लडाखच्या उपराज्यपालांचे अधिकार गोठवले
नवी दिल्ली : लडाखबाबत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राशासित प्रदेशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत बदल करत, केंद्राने उपराज्यपाल तसेच स्थानिक प्रशासकीय अधिका-यांकडे असलेले महत्त्वाचे आर्थिक अधिकार परत घेतले आहेत. आता १०० कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना मंजुरी देण्याचा अधिकार थेट केंद्रीय गृह मंत्रालयाकडे असेल. हा निर्णय लडाखचे एलजी आयवाय विंदर गुप्ता यांनी एमएचएकडून मिळालेल्या निर्देशांच्या आधारे […] The post लडाखच्या उपराज्यपालांचे अधिकार गोठवले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने टँकरमधून मद्यार्क चोरी आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन टँकरसह एकूण १ कोटी १९ लाख ४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही घटना भोर तालुक्यातील निगडे गाव हद्दीतील सातारा-पुणे महामार्गावर घडली. आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, त्यांनी सापळा रचला. यावेळी अशोक लेलॅण्ड कंपनीचे दोन १६ चाकी टँकर (एमएच-१२ वायबी-९८८६ आणि एमएच-१२ युएम-९८८७) संशयास्पदरीत्या थांबले होते. चालकांनी प्लास्टिक पाईपद्वारे टँकरमधून मद्यार्क बाहेर काढण्यास सुरुवात केली. पथकाने तात्काळ छापा टाकला असता, आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. छाप्यादरम्यान, टँकर क्र. एमएच-१२ वायबी-९८८६ मधून ३९,८०० लिटर मद्यार्क आणि टँकर क्र. एमएच-१२ युएम-९८८७ मधून ३९,८०० लिटर मद्यार्क जप्त करण्यात आले. याव्यतिरिक्त, २०० लिटर क्षमतेचे दोन ड्रम (प्रत्येकी १८० लिटर मद्यार्क), ३५ लिटर क्षमतेचा एक कॅन (३५ लिटर मद्यार्क), २० लिटर क्षमतेची एक प्लास्टिक बादली (२० लिटर मद्यार्क), रिकामे ड्रम, कॅन, पाईप, नरसाळे आणि पक्कड यांसारखे साहित्यही जप्त करण्यात आले. एकूण ७९ हजार ६०० लिटर मद्यार्क आणि इतर साहित्यासह १ कोटी १९ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही टँकर चालक, टँकर मालक, संबंधित आसवणी व्यवस्थापक आणि अज्ञात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५(अ)(ई), ६७, ८१, ८३, ९० आणि १०३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सध्या सुरू आहे. या कारवाईत निरीक्षक नरेंद्र थोरात, दुय्यम निरीक्षक बिराज माने, धीरज सस्ते, एन.जी. निकम, जवान सतीश पांधे, रुतिक कोळपे, शशिकांत भाट, रणजित चव्हाण, संदीप सुर्वे, माधव माडे, राहुल तारळकर तसेच वाहनचालक शशिकांत झिंगळे आणि अमोल दळवी यांनी सहभाग घेतला. पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात करत आहेत.
दुुस-या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
नवी दिल्ली : भारताच्या अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली असून चालू आर्थिक वर्षाच्या दुस-या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% च्या वेगाने वाढला. हा गेल्या सहा तिमाहींमधील सर्वाधिक आहे. ही वाढ अपेक्षेपेक्षा जास्त नाही तर देशांतर्गत मागणी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सरकारी खर्चाची ताकद देखील स्पष्टपणे दाखवत आहे. मागील तिमाहीत ७.८% असलेला जीडीपी विकासदर दुस-या तिमाहीत […] The post दुुस-या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
थायलंडमध्ये भीषण पुर; १४५ जणांचा मृत्यू
बँकॉक : थायलंडमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. दक्षिण थायलंडमध्ये मृतांचा आकडा १४५ वर पोहोचला आहे, पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अधिका-यांनी म्हटले की पुराचे पाणी कमी होत असताना, विनाशाचे भयानक दृश्य समोर येत आहे. थायलंडच्या आपत्ती निवारण आणि व्यवस्थापन विभागाने शुक्रवारी सांगितले की, मुसळधार पावसामुळे दक्षिणेकडील १२ प्रांतांमध्ये पूर […] The post थायलंडमध्ये भीषण पुर; १४५ जणांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दितवाह चक्रीवादळ भारताच्या दिशेने
कोच्ची : शेजारील देश श्रीलंकेमध्ये मोठी हानी केल्यानंतर दितवाह नावाचे भयानक चक्रीवादळ आता भारताच्या किना-याकडे वेगाने सरकत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि पुद्दुचेरीसह काही राज्यांसाठी प्री-सायक्लोन अलर्ट जारी केला आहे. श्रीलंकेत दितवाहने मोठे नुकसान केले आहे. या वादळामुळे आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला असून २३ जण बेपत्ता आहेत. गेल्या […] The post दितवाह चक्रीवादळ भारताच्या दिशेने appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा
नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक चिंताजनक बातमी असून भारताने केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीपूर्वी दिलेल्या नोटाम इशा-याच्या पार्श्वभूमीवर, चौथे चीनी हेरगिरी जहाज हिंदी महासागरात दाखल झाले आहे. या चीनी जहाजाच्या हालचालींवर भारतीय नौदल आणि सुरक्षा यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहेत. भारताच्या संरक्षण क्षमतेची माहिती गोळा करण्याच्या चीनच्या प्रयत्नांचा हा एक भाग मानला जात आहे. […] The post भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
ताई पो : हॉंगकॉंगमधील ताई पो जिल्ह्यातील निवासी संकुलात बुधवारी लागलेल्या आगीत आतापर्यंत ९८ लोकांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत १०३ लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. अधिका-यांचे म्हणणे आहे की मृतांचा आकडा वाढू शकतो. सरकारने या दुर्घटनेची फौजदारी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी […] The post आतापर्यंत ९८ जणांचा मृत्यू appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
दहशतवादी डॉ. आदिलची व्हॉट्सअप चॅट समोर
फरीदाबाद : दिल्ली स्फोटाच्या दहशतवादी मॉड्यूलमध्ये सामील डॉक्टर्स स्फोटके जमा करण्यासाठी पगारातून पैसे देत राहिले. अटक केलेल्या डॉक्टरांच्या बँकिंग तपशील आणि मोबाईल रेकॉर्डमधून याचे पुरावे मिळाले आहेत. सहारनपूरच्या प्रसिद्ध मेडिकेअर रुग्णालयात काम करणा-या डॉ. आदिल अहमदची व्हॉट्सअॅप चॅटही समोर आली आहे, ज्यात तो अॅडव्हान्स पगारासाठी विनवणी करत आहे. हरियाणातील फरिदाबादच्या धौज आणि फतेहपूर तगा गावात […] The post दहशतवादी डॉ. आदिलची व्हॉट्सअप चॅट समोर appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. बहुतेक शहरांमध्ये शुक्रवार सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जयपूरमध्ये हलका पाऊसही झाला. अजमेर, उदयपूर विभाग आणि आसपासच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने २९-३० नोव्हेंबर रोजी राज्यात दाट धुक्याचा इशारा दिला आहे. १ डिसेंबरपासून शीतलहर सुरू होईल. मध्य प्रदेशातही डोंगराळ भागातून येणा-या थंड वा-यांचा प्रभाव […] The post १ डिसेंबरपासून देश गारठणार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पीएच.डी. PET- २०२४ प्रक्रियेला तब्बल १८ महिने उलटूनही अद्याप विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल प्रवेशपत्र, कन्फर्मेशन लेटर व कोर्सवर्क शेड्यूल न मिळाल्याने संशोधकांमध्ये तीव्र नाराजी व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर 'एसएफआय' (स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया) तर्फे विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना निवेदन देत तातडीने कार्यवाहीची मागणी केली. निवेदनाच्या प्रती राज्यपाल, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, यूजीसी अध्यक्ष, केंद्रीय शिक्षण मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, मुंबई उच्च न्यायालय आणि औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्तींना पाठवण्यात आल्या आहेत. यावर लवकरात लवकर तोडगा निघावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलीय. नेमके प्रकरण काय? विद्यापीठाने PET-२०२४ चे नोटिफिकेशन १ जुलै २०२४ रोजी जाहीर केले. अर्ज ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत स्वीकारले गेले. PET परीक्षा ३ ऑक्टोबर २०२४ रोजी झाली. त्यानंतर RRC मुलाखती ४ ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान झाल्या आणि RRC निकाल २५ मार्च २०२५ रोजी जाहीर झाला. निवड झालेल्या संशोधकांचे प्रस्ताव RAC मार्फत ६ जून २०२५ पर्यंत विद्यापीठात सादर झाले. एकूण १४३६ विद्यार्थी PET प्रक्रियेत यशस्वी झाले. मात्र, अद्याप त्यांना पुढील संशोधन प्रक्रियेची कोणतीही अधिकृत कागदपत्रे मिळालेली नाहीत. याचिकेमुळे प्रक्रिया ठप्प मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये रिट याचिका क्रमांक १ ते १० प्रलंबित असल्यामुळे प्रक्रिया ठप्प असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या याचिकांमुळे १४३६ संशोधकांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असल्याचा आरोप 'एसएफआय'ने केला आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला व न्यायालयाला याचिका फास्टट्रॅकवर चालवून तातडीने निकाली काढण्याची विनंती केली आहे. फेलोशिपसाठी कागदपत्रे आवश्यक विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, सारथी, बार्टी, महाज्योती, ARTI, अमृत यांसारख्या सरकारी संस्थांच्या फेलोशिपसाठी प्रोव्हिजनल व कन्फर्मेशन लेटर अनिवार्य आहे. मागील दोन वर्षांपासून जाहिराती निघालेल्या नसून लवकरच त्या येणार असल्याचे वृत्तपत्रांतून समजते आहे, परंतु आवश्यक कागदपत्रे न मिळाल्यास संशोधक फेलोशिपपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थी संभ्रमात गेल्या १८ महिन्यांपासून या प्रक्रियेत गुंतून वेळ, पैसा आणि मेहनत, घालवूनही संशोधन सुरू करण्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे. प्रक्रियेला इतका अवाजवी काळ लागल्याने पीएच.डी. करावी की सोडून द्यावी, असा प्रश्न संशोधक विद्यार्थ्यांच्या समोर निर्माण झाला आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी न्यायालयीन प्रक्रिया जलद निकाली निघावी व त्यांचे उच्च शिक्षण सुरक्षित रहावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. या प्रसंगी एसएफआय जिल्हा सचिव अरुण मते, एकनाथ तिरमले,प्रतिक गंगावणे,सुरज देवकर,मनोरमा नरवडे, मीरा सावंत व विद्यार्थी उपस्थित होते.
दहशतवादी हल्ला आणि काळ्या पैशांच्या व्यवहारात बँक खात्याचा वापर झाल्याची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच आहेत. पुणे शहरातील पाषाण भागात एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी २० लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. चोरट्यांनी समाजमाध्यमातील व्हिडिओ कॉल सुविधेचा वापर करत पोलिसांसारखा गणवेश परिधान केला होता. चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्याचा वापर दहशतवादी संघटनांना पैसे पुरवण्यासाठी, तसेच काळ्या पैशांच्या व्यवहारात झाल्याची बतावणी केली. या प्रकरणात अटक करण्यात येईल, अशी भीती दाखवून त्यांनी तातडीने बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर १८ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी २० लाख ६५ हजार रुपये जमा केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला. पोलीस निरीक्षक ननावरे या प्रकरणाचा तपास करत आहेत. गुंतवणुकीचे दाखवले आमिष दरम्यान, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीची २७ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. खडकीतील रेंजहिल्स परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी त्याला जाळ्यात ओढले आणि पैसे जमा करण्यास सांगितले. परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंग कदर तपास करत आहेत. याशिवाय, घरातून ऑनलाइन पद्धतीने काम (ऑनलाइन टास्क) करण्याची संधी देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका तरुणीची १२ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवून ऑनलाइन कामातून चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली.
महाराष्ट्राला लोककला आणि लोकनृत्याचा भक्कम पाया लाभला असून लोकनृत्य हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे, असे मत प्रसिध्द उद्योगपती आणि दी पूना गुजराती केळवणी मंडळाचे चेअरमन राजेश शहा यांनी व्यक्त केले. दी पूना गुजराती केळवणी मंडळाच्या ए.एस. डी.बी. दादावाला ज्युनिअर कॉलेजतर्फे आयोजित 'अभिजया' या आंतरशालेय आणि आंतरकनिष्ठ महाविद्यालयीन लोकनृत्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राजेश शहा यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातील १६ शाळा आणि १८ कनिष्ठ महाविद्यालयांचा प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी व्यासपीठावर दी पूना गुजराती केळवणी मंडळाचे व्हाईस चेअरमन जनक शहा, सचिव हेमंत मणियार, सहसचिव प्रमोद शहा, संदिप शहा, दिलीप जगड, विनोद देडीया आणि खजिनदार महेश धरोड उपस्थित होते. राजेश शहा म्हणाले की, लोककला या लोकसंस्कृतीचा गाभा असून याच लोककला वर्षानुवर्षे आपले वैचारीक आणि भावनीक भरणपोषण करीत आहेत. लोककला हा आपला ठेवा आहे. महाराष्ट्रात लोककलांनी केवळ मनोरंजन केले नाही, तर महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेचे प्रबोधन देखील केले. शासन देखील त्यांच्या योजना नागरिकांपर्यंक प्रभावी आणि परिणामकारकपणे पोहचिवण्यासाठी लोकसंकृती आणि लोककलांचाच आधार घेते. लोककला आणि लोकनृत्य हा आपला सांस्कृतिक चेहरा आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. स्पर्धेचे परीक्षक म्हणून जतीन माया पांडे आणि श्रद्धा मलय ठाकर यांनी काम पाहिले.या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्राचार्या अनुजा सेलोट आणि उपप्राचार्या उन्नती पढ यांच्या मार्गदर्शनाखाली अर्चना काळे, आरती देशपांडे यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे सूत्रसंचालन निलेश सरोटे आणि मेघा रानपुरा यांनी केले.
युद्ध आणि दहशतवाद कोणत्याही समस्येवर उपाय नाहीत. अहिंसा आणि विश्वशांतीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत प्रसिद्ध सिनेअभिनेते मुकेश खन्ना यांनी व्यक्त केले. एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे (कोथरूड, पुणे) आयोजित ३० व्या तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर व संत श्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च (आयसर) चे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू, यशदा आयएएस अकादमीचे संचालक रंगनाथ नाईकडे, डॉ. बी. एस. नागोबा, दूरदर्शनचे माजी कार्यकारी अधिकारी डॉ. मुकेश शर्मा, डॉ. मिलिंद पात्रे, डॉ. दिपेंद्र शर्मा, डॉ. भरत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. खन्ना पुढे म्हणाले की, आजची मुले देशाचे भविष्य आहेत, परंतु ती मोबाईलच्या आभासी जगात जास्त गुंतलेली दिसतात, ज्यामुळे ती अस्वस्थ आहेत. मुलांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर ठेवणे हे मोठे आव्हान आहे. यासाठी नैतिकतेची शिकवण देणारी संस्कृत शिक्षण व्यवस्था आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. रंगनाथ नाईकडे यांनी सांगितले की, संतांचे विचारच आज विश्वबंधुत्वाचे बीज रोवू शकतात. लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये संत साहित्य रुजवण्याची गरज आहे. योगा, मेडिटेशन आणि अध्यात्मामुळे आजची पिढी सक्षम होईल. विद्यार्थ्यांना उत्तुंग ध्येये गाठण्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षण देणे हाच योग्य उपाय असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. अरविंद नातू यांनी विज्ञान आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगितले. विज्ञान मानवी आरोग्यासाठी कृत्रिम उपचार देते, तर अध्यात्म मेडिटेशन, योगा आणि ध्यानधारणेद्वारे नैसर्गिक आरोग्य उपचार देते. सध्या लोकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले असून, सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अध्यात्म हाच एकमेव उपाय असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. डॉ. विश्वनाथ कराड यांनी सांगितले की, विश्वशांतीसाठी कार्यरत असलेल्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी ही व्याख्यानमाला दरवर्षी आयोजित केली जाते. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा जगाला जोडणारा विचार आजच्या विनाशकारी जगात आशेचा किरण आहे. केवळ विश्वमानवताच जगात शांती प्रस्थापित करू शकते, असे आवाहन त्यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आपल्या एका अंतरिम आदेशाद्वारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया आहे तशी सुरू ठेवण्याचा निर्वाळा दिला. पण त्याचवेळी ज्या ठिकाणी आरक्षणाची 50% ची कमाल मर्यादा ओलांडली गेली आहे, तेथील निकाल आपल्या अंतिम निकालाच्या अधिन राहतील असेही स्पष्ट केले. यामुळे या जागांवर निवडून येणाऱ्या उमेदवारांवर पद जाण्याची टांगती तलवार कायम राहणार आहे. कोर्ट या प्रकरणी 21 जानेवारीच्या पुढील सुनावणीत कायदेशीर स्थिती स्पष्ट करणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाद्वारे जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकांचे काय होईल? हे ही स्पष्ट् होणार आहे. चला तर मग पाहुया सुप्रीम कोर्टाच्या आदेशातील 5 महत्त्वाचे मुद्दे... 1) निवडणुका रोखता येणार नाहीत राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कारभार गृहीत धरून कामकाज करत आहे, अशी तक्रार सुनावणीवेळी ज्येष्ठ विधिज्ञ विकास सिंह यांनी कोर्टापुढे केली. त्यावर कोर्टाने अगोरच उशीर झालेल्या निवडणुका आणखी थांबवता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील निवडणूक कार्यक्रम पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच होईल हे स्पष्ट झाले आहे. 2) बांठिया आयोगाच्या अहवालावर विस्तृत भाष्य बांठिया आयोगाने जुलै 2022 मध्ये सादर केलेल्या आपल्या अहवालाद्वारे ओबीसींना सरसकट 27 आरक्षण देताना आरक्षणाची 50 टक्क्यांची कमाल मर्यादा ओलांडता कामा नये असे स्पष्ट केले होते. या मुद्यावर ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंग यांनी जोरदार आक्षेप घेतला. कशाच्या आधारावर संबंधित मतदारसंघातील ओबीसींची संख्या निश्चित केली? असा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला. त्यामुळे या प्रकरणी जानेवारी महिन्यात होणाऱ्या सुनावणीत बांठिया आयोगाच्या शिफारशींचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. कोर्टाने स्वतः तसे स्पष्ट केले आहे. ही सुनावणी 21 जानेवारी रोजी होईल. 3) 57 नगरपरिषदा व नगरपंचायतींवर टांगती तलवार सुप्रीम कोर्टाने सध्या सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया जैसे थे सुरू ठेवण्याची परवानगी दिली असली तरी त्यात एक महत्त्वाची अटही घातली आहे. ज्या नगरपरिषदा व नगरपंचायतीत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली आहे, त्या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून लागलेले निकाल हे जानेवारी महिन्यात होणाऱ्या सुनावणीतून येणाऱ्या निकालावर अवलंबून असतील, असे कोर्टाने नमूद केले आहे. अर्थात निकाल विरोधात गेल्यास या मतदारसंघातील निकाल रद्द होऊ शकतो. राज्यात अशा 40 नगरपरिषदा व 17 नगरपंचायती आहेत, जेथील आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांवर गेले आहे. 4) महापालिका निवडणुकांना अधिक विलंब नको सुप्रीम कोर्टाने आज महापालिका निवडणुकांची कोणत्याही विलंबाशिवाय घोषणा करण्याचेही निर्देश दिलेत. राज्यातील एकूण महापालिकांपैकी केवळ 2 महापालिकांत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात आहे. कोर्टाने तेथील आरक्षणाची सोडत व आरक्षणाची मर्यादा यासंबंधी फेरविचार करण्याचे निर्देश दिलेत. त्यानंतरही काही ठिकाणी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली तर तेथील निकालही प्रस्तुत न्यायालयाच्या जानेवारी महिन्यातील सुनावणीच्या आदेशांवर अवलंबून असतील. 5) झेडपी अन् पंचायत समित्यांचे काय? कोर्टाने ज्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्या आत आहे, त्या ठिकाणी यापूर्वीच्या निर्देशांनुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिलेत. म्हणजे, ज्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची 50 टक्क्यांची कमाल मर्यादा ओलांडली गेली असेल, तिथे आरक्षण सोडतीबाबत निवडणूक आयोगाला पुन्हा काम करावे लागण्याची शक्यता आहे. याऊपरही इथे आरक्षण मर्यादा ओलांडली गेली असेल तर तेथील निकालही वरील प्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या जानेवारी महिन्यातील सुनावणीतून बाहेर येणाऱ्या निकालावर अवलंबून असतील. आत्ता पाहू बांठिया आयोगाच्या शिफारशीमुळे काय आली अडचण? सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीत बांठिया आयोगाच्या शिफारशींचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला. या आयोगाच्या शिफारशीनुसार, ओबीसींना 27 टक्के आरक्षण देताना कुठेही 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाणार नाही याची काळजी घेणे बंधनकारक आहे. पण ओबीसींना लागू केलेल्या सरसकट 27 आरक्षणासह मराठा आरक्षण व इतर समाजांच्या आरक्षणामुळे काही ठिकाणी एकूण आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवर पोहोचली आहे. यामुळे येथील निकाल न्यायालयाच्या अंतिम निकालावर आधारित असणार आहेत.
