SENSEX
NIFTY
GOLD
USD/INR

Weather

30    C
... ...View News by News Source

भाजपची ‘माझं ते माझं, तुझंही माझं’ हीच वृत्ती:भास्कर जाधवांचा घणाघात; मला विरोधी पक्षनेता बनवायला सरकार घाबरतंय!

भाजपला जिथे गरज असते, तिथे ते मित्रपक्षांना जवळ करतात. मात्र, जिथे त्यांची ताकद वाढते, तिथे ‘माझं ते माझं आणि तुझं तेही माझं’ अशी त्यांची वृत्ती आहे. सध्या भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला करण्याचे ठरवले आहे, मात्र शिंदे भाजपच्या दबावाखाली येतील असे वाटत नाही, असा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका करताना भास्कर जाधव म्हणाले की, सरकारकडे पाशवी बहुमत आहे, तरीही ते मला विरोधी पक्षनेते बनवायला घाबरतात. ही भीती म्हणजे कोकणी माणसाचा आणि इथल्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, उमेदवार देताना त्याचे समाजातील स्थान आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना यांचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमध्ये इटलीत बंदी घातलेले 'परमानेंट केमिकल' हे विषारी रसायन बनवले जात असल्याचा खळबळजनक दावा भास्कर जाधव यांनी यावेळी केला. हे रसायन मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाला परवानगी दिली असली, तरी स्थानिक आणि पर्यावरण तज्ज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून या संदर्भात एक क्लिप समाजमाध्यमांवर फिरत असून, मी त्याची सत्यता पडताळून पाहत आहे. तथ्य आढळल्यास याविरोधात सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. विनायक राऊतांवर मिश्किल टिप्पणी खासदार विनायक राऊत यांच्या नाराजीच्या चर्चांवर बोलताना भास्कर जाधव यांनी आपल्या खास शैलीत टोला लगावला. विनायक राऊत नाराज आहेत की खुश, हे मला माहित नाही. माहिती घेऊन सांगतो, असे ते मिश्किलपणे म्हणाले. तसेच, वैभव नाईक यांना एसीबीने नोटीस दिल्यानंतर घेतलेल्या सभेचा फायदा आगामी निवडणुकीत नक्कीच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सत्ताधारी पक्षातील काही लोक शहर विकास आघाडी करून आमच्यासोबत येत आहेत, याचा अर्थ काहीतरी चुकीचे घडत असताना समान धागा पकडून लोक एकत्र येत आहेत. दरम्यान, राणे बंधूंवर मी काहीही बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी या विषयावर बोलणे टाळले.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 6:12 pm

विकासाच्या नावाखाली विनाश होतोय:आज अरावली, उद्या पश्चिम घाट-हिमालय; 'अरावली'च्या वादावरून आदित्य ठाकरेंचा केंद्रावर घणाघात

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अरावली पर्वतरांगांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री अरावली पर्वतरांगा उद्ध्वस्त करण्याचे समर्थन करतात, ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आज अरावली, उद्या पश्चिम घाट आणि हिमालयातही हे खाणकामाला परवानगी देतील, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अरावली पर्वतरांगेची व्याप्ती ठरवण्यासाठी केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीने सुचवलेली व्याख्या स्वीकारली. या नव्या व्याख्येनुसार जमिनीपासून ज्या भू-आकृतींची उंची किमान 100 मीटर आहे, त्यांनाच 'अरावली पर्वतरांग' मानले जाईल. 100 मीटरपेक्षा कमी उंची असलेल्या टेकड्या किंवा भाग आता तांत्रिकदृष्ट्या 'अरावली'च्या व्याख्येतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे, कारण 100 मीटरपेक्षा कमी उंचीच्या भागांत आता खाणकाम आणि बांधकामासाठी खुला होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, केंद्र सरकारवर सडकून टीका करत, भाजप पर्यावरणाचा विनाश करायला निघाल्याचा गंभीर आरोप केला आहे. नेमके काय म्हणाले आदित्य ठाकरे? आदित्य ठाकरे यांनी अरावलीतील खाणकामाला दिलेल्या परवानगीबाबत केंद्र सरकारला काही रोकडे सवाल विचारले आहेत. ते म्हणाले, या प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतरही सरकार यावर खोटे का बोलत आहे? अरावली टेकड्यांचा एखादा छोटा भाग जरी असला, तरी तो खाणकामासाठी खुलाच का केला जात आहे? ज्याप्रमाणे भाजप देशाची सामाजिक वीण नष्ट करत आहे, त्याचप्रमाणे ते देशाची पर्यावरण व्यवस्थाही नष्ट करण्यासाठी का उतावीळ आहेत? आज अरावली, उद्या पश्चिम घाट-हिमालय अरावली टेकड्यांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी भविष्यातील धोक्याचा इशाराही दिला आहे. आज अरावली टेकड्यांवर खाणकामाची परवानगी दिली जात आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर उद्या ते खाणकामासाठी पश्चिम घाट किंवा हिमालय देखील खुले करतील, अशी भीती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. राजस्थानमधील जनआंदोलनाचे कौतुक अरावली टेकड्यांच्या रक्षणासाठी राजस्थानमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचे आदित्य ठाकरेंनी समर्थन केले आहे. अरावली टेकड्या वाचवण्यासाठी संपूर्ण राजस्थान ज्या प्रकारे रस्त्यावर उतरला आहे, ते पाहून प्रेरणा मिळते, असे ते म्हणाले. सध्याच्या सरकारकडून अपेक्षा नाही नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी विद्यमान केंद्र सरकारवर अविश्वास दर्शवला. सरकारने आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संरक्षणासाठी आता दुप्पट वेगाने प्रयत्न करण्याची गरज आहे. परंतु, अशा प्रकारच्या संरक्षणाची आणि सकारात्मक कामाची आशा सध्याच्या सरकारकडून मुळीच नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 5:48 pm

अजित पवारांना महायुतीत राहण्याचा अधिकार नाही:दोन्ही राष्ट्रवादींच्या मनोमिलनावरून संजय राऊतांचा इशारा, काय म्हणाले राऊत?

राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा टप्पा पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आगामी महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युतीचे संकेत मिळत असून, उद्याच त्यांचे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, मुंबई महापालिकेवर वर्चस्व गाजवण्यासाठी ठाकरे बंधूंनी ही नवी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या हालचालींवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. अजित पवार यांचे नेते आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, त्यामुळे जर पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत ते हातमिळवणी करणार असतील, तर त्यांना महायुतीत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले. तसेच, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास शिवसेना ठाकरे शरद पवारांच्या गटासोबत न जाता मनसे आणि काँग्रेसला सोबत घेऊन स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील महाविकास आघाडीच्या भविष्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी माहिती दिली की, मुंबईत काँग्रेससोबत युती होण्याची शक्यता आता धूसर झाली आहे. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून, ती यशस्वी झाल्यास उद्याच्या पत्रकार परिषदेला शरद पवार स्वतः उपस्थित राहू शकतात. काँग्रेस मुंबईबाहेर इतर काही शहरांमध्ये शिवसेनेसोबत राहू शकते, त्यादृष्टीने अद्याप चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. निवडणुकीच्या या रणधुमाळीत ठाकरे बंधूंसमोर मतदारांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने दलित आणि मुस्लिम मतांचे विभाजन टाळणे ही त्यांच्यासाठी मोठी कसोटी असेल. तसेच, मुंबईतील उत्तर भारतीय मतदार भाजपच्या पाठीशी उभा राहण्याची शक्यता असल्याने, मराठी बहुल भागातील जास्तीत जास्त मराठी मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांना विशेष रणनीती आखावी लागणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 5:41 pm

हिंदूंनीही चार –चार मुलांना जन्म द्यावा: नवनीत राणा

अमरावती : प्रतिनिधी एक मौलाना आहे तो म्हणाला की, मला चार बायका आणि १९ मुले आहेत. तो म्हणतो की, मला तीस-पस्तीस मुले पाहिजे होती. तो कोरम मी पूर्ण करू शकलो नाही याची लाज वाटते. ते जर खुल्यापणे चार बायका १९ मुले पाहिजे असे म्हणत असतील, तर आपल्या हिंदू लोकांनी किमान तीन-तीन, चार-चार मुलं जन्माला घातली […] The post हिंदूंनीही चार – चार मुलांना जन्म द्यावा: नवनीत राणा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Dec 2025 5:25 pm

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर आरोप निश्चित

बीड : प्रतिनिधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी बीडमधील विशेष मकोका न्यायालयात पार पडली. आजच्या सुनावणीत न्यायालयानं आरोपींविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. या खटल्यातील हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. याप्रसंगी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी संवाद साधताना खटल्याच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. खंडणीच्या व्यवहारात अडथळा निर्माण केल्यामुळे […] The post संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींवर आरोप निश्चित appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Dec 2025 5:16 pm

गजाला शेख यांच्या 'द फिनिक्स पाथ' पुस्तकाचे प्रकाशन:अडचणींवर मात करत फिनिक्सप्रमाणे भरारी घेण्याचे आवाहन

पुणे येथे प्रसिद्ध लेखिका गजाला शेख यांच्या 'द फिनिक्स पाथ' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. द पूना क्लब, कॅम्प येथे आयोजित या प्रकाशन समारंभात गजाला शेख यांनी आयुष्यातील आव्हानांवर मात करत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उंच भरारी घेण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना शेख म्हणाल्या की, आयुष्यातील प्रश्न, मृत्यू आणि बदल या तीन गोष्टी कधीच बदलत नाहीत. या गोष्टी समजून घेत आयुष्य आनंदाने जगावे. अडचणींवर मात केल्यास आयुष्य सुखावह होते, अन्यथा ते व्यर्थ ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रकाशन सोहळ्यात अंशुमन आनंद यांनी गजाला शेख यांच्याशी संवाद साधला. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, उदयन पाठक, ज्योतिषतज्ज्ञ संदीप अवचट आणि पार्थो सारथीदास यांची प्रमुख उपस्थिती होती. शेख यांनी आपल्या बालपणापासूनचे अनेक अनुभव सांगितले. चांगले-वाईट प्रसंग आयुष्यात चढ-उतार आणतात, पण अशा काळात न डगमगता सामोरे गेल्यास आयुष्य अधिक सुंदर होते, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या आयुष्याच्या प्रवासातूनच या पुस्तकाची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ. मोहन आगाशे यांनी गजालाच्या पुस्तकातून तिच्या कठीण प्रसंगांना तोंड देण्याची आणि स्वतःला सावरण्याची क्षमता दिसून येते, असे सांगितले. तिला कोणाच्याही पाठिंब्याची किंवा सहानुभूतीची अपेक्षा नाही. तिने स्वतःच आपली लढाई लढली आहे. हे पुस्तक वाचकांना अडचणींवर मात करत स्वतःला कसे सांभाळावे हे शिकवते आणि स्त्रीची ताकद काय असते हे दर्शवते, असे आगाशे म्हणाले. ज्योतिषतज्ज्ञ संदीप अवचट यांनी गजाला यांचे व्यक्तिमत्व विलक्षण असल्याचे म्हटले. त्यांनी केवळ पुस्तकासाठी नव्हे, तर आपले अंतरंग उलगडले आहे. राखेतून भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे त्यांचे आयुष्य आहे. हे पुस्तक पथदर्शी असून त्याची मराठी आवृत्तीही प्रकाशित व्हावी, अशी अपेक्षा अवचट यांनी व्यक्त केली. उदयन पाठक यांनी गजाला यांच्या धैर्याचे कौतुक केले. 'महाराष्ट्राची मलाला' या त्यांच्यावरील कथेमुळे त्यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी अनेक अनाथ मुलांना आणि संस्थांना मदतीचा हात दिला आहे, असे पाठक यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 5:15 pm

मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा:अंजली दमानिया यांची मागणी, पुरावे घेऊन बावधन पोलिस ठाण्यात हजर

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मुंढवा येथील जमीन प्रकरणात ही मागणी करण्यात आली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, असे दमानिया यांनी म्हटले आहे. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानिया आणि विजय कुंभार दोघेही आज बावधन पोलिस ठाण्यात पोहोचले होते. पार्थ पवार यांच्याविरोधात मिळालेल्या सगळ्या कागदपत्रांवरील प्रत्येक पानावर त्यांची सही आणि व्यवहारासंबंधी नोटरी आहे. यावरून पार्थ पवारांना कुणीच वाचवू शकत नाही. हे डॉक्युमेंट्स पोलिसांना देण्यासाठी आम्ही बावधन पोलिस ठाण्यात आलो. दरम्यान, ही कागदपत्रे १८ डिसेंबरला पोलिसांकडे गेले होते, मात्र अजुनपर्यंत काही होत नव्हते, म्हणून आज आम्ही तक्रार देण्यासाठी आलो, असे अंजली दमानिया यांनी सांगितले. पोलिसांची भेट घेतल्यानंतर अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुण्यात मुंढवा प्रकरणात दोन एफआयआर दाखल झाल्या आहेत. याशिवाय, बावधन येथील एका प्रकरणात केवळ मुद्रांक शुल्क बुडवल्याची तक्रार आहे, ज्यात पुढे काही निष्पन्न होण्याची शक्यता कमी असल्याचे दमानिया यांनी सांगितले. त्यांनी पोलीस आयुक्त आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना या गुन्ह्याच्या स्वरूपाबाबत माहिती दिली असून, पोलिसांची कारवाई टप्प्याटप्प्याने सुरू असल्याचे नमूद केले. दमानिया यांच्या मते, या गुन्ह्यात एकच एफआयआर आणि एकच तपास अधिकारी असणे आवश्यक आहे, अन्यथा तपास भरकटू शकतो. खारगे समितीसमोर दिग्विजय पाटील आले नाहीत, तर पार्थ पवार कधी येणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दिग्विजय पाटील यांची पोलिसांनी गोडीगुलाबीत चौकशी केल्याचा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी पक्ष ही केस विसरून जाईल अशी अपेक्षा करत असल्याचे दमानिया म्हणाल्या. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए वारंवार अमेडिया कंपनीचे गुंड मुंढवा येथील जागा ताब्यात घेण्यासाठी गेले असताना त्यांच्या संपर्कात होते, असा दावा दमानिया यांनी केला. अजित पवार यांना जागा खरेदी करताना सर्व गोष्टींची माहिती होती, असेही त्यांनी म्हटले. मात्र, या चौकशीतून काही निष्पन्न होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दमानिया यांनी सिंचन घोटाळ्याचाही उल्लेख केला, ज्यात अजित पवार यांच्याविरोधात सर्व पुरावे दिले होते. तरीही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासोबत शपथविधी केला, ही गोष्ट चुकीची होती, असे दमानिया म्हणाल्या. शीतल तेजवानी यांनी न्यायालयात अनेक खटले दाखल केले असल्याने खरी चौकशी होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 5:05 pm

बार्शीत 11 वीच्या विद्यार्थ्याला स्टंपने 3 तास बेदम मारहाण:खोली झाडण्यास नकार दिल्याने खोलीत घुसून झोडपले, महाविद्यालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह

इयत्ता 11 वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला चार विद्यार्थ्यांनी खोलीत घुसून स्टंपने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उक्कडगाव येथील एका महाविद्यालयात घडली आहे. या घटनेने महाविद्यालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या मारहाणीच्या घटनेत जखमी झालेल्या विद्ययार्थयाचे नाव प्रसिक बनसोडे असे असून त्याच्यावर धाराशिव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्या प्रसिक बनसोडेने दिलेल्या माहितीनुसार, चार विद्यार्थ्यांनी रूममध्ये जबरदस्तीने प्रवेश करत स्टंपने मारहाण केली. तब्बल तीन तास मला मारहाण करण्यात आली, असा गंभीर आरोप पीडित विद्यार्थ्याने केला आहे. तसेच रूम स्वच्छ करणे, झाडू मारायला लावल्यावर कामे करण्यास नकार दिल्याने ही मारहाण केल्याचा पीडित विद्यार्थ्याने आरोप केला आहे. पीडित प्रसिक बनसोडेने असाही आरोप केला की, या आधीही महाविद्यालयात असे प्रकार घडले आहेत. तसेच महाविद्यालय प्रशासन दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप प्रसिकने केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर अल असून पालक वर्गातही संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या घटनेनंतर संबंधित विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व महाविद्यालय प्रशासनाच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. 3 वर्षांच्या चिमूकल्याची आईच्या प्रियकराने केली हत्या दरम्यान, सोलापूरमध्ये तीन वर्षांच्या फरहान जाफर शेख या चिमूकल्याची त्याच्या आईच्या प्रियकराने गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीचे नाव मौलाली उर्फ अकबर अब्दुल रज्जाक मुल्ला असे असून त्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. चिमुकल्याची आई शहनाज आणि आरोपी मौलालीचे विवाहबाह्य संबंध होते. 11 डिसेंबरच्या रात्री फरहान झोपलेला असताना कपडे खराब झाल्याच्या कारणावरून आरोपीने रागाच्या भरात मारहाण करून गळा दाबला. त्यानंतर फरहान खाली पडून जखमी झाल्याचे खोटे सांगून त्याला विजयपूरला नेण्यात आले. मात्र एसटी स्टँडवरून आरोपी पळून गेला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी फरहानचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदनात गळा दाबून हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 4:50 pm

मनसे-ठाकरे गटात कोणत्याही जागेबाबत तिढा नाही:मुंबईत राज-उद्धव बंधू एकत्र लढणार, मनसे नेते संदीप देशपांडे यांचे स्पष्टीकरण

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात 19 वर्षांनंतर दोन 'ठाकरे' बंधू पुन्हा एकदा खांद्याला खांदा लावून उतरणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युती आता एक 'ओपन सीक्रेट' आहे, असे मनसे नेते संदीप देशपांडे म्हणालेत. तसेच मनसेला समाधानकारक जागा मिळतील का? या प्रश्नावर उत्तर देताना संदीप देशपांडे यांनी मोठे विधान केले आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या ऐतिहासिक युतीची अधिकृत घोषणा उद्या (बुधवारी) दुपारी 12 वाजता होणार असल्याचे जाहीर केले आहे. 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने मुंबईतील मराठी मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. उद्या दुपारी 12 वाजता होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे केवळ मुंबईच नाही, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मनसे आणि ठाकरे गटात काही जागांबाबत तिढा असल्याची माहिती समोर आली होती. मात्र कोणत्याही जागेबाबत तिढा नसल्याची प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. नेमके काय म्हणाले संदीप देशपांडे? गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' आणि राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या दोन्ही निवासस्थानांवर शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्यात मुंबईतील जागावाटपांसंदर्भात बैठकांचे सत्र सुरू आहे. याविषयी बोलताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, युती तर झालेलीच आहे, आता फक्त घोषणा बाकी आहे. जागावाटपाबाबत आमचे नेते चर्चा करत आहेत. कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो, कोणाचा डेटा काय सांगतो, याचे बारकाईने विश्लेषण सुरू आहे. यात कोणताही तिढा नाही, केवळ विजयाचे गणित जुळवले जात आहे. मनसेला समाधानकारक जागा मिळतील का? मनसेला समाधानकारक जागा मिळतील का? जागावाटपावरून पक्षात नाराजी नाट्य घडणार का? या प्रश्नावर संदीप देशपांडे यांनी अत्यंत भावनिक उत्तर दिले. ते म्हणाले, मला असे वाटते की, शेवटी मुंबईसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. मराठी माणसासाठी ही निवडणूक लढवायची आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे. ही लढाई आम्ही लढणार आहोत. त्यात जागा हा विषय असला, तरी चर्चा होत राहील. आमच्याकडे कोणीही नाराज होणार नाही. त्यांच्याकडूनही कोणी नाराज होणार नाही.'' मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी बलिदानाचीही तयारी देशपांडे म्हणाले, ''मला वाटते की, मुंबईसाठी त्याग करायला सगळे जण तयार आहेत. बलिदान द्यायला सगळे जण तयार आहेत. परंतु, कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो. काय परिणाम होऊ शकतात. कोणत्या वॉर्डात कोण येऊ शकते. या सगळ्या गोष्टी चर्चेचा भाग आहेत. ती चर्चा आमची नेतेमंडळी करत आहेत 100 चा आकडा पार करण्याचा राऊतांचा निर्धार दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी युतीबाबत अत्यंत आत्मविश्वास व्यक्त केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसेच आम्ही सगळे एकमेकांच्या संवादात आहोत. जागावाटप झाल्याशिवाय कोणतीही युती जाहीर होत नाही. आमच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. आम्ही दोन्ही पक्ष मनापासून एकत्र आहोत. दोन्ही पक्षात जागावाटपावरून कोणताही तणाव, रस्सीखेच, विसंवाद नाही. दोन्ही पक्षांमध्ये एका कोणत्या जागेसाठी कोणी अडून बसले आहेत, असे अजिबात झालेले नाही. वरळी येथे दोन भाऊ एकत्र आले, तेथेच युतीची घोषणा झाली. घोषणेबाबत अन्य कुणी चिंता करू नये. आमचे जागावाटप आणि तिकीट वाटप पूर्ण झालेले आहे. शिवसेना आणि मनसे युती, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत, तेव्हा आम्ही 100 चा आकडा 100 टक्के पार करू, असा दावा संजय राऊत यांनी व्यक्त केला.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 4:43 pm

हिंदुत्व सोडल्याचा आरोप करत राजू वैद्यांचा ठाकरे गटाला रामराम:महापालिका निवडणुकीच्या गळती; भाजप प्रवेशाने राजकारण तापले

कट्टर हिंदुत्ववादी भूमिका मांडता यावी या एकाच उद्देशाने आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख राजू उर्फ रेणुकादास वैद्य यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताच राजू वैद्य यांनी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास सोडली असल्याचा आरोप केला आहे. मुंबईमध्ये झालेल्या प्रवेश सोहळ्यात भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वैद्य यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी राजू वैद्य यांनी पक्षांतराबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. महाविद्यालयीन जीवनापासून हिंदुत्व या एकाच अजेंडावर आम्ही काम करत आलो आहोत. मात्र आता मी ज्या पक्षात होतो, त्या पक्षात हिंदुत्ववादी भूमिका मांडणे शक्य नाही. त्यामुळे आपण पक्षांतर केले असल्याचे राजू वैद्य यांनी यावेळी सांगितले. पक्ष जी जबाबदारी देईल, ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे देखील ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकासासाठी आपण हा पक्ष प्रवेश केला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. राजू वैद्य यांचे पक्षांतर अनाकलनीय - अंबादास दानवे राजू वैद्य यांच्या भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांवर अंबादास दानवे म्हणाले की, परवापर्यंत राजू वैद्य आमच्यासोबत होते. अचानक काय घडलं हे समजत नाही. ते एक सक्षम आणि चांगले कार्यकर्ते होते. पक्षाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. तरीही त्यांनी हा निर्णय का घेतला, हे अनाकलनीय आहे. पक्षांतराच्या मुद्द्यावर भाष्य करताना दानवे यांनी स्पष्ट केलं की, प्रत्येक पक्षात काही ना काही अंतर्गत मतभेद असतात. मात्र उखाळ्या-पाखाळ्या काढण्यातून राजकीय संस्कृती सुधारत नाही. कोणत्या पक्षात मतभेद नसतात? पण त्यावर सार्वजनिक टीका करणे योग्य नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन ठाकरे गटावर आरोप छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांच्या प्रवेशावरून राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामू यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला आहे. रशीद मामूंना कोणत्याही परिस्थितीत तिकीट मिळू देणार नाही, अशी ठाम भूमिका खैरे यांनी घेतली आहे. चंद्रकांत खैरे आणि रशीद मामू यांच्यामध्ये वादावादी देखील झाले. त्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. त्यात आता राजू वैद्य यांनी देखील हिंदुत्त्वाच्या मुद्यावरुन ठाकरे गटावर आरोप केले आहेत. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातले राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव सेनेला मोठा धक्का उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महानगरप्रमुख राजू वैद्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यांच्या या राजीनाम्यामुळे उद्धव सेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. यापूर्वी उद्धव सेनेच्या नऊ नगरसेवकांनी पक्ष सोडून शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पक्षाला आधीच अनेक धक्के बसले होते. आता आगामी निवडणुकांपूर्वी भाजपने थेट महानगरप्रमुखांना आपल्याकडे खेचून उद्धव सेनेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा... राजू वैद्य परवापर्यंत आमच्यासोबत होते, हे अनाकलनीय:प्रलोभनांच्या राजकारणावर अंबादास दानवे यांची टीका; मशाल यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा शुभारंभ रशीद मामूंच्या पक्षप्रवेशावरून संभाजीनगरात उद्धव सेनेत वाद:चंद्रकांत खैरे यांचा तीव्र विरोध, म्हणाले- 'तिकीट मिळू देणार नाही'

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 4:30 pm

‘ग्रंथदिंडी’त होणार भारतीय संस्कृतीचे दर्शन

पुणे : प्रतिनिधी सातारा येथे दि १ ते ४ जानेवारी या कालावधीत होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात येणा-या ग्रंथदिंडी व शोभायात्रेत भारतीय संत परंपरेपासून समाज सुधारकांचे कार्य,भारतीय संस्कृती,लोकसाहित्य तसेच साता-यातील शिक्षण,पर्यटन आणि साहित्य परंपरांचे चित्रण दिसून येणार आहे. तब्बल ३२ वर्षांनंतर मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद […] The post ‘ग्रंथदिंडी’त होणार भारतीय संस्कृतीचे दर्शन appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Dec 2025 4:27 pm

पुणे पुस्तक महोत्सवातात कोटींची उलाढाल

पुणे : पुस्तक महोत्सवात साडेबारा लाख नागरिकांनी भेट देत सुमारे ३० लाखांपेक्षा अधिक पुस्तकांची खरेदी केली असून, त्यातून सुमारे ५० कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पुस्तकांची विक्री आणि पुस्तक खरेदी करणा-यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या महोत्सवात ६० टक्क्यांपेक्षा अधिक तरुणांचा सहभाग होता. त्यामुळे युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव […] The post पुणे पुस्तक महोत्सवातात कोटींची उलाढाल appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Dec 2025 4:25 pm

प्रकाशवाटा:सनटेक एनर्जी सिस्टम्सला सचिन तेंडुलकर यांचे पाठबळ, स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला गती देणारी धोरणात्मक भागीदारी

