SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

31    C
... ...View News by News Source

मी मुंबईला येतोय, माझे पाय छाटून दाखवा:भाजप नेते अन्नामलाईंचे ठाकरे बंधूंना आव्हान; मला धमकावणारे राज ठाकरे कोण? असा सवाल

मुंबई महापालिका निवडणुकीच्या ऐन तोंडावर मुंबई महाराष्ट्राची नसल्याचे विधान करून भाजपची अडचण करणाऱ्या के अन्नामलाई यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे. मुंबई महाराष्ट्रापुरते मर्यादित शहर नाही. ते एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केली नाही, असे ते म्हणालेत. मला धमकावणारे आदित्य ठाकरे व राज ठाकरे कोण? असा सवालही त्यांनी या प्रकरणी केला आहे. मुंबई महापालिकेसह 29 महापालिकांसाठी येत्या 15 तारखेला निवडणूक होणार आहे. ही निवडणूक अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे सर्वच पक्ष अंग झटकून प्रचाराला लागलेत. त्यातच तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष के अन्नामलाई यांनी मुंबई महाराष्ट्राचे नव्हे तर आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे विधान करून भाजपची अडचण केली आहे. या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी सोमवारी पुन्हा एकदा या मुद्याला हात घालत एकप्रकारे आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचाच दावा केला आहे. एवढेच नाही तर मी मुंबईला येतोय, माझे पाय तोडून दाखवा, असे आव्हानही त्यांनी ठाकरे बंधूंना दिले आहे. मला धमकावणारे राज ठाकरे कोण? के अन्नामलाई आज सकाळी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, मला धमकी देणारे आदित्य ठाकरे व राज ठाकरे कोण आहेत? मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. त्या लोकांनी (ठाकरे बंधू) फक्त मला शिवीगाळ करण्यासाठी सभा बोलावली होती. मलाही माहिती नव्हते की, मी त्यांच्यासाठी एवढा महत्त्वाचा बनलो आहे. कुणीतरी असे लिहिले आहे की, मी मुंबईत आल्यानंतर माझे पाय छाटले जातील. अशा लोकांना मी सांगतो की, मी मुंबईत येतो. माझे पाय छाटण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करा. मी धमक्यांना घाबरणारा असतो, तर मी माझ्या गावात लपून बसलो असतो. जर मी म्हणत असेन की, कामराज हे भारताच्या सर्वोत्तम नेत्यांपैकी एक आहेत. तर याचा अर्थ असा होतो की, ते तामिळ राहिले नाहीत. त्यानुसारच जर मी म्हणालो की, मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे, तर त्याचा अर्थ असा होतो का की, महाराष्ट्रातील लोकांनी मुंबई उभी केली नाही? हे सर्व अज्ञानी लोक आहेत, असे ते म्हणालेत. आत्ता पाहू मुंबईविषयी काय म्हणाले होते अन्नामलाई? भाजप नेते अन्नामलाई गत आठवड्यात मुंबईत भाजपच्या प्रचाराला आले होते. तिथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले होते, मुंबईतील लोकांना ट्रिपल इंजिन सरकार हवे आहे. मुंबई हे देशातील एकमेव असे शहर आहे जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे. केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र आणि बीएमसीमध्ये भाजपचा महापौर असेल. कारण बॉम्बे महाराष्ट्रातील शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट 75 हजार कोटी आहे. ही लहान रक्कम नाही. चेन्नईचे बजेट 8 हजार कोटी आहे. बंगळुरूचे बजेट 19 हजार कोटी आहे. त्यामुळे तुम्हाला अशा माणसांची गरज आहे जे आर्थिक नियोजन करून प्रशासन चांगले सांभाळतील.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 12:41 pm

मातोश्रीचे दार मी नाही, त्यांनीच बंद केले:मी फोन करत होतो, ते बोलायला तयार नव्हते; फडणवीसांचा ठाकरेंबाबत मोठा खुलासा

मातोश्रीचे दरवाजे कोणासाठीही बंद नाहीत, असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी हे लक्षात ठेवावे की, ते दार मी नाही तर त्यांनीच बंद केले होते. मी वारंवार फोन करत होतो, पण त्यांनी फोन घेण्याचेही सौजन्य दाखवले नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. समृद्धी महामार्गाचे श्रेय एकनाथ शिंदेंनाही जाते:प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना कसले श्रेय? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी युती तुटली तेव्हाच्या अनेक खळबळजनक बाबींचा खुलासा केला. २०१९ च्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींवर बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही पाच वर्षे सोबत होतो, एकत्र निवडणूक लढलो. तरीही तुम्हाला जर फारकत घ्यायची होती, तर किमान 'देवेंद्रजी, माझे आता तुमच्यासोबत जमणार नाही' असे सांगण्याची माणुसकी तरी दाखवायला हवी होती. मी फोन करत होतो, पण ते फोनवर बोलायला तयार नव्हते. याचे साक्षीदार स्वतः एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर आहेत. बदनामी मी नाही, त्यांच्या लोकांनी केली मातोश्रीची बदनामी थांबवा, या उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, इतक्या वर्षात मी मातोश्रीची कोणती बदनामी केली. मी बोललेलं एक स्टेटमेंट दाखवा. मी विरोधी पक्षनेता असताना आदित्य ठाकरेंवर मला विचारलं गेलं. मी एकमेव विरोओधी पक्षनेता होतो, मी म्हटलं मला असं वाटत नाही. त्यामुळे मी कधीही बिलो द बेल्ट आरोप करत नाही. त्यांच्या लोकांनी माझ्या पत्नीची बदनामी केली फडणवीस पुढे म्हणाले, मी त्यांच्यावर आरोप करत नाही. त्यांच्या लोकांनी माझ्याविरोधात माझ्या पत्नीविरोधात खालच्या स्तरावर जाऊन बदनाम केले. आमच्याबद्दल अश्लील लिहिले. पुरावे आहेत. तरीही मी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. आता मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे उघडलेत उद्धव ठाकरे आता म्हणतात की दारे उघडी आहेत, पण आता मला कोणत्याही दरवाजाची लालसा उरलेली नाही. माझ्यासाठी आता मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे उघडले आहेत आणि तीच माझी ताकद आहे, असे म्हणत फडणवीसांनी आता 'मातोश्री'शी पुन्हा सख्य होण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. आम्हीच आमच्याविरोधात उमेदवार द्यायचा का? या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देत उमेदवारांच्या निवडीबद्दल सांगितले. तसंच त्यांनी याच मुद्यावरून विरोधकांनाही घेरले. “या निवडणुकीमध्ये फक्त आमचे उमेदवार निवडून हे म्हणणे चुकीचे आहे. अपक्ष आणि इस्लामिक पार्टीचाही उमेदवार निवडून आलाय. अपक्षांची काय ताकद असते? पण तोही आला ना? किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्यांच्या विरुद्ध काँग्रेसने, उबाठाने, शरद पवारांनी उमेदवार दिला नाही. अपक्ष उमेदवार त्यांच्यापुढे आहे. अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार नाही सापडले,” असे फडणवीस म्हणालेत. उद्धव ठकरेंची शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आली, आता त्यांच्याकडे नेतेच राहिले नाही. आम्ही आघाडी केल्यावर महापालिका वनसाईड झाली. दुसऱ्या पक्षांचं अस्तित्व संपलं. अनेक वॉर्डात यांना उमेदवारच मिळाले नाही. जर उमेदवार देणार नसतील तर आम्ही स्वत: आणून उभे करायचे का? असा सवाल फडणवीस यांनी केला.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 12:33 pm

फडणवीसांनी अजित पवारांची खिल्ली उडवताच सुप्रिया सुळेंचा पलटवार:आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण; मेट्रो मोफत की घोषणा?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या मोफत मेट्रोच्या घोषणेवर टीका केल्यानंतर, खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या वक्तव्याला खोचक शैलीत प्रत्युत्तर दिले. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकण्याचा अनुभव असेल, म्हणूनच अशा घोषणा कशा करायच्या हे त्यांना माहिती असेल, असा टोला लगावत सुळेंनी फडणवीसांच्या टीकेला पलटवार केला. शब्दांपेक्षा काम महत्त्वाचं असल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीचा दाखला दिल्याने, पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांमधील आरोप-प्रत्यारोप अधिकच तीव्र झाले आहेत. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, विशेषतः पुणे महानगरपालिका निवडणूक केंद्रस्थानी आली आहे. राज्यात सत्तेत सहभागी असलेले पक्षच या निवडणुकीत वेगवेगळ्या आघाड्यांमधून लढत असल्याने, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र झाली आहे. पुणे महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या संयुक्त जाहीरनाम्यामुळे ही राजकीय लढाई आणखी तापली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी मेट्रो सेवा मोफत करण्याची मोठी घोषणा केल्यानंतर, त्यावरून सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्येच शब्दयुद्ध सुरू झाले आहे. या घोषणेवर भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट टीका करत अजित पवारांच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, मोफत मेट्रोची घोषणा ऐकून त्यांनाही एक कल्पना सुचली होती. मी जाहीर करणार होतो की पुण्यातून उडणाऱ्या सर्व विमानांमध्ये महिलांना मोफत तिकीट दिलं पाहिजे. अनाउन्स करायला काय जातंय? अनाउन्स करायला आपल्या बापाचं काय जातंय, असे विधान करत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला. केवळ घोषणा करणं सोपं असतं, मात्र त्या प्रत्यक्षात शक्य आहेत का, याचा विचार राजकीय नेत्यांनी करायला हवा, असा टोला त्यांनी लगावला. फडणवीस यांनी पुढे सांगितले की, राजकीय जीवनात अनेक वेळा निवडणूक जिंकण्याची शक्यता कमी वाटू लागली की काही नेते लोकांना भुलवण्यासाठी अवास्तव जाहीरनामे काढतात. काहीही सांगितलं तरी चालेल, अशी मानसिकता असते. पण किमान जनतेचा विश्वास बसेल, अशा गोष्टी तरी सांगायला हव्यात, ज्या प्रत्यक्षात करता येतील, असे म्हणत त्यांनी अजित पवारांच्या घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अजित पवार फक्त बोलतात, माझं काम बोलतं, असा थेट हल्ला चढवत, आतापर्यंत आपण संयम राखला होता, मात्र आता परिस्थिती बदलत असल्याचे संकेतही फडणवीस यांनी दिले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी, कदाचित हा त्यांचा अनुभव असेल. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये टाकणार होते ना? त्यामुळे मोफत घोषणांचा अनुभव त्यांनाच जास्त असावा, असा उपरोधिक टोला लगावला. आमचा अनुभव कामाचा आहे, असे सांगत सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले शब्द नेहमीच पाळले आहेत. सरसकट कर्जमाफीसाठी 70 हजार कोटी रुपयांची योजना आम्ही राबवली होती, मात्र सत्ताधाऱ्यांनी दिलेले शब्द आजही पूर्ण केलेले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. दोन भाऊ काय करतात, यापेक्षा देशासमोरचे प्रश्न जास्त गंभीर सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावरही भाष्य केले. आजकाल भाषणं कमी आणि इंटरव्यू जास्त झाले आहेत. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक वृत्तवाहिनीवर तेच चेहरे दिसत आहेत. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, असे त्या म्हणाल्या. मात्र, राज्यातील राजकीय नेते कोण काय बोलत आहेत, यापेक्षा देशासमोर उभ्या असलेल्या मोठ्या आव्हानांवर चर्चा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात कोण बहीण-भाऊ काय करत आहेत किंवा दोन भाऊ काय करतात, यापेक्षा देशासमोरचे प्रश्न जास्त गंभीर आहेत, असा सूचक टोला त्यांनी लगावला. पुणे महानगरपालिकेसाठी संयुक्त जाहीरनामा दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी पुणे महानगरपालिकेसाठी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये पुणेकरांसाठी मेट्रो आणि बस सेवा मोफत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामागील गणित स्पष्ट करत सांगितले की, पुण्यातील वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे दररोज साडे सात कोटी रुपये पेट्रोलवर खर्च होतात. वार्षिक हिशोब केला तर हा खर्च सुमारे दहा हजार आठशे कोटी रुपयांपर्यंत जातो. हेच पैसे सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्यास नागरिकांना दिलासा देता येईल, असा दावा त्यांनी केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 12:26 pm

कोंढव्यातील चाळीत दाम्पत्य मृतावस्थेत आढळले:मुलगा रात्रपाळीवरून आल्याने घटना समोर; महिला वर्षभरापासून होती आजारी

कोंढव्यातील एका चाळीत दाम्पत्य मृतावस्थेत सापडल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानंतर दाम्पत्याच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रकाश मुंडे (वय ५२) आणि ज्ञानेश्वरी मुंडे (वय ४८) अशी मृतावस्थेत सापडलेल्यांची नावे आहेत. मुंडे कुटुंबीय कोंढव्यातील श्रद्धानगर भागात असलेल्या एका चाळीत राहायला होते. मुंडे दाम्पत्याचा मुलगा गणेश(वय २३) हा एका खासगी कंपनीत नोकरी करतो. सकाळी तो रात्रपाळीवरुन घरी आला. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. गणेशने दरवाजा वाजविला. मात्र, प्रतिसाद देण्यात आला नाही. गणेशने शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा वडील प्रकाश आणि ज्ञानेश्वरी हे बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळून आले. मुंडे दाम्पत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. ‘ज्ञानेश्वरी यांना ब्रेन ट्यूमर होता. वर्षभरापासून त्या आजारी होत्या. प्रकाश हे चालक म्हणून काम करायचे. पोलिसानी घटनास्थळाची पाहणी केली. दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकेल. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे’, अशी माहिती येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळंगे यांनी दिली. दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा गजाआड दहशत माजविण्यासाठी देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. सराइताकडून देशी बनावटीच्या पिस्तुलासह काडतूस जप्त करण्यात आले. अभिषेक कैलास दांगट (वय १९, रा. वृंदावन विश्व सोसायटी, नऱ्हे रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दांगट याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक भारती विद्यापीठ परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी राजमाता उद्यानाजवळ एक जण पिस्तूल घेऊन थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी मितेश चोरमले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दांगट याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस सापडले. चौकशीत त्याने दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगल्याची कबुली दिली.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 12:11 pm

शिवसेनेचा पुणे भयमुक्त करण्याचा संकल्प:डॉ. नीलम गोऱ्हे यांचे जनतेला दबावाला बळी न पडण्याचे आवाहन

पुणे महानगरपालिकेत भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा शिवसेनेने निर्धार केला असून, जनतेने कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वतंत्रपणे मतदान करावे, असे आवाहन शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. त्यांनी नागपूर चाळ येथे आयोजित प्रचारसभेत हे वक्तव्य केले. डॉ. गोऱ्हे फुलेनगर-नागपूर चाळ प्रभागातील शिवसेना उमेदवार डॉ. रिंकू मोरे, विजयकुमार ढाकणे, सविता नाईक आणि विपुल दळवी यांच्या प्रचारार्थ बोलत होत्या. यावेळी गायत्री भागवत, शैलेंद्र मोरे, डॅनियल मगर, भानुदास बावस्कर, राजकुमार ढाकणे, सुजित परदेशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. याच सभेत रेश्मा शेख, अलिशा शेख, प्रगती दोडके आणि अर्चना लोखंडे यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. महिलांच्या सक्षमीकरणावर भर देताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 'लाडकी बहीण' योजनेमुळे महिलांना मोठा आधार मिळाला आहे. महिलांचा सन्मान हा त्यांचा अधिकार आहे, ही भूमिका शिवसेनेने नेहमीच घेतली आहे. शिवसेना सत्तेत आल्यास दोन लाख महिलांना लखपती बनवण्यासाठी सहकारी तत्त्वावर उद्योगभवन उभारले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, नोंदणीकृत महिला बचत गटांना महानगरपालिकेतर्फे दरवर्षी ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुढील १० वर्षांत सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करून प्रत्येक झोपडीधारकाला ५५० चौरस फुटांचे मोफत घर देण्याचेही त्यांनी जाहीर केले. शिक्षण क्षेत्रातही सुधारणा करण्याचे आश्वासन देत डॉ. गोऱ्हे यांनी मनपा शाळांमध्ये कॉम्प्युटर आणि एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) शिक्षण सुरू करण्याची घोषणा केली. मुलींना मोफत शिक्षण, ई-लर्निंग शाळांची वाढ आणि पीएमपीएमएल बसमध्ये महिलांना अर्धे तिकीट भाडे यांसारख्या योजनाही त्यांनी मांडल्या. यावेळी त्यांनी मतदारांना मोठ्या संख्येने शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण आणि फळा चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेना उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 12:08 pm

समृद्धी महामार्गाचे श्रेय एकनाथ शिंदेंनाही जाते:प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना कसले श्रेय? देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

समृद्धी महामार्गाची संकल्पना माझी होती, तर त्यासाठी तत्कालिन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी परिश्रम घेतले, त्यामुळे समृद्धी महामार्गाचे श्रेय एकनाथ शिंदे यांना देखील जाते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ज्या प्रकल्पाला उद्धव ठाकरेंचा सुरुवातीपासून विरोध होता, ज्याच्या विरोधात त्यांनी सभा घेतल्या, त्यांना त्याचे श्रेय कसे मिळेल? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी समृद्धी महामार्गाबद्दल बोलताना एकनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले. तर श्रेयवादावरून उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पामागची क्रोनोलॉजी सांगितली. ते म्हणाले, मी शिंदेंना एमएसआरडीसी दिले, तेव्हा ते त्यांना नको होते. उद्धवजींना या खात्यात काहीच नाही, म्हणून एमएसआरडीसी शिंदेंना दिले. त्यामुळे शिंदे फार नाराज होते. त्यावेळी हे खाते आपण मोठे करून दाखवू, तुम्ही काळजी करू नका, असे शिंदेंना सांगितले. निधीची जुळवाजुळव आणि शिंदेंचे कष्ट फडणवीस पुढे म्हणाले, त्यानंतर मी समृद्धी पीडब्ल्यूडीला दिला. त्यावर काम सुरू होते. तो पीडब्ल्यूडीकडून काढून एमएसआरडीसीला दिला. त्याही वेळेत शिंदेंना सुरुवातीच्या हा प्रकल्प होईल, असे वाटत नव्हते. कारण एवढे पैसे येणार कुठून? असा प्रश्न त्यांना होता. मी पहिल्यांदा जमिनीचे अधिग्रहण हातात घेतले. जमीन अधिग्रहणासाठी कुणी अर्थसहाय्य करत नाही. मी मुख्यमंत्री असताना एमआयडीसी, एमएमआरडी यांच्याकडून उधार घेऊन पैसे उभे केले. त्यानंतर शिंदेंनी गावात जाऊन एका दिवसात सगळ्या रजिस्ट्र्या केल्या. त्यामुळे मी कधीच एकट्याचे श्रेय घेतले नाही. समृद्धी महामार्ग हा माझ्यामुळे आणि शिंदे साहेबांमुळे झाला. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विरोध करणाऱ्यांना श्रेय कसे? दरम्यान, समृद्धी महामार्ग झाला, तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरे गटात होते, त्यामुळे ते ठाकरेंचे श्रेय झाले का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला. त्यावर ते म्हणाले, त्यावेळी शिंदे हे ठाकरे गटात असतील, पण समृद्धीचे श्रेय त्यांचे नाही. कारण ठाकरेंनी त्यांना वाळीत टाकले होते. मरी गाय बम्मण को दान, या म्हणीप्रमाणे ठाकरेंनी शिंदेंना मरी गाय (काहीच नसलेले एमएसआरडीसी खाते) देऊन टाकली होती. त्याला जिवंत करण्याचे काम शिंदेंनी केले, असे फडणवीस म्हणालेत. ज्या प्रोजेक्टला उद्धव ठाकरेंचा विरोध होता. हा प्रोजेक्ट होऊ नये, यासाठी सभा घेतल्या, त्यांना त्याचे श्रेय कसे मिळेल? असा सवालही फडणवीस यांनी केला.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 12:08 pm

परभणी संविधान विटंबना प्रकरणातील आरोपीची आत्महत्या:13 महिन्यांनंतर मिळाला होता जामीन; शेतातील खोलीत घेतला गळफास

परभणीतील संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता सोपान पवार याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दत्ता पवारला 4 दिवसांपूर्वीच या प्रकरणात जामीन मिळाला होता. त्यानंतर आज त्याने आपल्या घरातच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परभणीसह महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. दत्ता सोपान पवार याच्यावर परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथील पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या शिल्पाची विटंबना केल्याचा आरोप होता. त्याचे तीव्र पडसाद परभणी शहरात उमटले होते. देशपातळीवर या घटनेची दखल घेण्यात आली होती. या प्रकरणी दत्ता पवारला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून 13 महिन्यांनंतर तो तुरुंगातच होता. अखेर 4 दिवसांपूर्वी त्याला सशर्त जामीन मिळाला. तो मिर्झापूर या आपल्या गावी परतला होता. तिथे दोन-तीन दिवस राहिला. त्यानंतर आज सोमवारी सकाळी त्याने आपल्या शेतातील एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून त्याची माहिती दत्ता पवारच्या कुटुंबीयांना दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, दत्ता पवारची पत्नी व दोन्ही मुले पुण्यात राहतात. तर इतर नातेवाईक जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये राहतात. पोलिसांनी या सर्वांना दत्ता पवारच्या आत्महत्येची माहिती दिली आहे. त्यानंतर आता ते सर्वजण मिर्झापूरच्या दिशेने निघालेत. सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत झाला होता मृत्यू? परभणी हिंसाचारानंतर पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी नामक तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याचा 16 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, त्याच्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत हायकोर्टाने या प्रकरणातील दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतली होती कुटुंबाची भेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गतवर्षी 23 डिसेंबर रोजी परभणीला भेट दिली होती. त्यांनी मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती. राहुल गांधी यांनी दावा केला होता की, सोमनाथ हे दलित असल्याने आणि संविधानाचे रक्षण करत असल्याने त्यांची पोलिस कोठडीत हत्या करण्यात आली. त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावरही या वेळी टीका केली होती.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 11:31 am

हिंगोली जिल्हा बालविवाहमुक्तीसाठी प्रत्येक विवाहाची नोंद बंधनकारक:जिल्हा प्रशासनाचे आदेश, धर्मगुरू, कार्यालयांनी वधुवरांच्या वयाच्या प्रमाणपत्राची तपासणी करावी

