीत देशमुख, नितीन शिरभाते, प्रशांत शिरभाते, प्रफुल चहाकार, तेजस शिरभाते, इमरान शहा, अजय तायडे, कुणाल खंडारे आदी उपस्थित होते.
वादग्रस्त बोलणे टाळा. एकमेकांचा द्वेष करू नका. आपापल्या मतदारसंघात लोकांच्या हिताचे काम करा. हे काम इतरांनी आवर्जून पाहण्यासाठी यावे असे असावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आयएनएस आंग्रे सभागृह येथे महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांशी वैयक्तिक संवाद साधला. त्यात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा तसेच संघटना वाढीवर भर देण्याचे निर्देशही िदले. दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात मोदींनी राज ठाकरेंचा आवर्जून उल्लेख केला. त्यातून त्यांनी मुंबई मनपा निवडणुकीसाठी मनसे महायुतीत येणार असल्याचे संकेत दिल्याचे म्हटले जात आहे. मोदी म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना, राज ठाकरे माझे काम पाहण्यासाठी गुजरातला आले होते. तुम्हीही असे काम केले पाहिजे, जेणेकरून इतर राज्यांतील लोकप्रतिनिधी तुमच्या विकासकामांचे मॉडेल पाहण्यास यावेत. मोदींनी राज यांचा सकारात्मक उल्लेख करणे हा आगामी मुंबई मनपा निवडणुकीत भाजप मनसेसोबत युती करण्याच्या दिशेने काम करत आहे, याचाच संकेत असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. धनंजय मुंडेंविषयी संजय राऊतांना आला उमाळा मस्साजोग प्रकरणात धनंजय मुंडेंवर कायम टीका करणारे उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बुधवारी मुंडेंविषयी प्रेमाचा उमाळा आला होता. मोदींच्या उपस्थितीत झालेल्या महायुती आमदार संवाद कार्यक्रमात मुंडेंना वगळण्यात आल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला. ते म्हणाले की, मोदींचा कार्यक्रम पूर्वनियोजित होता. त्यात मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसह बहुतांश मंत्री उपस्थित होते. देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिकेमुळे धनंजय मुंडेंना जाणूनबुजून दूर ठेवण्यात आले. मोदींच्या मुंबईत आगमनाच्या एक दिवस आधी मुंडे बीडला रवाना झाले होते. मुख्यमंत्री फडणवीस मुंडेंशी भेदभाव करत आहेत. महायुतीत अनेक कलंकित मंत्री आहेत, मग फक्त धनंजय मुंडे यांनाच मोदींच्या कार्यक्रमापासून का दूर ठेवण्यात आले? निवडणूक मार्गदर्शनाविषयी शिंदेसेना, भाजप आमदारांत विरोधाभास आ. प्रकाश सुर्वे, आ. तुकाराम काटे (शिंदेसेना) : मोदींनी आगामी मनपा, नगर परिषद, जि.प. तसेच पंचायत समिती निवडणुका जिंकण्याबाबत तसेच जनतेशी कसे वागले पाहिजे आणि त्यांच्यासाठी कोणते काम करावे याबद्दल मार्गदर्शन केले. आ. संजय कुटे, आ. चित्रा वाघ, आ. स्नेहा दुबे (भाजप) : जनतेसाठी काम करताना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. निवडणुकांच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करा. मनपा-जि.प. निवडणुका जिंकण्याचा, संघटना वाढीवर भर देण्याच्या सूचना आमदारांना मार्गदर्शन करण्यापूर्वी मोदींनी आयएनएस सुरत, आयएनस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर या युद्धनौका, पाणबुडीचे राष्ट्राला लोकार्पण केले. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नौदलप्रमुख दिनेश त्रिपाठी उपस्थित होते.
दर्यापूर येथील साईनगर परिसरातील वसंतनगरात एका घरात भाड्यानेराहणाऱ्या १३ तरुणांना मुंबई पोलिसपथकाने बुधवारी १५ जानेवारीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मुंबई पोलिस एका ऑनलाइनफ्रॉडच्या तपासात दर्यापुरात पोहाेचलेहोते. चौकशीअंती बुधवारी रात्री मुंबई पोलिसांनी दोघांना नोटीस दिली आणि चौकशीसाठी मुंबईत बोलवले आहे.मुंबई पोलिसांच्या या कारवाईने शहरात खळबळ उडाली. दरम्यान या १३तरुणांना दरमहा १५ हजार पगार देऊन‘वर्क फ्रॉम होम’ सांगून सायबरगुन्हेगारीत ओढण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोरयेत आहे. मुंबई येथील ना. मा. जोशी मार्गपोलिस ठाण्यात ऑक्टोबर २०२४ मध्येएका महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हादाखल आहे. त्या महिलेची अज्ञातसायबर गुन्हेगारांनी ओटीपी मागून १लाख ९४ हजारांनी फसवणूक केलीआहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनीतपास सुरू केला. त्यावेळी दर्यापुरातीलया १३ जणांपैकी एका तरुणाच्यामोबाइलचा आयपी ॲड्रेस तपासातसमोर आला. त्या ॲड्रेसच्यालोकेशनवरुन मुंबई पोलिस दर्यापुरातपोहाेचले. मुंबई पोलिसांनी स्थानिकपोलिसांच्या मदतीने दर्यापुरातील वसंतनगर येथे एका घरात धाड टाकली.त्यावेळी या घरात एकाच ठिकाणी १३युवक होते. पोलिसांनी या १३ जणांनाचौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणलेहोते. पाच ते सहा तास चौकशीकेल्यानंतर पोलिसांनी मुंबईतील गुन्ह्यातसहभाग आढळल्यानंतर दोघांना नोटीसदेवून चौकशीसाठी बोलवले आहे.दरम्यान पोलिसांनी तरुणांना ताब्यातघेतानाच २२ मोबाइल, दहा लॅपटॉपसहअन्य साहित्य सुद्धा जप्त केले. या तरुणापैकी दोघांचा समावेश मुंबईतील गुन्ह्यात समोर आला आहे. मात्र या सर्वचतरुणांना १५ हजार महिना देऊन डेटा एन्ट्रीचे काम करावे लागेल, असे सांगण्यातआले होते, मात्र हे तरुण प्रत्यक्षात सोशल मीडियावरील एका ॲपद्वारे युटीआरतपासणे, तसेच ही तपासलेली माहिती समोर देत होते, त्या माहितीचा वापर सायबरगुन्हेगारीसाठी होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान तरुणांना कामदेणारा कोण, त्याचा शोध पोलिस घेणार आहेत. या तरुणांना जेवण पुरवणारापोहाेचला पोलिस ठाण्यात भाड्याने वास्तव्यास असलेल्या युवकांनामागील दोन महिन्यांपासून त्याचपरिसरातील एक युवकसकाळ-संध्याकाळ २० जेवणाचे डबेपोहाेचवत होता. दरम्यान या १३ युवकांनापोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताचडबे पोहोचवणारा युवक थेट पोलिसअधीकाऱ्यांसमोर पोहाेचला आणि त्यानेअश्रूंना वाट मोकळी केली. साहेब मीयांना मागील दोन महिन्यांपासून जेवणाचेडबे दिले आहे व त्या डब्यांचे २० हजाररुपयांवर पैसे घेणे बाकी असल्याचेसांगत होता. या वेळी मुंबईच्या पोलिसअधीकाऱ्यांनी तुझे पैसे मिळवून देणारअसल्याचे त्याला सांगितले. दोन जणांना दिल्या नोटीस आमच्या ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आमचे पथक दर्यापुरात पोहाेचले आहे. काही तरुणांचीचौकशी केली, त्यापैकी दोघांचा समावेश गुन्ह्यात असल्यामुळे त्या दोघांना नोटीस दिली आहे. अरविंद चंदनशिवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ना. मा. जोशी मार्ग, पोलिस ठाणे, मुंबई.
रस्त्यावर थाटलेल्या टपऱ्यांवर उभे राहून रस्त्याने जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेड काढणे, अश्लील शेरेबाजी करणे हे प्रकार एमजीएम परिसरात सुरू होते. याबाबत अनेकांनी पोलिस व मनपाकडे तक्रारी केल्या. या तक्रारीची मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी गंभीर दखल घेतली. बुधवारी (१५ जानेवारी) एमजीएम परिसरातील रस्त्यावर थाटण्यात आलेले अनधिकृत अतिक्रमण जमीनदोस्त केले. यामध्ये अतिक्रमण हटाव विभागाने १५ हातगाड्या, दोन हॉटेल व पाच टपऱ्या स्क्रॅप करत रस्ता मोकळा केला. स्थानिकांकडून विरोध होत असल्याने अतिरिक्त आयुक्त व अतिक्रमण विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे स्वतः कारवाईदरम्यान ठाण मांडून होते. चिश्तिया चौक, सेंट्रल नाका या भागात एमजीएम महाविद्यालय व हॉस्पिटल, मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्यामुळे अनेकांनी रस्त्यावर हातगाड्या लावून, टपऱ्या टाकून व्यवसाय सुरू केला होता. यामुळे मनपाच्या अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू केली. महापालिकेने बंद केलेले रस्ते खुले करावेत, ठरावीक लोकांवर कारवाई न करता इतर भागातही कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.
बीड जिल्ह्यातील पिंपरखेडा गावातून शिक्षणासाठी आलेल्या १९ वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना उस्मानपुऱ्यातील म्हाडा कॉलनी येथे १४ जानेवारी रोजी मध्यरात्री घडली. प्रदीप विश्वनाथ निपटे (१९, रा. पिंपरखेड, ता. वडवणी, जि. बीड) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी रूम पार्टनरसह कॉलेजमधील १५ जणांना संशयावरून ताब्यात घेतले आहे. प्रदीप सहा महिन्यांपूर्वी शहरातील एका महाविद्यालयात बीसीएसचे शिक्षण घेण्यासाठी आला होता. उस्मानपुऱ्यातील रेड कॉलनीत चार पार्टनरसोबत तो राहत होता. त्यातील दोघे हे त्याचे नातेवाईक होते. मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास चारही पार्टनर वेगवेगळ्या कारणांसाठी घराबाहेर गेले होते. तेव्हा प्रदीप एकटाच मोबाइल पाहत अंथरुणावर पडला होता. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पहिला रूम पार्टनर घरी परतला तेव्हादेखील प्रदीप झोपलेलाच होता. रात्री दहाच्या सुमारास प्रदीपला जेवण्यासाठी उठवले असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. घाबरलेल्या रूम पार्टनरने नातेवाइकांना फोन केला. चार दिवसांपासून घराबाहेर पडला नाही प्रदीपच्या नातेवाइकांना याबाबत विचारले असता ११ जानेवारी रोजी प्रदीपचे महाविद्यालयात एकमेकांना खुन्नस देण्यावरून भांडण झाले होते. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ते सोडवले होते. मात्र त्या दिवशीपासून तो घराबाहेर पडला नव्हता. हा सगळा प्रकार त्याने त्याच्या गावाकडच्या मित्राला सांगून मदत मागितली होती, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. रूमवरून मोबाइल अन् हत्यार गायब मृत प्रदीपचा गळा चिरला असून त्याच्या पाठीवर, हातावर तीक्ष्ण हत्याराने १७ वार केल्याचे दिसते. विशेष म्हणजे प्रदीपचा मोबाइलही सापडलेला नाही. तसेच हत्यारही गायब आहे. त्याच्या अंगावर असलेले पांघरूण,गादी रक्ताने भिजली होती. खून करून प्रदीपच्या अंगावर पांघरूण टाकले होते. रूम पार्टनरचा जबाब संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रदीपला सोडून सगळे घराबाहेर पडले. सीसीटीव्हीमधील तीन अज्ञातांवर संशय प्रदीप शाळेत असतानाच कराटेत ब्लॅक बेल्ट झाला होता. शरीराने धडधाकट आणि ब्लॅक बेल्ट असून त्याला शेवटचा प्रतिकार करता आला नाही. विशेष म्हणजे ६ ते १० या वेळेत या परिसरात अज्ञात तिघे संशयितरीत्या दिसले आहेत. प्रदीपवर हल्ला करणारे तेच आरोपी असल्याचाही संशय व्यक्त होत आहे. प्रदीपचा खून महाविद्यालयात झालेल्या भांडणावरून झाला का? ती मुले डेंजर हे प्रदीपने फोनवरून कुणाबद्दल सांगितले? ४ दिवस घराबाहेर पडला नाही, एवढी त्याला कोणाची भीती होती? रूम पार्टनर घराबाहेर पडण्याची रेकी केली जात होती का? घरामध्ये प्रतिकार करण्याचे पुरावे का नाही? रूम पार्टनरनी दीड तास पोलिसांना उशिरा का माहिती दिली? शेजाऱ्यांना आवाज कसा गेला नाही? रूमपार्टनरला मित्राचा खून २ तास कसा कळला नाही?
‘वल्लभभाई पटेलांपासून यशवंतराव चव्हाणांनी देशाचं गृहमंत्रिपद भूषवलं पण ‘तडीपार’ राहिलेला माणूस पहिल्यांदाच गृहमंत्रिपदावर बसला आहे!’ अशी टीका शरद पवारांनी अमित शाह यांच्यावर केली होती. त्याला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा (म्हणजे शरद पवारांपेक्षा) सोहराबुद्दीनसारख्या लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवाद्याच्या एन्काउंटरमुळे तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. शाह यांनी १२ जानेवारी रोजी शिर्डी येथे शरद पवारांनी १९७८ मध्ये विश्वासघाताची परंपरा सुरू केली असे म्हटले होते. त्याला पवारांनी उत्तर दिल्यावर पुन्हा तावडेंनी हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले आहे की, दाऊदच्या हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही. अटलजी, अडवाणीजी आणि अनेक मान्यवर नेते आणीबाणीच्या काळात १७ महिने तुरुंगात होते. ते नंतरच्या काळात मंत्री व पंतप्रधान झाले, त्यांच्याविषयीदेखील हेच म्हटले असते का? हे पवारांनी जनतेला नक्की सांगितले पाहिजे. लोकांना देशभक्ती काय असते, देशासाठी कोण काय करते हे नीट कळते असेही तावडेंनी पोस्टमध्ये म्हटले आहे. लवासाची फाइल उघडायला लावू नका : मंत्री आशिष शेलार मुंबई भाजप अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री आशिष शेलार पवारांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही जर शाहांच्या जुन्या प्रकरणांवर बोलत असाल तर आम्हाला पण लवासाची फाइल उघडायला लावू नका.