ट्रुझोन सोलर या प्रमुख ब्रँडतर्गत कार्यरत असलेल्या सनटेक एनर्जी सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडने दिग्गज क्रिकेटपटू, जागतिक क्रीडा क्षेत्रातील आयकॉन आणि कल्याणकारी वृत्तीचे प्रतीक असलेल्या सचिन तेंडुलकर यांच्यासोबत धोरणात्मक गुंतवणूक तसेच दीर्घकालीन भागीदारीची महत्वपूर्ण घोषणा केली आहे. सचिन तेंडुलकरबरोबरील ही ऐतिहासिक भागीदारी ट्रुझोन सोलरच्या विकासाच्या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. येत्या २०३० पर्यंत भारतात आघाडीच्या तीन सोलर ईपीसी कंपन्यांमध्ये स्थान मिळविण्याची कंपनीची महत्त्वाकांक्षा असून या भागीदारीमुळे या महत्त्वाकांक्षेला बळकटी मिळाली आहे. विश्वास, दर्जेदार कामगिरी आणि राष्ट्रीय अभिमानाचे मूर्तिमंत उदाहरण असलेले तेंडुलकर यांच्याशी केलेल्या सहकार्यामुळे ट्रुझोन सोलरच्या ब्रँड विश्वासार्हतेला नवीन उंची प्राप्त झाली आहे, तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छ-ऊर्जा कंपनीच्या दिशेने वाटचालीला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. तेंडुलकर यांच्या या धोरणात्मक गुंतवणूकीमुळे ट्रुझोन सोलरच्या आगामी विस्तारात विविध योजनांची अंमलबजावणी करण्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे. तसेच कामकाजात पायाभूत सुविधा वाढण्याबरोबरच सौर मूल्य साखळीमध्ये कंपनीची वितरण प्रणाली आणखी मजबूत होण्यास मदत होणार आहे. कंपनी तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटकमध्ये आपली स्थिती आणखी बळकट करणार आहे, तर उत्तरप्रदेश, तामिळनाडू, ओडिसा आणि केरळ यासारख्या उच्च-क्षमतेच्या बाजारपेठांमध्ये अधिक वेगाने विस्तार करण्यावर भर देणार आहे. भागीदारीबद्दल भाष्य करताना ट्रुझोन सोलरचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक चारुगुंडला भवानी सुरेश म्हणाले, “सचिन तेंडुलकर यांच्यासोबतची ही भागीदारी केवळ एक गुंतवणूक नसून तिला त्यापेक्षाही अधिक मूल्य आहे. ही भागीदारी म्हणजे आमची मूल्ये, प्रशासन आणि दूरदृष्टीला लाभलेले एक शक्तिशाली पाठबळ आहे. ग्राहकांचा विश्वास वृध्दींगत करणारा त्याचबरोबर विस्तारत जाणारा आणि भविष्यासाठी सज्ज असा सौर ऊर्जा उद्योग उभारण्याच्या आमच्या वचनबद्धतेला ट्रुझोन सोलरवर तेंडुलकर यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे बळकटी मिळालेली आहे. भारतातील घरांना, व्यवसायांना आणि उद्योगांना स्वच्छ ऊर्जापुरवठा हा प्रमुख आणि उपयुक्त पर्याय बनवण्याचे ध्येय आम्ही या भागीदारीतून आखलेले आहे.’’ ट्रुझॉन सोलार ही कंपनी निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक (CI), तसेच मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे आणि सौरऊर्जा विकास प्रकल्प उभारणीपासून ते ऊजानिर्मिती ते वापर या संपूर्ण जीवनचक्राची जबाबदारी घेत संपूर्ण सौरऊर्जा योजनाच प्रदान करते. युटिलिटी-स्केल ईपीसी प्रकल्प, छतावरील सौरऊर्जा प्रणाली, पीएम-कुसुम कृषी सौर कार्यक्रम, औद्योगिक सीएसजी प्रकल्प आणि सर्वसमावेशक संचालन व देखभाल सेवा आदी घटक कंपनी सध्या एकत्रितरित्या पुरविते. उत्कृष्ट कामगिरी, ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन आणि देशभरात वाढता विस्तार यामुळे ट्रुझोन सोलरने गुणवत्ता, विश्वासार्हता आणि दीर्घकालीन परिणाम या घटकांवर लक्ष केंद्रित करत आगळेवेगळे सौर ऊर्जा व्यासपीठ तयार केले आहे. सचिन तेंडुलकर यांच्यासोबतच्या भागीदारीमुळे भागधारकांचा कंपनीवरील विश्वास आणखी वृध्दिंगत होणार आहे, तसेच धोरणात्मक सहकार्यासाठी नवनवीन संधीही उपलब्ध होतील आणि भारतात वेगाने विकसित होत असलेल्या अक्षय ऊर्जा परिसंस्थेमध्ये कंपनीची आघाडीचे स्थान अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे. लाखो ग्रामीण आणि शहरी ग्राहकांना सौरऊर्जेकडे वळण्यासाठी सक्षम करताना भारताच्या अक्षय ऊर्जा ध्येयांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणे आणि त्याव्दारे भावी पिढ्यांसाठी एक स्वच्छ, उज्वल आणि आत्मनिर्भर भविष्य निर्माण करणे, हा या भागीदारीमागील दीर्घकालीन दृष्टीकोन आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 4:03 pm

कोल्हापूर-मुंबई खासगी बसवर ‘सिनेस्टाईल’ दरोडा

कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापुरात एका भीषण दरोड्याची घटना घडली आहे. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणा-या एका खासगी आराम बसला मध्यरात्री गाठून सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी सुमारे १ कोटी २२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. मिळालेल्या माहितीनुसार, अशोका कंपनीची खासगी आराम बस रविवारी रात्री ११ च्या सुमारास कोल्हापूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली. कोल्हापूर शहराबाहेरील तावडे हॉटेलजवळ तीन […] The post कोल्हापूर-मुंबई खासगी बसवर ‘सिनेस्टाईल’ दरोडा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Dec 2025 3:57 pm

पतीला रेल्वेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक:महिलेला सात लाखांचा घातला गंडा, संभाजीनगरच्या भामट्यावर गुन्हा दाखल

पुण्यात रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची सहा लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत श्यामलाल तलरेजा (वय ३५, रा. फ्लेमिंगो सोसायटी, छत्रपती संभाजीनगर, मूळ रा. तलरेजानगर, जालना) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धनकवडी भागात राहतात. त्यांची आरोपी तलरेजासोबत २०१८ मध्ये ओळख झाली होती. तलरेजाने महिलेच्या पतीला रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाने आरोपीने महिलेकडून वेळोवेळी सहा लाख ९६ हजार रुपये घेतले. महिलेने नोकरीबाबत विचारणा केली असता, त्याने टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत, आयुर्विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीची दोन लाख ५७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडी भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने याबाबत फिर्याद दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. चोरट्यांनी त्यांना 'तुमची पॉलिसी बंद पडली असून, परताव्यापोटी १२ लाख रुपये मिळतील' असे सांगितले. ही रक्कम मिळवण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि त्यासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगून त्यांनी तक्रारदाराला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडून वेळोवेळी दोन लाख ५७ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 3:51 pm

उद्धव-राज ठाकरे एकत्र

मुंंबई : प्रतिनिधी राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातही उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेसाठी भाजपने जोर लावला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज एकत्र आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे. त्यात फक्त तीन शब्दांत आपले नेमके म्हणणे मांडले आहे. ‘उद्या […] The post उद्धव-राज ठाकरे एकत्र appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Dec 2025 3:47 pm

महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली गेली:सत्तालोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल - दिल्लीचे माजी आमदार प्रकाश जरवाल

आम आदमी पार्टी (आप) महाराष्ट्रातील सत्तलोभी राजकारणाला आव्हान देईल, असे दिल्लीचे माजी आमदार आणि आपचे प्रभारी प्रकाश जरवाल यांनी म्हटले आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपली विचारधारा सोडून सामान्य जनतेचा अपेक्षाभंग केला असून, राज्यात भ्रष्टाचाराने परिसीमा गाठली असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडून आल्यानंतर नगरसेवक कोट्यधीश बनले आहेत, असे निरीक्षण जरवाल यांनी नोंदवले. विकासाची गंगा सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळा, दवाखाने, वाहतूक आणि रोजगाराचे सक्षमीकरण करणे हे 'आप'चे धोरण असेल. पंजाब आणि दिल्लीमध्ये 'आप'ने जे बदल घडवून आणले, तेच 'आप'चे विकासाचे मॉडेल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असून, सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न करेल. आमच्याकडे प्रामाणिक आणि इमानदार कार्यकर्ते असल्याने, आम्ही अनेक नगरपालिकांमध्ये उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे, असे जरवाल यांनी सांगितले. 'आप'ने आपल्या स्टार प्रचारकांची यादीही जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंग, माजी मुख्यमंत्री अतिशी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राखी बिडलान यांचा समावेश असून, हे नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती प्रकाश जरवाल यांनी दिली. यावेळी बोलताना 'आप'चे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी सांगितले की, नगरपरिषद निवडणुकीत नेवासा येथे 'आप'च्या उमेदवार शालिनीताई सुखधान निवडून आल्या आहेत. या विजयामुळे महाराष्ट्रात 'आप'ने आपले खाते उघडले आहे. या पत्रकार परिषदेला 'आप'चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, शहर अध्यक्ष धनंजय बेनकर, सुदर्शन जगदाळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 3:46 pm

अंड्यांचे भाव कडाडले

मुंबई : कडाक्याच्या थंडीत अंड्यांचा भाव चांगलाच वधारला आहे. एक डझन अंड्यासाठी १०० रुपयांची नोट कामी येत आहे. त्यामुळे खवय्यांच्या तोंडची चव गेली आहे. यापूर्वी त्यापेक्षा स्वस्तात अंडी येत होती. पण थंडी वाढताच मागणी वाढल्याने अंड्याच्या किमतींचा भडका उडाला आहे. त्यामुळे थंडीत ऑम्लेट आणि अंडा करीसाठी ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात […] The post अंड्यांचे भाव कडाडले appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Dec 2025 3:44 pm

काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर:महापालिकेसाठी पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट, अमित देशमुख, अझरूद्दीन, राज बब्बर महाराष्ट्र पिंजून काढणार

राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकासांठी काँग्रेसने आज 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात रमेश चेन्निथला, हर्षवर्धन सपका, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट, अमित देशमुख, अझरूद्दीन, राज बब्बर अशा दिग्गज नेत्यांची नावे आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. ही यादी 19 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवण्यात आली. काँग्रेसच्या महापालिका निवडणुकीतील स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये रमेश चेन्निथला, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, छत्रपती शाहू महाराज, सतेज उर्फ बंटी पाटील, मुकुल वासनिक, रेवंत रेड्डी, पृथ्वीराज चव्हाण, सचिन पायलट बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे. माजी क्रिकेटपटून मोहम्मद अझरूद्दीन, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, नाना पटोले, इम्रान प्रतापगढी, चंद्रकांत हंडोरे, आरिफ नसिम खान, राज बब्बर, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, अमिन पटेल यांचीही या यादीत नावे आहेत. नितीन राऊत, सुनील केदार, अमित देशमुख, विश्वजित कदम, भाई जगताप, अनिल अहेमद, रमेश बागवे, हुसेन दलवाई, साजीद खान पठाण, कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, वसंत पुरके, मुझफ्फर हुसेन, एम. एम. शेख, मोहन जोशी, वजाहत मिर्झा, अतुल लोंढे, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, हनुमंत पवार यांचीही स्टार प्रचारकांच्या यादीत नावे आहेत.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 3:33 pm

तूर हंगाम लांबणार!

पुणे : गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर लक्षणीय वाढला असून, त्याचा थेट परिणाम खरीप हंगामातील तूर पिकावर होताना दिसत आहे. तापमानात झालेल्या तीव्र घसरणीमुळे तुरीची वाढ मंदावली असून, शेंगा भरण्याची प्रक्रिया संथ झाली आहे. परिणामी, यंदा तुरीची काढणी अपेक्षेपेक्षा उशिरा होण्याची शक्यता असून, तूर हंगाम लांबण्याचा अंदाज कृषीतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याचा थेट फटका पुढील […] The post तूर हंगाम लांबणार! appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Dec 2025 3:33 pm

पुण्यात राष्ट्रवादी एकत्र येण्याची स्पष्ट चिन्हे:गुप्त बैठकीतील मुद्दे समोर आल्याने उलगडा; शरद पवार-अजित पवार गटातील हालचालींना वेग

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात महत्त्वाची हालचाल सुरू झाली असून, फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत मिळून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहेत. भाजपविरोधात ताकद एकवटण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आज उशिरा महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत जागावाटप, निवडणूक रणनीती आणि एकत्र लढण्याचा आराखडा ठरवला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील यांच्याशी पुणे महापालिकेत आघाडी म्हणून लढण्याबाबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून ॲड. वंदना चव्हाण, अंकुश काकडे, विशाल तांबे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप सहभागी झाले होते. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याबाबत अनुकूल वातावरण असल्याचे स्पष्ट झाले असून, महाविकास आघाडीतील मित्र पक्षांशी स्वतंत्र चर्चा केली जाणार आहे. राष्ट्रवादी एकत्र लढल्यास कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. दरम्यान, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला नसून, ते मुंबईत असल्याने बैठकीला अनुपस्थित राहिले. मात्र, ते पक्षासोबतच राहतील, असा विश्वास अंकुश काकडे यांनी व्यक्त केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटाकडून ठाकरे गटालाही सोबत घेण्याचा प्रस्ताव अजित पवार यांच्यासमोर ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडींमुळे पुण्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, महापालिका निवडणुकीत कोणती समीकरणे आकाराला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, या संभाव्य युतीमुळे शरद पवार गटातच अस्वस्थता निर्माण झाली असून, अंतर्गत नाराजीचे सूर उघडपणे ऐकू येऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आपण पक्षातून राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला होता. हा इशारा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला असला, तरी त्याचा दोन्ही राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेतृत्वावर फारसा परिणाम झाल्याचे दिसत नाही. कारण, जगताप यांच्या भूमिकेनंतरही पुण्यात दोन्ही गटांतील नेत्यांची गुप्त बैठक सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत शरद पवार गटाकडून अंकुश काकडे आणि विशाल तांबे, तर अजित पवार गटाकडून सुभाष जगताप आणि सुनील टिंगरे सहभागी झाले आहेत. स्थानिक पातळीवरील या चर्चेनंतर महापालिका निवडणूक आणि इतर राजकीय मुद्द्यांबाबतचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे सादर केला जाणार असल्याचे समजते. जनतेसमोर कोणत्या तोंडाने मते मागायची- प्रशांत जगताप दरम्यान, प्रशांत जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आपण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र अद्याप औपचारिक राजीनामा दिलेला नाही. आपण लवकरच मुंबईत सुप्रिया सुळे यांची भेट घेणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्याशी आपला वैयक्तिक वाद नसल्याचे सांगत त्यांनी महत्त्वाचा सवाल उपस्थित केला की, एकीकडे अजित पवार महायुती सरकारमध्ये सहभागी असताना, दुसरीकडे त्यांच्यासोबत आघाडी कशी करायची? पुणेकरांना सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे, असे ते म्हणाले. महायुती सरकारमुळे पुण्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अजित पवार त्या सरकारचा भाग असल्याने जनतेसमोर कोणत्या तोंडाने मते मागायची, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आपण हट्टाग्रही नसून विचारधारेशी निष्ठावान कार्यकर्ता असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पक्षांतरांच्या हालचालींनाही वेग आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून, पैलवान आणि माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे आणि त्यांची कन्या दीप्ती कांबळे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. अंबरनाथ कांबळे हे यापूर्वी भाजपमध्ये होते, त्यानंतर त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मार्ग स्वीकारला आहे. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. निवडणुकीपूर्वीच राजकीय पक्षांतील हालचाली अधिक तीव्र दुसरीकडे, पुणे शहरातही पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि माजी नगरसेवक संजय भोसले हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मनपा निवडणुकीपूर्वीच राजकीय पक्षांतील हालचाली अधिक तीव्र झाल्या असून, युती, आघाड्या आणि नाराजी यांचा गुंता अधिकच वाढताना दिसत आहे. एकीकडे राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता, तर दुसरीकडे कार्यकर्त्यांची नाराजी आणि पक्षांतरांची लाट, यामुळे पुणे महानगरपालिका निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, राज्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी लढाई ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 3:31 pm

प्रशांत जगतापांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही:सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका; दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीबाबत केले सूचक विधान

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. प्रशांत जगताप यांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही, त्यामुळे मला त्याबद्दल अधिकृत माहिती नाही, असे सांगत सुळे यांनी या राजीनामा नाट्यावर सस्पेन्स कायम ठेवला आहे. तसेच, २६ डिसेंबर रोजी दोन्ही राष्ट्रवादींची युती होणार असल्याच्या अजित पवारांच्या दाव्यावरही त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. प्रशांत जगताप यांच्या नाराजीबद्दल विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजीनामा द्यायचा असेल तर तो प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे जाणे अपेक्षित असते. मात्र, अद्याप तरी तसे काही घडल्याचे माझ्या कानावर नाही. कालच मी स्वतः, जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांनी प्रशांत जगताप यांच्याशी मुंबईत दोन तास सविस्तर चर्चा केली. महापालिका निवडणुकीत पक्षाचे धोरण काय असावे आणि समोर कोणते पर्याय आहेत, यावर आमचे सकारात्मक बोलणे झाले आहे. आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. मतांचे विभाजन टाळण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न मुंबईतील निवडणुकीबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीच्या ऐक्यावर भर दिला. आमची मुंबईत उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत चर्चा सुरू आहे. आजही आम्ही त्या चर्चेसाठी पुन्हा बसणार आहोत. दोन्ही ठाकरे बंधू आणि काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी पूर्णपणे एकत्र आपण लढले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. मताचे विभाजन होऊ नये, यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे. आम्ही जे काही करतोय, ते विकासासाठी करतोय, असेही त्यांनी नमूद केले. २६ डिसेंबरच्या 'मुहूर्ता'वर सुळेंची प्रतिक्रिया अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना २६ डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीची घोषणा होणार असल्याचे विधान केले आहे. यावर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवार हे एक जबाबदार नेते आहेत. त्यांनी जर काही विधान केले असेल, तर ते नक्कीच विचार करून आणि जबाबदारीने केले असेल. मात्र, अद्याप माझ्याकडे किंवा पक्षाकडे असा कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. या विधानातून सुळे यांनी युतीची शक्यता पूर्णपणे नाकारली नाही, मात्र चेंडू अजित पवारांच्या कोर्टात ढकलला आहे. कार्यकर्ता हाच केंद्रबिंदू महापालिका निवडणुका या प्रामुख्याने कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना कार्यकर्त्यांचे हित आणि त्यांची मते महत्त्वाची ठरणार आहेत. आघाड्यांबाबत अनेक स्तरावर चर्चा सुरू आहेत. जोपर्यंत काही ठोस हातात पडत नाही, तोपर्यंत त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. जागावाटप सध्या अंतिम टप्प्यात असून कार्यकर्ता केंद्रबिंदू ठेवूनच आम्ही पुढील पाऊल उचलू, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 3:28 pm

कोल्हापूर-मुंबई खासगी बसवर 'सिनेस्टाईल' दरोडा:चाकू दाखवत सव्वा कोटींचे दागिने लंपास, पुणे-बंगळुरू महामार्गावरील घटना

कोल्हापुरात एका भीषण दरोड्याची घटना घडली आहे. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी आराम बसला मध्यरात्री गाठून सात ते आठ सशस्त्र दरोडेखोरांनी सुमारे 1 कोटी 22 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. या सिनेस्टाईल दरोड्यामुळे प्रवाशांमध्ये आणि खासगी बस चालकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोका कंपनीची खासगी आराम बस (क्रमांक MH 09 GJ 7272) रविवारी रात्री 11 च्या सुमारास कोल्हापूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली. कोल्हापूर शहराबाहेरील तावडे हॉटेलजवळ तीन अनोळखी व्यक्ती प्रवासी म्हणून बसमध्ये चढले. ही बस पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी गावच्या हद्दीतील 'भुताचा माळ' परिसरात आली असता, बसमध्ये आधीच बसलेल्या त्या तिघांनी अचानक चाकूचा धाक दाखवून चालकाला बस रस्त्याच्या कडेला थांबवण्यास भाग पाडले. पाठलाग करून गाठले आणि लुटले बस थांबताच पाठीमागून एका वाहनातून आलेल्या पाच ते सहा साथीदारांनी बसला वेढा घातला. हे सर्व दरोडेखोर बसमध्ये शिरले आणि त्यांनी अरेरावी करत प्रवाशांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यांनी बसमधील सुतळी बारदानातील 34 किलो आणि प्लास्टिक पोत्यातील 26 किलो अशी एकूण 60 किलो चांदी, मशिनरीचे स्पेअर पार्ट, 10 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि मोबाईल हँडसेट असा एकूण 1 कोटी 22 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. थांबलात तर मारून टाकू! लूट केल्यानंतर दरोडेखोरांनी जाताना बस चालक आणि प्रवाशांना सज्जड दम भरला. या परिसरात अजिबात थांबायचं नाही, पुढे निघून जा, नाहीतर जीवानिशी मारून टाकू, अशी धमकी देऊन ते पसार झाले. प्रचंड घाबरलेल्या बस चालकाने बस तशीच पुढे नेली आणि सांगली जिल्ह्यातील कणेगाव येथे बस थांबवून '112' क्रमांकावर पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांकडून तपास सुरू घटनेची माहिती मिळताच सांगली आणि कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि बसमधील प्रवाशांच्या वर्णनावरून दरोडेखोरांचा शोध घेतला जात आहे. निवडणुकीच्या जल्लोषात न्हाऊन निघालेल्या जिल्ह्यात या घटनेमुळे भीती पसरली असून, अशा प्रकारे महामार्गावर बस लुटली गेल्याने खासगी बस कंपन्यांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 2:29 pm

महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कुणासोबत?:मुंबई आणि नागपुरात काँग्रेसशी चर्चा सुरू, मात्र, 50 टक्के जागांवर ठाम

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर नेमके कुणासोबत जाणार, यावरून राज्याच्या राजकारणात मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्यात बोलताना आंबेडकरांनी इतर पक्षांसोबतच्या आघाडीबाबत सूचक विधान केले. नवरदेव तयार आहे, मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे. सध्या फक्त चहापाण्याच्या चर्चा सुरू आहेत, मुलगी पसंत पडली की लगीन लावू, असे म्हणत अद्याप कोणत्याही पक्षाशी अधिकृत युती झाली नसल्याचेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याचवेळी त्यांनी मुंबईतील जागावाटपाचा '50-50' फॉर्म्युला मांडत मित्रपक्षांना मोठा इशाराही दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई आणि नागपुरात काँग्रेसशी आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे मान्य केले असले तरी, त्यांनी जागावाटपाच्या अटी कडक केल्या आहेत. आम्ही मुंबईत 200 जागांवर तयारी केली असून 50 टक्के जागांच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. नगरपालिका निवडणुकीत आमची ताकद काय आहे हे दिसले आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट अजूनही एकत्रित निर्णय घेऊ शकत नसल्याने आम्हाला स्वतंत्र विचार करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले. शिंदे यांची शिवसेना (12 जागा) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (१० जागा) यांच्याशीही प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. अकोल्याचा निधी बारामतीला; संजय धोत्रेंवर गंभीर आरोप पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी अकोल्याचे भाजपचे माजी खासदार संजय धोत्रे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. अकोल्यातील भूमिगत गटार योजनेच्या अपयशाला धोत्रे जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. संजय धोत्रे यांनी ही योजना नको म्हणून केंद्राला पत्र लिहिले होते. त्यामुळे अकोला महापालिकेला मिळणारा 350 कोटींचा निधी अजित पवारांनी बारामतीला पळवला. खुद्द अजित पवारांनी मला फोन करून हा निधी बारामतीकडे वळवल्याचे सांगितले होते, असा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या आरोपामुळे अकोल्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आता या आरोपावर भाजप काय उत्तर देते, हे पाहावे लागणार आहे. यशवंत भवन'वर इच्छुकांची गर्दी अकोला महापालिकेत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याने तिकिटासाठी मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या कृषीनगरमधील 'यशवंत भवन' या निवासस्थानी आज इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील 80 जागांसाठी आतापर्यंत २०० हून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. विशेषतः मुस्लिम आणि दलित बहुल प्रभागांमध्ये वंचितच्या तिकिटासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठी स्पर्धा दिसून येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 2:09 pm

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र?

पुणे : महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर पुण्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यातील सर्व २९ महापालिका निवडणुकांत महायुती म्हणून लढण्यास तयार असल्याचे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले होते. मात्र, पुण्यात भाजप-शिवसेना यांच्यात युती होत असल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची वारंवार चर्चा होत होती. अखेर त्यांच्यात सोमवारी (२२ डिसेंबर) मुंबईत चर्चा […] The post पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Dec 2025 1:44 pm

ठाकरे गटाचे पृथ्वीराज सुतार, संजय भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश:केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) माजी नगरसेवक आणि गटनेते पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि अश्विनी भोसले यांनी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, भाजप हे जगातील सर्वात मोठे संघटन असून, आम्ही केवळ निवडणुकीसाठी नव्हे, तर वर्षभर काम करतो. जे लोक भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत आणि पक्षविस्तारासाठी ज्यांची आम्हाला गरज आहे, त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. भाजप हा कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यात अनेक विकासकामे झाली आहेत. मोहोळ यांनी पुढे सांगितले की, सुतार आणि भोसले हे दोघे अनेक वर्षांपासून शहराच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात कार्यरत आहेत. भाजप आणि शिवसेनेची अनेक वर्षांपासून युती होती आणि त्यांनी राजकीय हिंदुत्ववादी वारसा जपला आहे. हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्यासाठी आणि विकसित भारताच्या संकल्पनेसाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संजय भोसले यांनी वर्षानुवर्षे कट्टर शिवसैनिक म्हणून येरवडा परिसरात काम केले असून, ते तीन वेळा नगरसेवकही होते. या पक्षप्रवेशावेळी खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले, सरचिटणीस सुशील मेंगडे, पुनीत जोशी, रवींद्र साळगावकर, प्रियांका शेंडगे, अमोल कविटकर आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पृथ्वीराज सुतार, संजय भोसले आणि अश्विनी भोसले यांचे भाजपमध्ये स्वागत केले. ते म्हणाले की, मनपात आम्ही अनेक वर्षे सोबत काम केले आहे आणि हिंदुत्वाचा धागा कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर विश्वास ठेवून संबंधित व्यक्ती पक्षात आल्या आहेत. शिवसेनामध्ये काम करत असताना त्यांना जे प्रेम आणि आपुलकी मिळाली, त्यापेक्षा अधिक स्थान आम्ही देऊ. या प्रवेशामुळे त्यांच्या मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार असून, मनपावर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी आपण सज्ज होऊ. संजय भोसले म्हणाले, मागील दोन निवडणुकीत आम्ही आघाडीचा धर्म पाळला. ज्या काँग्रेसचा विरोध कायम केला पण आघाडी मध्ये त्यांच्या सोबत काम केले.मात्र, आम्हाला लोकांनी शिव्या घातल्या आहे.नंतर काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नसून काँग्रेसने येरवडा परिसरात निवडणुकीस तीन जागा सोडल्या नाही. भाजप सोबत आम्ही २५ वर्ष एकत्रित काम केले. त्यांची साथ सोडल्यावर आम्हाला दुःख होते. काँग्रेस आघाडी धर्म पाळत नाही. भाजप हिंदुत्ववादी पक्ष असून त्याकरिता आम्ही आज पक्षप्रवेश केला आहे. पृथ्वीराज सुतार म्हणाले, ४० वर्षापासून आम्ही हिंदुत्व मुद्द्यावर कोथरूड परिसरात आम्ही काम करतो आहे. पंतप्रधान मोदी यांनी हिंदुत्व मुद्द्यावर देशवासी एकत्र केले असून विकासाच्या मार्गावर ते सर्वांना घेऊन जात आहे त्यामुळे आज आम्ही पक्ष प्रवेश करत आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 1:43 pm

राज्यात थंडी ओसरली!;  कमाल तापमानात वाढ

मुंबई : प्रतिनिधी राज्यात थंडीची लाट ओसरली आहे. पुढील काही दिवस राज्याच्या किमान तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज राज्यात कमाल तापमानातील चढ-उतार सुरूच राहणार असून निफाड आणि धुळ्यात तापमानाचा पारा ६ अंश सेल्सियसच्या खाली गेला आहे. वातावरणात होणा-या सततच्या बदलांमुळे नागरिक देखील हैराण झाले आहेत. काल म्हणजेच सोमवारी निफाड […] The post राज्यात थंडी ओसरली!; कमाल तापमानात वाढ appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Dec 2025 1:42 pm

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईकर सज्ज; हॉटेल्स फुल्ल, रस्ते जाम

मुंबई : प्रतिनिधी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकरांसह संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांनी कोकणाला पसंती दिली आहे. नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने सध्या संपूर्ण कोकण किनारपट्टी पर्यटकांनी गजबजून गेली आहे. नाताळपासून सुरू झालेला पर्यटकांचा ओघ नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहणार आहे. यंदा कोकण पर्यटनाने गेल्या अनेक वर्षांचे विक्रम मोडीत काढले आहेत. सलग […] The post नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईकर सज्ज; हॉटेल्स फुल्ल, रस्ते जाम appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Dec 2025 1:40 pm

महापालिका निवडणुकीत काळ्या पैशावर 'आयकर'ची नजर:विदर्भ, मराठवाड्यात 24 तास नियंत्रण कक्ष, टोल फ्री क्रमांक जारी

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विभागाने नागपूरमध्ये २४ तास कार्यरत असलेला नियंत्रण कक्ष आणि तक्रार हाताळणी केंद्र स्थापन केले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, जनतेकडून तक्रारी स्वीकारण्यासाठी टोल फ्री क्रमांकही सुरू करण्यात आले आहेत. नागपूरमध्ये संशयास्पद स्थितीत मोठ्या प्रमाणात रक्कम किंवा वस्तू नेताना आढळल्यास नागरिक ०२२-२२६३५५११, २२६२७२७५ आणि १८००-०२२-०११५ (टोल फ्री) या क्रमांकांवर तक्रार करू शकतात. अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यानंतर, आयकर विभागाकडून संबंधित प्रकरणाची आयकर कायद्यातील तरतुदींनुसार चौकशी केली जाईल. जर संबंधित व्यक्ती समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकली नाही, तर तिच्याकडील रक्कम किंवा वस्तू जप्त केली जाईल. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्कम किंवा वस्तू सोबत घेऊन जाताना अनावश्यक गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, ओळखपत्र आणि पॅनकार्ड सोबत ठेवावे, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सेमिनेरी हिल्स परिसरातील प्रधान आयकर विभागातर्फे (अन्वेषण) १८००-२३३-०३५५ आणि १८००-२३३-०३५६ हे टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. काळ्या पैशाच्या वापराशी संबंधित छायाचित्रे, ध्वनीचित्रफित किंवा ध्वनीफित यांसारखे पुरावे ९४०३३-९०९८० या भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठवता येतील. रोख रकमेचे वाटप किंवा वाहतूक करण्यासंबंधीची माहिती मिळाल्यास ती विभागातर्फे देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल. याव्यतिरिक्त, नागरिक nagpur.addldit.inv@incomtax.gov.in आणि nashik.addldit.inv@incomtax.gov.in या ईमेल पत्त्यांवरही आपल्या तक्रारी नोंदवू शकतात.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 1:40 pm

