SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

28    C
...

अशोक खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार

प्रतिभा चाकणकर रुपाली चाकरणकरांच्या भगिनी कोट्यवधींचे व्यवहार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार अहिल्यानगर : प्रतिनिधी नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला एसआयटीने आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले होते. यावेळी न्यायालयाने अशोक खरातला आणखी ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यामुळे खरातचा पोलिसांच्या तावडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. खरातवर एकूण १२ गुन्हे दाखल असून एसआयटीने न्यायालयातून आज लगेचच तिस-या […] The post अशोक खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 1:15 am

शस्त्रसंधी हवेतच?

इस्रायल, अमेरिकेचे हल्ले सुरूच, होर्मुझवर इराणचे नियंत्रण विश्वासघात केल्यास सर्वनाश, ट्रम्प यांचा इराणला इशारा वॉशिंग्टन : वृत्तसंस्था इराण आणि अमेरिकेमध्ये १४ दिवसांच्या युद्धविरामाचा निर्णय झाला. या निर्णयानंतर आखातातील तणाव कमी होईल, असे वाटत होते. मात्र, इस्रायलने लेबनानवरील हल्ले सुरूच ठेवल्याने इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. याच दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पोस्ट करत […] The post शस्त्रसंधी हवेतच? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 1:13 am

मुकुल चौधरीची धमाकेदार खेळी, लखनौचा विजय

कोलकाता : वृत्तसंस्था मुकुल चौधरीने मोक्याच्या क्षणी जोरदार फटकेबाजी करीत शानदार अर्धशतक झळकावले आणि घरच्या मैदानावर खेळणा-या कोलकाता नाईट रायडर्सचा लखनौ सुपर जाएंटस संघाने पराभव केला. त्यामुळे अजिंक्य राहणेच्या संघाला मोठा धक्का बसला. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने ४ विकेटसच्या मोबदल्यात १८१ धावा करीत लखनौसमोर १८२ धावांचे आव्हान ठेवले होते. १८२ धावांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी लखनौचा […] The post मुकुल चौधरीची धमाकेदार खेळी, लखनौचा विजय appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 1:11 am

महिला आरक्षण विधेयकाला विशेष अधिवेशनात मंजुरी?

मसुदा मंजूर, आता १६ ते १८ एप्रिलदरम्यान विशेष अधिवेशन नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नारी शक्ती वंदन कायद्यात सुधारणा करणा-या विधेयकाच्या मसुद्याला काल मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावानुसार लोकसभेच्या जागांची संख्या सध्याच्या ५४३ वरून ८१६ पर्यंत वाढेल, ज्यापैकी २७३ जागा महिलांसाठी राखीव असतील. त्यातच आता सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन […] The post महिला आरक्षण विधेयकाला विशेष अधिवेशनात मंजुरी? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 1:08 am

तात्पुरता युद्धविराम?

काही तासांपूर्वी ‘आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल’ अशी भीषण धमकी देणा-या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर नरमाईची भूमिका घेतली. मध्य आशियातील वाढता तणाव पाहता, ट्रम्प यांनी इराणवर होणारी संभाव्य बॉम्बफेक किमान दोन आठवड्यांसाठी स्थगित करण्याचे मान्य केले. मध्यस्थांनी मांडलेला १४ दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव अमेरिकेने स्वीकारल्याने जगावर ओढवलेले युद्धाचे संकट तूर्तास टळले आहे. […] The post तात्पुरता युद्धविराम? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:35 am

बाकली येथे यात्रेनिमित्त  जंगी कुस्त्या उत्साहात

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी बाकलीचे श्रीक्षेत्र हनुमान मंदीर देवस्थानच्या यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा शुभारंभ श्री क्षेत्र मारोती आश्रमचे महंत शिवरामदास गुरु नारायणदास वैरागी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संत महतांची प्रमुख उपस्थिती होती. लातूर जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील मल्लांच्या जंगी कुस्त्या झाल्या. तालमीतील मातीचा सुगंध, अंगावर पिळदार स्रायू, पहाटेच्या सरावाने कमावलेली अफाट ताकद, दुध-तुपावर पोसलेले शरीर आणि […] The post बाकली येथे यात्रेनिमित्त जंगी कुस्त्या उत्साहात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:33 am

उपाध्यक्षांसह सभापतींना आज खातेवाटप

लातूर : प्रतिनिधी लातूर जिल्हा परिषदेत चार विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रीया पार पडल्यानंतर चार पैकी दोन सभापतींना खाते वाटप झाले. तर उर्वरीत दोन सभापतींना व उपाध्यक्षांना आगामी शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक बोलवून पदभार देणे आवश्यक होते. मात्र उर्वरीत दोन्ही सभापतींनी पुढील सभेच्या १० दिवस अगोदरच आपल्या पदाचा पदाभार […] The post उपाध्यक्षांसह सभापतींना आज खातेवाटप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:31 am

विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठण्याची सुवर्णसंधी

लातूर : प्रतिनिधी विद्यार्थ्यांसाठी पोषक शैक्षणिक वातावरण आहे. म्हणून विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठण्याची सुवर्ण संधी उपलब्ध असल्याचे मत विभागीय शिक्षण उपसंचालक दीपक चवणे यांनी व्यक्त केले. दयानंद विज्ञान महाविद्यालयास लातूर विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक दीपक रामराव चवणे यांनी पदावर रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हास्तरीय आढावा बैठकीच्या निमित्ताने भेट दिली. यावेळी महाविद्यालयात चवणे यांचा सन्मान व सत्कार […] The post विद्यार्थ्यांना यशाचे शिखर गाठण्याची सुवर्णसंधी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:29 am

चिंचोलीराव वाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट

लातूर : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोलीराव वाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास गुरुवारी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी भेट देऊन दर्शन घेतले, प्रार्थना केली. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते काल्याच्या कीर्तना निमित्त दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी हभप नितीन महाराज हिप्पर्गेकर, […] The post चिंचोलीराव वाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:28 am

जुन्यांचे हाल, नवीन अर्ज धूळखात 

लातूर : प्रतिनिधी ‘सब का साथ, सबका विकास’, ही देशाचे पंपप्रधान नरेंद्र मोदी यांची टॅग लाईन असली तरी येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वृद्ध, दिव्यांग व विधावांना ना साथ आहे ना विकास, असे चित्र दिसून येत आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून अनुदान रखडल्याने या लाभार्थ्यांचे हाल होत आहेत. लातूरच्या तहसील कार्यालयात या योजनेच्या […] The post जुन्यांचे हाल, नवीन अर्ज धूळखात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:27 am

पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद

लातूर : प्रतिनिधी राज्यात काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी सुरू असलेल्या ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत दि. ९ एप्रिल रोजी लातूर येथील काँग्रेस भवनमध्ये जिल्ह्यातील प्रमुख पदाधिका-यांची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तथा चंदीगड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष एच. एस. लकी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या […] The post पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:26 am

काँग्रेसचे निरीक्षक हरमिंदरसिंग लकी यांनी घेतली माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट

लातूर : प्रतिनिधी आखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निरीक्षक तथा चंदीगड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हरमिंदरसिंग लकी, प्रदेश निरीक्षक राजदीप सिद्धू, प्रदेश निरीक्षक बाळासाहेब देशमुख यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या आशियाना निवासस्थानी गुरुवारी भेट दिली. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना हरमिंदरसिंग लकी यांनी आखिल […] The post काँग्रेसचे निरीक्षक हरमिंदरसिंग लकी यांनी घेतली माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:25 am

विश्व नवकार मंत्र दिनानिमित्त सामूहिक जप 

लातूर : प्रतिनिधी ९ एप्रिल हा दिवस दरवर्षी पूर्ण जगात जीतो जैन संघटनेच्या वतीने ‘विश्व नवकार मंत्र दिवस’ म्हणून श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. या निमित्ताने विविध जैन मंदिरे, जैन देहरासर तसेच जैन उपाश्रय (स्थानक) येथे नवकार मंत्राच्या सामूहिक जपाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने श्री वर्धमान श्वेतांबर जैन श्रावक संघ, लातूर यांच्या […] The post विश्व नवकार मंत्र दिनानिमित्त सामूहिक जप appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:24 am

शाहू महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘शांतिपर्व’ची धमाल 

लातूर : प्रतिनिधी शिवछत्रपती शिक्षण संस्थाद्वारा संचलित येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘शांतिपर्व-२०२६’ उत्साहाच्या वातावरणात पार पडले. दोन दिवशीय या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करुन धमाल उडवून दिली. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीकांचे वितरण करण्यात आले. ‘शांतिपर्व-२०२६’ स्नेहसंमेलनाचे बक्षीस वितरण झाले. त्यावेळी शिव छत्रपती शिक्षणसंस्था गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या नेहमीच पाठीशी उभी आहे. शिक्षणक्षेत्रात अत्याधुनिक […] The post शाहू महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘शांतिपर्व’ची धमाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 10 Apr 2026 12:22 am

महाराष्ट्रातील भाविकांच्या बसला यूपीमध्ये अपघात:कारला वाचवताना प्रयत्नात बस रेलिंगला धडकली, 2 महिलांचा मृत्यू, 35 जखमी

तीर्थटनासाठी उत्तर प्रदेशात गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर काळाने भीषण घाला घातला आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन आध्यात्मिक आनंदाने नेपाळच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या खासगी बसचा वाराणसी-गोरखपूर महामार्गावर उत्तर प्रदेशातील नादगंज जवळील नवसारा येथे भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील दोन महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे आणि परिसरातील ४४ भाविक काही दिवसांपूर्वी खासगी बसने धार्मिक पर्यटनासाठी तीर्थयात्रेवर निघाले होते. या भाविकांनी अयोध्या आणि वाराणसी येथील दर्शन आटोपले होते. आज सकाळी ही बस वाराणसीहून नेपाळच्या दिशेने मार्गस्थ झाली असताना ही दुर्घटना घडली. नवसारा परिसरात समोरून येणाऱ्या एका बोलेरो गाडीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी रेलिंगला जाऊन जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की बसचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातात दोन महिलांचा मृत्यू या घटनेत बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रोहिनखेड येथील रहिवासी सरस्वती पाखरे आणि अकोला जिल्ह्यातील अन्नपूर्णाबाई या दोन ज्येष्ठ महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या ३५ प्रवाशांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची बातमी मोताळा तालुक्यात पोहोचताच धामणगाव बढे आणि रोहिनखेड परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या परिवारातील सदस्य सुरक्षित आहेत की नाही, याची माहिती घेण्यासाठी नातेवाईकांनी प्रशासकीय यंत्रणेकडे धाव घेतली आहे. प्रशासनाची तत्परता आणि मदतकार्य अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. उत्तर प्रदेशचे एसएसपी राकेश मिश्रा यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, अपघातातील मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली असून, त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश डॉक्टरांना दिले आहेत. जखमींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धेने तीर्थाटनावर निघालेल्या या भाविकांच्या प्रवासाचा अंत इतक्या भीषण अपघातात होईल, अशी पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर दुःखाचे सावट पसरले असून, जिल्हा प्रशासनाकडून मदतकार्यासाठी समन्वय साधला जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:44 pm

धरणाचे पाणी कोरवाहू शेतकऱ्यांना का देत नाही?:प्रा. साहेबराव विधळे गौरव समारंभात ज्येष्ठ विचारवंत भारत पाटणकर यांचा सवाल

अमरावती येथे आयोजित प्रा. साहेबराव विधळे यांच्या गौरव समारंभात ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उचलला. धरणाचे पाणी कोरडवाहू शेतकऱ्यांना का दिले जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित करत शासनाने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली. डॉ. पाटणकर म्हणाले की, कोरडवाहू शेती हा अत्यंत अडचणीचा विषय आहे. सिंचनाची सोय नसणे ही त्यांच्यापुढील सर्वात मोठी अडचण असते, ज्यामुळे अनेकदा शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. यावर शासनाने गांभीर्याने विचार करून उपाययोजना करणे आवश्यक आहे. धरणग्रस्तांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे कार्यकर्ते प्रा. साहेबराव विधळे यांचा गौरव समारंभ आणि त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘संघर्षधारा’ या गौरवग्रंथाचे विमोचन डॉ. पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई अरविंद वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली अभियंता भवनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नागपूर येथील ज्येष्ठ विचारवंत नागेश चौधरी, मोझरी येथील गुरुदेव सेवा मंडळाचे आजीवन प्रचारक आचार्य वेरुळकर गुरुजी, डॉ. प्रतिभा विधळे, पुष्पाताई बोन्डे, माणिकराव गंगावणे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांची व्यथा मांडताना डॉ. पाटणकर पुढे म्हणाले की, विकास प्रकल्पांखाली अनेक गावे आणि शेतजमिनी जातात, अनेकजण विस्थापित होतात, मात्र त्यांचे योग्यप्रकारे पुनर्वसन होत नाही. अशा स्थितीत प्रकल्पग्रस्तांच्या वाट्याला संघर्ष येतो. त्यामुळेच त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारणे आवश्यक असते. अप्परवर्धा धरणग्रस्तांसाठी प्रा. साहेबराव विधळे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबतीने दीर्घकाळ लढा दिला आणि त्यांना न्याय मिळवून दिला. प्रकल्पग्रस्तांच्या न्याय लढ्याच्या इतिहासातील ही अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे डॉ. पाटणकर यांनी नमूद केले. यावेळी बोलताना नागेश चौधरी म्हणाले की, आज संधी प्राप्त लोक समाजविन्मुख आयुष्य जगण्यावर भर देत आहेत. मात्र प्रा. साहेबराव विधळे यांनी कायम समाजसन्मुख भूमिका अंगिकारून कार्य केले. धरणग्रस्तांचा लढा असो की बहुजन संघर्ष समितीचे प्रबोधनाचे कार्य असो, सर्वांमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका घेऊन गुणात्मक कार्य केले. आचार्य वेरुळकर गुरुजी म्हणाले की, संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांमध्ये पीडित व्यक्तीच्या संघर्षात उभे राहण्याची प्रेरणा आहे. प्रा. साहेबराव विधळे यांनी विविध चळवळींमध्ये केलेले कार्य असेच असल्याने ते अतिशय मोलाचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई अरविंद वानखडे म्हणाले की, प्रा. साहेबराव विधळे यांचे जीवनकार्य कष्टकरी, बहुजन समाजाच्या न्यायहक्कांसाठी राहिले आहे. धरणग्रस्तांच्या सोबतीने त्यांनी शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न मांडले. मंडल आयोगाच्या प्रबोधन कार्यात हिरीरीने पुढाकार घेतला, तसेच बहुजन संघर्ष समितीतही कार्य केले. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन त्यांनी मागील पन्नास वर्षे केलेले सामाजिक कार्य महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा हा सत्कार एकप्रकारे नव्या सामाजिक चळवळींसाठी ऊर्जा देणारा आहे, असेही वानखडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महेंद्र मेटे यांनी केले. प्रारंभी अहाना पाटील आणि अधिराज या दोन चिमुकल्यांनी गीत गायन केले.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:22 pm

समाज कल्याण विभागाच्या समता सप्ताहाला प्रारंभ:14 एप्रिलपर्यंत जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाज कल्याण विभागाने 'समता सप्ताह' सुरू केला आहे. हा सप्ताह १४ एप्रिलपर्यंत चालणार असून, या अंतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहादरम्यान भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, वक्तृत्व, निबंध स्पर्धा, पथनाट्ये, कार्यशाळा, मेळावे आणि व्याख्यानांचा समावेश आहे. शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच सामाजिक समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांना प्रोत्साहन देणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी सांगितले की, शाळा, महाविद्यालये आणि शासकीय वसतिगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित स्पर्धा घेतल्या जात आहेत. तसेच, संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे महत्त्व सांगणारी व्याख्याने आणि वक्तृत्व स्पर्धा जिल्हा व विभागीय स्तरावर आयोजित करण्यात आल्या आहेत. १० एप्रिल रोजी समतादूतांद्वारे ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये पथनाट्ये व लघुनाटिकांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांविषयी प्रबोधन केले जाईल. याच दिवशी मार्जिन मनी योजनेवर कार्यशाळा आणि लाभार्थी मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. ११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी केली जाईल, ज्यात त्यांच्या सामाजिक कार्यावर व्याख्यान आयोजित केले आहे. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांचे मेळावे, शाळा, वसतिगृहे व महाविद्यालयांमध्ये आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरे घेतली जातील. १२ एप्रिल रोजी 'संविधान जागर' कार्यक्रमांतर्गत भारतीय संविधानाची निर्मिती, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यावर माहिती दिली जाईल. महिलांसाठी विशेष मेळावे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबिरे व मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. १३ एप्रिल रोजी जनजागृती शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन असून, शासकीय कार्यालये आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. याच दिवशी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात ऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्रे वितरित केली जातील. सप्ताहाचा समारोप १४ एप्रिल रोजी होईल. या दिवशी शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन कार्यक्रम, विविध व्याख्याने आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे विभागाने कळविले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:20 pm

डॉ. दिनेश वाघाडेंची आयएमए अमरावती अध्यक्षपदी निवड:सिताराम बाबा कॉलनीवासियांनी केला सत्कार

डॉ. दिनेश वाघाडे यांची नुकतीच इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) च्या अमरावती शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल सिताराम बाबा कॉलनीतील रहिवाशांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला. या सत्कार समारंभात आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक डॉ. राजू डांगे, इच्छापूर्ती गणेश मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर तीनखेडे, माजी अध्यक्ष अरुणभाऊ ठाकरे, प्रा. मिलिंद चुटके आणि कोषाध्यक्ष प्रदीप सागळे उपस्थित होते. त्यांनी संयुक्तपणे डॉ. वाघाडे यांना शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तिका देऊन सन्मानित केले. डॉ. दिनेश वाघाडे यांनी यापूर्वी आयएमएमध्ये उपाध्यक्ष, सचिव आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले आहे. ते सायंटिफिक उपसमितीचे अध्यक्ष तसेच सीडब्ल्यूसी सदस्य आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्याही त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. वैद्यकीय व्यवसायाव्यतिरिक्त, डॉ. वाघाडे अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आहेत आणि फिजिशियन असोसिएशनचे सचिवही राहिले आहेत. सिताराम बाबा कॉलनी येथील इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त ते अनेकदा मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करतात आणि कॉलनीतील रहिवाशांना तातडीच्या वेळी प्राधान्याने वैद्यकीय सेवा देतात. ते हायटेक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक म्हणूनही परिचित आहेत. यावेळी डॉ. वाघाडे यांच्या पत्नी मेघा दिनेश वाघाडे आणि त्यांच्या मातोश्री उपस्थित होत्या.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:19 pm

संख्या पडताळणी अभियान:अमरावती जिल्ह्यात 4.83 लाख विद्यार्थी, बोगस संख्या लवकरच कळणार, तीन टप्प्यात पटपडताळणी

अमरावती जिल्ह्यात विद्यार्थ्यांची खरी संख्या पडताळण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष अभियान सुरू केले आहे. शनिवार, ११ एप्रिल रोजी या पटपडताळणीचा पहिला टप्पा सुरू होत असून, यामुळे शाळेच्या पटावरील खोट्या विद्यार्थी संख्येचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. ही पटपडताळणी तीन टप्प्यांत केली जाईल. ११ एप्रिलनंतर उर्वरित शाळांची पडताळणी १५ आणि २२ एप्रिल रोजी होणार आहे. जिल्ह्यात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या चारही माध्यमांच्या एकूण २ हजार ८७१ शाळा आहेत. या शाळांमध्ये ४ लाख ८३ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून, ६ हजारांहून अधिक शिक्षक त्यांना शिकवतात. पटपडताळणीसाठी एकूण शाळांना तीन गटांत विभागण्यात आले आहे. ११ एप्रिल रोजी सुमारे ९५० शाळांची पडताळणी करण्याचे नियोजन आहे. शिक्षणाधिकाऱ्यांवर (EO) यासाठी नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, लेखाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील (डायट) शिक्षक हे अधिकारी पटपडताळणी करतील. दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यामुळे त्यांना या पटपडताळणीतून वगळण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकत्याच घेतलेल्या परीक्षेला जेवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, तेवढीच त्यांची संख्या गृहीत धरली जाईल. विद्यार्थ्यांची मोजदाद पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने केली जाईल. यासाठी शासनाच्या 'स्टुडंट्स पोर्टल'चा वापर केला जाईल. संबंधित अधिकारी शाळेत पोहोचल्यावर पोर्टल उघडून विद्यार्थ्यांची नावे पाहतील आणि हजेरीपटानुसार उपस्थितीची नोंद करतील. या पटपडताळणीमुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक धास्तावले आहेत. पडताळणीच्या दिवशी एकही विद्यार्थी गैरहजर राहणार नाही, याची ते विशेष काळजी घेत आहेत. गैरहजेरी टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष परीक्षांचे नियोजनही केले आहे, जेणेकरून विद्यार्थी उपस्थित राहतील.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:17 pm

ग्राहक बुचकळ्यात:सिलिंडर मिळण्याआधीच डिलिव्हरीचा संदेश; रांगा कायम, तासन् तास उभे राहूनही सिलिंडरसाठी करावी लागते प्रतीक्षा