हिंगोली जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रत्येक विवाहाची नोंदणी करावी तसेच धर्मगुरु, मंगल कार्यालय व्यवस्थापकांनी वधुवरांच्या वयाच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यंत्रणांना दिले आहेत. हिंगोली जिल्हयात बालविवाह हि समस्या निर्माण झाली आहे. जिल्हयात ८१ मातांचा विवाह अल्पवयीन काळात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारानंतर यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी गुप्ता यांनी यंत्रणांची बैठक घेतली. यामध्ये सामाजिक रूढी, अज्ञान, गरीबी, स्थलांतर, शिक्षणात खंड व परंपरागत समजुतींमुळे हिंगोली जिल्ह्यातील काही ग्रामीण, दुर्गम व शहरी भागांत अद्याप बालविवाहाच्या घटना निदर्शनास येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. बालविवाह जिल्ह्यासाठी चिंताजनक असल्याने हिंगोली जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी गावात होणाऱ्या प्रत्येक विवाहाची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात करणे अनिवार्य आहे. ग्रामीण भागात विवाह नोंदीची जबाबदारी पोलीस पाटील, ग्रामसेवक व सरपंच यांची तर शहरी भागात संबंधित प्रभागाचे नगरसेवक व मुख्याधिकारी यांची राहील असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व धार्मिकस्थळांचे व्यवस्थापक, विश्वस्त व सर्व धर्मांचे धर्मगुरू यांनी कोणताही विवाह विधी पार पाडण्यापूर्वी वधू-वरांचे वय तपासणे अनिवार्य असून वधु किंवा वर अल्पवयीन असल्यास कोणत्याही परिस्थितीत विवाह लावण्यात येऊ नये. बालविवाहाची माहिती मिळाल्यास तात्काळ स्थानिक बालविवाह प्रतिबंध अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय किंवा चाइल्ड हेल्पलाईन 1098 यांना कळवावे, असे आवाहन त्यांनी केले. विवाहासाठी मंडप, केटरिंग, मंगल कार्यालय, प्रिंटिंग प्रेस, बँड, लाईट-साऊंड, डीजे, फोटोग्राफी, डेकोरेशन आदी सेवा/साहित्य पुरविणाऱ्यांनी सेवा देण्यापूर्वी वधू-वरांचे वय तपासणे बंधनकारक आहे. बालविवाहास प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष मदत केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. जन्म प्रमाणपत्र तपासावे वयाच्या पुराव्यासाठी जन्म प्रमाणपत्रास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. जन्म प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास शाळेचे अभिलेख किंवा संबंधित परीक्षा मंडळाचे मॅट्रिक किंवा समतुल्य प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. आधार कार्ड वयाच्या पुराव्यासाठी ग्राह्य धरू नये. कोणतेही दस्तऐवज नसल्यास प्रकरण बालकल्याण समितीकडे वय पडताळणीसाठी पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिल्या.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 11:18 am

आमच्या विरोधात उभे राहिलात तर संपवून टाकू:भाजप कार्यकर्त्यांचा विरोधी उमेदवाराच्या घरात धिंगाणा, पिंपरी-चिंचवडमधील घटना

महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय संघर्षाने हिंसक वळण घेतले आहे. प्रभाग क्रमांक २१ मधील भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी चक्क विरोधी उमेदवाराच्या घरात घुसून धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका ३३ वर्षीय महिला डॉक्टरने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी भाजप उमेदवाराच्या समर्थकांविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी मध्यरात्री १२:१५ च्या सुमारास पिंपरी गावातील नवमहाराष्ट्र स्कूलजवळ घडली. प्रभाग २१ मधील भाजप उमेदवार उषा संजोग वाघेरे यांचे समर्थक आणि नातेवाईक असलेल्या कार्यकर्त्यांनी विरोधी उमेदवाराच्या निवासस्थानी जाऊन दहशत निर्माण केली. स्वप्नील वाघेरे, सूरज वाघेरे, सागर वाघेरे, सिद्धार्थ वाघेरे, वरुण जगताप, प्रशांत वाघेरे, सारंग वाघेरे आणि इतर काही जणांनी संगनमत करून हा हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. आमच्या विरोधात उभे राहिलात तर संपवून टाकू तक्रारदार महिला डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील वाघेरे याने परवानगीशिवाय घरात प्रवेश केला आणि घरातील सदस्यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुम्ही आमच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचे धाडस कसे काय केले? तुम्हाला जीवे मारून टाकू, अशी धमकी आरोपींनी दिली. या गोंधळात आरोपींनी तक्रारदार महिलेशी अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केला. तसेच, मध्यस्थीसाठी आलेल्या दिराला धक्काबुक्की केली आणि वयोवृद्ध आजेसासूलाही ढकलून दिले. सीसीटीव्ही आणि व्हिडिओ पुरावे सादर आरोपींनी केवळ घरात घुसून धिंगाणाच घातला नाही, तर घराबाहेर उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांचीही तोडफोड केली. या सर्व प्रकाराचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून, फिर्यादीने हे व्हिडिओ पुराव्यादाखल पोलिसांकडे सोपवले आहेत. निवडणुकीच्या दहशतीपोटी हा प्रकार करण्यात आला असून आम्ही सुरक्षित नाही, अशी भीती पीडित कुटुंबाने व्यक्त केली आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता या घटनेनंतर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या या कथित कृत्यामुळे विरोधकांनी सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली आहे. हे ही वाचा… जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार?:राज्य निवडणूक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज, मुदतवाढ देण्याची मागणी राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या भवितव्याबाबत आज, १२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती अर्जाद्वारे केली आहे. या निर्णयावर राज्यातील ३२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे गणित अवलंबून आहे. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 11:17 am

फडणवीसांना हवं तेच गणेश नाईक बोलतायत:संजय राऊतांची टीका, लवकरच जाहीर सत्काराची घोषणा; म्हणाले- भ्रष्टाचाऱ्यांचा टांगा पलटी करायला हायकमांड नको

ठाण्यात होणाऱ्या ठाकरे गटाच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक हे शिंदे गटातील भ्रष्टाचाराबाबत जाहीरपणे बोलत असल्याने नवी मुंबई-ठाण्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. याच मुद्द्यावर बोलताना संजय राऊत यांनी गणेश नाईकांचे कौतुक करत, नाईक आज जे बोलत आहेत, ते फडणवीसांना हवं तेच आहे, असा टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रीच या लोकांना तुरुंगात जावंच लागेल, असे बोलत असतील आणि त्यांना शांत केलं जात नसेल, तर सत्ताधाऱ्यांची अंतर्गत स्थिती काय आहे, याचं ते द्योतक असल्याचं राऊत म्हणाले. राऊतांनी पुढे जात गणेश नाईक यांचा जाहीर सत्कार करण्याची घोषणा करत राजकीय वर्तुळात नवा स्फोट घडवून आणला. भ्रष्टाचार कसा सुरू आहे, हे एक मंत्री बेधडकपणे सांगतोय, यासाठी जनतेने त्यांचा सत्कार करायला हवा, असे ते म्हणाले. गणेश नाईक यांनी हायकमांडने परवानगी दिली तर टांगा पलटी करेन, असे विधान केल्याचा उल्लेख करत राऊत म्हणाले की, भ्रष्टाचाऱ्यांचा टांगा पलटी करायला कुठल्याही हायकमांडची गरज नसते. तुमचा अंतरात्मा पुरेसा आहे. शिवसेना, शरद पवार यांच्यासोबत काम केलेल्या गणेश नाईकांकडे ही ताकद आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना एकत्र आणल्याचे श्रेय घेतल्यावर राऊतांनी त्यावरही जोरदार प्रतिवाद केला. फडणवीसांनी स्वतःविषयी गैरसमज करून घेऊ नये. ठाकरे बंधू एकत्र येणं ही महाराष्ट्राची गरज होती आणि मराठी माणसांनी ते केलं आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीसांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील एकोपा आधी सांभाळावा, असा सल्ला देत राऊत म्हणाले की, भिऊ नकोस, मी तुमच्या पाठीशी आहे, हा संदेश ठाकरेंनी महाराष्ट्राला दिला, म्हणून सभेला एवढी गर्दी झाली. मतं विकत घ्यावी लागणार नाहीत, मात्र शिंदे गटाकडून पैशांचा वापर होत असल्याचे व्हिडीओ पुढे येतील, असा दावाही त्यांनी केला. अजित पवार थापा मारत असतील, तर त्यांना आवर घालावा याचबरोबर संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केले. पुण्यात मोफत बससेवेचं आवाहन केवळ पुण्यापुरतं का, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी का नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. अजित पवार थापा मारत असतील, तर त्यांना आवर घालावा, असे आवाहन राऊतांनी फडणवीसांना केले. तसेच अण्णामलाईंच्या वक्तव्यावरून भाजपवर टीका करत, भाजप बाहेरून लोक आणून चाचपणी करते, हे आमच्यावर फेकलेले मुंगळे आहेत, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. ठाण्यातील सभेपूर्वीच राऊतांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 11:12 am

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:राज्यभरामध्ये आरटीओंचे हात बांधले, आता मॅन्युअल फिटनेस चाचण्यांना ब्रेक; केंद्राचा निर्णय, वाहन फिटनेस चाचण्या एटीएसमध्येच

केंद्र सरकारने राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) दिलेल्या अधिकारांवर मोठी कात्री लावत १ जानेवारी २०२६ पासून मॅन्युअल वाहन फिटनेस चाचण्या व प्रमाणपत्र देण्याचा अधिकार रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता ज्या जिल्ह्यांच्या शेजारी ऑटोमेटेड टेस्टिंग स्टेशन (एटीएस) कार्यरत आहेत, त्याच जिल्ह्यातील आरटीओंना आता वाहन फिटनेस चाचण्या घेता येणार नाहीत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचे अवर सचिव मृत्युंजय कुमार यांनी यासंदर्भात महाराष्ट्र शासनाला अधिकृत पत्र पाठवले आहे. या निर्णयामुळे पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या फिटनेस चाचण्यांना पूर्णविराम मिळणार असून, आता अत्याधुनिक यंत्रणांवर आधारित एटीएस केंद्रांमध्येच वाहनांची चाचणी होणार आहे. यापूर्वी १७ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशात सुधारणा करत ज्या जिल्ह्यांमध्ये स्वतः एटीएस उपलब्ध नाही, पण शेजारील जिल्ह्यात एटीएस आहे, अशा ठिकाणच्या आरटीओंचे अधिकारही रद्द करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा-आरटीओ मॅपिंगची सुधारित यादीही जोडण्यात आली आहे. परिणाम कोणावर? सर्व लहान मोठे वाहनधारक, आरटीओ कार्यालये, व्यावसायिक वाहनचालक, खासगी बस व ट्रक मालकया सर्वांना एटीएस केंद्रावरच वाहन फिटनेस चाचणीसाठी जावे लागेल. ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणे अनिवार्य आहे. हा होईल फायदा या निर्णयामुळे पारदर्शकता वाढेल, भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि वाहनांच्या सुरक्षिततेचा दर्जा उंचावेल, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, आरटीओ कर्मचाऱ्यांमध्ये आणि वाहनचालकांमध्ये या निर्णयामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील या आरटीओ कार्यालयांचा समावेश महाराष्ट्रात नाशिक येथील एटीएस केंद्राशी संलग्न धुळे, भाडगाव, चाळीसगाव, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, श्रीरामपूर, ठाणे, कल्याण, वाशी, न्यू मुंबई, पालघर आदी जिल्ह्यांतील अनेक आरटीओंवर याचा थेट परिणाम होईल. कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला राज्यात नव्या एटीएस केंद्रांच्या उभारणीसाठी ठोस कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात आणखी आरटीओंचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय या आराखड्याच्या आधारे घेतला जाईल. महत्त्वाचे मुद्दे > १ जानेवारी २०२६ पासून अंमलबजावणी > आरटीओंचे मॅन्युअल फिटनेस अधिकार रद्द > फक्त एटीएस केंद्रांमध्येच फिटनेस चाचणी > नाशिक व छत्रपती संभाजीनगर एसटीएसशी संलग्न अनेक जिल्ह्यांवर परिणाम > राज्य सरकारला एटीएस विस्ताराचा आराखडा सादर करण्याचे आदेश

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:57 am

ठाकरेंना अदानी चालत नाहीत, पण मुलतानी आणि ममदानी चालतो:नितेश राणेंचा पहिला वार; मुंबई विक्रीच्या आरोपांवरून रणसंग्राम

मुंबईतील शिवाजी पार्कवर रविवारी पार पडलेल्या मनसेच्या जाहीर सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देशातील मोठ्या उद्योगसमूहांबाबत थेट आणि आक्रमक भूमिका घेतली. गेल्या दहा वर्षांमध्ये अदानी समूहाने देशभरात, विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रात कशाप्रकारे आपला प्रभाव वाढवला, यावर त्यांनी सादर केलेला व्हिडीओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. लाव रे तो व्हिडीओ, या त्यांच्या खास शैलीत राज ठाकरे यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून 2014 नंतर अदानी समूहाला मिळालेल्या प्रकल्पांचा, जमिनींचा आणि सत्ताकाळातील वाढत्या प्रभावाचा आढावा सभेत मांडला. या सादरीकरणानंतर सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात आपण उद्योगपतींच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, एकाच उद्योगसमूहाला सातत्याने मोठे केले जात असल्याचे चित्र दिसत असल्याने चिंता व्यक्त केली. देशात उद्योग वाढले पाहिजेत, रोजगार निर्माण झाला पाहिजे, याला आपला विरोध नसल्याचे सांगत त्यांनी सत्तेचा आणि उद्योगाचा अतिशय जवळचा संबंध असल्याचा आरोप केला. मुंबईसारखे आर्थिक राजधानीचे शहर हळूहळू एका विशिष्ट गटाच्या ताब्यात दिले जात असल्याचा दावा करत त्यांनी याचा थेट संबंध आगामी महापालिका निवडणुकांशी जोडला. त्यामुळे ही सभा केवळ राजकीय आरोपांची नव्हे, तर मुंबईच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित करणारी असल्याचे चित्र निर्माण झाले. राज ठाकरे यांच्या या सभेनंतर अवघ्या काही तासांत भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियावर एक ट्विट करत ठाकरे बंधूंना थेट लक्ष्य केले. ठाकरेंना अदानी चालत नाहीत, पण चंगेज मुलतानी आणि झोहरान ममदानी चालतो, असा टोला त्यांनी लगावला. मुंबईकरांनी सावध राहावे, असा सूचक इशाराही त्यांनी या ट्विटमधून दिला आहे. नितेश राणे यांच्या या ट्विटमुळे राजकीय वातावरण अधिक तापले असून, हा मुद्दा केवळ अदानी समूहापुरता न राहता थेट ठाकरे बंधूंवरील आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे. राज ठाकरे यांनी या व्हिडीओतून 2014 पूर्वी आणि 2014 नंतरचा कालखंड ठळकपणे वेगळा करत तुलना मांडली. भाजप सत्तेपूर्वी देशात फारसे नाव नसलेले अदानी समूह कसा देशातील सर्वात प्रभावशाली उद्योगसमूहांपैकी एक बनला, हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वर्षानुवर्षे कशाप्रकारे अदानी समूहाला विविध प्रकल्प मिळत गेले, याचे नकाशे आणि आकडेवारी सभेत दाखवण्यात आली. विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रात मिळालेल्या मोठ्या प्रकल्पांवर राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यामध्ये मुंबई विमानतळ, नवी मुंबई विमानतळ आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा उल्लेख करत मुंबईतील मौल्यवान जमिनी एका उद्योगसमूहाकडे जाण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. सभेत बोलताना राज ठाकरे यांनी अदानी समूहाच्या औद्योगिक विस्ताराचे उदाहरण देत सिमेंट उद्योगाचा उल्लेख केला. कधीही सिमेंट उद्योगात नसलेला अदानी समूह अवघ्या दहा वर्षांत देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक कसा झाला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. सध्या देशातील अनेक सरकारी प्रकल्पांमध्ये अदानी समूहाच्या सिमेंटचा वापर होत असल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ अदानींच्या ताब्यात गेल्याचे सांगत, वाढवण येथे प्रस्तावित असलेले विमानतळही भविष्यात त्यांच्याच ताब्यात जाण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. हा सर्व विस्तार नैसर्गिक उद्योगवाढ आहे की सत्तेच्या आश्रयामुळे घडलेली प्रक्रिया, असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मुंबईच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी एकूणच, शिवाजी पार्कवरील सभेत दाखवलेला अदानी समूहाचा व्हिडीओ, त्यातून मांडलेले आरोप आणि त्यानंतर भाजपकडून करण्यात आलेला थेट हल्ला यामुळे मुंबईच्या राजकारणात नव्या संघर्षाची नांदी झाली आहे. मुंबईचे प्रकल्प, जमीन आणि विकास कोणाच्या हातात जाणार, हा प्रश्न निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र होत चालला आहे. येत्या काळात हा वाद अधिक चिघळणार की राजकीय पातळीवर शमणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:47 am

शिवसेनेत अंतर्गत वाद अन् ठाकरे यांनी घेतले 2 नगरसेवकांचे राजीनामे:पाणीपट्टीत वाढ करण्याच्या मुद्द्यावरून पेटलेला वाद थेट पोहोचला हाेता ‘मातोश्री’पर्यंत

मी महापालिका बोलतेय... आतापर्यंत मी आपल्याला सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील कुरघोडीचं राजकारण सांगितलं. शिवसेना, भारतीय जनता पक्षातील संघर्षही आपण पाहिला, पण मला आता आठवते ती गोष्ट आहे शिवसेनेतील अंतर्गत वादाची. शिवसेनेचे विकास जैन महापौर असताना घडलेलं हे प्रकरण. सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपट्ट्याच्या मुद्द्यावरून आणि इतर काही ठरावांवरून शिवसेनेमध्ये हा वाद पेटला. उत्पन्न वाढीसाठी पाणीपट्टी वाढवण्याचा ठराव आला होता. हा मुद्दा केवळ एक निमित्त ठरला. खरंतर तेव्हा पाणीपट्टी वाढलीच नाही, पण वाद या मुद्द्यावर असल्याचं वरवर दाखवण्यात आलं. सभागृह नेते अंबादास दानवे यांनी विकास जैन यांची कोंडी केली. त्यांना सुदाम सोनवणे यांचीही साथ होती. बरेच दिवस त्यांच्यातील संघर्ष मिटला नाही. ‘त्यांना म्हणजे दानवे आणि सोनवणे यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही,’ असं जैन उघडपणे बोलले होते. त्यावर ‘हा पक्षातील अंतर्गत विषय आहे. आम्ही त्यातून तोडगा काढू,’ असं सोनवणे यांनी सांगितलं होतं. स्थानिक पातळीवर वाद मिटंना. अखेरीस प्रकरण थेट उद्धव ठाकरे यांच्याकडं गेलं. त्यांनी तिघांनाही मुंबईला बोलवून घेतलं. मुंबईत जाताना त्यांच्यासोबत शिवसेनेचे आणखी नगरसेवकही होते. कुणी काय बोलायचं हे सर्व ठरलेलं होतं. मात्र, ऐनवेळी ठाकरे यांच्या पवित्र्यामुळे अंतर्गत धुसफूस ‘मातोश्री’वर उघड झाली. दानवे आणि सोनवणे यांना स्थानिक नेत्यांनीही साथ दिली नाही. पक्षानं दोघांनाही राजीनामा द्यायला सांगितलं होतं. विशेष म्हणजे पक्षाने राजीनामा घेतलेले हे पहिले दोन नगरसेवक. त्यानंतरच्या काळातही शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद होतच राहिले. मात्र, सोनवणे आणि दानवे यांना झालेली शिक्षा लक्षात घेता बऱ्याच जणांनी स्थानिक पातळीवरच वाद मिटवण्यात धन्यता मानली. दानवे यांचा नगरसेवक पदाचा राजीनामा घेतल्यानंतर त्यांची शिवसेनेतून पीछेहाट सुरू होईल, अशी चर्चा होती. प्रत्यक्षात त्यांनी जिल्हाप्रमुख पद मिळवलं आणि ते कायम आपल्याकडं ठेवत ही चर्चा फोल ठरवली. नंतर तर ते विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेही झाले. सध्याच्या निवडणुकीची सूत्रं दानवे यांच्याकडंच आहेत. महत्त्वाचे म्हणजे दानवे आणि सोनवणे यांचे राजीनामे कोणत्या कारणामुळे घेतले हे गुलदस्त्यातच आहे. मनपात सर्वात प्रभावी काम करणारे प्रदीप जैस्वाल आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील संघर्ष त्यांनी कधी उघड होऊ दिला नाही. अंतर्गत वादात न पडता नंदकुमार घोडेले यांनी मात्र दोन वेळा महापौरपद मिळवलं. शिवसेनेनं आमदारकीची उमेदवारी नाकारल्यानंतर प्रदीप जैस्वाल अपक्ष म्हणून लढले. पुढं यांनी शहर विकास आघाडी स्थापन करत मनपा निवडणूक लढवली. त्यांनी काही नगरसेवक निवडूनही आणले. या शहरात स्वतःच्या बळावर काही नगरसेवक निवडून आणणारे ते एकमेव स्थानिक नेते म्हणावे लागतील. एकूणच काय तर वेळप्रसंगी संघर्ष करावा, पण राजकारणात टिकून राहावं हा संदेश महापालिकेच्या राजकारणातच मिळतो. मग ते उदाहरण दानवेंचं असो किंवा जैस्वाल यांचं...

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:34 am

अपघाती मृत्यूच्या घटनेनंतर बेशिस्त वाहनांवर दर्यापूर पोलिसांची कारवाई:अकोट–दर्यापूर मार्गावर रस्ते सुरक्षेसाठी मोहीम; बेशिस्त वाहने उभे करू नका‎

प्रतिनिधी । दर्यापूर उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी व ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दर्यापूर पोलिसांनी अकोट–दर्यापूर मार्गावर वाहतूक नियंत्रण व रस्ते सुरक्षा मोहीम राबवली आहे. शुक्रवारी याच मार्गावर अवैध व बेशिस्त ऑटोमुळे अनियंत्रित होऊन दुचाकी चालक प्राचार्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान पोलीस प्रशासन अधिक सतर्क झाले असून भविष्यात असे दुर्दैवी अपघात घडू नयेत, यासाठी ही कारवाईची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने हटवून संपूर्ण मार्ग मोकळा करण्यात आला. मुख्य रस्त्यावर बेवारस, बेशिस्त व चुकीच्या पद्धतीने उभी असलेली वाहने पोलीसांकडून हटवण्यात आली.तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली. हेल्मेट न घालणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, रस्त्यावर वाहन उभे करून अडथळा निर्माण करणे, तसेच वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर दंड आकारण्यात आला. पुढील काळातही नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे यामुळे वाहनचालक व नागरिकांनी थोडे समाधान व्यक्त केले आहे. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन अनिवार्य वाहन चालकांनी व नागरिकांनी नियमाचे काटेकोर पालन करणे महत्त्वाचे आहे. अति घाई संकटात नेई याप्रमाणे रस्त्याचे नियम पाळणे नागरिक हिताचे मानले जाते. तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा सुजान नागरिक म्हणून सहकार्य करणे महत्वाचे असून यापुढेही पोलीस प्रशासनाची कारवाई व खाकीचा धाक असणे महत्त्वाचे आहे,अशी प्रतिक्रीया अॅड. अनुप गोमाशे यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:26 am

जिल्हा परिषद निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार?:राज्य निवडणूक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज, मुदतवाढ देण्याची मागणी

राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या भवितव्याबाबत आज, १२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती अर्जाद्वारे केली आहे. या निर्णयावर राज्यातील ३२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे गणित अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रशासकीय अडचणी आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ हवा असल्याने आयोगाने १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मागितली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आज या अर्जावर सुनावणी होणार असून, न्यायालय ही मुदतवाढ देणार की ३१ जानेवारीच्या डेडलाईनवर ठाम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरक्षणाचा पेच आणि नवीन याचिका राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के आरक्षण मर्यादेचा मुद्दा कळीचा ठरला आहे. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्या येथे आरक्षण ५० टक्क्यांच्या आत असल्याने त्यांच्या निवडणुका घेण्यास तांत्रिक अडचण नाही. २० जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली असल्याने त्यांच्या निवडणुकांवर प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातून एक नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे. नगरपालिका आणि महापालिकांप्रमाणेच ५० टक्के मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही न्यायालयीन निकालाच्या अधीन राहून एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. आजच्या सुनावणीचे महत्त्व आजच्या सुनावणीत दोन प्रमुख गोष्टींवर निर्णय अपेक्षित आहे. पहिला म्हणजे निवडणूक घेण्यास मुदतवाढ. निवडणूक आयोगाला १० फेब्रुवारीपर्यंत वेळ मिळणार का? हे पाहावे लागणार आहे. दुसरा म्हणजे, ५० टक्क्यांच्या आतील आणि बाहेरील अशा सर्व जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाच वेळी होणार की टप्प्याटप्प्याने? याकडे लक्ष असणार आहे. या निकालावर राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींची दिशा ठरणार आहे. महापालिका निवडणुकांचा धुरळा उडालेला असतानाच आता 'जिल्हा परिषद निवडणुकां'चा चेंडू सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टात आहे. हे ही वाचा… मुंबई मनपाचा निकाल यंदा लांबणीवर?:मतमोजणीच्या नियमात मोठा बदल, उमेदवारांची धाकधूक वाढली; नियमात बदल करण्याची मागणी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा सोपान कोण चढणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच, निकालासाठी आता उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना अधिक काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत 'एकापाठोपाठ एक' असा नवा बदल केल्याने निकालाचा गुलाल उधळण्यासाठी मध्यरात्र किंवा दुसरा दिवस उजाडू शकतो, अशी चिन्हे आहेत. या नव्या नियमामुळे राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, यावर तोडगा काढण्यासाठी आज (सोमवारी) दुपारी आयोगाची राजकीय पक्षांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:24 am