पिस्तूलराज रोखण्यासाठी मुख्य सचिवांची समिती:बीडच्या घटनेपासून धडा घेत कृती आराखडा तयार करणार
राज्यातील पिस्तूलराज रोखण्यासाठी राज्य शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली. तसेच राज्यातील शस्त्रांच्या खरेदी विक्री करणारे परवानाधारक तसेच शस्त्र उत्पादन कारखान्यांचेही लेखापरीक्षण करण्यासाठी कृती आराखडा तयार होणार आहे. त्यामुळे राज्यातील अवैध शस्त्रविक्री आणि बेकायदेशीर वापरावर चाप बसेल असा दावा केला जात आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील पिस्तूलराज समोर आले. पुण्यात कोयत्या गँगने धुमाकूळ घातला आहे. म्हणून अशा गुंडांविरुद्ध सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. या समितीत गृह विभागाचे अपर मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, मुख्य सचिवाद्वारा नामनिर्देशित बॅलेस्टिक्स क्षेत्रातील एक तज्ज्ञ यांचा समावेश आहे. वर्षातून एकदा समितीची बैठक होणार आहे. बीडमध्ये सर्वाधिक बेकायदेशीर शस्त्रे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यातील हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या अनेकांचे फोटो एक्स या सोशल मीडियावर ट्वीट केले होते. दरम्यान, गृह विभागाकडून बीड जिल्ह्यातील परवानाधारकांचाही आढावा घेण्यात आला आहे. त्या वेळी बेकायदेशीर शस्त्रांची संख्या अधिक असल्याचे समजते. त्यामुळे बीडमधील शस्त्रांचे लेखापरीक्षण होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. समिती काय करणार राज्यातील अवैध शस्त्र व दारूगोळा निर्मिती विक्री वाहतूक यासंबधीची माहिती मिळवणार, अवैध शस्त्र व दारूगोळ्याची तस्करी रोखण्यासाठी उपाययोजना सांगणार. तसेच शस्त्र व दारूगोळा उत्पादन व खरेदी-विक्री परवाना नसलेल्या कारखान्यांची सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत तपासणी, लेखापरीक्षण करणार आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पडली विहिरीत:जामखेडच्या चौघांचा बुडून मृत्यू
चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोलेरो कार रस्त्यालगतच्या ५० फूट विहिरीत कोसळली. या अपघातात चालकासह कारमधील चौघांचाही मृत्यू झाला. जामखेडमधील जांबवाडी शिवारात बुधवारी (१५ जानेवारी) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अशोक विठ्ठल शेळके (२९), रामहरी गंगाधर शेळके (३५), किशोर मोहन पवार (३०, सर्व रा. जांबवाडी) व वाहनचालक चक्रपाणी सुनील बारस्कर (२५, रा. राळेभात वस्ती, जामखेड) अशी मृतांची नावे आहेत. जांबवाडीकडून हे चौघे तरुण बोलेरा (एमएच २३ एयू ८४८५) गाडीतून जामखेडकडे बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास येत होते. जांबवाडी शिवारातील मातकुळी रस्त्यालगत चालक चक्रपाणी बारस्कर याचा बोलेरोवरील ताबा सुटल्याने रस्त्यालगतच्या ५० फूट खोल विहिरीत चौघेही गाडीसह कोसळले. विहिरीत १५ फूट खोल पाणी होते. या वेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जवळच रस्त्याचे खडीकरणाचे काम सुरू असल्याने तेथील मजूरही मदतीसाठी धावले. जांबवाडी येथील तरुण, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनीही विहिरीत पडलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. स्थानिक नागरिक व मजुरांच्या मदतीने चारही तरुणांना विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिकेतून तातडीने त्यांना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच चौघांचाही मृत्यू झाला. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या चार मृत तरुणांपैकी दोघांची लग्ने झाली असून त्यांना लहान मुले आहेत. बीड जिल्ह्यातील पवनचक्की कंपनीची कार बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात एका पवनचक्की कंपनीचे काम सुरू आहे. या पवनचक्की कंपनीची ही कार असून त्यावर चालक म्हणून चक्रपाणी सुनील बारस्कर हा कामाला होता. रात्री उशिरापर्यंत ही कार विहिरीतच पडलेली होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
किनवट तालुक्यातील एका युवतीला नोकरीचे आमिष दाखवून आरोग्य सेवकासह अन्य दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. ही घटना सोमवारी(१३ जानेवारी) घडली. याप्रकरणी किनवटपोलिस ठाण्यात मंगळवारी (१४ जानेवारी) रात्रीउशिरा गुन्हा दाखल झाला असून मुख्य आरोपीलापोलिसांनी अटक केली आहे. किनवट तालुक्यातील २३ वर्षीय बेरोजगारयुवतीला एका उपकेंद्रातील आरोग्यसेवक विठ्ठलमुंडे (रा.कंधार) याने आशा वर्कर म्हणूनगावातच नोकरीस लावून देतो. तू तुझी कागदपत्रेघेऊन किनवट शहरातील पैनगंगातीरी असलेल्यासाईबाबा मंदिराजवळ येऊन मला भेट असेसांगितले. त्यावर युवतीने विश्वास ठेवत कागदपत्रेघेऊन सोमवारी दुपारी १ वाजता संशयितानेसांगितलेले ठिकाण गाठले. त्या वेळी मुंडे यानेएक पेशंट पाहण्यासाठी पैनगंगेच्या दुसऱ्याकाठावरील विदर्भातील खरबी गावात जायचेआहे, तूसुद्धा सोबत चल म्हणून पीडितेला त्याच्यादुचाकीवर बसवले. तसेच खरबी गावालगतपैनगंगा अभयारण्याच्या नाक्यासमोरील जंगलातनेले. त्या ठिकाणी संशयिताने युवतीवर अत्याचारकेला. त्यानंतर याची चाहूल लागल्याने तिथेचजवळपास असणाऱ्या ३० ते ३५ वर्षीय दोन अज्ञातसंशयितांनीही पीडितेवर अत्याचार केला. तिच्यापर्समधील ३० हजार रुपयेही काढून घेतले.त्यानंतर पीडितेला घटनेची वाच्यता करू नयेम्हणून धमकावत मारहाण केली. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी संशयितांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाइलमध्येचित्रित केला. तसेच घटनेची वाच्यता केल्यासव्हिडिओ व्हायरल करण्याची व जिवे मारण्याचीधमकी दिली, अशी माहिती पीडितेने दिली .
वैजापुरात बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार:शेतात खेळताना झडप, 18 दिवसांतील दुसरा हल्ला
वैजापूर तालुक्यातील कविटखेडा परिसरात बुधवारी मध्य प्रदेशचे काही मजूर कुटुंबीयांसह कापूस वेचणी करत होते. सकाळी ११ वाजता शेतात झाडाखाली खेळत असलेल्या महेश सिद्धार्थ आखाडे (रा. बडवाणी, मध्य प्रदेश) या ९ वर्षीय बालकावर बिबट्याने झडप घातली. त्याला १५० फूट ज्वारीच्या शेतात फरफटत नेले. मोठ्या भावाने आरडाओरड केल्याने शेजारीच एका ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर वळवत बिबट्याने मुलाला नेलेल्या ज्वारीच्या शेतात ट्रॅक्टर घातले. तेव्हा बिबट्याने मुलाला सोडून पळ काढला. तोपर्यंत बालक गतप्राण झाले होते. १८ दिवसांत परिसरात हा बिबट्याचा मानवावर दुसरा हल्ला आहे. वैजापूर तालुक्यातील डोंगरथडी भागातील तलवाडा, लोणीसह कविटखेडा परिसरात गेल्या दीड महिन्यापासून बिबट्याची दहशत आहे. कविटखेडा शिवारात गट नंबर १३३ मध्ये गोरख काशीनाथ चव्हाण यांच्या शेतात मध्य प्रदेश राज्यातील मजूर कापूस वेचत असताना मुले झाडाखाली खेळत होती. या वेळी बिबट्याने महेशला ओढून नेले. त्याचा मोठा भाऊ आकाश याने आरडाओरडा केल्याने बाजूच्या शेतात ट्रॅक्टर होते ते आले. त्यांनी ज्वारीच्या शेतात ट्रॅक्टर फिरवले तेव्हा बिबट्याने मुलाला सोडून पळ काढला. पण तोपर्यंत महेशचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच वन विभाग व शिऊर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
भरधाव कार विहिरीत कोसळून चौघे ठार
अहिल्यानगर : प्रतिनिधी जामखेड तालुक्यातील जांबवडी रस्त्यावर भीषण अपघात घडला. या अपघातात बोलेरो कार रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे नियंत्रण सुटून विहिरीत पडली. या दुर्दैवी घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला. चालकाचा ताबा सुटल्याने गाडी पन्नास फूट खोल विहिरीत पडली. आवाज ऐकून जमलेल्या ग्रामस्थांनी त्यांना विहिरीतून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. बोलेरो कार जांबवडी गावाच्या […] The post भरधाव कार विहिरीत कोसळून चौघे ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
केजरीवालांविरुद्ध केंद्राचा डाव!
ईडी चौकशीला परवानगी, ऐन निवडणुकीत गोत्यात आणणार नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्ली विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हॅट्ट्रिक विजयाकडे डोळे लावून बसले असतानाच केंद्रीय गृह मंत्रालयाने दणका दिला आहे. दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणी केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने ईडीला (अंमलबजावणी संचालनालय) ला परवानगी दिली. दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान होत असून ८ […] The post केजरीवालांविरुद्ध केंद्राचा डाव! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लाडकी बहीण हा धोरणात्मक निर्णय
राज्य शासनावर बोजा नाही, सरकारचे प्रतिज्ञापत्र नागपूर : प्रतिनिधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रातून आपली बाजू मांडली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला घेऊन सध्या नागपूर खंडपीठात एक जनहित याचिकेची […] The post लाडकी बहीण हा धोरणात्मक निर्णय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशमुख, सूर्यवंशी हत्येची आता न्यायालयीन चौकशी
मुंबई : प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती एम. एल. ताहिलियानी यांच्या एकसदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती सरकारने केली तर परभणी येथील घटना व सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणांची न्यायालयीन चौकशी सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही. एल. आचलिया करणार आहेत. या चौकशी समितीचा अहवाल तीन ते सहा महिन्यात सादर होईल, अशी […] The post देशमुख, सूर्यवंशी हत्येची आता न्यायालयीन चौकशी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सीम कार्ड खरेदीसाठी आता आधार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मोबाइल सीम कार्ड बनावट कागदपत्रांनी घेण्याचा प्रकारास आता आळा बसणार आहे. सीम कार्डमुळे वाढलेल्या फसवणुकीच्या घटना पाहून पंतप्रधान कार्यालयाने दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यामुळे नवीन सीम कार्ड खरेदीसाठी आधार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन गरजेचे असणार आहे. त्यामुळे मोबाइल कनेक्शनचे वाढते गैरप्रकार रोखले जाणार आहे. बनावट कनेक्शन फसवणूक किंवा गुन्हेगारी करण्यासाठीच घेतले जातात. नवीन […] The post सीम कार्ड खरेदीसाठी आता आधार बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडच्या जामवाडीत चार चाकी वाहन विहिरीत पडून अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. कठडा नसलेल्या विहिरीत चारचाकी वाहन पडून यात चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर तसेच जामवाडी गावावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी साडे चारच्या सुमारास ही घटना घडली. विहिरीत चारचाकी वाहन पडून यातील चारही जणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे. अशोक विठ्ठल शेळके (वय 29) रामहरी गंगाधर शेळके (वय 35), किशोर मोहन पवार (वय 30) आणि चक्रपाणी सुनिल बारस्कर (वय 25) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतला. ग्रामस्थांच्या मदतीने चौघांचेही मृतदेह विहीरीतून बाहेर काढण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, मृत चौघेही चारचाकी बोलेरो या गाडीतून प्रवास करत होते. जामवाडी गावात रस्त्याचे काम सुरू असल्याने खडी टाकून ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकास अंदाज न आल्याने नियंत्रण सुटले आणि गाडी थेट विहिरीत जाऊन पडली. विहीर खोल असल्याने विहीरीतील पाण्यातून गाडीतील प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. पोलिस निरीक्षक महेश पाटील आणि सहकारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर त्यांनी अग्निशमन दलालाही बोलावून घेतले. क्रेनच्या सहाय्याने विहिरीत पडलेली गाडी व सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पाण्यातून बाहेर काढल्यावर चौघांनाही रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे जामवाडी गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
बारदानाअभावी खरेदी पुन्हा ठप्प
रेणापूर : प्रतिनिधी एकीकडे शासनाने सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली असली तरी तालुक्यात रेणापूर येथे एकमेव असलेल्या आधारभूत खरेदी केंद्रावर बुधवारी दि .१६ रोजी सांयकाळी बारदना उपलब्ध नसल्याने पुन्हा एकदा सोयाबीनची खरेदी ठप्प झाली आहे. त्यामुळे येथील खरेदी केंद्रावर वाहनाच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या . बारदाना कधी उपलब्ध होणार याकडे शेतक-याचे लक्ष लागले आहे . रेणापूर […] The post बारदानाअभावी खरेदी पुन्हा ठप्प appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
आंब्याच्या मोहोराने शिवारात दरवळू लागला सुगंध
जळकोट : ओमकार सोनटक्के जळकोट तालुक्यातील अनेक बागायतदार शेतक-यांचा आंबा लागवडीकडे कल दिसून येत आहे. पूर्वी नागरिकांना गावरान आंब्याची चव चाखायला मिळायची परंतु आता याची जागा केशर आंब्यांनी घेतली आहे. जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरात मोठ्या प्रमाणात आंब्याला मोहर लागला असून याचा सुगंध शिवारात दरवळू लागला आहे. सध्याचा आंब्याला आलेला मोहर पाहता यंदा तालुक्यात आंब्याचे उत्पादन […] The post आंब्याच्या मोहोराने शिवारात दरवळू लागला सुगंध appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूर जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीला गती
लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा रुग्णालयाची उभारणी, त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी निधीची तरतूद करणे, यासह लातूर शहर व जिल्ह्यातील आरोग्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मुंबई येथे […] The post लातूर जिल्हा रुग्णालयाच्या उभारणीला गती appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
लातूरच्या बसप्रवाशांना ई-बसेसची अद्यापही प्रतिक्षाच