अमरावतीमध्ये गेल्या महिनाभरापासून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा कायम आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सुरू झालेला हा तुटवडा अजूनही अमरावतीकरांची पाठ सोडायला तयार नाही. ग्राहकांना आजही सिलिंडरसाठी लांबच लांब रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे. भारत, इंडेन आणि एचपी या तिन्ही गॅस वितरकांच्या कार्यालयांबाहेर हेच चित्र दिसत आहे. अनेक ग्राहकांना सिलिंडर प्रत्यक्षात मिळण्यापूर्वीच 'डिलिव्हरी झाली' असा संदेश येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एजन्सी कर्मचाऱ्यांनुसार, बुकिंगनंतर साधारणतः १२ दिवसांत सिलिंडर मिळायला हवे, परंतु काही ग्राहकांना त्यापेक्षा जास्त काळ वाट पाहूनही सिलिंडर मिळालेले नाही. जेव्हा ग्राहक यासंदर्भात चौकशी करतात, तेव्हा एजन्सी कर्मचारी 'तुमचा नोंदणीकृत फोन नंबर सांगा, सिस्टीमवर तपासू' असे सांगतात. मात्र, त्याचवेळी आतून 'सर्व्हर डाऊन' असल्याचा संदेश दिला जातो. एचपीचे ग्राहक रवींद्र पाठक यांनी सांगितले की, त्यांना बुकिंगचा संदेश येऊन आठ दिवस झाले, तरी 'आगामी आठ तासांत बुकिंगचा संदेश येईल, कृपया संयम बाळगा' हा संदेश अद्यापही 'आठ तास' पूर्ण झाल्याचे दाखवत नाही. सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांची होणारी ही धावपळ पाहता, प्रशासन 'पुरेशा प्रमाणात सिलिंडर उपलब्ध आहेत' असा जो दावा करत आहे, तो किती फोल आहे हे स्पष्ट होते. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यात दररोज १५,७९४ सिलिंडरचा वापर होतो, ज्यात उज्ज्वला योजना आणि नियमित ग्राहक यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आयओसीचे २५, बीपीसीएलचे १७ आणि एचपीसीएलचे १४ असे एकूण ५६ गोदामे आहेत. या गोदामांमध्ये दररोज २४,५७४ सिलिंडर साठवले जातात. ही साठवण क्षमता रोजच्या वापराच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे. त्यामुळे रोजच्या आवश्यकतेनुसार सिलिंडर ग्राहकांना पुरवले जात असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, गॅस वितरकांच्या कार्यालयांसमोर कायम असलेल्या रांगा प्रशासनाच्या या माहितीला खोडून काढत आहेत. दरम्यान, म्हाडा कॉलनी, अमरावती येथील संदीप मोरस्कर यांनी एका एजन्सीने केवायसीसाठी ३०० रुपये मागितल्याची तक्रार केली आहे. त्यांच्यासमोर एका महिलेकडून घरी जाण्यासाठी पैसे शिल्लक राहावेत म्हणून २०० रुपये घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:13 pm

अमरावतीत पहिल्यांदाच गौमातेची रक्ततुला:परशुराम जयंतीनिमित्त 19 एप्रिलला कार्यक्रम, रक्तदान शिबिरे सुरू

अमरावतीत पहिल्यांदाच एका गौमातेची रक्ततुला केली जाणार आहे. भगवान श्री परशुराम जयंतीनिमित्त १९ एप्रिल रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी रक्तदान शिबिरांची शृंखला सुरू करण्यात आली असून, त्याद्वारे जमा झालेल्या रक्ताचा वापर तुला करण्यासाठी केला जाईल. या अनोख्या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, श्री माहेश्वरी पंचायत, श्री गोरक्षण संस्था आणि रामचरित मानस परिषद यांसारख्या विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ‘गौ माता सन्मान समिती’ ची स्थापना केली आहे. या समितीमार्फत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गुरुवारी माध्यमांना देण्यात आली. सहसंयोजक सुरेश साबू यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम गोरक्षण संस्थेत होणार आहे. तत्पूर्वी, धनराज लेन येथील माहेश्वरी भवनातून भगवान श्री परशुराम आणि गौमातेची शोभायात्रा काढण्यात येईल. ही शोभायात्रा सक्करसाथ, जवाहर गेट, प्रभात चौक, सरोज चौक, श्याम चौक, अंबादेवी रोडमार्गे गांधी चौक असा प्रवास करून गोरक्षण संस्थेत पोहोचेल. गोरक्षण संस्थेत परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज आणि राजराजेश्वर माऊली यांच्या उपस्थितीत गौमातेची रक्ततुला केली जाईल. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जात आहेत. अमरावतीत १२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत एका विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला समितीचे ज्येष्ठ पदाधिकारी ॲड. आर. बी. अटल, संयोजक रमेश छांगाणी, प्रचारप्रमुख संजयकुमार राठी, रक्तदान समितीचे प्रमुख महेंद्र भुतडा, दीपक मंत्री आणि नवल चांडक आदी उपस्थित होते. यावेळी गौमातेच्या संवर्धनासाठी गौहत्याबंदी कायद्याची मागणीही करण्यात आली. हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी २७ एप्रिल रोजी इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पैदल मार्च काढण्यात येणार असून, सरकारला निवेदन दिले जाईल. या आंदोलनाचा समितीच्या कार्यक्रमाशी थेट संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:11 pm

येवदा-वडनेरला आरोग्य सुविधा द्या:खासदार अनिल बोंडे यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना, विकासकामांचा घेतला आढावा

खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दर्यापूर येथे ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यासाठी जागा शोधण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, येवदा आणि वडनेर गंगाई येथे अधिक आरोग्य सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. डॉ. बोंडे यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि विविध यंत्रणाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वरील सूचना केल्या. दर्यापूर तालुका शासनाच्या निर्देशांकानुसार अल्पसंख्याक संवर्गात येत असल्याने, या तालुक्यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून आरोग्य सुविधा उभारण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. येवदा आणि वडनेर गंगाई येथील रुग्णांच्या विविध तपासण्यांचे नमुने अमरावती येथे पाठवावे लागतात, ज्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. तपासणीची सुविधा त्याच ठिकाणी उपलब्ध झाल्यास रुग्णांची अडचण दूर होईल आणि जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल, असे डॉ. बोंडे यांनी नमूद केले. यावेळी डॉ. बोंडे यांनी विविध विकासकामांची माहिती जाणून घेतली. यंत्रणांनी लोकाभिमुख कामे करताना आपले उत्तरदायित्व पाळावे आणि शासनाची प्रतिमा मलीन होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. गरजूंना आयुष्मान कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, असेही त्यांनी संबंधितांना सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर अतिक्रमणाचा प्रश्न समोर येत असल्याने, नगरपालिकांनी पुढाकार घेऊन शहरातील अतिक्रमणे काढावीत. तसेच, 'सर्वांसाठी घरे' या शासनाच्या भूमिकेनुसार पट्टेवाटप करण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी दिले. खेलो इंडिया अंतर्गत प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे १४ प्रस्ताव पाठवण्यात यावेत. यावली शहीद येथील शहीद स्मारकासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, अशी खात्री त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून मिळवून घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. बैठकीत केंद्र सरकारच्या 'नमो उद्यान' आणि 'वड उद्यान' या विषयांवर अधिक चर्चा झाली. वन विभागामार्फत जिल्ह्यात ही उद्याने तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही उद्याने तातडीने पूर्ण करावीत आणि ती तयार करताना झाडांची संख्या अधिक असावी, असेही डॉ. बोंडे यांनी निक्षूण सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:10 pm

पुणे ग्रामीण पोलिसांनी तीन खुनांचे गुन्हे उघडकीस आणले:35 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला बेड्या

पुणे ग्रामीण पोलिसांनी खेड परिसरात झालेल्या तीन खुनांचा छडा लावत रेकॉर्डवरील तिघा आरोपींना अटक केली आहे. या आरोपींपैकी एकावर ३५ गुन्हे दाखल आहेत. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ललित दीपक खोल्लम (वय ३८, रा. शिरोली, ता. आंबेगाव), नंदलाल दिलीप होले (वय ३१, रा. कारेगाव, ता. आंबेगाव) आणि निलेश कैलास सणस (वय ३४, रा. कारेगाव, ता. आंबेगाव) अशी आहेत. यातील पहिली घटना १८ मार्च रोजी खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जैदवाडी येथे घडली होती. धनंजय मारुती घेवडे (वय ३३, रा. राक्षेवाडी, ता. खेड; मूळ रा. कारेगाव, ता. आंबेगाव) यांचा डोक्यावर आणि तोंडावर वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांचे भाऊ सचिन मारुती घेवडे यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेचा तपास गुन्हे शाखेचे पथक समांतरपणे करत होते. पोलिसांनी खेड ते वडगाव निंबाळकर या १४५ किलोमीटरच्या रस्त्यावरील ११० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. यातून ललित खोल्लम आणि नंदलाल होले हे सराईत आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही संशयित आरोपी वडगाव निंबाळकर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर २५ मार्च रोजी सापळा रचण्यात आला. आरोपींनी आजूबाजूच्या उसाच्या शेताचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि नदीच्या दिशेने धावले. मात्र, नदीपात्रात उडी मारण्यापूर्वीच दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले की, मयत धनंजय घेवडे आणि आरोपी होले हे एकाच गावात राहत होते. होले आणि निलेश सणस यांचे घेवडे यांच्याशी काही कारणावरून भांडण झाले होते. याच रागातून खोल्लम आणि होले यांनी लोखंडी रॉड आणि दगडाने मारून घेवडे यांचा खून केला. या गुन्ह्यासाठी निलेश सणस याने इतर आरोपींना पैसे पुरविल्याचेही तपासात उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असताना आरोपी ललित खोल्लम याने श्रीकांत विलास वाडेकर (वय २६) आणि त्यांची आई रुपाली विलास वाडेकर (वय ४६, दोघेही रा. शिरोली, ता. खेड) यांचाही खून केल्याची कबुली दिली. यामुळे आणखी दोन खुनांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी खोल्लम आणि रुपाली वाडेकर यांचे प्रेमसंबंध होते. पैसे मागण्यावरून दोघांमध्ये वारंवार भांडण होत होते. दरम्यान, रुपाली यांचा मुलगा श्रीकांत हाही आरोपी खोल्लमकडे पैशांची मागणी करत होता. याचा राग मनात धरून खोल्लमने श्रीकांतला खेड येथे बोलावून त्याचे अपहरण केले व त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून खून केला. त्यानंतर आरोपी नंदलाल होलेच्या मदतीने श्रीकांतचा मृतदेह मंचर परिसरात जाळून टाकला आणि राख घोड नदीपात्रात टाकली.याप्रकरणी ठाणे शहरातील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच श्रीकांतची आई रुपाली वाडेकर या आरोपीला “माझा मुलगा कुठे आहे?” अशी वारंवार विचारणा करून भांडण करत होत्या. त्यामुळे आरोपी खोल्लमने रुपाली यांना शिरोली येथील सदनिकेत बोलावून त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली व गळ्यावर चाकूने वार करून त्यांचा खून केला. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी खोल्लम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी २ खुनांचे, १ खुनाच्या प्रयत्नाचे, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी असे एकूण ३५ गुन्हे दाखल आहेत. तसेच नंदलाल होले याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल असून दोन्ही आरोपींवर यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. सध्या दोघे जामिनावर बाहेर आहेत.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:05 pm

द इक्वाइन कलेक्टिव्हची पुण्यात राष्ट्रीय परिषद:11-12 एप्रिलला अश्व उद्योगाच्या भविष्यावर चर्चा होणार

भारतातील अश्व उद्योगाला औपचारिक स्वरूप देण्यासाठी आणि त्याचे भविष्य घडवण्यासाठी 'द इक्वाइन कलेक्टिव्ह'ने पुण्यात पहिल्या राष्ट्रीय 'द इक्वेस्ट्रियन फोरम' परिषदेचे आयोजन केले आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने ही परिषद ११ व १२ एप्रिल रोजी पुण्यातील हॉटेल हयात येथे होणार आहे. या अश्वारोहण मंचाचे उद्घाटन ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे विपणन आणि शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल आणि पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होईल. द इक्वाइन कलेक्टिव्हच्या संस्थापिका व समन्वयक गायत्री राहुल कराड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. एफ. एफ. वाडिया, पुण्याच्या जपलुप्पे इक्वेस्ट्रियनचे सह-संस्थापक रोहन मोरे आणि एमआयटी डब्ल्यूपीयूच्या सीआयएपीचे सह-संचालक प्रा. रविशंकर साहू उपस्थित होते. या मंचाला पूनावाला स्टड फार्म्स, नानोली स्टड फार्म्स आणि नॅशनल हॉर्स ब्रीडिंग सोसायटी ऑफ इंडिया येथील डॉ. एफ. एफ. वाडिया यांचे सहकार्य लाभले आहे. या परिषदेत भारतातील अश्व उद्योग क्षेत्रातील शेकडो तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यामध्ये डॉ. हसनेन मिर्झा, याशन खंबाटा, गौरव रामपाल, रोहन मोरे, डायना अल शाईर, डॉ. रवी रेड्डी, बर्नार्ड डुव्हरनय, जुट्टा पुटझ आणि उत्पल एस. टाटू यांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी होणाऱ्या पॅनल चर्चेमध्ये दोन मंत्री, कोलकात्याचे ज्येष्ठ पत्रकार आणि अश्वारोहण खेळ व घोड्यांच्या शर्यतींवरील लेखक सायरस जे. मदन आणि ज्येष्ठ उद्योजक व पशुवैद्य डॉ. रवी रेड्डी यांसारख्या दिग्गजांची विविध सत्रे होतील. भारतीय अश्व परिस्थितीवरील धोरणात्मक दृष्टिकोन या विषयावर चर्चा होईल. हिसार येथील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्राचे डॉ. नितीन विरमानी रोग नियंत्रण आणि गतिशीलता या विषयावर बोलतील. केंटकी इक्वाइन रिसर्चचे डॉ. पीटर हंटिंग्टन ऑस्ट्रेलियाहून तरुण घोडे आणि कामगिरी करणाऱ्या घोड्यांसाठी आहार धोरणे या विषयावर मार्गदर्शन करतील. ऑस्ट्रेलियाचे मार्क बर्नेल मूल्य मानांकन या विषयावर आपले विचार मांडतील. ऑल इंडिया मारवाडी हॉर्स सोसायटीचे अध्यक्ष के. आर. गजेंद्र पाल सिंगजी पोसाना 'देशी घोड्यांचा पुनर्वापर' या विषयावर प्रकाश टाकतील. तंत्रज्ञान अवलंबन या संकल्पनेअंतर्गत जपालूप इक्वेस्ट्रियन सेंटर, पुणे येथील रोहन मोरे, द बार्न हाऊस, पुणे येथील रणजीत खेर आणि वायू टेक्नॉलॉजीज, पुणे येथील टीम यांची तीन सादरीकरणे होतील. चंदीगड येथील अश्व शल्यचिकित्सक डॉ. अनहद सिंधू, युनिव्हर्सिटी ऑफ सरे, यूके येथील श्री. ध्रुवपाल सिंग आंचन, वलसाड, गुजरात येथील यशस्वी ऑलिम्पियन अश्वारोहक श्री. इम्तियाज अनीस, यूके येथील अश्व प्रशिक्षक डॉ. डेव्हिड शीरीन, यूके येथील प्रतिष्ठित पशुवैद्य डॉ. डेसमंड लीडॉन हे पशुवैद्यकीय शिक्षण, घोडेस्वारांची तंदुरुस्ती आणि उद्योग क्षेत्राचे स्वरूप या विषयांवर बोलतील. जेपी ब्रँड्स, यूएसए येथील सुश्री जुट्टा पुट्झ या विस्तारक्षम अश्व व्यवसाय उभारण्यावर बोलतील. १२ एप्रिल रोजी सकाळी ९:०० वा. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरूड कॅम्पसमध्ये दिवसाची सुरुवात घोड्यांच्या थेट प्रात्यक्षिकाने (उपयोजित शिक्षण / सादरीकरण) होईल. त्यानंतर फ्रान्सच्या सुश्री मॉड चॅटेल यांचे फिजिओथेरपीचे थेट प्रात्यक्षिक सत्र होईल. युकेचे बर्नार्ड डुव्हरने हे घोड्यांच्या नाल कामावर (फॅरिअरी) आणखी एक थेट प्रात्यक्षिक सादर करतील. तसेच, या वेळी खालील विषयांवर विशेष सादरीकरणे होतील. या मध्ये संकरण, संघर्ष, कल्याण मानके आणि नीतिमत्ता, अश्व धोरण, घोड्यांची आयात-निर्यात, आणि पशुवैद्यकीय व औद्योगिक दृष्टिकोन या विषयांवर गुजरातच्या वनतारा येथील डॉ. रामनाथन, युके येथील सुश्री झारा पॉली, युके येथील रोली ओवर्स, पुणे येथील स्कूल ऑफ गव्हर्नमेंट एमआयटी डब्ल्यूपीयूचे डॉ. नमेश किल्लेमशेट्टी, पुणे येथील प्रसिद्ध भारतीय अश्वारोहण क्रीडापटू कपिलेश भाटे, नेतृत्व प्रशिक्षक, ब्लडस्टॉक विशेषज्ञ आणि लेखक गौरव रामपाल आणि बंगळूर येथील गॅलोपिन व्हेट क्लिनिकचे डॉ. हसनेन मिर्झा यांसारखे तज्ञ मार्गदर्शन करतील. रविवार, १२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता परिषदेची सांगता होईल.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:02 pm

सातारा झेडपी अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नियमांनुसार:प्रश्नचिन्हाचे कारण नाही, न्यायप्रविष्ट प्रकरणावर चर्चा थांबवावी – आमदार महेश शिंदे

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे यांच्या जात पडताळणीसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर माध्यमांमध्ये सुरू असलेली चर्चा थांबवावी, असे आवाहन कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी केले. अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्णपणे नियमांनुसार झाली असून ती वैध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना शिंदे म्हणाले की, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीनंतर महायुतीतील काही सहकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मात्र, या निवडी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पार पडल्या असून अर्ज छाननीवेळी कोणताही आक्षेप नोंदवला गेला नव्हता. त्यामुळे या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. जात पडताळणीच्या मुद्द्यावर त्यांनी सांगितले की, प्रिया शिंदे यांच्या कुटुंबाची वंशावळ 1812 सालापासून उपलब्ध असून त्यामध्ये कुणबी समाजाच्या नोंदी आहेत. यापूर्वी अशा नोंदींवर अनेकांना ओबीसी दाखले देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणी माध्यमांमध्ये अनावश्यक चर्चा होऊ नये, असे त्यांनी नमूद केले. कोणालाही आक्षेप असल्यास त्यांनी तो संबंधित प्राधिकरणाकडे मांडावा, असेही त्यांनी सांगितले. राजकीय पार्श्वभूमीवर बोलताना शिंदे म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच महायुतीतील काही सदस्यांना महाविकास आघाडीशी युती मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी आमच्या बाजूने मतदान केले. कोरेगाव तालुक्यात ओबीसी उमेदवारांना संधी देताना कोणताही अन्याय झाला नसल्याचा दावा त्यांनी केला. महायुतीतील समन्वयाबाबत त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगला समन्वय असून, काही किरकोळ मतभेद असूनही युती एकसंध आहे. “निवडणुकीदरम्यान काही मतभेद झाले असतील, मात्र ते आता मागे टाकून पुढे जाण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले. अडीच वर्षांनंतर सभापती पदासाठी शिवसेनेच्या उमेदवारांना संधी दिली जाईल, असा विश्वासही महेश शिंदे यांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 10:58 pm

मुंबई विमानतळावर भीषण आग

मुंबई : मुंबई विमानतळावर आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. विलेपार्ले मुंबई विमानतळावरील टर्मिनल एक वर ही आग लागल्याची घटना घडली असून अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यास प्रशासनाला यश मिळाले आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज असून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच विमानतळ पोलिस, […] The post मुंबई विमानतळावर भीषण आग appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 9:58 pm

आमचे हात अजूनही ट्रिगरवरच

तेहरान : इराण आपल्या लेबनानी बंधू आणि भगिनींना कधीही एकटे सोडणार नाही असे सांगत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी इस्रायलला हल्ले करण्याची खुली धमकी दिली आहे. इस्रायलने शस्त्रसंधी झाल्यानंतर लेबनानमध्ये हल्ले केले. ज्यात २०० पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत. त्यानंतर इराणने इस्रायलविरोधात आक्रमक झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हिजबुल्लाहवरील हल्ले सुरूच ठेवणार असल्याचे […] The post आमचे हात अजूनही ट्रिगरवरच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 9:44 pm

मुंबई विमानतळाच्या 'टर्मिनल 1' वर आग:रनवे परिसरात धुराचे लोट; हाय-अलर्टनंतर सर्व गेट्स बंद, प्रवाशांमध्ये घबराट

देशातील अत्यंत गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज संध्याकाळी आगीच्या एका भीषण घटनेने एकच खळबळ उडाली. विमानतळाच्या 'टर्मिनल १' वरील रनवे परिसरात अचानक लागलेल्या आगीमुळे प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. आगीमुळे काही वेळातच संपूर्ण परिसरात धूर पसरला. खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ प्रशासनाने तातडीने सर्व प्रवेशद्वारे (गेट्स) बंद करून हाय-अलर्ट जारी केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज संध्याकाळच्या सुमारास टर्मिनल १ जवळील रनवे परिसरात अचानक ठिणग्या उडून आगीचा भडका उडाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आगीची बातमी समजताच विमानतळावरील इन-हाऊस अग्निशमन यंत्रणा आणि मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. विमानसेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा विमानतळासारख्या अतिसंवेदनशील (हाय-सिक्युरिटी झोन) भागात आगीची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या तासाभरापासून विमानतळाचे सर्व गेट्स बंद करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. तसेच, धावपट्टीच्या जवळच ही आग लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून टर्मिनल 1 वरील काही विमानांची उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आली आहेत. यामुळे विमानसेवेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. प्रशासनाकडून चौकशीचे आदेश विमानतळ प्रशासनाने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. आगीचे नेमके उगमस्थान कोठे होते आणि एवढ्या सुरक्षित ठिकाणी शॉर्टसर्किट झालेच कसे, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही तांत्रिक चूक आहे की मानवी निष्काळजीपणा, याचा तपास केला जाणार आहे. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता आहे. सुरक्षेवर प्रश्नचिन्ह? आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळावर जिथे चोवीस तास कडक सुरक्षा आणि देखरेख असते, तिथे अशा प्रकारे आग लागल्याने सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी फायर ऑडिट आणि तांत्रिक तपासणी अधिक कडक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 8:36 pm

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे 'रुल्स' अद्याप प्रलंबित:प्रभावी अंमलबजावणीसाठी अंनिस तर्फे हायकोर्टात धाव, जनहित याचिका दाखल