पुणे पोलिस आयुक्तांचे पीआरओ प्रवीण घाडगे निलंबित:पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी सेवेतून बडतर्फीची प्रक्रिया सुरू

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण घाडगे यांना गंभीर अनियमितता आणि पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात सेवेतून बडतर्फ करण्याची विभागीय प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. गोपनीय चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली. चौकशीत प्रवीण घाडगे यांनी आपल्या पदाचा आणि पोलिस आयुक्तांच्या नावाचा वापर करून एका वादग्रस्त बिल्डरला मदत करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. संबंधित बिल्डरचा आंदेकर टोळीशी थेट संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घाडगे यांनी पोलिस आयुक्तांच्या नावाचा वापर करत सहाय्यक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आंदेकर टोळीशी संबंधित बिल्डर अविनाश पवार याला जमीन वादाच्या प्रकरणात मदत मिळावी, यासाठी हा दबाव टाकण्यात आला होता. मात्र, एसीपी खटके यांनी कोणतीही मदत करण्यास स्पष्ट नकार देत हा प्रकार थेट पोलिस उपायुक्त निखिल पिंगले यांच्या निदर्शनास आणून दिला. दरम्यान, जमीन वादाच्या एका प्रकरणात काही तक्रारदार अविनाश पवार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयात आले होते. तक्रार दाखल होऊ नये म्हणून अविनाश पवार याने तक्रारदारांवर दबाव टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ‘स्टॅनली’ नावाचा व्यक्ती मध्यस्थ म्हणून काम करत असल्याचे समोर आले असून, त्याचा थेट संपर्क प्रवीण घाडगे यांच्याशी असल्याचे तपासात उघड झाले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेने स्टॅनली याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीत स्टॅनलीने धक्कादायक खुलासा करत सांगितले की, प्रवीण घाडगे यांनी प्रकरण मिटवण्यासाठी आणि तडजोडीसाठी २० लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच आंदेकर टोळीशी संबंधित अविनाश पवार याचे प्रकरण स्वतः प्रवीण घाडगे यांच्याकडे नेल्याची कबुलीही त्याने दिली. एका बाजूला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आंदेकर टोळीविरोधात कठोर कारवाई सुरू असताना, पोलिस दलातीलच एक कर्मचारी त्या टोळीच्या फायद्यासाठी काम करत असल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. तपासात यापूर्वीही प्रवीण घाडगे यांच्याविरोधात तक्रारी प्राप्त झाल्याचे समोर आले असून, ते पोलिस आयुक्तांच्या नावावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून प्रकरणे निकाली काढण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप होता. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच प्रवीण घाडगे यांची ‘भरोसा सेल’मध्ये बदली करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांनी गैरप्रकार थांबवले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, ते पुन्हा पीआरओ पदावर येणार असल्याचा दावा करत लोकांना फोन करत होते आणि आईच्या आजारपणाचे कारण देत साइड पोस्टिंग मिळवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर पीआरओ पदाचा गैरवापर करून अनैतिक आणि बेकायदेशीर कृत्यांमध्ये सातत्याने सहभाग आढळल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेत प्रवीण घाडगे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणामुळे पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 1:38 pm

ठरलं:ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा उद्या दुपारी 12 वाजता होणार; मुंबई मनपासाठी उद्धव-राज एकत्र, संजय राऊत यांनी दिली माहिती

उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा उद्या दुपारी 12 वाजता होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ही माहिती दिली. राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालीय. त्यातही उभ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेसाठी भाजपने जोर लावला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज एकत्र आलेत. राऊतांचे म्हणणे काय? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे. त्यात फक्त तीन शब्दांत आपले नेमके म्हणणे मांडले आहे. 'उद्या १२ वाजता' असे वाक्य लिहून त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एक फोटो ट्विट केलाय. त्यात ठाकरे बंधूंच्या हातांमध्ये गुलाबांच्या फुलांचा एक मोठा गुच्छ दिसतोय. एकाद्या हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जातेय. उद्धव यांनीच पक्ष सोडायला भाग पाडले ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजप नेते राम कदम म्हणाले की, 'राज ठाकरे यांनी पक्ष सोडला नव्हता. त्यांना उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडायला भाग पाडले होते. मात्र, आता त्यांना राज यांची आवश्यता आहे. त्यामुळे ते त्यांच्या दारी गेलेत. कोविडच्या काळात ते घराबाहेर पडले नाहीत. जनतेच्या कफनमध्ये पैसे खाल्ले. आता दोघेही मराठी माणसांवर बोलतील. मात्र, यांना आवश्यकता असेल, तेव्हा मराठी माणूस आठवतो. हे किती एकत्र येऊ द्या. त्यांचा आकडा ३५-४० च्या वर जाणार नाही,' अशी टीका त्यांनी केली. (बातमी अपडेट होत आहे...)

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 1:17 pm

मोठी बातमी:संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेग; वाल्मिक कराडसह इतरांवर मकोका न्यायालयात आरोप निश्चित, 8 जानेवारीला सुनावणी

खंडणीच्या व्यवहारात अडथळा निर्माण केल्यामुळे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा ठपका अखेर न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्टपणे समोर आला आहे. बीड येथील विशेष मकोका न्यायालयात आज या बहुचर्चित हत्या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, न्यायालयाने सर्व आरोपींवरील आरोप अधिकृतपणे निश्चित केले असून खटला लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आरोपींकडून खटला लांबवण्याचा प्रयत्न होत असला, तरी न्यायालयाने त्याला आळा घातल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती. अत्यंत क्रूर पद्धतीने ही हत्या करण्यात आली असून त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने जनआक्रोश आणखी वाढला. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून उर्वरित सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या घटनेनंतर बीडसह राज्यातील अनेक ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले. मारहाणीचे व्हिडीओ समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. या हत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचे नाव समोर आल्यानंतर थेट मुंडे यांच्यावरही आरोप झाले. वाढत्या दबावामुळे अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. या संपूर्ण प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली होती. पुढील सुनावणी आता 8 जानेवारी रोजी आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व आरोपींना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींचे वकील उपस्थित होते, तर सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम आणि ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपींवरील आरोपांचे वाचन करून दाखवले. मात्र, वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आपल्यावरील आरोप मान्य नसल्याचे न्यायालयासमोर स्पष्ट केले. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 8 जानेवारी रोजी होणार आहे. न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी प्रयत्न सुनावणीनंतर माध्यमांशी संवाद साधताना ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, खंडणी मिळण्यास अडथळा निर्माण झाला म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, हे तपासातून स्पष्ट झाले आहे. आरोपींच्या वकिलांकडून ‘डी फॉर डिले’ आणि ‘डी फॉर डिरेल’ म्हणजेच खटला लांबवण्याचा आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, न्यायालयाने तो ओळखून योग्य आदेश दिले आहेत. प्रत्यक्ष पुराव्यांचे सादरीकरण लवकरच सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात असो वा अन्य कोणत्याही न्यायालयात, न्याय लवकरात लवकर मिळावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे निकम यांनी स्पष्ट केले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेला वेग मिळाल्याने पीडित कुटुंबासह संपूर्ण राज्याला न्यायाची अपेक्षा आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 1:09 pm

'चला कवितेच्या बनात'चा गौरव:उदगीरचे अनंत कदम यांना रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार जाहीर

यंदाचा रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार उदगीरचे अनंत कदम यांना जाहीर केल्याची माहिती, साहित्यिक सुरेंद्र पाटील यांनी दिली. पाटील यांनी आपल्या वडिलांच्या नावाने हा पुरस्कार सुरू केलाय. साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे साहित्यिक, संस्था किंवा व्यक्तीसाठी पाच हजार रुपये, ग्रंथभेट, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारासाठी कसलीही प्रवेशिका मागवली जात नाही. विशेष म्हणजे पुरस्कारप्राप्त व्यक्तीच्या घरी जाऊन हा पुरस्कार सन्मानपूर्वक दिला जातो. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. उदगीरचे अनंत कदम हे एक उपक्रमशील शिक्षक असून त्यांनी वाचन चळवळीची गरज लक्षात घेऊन जून २०११ पासून 'वाचक संवाद' हा उपक्रम सुरू केला तो आजही समविचारी मित्रांना घेऊन अखंडपणे चालू आहे. आत्तापर्यंत ३५१ वक्त्यांनी त्यांच्या या उपक्रमात हजेरी लावलेली आहे. आतापर्यंत ३५१ पुस्तकांवर तितक्याच संवादकांनी 'वाचक संवाद'मध्ये संवाद साधलेला आहे. 'चला कवितेच्या बनात' हा उपक्रमही ते राबवतात. या यशस्वी उपक्रमशीलतेमुळे त्यांची निवड केल्याचे सुरेंद्र पाटील यांनी सांगितले. येत्या जानेवारीमधे त्यांच्या घरी जाऊन अनंत कदम यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराने अनंत कदम यांच्या कार्याची दखल घेतल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे. पहिला रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार कथाकार सचिन वसंत पाटील यांच्या मायबोली रंग कथांचे या पुस्तकास मिळाला होता. सचिन पाटील यांचा त्यांच्या घरी जाऊन त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. संबंधित वृत्त जिद्दी लेखकाचा सन्मान:सचिन पाटील यांच्या मायबोली रंग कथांचे पुस्तकाला पहिला रावसाहेब पाटील साहित्य पुरस्कार जाहीर

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 12:58 pm

पराभवाचे खापर, शब्दांची चकमक आणि अखेर पडदा:मुनगंटीवारांनी दौरा गुंडाळला; बावनकुळे आणि आशिष देशमुखांची वक्तव्ये चर्चेत

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला बसलेला जबर धक्का, त्यानंतर पक्षांतर्गत निर्माण झालेली अस्वस्थता आणि त्यावर आलेल्या विविध प्रतिक्रिया यामुळे राज्याच्या राजकारणात नवे वळण पाहायला मिळत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि नेते आशिष देशमुख यांच्या भूमिकांमुळे हा विषय अधिकच चर्चेत आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 11 नगरपालिकांपैकी केवळ एक नगरपरिषद आणि एक नगरपंचायत भाजपला जिंकता आल्याने पक्षाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. या पराभवावरून मुनगंटीवारांनी थेट पक्ष संघटनेवर नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर भाजपमधील सुप्त मतभेद उघडपणे समोर आले. चंद्रपूरमधील निकाल जाहीर झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी या पराभवाची जबाबदारी पक्षाच्या कार्यपद्धतीवर टाकली. त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुनगंटीवार यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा रंगली. मुनगंटीवारांनी यानंतर राज्यभर दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची घोषणा केली होती. या दौऱ्याच्या घोषणेला अनेकांनी अंतर्गत नाराजीचा सूर असल्याचे मानले. भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकांमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीने, पक्षाच्या एकजुटीबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले. मात्र, काही दिवसांतच या राज्यव्यापी दौऱ्यावर मुनगंटीवारांनी स्वतःच पडदा टाकला. नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, राज्यभर दौऱ्याचा विषय आता संपला आहे. तो विषय आता बंद झाला आहे. भेटीगाठी होत राहतील, चर्चा होतील, असे सांगत त्यांनी या मुद्द्यावर अधिक बोलणे टाळले. सध्या आपण काही नेत्यांना भेटत असल्याचे त्यांनी सांगितले. या वक्तव्यामुळे मुनगंटीवारांनी आपली भूमिका काहीशी मवाळ केल्याचे संकेत मिळाले. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे भाजपमध्ये सुरू असलेली चर्चा काही प्रमाणात शांत होत असल्याचे चित्र आहे. मुनगंटीवारांचा दौरा रद्द होण्यामागे पक्ष नेतृत्वाशी होणारा संवाद दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातील पराभवावर भाजपने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले होते. त्यांनी मुनगंटीवार यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यानुसार आज सुधीर मुनगंटीवार यांची मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत चंद्रपूरच्या निकालासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुनगंटीवारांचा दौरा रद्द होण्यामागे पक्ष नेतृत्वाशी होणारा थेट संवाद हेच कारण असल्याची चर्चा आहे. सुधीरभाऊ नाथाभाऊंच्या मार्गावर तर चालले नाहीत ना? - आशिष देशमुख या संपूर्ण वादावर भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी प्रतिक्रिया देत मुनगंटीवारांच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले. त्यांनी मुनगंटीवारांची तुलना थेट माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी करत, सुधीरभाऊ नाथाभाऊंच्या मार्गावर तर चालले नाहीत ना? असा सवाल उपस्थित केला. देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांची अशी कोणतीही इच्छा नाही की पक्षात मतभेद निर्माण व्हावेत. मुनगंटीवारांनी फडणवीसांवर श्रद्धा आणि संयम ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला. मुनगंटीवार हे वरिष्ठ नेते असून त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल, त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींची मेहेरनजर राहील, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. सख्खे भाऊ एकत्र यावेत, ही आमची सदिच्छा दरम्यान, राजकीय चर्चेत असलेल्या ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवरही सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. दोन सख्खे भाऊ एकत्र यावेत, ही आमची सदिच्छा आहे. मुंबईमध्ये त्यांचा जीव आहे, त्यामुळे मुंबईसाठी ते सर्व प्रयत्न करतील, असे मुनगंटीवार म्हणाले. या वक्तव्यामुळे भाजपचा ठाकरे बंधूंच्या युतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही स्पष्ट झाला. मुंबईतील राजकारणात या घडामोडींचा मोठा प्रभाव पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुनगंटीवारांची माघार आणि बावनकुळेंची समन्वयाची भूमिका महायुतीबाबत बोलताना मुनगंटीवारांनी स्पष्ट केले की, भारतीय जनता पार्टी जिथे शक्य आहे, तिथे महायुती एकत्र लढत आहे. मात्र, प्रत्येक शहराची राजकीय परिस्थिती, संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा लक्षात घेऊनच युती किंवा आघाड्यांचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे कुठे महायुती, कुठे महाविकास आघाडी किंवा स्थानिक समीकरणे पाहून निर्णय होतात, असे त्यांनी नमूद केले. एकंदरीत, चंद्रपूरच्या पराभवातून निर्माण झालेला भाजपमधील वाद, त्यावर मुनगंटीवारांनी घेतलेली माघार, बावनकुळेंची समन्वयाची भूमिका आणि देशमुखांनी उपस्थित केलेले प्रश्न, या सर्व घडामोडींमुळे भाजपच्या अंतर्गत राजकारणाची दिशा स्पष्ट होत असल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 12:46 pm

रंगीत पणत्यांनी साकारली भारतमातेची भव्य मोझॅक कलाकृती:'वंदे मातरम' गीताच्या 150 व्या वर्षानिमित्त मानवंदना, जागतिक विक्रमाची नोंद

डोंबिवलीत २.५ लाख रंगेबिरंगी पणत्यांमधून साकारलेली भारतमातेची एक अफलातून मोझॅक चित्रनिर्मिती सध्या अतिशय लक्षवेधक ठरत आहे. रंगीत पणत्यांच्या माध्यमातून आकारलेल्या चित्राने जागतिक विक्रम प्रस्थापित केला असून भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराच्या माध्यमातून ही अभिनव कलाकृती तयार करण्यात आली आहे. ही रेकॉर्ड ब्रेक कलाकृती पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने रसिक प्रेक्षक डोंबिवली जिमखाना मैदानावर गर्दी करत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण डोंबिवलीसारख्या मराठी साहित्य, संस्कृती आणि कलेचं माहेरघर असलेल्या शहराचं प्रतिनिधित्व करतात. या अनोख्या उपक्रमाविषयी माहिती देताना ते म्हणाले की, भारतमातेचे पूजन हे संस्कार बालपणातून झालेले असल्याने आणि त्या भारतमातेचे गुणगान गाणारे व वंदन करणारे राष्ट्रगान म्हणजेच वंदे मातरम. अशा श्रद्धा व आस्थेच्या वंदे मातरम या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डोंबिवलीत जागतिक विक्रम करण्याचा डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराने निर्णय घेतला. चेतन राऊत तसेच प्रभू कापसे व वैभव कापसे या पितापुत्रांच्या जोडीने आणि अन्य कलाकार-साथीदारांनी मिळून सतत नऊ दिवस खपून पणत्या रंगवून कलात्मकतेचा अविष्कार सादर केल्याचे गौरवोद्गार प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी काढले. प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की भारतमाता आपल्यासाठी देवी स्वरूप आहे म्हणून तिचं सनातन संस्कृतीत आपण पूजन करतो. आपण सर्वजण त्याच धरतीची लेकरं आहोत आणि या मातीतूनच तयार केलेल्या पणत्यांनी मोझॅक साकारण्याची कल्पना सुचली आणि भारतमातेला, वंदे मातरम गीताला अनोखी मानवंदना देण्याचे ठरले. ९५ फूट उंची आणि ७५ फूट रुंदीची, सुमारे अडीच लाखांहून अधिक रंगीत पणत्यांचा (दिव्यांचा) वापर करून साकारलेली भारतमातेची अद्भुत मोझॅक कलाकृती निर्माण करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया अंतर्गत एक नवा जागतिक विक्रम यशस्वीपणे प्रस्थापित झालेला आहे. ही भव्य कलाकृती कलाकार चेतन राऊत, वैभव प्रभू कापसे तसेच डोंबिवलीकर आर्टिस्ट टीम यांनी अवघ्या नऊ दिवसांत साकारली. डोंबिवली जिमखानातर्फे उत्सव या नावाने वार्षिक मेळा आयोजित केला जातो. तिथे ही कलाकृती २८ डिसेंबर २०२५ पर्यंत खुली ठेवण्यात आली असून प्रेक्षकांनी त्याचा लाभ घ्यावा असे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आवाहन केले.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 12:41 pm

उबाठाकडून मिठी नाही, तर पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी:राज ठाकरेंनी सावध राहावे, भाजपचे नवनाथ बन यांचा इशारा

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (UBT) यांच्यातील कलगीतुरा अधिकच तीव्र झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर केलेल्या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाचा सौदा केला आणि मराठी माणसाची पत्राचाळ लुटली, त्यांनी आम्हाला लोकशाही शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दात बन यांनी राऊतांना सुनावले आहे. तसेच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीवर भाष्य करताना त्यांनी राज ठाकरेंना 'सावध' राहण्याचा इशारा दिला आहे. भ्रष्टाचार आणि कोविड घोटाळ्यावरून टोला नवनाथ बन यांनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेताना महाविकास आघाडी काळातील कथित घोटाळ्यांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, राऊतांनी टीका करण्यापूर्वी पत्राचाळ लूट, खिचडी घोटाळा आणि वसुली रॅकेटवर बोलावे. संपूर्ण जग आणि मुंबईतील जनता जेव्हा कोविडच्या संकटात होरपळत होती, तेव्हा सत्तेचा मलिदा खाणारे आज लोकशाहीसाठी मगरीचे अश्रू ढाळत आहेत. हा दुटप्पीपणाचा कळस आहे. उबाठा गटात कार्यकर्ते बेवारस नगरपालिका निवडणुकीच्या निकालावरून शंका घेणाऱ्या राऊतांना टोला लगावताना बन म्हणाले की, देशातील लोकशाही पूर्णपणे सुरक्षित आहे, मात्र 'उबाठा' गटात लोकशाही आणि कार्यकर्ते दोन्ही बेवारस झाले आहेत. निवडणुका जाहीर होऊनही या पक्षाचा एकही मोठा नेता मैदानात सभा घ्यायला तयार नव्हता. घरात बसून निवडणुका लढवायच्या आणि निकाल प्रतिकूल लागला की यंत्रणेवर शंका घ्यायची, ही राऊतांची जुनी सवय आहे. खंजीर खुपसण्याचे फळ भोगावे लागतंय देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून राऊतांनी जे राजकारण केले, त्याचे फळ त्यांना आता भोगावे लागत आहे, असा दावा नवनाथ बन यांनी केला. केवळ विशिष्ट मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्वाचा सौदा करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही. विधानसभेप्रमाणेच आगामी महापालिका निवडणुकीतही त्यांना या कृत्याचा पश्चात्ताप करावा लागेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. राज ठाकरेंना धोक्याचा इशारा ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीवर भाष्य करताना नवनाथ बन यांनी राज ठाकरेंना जुन्या इतिहासाची आठवण करून दिली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची परंपरा ही नेहमीच जवळच्यांना धोका देण्याची राहिली आहे. २००८ चा इतिहास पाहता राज ठाकरेंनी अत्यंत सावध राहावे. ही मिठी नसून पुन्हा एकदा पाठीत वार करण्याची तयारी असू शकते. मनसैनिकांनी राऊतांच्या नादाला लागू नये, हे 'मनोमिलन' नसून केवळ सत्तेच्या भीतीपोटी झालेले 'मिलन' आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ठाकरेंच्या युतीने चित्र बदलणार नाही संजय राऊत यांना वाटते की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यानंतर सर्व काही बदलून जाईल, परंतु चित्र बदलणार नाही. मुंबईतील मराठी माणूस हा भाजपच्या पाठिशी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्यापद्धतीने कामे केलीत, आम्ही घोटाळ्याबद्दल बोलत नाहीत. आम्ही मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतू बद्दल बोलतो. संजय राऊतांन मुंबईतील ही कामे बघावीत. तुम्हाला बोलण्यासारखे खूप काही, त्यावर बोला, असा टोला नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना लगावला.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 12:32 pm

कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याचीवाडी शिवारात आठ फुट लांबीची मगर सापडली:वन विभागाच्या पथकाने घेतली ताब्यात

कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याचीवाडी शिवारातील एका शेतात आठ फुट लांबीची जिवंत मगर मंगळवारी ता. २३ सकाळी आढळून आली असून वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन मगर ताब्यात घेतली आहे. इसापूर धरणाच्या जलाशयातून मगर शेतात आली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याचीवाडी शिवारात आनंदराव फटींग यांचे शेत आहे. त्यांच्या शेतापासून काही अंतरावरच इसापूर धरण असून एक छोटा कालवा देखील आहे. या पाण्याचा ऊसासाठी वापर केला जातो. मागील काही दिवसांपासून त्यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरु आहे. आज सकाळी कामगार ऊस तोडणी करीत असतांना त्यांना ऊसाच्या फडात मोठी हालचाल जाणवली. कामगारांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता तेथे जिवंत मगर आढळून आली. या प्रकाराची माहिती गावकऱ्यांना कळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे, सहाय्यक विभागीय वन अधिकारी सचिन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वन कर्मचारी शिवरामकृष्ण चव्हाण, सुधाकर कऱ्हाळे, संग्राम भालेराव यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते यांनीही घटनास्थळी भेट दिली. वन विभागाचे पथक तसेच गावकरी शामराव ढाकरे, गणपत पाचपुते, बाळू धनवे, भागोराव खुडे यांनी मगरीला दोरीने बांधून ताब्यात घेतले. वन विभागाच्या पथकाने सदर मगरीला वाहनाद्वारे हिंगोली येथे आणले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नैसर्गिक अधिवासात सोडणार - वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार कळमनुरी तालुक्यात पहिल्यांदाच मगर आढळून आली आहे. गावकरी अन वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत रेस्क्यू करण्यात आले आहे. आता वरिष्ठांच्या आदेशानुसार मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल असे वन परिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी सांगितले.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 12:11 pm

'कृपया कोणी देणगी मागायला येऊ नये':निवडणुकीत पराभूत झाल्याने उमेदवाराने दुकानाबाहेर लावले फलक; बॅनरची राजकीय क्षेत्रात चर्चा

राजकीय निवडणुकीतील जय-पराजय हे पाचवीलाच पुजलेले असतात, मात्र कधी कधी एखाद्या उमेदवाराचा पराभव त्याच्या इतका जिव्हारी लागतो की, तो थेट सार्वजनिक नात्यालाच छेद देण्याचा प्रयत्न करतो. चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत असाच एक प्रकार समोर आला आहे. येथील काँग्रेसचे पराभूत उमेदवार सुधीर शिंदे यांनी निवडणुकीत मतदारांनी नाकारल्याने संतप्त होऊन आपल्या दुकानाबाहेर 'कृपया कोणी देणगी मागायला येऊ नये' असा जाहीर फलक लावला आहे. चिपळूणच्या राजकारणात सध्या या फलकाची जोरदार चर्चा रंगली आहे. सुधीर शिंदे हे चिपळूण शहराच्या राजकारणात दीर्घकाळापासून सक्रिय आहेत. भाजी विक्रीच्या व्यवसायातून त्यांनी मोठा लोकसंपर्क निर्माण केला होता. या जनसंपर्काचा फायदा घेत त्यांनी या निवडणुकीत मोठी मदार ठेवली होती. सुधीर शिंदे यांनी नगराध्यक्ष पदासह प्रभाग 12 मधून नगरसेवक पदासाठी नशीब आजमावले होते, तर त्यांच्या पत्नी सुजीता शिंदे यांना प्रभाग 11 मधून रिंगणात उतरवले होते. मात्र, मतदारांनी या पती-पत्नीला पूर्णपणे नाकारल्याचे निकालातून स्पष्ट झाले. काम चालू राहील, पण देणगी नाही! निवडणुकीत मतदारांनी आपल्याला दगा दिल्याची भावना सुधीर शिंदे यांनी व्यक्त केली आहे. मी लोकांसाठी रात्रंदिवस धावलो, मदतीला धावून गेलो. मला ठाम विश्वास होता की जनता माझ्या पाठीशी उभी राहील, पण मतदारांनी मला नाकारले. मी हरलेलो नाही, माझे सामाजिक कार्य यापुढेही सुरूच राहील, पण आता मी कोणालाही वैयक्तिक देणगी देणार नाही, अशा शब्दांत सुधीर शिंदे यांनी आपला संताप व्यक्त केला. बलाबल आणि निकालाचे गणित सुधीर शिंदे यांनी उमेदवारीसाठी राजकीय पक्षांच्या अनेक उड्या मारल्या होत्या. प्रथम शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या सुधीर शिंदे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे उमेदवारी मागितली होती, मात्र तिथे डावलले गेल्याने त्यांनी पुन्हा काँग्रेसचा हात धरला. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत त्यांना अवघी 121 मते मिळाली, तर त्यांच्या पत्नीला तिसऱ्या क्रमांकाची 536 मते मिळाली. नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतही ते पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. वर्षानुवर्षे सामाजिक कामात आघाडीवर असूनही मतदारांनी इतक्या मोठ्या फरकाने पराभूत केल्याने शिंदे व्यथित झाले आहेत. हे ही वाचा... महाराष्ट्रात महापालिका रणधुमाळीला प्रारंभ:अर्ज प्रक्रियेला सुरुवात, पण युतींचा अजूनही गोंधळ; तणाव शिगेला, राजकीय चित्र अजून धूसर राज्यातील 29 महापालिकांसाठी होणाऱ्या महापालिका निवडणुका 2026 आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, आजपासून अधिकृतपणे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होऊन 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार असून, 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी उपलब्ध असेल. 3 जानेवारीला अंतिम उमेदवारांची यादी तसेच निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी एकाच टप्प्यात मतदान घेतले जाईल, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. अवघे 23 दिवस हातात असताना, राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, निवडणूक तयारीपेक्षा युती-आघाडीच्या गोंधळानेच अधिक चर्चा रंगत आहेत. सविस्तर वाचा...