अफगाणी नागरिकांना अमेरिकेत बंदी
वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे सरकारी निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या व्हाइट हाऊसजवळ झालेल्या गोळीबाराच्या घटनेने डोनाल्ड ट्रम्प संतापले आहेत. या घटनेनंतर त्यांनी पुन्हा एकदा स्थलांतरीतांबाबत कठोर भूमिका मांडली आहे. या गोळीबारात जखमी दोन नॅशनल गार्ड जवानांपैकी एकाचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प प्रशासन थर्ड वर्ल्ड देशांमधून येणारे सर्व स्थलांतर कायमचे थांबवण्याच्या दिशेने काम करत आहे, असे त्यांनी घोषित […] The post अफगाणी नागरिकांना अमेरिकेत बंदी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
देशातील एमबीबीएस जागांमध्ये महाराष्ट्राचा १० टक्के वाटा
नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र आघाडीचे राज्य म्हणून उदयास आले आहे. राज्यातील एकूण वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ८० आणि एमबीबीएसच्या जागांची संख्या ११,८४६ पर्यंत पोहोचली आहे. उत्तर प्रदेशात ८५ वैद्यकीय महाविद्यालये असून, एमबीबीएसच्या १२,४७५ जागा आहेत. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्राने आघाडी घेतली असून देशातील एमबीबीएस जागांमध्ये महाराष्ट्राचा १० टक्के वाटा असून आता […] The post देशातील एमबीबीएस जागांमध्ये महाराष्ट्राचा १० टक्के वाटा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी आणि सरकारी नोंदणीकृत चॅरिटेबल ट्रस्ट ‘मिशन स्माईल’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुभंगलेले ओठ व टाळू या जन्मजात विकृतींवर विनामूल्य शस्त्रक्रिया व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर ५ ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत पार पडेल. या तीन दिवसीय शिबिरात नवीन तसेच पूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची तपासणी, पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, स्पीच थेरपी मार्गदर्शन, औषधोपचार, रुग्णालयातील मुक्काम आणि दोन वेळचे जेवण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. तपासणी ५ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून बाह्यरुग्ण विभाग क्रमांक ५ ए, प्लास्टिक सर्जरी विभागात सुरू होईल. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांनी सांगितले की, “आमचा उद्देश प्रत्येक क्लेफ्टग्रस्त बालकाला जागतिक दर्जाची सेवा देणे हा आहे. विशेषतः ज्यांना आर्थिकदृष्ट्या आरोग्यसेवा परवडत नाही, अशा कुटुंबांना आम्ही जीवन बदलणारी मदत करू इच्छितो.” तर विद्यापीठाचे विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील म्हणाले, “या शस्त्रक्रियेमुळे केवळ चेहऱ्यावरील हास्य परत येत नाही, तर बोलणे, खाणे, श्वास घेणे आणि आत्मविश्वासाने जगणे शक्य होते. बालकांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या ध्येयाला हे शिबिर बळकटी देईल. मिशन स्माईलच्या सहकार्यामुळे गरजू बालकांना प्रगत पुनर्रचनात्मक उपचार सहज उपलब्ध होतील.” जास्तीत जास्त रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. संपर्कासाठी रुग्ण कुटुंबीय थेट रुग्णालयात येऊ शकतात किंवा प्लास्टिक सर्जरी विभागाशी संपर्क साधू शकतात.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आक्रमक भूमिका पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळणार आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत सोमवारपासून पुन्हा सक्रिय राजकीय मोहीम उभारणार असून, सकाळी माध्यमांसमोर येऊन ते महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहेत. आजारपणामुळे काही दिवस शांत राहिल्यानंतर राऊत पुन्हा मैदानात उतरत असल्याने विरोधकांसाठी ही धडकी भरवणारी बाब ठरणार आहे. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, आचारसंहिता आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा तुफान सुरू आहे. अशा परिस्थितीत संजय राऊत यांच्या पुनरागमनाने शिवसेना ठाकरे गटाचा आवाज अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वावर हल्ले, सत्ताधाऱ्यांवर टीका आणि शिंदे गटाला चोख प्रत्युत्तर देण्याची संजय राऊत यांची स्टाईल पुन्हा एकदा पहायला मिळेल, अशी पक्षातील सूत्रांची माहिती आहे. राऊत नेहमीप्रमाणे सरकारवरील टीकेत कोणतीही कुचराई करणार नाहीत, हे निश्चित. त्यामुळे सोमवारी सकाळपासूनच राजकीय चर्चांना पेट बसणार हेही तितकेच स्पष्ट आहे. त्यांच्या वक्तव्यांवर सत्ताधारी शिंदे-फडणवीस-शिंदे सरकार कशी प्रतिक्रिया देईल? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये राऊतांची भूमिका पुन्हा किती धारदार राहते, हे आगामी दिवसांत समोर येईल. उद्धव ठाकरे यांनी घेतली होती भेट शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच संजय राऊत यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी भांडूप येथील त्यांच्या घरी भेट दिली होती. राऊत यांची तब्येत मागील काही दिवसांपासून बिघडलेली असल्याने त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांपासून अंतर ठेवले आहे. मात्र, या भेटीत राऊत यांचा उत्साह पाहून उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी विनोदी शैलीत सांगितले होते की, आता मी राऊतांना रोज फोन न करता त्यांच्या भावालाच त्यांची खबरबात घेण्यासाठी त्रास देतो. त्यांनी पुढे सांगितले की राऊत आता प्रकृतीच्या अडचणीतून सावरत असून त्यांचे पुनरागमन लवकरच होणार आहे. फक्त परत येणार नाहीत, तर पूर्वीपेक्षा अधिक जोमाने राजकीय रणांगणात उतरणार, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला होता. संजय लवकरच पुन्हा मैदानात दिसतील… आणि या वेळी हातात तलवार घेऊन, अशा शब्दांत त्यांनी राऊतांच्या लढाऊ वृत्तीवर उद्धव ठाकरे यांनी मोहोर मारली होती. ठाकरे यांच्या या विधानामुळे शिवसेना-ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले होते राज्यातील राजकारणात नेहमीच ठाम भूमिका घेणारे आणि आपली भूमिका स्पष्टपणे मांडणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या गंभीर समस्यांमुळे घराबाहेर निघू शकले नाहीत. वैद्यकीय तपासणीत त्यांना गंभीर प्रकारचा आजार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले होते. त्यामुळे 31 ऑक्टोबरपासून त्यांनी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना ब्रेक दिला होता. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास त्यांच्या भांडूप येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची सविस्तर विचारपूस केली होती.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी शिवसेना व भाजपमधील राजकीय कटूता वाढल्याचे चित्र आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्याला कोणत्याही स्थितीत 2 डिसेंबरपर्यंत महायुती टिकवायची आहे असे विधान केल्यानंतर आता मंत्री गणेश नाईक यांनीही शिवसेनाला ढकलण्यासंबंधीचे विधान केले आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीत 2 डिसेंबरनंतर फूट पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसेना आमदार नीलेश राणे यांनी बुधवारी भाजपचे मालवण स्थित पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या घरी धाड टाकली होती. त्यात त्यांच्या हाती पैशाची थैली लागली होती. हा पैसा भाजपने मतदारांना वाटण्यासाठी आणल्याचा आरोप त्यांनी केला होता. पत्रकारांनी याविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना छेडले असता त्यांनी आपल्याला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे असे नमूद करत त्यावर भाष्य करणे टाळले. मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. त्यानंतर मी नीलेश राणे यांना उत्तर देईन. मी आता त्यावर काहीही बोलणार नाही. नंतर बोलेन. पण नीलेश राणे जे बोलत आहेत ते खोटे आहे, असे ते म्हणाले. श्रीकांत शिंदे यांची खोचक प्रतिक्रिया त्यांच्या या विधानानंतर सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मित्रपक्षांना एकमेकांविषयी बोलताना तारतम्य बाळगण्याचा सल्ला दिला. मित्र पक्षांनी एकमेकांविषयी बोलताना तारतम्य बाळगले पाहिजे. एकमेकांविषयीची आचारसंहिता पाळली पाहिजे. आमची केंद्रात व राज्यातही युती आहे. एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच प्रचारात एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका न करण्याचा सल्ला दिला आहे. आत्ता रवींद्र चव्हाण काय म्हणाले हे मला माहिती नाही. पण ते असे बोलले असतील तर पुढेही युती टिकवायची आहे का? असे ते म्हणाले. आत्ता भाजपचे मंत्री गणेश नाईक काय म्हणाले? भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनीही या वादावर सूचक विधान केले आहे. ते म्हणाले, रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते बोलण्याच्या ओखात चुकून बोलले असतील. त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आम्हाला राज्यातील जनतेचा विकास करायचा आहे. जनतेची कामे करताना भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. गाडीत बसताना अडचण झाली तरी आम्ही अॅडजेस्ट करू. पण उद्या तुम्ही आम्हाला ढकलणार असाल तर आम्हीही पुढे कोण कुणाला ढकलते ते पाहू, असे ते म्हणालेत. गणेश नाईक यांच्या या विधानामु्ळे महायुतीत सर्वकाही ठिकठाक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. युती कायम राहील - एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रवींद्र चव्हाण यांच्या विधानावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. आमची युती फार पूर्वीच स्व. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी साहेबांनी केली होती. ही युती विचारधारेवर झालेली होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएचे सरकार कार्यरत आहे. आमची युती फार पूर्वीपासूनच एका विचारावर काम करत आहे. ही युती कायम राहील, असे ते म्हणालेत. हे ही वाचा... संसदेत वंदे मातरम म्हणण्यावर बंदी:केंद्राने अधिसूचना जारी केल्याचा उद्धव ठाकरे यांचा दावा; म्हणाले - भाजपच्या तोंडात राम काखेत अदानी मुंबई - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने संसद भवनात वंदे मातरम म्हणण्यावर बंदी घातल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. सरकारने संसदेत वंदे मातरम म्हणण्यास मनाई करणारी अधिसूचना जारी केली आहे. ही काय गोष्ट आहे? यामागे कुणाचे डोके आहे? माझे खासदार संसदेत जाऊन वंदे मातरम म्हणतील. भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्यांना बाहेर काढून दाखवावे, असे ते म्हणाले. भाजपचे हिंदुत्त्व ढोंगी आहे. त्यांच्या तोंडात राम व काखेत अदानी आहेत, असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. वाचा सविस्तर
मंत्री शिरसाट गोत्यात; ४५०० कोटींचा जमीन घोटाळा?
मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना संजय शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष होते. त्यांनी तब्बल पाच हजार कोटीची जमीन यशवंत बिवलकर यांना नाममत्रात दिली. या व्यवहारात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. या प्रकरणी कोर्टात धाव घेण्यात आली होती. दरम्यान, या कथित घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे. कोकण […] The post मंत्री शिरसाट गोत्यात; ४५०० कोटींचा जमीन घोटाळा? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्यात राज्य सरकार बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी एक वर्ष निवडणूक पुढे ढकला मात्र ओबीसींचे आरक्षण कमी केलेले आम्हाला चालणार नाही असे […] The post शासन, निवडणूक आयोग बेजबाबदार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
१ डिसेंबर रात्री १० पर्यंत प्रचाराला परवानगी
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांसाठी आनंदाची बातमी दिली असून आयोगाच्या नवीन आदेशानुसार, २ डिसेंबरला होणा-या मतदानापूर्वी म्हणजेच सोमवार दि. १ डिसेंबर रात्री १० वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. यापूर्वीच्या नियमांनुसार मतदानाच्या दिवशी आणि त्याआधीच्या २४ तासांमध्ये सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकांचा वापर तसेच निवडणूक जाहिरात प्रसारणावर पूर्ण निर्बंध असायचे. परंतु, नव्या […] The post १ डिसेंबर रात्री १० पर्यंत प्रचाराला परवानगी appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
महाराष्ट्राच्या प्रशासकीय नेतृत्वात मोठा बदल होत असून वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल यांची राज्याच्या नव्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात येत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या मागणीनुसार त्यांना केंद्रातील कामकाजातून राज्याकडे परत पाठवले असून आता ते राज्य प्रशासनातील सर्वात वरिष्ठ अधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील. सध्याचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा यांची मुदत 30 नोव्हेंबरला संपत आहे आणि त्यानंतर अग्रवाल ही जबाबदारी सांभाळतील अशी अधिकृत माहिती समोर आली आहे. राजेश अग्रवाल हे 1989 च्या तुकडीतील आयएएस अधिकारी असून तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचे विशेष कौशल्य ओळखले जाते. आयआयटी दिल्ली येथून संगणक अभियांत्रिकीतील बी.टेक. पदवी मिळविल्यानंतर ते प्रशासनात दाखल झाले. राज्यात त्यांनी अकोला व जळगावचे जिल्हाधिकारी, तसेच मुंबई महापालिकेत उपआयुक्त म्हणून काम पाहिले आहे. राज्याच्या अर्थ व आयटी विभागात त्यांनी महत्त्वपूर्ण सुधारणा राबवल्या. याच अनुभवाच्या जोरावर केंद्रातही त्यांनी अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय योजनांमध्ये योगदान दिले आहे. केंद्रात तैनात असताना अग्रवाल यांनी आधार, जनधन योजना, डिजिलॉकर, सामाजिक न्याय विषयक डिजिटल उपक्रम अशा प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कामामुळे देशातील डिजिटल प्रशासनाला गती मिळाली. सध्या ते सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अपंग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांचे राज्यात पुनरागमन होताच ते मुख्य सचिवपदाचे स्वाभाविक दावेदार ठरले. राजेश अग्रवाल 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत सेवेत राहणार महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत मुख्य सचिवपदावर अल्पकाळासाठी नियुक्त्या होत असल्याचे चित्र दिसले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवृत्ती मुदती आणि प्रशासनातील वरिष्ठतेचे समीकरण यामुळे हे पद वारंवार बदलत गेले. पण राजेश अग्रवाल 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत सेवेत राहणार असल्याने त्यांना जवळपास एक वर्षाहून अधिक कार्यकाल मिळेल. त्यामुळे दीर्घकालीन योजना राबविण्यास आणि राज्य प्रशासनाला स्थैर्य देण्यास त्यांचा कार्यकाळ उपयुक्त ठरेल, असे सूत्रांचे मत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची संधी कमी झाली या नियुक्तीमुळे अतिरिक्त मुख्य सचिव (गृहमंत्री) आई. एस. चहल यांची मुख्य सचिव होण्याची संधी पुन्हा हुकली आहे. चहल हे देखील 1989 बॅचचे अधिकारी असून यापूर्वीही मीणा यांना मुदतवाढ मिळाल्याने ते या पदापासून दूर राहिले होते. आता अग्रवाल यांना प्राधान्य देण्यात आल्याने चहल तसेच भूषण गगरानी, अनिल डिग्गीकर, दीपक कपूर, ओपी गुप्ता यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही संधी कमी झाली आहे, कारण त्यांची निवृत्ती अग्रवाल यांच्या आधी होणार आहे. भविष्यकालीन विकासाचा पाया राजकीयदृष्ट्या पाहता, राज्यात प्रशासनाचा कणा मजबूत करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्याची गरज भासते. अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवर केंद्राशी समन्वय, गुंतवणूक वाढविणे, पायाभूत सुविधा, शेतकरी कल्याण, अर्थव्यवस्था हे सर्व विषय मुख्य सचिवांच्या कार्यात येतात. त्यामुळे या नियुक्तीकडे भविष्यकालीन विकासाचा पाया म्हणून पाहिले जात आहे. राज्य सरकारमध्ये काही निर्णयांबाबत जलदगतीने काम करण्याची गरज व्यक्त केली जात असताना अग्रवाल तंत्रज्ञान आणि प्रशासनाचा ताळमेळ चांगला साधत असल्याने अपेक्षा अधिक आहेत. महाराष्ट्राच्या प्रशासकीय नेतृत्वात नव्या युगाची सुरुवात म्हणून त्यांच्या नियुक्तीकडे पाहिले जात आहे. राज्य सरकार, उद्योग क्षेत्र, आयटी तज्ञ आणि सामान्य नागरिक यांचेही त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आता पुढील काही महिन्यांत ते कोणत्या प्राधान्याने निर्णय घेतात, यावरच त्यांच्या कार्यकाळाची दिशा आणि वेग अवलंबून राहणार आहे.
विरोधकांना थेट कापून टाकण्याची मानसिकता येते कुठून?
नागपूर : राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचाराला त्याचबरोबर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. महायुतीत एकत्रित असलेले मित्रपक्ष या निवडणुकांमध्ये प्रचार सभेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. मात्र, अशातच प्रचार सभेत भाजप नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. कळमेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचार सभेत बोलताना भाजप नेते आशिष देशमुखांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्याची […] The post विरोधकांना थेट कापून टाकण्याची मानसिकता येते कुठून? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
व-हाडी कवी मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन
अमरावती : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन झाले. शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी फातेमा मिर्झा, मुलगा रमीज आणि महाजबी, हुमा या दोन कन्या असा परिवार आहे. दुपारनंतर अमरावतीमधल्या ईदगाह कब्रस्तानमध्ये दफनविधी होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील […] The post व-हाडी कवी मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुंबई : गेल्या १५ दिवसांपासून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात मोठी धुसफूस सुरू आहे. शिंदे सेनेतील उमेदवारच भाजपने पळवल्याने शिंदे नाराज झाले होते. त्यांची दिल्लीवारी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी त्यावरच भेट झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान राजकारणाच्या या खेळात महायुतीत भगदाड पडल्या सारखे दिसून येत असून महायुतीतल्या मित्र पक्षाच्या नेत्यांकडून […] The post महायुतीला भगदाड? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांच्या वक्तव्यातून व वागणुकीत सत्तेचा माज व दर्प दिसून येत असल्याचा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केवळ पैशांचा धूर निघत आहे. सगळीकडे पैशांचे वाटप किंवा पैशाचा पाऊस अथवा पैशांची अतिवृष्टी भयानक पद्धतीने सुरू आहे. सरकार जनतेशी बोलत नाही. फक्त जिथे जात आहे तिथे पैशांच्या थैल्या उधळून मते मागत आहे, असे ते म्हणालेत.एकप्रकारचा सत्तेचा माज व सत्तेचा दर्प या सर्व राजकर्त्यांच्या वक्तव्यातून व त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहत आहे. उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले, राज्यात सध्या निवडणुकांचे वातावरण आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह त्यांचे सर्वच सरकार प्रचारासाठी फिरत आहेत. गावोगावी किंवा जिथे कुठे निवडणूक आहे, तिथे जाऊन मते मागत आहेत. या निवडणुकीत केवळ पैशांचा धूर निघताना दिसत आहे. पैशांचे वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही महाराष्ट्रात भयानक पद्धतीने सुरू आहे. एकप्रकारचा सत्तेचा माज व सत्तेचा दर्प या सर्व राजकर्त्यांच्या वक्तव्यातून व त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहत आहे. मी 8-10 दिवसांपूर्वी मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसलो होतो. त्यांच्या वेदना, व्यथा समजून प्रयत्न केला. त्यांना धीर दिला. त्यानुसार एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसत नाही. नागरिकांशी बोलत नाही. फक्त जिथे जातात तिथे पैशांच्या थैल्या उधळून मते मागितली जात आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना शिवसेना ठाकरे गटात अचानक मोठा राजकीय कल्लोळ निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार न करता थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. चिपळूणमधील या वादाचे मूळ काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघटनात्मक मतभेदांमध्ये असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे […] The post कोकणात भास्कर जाधवांचे बंड appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत पात्र मतदारांना मतदान करता यावे याकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगरपरिषद व नगरपचांयतीच्या मतदार संघात सुट्टी असणार आहे. मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना मतदारांना देखील लागू राहणार आहे. केंद्र शासनाच्या शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींना सार्वजनिक सुट्टी लागू राहील, येत्या 2 डिसेंबर रोजी पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन डुडी यांनी केले आहे. १ डिसेंबरपर्यंत प्रचार करता येणार राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडुकीकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान सुरु होणार असून प्रचार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता बंद करण्यात यावे ; प्रचार बंद झाल्याच्या वेळेपासून सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही तसेच निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात प्रसिध्दी, प्रसारण देखील बंद करावे. जिल्ह्यातील उमेदवारांनी आयोगाच्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
भारताच्या लोकशाही प्रणालीत प्रत्येकाला आपल्या धर्माचे स्वातंत्र्य असले तरी, कोणतेही सरकार कोणत्याही एका धर्माचा प्रचार-प्रसार करू शकत नाही. हे घटनाबाह्य कृत्य असून, गेल्या १५-२० वर्षांत ब्राह्मणी विचारधारेची पुनर्मांडणी होत आहे, हे संविधानविरोधी कृत्य आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. पुणे येथे 'समता पुरस्कार' स्वीकारताना ते बोलत होते. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या १३५ व्या पुण्यतिथीनिमित्त हा 'समता पुरस्कार' डॉ. सुखदेव थोरात यांना प्रदान करण्यात आला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा हा पुरस्कार खासदार उपेंद्र कुशवाहा यांच्या हस्ते देण्यात आला. या पुरस्कारात एक लाख रुपये रोख, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी आणि समता दिनानिमित्त पुणे येथील समता भूमी, फुले वाडा येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर बाळासाहेब शिवरकर, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष पंकज भुजबळ, समीर भुजबळ, लक्ष्मण हाके, रूपाली चाकणकर, डॉ. शेफाली समीर भुजबळ, विशाखा भुजबळ, बापूसाहेब भुजबळ, प्रीतेश गवळी, पंढरीनाथ बनकर, मंजिरी धाडगे आणि वैष्णवी सातव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. थोरात पुढे म्हणाले की, ज्या महाराष्ट्रात जातीव्यवस्थेविरोधात कुणबी समाजाने मोठी चळवळ उभी केली, त्याच समाजातील काही घटकांचा बुद्धीभ्रम झाल्याने ते ब्राह्मणी विचारधारेला हातभार लावत आहेत. महात्मा फुले यांच्या काळातील जातीव्यवस्था, स्त्रियांचे दमन, अस्पृश्यता, विधवा पुनर्विवाह आणि आर्थिक शोषण यांसारखे प्रश्न आजही ग्रामीण व शहरी भागात वेगवेगळ्या स्वरूपात आव्हान म्हणून उभे आहेत. शिक्षण आणि विकासाच्या समान संधींपासून समाजातील काही घटकांना जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे. स्वातंत्र्य, बंधुता आणि समता या त्रिसूत्रीवर आधारित घटनेची पायमल्ली होत असून धार्मिक अवडंबर आणि कर्मकांड वाढत आहे. सरकार आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी धर्माचा उघडपणे प्रचार-प्रसार करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. महात्मा फुले यांनी अपेक्षित केलेले परिवर्तन आजही आवाक्यात नाही, त्यामुळे त्यांची शिकवण आणि विचार प्रत्यक्ष कृतीत आणणे गरजेचे आहे, असे आवाहन डॉ. थोरात यांनी केले. खासदार उपेंद्र कुशवाहा म्हणाले की, महात्मा फुले हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्यांना गुरूस्थानी मानत होते. महात्मा फुले यांना अपेक्षित असलेले समाज परिवर्तन प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेची रचना केली.परंतु, नोकरशाहीने राज्यघटनेची योग्य अंमलबजावणी न केल्यामुळे समाजातील काही घटक त्यांच्या अधिकारांपासून आजही वंचित आहेत. . संसद, नोकरशाही आणि न्यायव्यवस्था अशा तीन स्तरांवर सरकारचे अस्तित्व जाणवत असते. या तिन्हीपैकी एकाही व्यवस्थेने त्यांच्या कर्तव्यात कुसूर केल्यास समाजातील शोषित, वंचित आणि दुर्लक्षित घटक न्यायापासून दूर राहतो सर्वोच्च आणि उच्च न्यायलयांमध्ये होणाऱ्या न्यायधीशांची नेमणूक असंविधानिक असून चोर दरवाजातून प्रवेश करून न्यायाधीश आपल्या खुर्चीत जाऊन बसत आहेत. न्यायालयातीलच एक समुह मक्तेदारी पध्दतीने कोण न्यायाधीश होणार, हे ठरवतो. मोजक्या लोकांच्या हातात असलेली ही निवडपध्दती रद्द करून आयएएस आणि आयपीएस यांची निवड ज्या प्रकारे स्पर्धा परिक्षेव्दारे आणि पात्रतेनुसार होते, त्याच पध्दतीने सर्वोच्च आणि उच्च न्यायलयांमधील न्यायधीशांची निवड झाली पाहिजे. हे जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत सामाजिक न्याय साध्य होणार नाही आणि आम्ही त्याचे बळी पडत राहू.