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियमांची गरज आहे. हा कायदा अस्तित्वात येण्याला 12 वर्षे झालीत तरीही राज्य सरकारने कायद्याला पूरक रुल्स केले नाहीत. त्यामुळे अनेक अन्यायग्रस्त व शोषित व्यक्तींना व्यक्तींना कायद्याची प्रभावी मदत मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे, असा आरोप करणारी जनहित याचिका कोल्हापूर उच्च न्यायालय सर्किट बेंच पुढे दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी दाखल करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर तर्फे अंनिस कार्यकर्त्या सीमा रामदास पाटील, आनंद माने, अभिषेक मिठारी, प्रशांत गोंधळी, अस्मिता दिघे, राजेश वरक, बाळू माली, गीता हसूरकर यांनी ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले, ॲड. सकलेन मुजावर यांच्या मदतीने ही जनहित याचिका दाखल केली आहे. राज्याचे मुख्य सचिव, विधी आणि न्याय विभाग सचिव, महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक, महिला व बाल विकास मंत्रालय, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यता विभाग यांनी जनहित याचिकेतून प्रतिवादी करण्यात आलेले आहे. याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013' हा कायदा डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी हौतात्म्य पत्करल्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असतांना 26/08/2013 रोजी अंमलात आला. परंतु आज 12 वर्षे झाल्यावरही या कायद्याच्या अंमलबजावणी साठी पूरक रुल्स करण्यात सरकारने दाखविलेली उदासीनता म्हणजे बुवाबाजीच्या अत्याचार व शोषणाने त्रस्त असलेल्या व्यक्तींना मानवी प्रतिष्ठेसह जगण्यास अडथळा निर्माण करणे, न्यायाची प्रक्रिया परिणामकारकपणे वापरण्याची संधी नाकारणे आहे. सरकार त्यांची पालकत्वाची भूमिका पार पाडतांना दिसत नाही आणि केवळ बुवाबाजीतून होणारे लैगिक-आर्थिक शोषण झाल्यावरच त्याबाबत चर्चा करतात असा उल्लेख याचिकेतून केलेला आहे. जनहित याचिकेत बाजू मांडणारे ॲड. असीम सरोदे म्हणाले, कि अश्या सामाजिक कायद्यांच्या अंमलबजावणी साठी सरकरने स्वतःहून सक्रिय भूमिका घेणे अपेक्षित आहे. नियमांशिवाय कायदा म्हणजे पांढऱ्या कागदवरील काळे मृत अक्षर असेच अनेकदा असते. अशा कायद्यांच्या व्यवस्थापनात सरकारची निष्क्रीताच अशोक खरात सारख्या भोंदूगिरी प्रवृत्तीला प्रोत्साहक ठरते. अनेक भोंदू बाबांना राजाश्रय मिळतोय त्यामुळे जनहित याचिकेची सुनावणी तातडीने घ्यावी अशी मागणी ॲड. असीम सरोदे यांनी दिनांक 7 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात केली त्यावर न्या. माधव जामदार व न्या. प्रवीण पाटील यांनी दिनांक 20 एप्रिल रोजी जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल असे नक्की केले. 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, 2013' या कायद्यासाठी त्वरित नियम करावेत, कायद्यात सांगितल्यानुसार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिस दक्षता अधिकारी नेमावेत, अंधश्रद्धेच्या शोषणाला बळी पडणाऱ्यांसाठी सुरक्षा नियम करावेत, अशोक खरात सोबत विविध महिलांचे फोटो व व्हिडीओ प्रसारित झाले आहेत ते सोसिअल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरून काढून टाकावेत, अन्यायग्रस्तांना 'व्हिक्टीम' म्हणून ओळख व सुरक्षा द्यावी, या कायद्यानुसारच्या केसेस विशेष न्यायालयात जलद पद्धतीने चालवाव्यात, व सातत्याने कायद्याबाबत प्रबोधन उपक्रम चालवावेत अश्या मागण्या जनहित याचिकेतून करण्यात आल्याचे ॲड. श्रीया आवले यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 8:04 pm

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावाच्या दौऱ्यावर:नेमके कारण काय? जिल्हा परिषदेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला राजकीय रंग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तीन दिवसांचा सातारा दौरा सुरु झाला असून त्यांच्या दरेगाव भेटीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा दौरा अधिकृतपेक्षा खाजगी असल्याचे सांगितले जात असले तरी, अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय नजरेने पाहिले जात आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत मोठे राजकीय नाट्य रंगले होते. या निवडीदरम्यान शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. त्यातच नवनिर्वाचित अध्यक्षांच्या जात प्रमाणपत्रावरून सुरू झालेला कायदेशीर वाद आणि तक्रारदारांनी घेतलेला आक्षेप यामुळे जिल्ह्यातील सत्तासमीकरणे अस्थिर झाली आहेत. या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी सातारा जिल्हा असल्याने मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात 'डॅमेज कंट्रोल' संदर्भात काही ठोस निर्णय घेतले जाण्याची दाट शक्यता आहे. दौऱ्याला राजकीय रंग गुरुवारी दुपारी हेलिकॉप्टरने शिंदे यांचे दरेगावात आगमन झाले. ते येथे मुक्काम करणार असून स्थानिक पातळीवरील काही भेटीगाठी आणि चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद निवड प्रक्रियेतील घडामोडी, त्यानंतर निर्माण झालेला वाद, तसेच सत्तासमीकरणातील बदल यामुळे या दौऱ्याला राजकीय रंग चढला आहे. शिंदेंचा दौरा खासगी की राजकीय? दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि इतर स्थानिक नेत्यांच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या या भेटीकडे लक्ष लागले आहे. विशेषतः जिल्हा परिषद निवडीनंतर शिवसेना आणि भाजपमधील निर्माण झालेल्या तणावाच्या संदर्भात या दौऱ्यात काही राजकीय संदेश दिला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या दरे गावी मुक्कामादरम्यान महत्त्वाच्या बैठका किंवा अंतर्गत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा दौरा केवळ वैयक्तिक की राजकीय रणनीतीचा भाग, याबाबत पुढील दोन-तीन दिवसांत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. एकूणच, मुख्यमंत्र्यांचा हा 'गाव दौरा' केवळ विश्रांतीपुरता मर्यादित नसून, सातारा जिल्ह्यातील बिघडलेले राजकीय समीकरण दुरुस्त करण्यासाठीची ही एक महत्त्वाची 'फिल्डिंग' असल्याचे बोलले जात आहे. हे ही वाचा… बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार:सुनील तटकरेंनी मानले आभार, म्हणाले - त्यांनी सामंजस्यपणा दाखवला बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत अखेर मोठा पेच सुटला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या काँग्रेसने अखेर या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत केले आहे. तटकरे यांनी काँग्रेसचे आभार मानताना जुन्या राजकीय स्मृतींना उजाळा दिला. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 7:56 pm

कोकणातील शेतकऱ्यांना दिली बोगस खते, कीटकनाशके:कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची राजू शेट्टींची कृषी आयुक्तांकडे मागणी

माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुणे येथे कृषी आयुक्तांची भेट घेऊन बोगस आणि निकृष्ट खते व कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे या निकृष्ट उत्पादनांमुळे मोठे नुकसान झाले असून, त्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली. चालू वर्षी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी अस्मानी आणि सुल्तानी अशा दुहेरी संकटात सापडले आहेत. औषध कंपन्यांच्या दरांवर राज्य सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सुमारे ३०० कोटी रुपयांची औषधे खरेदी केली आहेत. औषध कंपन्यांकडून खते, कीटकनाशके, पीजीआर (PGR) आणि बुरशीनाशकांचा वापर कोणत्या पद्धतीने करावा, याबाबत योग्य माहिती न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आंबा पिकासाठी जवळपास ७० हून अधिक कंपन्यांनी औषधांची विक्री केली आहे. या कंपन्यांच्या औषधांच्या किमतीत मोठी तफावत असून, शेतकरी रोखीने औषध खरेदी केल्यास मूळ किमतीच्या ६० ते ६५ टक्के सवलत दिली जाते. गुण नियंत्रण विभागाकडून मोजक्याच कंपन्यांच्या औषधांची तपासणी करण्यात येते, यामुळे बोगस औषध कंपन्यांचा सुळसुळाट झाला आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी बोलताना माजी आमदार बाळा माने यांनी, आंबा पिकांच्या कीड रोगांच्या औषध फवारणीमध्ये संशोधन विभागाने नेमके काय संशोधन केले, तसेच ज्या औषध कंपन्या बोगस आहेत, त्यांच्यावर गुणनियंत्रण विभागाने काय कारवाई केली, असे प्रश्न उपस्थित केले. १९९० सालापासून गुणनियंत्रण विभाग व कृषी विद्यापीठाकडून फळबाग लागवडीसाठी नाविन्यपूर्ण कोणतेच संशोधन करण्यात आले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. या बैठकीला संचालक गुण नियंत्रक सुनील बोरकर, दापोली कृषी विद्यापीठाचे संशोधक अनिल देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, गणेश गायकर, सुशांत नाईक, प्रशांत शिंदे, प्रकाश बालवडकर, अजय तेली, उमेश वाळके, तिमीर माणगांवकर, सुजीत चौकेकर, दीपक कदम, विनय पाडावे, औषध कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 5:55 pm

पुणे महापालिका डॉ. आंबेडकर जयंतीसाठी देणार अद्ययावत सुविधा:उपमहापौर वाडेकर म्हणाले - यंदाचा उत्सव संस्मरणीय ठरेल

पुणे महापालिकेकडून यावर्षीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे यंदाचा जयंती उत्सव संस्मरणीय ठरेल, अशी ग्वाही उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दिली. त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. जयंती उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आंबेडकर पुतळा येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर वाडेकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक नीलेश आल्हाट, मनपा उपायुक्त परिमंडळ १ माधव जगताप, उपअभियंता बाळासाहेब पंडित, विठ्ठल गायकवाड आणि राहुल डंबाळे उपस्थित होते. महापालिका यावर्षी प्रथमच अनेक नवीन सुविधा उपलब्ध करून देणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा आंबेडकर पुतळा, मंगळवार पेठेतील आंबेडकर भवन आणि कॅम्प परिसरातील आंबेडकर पुतळा या संपूर्ण मार्गावर मंडपाचे आच्छादन घालण्यात येणार असल्याची माहिती उपमहापौर वाडेकर यांनी दिली. आंबेडकरी चळवळीच्या विचारांचा प्रसार करणारी पुस्तके नागरिकांना पाहता यावीत आणि विकत घेता यावीत यासाठी फोटोझिंकोच्या गल्लीत पुस्तकांच्या स्टॉल्ससाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाईल. तसेच, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या सूचनेनुसार जयंती उत्सव काळात संपूर्ण परिसरावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार असल्याचेही वाडेकर यांनी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी ज्या ठिकाणी उत्सव साजरा केला जाईल, तेथे रात्री बारा वाजेपर्यंत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहतील. तेथील सुविधा आणि स्वच्छतेचे नियोजन त्यांच्याकडून केले जाईल. पोलिसांच्या सहकार्याने काही मार्गांमध्ये बदल करून वाहतुकीचे योग्य नियोजन केले जाईल, अशी माहिती उपायुक्त जगताप यांनी दिली. उत्सवाच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा आणि अग्निशामक दलही तैनात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपमहापौर वाडेकर यांनी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. आंबेडकर जयंती किंवा अन्य कोणत्याही महापुरुषांच्या उत्सवावेळी वेळेच्या किंवा आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे. याला सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वाडेकर यांनी व्यक्त केला. शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांची योग्य देखभाल होत नसल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची आठवड्यातून एकदा स्वच्छता करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिल्याचेही उपमहापौर वाडेकर यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 5:53 pm

वयोवृद्धाचा खून करून जबरी चोरी, दोन आरोपींना अटक:पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई, 5 गंभीर गुन्हे उघडकीस

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलिसांनी एका वयोवृद्ध व्यक्तीच्या खून आणि जबरी चोरी प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे खून, दरोडा आणि जबरी चोरीचे एकूण पाच गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. मंचर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दामोदर जयराम मिंडे (वय ६२, रा. थोरांदळे पाईनमळा, ता. आंबेगाव, जि. पुणे) हे त्यांच्या शेतातील घरात झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून लोखंडी पहाराने त्यांच्या डोक्यात वार करून खून केला. आरोपींनी सोन्याची अंगठी, रोख रक्कम आणि मोबाईल असा सुमारे २९ हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. मिंडे यांच्या मुलगी गीतल गावडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. या गंभीर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सुमारे १०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासादरम्यान, आरोपींनी पॅशन मोटारसायकलचा वापर करून खोडद-बेल्हे मार्गे पारनेरकडे पलायन केल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणेवाडी परिसरात सापळा रचून कबीर उंबऱ्या काळे (वय २४) आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. कबीर काळे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासात आणखी चार गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास आरोपींकडे करत आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 5:52 pm

बाहेरची औषधे लिहिल्यास डॉक्टरांवर होणार कारवाई!

मुंबई : प्रतिनिधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणा-या रुग्णांना बाहेरून औषधे खरेदी करण्यास भाग पाडणा-या डॉक्टरांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. रुग्णालयात औषधे उपलब्ध असतानाही बाहेरील प्रिस्क्रिप्शन देण्याच्या प्रकारांवर राज्य सरकारने लगाम घालण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने सर्व अधिष्ठाता आणि वैद्यकीय अधीक्षकांना स्पष्ट निर्देश दिले […] The post बाहेरची औषधे लिहिल्यास डॉक्टरांवर होणार कारवाई! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 5:49 pm

सीजफायरनंतर पाकची नोबेल शांतता पुरस्काराची मागणी

इस्लामाबाद : अमेरिका आणि इराणमध्ये बुधवारी झालेल्या सशर्त युद्धविरामाचे श्रेय घेण्यासाठी पाकिस्तानचा जोरदार आटापिटा सुरू आहे. आता पाकिस्तानला नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी म्हणजे अजबच विनोद आणि अत्यंत हास्यास्पद वाटते. स्थानिक माध्यमे आणि काही संघटना पाकिस्तानला नोबेल शांतता पुरस्कार देण्याची मागणी करत आहेत. खरेतर, युद्धविरामाची घोषणा करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड […] The post सीजफायरनंतर पाकची नोबेल शांतता पुरस्काराची मागणी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 5:47 pm

28 वा कलाश्री संगीत महोत्सव उत्साहात पडला पार:पिंपळेगुरव येथे घराणेदार गायकांच्या मैफलीने समारोप

गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाच्या वतीने आयोजित २८ वा कलाश्री संगीत महोत्सव नुकताच पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात दिमाखात संपन्न झाला. घराणेदार गायक कलाकारांच्या मैफलीने या महोत्सवाचा समारोप झाला. महोत्सवाच्या उद्घाटनाला आमदार शंकरभाऊ जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत शितोळे, चंद्ररंग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य लक्ष्मण जगताप, उद्योजक विजू शेठ जगताप, गुरुकुल कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक पं. सुधाकर चव्हाण, विश्वस्त सच्चिदानंद कुलकर्णी, संतपिठाचे संचालक राजू महाराज ढोरे, बासरीवादक दीपक भानुसे, गायक पं. रघुनाथ खंडाळकर आणि वास्तू उद्योजक अजित घुले आदी मान्यवर उपस्थित होते. महोत्सवाच्या तिन्ही दिवसांची सुरुवात राधानंद व कलाश्री संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गायन व वादनाच्या कार्यक्रमाने झाली. पहिल्या दिवशी युवा शास्त्रीय गायक अभयसिंह वाघचौरे यांचे शास्त्रीय गायन रंगले. अभयसिंह यांनी राग पुरिया धनश्री सादर केला. यात त्यांनी विलंबित एक तालात ‘अब तो ऋतु मान आये...’ ही बंदिश आणि ‘पायलिया झनकार मोरी...’ हा छोटा ख्याल गायला. त्यांच्या ‘याद पियां की आयें...’ या लोकप्रिय ठुमरीला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. अभयसिंह वाघचौरे यांना हरिभाऊ असतकर यांनी संवादिनी, चेतन ताम्हणकर यांनी तबलासाथ दिली, तर आयुष सोनावणे, रवी पांचाळ आणि ईशान भंडारी यांनी तानपुरा व गायनसाथ केली. यानंतर कृष्णा साळुंखे यांच्या पखवाजवादनाने महोत्सवाचा माहोल बदलला. त्यांनी राग आदिताल निवडत प्रस्ताराने वादनाला सुरुवात केली. शिवपरण सादर करत त्यांनी एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. काही रेले आणि विविध जती या तांत्रिक व लयकारीच्या प्रकारांच्या सादरीकरणाने त्यांनी आपल्या वादनाला विराम दिला. साळुंखे यांना यशवंत थिट्टे यांनी संवादिनीसाथ केली. २८ व्या कलाश्री संगीत महोत्सवाचा समारोप संगीत मार्तंड पं. जसराज यांच्या शिष्या अंकिता जोशी यांच्या गायनाने झाला. अंकिता यांनी राग दरबारी कानडा आणि राग हंसध्वनी गायले. राग दरबारी कानडामध्ये त्यांनी ताल झपतालात ‘असी दरबारी गुणीजन गावे...’ ही रचना, त्यानंतर तीनतालात ‘बनवारी बनायके गए...’ आणि एकतालातील ‘मान जा मोरे पिया...’ या रचना सादर केल्या. यानंतर राग हंसध्वनीमध्ये अंकिता यांनी ‘पवन पूत हनुमान लला…’ ही रचना गायली. ‘नाम गाऊ...’ या अभंगाने त्यांनी महोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा समारोप केला. अंकिता यांना प्रशांत पांडव (तबला), अभिनय रवंदे (संवादिनी), भाग्यश्री टोमके, तेजल कोठावळे, मानसी महाजन यांनी तानपुरासाथ केली.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 5:39 pm

वीज कंपनीच्या अधिक्षक अभियंत्यांची 10 लाखांची फसवणूक:एपीके फाईल पाठवून काढले खात्यातील पैसे, हिंगोली पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई महानगर गॅस पाईपलाईनचे पैसे थकीत असून तातडीने पैसे भरा असा संदेश देत एपीके फाईल पाठवून विज कंपनीच्या अधिक्षक अभियंत्याच्या खात्यातील १० लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ९ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी या भामट्यांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील विज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांचे मुंबई येथे घर आहे. ता. ५ एप्रिल रोजी त्यांना एका मोबाईल क्रमाकांवरून संपर्क साधण्यात आला. संपर्क साधणाऱ्या व्यक्तीने त्याचे नांव दीपक जोशी असल्याचे सांगत तुमच्या घराचे महानगर गॅस पाईपलाईनचे पैसे थकलेले असून त्यामुळे कनेक्शन बंद करीत असल्याचे सांगितले. यावेळी चव्हाण यांनी थकीत रक्कम भरण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार भामट्यांनी त्यांच्या मोबाईलवर एपीके फाईल पाठवली. सदर फाईल डाऊनलोड झाल्यानंतर भामट्यांनी चव्हाण यांना ओटीपी मागितला. यावेळी त्यांनी ओटीपी दिल्यानंतर भामट्यांनी मोबाईल बंद केला. त्यानंतर भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यातून दोन वेळेस प्रत्येकी पाच लाख रुपये या प्रमाणे दहा लाख रुपयांची रक्कम काढून घेतली. दरम्यान, बँकेतून रक्कम काढण्यात आल्याबाबत चव्हाण यांच्या मोबाईलवर संदेश प्राप्त झाला नाही. मात्र त्यांनी त्यांचा ईमेल तपासल्यानंतर त्यात त्यांच्या बँक खात्यातून ता. ५ एप्रिल रोजी दोन वेळा व्यवहार झाल्याचे दिसून आले. या दोन्ही व्यवहारात प्रत्येक पाच लाख रुपये काढण्यात आल्याचेही दिसून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी आज हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी दीपक जोशी नावाच्या भामट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, उपनिरीक्षक राहुल महिपाळे, जमादार अशोक धामणे, संजय मार्के, शेख मुजीब, गणेश लेकुळे, संतोष करे, शिवाजी ढोंबरे, जोगे, गणेश वाबळे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी सायबर सेलची मदत घेण्याची तयारी सुरु केली असून, ज्या मोबाईलवरून चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्यात आला तो मोबाईल कोणाच्या नावे आहेत याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 5:37 pm

शिर्डी साईबाबा संस्थानला रिलायन्सकडून अन्नदानासाठी मोठी देणगी!