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 11:45 am

सेना-मनसे युतीवर शिक्कामोर्तब? संजय राऊतांचा मोठा दावा:कार्यकर्त्यांचं मनोमिलन, जागावाटप पूर्ण; केवळ एक औपचारिक घोषणा बाकी असल्याचे केले स्पष्ट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना आणि मनसे युतीबाबत कोणत्याही प्रकारचा संभ्रम उरलेला नसल्याचे स्पष्ट करत, ही युती प्रत्यक्षात अस्तित्वात आल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रितपणे कामाला लागल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये समन्वय आणि मनोमिलन झाल्याचे चित्र दिसत असल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, शिवसेना आणि मनसे यांच्यातील युती ही केवळ चर्चेपुरती मर्यादित नसून ती प्रत्यक्षात आकाराला आली आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर काल रात्री अंतिम तोडगा निघाला असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांची रणनिती आता स्पष्ट होत असल्याचे संकेत मिळत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये कोणताही गोंधळ नाही, सर्व स्तरावर समन्वय साधला जात असून संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रक्रियेत आता केवळ एक औपचारिक घोषणा बाकी असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन युतीची अधिकृत घोषणा करायची असून, ती लवकरच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या घोषणेकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, सेना-मनसे युतीची औपचारिक घोषणा झाल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेळेत बोललो नाही, तर नंतर पश्चात्ताप करावा लागेल संजय राऊत यांनी भाजपवर आणि घटनात्मक संस्थांवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र आणि बिहारमधील निवडणूक निकाल ज्या पद्धतीने लावण्यात आले, त्यातून लोकशाहीचा गळा घोटला गेला असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व घटनात्मक संस्था सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली चिरडल्या जात असल्याची भावना राऊत यांनी व्यक्त केली. वेळेत बोललो नाही, तर नंतर पश्चात्ताप करावा लागेल, असे सांगत त्यांनी सध्याच्या घडीला संघर्ष आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. आम्ही जिवंत आहोत, म्हणूनच लढतोय, असा ठाम संदेश त्यांनी दिला. त्यांनी केलेल्या पोस्टवर त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. राऊत यांनी केलेली पोस्ट देखील पहा.... हमें बोलना चाहिये था…..! pic.twitter.com/f3W632VJCm— Sanjay Raut (@rautsanjay61) December 23, 2025 आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत...

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 11:02 am

रामेश्‍वरतांडा बसथांब्यावर तरुणाचा रुमालाने गळा आवळून खून:श्‍वान पथकाला पाचारण, एक जण चौकशीसाठी ताब्यात

कळमनुरी तालुक्यातील रामेश्‍वरतांडा बसथांब्यावर एका तरुणाचा रुमालाने गळा आवळून खून झाल्याचा प्रकार मंगळवारी ता. २३ सकाळी उघडकीस आला आहे. आखाडा बाळापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. याप्रकरणात एक जण चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सुत्रांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालु्क्यातील रामेश्‍वरतांडा येथील बसथांब्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या गळया भोवती रुमालाने आवळल्याचे स्पष्ट झाले असून सदर प्रकार खूनाचा असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामेश्‍वरतांडा येथील गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. तर घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विष्णूकांत गुठ्ठे, जमादार रिठ्ठे, शिवाजी पवार यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता सदर मृतदेह वडगाव येथील ज्ञानेश्‍वर गाडेकर (३०) या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, ज्ञानेश्‍वर हा सोमवारी रात्री परिसरातील यात्रेमध्ये गेला होता. त्यानंतर तो घरी आलाच नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी श्‍वान पथकाला पाचारण केले आहे. या शिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी रवाना झाले असल्याचे सुत्रांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. सदर खून नेमका कशामुळे झाले याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे सुत्रांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. मयत ज्ञानेश्‍वर हा वडगाव शिवारात शेती करीत असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 10:26 am

लाडकी बहीण योजनेत 40 लाख महिलांचा लाभ थांबण्याची शक्यता:अत्यंत महत्त्वाची माहिती समोर; महिला थेट अपात्र ठरू शकतात

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबवली जाणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेमुळे राज्यातील कोट्यवधी महिलांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता या योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली असून, सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे योजनेतून अपात्र लाभार्थी बाहेर काढणे आणि केवळ पात्र महिलांनाच मदत मिळावी हा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या प्रत्येक महिलेला ई-केवायसी करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी आधी दिलेली मुदत वाढवून आता थेट 31 डिसेंबर 2025 पर्यंतची अंतिम संधी देण्यात आली आहे. या मुदतीत ई-केवायसी न करणाऱ्या महिलांना पुढील काळात योजनेचा लाभ मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा विभागाकडून देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत 1 कोटी 60 लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे, मात्र अजूनही 30 ते 40 लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, ही बाब शासनासाठी चिंतेची ठरली आहे. सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्यातील एकूण 2 कोटी 47 लाख महिलांना दिला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी वितरित होत असताना, योजनेत अपात्र महिलांचा समावेश झाला आहे का, याची तपासणी करणे आवश्यक असल्याचे महिला व बालविकास विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळेच ई-केवायसी ही प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबवली जात आहे. विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-केवायसी पूर्ण झाली नाही, तर 40 लाखांहून अधिक महिला या योजनेतून थेट अपात्र ठरू शकतात. याचा थेट परिणाम त्यांच्या दरमहा मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या मदतीवर होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी आणि खऱ्या गरजू महिलांपर्यंतच लाभ पोहोचावा, यासाठी ई-केवायसी ही अट लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थी शोधण्यासाठीच 31 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया सक्तीची करण्यात आली आहे. आधार क्रमांक, ओटीपी प्रमाणीकरण आणि आवश्यक कागदपत्रांच्या आधारे ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जात असून, महिलांनी स्वतःहून पुढाकार घेऊन ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात येत आहे. अंतिम मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही दरम्यान, जुलै 2024 पासून सुरू असलेल्या या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जात आहेत. अनेक महिलांसाठी हा निधी घरखर्च, आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे केवळ ई-केवायसी न केल्यामुळे हा लाभ बंद पडू नये, यासाठी महिलांनी तातडीने आवश्यक पावले उचलावीत, असा सल्ला देण्यात येत आहे. शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, दिलेल्या अंतिम मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल, तर 31 डिसेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे हाच एकमेव पर्याय आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 10:23 am

चिखलीकर भावी मंत्री, नादी लागू नकोस:माजी नगरसेवकाच्या अपहरणाने खळबळ; नांदेडमध्ये गुंडगिरीचा कळस, आज बंद

राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच नांदेड शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण राजकीय वातावरण तापलं आहे. नांदेड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांचं भरदिवसा अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध झालं आहे. आपणास जबरदस्तीने पळवून नेऊन जीवघेणी मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्वतः जीवन घोगरे यांनी केला आहे. या हल्ल्यामध्ये आपण गंभीर जखमी झालो असून, अपहरणकर्त्यांनी तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकी दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार अत्यंत संवेदनशील मानला जात आहे. घटनाक्रमाबाबत माहिती देताना जीवन घोगरे यांनी सांगितलं की, सोमवारी दुपारी सुमारे 12 वाजताच्या सुमारास ते कामानिमित्त घराबाहेर पडले होते. हडको परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ आल्यानंतर अचानक त्यांची कार अडवण्यात आली. त्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने दुसऱ्या वाहनात बसवलं आणि अज्ञात स्थळी घेऊन गेले. त्या ठिकाणी सात जणांनी आपल्याला अमानुष मारहाण केल्याचा आरोप घोगरे यांनी केला आहे. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. काही वेळानंतर मुसलमानवडी परिसरात त्यांना रस्त्यावर सोडून देण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. या प्रकरणात जीवन घोगरे यांनी अजित पवार गटातील लोहा-कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. वृत्त वाहिन्यांशी बोलताना घोगरे यांनी सांगितलं की, या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे आणि प्रवीण पाटील चिखलीकर असल्याचा त्यांना संशय आहे. अपहरणकर्त्यांनी मारहाण करताना चिखलीकर भावी मंत्री आहेत, त्यांच्या नादी लागू नकोस, अशी धमकी दिल्याचाही दावा त्यांनी केला. इतकंच नव्हे तर, जमीन बळकावणे, कब्जे करणे हेच या लोकांचे उद्योग असल्याचा गंभीर आरोपही घोगरे यांनी केला आहे. सात आरोपींपैकी तीन आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार या हल्ल्यानंतर जीवन घोगरे यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सवाल केला आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला तुम्ही मंत्री करणार आहात का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी नांदेडमधील गुंडाराज संपवण्याचं आवाहन केलं. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात जणांना अटक केली असून, घोगरे यांच्या फिर्यादीनुसार संबंधित आरोपींविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी तीन आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, राजकीय दबावाखाली तपास होणार नाही ना, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिडको परिसर पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी नांदेड शहरातील सिडको परिसर पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीवन घोगरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, निवडणुकांच्या तोंडावर शहरात अशा प्रकारची गुंडगिरी वाढत असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शुभम दत्ता सुनेवाड, राहुल मारोती दासरवाड, कौस्तुभ रमेश रणवीर, विवेक नरहरी सूर्यवंशी, माधव बालाजी वाघमारे, मोहंमद अफ्रोज फकीर (चालक) आणि देवानंद भोळे अशी आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही घटना नांदेडच्या राजकारणाला कोणती दिशा देणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 10:11 am

तुल्यबळ असूनही शिवसेनेची महापालिकेतील अगतिकता चर्चेचा विषय‎:नगरपालिकांच्या निवडणुकीत दुप्पट चांगली कामगिरी, भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीने जळगाव जिल्ह्यात आमदार‎

जिल्ह्यात भाजपच्या बरोबरीचे‎म्हणजे पाच आमदार, एक मंत्रिपद‎आणि नगराध्यक्ष पदाच्या‎निवडणुकीत पक्षाची भाजपच्या‎दुप्पट चांगली कामगिरी असतानाही‎जळगाव महापालिका निवडणुकीत‎मात्र, शिवसेना जागांची मागणी‎करीत भारतीय जनता पक्षाच्या‎नेत्यांच्या मागे फरफटत जाताना‎दिसते आहे. पक्षाच्या नेत्यांची ही‎लाचारी का, असा प्रश्न शहरातील‎शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना‎पडू लागला आहे.‎ नुकत्याच झालेल्या‎नगरपालिका आणि नगरपंचायती‎निवडणुकीत शिवसेनेचे सहापैकी‎सहाही उमेदवार नगराध्यक्ष‎पदासाठी निवडून आले आहेत.‎म्हणजे पक्षाला १०० टक्के यश‎मिळाले आहे. भाजपने १५ उमेदवार‎उभे करून त्यांचे केवळ आठ‎उमेदवार नगराध्यक्ष झाले. म्हणजे‎यशाचे प्रमाण ५३ टक्के राहिले.‎त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेचीच‎कामगिरी प्रभावी ठरली असून,‎जनतेचा त्यांना पाठिंबा असल्याचे‎चित्र तयार झाले आहे.‎ विधानसभा निवडणुकीतही ‎‎जिल्ह्यात जितके आमदार भाजपचे ‎‎निवडले गेले तितकेच शिवसेनेचेही ‎‎निवडले गेले आहेत. भाजपकडे‎गिरीश महाजन ज्येष्ठ मंत्री आहेत‎तर शिवसेनेकडेही गुलाबराव‎पाटील ज्येष्ठ मंत्री आहेत आणि ते‎अनेक वर्षांपासून जिल्ह्याचे‎पालकमंत्रीही आहेत. सर्व ताकद‎महापालिकेत लावायची म्हटले तर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎जिल्ह्यातील चार आमदार आणि‎स्वत: मंत्री गुलाबराव पाटील यांची‎शक्ती उपयोगात येऊ शकते.‎सर्वांचे आर्थिक आणि मनुष्यबळ‎कामाला लागले तर शहरात मोठा‎विजय शिवसेना मिळवू शकते.‎पैशांच्या बाबतीत दोन्ही पक्ष‎तुल्यबळ आहेत, हे लपून राहिलेले‎नाही. त्या तुलनेत भाजपचे‎आमदारही शहरात उतरले तरी‎चारच नेते काम करू शकतील.‎कारण मंत्री गिरीश महाजन‎यांच्याकडे नाशिकची जबाबदारी‎असणार आहे. अशी अनुकूल‎परिस्थिती असतानाही शिवसेनेचे‎पदाधिकारी भारतीय जनता‎पक्षाकडे जागांचा जोगवा मागत का‎फिरत आहेत, असा प्रश्न‎शिवसैनिकांना आणि राजकीय‎विश्लेषकांनाही पडला आहे.‎ भाजपच्या तुलनेत निरुत्साह का?‎ अनुकूल स्थिती असताना शिवसेना‎नेत्यांमध्ये भाजपच्या नेत्यांच्या‎तुलनेत उत्साहाची कमी जाणवते‎आहे. भाजपकडे शहरात आमदार‎आहे. शिवाय चाळीसगावचे‎आमदार मंगेश चव्हाण यांनाही‎पक्षाने प्रभारी बनवून शहरात‎पाठवले आहे. शिवसेनेचा गाडा‎मात्र, स्थानिक पातळीवरचे‎पदाधिकारीच ओढताना दिसत‎आहेत. शिवसेनेनेही जिल्ह्यातल्या‎एखाद्या आमदाराची प्रभारी म्हणून‎नियुक्ती केली असती तर त्यांच्या‎उमेदवारांमध्येही आत्मविश्वास‎आणि अधिक उत्साह संचारला‎असता, असे राजकीय निरीक्षकांना‎वाटते आहे. सध्या लोकप्रिय‎झालेल्या लाडक्या बहिणीसारख्या‎योजना, एसटीत निम्मे भाड्याची‎योजना शिवसेनेचे नेते एकनाथ‎शिंदे मुख्यमंत्री असतानाच सुरू‎झाल्या. त्यामुळे शिंदे यांची एखादी‎सभा शहरात महिला मतदारांवर‎मोठा प्रभाव पाडू शकते. तसे‎नियोजन शिवसेनेचे स्थानिक नेते‎करीत आहेत का, असा प्रश्न आहे.‎या पार्श्वभूमीवर जागा वाटप‎बैठकीत सेनेचे नेते काय भूमिका‎घेतात, हे जिल्ह्यातील शिवसेनेच्या‎दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 10:08 am

महाराष्ट्रात महापालिका रणधुमाळीला प्रारंभ:अर्ज प्रक्रियेला सुरुवात, पण युतींचा अजूनही गोंधळ; तणाव शिगेला, राजकीय चित्र अजून धूसर

राज्यातील 29 महापालिकांसाठी होणाऱ्या महापालिका निवडणुका 2026 आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून, आजपासून अधिकृतपणे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होऊन 30 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार असून, 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची संधी उपलब्ध असेल. 3 जानेवारीला अंतिम उमेदवारांची यादी तसेच निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी एकाच टप्प्यात मतदान घेतले जाईल, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. अवघे 23 दिवस हातात असताना, राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून, निवडणूक तयारीपेक्षा युती-आघाडीच्या गोंधळानेच अधिक चर्चा रंगत आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही अद्याप महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांची अधिकृत घोषणा न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. मुंबईसह राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील कुरबुरी उफाळून आल्याचे दिसत आहे. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमनेसामने येण्याची चिन्हे स्पष्ट होत आहेत. ठाणे जिल्ह्यात सहा महापालिका असून, येथे भाजप आणि शिंदे गटातील शिवसेनेमध्ये जागावाटपावरून अद्यापही खणाखणी सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर समन्वयाचे प्रयत्न सुरू असले तरी स्थानिक नेत्यांमधील मतभेद युतीच्या वाटचालीत अडथळा ठरत आहेत. महाविकास आघाडीकडे पाहिले तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्यातही अद्याप अंतिम चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यातच सर्वाधिक चर्चेत असलेली बाब म्हणजे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीची औपचारिक घोषणा आज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून या युतीबाबत जोरदार चर्चा सुरू असून, जागावाटपावरून झालेल्या चर्चांमुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवडी परिसरातील तीन प्रभागांवरील वादावर तोडगा निघाल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये दोन जागा ठाकरे गटाच्या शिवसेनेला, तर एक जागा मनसेला देण्यावर सहमती झाल्याची माहिती आहे. मात्र, सर्वच ठिकाणी हा समन्वय सहजसोप्या पद्धतीने होताना दिसत नाही. भांडूपमधील वॉर्ड क्रमांक 114 वरून ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचे समजते. काही प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांची ताकद असल्याने, उमेदवारी कोणाला द्यायची यावरून पेच निर्माण झाला आहे. अशा ठिकाणी थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून तोडगा काढला जात असल्याची माहिती आहे. या युतीकडे मुंबईसह राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, प्रत्यक्ष घोषणा झाली तर त्याचे पडसाद इतर महापालिकांवरही उमटण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ही युती राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकते, असे निरीक्षकांचे मत आहे. राज्यातील राजकारण पुन्हा एकदा निर्णायक वळणावर दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे. उमेदवारांकडून अर्ज भरण्याची तयारी सुरू असून, राजकीय पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. अनेक इच्छुकांनी पक्ष नेतृत्वाकडे लॉबिंग सुरू केले असून, काही ठिकाणी बंडखोरीची शक्यताही नाकारता येत नाही. युती आणि आघाड्यांच्या अंतिम घोषणांकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, उमेदवार निवड, प्रचार रणनीती आणि स्थानिक प्रश्न या मुद्द्यांवरही चर्चा सुरू झाली आहे. अवघ्या काही आठवड्यांत होणाऱ्या या निवडणुकांमुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा निर्णायक वळणावर आले असून, महापालिकांचे निकाल आगामी विधानसभा राजकारणाची दिशा ठरवतील, असेही बोलले जात आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 9:51 am

साडेपाच हजार हेक्टरवरील तुरीचे पिक धोक्यात:उत्पादन प्रचंड घटणार असल्याने शेतकरी हवालादिल, शासनाकडून मदतीची मागणी‎

तेल्हारा तालुक्यातील साडेपाच हजार हेक्टरवरील तुरीचे पीक वाळत असून, उत्पादन प्रचंड घटणार असल्याने शेतकरी हवालादिल झाला आहे. जिल्ह्यात यंदा जून महिन्याच्या प्रारंभी वरूणराजाने फारशी कृपा केली नाही. मृगनक्षत्रात पावसाने पाठ फिरवल्याने अनेकांची चिंता वाढली. मात्र जूनच्या अखेरीस दोन वेळा मुसळधार पाऊस झाला होता. जुलै महिन्यात मात्र पावसाने सरासरी गाठली नाही. ऑगस्ट महिन्यात कधी संततधार तर कधी जोरदार पाऊस पडत सप्टेंबरमध्ये पावसाने सरासरी ओलांडली. याचा परिणाम पिकांवर झाला. दरम्यान आता रब्बी हंगामातील पिकेही धोक्यात आल्याचे तेल्हारा तालुक्यातील शेतीवर नजर टाकल्यास दिसून येते. तेल्हारा तालुक्यात सुरुवातीला अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. शेतकऱ्यांची तूर पिकावर आशा असतांनाच गत काही दिवसांपासून शेतातील तूर पिक वाळत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पिकाच्या रुपाने हाता तोंडांशी आलेला घास हिरावून घेतल्या जात आहे. गत आठवड्यापासून धुवारी पडत असल्याने शेतातील तूर पिक जोमदार असतांनाच सुकु लागल्याने फुलोर गळत आहे. शेतकरी पार खचून गेले आहे. तूर पिकावरील संकटाकडे कृषी विभागाने लक्ष देऊन उपाय योजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी : सोयाबीन उत्पादनात जवळपास ३० ते ४० टक्के घट झाली आहे. मजुरी, खत, औषधे, डिझेल आणि इतर शेतीखर्च वाढल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. पंचनामा करून मदत देण्याची केली मागणी ^मी १० एकर क्षेत्रावर तुर लागवड केली. तूर पिकांवर मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र सध्या आठवड्यापासून धुवारी पडत असल्याने शेतातील पिक सुकत आहे. शासनाने सदर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. - प्रवीण पाटील , शेतकरी तळेगाव बाजार.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 9:30 am

ख्रिसमस; सजावटीच्या साहित्याने सजली बाजारपेठ:ख्रिसमस-ट्री, सांताक्लॉजचे पेहराव ठरताहेत बच्चे कंपणीसाठी मोठे आकर्षण‎

ख्रिश्चन धर्मियांच्या सर्वात मोठ्या ख्रिसमस अर्थात नाताळ सणाला अवघे तीन दिवस उरले आहेत. ख्रिसमसच्या अनुषंगाने अकोला महानगरातील परिसरात बेकऱ्या, केक शॉप, चॉकलेट, ब्लॅॅक फॉरेस्ट, स्ट्रॉबेरी, कॉफी विथ क्रीम, पाइनॅपल अशा विविध फ्लावर्सच्या कुकीज, पेस्ट्रीज आणि चॉकलेट्सने सजल्या आहेत. महानगरातील आणि जिल्ह्यातील सुमारे ३० चर्चच्या बाहेर रोषणाई करण्यात येत आहे. ख्रिसमस हा सण ख्रिश्चन जिल्ह्यात दरवर्षीच उत्साहात साजरा करण्यात येते. ख्रिश्चन बांधवांकडून उत्सवासाठी तयारी करण्यात येते. यंदाही अशीच तयारी करण्यात येत आहे. ख्रिसमस हा सण ख्रिश्चन बांधवांचा असला, तरी सर्वच धर्मीय उत्साहाने हा सण साजरा करतात. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच ख्रिसमस ट्री पासून ते सांताक्लॉज, खाद्यजत्रा आणि चर्चेतील रोषणाईबद्दल कुतूहल असते. ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोठमोठ्या मॉल बरोबरच लहान दुकाने रोषणाईने उजळून निघतात. ख्रिसमसला अवघे तीन दिवस राहिल्याने शहर परिसरातील वातावरण सध्या बदलले आहे. ख्रिश्चन कॉलनीमध्ये दिव्यांच्या माळा आणि चांदण्यांनी लहान-मोठ्या गल्ल्या सजविल्या आहेत. येथील बाजारपेठांमध्ये ख्रिसमस ट्री सजवण्याचे अनेकविध प्रकार उपलब्ध असून, नागरिक हौस म्हणून या वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत. ख्रिसमस आणि केक हे समीकरणच असल्याने नामवंत बेकऱ्यांमध्ये केकचे विविध प्रकार दाखल झाले आहेत. दीड वर्षांचा इतिहास असलेली कॉलनी महानगरातील एकमेव सुमारे दीडशे वर्षचा इतिहास असलेली ख्रिश्चन कॉलनीदेखील ख्रिसमसच्या स्वागतासाठी सजू लागली आहे. गांधी रोडवरील दुकानांमध्ये सजवलेले ख्रिसमस ट्री, आकाशकंदील आणि सांजाक्लॉजचे छोेटे- मोठे पेहराव सगळ्यांचे आकर्षण ठरत आहेत.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 9:29 am

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त महाविद्यालयात ‘नो व्हेईकल डे’:ऊर्जा संवर्धन ही काळाची गरज- प्राचार्य रूमाले‎

प्रतिनिधी |अकोला श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त ‘नो व्हेईकल डे’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. चारूशीला रुमाले यांनी संबोधित केले. ऊर्जा संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कमीत कमी ऊर्जेचा वापर करून ऊर्जा संवर्धन करावे. तसेच शक्यतो अक्षय ऊर्जेवर चालणाऱ्या विविध वस्तू व साधने यांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने प्राचार्य डॉ. चारुशीला रुमाले, उपप्राचार्य डॉ. अंबादास पांडे, डॉ. संजय विटे आय.क्यू.ए.सी. समन्वयक हे उपस्थित होते. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त ‘नो व्हेईकल डे' साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन सेलचे समन्वयक डॉ. स्वप्नील देशपांडे, तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्रा. अजय शिंगाडे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. सुमेध सगणे, डॉ. विद्या ध्रुवे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. महाविद्यालयातील बहुसंख्य कर्मचारी तसेच विद्यार्थिनी सार्वजनिक वाहन, सायकलने किंवा पायी महाविद्यालयात आले आणि नो व्हेईकल डे साजरा करण्यास सहकार्य केले.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 9:26 am

रामनामाच्या गजरातून नूतन वर्षाचे स्वागत विद्यार्थी करणार शंखनादाने:बिर्ला राम मंदिरात हाेणार साेहळा, सरत्या वर्षाला निराेप दिला जाणार निरोप‎

अयोध्या नगरीतील प्रभु श्रीरामांच्या नवसाकार मूर्तीच्या पुनर्स्थापनेच्या १० लाख १९ हजार ५२० सेकंदांच्या पावन पूर्णतेचा उत्सव जठारपेठ बिर्ला राम मंदिरात साजरा होणार आहे. सोहळ्याला ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता सुरुवात होणार आहे. अकोल्यातील इतिहासात प्रथमच ५०१ विद्यार्थी-विद्यार्थ िनी एकत्र येऊन ५० मिनिटांचा विराट शंखनाद करणार असून, या नादातून प्रभु श्रीरामाच्या स्मरणाची दिव्य ऊर्जा अवतीभवती प्रसारीत होणार आहे. भक्त वर्षाला निरोप देताना व नव वर्षाचा पहिल्याच दिवशी राम नामात दंग होणार आहेत. मन रामरंगी रंगण्याचा २४ तासांचा अखंड सोहळा होणार आहे. अनेक वर्षांच्या अविरत संघर्षानंतर अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना जानेवारी महिन्यात झाली होती. प्रभू श्रीरामांचे अयोध्येत होणारे भव्य मंदिर हा श्रद्धेचा, त्यागाचा, अभिमानाचा विषय आहे. श्रीराम मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा एक ऐतिहासिक क्षण होता. दरम्यान यंदा वर्षाच्या अखेरच्या दिवशी व नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी राम नामाचा गजर होणार आहे. नववर्षाची सुरुवात प्रभु रामाच्या नामाने होणार असून, अकोल्याचा आध्यात्मिक शंखध्वनी गुंजणार आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणारा हा दिव्य उत्सव अकोल्याच्या अध्यात्मिक ओळखीला नवे उंची देणारा व महाराष्ट्रभरात अकोल्याचे नाव उजळवणारा ठरणार आहे. असा होणार सोहळा भव्य शंखनादानंतर सोहळ्याचा श्रीगणेशा होणार आहे. सोहळ्याला ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता होणार असून, सुमारोप १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. २४ तास अखंड रामनाम जप होणार आहे. या पवित्र काळात प्रत्येक श्वासावर ‘श्रीराम’ अंकित करत भक्तीची अविरत मुद्रिका भक्तांच्या हृदयात उमटणार आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 9:24 am

ऐतिहासिक दगडी मशीद ते पोलिस स्टेशनपर्यंतचा रस्ता तत्काळ करावा:श्री संताजी महाराजनगरमध्ये रस्त्याला फुलांचे तोरण बांधून केले आंदोलन‎

येथील श्री संताजी महाराजनगरमधील व ऐतिहासिक दगडी मस्जिद ते पोलिस स्टेशनपर्यंतचा रस्ता तत्काळ करण्यात यावा. या मागणीसाठी श्री संताजीनगरमधील नागरिकांनी रस्त्यावर फुलांचे तोरण लावून अनोखे आंदोलन केले. मातृतिर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा हे जवळपास २५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. अध्यात्मिक व ऐतिहासिक अशी गावाची ओळख आहे. गावामध्ये गल्ली बोळात रस्ते झाले. मात्र, व्यावहारिकदृष्ट्या दैनंदिन जीवन निगडित असलेला हा मुख्य मार्गावरील रस्ता संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिला. मुख्य बाजारपेठेला जाण्या येण्यासाठी हाच रस्ता आहे. या रस्त्यावर जिल्हा परिषद कन्या शाळा, पोलिस स्टेशन आहे. सर्व महापुरूषांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुका, रॅली, धार्मिक दिंड्या मुख्य चौकातून याच रस्त्यावरून निघतात. आता परिसरातील नागरिक रस्ता तत्काळ व्हावा, या मागणीसाठी एकवटले आहेत. त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. २१ डिसेंबर रोजी रस्त्याला फुलांचे तोरण लावून अनोखे आंदोलन केले. लवकर दखल न घेतल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी नागरिकांनी दिला. या आंदोलनामध्ये गजानन इंगळे, गोपाल मानकर, विजय इंगळे, गोपाल शीलवंत, सोमेश इंगळे, गणेश जैताळकर, सुनील जैन आदींची उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 9:16 am

भाजपच्या विजयाआड काँग्रेसचा संघर्ष समोर:10 वर्षांच्या अपयशानंतरही काँग्रेस मैदानात; नगरपरिषद निकालांनी मोडली पराभवाची साखळी