लातूर : सिध्देश्वर दाताळ एसटी महामंडळाने लातूर जिल्ह्याला १०९ नविन ई बसेस एप्रिल -मे २०२४ महिन्यातच्या सुरुवातीला शहरासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख आगारांना ई बसेस देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र जवळपास सहा महिने उलटून गेले तरी लातूर विभागाला एकही ई बसेस उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एसटीच्या मोडकळीस आलेल्या […] The post लातूरच्या बसप्रवाशांना ई-बसेसची अद्यापही प्रतिक्षाच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. कराड सारख्या लोकांकडून खंडणी गोला केली जात असेल, तर महाराष्ट्रात कंपण्यांकडून गुंतवणूक कशी येणार? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक व छगन भुजबळ यांच्यावर केवळ ऐकीव माहितीवरुन ईडीकडून कारवाई केली. मग वाल्मिक कराडविरुद्ध खंडणीची तक्रार दाखल असतानाही ईडीने अद्याप कारवाई का केली नाही?, असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला आहे. पुढे त्या म्हणाल्या, सरकारने वाल्मिक कराडची किती बॅंक खाती गोठवली आहेत आणि त्यामध्ये किती संपत्ती आहे ? हे पैसे खंडणीतुन गोळा केलेले असतील तर ईडीने त्यावर तत्काळ कारवाई का केली नाही. सुप्रिया सुळे म्हणाल्या, संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणातील एक आरोपी अजुनही पोलिसांना सापडत नाही. आरोपींच्या आवाजाच्या नमुन्याची तपासणी झाली का ? आरोपींच्या संभाषणाबाबत सीडीआरची तपासणी झाली का ? मंगळवारी बीडमध्ये दंगल कशी झाली ? त्यावेळी पोलिस कुठे होते, हे माझे सरकारला प्रश्न आहेत, असे म्हणत सुळे यांनी सरकारवर प्रश्नांचा भडीमारच केला आहे. पत्रकारांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विचारले तेव्हा सुप्रिया सुळे म्हणाल्या, नैतिकतेच्या आधारावर आत्तापर्यंत अनेक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, रोहीत पवार हे नेते करत आहेत.तरीही, मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही. शेतकऱ्यांच्या पैशांचा भ्रष्टाचारचाही मुद्दा पुढे आला आहे. संबंधित खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यामुळे त्यांच्याशी याबाबत चर्चा करु. माझ्यासाठी वाल्मिक कराड हा राजकीय नव्हे, तर समाजातील गुन्हेगारीचा विषय आहे. बीड व परभणीचा विषयात मी राजकारण आणत नाही, तो माणुसकीच्या भावनेतुन बघते. खासदार सुळे यांनी बुधवारी महापालिकेमध्ये आढावा बैठक घेत रस्ते, पाणी, समाविष्ट गावांचे प्रश्नांबाबत महापालिका प्रशासनाकडुन माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी सुप्रिया सुळे यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी वाल्मीक कराड प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरील एका जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू आहे. यावेळी राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रातून आपली बाजू मांडली आहे. या योजनेमुळे राज्य शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही, असे या पत्रात राज्य सरकारने म्हंटले आहे. राज्य सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात लाडकी बहीण योजनेसाठी संबंधित विभागाच्या हेड अर्थसंकल्पीय निधीची तरतूद करण्यात आल्याचे म्हंटले आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजनेवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी नागपूर खंडपीठाने 15 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिला होता. त्यामुळे राज्य सरकारला तूर्तास दिलासा मिळाला होता. कॉंग्रेस नेते अनिल वडपल्लीवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेसह विविध योजनांवर आक्षेप घेत जनहित याचिका दाखल केली होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोफत लाभ देणाऱ्या योजना राज्याचे आर्थिक आरोग्य खराब करण्यास कारणीभूत ठरू शकतात, असे या याचिकेत म्हटले होते. यावर न्यायालयाने उत्तर सादर करण्यास राज्य सरकारला सांगितले होते. या प्रकरणात नागपूर खंडपीठाने सुरुवातीला 23 ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्यात सांगितले होते. त्यानंतर 3 डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र राज्य सरकारने पुन्हा वेळ वाढवून मागितला होता. त्यानुसार 15 जानेवारीपर्यंत खंडपीठाने वेळ वाढवून दिला होता. आता पुढील सुनावणी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 च्या जुळ्या महिन्यात सुरू केली होती. पुरवणी अर्थसंकल्प मांडताना याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे लाडक्या बहीणींच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या बहीणींकडून मोठ्या प्रमाणात अर्ज भरून घेण्यात आले. यात अनेकांनी योजनेचा गैरफायदा देखील घेतल्याचे उघडकीस आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील यावर भाष्य केले आहे. जाया महिला लाभार्थी पात्र नाहीत त्यांनी योजनेतून स्वतःहून नाव काढून टाकावे, असे भुजबळ म्हणाले आहेत. असे म्हंटले असले तरी आता योजनेतून बाहेर पाडण्यासाठी कुठली प्रक्रिया आहे याबाबत कुठलीच माहिती नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे.
गावोगावी रंगणार महायुतीची ‘डब्बा पार्टी’
मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीला २३० जागांवर यश मिळाले. त्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपला १३२, शिवसेनेला ५७ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. त्या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यानंतर दुस-यांना नरेंद्र मोदी मुंबईत आले. यावेळी त्यांनी महायुतीच्या […] The post गावोगावी रंगणार महायुतीची ‘डब्बा पार्टी’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
साध्वी हर्षा रिछारियावर शंकराचार्य भडकले
प्रयागराज : महाकुंभातील बातम्यांमध्ये सर्वाधिक चर्चा साध्वी रिछरियाची होत आहे. मॉडेल आणि अॅँकर असलेल्या हर्षा रिछारिया दोन वर्षांपूर्वी साध्वी बनल्या. प्रयागराजमधील महाकुंभात त्यांच्याबाबत नवीन वाद समोर आला आहे. हर्षा यांना महाकुंभातील पहिले अमृत स्रान करु देणे आणि महामंडलेश्वर यांच्या शाही रथावर बसण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. ज्योतिष पीठातील शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी या प्रकारावर […] The post साध्वी हर्षा रिछारियावर शंकराचार्य भडकले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
युक्रेन हादरले, एकाचवेळी १०० ठिकाणी हल्ला
कीव : वृत्तसंस्था रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केला आहे. युक्रेनच्या १०० ठिकाणांवर एकाचवेळी हल्ला केला. रशियाने अखेर टीयू-९५ विमानाचा वापर केला. हे रशियाचे अत्यंत घातक बॉम्बवर्षक विमान आहे. रशियाच्या या हल्ल्याला पलटवार म्हणून पाहिलं जात आहे. मंगळवारी रात्री युक्रेनने रशियावर हल्ला केला होता. रशियाच्या या हल्ल्यात कीवमधली डझनभरपेक्षा जास्त इमारती उद्धवस्त झाल्या […] The post युक्रेन हादरले, एकाचवेळी १०० ठिकाणी हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जनआक्रोश मूक मोर्चाची संपूर्ण तयारी:मस्साजोग घटनेच्या निषेधार्थ सर्वधर्मीय संघटनांचा एकत्रित मोर्चा
छत्रपती संभाजीनगरात मस्साजोग आणि परभणी येथील घटनांच्या निषेधार्थ रविवार, १९ जानेवारीला सकल मराठा समाजातर्फे जनआक्रोश मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. चंद्रकांत भराट यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. मोर्चा सकाळी १० वाजता क्रांती चौकातून सुरू होऊन विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जाणार आहे. या मोर्चात सर्व जाती, धर्म आणि पक्षांच्या संघटना सहभागी होणार असून, पीडित देशमुख व सूर्यवंशी कुटुंबीयांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत माणुसकीच्या नात्याने मोर्चात सहभागी होण्याची घोषणा केली. मोर्चा क्रांती चौक, पैठण गेट, निराला बाजार मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जाणार असून, सर्वात पुढे बॅनर, त्यामागे धर्मगुरू, महिला आणि पुरुष अशी रचना असेल. मोर्चेकऱ्यांनी स्वतःची भाकरी व पाणी घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे. निषेधार्थ काळे कपडे परिधान करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. उपस्थितांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तसेच या घटनेतील सर्व दोषींना, मग ते पोलीस असोत किंवा इतर कोणीही, कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली.
स्मृती मानधनाच्या वादळी खेळीत अनेक विक्रम मोडीत
राजकोट : वृत्तसंस्था स्मृती मानधना ही नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या अनुपस्थितीत आयर्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. स्मृतीला पहिल्या सामन्यात अर्धशतक करता आलं नाही. स्मृतीने त्याची भरपाई दुस-या सामन्यात केली. स्मृतीने दुस-या सामन्यात ७३ धावांची खेळी केली. स्मृतीला शतक करण्याची संधी होती. स्मृतीने तिस-या आणि आणि अंतिम सामन्यात शतकी खेळी […] The post स्मृती मानधनाच्या वादळी खेळीत अनेक विक्रम मोडीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मोदी यांच्या क्लासला १० आमदारांची दांडी
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबई दौ-यावर आले. त्यांच्या या दौ-यात नौदल डॉकयार्ड येथे तीन प्रमुख नौदल युद्धनौका आयएनएस सुरत, आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर राष्ट्राला समर्पित करण्यात आले. तसेच इस्कॉन मंदिराचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी महायुतीच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातून १० आमदारांनी दांडी मारली. […] The post मोदी यांच्या क्लासला १० आमदारांची दांडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर येथे सीएमआयएच्या वतीने आयोजित 'प्रेरिता' कार्यक्रमात किर्लोस्कर सिस्टिम्स प्रा. लि.च्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक गीतांजली किर्लोस्कर यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले. जागतिक व्यवसायात चीनचा वाटा 30% वरून 20% पर्यंत खाली येत असल्याने भारताला मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. देश विकसित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असताना शहरी आणि ग्रामीण भारतामध्ये समन्वय साधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शेंद्रा-बिडकीन (ऑरिक) औद्योगिक वसाहत राज्य आणि देशाच्या विकासाचे केंद्रबिंदू ठरेल असे त्यांनी नमूद केले. टोयोटा किर्लोस्कर प्रकल्प स्टार्टअप्स आणि एमएसएमईच्या प्रगतीसाठी सकारात्मक ठरेल, असेही त्या म्हणाल्या. राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांनी जायकवाडी धरणावर 10,000 मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सोलार प्रकल्प राबवणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. या प्रकल्पामुळे उद्योजकांना अल्प दरात वीज उपलब्ध होणार आहे. सीएमआयए संस्थेचे अध्यक्ष अर्पित सावे यांनी हा काळ औद्योगिक विकासाचे दुसरे पर्व असल्याचे सांगितले. टोयोटा किर्लोस्करनंतर आणखी जपानी कंपन्यांची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उद्योजक आणि शहरातील जेष्ठ उद्योजकांची उपस्थिती होती.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पै. खाशाबा जाधव यांचा जयंती दिन आणि दुसरा राज्य क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर यांनी या कार्यक्रमात क्रीडा दिनाचे रूपांतर क्रीडा संस्कृतीत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्र-कुलगुरू प्रा. काळकर, अधिसभा सदस्य गणपत नांगरे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विष्णु पेठकर आणि प्रभारी क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके यांनी खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पै. खाशाबा जाधव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. महाराष्ट्र शासनाने ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून जाहीर केला आहे. या निमित्ताने डॉ. पेठकर यांनी क्रॉस एक्स स्पर्धेची घोषणा केली असून, पुढील १५ दिवस विद्यार्थ्यांना शारीरिक सुदृढता कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यापीठाने या दिवशी विद्यार्थ्यांसाठी फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल आणि रस्सीखेच या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. विभागातील विद्यार्थी मोहित यांनी उपस्थितांना खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. कार्यक्रमाला क्रीडा विभागातील शिक्षक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
पुणे पोलिसांनी झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा वेष धारण करून घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. स्वारगेट पोलिसांनी केलेल्या कारवाईत सराईत गुन्हेगार गणेश काठेवाडे (३७) सह तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी १६०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर आरोपींचा शोध लागला. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ८६० ग्रॅम सोन्याचे दागिने, १५० हिरे, साडेतीन किलो चांदी, दोन पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे आणि एक दुचाकीसह घरफोडीचे साहित्य आहे. मुख्य आरोपी गणेश काठेवाडे याच्यासोबत सुरेश पवार (३५) आणि अजय राजपूत (३९) यांनाही अटक करण्यात आली आहे. काठेवाडे हा मोक्का कायद्याखाली गुन्हा दाखल असलेला आरोपी असून त्याच्यावर पुणे शहर आणि जिल्ह्यात ५५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. तो डिलिव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जाऊन रेकी करत असे. पुण्यात त्याने १४ घरफोड्या केल्या असून स्वारगेट एसटी स्टँड परिसरात सात चोऱ्या केल्या आहेत. पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपी घरफोडी करण्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ४० ते ५० किलोमीटरचा प्रवास करत असे. तो स्वत:ची ओळख लपविण्यासाठी ताे विविध जॅकेट, केसांचा विग, टोपी परिधान करुन वेशभूषा बदलत होता. त्यातून जरी चूकून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याची छबी आलीच तर पोलिसांचा तांत्रिक विश्लेषणातून तपास भरकटण्यासाठी मोबाईल फोन कानाला लावून बोलण्याची अॅक्टींग करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुरेश पवार हा मुळशी तालुक्यातील अंबरवेड गावचा माजी उपसरपंच असून त्याच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त स्मिता पाटील आणि एसीपी राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
वाल्मीक कराडवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई झाल्यानंतर परळीमध्ये जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. वाल्मीक कराड समर्थकांकडून काल परळी बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान, आजही परळीतील व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. या घटनांवर आमदार पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून मला त्याबद्दल काही माहिती नसल्याचे त्या म्हणाल्या. बीडमधील तणावाबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा करणार, असेही त्यांनी सांगितले. वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ मंगळवारी आणि आज परळी तालुक्यात आंदोलन करण्यात आले. अनेक ठिकाणी वाल्मीक कराडचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे परळीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र, यावेळी त्यांनी अधिक बोलणे टाळले. काय म्हणाल्या पंकजा मुंडे? परळी सध्या बंद आहे, याबाबत पत्रकारांनी पंकजा मुंडे यांना विचारणा केली असता, सध्या परळीत काय सुरू आहे, याबाबत मला फारशी माहिती नसल्याचे त्या म्हणाल्या. मी माझ्या नियोजित कार्यक्रमात आहे. रोज सकाळी उठून रात्रीपर्यंत काम करत आहे. या गोष्टी आता माझ्यासाठी आत्ता मॅटर करत नाहीत. माझ्यासाठी रोजचे काम मॅटर करते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. परळीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून तणावपूर्ण वातावरण आहे, अशी विचारणा केली असता, तेथील तणाव करण्यासाठी मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. तणाव कमी करण्यासाठी गृहमंत्रालयाला काय करता येईल, ते करावे, असेही त्या म्हणाल्या. न्यायालय परिसरात समर्थक, विरोधकांची घोषणाबाजीदरम्यान, खंडणी प्रकरणातील आरोपी आणि धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडच्या रिमांडवर आज बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने वाल्मीक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. वाल्मीक कराडची सुनावणी पार पडल्यानंतर त्याला न्यायालयातून जेलकडे नेत असताना बीड न्यायालय परिसरात वाल्मीक कराड समर्थक आणि विरोधकांची एकमेकांसमोर घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतले. कराडच्या मूळगावी टॉवरवर चढून आंदोलनवाल्मीक कराडच्या मूळगावी पांगरी येथे काही तरुण मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत. वाल्मीक कराडवर राजकीय आणि जातीय द्वेषातून कारवाई केल्याचा आरोप समर्थकांकडून होत आहे. पांगरी गावातील पुरुष महिला एकत्रित येऊन वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ निदर्शने करत आहेत. हे ही वाचा... बीड हत्या प्रकरणात SIT चा मोठा दावा:अपहरणाची आणि आरोपींच्या फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती, तिघांमध्ये 10 मिनिटे संभाषण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. या हत्याप्रकरणात एसआयटीने आज कोर्टात मोठा दावा केला आहे. हत्येच्या दिवशी आरोपींमध्ये फोनवर 10 मिनिटे संभाषण झाल्याचे एसआयटीने न्यायालयासमोर सांगितले. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि आरोपींच्या फोनवरील संवादाची वेळी ही मिळतीजुळती असल्याची माहिती एसआयटीने न्यायालयात दिली. सविस्तर वाचा...