भेदभाव टाळून पत्रकारांनी संघटीत व्हावे-संजय देशमुख:लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा सन्मान सोहळा‎

प्रतिनिधी |अकोला बदलत्या काळात कोसळणाऱ्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी अवास्तव अहंभावाने निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या भेदभावांनी तिलांजली देऊन पत्रकारांनी संघटीत व्हावे, असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम. देशमुख यांनी केले. लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून ४० पत्रकारांसह अन्य मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी देशमुख बोलत होते. समाजाला अपेक्षित असणारा पत्रकार कसा असावा' या विषयावर परिसंवाद व ४० पत्रकारांना राज्यस्तरीय पुरस्कारांनी व सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार प्रदीप खाडे अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाला जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, स्तंभलेखक प्रा. मोहन खडसे, महेंद्र कवीश्वर, अॅड. अनंतराव खेळकर, दिनेश शुक्ल, निशाली पंचगाम, माणिकराव कांबळे, संघटन प्रमुख जगदिश अग्रवाल, विदर्भ संघटक सागर मोदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जया भारती यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सचिव राजेंद्र देशमुख, अंबादास तल्हार, सिद्धेश्वर देशमुख, पुष्पराज गावंडे, प्रा. डॉ. किरण वाघमारे, राजेश खारोडे, पंजाबराव वर, सागर लोडम आदी उपस्थित होते. आभार दीपाली बाहेकर यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:21 am

श्री गजानन महाराजांचा जयघोष; पालखी सोहळा शेगावी मार्गस्थ:श्री गजानन महाराजांचा जयघोष करत वारकरी हरिनामात दंग

बोरगाव मंजू | बोरगाव मंजू येथील लक्ष्मीनगरातील संत गजानन महाराज मंदिरातून पालखी सोहळा रविवारी शेगावकडे मार्गस्थ झाला. टाळ मृदंगाच्या गजरात श्री गजानन महाराजांचा जयघोष करत वारकरी हरिनामात दंग झाले. पाच दिवस चालणाऱ्या सोहळ्यात विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. असा राहणार प्रवास पालखी सोहळ्याला रविवारी बोरगाव मंजू येथून प्रारंभ. अकोला येथे मुक्काम करून सकाळी निघून रात्री गायगाव येथे पालखी सोहळा मुक्कामी असेल. सकाळी गायगाव नागझरीकडे वारकरी मार्गस्थ होतील. रात्री श्री क्षेत्रे रात्री गोमाजी महाराज, नागझरी येथे मुक्काम राहणार आहे. मंगळवारी सकाळी संतनगरी शेगावकडे पालखी सोहळा निघणार आहे. (छाया : देवानंद मोहोड) असा झाला प्रारंभ सोहळ्यात ५०० भाविक सहभागी झाले आहेत. रविवारी सकाळी श्रींच्या चरणी महापूजेसह जलाभिषेक करून पालखी सोहळ्याचा श्रीगणेशा झाला. पालखी मार्गावर भाविकांनी स्वच्छतेसह रांगोळी काढून श्रींच्या चरणी मनोभावे सेवा अर्पण केली. या पालखी सोहळ्यात पांढरा शुभ्र वस्त्र व डोक्यावर टोपी, महिला सेवाधारी हातात टाळ मृदंगाच्या गजरात जयघोष करत मार्गस्थ झाले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:20 am

महापालिका निवडणूक‎प्रचाराचा ठरला ‘सुपर संडे''‎:रणधुमाळी काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, वंचितचे नेते उतरले मैदानात‎

प्रतिनिधी | अकोला मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रचाराचा ‘सुपर संडे' शहरातील मतदारांना अनुभवायला मिळाला. मतदान अवघ्या दोन दिवसावर आल्याने विविध प्रभागांमध्ये प्रचार रॅली, पदयात्रा, सभा व कोपरा बैठका यांच्या माध्यमातून सर्वच पक्षांचे उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसून आले. रविवारी सुटी असल्याने उमेदवारांच्या प्रचार रॅलीत नागरिकांचाही सहभाग दिसून आला. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, मौलाना हारुण नदवी, शिंदे सेनेचे मंत्री संजय राठोड, भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांच्या गल्ली बोळांमध्ये प्रचार रॅलींमुळे शहरातील विविध भागांतील प्रभागांत राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रत्येक मत महत्त्वाचे ठरणार असल्याने उमेदवारांनी प्रचाराची ताकद पणाला लावली असून, महानगरपालिका निवडणूक अधिकच रंगतदार होत चालली आहे. रविवारी जास्तीत जास्त सभा घेण्यावर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी भर दिला आहे. त्यामुळे विविध शहरांत राजकीय पक्षांबरोबरच कार्यकर्त्यांची धावपळ दिसून आली. रिंगणातील उमेदवारांकडून विकासकामे, स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा यांवर भर देत मतदारांना साद घातली जात आहे. या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा १३ जानेवारी रोजी थंडावणार आहेत. त्यामुळे प्रचाराला अवघे दोनच दिवस शिल्लक असल्याने रविवारपासून शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली. शेवटच्या टप्प्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस, शिवसेना (उबाठा), मनसे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी यांच्या प्रमुख नेत्यांच्या सभांतून आरोप-प्रत्यारोपांनी प्रचाराचा खऱ्या अर्थाने धुरळा उडण्यास सुरवात झाली आहे. या सभांमधून नेतेमंडळी आपले निवडणुकीचे मुद्दे मांडत असून, मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यामुळे निवडणुकांची रंगत आणखी वाढली आहे. रविवार सत्कारणी लावण्यासाठी उमेदवारांची लगीनघाई सुटीच्या निमित्ताने घरी असलेल्या जास्तीत जास्त मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांची भेट घेण्यासाठी उमेदवारांनी फिल्डिंग लावली होती. त्यामुळे रविवार सत्कारणी लावण्यासाठी उमेदवारांची लगीनघाई झाल्याचे पाहायला मिळाली. या प्रचार धडाक्यात रविवारी भाजपचे प्रदेश प्रवक्ते आमदार रणधीर सावरकर यांच्या शहरात विविध प्रभागात पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली, पदयात्रा, कॉर्नर सभा झाल्या. १२ जानेवारीपासून दोन दिवस जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर शहरात प्रचारासाठी येणार आहेत. रविवारी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, शिंदे सेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या शहरात ठिकठिकाणी कॉर्नर सभा झाल्या. शहराच्या विविध प्रभागात विविध राजकीय पक्षांच्या निघालेल्या प्रचार रॅलींमुळे सर्वत्र निवडणुकमय वातावरणाची धामधूम पाहायला मिळाली.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:19 am

स्नेहमेळाव्यातून मिळाला जुन्या आठवणींना उजाळा:चांद्यातील जवाहर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा‎

प्रतिनिधी|चांदा चांदा येथील जवाहर माध्यमिक विद्यालयामध्ये नुकताच माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. विद्यालयाच्या स्थापनेपासून म्हणजेच १९५९ पासून ते २०२५ पर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. माजी विद्यार्थी व पुण्यातील एस.पी. महाविद्यालयाचे उपप्राचार्य सोपानराव शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्था कार्यकारिणी सदस्य नानासाहेब अंबाडे, डॉ. दीपक शिंदे, संभाजी दहातोंडे, विनोद गुंदेचा, अमृत गांधी, प्रा. किसन अंबाडे, आसाराम कर्डिले, मच्छिंद्र थिटे, आर.डी. गायकवाड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कैलास दहातोंडे आदी उपस्थित होते. यावेळी संभाजी दहातोंडे, संस्था कार्यकारिणी सदस्य नानासाहेब अंबाडे, डॉ. दीपक शिंदे, प्रा. अशोक चौधरी, प्रा. किसन अंबाडे, प्रा.रावसाहेब राशिनकर, किशोर रक्ताटे, संतोष कानडे, किशोर शिंदे, कार्तिक पासलकर, ज्योती जावळे, जनार्धन पटारे, विनोद गुंदेचा यांनी मनोगत व्यक्त करताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. विद्यालयाच्या प्रगतीसाठी व आवश्यक त्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शक्य तितकी मदत देणगी स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी माजी विद्यार्थी महासंघाची स्थापना करण्यात आली. विद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. विनोद गुंदेचा यांची माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी तर विद्यालयाचे प्राचार्य अंशुमन वाकचौरे यांची सचिवपदी निवड करण्यात आली.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:13 am

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करत त्यानुसार वाटचाल करावी:पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे प्रतिपादन, हंडीनिमगाव येथे श्रमसंस्कार शिबीर उत्साहात‎

प्रतिनिधी | नेवासे फाटा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना आपले ध्येय निश्चित करून त्यादृष्टीने आपली वाटचाल केली पाहिजे. स्पर्धा परीक्षा देताना येणारे विविध आव्हाने समाजातील दैनंदिन जीवन जगाताना वेगवेगळ्या आव्हानांना कसे सामोरे जावे, विद्यार्थी जीवनात शिस्त किती महत्वाची आहे, हे आपले दैनिक वेळापत्रकच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बनवायला हवे, असे आवाहन नेवासे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले. नेवासे तालुक्यातील हंडीनिमगाव येथे पुणे विद्यापीठ व ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरी महाराज, विठ्ठल पाषाण, बाबासाहेब रोडगे, बाळासाहेब पिसाळ, किरण जाधव, संकेत वाघमारे, कुणाल पिसाळ, प्रा. डॉ. एन. डी शेख, प्रा. डॉ. कार्तिकी नांगरे आदी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अभ्यास, शारिरीक कसरत आणि संस्कार या त्रिसूत्रीवर आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास निश्चितच तुम्ही समाजासाठी आदर्श नागरिक बनताल. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. नवनाथ आगळे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात स्वयंभू त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशनंदगिरी महाराज यांनी विद्यार्थ्यांना संस्कार, श्रमदान, आईवडिलांचा आदर व सामाजिक जबाबदारी राखावी असे आवाहन केले. विद्यार्थ्यांपैकी अजित चौरे, अनुष्का सदाफळ, वेदांत बोलके, भारती दारूंटे, विशाल हपसे, सलमान शेख यांनी मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी विठ्ठल पाषाण, बाबासाहेब रोडगे, बाळासाहेब पिसाळ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अनेकांनी भाषणात समसंस्कार शिबीराचे कौतुक केले. शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या शिबिरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विविध मान्यवरांच्या व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले होते.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:12 am

अपयशाच्या भीतीचा सामना करावा आणि यशस्वी व्हावे:व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांचा विद्यार्थ्यांना मंत्र‎

प्रतिनिधी | संगमनेर अपयशाची भीती तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही, त्याचा सामना करा आणि तुमच्या यशाचा मार्ग प्रशस्त करा. असफलता ही यशाच्या मार्गातील एक पाठशाळा आहे. प्रत्येक अपयशातून शिकून तुमच्या ध्येयाकडे सजगतेने पुढे जा. तुमचं आयुष्य अपयश हे तुमच्यामुळे तुमच्या विचारांमुळे अडतं इतरांमुळे नाही. तुम्ही जितकं कमी ठेवालं तेवढे जग तुम्हाला कमी देईल. त्यामुळे तुम्हाला अपयशातून शिकून तुमच्या ध्येयाकडे सजगतेने पुढे जा असे उद्गार व्याख्याते, व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी काढले. मंगळेश्वर विद्यालय मंगळापूर, संगमनेर आणि अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था, शाखा संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कथाकथन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी अरविंद गाडेकर यांनी कथेतून अनेक थोर व्यक्तिमत्वांची बालपणातील शिक्षण, नापास होण्याची गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली. या कथेतून विद्यार्थ्यांनी बोध घ्यावा आणि विद्यार्थ्यांमधील नापास होण्याची भीती दूर व्हावी यासाठी प्रबोधन केले. यावेळी काही निवडक व्यंगचित्र सादर करून विद्यार्थ्यांना हसविले आणि मार्मिक चिमटेदेखील काढले.अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था, शाखा संगमनेर या संस्थेविषयी संस्थेचे सदस्य मनोज साकी यांनी माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील काढणे, पवार दौलत आणि शिक्षकवृंद, शालेय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:11 am

शेतकऱ्यांना मिळाले ऊस पीक व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान:पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापनाचे मार्गदर्शन‎

प्रतिनिधी| शनिशिंगणापूर सोनई येथील कृषी महाविद्यालयाच्यावतीने ग्रामीण जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नेवासे तालुक्यातील खेडलेकाजळी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर तंत्रज्ञान प्रचार-प्रसार करत कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कृषिदूत विद्यार्थ्यांनी ऊस पिकावरील संपूर्ण व्यवस्थापन या विषयावर शेतकरी चर्चासत्राचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत डॉ. अतुल दरंदले यांनी ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गावात राहून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष समस्या जाणून घेता येतात. पिकांवरील कीड व रोग, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याचे शास्त्रीय मार्ग विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. प्रा. नरेंद्र दहातोंडे यांनी कांदा व ऊस पिकांवर येणाऱ्या प्रमुख कीड व रोगांची ओळख, एकात्मिक कीड व्यवस्थापन, कीटकनाशकांचा सूज्ञ वापर, जैविक व रासायनिक उपाय, कीड नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर, जैविक खते व जैविक बुरशीनाशकांचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. क्षारयुक्त जमिनीच्या सुधारणा यावर प्रा. राहुल गडाख यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. सूत्रसंचालन कृषिदूत पृथ्वीराज चौधरी यांनी तर आभार माजी सरपंच बाळासाहेब कोरडे यांनी मानले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:10 am

मुंबई मनपाचा निकाल यंदा लांबणीवर?:मतमोजणीच्या नियमात मोठा बदल, उमेदवारांची धाकधूक वाढली; नियमात बदल करण्याची मागणी

मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा सोपान कोण चढणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच, निकालासाठी आता उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना अधिक काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणी प्रक्रियेत 'एकापाठोपाठ एक' असा नवा बदल केल्याने निकालाचा गुलाल उधळण्यासाठी मध्यरात्र किंवा दुसरा दिवस उजाडू शकतो, अशी चिन्हे आहेत. या नव्या नियमामुळे राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, यावर तोडगा काढण्यासाठी आज (सोमवारी) दुपारी आयोगाची राजकीय पक्षांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. मुंबईत २२७ वॉर्डांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. आयोगाच्या नव्या निर्णयानुसार एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या ५ ते ६ वॉर्डांची मतमोजणी एकाच वेळी वेगवेळ्या टेबल्सवर सुरू व्हायची. यामुळे दुपारपर्यंत कल स्पष्ट व्हायचे. मात्र, आता एका निवडणूक अधिकाऱ्याच्या अखत्यारीत असलेल्या वॉर्डांपैकी प्रथम एकाच वॉर्डाची मोजणी पूर्ण केली जाईल. त्याचा अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतरच दुसऱ्या वॉर्डाची मतमोजणी सुरू होईल. उदाहरणार्थ जर एखाद्या विभागात वॉर्ड क्रमांक २०७ ते २२७ असे वॉर्ड असतील, तर २०७ चा निकाल लागल्याशिवाय २०८ ची मशिन उघडली जाणार नाही. गोंधळ टाळणे आणि पारदर्शकता राखणे हा आयोगाचा उद्देश असला तरी, यामुळे निकालाची प्रक्रिया संथ होणार आहे. आयोगाचा तर्क आणि राजकीय आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणीदरम्यान होणारा गोंधळ आणि गोंधळातून निर्माण होणारे संशयाचे वातावरण टाळण्यासाठी हा पारदर्शकतेचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. मात्र, राजकीय पक्षांनी याला 'वेळेचा अपव्यय' संबोधले आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात २२७ वॉर्डांची मोजणी अशा पद्धतीने केल्यास निकालासाठी प्रचंड वेळ लागेल, ज्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा दावा पक्षांनी केला आहे. आजची बैठक ठरणार निर्णायक या तांत्रिक पेचप्रसंगामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. या प्रक्रियेत बदल करून जुन्याच पद्धतीने (Simultaneous Counting) मोजणी करावी, अशी मागणी सर्वच प्रमुख पक्षांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आज (सोमवारी) होणाऱ्या बैठकीत निवडणूक आयोग आपला निर्णय मागे घेणार की 'एकापाठोपाठ एक' मोजणीवर ठाम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 10:07 am

श्रीगोंदेतील क्रीडा संकुल खेळाडूंसाठी महत्वपूर्ण ठरेल:पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे

प्रतिनिधी|श्रीगोंदे “ग्रामीण भागातील युवकांमध्ये खूप गुणवत्ता आहे. त्यांना योग्य संधी, सुविधा व व्यासपीठ मिळाले तर ते राज्य व देश पातळीवर चमकदार कामगिरी करू शकतात. अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्राची परंपरा सर्व खेळाडूनी आपल्या नैपुण्यातून जोपासली आहे. श्रीगोंदे येथे उभारण्यात येणारे हे क्रीडा संकुल युवकांच्या क्रीडा कौशल्यांना चालना देणारे ठरेल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला. श्रीगोंदे शहरातील क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजन मंत्री विखे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम पाचपुते, माजी मंत्री बबनराव पाचपुते, नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, तहसीलदार सचिन डोंगरे, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव आदी उपस्थित होते. सुमारे साडे आठ कोटी रुपयांच्या माध्यमातून पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलाच्या धर्तीवर २ हेक्टर जागेवर क्रीडा विकासाची कामे या ठिकाणी करण्यात येणार आहेत. क्रीडा संकुलामध्ये मैदाने, धावपट्टी, इनडोअर हॉल, व्यायामशाळा, स्विमिंग पूल, प्रेक्षक गॅलरी, प्रकाशव्यवस्था अशा आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले. भूमिपूजन कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ. विखे यांनी श्रीगोंदे येथील नव्याने उभारण्यात येणाऱ्या शासकीय विश्रामगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी बांधकामाची गुणवत्ता, खोल्यांची रचना, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, पार्किंग, सभागृह आदी बाबींची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 9:58 am

आध्यात्मिक उपक्रमांतून समाजात सद्भाव व एकोपा:संगीतमय श्रीमद् भागवत कथा तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात

प्रतिनिधी|सोनई येथे श्री संत हभप महंत भगवानबाबा व श्री संत हभप महंत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त संगीतमय श्रीमद् भागवत कथा तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात पार पडला. आज झालेल्या हभप राम महाराज झिंजुर्के यांच्या काल्याच्या कीर्तनाला माजी पंचायत समिती सभापती सुनिता गडाख उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत अशा अध्यात्मिक कार्यक्रमांमुळे समाजात सद्भावना, एकोपा व संस्कार वृद्धिंगत होत असल्याचे मत व्यक्त केले. कथा व पारायण सोहळ्यामुळे मनुष्याला आत्मिक ऊर्जा मिळते तसेच जीवनाला योग्य दिशा मिळते, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. सोनई परिसर ही अध्यात्मिक भूमी असून येथे सातत्याने धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम होत असल्याचेही सांगण्यात आले. या पुण्यतिथी सोहळ्यासाठी सोनई व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घेतला. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 9:57 am

मोबाइलच्या अतिवापराचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम:सायबर गुन्हेगारी, फसवणुकीचे प्रकार वाढले, पालकांनी जागरुक व्हावे

प्रतिनिधी |अहिल्यानगर सध्या मोबाइलचा अतिरेक वाढत असून त्याचा लहान मुलांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होत आहे. याद्वारे सायबर गुन्हेगारी व आर्थिक फसवणूक वाढत आहे. पालकांनी स्वतः जागरूक राहून मुलांना मोबाइलपासून दूर ठेवावे तसेच सुरक्षित इंटरनेट वापराचे धडे द्यावेत असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण यांनी केले. लिटिल स्कॉलर्स प्री-प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित पालक आणि मान्यवरांची मने जिंकली. कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण, स्नेहालयचे सहसंचालक संजय चाबुकस्वार, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दौलत येवले, संस्थेचे अध्यक्ष बद्रीनाथ जाधव, एकनाथ शिंदे, शाळेच्या प्राचार्या संगीता जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व नृत्य सादर केले. त्यानंतर विविध शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दौलत येवले यांनी सांगितले, मुलांचा बौद्धिक, शारीरिक आणि संस्कारक्षम विकास घडवून आणण्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पाल्य कोणत्या वातावरणात वावरतो, तो काय शिकतो, कोणत्या सवयी अंगिकारतो याकडे पालकांनी बारीक लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केल्यास मुलांचे उज्ज्वल भविष्य घडू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष बद्रीनाथ जाधव यांनी शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत शिक्षक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्या संगीता जाधव यांनी शाळेच्या वाटचालीचा आढावा घेत पालकांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शुभम जाधव, अथर्व औताडे, प्रणव जाधव, स्मिता थोरात, नम्रता गोळे, मंगेश आहेर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी ढेरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शरद जाधव यांनी मानले. मुलांचा भावनिक विकासही महत्वाचा स्नेहालयचे सहसंचालक संजय चाबूकस्वार यांनी सांगितले, मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासाचा सखोल अभ्यास करून पालकांनी त्यानुसार त्यांच्या गरजांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे तर मुलांचा भावनिक विकासही तितकाच महत्त्वाचा असून त्यासाठी पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा, असे त्यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 9:56 am

नथुराम गोडसे माणसात नव्हता, त्याच्याच या औलादी...:असदुद्दीन ओवैसींचे वादग्रस्त विधान, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

महानगरपालिका निवडणुकींच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी नथुराम गोडसेबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. नथुराम गोडसे माणसात नव्हता, त्यालाही कपडे पाहण्याचा नाद होता. त्याच्याच या औलादी आहेत., अशा शब्दांत ओवैसींनी विरोधकांवर प्रहार केला. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. परभणी आणि जालना महापालिका निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारांसाठी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची काल सभा पार पडली. या सभांमध्ये बोलताना त्यांनी काँग्रेस आणि भाजपवर निशाणा साधताना उपरोक्त वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, आमच्या बरबादीची दास्तान हे लोक लिहितात आणि सांगतात आम्ही सेक्युलर आहोत. मात्र नथुराम गोडसे हा टुई होता. इथे नाही बोलता येत, त्यालाही कपडे पाहण्याचा नाद होता. त्याच्याच या औलादी आहेत. त्यांचेच विचार हे लोक घेवून आलेत. ओवैसींच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून मोठी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या 'बी-टीम' आरोपाचा घेतला समाचार परभणी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी रविवारी दर्गाह रोडवरील मैदानावर असदुद्दीन ओवैसी यांची सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून होणाऱ्या 'बी-टीम'च्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. मोदी तीनवेळा पंतप्रधान झाले, ते काय मुस्लिमांमुळे झाले का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते पुढे म्हणाले, तुम्हाला भाजपला हरवता येत नाही आणि नाव माझे घेता. बिहारमध्ये आम्ही केवळ ५ जागा मागितल्या होत्या, त्या तुम्ही दिल्या नाहीत. स्वतः ६० जागा लढवून फक्त ५ जागा जिंकलात; मग उरलेल्या जागांवर कोण जिंकले? याचे उत्तर काँग्रेसने द्यावे. नेहरू ते मनमोहन सिंग... अन्यायाचा पाढा वाचायला तयार असदुद्दीन ओवैसी यांनी केवळ भाजप-काँग्रेसवरच नाही, तर राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि इतर पक्षांवरही तोफ डागली. नेहरूंपासून ते मनमोहन सिंग यांच्या काळापर्यंत मुस्लिमांवर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचायला मी तयार आहे. मला फक्त दोन मिनिटे द्या, तुम्हाला चुल्लूभर पाण्यात जीव द्यावा लागेल, अशा जहाल शब्दात त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. तरुणांची मोठी उपस्थिती या सभेला मुस्लिम बांधवांसह मोठ्या संख्येने तरुण-तरुणींची उपस्थिती होती. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर असदुद्दीन ओवैसींनी थेट गोडसेचा उल्लेख करत भावनिक आणि राजकीय मुद्द्यांना हात घातल्याने आगामी काळात प्रचाराची रणधुमाळी अधिकच तीव्र होण्याचे शक्यता आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 9:45 am