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राजकीय वातावरणात महायुती आणि भाजपच्या विजयाची चर्चा सुरू झाली असली, तरी या निकालांमधून काँग्रेसच्या पराभवापेक्षा संघर्षाचीच अधिक चर्चा होताना दिसत आहे. एकीकडे भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाने मिळून अनेक ठिकाणी सत्ता हस्तगत केली असली, तरी दुसरीकडे सलग पराभवांच्या मालिकेत अडकलेल्या काँग्रेससाठी हे निकाल काही अंशी दिलासादायक ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 2014 नंतर सातत्याने निवडणुकांत अपयशाचा सामना करणाऱ्या काँग्रेसने या नगरपरिषद निवडणुकीत राज्यभरात आपली उपस्थिती अधोरेखित करत, पक्ष पूर्णपणे संपलेला नाही, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषक आणि कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या यशाइतकीच चर्चा काँग्रेसने मिळवलेल्या मर्यादित पण महत्त्वपूर्ण यशाची होताना दिसत आहे. या नगरपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसने राज्यभरात नगराध्यक्ष पदाच्या एकूण 43 जागांवर विजय मिळवला असून नगरसेवक पदाच्या 1006 जागा जिंकल्या आहेत. सलग अनेक निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करत असलेल्या काँग्रेससाठी हा आकडा निश्चितच दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. या यशामुळे काँग्रेसची पराभवाची दीर्घ मालिका काही अंशी खंडित झाल्याचे मानले जात आहे. विदर्भात काँग्रेसला सर्वाधिक यश मिळाले असून या विभागात 23 नगराध्यक्ष पदांवर काँग्रेस किंवा काँग्रेस पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत. मराठवाड्यात 5, पश्चिम महाराष्ट्रात 3, कोकणात 1 तर स्थानिक पातळीवरील काँग्रेस पुरस्कृत आघाड्यांना 7 ठिकाणी यश मिळाले आहे. हे यश महायुतीच्या तुलनेत संख्येने कमी असले, तरी काँग्रेससाठी राजकीय पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका विशेष चर्चेचा विषय ठरली. महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रचारापासून दूर असताना, सपकाळ यांनी मात्र एकाकीपणे संपूर्ण राज्यभर प्रचाराची धुरा सांभाळली. विशेष म्हणजे त्यांनी प्रचारासाठी हेलिकॉप्टरचा वापर टाळत, जमिनीवर उतरून जनतेशी थेट संवाद साधण्यावर भर दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या काळात राज्यभरात 64 जाहीर सभा आणि 22 बैठका घेतल्या. काही ठिकाणी काँग्रेसने स्वबळावर उमेदवार उभे केले, तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांना पाठिंबा देत पुरस्कृत उमेदवारांच्या माध्यमातून निवडणूक लढवली. हे यश म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे आणि तळागाळातील संघटनेच्या ताकदीचे प्रतिक असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. हार कर भी जो जीता है, उसे बाजीगर कहते है निवडणूक निकालांनंतर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडली. हार कर भी जो जीता है, उसे बाजीगर कहते है, या शब्दांत त्यांनी काँग्रेसचा संघर्ष अधोरेखित केला. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट ज्या पद्धतीने सत्ता मिळवत आहेत, त्या मार्गाने काँग्रेसला सत्ता नको असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि जनतेच्या मनातील विश्वासाची सत्ता महत्त्वाची आहे, असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्येही काँग्रेस याच विचारधारेवर ठाम राहून लढेल, असा इशाराही त्यांनी दिला. बचेंगे तो और भी लढेंगे…! असा सूचक नारा त्यांनी दिला.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 9:15 am

सीन रिक्रिएटसाठी आरोपी पंचवटी चौकात:मंथन खुन प्रकरण; आतापर्यंत आठ आरोपींना केली अटक, तपास वेगाने‎

चार दिवसांपुर्वी मंथन पाळणकर या तरुणाचा बोर नदी प्रकल्पा जवळ टोळीयुद्धातून खुन करण्यात आला आहे. पुर्व नियोजीत कट रचून हा खुन केल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. खुन करण्यापुर्वी आरोपींनी एका मुलीच्या माध्यमातून मंथनला पंचवटी चौकात बोलावले होते. याच प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ‘सीन रिक्रिएट’ करण्यासाठी नांदगाव पेठ व गुन्हे शाखेचे पोलिस आरोपींना घेऊन सोमवारी (दि. २२) सायंकाळी पंचवटी चौकात गेले होते. मंथन पाळणकर (१९) या तरुणाचा खुन करण्यापुर्वी आरोपींनी एका मुलीच्या माध्यमातून त्याला पचवटी चौकात बोलवले होते. त्यावेळी आरोपी मात्र मंथन समोर आले नव्हते. त्यानंतर त्या मुलीसह मंथन बोर नदी प्रकल्पावर पोहचला. तो प्रकल्पाजवळ पोहचताच आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राचे सपासप वार करुन खुन केला होता. या प्रकरणाचा सुक्ष्म तपास नांदगाव पेठ पोलिसांकडून सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांनी आज ‘सीन रिक्रिएट’ केला. त्यासाठी गुन्हे शाखेचे पीआय संदीप चव्हाण, नांदगाव पेठचे ठाणेदार दिनेश दहातोंडे व पथकाने आरोपींना पंचवटी चौकात आणले होते. त्यांनी मंथनला कुठे बोलवले, त्यावेळी तो कुठे बसला, मंथन बसला असताना आरोपी कुठे होते, त्याच्यावर आरोपीने घटनेपूर्वी कशी पाळत ठेवली. अशी प्रत्यक्ष पाहणी केली.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 9:11 am

वाघांच्या गस्तीने कोलकासच्या हत्ती सफारीला उशीर:हत्ती सफारी 15 डिसेंबरला सुरू, पाचपैकी केवळ दोनच हत्ती तैनात; वार्धक्यामुळे जयश्रीला विश्रांती‎

मेळघाटातील जरीदा रेंजमध्ये हल्लेखोर वाघांच्या गस्तीत व्यस्त असल्याने कोलकासची हत्ती सफारी सुरू होण्यास उशीर झाला. हत्तीची सफारी हे पर्यटकांचे विशेषत: बालकांचे मुख्य आकर्षण आहे. ते बघता पाचपैकी दोन हत्तींची सफारी सुरू करण्यात आली आहे. तर दोन हत्ती हे अजुनही गस्तीवर आहेत. जयश्री ही हत्तीण म्हातारी झाल्यामुळे तिला सफारीसाठी वापरले जात नाही. ती सध्या कोलकासमध्येच विश्रांती घेत आहे. त्यामुळे सध्या सुंदरमाला व चंपाकली या दोन हत्तीणीच सफारीसाठी वापरल्या जात आहेत. तर लक्ष्मी व सुंदरकली या दोन हत्तीणी गस्तीवर आहेत. कोलकास येथे जास्तीत जास्त प्राणी सफारीदरम्यान बघता येतील, असे ३ कि.मी.चे काही ट्रॅक तयार करण्यात आले आहेत. या ट्रॅकवरच सफारीतील हत्ती फिरतात. एक फेरी ही ३० ते ४५ मिनिटांची असते. यात विविध वन्य प्राणी पर्यटकांना बघता येत आहेत. या हत्तींच्या खानपानावर वन विभागाद्वारे विशेष लक्ष दिले जाते. त्यांना मोसमी फळे जसे केळी, ऊस, कलिंगड, खरबुज, तेल, गुळ, गव्हाच्या परातीएवढ्या आकाराच्या पोळया त्यात मिठ दिले जाते. यासाठी वन विभाग, शासन आणि काही समाजसेवी संघटनाही मदत करत असतात. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हत्तींचा सांभाळ करणे शक्य होत आहे. कारण, हत्तीच्या आहारासह त्यांच्या देखभालीचा खर्च हा बराच मोठा आहे. त्यांच्यासाठी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना वेतनही मिळते. तसेच निवृत्त झाल्यावर निवृ़त्ती वेतनही दिले जाते, अशी माहिती वन विभागाद्वारे देण्यात आली. ....अडीच महिने उशीर हत्तीची सफारी सुरू करण्यास यंदा प्रथमच अडीच महिने उशीर झाला. दिवाळीतही ती सुरू करण्यात आली नाही. कारण पाचही हत्ती हे जरिदा रेंजमध्ये वाघाच्या हल्ल्याच्या घटना घडल्यानंतर पेट्रोलिंगच्या कामी होते. परंतु, ख्रिसमस व नवीन वर्षाची सुटी व पर्यटनाचा मोसम बघता हत्तीची सफारी १५ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली. ऐरवी ती २ ऑक्टोबरला सुरू होते, अशी माहिती कोलकास,सेमाडोहचे आरएफओ प्रदीप तळखंडकर यांनी दिली.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 9:11 am

संस्थेच्या भक्कम पाठबळामुळेच मारली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदकापर्यंतची मजल:शहरातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी व्यक्त केले मनोगत‎

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाध्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंती उत्सवानिमित्त श्री शिवाजी शारिरिक शिक्षण महाविद्यालय अमरावतीच्या यजमानपदाखाली तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्था अंतर्गत आयोजित डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख क्रीडा महोत्सवाच्या समारोप प्रसंगी १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला सांघिक रौप्य पदक जिंकून देणारा धनुर्धर तुषार शेळके व आंतरराष्ट्रीय धनुर्धर यशदीप भोगे यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मदतीमुळेच आम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारता आली. संस्थेने आम्हा दोघांना अगणित मदत केली .त्यामुळे आम्ही आशियाई स्पर्धेपर्यंत पोहचू शकलो, याचा आम्हाला आयुष्यात कधीच विसर पडणार नाही, असे मनोगत सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले. महोत्सवाचे आयोजन १८ ते १९ डिसेंबर या कालावधीत श्री शिवाजी बीपीएड महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते. समारोप व पुरस्कार वितरण १९ रोजी दु. ४ वाजता झाले होते. सदर स्पर्धेचे समारोपीय समारंभाला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, समारंभाध्यक्ष संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. गजानन पुंडकर, तर प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष ॲड.जयवंत उपाख्य भैय्यासाहेब वि. पाटील (पुसदेकर), कार्यकारिणी सदस्य प्रा. सुभाष बनसोड, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.भैय्यासाहेब मेटकर, आंतरराष्ट्रीय धनुर्धर तुषार शेळके, यशदीप भोगे, श्री शिवाजी बीपीएडचे प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे, आजीवन सदस्य सुभाष पावडे, बबन चौधरी, शिक्षण विभाग उपव्यस्थापक पंडित पंडागळे उपस्थित होते. त्यानंतरबक्षीस समारंभात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी,खेळाडू विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येत आवर्जून उपस्थित होते. क्रीडा महोत्सवचे आयोजन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव प्राचार्य वी.गो ठाकरे,आयोजन समितीचे सचिव डॉ. सुभाष गावंडे,पंडित पंडागळे व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. नागपूर विभागाला सर्वसाधारण विजेतेपद प्राचार्य डॉ. सुभाष गावंडे यांनी आपले प्रास्ताविकात महाविद्यालयातील खेळाडू व स्पर्धेसंबंधी ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितली. तसेच महोत्सवाचा उद्देश विषद केला. यानंतर लगेचच शिवाजी शिक्षण संस्थेंतर्गत येणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून सहभागी झालेल्या १७ व १९ वयोगटातील मुले व मुलींच्या झालेल्या कबड्डी, हॉलीबॉल व खो-खो स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना पुरस्कार वितरित करण्यात आले. क्रीडा महोत्सवात नागपूर विभागाने वैयक्तिक व सांघिक खेळांमध्ये सर्वाधिक विजेतेपदं मिळवून प्रथम क्रमांकासह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मान्यवरांचे उत्साहात स्वागत सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम डॉ. पंजाबराव उपाध्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला हारर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले व लगेचच सन्माननीय मान्यवरांचे स्वागत फुलझाड देऊन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सर्वप्रथम विजेत्या चमूचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे दिलीपबाबू इंगोले यांनी याप्रसंगी खेळाडूंनी खेळाच्या मैदानात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल पुढील वाटचालीच्या शुभेच्छा व आशीर्वाद दिला.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 9:10 am

राष्ट्रसंतांचे गुरुकुंज मोझरी गाव फलकावरून पुसण्याचा महामार्ग प्राधिकरणाकडून प्रताप:प्रशासनाकडून झालेली चूक की मुद्दाम केलेला खोडसाळपणा, ग्रामस्थ नाराज‎

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागामार्फत नव्यानेच महामार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. यात गुरुकुंज मोझरी नाव न लिहिता केवळ गुरू मोझरी नावाने फलक लावण्यात आले आहे. अर्थात गावाचे नामकरणच चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. गुरुकुंज मोझरी,या गावाचे नाव बदलवून चक्क गुरू लिहिण्याचा प्रताप महामार्ग प्राधिकरण विभागाने केला आहे.परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासांना फलकावरील गावाची ओळख दर्शवणाऱ्या नावाचा अर्थ बोध होत नसल्याने कित्येक वेळा चुकून दुसऱ्या गावाला आलो की, काय? असा संभ्रम त्यांच्यात निर्माण होत आहे. अखिल विश्वाला मानवतेची शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, यांची कर्मभूमी म्हणून नावलौकिक असलेले गुरुकुंज मोझरी, हे गाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशाबाहेर देखील प्रसिद्ध आहे. ''अ'' तीर्थक्षेत्र दर्जा असलेल्या या गावात पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने मौन श्रद्धांजलीच्या हृदयस्पर्शी कार्यक्रमात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. दरवर्षी भाविकांची गर्दी लक्षात घेता शासनाच्या वतीने नव्यानेच बायपास वळण मार्ग तयार करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून महामार्गाच्या दोन्ही दिशेला मोठमोठे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. अन्यथा प्रहार स्टाइलने करणार आंदोलन बायपास वळण मार्गावर लावण्यात आलेल्या फलकावर गुरुकुंज मोझरी ऐवजी गुरू असा उल्लेख करणे ही प्रशासनाकडून झालेली चूक की मुद्दाम केलेला खोडसाळपणा हे समजायला मार्ग नसून २४, डिसेंबर पर्यंत जर ही चूक दुरुस्त करण्यात आली नाही तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कार्यालयात प्रहार स्टाइलने शेकडो कार्यकत्यांसमवेत डेरा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख, यांनी महामार्ग प्राधिकरण विभागास सादर केलेल्या एका निवेदनातून दिला आहे. लवकरच चुकीची दुरुस्ती करू :प्रकल्प संचालक महामार्ग प्राधिकरण विभागाकडून बायपास वळण मार्गावर चुकीचे गावाचे नाव असलेले फलक लावण्यात आले ते लवकरच दुरुस्त करण्यात येईल. तयार करताना त्यात चुक झाली हे मान्य आहे. गुरुकुंज मोझरी असे नाव असलेले फलक लावणार,अशी प्रतिक्रीया राष्ट्रीय विभागाचे प्रकल्प संचालक राकेश जवादे यांनी दिली. भाविकांसह पर्यटकांत संभ्रम आपले गाव व त्याचे नाव हा आमच्यासाठी अभिमानासह अस्मितेचा विषय असल्याने चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या नामफलकात तात्काळ सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. गुरुकुंज मोझरी, या गावाचे नाव बदलवून चक्क फलकावर गुरू, लिहिण्याचा प्रताप प्राधिकरणाने केला आहे.चुकीने या मार्गावरून जाणाऱ्या भाविकांसह प्रवासी संभ्रमात पडले असून परिणामी अनेकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. नवा फलक लावावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 9:09 am

‘बहिष्कृत परिषदे'ची शताब्दी ; रविवारी बार्शीत धम्म परिषद:श्रावस्ती विहारात सोहळा, श्रीलंकेतील भिक्खूंची प्रमुख उपस्थिती‎

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १० मे १९२४ रोजी बार्शीच्या भूमीमध्ये ऐतिहासिक ‘मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषद' झाली होती. या महान घटनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने, येत्या रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी बार्शीत शतकोत्तर वर्षानिमित्त धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. श्रावस्ती बुद्ध विहार प्रांगणात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत ही परिषद होणार आहे. या परिषदेचे नियोजन दोन महत्त्वपूर्ण सत्रांत करण्यात आले आहे. पहिले सत्र सकाळी १० ते १ या वेळेत ‘प्रांतिक बहिष्कृत परिषद' या विषयावर आधारित असेल. याची सुरवात माजी मंत्री आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते होणार आहे. या सत्राचे अध्यक्षपद माजी प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे भूषवणार असून, मुख्य वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे मार्गदर्शन करणार आहेत. तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. कृष्णा मस्तुद तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. बी. वाय. यादव व प्रशांत पैकेकर उपस्थित राहणार आहेत. दुसरे सत्र दुपारी १ ते ५ या वेळेत बौद्ध धम्म परिषद म्हणून पार पडेल. याची सुरवात माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते होईल. या सत्राचे अध्यक्षपद पूज्य भिक्खू करुणानंद महाथेरो (छत्रपती संभाजीनगर) भूषवतील. या सत्रात विशेष आकर्षण म्हणून श्रीलंकेहून आलेले पूज्य भिक्खू यश थेरो व पूज्य भिक्खू गुणानंद थेरो यांची धम्मदेसना लाभणार आहे. त्यांच्यासोबतच भिक्खू सुमेधजी नागसेन, भिक्खू एन. धम्मानंद थेरो, भिक्खू धम्मबोधी थेरो, भिक्खू विनितधम्म आणि भिक्खू शासनसुरी हे देखील मार्गदर्शन करतील. प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्ट, मातोश्री रमाई महिला मंडळ आणि बार्शीतील सर्व पुरोगामी व आंबेडकरी संघटनांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बार्शी शहर व तालुक्यातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विष्णू कांबळे, जगन्नाथ शिवशरण, डॉ. शशिकांत गायकवाड, टी. एस. मोरे, अशोक वाघमारे, डी. डी. मस्के, नागनाथ सोनवणे व सहकाऱ्यांनी केले आहे. गायकवाड, वाघमारे, शिंदे यांना देणार मानपत्र या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून श्रावस्ती बुद्ध विहार परिसरात ‘अशोक स्तंभाचे लोकार्पण' करण्यात येणार आहे. तसेच ‘समग्र विचार' या विशेष पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते होईल. सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दत्ता गायकवाड, योगिराज वाघमारे आणि सावळा (तात्या) शिंदे यांना मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वा. संगीत विशारद शंकर वाघमारे यांच्या सुरावलींनी होईल. शाहीर राजेश ननवरे आपल्या शाहिरीतून प्रबोधन करतील. संपूर्ण सोहळ्यासाठी उपस्थितांना भोजनाची व्यवस्था सावळा शिंदे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:55 am

विज्ञान प्रदर्शनामधून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करावा:चपळगाव येथील तालुकास्तरीय प्रदर्शनात नीलकंठ पाटील यांचे प्रतिपादन‎

अक्कलकोट स्टेशन ग्रामीण विद्या विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, चपळगाव येथे सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती शिक्षण विभाग, अक्कलकोट आणि श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ, चपळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहात उद्घाटन पार पडले आहे. यावेळी विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करावा, असे प्रतिपादन नीलकंठ पाटील यांनी केले. यावेळी व्यासपीठावर तालुका गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे, लकप्पा पुजारी, विस्तार अधिकारी पं. स. अक्कलकोट, संस्था सचिव प्रभाकर हंजगे, कार्याध्यक्ष पंडित पाटील, ज्येष्ठ संचालक मल्लिकार्जुन मामा पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी नीलकंठ पाटील म्हणाले की, या विज्ञान प्रदर्शनाचे हेतू म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे आहे. संस्था स्थापनेपासून या पंचक्रोशीत शिक्षणातून विज्ञाननिष्ठा रुजवणूक करण्याचे कार्य अविरत चालू आहे. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी या शाळेची निवड झाली म्हणून प्रशाला व संस्थांकडून अरबाळे यांचे आभार मानतो. तदनंतर प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ, भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम व सीव्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बनवलेले चांद्रयान ३ चे स्वयंचलित प्रतिकृती चालू करून प्रदर्शनाचे औपचारिक निसर्ग हेच विज्ञान आहे. सध्याचे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. विज्ञानाचे विविध प्रकार आहेत आणि त्यातील गुणधर्म, संयोग, उपयोगिताबद्दल आपण परिचित व्हावे. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी संस्था अध्यक्ष रविकांत पाटील यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिले. रोबोटच्या प्रतिकृतीतील सेल्फी पॉईंट व विज्ञान प्रदर्शनाचे फलकलेखन विशेष लक्षवेधी होते. या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान विभागाचे सर्व गुरुजन वर्ग आणि इतर गुरुजन यांनी विशेष परिश्रम घेतले. उद्घाटन करण्यात आले. संस्था व प्रशालेकडून उपस्थित सर्व अभ्यागताचे सत्कार करण्यात आले. अरबाळे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, विज्ञान म्हणजे विशुद्ध ज्ञान जे पुन्हा प्रयोग करून सिद्ध करता येते. विज्ञान हे पुस्तकातून बाहेर रोजच्या जीवनात यावे आणि प्रत्येकानी वैज्ञानिक दृष्टीकोन आत्मसात करावे. चपळगाव प्रशाला ही विविध उपक्रमासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आदर्श शाळा आहे. या विज्ञान प्रदर्शनासाठी इ. ६ वी ते इ. ८ वी पूर्व माध्यमिक गटात १२० नाव नोंदणी तर इ.९ वी ते इ. १२ वी माध्यमिक गटात १०५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदणी केली. तालुक्यातील सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी प्रयोग सादरीकरण करतील.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:54 am

कांदा पेरणीला वेग; खत, बियाण्याच्या दरवाढीचे संकट:करमाळा तालुक्यात कांद्यासह पूर्व हंगामी ऊस लागवडीची लगबग, मजुरी वाढल्याचाही फटका‎

पांडे करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या गावरान कांदा तसेच पूर्व हंगामी ऊस लागवडीला वेग आला आहे. मात्र या दोन्ही पिकांच्या लागवडीसाठी लागणारे मजूर, बियाणे, तसेच रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. गावरान कांद्याची बेडवर व वाफ्यात लागवड करण्यासाठी एकरी तब्बल पंधरा ते सोळा हजार रुपये मजुरी मोजावी लागत असून, ऊस लागवडीसाठी हा खर्च एकरी आठ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ग्रामीण भागात मजुरांची तीव्र टंचाई भासत असल्याने शेतकऱ्यांना बाहेरगावाहून मजूर आणावे लागत आहेत. परिणामी मजुरीबरोबरच वाहतूक खर्चाचा दुहेरी भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या शेती क्षेत्रात विविध समस्या उभ्या राहिल्या असून अनेक शेतकरी उसनवारी, दागदागिने गहाण ठेवून, तर काही कर्ज काढून भविष्यात चांगला बाजारभाव मिळेल या आशेवर लागवड करत आहेत. करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील काही शेतकऱ्यांनी तर खोडवा केळीचे पीक मोडून कांद्याची लागवड केल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा पावसाने चांगली साथ दिली असली तरी बियाणे, खते व औषधांच्या वाढलेल्या किमती शेतीसाठी मोठे आव्हान ठरत आहेत. एवढ्या अडचणींवर मात करून पिकवलेल्या कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळेल की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. तरीही ‘पर्याय नाही’ या वास्तवाला सामोरे जात शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करताना दिसत आहेत. बाजारभावात अनिश्चितता यावर्षी नऊ एकर क्षेत्रावर कांदा लागवड केली आहे. दरवर्षी सरासरी चार ते पाच हजार गोण्या कांद्याचे उत्पादन घेतो. कांद्याच्या बाजारभावात अनिश्चितता असली तरी सातत्य ठेवल्यास हमखास यश मिळते, असा माझा अनुभव आहे.” अमोल दुरंदे, शेतकरी, राजुरी. यंदा अधिक मासाचा आधार यंदा अधिक मास म्हणजेच ‘धोंड्याचा महिना’ असल्याने कांद्याला चांगला बाजारभाव मिळतो, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. याच अपेक्षेने यावर्षी कांदा लागवड जोमात होत असल्याचे चित्र दिसत आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:53 am

उमेदवारी अर्ज भरतानाच धुसफूस, भाजपालाच आत्मचिंतनाची संधी

नगरपालिकेची निवडणूक सुरू झाल्यापासून उमेदवारी अर्ज भरतानाच भाजपामध्ये धुसफूस सुरू होती. समन्वय नव्हता, गेल्या अनेक वर्षापासून मंगळवेढा शहरातील मूलभूत प्रश्नांची सोडवणूक न झाल्यामुळे या निवडणुकीत मतदारांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीला संधी दिली आहे. देशात राज्यात भाजपाची सत्ता असताना निधी मिळायची असे असताना या निवडणुकीत मतदारांनी उलटा निर्णय घेतला याचे भाजपाने चिंतन करण्याची गरज आहे. आवताडे आमदार आवताडे व त्यांचे बंधू संजय आवताडे यांनी प्रतिष्ठेची केली होती मात्र शहरातील आवताडे प्रेमी मतदारांनी सुनंदा आवताडे यांचा विजय अधोरेखित केला. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार स्वतःच्या बालेकिल्ल्यातच पाठीमागे राहिल्याचे दिसून आले आहे ,त्यामुळे सामोरे पराभावाला जावे लागले. या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्ष जात गट तट या सर्व गोष्टींना फाटा देत जुने हेवेदावे मनात ठेवून उमेदवारांना विजयी करण्यापेक्षा पराभूत करण्यासाठी सर्वच प्रभागांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करताना दिसून आले आहेत. स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके व सुनबाई प्रणिता भालके यांनी शहरामध्ये प्रचारामध्ये नोंदवलेला सहभाग तीर्थक्षेत्र विकास आघाडी साठी लक्षणीय ठरला असून,माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडी कडून केलेला टोकाचा प्रचार व टीका हा अजित जगताप यांच्यासाठी घातक ठरला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला नगरसेवक उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या प्रमाणात कमी मते मिळाल्याचे दिसून आले ,असून भाजपाच्या जुने निष्ठावंत कार्यकर्ते या निवडणुकीपासून अलिप्त राहिल्याचे दिसून आले. सुनंदा आवताडे यांच्याकडे प्रबळ प्रचार यंत्रणा होती. सुप्रिया जगताप यांच्याकडे यंत्रणेचा अभाव होता. ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे यांनी या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद लावल्याने व विधानसभा लढविलेली तरुणांचे आयडॉल असणारे सिद्धेश्वर आवताडे यांना प्रचाराचा दांडगा अनुभव असल्यामुळे यश मिळाले आहे. पालकमंत्र्यांचे वक्तव्य अन् मतदार दुखावला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आम्हाला निवडून दिले तर आम्ही निधी देऊ विरोधकांना निवडून दिले तर निधी कोण देणार असा प्रश्न करून मतदारांचा स्वाभिमान दुखावला गेला त्यामुळे मतदान घटले. ऐन वेळेला भाजपात आलेल्या सुप्रिया जगताप या भारतीय जनता पक्षाला व आवताडे गटाच्या बऱ्याच समर्थकांना रुसल्या नाहीत याचा परिणाम त्यांच्या मताधिक्यावर झाल्याचे दिसत असून सुप्रिया जगताप यांच्यापेक्षा सुनंदा आवताडे यांचे व्यक्तिमत्व प्रचारातले वावरणे व संपर्कात मतदारांशी केलेला संवाद महत्त्वपूर्ण ठरला आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:52 am

बार्शीत सोशल इंजिनिअरिंगचा प्रभाव, राऊत यांचा राजकीय दबदबा वाढला:जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वेध‎