शिर्डी : प्रतिनिधी उद्योगपती अंबानी कुटुंबीय शिर्डी साईबाबांचे भक्त असून साईबाबांच्या दर्शनासाठी अनेकवेळा येत असतात. तसेच वस्तू आणि रोख स्वरूपात साईबाबांच्या चरणी देणगी देत असतात. गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वतीने साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा प्रसादालयात अन्नदानासाठी देणगी दिली आहे. तसेच अंबानी कुटुंबीय नेहमी साईबाबांच्या चरणी निळ्या रंगाचे वस्त्र […] The post शिर्डी साईबाबा संस्थानला रिलायन्सकडून अन्नदानासाठी मोठी देणगी! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 5:34 pm

तेल नेण्यासाठी मोजावा लागणार प्रति बॅरल १ डॉलर टोल

तेहरान : इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांचा युद्धविराम झाल्यानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपली पकड अधिक घट्ट केली आहे. जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या अरुंद जलमार्गातून जहाजांची वाहतूक करण्यासाठी इराण आता शिपिंग कंपन्यांकडून क्रिप्टोकरन्सीमध्ये टोलची मागणी करण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर आले आहे. इराणच्या तेल, गॅस, आणि पेट्रोकेमिकल प्रॉडक्ट्स एक्सपोर्टर्सचे प्रवक्ते हमिद हुसैनी […] The post तेल नेण्यासाठी मोजावा लागणार प्रति बॅरल १ डॉलर टोल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 5:21 pm

हेझबोल संबंधीत हर्शी ठार

जेरुसलेम : इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरुतमध्ये बुधवारी रात्रभर भीषण हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यात लेबनॉनमधील बंडखोर गट हेझबोलचा प्रमुख नईम कासिम याचा पुतण्या आणि वैयक्तिक सल्लागार अली युसूफ हर्शी याला ठार करण्यात आल्याचा दावा इस्रायलने गुरुवारी दिली आहे. टेलिग्रामवर जारी करण्यात आलेल्या आपल्या निवेदनात इस्रायली लष्कराने म्हटले आहे की, आयडीएफने बैरुतमध्ये हेझबोलाचा सेक्रेटरी जनरल […] The post हेझबोल संबंधीत हर्शी ठार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 5:18 pm

पेट्रोल पंपावर तरुणीची भरदिवसा निर्घृण हत्या:माथेफिरू प्रियकराने गळा चिरून संपवले, संभाजीनगरच्या करमाडमधील घटना;VIDEO

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे. भरदिवसा, लोकांच्या गर्दीने गजबजलेल्या पेट्रोल पंपावर एका माथेफिरू तरुणाने आपल्याच प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून केला. या थरारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. मिळालेल्या माहितीनुसार, करमाड येथील गणपती मंदिराजवळ असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर पूजा सुदाम गावंडे ही तरुणी कर्मचारी म्हणून कार्यरत होती. आज दुपारी १२:३० च्या सुमारास ती आपल्या कामात व्यस्त असताना, तिचा प्रियकर सत्यम रावसाहेब गावंडे हा दुचाकीवरून तिथे पोहोचला. दोघांमध्ये काही वेळ शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या सत्यमने अचानक खिशातील धारदार चाकू काढला आणि काही समजण्याच्या आत पूजाच्या पाठीत बुक्का मारून तिला जमिनीवर पाडले आणि तिच्या गळ्यावर सपासप वार केले. एक व्यक्ती वाचवण्यासाठी आला, पण... या हल्ल्यात पूजा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. सत्यम हा पूजावर चाकुने वार करत असताना, पेट्रोल पंपावर उपस्थित एक व्यक्ती तिला वाचवण्यासाठी पुढे आला, मात्र नराधम सत्यमने त्यालाही चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत मागे हटवले. यानंतर सत्यम दुचाकीवर बसून घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओही समोर आला असून, आरोपीच्या डोळ्यात माणुसकीचा लवलेशही उरला नसल्याचे त्यात दिसत आहे. प्रेम प्रकरणातील संशय किंवा वादातून खून झाल्याचा अंदाज घटनेची भीषणता पाहून परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर आरोपी सत्यम गावंडे घटनास्थळावरून फरार झाला. करमाड पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, प्रेमप्रकरणातील संशयावरून किंवा वादातून हा पाशवी खून झाला असावा, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीला पोलिसांकडून अटक भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी हत्या करण्याचे धाडस गुन्हेगारांमध्ये येतेच कसे? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. फरार आरोपी सत्यमच्या मुसक्या आवळण्यासाठी करमाड पोलिसांनी विशेष पथके पाठवली. विविध ठिकाणी छापेमारी करत अखेर आरोपीला कचनेर येथून पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हे ही वाचा… सिल्लोडला वाहतूक नियंत्रकाची आत्महत्या:वरिष्ठांनी अपमानित केल्याची फिर्याद, आगारप्रमुखासह तिघांवर गुन्हा नोंद‎ आगारप्रमुख व दोन सहायक वाहतूक अधिकाऱ्यांनी अपमानित करून जातिवाचक बोलल्याने अपमान सहन न झाल्याने वाहतूक नियंत्रण शरद विठ्ठल भिवसने (४०, रा. वडोद चाथा, सिल्लोड, ह.मु लक्ष्मी कॉलनी, सिल्लोड) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी शहरातील आनंद पार्क परिसरात दुपारी उघडकीस आली. सविस्तर वाचा…

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 5:13 pm

बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार:सुनील तटकरेंनी मानले आभार, म्हणाले - त्यांनी सामंजस्यपणा दाखवला

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत अखेर मोठा पेच सुटला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या काँग्रेसने अखेर या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत केले आहे. तटकरे यांनी काँग्रेसचे आभार मानताना जुन्या राजकीय स्मृतींना उजाळा दिला. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची जागा रिकामी झाली. सध्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न करण्यात येत होते. पण काँग्रेस निवडणूक लढण्यावर ठाम होती. काँग्रेसकडून आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज देखील भरला होता. मात्र आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दुपारी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली. यामुळे काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी आपला अर्ज मागे घेतला असून, बारामतीची निवडणूक आता 'बिनविरोध' होण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल पडले आहे. सुनील तटकरेंनी व्यक्त केली कृतज्ञता काँग्रेसच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत केले आहे. तटकरे यांनी काँग्रेसचे आभार मानताना जुन्या राजकीय स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवला आहे. अजित पवार यांनी १९९१ आणि १९९२ मध्ये काँग्रेसच्याच तिकिटावर निवडणूक जिंकली होती. तसेच १९९९ ते २०१४ या काळात लोकशाही आघाडी सरकारमध्ये त्यांनी काँग्रेससोबत राहून महत्त्वाची पदे भूषवली आहेत. काँग्रेसने दाखवलेल्या या सामंजस्याचे मी बारामतीच्या जनतेच्या वतीने मनापासून आभार मानतो. दिल्लीतून सुटला माघारीचा 'टॅब' यावेळी सुनील तटकरे यांनी यावेळी एक महत्त्वाची माहिती दिली की, ही उमेदवारी मागे घेण्यासाठी स्वतः त्यांनी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी संपर्क साधला होता. दिल्लीतील वरिष्ठ पातळीवर झालेल्या या चर्चेनंतरच माघारीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. शरद पवारांच्या भूमिकेवर भाष्य यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेवर विचारले असता सुनील तटकरे म्हणाले की, साहेबांची भूमिका लोकशाही मूल्यांना धरून होती. प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता. परंतु, जशी नाशिकच्या पोटनिवडणुकीत राजकीय परिपक्वता पाहायला मिळाली होती, तशीच आता बारामतीतही दिसत आहे. काँग्रेससोबतच्या वादावर पडदा राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत (NDA) हातमिळवणी केल्याबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेलाही सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिले. आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि ही भूमिका आम्ही उघडपणे मांडली आहे. सपकाळ यांचे राजकारणातील ज्ञान मोठे आहे, आम्हीही अनेक वर्षे काँग्रेससोबत काम केले आहे. आजच्या घडीला त्यांनी घेतलेल्या सकारात्मक निर्णयाबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे सांगत तटकरेंनी वादावर पडदा टाकला.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 4:49 pm

शबरीमलाचा निकाल पुरुषांच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेवर आधारित

नवी दिल्ली : केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून सुरू असलेल्या वादाबाबतची सर्वोच्च न्यायालयाचे नऊ न्यायाधीशांचे घटनापीठासमोर सुरु आहे. या प्रकरणामुळे धार्मिक स्थळांमध्ये महिलांच्या प्रवेशाबाबत आणि धार्मिक स्वातंर्त्याच्या व्याप्तीबाबत व्यापक प्रश्न उपस्थित होतात, असा दावा केंद्र सरकारच्या वतीने आजच्या सुनावणीवेळी करण्यात आला. केंद्र सरकारच्या वतीने बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, हे प्रकरण […] The post शबरीमलाचा निकाल पुरुषांच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेवर आधारित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 4:25 pm

देशातील ६५ टक्के लोक सकारात्मक दिशेने

नवी दिल्ली : या वर्षी जगभरात अनेक महत्त्वाचे अडथळे दिसून आले आहेत, ज्यात पश्चिम आशियातील सध्याचा संघर्षही समाविष्ट आहे. जागतिक अर्थव्यवस्थांसाठी आव्हाने वाढली आहेत. संपूर्ण जगातील लोक भविष्याबद्दल चिंतित आहेत आणि निराशा वाढत आहे. या दरम्यान, भारत आणि दक्षिण-पूर्व आशियातील काही देशांमध्ये आशेचा किरण कायम आहे. ग्लोबल रिसर्च फर्म इप्सोसने मार्च २०२६ चा एक अहवाल […] The post देशातील ६५ टक्के लोक सकारात्मक दिशेने appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 4:12 pm

साई संस्थान कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट:चार्जशीटमधून नाव वगळलं, तरी अशोक खरात पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात

शिर्डीतील साई संस्थानमध्ये कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या 2022 मधील मृत्यू प्रकरणात आता मोठी घडामोड घडली आहे. राहाता न्यायालयाने या प्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास करण्याचे आदेश दिल्याने संपूर्ण प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. याआधी तपासादरम्यान पुरावे अपुरे असल्याचे कारण देत अशोक खरात यांचे नाव दोषारोपपत्रातून वगळण्यात आले होते. मात्र, आता न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्या भूमिकेचा पुन्हा सखोल तपास होणार आहे. मृत व्यक्तीचे नाव विकास रामदास दिवटे (वय 37, रा. शिर्डी) असे आहे. त्यांनी 9 जून 2022 रोजी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले होते. या घटनेनंतर त्यांच्या भावाने, राजेंद्र दिवटे यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, विकास दिवटे यांना कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर सासरच्या मंडळींकडून सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागत होता. तक्रारीनुसार, सासरे, मेहुणा आणि साडू यांच्याकडून विकास यांना पत्नी आणि मुलाशी संपर्क साधण्यास अडथळे आणले जात होते. इतकेच नव्हे तर त्यांना जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या सगळ्या तणावामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते, अशी माहिती समोर आली होती. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित तिघांसह अशोक खरात यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतही अशोक खरात यांचा उल्लेख असल्याचे तपासात समोर आले होते. मीरगाव (ता. सिन्नर) येथील भोंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्याकडे विकास यांना नेण्यात आले होते. तेथेही त्यांना त्रास देण्यात आला आणि धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या सर्व घटनांमुळे विकास दिवटे यांच्यावर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला होता. पोलिस पुन्हा या प्रकरणाची चौकशी करणार तथापि, तपासादरम्यान पुरावे अपुरे असल्याचे सांगत पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून अशोक खरात यांचे नाव वगळले होते. या निर्णयावर आक्षेप घेत पुन्हा तपास करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर राहाता न्यायालयाने ही मागणी मान्य करत प्रकरणाचा पुनर्तपास करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता या प्रकरणातील सर्व बाबींचा नव्याने आढावा घेतला जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर शिर्डी पोलिस पुन्हा एकदा या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत. विशेषतः अशोक खरात यांचा या घटनेत नेमका काय सहभाग होता, याचा शोध घेण्यावर भर दिला जाणार आहे. या नव्या तपासामुळे प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 4:12 pm

हिंगोली शहरात 4.97 लाखांचा गुटखा जप्त:तिघांवर गुन्हा दाखल, दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हिंगोली शहरातील पेन्शन पुरा भागामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी तारीख 9 एका घरावर टाकलेल्या छाप्यात 4 लाख 97 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हिंगोली शहरासह जिल्हाभरामध्ये मटका, जुगारअड्डे, गुटखा विक्री, बेकायदेशीर रित्या वाळू वाहतूक करणे तसेच इतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यासाठी पोलिस अधीक्षक नीलाभ रोहन,अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाण्यांचे तसेच स्थानिक गुन्हे शाखेची पथके स्थापन केली आहेत. या पथकाकडून दररोज अवैध व्यवसायाची माहिती घेऊन त्या ठिकाणी छापे टाकले जात आहेत. दरम्यान हिंगोली शहरातील पेन्शनपुरा भागात किरायाने घेतलेल्या एका घरात गुटख्याची पोती साठवून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून परिविक्षाधीन पोलिस उपाधीक्षक मयूर रसाळ,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे, जमादार किशोर सावंत, आजम प्यारेवाले, विशाल खंडागळे, चालक प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने एका घरावर छापा टाकला. पोलिसांनी घराची तपासणी केली असता घरामध्ये पोत्यात साठवून ठेवलेला रजनीगंधा पान मसाला, विमल पान मसाला, आर के पान मसाला, तसेच इतर गुटख्याची पोती आढळून आली. पोलिसांनी सदर गुटखा जप्त केला असून या गुटक्याची किंमत चार लाख 97 हजार रुपये एवढी आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात आर्यन खान मुस्ताक खॉन, रा. पेन्शनपुरा, शेख अमर शेख अनिस रा. आजम कॉलनी हिंगोली यांच्या सह अन्य एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, संजय मार्के, गणेश लेकुळे, शेख मुजीब पुढील तपास करीत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 4:08 pm

मलाड दिंडोशी दंगलप्रकरणी मोठी कारवाई, अवैध बांधकामांवर बुलडोजर:दंगल, ड्रग्स आणि दहशत; प्रशासनाची कडक भूमिका

मुंबईतील मलाड पूर्व भागातील दिंडोशी परिसरात घडलेल्या दंगलप्रकरणी प्रशासनाने कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. संतोष नगर परिसरात झालेल्या या हिंसाचारानंतर संबंधित आरोपींच्या अवैध बांधकामांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बुलडोजर चालवण्यात आला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये काही महिला आणि अल्पवयीनांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. ही दंगल 5 एप्रिलच्या रात्री संतोष नगरमध्ये देवी मरियम्मा पूजेसाठी निघालेल्या त्रिशूल यात्रेदरम्यान घडली होती. लाउडस्पीकरवर भजन लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि त्यानंतर दोन समुदायांमध्ये हिंसक झटापट सुरू झाली. काही वेळातच परिस्थिती गंभीर बनली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तपासादरम्यान या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दंगल भडकवणाऱ्या शेख कुटुंबाचा ड्रग्सच्या अवैध व्यापाराशी संबंध असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी घराची झडती घेतली असता तेथून ड्रग्सचे पॅकेट्स जप्त करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या मते, हे कुटुंब बराच काळ परिसरात दहशत निर्माण करत होते. त्यांनी बेकायदेशीरपणे तीन मजली इमारत उभारून त्यावर मोबाईल टॉवरही बसवला होता. दंगलीनंतर महानगरपालिकेने या अवैध बांधकामांबाबत नोटीस बजावली होती. 24 तासांचा कालावधी देऊनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गुरुवारी प्रशासनाने थेट कारवाई करत बुलडोजरच्या सहाय्याने हे बांधकाम पाडले. या मोहिमेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई शांततेत पार पडली. या कारवाईदरम्यान प्रमुख आरोपी सोहेल शेख, शब्बू शेख, फिरोज शेख आणि मुनीर शेख यांच्यासह एकूण 11 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. मात्र काही स्थानिकांनी आरोप केला की, मुख्य आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी काही निरपराधांवरही कारवाई केली. या आरोपांचीही चौकशी केली जात आहे. कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कृत्ये सहन केली जाणार नाहीत. दंगल, अवैध बांधकाम आणि ड्रग्स तस्करी या सर्व बाबींवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 3:42 pm

गरोदर महिलांवरही खरातचा लैंगिक अत्याचार

नाशिक : प्रतिनिधी भोंदू अशोक खरात प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून एका पाठोपाठ खळबळजनक माहिती समोर येत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांकडून खरातची कसून चौकशी सुरू आहे. शेकडो महिलांचे शोषण करणा-या खरातला आज गुरुवारी सुनावणीसाठी कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिका-यांनी कोर्टात कागदपत्रे आणि लॅपटॉप देखील आणला. भोंदू खरात हा लॅपटॉप समोर ठेवून महिलांवर लैंगिक […] The post गरोदर महिलांवरही खरातचा लैंगिक अत्याचार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 3:28 pm

युद्धाच्या छायेतही भारताचा पुरवठा सुरक्षित:15,400 टन एलपीजीसह ग्रीन आशा जहाजाचे जेएनपीएमध्ये आगमन; तणावात मोठी कामगिरी

आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक घडामोड समोर आली आहे. ‘ग्रीन आशा’ नावाचे भारताच्या ध्वजाखालील एलपीजी वाहतूक करणारे जहाज सुरक्षितपणे जेएनपीए बंदरात दाखल झाले आहे. विशेष म्हणजे, इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सुरू झाल्यानंतर या मार्गाने पोहोचलेले हे पहिले जहाज ठरले आहे. त्यामुळे या घटनेला मोठे सामरिक आणि आर्थिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हे जहाज अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या हॉर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करून भारतात पोहोचले. या मार्गावर सध्या तणावपूर्ण परिस्थिती असल्यामुळे जहाजांच्या हालचालींवर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत ‘ग्रीन आशा’ने हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केल्याने भारतीय सागरी व्यवस्थेची क्षमता आणि नियोजनशक्ती अधोरेखित झाली आहे. ‘ग्रीन आशा’ या जहाजामध्ये एकूण 15,400 टन द्रवरूप पेट्रोलियम वायू (एलपीजी) होता. हे जहाज जेएनपीएच्या द्रव टर्मिनलवर सुरक्षितरीत्या आले असून हा टर्मिनल भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या कंपन्यांच्या संयुक्त व्यवस्थापनाखाली कार्यरत आहे. या मोठ्या प्रमाणातील एलपीजीमुळे देशातील इंधन पुरवठा साखळी अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. या प्रवासादरम्यान जहाज, त्यावरील माल आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग पूर्णपणे सुरक्षित राहिल्याची माहिती देण्यात आली आहे. तणावपूर्ण परिस्थितीतही जहाजाने आपले मिशन यशस्वीरित्या पूर्ण केले, यामुळे सागरी सुरक्षेच्या दृष्टीनेही हे यश महत्त्वाचे मानले जात आहे. जहाजाच्या सुरक्षित आगमनामुळे संबंधित यंत्रणांनीही समाधान व्यक्त केले आहे. भारताच्या सागरी ताकदीचे आणि दृढतेचे प्रतीक या घटनेमुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने एक सकारात्मक संदेश गेला आहे. जागतिक स्तरावर तणाव वाढत असताना देखील देशातील आवश्यक इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्याची क्षमता भारताकडे असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. यामुळे भविष्यात अशा आव्हानात्मक परिस्थितींमध्येही पुरवठा साखळी अबाधित ठेवण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. एकूणच, ‘ग्रीन आशा’चे जेएनपीए बंदरात आगमन हे केवळ एक साधे जहाज आगमन नसून, ते भारताच्या सागरी ताकदीचे आणि ऊर्जा व्यवस्थापनाच्या दृढतेचे प्रतीक ठरले आहे. आंतरराष्ट्रीय संघर्षाच्या छायेतही देशाने आपली पुरवठा व्यवस्था सुरळीत ठेवत मोठे उदाहरण घालून दिले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 3:27 pm

नागपुरात गॅस सिलिंडरचा काळा बाजार; संतप्त नागरिकांनी अक्षरश: सिलिंडर पळवले

नागपूर : प्रतिनिधी नागपुरातील जरीपटकाच्या नारा दहन घाटाच्या जवळच असलेल्या एका एलपीजी गॅस सिलिंडर एजन्सीच्या गोडाऊनमध्ये आज गोंधळ उडाला होता. गॅस सिलिंडर आज तरी मिळेल या आशेने सकाळपासून तर दुपारपर्यंत उन्हा-तान्हात रांगेत उभे असलेल्या नागरिकांना ज्यावेळी कळलं की आजही सिलिंडर मिळणार नाही, त्यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी अक्षरश: सिलिंडरच घेऊन पळ काढल्याची घटना घडली. सिलिंडरचा काळा […] The post नागपुरात गॅस सिलिंडरचा काळा बाजार; संतप्त नागरिकांनी अक्षरश: सिलिंडर पळवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 3:17 pm

नवीन हंगामातील ज्वारी बाजारात

पुणे : नवीन हंगामातील ज्वारीची आवक सुरू झाली असून, आवक वाढल्याने क्विंटलमागे ३०० रुपयांनी घट झाली आहे. गॅसटंचाईच्या काळात ज्वारी स्वस्त झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. ‘हंगामाच्या सुरुवातीला ज्वारीच्या दरात घट झाली असून, यापुढील काळात दर स्थिर राहणार आहेत. मार्च महिन्यापासून ज्वारीचा हंगाम सुरू झाला आहे. ज्वारीची तीन टप्प्यांत लागवड करण्यात येते. त्यानंतर बाजारात ज्वारीची […] The post नवीन हंगामातील ज्वारी बाजारात appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 3:14 pm

सुनेत्रा पवारांच्या आग्रहामुळेच काँग्रेसची बारामतीतून माघार:हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्ट केली काँग्रेसची भूमिका

राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने अखेर माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मात्र, निवडणुकीतून माघार घेतली असली तरी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे या निर्णयानंतरही राजकीय समीकरणांमध्ये अनिश्चितता कायम असल्याचे दिसून येत आहे. सपकाळ यांनी सांगितले की, या निर्णयामागे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांचा मोठा प्रभाव आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 5 एप्रिलपासूनच संपर्क साधत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर काल आणि आजही त्यांनी फोन करून पुन्हा आग्रह धरला. याशिवाय छगन भुजबळ, धनंजय मुंडे तसेच अजित पवार गटातील इतर नेत्यांनीही काँग्रेसकडे माघारीची विनंती केली होती. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सपकाळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. तसेच खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांनीही आपली भूमिका मांडत भावनिक दृष्टिकोनातून विचार करण्याचे आवाहन केले होते. या सर्व घडामोडीनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चा झाली आणि शेवटी माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सपकाळ यांनी अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात काँग्रेसची भूमिका पुन्हा अधोरेखित केली. एवढ्या मोठ्या नेत्याच्या अपघाताची योग्य चौकशी व्हायला हवी. एफआयआर दाखल होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत, असे ते म्हणाले. तसेच पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. 23 एप्रिल रोजी मतदान, 4 मे रोजी निकाल बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने सुरुवातीला उमेदवार म्हणून आकाश मोरे यांना मैदानात उतरवले होते. मात्र, निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर आता मुख्य लढत टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार रिंगणात असून काँग्रेसच्या माघारीनंतर त्यांचा मार्ग सुकर होण्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे बारामतीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 2:51 pm

गहिनीनाथ गडावर फडणवीसांचे भाष्य चर्चेत:नाशिक प्रकरणावर तपासाची घोषणा, भाविकांकडून मुंडेंना मंत्री करण्याची मागणी

नाशिकमधील आयटी कंपनीत घडलेल्या गंभीर प्रकारावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका घेत सखोल तपास करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडावर आयोजित 94 व्या नारळी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात सहभागी होत त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले. याचबरोबर बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसशी संपर्क साधल्याची कबुली देत त्यांनी राजकीय चर्चेलाही वेगळं वळण दिलं. नाशिकमध्ये काही आयटी कंपन्यांच्या माध्यमातून बेरोजगार तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत. या प्रकरणात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगत, अशा प्रकारचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, याचा सखोल तपास होईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी धार्मिक आणि सामाजिक परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. वामनभाऊंचा वारसा विठ्ठल महाराज पुढे नेत आहेत. आम्ही इथे पदामुळे नाही, तर भक्त म्हणून आलो आहोत, असे सांगत त्यांनी भाविकांशी संवाद साधला. विशेष म्हणजे, या गडावर 2039 पर्यंतच्या नारळांचे बुकिंग झाले असल्याचा उल्लेख करत त्यांनी या परंपरेचे कौतुक केले. तसेच वारकरी संप्रदायाच्या सातत्याची आणि शिस्तीची प्रशंसा करत, पंढरपूर दिंडी मार्गासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे आश्वासन दिले. सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकत्र या धार्मिक कार्यक्रमाला राजकीय रंगही चढल्याचे पाहायला मिळाले. मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे सर्व नेते एकत्र आले होते. याआधी एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच व्यासपीठावर दिसल्याने उपस्थितांमध्ये चर्चा रंगली. कार्यक्रमादरम्यान भाविकांनी धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री करा, अशी जोरदार मागणी केली. या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हसत प्रतिसाद दिला, मात्र यामुळे राजकीय वातावरणात नवीन चर्चांना उधाण आले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना फोनयाचवेळी बारामती पोटनिवडणुकीबाबत बोलताना फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून उमेदवारी मागे घेण्याची विनंती केल्याचे सांगितले. मी प्राजक्त तनपुरे यांनाही सांगितले होते आणि त्यांनी अर्ज मागे घेतला. त्याचप्रमाणे काँग्रेसनेही विचार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बारामतीतील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा मुख्यमंत्री फडणवीस यांनी माजी नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्यासोबतचा एक जुना फोटो मला भेट म्हणून मिळाला, ते पाहून मला खूप भावनिक वाटलं, असे ते म्हणाले. धार्मिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्वच अंगांनी महत्त्वपूर्ण ठरलेल्या या कार्यक्रमातून अनेक संदेश दिले गेले असून, आगामी काळात याचे परिणाम राज्याच्या राजकारणात दिसून येतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 2:29 pm

बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट

नागपूर : प्रतिनिधी सर्वांचंच लक्ष बारामतीतकडं लागले आहे. काँग्रेसचा उमेदवार आपला अर्ज मागे घेईल की नाही याबाबत तर्क लढवले जात असताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भूमिका स्पष्ट केली. काँग्रेसचा उमेदवार बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे उमेदवार अर्ज माघारी घेतील, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ […] The post बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 1:49 pm

भोंदूबाबा अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलिस कोठडी:नाशिक न्यायालयाचा निर्णय, नकली साप, नशिल्या पेढ्यांचे रहस्य उलगडणार

नाशिकमधील बहुचर्चित आयटी हब आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली आहे. खरातला आज नाशिक सत्र न्यायालयाने तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यापूर्वीच्या दुसऱ्या गुन्ह्यातील 7 दिवसांची कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायाधीश बी. एन. इचपुराणी यांच्या न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात खरातच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश केला. आरोपी लोकांना नकली साप आणि वाघाची भीती दाखवून लुटत होता. मंतरलेले खडे आणि चिंचोके विकून त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, महिलांना वश करण्यासाठी तो त्यांना विशिष्ट प्रकारचे द्रव्य किंवा पेढे खाऊ घालत असे. या पदार्थांमध्ये नक्की काय मिसळले जात होते आणि ते कुठून आणले जात होते, याचा तपास करणे आवश्यक आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद: आरोपी सहकार्य करत नाही! सरकारी वकिलांनी 7 दिवसांच्या कोठडीची मागणी करताना सांगितले की, आरोपी अत्यंत हुशार असून तो तपासात सहकार्य करत नाही. त्याच्याकडून जप्त केलेला पेनड्राईव्ह आणि लॅपटॉप यातील माहितीच्या आधारे त्याची समोरासमोर चौकशी करायची आहे. तसेच, नकली खडे पुरवणाऱ्या महेश कलंत्री याच्याशी असलेल्या संबंधांचा आणि गुन्ह्यात वापरलेल्या साहित्याचा शोध घेणे बाकी असल्याचे वकिलांनी नमूद केले. बचाव पक्षाचा विरोध आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला जोरदार विरोध केला. या प्रकरणाचा तपास आधीच एसआयटी (SIT) करत आहे. नकली साप, नाग आणि खड्यांचे विषय यापूर्वीच्या तपासातही आले होते. एकाच विषयावर वारंवार कोठडीची गरज काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच गुन्ह्याचा कालावधी आणि पेनड्राईव्हच्या जप्तीवरही त्यांनी शंका उपस्थित केली. न्यायालयाचा निकाल दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासातील अपूर्ण दुवे लक्षात घेता न्यायालयाने अशोक खरातला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या काळात त्याच्याकडून 'आयटी जिहाद' आणि महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात आणखी कोणते धागेदोरे हाती लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 1:35 pm

पार्थ पवारांच्या शपथविधीत पेहराव ठरला चर्चेचा:अजित पवारांच्या शैलीत गुलाबी जॅकेट परिधान; आवाज-देहबोलीतही त्याच छटा

पार्थ पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवार राज्यसभेतील प्रवेशावर चर्चा सुरू होती. त्यांच्या सोबतच्या महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या इतर सर्व खासदारांचा शपथविधी आधीच झाला होता. त्यामुळे पार्थ पवार कधी शपथ घेणार याबाबत चर्चा सुरू होती. अखेर आज त्यांच्या शपथविधीने त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. या सोहळ्यात मात्र सर्वाधिक लक्ष वेधले ते त्यांच्या पेहरावाने. पार्थ पवार यांनी शपथविधीवेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शैलीतील गुलाबी जॅकेट परिधान केले होते. अजित पवार यांचा खास ओळख बनलेला हा पेहराव पुन्हा एकदा पाहायला मिळाल्याने अनेकांच्या भावना दाटून आल्या. त्यांच्या आवाजात आणि देहबोलीतही काही प्रमाणात अजित पवारांची छटा जाणवत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची जबाबदारी सुनेत्रा पवार सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत पार्थ पवारांच्या शपथविधीला अधिकच भावनिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने पाहिले जात होते. दरम्यान, पार्थ पवारांच्या या नव्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शपथविधी सोहळ्यातील त्यांचा साधा पण प्रभावी अंदाज आणि अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देणारा पेहराव यामुळे हा क्षण अनेकांसाठी विशेष ठरला.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 12:59 pm

सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा

पुणे : बारामती अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसचे आकाश मोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवर चर्चा केली. यानंतर […] The post सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 12:53 pm

प्राचार्याला ब्लॅकमेल करून 7 लाख खंडणी उकळली:पोलिस उपनिरीक्षक, रील स्टार सोनाली हिंगेसह तिघांवर गुन्हा दाखल

पुण्यात एका धक्कादायक घटनेत, प्राचार्याला ब्लॅकमेल करून 7 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी एका पोलिस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेत कारवाईचे आदेश दिले. या गुन्ह्यात पोलिस उपनिरीक्षक अजित बडे, पोलिस कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील मार्शल तथा सोशल मीडियावरील 'रील स्टार' सोनाली हिंगे यांचा समावेश आहे. अजित बडे सायबर पोलिस ठाण्यात कार्यरत असून, सोनाली हिंगे आणि सुदाम तायडे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. आरोपींनी संगनमत करून एका शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्याला लक्ष्य केले. त्यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवण्यात आली. अटकेची कारवाई टाळण्यासाठी आणि प्रकरण मिटवण्यासाठी आरोपींनी 7 लाख रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या प्राचार्याने ही रक्कम आरोपींना दिली. हा प्रकार खंडणीखोरीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित प्राचार्यांनी वरिष्ठ स्तरावर तक्रार केली. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. खाकी वर्दीचा गैरवापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार, बंडगार्डन पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील आरोपी सोनाली हिंगे सोशल मीडियावर 'रील स्टार' म्हणून लोकप्रिय आहे. पोलिस गणवेशातील तिचे रिल्स मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. मात्र, खंडणीच्या गुन्ह्यात नाव आल्याने तिच्या चाहत्यांमध्ये आणि पोलिस दलात चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे पुणे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली असून, बंडगार्डन पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 12:50 pm

पुण्यात तरुणावर गोळीबार, एक गंभीर जखमी:वडगाव बुद्रुकमध्ये पूर्ववैमनस्यातून हल्ला; आरोपींचा शोध सुरू

पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे एका तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चरवड वस्तीमधील एका मोकळ्या मैदानात हा प्रकार घडला. या हल्ल्यात सुरज गायकवाड हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरज गायकवाड आपल्या मित्रासह वडगाव बुद्रुक येथील चरवड वस्ती परिसरातील एका मोकळ्या मैदानात थांबला होता. त्यावेळी सोहम खामकर, आर्यन जोगडे, मनोज गीते, प्रेम जाधव आणि त्यांच्या इतर साथीदारांनी त्याला गाठले. जुन्या वादाचे निमित्त करून या टोळक्याने प्रथम सुरज आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरू असतानाच, टोळक्यातील एकाने पिस्तूल काढून सुरजवर थेट गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ उडाली. या हल्ल्यात सुरज गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. सोहम खामकर, आर्यन जोगडे, मनोज गीते आणि प्रेम जाधव यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली आहेत. जखमी तरुणाच्या मित्राचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे. भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 12:37 pm

स्वातंत्र्यवीर ही पदवी सरकारने दिलेली नाही:जनतेने बहाल केली असावी, पण कोणताही अधिकृत पुरावा नाही- सात्यकी सावरकर

पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाची सुनावणी पार पडली. या खटल्यात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पंतू सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी राहुल गांधी यांच्या वतीने ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी घेतली. उलटतपासणीदरम्यान, सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दावे मान्य केले. त्यांनी कबूल केले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काही पुस्तके इतरांच्या नावाने प्रकाशित केली होती. तसेच, इतर लेखकांनी सावरकरांच्या नावाने पुस्तके प्रकाशित केली असण्याची शक्यता त्यांनी नाकारली नाही. सावरकरांच्या नावावर असलेल्या सर्व लिखाणाबाबत स्वतःला संपूर्ण माहिती नसल्याचेही त्यांनी मान्य केले. 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी सरकारने बहाल केलेली नाही, हे सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात स्पष्टपणे कबूल केले. ही पदवी जनतेकडून बहाल करण्यात आली असावी, परंतु त्याचा कोणताही अधिकृत किंवा कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाही, असेही त्यांनी सांगितले. 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी सर्वप्रथम लेखक सदाशिव रानडे यांनी त्यांच्या चरित्रग्रंथामध्ये वापरली होती. रानडे यांनी ही पदवी त्यांच्या स्वतःच्या कल्पनेतून दिली होती किंवा कसे, याची आपल्याला माहिती नसल्याचे सात्यकी सावरकर यांनी नमूद केले.या खटल्याची पुढील नियमित सुनावणी 13 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. जुन्या वादातून मारहाण केल्‍याप्रकरणी गुन्‍हा दाखल जुन्या वादातून महिलेला व तिच्‍या मुलाला मारहाण केल्‍याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष इंद्रजीत जाधव (32, रा. गणेशनगर, आव्हाळवाडी रोड, वाघोली), सागर सातव (रा. श्रावणी हॉटेल, लोहगाव रोड, वाघोली) अशी गुन्‍हा दाखल करण्यात आलेल्‍या दोघांची नावे आहेत. याबाबत अश्र्वनी लक्ष्मण उघडे (37, रा. विकास सातव यांच्‍या भाडेतत्‍वावरील खोली, गणेशनगर, आव्‍हाळवाडीरोड, वाघोली) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 12:33 pm

संजय राऊत, पुतणा मावशीचं प्रेम दाखवू नका:तुमचा इथल्या यंत्रणेवर विश्वास नाही, मग पाकिस्तानची यंत्रणा नेमायची का? भाजपचा संजय राऊतांना सणसणीत टोला

अजित पवार यांच्या अपघाताचा आणि भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. उलट सरकारकडून या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. शरद पवारांपेक्षा संजय राऊत मोठे झाले का? असे संशयाचे वातावरण निर्माण केल्याने काहीही होणार नाही, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. संजय राऊतांनी कायद्याचे थोडेस ज्ञान घेतले पाहिजे, अपघात प्रकरणी एडीआरच दाखल होत असतो. दिशा सालियान प्रकरणी एडीआरच दाखल करण्यात आला होता, असेही बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, अजित पवार अपघात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन करत तपास सुरू केला आहे. पवार कुटुंबियांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामध्ये संजय राऊत यांनी नाक खुपसू नये. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना अजित पवार अपघात प्रकरणी काळजी आहे, तुम्ही पुतणा मावशीचे प्रेम दाखवू नका.चौकशीमध्ये जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई होईल. पण हा जर निव्वळ अपघात असेल तर कोणावर कारवाई करायची हा सुद्धा प्रश्न आहे. हा तपासाचा भाग आहे, त्यातून सत्य बाहेर येईल.तुमचा इथल्या यंत्रणेवर विश्वास नाही तुमचा पाकिस्तावर विश्वास आहे तिथली यंत्रणा नेमायची असेल तर आमची काही हरकत नाही. राऊतांनी दुटप्पी धोरण ठेवू नये नवनाथ बन म्हणाले की, अजित पवार अपघात प्रकरणी एफआयआर का दाखल होत नाही असा सवाल जनाब संजय राऊत यांच्याकडून विचारला जात आहे. या प्रकरणी एडीआर दाखल झालेला आहे. कोणताही अपघात झाला तर एडीआरच दाखल होतो. सुशांतसिंह राजपूत यांची संशयास्पद आत्महत्या, दिशा सालियानचा संशयास्पद मृत्यू झाला होता, त्या प्रकरणी तत्कालीन मविआ सरकारने एडीआरच दाखल केला होता, FIR दाखल केला गेला नव्हता. त्यावेळी संजय राऊत यांनी एफआयआर दाखल का केला नव्हता, असा सवाल बन यांनी केला आहे. राऊत तुम्हाला कायद्याचे ज्ञान नसेल तर ते घ्या, थोडा अभ्यास करा. कोणताही अपघात झाला तर एडीआर दाखल होतो त्यातूनच चौकशी होते. अजित पवार प्रकरणी एडीआर दाखल करत तपास सुरू आहे. एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. त्यामुळे दुटप्पी धोरण ठेवणे बंद करा. राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी द्यावे नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप मोठा भाऊ आहे. अजित पवार अपघात प्रकरणामध्ये संपूर्ण चौकशी करण्याचे काम केले जात आहे. संजय राऊतांकडे जर काही पुरावे असतील तर त्यांनी ते पुरावे तपास यंत्रणाकडे द्यावे. विनाकारण भाजपचा कशामध्ये हात आहे का? असे संशयाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे काहीही साध्य होणार नाही. अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे. शरद पवारांनी सांगितले की हा अपघात आहे.संजय राऊत शरद पवारांपेक्षा मोठे झाले आहेत का हा संशोधनाचा विषय आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 12:30 pm

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा यू-टर्न:खरगे- शरद पवारांमध्ये चर्चा, फडणवीसांचा सपकाळांना फोन; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसने बारामतीतून उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. या घडामोडीमुळे बारामतीतील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे एक तासापूर्वी खरगे आणि पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत बारामती पोटनिवडणुकीतील राजकीय परिस्थिती, स्थानिक भावना आणि पुढील रणनीती यावर विचारविनिमय झाला. त्यानंतर काँग्रेसचा उमेदवार मागे घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे समजते. या चर्चेदरम्यान, बारामतीतील निवडणूक ही भावनिक आणि संवेदनशील पार्श्वभूमीवर होत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. त्यानुसार, राज्यातील राजकीय वातावरण लक्षात घेऊन काँग्रेसने माघार घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. खरगे यांनी स्वतः शरद पवारांना याबाबत आश्वासन दिल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, या निर्णयामुळे बारामतीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असून, आता अधिकृत घोषणा आणि पुढील घडामोडींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. याबाबत लाईव्ह अपडेट खाली पहा…..

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 12:29 pm

बारामतीत मोठा ट्विस्ट:काँग्रेस माघारीच्या तयारीत; बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा? विजय वडेट्टीवार यांची माहिती

राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर मोठी घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असताना काँग्रेस पक्ष माघार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बारामतीतील निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग जवळपास मोकळा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार आज दुपारपर्यंत आपला अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. काल प्रदेशाध्यक्षांसोबत पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत अनेक नेत्यांनी माघार घेण्याच्या बाजूने भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी मागील काही दिवसांत विविध स्तरांवर चर्चा, बैठका आणि संपर्क सुरू होता. अखेर या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्षांकडून पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दुपारपर्यंत केंद्रीय नेतृत्वाची परवानगी मिळाल्यास काँग्रेस अधिकृतपणे उमेदवारी मागे घेईल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे बारामतीतील राजकीय चित्रात मोठा बदल होण्याची शक्यता असून, आता अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या संदर्भातील खालील बातम्या देखील वाचा…. शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला:बारामतीची जागा अपघाताने रिक्त झाली, निवडणूक बिनविरोध व्हावी; शेवटच्या दिवशी निर्णायक क्षण बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. पूर्ण बातमी वाचा…. रोहित पवारांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी बंद दाराआड चर्चा:बारामतीत काँग्रेस ठाम, शेवटच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. या भेटीत काँग्रेसने बारामतीतून उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी संवाद झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढवण्याचा निर्धार आधीच स्पष्ट केला आहे. पूर्ण बातमी वाचा…

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 12:09 pm

पार्थ पवारांच्या विधानावर रोहित पवारांकडून काँग्रेसची दिलगिरी:अजित पवार प्रकरणी FIR दाखल करण्यास सरकारने विरोध का केला, सुप्रिया सुळेंचा सवाल

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात असतानाच, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन महत्त्वाची चर्चा केली. काँग्रेसबद्दल जे काही वक्तव्य झाले, त्याबद्दल रोहितने दिलगिरी व्यक्त केली आहे. काही चूक-भूल झाली असेल तर माफ करा, अशी विनंती रोहित पवारांनी हर्षवर्धन सपकाळ यांना केल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. काँग्रेस उमेदवारी अर्ज मागे घेणार का नाही हे दोन-4 तासात समजेलच, असेही त्यांनी म्हटले आहे. पार्थ पवारांच्या विधानावर पत्रकारांनी विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की,आत्या म्हणून मला पार्थला जे काही सांगायचे आहे, ते मी घरात सांगेन. अशा गोष्टी कॅमेऱ्यासमोर बोलायच्या नसतात. रोहित पवारांनी या प्रकरणी मध्यस्थी करत दिलगिरी व्यक्त केली आहे, त्यामुळे आता काँग्रेसची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. FIR का नोंदवला गेला नाही? सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर सर्वात जास्त पाठपुरावा घेण्याचे योगदान हे रोहित पवारांचे आहे. तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने हा मुद्दा संसदेत मांडला. आम्ही सर्वांनी दोन्हीकडे हा मुद्दा मांडला. आम्हाला वाटले होते तशी चर्चा यावर झाली नाही. रोहित पवारांनी मांडलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले की आम्ही करू. अजित पवार हे या राज्याचे उपमुख्यमंत्री होते पण काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात या प्रकरणी FIR केला. म्हणजे काँग्रेससोबत अजित पवारांनी अनेक वर्षे काम केले. दादा गेल्यानंतर रोहित पवार यांना FIR दाखल करण्यासाठी काँग्रेसच्या सरकारकडे जावे लागले. पण अजित पवार ज्या सरकारमध्ये होते त्या सरकारने FIR नोंदवण्यास नकार का दिला हा प्रश्न महाराष्ट्राच्या मनात आहे. दमानियांच्या आरोपांची नोंद घ्यावी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अंजली दमानिया एक जबाबदार भारतीय आहेत. त्या सातत्याने चुकीच्या होणाऱ्या गोष्टीवर आवाज उठवताना दिसतात. त्या न घाबरता पारदर्शकपणे अनेक प्रश्न महाराष्ट्रासमोर मांडत आलेल्या आहेत. दमानियांनी जी माहिती माध्यमांसमोर मांडली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानते. अंजली दमानियांनी सर्व माहिती सरकारला द्यावी आणि महाराष्ट्र सरकारने त्यांची नोंद घेतली पाहिजे. दुसऱ्या कामात व्यस्त होते सुनेत्रा पवार यांनी काल हर्षवर्धन सपकाळ यांना काल फोन केल्यावरून बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, देशावर सध्या मोठे आर्थिक संकट आहे. जागतिक युद्धाचे सावट जरी कमी झाले असले, तरी पेट्रोल-डिझेलचे दर आणि वाढती महागाई सामान्य माणसाचे कंबरडे मोडत आहे. मी या प्रश्नांवर काम करण्यात व्यस्त असल्याने बारामतीच्या निवडणुकीकडे माझे लक्ष नव्हते. प्रशासकीय दिरंगाईवर ओढले ताशेरे राजकारणासोबतच सुळे यांनी स्थानिक प्रश्नांवरही प्रशासनाला धारेवर धरले. शहरात नालेसफाईसाठी मोठा निधी दिला जातो, पण त्याची अंमलबजावणी शून्य आहे. नाल्यांवर रस्ते आणि इमारतींचे अतिक्रमण झाल्याने पावसाळ्यात पाणी तुंबते. अनेकदा निवेदने देऊनही प्रशासन ढिम्म आहे, अशी टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी मदतीची हाक अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी, यासाठी सुप्रिया सुळे यांनी आमदार दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. प्रत्येक बाधित शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:47 am

केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे अपघाती निधन

बीड : प्रतिनिधी बीडमध्ये पुन्हा भीषण अपघात झाला आहे. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरच्या नेहरूनगर कॉर्नरवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बीडच्या केज येथे कार्यरत असलेले तहसीलदाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तहसीलदाराच्या मृत्यूने प्रशासकीय कर्मचा-यांवर शोककळा पसरली आहे. बीडमधील केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा आज बुधवारी ( ९ एप्रिल) सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ भीषण कार […] The post केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे अपघाती निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 9 Apr 2026 11:35 am

रब्बीच्या ई पिक पाहणीमध्ये वसमत तालुक्याचे काम जिल्ह्यात अव्वल:42 हजार हेक्टरपैकी 31 हजार हेक्टर क्षेत्रावरील पाहणी पूर्ण, तहसीलदार शारदा दळवीचे नियोजन

हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या ई पिक पाहणीमध्ये वसमत तालुक्याचे काम अव्वल ठरले असून 42 हजार हेक्टरपैकी 31 हजार हेक्टरवरील ई पिक पाहणीचे काम पूर्ण झाले आहे. तर सर्वात कमी 46 टक्के काम कळमनुरी तालुक्याचे झाले आहे. वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांच्या नियोजनामुळे मुदतीमध्ये सर्वात जास्त काम झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्व साधारण क्षेत्र सुमारे 1.50 हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. शासनाकडून नुकसान भरपाईसाठी ई पिक पाहणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमधून जास्तीत जास्त क्षेत्रावरील ई पिक पाहणी करून पिकांचे छायाचित्र ॲपवर अपलोड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पाचही तालुक्यांनी नियोजन करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात पाचही तालुक्यांनी तातडीने रब्बी हंगामासाठी ई पिक पाहणीचे काम हाती घेण्यात आले होते. ता. 31 मार्च हि अखेरची मुदत असल्याने या मुदतीत कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु होती. त्यासाठी प्रत्येक गावांमधून बैठका घेऊन शेतकऱ्यांना ई पिक पाहणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, वसमत तालुक्यात उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शारदा दळवी यांनी पोलिस पाटील, कोतवाल व रोजगार सेवकांची बैठक घेऊन ई पिक पाहणीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या ठिकाणी वेळोवेळी आढावा घेऊन येणाऱ्या अडचणींची सोडवणुक देखील केली होती. त्यामुळेच वसमत तालुक्याचे ई पिका पाहणीचे काम 75 टक्के झाले आहे. तालुक्यातील 42 हजार हेक्टरपैकी 31 हजार हेक्टरवरील पिकांची ई पिक पाहणी झाली आहे. या शिवाय औंढा नागनाथ तालुक्याचे 64 टक्के काम झाले असून 25 हजार पैकी 16 हजार हेक्टरवर पिक पाहणी झाली. कळमनुरी तालुक्यात 46 टक्के काम झाले असून 50हजार पैकी 23 हजार हेक्टरवर पाहणी झाली. सेनगाव तालुक्यात 49 टक्के काम झाले असून 27 हजार हेक्टरपैकी 13 हजार हेक्टरवर पाहणी झाली. तर हिंगोली तालुक्यात 63 टक्के काम झाले असून 31 हजार पैकी 19 हजार हेक्टरवर पिक पाहणी झाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:14 am