पुणे येथील डी पी रस्त्यावरील पंडित फार्म्स येथे झालेल्या १२व्या तालचक्र महोत्सवात उस्ताद झाकीर हुसैन यांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 'जिक्र उस्ताद का...' या संकल्पनेवर आधारित या महोत्सवात अनेक नामवंत कलाकारांनी सहभाग घेतला. प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन ममता घाटे, सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये, प्रवीण बढेकर आणि सचिन झगडे यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाचे सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे उस्ताद झाकीर हुसैन यांनी ५० वर्षांपूर्वी तयार केलेल्या तालमालेचे भारतातील पहिले सार्वजनिक सादरीकरण होते. नितीन शंकर (कोंगा, जेंबे), शिखरनाद कुरेशी (जेंबे), ख्वाब हरिया (ड्रम्स), हरमित सिंग (तबला), जॉय रुपडे, वरद कुलकर्णी, नवीन शर्मा (ढोलक) आणि अनंता आर कृष्णन (मृदंगम्) यांसारख्या कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट वादनाने श्रोत्यांची मने जिंकली. या विशेष तालमालेमध्ये विविध आवर्तने, कायदे, पेशकार आणि उस्ताद अल्ला रखाँ साहेब यांच्या रचनांचा समावेश होता. नितीन शंकर यांनी सांगितले की, उस्ताद झाकीर हुसैन यांनी काही दिवसांपूर्वीच ऑनलाईन पद्धतीने ही तालमाला त्यांना आणि शिखरनाद कुरेशी यांना शिकवली होती. कार्यक्रमाच्या शेवटी नितीन शंकर यांनी नऊ मात्रांची विशेष रचना सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी तसेच मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचे असलेले वाल्मीक कराडला बीड कोर्टाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर कोर्टाच्या बाहेर वाल्मीक कराड समर्थकांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि हा त्यांच्या घरी जाऊन भेटतो, मंत्री असून. या धनंजय मुंडेनेच त्याच्या टोळीला सांगितले असणार, ही जातीयवादी टोळी आहे, जातीय तेढ निर्माण करणारी टोळी आहे ही. बीडमध्ये कायदा सुव्यवस्था नीट ठेवायचा नाहीये या धनंजय मुंडेला. त्यानेच सांगितले वाटतं यांना गोंधळ घालायला म्हणून एवढा माज आला आहे यांना. मुख्यमंत्री साहेब थांबवा हे. गोरगरीब जनतेला त्रास नाही झाला पाहिजे याचा. यांचा माज उतरवायला मला पण वेळ लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, कोर्टा बाहेर जाऊन गोंधळ घालणार असतील आणि पोलिसांना सांगतात की पोलिसांनी आमच्यावर दादागिरी करू नये आम्ही हे सहन करणार नाही, ही भाषा आहे का धनंजय मुंडेच्या टोळीची? आता कुठे गेली तुमची संचारबंदी? या आरोपीला साथ कसे काय देऊ शकतात, त्याच्यामुळे यांना सुट्टी देऊ नका. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर असताना मंत्री धनंजय मुंडे परळीमध्ये आहेत, त्यांना दूर ठेवले जात आहे का? असा प्रश्न विचारला तेव्हा मनोज जरांगे म्हणाले, हे काय जवळ करण्याच्या लायकीचे आहेत का? सामाजिक तेढ निर्माण करतात, सामाजिक सलोखा यांना ठेवायचा नाही, जिल्ह्याची शांतता भंग करायची आणि हे असले काय कामाचे? खुनातला, खंडणीमधला आरोपी त्याला पाठबळ देती धनंजय मुंडेची टोळी, हे असले काय जवळ करायचे. हे तर डाग आहेत, फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायला लागलेत हे. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आपल्या माध्यमातून मी सांगतो मुख्यमंत्री साहेबांना आणि अजित पवारांनाही सांगतो, आज पहिल्यांदा त्यांचे नाव घेत आहे. जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. धनंजय मुंडेची गुंडची टोळी थांबवा. जर हे आरोपीच्या बाजूने आरडाओरडा करायला लागले तर आम्ही सुद्धा सहन करणार नाही. या धनंजय मुंडेला थांबवा. आमचे लेकरू गेले संतोष देशमुख, आनंद हिरावून घेतला यांनी सुखी कुटुंबाचा या धनंजय मुंडे आणि त्याच्या टोळीने. खून करतात, खंडणी मागतात यात आता एकाला सुद्धा सोडायचे नाही. यातला एक पण सुटला नाही पाहिजे. धनंजय मुंडे परळीमध्ये येऊन वाल्मीकच्या कुटुंबीयांना भेटले. यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे. मनोज जरांगे म्हणाले, चांगले काम केले त्यांनी. मंत्रीपदाचा फायदा घेतो. संतोष भैय्याचे कुटुंब उद्ध्वस्त केले तुझ्या लोकांनी. संतोष भैय्याछ्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीवरून हात फिरवायला तुला वेळ मिळाला नाही का? या सगळ्यामागे याचाच हात आहे का असा संशय आता आम्हाला येतोय, अशी शंका देखील मनोज जरांगे यांनी उपस्थित केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खास उल्लेख करून सत्ताधारी आमदारांना त्यांच्यासारखे अभ्यास दौरे काढण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबईच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात सकाळी त्यांनी 2 युद्धनौका व एका पाणबुडीचे राष्ट्रार्पण केले. त्यानंतर त्यांनी आशिया खंडातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचेही उद्घाटन केले. तत्पूर्वी, महायुतीच्या आमदारांशी साधलेल्या संवादात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खास उल्लेख केला. राज ठाकरे यांनी 2011 मध्ये गुजरातचा अभ्यास दौरा केला होता. तसेच दौरे महायुतीच्या आमदारांनी केले पाहिजे, असे ते म्हणाले. राज ठाकरेंसारखे अभ्यास दौरे करा मोदी म्हणाले, आमदारांनी लोकांमध्ये जाऊन मिसळले पाहिजे. विरोधकांवर टीका करण्यापेक्षा त्यांना आपल्या कामातून प्रत्युत्तर द्यावे. आपल्या कामावर लोकांची मते काय आहेत? हे जाणून घ्यावे. इतर राज्यात किंवा मतदारसंघात एखादी गोष्ट चांगली झाली असेल तर त्याविषयी अभ्यास दौरे आयोजित करावे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2011 मध्ये गुजरातमध्ये अभ्यास दौरा काढला होता. त्यांच्यासारखे दौरे आयोजित करावेत. समाजाला वेळ देताना आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. त्यांनाही वेळ द्या. विशेषतः स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. तसेच आपण ठरवलेली कामे निर्धाराने कशी पूर्ण होतील याचेही काटेकोर नियोजन आमदारांनी करायला हवे. महायुती वाढवण्यावर भर द्या मोदींनी आमदारांना महायुती म्हणून संघटना वाढवण्यावर भर देण्याचाही सल्ला दिला. ते म्हणाले, आमदारांनी संघटना म्हणून महायुती वाढवण्यावर भर द्यावा. मतदारसंघात घटकपक्षातील आपले जे आमदार व पदाधिकारी आहेत, त्यांच्या कार्यालयांना भेटी द्याव्यात. महायुतीचा एकोपा वाढवण्यासाठी गावोगावी डब्बा पार्टीचे आयोजन करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवरही उपरोधिक टीका केली. यासंबंधी त्यांनी काँग्रेसने अनेक वर्षे आपली सत्ता कशी टिकवली हे समजून सांगितले. काँग्रेस एका पंचवार्षिकमध्ये रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये ती जनतेला रस्त्याचा नकाशा दाखवते. अखेर तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करते. काँग्रेसने या पद्धतीने वर्षानुवर्षे आपली सत्ता सांभाळली, असे ते म्हणाले. माध्यमांशी बोलताना काळजी घ्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्याकडे सर्वांचे लक्ष असते. त्यामुळे माध्यमांशी बोलताना विशेष काळजी घेतली जावी. आपल्या हातून एकही चूक होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे, असेही मोदी यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी गुजरातमध्ये भाजपकडून सत्ता केंद्र कशा पद्धतीने चालवले जाते याचेही उदाहरण दिल्याची माहिती आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. या हत्याप्रकरणात एसआयटीने आज कोर्टात मोठा दावा केला आहे. हत्येच्या दिवशी आरोपींमध्ये फोनवर 10 मिनिटे संभाषण झाल्याचे एसआयटीने न्यायालयासमोर सांगितले. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि आरोपींच्या फोनवरील संवादाची वेळी ही मिळतीजुळती असल्याची माहिती एसआयटीने न्यायालयात दिली. खंडणी प्रकरणातील आरोपी आणि धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडच्या रिमांडवर आज बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने वाल्मीक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एसआयटीने 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. 10 दिवसांच्या कोठडीच्या मागणीसाठी तपास अधिकाऱ्यांनी विविध दाव्यांमध्ये उपरोक्त दावा केला. तपास अधिकाऱ्यांचा नेमका दावा काय? संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांचे दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी अपहरण झाले होते. अपहरणानंतर 3 वाजून 20 मिनिटे ते 3 वाजून 30 मिनिटापर्यंत आरोपी सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि वाल्मीक कराड यांच्या फोनवर संभाषण झाले. या तिघांमध्ये 10 मिनिटे फोनवरून संवाद झाल्याचे एसआयटीने कोर्टामध्ये सांगितले. अपहरणानंतर आरोपींमध्ये 10 मिनिटे संभाषणसंतोष देशमुख यांच्या अपहरणआची वेळ आणि तीन आरोपींच्या फोनवरील संभाषणाची वेळ मिळतीजुळती आहे. दुपारी तीन ते सव्वा तीनच्या सुमारास संतोष देशमुख यांचा अपहरण झाले होते. त्यांच्या अपहरणानंतर या तिघांमध्ये फोन कॉल झाल्याचे रेकॉर्डवरून दिसत आहे. या तिघांमध्ये 10 मिनिटे संभाषण झाले असून ते संभाषण काय झाले, त्याचा तपास करायचा असल्याचे सांगत आरोपींच्या 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी एसआयटीने कोर्टाकडे केली. हत्येच्या दिवशी देशमुखांना वाल्मीककडून धमकीदरम्यान, वाल्मीक कराडने हत्येच्या दिवशी देखील संतोष देशमुख यांना धमकी दिल्याचा दावा एसआयटीने केला आहे. विशेष म्हणजे संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनीही वाल्मिक कराडने आपल्या पतीला धमकी दिली होती. त्यामुळे ते तणावात होते, असे पोलिस जबाबात सांगितले होते. आता एसआयटीकडून सुद्धा धमकीचा उल्लेख न्यायालयात करण्यात आल्याने वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांची हत्याअवादा कंपनीकडे मागितलेल्या खंडणीत अडथळा ठरल्याने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचे सीआयडीने म्हटले आहे. आरोपींनी वारंवार अवादा कंपनीकडे खंडणी मागितली. पण कंपनीने दिली नाही. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही कंपनीने त्यांना खंडणी दिली नव्हती. अवादा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिले होते. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केली, असा दावा सीआयडीने आणि एसआयटीने कोर्टात केला.