नशिराबाद येथे आजपासून पीर यासीन मिया कादरी यांचा उरूस:१२६ वा उरूस सोहळा साजरा होणार

प्रतिनिधी | नशिराबाद पीर यासीन मिया कादरी यांच्या उरुसाला १२ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. यंदा हा १२६ वा उरूस सोहळा साजरा होणार आहे. या उरुसानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल नशिराबाद येथे पाहायला मिळणार आहे. उरूस सोहळ्याची सुरुवात १२ रोजी संदल मिरवणुकीने होणार असून, १३ रोजी मेहंदी व चादर अर्पण करण्यात येणार आहे. याच दिवशी उकाब एज्युकेशन सोसायटीतर्फे ऑल इंडिया मुशायरा (कविसंमेलन) होणार आहे. १५ रोजी पारंपरिक कुस्ती स्पर्धा होईल. याच दिवशी रात्री कव्वालीचा शानदार मुकाबला रंगणार आहे. मैफलीत मुंबई येथील प्रसिद्ध कव्वाल अंजुम बानू, कव्वाल जावेद अख्तर (मुंबई) आपल्या दमदार सादरीकरणाने रसिकांची मने जिंकणार आहे. उरूस शेख अजित शेख युसूफ, आबीद शेख मजिद, सैय्यद बरकत अली युसूफ अली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. पीर यासीन मिया कादरी यांचा दर्गा.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 9:35 am

दिव्य मराठी मुलाखत:पोलिस आयुक्तांवर मी समाधानी नाही; पोलिसांना विश्वासात घेतल्याशिवाय दोन नंबरचा धंदा करता येत नाही -पालकमंत्री संजय शिरसाट

मी पोलिस आयुक्तांच्या कामावर समाधानी नाही. शहरात ड्रग्जचे धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. २२ वर्षांची पिढी बरबाद होत आहे. पडेगाव मुकुंदवाडी, नारेगाव, ब्रिजवाडीत ड्रग्जचा व्यापार वाढला आहे. कोणताही दोन नंबरचा धंदा पोलिसांना विश्वास घेतल्याशिवाय करता येत नाही, असा माझा ठाम दावा आहे. पोलिसांनी सर्वांना असेच सोडले तर हे लोण घराघरात येईल. पोलिसांचेदेखील कुटुंब आहे असे सांगत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शहरातल्या कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवले. शहरातील ‘बेसिक’ सुविधांचा विकास झाला पाहिजे. त्यावर शिवसेनेचे लक्ष आहे, असे त्यांनी सांगितले. पक्षांतील गटबाजीचे राजकारण, शहरातील शांतता, भारतीय जनता पक्षाबरोबर युतीची फिसकटलेली चर्चा या सर्व विषयांवर शिरसाट यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मनमोकळी उत्तरे दिली.... प्रश्न : मुख्यमंत्री म्हणतात, भाजपची शिवसेनेमुळे युती तुटली. त्यांच्यात दोन गट आहेत...? शिरसाट : निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. आमच्या युतीच्या १० बैठका झाल्या. मुलगी पाहिल्यानंतर हो की नाही २-३ बैठकांत सांगता येते. मात्र, आमच्यात शेवटपर्यंत निर्णय झाला नाही. सुरुवातीला ५० टक्क्यांचा फॉर्म्युला, मग ‘छोटा भाऊ की मोठा भाऊ’ असे करत ५० टक्क्यांवरून आम्ही ३९ वरून ३६ वर आलो. मात्र, त्यामध्येही पुन्हा चुका केल्या. रात्री दहा वाजले तरी कळवले नाही. शेवटी त्यांचाच निरोप आला, आमचे काही ठरले नाही. मी स्पष्टपणे सांगितले की, मला नऊ वाजेपर्यंत फोन नाही आल्यास मी घोषणा करणार. मुख्यमंत्र्यांना या लोकांनी मिसगाइड केले. ही त्यांची रणनीती होती का याची माहिती नाही. प्रश्न : शिवसेनेत दोन गट आहेत. त्यामुळे युती तुटली का? शिरसाट : भाजपमध्ये दोन गट नाही काय? भागवत कराड, अतुल सावे गळ्यात गळे घालून फिरतात का? संजय केणेकर सोबत असतात का? प्रश्न : पोलिसांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? शिरसाट : मी पोलिस आयुक्तांवर समाधानी नाही. मी आयुक्तांना काही नावे दिली. कुठे धंदे चालतात मी त्यांना सांगितले आहे. ड्रग्जचे धंदे करणाऱ्यांना धरा आणि त्यांची धिंड काढा. पोलिसांचा धाक लोकांना कळू द्या. देवगिरी कारखान्यापासून पुढे गेल्यावर ड्रग्ज विक्रेते दिसतील. नारेगाव, ब्रिजवाडी येथे २० ते २२ वर्षांची मुले बरबाद होत आहेत. ड्रगमाफिया पोलिसांसोबत ‘कनेक्ट’ असतो. कोणताही दोन नंबरचा धंदा पोलिसांना विश्वासात घेतल्याशिवाय करता येत नाही. खून करणारे इतके निर्ढावले आहेत की त्यांच्या चेहऱ्यावर कसलाही लवलेश नसतो. पोलिस मारताना ते आरोपी किती मारले ते मोजत असतात. पोलिसांनाच भीती वाटते. प्रश्न : पत्रकार परिषद घेऊन तुम्ही पोलिसांविषयी सांगूनही हे जाणीवपूर्वक होत आहे का? शिरसाट : जाणीवपूर्वक नाही. काही सवयी मोडायला वेळ लागतो. आम्ही राज्यकर्त्यांनी अनेक सवयी लावलेल्या आहेत. एखाद्या पत्त्याचा अड्डा असला तर दुर्लक्ष कर. मग आणखी दोन अड्डे नवीन तयार होतात. मग एकाचे तीन होतात. दारूचेदेखील तसेच आहे. मग त्यानंतर हे उदरनिर्वाहाचे साधन बनतात. प्रश्न : पालकमंत्री तुम्हीच. अधिकारीही तुमचेच सगळे. तुम्हाला माहिती आहे. मग ही परिस्थिती सुधारणार कधी? शिरसाट : मी पोलिसांना दोष देत नाही. मला वाटते मी आयुक्तालयात जाऊन काही सांगतो तेव्हा माझे ऐकले नाही तर मी माझ्या पद्धतीने करेन. शासनाचे ऐकले पाहिजे. जबाबदारी झटकता येणार नाही. प्रश्न : भाजपचे लोक जर्मनीतल्या शहरासोबत तुलना करतात आणि तुम्ही हिंदू-मुस्लिम करतात... शिरसाट : मला ते कोणते जर्मनीतील शहर बनवायचे नाही. मी लहानपणी नांदेडला लंडन करणार असे ऐकले होते. त्याची मी आजही वाट पाहतो, मुंबईला सिंगापूर होण्याची वाट मी पाहत आहे. बेसिक गोष्टी करून घेतल्या पाहिजेत. इथून लोक परदेशात जातात. आपला देश १०० वर्षे मागे आहे, असे सांगतात. दुबई कोणाच्या जिवावर उभी आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा सहभाग आहे. बेसिक गोष्टी चांगल्या झाल्या तर विकास होईल. या शहरामध्ये ‘ग्रोथ’ होण्यासारखी जागा आहे. त्याचा वापर करायची गरज आहे. उद्योगासोबत अडीच ते तीन लाख लोकसंख्या वाढणार आहे. त्यांच्यासाठी बेसिक सुविधा आहेत का, त्यावर ‘फोकस’ केले पाहिजे. त्या असतील तर विकास होत जाईल. प्रश्न : कोणताही नेता आला की तुमचा बंगला, व्हिट्स हॉटेल, एमआयडीसीतील प्लॉटवरून तुमच्यावर टीका करतो... शिरसाट : माझे मोठेपण सिद्ध करण्याचा तो एक मार्ग आहे. जे आहेत ती वस्तुस्थिती आहे. माझ्या बंगल्यावर आता तर कपडा टाकता येणार नाही. व्हिट्सबाबत गुन्हे दाखल करा. ‘रिट पिटिशन’ दाखल करा ना. मी सडेतोड, स्पष्टपणे उत्तरे देतो म्हणून हे लोक टार्गेट करतात. प्रश्न : शहराच्या विकासाबाबत अनेक समस्या आहेत... शिरसाट : काही वेळा मी स्पष्ट बोललो की काही राज्यकर्त्यांनी सोयीनुसार निर्णय घेतला. उड्डाणपूल पाहिले तर याला सी-सॉ म्हणतात. यामध्ये कोणाचे इंटरेस्ट होते हे तपासून बघा. कोणत्याही शहरात देशात क्रांती चौकासारखा पूल पाहायला मिळणार नाही. तो पूल जिल्हा न्यायालयासमोर न्यायला हवा होता. आज काय होते तर रोज ती धूळ महाराज सहन करत आहेत. प्रश्न : पाण्याच्या बाबतही तसेच झाले आहे का? उत्तर : पाण्याच्या प्रश्नाबाबत एजन्सीला जाऊन विचारले. ‘मातोश्री’वर कोण गेलो होते? चार्टर्ड िवमान घेऊन कोण आले होते? ती एजन्सी कोणाची होती? तर राज्यसभा सदस्याची होती. याची विचारणा केली की सगळे माहिती होते. प्रश्न : महापौरपदी कोण, हर्षदा शिरसाट की आणखी कोणी? शिरसाट : महापौर शिवसेनेचा होणार आहे. महापौर कोण होणार हे सांगण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे, मला नाही. प्रश्न : सततच्या प्रक्षोभक भाषणामुळे अशांत वातावरणामुळे आपण २० वर्षे मागे चाललो आहोत का?शिरसाट : ‘ग्रीन बेल्ट’मध्ये भाषणाची सुरुवात विकासावर करण्यापेक्षा ‘मुस्लिम महिलांचे नकाब काढले तर हात छाटून टाकू,’ इथून सुरू होते. मग ‘शेर आया रे शेर आया, शेर भागा रे शेर भागा...’ शहरात मारामारी त्यांच्यात झाली. त्यात माझे, सावे यांचे नाव घेतले. तुम्ही दलाली केली नसती तर लोक चिडले नसते हे त्यांनी विसरू नये. प्रश्न : इम्तियाज यांनी आरोप केला की दंगलीत त्यांनी राम मंदिर वाचवले, तुम्ही घरी होतात... शिरसाट : कदीर मौलाना यांची मुले मारायला आली होती. त्यामुळे राम मंदिरात आश्रय घेतला. शरणागती घेतली. तिथे ते वाचले, अन्यथा कदीर मौलानाच्या मुलांनी मारून टाकले असते. आजही राम मंदिरातल्या ट्रस्टीसोबत जाऊन चर्चा करा. हा काय राम मंदिर वाचवणार? हा स्वत:ला वाचू शकत नाही. असे धर्मात्मा नको आम्हाला. रॅपिड फायर १. सत्तेसाठी उबाठा, एमआयआयचा पर्याय खुला आहे का ?उत्तर : बिलकुल नाही२. वारसदार कोण, हर्षदा, सिद्धांत की कार्यकर्ते?उत्तर : विचार कार्यकर्त्यांनी चालवला पाहिजे३. महापालिकेचा प्रचारात हिंदुत्व की विकास ?उत्तर : हिंदुत्व आणि विकास४. गटबाजी कोण करते, जंजाळ, भुमरे की शिरसाट?उत्तर : हे पक्षाच्या जिवंतपणाचे लक्षण५. उद्धवसेनेतील स्थानिक कोणता नेता आवडतो, खैरे की दानवे?उत्तर : संजय राऊत

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 9:08 am

लाडकी बहीण योजना अपडेट:मतदानाच्या आदल्या दिवशी 3 हजार रुपये देणार का? काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाकडून सरकारला विचारणा

राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहत असतानाच 'लाडकी बहीण' योजनेच्या हप्त्यावरून मोठे राजकीय वादंग निर्माण झाले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १४ जानेवारी रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये जमा केले जाणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या दाव्याची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना आज (सोमवारी) सकाळी ११:०० वाजेपर्यंत वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे कडक आदेश दिले आहेत. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी शनिवारी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवून खळबळजनक दावा केला होता. राज्य सरकार आचारसंहितेचा भंग करून मतदानाच्या बरोबर आदल्या दिवशी महिलांना प्रलोभन देण्यासाठी दोन महिन्यांचे पैसे एकत्र देणार आहे, असा आरोप त्यांनी पत्रात केला. हा प्रकार लोकशाहीला मारक असून आयोगाने तातडीने हस्तक्षेप करून सरकारला रोखावे, अशी मागणी काँग्रेसने केली होती. आयोगाचा सरकारला 'अल्टिमेटम' काँग्रेसच्या या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने रविवारी रात्री उशिरा मुख्य सचिव राजेश कुमार यांना पत्र पाठवले. सरकार खरोखरच १४ जानेवारीला दोन महिन्यांचे एकत्रित पैसे लाभार्थींच्या खात्यात जमा करणार आहे का? याबाबतची नेमकी वस्तुस्थिती काय आहे? अशी विचारणा आयोगाने केली आहे. यावर आज सकाळी ११ वाजेपर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. योजनेला विरोध नाही, टायमिंगला आक्षेप काँग्रेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या भूमिकेवर अधिक स्पष्टीकरण दिले आहे. लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा अजिबात विरोध नाही. मात्र, १५ तारखेला मतदान असताना १४ तारखेलाच हे पैसे देणे, हा थेट आचारसंहितेचा भंग आहे. हे एक प्रकारचे प्रलोभन आहे. आमचा विरोध केवळ या वेळेला (टायमिंगला) आहे, योजनेला नाही, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण पुन्हा केंद्रस्थानी निवडणूक आयोगाच्या या पत्रामुळे राज्य सरकार आता काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर आयोगाला हे उत्तर समाधानकारक वाटले नाही, तर मतदानापूर्वी पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेवर स्थगिती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे ऐन मतदानाच्या तोंडावर 'लाडकी बहीण' योजनेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 9:06 am

शिवराईत आनंदनगरी:१६ हजारांची उलाढाल

प्रतिनिधी | हतनूर कन्नड तालुक्यातील शिवराई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी ‘आनंदनगरी’ उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि व्यावसायिक कौशल्यांची रुजवणूक करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे आणि खेळांचे स्टॉल्स लावले. पाववडा, सँडविच, गुलाबजाम, समोसे, कांदेपोहे, पाणीपुरी, चटपटीत शेंगदाणे, घरगुती पौष्टिक पदार्थ अशा चविष्ट पदार्थांनी स्टॉल्स गजबजले होते. विद्यार्थ्यांनी वस्तूंची विक्री करताना नफा-तोटा, हिशेब आणि ग्राहकांशी संवाद साधण्याचे कौशल्य आत्मसात केले. ‘चला या, ताजे साबुदाणा वडे घेऊन जा’, ‘केवळ पाच रुपयांत आरोग्यदायी नाष्टा’ अशा घोषणांनी परिसरात उत्साह निर्माण झाला. पालकांनी स्टॉल्सना भेट देऊन मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. ‘मुलांना शाळेतच व्यवहारज्ञान मिळत आहे हे पाहून समाधान वाटले,’ अशी प्रतिक्रिया एका पालकाने दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी १६ हजारांहून अधिक रुपयांची उलाढाल केली. सर्वाधिक नफा कमावणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रजासत्ताकदिनी शाळेतर्फे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ‘आम्ही सारे खवय्ये’ या सेल्फी पॉइंटवर पालकांनी फोटो काढत आनंद व्यक्त केला. विविध खेळांचे स्टॉल्सही पालकांचे मनोरंजन करून गेले. उपक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि गावातील मान्यवरांच्या हस्ते झाले. सरपंच, उपसरपंच, सदस्य, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक देशपांडे, सहशिक्षक सोनवणे, नवघडे, नलावडे, डोंगरे, घोडमारे यांनी मार्गदर्शन केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:36 am

वाहेगाव येथील सेंट मेरी'च्या माजी विद्यार्थ्यांचा २० वर्षांनंतर स्नेहमेळावा:दहावी २००५ व बारावी २००७ च्या विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा‎

प्रतिनिधी | गंगापूर विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेतील शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मोठा वाटा असल्याचे मत या वेळी व्यक्त करण्यात आले. समाजाच्या विविध क्षेत्रांत नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे पार पाडणारे विद्यार्थी पाहणे हे शिक्षकांसाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. तालुक्यातील वाहेगाव येथील येथील सेंट मेरी प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी २००५ व बारावी २००७ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. दोन दशकांनंतर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अनेकांच्या मते ‘ना भूतो ना भविष्यति’ असा ठरला. स्नेहमेळाव्याचे उद्घाटन माजी संचालक रे. फादर विल्फ्रेड सल्ढाणा यांच्या हस्ते झाले. या वेळी संचालक फादर मायकल अँथनी व प्राचार्य एस. बी. बनसोडे प्रमुख म्हणून उपस्थित होते. या विद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवा, उद्योग, सामाजिक, पत्रकारिता, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याचे गौरवोद्गार शिक्षकांनी काढले. या स्नेहमेळाव्यास शिक्षकवृंद म्हणून एस. यू. निकम, ए. एम. थोरात, व्ही. ई. विराळे, एस. के. जाधव, ए. के. भडके, एस. एम. मानकर, आर. जी. चौधरी, जेम्स पंडित, दीपक गणराज, व्ही. व्ही. साबणे, डी. जी. सुरशे, ए. के. दुशिंग, सुभाष कुटे, आर. के. गायकवाड, बजरंग गायकवाड, रवींद्र वालतुरे, सोनवणे, येडू गुडाळे, संजय पारखे, अविनाश त्रिभुवन, एस. एच. मते, वेरॉनिका पारखे, अनिता पोळ, वाघमारे व गोरे उपस्थित होते. आयोजनासाठी सोमनाथ मनाळ, शिवाजी बर्डे, प्रमोद सूर्यवंशी, नितेश साबणे, अमोल पवार, पंकज जाधव, रामेश्वर हिवाळे, अमोल काकडे, प्रफुल्ल गणराज, संतोष डावान, अमोल जगताप, गणेश जगताप, सतीश आदमाने, लक्ष्मण जाधव, देविदास तगरे, वर्षा पवार, सुरेखा हिवाळे, सीमा वालतुरे व विनोद भडके व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेतील शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा मोठा वाटा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. समाजाच्या विविध क्षेत्रांत नेतृत्वाची जबाबदारी समर्थपणे पार पाडणारे विद्यार्थी पाहणे हे शिक्षकांसाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:35 am

बाभुळगाव येथील आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद:रासेयोअंतर्गत शिबिरास गावकऱ्यांचा सहभाग‎

प्रतिनिधी | लासुर स्टेशन गंगापूर तालुक्यातील बाभुळगाव नांगरे येथे राष्ट्रीय सेवा योजना एनएसएस विभाग विशेष शिबिराअंतर्गत शनिवारी आरोग्य तपासणी शिबिरास गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी, वृध्द नागरिक, महिलांसह तीनशेहून अधिक नागरिकांची या मोफत शिबिराद्वारे आरोग्य तपासणी करण्यात आली. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि छत्रपती शाहू महाविद्यालय लासूर स्टेशन येथील राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर अंतर्गत गेल्या आठवड्यापासून बाभुळगाव नांगरे येथे एनएसएस विशेष शिबिर सुरू आहे. या शिबिरामध्ये सर्व नागरिकांचे आरोग्य तपासणी करून मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, सर्दी, ताप, डोकेदुखी, गुडघेदुखी, मनकेदुखी, त्वचाविकार इत्यादी आजारांची तपासणी करून औषधी देऊन योग्य तो पुढील उपचारासाठी सल्ला देण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल धाबे, डॉ. विशाल उईके, डॉ. प्राची पाटील, डॉ. नदीम, डॉ. दत्ता पाटील, डॉ. ऋतुजा पाटील, डॉ. संतोष जाधव यांच्यासह ॲडव्हान्स मेडिसिटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील सर्व डॉक्टरांचे पथक सहकारी सहभागी झाले होते. प्राचार्य बाळासाहेब पवार व सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:34 am

टाकळी जिवरग येथील विद्यार्थ्यांना आनंदनगरीत मिळाले व्यवहार ज्ञान:श्री शिवछत्रपती विद्यालयात आनंदनगरी मेळावा, पालकांचा प्रतिसाद

प्रतिनिधी | टाकळी जिवरग सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरग येथील श्री शिवछत्रपती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय जिवनासोबतच व्यावहारिक ज्ञानदेखील मिळावे म्हणून नारायण जिवरग यांच्या नेतृत्वाखाली आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी ३६ स्टॉल उभारले होते. दिवसभरात विविध पदार्थाच्या विक्रीतून १७ हजार ५०० रुपयांची कमाई केली. निमखेडा गावाचे सरपंच नामदेव खेत्रे व संस्तेचे आध्यक्ष नारायण जिवरग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान मिळणेदेखील गरजेचे असते. यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातून दोन पैसे मिळवताना कशा प्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून श्री शिव छत्रपती विद्यालयात आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील तब्बल १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला. मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरूनच साहित्य बनवून आणून शालेय आवारात स्टॉल लावले. विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होते. या मेळाव्याला एक प्रकारे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते. या वेळी सरपंच ज्ञानेश्वर वाहटुळे उपसरपंच कौतिक जिवरग, माजी सरपंच परमेश्वर जिवरग, गावकरी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. दरम्यान, या आनंदनगरीमुळे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान मिळाले. बाजारपेठेचा अनुभव मिळाला.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:34 am

नागापूर येथील विद्यार्थ्यांनी अनुभवला बँकेचा व्यवहार‌:जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताविषयी भीती घालवली

प्रतिनिधी | नागापूर गणित विषय विद्यार्थ्यांना अवघड असला तरी नागापूर तालुका कन्नड येथील नागेश्वर विद्यालयाचे गणिताचे शिक्षक दत्तात्रय महाजन यांनी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना बँक व सरळ व्याज या पाठाविषयी जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताविषयी भीती घालवली. सहावीच्या विद्यार्थ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेत नेऊन बँकेचे प्रत्यक्ष कामकाज दाखवले. गणित विषयाच्या बँक व सरळ व्याज या पाठाविषयी विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान व्हावे तसेच विद्यार्थ्यांना बँकेच्या विविध योजना, विविध प्रकारचे फॉर्म, चलन कसे भरावे, पैशांचा व्यवहार कसा करावा, बँकेत खाते उघडण्यासाठी फॉर्म कसा भरावा, त्यासाठी लागणारी कागदपत्रे यासह बँकेच्या व्यवहाराची इत्थंभूत माहिती व्हावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. शाखा मॅनेजर अबेद सय्यद, लिपिक जयाभाऊ राजपूत यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मंगेश तायडे, संचालक अमोल तायडे, मुख्याध्यापक शशिकांत जोशी तसेच सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी दत्तात्रय महाजन यांचे कौतुक केले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:25 am