वर्षभरापूर्वी झालेल्या बार्शी विधानसभा निवडणुकीतील पराभवाची मरगळ झटकत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी सरत्या वर्षा अखेरीस झालेल्या सहकार क्षेत्रातील बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकहाती सत्ता व पाठोपाठ प्रतिष्ठेच्या बार्शी नगर परिषदेची सत्ता देखील ताब्यात ठेवण्यात मोठे यश मिळवले आहे. प्रचारादरम्यान दाखवलेला संयम, राजकीय परिपक्वता, योग्य नियोजन, उमेदवारी देताना केलेले सोशल इंजिनिअरिंग या राऊतांच्या जमेच्या बाजू ठरल्या. सोपल व बारबोले यांनी देखील पूर्ण ताकदीने सर्वस्व पणाला लावून टक्कर दिली. नगराध्यक्षपद मोठ्या मतांनी गमवावे लागले असले तरी नगरसेवक पदासाठी काट्याची टक्कर देत तब्बल १९ नगरसेवक निवडून आणले. बाजार समिती व नगर परिषद सत्तेचा सोपान गाठल्याने राऊतांचा आत्मविश्वास वाढला असून आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक जिंकत विजयाची हॅट्रिक करण्यासाठी राऊत यांनी तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. केंद्रातील व राज्यातील सत्तेच्या माध्यमातून आमदारकीच्या काळात हजारो कोटी रुपयांच्या निधी आणला. विकास कामांच्या जोरावर बार्शी नगर परिषदेची सत्ता पुन्हा ताब्यात ठेवण्यात राऊत यांना यश आले. या उलट बार्शी विधान सभा निवडणुकीत बार्शी शहरातून ७ हजार ५०० एवढा विजयी लीड घेतलेल्या आमदार दिलीप सोपल यांना मागील ९ वर्षातील अनियमित पाणी पुरवठ्यासह नागरी समस्यांवर राऊत यांना कोंडीत पकडता आले नाही. विशेषतः माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांना सोबत घेऊनही सोपल यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही. बार्शी शहराचा पाणी प्रश्न गंभीर असताना देखील राऊत यांनी कुशलतेने राजकीय परिपक्वता दाखवत सोपल व बारबोले यांच्याशी नियोजन करत दोन हात केले. याठिकाणी अपेक्षित मताधिक्य मिळले नाही बारबोले यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सुतार नेट, कसबा पेठ, उपळाई रोड या भागातून बारबोले यांना अपेक्षित मते मिळाली नसल्याचे निकाल नंतर स्पष्ट झाले आहे. राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या एकूण ३६ जागा लढवल्या तर महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे पक्षाला ६ जागा दिल्या. यात भाजपचे १७ तर शिंदे सेनेचे सर्व ६ नगरसेवक निवडून आले. एकूण २३ नगरसेवक व नगराध्यक्षपदी तेजस्विनी कथले यांना सुमारे ४६८८ मतांनी निवडून आणण्यात एकट्या राऊत यांनी मोलाची कामगिरी बजावली. राऊत यांनी लिंगायत मुस्लिम जातीय समतोल राखत उमेदवारी दिल्याने काठावरची सत्ता काबीज करणे सोपे झाले. या निवडणुकीकडे तालुक्यासह संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीतून राऊतांचा आत्मविश्वास वाढला.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:52 am

पंढरपूरचे कास्ट ऐवजी क्लासला प्राधान्य:सत्ताविरोधी लाट निर्माण करण्यात भालकेंना मिळाले यश‎

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले असले तरी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दारुण पराभूत झाल्याने भाजपचे पंढरपूर विजयाचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. पंढरपूरच्या नागरिकांनी कास्ट ऐवजी क्लास ला प्राधान्य दिल्याने निवडणूक जातीच्या अंगाने नेऊन जिंकण्याचे भाजपचे प्रयत्न उधळून लावले आणि प्रणीता भालके यांच्या सारखा सुसंस्कृत, विकासाचे व्हिजन मांडलेला, सामान्य जनतेच्या सहज संपर्कात असलेला उमेदवार निवडला. संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग त्यामुळेच झाले. परिचारक यांच्या अनेक दशकांच्या सत्तेविरोधात परिवर्तनाची लाट निर्माण करण्यात भालकेंना यश आले. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत विरोधकांचे आव्हान नाही असे समजून एकहाती सत्ता मिळवण्याचा विश्वास भाजपला होता. विधानसभा निवडणुकीनंतर भालके कुटुंब राजकीयदृष्ट्या कमजोर आणि त्यांचे कार्यकर्ते नाउमेद झाल्याचा कयास भाजप नेतृत्वाने बांधलेला असावा. त्यातच मराठा विरुद्ध ओबीसी असे जातीय ध्रुवीकरण करण्याच्या हेतूने भाजपने जोखीम घेतली.शहरातील जातीय समीकरणे गृहीत धरून भाजपने सर्वसाधारण महिला जागेवर प्रणिता भालके यांच्या विरोधात शामल शिरसाट यांना मैदानात उतरवले. प्रणिता भालके यांची प्रतिमा सुसंस्कृत, सर्व सामान्य नागरिकांत सहज संपर्क असणाऱ्या, विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या उमेदवार अशी आहे, त्यामुळे पंढरपूरकर कास्ट ऐवजी क्लासचा विचार केल्याचे दिसून आले. पंढरपूर विकास कॉरिडॉरचा फटका पंढरपूर विकास कॉरिडॉर राबवताना भाजपने विशेषतः माजी आ. प्रशांत परिचारक आणि आ. समाधान आवताडे यांनी कॉरिडॉर प्रभावित नागरिकांना गृहीत धरून कॉरिडोर रेटण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे कॉरिडॉर प्रभावित क्षेत्रातही भाजपला मोठा फटका बसल्याचे दिसून आले. परिचारक आणि भाजप साठी नागरिकांना रोष महागात पडलेला दिसून आला आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:51 am

महाबळेश्वरच्या तुलनेत नगरचा पारा 5 अंश घसरला:शहरावर आज पहाटे 5 ते सकाळी 8.30 वाजेपर्यंत दाट धुक्याची चादर‎

सोमवारी महाबळेश्वरपेक्षाही अहिल्यानगर हे थंड शहर ठरले. २२ डिसेंबरला महाबळेश्वरचे किमान तापमान १२.१ अंश सेल्सिअस होते. तर शहराचे किमान तापमान ७.३ अंशावर नोंदवले गेले. मंगळवारपासून किमान तापमान पुन्हा घसरुन ते ६ अंशावर जाणार असून, मंगळवारी शहरावर पहाटे ५ वाजल्यापासून ते सकाळी ८.३० वाजेपर्यंत दाट धुक्याची चादर पसरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. डिसेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात सलग ३ वेळा शहराचे किमान तापमान ६ अंशावर गेले होते. त्यानंतर किमान तापमानात चढ-उतार होत होता. गेल्या ७ दिवसांपासून मात्र शहराचे किमान तापमान ७ ते ८ अंशावर होते. शनिवार (२० डिसेंबर) मात्र किमान तापमान पुन्हा ६.४ अंशावर गेले आहे. त्यामुळे थंडीत वाढ झाली होती. रविवार (२१ डिसेंबर) ला किमान तापमान ६.५ होते. तर सोमवार (२२ डिसेंबर) ला किमान तापमान ७.३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. दहा वर्षांपूर्वी ( नोव्हेंबर २०१६) मध्ये शहराचे किमान तापमान ६ अंशावर गेले होते. यंदा १७ व १८ नोव्हेंबरला किमान तापमान ८ अंशावर गेले. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला होता. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशीच शहराचे किमान तापमान ९ अंशावर गेले होते. त्यानंतर किमान तापमानातील घसरण कायम होती. मंगळवार (९ डिसेंबर) ला किमान तापमान ७ अंशावर गेले होते. बुधवारी (१० डिसेंबर) ला यामध्ये १ अंशांनी घट होऊन ते ६ अंशावर गेले आहे. त्यानंतर बुधवार (११ डिसेंबर) व गुरुवार (१२ डिसेंबर) ला या दोन दिवशी सलग ६ अंशावर किमान तापमान होते. कडाक्याच्या थंडीत फिरायला आलेले नागरिक. छाया : सिद्धार्थ दीक्षित. बी.एन.शिंदे, हवामान तज्ज्ञ, अहिल्यानगर पुढचे ५ दिवस थंडी कायम राहिल २३ डिसेंबरला शहराचे किमान तापमान ६ अंशावर जाण्याची शक्यता आहे. २४ ते २८ डिसेंबरला शहराचे किमान तापमान ७ ते १० अंशावर राहिल. तर शहराचे कमाल तापमान २८ ते २९ अंशावर राहणार आहे. रात्री थंडी व सकाळी ९ वाजल्यानंतर कडक उन्हाचे चटके जाणवणार आहेत. पुढच्या ५ दिवसांत सायंकाळी ५.३० वाजल्यापासून थंडी जाणवणार आहे. २१ डिसेंबरचा दिवस सर्वात लहान व रात्र सर्वात मोठी होती. साधारण अहिल्यानगर जिल्ह्यात २१ डिसेंबरचा दिवस सव्वा तेरा तासांचा होता. तर रात्र पावणे अकरा तासांची होती. त्यामुळे मंगळवारपासून दिवस किंचित वाढण्यास सुरुवात झाली आहे. काश्मिरमधील बर्फवृष्टीमुळे थंडीत वाढ झाली आहे. २५ वर्षांत प्रथमच अहिल्यानगर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पाऊस नाही. गहू,हरबरा,कांदा यासाठी थंडी पोषक मात्र द्राक्ष काढणीला उशीर होईल.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:43 am

विद्यार्थ्यांनो, क्षमता ओळखून ध्येय निश्चित करत योग्य वाटचाल करा':श्रीकांत पेमराज गुगळे विद्यालयाचे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात

मनुष्याला सर्वगुण संपन्न नागरिक घडविणारी शाळा असते. शाळेतून मिळालेल्या संस्कारातून विद्यार्थी तयार होत असतात. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणारे स्नेहसंमेलन हे विशेष आकर्षण असते. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर करुन त्यांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन केल्यास जीवनात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. आपल्यातील क्षमता ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याचे काम शाळेतून होत असते. आजच्या विद्यार्थ्यांनी काळानुसार बदलांचा स्वीकार केला पाहिजे, असे प्रतिपादन आर्किटेक्ट वैभव देशमुख यांनी केले. शिशु संगोपन संस्थेच्या श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल व महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाचे उद्घाटनप्रसंगी देशमुख बोलत होते. यावेळी स्वाती देशमुख, उपसरपंच सत्यजित पालवे, रयत शिक्षण संस्थेचे ज्ञानदेव पांडुळे, दिलीप गुंदेचा, दशरथ खोसे आदी उपस्थित होते. देशमुख पुढे म्हणाले, आजच्या युवा पिढीने आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी केला पाहिजे. मुलांनी त्यांची ओळख स्वतः निर्माण केली पाहिजे. आज विविध क्षेत्रात करिअरच्या मोठी संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आपले जीवनातील ध्येय निश्चित करुन त्यादृष्टीने मार्गक्रमण करावे. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त विजय गुंदेचा, राजेंद्र चोपडा, बन्सी नन्नवरे, रश्मी येवलेकर, सचिन डागा आदी उपस्थित होते. प्रास्तविक प्रा. संजय शेवाळे यांनी केले तर प्राचार्य दत्तात्रय कसबे यांनी संस्थेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली व अहवाल वाचन केले. यावेळी विविध क्षेत्रात नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, समाजप्रबोधनपर गीते आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमादेवी राऊत व वैष्णवी किंद्रे यांनी केले तर पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन उज्वला सूर्यवंशी यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा बारगळ व श्रद्धा कुलकर्णी यांनी केले. शेवटी प्रा.सुभाष चिंधे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांसाठी राबवलेले उपक्रम कौतुकास्पद ज्ञानदेव पांडुळे म्हणाले, शाळेतील शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करत असतात. सर्वसामान्य परिस्थितीतील मुलांसाठी विशेष शाळा राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्षमता ओळखून त्यादृष्टीने ध्येय ठेवून अभ्यास करावा. यश आपणास निश्चित मिळेल.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:42 am

14 विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीसाठी तिसऱ्यांदा सराव:170 केंद्रांवर पाचवी व आठवीची परीक्षा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग‎

जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने नवोदय तसेच शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये गुणवत्तेचा टक्का वाढावा या उद्देशाने मिशन आरंभ हाती घेतले आहे. मिशनचा एक भाग म्हणून, राज्य परीक्षा परीषदेच्या धरतीवर सराव परीक्षा घेण्यात येत आहेत. जिल्हाभरात रविवारी (२१ डिसेंबर) सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीपूर्व सराव परीक्षा दिली. ही तिसरी सराव चाचणी असून, फेब्रुवारी २०२६ मध्ये अंतिम परीक्षा होणार आहे. राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने पाचव व आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी १७० परीक्षा केंद्रांवर झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी या परीक्षेचे नियोजन केले. शिक्षणाधिकारी पाटील यांनी जेऊर, नांदगाव येथील केंद्रांना भेटी देऊन परीक्षेची पाहणी केली. या परीक्षेचा निकाल २६ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. २७ डिसेंबरला पालक मेळावा घेऊन, निकाल जाहीर केला जाईल, व पाल्यांची प्रगती सांगितली जाईल. आतापर्यंत ऑक्टोबरपासून तीन सराव परीक्षा झाल्या आहेत. मुख्य अंतिम परीक्षा २२ फेब्रुवारीला होईल. ५७६ गुणवंतांना मिळणार दरमहा ७८० राज्य परीक्षा परीषदेच्या वतीने आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेंतर्गत गुणवंत ठरलेल्या जिल्ह्यातील ५७६ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ५०० तर आठवीतील विद्यार्थ्यांना दरमहा ७५० रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाईल.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:41 am

घोडेगाव-कुकाणा रस्त्यामध्ये जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य:रस्ता दुरुस्तीचे कामही असमाधानकारक असल्याची चर्चा, वाहनचालकांचे हाल‎

घोडेगाव-कुकाणा रस्ता अक्षरशः खड्ड्यात गेल्याने रस्त्यावर कोणतेही वाहन चालविणे प्रचंड त्रासदायक ठरत आहे. साखर कारखान्यावर जाणारे वाहने या खड्ड्यामध्ये पलटी होत असल्याने वाहनांबरोबर उसाचेही नुकसान होत आहे. तसेच खड्डे बुजविण्याचे काम अत्यंत धिम्या गतीने चालू असून काम दर्जेदार होत नसल्याची चर्चा सुरू आहे. घोडेगाव- कुकाणा रस्ता खराब झाला आहे. या रस्त्यावरुन वाहन चालवणे वाहनचालकांसाठी अतिशय त्रासदायक ठरत आहे. वाहने खड्ड्यात आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. अपघातांची शक्यता वाढली आहे. तसेच वाहनचालकांनाही पाठदुखीचा त्रास सुरू झाला आहे. घोडेगाव, चांदा, कौठा, फत्तेपूर, देवगाव असा प्रवास अत्यंत कठीण झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही ठिकाणी खड्डे दुरुस्त करण्याचे काम चालू आहे. मात्र काम गुणवत्तेचे होत नसल्याचे सांगितले जात आहे. घोडेगाव ते कुकाणा रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत. त्यातील काही ठराविक खड्डयात खडी डांबर टाकून काम केले जात आहे. परंतु काम व्यवस्थित होत नसल्याने सायंकाळच्या वेळी वाहने चालवणे आणखी जोखमीचे ठरत आहे. या रस्त्यावर उस वाहतूक चालू असून मोठ्या खड्ड्यांमुळे दररोज दोन-तीन वाहन पलटी होत असल्याने शेतकऱ्यांच्या उसाचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाचा दर्जाची पाहणी करुन कार्यवाही करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:40 am

विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने:आनंद गुरुकुलच्या स्नेहसंमेलनात देशभक्ती अन् सामाजिक बांधिलकीचे दर्शन‎

येथील आनंद गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यक्रमासाठी पालक, विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतीभाऊ गांधी उपस्थित होते. अरुण पाटील कडू व मा. डॉ. योगेंद्र सचदेव उपस्थित होते. सर्व विश्वस्तांच्या देणगीतून उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाच्या कोनशिलेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यानंतर नर्सरी ते इयत्ता दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करत विविध लोकनृत्ये, देशभक्तीपर नृत्ये व समूह नृत्ये सादर केली. तसेच मोबाइलचा दुरुपयोग, सामाजिक जाणीव तसेच हिंदी गीतांवर आधारित नृत्यनाट्य, एकपात्री अभिनय, कविता व संगीत सादरीकरणाने प्रेक्षकांची दाद मिळवली. शाळेचे सचिव सतीश गांधी व सर्व विश्वस्त यांच्या एकमताने डॉ. राहुल बोरा यांची शाळेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आनंद गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षकांनी केले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:40 am

तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शनात अगस्ति'चा डंक:तीन विद्यार्थिनींनी मिळवले यश, विद्यालयाने मानाचा फिरता करंडकही पटकावला‎

येथील अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने ५३ व्या गणित विज्ञान तालुकास्तरीय प्रदर्शनात सर्व गटांतून नेत्रदीपक यश मिळवले. यामुळे प्रदर्शनातील यावर्षीचा फिरता करंडक हा सर्वाधिक पारितोषिके मिळविण्याचा बहुमान प्राप्त केल्याबद्दल अगस्ति विद्यालयास देण्यात आला. अकोले येथे तालुकास्तरीय गणित विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले. यामध्ये तालुक्यातील बहुतांश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अगस्ती विद्यालयाने या प्रदर्शनात गणित व विज्ञान विभागात वेगवेगळ्या गटांतून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. प्रदर्शनात विद्यालयाने एकूण तीन पुरस्कार प्राप्त केले. यामुळे मानाचा फिरता करंडकही अगस्ति विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी पटकावला. अगस्ती विद्यालयाची आराध्या रविंद्र नाईकवाडी हीने विज्ञान विभागातील उच्च प्राथमिक गटातून तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. विज्ञान विभागातील उच्च माध्यमिक गटातून आर्या विजय गुजर हीने प्रथम क्रमांक मिळविला. तिने सादर केलेल्या राईड सेफ २.० या नाविन्यपूर्ण प्रकल्पाच्या माध्यमातून वाढते रस्ते अपघात आणि ड्रिंक अँड ड्राइव्हबाबतच्या वाढत्या दुर्घटनांना रोखण्यासाठी हा प्रकल्प एक वरदान ठरू शकतो, असे मत मांडले. उच्च माध्यमिक गटातून गणित विभागात श्रद्धा महेश पंडित हीने प्रथम क्रमांक पटकावून गोल्डन रेशो ही संकल्पना केवळ गणितापुरती मर्यादित नसून ती निसर्ग, कला, अर्थशास्त्र, वैद्यकीय व संगणक विज्ञान अशा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरली जाते हे पटवून दिले. या यशाबद्दल संस्थेच्या सचिव शैलजा पोखरकर, कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, सतीश नाईकवाडी, संदीप नाईकवाडी, प्राचार्य मंगेश खांबेकर, तात्यासाहेब दौंड, नंदा गोपाळे, पत्रकार विजय पोखरकर आदींनी यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे गणित विज्ञानाचे शिक्षक महेश पंडीत, अनिल दाते, कांचन वाकचौरे, नीरज वाळूंज यांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या या यशस्वी कामगिरीचे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात कौतुक होत आहे. अगस्ती शिक्षण संस्थेचे उपक्रमशीलतेला प्राधान्य अगस्ति शिक्षण संस्थेने नेहेमीच विज्ञान व तंत्रज्ञानाचे महत्व ओळखून उपक्रमशीलतेस प्राधान्य दिले. या यशाने पुनश्च शिक्कामोर्तब झाले. संस्थेच्या सर्वच विद्यांलयातून याबाबत वेळोवेळी प्रोत्साहन मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:39 am

नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वेच्या जुन्या मार्गासाठी लोकप्रतिनिधी एकवटले:सहविचार सभेत ठरली रणनिती, निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा‎

नाशिक–पुणे हायस्पीड रेल्वे अकोले स्टेशनसह नाशिक–सिन्नर–संगमनेर –अकोले–नारायणगाव–राज गुरुनगर–चाकण या पूर्वीच्याच मार्गाने जावी या ठाम मागणीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेते व कार्यकर्ते एकवटले. या मागणीसाठी जनआंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी नांदूर खांदरमाळ फाटा येथे सहविचार सभा पार पडली. अकोले तालुक्यातील नागरिकांनी नुकताच अकोले ते संगमनेर असा २२ किलोमीटरचा मोर्चा प्रांत कार्यालयावर नेला होता. या मोर्चात आंदोलनाचे नेतृत्व सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन करावे, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली होती. त्यानुसार आ. सत्यजित तांबे यांनी पुढाकार घेत बैठक आयोजित केली. सभेत संवाद व संघर्ष या दोन्ही मार्गाने प्रयत्न करूनच मागणी मान्य करून घेण्यावर सर्वांचे एकमत झाले. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन भूमिका मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीदरम्यानच आ. तांबे यांनी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी रेल्वे कृती समितीच्या शिष्टमंडळाला जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भेटीसाठी वेळ देण्याचे आश्वासन दिले. या बैठकीस खासदार डॉ. अमोल कोल्हे, खा. राजाभाऊ वाजे, खा. भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार शरद सोनवणे, आमदार किरण लहामटे आदी उपस्थित होते. संवादातून प्रश्न सुटेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मात्र सकारात्मक निर्णय न झाल्यास नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव व राजगुरुनगर परिसरात व्यापक जनजागृती करून आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. सिन्नर ते राजगुरुनगर असा वाहन मोर्चा काढण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून गरज पडल्यास चाकण किंवा आळेफाटा येथे बेमुदत चक्काजाम आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:38 am

वराड येथे एसटी बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल:2 किमीची पायपीट, वराड येथील संतप्त ग्रामस्थांचा रास्ता राेकाे आंदाेलन करण्याचा इशारा‎

वांरवार मागणी करून सुद्धा एसटी थांबत नाही, त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना थंडीत वराड ते मुसळी फाटा अशी दोन किमीची पायपीट करावी लागते. विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल होत असून जळगाव व एरंडोल आगारातून वराड येथून धरणगाव जाण्यासाठी बससेवा सुरू करावी. अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. सकाळी सहा वाजेपासून थंडीमध्ये २५ ते ३० विद्यार्थी, विद्यार्थिनिंना वराड ते मुसळी फाटा पायी चालत जावे लागते. तेथे सुद्धा मुसळी फाट्यावर बसेस भरून येत असतात. विद्यार्थ्यांना थंडीत उभे राहावे लागते. तरी एसटी महामंडळाने दखल घ्यावी. अन्यथा वराड ग्रामस्थांकडून रस्ता रोको आंदोलन केले जाईल. जळगाव आगाराकडे यापूर्वी वेळोवेळी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. मात्र या समस्येकडे लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. अधिकारी पाहणी करून निघून गेले. आम्ही एसटी पाठवतो असेही सांगून एरंडोल डेपोचे मॅनेजर यांनी एसटी पाठवलीच नाही.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:25 am

खामलोण येथील शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयावर मोर्चा:दिवसा थ्री फेज वीजपुरवठा‎करण्याची मागणी‎

खामलोण (ता. बागलाण) येथील शेतकऱ्यांनी परिसरात असलेली कडाक्याची थंडी आणि वन्य प्राण्यांच्या मुक्त संचारामुळे दिवसाकाठी वीज वितरण कंपनीने थ्री फेज वीज पुरवठा करावा या मागणीसाठी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढून अधिकाऱ्यांना निवेदन दिले. वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. कांद्याला भाव मिळेल, या अपेक्षेने परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली आहे. परंतु, गेल्या आठवड्यापासून परिसरात पडलेली थंडीची लाट आणि बिबट्याची दहशद यामुळे शेतकरी धास्तावले आहे. परिसरात बिबट्या, रानडुक्कर, तरस आदी वन्य प्राण्यांचा मुक्तसंचार असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून पीक जगवावे लागत आहे. त्यामुळे मोसम खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने वीज कंपनीचे उपविभागीय अधिकारी जगताप यांना घेराव घालून भारनियमनाची वेळ बदलावी, शेती सिंचनासाठी दिवसभर बारा तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते दिगंबर धोंडगे, खामलोण सोसायटीचे सभापती विशाल धोंडगे, भाऊसाहेब सोनवणे, केवळ धोंडगे, विजय मुथा आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:22 am

उगाव रेल्वे अंडरपासमध्ये पाणी:परिसरातील शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता नसल्याने प्रचंड हाल‎

रेल्वे गेट बंद असल्यामुळे अनेकदा वाहन चालकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्याला पर्याय म्हणून रेल्वेने अंडरपास बनवले मात्र अनेक ठिकाणी रेल्वे अंडरपासमध्ये शेतातील पाणी साचत आहे. उगाव परिसरात असलेल्या पानेवाडी येथील रेल्वे अंडरपास मध्ये पावसाळा संपून दोन ते अडीच महिने लोटले तरी अजूनही गुडघाभर पाणी साचत असल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केले आहे. उगाव पानेवाडी परिसरात रेल्वे गेट बंद करून त्या ठिकाणी अंडरपास करण्यात आलेला आहे. या रेल्वे अंडरपासमध्ये अजूनही गुडघाभर पाणी साचत असल्यामुळे शेतकऱ्यांना इच्छित स्थळी शेतीमाल विक्रीस जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. या संदर्भात रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही त्यावर ठोस उपाय करण्यात आलेला नाही. रेल्वेतर्फे या ठिकाणी जनरेटर लावून पाणी काढले जात असले तरी दररोज सायंकाळी मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. साचलेल्या पाण्याचा पूर्णतः निचरा होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काम करण्याची गरज आहे. रेल्वे अंडरपास मध्ये दररोज मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. पावसाळा संपून दोन महिने झाले तरी अजूनही शेतातील पाणी या ठिकाणी साचत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपला प्रवास करता येत नाही. या ठिकाणी जनरेटर लावले जाते मात्र तरी देखील शेतकऱ्यांना दोन दोन तास या ठिकाणी थांबावे लागते याच्यावर योग्य तो तोडगा निघणे गरजेचे आहे. प्रभाकर मापारी, द्राक्ष उत्पादक, उगाव

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:21 am

कृषी संशोधन केंद्रातून फुले समाधान वाणाची 25 टन विक्री:40 ते 45 क्विंटल प्रति हेक्टर मिळणार उत्पादन‎

प्रतिनिधी | लासलगाव निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील कृषी संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेला ‘फुले समाधान’ हा सरबती गव्हाचा अधिक उत्पादन देणारा वाण महाराष्ट्रासाठी शिफारशीत करण्यात आला आहे. या वाणाला शेतकऱ्यांकडून मोठी मागणी असून चालू हंगामात कृषी संशोधन केंद्रातील बियाणे विक्री केंद्रातून सुमारे २५ टन इतकी विक्रमी बियाणे विक्री झाली आहे, अशी माहिती केंद्राचे वरिष्ठ संशोधन सहायक (कृषी विद्या) डॉ. भरत दशरथ मालुंजकर यांनी दिली. ‘फुले समाधान’ हा वाण अधिक उत्पादनक्षम असून प्रति हेक्टर ४० ते ४५ क्विंटल उत्पादन देतो. वेळेवर बागायत पेरणी, उशिरा पेरणी तसेच उशिरात उशिरा पेरणीसाठीही हा वाण उपयुक्त असून साधारण २३ डिसेंबरपर्यंत त्याची पेरणी करता येते, ही या वाणाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. हा बुटका वाण असल्याने पिक लोळत नाही. तसेच फुटव्यांची संख्या जास्त आणि समान असते. या वाणाचा वाढीचा कालावधी कमी म्हणजेच ११० ते ११५ दिवसांचा आहे. ओंबी भरणे आणि दाणे भरण्याचे प्रमाण अधिक असून हजार दाण्यांचे वजन सुमारे ४३ ग्रॅम आहे. यामध्ये प्रथिनांचे प्रमाणही जास्त म्हणजे १२.५ टक्के असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या वाणाला विशेष पसंती मिळत असल्याची माहिती मालुंजकर यांनी दिली आहे.या गव्हाच्या वाणाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी कृषी संशोधन केंद्रातील गहू विशेषतज्ज्ञ प्रा. भालचंद्र म्हस्के यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संशोधन केंद्राकडून करण्यात आले आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:19 am

तलाठी उपलब्ध नसल्याने दहेगाव वागळूदला शेतकरी हवालदिल:तहसीलदार दराडेंना ‎ग्रामस्थांचे निवेदन‎

तालुक्यातील दहेगाव वागळूद येथे गेल्या अनेक दिवसांपासून तलाठी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील ग्रामस्थांनी नायब तहसीलदार चैताली दराडे यांना उपसरपंच अजित कड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले आणि तातडीने कायमस्वरूपी तलाठी देण्याची मागणी केली. दहेगाव वागळूद सजा अंतर्गत येणाऱ्या गावातील महसूल कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. सध्या शेतीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना सात-बारा उतारा, फेरफार नोंद, उत्पन्नाचा दाखला आणि विविध सरकारी योजनांसाठी तलाठ्यांच्या स्वाक्षरीची नितांत गरज असते. मात्र, तलाठी कार्यालयात उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठीही पालकांची धावपळ होत आहे. तलाठी नसल्यामुळे आमची महत्त्वाची कामे रखडली आहेत, प्रशासनाने याकडे गांभीर्याने पहावे, अशी भावना उपसरपंच अजित कड, सचिन गणोरे, नवनाथ मेधने, भाऊसाहेब कड, आदींसह ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या निवेदनाची दखल घेऊन प्रशासनाने तलाठ्याची नियुक्ती करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी दिला आहे.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:17 am

इगतपुरीत अनधिकृत 12 व्हिला व बंगल्यांना महसूलच्या नोटिसा:‘ऑपरेशन व्ही’ अंतर्गत‎व्हिला व्यवसायावर कारवाई‎