पुणे: दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी संकलित केलेला २५ लाख रुपयांचा निधी विद्यार्थी साहाय्यक समितीकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी, चांगल्या कामासाठी मदत मागण्यास लाजू नका, दानशूर व्यक्ती सढळ हाताने मदत करतात, असे प्रतिपादन केले. समितीच्या १३०० विद्यार्थ्यांनी आपल्या गावी आणि परिसरातून हा निधी जमा केला. संस्थेच्या आपटे वसतिगृहातील मोडक सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात हा निधी समितीकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, कायम विश्वस्त तुकाराम गायकवाड, सहाय्य संकलन उपसमितीचे अध्यक्ष प्रदीप मांडके, वसतिगृह उपसमिती अध्यक्ष दिनकर वैद्य, मुख्य विकास अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी आणि मुख्य कार्यपालन अधिकारी दुर्गेश पवार उपस्थित होते. डॉ. मोरे म्हणाले की, निधी संकलन हा सामाजिक अभिसरणाचा महत्त्वाचा भाग आहे. संस्थेच्या कार्याला पुढे नेणारा हा उपक्रम कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो. निर्मळ मनाने मागितलेली मदत देणारे दानशूर समाजात मोठ्या संख्येने आहेत. डेक्कन कॉलेज, गोखले इन्स्टिट्यूट, भारत इतिहास संशोधक मंडळ आणि भांडारकर इन्स्टिट्यूट यांसारख्या समाज घडवणाऱ्या संस्थांप्रमाणेच विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्य आहे. या संस्था महाराष्ट्राचे भूषण आहेत. विद्यार्थी साहाय्यक समिती शिक्षण, संस्कार आणि सामाजिक संवेदनशीलता रुजवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधते. महाराष्ट्रातील लोक चांगल्या कामासाठी नेहमीच सढळ हाताने मदत करतात, आपले काम तळमळीने आणि प्रामाणिकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवे. तुषार रंजनकर यांनी सांगितले की, हा उपक्रम गेल्या ४० वर्षांपासून सुरू आहे. समितीचे कार्य गावागावात पोहोचावे आणि निधी संकलन व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव अधिक दृढ करतो. देणारे हात असंख्य आहेत, आपण फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. प्रदीप मांडके यांनी स्पष्ट केले की, मुलांमध्ये निधी संकलनाचा संस्कार रुजावा आणि त्यांच्यात सामाजिक कार्याची भावना निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान वीस लोकांना भेटून प्रत्येकी शंभर रुपये संकलित करावेत, अशी अपेक्षा असते. यातून विद्यार्थ्यांमध्ये संस्थेप्रती आदराची भावना तयार होते.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राज्यात राबवण्यासाठी फडणवीस सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे. पुढील पाच वर्षे हे अभियान राबविले जाणार असून, महाराष्ट्राला कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर करण्याचा हा मोठा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना कडधान्याचे उत्पादन वाढवता यावे, आयातीवरील अवलंबित्व कमी व्हावे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी हा या उपक्रमामागचा उद्देश. या अभियानामुळे राज्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत बियाणे उत्पादन आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या बियाणांच्या खरेदीसाठी 100 टक्के मदत केंद्र सरकार करणार आहे. तर इतर शेतीविषयक उपाययोजनांसाठी केंद्र 60 टक्के आणि राज्य 40 टक्के निधी देणार आहे. विशेष म्हणजे अभियानाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी राज्य शासनाने प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या निधीचे वितरण आणि योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कृषी विभागाकडे देण्यात आली आहे. केंद्राने 2025-26 ते 2030-31 या कालावधीसाठी देशभर हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी एकूण 11,440 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांची निवड या योजनेसाठी झाली असून, तूर, हरभरा, उडीद, मूग आदी कडधान्यांच्या उत्पादन क्षेत्रात वाढ करण्याचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना योग्य बियाणे, मार्गदर्शन, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ यांचा लाभ मिळावा यासाठी विविध योजना यामधून राबवल्या जाणार आहेत. महिला शेतकरी आणि समाजातील मागास घटकांना प्राधान्य केंद्र शासनाने राज्याला दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार महिला शेतकरी आणि समाजातील मागास घटकांना प्राधान्य दिले जाणार आहे. कडधान्य उत्पादनात हे घटक मोठ्या प्रमाणात सहभागी असतात, त्यामुळे त्यांना तांत्रिक प्रशिक्षणे, प्रोत्साहन आणि आर्थिक सहाय्य मिळाल्यास कुटुंबाची आर्थिक प्रगती अधिक वेगाने होईल, असा सरकारचा विश्वास आहे. तसेच, जिल्हानिहाय कृती आराखडा तयार करून अभियानाचे नियमित निरीक्षण केले जाईल. महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात मोठा बदल घडेल, उत्पादन वाढेल कडधान्य आयात कमी करून देशाला आत्मनिर्भर करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. तूर आणि हरभरा यांसारख्या कडधान्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असल्याने दर चढ-उतार आणि टंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकरी स्वतःच मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू लागले, तर बाजारपेठही स्थिर राहील आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकेल. या अभियानामुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात मोठा बदल घडेल, उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मराठी भाषेवरून होणारे राजकारण व तिच्या सक्तीसाठी केली जाणारी मारहाण हे दोन्ही प्रकार अत्यंत चुकीचे आहेत, असे परखड मत मत बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने व्यक्त केले आहे. मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, असेही तो यावेळी म्हणाला. मुंबई व महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी वादात काही परप्रांतीयांना मारहाण करण्याच्या घटना घडल्या होत्या. राज्य सरकारने प्राथमिक शिक्षणात हिंदीची सक्ती केल्यामुळे हे प्रकार घडले होते. सहसा सिनेसृष्टीतील अभिनेते मंडळी अशा वादांवर बोलत नाहीत. ते स्वतःला त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण सुनील शेट्टीने एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना या वादावर परखड मत व्यक्त करून राजकारण्यांना आरसा दाखवण्याचे काम केले. 'मराठी भाषेवरून होणारे राजकारण व तिच्या सक्तीसाठी होणारा हिंसाचार अत्यंत चुकीचा आहे. पण मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे,' असे तो म्हणाला. त्याच्या या विधानाची राज्याच्या राजकारणासह सिनेसृष्टीत खमंग चर्चा रंगली आहे. राजकीय व बॉलिवूड पार्ट्यांपासून राखले अंतर सुनील शेट्टीने यावेळी आपण राजकीय व बॉलिवूडच्या पार्ट्यांपासून स्वतःला दूर ठेवल्याचेही स्पष्ट् केले. तो म्हणाला, मी आजही पॉलिटिकल व बॉलिवूड पार्ट्यांपासून स्वतःला दूर ठेवले आहे. मी नेहमीच त्यापासून दूर राहतो. काही राजकीय व्यक्ती माझे आदर्श आहेत. मी चित्रपटसृष्टीत प्रवेश करतानाच ठरवले होते की, मी आधी लग्न करेन आणि मग चित्रपट करेन. कारण, मला माझ्या पार्टनरला असुरक्षित वाटू द्यायचे नव्हते. तुम्ही पाहा, एखाद्या सेलिब्रेटीच्या कुटुंबात त्यांच्या पार्टनर्सना नेहमीच असुरक्षित वाटते. त्यांनी कितीही नाही म्हटले तरी ती भावना कुठे ना कुठे तरी असतेच. कारण, हिरो बाहेर असतात. त्यांच्यासोबत ग्लॅमर असते. आसपास सुंदर मुली असतात. अशी असुरक्षितता मला माझ्या पार्टनरला द्यायची नव्हती. त्यावेळी मला अनेकांनी असे काहीही नसते असे सांगितले. लग्नानंतर बॉक्स ऑफिसवर परिणाम होतो, पण मला आजवरच्या कामात कळले की, तुमच्याकडे कॉन्टॅक्ट असेल तरच बॉक्स ऑफिसवर परिणाम होतो. स्मृती मंधाना कठीण काळातून जात आहे सुनील शेट्टीने यावेळी महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना कठीण काळातून जात असल्याचेही सांगितले. तो म्हणाला. स्मृती सध्या तिच्या आयुष्यातल्या सर्वात कठीण काळातून जात आहे. मी नुकताच जेमीमाची एक मुलाखत पाहिली. त्यात तिने सांगितले की, मी लग्नासाठी काही दिवस सुट्टी घेऊन आले होते. मला पुन्हा क्रिकेट खेळायला जायचे होते. पण इथे स्मृतीला पाहून ठरवले की, मी जाणार नाही. तिने तिच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. याला फक्त मैत्री नाही, तर बंधूभाव म्हणतात. भारताने विश्वचषक याच बंधूभावामु्ळे जिंकला. अशी नाती फार कमी मिळतात. पण असे कुणी मिळाले तर त्याला जपणे फार गरजेचे असते.
पैसे घे.. निधी घे..हे धोरण घातक
बारामती : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने महायुतीच्या नेत्यांमध्ये मते मागताना निधी देण्यासाठी जी काही चढाओढ चालली आहे.. पैसे घे.. निधी घे.. हे काही चांगले नाही. अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टीकोन असेल तर त्यावर भाष्य न केलेलं बरं, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला आहे. ज्येष्ठ नेते पवार […] The post पैसे घे.. निधी घे..हे धोरण घातक appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
तोतया आयएएस महिला अधिका-याचे दिल्लीत होते वास्तव्य
छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी देशाला हादरवून टाकलेल्या दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोटादरम्यान शहरातील तोतया आयएएस महिला अधिकारी कल्पना भागवत हिचेदेखील दिल्लीत वास्तव्य असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच दरम्यान, तिच्या मोबाइलमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया व बांग्लादेशच्या व्यक्तींच्या नावे क्रमांक सेव्ह असल्याचे नव्याने समोर आले. केंद्रीय तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचे केंद्रीय गुप्तचर खात्यातील वरिष्ठ […] The post तोतया आयएएस महिला अधिका-याचे दिल्लीत होते वास्तव्य appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
रांची : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारतीय संघाला कसोटी मालिकेत २-० ने पराभूत व्हावे लागले. त्यानंतर आता ३० नोव्हेंबरपासून वनडे मालिकेला सुरूवात होणार आहे. पहिला सामना रांचीच्या मैदानावर आहे. या मालिकेसाठी संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली रांचीमध्ये दाखल झाला. त्याने सरावही केला. त्यानंतर विराट आणि इतर भारतीय खेळाडूंनी महेंद्रसिंग धोनीच्या रांची येथील आलिशान घरी डिनर पार्टीसाठी हजेरी […] The post विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
१७ वर्षांनी लहान हिरे व्यापा-याच्या प्रेमात पडली मलायका अरोरा
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन मलायका अरोरा तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांमध्ये कायम उत्सुकता असते. मलायका आणि अर्जुन कपूरसोबतचं रिलेशनशीप चांगलंच गाजलं होतं. अर्जुन आणि मलायका यांचे एकमेकांना डेट करतानाचे फोटोही चांगलेच व्हायरल झाले होते. दोघे लग्न करणार अशा चर्चा सरू […] The post १७ वर्षांनी लहान हिरे व्यापा-याच्या प्रेमात पडली मलायका अरोरा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
भद्रावती नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना मतदारांच्या, विशेषतः महिलांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले आहे. गवराळा भागात प्रचारासाठी गेलेल्या धानोरकर यांना स्थानिक महिलांनी विकासकामे आणि दारूच्या मुद्द्यावरून चांगलेच धारेवर धरले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भद्रावती नगरपालिकेचे राजकारण गेल्या 15 वर्षांपासून हाताळणारे अनिल धानोरकर हे भाजपच्या तिकीटावर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे ते दीर आहेत. रात्रीच्या वेळी ते गवराळा गावात प्रचारासाठी पोहोचले असता, तेथील महिलांनी त्यांना घेरले आणि प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल धानोरकर येथील गवराळा प्रभागात मतदारांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी महिलांनी त्यांची चांगलीच शाळा घेतली. निवडणूक आली की सर्वच आश्वासन देतात. मग पाच वर्षे कुणी ढुंकून बघत नाही, नगराध्यक्ष व नगरसेवक म्हणून प्रभागातील काम करुन घ्यायचा दम नाही तर कशाला उभे राहते असा थेट प्रश्नही महिलांनी यावेळी केला. जसे मालेगावला विषारी दारु पिल्याने घडले तशी घटना भद्रावतीत घडायला वेळ लागणार नाही असेही महिला म्हणाल्या. दारूमुळे संसार उद्ध्वस्त परिसरातील दारू दुकानांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याची तक्रार महिलांनी केली. विशेष म्हणजे, संबंधित दारू दुकानाचे मालक तुम्हीच आहात, त्यामुळे दारूमुळे तरुण पिढी बिघडत असताना आम्ही तक्रार कोणाकडे करायची? असा थेट सवाल महिलांनी विचारला. यावेळी महिलांनी घरकुल योजनेच्या अंमलबजावणीवरून ही धानोरकर यांना जाब विचारला. विकासाचा अभाव एका ज्येष्ठ महिलेने संताप व्यक्त करताना सांगितले की, गेल्या 40 वर्षांपूर्वी लग्न करून या भागात आले, तेव्हापासून हा वॉर्ड तसाच आहे. गेल्या 15 वर्षात तुम्ही सत्तेत असूनही इथे रस्ते झाले नाहीत की गट्टू बसवले नाहीत. नाल्या आणि गटारी तुंबलेल्या अवस्थेत आहेत. प्रचारातून घेतला काढता पाय महिलांचा आक्रमक पवित्रा आणि प्रश्नांचा भडिमार पाहून अनिल धानोरकर निरुत्तर झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आणि प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता येत नसल्याने त्यांनी अखेर तिथून काढता पाय घेतला. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजप उमेदवाराला मतदारांनी अशा प्रकारे पिटाळून लावल्याने चर्चा सुरू झाली आहे. उद्या 29 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहिर सभा आहे. त्याचे काय होणार असाही प्रश्न आता केला जात आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी राजकीय आरक्षण हे नोकरी व शिक्षणाच्या आरक्षणापेक्षा पूर्णतः वेगळे असल्याचा दावा केला आहे. सद्यस्थितीत 60 टक्के ओबीसी समाजाला केवळ 27 टक्के आरक्षण आहे. ते कमी होऊन द्या शून्य टक्के झाले तर ओबीसी कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे केंद्राने या प्रकरणी संविधानाच्या कलम 243 डी 6 मध्ये सुधारणा करून हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढावा, असे ते म्हणालेत. सुप्रीम कोर्टाने आज ओबीसी आरक्षणासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा केला. पण सोबतच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडणाऱ्या 40 नगरपरिषदा व 17 नगपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल कोर्टाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहतील असेही स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर बबनराव तायवाडे यांनी वरील मागणी केली आहे. ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हणाले, सुप्रीम कोर्टाने कोणत्याही निवडणुकीला स्थगिती देण्यास नकार दिला. सुप्रीम कोर्टाने स्वतःच या निवडणुका घेण्यासाठी 31 जानेवारीची डेडलाईन दिली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया संपवायची आहे. या निवडणुका निवडणूक आयोगही थांबवू शकत नाही. त्यांनी या निवडणुका थांबवण्याचा प्रयत्न केला, तर उद्या सुप्रीम कोर्ट त्यांना त्याचा जाब विचारेल. त्यामुळे निवडणूक आयोग ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणासह 31 जानेवारीपर्यंत ही निवडणूक घेईल. सर्वच स्तरावरील निवडणुका 27 टक्के आरक्षणासह होणार आहेत. त्यामुळे पुढे सर्वोच्च न्यायालयापुढेही पेच निर्माण होईल. राजकीय आरक्षण पूर्णतः वेगळे बबनराव तायवाडे म्हणाले, एवढ्या निवडणुका रद्द करून किंवा पुढे ढकलून आपण समाजाचे नुकसान करू शकत नाही. 1992 मध्ये इंदिरा सहानी प्रकरणाचा निकाल आला तेव्हा त्यात शिक्षण व नोकऱ्यांत या दोनच क्षेत्रात 50 टक्क्याच्या मर्यादेच्या आत ओबीसी समाजाला आरक्षण द्या अशी तरतूद होती. 1994 मध्ये ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 27 टक्के राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय राज्यसभा व लोकसभेत एक विधेयक पारित करून घेण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू आहे. आत्ता त्या अंमलबजावणीला कुठेतरी धक्का लावून इथेसुद्धा 50 टक्क्यांची मर्यादा असायला पाहिजे अशा पद्धतीचा काढण्यात येणारा अर्थ चुकीचा आहे. शिक्षण व नोकरीतील आरक्षण हे वेगळे आहे आणि राजकीय आरक्षण वेगळे आहे. याच्याकरिता की, 60 टक्के ओबीसी समाजाला केवळ 27 टक्के आरक्षण आहे. ते सुद्धा कमी करून उद्या शून्य टक्के झाले तर ओबीसीच्या कार्यकर्त्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे माझी केंद्र सरकारला विनंती आहे की, हे सर्व धाकधुक थांबवण्यासाठी त्यांनी संविधानाच्या कलम 243 डी 6 मध्ये दुरुस्ती करून हा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढावा, अशी मागणी तायवाडे यांनी यावेळी केली. कोणत्या आदेशांना संरक्षण द्यायचे हा सुप्रीम कोर्टापुढेच पेच सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपू्र्वी 4 महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले. तेव्हाच कोर्टाने असे म्हटले होते की, 2022 च्या पूर्वी जी परिस्थिती होती, त्यानुसार निवडणुका घ्या. या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयानुसार होत आहेत. आत्ता सुप्रीम कोर्टापुढे सुद्धा पेच आहे की, आधीचा एक निर्णय, नंतरचा एक निर्णय व आता तर पुन्हा ही पीटिशन. मग कोणत्या निर्णयाला आपण संरक्षण द्यायचे हा पेच सुप्रीम कोर्टापुढेही निर्माण झाला आहे. माझ्या मते, सध्या तरी या 27 टक्के आरक्षणाला धक्का लागणार नाही, असेही तायवाडे यावेळी बोलताना म्हणाले.
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसारच
नवी दिल्ली : नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. निवडणुकीतील ५० टक्के आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार आहेत. सुप्रीम कार्टात २१ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. हे प्रकरण आता जानेवारीच्या दुस-या आठवड्यात प्रथम तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर […] The post नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसारच appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .
मुख्यमंत्री, गृहमंत्री नागपुरातले, जास्त वळवळ केली तर कापून काढू, अशा शब्दांत भाजप आमदार आशिष देशमुख यांनी विरोधकांना धमकीवजा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आशिष देशमुख यांच्या या विधानाचा व्हिडिओ पोस्ट करत अशी भाषा लोकशाहीसाठी घातक असल्याची टीका केली आहे. सार्वजनिक व्यासपीठावरून सज्जनतेचे धडे देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना विरोधकांचे एन्काऊंटर करायची परवानगी दिलीय का? असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे घमासान माजले आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडी एकमेकांना पराभवाची धूळ चारण्यासाठी आसुसलेत. या दोन्ही आघाड्या एकमेकांवर टीका -टीप्पणी करत असताना भाजपचे सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांनी चक्क विरोधी पक्षांच्या उमेदवारांनाच कापून काढण्याची भाषा केली. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात ते म्हणतात, हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे सरकार आहे. गृहमंत्री, मुख्यमंत्री नागपुरातले आहेत. त्यामुळे जास्त वळवळ केली तर तुम्हाला अर्धे कापले जाईल. कुणालाही घाबरून जाण्याची गरज नाही. आशिष देशमुख तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. काय म्हणाले आमदार रोहित पवार? रोहित पवारांनी आशिष देशमुख यांच्या या विधानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, मुख्यमंत्री, गृहमंत्री नागपुरातले, जास्त वळवळ केली तर कापुन काढू हे शब्द कुण्या नक्षलवाद्याचे नाहीत तर भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी जाहीर व्यासपीठावरून विरोधकांना दिलेली ही धमकी आहे. राजकीय विरोध असावा पण विरोधकांना थेट कापून टाकण्याची ही मानसिकता भाजप नेत्यांमध्ये येते कुठून? पाशवी सत्तेच्या बळावर विरोधकांना मारून टाकण्याची भाषा होत असेल तर हे लोकशाहीसाठी घातक आहे. सदा सर्वकाळ सार्वजनिक व्यासपीठावरून सज्जनतेचे धडे देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदारांना विरोधकांचे एन्काऊंटर करायची परवानगी दिलीय का? मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आपल्या आमदारांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावं अन्यथा मुख्यमंत्र्यांचाही आशिष देशमुखांच्या या भाषेला पाठिंबा आहे, असाच त्याचा अर्थ होईल, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. सिडको भूखंड घोटाळ्यावरही केले होते भाष्य उल्लेखनीय बाब म्हणजे रोहित पवारांनी गुरुवारी सिडको जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीचे स्वागत केले होते. ते म्हणाले होते, नवी मुंबईच्या 5000 कोटीच्या सिडको-बिवलकर-शिरसाठ जमीन घोटाळा प्रकरणात आज अखेर सरकारला समिती स्थापन करावीच लागली. सरकारचा आजचा निर्णय म्हणजे ‘देर आये दुरुस्त आये’ असंच म्हणावं लागेल. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत गेल्या वेळेसच ‘सरकारने कारवाई नाही केली तर आम्हाला कारवाई करावी लागेल’ अशा स्पष्ट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला तंबी दिली होती, तसंच central empowered कमिटीने देखील स्पष्ट सूचना केल्या होत्या. सरकारने आज समिती स्थापन केली असली तरी समिती स्थापन करतानाही घोळ केलेला दिसतो. ज्या अधिकाऱ्याने (लक्ष्मीकांत जाधव) आजचा जीआर काढला आहे त्याच अधिकाऱ्याने जमीन देण्याची शिफारस करणारे पत्र सिडकोला लिहिले होते. आजच्या समितीत समितीचे सचिव म्हणून जे अधिकारी आहेत त्यांनीच बिवलकर यांना जमीन अलोट केली होती. हे सर्व बघता आजची समिती म्हणजे चोरालाच पोलीस केल्यासारखं आहे. त्यामुळं केवळ समिती स्थापन करून चालणार नाही तर निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करणं गरजेचं आहे. शिवाय या प्रकरणाचं गांभीर्य बघता तसेच समितीची चौकशी प्रभावित होण्याची शक्यता बघता मंत्री शिरसाठ यांचा राजीनामा घेतलाच गेला पाहिजे. काहीही झालं तरी शिरसाठ साहेबांची यातून सुट्टी नाही. दरम्यान, हे आरोप फेटाळणाऱ्या सरकारने आज किमान समिती तरी स्थापन केली. आमचे प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे साहेब, भावनाताई घाणेकर, consious citizen forum यांच्यासह आमचे स्थानिक कार्यकर्ते आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या आणि प्रामाणिक पत्रकारांच्या लढ्याचं हे यश आहे, असे ते म्हणाले होते.
छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील 5 लाखांहून अधिक ग्राहकांकडे थकीत 300 कोटी रुपयांच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. नोव्हेंबर महिन्यात जवळपास 7 हजार थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. ग्राहकांनी चालू बिलासह थकबाकी भरून सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. संभाजीनगरही रडारवर छत्रपती संभाजीनगर परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील एकूण 5 लाख 9 हजार 732 ग्राहकांकडे 296 कोटी 88 लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यात घरगुती वर्गवारीतील 4 लाख 59 हजार 444 ग्राहकांकडे 239 कोटी 11 लाख, व्यावसायिक वर्गवारीतील 37 हजार 290 ग्राहकांकडे 32 कोटी 80 लाख, औद्योगिक वर्गवारीतील 7 हजार 49 ग्राहकांकडे 13 कोटी 24 लाख व इतर वर्गवारीतील 5 हजार 649 ग्राहकांकडे 11 कोटी 73 लाख रुपयांची थकबाकी आहे. जालन्यातही कारवाई छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील 1 लाख 34 हजार 741 ग्राहकांकडे 69 कोटी 6 लाख, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलातील 2 लाख 32 हजार 496 ग्राहकांकडे 84 कोटी 79 लाख व जालना मंडलातील 1 लाख 42 हजार 495 ग्राहकांकडे 143 कोटी 3 लाख रुपयांची थकबाकी आहे. वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील शहर, ग्रामीण व जालना मंडलात महावितरणतर्फे धडक वसुली मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. अभियंते सरसावले मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, तांत्रिक कर्मचारी या मोहिमेत प्रत्यक्ष ग्राहकांकडे भेट देऊन थकबाकी वसुलीसाठी सरसावले आहेत. अनेक ग्राहक तातडीने बिल भरून सहकार्य करत आहेत. तर जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव खंडित करण्याची कारवाई या मोहिमेत करण्यात येत आहे. सुट्टीच्या दिवशीही मोहीम चालू नोव्हेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर शहर मंडलातील 5 हजार 15, ग्रामीण मंडलातील 942 व जालना मंडलातील 893 ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. यानंतरही ग्राहक अनधिकृतरित्या वीज वापरत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सुट्टीच्या दिवशीदेखील ही मोहीम सुरू आहे. तरी परिमंडलातील सर्व ग्राहकांनी थकबाकी व चालू वीजबिले भरून सहकार्य करावे व संभाव्य गैरसोय टाळावी, असे आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे. बिल भरण्यासाठी विविध पर्याय वीजबिल भरण्यासाठी महावितरणने अधिकृत वीजबिल भरणा केंद्रांसह विविध ऑनलाईन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. वीजबिलावरील क्यूआर कोड स्कॅन करून वीजबिल भरता येते. महावितरण मोबाईल ॲप, www.mahadiscom.in हे संकेतस्थळ तसेच विविध यूपीआय ॲपद्वारे घरबसल्या ऑनलाईन वीजबिल भरता येते. वेळेत ऑनलाईन वीजबिल भरल्यास 0.25 टक्के सूटही मिळते. मनस्ताप अन् भुर्दंड टाळा महावितरणने आपले वीज कनेक्शन तोडण्याची वाट न पाहता ग्राहकांनी चालू महिन्याच्या वीजबिलासह थकबाकीची रक्कम विनाविलंब भरून सहकार्य करावे. थकबाकीसाठी कनेक्शन तोडल्यास बिलाच्या रकमेसह पुनर्जोडणी शुल्क भरावे लागते. सिंगल फेज जोडणीसाठी 310 रुपये तर थ्री फेजजोडणीसाठी 520 रुपये पुनर्जोडणी शुल्क आकारले जाते. हा भुर्दंड टाळण्यासाठी वेळेत वीजबिल भरणे आवश्यक असल्याचे महावितरणने म्हटले आहे.