दहा महिन्यांतच दोन लाखांहून अधिक पर्यटकांनी दिली भेट‎:सहलींमुळे संत ज्ञानेश्वर उद्यानात गर्दी; दररोज ३ हजार पर्यटक देताहेत भेटी

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलींमुळे पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. शाळा–महाविद्यालयांच् या सहलींसाठी हे उद्यान प्रमुख आकर्षण ठरत असून या दहा महिन्यांतच दोन लाखांहून अधिक पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. मध्यंतरी तब्बल पाच वर्षे बंद असलेले हे उद्यान ‘दिव्य मराठी’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीमुळे पुन्हा खुलं झाले, सध्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने सहली येत असल्याने रोज उद्यानात तीन हजारहून अधिक पर्यटक येत असुन उद्यानाची वेळ संध्याकाळी ५ची सुरू होण्याची आहे. ही वेळ दुपारी १२ ची करण्याची मागणी पर्यटकांनी केली आहे. नाथसागर परिसरातील ३१० एकर क्षेत्रात वसलेल्या या उद्यानात विद्यार्थ्यांना निसर्ग, पर्यटन व मनोरंजनाचा एकत्रित अनुभव मिळत आहे. रंगीत व संगीत कारंजे, हिरवळ, फुलांचे ताटवे आणि मोकळी जागा यामुळे सहलींसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या दररोज दोन हजारहून अधिक पर्यटक येत असून सध्या मोठ्या प्रमाणात शालेय व महाविद्यालयीन सहली येत असल्याचे अभियंता तुषार विसपुते यांनी सांगितले. उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी १३१ कोटींचा विशेष निधी प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात २७ कोटींच्या कामांतून २१ प्रकारची रंगीत व संगीत कारंजे सुरू करण्यात आली आहेत. आमदार विलास भुमरे यांच्या माध्यमातून ही कामे पूर्ण झाली. पुढील टप्प्यात अंतर्गत रस्ते, वाहनतळ, बगिचे, मुलांसाठी खेळणी तयार करण्यात येत आहे तर अ‍ॅडव्हेंचर पार्क लवकर खुले होणार आहे. पैठणला जगातील पर्यटक येतील : आमदार भुमरे आमदार विलास भुमरे यांनी सांगितले की, पैठणला जगभरातील पर्यटक येतील असे नियोजन करण्यात येत असून सध्या पहिल्या टप्प्यात उद्यान सुरू आहे, सर्व कामे झाल्यावर येथे येणाऱ्या पर्यटकाची संख्या प्रचंड वाढेल, मी पैठणकर म्हणून आपण शहराच्या विकासात भर टाकण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन विकासकामे करण्यात येतील. अध्यात्म, शिक्षण व पर्यटनाचा सुंदर संगम विद्यार्थ्यांच्या सहलींसोबतच नाथ मंदिर व समाधिस्थळी दर्शनासाठी येणारे भाविकही उद्यानाला भेट देत आहेत. त्यामुळे अध्यात्म, शिक्षण व पर्यटन यांचा सुंदर संगम येथे घडत आहे. वाढलेल्या पर्यटकांमुळे पैठणच्या अर्थकारणालाही चालना मिळाली आहे. हॉटेल, उपाहारगृहे, रिक्षा, खेळणी दुकाने, हातमाग साड्या व इतर व्यवसायांना लाभ झाल्याची माहिती व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष पवन लोहिया यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून उद्यानातील रखडलेली कामे तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे. उद्यान विकास समितीचे प्रा. संतोष गव्हाणे, रमेश लिंबोरे, बाळू आहेर, रमेश शेळके, बजरंग काळे यांनी केली आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:24 am

लाडगावला भाजपचा कार्यकर्ता मेळावा:श्रीराम शेळकेंचा सत्कार

प्रतिनिधी | करमाड भाजपचा कार्यकर्ता मेळावा लाडगाव येथे उत्साहात झाला. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रीराम शेळके यांचा सत्कार करण्यात आला. नुकतीच त्यांची छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी बिनविरोध निवड झाली आहे. सत्कार दानवे यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार अनुराधा चव्हाण, जिल्हा दूध संघाचे संचालक दामोदर नवपुते, माजी सभापती राधाकिसन पठाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामू शेळके, माजी उपाध्यक्ष अशोक पवार उपस्थित होते. दानवे म्हणाले, राज्यातील नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम केले. तशीच एकजूट संभाजीनगर महापालिका निवडणुकीत दिसत आहे. त्यामुळे १६ जानेवारीला मनपात भाजपचा भगवा झेंडा फडकताना दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्रीराम शेळके हे दिलदार कार्यकर्ते आहेत. पक्षाने त्यांना योग्य न्याय दिला. पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी अधिक जोमाने काम करावे, असा सल्ला दानवे यांनी दिला. यावेळी अनुराधा चव्हाण, रामू शेळके, श्रीराम शेळके यांनीही भाषणे केली. सूत्रसंचालन सुदाम ठोंबरे यांनी केले. प्रकाश चांगुलपावे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:24 am

सावंगीत भैरवनाथ बाबांच्या यात्रोत्सवास प्रारंभ; एक लाख भाविकांनी घेतले दर्शन:गावकऱ्यांकडून सामूहिक महाआरतीने यात्रा उत्सवास प्रारंभ‎

प्रतिनिधी | लासूर स्टेशन सावंगी येथील श्री भैरवनाथ बाबांच्या यात्रेनिमित्त रविवारी पंचक्रोशीतील सुमारे एक लाखाहून अधिक भाविकांनी भैरवनाथ बाबा मंदिरात नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले. दिवसभर भाविकांची दर्शनासाठी मंदिरात गर्दी दिसून आली. रात्री उशिरापर्यंत लासूर स्टेशन येथील स्थानिक व्यापारी वर्ग, महिलांची दर्शनासाठी ये-जा सुरूच होती. यंदा प्रथमच गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून तब्बल दोन कोटी रुपयांचे भैरवनाथ बाबांचे मंदिर बांधल्याने यात्रेचा उत्साह अधिकच वाढला आहे. रविवारी यात्रेमुळे सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. पूर्वी भैरवनाथ बाबांचे छोटेसे मंदिर असल्याने भाविकांना रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागायचे, आता गावकऱ्यांच्या इच्छाशक्तीने दोन वर्षांत येथील परिस्थिती बदलली अन् भलेमोठे आलिशान मंदिर बांधण्यात आले. मंदिराला चोहोबाजूने संरक्षण भिंत तयार केलेली असून येथे नवीन मुख्य प्रवेशद्वारचे काम देखील प्रगतिपथावर आहे. दरम्यान, सावंगी चौकापासून ते भैरवनाथ बाबाच्या मंदिरापर्यंतचा रस्ता रविवारी भाविकांच्या गर्दीने फुलून निघाला होता. लासूर स्टेशन पंचक्रोशीतील ५० ते ६० खेड्यापाड्यातील हजारो भाविकांच्या हजेरीने मंदिर परिसर दुमदुमला होता. विशेष म्हणजे एका दिवसाची भरणारी ही यात्रा जुन्या काळापासून चालत आलेली आहे. यंदा तीन दिवस यात्रा भरवण्याचा गावकऱ्यांनी संकल्प केलेला आहे. लासूरला दर रविवारी भरणारा सर्वात मोठा आठवडी बाजारदेखील यात्रेमुळे सावंगी येथेच भरवला जातो, ही परंपरा सुरुवातीपासून चालत आलेली आहे. मंदिराच्या प्रांगणासह रस्त्यांच्या दुतर्फा नारळ महाप्रसादाची दुकाने भांडी, कटलरी, खेळणी, रहाटपाळणे, खाऊ, हॉटेल, रसवंती अशा विविध दुकानातील स्टॉलवर भाविकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. कुस्त्याच्या आखाड्याने मंगळवारी होणार सांगता यात्रेच्या दिवशी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी रोडग्यांचा नैवेद्य करून पाहुण्यांना खाऊ घातला. दरवर्षीप्रमाणे मंगळवारी कुस्ती आखाडा ठेवण्यात आलेला असून पंचक्रोशीतील पहिलवानांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे. या तीनदिवसीय भैरवनाथ बाबांच्या यात्रेची सांगता कुस्त्याच्या आखाड्याने होणार आहे. शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पीआय सलीम चाऊस यांनी दोन फौजदारांसह ३० पोलिस कर्मचारी मंदिरासह भैरवनाथ बाबाच्या प्रवेशद्वारापर्यंत चोख बंदोबस्त ठेवला आहे. गावातील ४०-५० युवक स्वयंसेवक म्हणून यात्रेत काम करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:23 am

तब्बल ५६ वर्षांनंतर शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदाचा मान वैजापूरच्या आमदाराला:रमेश बोरनारे यांना संधी की कसोटी? शहरातील नागरिकांमधून आता तर्कवितर्क सुरू‎

प्रतिनिधी | वैजापूर वैजापूर तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या चर्चेचा विषय बनला आहे. राज्य सरकारने शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांना मंत्रिपदाचा दर्जा बहाल झाला आहे. हा निर्णय केवळ वैजापूरसाठी नव्हे, तर तालुक्याच्या राजकीय इतिहासातही महत्त्वाचा मानला जातो. कारण माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या निधनानंतर ५६ वर्षांनी वैजापूरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदाराला हा मान मिळाला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला पीछेहाट सहन करावी लागली. विशेषत नगराध्यक्षपदासाठी बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांचा पराभव हा पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निराशा निर्माण करणारा ठरला. भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांनी नगराध्यक्षासह १६ नगरसेवक जागा जिंकून नगरपालिकेवर स्पष्ट बहुमत मिळवले. आता मंत्रिपदाचा दर्जा मिळाल्याने आमदार बोरनारे यांचा पक्षातील आणि शासनातील प्रभाव निश्चितपणे वाढणार आहे. हा दर्जा आता पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तसेच वैजापूर मतदारसंघाच्या विकासकामांसाठी कितपत उपयोगी ठरेल याकडे राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:22 am

सुखना नदीत वाळू उपसा; दोन डंपर सोडले- ग्रामस्थ:कायदा सर्वांसाठी समान, मग अवैध वाळू उपसणाऱ्यांना सूट का

प्रतिनिधी | करमाड पिंप्रीराजा परिसरातील सुखना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे. महसूल विभागाच्या पथकाने रविवारी दोन डंपर पकडले. दोन्ही डंपरमध्ये दोन ते तीन ब्रास वाळू होती. या वाहनांवर कारवाई सुरू असतानाच वरिष्ठ पातळीवरून फोन आल्याची चर्चा आहे. त्यानंतर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता दोन्ही डंपर सोडून देण्यात आले, अशी माहिती स्थानिकांनी दिली. या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. कायदा सर्वांसाठी समान असावा, मग अवैध वाळू उपसणाऱ्यांना सूट का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. नदीपात्र खोल होत आहे. भूजल पातळीवर परिणाम होत आहे. पर्यावरणीय नुकसानही वाढत आहे. तरीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिक नाराज आहेत. स्थानिकांनी सांगितले की, कारवाई अर्धवट राहिल्यास अवैध वाळू उपसाऱ्यांचे मनोबल वाढेल. त्यामुळे या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणी उपविभागीय महसूल अधिकारी व्यंकट राठोड आणि तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:21 am

सावध व्हा, शहराचे नाव बदलणारे महापौर होतील:एमआयएम नेते अकबरूद्दीन ओवैसी यांचा इशारा

“लोकसभेला आपण हरलो, आता तुम्हाला शहराचे महापौरपदही गमवायचे आहे का? तुम्ही सावध झाला नाहीत, तर शहराचे नाव बदलणारे लोक महापौर होऊन बसतील. तुम्हाला आपला भाऊ महापौर होताना पाहायचा नाही का?’ अशा शब्दांत आॅल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमिन (एमआयएम) पक्षाचे नेते आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांनी मतदारांना आवाहन केले. मनपा निवडणूक प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते. त्यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. देशात मुस्लिम समाजाचा केवळ व्होट बँक म्हणून वापर करण्यात आला आहे. प्रत्येक सरकारने आम्हाला मागे ठेवण्याचेच काम केले. आज शिक्षण नाही, रोजगार नाही आणि साधी कारकूनची नोकरीही मिळत नाही. देशात आम्हाला योग्य हिस्सा दिला असता, तर ‘एमआयएम’ला प्रत्येक ठिकाणी जाण्याची गरज पडली नसती,’ असे त्यांनी सांगितले. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचाही आपण निषेध करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाषणाच्या शेवटी त्यांनी “१५ तारखेला १५ मिनिटं काढून या,’ असा सूचक उल्लेख केला. मतदारांना भावनिक साद “मी आज तुमच्याकडे झोळी घेऊन भिकारी म्हणून आलो आहे. माझी झोळी भरून टाका, तुमची भीक घेऊन मी तुमची सुरक्षा करेन. दुश्मन पूर्ण तयारीने येत आहे, आताही समजले नाही तर संपवून टाकतील. त्यामुळे एक व्हा,’ अशी भावनिक साद त्यांनी घातली. आम्हाला अंधारात ठेवले मुस्लिम समाजाच्या स्थितीवर भाष्य करताना ओवेसी म्हणाले, “आम्हाला मुसलमान असल्याचा गर्व आहे, पण आज सरकारी योजनांमध्ये मुस्लिमांचे स्थान काय आहे? डॉक्टर, वकील, शास्त्रज्ञ अशा सर्वच क्षेत्रात मुस्लिम समाज शेवटी आहे. हा अन्याय नाही का? आम्हाला जाणीवपूर्वक अंधारात ठेवले गेले. तेलंगणामध्ये आम्ही काम करून दाखवले आहे.’

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:19 am

कार ट्रकला धडकून 2 ठार; कोल्हापूर एसीबीच्या डीवायएसपी पाटील जखमी:अपघातात कारचा चुराडा जखमींवर चित्रदुर्गमध्ये उपचार सुुरू

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या कारचा अपघात झाला. अपघातात त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या दाेन जणांचा जागीच मृत्यू झाला असून वैष्णवी पाटील यांच्यासह तिघे जखमी झाले. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. बेंगळुरूवरून कोल्हापूरकडे परतताना आज पहाटे हा अपघात झाला. वैष्णवी पाटील ज्या कारमधून प्रवास करत होत्या, ती कार अचानक एका ट्रकला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की, कारचे मोठे नुकसान झाले आणि त्यामध्ये प्रवास करणाऱ्या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमींना त्वरित चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. वैष्णवी पाटील यांच्यावर तेथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 7:00 am

बडतर्फ आयएसएस पूजा खेडकरच्या बंगल्यात दरोडा:आई-वडिलांना गुंगीचे ओैषध देऊन लूट

बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडेकरच्या बाणेरमधील बंगल्यात मध्यरात्री दरोडा घालण्यात आला. दहा दिवसांपूर्वी कामाला आलेला नेपाळी स्वयंपाकी व साथीदारांनी दरोडा घातल्याची प्राथमिक माहिती आहे. खेडकरच्या आई-वडिलांना जेवणातून गुंगीचे ओैषध दिले. रात्री एकच्या सुमारास पूजा खेडकर बंगल्यात आली. तेव्हा बेशुद्धावस्थेत आई-वडिलांना पाहिले. नेपाळी कामगाराने खेडकरचे हात पाय चिकटपट्टीने बांधले. त्यानंतर कामगार व त्याच्याबरोबर असलेले साथीदार दागिन्यांची लूट करुन पसार झाले. या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पसार झालेल्या नेपाळी कामगार आणि साथीदारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. चतु:शृंगी पोलिसांची घटनास्थळी पाहणी नेपाळी कामगार आणि साथीदारांनी सोन्याचे दागिने, तसेच मौल्यवान वस्तू काढून घेतल्या. त्यानंतर नेपाळी कामगार व साथीदार पसार झाले. रात्री दीडच्या सुमारास चिकटपट्टीने बांधलेले हातपाय पूजाने सोडविले आणि तिने आई-वडील, नोकराला जागे करण्याचा प्रयत्न केला. पूजाने चतु:शृंगी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. ठाण्याचे निरीक्षक उत्तम भजनावळे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अलका सरग, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे यांनी घटनास्थळी भेट दिली.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 6:59 am

'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा':'रस्त्यावर गाडी पलटते म्हणून रिक्षावालासुद्धा येत नाही', दूषित पाण्याची समस्या काही सुटेना, छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांची एकच हाक पाणी

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका इमारतीपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेला प्रभाग क्रमांक ५… पण इथे राहणाऱ्या जय भीमनगरमधील नागरिकांसाठी विकास आजही केवळ कागदावरच आहे. दिव्य मराठी डिजिटलच्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या शोमध्ये आम्ही जेव्हा या वस्तीत पोहोचलो, तेव्हा समोर आलेले वास्तव अस्वस्थ करणारे होते. छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर दिव्य मराठी ऍपने सुरु केलेल्या 'लढाई मनपाची , मुद्दा नागरिकांचा' या टॉक शोला शहरवासीयांनी उदंड प्रतिसाद दिला. ‘आमच्याकडे पाणी नाही, ड्रेनेज तुंबलेली आहे, गल्ल्या इतक्या अरुंद आहेत की रुग्णवाहिकाही आत येऊ शकत नाही’ हे सांगताना नागरिकांचा आवाज भरून येत होता. याच अरुंद गल्लीत रुग्णवाहिका वेळेत पोहोचू न शकल्याने एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची वेदनादायक घटना त्यांनी सांगितली. ही केवळ एक घटना नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाचा जिवंत पुरावा आहे. महानगरपालिका इतकी जवळ असतानाही या परिसरात ना नियमित पाणीपुरवठा आहे, ना नीट रस्ते, ना स्वच्छ ड्रेनेज व्यवस्था, ना कचरा उचलण्याची यंत्रणा. नागरिकांनी सांगितले की, २०१६ नंतर या प्रभागाचा नगरसेवक वस्तीत फिरकलाही नाही. निवडणुकीच्या वेळी मात्र पाच किलो गहू आणि पाचशे रुपये घेऊन येतात, मतदान मागतात, पण नंतर पुन्हा या वस्तीकडे पाठ फिरवली जाते. असा संतापही नागरिकांनी व्यक्त केला. या सगळ्यात सर्वाधिक अस्वस्थ करणारे दृश्य म्हणजे काही अपंग महिला. डोक्यावर हंडे घेऊन, ओबडधोबड रस्त्यांवरून, पाण्यासाठी वणवण फिरताना दिसत होत्या. २१व्या शतकात, शहराच्या मध्यभागी, महिलांना आणि अपंगांना अशा परिस्थितीत जगावे लागत असेल, तर विकास नेमका कोणासाठी झाला, हा प्रश्न उपस्थित होतो. कोणी मरून पडलं तर गाडीसुद्धा येत नाही जय भीम नगरमधील रहिवासी ऋतुजा सागर साबळे म्हणतात की, ‘आमच्याकडे रस्ते एवढे घाण आहेत की, त्यावरून नीट चालता सुद्धा येत नाही. जर कोणी मरून पडलं ना तर गाडीसुद्धा येत नाही. जागा खूप कमीये. छोटे - छोटे रस्ते आहेत. त्यामुळे रिक्षावाला म्हणतो की आम्ही तुमच्याकडे येत नाही आमच्या गाड्या पलटतात. त्यामुळे आजारी माणसाला आम्हाला झोळीत टाकून रस्त्याने न्याव लागत. नगरसेवक तर काहीच कामाचे नाहीत. असूनही ते नसल्यासारखे आहेत. त्यांना काही सांगावं तर ते हो हो म्हणतात आणि काहीच करत नाहीत. आम्हाला ते कवडीमोल समजतात. ते फक्त स्वतःचेच घर भारतायेत. आमच्या गल्लीत मोटारीचा चार जणांना शॉक लागलेला आहे. तरीही कोणी बघायला आले नाही. हे आमच्या कामाला येत नाही तर काय कामाचे असले नगरसेवक? त्यामुळे यावेळी तर आम्ही मतदान करण्याच्या मनस्थितीतच नाहीयेत.’ पाच किलो गहू आणि पाचशे रुपये घेऊन मतदान करा प्रभागातील सुमनबाई पाटोळे म्हणतात, 'फक्त एक तास पाणी येत. त्यातही ड्रेनेजचे पाणी आर्धा तास. आम्हाला नवीन पाईपलाईन हवी आहे. पाणी इतकं घाण येत की ते हातात सुद्धा घ्यावंसं वाटत नाही. आम्हाला ते पाणी प्यावं लागत. काँग्रेसवाले आले आणि म्हणाले की, आम्ही तुम्हाला पाचशे रुपये आणि पाच किलो गहू देतो तुम्ही आम्हालाच मतदान करा. यासाठी आम्हाला बिल्ले देऊन गेले आहेत. आम्ही काय म्हणून त्यांना मत द्यावं. आमची एकदा हालत येऊन बघावं म्हणा. आमचं जे काम करेन त्यांनाच आम्ही मतदान करू.' मतदानासाठी हाता पाया पडतात रहिवासी छाया साळवे म्हणाल्या की, 'गेली ११ वर्ष झाले आम्ही इथे राहतोय. पण कुठल्याही प्रकारचा विकास आमच्याकडे नाहीये. ना पाणी आहे , ना रस्ता आहे. पाणी आलं तर दूषित येत. कितीवेळेस आम्ही महानगरपालिकेमध्ये गेलो होतो. आम्ही गल्लीतल्या बायका मिळून तिथे गेलो होतो. मात्र तुम्ही पुढे जा आम्ही येतो असं म्हणतात आणि कोणीच येत नाही. फक्त मतदान आलं की ते मिळवण्यासाठी मग हाता पाया पडतात. आम्हाला मत द्या, आम्हाला मत द्या... असं म्हणतात. त्यानंतर काय काहीच नाही. आम्ही काय म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवावा.' हंड्याने पाणी आणावे लागते प्रभागातील रहिवासी रुंजाजी साळवे म्हणाले की, ‘गेली ३० वर्ष झाले आम्हाला पाणी नाहीये. आज आम्ही पाणी विकत आणतो. नाहीतर हंड्याने मागच्या गल्लीतून आणतो. आम्ही शहरात आहोत की खेड्यात तेच समजत नाही. खेड्यातले लोक आमच्यापेक्षा सुखी आहेत. इतकी भयंकर परिस्थिती आहे आमची. आमच्याकडे भागवत कराड येऊन गेले, मोठं मोठे लोक येऊन गेले. मात्र कोणीच येऊन काहीच फायदा नाही. चार - पाच वर्षांपूर्वी नुसते पाईप टाकले होते. त्याच्यानंतर काहीच नाही. फक्त यांना हात जोडायला लावा मतदानासाठी. ते त्यांच्याकडून खूप छान आणि वेळेवर होत. आम्ही थकलो आता ४० वर्ष झाले आम्ही इथे असून. काही एक उपयोग नाही.’ महानगरपालिकेच्या गेट पर्यंत पाणी जात रहिवासी तुषार मिसाळ म्हणतात, 'पाणी आम्हाला १५ दिवसातून एकदा येत. आम्ही मोटार जरी लावली तरी पाणी येत नाही. ते उपसू उपसू काढावं लागत. आमच्या रस्त्यावर तुम्हाला जागा कमी आणि मोटर आणि पाईपच जास्त दिसतेन. ड्रेनेज लाईन सगळ्या फुटलेल्या आहेत. इथे काहीच व्यवस्थित नाहीये. आम्ही गल्लीतले लोक मिळून दर पंधरा दिवसाला पालिकेत चकरा मारतो. पण त्यांना काहीच फरक पडत नाही. एवढंच नाही तर आमच्या ड्रेनेजचे पाणी त्यांच्या गेट पर्यंत जात. पण तरीही काहीच फरक नाही पडत. हे सगळे लोक निगरगट्ट झाले आहेत. त्यांना काही घेणं देणं नाहीये कोण जगेल आणि कोण मरेन. फक्त यांना यांचे खिसे भरायचे आहेत.' जय भीमनगरमधील ही कहाणी केवळ एका वस्तीची नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उदासीनतेची आणि राजकीय उपेक्षेची जिवंत साक्ष आहे. ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या माध्यमातून नागरिकांनी मांडलेला हा आक्रोश आता ऐकला जाणार की पुन्हा दुर्लक्षित राहणार हा खरा सवाल आहे. या आहेत प्रभागातील समस्या दाट वस्तीत स्ट्रीट लाइट बंद, रस्त्यावर अनधिकृत पार्किंग व फेरीवाल्यांचा ताबा यामुळे रात्री वाढलेले अपघात व गुन्हे. रस्त्यालगत कचऱ्याचे ढिगारे, वाहणारे ड्रेनेजचे पाणी आणि उघड्या नाल्यातील उग्र वासाचा हा त्रास प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिकांना कायम सहन करावा लागतो. आरेफ कॉलनी, आसेफिया कॉलनी, बुढीलेन, कबाडीपुरा, गरमपाणी, ज्युबिली पार्क, जयभीमनगर, भडकल गेट, ग्रीन व्हॅली, टाऊन हॉल, आनंदनगर भागांत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिक त्रस्त आहेत. खराब रस्ते, ड्रेनेज तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर, कचऱ्याचे डोंगर यांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रभागात रस्ते झाले नाही. रहदारी वाढली. मात्र, रस्ते रुंद केले नाही. खड्डे, दुकानासमोर उभी राहत असलेली वाहने, अतिक्रमण यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. रस्त्यालगत कचरा साठलेला असतो.नागरिक, व्यावसायिक, हॉटेलचालक रस्त्यावरच कचरा टाकतात. जलवाहिन्या जुन्या झाल्याने वारंवार गळती प्रभागात जुन्या शहराचा बहुतांश भाग आहे. जलवाहिनीदेखील जुनी झाली. यामुळे ती वारंवार फुटते. त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. प्रभागाची व्याप्ती आरेफ कॉलनी, आसेफिया कॉलनी, बुढीलेन, कबाडीपुरा, गरमपाणी, ज्युबिली पार्क, जयभीमनगर, भडकल गेट, ग्रीन व्हॅली, टाऊन हॉल, आनंदनगर, नेहरू भवन, मध्यवर्ती बसस्थानक, पोलिस मुख्यालय वसाहत, मोगलपुरा, कोहिनूर कॉलनी, बुऱ्हाणी कॉलनी, सिद्धार्थ उद्यान, रशीदमामू कॉलनी.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 6:59 am