सुनेत्रा पवारांनी दोनदा फोन करून बिनविरोधसाठी विनंती केली:देवेंद्र फडणवीस म्हणजे झरीतले शुक्राचार्य, निवडणूक लढायला आम्ही सक्षम- हर्षवर्धन सपकाळ

बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी दोन वेळा फोन करत संपर्क साधला आणि बिनविरोध निवडणुकीची विनंती केली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. आपण सभ्यतेने वाटचाल केली पाहिजे असे या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रयत्न करतो आहोत. आमची भूमिका ही सर्वांना माहिती आहे. सत्ताधाऱ्यांनी तसा प्रतिसाद दिलेला नाही. बारामती निवडणूक लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, पण जी विनंती सुरू आहे, त्यासाठी आम्ही चर्चा करतो आहोत. बारामतीमध्ये काँग्रेस संदर्भात बोटं दाखवणे चुकीचे तिथे 53 अर्ज दाखल झाले आहेत. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादीअजित पवार गटातील नेत्यांनी या निवडणुकीसंदर्भात आमच्याशी संपर्क इतक्यादिवस का साधला नाही. त्यांच्या पक्षातील नेत्यांना या निवडणुकीसंदर्भात काही देणं घेणं नव्हते का? असा सवाल सपकाळ यांनी केला आहे. इतके दिवस त्यांनी संवाद का साधला नाही. पक्षश्रेष्ठींना का संवाद साधला नाही. भाजपकडे सगळी सुत्रे सोपवली होती का? असा प्रश्न निर्माण होतो. पार्थ पवारांचे वक्तव्य हे निराधार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बारामतीसाठी आम्ही अर्ज दाखल केलेला आहे. काँग्रेसच्या सर्व नेत्यांशी चर्चा करत आम्ही पुढची भूमिका घेऊ. सुनेत्रा पवारांशिवाय आणखी कोणीही आमच्या नेत्यांशी किंवा काँग्रेसशी संपर्क केलेला नाही. पार्थ पवारांचे वक्तव्य हे निराधार आहे. त्यांच्या वाक्यासंदर्भात त्यांना कधीतरी पश्चताप होईल. अजित पवार यांचे पुत्र असल्याने त्यांनी भान राखले पाहिजे. सरकारचे वाभाडे निघण्याचा प्रकार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बारामती पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात आम्ही जी अट ठेवली आहे ती काय चुकीची नाही. अजित पवार अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाला तर काँग्रेसचे आकाश मोरे उमेदवारी अर्ज मागे घेणार ही त्यांची भूमिका आजपण कायम आहे. हे होत असताना गुन्हा दाखल करावा ही मागणी करावी लागते. पोलिस स्टेशनमध्ये जात बसावे लागते तिथे पोलिसांशी हुज्जत घालावी लागते. महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नाही म्हणून तो कर्नाटकात दाखल करावा लागतो. हे सर्व सरकारचे वाभाडे निघण्याचा प्रकार आहे. फडणवीस गुन्हा नोंदवू देत नाही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात गुन्हा नोंदवू देत नाही. त्यांच्या मृत्यूची चौकशी होऊ देत नाही. हे झरीतले शुक्राचार्य म्हणून देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत हे सर्वांना माहिती आहे. गु्न्हा दाखल करा अशी मागणी आम्हाला करायची गरजच पडायला नको होती. त्यापूर्वीच गुन्हा दाखल व्हायला हवा होता. हे सरकार मुकं, आंधळं, बहिरं सरकार आहे हे आम्ही विरोधक म्हणून सांगतच होतो. आता हे बेशर्म असल्याचेही दिसून येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 11:10 am

नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो:खरात अन् ऐंरडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का? लव्ह जिहाद' सर्वांना लागू करा- संजय राऊत

नाशिकमधील खरात बाबा काय मुस्लीम होता का? ऐंरडे काय मुस्लीम होते का? मौला, पादरी होते का? नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो. खरात बाबा हिंदू आहे, ऐंरडे हिंदू आहेत म्हणून हिंदू संघटना नरमाईची भूमिका घेणार आणि इतर धर्मांचे कुणी सापडल्यावर रस्त्यावर येणार हे चालणार नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील आयटी कंपनीत सुरू असलेल्या आयटी जिहादबद्दल बोलताना म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, लव्ह जिहाद हा शब्द सर्वांना लागू झाला पाहिजे. महिलांचे शोषण करणाऱ्यांना हा शब्द लागू पडतो. मोदी संसदेत महिलांच्या न्याय हक्कासाठी बिल आणताय पण त्यांना कोणीतरी सांगितले पाहिजे असे हक्क देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी महिलांना असे हक्क दिले होते. याचे श्रेय महाराष्ट्राला जाते. अशा राज्यात बुआ उदयाला येत आहेत ते सर्व भाजपचे प्रचारक आहेत. याचा भाजपशी संबंध आहे त्यावर बोलले पाहिजे. FIR बद्दल मागणी सुनेत्रा पवारांनी करायला हवी संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघतासंदर्भात महाराष्ट्रात FIR दाखल करा ही रोहित पवार यांची मागणी आहे. तीच मागणी हर्षवर्धन सपकाळ आणि आकाश मोरे करत आहेत. स्वत: मुख्यमंत्री सांगताय की अजित पवार यांच्या अपघाताबद्दल खोलपर्यंत जात तपास करू. त्यासाठी FIR नोंदवावा लागेल. विमान कंपनीवर गुन्हा दाखल करायला तुम्ही तयार नाहीत मग या प्रकरणी तुम्ही सखोल तपास कसा करणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. खरंतर ही मागणी सुनेत्रा पवार यांनी करायला पाहिजे. अजित पवारांच्या दोन्ही मुलांनी केली पाहिजे. पण ती मागणी रोहित पवार, काँग्रेस, आकाश मोरे आणि आम्ही सर्व जण करत आहोत. मोरे यांच्या मागणीचा विचार झाला तर उपकार होतील. कर नाही त्याला डर कशाला? असा सवाल राऊत यांनी केला आहे. यामध्ये मोठ्या भावाचा हात आहे का? संजय राऊत म्हणाले की, भाजपकडून विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल केले जातात, पण त्यांचा जवळचा सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा जीवाभावाचा सहकाऱ्यांच्या मृत्यू संदर्भात गुन्हा का दाखल केला जात नाही. लहान भावाचा मृत्यू कसा झाला याचा तपास झाला पाहिजे की यामध्ये मोठ्या भावाचा हात आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यावर सर्वांचे एक मत होईल. पण जी मागणी आहे, FIR करा ती का सोडत आहेत. निवडणूक एक निमित्त आहे ही संधी आहे गुन्हा दाखल करूण घेण्याची. सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील हे सांगायला कोणाची गरज नाही. पार्थ पवारांना अभ्यास करावा लागेल संजय राऊत म्हणाले की, पार्थ पवार यांना अभ्यास करावा लागेल. त्यांनी आजोबांकडून काही धडे घेतले पाहिजे. त्यांच्या वडीलांचा इतिहास त्यांनी चाळला पाहिजे. त्यांना राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्यांनी त्या पद्धतीने काम केले पाहिजे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 10:47 am

शरद पवारांचा काँग्रेसला सल्ला:बारामतीची जागा अपघाताने रिक्त झाली, निवडणूक बिनविरोध व्हावी; शेवटच्या दिवशी निर्णायक क्षण

बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सध्या राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ राजकीय नव्हे, तर भावनिक दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शरद पवार यांना सल्ला देण्याचा अधिकार असल्याचे मान्य केले. मात्र, या विषयावर अंतिम निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसने अजून अंतिम भूमिका जाहीर केलेली नसली तरी पक्षामध्ये विचारमंथन सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. आपली भूमिका केवळ सल्ल्यापुरती मर्यादित - शरद पवार काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे स्पष्ट करत शरद पवार यांनी थेट हस्तक्षेप न करता आपली भूमिका मांडली. मात्र, ही जागा अपघाताने रिक्त झाली असल्याने महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान प्रतिनिधी गमावला आहे, याची जाणीव ठेवून या निवडणुकीकडे पाहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याच अनुषंगाने, ही पोटनिवडणूक बिनविरोध पार पडावी, असा सल्ला आपण काँग्रेसला देऊ इच्छितो, असे शरद पवार यांनी नमूद केले. तथापि, अंतिम निर्णय हा काँग्रेसनेच घ्यायचा असून आपली भूमिका केवळ सल्ल्यापुरती मर्यादित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवार यांचेही बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी आक्रमक प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी सपकाळ यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती केली. या बैठकीत त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशीही चर्चा केली. बंद दाराआड झालेल्या या संवादात अजितदादांसारखा मोठा नेता गेल्यानंतर ही निवडणूक भावनिक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे, असे मत रोहित पवार यांनी मांडले. मात्र काँग्रेसने आपली भूमिका ठाम ठेवली आहे. अजित पवार प्रकरणात योग्य तपास आणि कारवाई होणे गरजेचे असल्याचा मुद्दा काँग्रेसने पुढे केला आहे. एवढ्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूनंतरही जर तपासाला गती मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांना न्याय कसा मिळणार? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. याच कारणामुळे काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. काँग्रेस काय निर्णय घेते, याकडे लक्ष काँग्रेस हा स्वतंत्र विचारांचा पक्ष असल्याचे नमूद करत रोहित पवार यांनी पुन्हा एकदा माघारीची विनंती केली आहे. कुटुंबातील सदस्य आणि अजितदादांचा कार्यकर्ता म्हणून मी ही विनंती करत आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेसमध्येही या विषयावर अंतर्गत चर्चा सुरू असल्याची जाणीव होत असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, पार्थ पवार यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीबाबत रोहित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते विधान चुकीचे होते. आता सर्वांनी एकत्र येऊन पुढे जाण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस काय निर्णय घेते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 10:45 am

उमरदरी शिवारात तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली:लोणार येथील तरुणाचा मृतदेह असल्याचे स्पष्ट, खूनाचे नेमके कारण शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू

सेनगाव तालुक्यातील उमरदरी शेत शिवारात बुधवारी तारीख 8 सकाळी मृत अवस्थेत आढळून आलेल्या तरुणाची ओळख पटली असून सदर मृतदेह विदर्भातील लोणार येथील सचिन राजगुरू या तरुणाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आता पोलिसांनी त्याच्या खुनाचे नेमके कारण शोधण्याची प्रयत्न सुरू केले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील उमरदरी फाट्याजवळ एक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाची वय सुमारे पंचवीस वर्षे असून त्याच्या उजव्या हातावर सचिता व एक पाऊल गोंदलेले (टॅटू )काढला असून तर दुसऱ्या हातावर मॉम डॅड व आई वडील लहान मुलाचा हात धरलेला असे छायाचित्र (टॅटू) काढलेले आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, सेनगांवचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक नागनाथ पाटील,जमादार जीवन मस्के, सुभाष चव्हाण, ओमनाथ राठोड,अमोल चिकने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणे केली आहे. मयताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती घेण्याचे प्रयत्न चालवले होते. यासोबतच पोलिसांनी मृतदेहाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली होती. उमरदरा शिवारापासून विदर्भ सीमा लागूनच असल्यामुळे पोलिसांनी विदर्भातही मृतदेहाची माहिती व्हायरल केली होती. मृतदेहाची ओळख पटेपर्यंत मृतदेह हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयातील शवागारामध्ये ठेवण्यात आला. दरम्यान रात्री उशिरा मृतदेहाची ओळख पटली असून सदरील मृतदेह लोणार येथील सचिन राजगुरू या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यानुसार पोलिस ांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असल्याचे सांगितले. मयत सचिन हा पुणे येथे कामाला होता. मागील पाच वर्षापासून तो गावाकडे राहू लागला होता. त्याचा विवाह झाला होता मात्र काही कारणामुळे फारकत झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. दरम्यान आता मयत सचिन याचा खून कोणी केला याचा शोध लावण्यासाठी सेनगाव पोलिसांचे पथक लोणार कडे रवाना झाले आहे याशिवाय. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक दिलीप मोरे, जमादार धनंजय क्षीरसागर, भुजंग कोकरे, आकाश टापरे विशाल खंडागळे,साईनाथ कंठे, हरिभाऊ गुंजकर, गजानन पोकळे यांचे पथकही अधिक माहिती घेण्यासाठी लोणार कडे रवाना झाल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले. अनैतिक संबंधातून खून झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दृष्टीने माहिती घेण्यात येत असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 10:19 am

नव्या युगातील तुकाराम माहित नाहीत:मुंढेंच्या बदलीवर सदाभाऊ खोतांची टोलेबाजी; वक्तव्य चर्चेत; प्रशासनावर पुन्हा प्रश्नचिन्ह

राज्यातील कडक शिस्तीचे आणि धडाकेबाज कामासाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. अवघ्या आठ दिवसांपूर्वी दिव्यांग विभाग मंत्रालयाच्या सचिवपदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांची आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागात बदली करण्यात आली. त्यांच्या 21 वर्षांच्या सेवाकाळात ही 25 वी बदली ठरली असून, या निर्णयामुळे प्रशासनात तसेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या बदल्यांवर सोशल मीडियावरही तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना, नांदेड दौऱ्यावर असलेल्या आमदार सदाभाऊ खोत यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या बैठकीसाठी ते नांदेडमध्ये आले होते. पत्रकारांनी मुंढे यांच्या वारंवार बदल्यांबद्दल विचारले असता खोत यांनी दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. माझं घराणं वारकरी संप्रदायाचं आहे. संत तुकाराम महाराजांविषयी मला चांगली माहिती आहे. माझे वडील वारकरी होते, त्यांना अनेक अभंग पाठ होते. पण नव्या युगातील तुकारामांबाबत मला फारशी माहिती नाही, असे वक्तव्य खोत यांनी केले. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याबद्दल थेट भाष्य करण्याऐवजी त्यांनी असा टोला लगावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, मुंढे यांनी दिव्यांग विभागात अल्पावधीत केलेल्या कामाची दखल घेत त्यांची बदली रद्द करावी, अशी मागणी जोर धरत आहे. नांदेडमध्ये दिव्यांग संघटनांनी राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले. मुंढे यांची बदली रद्द झाली नाही, तर अंदाज समितीच्या आमदारांना घेराव घालू, असा इशाराही आंदोलकांनी दिला. यापूर्वी मंत्रालयातही या मागणीसाठी आवाज उठवण्यात आला होता. याचदरम्यान, नांदेड दौऱ्यात सदाभाऊ खोत यांनी परिवहन विभागीय कार्यालयाला अचानक भेट दिली. या पाहणीत विभाग नियंत्रक चंद्रकांत वडस्कर अनुपस्थित असल्याचे आढळल्याने खोत संतापले. ठरलेल्या वेळेनंतरही अधिकारी कार्यालयात नसल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला हार अर्पण आपला निषेध नोंदवण्यासाठी खोत यांनी अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीला हार अर्पण केला. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी पैशांची मागणी केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. या सर्व घडामोडींमुळे मुंढे यांच्या बदलीसह प्रशासनातील कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 9:56 am

पोलिस दलास 3 आधुनिक सर्व्हिलन्स वाहने:कायदा, सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर तत्काळ नियंत्रण ठेवणे आता हाेणार शक्य‎

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोला पोलिस दलाच्या ताफ्यात अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त ३ सर्व्हिलन्स वाहने नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत. या वाहनांचा शुभारंभ ७ एप्रिल रोजी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या सर्व्हिलन्स वाहनांच्या माध्यमातून शहरातील संवेदनशील भाग, गर्दीची ठिकाणे, मोर्चे, धार्मिक कार्यक्रम, उत्सव, तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी प्रभावी देखरेख ठेवणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर तत्काळ नियंत्रण ठेवणे, तसेच चोरी, दंगल, संशयास्पद हालचाली यांसारख्या घटनांवर वेळीच आळा घालणे शक्य होणार आहे. पोलिस दलात दाखल होणाऱ्या सर्व्हिलन्स व्हेईकलमधील कॅमेरे अंधारातही काम करतील. दाट झाडीत लपलेल्या संशयित या वाहनातील कॅमेरे टिपतील. अकोला पोलिसांना शासनाने अशा प्रकारची तीन वाहने उपलब्ध करून दिली आहेत. एका वाहनाची किंमत साधारणपणे दीड कोटी रुपये असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. वाहनांमध्ये आधुनिक सुविधा वाहनात हाय रिझोल्युशन सीसीटीव्ही कॅमेरे ३६० अंशात परिसरावर सतत नजर ठेवण्याची क्षमता असून डिजटस व्हिडिआे रेकॉर्डर प्रणाली व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरक्षितपणे साठवण्याची सुविधा आहे. लाइव्ह मॉनिटरिंग स्क्रीन घटनास्थळी थेट दृश्य पाहण्याची सुविधा, इन्व्हर्टर व बॅटरी बॅकअप प्रणाली वीज नसतानाही अखंडित कार्य क्षमता, वायरलेस कम्युनिकेशन प्रणाली नियंत्रण कक्षाशी सतत संपर्क, नागरिकांना सूचना व जनजागृती संदेश देण्यासाठी पब्लिक अॅड्रेस सिस्टम, मोबाइल नेटवर्क-इंटरनेट कनेक्टिव्हिटी, इमर्जन्सी लाइट व सायरन सिस्टम उपलब्ध आहे. संवेदनशील भागावर लक्ष ठेवणे होणार शक्य ^ही वाहने खास पोलिस दलासाठी तयार करण्यात आली आहेत. या वाहनांमध्ये घटनास्थळाचे चित्रीकरण करण्याची सुविधा आहे. शहरातील संवेदनशील भागात अशा प्रकारची वाहने तैनात केली जाणार आहेत. या वाहनांमध्ये असलेले कॅमेरे ३६० अंशात फिरणारे असतील. या वाहनात ड्रोन कॅमेरेही आहेत. ड्रोन कॅमेऱ्याद्वारे संवेदनशील भागावर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. सभा, मोर्चा, आंदोलनाच्या ठिकाणी हे वाहन तैनात केले जाणार आहे. कॅमेरे पोलिस नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहेत. आहे. - डॉ. अर्चित चांडक , पोलिस अधीक्षक.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 9:55 am

डासांनी उडवली शहरवासीयांची झोप; महिनाभरात आढळले डेंग्यूचे 10 रुग्ण:कष्टकरी, मध्यमवर्गीयांच्या वसाहतीतच नव्हे, तर उच्चभ्रू वस्तीतही डासांचा कहर‎

शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या जलकुंभीमुळे जुने शहर परिसरात डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती वाढली आहे. सायंकाळी सहा नंतर कानाभोवती घोंगावणाऱ्या आणि हाता पायांना चावणाऱ्या डासांचा उपद्रव रात्री बारा वाजेपर्यंत कायम असतो. जुने शहरासह अकोट फैल, खदान, शिवणी, खडकी, उमरी, कृषीनगर, कैलास टेकडी भागातील कष्टकरी, मध्यमवर्गीयांच्या वसाहतीसह शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून आेळखल्या जाणाऱ्या राम नगरातही डासांचा कहर झाल्याने त्यामुळे शहरवासीयांची रात्रीची झोप उडाली आहे. महापालिकेचे फॉगिंग, धुरळणीकडे दुर्लक्ष झाले आहे. महिनाभरात शहरात डेंग्यूचे १०, चिकुनगुनियाचे ४ आणि मलेरियाचा एक रुग्ण आढळून आला आहे. डास निर्मूलनासाठी महापालिका प्रशासन कोणतेही प्रयत्न करत नाहीत. गेल्या वर्षभरात महापालिकेने डासांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जुने शहरातील डाबकी रोड, जुने शहर, भीमनगर, नायगाव, जुल्फेकार दर्गा परिसर, आरपीडीएस रोड, गुलजार पुरा, शरीफनगर, रामजीपीर नगर, शिवाजीनगर, शिवसेना वसाहत, खैर मोहंमद प्लॉट, भगतवाडी, गीता नगर, उर्वरित पान ४ धुरळणी, फवारणीचे नियोजन ^डासांचा उपद्रव पाहता मोर्णेतील जलकुंभी काढण्याची महापालिकेने मोहीम सुरु केली आहे. शहरात धुरळणी, फवारणी प्रत्येक वॉर्डात दुचाकीवरील दोन स्प्रे पंपासह दोन कर्मचारी यांची नियुक्ती केली जाणार आहे. नवीन स्प्रे पंपासह फॉगिंग मशिनची खरेदीचे नियोजन केले असून मनपाने मलेरिया विभागात कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवली आहे. शहरात नियमित नाले, गटारींची साफसफाई आणि कचरा उचलण्याचे निर्देश सर्व स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आले आहेत.- विजय अग्रवाल, सभापती, स्थायी समिती, महापालिका. शौचालयांच्या व्हेन पाइपला जाळ्या बसवा,तोंड झाकावे ^शहरात डासांचा उपद्रव वाढला हे सत्य आहे. जलकुंभी वनस्पती, उघड्या नाल्या, सांडपाण्याची साचलेली डबकी तसेच शहरातील शौचालयांचे व्हेन पाइप यामध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत आहे. सायंकाळच्या वेळी कानाभोवती घोंगावणारे क्युलेक्स डास यांची उत्पत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी आपल्या शौचालयांच्या पाइपला जाळ्या बसवाव्यात किंवा पाइपचे वरचे तोंड कापडाने बांधून घ्यावे. आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळावा. - डॉ. अतुल शंकरवार , जिल्हा िहवताप अधिकारी. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात- 44| महापालिका शहरी भागात- 49