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा उघड झाली आहे. विमान नगर परिसरात, सिगारेट फुकट देण्यास नकार दिल्याने, पाच ते सहा जणांच्या टोळक्याने एका पान टपरीवर अचानक हल्ला करून तोडफोड केली. या घटनेनंतर स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फुकट वस्तू मिळवण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळक्याने दुकानदाराकडे मोफत सिगारेटची मागणी केली. दुकानदार शांतपणे उत्तर देत असताना, टोळक्यातील एका आरोपीने कोयता काढून दुकानात तोडफोड सुरू केली. हे संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांमध्ये काही अल्पवयीन मुलांचा समावेशही आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे विमान नगर परिसरात खळबळ उडाली आहे. वारंवार अशा घटनांमुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिक आणि व्यापारी आता गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. काही दिवसांपूर्वी टोळक्यांनी 25 ते 30 वाहनांची तोडफोड केली होती, ज्यात रिक्षा आणि कारांचा समावेश होता. ही घटना देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती, आणि हल्लेखोरांनी घोषणाबाजी करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. सीसीटीव्ही काय दिसतंय? सिगारेटचे पाकीट मोफत मिळावे म्हणून काही तरुणांनी पुण्यामध्ये कोयत्याने टपरी फोडल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये टोळक्याने मोफत सिगारेटचे पाकीट दे, तुझे दुकान फोडू का? असे म्हणत टोळक्याने टपरी चालकाला धमकावले. यानंतर टोळक्यामधील एका तरुणाने कोयता काढत टपरीच्या काउंटरवर दोन-चार वेळा वार केले. आणि पळून गेले. यानंतर काही क्षणात हल्ला करणारा तरुण पुन्हा माघारी आला आणि कोयत्याच्या धाकावर सिगारेटची पाकिटे उचलून नेली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे सतत जनतेच्या संपर्कात राहण्यावर भर देणारे नेते म्हणून ओळखले जातात. विशेषतः निवडणूक काळात त्यांचे दौरे, सभा आणि लोकांशी संवाद सतत सुरू असतो. अशाच एका दौऱ्यात, शिर्डीतील सभेला पोहोचण्यासाठी झालेली त्यांची लगबग सध्या चर्चेत आहे. संगमनेर येथे झालेल्या सभेसाठी उपमुख्यमंत्री शिंदे फक्त काही मिनिटे शिल्लक असताना सभास्थळी पोहोचले. त्यांच्या या धावपळीमुळे सभेची निर्धारित वेळ पाळण्यावरील त्यांची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर नेत्यांना अतिशय शिस्तबद्धपणे वेळेचे नियोजन करावे लागते. प्रत्येक सभेची वेळ ठरलेली असते आणि त्या वेळेतच भाषण पूर्ण करण्याची सक्त अट असते. अशा परिस्थितीत अजिबात वेळ न दवडता कार्यक्रम पार पाडणे हेच नेत्यांसमोर आव्हान असते. एकनाथ शिंदे यांच्या या प्रसंगातून त्यांनी आचारसंहितेचे पालन किती गांभीर्याने केले, हे स्पष्ट होत आहे. त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांनाही वेळेच्या काटेकोर अटीनुसार मोठी धावपळ करावी लागली. सुरक्षा, वाहतूक आणि कार्यक्रमाची गर्दी यामुळेही या क्षणांचे तणावपूर्ण स्वरूप वाढते. सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा सुरू आहे. प्रत्येक पक्ष, प्रत्येक नेता स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जनतेपर्यंत पोहोचणे, विकासकामांची माहिती देणे, विरोधकांना उत्तर देणे आणि आपला पक्ष मजबूत असल्याचा आत्मविश्वास दाखवणे हे नेत्यांचे मुख्य उद्दिष्ट. या पार्श्वभूमीवर वेळेचे काटेकोर पालन करणे आणि सभांमध्ये हजेरी लावणे, हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या प्रयत्नामुळे त्यांची धारणा अधिक ठळक झाली आहे. शिर्डी परिसर राजकीय दृष्टिकोनातून संवेदनशील शिर्डी आणि परिसरात एकनाथ शिंदे यांची सभाही महत्त्वाची मानली जाते. कारण हा प्रदेश राजकीय दृष्टिकोनातून संवेदनशील तसेच विकासाची मोठी क्षमता असलेला आहे. लोकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात आहेत. शिंदे यांनी आतापर्यंत घेतलेल्या बैठका आणि सभांमध्ये विकास हा मुख्य मुद्दा कायम ठेवला आहे. राज्याचे हित, शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगार, पायाभूत सुविधा विकास हे विषय त्यांच्या भाषणांमध्ये वारंवार समोर येतात. त्यामुळे अशा सभांमध्ये वेळेवर पोहोचून ते लोकांना गंभीरपणे सामोरे जाण्याचा संदेश देतात.
एका महिलेने पैशांसाठी आपल्या अल्पवयीन मुलीला शेजारच्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्याची संतापजनक घटना मुंबईच्या घाटकोपर परिसरात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, मुंबईतील घाटकोपर परिसरात ही घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलगी तेथील एका नामांकीत शाळेत 10 वीच्या वर्गात शिकते. तिच्या आईला पैशांची चणचण भासत होती. त्यामुळे ती नेहमी आपल्या मुलाला शेजारच्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पाठवत होती. मुलीने अनेकदा नकार दिला. पण आईने तिच्यावर बळजबरी केली. त्यांच्यात या मुद्यावरून दररोज वाद व्हायचा. आई धमकी देऊन जबरदस्तीने तिला शेजारच्या व्यक्तीकडे पाठवायची. ही सर्व माहिती पीडित विद्यार्थिनीने पोलिसांना दिल्याचे सांगण्यात येत याहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलीवर दररोज अत्याचार होत होते. त्याला ती कंटाळली होती. अखेर या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी ती एकदा आपल्या घरातून पळून गेली. ती 3 दिवस आपल्या एका मैत्रिणीकडे राहिली. पण त्यानंतर तिचा शोध लागला. तिला पुन्हा घरी आणले गेले. त्यानंतरही तिचा लैंगिक छळ संपला नाही. यावेळी आई व शेजारी हे दोघे मिळून तिला इतरांकडे पाठवू लागले. मुलीला हा त्रास असहय्य होऊ लागला. वर्गात रडली अन् अत्याचाराचा झाला पर्दाफाश एकदा ती वर्गात आली असता तिला आपल्यावरील अत्याचार आठवून भर वर्गात रडू कोसळले. ती ओक्साबोक्सी रडत होती. हे पाहून तिच्या वर्गशिक्षिकेने तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली. तेव्हा तिने आपल्यासोबत घडणारा प्रसंग त्यांना सांगितला आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. वर्गशिक्षिकेने हा सर्व प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कानावर घातला. त्यानंतर शाळेनेच पुढाकार घेत पोलिस ठाणे गाठले. पीडित मुलीने पोलिसांपुढे आपली आपबीती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी पीडितेची आई व शेजारच्या व्यक्तीविोरधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. अंधेरीत महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार दुसरकीडे, अंधेरी परिसरात एका 22 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवरही सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुषमा राव (31) नामक एका स्ट्रगलिंग मॉडेलला अटक केली आहे. तिच्या 2 सहकारी फरार आहेत. आरोपींनी पीडित विद्यार्थिनीला कोल्ड ड्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला होता. त्यानंतर त्यांनी तिचे अश्लील व्हिडिओ व फोटोही काढले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी मुंबईतील अंधेरी परिसरातील रहिवासी आहे. ती आरोपी सुषमा रावच्या कार्यालयात गरम मसाला उत्पादनांच्या मार्केटिंग, विक्रीसाठी पार्ट टाईम जॉब करत होती. सुषमाने पीडितेला सांगितले होते की, तिचे कार्यालय अंधेरी पूर्वेकडील जेबीनगर येथील एका लॉजमध्ये काही दिवसांसाठी भाड्याने घेतलेल्या खोलीत चालू आहे. या ठिकाणी केवळ सुषमा आणि पीडिता या दोघीच काम करत होत्या. काही दिवसांपूर्वी सुषमाने पीडितेला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर सुषमाच्या 2 पुरुष सहकाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ माजली आहे.
महाराष्ट्रात 50 ते 60 टक्के ओबीसी आहे. अनेक वर्षे निवडणूक झाली नाही पण ओबीसींचे आरक्षण संपवून निवडणूक घ्या असा आहे का? ओबीसींच्या प्रतिनिधीत्वाशिवाय इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक तुम्हाला घ्यायच्या आहेत का? असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की, महाराष्ट्रातील निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र शासन बेजबाबदारपणे वागत आहेत. बंठिया समितीच्या शिफारशींना आमचा 100 टक्के विरोध आहे. त्यानुसार निवडणूक घेण्याचा प्रयत्न करणार असाल तर ओबीसी निवडणुकीवर बहिष्कार घालेल. आदिवासीचे आरक्षण 50 टक्के वर जात असेल तिथे कोर्टाचे वरीष्ठ बेंच बसले पाहिजे. घटनात्मक दुरुस्ती केली पाहिजे, असे काम करायला महाराष्ट्र सरकार तयार नाही, असे आम्हाला वाटते आहे. जरांगेंची युनोत नेमणूक करावीलक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे यांच्यासारखा ज्ञानी माणूस आहेत. त्यांची आजच्या घडला पाकिस्तानमध्ये जास्त गरज आहे. महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये दुरावा निर्माण केल्यानंतर आज एससीबीसीचा कट ऑफ जास्त आहे की ओबीसीचा जास्त आहे? यावर मराठा समाजातील विचारवंतांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढे यायला हवे. जरांगे समाजासाठी फायद्याचे आहेत की तोट्याचे हे एकदा समाजाला कळाले पाहिजे. जरांगे हे उद्योजकांमध्ये जाऊन काय करणार आहेत. ते खूप ज्ञान असलेले व्यक्ती आहेत त्यांची आंतरराष्ट्रीय युनो-बिनोमध्ये कुठेतरी नेमणूक करावी, अशी विनंती आम्ही महाराष्ट्र शासनाला करु.लक्ष्मण हाके म्हणाले की, उद्योजकांनी उद्योग करावा कारण उद्योगाला जात पात नसते. ते सर्वसमावेशक असते, उद्योजकांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. .. तर ओबीसी मतदानावर बहिष्कार टाकणार लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबद्दल शासन आणि निवडणूक आयोग बेजबाबदार पद्धतीने वागत आहे. एसटी लोकसंख्येचे आरक्षण वाढते तिथे ओबीसी आरक्षणाचे काय? याचे मार्गदर्शन निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाकडे मागितले असते तर त्यावर सुप्रीम कोर्टाने त्यावर काही तरी सांगितले असते. महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यास तयार नाही तर निवडणूक आयोग जबाबदारीने वागायला तयार नाही. बंठीया समितीची काहीतरी माहिती सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. या समितीने जी जुजबी माहिती संकलित केलेली आहे यासाठी काही व्यापक सर्वे करण्यात आला नाही यामुळे तिला ओबीसी समाजाचा विरोध असेल. या माहितीच्या आधारावर जर निवडणुका रेटून नेण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर ओबीसी बांधव या निवडणुकीवर बहिष्कार टाकतील, असा इशारा हाकेंनी दिला आहे. निवडणूक आणखी वर्षभर पुढे ढकला लक्ष्मण हाके म्हणाले की, गेली 6 ते 7 वर्षे राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था या प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहेत. ओबीसी आरक्षणावर स्पष्टता येईपर्यंत निवडणूक आणखी वर्षभर पुढे ढकला. पण ओबीसीचे आरक्षण कमी करू नका. महाराष्ट्राच्या मागून येत अनेक राज्यात आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला मग नेमकी महाराष्ट्रात काय समस्या आहे. महाराष्ट्र पुरोगामी आहे असा दावा केला जातो तिथे इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला तुम्हाला काय अडचण आहे.
कुर्डूवाडी नगरपालिकेच्या निवडणूक प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात आल्यापासूनच विरोधकांनाच नाही तर आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांनाही चिमटे काढत वातावरण तापवले. निवेदनादरम्यान सूत्रसंचालिकेने त्यांचा उल्लेख महाराष्ट्राचा कोहिनूर असा केला आणि तेव्हाच दादांनी हसत-हसत सुनावलं, हे कोण सांगतं तुम्हाला असं बोलायला? मी कोहिनूर वगैरे नाही, साधा हाडामासाचा माणूस. त्यामुळे एका क्षणात वातावरणात हशा पिकवणारा हा प्रसंग दादांच्या शैलीची झलक दाखवणारा होता. सभा जोशात सुरू असतानाच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी अजित पवारांच्या गळ्यात पक्षाचा पंचा घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी मात्र दादांच्या चेहऱ्यावरचा चेहरा बदलला. त्यांनी जोरदार आवाजात अरे गप रे बाबा! राष्ट्रवादीचा पंचा आहे हे कळतंय, याला काही अक्कल नाही का? अशी झापड लगावली. हा प्रकार पाहून उपस्थित कार्यकर्तेही थोडे दचकल्याचे दृश्य होते. उपमुख्यमंत्री म्हणाले की, मी एखाद्याचा अपमान करण्यासाठी बोलत नाही, पण 35 वर्षे मेहनत करून येथे पोहोचलोय. मी जे आहे, ते माझ्या घासून-घासून उभी केलेल्या प्रतिमेमुळेच आहे. विरोधक नेहमीच टीका करतात, पण लोकांनी काम पाहून निर्णय घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केलं. सभा सुरू असतानाच विरोधकांची रिक्षा आवाज वाढवत जात होती. त्यामुळे भाषण काही क्षण थांबवावे लागले. लगेचच ते चिडून म्हणाले, हे लोक बघा, ओवाळून टाकलेले दिसतात! मी गेल्यावर हवा तेव्हढा आवाज करा. त्याच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि दादांनी हसत-हसत पुढचं भाषण सुरू ठेवलं. राज्यात आणि केंद्रात महायुतीचं सरकार असल्याने विकास निधी मिळवण्यासाठी त्यांच्या गटातील उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. कर्तुत्व असलं तरी पैसे मिळवण्यासाठी वर मदत करणारे लागतात. पैसा म्हणजे पैसा, त्याचं सोंग आणता येत नाही, असे म्हणत त्यांनी हातवारे करत नोटांच्या खुणाही केल्या. या वक्तव्यावर प्रेक्षकांमध्ये चैतन्य पसरलं. बारामतीत केलेल्या विकासकामांची उदाहरणे देताना, जॉगिंग ट्रॅक, उद्याने, क्रीडांगणे कशी उभारली, हे त्यांनी उत्साहाने सांगितले. बाकांबद्दल बोलताना अचानक त्यांनी दारुड्यांची मजेदार नक्कल केली. दारुड्या येतो, झोपतो आणि मग विचारतो, मला कोण उठवतंय? प्रेक्षक हसतच राहिले आणि सभेचं वातावरण अजून रंगत गेलं. बहुकोनी लढतीत अजित दादांचा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न कुर्डूवाडीमध्ये विविध पक्ष-गटांमध्ये अष्टपैलू राजकीय लढत रंगली आहे. अजित पवार गट आणि रिपाई (आठवले) एकत्र, तर त्यांच्याविरोधात भाजप व शिवसेना ठाकरे गट स्वतंत्र लढत आहेत. दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत शिंदे गटाची आघाडी आहे. या बहुकोनी लढतीत अजित दादांनी आपल्याच शैलीत जनतेपर्यंत पोहोचत, मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. आयोगाच्या नवीन आदेशानुसार, 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानापूर्वी म्हणजेच 1 डिसेंबरपर्यंत रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. या आदेशामुळे मतदानाच्या आधीच्या अंतिम दिवसात उमेदवारांना मतदारापर्यंत आपला संदेश पोहोचवण्याची अधिक संधी मिळाली आहे. यापूर्वीच्या नियमांनुसार मतदानाच्या दिवशी आणि त्याआधीच्या 24 तासांमध्ये सभा, मोर्चे, ध्वनिक्षेपकांचा वापर तसेच निवडणूक जाहिरात प्रसारणावर पूर्ण निर्बंध असायचे. परंतु, नव्या आदेशानुसार ही वेळ थोडी पुढे नेण्यात आली असून, उमेदवारांना मतदानाच्या आधल्या दिवशी ( 1 डिसेंबर) रोजी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची मुभा राहणार आहे. राज्यातील 3 प्रभागांमध्ये निवडणूक स्थगित राज्यातील तीन प्रभागांमध्ये नगरसेवक पदासाठी निवडणूक राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थगित करण्यात आली आहे. नगरसेवक पदासाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांचा अचानक मृत्यू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मात्र अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी कोणतीही स्थगिती देण्यात आलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असून निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक चिन्ह वाटप आणि प्रचार अंतिम टप्प्यात असून, अनेक प्रभागांमध्ये रणधुमाळी सुरू आहे. मात्र तीन ठिकाणी निवडणूक स्थगित झाल्याने काही प्रभागातील प्रक्रिया बाधित झाली आहे. या उमेदवारांचा झाला मृत्यू नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये उमेदवार नितीन वाघमारे यांचा निधन झाल्यामुळे येथील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. या संदर्भातील निवडणूक आयोगाचे अधिकृत पत्र जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर प्रभाग क्रमांक 2 मध्ये कुसुमबाई पाथरे यांचे हृदयविकाराने निधन झाल्यामुळे ही निवडणूक स्थगित झाली आहे. भाजपच्या उमेदवार असलेल्या पाथरे यांच्या निधनाने प्रभागातील निवडणुकीला ब्रेक लागला आहे. याशिवाय, बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये दूरदानाबेगम सलीम फारुकी यांच्या निधनामुळे त्या प्रभागातील निवडणूकही स्थगित करण्यात आली आहे.
वयाची तिशी ओलांडूनही लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यामुळे नैराश्य आलेल्या एका तरुणाने पंचगंगा नदीत उडी मारून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. त्याने बुधवारी सायंकाळी नदीत उडी मारली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह पोलिसांना आढळला. पोलिसांच्या माहितीनुसार सुमीत श्रीकांत तेली (30) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो शहरातील शुक्रवार पेठ भागात राहत होता. सुमीत बुधवारी रात्री घराबाहेर पडला होता. त्यानंतर त्याने शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी मारली. तेथील काही तरुणांनी त्याला नदीत उडी मारताना पाहिले होते. त्यांनी ती माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमीतचा पंचगंगा नदीत शोध घेतला. पण रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाही. परिणामी, अंधारामुळे शोधकार्यात अडथळा येत असल्यामुळे ही शोध मोहीम थांबवण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा ही शोध मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या पथकाला आढळला. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सुमीत तेली आपली आई, वडील व लहान भावासोबत शुक्रवार पेठेत राहत होता. तो शाहूपुरीतील एका रेडियमच्या दुकानात कामाला होता. गत काही दिवसांपासून त्याच्या नातलगांत त्याच्या लग्नाची चर्चा सुरू होती. तुळशी विवाहानंतर घरीही त्याविषयी चर्चा सुरू झाली होती. पण विवाह जमत नसल्यामुळे त्याला नैराश्य आले होते. कुटुंबीयांशी बोलला अन् नदीत उडी मारली सुमीतने लग्नाच्या मुद्यावर आपल्या कुटुंबीयांशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी अचानक घराबाहेर पडला. त्याचा लहान भाऊ त्याच्या मागोमाग गेला. पण सुमीत काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर त्याने शिवाजी पुलावरून थेट पंचगंगा नदीत उडी मारली. त्यानंतर काही वेळातच त्याचा भाऊ तिथे पोहोचला. त्याने आरडाओरडा करून मदतीसाठी धावा केला. पण तोपर्यंत उशीर झाला होता. मुलींचा जन्मदर घटणे चिंताजनक उल्लेखनीय बाब म्हणजे भारतात मुलींच्या लोकसंख्येत कमालीची घट होताना दिसून येत आहे. गत काही वर्षांत या टक्केवारीत सुधारणा होत आहे. पण स्थिती म्हणावी तशी अजून सुधारली नाही. 2011 च्या जनगणनेनुसार 1 हजार पुरुषांमागे 943 महिला होत्या. महिलांच्या लोकसंख्येत होणारी घट ही भविष्यात सामाजिक असंतुलन निर्माण करणारी ठरणार असल्याचा दावा केला जात आहे.
मुंबईतील वरळी परिसरात डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांच्या मृत्यूने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे स्वरूप असलेल्या या घटनेने आता गंभीर वळण घेतले आहे. भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांची पत्नी असलेल्या गौरी यांनी घरात गळफास घेतल्याची माहिती सुरुवातीला समोर आली. मात्र त्यांच्या मृत्यूमागे आत्महत्या नसून प्रत्यक्ष घातपात झाला असल्याचा दावा पालवे कुटुंबीयांनी केला असून, पोलिसांच्या तपासातही अनेक नवे पुरावे पुढे येत आहेत. परिणामी, या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. घटना उघड झाल्यानंतर वरळी पोलिसांनी तत्काळ अनंत गर्जे याला ताब्यात घेतले. शिवाय त्याच्यासह त्याचा भाऊ आणि बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर अनंतला न्यायालयात हजर केले असता, त्याच्या शरीरावरही जखमांचे निशाण असल्याचे धक्कादायक निदर्शनास आले. केवळ अनंत नव्हे, तर मृत गौरीच्या शरीरावरही काही जखमा असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. यामुळे मृत्यूच्या आधी अनंत आणि गौरी यांच्यात काहीतरी गंभीर संघर्ष किंवा झटापट झाली का? असा संशय अधिकच गडद होत आहे. तसेच घटनाकाळातील दोघांच्या संभाषणाचे रेकॉर्डिंगही पोलिसांच्या हाती लागले असून त्याचाही तपास सुरू आहे. गौरी पालवे-गर्जे या मुंबईतील एका नामांकित वैद्यकीय संस्थेत काम करत होत्या. त्या हुशार, शांत आणि स्वावलंबी असल्याचे मैत्रिणी व सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र काही महिन्यांपासून त्यांच्या दांपत्यात वाद सुरू असल्याचे माहिती आहे. अनंत गर्जेच्या कथित अफेअरमुळे दाम्पत्यात मतभेद वाढले होते, अशी माहिती सुरुवातीला समोर आली होती. याच वैयक्तिक जीवनातील तणावामुळे गौरीने आत्महत्या केली असावी अशी शक्यता सुरुवातीला मांडण्यात आली होती; परंतु आता मिळत असलेल्या पुराव्यांनुसार संपूर्ण प्रकरणात हिंसाचाराचा मोठा भाग असू शकतो, असे संकेत मिळत आहेत. आमची मुलगी कधीच जीवन संपवू शकत नाही, तिच्या मृत्यूमागे कट या घटनेनंतर पालवे कुटुंबीयांनी स्पष्टपणे गौरीची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. आमची मुलगी कधीच स्वतःचे जीवन संपवू शकत नाही. तिच्या मृत्यूमागे कट आहे, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. त्यांच्याकडून सखोल तपासाची मागणी करण्यात आली असून, त्यांनी न्यायालय आणि पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली आहे. सरकारी वकिलांनीही या प्रकरणातील आरोपी असलेल्या अनंत गर्जेच्या भावंडांचा शोध घेण्यासाठी त्याची अधिक कोठडी आवश्यक असल्याचे सांगितले आहे. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत त्याला दोन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. विविध बाजूंनी तपास सुरू या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही खळबळ उडवली आहे. कारण आरोपी अनंत गर्जे हे सत्ताधारी पक्षातील महत्त्वाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे या प्रकरणाचा तपास किती पारदर्शकपणे होईल याबाबत अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ, संभाषणांची नोंद, मोबाइल लोकेशन, वैद्यकीय पंचनामे यांसह विविध बाजूंनी तपास सुरू केला आहे. येत्या काही दिवसांत सत्य स्पष्ट झाल्यावर या प्रकरणाचे नेमके स्वरूप बाहेर येण्याची शक्यता आहे. गौरी पालवे-गर्जे यांना न्याय मिळावा यासाठी त्यांच्या कुटुंबासह समाजातूनही दबाव वाढू लागला आहे.