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:छत्रपती संभाजीनगरहून नांदेडला‎तीन तासांत पोहोचणे शक्य होणार‎; जालना-नांदेड समृद्धी महामार्ग जुलै 2028 पर्यंत खुला होईल‎

जालना ते नांदेड या १७९ किमीच्या समृद्धी‎महामार्गाच्या कामाला गती आली आहे. या‎महामार्गासाठी नांदेड जिल्ह्यातील ११‎गावांमध्ये १२०० शेतकऱ्यांची १७५ हेक्टर आर‎क्षेत्र संपादित केले आहे. त्यापोटी शेतकऱ्यांना‎१९१ कोटी २४ लाखांचा मोबदला यापूर्वी‎देण्यात आला आहे. उर्वरित पांगरी भागातील‎१.८६९३ हेक्टर आरचे भूसंपादन झाले असून‎कामाला सुरुवात झाली आहे. पुढील ३०‎महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत‎आहे. अर्थात, जुलै २०२८ मध्ये महामार्गाचे‎काम पूर्ण होऊन तो वाहनांसाठी खुला होईल,‎अशी माहिती सूत्रांनी दिली. हा मार्ग पूर्ण ‎‎झाल्यानंतर नांदेड ते छत्रपती संभाजीनगर हे‎२५७ किमीचे अंतर ३ तासांत कापता येईल.‎ मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाप्रमाणेच ‎‎जालना ते नांदेड हा एक्स्प्रेस-वे अाहे. समृद्धी ‎‎महामार्गाचा या एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून ‎‎नांदेडपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. हा ‎‎प्रकल्प पूर्ण झाल्यावर नांदेड शहराची ‎‎कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.‎ एक्सप्लेनर‎ समृद्धी महामार्गाचा नांदेडपर्यंत विस्तार‎झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील‎शेतकऱ्यांना आपला शेतमाल कमी‎कालावधीत मुंबईपर्यंत नेता येईल. तसेच‎नांदेड ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर‎एक्स्प्रेस रेल्वेने कापण्यासाठी ४ तासांचा‎अवधी लागतो. मात्र, समृद्धी‎महामार्गामुळे हे अंतर केवळ ३ तासांत‎कापणे शक्य होईल. प्रशासकीय‎कामकाज आणि उपचारांसाठी नांदेडहून‎कमी वेळात छत्रपती संभाजीनगर गाठता‎येईल. आंध्र प्रदेशातून मुंबईला होणाऱ्या‎मालवाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत‎सोयीचा ठरेल. त्यामुळे नांदेड हे‎मालवाहतुकीच्या दृष्टीने भविष्यात‎महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल.‎ या भागात भूसंपादन‎ जालना- नांदेड समृद्धी‎महामार्गासाठी नांदेड तालुक्यातील‎जैतापूर, रहाटी बु., नाळेश्वर,‎पिंपळगाव कोरका, बोरगाव तेलंग,‎कल्हाळ, विष्णुपुरी, पांगरी,‎गुंडेगाव, बाभूळगाव, तुप्पा व‎काकांडी या बारा गावांमधील‎शेतजमिनी संपादित करण्यात‎आल्या आहेत.‎

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 6:43 am

निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या 4,521 कर्मचाऱ्यांवर सोमवारपासून पोलिस कारवाई:एकूण 6 हजार 871 अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोटिसा

मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त असूनही प्रशिक्षणास आणि कर्तव्यावर गैरहजर राहणाऱ्या ४ हजार ५२१ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उद्या, सोमवारपासून थेट पोलिस कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी या संदर्भात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. निवडणूक कर्तव्यात टाळाटाळ करणाऱ्या एकूण ६ हजार ८७१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. यापैकी २ हजार ३५० कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत पुन्हा सहभागी झाले आहेत. मात्र, वारंवार सूचना देऊनही प्रशिक्षणास आणि प्रत्यक्ष कामावर हजर न राहणाऱ्या उर्वरित ४ हजार ५२१ कर्मचाऱ्यांविरुद्ध आता फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. या संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश या कारवाईच्या कचाट्यात केवळ महापालिकेचेच नव्हे, तर राष्ट्रीयीकृत बँका, बेस्ट, बीएसएनएल, रेल्वे, एमटीएनएल, म्हाडा, एलआयसी, टपाल खाते आणि आरसीएफ यांसारख्या विविध शासकीय व निमशासकीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये गुन्हा नोंदवणे, दंड आकारणे आणि विभागीय कारवाई यांचा समावेश असेल. मुंबईत १ कोटींवर मतदार मुंबईत सुमारे १ कोटी ३ लाख ४४ हजार मतदारांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या मोठ्या प्रक्रियेसाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज असल्याने प्रशासन कोणत्याही प्रकारची दिरंगाई सहन करणार नाही, असे संकेत देण्यात आले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 6:38 am

मातृभाषेचा विसर पडू नये म्हणून अमेरिकेत मराठी शाळा उघडली:स्थायिक मराठी भाषिकांकडून मोफत अध्यापन

अमेरिकेत स्थायिक भारतीय मुले आपली मातृभाषा विसरत आहेत. त्यांना आपली भाषा शिकवण्यासाठी आणि संस्कृतीशी जोडण्यासाठी मराठी भाषिक भारतवंशीय अभियंत्यांनी अमेरिकेतील मिल्वाकी शहरात एक मराठी शाळा सुरू केली आहे. तेथे मराठी भाषिक भारतीय अभियंतेच मराठी भाषा शिकवतात. येथे कोणतेही शुल्क घेतले जात नाही. बीएमएम स्तरावरील पुस्तके दिली जातात. त्यासाठी केवळ १०० रुपये आकारले जातात. या शाळेत नर्सरी ते सातवीपर्यंत इतर विषयांसह मातृभाषा मराठीचे धडे गिरवले जातात. ही शाळा धुळे जिल्ह्यातील कौठळ गावातील प्रफुल्ल पाटील या तरुणाच्या प्रयत्नातून उघडण्यात आली. ते एका अमेरिकन कंपनीत अभियंता आहे. त्यासाठी त्यांनी अमेरिकन प्रशासनाकडून औपचारिक परवानगी घेतली. ते शाळेचे मुख्याध्यापकही आहेत. डॉ. नीरज अग्रवाल, शौनक ठुसे, मीनल कानडे, तेजस्विनी शुभचिंत आणि सायली हेडे अध्यापनाचे काम करतात. ही शाळा बृहन्महाराष्ट्र मंडळाशी संबंधित मिलवॉकी मंडळाच्या मदतीने सुरू आहे. सर्व खर्चदेखील मंडळामार्फत भारतीय वंशाचे लोक करतात. बृहन्महाराष्ट्र मंडळांतर्गत १०० हून अधिक मराठी शाळा सुरू आहेत. अमेरिका-कॅनडातील ६० मंडळे त्याच्याशी जोडलेली आहेत. या शाळेत शिकणारी आराध्या इंगोले म्हणते - अमेरिकेत सर्वत्र इंग्रजी भाषेचे वातावरण आहे. या शाळेमुळेच मला अमेरिकेत मराठी शिकायला मिळत आहे. एका विद्यार्थ्याचे वडील अमिनेश जाधव म्हणाले - येथे मराठी शाळा सुरू झाल्यापासून दुसरीत शिकणारी माझी मुलगी आयुषी मराठी वाचू, लिहू आणि बोलू शकते. प्रयत्न... ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड कॅनडा, सिंगापूरमध्येही वर्ग विविध देशांतील मराठी तरुणांसाठी त्यांच्या मुलांना मातृभाषेचे ज्ञान देणे हे एक मोठे आव्हान होते. परंतु महाराष्ट्र सरकारच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मदतीने अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि सिंगापूरसारख्या देशांमध्ये मराठी शिकवणीचे वर्ग आयोजित केले जात आहेत. हे वर्ग तेथील हिंदू मंदिरांमध्ये आयोजित केले जातात. तेथे राहणारे मराठी भाषिक भारतीय तरुण हे वर्ग मोफत घेतात. यश... विद्यार्थ्यांचे परदेशी मित्रही मराठी गिरवू लागले... मिलवॉकी येथील या मराठी शाळेत २५ हून अधिक मुले शिकतात. त्यांचे मित्रही त्यांच्यासोबत मराठी शिकण्यासाठी शाळेत येऊ लागले. येथील शिक्षक त्यांना मोफत मराठी शिकवतात. अमेरिका, कॅनडातील मंदिरांतही मराठी भाषेचे वर्ग घेतले जात आहेत. बहुतेक विद्यार्थी हे भारतवंशीय आहेत. ते अमेरिकेत जन्मले.त्यांनी इंग्रजीला पहिली भाषा म्हणून स्वीकारले आहे.परदेशात नोकरीनंतर लोक मायदेशी परततात तेव्हा त्यांच्या मुलांना मातृभाषा यायला हवी. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सहकार्याने ही शाळा सुरू करण्यात आली. स्थानिक पातळीवर या शाळेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. - प्रफुल्ल पाटील, अभियंता, अमेरिका

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 6:32 am

एक औरंगजेब आम्हाला महाग पडला, आमचे शहर गोदाम नाही -शिरसाट:संभाजीनगरात ‘दफन’ करावे, या ओवेसींच्या वक्तव्याला पालकमंत्र्यांचे प्रत्युत्तर

‘यह शहर इतना प्यारा है, मेरा इंतकाल हुआ तो मुझे यही दफना दो,’ असे वक्तव्य एमआयएमचे नेते, खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आमखास मैदानावरील सभेत केले होते. त्याला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘एक औरंगजेब आम्हाला महाग पडला. त्याने तसेच केले. नगरला मेला आणि इथे आला. आमचे शहर काही गोदाम आहे का? तिकडे जागा नाही का? अशा भावनिक वक्तव्यामुळे समाजात हालचाल निर्माण होते,’ असे शिरसाट यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. भाषणात नेते भावनिक स्टेटमेंट करतात. त्यामुळे लोकांना वाटते ‘क्या बडा आदमी है. यहा दफन होना चाहता है.’ त्या माध्यमातून भावनिक वातावरण तयार करतात. भावनिक वक्तव्यामुळे समाजात हालचाल होते. त्यातून दंगली घडू शकतात, हे मी बोललो होतो. लोकांनी सावध राहण्याची गरज असल्याचे सांगितले होते, ही बाबही शिरसाट यांनी नमूद केली. हे तर जिवंतपणाचे लक्षण पक्षातील अंतर्गत संघर्षाबाबत विचारले असता, ‘आमच्यात वाद नाही. हे जिवंतपणाचे लक्षण आहे. नेतृत्वात पुढे जाण्याची स्पर्धा म्हणजे वाद नाही. आम्ही एकत्र आहोत. तिकीट कापल्याचे काहींना वाईट वाटले. सर्वांशी चर्चा केली. आता काही वाद नाही, असे त्यांनी सांगितले. शहरात काहीही घडू शकते दंगलीबाबत शिरसाट म्हणाले की, या शहरात काहीही घडू शकते. हे शहर संवेदनशील आहे. शहागंजमध्ये दगडफेक झाली, तर दुसरीकडे अफवा येते की दोन लोक मेले. अशा अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागले पाहिजे, शांतता बाळगली पाहिजे.

दिव्यमराठी भास्कर 12 Jan 2026 6:26 am

भाजपने देश विकायला काढला

पहिल्याच संयुक्त सभेत राज ठाकरे यांचा जोरदार घणाघात मुंबई : प्रतिनिधी वेड्यावाकड्या पद्धतीने निवडणुका जिंकल्या जातात. विजयाचे तंत्र माहीत असते, तेव्हा सत्तेचा माज येतो. भाजपचे सध्या तसेच सुरू आहे. यांनी मुंबई, महाराष्ट्र, देश विकायला काढला. हे मनाला वाटेल ते करायला लागले आहेत. आली कुठून हिंमत, कुणाला विचारायचे नाही, जनता नाही, काय नाही. आम्हाला वाटले म्हणून […] The post भाजपने देश विकायला काढला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 1:51 am

दडपशाहीविरुद्धचा ‘संग्राम’!

लंडनमध्ये राहणारे, मूळचे महाराष्ट्राचे प्रसिद्ध भूलतज्ज्ञ आणि सोशल मीडियावरून आपले विचार मांडणारे डॉ. संग्राम पाटील यांना शनिवारी (१० जानेवारी) मुंबई विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले. लंडनहून मुंबईत उतरताच पहाटे २ वाजता त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. भाजप नेत्यांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपाखाली ही चौकशी करण्यात आली असून १५ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. भाजपच्या […] The post दडपशाहीविरुद्धचा ‘संग्राम’! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 1:44 am

खडी उघडी पडल्याने अपघाताच्या घटनांत वाढ

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी शहरातून नागेवाडी, कारेवाडी, धामणगाव, बोळेगाव या मार्गावरुन जाणा-या डांबरी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खडी उघडी पडली असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात घडण्याच्या घटनामध्ये वाढ झाली असून या रस्त्यावरील खड्डे बुजवून उखडलेला रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. शिरुर अनंतपाळ, चाकूर यांसह उदगीर लातूर या प्रमुख […] The post खडी उघडी पडल्याने अपघाताच्या घटनांत वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 1:42 am

भ्रष्ट कमाईतून परत सत्ता मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

लातूर : प्रतिनिधी जिल्हा निर्मितीपासून ते आजतागायत काँग्रेस पक्षाने लातूचा विकास केला, असे असताना ही २०१७ च्या महानगरपालिका निवडणूकीत लातूरच्या जनतेने विकासाच्या नावाखाली मते मागणा-या भाजपाला संधी दिली. पण या संधीसाधू लोकांना संधीच सोन करता आल नाही. या संधी साधू लोकांनी मागील काळात कमावलेल्या भ्रष्ट पैशातून आता परत महानगरपालिकेची सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या […] The post भ्रष्ट कमाईतून परत सत्ता मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 1:41 am

भाजप सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस

लातूर : प्रतिनिधी मागील काळात आपन सर्वानी काँग्रेस पक्षाला भरभरून आशिर्वाद दिले आहेत. त्याच आशिर्वादाचे सोने करीत काँग्रेस पक्षाने लातूर शहर महानगरपालिकेचा चौफेर विकास केला आहे. मात्र भाजपच्या लोक महानगरपालिकेत सत्ता हाती घेऊन लातूर शहराच्या विकासाची गती थाबली. आज आपण पाहतो लातूर शहरात मोठ्या प्रमाणात घन कचरा, स्वच्छता, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न असताना भाजप सरकार […] The post भाजप सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 1:39 am

कोरोना काळात तत्कालिन पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर जिल्ह्याचे ख-या अर्थाने पालकत्व निभावले 

लातूर : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या जागतिक संकटादरम्यान राज्याचे तत्कालिन वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि लातूर जिल्ह्राचे पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याची विशेष काळजी घेतली. महामारीच्या काळात पहिल्या लाटेच्यावेळी ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ लातूरमध्ये थांबून नागरीकांना कोरोना उपचार व इतर सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या संपर्कात राहून […] The post कोरोना काळात तत्कालिन पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर जिल्ह्याचे ख-या अर्थाने पालकत्व निभावले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 12 Jan 2026 1:38 am

अजितदादांचा संयम ढळलाय, 15 तारखेनंतर शांत होतील:महायुतीमधील 'मैत्रीपूर्ण' संघर्षावर फडणवीसांचे भाष्य, ठाकरे बंधुवरही टीका

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, राज्यातील सर्वच बडे नेते प्रचारात व्यस्त आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणेकरांशी संवाद साधला. अभिनेत्री गिरीजा ओक यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्नांवर भाष्य केले. पुण्यात आगामी काळात सरकार काय उपाययोजना राबवणार याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी पुणे हे माझे आवडते शहर असल्याचे म्हटले आहे. मुलाखतीदरम्यान 'देवाभाऊ काय म्हणतायत?' या प्रश्नावर फडणवीस यांनी मिश्किलपणे उत्तर दिले की, देवाभाऊ काही म्हणत नाहीत, देवाभाऊंचे काम बोलते. अजित पवार यांच्याकडून होणाऱ्या टीकेबद्दल विचारले असता ते म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही प्रबळ पक्ष असल्याने आम्ही मैत्रीपूर्ण लढत देत आहोत. मी संयम पाळला आहे, पण सध्या दादांचा संयम ढळलेला दिसतोय. १५ तारखेनंतर (मतदानानंतर) ते काही बोलणार नाहीत. सध्या आम्ही एकमेकांविरोधात लढत असलो, तरी प्रचारात मर्यादा पाळणे आवश्यक आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवर टिप्पणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ऐतिहासिक युतीवर बोलताना फडणवीस यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, कोणताही परिवार एकत्र येत असेल तर मला आनंदच आहे. राज ठाकरेंनी यासाठी मला क्रेडिट दिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. दोन भाऊ एकत्र यावेत हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते. त्यांनी प्रयत्न केले पण ते एकत्र आले नाहीत, मात्र माझ्यामुळे (राजकीय परिस्थितीमुळे) ते एकत्र आले. यासाठी बाळासाहेब मला आशीर्वादच देतील. पण आता दोन भाऊ-बहीण एकत्र येणार का, हे मला माहीत नाही, ते १५ तारखेनंतर कळेल. पुणेकरांना फुकट नको, उत्तम सेवा हवी अजित पवार यांनी महिलांना मेट्रोतून मोफत प्रवासाचे आश्वासन दिले होते, त्यावर फडणवीस यांनी उपरोधिक टीका केली. ते म्हणाले, मी तर आज जाहीर करणार होतो की पुण्यातून उड्डाण करणाऱ्या महिलांना विमानातून मोफत प्रवास मिळेल! घोषणा करायला काय जाते, पण ते पटले पाहिजे. मेट्रो ही केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त मालमत्ता आहे, तिचे दर 'फेअर सिस्टम' ठरवते. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्याची आश्वासने देणे चुकीचे आहे. पुणेकरांना मोफत काहीही नको आहे, त्यांना रिलायबल, डिपेंडेबल आणि उत्तम सेवा हवी आहे. ही आश्वासनं पुणेकरांना नीट समजली आहेत. पुण्याच्या वाहतूक कोंडीवर 'पाताळ लोक'चा उतारा पुण्याच्या भविष्यातील विकासावर बोलताना फडणवीस यांनी ३२ हजार कोटी रुपयांचा भव्य आराखडा मांडला. पुण्यात खाली आणि वर कुठेही जागा उरली नसल्याने आता आम्ही 'पाताळ लोक' म्हणजेच टनेल (बोगदे) तयार करणार आहोत. येरवडा ते कात्रज, पाषाण, कोथरूड, औंध आणि संगमवाडी अशा ५४ किलोमीटरच्या टनेलचे नियोजन पूर्ण झाले आहे. तसेच पुण्यात २३ नवीन उड्डाणपूल उभारले जातील, त्यापैकी ८ पुलांचे काम सुरू झाले असून उर्वरित १५ पुलांचे काम येत्या तीन महिन्यात सुरू होईल. हे पूल असे असतील की पुढील २५ वर्षे ते तोडावे लागणार नाहीत, असे आश्वासन त्यांनी दिले. नागपूरकरांनी आपल्याला सहा वेळा निवडून दिले असले, तरी पुणे हे आपले अत्यंत आवडते शहर असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. उद्धव ठाकरेंच्या 'इगो'मुळे मेट्रोचा खर्च वाढला या मुलाखतीत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. मुंबई मेट्रोच्या आरे कारशेड वादावर बोलताना ते म्हणाले की, मेट्रो कामाला लोकांचा विरोध नव्हता, तर आमचे मित्र उद्धव ठाकरे यांनाच अडचण होती. आरेची जागा राखीव जंगल नाही, असा स्पष्ट अहवाल असूनही केवळ इगोसाठी त्यांनी कामाला स्थगिती दिली. यामुळे साडेतीन वर्षांचे काम तीन वर्षे पुढे गेले आणि प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटी रुपयांनी वाढला. आम्ही दहापट झाडे लावून ती मोठीही केली, पण ठाकरेंच्या हट्टामुळे जनतेच्या पैशांचे नुकसान झाले, असा आरोप त्यांनी केला.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 11:03 pm

अमरावतीतील 557 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर:प्रशासक नेमण्याची शक्यता; सरपंचांनाच अधिकार देण्याची मागणी