‘ऑपरेशन व्ही’ अंतर्गत व्हिला व्यवसायावर कारवाई प्रतिनिधी | इगतपुरी शहर व परिसरात अनेक व्हिला उभारून ते पर्यटकांना व नागरिकांना भाड्याने देत व्यावसायिक वापर सुरू केले. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने ‘ऑपरेशन व्ही’ अंतर्गत कारवाई केली. या मोहिमेदरम्यान अनधिकृतपणे सुरू असलेल्या व्हिला व बंगल्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणी मोहिमेचे नेतृत्व सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. जी. व्ही. एस. पवन दत्ता यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार धनंजय लचके, प्रवीण गोंडाळे, मंडळ अधिकारी गिरीश कुलकर्णी, तलाठी कल्याणकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी निवासी वापरासाठी मंजूर असलेल्या व्हिलांचा व्यावसायिक वापर करण्यात येत असल्याचे आढळून आले. आवश्यक परवानग्या, नोंदणी, कर भरणा व संबंधित विभागांची मंजुरी नसताना हा व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर संबंधित १० ते १२ व्हिलांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहे. आवश्यक कागदपत्रे व खुलासा तातडीने प्रांताधिकारी कार्यालय, नाशिक येथे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:14 am

कळवण- नांदुरी रस्त्यावरील झाडांच्या धोकादायक फांद्या छाटणी मोहीम ठप्प:वाहन चालकांसह नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; काम सुरू करण्याची मागणी‎

कळवण–नांदुरी रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याच्या मोहिमेला अचानक ब्रेक लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ५ ऑक्टोबरपासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आलेली ही मोहीम काही अंतरापर्यंत राबवून पुढे थांबविण्यात आल्याने नेमके कारण काय, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. नागरिकांनी ही मोहीम तातडीने पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. गेल्या २० सप्टेंबर रोजी कळवण–नाशिक रस्त्यावर मानूर येथे झाडाची फांदी कोसळून झालेल्या अपघातात २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी रस्त्यालगत असलेल्या धोकादायक झाडांच्या फांद्या काढण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवण ते नांदुरी रस्त्याच्या कडेला फांद्या छाटण्यास सुरुवात केली होती. काम का थांबवले ? सार्वजनिक बांधकाम विभागाने झाडाच्या फांद्या काढण्याच्या कामाला यापूर्वीच सुरुवात करायला हवी होती. एका तरुणाचा जीव गेल्यानंतर रस्ता कितीही मोकळा झाला तरी त्या तरुणाची उणीव त्या कुटुंबाला भरून काढता येणे अशक्य आहे. त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाने वाळलेली झाडे आणि धोकेदायक झाडांच्या फांद्या काढण्याचे काम बंद केले आहे. - केदा पवार, नागरिक, मानूर

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 8:13 am

घेवड्याच्या शेतीतून केवळ 40 गुंठ्यात कमावले तीन लाख रुपये:वसई येथील शेतकरी अंकुश भगवान सावळकर यांचा प्रयाेग‎

सिल्लोड तालुक्यातील कोंबडवाडी वसई येथील तरुण शेतकरी अंकुश भगवान सावळकर यांनी घेवड्याच्या शेतीतून यशस्वी उत्पन्न घेतले आहे. त्यांनी माळरानावर ४० गुंठे शेतीत घेवड्याची लागवड केली. योग्य व्यवस्थापन, मेहनत आणि प्रयोगशीलतेमुळे त्यांना अडीच ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. घेवडा हे वेलवर्गीय पीक असून चार महिन्यांत उत्पादनास तयार होते. लागवडीत दोन पट्ट्यांमध्ये पाच ते सहा फूट अंतर ठेवले. दोन वेलांमध्ये एक फूट अंतर ठेवले. मकरसंक्रांतीच्या काळात या पिकाला मोठी मागणी असते. स्त्रिया वाण म्हणून याचा वापर करतात. तसेच दैनंदिन भाजीसाठीही याला शहरी व ग्रामीण भागात चांगली मागणी आहे. या पिकासाठी एकरी सुमारे ५० हजार रुपये खर्च येतो. योग्य भाव मिळाल्यास एकरी अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न मिळते. मजूर घरचे असल्यास खर्च कमी होतो. एक मजूर दिवसाला २० किलो घेवडा तोडतो. अंकुश यांनी शेणखत, मशागत, औषध फवारणी यावर विशेष भर दिला. लागवडीपूर्वी आणि नंतर शेणखत टाकले. दोन ते तीन वेळा औषध फवारणी केली. योग्य निगा राखल्याने उत्पादन चांगले मिळाले. टोमॅटो, वांगी, घेवडा अशा पिकांद्वारे त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही शेती फायदेशीर होऊ शकते हे दाखवून दिले. त्यांच्या यशस्वी प्रयोगामुळे परिसरात त्यांची शेती चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या या प्रयोगाचे परिसरात कौतुक होत आहे. तसेच त्यांची शेती पाहण्यात इतर शेतकरी येत आहेत चालू स्थितीत त्याने चाळीस गुंठे क्षेत्रात घेवडा हे पीक घेतले आहे. आतापर्यंत त्याने यातून एक लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. अजून उत्पादन मिळू शकेल असा अंदाज वर्तवला आहे. थोडक्यात, शेतीमध्ये स्वतः लक्ष देऊन कुटुंबाची साथ‌ आणि शेती पिकवली तर निश्चितच चांगले उत्पन्न मिळू शकते. शेतीमध्ये पिकामध्ये बदल करून एक चांगल्या पद्धतीचा शेतकरी होता येते हे अंकुश भगवान सावळकर याने दाखवून दिले आहे. चांगले उत्पन्न मिळू शकते

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 7:49 am

विद्यार्थ्यांनी सादर केले 100 विज्ञानाचे प्रयोग:सोयगाव येथील अजंता स्कूल येथे विज्ञान प्रदर्शन‎

अजंता व्हॅली इंग्लिश स्कूलमध्ये सोमवारी विज्ञान प्रदर्शन आणि स्टुडंट्स लेड कॉन्फरन्स झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुशील जावळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रघुनाथ फुसे, संजय शहापूरकर, संजय पाटील, सुनील शेटे, भास्कर पिंगळकर, डॉ. दिनकर पिंगळकर, डॉ. स्वाती पिंगळकर आणि मुख्याध्यापिका मीनाक्षी रोकडे उपस्थित होत्या. प्रास्ताविक शाळेच्या संचालिका डॉ. स्वाती पिंगळकर यांनी केले. सूत्रसंचालन सोनाली बागुल यांनी केले. आभार प्रदर्शन पूजा दामोधर यांनी केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो. पुस्तकांव्यतिरिक्त ज्ञान मिळते. अभ्यासात रुची वाढते. आत्मविश्वास वाढतो, असे डॉ. स्वाती पिंगळकर यांनी सांगितले. प्रा. सुशील जावळे यांनी विज्ञानातील शोधांचे चांगले आणि वाईट परिणाम समजावून सांगितले. नर्सरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी चांद्रयान, बुलडोझर, भूकंप सूचक यंत्र, एटीएम मशीन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर प्युरिफायर यासह १०० प्रयोग सादर केले. पाहुणे आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका प्रियांका रोकडे, सीमा भामरे, सोनाली बागुल, दीक्षा पवार, पूजा दामोधर, रुपाली गोल्हरे, शीतल कटोले आणि शिक्षक रामचंद्र लाडकर यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला पालकांची मोठी उपस्थिती होती.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 7:49 am

गुप्तीनंदी गुरुदेवांच्या उपस्थितीत भगवान मुनिसुव्रतनाथांचा अभिषेक:पैठण येथे शनिअमावास्येनिमित्त महामस्तकाभिषेक महोत्सव‎

पैठण येथील जैन मुनिसुव्रतनाथ भगवान शनिअमावास्येनिमित्त आयोजित महामस्तकाभिषेक महोत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. या निमित्ताने हजारो भाविकांनी भगवान मुनिसुव्रतनाथांचे दर्शन घेतले. आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव ससंघ यांच्या उपस्थितीत भगवान मुनिसुव्रतनाथांचा अभिषेक व विधी संपन्न झाले. महोत्सवाच्या प्रारंभी खासदार संदिपान भुमरे, आमदार विलास भुमरे, अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, सी. ए. आनंद कांकरिया, नरेंद्र पहाडे (जालना), मनोज चौधरी, अशोक जैन (दिल्ली), डॉ. के. एम. गंगवाल (पुणे) आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाप्रसाद दाते सुशीला श्रीपाल कासलीवाल यांचा विशेष सहभाग होता. यावेळी भगवान मुनिसुव्रतनाथांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. विविध अभिषेक व धार्मिक विधींचा मान वेगवेगळ्या जैन बांधवांना देण्यात आला. आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांनी प्रवचनात सांगितले की, “मनुष्य जीवनात सुख मिळवण्यासाठी पैसा कमावतो; मात्र खरी शांती भगवंताच्या भक्तीतूनच प्राप्त होते. भगवान मुनिसुव्रतनाथांची भक्ती केल्यास संकटे दूर होऊन जीवनात समाधान मिळते.” तसेच महाराष्ट्रातील हे एकमेव जैन क्षेत्र असल्याचे त्यांनी नमूद केले, जिथे आवास, निवास व भोजनासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. महोत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष महावीर बडजात्या, महामंत्री विलास पहाडे, कोषाध्यक्ष विजय पापडीवाल यांच्यासह नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी विशेष परिश्रम घेतले. आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांना ‘क्रांतिकारी राष्ट्रसंत’ पदवी सकल जैन समाजाच्या वतीने आचार्य गुप्तीनंदी गुरुदेव यांना ‘क्रांतिकारी राष्ट्रसंत’ ही पदवी बहाल करण्यात आली. खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते गौरवपत्र प्रदान करण्यात आले. महोत्सवात मुनी विमलगुप्तजी महाराज, मुनी वीरगुप्तजी महाराज, आगमस्वरा गणिनी आर्यिका आस्थाश्री माताजी, शांतीगुप्तजी महाराज, धन्यश्री माताजी यांची उपस्थिती लाभली. संगीतकार प्रवीण चौगुले यांच्या साग्रसंगीतात महामस्तकाभिषेक पार पडला.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 7:48 am

पैठण एमआयडीसी परिसरात मुधलवाडी ग्रामपंचायतीचा कचरा:परिसरात दुर्गंधी, ग्रामपंचायतीने उपाययोजना न केल्यास आंदाेलन करू, भाजपचे भाग्यवंत‎

पैठण तालुक्यातील मुधलवाडी ग्रामपंचायतीकडून पैठण एमआयडीसी परिसरातील केमिकल उद्योगांच्या परिसरात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात कचऱ्याचे ढिगारे साचत आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. मुधलवाडी ग्रामपंचायतीविरोधात तत्काळ कठोर कारवाई करावी आणि एमआयडीसी प्रशासनाने जबाबदारी स्वीकारून ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशारा भाजप कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाग्यवंत यांनी दिला आहे. दरम्यान, यासंदर्भात एमआयडीसीचे अधिकारी बोलण्याचे टाळतात. हजारो नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांच्या आजूबाजूला कचऱ्याचे ढिगारे म्हणजे चालता-फिरता धोका आहे. उद्या एखाद्या कंपनीला आग लागली किंवा स्फोट झाला, तर तो स्फोट केवळ त्या उद्योगापुरता मर्यादित राहणार नाही, तर आजूबाजूच्या गावांसाठीही जीवघेणा ठरू शकतो. हजारो नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे, असा इशारा भाजप कामगार मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाग्यवंत यांनी दिला. हा कचरा केमिकल कंपन्यांचा ^जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी दोन एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याच ठिकाणी आम्ही कचरा व्यवस्थापन करतो. एमआयडीसीमधील इतर केमिकल कंपन्या येथे कचरा आणून टाकतात. एमआयडीसी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. -मनीषा मुकुटमल, सरपंच, मुधलवाडी

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 7:47 am

डॉ. कृष्णा रेड्डी उर्फ रामकृष्णला उचलले:चौकशीसाठी चंद्रपूरला नेले, शेतकऱ्याच्या किडनी विक्री रॅकेट प्रकरणी सोलापुरातून एकजण पोलिसांच्या ताब्यात

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या किडनी विक्री प्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी सोलापुरातील विडी घरकुल परिसरातून डॉ. कृष्णा रेड्डी उर्फ रामकृष्ण मल्लेशन सुंचू (३६ रा. १०२ प्रियदर्शनी नगर याला अटक केली आहे. शेतकरी रोशन कुळे या शेतकऱ्याला कर्जफेडीसाठी कंबोडियात किडनी विकण्यास भाग पाडण्यात आले होते. पदवी नसतानाही नावापुढे डॉक्टर लावतो, प्रवचनमालेवर ५० लाख खर्च रामकृष्ण सुंचू याचे संभाजीराव शिंदे शाळेत शिक्षण झाले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर तो काय करतो, याची माहिती कोणालाच नाही. पण तो डॉक्टर नाही. टोलेजंग घर बांधून महागड्या चारचाकीतून फिरू लागला. कोणी विचारलेच तर बंगळुरूत हॉटेल व्यवसाय, हैदराबादला बिझनेस असल्याचे सांगायचा. आजूबाजूला कामगार वसाहती असल्याने सर्व त्याच्याकडे मानाने बघत. वृंदावन येथील देवकीनंदन महाराज यांचे सोलापुरात प्रवचन झाले. तीन दिवसांच्या या प्रवचनमालेसाठी त्याने ५० लाख रुपये खर्च केले होते. त्यानंतर घरकुलमध्येच दाक्षिणात्य शैलीतील एक देवीमंदिरही बांधून दिले. एका मंदिरास त्याने ३० लाखांची देणगी दिल्याची माहिती आहे. तो महागड्या कारने एकटाच बाहेर पडायचा. चालकही ठेवला नाही.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 7:36 am

3200 काेटींच्या जिल्हा बँकेवर ताब्यासाठी नाेंदवल्या 23 संस्था:एकही अस्तित्वात नाही, बँकेच्या निवडणुकीत मताचा अधिकार मिळावा म्हणून नोंदणी

सहकार खात्याने कागदपत्रांविनाच प्राथमिक ग्राहक सहकारी संस्था सुरू करण्याचा धडाका लावला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकांत नोंदणीकृत संस्थांनाच मतदान करता येते म्हणून नियोजित मतदानावेळी आपल्याकडे अधिक मते वळवण्यासाठी काही लोकांनी हा प्रकार केल्याचे ‘दिव्य मराठी’च्या इन्व्हेस्टिगेशनमधून समोर आले आहे. ‘दिव्य मराठी’कडे अशा २३ बोगस संस्थांची यादी आहे. त्यांना बेकायदा कर्ज वाटप केल्याचे पुरावेही आहेत. सहकारी संस्था अधिनियम १९६० नुसार बिगरशेती गटातून या नोंदणी होतात. बँकेची पंचवार्षिक निवडणूक मे-२०२६ मध्ये आहे. दरम्यान, पदाचा गैरवापर करत बोगस संस्था नोंदवणारे नेते व जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून संस्थांची नोंदणी रद्द करण्याची मागणी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप बनकर पाटील यांनी केली. कुणी दोषी आढळले तर कारवाई करणार बोगस सहकारी संस्था नोंदवल्या आहेत का ?-होय. आम्ही याबाबत उपनिबंधकांकडून माहिती मागवली आहे.केवायसीविना नोंद होते?-नाही. या संस्थांवर कारवाई करावी लागणार आहे.काय कारवाई होईल?- खोटी व दिशाभूल करणारी कागदपत्रे असतील तर कलम २१ प्रमाणे संस्थांची नोंदणी रद्द करू.बँक कर्मचारी स्कँडलमध्ये सहभागी असतील का..?कागदपत्रे आम्ही तपासतो. अधिकारी असो वा कर्मचारी, दोषींवर कारवाई करू. कुणाचीही गय केली जाणार नाही. 1. आधार, पॅनशिवाय केली नोंदणी संस्थांचे प्रवर्तक आणि सभासद यांचे आधार, पॅन आणि पत्त्यांचे पुरावे आवश्यक असतात. परंतु या कागदपत्रांशिवाय तालुका उपनिबंधक कार्यालयात नोंदणी करण्यात आली आहे. 2. अपूर्ण पत्ते, फलकसुद्धा नाहीपत्त्याच्या रकान्यात केवळ परिसराचे नाव आहे. सविस्तर पत्ता नाही. दिव्य मराठीने विविध २३ संस्थांच्या पत्त्यांचा शोध घेतला. मात्र, एकही संस्था, प्रवर्तक पत्त्यावर सापडले नाही. 3. बेकायदा कर्ज वाटपजिल्हा बँकेच्या सभासद असणाऱ्या संस्थांनाच मतदान करता येते. तत्पूर्वी बँकेचे सभासद होण्यासाठी संस्थांना बँकेकडून कर्ज घ्यावे लागते. नियमानुसार नोंदणीची २ वर्षे व ऑडिटशिवाय कर्ज देता येत नाही. परंतु या २३ संस्थांसह १४६ संस्थांनी नियमबाह्य कर्ज घेतले. केवायसीसाठी पत्र दिलेबँकेचे विद्यमान अध्यक्ष अर्जुन गाढे म्हणाले, ‘एकाही बोगस संस्थेची नोंद नाही. काही लोक जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत. काही संस्थांचे केवायसी नव्हते. त्यांना केवायसी करण्यासाठी पत्र दिले आहे.’

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 7:30 am

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:हर्सूल टी-पॉईंटवर रस्ता ओलांडणे झाले कठीण, दोन-दोन तास ट्राफिक जॅम, सिग्नल बसवण्याची मागणी!

हर्सूल टी-पॉइंटवर रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे. येथे दोन-दोन तास ट्राफिक जाम होते. त्यामुळे अडकून पडावे लागते. हे पाहता या ठिकाणी सिग्नल बसवावा आणि रोजच होणाऱ्या त्रासातून सुटका करावी, अशी मागणी या भागातल्या नागरिकांनी केली. दिव्य मराठीच्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' या टॉक शोला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमधील पाण्याची समस्या तर आहेच, पण त्याचबरोबर रस्ते आणि ट्राफिक जाममुळेही नागरिक वैतागलेत. प्रभाग क्रमांक २ मध्ये याचा प्रत्यय आला. मुख्य रोड धोकादायक प्रभागातील एन-१३ मधील रहिवासी 'भाऊसाहेब दुबिले' म्हणतात 'आमच्या भागातील हर्सूल टी -पॉइंट ते बसस्थानकापर्यंत जाणारा जो मुख्य रोड आहे. तिथे एक सिग्नल जर बसवला तर नागरिकांच्या जीवाला असलेला धोका कमी होईल. कारण त्या रस्त्याने शाळेची मुले, वृद्ध अनेकजण तिथून ये - जा करतात. रस्ता मोठा असल्यामुळे क्रॉस करायला भीती वाटते. आम्ही नगरसेवकाला याबाबत बोललोही. मात्र, ते शक्य नाही असे म्हणतात. पण आम्हाला तो रस्ता क्रॉस करणे म्हणजे जीवाशी खेळ झाला आहे.' रस्ता ओलांडणे कठीण एन-१३ या भागात राहणारे 'भुजंगराव तरटे म्हणतात की, 'हर्सूल टी -पॉईंट ते बस स्थानकापर्यंतचा जो रस्ता आहे. तो ओलांडण्यासाठी रात्री आणि सकाळी २-२ तास ट्राफिक जॅम होत. त्यामुळे आमची अशी विनंती आहे की, येथे जर सिग्नल लावले तर तो त्रास कमी होईल.' या भागात अनेक ठिकाणी रस्ते ठीक नाहीत. याबद्दलही नागरिकांनी पोटतिडकीने तक्रारी केल्या. ही समस्याही भावी नगरसेवकांनी सोडवावी, अशी मागणी दिव्य मराठीच्या 'लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा' या टॉक शोमध्ये केली. खड्ड्यात पाणी तुंबते प्रभाग २ मधील अनेक ठिकाणी सिमेंटचे रस्ते आहेत. मात्र, नवीन केलेल्या रस्त्यामुळे जमीन खाली वर झाल्यामुळे खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे तिथे पाणी साचते आणि त्याचा त्रास आम्हाला होतोय. अनेकदा आम्ही याची तक्रार केली आहे. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून त्यांनी एक छोटा पाइप टाकला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ही समस्या लवकरात लवकर मार्गी लागावी, अशी अपेक्षा मयूरनगरमधील नागरिकांनी व्यक्त केली. अशी आहे प्रभागाची व्याप्ती प्रभाग क्रमांक २ मधील एकूण लोकांची संख्या 36,131 एवढी आहे. यामध्ये भारतनगर, वानखेडेनगर, होनाजीनगर, पटेल प्लॅनेट, IIHM-A हॉस्टेल परिसर, मुजफ्फरनगर, यादवनगर, नवजीवन कॉलनी, नवनाथनगर भाग, एम.एस.ई.बी. पॉवर हाऊस, मयूरनगर, दीपनगर, सुदर्शननगर भागशः, गजानननगर भागशः, रोझेबाग, डी-मार्ट, भारतमातानगर एन-12, छत्रपती नगर एन-12, सारा वैभव, महमूदपुरा, फरहत नगर, N13 भागशः या भागांचा समावेश यात होतो. अनुसूचित जातींची लोकसंख्या तुलनेने लक्षणीय असल्यामुळे सामाजिक न्याय, आरक्षण, शिक्षण, रोजगार, घरकुल आणि मूलभूत सुविधा यासारख्या प्रश्नांना या प्रभागात विशेष महत्त्व आहे. प्रभागातले मागील नगरसेवक आणि पक्ष

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 7:22 am

आजपासून राशीनुसार भरा अर्ज, 27 अन् 30 डिसेंबरला नाही योग:उद्या तूळ अन् मिथुन राशीच्या उमेदवारांनी भरू नये उमेदवारी अर्ज, 8 पैकी 5 दिवसच अर्ज भरण्याचे उत्तम योग

कोणत्याही कार्याची सुरुवात करताना मुहूर्त पाहण्याची पद्धत हिंदू संस्कृतीत आहे. अचूक वेळी केलेले कार्य उत्तम फळ देते. २३ ते ३० डिसेंबरदरम्यान महानगरपालिका उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. राशीनिहाय उत्तम वेळ अन् दिवस पाहून अर्ज भरल्यास चांगला लाभ मिळतो. याकरिता दिव्य मराठीने शहरातील इच्छुकांसाठी वेदमूर्ती अनंत पांडव यांच्याकडून घेतलेली ही माहिती आहे. कुठलेही कार्य आरंभ करण्यापूर्वी शास्त्रामध्ये विशिष्ट मुहूर्त पाहण्याची पद्धत पंचांगानुसार ठरते. प्रत्येक राशीनुसार प्रत्येक दिवशी विशेष असे मुहूर्त असतात. या शुभ मुहूर्तावर केलेले कार्य अत्यंत लाभदायी ठरते. दिनांक अर्ज भरा अर्ज भरू नका २३ डिसेंबर मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, मीन तूळ आणि मिथुन२४ डिसेंबर दुपारी १ नंतर मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनू, मकर, मीन तूळ, मिथुन, कुंभ२५ डिसेंबर मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कन्या, तूळ, धनू, मकर, कुंभ वृश्चिक, कर्क, मीन२६ डिसेंबर दु. २ वाजेनंतर मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कन्या, तूळ, धनू, मकर, कुंभ वृश्चिक, कर्क, मीन२७ डिसेंबर व्यतिपात योग असल्यामुळे या दिवशी नाहीत मुहूर्त२८ डिसेंबर वृषभ, मिथुन, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक, मकर, कुंभ, मीन धनू, सिंह, मेष२९ डिसेंबर मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, तूळ, धनू, कुंभ मीन, मकर, कन्या३० डिसेंबर तिथीचा क्षय असल्याने दिनशुद्धी नाही उपासना, कर्मयोगातून विजयश्री सर्वांनी जर विशिष्ट मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला तर प्रत्येकाला विजयश्री मिळेल, असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. शुभवेळी अर्ज भरण्याने प्रक्रिया सुरळीत होईल. पण विजयश्रीसाठी वैयक्तिक कुंडली महत्त्वाची ठरेल. ज्यांना उमेदवारी मिळते त्यांच्या कुंडलीत निश्चितच राजयोग आहे. पण विजयश्री मिळवण्यासाठी राशीनिहाय उपाय, उपासना आणि कर्मे करावी लागतात. - वेदमूर्ती अनंत पांडव.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 7:18 am

अनधिकृत पार्किंग, अपुऱ्या घंटागाड्यांमुळे डोकेदुखी; रस्त्यांच्या अर्धवट कामाने गैरसोय:रस्ते, ड्रेनेजलाइन, स्ट्रीट लाइटची कामे पूर्ण करण्याची मागणी

गतवेळी निवडणूक काळात या प्रभागातील वसाहतींत विकासाच्या आश्वासनांचा पाऊस पाडला होता. प्रत्यक्षात मात्र ड्रेनेज, रस्ते डांबरीकरण, पथदिवे आणि कचरा व्यवस्थापनाची कामे कासवगतीने सुरू आहेत. रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग, फेरीवाल्यांचा ताबा आणि स्ट्रीट लाइट बंद असल्याने रात्री अपघात व गुन्ह्यांचा धोका वाढल्याचे स्थानिकांन सांगितले. या नवीन प्रभागात ९० कोटींपेक्षा अधिक निधी खर्चून कामे झाल्याचा दावा प्रशासन व माजी नगरसेवक करत असले तरी अद्यापही नागरिकांना अडचणींचा सामना करावाच लागत आहे. हिमायतबाग, पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, भावसिंगपुरा, भीमनगर, कानिफनाथ कॉलनी आदी भागांमध्ये मूलभूत समस्या अद्यापही कायम आहेत. अर्धवट काम केलेले रस्ते, जुनाट ड्रेनेजलाइनमुळे सांडपाणी रस्त्यावर येणे, गलिच्छ नाले व डासांचा उपद्रव यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. क्र. ३ पहाडसिंगपुरा-भावसिंगपुरा, भीमनगर, जयसिंगपुरा २०१५ : पक्ष, नगरसेवक, मतदानवॉर्ड क्र. उमेदवाराचे नाव मतदान१६ मनीषा लोखंडे, शिवसेना २७२८१२ सचिन खैरे, शिवसेना २,३७७१८ अफसर खान, काँग्रेस २५७५प्रभाग आरक्षण : अ - एससी, ब - ओबीसी महिला, क - सर्वसाधारण महिला, ड - सर्वसाधारण ९० कोटींची कामे करूनही दुरवस्था या भागात मागील ८ ते १० वर्षांत ९० कोटी रुपयांपेक्षा अधिकची कामे केल्याचा दावा मनपा आणि माजी नगरसेवकांनी केला. मात्र असे असले तरी रस्ते ड्रेनेज आदी महत्त्वाची कामे तशीच आहेत. रस्ते, ड्रेनेजलाइन, स्ट्रीट लाइटची कामे पूर्ण करण्याची मागणी अर्धवट कामे, तुंबलेला कचरा अन् बंद स्ट्रीट लाइटमुळे नागरिक त्रस्तप्रभागाची व्याप्ती : पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, भावसिंगपुरा, जयसिंगपुरा, हनुमान टेकडी, हिमायतबाग, विद्युत कॉलनी, गणेश कॉलनीचा काही भाग, चाऊस कॉलनी, विद्युत कॉलनी, साफल्यनगर, पेठेनगर, भीमनगर भागश:, कानिफनाथ कॉलनी, कुतुबपुरा, पराक्रम कॉलनी. 1. कचरा संकलन : घंटागाडी नियमित येत नसल्याची नागरिकांची तक्रारया परिसरात ६५ हजार नागरिक राहतात. मात्र, असे असले तरी घंटागाडी आठवड्यात तीन ते चार वेळेसच येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. प्रभागात १८ घंटागाड्या आहेत. 2. पाणीपुरवठा : अनेक वसाहती टँकरच्या पाण्यावर अवलंबूनया प्रभागातील अद्यापही टँकरने पाणीपुरवठा होतो. अनेक ठिकाणी तर टँकरदेखील उपलब्ध नसल्याने नागरिकांना बोअर आणि विहिरीच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. 3. रस्ते : अंतर्गत रस्त्यांची कामे बाकी असल्याने नागरिक त्रस्तमनपा आणि स्मार्ट सिटीने रस्त्याच्या कामासाठी मोठा खर्च केला. यामुळे रस्त्याचे जाळे वाढले. मात्र, अंतर्गत रस्त्याची कामे अद्याप बाकी असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 7:15 am