अहिल्यानगरजवळ बिबट्या जेरबंद:पहाटे चार वाजता तपोवन परिसरात पिंजऱ्यात सापडला
अहिल्यानगर शहराच्या जवळ तपोवन परिसरात गेल्या काही दिवसांपासून वावर असलेला बिबट्या अखेर पहाटे चार वाजता पिंजऱ्यात जेरबंद झाला. यामुळे शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. शहरालगतच्या तपोवन परिसरातील बुऱ्हानगर हद्दीत कराळे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना, सोमवारी (24 नोव्हेंबर) दुपारी दीडच्या सुमारास बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली होती. त्यानंतर तात्पुरती ऊसतोड थांबवण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल अविनाश तेलोरे यांच्यासह वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरा लावला आणि ड्रोनद्वारे परिसराची टेहळणी केली. दरम्यान, पिल्ले पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वन विभागाने पिलांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पिलांजवळ मादी बिबट्या गुरगुरत धावून येत होती. चार दिवसांनंतर, 28 नोव्हेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास ही मादी बिबट पिंजऱ्यात अडकली. वन विभागाने प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे की, जेरबंद झालेली ही मादी याच पिलांची आई असावी. कोपरगावात बिबट्याचा दाम्पत्यावर हल्ला राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेली दहशत कमी होताना दिसत नाही. कोपरगाव तालुक्यात दोन चिमुकल्यांचा जीव घेतलेल्या नरभक्षक बिबट्याला शार्प शूटर पथकाने नुकतेच ठार केले असताना, टाकळी फाटा परिसरात बिबट्याचा धोका अजूनही कायम असल्याचे काल रात्री सिद्ध झाले.5 दिवसांपूर्वी बिबट्याने रस्त्यावरून जात असलेल्या एका दाम्पत्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचा थरकाप उडाला आहे. वर्षभरात अहिल्यानगरमध्ये 11 बळी दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यात मागील तीन वर्षांत 19 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 136 जण गंभीर जखमी झाले आहेत. यात चालू वर्ष 2025 मध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात या वर्षात बिबट्याने आठ जणांचा बळी घेतला आहे, तर विदर्भात चालू वर्षात एकाचा बळी घेतला आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नरसह काही वनपरिक्षेत्रात ही बिबट्यांची संख्या वाढलेली असून बिबट्याकडून ग्रामस्थांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत आहेत.
पुण्यात एकाच दिवशी तीन घरफोड्या:कोथरूड, बाणेर, फुरसुंगी परिसरातून 4 लाखांचा ऐवज लंपास
पुणे शहरात चोरांनी धुमाकूळ घातला असून, गेल्या 24 तासांत कोथरूड, बाणेर आणि हडपसरमधील फुरसुंगी परिसरात तीन वेगवेगळ्या घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. घरमालक बाहेरगावी असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी कुलूप तोडून किंवा छतावरून घरात प्रवेश केला. कोथरूड येथील उजवी भुसारी कॉलनीतील अमोलिका सोसायटीत गुरुवारी (27 नोव्हेंबर) पहाटे एक घरफोडी झाली. घरमालक बाहेरगावी असताना चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून शयन कक्षातील कपाटातून दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरली. शेजाऱ्यांनी ही घटना सकाळी लक्षात आणून दिल्यानंतर घरमालकांच्या नातेवाईक महिलेने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. सहायक पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत. बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रस्त्यावरील बेसल गार्डन सोसायटीतही मध्यरात्री घरफोडी झाली. चोरट्यांनी सदनिकेच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातून 65 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, सहायक पोलिस निरीक्षक रायकर तपास करत आहेत. हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फुरसुंगी येथील होळकरवाडी परिसरात चोरट्यांनी वेगळ्या पद्धतीने घरात प्रवेश केला. घरमालक कुटुंबासह लग्न समारंभासाठी बाहेरगावी गेले असताना, चोरट्यांनी घराच्या छतावरून आत शिरून कपाटाचे कुलूप तोडले. त्यांनी एक लाख 67 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. या घटनेनंतर फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत. या तिन्ही घटनांमध्ये घरमालक बाहेरगावी असल्याने चोरट्यांना सहज लक्ष्य मिळाले. सणासुदीच्या काळात अशा घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुणे पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असली तरी, नागरिकांनी घर बंद करताना सीसीटीव्ही, मजबूत कुलुपे वापरणे आणि शेजाऱ्यांशी समन्वय साधणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अल्पवयीन मुलाकडून देशी पिस्तूल जप्त:पुणे पोलिसांकडून कात्रज परिसरात मोठी कारवाई
पुणे शहरात गुन्हे शाखेने एका अल्पवयीन मुलाला देशी बनावटीच्या पिस्तुलासह ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई कात्रजमधील जांभुळवाडी रस्ता परिसरात करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक जांभुळवाडी रस्ता परिसरात गस्त घालत असताना, पोलिस कर्मचारी उज्वल मोकाशी आणि योगेश मांढरे यांना एका अल्पवयीन मुलाकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलाने हे पिस्तूल का बाळगले होते आणि ते त्याला कोणाकडून मिळाले, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, संजय जाधव, शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, शंकर कुंभार, नागनाथ राख, सद्दाम तांबोळी, आजीम शेख आणि विशाल दळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली. मद्य विक्री दुकानातून रोख रक्कम चोरी दरम्यान, कोथरूड भागात एका देशी मद्य विक्री दुकानातून रोख रक्कम चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील पाच हजार रुपयांची रोकड लंपास केली. याबाबत एका दुकानदाराने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी भवानी पेठेत राहतात आणि त्यांचे कोथरूडमधील आशिष गार्डन चौकात देशी मद्य विक्रीचे दुकान आहे. मध्यरात्री चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून ही चोरी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. टी. गावित करत आहेत.
औंढा नागनाथ पंचायत समितीमधील 57 लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात पंचायत समितीच्या लेखा विभागातील तीन कर्मचारी निलंबित केल्यानंतर आता गटविकास अधिकाऱ्यांना मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अभय दिले जात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे पथकाच्या अहवालामध्ये गटविकास अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई का होत नाही हा संशोधनाचा विषय बनला आहे. औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये लेखा विभागात कपातीच्या रकमेमध्ये 57 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले होते. यामध्ये जीएसटी, विमा आदी रक्कम कपात करून वैयक्तिक बँक खात्यात जमा केल्याचे जिल्हा परिषदेच्या चौकशीत स्पष्ट झाले होते. याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाकडे सादर करण्यात आला होता. मात्र सहा महिन्याचा कालावधी लोटला तरी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नाही. दरम्यान, जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी लेखा विभागाच्या अहवालानंतर तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. उशीरा का होईना तीन कर्मचाऱ्यांच्या कारवाई झाल्यामुळे गैरव्यवहार करणाऱ्यांवर वचक बसणार असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने दिलेल्या अहवालामध्ये गटविकास अधिकाऱ्यांवरही ठपका ठेवला आहे. मात्र गटविकास अधिकाऱ्यांवर अद्यापही कारवाई का झाली नाही हा संशोधनाचा विषय बनला आहे. त्यांच्यावर जिल्हा परिषदेकडून कधी कारवाई केली जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. या संदर्भात मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. मात्र गटविकास अधिकाऱ्यांवर कारवाईचे अधिकार लेखा विभागाला नाहीत. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल असे स्पष्ट केले.
विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीला लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. 3 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीचे निकाल येत जातील तसे या महाविकास आघाडीचे तकलादू मनोरे कोसळत जातील, असा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे. काँग्रेसला ठाकरे गटाची गरज नाही, ठाकरे गटाला मुंबई सोडून महाराष्ट्र दिसत नाही आमि शरद पवार गटाला कुणी गांभीर्यानेच घेत नाही, असेही या नेत्याने म्हटले आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे घमासान माजले आहे. सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडी एकमेकांना पराभवाची धूळ चारण्यासाठी आसुसलेत. त्यातच काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा देऊन ठाकरे गटाला धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी लवकरच फुटण्याची भविष्यवाणी केली आहे. मविआला लागलेली घरघर अखेरच्या टप्प्यात केशव उपाध्यक्ष शुक्रवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, मविआ फुटणार. ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या संभ्रमाचे ओझे वागवत कशीबशी वाटचाल करणाऱ्या मविआला लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आली आहे. ३ डिंसेबरला जसेजसे नगरपालिका निवडणुकीचे निकाल येत जातील तसतसे मविआचे तकलादू मनोरे कोसळत जातील. केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले हे तीन पक्ष आता जाणून आहेत की अपघाताने आलेली सत्ता गेली, आता मविआचा उपयोग संपला! नगरपालिका निवडणूकीचे निकाल ही त्याची ताजी साक्ष असेल. आरती प्रभू यांचे हे गीत मविआ सारख्या हंगामी संधीसाधूंचा मुखवटा नेमका उतरविते… ‘कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझेकशासाठी उतरावे तंबू ठोकून’ काँग्रेसला उबाठाची गरज नाही, उबाठाला मुंबई सोडून महाराष्ट्र दिसतच नाही, आणि शरद पवार गटाला कुणी गांभीर्याने घेतच नाही, असेही केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरेंनी घेतली राज ठाकरेंची भेट दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत दोन्ही भावांत मुंबई महापालिका निवडणुकीतील जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज यांनी ठाकरे गटाचे विद्यमान नगरसेवक असणाऱ्या 20 ते 30 जागा मागितल्या आहेत. तसेच ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांच्या जागांचीही त्यांनी मागणी केली आहे. पण मनसेची संबंधित प्रभागातील संघटनात्मक ताकद, तगडा उमेदवार पाहूनच ठाकरे गटाने या जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. सद्यस्थितीत दादर, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी या मराठीबहुल भागातील प्रभागांसाठी ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यात चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होण्याची शक्यता आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बसवलेल्या 2500 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर 8 ठिकाणी शिल्लक असलेल्या जोडण्या करण्यासाठी मागील 12 दिवसांपासून 900 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर शटडाऊन घेतला आहे. मात्र, हे काम वेळेत न झाल्याने शटडाऊन आणखी 4 दिवसांसाठी वाढवला आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा आणखी आठवडाभर विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यातील खंड 6 ते 11 दिवसांपर्यंत पोहोचला आहे. जयविश्वभारती काॅलनीतील जलकुंभावरून 11 दिवसांनंतर पाणी सोडण्यात येत आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी यादरम्यान 39 किमी लांबीची 2500 मिमीची मुख्य जलवाहिनी बसवण्यात आली आहे. हायड्रॉलिक चाचण्या, व्हॉल्व्ह बसवण्याच्या कामांसाठी या जलवाहिनीवर काही गॅप सोडण्यात आले होते. बहुतांश गॅप जोडण्यात आले आहेत. शिल्लक 12 ठिकाणचे गॅप जोडणीचे काम अनेक महिन्यांपासून ‘जैसे थे’ पडून होते. ते पूर्ण करण्यासाठी शटडाऊन घेण्यात आला. मात्र, तो लांबल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यामधील खंड 11 दिवसांपर्यंत वाढला आहे. पाणीपुरवठ्याची परिस्थिती
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना शिवसेना ठाकरे गटात अचानक मोठा राजकीय कल्लोळ निर्माण झाला आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार न करता थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रमेश कदम यांना समर्थन जाहीर केल्याने स्थानिक राजकारणात खळबळ माजली आहे. चिपळूणमध्ये शिवसेना ठाकरे गटाने नगराध्यक्षांसह 24 जागांवर उमेदवार उभे केलेले असतानाही त्यांच्या स्वतःच्या आमदाराने पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून या घडामोडींची चर्चा आता राज्यभर होत आहे. चिपळूणमधील या वादाचे मूळ काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघटनात्मक मतभेदांमध्ये असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे मत आहे. खासदार विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यातील वाद अनेक वेळा सार्वजनिकरीत्या दिसून आला आहे. निवडणूक जाहीर होताच या मतभेदांचे रूपांतर सरळसरळ बंडात झाल्याचे पाहायला मिळत आहे. भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेत स्थानिक नेते आणि नागरिकांनी केलेल्या विनंतीवरून रमेश कदम यांना दिलेला शब्द पाळणे गरजेचे असल्याचे सांगितले. जेव्हा तिढा सोडवायला मला सांगितले, तेव्हा मी होकार दिला. आता दिलेल्या शब्दाला तडा जाऊ देणार नाही, असे जाधव यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याने ठाकरेंच्या शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली आहे, हे उघड झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती थेट मातोश्रीपर्यंत पोहोचल्याचे समजते. निवडणूक तोंडावर असताना अशी बंडखोरी पक्षासाठी धोकादायक ठरू शकते, याची जाणीव ठाकरे नेतृत्वाला झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून जाधव यांच्याशी संपर्क साधून पक्षाला नुकसान होईल असे निर्णय घेऊ नयेत, असा थेट इशारा दिल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी यामुळे आणखीच अडचणीत आले आहेत. कारण आता कोणाची भूमिका योग्य आणि कोणाची चूक यावर अंतर्गत संघर्ष पुढे उफाळून येऊ शकतो. दोन गट एकाच पक्षात दिसल्याने मतदारांमध्ये संभ्रम दरम्यान, चिपळूण नगरपालिकेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि भाजप अशा तिन्ही पक्षातील चुरस स्थानिक पातळीवर जाणवत आहे. ठाकरे गटाने यासाठी जोरदार तयारीही केली होती. मात्र, जाधवांच्या पावलांमुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढासळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचा अधिकृत प्रचार आणि आमदारांचा स्वतंत्र प्रचार असे दोन गट एकाच पक्षात दिसल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. भास्कर जाधव पुढे कोणती भूमिका घेतात आता सगळ्यांच्या नजरा भास्कर जाधव पुढे कोणती भूमिका घेतात यावर खिळल्या आहेत. मातोश्रीकडून समज मिळाल्यानंतरही त्यांनी रमेश कदम यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहायचे का? की परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून स्वतःचा निर्णय बदलणार? यावर संपूर्ण चिपळूणचे आणि राज्याच्या राजकारणाचेही लक्ष लागलेले आहे. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, या बंडखोरीमुळे शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत राजकीय असंतोष तीव्र असून, त्याचा परिणाम थेट निवडणुकीवर दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सोलापूर महापालिकेत ‘शत- प्रतिशत’चा नारा देत भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. अजून तशी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण इतर पक्षातून विजयाची क्षमता असलेले माजी नगरसेवक ओढण्यासाठी जे ‘ऑपरेशन लोटस’ राबवले जात आहे ते पाहता भाजप ‘कुबड्यां’वर अवलंबून राहणार नसल्याचे स्पष्ट होते. महायुतीतील मित्रपक्षाचा हा कावा लक्षात आल्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही स्वबळाची तयारी केली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांनी गुरुवारी शहरात येऊन त्याबद्दल चाचपणी केली. तसेच मनपाच्या सर्वच्या सर्व 102 जागांवर स्वतंत्र उमेदवार देऊन त्यापैकी 75 नगरसेवक निवडून आणण्याची तयारी ठेवा, असे आवाहनही पदाधिकाऱ्यांना केले आहे. राष्ट्रवादीनेही शरद पवार गटातील व एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात आणून ताकद वाढवण्यास सुरुवात केली. महायुतीच्या या अंतर्गत स्पर्धेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना मात्र एकाकी पडलेली आहे. सध्या या पक्षाचे नेते नगर पालिका निवडणुकीत व्यग्र आहेत. बहुतांश ठिकाणी त्यांचा भाजपशीच सामना होत आहे. त्यामुळे दोन्ही मित्रपक्षातील संबंध टोकाला गेले आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेचा एकही बडा नेता महापालिकेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सोलापुरात येऊन गेलेला नाही. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी जिल्ह्यात येऊन गेले, पण त्यांनी मनपावर काहीच भाष्य न केल्याने शिवसैनिक अस्वस्थ आहेत. भाजपसोबत युती झाली तरच आपल्याला फायदा होईल, अशा आशेवर शिवसेना आहे. पण भाजप मात्र मित्रपक्षाचेच उमेदवार फोडण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने मात्र आपली सावध भूमिका घेतली आहे. गेल्या वेळी एमआयएमचे 9 नगरसेवक होते. यापैकी 6 जण यापूर्वीच दोन्ही राष्ट्रवादीत गेले. उर्वरित तिघांनाही लवकर घेऊ, असे संकेत अण्णा बनसोडे यांनी गुरुवारी दिले. ते तीन दिवस शहरात तळ ठोकून बसणार आहेत. प्रभागनिहाय दौरे करुन उमेदवारांची चाचपणीही करणार आहेत. महायुतीत नेमके काय घडले; ज्यामुळे स्वबळावर आले...! 1 भाजप : ‘भाजपला आता कुबड्यांची गरज नाही’ असे अमित शाह यांनी म्हटले होते. तेव्हापासूनच भाजपने ऑपरेशन लोटस राबवत ताकद वाढवली. विरोधकांप्रमाणे मित्रपक्षांचे बडे नेतेही खेचून घेतले. नगर पालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी मित्रपक्षांशीही युती करणे टाळले.2 राष्ट्रवादी (अजित पवार) : भाजप स्वबळावरच जात असल्याचे पाहून राष्ट्रवादी सावध झाली. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर जे नेते भाजपकडे जाणार नाहीत त्यांना ओढण्यास सुरुवात केली. विशेषत: शरद पवार गट, काँग्रेस, एमआयएमचे नेते आणून स्वबळाची तयारी सुरु केली. 3 शिवसेना (शिंदे गट) : भाजपशी युती झाली तरच आपला मनपाच्या सत्तेत येण्याचा मार्ग खुला होईल, असे शिंदेसेनेला वाटते. मात्र तसे झाले नाही तर सर्वच 102 जागांवर त्यांना उमेदवार मिळणे कठीण. त्यांचे काही इच्छूक भाजपमध्येही जाऊ शकतात. बनसोडेंचा भाजपवर थेट आराेप,शहराचा अपेक्षित विकास नाहीच सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली. ते म्हणाले, ‘अनेक वर्षे सत्ता असूनही सोलापूरचा अपेक्षित विकास झाला नाही. अनेक विकासाचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत’, त्यांचा राेख भाजपावरच हाेता. स्वबळाची भूमिका मांडत त्यांनी ‘अब की बार 75 पार’ असा नाराही दिला. ते पुढे म्हणाले, ‘माझे आजोळ सोलापूर. त्यामुळे या शहराबद्दल मला आपुलकी आहे. म्हणून मी स्वत:हून इथली जबाबदारी घेतली. पिंपरी-चिंचवडमधील विकासाच्या धर्तीवर सोलापूरचा विकास करायचा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने एक संधी द्यावी. जो खरा कार्यकर्ता आहे, त्याच्यापाठीशी आम्ही असणार. महापालिका निवडणुकीत स्वबळावर 26 प्रभागांत 102 उमेदवार देणार. भाजपप्रमाणे आमच्याकडेही इन्कमिंग सुरू आहे,’ असेही ते म्हणाले. भाजप, राष्ट्रवादीप्रमाणे आम्हीही सज्ज लोकसभा आणि विधानसभेला महायुती होती. त्याच धर्तीवर मनपा निवडणुकीतही युती व्हावी. पण जर भाजप, राष्ट्रवादी स्वबळाची भाषा करेल तर आमचीही तयारी आहे. - अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट) महायुतीची चर्चाच अद्याप नाही राष्ट्रवादीने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे ठरवले तरी महायुतीची अद्याप चर्चाच नाही. नगरपालिका निवडणुका झाल्यानंतर प्रदेश पातळीवरील निर्णय होईल. - रोहिणी तडवळकर, भाजप शहराध्यक्षा
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी ,हास्यसम्राट, 'मिर्झा एक्सप्रेस 'फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.30 वाजता प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज - माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे. सध्या अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात 'मिर्झा एक्सप्रेस ' या घरात त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, महाजबी व हुमा या दोन सुविद्य कन्या आहेत. त्यांच्यावर अमरावती येथील ईदगा कब्रस्तानात दुपारी दोन नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डॉ. मिर्झा रफी अहमद बेग आपल्या खुमासदार सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्यांचे एकूण २० काव्यसंग्रह असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपल्या 'मिर्झा एक्सप्रेस ' या काव्य मैफिलीचे ६ हजारावर सादरीकरण केले आहे. मूत्रपिंडाच्या आजाराने होते त्रस्त गेल्या काही दिवसापासून मूत्रपिंडाच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर अमरावती येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या 11 व्या वर्षापासून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली होती. 17 सप्टेंबर 1957 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यानंतर 1970 पासून त्यांनी मंचावर कविता सादर करायला सुरुवात केली. पुढील 50 वर्ष विदर्भ, मराठवाड्यातील कवी संमेलनाचे ते केंद्रबिंदू ठरले. वृत्तपत्रातील विविध स्तंभातून लेखनही त्यांनी केले. त्यांचा 'मिर्झाजी कहीन ' हा स्तंभ तुफान लोकप्रिय ठरला होता. त्यांचे २० काव्यसंग्रह असून मिर्झा एक्सप्रेस या नावाने अफलातून किस्से आणि कवितेचा कार्यक्रम प्रसिद्ध होता. शेती, माती, कृषी, शेतकऱ्यांच्या समस्या, ग्रामीण भागातील समस्या, आणि सामाजिक समस्यांवर व राजकीय विरोधाभासावर नर्म विनोदी शैलीमध्ये लिखाण करणे ही त्यांची खास हातोटी होती.जांगडबुत्ता या शब्दाचे जनक विदर्भातील ख्यातनाम संत फकीरजी महाराज या मंदिर ट्रस्टचे ते ट्रस्टी होते. त्यांचे वडील मिर्झा रज्जाक बेग उर्फ भाईजी हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रभावी राजकीय सामाजिक व्यक्तिमत्व होते. विदर्भातील नागपूर येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधीज्ञ फिरदोस मिर्झा हे त्यांचे चुलत बंधू आहेत. मराठी, वऱ्हाडी भाषेवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यांच्या कार्यक्रमांनी वऱ्हाडी भाषेची महती देशभर झाली.राजधानी दिल्ली पासून तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईपर्यंत त्यांचे कार्यक्रम सतत सुरू असायचे. मोठा माणूस, सातवा महिना, उठ आता गणपत, जांगडबुत्ता अशा कितीतरी कविता त्यांच्या लोकप्रिय झाल्या. जांगडबुत्ता या शब्दाचे ते जनक आहेत. मुसलमान असूनही येते मला मराठी ठोकू नका माई पाठ याच्यासाठी जो जिथे जन्मला तेच त्याची भाषा पऱ्हाटीकून बोंडाचीच करानं आशा अशा शब्दात त्यांचे काव्य लेखन असायचे. धर्मभेदाची अतिशय सोपी त्यांची व्याख्या होती. त्यामुळे ते सर्वधर्मीयांच्या गळ्यातील ताईत होते.हिंदू मुसलमानात काय आहे फरकहा म्हणते हटजा तो म्हणते सरक काथा संग जसा चुना असते पानात हिंदू संग मुसलमान तसा हिंदुस्थानात अशा अनेक रचना त्यांच्या व्यासपीठावरून लोकांच्या कायम स्मरणात आहेत. ते लोककवी होते.संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे हजारो चाहते आहेत. त्यांच्या निधनाने वऱ्हाडी भाषेचा स्तंभ ढासळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. आज या प्रकरणी महत्त्वाची सुनावणी होणार असून, राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे भवितव्य त्यावर ठरणार आहे. सध्या राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका रंगात आल्या आहेत. 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींमध्ये उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, अनेक ठिकाणी थेट लढती रंगल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे आजचे मत राज्याच्या राजकीय वातावरणावर मोठा परिणाम घडवू शकते. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांना स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला. मात्र, राज्य निवडणूक आयोगानेही कोर्टात कबुली दिली की 40 नगरपरिषद व 17 नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे संतुलित आरक्षण रचनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संविधानात आरक्षणाची कमाल मर्यादा 50% निश्चित असल्याने, आयोगाकडून केलेल्या अद्ययावत अहवालानंतर कोर्टाचे आदेश निवडणूक प्रक्रियेला वळण देऊ शकतात. या याचिकेवर विकास गवळी यांनी न्यायालयात आक्षेप नोंदवला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, राज्य सरकारने काही ठिकाणी ओबीसी व इतर घटकांना जास्त प्रमाणात आरक्षण देत घटनात्मक रेषा ओलांडली आहे. दुसरीकडे, राज्य सरकार मात्र बांठिया आयोगाचा अहवाल दाखवत आपण कायद्याच्या चौकटीत राहूनच आरक्षण निश्चित केले असल्याचा दावा करत आहे. या दोन बाजूंच्या युक्तिवादावर न्यायालय आता कोणता निर्णय देते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. मंगळवारीच्या सुनावणीत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्याला अधिक वेळ देण्याची विनंती केली. त्यावर याचिकाकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला की, निवडणुका जाहीर झाल्या आहेत, अर्ज भरून झाले आहेत आणि आता वेळ कशासाठी? कोर्टाने कोणतेही मत नोंदवण्याचे टाळले मात्र, अंतिम आदेशाच्याच चौकटीत निवडणुका होतील, अशी टिप्पणी केली. त्यामुळे आज सुनावणी ठेवण्यात आली आहे. आजचा निकाल म्हणजे भविष्यातील आरक्षण रचनेचा मार्गदर्शक ठरू शकतो. अनेक ठिकाणी उमेदवारीच बदलण्याची शक्यता सध्या निवडणूक प्रचार जोमात असताना, अचानक न्यायालयीन मुद्दा वाढल्याने राजकीय नेत्यांचे लक्षही न्यायालयात काय घडते, याकडेच लागले आहे. जर कोर्टाने आरक्षण रचनेबाबत फेरबदलाचे आदेश दिले तर अनेक ठिकाणी उमेदवारीच बदलण्याची शक्यता निर्माण होईल. राज्यात आधीच अनेक पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना, हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता वाढवणारा ठरला आहे. त्यामुळे, आजच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे, हे निश्चित.