अमरावती जिल्ह्यातील ५५७ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ १५ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. निवडणुकांची प्रक्रिया सुरू न झाल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांऐवजी विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी काही सरपंच संघटनांनी केली आहे. राजकीय जाणकारांनुसार, ग्रामपंचायत निवडणुकांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे त्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा विचार करत आहे. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले आहे. विधी अभ्यासकांच्या मते, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ नुसार प्रशासकाला सरपंचाचे सर्व अधिकार मिळतात. मावळत्या सरपंचांनाच प्रशासक म्हणून प्राधान्य दिल्यास गावातील विकासकामे थांबणार नाहीत आणि प्रशासनही सुरळीत चालेल, असे मत व्यक्त केले जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने सर्व पंचायत समित्यांना पत्र पाठवून १ जानेवारी २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची सविस्तर माहिती तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ही माहिती प्रपत्र–१ व प्रपत्र–२ मध्ये भरून सॉफ्ट व हार्ड कॉपी स्वरूपात दोन दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सध्या कार्यरत सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली असून, त्याचा पाठपुरावा सुरू आहे, असे राष्ट्रीय प्रधान मुखिया संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके आणि प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडण्याची अनेक कारणे आहेत. निवडणुका घोषित करण्यापूर्वी प्रभाग रचना, आरक्षण निश्चिती आणि मतदार याद्यांची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढ मागितली आहे. तसेच, मार्चमध्ये शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षांमुळे मतदान केंद्रे व शिक्षक उपलब्ध होणार नाहीत, तर जूनपासून पावसाळा सुरू झाल्याने निवडणूक प्रक्रिया राबवणे कठीण होईल. त्यामुळे दसरा-दिवाळीच्या काळातच निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 10:45 pm

जि.प. क्रीडा महोत्सवात धारणी तालुका ठरला सर्वोत्कृष्ट:सांस्कृतिकमध्ये मोर्शी, निदर्शनांमध्ये अंजनगाव पंचायत समितीने पटकावले अव्वल स्थान

अमरावती येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात धारणी तालुक्याने सर्वोत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम पुरस्कार पटकावला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोर्शी पंचायत समितीने, तर निदर्शनांमध्ये अंजनगाव सुर्जी पंचायत समितीने अव्वल स्थान प्राप्त केले. श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा शनिवारी समारोप झाला. यावेळी तिन्ही विजेत्यांना गौरवून पुरस्कृत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सतीश मुगल, उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने व रजनी शिरभाते, ओपन लिंक फाउंडेशनच्या (ओएलएफ) राज्य समन्वयक चित्रा खन्ना, विस्तार अधिकारी संगीता सोनोने तसेच जिल्ह्यातील बहुतेक पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवात धारणीच्या खेळाडूंनी प्राथमिक विभागात कबड्डी (मुली), लंगडी (मुली) आणि खो-खो (मुली) मध्ये अजिंक्यपद मिळवले. तसेच, माध्यमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी (मुली) आणि खो-खो (मुले-मुली) मध्येही धारणीच्या विद्यार्थ्यांनी अव्वल यश संपादन केले. वैयक्तिक खेळांमध्येही धारणीच्या विद्यार्थ्यांनी शंभर मीटर धावणे, उंच उडी, गोळा फेक यांसारख्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोर्शीच्या विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरणातून उत्कृष्ट कामगिरी बजावली. तर निदर्शनांमध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी चमकदार प्रदर्शन केले. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांना त्यांच्या संबंधित प्रकारात प्रथमांक देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी सतीश मुगल यांनी केले. मनीष काळे यांनी सूत्रसंचालन केले, तर क्रीडा संयोजक प्रवीण खांडेकर यांनी आभार मानले. यावेळी प्रसिद्धी समितीचे विनोद गाढे, विनायक लकडे, राजेश सावरकर, शकील अहमद, श्रीनाथ वानखडे, हेमंतकुमार यावले, पूनम उके आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 10:44 pm

टायर फुटल्याने तिवसा महामार्गावर मालवाहू ट्रकला आग:प्लास्टिक दाण्यांनी भरलेला ट्रक जळाल्याने वाहतूक ठप्प

तिवसा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री एका मालवाहू ट्रकला भीषण आग लागली. टायर फुटल्याने ही घटना घडली असून, प्लास्टिकचे दाणे भरलेला ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. या घटनेमुळे अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तास खोळंबली होती. नागपूरहून अमरावतीच्या दिशेने जाणारा हा ट्रक दिवाणी व फौजदारी न्यायालयाजवळून जात असताना त्याच्या मागील चाकाचा टायर अचानक फुटला. टायर फुटल्याने मोठा आवाज झाला आणि टायरजवळ असलेले लायनर घासल्याने ट्रकला खालून आग लागली. ट्रकमध्ये प्लास्टिकचे दाणे असल्याने आगीने त्वरित रौद्र रूप धारण केले आणि काही क्षणातच संपूर्ण ट्रक जळून कोळसा झाला. आगीची घटना निदर्शनास येताच दोन्ही बाजूंनी येणारी वाहने थांबवण्यात आली. घटनेची माहिती तिवसा नगरपंचायतच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. वृत्त लिहिपर्यंत आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 10:41 pm

तिजोरी जनतेच्या पैशातून तयार होते - बाळासाहेब थोरात:म्हणाले - निवडणुका निकोप झाल्यास काँग्रेसला निश्चित यश

तिजोरी ही जनतेच्या पैशातून तयार होते. सत्तेवर येणाऱ्यांनी त्या पैशांची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे, असे स्पष्ट मत ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आघाडीच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विकासाच्या नावाखाली होणारा खर्च हा पायाभूत सुविधा, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य यासाठीच व्हावा, कोणाच्या लांगूलचालनासाठी नव्हे, असे थोरात यांनी नमूद केले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर आणि सरचिटणीस प्राची दुधाने उपस्थित होते. प्रचारात काँग्रेस आघाडीवर दिसत नसली तरी, काँग्रेस लोकांच्या मनात रुजलेली आहे. निवडणुका जर निकोप, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात झाल्या तर काँग्रेसला निश्चितच यश मिळेल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. अनेक मोठी पदे भूषवणारे नेते विविध अमिषे आणि दबावतंत्राला बळी पडून भाजपमध्ये गेले, त्यामुळे आज भाजपामध्ये काँग्रेसची विचारधारा असलेले अनेक चेहरे दिसत असून, काँग्रेसयुक्त भाजप तयार झाली आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस हे बुडणारे जहाज नसून आत्मविश्वासाने पाण्यावर तरंगणारे जहाज आहे. सध्या पदे कमी असली तरी पक्षाची ताकद कायम आहे, असे थोरात यांनी सांगितले. पुणे महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक नसून महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे हे दाखवणारी निवडणूक आहे. राज्याच्या जडणघडणीत पुण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. निवडणूक आयोगाकडून वारंवार वेळापत्रक बदलणे, नियमांमध्ये अचानक बदल, उमेदवारांना अपील करण्यास अडथळे, अर्ज माघारीसाठी दहशत व दबावतंत्र, बिनविरोध निवडणुका या बाबी गंभीर असून त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी थोरात यांनी केली. भाजपाने सर्व नियम मोडीत काढून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकल्याचा आरोपही त्यांनी केला. पुण्यात वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण, गुन्हेगारी आणि पाण्याची भीषण समस्या यावर सत्ताधारी ठोस भूमिका घेत नाहीत. सत्ता मिळवून भ्रष्टाचार करणे हे भाजपाचे धोरण आहे. केवळ प्रगतीच्या गप्पा मारून काहीही साध्य होणार नाही. सुसंस्कृत, विचाराधिष्ठित आणि निकोप महाराष्ट्र घडवण्यासाठी मतदारांनी आघाडीला साथ द्यावी, असे आवाहन थोरात यांनी शेवटी केले.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 10:38 pm

भारताचा न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय

वडोदरा : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वडोदराच्या मैदानात रंगलेल्या पहिला वनडे अपेक्षेप्रमाणे रंगतदार झाला. पाहुण्या न्यूझीलंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३०० धावा करत टीम इंडियासमोर ३०१ धावांचे आव्हान ठेवले होते. ते आव्हान भारताने ४९ व्या षटकात पूर्ण करीत दणदणीत विजय मिळविला. भारताने एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव करीत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० […] The post भारताचा न्यूझीलंडवर ४ गडी राखून विजय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 9:56 pm

ठाकरेंचे अस्तित्व ठरवणारा अजून जन्माला आला नाही:उद्धव ठाकरेंचा घणाघात, मुंबई अदानीच्या घशात घालण्याचा डाव उधळण्याचा निर्धार

ठाकरे संपले अशी स्वप्ने पाहणाऱ्यांनी हे समोर बसलेले जनसागर पहावे. ठाकऱ्यांचे अस्तित्व ठरवणारा अजून जन्माला यायचा आहे! अशा कडक शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. १९ वर्षांनंतर शिवतीर्थावर राज ठाकरे यांच्यासोबत ऐतिहासिक व्यासपीठ सामायिक करताना उद्धव ठाकरेंनी भाजपच्या 'हिंदू महापौर' कार्डाचा समाचार घेतला आणि फडणवीसांना सडेतोड आव्हान दिले. आज राज यांनी मांडलेल्या पोटतिडकीच्या विचारांनी प्रत्येक मराठी माणसाच्या डोक्यात तिडीक गेली पाहिजे, तरच आपल्याला शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार आहे, असेही ते भावूकपणे म्हणाले. महापौर पदावरून सुरू असलेल्या वादावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने हा वाद सुरू केला. ते 'हिंदू महापौर' म्हणतात आणि आम्ही 'मराठी महापौर' म्हणतो. देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही? असा सवाल करत त्यांनी विचारले की, आम्हाला हिंदुत्व तपासायला सांगणारे स्वतः कोण आहेत? आम्ही प्रबोधनकारांचे नातू असून आमचे हिंदुत्व आणि मराठी प्रेम रक्तात आहे. भाजप केवळ निवडणूक आली की हिंदू-मुस्लिम आणि मराठी-अमराठी असा 'रोम्बासोम्बा' खेळायला लागते. लाचार माकडे कधीच वाघ बनू शकत नाहीत, असे म्हणत त्यांनी शिंदे गटावरही निशाणा साधला. फडणवीसांना १ लाखांचे जाहीर चॅलेंज देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना विकासावरचे एक भाषण दाखवण्याचे आव्हान दिले होते. त्यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, आम्हाला चोराचा पैसा नको. मी उलट चॅलेंज देतो की, पंतप्रधान मोदींपासून तुमच्या चेल्याचपाट्यांपर्यंत, ज्यांनी हिंदू-मुस्लिम न करता केवळ विकासावर भाषण केले आहे, असे एक तरी भाषण दाखवा. आम्ही सगळे मिळून तुम्हाला १ लाख रुपये देऊ. भाजप हे केवळ घरे पेटवून आपल्या पोळ्या भाजणारे लोक आहेत. आपलीच माणसे आपल्यावर सोडून रक्तपात घडवून आणणे हा त्यांचा धंदा असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. गुजरातचा मुंबईवर डोळा मुंबईच्या इतिहासाची आठवण करून देताना उद्धव ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील प्रबोधनकारांच्या योगदानाचा उल्लेख केला. ज्या वेळी मुंबई मिळवण्यासाठी लढा सुरू होता, तेव्हा प्रबोधनकार पाच प्रमुख नेत्यांपैकी एक होते. आजही गुजरातचा मुंबईवर डोळा आहे, असा आरोप त्यांनी केला. मोरारजी देसाई या 'नरराक्षसाने' १०६ हुतात्म्यांवर गोळ्या चालवण्याचे आदेश दिले होते, तोही हिंदूच होता. अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांनी हा लढा लढला. मराठी माणूस कधीही विकला जाणार नाही, हे अमर शेख यांनी तेव्हाच ठणकावून सांगितले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. अदानीचे हित जपण्यासाठी मुंबईचे 'बॉम्बे' करण्याचा डाव मुंबई अदानीच्या घशात घालण्यासाठी भाजपला महापालिका हवी असल्याचा मोठा दावा उद्धव ठाकरेंनी केला. मुंबईत सध्या सुरू असलेल्या बांधकामामुळे प्रदूषणाची समस्या गंभीर झाली आहे. या बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सिमेंटपैकी ७० टक्के सिमेंट हे केवळ अदानीकडून घेतले जात आहे, असे त्यांनी सांगितले. भाजपचा 'अण्णामलाई' मुंबईत येऊन जे बोलला, तेच भाजपच्या मनात आहे. मुंबईचे पुन्हा 'बॉम्बे' करणे आणि इथला मराठी टक्का संपवून शहर अदानीला देणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असल्याचा पर्दाफाश उद्धव ठाकरेंनी केला.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 9:41 pm

‘अदानीवर घाव, लाव रे तो व्हीडीओ लाव…’!

मुंबई : मुंबई महानगपालिका निवडणुकीतील प्रचारामध्ये सर्वांचे लक्ष लागलेली ठाकरे बंधूंची संयुक्त सभा शिवतीर्थावर सुरू झाली आहे. तसेच या सभेमधून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हीडीओ’ अंदाज दाखवला. तसेच यामधून राज ठाकरे यांनी पहिला घाव उद्योगपती अदानी यांच्यावर घातला. २०१४ साली केंद्रात मोदी सत्तेवर आल्यापासून उद्योगपती गौतम अदानी यांच्या झालेल्या प्रगतीचा आलेख […] The post ‘अदानीवर घाव, लाव रे तो व्हीडीओ लाव…’! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 9:29 pm

नवनिर्वाचित नगरसेविका सौ. मंगला मानवतकर यांचा सन्मान

मेहकर(बुलडाणा) : नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सौ. मंगला सुरेश मानवतकर यांचा दणदणीत विजय झाला. दरम्यान सिने अभिनेते व जय साई नटराज चित्रपट कला व सांस्कृतिक संस्था छत्रपती संभाजीनगर यांचे अध्यक्ष विजय मानवतकर व त्यांच्या सोबत सौ. सुलोचना विजय दुतोंडे जिल्हा (अध्यक्ष लहुजी सेना महिला आघाडी) व त्यांचे पती विजय […] The post नवनिर्वाचित नगरसेविका सौ. मंगला मानवतकर यांचा सन्मान appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 9:07 pm

दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया खोडून काढण्यासाठी भारतीय लष्कर, सीमा सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष ऑपरेशन ग्रुपने राबवलेल्या संयुक्त मोहिमेला मोठे यश मिळाले. शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना दहशतवाद्यांनी लपवून ठेवलेले एक सक्रिय सॅटेलाईट कम्युनिकेशन डिव्हाइस सापडले आहे. यामुळे सीमापार बसलेल्या देशविरोधी कारवाया करणा-या गटांशी संपर्क साधण्याचे दहशतवाद्यांचे प्रयत्न उधळून लावले गेले आहेत. जम्मूच्या दुर्गम […] The post दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 8:34 pm

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात ९ महिन्यांच्या बालिकेचा अखेर मृत्यू

जिंतूर : शहरातील साबळे गल्ली परिसरात पिसाळलेल्या कुर्त्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जुनेशा तौफिक कुरेशी (९ महिने) या चिमुकलीचा उपचारादरम्यान रविवार दि. ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास परभणी येथील एका खासगी रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास साबळे गल्ली […] The post पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात ९ महिन्यांच्या बालिकेचा अखेर मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 8:05 pm

इंडियन आयडल फेम प्रशांत तामांगचे निधन

नवी दिल्ली : इंडियन आयडलच्या तिस-या पर्वाचा विजेता गायक आणि अभिनेता प्रशांत तामांग याचे रविवार दि. ११ जानेवारी निधन झाले. वयाच्या ४३ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील राहत्या घरी प्रशांतचा मृतदेह आढळून आला असून, या बातमीने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. प्रशांतचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, अद्याप अधिकृत […] The post इंडियन आयडल फेम प्रशांत तामांगचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 8:02 pm

१०८ अश्वांसह काढली शौर्य यात्रा

सोमनाथ : सोमनाथ मंदिराच्या स्वाभिमान पर्वामध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. येथे १०८ अश्वांसह काढण्यात आलेल्या शौर्य यात्रेमध्ये ते सहभाही झाले होते. ही शौर्य यात्रा सोमनाथ मंदिराच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणा-या अगणित वीर योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने काढण्यात आली होती. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिरावर झालेल्या […] The post १०८ अश्वांसह काढली शौर्य यात्रा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 6:57 pm

अमेरिकेचा सीरियात इसिसच्या ठिकाणांवर हवाई हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेने शनिवारी मध्यरात्री सीरियामध्ये दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) विरुद्ध हवाई हल्ले केले आहेत. ही कारवाई गेल्या महिन्यात पाल्मायरामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन अमेरिकन सैनिक आणि एका नागरिकाच्या मृत्यूनंतर करण्यात आली. अमेरिकन सेंट्रल कमांड नुसार, हल्ल्यांमध्ये सीरियाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये इसिसच्या अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. सेंटकॉमने सांगितले की, या ऑपरेशनमध्ये इसिसच्या ठिकाणांना, शस्त्रास्त्रांना […] The post अमेरिकेचा सीरियात इसिसच्या ठिकाणांवर हवाई हल्ला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 6:56 pm

भारत मला घाबरतो

नवी दिल्ली : लष्कर-ए-तोयबाच्या एका वरिष्ठ नेत्याने पाकिस्तानी लष्कराचे या दहशतवादी संघटनेसोबत असलेले थेट संबंध उघड केले आहेत. पाकिस्तानी लष्कर आपल्याला त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी नियमितपणे निमंत्रणे पाठवते आणि शहीद सैनिकांच्या अन्त्यविधीचे नेतृत्व करण्यासाठी बोलावते असे या नेत्याने म्हटले आहे. हाफिज सईदच्या संघटनेचा प्रमुख आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला कसूरी याने पाकिस्तानमधील एका शाळेत […] The post भारत मला घाबरतो appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 6:55 pm

ठाकरे बंधुंची ऐतिहासिक सभा थोड्याच वेळात:शिवतीर्थावर शिवसैनिकांसह मनसैनिकांची गर्दी, सभेआधी राज यांनी घेतली उद्धव यांची भेट

महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईच्या राजकीय इतिहासात आज सुवर्णक्षरांची नोंद होणार आहे. दादर येथील ऐतिहासिक शिवतीर्थावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त विराट जाहीर सभा आज पार पडत आहे. तब्बल १९ वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच राजकीय मंचावरून मुंबईकरांना संबोधित करणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या सभेकडे लागले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी ही ठाकरे बंधूंची एकत्र येण्याची वेळ अत्यंत सूचक मानली जात आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीसमोर मोठे आव्हान उभे करण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येणे हा 'गेम चेंजर' ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दोन्ही नेत्यांचे वक्तृत्व आणि त्यांच्या पाठीशी असलेली मराठी माणसाची ताकद यामुळे मुंबईतील राजकारणाला आता एक नवी दिशा मिळण्याचे संकेत मिळत आहेत. या सभेत दोन्ही नेते काय बोलणार आणि कोणावर निशाणा साधणार, याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 6:51 pm

भारताने अमेरिकेतील गुंतवणूक २१ टक्क्यांनी घटविली

न्यू यॉर्क : ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार ३१ ऑक्टोबर २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत भारताने अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील आपली गुंतवणूक तब्बल २१ टक्क्यांनी कमी केली आहे. ही गुंतवणूक २४१.४ अब्ज डॉलरने कमी होऊन १९०.७ अब्ज डॉलर एवढीच राहिली आहे. गेल्या चार वर्षातील ही पहिलीच घटना आहे, ज्यामध्ये भारताने अमेरिकन ट्रेझरी बाँडमधील आपली गुंतवणूक कमी केली आहे. […] The post भारताने अमेरिकेतील गुंतवणूक २१ टक्क्यांनी घटविली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 6:36 pm

लडाख, कारगिल भारताचा आत्मा - नायब राज्यपाल कविंदर गुप्ता:सरहदतर्फे लडाख महोत्सव, कारगिल गौरव राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

लडाख आणि कारगिल या केवळ भारताच्या सीमा नसून, त्या भारताचा आत्मा आहेत. लडाखमध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करते, त्यामुळे भारताशी लडाखचे नाते अतूट आहे, असे प्रतिपादन लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता यांनी केले. ‘सरहद, पुणे’ संस्थेच्या वतीने आयोजित लडाख महोत्सवांतर्गत ‘कारगिल गौरव नॅशनल अवॉर्ड २०२५’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना कविंदर गुप्ता यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, लडाखच्या प्रथम नागरिक बिंदू गुप्ता, सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, सुषमा नहार, अर्हम इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश पगारिया आणि संवाद फाउंडेशनचे संजीव शहा आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद कोकरे, मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, ज्येष्ठ आर्किटेक्ट दिलीप काळे, सामाजिक कार्यकर्ते राज देशमुख, निर्भय भारत फाउंडेशनचे संचालक तरुण उत्पल आणि राज्य शासनाच्या मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गुप्ता पुढे म्हणाले की, लडाख भावनात्मकतेने भारताशी अखंड जोडलेला आहे. भौगोलिकदृष्ट्या हिवाळ्यात काही काळ हा भूभाग विलग होत असला तरी, भारताशी लडाखचे नाते कायम अतूट राहते. लडाखच्या सीमाक्षेत्रात शिक्षण, क्रीडा आणि इतर अनेक क्षेत्रांत विकासाची कामे सुरू आहेत. ‘सरहद’सारख्या संस्थांचे या विकासातील योगदान मोलाचे आहे. राज्यपालपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम कारगिल येथील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलो होतो, असे गुप्ता यांनी सांगितले. राष्ट्राची सुरक्षा केवळ युद्धभूमीवरच नव्हे, तर नागरिकांच्या सहभाग आणि सहकार्यावर अवलंबून असते. कारगिल युद्धात नागरिकांनी कोणत्याही स्वार्थाशिवाय सैन्याला मोठी मदत केली होती, असे त्यांनी नमूद केले. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात सध्या सुरू असलेले ऐतिहासिक परिवर्तन आपण पाहत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे लष्कराचे मनोबल उंचावले आहे. सीमाक्षेत्रांचा विकास होत असून, तिथे आवश्यक सुविधा मिळत आहेत. केवळ सुरक्षेच्या दृष्टीने नव्हे, तर सन्मान आणि विकासाच्या दृष्टीने लडाख व कारगिलकडे पाहिले जात असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भूभाग देशाचा सन्मान आहेत आणि प्रत्येक नागरिकाला त्यांचा अभिमान आहे. ‘सरहद’च्या माध्यमातून अनेक वर्षांपासून तिथे सातत्याने सुरू असलेले काम अद्वितीय आहे. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. विस्तारवादाचा धोका भविष्यात वाढत जाणार असल्याने देशातील नागरिकांनी एकत्र येऊन उभे राहणे गरजेचे आहे. आपण एक आहोत ही भावना प्रबळ करण्यासाठी काश्मीर आणि लडाखमध्ये सातत्याने जायला हवे. प्रास्ताविक करताना संजय नहार यांनी सरहदच्या वाटचालीचा आढावा घेतला ते म्हणाले, सरहदने गेल्या अनेक वर्षांपासून सीमावर्ती भागात चांगले काम केले आहे. हे काम पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार आहे. लवकरच पुण्यामध्ये लडाख भवन आणि कारगील भवन उभारण्यात येणार आहे. मिनी काश्मीर उभे करण्याचाही प्रयोग पुण्यात सुरू आहे.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 6:36 pm

इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र

तेहरान : इराणमधील सरकारविरोधी आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले असून २८ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनांनी आता संपूर्ण देश व्यापला आहे. आतापर्यंत किमान ३०० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३,६०० हून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली आहे. आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या हिंसक चकमकींमुळे परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. राजधानी तेहरानमध्ये सुरू झालेले आंदोलन […] The post इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 6:35 pm

जनहितनामा पूर्णपणे जनतेच्या सहभागातून तयार:उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विकासकामांचा 'प्रगती अहवाल' प्रकाशित