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 9:54 am

रोहित पवारांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी बंद दाराआड चर्चा:बारामतीत काँग्रेस ठाम, शेवटच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. या भेटीत काँग्रेसने बारामतीतून उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी संवाद झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढवण्याचा निर्धार आधीच स्पष्ट केला आहे. या चर्चेदरम्यान रोहित पवार यांनी पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीबाबत दिलगिरी व्यक्त केल्याचेही सांगितले. पार्थ पवारांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये काही प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. तसेच, अजितदादांना न्याय द्या, असा संदेश काँग्रेसकडून देण्यात आल्याचेही समजते. या भेटीत रोहित पवार यांचा काँग्रेसचे प्रभारी नेते चेन्नीथला यांच्यासोबतही संवाद झाला, ज्यामुळे या चर्चेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस जवळ आला असून, काँग्रेसने माघार न घेण्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज बारामतीत सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. सुरुवातीला वैध ठरलेल्या 53 अर्जांपैकी आता 47 उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. मात्र अंतिम आकडेवारी सायंकाळनंतर स्पष्ट होणार असून, शेवटच्या दिवशी आणखी घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांच्या विरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना मैदानात उतरवले आहे. काँग्रेसने आतापासूनच प्रचाराची तयारी सुरू केली असून, बारामतीत थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राहुरी पोटनिवडणुकीतही माघारीच्या प्रक्रियेला वेग दुसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतही माघारीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दुसऱ्या दिवशी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता 18 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या मतदारसंघात भाजप-महायुतीचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंदराव मोकाटे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता दिसत आहे. राहुरीत शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले असून, तसेच ठाकरे गटाचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांच्या उमेदवारीबाबतही उत्सुकता आहे. अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांत मोठे राजकीय निर्णय आणि अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता या शेवटच्या टप्प्याकडे लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 9:19 am

नगरपालिकेत मानापमान नाट्य अन् खेकडी चाल:कुर्डुवाडी नगरपालिका सत्ताधारी-विरोधकात वाद, त्यामुळे मूलभूत प्रश्न व विकासकामे रखडली‎

कुर्डुवाडी ९ वर्षांच्या प्रशासकीय कालानंतर २०२५ मध्ये झालेल्या कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाने नगराध्यक्षपद मिळवले, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमत (१३ नगरसेवक) आहे. शिवसेना शिंदे गटाकडे एक सदस्य असून एक अपक्षही शिवसेना(उबाठा) गटाशी जोडला गेला. नगरपालिकेत विरोधी गटच नसल्याने सत्ताधारी गटांतच मानापमान नाट्य आणि खेकडी चाल सुरू झाली असून, यामुळे शहरातील मूलभूत प्रश्न व विकासकामे रखडली आहेत असा आरोप नागरिक करत आहेत. निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाकडे नगराध्यक्षसह सहा सदस्य (पाच सदस्य + एक अपक्ष), राष्ट्रवादीकडे १३ नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाकडे एक सदस्य निवडून आले. राष्ट्रवादीकडे बहुमत असले तरी नगराध्यक्षपद शिवसेना गटाकडे गेल्याने दोन्ही पक्ष सत्ताधारी झाले. यामुळे सभागृहात विरोधकांचा अभाव असून, सत्ताधारी गटांतच एकमेकांना आव्हान देण्याची खेकडी चाल सुरू आहे. जनतेने दिलेल्या कौलानुसार दोन्ही पक्ष एकमेकांविना पुढे जाऊ शकत नाहीत, पण मानापमानाच्या निमित्ताने विषय हाणून पाडण्याचा प्रकार वाढला आहे . नागरिकांच्या हितांना धक्का आणि भीती थकीत मालमत्ता कर शास्ती माफीला सभागृहात मंजुरी मिळाली, कारण हा नागरिकहिताचा जिव्हाळ्याचा मुद्दा होता. मात्र राष्ट्रवादी आरोग्य सभापती मोहसीन मकणू यांच्या अखत्यारीतील न्यायालयीन आदेशित भटक्या श्वानांच्या नसबंदीचा विषय नामंजूर झाला. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोधाला विरोध म्हणून हा विषय पुढील सभेसाठी ढकलला. तसेच राष्ट्रवादी शिक्षण सभापती संजय टोणपे यांनी आरोग्य विभागाची जेटींग मशीन बाहेर पैसे कमावत असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचेच सर्व सभापती असतानाही हे आरोप होत असल्याने सत्ताधारी गटातील अंतर्गत कलह उघडकीस आला आहे. रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता यांसारखे प्रकल्प रखडले असून शहराच्या धुळ मुक्तीचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. दुसऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वी राष्ट्रवादीचे सदस्य नगराध्यक्षांविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असल्याचा आरोप शिवसेना गटातील स्वीकृत नगरसेवक धनंजय डिकोळे यांनी केला. नगराध्यक्षांनी न्यायालयीन आदेशाप्रमाणे भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि थकीत मालमत्ता करावरील शास्ती माफी हे दोनच विषय मांडले. राष्ट्रवादीने या विषयांपूर्वी आयत्यावेळीचा विषय म्हणून भगवान महावीर जयंतीनिमित्त शहरातील एका रस्त्याला भगवान महावीर पथ नाव देण्याचा प्रस्ताव मांडला. डिकोळे यांनी सदर समाजाने कोणालाही विश्वासात न घेता व गांधी यांच्या सांगण्यावरुन मिटींगलाही बोलावले नसल्याचा आरोप करून, आधी अध्यक्षांचे दोन विषय मंजूर करा, मग हा घेऊ अशी सूचना मांडली. यावरून सभागृहात जोरदार नाट्य घडले. या खेकडी चालीमुळे नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रभागातील मूलभूत कामे करता येत नाहीत. भटक्या कुत्र्यामुळे आरोग्य- सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर झाले असून, रस्त्यांची अर्धवट कामे, पाण्याची कमतरता, कचरा संकलन व फवारणी यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. हे मानापमान नाट्य असेच चालू राहिले तर कुर्डुवाडी शहराला मोठे नुकसान होईल, अशी भीती आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 9:12 am

कृषी यंत्रे, औजार योजनेत ‘एआय’ किटचा समावेश करा:बळीराजाची तंत्रासाठी साद, एआयमुळे होईल शेती अधिक कार्यक्षम आणि उत्पादनात वाढ‎

शासन व जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध कृषी उपयोगी यंत्रे व औजारांच्या अनुदानित योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती सुधारण्यासाठी आवश्यक असलेली विविध यंत्रसामग्री अनुदानावर किंवा कमी दरात दिली जातात.मात्र, बदलत्या काळानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित किटचा समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सोलापूर जिल्ह्यात केळी, डाळिंब, ऊस व इतर नगदी पिकांच्या क्षेत्रात मागील काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली आहे. विशेषतः केळी आणि डाळिंब, द्राक्ष उत्पादकांनी मोठी आघाडी घेतली आहे. आगामी काळात जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तसेच उत्पन्नात दुपटीने वाढ करण्यासाठी होईल तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अनुदान मिळत नसल्याने शेतक-यांना किटसाठी सुमारे २५ हजार खर्च करावा लागतो. त्यामुळे अनुदानित योजनांमधून एआय किट द्यावे, अशी मागणी होत आहे. लक्ष्य फवारणी: जिथे गरज आहे तिथेच औषध फवारणी करून खर्चात बचत. प्रिसिजन फार्मिंग: माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, ठिबकचा वापर. निर्यात दर्जा : बंच स्प्रे, स्कर्ट बॅग, बड इंजेक्टर या साधनांमुळे केळीचा दर्जा. ^सोलापूर जिल्ह्यात एकूण सुमारे ३२ हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडीखाली आहे. करमाळा तालुक्यात २० हजार हेक्टर क्षेत्र केळी लागवडी खाली आहे. जिल्ह्यात डाळिंब व द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उत्पादनात दुपटीने वाढ व्हावी, तसेच जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी दर्जेदार आणि निर्यातक्षम उत्पादनासाठी कृषी यंत्र औजार या अनुदानित योजनेत एआय किटचा समावेश करण्यात यावा. संतोष झांझुर्णे, प्रगतशील शेतकरी, रामवाडी . खते व पाणीवापर खर्चात मोठी बचत . कीड व रोग नियंत्रणामुळे उत्पादनात वाढ . केळीला जागतिक बाजारपेठेत चांगला दर . टिश्यू कल्चर, मल्चिंगमुळे दर्जा सुधारणा ^कृषी यंत्र औजार अनुदान योजनेत एआय किटचा समावेशाची मागणी होत आहे. कोणती यंत्रे, औजारांसाठी योजना राबवण्याचे धोरण शासनस्तरावर ठरते. वरिष्ठांकडे मागणीचा प्रस्ताव पाठवून योग्य कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. - राजेंद्र नेटके, तालुका कृषी अधिकारी , करमाळा. ^मागील २ वर्षापासून माझ्या शेतात एआय तंत्रज्ञान वापरुन शेती करत आहे. त्यामुळे मोठा बदल घडून आला असून उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून तब्बल एकरी ११० टन ऊसाचे उत्पादन घेतले आहे. धुळाभाऊ कोकरे, कुगाव, ता करमाळा. शेतकऱ्यांना होणारे फायदे योजनेत एआय किट करता पाठपुरावा करु हवामानाचा अंदाज घेऊन पिकांना आवश्यक तेवढेच पाणी नियोजन.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 9:11 am

पंढरपूर कॉरिडॉर, उजनी पर्यटन विरोधात एल्गार‎:अधिकारी आणि पालक मंत्र्यांकडून उपोषणाची दखल नाही

उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, जल पर्यटन प्रकल्प व अतिरिक्त संपादित जमिनींच्या मोजणी विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाचा उद्या तिसरा दिवस असून शासनाने कसलाच प्रतिसाद न दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. माढा तालुका उजनी धरणग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. संघटनेचे अध्यक्ष सुरेश पांडुरंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रस्तावित केलेल्या जल पर्यटन योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उपजिविकेवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. जल पर्यटन योजनेला सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) धोरणा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांवर २०१९ ते २०२५ दरम्यान काढण्यात आलेल्या शासन निर्णयांचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रतिनिधी | पंढरपूर कॉरिडॉरच्या नावाने होणारा विध्वंसक विकास नाकारून शहराचा शाश्वत विकास करा. सामान्यांची घरे-दुकाने वाचवण्यासाठी सरकारी मोकळ्या जागांचा वापर व्हावा, या मागणीसाठी ‘पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती'च्या वतीने बुधवारी शहरातून मोटारसायकल रॅली काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. खादी ग्रामोद्योग भवनपासून सकाळी ९.३० वाजता सुरू झालेली ही रॅली शहरातील विविध भागांतून मार्गक्रमण करत प्रांत कार्यालयावर धडकली. खादी ग्रामोद्योग, स्टेशन रोड येथून निघालेली ही रॅली सावरकर पुतळा, जुने बसस्टँड, भोसले चौक, जुने कोर्ट, हनुमान मैदान, नगरपालिका दवाखाना, जळका वाडा, कालिकादेवी चौक, सीपीडब्ल्यूडी (मध्यप्रदेश) मार्गे सांगोला चौकात पोहोचली. तेथून भाजी मंडई, चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज सध्या प्रस्तावित असलेल्या कॉरिडॉर मुळे शहरातील पिढ्यानपिढ्यांचा आध्यात्मिक वारसा, घरे, दुकाने, मठ आणि मंदिरे उद्ध्वस्त होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. हे विस्थापन टाळण्यासाठी सरकारने स्वतःच्या ताब्यातील वर्षानुवर्षे बिगर उपयोगाच्या पडून असलेल्या जागांचा विकास करावा, या मुख्य उद्देशाने ही शोधयात्रा आयोजित करण्यात आली होती. रॅली दरम्यान अशा विविध सरकारी जागांची पाहणी करून त्यांचा विकासासाठी कसा वापर करता येईल, याचे विवेचन करण्यात आले. महाराज चौक, गजानन महाराज मंदिर पिछाडी, संत गाडगे महाराज चौक, यमाई तलाव खालचे पार्किंग, एमटीडीसीचे भक्तनिवास, ब्लड बँक आणि पद्मावती उद्यान पिछाडी अशा विस्तृत मार्गावरून ही फेरी काढण्यात आली. रॅलीचा समारोप प्रांत कार्यालयावर झाला. या ठिकाणी बचाव समितीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले. पंढरपूरचे पावित्र्य राखून आणि कोणत्याही नागरिकाचे नुकसान न करता सरकारी जागांवरच विकास व्हावा, अशी आग्रही मागणी केली. अति.संपादित जमीनींचा प्रश्न कोल्हापूर उच्च खंडपीठात धरण परिसरातील अतिरिक्त संपादित जमिनींचा प्रश्न कोल्हापूर उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना कोणतीही मोजणी अथवा पुढील कारवाई करू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. या जमिनींवर मूळ मालकांच्या वारसांनी शेती व इतर उपजविकेची साधने उभी केली आहेत. अनेक ठिकाणी घरे, मंदिरे व इतर बांधकामेही अस्तित्वात आहेत. त्यामुळे या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळाव्यात, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. शासकीय जागांचा विकास करा, आंदोलकांची मागणी

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 9:10 am

भोंदूबाबा अशोक खरातचा नवा कारनामा उघड; चौदावा गुन्हा दाखल:शेतकऱ्यांची लूट, जमीन व्यवहारात मोठी फसवणूक

नाशिक जिल्ह्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा प्रकरणात अशोक खरात याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आधीच अनेक गंभीर गुन्ह्यांना सामोरे जात असताना आता त्याच्याविरोधात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सिन्नर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या नव्या प्रकरणामुळे खरातविरोधातील गुन्ह्यांची संख्या चौदा झाली असून तपास यंत्रणांनी कारवाई अधिक तीव्र केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील मिरगाव परिसरात जमीन व्यवहाराच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 2003 ते 2004 या कालावधीत त्यांनी शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करताना मंदिर उभारण्याचा बहाणा केला. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत त्यांनी शेतजमिनी आपल्या नावावर करून घेतल्याचे उघड झाले आहे. ईशान्येश्वर मंदिर, फार्महाऊस, आंब्याची बाग आणि इतर मालमत्ता या व्यवहारात समाविष्ट असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, शेतकऱ्यांनी विरोध केल्यास जादूटोणा करून नुकसान करण्याच्या धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 16.50 एकर जमीन केवळ 15 लाख रुपयांत विकत घेतल्याची नोंद असून या व्यवहाराची चौकशी आता सखोलपणे केली जाणार आहे. फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. दरम्यान, अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दुसऱ्या गुन्ह्यातील पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचवेळी तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेण्यासाठी विशेष तपास पथकाने अर्ज केला असून तो मंजूर करण्यात आला आहे. या तिसऱ्या गुन्ह्यात महिलांच्या शोषणाचे गंभीर आरोप असून, एका गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हाही दाखल आहे. फसवणूक करण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या या प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे खरातचे नवे कारनामे उघड होत आहेत. भाविकांची फसवणूक करण्यासाठी विविध युक्त्या वापरल्या जात असल्याचे समोर आले आहे. स्वस्त वस्तू महागात विकणे, बनावट साधनांचा वापर करून भीती निर्माण करणे अशा प्रकारांमुळे अनेक लोकांची फसवणूक झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता न्यायालयात पुढील सुनावणीत काय घडते आणि तपास यंत्रणा कोणती भूमिका मांडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 9:08 am

‘ग्रीन टॅक्स दुप्पट’:आता 26 हजार 845 वाहनधारकांना ‘फिटनेस’चा आर्थिक भार, जिल्ह्यात 13 लाख 87 हजार 134 पैकी 26 हजार वाहनांची नोंदणी मुदत संपली‎

वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने जुन्या वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्रासाठी १ एप्रिलपासून ‘ग्रीन टॅक्स'मध्ये (पर्यावरण कर) थेट दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सामान्य वाहनधारकांचे कंबरडेच मोडणार आहे. सेकंडहँड वाहनांच्या विक्री व्यवसायिकांवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. वाहन परवान्यांची १५ वर्षांची मुदत संपलेली जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी, टेम्पो, माल ट्रकसह २६ हजार ८४५ वाहने आहेत. ग्रीन टॅक्स दुप्पट केल्याने या गाड्या भंगाराच्या भावात विकण्याची वेळ मालकांवर येऊ शकते. जुन्या वाहनांच्या प्रदूषणामुळे नैसर्गिक वातावरणाचा समतोल बिघडत आहे. त्यामुळे परिवहन विभागाकडून २०१० पासून जुन्या वाहनांवर पर्यावरण कर आकारणी केली जात आहे. हा कर दुचाकींसाठी २ हजार रुपये होता, आता ४ हजार रुपये केला जात आहे. तीनचाकी साठी ७५० वरुन १५०० रुपये तर पेट्रोल चार चाकी वाहनांचा ३ हजार वरुन ६ हजार रुपये झाला. डिझेल चारचाकीला ३ हजार ५०० रुपयांवरून ७००० रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर वाहनांमुळे प्रदूषण होत नाही, याची खात्री करून, आवश्यक सुरक्षा निकष पूर्ण केल्यास फिटनेस प्रमाणपत्र दिले जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या घोषणेनंतर ही अद्याप या निर्णयाचा जीआर परिवहन विभागाला प्राप्त झाला नसला तरी हा भुर्दंड भरावा लागणार आहे. सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे. महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला की प्रदूषण नियंत्रणासाठी असा सवाल केला जात आहे. शासनाचा कल प्रदूषण रोखण्यापेक्षा महसूल वाढवण्यावर अधिक दिसतो आहे. जी वाहने प्रदूषण करतात, त्यांना परवानगीच दिली जात नाही, तर मग हा कर का वाढवला असा सवाल व्यक्त होत आहे. ^जुनी वाहने जास्त प्रदूषणकारी असल्याने सरकारने हा कर दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पर्यावरण संवर्धन ठेवण्यास मदत होईल. अमरसिंह गवारे, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 9:06 am

वर्षभरात उद्यान देखभालीवर 98 हजार, कर्मचाऱ्यांच्या पगारावर 4.90 कोटी खर्च:महापालिकेच्या 33 पैकी निम्म्याहून अधिक उद्यानात सुविधाच नाहीत‎

शहरात महापालिकेची सुमारे ३३ उद्याने आहेत. त्यापैकी तीन उद्याने खासगी संस्थेकडे देण्यात आली आहेत. मात्र, उर्वरित ३० पैकी ठराविक १० ते १५ उद्याने वगळता उर्वरीत उद्याने भकास अवस्थेत आहेत. या उद्यानात नागरिकांना विरंगुळ्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी सुविधाच नाहीत. मनपाने मागील वर्षभरात या उद्यानांच्या देखभालीसाठी अवघे ९८ हजार रुपये खर्च केले आहेत. तर दुसरीकडे उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर वर्षभरात ४.९० कोटींचा खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे. दिवसेंदिवस वाढत्या नागरीकरणामुळे नागरिकांकडून क्रीडांगणे, उद्याने उभारण्याची, उद्याने विकसित करण्याची मागणी होत आहे. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेक वर्षांपासून उद्यानांच्या दुरवस्थेचा विषय गंभीर झाला आहे. शहरात महापालिकेची ३३ उद्याने असल्याची नोंद कागदावर आहे. त्यातील गंगा उद्यान, सिद्धीबाग व महालक्ष्मी उद्यान खासगी संस्थेला चालविण्यास देण्यात आले आहेत. उर्वरित उद्यानांपैकी काही ठराविक उद्याने स्थानिक नगरसेवक व काही संस्था, कंपन्यांच्या पुढाकारातून विकसित झाली. मात्र, निम्म्यापेक्षा अधिक उद्यानांची भकास अवस्था झाली आहे. महापालिका सतत आर्थिक अडचणीचे कारण पुढे करते. उद्यानांची देखभाल व तेथील खेळण्यांची दुरुस्तीही महापालिका करत नाही. गेल्या वर्षात उद्यानांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी फक्त ९८ हजार खर्च झालेत. सावेडी उपनगरात लाखो रुपये खर्चून विकसित केलेल्या नंदनवन कॉलनी येथील उद्यानाची देखभालीअभावी झालेली दुरावस्था. वसुंधरा अभियानांतर्गत लाखोंचा खर्च राज्य शासनाच्या वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्ष लागवड, ऑक्सिजन पार्क विकसित करणे यासारखे उपक्रम हाती घेतले जात आहेत. मात्र, केवळ सर्वेक्षणासाठीच हे उपक्रम राबविले जातात. सर्वेक्षण झाल्यावर याची देखभाल न झाल्याने त्यावर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे. महापालिकेने सध्या सुस्थितीत असलेल्या उद्यानांची देखभाल करण्यासाठी ठोस धोरण निश्चित करण्याची गरज आहे. वृक्ष लागवडीचा पाच कोटींचा खर्च वाया केंद्र शासनाच्या हरित क्षेत्र विकास योजनेअंतर्गत गेल्या काही वर्षांत महापालिकेने ५ कोटी रुपये वृक्ष लागवडीवर खर्च केला आहे. यातून २३ उद्याने व सीना नदी काठावर मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली होती. मात्र, देखभाल न झाल्याने हा खर्च वाया गेल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीत अनेक नगरसेवक उद्यान विकसित करण्याऐवजी लाखो रुपये खर्चून केवळ सुशोभीकरण करण्यावर उधळपट्टी करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 8:16 am

शनिशिंगणापूर देवस्थानला आता मिळणार ‘मंत्रालयीन’ बळकटी‎:कार्यकारी अधिकारीपदी कक्ष अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; 30 एप्रिलपर्यंत मागवले अर्ज

प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार आता अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देवस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी आता मंत्रालयीन ‘कक्ष अधिकारी’ दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज मागविण्यात आले असून ३० एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. २०१८ च्या विशेष कायद्यानंतर शनिशिंगणापूर देवस्थान सरकारी अखत्यारीत आले असले, तरी अद्याप नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती झालेली नाही. सध्या नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम हेच सध्या प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त होईपर्यंत, या नवीन नियुक्तीमुळे देवस्थानचा कारभार अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करत शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार पारदर्शक व सुरळीत करण्याची मागणी केली होती. नवीन कायद्यानुसार सरकारकडून लवकरच नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तोपर्यंत तोपर्यंत कार्यकारी अधिकारीपद भरण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. कारभारात शिस्त आणि अचूकता येईल मंत्रालयीन कक्ष अधिकारी दर्जाचे अधिकारी नियुक्त केल्यामुळे देवस्थानच्या प्रशासकीय कामकाजात शिस्त आणि अचूकता येईल. मंत्रालयातील कामाचा अनुभव असल्याने त्यांना कायदेशीर बाबी, सरकारी नियम आणि धोरणात्मक निर्णयांची सखोल समज असते. यामुळे देवस्थानच्या विकासकामांना वेग येईल, आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता राहिल आणि सरकारी नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे शक्य होईल. नेमका काय होईल बदल { पात्रता: शासकीय सेवेतील कक्षाधिकारी' पदाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक. { बदल: यापुढे आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांऐवजी शासननियुक्त अधिकारी कार्यभार पाहणार. { भूमिका: देवस्थान, विश्वस्त मंडळ आणि सरकार यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कामकाज. { फायदा: देवस्थानच्या कारभारावर आता सरकारचे थेट नियंत्रण आणि प्रशासकीय पारदर्शकता येणार.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 8:15 am