‘तायडे मला एकदा बाेलली असती तर वाचवू शकलाे असताे... असा टाहाे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेच्या पाेलिस असलेल्या भावनाे फाेडला. माझ्या मोबाईलवर नेहाने चिठ्ठी पाठवल्याचा तीने काॅल केला. ती चिठ्ठी मी वाचतच हाेताे. त्याचवेळी तिच्या नणंदेचा मला फाेन आला. तेव्हा माझी लाडकी बहीण नेहा आम्हाला साेडून गेली हाेती. माझ्या बहिणीचा अतोनात छळ झाल्याने तीने जीवन संपवले. तीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांना कठोर शिक्षा व्हावी असे मुंबई पाेलिसांत असलेला नेहाचा भाऊ सांगत हाेता तेव्हा उपस्थितांचेही डाेळे पाणावले हाेते. विवाहितेच्या वडिलांचा 10 वर्षांपूर्वी मृत्यू झाल्याने त्यांचे मित्र व विवाहितेच्या भावांनी तिचे माेठ्या थाटात लग्न लावून दिले. साेने, चांदी आणि दागिने, भांडीही दिली. मात्र, वारंवार हाेणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून तिने बुधवारी (दि. 26) 7 पानांची चिठ्ठी लिहून आत्महत्या केली हाेती. तिचा मृतदेह सिव्हीलमध्ये शवविच्छेदन करीता आणला होता. नातेवाईकांनी तीच्या सासरच्या लोकांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतल्याने काही सिव्हिल हाॅस्पिटल परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी नातेवाईकांना समजविण्याचा प्रयत्न केला. त्यांना विश्वास देत या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ पती संतोष पवार, सासू आणि 3 नणंद अशा 5 संशयितांना अटक केल्याचे सांगीतले. आरोपींना कठोर शिक्षा होईल असे अश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी नेहाचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. बहिणीला न्याय मिळावा चिठ्ठी मेसेज केल्याचे सांगण्याकरीता तीचा फोन आला, मी ती चिठ्ठ वाचत होताे. तेवढ्याच तीच्या नंदेचा फोन माझ्या तायडीचा छळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. - राहुल डावरे, मृत नेहाचा भाऊ सिव्हीलमध्ये तणाव सासरच्यांना अटक होईपर्यंत नातेवाईकांचा पवित्रा घटना दुर्दैवी आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ पतीसह सासू, 3 नणंद यांना अटक केली. त्यामुळे नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले. घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा होण्याकरीता लवकरच दोषारोपपत्र सादर केले जाईल. - गजेंद्र पाटील, वरिष्ठ निरीक्षक पंचवटी पोलिस ठाणे.
सातारा जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीने मैदानात उतरला आहे आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. अशातच रहिमतपूर नगरपालिकेतील सभेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले. आपलं चिन्ह कमळ आहे… घड्याळाची वेळ आता चांगली नाही, अशा टिप्पणीमुळे सभेचे वातावरण आणखी रंगले. मतदारांनी भ्रमात न राहता भाजपवर विश्वास ठेवावा, असा ठाम संदेश त्यांनी दिला. शिवेंद्रराजे म्हणाले, की आता इकडे-तिकडे पाहू नका. हातातील घड्याळ आणि चिन्हावरील घड्याळ वेगळे आहे. कमळ चिन्हाचा आधार घ्या. विकास करणारे, स्थिर नेतृत्व देणारे उमेदवार निवडून द्या. त्यांच्या या वक्तव्यावर जनसमुदायातून मोठा प्रतिसाद मिळाला. गेल्या काही काळात राजकीय पक्षांतील बदल, फुट, चिन्ह वाद या सर्व चर्चांना चांगलाच उत आला असताना शिवेंद्रराजेंची ही टीका महत्त्वाची ठरली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठे बदल होताना दिसत आहे. सातारा, कराड, महाबळेश्वर, फलटण, वाई, म्हसवड, रहिमतपूर, पाचगणी आणि मलकापूर या नगरपरिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका होत आहेत. तसेच मेढा नगरपंचायतीत तिरंगी लढत रंगणार आहे. जिल्ह्यातील पक्षांची स्थिती लक्षात घेता ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांत घराणेशाही विरुद्ध तळागाळातील नेतृत्व असा सामना निर्माण झालाय. साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये थेट सामना रंगणार आहे. फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुत्र अनिकेतराजे विरुद्ध त्यांच्या नातेवाईक समशेरसिंह नाईक निंबाळकर रिंगणात असणे ही देखील चर्चेची बाब ठरत आहे. त्यामुळे सत्ता आणि प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत कुणाचे पारडे जड ठरणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जनतेची सहानुभूती कोणाकडे वळते? रहिमतपूर नगरपालिकेतही घरच्यांतील लढत पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटातून अजित पवार गटात प्रवेश केलेले सुनील माने आता या निवडणुकीत केंद्रस्थानी आहेत. येथे त्यांच्या पत्नी नंदना माने या नगराध्यक्षपदासाठी मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात भाजपच्या वैशाली माने या उमेदवार आहेत. आडनाव एकच पण राजकीय मार्ग वेगळा असल्यामुळे ही लढत लोकांच्या विशेष उत्सुकतेचा विषय ठरली आहे. राजकीय समीकरणे बदलल्यानंतर जनतेची सहानुभूती कोणाकडे वळते? हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. स्थानिक पातळीवरील गटबाजी अधिक चिघळण्याची शक्यता शिवेंद्रराजे यांनी सूचकपणे माने दाम्पत्यालाही लक्ष्य केले आणि मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे हे अधोरेखित केले. घड्याळाला दाद द्यायची वेळ गेली, आता कमळावर विश्वास ठेवा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. त्यांच्या या वक्तव्याने स्थानिक पातळीवरील गटबाजी अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सातारा जिल्हा पुन्हा एकदा राजकीय नकाशावर केंद्रस्थानी जिल्ह्यातील निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसा राजकीय वातावरणाचा ताण वाढताना दिसत आहे. नवीन-जुने नेते, बदलेली चिन्हे, कुटुंबातीलच राजकीय स्पर्धा, या सगळ्यामुळे रहिमतपूरपासून संपूर्ण साताऱ्याचे राजकारण चुरशीचे बनले आहे. मतदानापर्यंत अजून अनेक टीका-प्रत्युत्तरं पाहायला मिळतील यात शंका नाही. मतदारांनी विकास, स्थिरता आणि प्रामाणिक नेतृत्व ओळखून निर्णय घ्यावा, अशा भूमिका सर्वच पक्षांकडून मांडल्या जात आहेत. मात्र अंतिम निकाल कोणाच्या बाजूने झुकेल हे ठरवण्याची ताकद फक्त जनतेच्या हातात आहे. त्यामुळे यंदाच्या स्थानिक निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून सातारा जिल्हा पुन्हा एकदा राजकीय नकाशावर केंद्रस्थानी आला आहे.
राकाँच्या विद्यार्थी आघाडीचे वैभव घुगेंनी संपवले जीवन
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीचे महानगरप्रमुख वैभव घुगे यांचा रेल्वेखाली सापडल्याने मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी उजेडात आली. त्यांनी आर्थिक विवंचनेतून जीवन संपवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पोलिस तपासातून मृत्युमागील कारणांसह सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत. त्यांनी सुमारे एक आठवड्यापूर्वी आपल्याला पक्ष संघटनेत पुन्हा जास्त सक्रिय व्हायचे आहे, असे प्रदेश स्तरावरील नेत्यांकडे बोलून दाखवले होते. बुधवारीच राकाँ प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अकोट येथे सभा झाली होती. त्यानंतर गुरुवारी त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. अकोल्यात िवविध संघटना, राजकीय पक्षांच्या विद्यार्थी आघाड्या सक्रिय आहेत. विद्यार्थी संघटना, आघाड्यांमधून समाजकारण, राजकारणात प्रवेश करणाऱ्यांची संख्याही वाढतच आहेत. दरम्यान वैभव घुगे यांचा रेल्वेखाली सापडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी उजेडात आली. ही दुर्घटना जुन्या आरटीओ रोड परिसरातील रेल्वे रुळावरसमोर आली. रेल्वे अंगावरून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. राजकीय वर्तुळात वैभव घुगे हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. शिक्षण क्षेत्रात, विद्यार्थ्यांमध्ये ते सक्रिय होते. मानसिक दबावातून हा प्रकार घडला काय, यासह अन्य बाबी आता तपासातून पुढे येणार आहे. घटनेची माहिती मिळताच खदान पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल कॉल डिटेल्स यांचीही माहिती घेऊन चौकशी होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी झाले बोलणे वैभव घुगे हे पदावर होते. मात्र ते काही दिवसांपासून संघटनेच फारसे सक्रिय नव्हते. त्यांच्याशी ५-६ दिवसांपूर्वी फोनवर बोलणे झाले होते. पुन्हा पक्ष संघटनेत सक्रिय व्हायचे आहे, असे त्यांचे म्हणणे होते. मी त्यांना तुम्ही पदावर आहातच; तुम्ही सक्रियपणे कार्य करीत राहा, असेही म्हणालो. मात्र त्यांचा मृत्यू मनाला चटका लावून गेला, अशा शब्दात राकाँच्या विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम म्हणाले. पोलिस तपासात सर्व बाबी स्पष्ट होतील; लवकरच अकोल्यात येऊन कुटुंबीय-परीचितांची भेट घेऊ, असे असेही त्यांनी नमूद केले.
येथील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी २६ नोव्हेंबरला लोकमान्य टिळक सभागृहात सकाळी दहा वाजता संविधान दिनानिमित्त व्यक्तिमत्व विकास व कौशल्य शिबिर उत्साहात झाले. संविधान दिनानिमित्त आयोजित या शिबिराला अध्यक्ष म्हणून प्राचार्य माधव मुनशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी नागेश देशपांडे, उपप्राचार्य उदय हातवळणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी अमोल बुटे, पर्यवेक्षिका अलका मुंडे या वेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन, संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी जीवनात जेवढे महत्त्व अभ्यासाचे आहे, तेवढेच आवडी निवडीला महत्त्व आहे आणि त्याच माध्यमातून कौशल्य विकसित करून रोजगार प्राप्त करू शकतो, असे मत व्यक्त करून विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व सांगितले. प्राचार्य माधव मुनशी यांनी संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून हक्क व कर्तव्य काय असतात, याची जाणीव करून दिली. उपस्थित विद्यार्थ्यांसोबत संविधानावर आधारित काही प्रश्न उपस्थित करून संवाद साधला. त्यानंतर धबाले यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून विद्यार्थ्यांना संविधानाचे पालन करण्याची शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिका पातुरकर यांनी केले. श्रीकांत रत्नपारखी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील, हायस्कूलमधील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याकरिता कनिष्ठ महाविद्यालयाचे उदय कोल्हेकर, राहूल महाजन, अमोल काजळे, नंदकिशोर थुटे, आरती मुळे यांनी परिश्रम घेतले. संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात श्रुती भोसले, कार्तिक चितोडे, सलोनी उमाळे, समीक्षा गवई यांचा समावेश होता. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते, त्यानंतर संविधान दिनानिमित्त मनोगत व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व प्रश्नमंजुषेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले.
अकोला जिल्ह्यातील पाच नगर परिषदा व एक नगर पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली आहे. नगरसेवक पदाच्या १४२ जागांसाठी ६८५ उमेदवार रिंगणात असून, सहा नगराध्यक्ष पदासाठी ३८ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. सर्व उमेदवारांना चिन्हांचे वितरण करण्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत आली असून, राजकीय घमासान सुरू झाले आहे. ओबीसीच्या मुद्द्यावरून दाखल याचिकेवर ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. ४ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. जिल्ह्यातील अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, तेल्हारा व हिवरखेड नगर परिषदेसह बार्शीटाकळी नगर पंचायतीसाठी निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांची मोठी गर्दी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात झाली होती. परिणामी १७ नोव्हेंबर रोजी रात्री उशीरापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. अध्यक्षपदासाठी एकूण ६१ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ५३ वैध तर ८ अर्ज अवैध ठरले. सदस्य पदासाठी एकूण ८५० उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८०२ अर्ज वैध तर ४८ अर्ज अवैध ठरले. निवडणुकीतून माघार घेण्याची शेवटचा दिवस २१ नोव्हेंबर असल्याने सदस्य पदाच्या निवडणुकीतून ९५ उमेदवारांनी माघार घेतली होती. तसेच नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतून १४ अर्जदारांनी माघार घेतली होती. अखेर आता उमेदवारांची अंतीम यादी निवडणूक विभागाकडून प्रकाशित झाली आहे. हिवरखेड येथे सर्वांचे लक्ष : जिल्ह्यात हिवरखेड नगर परिषद उदयास आल्यानंतरही ही पहिलीच निवडणूक आहे. हिवरखेड न.प. होण्यासाठी राजकीय पक्ष, नेते, काही समाजसेवक यांच्यात श्रेयवादासाठी चढाओढ झाली. आता निवडणूक होत असल्याने प्रचारात हा मुद्दा गाजणार असून, मूलभूत सुविधा प्रदान करण्यावरून आश्वासनांचा पाऊस पडत आहे. हिवरखेड नगर परिषद कार्यालय. नगराध्यक्षपदाचे चित्र न.प. उमेदवार अकोट ०८ मूर्तिजापूर ०८ बाळापूर ०५ तेल्हारा ०५ हिवरखेड ०७ बार्शीटाकळी ०५ एकूण ३८ तीन ठिकाणी सत्ता असलेल्या भाजपचे सदस्य पदाच्या १४२ पैकी १३१ उमेदवार कायम आहेत. तसेच सहा अध्यक्ष पदासाठी उमेदवार कायम ठेवण्यात आले आहेत. तेल्हारा, अकोट व मूर्तिजापूर येथील सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान भाजप पुढे आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सोयीनुसार व राजकीय शक्ती पाहता उमेदवार उभे केले आहेत. महाविकास आघाडीत सर्व जागांवर सूर जुळले नाहीत. अकोट, मूर्तिजापूर, हिवरखेड व बार्शीटाकाळी काँग्रेस लढत असून, शिवसेना तेल्हारा, मूर्तिजापूर येथे लढत आहे. वंचित बहुजन आघाडीने बाळापूर वगळता अन्य सर्व ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार कायम ठेवले आहेत. न.प. जागा उमेदवार अकोट ३५ १८७ मूर्तिजापूर २५ १३० बाळापूर २५ ८५ तेल्हारा २० ९२ हिवरखेड २० ९९ बार्शीटाकळी १७ ९२ एकूण १४२ ६८५
येत्या २ डिसेंबर रोजी नगर परिषदेची निवडणूक होऊ घातली असून त्या अनुषंगाने राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. खामगाव नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या वतीने राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या होम ग्राउंड मध्ये त्यांच्या वहिनी अपर्णा सागर फुंडकर या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात असून त्यांना निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. सध्या तरी खामगावात नगराध्यक्ष पदासाठी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये तिरंगी लढत असल्याचे दिसून येते. लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर व माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई खामगाव मतदार संघात नेहमीच गाजली आहे. स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्यानंतर सध्या राज्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी मतदारसंघाची धुरा हाती घेतली आहे. सलग तीन टर्म आकाश फुंडकर आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा दोन वेळा पराभव केला आहे. मागील काही महिने अगोदर माजी आमदार सानंदा यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. सानंदा यांच्याकडे एकमेव खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता होती. मात्र त्यालाही विरोधकांनी सुरुंग लावत त्यांच्या ताब्यातील बाजार समितीची सत्ता हिसकावून घेतली.अशातच नगर परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून खामगाव नगर परिषद नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेकरिता राखीव आहे. नगराध्यक्ष पदासाठी खामगाव नगर परिषद निवडणुकीत ६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा सागर फुंडकर या भाजपच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने स्मिता किशोर आप्पा भोसले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने चेतना संजय शर्मा या तीन प्रमुख उमेदवारा सोबतच शिवसेना शिंदे गट, बसप व इंडियन नॅशनल लीगच्या उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगर परिषद निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असून या दिवसात नगराध्यक्ष पद निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे सलग १५ वर्षे आमदार राहिलेले माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. कोणतीही निवडणूक असो सानंदा नेहमीच आक्रमक राहतात. यावेळी ते प्रथमच काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादीच्या घड्याळासाठी निवडणूक मैदानात उतरले आहेत. माजी आमदार सानंदा यांना निवडणूक लढवण्याचा दांडगा अनुभव आहे. मात्र तरीही खामगाव नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सानंदा यांना चांगलीच दमछाक करावी लागणार असल्याचे पहावयास मिळते. माजी आमदार सानंदा प्रथमच राष्ट्रवादीकडून मैदानात
ग्रामपंचायतचा कर भरला नाही; सरपंच,2 सदस्य अपात्र
ग्रामस्थांना थकित कराचा भरणा करण्याची नोटीस बजावणाऱ्यांनी मात्र स्वतःच कराचा भरणा केला नाही. त्यामुळे सरपंचासह दोन सदस्यांवर अपात्रतेची वेळ आल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे आहे. ग्रामपंचायत सदस्य यांनी केलेल्या तक्रारीवरून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी ही अपात्रतेची कारवाई केली आहे. तिवसा तालुक्यातील शेंदोळाखुर्द ग्रामपंचायत सरपंच तृप्ती निस्ताने, ग्रामपंचायत सदस्य रेखा गणेश, दिलीप काळमेघ, यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. शेदोळाखुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य आशिष निस्ताने, यांनी याप्रकरणी अप्पर आयुक्त यांच्याकडे सदस्यत्त्व रद्द करण्याची मागणी केली होती. अप्पर आयुक्त यांनी अपिलार्थींची याचिका फेटाळून याप्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी यांचे आदेश कायम ठेवले. अप्पर जिल्हाधिकाऱ्यानी एकंदरीत परिस्थिती, पुरावे याच्या आधारे सरपंच, सदस्यांना अपात्र घोषित केले. या प्रकरणामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात अहवाल मागवला होता. यावेळी ग्रामपंचायत सरपंच व दोन सदस्यांनी कराचा भरणाच केला नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे ग्रामपंचायत अधिनियम १९५९, अन्वये कलम १४, नुसार याचिका दाखल करण्यात आली ग्रामपंचायत कर वेळेत न भरल्यामुळे येथील सरपंच व दोन सदस्यांना कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. आता कर चुकवेगिरी नको रे बाबा, असा सूर इतर सदस्यांमधून निघत आहे. अप्पर आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाई ^२०२२ -२०२३ चे मागील बिल सरपंच व सर्व सभासदांना दिल्यानंतर कराचा भरणा ९०, दिवसाच्या आत करणे बंधनकारक होते. परंतु, कर न भरल्याने सरपंच व दोन सदस्यांना अप्पर आयुक्त यांच्या आदेशानुसार अपात्र घोषित करण्यात आले आहे. - आशिष निस्ताने, शेंदोळा खुर्द
मुरूम घेवून येणाऱ्या टिप्परच्या धडकेत छायाचित्रकार तरुणाचा जागेवरच मृत्यू
रस्त्याच्या कॉँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामावर मुरूम घेवून येणाऱ्या एका टिप्परने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार ४२ वर्षीय छायाचित्रकाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात गुरूवारी (दि. २७) दुपारी दोन वाजताच्या सुमारास ब्राह्मणवाडा थडी ते घाटलाडकी मार्गावरील टी पॉइंटवर झाला आहे. या घटनेने ब्राम्हणवाडा थडी गावात हळहळ व्यक्त होत आहे. अमोल दादारावजी पेठे (४२, रा. ब्राह्मणवाडा थडी, ता. चांदूर बाजार) असे मृतकाचे नाव आहे. अमोल पेठे हे गावात एका बँकेचे दैनंदिन रोख गोळा करणे तसेच छायाचित्रणाचा व्यवसाय करत होते. अमोल पेठे हे दुचाकीने जात असताना त्यांना टिप्परने धडक दिली. या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून खरपी, शिरजगाव, ब्राह्मणवाडा मार्गे चांदूरबाजार या राज्य महामार्गाचे सिमेंट कॉँक्रिट बांधकाम सुरू आहे. टिप्परने दुचाकीला धडक दिली. यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नागरिक घटनास्थळी अपघातानंतर घटनास्थळावर ब्राह्मणवाडा थडी येथील संतप्त नागरिकांनी घटनास्थळी जावून वाहतूक रोखून धरली. धडक देणाऱ्या टिप्परचालक व रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर कारवाई करेस्तोवर मृतदेह उचलणार नाही, अशी मागणी लावून धरली होती.
भारतीय संविधानामुळेच या देशाची एकता आणि एकात्मता टिकून आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने भारतीय संविधानाला राष्ट्रीय ग्रंथ मानून त्याची अंमलबजावणी कशी होईल यासाठी प्रयत्न करावेत. भारतीय संविधान देशासाठी एक मोठा ठेवा असून प्रत्येक नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त ग्रंथ आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला एकतेच्या सूत्रात बांधण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन भारतीय संविधान दिनाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोके यांनी केले. ते श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित जे.डी.पाटील सांगळुदकर महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग व तालुका विधी सेवा समिती दर्यापूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अतुल बोडखे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संविधानाचे महत्त्व सांगताना प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण केले पाहिजे. संविधानाने भारतीय नागरिकांची कर्तव्ये सांगितलेली असून प्रत्येक नागरिकाने त्यांचे पालन करणे आवश्यक आहे तरच सशक्त भारताची निर्मिती होऊ शकेल असे मत मांडले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अधिवक्ता अॅड. रितेश गवई यांनी विद्यार्थ्यांना मूलभूत अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ॲड.गवई यांनी भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या बाबतीत नागरिकांनी जागरूक असले पाहिजे,असे मत व्यक्त केले. तसेच ॲड.विद्यासागर वानखडे यांनी भारतीय संविधानातील नीती निर्देशक तत्त्वे सरकारला धोरण निर्मिती करण्यासाठी कशी उपयुक्त आहेत हे सांगितले. ॲड.वैभव इंगळे यांनी संविधानातील मूलभूत कर्तव्ये सांगत असतांना भारतीय संविधान नागरिकांनी आत्मसात करण्याची गरज असून घराघरात भारतीय संविधान कसे पोहोचेल यासाठी प्रत्येकाने जबाबदारी पार पाडावी असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधानसभेचे सदस्य डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख, बाबासाहेब सांगळूदकर आणि कोकिळाबाई गावंडे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. संगीत विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुरेंद्र शेजे आणि डॉ.राजेश उमाळे यांनी गौरव गीत सादर केले. या कार्यक्रमाचे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रकाश पानतावणे यांनी केले.संचालन प्रा.डॉ.वृशाली देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.सुशील चरपे यांनी केले. या कार्यक्रमास तालुका विधि सेवा समिती अध्यक्ष ॲड.डी.एन.आठवले, गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे, पंचायत समितीचे गट समन्वयक सुनील स्वर्गीय, आयक्यूएनसी समन्वयक प्रा.डॉ.मनिष होले, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.डॉ.विजय एलकर, प्रा.डॉ.मिलींद भिलपवार आणि महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मनुष्य-मोकाट श्वान संघर्ष प्रतिबंधासाठी तत्काळ उपाय योजना राबवाव्यात. प्राधान्याने ज्या भागांत भटक्या कुत्र्यांचे प्रमाण जास्त आहे, त्या वॉर्डांचे सर्वेक्षण तत्काळ पूर्ण करण्यात यावे. सर्व विभागांमध्ये सतत समन्वय राहील याची काळजी घ्यावी. नागरिकांच्या तक्रारींवर जलद प्रतिसाद द्यावा. २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करून तक्रारी तत्काळ नोंदवून त्यावरच्या कारवाईचा अहवाल डिजिटल स्वरूपात ठेवावा. गल्लीबोळात उघडा कचरा साठू नये व त्यामुळे भटक्या कुत्र्यांची वाढ होत असल्यास जबाबदार विभागाविरुद्ध कारवाई करावी, असे निर्देश मनपा आयुक्त सौंम्या शर्मा यांनी गुरुवारी २७ रोजी झालेल्या बैठकीत दिले. अमरावती महानगरपालिकेत सर्वोच्च न्यायालयातील अंतर्गत याचिका ०५/२०२५ च्या पार्श्वभूमीवर मनुष्य-श्वान संघर्ष तसेच संस्थात्मक व्यवस्थापनाशी संबंधित गंभीर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस महानगरपालिकेतील विविध विभागांचे प्रमुख, आरोग्य विभागाचे अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, स्वच्छता विभाग, कायदेविषयक शाखा, पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी तसेच जिल्हास्तरावरील प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते. न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन व्हावे, तसेच शहरातील मानव-श्वान संघर्ष परिस्थितीवर नियंत्रण आणता यावे, यासाठी सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या. अमरावती शहरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये निर्माण होणारी भीती, चावा घेण्याच्या घटना, रेबिजविषयक धोके यांचा विचार करून संघर्ष कसा कमी करता येईल यावर चर्चा झाली. विशेषतः शहरी भागातील कुत्र्यांच्या संख्येचे वैज्ञानिक सर्वेक्षण, त्यांचे पुनर्वसन, नागरिकांच्या तक्रारींवर जलद प्रतिसाद, तसेच जनजागृती या बाबींवर भर देण्याचा निर्णय झाला. आयुक्तांनी सांगितले की, मनुष्य-श्वान यांच्यातील संघर्ष हा केवळ एका विभागाचा विषय नसून अनेक विभागांच्या संयुक्त प्रयत्नांद्वारेच त्यावर नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय शाखा, कायदेशीर सल्लागार आणि पोलीस प्रशासन यांच्यात सातत्याने समन्वय राहणे अत्यावश्यक आहे. विशेष नियंत्रण पथके स्थापन करावी : अॅनिमल बर्थ कंट्रोल कार्यक्रमाची गती वाढवावी. स्टरलायझेशन व लसीकरण मोहिमांना आवश्यक मनुष्यबळ, साधनसामग्री व तांत्रिक मदत पुरवून प्रक्रिया नियोजित वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावी. पशुवैद्यकीय विभागाने विशेष नियंत्रण पथके स्थापन करावीत. समन्वयासाठी साप्ताहिक आढावा बैठक अनिवार्य स्वच्छता, आरोग्य, कायदेविषयक शाखा, पशुवैद्यकीय विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वयासाठी साप्ताहिक आढावा बैठक अनिवार्य करण्यात यावी. कचरा संकलनाचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे. शाळा व नागरिकांमध्ये जनजागृती अभियान राबवावे. प्राणी मालकांना जबाबदार धरावे, रेबिज प्रतिबंधित प्राण्यांसोबत वागणुकीचे सुरक्षित नियम याबाबत शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करावेत. प्राणी पुनर्वसन केंद्रांची क्षमता वाढवावी, अशीही सूचना बैठकीत आयुक्तांनी केली.