वाल्मिक कराडला ७ दिवस पोलीस कोठडी
केज : प्रतिनिधी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याच्यावर काल मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर आज आरोपी वाल्मिक कराड याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. केज कोर्टाकडून वाल्मिक कराडला ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे २२ तारखेपर्यंत वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीत असणार आहे. दरम्यान, वाल्मिक कराडच्या चौकशीसाठी […] The post वाल्मिक कराडला ७ दिवस पोलीस कोठडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी व मंत्री धनंजय देशमुखांचे जवळचे मानले जाणारे वाल्मीक कराड यांच्यावर मंगळवारी मकोक अंतर्गत गुन्हा दाखल झाला. यानंतर वाल्मीक कराडच्या कुटुंबीयांनी तसेच त्याच्या समर्थकांनी परळी बंद ठेवले होते. तसेच वाल्मीक कराडवरील सर्व गुन्हे त्याच्या पत्नीने फेटाळून लावले आहेत. यावर आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार सुरेश धस म्हणाले, परळी बंद करणे शक्य आहे का? परळीमध्ये हे काही दोन चार टक्के लोकांनी परळी बंद ठेवले होते हे गुंडाडवाद आहे. कोणाच्याही आरोपीला त्याला लागलेल्या कलमामध्ये ताब्यात घेतले की शहरं बंद करायची, दुकाने बंद करायची, मोठ्याने ओरडायचे रडायचे हे नवीन पद्धत परळीमध्ये कालपासून सुरू झाली आहे. यात कुठलाही जातीवाद नाही. हा गुंडाडवाद आहे. वाल्मीक कराडची आई देखील काल आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावर बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले, मला त्या माऊलीवर काही बोलायचे नाही. त्या माझ्या भगिनीच्या बाबतीत बोललो तर सगळं फोकस दुसरीकडे जातो. माझी एक विनंती आहे तुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या लोकांना सांगा की राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा. अजून बरेच बाकी आहे. उज्ज्वल निकमची नियुक्ती आहे, आता आका सापडला अजून बरेच बाकी असल्याची माहिती सुरेश धस यांनी केली आहे. दरम्यान, आमदार सुरेश यांच्यावर वाल्मीक कराडची पत्नी मंजली कराडने आरोप लावले आहेत. त्या म्हणाल्या होत्या, बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. ते सुरेश धस यांच्या जवळचे असून या दोघांचा आठ दिवसांचा सीडीआर काढावा अशी मागणी देखील मंजिली कराड यांनी केली आहे. एसआयटी मधील अधिकारी बदलण्यात यावेत, त्यात कोणाचेही नातेवाईक नको, अशीही मागणी त्यांनी केली होती.
मोदी यांच्या क्लासला दहा आमदारांची दांडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यात नौदल डॉकयार्ड येथे तीन प्रमुख नौदल युद्धनौका INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाघशीर राष्ट्राला समर्पित करण्यात आले. तसेच इस्कॉन मंदिराचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी महायुतीच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षातून १० आमदारांनी दांडी मारली. नौदल गौदीमध्ये तिन्ही […] The post मोदी यांच्या क्लासला दहा आमदारांची दांडी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
वाल्मिक कराडवरील गुन्ह्यांची यादी कोर्टात; “हत्येच्या दिवशी १० मिनिटांचं संभाषण…”
बीड : प्रतिनिधी वाल्मिक कराडला आज एसआयटीने बीड येथील कोर्टात हजर केले. त्यावेळी तपास अधिकाऱ्यांनी कराड याच्यावरील गुन्ह्याची यादी कोर्टासमोर दिली. त्यात ९ डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी आरोपी विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्यात दुपारी ३.२० ते ३.३० वाजता संभाषण झाले होते. त्याचवेळी संतोष देशमुख अपहरण झाले होते आणि त्याच दिवशी […] The post वाल्मिक कराडवरील गुन्ह्यांची यादी कोर्टात; “हत्येच्या दिवशी १० मिनिटांचं संभाषण…” appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी व मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडवर मंगळवारी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर परळीमध्ये कराड समर्थक तसेच कराड कुटुंबीयांनी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. वाल्मीक कराडवरील सर्व आरोप वाल्मीक कराडची पत्नी मंजली कराड यांनी फेटाळून लावले आहेत. तसेच माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. मंजली कराड मनोज जरांगे यांना उद्देशून म्हणाल्या, मराठा, मराठा काय करतो. मीही 96 कुळी मराठा आहे. तुम्ही जे काही आरोप करत आहात ते आधी सिद्ध करा. यांना जातीवाद करायला कोणी शिकवला, जातीवादामध्ये आणि राजकारणामध्ये माझ्या नवऱ्याचा बळी दिला जात आहे. आमच्या महाराजांनी असे जातीवाद करण्यास शिकवले नव्हते. जात बघून खून किंवा गुन्हे होत नाहीत, असा हल्लाबोल मंजली कराड यांनी केला आहे. आमदार सुरेश धसांची प्रतिक्रीया आमदार सुरेश धस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, परळी बंद करणे शक्य आहे का? परळीमध्ये हे काही दोन चार टक्के लोकांनी परळी बंद ठेवले होते हे गुंडाडवाद आहे. कोणाच्याही आरोपीला त्याला लागलेल्या कलमामध्ये ताब्यात घेतले की शहरं बंद करायची, दुकाने बंद करायची, मोठ्याने ओरडायचे रडायचे हे नवीन पद्धत परळीमध्ये कालपासून सुरू झाली आहे. यात कुठलाही जातीवाद नाही. हा गुंडाडवाद आहे. दरम्यान, वाल्मीक कराडच्या पत्नीने मंगळवारी देखील पत्रकारांशी बोलताना खासदार बजरंग सोनवणे तसेच आमदार सुरेश धस यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. मंजली कराड म्हणाल्या, घटना घडली तेव्हा वाल्मीक कराड हे परळीमध्ये नव्हते. त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. बजरंग सोनवणे यांनी माझ्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच बाजर्न सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी माझ्या पटीने मदत केली असल्याचेही कराड म्हणाल्या आहेत. पुढे बोलताना मंजली कराड यांनी सुरेश धस यांच्यावर देखील आरोप केला होता. त्या म्हणाल्या, मंजिली कराड म्हणाल्या, बसवराज तेली हे आष्टीचे जावई आहेत. ते सुरेश धस यांच्या जवळचे असून या दोघांचा आठ दिवसांचा सीडीआर काढावा अशी मागणी देखील मंजिली कराड यांनी केली आहे. एसआयटी मधील अधिकारी बदलण्यात यावेत, त्यात कोणाचेही नातेवाईक नको, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
‘ऑपरेशन पंजा’: कर्नाटकात कॉँग्रेस भाजपचा डाव खेळणार
बंगळुरू : वृत्तसंस्था काँग्रेस शासित कर्नाटक राज्यात सध्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून काँग्रेसमधील नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. त्यातच काँग्रेस चन्नगिरीचे आमदार शिवगंगा बसवराज यांनी केलेल्या भविष्यवाणीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जेडीएसचे ११ आमदार लवकरच काँग्रेसमध्ये सहभागी होतील असं शिवगंगा बसवराज यांनी म्हटलं आहे. कर्नाटकात जेडीएस विरोधी पक्षात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ज्यारितीने विरोधी पक्ष फुटला तसाच कर्नाटकात […] The post ‘ऑपरेशन पंजा’: कर्नाटकात कॉँग्रेस भाजपचा डाव खेळणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
अखेर ‘मेटा’ने मागितली माफी; झुकरबर्गने केलेला दावा चुकीचा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था फेसबुकचे संस्थापक आणि मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग याने अखेर भारताची माफी मागितली आहे. झुकरबर्गने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये म्हटले होते की, २०२४ हे वर्ष जगासाठी अशांततेने भरलेले होते. कोव्हिडनंतर झालेल्या निवडणुकीत भारतासह अनेक देशांची सरकारे पडली. या विधानामुळे भारताच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली, अनेक मंत्र्यांनी मार्कवर टीका केली. मार्क झुकरबर्गच्या टिप्पणीविरोधात […] The post अखेर ‘मेटा’ने मागितली माफी; झुकरबर्गने केलेला दावा चुकीचा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुणे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी महत्त्वपूर्ण सूचना मांडली आहे. शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि अपुरी पायाभूत सुविधा यामुळे दररोज नागरिकांना जीवघेण्या वाहतुकीला सामोरे जावे लागत आहे. बागुल यांनी पुढील ५० वर्षांचा विचार करून विकास आराखड्यातील सर्व रस्त्यांसाठी स्वतंत्र डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) तयार करण्याची मागणी केली आहे. या कामासाठी आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. प्रस्तावित कक्षाची प्रमुख कार्ये असतील - विकास आराखड्यातील विद्यमान रस्त्यांची स्थिती तपासणे, प्रस्तावित रस्त्यांची अंमलबजावणी, रस्ता रुंदीकरणाची शक्यता पडताळणे आणि भूसंपादनासाठी येणाऱ्या खर्चाचे नियोजन करणे. सध्या या महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक कोंडी, प्रदूषण, पार्किंग आणि इतर पायाभूत सुविधांवर ताण वाढत आहे. बागुल यांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना विनंती केली आहे की त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे या स्वतंत्र कक्षाच्या स्थापनेसाठी प्रस्ताव पाठवावा, जेणेकरून या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी होऊ शकेल. हा कक्ष स्थापन झाल्यास पुणेकरांना वाहतूक कोंडी आणि अपघातांपासून दिलासा मिळण्यास मदत होईल. हे ही वाचा... पश्चिम सीमेवर सुरक्षा कडक:हिंसाचार आणि घुसखोरी कमी झाल्याचा लष्करप्रमुख द्विवेदींचा दावा पुणे - भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी बुधवारी पुण्यात महत्त्वपूर्ण निवेदन केले. त्यांनी सांगितले की, देशाच्या पश्चिम सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केल्यामुळे हिंसाचार आणि घुसखोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. संवेदनशील भागांमध्ये सैनिक अत्यंत दक्षतेने पहारा देत असून, उत्तर सीमेवरही सध्या शांतता नांदत आहे. वाचा सविस्तर दावोस परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार बारामतीची देवयानी पवार:जागतिक नेत्यांसोबत चर्चा करणार; ६०० अर्जदारांमधून निवड पुणे - स्वित्झर्लंडमधील दावोस येथे २० ते २४ जानेवारी दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) वार्षिक बैठकीत बारामतीच्या तरुण उद्योजिका देवयानी पवार यांची निवड झाली आहे. ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या जगभरातील ५० प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासाठी निवडलेल्या दोन भारतीयांपैकी त्या एक आहेत. वाचा सविस्तर
जागतिक तापमानवाढीचा धोका दिवसेंदिवस वाढत असून २०२४ मध्ये सर्वाधिक तापमानवाढ नोंदवली गेली आहे. केंद्रीय वने, पर्यावरण आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाच्या आर.इ.सी.चे माजी सदस्य व पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी या धोक्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. गेल्या १० वर्षांपासून दर वर्षी तापमानवाढीचे नवे उच्चांक नोंदवले जात आहेत. दर दशकात सरासरी ०.२ सेल्सिअस इतकी वाढ होत आहे. १८५०-१९०० या औद्योगिक काळाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये सरासरी तापमानात १.५ सेल्सिअसची वाढ झाली आहे. विशेष चिंतेची बाब म्हणजे २०२४ च्या जानेवारी-एप्रिल आणि ऑक्टोबर-डिसेंबर या महिन्यांत ही वाढ १.५८ ते १.७८ सेल्सिअसपर्यंत पोहोचली. सेंटर फॉर सायन्स टेक्नॉलॉजी अँड पॉलिसीच्या अभ्यासानुसार, महाराष्ट्रातील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. २०३० पर्यंत तापमान १.० डिग्री सेल्सिअसच्या वर पोहोचेल, २०५० पर्यंत १.५ ते २.० डिग्री सेल्सिअस आणि २०८० पर्यंत २.५ ते ३.० डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाणही वाढणार असून, विशेषतः उत्तर महाराष्ट्रात ४०% पर्यंत वाढ अपेक्षित आहे. तज्ज्ञांच्या मते, या वाढत्या तापमानाला रोखण्यासाठी शून्य कार्बन उत्सर्जन हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. योग्य उपाययोजना केल्यास तापमानवाढ ०.९ ते १.४ डिग्री सेल्सिअसपर्यंत नियंत्रित ठेवणे शक्य आहे.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाचा कथित सूत्रधार असणाऱ्या वाल्मीक कराडच्या पिंपरी चिंचवड येथील एका आलिशान फ्लॅटचा लिलाव होणार असल्याची माहिती आहे. वाल्मीक कराडवर या फ्लॅटचा जवळपास दीड लाखांचा कर थकवल्याचा आरोप आहे. वाल्मीक कराडचा पिंपरी चिंचवड येथील पार्क स्ट्रीट येथील उच्चभ्रू सोसायटीत आलिशान फ्लॅट आहे. हा फ्लॅट 16 जून 2021 रोजी वाल्मीकची पत्नी मंजली कराड यांच्या नावावर नोंदणी करण्यात आली. पण तेव्हापासून या फ्लॅटचा कोणताही करभरणा करण्यात आला नाही. सद्यस्थितीत पिंपरी चिंचवड महापालिकेने वाल्मीक कराडला 1 लाख 55 हजार 444 रुपयांचा कर थकला आहे. या प्रकरणी महापालिकेने संबंधितांना 21 नोव्हेंबर 2024 रोजी नोटीसही बजावली आहे. पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामु्ळे आता हा फ्लॅट सील केला जाईल. त्यानंतर त्याचा लिलाव केला जाईल असे सांगितले जात आहे. मिळकत कर थकबाकी, जप्तीची नोटीस महापालिकेच्या कर संकलन विभागाचे प्रमुख अविनाश शिंदे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. महापालिकेने संबंधितांना चालू वर्षाच्या मिळकत कर व जप्तीची नोटीस यापूर्वीच बजावली आहे. मालमत्ता धारकाकडे 1 लाख 55 हजारांहून अधिकची थकबाकी आहे, असे ते म्हणाले. अविनाश शिंदे पुढे म्हणाले, सदरच्या मालमत्ता धारकाला आपण जप्ती अधिपत्र बजावले आहे. त्यांना 21 दिवसांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत आता संपली आहे. आपण वारंवार मालमत्ताधारकांना फोन व एसएमएसद्वारे आवाहन करतो की, आपली मालमत्तेची थकबाकी असेल तर दिलेल्या तारखेपर्यंत ती महापालिकेकडे जमा करावी. याप्रमाणे त्यांना सुद्धा आवाहन करण्यात आले आहे. आवाहन करूनही त्यांनी कर भरला नाही, तर सदरची मालमत्ता सील करण्यात येईल. त्यानंतर त्याच्या पुढची लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाईल. हायफाय सोसायटीत 4 BHK फ्लॅट उल्लेखनीय बाब म्हणजे वाल्मीक कराडने पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमधील अतिशय उच्चभ्रू सोसायटीत 4 बीएचके फ्लॅट खरेदी केल्याचे समोर आले आहे. वाल्मीक बाबुराव कराड व त्याची पत्नी मंजली वाल्मीक कराडच्या नावाने हा फ्लॅट आहे. काळेवाडी फाट्याजवळच्या पार्क स्ट्रीट सोसायटीतील पार्क आयव्हरी इमारतीत हा फोर बीएचके फ्लॅट आहे. त्याची आजच्या बाजार भावानुसार किंमत साडेतीन कोटींच्या आसपास आहे. सध्या इथे कुणीही राहत नाही. पण मिळकत कर थकवल्याप्रकरणी महापालिकेने फ्लॅटच्या बाहेर आपली नोटीस चिकटवली आहे. फर्ग्युसन रोडवरही वाल्मीक कराडची प्रॉपर्टी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या समोर असलेल्या इमारतीत वाल्मीक कराड व त्याच्या सहकाऱ्यांनी 25 कोटी रुपयांचे 6 ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याचाही दावा केला जात आहे. ही मालमत्ता खरेदी करणाऱ्यांत वाल्मीकसह त्याच्याशी संबंधित एक महिला व विष्णू चाटेचा समावेश असल्याची माहिती आहे.