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील विकासकामांचा सविस्तर प्रगती अहवाल प्रकाशित करण्यात आला. यावेळी प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांच्या अपेक्षा आणि जनतेच्या हितासाठी तयार करण्यात आलेला जनहितनामा देखील प्रसारित करण्यात आला. या प्रगती अहवालात प्रभाग क्रमांक ९ मधील पायाभूत सुविधा, नागरिकांसाठी राबवलेले उपक्रम आणि पुढील काळात करण्यात येणाऱ्या विकासकामांचा ठोस आराखडा मांडण्यात आला आहे. येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वसमावेशक आणि व्यवहार्य उपाययोजनांचा समावेश असलेला जनहितनामा तयार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार गायत्री मेढे-कोकाटे, बाबुराव चांदेरे, पार्वती निम्हण तसेच अमोल बालवडकर उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ९ मधील विकासकामे अधिक गतीने पूर्ण करून नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा देणे आणि दिलेली आश्वासने पूर्णत्वास नेणे हा आमचा संकल्प आहे, असे उपस्थित उमेदवारांनी स्पष्ट केले. जनहितनामा पूर्णपणे जनतेच्या सहभागातून तयार करण्यात आला आहे. प्रगती अहवालात प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते सुधारणा, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता उपक्रम, स्मार्ट सुविधा, नागरिक सेवा केंद्र, आरोग्यसेवा आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांसह झालेल्या कामांचा सविस्तर आढावा देण्यात आला आहे. प्रभागातील वाढत्या गरजा आणि भविष्यातील प्राधान्यक्रमांवरही स्पष्ट दिशानिर्देश मांडण्यात आले आहेत. या उपक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जनहितनामा पूर्णपणे जनतेच्या सहभागातून तयार करण्यात आला आहे. प्रभागातील पाच हजारहून अधिक नागरिकांचे मत, तसेच रहिवासी संस्था, नागरिक संघटना आणि विविध सिटिझन ग्रुप्स यांच्या सूचना, समस्या आणि अपेक्षा नोंदवूनच हा जनहितनामा साकारण्यात आला आहे. या दस्तऐवजात लोकांनी ज्या मुद्द्यांना प्राधान्य दिले, जिथे प्रत्यक्ष बदल घडवून आणण्याची गरज आहे आणि ज्याचा थेट लाभ नागरिकांना मिळू शकतो, त्या सर्व बाबींना स्थान देण्यात आले आहे. जनतेला जे हवे आहे, जिथे त्यांचा हक्क आणि हित आहे, त्या गरजांवर आधारित हा आराखडा तयार करण्यात आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 6:33 pm

पती अथवा वडील नसणा-या एकल महिलांना दिलासा

मुंबई : प्रतिनिधी ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांना अजूनही केवायसी करता येणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, अंगणवाडी सेविकांकडे जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही केवायसीची प्रक्रिया सुरू आहे. जिल्हा महिला बालविकास अधिकारी हे त्यांच्या लॉगईनवरून केवायसी करत आहेत. त्यामुळे आता आशा लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. अजूनही राज्यातील तब्बल […] The post पती अथवा वडील नसणा-या एकल महिलांना दिलासा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 6:25 pm

'लाडकी बहीण' योजनेचा हप्ता लांबणीवर पडणार?:अजित पवार म्हणाले - निवडणूक आयोगाने सांगितल्यास 16 तारखेला पैसे देणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात संघर्षाचा केंद्रबिंदू ठरली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित ३००० रुपये बहिणींच्या खात्यात जमा करण्याच्या हालचाली सत्ताधाऱ्यांनी सुरू केल्या होत्या. मात्र, काँग्रेसने यावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून, १४ जानेवारीनंतरच हे पैसे देण्यात यावेत अशी मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. जर निवडणूक आयोगाने सांगितले, तर आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता १६ जानेवारीला देऊ, असे स्पष्टीकरण त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीला विधानसभा निवडणुकीत सत्तेत येण्यासाठी गेमचेंजर ठरलेली ही योजना आता महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे मुख्य हत्यार बनली आहे. भाजप नेते गिरीश महाजन आणि मुंबईतील उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी दोन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याबाबत समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर केल्या होत्या. याला काँग्रेसने 'निवडणूक आचारसंहितेचा भंग' असल्याचे मानत विरोध दर्शवला आहे. यासंदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून, आपण योजनेच्या विरोधात नसून, केवळ निवडणुका संपेपर्यंत हप्ता न देण्याची विनंती केली आहे. या राजकीय पेचप्रसंगामुळे आता लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 'रॉकी भाई' टिप्पणीवर मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांचा उल्लेख 'रॉकी भाई' असा केला होता. यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत मिश्किल उत्तर दिले आहे. मी अद्याप केजीएफ सिनेमा पाहिलेला नाही. आधी मी तो चित्रपट पाहतो आणि मगच ठरवतो की रोहितने मला 'रॉकी भाई' म्हटले ते योग्य आहे की अयोग्य, असे दादांनी हसत हसत सांगितले. युती धर्मावरून देवेंद्र फडणवीस यांना सडेतोड उत्तर महायुतीमधील अंतर्गत वादावर बोलताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही प्रत्युत्तर दिले. मी इथे महापालिकेची निवडणूक लढवत आहे, मग मी प्रशासनातील चुका दाखवल्या म्हणजे युती धर्म पाळला नाही असे होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'आता कुठे कंठ फुटला' या विधानाचा समाचार घेताना अजित पवार म्हणाले की, जर गेल्या नऊ वर्षांपासून निवडणुकाच झाल्या नसतील, तर जनतेच्या समस्या मांडण्यासाठी कंठ फुटणारच ना? महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतील नेत्यांमधील हे शाब्दिक युद्ध आता विकोपाला पोहोचल्याचे दिसत आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, महेश लांडगे हा खूप मोठा नेता आहे, तो स्वयंपूर्ण आहे आणि त्याचा बोलवता धनी कोणी नाही, तसेच भोसरीतील लोक हे स्वयंभू आणि स्वाभिमानी असतात, असे म्हणत त्यांनी लांडगे यांना टोला लगावला.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 6:23 pm

गोरेगावात भाजप-मनसे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा:प्रचाराच्या टेबलवरून वाद, मनसे कार्यकर्ता जखमी झाल्याने तणाव वाढला

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे ठाकरे बंधू प्रत्यक्ष मैदानात उतरून सभांचा धडाका लावत असताना, दुसरीकडे कार्यकर्त्यांमधील संघर्ष आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. मुंबईच्या गोरेगाव पश्चिम परिसरात आज भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना घडली. प्रभाग क्रमांक ५८ मधील अमृत नगर भागात प्रचाराचे टेबल लावण्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेकडील अमृत नगर परिसरात आपापल्या पक्षाचे प्रचार साहित्य आणि टेबल लावण्यावरून भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. मात्र, काही वेळातच या वादाने उग्र रूप धारण केले आणि दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले. या धुमश्चक्रीत दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी आणि धक्काबुक्की करण्यात आली. या हाणामारीत मनसेचा एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने अमृत नगर भागात धाव घेतली. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या राड्यामुळे गोरेगाव परिसरात मोठी राजकीय खळबळ उडाली असून, दोन्ही पक्षांचे पदाधिकारी पोलिस ठाण्याबाहेर जमा झाले आहेत. सध्या या भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू ही घटना नेमकी कोणाच्या चिथावणीमुळे घडली आणि यामध्ये दोन्ही बाजूने नक्की किती जण जखमी झाले आहेत, या संदर्भात गोरेगाव पोलिस सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, निवडणुकीच्या काळात शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुंबईच्या राजकीय रणांगणावर कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि मनसे यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. शीर्ष स्तरावरील नेते मोठ्या सभांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना, स्थानिक पातळीवर मात्र जागेवरून आणि वर्चस्वावरून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड इर्षा पाहायला मिळत आहे. गोरेगावातील या राड्यामुळे आता आगामी मतदानाच्या दिवशी देखील अशा प्रकारच्या संघर्षाची शक्यता वर्तवली जात असून, पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 6:03 pm

‘तान्हाजी’ सिनेमाचा येणार सीक्वल?

मुंबई : प्रतिनिधी अभिनेता अजय देवगणच्या २०२० साली प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शूरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा दाखवणा-या या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत होता. तर अभिनेत्री काजोल हिची देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका होती. यशानंतर आता या सिनेमाच्या सीक्वलची चर्चा सुरू झाली आहे. त्याचे कारण म्हणजे अजय देवगणने शेअर […] The post ‘तान्हाजी’ सिनेमाचा येणार सीक्वल? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 5:58 pm

कल्याण-डोंबिवलीत 'पाकीट' संस्कृती!:भाजप उमेदवाराकडून 3 हजारांचे वाटप, शिंदे गटाच्या उमेदवाराने डाव उधळला

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांच्या बूथवर कार्यकर्त्यांची नियोजनबद्ध कामे सुरू असतानाच, डोंबिवलीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपने सर्वाधिक जागा बिनविरोध निवडून आणल्याचा दावा केलेल्या या महापालिकेत, आता भाजपच्याच एका उमेदवाराच्या प्रचारार्थ पैशांचे वाटप केल्याचे उघडकीस आले आहे. डोंबिवलीतील तुकाराम नगर परिसरात एका महिलेच्या घरात पैशांची पाकिटे सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून निवडणुकीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी चक्क रोख पैशांचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. डोंबिवलीच्या तुकाराम नगरमधील दशरथ भुवन परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून नागरिकांच्या घरी पांढऱ्या रंगाची पाकिटे पोहोचवली जात होती. या प्रत्येक पाकिटात ५०० रुपयांच्या सहा नोटा, म्हणजे ३ हजार रुपये असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, येथील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या दक्ष कार्यकर्त्यांनी या पैसे वाटपाचा छडा लावत संबंधितांना रंगेहाथ पकडले. या घटनेची माहिती मिळताच निवडणूक आयोगाचे भरारी पथक आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. महायुतीमधील 'मैत्रीपूर्ण' लढत ठरतेय संघर्षाची डोंबिवलीतील या विशिष्ट प्रभागात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात 'मैत्रीपूर्ण' लढत होत आहे. भाजपचे उमेदवार विशू पेडणेकर आणि शिवसेनेचे नितीन पाटील यांच्यात येथे थेट सामना आहे. महायुती म्हणून एकत्र असणारे हे दोन्ही पक्ष या ठिकाणी एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने मोठी रसाखेच पाहायला मिळत आहे. विशू पेडणेकर यांचे कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचे समोर आल्यानंतर, शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्याचे व्हिडिओ बनवून हा डाव उधळला. महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्षच अशा प्रकारे समोरासमोर आल्याने आणि त्यातही पैसे वाटपाचे आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. बिनविरोध विजयाचा विक्रम करणाऱ्या भाजपची नाचक्की? कल्याण-डोंबिवलीत भाजपने यापूर्वीच अनेक जागा बिनविरोध जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीतही एका जागेसाठी उमेदवाराला पैशांचे वाटप करावे लागते, यावरून भाजपच्या स्थानिक गोटात अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. बिनविरोध विजयाचा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या पक्षातच अशा प्रकारे 'पाकीट संस्कृती' फोफावल्याने विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतर आता संबंधित उमेदवारावर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण डोंबिवलीचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 5:53 pm

काश्मिरी व्यक्ती ताब्यात

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरामध्ये दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अयोध्या हे संवेदनशील ठिकाण असल्याने येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. मात्र या सुरक्षा व्यवस्थेला सुरुंग लावत एका व्यक्तीने राम मंदिराच्या परिसरात नमाज पठणाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुरक्षा दलांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले असून तो काश्मिरी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी […] The post काश्मिरी व्यक्ती ताब्यात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 5:53 pm

देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा

नवी दिल्ली : हल्ले, गुलामगिरीच्या वेदनादायक इतिहासाचा प्रतिशोध घेण्यासाठी भारताला केवळ सीमांवरच नव्हे, तर आर्थिकदृष्टया तसेच प्रत्येक पातळीवर स्वत:ला सामर्थ्यशाली करावे लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी केले. दिल्लीमध्ये आयोजित एका समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी हे वक्तव्य केले. महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग आदी महनीय व्यक्तींनी स्वातंर्त्यचळवळीत दिलेल्या योगदानाचा […] The post देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 5:51 pm

‘एक्स’वरील ६०० अकाउंट मिटविले

नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’चे मालक इलॉन मस्क यांनी कंटेंटसंदर्भातील आपली चूक मान्य करत, यापुढे भारतीय कायद्यांनुसारच काम करण्याचे आश्वासन दिले आहे. खरे तर, ‘एक्स’वरील आक्षेपार्ह मजकुरासंदर्भात मोदी सरकारने गंभीर दखल घेतल्यानंतर, कंपनीने कारवाई करत मोठ्या प्रमाणावर संबंधित मजकूर ब्लॉक केला. मोदी सरकारने एक्सवरील आक्षेपार्ह मजकुराची गांभीर दखल […] The post ‘एक्स’वरील ६०० अकाउंट मिटविले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 5:49 pm

तणाव, प्रदूषणामुळे पुरुषांमधील थायरॉईड ग्रंथींवर परिणाम

नवी दिल्ली : थायरॉईड ही केवळ महिलांची समस्या समजली जात होती. मात्र, बदलती जीवनशैली, सततचा तणाव, प्रदुषण, आहाराच्या अनियमित वेळा आणि वाढते प्रदूषण यामुळे आता पुरुषांमध्येही थायरॉईड विकारांचे प्रमाण वाढले आहे. थायरॉईडच्या समस्या या सर्वच वयोगटातील पुरुष आणि महिलांना प्रभावित करू शकतात. वाढता ताण, चुकीची जीवनशैली आणि प्रदूषण यांसारखी विविध कारणे विशेषत: शहरी भागात थायरॉईडच्या […] The post तणाव, प्रदूषणामुळे पुरुषांमधील थायरॉईड ग्रंथींवर परिणाम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 5:45 pm

हिंगोलीत वाळू माफियांची मुजोरी:ट्रॅक्टर पकडणाऱ्या महसूल अधिकाऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न, थरारक पाठलागानंतर दोघांना बेड्या

औंढा नागनाथ तालु्क्यातील जवळाबाजार ते शिरला रोडवर अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणतांना ग्राम महसूल अधिकाऱ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांवर रविवारी ता. ११ औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले असून अन्य एकाचा शोध सुरु करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पोलिस व महसूल विभागाची पथके सक्रिय झाली असून यापथकांकडून सुट्टीच्या दिवशीही वाळू घाटावरील मार्गावर वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, आज सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास पोटा शिवारातून पूर्णा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक केली जात असल्याची माहिती तहसील व पोलिस विभागाच्या पथकाला मिळाली होती. ्त्यावरून तहसीलदार हरिष गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी नवनाथ गोडसे व त्यांचे पथक तसेच पोलिसांचे पथक जवळा बाजार ते शिरला मार्गावर वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी पोलिसांनी पुरजळ शिवारात एका ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली. पोलिस व महसूल विभागाच्या पथकाने ट्रॅक्टर पोलिस ठाण्यात नेण्याच्या सूचना चालक बालाजी बोंगाने याला दिल्या. त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी नवनाथ गोडसे ट्रॅक्टरवर बसले होते. यावेळी चालक बालाजी याने ट्रॅक्टर काही अंतरावर नेल्यानंतर वडद शिवारातील रोडने भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालविण्यास सुरवात केली. यावेळी नवनाथ यांनी थांबण्याची सुचना केली असतांनाही बालाजी याने भरधाव वेगात ट्रॅक्टर नेऊन त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर प्रकार पोलिस व महसूलच्या पथकाच्या लक्षात येताच त्यांनी वाहनाद्वारे पाठलाग करून ट्रॅ्क्टर पकडले. या प्रकरणी नवनाथ यांच्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिसांनी बालाजी बोंगाने (रा. उमरा), कैलास आव्हाड, रामेश्‍वर जाधव (रा. पोटा) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बालाजी व रामेश्‍वर यांना ताब्यात घेतले आहे. उपनिरीक्षक दत्ता कानगुले पुढील तपास करीत आहेत. हे ही वाचा… सेनगाव तालु्क्यात अवैध वाळू वाहतूक:दोन टिप्परसह 18 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल सेनगाव तालुक्यातील बन शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परसह 18 लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर सेनगाव पोलिस ठाण्यात शनिवारी ता. 10 रोजी गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 5:33 pm

‘सुवर्णगड’ बंगल्याबाहेर संशयास्पद बॅग

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांच्या मुंबईतील ‘सुवर्णगड’ या निवासस्थानाबाहेर एक संशयास्पद बेवारस बॅग आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बॅगमुळे घातपाताचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने परिसराची नाकेबंदी केली असून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. संशयास्पद […] The post ‘सुवर्णगड’ बंगल्याबाहेर संशयास्पद बॅग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 5:31 pm

बौद्ध साहित्य आणि मानवतावादी विचारांचा खंदा पुरस्कर्ता हरपला:ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा यांचे 87 व्या वर्षी निधन

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा (वय ८७) यांचे आज रविवारी दुपारी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झाले. पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून, मानवतावादी समाजसुधारकांच्या विचारांचा एक मोठा अभ्यासक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा विचार सातत्याने मांडला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद भूषवत असताना त्यांनी साहित्याच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण काम केले. प्रामुख्याने बौद्ध साहित्य आणि मानवतावादी समाजसुधारकांच्या कार्यावर आधारित त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांच्या साहित्यातून नेहमीच समता आणि मानुसकीचा संदेश दिला गेला, ज्यामुळे त्यांना साहित्य वर्तुळात आदराचे स्थान प्राप्त झाले होते. महत्त्वपूर्ण ग्रंथसंपदा आणि आत्मचरित्राचा ठेवा रतनलाल सोनग्रा यांच्या साहित्यकृतींनी वाचक वर्गावर मोठा प्रभाव टाकला आहे. यामध्ये संत कबीरांच्या विचारांवर आधारित 'कबीर वाणी' हा त्यांचा ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. तसेच 'तिमिरातुनी तेजाकडे' या ग्रंथामधून त्यांनी प्रबोधनाचा विचार मांडला. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांचा आणि जीवनप्रवासाचा ठेवा असलेल्या 'सोनजातक' या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचा १४ भागांचा संच साहित्य क्षेत्रात मैलाचा दगड ठरला आहे. या ग्रंथातून त्यांनी केवळ स्वतःचा प्रवासच नाही, तर तत्कालीन सामाजिक परिस्थितीचेही दर्शन घडवले आहे. उद्या सकाळी पार पडणार अंत्यविधी आचार्य रतनलाल सोनग्रा यांचे पार्थिव उद्या सोमवारी सकाळी ९:०० ते १०:३० या वेळेत त्यांच्या विमान नगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११:३० वाजता येरवडा येथील विद्युत दाहिनी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत व्यक्त केले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 5:27 pm

माजी आमदार दगडू सकपाळांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या मतदानाला अवघे चार दिवस राहिले असताना ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या शिवशक्ती युतीच्या मुंबईतील पहिल्या जाहीर सभेच्या दिवशीच ‘मातोश्री’शी प्रामाणिक असलेले आणि सच्चे शिवसैनिक म्हणून ओळख असलेले शिवडीचे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवडीमध्ये उमेदवारी देताना उद्धव ठाकरे यांच्याकडून […] The post माजी आमदार दगडू सकपाळांचा ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 4:29 pm

दोरखंड बांधून एटीएम उखडले; १२ मिनिटांत रक्कम लुटली

नाशिक : एटीएम कटरने फोडून रक्कम लुटण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. मात्र नाशिकच्या सटाणा येथे चोरट्यांनी एटीएम चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी थेट जीपला दोरखंड बांधून एटीएम उखडून काढले आणि ते जीपमध्ये टाकून अवघ्या १२ मिनिटांत घटनास्थळावरून पोबारा केला. ही घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरातील ताहाराबाद रोडवरील यशवंतनगर परिसरात असलेल्या स्टेट […] The post दोरखंड बांधून एटीएम उखडले; १२ मिनिटांत रक्कम लुटली appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 4:26 pm

अजितदादांंचा एकेरी उल्लेख लांडगेंना शोभत नाही

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध भाजप आमदार महेश लांडगे यांच्यात सुप्त संघर्ष पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे आयोजित एका सभेला संबोधित करताना आमदार महेश लांडगेंवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना महेश लांडगे यांनी एकेरी भाषेत अजित पवार यांचा उल्लेख केला होता. यानंतर आता […] The post अजितदादांंचा एकेरी उल्लेख लांडगेंना शोभत नाही appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 11 Jan 2026 4:23 pm

अमरावतीत राजकीय उलथापालथ:रवी राणांच्या युवा स्वाभिमानला मोठा धक्का, भाजपचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा; साईनगरमध्ये बिग फाईट

अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षामध्ये असलेली युती आता केवळ नावापुरतीच उरली असल्याचे चित्र दिसत आहे. प्रभाग क्रमांक १८ (ड) मध्ये भाजपने अधिकृत युती असतानाही चक्क अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (१० जानेवारी) रात्री उशिरा अपक्ष उमेदवार रितेश नेभनानी यांना पाठिंब्याचे पत्र दिल्याने आता या प्रभागात भाजप समर्थित अपक्ष विरुद्ध युवा स्वाभिमान अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि युवा स्वाभिमानची युती आहे. प्रभाग क्रमांक १८ ही जागा स्वाभिमान पक्षाला सोडण्यात आली होती. तिथे युवा स्वाभिमानने स्वतंत्र उमेदवार दिल्याने भाजपने रणनीती बदलत अपक्ष उमेदवार रितेश नेभनानी यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्री उशिरा दिलेल्या या पाठिंब्यामुळे रवी राणा यांच्या पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. अमरावतीत रवी राणा यांनी ८७ पैकी ४१ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत, मात्र भाजपच्या या भूमिकेमुळे आता युतीमध्ये कुरबुरी वाढल्या आहेत. भाजपला मतांच्या विभाजनाची भीती भाजप आणि युवा स्वाभिमानमधील या अंतर्गत वादामुळे मतांचे मोठ्या प्रमाणावर विभाजन होऊन भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा संभाव्य धोका ओळखून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतः अमरावतीत तळ ठोकून आहेत. यापूर्वी त्यांनी रवी राणा यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जागावाटपावरून आणि उमेदवार देण्यावरून झालेला वाद न मिटल्याने अखेर भाजपने अपक्ष उमेदवाराला साथ देण्याचा पवित्रा घेतला आहे. या निर्णयामुळे महायुतीमधील मित्रपक्षांमधील दरी अधिकच रुंदावली आहे. साईनगरमधील प्रतिष्ठेची लढाई आज अमरावतीत प्रचाराचा 'सुपर संडे' असून सर्वच उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावली आहे. यामध्ये सर्वाधिक चुरशीची लढत साईनगर प्रभागात पाहायला मिळत आहे. याठिकाणी भाजपचे वजनदार नेते तुषार भारतीय आणि युवा स्वाभिमान पार्टीचे सचिन भेंडे यांच्यात थेट सामना रंगला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रभागाकडे लागले आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात रवी राणा यांनी दिलेले आव्हान तुषार भारतीय कसे पेलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रवी राणांची पदयात्रा आणि विजयाचा विश्वास सचिन भेंडे यांच्या प्रचारासाठी आमदार रवी राणा यांनी आज साईनगर प्रभागात मोठी पदयात्रा काढून शक्तीप्रदर्शन केले. यावेळी बोलताना रवी राणा यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. साईनगर प्रभागाची निवडणूक आता जनतेनेच आपल्या हातात घेतली आहे, त्यामुळे सचिन भेंडे यांचा विजय निश्चित आहे, असे विधान त्यांनी यावेळी केले. प्रचाराच्या या अखेरच्या टप्प्यात रवी राणा यांनी आपली सर्व ताकद सचिन भेंडे यांच्या पाठीशी लावली असून, भाजपनेही तुषार भारतीय यांच्यासाठी कंबर कसली आहे.

दिव्यमराठी भास्कर 11 Jan 2026 4:19 pm