भगवंताच्या नामस्मरणाने आपल्या जीवनातील अडचणी होतात कमी:राधाकृष्ण महाराज यांचे प्रतिपादन, श्रीमद्भागवत कथेला भाविकांची गर्दी‎

असफल झालेल्या विद्यार्थ्यांना सफल कसे व्हावे याची प्रेरणा भागवत कथेमधून मिळते. विद्या धन प्राप्त करण्यापूर्वी परमात्म्याचे स्मरण आवश्यक असते. दिवसाची सुरुवात भगवंताचे स्मरण करून करावी. आपल्या भारतीय संस्कृतीत भगवंताच्या स्मरणास अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेळ निश्चित करून दररोज भगवंताचे भजन करावे, जीवनातील अडीअडचणी कमी होत चालल्याचे अनुभवास येते. जीवनात यशस्वी होण्याचे आणि आनंद मिळवण्याचे गूज भागवत कथा सांगते, असे प्रतिपादन राधाकृष्णजी महाराज यांनी केले. येथील रामनिवास इंदाणी आणि इंदाणी परिवारातर्फे नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे तृतीय पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्यासपीठावर हभप भास्करगिरी महाराज होते. महेश इंदानी यांच्या हस्ते भास्करगिरी महाराजांचा तर दिव्या इंदाणी यांच्या हस्ते महापौर ज्योती गाडे यांचा सन्मान करण्यात आला. राधाकृष्ण महाराज म्हणाले, राजा परीक्षित आपल्या प्रपंचाचा आणि राज्य कारभाराचा भार भगवंताकडे सोपवून निरंतर कथा श्रवणाचा आनंद घेत होते. त्यामुळे ते श्रवण भक्तीचे आचार्य आणि आदर्श झाले. राजा असून राज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांना कधीही युद्ध करावे लागले नाही. अंत:करण निर्मळ असले की भगवंताचा प्रभाव दिसून येतो. चित्तात भजन उतरले की, चिंतामुक्त होण्याचा आनंद मिळतो. सीमेवरील सैनिक भययुक्त नसतो तर भयमुक्त असतो. आपल्या देशातील सैनिक महात्मा पेक्षा कमी नाही, असे त्यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट होत भारत मातेचा उत्स्फूर्त जयघोष उपस्थित भाविकांनी केला.भजनाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, भक्त मागील दहा पिढ्यांचा आणि पुढील दहा पिढ्यांचा उद्धार करतो हे सत्य आहे. त्यामुळेच आजही संतांची नावे घेतली की, मन प्रसन्न होते. भक्तांशी संबंध जोडला की, मन शाश्वत आनंदाची अनुभूती घेत रहाते. लहानांप्रती स्नेह आणि मोठ्यांबद्दल आदर ठेवावा, जीवन आनंददायी होते. व्यापाऱ्यांना इमानदारीने व्यापार करतानाही अडचणींचा सामना करावा लागतो. हभप भास्करगिरी महाराजांनी भागवत कथा जीवनातील भिती घालवणारी आहे असे सांगितले. कथा श्रवण करण्यासाठी शहराच्या विविध उपनगरातील भाविकांची अलोट गर्दी होऊ लागली आहे. दररोज गर्दीचा उच्चांक होऊ लागल्याचे दिसून येते आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 8:14 am

गहू खरेदीसाठी तत्काळ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी:व्यापारी कमी दराने गहू करतात खरेदी, तहसीलदारांना दिले निवेदन‎

गहू पिकासाठी शासनाच्या हमी भावाने खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासे बाजार समितीच्यावतीने तहसील डॉ. संजय बिरादार यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यात १८,७८६ हेक्टरवर गव्हाचे क्षेत्र असून यावर्षी हवामान अनुकुल असल्यामुळे गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी गहु पिकावर अवलंबून आहेत. परंतु मागील महिन्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात गहु पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे बाजारात गव्हाचे दर शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत. शासनाने गहू या पिकासाठी २५८५ रुपये प्रती क्विंटल इतका हमीभाव जाहीर केलेला असताना काही व्यापारी मालाची प्रत खूप कमी आहे असे कारणे देऊन गहू अवघ्या १८०० ते २२०० रुपये भावाने खरेदी करत असल्याच्या तक्रारी बाजार समितीकडे प्राप्त होत आहेत. सध्या तालुक्यात शासनाने गहु खरेदी करण्यासाठी अधिकृत हमीभाव खरेदी केंद्र उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दराने गहू विकावा लागत आहे. तसेच वाहतूक खर्च, मजुरी खर्च आणि इतर शेतीसंबंधित खर्च वाढलेले असल्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक ताण पडत आहे. शासनाने नेवासा तालुक्यात तात्काळ गहू खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरू करावे तसेच खरेदी प्रक्रिया सुलभ व पारदर्शक पद्धतीने राबवावी जेणे करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकेल. या बरोबरच खरेदी केंद्रावर पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली. यावेळी नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील, संचालक गणेश ढोकणे, नारायण लोखंडे, अरुण शिंदे, राजेंद्र सानप, अण्णासाहेब पटारे आदी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 8:13 am

आत्मकल्याण अन् स्वत:च्या हिताचा विचार करणारा मनुष्य शहाणा:हभप रामभाऊ महाराज राऊत, नेवासा तालुक्यातील निंभारीत हरिनाम सप्ताहास भाविकांची गर्दी‎

केवळ शास्त्रज्ञान, उच्च शिक्षण किंवा मोठे पद मिळवणे यावरून मनुष्य शहाणा ठरत नाही. जो स्वतःच्या खऱ्या हिताचा आणि आत्मकल्याणाचा विचार करतो, तोच खऱ्या अर्थाने शहाणा असतो, असे प्रतिपादन रामभाऊ महाराज राऊत यांनी केले. नेवासा तालुक्यातील निंभारी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सहाव्या दिवशी रामभाऊ महाराज राऊत यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराजांनी “देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज” हा अभंग घेऊन अत्यंत परखड व हृदयस्पर्शी अध्यात्मिक विवेचन केले. देहाभिमान विसरून आत्मज्ञानाकडे वळणे हाच खरा स्वहिताचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनुष्य देहाच्या मोहात अडकतो; मात्र देहाचा विसर पडल्यावरच खरा आत्मिक आनंद आणि समाधान प्राप्त होते, असे त्यांनी विविध उदाहरणांतून पटवून दिले. संत महात्मेच आपल्याला खऱ्या हिताचा मार्ग दाखवतात. त्यामुळे नामस्मरण, भजन आणि संतसंग यांना जीवनात महत्त्वाचे स्थान द्यावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित भाविकांना केले. दरम्यान, रामभाऊ महाराज राऊत यांची कीर्तन सेवा सात व आठ तारखेलाही होणार असून भाविकांना त्यांच्या ओजस्वी वाणीतील सखोल अध्यात्मिक विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. अखंड हरिनाम सप्ताहामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभत आहे. याप्रसंगी हभप देविदास महाराज म्हस्के, हभप भगवान महाराज जंगले, हभप नंदकिशोर महाराज खरात, हभप रामनाथ महाराज पवार, हभप आदिनाथ महाराज भोगे, हभप गणेश महाराज आरगडे, हभप श्रीहरी महाराज वाकचौरे, हभप सागर महाराज टेमक, हभप ऋषिकेश महाराज वाल्हेकर यांच्यासह अनेक महाराज मंडळी उपस्थित होती. पंचक्रोशीतील भजनी मंडळ, तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान व विठ्ठल-रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र, गोणेगाव चौफुला येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अखंड हरिनाम सप्ताहामुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. कीर्तनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे परिसरात नवचैतन्य निर्माण झाले आहे. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप होत आहे. त्यामुळे या सोहळ्याप्रसंगी मोठ्या प्रमाणात अन्नदान होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 8:12 am

सकारात्मक जीवनशैली घडविण्यासाठी मैदानी खेळांचे महत्व- सुमित कोल्हे:कोपरगाव गुरुजी प्रीमियर लीगचे उत्साहात उद्घाटन,मान्यवरांची उपस्थिती‎

व्यस्त जीवनशैलीतून मानसिक ताजेपणा मिळविण्यासाठी आणि अडचणींना सामोरे जाण्याची ताकद निर्माण करण्यासाठी खेळासारखा उत्तम पर्याय दुसरा नाही. खेळातून सांघिक भावना वाढीस लागून एकोपा निर्माण होतो. म्हणून सकारात्मक जीवनशैली घडविणासाठी खेळाचे जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे, असे उद्गार संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी काढले. कोपरगाव गुरुजी प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा संकुल, टाकळी फाटा येथे पार पडले. या सोहळ्यात कोल्हे बोलत होते. माजी सभापती सुनील देवकर उपस्थित होते. कोल्हे पुढे म्हणाले, शिक्षकांसारख्या समाजघटकांसाठी अशा स्पर्धा केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित नसून त्या आरोग्यदायी व सकारात्मक जीवनशैली घडविणाऱ्या ठरतात. यावेळी त्यांनी संजीवनी परिवाराची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करत अशा उपक्रमांना संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांचे नेहमी पाठबळ असते. स्पर्धेदरम्यान लागणाऱ्या वैद्यकीय सुविधांसाठी संजीवनी आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल तसेच संपूर्ण संजीवनी शिक्षण संस्था सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आठवणींना उजाळा दिला. या मैदानावर स्वतः स्व. कोल्हे उपस्थित राहून त्यांनी केलेल्या वृक्षारोपण व संगोपनाची आठवण सांगताना आज या झाडांची सावली म्हणजे जणू त्यांचे आशीर्वादच असल्याची भावनिक भावना त्यांनी व्यक्त केली.या सामन्यांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ विजेत्या संघाला अनुक्रमे ७१०१, ५१०१, ३१०१ व २१०१ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. मालिकावीरास ११०० चे बक्षिस आहे. तसेच सर्वाधिक चौकार, उत्कृष्ट गोलंदाज, उत्तम संघ, सर्वाधिक षटकार, उत्कृष्ट झेल, हॅटट्रीक, उत्कृष्ट यष्टीरक्षक, अष्टपैलू खेळाडू सामनावीर अशा वर्गवारीतील खेळाडूंना ट्रॉफी बक्षीस देण्यात येणार आहे.याप्रसंगी किरण निंबाळकर, मनोहर शिंदे, महेंद्र विधाते, रमेश दरेकर, शशिकांत जेजूरकर, माणिक कदम, मनोज सोनवणे, विद्या आढाव, सुनील पोरे, दिपक तुंगार, राहुल भागवत, विलास गवळी, चंद्रविलास गव्हाणे, अमोल कडू, मारुती भोईर, सुधाकर निकुंभ, संजय साबळे, नारायण कवडे, गोविंद आढळ आदींसह क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 8:11 am

उज्जैन ते आळेफाटा, उभा राहतोय नवा अन् अनोखा शेतीपूरक व्यवसाय:कुक्कुट व बदक पालनाकडे वाढला शेतकऱ्यांचा कल, उज्जैनहून पक्ष्यांची हजेरी‎

पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीसमोर उभ्या राहिलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा परिसरात एक वेगळीच आर्थिक चळवळ पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनहून दरवर्षीप्रमाणे यंदाही व्यापाऱ्यांनी विविध जातींच्या कोंबड्या व बदकांसह हजेरी लावली असून, या पंखांच्या बाजाराला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून पारंपरिक दुग्ध व्यवसायाबरोबरच आता कुक्कुटपालन आणि विशेषतः बदक पालनाकडे शेतकरी झुकताना दिसत आहेत. जुन्नर तालुक्यात चिनी कोंबडी, राजहंस डक आणि व्हाईट डक यांची मागणी वाढली असून अनेक शेतकरी या व्यवसायाकडे उत्पन्नाचे पर्यायी साधन म्हणून पाहत आहेत. या पक्ष्यांची एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जलद वाढ आणि तुलनेने चांगली रोगप्रतिकारक क्षमता. त्यामुळे कमी वेळात उत्पन्न देणारा हा व्यवसाय म्हणून त्यांना पसंती मिळत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता अशा नव्या संधींचा शोध घेत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. दरांच्या बाबतीतही या बाजारात चांगली उलाढाल होत आहे. बदकाची जोडी सुमारे १३०० रुपये, व्हाईट डक ४००० रुपये, राजहंस ७००० रुपये, तर चिनी कोंबडीची जोडी सुमारे १२०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. विशेष म्हणजे या जाती पुणे जिल्ह्यात सहज उपलब्ध नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांसाठी हा थेट खरेदीचा मोठा पर्याय ठरत आहे. दरवर्षी उज्जैनहून येणाऱ्या या व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना दूरवर भटकंती न करता दर्जेदार पक्षी मिळत आहेत. त्यामुळे अनेकांनी आपल्या शेतात छोट्या प्रमाणात का होईना,पण पूरक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आळेफाटा परिसरात हा छोटा पण परिणामकारक व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 8:10 am

धुळगावची दिव्या बनली पोलिस:आठ महिन्यांपूर्वीच मातृछत्र हरपलेले असतानाही यशाला गवसणी‎

एकीकडे आठ महिन्यांपूर्वीच मातृछत्र हरपलेले असताना आणि दुसरीकडे नातेवाईकांकडून विवाहासाठी होणारा दबाव झुगारून, धुळगाव (ता. येवला) येथील दिव्या बारहाते हीने पोलीस दलात झेप घेत आपले आणि वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असूनही दिव्याने जिद्दीच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात नाशिक पोलिस दलात स्थान मिळवले आहे. दिव्याचे प्राथमिक शिक्षण धुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण नारायणराव पवार माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर तिने येवला येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने नाशिक येथील संघर्ष करिअर अॅकेडमीमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, तयारी सुरू असतानाच गेल्या आठ महिन्यांपूर्वी तिच्या आजारी आईचे निधन झाले. या मोठ्या दुःखातून सावरत असतानाच नातेवाईकांकडून तिचे लग्न लावून देण्यासाठी वडिलांवर दबाव वाढू लागला. अशा परिस्थितीतही खचून न जाता दिव्याचे वडील तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. तिला तिचे काका सचिन बारहाते यांचेही मोलाचे मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाला.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 8:00 am

कन्नडला क्रीडा संकुलात भाजी मंडई:मोकाट जनावरे, डुकरांचा सुळसुळाट, कचऱ्यामुळे पसरली अस्वच्छता‎

येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये नगर परिषदेने कोरोना काळापासून सुरू केलेली भाजी मंडई अद्यापही सुरू असल्याने खेळाडूंमधून संताप व्यक्त केला जात आहे. तालुका क्रीडा संकुल कन्नड-चाळीसगाव रस्त्यावर आहे. कन्नड शहराच्या हृदयात २ हजार ६०० चौरस मीटर क्षेत्रफळावर तालुका क्रीडा संकुल आहे. या ठिकाणी मल्टिपर्पज सभागृह, कबड्डी, व्हॉलीबॉल मैदान, धावपट्टी, तसेच कुस्ती, व्हॉलीबॉल प्रशिक्षण केंद्र आहे. या ठिकाणी मैदानी खेळांचे प्रशिक्षण देण्यात येते. ग्रामीण भागातील खेळाडू निर्माण करणे, विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करणे शासकीय धोरण आहे. मात्र हे क्रीडा संकुल समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारातच भाजी मंडई बसल्याने अमूल्य क्रीडा संकूलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या क्रीडा संकुलासाठी तत्कालीन माजी आमदार किशोर पाटील, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी निधी उपलब्ध करून दिला होता. ^मी मुख्याधिकारी म्हणून नव्यानेच रुजू झालो आहे. क्रीडा संकुलाच्या आवारातील भाजी मंडईला पर्यायी जागा देण्यासाठी लवकरच निर्णय घेऊ. क्रीडा संकुल अतिक्रमणमुक्त करण्यात येईल. क्रीडा संकुलालगतचे अतिक्रमण हटवण्यात येईल. -रवींद्र लांडे, मुख्याधिकारी, न.प. ^क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारात व आवारातील अतिक्रमण हटवण्यासाठी न.प.ला पत्रव्यवहार केला आहे. बैठकीत मल्टिपर्पज हॉल जीर्ण अवस्थेत असल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजला पत्र दिले आहे. -तुषार आहेर, तालुका क्रीडा अधिकारी क्रीडा संकुलाच्या आवारात भाजी मंडई भरल्याने क्रीडा संकुलाचा मुळ उद्देश संपला आहे. तसेच प्रवेशद्वारात शंभर टपऱ्यांचे अतिक्रमण झाले आहे. या ठिकाणी खेळाडूंसाठी होस्टेल उभारले तर अनेक खेळाडूंना राहण्याची संधी उपलब्ध होईल. राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा येथे होऊ शकतात. त्यासाठी अतिक्रमण हटवावे लागणार आहे. तालुक्यात आजपर्यंत तेजस्विनी बारवाल राज्यस्तरीय कुस्तीपटू निर्माण झाली, समृद्धी शिंदे सॉफ्टबॉल स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर चमकली. सुनील वाघ यांनी व्हॉलीबॉलमध्ये राज्यस्तरीय यश मिळवले. आता संकुल मरणासन्न अवस्थेत आहे, अशी माहिती क्रीडा प्रशिक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली. भाजी मंडईमुळे मोकाट जनावरे, डुकरे यांचा सुळसुळाट आहे. उरलेला काडीकचरा येथे साचत असल्याने डास, घाणीचे साम्राज्य आहे. या ठिकाणी यापूर्वी राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धा, सायकल पोलिस स्पर्धा, विभागीय शिपाई, मार्शल आर्ट व दरवर्षी शासनाच्या वतीने दहा मैदानी खेळांच्या स्पर्धा होत होत्या, त्या आता थांबल्या आहेत. या ठिकाणी अविनाश काळे, प्रवीण शिंदे हे क्रीडा प्रशिक्षक नेमलेले आहेत. पर्यायी जागेसाठी निर्णय घेऊ पत्रव्यवहार केला, प्रतिसाद नाही

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 7:43 am

सिल्लोडला वाहतूक नियंत्रकाची आत्महत्या:वरिष्ठांनी अपमानित केल्याची फिर्याद, आगारप्रमुखासह तिघांवर गुन्हा नोंद‎

आगारप्रमुख व दोन सहायक वाहतूक अधिकाऱ्यांनी अपमानित करून जातिवाचक बोलल्याने अपमान सहन न झाल्याने वाहतूक नियंत्रण शरद विठ्ठल भिवसने (४०, रा. वडोद चाथा, सिल्लोड, ह.मु लक्ष्मी कॉलनी, सिल्लोड) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी शहरातील आनंद पार्क परिसरात दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी मृताचे भाऊ पोपट विठ्ठल भिवसने यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले की, भाऊ शरद हे सिल्लोड आगारात सहायक वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत होते. मागील एक महिन्यापासून हृदयविकाराचा आजार असल्याने ते वैद्यकीय रजेवर होते. त्यांची बढती झाल्याने माझी सिल्लोडलाच नियुक्ती करावी म्हणून त्यांनी विनंती अर्ज सिल्लोड आगारप्रमुखांना दिला. दरम्यान, बुधवारी सकाळी नऊ वाजता ते हजर होण्यासाठी सिल्लोड आगारात गेले असता, तेथील आगारप्रमुख विजय काळवणे, सहायक वाहतूक अधिकारी किरण अवसरमल व विकास चव्हाण यांच्याकडे गेले असता तुम्ही हजर होण्यासाठी आले असताना असे मळालेले कपडे, पायात चप्पल का घातली नाही, दाढी का केली नाही व आपल्या हुद्द्याचा पोशाख का घातला नाही?' असे म्हणून त्यांनी जातीचा उल्लेख करून अपमानित केले. तो अपमान सहन न झाल्याने शरद भिवसने यांनी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भराडी रस्त्यावरील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 7:42 am

तरुणांच्या पुढाकाराने साठ वर्षांनंतर लक्ष्मीमातेचा यात्रोत्सव उत्साहात:हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ‎

सिल्लोड तालुक्यातील भराडी परिसरालगत असलेल्या बोजगाव येथे सुमारे साठ वर्षांपासून खंडित झालेली लक्ष्मी मातेची पारंपरिक यात्रा यंदा गावातील तरुणांच्या पुढाकारातून आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सुरू करण्यात आली. या ऐतिहासिक पुनरुज्जीवनामुळे गावासह परिसरात आनंद, भक्ती आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बोजगाव येथे पूर्वीपासून लक्ष्मी मातेची यात्रा मोठ्या भक्तिभावाने भरत होती. गावाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा हा महत्त्वाचा भाग होता. मात्र, काही कारणास्तव ही यात्रा सुमारे सहा दशकांपूर्वी बंद पडली होती. काळाच्या ओघात ही परंपरा लोप पावत चालली होती. दरम्यान, आसपासच्या गावांमध्ये दरवर्षी उत्साहात जत्रा भरत असल्याचे पाहून बोजगावातील तरुणांमध्ये आपल्या गावाची परंपरा पुन्हा जिवंत करण्याची भावना निर्माण झाली. आपल्या गावातही यात्रा का नसावी? या विचारातून त्यांनी पुढाकार घेतला. यासाठी गावातील ज्येष्ठ मंडळी, ग्रामस्थ आणि विविध घटकांशी चर्चा करून नियोजनबद्ध तयारी सुरू करण्यात आली. यात्रेच्या आयोजनासाठी स्वच्छता मोहीम, मंदिर परिसराची सजावट, वीज-प्रकाश व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तरुणांनी स्वतः पुढाकार घेत आर्थिक व श्रम दानाच्या माध्यमातून सर्व व्यवस्था उभारल्या. यात्रेदरम्यान पारंपरिक विविध सोंगे, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक, तसेच जागरण-गोंधळ यांसारख्या लोक परंपरा जिवंत करण्यात आल्या. या कार्यक्रमांनी ग्रामस्थांसह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांचे विशेष आकर्षण ठरले. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. सामाजिक एकात्मता अधिक दृढ या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील एकजूट आणि सामूहिक सहभाग. जात, धर्म, वय या सर्व भेदांपलीकडे जाऊन ग्रामस्थांनी एकत्र येत हा उत्सव साजरा केला. यामुळे गावातील सामाजिक एकात्मता अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दिव्यमराठी भास्कर 9 Apr 2026 7:42 am