…. तर भागवतांना अटक केली असती : राहुल गांधी
इंदौर : वृत्तसंस्था राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतरच देशात ख-या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. यानंतर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला. मोहन भागवत यांनी संविधानाचा अपमान केल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी राहुल गांधी […] The post …. तर भागवतांना अटक केली असती : राहुल गांधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार, अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. प्रदेशाध्यक्ष पदासाठी मी इच्छुक नाही, असे सांगत पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सध्या ज्या काही चर्चा सुरू आहे, त्याबाबतही मला माहिती नसल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत मोठे यश मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत खदखद दिसून येते आहे. काही नेते अप्रत्यक्षपणे नाना पटोले यांना जबाबदार ठरवत असून त्यांना हटवण्याची मागणी पक्षातून केली जात आहे. परंतु, काँग्रेस हायकमांडने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली येथे काँग्रेसच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी माध्यमांशी बोलत होते. काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी पत्रकारांनी पृथ्वीराज चव्हाणयांनी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत प्रश्न विचारला असता, प्रदेशाध्यक्ष पदासाठी मी इच्छुक नाही. जी चर्चा सुरू आहे, ती मला माहित नाही, अशी प्रतिक्रिया दिली. या महिन्यात काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल की नाही, हे मला माहीत नाही, असेही त्यांनी सांगितले. पक्षाच्या नवीन कार्यालयाबाबत बोलतात पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आज नव्या काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन होत आहे, त्याचा आनंद आहे. अकबर रोडवरील कार्यालयाला मोठा इतिहास आहे प्रदेशाध्यक्ष पदासाठी यशोमती ठाकूर इच्छुककॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडून नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी तरुण नेत्यांची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. या पदासाठी विश्वजीत कदम, माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि माजी मंत्री अमित देशमुख यांची नावे चर्चेत आहेत. लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. महिलांना संधी मिळाली तर चांगलंच आहे. पक्ष कोणाला संधी देतो बघू, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नेमकी कोणाची वर्णी लागणार, पक्षश्रेष्ठी कुणाची निवड करणार, ते पाहणे लागणार आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाच्या तपासाला आता चांगलाच वेग आला आहे. या प्रकरणी विशेष तपास पथकाने मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मीक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. त्यानंतर आता संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना आश्रय देणाऱ्या लोकांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना तसे सूतोवाच केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की, संतोष देशमुख हत्याकांडाची व्याप्ती फार मोठी आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण करताना स्विफ्ट कार कुणाची होती? मारेकऱ्यांना राहण्यासाठी घर कुणी दिले? या सर्व गोष्टींचा तपासात उलगडा होईल. खंडणीमधील आरोपी कुणाच्या घरात राहिले? त्यांना गाडी कुणी पुरवली? हे सर्व समोर येईल. परळी बाहेरचा विषय खूप मोठा आहे. केजमध्ये गुंडांची मोठी प्रवृत्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे इतर आरोपींनाही मकोका लावला जावा अशी आमची मागणी आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे. उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात सरकारी पक्षाचा युक्तिवाद करण्यास नकार दिला असेल तर सतीश मानेशिंदे यांना वकीलपत्र देण्यात यावे. जमावबंदी असताना परळीत आंदोलन कसे? बीडमध्ये जमावबंदी लागू असताना परळीत आंदोलन कसे झाले? असा सवालही बजरंग सोनवणे यांनी यावेळी उपस्थित केले. ते म्हणाले, भाजप आमदार सुरेश धस काय म्हणतात मला माहिती नाही. पण बीडमध्ये मंगळवारपासून जमावबंदीचे आदेश लागू आहेत. त्यानंतरही परळीत आंदोलन कसे झाले? गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी परळी बंदचा निर्णय घेतला. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना संपूर्ण माहिती देणार आहे. अजित पवारांनी कारवाई करण्यास उशीर केला बजरंग सोनवणे म्हणाले, मी वाल्मीक कराड यांच्या पत्नीच्या मुद्यावर बोलणार नाही. पण मी वाल्मीक कराडला धमकी दिली होती, तर मग त्यांनी एवढे दिवस आरोप का केला नाही? गुंडाराज होते. आमच्या लोकांना मारण्याचा प्लॅन होतो. अशा गुंडांना आम्ही कशी धमकी देणार? गुन्हेगारांना कोणतीही जात नसते. काही मूठभर समाजकंटक जिल्ह्यात आहेत. त्यांना या प्रकरणाला जातीय रंग द्यायचा आहे. अजित पवारांनी पक्षाची कारवाई करताना उशीर केल्याची आमची भावना आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ज्या कुणाचा हात असेल त्या सर्वांना फाशी व्हावी. धनंजय मुंडेंचा राजीनामा सरकारचा प्रश्न बजरंग सोनवणे यांनी यावेळी मी मागणी केल्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत का? असा सवाल करत हा सरकारचा प्रश्न स्पष्ट केले. केज प्रकरणात जवळपास 50 आरोपी समोर येतील, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात हिंगोलीच्या पुष्यमित्र जोशी याने सादर केलेल्या ॲक्वामित्र डिफ्लुरिडेशन ड्रॉप या संशोधनाचे कौतूक झाले आहे. या ड्रॉपमुळे देशातील 230 जिल्हयातील फ्लोराईडची समस्या दूर करता येणार असल्याचे त्याने संशोधनातून मांडले आहे. भारत मंडपम दिल्ली येथे युवा व खेल मंत्रालय भारत सरकार, नेहरू युवा केंद्र यांच्यावतीने ता. 12 जानेवारी रोजी आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवात विज्ञान तंत्रज्ञान आधारित स्पर्धा (सायन्स मेला) या प्रकारात पुष्यमित्र जोशी यांनी आपले संशोधन सादर केले. या राष्ट्रीय युवा महोत्सवात जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर निवड होऊन प्रत्येक राज्यातून 2 संशोधकांची निवड राष्ट्रीय पातळीवर सादरीकरणासाठी करण्यात आली होती, यामधये महाराष्ट्रातून पुष्यमित्रने ॲक्वामित्र डिफ्लुरिडेशन ड्रॉप या संशोधनाचे सादरीकरण केले. पाण्यातील फ्लुराईड मुळे 10 पेक्षा अधिक आजार होतात. भारतामधील 230 जिल्ह्यांत ज्वलंत समस्या आहे. पाण्यातील हेच फ्लुराईड पुष्यमित्र चे संशोधन अतिशय कमी खर्चामध्ये कोणत्याही उर्जेशिवाय कमी करता येते हे दाखवून दिले आहे. त्याच्या या संशोधनाचे उपस्थितांनी कौतूक केले आहे. केंद्र शासनाने या संशोधनास पाठबळ दिल्यास देशातील 230 जिल्हयातील पाण्यातील फ्लुराईडचे प्रमाण कमी करता येणार असून त्यासाठी खर्चही कमी लागणार असल्याचा दावा त्याने केला आहे. दरम्यान संशोधक, वैज्ञानिक व उत्कृष्ट वक्ता असलेल्या पुष्यमित्रने याआधी महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा, महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज, स्वच्छ तंत्रज्ञान स्पर्धा, आविष्कार वैज्ञानिक संमेलन आदींचे विजेतेपद पटकावले आहे. पुष्यमित्रची ब्रिक्स संघटनेच्या सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन वर्किंग ग्रुपमध्ये युवा प्रतिनिधी म्हणून निवड झाली होती. त्याचप्रमाणे पुष्यमित्रची वयाच्या 25 वर्षी तसेच प्रतिष्ठित इंडीयन सायन्स काँग्रेसच्या सायन्स कम्युनिकेटरपदी निवड झाली होती. नुकतेच त्याच्या 2 संशोधनाला पेटंट देखील मिळाले आहे. आजपर्यंत पुष्यमित्रचे 20 पेक्षा अधिक शोधनिबंध (रिसर्च पेपर) आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत व ३ पुस्तकांचे लिखाणदेखिल पुष्यमित्रने केले आहे. आजपर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदांचे विजेतेपद देखिल त्यानी मिळवले आहे. त्याच्या यशामुळे वैज्ञानिक क्षेत्रात हिंगोलीचे नांव राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.
माजी IAS पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याप्रकरणी बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे. यात पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत त्यांच्याविरुद्ध कोणतेही सक्तीचे पाऊल उचलले जाणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. पूजावर यूपीएससी परीक्षेत फसवणूक केल्याचा आणि ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. 23 डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने पूजाचा जामीन अर्ज फेटाळला होता. वास्तविक, यूपीएससीच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर विरोधात फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल केला होता. अटक टाळण्यासाठी पूजाने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती चंदर धारी सिंह यांच्या खंडपीठाने 27 नोव्हेंबर रोजी या प्रकरणी निर्णय राखून ठेवला होता. आता यात पूजा खेडकरला दिलासा मिळाला आहे. यापूर्वी 1 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. पूजावरील आरोप गंभीर असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. संपूर्ण कटाचा उलगडा होण्यासाठी आणि त्यात इतर लोकांचा सहभाग असल्याची पुष्टी करण्यासाठी कोठडीत चौकशीची गरज असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. UPSC ने केस मागे घेतली, नवीन केस दाखल करणार UPSC ने खोटी साक्ष खटला मागे घेतला आणि स्वतंत्र केस दाखल करणार असल्याचे सांगितले. UPSC ने पूजावर न्याय व्यवस्थेत फेरफार करण्याचा प्रयत्न केल्याचा आणि खोटे प्रतिज्ञापत्र देऊन खोटी साक्ष देण्याचा आरोपही केला आहे. UPSC म्हणाले की, पूजाने खोटा दावा केला की आयोगाने तिचा बायोमेट्रिक डेटा (डोळा आणि बोटांचे ठसे) गोळा केले. न्यायालयाची फसवणूक करून एखाद्याच्या बाजूने आदेश मिळविण्यासाठी हे केले गेले. आयोगाने त्याच्या वैयक्तिक तपासणीदरम्यान कोणताही बायोमेट्रिक डेटा घेतला नाही किंवा त्याच्या आधारावर पडताळणी करण्याचा प्रयत्न केला नाही. आयोगाने अद्याप कोणत्याही उमेदवाराचा बायोमेट्रिक डेटा घेतलेला नाही. पूजाने उच्च न्यायालयात दावाही केला होता की, तिला उमेदवारी रद्द करण्याचे कोणतेही आदेश मिळाले नव्हते. तर UPSC म्हणते की त्यांच्या नोंदणीकृत मेल आयडीवर सूचना देण्यात आली होती. यूपीएससीने याप्रकरणी एफआयआरही दाखल केला आहे. जाणून घ्या कशी समोर आली पूजाची फसवणूक... पूजा पुण्यात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत होती. यावेळी तिने सुविधांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चेंबरवर कब्जा केल्याची तक्रारही समोर आली.तिच्या वैयक्तिक ऑडी कारमध्ये लाल दिवा आणि 'महाराष्ट्र सरकार'ची प्लेट लावण्यात आली होती. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजाविरोधात तक्रार केली होती, त्यानंतर तिची वाशिम येथे बदली करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली असता त्याने यूपीएससीमध्ये निवड होण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे आढळून आले. तपासात पुढे जात असताना अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. अपंगत्व प्रमाणपत्राशी संबंधित 4 वाद पूजाने ओबीसी कोट्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप पूजावर तिच्या पालकांच्या वैवाहिक स्थितीची माहिती लपवून ओबीसी नॉन-क्रिमी लेयर कोट्याचा फायदा घेतल्याचा आरोप आहे. पूजाचे वडील दिलीप खेडकर हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी निवडणूकही लढवली होती. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती 40 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते, तर पूजाने यूपीएससीला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कुटुंबाची संपत्ती 8 लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे जाहीर केले होते. पूजाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती तिच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतल्याचा दावा करत आहे. पूजाने दावा केला की, तिचे वडील तिच्यासोबत राहत नाहीत, त्यामुळे ती ओबीसी नॉन क्रिमी लेयरमध्ये येते.
पश्चिम सीमेवर सुरक्षा कडक:हिंसाचार आणि घुसखोरी कमी झाल्याचा लष्करप्रमुख द्विवेदींचा दावा
भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी बुधवारी पुण्यात महत्त्वपूर्ण निवेदन केले. त्यांनी सांगितले की, देशाच्या पश्चिम सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केल्यामुळे हिंसाचार आणि घुसखोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. संवेदनशील भागांमध्ये सैनिक अत्यंत दक्षतेने पहारा देत असून, उत्तर सीमेवरही सध्या शांतता नांदत आहे. पुण्यातील विश्रांतवाडी येथील बॉम्बे सॅपर्स लष्करी संस्थेच्या मैदानावर भारतीय सैन्यदलाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जनरल द्विवेदी यांनी देशाच्या प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य आवश्यक असल्याचे सांगितले आणि यामध्ये सेनेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले. लष्करप्रमुखांनी भारतीय सेनेतील महिला सहभागाचेही कौतुक केले. त्यांनी सांगितले की, महिलांना आता केवळ ठराविक जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न ठेवता सर्व क्षेत्रांमध्ये संधी दिली जात आहे. यंदाच्या परेडमध्ये नेपाळी लष्कराच्या बँडचा सहभाग हे दोन्ही देशांमधील लष्करी आणि सांस्कृतिक संबंधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, देशातील जनतेचा लष्करावरील विश्वास अधिक दृढ होत असून, यातूनच सैन्यदलाला नवी ऊर्जा मिळत आहे.
कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (सीसीआय) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक महत्त्वपूर्ण प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार, सीसीआयने आतापर्यंत शेतकऱ्यांकडून 85.95 लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे. 1 ऑक्टोबर 2024 पासून राज्यात 121 कापूस खरेदी केंद्रे कार्यरत करण्यात आली असून, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींच्या विनंतीवरून आणखी 7 केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे श्रीराम सातपुते यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत सरकारी खरेदी केंद्रे वेळेवर सुरू न झाल्याने व्यापारी हमी भावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करत असल्याची तक्रार करण्यात आली होती. सीसीआयने स्पष्ट केले की कापूस हंगाम दरवर्षी 1 ऑक्टोबरपासून सुरू होतो. यावर्षी सर्व आवश्यक व्यवस्था वेळेत करण्यात आल्या असून, एफएक्यू ग्रेड कापसाची किंमत एमएसपीपर्यंत खाली आल्यावर खरेदी सुरू केली जाते. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये भात प्रामुख्याने पिकवला जात असल्याने आणि कापूस उत्पादन अत्यल्प असल्याने तेथे खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली नाहीत. न्यायालयाने सीसीआयला खरेदी केंद्रे निश्चित करण्यासाठीचे निकष स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार सीसीआयने हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सात दिवसांच्या आत पैसे त्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
पुण्यातील विश्रांतवाडी येथील बॉम्बे सॅपर्स मैदानावर भारतीय सैन्यदलाचा 77 वा वर्धापनदिन भव्य समारंभात साजरा करण्यात आला. भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून परेडची पाहणी केली आणि सैनिकांची मानवंदना स्वीकारली. कार्यक्रमाला बीईजी कमांडंट ब्रिगेडियर परमजित सिंग ज्योती, दक्षिण महाराष्ट्र आणि गोवाचे जीओसी मेजर जनरल अनुराग बिजनोई, लेफ्टनंट जनरल पवन चढ्ढा आणि लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठी यांची प्रमुख उपस्थिती होती. यंदाच्या परेडमध्ये एक ऐतिहासिक क्षण साकारला गेला, जेव्हा नेपाळी आर्मी बँडची तुकडी प्रथमच सहभागी झाली. तीन महिला सैनिकांसह 33 सदस्यांच्या या पथकाने ब्रास आणि पाईप बँडचे प्रदर्शन केले. हा सहभाग दोन्ही देशांमधील वाढत्या लष्करी आणि राजनैतिक संबंधांचे प्रतीक मानला जात आहे. कार्यक्रमात लष्कराचे बहारदार संचलन, आधुनिक लष्करी वाहने, हेलिकॉप्टर आणि रोबोटिक श्वान यांचे प्रदर्शन करण्यात आले. विशेष आकर्षण म्हणून सुखोई लढाऊ विमानांच्या तीन विमानांनी मानवंदना दिली. 15 जानेवारी 1949 रोजी ले. जन. के.एम. करिअप्पा यांची भारतीय लष्कराच्या प्रमुखपदी निवड झाल्यापासून हा दिवस लष्कराचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो.
दाऊदच्या हस्तकांना प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा दहशतवादी याच्या एन्काऊंटर प्रकरणी तडीपारी बरी असा टोला भाजपचे नेते विनोद तावडे यांनी शरद पवार यांना लगावला आहे. शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तडीपारीवरुन टीका केली होती. अमित शहांनी शिर्डीच्या अधिवेशनात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलास होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, अमित शहा यांनी थोडीफार माहिती घेऊन भाषण केले तर लोकांच्या मनात शंका निर्माण होणार नाही. देशात आजपर्यंत अनेक गृहमंत्री झाले ज्यांनी पदाची प्रतिष्ठा वाढवली, असे ते देशभक्त होते. आपण तडीपार असा गृहमंत्री पाहिलेला नाही असा टोला त्यांनी शहांना लगावला. गुजरातमध्येही अनेक प्रशासक होऊन गेले. या सगळ्या प्रशासकांचे वैशिष्ट्य होते, की यापैकी कुणालाही तडीपार केले गेले नव्हते. नेमके विनोद तावडेंचे ट्विट काय? भाजपचे नेते विनोद तावडे म्हणाले की, ्रदाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटर मध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती! दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा मा. पवार साहेब विसरले आहेत. अमित शहांचे नेमके वक्तव्य काय? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, महाराष्ट्राच्या विजयाने 1978 पासून शरद पवारांनी जे दगा फटक्याचे जे राजकारण होते ते 20 फूट गाडण्याचे काम केले. उद्धव ठाकरेंनी आपल्याशी जो द्रोह केला, 2019 ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली. 1978 ते 2024 पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचे राजकारण सुरु होते. ते जनतेने संपवून दाखवले.
एसटीत मद्यधुंद चालकांवर संक्रांत
मुंबई : प्रतिनिधी इतर वाहनांपेक्षा एसटी बसच्या अपघाताची संख्या अत्यंत कमी आहे. तरीही एसटी महामंडळाने अलिकडे सोशल मीडियावर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन एसटी महामंडळातील सर्व वाहक आणि चालकांची ब्रेथ एनालायझर टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्रेथ एनालायझर चाचणीत शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण नेमके किती आहे याची इत्यंभूत माहिती मिळत असते. त्यामुळे एसटी चालक आणि वाहकांवर […] The post एसटीत मद्यधुंद चालकांवर संक्रांत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाला सामर्थ्य दिले : पंतप्रधान मोदी
मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (१५ जानेवारी) आयएनएस सुरत, आयएनएस वाघशीर, आयएनएस निलगिरी या युद्धनौका आणि पानबुडीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी लष्कर दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी संवाद साधताना, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाची स्थापना केली असून त्यांच्याच भूमीतून नौदलाला सामर्थ्य देण्याचा प्रयत्न होत आहे,’ असे म्हणत त्यांनी आत्मनिर्भर भारत अभियानासाठी हा सर्वात महत्त्वाचा […] The post छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाला सामर्थ्य दिले : पंतप्रधान मोदी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कॉलेजमध्ये कॉलर उडवल्याच्या रागातून एका 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळा चिरून निर्घृण हत्या झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर येथील उस्मानपुरा परिसरात घडली आहे. विद्यार्थ्याच्या राहत्या फ्लॅटमध्ये शिरून ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रदीप विश्वनाथ निपटे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो उस्मानपुरा भागातील एका महाविद्यालयात बीसीएचे शिक्षण घेत होता. तो त्याच परिसरात असणाऱ्या भाजीवाली बाईच्या पुतळ्यालगत असणाऱ्या एका अपार्टमेंटमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होता. त्याच्यासोबत त्याचा मावसभाऊ व इतर 3 मित्रही राहत होते. मंगळवारी सायंकाळी सर्वजण महाविद्यालयातून घरी परतले. त्यानंतर त्याचा मावसभाऊ व इतर मित्र बाहेर फिरण्यासाठी गेले. यावेळी प्रदीप एकटाच फ्लॅटवर थांबला होता. रात्री 10 च्या सुमारास त्याचा भाऊ व मित्र घरी परतले असता त्यांना प्रदीप गळा चिरलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. तू एकटक का पाहतो, कॉलर का उडवतो त्याची माहिती त्यांनी घटनास्थळावरून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या उस्मानपुरा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास शोध सुरू केला. त्यांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, प्रदीपच्या हत्येपूर्वी 3 दिवस अगोदर त्याचा कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांशी वाद झाला होता. तू एकटक का पाहतो, कॉलर का उडवतो, अशा किरकोळ कारणांवरून हा वाद झाला होता. यावेळी विद्यार्थ्यांच्या दोन्ही गटांत हाणामारी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या वादातून हत्येची ही घटना घडली असावी असा संशय आहे. ऐन संक्रातीच्या दिवशी विद्यार्थ्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे छत्रपती संभाजीनगरात एकच खळबळ माजली आहे. शहागंजमध्ये तरुणावर तलवारीने हल्ला दुसरीकडे, संभाजीनगर येथीलच शहागंज परिसरात एका तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. शेख रईस असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात सोहेल पटेल बशीर पटेल याने तक्रार दिली आहे. सोहलने थट्टा मस्करीमध्ये रईसला शिवीगाळ केली होती. त्याचा राग आल्यामुळे रईस तेथून निघून गेला. त्यानंतर 10 मिनिटांतच तो हातात तलवार घेऊन त्या ठिकाणी आला व सोहेलवर हल्ला चढवला. या हल्ल्यात सोहेलच्या डाव्या पायावर व पाठीवर खोलवर जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात रईस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रईस तलवार घेऊन येत असताना रस्त्यातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अक्षता सोहळ्यानिमित्त ओमसाई प्रतिष्ठानतर्फे भक्तांना अक्षता वाटप
सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वर महाराज यांच्या अक्षता सोहळ्यानिमित्त ओमसाई प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने श्री. सिद्धरामेश्वर महाराजांच्या साधारण ४००० भाविक भक्तांना अक्षता वाटप करण्यात आले. याप्रसंगी महावितरण सोलापूर शहर विभाग कार्यकारी अभियंता आशिष मेहता , नाशिक प्रशिक्षण केंद्राचे कार्यकारी अभियंता आर.सी. पाटील , औद्योगिक वसाहत कार्यालय शाखाधिकारी अजय चव्हाण , शुभराय टॉवर शाखाधिकारी उल्हास […] The post अक्षता सोहळ्यानिमित्त ओमसाई प्रतिष्ठानतर्फे भक्तांना अक्षता वाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
जिल्ह्यात वाळू तस्करीला ऊत,सुधारित वाळू धोरण सरकारी लालफितीत
सोलापूर/प्रतिनिधी सोलापूर: पूर्वीच्या वाळू धोरणात त्रुटी असल्याने सुधारित वाळू धोरण तयार करणार्या समितीने अहवाल देऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तरीही अद्याप चालू धोरणाबाबत राज्य सरकारकडून कोणताही निर्णय झाला असल्याने सुधारित वाळू धोरणाच्या शिफारशींचा प्रस्ताव सरकारकडे धूळ खात आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या सुधारित वाळू धोरणाबाबत काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. तथापि, वाळू […] The post जिल्ह्यात वाळू तस्करीला ऊत,सुधारित वाळू धोरण सरकारी लालफितीत appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
परळीनंतर केजमध्ये वातावरण तापले
बीड : प्रतिनिधी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लागल्यानंतर बीड जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. काल परळीत वाल्मिक कराडविरोधातील कारवाईनंतर पडसाद उमटले होते. आज दुस-या दिवशीही परळीत तणावपूर्ण शांतता आहे. या अशांततेचे लोण आता केजमध्येही पसरले आहे. वाल्मिक कराड याला बुधवारी पुन्हा केज न्यायालयात हजर केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर केज […] The post परळीनंतर केजमध्ये वातावरण तापले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
खंडणी प्ररकणातील आरोपी आणि धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या रिमांडवर आता केज न्यायालयाऐवजी बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. सीआयडीने याबाबत केलेला अर्ज कोर्टाने स्वीकारला आहे. या सुनावणीत मोक्काअंतर्गत पोलिसांकडून कोठडी मागितली जाणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीला महत्व प्राप्त झाले आहे. मकोका अंतर्गत अटकेची प्रक्रिया पूर्ण करुन त्याला थोड्याच वेळात बीड जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. वाल्मिक कराडला सुनावणीसाठी केज न्यायालयात आणण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी ही सुनावणी बीड जिल्हा न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सीआयडीकडून न्यायालयाकडे केलेला अर्ज स्वीकारण्यात आला आहे. आता बीड जिल्हा न्यायालयाबाहेर सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. वाल्मिक कराडला मंगळवारी केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. अटकेनंतर 15 दिवसांनी त्याच्यावर‘मकोका’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. कोर्टाने त्याची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. मात्र, कराडला मकोका लावल्याचे पत्र सादर करून त्याला ताब्यात घेण्याची परवानगी एसआयटीने मागितली. त्यानंतर कोर्टाच्या परवानगीने सीआयडीच्या ताब्यातून एसआयटीने ताब्यात घेतले. बुधवारी पुन्हा केज न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु, आता एसआयटीने ताब्यात घेतल्यामुळे त्याची बीड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान SIT कराडचा ताबा मागणार असून न्यायालय कोणता निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कराडच्या मूळगावी टॉवरवर चढून आंदोलन दरम्यान, वाल्मिक कराड याच्यावरील कारवाईनंतर काल परळीत बंद पुकारण्यात आला होता. वाल्मीक कराडच्या समर्थकांकडून आजही आंदोलन करण्यात येत आहे. वाल्मिक कराडच्या मूळगावी पांगरी येथे काही तरुण मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करत आहेत. वाल्मीक कराडवर राजकीय आणि जातीय द्वेषातून कारवाई केल्याचा आरोप समर्थकांकडून होत आहे. पांगरी गावातील पुरुष महिला एकत्रित येऊन वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ निदर्शने करत आहेत.
मानसोपचारतज्ज्ञांकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण
नागपूर : प्रतिनिधी एका ४५ वर्षीय मानसोपचारतज्ज्ञाला त्याच्याकडे समुपदेशनासाठी येणा-या तरुणी आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मानसोपचारतज्ज्ञ गेली अनेक वर्षे नागपुरात समुपदेशन केंद्र चालवत होता. तो नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्ये त्या संदर्भातील शिबिरेही घेत होता. त्यापैकीच काही अल्पवयीन मुली आणि तरुणींचे त्याने विविध आमिषे दाखवून लैंगिक शोषण […] The post मानसोपचारतज्ज्ञांकडून अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
बीड : प्रतिनिधी संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्रिय असलेले मनोज जरांगे पाटील अजून अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे मीडियाशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागणी केली आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. राज्यात एवढी मोठी क्रूर हत्या झालेली असताना देशमुख यांच्या आरोपींना मोक्का लावणे आवश्यक होते. त्यांना ३०२ मध्ये […] The post आरोपींना ३०२ कलम लावा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विद्यार्थ्याचा गळा चिरला; कॉलर उडवल्याचा राग
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर शहराला हादरवणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथे एका १९ वर्षीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. काही अज्ञात मारेक-यांनी फ्लॅटमध्ये घुसून विद्यार्थ्याचा गळा चिरला आहे. ऐन संक्रांतीच्या दिवशी मित्र बाहेर गेल्यानंतर मारेकरी घरात घुसले आणि विद्यार्थ्याची हत्या केली आहे. हत्येची ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ […] The post विद्यार्थ्याचा गळा चिरला; कॉलर उडवल्याचा राग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेच्या दरम्यान भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने निवृत्तीची घोषणा करून संपूर्ण देशाला मोठा धक्का दिला. टीम इंडियाचा दिग्गज ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने पहिल्यांदाच आपल्या निवृत्तीबद्दल उघडपणे बोलला आहे. दरम्यान, आर. अश्विनने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे सामने पार पडले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या सामन्यानंतर रविचंद्रन अश्विन याने झालेल्या […] The post मी अजून खेळू शकलो असतो appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
‘नागिन’ चित्रपटाचे शूटिंग सुरू?