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल)येथे फ्री फ्लॅपद्वारे कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्ण हा ४९ वर्षाचा असून रा.गणोरी, ता.भातकुली, जि.अमरावती येथील रहिवासी आहे. या रुग्णास एकदाच नव्हे तर दुसऱ्यांदा कर्करोग झाला. पहिल्यांदा शस्त्रक्रिया केली तेव्हा जबड्याचा मोठा भाग काढावा लागला होता. गालातील कर्करोग काढण्यात आला होता. मानेतील कर्करोगाच्या ग्रंथी काढल्या होत्या आणि छातीतील स्नायू वापरून तोंडाची पुनर्बांधणी करण्यात आली होती. पीएमएमसी फ्लॅपद्वारे ट्रीटमेंट संपली असे वाटत असतानाच, पुन्हा एकदा आणि आता थेट जीभेला कर्करोग झाला. त्यामुळे या रुग्णावर ही दुसरी शस्त्रक्रिया म्हणजे जीवन-मरणाचा संघर्ष होता. रुग्णाची तोंडाची रचना आधीच बदललेली. रक्तवाहिन्या आधीच वापरलेल्या. जखमा, चिरा, जुनी पुनर्बांधणी सर्व काही अडचणी असताना जिभेच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्यामुळे शस्त्रक्रिया करून जीभे वर पसरलेला पूर्ण कर्करोग काढण्यात आला. डाव्या बाजूचा जबडा थोडा काढण्यात आला. फ्री फ्लॅप तंत्राद्वारे पुनर्बांधणीसाठी वापरण्यात आली. ज्यामध्ये रुग्णाच्या हातातील त्वचा व जिवंत रक्तवाहिन्या सूक्ष्मदर्शकाखाली जोडून तोंडाची पुन्हा जिवंत पुनर्बांधणी करण्यात आली. शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत विनामूल्य करण्यात आली आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सर तज्ञ डॉ. रोहित मुंदडा, डॉ. भुषण मुंदडा, डॉ. तक्षक देशमुख, डॉ. प्रितेश पडगव्हाणकर, बाधिरीकरण तज्ञ डॉ. राखी वानखडे, डॉ. रमणिका ढोमणे, डॉ.माधुरी गाडेकर, डॉ.रोहिणी राठोड, डॉ. ऐश्वर्या, डॉ. किरण, डॉ. स्नेहल, डॉ. प्रियंका, डॉ. साक्षी, अधिसेविका चंदा खोडके यांच्या पथकाने केली. रुग्ण सुरक्षित जमेची बाजू ही शस्त्रक्रिया केवळ कर्करोग काढण्यापुरती मर्यादित नव्हती, तर रुग्णाला पुन्हा बोलता यावे, गिळता यावे आणि सामान्य जीवन जगता यावे, यासाठीही होती. आधीच मोठी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णावर पुन्हा जीभेचा कर्करोग आणि त्यावर फ्री फ्लॅपद्वारे पुनर्बांधणी हे अतिशय कठीण आव्हान होते. आज रुग्ण सुरक्षित आहे, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी जमेची बाजू आहे. - डॉ. रोहित मुंदडा, कॅन्सर तज्ञ, अंको सर्जन.
पुढारी म्हणजे खादीचे कपडे हे अनन्यसाधारण समीकरण आहे. आपल्याकडे कोणत्याही राजकीय नेत्याची खादीच्या कपड्यांना सर्वाधिक पसंती असते. त्यामुळे बहुतांश नेते हे खादी परिधान केलेले दिसतात. खादीचा कुर्ता आणि पायजमा हा आजच्या काळातही राजकीय नेत्यांचा गणवेश म्हणावा, इतका सर्वमान्य झाला आहो. त्यामुळे नगरपालिका, नगरपंचायती व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खादीच्या कपड्यांना मागणी वाढली आहे. सगळीकडे सध्या नगरपरिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. प्रचारादरम्यान कडक पांढऱ्या कपड्यांना मोठी मागणी सध्या पाहायला मिळत आहे. अंगावरील पोशाखामुळे माणसाचे व्यक्तिमत्त्व खुलते. कपडे स्वच्छ आणि नीटनेटके असले, तर त्या व्यक्तीकडे लोकही आकर्षित होतात. त्यामुळे निवडणुकीच्या या धामधुमीत अनेक उमेदवार प्रचारासोबतच आपल्या अंगावरील पोशाखावर खास लक्ष देत आहेत. पांढरा शुभ्र स्टार्च केलेला कपडा अंगावर परिधान करून उमेदवार तथा त्यांचे काही कार्यकर्तेही मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. कपड्यांना तर फार महत्त्व आहेच, चहाच्या टपरीसोबतच लाँड्रीवालाही ठरलेला आहे. त्याच्याकडूनच हे कपडे स्वच्छ धुऊन स्टार्च केले जात आहेत. सगळीकडे सध्या येथील नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. त्यामुळेच प्रचारादरम्यान कडक पांढऱ्या कपड्यांना मोठी मागणी सध्या पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते गावोगावी प्रचार करत फिरत असतात. आपण रुबाबदार कपड्यात एक वजनदार माणूस वाटावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. त्यामुळे आपल्याकडे लोकांचे एक आकर्षण असावे यासाठी उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते तशा रुबाबदार कपड्याकडे जास्त लक्ष देत असतात. निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांच्याही पोशाखामध्ये बदल पाहायला मिळतो. कार्यकर्त्यांना कपडेदेखील तसेच कडक हवे आहेत. त्यामुळे बाजारातही सध्या कापड दुकानामध्ये गर्दी देखील पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते व उमेदवार हे लोकांसमोर एक वेगळी छाप पडेल, असे कपडे मिळविण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र सध्या बाजारात पाहायला मिळत आहे. त्याचमुळे सध्या बाजारात या कपड्यांना मागणी वाढली आहे. यामध्ये कुर्ता, पायजमा तर हवाच पण तोदेखील कडकच असायला हवा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे यासाठी स्टार्चच्या कपड्यांना प्राधान्य दिले जात आहे. काय म्हणतात शहरातील कापड व्यवसायिक? काही नेते पदाधिकारी पांढऱ्या शर्टला प्राधान्य देत आहेत. यासाठी शहजादा, मिनिस्ट्री खादी या कापडाचा वापर केला जात आहे. या कडक पांढऱ्या शर्टवर जॅकेटचा ट्रेंड अलीकडेच वाढलेला पाहायला मिळत आहे. यामध्ये पांढऱ्या रांगासोबत इतरही पुरक रंगाची मागणी ग्राहक करीत आहेत. सियाराम शर्टची किंमत ९९९ रुपयांपासून असून जिम कापडाची सुरुवात १५०० रुपयापासून होत आहे. त्याचवेळी ओक्झाम्बर शर्ट १२९९ रुपये किंमतीला मिळते, अशी माहिती व्यावसायिकांनी दिली.
येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या प्राध्यापक भरती घोटाळ्याची बातमी ‘दिव्य मराठी'ने पुराव्यासह प्रसिद्ध केल्यानंतर राज्यातील शैक्षणिक आणि वैद्यकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर अखेर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्याअधिष्ठाता डॉ. मा. सं. इंदूरकर यांनीगुरुवार, २७ नोव्हेंबर रोजी याप्रकरणी हा खुलासा केला आहे. सहायकप्राध्यापकपदी निवड झालेल्या उमेदवाराने सहयोगी प्राध्यापकपदाचा अर्ज भरलाहोता. त्यामुळे त्यांचे नाव पात्रता यादीत नव्हते, असे त्यांनी म्हटले आहे. शासकीय दंत महाविद्यालय वरुग्णालयाने सहयोगी आणि सहायक प्राध्यापकपदाच्या भरतीसाठी जाहिरातदिली होती. त्यात सहायक प्राध्यापकपदाच्या भरतीसाठी ४ उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र, तर ३ उमेदवारांनाअपात्र ठरवले होते. मात्र, १३ नोव्हेंबर रोजीपात्र डॉक्टरांसोबतच डॉ. मेहुल शहा या पाचव्या उमेदवाराला सुद्धा बोलावले.त्यामुळे या भरती प्रक्रियेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने पुन्हा डॉ. मा. सं. इंदूरकर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. डेंटलचा खुलासा असा शासकीय दंत महाविद्यालय वरुग्णालयाने दिलेल्या खुलासापत्रात म्हटले आहे की, डॉ. मेहुलशहा यांनी स्वहस्ताक्षरामध्येसहायक प्राध्यापक, सामाजिकदंतशास्त्र पदासाठी नियुक्तीदेण्याबाबतचा उल्लेख केला आहे.डॉ. मेहुल शहा यांनी सादरकेलेल्या अर्जावरील शीर्षक मात्रसहयोगी प्राध्यापक असल्यामुळेत्यांचा अर्ज सहयोगी प्राध्यापकयादीत ठेवण्यात आला. त्यामुळेत्यांचे नाव पात्र/अपात्रउमेदवारांच्या यादीत आले नाही.मुलाखतीच्या दिवशी डॉ. मेहुलशहा यांनी याबद्दल आक्षेपनोंदवला. त्यानंतर उमेदवार निवडसमितीची बैठक झाली. डॉ. मेहुलशहा यांच्या अर्जाची पुन्हा छाननीकेली गेली. त्यात त्यांच्याकडेसहायक प्राध्यापक पदासाठीलागणारी शैक्षणिक पात्रताअसल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे त्यांना मुलाखतीसाठी पात्रठरवले गेले. ते त्याच दिवशीसंस्थेच्या सूचना फलकावरहीप्रसिद्ध केले. या प्रकरणीमहाविद्यालयाकडून कोणतीहीअनियमितता झाली नाही.
येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निकालावर तीन वेगवेगळे अपील दाखल केले होते. गुरुवारी (दि.२७) दुपारी न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मदन जाधव यांचा निर्णय कायम ठेवला. दरम्यान निवडणूक आयोगाने येथील नगराध्यक्ष निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. पंढरपूर येथील जिल्हा न्यायाधीश ए. एस. सलगर यांच्या न्यायालयात यावर अंतिम निर्णय होणार उत्कंठा वाढली होती. रागिणी कांबळे यांचा अर्ज मंजूर करण्याबाबतचे अपील व सुप्रिया अजित जगताप यांच्या अर्जावरील हरकतीचे अपील हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास नामंजूर करत निकाली काढले. सुनंदा बबनराव आवताडे यांच्या उमेदवारी अर्जावरील हरकतीचे अपील सायंकाळी ५.४५ च्या सुमारास न्यायालयाने नामंजूर केले. यात प्रामुख्याने नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रागिनी कांबळे यांनी सुनंदा बबनराव आवताडे यांच्या विरोधात मुलाच्या मक्तेदारीवरून अपील दाखल केले होते. तर सुनंदा बबनराव आवताडे यांनी सुप्रिया अजित जगताप या निकालाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते एकामेकाला फोन लावून विचारणा करत होते. तसेच अनपेक्षित निकाल लागला तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील प्रमुख चौकात बंदोबस्त वाढवला होता. ^सुनंदा बबनराव आवताडे यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अपिलाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.- ॲड संताजी माने, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रागिनी कांबळे यांचे वकील. ^ जिल्हा न्यायालयाने लोकशाही वाचवण्याच्या हेतूने निर्णय दिला आहे. विरोधकाने न्यायालयानीन प्रक्रियेत उमेदवार अडकून रहावा ,अशा हेतूने अपील दाखल केले होते. - ॲड. इरफान सय्यद, नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनंदा बबनराव आवताडे यांचे वकील. नगराध्यक्षपदाच्या तीन उमेदवारी अर्जांबाबत पंढरपूर येथील जिल्हा न्यायालयात दाखल असलेल्या अपिलावर बुधवारपर्यंत (दि.२६) निर्णय झाला नसल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया स्थगित होऊन पुढे जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, रात्री ८ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने याबाबत अधिकृत कळवले नव्हते. रात्री उशिरा आयोगाने प्रक्रियेला स्थगिती दिल्याचे समजले. यांच्याविरोधात अपील दाखल केले. रागिनी कांबळे यांनी त्यांचा स्वतःचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवल्याबद्दल अपील दाखल केले होते. सर्व अपिलांवर गुरुवारी अंतिम निर्णय झाला. नगराध्यक्षपदाच्या तीनही प्रकरणात जिल्हा न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला आहे. तीनही अपील नामंजूर करण्यात आले. या निर्णयामुळे सुनंदा बबनराव आवताडे व सुप्रिया जगताप आणि अपक्ष उमेदवार राजामती तायाप्पा कोंडूभैरी यांच्यात लढत होणार असे दिसत असताना आयोगाने निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली. उमेदवार रागिणी कांबळे मागणार उच्च न्यायालयात दाद जिल्हा न्यायालयाचा लोकशाही वाचवण्याच्या हेतूने निर्णय निवडणूक प्रक्रिया स्थगितीची होती चर्चा
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, शरद पवारांचे विश्वासू बळीरामकाका साठे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वडाळा येथील विठ्ठल मंगल कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांसह कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. साठे हे गेल्या साठ वर्षांपासून सोलापूरमधील राजकीय घडामोडींचा महत्त्वाचा भाग राहिलेले आहेत. १९६४–१९८९ दरम्यान वडाळा गावचे सरपंच, १९७९–२०२२ (अपवाद १९९८ व २००३) पर्यंत जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी शुसंवर्धन समिती सभापती म्हणून त्यांनी जिल्ह्यातील ग्रामविकास आणि शेतकऱ्यांसाठी उपक्रम राबवले. १९९३ साली भूकंपग्रस्त किल्लारी परिसरात मदतकार्याच्या नेतृत्वासह जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व केले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत राज्य शासनाच्या योजनांचा प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला आणि कृषी अवजारे वाटपाचा पायलट प्रोजेक्ट संपूर्ण राज्यात लागू केला. राजकीय विश्लेषण दर्शवते की, साठे यांना शरद पवारांच्या पक्षातून जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्यामुळे त्यांच्यात आणि कार्यकर्त्यात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली, मात्र कार्यकर्त्यांच्या दबावाखाली आणि स्थानिक राजकीय समीकरणांचा विचार करून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणे योग्य ठरवले. भाजप व शिवसेनेकडून आकर्षण असताना, साठे यांचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सोलापूरमध्ये पक्षीय संतुलन मजबूत करण्याच्या रणनीतीस अधोरेखित करतो. उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये बळीरामकाका साठे, त्यांचे नातू जयदीप साठे, वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे, उपसरपंच अनिल माळी, प्रल्हाद काशीद, श्रीकांत मार्तंडे, शशिकांत मार्तंडे, प्रशांत काशीद यांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी होत आहेत. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पक्ष प्रवेशाची दिशा आणि रणनीती ठरविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांच्या अडचणींवर काम करावे, शासनाला नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करावेत, जेणेकरून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. कृषी विद्यापीठांनी शिक्षण संशोधन व विस्तार एकत्रितपणे समन्वयाने काम केल्यास निश्चितच शेतकऱ्यांना व महाराष्ट्रातील शेतीला फायदा होईल. शेतकऱ्यांना काय हवंय, त्यानुसार संशोधन व्हायला हवं. त्यांच्या प्राधान्यक्रम नाविन्यपूर्ण अवजारे, बियाणे किंवा विविध पीक असू शकेल, असे प्रतिपादन कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे महासंचालक लड्डा उंटवाल यांनी व्यक्त केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ या केंद्रास श्रीमती लड्डा उंटवाल महासंचालक महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे यांनी दि.२६ नोव्हेंबर रोजी भेट दिली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी डॉ. यशवंत साळे संचालक शिक्षण महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे हे देखील उपस्थित होते. डॉ.नितीन कुमार रणशूर प्रमुख शास्त्रज्ञ तथा सहयोगी संशोधन संचालक यांनी देखील कृषी विज्ञान केंद्र राबवत असणारे प्रकल्प याविषयी जाणून घेतले. कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे यांनी सद्य परिस्थितीमध्ये सुरू असलेले कृषी विज्ञान केंद्र मार्फत राबवले जाणारे प्रकल्प व कार्याचा आढावा याविषयी सादरीकरण केले. श्रीमती लड्डा उंटवाल यांनी केंद्राच्या कार्याबाबत समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या सीड हब अंतर्गत बीज उत्पादन या विषयी जाणून घेतले. महासंचालक लड्डा उंटवाल यांनी कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली.
अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव (दे ) येथील श्री खंडोबा मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही चंपाषष्ठी उत्सव मोठ्या भक्ती भावाने उत्साहात साजरा करण्यात आली. ‘येळकोट येळकोट जय मल्हार.., सदानंदाचा येळकोट’च्या निनादाने व भंडाऱ्याच्या उजळणीने बोरगाव दुमदुमून गेले. श्री खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भक्तांनी देखील एकच गर्दी केलेली होती. चंपाषष्ठी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी तिथीला साजरा केला जाणारा एक सण असून यादिवशी भगवान शंकराचा अवतार असलेल्या खंडोबाने मणी-मल्ल या राक्षसांचा वध करून मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या दिवशी खंडोबाचे नवरात्र संपते आणि तळी भरण्याचा विधी केला जातो. या दिवशी खंडोबाने लोकांना राक्षसांच्या अत्याचारातून मुक्त केले होते, म्हणून त्याचे स्मरण म्हणून हा सण साजरा करतात. दरम्यान चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी जागरण गोंधळ, पहाटे देवाचा लंगर तोडण्याचा कार्यक्रमानंतर महापूजा, आरती व संपूर्ण गावातून श्री खंडोबा देवाची पालखी व नंदीध्वज मिरवणूक काढण्यात आली. महानैवेद्यानंतर सदर भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या नवरात्राची सांगता होते. हे नवरात्र मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होऊन षष्ठीपर्यंत चालते. यासह चंपाषष्ठीच्या दिवशी मुख्य विधींपैकी एक म्हणजे तळी भरणे. यात खंडोबाच्या मूर्तीभोवती तळी भरली जाते आणि आरती केली जाते. खंडोबा देवाचे पूजन मंदिराचे पुजारी शशिकांत फुलारी यांनी केले. उत्सव साजरा करण्यासाठी हंसराज कामशेट्टी, भीमाशंकर जिरगे, लिंबण्णा जिरगे, आनंदराव भोसले, शरणप्पा जिरगे, व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक येथील श्री स्वामी समर्थ महाराज आलेले प्रथम स्थळ श्री खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री खंडोबा देवाचे विधिवत पूजन, महाआरती, महानैवद्य, महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम मंदिराचे मुख्य पुरोहित गुरव बंधूंच्या हस्ते संपन्न झाली. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलेला होता. खंडोबा देवाची पालखी व नंदीध्वज मिरवणूक काढण्यात आली. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून सहकार, कृषी व औद्योगिक क्षेत्रात दिलेले योगदान वंदनीय आहे. त्यामुळे त्यांचे कार्य राज्यातील जनता कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले. महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचालित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयांतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्रात पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कालिदास वळसंगे, प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते. ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी शेतकरी, शेतमजूर, कामगार व सर्वसामान्य नागरिकांना न्याय दिला. त्यामुळे राज्याची चौफेर प्रगती झाली. ते विद्या व कलेचे उपासक होते. अफाट विद्वत्ता व नम्रता त्यांच्याकडे होती. त्यांचा समाजसेवक ते साहित्यिक, असा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे. प्रारंभी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसवराज कामाठी यांनी केले, सूत्रसंचालन सरोजनी हारकुड यांनी केले तर आभार शरणय्या मसुती यांनी मानले. कार्यक्रमास प्रा शिल्पा धूमशेट्टी, फुटाणे उपस्थित होते. मुक्त विद्यापीठ हे ज्ञानदानात अग्रेसर यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने कार्यरत असलेले मुक्त विद्यापीठ ज्ञानदानात अग्रेसर आहे, पदवी व पदव्युत्तर विषयाचे शिक्षण विद्यापीठामार्फत दिले जाते. त्यामुळे शिक्षणापासून वंचित व उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत, असे गौरवोद्गार मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी काढले.
मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेला आदेश दिले आहेत. त्यामुळे आता शहरातून पकडलेल्या मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्यानंतर त्यांना पुन्हा न सोडता निवारा केंद्रातच त्यांना ठेवले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून पिंपळगाव माळवी येथील श्वान निर्बीजीकरण केंद्रात निवारा केंद्र उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरात सुमारे २५ हजार मोकाट कुत्री असून महापालिकेने मोकाट कुत्री पकडण्यासाठी संस्थेची नियुक्ती केलेली आहे. तसेच पिंपळगाव माळवी येथे निर्बीजीकरण केंद्र कार्यरत आहे. सद्यस्थितीत मोकाट कुत्री पकडून निर्बीजीकरणानंतर त्यांना पुन्हा पकडलेल्या ठिकाणी सोडले जाते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पकडलेल्या मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण केल्यानंतर त्यांना पुन्हा न सोडता त्यांना निर्बीजीकरण केंद्रात ठेवले जाणार आहे. यापूर्वी मोकाट कुत्री ठेवण्यासाठी दोन शेड उभारण्यात आल्या होत्या. आता आणखी एक निवारा केंद्र उभारण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. शासनाच्या आदेशानुसार मोकाट कुत्री पकडून त्यांना परत सोडू नये, असे आदेशही मनपा प्रशासनाने ठेकेदार संस्थेला दिले आहेत. भटक्या श्वानांना खाण्यासाठी जागा निश्चित केल्या जाणार मनपा क्षेत्रातील भटक्या श्वानांकरीता खाण्यासाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. शहरातील अशा जागा निश्चित करून त्याच जागेवर भटक्या श्वानांना खायला देण्यात येईल. अशा जागा शोधण्याची कार्यवाही मनपाकडून सुरू आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. कुत्र्यांच्या देखभालीसाठी संस्थेची नियुक्ती करणार ^ मनपा निवारा केंद्र उभारत आहे. येथे ठेवलेल्या कुत्र्यांच्या देखभालीसाठी संस्थेची नियुक्ती केली जाईल. त्यासाठी प्रस्ताव मागवू. मोकाट कुत्री पकडून त्यांना परत न सोडण्याचे निर्देश दिले आहेत. - यशवंत डांगे, आयुक्त. तक्रारीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी होणार महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्या क्षेत्रातील भटक्या श्वानांच्या तक्रारींकरिता हेल्पलाईन क्रमांक विकसित करावा. नागरिकांना या क्रमांकाद्वारे तक्रारीची सुविधा उपलब्ध करून त्यावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे लवकर निवारण करावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार मनपाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात येणार आहे.