महायुतीत 50-50 टक्क्यांवर पेच; राजेंद्र जंजाळ यांच्या घरी खलबते:भाजपचा ‘मोठ्या भावा’चा दावा, जागावाटप 24 डिसेंबरला

महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचे (भाजप-शिंदेसेना) जागावाटप आता पेचात अडकल्याचे दिसत आहे. सोमवारी (२२ डिसेंबर) माध्यमांना चकवा देत महायुतीची चौथी बैठक हॉटेलऐवजी जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या घरी पार पडली. या बैठकीत भाजपने ५० टक्क्यांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा थांबवली असून आता अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम निर्णय मंत्र्यांच्या हाती प्रभागनिहाय चर्चा अंतिम टप्प्यात असून पालकमंत्री संजय शिरसाट आणि अतुल सावे २४ डिसेंबरला अंतिम शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. बैठकीला जंजाळ, तनवाणी, विकास जैन, ऋषिकेश जैस्वाल (शिंदेसेना) आणि किशोर शितोळे, समीर राजूरकर, शिरीष बोराळकर, प्रशांत देसरडा (भाजप) यांची उपस्थिती होती. उद्धवसेना : मुलाखतीला गर्दी दुसरीकडे, शिवसेना (उद्धवसेना) पक्षाने शिवसेना भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. पहिल्याच दिवशी २९९ जणांनी आपली दावेदारी मांडली. मध्य विधानसभेतून सर्वाधिक १२४, पूर्वमधून ९० तर पश्चिममधून ८५ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. जागावाटपाची ओढाताण

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 7:12 am

मी महापालिका बोलतेय...:महापौर निवडणुकीत जैस्वाल, घडमोडे यांनी मतपेटीच पळवली, यश शिवसेनेला मिळाले तरी महापौर काँग्रेसचाच, विलासराव बोललेही अन् करूनही गेले

महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत झंझावाती कामगिरी करणाऱ्या शिवसेनेला पहिला झटका देणाऱ्या विलासराव देशमुख यांच्या मुरब्बी राजकारणाचा हा किस्सा. ६० पैकी तब्बल २७ जागा जिंकून शिवसेनेने मुंबईबाहेर पहिल्यांदा मजबूत पाय रोवले. आता विषय होता महापौरपदाचा. शिवसेनेच्या एकमेव महिला नगरसेवक लता दलाल. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पहिल्या महापौरपदासाठी उमेदवारी दिली. पण, मराठवाड्यातील महापालिकेत लागलेल्या या निकालाच्या धक्क्यातून सावरत विलासराव देशमुख शहरात दाखल झाले. त्यांनी सांगितले, ६० पैकी २७ म्हणजे बहुमत नाही. महापौर काँग्रेसचाच होणार.’ इतकंच काय, विलासराव देशमुख यांनी शिवसेनेतील काही नगरसेवकांनाही मतदान करण्यासाठी ओढण्याचा प्रयत्न केला. एक नगरसेवक त्या वेळी म्हणाला, ‘साहेब, जीव देऊ, पण शिवसेनेच्या विरुद्ध काम करणार नाही.’ विलासराव देशमुख ठाम होते. ते म्हणाले, ‘महापौरपद शिवसेनेला मिळणारच नाही.’ त्यांनी उर्वरित सर्व ३२ नगरसेवकांची मोट बांधली. काँग्रेसकडून डॉ. शांताराम काळे यांना उमेदवारी मिळाली. शिवसेनेच्या अभूतपूर्व यशामुळे आधीच शहरातील वातावरण खूप बदललेलं. त्यातच महापौरपद शिवसेना खेचणार का याकडे सर्वांचे लक्ष. त्याच वेळी शिवसेनेला एक गोड बातमी मिळाली, ती मोरेश्वर सावे या अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्याची. सावे म्हणाले, ‘मी बिनशर्त शिवसेनेसोबत जात आहे.’ आता शिवसेनेची संख्या झाली २८. मग आली वेळ महापौरपदाच्या मतदानाची. महापालिकेवर भगवा फडकणार की नाही... ही उत्कंठा. पहिल्यांदाच नगरसेवक झालेले मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करू लागले. राज्यात काँग्रेसची सत्ता असल्याने प्रशासन मदत करत नाही असा आरोप शिवसेना नगरसेवकांनी सुरू केला. यामुळे झालेल्या गोंधळात प्रदीप जैस्वाल यांनी चक्क मतपेटीच पळवली. त्यांच्या पाठीशी मोतीराम घडमोडे होते. निवडणुकीत मतपेटी पळवण्याची ही घटना खूप गाजली. देशभरातील वर्तमानपत्रातही या घटनेची नोंद घेण्यात आली. अखेर महापौरपदी शांताराम काळे विजयी झाले. महापालिकेत पहिला महापौर झाला तो काँग्रेसचा. विलासराव देशमुख यांनी शहरात तळ ठोकल्यामुळंच हे घडू शकलं. बहुमताच्या काठावर असलेल्या शिवसेनेला नंतर पुढंही संघर्षच करावा लागला. ही झाली महापौरपदाची कहाणी. याच वेळी बाळासाहेब ठाकरे यांची ऐतिहासिक विजयी सभाही सांगावी लागेलच. महापालिकेत मिळालेल्या यशानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा जाहीर सभा घेतली. त्या सभेच्या सुरुवातीलाच त्यांनी जनतेसमोर लोटांगण घालत आभार मानले. शहराच्या ‘संभाजीनगर’ नावाची घोषणा केलेल्या बाळासाहेबांचे हे लोटांगण आजही लोकांच्या लक्षात आहे. लोटांगण घालून ते म्हणाले होते, ‘या शहराला मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. माझं या शहरावर सर्वाधिक प्रेम आहे.’

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 7:06 am

निकालानंतर भडका:मुनगंटीवारांचा फडणवीस तर राणे बंधूंचा एकमेकांवर हल्ला

राज्यातील २८८ नगर परिषद, पंचायतींचे निकाल रविवारी जाहीर झाले. त्याचे पडसाद उमटणे सुरू झाले आहे. ठिकठिकाणी विजयी, पराभूत उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांत चकमकी झडत आहेत. भाजप नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला ११ पैकी ७ ठिकाणी यश मिळाले. भाजपला फक्त २ जागा मिळवता आल्या. त्यामुळे ते रविवारपासूनच भडकले आहेत. सोमवारी त्यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री बावनकुळेंवर हल्लाबोल केला. ‘मुख्यमंत्रिपद, मंत्रिपद असे काहीच शाश्वत नसते’ असे त्यांनी सुनावले. दुसरीकडे कणकवली, मालवणमध्ये भाजपच्या पराभवानंतर माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या दोन मुलांनी वादात थेट वडील नारायण राणेंना खेचले आहे. रविवारी दुपारी निकाल जाहीर होताच मुनगंटीवार म्हणाले होते की, चार जिल्ह्यांत मंत्रिपदच नसल्याने पराभव झाला आहे. १५ डिसेंबर २०२४ रोजी जेव्हा मुनगंटीवारांना मंत्रिपद नाकारण्यात आले होते त्याच दिवशी त्यांनी फडणवीसांविषयी खदखद व्यक्त केली होती. याशिवाय चाळीसगावला पराभूत उमेदवार राकेश बोरसेंच्या घरावर दगडफेक झाली. राणे बंधूंतील वाद त्यांच्या वडिलांपर्यंत नितेश राणे : पक्ष, नेता, कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो. कणकवली या नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यातच त्यांचा खंदा कार्यकर्ता पाडला. नीलेशना आमदार करण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना ११ महिन्यांत धमक्या, शिव्या दिले गेल्या. नीलेश राणे : युती आवश्यक होती. कारण एका बाजूला एक मुलगा आणि दुसऱ्या बाजूला दुसरा, अशा परिस्थितीत वडील (नारायण राणे) कुणाला आशीर्वाद देणार? नारायण राणेंनी युती करण्याचा सल्ला दिला होता. तो वेळीच ऐकला असता, तर दोन्ही ठिकाणी निकाल अधिक सुखद असते. संघाच्या विरोधकांना पक्षात घेतले जात आहे फडणवीसांविषयी : मला मंत्रिपद नाकारले. त्याची नाराजी माझ्यात नव्हे तर येथील जनतेत आहे. मंत्रिपद येते आणि जाते. मुख्यमंत्रिपदही येणार आहे जाणारही आहे. पर्मनंट कुणीही नाही. शेवटच्या श्वासापर्यंत कुणीही मंत्री, आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री नाही. भाजपविषयी : काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली. पण माझ्या पक्षाने माझी शक्ती कमी केली. जिल्हाध्यक्ष, नेत्यांना विश्वासात न घेता कुणालाही पक्षात घेतले जाते. आयुष्यभर संघ विचारांचा विरोध करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसवणार असाल, तर कार्यकर्ता शंका उपस्थित करणारच. दिल्लीतून निरोप आला तरच शांत होतील सुधीर मुनगंटीवार १९९५ ते १९९९ आणि २०१४ ते १९ तसेच २०२२ ते २०२४ पर्यंत मुनगंटीवार कॅबिनेट मंत्री होते. २०१० ते २०१३ पर्यंत भाजप प्रदेशाध्यक्षही होते. संघाच्या मुशीत तयार झालेले मुनगंटीवार विदर्भातील भाजपचे प्रमुख नेते आहेत. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे मोठे बळ नसले तरी ते आगामी मनपा, जि. प. निवडणुकीत भाजपला काही प्रमाणात अंतर्गत धक्का देऊ शकतील. पुढे त्यांची थेट दिल्लीहून समजूत घालण्यात आली तरच ते शांत होतील, अन्यथा एकनाथ खडसेंप्रमाणे इतर पक्षात ते जागा शोधू शकतात. मात्र, सध्या तरी ते फडणवीसांविरुद्ध मोठे बंड उभारतील अशी शक्यता नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. वाद, चाळीसगावात घरावर दगडफेक परळी : इस्लामपुरा बंगला परिसरात दोन पराभूतांच्या समर्थकांत रविवारी दगडफेकीत दोघे जखमी झाले. गेवराई : प्रभाग क्र ४ मधील नवनिर्वाचित नगरसेविका संगीता घोडके व पती दादासाहेब व आईला मारहाण झाली. दोन्ही घटनांत सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. सुधीरभाऊंना ताकद कमी पडलीअसेल तर भरपाई करू : फडणवीस पक्षाची दारे कोणत्याही समाजासाठी, कोणत्याही व्यक्तीसाठी बंद असू नये. फक्त प्रवेश देताना व्यक्ती योग्य आहे की अयोग्य, पक्षाला त्याचा काही फायदा होईल की नाही हे आपण पाहिले पाहिजे. सुधीरभाऊंना काही ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई करून चंद्रपूर मनपा निवडून आणू,

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 7:00 am

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:मित्रपक्षांतच वाद, विकासाच्या दाव्यांवर आरोप-प्रत्यारोप; पाणी योजना रखडण्याचे खापर खैरेंवर

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर दिव्य मराठी डिजिटलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शहरातील विविध प्रभागांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या या चर्चासत्रांमधून स्थानिक राजकारणासोबतच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेले प्रश्न थेट समोर येत आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये झालेल्या चर्चासत्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप, विकासकामांचे दावे आणि वास्तव यावर सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे, या चर्चेत सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्ष एकमेकांवरच तुटून पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. या टॉक शोदरम्यान भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील इच्छुक उमेदवार एकमेकांची उणीदुणी काढण्यात अधिक व्यस्त असल्याचे स्पष्टपणे जाणवले. दोन्ही पक्ष सध्या महायुतीचा भाग असले तरी स्थानिक पातळीवर मात्र स्पर्धा तीव्र असल्याचे या चर्चेतून समोर आले. जुन्या चार वार्डांचे एकत्रीकरण करून एक मोठा प्रभाग तयार करण्यात आल्याने, पूर्वीचे सर्व नगरसेवक आपापल्या कार्यकाळातील विकासकामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. प्रत्येकाने ‘आमच्याच काळात विकास झाला’ असा दावा केला, मात्र मित्रपक्षातीलच नगरसेवकांवर विकासकामे अपुरी ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे नागरिकांसमोर नेमके कोणाचे दावे खरे, हा प्रश्न उभा राहिला. या चर्चेत काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते राजेंद्र दाते पाटील यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना, स्मार्ट सिटी योजना, सिडकोची घरे फ्री होल्ड करणे आणि शहराला मुबलक पाणीपुरवठा यांसारख्या महत्त्वाच्या योजनांची उदाहरणे देत, या योजनांची केवळ घोषणा झाली असून प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप केला. इतकेच नव्हे, तर या योजनांबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेची कागदपत्रे त्यांनी उपस्थितांसमोर दाखवली. सत्ताधाऱ्यांनी विकासाची स्वप्ने दाखवून नागरिकांची फसवणूक केली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कामगिरी दिसत नसल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेवर महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोपही केला. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या आरोपांना माजी नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामांना सुरुवात झाली होती. पाणीपुरवठा, रस्ते, पायाभूत सुविधा अशा अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळाली होती. मात्र, मधल्या काळात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने या कामांना स्थगिती दिली. या ‘ब्रेक’मुळे अनेक विकासकामे रखडली आणि त्याचा फटका थेट नागरिकांना बसला, असा आरोप त्यांनी केला. आता पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आल्याने ही सर्व कामे वेगाने सुरू झाली असून लवकरच शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होईल, असा दावा त्यांनी केला. राजगौरव वानखेडे यांनी पुढे सांगितले की, शहरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे झाली असून प्रभाग क्रमांक 2 मध्येही रस्ते, ड्रेनेज, स्ट्रीटलाइट्स यांसारख्या पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी कामे अपुरी वाटत असतील, तर त्यामागे निधीअभावी आणि प्रशासकीय अडचणी कारणीभूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी पक्षावर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप निराधार असून, विरोधकांकडे स्वतःची कामगिरी दाखवण्यासारखी काहीच नसल्याने ते केवळ आरोपांच्या आधारे राजकारण करत असल्याचा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेचे उपशहर प्रमुख विशाल आहेर पाटील यांनीही या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी वार्डातील विविध समस्यांचा आढावा घेत, अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे मान्य केले. नागरिकांना भेडसावणाऱ्या छोट्या-मोठ्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्या सोडवण्यासाठी आगामी काळात सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. विशेषतः श्री स्वामी समर्थ केंद्राजवळील सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न उपस्थित करत, या समस्येचा पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यासोबतच, वार्डातील युवकांसाठी रोजगाराभिमुख योजना राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत भदाणे पाटील यांनी शिवसेनेवर थेट आरोप केले. शिवसेना नगरसेवकांच्या कार्यकाळात वार्डात अपेक्षित विकासकामे झाली नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे नागरिकांना आजही पाणी, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. मयूर नगर आणि सुदर्शन नगर परिसरातील नागरिकांच्या समस्या गंभीर असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी असुरक्षित स्थिती निर्माण झाली असून परिसरात ‘मौत का कुवाँ’ उभा राहिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. भाजपकडून करण्यात आलेल्या या आरोपांना शिवसेनेच्या माजी नगरसेविका स्वाती किशोर नागरे यांनी सडेतोड उत्तर दिले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या कार्यकाळात वार्डामध्ये अनेक महत्त्वाची विकासकामे करण्यात आली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला गेला असल्याचा त्यांनी दावा केला. नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही 24 तास उपलब्ध राहिलो असून, आजही लोकांच्या प्रश्नांसाठी तत्पर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही समस्या अद्याप शिल्लक असतील, तर आगामी काळात त्या निश्चितपणे सोडवण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. माजी नगरसेवक भाऊसाहेब ताठे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकास कामे केले असल्याचा दावा केला. मात्र, यावेळी त्यांनी सांगिलेली काही कामे ही शिवसेना गटातील पदाधिकाऱ्यांनी खोडून काढली. ही कामे माजी नगरसेविका रजनी जोशी यांच्या कार्यकाळात झाली असून आम्ही त्याचे साक्षीदार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. त्यामुळे भाजपचे भाऊसाहेब ताठे विरुद्ध शिवसेनेचे पदाधिकारी असा वाद पाहायला मिळाला. चंद्रकांत खैरे आणि शिवसेना ठाकरे पक्षावर गंभीर आरोप या चर्चासत्रात शहरातील पाणीप्रश्नावरून माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर गंभीर आरोप करण्यात आले. भाजप तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समांतर जलवाहिनी योजनेसाठी उद्धव ठाकरे गटातील वरिष्ठ नेते जबाबदार असल्याचा आरोप केला. या योजनेमुळे शहरातील पाणीप्रश्न सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचा झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे नागरिकांना वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. संपूर्ण योजनेची चौकशी होणे आवश्यक या मुद्द्यावर काँग्रेसचे राजेंद्र दाते पाटील यांनीही आपली भूमिका मांडली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, समांतर जलवाहिनी योजनेत भ्रष्टाचार झाला असून तो युती सरकारच्या काळातच झाला आहे. केवळ एकाच पक्षावर दोष ढकलून चालणार नाही, तर या संपूर्ण योजनेची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. पाणीप्रश्नासारखा मूलभूत विषय राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये अडकून राहिला असून, त्याचा फटका थेट सामान्य नागरिकांना बसत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विकासकामांचे श्रेय कोणाचे, यावरून वाद ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शोमधून एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली, ती म्हणजे नागरिकांचे प्रश्न आणि राजकीय श्रेयवाद यातील संघर्ष. प्रत्येक पक्ष आपापली कामगिरी मोठ्या प्रमाणावर मांडत असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांना अजूनही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे. चार वार्डांचा एक प्रभाग झाल्याने विकासकामांचे श्रेय कोणाचे, यावरून वाद सुरू असले तरी नागरिकांना मात्र ठोस उपाययोजना हव्या आहेत. राजकीय मतभेद बाजूला ठेवून नागरिकांच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. निवडणुकीपूर्वीच अनेक मुद्दे चर्चेत छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय धुसफूस अधिक तीव्र होताना दिसत आहे. ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या मंचामुळे राजकीय नेत्यांना थेट नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत असून, यामुळे निवडणुकीपूर्वीच अनेक मुद्दे चर्चेत आले आहेत. मात्र, या चर्चेचा निष्कर्ष नागरिकांच्या हितासाठी कितपत उपयोगी ठरतो, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. सध्या तरी मित्रपक्षांतील आरोप-प्रत्यारोप, विरोधकांचे गंभीर आरोप आणि विकासाच्या दाव्यांमुळे छत्रपती संभाजीनगरची मनपा निवडणूक अधिकच रंगतदार होत चालली आहे. प्रभाग सामाजिकदृष्ट्या मिश्र स्वरूपाचा प्रभाग क्रमांक 2 ची एकूण लोकसंख्या 36,131 इतकी आहे. हा प्रभाग सामाजिकदृष्ट्या मिश्र स्वरूपाचा असून विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व येथे दिसून येते. अनुसूचित जातींची लोकसंख्या तुलनेने लक्षणीय असल्यामुळे सामाजिक न्याय, आरक्षण, शिक्षण, रोजगार आणि मूलभूत सुविधा यासारख्या प्रश्नांना या प्रभागात विशेष महत्त्व आहे. प्रभागात नेमका कोणता परिसर कोणत्याही एका समाजाचे संपूर्ण बहुमत नसल्यामुळे हा प्रभाग राजकीयदृष्ट्या संतुलित आणि स्पर्धात्मक आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेणारी समावेशक विकासाची भूमिका येथे प्रभावी ठरण्याची शक्यता अधिक आहे. या प्रभागात भारतनगर, वानखेडेनगर, होनाजीनगर, पटेल प्लॅनेट, IIHM-A हॉस्टेल परिसर, मुजफ्फरनगर, यादवनगर, नवजीवन कॉलनी, नवनाथनगर भाग, एम.एस.ई.बी. पॉवर हाऊस, मयूरनगर, दिपनगर, सुदर्शननगर, भागशः, गजानननगर भागशः, रोझेबाग, डी-मार्ट, भारतमातानगर एन-12, छत्रपती नगर एन-12, सारा वैभव, महमूदपुरा, फरहत नगर, N13 चा काही भागाचा समावेश आहे. प्रभागातील चार वार्डात या आधी असलेले नगरसेवक आणि पक्ष

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 7:00 am

सदनिका गैरव्यवहार:काेकाटेंच्या आमदारकीवरचा धाेका तूर्तास तरी टळला, सुप्रीम काेर्टाची शिक्षेला स्थगिती

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार, माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी कमी उत्पन्न असल्याचे दाखवून सदनिका घेतल्याप्रकरणी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवलेली दोन वर्षे कारावासाची शिक्षा सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याचा धोका टळला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. या प्रकरणात ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी कोकाटे यांची बाजू मांडली. ३१ वर्षांपूर्वीच्या या सदनिका वाटप प्रकरणात अनियमिततेचा ठपका ठेवत नाशिक जिल्हा न्यायालयाने कोकाटे यांना सत्र न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा कायम ठेवली होती. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, दोन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधीची आमदारकी किंवा खासदारकी तत्काळ रद्द केली जाते. या निर्णयामुळे कोकाटे यांचे विधिमंडळ सदस्यत्व धोक्यात आले होते. शिक्षा म्हणजे बदला नव्हे, सुधारण्याची संधी काही खासगी याचिकाकर्त्यांनी शिक्षेस स्थगितीला विरोध दर्शवला. यावर कोर्टाने शिक्षेच्या संकल्पनेवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. शिक्षेबाबत कायद्यातील संकल्पना ती पाहावी लागेल. शिक्षा म्हणजे बदला नाही तर ती सुधारण्यासाठी दिलेली संधी असते. त्यामुळे सुनावणी सुरू राहील तोवर शिक्षेला स्थगिती देण्यात आली असल्याचे कोर्टाने सांगितले. संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम मंत्रिपद स्वीकारता येणार नाही १.आमदारकी शाबूत : न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षेला ‘तूर्तास’ स्थगिती दिली आहे. याचा अर्थ पुढील सुनावणीपर्यंत त्यांची आमदारकी कायम राहील आणि ते अपात्र ठरवले जाणार नाहीत.२.संवैधानिक पदांवर बंदी : आमदारकी टिकली असली तरी सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्रिपद, राज्यमंत्रिपद किंवा कोणत्याही शासकीय महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारता येणार नाही.३. आमदार म्हणून अधिकार काय? : वकिलांच्या दाव्यानुसार, त्यांची आमदारकी संरक्षित असल्याने त्यांना विधिमंडळात मतदान करण्याचा, विकास निधी वापरण्याचा आणि आमदाराचे सर्व कर्तव्य बजावण्याचा अधिकार असेल.४. राज्य सरकारला नोटीस : न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकारला नोटीस बजावली असून जानेवारी-फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या नियमित सुनावणीत पुराव्यांच्या आधारे अंतिम निर्णय होईल.नितीन सातपुते. ज्येष्ठ विधिज्ञ, सर्वोच्च न्यायालय

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 6:56 am

पाकच्या महिलेला माहिती देणाऱ्या माजी संचालकाविरुद्ध लवकरच आरोपनिश्चिती:आता 12 जानेवारीला सुनावणी, खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा होणार

“हनी ट्रॅप’’मध्ये अडकून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हस्तक महिलेला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून कोठडीत असलेला संरक्षण, संशोधन व विकास संस्थेचा (डीआरडीओ) माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्याविरोधात आरोपनिश्चितीसंदर्भात १२ जानेवारीला सुनावणी होणार आहे. सरकार पक्ष आणि बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर आरोपनिश्चिती झाल्यावर या खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ होणार आहे. प्रदीप कुरुलकरविरोधात शासकीय गुपिते अधिनियमाच्या (ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट) कलम ३ (१) (सी), ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपनिश्चितीचा मसुदा विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी फेब्रुवारीमध्ये विशेष न्यायालयासमोर सादर केला होता. त्यावर कुरुलकर याच्याविरोधात ही कलमे प्रथमदर्शनी लागू होऊ शकत नाहीत, कारण या प्रकरणाशी संबंधित गोपनीय माहितीचे स्वरूप समजल्याशिवाय शासकीय गुपिते अधिनियमाचे कलम लागू होऊ शकत नाही, त्यामुळे कुरुलकरला दोषमुक्त करण्यात यावे, असा अर्ज बचाव पक्षातर्फे ॲड. ऋषिकेश गानू यांनी केला. याशिवाय कुरुलकर याच्या वतीने ॲड. गानू यांनी मुंबई उच्च न्यायालयात नियमित जामिनासाठीही अर्ज केला आहे. हे दोन्ही अर्ज सुनावणीच्या प्रक्रियेत आहेत. दरम्यान, पुण्याच्या विशेष न्यायालयात सोमवारी कुरुलकरविरोधात आरोपनिश्चितीबाबत प्राथमिक सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, १२ जानेवारीला विशेष सरकारी वकील आरोप निश्चितीबाबत युक्तिवाद करतील. त्यानंतर बचाव पक्षाचे वकील आपले म्हणणे सादर करतील. त्यानंतर आरोपनिश्चिती झाल्यावर खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा होईल. काय आहे प्रकरण? ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकून झारा दासगुप्ता नामक कथित पाकिस्तानी एजंटला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती दिल्याच्या आरोपावरून ‘डीआरडीओ’चा शास्त्रज्ञ व माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ४ मे रोजी अटक केली. त्यानंतर त्याच्याविरोधात दोन हजार पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये कुरुलकर व झारा दासगुप्ता यांच्या चॅटिंगमधून संवेदनशील माहिती पुरवल्याचे उघड झाले आहे. अधिनियमाचे कलम लागू होऊ शकत नाही, त्यामुळे कुरुलकरला दोषमुक्त करण्यात यावे, असा अर्ज बचाव पक्षातर्फे ॲड. ऋषिकेश गानू यांनी केला. याशिवाय कुरुलकर याच्या वतीने ॲड. गानू यांनी मुंबई उच्च न्यायालयात नियमित जामिनासाठीही अर्ज केला आहे. हे दोन्ही अर्ज सुनावणीच्या प्रक्रियेत आहेत. दरम्यान, पुण्याच्या विशेष न्यायालयात सोमवारी कुरुलकरविरोधात आरोपनिश्चितीबाबत प्राथमिक सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, १२ जानेवारीला विशेष सरकारी वकील आरोप निश्चितीबाबत युक्तिवाद करतील. त्यानंतर बचाव पक्षाचे वकील आपले म्हणणे सादर करतील. त्यानंतर आरोपनिश्चिती झाल्यावर खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा होईल. प्रकरणात इतर गंभीर खुलासे लैंगिक शोषणाचे आरोप या प्रकरणातील तपासादरम्यान असे समोर आले की, (डीआरडीओ) माजी संचालक कुरुलकर यांनी डीआरडीओमध्ये नोकरीचे आमिष दाखवून दोन महिलांचे लैंगिक शोषण केले. साक्षीदारांवर दबाव: एटीएसने न्यायालयात असा युक्तिवाद केला आहे की, कुरुलकर हे उच्चपदस्थ अधिकारी असल्याने ते पुराव्यांशी छेडछाड करू शकतात किंवा साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात. कलमे काय सांगतात? ऑफिशियल सिक्रेट ॲक्टच्या कलम ३ (१) (सी) नुसार, कोणतीही व्यक्ती देशाची सुरक्षितता किंवा हिताला बाधक ठरेल आणि शत्रूला उपयुक्त ठरू शकेल, अशी कोणतीही गोपनीय माहिती मिळवेल, गोळा करेल, नमूद किंवा प्रसिद्ध करेल किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला देईल, त्या व्यक्तीला चौदा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. कलम चारनुसार देशाच्या सुरक्षिततेस बाधक ठरतील अशा परकीय हस्तकांशी संवाद साधणाऱ्यावर आणि कलम पाचनुसार गोपनीय माहितीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होतो.

दिव्यमराठी भास्कर 23 Dec 2025 6:47 am

ठाकरे बंधूंची युती, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

जागावाटप अंतिम टप्प्यात, १० जागांवर घोडे अडले! मुंबई : प्रतिनिधी शिवसेना ठाकरे गट व मनसेने एकत्र येण्याचे आणि एकत्र राहायचे ठरवले असले तरी चर्चेच्या अनेक फे-या होऊनही अजून जागावाटप पूर्ण होऊ शकलेले नाही. मराठीबहुल व मागच्या निवडणुकीत शिवसेनेने जिंकलेल्या १० प्रभागांसाठी दोन्ही सेना आग्रही असल्याने तिढा सुटत नसल्याचे समजते. हा तिढा सोडवण्यासाठी मनसे नेते बाळा […] The post ठाकरे बंधूंची युती, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा appeared first on पुरोगामी विचाराचे एकमत .

दैनिक एकमत 23 Dec 2025 1:14 am