मुंबई : श्रद्धा कपूरच्या ‘नागिन’ चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी निर्माता निखिल द्विवेदी यांनी सोशल मीडियावर याबद्दल एक संकेत दिला. दरम्यान, काही वर्षांपूर्वी अशी बातमी आली होती की श्रद्धा कपूर ‘नागिन’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. आता या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट आली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होण्याची शक्यता […] The post ‘नागिन’ चित्रपटाचे शूटिंग सुरू? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त
बीड : प्रतिनिधी बीडमधील संतोष देशमुख प्रकरणानंतर फक्त बीडच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात खळबळ माजली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील काही आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित […] The post राष्ट्रवादी काँग्रेसची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
कराड समर्थकांचे आंदोलन मणिपूर हिंसाचाराप्रमाणे
मुंबई : प्रतिनिधी बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राजकारण तापले आहे. आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून वाल्मिक कराड याची आई आणि समर्थकांनी मोठा गदारोळ करत आंदोलन केले आहे. आरोपीच्या समर्थनार्थ केले जाणारे आंदोलन हे घातक असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, शिवसेना खासदार […] The post कराड समर्थकांचे आंदोलन मणिपूर हिंसाचाराप्रमाणे appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
संतोष देशमुख खंडणी अन् हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर महिन्यात दिले होते. त्यावेळी वाल्मीक कराड हा देशमुख हत्या प्रकरणात आरोपी नव्हता. पण आता त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. परिणामी, मकोकातील तरतुदी व मुख्यमंत्र्यांचे आदेश यामुळे त्याच्या शेकडो कोटींच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांची अनेक ठिकाणी एकत्र जमीन असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. त्यानंतर अंजली दमानिया यांनी या प्रकरणात उडी घेत या दोघांच्या जमिनीचा सामायिक सातबाराच X वर पोस्ट केला. त्यात जवळपास 88 एकर जमीन मुंडे-कराड यांच्या नावावर असल्याचे दिसते. त्यामुळे या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनाही मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. नेमके प्रकरण काय? गेली अनेक दिवस संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. वाल्मीक कराडवर मकोकाची कारवाई करण्यात आली आहे. या कायद्यामधील तरतुदीनुसार कराडची मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांचे अनेक ठिकाणी संयुक्त भूखंड असल्याचा दावा भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस आणि अंजली दमानिया यांनी केला आहे, यामुळे आता हे या संपत्तीवर जप्तीची टागती तलवार आहे. वाल्मीक कराडवरील कारवाईने धनंजय मुंडेंच्या अडचणीत यामुळे वाढ होऊ शकते. फरार आरोपींची संपत्ती जप्त करा- मुख्यमंत्री संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जमा करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र, त्यात वाल्मीक कराडचे नाव आहे की नाही? याची स्पष्टता त्यांनी दिलेली नाही. त्यामुळे वाल्मीक कराडची संपत्ती जप्त होणार की नाही? असा सवाल त्यावेळी अंजली दमानियांनी केला. बीड जिल्ह्यातच अनेक ठिकाणी घरातील काम करणाऱ्या व्यक्तीपासून तर वॉचमनच्या नावावर जमीनीचे 20 ते 25 एकरचे तुकडे आहेत अशी चर्चा आहे. कराडची पुण्यातही बेनामी संपत्ती? वाल्मीक कराडने पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवर एका इमारतीत ऑफिससाठी जागा घेतल्याचे समोर आले आहे. ही गुंतवणूक वाल्मीकने एका महिलेच्या नावावर केल्याचे उघड झाले असून या महिलेचे नाव ज्योती जाधव असे आहे. फर्ग्युसन कॉलेज रोडवर कुशल वॉल स्ट्रीट या इयमरातीचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी काम सुरू होतानाच वाल्मीक कराडने इथे गुंतवणूक केली. या इमारतीत ऑफिस नंबर 610 सी हे अपार्टमेंट असून त्यात 45.71 चौ.मी कार्पेट एरिया एवढ्या जागेचे आलिशान ऑफिस घेतले आहे. विशेष म्हणजे या ऑफिसला बाल्कनी असून पार्किंगसाठी देखील जागा देण्यात आली आहे. महिलेचा कराडशी संबंध काय? वाल्मीकचे दुसरे ऑफिस नंबर 611 बी या अपार्टमेंटमध्ये असून त्याचे कार्पेट एरिया 54.51 चौ.मी एवढे आहे. यात देखील पार्किंगची सुविधाआहे. हा एकूण 25 कोटींचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आता प्रश्न हा उपस्थित होत आहे की या महिलेचा वाल्मीक कराडशी काय संबंध आहे? या प्रकरणात ईडीकडून चौकशी होऊ शकते. कराडची संपत्ती शोधणार कराडने कोणत्या गुन्ह्यातून संपत्ती कमावली, त्याची देश-विदेशात किती संपत्ती आहे हे शोधण्यासाठी पोलिस कोठडी हवी आहे.ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याचा व हत्येतील त्याचा सहभाग जाणून घेण्यासाठी 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी कोर्टात केली होती. सरकारी वकील जितेंद्र शिंदे व आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली. कराड यांच्या नावावर ही गाडीही होऊ शकते जप्त वाल्मीक कराडवर मकोका? महाराष्ट्राचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडवर अखेर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरण आणि हत्येच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. फरार आरोपींची संपत्ती जमा करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मात्र, त्यात वाल्मीक कराडचे नाव आहे की नाही? याची स्पष्टता त्यांनी दिलेली नाही. त्यामुळे वाल्मीक कराडची संपत्ती जप्त होणार की नाही? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला होता. यानंतर आता मकोकाची कारवाई करण्यात आल्यावर कराडांच्या नावे असलेली संपत्ती जप्त करणार येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंजली दमानियांचे ट्विट काय? अंजली दमानिया यांनी ट्विट करत धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांची एकत्र जमीन! असल्याचा दावा केला आहे. जमीनीचा सातबाराच त्यांनी आपल्या सोशल मिडीयावर प्रसारित केला. अन् म्हटलंय की, हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे. कंपनी एकत्र, जमीन एकत्र जगमित्र शुगर्स चे 6 सातबारे मी डिजिटली डाउनलोड केले 3554 गुंठे जमीन (88 एकर 34 गुंठे) जमीन एकत्र असल्याचा दावा केला आहे. यामुळे आता धनंजय मुंडेंच्या जमीनवर जप्ती येणार का असा सवाल राजकीस वर्तुळात उपस्थात होत आहे. काय कारवाई होऊ शकते? संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 1999 मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू केला. खंडणी, खंडणीसाठी अपहरण, खून किंवा खुनाचा प्रयत्न, धमक्या, खंडणी आणि बेहिशोबी पैसे कमविणारी कोणतीही बेकायदेशीर कृती अशा प्रकारचे संघटित गुन्हे या कायद्याच्या कक्षेत येतात. मकोका कायद्यात आरोपीची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. असे असले तरी न्यायालयातील सुनावणी, त्यात आरोपी आणि सरकारपक्षाचा युक्तिवाद, सरकारकडून सादर केलेले पुरावे, आरोपीचा बचाव यावर सुनावणी होते. त्यावर निकाल अवलंबून असतो.
दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातील आरोपी व राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक वाल्मीक कराडवर अखेर मंगळवारी मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचे परळीत पडसाद उमटल्याचे दिसले. या सर्व घडामोडींवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. आम्ही कोणताही दबाव निर्माण केला नाही. आम्ही केवळ न्याय मागतोय. परळीतील लोकांना काय उत्तर द्यायचे हे प्रशासनाचे काम आहे, असेही त्यांनी सांगितले. वाल्मीक कराड याच्यावर मकाको कायद्याअंतर्गत कारवाई झाल्यानंतर त्याचे समर्थक आक्रमक झाले आहेत. धनंजय देशमुख यांनी दबाव टाकल्यामुळे कारवाई होत असल्याचे कराड समर्थकांकडून म्हटले जात आहे. तसेच एसआयटी संदर्भात वाल्मीक कराडच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला असून एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांच्या जवळचे असल्याचा आरोप वाल्मीक कराडच्या पत्नीने केला. या सर्व घडामोडींवर धनंजय देशमुख यांनी आपली भूमिका मांडली आहे. सुरुवातीपासून आम्ही न्यायाच्या भूमिकेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची आधीपासूनची मागणी आहे. देशमुख कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे. सुरुवातीपासूनच आम्ही न्यायाच्या भूमिकेत आहोत. आरोपींना शिक्षा झाली पाहिजे, या आमच्या मागणीवर कायम आहे. ज्यांनी हे कटकारस्थान केले, गुन्हा केला, त्याला शिक्षा झाली पाहिजे, या भूमिकेत आम्ही कायम असणार आहोत, असे धनंजय देशमुख म्हणाले. SIT मध्ये दोन अतिरिक्त लोक नेमण्याची शिफारस खंडणी आणि खून यामध्ये कनेक्शन आहे, असा दावा 31 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत सीआयडी अधिकाऱ्यांनी केला होता. तपासातून हे निष्पन्न झाले असेल तर त्यावरच सगळा निकाल असणार. या प्रकरणात जो कोणी आरोपी असेल, त्याला शिक्षा झाली पाहिजे हीच आमची मागणी असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले. कटकारस्थान करताना जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असेही तेम्हणाले. SIT चे प्रमुख बसवराज तेली यांच्याशी काल झालेल्या भेटीनुसार, दोन अतिरिक्त लोक तपासासाठी नेमावेत, अशी शिफारस आम्ही केली होती. यावर आज चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कराड कुटुंबीयांच्या आक्षेपावर मुख्यमंत्री निर्णय घेतील आम्ही कुठलाही दबाव निर्माण केला नाही, आमचा भाऊ गेला आहे आणि आम्ही केवळ न्याय मागतोय. परळीतील लोकांना काय उत्तर द्यायचे हे प्रशासनाचे काम आहे, ते उत्तर देतील. एसआयटी संदर्भात कराड कुटुंबीयांनी जे आक्षेप घेतले, त्या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील. ज्यावेळी आरोप केले होते, त्यावेळी सर्व समाजाचे म्हणणे होते की ज्यांचे फोटो आरोपांसोबत आहेत, ते काय न्याय देतील? म्हणून देशमुख कुटुंबीयांनी नव्याने समिती गठित करण्याची मागणी केली होती. ती समिती आता गती घेत आहे, असेही धनंजय देशमुख यांनी सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडवर मंगळवारी 'मकोका' लावण्यात आला. ही बातमी समजताच काल परळीत राडा झाल्याचे पाहायला मिळाले. वाल्मीक कराड समर्थकांकडून परळी बंद ठेवण्यात आले. तर काही ठिकाणी निदर्शने झाली. परळीतील व्यापाऱ्यांनी वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. परळीत तणावपूर्ण शांतता आहे. अवादा कंपनी व्यवस्थापकाला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातील आरोपी व राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा समर्थक वाल्मीक कराडवर अटकेनंतर 15 दिवसांनी‘मकोका’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. कोर्टाने त्याची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. मात्र सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातही सहभाग असल्याचा संशय असल्याने एसआयटीने त्याला ताब्यात घेतले आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक या कारवाईमुळे कराड समर्थक आक्रमक झाले असून त्यांनी परळीत तीव्र आंदोलन सुरू केले आहे. कराडला मकोका लागल्याची बातमी समजताच त्याच्या समर्थकांकडून कालपासून परळी शहर बंद ठेवले आहे. त्यात आता परळीतील व्यापाऱ्यांनी वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. परळी शहरातील संत जगमित्र कार्यालयात वाल्मीक समर्थकांची बैठक बोलावली असून या बैठकीत वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती आहे. परळीची बदनामी थांबवा - व्यापारी वाल्मीक कराडला विनाकारण या प्रकरणात अडकावण्यात येत आहे, तसेच परळीची बदनामी सुरू असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. महिनाभरापासून धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह परळीची बदनामी सुरू आहे. कायद्याने जे व्हायचे ते होतच राहील, तुम्ही फक्त परळीची बदनामी करू नका आणि हे कुठेतरी थांबवावे, असेही व्यापारी म्हणाले. वाल्मीकच्या आईचा 12 तास ठिय्यावाल्मीक कराडवर मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच परळीत कराडच्या 75 वर्षीय आई पारूबाई कराड, पत्नी मंजिली कराड यांनी परळी शहर पोलिस ठाण्यासमोर 12 तास ठिय्या आंदोलन केले. रात्री उशिरा त्यांनी आंदोलन मागे घेतले. तर, कराड समर्थकांनी परळी शहरातील राणीलक्ष्मीबाई टॉवरवर चढून घोषणाबाजी केली. मंगळवारी दुपारी 3 वाजता परळी शहर बंदचे आवाहन कराड समर्थकांनी करताच, संक्रांतीच्या दिवशी परळीतील बाजारपेठ बंद झाली. शहरातील मुख्यबाजारपेठ मोंढा, टॉवर, बाजार समिती रोड, बसस्टँड रोडवर वाहतूक लगेच बंद झाली. माझ्या लेकरावर झालेला अन्याय दूर करा, त्याच्यावर दाखल झालेले सगळे गुन्हे खोटे आहेत. माझा मुलगा निर्दोष आहे, असा दावा पारूबाई कराड यांनी केला. तरुणीसह दोघांचा पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्नवाल्मीक कराडवर ‘मकोका’ लावताच परळीतील त्याच्या समर्थकांनी आक्रमक आंदोलन सुरू केले. राष्ट्रवादीची कार्यकर्ती वर्षा दहिफळे हिने परळी पोलिस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यात तिचा पाय भाजला आहे. तर सकाळी दत्ता जाधव (रा. फुलेनगर) याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. इतर आंदोलक आणि पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. दरम्यान, सायंकाळी परळी- कौडगाव कानडी या बसवर अज्ञात जमावाने दगडफेक केली. त्यामुळे मंगळवारी दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत बीड मार्गावरील सर्व बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. दगडफेकीत कुणालाही इजा झाली नाही. परळी बंदचे आवाहनही करण्यात आले होते.