दरवर्षी आयोजित केली जाणारी गॉडविन कप २०२५ ही प्रतिष्ठित फुटबॉल स्पर्धा भुईकोट किल्ला येथील मैदानावर सुरू आहे. फुटबॉल खेळाडूंना चालना, प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या अधिपत्याखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. भुईकोट किल्ला परिसरात खेळाडूंचे कौशल्य, रणनीती स्पर्धेत दिसून येत आहे. या स्पर्धेसाठी शहरातील फुटबॉलप्रेमींची गर्दी होत आहे. राठोड एफसीचा डॉन बॉस्को स्कूलवर ८-० असा धडाकेबाज विजय झाला. राठोड एफसी संघाने अप्रतिम कामगिरी करत डॉन बॉस्को स्कूल संघावर एकतर्फी विजय मिळवला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत राठोडच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाला कोणतीही संधी न देता एकहाती वर्चस्व स्थापित केले. गुलमोहर एफसी आणि फिरोदिया यांच्यात अत्यंत अटीचटीचा सामना झाला. दोन्ही संघांनी बचाव आणि आक्रमण या दोन्ही आघाड्यांवर समसमान कामगिरी करत शेवटपर्यंत एकाही संघाला गोल करता आला नाही. सामना गोलशून्य बरोबरीत संपल्यानंतर निकाल टायब्रेकरवर लागला आणि यात गुलमोहर एफसीने विजयाची नोंद करत पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला. तिसऱ्या रोमांचकारी सामन्यात सुमन एफसी आणि राठोड एफसी यांच्यात सामना तितकाच रंगला. दोन्ही संघांनी कौशल्यपूर्ण खेळाचा उत्कृष्ट नमुना सादर केला. या सामन्यात सुमन एफसीने एक महत्त्वाचा गोल करत १-० अशी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले. विजय संपादन करुन राठोड एफसी, गुलमोहर एफसी आणि सुमन एफसी या विजयी संघांनी स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश मिळवला आहे. या स्पर्धेत आता अटीतटीच्या लढती होत आहेत. त्यामुळे उत्कंठा वाढत चालली आहे. राठोड फुटबॉल क्लब आणि डॉन बॉस्को यांच्यात झालेला सामना अटीतटीचा होता. राठोड एफसी संघाने अप्रतिम कामगिरी करत डॉन बॉस्को स्कूल संघावर एकतर्फी विजय मिळवला. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत राठोडच्या खेळाडूंनी प्रतिस्पर्धी संघाला कोणतीही संधी न देता एकहाती वर्चस्व स्थापित केले. याच पद्धतीने गुलमोहोर एफसी आणि फिरोदिया यांच्यातही अटीतटीचा सामना झाला. दोन्ही संघांनी बचाव आणि आक्रमण या दोन्ही आघाड्यांवर समसमान कामगिरी करत शेवटपर्यंत एकाही संघाला गोल करता आला नाही. त्यामुळे सामना बरोबरीत होता. नंतर या सामन्याचा निकाल टायब्रेकरवर लागला. यात गुलमोहोर एफसीने विजय मिळवला. या विजयाबरोबरच या संघाने पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. तिसऱ्या रोमांचकारी सामन्यात सुमन एफसी आणि राठोड एफसी यांच्यात सामना तितकाच रंगला. दोन्ही संघांनी कौशल्यपूर्ण खेळाचा उत्कृष्ट नमुना सादर केला. या सामन्यात सुमन एफसीने एक महत्त्वाचा गोल करत १-० अशी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम ठेवत विजयाची नोंद केली. आता पुढील फेरीतील स्पर्धा होणार असून संघांनी या फेरीतील सामन्यांसाठी तयारी सुरू केली आहे. अटीतटीच्या लढतीने वाढली उत्कंठा गुलमोहर एफसी आणि फिरोदिया यांच्यात अत्यंत अटीचटीचा सामना झाला. दोन्ही संघांनी बचाव आणि आक्रमण या दोन्ही आघाड्यांवर समसमान कामगिरी करत शेवटपर्यंत एकाही संघाला गोल करता आला नाही.
संविधान अमृतमहोत्सवानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवे (ता. पाथर्डी) येथील विद्यार्थ्यांनी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर सादर होणाऱ्या ‘बालमेळा’ या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. संविधान जागृतीसाठी सादर केलेली ‘घर घर संविधान’ ही श्रुतनाटिका कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली. विद्यार्थ्यांनी संवाद, कथा, नैतिक मूल्ये, नागरिकत्वाची जाणीव यांचा उत्तम संगम साधत श्रोत्यांची मने जिंकली. लोकशाहीचे मूल्य, संविधान निर्मितीची प्रक्रिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, जबाबदार नागरिकत्व, कर्तव्य व अधिकार यांची सांगड घालत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने नाटिका सादर केली. छोट्या-छोट्या भूमिकांमध्येही विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण अभिनय करून संविधानाचे महत्त्व सोप्या शैलीत प्रभावीपणे पोहोचवले. विद्यार्थ्यांच्या स्पष्ट उच्चार, उत्कृष्ट संवादफेक, भावसंपन्न अभिनय आणि सादरीकरणातील शिस्त यांचे उपस्थितांनी कौतुक केले. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, विस्ताराधिकारी भवार, केंद्रप्रमुख महांडूळे, विषय तज्ञ संतोष नरवडे, मुख्याध्यापक अंबादास पालवे, शिक्षिका वृषाली रुईकर, श्रीनिवास एल्लाराम, ग्रामपंचायत मांडवे, सेवा सोसायटी मांडवे, शाळा व्यवस्थापन समिती, आणि सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शाळेचे नाव अभिमानाने उंचावल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचे प्रसारण प्रमुख सुदाम बटुळे यांनी केले.
अयोध्यत श्रीराम मंदिर न्यास संकल्पनेतून पूर्णत्वास गेलेल्या व देवस्थानांच्या विस्तारित निर्माणातील नूतन सप्तमंदिरात स्थापन केलेली महर्षी अगस्त्य ऋषींची मूर्ती ही अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासीबहुल दुर्गम अकोले तालुक्यात अगस्त्य आश्रम मंदिरात सद्यस्थितीत अस्तित्वातील पौराणिक व ऐतिहासिक अगस्त्य ऋषींच्या मूर्तीची प्रतिकृतीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अयोध्येतील श्रीराम मंदिर शिखरावरील ध्वनी दंड तसेच धर्मध्वजाचे ध्वजारोहण सोहळ्यात श्रीराम मंदिरात देवस्थानांच्या धार्मिक विस्तारीत सप्तमंदिरात अगस्त्य ऋषींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सप्तमंडपांतर्गत निर्माण कार्यातील सप्तमंदिरात गोस्वामी तुलसीदास यांच्या प्रतिमेसह अगस्त्य ऋषींची मूर्ती शिल्पकारांनी निर्माण केली आहे. धार्मिक ग्रंथातील संदर्भ व पौराणिक आख्यायिकेनुसार श्रीरामांना रावण वधात सहाय्यभूत ठरलेला सामर्थ्यवान व शक्तिशली अनमोल अगस्त्य बाण अकोले दंडकारण्यात अमृतवाहिनी तथा प्रवरा नदितीरावर स्थित पवित्र अगस्त्य आश्रमात अगस्त्य ऋषी यांनी प्रभू श्रीराम यांना दिला होता. या मूर्तीची प्रतिकृती अयोध्या नगरीत निर्माण झालेल्या सप्तमंदिरात स्थापन करण्यात आली. ही मूर्ती अकोले आश्रमात अस्तित्वातील मूर्तीच्या मूळ रुपावरुन (प्रतिमा) तयार केल्याची माहीती इतिहास अभ्यासक, संशोधक व अगस्ति महाविद्यालयातील निवृत्त उपप्राचार्य प्रा. सुनील शिंदे यांनी दिली. अकोले अगस्त्य ऋषी मूर्तीची छायाचित्र, ठेवण, मुद्रा यासंदर्भात अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष तथा जिल्ह्यातील भूमिपुत्र व गीता परिवाराचे अध्वर्यू किशोर व्यास यांनी माहितगाराकडून अगस्त्य आश्रमातून ही सर्व माहिती संकलित केली. अयोध्येत त्यावर आधारित स्थापित श्री अगस्त्य ऋषींची मूर्ती शिल्पकाराकडून घडवली. डॉ. सुनील शिंदे म्हणाले, अकोले येथील अगस्त्य आश्रम देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ अॅड के. डी. धुमाळ व व्यवस्थापक रामनाथ मुर्तडक यांनी अयोध्या न्यास यांना पाठवलेल्या निवडक आकर्षक छायाचित्रांचा फार मोठा आधार आणि संदर्भीय उपयोग अयोध्येतील मंदिरात अगस्त्यऋषिंच्या मूर्ती निर्माणात झाला. अयोध्येतील विस्तारित एकंदर १८ मंदिरांपैकी सप्तमंडपाकृत सप्तमंदिरे आकर्षक वेधक ठरली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्येत श्रीराम सप्तमंदिरात अगस्त्य मूर्तीचे पूजन केले. अकोले येथील मूळ मूर्तीत महर्षि अगस्त्य यांच्या एका हातात असलेली रुद्राक्ष माला आणि अयोध्येतील मंदिरात अगस्त्य यांचा एक हात आशीर्वाद प्रदान करतानाचा आहे. हा एकच बदल अगस्त्यऋषिंच्या नव्या मूर्ती निर्माणात आहे. नव्याने हा बदल घडवून तयार केलेली मूर्ती स्थापन केली. अगस्त्यऋषिंची अकोले स्थित प्रतिमा आता या माध्यमातून सर्वदूर मान्यता पावल्याची भावना अगस्त्य आश्रम देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अॅड के. डी. धुमाळ, खजिनदार किसनराव लहामगे, सचिव सुधाकर शाळिग्राम, विश्वस्त गुलाबराव शेवाळे, संभाजी भिंगारे, मारूती भिंगारे व रामनाथ मुर्तडक यांनी व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी यांनी केले पूजन
श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत आणि निर्भयपणे पार पडण्यासाठी योग्य ती सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये, असे आश्वासन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत किरण सावंत यांनी निवडणूक अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणावेळी मतदान पथकाला दिले. मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण खासदार गोविंदराव आदिक सभागृहात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मिलिंद वाघ, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप आदींसह सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. मतदान करण्यासाठी बारा फोटो ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे या व्यतिरक्त कोणताही पुरावा असेल तर मतदाराला मतदान करता येणार नाही.मतदान केंद्रात आयोगाने प्राधिकृत केलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश करू द्यायचा नाही. मतदान केंद्रात येऊन कोणालाही फोटो काढता येणार नाही.मतदान वेळ संपण्यापूर्वी मतदान केंद्रावर आलेल्या सर्व मतदारांना क्रमांकाच्या चिठ्ठी देऊन सर्वांचे मतदान करून घ्यावे, एखाद्या मतदान केंद्रावर कोणी बेकायदेशीर कृत्य करण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात यावे,सर्वच मतदान केंद्रावर लाईव्ह वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या मतदान केंद्रावर काही आक्षेपार्ह घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली तर तात्काळ पोलिस कुमक दाखल होईल,मतदान केंद्रावर जाताना आणि येताना निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या वाहनातून प्रवास करावा. कोणीही खाजगी वाहनाचा वापर करू नये. नियुक्त केलेल्या वाहनाला जीपीएस यंत्रणा बसवलेली असते. दरम्यान, ज्या शाळेत मतदान केंद्र आहे त्या शाळांना १ व २ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी सुटी जाहीर केली आहे. २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ८९ मतदान केंद्रांसाठी दहा क्षेत्रीय अधिकारी आणि १०० केंद्राध्यक्ष अधिकारी,प्रत्येकी १०० मतदान अधिकारी एक दोन तीन असे एकूण ५०० कर्मचारी नियुक्त केले आहेत. मद्यपान धूम्रपान टाळा सरकारी कर्मचाऱ्यांना व्यसन नसतेच.पण काही लपून छपून करीत असतील तर मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी कर्मचारी आदल्या दिवशी किंवा मतदानाच्या दिवशी मद्यपान करीत असल्याच्या घटना घडल्या असल्याचे समोर आल्या आहेत. त्यामुळे मतदान अधिकारी कर्मचारी यांनी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी कर्तव्यावर असताना मद्यपान अथवा धूम्रपान करू नये, असे आवाहन करण्यात आले.
पक्षविरोधी काम करणाऱ्या अरुण मुंडेंना पक्षातून निलंबित करा:भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी
भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे हे पक्षविरोधी काम करत आहे. केवळ पक्षाकडून पदे घेऊन ठेकेदारी,वाळूधंदा,अव ैध जमिन व्यवहार करत स्वतःचा आर्थिक लाभ करून घेतात.त्यामुळे मुंडे यांना पक्षातून निलंबित करण्याची मागणी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील भाजप अंतर्गत वाद उफाळून आला आहे. गुरुवारी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांची भेट घेतली. भाजपचे पाथर्डी मंडल अध्यक्ष धनंजय बडे,जिल्हा युवामोर्चा अध्यक्ष सचिन वायकर,कोरडगाव मंडल अध्यक्ष दिगंबर भवार,शेवगाव मंडळ अध्यक्ष संजय टाकळकर,महिला मोर्चाच्या विद्या आधाट,शेवगाव शहराध्यक्ष राहुल बंब,शेवगाव मंडल अध्यक्ष महेश फलके,महिला मोर्चाच्या दीपाली काथवटे,व्यापारी आघाडीचे राजाभाऊ लड्डा,आध्यत्मिक आघाडीचे शेखर मुरदारे यांनी जिल्हाध्यक्ष भालसिंग यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, आमदार मोनिका राजळे यांनी मंजूर केलेल्या विकास कामांत विरोधकांना सोबत घेऊन खोडा घालण्याचे काम ते करतात. तसेच या कामाविरोधात आंदोलने करतात. पक्षाकडून पदे घ्यायची व त्या पदाचा वापर ठेकेदाराची कामे मिळवणे,वाळूधंदा व अवैध जमीन व्यवहार करत स्वतःचा आर्थिक लाभ करून घेतात. लोकप्रतिनिधी व पक्षश्रेष्ठी यांच्या विरोधात आरोप करत पक्षाला शोभणार नाही, अशी वक्तव्ये ते करतात. भाजप नेते व राष्ट्रीय स्वयंकसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांविषयी चुकीचे वक्तव्य करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांसोबत ते संधान बांधून आहेत. शेवगाव पालिका निवडणुकीत उभे राहिलेल्या भाजप उमेदवारांना ते दमदाटी करतात. मुंडे यांचे भाजपमधून निलंबन केले नाही, तर जनतेत वेगळा संदेश जाईल.
संविधान दिनानिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व समरसता सामाजिक मंचतर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संविधान पूजन व वाचन करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील, डॉ. प्रशांत भोंडे, शंकर राजपूत, रमेश नाईक, नीलेश चव्हाण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमोद सोनार, ईश्वर चौधरी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान शहरासह तालुक्यात २६ नोव्हेंबर रोजी 'संविधान दिन' मोठ्या उत्साहात आणि राष्ट्रीय भावनेने साजरा करण्यात आला. विविध शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन झाले. तज्ज्ञांनी आपल्या व्याख्यानातून नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली.
येथे गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाने नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने तत्काळ मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी डॉ. महेंद्र गिते यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी अर्ज देऊन केली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांवर कुत्रे हल्ला करण्याचा प्रयत्न करतात आणि चावा घेण्यासाठी पाठलाग करतात. लहान मुलांना, महिलांना आणि वृद्धांना रस्त्यावर चालताना भीती वाटत आहे. आठवडाभरात नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. सर्वात गंभीर म्हणजे तपेश्वर नगर भागातील किमान ६–७ गुरं (जनावरे) कुत्र्याच्या चाव्यामुळे ‘रेबिज’ आजाराने मृत्यूमुखी पडली आहेत. इतकी गंभीर परिस्थिती असूनही ग्रामपंचायतीने अद्याप कोणतीही योग्य कार्यवाही केलेली नाही. ही परिस्थिती नागरिकांच्या आणि जनावरांच्या जीवनाला गंभीर धोका निर्माण करत आहे. रेबीज इंजेक्शनचा तुटवडा : लोहारा येथे भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यास लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीजचे इंजेक्शन बऱ्याचदा उपलब्ध नसते.त्यामुळे नागरिकांना पाचोरा, जळगाव जावे लागते. त्यामुळे रेबीज इंजेक्शनचा साठा कायमस्वरूपी उपलब्ध व्हावा,अशी मागणी आहे. लोहारा येथे हल्ली अशा पद्धतीने भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. गुरांच्या कोंडवाडा शो पीस लोहारा गावात जवळपास १०० मोकाट गुरे संपूर्ण गावातून फिरत असतात. तर रस्त्यावर वाहनांना अडथळा होईल अशा पद्धतीने ठाण मांडून बसलेले दिसतात.तर अनेकदा वाहन धारकांना गुरांना रस्त्यावरून उठवण्यासाठी वाहनाच्या खाली उतरून गुरांना उठवावे लागते..हा प्रकार नित्याचाच झाला आहे..तसेच गावालगतच शेती असलेले नागरिक ही या मोकाट गुरांच्या त्रासाने त्रस्त झाले असून त्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे.
येथील सनराईज स्कूलमध्ये आंनद मेळावा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले. त्यात मिसळ पाव, पाव भाजी, पाणी पुरी, इडली सांबर, वडापाव, जिलेबी तसेच चविष्ट पदार्थ, स्नॅक्स आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल होती. कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय समिती अध्यक्ष इंजि पोपटराव पाचोरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी समिती सदस्य दिलीप सलादे, संजय भालेराव आदी उपस्थित होते. अध्यक्षांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अशा उपक्रमांमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत व्यक्त केले शाळेचे प्राचार्य ज्ञानेश्वर ढिकले यांनी मेळाव्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना आनंददायी अनुभव देणे,त्यांच्यामध्ये सहभाग, सहकार्य आणि सामाजिकता वाढवणे, समूहात कार्य करण्याची सवय लावणे, शालेय जीवन अधिक आनंदमय व प्रेरणादायी करणे, विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान देणे आणि त्यांच्यात व्यावसायिक कौशल्य वाढीस लावणे हे मेळाव्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. मेळाव्यात पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.
इगतपुरी नगरपरिषदेची रणधुमाळी आता चांगलीच रंगली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित, रिपाइं या सर्व राजकीय पक्षांच्या वतीने आता जाहीर सभा, प्रचार सभा मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र गेल्या ३५ वर्षांपासून इगतपुरी शहराची दयनीय अवस्था झालेली आहे. विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करणाऱ्या नेत्यांनी मात्र विकासावर न बोललेले बरे, असे मतदार म्हणत आहे. ज्या ठिकाणी नगरसेवक, नगराध्यक्ष शहराचा कारभार बघणार आहे, तीच इमारत जीर्ण झाली आहे. विशेष म्हणजे आरोग्य स्वच्छता रस्ते या मूलभूत समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. गेल्या ३५ वर्षांत इगतपुरी नगरपरिषदेचा कायापालट होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरात फिरले तर रस्त्यांची बिकट अवस्था व रस्त्यानवर सांडपाणी आहे. तुंबलेल्या गटारीत मोठ्या प्रमाणात कचारा अशा अनेक समस्या दिसत आहे. त्यामुळे आता विकासाला प्राधान्य देईल, अशाच उमेदवाराला मतदान करू, अशी चर्चा सर्वत्र रंगत आहे. अनेक रस्ते उखडून गेलेले असून गटारीत घाणीचे साम्राज्य पसरल आहे. दरम्यान इगतपुरी शहरासाठी कोट्यवधी रुपयांची भावली धरण क्षेत्रामधून पाणीपुरवठा योजना सुरू आहे. मात्र आठ दिवसांतून एकदाच पाणी येते. नगरपरिषदेचा स्वतंत्र रेल्वे डॅम असताना देखील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळत नाही. त्यामुळे आता मतदान करावे तरी कोणाला, असा प्रश्न मतदारांना पडला आहे. दरम्यान, नगरपरिषद असूनसुद्धा इगतपुरी शहरात उद्यान नाही, अभ्यासिका नाही, गटारी, रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. त्याचप्रमाणे नगरपालिकेचा स्वतंत्र्य रुग्णालय असताना अजूनपर्यंत ते बंदच आहे, त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात समस्या असल्याने स्थानिक नागरिक स्थलांतर करत आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध कार्यक्रमांत भाग घ्यावा. केवळ अभ्यास करून परिपूर्ण व्यक्तिमत्त्व घडत नाही. जीवनात एखादी तरी कला आत्मसात असावी, असे मत उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री यांनी व्यक्त केले. बुधवारी बाळासाहेब पवार वाचनालय व फाउंडेशनतर्फे आयोजित संगीत महोत्सवाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. २५ व २६ नोव्हेंबर रोजी सहकार महर्षी बाळासाहेब पवार संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अग्निहोत्री उपस्थित होत्या. व्यासपीठावर चंद्रकांतराव देशमुख, डॉ. मिलिंद पाटील, प्राचार्य डॉ. विजय भोसले, रामकृष्ण पवार, परीक्षक प्रा. राहुल शिंदे, प्रा. गणेश दळे, तन्मय अवसरमल उपस्थित होते. अग्निहोत्री म्हणाल्या, विद्यार्थ्यांना मोठे व्यासपीठ मिळाले आहे. या संधीचा त्यांनी लाभ घ्यावा. महोत्सवात ६० संघांनी विविध कला प्रकारात सहभाग घेतला. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. विजय भोसले यांनी केला. ते म्हणाले, कन्नड तालुक्यात प्रतिभावंत, सजग, विवेकी नागरिक घडवण्यासाठी ही सांस्कृतिक चळवळ महत्त्वाचे योगदान देत आहे. प्रास्ताविक व निकाल वाचन संयोजन समितीचे प्रा. डॉ. के. एल. भानुसे यांनी केले. कार्यक्रमास मानसिंह पवार, डॉ. ए. के. महाले, सागर जाधव, राधा कडवकर, प्राचार्य राहुल क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब मगर, रामराव शिंदे, संजय जाधव, डॉ. रुपेश मोरे, डॉ. आर. टी. नागे, प्रा. हुकुमचंद पवार, प्रा. संतोष देशमुख, डॉ. शिवाजी हुसे, डॉ. रामचंद्र झाडे, डॉ. उदय डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. गायन,नृत्य प्रकारातील विजेते समूह गायन प्रकारात प्रथम - जवाहर नवोदय विद्यालय कन्नड, द्वितीय - तरलनिनाद अकादमी कन्नड, तृतीय - जि. प. प्रशाला विठ्ठलपूर, उत्तेजनार्थ - काशीनाथराव पाटील विद्यालय कन्नड. एकल गायन व नृत्य प्रकारात प्रथम - साने गुरुजी माध्यमिक विद्यालय कन्नड, द्वितीय - देवगिरी इंग्लिश स्कूल कन्नड, तृतीय - ए. एन. आय. स्मार्ट स्कूल पांडवनगरी, उत्तेजनार्थ - जि. प. प्रा. शाळा बहिरगाव. समूह नृत्य प्रकारात प्रथम - ए. एन. आय. स्मार्ट स्कूल पांडवनगरी, द्वितीय - जि. प. प्रशाला महालपूर, तृतीय - गौताळा व्हॅली स्कूल कन्नड, उत्तेजनार्थ - जि. प. मा. विद्यालय देभेगाव.

29 C